diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10018.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b75bb324a29f4ca23c1838521d622379a8494ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10018.txt @@ -0,0 +1,2 @@ +महंमद घोरी (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) (इ.स. ११५०:घोर, अफगानिस्तान - १५ मार्च, इ.स. १२०६:दमिक, झेलम जिल्हा, पाकिस्तान) हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने पृथ्वीराज चौहानचा थानेसर येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले. कैदेमध्ये असतानाच महाराज पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारून मोहम्मद घौरीचा वध केला. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते. +तुर्की अमिरांना घुरीद किंवा घोरी या नावाने ओळखले जात होते. महंमद घोरी हा घियासुद्दीन घोरी या घुर प्रमुखाचा धाकटा बंधू होता. इ.स. ११७३ मध्ये महंमद घोरीने गझनी काबीज केली तेव्हा तो आपल्या वडील बंधूच्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. महंमदाने गझनी ताब्यात घेतल्यामुळे घियासुद्दीनने त्याला गझनी प्रांताचा राज्यपाल म्हणून नेमले तसेच मर्जीनुसार गझनीचे प्रशासन चालवण्याची आणि राज्याचा विस्तार करण्याची त्याला परवानगी दिली. काही वर्षांनी घियासुद्दीनच्या निधनानंतर महंमदाने आपले सार्वभौम राज्य जाहीर केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10029.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a627d708cc014d0858eb8a9320b8e1230702e8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10029.txt @@ -0,0 +1,5 @@ +मुहम्मद बिन कासिम (अरबी:عماد الدين محمد بن القاسم الثقفي‎‎; अंदाजे ६९५:तैफ, सौदी अरेबिया - इ.स. ७१५) हा उमायद खिलाफतीचा सेनापती होता. याने आठव्या शतकाच्या सुरुवातीस इराणमार्गे भारतावर चाल केली व सिंधसह मुलतान व पंजाबमधील सिंधू नदीकाठचा प्रदेश काबीज केला. +मुहम्मद त्यावेळचा इराकचा जहागिरदार अल हज्जाजचा पुतण्या होता व त्याच्या हाताखाली त्याने प्रशिक्षण घेतले. इ.स. ७१२मध्ये अरोरच्या लढाईत सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केल्यावर याने आसपासच्या प्रदेशांतील राजांना आपल्याला शरण येण्याचा किंवा लढण्याचा इशारा दिला. शरण आलेल्या किंवा तह केलेल्या राज्यांकडून खंडणी घेतली व त्याच्याविरुद्ध लढून हरलेल्या राज्यांचे त्याच्या अरब फौजेने अतोनात नुकसान केले व तेथील बायका व मुलांवर अत्याचार करून त्यांना गुलाम बनविले व त्यातील एक पंचमांश भाग अरबस्तानात पाठवून दिले.]].[१] +तिकडे इराकमध्ये अल हज्जाज आणि दमास्कसमध्ये खलीफा अल वालिद पहिल्याच्या मृत्यूनंतर सुलेमान अब्द अल-मलिक खलीफा झाला. त्याने मुहम्मद बिन कासीमला दमास्कसला बोलावून घेतले. अल हज्जाजचा शत्रू असलेल्या सुलेमानने मुहम्मदला लगेचच कैदेत घातले. मुहम्मदच्या मृत्यूबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका मतानुसार अल हज्जाजच्या सांगण्यावरून मुहम्मदने सुलेमानहा मुहम्मदने जिंकलेल्या प्रदेशांचा खलीफा नसल्याचे जाहीर केले होते. याचा सूड म्हणून सुलेमानने कासिमला हालहाल करून ठार मारविले.[२][३] दुसरे मत चाचनामा या ग्रंथात आहे. त्यानुसार मुहम्मदने दाहिरच्या दोन मुली खलीफाला नजराणा म्हणून पाठविल्या होत्या. त्यांनी खलीफाला असे पटविले की मुहम्मदने त्याआधी खलीफाचा अपमान करण्यासाठी त्यांच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून नंतर पाठविले होते. हे ऐकून चवताळलेल्या खलीफाने मुहम्मदला असेल तेथून कातड्याच्या पिशवीत[४] बांधून पाठविण्याचे फर्मान काढले. त्यात गुदमरून मुहम्मदचा मृत्यू झाला.[५] नंतर दाहिरच्या मुली खोटे बोलले असल्याचे कळल्यावर सुलेमानने त्यांना भिंतीत चिणून ठार केले.[६] +[२][७] +अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यू पावलेल्या मुहम्मद बिन कासिमने अरबस्तानातून भारतावर पहिली सफल स्वारी केली होती. जरी त्यानंतर काही वर्षांतच भारतातील हिंदू राजांनी अरबांना हाकलून लावले असले तरी भारतावरील मुसलमान आक्रमणांचा पायंडा मुहम्मद बिन कासिमपासून पडला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1003.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec6a640bfc2209994c5b2553bdcb943487ca144b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1003.txt @@ -0,0 +1,6 @@ +मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; - चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. +बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला. +अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. +कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत. +डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10035.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5408e0909a893203f3cffedf223af9e819807b02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10035.txt @@ -0,0 +1,5 @@ +पैगंबर मुहंमद यांनी एकूण अकरा महिलांशी विवाह केला होता. मुस्लिम लोक त्यांच्या नावापुढे किंवा मागे आदराने उम्म अल-मुमिनीन (अरबी: أم ٱلْمُؤْمِنِين‎) हा शब्द वापरतात. याचा अर्थ 'विश्वासूंची आई' असा होतो. हा शब्द कुराण ३३:६ मधील एक संज्ञा आहे. +वयाच्या २५ व्या वर्षी, मुहम्मदांनी त्याची पहिली पत्नी, विधवा खादिजा बिंत खुवायलिद हिच्याशी लग्न केले. हे लग्न २५ वर्षे टिकले. ६१९ इस मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, [२] त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उर्वरित वर्षांत एकूण १० स्त्रियांशी लग्न केले. या पत्नींपासून, त्यांना दोन मुले झाली: खदिजा आणि मारिया अल-किब्तिया . आयशाचा अपवाद वगळता मुहम्मद साहेबांच्या सर्व बायका विधवा किंवा घटस्फोटित होत्या. +मुहम्मदचे जीवन पारंपारिकपणे दोन युगांद्वारे चित्रित केले गेले आहे: पूर्व-हिजराह मक्का, पश्चिम अरबमधील एक शहर, ५७० ते ६२२ CE, आणि मदिना मधील हिजराहोत्तर, ६२२ ते ६३२ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत. हिजरा म्हणजे मुहम्मद आणि त्याच्या अनुयायांचे मक्केतील मुस्लिमांनी केलेल्या छळामुळे मदिना येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणे होय. या स्थलांतरानंतर त्यांचे दोन सोडून इतर सर्व विवाह करारबद्ध झाले. + +मुहम्मद यांनी पहिले लग्न वयाच्या २५ व्या वर्षी खदिजाशी झाले होते. [३] त्यांच्या दुखत मृत्यूपर्यंत त्याने आणखी २५ वर्षे तिच्याशी एकविवाह केला. [४] त्यानंतर खाली दिलेल्या कारणांमुळे त्यांना अनेक बायका होत्या असे मानले जाते. आयशाचा अपवाद वगळता, मुहम्मद यांनी फक्त विधवा, घटस्फोटित किंवा बंदिवानांशी लग्न केले. [५]चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10044.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29416c3ad8d56f348a5f48acc9c1a0b2453f3ac3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10044.txt @@ -0,0 +1,4 @@ +१० फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +शब्बीर रहमान (२२ नोव्हेंबर, इ.स. १९९१:राजशाही, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10051.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc1d667943c4a3e369c029599e288acbafd6d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10051.txt @@ -0,0 +1,4 @@ +१४ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.. +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10080.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49eb3f8cb4d793d28b3b7ca94f865324a1dccebd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10080.txt @@ -0,0 +1 @@ +मूडबिदरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10093.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1fd32e19e7d6bf5841fbb161f36e008ee930421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10093.txt @@ -0,0 +1,2 @@ + मूद्रे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10109.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50c212ccf8c9eb1743996c2861753a554cdb6f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10109.txt @@ -0,0 +1,2 @@ +मूर्तिजापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या सात पैकी एक तालुका आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1012.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e84d30bdfd7225008b692f9d2fd39e661a280a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1012.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२] +मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२] +इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४] +नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१] +मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे. +डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ] +प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10131.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34f46822b11a7b20ef62748011d94b44d2e8a9c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10131.txt @@ -0,0 +1,10 @@ +मूलपेशी (इंग्लिश: Stem cell) या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणाऱ्या पेशी असतात. मायटॉसिस पेशीय विभाजनाद्वारे स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते. +गर्भातून मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे रक्त साठवण्याची काळजी काही पालक घेतात. +वैज्ञानिकांनी उंदरांच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या बीटा इसलेट पेशी मानवी वृषणाच्या पेशींपासून तयार करण्यात यश मिळवले आहे. +मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती होऊ शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. थोडक्यात सांगायचे, तर मूळ पेशी या शरीराच्या ‘मास्टर’ पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मूळ पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार भ्रूण मूळ पेशी (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स). या पेशी भ्रूणापासून (एम्ब्रियो) मिळवलेल्या असतात. दुसरा प्रकार असतो पूर्ण वाढ झालेल्या पेशी (अॅडल्ट किंवा आयपीएस सेल्स). या पेशी त्वचा, हाडाचा गाभा किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते. +मूळ पेशींच्या अंगच्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून पेशंटच्या शरीरावर उपचार करता येऊ शकतात. म्हणूनच आता ‘पर्सनलाइज्ड मेडिसीन’चे युग येऊन ठेपले असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. +हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणे हे फार मोठे आव्हान आहे. यात नैतिकतेचे मुद्दे आहेत. महत्त्वाचे म्हणजे गर्भातील पेशींचा वापर यासाठी करू नये कारण एक प्रकारे ती भ्रूणहत्याच आहे असे मानणारा एक वर्ग आहे.. त्यामुळेच प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार करण्यात आणखी सहजता आली तर हा मुद्दा गैरलागू ठरेल कारण रुग्णाच्याच पेशी वापरून मूलपेशी भविष्यात तयार करता येतील. +या शोधामुळे मानवासह विविध प्राण्यांमध्ये विविध पेशीसमूहांची (ऊती किंवा टिश्यू) निर्मिती करणे शक्य होणार आहे. धक्का लागलेल्या पेशी बदलणे; तसेच गरजूंसाठी नव्या अवयवांची निर्मिती करण्यासाठी या नव्या तंत्राचा उपयोग होऊ शकेल. भ्रूणाचा विकास होऊन सजीव तयार होणे हा निसर्गनियम आहे; मात्र या नव्या प्रयोगात ते चक्र उलटे फिरले असून, पूर्ण विकसित झालेल्या सजीवाच्या पेशीपासून भ्रूणनिर्मिती होऊन त्यापासून पुन्हा नव्या पेशींची निर्मिती करता येऊ शकेल. + +Source : https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/imouse/stemcells/ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10165.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ccdda3ff73a46105ed896740c378e902506873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10165.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मृगजळ या विषयाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10173.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e882ec7905529d2bf3e27fbc9253557e8d1592f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10173.txt @@ -0,0 +1,4 @@ +मृणाल झा ही एक भारतीय लेखिका, पटकथा लेखक आणि निर्माता आहे, जी हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करते. तिने कहां किस्सी रोज, बनू में तेरी दुल्हन, मायका, आगले जनम मोहे बिटिया ना किजो, कुबूल है, दिव्या दृष्टी, नागिन, इश्कबाज, ये जादू है जिन का! यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोसाठी लेखन केले आहे.[१] +मृणाल झा यांनी २००८ मध्ये मायका या टीव्ही मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा (कथा) सुवर्ण पुरस्कार जिंकला. सोनी टीव्हीच्या तारा फ्रॉम सातारा या चित्रपटासाठी ती २०१९ च्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी (आय.टी.ए) अवॉर्ड्सची सर्वोत्कृष्ट कथा विजेती आहे. पिशाचिनी हा तिचा अलीकडचा उपक्रम.[२] +मृणाल झी टीव्ही, बालाजी टेलिफिल्म्स, दूरदर्शन, स्टार प्लस, यूटीव्ही या अनेक टीव्ही चॅनेलसाठी पटकथा लेखक आणि सर्जनशील निर्माती आहे. तिने अभिज्ञान झा सोबत २०१० मध्ये काली - एक अग्निपरीक्षा ची निर्मिती केली. ती जय हिंदची निर्माती देखील होती! इंटरनेट प्लॅटफॉर्मसाठी स्टँडअप कॉमेडी शो.मृणाल ने कहां किस्सी रोज, क्या हाथसा क्या हकीकत, तुम बिन जाने कहां, बनू में तेरी दुल्हन, अंबर धारा, छुना है आसमान, क्यूंकी सास भी कभी बहू थी, सांतान, कस्तुरी, अग्नीकाली, यांसारख्या टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. संजोग से बनी संगिनी, नजर आणि प्यार का बंधन. तिने मनो या ना मानो, मेहेर, ये जादू है जिन का!, तारा फ्रॉम साताऱ्यासाठीही लेखन केले आहे.ती अंडरकव्हर यूटोपियाची सह-संस्थापक देखील आहे. मृणालने २००८ मध्ये दुबई येथे झालेल्या गोल्ड अवॉर्ड्स सोहळ्यात मायका या टीव्ही मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखिका - कथा पुरस्कार देखील जिंकला. +मृणाल झा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10174.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06b3d647b7da10d2ba9f78dd6f9929b5e18626a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10174.txt @@ -0,0 +1 @@ +मृणाल ठाकूर ( १ ऑगस्ट १९९२)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. तिने स्टार प्लसवरील खामोशियां मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10175.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86621ad96b3a874884c3db04d0d333efad207e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10175.txt @@ -0,0 +1,2 @@ +मृणाल दत्त हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने वेब शोसह हिंदी चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करतो.[१] त्याने २००९ मध्ये एमटिव्ही रूमीजमधून अभिनयात पदार्पण केले आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरसह त्याचे यश मिळवले.[२] त्याने २०१२ मध्ये तुनेगा तुनेगा या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले.[३] दत्तने २०१६ मध्ये ये है आशिकी होस्ट केले होते.[४][५] +दत्तने २०१८ मध्ये १३ मसुरीमधून वेब पदार्पण केले आणि हॅलो मिनी, हिज स्टोरी आणि ख्वाबों के परिंदे यासह अनेक वेब शोचा भाग आहे. दत्त लघुपट, ५५ किमी/सेकंद आणि द लोनली प्रिन्समध्येही दिसला आहे.[६][७][८][९] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1020.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d996a0c08e45b52cccdcc7c569c1cf69cd7a77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1020.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगलाष्टक : हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत. +मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे.पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10228.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b2c34295e46badaba2475196564c6852f4e4f6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10228.txt @@ -0,0 +1,11 @@ +मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या परिसंस्थेचा वापर करतो. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते. +माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते. + +मानवीय आणि नैर्सगिक घटकामुळे मृदा अवनती होते. जंगलतोड, अतिचराई, रासायनिक खते व किटकांचा अतिवापर, भूस्खलन, पूर इ. होय. +मृदा अवनती रोखण्यासाठी काही पद्धती +१.गाळाची मुदा +२.काळी मृदा +३.तांबडी मृदा +४.लॅटारेट मृदा +५.वन मृदा +६.शुष्क मृदा diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10229.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e495fb817516e00438235479d11146736995872e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10229.txt @@ -0,0 +1,4 @@ +मृदा आणि जलसंधारण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. संजय राठोड हे सध्या मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत. +[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10233.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f220d7c33d49ad2074d6b4b252b8c46a14beed56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10233.txt @@ -0,0 +1,45 @@ +माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस 'मृदा आरोग्य पत्रिका' असे नाव आहे. +एकोणिसावे शतक (१८०० ते १८९९) हे शास्त्रीय प्रगतीच्या दृष्टीने रसायन शास्त्राचे शतक होते. या शतकात आणि विशेषतः त्याच्या उत्तरार्धात रसायनाची सर्व दृष्टीने म्हणजे पदार्थचे विघटन, परीक्षण आणि संंश्लेषण या अंगाने इतकी जलद प्रगती होत गेले की निर्जीव खनिजापासून ते थेट सजीव पेशीपर्यंतच्या सर्व प्राकृतिक अवस्थेतील पदार्थांची रचना आणि त्याची कार्य रासायनिकरीत्या उलगडता येऊ लागली. असेंद्रिय पदार्थांनंतर सेंद्रिय आणि त्यानंतर जीवशास्त्रीय अश्या चढत्या गुंतागुंतीच्या पायऱ्यांनी रसायनाची कक्षा वाढत वाढत ती कृषिविद्येसही सामावू लागली. +या काळात इंग्लंडमध्ये सर हंफ्रे डेव्ही आणि जर्मनीत युस्ट्स फॉन लिबिग या शास्त्रज्ञांनी वनस्पतीवाढीचा रासायनिक अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या प्रयोगशाळेत कृषी रसायनाचा जन्म झाला. डेव्ही यांनी१८१३साली लिबिक यांनी १८४० सालात  कृषी रसायनशास्त्रावर प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांतून वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक पृथ:करणाने पिकांच्या कमीजास्त वाढीची कारणमीमांसा करता येते असे दाखवून दिले. या दोन शात्रज्ञांच्या पाठिंब्यामुळे वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक परीक्षणाला मोठीच चालना मिळाली अणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फ़ुरद अणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता सिद्ध झाली. इंग्लंडमध्ये रोथमेस्टेड येथे प्रायोगिक क्षेत्रावर प्रयोगास सुरुवात करून सर जॉन लॉज यांनी सुपरफॉसटेंट या खताच्या उत्पादनाला आरंभ केला. खतांच्या वापराने जमिनीचा कस वर्षानुवर्षे कायम ठेवता येतो हे पटवून देण्यासाठी १८५३ मध्ये चालू केलेले प्रयोग आजसुद्धा रोथमेस्टेड येथे पहावयास मिळतात. फ्रान्समध्ये ड सोस्यूर अणि बुसिंगो यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित प्रत्यक्ष शेतावर सुरू केलेल्या प्रयोगांतून कृषिशास्त्र विकास पावू लागले. यातूनच म्हणजे १९ वे शतक अर्धे होईपर्यंत कृषी रसायनाच्या स्वतंत्र विस्ताराला सुरुवात झाली. +लिबिग यांनी पीकवाढीचा सिद्धान्त मांडताना पिकांची वाढ त्यांना मिळणाऱ्या आवश्यक अन्नद्रवांपैकी जे अत्यल्प किंवा अत्यंत कमी असेल त्यामुळे खुंटते असा अत्यल्पाचा सिद्धान्त मांडला. आजही थोड्याफार फरकाने हाच सिद्धान्त मृदा परीक्षणात वापरला जातो . परंतु लिबिग यांची कल्पना जमीन म्हणजे एक केवळ निर्जीव घटकांचा सांगाडा अशी होती आणि सर्व अन्नद्रव्ये मातीत निर्वेधपणे वावरतात असे त्यांनी गृहीत धरले होते. या गृहीतामुळे अन्न द्रव्यातील कमी जास्त प्रमाणाचा उलगडा केवळ रासायनिक परीक्षणाने करणे पुढेपुढे कठीण होऊ लागले आणि वरील सिद्धांतांत बदल करावा लागला. +लिबिग यांच्या पद्धतीनुसार मातीचे आणि वनस्पतीचे पृथ:क्करण इतर पदार्थाप्रमाणे सामान्यतः तीव्र रसायनांच्या साहाय्याने करण्यात येत असे वनस्पती वाढीविषयी जशी जास्त माहिती मिळत गेली तशी या प्रकारच्या पद्धतीवर असा आक्षेप घेण्यात येऊ लागला की वनस्पतीची अन्नशोषण क्रिया आणि तीव्र रसायनांची प्रक्रिया यात मूलभूत फरक आहे. तीव्र रासायनांनी मिळणारी अन्नद्रव्ये जरी मातीत असली तरी ती पिकांना उपलब्ध होऊ शकतीलच असे नाही. मातीचे अयन-बदल (?), तिची भौतिक रचना इत्यादी गुणधर्म उमजून आल्यानंतर लिबिग यांच्या परीक्षण पद्धतीत बदल करण्यात येऊ लागले. मिटरलिश या जर्मन शास्त्रज्ञाने मोठया कुंडातील मातीत वनस्पती वाढवून आणि तिला नत्र, स्फ़ुरद व पालाशयुक्त खते देऊन पीक वाढीतील फरक मोजण्याचे तंत्र सुरू केले आणि रासायनिक परीक्षणाला वनस्पती वाढीचा प्रत्यक्ष पुरावा देण्याची प्रथा पाडली. डायर आणि ऑग्ल ह्या रसायन शास्त्रज्ञांनी तीव्र रसायनांऐवजी सौम्य रसायने वापरून मातीची परीक्षा करण्याचे तंत्र उपयोगात आणले (१८९०). अनेक नमुन्यांची परीक्षा करून डायर यांनी मातीची कसाच्या दृष्टीने वर्गवारी केली. या वर्गवारीनुसार खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सल्लाही देण्याचे काम ते यशस्वी रीतीने करीत असत. +[१] +मातीचा नमुना घेताना सदर जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात. सदर जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक या प्रमाणे एकरी ६ ते ७, २२.५ से.मी. खोलीचे इंग्रजी 'व्ही' (V) आकाराचे खड्डे घेतात. खड्डयातील माती बाहेर काढून टाकून 'व्ही' खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घेतात. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा केले की ते एका स्वछ पोत्यावर एकत्र करतात. सदर मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात. उरलेले दोन भाग एकत्र करतात. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करतात. ती अर्धा ते एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. +भारतात या मातीचे परीक्षण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागातर्फे करण्यात येते व त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिकाही मिळते. +यामध्ये नत्र, पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे बघितले जाते. तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते. +यात शेतातील मातीत असणाऱ्या तांबे, लोह, मॅंगनीज, जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी करतात. +यात मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आर्द्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म आदी गोष्टी तपासण्यात येतात. तसेच मातीत असलेल्या जाड रेती, बारीक रेती, चिक्कण माती, पोयटा आदी घटकांचे शेकडा प्रमाण काढले जाते.त्यासोबतच आम्ल-विम्ल निर्देशांक, मातीची विद्युत वाहकता,कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम (पालाश), स्फुरद आदी घटकांचीही तपासणी करण्यात येते. +यासमवेतच शेतातील विहिरीच्या किंवा नमुना दिलेल्या पाण्यात आढळणाऱ्या विविध खनिजांचे व घटकांचे प्रमाणही काढले जाते. +पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे वापरास फार महत्त्व आहे. पिके ही पोषणाला आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे, हे पाहण्यासाठी म्हणजेच सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण, पीक - पृथःकरण, जीवजंतूची वाढ इत्यादी भौतिक, रासायनिक व जैविक परीक्षापद्धती आहेत. या परीक्षा मातीचे व वनस्पतीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करून किंवा प्रत्यक्ष शेतातच पाहणी व प्रयोग करून घेतल्या जातात. +मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत सामू, विद्राव्यक्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यासाठी परीक्षण केले जाते. यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय माती परीक्षण व पीक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळते. + +माती परीक्षणावरून खताची शिफारस - +जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची गरज पाहून खतमात्रा सुचवितात. मातीतल अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी, मध्यम व जास्त या वर्गवारीत केले जाते. अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण अत्यंत कमी असल्याने खतमात्रा ५०%नी व कमी असल्यास २५%नी वाढवतात. प्रमाण मध्यम किंवा थोडेसे जास्त असल्यास मात्रेत बदल केला जात नाही. +प्रकल्पाची निवड : +कोणत्याही एका पिकासाठी माती परीक्षण करून खताची मात्रा ठरवावी. +अधिक माहिती : +माती परीक्षणावरून खतांची मात्रा कशी ठरविली जास्ते याचे एक उदाहरण - +श्री. पांडुरंग पाटलांच्या शेतातील मातीचे परीक्षण केले असता असे दिसून आले की, त्यांच्या जमिनीत, तिन्हीचे प्रमाण या तक्त्यावरून आहे. श्री पाटील यांना त्यांच्या १ हेक्टर (२.५ एकर) जमिनीत कांदा हे पीक घेण्याचे असून त्यासाठी ते युरिया, सिंगल, फॉस्फेट (SSP) आणि म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) ही खते वापरणार आहेत, तर त्यांना किती किलो खते बाजारातून विकत घ्यावी लागतील. +कांदा पिकाची खताची मात्रा - १००:५०:५० कि / हेक्टर +ह्याचाच अर्थ १०० कि-नत्र, 50 कि- स्फरद, ५० कि - पालाश प्रती हेक्टरी दिली पाहिजे. +नत्राची मात्रा आपण युरिया खतातून पूर्ण करू शकतो. बाजारामध्ये युरोया हे खत ४६% नत्र, या प्रमाणात मिळते. म्हणजेच १०० किलो युरियामध्ये ४६ किलो नत्र असते. तर आपण १ किलो मिळवण्यासाठी किती किलो युरिया घ्यावा लागेल ते पाहू - १००/४६=२.१७ कि.ग्रॅ. युरिया +म्हणजेच २.१७ कि.ग्रॅ युरिया घेतल्यानंतर ७ कि.ग्रॅ नत्र मिळेल. आपणास १०० किलो नत्राची गरज आहे. +म्हणजेच १००*२.१७=२१७ कि.ग्रॅ. युरिया लागेल. +पण, श्री पाटील ह्यांच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच नत्रांची मात्रा आपणास २५%नी वाढविली पाहिजे - २१७*२५/४६=५४.२५ कि.ग्रॅ +२१७+५४.२५=२७१ कि.ग्रॅ / हेक्टर +म्हणजेच २७१ कि.ग्रॅ / हेक्टर युरिया बाजारातून खरेदी करावा लागेल. +आता आपण पाहू स्फुरदची मात्रा कशी ठरायची - सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये १६% स्फुरद असते. म्हणजेच १००/१६=६.२५ कि.ग्रॅ +म्हणजेच ६.२५ कि.ग्रॅ. SSP मध्ये १ कि.ग्रॅ. स्फुरद असते. SSPचे प्रमाण - +५०*६.३५=३१५.५ कि.ग्रॅ SSP/हेक्टर +स्फुरद प्रमाण मध्यम असल्याने ३१२.५ कि.ग्रॅ. SSP खरेदी करावा लागेल. +आता आपण पालाशाचे प्रमाण कसे द्यायचे ते पाहू - +पालाश हे अन्नद्रव्य आपण म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) (पोटॅशियम नायट्रेट) या खताद्वारे देऊ शकतो - +MOP मध्ये पालाशचे प्रमाण ५८% असते. म्हणजेच १००/५८=१.७१ कि.ग्रॅ. MOP मध्ये १ कि.ग्रॅ. पालाश असते. +आपणस ५०कि.ग्रॅ. पालाशची गरज आहे - +५०*१.७१=५.५ कि.ग्रॅ. MOP / हेक्टर. म्हणजेच ८५.५ कि.ग्रॅ MOPची गरज आहे. पण आपणास माहित आहे कि, श्री. पाटील यांच्या जमिनीत पालाशाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच आपणास पालाश २५%नी कमी करावा लागेल. +८५.५*२५/१००=२१.३७५ कि.ग्रॅ / हेक्टर. +८५.५-२१.३७५=६४.१२५ कि.ग्रॅ / हेक्टर. +याचा अर्थ असा झाला कि - +२७१ कि.ग्रॅ युरिया; ३१२.५ कि.ग्रॅ. SSP; ६४.१२५ कि.ग्रॅ MOP १ हेक्टर (२.५ एकर ) कांदा लागवडीसाठी श्री.पांडुरंग पाटील यांना बाजारातून खरेदी करावी लागेल. +माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. +त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10240.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a5e42c062722f74e1159a65834e273c1db5b4b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10240.txt @@ -0,0 +1 @@ +विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.मृदगंधातही ही वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10241.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d86870b7fcf03ab9306ac155a3a07fb96b63841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10241.txt @@ -0,0 +1,7 @@ +मृषानाट्य (द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड). जीवनाची अर्थशून्यता ज्‌या नाट्यकृतींद्वारा रंगभूमीच्या माध्यमातून व्यक्त होत असते, तिला मृषानाट्य असे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये ‘द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ या नावाने ही रंगभूमी ओळखली जाते. ‘Absurdum’ या लॅटिन शब्दावरून ‘Absura’ हा शब्द इंग्रजीत रूढ झाला. त्याचा अर्थ विसंगत किंवा व्यस्त असा आहे. +ॲब्सर्ड थिएटर या शब्दाला मराठी प्रतिशब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. उदा., ‘न-नाट्य’, ‘असंगता’चे अथवा ‘विसंगता’चे नाट्य, ‘व्यस्त रंगभूमी’, ‘निरर्थ-नाट्य’ व ‘मृषानाट्य’ या भिन्न संज्ञा वेगवेगळ्या अन्वयार्थाप्रमाणे वापरल्या जातात. +पारंपरिक किंवा प्रस्थापित रंगभूमीवर जीवनातील मूल्यव्यवस्थेचे, तार्किक संगतीचे, आदर्श नीतिकल्पनांचे दर्शन घडविण्याचा यत्न असतो. याउलट हे सारे जीवन अर्थशून्य, हेतुशून्य आहे जीवनातील अनेक गोष्टींची तार्किक संगती माणसाला लागू शकत नाही, नीतिमूल्यांचे, आदर्श कल्पनांचे अधःपतन झालेले आहे त्यामुळे जीवनाचा अर्थ लावणे किंवा शोधणे ही आभासात्मक गोष्ट आहे, निरर्थ गोष्ट आहे, असा आशय मृषानाट्यातून व्यक्त होतो. मृषानाटककार सहसा जीवनातील निरर्थतेचा अर्थ लावून दाखवत नाहीत किंवा भाष्य करीत नाहीत मात्र नाट्यकृतीतून व्यस्त जीवनार्थाचे चित्रण करीत असतात. +काहींच्या मते मृषानाट्याचा जनक यूबूर्‌षा या नाटकाचा लेखक आल्फ्रॅद जारी (१८९६) हा आहे परंतु प्रत्यक्षात या रंगभूमीचे जनकपद ⇨ सॅम्युएल बेकेट या विश्वविख्यात नाटककाराकडे जाते. याचा जन्म १९०६ सालचा. याने लिहिलेल्या वेटिंग फॉर गोदो (१९५३) या नाटकाने मृषानाटकाची मुहूर्तमेढ रोवली आणि साऱ्या जगाचे लक्ष या वेगळ्या रंगभूमीकडे वेधले. त्याचे दुसरे नाटक एन्ड गेम नावाचे आहे. +बेकेटप्रमाणेच मृषानाट्यात अग्रेसर असलेला दुसरा नाटककार म्हणजे ⇨ यूझेअन यानेस्कू. त्याची नाटके दबाल्ड सोप्रानो, द न्यू इज टेनन्ट, आमेदी, ऑर हाऊ टू गेट रिड ऑफ इट, ऱ्हाइनोसेरॉस, चेअर्स, लेसन इत्यादी. या व्यतिरिक्त मृषानाट्य लिहिणारे महत्त्वाचे नाटककार पुढीलप्रमाणे : हॅरॉल्ड पिंटर (द रूम, द बर्थ डे पार्टी, द केअरटेकर), झां झने (द मेडस, द ब्लॅक्स, द बाल्कनी), एडवर्ड आल्बी (झू स्टोरी, सँड बॉक्स, द अमेरिकन ड्रीम, पुअर डॅड), गटर ग्रास, (द फ्लड), आर्थर आदामाँव्ह (द पिंगपाँग), झां तार्व्हू (द की होल) मॅक्स फ्रिश (द फायर बग्ज), फ्रीड्रिख ड्युरेनमॅट (द व्हिजिट). +मराठी रंगभूमीवर मृषानाट्याचा पंथ मोठ्या प्रमाणात विकसित झाला नाही. काही प्रयत्न झाले ते असे : चिं.त्र्यं. खानोलकर (एक शून्य बाजीराव), सतीश आळेकर (महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, मिकी आणि मेमसाहेब), महेश एलकुंचवार (गार्बो), अच्युत वझे (चल रे, भोपळ्या टुणूक, टुणूक, लागला तर घोडा नाही तर झेब्रा) इत्यादी. सॅम्युएल बेकेटचे वेटिंग फॉर गोदो, यानेस्कूचे चेअर्स, लेसन तसेच एडवर्ड आल्बीचे झू स्टोरी इ. नाट्यकृतींची भाषांतरे मराठीत झालेली आहेत. १९५० मध्ये मृषानाट्याची सुरू झालेली चळवळ आता थंडावल्यासारखी दिसते. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10262.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1095d443873a24437291fc24b44d5c567fdbd36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10262.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅक ओ. एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील अ‍ॅपल ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. अ‍ॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली युनिक्स ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे. +ओएस एक्स नावामधील "एक्स" हा रोमन अंक "X" असून, तो प्रणालीची दहावी आवृत्ती दर्शवतो. २००२ मधे ओएस एक्स प्रकाशीत करण्याबरोबर अ‍ॅपल कंपनीने स्वतःच्या संचालन प्रणालींना मार्जारकुळातील विविध प्राण्यांची नावे द्यायची प्रथा सुरू केली. पहिली ओएस एक्स १०.० "चीता" या नावाने प्रकाशीत झाली, आणि त्यानंतर "पुमा", "जॅग्वार", "पॅंथर", "टायगर", "लेपर्ड", "स्नो लेपर्ड", आणि सर्वात नवीन "लायन" या नावांनी पुढील आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत. माउंटन लायन ही आवृत्ती अद्याप विकसनशील आहे. +सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10283.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f2560b7394deb5b6a918f14630f4301b2857f82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10283.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मॅक ओएस एक्स १०.५ (सांकेतिक नाव लेपर्ड) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स टायगरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डची पूर्वाधिकारी होती. टायगरच्या पुढील आवृत्ती म्हणून २६ ऑक्टोबर २००७ मधे लेपर्ड ही आवृत्ती प्रकाशित झाली. ती दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: खासगी संगणकांसाठी योग्य असलेली डेस्कटॉप आवृत्ती व सर्व्हर आवृत्ती, मॅक ओएस एक्स सर्व्हर. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10307.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43486e54137b4aa26378d820b128e39008ad5c80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10307.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅककूक बेन नेल्सन प्रादेशिक विमानतळ तथा मॅककूक म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: MCK, आप्रविको: KMCK, एफ.ए.ए. स्थळसूचक: MCK) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील मॅककूक शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दोन मैल पूर्वेस रेड विलो काउंटी मध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे. +या विमानतळाला नाव मॅककूकमध्ये जन्मलेल्या अमेरिकेच्या सेनेटर आणि नेब्रास्काचे ३७वे गव्हर्नर बेन नेल्सन यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10320.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf95391488e095661e6a8ca17c330a442e254855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10320.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅकघी टायसन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TYS, आप्रविको: KTYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: TYS) अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॉक्सव्हिल शहराचा विमानतळ आहे. याला पहिल्या महायुद्धात अमेरिकेकडून लढलेल्या चार्ल्स मॅकघी टायसन या वैमानिकाचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. +येथे टेनेसी एर नॅशनल गार्डची १३४वी रिफ्युएलिंग विंग[मराठी शब्द सुचवा] तळ ठोकून आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1034.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b374937f010ece47360b53fc745e4c5e56f16eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1034.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +शब्द निःसंदिग्धीकरण +तुम्हाला हे हवे आहे का? diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10344.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10344.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10362.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7d25384e9a14c360140983b00aa3d7cb70c2f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10362.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅकफर्सन काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅकफर्सन काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10414.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10414.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10416.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10416.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1043.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a85fdcdf09692d5a81500bcd2a224acbbc19943f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1043.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळवार पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10433.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2bbf524593fa3469d2f49d1606b46b8c96ad9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10433.txt @@ -0,0 +1,37 @@ +[१]मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक, (जन्म : २३ एप्रिल १८५८; - ४ ऑक्टोबर १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिद्धान्ताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना इ.स. १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[२] +प्लॅंक यांचे कुटुंब पारंपरिक पण सुशिक्षित होते. त्यांचे पणजोबा आणि आजोबा दोघेही गॅटिंजेनमधील ब्रह्मज्ञानाचे प्राध्यापक होते; वडील 'कील' आणि 'म्युनिच' विद्यापीठांत कायद्याचे प्राध्यापक होते. त्यांचा एक काका न्यायाधीशही होता. +कील येथील जोहान ज्युलियस विल्हेल्म प्लॅंक व त्याची दुसरी पत्नी एम्मा पॅटझिग हे प्लॅंकचे वडील आणि आई. कार्ल अर्न्स्ट लुडविग मार्क्स प्लॅंक या नावाने त्याचा बाप्तिस्मा झाला; त्याच्या दिलेल्या नावांपैकी मार्क्स (मार्कसचा एक अप्रचलित प्रकार किंवा कदाचित मॅक्ससाठी फक्त एक त्रुटी, जी प्रत्यक्षात मॅक्सिमिलियनसाठी लहान आहे) यांना "अपीलेशन नेम" म्हणून सूचित केले गेले.तथापि, वयाच्या दहाव्या वर्षी त्याने मॅक्स नावावर स्वाक्षरी केली आणि आयुष्यभर याचा उपयोग केला. +वडिलांच्या पहिल्या लग्नापासून त्याचे दोन भावंड असले तरी कुटुंबातील ते सहावे मूल होते.१८६७ मध्ये हे कुटुंब म्युनिकमध्ये गेले आणि प्लॅंकने मॅक्सिमिलियन्स व्यायामशाळेच्या शाळेत प्रवेश घेतला, जेथे तो एक तरुण गणितज्ञ हर्मन म्युलरच्या अधिपत्याखाली आला आणि त्याने त्याला खगोलशास्त्र आणि तंत्रशास्त्र तसेच गणित शिकवले. मल्लरकडूनच प्लॅंकने प्रथम ऊर्जा संवर्धनाचे तत्त्व शिकले.प्लॅंक यांचे पदवीचे शिक्षण 17 व्या वर्षी झाले.अशाप्रकारे प्लॅन्कचा प्रथमच भौतिकशास्त्राच्या क्षेत्राशी संपर्क साधला गेला. +प्लॅंकला संगीत ही भेट दिली गेली त्याने गाण्याचे धडे घेतले आणि पियानो, ऑर्गन आणि सेलो वाजविला ​​आणि गाणी आणि ओपेरा तयार केल्या. तथापि, संगीताऐवजी त्याने भौतिकशास्त्र अभ्यासण्याचे निवडले. +म्यूनिच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिलिप वॉन जॉली यांनी प्लॅंकला भौतिकशास्त्रात जाण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “या क्षेत्रात जवळजवळ प्रत्येक गोष्ट आधीपासूनच सापडली आहे आणि जे काही बाकी आहे ते काही जागा भरून टाकायचे आहे.” प्लॅंकने उत्तर दिले की आपली इच्छा ही नवीन गोष्टी शोधण्याची नसून,केवळ त्या क्षेत्राची ज्ञात मूलतत्त्वे समजून घेण्याची आहे.आणि म्हणूनच त्याने १८७४ मध्ये म्युनिक विद्यापीठातून अभ्यास सुरू केला.जॉली यांच्या देखरेखीखाली प्लॅंकने त्याच्या वैज्ञानिक कारकिर्दीचे पहिले प्रयोग केले, त्यांनी तापलेल्या प्लॅटिनमद्वारे हायड्रोजनच्या प्रसाराचा अभ्यास केला,आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पदार्पण केले. +१८७७ मध्ये ते बर्लिनमधील फ्रेडरिक विल्हेल्म्स विद्यापीठात भौतिकशास्त्रज्ञ हर्मन फॉन हेल्महोल्टझ आणि गुस्ताव किर्चहोफ आणि गणितज्ञ कार्ल वेयर्सट्रास यांच्यासमवेत एका वर्षाच्या अभ्यासासाठी गेले. त्यांनी लिहिले की हेल्होल्ट्ज कधीच तयार नव्हते, हळू हळू बोलले, सतत चुकीचे गणले गेले आणि आपल्या श्रोत्यांना कंटाळले, तर किर्चहोफ कोरडे व नीरस असलेल्या काळजीपूर्वक तयार व्याख्यानांमध्ये बोलले. लवकरच हेल्महोल्ट्जचे त्याचे जवळचे मित्र झाले. तेथे असताना त्याने क्लॉशियसच्या लेखनाचा मुख्यतः आत्म-अभ्यासाचा कार्यक्रम हाती घेतला ज्यामुळे ते त्याचे क्षेत्र म्हणून थर्मोडायनामिक्स निवडण्यास कारणीभूत ठरले. +ऑक्टोबर १८७८ मध्ये प्लॅंकने आपली पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आणि फेब्रुवारी १८७९ मध्ये त्याच्या शोध प्रबंध सादर केला. त्यांनी म्युनिकमधील त्याच्या पूर्वीच्या शाळेत थोडक्यात गणित आणि भौतिकशास्त्र शिकवले. +सन १८८० पर्यंत, प्लॅंकने युरोपमध्ये दोन उच्च शैक्षणिक पदवी मिळविल्या. +त्याच्या क्षेत्रामधील प्रबंध (thesis ) पूर्ण झाल्यावर, प्लॅंक म्युनिकमध्ये एक विनाशुल्क प्राइवेटडोजेंट (व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापकांच्या तुलनेत जर्मन शैक्षणिक रॅंक) बनले, त्याला शैक्षणिक पदाची ऑफर येईपर्यंत प्रतीक्षा केली गेली.सुरुवातीला त्यांच्याकडे शैक्षणिक समुदायाकडून दुर्लक्ष केले गेले असले तरी उष्णतेच्या सिद्धांताच्या क्षेत्रावर त्यांनी आपले कार्य वाढवून दिले आणि एकामागून एक गिब्ज सारखा थर्मोडायनामिकमधले नव-नवे शोध लक्षात आले.एंट्रोपीविषयी क्लॉझियसच्या कल्पनांनी त्याच्या कार्यात मध्यवर्ती भूमिका घेतली. + + +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10434.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2bbf524593fa3469d2f49d1606b46b8c96ad9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10434.txt @@ -0,0 +1,37 @@ +[१]मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक, (जन्म : २३ एप्रिल १८५८; - ४ ऑक्टोबर १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिद्धान्ताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना इ.स. १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[२] +प्लॅंक यांचे कुटुंब पारंपरिक पण सुशिक्षित होते. त्यांचे पणजोबा आणि आजोबा दोघेही गॅटिंजेनमधील ब्रह्मज्ञानाचे प्राध्यापक होते; वडील 'कील' आणि 'म्युनिच' विद्यापीठांत कायद्याचे प्राध्यापक होते. त्यांचा एक काका न्यायाधीशही होता. +कील येथील जोहान ज्युलियस विल्हेल्म प्लॅंक व त्याची दुसरी पत्नी एम्मा पॅटझिग हे प्लॅंकचे वडील आणि आई. कार्ल अर्न्स्ट लुडविग मार्क्स प्लॅंक या नावाने त्याचा बाप्तिस्मा झाला; त्याच्या दिलेल्या नावांपैकी मार्क्स (मार्कसचा एक अप्रचलित प्रकार किंवा कदाचित मॅक्ससाठी फक्त एक त्रुटी, जी प्रत्यक्षात मॅक्सिमिलियनसाठी लहान आहे) यांना "अपीलेशन नेम" म्हणून सूचित केले गेले.तथापि, वयाच्या दहाव्या वर्षी त्याने मॅक्स नावावर स्वाक्षरी केली आणि आयुष्यभर याचा उपयोग केला. +वडिलांच्या पहिल्या लग्नापासून त्याचे दोन भावंड असले तरी कुटुंबातील ते सहावे मूल होते.१८६७ मध्ये हे कुटुंब म्युनिकमध्ये गेले आणि प्लॅंकने मॅक्सिमिलियन्स व्यायामशाळेच्या शाळेत प्रवेश घेतला, जेथे तो एक तरुण गणितज्ञ हर्मन म्युलरच्या अधिपत्याखाली आला आणि त्याने त्याला खगोलशास्त्र आणि तंत्रशास्त्र तसेच गणित शिकवले. मल्लरकडूनच प्लॅंकने प्रथम ऊर्जा संवर्धनाचे तत्त्व शिकले.प्लॅंक यांचे पदवीचे शिक्षण 17 व्या वर्षी झाले.अशाप्रकारे प्लॅन्कचा प्रथमच भौतिकशास्त्राच्या क्षेत्राशी संपर्क साधला गेला. +प्लॅंकला संगीत ही भेट दिली गेली त्याने गाण्याचे धडे घेतले आणि पियानो, ऑर्गन आणि सेलो वाजविला ​​आणि गाणी आणि ओपेरा तयार केल्या. तथापि, संगीताऐवजी त्याने भौतिकशास्त्र अभ्यासण्याचे निवडले. +म्यूनिच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिलिप वॉन जॉली यांनी प्लॅंकला भौतिकशास्त्रात जाण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “या क्षेत्रात जवळजवळ प्रत्येक गोष्ट आधीपासूनच सापडली आहे आणि जे काही बाकी आहे ते काही जागा भरून टाकायचे आहे.” प्लॅंकने उत्तर दिले की आपली इच्छा ही नवीन गोष्टी शोधण्याची नसून,केवळ त्या क्षेत्राची ज्ञात मूलतत्त्वे समजून घेण्याची आहे.आणि म्हणूनच त्याने १८७४ मध्ये म्युनिक विद्यापीठातून अभ्यास सुरू केला.जॉली यांच्या देखरेखीखाली प्लॅंकने त्याच्या वैज्ञानिक कारकिर्दीचे पहिले प्रयोग केले, त्यांनी तापलेल्या प्लॅटिनमद्वारे हायड्रोजनच्या प्रसाराचा अभ्यास केला,आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पदार्पण केले. +१८७७ मध्ये ते बर्लिनमधील फ्रेडरिक विल्हेल्म्स विद्यापीठात भौतिकशास्त्रज्ञ हर्मन फॉन हेल्महोल्टझ आणि गुस्ताव किर्चहोफ आणि गणितज्ञ कार्ल वेयर्सट्रास यांच्यासमवेत एका वर्षाच्या अभ्यासासाठी गेले. त्यांनी लिहिले की हेल्होल्ट्ज कधीच तयार नव्हते, हळू हळू बोलले, सतत चुकीचे गणले गेले आणि आपल्या श्रोत्यांना कंटाळले, तर किर्चहोफ कोरडे व नीरस असलेल्या काळजीपूर्वक तयार व्याख्यानांमध्ये बोलले. लवकरच हेल्महोल्ट्जचे त्याचे जवळचे मित्र झाले. तेथे असताना त्याने क्लॉशियसच्या लेखनाचा मुख्यतः आत्म-अभ्यासाचा कार्यक्रम हाती घेतला ज्यामुळे ते त्याचे क्षेत्र म्हणून थर्मोडायनामिक्स निवडण्यास कारणीभूत ठरले. +ऑक्टोबर १८७८ मध्ये प्लॅंकने आपली पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आणि फेब्रुवारी १८७९ मध्ये त्याच्या शोध प्रबंध सादर केला. त्यांनी म्युनिकमधील त्याच्या पूर्वीच्या शाळेत थोडक्यात गणित आणि भौतिकशास्त्र शिकवले. +सन १८८० पर्यंत, प्लॅंकने युरोपमध्ये दोन उच्च शैक्षणिक पदवी मिळविल्या. +त्याच्या क्षेत्रामधील प्रबंध (thesis ) पूर्ण झाल्यावर, प्लॅंक म्युनिकमध्ये एक विनाशुल्क प्राइवेटडोजेंट (व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापकांच्या तुलनेत जर्मन शैक्षणिक रॅंक) बनले, त्याला शैक्षणिक पदाची ऑफर येईपर्यंत प्रतीक्षा केली गेली.सुरुवातीला त्यांच्याकडे शैक्षणिक समुदायाकडून दुर्लक्ष केले गेले असले तरी उष्णतेच्या सिद्धांताच्या क्षेत्रावर त्यांनी आपले कार्य वाढवून दिले आणि एकामागून एक गिब्ज सारखा थर्मोडायनामिकमधले नव-नवे शोध लक्षात आले.एंट्रोपीविषयी क्लॉझियसच्या कल्पनांनी त्याच्या कार्यात मध्यवर्ती भूमिका घेतली. + + +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1044.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33589bd7358d5a749a526a58c25c6438c4a5477c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1044.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळवार पेठ आणि सोलापूरचे पारंपारिक वतनदार शेटे घराणे : सोलापूरच्या प्रत्येक परिसराला एक वेगळी पंरपंरा आणि उज्जवल इतिहास आहे.मंगळवार पेठ ही शहराची आर्थिक बाजू म्हणून ओळखली जाते. सोलापूरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.शहरातील वेगवेगळ्या परिसराला आणि पेठेला वाराचे नाव देण्याची पंरपंरा ही पेशव्यांच्याही पूर्वी पासूनची होती.दिलेली नावे लक्षात ठेवण्यास सोपी जावी म्हणून आणि या पेठांची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीत व्हावी,अशा पद्धतीने केली जात होती.आंध्रप्रदेश,कनॉंटक या दोन राज्याच्या सीमेवर असलेले सोलापूर हे व्यापारी पेठ म्हणून उदयास आले. सुरुवातीस केवळ 150 एकर मध्ये वसलेल्या सोलापूर मध्ये बाजारपेठ वसवण्या साठी जागा अत्यंत अपूरी असल्याने व्यापाऱ्यांच्या द्रष्टीने नवी जागा शोधण्यास सुरुवात केली. मंगळवार पेठ देखील कसबा सोलापूर चाच भाग होता.श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सोलापूरचे किल्लेदार उद्धव वीरेश्वर यांच्यासह सोलापूरचे पारंपारिक वतनदार देशमुख,जगदेवपा शेटे, देशपांडे यांच्याशी याबाबत चर्चा करून नवीन बाजारपेठ वसविण्याबाबत सूचना केली.1768 साली किल्लेदार वीरेश्वर यांनी मधला मारुतीच्या पाठीमागील सुमारे 73 एकर जागा शहरातील वतनदार जगदेवप्पा शेटे यांच्या मालकीची जागा व्यवसाय वाढीसाठी नियुक्त केली.सोलापूरचा विस्तार त्याकाळी सावरगाव डोंगरापर्यंत होता.जगदेवप्पा शेटे यांच्याकडे सावरगाव तसेच नळदुर्ग ठाणे यांची देखील वतनदारी व जहागिरी होती. त्याकाळी अत्यंत धाडसी तसेच व्यवहारचातुर्य असे जगदेवप्पा शेटे यांनी या ठिकाणी नवीन व्यापारीपेठ वसविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. यादरम्यान माधवराव पेशवे यांनी सोलापूरला भेट दिली.येथील वतनदार, किल्लेदार यांच्या समवेत झालेल्या चर्चेअंति या 73 एकरामध्ये वसलेल्या नव्या बाजारपेठेला 'माधवपेठ' असे नाव देण्याचे एकमताने ठरले.मधला मारूतीपासून तुळजापूर वेशीपर्यत शेळगी गावठाण पर्यंत व कुंभार वेशीपासून ते बाळीवेस मारुती तसेच शतकेश्वर लिंगापर्यंत अशी या पेठेची चतुःसीमा ठरविण्यात आली. या बाजारपेठेसंबंधीचे सर्व अधिकार जगदेवप्पा शेटे यांना देण्यात आले.जगदेवप्पा शेटे यांनी मुख्य पेठेत चार दिशेला चार मारुती मंदिराची प्रतिष्ठापना केली. कुंभारवेस मारुती,बाळीवेस मारुती, तुळजापूर वेस मारुती व मधला मारुतीची स्थापना केली. पेठेच्या मधोमध शेटे यांनी वाडा बांधला.मोठ्या बाजरपेठेची निर्मिती केली.विविध जातीधर्माच्या लोकांना व्यवसाय करिता जागा उपलब्ध करून दिली.फलटण भागातील व्यापाऱ्यानिमित्त आलेल्या मारवाडी गुज्जर लोकांना व्यवसायाकरिता फलटण गल्लीत जागा दिली. केवळ 25-30 वर्षामध्ये माधवपेठेत व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास सुरुवात झाली. शेजारच्या दोन्ही राज्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे ही पेठ पूर्णपणे गजबजली.सोलापुरचा सर्वात मोठा बाजार हा दर मंगळवारी भरत असे.हा बाजार खूप मोठा असतो म्हणून बाहेरील गावातील लोक मंगळवारी सोलापूर मध्ये येत असतात मधला मारूतीच्या पिछाडीस असलेल्या मोकळ्या जागेत हा बाजार भरायचा.याच ठिकाणी ही नवीन पेठ स्थापन झाल्यानंतर मंगळवारी भरण्याऱ्या आठवडी बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली व पुढे या बाजाराचे नाव 'माधवपेठ' ऐवजी 'मंगळवारपेठ'असे बदलले गेले.ते आज पूर्व आणि पश्चिम मंगळवारपेठ असे ओळखले जाते.मंगळवार पेठेतील मधला मारुती मंदिरातील ऐतिहासिक मारुतीच्या मूर्तीच्या मागील बाजूस शिव पार्वती विवाह पुराण कोरण्यात आले आहे. अशी ऐतिहासिक शिल्प मंगळवार पेठेत आहे.मंगळवार पेठेतील वतनदार शेटे यांच्या वाड्यात श्रीमंत माधवराव पेशवे बाजारपेठ तसेच मंदिर बाबतीत चर्चेसाठी येत असत. शेटे घराण्यातील दुसरे जगदेवप्पा यांनी वारद घराण्यातील व्यक्तीला व्यवसाय वाढीसाठी सोलापुरात आणले व त्यांना शेटे वाड्यासमोरील जागा राहण्यास दिली.सोलापूरची पहिली नगरपालिका भाड्याने याच मंगळवार पेठेतील शेटे यांच्या वाड्याबाहेरील आठ खण जागेत होती.आजही वतनदार शेटे घराण्यातील वारसदार बाळासाहेब उर्फ सिद्धेश्वर मल्लिकार्जुनप्पा शेटे यांच्याकडे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शेकडो अंदाजे 300 वर्षांपूर्वीचे शस्त्र पाहवयास मिळतात.वतन दार शेटे घराणे हे अत्यंत जुने घराणे आहे. आद्यपंचपिठाधिशांनी हजारो वर्षांपूर्वी याच शेटे घराण्यास वीरशैव परंपरेतील सर्व धार्मिक अधिकार मान सन्मान दिलेला आहे.लग्नकार्यातील पूजेतील पंच कलशपैकी पहिला कलश घेण्याचे तसेच सर्व धार्मिक विधिना मान्यता देणे बाबत शेटे यांना मान आहे.वीरशैव लिंगायत समाजाचा प्रमुख व्यक्ती हा शेटे आहे.त्यामुळे गावातील ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या जत्रेत शेटे घराण्यास मोठा मान आहे.चालुक्य काळापूर्वीपासून म्हणजेच अंदाजे 1200-1300 वर्षांपूर्वीपासून या शेटे घराण्याचा इतिहास दिसून येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10451.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db5513d3c5c765445f291d051e6c112f1d7c7805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10451.txt @@ -0,0 +1,3 @@ +४ जानेवारी, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10505.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c233d371e871c4d42248e3ad733ff97315d9e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10505.txt @@ -0,0 +1,3 @@ +माक्देबुर्गचा वेढा हा वेढा जर्मनीतील माक्देबुर्ग शहराला ऑक्टोबर २५ - नोव्हेंबर ६, इ.स. १८०६ मध्ये फ्रान्सच्या सैन्याने घातलेला वेढा होता. प्रशियाच्या आधिपत्यात असलेले माक्देबुर्ग शहर पडल्यावर फ्रान्सचा विजय झाला. +या वेढ्याचे नेतृत्व सुरुवातीस मार्शल जोआकिम मुरातने तर नंतर मिशेल नेय यांनी केले होते. प्रशियन सैन्य फ्रांत्स फॉन क्लाइस्टच्या नेतृत्वाखाली लढले.[१][२] फ्रांसच्या ग्रांड आर्मेने जेना-आउअरश्टेटच्या लढाईतून पळ घेतलेल्या प्रशियन सैन्याचा पाठलाग करीत असताना प्रशियन सेनापती फ्रेडरिक लुईने माक्देबुर्गच्या किल्ल्यात आश्रय घेतला. मुरातने फ्रेडरिक लुईला शरण पत्करण्यास सांगितले आणि किल्ल्यास वेढा घालण्यास सुरुवात केली. फ्रेडरिक लुईने किल्ला आणि त्यातील २५,००० सैनिक जनरल फॉन क्लाइस्टच्या हवाली केले व तेथून पळ काढला. त्याच वेळी फ्रांसच्या सम्राट नेपोलियनने मार्शल ज्यॉं-दि-द्यू सूल्तच्या हाताखालील फौजेला परत बोलावून घेतले. माक्देबुर्गला वेढा घातलेले सैन्य याच फौजेचा भाग असल्याने मुरातने १८,००० सैनिक नेयला दिले व इतर सैनिकांसह फ्रांसकडे कूच केली.[१] नेयने एल्ब नदीच्या दोन्ही तीरांवर छावणी टाकली पण किरकोळ झटापटींशिवाय किल्ला घेण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत. फॉन क्लाइस्टनेही एखाददुसरा एल्गार सोडता फारशी हालचाल केली नाही. किल्ल्यातील सैनिकांचे ढासळते धैर्य पाहून फॉन क्लाइस्टने माझ्या खिशातील रुमाल जेव्हा जळेल तेव्हाच मी संधीची बोलणी सुरू करेन अशी घोषणा केली[२] पण इकडे फ्रेंचांनी आपल्या तोफा मोर्चावर आणीत असलेले पाहून प्रशियनांची गाळण उडाली व त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. नोव्हेंबर ७ रोजी संधीची कलमे निश्चित झाली आणि पुढच्या दिवशी किल्ल्यातील सगळ्या शिबंदीने शरणागती पत्करली व ११ तारखेला फ्रेंचांनी सगळ्यांना युद्धकैदी बनवून किल्ल्याबाहेर काढले.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10513.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..995db91fdf7dd60e94d87e621861428e45750b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10513.txt @@ -0,0 +1,10 @@ +चुंबकीय शाईच्या वर्णांची ओळख (इंग्लिश Magnetic Ink Character Recognition लघुरूप - MICR) ही जगातील बँकांनी धनादेशाच्या व्यवहारासाठी अवलंबलेली एक अभिनव पद्धती आहे. धनादेशावर चुंबकीय गुणधर्म असलेली शाई वापरून आकडे लिहिले जातात आणि ते एका विशिष्ट यंत्रामार्फत ओळखले जातात. ही पद्धती केनेथ एल्डरीजी याने शोधून काढली. +. +बँकेकडून खातेदाराला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक धनादेशावर तळाशी चुंबकीय शाई वापरून काही आकडे आणि चिन्हे छापलेली असतात. या सर्व आकड्यांच्या मध्यावर साधारणपणे एक विरामचिन्ह असते. विरामचिन्हाच्या अलीकडील भाग ज्या बँकेमधून धनादेश काढला आहे त्या बँकेचे सांकेतिक नाव दर्शवितो आणि विरामचिन्हाच्या पलीकडील भाग ठेवीदाराचा खाते क्रमांक दर्शवितो. हे सर्व आकडे आणि चिन्हे चुंबकीय शाईत छापलेली असतात. +चेकचे वाचन आणि वर्गीकरण करणारे एक यंत्र असते त्याला धनादेश वाचक किंवा रीडर किंवा सॉर्टर म्हणतात. या यंत्रात धनादेशांचा गठ्ठा ठेवला की, हळूहळू एकएक धनादेश पुढे सरकतो आणि एका विशिष्ट क्षणी तो चुंबकीय क्षेत्रातून जातो. त्याचवेळी चेकवरील शाई चुंबकीय बनते आणि चेकवरील आकड्यांच्या आणि चिन्हांच्या आकारावरून धनादेशावरील सर्व माहिती वाचली जाते. एका मिनिटात साधारणपणे २५०० धनादेश वाचून त्याची संगणकात नोंद करता येते. +भारतातील धनादेशावर खालील तपशील चुंबकीय स्वरूपात नोंदवलेला असतो +१) धनादेश क्रमांक +२)बँकेची माहिती - ९ आकड्यात नोंदवल्या जाणाऱ्या या अंकातील पहिले तीन अंक शहराबद्दल (पोस्टाच्या पिनकोड प्रमाणे), मधले तीन अंक बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेला संकेतांक आणि शेवटचे तीन अंक त्या शहरातील त्या बँकेच्या शाखेला बँकेने दिलेला क्रमांक असतात. +३) धनादेश प्रकार - खात्याच्या प्रकाराप्रमाणे आणि धनादेशाच्या स्वरूप प्रमाणे धनादेशाचा प्रकार बदलतो.उदा. चालू खात्यासाठी २९, रोख पत खात्यासाठी ३०, बचत खात्यासाठी ३१, लाभांश वितरक १४ इत्यादी +४) खात्याचा संक्षिप्त क्रमांक +५) रक्कम diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10529.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..803a0c44ee430b9ca45d81745c3c0a53e443ba1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10529.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम मॅट पॅटिन्सन (२४ ऑक्टोबर, १९९६:इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो. हा १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1054.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6c81e2a4d236163ab1bdfb4db9bdf2806163d2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1054.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10541.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6110defa4c099af6b9b94e6d884b2a399562103a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10541.txt @@ -0,0 +1,4 @@ +२३ सप्टेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [मॅट हेन्री क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर) +मॅथ्यू जेम्स हेन्री (जन्म १४ डिसेंबर १९९१) हा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो कॅंटरबरी ह्या स्थानिक संघ तसेच इंग्लंडमधील वूस्टरशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा एक तेज-मध्यमगती गोलंदाज आहे. +त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३१ जानेवारी २०१४ रोजी भारताविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केले.[१] त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४ डिसेंबर २०१४ झालेल्या १ल्या टी२० सामन्यात केले.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10549.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa36ad8f5550f3af6dd98ecaa169759e478d0ce0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10549.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅड मॅक्स हा १९७९मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतील ऑस्ट्रेलियन चित्रपट आहे. यात चित्रपट मेल गिब्सन, जोअॅन सॅम्युएल, ह्यू कीझ-बर्न, स्टीव बिस्ली, टिम बर्न्स आणि रॉजर वॉर्ड यांच्या मुख्य भूमिका आहेत. +या चित्रपटाच्या निर्मितीला अंदाजे ४ लाख ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये खर्च आला तर त्याने १० कोटी अमेरिकन डॉलर मिळविले. या चित्रपटाचे मॅड मॅक्स २ (१९८१), बियॉन्ड थंडरडोम (१९८५) आणि फ्युरी रोड (२०१५) हे भाग निर्माण केले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10550.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2f01577a21c3f4a0776d0f1988d554abf998c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10550.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंद महासागर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10568.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34a8e6aface4ea2af1bd0b618332145aadbca680 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10568.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅडिसन काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅडिसन काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10581.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bc92e407031656af73eb6fac46a04c9b007dd73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10581.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅडिसन कीझ (१७ फेब्रुवारी, १९९५:रॉक आयलंड, इलिनॉय, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10586.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dec1b1a9ff87c5e903b0cadee6dde30eae1c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10586.txt @@ -0,0 +1 @@ +मॅडिसनव्हिल हे टेक्सासच्या मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. इ.स. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१५९ होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10600.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..564213049f32c8e03a0decf83c273b7b5e779f75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10600.txt @@ -0,0 +1,6 @@ +मॅडोना ऑफ क्यिव (मराठी: कीवची मॅडोना) ही रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलाने २०२२ मध्ये युक्रेनची राजधानी क्यीव शहरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी कीव मेट्रोमध्ये आश्रय घेतलेल्या मुलाचे पालनपोषण करणाऱ्या महिलेची प्रतीकात्मक प्रतिमा आहे. पत्रकार अन्द्रस फॉल्ड्स (András Földes) यांनी काढलेला फोटो इंटरनेटवर लोकप्रिय झाला आहे. हे मानवतावादी संकट आणि अन्यायकारक युद्ध या दोन्हींचे उदाहरण बनले आहे. ही प्रतिमा इटलीतील मुग्नानो डी नेपोली येथील कॅथोलिक चर्चमध्ये प्रदर्शित केलेल्या आयकॉनची प्रेरणा होती, जी प्रतिकार आणि आशेचे कलात्मक प्रतीक बनली.[१] +युक्रेनमधील रशियाच्या युद्धाच्या पहिल्या दिवसात, २७ वर्षीय टेटियाना ब्लिझ्नियाक तिच्या तीन महिन्यांच्या मुलीला स्तनपान देत आहे, ज्याने बॉम्बहल्ल्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी कीव सबवेच्या बोगद्यांमध्ये आश्रय घेतला होता. रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलाने कीव शहराने हंगेरियन पत्रकार आंद्रेस फोल्डेसचे लक्ष वेधून घेतले आणि त्याने उत्स्फूर्तपणे त्याचे चित्रीकरण केले. महिलेने २५ फेब्रुवारी २०२२ पासून पती आणि मुलासह भुयारी मार्गात आश्रय घेतला. २६ फेब्रुवारीला त्यांना बाहेर काढायचे होते, तरीही मारामारीमुळे ते ज्या बोगद्यात आश्रय घेत होते त्यातून बाहेर पडता आले नाही. [२] हा फोटो व्हायरल झाला आणि व्हॅटिकनच्या अधिकृत संकतस्थळावर शेअर केला. डनिप्रो येथील युक्रेनियन कलाकार मरीना सोलोमेन्नीकोवा ज्यांनी ते पाहिले त्यांच्यापैकी एक होती. तिने आपल्या बाळाचे संगोपन करत असलेल्या मेरीच्या पोर्ट्रेटसाठी प्रेरणा म्हणून स्त्रीची प्रतिष्ठित प्रतिमा वापरली. चित्रात, युक्रेनियन महिलेचा शिरोभूषण मेरीचा बुरखा म्हणून वापरला आहे आणि तिचे डोके भुयारी मार्गाच्या नकाशासमोर चित्रित केले आहे. ५ मार्च २०२२ रोजी, कलाकाराने त्याने तयार केलेले पोर्ट्रेट इंटरनेटवर पोस्ट केले. [३] +जेसुइट प्रीष्ट (पुजारी) व्याचेस्लाव ओकुन यांच्या विनंतीनुसार, "मेडोना फ्रॉम द मेट्रो" या पोर्ट्रेटची कॅनव्हास प्रत इटलीला पाठविली गेली होती जिथे प्रिष्ट (पुजारी) सेवा करतील त्या ठिकाणी ठेवण्यासाठी. [४] पवित्र गुरुवारी, नेपल्सच्या मुख्य आर्कबिशपने पेंटिंगला उपासनेची वस्तू म्हणून पवित्र केले. [२] चर्च ऑफ सेक्रेड हार्ट ऑफ जीझसमध्ये चिन्ह प्रदर्शित करण्यात आले होते, ज्याचे टोपणनाव "मॅडोना ऑफ कीव" आहे, जे मुन्यानो डी नेपोलीच्या कम्युनमध्ये आहे. २५ मार्च २०२२ रोजी पोप फ्रान्सिस यांनी या चिन्हाला अभिषेक केला होता [५] +टेत्याना ब्लिझनियाकने नंतर ल्विव्हमध्ये आश्रय घेतला. [६] +ही प्रतिमा मानवतावादी संकट आणि अन्यायकारक युद्धाचे उदाहरण बनली आहे, [६] आणि युक्रेनियन लोकांच्या आशा आणि मूक प्रतिकाराचे प्रतीक आहे. [४] बदल्यात, हेरोड द ग्रेटच्या धोक्यापासून आश्रय घेतलेल्या नाझरेथच्या येशूच्या आईचे पोर्ट्रेट, आज आधुनिक मेरीचे प्रतीक मानले जाते जी युद्धाच्या हिंसाचारापासून आश्रय घेते आणि त्याच्यासारख्या आपल्या बाळाची देखभाल करते. [७] कीव व्हर्जिन युक्रेनियन इतिहास आणि राष्ट्रीय अस्मितेमधील भूमिकेसाठी देखील उल्लेखनीय आहे. सोव्हिएत काळात, चिन्ह युक्रेनियन राष्ट्रवाद आणि सोव्हिएत वर्चस्वाचा प्रतिकार यांचे प्रतीक म्हणून वापरले गेले. आज, तो एक सांस्कृतिक खजिना आणि युक्रेनियन ओळख आणि वारसा प्रतीक मानले जाते. [८] [९] +साचा:2022 Russian invasion of Ukraine diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1061.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..151ee81d2231408907ab970177ffb8066f932658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1061.txt @@ -0,0 +1,208 @@ + + +मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ(आहसंवि: IXE, आप्रविको: VOML)(लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value).,हे भारताच्या कर्नाटक राज्यात मंगळूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यास पूर्वी 'बाजपै विमानतळ' असे नाव होते. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10614.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad410256ff3385f41791d077b567a043b2ceee17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10614.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू स्टूअर्ट सिंकलेर (९ नोव्हेंबर, १९७५:ऑस्ट्रेलिया - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10620.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba0ed41ddd5d68ca22f180459d920d0cd4f5f44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10620.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू जेम्स अप्सन (इंग्लिश: Matthew James Upson) (एप्रिल १८, १९७९ - हयात) हा इंग्लिश आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील संरक्षकाच्या भूमिकेत खेळणाऱ्या अप्सनाने २०१० फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. एरवी इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत तो वेस्टहॅम युनायटेड संघाकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10627.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6110defa4c099af6b9b94e6d884b2a399562103a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10627.txt @@ -0,0 +1,4 @@ +२३ सप्टेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [मॅट हेन्री क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर) +मॅथ्यू जेम्स हेन्री (जन्म १४ डिसेंबर १९९१) हा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो कॅंटरबरी ह्या स्थानिक संघ तसेच इंग्लंडमधील वूस्टरशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा एक तेज-मध्यमगती गोलंदाज आहे. +त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३१ जानेवारी २०१४ रोजी भारताविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केले.[१] त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४ डिसेंबर २०१४ झालेल्या १ल्या टी२० सामन्यात केले.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10638.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c82b01fcee01e1e547b43ea26148bb593d6c14f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10638.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू पॉल कुन्हेमन (२० सप्टेंबर, १९९६:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10646.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d19db81c72ba2120d5c274eeb1141ae051fcc805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10646.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू ब्रेट्झके (जन्म ३ नोव्हेंबर १९९८) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने ९ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सनफोइल ३-दिवसीय चषक मध्ये पूर्व प्रांतासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने १२ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सीएसए प्रांतीय वन-डे चॅलेंजमध्ये पूर्व प्रांतासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] त्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७ आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेत पूर्व प्रांतासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10663.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c623cdab5c6e32eabe6bc45773f50cb1ee09260d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10663.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मॅथ्यू स्कॉट वेड हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1068.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48497ffc640e7a52b323cb203b58c58e3eb02e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1068.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10709.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bc2fa79a14a961adfe1981ea9091a7a54d456d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10709.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 53°28′N 2°14′W / 53.467°N 2.233°W / 53.467; -2.233 + +मॅंचेस्टर (इंग्लिश: Manchester हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. +१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस्टर औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. लिव्हरपूल ते मॅंचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती व मॅंचेस्टर येथे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मॅंचेस्टर कालव्याद्वारे मॅंचेस्टर आयरिश समुद्रासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली. +सध्या मॅंचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाच्या आहेत. +मॅंचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारे मॅंचेस्टर युनायटेड व मॅंचेस्टर सिटी हे दोन सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. २००२ राष्ट्रकुल खेळ येथील सिटी ऑफ मॅंचेस्टर स्टेडियममध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या मॅंचेस्टर सिटी हा क्लब वापरत असून मॅंचेस्टर युनायटेड आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मॅंचेस्टरमध्ये आजवर १९६६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९९६, २०१२ उन्हाळी ऑलिंपिक, २००३ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामना तसेच २००८ युएफा युरोपा लीग अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत. +इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लब मॅंचेस्टर येथे स्थित आहे व तो आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानामधून खेळतो. +मॅंचेस्टर विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तो २०१३ साली ब्रिटनमधील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10725.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dd07d656e84fd5e7461838abef91df5b6187c4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10725.txt @@ -0,0 +1,4 @@ +२९ जानेवारी, इ.स. २०१८ +दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) +मेरिझॅन कॅप (४ जानेवारी, १९९०:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकााची क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १० मार्च, २००९ रोजी  ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10734.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..605438c10f4bb959d64cde0a109f94fe8912355e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10734.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅरियन काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅरियन काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10751.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c2f6142403e6af1eb548e1725bc525e5ef25f60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10751.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मॅरिलिन मनरो (जन्मनाव नॉर्मा जियान मॉर्टेन्सन; १ जून १९२६ - ५ ऑगस्ट १९६२) ही १९५० च्या दशकात अनेक यशस्वी व्यावसायिक बोलपटांमधून प्रसिद्धीस आलेली आणि प्रमुख ‘प्रणय प्रतीक’ बनलेली अमेरिकी अभिनेत्री, मॉडेल व गायिका होती. +मॉडेल म्हणून कारकिर्दीस प्रारंभ केलेल्या मॅरिलीनला सन १९४६ मध्ये एका चित्रपटासाठी ट्वेंटिएथ-सेंच्युरी फॉक्स ने करारबद्ध केले. काही दुय्यम भूमिकांनंतर १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या दी ॲस्फाल्ट जंगल आणि ऑल अबाऊट ईव्ह या दोन चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीस आली. सन १९५२ मध्ये डोंट बॉदर टु नॉक या चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. नायगारा या सन १९५३ मधील अतिनाट्यात्मक चित्रपटात तिच्या मादकपणाचा प्रभावी वापर मुख्य भूमिकेत दिसला. ‘डंब ब्लॉंड’ (बुद्धीपेक्षा सौंदर्यावर भर देणारी पिंगट केसांची नायिका) ह्या तिच्या प्रतिमेचा जन्टलमेन प्रिफर ब्लॉंड्स (१९५३), हाऊ टू मॅरी अ मिलियेनर (१९५३) व द सेवन इयर इच (१९५५) या चित्रपटांमध्ये करण्यात आला. आपल्या कौशल्यांमध्ये भर घालण्यासाठी ॲक्टर्स स्टुडिओमध्ये जाऊन तिने अभ्यास केला. बस स्टॉप (१९५६) मधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले आणि गोल्डन ग्लोबचे नामांकन तिला मिळाले. सन १९५९ मधील सम लाइक इट हॉट या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. +मॅरिलिनच्या आयुष्याची अखेरची वर्षे आजारपण, वैयक्तिक समस्या आणि कामातील कुचराईसाठी उठून दिसतात. मुख्यतः निद्रानाशावर वापरल्या जाणाऱ्या बार्बिट्युरेट्स गटातील औषधांच्या अधिक मात्रेने तिचा झालेला मृत्यू संशयास्पद ठरला. अधिकृतरीत्या ‘बहुधा आत्महत्या’ असे या मृत्यूचे वर्गीकरण झालेले आहे. मृत्यूनंतरच्या काळात तिच्याकडे पॉप व सांस्कृतिक प्रतीक म्हणून तसेच आदर्श अमेरिकी लैंगिक प्रतीक म्हणून बघितले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10755.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec733442876460b05838ea3ca8570d58ed8bd34b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10755.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी-ॲन मुसोंडा (८ एप्रिल, १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०१८ मध्ये मेरीकडे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10777.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea4a8a8c0550cd2c7243612139ba5ac9db97db3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10777.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ बॉस्टन महानगराच्या केंब्रिज शहरात असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम.आय.टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10781.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea4a8a8c0550cd2c7243612139ba5ac9db97db3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10781.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ बॉस्टन महानगराच्या केंब्रिज शहरात असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम.आय.टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10790.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e7f22ba1266d39ed4e96786d99daa6daa227a9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10790.txt @@ -0,0 +1 @@ +मँडोलिन हे एक तंतुवाद्य आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1080.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40270a086210bd62201482574d5f74ea4a264552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1080.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८९१ असलेले मंगेवाडा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३८३.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६०३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा मंगेवाडा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : पदवी महाविद्यालय मालेवाडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय मालेवाडा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धानोरा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10811.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20dbf1a220484c818393a739ae7eb8e5bea4096b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10811.txt @@ -0,0 +1,6 @@ +मे २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४० वा किंवा लीप वर्षात १४१ वा दिवस असतो. + +जनसंघचा विजयQ + + +मे १८ - मे १९ - मे २० - मे २१ - मे २२ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10818.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a7fd0b277bdc7d7dca286e5d385082392c6becd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10818.txt @@ -0,0 +1,6 @@ +मे २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४७ वा किंवा लीप वर्षात १४८ वा दिवस असतो. + + + + +मे २५ - मे २६ - मे २७ - मे २८ - मे २९ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10843.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc14c34b088dfb0f044083a2fb44f9d0a05a3b0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10843.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंडुकडोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10851.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb2af24c761aacd2b50eb6cc0e4df472c9b78e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10851.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेंडोचिनो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे.[१] याचे प्रशासकीय केन्द्र युकिया येथे आहे.[२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,६०१ इतकी होती.[३] +या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10859.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8de056420e0634b1ea72b014b104822a34093b1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10859.txt @@ -0,0 +1 @@ +मेंढा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10860.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b66e62c1510207bf4929f4dfa9bfd553eaf423fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10860.txt @@ -0,0 +1,41 @@ +मेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकूण १०५ घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा हायवे रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गावापासून फक्त्त ४ कि.मी.अंतरावर व जिल्हाच्या ठिकाणापासून ३५ कि.मी. वर आहे. +ग्रामपंचायत कार्यालय असलेले लेखा हे गाव याच्या सीमेला लागून आहे. या गावाचे क्षेत्रफळ १९३० हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०५कुटुंबे व एकूण ४७३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४१ पुरुष आणि २३२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित महाराष् ४७३ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८३[१] आहे. +गावात दोन शासकीय शाळा आहेत. एक उच्च माध्यमिक शाळा, एक अगनवा पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा व पदवी महाविद्यालय धानोरा येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे ३० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात सरकारी विहिरी पाच आहेत. दगडाने बांधलेले खाजगी विहिरी दोन आहेत.हॅन्डपंप तीन आहेत.सदर विहिरी मध्ये बाराही महिने पाणी असतो. +गावात उघडी गटारव्यवस्था आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावातील मतदार यादीतील सर्व प्रोढ स्त्री-पुरुषांची सभा म्हणजेच ग्रामसभा, गावाची ग्रामसभा लोकशाहीची तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत आहे.[२].[३] ऐकायचे सर्वांचे ,पण करायचे तेच जे ग्रामसभा ठरवेल,असे ठरलेले आहे.ग्रामसभेत सर्व स्त्री -पुरुषांना आपले मत मांडण्याचा समान अधिकार आहे.निर्णय घेण्यासाठी ग्रामसबा व अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळ अशा दोन स्वंतत्र्य रचना आहेत.अभ्यास मंडळात फक्त्त चर्चा करायची ,निर्णय घ्यायचा नाही,असेही ठरलेले आहे.अभ्यास मंडळ या मंडळातील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे.अभ्यास मंडळात गावाबाहेरील व्यक्त्तीही सहभागी होऊ शकतात.पण ग्रामसभेत नाही.सर्व लोक चर्चा करून ,सर्वाचे मत घेऊन सर्वसहमतीनेच निर्णय घेतात.कोणतीही व्यक्त्ती मग स्त्री असो की पुरुष ,गरीब असो की श्रीमंत सहमत नसेल तर तिच्यावर निर्णय लादत नाही.त्या व्यक्तीचे म्हणणेही कदाचित बरोबर असेल असे मानून सर्वसहमती होईपर्यत चर्चा सुरू राहते.ग्रामसभेत निर्णय होऊ शकला नाही तर त्यावर अभ्यास मंडळात पुन्हा चर्चा होते व कोणत्याही परिस्थितीत बहुमताने निर्णय घेत नाहीत.[४] +याच्या अर्थ +ग़ावासबंधी काही ठरवायचे असेल ,निर्णय घ्यायच्या असेल तर गावातील सर्व स्त्री -पुरुष मीळून ठरवतील.आमच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही प्रतिनिधीला न देता तो आम्हीच वापरू म्हणजे आमच्या गावात आम्हीच सरकार पण एकापेक्षा जास्त्त गावांचा किंवा जिल्हा ,राज्य व् देशाचा प्रश्न असेल तर त्यासाठी आमच्या प्रतिनिधीला अधिकार देऊ .म्हणजेच - दि्ल्ली - ्मुंबईत आमचे सरकार[४] +व्यक्त्तीच्या नावावर असलेली जमीन गावाच्या नावाने करणे ,त्यापैकी विसावा हिस्सा भूमिहिनांना वाटप करून उरलेली जमीन ज्याची त्यानेच कसणे,कसण्याच्या हक्क राहील,पण गावाबाहेर विकण्याची परवानगी राहणार नाही.जो मेहनत करायला तयार आहे,पण कसायला जमीन नाही ,असा कुणीही गावात राहु नये उत्पनातून चाळीसावा हिस्सा गाव फंडात जमा करणे.गावाचे ग्रामंडळ बनवून गावाचा कारभार गावानेच ग्राममंडळाच्या म्हणजेचे ग्रामसभेच्या माध्यमातुन सर्वसहमतीने निर्णय घेऊन चालवीणे हा ग्रामदानाचा अर्थ आहे. +ग्रामसभेचे सामुहिक फंड +१. धान्य कोष +गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील एकूण उत्पना तील 2.50% धान्य कोषात धान्य जमा करतात. मेन्ढा‍‍‍ लेखा येथे तीन मोहला समिती आहेत.त्याप्रमाणे धान्य कोष्याची व्यवस्थापन केले जाते.आणि मोह्ल्या प्रमाणे रेकार्ड ठेवला जातो. सदर गोळा केलेला धान्य गावातील कुंटुबाना अडीअडचणीचा वेळी उदा.शेती ,लग्न्न कार्य,नामकरण ,मयत इ.कामासाठी गावातील बचत गट मार्फत कर्ज म्हणून दिला जातो.यासाठी ग्रामसभेने धान्य कोष समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे. +गावातील प्रत्येक कुंटुबातील मजूरी करणारी महिला किवा पुरु व्यक्त्ती गावाच्या हद्दीत केलेल्या कामाचे एकूण मजूरीतुन १० % रक्कम कोष्यात जमा करतात.व गरज पडल्यास शेती,शिक्षण, लग्न्न,मरण,नामकरण,इ.आवश्यक कामासाठी बचत गटामार्फत ग्रामसभेकडुन कर्ज म्हणून घेतले जातो. सदर काम करण्यसाठी ग्रामसभेने महिलांचे ग्राम कोष्य समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे. +‘आमच्या गावात आम्हीच सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार’[५] ही घोषणा देऊन ती प्रत्यक्षात आणणारे गाव, ही मेंढा (लेखा) गावाची ओळख आहे.[४] गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या या ग्रामसभेने, २००६ साली पारित झालेला ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन-निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, अर्थात वनाधिकार कायदा' व २००८ साली झालेले नियम[६] अंमलात आणून शेत जमिनींवर व्यक्तिगत व जंगलावर सामूहिक वनहक्क प्राप्त केला. अशा प्रकारे गावाच्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे मेंढा हे देशातील पहिले गाव ठरले. हा दावा दि.२८-८-२००९ रोजी मान्य झाल्यामुळे मेंढा गावाला गावाच्या पारंपरिक हद्दीतील एकूण १८०९.६१ हेक्टर वनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्याचा अधिकार मिळाला.[७] दि.१५ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सामुहिक वनहक्क अभिलेख ग्रामसभेला देण्यात आला. +१९ एप्रिल २०१२ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने केलेल्या शासन निर्णयाद्वारे मेंढा(लेखा) या ग्रामसभेला सामुहिक वन्नहक्काच्या वनक्षेत्रात जल व मृद्संधारणाची कामे करण्यासाठी ‘पथदर्शी प्रकल्पांतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची[८] (मनरेगा) अंमलबजावणी यंत्रणा’ म्हणून मान्यता मिळाली. ग्रामसभेला अशा प्रकारे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळण्याचा मनरेगाच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.[९] रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभा मेन्ढा‍ ‍‍लेखा यांनी आतापर्यत बांबू रांझी जवळ जलशोषक चर खोदणे , अंतर्गत रस्ते,अस्थाई रोवाटीका ,मिश्र रोपवन,दगडी बंधारे ,मजगी, इ.कामे केलेले आहेत. +गावाजवळच्या जंगलात आग्या[१०] मधमाशांची पोळी आहेत. आग्या जातीच्या मधमाशा आकाराने मोठ्या असून तीक्ष्ण दंश करतात. गावातील युवकांचा बचत गट अहिंसक पद्धतीने पोळ्यातील मध काढण्याचे काम गेली २० वर्षे करत आहे. रात्रीच्या वेळी माशा शांत असताना संरक्षक पोशाख घालून पोळ्याच्या जवळ जाऊन मधाचा साठा असलेला भाग हळुवारपणे कापून घेतला जातो. यामुळे मधमाशांची वसाहत, अंडी व माशा सुरक्षित राहतात. पारंपरिक पद्धतीत धूर, आग करून माशांना इजा केली जाते. यामुळे मधमाशांच्या वसाहतींची संख्या अतिशय कमी होत चालली आहे. आधुनिक असे हे तंत्र विकसित करण्यासाठी गावाला वर्धा येथील 'सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट' या संस्थेची मदत मिळाली. इतर गावातील लोकांनाही हा बचत गट प्रशिक्षण देत असतो. या तंत्रामुळे परिसरातील पोळ्यांचे प्रमाण वाढले आहे. माशा परागीभवन करत असल्याने शेती व जंगलातील उत्पादनात वाढ दिसून येत आहे.[११] +ग्रामसभेने गावात मध प्रक्रिया केंद्र उभे केले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाची प्रक्रिया व पॅकिंग करून तयार उत्पादन विविध आकाराच्या बाटल्यांमधून 'मेंढा हनी' या नावाने विकले जाते. +१.नर्मदा महिला बचत गट - धान्य,मोह , खरेदी करणे, +२.मॉं.दंतेश्वरी महिला बचत गट - तेलघाणी यंत्र चालविणे +३.आदिवासी महिला बचत गट - धान्य खरेदी करने +४.पेरसापेन महिला बचत गट - सध्या बचत करणे +५. गडमाता महिला बचत गट - सध्या बचत करणे +६.लक्ष्मी महिला बचत गट - राशन दुकान चालविणे +७.हितानाटांग वेलाह पेन महिला बचत गट - केरोसीन दुकान चालविणे +८. मंहानकाली पेन महिला बचत गट - चारोळी यंत्र चालविणे +१. बांबू व्यवस्थापन समिती ६. ग्रामसभा,मेन्ढा(लेखा) शेतकरी गट +२. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ७.ग्रामसभा कोष्य समिती +3. ग्रामसभा,मेंढा(लेखा)एम.आर.ई.जीएस.कार्य.समिती +4. न्याय समिती + +5. धान्य कोष्य समिती सर्वात जवळील पोस्ट ऑफिस गावा पासून ४ कि.मी अतरावर धानोरा येथे आहे. सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात . गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील टॅक्सी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशन दुकान आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना पोषण आहार केंद्र व अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात 'आशा' आरोग्य स्वयंसेविका आहे. सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय)५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील क्रीडांगण ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील चित्रपटगृह/व्हिडिओ केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +घरगुती, शेती व व्यापारी उपयोगासाठी प्रतिदिवस १४ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) उपलब्ध आहे. +मेंढा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ) +मेंढा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, बांबू, तेंदूपत्ता, मोहाची फुले, मध, डिंक, मासे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10865.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af48f3e6033344767ef55c65b1671c9301e5b5fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10865.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंढागड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1088.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d29bde60cb901e46429c7531c5cbc3aa1fd46726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1088.txt @@ -0,0 +1 @@ +मंगेश देेेेसाई हे एक मराठी चित्रपट कलाकार आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1090.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58cd6ea7074c0a094ad4996d91320b54873c5ae1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1090.txt @@ -0,0 +1,30 @@ +मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. +साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.[ संदर्भ हवा ] +त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.[ संदर्भ हवा ] +पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे. +एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.[ संदर्भ हवा ] +पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले. +१. रिमझिम पावसात जाऊ गं, +गुण गुण गाणे गाऊ गं, +थेंब टपोरे आले गं, +सगळे गोकुळ न्हाले गं, +थुइथुइ नाचत न्हाऊ गं || +२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; +ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. +काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा; +एकाएकी कोसळला पाऊस मधाचा || +३. या मेघांनो आभाळ भरा +या धरतीवर अभिषेक करा +विहंगाचे मधुगान हरपले +या मातीचे श्वास करपले || +वाहु दे सुखाचा पुन्हा झरा +सुकून गेल्या वनांवनांवर +सचिंत झाल्या मनांमनांवर +करुणेची संतत धार धरा || +एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही. +साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. +वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती. +इ.स. १९९० च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे. +बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असे नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेकजण गळेपर्यंत. +बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारून जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1091.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58cd6ea7074c0a094ad4996d91320b54873c5ae1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1091.txt @@ -0,0 +1,30 @@ +मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. +साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.[ संदर्भ हवा ] +त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.[ संदर्भ हवा ] +पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे. +एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.[ संदर्भ हवा ] +पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले. +१. रिमझिम पावसात जाऊ गं, +गुण गुण गाणे गाऊ गं, +थेंब टपोरे आले गं, +सगळे गोकुळ न्हाले गं, +थुइथुइ नाचत न्हाऊ गं || +२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; +ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. +काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा; +एकाएकी कोसळला पाऊस मधाचा || +३. या मेघांनो आभाळ भरा +या धरतीवर अभिषेक करा +विहंगाचे मधुगान हरपले +या मातीचे श्वास करपले || +वाहु दे सुखाचा पुन्हा झरा +सुकून गेल्या वनांवनांवर +सचिंत झाल्या मनांमनांवर +करुणेची संतत धार धरा || +एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही. +साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. +वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती. +इ.स. १९९० च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे. +बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असे नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेकजण गळेपर्यंत. +बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारून जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10919.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0dc0b9668e8f494fec9e6c3c19af0c7425c86ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10919.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेकोस्टा काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10929.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa947f909384a4ca77305eedad78d87605b41d08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10929.txt @@ -0,0 +1,3 @@ +टी२०आ किट +मेक्सिको राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेक्सिको देशाचे प्रतिनिधित्व करतो. २००४ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे संलग्न सदस्य बनले[५] आणि २००६ मध्ये कोस्टा रिका विरुद्ध त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. संघाने जून २०१० मध्ये आयसीसी अमेरिका चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि २०११ मध्ये कोस्टा रिका येथे आयसीसी अमेरिका विभाग ३ स्पर्धेत भाग घेतला. मेक्सिकोने २०१४ आणि २०१८ मध्ये दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला आहे आणि दोन्ही वेळा जिंकले आहे. २०१७ मध्ये ते सहयोगी सदस्य झाले.[१] +एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १ जानेवारी २०१९ नंतर मेक्सिको आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ दर्जासाठी पात्र असतील.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10947.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c291ffa7dc19c7ca60a2794e80dcf00b60ef78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10947.txt @@ -0,0 +1 @@ +मेग केन्डल (२५ डिसेंबर, इ.स. १९८९:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. केन्डल यष्टिरक्षक आहे आणि डाव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10960.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b28f4618d1059516d7a31c2150eeb63287a226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10960.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेगाबाइट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक आहे. +१०२४ किलोबाईट्स म्हणजे एक मेगाबाइट होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10985.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ed68eace8b9279e1ad6f5bc8274061d9f217de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_10985.txt @@ -0,0 +1 @@ +मेघना साकोरे बोर्डीकर मराठी राजकारणी आहेत. या जिंतूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11025.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9cb43d01c277ec858c2aa27878eb82b3720a8eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11025.txt @@ -0,0 +1,16 @@ +मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हे नवी दिल्लीमधील हॉकी मैदान आहे. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम हे नाव पडण्याच्या आधी नॅशनल स्टेडियम नावाने म्हणून ओळखले जाते, हे भारतातील नवी दिल्ली येथील फील्ड हॉकी स्टेडियम आहे. या स्टेडियमचे नाव भारताचे माजी हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. +हे मैदान १९५१ मधील पहिल्या आशियाई खेळांत वापरले गेलेले एक मैदान होते.[१]मैदानात २५,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियम हे च्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमान ठिकाण होते. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे हे फील्ड हॉकी स्थळ देखील होते. +मेजर ध्यानचंद स्टेडियम हे २०१० च्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमान ठिकाण होते. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे हे फील्ड हॉकी स्थळ देखील होते.[२] +मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम 1933 मध्ये भावनगरच्या महाराजांकडून दिल्लीला भेट म्हणून बांधण्यात आले होते, ते मूळत: बहुउद्देशीय स्टेडियम होते आणि त्याला इर्विन ॲम्फीथिएटर असे नाव देण्यात आले होते. त्याची रचना अँथनी एस. डेमिलो यांनी केली होती आणि लॉर्ड विलिंग्डन यांनी उघडली होती. नवी दिल्लीच्या वास्तुविशारद एडविन लुटियन्सच्या मूळ योजनेनुसार, राष्ट्रपती भवनापासून सुरू होणाऱ्या अक्षाला लंबवत असलेल्या ऐतिहासिक पुराण किल्लाचे (जुना किल्ला) पार्श्वभूमीवर स्पष्ट दृश्य देण्यासाठी या जागेवर उद्यान बनवायचे होते. १९५१ च्या आशियाई खेळापूर्वी त्याचे राष्ट्रीय स्टेडियम असे नामकरण करण्यात आले, २००२ मध्ये मेजर ध्यानचंद यांचे नाव जोडण्यात आले.[३] +मेजर ध्यानचंद स्टेडियम हे २०१० हॉकी विश्वचषका च्या वेळी पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमान ठिकाण होते. २०१० च्या राष्ट्रकुल खेळाचे हे फील्ड हॉकी स्थळ देखील होते. २०१० च्या हॉकी विश्वचषकापूर्वी या स्टेडियमचे पुनर्बांधणीचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते.[४] +24 जानेवारी 2010 रोजी ते राष्ट्रकुल खेळांचे अनावरण होणारे पहिले ठिकाण बनले होते. 262 कोटी रुपये खर्च करून स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. हे स्टँड जे मातीचे बंधारे होते ते पूर्ण पाडण्यात आले होते आणि त्या जागी पूर्ण नवीन आयताकृती बसण्याची सिटिंग बांधण्यात आली. +या स्टेडियममध्ये एकूण 16,000 आसनक्षमता आहे, ज्यामुळे ते विविध क्रीडा स्पर्धांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. +हे स्टेडियम 37-एकर (150,000 मीटर) कॉम्प्लेक्समध्ये 17,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात तीन सिंथेटिक खेळपट्ट्या आहेत - दोन आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड सुसंगत आहेत आणि तिसरे सरावासाठी आहेत.[५] +मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, दिल्ली, भारत येथे स्थित असलेले एक विशिष्ट डिझाइन आणि मनोरंजक वास्तुकला असलेले एक उल्लेखनीय फील्ड हॉकी स्टेडियम आहे. प्रख्यात वास्तुविशारदांनी डिझाइन केलेले हे स्टेडियम त्यांच्या कौशल्याचा आणि दृष्टीचा पुरावा आहे.[६] +24 जानेवारी 2010 रोजी ते 2010 राष्ट्रकुल खेळांचे अनावरण होणारे पहिले ठिकाण बनले. 262 कोटी रुपये खर्चून स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. हे स्टँड जे मातीचे बांधलेले होते ते पाडून त्या जागी नवीन आयताकृती बसण्यासाठी बांधण्यात आले.[७] +एडविन लुटियन्स यांच्या नेतृत्वाखालील प्रतिभावान वास्तुविशारदांच्या टीमने स्टेडियमची रचना केली होती. त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि स्टेडियम डिझाइनचे विस्तृत ज्ञान यामुळे एक स्टेडियम बनले आहे जे केवळ खेळाची भावनाच प्रतिबिंबित करत नाही तर भारताच्या स्थापत्य शास्त्रातील पराक्रमाचे प्रदर्शन देखील करते.[८] +नवीन स्प्रिंकलर सिस्टमने सुसज्ज असलेल्या सर्व खेळपट्ट्यांवर नवीन पॉलीग्रास टर्फ बनवला आहे. मैदानात सुमारे 16,200 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मुख्य रिंगणाबाहेरील दुसऱ्या खेळपट्टीवर 900 कायमस्वरूपी जागा आहेत आणि 1,600 तात्पुरत्या जागांची तरतूद आहे. दोन स्पर्धात्मक खेळपट्ट्या फोल्डेबल फ्लडलाइट टॉवर्स (हिंग्ड मास्ट लाइट्स) सह फ्लड-लाइट आहेत जे स्पर्धेदरम्यान 2,200 लक्स प्रकाश प्रदान करतील. हे हाय डेफिनिशन टीव्ही ट्रान्समिशन सक्षम करेल. +दोन्ही खेळपट्ट्या खेळाडूंसाठी चेंज रूम, विश्रांती लाउंज आणि व्हीव्हीआयपी लाउंजसारख्या सुविधा उपलब्ध आहे.[९] +हे स्टेडियम 37-एकर (150,000 m2) कॉम्प्लेक्समध्ये 17,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात तीन सिंथेटिक खेळपट्ट्या आहेत - दोन आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत आहेत आणि तिसरे सरावासाठी आहेत. हे भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला लागून आहे.[१०] +नवीन स्प्रिंकलर सिस्टमने सुसज्ज असलेल्या सर्व खेळपट्ट्यांवर नवीन पॉलीग्रास टर्फ घातला आहे. मुख्य मैदानात सुमारे 16,200 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मुख्य रिंगणाबाहेरील दुसऱ्या खेळपट्टीवर 900 कायमस्वरूपी जागा आहेत आणि 1,600 तात्पुरत्या जागांची तरतूद आहे. दोन स्पर्धात्मक खेळपट्ट्या फोल्डेबल फ्लडलाइट टॉवर्स (हिंग्ड मास्ट लाइट्स) सह फ्लड-लाइट आहेत जे स्पर्धेदरम्यान 2,200 लक्स प्रकाश प्रदान करतील. हे हाय डेफिनिशन टीव्ही ट्रान्समिशन सक्षम करेल.[११] +स्टेडियम वातानुकूलित आणि लिफ्टसह बसवलेले आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यासाठी अडथळा मुक्त तरतुदी आहेत. स्टेडियमला जनरेटर सेट आणि बॅटरी अखंडित वीज पुरवठ्यावर आधारित बॅकअपसह दोन ग्रिड्समधून वीजपुरवठा मिळेल.[१२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11026.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..458c54931400e92af1a760161d68bd1353c33cae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11026.txt @@ -0,0 +1,2 @@ +ध्यानचंद सिंग (२९ ऑगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९) हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त Fit India चळवळ सुरू झाली.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व लोक जमतात आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सव यशस्वी करतात. +ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटिश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11036.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3483bd8765b54b1e263932b797e89d087b1a00b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11036.txt @@ -0,0 +1,10 @@ +भावी आमदार श्री.विक्रम उत्तम राठोड युवा उद्योजक (सीईओ मंथन कन्स्ट्रक्शन) जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, यवतमाळ तथा तालुका अध्यक्ष सरपंच सेवा संघ, उमरखेड +गावातील प्रमुख व्यक्ती =श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड (नाईक) तथा तंटा मुक्ती अध्यक्ष +श्री मोहन राठोड (कारभारी) +श्री थावरा चव्हाण (असामी) + मेट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +उमरखेड तालुक्यातील ढानकी शहारापासुन् 4 किमी अंतरावर निसर्गरम्य डोंगराचा काठावर मसाई मातेच्या पायथ्यासी मेट हे गाव वसलेला आहे.जवळच दत्तात्रेय मंदिर,विजयनगरच्या बाजूला तळा आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. +बंजारा सण होळी , लेगि नृत्य , तिज उत्सव , वडार समाज दुर्गा उत्सव +उमरखेड तालुक्यातील ढानकी शहारापासुन् 3 किमी अंतरावर निसर्गरम्य डोंगराचा काठावर मसाई मातेच्या पायथ्यासी मेट हे गाव वसलेला आहे.जवळच दत्तात्रेय मंदिर,विजयनगरच्या बाजूला तळा आहे. मसाई माता मंदिर. श्री क्षेत्र दत्तात्रेय मंदिर मा.भगवति माता मंदिर , श्री सेवालाल महाराज मंदिर , मा तुळजाभवानि माता मंदिर ,मा जगदंबा माता मंदिर , पोचमाई माता,वाघदरा,हतिभाटा, बोरवाडी, +धानकि , निगनूर,खरुस्,कृष्णापुर्,वाडी,गोविन्द्पुर , diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1105.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70685736e87c60bdf2cfd43fa886c34b6a96660f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1105.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11056.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6febd9b78ea0352f58ae680aedcb178cf5737b50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11056.txt @@ -0,0 +1 @@ +मेटशिवडौली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11060.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ac0fc44a5636fe81bbe9b64961aa9f4ad0386a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11060.txt @@ -0,0 +1,13 @@ +मेटा एआय ही मेटा प्लॅटफॉर्म्स (पूर्वीची Facebook, Inc.) च्या मालकीची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा आहे. मेटा एआय विविध प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करते, ज्यामध्ये वाढीव आणि कृत्रिम वास्तव तंत्रज्ञानाचा सामावेश आहे. मेटा एआय ही एक शैक्षणिक संशोधन प्रयोगशाळा आहे जी अेआय समुदायासाठी ज्ञान निर्माण करण्यावर केंद्रित आहे. हे फेसबूक च्या प्रयुक्त यंत्र शिक्षण (अप्लाइड मशीन लर्निंग) संघाच्याच्या विरुद्ध आहे, जे त्याच्या उत्पादनांच्या व्यावहारिक प्रयुक्तीवर लक्ष केंद्रित करते. +मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया, मुख्यालय, लंडन, युनायटेड किंग्डम आणि मॅनहॅटनमधील नवीन प्रयोगशाळा येथे फेसबुक आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च (फेअर) म्हणून प्रयोगशाळा चालू झाली. फेअर अधिकृतपणे सप्टेंबर २०१३ मध्ये घोषित करण्यात आला [१] फेअर चे दिग्दर्शन न्यू यॉर्क विद्यापीठाच्या यान लेकुन यांनी केले होते, जे सखोल अभ्यास करणारे प्राध्यापक आणि ट्युरिंग पारितोषिक विजेते होते. [२] न्यू यॉर्क विद्यापीठाच्या च्या सेंटर फॉर डेटा सायन्स सोबत काम करताना, फेअर चे प्रारंभिक ध्येय दत्तांशिक विज्ञान(डेटा सायन्स), यंत्र शिक्षण(मशीन लर्निंग) आणि कृत्रिम बुद्धीमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स)चे संशोधन करणे आणि "बुद्धिमत्ता समजून घेणे, त्याची पायाभूत तत्त्वे शोधणे आणि यंत्रांना अधिक बुद्धिमंत बनविणे" होते. [३] फेअर मधील संशोधनाने चेहऱ्याची ओळख, छायाचित्रांमध्ये टॅगिंग आणि वैयक्तिकृत फीड अनुस्तुती या तंत्रज्ञानाचा मार्ग दाखवला. [४] व्लादिमीर वाप्निक, सांख्यिकीय शिक्षणातील प्रणेते, २०१४ मध्ये फेअर [५] मध्ये सामील झाले, ते सपोर्ट-व्हेक्टर यंत्राचे सह-शोधक आहेत आणि वाप्निक-चेर्वोनेंकिस सिद्धांताच्या विकासकांपैकी एक आहेत. +२०१८ मध्ये, आय.बी.अॅम् च्या बिग डेटा ग्रुपचे भूतपूर्व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, झेरोम पेझेन्टी यांनी फेअर च्या अध्यक्षाची भूमिका स्वीकारली, तर ली-कन् ने मुख्य अेआय शास्त्रज्ञ म्हणून काम सोडले. [६] २०१८ मध्ये, फेअर ला अेआय संशोधन क्रमवारी २०१९ मध्ये २५वा स्थान देण्यात आला होता, ज्याने अेआय संशोधनात आघाडीवर असलेल्या सर्वोच्च जागतिक संस्थांना स्थान दिले होते. [७] फेअर पटकन २०१९ मध्ये आठव्या स्थानावर पोहोचले, [८] आणि २०२० क्रमवारीत आठव्या स्थानावर कायम राहिले. [९] फेअर मध्ये २०१८ मध्ये अनुमानी २०० कर्मचारी होते आणि २०२० पर्यंत ही संख्या दुप्पट करण्याचे त्यांचे ध्येय होते. [१०] +फेअर च्या प्रारंभी कार्यामध्ये शिक्षण-प्रतिमान सक्षम स्मरणशक्ती संजाळ, स्व-पर्यवेक्षित शिक्षण आणि जनकसूत्री प्रतिकूलात्मक संजाळे, मजकूर वर्गीकरण आणि भाषांतर तसेच संगणक दृष्टी यामधील संशोधन सामाविष्ट होते. [३] FAIR ने २०१७ मध्ये टॉर्च सखोल-शिक्षण मध्ययगुणक तसेच पायटॉर्च जारी केले, एक मुक्त-स्त्रोत यंत्र शिक्षण कार्यचौकट, [३] जे नंतर टेस्लाचे ऑटोपायलट [११] आणि उबेरचे पायरो सारख्या अनेक सखोल शिक्षण तंत्रज्ञानामध्ये वापरले गेले. [१२] २०१७ मध्ये देखील, फेअर ने एक संशोधन प्रकल्प बंद केला जेव्हा अेआय बॉट्सने मानवांना न समजणारी भाषा विकसित केली, [१३] कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियंत्रणाबाहेर जाण्याच्या भीतीविषयी संवादांना उत्तेजन देणे. [१४] मात्र, फेअर ने स्पष्ट केले की हे संशोधन बंद करण्यात आले कारण त्यांनी भीतीपोटी भाषा कशी निर्माण होते हे समजून घेण्याचे त्यांचे प्रारंभिक ध्येय पूर्ण केले होते. [१३] +फेअरचे नाव बदलून मेटा अेआय असे करण्यात आले ज्याने फेसबूकचे बदलून मेटा प्लॅटफॉर्म्स् केले. [१५] +२३ फेब्रुवारी २०२२ मध्ये, प्रक्षेपित कार्यक्रम इनसाइड द लॅब: बिल्डिंग फॉर द मेटाव्हर्स व्हिथ अेआय, मेटा अेआय संघाने कृत्रिम बुद्धीमत्तेमधील संशोधन आणि विकासातील प्रमुख प्रगतींवर चर्चा केली. [१६] असे एक साधन बिल्डरबॉट आहे, जे वापरकर्त्यांना वाणी आदेश वापरून आभासी जग निर्माण करण्यास मुभा देते. इतर साधनांमध्ये कोणतीही भाषा मागे नाही, लिखित भाषांमधील स्वचलित भाषांतर करण्यास सक्षम असलेली प्रणाली आणि जागतिक वाणी भाषांतरक, त्वरित भाषण-ते-भाषण भाषांतर करण्यास सक्षम असलेली पद्धती सामाविष्ट आहे. +मेटा एआयच्या संगणक दृष्टी संशोधनाचा ध्येय अंकीय प्रतिमा आणि दृकपटातून वातावरणाविषयी माहिती मिळवणे आहे. [१७] अेआय द्वारे विकसित केलेल्या संगणक दृष्टी तंत्रज्ञानाचे एक उदाहरण म्हणजे पॅनॉप्टिक खंडीकरण, जे अग्रभागातील वस्तू ओळखते पण पार्श्वभूमीतील दृश्यांचे वर्गीकरण देखील करते. [१८] मेटा अेआय दृश्यात्मक प्रश्न उत्तर तंत्रज्ञान सुधारण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये एक यंत्र चक्र-सुसंगतत्व वापरून प्रतिमांविषयी मानवी वापरकर्त्याच्या प्रश्नांची उत्तरे देते, प्रश्नांमधील भाषिक भिन्नता संबोधित करण्याच्या उत्तराव्यतिरिक्त यंत्र एक प्रश्न निर्माण करते. [१९] +२०१८ मध्ये, मेटा अेआयने मुक्त-स्त्रोत पायटेक्स्ट लाँच केले, एक प्रतिमानी कार्यचौकट जे नैसर्गिक भाषा प्रक्रिया पद्धतीवर केंद्रित आहे. [२०] +२०२३ मध्ये, मेटा अेआय ने ६५बी प्राचली विशालकाय भाषा प्रतिमान LLaMA (लार्ज लँग्वेज मॉडेल मेटा अेआय) ची घोषणा केली आणि मुक्त स्त्रोत केले. [२१] +फेसबूक आणि इंस्टाग्राम त्यांच्या वार्ताफीड, विज्ञप्ती आणि शोध परिणामांमध्ये क्रमवारी आणि अनुस्तुतीत मेटा अेआय संशोधन वापरतात. [२२] मेटा अेआय ने री-एजेंट, एक टूलसेट देखील सादर केला आहे जो निर्णय व्युत्पन्न करतो आणि वापरकर्त्याच्या अभिप्रायाचे मूल्यनिर्धारण करतो. [२३] +यंत्र शिक्षण आणि अेआय हे नवीन विधीकल्प, अनुदेशन आणि यंत्रसामुग्री तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून आहेत. जसे की, मेटा अेआयचे पद्धती संशोधन संघ संगणक भाषा, संकलक आणि यंत्रसामुग्री अनुप्रयोगाचा अभ्यास करतात. [२४] +मेटा अेआय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गणितीय आणि सैद्धांतिक पायाचा अभ्यास करते. मेटा अेआय मध्ये शिक्षण सिद्धांत, इष्टतमीकरण(ऑप्टिमायझेशन) आणि संकेत संस्करणात प्रकाशने आहेत. [२५] +MTIA v1 हे Meta चे पहिल्या पिढीचे अेआय प्रशिक्षण आणि अनुमान प्रवेगक आहे, जे विशेषतः मेटा च्या अनुस्तुती कार्यभारासाठी विकसित केले आहे. हे टीएसएमसी च्या ७नॅनोमीटर प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले आहे आणि ८०० MHz च्या वारंवारतेवर कार्य करते. संस्करण शक्तीच्या संबंधात, प्रवेगक २५ W ची उष्ण सुकल्प शक्ती (थर्मल डिझाईन पॉवर) राखून INT8 अचूकतेवर १०२.४ TOPS आणि FP१६ अचूकतेवर ५१.२ TFLOPS प्रदान करतो. [२६] [२७] [२८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11064.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2082812acd6399695db87bc9a3f3c5cb0c5307d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11064.txt @@ -0,0 +1,50 @@ + + +साचा:H:h +Metawikipedia:Help:Advanced templates येथील पानाचे भाषांतर +या पानात ,प्रगत साचांचे तंत्रज्ञान नमुद केले आहे,विशेषतः,साच्यांच्या बदलणार्‍या नावांचा वापर तसेच साच्यांच्या कार्यकक्षांची नावे इत्यादी. सहाय्य:साचे येथे असणार्‍या साच्यांचे तंत्रज्ञान वाचकांनी, संपूर्णपणे अवगत करून घ्यावे.यातील काही खाली नमुद केलेली तंत्रे ही मर्यादित स्वरुपाची असु शकतात तर काही अद्ययावत् नसु शकतात ;उदाहरणार्थ: येथील चर्चा केलेली काही (ब्रांचिंग टेक्निक्स) branching techniques[मराठी शब्द सुचवा] यापेक्षा पार्सर क्रिया या जास्त सुटसुटीत असु शकतात. +.This page covers advanced template techniques, in particular the use of variable template names and parameter names in templates. Readers should be thoroughly familiar with the standard template techniques found in Help:Template. Some techniques described below may be outdated or of limited use; for example, ParserFunctions may be more convenient than some of the branching techniques discussed. + +सर्वसाधारणपणे,ही तंत्रे पुनर्कृति (रीकर्सिव्ह)recursive[मराठी शब्द सुचवा] (आतुन-बाहेर) पद्धतीच्या साच्यांवर प्रक्रिया करण्यावर अवलंबुन असतात.जेंव्हा एखाद्या साच्यावर प्रक्रिया करण्यात येते,ती साच्याचा संकेतास(कोड) string values (स्ट्रिंग किंमतीत)[मराठी शब्द सुचवा] भाषांतरीत करते. बहुधा, हे सरळ वेब ब्राउजरला सादरीकरणास पाठविले जाते परंतु त्यास 'संकेत'(code) म्हणुनही समजल्या जाउ शकते. दोन महिरपी कंसात (गद्य स्ट्रिंग) text strings[मराठी शब्द सुचवा] बद्ध केल्यावर () साच्यांची नावे किंवा बदल नावे म्हणुनही त्यावर पुनर्प्रक्रिया केल्या जाउ शकते. त्याने, string च्या किंमती बदलल्यामुळे, वेगवेगळे निकाल मिळतात. +In general, these techniques rely on the recursive (inside-out) processing of templates. When a template is processed, it translates template code into string values. These are often sent directly to the web browser for display, but they can be treated as code themselves. By enclosing the text strings in double-curly-brackets ( ), for instance, they can be reprocessed as template names or variable names, producing different results as the string values are changed. +नोंदी: +काही प्रकरणात, एखाद्या साच्यास ,बदल किंवा कार्यकक्षा निस्तरणा बघुन, दुसर्‍या अनेक साच्यांना आमंत्रित करणे सहाय्यक ठरु शकते. +In some cases, it may be useful for a template to call different templates depending on a variable or a passed parameter. This allows a type of branching that can be simpler than Parser functions, though they are generally less versatile. +उदाहरण: +The extra spaces in the above examples are needed: without them, the code is not processed as a template or a magic word, but just as a plain text string like so: {{{{NAMESPACE}}}}. +साचा:Hist5Since there is no convenient way to test substring values (even using parser functions), these techniques work best if the variable template has only a limited number of possible values. For example, the variable {{CURRENTDAYNAME}} has only seven possible values, so all cases can be handled with seven templates (or fewer, if some are redirects), and the variable {{NAMESPACE}} currently has 18 possible values. On the other hand, {{CURRENTTIME}} has 1440 possible values, which would require the creation of 1440 template pages or redirects, which would be impractical. Even with parser functions, all 1440 values would have to be listed (see m:Template:hour (backlinks edit) and m:Template:minute (backlinks edit)). In cases like that, it would be better to construct the template with multiple parameters that each only take a few values, rather than trying to account for all possibilities in a single parameter. +If a template depends on PAGENAME, then the many possible values of PAGENAME may not be a problem. Only the pagenames of the pages that call the template apply, and these can be limited to a small, enumerable set. +Templates can be passed as parameters to other templates. This can mean either that the template is evaluated and the result is passed as a parameter or that the template name is passed and evaluated as part of the other template. +A parameter name in a template can be a variable. This is useful if you want the behavior of a template to change based on the information that is provided to it. +Choosing parameters contextually - {{t pnd|parameter name}} +Template:t p contains {{{capital}}} is the capital of {{{country}}}, with two parameters - "capital" and "country". साचा:Timc can be used to select which parameter is used in a particular case. Thus: +This applies to integer parameters as well, since integer parameters can be specified using the "#=" notation. Passing the integer value N to {{t pnd}} as its parameter will make it look for the Nth unnamed parameter. +The following branching methods are generally obsolete; Parser Functions give easier forms of control. However, they may be useful in particular situations, and point out some unintuitive features of template behavior. +Variables (Magic Words) names can also be generated as variables. +| {{ns:0}}=लेख +| {{ns:1}}=चर्चा पान +| {{ns:2}}=सदस्य पान +| {{ns:3}}=सदस्य चर्चा पान +| {{ns:4}}=विकिपीडिया +| {{ns:5}}=विकोपीडिया चर्चा +| {{ns:6}}=चित्र +| {{ns:7}}=चित्र चर्चा पान +| {{ns:8}}=मिडियाविकी +| {{ns:9}}=मिडियाविकी चर्चा पान +| {{ns:10}}=साचा +| {{ns:11}}=साचा चर्चा पान +| {{ns:12}}=साहाय्य पान +| {{ns:13}}=साहाय्य चर्चा पान +| {{ns:14}}=वर्ग +| {{ns:15}}=वर्ग चर्चा पान +| {{ns:100}}=दालन +| {{ns:101}}=दालन चर्चा +| {{ns:828}}=विभाग +| {{ns:829}}=विभाग चर्चा +| {{TALKSPACE}}=चर्चा पान +| page}} +{{documentation}} + +[[वर्ग:विकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे|{{PAGENAME}}]] +, the last use of the parameter evaluates to a number #, and the entire phrase ns:# is evaluated as a template. Thus, {{namespace|4}} gives लेख, where Meta is the name of Namespace 4. +साचा:H:f diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11078.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4e000ab8d69fc12d15a73da210aca1fa01b9dc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11078.txt @@ -0,0 +1 @@ +मेट्रो सिटी मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] प्रस्तावित विसावे व अंतीम स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक भू-पातळीवर आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11086.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b293e926c84b833d6c7a22a2e88c9edaad03860 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11086.txt @@ -0,0 +1 @@ +मेडलाइन प्लस हे एक रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांना व वैद्यकीय व्यावसायिकांना महिती उपलब्ध करून देण्याकरिता असलेले संकेतस्थळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था व राष्ट्रीय आरोग्य ग्रंथालयाची माहिती या द्वारे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11100.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0de9e4b36600da629cd4e9479242e3ab682278fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11100.txt @@ -0,0 +1 @@ +झाग्रेब विमानतळ (क्रोएशियन: Međunarodna zračna luka Zagreb) (आहसंवि: ZAG, आप्रविको: LDZA) हा क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्रोएशियन वायूसेनेचा प्रमुख तळ देखील येथेच आहे. झाग्रेब विमानतळावर क्रोएशिया एरलाइन्सचा हब आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11107.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9d0728f35d89afb51280c54bc05853281f5aade --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11107.txt @@ -0,0 +1,8 @@ + मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11108.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b330293fcb54069a3fff4525cf685a2a21fc028a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11108.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे. या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचे व शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11116.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63d9f7a75958c236223c31d1d3d5f14bcf8af3ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11116.txt @@ -0,0 +1,19 @@ +मेढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर पुढे मेढे रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७९ कुटुंबे राहतात. एकूण ३५५ लोकसंख्येपैकी १८० पुरुष तर १७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.३७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.२१ आहे तर स्त्री साक्षरता ४५.१० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.०६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +झाप, शिवाजीनगर, डोंगरवाडी, पाथर्डी, चौक, खिडसे, ऐने, मानमोहाडी, भुरीटेक, धामणी, आसे ही जवळपासची गावे आहेत.कोरताड ग्रामपंचायतीमध्ये कोरताड, मेढे, रामनगर, सावरपाडा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11125.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..effcbe1853658e89bc289c69a60a1676f70a3f8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11125.txt @@ -0,0 +1 @@ +मेणखट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11137.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a784c5a6d3f5212f4104e4ac5df9d51fe22bd4f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11137.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेथी(शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. +नेपाळ, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, आर्जेन्टिना, इजिप्त, फ्रान्स, स्पेन, तुर्कस्तान, मोरोक्को आणि चीन या देशांत मेथीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतात राजस्थान राज्यात मेथीचे सर्वांत जास्त उत्पादन होते. तसेच हिवाळया मध्ये मेथीच्या उत्पादनाचे प्रमाण जास्त असते. +लोणची, रसभाज्यांसाठी वापरण्यात येणारे मसाले तसेच वाटणे यांमध्ये मुख्यतः मेथीदाण्याचा वापर केला जातो. मेथी ही एरिट्रीअन तसेच इथिओपियन जेवणातही वापरली जाते. इथिओपियामध्ये मेथीदाणे हे मधुमेहावरचे औषध म्हणून वापरले जातात. काही यहुदी लोक प्रथा म्हणून रोश हाशनाच्या (यहुदी नववर्ष) पहिल्या आणि दुसऱ्या रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश करतात.मेथीच्या पानांची भाजी केली जाते.ती भाजी खूप पौष्टिक आहे. मेथीच्या पानांचे मुटके केले जातात. मेथीची भाजी उंधियो या गुजराथी पदार्थात वापरली जातात. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले,आणि धपाटे असे पदार्थ केले जातात. +मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11141.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8ddb3c37eb14ae221c33cd2fd2c2db081dc104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11141.txt @@ -0,0 +1 @@ +मेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11155.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e021dac7b9793a25ecb682dc59e686ee6e3909 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11155.txt @@ -0,0 +1 @@ +मेदू वडा हा उडीद डाळ पासून बनवलेला दक्षिण भारतीय नाश्ता आहे. हे सहसा डोनटच्या आकारात बनवले जाते, एक खुसखुशीत बाह्य आणि मऊ आतील भाग. दक्षिण भारतीय पाककृतीतील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ हा सामान्यतः नाश्ता म्हणून खाल्ले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1117.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de34e1ee9512986fb36e917cf651b6541ed01ab4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1117.txt @@ -0,0 +1 @@ +मंगोलियाचा ध्वज १२ जानेवारी १९९२ रोजी स्वीकारला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1118.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d082475578f77cce471d8a809bb66137c5d29230 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1118.txt @@ -0,0 +1,3 @@ +मंगोलिया हा एक बौद्ध बहुसंख्य देश आहे. काही अहवालांनुसार, मंगोलियाची ९३% लोकसंख्या (३० लाख) बौद्ध धर्मीय आहे.[१][२] तथापि, २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे.[३][४] मंगोलियामधील बौद्ध धर्माची अलिकडील वैशिष्ट्ये गेलुग आणि कागिय वंशाच्या तिबेटी बौद्ध धर्मामधून प्राप्त झाली आहेत, परंतु ती वेगळी आहे आणि स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येही प्रस्तुत करते. +मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरुवात युआन घराण्याच्या (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. मंगोल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला. +मंगोलिया मधील बौद्ध हे प्रामुख्याने वज्रयान या बौद्ध संप्रदायाचे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11182.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8339b5ba24c79ed5e33df572b5a3893458eaaf16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11182.txt @@ -0,0 +1 @@ +मेनास (इ.स. १५५९ - फेब्रुवारी १, इ.स. १५६३) हा इथियोपियाचा सम्राट (नेगुसा नागास्ट) होता. हा सम्राट दावित दुसऱ्याचा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11184.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e30a8e692bc997a2a4b4f2e478354cd214a4c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11184.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेनिंगोकोकल लस ही नायशेरिया मेनिन्जायटीसच्या कोणत्याही संसर्गाला प्रतिबंधित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही लसींसाठी संदर्भित केली जाते.[१] मेनिन्गोकोकसच्या काही किंवा सर्व प्रकारांविरुद्ध भिन्न आवृत्त्या प्रभावी आहेत: ए, बी, सी, डब्ल्यू -135 आणि वाय. या लसी किमान दोन वर्षांसाठी 85 ते 100% प्रभावी आहेत. त्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेल्या लोकांमध्ये मेनिन्जायटीस आणि सेप्सिस कमी होण्यास कारणीभूत असतात.[२][३] ते एकतर स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे किंवा त्वचेच्या खाली दिले जातात. +जागतिक आरोग्य संघटनेने अशी शिफारस केली आहे की मध्यम किंवा जास्त प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या किंवा जेथे वारंवार उद्रेक होतो अशा देशांनी नियमितपणे लसीकरण करावे.[१][४] रोगाची जोखीम कमी असलेल्या देशांमध्ये, उच्च जोखीम गटांना लसीकरण करण्याची त्यांनी शिफारस केली आहे.[१] आफ्रिकन मेनिन्जायटीस बेल्टमध्ये एक ते तीस वर्ष वयोगटातील सर्व लोकांना मेनिन्जोकॉकल ए संयुग्मक लसीच्या द्वारे लसीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.[४] कॅनडा आणि अमेरिकेत चारही प्रकारच्या मेनिन्गोकोकस विरुद्ध प्रभावी लस किशोरवयीन आणि ज्यांना जास्त धोका आहे अशा इतरांसाठी नियमितपणे देण्याची शिफारस केली जाते.[१] सौदी अरेबिया मध्ये हज साठी मक्का येथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना चतुर्भुज लसीच्या लसीकरणाची आवश्यकता आहे.[१] +मेनिन्गोकोकल लसी सामान्यत: सुरक्षित असतात.[१] काही लोकांना इंजेक्शनच्या जागेवर वेदना आणि लालसरपणा विकसित होतो.[४] गर्भधारणेच्या काळात वापर सुरक्षित असल्याचे दिसून येते.[१] एक दशलक्ष डोसपैकी एकापेक्षा कमी या प्रमाणात तीव्र ॲलर्जीच्या प्रतिक्रिया आढळतात.[१] +मेनिन्गोकोकलची पहिली लस 1970 मध्ये उपलब्ध झाली.[५] ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या सूचीमध्ये आहे, जी आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेल्या सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी औषधे आहेत.[६] 2014 पर्यंत विकसनशील जगात याची घाऊक किंमत ही 3.23 अमेरिकन डॉलर आणि 10.77 अमेरिकन डॉलर प्रति डोस या दरम्यान आहे.[७] अमेरिकेत एका कोर्ससाठी त्याची किंमत 100-200 अमेरिकन डॉलर इतकी आहे.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11199.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701220ae6de5bb960904bdedea8ab91d44ffffdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11199.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेन्सा इंटरनॅशनल ही असामान्य बुद्ध्यांक असणाऱ्या लोकांची संघटना आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11200.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..922ed57240e313a6edefb4d1c0f954c617379f61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11200.txt @@ -0,0 +1 @@ +मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान हे कॅनडाच्या किंग सिटी शहरातील एक मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11216.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d3113d200335761fbbcfe61cdb7b026e59b2507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11216.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेमोरियल मैदान हे इंग्लंडच्या फिनचॅम्पस्टेड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२५ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11232.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dc0703e5b0db47adcfffabbbe53b5e7f58a9fc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11232.txt @@ -0,0 +1 @@ +इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11269.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4da26e7d7db3aa28ebad9045e9020de39b7c18a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11269.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरिदा हे मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०,३७७ होती तर महानगराची लोकसंख्या १०,३५,२३८ होती. वस्तीनुसार मेरिदा मेक्सिकोतील १२व्या क्रमांकाचे शहर आहे. +युकातान द्वीपकल्पावर मेक्सिकोच्या आखातापासून ३५ किमी आत असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५४२ मध्ये फ्रांसिस्को दि मॉंतेहो इ लेऑनने केली. त्याने स्पेनमधील मेरिदा शहराचे नाव नवीन शहरास दिले. त्याआधी आसपासच्या प्रदेशात इच्कांझिहू (पाच टेकड्यांचे शहर) नावाचे माया शहर वजा वस्ती होती. या शहरावर माया संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. येथे राहणाऱ्यांपैकी ६०% लोक स्वतःला मायांचे वंशज समजतात. याशिवाय येथे स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश आणि डच प्रभावही आढळून येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11288.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08b9223949f75b70f103c2ebcf074fd3fdf443cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11288.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारिलियर शॉट, मेरिलियर शॉट, पॅडल स्कूप किंवा रॅम्प शॉट हा क्रिकेट मधील फलंदाजाने चेंडू टोलविण्याचा प्रकार आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11301.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68b70a6b714e42c50b68055639c23b25a308190e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11301.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेरी ॲन इव्हान्स (जर्मन: Mary Anne Evans; २२ नोव्हेंबर १८१९ - २२ डिसेंबर १८८०) ही जॉर्ज इलियट ह्या कलमनावाने प्रसिद्ध असलेली एक ब्रिटिश लेखिका, पत्रकार व अनुवादकार होती. आपले लेखन तत्कालीन लोकांनी गांभीर्याने घ्यावे ह्या आशेने तिने पुरुषी कलमनाव धारण केले होते.१८७२ साली प्रकाशित झालेला तिचा मिडलमार्च ह्या नावाचा ग्रंथ जगातील सर्वोत्तम इंग्लिश भाषिक पुस्तकांपैकी एक मानला जातो. +पॅरिसमध्ये कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर १९२६ मध्ये ग्रीक राजनैतिक सेवेत त्याने प्रवेश केला. लंडनमध्ये व्हाइस कॉन्सल म्हणून त्याने आपल्या सेवेस प्रारंभ केला. लंडनमध्ये व्हाइस कॉन्सल म्हणून त्याने आपल्या सेवेस नंतर अल्बानियात त्याने कॉन्सल ह्या पदावर काम केले. दुसऱ्या महायुद्धात ग्रीस पराभूत झाल्यानंतर परागंदा ग्रीक सरकारमध्ये तो सामील झाला. युद्धोत्तर काळात त्याने लेबानन, सिरिया, जॉर्डन आणि इराक ह्या देशांत ग्रीक राजदूत म्हणून काम केले (१९५७ – ६२). १९६२ मध्ये त्याला त्याच्या काव्यलेखनासाठी विल्यम फॉयल पारितोषिक प्रदान करण्यात आले आणि १९६३ मध्ये तो साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला. हा बहुमान मिळविणारा तो पहिला ग्रीक साहित्यिक होय. निवृत्तीनंतर तो अथेन्समध्ये राहू लागला. आपला निवृत्तिकाल त्याने साहित्यनिर्मितीत घालवला.प्रारंभ केला.सेफेरीसच्या कवितेवर फ्रेंच प्रतीकवाद्यांचा-विशेषतः  पॉल व्हालेरी, आर्त्यूर रॅंबो  आणि लाफोर्ज ह्यांचा-प्रभाव होता. +फ्रान्समध्ये शिकत असताना ह्या कवींच्या कवितेत त्याला स्वारस्य निर्माण झाले होते. लंडनमधल्या वास्तव्यात टी. एस्. एलियट  ह्या श्रेष्ठ इंग्रज साहित्यिकाच्या साहित्याशी त्याचा परिचय झाला आणि त्याच्या कवितेला एक नवीन आयाम प्राप्त झाला. तसेच त्याच्या कवितेची मौलिकता प्रकर्षाने प्रकट झाली. ‘टर्निंग पॉइंट’ (१९३१, इं. शी.) हा त्याचा पहिलाच कवितासंग्रह ख्याती पावला. भविष्यवेधी कवी – – द पोएट ऑफ द फ्यूचर – म्हणून त्याची प्रशंसा झाली. प्रत्ययकारी प्रतीके, संयत शब्दकळा आणि यथार्थ प्रतिमा ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये, तोपर्यंतच्या ग्रीक कवितेत प्रस्थापित झालेल्या संकेतांपासून वेगळी होती. ‘द सिस्टर्न’ (१९३२, इं. शी.) ह्या त्याच्या दुसऱ्या काव्यसंग्रहातील कविता अत्यंत काटेकोर अभिव्यक्ती आणि भाषेच्या नादमयतेचा अभाव ह्यांमुळे शब्दांच्या आवाहक सामर्थ्याला पूर्ण वाव देतात. मिथ-हिस्टरी (१९३५, इं. शी.), लॉग बुक (१९४०, इं. शी.), एक्झरसाइज बुक (१९४०, इं. शी.), थ्रश (१९४७, इं. शी.) आणि थ्री सिक्रेट पोएम्स (१९६६, इं. शी.) हे त्याचे अन्य काही काव्यग्रंथ.  त्याच्या कवितांचे अनुवाद मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. एडमंड केली व फिलिप शेरार्द यांनी केलेले त्याच्या इंग्रजी अनुवादांचे संकलन जॉर्ज सेफेरीस : कंप्लिट पोएम्स  (१९९५) ह्या नावाने प्रसिद्ध आहे.अथेन्समध्ये तो निधन पावला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11308.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..612e86f8b51aee30012d2bc9066170cd4fa6a6bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11308.txt @@ -0,0 +1,6 @@ +मेरी एलायझा फुलरटन (१४ मे, १८६८ - २३ फेब्रुवारी, १९४६) ह्या ऑस्ट्रेलियन लेखिका होत्या. +फुलरटन ह्यांचा जन्म 14 मे 1868 रोजी ग्लेनमॅगी, व्हिक्टोरिया येथे झाला. [१] तिच्या आईने तिचे शिक्षण घरी आणि स्थानिक सरकारी शाळेत केले. शाळा सोडल्यानंतर ती विसाव्या वर्षी मेलबर्नला जाईपर्यंत तिच्या पालकांकडे राहिली. [२] +१८९० आणि १९०० च्या सुरुवातीपासून ती महिला मताधिकार चळवळीत सक्रिय होती. तिने पहिल्या महायुद्धादरम्यान स्त्रीवादी मुद्द्यांवर लेख लिहिले तसेच व्हिक्टोरियन प्रकाशनांसाठी भरतीच्या विरोधात युक्तिवाद केला. ती व्हिक्टोरियन सोशलिस्ट पार्टी आणि महिला राजकीय संघटना(वुमेन्स पॉलिटिकल असोसिएशन)ची सदस्य होती. [२] [१] +तिने १९१२मध्ये इंग्लंडला भेट दिली. १९२२ मध्ये ती तिच्या साथीदार मेबेल सिंगलटन सोबत तिथे राहायला गेली. [२] [३] +इंग्लंड मधील मॅरेसफील्ड येथे २३ फेब्रुवारी १९४६ रोजी फुलरटन यांचे निधन झाले. [२] +त्यांनी कधीकधी अल्पेनस्टॉक या टोपणनावाने मासिके आणि नियतकालिकांसाठी कथा, लेख आणि कडवे लिहिले. त्यांनी 1921 ते 1925 दरम्यान तीन कादंबऱ्या स्वतःच्या नावाने लिहिल्या. पण त्यांच्या मोल्स डू सो लिटल विथ देअर प्रायवसी आणि द वंडर आणि ऍपल,ह्या काव्यातील त्यांच्या शेवटच्या दोन कामांचे प्रकाशन, विद्यापीठात शिक्षण नसलेली एक स्त्री म्हणून त्यांच्याविरुद्ध पूर्वग्रह होण्याच्या भीतीने, ई टोपणनावाने प्रकाशित झाले. त्यांची मैत्रीण माइल्स फ्रँकलिनने त्यांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली होती. त्यांची लेखिका म्हणून ओळख त्यांच्या मृत्यूनंतर उघड झाली. [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11321.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc51543cc7cbac41dea1e17971c7947ff2d16701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11321.txt @@ -0,0 +1,5 @@ +मेरी क्लबवाला जाधव (१९०९-१९७५) या भारतीय समाजसेवी होत्या. +त्यांनी चेन्नई आणि भारतभर अनेक NGO स्थापन केल्या आणि देशातील सर्वात जुनी संघटित सामाजिक-कार्य संस्था स्थापन करण्याचे श्रेय तिला दिले जाते. त्यांची संघटना गिल्ड ऑफ सर्व्हिस ही अनाथाश्रम, महिला साक्षरता, अपंगांची काळजी आणि पुनर्वसन इत्यादींशी संबंधित अनेक अधिक गट चालवते.[१] +मेरीचा जन्म १९०९ मध्ये तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमधील ओटाकामुंड येथे रुस्तम पटेल आणि अल्लामाई यांच्या घरी झाला. हा परिवार मद्रास शहरातील ३०० सशक्त पारशी समुदायाचा भाग होता.[२] त्यांचे शालेय शिक्षण मद्रासमध्ये झाले आणि वयाच्या १८ व्या वर्षी नोगी क्लबवालाशी लग्न केले. १९३० मध्ये त्यांना खुसरो नावाचा मुलगा झाला. नोगी क्लबवाला यांचे १९३५ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांनी नंतर मेजर चंद्रकांत के जाधव, भारतीय लष्करी अधिकारी यांच्याशी पुनर्विवाह केला. जाधव पण सामाजिक कार्याच्या त्याच क्षेत्रात कार्यरत होते. [३] +१९४२ मध्ये, दुसरे महायुद्ध भडकत असताना, क्लबवाला यांनी भारतीय हॉस्पिटॅलिटी कमिटीची स्थापना केली ज्यात मुख्यतः गिल्ड ऑफ सर्व्हिसमधून आलेले सहाय्यक होते. मद्रास आणि आसपासच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय सैन्य तैनात होते आणि त्यांच्याकडे फार कमी सोयी होत्या. क्लबवाला यांनी सर्व समाजातील आणि समाजातील महिलांना कॅन्टीन, हॉस्पिटल आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रयत्नात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले. हॉस्पिटॅलिटी कमिटीने सुरू केलेल्या वॉर फंडाला जनतेने उदार हस्ते देणगी दिली ज्याने माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पुनर्वसन करण्यास मदत करून युद्धानंतर आपले प्रयत्न चालू ठेवले. विजयी १४ व्या सैन्याने मेरीला जबरदस्त प्रयत्नांचे कौतुक म्हणून जपानी तलवार दिली. क्लबवाला जनरल करिअप्पा यांनी "लष्कराचा डार्लिंग" म्हटले होते. त्यांनी १९५२ मध्ये मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क सुरू केले, जी दक्षिण भारतातील सामाजिक कार्याची पहिली शाळा आणि भारतातील दुसरी (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस- मुंबई नंतर). +१९५६ मध्ये श्री. आर.ई. कॅस्टेल यांच्या पाठोपाठ एक वर्षासाठी त्यांची मद्रासची शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.[४] त्यांनी १९६१ मध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्गचा सन्मान केला जे मद्रास दौऱ्यावर होते. [५] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11333.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38005e600b39f54f88b48a03b7bfdee6e515789a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11333.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरी मेरी (३० एप्रिल, इ.स. १६६२:सेंट जेम्स पॅलेस, लंडन, इंग्लंड - २८ डिसेंबर, इ.स. १६९४:केन्सिंग्टन पॅलेस, लंडन, इंग्लंड) ही इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होती. ही जेम्स दुसऱ्याची मुलगी होती. हिच्या राज्यकारभारावर तिचा पती विल्यम ऑफ ऑरेंजचा मोठा प्रभाव होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11339.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e7e19cff4906c8b45a896ba4ebceca50b593d16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11339.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरी पॅट्रिशिया मॅकअलीस (२७ जून, इ.स. १९५१:बेलफास्ट, उत्तर आयर्लंड - ) या आयर्लंडची आठवी राष्ट्राध्यक्ष होत्या. या ११ नोव्हेंबर, १९९७ ते १० नोव्हेंबर, २०११ दरम्यान सत्तेवर होत्या + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11341.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ef74fc15889f96491e61af38cfac28361ae1a3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11341.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेरी प्यारी बिंदू हा २०१७ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे, जो सुप्रोतीम सेनगुप्ता लिखित आणि अक्षय रॉय दिग्दर्शित आहे. यात परिणीती चोप्रा आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. +चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण मे २०१६ मध्ये कोलकाता येथे सुरू झाले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये संपले. हा चित्रपट १२ मे २०१७ रोजी प्रदर्शित झाला.[१][२] +या चित्रपटाचे एकूण १७९ दशलक्ष (US$३.९७ दशलक्ष) कलेक्शन होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11366.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10806538eceec9bf90a51b0b5a338b37ab56dfd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11366.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी व्हेरॉनिका वॉल्ड्रोन (५ मे, इ.स. १९८४:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. वॉल्ड्रोन आयर्लंडकडून फुटबॉलही खेळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11382.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fad745c08a94b9b9f0a2946fb764b33e43f4c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11382.txt @@ -0,0 +1,5 @@ +मेरीट योहान आरम (२२ एप्रिल, १९०३ - १९५६) ही नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ, उदारमतवादी राजकारणी, नागरी सेवक आणि स्त्रीवादी होती. +आरमचा जन्म २२ एप्रिल, १९०३[१] रोजी झाला. तिने रॉयल फ्रेडरिक विद्यापीठात शिक्षण घेतले आणि कॅंडीडेटा इकॉनॉमिक्स (उमेदवारी अर्थशास्त्र) पदवी १९२६ मध्ये प्राप्त केली. +आरम ही नॉर्वेजियन लेबर इन्स्पेक्शन अथॉरिटीमध्ये निरीक्षक होती. १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत नॉर्वेजियन सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिने काम केले. तिने १९५२ ते १९५३ मध्ये सहा महिने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे तज्ञ म्हणून काम केले.[२] +आरम १९५२ मध्ये नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्सची उपाध्यक्ष बनली. ऑगस्ट १९५५ मध्ये जेव्हा संस्थेचे अध्यक्ष, इंगेरिड ग्जोस्टीन रेसी याचे विमान अपघातात निधन झाले, तेव्हा मेरिट आरमने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. १९५६ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत[२] ती अध्यक्ष होती. +तिच्या राजकीय कारकिर्दीत, ती लिबरल पार्टीच्या ओस्लो शाखेची अध्यक्ष आणि ओस्लो सिटी कौन्सिलच्या सदस्य होती. १९५४ पासून तिच्या मृत्यूपर्यंत ती लिबरल पार्टीसाठी ओस्लोचे प्रतिनिधित्व करणाऱी नॉर्वेजियन संसदेची उपसदस्य होती.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1141.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3321b648dcec82c993c2d997e867cbcd2c0f4ec8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1141.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंजिल हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1144.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..002515e82eef1623a179713a94ed450a0bb58cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1144.txt @@ -0,0 +1 @@ +मंजिरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11466.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a8a1611bba298fd7cc8246a06b3e5880c7d5c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11466.txt @@ -0,0 +1 @@ +मेल्चियोर लूइयेन (६ जानेवारी, १९८२ - ) हा नेदरलँड्सचा हॉकी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11480.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40458cc421f70c489746a535006a57bd68a8e88a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11480.txt @@ -0,0 +1 @@ +मेळूकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11505.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cde2f6af1f7ca908e6d22449d07853b706759eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11505.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेसन काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेसन काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11519.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..991d103bc953fc0563f3d18a002fbcda4288b866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11519.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४६,७१२ होती.[१] ग्रँड जंक्शन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +मेसा काउंटीची रचना १८८३मध्ये झाली. या काउंटीमध्ये असलेल्या अनेक मेसांवरून (पठार) या काउंटीला नाव देण्यात आले आहे. यात ग्रँड मेसाचाही समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11534.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36e30d3ad94de020e2f4b8fe78f3841012467a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11534.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +मेसेज इन अ बॉटल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, चौदावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८२वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11537.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33c963720027fb5d079f011f82f77e8e92157af0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11537.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेसोअमेरिका हा अमेरिकेच्या मध्य भागातील प्रदेश आहे. +साधारणतः मेक्सिकोच्या दक्षिणेपासून कोलंबियाच्या उत्तरेपर्यंतचा भाग हा मेसोअमेरिका समजला जातो. सध्याच्या मेक्सिको, बेलीझ, ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा, उत्तर कॉस्ता रिका, पनामा आणि कोलंबिया देशांमध्ये हा प्रदेश पसरलेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1154.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1eb7e27be1cef4dc6af1d75b3df5a45f12a4ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1154.txt @@ -0,0 +1 @@ +मंजुळा तुळशीराम गावित मराठी राजकारणी आहेत. हे साक्री मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11560.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c49eb7d92f5d067936c0ea7799368f60f3770a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11560.txt @@ -0,0 +1,10 @@ + +अमर शेख ( ऑक्टोबर २०, १९१६ ते ऑगस्ट २९, १९६९) मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता.[१] +कॉम्रेड अमर शेख यांच्‍या राजकीय जीवनाची सुरुवात बार्शी येथून झाली. ते प्रथमतः बार्शीमध्‍ये असलेली राजण मिल गिरणीमध्‍ये कामगार होते.  तेथे सुरू असलेल्‍या आयटक या केंद्रिय कामगार संघटनेची शाखा त्‍या मिलमध्‍ये होती. त्‍या गिरणीसमोर होत असणारे लढे, गेट सभा, आंदोलने यामुळे प्रभावित होत, त्‍यांना डाव्‍या विचारांची आवड निर्माण झाली. कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर या कम्‍युनिस्‍ट नेत्‍याच्‍या मार्गदर्शनाखाली ते तेथील कामगारांना संघटित करू लागले पुढे ते भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाचेही सभासद झाले. त्यांनी बार्शीमध्‍ये शेतसारा वाढीविरुद्ध त्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्‍या नेतृत्‍वाखाली २५ हजारांचा मोर्चा काढला होता.  +संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इप्‍टा या डाव्‍या विचारांनी चालत असलेल्‍या सांस्‍कृतीक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्‍थापना केली होती.  यामध्‍ये कॉम्रेड अण्‍णा भाऊ साठे, शाहीर द. ना. गव्‍हाणकर यांची जबरदस्‍त साथ लाभली.  अमर शेखा यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली.[२] मार्‍क्सवादावर अढळ निष्‍ठा ठेवत संपूर्ण हयात भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षात त्‍यांनी काम केले. +गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७). स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला.[३]स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले.चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. +उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. ⇨ प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.[४] +कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. +स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. +चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. +लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे (२००७). मराठी कवी आणि लेखिका मल्लिका अमर शेख ह्या अमर शेख यांच्या कन्या होत. इंदापूर येथे त्यांचे अपघाती निधन झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11562.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86f172281bb35dcfc9b9549e26225a1f66eb8dbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11562.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मेहमूद अली हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11570.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1b40889e37bb2e57a7434a081629ad36099eef8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11570.txt @@ -0,0 +1 @@ +पाचवा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد خامس; २ नोव्हेंबर, इ.स. १८४४ - ३ जुलै, इ.स. १९१८) हे ऑट्टोमन साम्राज्याचा ३५वा सम्राट होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11583.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..500412584092d61759795175a5abe02565b46b5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11583.txt @@ -0,0 +1 @@ +मेहसाणा म्हैस ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झालेली म्हैस असून या जातीची शरीरवैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी ३००० लीटर दूध देतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11598.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c52cb88f5539a0163cd1a6acac2b66fe5401914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11598.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मेहेदी हसन मिराझ (२५ ऑक्टोबर, इ.स. १९९७:खुलना, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11605.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f1872cc3e3c4977ecc443d29cf2a00ab9135ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11605.txt @@ -0,0 +1,3 @@ +मैं आझाद हूॅं, हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11610.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1877f5d338adb29765b66f7789f4fd3430def3c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11610.txt @@ -0,0 +1,2 @@ +मैं इन्तकाम लूॅंगी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11622.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9dae89786e10928e1d770e7c91c82d169a3b573 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11622.txt @@ -0,0 +1,10 @@ +शाहरुख खान +सुष्मिता सेन +सुनील शेट्टी +अमृता राव + + +मैं हूँ ना हा २००४चा हिंदी-भाषेतील मसाला चित्रपट आहे, जो फराह खानने तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात लिहिला आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव आणि झायेद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राम शर्मा या भारतीय सैनिकावर चित्रपटाची कथा आहे. रामला एका कपटी सैनिकापासून जनरलच्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून गुप्तपणे पाठवले गेले आहे.[१] +2001 मध्ये चित्रपटाचे काम सुरू झाले. निर्मितीदरम्यान अनेक विलंबांचा सामना करावा लागला. तटस्थ दृष्टिकोनातून भारत-पाकिस्तान संघर्षाकडे जाण्यासाठी मैं हूं ना उल्लेखनीय आहे. सेंट पॉल स्कूल आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या राज्यात याचे चित्रीकरण करण्यात आले. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि वितरीत केलेला पहिला चित्रपट आहे. गौरी खानने चित्रपटाची निर्मिती केली. 30 एप्रिल 2004 रोजी जगभरात चित्रपट रिलीज झाला. +या चित्रपटाने त्याच्या थिएटरमध्ये अनेक बॉक्स-ऑफिस विक्रम प्रस्थापित केले. जगभरात ₹84 कोटी (US$11 दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून, 2004 मध्ये वीर-झारा नंतर हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. +चित्रपटाला 50 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 12 नामांकने मिळाली. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, फराह खानसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, शाहरुख खानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, झायेद खानसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि रावसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यांचा समावेश आहे. अनु मलिकला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1165.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b14abe5e0f571e22547325595772e818f6f61a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1165.txt @@ -0,0 +1,5 @@ +मंजुषा कुलकर्णी-पाटील (२ नोव्हेंबर १९७१ सांगली, महाराष्ट्र, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीतातील गायिका आहेत.[१][२] .त्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. +त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा होतीच,त्यामुळे त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले.[३] त्यांनी अखिल भारतीय बालगंधर्व संगीत महाविद्यालयातून संगीत विषयात मास्टर ऑफ आर्ट्स केले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे इचलकरंजी येथील गायक पं.द. वि. काणेबुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने १३ वर्षे [४] शिक्षण घेतले.[५][६] त्यांच्या निधनानंतर पाटील यांनी काही काल पं.नरेंद्र कणेकर आणि शुभदा पराडकर यांच्याकडे काही काळ संगीत शिक्षण घेतले.लग्नानंतर पुण्यात आल्यावर त्यांनी डॉ.विकास कशाळकर यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. सध्या त्या उल्हास कशाळकर यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत. +मंजुषा कुलकर्णी-पाटील त्यांच्या हिंदुस्तानी खयाल गायकीसाठी प्रसिद्ध आहेत.[७] त्यांनी १९९८ तसेच २००३ मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील 'उस्ताद रहमत खॉंसाहेब महोत्सव' अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच भारतातल्या आणि शिकागो, लंडन, सिंगापूर,मस्कत इ. परदेशातल्याही अनेक ठिकाणी आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत.[८] +त्यांनी आपले गुरू काणे बुवा यांच्या नावाने संगीताचार्य द.वि.काणे बुवा प्रतिष्ठानची स्थापना केली. सर्वसामान्यांपर्यंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पोहोचवणे, हा या संस्थेचा उद्देश आहे. +प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना युवा पुरस्कार तसेच शिष्यवृत्त्या देण्यात येतात. तसेच सांगली येथे गुरुकुल चालवले जाते.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11650.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9124f97710d3340c9c345d754a0ff6ada4bf3992 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11650.txt @@ -0,0 +1 @@ +मैत्रीण हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11661.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64677ddeea6b9908e8d68f749218017986fa780b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11661.txt @@ -0,0 +1,3 @@ +भावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळ:பாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जून १९८५,त्रिश्शुर,केरळ) +(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്‍) कार्तिका मेनन ही एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते. +ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11674.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0247a7a909b70c55f5b5336bbcab29ce1ef9975b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11674.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11687.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747f349508d205086e4f94f880f490df649977fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11687.txt @@ -0,0 +1 @@ +मैया ॲन मेरिआना लुईस (२० जून, १९७०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००५ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ७८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1169.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9f3ae0cc0cf08e5d03c9dc66fb3266a3bb75b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1169.txt @@ -0,0 +1 @@ +मंजू नाडगौडा (११ जुलै, १९७६:बेळगाव, कर्नाटक ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून एका एकदिवसीय सामन्यात खेळलेली खेळाडू आहे. [१] [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11725.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7719539eb9bb40f4608371b9d514cf8112a01eb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11725.txt @@ -0,0 +1 @@ +माँग माँग खा (बर्मी:မောင်မောင်ခ [màʊɰ̃ màʊɰ̃ kʰa̰]; ७ जून, १९२० - ३० एप्रिल, १९९५) हे म्यानमारचे पंतप्रधान होते. हे १९७७ ते १९८८ दरम्यान सत्तेवर होते diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11728.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71f073fe7425a69339cfc7a207f48584606a150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11728.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटाना (इंग्लिश: Montana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. माँटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे. +माँटानाच्या उत्तरेला कॅनडाचे आल्बर्टा व सास्काचेवान हे प्रांत, वायव्येला ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा तर दक्षिणेला वायोमिंग ही राज्ये आहेत. हेलेना ही मोंटानाची राजधानी असून बिलिंग्स हे सर्वात मोठे शहर आहे. +इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास मागे असते म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे आहे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11731.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad71882bc2c8c99b29c636d5e69b439eef203e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11731.txt @@ -0,0 +1,3 @@ +सुदांग्सु अबिनाश तथा मॉॅंटु बॅनर्जी. +जुलै ७, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11738.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9a6d983ef6db71ca37c58aaf75e6021062d0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11738.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 45°30′N 73°33′W / 45.500°N 73.550°W / 45.500; -73.550 + +माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे. +मॉन्ट्रियॉल शहर क्वूबेक प्रांताच्या नैर्ऋत्य भागात सेंट लॉरेन्स व ओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. +मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात. +माँत्रिऑल शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. माँत्रिऑल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो. +मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ माॅन्ट्रियॉलमध्ये आहे. +आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा मॉंत्रियाॅल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी. व डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात. +१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11750.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68eaf3d1b11420b5b14c244304519007fab2f60e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11750.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917 + +मॉंटगोमेरी (इंग्लिश: Montgomery) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या मॉंटगोमेरी शहराची लोकसंख्या २.०५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.७५ लाख इतकी आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11772.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45b92a1898eea9817eba9256918007d19f5098ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11772.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 25°40′N 100°18′W / 25.667°N 100.300°W / 25.667; -100.300 + +मॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. +औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१] +मॉंतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते. + +फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरे व तिग्रेस दिला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी मॉंतेरे हे एक होते. +मॉंतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11820.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2447eb1d7a8984eb44e7e350b50629b47e8007a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11820.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोनार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे. येथे ५४ ट्रेल्स[मराठी शब्द सुचवा] आहेत. पैकी स्कायवॉकर ही ट्रेल खंडीय विभाजनरेषेवरून जाते. याच्या डावीकडे अटलांटिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (आर्कान्सा नदी मार्गे) तर उजवीकडे पॅसिफिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (गनिसन नदी मार्गे) आहेत. +शेफी काउंटीमध्ये असलेले हे रिझॉर्ट सलायडा या गावाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11821.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2447eb1d7a8984eb44e7e350b50629b47e8007a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11821.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोनार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे. येथे ५४ ट्रेल्स[मराठी शब्द सुचवा] आहेत. पैकी स्कायवॉकर ही ट्रेल खंडीय विभाजनरेषेवरून जाते. याच्या डावीकडे अटलांटिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (आर्कान्सा नदी मार्गे) तर उजवीकडे पॅसिफिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (गनिसन नदी मार्गे) आहेत. +शेफी काउंटीमध्ये असलेले हे रिझॉर्ट सलायडा या गावाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11829.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71f073fe7425a69339cfc7a207f48584606a150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11829.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटाना (इंग्लिश: Montana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. माँटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे. +माँटानाच्या उत्तरेला कॅनडाचे आल्बर्टा व सास्काचेवान हे प्रांत, वायव्येला ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा तर दक्षिणेला वायोमिंग ही राज्ये आहेत. हेलेना ही मोंटानाची राजधानी असून बिलिंग्स हे सर्वात मोठे शहर आहे. +इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास मागे असते म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे आहे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11834.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52bcbdee7c7cf2d3e38e4e68fba6c2aba5f5d778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11834.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 18°28′N 77°55′W / 18.467°N 77.917°W / 18.467; -77.917 + +मॉंटेगो बे हे कॅरिबियनच्या जमैका देशातील एक शहर आहे. जमैका बेटाच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले व सुमारे ९६ हजार लोकसंख्या असलेले मॉंटेगो बे किंग्स्टन खालोखाल जमैकामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मॉंटेगो बे जमैकाच्या प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11841.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e31a8297fd1f39fb246c1bc2d38fc1eb0a17cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11841.txt @@ -0,0 +1 @@ +मॉन्युमेंट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एल पासो काउंटीमध्ये असलेले गाव आहे. हे गाव रॅम्पार्ट रेंज या डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे. मॉन्युमेंट पामर लेक आणि वूडमूर ही तीन गावे ट्राय-लेक परिसरम्हणूनही ओळखली जातात.हे शहर कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगर क्षेत्राचा एक भाग आहे. मॉन्युमेंटच्या पश्चिमेला पाइक नॅशनल फॉरेस्ट, दक्षिणेला कॉलोराडो स्प्रिंग्ज आणि युनायटेड स्टेट्स एर फोर्स अकॅडेमी, उत्तरेला बाल्ड माउंटन, ट्रू माउंटन आणि स्प्रूस माउंटन तर पूर्वेला ब्लॅक फॉरेस्ट आहेत. [१] या शहराची सुरुवात १८७२मध्ये रियो ग्रांदे रेल्वेमार्गाचा एक थांबा म्हणून झाली. [२] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १०,३९९ होती, [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11850.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5135b009c17d6d8736411301e114cb84e25b7f6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11850.txt @@ -0,0 +1,9 @@ +सुनील मनचंदा +मुकेश तलरेजा +नरेश अग्रवाल +श्रीदेवी + + +मॉम हा २०१७ मधील हिंदी भाषेतील गुन्हा-थ्रिलर चित्रपट आहे जो रवि उद्यावार दिग्दर्शित आहे.[१] याची निर्मिती सुनील मनचंदा, मुकेश तलरेजा, नरेश अग्रवाल आणि गौतम जैन यांनी केली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या श्रीदेवी आणि सजल अली यांच्यासह मुख्य भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना आणि अदनान सिद्दीकी समर्थक भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.[२] +तिच्या शाळेतील लुबाडलेल्या श्रीमंत विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तेव्हा आर्यचे आयुष्य बदलते आणि त्यांच्या घरातले दोघे मदत करतात. तिची सावत्र आई न्याय मिळवते आणि दोषींना धडा शिकवण्यासाठी एका गुप्त पोलिसांची मदत घेते.[३] +मॉम आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11855.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679b38c4fb7e5f8fbf691a531dca1b51b9e05b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11855.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11887.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..361b889e17da1574d5ad3fd2f255e3855502c781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11887.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉरिस स्टॅनली स्टॅन निकोल्स (ऑक्टोबर ६, इ.स. १९००:स्टॉंडन मॅसी, एसेक्स, इंग्लंड - जानेवारी २६, इ.स. १९६१:नूअर्क, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11896.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fd93dbc43d71ea54ddf4a6d53a66640e1e541e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11896.txt @@ -0,0 +1 @@ +लेफ्टनंट कर्नल मॉरिस वाइल्डर-नेलिगन, सीएमजी, डीएसओ आणि बार, डीसीएम (४ ऑक्टोबर, इ.स. १८८२ - १० जानेवारी, इ.स. १९२३), मॉरिस नेलिगन हे एक ऑस्ट्रेलियन सैनिक होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महायुद्धात १० व्या बटालियनचे नेत्रुत्व केले होते. ते युनायटेड किंग्डम मध्ये वाढले आणि शिकले. त्यांनी लंडनमधील रॉयल हॉर्स आर्टिलरीमध्ये थोड्या काळासाठी सैनिकाची भूमिका बजावली होती. नंतर त्याने ऑस्ट्रेलियाला प्रवास केला आणि तिथे क्विन्सलॅंडमध्ये काम केले. २० ऑगस्ट इ.स. १९१४ रोजी टाउन्सविले येथे त्यांनी ऑस्ट्रेलियन इंपिरियल फोर्स (एआयएफ) मध्ये खाजगी पायलट म्हणून काम केले. तिथे त्याने मौरिस वाइल्डर या नावाने काम केले आणि ऑकलंड, न्यू झीलंडला असे जन्मभूमीचे स्थान म्हणून दिले. ९व्या बटालियनमध्ये इ.स. १९१५ सालच्या गॅलिपोलीच्या जमिनीचा एक सार्जेंट, त्याला डिस्टिंग्विश्ड आचार पदक देऊन सन्मानित करण्यात आले, इतर शर्यतींनी शौर्य कृत्यांसाठी दुसरा सर्वोच्च पुरस्कार दिला. गॅलिपोली मोहिमेच्या समाप्तीपूर्वी तात्पुरत्या नेतृत्वाच्या पदापर्यंत ते त्वरित कार्यान्वित झाले. गॅलिपाली येथे आपल्या काळात तो एकदा जखमी झाला होता आणि औपचारिकरित्या त्याचे नाव वाइल्डर-नीलिगन असे बदलले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11903.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e45bf7d06863bb8ead757d6319630e0a4659852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11903.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉरिसन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लिटल फॉल्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,०१० इतकी होती.[२] +या काउंटीचा मोठा भाग कॅम्प रिप्ली सैन्यतळाने व्यापला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11908.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc84e2c66e7d6741239287b351b2be6b6ba10d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11908.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरीसियो आल्बेर्तो साबियॉन पेन्या (११ नोव्हेंबर, १९७८ - ) हा  होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11925.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..581df2cd6b6fdfaad5a198ad556b4d83b9782b02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11925.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्गन काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11941.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b1240c3e69b69dfa070b60525de248ebb25997 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11941.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +मॉर्टल कॉईल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, बारावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८०वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11974.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a64065632c9d3ffaeb981458231e594d8bc930 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11974.txt @@ -0,0 +1 @@ +मॉली मे पेनफोल्ड (१५ जून, २००१:लंडन, इंग्लंड - ) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11976.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb3defaad3d58de1bec2b7bd122490b89e24071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11976.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी इडिथ मॉली हाइड (२४ ऑक्टोबर, १९१३:शांघाय, चीन - १० सप्टेंबर, १९९५:सरे, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९५४ दरम्यान १५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11982.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a912428585b358142c78d1c6dd0c22d2908b964 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11982.txt @@ -0,0 +1,2 @@ +हॅलिकर्नासस येथील कबर किंवा समाधी किंवा मौसोलसची कबर ही इ.स.पू. ३५३ आणि ३५० च्या दरम्यान बांधलेली थडगी होती. हॅलिकर्नासस (सध्याचे बोडरम, तुर्की) येथे हे स्थीत होते. मौसोलस आणि त्याची पत्नी आर्टेमिसियाचे हे थडगे आहे. मौसोलस हा करियाचा होता व हखामनी साम्राज्यतील एक राज्यपाल होता. ग्रीक वास्तुविशारद सॅटीरोस आणि पायथियस ऑफ प्रीन यांनी ही रचना तयार केली होती. [१] [२][३] +थडग्या इंग्रजी शब्द "मौसोलीयम" हा आता जमिनीच्या वरच्या थडग्यासाठी सामान्यपणे वापरला जाऊ लागला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11985.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8adc3579c71739c800a298ce732d57c79260173d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11985.txt @@ -0,0 +1,15 @@ +गुणक: 55°45′N 37°37′E / 55.750°N 37.617°E / 55.750; 37.617 + +मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. +राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत. +मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे. +मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच यु‌एफा चॅंपियन्स लीगच्या २००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल. +रशियन प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये मॉस्को महानगरामधील पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, एफ.सी. डायनॅमो मॉस्को, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को व एफ.सी. स्पार्ताक मॉस्को हे चार क्लब खेळतात. +मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणाऱ्या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणाऱ्या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. तसेच मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वे ही रशियामधील सर्वात जुनी रेल्वे येथूनच सुरू होते. मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक व लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक ही मॉस्कोमधील प्रमुख स्थानके आहेत. +हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत. +जगातील खालील शहरांसोबत मॉस्कोचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. +[ संदर्भ हवा ] https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India +17. +[१] +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11988.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f9fe84ae57ce11c7f8b90b105c1a96c2dadd99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_11988.txt @@ -0,0 +1 @@ +शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Международный аэропорт Шереме́тьево) (आहसंवि: SVO, आप्रविको: UUEE) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी शेरेमेत्येवो एक आहे. दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या २९ किमी वायव्येस स्थित असलेला शेरेमेत्येवो विमानतळ ११ ऑगस्ट १९५९ रोजी बांधला गेला. एरोफ्लोत ह्या रशियामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच आहे. शेरेमेत्येवोमध्ये २ धावपट्ट्या व ६ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12004.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf5be7e3922ea7ee0d244caaf61d32b70476e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12004.txt @@ -0,0 +1 @@ +मॉहने नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे.या नदीवरील तयार झालेल्या जलाशयास मॉहने जलाशय म्हणतात.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12030.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d83363d2886d98d99b2f61352d642a5a28c15c3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12030.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुआन मोये (जन्म १७ फेब्रुवारी १९५५), जे मो यान या टोपण नावाने ओळखले जातात हे एक चीनी कादंबरीकार आणि लघु कथा लेखक आहे. अमेरिकी नियतकालिक टाइम चे डोनाल्ड मॉरिसन यांनी त्यांचा उल्लेख "सर्व चिनी लेखकांपैकी एक सर्वात प्रसिद्ध, अनेकदा प्रतिबंध घातलेला आणि मोठ्या प्रमाणावर वाड्:मयचौर्यने प्रभावित" लेखक आहे असा केला आहे.[१][२] त्यांची तुलना फ्रांत्स काफ्का किंवा जोसेफ हेलर सोबत केली जाते. २०१२ मध्ये, मो यांना लेखक म्हणून त्यांच्या कार्यासाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.[३][४][५] +ते पाश्चात्य वाचकांना त्यांच्या १९८६ मधील रेड सॉर्घम या कादंबरीसाठी ओळखले जातात. [६] यान यांना इटलीमध्‍ये २००५चा आंतरराष्‍ट्रीय नॉनिनो प्राईज मिळाले आहे. २००९ मध्ये, ते चीनी साहित्यासाठी ओक्लाहोमा विद्यापीठाच्या न्यूमन पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते.[७] +"मो यान" हे त्याचे उपनाम आहे ज्याचा चिनी भाषेत "बोलू नका" असा अर्थ होतो. यान यांनी प्रसंगी स्पष्ट केले आहे की हे नाव त्यांच्या आई-वडिलांच्या चेतावणीतून आले आहे जेव्हा १९५० च्या दशकात चीनच्या क्रांतिकारी राजकीय परिस्थितीमुळे, बाहेर असताना आपले मत कोणी बोलू नये. हे मो यानच्या लेखनाच्या विषयाशी देखील संबंधित आहे, जे चीनी राजकीय आणि लैंगिक इतिहासाचा पुनर्व्याख्या करतात. एका मुलाखतीत मो यान यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे "अधिकृत नाव" बदलून मो यान केले कारण त्यांना या नावाखाली रॉयल्टी रक्कम मिळू शकली नाही.[८] +मो यान यांनी चिनी भाषेत डझनभर लघुकथा आणि कादंबऱ्या प्रकाशित केल्या व आपल्या कारकिर्दीची लेखक म्हणून सुरुवात केली. सप्टेंबर १९८१ मध्ये प्रकाशित "फॉलिंग रेन ऑन अ स्प्रिंग नाईट" ही त्यांची पहिली प्रकाशित लघुकथा होती.[९] +रेड सॉर्घम ही कादंबरी १९८६ मध्ये विविध नियतकालिकांमध्ये पाच भागात प्रकाशित झाली होती. १९८७ मध्ये ही एक संपुर्ण कादंबरी म्हणून प्रकाशित झाली होती. ह्याचे पाच भाग होते: "रेड सॉर्घम", "सॉर्घम वाइन", "डॉग वेज्", "सॉर्घम फ्युनरल" आणि "स्ट्रेंज डेथ". ह्याच्या पहिल्या दोन भागांवर आधारित चिनी चित्रपटा रेड सॉर्घमला (१९८८) गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला आहे. [६] +त्यांची दुसरी कादंबरी, द गार्लिक बॅलाड्स ही एका सत्य कथेवर आधारित आहे जेव्हा गाओमी टाउनशिपमधील शेतकऱ्यांनी पीक खरेदी न करणाऱ्या सरकारविरोधात दंगल केली. त्यांची पुढिल कादंबरी रिपब्लिक ऑफ वाईन हे मद्यपानावर एक व्यंग आहे. अत्यंत विपुल, मो यान यांनी केवळ ४२ दिवसांत लाइफ अँड डेथ आर वेअरिंग मी आउट लिहिले. ही एका जमीनदाराच्या कथेबद्दलचे उपहासात्मक कथा आहे.[१०][११][१२] +मो यानच्या लेखनाचे भाषांतर हॉवर्ड गोल्डब्लॅट यांनी इंग्रजीत केले आहे. गोल्डब्टलॉटने प्रेक्षकांपर्यंत चीनी संस्कृती प्रभावीपणे प्रसारित केली आहे.[१३][१४][१५][१६] +मो यानची कामे प्रामुख्याने सामाजिक भाष्य आहेत आणि लू क्सुनच्या सामाजिक वास्तववादाचा आणि गॅब्रिएल गार्सिया मार्केझच्या जादुई वास्तववादाचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव आहे.[१७][१८][१९][२०] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12036.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1f640a8cedb472eb93bee16ce0bb891aa08029c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12036.txt @@ -0,0 +1 @@ +मंगोलियन ही अल्ताई भाषासमूहामधील एक भाषा मंगोलिया देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा चीनच्या आंतरिक मंगोलिया प्रांतामध्ये देखील अधिकृतपणे वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12052.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46b9c16dc36b9b7b0cbbe1c236abd30d53c2ae7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12052.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोॲब हे अमेरिकेच्या युटा राज्यातील गाव आहे. +ग्रॅंड काउंटीत कॉलोराडो नदीकाठी वसलेल्या या गावाची लोकसंख्या ४,७७९ (इ.स. २०००ची गणना) होती. +आर्चेस नॅशनल पार्क येथून जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12061.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7244dbbd61ccd5c1bb8e50ca7ee49184564949b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12061.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12065.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee2c0a2c839420003f243c61359949c568b888f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12065.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोईन-उल-हक स्टेडियम (पुर्वीचे राजेंद्रनगर स्टेडियम) हे भारताच्या पटना शहरातील एक मैदान आहे. +१७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला आणि १९७८ महिला क्रिकेट विश्वचषक आणि १९९६ क्रिकेट विश्वचषकाचे काही सामने येथे खेळविण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12066.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68d3f8037cd83ac8cc7dc01664323b5e45468b07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12066.txt @@ -0,0 +1 @@ +मोईन-उल-हसन अहमद ( मार्च ३, इ.स. १९५८-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12075.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ef8129d11c9745f414d16d7847c1bd8e1f1e62a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12075.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोकाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12084.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf3a76238036968e16afc231d9b1f21a66ea238b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12084.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख मोकोकचुंग जिल्ह्याविषयी आहे. मोकोकचुंग शहराविषयीचा लेख येथे आहे. +मोकोकचुंग हा भारताच्या नागालॅंड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मोकोकचुंग येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1209.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce5ce23688c2ea2b7a5962c6ea12c5311731bc01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1209.txt @@ -0,0 +1 @@ +मंड्या विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12120.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724c4479c232427c150a1c60f06c8c0bc492554a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12120.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोगराळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +अनभुलेवाडी, जाधववाडी, तोंडले, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12121.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01dc1a64bd2356ebf345dabdc0fc553914d787f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12121.txt @@ -0,0 +1,8 @@ +मोगरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.राष्ट्रीय महामार्ग ३ वरील मुंढेगाव या गाव जवळून या गावाला जाण्यासाठी रस्ता आहे. +मोगरे येथे म्हसोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे +92 टक्के कोळी महादेव समाज या गावात राहतो. +गावची लोकसंख्या ही २२५४ इतकी आहे . +मोगरे गाव हे दारणा नदीच्या काठी वसलेले आहे. +घोटी शहरापासून १६ किमी अंतरावर आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12142.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33fcdedf58f51c42c394d9c0f4c8843eef18564b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12142.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोघली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12147.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa7bc23a0dd16dacc9bb2132450711a14ede166a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12147.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोचेमाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12153.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49720a507e5ddf87c3cb4b430fa6c7ca22cc374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12153.txt @@ -0,0 +1,2 @@ +१७ ऑक्टोबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12169.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298e7a859870e39988113b3c82a5380a4704f41c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12169.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोझारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12171.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..386ec4f899097edd6b17d0a860b52dff1ed5af25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12171.txt @@ -0,0 +1,2 @@ +वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट (जर्मन: Wolfgang Amadeus Mozart; २७ जानेवारी १७५६ - ५ डिसेंबर १७९१) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. ऐतिहासिक संगीत पर्वामधील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामधील सर्वोत्तम मानल्या जातात. +पवित्र रोमन साम्राज्यातील सध्याच्या ऑस्ट्रियातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12186.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a547264c08ebedd01ca3799827ef9480ab7fea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12186.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोझिला फायरफॉक्स ३.६ ही फायरफॉक्स या आंतरजाल न्याहाळकाची आहे. +— मार्च २०१२ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12190.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b40dc77e079c4f8ba71dc3ba5630221864ed4e38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12190.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +मोझिला फायरफॉक्स ७ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती आहे. +— मार्च २०१२ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12195.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b39d3dde1e0d4f483f57d3de5ed4cf4c5c1ad6cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12195.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोझेल नदी तथा मोसेल नदी फ्रांस, लक्झेंबर्ग आणि जर्मनीमधून वाहणारी नदी आहे. ही नदी फ्रांसमधील व्होस्गेस पर्वतरांगेत उगम पावते व ५४५ किमी वाहत ऱ्हाइन नदीस डाव्या काठाकडून मिळते. +या नदीकाठी वाइन बनविण्याचे अनेक उद्योग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12198.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4324cfd25e21d8e34d6a03c404597c70052d7e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12198.txt @@ -0,0 +1 @@ +मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12213.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bccc81642fc20ae0d74a78dc189481671e552e0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12213.txt @@ -0,0 +1,11 @@ +मोटारवाहन, मोटार, मोटारकार किंवा कार हे एक चाके असणारे एक स्वयंचलित वाहन आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात. +जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स ह्याने १८८५ साली फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. +काही अनुमानांनुसार सध्या जगात सुमारे ६० कोटी मोटारवाहने अस्तित्वात आहेत.[१][२] +1908 मॉडेल टी ही फोर्ड मोटर कंपनीने बनवलेल्या अमेरिकन कारची सर्वसामान्यांना वापरण्यासारखी पहिली कार होती. अमेरिकेत मोटारींचा वेगाने अवलंब करण्यात आला, जिथे त्यांनी प्राण्यांनी ओढलेल्या गाड्याच्या बदल्यात स्वयंचलित गाड्या वापरायला सुरुवात केली. +१९०१ मध्ये रॅन्सम ओल्ड्सने परवडणाऱ्या मोटारींचे असेंबी-लाइन उत्पादन सुरू केले. मॅसेच्युसेट्सच्या स्प्रिंगफील्डमधील स्प्रिंगफील्ड आर्मोरी येथे १९२१ मध्ये थॉमस ब्लाँकार्ड यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि विनिमय करण्यायोग्य भागांची असेंब्ली लाइन शैली प्रस्थापित केली होती. हेन्री फोर्डने ही संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारली, १९१३ मध्ये हायलँड पार्क फोर्ड प्लांटमधील कारसाठी जगातील पहिल्या फिरत्या असेंब्ली लाइनला सुरुवात केली. +परिणामी कमी मनुष्यबळ वापरत असताना, फोर्डची उत्पादकता आठपट वाढली. हे इतके यशस्वी झाले, की उत्पादन हे नुसत्या रंग कामा मुळे अडून राहायला लागले. बनला. जपान ब्लॅक हा एकमेव रंग जलद रीतीने कोरडा होऊ शकत होता म्हणून इतर प्रकारचे रंग बंद करण्यात आले. म्हणून त्या काळात फोर्डची +any color as long as it's black ही जाहिरात प्रसिद्ध झाली. १९१४ मध्ये असेंब्ली लाइन कामगार चार महिन्यांच्या पगारासह मॉडेल टी खरेदी करू शकला. उच्च वेतन आणि उच्च कार्यक्षमतेच्या संयोगास "फोर्डिझम" असे म्हणले गेले. असेंब्ली लाइनमधून प्राप्त झालेल्या कार्यक्षमतेचा फायदा अमेरिकेच्या आर्थिक वाढीसह देखील झाला. +मोटार वाहन उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते, मागील वर्षाच्या तुलनेत ४ दशलक्ष कमी.[३] +अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. +जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे. +International Organization of Motor Vehicle Manufacturers diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1227.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50bb598da52385f448e0d748be999321322063ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1227.txt @@ -0,0 +1 @@ +मंथरा ही अयोध्येचा राजा राजा दशरथ याच्या कैकयी नावाच्या पत्‍नीची दासी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12278.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..276c830e26ab8ef182ef822cef72e96485d72521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12278.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +मोतगणहळ्ळी लक्ष्मीनरसु जयसिंहा ऊर्फ एम.एल. जयसिंहा (रोमन लिपी: Motganhalli Laxminarsu Jaisimha) (मार्च ३, इ.स. १९३९; सिकंदराबाद, आंध्र प्रदेश - जुलै ६, इ.स. १९९९; सिकंदराबाद, आंध्र प्रदेश) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12306.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..febd4ea83a1b6a0b6a8de47e01337e20cb81a09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12306.txt @@ -0,0 +1,8 @@ +मोत्सु-जी (毛越寺?) हे तेंडाई पंथाचे एक बौद्ध मंदिर आहे. ते जपानच्या दक्षिणेकडील इवाते प्रांतामधील हिराझुमी शहरात आहे. याच्या सभोवतालच्या ऐतिहासिक परिसरात दोन जुन्या मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदीरे एनरीयू-जी (圓隆寺?) आणि कशो-जी (嘉祥寺?) जोडो (शुद्ध जमीन) या बागेत आहेत. सध्याचे मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले होते. पूर्वी येथे असलेल्या प्राचीन मंदिर संरचनांशी त्याचा कोणताही संबंध नाही. जून २०११ मध्ये, मोत्सु-जीची "हिरायझुमीची ऐतिहासिक स्मारके आणि स्थळे" म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव दाखल करण्यात आले. +मोत्सु-जीची स्थापना ८५० मध्ये एनिन (जिकाकू दाईशी) याने केली होती. त्या वेळी, हे क्षेत्र यामातो जपान आणि उत्तर होन्शुच्या तोहोकू प्रदेशातील एमिशी यांच्या दरम्यानची सीमा होती. +१२व्या शतकाच्या मध्यात, फुजिवारा नो मोतोहिरा, उत्तरेकडील फुजिवाराचा दुसरा स्वामी, याने येथे एनरीयू-जी नावाचे मंदिर बांधले. मोतोहिराचे वडील फुजिवारा नो कियोहिरा य्याआणॅ ११२८ मध्ये मृत्यूपूर्वी या जागेवर पूर्वीचे एनरीयू-जी बांधले असण्याचीही शक्यता आहे. तसे असल्यास, असे मानले जाते की हे मूळ मंदिर मोतोहिरा आणि त्याचा भाऊ कोरेतसुने यांच्यातील उत्तराधिकाराच्या युद्धात पूर्ण झाल्यानंतर लगेचच आगीत भस्मसात झाले. स.न. ११५० च्या सुमारास मोतोहिराने बांधलेले मंदिर त्याच्या वडिलांच्या मंदिराची प्रत असल्यासारखे आहे. +मोतोहिरा चे एनरीयू-जी कोणत्याही मानकांनुसार प्रेक्षणीय आहे. मुख्य सभामंडपात याकुशी न्योराई, उपचाराचा बुद्ध, बारा दैवी सेनापतींच्या (जुनी शिन्शो) स्मारकात्मक पुतळ्यांसह अनेक सुंदर गोष्टी येथे दिसून येतात.अनकेईने स्फटिकाच्या डोळ्यांनी शिल्पित केलेली स्मारकीय मूर्ती आहे. त्यावेळचा हॉल स्वतःच चमकदार रंगवलेला होता आणि मौल्यवान लाकूड, सोने, चांदी आणि दागिन्यांनी सजवलेला होता. मुख्य सभामंडप इतर इमारतींनी वेढलेला होता ज्यात एक व्याख्यान हॉल, एक परिक्रमा हॉल, एक दुमजली दरवाजा, एक घंटा टॉवर आणि एक सूत्र भांडार यांचा समावेश आहे. मंदिराच्या नावाचे फलक फुजिवारा नो तदामिची (藤原忠通?) यांनी लिहिलेले होते आणि फुजिवारा नो नोरिनागा यांनी अलंकारिक कविता लिहिली होती. +मोत्सु-जीच्या ऐन उमेदीच्या काळात ४० इमारती आणि ध्यानासाठी ५०० सहाय्यक खोल्या होत्या. ज्यापैकी अनेकांच्या बांधकामात दुर्मिळ लाकूड आणि मौल्यवान साहित्य वापरले होते. ही पद्धत चुसन-जीच्या पद्धतीसारखीच होती. +उत्तर फुजिवारा वंशाच्या पडझडीनंतर, सर्व इमारती आगीमुळे नष्ट झाल्या. त्यानंतर स.न १२२६ पर्यंत एकतर नैसर्गिक कारणाने किंवा संघर्षामुळे हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त झाले.[१] +ईडो काळात मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. तथापि, सध्याच्या संरचना मूळ पायावर वसलेल्या नाहीत आणि मूळ इमारतींचे पुनर्बांधणी नाहीत. सध्याच्या मंदिराच्या इमारतींमध्ये याकुशी न्योराई आणि जोग्यो-डो ध्यानमंदिर असलेल्या होंडोचा समावेश आहे. ओइझुमी-गा-इके तलाव आणि आजूबाजूची जोडो(शुद्ध जमीन) बाग ८०० वर्षांपासून जतन केली गेली आहे. या बागेचा डिझायनर अज्ञात आहे, परंतु साकुतेकी (बागेच्या निर्मितीवर ११ व्या शतकातील ग्रंथ) स्पष्टपणे परिचित होता. बागेत दोन बेटांसह एक मोठा तलाव आहे.यातील आग्नेय किनाऱ्यावर एक द्वीपकल्प आणि दक्षिण किनाऱ्यावर तीन आहेत. तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर मूळ मुख्य सभामंडप, बेल टॉवर आणि सूत्र भांडाराचे अवशेष आहेत. मूळ बागेत, पुलांनी या हॉलला मध्य बेट आणि दक्षिणेचा मोठा दरवाजा जोडला होता. समुद्रकिनारा, द्वीपकल्प आणि खडबडीत पर्वत खडक असलेली किनारपट्टी समुद्रकिनाऱ्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. चेरीची झाडे, इरिसेस, कमळ, बुश क्लोव्हर आणि मॅपल्सची सुंदर लागवड आहेत. वर्षभर विविध उत्सव आयोजित केले जातात. +मोत्सु-जी हे निसर्गरम्य सौंदर्य असलेले एक खास ठिकाण आहे. एक विशेष राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ म्हणून नियुक्त केले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12357.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cdb23d52219b2216c7d1620453a384e865754e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12357.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोनिषा सिंग साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत रुपाली गांगुलीने मोनिषाची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एक उच्चवर्गीय कुटुंबाची कथा आहे.[१][२] +मोनिषा एक मध्यमवर्गीय मुलगी आहे. ती दिल्लीजवळच्या नोएडातील एका पंजाबी कुटूंबातील आहे आणि आता साराभाईंची सून आहे. ती क्वचितच घराची साफसफाई करते आणि टीव्हीवर नेहमी मालिका पाहत राहते. साहिलची बायको असलेल्या मोनिषाच्या मध्यमवर्गीय सवयी माया साराभाई, तिच्या सासूला खूप त्रासदायक असतात. ज्याच्यामुळे माया उच्चवर्गीय टोमणे मोनिषाला मारत राहते. हे टोमणे कार्यक्रमात विनोद प्रचंड प्रमाणात विनोद निर्माण करत राहतात. मायाचे वाक्य "It's so middle class!" प्रचंड गाजले.[३] आजही मायाचे हे वाक्य आणि इतर टोमणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात. मोनिषा हे नाव लोकप्रिय होण्यामागे मायाच्या हे टोमणेच कारणीभूत आहेत.[४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12360.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12360.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12377.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45b92a1898eea9817eba9256918007d19f5098ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12377.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 25°40′N 100°18′W / 25.667°N 100.300°W / 25.667; -100.300 + +मॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. +औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१] +मॉंतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते. + +फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरे व तिग्रेस दिला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी मॉंतेरे हे एक होते. +मॉंतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12380.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624fef3bb95ac202714339626bed65ab74612422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12380.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 6°18′48″N 10°48′5″W / 6.31333°N 10.80139°W / 6.31333; -10.80139 + +मोनरोव्हिया ही लायबेरिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12386.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5083e009e43d9a3b8bb5c6f600894c2f09480106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12386.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12387.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63a9303049cc79bb3e5fe6fa9a65c7a258bdd96a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12387.txt @@ -0,0 +1,6 @@ +निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा (इंग्रजी: फ्री-टू-एर (FTA) सेवा[मराठी शब्द सुचवा]) ही एक प्रकारची दूरचित्रवाणी आणि नभोवाणी (रेडिओ) सेवा असते जी कोणत्याही व्यक्तीला सदस्यत्व किंवा इतर खर्चाशिवाय कार्यक्रम पाहण्याची किंवा ऐकण्याची परवानगी देते. ही सेवा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये प्रसारित होत असून योग्य रिसीव्हिंग उपकरणांद्वारे, जे सिग्नल प्राप्त करण्यास सक्षम असतात, त्यांच्याद्वारे उपलब्ध करून दिली जाते. ही सेवा स्थलीय रेडिओ सिग्नलवर चालते आणि अँटेनाद्वारे प्राप्त केली जाते.[१] +निःशुल्क सेवा म्हणजे अशा वाहिन्या असतात ज्यांना त्यांची सदस्यता (इंग्रजी: subscription) अपेक्षित नसते; जरी या वाहिन्या दर्शक/श्रोता यांना दुसऱ्या वाहकाद्वारे वितरित केल्या जाऊ शकतात जिथे सदस्यता आवश्यक आहे, उदा., केबल टेलिव्हिजन, इंटरनेट किंवा उपग्रह. +प्रीमियम सबस्क्रिप्शन नसले तरीही तरीही काही भौगोलिक प्रदेशांमध्ये या वाहकांना निःशुल्क चॅनेल वितरीत करणे अनिवार्य केले जाऊ शकते, विशेषतः जेथे निःशुल्क चॅनेल आणीबाणीच्या प्रसारणासाठी वापरणे अपेक्षित आहे, जसे 1-1-2 (112) आपत्कालीन सेवा मोबाइल फोन ऑपरेटर आणि उत्पादकांनी प्रदान केली आहे. +दुसरीकडे, फ्री-टू-व्ह्यू (FTV) सामान्यतः सबस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध असते, परंतु ते डिजिटली एन्कोड केलेले असते आणि भौगोलिकदृष्ट्या प्रतिबंधित केले जाऊ शकते. फ्री-टू-एर अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रसारणासाठी वापरले जाते, ज्यामुळे ते शॉर्टवेव्ह रेडिओच्या समतुल्य व्हिडिओसारखे बनते. बहुतेक निःशुल्क दूरचित्रवाणीचे किरकोळ विक्रेते फ्री-टू-एर चॅनेल मार्गदर्शक आणि फ्री-टू-एर वापरासाठी उत्तर अमेरिकेत उपलब्ध सामग्रीची यादी करतात. +मुख्य लेख: डीडी फ्री डिश +दूरदर्शन हा भारतातील सार्वजनिक प्रसारक आहे. जो डीडी फ्री डिश ही मोफत दूरचित्रवाणी सेवा पुरवतो. यामध्ये सध्या ११६ टेलिव्हिजन चॅनेल विनामूल्य उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_124.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_124.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12409.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6382f3e2f63acc9dbfc99dcbb8614d89b3941001 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12409.txt @@ -0,0 +1,26 @@ +मोबिलैझिंग इंडिया:ओमेन मुसीक अंड मैग्रेसोन बिटवीन इंडिया अंड त्रिनिदाद हे तेजस्विनी निरांजना लिखित पुस्तक डीउक युनिवेरसीती यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या इतिहासाचा विचार वेगळ्या पद्धतीने करण्याकरिता हे पुस्तक उद्युक्त करते. विसर पडलेल्या व अवैध भारतीय म्हणवल्या गेलेल्या स्थलांतरित श्रमिकांच्या नजरेतून आधुनिक भारताच्या प्रस्थापित इतिहासाकडे बघत भारतातील आधुनिक सांस्कृतिक अस्मितांची पुर्नकल्पना हे पुस्तक करताना दिसते. +स्थलांतरित करारतत्त्वावरील श्रमिक कामगार भौगोलिकदृष्ट्याही भारतापासून अंतरावर असले तरी त्यांनी स्वतःचे वेगळेपण टिकवणे व स्वतःला सातत्याने 'भारतीय' म्हणवून घेणे हे आपल्या राष्ट्रवाद,हिंदू -मुस्लिम,जात- संस्कृती स्त्रीत्व- सार्वजनिक क्षेत्र याबद्दलच्या भारतीयपणाच्या ज्या निश्चित धारणा आहेत त्याला आव्हान देणारे कसे ठरते हे 'राष्ट्र' या संकल्पनेची चिकित्सा केलेली दिसते. राष्ट्राबाबतचा हा टीकात्मक दृष्टीकोन १९७०-१९८० या काळात,मार्क्सवादी- लेनिनवादी व स्त्रीचळवळीतून उभ्या राहिलेल्या जहाल राजकारणातून पुढे आलेला दिसतो. + +प्रस्तावनेमध्ये पुस्तकनिर्मितीची पार्श्वभूमी सांगताना लेखिका स्पष्ट करतात की, हे पुस्तक एका संशोधन प्रकल्पातून साकार झालेले आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, दक्षिण गोलार्धाकडून खूप काही शिकण्यासारखे नसते हे गृहीतक पक्के करूनच केवळ पहिल्या जगाकडे ज्ञानक्षेत्र म्हणून बघितले जाते. म्हणूनच बव्हंशी संशोधकांना पहिल्या जगाला संशोधनभेटी देण्याकरता अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. तेजस्विनी निरांजना या पुस्तकाच्या माध्यमातून या गृहीतकाची पुर्नचिकित्सा करतात व दक्षिण गोलार्धाच्या तुलनात्मक अभ्यास संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करतात. +पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये, कॅरीबिया मधील करारतत्त्वावर गेलेल्या व स्वतःला भारतीय म्हणवणाऱ्या श्रमिकांद्वारे 'subaltern diaspora' या संकल्पनेची ओळख लेखिका करून देतात. भारतामध्ये या कारारतत्त्वावरील कामाविरोधी जी राष्ट्रीय मोहीम उभी राहिली ती, श्रमिक महिलांच्या लैंगिकतेभोवती कशी फिरते याचा वेध दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. तर इतर प्रकरणांतून लेखिकेने तिच्या लोकप्रिय संगीताच्या लोकलेखा अभ्यासपद्धतीची मांडणी केलेली आहे. + +या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिण गोलार्धाच्या तुलनात्मक अभ्यासाकरिता एक संकल्पनात्मक अभ्यासचौकट देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. याकरिता त्यांनी साहित्य अभ्यास, स्त्रीवादी सिद्धांत, मानववंशशास्त्र,संगीतशास्त्र,चित्रपट अभ्यास या सर्व आंतरज्ञानशाखांशी संशोधन जोडलेले आहे. या पुस्तकाचा उद्देश केवळ भारतीय व कॅरीबियन ऐतिहासिक दुवे,साम्य व भिन्नत्व पाहणे हा नसून या दोन्ही वेगवेगळ्या स्थानांत एकमेकांच्या खुणा कश्या टिकून राहतात,जसे की, कॅरीबियनमध्ये 'भारतीयत्व' कसे वेगळेपण जपते हे पाहणे हा आहे. पाश्चात्य आधुनिकता हीच केवळ दक्षिण गोलार्धाची चिकित्सात्मक तुलना करण्याची वैध अभ्यासपद्धती आहे हे मिथक फोडण्याचा प्रयत्न निरांजना या पुस्तकाच्या माध्यमातून करू इच्छितात. +या पुस्तकाचे योगदान, विविध पुस्तकांमध्ये झालेल्या त्याच्या पुनरावलोकनाच्या आधारावर रेखाटता येईल. वेस्ट इंडीस विद्यापीठातील एका अभ्यासकाच्या मते, +"त्रिनिदादच्या लोकप्रिय संगीतात इस्ट इंडियनसची लैंगिकता व सांस्कृतिक ओळख कशा पद्धतीने दर्शवली गेली याचे यशस्वी व कौशल्यपूर्ण चित्रीकरण लेखिकेने केलेले आहे.' (जेरोम टीलुकसिंघ Archived 2016-02-20 at the Wayback Machine.) +जेरोमच्यामते सांस्कृतिक अध्यापनक्षेत्रात (Cultural Studies) नवीन विषयांवर अभ्यास करताना सदरचे पुस्तक उपयोगी ठरू शकते. त्याच धर्तीवर ‘केनेडीअन जरनल ऑफ लेटीन अमेरिका अंड कॅरीबियन स्टडीस (Canadian Journal of Latin America and Carribean Studies)’ मधील एक पुनरावलोकनार्थी मांडतात कि वैश्विक दक्षिणार्थाला तुलनात्मक सांस्कृतिक संशोधन करण्याचे आदर्श घालून देण्यास हे पुस्तक यशस्वी राहिलेले आहे. +या पुस्तकाचे पुनरावलोकन 'Ethnomusicology' या मासिकात करताना पुनरावलोकनार्थी ‘विदेशात राहणारे दक्षिण आशियातील लोकांवर(South Asian Diasporas)’ व ‘केरिबियन अध्यापनातील (Carribbean Studies)’ अभ्यासकांना हे पुस्तक सुचवतात. +मॅनुएलच्या मते लेखिकेनी सदरचा अभ्यास हा त्रिनिदाद मध्ये सखोल कार्यक्षेत्रातील काम व ग्रंथालयात केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले दिसते तसेच लेखिकेची समकालीन मानववंशशास्त्र व साहित्यातील सिद्धांकनावरची पकड सुद्धा या अभ्यासात प्रतिबिंबित होते. (मॅनुएल, २००९) +कंत्राटी कामगार +कॅरीबेअन अभ्यास +राष्ट्रवाद +जागतिक उत्तर/ +जागतिक दक्षिण +आंतर सांस्कृतिक अभ्यास +सबाल्टर्न अध्ययन +स्त्रीवादी सिद्धांकन +संगीत विद्या +Brereton Bridget, Canadian Journal of Latin American and Caribbean Studies, Vol. 33, No. 65, Special Issue on Human Security (2008), pp. 230-232 +Manuel Peter, Ethnomusicology, Vol. 53, No. 1 (WINTER 2009), pp. 144-146 +Teelucksingh Jerome, The University of the West Indies. +राष्ट्रवाद +स्त्रीवादी सिद्धांकन diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12427.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3322732b36bb12eb2fc2b0d13ed64b480b78fe5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12427.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोयणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12464.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef62517275b2612c616fcb3c2a5fe9a67dbd610f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12464.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12503.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0247a7a909b70c55f5b5336bbcab29ce1ef9975b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12503.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12515.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf632efbac3468e4e58298ccdaa6f5734227ec2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12515.txt @@ -0,0 +1 @@ +मोरादाबाद हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12529.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56bc5d25e70196914f6fab0252b43549daeef037 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12529.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरियोका हे जपानच्या इवाते प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती. +किताकामी, शिझुकुइशी आणि नाकात्सु नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12547.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..757ff13f8b36e6b53a129e0b4ad1039e4bc3e598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12547.txt @@ -0,0 +1,6 @@ +मोरेकुरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील व पालघर तालुक्यातले गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून हे गाव बोईसर राज्य मार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर ५ किमी अंतरावर आहे. +येथे मुख्यतः वंजारी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या स्थायिक झालेले आहेत. गावापासाच्या शेतांत खरीप हंगामात कोलम, तायचुंग, कोळपी, आयआर८ इत्यादी जातींचे भात पिकविले जाते. भातशेती करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रथम राब केला जातो.सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर शेतातील एका खाचरात भातबियांची पेरणी केली जाते. भाताचे रोप साधारण वीस ते पंचवीस दिवसानंतर मोठे झाल्यावर प्रत्येक खाचरात पावसाचे अथवा पाऊस कमी पडला तर मोटारपंपाद्वारे विहिरीचे पाणी साधारण अर्धा गुडघाभर साचवून भारतीय पद्धतीने अथवा जपानी पद्धतीने शेतीतील सर्व खाचरांत भातरोपांची लावणी ऊर्फ रोपणी केली जाते.काही वेळेस भाताची रोपे अपुरी पडल्यास ती अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन ती उर्वरित खाचरांत लावतात. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12557.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a61c1fcaef36b6ee046e82520ae4351d19d7c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12557.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12559.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e7a012c4ac1094bcc2cc2e07fcdc3d57e517d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12559.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12570.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c5e5668c921291f777dddb98cd4cc6470ddd24d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12570.txt @@ -0,0 +1,9 @@ +मोरेश्वर दीनानाथ सावे (१४ फेब्रुवारी, इ.स. १९३१:चिंचणी-ठाणे, महाराष्ट्र - १६ जुलै, इ.स. २०१५:औरंगाबाद, महाराष्ट्र) हे लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार होते. +मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्‍यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले. +हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी भूमिगत राहून सक्रिय सहभाग घेतला होता. +बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते. +मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता, असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वतः शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही असे अनेकांचे मत आहे.[ संदर्भ हवा ] +मोरेश्वर सावे यांचे औरंगाबादच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही मोलाचे योगदान राहिले. +सावे हे औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे, नादब्रह्म या सांस्कृतिक संघटनेचे आणि मराठवाडा सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएनचे अध्यक्ष होते. +सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते सवेरा उद्योगसमूहाचे अध्यक्ष होते. ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष तर १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते. +मोरेश्वर सावे यांच्या पत्‍नीचे नाव लीलावती. अनिल, अजित व आमदार अतुल सावे ही तीन मुले आणि अंजली ही त्यांची विवाहित कन्या होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12581.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0280e57835f919c56f94f31474faf026855c060e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12581.txt @@ -0,0 +1 @@ +मोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ (फिफा संकेत: MAR) हा पश्चिम आफ्रिकामधील मोरोक्को देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला मोरोक्को सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५३व्या स्थानावर आहे. मोरोक्को १९७० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा पात्र ठरला. त्यानंतर मोरोक्को अजून तीनदा विश्वचषक स्पर्धेत खेळला. हा देश १७६ च्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेचा विजेता होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_126.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90cbcd4cdef8ef7904bd0f4ac9a311b642d5b518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_126.txt @@ -0,0 +1 @@ +भीमराव केराम मराठी राजकारणी आहेत. हे किनवट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12609.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..060ebe57e8776e624138b31d674abb4b642c8a63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12609.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोर्दोविया प्रजासत्ताक (रशियन: Республика Мордовия) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12622.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75848322695f82939c1a70661579bb91c1319e44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12622.txt @@ -0,0 +1 @@ +येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च (इंग्लिश: The Church of Jesus Christ of Latter-day Saints; इतर नावे: मॉर्मन चर्च, एलडीएस चर्च) हा ख्रिस्ती धर्माच्या उपधर्मांपैकी एक आहे. ह्या धर्माची स्थापना १८३० साली जोसेफ स्मिथ, ज्युनियर ह्या धार्मिक पुढाऱ्याने अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यामध्ये केली. ह्या चर्चचे मुख्यालय युटाच्या सॉल्ट लेक सिटी ह्या शहरामध्ये असून जगभर त्याचे ५०,००० प्रचारक व १.४१ कोटी अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12635.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4486d2001265cc6c22d5ccc5a8695c473249a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12635.txt @@ -0,0 +1 @@ +मोलकलमुरू विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12665.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef16add771d7f7725b6251f0e8ae4f253c73e6e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12665.txt @@ -0,0 +1 @@ +मोल्दोव्हन ही मोल्दोव्हा देशाची राष्ट्रभाषा आहे. मोल्दोव्हन ही रोमेनियन भाषेसोबत पूर्णपणे समान आहे व केवळ राजकीय कारणांस्तव मोल्दोव्हन भाषा हे नाव वापरले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12671.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fecb0cc0a084bfd2266596cd461df4c0d8a29da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12671.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[१] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[२] +मोल्दोव्हाने २३ सप्टेंबर २००२ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्याची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली. सन् २०२२ पर्यंत, मोल्दोव्हाच्या जागतिक वारसा यादीत १ स्थान आहे व २ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12679.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b49906e2a3367f61789e525f5c6352c4a212295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12679.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोवर काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑस्टिन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,०२९ इतकी होती.[२] +ही काउंटी रॉचेस्टर नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12680.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b49906e2a3367f61789e525f5c6352c4a212295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12680.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोवर काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑस्टिन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,०२९ इतकी होती.[२] +ही काउंटी रॉचेस्टर नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12686.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980457dd3f91226255e6ac2894702864ace00811 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12686.txt @@ -0,0 +1,7 @@ +मोसे नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +मोसे नदी किंवा मोशी नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातली एक नदी आहे. या नदीवर वरसगाव येथे महाराष्ट्र सरकारने बांधलेले वरसगाव धरण (बाजी पासलकर धरण) आहे. हे धरण आंबी नदीवर असलेल्या पानशेत धरणाला अगदी लागून आहे.लवासा हा प्रकल्प मोसे नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. + + आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी  · नाग नदी  · नीरा नदी  · पवना नदी  · भामा नदी  · मांडवी नदी  · मीना नदी  · मुठा नदी  · मुळा नदी  · मोसी नदी  · वेळवंडी नदी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12687.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18534d307b94c2c7514a3c20aa425414cbcac3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12687.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोशे कात्साव्ह (हिब्रू:מֹשֶׁה קַצָּב; पर्शियन:موسى قصاب‎‎; ५ डिसेंबर, इ.स. १९४५:यझ्द, इराण - ) हे इस्रायेलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. यांचे मूळ नाव मुसा कसाब होते. +यांना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या स्त्रीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यापायी सात वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12705.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90e41d47b87a9bd82c36f3a77d71ca43f777078d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12705.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही मूठभर देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगद्व्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रुराष्ट्रे व इस्लामी दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला तारले आहे. मोसादच्या कारवायांनी मोठमोठ्या महासत्तांनाही हिसका दाखवला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12740.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2914816dc1038980ede6273e95a835a6ac8d8af5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12740.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12748.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0277791c04ac366aad85120611c99af90b032e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12748.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहजाबांदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12758.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12758.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12763.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59ef4143a3b18f21ad08c1ca08f271e33a00ad89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12763.txt @@ -0,0 +1 @@ +मोहन कुंडारिया ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12783.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3d7d421195859fbda082e9fff16111c87f9240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12783.txt @@ -0,0 +1,13 @@ +मोहन मधुकर भागवत (११ सप्टेंबर, इ.स. १९५० - हयात) सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत. ते आधुनिक विचाराचे असून त्यांना प्रगतिशील नेता समजले जाते. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत.[१]. +मूळच्या चंद्रपूरच्या असणाऱ्या भागवतांचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघात क्रियाशील असणाऱ्या एका कुटुंबात ११ सप्टेंबर, इ.स. १९५० रोजी झाला. .[१]. त्यांचे वडील मधुकर भागवत, हे आर.एस.एस.च्या चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष होते. त्या आधी त्यांनी गुजरातेत प्रांत प्रचारक म्हणूनही काम केले होते.[१].मधुकर भागवतांनी लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणले. +मोहन भागवतांचे एक भाऊ हे चंद्रपूर शहराच्या एका शाखेचे मुख्य आहेत. ३ भाऊ व १ बहिणींपैकी मोहन हा सर्वात मोठा आहे. +मोहन भागवतांचे प्राथमिक शिक्षण व कॉलेजचे प्रथम वर्षाचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले.त्यांनी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी (बी.व्ही.एस्‌सी.अँड डी.एच.) ही पदवी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठातून घेतली. +सन १९७५ मध्ये, देशाच्या तेंव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांनी लागू केलेल्या आणीबाणीमुळे, त्यांनी पशुवैद्यकातील पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ स्वयंसेवक झाले.[१]. +शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्पकाळ नोकरी केल्यावर,तसेच,आणीबाणीच्या काळात भूमिगत राहिल्यावर, ते इ.स. १९७७ मध्ये अकोला , महाराष्ट्र येथे प्रचारक म्हणून काम करू लागले. संघातील त्यांचे नेतृत्व नागपूर व विदर्भ विभागाचा प्रांत प्रचारक म्हणून उभारून आले.[१]. +संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाल्यानंतर पुढे प्रांत प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख यासारख्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ११ मार्च २०००ला त्यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून सलग ९ वर्षे ते या पदावर आहेत.[२] +सन १९९१ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह शारीरिक शिक्षण प्रमुख झाले. या पदावर त्यांनी इ.स. १९९९पर्यंत काम केले. त्या वर्षी त्यांना देशातील पूर्णवेळ शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून एका वर्षासाठी निवडले गेले.[१]. +इ.स. २००० मध्ये, जेंव्हा राजेद्र सिंग व एच.व्ही. शेषाद्रींनी अनुक्रमे सरसंघचालक व मुख्य सचिव या पदावरून तब्येतीच्या कारणास्तव पायउतार व्हायचे ठरविले, त्यावेळी के.एस.सुदर्शन यांना प्रमुख केले गेले व मोहन भागवत यांना मुख्य सचिव या पदावर तीन वर्षासाठी बढती मिळाली. इ.स. २००३ नंतर इ.स. २००६ मध्ये त्यांची त्याच पदावर पुनर्नेमणूक करण्यात आली.[१]. +मोहन भागवत हे इ.स. २००९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकझाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे. ते स्पष्टवक्ते, आशावादी व पक्षीय राजकारणांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दूर ठेवण्याची स्पष्ट दृष्टी असणारे असे समजले जातात. +[१] +भागवत यांचा हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न आहे.[३].त्यांनी, उच्च व जुन्या भारतीय मूल्यांवर संघाचा पाया मजबूत ठेवून बदलत्या काळासोबत जाण्यावर जोर दिला.[४].ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जुने समज व चालीरीतींना चिकटून असतो या प्रसिद्ध समजाविरुद्ध देशातील लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधुनिकता स्वीकारून त्यासोबत वाटचाल करीत आहे.[४]. +हिंदू समाजात असलेल्या जातींच्या असमानतेच्या प्रश्नावर भागवत यांनी 'अस्पृश्यतेस थारा नको' असे विधान केले आहे. ते असेही म्हणाले की, 'विविधतेत एकता' या तत्त्वावर आधारित असलेल्या हिंदू समाजाने स्वतःच्याच जातभाईंशी जातिभेद करण्याच्या पूर्वापारच्या प्रथेकडे लक्ष वेधून अश्या भेदभावपूर्ण प्रवृत्ती हटविण्यासाठी पुढाकार घ्यावयास हवा व याची सुरुवात प्रत्येक हिंदू घरातून व्हावयास हवी.[५]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12785.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c009329a8dd2d4a06e91ceffe130d328d577b3f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12785.txt @@ -0,0 +1 @@ +मोहन मांडवी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12787.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffe65abf4f7a65c87ce8a7591741313c608dc660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12787.txt @@ -0,0 +1,6 @@ +मोहन धारिया(जन्म : नाते, १४ फेब्रुवारी इ.स.१९२५ मृत्यु : पुणे, १४ ऑक्टोबर २०१३) हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते.त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडी्ल मूळचे गुजराथचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते. +मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील झाले.[१] +मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.सन १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी तयार व सादर केलेला 'धारिया कमिटी रिपोर्ट' हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचा अहवाल स्वीकारला गेला. त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. तत्त्वासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे धारिया हीकमेव मंत्री होते.[२] +खासदार असताना मोहन धारिया यांनी १९७०मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राजीव गांधी आणि चंद्रशेखरया पंतप्रधानांच्या आग्रहाखातर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. +मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते.[३] +[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12795.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d651f334172c9d2ffe1b0174a675eeca2e0740a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12795.txt @@ -0,0 +1,5 @@ +मोहन सिंग मेहता (१८९५-१९८६) [१] हे उदयपूर, राजस्थान, येथील विद्या भवन समूह आणि सेवा मंदिराचे संस्थापक होते. +त्यांचा जन्म २० एप्रिल १८९५ रोजी राजस्थानमधील भिलवाडा येथे जीवन सिंग मेहता यांच्या घरी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव हुलास कुमारी मेहता होते आणि त्यांना एक मुलगा होता, जगतसिंग मेहता, जो भारत सरकारमध्ये परराष्ट्र सचिव झाला. +मेहता यांनी १९१६ मध्ये आग्रा कॉलेज येथून बीए पदवी, १९१८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून एमए (अर्थशास्त्र), १९१९ मध्ये एलएलबी, आणि १९२७ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पीएच.डी. प्रदान केली. + +१९३१ मध्ये त्यांनी विद्या भवनची स्थापना केली.[२] १९६९ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1281.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..982c072605330bf64748f042245a57592c96c5f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1281.txt @@ -0,0 +1,4 @@ +मकरंद मधुकर अनासपुरे (२२ जून, इ.स. १९७३; छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. स. भु. महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर नाट्यशास्त्र विभागात होतो. +काही चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. ‘डॅबिस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती त्यांची आहे. +मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. +मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12814.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ef3cab4177c71ea3cd8d9ceee3311ef8f362146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12814.txt @@ -0,0 +1 @@ +मोहनलाल बाकलीवाल (नोव्हेंबर ४,इ.स. १९०१-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील दुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12840.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39ca8c9976a5830641d6ed5d58c3d08c8a7cec2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12840.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद बुदियाफ (२३ जून, इ.स. १९१९ - २३ जून, इ.स. १९९२) हा अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12847.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22f551cd27d07ba3ba53872e0c74c5718fca99b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12847.txt @@ -0,0 +1 @@ +मोहमेडन एस.सी. भारताच्या कोलकाता शहरातील फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12848.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd0bbdd829d30ff4c8fa084cc181839e14279e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12848.txt @@ -0,0 +1,20 @@ + +मुहमंद (५७० – ६३२) [२] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[३] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[२] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला: +वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[५]ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. [६] +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [७] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले. +मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले. +वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली. +मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला. +या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला. +मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला. +हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले. +सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले: +"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[८][९] +शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले. +पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११] +आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12856.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5027c0c236945cf78ce97931cc61692a603e944c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12856.txt @@ -0,0 +1,17 @@ + +१ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेट खेळाडू आहे. 1990च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.[१] 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ति किटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.[२] +अझरुद्दीन यांचा जन्म हैदराबादमध्ये मोहम्मद अजीझुद्दीन आणि युसूफ सुलताना यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी ऑल सेंट हायस्कूल, हैदराबाद येथे शिक्षण घेतले आणि निजाम कॉलेज, उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.[३] +31 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली.[४] अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 22 शतके केली, 45च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 37च्या सरासरीने 7 शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 झेल घेतले. ते 99 कसोटी सामने खेळले आहेत, श्रीलंकेविरुद्ध 199 सर्वाधिक धावा केल्या आहेत.[५] 300 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो पहिला खेळाडू ठरला. त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे (3).[६] +1989 मध्ये कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यापाठोपाठ अझरुद्दीन भारतीय संघाचे कर्णधार बनले. 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून टीमची धुरा सांभाळली, ते 2 सप्टेंबर 2014 रोजी एम.एस. धोनीने पार केला. कर्णधार म्हणून त्यांनी 14 कसोटी सामन्यांत विजय मिळवला, तो सौरव गांगुलीने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवून पार केला.[५] +2000 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनवर आरोप ठेवण्यात आला होता.[७] मग दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅंसी कॉनेंज याने सूचित केले की, अझरुद्दीनने त्याचा सट्टेबाजांशी परिचय करून दिला होता .[८] आयसीसी आणि बीसीसीआयने अझरूद्दीनवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अहवालावर आधारित जीवनभर बंदी घातली.[९] स्पॉट फिक्सिंगसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात येणारा तो पहिला खेळाडू होता. +8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष मोहोन्ता आणि कृष्णा मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने लादलेली बंदी मागे घेतली.[१०][११][१२] + +अझरुद्दीन हा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता. त्यांची फलंदाजी डौलदार फलंदाजीची शैली म्हणून ओळखली जाते. सेवानिवृत्त क्रिकेट खेळाडू वेंकटराघवन यांनी त्यांच्या या शैलीचे कौतुक केले आहे.[१३]19 फेब्रुवारी 2009 रोजी अझरुद्दीन औपचारिकपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले होते. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. +1986 मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१४] 1991 साली त्यांना विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. +1987 मध्ये अझरुद्दीनने नऊरीनशी विवाह केला होता. 1996 साली त्यांनी नऊरीनशी घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले.[१५] अझरचा बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा याच्या कथित संबंधामुळे संगीता बिजलानीशी 2010 साली घटस्फोट झाला.[१६][१७] त्यांचा मोठा मुलगा अयाजुद्दीन यांचे 2011 मध्ये एका अपघातात निधन झाले. +साचा:Indian Test Cricket Captains साचा:India ODI Cricket Captainsसाचा:India Squad 1992 Cricket World Cup +साचा:India Squad 1996 Cricket World Cup +साचा:India Squad 1998 ICC KnockOut Trophy diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12866.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d78ccd1c88de54216ada338350400417cc9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12866.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. +प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते. +१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12878.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b17a6f4f0d419acdd346a033c675da156e45df5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12878.txt @@ -0,0 +1 @@ +महंमद इद्रिस अली ( फेब्रुवारी १, इ.स. १९३२) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12892.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df889911210c3d3a4610ad14c1d6e2799e07ed41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12892.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक मराठी राजकारणी आहेत. हे मालेगाव मध्य मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. +या आधी ते जन सुराज्य शक्ती पक्षाकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12932.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81d88b3e42b5622278ce9af4005d3fce0a2a8552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12932.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद नयीम (२२ ऑगस्ट, १९९९:बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12944.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40aee2cfb1d6907c098ac0ca3c3b100ed14f198f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12944.txt @@ -0,0 +1,3 @@ +११ मार्च, १९६३ (वय ५२) +९ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12960.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d48a23896d967e6a8d68e6445bab60316619d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12960.txt @@ -0,0 +1 @@ +फुझुली (अरबी: فضولی; अझरबैजानी: Füzuli; इ.स. १४९४ - इ.स. १५५६) हा १०व्या शतकामधील एक मध्य युगीन कवी होता. ह्याचे खरे नाव मोहम्मद बिन सुलेमान असे होते. अझरबैजानी वाग्मयामध्ये फुझुलीचे योगदान अद्वितीय मानले जाते. ओस्मानी साम्राज्यामधील सर्वात लोकप्रिय साहित्यिकांपैकी एक असलेल्या फुझुलीने अझरबैजानी, अरबी व फारसी ह्या तीन भाषांमधून कविता लिहिल्या आहेत. काव्यासोबत फुझुलीचा गणित व खगोलशास्त्रामध्ये देखील अभ्यास होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12963.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e6d72ae8378fdc3c0645613cc7b183280845c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12963.txt @@ -0,0 +1,3 @@ +२१ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12972.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ec2a98556df80402812a7a9c3a1bebbc9c2772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12972.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद मोसादेक (फारसी: مُحَمَد مُصَدِق; १६ जून, इ.स. १८८२:तेहरान, इराण - ५ मार्च, इ.स. १९६७) हा १९५१ ते १९५३ दरम्यान इराण देशाचा पंतप्रधान होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील खनिज तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले ब्रिटनचे नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने अमेरिकेच्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. सी.आय.ए.ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा मोहम्मद रझा पेहलवीने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या इराणी क्रांतीपर्यंत पेहलवी राज्यपदावर होता. +मोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वतःच्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12973.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ec2a98556df80402812a7a9c3a1bebbc9c2772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12973.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद मोसादेक (फारसी: مُحَمَد مُصَدِق; १६ जून, इ.स. १८८२:तेहरान, इराण - ५ मार्च, इ.स. १९६७) हा १९५१ ते १९५३ दरम्यान इराण देशाचा पंतप्रधान होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील खनिज तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले ब्रिटनचे नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने अमेरिकेच्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. सी.आय.ए.ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा मोहम्मद रझा पेहलवीने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या इराणी क्रांतीपर्यंत पेहलवी राज्यपदावर होता. +मोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वतःच्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12978.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76c9e3c0e8f1684949a27ce99c764b0418689be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12978.txt @@ -0,0 +1,3 @@ +[मराठी शब्द सुचवा]Soraya Esfandiary-Bakhtiari (१९५१–१९५८) +फराह दिबा(१९५९-१९८०)(मृत्युपर्यंत) +मोहम्मद रझा शाहर पेहलवी (ऑक्टोबर २६, इ.स. १९१९ - जुलै २७, इ.स. १९८०) (पर्शियन: محمدرضا شاه پهلوی ; साचा:IPA-fa) हा इराणचा शहा होता. हा सप्टेंबर १६, इ.स. १९४१पासून फेब्रुवारी ११, इ.स. १९७९पर्यंत सत्तेवर होता. पेहलवी घराण्याचा हा दुसरा व शेवटचा राज्यकर्ता होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12996.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd683c12067ad332bc12f3bcf69be1bba1e224c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_12996.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद वसिम (२५ ऑगस्ट, २००१:पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13007.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade8904cc1fcb1d27ffc5a31dd2a4e57849a0f44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13007.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद सनवर होसेन (५ ऑगस्ट, १९७३ - ) हा  बांगलादेशकडून ९ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13015.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc1d667943c4a3e369c029599e288acbafd6d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13015.txt @@ -0,0 +1,4 @@ +१४ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.. +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13023.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc7ddd2e530376803be0f6ca85e229e5ad24f066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13023.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद हसनैन (५ एप्रिल, २०००:सिंध, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13028.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971c3ff012ecaa9560797a4e9af8d3d887789c75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13028.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहम्मद हिदायत उल्लाह (१७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२) हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते.[ चित्र हवे ] + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13031.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a17a7c0d79565946ece746476c865628dc34a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13031.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद हॅरीस (३० मार्च, २००१:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. हॅरिस सहसा यष्टिरक्षक म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13038.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e86b582c37203f7185a421343eb1e3e1e7e58458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13038.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13052.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0b73890bf7ed6ea679666e4e5c2a598ef57e0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13052.txt @@ -0,0 +1 @@ +मोहळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13069.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..647afacd34214be24963a0aca43281cbe1a08e5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13069.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहाडातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1307.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4efef0d0bd2f635fd30f07b896331edf16f7ca7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1307.txt @@ -0,0 +1 @@ +मकाजी मेघपर गुजरात मधील सौराष्ट्राच्या जामनगर जिल्ह्यातील कालावड तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची स्थापना इ.स. १७५४ मध्ये ध्रोल राज्याचे कुंवर मकनजी जाडेजा द्वारे केली गेली होती. येथील जनसंखेत मुख्यतः जाडेजा राजपुत आहेत, तसेच पटेल, ब्राह्मण आणि दलितांची वस्ती आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13122.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b580f5638410ec95145aab319f90a58f3acab14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13122.txt @@ -0,0 +1,5 @@ +नेवासे गावचे मध्यवस्तीत मोहिनीराजाचे भव्य मंदिर आहे. +मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्यशैली आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या मूर्ती दगडावर आहेत. मंदिर पूरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाईचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तर कडे आहे. प्रवेश द्वारावर भालदार, चोपदाराच्या मूर्ती असून सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता, भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली ४.५ फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजाची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते. शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे. +समुद्रमंथन झाले असता १४ रत्ने बाहेर आली. त्यापैकी अमृत हे एक होय. अमृताचे वाटपाचे काम देवांनी श्री विष्णूकडे सोपवले. श्री विष्णूनी मोहिनीचे (अर्धनारीनटेश्वर) रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरा यांचे वाटप युक्तीने केले. देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरासमोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांना सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. हे फक्त राहू व केतू या दानवांना लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले. मोहिनीरूप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. परंतु त्यांचे शीर अमर झाले. +श्री विष्णूने मोहिनीरूप घेऊन अमृताचे वाटप केले ते नेवासे येथे. म्हणून मोहिनीराजाचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे. +श्री मोहिनीराजाचा उत्सव माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमीपासून सुरू होतो. पौर्णिमेच्या दिवशी कुलार्म कुलाचार करतात. मंदिरात भागवत सप्ताह ही सुरू होतो व उत्सव पुढे पाच दिवस चालतो. या उत्सवात कीर्तन, गायन व भोजन असे कार्यक्रम होतात. उत्सवाची सांगता काल्याने होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13148.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cfad77c0a3c8a6482af527fa85835da9d4f978d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13148.txt @@ -0,0 +1 @@ +मोहोज केडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मोहोज केडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13150.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3ef95c6acc54aa4ecbb32750d2d86565a5cf1b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13150.txt @@ -0,0 +1 @@ +मोहोज बीके हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मोहोज बीके हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13154.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e1e4e522eeca82732ee6748d9cf0ecdb5201db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13154.txt @@ -0,0 +1,7 @@ +मोहोपे हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-कर्जत मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13185.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6dde6d304cb1a198b773818bb2f4f1e982bbd1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13185.txt @@ -0,0 +1,8 @@ + मौजेदापोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13194.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d07c2091b9a2384d041607b08ed426ee95cc3e93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13194.txt @@ -0,0 +1 @@ +मौदुद अहमद हे बांगलादेशचे सातवे पंतप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13201.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0c6c39ad87361896cf9282689713c114c4a010 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13201.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + +यास 'मोक्षदा एकादशी' असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13203.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c585d6d1d8a83804c521d96745b4169e33e429b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13203.txt @@ -0,0 +1 @@ +मौनो हेन्रिक कोइव्हिस्टो (फिनिश: Mauno Henrik Koivisto; २५ नोव्हेंबर १९२३, तुर्कू) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान आहे. तो १९६८-७० व १९७९-८२ दरम्यान दोन वेळा पंतप्रधान तर मार्च १९८२ ते मार्च १९९४ दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदांवर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13206.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be0a548c3e0659a816a1ad9aac303963168c81a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13206.txt @@ -0,0 +1 @@ +मौर हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13213.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951726d06a6778cb98c6c0b9b6c44d7bacc1825f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13213.txt @@ -0,0 +1,38 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती.[१] हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने सिकंदरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.[२] +५०,००,००० वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. नंतर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून घेतला. अशोकांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले. +चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले. +कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे. +या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी होती व हे साम्राज्य हे जगातील लोकसंख्येनुसार मोठे साम्राज्य होते.[३] +मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या शिक्षकाच्या मदतीने केली. आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला. मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करीत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली.[४] दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा इ.स.पू. ३२३ साली मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या साम्राज्यात फूट पडली व त्याच्या क्षत्रपांनी (प्रांतशासक) आपापली अनेक वेगवेगळी विखुरलेली राज्ये तयार केली. +ग्रीक सेनापती युडेमस व पिथोन यांनी इ.स.पू. ३१६ पर्यंत राज्य केले. नंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने (जो त्याचा आता सल्लागार होता) त्यांना पराभूत केले. मगधातील सत्तेच्या जोरावर त्याने एक मोठे साम्राज्य तयार केले.[५] +चंद्रगुप्ताचा उदय हा काहीसा विवादात्मक व रहस्यमय आहे. मुद्राराक्षस या काव्यात विशाखदत्ताने चंद्रगुप्त मौर्य हा नंदांचा नातलग असल्याचे लिहिले आहे. महापरिनिबाण सुत्त या प्राचीन बौद्ध धर्मग्रंथात एक मौर्य नावाच्या क्षत्रिय जमातीचा उल्लेख आहे. तरीही, ऐतिहासिक पुराव्यांविना अजून निष्कर्ष काढणे कठीण आहे. चंद्रगुप्ताचा ग्रीक लेखांत सॅंड्रोकोत्तोस म्हणून उल्लेख येतो. तरुणपणी तो अलेक्झांडरला भेटला असल्याचेही सांगण्यात येते. असेही सांगण्यात येते की तो नंद सम्राटाला भेटला व त्याने सम्राटाला नाराज केले व कशीबशी सुटका करून घेतली. चाणक्याचे मूळ ध्येय हे चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली लुटारू टोळी तयार करण्याचे होते. विशाखादत्ताचे मुद्राराक्षस व जैन ग्रंथ परिशिष्टपावन यांत चंद्रगुप्ताच्या हिमालयीन राजा पुरुषोत्तम तथा पोरस यांच्या मैत्रीसंबंधी उल्लेख आहेत. +चाणक्याने चंद्रगुप्त व त्याच्या सैन्यास मगध जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले. चंद्रगुप्ताने चातुर्याने मगध व आजूबाजूच्या प्रांतांमधून नंद राजावर नाराज झालेले तरुण लोक व लढण्यासाठीची साधने गोळा केली. त्याच्या सैन्यामध्ये तक्षशिलेचा भूतपूर्व सेनापती, चाणक्याचे इतर हुशार विद्यार्थी, काकायीच्या पोरस राजाचा मुलगा मलयकेतू व लहान राज्यांचे राज्यकर्ते होते. +पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने चंद्रगुप्ताने एक योजना आखली. युद्धाची घोषणा झाल्यावर मगधचे सैन्य मौर्य सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी शहरापासून लांब आले. दरम्यान मौर्याचे सेनापती व हेर यांनी मगधाच्या भ्रष्ट सेनापतीला लाच दिली, तसेच राज्यात यादवी युद्धाचे वातावरण निर्माण केले. या गोंधळात मगधाचा युवराज मृत्यू पावला. धनानंदाने शरणागती पत्करली व सत्ता चंद्रगुप्त मौर्याकडे देऊन तो अज्ञातवासात गेला. चंद्रगुप्ताने मगधाचा प्रधान राक्षस यास हे पटवून दिले की त्याची निष्ठा मगधावर राज्य करणाऱ्या नंद वंशावर नसून मगधावर होती. चंद्रगुप्ताने राक्षसाला हेही सांगितले की शहर व राज्य नष्ट होईल असे युद्ध तो होऊ देणार नाही. राक्षसाने चंद्रगुप्ताचा युक्तिवाद मान्य केला व चंद्रगुप्त अधिकृतरीत्या मगध सम्राट झाला. राक्षस हा चंद्रगुप्ताचा मुख्य सल्लागार झाला व चाणक्य मोठा राजनेता झाला. +अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा क्षत्रप सेल्युकस निकेटर याने साम्राज्याचा पूर्वेस असलेल्या भारतावर चढाई केली. चंद्रगुप्ताने त्याचा प्रतिकार केला. इ.स.पू. ३०५ मध्ये झालेल्या या लढाईत चंद्रगुप्ताने सेल्युकसचा पराभव केला. त्यानंतरच्या तहानुसार सेल्युकसच्या मुलीचा चंद्रगुप्ताबरोबर विवाह झाला. तर कंभोज-गांधार (पॅरोपॅमिसेड), कंदाहार (अराकोसिया) व बलुचिस्तान (जेड्रोसिया) हे प्रांत मौर्य अधिपत्याखाली आले. बदल्यात ५०० लढाऊ हत्ती चंद्रगुप्ताकडून सेल्युकसला मिळाले, ज्यांचा उपयोग त्याला इप्ससच्या लढाईत झाला. दोन्ही देशांत राजनैतिक संबंध दृढ झाले. मेगॅस्थनिस, डिमॅकस व डायोनिसस हे ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताच्या दरबारात राहत. +चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र येथे गुंतागुंतीच्या शासनव्यवस्थेसोबत शक्तिशाली व केंद्रीकृत प्रांत निर्माण केला. मॅगॅस्थनिसने लिहिल्याप्रमाणे, चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल अशी ६४ दरवाजे व ५७० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत पाटलीपुत्रभोवती बांधली होती. चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने दक्षिण भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्याच्या दरबारीही डिमॅकस हा ग्रीक राजदूत होता. +मेगॅस्थनिसने चंद्रगुप्ताच्या सत्तेतील मौर्य जनतेचे शिस्तप्रिय, साधी राहणी, प्रामाणिकता या गुणांचे तसेच निरक्षरतेचेही वर्णन केलेले आहे. +चंद्रगुप्ताचा मुलगा बिन्दुसार चंद्रगुप्तानंतर मौर्य सम्राटपदी आला. त्याच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा दक्षिणेत कर्नाटकमध्ये विस्तार झाला. त्याचा मृत्यू इ.स.पू. २७२ मध्ये झाला. +चंद्रगुप्ताचा नातू (बिन्दुसाराचा मुलगा) हा अशोकवर्धन मौर्य हा होता. तो इ.स.पू. २७३ ते इ.स.पू. २३२ इतका काळ मौर्य साम्राज्याचा सम्राट होता. +अशोक राजपुत्र असताना त्याने उज्जैन व तक्षशिला येथील बंडे मोडून काढली. राजा म्हणून तो महत्त्वाकांक्षी व आक्रमक होता. त्याने दक्षिण भारतात मौर्य राजवट पुनर्स्थापित केली. कलिंगचे युद्ध हा त्याच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा प्रसंग ठरला. घनघोर युद्धानंतर अशोकाने कलिंगच्या सैन्याचा पराभव केला. या युद्धात व नंतरच्या कत्तलीत अंदाजे १,००,००० सैनिक व नागरिक या युद्धात मरण पावले. त्यातील अंदजे १०,००० सैनकि मागधी तर इतर कलिंगदेशीय होते. हे पाहिल्यावर त्याला इतके घोर युद्ध करून लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा पश्चात्ताप झाला. कलिंग जिंकल्यावर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने हिंसा व युद्ध यांचा त्याग केला. +अशोकाने अहिंसेची तत्त्वे आपल्या राज्या अंमला आणली तसेच प्राण्यांची शिकार करणे तसेच गुलामगिरीची प्रथा बंद केली. त्यानुसार कलिंग युद्धातील पराभूतांना सक्तीने गुलाम केलेल्यांना मुक्ती दिली गेली. अशोकाने आपल्या प्रचंड व शक्तिशाली सैन्याचा उपयोग राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी केला. अशोकाने आशिया व युरोपीय राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवले तसेच त्याने तिथे बौद्ध विचारांचा प्रसार केला. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या राज्यात शांती, समृद्धी व सामंजस्य त्याच्या राज्यात नांदत होते. त्यामुळे तो भारतातील सर्वांत प्रसिद्ध राजांपैकी एक समजला जातो. तो भारतात अजूनही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. +दगडामध्ये कोरलेले अशोकाचे शिलालेख संपूर्ण भारतीय उपखंडात सापडतात. अतिपश्चिमेकडील अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे नेल्लोर जिल्ह्यातही ते आढळतात. या शिलालेखांवर अशोकाची धोरणे व कार्य लिहिले आहे. प्रामुख्याने हे शिलालेख प्राकृत भाषेत लिहले गेले आहेत, तरी दोन शिलालेख ग्रीकमध्ये तर एक ग्रीक व एक ॲरेमाइक भाषेमध्ये लिहला गेला आहे. ते असेही प्रमाणित करतात की अशोकाने भूमध्य समुद्राकडील ग्रीक राजांकडेसुद्धा आपले राजदूत पाठवले होते. त्यांच्यावर ग्रीक राजांची नावेदेखील कोरण्यात आली आहेत. अंतियोको (ॲंटियोकस), तुलामाया (टॉलेमी), अंतिकिनी (ॲंटिगोनस), मक (मॅगस), व अलिकासुन्दरो (अलेक्झांडर) यांची नावे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे शिलालेखांवर आली आहेत. त्यांच्या प्रदेशाचे (म्हणजेच ग्रीसचे) भारतापासूनचे अंतरही शिलालेखांवर अचूक म्हणजेच "६०० योजने दूर" (एक योजन म्हणजे सात मैल) असे लिहिले आहे (अंदाजे ४,००० मैल). +अशोकानंतर पन्नास वर्षे दुर्बळ सम्राटांचे राज्य होते. दक्षिणेकडे सातवाहन साम्राज्य व वायव्येकडे ग्रीक-बॅक्ट्रिया राजतंत्र या सत्तांच्या उदयामुळे मौर्य साम्राज्याचा विस्तार घटला. अखेरचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची हत्या त्याच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने ख्रि.पू. १८५ मध्ये एका लष्करी संचलनात केली व शुंग राजवंशाची स्थापना केली. +मौर्य साम्राज्य हे चार प्रांतात विभागले गेले होते. अशोकाच्या शिलालेखांच्या अनुसार प्रांतांची नावे तोसली (पूर्वेकडील), उज्जैन (पश्चिमेकडील), सुवर्णनगरी (दक्षिणेकडील) व तक्षशिला (उत्तरेकडील) ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा कुमार (राजपुत्र) असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांतावर राज्य करत असे. राजपुत्राला सहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावरदेखील असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट तर त्यास साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. +मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्याकाळचे सर्वांत मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ व ९,००० लढाऊ हत्ती होते. हेरगिरीचा विभाग अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने जरी युद्ध व विस्तारास आळा घातला तरी त्याने त्याचे सैन्य शांतता व सुरक्षितता यांसाठी कायम ठेवले. +मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली एकछत्री शासन आल्यामुळे अंतर्गत लढायांना आळ बसला व प्रथमच संपूर्ण भारताची अशी एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली. आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख तसेच आपापसातील अनेक युद्धे अशी परिस्थिती होती. मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देण्याच्या बोज्यातून मुक्त झाले. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्त्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर व उचित प्रणालीद्वारे कर घेतला जाई. +चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतभर एकच चलन स्थापित केले. त्याने भारतात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतीय नियंत्रकांचे व प्रशासकांचे जाळे निर्माण केले. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय खाजगी सैन्यांना पराभूत केले. फुटकळ जमीनदारांची राज्ये साम्राज्यात विलीन केली. मौर्य शासन कर गोळा करण्यात कडक असले तरी त्याचा खर्च अनेक सार्वजनिक कार्यांवर केला गेला. याच काळात भारतात अनेक कालवे तयार केले गेले. भारतात अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता व अंतर्गत सुरक्षा यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढला. +याचबरोबर मौर्य साम्राज्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासही प्रोत्साहन दिले. ग्रीक क्षत्रपांच्या राज्यांशी मैत्री करून त्यांच्याशी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळेही वाढविले. सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली. मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशीम, रेशमी कापड, कपडे तसेच मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात करी. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्याने हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले. अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा व इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने मौर्य साम्राज्यात उत्पादनक्षमता व आर्थिक हालचाल वाढली. +मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यासारखीच होती. दोन्ही साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. दोन्ही साम्राज्यांत सहकारी संस्थांसारख्या संस्था होत्या. +वरील १० देशांच्या कमी-अधिक भूभागांवर मौर्य साम्राज्य पसरलेले होते. +मौर्यकाळात आरंभी जैन धर्म साम्राज्याचा प्रमुख धर्म होता. पुढे सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा देशभर - जगभर प्रसार केला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. तसेच त्यांनी श्रीलंकेमध्ये आपला मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा यांना पाठवून तेथे बुद्ध धर्माचा प्रसार केला. तेथील राजा तिसा याने बुद्ध धर्माचा स्वीकार केला. अशोकाने पश्चिम आशिया, ग्रीस व आग्नेय आशिया येथे अनेक धर्मप्रसारक पाठवले. +अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या कारकिर्दीत त्याचे राज्य अशोकाच्या साम्राज्याहून खूपच लहान होते. तो बुद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता. +बृहद्रथाची हत्त्या इ.स.पू. १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यान त्याच्या मुख्य सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी शुंग साम्राज्याची स्थापना केली. "अशोकवदन" सारख्या बौद्ध ग्रंथात बृहद्रथाच्या मृत्यूमुळे व शुंगांच्या उदयामुळे हिंदू धर्माचे पुनरुत्थान व बौद्धांविरोधी लाट आली असे लिहिले आहे. सर जॉन मार्शल यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध धर्माविरोधीच्या लाटेला स्वतः पुष्यमित्र शुंगच कारणीभूत असावा, परंतु नंतरचे शुंग राजे बौद्ध धर्माला समर्थन करणारे होते हे लक्षात आले आहे. मात्र एटिने लॅमोते व रोमिला थापार तसेच इतर इतिहासकारांनी सांगितले आहे की बौद्ध धर्माला विरोध करण्यासंबंधी ऐतिहासिक पुरावा सापडत नसल्याने बौद्ध धर्मासंबंधीचा विरोध अतिशयोक्तीपूर्ण आहे. +मौर्यांचे साम्राज्य संपुष्टात आल्यावर खैबर खिंड असुरक्षित बनली व पुढील काळात तेथून परकीय आक्रमणे आली. ग्रीस-बॅक्ट्रियाचा राजा डिमेट्रियस याने या परिस्थितीचा फायदा घेऊन इ.स.पू. १८०च्या सुमारास दक्षिण अफगाणिस्तान व पाकिस्तान जिंकून घेतले. त्याने भारत-ग्रीक राज्य स्थापन केले. ग्रीकांनी पुढील शंभर वर्षांच्या कालखंडात मध्य भारतावर चढाई केली. या ग्रीक राजांच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म खूपच फोफावला तसेच राजा मिनॅंडर हा बौद्ध धर्मातील महत्त्वाची व्यक्ती बनला. परंतु या राजांचे राज्य कुठवर पसरले होते हे विवादात्मक आहे. नाणकशास्त्रात्मक पुराव्यांवरून लक्षात येते की त्यांचे राज्य ख्रिस्तजन्माच्या कालखंडापर्यंत शिल्लक होते. परंतु त्यांनी शुंग, सातवाहन व कलिंग अशा प्रबळ स्थानिक सत्तांसी केलेला संघर्ष संदिग्ध आहे. परंतु हे स्पष्ट आहे की शक (सिथियन) टोळ्यांनी इ.स.पू. ७०च्या सुमारास भारत-ग्रीक राज्याचा पराभव करून सिंधू नदीच्या आसपासचा प्रदेश, मथुराजवळील प्रदेश व गुजरात हे प्रदेश जिंकले. +सध्या मौर्यकाळातील वास्तूंचे अवशेष फारच तुरळक प्रमाणात सापडतात. १० मीटर उंची असलेल्या ८० स्तंभ असलेल्या मौर्यकालीन बहुस्तंभी मंडपाचे अवशेष पाटणा रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुम्राहर येथे सापडले आहेत. मौर्य राजधानीच्या जवळ असल्याने ह्यास खूप महत्त्व आहे. तिची शैली काही प्रमाणात इराणच्या हखामनी वास्तुशैलीसारखी आहे. +बराबार गुहा या मौर्यकालीन वास्तुशैलीचे अजून एक उत्तम उदाहरण आहेत. यातील लोमस ऋषी गुहेचा पुढील भाग महत्त्वाचा आहे. या गुहा मौर्यांनी बौद्धांमधील आजीविक संप्रदायांना देऊ केल्या होत्या. +अशोकाचे स्तंभ ह्या सर्वांत जास्त पसरलेल्या मौर्य वास्तू आहेत. बरेचसे स्तंभ सुंदरतेने सजवलेले आढळले आहेत. संपूर्ण भारतीय उपखंडात ते चाळीसहून अधिक सापडले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13235.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47ab48992a4110551e33805e0126dfe566a8c451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13235.txt @@ -0,0 +1,10 @@ +मौसमी चॅटर्जी (जन्म इंदिरा चट्टोपाध्याय ; २६ एप्रिल १९५२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. १९७० च्या दशकात त्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. +चॅटर्जी यांचा जन्म कोलकाता येथे एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला जो अविभक्त बंगालमधील बिक्रमपूर येथील होता. त्यांचे वडील प्रणतोष चट्टोपाध्याय हे भारतीय सैन्यात होते आणि आजोबा न्यायाधीश होते. त्याँचे खरे नाव इंदिरा आहे आणि मौसमी हे तिचे स्क्रीन-नाव आहे.[१] +तरुण वयात, इंदिरा चट्टोपाध्याय यांचा विवाह त्यांच्याच समाजातील आणि तत्सम कौटुंबिक पार्श्वभूमीतील गृहस्थ जयंता मुखर्जी यांच्याशी बंगाली पद्धतीने झाला. जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांचे पती जयंता मुखर्जी हे संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांचे पुत्र आहेत. जयंता हे रवींद्र संगीताचेही प्रवर्तक आहेत. पती आणि सासरच्या लोकांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने, इंदिराजींनी एका चित्रपटात अभिनयाचे काम स्वीकारले आणि स्क्रीन नाव म्हणून मौसमी घेतले. त्यामुळे तिच्या चित्रपट कारकिर्दीला लग्नानंतरच सुरुवात झाली.[२] तिची मुलगी पायल १३ डिसेंबर २०१९ रोजी ४५ व्या वर्षी मरण पावली.[३] +चॅटर्जीने तरुण मजुमदार दिग्दर्शित बंगाली बालिका बधू (१९६७) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[४] एका मुलाखतीत, मौसमी चॅटर्जीने उद्धृत केले: "बालिका बधू नंतर, मला बंगाली चित्रपटांचा पूर आला होता, परंतु मला माझे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. तथापि, चित्रपट माझ्या नशिबात होते म्हणून मी दहावीत शिकत असताना, माझी एक जवळची मावशी होती. तिची मृत्यूशय्येची आणि तिची शेवटची इच्छा मला लग्न करून पाहण्याची होती. म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लग्न केले." [४] त्यांना घरी इंदिरा म्हणून संबोधले जायचे. तिचे पालक आणि शेजारी हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी (बाबू) यांच्याशी लग्न झाले. "मी बाबूच्या प्रेमात पडले. माझ्या कुटुंबाबाहेरील माझ्या संपर्कात आलेला तो पहिला माणूस होता." [५] त्यानंतर त्या परिणीता, अनिंदिता या बंगाली चित्रपटांमध्ये दिसल्या. +१९७२ मध्ये शक्ती सामंता दिग्दर्शित अनुराग या हिंदी चित्रपटातून त्यांनी प्रमुख महिला म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट मोठा यशस्वी ठरला. त्यांनी एका आंधळ्या मुलीची भूमिका केली जी प्रेमात पडते, आणि सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळवले. अनुरागला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[४] +१९७३ मध्ये, त्यांनी शशी कपूरसोबत नैना, विनोद खन्नासोबत कुछ धागे आणि विनोद मेहरासोबत उस पार या चित्रपटात काम केले. १९७४ मध्ये, तिने थ्रिलर बेनाममध्ये तत्कालीन संघर्षशील अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि सस्पेन्स ड्रामा हमशकलमध्ये राजेश खन्ना सोबत काम केले. त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट १९७४ च्या शेवटी आला, जिथे मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकानमध्ये त्यांनी बलात्कार पीडितेची भूमिका केली होती. [६] त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळाले. +अनुराग, उस-पार, रफ्तार, उमर कैद, मजाक, जिंदगी आणि दो झूट यासह त्यांनी चित्रपटांमध्ये विनोद मेहरासोबत जोडी केली होती.[७] त्यांनी अमिताभ बच्चन सोबत बेनाम आणि बासू चॅटर्जी यांच्या मंझिल (१९७९) चित्रपटात काम केले. उत्तम कुमार सोबतचा तिचा बंगाली चित्रपट, ओगु बोधू सुंदरी १९८१ मध्ये प्रदर्शित झाला आणि यशस्वी झाला. १९८२ मध्ये, तिने मराठी चित्रपट भन्नट भानू मध्ये "तुम्ही अडकित्ता मी हो सुपारी" या गाण्यासाठी पाहुणी कलाकाराची भूमिका केली. राजेश खन्नासोबतच्या त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये भोला भला, प्रेम बंधन आणि घर परिवार यांचा समावेश होता. त्यांनी संजीव कुमारसोबत अंगूर, दासी आणि इतनी सी बातमध्ये काम केले. १९८५ मध्ये त्यांनी प्रतिज्ञा या बंगाली चित्रपटात काम केले. १९८५ नंतर, त्यांनी वतन के रखवाले, आग ही आग आणि घायाल सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. +१९८०-९० च्या दशकात त्यांनी आई आणि वहिनी च्या भूमिका साकारल्या जसे की घायल, घर परिवार आणि आ अब लौट चलें (१९९९). चॅटर्जीने तनुजा चंद्रा यांच्या जिंदगी रॉक्ससह सिनेमात पुनरागमन केले. त्यांनी २००३ मध्ये इंडो-कॅनडियन प्रोडक्शन बॉलीवूड/हॉलीवूड मध्ये काम केले. [७] + +चटर्जी यांनी २००४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.[८] २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13240.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ca184f94d168e764b562c1d44f51c57a1b86619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13240.txt @@ -0,0 +1 @@ +मौसोम धकाल (२७ जानेवारी, २००१ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13252.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34403dc84b367a87cb01e293d127bffbe37bdbb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13252.txt @@ -0,0 +1,6 @@ + +(Mg) (अणुक्रमांक १२) धातुरूप रासायनिक पदार्थ. पृथीवर मुबलक प्रमाणात (२.३%) आढळणारा धातू म्हणून मॅग्नेशियमची ओळख आहे. मेंदेलेयेवच्या आवर्त सारणीतील केवळ ६ घटकच मॅग्नेशियमपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. माणसाच्या शरीरातही मॅग्नेशियम असतेच, ६० कि. ग्रॅ. वजनाच्या माणासाच्या शरीरात सुमारे २५ ग्रॅ. इतके मॅग्नेशियम असते. +मॅग्नेशियम हा रुपेरी शुभ्र रंगाचा अगदी हलका धातू आहे. त्याचे वजन तांब्याच्या १/५ आहे तर लोखंड त्याच्यापेक्षा ४.५ पट आणि ऍल्युमिनियम १.५ पट अधिक वजनदार आहे. मॅग्नेशियमचा वितळणबिंदू ६५०° से. असला तरी ५५०° से. तपमान होताच त्यातून ज्वाला बाहेर पडायला लागतात. मॅग्नेशियममधून निघणारा हा प्रकाश डोळे दिपविणारा असतो म्हणून शोभेच्या दारूकामात मॅग्नेशियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मॅग्नेशियमला फक्त पेटलेली काडी लागली तरी त्याच्या ज्वलनास सुरुवात होते. केवळ ४ ग्रॅम मॅग्नेशियम इंधनातून बाहेर पडणारी उष्णता पेलाभर थंडगार पाणी उकळण्यास पुरेशी ठरते. हवेशी संपर्कात आल्यावर मॅग्नेशियम निस्तेज बनते, त्यावर ऑक्साईडचा पापुद्रा तयार होतो आणि पुढील ऑक्सिडीकरण थांबते. +मॅग्नेशियमचे उत्पादन दोन पद्धतीनुसार केले जाते. (१) विद्युतऔष्णिक पद्धतीने, (२) विद्युतविच्छेदनाद्वारे. पहिल्या पद्धतीत मॅग्नेशियम ऑक्साईडचे कार्बन, ऍल्युमिनियम इ. पदार्थांच्या सहाय्याने क्षपण केले जाते, तर दुसऱ्या पद्धतीत वितळलेल्या मॅग्नेशियम लवणाचे विद्युतविच्छेदन करून ९९.९९ % शुद्ध मॅग्नेशियम धातू मिळविला जातो. +लिथियम, बेरिलियम, कॅल्शियम, सेरियम, कॅडमियम, टायटॅनियम हे मॅग्नेशियमचे मित्र धातू असून यापैकी प्रत्येकासह मॅग्नेशियम मिळून मिसळून राहते. तर लोखंड, निकेल आणि सिलिकॉन यांच्याशी मॅग्नेशियमचे जमत नाही.औषधी क्षेत्रात मॅग्नेशियम विस्तृत प्रमाणात वापरले जाते. शुद्ध मॅग्नेशियम ऑक्साईड जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आम्लाच्या विषारी परिणामांवर वापरले जाते. मॅग्नेशियम पेरॉक्साईड हे उत्कृष्ट जंतुनाशक संयुग जठराच्या तक्रारींवर वापरता. जरदाळू, पेर, फुलकोबी यात नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतात. ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांच्या रक्तात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून येते म्हणून अशांना भाज्या, फळे, औषधांच्या माध्यमातून ते दिले जाते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांना मॅग्नेशियम दिल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. +औद्यगिक क्षेत्रातही मॅग्नेशियम खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. विविध यंत्रे, त्यांचे सुटे भाग, कॅमेरे, द्विनेत्री, पेट्रोल आणि इतर तेलवाहक टाक्या, रेल्वे डब्यांचे सांगाडे, अणुभट्ट्या, विमाने, अग्निबाण आदी सर्व ठिकाणी मॅग्नेशियम वापरलेले दिसून येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13268.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a32e9fac63df1c73dcf8977eff722cfc19de272 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13268.txt @@ -0,0 +1 @@ +क्यात हे म्यानमारचे अधिकृत चलन आहे. हे चलन इ.स. १८५२पासून वापरात असून त्याची सध्याची आवृत्ती इ.स. १९५२मध्ये बाजारात आणली गेली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1327.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb6dfa693f534cbabe02528c8e06adf2f262171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1327.txt @@ -0,0 +1 @@ +मखमल भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13286.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc3eb79732c25885eafb9cd4f2f48bf3690e5c5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13286.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 48°8′0″N 11°34′0″E / 48.13333°N 11.56667°E / 48.13333; 11.56667 + +म्युनिक अथवा म्युनशेन (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. बायर्न राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्प्सच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे वस्तूसंग्रहालय , विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्ल्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते. +म्युनिच हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीवरून दक्षिणेकडच्या आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात. +म्युनिचचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणाऱ्या बाष्पामुळे म्युनिचमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडीचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते. +म्युनशेन हे दक्षिण जर्मनीमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध वाहननिर्माण कंपनीचे म्युनिच हे माहेरघर आहे. याचे मुख्य कार्यालयाची इमारत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. +म्युनिच येथील तांत्रिक विद्यापीठ (टी.यू म्युनशेन) हे जर्मनीतील अग्रणी विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची गणना पहिल्या शंभर विद्यापीठांत होते. + जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच फुटबॉल हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. बायर्न म्युनशेन (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे. +फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रीडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहील. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलीस अधिकाऱ्यांचा म्रुत्यू झाला. +इतर + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1329.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..595d3ba2f7bfe846d2e4b9f14f6f177d6a1e0d9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1329.txt @@ -0,0 +1,2 @@ +मखराणा पाकिस्तान आणि इराणमधील एक वाळवंटी प्रदेश आहे. येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे. +या प्रदेशातील हिंगोल नदीच्या काठी हिंगलाज मातेचे मंदिर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. ५६ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिंगलाज माता भावसार समाजाचे कुलदैवत मानले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13304.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c007ec5904971313bda2280c9a24466c2e109e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13304.txt @@ -0,0 +1,12 @@ +मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते. +मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात. +मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले. +मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. +ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१] +दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर्ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो. +पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे. +सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो. +सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते. +'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे. +एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो. +मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13313.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17efe9fa465c780b87d5bb9c8c13db2944cae918 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13313.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. +म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी' आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो.[१]'म्हण' शब्द समूहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्थापेक्षा निराळा असू शकतो. या शिवाय गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात. +मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ +(गोत >गोत्र> कूळ >आपली माणसे ) +(मराठी म्हणींची यादी विकीकोट सहप्रकल्पात पहावी.) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13325.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06aa619ae4631e2b9043d794341bd27e7e8df3d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13325.txt @@ -0,0 +1,2 @@ + म्हसाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1334.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecebf7ecabc5220711c43ca5d2289759a987e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1334.txt @@ -0,0 +1,5 @@ +५ जानेवारी, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +साचा:वॉरियर्स क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13344.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dde5da3269984f03f761ca1a27a592fc0087e860 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13344.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हारळ खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13375.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d871ced48b13481e95e7a736fae2b249b890305 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13375.txt @@ -0,0 +1 @@ +म्हासळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13377.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2e1a213c5b2a744263d961004b1cbaccbab54d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13377.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हासवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13381.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5deba6d1a6c5980b39c23a2f0cb6145cedc413be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13381.txt @@ -0,0 +1 @@ +म्हासेपठार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13398.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b4e3077ff263148d493a8acd7897c69e2b8622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13398.txt @@ -0,0 +1,2 @@ + म्हैसमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13439.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c73c428da1ba223316a2cf94a07a8d1c30d2816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13439.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशवंत दिनकर फडके (साधारणपणे यदि म्हणून ओळखले जाणारे) (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; - ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. +फडक्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरिभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. हे शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून त्यांनी लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी १९५१ साली बी.ए. व १९५३ साली एम्‌.ए. या पदव्या मिळाल्या. पुढे १९७३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पीएच्‌.डी.धारक झाले. +१९७० ते १९९७ ह्या थोड्या-अधिक कालखंडात यदिंनी खेळलेल्या काही वादांचे संकलन पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहे. त्या पुस्तकातील वाद वैचारिक आहेत. ते खेळणाऱ्या व्यक्ती विद्याव्यासंगी आहेत. फक्त त्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. वाद हे भारतीय संस्कृतीला नवीन नाहीत. द्वैत, द्वैताद्वैत, चार्वाक इत्यादी वाद पूर्वी खेळले गेले. साहित्यिक वादही खेळले गेले. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले वाद नित्य खेळले जात असतातच. वाचन व व्यासंग यामुळेच या वादांत भाग घेणाऱ्या व्यक्ती एकमेकांसमोर ठाकल्या. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. मात्र विचारांचा मुकाबला विचारानेच करायचा हा विचार यामध्ये ठाम दिसून येतो. डॉ. अरुण टिकेकरांनी हंटरवाले फडके हे मार्मिक विशेषण यदिंसाठी वापरले आहे. या वादात उत्तरे प्रत्युत्तरे झडली. कधी लिहिणाऱ्यांचा तोल गेला. मात्र त्यांतून त्या त्या विषयाचे भिन्न पैलू जसे समोर आले तसेच वाद खेळणाऱ्यांचे वादकौशल्यही प्रकट झाले. 'वाद प्रतिवाद-य.दि. फडके' हे वेगळ्या पठडीतले पुस्तक या संकलनातून सिद्ध झाले आहे.पुस्तकाचे संपादन डाॅ. वासंती फडके यांनी केले आहे. प्रकाशक - अक्षर प्रकाशन. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13456.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69e3b7deb68071791c6efa64d7030285b05d3760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13456.txt @@ -0,0 +1,22 @@ +यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे. यामध्ये आकडेवारी आणि माहितीपासून शिकणाऱ्या प्रणाली तयार केल्या जातात आणि अशा प्रणालींचा अभ्यास केला जातो. उदा. अशी प्रणाली इन्बॉक्समध्ये येणाऱ्या ईमेल कचरा आणि महत्त्वाच्या ईमेलमध्ये वर्गीकृत करू शकते. +यंत्र शिक्षण हे संगणक विज्ञानाचे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये अल्गोरिदम आणि मॉडेल्सचा विकास समाविष्ट आहे जे संगणकांना डेटावरून शिकू देतात आणि त्या शिक्षणावर आधारित अंदाज किंवा निर्णय घेऊ शकतात. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उपसंच आहे जो डेटाच्या आधारे शिकू शकणाऱ्या आणि निर्णय किंवा भविष्यवाणी करू शकणाऱ्या प्रणालींच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. +यंत्र शिक्षण अल्गोरिदमचे अनेक प्रकार आहेत, ज्यात पर्यवेक्षित शिक्षण, पर्यवेक्षित शिक्षण, अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण आणि मजबुतीकरण शिक्षण समाविष्ट आहे +पर्यवेक्षित शिक्षण +पर्यवेक्षित शिक्षणामध्ये, अल्गोरिदम लेबल केलेल्या डेटावर प्रशिक्षित केले जाते, याचा अर्थ डेटा आधीपासूनच वर्गीकृत किंवा योग्य उत्तरासह लेबल केलेला आहे. नवीन, लेबल नसलेल्या डेटावर अंदाज लावण्यासाठी अल्गोरिदम नंतर या लेबल केलेल्या डेटावरून शिकतो. +पर्यवेक्षण न केलेले शिक्षण +पर्यवेक्षित नसलेल्या शिक्षणामध्ये, अल्गोरिदमला लेबल न केलेल्या डेटावर प्रशिक्षण दिले जाते आणि त्याला स्वतःच डेटामध्ये नमुने किंवा संबंध शोधणे आवश्यक आहे. +अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण +अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण हे पर्यवेक्षित आणि पर्यवेक्षित शिक्षणाचे संयोजन आहे, जेथे काही डेटा लेबल केला जातो आणि काही नाही. +मजबुतीकरण शिक्षण +मजबुतीकरण शिक्षणामध्ये, अल्गोरिदम वातावरणाशी संवाद साधून आणि बक्षिसे किंवा शिक्षेच्या स्वरूपात अभिप्राय प्राप्त करून शिकते. +यंत्र शिक्षण मॉडेल्स +यंत्र शिक्षण मॉडेलचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता. येथे काही सर्वात सामान्य प्रकारचे यंत्र शिक्षण (मशीन लर्निंग) मॉडेल आहेत: +रेखीय प्रतिगमन: +सतत मूल्यांचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिगमन विश्लेषणाचा एक प्रकार. यामध्ये इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्सच्या सेटमध्ये एक रेखीय समीकरण बसवणे समाविष्ट आहे. +लॉजिस्टिक रिग्रेशन: +बायनरी परिणामांचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिगमन विश्लेषणाचा एक प्रकार. यात इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्सच्या संचामध्ये लॉजिस्टिक फंक्शन फिट करणे समाविष्ट आहे. +निर्णय झाडे: +वर्गीकरण आणि प्रतिगमन समस्यांसाठी वापरलेले पर्यवेक्षी शिक्षण अल्गोरिदमचा एक प्रकार. यामध्ये इनपुट डेटाला झाडासारख्या संरचनेत विभाजित करणे समाविष्ट आहे, जेथे प्रत्येक नोड एक किंवा अधिक इनपुट व्हेरिएबल्सवर आधारित निर्णय दर्शवतो. +यादृच्छिक जंगले: +अचूकता सुधारण्यासाठी आणि ओव्हरफिटिंग कमी करण्यासाठी एकापेक्षा जास्त निर्णय झाडे एकत्रित करणारी एकत्रित शिक्षण पद्धत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13470.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23182c82623c8d03ce9a0e181b4c7c390cec3bf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13470.txt @@ -0,0 +1,26 @@ + +यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले. +यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत - शुक्ल संहिता व कृष्ण संहिता.दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मणग्रंंथातील गद्य भाग दिले आहेत, तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत. [१] +शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. +शुक्ल यजुर्वेदाच्या 'वाजसनेयी संहिता' म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत. +वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, काण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध आहे.. +जगदगुरू आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, काण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरूंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबिली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,काण्व शाखीय वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, 'बृहदारण्यक'हेहा सर्व उपनिषदांत आकाराने सर्वात मोठे आहे. ईशोपनिषदालाच ईशावास्य उपनिषद असेही म्हटले जाते. +वाजसनेयी संहितेत,खालील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे - +अध्याय- +'वाजसेनीय संहिते'चे संपादन व प्रकाशन 'वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि इंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले. +कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत. +प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रातिशाख्ये संलग्न होते. +कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य 'यज्ञ' हे आहे.(१) +तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तिरीय संहिता आहे. हे नाव ' निरुक्तकार यास्काचार्य यांंचा शिष्य 'तैत्तिरी' वरून पडले. त्यात ७ अध्याय /कांडांचा समावेश आहे.त्याची पुढे 'प्रपाठक' व नंतर 'अनुवाक्'म्हणुन विभागणी झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे. उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात 'रुद्र चमक' आहे आणि १.८.६.१ यात महामृृत्युंंजय मंत्र. भूः ,भुवः,स्वः हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंब सूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता(७ कांड), तैत्तिरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तिरीय (७ प्रश्न) तैत्तिरीय उपनिषद-(शिक्षावली, आनंदवल्ली भृगूवल्ली व महानारायण उपनिषद. +इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार या बाबतीत शुक्ल यजुर्वेद फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक "य"च्या जागी "ज" आणि "श"च्या जागी "ख" उचारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीने उचारतात.अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक करतात आणि स्वर मानेने व्यक्त न करता हाताने करतात.[२] +याज्ञवल्क्य' हा 'वैशंपायन ऋषीं'कडून परंपरेनुसार 'वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असे मानले जाते. तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता. त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे. वेदांच्या निरूपणात(interpretation ) दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी,'वैशंपायन ऋषी' इतके संतापले की, त्यांनी त्यांंचे ज्ञान परत मागितले. +याज्ञवल्क्य याने ते ओकून टाकले. 'वैशंपायन ऋषी' यांंच्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाऊन टाकले. म्हणून, यास 'तैत्तिरीय संहिता' असे म्हणतात. गुरूने दिलेले सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्याने सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी सूर्याने घोड्याचे रूप घेतले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. वैशंपायन मूळ संहितेला शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे. +श्री.शकुंतला राव शास्त्री यांचे मत :- देवताविषयक कल्पनांमध्ये ऋग्वेदापेक्षा यजुर्वेदात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ऋग्वेदातील देवतांचीच यजुर्वेदातही आराधना व प्रार्थना असून यज्ञात त्याच देवतांना हविर्भाग अर्पण करण्यास सांगितले आहे. ब्रह्मा,विष्णू व रुद्र या देवतांच्या दर्जामध्ये फेरफार झाला आहे. या देवतात्रयीचे गुणकर्मानुसार पृथकत्व पुराण ग्रंथांमध्ये पूर्णावस्थेला गेले आहे. त्याचा प्रारंभ यजुर्वेदात झालेला दिसून येतो. उपनिषद साहित्यात वाढीस लागलेली एका ईश्वराची कल्पना यजुर्वेदात निश्चित व सप्रमाण मांडली गेली आहे. यजुर्वेदातल्या नीतिविषयक कल्पना ऋग्वेदातील कल्पनांपेक्षा बऱ्याच प्रगत झालेल्या दिसतात. तिथे उच्चतर नैतिक जीवनाबद्दल खरीखुरी तळमळ दिसून येते. ज्ञान, पापाची क्षमा, अमरत्व इ.आध्यात्मिक गुणांच्या प्राप्तीबद्दलच्या प्रार्थना यजुर्वेदात विपुल प्रमाणात आढळतात.[३] + +. + +Sanskrit Web Freely downloadable, carefully edited Sanskrit texts of Taittiriya-Samhita, Taittiriya-Brahmana, Taittiriya-Aranyaka, Ekagni-Kanda etc. as well as English translations of the Taittiriya-Samhita etc. +Albrecht Weber, Die Taittirîya-Samhita 1871 +Ralph Griffith, The Texts of the White Yajurveda 1899, full text, (online at sacred-texts.com) +A. Berridale Keith, The Yajur Veda - Taittiriya Sanhita 1914, full text, (online at sacred-texts.com) +Retrieved from "http://en.wikipedia.org/wiki/Yajurveda" diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13480.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5887a27221698aa448fc4bf723a6556faa569414 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13480.txt @@ -0,0 +1,3 @@ +यतींदर सिंग (जन्म २५ डिसेंबर १९८२ , सहारनपुर) एक भारतीय प्रो-बॉडीबिल्डर आहे.[१] २०१५ मध्ये त्यांनी  ७ व्या जागतिक बॉडी बिल्डिंग आणि फिजिक चँपियनशिप आणि २०१६ मध्ये मिस्टर इंडियाचे रौप्य पदक जिंकले.[२] +लहानपणापासूनच यतींदरचा असा समज होता की त्याच्या शारीरिक अवस्थेचे वजन कमी झाल्यामुळे त्याचे वजन कमी होते. आपल्या हायस्कूल आणि महाविद्यालयीन जीवनात, त्यांनी शरीरसौष्ठव गंभीरपणे स्वीकारला आणि घरातील आणि मैदानी प्रशिक्षण सत्राच्या संयोजनासह आवश्यक प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षकाद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये यतींदरच्या शरीरसौष्ठव कारकिर्दीची सुरुवात झाली.[३] +२००१ मध्ये यतींदरने बॉडीबिल्डिंग कारकीर्द सुरू केली. २००२ मध्ये प्रथम विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांना बॉडीबिल्डिंग व्यावसायिकरित्या करण्याची, भारतात आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अनेक शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रेरित केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13492.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3770a615abec34fe601676b49340402547a63b5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13492.txt @@ -0,0 +1,2 @@ +आदि यदुराया तथा विजय राजा वोडेयार (१३७१ - ऑक्टोबर, १४२३:मैसुरु, विजयनगर साम्राज्य) हा १३९९ ते ऑक्टोबर १४२३ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मैसुरुचा राजा होता [१] [२] विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने याने यदुरायाला १३९९ मध्ये मैसुरु आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून इनाम दिला आणि त्याला तेथील पाळेगाराचा खिताब देउन मैसुरुच्या आसपासच्या बंडखोर टोळक्यांना आवाक्यात आणण्याचे काम दिले. +यदुराया मैसुरुचा पहिला राजा होता. याच्या वंशजांनी १९५०मध्ये राज्य भारतात विलीन होईपर्यंत शासन केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13503.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880f484a2d25d37c44cce7d55b12ea195c57b263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13503.txt @@ -0,0 +1,3 @@ +यमघंटायोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे. +रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी अार्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी अनुराधा आणि शनिवारी हस्त हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो. +अशाच प्रकारचे अन्य योग - दग्धयोग, अमृतसिद्धियोग, मृत्युयोग. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13519.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ff134cf336a449fd529d04c38176850a62821e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13519.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या विकिवर यमुना शब्दापासून सुरू होणारे खालील लेख आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13533.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0964eb850c12ba23b37ba022aca50d92d459049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13533.txt @@ -0,0 +1 @@ +यमुनाबाई सावरकर किंवा माई सावरकर (जन्म : ४ डिसेंबर, १८८८; - ८ नोव्हेंबर, १९६३) या वि.दा. सावरकरांच्या पत्नी होत्या.[१] त्यांच्या जन्म तिथीनुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, विक्रम संवत १९४५ या दिवशी झाला. इ.स. १९०१ साली त्यांचा विवाह विनायक सावरकर यांच्याशी झाला. यमुनाबाईंचे वडील भाऊराव तथा रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर हे ठाण्याच्या जवळ जव्हार पालघर() कसबे येथे राहत होते. सावरकरांच्या उच्च शिक्षणाचा  आणि लंडनला जाण्याचा भार माईच्या वडिलांनी घेतला होता. माई यांनी सावरकरांच्या रत्‍नागिरीतील सामाज सुधारक कार्यक्रमात हळद-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना चार मुलं होती. सावरकर लंडनमध्ये असतांना त्यांंचा मुलगा मोठा प्रभाकर यांचा मृत्यू झाला. जानेवारी १९२५मध्ये सातारा येथे त्यांना एक मुलगी प्रभात झाली. दुसरी मुलगी शालिनी ही सतत आजारी असे., ती अल्पायू निघाली, व थोड्याच दिवसात मरण पावली. मार्च १९२८मध्ये त्यांना विश्वास नावाचा मुलगा झाला. १९६३ साली माई यांचे मुंबई येथे निधन झाले.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13555.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..794c724879c4a3200d48657ec1e77fbd40237c1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13555.txt @@ -0,0 +1,2 @@ +यवतमाळ-वाशिम हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यामधील ४ व वाशिम जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13571.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7122bda3d004b75ecd7d7fcf25584a531e5ecec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13571.txt @@ -0,0 +1,2 @@ +यश चोप्रा (२७ सप्टेंबर, इ.स. १९३२; लाहोर - २१ ऑक्टोबर, इ.स. २०१२; मुंबई, भारत) हे चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13579.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76f5690461eaff19d8c4f7f814050637bbd8d695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13579.txt @@ -0,0 +1,29 @@ +प्राध्यापक यशपाल (जन्म : २६ नोव्हेंबर १९२६, - नॉयडा, २४ जुलै २०१७) हे एक भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी मधून याच विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केली. +यश पाल यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढीलप्रमाणे आहेत : +प्रा. यशपाल हे दूरदर्शनवरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम-टर्निंग पॉईंटमधून साध्या शब्दांत सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या कामामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले. +मृत्यूपूर्वीचे काही दिवस आधी ते नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13590.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3242bfee0859fe009aedcbb4199a533f1bc1952f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13590.txt @@ -0,0 +1 @@ +यशपाल शर्मा हा हिंदी चित्रपटातील एक अभिनेता आहे. त्याने लगान, गंगाजल, अब तक छप्पन, अपहरण, रावडी राठोड या व इतर चित्रपटांत भूमिका केलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13622.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0601ec22eb0cb43f630ca47b07a9c7abfed929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13622.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंत मराठे (अज्ञात - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13627.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f078466f77a030f57787e58f1bcab1f4ce498104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13627.txt @@ -0,0 +1,13 @@ +यशवंत रांजणकर (जन्म : २३ जुलै १९३३; - १५ जून २०२०) हे मराठीतील पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीलेखक, नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक आणि चरित्रलेखक होते. नाट्यलेखन, चित्रपट कथा-पटकथालेखन आणि संवाद लेखन करून त्यांनी त्यांच्या चौफेर व्यासंगाने व उपजत प्रतिभेने आपला वेगळा ठसा उमटवला होता. भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी असे विविध विषयावरील कथा-कादंबऱ्या स्वरूपातील लेखनासाठी ते वाचकप्रिय होते. १९८० च्या दशकात गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांचे ते लेखक होते. त्यांनी किमान पन्नास पुस्तके लिहिली. त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +रांजणकरांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलाचे नाव प्रियदर्शन असून एका मुलीचे ज्योतिष्मती भरडकर आहे.[१][२] +यशवंत रांजणकर यांनी लेखन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी काही काळ एका बँकेत नोकरी केली. तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता मध्ये ते १९८० च्या दशकात चित्रपट विषयक साप्ताहिक 'लोकरंग'चे कार्यकारी संपादक होते. लोकसत्ता मध्ये त्यांनी वीस वर्षे काम केले. +रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते. +रांजणकर यांची कथा, पटकथा, संवाद असलेले काही महत्त्वाचे चित्रपट :-[३] +मुंबईतल्या हीरानंदानी रुग्णालयात १५ जून २०२० रोजी यशवंत रांजणकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले.[४][५] +"रांजणकरांचे नेमके योगदान काय?' असा प्रश्न उपस्थित केल्यास भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्या लिहिणारी बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, चंद्रकांत काकोडकर, गजानन क्षीरसागर अशा लोकप्रिय लेखकांच्या परंपरेतल्या रांजणकरांचा समावेश ‘टॉप टेन’ मध्ये होतो, असे मत 'अक्षरनामा' या मराठी वृत्तसंकेतस्थळाचे संपादक राम जगताप व्यक्त करतात. हिचकॉक, वॉल्ट डिस्ने आणि लॉरेन्स यांची चरित्रे आणि इंग्रजी क्लासिक सिनेमांविषयीची ‘अ-पूर्व चित्रलेणी’ आणि ‘BEST OF हॉलीवूड’ ही पुस्तके रांजणकरांच्या एकंदर लेखकीय कारकिर्दीतला सर्वोच्च आविष्कार आहे. या पुस्तकांची निर्मिती, त्यांचा लेखनदर्जा यांचे साहित्यिक मूल्य अनोखे आहे. ‘लोकसत्ता’मध्ये असताना, विशेषतः रविवार पुरवणीचे संपादन पाहत असताना त्यांनी अनेक कल्पक प्रयोग केले. +रांजणकरांनी अंदाजे सात ‘धारावाहिक कादंबऱ्या’ लिहिल्या आहेत. २०१० साली प्रकाशित झालेली त्यांची ‘बैरागपाडा’ ही बहुधा शेवटची ‘धारावाहिक कादंबरी’ असावी. हा वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या मराठी कादंबरीकारांच्या पिढीचेही ते बहुधा शेवटचे प्रतिनिधी असावेत. ‘बैरागपाडा’ या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी ‘धारावाहिक कादंबरी’विषयी लिहिले आहे.[६] ते म्हणतात, +"केवळ पुस्तकासाठी किंवा नियतकालिकाच्या एकाच अंकात पूर्णपणे देण्यासाठी लिहिलेली कादंबरी आणि धारावाहिक कादंबरी या दोहोंच्या लेखनतंत्रांत मोठाच फरक आहे. पहिल्या प्रकारातली कादंबरी संपूर्ण लिहून झाल्यावरच प्रसिद्ध होत असल्यानं त्या लेखनात वारंवार बदल करता येणं, त्याचं पुनर्लेखन करता येणं, लेखन अखेरच्या टप्प्यात येत असताना आरंभीच्या प्रकरणांतील काही भाग विसंगत वा जाचक वाटल्यास तो पुढील कथा-विकसनाशी सुसंगत वा रद्द करता येणं शक्य असतं. म्हणजेच अशा लेखनावरून, ते प्रसिद्धीस पाठवेपर्यंत पुनःपुन्हा हात फिरवता येणं लेखकाला शक्य होतं. +धारावाहिक कादंबरीच्या लेखकाला मात्र या सुविधेपासून वंचित राहावं लागतं. हे लेखन क्रमश: प्रसिद्ध होत असलं तरी त्याची एकूण जातकुळी एखाद्या सदराच्या लेखनाहून पार वेगळी आहे. सदरासाठी दर आठवड्याला एक योग्य विषय मिळेपर्यंत काय ती मनाची उलघाल. त्या विषयावर एकदा लिहिलं, की नंतर त्याचा विचार करण्याची वा संदर्भ लक्षात ठेवण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. परंतु धारावाहिक कादंबरीचं तसं नसतं. त्यातही रहस्य, भय, संदेह, थरार, अदभुत असे घटक असलेल्या धारावाहिक कादंबरीच्या लेखनाचं तंत्र, तसंच लेखनप्रक्रियाही वेगळीच असते. +धारावाहिक कादंबरी-लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो. सुप्रसिद्ध जादूगार हौदिनी याला साखळदंडांनी जखडून एका लोखंडी पेटीत कुलूपबंद करून ती समुद्रात वा मोठ्या जलाशयात सोडत आणि तो मग अवघ्या काही मिनिटांतच आपली मुक्तता करून घेऊन पाण्यातून सुखरूप बाहेर येई, असं सांगतात. धारावाहिक कादंबरीकाराचं काहीसं असंच असतं. फरक एकच : जादूगाराला इतर लोक जखडून टाकत, तर इथं कादंबरीकाराला स्वतःच स्वतःच्या कोड्यांनी स्वतःलाच जखडून त्यांतून सहीसलामत बाहेर यायचं असतं. आणि विशेष हे की, ती कोडी टाकण्याच्या वेळी किंवा नंतरही काही काळ त्याला त्यांच्या उलगड्याची काहीच कल्पना नसते. +वाचकाची उत्कंठा ताणून धरण्याकरिता वेळ मारून नेण्यापुरती गूढ, संदेह, रहस्य, भय, थरार यांची निर्मिती एक वेळ सोपी असेल; पण पुढं ते सारं नीट किनाऱ्याला लावणं हे खरं कसोटी पाहणारं असतं. त्याकरता लेखनाच्या किमान उत्तरार्धाच्या टप्प्यापासून तरी पुढचा विचार करताकरताच पूर्वार्धातील कोणते प्रश्न वा कोडी वाचकासाठी (आणि स्वतःसाठीही) अनुत्तरित राहिली आहेत, याचा सतत धांडोळा घेत राहणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारच्या लेखनालाही त्याचं असं एक ‘लॉजिक’ असतंच. आणि त्याला धरूनच कादंबरी संपवण्याआधी उपरिनिर्दिष्ट गोष्टींची प्रयोजनं स्पष्ट व्हावयास हवीत. त्यांचे धागेदोरे हवेत अधांतरी ठेवून चालणार नाही. तसं केल्यास कादंबरी तर बिघडतेच; पण त्याहूनही मुख्य म्हणजे ती वाचकाची फसवणूक आणि त्याच्या सुजाणतेचा अपमानही ठरते."[६] +यशवंत रांजणकरांचे ‘गर्भश्रीमंत’ हे नाटक त्याकाळी खूपच गाजले होते. ह्या नाटकासाठी, अर्धांगी (१९८५) चित्रपटाच्या पटकथेसाठी, तसेच 'अ-पूर्व चित्रलेणी' व 'वॉल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी' या चरित्र लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुरस्कार प्रदान करून रांजणकरांच्या कार्याचा गौरव केला. व्हाॅल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी'ला महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९चा 'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती'साठीचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार लाभला.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13683.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76ebe63449048d9180f18eac2fe6f89af2a16e4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13683.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंतराव जिजोबा मोहिते (७ नोव्हेंबर १९२० - २२ ऑगस्ट २००९), उर्फ भाऊ, हे भारतीय राजकारणी होते, ते १९८० ते १९८४ या काळात लोकसभेचे सदस्य आणि १९५२ ते १९८० पर्यंत कराड (दक्षिण) मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते.कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. 1947 मध्ये ते भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. 1952 मध्ये, ते कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले परंतु संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 1957 मध्ये ते मजदूर किसान पक्षातर्फे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. तथापि, 1960 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1962, 1967, 1972 आणि 1978च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. मोहिते यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उपगृहमंत्री (1960), कृषी उपमंत्री (1963), गृहनिर्माण विकास आणि वाहतूक मंत्री (1967), सहकार मंत्री (1969), सहकार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री (1972) आणि वित्त मंत्री (1975 आणि 1978) या जबाबदाऱ्या पार पाडल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13731.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97627a2f426bb31dd52a7a8d8ceede1f67ab168e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13731.txt @@ -0,0 +1 @@ +यस्तिका भाटिया (११ जानेवारी, २०००:भारत - ) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13736.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ccae6209d6dfbd909ebe28463bafffb159215db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13736.txt @@ -0,0 +1,2 @@ +यहूदी मेनुहिन (एप्रिल २२, इ.स. १९१६ - मार्च १२, इ.स. १९९९) हा ब्रिटिश-अमेरिकन संगीतकार होता. अमेरिकेत जन्मलेला मेनुहिन नंतर स्वित्झर्लंड व तत्पश्चात युनायटेड किंग्डमचा नागरिक झाला. +मेनुहिनला विसाव्या शतकातील सर्वोत्तम व्हायोलिनवादकांपेकी एक गणले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13765.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f826d3f4db5f0d7849105be3e0524ffe0db4749 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13765.txt @@ -0,0 +1,2 @@ +यांगोन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RGN, आप्रविको: VYYY) (बर्मी:ရန်ကုန်အပြည်ပြည်ဆိုင်ရာလေဆိပ်;) हा म्यानमारच्या यांगोन शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून १५ किमी उत्तरेस असलेल्या या विमानतळावरून दक्षिण आशियातील प्रमुख शहरे आणि जगातील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. +याला मिंगालादोन विमानतळ असेही नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13779.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..941de546eb9e78294e53ba9b4ef95c92954734d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13779.txt @@ -0,0 +1,3 @@ +याकिमा काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +याकिमा काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13781.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6282e2135dc8a860a1e3b825d5d2d9b79203e44f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13781.txt @@ -0,0 +1,2 @@ +याकुबु ऐयेग्बेनी (नोव्हेंबर २२, इ.स. १९८२:बेनिन सिटी, बेनिन - ) हा  नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +याला याक असे टोपणनाव आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13796.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06d23fe878f666cd3d85b80a95e2568469e5480c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13796.txt @@ -0,0 +1,3 @@ +याज्ञवल्क्य साहित्य संमेलन एकदा पुण्यात वसंत ऋतूत भरले होते. त्याचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी होते. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13800.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b5547eacdb3c5b68561b105f3711b41b758034a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13800.txt @@ -0,0 +1 @@ +याझ्द (फारसी: استان یزد‎, ओस्तान-ए-याझ्द) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या मध्य भागात स्थित असून याझ्द शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1381.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fef93e0d6ae2681c496d77fb7a97c2f8cce504d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1381.txt @@ -0,0 +1,3 @@ +मजबूर हा १९७४ साली प्रदर्शित झालेला हिंदी-भाषेतील रवी टंडन दिग्दर्शित चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, परवीन बाबी, प्राण व सत्येन कप्पू यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे. + +रवी खन्ना (अमिताभ बच्चन) नावाच्या एक माध्यमवर्गीय ट्रॅव्हल एजन्ट असतो तो आपली वृद्ध आई (सुलोचना लाटकर), चालता येत नसलेली बहीण (फरीदा जलाल) व शाळेत जाणारा भाऊ ह्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याला हे कळून धक्का बसतो की त्याच्या मेंदूत वाढणारा ब्रेन ट्यूमर असून त्याला जगायला फक्त सहा महिने आहेत. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी रवी त्यानी न केलेल्या खुनात स्वतःला अडकवतो म्हणजे त्याच्या कुटुंबाला बक्षिसाचे पाच लाख रुपये मिळतील. खुनाचे तपासकर्ते सीआईडी इन्स्पेक्टर खुराना (इफ़तेखार) व इन्स्पेक्टर कुलकर्णी (जगदीश राज) हे रवीला अटक करतात आणि कोर्टात रवीला फाशीची शिक्षा सुनावली जाते. तुरुंगात असताना त्याला मोठा ट्यूमर अ‍टॅक येतो व त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिथे रवीचं ऑपरेशन करून त्याच्या मेंदूतला ट्यूमर बाहेर काढतात. परंतु, आता खूप उशीर झालेला आहे कारण रवी कोर्टात खूनी म्हणुन दोषी ठरलेला आहे. स्वतःला फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी रवी हॉस्पिटलमधून पळून जातो व त्याची प्रेयसी नीला (परवीन बाबी) हिच्यासोबत खऱ्या खुनीच्या शोधात निघतो. रवीची मायकल डिसोझा (प्राण) नावाच्या एका चोराशी गाठ पडते. खऱ्या खुनीला पाहिलेला मायकल रवीला त्याला शोधण्यात मदत करायचं वचन देतो. शेवटी असं उघडकीस होतं की ज्याचा खून झालेला आहे त्याचाच भाऊ नरेंद्र सिन्हा (सत्येन कप्पू) हा त्याचा खुनी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13814.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1faf233d9af009795d3b48d19ceef9688fcbb22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13814.txt @@ -0,0 +1 @@ +यादगीर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या यादगीर जिल्ह्यातील यादगीर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर आणि कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस, इत्यादी जलद गाड्या या स्थानकात थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13841.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13841.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13876.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ca640c5b134df58ed1d95f53280fe916c4ab98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13876.txt @@ -0,0 +1 @@ +यफान वाँग (चिनी: 王雅繁; ३० एप्रिल, १९९४:वुशी, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13900.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bae7d15d6205b908abbd1ea3d26648774711e07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13900.txt @@ -0,0 +1,2 @@ +यारळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13906.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8c1ffd881fae6ab565a1de2b8780bf0465abe48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13906.txt @@ -0,0 +1,3 @@ +यारॉस्लाव्ह सेफर्ट (२३ सप्टेंबर १९०१-१० जानेवारी १९८६). चेक कवी आणि पत्रकार. जन्म प्राग शहरी. १९५० पर्यंत त्याने पत्रकारी केली तथापि एकीकडे त्याचे काव्यलेखनही चालू होते. ‘सिटी इन टीअर्स’ (इं. शी) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९२० सालीच प्रसिद्ध झाला होता. तरुण वयात त्याचा साम्यवादाकडे ओढा होता. त्याच्या आरंभीच्या कवितांतून श्रमजीवी वर्गाबद्दलची आस्था, सोव्हिएट रशियाकडून असलेल्या अपेक्षा प्रकट होतात. +१९२० नंतरच्या काही वर्षांत सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी प्रयोगाने अन्य काही चेक कवीही भारावून गेले होते तथापि सेफर्टचा कम्युनिस्ट पक्षाबद्दलचा उत्साह पुढे ओसरला. १९२९ मध्ये त्याने कम्युनिस्ट पक्ष सोडला. ‘पोएटिझम’ (इं. शी) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चेक काव्यसंप्रदायात तो सामील झाला. ‘विशुद्ध कविता’ हे ह्या काव्यसंप्रदायाचे ध्येय होते. +‘ऑन वायरलेस वेव्ह्‌ज’ (१९२५, इं. शी), ‘द नाइटिंगेल सिंग्ज राँग’ (१९२६, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून विशुद्ध कवितेकडे झुकणारी त्याची प्रवृत्ती दिसून येते. देशात घडणाऱ्या घटनांविषयी तो संवेदनशील होता. ‘म्युनिक करारा’ नुसार चेकोस्लोव्हाकियाचा काही भाग जर्मनीला जोडण्यात आला, तेव्हा त्याने ‘स्विच ऑफ द लाइट्स’ (१९३८, इं. शी.) मधल्या कविता लिहिल्या. त्याचे सु. ३० काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. यांशिवाय त्याने अनेक नियतकालिकांमधून  लेखन केले, तसेच लहान मुलांसाठीही लिहिले. १९६६ साली चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्रकवी म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13925.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b20ad4cb4b813fd588552a8fffda4522c685bca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13925.txt @@ -0,0 +1,3 @@ +याल्टा हे युक्रेनच्या क्राइमिया प्रदेशातील शहर आहे. +जानेवारी १, इ.स. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८०,५०० आहे तर महानगराची लोकसंख्या १,३९,५०० आहे. यात ६५.५% रशियन, २५.७% युक्रेनियन, १.६% बेलारशियन तर १.३% व्यक्ती क्राइमियन तातर आहेत.[१] +काळ्या समुद्रावर वसलेल्या या शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान याल्टा परिषद भरली होती. यात दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13929.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56f91bdb70a5966affcc54fd03a0c8680b7000d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13929.txt @@ -0,0 +1,3 @@ +या ठिकाणी प्रसिद्ध असलेले व्यास मुनींचे भव्य असे 'व्यासमंदिर' आहेमहाराष्ट्र • भारत +२१° १०′ ००.१२″ N, ७५° ४२′ ००″ E +यावल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13951.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13951.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13979.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0442267f36be474c3b6c13d275e8cf6f730a7c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13979.txt @@ -0,0 +1,21 @@ +यींगत्सोंग (सोपी चिनी लिपी: 英宗; पारंपरिक चिनी लिपी: 英宗; फीनयीन: yīngzōng ; उच्चार: यीऽऽऽङ्ग-त्सोऽऽऽङ्ग) (फेब्रुवारी १६ इ.स. १०३२ - जानेवारी २५ इ.स. १०६७) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशातला पाचवा सम्राट होता. तो सम्राट रन्-त्सोंगाचा दत्तकपुत्र होता. दत्तकविधानाआधी त्याचे नाव चाओ त्सोंग-श (फीनयीन: Zhao Zongshi ;) असे होते. त्याने इ.स. १०६३ ते इ.स. १०६७ या कालखंडात राज्य केले. +उत्तरी सोंग +थायत्सू (太祖)  · +थायत्सोंग (太宗)  · +चन्-त्सोंग (真宗)  · +रन्-त्सोंग (仁宗)  · +यींगत्सोंग (英宗)  · +षन्-त्सोंग (神宗)  · +च-जोंग (哲宗)  · +हुईजोंग (徽宗)  · +छीन्-जोंग (欽宗)  · +दक्षिणी सोंग +काओत्सोंग (高宗)  · +स्याओचोंग (孝宗)  · +क्वांगत्सोंग (光宗)  · +निंगत्सोंग (寧宗)  · +लित्सोंग (理宗)  · +तुत्सोंग (度宗)  · +गोंगत्सोंग (恭宗)  · +तुआनजोंग (端宗)  · +ह्वायत्सोंग (懷宗) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13988.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c82bb639ba9a3aa37a93c8ec64ba8ee4dacbfb0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13988.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Yb) (अणुक्रमांक ७०) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13998.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa98116b05618ef128746cf5e0abcb53547f1acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_13998.txt @@ -0,0 +1,3 @@ +यीफ लातेर्मा (डच: Yves Camille Désiré Leterme) हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत. + + मार्क आयस्केन्स · ज्यॉँ-लुक डेहेन · विल्फ्रीड मार्टेन्स · यीफ लातेर्मा · एल्यो दि र्‍युपो · गाय व्हेरोफ्श्टाट · पॉल-हेन्री स्पाक diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_140.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8842fa87f7c5e9c083b8fb78b933efb5190009e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_140.txt @@ -0,0 +1 @@ +भीमसेन हे भारतीय पुरुषांना दिले जाणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14001.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b44991842be4760f43e74a9b01f84c3d6f181f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14001.txt @@ -0,0 +1,3 @@ +यीस्ट हा एक बुरशीचा प्रकार आहे. बहुतेक यीस्ट जाती मानवाला उपयोगी आहेत. सॅकॅरोमायसीज सेरेव्हिसिआय या जातीचा उपयोग पाव तसेच मद्य तयार करण्यासाठी करतात. पाव तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाणाला ‘बेकर्स यीस्ट’ म्हणतात, तर मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाणाला ‘ब्रुअर्स यीस्ट’ किंवा ‘डिस्टिलर यीस्ट’ म्हणतात. पेशी जीवविज्ञानाच्या अभ्यासात यीस्टची ही जाती एक नमुनेदार सजीव वापरली जाते. दृश्यकेंद्रकी पेशी आणि मानवी पेशीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी या सजीवांचा संशोधनासाठी वापर केला जातो. सॅकॅरोमायसीज सेरेव्हिसिआय यीस्टचा जीनोम (जनुकीय माहितीचा संपूर्ण संच) सर्वात प्रथम शोधण्यात आला आहे. या कवकामध्ये १६ गुणसूत्रे असून ६२७५ जनुके आढळली आहेत. यीस्टची सु. ३१% जनुके माणसांच्या जनुकांसारखी आहेत. +यीस्टच्या काही जाती (उदा., कँडिडा आल्बिकान्स) रोगजनक असतात. कँडिडा आल्बिकान्स हे द्विरूप कवक आहे. ते यीस्टसारखे एकपेशीय तसेच तंतुकवक अशा दोन्ही रूपात आढळते. त्यांच्यामुळे माणसाच्या तोंडामध्ये, नखांमध्ये आणि जननेंद्रियामध्ये संक्रामण होऊ शकते. +जैवइंधन उद्योगांमध्ये एथेनॉल या जैवइंधनाच्या निर्मितीसाठीही यीस्टचा उपयोग केला जाऊ लागला आहे. अलीकडे (२००७ मध्ये) यीस्टचा उपयोग यीस्ट इंधनघटाद्वारे वीजनिर्मितीसाठीही करण्यात येत आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14002.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..392412dcfa74a7cdcb3d0680aafecb02a366420b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14002.txt @@ -0,0 +1,9 @@ + + युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (इंग्लिश: United States Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या देशाच्या ऑस्टिन शहरामधील सर्किट ऑफ द अमेरीकाज ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14003.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ee734f2b5ccf1df76fd87aa73f5dad3462f300a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14003.txt @@ -0,0 +1 @@ +यू-बोट, यू-बूट किंवा उंटेरसीबूट या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यान कार्यरत असलेल्या जर्मनीच्या लढाऊ पाणबुड्या होत्या. शत्रूच्या, विशेषतः कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटिश साम्राज्याच्या व्यापारी नौकांचे तांडे हेरून ते बुडविणे व त्यांद्वारे रसदपुरवठा खंडित करणे ही या बोटींची प्रमुख कामगिरी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14033.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63dd6b7bfb7a2535eb5b8e2c763cd950a8f7fa86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14033.txt @@ -0,0 +1,2 @@ +यु.एस.एस. साउथ कॅरोलिना (बीबी-२६) ही ड्रेडनॉट प्रकारची युद्धनौका होती. ही नौका त्या वर्गातील पहिली असून अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्याचे नाव दिलेली अमेरिकेच्या आरमाराची चौथी युद्धनौका होती. ती अमेरिकेची पहिली ड्रेडनॉट युद्धनौका होती. यात एचएमएस ड्रेडनॉट सारख्या टर्बाइन प्रोपल्झन नव्हते. साउथ कॅरोलिनाच्या बांधणीत तिच्या मुख्य बॅटरीची व्यवस्थे सारखे अनेक नवीन पैलू समाविष्ट होते. +ही नौका डिसेंबर १९०६ मध्ये जहाज तयार करण्यात आली आणि जुलै १९०८ मध्ये अमेरिकेच्या अटलांटिक तांड्यामध्ये रुजू झाली. साउथ कॅरोलिनाने आपल्या कारकिर्दीतील मोठा भाग अटलांटिक व कॅरिबियन समुद्रात गस्त घातली. १९१० आणि १९११ मध्ये तिने युरोपला दोन भेटी दिल्या आणि १९१२ मध्ये जर्मन क्रूझर स्क्वाड्रनशी संधान साधले. १९१३-१९१४ मध्ये मेक्सिकन क्रांतीदरम्यान अमेरिकेच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी मेक्सिकोच्या किनारपट्टीवर त्यांनी अनेकदा गस्त घातली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14051.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f4e7063251a07d305e6d302e8568f275ffdc0cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14051.txt @@ -0,0 +1,12 @@ +अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपला यु एफ सी या नावाने सुद्धा ओळखले जाते. +यु एफ सी ने पहिली स्पर्धा १२ नोव्हेंबर १९९३ ला आयोजित केली होती.या स्पर्धेत वेगवेगळ्या खेळ प्रकारातील खेळाळुंनी भाग घेतला नंतर या सपर्धेला यु एफ सी १ या नावाने ओळखले गेले आणि 'जू जुत्सू' फाईटर 'राईस ग्रेसी' हे अंतिम सामन्यात 'केन शेमरलोक' या फाईटर विरुद्ध विजयी झाले होते. +यू.एफ.सी.१ चा मुख्य उद्देश्य हा होता की वेगवेगळ्या द्वंद्व,युध्य कलां मधून कोणती द्वंद्व कला उत्तम आहे हे शोधणे आणि पाहणे की जेव्हा मुष्टी योध्या (बाॅक्सर) समोर जेव्हा एखादा मल्ल लढेल तेव्हा काय होईल. अश्या प्रकारे वेवेगळ्या युद्ध कलेतील फाईटर एकमेकांचा सामना कसे करतील[१]. +जानेवारी २००१ ला जूफा कंपनीने यू.एफ.सी.ला विकत घेतले[२]. +यू.एफ.सीचे जे सध्याचे नियम आहेत ते न्यू जर्सी एथेलिटिक आयोगाने तयार केले आहेत. +यू एफ सी सामने समण्यात्वे तीन फेऱ्यांचे असतात. प्रत्येक फेरी (राऊंड) हा पाच मिनिटांचा असतो. मुख्य पुरस्काराच्या फाइट या पाच फेऱ्यांचा असतात. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक फेरी ही पाच मिनिटांनी असते. +यू एफ सी सामने ज्या रिंग मध्ये होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.हा अष्टकोणी आकाराचा एक लोखंडी जाळी पासून आणि पाईपां पासून बनवलेला असतो.त्याला दोन दरवाजे असतात. +सामण्यांन दरम्यान फक्त पंच आणि दोन फाईटर हे एवढेच ओक्टेगाॅन मध्ये असतात.आॅक्टेगाॅनच्या बाजुने बसलेले निर्नायक दोन्ही फाईटरना त्यांनी विरोधी फाईटरवर केलेल्या प्रहारांवरून गुण देतात व शेवटि ज्याला जास्त गुण मिळतात तो विजयी होतो.जर विरोधी फाईटर मुक्क्याने बेशुद्ध होऊन पडला तर विरोधी फाईटर विजयी होतो. +ऑक्टेगाॅन यु.एफ.सी. १३१ +ज्युनियर डाॅस सॅन्तोस विरुद्ध शेन कार्विन. +युएफसीचे सामने ज्या ठिकाणी होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.खाली दिलेल्या छायेत यु.एफ.सी.ऑक्टेगाॅन दाखवलेला आहे. +यु.एफ.सी. ७४ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14063.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caa8328167a705283049f999865a6439f8d7b35d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14063.txt @@ -0,0 +1,2 @@ + +युआ ऐदा (जपानी:あいだゆあ; १२ ऑगस्ट, इ.स. १९८४:जपान - ) ही एक जपानी रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14080.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09b22c80ae86d409537ca681b82fc30261b173d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14080.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14091.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e81c697cb0bde3f809371d8d761cff88ab70bdf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14091.txt @@ -0,0 +1,5 @@ + +(aet) + +Source: UEFA Champions League Press Release - Top Scorers - Final - Wednesday 21 May 2008 (after match) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14097.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0740ed44398b3cda64d36c006f17b675fa7c8619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14097.txt @@ -0,0 +1,3 @@ +युएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चॅंपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते. +आजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलान व लिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14125.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30b8e3db879eb4de0227c30ff18cc0d94e471b51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14125.txt @@ -0,0 +1 @@ +युएफा यूरो २००८ पात्रता फेरी गट ड मधून  चेक प्रजासत्ताक आणि  जर्मनी पात्र ठरले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14126.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfb6da1cffd8afd60a0a1756de96e259c27c1532 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14126.txt @@ -0,0 +1 @@ +युएफा यूरो २००८ पात्रता फेरी गट फ मधून  स्पेन आणि  स्वीडन पात्र ठरले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14132.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc011234eed270e681c5a3fcc92891072da3c0f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14132.txt @@ -0,0 +1,12 @@ +युएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेन व इटली संघात झाला.[१] यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्त्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.[२][३] +स्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.[४] +सहाय्यक पंच: +बर्टिनो मिरांडा (पोर्तुगाल) +रिकार्दो संतोस (पोर्तुगाल) +चौथा अधिकारी: +कुनेय्त काकिर (तुर्की) +जादा सहाय्यक पंच: +यॉर्ग सौसा (पोर्तुगाल) +दुअर्ते गोम्स (पोर्तुगाल) +राखीव सामना अधिकारी: +भट्टीन दुरान (तुर्की) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14152.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50223ffebf6d610570712ed6240ac7d4e53b17d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14152.txt @@ -0,0 +1,3 @@ +अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे. +१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज [८] इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते [९]. +अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1416.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e73bdccf4dc70b4df8af27a8093bb1dfd96fc26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1416.txt @@ -0,0 +1 @@ +मटकाझरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14161.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f6b3ec354360fe0e3320f5ced332457ed56441f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14161.txt @@ -0,0 +1,9 @@ +यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले. +यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात. +यूएस एरवेझ विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एरवेझ असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे अॅगनी एर असे टोपणनाव मिळाले. +या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत. +जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३] +यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे. +सन २०१५ मध्ये अमेरिकन एरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे. +५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एरवेझ एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात. +सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14162.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf030cd58554456ab9e38927301823d23e5493a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14162.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:TOC right +यु.एस.एस. एंटरप्राइझ नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14174.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d16a9fffb0a0448c67d1fe1594a4bece92c9020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14174.txt @@ -0,0 +1,37 @@ +युकातान (संपूर्ण नाव: युकातानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Yucatán)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या युकातानच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मेरिदा ही युकातानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या युकातानध्ये चिचेन इत्सा व माया संस्कृतीमधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. +मेक्सिकोच्या आग्नेय भागात ३९,६१२ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २०व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती तुरळक आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14179.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6913d55d155ce56c13fb1e149f1b76331c9bedd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14179.txt @@ -0,0 +1 @@ +युकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14198.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2de64a306a2625af0d2da637a24a9336537de8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14198.txt @@ -0,0 +1,15 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +युक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हिएत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हिएत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य हे सोव्हिएत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. +६,०३,७०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा जगातील ४४व्या क्रमांकाचा देश आहे. ह्या बाबतीत युक्रेनचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनला २,७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. द्नीपर ही युक्रेनमधून वाहणारी प्रमुख नदी असून डॅन्युब नदी युक्रेन व रोमेनियाच्या सीमेवरून वाहते. +युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. +युक्रेन देश २४ ओब्लास्त, क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक व क्यीव आणि सेव्हास्तोपोल ही दोन विशेष शहरे अशा राजकीय विभागांचा बनला आहे. +युक्रेनी वायुसेना देशाच्या संरक्षण दलाचा भाग[५] असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.[६][७] +युक्रेनमध्ये रस्त्यांचे जाळे १,६४,७३२ किमीचे आहे. त्यातील १०९ किमीचा क्यीव-द्निप्रोपेत्रोव्स्क आणि १८ किमी लांबीचा क्यीव-बोरिस्पिल हे मार्ग द्रुतगती मार्ग आहेत. +युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेली ही कंपनी २३,००० किमी लांबीच्या लोहमार्गांचे व्यवस्थापन करते. +एरोस्वित आणि युक्रेनियन इंटरनॅशनल एरलाइन्स या युक्रेनच्या सगळ्यात मोठ्या विमानकंपन्या आहेत. क्यीव आणि ल्विव येथील विमानतळ सगळ्यात मोठे असून दोनेत्स्कचा विमानतळ आता उद्ध्वस्त झाला आहे. +ओदेसा हे युक्रेनचे सगळ्यात मोठे बंदर असून येथून काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील मोठ्या शहरांना सागरी सेवा उपलब्ध आहे. +सोव्हिएत संघाच्या शारिरिक शिक्षणावर भर देण्याच्या व क्रीडा संकुले बांधण्याच्या धोरणाचा युक्रेनला फायदा झाला. संघाच्या विघटनानंतर युक्रेनला असंख्य स्टेडियम व मैदाने मिळाली. सध्या क्यीवमधील ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व राष्ट्रीय स्टेडियम मानले जाते. +फुटबॉल हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ऑंद्रे शेवचेन्को हा येथील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे. युक्रेनने युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धेचे पोलंडसोबत आयोजन केले आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14208.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd160dbb9a8b5a7231556bf7a7544b515f3627e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14208.txt @@ -0,0 +1,5 @@ + पोलंड + रोमेनिया + रशिया + सर्बिया +युक्रेनियन ही स्लाव्हिक भाषागटातील एक भाषा युक्रेन देशाची राष्ट्रभाषा आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये युक्रेनियन भाषेला अल्पसंख्य दर्जा प्राप्त झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1421.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..522cbd77ad91b694e5b51ffefbda2f9e7001c6ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1421.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतात मातरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२८३[३] चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,६१,३७०[४] होती. + +अंपारा जिल्ह्यात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १५[२] प्रदेश्य सभा आणि २०[१] विभाग सचिव आहेत. २० विभागांचे आणखी ६५०[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14229.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c201b95e1f203886b7dc7e5d7e03b17949e4d7ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14229.txt @@ -0,0 +1,79 @@ +टी२०आ किट +युगांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला क्रिकेट क्रेन असे टोपणनाव दिले जाते, हा पुरुष संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14231.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efcf81fab4191a388343b23161f29ac2eeb307e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14231.txt @@ -0,0 +1,2 @@ +युगांडा क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14241.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad1f07bb38c884bd5646cddaee0bfaabce2e4c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14241.txt @@ -0,0 +1 @@ +युगान्त हा इरावती कर्वे यांनी लिहिलेला महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारित ग्रंथ आहे. याची पहिली आवृत्ती १९६७ साली देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे यांनी प्रकाशित केली. २०१५ सालापर्यंत या पुस्तकाच्या २१ आवृत्त्या निघाल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14255.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37dbd117e11c4dab873e9d4d64d7478182d5ddf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14255.txt @@ -0,0 +1,2 @@ +युगोस्लाव्हियाचे राजतंत्र हा १९१८ ते १९४३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. हे राजतंत्र दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात पश्चिम बाल्कन प्रदेशापासून मध्य युरोपापर्यंत पसरले होते. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान १७ एप्रिल १९४१ रोजी नाझी जर्मनीने युगोस्लाव्हियावर कब्जा मिळवला व युगोस्लाव्हियाच्या राजाने युनायटेड किंग्डममध्ये स्थलांतर केले व पुढील दोन वर्षे तेथूनच राज्यकारभार चालवला. युद्ध संपल्यानंतर योसिफ ब्रोझ तितोच्या नेतृत्वाखाली युगोस्लाव्हिया राजतंत्र बरखास्त करून नवा युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा कम्युनिस्ट देश स्थापन करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14267.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c2477968aecca4c4b17b5841d87a0fd8d5f4735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14267.txt @@ -0,0 +1,26 @@ +युजीन विग्नर हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14277.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a199c8befb937806abd62f58c20cb362f278d84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14277.txt @@ -0,0 +1,2 @@ + +युजेनी जिनी बुशार (२५ फेब्रुवारी, १९९४:मॉंत्रिआल, कॅनडा - ) ही एक केनेडियन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14292.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6ea2a1655b20507405f26a8716846eda1c2469b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14292.txt @@ -0,0 +1 @@ +युटा जॅझ (इंग्लिश: Utah Jazz) हा अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14293.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97f78589c5163cceab4411030559ea5fbdce8b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14293.txt @@ -0,0 +1,2 @@ +युटा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी सगळ्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश दूव्ह आणि व्हिरे नद्यांच्या पश्चिमेस असलेली मोठी पुळण आहे. +६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर हजारो इतर सैनिक येथून शेरबोर्ग आणि फ्रांसच्या इतर भागांतून घुसले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14295.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97f78589c5163cceab4411030559ea5fbdce8b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14295.txt @@ -0,0 +1,2 @@ +युटा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी सगळ्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश दूव्ह आणि व्हिरे नद्यांच्या पश्चिमेस असलेली मोठी पुळण आहे. +६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर हजारो इतर सैनिक येथून शेरबोर्ग आणि फ्रांसच्या इतर भागांतून घुसले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14324.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1cdb118646c0891d9e80b05488ab51f3ba0a8c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14324.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. +युनानी रोगनिवारक शास्त्राच्या तत्त्वानुसार, युनानी चिकित्सकाला रोग्याच्या खालील बाबी नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. रोग्याची प्रवृत्ती, स्वभाव, भावना, वागणूक, सवयी, मूलस्थान, राहणीमान, जीवनपद्धती, जात, व्यवसाय, हवामान व पर्यावरण. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14327.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20f7d3b0124caeae72bdf61843441d8bb7eaf85e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14327.txt @@ -0,0 +1 @@ +युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १८ फेब्रुवारी १९३८ रोजी करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1435.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2c6babf9139893f83cadaee5af7dd6308e7b06e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1435.txt @@ -0,0 +1,12 @@ + मठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +या गावात कुंभारवाडी ,गुरववाडी,तेलीवाडी,चांभारवाडी अश्या वाड्या आहेत. +गावात शंकराचे एक देऊळ आहे.सोंबा देवाचे. गावातील लोक नेहमी देवळात एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करत असतात .लोक तुळशी विवाह,महाशिवरात्र,शिमगा,गुढीपाडवा,दसरा असे मोठे सण नेहमी एकत्र येऊन साजरे करतात. +मठ गाव हे पाली बस स्थनकापासून साधारण चार किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाली बाजाराचा चांगलाच फायदा लोकांना होतो. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +निवसर, गंगर कारगाव, शिरंबवली, नांदिवली, आंजणारी, आसोडे, वेसुर्ले, चाफेत, कडुगाव, पड्यार, घडशी ही जवळपासची गावे आहेत.मठ ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14353.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869074f4a1dabecada867a9e43362f6986a024d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14353.txt @@ -0,0 +1,9 @@ +संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.[ संदर्भ हवा ] +जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.[ संदर्भ हवा ] +राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे- +२०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले +खालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत. + + +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14390.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d23506cd8e7381d79fdfaa75d61833bffbca579 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14390.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14391.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..295fb4baea3192ba4fddcf2620757257b51a96c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14391.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनियन काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +युनियन काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14403.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc15659e6b31158e974e3c539ec1f3a505f6c7f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14403.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनियन काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +युनियन काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14404.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c405ba806f7c5b108c56c2cb49fb48b5c76498b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14404.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन ही अमेरिकन रसायनकंपनी आहे. २००१पासून ही डाउ केमिकल कंपनीची उपकंपनी आहे. युनियन कार्बाइडच्या मूळ कंपनीची स्थापना १९१७मध्ये झाली होती. +याचे मुख्यालय ह्युस्टन येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1443.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..988c9ead20eb5b3d1b2197a5b254e32bc9a3c227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1443.txt @@ -0,0 +1,8 @@ + मठ बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14430.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e04ab01e3985425c6dc8d965a5958c8fb46308a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14430.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14431.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a7f03463792f009d5094b5da2ba1e1954755f9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14431.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलोराडो डेन्व्हर विद्यापीठ ( सीयू डेन्व्हर ) हे डेन्व्हर, कॉलोराडो येथील सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. हे कॉलोराडो विद्यापीठ प्रणालीचा भाग आहे. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14454.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..371fb94d38657582a5863b7cb100931dc2ca62dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14454.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनिव्हर्सिटी ओव्हल हे न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील. +हे मैदान पूर्वी ओटेगो विद्यापीठाच्या मालकीचे होते. २००० च्या दशकात हे मैदान ड्युनेडिन महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले व त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14462.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc45ef9c5936600643be8f1103bdde640ea8ef0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14462.txt @@ -0,0 +1,5 @@ +संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे. + +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था +11 डिसेंबर 1 9 46 रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमरजन्सी फंड तयार करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली. बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळा आयोजित करते.भारतातही अशा कार्यशाळा होतात.त्यांना युनिसेफ मदत करते.पोलिश डॉक्टर लुडविक राजचमॅन यांना युनिसेफचे संस्थापक म्हणून ओळखले जाते आणि 1 9 46 पासून त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले. राजमॅनच्या मते अमेरिकेत मॉरीस पाटला 1 9 47 पासून 1 9 65 पर्यंत सेवा देणारी त्यांची पहिली कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1 9 50 मध्ये युनिसेफच्या सर्वत्र विकसनशील देशांतील मुलांच्या आणि महिलांच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आला. 1 9 53 मध्ये ते युनायटेड नेशन्स सिस्टमचे कायमस्वरुपी भाग बनले आणि "आंतरराष्ट्रीय" आणि "आणीबाणी" शब्द संस्थानाच्या नावावरून काढून टाकण्यात आले आणि त्यास "युनिसेफ" ही मूळ संक्षेप टिकवून ठेवणारी "युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड" अशी संज्ञा मिळाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14476.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebce3d36a980a5741a78f70a1817bc3039d7a8e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14476.txt @@ -0,0 +1,3 @@ +युन्नान (देवनागरी लेखनभेद : युइन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओस व व्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. हान चीनी वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत. +युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला चहाचे उगमस्थान मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14478.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f07f02594afe39660589ef7c718d894bf393dedc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14478.txt @@ -0,0 +1 @@ +युनायटेड पार्सल सर्व्हिस अमेरिकेतील मालवाहतूक कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14483.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6081e2ba8d1098647782c6ee7da51e2b309a2a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14483.txt @@ -0,0 +1,2 @@ +युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बॅंड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14486.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22efb3824ecf04849e07be394955c7ed4935d581 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14486.txt @@ -0,0 +1 @@ +युफ़ोरीया त्यांच्या शैलीच्या गाण्यांना "हिंद रॉक" प्रकारचे संगीत म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14503.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e7a300496d99372583b507ba0ecff48d0dcb29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14503.txt @@ -0,0 +1,3 @@ +युमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोतील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १०,०४३ होती.[१] रे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +युमा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. +या काउंटीमध्ये अरिकेरी नदी जेथे कॉलोराडोमधून कॅन्ससमध्ये वाहते ते ठिकाण कॉलोराडोमधील सगळ्यात कमी उंचीचे (१,०१० मीटर; ३,३१५ फूट) /ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14505.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e7a300496d99372583b507ba0ecff48d0dcb29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14505.txt @@ -0,0 +1,3 @@ +युमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोतील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १०,०४३ होती.[१] रे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +युमा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. +या काउंटीमध्ये अरिकेरी नदी जेथे कॉलोराडोमधून कॅन्ससमध्ये वाहते ते ठिकाण कॉलोराडोमधील सगळ्यात कमी उंचीचे (१,०१० मीटर; ३,३१५ फूट) /ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14508.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e85e5b82626d179167ea7772b5abd100ccf07ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14508.txt @@ -0,0 +1,2 @@ +युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र होता. हा गांधारीपुत्र नसून शंभर कौरवांतील एक गणला जात नाही. युयुत्सु हा धृतराष्ट्राचाच एक पुत्र होता. परंतु तो १०० कौरवांपैकी एक गणला जात नव्हता. अर्थात तो कौरवांचा सावत्र भाऊ होता. महाभारताच्या युद्धावेळी जेव्हा धर्मराज युधिष्ठिराने समस्त सैन्यास आवाहन केले की ज्यांना अजूनहि आपला पक्ष बदलावयाचा असेल ते आपला पक्ष बदलू शकतात. तेव्हा युयुत्सु ने आपला रथ पांडवांच्या शिबिरात नेला.अन तो युद्ध पांडवांच्या बाजूने लढला. +कौरवांच्या पराजय अन् मृत्युनंतर जेव्हा युधिष्ठिर हस्तिनापुरचा राजा झाला तेव्हा हस्तिनापुरच्या आधिपत्याखाली असलेल्या इंद्रप्रस्थचा राज्यकारभार युयुत्सु कडे देण्यात आला. ३६ वर्षे राज्यकारभार बघितल्यानंतर जेव्हा पांडवांनी संन्यास घेतला तेव्हा हस्तिनापुरचा राज्यकारभार हा अभिमन्युचा पुत्र आणि अर्जुनचा नातू परिक्षित यास सोपवण्या आली आणि राज्यकारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी युयुत्सुला देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14510.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a18b5cc8bdb50094a884bc6a0cc1ee51e33117b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14510.txt @@ -0,0 +1,105 @@ +युर-ए-लुआर (फ्रेंच: Eure-et-Loir) हा फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला येथून वाहणाऱ्या युर व लुआर ह्या नद्यांवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. + + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14525.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28074fe7485ddd47d434e5b22d5595808596deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14525.txt @@ -0,0 +1,12 @@ +व्लादिमिरोविच आंद्रोपोव्ह (रशियन:Ю́рий Влади́мирович Андро́пов; १५ जून, इ.स. १९१४ - ९ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हे सोव्हिएत राजकारणी आणि सोव्हिएत संघाच्या साम्यवादी पक्षाचे महासचिव होते. या नात्याने ते सोव्हिएत संघाचे १२ नोव्हेंबर, इ.स. १९८२पासून मृत्यूपर्यंत सर्वेसर्वा होते. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1467.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..618f80a6e9a90e23f75636167822e606ecf141e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1467.txt @@ -0,0 +1,3 @@ +मडेरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे.[१] याचे प्रशासकीय केन्द्र मडेरा येथे आहे.[२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५६,२५५ इतकी होती.[३] +मडेरा काउंटीचा बव्हंश भाग फ्रेस्नो महानगरक्षेत्रात आहे. या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील लाकूड असे नाव दिलेले आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14687.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192f6d286bf3f342267185c6b24ce63b277e7f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14687.txt @@ -0,0 +1,8 @@ +उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत. +यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. +अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली. +पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा. +यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले. +भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14712.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b662e37c691086231dd045eac1f8d8e7bc0a71aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14712.txt @@ -0,0 +1,11 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग 'कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील' (Ministry of Personnel , Public Grievances and Pensions) 'कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग'( Department of Personnel and Training) ह्यांच्या अधिपत्याखाली येतो. +या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग १४, अनुच्छेद ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. त्यास 'संघ व राज्यातील सेवा' असे नामकरण आहे. हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. भारत सरकार संघ सेवेतील(गट 'अ' व गट 'ब') तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक, बदली, पदोन्नती व शिस्तीची कारवाई इ. करिता लोक सेवा आयोगाशी सल्लामसलत करते. हा आयोग थेट राष्ट्रपतींना अहवाल साधार करतो तसेच, आयोग राष्ट्रपती मार्फत भारत सरकारला सल्ले देऊ शकते पण असे सल्ले बंधनकारक नसतात. संवैधानिक संस्था असल्याकारणाने केंद्रीय लोकसेवा आयोग हा भारतीय न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ह्याप्रमाणेच स्वायत्त आहे. +'लोकसेवा आयोग' या नावाने १ ऑक्टोबर १९२६ रोजी स्थापना. नंतर "भारत सरकार कायदा, १९३५" नुसार 'फेड्रल संघराज्य लोकसेवा आयोग' असे नामकरण. आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'संघलोकसेवा आयोग' असे नावबदल. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14740.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5162f7e889c23512918c56656b05ffc2d42b8af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14740.txt @@ -0,0 +1,11 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे. +युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे. +युनायटेड किंग्डम हा असा देश आहे की ज्याची सीमा फक्त दुसऱ्या एकाच देशासोबत आहे. युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड देशाच्या नैऋत्येला आयर्लंड हा देश आहे व इतर सर्व बाजुंनी समुद्र आहे. +युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. +बहुसंख्य लोक हे ख्रिस्ती धर्माचे अनुयायी आहेत . +युनायटेड किंग्डम एक संवैधानिक राजेशाही अंतर्गत एक एकसंध राज्य आहे. +क्वीन एलिझाबेथ दुसरा ब्रिटनच्या राज्याचे प्रमुख आणि प्रमुख असून पंधरा अन्य स्वतंत्र राष्ट्रमंडल देशांची राणी आहे. राजाकडे "सल्ला घेण्याचा हक्क, प्रोत्साहनाचा अधिकार आणि चेतावणीचा अधिकार" आहे. युनायटेड किंग्डमचा संविधान अनिश्चित आहे आणि बहुतेक असंख्य लिखित स्त्रोतांचा संग्रह असतो, त्यात कायदे, न्यायनिर्मित केस कायदा आणि आंतरराष्ट्रीय संधि समावेश आहेत. +सामान्य नियम आणि "संवैधानिक कायदा" यांच्यात तांत्रिक फरक नसल्यामुळे, यूके संसदे "संवैधानिक सुधारणा" करू शकते केवळ संसदेच्या कृती पार करून, आणि अशा प्रकारे संविधानाच्या जवळजवळ कोणत्याही लिखित किंवा अवांछित घटकाला बदलण्याची किंवा समाप्त करण्याचे राजकीय सामर्थ्य आहे.तथापि, संसदेत असे कोणतेही नियम होऊ शकत नाहीत जे भविष्यात संसदेत बदलू शकणार नाहीत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14742.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2de64a306a2625af0d2da637a24a9336537de8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14742.txt @@ -0,0 +1,15 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +युक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हिएत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हिएत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य हे सोव्हिएत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. +६,०३,७०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा जगातील ४४व्या क्रमांकाचा देश आहे. ह्या बाबतीत युक्रेनचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनला २,७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. द्नीपर ही युक्रेनमधून वाहणारी प्रमुख नदी असून डॅन्युब नदी युक्रेन व रोमेनियाच्या सीमेवरून वाहते. +युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. +युक्रेन देश २४ ओब्लास्त, क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक व क्यीव आणि सेव्हास्तोपोल ही दोन विशेष शहरे अशा राजकीय विभागांचा बनला आहे. +युक्रेनी वायुसेना देशाच्या संरक्षण दलाचा भाग[५] असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.[६][७] +युक्रेनमध्ये रस्त्यांचे जाळे १,६४,७३२ किमीचे आहे. त्यातील १०९ किमीचा क्यीव-द्निप्रोपेत्रोव्स्क आणि १८ किमी लांबीचा क्यीव-बोरिस्पिल हे मार्ग द्रुतगती मार्ग आहेत. +युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेली ही कंपनी २३,००० किमी लांबीच्या लोहमार्गांचे व्यवस्थापन करते. +एरोस्वित आणि युक्रेनियन इंटरनॅशनल एरलाइन्स या युक्रेनच्या सगळ्यात मोठ्या विमानकंपन्या आहेत. क्यीव आणि ल्विव येथील विमानतळ सगळ्यात मोठे असून दोनेत्स्कचा विमानतळ आता उद्ध्वस्त झाला आहे. +ओदेसा हे युक्रेनचे सगळ्यात मोठे बंदर असून येथून काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील मोठ्या शहरांना सागरी सेवा उपलब्ध आहे. +सोव्हिएत संघाच्या शारिरिक शिक्षणावर भर देण्याच्या व क्रीडा संकुले बांधण्याच्या धोरणाचा युक्रेनला फायदा झाला. संघाच्या विघटनानंतर युक्रेनला असंख्य स्टेडियम व मैदाने मिळाली. सध्या क्यीवमधील ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व राष्ट्रीय स्टेडियम मानले जाते. +फुटबॉल हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ऑंद्रे शेवचेन्को हा येथील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे. युक्रेनने युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धेचे पोलंडसोबत आयोजन केले आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14747.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9051ce1b14d982ddfc3acc476d94674d503e4c38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14747.txt @@ -0,0 +1,13 @@ +विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.)ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) शिक्षणक्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते. या आयोगाची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १९५३ रोजी करण्यात आली.इ.स.१९४४ मध्ये सार्जंट समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली होती. सुरुवातीस या समितीचे कार्यक्षेत्र बनारस, अलीगढ व दिल्ली विद्यापीठापुरते होते. इ.स.१९४८ मध्ये डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोग स्थापनेची शिफारस केली. इंग्लंड मधील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर भारतातही असा आयोग स्थापन करावा अशी शिफारस केली. इ.स.१९५३ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्घाटन झाले. इ.स.१९५६ च्या कायद्यानुसार 'यूजीसी'ला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. +शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो. उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो. शैक्षणिक क्षेत्रातील खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्दिष्ट आहे. +प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी 'यूजीसी'ने सहा प्रादेशिक केंद्रांची स्थापना केली – +, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, गुवाहाटी.भोपाल +विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)च्या कार्यकारी मंडळात एकूण १२ सदस्य असतात. यात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सचिव (शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय) +अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. उपाध्यक्षांचा कार्यकाळ ३ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो व इतर सदस्यांचा कार्यकाळ ३ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्ष वयापर्यंत असतो. वरीलपकी कोणतीही व्यक्ती दोनपेक्षा जास्त वेळा निवडून येत नाही. अध्यक्ष असताना त्या व्यक्तीला कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत राहता येत नाही. +यू.जी.सी.ची कार्य दोन प्रकारची असतात. +विद्यापीठ हे वित्तविषयक गरजेची तपासणी करते, तसेच केंद्र शासनाला विद्यापीठांना अनुदान साहाय्य देण्यासाठी शिफारस करते. यूजीसी हे विद्यापीठांना त्यांच्या शिक्षण सुधारणांसाठी सल्ला देते. विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा व त्याच्यासाठी उपलब्ध सोयीसुविधा यासंबंधी आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाला सल्ला देते. +उच्च शिक्षणाच्या विकासासाठी विविध योजना राबवणे, आयोगाकडे उपलब्ध निधी विद्यापीठांना योग्य प्रकारे योग्य निकषांवर वाटप करणे, उच्च शिक्षणाचे अध्यापन, संशोधन व परीक्षा पद्धती यांच्या दर्जा निश्चितीबाबत व्यवस्थापन करणे. +जर्नल ऑफ हायर एज्युकेशन, बुलेटिन ऑफ हायर एज्युकेशन, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट इन इंडिया. +विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणांची अंमलबजावणी अभिमत, खासगी, स्वायत्त व सरकारी विद्यापीठे (केंद्रीय व राज्य सरकारांची) यांच्या मार्फत काही प्रमाणात केली जाते. +विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन प्राधिकरण या संस्था बरखास्त केल्या जाणार असून, यापुढे राष्ट्रीय उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग ही शिखर संस्था स्थापून उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी नियोजन केले जाईल. +विद्यापीठ अनुदान आयोग संकेतस्थळ (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14753.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3ff7e7878bff7509e31ece09f7b8ca090308e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14753.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसीयूटीसी+०:२० ही यूटीसी पासून ० तास २० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14762.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70e8cbdfe488bcfce38b8fe0d379145dd875930b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14762.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०४:०० ही यूटीसीच्या ४ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: रशिया, जॉर्जिया, संयुक्त अरब अमिराती, आर्मेनिया, सेशेल्स व मॉरिशस ह्या देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1477.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48df567b34d5cc6dc8945001bf42098a916bb252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1477.txt @@ -0,0 +1,7 @@ +१८° ०१′ ००.१२″ N, ७५° ३१′ ००.१२″ E +माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी (१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. +माढा तालुक्यात टेंभुर्णी​ जवळील भीमानगर या गावाजवळ,सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी ठरलेले भीमा नदीवरचे उजनी​ हे एक मोठे धरण आहे.याचे पाणी पुढे नीरा-नरसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला'यशवंतसागर'असेही संबोधले जाते. +या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (Gigalitres) एवढी प्रचंड आहे.११७ टि.एम.सी (१००%) क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोहचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात.फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. +माढ्यामध्ये प्राचीन भुईकोट किल्ला आहे. याची निर्मिती राव रंभाजी निंबाळकर राजे यांनी केली. माढा शहराची लोकसंख्या जवळपास ३०,००० आहे. माढ्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली अाहे. किल्ल्याची पडझड झाली आहे.पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14770.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570adee1dd5c60e1d36b9ae5f4eb175f488251ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14770.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०६:३० ही यूटीसीच्या ६ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ म्यानमार देशात व ऑस्ट्रेलियाच्या कोकोस द्वीपसमूह येथे पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14776.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca2b68443e95a2aef73d3d2eaa8f35dd78cd7a1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14776.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०९:४५ ही यूटीसी पासून ९ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14783.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db1b313054f72ec99ab20ebd29cffe2b02f4627c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14783.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+११:३० ही यूटीसी पासून ११ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ऑस्ट्रेलिया देशाचे नॉरफोक द्वीप येथे ही प्रमाणवेळ पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1479.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..968eb7dff98f729d03b8b09661367bfe441950a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1479.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +स्त्री अबला तिच्या शरीर रचनेमुळे ठरते. तिच्यात प्रेमाचा सागर सामावलेला असतो म्हणून ती कठोर होऊन कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. उलट प्रमाने त्याला क्षमा करते. तिचे हेच रूप अबला ठरते. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' पूर्वी स्त्रियांना फारच बंधनात राहावे लागायचे. बालविवाह, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक काही रुढीमुळे स्त्री अबला होती किंवा ठरली. त्यामळे तिच्यात सतत कोणाचा तरी धाक असायचा. लग्नाआधी आई -वडील व लग्नानंतर पती -मुलगा अशाप्रकारे तिच्यावर पुरुषप्रधान समाजाचा पगडा असायचा आणि तिला स्वतःला काही विचार मांडण्याची बंदी आहे /होती. स्त्रीला मनच नाही चार भिंती, चूल आणि मुलं हेच तिचे विश्व् आणि हेच तिचे जीवन होते. पण स्त्रीरत्नांची खरी पारख ही आपल्या नेत्यांनी केली आणि तिला या रूढींनी जखडलेल्या समाजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. +महात्मा गांधी म्हणत, "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी" अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्त्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबलातून सबला झाली ती सावित्रीबाई फुले या स्त्रिरत्नामुळे. शिक्षणामुळे स्त्रीला आपले हक्क, कर्तव्य समजले. तिच्यात क्रंतिकारक बदल घडून आला आणि अबला की सबला हाच प्रश्न निर्माण झाला. +हा श्याम कोण? या श्यामला महान बनवण्याचे काम त्याच्या आईनेच केले. 'अरे श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप" असा कानमंत्र देणारी कोण? स्त्रीचं ना? शिवाजीचा छत्रपती शिवाजी करणारी कतृर्त्वान कोण? स्त्रीचना !यातून स्त्री स्वतःला ओळखून पुढे आली व आता तर तिच्या कर्तृत्वाने एवढी पुढे गेली की, तिच्या हाती संपूर्ण राष्ट्रच गेले आणि ती राष्ट्रपती झाली. ही क्रांती तिच्यातून अबालपण काढून सबला होण्यास कारणीभूत ठरली. +महिलांनी नोकरी मिळणे हे त्याचे सबलीकरण नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा चतुस्त्र विकास त्यात अपेक्षित आहे. स्त्री स्वतंत्र म्हणजे स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग. हुंडा व वंशाला दिवा म्हणून होणारा छळ तसेच गरीब कुटूंबात असलेली मुलीच्या शिक्षणाविषयीची अनास्था पण. त्याचबरोबर समस्या असतांनाही 'में लिखुंगी, पढुगीं, मेहनत भी करुंगी, बेटी हूं बेटी में तारा बनुगी"असा दुर्दम्य आशावाद व्यक्त्त करण्यात येतो. +स्त्री आज समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुटूंबाच्या उन्नतीचा वाटा आहे पण तिला स्वतःची जागा मिळविण्यासाठी झगडावे लागते. स्त्रियांना भेसवणाऱ्या त्या पारंपरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. +आज सर्वच ठिकाणी आपल्याला स्त्रीचा पगडा दिसून येतो. +स्त्री एवढी कर्तृत्वान असूनसुद्धा तिची चाचणी करून हत्या केली जाते? हत्या करून घेणारे हे का विसरतात कीं, त्यांना जन्म देणारी एक स्त्रीच होती मग तिला या जगात पाऊल टाकायला बंदी? +स्त्रीने या पुरुषाला वारंवार खांदा दिला यमाच्या तावडीतून तिने पतीची सुटका केली असे असूनही तिची मातेच्या उदरातच हत्या का? हा विषय मनात आला तर माझी पारं झोपच उडते आणि मनाला खेद वाटतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14800.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6795a40888c2f41e1e9f42640534224e7a111a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14800.txt @@ -0,0 +1,3 @@ +यूटीसी+५:४० ही यूटीसी पासून ५ तास ४० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. +ही वेळ काठमांडुच्या रेखांशाप्रमाणे प्रमाणवेळ असून १९८६पर्यंत ही वेळ नेपाळमध्ये प्रमाणवेळ धरली जात असे. +१९८६ नंतर नेपाळी प्रमाणवेळ यूटीसी+५:४० ही निश्चित करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14835.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42dfc2e295105cd2fe21294d87a6ad66593d56a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14835.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी-१२:०० ही प्रमाणवेळ यूटीसी वेळेच्या १२ तास मागे आहे. संपूर्णपणे निर्मनुष्य असणारी ही एकमेव प्रमाणवेळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14841.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b73d5edea3b0fb46c59a263fb9e6f58d5661f04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14841.txt @@ -0,0 +1 @@ +यूथ प्रेस क्लब ही युवा पत्रकारांची संघटना आहे. पत्रकार दशरथ यादव, चंद्रकांत भुजबळ, ज्ञानेश्वर भाकरे यांनी १९९६ साली ही संघटना स्थापन केली. २००० साली बहुजन समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रेस क्लबचा पुरस्कार वितरण समारंभ व शहीद पत्रकार स्मृतीस्तंभ प्रतिकृतीचे अनवारण झाले. दशरथ यादव काही वर्षे युथ प्रेस क्लबचे अध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14842.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f28e40726024f492671118d6ffb0a405a824f9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14842.txt @@ -0,0 +1 @@ +यून बॉ-सिऑन (कोरियन: 윤보선; २६ ऑगस्ट १८९७ - १८ जुलै १९९०) हा दक्षिण कोरिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14846.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ea5032a099be6f56ff5eec2b0430643f0a8547a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14846.txt @@ -0,0 +1,51 @@ + +युनिकोड (रोमन लिपी: Unicode) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक वर्णसंच आहे. +'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे ‘कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे’. +येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते. +हेच उदाहरण पुढे वाढवल्यास मराठीतील १२ स्वर आणि ३६ व्यंजन अक्षरे ही एकूण ४८ आकड्यांनी ओळखता येतील. असे केल्यास हा नवीन कॅरॅक्टर संच एकूण ४८ अक्षरांना आकड्यांचे स्वरूप देईल. +असे करण्याचे एकच कारण आहे व ते म्हणजे संगणकास कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. संगणकावर साठवलेली सर्व माहिती ही केवळ आकड्यांच्या स्वरूपात साठवलेली असते. त्याचप्रमाणे संगणकास समजणारी सर्व आज्ञावली हीदेखील आकड्यांच्याच स्वरूपात साठवली जाते. + +उदा. cat हा शब्द आस्कीमध्ये ९९ ९७ ११६ ह्या तीन आकड्यांत साठवला जातो; तर Cat हा शब्द ६७ ९७ ११६ असा साठवला जातो. 'Windows 95' हा मजकूर '८७ १०५ ११० १०० १११ ११९ ११५ ३२ ५७ ५३' असा होईल व संगणकात साठवला जाईल. आस्कीप्रमाणे इतर अनेक कॅरॅक्टर सेट्‌स प्रचलित असून बहुतांश देशांमध्ये त्या देशाच्या भाषेप्रमाणे कोणतातरी एक कॅरॅक्टर संच प्रमाण मानला जातो. भारतीय भाषांकरिता प्रमाण कॅरॅक्टर सेट इस्की (इस्की) हा आहे. (हा भारतीय सरकारद्वारे साधारणतः १९८० च्या दशकात विकसित करण्यात आला) +असाच एक कॅरॅक्टर सेट म्हणजे युनिकोड. +आस्की किंवा इस्की यांसारखे कॅरॅक्टर सेट फक्त ठरावीक भाषेसाठी ठरवण्यात आले आहेत. भारतीय भाषांसाठी जरी 'इस्की' संच असला तरी तो 'आस्की'चेच रूप आहे. कारण 'आस्की'ला फक्त इंग्रजीलाच बरोबर घेऊन पुढे जायचे होते, तर 'इस्की'ला देवनागरीसह इंग्रजीला घेऊन पुढे जायचे होते. जगातील सर्व भाषांचा संगणकावर वापर करता यावा व सर्व भाषा एकाच कॅरॅक्टर सेटमध्ये वापरता याव्यात यासाठी युनिकोडची निर्मिती करण्यात आली. +(The en:Unicode range for Devanāgarī is U+0900 .. U+097F.) +राखाडी रंगाचा ठोकळा अक्षरांसाठी सध्या रिकामी ठेवलेली घरे दाखवतो. +जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या) + + +Unicode Chart for Devanagari +जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf-२ संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या) + +जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf-३ संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या) +साचा:Unicode chart Vedic Extensions +टंक म्हणजे font. देवनागरी लिपीसाठी हजारो टंक उपलब्ध आहेत. + +टंकाबद्दल माहिती +काही अक्षरे ही दोन युनिकोड जोडून तयार करावी लागतात, परंतु काही अक्षरांना स्वतःचा युनिकोड असतो, तरीही बऱ्याचदा ही अक्षरे चुकीची लिहिली जातात. जसे की ॲच्या जागी ऍ (ही चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे ).(ही चूक कशी? ऍ हे अक्षर मराठीत नाही, अ‍ॅ (‘अ’ वर चंद्र) हे आहे. +क + ् + ष = क्ष +ज + ् + ञ = ज्ञ +ऱ +् + य = ऱ्य +(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्यच्या जागी ऱ्य ). .) +ऱ +् + ह = ऱ्ह +(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्हच्या जागी ऱ्ह ). .) +क + ् + र = क्र +प + ् + र = प्र +क + ् + क + ् + य = क्क्य +त + ् + र = त्र +र +् + क = र्क +र + ् + व = र्व +ब + ृ = बृ + + +व्यंजनाला पायाशी लावलेले हलन्त(पाय मोडायचे) चिन्ह त्या व्यंजनाचा निभृत(स्वरहीन) उच्चार करावा असे सूचित करते. अशा हलन्त व्यंजनापाठोपाठ दुसरे व्यंजन आले की जोडाक्षर बनते.जोडाक्षर झाल्यामुळे पहिले हलन्त व्यंजन तसे रहात नाही. पण कधीकधी हे पायमोडके अक्षर दिसावे अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर विलगक’(ZWNJ-Zero Width Non-joiner) वापरून एका पायमोडक्या व्यंजनाशेजारी दुसरे व्यंजन टंकित करता येते. हे साध्य करण्यासाठी युनिकोडने U+200C या संकेताक्षराची योजना केली आहे. +उदा० +या उलट कधीकधी दोन्ही व्यंजने आडव्या बांधणीने जोडली जावी अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर सांधक’((ZWJ-Zero Width Joiner) लागतो. युनिकोडने त्यासाठी U+200D या कोडची योजना केली आहे. (कधीकधी अक्षरे उभ्या जोडणीने जोडली जावी अशीही आमची इच्छा असते, त्यासाठी युनिकोडने काय सोय केली आहे?) + + +जर अक्षर-सांधक किंवा विलगक वापरला नाही तर, + + +आणि, + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14850.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83a8f5ac8861888dd74bc632869bdc6bf770878f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14850.txt @@ -0,0 +1,2 @@ +उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे. +उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14861.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0352d47b460dc79c4995ed8136cacbe9669c084c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14861.txt @@ -0,0 +1,2 @@ +युरे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. यूरे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या १,००० होती. +यूएस ५५० हा महामार्ग या गावातून जाणारा एकमेव पक्का रस्ता आहे. या प्रदेशाची उंची, हवामान, डोंगर, इ. युरोपमधील स्वित्झर्लंडसारखे असल्याने याला अमेरिकेचे स्वित्झर्लंड म्हणले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14865.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2db7fd0fb3bf96cf06e396f8358bdee206a66e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14865.txt @@ -0,0 +1,12 @@ +युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे. +भौगोलिक दृष्ट्या युरोप खंड चार प्रदेशांमध्ये विभागला जातो. +अनेकदा मध्य युरोप हा देखील एक भौगोलिक प्रदेश समजला जातो. +युरोप खंडामध्ये एकूण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. ह्यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघाचे सदस्य आहेत. +वरील ५० स्वतंत्र देशांव्यतिरिक्त खालील अंशतः मान्य देश तसेच वरील देशांच्या अखत्यारीखालील प्रदेश युरोपामध्ये मोडले जातातः + + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14880.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d5d9515496c524fd690319061da51ad3d29e8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14880.txt @@ -0,0 +1 @@ + ये हैं मोहब्बते ही स्टार प्लस वर प्रसारित झालेली सर्वाधिक काळ चाललेली एक हिंदी मालिका होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14889.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27537aa4d8ac6b791847b5fb9cc17e072e7b7498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14889.txt @@ -0,0 +1 @@ +येकांबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1489.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a7fe026088619089a0601cc10cbd3937166272 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1489.txt @@ -0,0 +1 @@ +मणीन्द्र अग्रवाल (२० मे, १९६६ - ) हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथील प्राध्यापक आहेत.[१] यांना पद्मश्री पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच पहिला इन्फोसिस गणित पुरस्कार मिळाला आहे.[२] [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14894.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507b9e861c468061050bfa8818a7e039d3d63a01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14894.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 56°50′N 60°35′E / 56.833°N 60.583°E / 56.833; 60.583 + +येकातेरिनबुर्ग (रशियन: Екатеринбург) हे रशिया देशाच्या स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे व उरल संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. येकातेरिनबुर्ग शहर रशियाच्या मध्य-पश्चिम भागात युरोप व आशिया खंडांच्या सीमेजवळ व उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १३.५ लाख लोकसंख्या असलेले येकातेरिनबुर्ग रशियामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील येकातेरिनबुर्ग हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. +रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14923.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7577260c43859ab62781afdb05ce087b2f566c30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14923.txt @@ -0,0 +1,3 @@ +येडुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. +येडुर साठवण तलाव diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14926.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c9626fc0c0a4891a389afc29b69eebbbe99e0fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14926.txt @@ -0,0 +1,2 @@ +येडे निपाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14948.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca897be02ad61e17beb896fea6ce9dcded741e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14948.txt @@ -0,0 +1,2 @@ +येताळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14955.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08e5e33f78b1b03b26d7e226e7d2c18751bd4389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14955.txt @@ -0,0 +1,2 @@ + येनाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1497.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..324086679b73b8cc9241ca4e6b04e9c19703f8ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1497.txt @@ -0,0 +1 @@ +मणिपुरी ही भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा ईशान्य भारतातील सुमारे १५ लाख लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार मणिपुरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14979.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9cb057c16967c95e2f20e656978e0a32f350277 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14979.txt @@ -0,0 +1,2 @@ + येरंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14992.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c4ebe72fd8efbe1cc58cfd521948101b73d0c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14992.txt @@ -0,0 +1 @@ +येरणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14994.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..876907b49c14a5fb7ba95932bc6cc4684335eaf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_14994.txt @@ -0,0 +1,2 @@ +येरणे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15000.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9475cffb07379cf9397f2789eef28dd1e8000f52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15000.txt @@ -0,0 +1,18 @@ +येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.धाराशिव जिल्हा येरमाळापासून तब्बल 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि येडेश्वरी देवी मंदिर मात्र 4 किलोमीटर वर आहे. भाविकांचे हे मोठे श्रद्धास्थान मानले जाते. +येरमाळा मासे, खेकडे आणि इतर जलचर पालन व खाद्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दर आठवड्याला भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठा बाजार भरतो आणि त्यातून शेतकरी आणि बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. +येडेश्वरी मंदिर +या ठिकाणी येरमाळा पासून चार किमी अंतरावर देवीचे हे मंदिर आहे. +तुळजाभवानी देवीचा रूद्रावतार म्हणून या देवीला पाहिले जाते त्यामुळे +तुळजापूर दर्शन करून येडेश्वरी दर्शनाकरता भाविक येतात . +तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यावर येडेश्वरीदेवीचे दर्शन घ्यावे लागते +तरच देवीचे पुर्ण दर्शन होते अशी श्रद्धा आहे . +मंदिर उंच टेकडीवर स्थित असून मंदिरात देवीचा शेंदूराने लेपलेला पिंडी +आकाराचा तांदळा आहे त्यावर चहू बाजूने नागवेलिच्या पानांचा वेढा देऊन +मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून मंदिरावर वेगवेगळ्या देवतांच्या मुर्त्या +दिसतात.जवळच मातंगीदेवीचेही स्थान आहे. +एके काळी येथे एक स्त्री वारंवार येत असे .या ठिकाणी कसलेही देवूळ +नव्हते .ती स्त्री येथे येऊन पुजापाठ करत असे मात्र लोक तिला वेडी समजत +.याच स्त्री च्या मुळे आज येडेश्वरी हे मंदिर टेकडीवर उभे आहे. +देवीच्या प्रसादाचा मान त्या स्त्रीच्या वंशजांना आहे . +उपळाई diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15001.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72fee3b8465cdbefe89d2632d4d19f5f08044d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15001.txt @@ -0,0 +1,2 @@ + येरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15010.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98b7de1e11c80100329016aac90b1ce6a5763826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15010.txt @@ -0,0 +1,10 @@ +येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे ३,६०० कैदी बंदिस्त राहू शकतात. +या तुरुंगात महात्मा गांधींपासून अजमल कसाबपर्यंत अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते. +हे कारागृह ५१२ एकर जागेत पसरलेले आहे.[१] इथे ५०००हून जास्त कैदी राहू शकतात आणि दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा सेलसुद्धा आहेत. +येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बांधले. तेव्हा येरवडा पुणे गावाबाहेर होते.[२] +ब्रिटिश राजवटीमध्ये या कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावासात ठेवले होते. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस,जोकिम अल्वा आणि लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांचा समावेश आहे.[२] १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा येथे ठेवण्यात आले होते.[३] महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. विशेषतः १९३२ आणि नंतर १९४२ मध्ये चले जाव चळवळीच्या वेळी ते इथे होते. १९३२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यावर त्यांना येथे ठेवण्यात आले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी हे उपोषण मागे घेतले.[४] मे १९३३ मध्ये गांधीजींची तुरुंगवासातून सुटका करण्यात आली.[५] +१९७५-७७ मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या अनेक राजकीय विरोधकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते आणि वसंत नारगोळकर यांचा सामावेश आहे.[६][७] +१९९८ मध्ये प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांनी दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला हरल्यावर काही काळ या तुरुंगात होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त २००७ मध्ये या तुरुंगात होता. तसेच स्टँप पेपर घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगी या तुरुंगात होता.[८] २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब २००८ मध्ये या तुरुंगात होता. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये येथेच फाशी देण्यात आले आणि दफन करण्यात आले.[९] +येरवडा खुले कारागृह हे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर याच आवारात आहे.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असते आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही.[१०] खुल्या कारागृहातील कैदी पाच गुंठे जमिनीत शेती पिकवतात. याशिवाय येथील गोठ्यात ३० गायी आहेत. त्यांचे शेण येथील शेतीसाठी वापरले जाते. खुल्या कारागृहातील महिला कैदीसुद्धा शेती करतात. विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. भाज्या कारागृहातील स्वयंपाकघरासाठी वापरल्या जातात.[११] +गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी येरवडा कारागृहात एक उपक्रम राबवला जातो. याची सुरुवात २००२ असीम सरोदे यांनी केली. या उपक्रमांतर्गत कैद्यांना वर्षभर गांधीजींची विचारसरणी शिकवली जाते. वर्षाच्या शेवटी ‘गांधी विचार परीक्षा’ घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश ऐच्छिक आहे.[१२] +कारागृहातील कैदी दररोज ५००० कपडे तयार करतात. कारागृहात कैद्याच्या पुनर्वसनासाठी नागरिकांसाठी कैद्यान्द्वारे इस्त्री विभाग चालवला जातो, तसेच केशकर्तनालयसुद्धा चालवले जाते.[१०][१३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15028.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c63d1dc8e1a294e8562e39d7a0f78f07a1b4310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15028.txt @@ -0,0 +1,2 @@ +येल विद्यापीठ अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यू हेवन शहरातील विद्यापीठ आहे. आयव्ही लीग विद्यापीठांतील एक असलेल्या या शिक्षणसंस्थेची स्थापना १७०१ मध्ये झाली होती. अमेरिकन क्रांतीच्या आधी सुरू झालेल्या नऊ कलोनियल कॉलेजांपैकी एक असलेले येल विद्यापीठ अमेरिकतील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जुनी उच्चशिक्षणसंस्था आहे. +या विद्यापीठात अंदाजे १२,००० विद्यार्थी ४,४१० प्राध्यापकांकडून शिक्षण घेतात. येथील माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेचे पाच राष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि उद्योजकांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15043.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..388c4255ee2ed65753465ad2ecc6f94bdc37b3d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15043.txt @@ -0,0 +1,3 @@ + +येलेना ओस्तापेन्को (लात्व्हियन: Jeļena Ostapenko; ८ जून १९९७) ही एक व्यावसायिक लात्व्हियन टेनिसपटू आहे. २०१७ सालची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून ओस्तापेन्को ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत विजय मिळवणारी पहिलीच लात्व्हियन टेनिस खेळाडू ठरली. एका अन-सीडेड महिला टेनिस खेळाडूने फ्रेंच ओपन जिंकण्याची १९३३ सालानंतर ही पहिलीच वेळ होती. ह्या विजयामुळे ओस्तापेन्को डब्ल्यू.टी.ए. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर पोचली. +ओस्तापेन्को आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आना इसाबेल मेदिना गारिगेस ही माजी टेनिस खेळाडू सध्या ओस्तापेन्कोची प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15066.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f942b46cdd03788dc3e8d789ebc58ae3011a97b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15066.txt @@ -0,0 +1,2 @@ + येळदरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15070.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1cefd93d4bb300f03c7b38798bc72eb326bb88d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15070.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळमारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15074.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..588819051852778c543f721b7c65944b176b8a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15074.txt @@ -0,0 +1,8 @@ + येळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15093.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d43ea596329b73b76f41d1b5b750a707cf7a688 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15093.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15106.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d23d500d8716aa3e53cfb75315b29edf0cc8d43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15106.txt @@ -0,0 +1,2 @@ +येवटा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15129.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..287e91e6518f000a29dcf5168d9c4bd5521556c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15129.txt @@ -0,0 +1 @@ +येवला रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15135.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43a2db002188c771e0afd3866708b3355347b8b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15135.txt @@ -0,0 +1,2 @@ +येवलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15140.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15140.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15142.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15142.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15152.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f387b0c75073653cd23fdd05c2739414519ec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15152.txt @@ -0,0 +1,2 @@ +येसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15166.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00072fab1c07240e3485e29c451f737c10d99b8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15166.txt @@ -0,0 +1,5 @@ +येसोपेट (लिटल इसाप) हा फ्रेंच साहित्यातील कथांच्या मध्ययुगीन संग्रहाचा संदर्भ देतो. विशेषतः इसापच्या दंतकथांच्या आवृत्त्यांसाठी. वैकल्पिकरित्या इसोपेट-अविऑनेट हा शब्द सूचित करतो की दंतकथा इसाप आणि एव्हियनस या दोघांकडून घेतल्या गेल्या आहेत. +'येसोपेट' या शब्दाची उत्पत्ती बाराव्या शतकातील आहे. जिथे ती प्रथम मेरी डी फ्रान्सने वापरली होती. ज्याच्या १०२ दंतकथांचा संग्रह अँग्लो-नॉर्मन ऑक्टोसिलॅबिक दोहेत लिहिलेला होता. तिने आल्फ्रीडच्या मूळ कृतीतून अनुवादित केल्याचा दावा केला आहे. परंतु आल्फ्रिड अशा कोणत्याही जुन्या इंग्रजी साहित्याचा पुरावा नसल्यामुळे, यावर विवाद निर्माण झाला आहे.[१] +यातील दंतकथा विविध स्रोतांमधून आलेल्या आहेत. त्यात केवळ प्राणी (आणि कीटक) नसून मानव देखील आहेत. पहिल्या चाळीस कथा इसापच्या रोम्युलस संग्रहांपैकी एकाशी संबंधित आहेत, परंतु तेथेही थोडी भिन्नता आहे. तिने "द डॉग अँड द चीझ" नावाची कथा द डॉगच्या शास्त्रीय आवृत्त्यांपेक्षा वेगळी आहे. त्याचे प्रतिबिंब तंतोतंत तपशीलवार आहे की ते वाहून नेत असलेल्या हाडे किंवा मांसाच्या तुकड्यापेक्षा ते चीज आहे. इतर अनेक कथा येसोपेटमध्ये प्रथमच दिसून येतात. विशेषतः ज्या मानवांबद्दल आहेत. किमान एक, द माऊस टेक्स अ वाईफ, फक्त पश्चिमेला प्रथमच दिसते. परंतु पूर्वेकडील साहित्यात याबद्द्ल अगोदरच उल्लेख दिसून येतात. इतर अजूनही लोककथेच्या चांगल्या प्रस्थापित श्रेणींमध्ये बसतात आणि त्यांचे तोंडी प्रसारण सुचवतात. +यात गुंतलेल्या पात्रांच्या वागणुकीतून नैतिक निष्कर्ष काढण्यात आला आहे की मेरी सर्वात वैयक्तिक आहे, १२ व्या शतकातील सरंजामशाही समाजातील वास्तविकता प्रतिबिंबित करते. त्याच वेळी त्यामधील लोकांच्या वैयक्तिक कल्याणाची चिंता देखील दिसून येते. तिचे स्तरीकरण स्वीकारत असताना, त्यांच्या पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर तिची टीका तीक्ष्ण आहे आणि दीनदलितांच्या दुर्दशेबद्दल तिची सहानुभूती स्पष्ट दिसते. विशेषतः ती कायदेशीर व्यवस्थेतील असमानता (द वुल्फ अँड द लँब, द डॉग अँड द शीप ), डेप्युटीची अयोग्य निवड आणि विश्वासाचा विश्वासघात यावर टीका करते. +मेरी लू मार्टिनच्या भाषांतरातील प्रस्तावना आणि पहिल्या काही दंतकथा गुगल बुक्सवरील मर्यादित पूर्वावलोकनामध्ये आढळू शकतात [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1518.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26cd11cac11e34e1cf6b94678a7dd388d05986a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1518.txt @@ -0,0 +1 @@ +मणीमाला सिंघल (११ एप्रिल, १९६५:दिल्ली, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९१ दरम्यान ६ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15181.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9b17124cef945464b5509aa1cba4c16cfa2c787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15181.txt @@ -0,0 +1,2 @@ +यॉर्क क्रिकेट क्लब हे इंग्लंडच्या यॉर्क शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15191.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df5ccd5e90723b66968aa35d9e586948a3dfd111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15191.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +आन योंग-हाक (हांजा: 安英學 ; कोरियन: 안영학 ;) (ऑक्टोबर २५, १९७८ - हयात) हा जपानात जन्मलेला उत्तर कोरियन फुटबॉल खेळाडू आहे. आन उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर जे. लीग डिव्हिजन १ साखळी स्पर्धेत ओमिया आर्दिजा संघाकडून खेळला आहे. तो मधल्या फळीतील खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1520.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d57264afffbc2feaec3e4951fc5d8ecc7e4d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1520.txt @@ -0,0 +1 @@ +मणी रत्नम (तमिळ: மணி ரத்னம்) (जून २, १९५६ - हयात) हे एक तमिळ चित्रपटनिर्माता, पटकथालेखक, दिग्दर्शक आहेत . diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15206.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cced3168ec0dc0f0e4c0907d8c7cc81de450908a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15206.txt @@ -0,0 +1,33 @@ +योग आणि महिलांचे आरोग्य +महिलांच्या आयुष्यात तीन टप्पे महत्त्वाचे असतात. +पहिला टप्पा म्हणजे ती वयात येते व ज्या वेळी तिला पाळी येते तो. +दुसरा टप्पा ती जेव्हा गरोदर असते तो आणि +तिसरा म्हणजे रजोनिवृतीचा +हे तिन्ही टप्पे पार करतना जर प्रत्येक स्त्रीने योगासने केली तर तिचे आयुष्य वेदनारहित जाईल. + +योग म्हणजे काय? +योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय. +महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो.                     +महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाची आठ अंगे सांगितलेली आहेत. +योगात यम, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे. +नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे ते अनुष्ठान आहे. +योगासन म्हणजे विशिष्ट स्थितीत शरीर स्थिर करणे होय. +प्राणायाम हे मनाच्या शांतीचे साधन आहे. +प्रत्याहार हा मनाला भोगांपासून परावृत्त करतो. +धारणा हे एकाग्रतेचे नाव आहे. +एकाग्रताने स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी. +महिलांचे स्वतः कडे दु्र्लक्ष +महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा  होतो. मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून लागते डिप्रेशन येते. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी महिलांनी थोडे स्वार्थी होणे गरजेचे असते. त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा, चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा एक तास योग केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात वाढते वजन नियंत्रणात येते. विकार बरे होतात. वाढते शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इन बॅलन्सने सुरू होतात. योग केल्यामुळे सर्व समस्या कमी होऊ शकतात आसनेन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, केल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे. +महिलांचे मानसिक विकार +महिलांना जीवन जगत असताना मनाची अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे . +मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात.त्यांना स्त्रियांमधील मानसिक आजार असे म्हटले जाते. +या टप्प्यावर स्त्रियांना मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. +शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते. +पौगंडावस्थेमध्ये मुलींमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा, कंटाळाव अन्य त्रास होतात. काही स्त्रियांना हे त्रास तीव्रतेचे होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चिडचिडेपणा, उदासपणाव झोपेचे त्रास होतात. हे त्रास होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात. +गर्भारपणात महिला आनंदी समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना समाधान वाटते, कधी कधी स्वतः भीती वाटू शकते. हे सर्व त्रास नंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते . +मासिक पाळी थांबण्याच्या वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात. वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह, उदासीनता जाणवते. त्याला डोमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपण्याच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेचा आजार नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या वयात विस्मृतीचे लक्षण असू शकते या सर्व कारणांमुळे या वयात या स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत उपचार केले पाहिजे. +स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक आरोग्यासाठी जसा उपचार सल्ला गरजेचा असतो; त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी महत्त्वाची असते. +योगाचे महत्त्व +योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो, जे जास्त महत्त्वाचे आहे. +ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते; दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते. +प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ कडून योग करावा व आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15210.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da94f16032ea257ed26d4297377375641dbb52e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15210.txt @@ -0,0 +1,8 @@ +योग-समन्वय या ग्रंथामध्ये श्रीअरविंद यांनी भारतीय योगपरंपरेतील प्रमुख सर्व योगांचा विचार केला आहे, आणि त्याचा समन्वय केला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांचा विस्तृत विचार यामध्ये समाविष्ट आहे. तंत्रमार्ग, हठयोग, राजयोग यांचाही धांडोळा यात घेण्यात आला आहे. हा सर्व विचार पार्श्वभूमी स्वरूपात मांडल्यानंतर श्रीअरविंद यांनी त्यांच्या योगाची म्हणजे पूर्णयोगाच्या तत्त्वज्ञानाची विस्तृत मांडणी या ग्रंथात केली आहे. म्हणून पूर्णयोगाचे आकलन करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जातो.[१] +या भागामध्ये समन्वयाची आवश्यक पूर्वपीठिका मांडण्यात आली आहे. यामध्ये ०५ प्रकरणांचा समावेश आहे. +यामध्ये १३ प्रकरणांचा समावेश आहे. +यामध्ये २८ प्रकरणांचा समावेश आहे. +यामध्ये ०८ प्रकरणांचा समावेश आहे. +यामध्ये २५ प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगाची मांडणी करण्यात आली आहे. +प्रकरणश: सारांश (इंग्रजीमधून) +योग-समन्वय (संपूर्ण ग्रंथ pdf स्वरुपात उपलब्ध) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15216.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5465137def61c40c4c81a54114a53a7ea688f0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15216.txt @@ -0,0 +1,4 @@ +योगर्ट[१] (तुर्की: yoğurt) किंवा योगहर्ट हे दुधाच्या किण्वनाने तयार होणारा एक दह्यासारखा खाद्य पदार्थ आहे.[२] योगर्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट बॅक्टेरिया योगर्ट विरजण म्हणून ओळखले जातात. या जिवाणूंद्वारे दुधातील शर्करा आंबवल्याने लैक्टिक ऍसिड तयार होते, जे योगर्टला त्याची रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण आंबट चव देण्यासाठी दुधाच्या प्रथिनांवर कार्य करते.[२] गाईचे दूध हे योगर्ट बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे दूध आहे. याशिवाय पाणथळ म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडी, सांडणी आणि याक यांचे दूध देखील योगर्ट तयार करण्यासाठी वापरले जाते. वापरलेले दूध होमोजिनाईज केलेले अथवा न केलेले असू शकते. ते पाश्चराइज्ड किंवा कच्चे देखील असू शकते. प्रत्येक प्रकारच्या दुधाचे परिणाम वेगळे असतात. +Lactobacillus delbrueckii च्या विरजनचा वापर करून योगर्ट तयार केले जाते. बल्गेरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस बॅक्टेरिया. याव्यतिरिक्त, इतर लैक्टोबॅसिली आणि बिफिडोबॅक्टेरिया कधीकधी योगर्ट संवर्धनादरम्यान किंवा नंतर जोडले जातात. काही देशांना बॅक्टेरियाच्या विशिष्ट प्रमाणात कॉलनी-फॉर्मिंग युनिट्स (CFU) समाविष्ट करण्यासाठी योगर्ट आवश्यक असते; चीनमध्ये, उदाहरणार्थ, लैक्टोबॅसिलस बॅक्टेरियाच्या संख्येसाठी किमान 1 दशलक्ष CFU प्रति मिलीलीटरची आवश्यकता आहे.[३] +जिवाणूंचे विरजण दुधात मिसळून ते 30-45 °C (86–113 °F) पर्यंतच्या उबदार तापमानात ४ ते १२ तास ठेवले जाते ज्यामुळे चांगले किण्वन होते. उच्च तापमान जलद कार्य करते परंतु यात कधी कधी एक गठ्ठा पोत तयार होण्याचा किंवा मठ्ठा वेगळे होण्याचा धोका असतो.[४][५] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15219.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c8a1176225eed66d3d213b3db3eb999892a8af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15219.txt @@ -0,0 +1,8 @@ +योगा फॉर यू ही एक लोकप्रिय भारतीय झी चॅनेल यूएसएची साखळी आहे. या साखळीला २००८ मध्ये अमेरिकेत दाखवले गेले. ही काही प्राचीन भारतीय योग प्रकारांची आपल्या कार्यक्रमांमध्ये ओळख करून देते.[१][२] +या कार्यक्रमाचे आयोजक : +या दैनिक भागात दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे दोन हिस्से असतात योगाचे मास्टर्स दीपा बक्षी आणि दिलीप तिवारी एका विभागात विविध योगासने करतात [१]. दुसरा विभागात कलर्स टीव्ही कार्यक्रम "प्राचीन उपचार " डॉक्टर पंकज नरम हे प्राचीन सिद्ध-वेद उपचार केंद्राचे रहस्य सांगतात. हा कार्यक्रम एक स्वस्थ निरोगी जीवन कसे जगावे आणि टिकवून ठेवावे ह्याकरता मदत करते [३] [४] [५].नॅशनल जिऑग्राफिक चॅनेल यांनी "वर्ल्ड ऑथॉरिटी ऑन एन्शंट हीलिंग" म्हणून डॉ.पंकज नराम यांचे वर्णन केले आहेत[६].या मध्ये घरगुती उपचार रहस्य,योग्य स्वरूपाचा आहार योग आणि प्राचीन उपचार पद्धतिचे रहस्य यांचा समावेश करण्यात आला.[७] ३०००पेक्षा जास्त भाग १६९ देशांमध्ये प्रसारित करण्यात आले आहेत.[१] +"योगा फॉर यू"ची अधिकृत साईट झी टीव्ही यूएसए +डॉ पंकज नरम - प्राचीन गुपिते उपचार आणि रेमेडीज Archived 2017-09-11 at the Wayback Machine. +आयुशक्ती आयुर्वेद +प्राचीन उपचाराचे मार्गदर्शन - डॉ पंकज नरम +डॉ पंकज नरमची "एन्शन्ट हीलिंग" कलर्स टीव्हीवरील नवीन साखळी कार्यक्रम diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15225.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09581769c78b68529a617829d5ccd155463ccfbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15225.txt @@ -0,0 +1,2 @@ +योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ;२९ डिसेंबर, इ.स. १९५२ - ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. इ.स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमामालिनी, रेखा, जया बच्चन व जीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. +किशोर कुमारची ती तीसरी पत्त्नी होती. परंतु लवकरच किशोर कुमार यांना घटस्फोट देउन तिने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15349.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f5287f7cb3c3d3b0c8196d9e353601bb3b04e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15349.txt @@ -0,0 +1 @@ +योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे (ऑगस्ट २८, इ.स. १७४९ - मार्च २२, इ.स. १८३२) हा जर्मन साहित्यिक होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15373.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf921235ea36bf2c6f5984949caa59da8b1b3c08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15373.txt @@ -0,0 +1 @@ +योहानेस हेर्मान झुकेरटोर्ट (७ सप्टेंबर, १८४२ - २० जून, १८८८:लंडन) हा एक पोलिश बुद्धिबळपटू होता. हा नंतर युनायटेड किंग्डमचे प्रतिनिधित्व करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15381.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf921235ea36bf2c6f5984949caa59da8b1b3c08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15381.txt @@ -0,0 +1 @@ +योहानेस हेर्मान झुकेरटोर्ट (७ सप्टेंबर, १८४२ - २० जून, १८८८:लंडन) हा एक पोलिश बुद्धिबळपटू होता. हा नंतर युनायटेड किंग्डमचे प्रतिनिधित्व करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1539.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c16ad63b56a8007029116f3af40db5c7bdffe9d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1539.txt @@ -0,0 +1,2 @@ +मणीबेळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15407.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94df9971fe3e518536432a5924beee00ab2775c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15407.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रमेश द. साठे हे एक मराठी बालसाहित्यकार आहेत. त्यांनी गडकिल्यांच्या सहलीवर पुस्तके लिहिली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15432.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8859e41c07953557db89ab158625356feed6e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15432.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॅंडी वेन शेकमन (३० डिसेंबर, १९४८:सेंट पॉल, मिनेसोटा, अमेरिका - ) हे अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे प्राध्यापक आहेत +यांना जेम्स रॉथमन आणि थॉमस सी. सुडहॉफ यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15434.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07e578f7e1e461c36043147e24c0fd8f9f6fa137 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_15434.txt @@ -0,0 +1,2 @@ +रँडोल्फ काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1544.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d57264afffbc2feaec3e4951fc5d8ecc7e4d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1544.txt @@ -0,0 +1 @@ +मणी रत्नम (तमिळ: மணி ரத்னம்) (जून २, १९५६ - हयात) हे एक तमिळ चित्रपटनिर्माता, पटकथालेखक, दिग्दर्शक आहेत . diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1547.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0792a8103eb5cf39b5f9846c9ac934875cfca08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1547.txt @@ -0,0 +1,2 @@ +मणुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1568.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..704e442730a9b363bb6ca0893d8835660842c2fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1568.txt @@ -0,0 +1 @@ +मतेज माव्रिक रोझिक (२९ जानेवारी, इ.स. १९७९:कोपर, युगोस्लाव्हिया - ) हा  स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_158.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22dc28889e050ea5efd3c5ce5b28f0649d7c93ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_158.txt @@ -0,0 +1,8 @@ +सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील खेड तालुक्यात +अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.इथल्या सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो. +:अथर्व पारंबे +महाराष्ट्राच्या वन्यजीव विभागात सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र १३ हजार ७८ हेक्टर इतके आहे. येथे वन्यजीव विभागाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली व हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट उंच कडय़ांनी दोन भागांत विभागले गेले आहे. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एकमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो, तर भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये ठाणे, रायगड, जिल्हय़ातील जंगलाचा समावेश आहे.धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील प्रमुख गावे आहेत. +हा परिसर गिरिभ्रमण आणि पदभ्रमण यासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात पदभ्रमण करण्यासाठी लोक येत असतात.[१] +भीमाशंकर अभयारण्य हे ‘डेसिडियस फॉरेस्ट’ या वनाच्या प्रकारात गणले जाते. अभयारण्य परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे आणि आईन अशा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. तसेच बिबटय़ा, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळिंदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, मोर असे अनेक प्रकारचे वन्यजीवदेखील भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात. +भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते. +भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेचा पट्टा इनरकॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमुळे गाजतो आहे. १९९२ साली भारतीय वन्य जीव मंडळाने सर्व अभयारण्यांच्या दहा किलोमीटर परिघात ईकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर करावेत असा ठराव केला होता. पण या दृष्टीने वनविभागाने काहीही कारवाई केलेली नाही. उलट २००९ मध्ये भीमाशंकरमध्ये पवन चक्क्यांना परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली गेली आहे.ह्या पवनचक्क्यांसाठी निष्काळजीपणे बांधलेल्या रस्त्यांनी दरडी कोसळताहेत, गाळाने ओढे, नदी-नाले-धरणे भरताहेत आणि सुपीक शेतीची नासाडी होते आहे.फॉरेस्ट रेंजरचा प्रामाणिक अहवाल डावलून,बनावट ठराव सादर करून खोटी माहिती नोंदवत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवन चक्क्यांना दिलेल्या परवानगीबद्दल माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाच्या अहवालातही कडक ताशेरे ओढले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1592.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7878be1ead8746d7337d428718f208c0174587a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1592.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व जर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1618.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e7a52f897c19d015241f133ef2f99dac99b1dd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1618.txt @@ -0,0 +1 @@ +मथुरापूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1670.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f89b76484fd4c37dd24c6be25588c1b64c47b970 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1670.txt @@ -0,0 +1,2 @@ +मदनापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1672.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67b44c9fe7f55f27ccec899c9db6d3f325cf01a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1672.txt @@ -0,0 +1,3 @@ +मदर हे श्रीमाताजींचे मराठी चरित्र आहे. श्री.लक्ष्मीकांत बनसोड यांनी हे चरित्र लिहिले आहे. +दोन शब्द या प्रकरणात लेखकाने हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. +या पुस्तकात एकंदर पंधरा प्रकरणे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1680.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e26152c4ed7cbe898c7d683095aec9a46bc8bb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1680.txt @@ -0,0 +1,2 @@ + मदानी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावतालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1690.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad99d4d98fcbf5714ef5665509e154a2c6fbac86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1690.txt @@ -0,0 +1,8 @@ + +९° ५५′ १०.७८″ N, ७८° ०७′ ०९.८२″ E +मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळ:மதுரை इतर उच्चार : मदुरै] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. +मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरैला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते. +मदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसून येतो. +भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे. +मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. +हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1698.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9a42602d7d6fd2e6507d9f9fc00102be295466 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1698.txt @@ -0,0 +1,16 @@ +मदुराई देहरादून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी तमिळनाडूच्या मदुराई व उत्तराखंडच्या देहरादून ह्या शहरांदरम्यान धावते. चेन्नई सेंट्रल पर्यन्त धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग मदुराईपर्यंत वाढवण्यात आला. हिचा अप क्रं.12687 आणि परतीचा डाऊन क्रं.12688 आहे. + +सध्या या रेल्वेला 1 वातानुकूलित 2 टायर, 3 वातानुकूलित 3 टायर, 8 श्ययन वर्ग, 4 सामान्य बिना आरक्षित, 2 बैठक कम प्रवाशी समान, 1 खान पान व्यवस्था, 4 उछ क्षमतेच्या पार्सल व्हॅन, अस्या एकूण 23 बोगी आहेत. +भारतीय रेल्वे स्वतःच्या अधिकारात प्रवाश्यांच्या मागणी नुसार रेल्वे सेवेत विविध प्रकारचे बादल करते. + +मदुराई देहरादून एक्सप्रेस रेल्वे प्रस्थान ते आगमन पर्यंतचा अप मार्गावर 3095 किमीप्रवास तासी सरासरी 57.94 किमी प्रमाणे 53 तास आणि 25 मिनिटात पार करते आणि परतीचा डावून 3087 किमी प्रवास तासी सरासरी 57.17 की.मी वेगाने 54 तासात पार करते. +भारतीय रेल्वे नियमांनुसार हिचा वेग तासी 55 किमी पेक्षा जादा असल्याने प्रवाशी भाड्यावर अधिभार लावलेला आहे. +ही रेल्वे चालविण्यासाठी तिच्या मार्गावर 4 रेल्वे इंजिनाची व्यवस्था ठेवलेली आहे. कांही मार्गाचे विध्युतीकरण झालेले असल्याने मदुराई जंक्शन ते इरोड जंक्शन पर्यन्त WDM 3 A इंजिन वापरले जाते +पुढे WAP 4 चेन्नई सेंट्रल पर्यन्त, पुढे हजरत निजामूद्दीन पर्यन्त WAP 4 इंजिन आणि WDM 3A पुढील देहरादून पर्यन्तचे प्रवासासाठी वापरले जाते. + + क्रं. + आणि रविवार) + आणि शुक्रवार) +मदुराई देहरादून एक्सप्रेस रेल्वे इरोड मार्गे चेन्नई सेंट्रल, विजयवाडा जंक्शन, नागपुर, भोपाळ जंक्शन, ग्वालियर, हजरत निजामूद्दीन, मीरठ सिटी जंक्शन, सहारनपुर जंक्शन, ते देहरादून या मार्गावर धावते.[२] +मदुराई चंडीगढ एक्सप्रेसच्या श्ययन बोगी या रेल्वेला साहरणपूर जंक्शनवर जोडल्या जातात तसेच काढल्या जातात. +इरोड जंक्शन, चेन्नई सेंट्रल आणि साहरणपूर जंक्शन स्टेशनवर या रेल्वे गाडीचे डबे तीन दिशेच्या रेल्वे मार्गावर विभागले जातात[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1702.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eb02f86e00b82ce9fd48c24a69286fb84631a46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1702.txt @@ -0,0 +1,23 @@ + +मद्रास तमिळ किंवा मेड्रास भाषै ( तमिळमध्ये: மெட்ராஸ் பாஷை ) + + + +, is a colloquial slang of Tamil language spoken in the city of चेन्नई, India (previously known as Madras). It is a loose polyglot blend of तमिळ and English, with loanwords from Telugu, Kannada, Malayalam, Hindi and उर्दू भाषा.ह्याच कारणामुळे मद्रास भाषै (मेड्रास तमिळ) साठी हल्ली टॅंग्लीश हा शब्दप्रयोग आस्तित्वात आला आहे.. जरी हिंग्लीश आणि टॅंग्लीश (तमिळ+इंग्लिश) ह्या इंग्रजी भाषेच्या बोली असल्यातरी त्या पूर्णपणे भिन्न आहेत,हिंग्लीश (हिंदी+इंग्लिश)चा संबंध बऱ्याच अंशी पिंग्लीश (पंजाबी+इंग्लिश) वगैरे उत्तरेतील भाषांशी असू शकतो ज्या हिंदी सारख्या आहेत.तमिळ ही इंडो युरोपिअन गटात मोडत नसल्याने त्यात हिंदी शब्द असण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे टॅंग्लीश ही एक भिन्नच बोली आहे +After Madras Bashai became somewhat common in Madras, it became a source of satire for early Kollywood movies from the 1950s, in the form of puns and double entendres. Subsequent generations in चेन्नई identified with it and absorbed English constructs into the dialect, making it what it is today. +Madras bashai favours Tamil syntactic structures, with heavy use of English words.. +The following examples illustrates the heavy use of English words, even for basic concepts: +Code-switching also plays a very important role in Madras bashai. For instance, a person aggrieved with the English in this article may plaintively wail: +किंवा खऱ्या तमिळभाषेतील वाक्य न समजल्याने एखादा विद्यार्थी नकारार्थी मान हलवत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर देखील असे म्हणेल :: +इथे हे नमूद करणे महत्त्वाचे ठरेल जर हेच वाक्य तमिळ मध्ये व्यक्त करायचे असते: +"वा तलैमुई ऍल्लाम्‌ मुलुक्क आंगिल्मदान् पेचूवांक्" +even in a colloquial form (as evidenced by the verb, pēcuvānka, as opposed to pēcuvārka), the word choice itself would make the sentence sound lofty and formal; words such as talaimuai are associated with literature, not everyday speech.[ संदर्भ हवा ] +Readers can understand immediately that this was done to save time, so that in the same period of time a Madras Tamilar can convey 1.5 times that of a Madurai, Tirunelveli Tamilar and 3 times that of an Erode Tamilar and 5 times that of a Coimbatore Tamilar (depending on the length of the drawl, like 'yaeeeeeeenunga?') One anomaly to this shortening rule is, some words get suffixed with the syllable 'ka'. So, summa = summaka, dhoora = dhooraka. +Some तमिळ words are pronounced differently from Madurai Tamil (considered the standard dialect). This practice is very similar to other dialects of Tamil. The pronunciation differences are usually accounted for by morphed and/or deleted vowels. +Questions with yes or no answers are framed by saying the statement whose truth is to be verified (using the participle if necessary) and then saying aa at the end with a rising inflexion like a question. The meaning of the aa is roughly analogous to Is it?. If the statement already ends in an aa or other interfering vowel sound, then the questioning aa can be made vaa in the interest of euphonics. Some speakers tend to carry the -aa even into full English conversations from force of habit. e.g.: You finished it aa? and also sometimes shortened to Finished-aa? +However, phrases like Late-aa? and Ready-aa? are usually used by the younger generation, and phrases of Madras Bashai in the above column are never used in polite form, and are usually used as street Tamil. +मद्रासी भाषेत परकीय भाषेतील अनेक शब्द, प्रत्यय आणि व्याकरणीय वैशिष्टे घेऊन अनेक शब्द बनले आहेत.यात इंग्रजी, फ्रेंच, डच, तेलुगू, हिंदी आणि कन्नड या भाषांतून जास्त शब्द आहेत. +इतर भाषांतून शब्द घेण्याची वेळ जेव्हा येते त्याबाबतीत असे म्हटले जाते "मेड्रास्सक्क निगर मेड्रास्से"(ह्या बाबतीत मद्रासला कोणी हरवू शकत नाही.).इंग्रजी शब्द अगदी सहजरीत्या परभाषिक नसल्यासारखे कोणत्याही संदर्भात बिनधास्त वापरले जातात.. 'रॉंगु,' 'राईटु,' 'येच्चूस मी,' 'आडजिस्ट्,' 'अबेस,' 'आबस्कॉंड्,' 'बीटिफुल,' 'सुपरा,' 'फ्रूईट्,' 'पिलिम,' 'फिगुरू,' 'एस्केप्,' 'आक्किस्डू'(accused) इ. इ.. हिंदीचे ही थोडेफार योगदान आहेच जसे 'बेजार' (பேஜார்), 'नास्ता' (நாஸ்தா), ई.. तेलूगू: 'नैना' (நைனா), 'बावा' (பாவா), 'एप्पुडु' (எப்புடு), 'चेप्पु', डब्बु, डुड्डु(Money) ई. +A large part of Madras bashai is dedicated to exhibiting road rage and starting street fights. +मचां किंवा माची हे अगदीच साधारणपणे सर्वत्र म्हटले जाते, म्हणजे बायकोचा भाऊ जसे मराठी किंवा हिंदीत साला असे म्हणतात ते.. Most common word to describe almost anyone. +However, not all of Madras Bashai is used predominantly for cursing. The Madras Bashai uses the English language in a very interesting manner. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1709.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23351f0c3e1815e81143b88b40f9fd25d86365b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1709.txt @@ -0,0 +1,2 @@ +मदुराई विमानतळ (आहसंवि: IXM, आप्रविको: VOMD) (तमिळ: மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे. +^१ केवळ आगमन. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1727.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52302be1fd038650c3e1d545c11b6ae49a41bc28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1727.txt @@ -0,0 +1,9 @@ +दारूचे व्यसन, ज्याला दारू निर्भरता पण म्हणतात एक निष्क्रिय करून देणारे व्यसनी विकार आहे ज्याला बाध्यकारी आणि अनियंत्रित दारूच्या व्यसनाच्या रूपात निरूपित केले जाते जेव्हा की पिण्यारेच्यास आरोग्यावर वाइट प्रभाव पड़तो आणि त्याच्या जीवनात नकारात्मक सामाजिक परिणाम पाहिला मिळतो. अन्य नशा आण्णारे गोळ्यांची लत सारख्या शराबीपनाला चिकित्साच्या दृष्टि ने एक इलाज़ योग्य आजाराच्या रूपात परिभाषित केले गेले आहे.19वीं शताब्दी आणि 20वीं शताब्दीची सुरुवातीत दारू वर निर्भरताला शराबीपन शब्द द्वारा प्रतिस्थापित करण्यात आधी याला मदिरापान म्हणटले जात होते. +शारीरिक स्वास्थ्यावर पडणाराप्रभाव +दारुच्या सेवनाने शारीरिक स्वास्थ्य वर पडणारे प्रभावात लीवरचे रोग, मिरगी, बहुतंत्रिकाविकृति, मादक मनोभ्रंश, हृदय रोग, पोषणीचे अभाव, यौन दुष्क्रिया आणि अनेक स्रोतांनी होणारे मरण असु शकते.गंभीर संज्ञानात्मक समस्या दारुड्या माणसांमध्ये असामान्य नाही आहे. मनोभ्रंशांशी संबंधित अनेक कारणे दारू शी संबंधित आहे जे दारूला मनोभ्रंशचे दूसरे प्रमुख कारण असते. शारीरिक स्वास्थ्य वर पडणारे अन्य प्रतिकूल प्रभावांमध्ये हृदय आणि रक्तवाहिकासंबंधी आजार, कु-अवशोषण, दारू मुळे लीवर ते आजार आणि कैंसर आहे. निरंतर दारूचे सेवन करण्याने केन्द्रीय तंत्रिका तंत्र (सेंट्रल नर्व्हस सिस्टम)आणि परिधीय तंत्रिका तंत्र क्षतिग्रस्त होऊ शकते. दारू पिणारे अनेकांचे मरण्याची कारणे म्हणजे हृदय आणि रक्तवाहिकासंबंधी गुंतागुंती. +मनाची कवाडे पूर्ण बंद रोग्याशी कुठल्याही मार्गाने संपर्क साधणे अशक्य झाले असते. तो जवळच्या सर्व मित्रांकडे, नातेवाईकांकडे संशयाच्या नजरेने बघत असतो. कुणाशोही मनमोकळेपणे संवाद साधायला तयार नसतो.त्याच्या भावना कुणाबरोबरही वाटायला तयार नसतो. वर होण्याबद्दल कुठली ही कळकळ, आस्था नसणे वर्तनान कमालीची बेजबाबदारी दिसुन येणे. +आक्रमकता, वाद घालणे, निंदा नालस्ती करणे आदि अनेक दुर्गुणांचा लक्षणीय प्रादुर्भाव + +दारू अचानक थांबवल्यामुळे शरीरावर व मनावर होणारे दुष्परिणाम : +मानसिक ताण येतो. +फक्त दवाखान्यात शक्य. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1744.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65fa8927b3bb720d35a34da8007f6cddfaf66484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1744.txt @@ -0,0 +1 @@ +चेन्नै विद्यापीठ किंवा मद्रास विद्यापीठ (तमिळ: சென்னைப் பல்கலைக்கழகம் ; उच्चार: चेन्नै पलकलैकळहम) हे तमिळनाडूमधील विद्यापीठ आहे. याची स्थापना १८५७मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1752.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..232ab18cebc9a6060f352fff0a44984cf14d84a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1752.txt @@ -0,0 +1,33 @@ +मधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ (en:Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. पण फक्त एपिस (en:Apis_(genus)) या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले. त्या खूप चावतात. +(फिलिपाइन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मधमा्श्यांची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे [[वर्गीकरण शास्त्र] सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस ॲंचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच आहे. इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू आहे. एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे. +मधमाशीच्या जवळचे इतर कीटक बंबल बी आणि नांगीरहित बी. थोड्या फार प्रमाणात या माश्यासुद्धा समूह वृत्तीने राहतात. समूह वृत्तीने राहणारे सर्वच कीटक एका पूर्वज कीटकाचे वंशज असावेत. एपिस या प्रजातीमधील एक पोळे तयार करणाऱ्या मधमाश्या प्राथमिक जाती असाव्यात. यापासून पुढे खडकांच्या खबदाडीमध्ये अनेक समांतर पोळी तयार करणाऱ्या प्रगत माश्या तयार झाल्या. अशा माश्या पाळणे अधिक सुलभ आहे. +मधमाश्यांपासून मध मिळतो याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते). त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून दूरवर एपिस मॅलिफेरा नेल्या गेल्या. +एपिस फ्लोरिया आणि एपिस अँड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically). मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाती झाल्या असाव्यात (allopatric speciation). त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांपासून असल्याचे सिद्ध झाले आहे. +उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधूनमधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस मधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो. +या प्रजातीमध्ये तीन-चार जाती आहेत. बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशीपासून वेगळी आहे. गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशीपासून हिची उत्पत्ती झाली. एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी. एपिस मॅलिफेराप्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते. बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएन्सिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाईन्समधील मधमाश्या यांचा नेमका संबंध काय ते अजून समजायचे आहे. नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाती आहेत. एपिस सेराना याचा उगम एका जातीपासून झाला नसल्याची शक्यता आहे. +एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली. उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशियामधून ती चीनमध्ये पसरली. या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी म्हणतात. या मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. त्या स्थानिक भौगोलिक हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत. या माशीपासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे. स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातींमध्ये बदल आढळतो. +एपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जात वेगळी झाली असा सिद्धान्त मांडला जातो. गुहेमधील मधमाश्या या पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहांमधील जनुक संक्रमण थांबले. शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे. हजारो वर्षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला. +अमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. १६२२मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली. या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्विस्टिका आणि इतर मधमाश्या आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली. सध्या अमेरिकेत वन्य मधमाश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाश्या कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाश्या आहेत. गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतींबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते. १९५० च्या सुमारास मधमाश्या जहाजांतून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या. +आफ्रिकन मधमाश्या किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावतः या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत. अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या. त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या. थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझीलमधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत. +एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठरावीक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा होऊ शकतो. +पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे. +मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या 'चुंबकीय रडार'वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. +समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे- +१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते. +२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत. +३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लॅंग्वेज”च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता. +४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो. +५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही. +६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही. +मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात. +दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. मधमाश्या गोळा झालेल्या समूहाच्या बाह्य कडेचे तापमान ८-९ सेंटिग्रेड असते. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो. +एपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात. +मध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. माणूस एपिस प्रजातीच्या सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर अनेक वर्षे करीत आलेला आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते. +मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात. +कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो. +पोळे बांधणाऱ्या मधश्याशा झाडाच्या ढोलीमध्ये झाडाच्या रेझिनपासून प्रोपोलिस नावाचा एक चिकट द्रव बनवतात. याच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. पोळ्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी प्रोपोलिस वापरले जाते. ज्या झाडावर मुंग्या आहेत त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये यासाठी पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले म्हणजे मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. प्रोपोलिसपासून काहीं सौंदर्यप्रसाधने बनविली जातात. +समूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणाऱ्याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणाऱ्यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो. +मधमाशीची नांगी आणि त्यावरील वक्र काटे पृष्ठवंशी प्राण्यांचापासून मधाचे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उत्क्रांत झाले असावे असे वाटते. कारण नांगीस असलेल्या काट्यामुळे त्वचेमध्ये अडकलेली नांगी उपटून बाहेर निघते. राणी मधमाशीच्या परस्परावरील हल्ल्याच्या वेळी राणी माशीची नांगी हत्यारासारखे काम करते. एपिस सेरेना मधमाशीचा इतर कीटकांचा प्रतिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या पोळ्यावर दुसऱ्या कीटक आल्याचे दिसताच सर्व कामकरी माशा आगांतुक कीटकाच्या अंगावर धावून जातात. कामकरी माशांचे स्नायू जोराने थरथरतात. अशा थरथराटामुळे आगांतुक कीटकाभोवतीचे तापमान एवढे वाढते की आगांतुक कीटकाचे मरण ओढवते. याआधी फक्त वाढलेल्या तापमानामुळे आगांतुक कीटक मृत्यू पावतो असे वाटत होते. नव्या संशोधनानुसार आगांतुक कीटकाभोवती तापमानाबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे आढळून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कीटक मरण पावतो. पोळ्यामध्ये आलेली नवखी राणी किंवा निकामी झालेल्या राणीचा याच पद्धतीने निकाल लावला जातो. या प्रकारास मधमाश्या पाळणारे बॉलिंग द क्वीन असे म्हणतात. +विविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते. +मधामाशीला ६ पाय व २ पंख असतात. + आकाराने जाड,खुप केसाळ म्हणजेच मधमाश्याचा कुटुंबातील नर होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_177.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a48cdc00efa881bb67313abefb9d358cfe4fb73a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_177.txt @@ -0,0 +1 @@ +भुईकोट म्हणजे भूमीवर बांधलेला कोट. अर्थात, जमिनीवर बांधलेला किल्ला. मराठ्यांच्या आणि पेशवाईच्या काळात अनेक भुईकोट अस्तित्वात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1779.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301f922cf4123c119091586493a9934a8a5392be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1779.txt @@ -0,0 +1,228 @@ + +२०° ००′ ००″ N, ७३° ४७′ ००″ E +नाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती) (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे. +पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. +'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत. +त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी.ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो. +नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ किमी२(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत. +शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. +पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान,त्रिकंटक,गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक'अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे. +भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. +नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय) +नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. +इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता. +१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले. +२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. +३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला. +४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. +त्याचप्रमाणे +५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. +याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती. +६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली. +सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. +नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. +यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. +७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. +८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. +सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. +सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. +९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे.. +१० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[१] +सातवाहन राजवंश +१) सिमुक राजवंश. +२) कृष्ण राजवंश. +३) सातकर्णी १ राजवंश. +४) वेदश्री राजवंश. +५) शक्तीश्री राजवंश. +६) पूर्णोत्संग राजवंश. +७) स्कन्द्स्भि राजवंश. +८) २रा सातकर्ण राजवंश. +९) लंबोदर राजवंश. +१०) आपीलक राजवंश. +११) मेघस्वाती राजवंश. +१२) स्वाती राजवंश. +१३) स्कन्द्स्वति राजवंश. +१४) मृगेंद्र राजवंश. +१५) कुंतल राजवंश. +१६) स्वतीवर्ण राजवंश. +१७) प्रथम पुलोमावी राजवंश. +१८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. +१९) हाल राजवंश. +२०) मंतलका राजवंश. +२१) पुरिंद्रसेन राजवंश. +२२) सुंदर सातकर्णी राजवंश. +२३) चकोर राजवंश. +२४) शिवस्वाती राजवंश. +२५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. +२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. +२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. +२८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. +२९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. +३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. +३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. +३२) तृतीय पुलोमावी राजवंश. +[२] +यादव काळ पुढील प्रमाणे:- +तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे. +इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती. +सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती. +इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले. +अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला. +खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता. +इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला. +अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[१][३] +मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:- +इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले. +इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. +इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले. +इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले. +इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला. +इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला. +इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले. +शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली. +इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली. +इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला. +इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते. +शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता. +बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[४][५] +मराठा कालखंड पुढील प्रमाणे:- +इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता. +इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला. +सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली. +१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले. +सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले. +काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले. +१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला. +व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले. +तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली. +परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला. +पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले. +इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले. +इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. +इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली. +यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले. +इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील +थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[४][६] +ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:- +ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले. +१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. +ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला. +आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्‍न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. +भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. +इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. +इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली. +इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. +इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले. +इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. +इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन +इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली. +मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली. +१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला. +२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली. +३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला. +४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या. +५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली. +६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते.. +७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले. +८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली. +९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते. +१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला. +[४][७] +भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. +अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. +भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता. +नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते. +नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. +येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो. +नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात. +हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो. +नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल. +पावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते. +चांदवड तालुक्यातील हट्टी येथे असलेला हा किल्ला महाराष्ट्र मधील क्रमांक दोन मध्ये उंच किल्ला आहे. येथे जाण्यासाठी अनेक रस्ते असून तुम्ही नाशिक, चांदवड, देवळा, कळवणवरून येत असताना वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊ शकतात. जर तुम्ही नाशिक वरून येत असेल तर तुम्हाला आधी वणी येथे यावे लागेल आणि तेथून पारेगाव वरून येऊन हट्टीला यावे लागेल. जर तुम्ही पिंपळगाव बसवंत वरून किंवा त्या चांदवड वरून येत असाल तर वडाळीभोई आणि धोडंबे वरून हट्टी असे यावे लागेल. धोडंबे वरून तुम्ही कानमंडाळे आणि पुढे कुंडाने असेही किल्ल्यावर जाऊ शकता. +नाशिकपासून जवळ असलेला नाशिक जिल्यातील तालुक्यातील गावात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. सह्याद्री पर्वत रांग, धबधबे आणि पावसाळ्यातील हवामानच आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. +सप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी या देवीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.हे मंदिर डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. +पंचवटी ह्याचे उल्लेख रामायणात केले आहे. पंचवटी शब्दशः म्हणजे "पाच वडाचे झाडे एक बाग". हे स्थळ गोदावरी नदीच्या पाठावर आहे . येथे तपोवन नावाची एक जागा आहे, जिथे लक्ष्मण (रामाचा लहान भाऊ) ने शुर्पणखा (रावणाची बहिण ) हिचे नाक कापले होते, असे म्हणले जाते आणि पंचवटी ह्याच ठिकाणी राम आणि सिता यांनी १४ वर्षाचा वनवास केला होता. येथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि तेथे माल निर्यात केला जातो +सीताकुंड हिंदू पवित्र जागा आहे. भाविकांना या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे. रामायणातील मते रामाने नाशिकमध्ये त्याच्या मुक्काममध्ये या नदीत स्नान केले होते. +मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड आहे. क्लिष्ट आर्किटेक्चर हे मंदिर पांढरा संगमरवरी बाहेर बांधण्यात आले. महान भारतीय धार्मिक मजकूर असणे असा , 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि हिंदू बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. +ते काळाराम मंदिर रामाला समर्पित आहे. हे काळाराम मंदिराचे अर्थ "काळा रामा" आहे. +महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे. +शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड,महिंद्र अन्ड महिंद्र,मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्,गरवारे,एबीबी,सीमेन्स, व्ही.आय.पी,ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो,सॅमसोनाइट,सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन,अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.तसेच नाशिक रोड येथे'इंडियन करन्सी प्रेस' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच'इंडिया सिक्युरिटी प्रेस'आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन,योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत. +प्राथमिक व विशेष शिक्षण:- +नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवत आहे. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे जास्त असतो. नाशिक मधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड/दिल्ली बोर्ड) या संस्थांशी मोठ्या प्रमाणात संलग्न आहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC / HSC) उपविभागीय कार्यालय नाशिक येथे आहे. +नाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे देखील आहेत. +नाशिक मधली महत्त्वाची महाविद्यालये पुढीलप्रमाणे :- +3. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे. +4. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली आहे. +5. आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य +6. इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर ) +7. एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी आहे. +8. कपालेश्वर मंदिर आहे. - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे) +9. कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि. मी. अंतरावर आहे. +10. कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे. +11. काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे. +12. खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कॅंपपाशी आहे. +13. गंगाघाट आहे. पंचवटी आहे. +14. चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत. +15. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि. मी. अंतरावर आहे. +16. नवश्या गणपती मंदिर आहे. +17. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे. +18. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे. +19. नारोशंकर यांची घंटा : ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे) +20 निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. हे स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे. +21. पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत. +22. फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे. +23. बाल येशू चर्च. +24. भक्तिधाम आहे.(पेठ नाका) +25. मुक्तिधाम आहे.(नाशिक रोड) +26. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ चांदीचा गणपती आहे. +27. राम कुंड - गोदावरी नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. +28. रामशेज किल्ला आहे. +29. विल्होळी जैन मंदिर आहे. +30. वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे. +31. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. +32. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. +33. सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे. +34. सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे. +35. सीता गुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती. +36. गंगापुर धरण-नाशिकपासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपूर्ण नाशिक शहराला पिण्याचे व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. +37. सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे. +38. सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे. +सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत. +विष्णू दिगंबर पळुसकर ह्या युगपुरुषाचा अवतार शास्त्रीय संगीतासाठी खूप मौल्यवान ठरला."गांधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्येचे फळ होय.[९] विष्णू दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते. "गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वास्तू आजही अस्तित्‍वात आहे [१०].विष्णू दिगंबर पळुसकर ह्यांना जरी बालपणी अंधत्व येऊनही संगीताला "संगीत प्रेस"च्या नावाने डोळे दिले.[१०] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा सांगीतिक वारसा आणि सर्वार्थाने सांभाळला तो त्यांचे पुत्र व पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी. +मातोश्री गंगाबाई पलुसकर : +गंगाबाईंचे कार्य समजोद्धारक सावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते. सावित्रीबाईंनी स्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डावीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गांधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल". याची स्थापना १९३१ सालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख अशाकरिता आवर्जून करावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मातोश्रींनाच जाते.[११] +गोविंदराव पलुसकर: +पं. डी.व्ही. पलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णू पलुसकर) नाशिकमध्ये संगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित गोविंदराव पलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानावर संगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग आसुसलेले असे, त्या पलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांचे या काका पं .डी.व्ही पलुसकर यांच्यामुळे. बालाजी संस्थानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [१२] +पलुसकर परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून पं. गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषतः महराष्ट्राबाहेरही पलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापनाचे कार्यच केले नाही, तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला. [१३] +आकाशवाणी औरंगाबाद, जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रांवरून गोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली संगीत अलंकर केले. दरम्यान कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहाल केली. .त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हे रत्‍न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुसकरांच्या स्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[१२] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित विष्णू दिगंबर पळुसकर, पंडित चिंतामणराव पळुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), .गंगाबाई पळुसकर (मातोश्री), पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर व पंडित गोविंदराव पलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१३] +"महामहोपाध्याय" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या विद्वान व बहु आयामी गायक, शिक्षक आणि कलावंत यांना अखिल भारतीय पातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा दिला जातो. या आधी पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, हिराबाई बडोदेकर ,पंडित वि. रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुसकर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पळुसकर यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा घनिष्ट प्रवास अधोरेखित करणारे आहे.[१४] +नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित हैदर शेख (कथक) यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ. माला रॉबिन्स( भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरू केले.[१५] +नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक लक्षणीय ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. गारगोटी संग्रहालय हे नाशिकपासून ३२ किमी (२० मैल) सिन्नर येथे स्थित आहे खूप सुंदर आहे. तेथे स्फटिकांचा (सूक्ष्म सच्छिद्र स्फटिकासारखे पदार्थ ) संग्रह देखील आहे. नाणी संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये केली गेली आहे.या संग्रहालयात भारतीय चलन प्रणालीशी निगडीत बाबींचा संग्रह आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी (१९ मैल) दुगरवाडी धबधबा आहे. नाशिक हे एक पवित्र शहर मानले जाते. नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तश्रुंगी गड,गोन्डेश्वर मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर, मुक्तीधाम , भक्ती धाम, श्री कपालेश्वर महादेव मंदिर , श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री वेद मंदिर आणि दुतोंड्या मारुती मंदिर ही काही पवित्र मंदिरे आहेत. तोफखाना विभाग केंद्र, नांदूर मध्यमेश्वर, धम्मगिरी, सापुतारा, भंडारदरा, कळसूबाई शिखर, चांभार लेणी, रामकुंड, सीता गुंफा , पांडवलेणी, गोदावरी घाट, दादासाहेब फाळके स्मारक, वीर सावरकर स्मारक, दूधसागर धबधबा, येशू देवस्थान, योग विद्या धाम,त्त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, अंजनेरी, दिंडोरी, रीन व्हॅली रिसॉर्ट आणि शुभम वॉटर पार्क जागतिक श्री स्वामी समर्थ केंद्र ही अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नाशिक "भारतातील वाइन कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. सुला वाईन, सोमा वाईन ह्या काही वाईनरी आहेत . +सुनील खांडबहाले (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[१६][१७] +दत्तात्रय रामचंद्र कर्पेकर +परिणीता दांडेकर (असोशिएट कोऑर्डीनेटर-'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल.’) +साप्ताहिक दिव्यसार्थी, गावकरी वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र, दिव्य मराठी वृत्तपत्र, पुढारी वृत्तपत्र, सकाळ वृत्तपत्र (वृत्तपत्र), लोकमत वृत्तपत्र, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र, लोकसत्ता वृत्तपत्र, दैनिक भास्कर वृत्तपत्र, नवभारत टाइम्स वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र, द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र, द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र, अशी विविध वर्तमानपत्रे नाशिकमध्ये मिळतात. गावकरी हे खास नाशिकमध्ये जन्माला आलेले वृत्तपत्र आहे. +सध्या नाशिकमधून चार एफ.एम. नभोवाणी केंद्रांचे प्रसारण होते आहे. रेडियो मिर्ची ९८.३ मेगाहर्ट्‌झ, रेड एफएम ९३.५, आकाशवाणी १०१.४, रेडिओ विश्वास ९०.८ मेगाहर्ट्‌झ. इ. +प्रत्येक तालुक्याला आपली स्वतंत्र अशी ओळख आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. +नाशिकमध्ये एकूण १५ तालुके आहेत,त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- +१) नाशिक +२) मालेगाव +३) दिंडोरी +४) कळवण +५) चांदवड +६) सुरगाणा +७) इगतपुरी +८) सिन्नर +९) देवळा +१०) बागलाण/सटाणा +११) नांदगाव +१२) येवला +१३) निफाड +१४) पेठ +१५) त्र्यंबकेश्वर +शहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारींचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे. +नाशिक हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1799.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179b33957109e9d08792c178e2ae8a8df662b6e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1799.txt @@ -0,0 +1 @@ +मधुकर पेडणेकर तथा पी. मधुकर हे प्रख्यात संवादिनी वादक आहेत. अनेक कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये तुळशीदास बोरकर यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1804.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ffb92ea482d314d98a349bf695a4d7a0385490 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1804.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रा.मधुकर विश्वनाथ दिवेकर(जन्म: ०८ जुलै १९५८ लोणी प्रवरानगर, राहाता तालुका, अहमदनगर - हयात) हे मराठीतील विज्ञानकथालेखक व सर्पकथालेखक आहेत. हे सर्पसंवर्धनाचे काम करीत असल्याने सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी ते परिसरातील डॉक्टरांना मदत करतात. बालपणापासून सापांविषयी विशेष प्रेम असल्याने त्यांनी सर्पकथालेखन केले. साप माणसाच्या सान्निध्यात आल्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, माणूस व साप यांचे नाते, त्या अनुषंगाने माणसांचे परस्पर संबंध अशा विषयांवर ते लेखन करतात. सापांविषयी माणसाला असलेली भीती घालविणे आणि वैज्ञानिक माहिती देणे हे त्यांच्या सर्पकथा लेखनामागील उद्दिष्ट आहे. परिसरातील डॉक्टर, निसर्गप्रेमी, विद्यार्थी यांच्यासाठी ते 'सर्पसंवर्धन व प्रशिक्षण' अशा कार्यशाळा आयोजित करतात. पुणे विद्यापीठ त्यासाठी त्यांना विशेष अनुदान देते. गेल्या दहा वर्षात त्यांनी या कार्यशाळेत ४०० जणांना प्रशिक्षित केले आहे. परिणामी परिसरात सर्पदंशाचे प्रमाण आणि सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. १९८२ ऑगस्ट ते आजतागायत : प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, अहमदनगर जिल्हा +प्रा.दिवेकर यांनी विज्ञान कथा या प्रकारात स्वतंत्र शैलीने 'सर्पकथा' हा कथाप्रकार रूढ केला. त्यांच्या एकूण कथा ३७ आहेत. त्यापैकी २२ विज्ञानकथा असून त्यात तीन दीर्घकथा, १९ लघुकथा १३ सर्पकथा आणि दोन इतर सामाजिक कथा आहेत. याशिवाय त्यांनी एक विज्ञान लघुकादंबरी आणि तीव वैज!ञानिक लेख लिहिले आहेत. विज्ञानयुग, धनंजय, कादंब, वसा, हेमांगी, पद्मगंधा, विवेक, यज्ञ इत्यादी दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 'निवडक धनंजय': विज्ञानकथा - मे २०१५'[१] या ग्रंथसंग्रहात चार आणि 'मन्वंतर मे २०१५' या ग्रंथसंग्रहात[२] एक कथा समाविष्ट झाली आहे.. +'पुनर्जन्म' ही विज्ञानकथा पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयांतर्गत २००८-२०१४ दरम्यानच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. +प्रा. दिवेकर यांच्या कथांवर आणि त्यांच्या मराठी कथेतील योगदानासंबंधी Some Trends in Marathi Vidnyankatha By M. V. Divekar हा प्रा. रवींद्र ताशीलदार यांचा संशोधन निबंध आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1813.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcb59b41ec155c0f42e1b0b3e1bdb71cc8a3a979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1813.txt @@ -0,0 +1,22 @@ +मधुकरनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे. हे गाव दांडा गावाला लागूनच आहे.हे गाव उत्तर कोकणात येते. + +मधुकरनगर हे नाव गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या व गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या मधुकर नावाच्या प्रतिष्ठित समाजसेवकावरून ठेवलेले आहे. +पूर्वी हे गाव भवानगडच्या हद्दीत होते परंतु कालांतराने लोकसंख्या वाढल्याने वेगळ्या गावाचा दर्जा मिळून मधुकरनगर म्हणून नावारूपास आले. +ह्या गावाला लागूनच भवानगड किल्ला आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण व दमट असते तर हिवाळ्यात सुखद गार असते. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो, परंतु जमीन जांभा मुरूम मिश्रित असल्याने पाणी साचत नाही. पावसाळ्यातसुद्धा हवामान उष्ण असते. +येथे येण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकावरून किंवा केळवेवरून एसटी बसची तसेच ऑटोरिक्षाची सोय आहे. सफाळे रेल्वे स्थानकापासून मधुकरनगर १० किमी अंतरावर आहे. केळवे गावापासून दांडा खाडी मार्गाने हे गाव ४ किमीवर येते. +ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक आरोग्य, रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी गोष्टीची तजवीज केली जाते.गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आगरवाडी,सफाळे,केळवे गावी जावे लागते. उच्चमाध्यमिक शिक्षण, न्यायालय, तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय, इत्यादी गोष्टींसाठी पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. +मधुकरनगर गावात मुख्यतः वाडवळ समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहतात. ते खरीप हंगामातील भातशेती बरोबरच रब्बी हंगामात कांदा, आले, हळद, इत्यादींचे तसेच पडवळ, कारले, दुधी भोपळा, इत्यादी फळभाज्यांचे उत्पादन घेतात. बरेच लोक नोकरी, व्यवसाय, धंदा, व्यापार करण्यासाठी मुंबई, पालघर, विरार, वसई, वापी, बोईसर येथे रोज ये-जा करीत असतात; नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी शेती बागायती करीत असतात. +भवानगड किल्ला +दांडा खाडी किल्ला +पुरातन शिवमंदिर +शितळादेवी मंदिर +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc +३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +५. http://tourism.gov.in/ +६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +७. https://palghar.gov.in/ +८. https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1823.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42c1bda5e608802a10024338ac325d4d69408388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1823.txt @@ -0,0 +1,2 @@ +मधुबनी भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मधुबनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1832.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..806f8ce1cdccd4c3fcf01ce0b93588e26fa18ff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1832.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +मधुमकरंदगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1857.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2e1b610956010654883d8fbfedc332ea5361e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1857.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम या विषयावर संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. +अग्रवाल यांचे एम.एस्‌सी. पीएच्‌.डीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले.जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला. +पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बन डायॉक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे. +इ.स. १९८८मध्ये फुलब्राइट फेलोशिप मिळाल्यावर अग्रवाल यांनी अमेरिकेतील मेरीलॅंडमधील बेलॅटिव्हल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लॅंकेस्टर येथे रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली (१९९४). +डॉ. अग्रवाल यांनी दिल्लीतील पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, काउन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च, आणि यू.के.- स्टॉकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट (यॉर्क)चा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यू.के. रिसर्च कौन्सिल (नॉर्वे) आदींनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. +२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) अग्रवालांच्या नावावर असून, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता. +मधुलिका शशिभूषण अग्रवाल यांनी ३६हून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. +त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मधुलिका अग्रवाल यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1860.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2e1b610956010654883d8fbfedc332ea5361e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1860.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम या विषयावर संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. +अग्रवाल यांचे एम.एस्‌सी. पीएच्‌.डीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले.जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला. +पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बन डायॉक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे. +इ.स. १९८८मध्ये फुलब्राइट फेलोशिप मिळाल्यावर अग्रवाल यांनी अमेरिकेतील मेरीलॅंडमधील बेलॅटिव्हल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लॅंकेस्टर येथे रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली (१९९४). +डॉ. अग्रवाल यांनी दिल्लीतील पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, काउन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च, आणि यू.के.- स्टॉकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट (यॉर्क)चा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यू.के. रिसर्च कौन्सिल (नॉर्वे) आदींनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. +२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) अग्रवालांच्या नावावर असून, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता. +मधुलिका शशिभूषण अग्रवाल यांनी ३६हून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. +त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मधुलिका अग्रवाल यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1907.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa80595fc5305d0a064c90b451587fb9ac8266eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1907.txt @@ -0,0 +1,11 @@ +मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनीशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो. +Notes: +a Under Israeli law. The UN doesn't recognize Jerusalem as Israel's capital. +b Includes the whole of the West Bank, according to the pre-1967 boundaries. +c In addition, there are around 400,000 Israeli settlers in the West Bank, of which half are in East-Jerusalem. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1968.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f8dd26be9544fcd470541731fbdccf7c2aba45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1968.txt @@ -0,0 +1 @@ +मध्यलिंगी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जिचे वर्गीकरण गुणसूत्र, बीजग्रंथी (Gonads) आणि/किंवा जननेंद्रिय यांच्यातील फेरफारांमुळे पुरुष किंवा स्त्रीमध्ये करता येत नाही. ०.१% ते ०.२% लोकांमध्ये ही अवस्था असू शकते. शस्त्रक्रिया करून अशा व्यक्तीला हवे ते लिंग प्रदान करता येऊ शकते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1971.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30f82d0db9591079d4ffeb8d99c7370a4084b3e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1971.txt @@ -0,0 +1,5 @@ +विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात. +[१] +[२] +[३] +[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1978.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da62c7b2301d4e5c684da22036bd296ce475fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_1978.txt @@ -0,0 +1,16 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +सर्वप्रथम १९२५ मध्ये मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी माध्यान्ह आहार कार्यक्रम सुरू केला. १९८० च्या दशकांपर्यंत तामिळनाडू, गुजरात आणि केरळ  राज्यामध्ये व पॉंण्डेचरित माध्यान्ह आहार योजना कार्यक्रम सुरू झाला , १९९०-९१ पर्यंत या राज्यांची संख्या १२ पर्यॅंत  पोहचली . भारतात ही योजना १९९५ साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. शाळेतील मुलांची गळती कमी करणे, उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू झाली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता ८वीपर्यंत)पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ठराविक प्रमाणात धान्य/डाळी दिल्या जात असत. मात्र २००२ मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, अन्नपदार्थांऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे झाले. +मुलांना किती अन्न मिळाले पाहिजे याचे निकष पुनरवलोकन करून वारंवार बदलले जातात. २००४ साली ३०० कॅलरी दिल्या जात होत्या, हे प्रमाण आता १ली ते ५वीच्या विद्यार्थ्यांना ४५० कॅलरी व १२ग्रॅ. प्रोटीन व ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरी व २०ग्रॅ.प्रोटीन असणारे शिजवलेले अन्न देणे व वर्षातील किमान २०० दिवस अन्न देणे बंधनकारक आहे. +या योजनेच्या अंमलबजावणीचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून उचलतात. केंद्र सरकार या योजनेसाठी लागणारे धान्य/डाळी वगैरे गोष्टी राज्य सरकारला विनामुल्य पुरवते. शिवाय राज्यस्तरावर अन्न शिजवणे, वाटप, वाहतूक, सुरक्षा व देखरेख आदींचा खर्च केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागलेला आहे. अन्न शिजवणे (५३%-४७%), स्वयंपाकी व वाढपी (२०%-८०%), वाहतूक (२%-९८%), देखरेख (२%-९८%), साठवणूक व एकवेळचे खर्च (१०%-९०%) अश्या प्रकारे हा खर्च अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागला आहे. +केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सुकाणू तथा संनियंत्रण समिती (National Steering cum Monitoring Committee) आणि योजनांतर्गत मान्यता समिती (Programme Approval Board) यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांचे काम या योजनेवर राष्ट्रीय पातळीवर देखरेख ठेवणे, योजनेच्या प्रत्यक्ष प्रभावाचे निर्धारण करणे, राज्य सरकारांबरोबर समन्वय साधणे आणि राज्य व केंद्र सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती मदत करणे आहे. +या व्यतिरिक्त, राज्य स्तरावर तीन पातळ्यांवर - राज्य, जिल्हा व विभाग पातळीवर - सुकाणू तथा संनियंत्रण समिती असते. दररोजच्या व्यवस्थापनावर व अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. या संस्था शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक संघटना,माता-पालक संघटना यांना ही योजना राबवण्यासाठी आवश्यक ते आदेश देऊ शकतात. +आतापर्यंत अंमलबजावणी करताना पुढील प्रश्न प्रामुख्याने समोर आले आहेत: +अनेक राज्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत सुसूत्रता, सुविधा व समन्वय निर्माण होण्यासाठी विविध उपाय राबवलेले दिसतात. +उत्तराखंड व झारखंड राज्यांमध्ये मुलांच्या आयांना या योजनेत समाविष्ट करून घेतलेले दिसते. तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि प.बंगालमध्ये "शाळेतील बाग" योजना राबवत लागणाऱ्या अन्नातील काही भाग शाळेच्याच आवारात मुलांकडून उगवला जात आहे. तामिळनाडू मध्ये सरकारने "सामायिक डायनिंग हॉल" बांधून दिले आहेत तर गुजरातमध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. +या योजनेतील प्रश्न व राबवल्याजाणाऱ्या चांगल्या पद्धतींचा सर्वंकश आढावा व माहिती अधिक विस्ताराने या २०१२ च्या अधिकृत सरकारी पत्रकात वाचता येईल. .[१]. +या व्यतिरिक्त २०१० मध्ये प्लॅनिंग कमिशनने सादर केलेल्या सुचवण्यांचा[२] +साचा:भारताच्या शासकीय योजना +भारताच्या सरकारी योजना diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2020.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8998ae7ba33382149f04af9f707f1c3abbac11f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2020.txt @@ -0,0 +1 @@ +मनप्रीत सिंग (९ जानेवारी, १९८५:भारत - हयात) हा  इटलीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २५ मे २०१९ रोजी निकोलसने जर्मनीविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ३ डिसेंबर २०१९ रोजी केनियाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2030.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a6af1ca34e530ade27c835272966e84e4bfbf95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2030.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +मनमाड रेल्वे स्थानक उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. +हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या जवळजवळ सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. येथून दौंडकडे आणि पूर्णाकडे जाणारे लोहमार्गही आहेत. वसई-दिवा लोहमार्ग तयार होईपर्यंत पश्चिम व उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे जात असत. मनमाड-इंदूर हा नवा रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अंतर कमी होईल. +भारतातील पहिला रेल्वेमार्ग १९५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] मनमाड रेल्वे स्थानक १८६६मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६८साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2064.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a4bbd5da80cfefcbeffaa80fffef569f09ec9a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2064.txt @@ -0,0 +1 @@ +मनसुखभाई धनजीभाई वसावा (१ जून, इ.स. १९५७:नर्मदा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भरुच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_207.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd8aa3316edd9c92033f28b6415467991ec9bde8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_207.txt @@ -0,0 +1 @@ +भुडकमडका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2076.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b63f42a85859c0cfb68a79625bef23052df0f7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2076.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 32°27′N 77°17′E / 32.450°N 77.283°E / 32.450; 77.283 + +मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर.या शहराची लोकसंख्या २२५४ (१९८१). हे शिमल्याच्या उत्तरेस सुमारे २५० कि.मी. समुद्रसपाटीपासून १७९८ मी. उंचीवर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. +महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका, गुंफलेल्या आढळतात. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. +मनालीपासून 3 कि.मी. वर वसिष्ठ कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. वसिष्ठ ऋषींनी तेथेच तप केल्याचे सांगितले जाते. हिमालयातील एक पुण्यक्षेत्र म्हणूनही ते विख्यात आहे. जगातील एक उंच रस्ता मनाली येथून निघून लडाखमधील लेह येथे जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2078.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b63f42a85859c0cfb68a79625bef23052df0f7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2078.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 32°27′N 77°17′E / 32.450°N 77.283°E / 32.450; 77.283 + +मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर.या शहराची लोकसंख्या २२५४ (१९८१). हे शिमल्याच्या उत्तरेस सुमारे २५० कि.मी. समुद्रसपाटीपासून १७९८ मी. उंचीवर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. +महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका, गुंफलेल्या आढळतात. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. +मनालीपासून 3 कि.मी. वर वसिष्ठ कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. वसिष्ठ ऋषींनी तेथेच तप केल्याचे सांगितले जाते. हिमालयातील एक पुण्यक्षेत्र म्हणूनही ते विख्यात आहे. जगातील एक उंच रस्ता मनाली येथून निघून लडाखमधील लेह येथे जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2087.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fef7e2f2fb2fb8afc017f30f64c8afb8d1d7537b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2087.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनिटोबा हा कॅनडा देशाचा मध्य भागातील एक प्रांत आहे. विनिपेग ही मॅनिटोबाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॅनिटोबाचा १५.६% भाग गोड्या पाण्याच्या सरोवरांनी व्यापला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2111.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c97eabae47dee8dc6fa58b529aabb2d1d5a71c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2111.txt @@ -0,0 +1 @@ +मनीष तिवारी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2121.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4b2ef9ad1d1ce306d26456e41ac6092fb815b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2121.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे. +तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2174.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffe75114308b44ce297512959154e0190f7b0e2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2174.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज कुमार हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या कोंडली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2198.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..912cdf0fdcf0a35c8a5c83b0d6f80aa37b70a54b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2198.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज सिन्हा (जन्म १ जुलै १९५९) हे जम्मू आणि काश्मीरचे दुसरे आणि सध्याचे उपराज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. [१] [२] त्यांनी भारत सरकारमध्ये दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. सिन्हा हे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते, त्यांनी गाझीपूरचे भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. [३] [४] सिन्हा २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर यूपीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. [५] [६] [७] [८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2230.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1f52546e7cf827fa71c58170ca0320347001fd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2230.txt @@ -0,0 +1,27 @@ +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +विविध मराठी आभासी अनुदिनी संकेतस्थळांमध्ये परस्पर स्रोतांच्या देवाण घेवाणी करता सहकार्य प्रस्थापित करणे . मनोगत,मायबोली, याहू ग्रुप्स व इतरत्र संकेतस्थळांवरची प्रताधिकार नसलेली किंवा मुक्त माहिती विकिपीडियावर संकलित करणे व त्या माहितीचे #विकिकरण करणे असे या प्रस्तावित प्रकल्पाचे स्वरूप आहे. +{{मनोगती}} +हे खालीलप्रमाणे दिसेल: + +मनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका: + +
विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +आणि जरा सोपी: + +
मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +उदाहरण म्हणून हे पान पाहा. +Making Yahoo Email Signature is like we do at 'Manogat'जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका: + + +
विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +आणि जरा सोपी: + +
मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +उदाहरण म्हणून हे पान पाहा. +एक पेक्षा जास्त संकेतस्थळांवर कार्यरत सदस्याकरिता "सदस्य माहिती चौकट(साचे)" तयार करून ती वापरण्यास सदस्यांना प्रोत्साहित करणे ,सदस्यांकडून सूचना संकलित करणे,विषयवार माहितीचे दुव्यांसहीत सुचीकरण,शुद्धीकरण, संकलन,स्थलांतरण ,संदर्भीकरण इत्यादी प्रकल्प परस्पर सहकार्याने तडीस नेणे . या किंवा अशा बाबींचा यात समावेश करावा असे वाटते. तरी उत्साही सदस्यांनी आपला सहभाग संबंधित विकिपीडिया प्रकल्प पानावर नोंदवावा हि नम्र विनंती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2233.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7809cd2c3c2ccabb277158629aa9d74abcda48e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2233.txt @@ -0,0 +1 @@ +मनोहर उंटवाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2250.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c77b84dee9bcc5bf40bbd3df35344798d80d5ec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2250.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनोहर दत्तात्रेय माळगांवकर ( १२ जुलै १९१३; - उत्तर कन्नड जिल्ह्यातील जगलपेट, १४ जून २०१०) हे इंग्लिश भाषेमधील मराठी लेखक आहेत. +माळगांवकरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते हिंदुस्तानी सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्रीमधील अधिकारी, तसेच शिकारी, मुलकी अधिकारी, खाणमालक आणि शेतकरी होते. ते भारतीय संसदेसाठी उमेदवार म्हणूनही उभे राहिले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2254.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f2118a53e6dbfa36913baa92ae39525d90c1b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2254.txt @@ -0,0 +1 @@ +मनोहरराव नाईक हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या नाईक घराण्यातील ते नेते आहे. पुसद विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे त्यांनी तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केले. २००९च्या विधानसभा निवडनूकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढत ७७,१३६ अशा दणदणीत मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे कॅबिनेट अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद ही त्यांनी भूषविले. गुटखा बंदीचा निर्णय देखील त्यांनी घेतला होता.त्यांनी शेतकरी हितासाठी अग्रेसर भूमिका राहिली. नाईक घराण्यातील ते चौथ्या क्रमांकाचे मंत्री आहे. राजकारणासह समाजकारणावर देखील त्यांची भक्कम पकड राहिली. तेे विदर्भातील राजकीय चाणक्य देेखील मानलेे जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2268.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a0f4cba2f47f237f9453476f8006695bbdc4ec3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2268.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मंगालिसो मोसेहले (२४ एप्रिल, इ.स. १९९०:दादुझा, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2274.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31af4ddc45520adc5558311e0d6845ee8a5ff097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2274.txt @@ -0,0 +1,5 @@ +मन्ना डे (मे १, इ.स. १९१९ - ऑक्टोबर २४, इ.स. २०१३:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांना सन २००७चा दादासाहेब फाळके पुरस्कार सप्टेंबर २००९ मध्ये जाहीर करण्यात आला आणि तो २१ ऑक्टोबर २००९ला प्रदान केला गेला. +मराठी भाषेमध्ये मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. त्यातले -घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा- हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे. +इतर गाणी पुढील प्रमाणे: +डॉ. श्रीराम लागू यांना त्यांचा आवाज मिळाला होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2278.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb438f47c77b20027a050b2627058645260f992b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2278.txt @@ -0,0 +1,6 @@ +महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी ऊर्फ मन्नू भंडारी (जन्म : भानुपुरा-मध्य प्रदेश, ३ एप्रिल १९३१ - १५ नोव्हेंबर २०२१) या हिंदी लेखिका आहेत. +मन्नू भंडारी जन्मा ने मारवाडी आहेत. सुधारक वृत्तीचे वडील; घरात खूप मासिके, पुस्तके अशा वातावरणामुळे मन्नूंना वाचनाची, लेखनाची आवड निर्माण झाली. एम.ए. झाल्यावर मन्नू भंडारी यांनी काही काळ कलकत्यात अध्यापन केले आणि नंतर त्या दिल्लीत आल्या आणि १९५० साली त्यांचे लग्न लेखक, समीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी झाले. लग्नानंतरही त्या मन्नू भंडारी याच नावाने लिखाण करीत राहिल्या. १९५०-६० दरम्यान हिंदीत नव्याने रुजू पाहणाऱ्या नवकथेच्या चळवळीच्या काळातल्या त्या आघाडीच्या लेखिका आहेत. +’मैं हार गई’ ही मन्नू भंडारी यांची पहिली कथा. त्यांच्या अनेक कथा वास्तवावर आधारलेल्या आहेत. +मन्नू भंडारी यांच्या कादंबऱ्यांचे आणि कथांचे मराठी, सिंधी, गुजराती, बंगाली, कानडी, उडिया, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या महाभोज या नाटकाचे मराठीतही प्रयोग झाले आहेत. अकेली आणि चष्मे या कथांचेही नाट्यरूपांतर झाले आहे. ’त्रिशंकु’ या कथेवर एक दूरदर्शन चित्रपट झाला आहे. मन्नू भंडारी यांनी प्रेमचंद यांच्या निर्मला कादंबरीवर आधारित हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे पटकथालेखन केले आहे. चित्रवाणीवरील दर्पण या हिंदी मालिकेसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांतील दहा कथांचे लेखनही केले आहे. +मन्नू भंडारी यांचे पती कै. राजेंद्र यादव हे हिंदी नवकथेचे आद्य प्रवर्तक, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या’एक इंच मुस्कान’ या कादंबरीतील नायिकेचा भाग मन्नू भंडारीयांच्या लेखणीतून उतरला आहे. +मन्नू भंडारी यांच्या गाजलेल्या कथा== diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2296.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78b134a1a5c7c0a103f0cb62e804917d43f10198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2296.txt @@ -0,0 +1,4 @@ +मन्रो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रॉचेस्टर येथे आहे.[१] +२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७,५२,०३५ इतकी होती.[२] +मन्रो काउंटीची रचना १८२१मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रोचे नाव दिलेले आहे.[३] +मन्रो काउंटी रॉचेस्टर महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2298.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21c75997091ab81928e7b14e0bd631d396768cbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2298.txt @@ -0,0 +1,3 @@ +मन्रो काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2299.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f0783ff0163202e483e2346b6106886b2840a65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2299.txt @@ -0,0 +1,2 @@ +मन्रो काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2302.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8b62ceca5491a1229b55b9f1ed2003c89756dd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2302.txt @@ -0,0 +1,3 @@ +मन्रो काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मन्रो काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2306.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78b134a1a5c7c0a103f0cb62e804917d43f10198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2306.txt @@ -0,0 +1,4 @@ +मन्रो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रॉचेस्टर येथे आहे.[१] +२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७,५२,०३५ इतकी होती.[२] +मन्रो काउंटीची रचना १८२१मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रोचे नाव दिलेले आहे.[३] +मन्रो काउंटी रॉचेस्टर महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2314.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a4941b18b61f912b1dcf4ab25bde52748e2fb23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2314.txt @@ -0,0 +1 @@ +मन्सूर अख्तर (२५ डिसेंबर, १९५७:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० ते १९९० मध्ये दरम्यान १९ कसोटी आणि ४१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2320.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31af4ddc45520adc5558311e0d6845ee8a5ff097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2320.txt @@ -0,0 +1,5 @@ +मन्ना डे (मे १, इ.स. १९१९ - ऑक्टोबर २४, इ.स. २०१३:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांना सन २००७चा दादासाहेब फाळके पुरस्कार सप्टेंबर २००९ मध्ये जाहीर करण्यात आला आणि तो २१ ऑक्टोबर २००९ला प्रदान केला गेला. +मराठी भाषेमध्ये मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. त्यातले -घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा- हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे. +इतर गाणी पुढील प्रमाणे: +डॉ. श्रीराम लागू यांना त्यांचा आवाज मिळाला होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2321.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2321.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2361.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624d26b2c6bd04623ee698f203a479be02bb8c51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2361.txt @@ -0,0 +1,11 @@ + +मयुरी ऊर्फ दुर्योधनप्रिया ही दुर्योधनाची पत्नी होती आणि मुलगा लक्ष्मण कुमार व मुलगी लक्ष्मणा ह्यांची आई असे म्हणतात व भानुमतीची लहान बहीण होती. इतिहासातील महाभारतांमध्ये एक पौराणिक राणी व महाभारतात एक स्त्री म्हणून ओळखली जाते. +तिला दुर्योधन म्हणजे खूप आवडतो. काही लोक तिचा आकलन भानुमतीशी करतात. +भानुमती, जे दुर्योधनाची नंतरची बायको म्हणून ओळखली जाते, तिने भीमावर विश्वास केली नाही व त्याला शाप दिले कि द्रौपदी पहिलच मरून जाईल व बाकीचे पांडव नंतर मरून जाईल. भानुमती व मयुरी सती करतात असे कविचे वह्यांमध्ये ओळखला जातो. गांधारी तिला सुंदर, छान डोळे व सुंदर वट असे कृष्णाला सांगते. मयुरी दुर्योधनासारखी घमंडी होती आणि तसेच भानुमती होती.महाभारत मयुरीचे वर्णन गांधारी यांनी केले आहे, असे एक अवतरण सांगते. दुर्योधन च्या लग्नाला सहमती देणारी सुंदर मयुरी नंतर त्याची आवडती होती. कलिंगाची राजकन्या चित्रांगदाची कन्या भानुमती ही महाभारत म्हटल्याप्रमाणे त्याची चौथी पत्नी होती. +लक्ष्मणा तिची आवडती मुलगी होती. ती आपल्या दोन्ही मुलांवर अन्याय न करता अपार प्रेम करत असे. लक्ष्मणा आणि तिच्या भावाचे भानुमतीशिवाय मयुरीवर प्रेम होते. +मयुरीचे अर्थ लांडोर आहे म्हणून महाभारतात मयुरी शांत, प्रेमळ जिने दुर्योधनाशी लग्न केले होते. लांडोर मोराचा विरूद्धार्थी शब्द आहे. +तिथेच त्रिलोकपुर साम्राज्यमध्ये स्वयंवर आयोजित केला होता. पण स्वयंवरात दुर्योधनाला निमंत्रण दिला होता, त्याने सर्व क्षत्रियांना सांगितला कि,"जेव्हा मयुरी माझ्याशी लग्न नाही करणार, मी तिचा बलपूवर्क अपहरण करीन". त्याचा रक्षा करण्यासाठी कर्ण ही आला होता. मयुरी स्वयंवरात माला घेऊन आली. तिने सगळ्यंना पाहिले पण कुठलेही चांगला नवरा नाही मिळाले. पण जेव्हा तिने दुर्योधनाला पाहिले, तिला जाण्यास दुर्योधनाने तिचे हात घट्ट धरून तिचे अपहरण केले, कर्णने सारथीला हस्तिनापुर जायला सांगितला. हस्तिनापुर येताच मयुरीने दुर्योधनाशी लग्न करण्याचे मान्य केले व ती त्याची बायको होऊन त्याचा मुलगा व मुलीची आई झाली व भानुमतीची सौतन व बहीण झाली. +मयूरीला "दुर्योधनपत्नी" व "दुर्योधनप्रिया" हे पद तिला देतात व तिचा मूर्ती करून तिला लाल व गुलाबी रंगाची कापड तिच्यावर घालून पूजापाठ करतात. +भानुमती, सुचिता व श्रीमती ही पण काही दुर्योधनाची बायका आहेत. मयूरीला हजार पदवी आहेत पण ह्याचात प्रमुख "गांधारीची सून". ती अर्जुनाशी लग्न करायचे होते पण तिच्या बाबांनी अस्वीकार करून तिचा लग्न दुर्योधनाशी केलं. स्त्रीपर्वात गांधारी तिला सुंदर व ती सौंदर्याची स्त्री असे ती कृष्णाला सांगते. +मयुरी दुर्योधन बरोबर खूप वेळा खेळली आणि त्याने तिला कसे खेळायचे ते शिकवले. खेळत असताना अचानक तिच्या गळ्यातील हार खाली पडला. दुर्योधनाने तिचा हार पाहिला आणि तिला दिला, तो तिच्या डोळ्यांनी मंत्रमुग्ध झाला आणि सामन्यादरम्यान तिचे चुंबन घेतले. त्याचा काका, शकुनी आणि त्याचा मित्र कर्ण यांनी दुर्योधन सोबत लग्नासाठी मयुरीची निवड केली. त्यांनी मयुरीला रथावर फिरायलाही नेले. तिला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते.ही कथा गांधारी पासून सुरू होऊ शकते जेव्हा तिच्या मुलाने तिचे बळजबरीने अपहरण केले आणि तिच्याशी लग्न केले तेव्हाचे तिचे स्वरूप वर्णन करते. ही कथा भानुमतीच्या कथेपर्यंत येऊ शकते जेव्हा ते दोघे मित्र बनले. +मयुरी जिंकत राहिली पण दुर्योधनाने त्याच्या तोंडून एकही वाईट शब्द काढला नाही कारण ती त्याची आवडती होती. तो सामना हरतोय याचं तिला वाईट वाटत होतं, ती असा विचार करत असताना तिचा नवरा आनंदी असावा अशी तिची इच्छा होती. भानुमती ही तिची तथाकथित बहीण होती, जी सुद्धा गर्विष्ठ स्त्री होती पण तिने कर्णाशी जुळवून घेतले. मयुरी आणि भानुमती अतिशय दयाळू, उदार, सुंदर होत्या. काही सूत्रांचे म्हणणे आहे की दुर्योधनाने कर्ण बरोबर फासे सामना खेळताना भानुमतीचा हार तिला दिला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2396.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbd5533ab3927974d764bb1b7c39ef99bb5474b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2396.txt @@ -0,0 +1 @@ +मरगसुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2452.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390b336fe1047d4c6560c046987b841ef1b2255e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2452.txt @@ -0,0 +1,11 @@ +मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक संलग्न संस्था आहे. इ.स. १९४३ साली 'दुसरे निजाम साहित्य संमेलन, नांदेड' येथे झाले. त्यावेळी म्हणजे २९ सप्टेंबर १९४३ रोजी 'मराठवाडा साहित्य परिषद' या नावाची स्थायी स्वरूपाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. एकवीस सभासदांची अस्थायी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली व तिचे कार्यालय सध्या नांदेडला असावे असे ठरविण्यात आले. +पहिले तात्पुरते कार्यकारी मंडळ - +अध्यक्ष - दत्तो वामन पोतदार +कार्याध्यक्ष - दे.ल. महाजन +चिटणीस - ग.ना. अंबेकर, श्री. रं. देशपांडे +सदस्य - सर्वश्री दिगंबरराव बिंदू, दिवाकर कृष्ण केळकर, वि.अं. कानोले, शंकरराव टेकळीकर, दासराव बोकील, व्यंकटराव देशमुख, नारायणराव जोशी, प्रभाकरराव देशमुख, भी.कृ. वाघमारे, वि.पां. देऊळगावकर, हनुमंतराव वैष्णव, स.मा.गर्गे, केशवराव पत्की, वि.भा. पाठक, बापुसाहेब इटगापल्लीकर, वा.दा. गाडगीळ, सौ. उषाताई पगडी व श्री. न. शे. पोहनेरकर इ.[१] +सध्या मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यालय औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, पैठण, जालना, हिंगोली आदी ठिकाणी शाखा आहेत. ही परिषद मराठवाडा साहित्य संमेलन, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आणि मराठवाडा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते. कौतिकराव ठाले पाटील हे सन २०१५पासून संस्थेचे अध्यक्ष आहेत. +अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच 'मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वतःचे पुस्तक प्रकाशन आहे. +मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. डाॅ. ना.गो.नांदापूरकर, दा.गो.देशपांडे, भगवंत देशमुख, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ,नागनाथ कोत्तापल्ले, महावीर जोंधळे, बाळकृष्ण कवठेकर, रवींद्र किंबहुने , लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे मुखपत्राचे आजवरचे संपादक आहेत. त्यानंतर आसाराम लोमटे हे संपादक झाले.[२] + +मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते.परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ : diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2463.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e72c2cd4e6f808a8a11541e66d2c7aeab84fbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2463.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठा मुघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सुरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाहीसारखी मोठी राज्ये मुघल आक्रमणापुढे संपुष्टात आली परंतु तुलनेने लहान असे मराठ्यांचे राज्य संपवण्यात मुघलांना पूर्णतः अपयश आले खूप मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ मुघल राज्याची संपत्ती या मोहिमेत खर्च झाली त्यामुळे नंतरच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार थांबला व काही वर्षातच मुघल साम्राज्य हे छोट्या राज्यापुरते मर्यादित झाले. या नंतर मराठे, राजपूत जाट व शीख यांचे भारतावर वर्चस्व स्थापन झाले. +यानंतर सर्व भारतावर मराठा साम्राज्य विस्तार झाला diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2467.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d5b56fa4fd78597acecbfc2098c0598d7c73f95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2467.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६३७ असलेले मराठा (गाव) हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १७८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ८३१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे. माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2526.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9918efa6e3832b86bc8c1ad7e373b01b867144f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2526.txt @@ -0,0 +1,25 @@ +मराठी सिनेमा म्हणजे भारतातील मराठी भाषेतील सिनेमा. मराठी ही भारतातील महाराष्ट्र राज्याची भाषा आहे. जुन्या मुंबईवर आधारित, हा सर्वात जुना आणि भारतातील अग्रणी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. मराठी आणि संस्कृत संगीत नाटके करत असणारे मराठी कामगारांनी त्या काळात मराठीत नाटक सादर केले.आलम आरा ह्या पहिले हिंदी बोलपट्टीच्या एक वर्षनंतर, पहिला मराठी बोलपट चित्रपट, अयोध्येचा राजा,१९३२ साली प्रदर्शित झाला . जरी हा उद्योग मुंबईत असलेल्या मोठ्या बाजारपेठित हिंदी चित्रपटापेक्षा खूपच लहान असला, तरी मराठी सिनेमा कर मुक्त आहे आणि अलिकडच्या वर्षांत ती प्रगती करीत आहे. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र, १९१३ साली प्रसिद्ध झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून ओळखला जात असे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारचा दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत जीवनगौरव भरण्यासाठी देण्यात येतो. +मराठी सिनेमा भारतीय चित्रपटातील सर्वात जुना प्रकार आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. +दादासाहेब फाळके यांना स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिल्या पायनियर आणि सिनेमाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९१३ मध्ये आपल्या पहिल्या स्वदेशी बनलेल्या फिल्म 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटाची क्रांती आणली. या चित्रपटाला इफ्फी आणि एनआयएफडीने मराठी चित्रपटाचा एक भाग म्हणून मानले आहे कारण मराठी आणि हिंदी चित्रपटाची निर्मिती पूर्णता मराठी कामगारांची निर्मिती होते.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे विसाव्या शतकातील सक्रिय चित्रपट निर्मितीचे एक केंद्र होते. १९१९ साली बाबुराव पेंटर यांनी लोकप्रिय म्हणून ओळखले आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रीय चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि बालाशेद पवार, कमला देवी आणि झुनझाराराव पवार यांच्यात पहिली ऐतिहासिक ऐतिहासिक सेरंधारी (१९२०) प्रसिद्ध भूमिका साकारली. सेट, वेशभूषा, डिझाइन आणि पेंटिंग या विषयातील त्यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी नवीन माध्यमांतून आणि ऐतिहासिक शैलीत विशेष करण्यासाठी मराठा इतिहासातील भाग निवडले. १९३० पर्यंत बाबुराव पेंटरने अनेक मूकपट तयार केले. तथापि, काही मूकपटांच्या नंतर, महाराष्ट्र चित्रपट कंपनीने आवाज येण्याच्या आशेने बंद केले. बाबूराव विशेषतः टॉकीजबाबत उत्सुक नव्हते कारण त्यांनी विश्वास ठेवला होता की ते गेल्या काही वर्षांत इतक्या वेदनादायक उत्क्रांतीचा नाश करतील.दासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटाचा जनक म्हणतात. त्यानि खुप जुन्य कलात् ही नविन् नविन् प्रयोग करत् सिनेमचि निर्मिति केली + +मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट अयोध्येचा राजा (चित्रपट) हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये श्यामची आई या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. +सिंहासन(जब्बार पटेल): कलावंत : श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, दत्ता भट. +अशी ही बनवाबनवी(सचिन): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी. +एक डाव भुताचा(रवि नेमाडे): कलावंत : दिलीप प्रभावळ्कर, अशोक सराफ, रंजना. +माहेरची साडी(विजय कोंडके): कलावंत : अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, आशालता वाबगांवकर. +नवरी मिळे नवऱ्याला(सचिन): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगांवकर. +जैत रे जैत(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले. +माझा पती करोडपती(सचिन पिळगावकर): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे. +पिंजरा(व्ही. शांताराम): कलावंत : संध्या, श्रीराम लागू, निळू फुले. +झपाटलेला(महेश कोठारे): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, मधू कांबीकर, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर. +आम्ही जातो आमुच्या गावा(कमलाकर तोरणे): कलावंत : धुमाळ, उमा भेंडे, सूर्यकांत, श्रीकांत मोघे. +जगाच्या पाठीवर(राजा परांजपे): कलावंत : सीमा देव, रमेश देव, राजा परांजपे. +मधुचंद्र(राजदत्त): कलावंत : उमा, काशीनाथ घाणेकर, नाना पळशीकर, श्रीकांत मोघे. +पाठलाग (राजा परांजपे): कलावंत : भावना, काशीनाथ घाणेकर. +सामना(जब्बार पटेल): कलावंत : निळू फुले, श्रीराम लागू. +आत्मविश्वास(सचिन): कलावंत : नीलकांती पाटेकर, दया डोंगरे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर. +हा खेळ सावल्यांचा(?) कलावंत: काशीनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग, राजा गोसावी. +कळत नकळत(कांचन नायक): कलावंत : विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ. +उंबरठा(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, गिरिश कर्नाड. + १९५० + •  १९५१  •  १९५२  •  १९५३  •  १९५४  •  १९५५  •  १९५६  •  १९५७  •  १९५८  •  १९५९  •  १९६०  •  १९६१  •  १९६२  •  १९६३  •  १९६४  •  १९६५  •  १९६६  •  १९६७  •  १९६८  •  १९६९  •  १९७०  •  १९७१  •  १९७२  •  १९७३  •  १९७४  •  १९७५  •  १९७६  •  १९७७  •  १९७८  •  १९७९  •  १९८०  •  १९८१  •  १९८२  •  १९८३  •  १९८४  •  १९८५  •  १९८६  •  १९८७  •  १९८८  •  १९८९  •  १९९०  •  १९९१  •  १९९२  •  १९९३  •  १९९४  •  १९९५  •  १९९६  •  १९९७  •  १९९८  •  १९९९  •  २०००  •  २००१  •  २००२  •  २००३  •  २००४  •  २००५  •  २००६  •  २००७  •  २००८  •  २००९  •  २०१०  •  २०११  •  २०१२  •  २०१३  •  २०१४  •  २०१५ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2528.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4206c826366fd30c790ad2de092015e6fa74ac66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2528.txt @@ -0,0 +1,85 @@ +मराठी चित्रपटांत काम करणारे अभिनेते खालीलप्रमाणे आहेत: + •  अद्वैत दादरकर  •  हेमचंद्र अधिकारी  •  मकरंद अनासपुरे  •  अभिनय बेर्डे  •  आनंद अभ्यंकर  •  सदाशिव अमरापूरकर  •  अमरनाथ खराडे  •  सोमनाथ अवघडे  •  अमोल रामसिंग कोल्हे  •  अस्ताद काळे + •  मोहन आगाशे  •  आनंद इंगळे  •  विनय आपटे  •  पार्श्वनाथ आळतेकर + •  शफी इनामदार  •  प्रकाश विठ्ठल इनामदार + •  आनंद एपरकर + •  गिरीश ओक  •  पद्माकर ओझे + •  राघवेंद्र कडकोळ  •  भालचंद्र कदम  •  किशोर भानुदास कदम  •  किरण करमरकर  •  विनायक दामोदर कर्नाटकी  •  मच्छिंद्र कांबळी  •  पंढरीनाथ कांबळे  •  उमेश कामत  •  यतिन कार्येकर  •  गिरीश कुलकर्णी  •  जयराम कुलकर्णी  •  पांडुरंग कुलकर्णी  •  संदीप कुलकर्णी  •  सक्षम कुलकर्णी  •  सुहास कुलकर्णी कृष्णा कोंडके  •  शशांक केतकर  •  आदिनाथ कोठारे  •  महेश कोठारे  •  संकेत कोर्लेकर  •  चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर + •  अविनाश खर्शीकर  •  सचिन खेडेकर + •  अमित गाडगीळ  •  किरण गायकवाड  •  टेक्सास गायकवाड  •  क्षितिज गावंड  •  लोकेश गुप्ते  •  विजय गोखले  •  चंद्रकांत रघुनाथ गोखले  •  राहुल गोरे  •  आशुतोष अशोक गोवारीकर  •  राजा गोसावी + •  काशीनाथ घाणेकर + •  विजय चव्हाण  •  चिंतामणराव कोल्हटकर  •  चिन्मय उदगीरकर  •  अश्विन चितळे  •  अंकुश चौधरी + •  हर्ष छाया + •  गजानन जहागीरदार  •  किशोर जाधव  •  भरत जाधव  •  संदेश जाधव  •  सिद्धार्थ जाधव  •  संतोष जुवेकर  •  पुष्कर जोग  •  रणजीत जोग  •  संजय जोग  •  मनोज जोशी  •  गिरीश जोशी  •  गिरीश जयंत जोशी  •  जितेंद्र जोशी  •  सुधीर जोशी  •  स्वप्नील जोशी + •  उदय टिकेकर  •  सुयश टिळक + •  गुरू ठाकूर + •  शेखर ढवळीकर + •  वैभव तत्ववादी  •  श्रेयस तळपदे  •  सतीश तारे  •  मधुकर तोरडमल + •  चेतन दळवी  •  तुषार दळवी  •  सुधीर दळवी  •  प्रशांत दामले  •  सतीश दुभाषी  •  अजिंक्य देव  •  रमेश देव  •  माधव देवचके  •  मकरंद देशपांडे  •  पु.ल. देशपांडे + •  समीर धर्माधिकारी  •  धुमाळ + •  नंदू माधव  •  अरुण नलावडे  •  शेखर नवरे  •  किशोर नांदलस्कर  •  निखिल राऊत + •  नचिकेत पटवर्धन  •  रवी पटवर्धन  •  अतुल परचुरे  •  नाना पळशीकर  •  सुहास पळशीकर  •  कुलदीप पवार  •  विजय पाटकर  •  नंदू पाटील  •  गणपत पाटील  •  नाना पाटेकर  •  चंदू पारखी  •  सचिन पिळगांवकर  •  पुष्कर श्रोत्री  •  अक्षय विनायक पेंडसे  •  बाबूराव पेंढारकर  •  अतुल पेठे  •  नारायण पै  •  शरद पोंक्षे  •  नंदू पोळ  •  प्रथमेश परब  •  किशोर प्रधान  •  भूषण प्रधान  •  नवीन प्रभाकर  •  दिलीप प्रभावळकर  •  प्रसाद ओक + •  अमित फाळके  •  निळू फुले + •  सुनील बर्वे  •  राजा बापट  •  बाळ कर्वे  •  लक्ष्मीकांत बेर्डे + •  भगवानदादा  •  दत्ता भट  •  अभिराम भडकमकर  •  रमेश भाटकर  •  दाजी भाटवडेकर  •  भारत गणेशपुरे  •  सुहास भालेकर  •  सुबोध भावे  •  ओम भूतकर  •  विनीत भोंडे + •  रवींद्र मंकणी  •  मंगेश देसाई  •  नागराज मंजुळे  •  राहुल मगदूम  •  राजा मयेकर  •  शरद तळवलकर  •  रवींद्र महाजनी  •  यशवंत महाडिक  •  वैभव मांगले  •  गणेश मांजरेकर + •  सूर्यकांत मांढरे  •  दामूअण्णा मालवणकर  •  श्रीकांत मोघे  •  शाहू मोडक  •  संजय मोने  •  उदय म्हैसकर + •  श्रीकांत यादव  •  विनय येडेकर  •  योगेश शिरसाट + •  विलास रकटे  •  निखिल रत्‍नपारखी  •  आलोक राजवाडे  •  राजशेखर (अभिनेता)  •  नारायण श्रीपाद राजहंस  •  श्रीराम रानडे  •  शिवाजी राव  •  राहुल सोलापूरकर  •  आदित्य रेडिज + •  श्रीराम लागू  •  उपेंद्र लिमये + •  माधव वझे  •  अजय वढावकर  •  देवेन वर्मा  •  अमेय वाघ  •  दुष्यंत वाघ  •  जयवंत वाडकर  •  विक्रम गोखले  •  विजू खोटे  •  विवेक  •  विवेक आपटे  •  विवेक लागू  •  अनिकेत विश्वासराव  •  विहंगराज  •  प्रदीप वेलणकर + •  व्ही. शांताराम  •  नारायणी शास्त्री  •  अशोक शिंदे  •  प्रमोद शिंदे  •  बाळकृष्ण शिंदे  •  मिलिंद शिंदे  •  वसंत शिंदे  •  सयाजी शिंदे  •  दीपक शिर्के  •  रवींद्र बेर्डे  •  जयराम शिलेदार  •  अभय शुक्ल  •  राजेश शृंगारपुरे  •  सुनील शेंडे  •  रामकुमार शेडगे  •  सुशांत शेलार  •  श्रीरंग गोडबोले  •  राजेश श्रृंगारपुरे + •  संजय नार्वेकर  •  सतीश पुळेकर  •  उदय सबनीस  •  अरुण सरनाईक  •  अशोक सराफ  •  शिवाजी साटम  •  मंगेश सातपुते  •  जयंत सावरकर  •  मोहनदास सुखटणकर  •  सूरज पवार + •  संज्योत हर्डीकर  •  इशाद हाश्मी +अ + •  किशोरी अंबिये  •  कांचन मार्कंड अधिकारी  •  अनुजा साठे  •  अपर्णा फटिंग  •  अलका कुबल  •  वृंदा गजेंद्र +आ + •  भारती आचरेकर  •  नयना आपटे  •  मधु आपटे +इ + •  जयमाला प्रकाश इनामदार +उ + •  उषा जाधव  •  वर्षा उसगांवकर +ओ + •  गिरिजा ओक +क + •  केतकी करंदीकर  •  मधू कांबीकर  •  ऊर्मिला कानिटकर  •  आशा काळे  •  अश्विनी कुलकर्णी  •  गौरी कुलकर्णी  •  भक्ति कुलकर्णी  •  ममता कुलकर्णी  •  वृषाली कुलकर्णी  •  शर्मिला कुलकर्णी  •  सुकन्या कुलकर्णी-मोने  •  सोनाली कुलकर्णी  •  सोनाली मनोहर कुलकर्णी  •  नीना कुलकर्णी  •  कृतिका देव  •  कानन कौशल +ख + •  सोनाली खरे  •  अमृता खानविलकर  •  शुभा खोटे  •  दुर्गा खोटे  •  अमिता खोपकर +ग + •  जयश्री गडकर  •  लीला गांधी  •  आश्विनी गिरी  •  सुमती गुप्ते  •  वंदना गुप्ते  •  कमलाबाई रघुनाथराव गोखले  •  शुभांगी गोखले  •  अदिती गोवित्रीकर  •  श्रीलेखा गोविल +घ + •  नेहा घाटे  •  पूनम घाडगे  •  मेघा घाडगे +च + •  उषा चव्हाण  •  पद्मा चव्हाण  •  इंदिरा चिटणीस  •  स्वाती चिटणीस +ज + •  शर्वरी जमेनीस  •  माया जाधव  •  समृद्धी जाधव  •  वीणा जामकर  •  उज्ज्वला जोग  •  शांता दत्तात्रेय जोग  •  अर्चना जोगळेकर  •  आसावरी जोशी  •  निवेदिता अशोक सराफ  •  रसिका जोशी  •  सुहास जोशी +ट + •  रेशम टिपणीस +ठ + •  शिल्पा ठाकरे +ड + •  दया डोंगरे  •  स्मिता डोंगरे +त + •  जयश्री तळपदे  •  स्मिता तळवलकर  •  स्मिता तांबे  •  सई ताम्हणकर  •  तितिक्षा तावडे  •  शिल्पा तुळसकर  •  प्रिया तेंडुलकर +द + •  देविका दफ्तरदार  •  रेणुका दफ्तरदार  •  नंदिता दास  •  मृणाल देव  •  सीमा देव  •  अदिती देशपांडे  •  आराधना देशपांडे  •  मृण्मयी देशपांडे  •  वसुधा देशपांडे  •  विभावरी देशपांडे  •  सुहासिनी देशपांडे  •  सुनीता पुरुषोत्तम देशपांडे  •  सुषमा देशपांडे  •  रंजना देशमुख  •  वत्सला देशमुख  •  सीमा देशमुख +न + •  नगमा (अभिनेत्री)  •  नम्रता प्रधान  •  शकुंतला नरे  •  उषा नाईक  •  मनवा नाईक  •  मानसी नाईक  •  उषा नाडकर्णी  •  सारिका निलाटकर  •  नेहा जोशी +प + •  हीना पंचाल  •  तेजस्विनी पंडित  •  भाग्यश्री पटवर्धन  •  विद्या पटवर्धन  •  दीपा परब  •  वैदेही परशुरामी  •  निशा परुलेकर  •  निशा परुळेकर  •  पल्लवी जोशी  •  पल्लवी पाटील  •  अर्चना पाटकर  •  नीलकांती पाटेकर  •  स्मिता पाटील  •  शर्वाणी पिल्ले  •  सुप्रिया पिळगांवकर  •  लीलाबाई भालजी पेंढारकर  •  आशा पोतदार  •  तेजश्री प्रधान  •  प्रेमा किरण +ब + •  कमलाबाई बडोदेकर  •  भक्ती बर्वे  •  मुक्ता बर्वे  •  सुचित्रा बांदेकर  •  प्रिया बापट  •  उत्तरा बावकर  •  श्रेया बुगडे  •  सोनाली बेंद्रे  •  प्रिया बेर्डे  •  सरस्वती बोडस  •  नेहा बोरगांवकर +भ + •  अदिती भागवत  •  इला भाटे  •  अश्विनी भावे  •  उमा भेंडे  •  श्वेता भोसले +म + •  मराठी चित्रपटांतील खलनायक  •  केतकी माटेगावकर  •  सविता मालपेकर  •  सुहासिनी मुळगावकर  •  प्रचीती म्हात्रे  •  विमल म्हात्रे +र + •  शिवानी रांगोळे  •  राजेश्वरी खरात  •  रेखा राव  •  रिंकू राजगुरू  •  रुही बेर्डे  •  रेखा कामत  •  क्रांती रेडकर +ल + •  रीमा लागू  •  कविता लाड  •  लालन सारंग  •  प्रतीक्षा लोणकर +व + •  वंदना पंडित  •  सुशीलादेवी बापूराव पवार  •  मनोरमा वागळे  •  योहाना वाच्छानी  •  निशिगंधा वाड  •  हंसा वाडकर  •  आशालता वाबगांवकर  •  विनी परांजपे  •  मधुरा वेलणकर +श + •  बेबी शकुंतला  •  किशोरी शहाणे  •  रेणुका शहाणे  •  नंदा शिंदे  •  श्वेता शिंदे  •  शोभा शिराळकर  •  नीलम शिर्के  •  स्मिता शेवाळे  •  श्रावणी सोळसकर  •  रितिका श्रोत्री +स + •  संध्या (मराठी अभिनेत्री)  •  शोभना समर्थ  •  तेजस्विनी सरकार  •  सविता प्रभुणे  •  चारुशीला साबळे  •  सायली संजीव  •  सारिका  •  मानसी साळवी  •  निर्मिती सावंत  •  पूजा सावंत  •  गौरी सुखटणकर  •  अमृता सुभाष  •  पल्लवी सुभाष  •  सुलभा देशपांडे  •  सुनीता सेनगुप्ता  •  दिपाली सैय्यद  •  माधवी सोमण  •  ज्योती सुभाष diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2539.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae5a6b458bf530dcbf86c289690a57b4036d4cdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2539.txt @@ -0,0 +1 @@ +पहा : जनसाहित्य संमेलन; मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2547.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d47c77a3f15442a5c8d4dc15bc5c19b9d36e07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2547.txt @@ -0,0 +1 @@ +मराठी वृत्तपत्रे भारतातील सगळ्यात जुन्या वृत्तपत्रांत आहेत. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरू केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2548.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c41e84c9e65b8f09ea829e5b7c06a31734e03730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2548.txt @@ -0,0 +1 @@ +१८६७ साली हिंदुस्थान सरकारच्या देशी प्रकाशनाच्या नोंदणीचा २५ वा कायदा पास झाला आमि देशी ग्रंथसंरक्षणाच्या दृष्टिने एक नवे युग सुरू झाले. ह्यापूर्वी १८४७ सालच्या प्रकाशनाचा विसावा कायदा अस्तित्वात होता, परंतु त्यामध्ये ग्रंथकाराच्या मालकी हक्कांच्या रक्षणापलीकडे ग्रंथसंरक्षणाची कोणतीही सोय नव्हती. १८६७ च्या कायद्याप्रमाणे प्रत्येक प्रकाशनाच्या तीन प्रती मुद्रित झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सरकारकडे पाठवाव्यात असे नमूद करण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_255.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4484bfd956b719782b45fdae5366dadb2d5de45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_255.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुरा कोळसा तथा लिग्नाइट हा दगडी कोळशाचा एक प्रकार आहे. हा कोळसा पीट नावाच्या कोळशाइतका सच्छिद्र नसला तरी त्याच्यापेक्षा अधिक घट्ट आणि कठीण असतो, आणि सामान्य दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट व कमी कठीण असतो. नुसत्या डोळ्यांनी ओळखू येतील अशा वनस्पतिज संंरचना याच्या बऱ्याचशा भागात नसतात, पण काही थोडे वनस्पतींच्या पानांचे किंवा सालींचे तुकडे असल्याचे सहज ओळखता येते. सूक्ष्मदर्शकाने पाहिले असता मात्र याच्यात वनस्पतिज पदार्थांचे कोशिकामय (पेशीमय) संरचना असलेले पुष्कळ तुकडे आढळतात. या कोळशाचा रंग तपकिरी ते काळा असतो. त्याचा कीस तपकिरी रंगाचा असतो. हा कोळसा फोडला तर त्याचे तुकडे वेडेवाकडे होतात. याच्यात बराच जलांश असतो. वाळल्यावर याचा सहज भुगा होतो. +क्रिटेशस (सुमारे १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात व तृतीय कल्पात (सुमारे ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले लिग्नाइटचे मोठे साठे उत्तर अमेरिकेत व तृतीय कल्पात तयार झालेले तसेच साठे युरोपात आहेत. भारतात तमिळनाडू, कच्छ, राजस्थान आणि काश्मीर यांच्यातील काही क्षेत्रांत लिग्नाइटचे साठे आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा साठा म्हणजे तमिळनाडूच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील नेव्हेली येथील होय. तो सुमारे २६० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. त्याच्यात लिग्नाइटचे पाच थर असून त्यांपैकी मधल्या थराची अधिकात अधिक जाडी २२.७ मीटर आणि सरासरी जाडी १५.२४ मीटर भरते. खाणकाम करून येथील लिग्नाइट काढले जाते [→ लिग्नाइट]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2551.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a659a8a11383d7fc511a2274880b4127528532a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2551.txt @@ -0,0 +1 @@ +१८४३ मध्ये विष्णूदास भावे यांच्या "सीतास्वयंवर" या मराठी नाटकाचा प्रयोग झाला मराठी नाट्य वाङमयाचा उदय म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते. १८५५ मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे आशय-विषय आणि भाषा अभिव्यक्ती या सर्व बाबतीत एक स्वतंत्र नाटक लिहिले. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या १८८० च्या संगीत शाकुंतल या नाटकापासून मराठी रंगभूमीवर संगीत नाट्य पद्धतीचा नवा संप्रदाय उदयास आला. इंग्रजीतील ऑपेरा या नाट्य प्रकाराच्या धर्तीवर किर्लोस्करांनी मराठी नाट्य संगीत शाकुंतलच्या रूपाने एक वेगळा प्रकार सुरू केला. शाकुंतल हे भाषांतरित नाटक आहे. त्यानंतर त्यांनी महाभारतातील सुभद्राहरणाची कथा आणि मोरोपंत तद्विषयक आख्यान यांचा आधार घेऊन संगीत सौभद्र हे स्वतंत्र नाटक लिहिले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2562.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f468c37c667a5a6a5b085e9e2890c6b512ee1dd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2562.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिल्मफेर पुरस्कार मराठी ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची मराठी आवृत्ती आहे. हे पुरस्कार मराठी सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. १९६४ साली मराठी फिल्मफेर पुरस्काराची सुरुवात झाली काळांतराने ही आवृत्ती बंद झाली आणि पुन्हा २०१५ साली त्याची सुरुवात झाली. [१] +मराठी भाषेतील चित्रपटांसाठी खालील पुरस्कार दिले जातात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2584.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42c7e6582d518a0064284fb047982657517b78c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2584.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विषयक कार्यालये/संस्था/मंडळ इत्यादींचे प्रशासकीय नियंत्रण मराठी भाषा विभागाच्या मार्फत होते. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी या विभागावर आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांना मोफत मराठीचे वर्ग उपलब्ध करून देतो. या विभागाचे दीपक वसंत केसरकर हे विद्यमान मंत्री आहेत. +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] +मंत्री (मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री असतात. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग-१ चे ५ अधिकारी व वर्ग-२ चे८ अधिकारी असतात, एकूण ८ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी असते.[३] +मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि. २४ जून, २०१० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन‍ विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.[४] +नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.[५] सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे. +  +मराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम 35 पदांना मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.३१ जानेवारी, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ६.९.२०११ रोजी सचिव कार्यालयासाठी ४ व विभागासाठी ६ अशा १० अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त ८ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. २७/४/२०१२ रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५३ मंजूर पदांपैकी 40 पदे भरण्यात आलेली असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक ६ मे, २०११ दि. १४/११/२०११ व दि. २/५/२०१२ अन्वये विभागातील कामकाजासाठी ८ कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या ८ व्या मजल्यावरील २४०० चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै, २०११ मध्ये करण्यात आले असून, विभागाचे कामकाज सुरू झाले आहे. +या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अ) प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार ब) बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार क) प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार ड) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र १ पुरस्कार असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करते. +मराठी भाषेतील उत्कृष्ट प्रकाशकास २००८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०१६चा श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट पुरस्कार भारतीय विचार साधना, पुणे यांना जाहीर. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2592.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53bf2597d6056c71866635deebef3121b499d062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2592.txt @@ -0,0 +1,2 @@ +विश्वनाथ खैरे (मार्च २९, इ.स. १९३० - हयात) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांनी काव्य, गद्य, नाट्यविषयक, भाषाविषयक, समीक्षणात्मक व विविध माहितीपर साहित्य लिहिले आहे. +खैऱ्यांचा जन्म महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील]] सुपे गावात शेतकरी कुटुंबात मार्च २९, इ.स. १९३० रोजी झाला. पुण्यात भावे स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. बी.ई. (स्थापत्य) पदवीपरीक्षेत त्यांनी प्रथम वर्ग, प्रथम क्रमांक पटकावला होता. शिक्षणानंतर ते केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून रुजू झाले. नोकरी करताना त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांचा पाठपुरावा करत मराठीत साहित्य निर्मिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2605.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad00ec595a044720024f9a29991be4143289cdf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2605.txt @@ -0,0 +1,3 @@ +मराठी मूव्ही मार्केटिंग हे मराठी फिल्मच्या प्रचाराचे एकमेव संकेतस्थळ आहे. + +मराठी मूव्ही मार्केटिंग Archived 2013-10-23 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2619.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5162cd3d12f72f544d617417340a12a66962a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2619.txt @@ -0,0 +1,37 @@ +मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. +इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी. +कादंबरी +कथा +कविता +ललित लेख +(कविता ) +नाटक +लोक साहित्य +बाल साहित्य +कथा +विनोद +अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख। +समीक्षा +चारोळी +गझल +ओवी +अभंग +भजन +कीर्तन +पोवाडा +लावणी +भारूड +बखर +पोथी +आरती +लोकगीत +गोंधळ +उखाणे +पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), माधव राजगुरू लिखित 'सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४ चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. +भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. +त्या यादीतील काही नावे :- +स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :- + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2620.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9acfe65d02f9c742634cd9ec9e9016b89693633 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2620.txt @@ -0,0 +1,11 @@ +मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना ८ फेब्रुवारी १९३१ रोजी कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी केली. +इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली आहेत. शेवटचे ६४वे अधिवेशन ५ ते ७ फेब्रुवारी २०११ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. नरेन्द्र जाधव होते. आत्तापर्यंत या अधिवेशनांचे अध्यक्षपद न. चिं. केळकर, वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्रबुद्धे, सेतुमाधवराव पगडी, कवी अनिल, विजया राजाध्यक्ष, कवि कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप चित्रे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश खरे, प्रतिभा रानडे, अशा नामवंत साहित्यिकांनी विभूषित केले आहे. +या व्याख्यानमालेचा श्रीगणेशा सन १९९४-१९९५ मध्ये कवि नारायण सुर्वे यांच्या व्याख्यानाने व काव्यसादरीकरणाने झाला. +यापूर्वी झालेल्या या व्याख्यानमालेत प्रा. नारायण सुर्वे, डॉ. गो. पु. देशपांडे, बालशंकर देशपांडे, डॉ. य. दि. फडके, नारायण देसाई, प्रा. राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विलास खोले, डॉ. दिगंबर पाध्ये, अरुण साधू, . समीर पळणीटकर, ह. मो. मराठे यांसारख्या विचारवंतांच्या, संशोधकांच्या, संपादकांच्या, साहित्यिकांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा लाभ बडोदेकर रसिकांना +मिळाला आहे. या मालेतले शेवटचे व्याख्यान २५डिसेंबर २०११ला झाले. +आत्तापर्यंतची या मालेतील व्याख्याने :- +१. 'गुरुकुल ते संगणक प्रगती की अधोगती?'(डॉ. अनिल काणे) -३१ ऑगस्ट २००८ +२. 'मी न लिहिलेल्या कादंबऱ्या' (ह.मो. मराठे) - १३ सप्टेंबर, २००९ +३. ’मराठी भाषेची परंपरा व त्याचा पुनर्विचार’ (सतीश काळसेकर) - २४ डिसेंबर २०११ +या मालेतील आत्तापर्यंतचे कार्यक्रम : +१. ‘माधुरी दीक्षित ते मधु दंडवते’ (वक्ती - शोभा बोन्द्रे) - ३० ऑक्टोबर २०१० diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2630.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d66e8f9dbe17abb3199daee37a446ae3c4c653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2630.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडियाचा बंधूप्रकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. 'मराठी विकिस्रोत' विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. +हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. +यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण असते. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले दस्तएवज आणता येतात. +१००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बंधू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असते. +मराठी विकिपीडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख फक्त मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवता येतात. उदा० मुळातली ज्ञानेश्वरी, तुकारामाचे मुळात जसे आहेत तसे अभंग, आणि मनाच्या श्लोकांची मूळ संहिता, वगैरे. + + +परंतु विकिस्रोतवर स्वरचित ग्रंथलेखन करता येत नाही, स्वरचीत ग्रंथलेखनासाठी अथवा स्वरचीत पुस्तक विकीवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्स[permanent dead link]वर चढवा. +त्याच प्रमाणे जालावर संस्कृत ग्रंथ आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत पहा. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2631.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d66e8f9dbe17abb3199daee37a446ae3c4c653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2631.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडियाचा बंधूप्रकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. 'मराठी विकिस्रोत' विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. +हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. +यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण असते. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले दस्तएवज आणता येतात. +१००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बंधू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असते. +मराठी विकिपीडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख फक्त मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवता येतात. उदा० मुळातली ज्ञानेश्वरी, तुकारामाचे मुळात जसे आहेत तसे अभंग, आणि मनाच्या श्लोकांची मूळ संहिता, वगैरे. + + +परंतु विकिस्रोतवर स्वरचित ग्रंथलेखन करता येत नाही, स्वरचीत ग्रंथलेखनासाठी अथवा स्वरचीत पुस्तक विकीवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्स[permanent dead link]वर चढवा. +त्याच प्रमाणे जालावर संस्कृत ग्रंथ आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत पहा. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2661.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609681adc87a97723aad7eabc36fec4f6f424905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2661.txt @@ -0,0 +1,24 @@ +१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. +वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात. +मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ. २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे १९८६, १९९८ आणि २०१० या साली तीन तीन वर्षांकरिता आले होते. २०१३साली ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. +सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली.[१] +महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. +या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामन पोतदार हे होते. १९६२मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले तेच मराठी शुद्धलेखनाचे नियम होत. हे नियम १९६२ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण, यांनी सरकारच्या वतीने स्वीकारले. हे महामंडळाने केलेले भाषाविषयक पहिले काम होय. +दरवर्षी महामंडळ आपला स्थापना दिवस साजरा करीत असते. महनीय वक्त्यांचे भाषण आणि दिवसभराचे चर्चासत्र असे त्याचे स्वरूप असते. ज्या मोठ्या लेखकांची किंवा विद्वानांची साहित्य संमेलनाचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान व्हावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून अशा साहित्यिकाला सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङ्मय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडातील वाङ्मयावर चर्चा घडवून आणली जाते. +महाराष्ट्रात वेळोवेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते. +महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद भरवीत असे. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. +प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे संमेलनाचा अनुक्रमांक जुन्यावरूनच पुढे असा चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे. +अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने : +१. मराठी साहित्य संघ (मुंबई) -कार्यक्षेत्र मुंबई शहर व उपनगरे. आजीव सभासद २०००. मतदारसंख्या १७५. +२ महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) -कार्यक्षेत्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश (एकूण १४ जिल्हे). आजीव सभासद : ९०००. मतदारसंख्या १७५. +३. मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) -कार्यक्षेत्र मराठवाडा (आठ जिल्हे). आजीव सभासद २४००. मतदारसंख्या १७५. +४. विदर्भ साहित्य संघ (नागपूर)-कार्यक्षेत्र विदर्भ (११ जिल्हे). आजीव सभासद ६०००. मतदारसंख्या १७५. +या संस्थेचे रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हे, नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही. +साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न नाही. +अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व महामंडळाच्या चार घटक संस्था, तसेच वर नावे दिलेल्या पण संलग्न नसलेल्या दोन संस्था यांना दरवर्षी रु.५ लाख इतके अनुदान ’महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळ’ या सरकारी संस्थेमार्फत देण्यात येते. शिवाय प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुमारे २५ लाख रुपयांचे अनुदान असते. भारताबाहेर भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनांनासुद्धा सरकारी अनुदान मिळाले आहे. +महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या ज्या साहित्य संस्था महाराष्ट्रालगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या, त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा, मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार केला आणि त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्यानंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रूपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले. मात्र या संस्थांच्या सभासदांना मताधिकार नाही. +साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बरीच वर्षे दत्तो वामन पोतदार हेच महामंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांनंतर(?) महामंडळाचे पदाधिकारी निवडणुकीने ठरू लागले. आणखी काही वर्षे गेल्यानतर(?) महामंडळाचे कार्यालय एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी ते चारही घटक संस्थांकडे म्हणजे मूळ संस्थांकडे फिरते असावे असा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यानंतर प्रत्येक तीन वर्षांनी संस्थांच्या ज्येष्ठतेनुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या क्रमाने हे कार्यालय दर तीन वर्षांनी स्थलांतरित होणे सुरू झाले. +आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, वि.भि.कोलते(एक महिन्याकरिता), कवि अनिल, गंगाधर गाडगीळ श्री.पु.भागवत, राजेंद्र बनहट्टी, सुरेश द्वादशीवार, डॉ. सुधीर रसाळ, वसुंधरा पेंडसे-नाईक, गं.ना.जोगळेकर, मनोहर म्हैसाळकर हे अध्यक्ष झालेले आहेत. २००७ पासून श्री. कौतिकराव ठाले पाटील हे अध्यक्ष होते. १ एप्रिल २०१३ रोजी संस्थेचे कार्यालय पुण्यात आल्यानंतर माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या होत्या. समहामंडळाचे कार्यालय नागपूरला आल्यानंतर ज्येष्ठ कवी-समीक्षक श्रीपाद भालचंद्र जोशी हे २०१६ ते २०१९ या काळासाठी अध्यक्ष झाले आहेत. +२०१३ सालापूर्वी महामंडळाचे कार्यालय मुंबईत होते. तेव्हा कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी संस्थेचे कार्यालय एखाद्या घटकसंस्थेकडे जाते. त्याप्रमाणे ते १ एप्रिल २०१३ रोजी पुण्यात आले आहे. तेव्हापासून माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. २०१७ साली डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्ष आहेत. +सध्या (इ.स. २०१२) प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्ष, हैद्राबादच्या डॉ. विद्या देवधर महामंडळाच्या उपाध्यक्षा, मराठवाडयातील डॉ. अरुण प्रभुणे कोषाध्यक्ष तर श्री. कुंडलिक अतकरे हे कार्यवाह आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ. वि.भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. मधु नेने, मुंबईच्या साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रा. सुहासिनी कीर्तीकर, श्रीमती कुंदा पडळकर, नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचे श्री. मनोहर म्हैसाळकर, प्रा. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीमती शोभा उबगडे हे प्रत्येकी तीन सभासद आहेत. गुलबर्ग्याच्या कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे जे.एन.कदम, भोपाळच्या मध्यप्रदेश साहित्य संघाचे अनिल निगुडकर, पणजीच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सुरेश नाईक, विलासपूरच्या छत्तीसगड साहित्य संघाचे श्री. कपूर वासनिक आणि बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या डॉ. वनिता ठाकूर हे प्रत्येकी एक एक सभासद आहेत. शिवाय साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा पदसिद्ध सभासद असतो. प्रत्येक वर्षात महामंडळाच्या किमान चार सभा होत असतात. आणि या सभांमधून सर्व निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेण्यात येतात. +आता महामंडळ कार्यालय नागपूर येथे आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2662.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..260e9eebc45e471bc369a660d29e4c577dcf4659 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2662.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबईच्या चेंबूर या उपनगरात बहुधा दरवर्षी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन भरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2665.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eeeb3be43f6d6978faafc56557498b38d52455a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2665.txt @@ -0,0 +1 @@ +बृहन्महाराष्ट्रात आणि अन्यत्रही अनेक मराठी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात; त्यांपैकी काही संमेलनाची ही यादी :- diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2667.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9918efa6e3832b86bc8c1ad7e373b01b867144f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2667.txt @@ -0,0 +1,25 @@ +मराठी सिनेमा म्हणजे भारतातील मराठी भाषेतील सिनेमा. मराठी ही भारतातील महाराष्ट्र राज्याची भाषा आहे. जुन्या मुंबईवर आधारित, हा सर्वात जुना आणि भारतातील अग्रणी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. मराठी आणि संस्कृत संगीत नाटके करत असणारे मराठी कामगारांनी त्या काळात मराठीत नाटक सादर केले.आलम आरा ह्या पहिले हिंदी बोलपट्टीच्या एक वर्षनंतर, पहिला मराठी बोलपट चित्रपट, अयोध्येचा राजा,१९३२ साली प्रदर्शित झाला . जरी हा उद्योग मुंबईत असलेल्या मोठ्या बाजारपेठित हिंदी चित्रपटापेक्षा खूपच लहान असला, तरी मराठी सिनेमा कर मुक्त आहे आणि अलिकडच्या वर्षांत ती प्रगती करीत आहे. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र, १९१३ साली प्रसिद्ध झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून ओळखला जात असे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारचा दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत जीवनगौरव भरण्यासाठी देण्यात येतो. +मराठी सिनेमा भारतीय चित्रपटातील सर्वात जुना प्रकार आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. +दादासाहेब फाळके यांना स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिल्या पायनियर आणि सिनेमाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९१३ मध्ये आपल्या पहिल्या स्वदेशी बनलेल्या फिल्म 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटाची क्रांती आणली. या चित्रपटाला इफ्फी आणि एनआयएफडीने मराठी चित्रपटाचा एक भाग म्हणून मानले आहे कारण मराठी आणि हिंदी चित्रपटाची निर्मिती पूर्णता मराठी कामगारांची निर्मिती होते.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे विसाव्या शतकातील सक्रिय चित्रपट निर्मितीचे एक केंद्र होते. १९१९ साली बाबुराव पेंटर यांनी लोकप्रिय म्हणून ओळखले आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रीय चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि बालाशेद पवार, कमला देवी आणि झुनझाराराव पवार यांच्यात पहिली ऐतिहासिक ऐतिहासिक सेरंधारी (१९२०) प्रसिद्ध भूमिका साकारली. सेट, वेशभूषा, डिझाइन आणि पेंटिंग या विषयातील त्यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी नवीन माध्यमांतून आणि ऐतिहासिक शैलीत विशेष करण्यासाठी मराठा इतिहासातील भाग निवडले. १९३० पर्यंत बाबुराव पेंटरने अनेक मूकपट तयार केले. तथापि, काही मूकपटांच्या नंतर, महाराष्ट्र चित्रपट कंपनीने आवाज येण्याच्या आशेने बंद केले. बाबूराव विशेषतः टॉकीजबाबत उत्सुक नव्हते कारण त्यांनी विश्वास ठेवला होता की ते गेल्या काही वर्षांत इतक्या वेदनादायक उत्क्रांतीचा नाश करतील.दासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटाचा जनक म्हणतात. त्यानि खुप जुन्य कलात् ही नविन् नविन् प्रयोग करत् सिनेमचि निर्मिति केली + +मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट अयोध्येचा राजा (चित्रपट) हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये श्यामची आई या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. +सिंहासन(जब्बार पटेल): कलावंत : श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, दत्ता भट. +अशी ही बनवाबनवी(सचिन): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी. +एक डाव भुताचा(रवि नेमाडे): कलावंत : दिलीप प्रभावळ्कर, अशोक सराफ, रंजना. +माहेरची साडी(विजय कोंडके): कलावंत : अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, आशालता वाबगांवकर. +नवरी मिळे नवऱ्याला(सचिन): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगांवकर. +जैत रे जैत(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले. +माझा पती करोडपती(सचिन पिळगावकर): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे. +पिंजरा(व्ही. शांताराम): कलावंत : संध्या, श्रीराम लागू, निळू फुले. +झपाटलेला(महेश कोठारे): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, मधू कांबीकर, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर. +आम्ही जातो आमुच्या गावा(कमलाकर तोरणे): कलावंत : धुमाळ, उमा भेंडे, सूर्यकांत, श्रीकांत मोघे. +जगाच्या पाठीवर(राजा परांजपे): कलावंत : सीमा देव, रमेश देव, राजा परांजपे. +मधुचंद्र(राजदत्त): कलावंत : उमा, काशीनाथ घाणेकर, नाना पळशीकर, श्रीकांत मोघे. +पाठलाग (राजा परांजपे): कलावंत : भावना, काशीनाथ घाणेकर. +सामना(जब्बार पटेल): कलावंत : निळू फुले, श्रीराम लागू. +आत्मविश्वास(सचिन): कलावंत : नीलकांती पाटेकर, दया डोंगरे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर. +हा खेळ सावल्यांचा(?) कलावंत: काशीनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग, राजा गोसावी. +कळत नकळत(कांचन नायक): कलावंत : विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ. +उंबरठा(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, गिरिश कर्नाड. + १९५० + •  १९५१  •  १९५२  •  १९५३  •  १९५४  •  १९५५  •  १९५६  •  १९५७  •  १९५८  •  १९५९  •  १९६०  •  १९६१  •  १९६२  •  १९६३  •  १९६४  •  १९६५  •  १९६६  •  १९६७  •  १९६८  •  १९६९  •  १९७०  •  १९७१  •  १९७२  •  १९७३  •  १९७४  •  १९७५  •  १९७६  •  १९७७  •  १९७८  •  १९७९  •  १९८०  •  १९८१  •  १९८२  •  १९८३  •  १९८४  •  १९८५  •  १९८६  •  १९८७  •  १९८८  •  १९८९  •  १९९०  •  १९९१  •  १९९२  •  १९९३  •  १९९४  •  १९९५  •  १९९६  •  १९९७  •  १९९८  •  १९९९  •  २०००  •  २००१  •  २००२  •  २००३  •  २००४  •  २००५  •  २००६  •  २००७  •  २००८  •  २००९  •  २०१०  •  २०११  •  २०१२  •  २०१३  •  २०१४  •  २०१५ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2685.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e09a8c2072249c14b2bae2a0406c0d88f55023c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2685.txt @@ -0,0 +1,3 @@ + +महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना किंवा वैद्यकीय व्यवसाय बंद करून अभिनय, चित्रपट निर्मिती, ललित लेखन किंवा माहितीपर पुस्तकांचे लेखन केले आहे. लेखक झालेल्या अशा डॉक्टरांची माहिती येथे संकलित केली आहे. मराठीतील किंवा अन्य विषयातील पीएच.डी. घेऊन लेखन करणाऱ्या, किंवा यशवंतराव चव्हाण, प्रतिभा पाटील आदी मानद डी.लिट.धारक डॉक्टर साहित्यिकांचा या यादीत समावेश नाही. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2706.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad50b947d923271b32fe49d90472e376606d2d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2706.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2716.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58eb23657e2c275539f7c3b2e1cf5cb7a0ff9995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2716.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मरिना एराकोविच (इंग्लिश: Marina Erakovic, क्रोएशियन: Marina Eraković; ६ मार्च १९८८, स्प्लिट, क्रोएशिया) ही न्यू झीलंडची एक टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2744.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece9b3fc330437d000fe3224b7463e84417f6476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2744.txt @@ -0,0 +1,7 @@ +मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. +मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला. +२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला. +वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. +मेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला. +नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2745.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece9b3fc330437d000fe3224b7463e84417f6476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2745.txt @@ -0,0 +1,7 @@ +मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. +मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला. +२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला. +वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. +मेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला. +नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2749.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2749.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2757.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..885665e5d5cf0652fcc66a595c510677bbc2a709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2757.txt @@ -0,0 +1 @@ +मरी-जोसेफ ब्लेस दि शेनिये (११ फेब्रुवारी, इ.स. १७६४ - १० जानेवारी, इ.स. १८११) हा फ्रेंच कवी, नाटककार आणि राजकारणी होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2767.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0173118033f7cbafb506d9d1d6678f42fe9a3e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2767.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मरी बूझ्कोव्हा (२१ जुलै, १९९८:प्राग, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2792.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4af1f06ba4f7f9ab87271786732a6c685daf739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2792.txt @@ -0,0 +1 @@ +मरीना बीच समुद्रकिनारा हा बंगालच्या उपसागरासह, भारत देशातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरांमधील एक नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. हा समुद्र उत्तरेकडील फोर्ट सेंट जॉर्ज जवळून दक्षिण- पूर्व इस्टेटपर्यन्त ६.० किलोमीटर (३.७ मिली. ) ॳतरावर आहे , आणि देशातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्रकिनारा बनतो. मुंबईत जुहू समुद्रकिनारा हा मरीना बीचचाच एक भाग आहे. या समुद्रकिनाऱ्याची सरासरी रुंदी ४३७ मीटर ( १४३४ फूट) आहे. मरीना बीचवर स्नान करणे, आणि पोहणे कायदेशीररीत्या प्रतिबंधित आहे कारण मरीना बीच समुद्रकिनारी धोका फारच त्रासदायक आहे कारण हा देशातील सर्वात गर्दींचा किनारा आहे. आणि आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवसात सुमारे ३०,००० लोकं आणि उन्हाऴ्याच्या महिन्यांमध्ये सुमारे १५,00 ते २०, ००० लोकं दररोज येऊन या समुद्रकिनारी आनंद घेतात. मरीना बीच समुद्रकिनारा हा ब्राझील देशातील रिउद्दीन जेनेरूच्या कोपाकबाना बीच समुद्रकिनाऱ्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_284.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77fa387f83a0573945f2b846a821f5d3d3504c6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_284.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुवन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2845.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95842c9939d8027e2d4a7428db0a2e2785614170 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2845.txt @@ -0,0 +1,3 @@ +मर्द हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2848.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd7ceafd2701060a0104878e12bf2c61684f8692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2848.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्द की ज़बान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2849.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680cb7afd55671188144508d546ca03ae9259d2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2849.txt @@ -0,0 +1,8 @@ + मर्दे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2862.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4120db5d76dfab8a43832e9bb78cb4ec28390bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2862.txt @@ -0,0 +1 @@ +मर्लिन एडवर्ड्स (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2873.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a9ed5eb573fac0cb31bc611dbd32d882d3aead --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2873.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेब्रुवारी २७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2892.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aa4bf4f49b4ea4f01b3b3a667d990983aa60040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2892.txt @@ -0,0 +1,3 @@ +मर्सर काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मर्सर काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2894.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e6a36c8a3d53e8e789d81cf1e06a86beaee57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2894.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टटगार्ड,, जर्मनी +मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ +मर्सिडिस बेन्झ या नावाचा उगम कार्ल बेन्झ यांच्या पहिल्या पेट्रोल कारच्या शोधापर्यंत घेऊन जातो. कार्ल बेन्झ याने जानेवारी १८८८ मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले. गोथिॲब डेमलर आणि ईंजिनिअर विलीहेम मेबॅक यानी या स्टेज-कारला त्याच वर्षी पेट्रोल ईजिन बसवले. मर्सिडिस हे नाव जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2899.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..206115ddec4dbada6a57e58d383339381ea57f4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2899.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सिडिज-बेंझ आर२३१ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीच्या सध्याच्या एसएल वर्गाच्या वाहनांच्या चॅसी[मराठी शब्द सुचवा]चे सांकेतिक नाव आहे. मार्च २०१२ मध्ये याचे उत्पादन सुरू झाले. यात ४.७ लिटर जुळे टर्बो व्ही-८ इंजिन असते. यातून ४३५ हॉर्सपॉवर (३२४ किवॉट) शक्ती निर्माण होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2919.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1e68fed9130895add54b503a12e0fe243425b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2919.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१३६ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेले वाहन असून इ.स. १९३५ ते इ.स. १९४२ पर्यंत व त्यानंतर इ.स. १९४७ पासून इ.स. १९५५ पर्यंत ते उत्पादित झाले. +यात चार इनलाइन सिलिंडरचे[मराठी शब्द सुचवा] इंजिन असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2927.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b26299f7906ac243fda44a2bc360a74d59259dff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2927.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ व्हिटो तथा मर्सेडिझ-बेंझ व्हियानो हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे लाइट व्हॅन प्रकारचे वाहन आहे. इ.स. १९९६ मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले असून ते सध्याही उत्पादित केले जाते. +हे वाहन डीझेल इंजिन वापरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2928.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efb2457902170a41705f9dc87b24dbfc382259f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2928.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ आर१०७ आणि सी१०७ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीची वाहने असून ती इ.स. १९७१ ते इ.स. १९८९ पर्यंत उत्पादित केली गेली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_293.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8254c09f457e219eb3ef9a76f675b3200514d54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_293.txt @@ -0,0 +1,3 @@ +भुवन शोम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2933.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e6a36c8a3d53e8e789d81cf1e06a86beaee57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2933.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टटगार्ड,, जर्मनी +मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ +मर्सिडिस बेन्झ या नावाचा उगम कार्ल बेन्झ यांच्या पहिल्या पेट्रोल कारच्या शोधापर्यंत घेऊन जातो. कार्ल बेन्झ याने जानेवारी १८८८ मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले. गोथिॲब डेमलर आणि ईंजिनिअर विलीहेम मेबॅक यानी या स्टेज-कारला त्याच वर्षी पेट्रोल ईजिन बसवले. मर्सिडिस हे नाव जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2958.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0fd87656f5017824b4924a0cffde51efaa3a140 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2958.txt @@ -0,0 +1 @@ +'मर्सिडिज-बेंझ एस क्लास (डब्ल्यु२२१) ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. २००५ ते आत्तापर्यंत उत्पादित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2975.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1e68fed9130895add54b503a12e0fe243425b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2975.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१३६ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेले वाहन असून इ.स. १९३५ ते इ.स. १९४२ पर्यंत व त्यानंतर इ.स. १९४७ पासून इ.स. १९५५ पर्यंत ते उत्पादित झाले. +यात चार इनलाइन सिलिंडरचे[मराठी शब्द सुचवा] इंजिन असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2980.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b26299f7906ac243fda44a2bc360a74d59259dff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2980.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ व्हिटो तथा मर्सेडिझ-बेंझ व्हियानो हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे लाइट व्हॅन प्रकारचे वाहन आहे. इ.स. १९९६ मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले असून ते सध्याही उत्पादित केले जाते. +हे वाहन डीझेल इंजिन वापरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2991.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f12b85ccaf048229915cdb9498b2404d42cac7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_2991.txt @@ -0,0 +1 @@ +मलकंदचा वेढा हा जुलै २६ - ऑगस्ट २, इ.स. १८९७ दरम्यान अफगाणिस्तानच्या मलकंद भागात (आता पाकिस्तानमध्ये) पश्तुन टोळ्यांनी ब्रिटिश फौजेला घातला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3006.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d338ea1d870a9542805b780561db82073618bc04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3006.txt @@ -0,0 +1 @@ +मलकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3031.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3547fa8ec326a8edd7d5afc59cad68577dcf6c22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3031.txt @@ -0,0 +1 @@ +मलप्पुरम भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3046.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..796300ad309e05c6e17d37260403e0b9cbe36b8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3046.txt @@ -0,0 +1 @@ +मलाय ही मलेशिया व ब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3051.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb394a115c261f86df309062a3c49d8df5f603a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3051.txt @@ -0,0 +1 @@ +मलयाळ मनोरमा (मल्याळम: മലയാള മനോരമ) हे एक मल्याळी भाषेतील केरळातून प्रकाशित होणारे दैनिक व मासिक आवृत्तीतून निघणारे नियतकालिक आहे, तसेच मासिकाच्या स्वरूपात देखील प्रकाशित होते. केरळमधील पत्तनम्तिट्टा ह्या ठिकाणी मलयाळ मनोरमाचे मुख्यालय आहे. मलयाळ मनोरमा हे सर्वात प्रथम मार्च १४, इ.स. १८९० साली साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झाले. सध्या त्याचा खप १.६ कोटी प्रतींहून अधिक आहे. साधारणपणे १८-२० लाखांहून अधिक दैनंदिन खपाचे मलयाळ मनोरमा दैनिक आहे. वार्षिक नियतकालकांमध्ये भारतातील सर्वाधिक खपाची अशी "दि वीक" (इंग्रजी) आणि "मनोरमा इयरबूक" (इंग्रजी) ही दोन्ही प्रकाशने मनोरमा संघटनेची आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3064.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277d46ac871e5c980bbe6725f186570e3feae5c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3064.txt @@ -0,0 +1 @@ +'मला काय त्याचे ही एक मराठी कादंबरी आहे. मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले ते या कादंबरीची पार्श्वभूमी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3086.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68416894128b57cb5f10dceae2db06a579778f2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3086.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलान क्रुगर (१२ एप्रिल, १९९५:नामिबिया - हयात) हा  नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे. +त्याने दक्षिण-पश्चिम जिल्हाविरुद्ध ३० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रथम-श्रेणी पदार्पण केले. तसेच त्याने दक्षिण-पश्चिम जिल्हाविरुद्ध २ नोव्हेंबर २०१४ रोजी ट्वेंटी२० पदार्पण केले तर त्याने २९ मार्च २०२२ रोजी आयर्लंड वूल्व्जविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3091.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..796300ad309e05c6e17d37260403e0b9cbe36b8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3091.txt @@ -0,0 +1 @@ +मलाय ही मलेशिया व ब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3102.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50703af09a763dd57de6deba82f8340e440a0cbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3102.txt @@ -0,0 +1,151 @@ +मलाला युसूफझाई (पश्तो: ملاله یوسفزۍ‎; उर्दू: ملالہ یوسف زئی; जन्म: १२ जुलै १९९७, मिंगोरा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स) ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.[ संदर्भ हवा ] +९ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.[ संदर्भ हवा ] +१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिले गेले. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण नोबेल पारितोषिकविजेती आहे. +पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तिने तीव्र विरोध केला.पाकिस्तानातल्या परिस्थितीचं भीषण चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात 'गुलमकई' या नावाने डायरी लिहिली आहे. +"एक पुस्तक,एक लेखणी ,एक बालक आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकते " हा विचार तिने मांडला. +मलाला युसूफझाईचा जन्म १२ जुलै, १९९७ रोजी पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या स्वात जिल्ह्यात एक कनिष्ठ-मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ती झियाउद्दीन युसुफझाई आणि तोर पेकाई यूसुफझाई यांची कन्या आहे . तिचे कुटुंब पश्तून वंशाचे सुन्नी मुस्लिम आहे . तिच्या जन्माच्या वेळी झियाउद्दीनकडे बाळंतिणीला हॉस्पिटलमध्ये नेण्याइतका पैसा नव्हता. परिणामी मलाला स्वतःच्याच घरी शेजारच्या मदतीने घरी जन्मली. तिला मलाला (म्हणजेच "फाटणे") नंतर मैवांदच्या मलालाई, दक्षिण अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध पश्तून कवी आणि वीरांगना मलालाईचे नाव दिले गेले. तिचे आडनाव, युसूफझाई एका मोठ्या पश्तून जमातीचे नाव आहे. युसुफझाई जमात पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यामध्ये प्रमुख आहे. ती मिंगोरा भागात मोठी झाली. तिला दोन लहान भाऊ खुशाल आणि अटल, आहेत. तिचे कुटुंब कोंबड्या पाळत असे.[ संदर्भ हवा ] +मलाला लहानपणी पश्तो, उर्दू आणि इंग्लिश भाषा शिकत होती. तिचे वडील झियाउद्दीन मुख्यत्वे तिला शिकवत असत. + +कोण, एक कवी, शाळा मालक आहे, आणि एक शैक्षणिक कार्यकर्ते स्वतः ला, खुशाल पब्लिक स्कूल म्हणून ओळखले खाजगी शाळा एक साखळी कार्यरत. एका मुलाखतीत युसूफझाईने एकदा सांगितले की ती डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगली होती, परंतु नंतर तिच्या वडिलांनी तिला त्याऐवजी राजकारणी होण्यासाठी प्रोत्साहित केले. झियाउद्दीनने आपल्या मुलीला पूर्णपणे खास काहीतरी सांगितले, तिला रात्रीच्या वेळी राहावे आणि तिच्या दोन बांधवांना झोपायला गेल्यानंतर राजकारणाविषयी बोलायला सांगितले.[ संदर्भ हवा ] +मुहम्मद अली जिन्ना आणि पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या प्रेरणेने युसूफझाईने सप्टेंबर 2008च्या सुरुवातीला शिक्षण हक्कांविषयी बोलणे सुरू केले, तेव्हा त्यांचे वडील त्यांना स्थानिक प्रेस क्लबमध्ये बोलण्यासाठी पेशावर घेऊन गेले . "तालिबानने माझ्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार कसा काढून घेतला?", युसूफझाई यांनी आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण प्रदेशभर वर्तमानपत्र आणि दूरदर्शन चॅनेलद्वारे भाषण दिले. 2009 मध्ये, युसूफझाईने प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर इन्स्टिट्यूट फॉर वॉर अँड पीस रिपोर्टिंगमध्ये एक सहकारी शिक्षक म्हणून सुरुवात केली.'ओपन माइंड्स' पाकिस्तान युवा कार्यक्रम, ज्यात तरुण लोक पत्रकारितेच्या, सार्वजनिक वादविवाद आणि संवादाच्या साधनांद्वारे सामाजिक समस्यांवरील रचनात्मक चर्चा करण्यास मदत करण्यासाठी या क्षेत्रातील शाळांमध्ये काम करतात.[ संदर्भ हवा ] +बीबीसी ब्लॉगर म्हणून +मार्टिन लूथर किंग जूनियर , नेल्सन मंडेला आणि मुहम्मद अली जिन्ना यांनी युसूफझाईवर प्रभाव पाडला आहे. उशीरा 2008 मध्ये, आमेरचा चेंडू अहमद खान बीबीसी उर्दू संकेतस्थळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पांघरूण एक कादंबरी मार्गाने केली तालिबान मध्ये 'च्या वाढत्या प्रभाव स्वात . त्यांनी शालेय मुलीला तिच्या जीवनाबद्दल अनामिकपणे ब्लॉग करण्यास सांगण्याचे ठरविले. त्यांच्या बातमीदार पेशावर , अब्दुल है काकर , स्थानिक शाळेत शिक्षक, झियाउद्दिन युसुफजाई संपर्कात होता, पण तो त्यांच्या कुळाप्रमाणे हे खूप धोकादायक मानले होते म्हणून, तसे अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती कोणत्याही विद्यार्थ्यांना शोधू शकत नाही. शेवटी, युसुफझाईने 11 वर्षीय मलालाची स्वतःची मुलगी सुचविली. त्यावेळी मौलाना फजलुल्ला यांच्या नेतृत्वाखालील तालिबान दहशतवाद्यांनी स्वात व्हॅली, दूरदर्शन, संगीत, मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणे,आणि स्त्रिया खरेदी करण्यापासून जात आहेत. शहराच्या चौकात डोकेदुखी पोलिसांची संस्था प्रदर्शित केली जात होती. सर्वप्रथम, आईशा नावाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या शाळेतून डायरी लिहायला सहमती दर्शविली, परंतु मुलीच्या पालकांनी तिला त्यास थांबविण्यास थांबविले कारण त्यांना तालिबानच्या बदल्याची भीती वाटत होती. मूळ पर्यायीपेक्षा चार वर्षांपेक्षा लहान व युद्धात सातव्या दर्जाचे युसुफझाई हे एकमेव पर्याय होते. बीबीसीच्या संपादक सर्वमतीने सहमत झाले. +काल मला लष्करी हेलीकॉप्टर आणि तालिबानसह एक भयानक स्वप्न पडले. स्वातमध्ये लष्करी ऑपरेशन सुरू झाल्यापासून मला असे स्वप्न पडले आहेत. माझ्या आईने मला न्याहारी दिली आणि मी शाळेत गेलो. मला शाळेत जाण्याची भीती वाटत होती कारण तालिबानाने सर्व मुलींना शाळांमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. 27 विद्यार्थ्यांपैकी फक्त 11 विद्यार्थ्यांनी वर्ग केला कारण तालिबानच्या आज्ञेमुळे ही संख्या कमी झाली. या निर्णयानंतर माझ्या तीन मित्रांना त्यांच्या कुटुंबियांसह पेशावर, लाहोर आणि रावळपिंडी येथे हलविण्यात आले आहे. +मलाला युसूफझाई , 3 जानेवारी 2009 बीबीसी ब्लॉग एंट्री +बीबीसी उर्दूच्या माजी संपादक मिर्झा वाहिद म्हणाले, "आम्ही स्वातच्या हिंसा आणि राजकारणास तपशीलवार माहिती देत ​​होतो परंतु तालिबानच्या अंतर्गत सामान्य लोक कसे रहायचे याबद्दल आम्हाला फार काही माहिती नव्हती". युसूफझाईच्या सुरक्षेबद्दल त्यांना काळजी वाटत असल्याने बीबीसीच्या संपादकांनी छद्म नावाचा उपयोग केला. तिचा ब्लॉग बायलाईन "गुल मकाई" ( "अंतर्गत प्रकाशित झाले कॉर्नफ्लॉवर " उर्दू), एक नाव एक पाष्टून लोककथा एक वर्ण घेतले. +3 जानेवारी 2009 रोजी, युसुफझाईची पहिली एंट्री बीबीसी उर्दू ब्लॉगवर पोस्ट केली गेली. तिने नोट्स लिहिल्या आणि नंतर त्या एका पत्रकारांना पास केली जे स्कॅन आणि ई-मेल करेल. ब्लॉग स्वातच्या पहिल्या लढाईत युसूफझाईच्या विचारांना नोंदवते , सैनिकी ऑपरेशन झाल्यानंतर, कमी मुलींना शाळेत दाखवते, आणि शेवटी, त्यांची शाळा बंद होते. +मिंगोरा येथे, तालिबानाने 15 जानेवारी 2009 नंतर शाळेत प्रवेश घेऊ शकत नाही अशी ताकीद दिली होती. या गटात आधीच शंभरहून अधिक मुलींच्या शाळा उडाल्या होत्या. बंदीच्या आधीच्या रात्री रात्रभर तोफांचा आवाज ऐकू लागला आणि युसूफझाईला अनेक वेळा जागृत केले. पुढील दिवसात, युसूफझाई यांनी आपल्या वृत्तपत्रातील पहिल्या वृत्तपत्रातही स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित केले. + +शाळेतून प्रतिबंधित +या निर्णयानंतर तालिबानने अनेक स्थानिक शाळा नष्ट केल्या. 24 जानेवारी 2009 रोजी युसूफझाई यांनी लिहिले: "आमची वार्षिक परीक्षा सुट्यानंतर दिली जाते परंतु तालिबान मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देत ​​असेल तरच शक्य होईल. आम्हाला परीक्षेसाठी काही अध्याय तयार करण्यास सांगण्यात आले होते परंतु मला अभ्यासासारखे वाटत नाही " +असे दिसते की फक्त तेव्हाच डझनभर शाळा नष्ट केली गेली आहेत आणि सैन्याने त्यांना संरक्षित करण्याबद्दल विचार केला तर शेकडो लोक बंद झाले आहेत. जर त्यांनी आपले कार्य योग्यरित्या येथे केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. +मलाला युसूफझाई , 24 जानेवारी 2009 बीबीसी ब्लॉग एंट्री +फेब्रुवारी 2009 मध्ये मुलींच्या शाळा अद्याप बंद होत्या. एकात्मतेत, मुलांसाठी खाजगी शाळा 9 फेब्रुवारी पर्यंत उघडण्यास नकार देतील आणि नोटिस असे म्हणत असल्याचे दिसून आले. 7 फेब्रुवारीला युसूफझाई आणि त्यांचा भाऊ मायिंगोना परतल्या, जिथे रस्ते सोडले गेले आणि तिथे "गोड शांतता" होती. "आम्ही आमच्या आईसाठी भेटवस्तू विकत घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेलो होतो पण ती बंद होती, परंतु पूर्वी ती उशीरापर्यंत उघडे राहिली होती. बऱ्याच इतर दुकाने देखील बंद केल्या होत्या", तिने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले. त्यांचे घर लुटले गेले आणि त्यांचे दूरदर्शन चोरी झाले. +मुलांच्या शाळा पुन्हा उघडल्यानंतर, तालिबानांनी मुलींच्या प्राथमिक शिक्षणावर मर्यादा उचलल्या, जेथे सह-शिक्षण होते . मुली-फक्त शाळा बंद होते. युसुफझाई यांनी लिहिले की 700 विद्यार्थ्यांपैकी केवळ 70 शिष्य उपस्थित होते. +15 फेब्रुवारीला मिंगोराच्या रस्त्यावर गोळीबार ऐकू आला, पण युसुफझाईच्या वडिलांनी तिला आश्वासन दिले की, "घाबरू नका - ही शांतीसाठी गोळीबार आहे." तिचे वडील वृत्तपत्रांत वाचले होते की पुढील दिवशी सरकार आणि दहशतवादी शांतता करार करणार आहेत. नंतर त्या रात्री, जेव्हा तालिबानने त्यांच्या एफएम रेडिओ स्टुडिओवर शांतता करार जाहीर केला तेव्हा आणखी एक मजबूत गोळीबार सुरू झाला. 18 फेब्रुवारीला राष्ट्रीय वर्तमान घडामोडी कॅपिटल टॉकवर तालिबानविरुद्ध युसूफझाईने भाषण केले . तीन दिवसांनंतर स्थानिक तालिबान नेते मौलाना फजलुल्लात्यांच्या एफएम रेडिओ स्टेशनवर जाहीर केले की, महिला शिक्षणावर बंदी आणत आहे आणि 17 मार्चला परीक्षा घेईपर्यंत मुलींना शाळेत जाण्याची परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना बुर्कस घालायला हवे होते . + +मुलींची शाळा पुन्हा उघडली +25 फेब्रुवारीला, युसूफझाई यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की "ती आणि तिच्या वर्गमित्रांनी" बऱ्याच वेळा वर्गात प्रवेश केला आणि स्वतःचा आनंद घेतला. " 1 मार्च पर्यंत युसूफझाईच्या वर्गावरील उपस्थित 27 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांपर्यंत वाढले होते, परंतु तालिबान अजूनही या क्षेत्रात सक्रिय होते. शेलिंग चालू राहिली, आणि विस्थापित लोकांना उद्देशून राहत असलेल्या वस्तूंचा लुटालूट झाला. केवळ दोन दिवसांनी युसूफझाईने लिहिले की सैन्य आणि तालिबान यांच्यात वादळ होता आणि मोर्टार शेल्सचा आवाज ऐकू आला: "लोक पुन्हा घाबरले आहेत की शांती दीर्घ काळ टिकू शकत नाही. काही लोक असे म्हणत आहेत की शांतता करार कायमस्वरूपी नाही, तो फक्त लढाईत ब्रेक आहे. " +9 मार्च रोजी युसुफझाईंनी विज्ञानविषयक कागदपत्रांबद्दल लिहिले होते जे त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि त्यांनी सांगितले की तालिबान यापूर्वी वाहने शोधत नव्हते. 12 मार्च 2009 रोजी तिचा ब्लॉग संपला. + +एक विस्थापित व्यक्ती म्हणून- +बीबीसी डायरी संपल्यानंतर, युसुफझाई आणि त्यांच्या वडिलांना न्यू यॉर्क टाइम्सच्या पत्रकार ऍडम बी. इलिक यांनी माहितीपट चित्रपटासंदर्भात संपर्क साधला . मे मध्ये, पाकिस्तानी सैन्याने स्वातच्या द्वितीय लढाईत नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रदेशात प्रवेश केला . मिंगोरा सुटका करण्यात आला आणि युसूफझाईचे कुटुंब विस्थापित आणि विभक्त झाले. त्यांचे वडील नातेवाईकांसोबत राहण्यासाठी ग्रामीण भागात पाठविण्यात आले होते तेव्हा त्यांना विरोध आणि निषेध करण्यासाठी पेशावर येथे आले होते. "मी खरोखर कंटाळलो आहे कारण माझ्याकडे वाचण्यासाठी कोणतेही पुस्तक नाहीत", युसूफझाईने डॉक्युमेंटरीमध्ये म्हटले आहे. +त्या महिन्यात पत्रकार परिषदेत दहशतवाद्यांना टीका केल्यानंतर युसूफझाईच्या वडिलांना तालिबानच्या कमांडरने रेडिओवर मृत्यूची धमकी दिली. युसुफझाई तिच्या वडिलांनी तिच्या सक्रियतेने प्रेरणा दिली. त्या उन्हाळ्यात, ती एकदाच बनण्याची इच्छा असल्यासारखीच ती राजकारणी बनण्यासाठी आणि डॉक्टर म्हणून बनण्यासाठी वचनबद्ध नव्हती. + +[[माझा एक नवीन स्वप्न आहे ... मी या देशास वाचवण्यासाठी राजकारणी असणे आवश्यक आहे. आपल्या देशात इतके संकट आहेत. मला ही संकटे काढायच्या आहेत.- +मलाला युसुफझाई , वर्ग डिसमिस (डॉक्युमेंटरी)]] + +जुलैच्या सुरुवातीस निर्वासित शिबिरे भरून काढली गेली. स्वात व्हॅलीकडे परत जाणे सुरक्षित आहे असे सांगून पंतप्रधानांनी दीर्घकाळापूर्वी घोषणा केली. पाकिस्तानी सैन्याने तालिबानांना शहरे आणि ग्रामीण भागातून बाहेर काढले होते. युसुफझाईचे कुटुंब पुन्हा एकत्र झाले आणि 24 जुलै 200 9 रोजी ते घरी गेले. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विशेष प्रतिनिधी भेटण्यासाठी आमंत्रित केलेल्या इतर जमीनी कार्यकर्त्यांच्या एका गटाने प्रथम भेट दिली - रिचर्ड होलब्रुक. युसुफझाईने होलब्रुकला परिस्थितीत हस्तक्षेप करण्यास विनंती केली, "आदरणीय राजदूत, जर आपण आमच्या शिक्षणात आम्हाला मदत करू शकला तर कृपया आम्हाला मदत करा." अखेरीस तिचे कुटुंब घरी परत आले तेव्हा त्यांना आढळले की ते नुकसान झाले नाही आणि तिच्या शाळेने फक्त प्रकाश नुकसान सहन केले. +प्रारंभिक कार्यवाही +युसुफझाईच्या प्रेरणास्थानांपैकी एक पंतप्रधान बेनझीर भुट्टो + +डॉक्युमेंटरीनंतर, युसूफझाईचे राष्ट्रीय पश्तो -भाषेचे स्टेशन एव्हीटी खैबर , उर्दू भाषा दैनिक आज आणि कॅनडाचे टोरोंटो स्टारवर मुलाखत घेतली गेली . 1 9 ऑगस्ट 200 9 रोजी तिने कॅपिटल टॉकवर दुसरे स्वरूप दिलं .तिची बीबीसी ब्लॉगिंग ओळख डिसेंबर 200 9 पर्यंत प्रकाशित करण्यात आली. तिने दूरदर्शनवर महिला शिक्षणासाठी सार्वजनिकपणे वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली . 200 9 ते 2010 या काळात 200 9 आणि 2010 पर्यंत खापल कोर फाऊंडेशनच्या जिल्हा बालसभेचे अध्यक्ष होते . +ऑक्टोबर 2011 मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील कार्यकर्त्या आर्कबिशप डेसमंड तुतु यांनी डच आंतरराष्ट्रीय मुलांच्या वकिलांच्या समूह किड्स राइट्स फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कारांसाठी युसूफझाई यांना नामांकित केले . पुरस्कारासाठी नामांकित होणारी ती पहिली पाकिस्तानी मुलगी होती. या घोषणेत म्हटले आहे, "मलाला आणि इतर मुलींसाठी उभे राहण्याची आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा वापर करून जगाला कळवा की मुलींना शाळेत जाण्याचा अधिकार देखील आहे." आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या मायकेल मायक्रॉफ्टने जिंकला . +डिसेंबर महिन्यात दोन महिन्यांनंतर पाकिस्तानच्या पहिल्या नॅशनल यूथ पीस पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांचे सार्वजनिक प्रोफाइल आणखी वाढले. 1 9 डिसेंबर 2011 रोजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी त्यांना युवकांसाठी राष्ट्रीय शांतता पुरस्कार दिला. आपल्या सन्मानार्थ कारवाईच्या वेळी, युसूफझाई यांनी सांगितले की ती कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नव्हती, परंतु शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी स्वतःच्या राष्ट्रीय पक्षाची अपेक्षा केली. युसुफझाईच्या विनंतीनुसार महिलांनी स्वात डिग्री कॉलेज फॉर विमेन मध्ये आयटी परिसर स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांना दिले आणि त्यांच्या माध्यमिक शाळेचे नाव बदलण्यात आले. 2012 पर्यंत, युसुफझाई मलाला एजुकेशन फाउंडेशन आयोजित करण्याचा विचार करीत होती, ज्यामुळे गरीब मुलींना शाळेत जाण्यास मदत होते. + +हत्या प्रयत्न +युसूफझाई अधिक ओळखले जात असताना, तिला तोंड देणारी धोके वाढली. तिच्याविरुद्ध मृत्यूची धमकी वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाली आणि तिचे दार खाली पडले. रोजी फेसबुक ती सक्रिय वापरकर्ता होते जेथे, ती धमक्या प्राप्त सुरुवात केली. अखेरीस, तालिबान प्रवक्त्याने सांगितले की त्यांना "सक्ती" करण्यास भाग पाडण्यात आले होते. 2012च्या उन्हाळ्यात झालेल्या बैठकीत तालिबान नेते सर्वसमावेशकपणे तिला मारण्यास सहमत झाले. +मी त्याबद्दल नेहमी विचार करतो आणि दृश्य स्पष्टपणे कल्पना करतो. जरी ते मला मारण्यासाठी आले तरी मी त्यांना जे काही करण्याचा प्रयत्न करीत आहे ते सांगेन, चुकीचे म्हणजे शिक्षण हे आमचे मूलभूत अधिकार आहे. - +मलाला युसूफझाईने तालिबानशी झगडा लावला. +9 ऑक्टोबर 2012 रोजी पाकिस्तानी स्वात व्हॅलीमध्ये परीक्षा घेऊन बसला घरी बसून एक तालिबान गनमॅनने युसूफझाईवर गोळीबार केला. त्यावेळी युसुफझाई 15 वर्षांचे होते. अहवालाच्या मते, एक मुखवटा गनमॅन म्हणाला, "आपणा पैकी एक कोण मलाला आहे? बोलू नका, अन्यथा मी तुम्हाला सर्व काही मारून टाकू" आणि, ओळखल्या जाताना, युसूफझाईला एका बुलेटने गोळी मारली गेली, जी बाजूला 18 इंच तिच्या डोळ्याच्या डोळ्यातील, तिच्या मानेतून आणि तिच्या खांद्यावर उतरले. शूटिंगमध्ये दोन अन्य मुली जखमी झाल्या होत्या: केनत रियाज आणि शाझिया रमजान, दोघेही शूटिंगच्या नंतर पुरेसे स्थिर होते, पत्रकारांशी बोलण्यासाठी आणि हल्ल्याचा तपशील देण्यासाठी. +वैद्यकीय उपचार +शूटिंगनंतर युसूफझाई यांना पेशावर येथील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले . तेथे डॉक्टरांना त्यांच्या मस्तिष्कच्या डाव्या भागात विकसित झालेल्या सूज नंतर काम चालू करण्यास भाग पाडले गेले. हे गोळ्या तिच्या डोकेतून जात असताना बुलेटमुळे खराब झाले. पाच तासाच्या ऑपरेशननंतर, डॉक्टरांनी यशस्वीरित्या बुद्धी काढली, जी तिच्या रीढ़ की हड्डीजवळ तिच्या खांद्यावर ठेवली होती. आक्रमणानंतरच्या दिवशी, डॉक्टरांनी एक डिओम्प्रेशिव्ह क्रॅनिक्टॉमी केली , ज्यामध्ये तिच्या खोपडीचा भाग सूज घेण्याची जागा काढून टाकण्यात आला. +11 ऑक्टोबर 2012, पाकिस्तानी आणि ब्रिटिश डॉक्टर एक पॅनेल युसुफजाई पुढे जाण्याचा निर्णय घेतला कार्डिओलॉजी सशस्त्र सेना संस्था मध्ये रावळपिंडी . मुमताज खान, डॉक्टर, म्हणाले की तिला जगण्याची 70% संधी आहे. गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की युसूफझाईला जर्मनीला हलविण्यात येईल, जिथे ती प्रवासासाठी पुरेशी स्थिर होती म्हणून तिला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकला. डॉक्टरांची एक टीम तिच्यासोबत प्रवास करेल आणि सरकार तिच्या उपचारांचा खर्च सहन करेल. डॉक्टरांनी 13 ऑक्टोबरला युसूफझाईच्या सांडपाला कमी केले आणि ती सर्व चार अंगे हलविली. +युसुफझाईच्या उपचारांसाठी ऑफर जगभरातून आली. 15 ऑक्टोबर रोजी, युसुफझाई तिच्या डॉक्टरांना आणि कुटुंबियांनी मंजूर केलेल्या आणखी उपचारांसाठी युनायटेड किंगडमला प्रवास केला. तिचा विमान बर्मिंगहॅम , इंग्लंड येथे रवाना झाला , जिथे तिला क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यात आले होते, या अस्पतालच्या खास वैशिष्ट्यांमधील एक म्हणजे विवादात जखमी झालेल्या लष्करी जवानांचा उपचार. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, यूके सरकारने सांगितले की " पाकिस्तानी सरकार मलाला आणि तिच्या पक्षासाठी सर्व वाहतूक, प्रवास, वैद्यकीय, निवास आणि राहणीमान खर्च देत आहे." +17 ऑक्टोबर 2012 पर्यंत युसूफझाई तिच्या कोमातून बाहेर पडले होते, उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते आणि कोणत्याही मेंदूच्या नुकसानाविना पूर्णपणे बरे होण्याची चांगली संधी असल्याचे सांगितले जात असे. 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी नंतरच्या अद्यतनांनी सांगितले की ती स्थिर होती, परंतु अद्यापही संक्रमणाशी लढत होती. 8 नोव्हेंबर पर्यंत, तिने बेडवर बसून छायाचित्र काढले होते. 11 नोव्हेंबरला, युसूफझाईला तिच्या चेहऱ्याच्या नवरांची दुरुस्ती करण्यासाठी साडेतीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली . +3 जानेवारी 2013 रोजी युसुफजाई तिच्या कुटुंबाच्या तात्पुरती घरी तिच्या पुनर्वसन सुरू करण्यासाठी रुग्णालयात घरी सोडण्यात आले पश्चिम मिडलॅंड्स , ती साप्ताहिक फिजिओ होते. तिचा खोपडी पुनर्निर्मित करण्यासाठी 2 फेब्रुवारीला पाच तासाचा मोठा ऑपरेशन झाला आणि तिला क्वेलर इम्प्लांटसह ऐकण्याची ताकद मिळाली , त्यानंतर तिला स्थिर स्थिती असल्याचे कळले. जुलै 2014 मध्ये युसुफझाईने लिहिले की तिचे चेहऱ्यावरील नक्षी 96% पर्यंत वाढली आहे. +हत्येच्या प्रयत्नांमुळे जगभरातील मीडिया कव्हरेज प्राप्त झाले आणि सहानुभूती आणि क्रोध निर्माण झाला. या हल्ल्याच्या विरोधात अनेक पाकिस्तानी शहरांमध्ये शूटिंगविरोधी निषेध करण्यात आले होते आणि 2 लाखांहून अधिक लोकांनी शिक्षणाच्या अधिकारांच्या याचिकेवर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा पहिला अधिकार मंजूर झाला अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना अटक केल्याबद्दल माहितीसाठी 10 लाख रुपये (यूएस $ 105,000) पुरस्कृत केले. युसूफझाईच्या वडिलांनी आपल्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले, "जर माझी मुलगी जिवंत राहिली असेल तर आम्ही आमच्या देशाला सोडणार नाही. आमच्यात एक विचारधारा आहे जी शांतीची प्रशंसा करते." तालिबान बुलेट्सच्या शक्तीद्वारे सर्व स्वतंत्र आवाज थांबवू शकत नाही. " +पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी या चित्रपटाचे वर्णन "सभ्य लोकांवर" हल्ला म्हणून केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिव बान की-मून यांनी ते "अत्यंत निष्ठुर आणि भयानक कृत्य" म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी "निरुपयोगी, घृणास्पद आणि दुःखद" हल्ला पाहिला, तर अमेरिकेचे सचिव हिलेरी क्लिंटन यांनी सांगितले की युसूफझाई "मुलींच्या हक्कांसाठी उभे राहण्यास अतिशय साहसी" होती आणि हल्ला करणारे "अशा प्रकारच्या सशक्तीकरणामुळे धमकी दिली". ब्रिटिश परराष्ट्र सचिव विलियम हेग यांनी "बर्बर" आणि " +अमेरिकेतील गायक मॅडोना यांनी युसूफझाईला त्यांचा हल्ला " ह्यूमन नेचर " या दिवशी लॉस एंजेलिसमधील एका मैफिलीत समर्पित केला तसेच तिच्या मागे तात्पुरती मलाला टॅटू देखील ठेवला. अमेरिकेच्या अभिनेत्री ॲंजेलीना जोली यांनी आपल्या मुलाला कार्यक्रम समजावून सांगण्याचा एक लेख लिहिले आणि "मलाला मारण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांना असे का वाटले?" मुलीने नंतरच्या शिक्षणासाठी मलाली फंड मध्ये जोलीने $ 200,000 दान केले . अमेरिकेच्या माजी प्रथम लेडी लॉरा बुश यांनी द वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओप-ईड तुकडा लिहिला ज्यामध्ये त्यांनी युसूफझाईशी तुलना केली.होलोकॉस्ट डायरिस्ट ॲने फ्रॅंक . भारतीय दिग्दर्शक अमजद खानने घोषणा केली की तो युसूफझाईवर आधारित एक जीवनात्मक चित्रपट तयार करणार आहे . +पाकिस्तानी तालिबानचे मुख्य प्रवक्ते एहसानुल्ला एहसान यांनी युद्धाच्या जबाबदारीचा दावा केला आणि म्हटले की युसूफझाई "अंधश्रद्धेचा व अत्याचारांचा प्रतीक आहे" आणि जर ती जिवंत राहिली तर समूह पुन्हा तिला लक्ष्य करेल. हल्ल्याच्या काही दिवसांत तालिबानने आपल्या वडिलांनी युद्धाला तोंड देत म्हटले होते की तालिबानने आपल्या औपचारिकपणाची पुनरावृत्ती केली: "आम्ही तिला आपल्या मुलीला आमच्याविरुद्ध गलिच्छ भाषा वापरण्यापासून रोखण्यासाठी बऱ्याच वेळा चेतावणी दिली, पण त्याने ऐकले नाही आणि जबरदस्ती केली नाही आम्ही या चरमपंथी पाऊल उचलू. " तालिबानने धार्मिक शास्त्रवचनाचा एक भाग म्हणून आपला हल्ला देखील उचित ठरविला आणि कुरान म्हणते की "इस्लाम आणि इस्लामी सैन्यांविरुद्ध प्रचार करणारे लोक ठार मारले जातील"शरीयत म्हणतात की जर इस्लामच्या विरोधात प्रचार केला जात असेल तर मुलाचाही खून केला जाऊ शकतो. " +12 ऑक्टोबर 2012 रोजी पाकिस्तानातील 50 इस्लामिक धार्मिक नेत्यांनी युसूफझाईला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबान बंदूकधारकांविरुद्ध इस्लामिक कायद्याचा निर्णय - फतवा जारी केला. सुन्नी इत्तेहाद परिषदेच्या इस्लामिक विद्वानांनी पाकिस्तानी तालिबानाने युसूफझाई आणि त्यांच्या दोन वर्गमित्रांच्या शूटिंगसाठी धार्मिक औपचारिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. +जरी पाकिस्तानमध्ये या हल्ल्याचा संपूर्णपणे निषेध करण्यात आला होता, "काही पाकिस्तानी राजकीय पक्ष आणि अतिरेकी संघटना" ने ड्रोन हल्ल्यांचे आक्षेप प्रदान करण्यासाठी अमेरिकन सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीने केलेल्या शूटिंगसारख्या साशंकतेच्या सिद्धांतांचा प्रसार केला आहे . पाकिस्तानातील तालिबानचा आणि इतर काही प्रो-तालिबान एक "अमेरिकन गुप्तचर" ब्रॅंडेड युसुफजाई घटक. +युनायटेड नेशन्सची याचिका +15 ऑक्टोबर 2012 रोजी, ग्लोबल एज्युकेशन फॉर ग्लोबल एज्युकेशन गॉर्डन ब्राऊन , माजी ब्रिटिश पंतप्रधान , यूसुफझाई यांना हॉस्पिटलमध्ये असताना भेट दिली, आणि त्यांच्या नावावर याचिका दाखल केली आणि "मलाला काय लढायच्या समर्थनात" याचिका दाखल केली. "मी एम मलाला" नाराचा वापर करून, याचिकाची मुख्य मागणी अशी होती की 2015 पर्यंत शाळा सोडण्याशिवाय कोणीही मूल नाही, "आशा आहे की सर्वत्र मलाला सारख्या मुली लवकरच शाळेत जातील". ब्राउनने नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद येथे राष्ट्रपती झरदारी यांना हा अर्ज दिला . +याचिकामध्ये तीन मागण्या आहेत: +आम्ही प्रत्येक मुलासाठी शिक्षण देण्याच्या योजनेशी सहमत होण्यासाठी पाकिस्तानला विनंती करतो. +मुलींवर भेदभाव करण्यासाठी आम्ही सर्व देशांना कॉल करतो. +2015च्या अखेरीपर्यंत जागतिक शिक्षणात 61 दशलक्ष शाळा बाहेर पडतील याची खात्री करण्यासाठी . +गुन्हेगारी अन्वेषण, अटक आणि बंदी +शूटिंगनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की युसूफझाईला ठार मारणाऱ्या तालिबान गनमॅनची ओळख पटली आहे. पोलिसांनी 23 वर्षीय अट्टा उल्लाह खान, रसायनशास्त्रातील पदवीधर विद्यार्थी म्हणून, हल्ला केला. 2015 पर्यंत तो कदाचित अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात राहिला. +या हल्ल्यात सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे, परंतु पुरावा नसल्यामुळे त्यांना नंतर सोडण्यात आले. नोव्हेंबर 2012 मध्ये अमेरिकेच्या सूत्रांनी पुष्टी केली की , युसुफझाईवरील हल्ल्याचा आदेश देणारा मल्ला फजलुल्ला पूर्वी अफगाणिस्तानमध्ये लपला होता. +12 सप्टेंबर 2014 रोजी आयएसपीआरचे संचालक मेजर जनरल असिम बाजवा यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले की 10 हल्लेखोर "शूरा" नावाच्या एका दहशतवादी गटाशी संबंधित आहेत. जनरल बाजवा म्हणाले की इशारूर रहमान हे प्रथम दहशतवादी गट सदस्य होते आणि त्यांना सैन्याने पकडले होते. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवर कार्यरत असताना, दहशतवादी गटातील इतर सर्व सदस्यांना अटक करण्यात आली. हे आयएसआय, पोलीस आणि सैन्याने आयोजित केलेल्या गुप्तचर-आधारित एकत्रित ऑपरेशनचे काम होते. +एप्रिल 2015 मध्ये, अटक केलेल्या दहा जणांना 25 वर्षानंतर पॅरोलची पात्रता मिळण्याची शक्यता असून, जबरदस्तीने खटला चालविणारा न्यायाधीश मोहम्मद अमीन कुंडी यांनी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खरं तर खून करणाऱ्या दहा जणांना दहा जणांना शिक्षा झाली तर हे माहित नाही. जून 2015 मध्ये, हे उघड झाले की या हल्ल्यात दहा पैकी आठ जणांनी कॅमेऱ्यात गुप्तपणे बरीच फसवणूक केली होती, आतल्यांना बाहेर काढण्यात आले आणि मुक्त केले जाणारे एक जण खून बिडचे मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. असा विश्वास आहे की युसुफझाईला मारणाऱ्या इतर सर्व लोकांनी नंतर अफगाणिस्तानला पलायन केले आणि त्यांना कधीही पकडले गेले नाही. लंडन डेली मिररनंतर संशयितांच्या सुटकेची माहिती प्रकाशात आलीजेल मध्ये पुरुष शोधण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी सलीम खान यांनी सांगितले की, आठ जणांना सोडण्यात आले होते कारण त्यांना हल्ला करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. +जून 2018 मध्ये अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यात मुल्ला फझलुल्ला यांचा मृत्यू झाला. + +मुलींच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी झगडणा-या मलाला यांच्या कार्याने वयाच्या चौदाव्या वर्षी सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानसहित जगभरातल्या अनेक देशांनी मलाला यांना विविध पुरस्कारने सन्मानीत केले आहे. केवळ वयाच्या अठराव्या वर्षी नोबेलसारख्या सर्वोच्च सन्मानासहित सुमारे चाळीसपेक्षाही अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेली मलाला ही बहुदा एकमेव मुलगी असावी. मलाला यांना खालील पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत. +१. इंटरनॅशनल चिल्डृन्स पीस प्राईझ: २५ ऑक्टोबर २०११ रोजी मलाला यांना 'इंटरनॅशनल चिल्डृन्स पीस प्राईझ' हा पुरस्कार मिळाला. स्वात प्रदेशातील कन्या-शिक्षण हक्कासाठी केलेल्या संघर्षाबद्धल आणि तालिबानद्वारा केल्या जाण-या अमानुष छळाविरुद्ध आवाज उठवल्याबद्धल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण हा मुलींचा मूलभूत हक्क आहे आणि तो हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही असा संदेश त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत जगापर्यंत पोहोचवला. +२. नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान: १९ डिसेंबर २०११ रोजी पाकिस्तान सरकारने 'नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान' ह पुरस्कार देऊन मलाला यांच्या कार्याचा गौरव केला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या हस्ते हा पुरस्कार मलाला यांना देण्यात आला. नंतर या पुरस्काराचे नाव बदलून 'मलाला यूथ पीस प्राईझ' असे ठेवण्यात आले. +३.नी फ्रॅंक वॉर्ड फॉर मॉरल करेज: कन्या शिक्षण मोहिमेत अडथळा बनणा-या, संकटांशी लढण्याचे नैतिक धैर्य दाखवल्याबद्धल मलाला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +४. गॅलेन्ट पुरस्कार: १९ नोव्हेंबर २०१२ रोजी 'वर्ल्ड पीस अँड प्रॉस्परिटी फाउंडेशन'चे अध्यक्ष प्रिश्नस अली खान यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये मलाला यांना हा पुरस्कार प्रदान केला. मलाला यांच्या वतीने पाकिस्तानच्या उपायुक्तांनी हा पुरस्कार स्विकारला होता. कारण त्यावेळी मलाला यांच्यावर क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीत नव्हत्या. +५. सितारा ए सुजात पुरस्कार: ऑक्टोबर २०१० मध्ये पकिस्तान सरकारतर्फे 'सितारा ए सुजात' या पुरस्काराने मलाला यांना गौरवण्यात आले. तालिबानी हल्ल्याची शिकार झाल्यानंतर मलाला यांना पकिस्तानमधील हा तिसरा सर्वोच्च नागरी वीरता पुरस्कार देण्यात आला. +६, टाईम मॅगझीनचा "पर्सन ऑफ द इयर" पुरस्कार: १९ डिसेंबर २०१२ रोजी टाईम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर" पुरस्कार मलाला यांना घोषित करण्यात आला. हा सन्मान मिळणे हा खरोखरीच फार मोठा बहुमान आहे. +७. मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार: २८ नोव्हेंबर २०१२ रोजी मलाला यांना त्यांच्या सामजिक कार्यासाठी त्यांना 'मदर तेरेसा मेमोरियल ॲवार्ड फॉर सोशल जस्टिस' हा पुरस्कार देण्यात आला.अ +८. टॉप ग्लोबल थिंकर सन्मान: अमेरिकेतील फॉरिन पॉलिसी मॅगझीन तसेच यू. के. मधील प्रोस्पेक्ट मॅगझीन यांनी जागतिक स्तरावर केलेल्या जनमत चाचणीनुसार १०० सन्माननीय विचारवंतांच्या यादीत मलाला यांचा समावेश केला गेला. +९. शांतता आणि मानवतावादी कार्यासाठी रोम प्राईझ: १२ डिसेंबर २०१२ रोजी मलाला यांना शांतता आणि मानवतावादी कार्यासाठी 'रोम प्राईझ' प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासोबतच मलाला यांना रोमचे मानद नागरिकत्वदेखील देण्यात आले. +१०. ग्लोबल इंटरनॅशनल पीस पुरस्कार: २०१२ मध्ये ग्लोबल इंग्लिशद्वारा करण्यात आलेल्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये मलाला यांना सर्वप्रथम स्थान मिळाले. +११. टिप्पोरी इंटरनॅशनल पीस पुरस्कार: स्वात प्रदेशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आवाज उठवल्याबद्धल आणि सतत संघर्ष केल्याबद्धल मलालाला ३ जानेवारी २०१३ मध्ये २०१२ च्या "टिप्पोरी इंटरनॅशनल पीस ॲवार्ड" देण्यात आला. हा आयर्लंडमधील एक् प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. +१२. सिमॉन द बेवॉर पुरस्कार: १० जानेवारी २०१३ मध्ये फ्रान्स सरकारनं मलालाला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. मलाला पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीमध्ये नसल्यामुळे तिच्या वतीने तिच्या वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला. मलालाबद्धल बोलताना तिचे वडील झियाउडद्दीन म्हणाले, "मलालासाठी हा कसोटीचा काळ आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो. अल्लाह आणि संपूर्ण जग तिच्या पाठीशी आहे याचा मला आनंद होत आहे. अल्लाहनी समाहजाच्या भल्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रसाराठी आणि प्रचारासाठीच मलालाला पुनर्जन्म दिला आहे. " +१३. व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप पुरस्कार: एप्रिल २०१३ मध्ये मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेव्हा अन्य कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची हिंमत करत नव्हते तेव्हा मलालाने आवाज उठवायचे धाडस दाखवले. म्हणून मलाला यांना 'व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप ॲवार्ड" देऊन तिचा गौरव करण्यात आला. +१४. जगभरातील १०० प्रभावई व्यक्तिमत्त्वं: एप्रिल २०१३ मध्ये टाइम मॅगझीनने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरातील १०० प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. +१५. ॲन्युअल ॲवार्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट: जून २०१३ मध्ये मलाला यांना या जगतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +१६. ऑब्झर्व्हर एथिकल पुरस्कार: मानवाधिकार आणि शिक्षणासाठी अभियान चालवल्याबद्धल जून २०१३ मलाला यांना 'ऑब्झर्व्हर एथिकल' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. +१७. ॲकिड्स राईट पुरस्कार: बालकांच्या अधिकारासाठी संघर्ष केल्याबद्धल मलाला यांना इंटरनॅशनल चिल्ड्र्न्स पीस प्राईज 'किड्स राईट २०१३' ने सन्मानित करण्यात आले. +१८. ॲम्बेसॅडर ऑफ कन्सायन्स पुरस्कार: ॲमनेस्टी इंटरनॅशनलने २०१३ सालच्या 'ॲम्बेसॅडर ऑफ कन्सायन्स ॲवार्ड' ने मलाला यांना सन्मानित करण्यात आले. +१९. क्लिंटन ग्लोबल सिटिझन पुरस्कार: २०१३ मध्ये मलाला यांना क्लिंटन फाउंडेशनकडून 'क्लिंटन ग्लोबल सिटिझन वार्ड' या सन्माननीय नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. +२०. पीटर गोम्झ ह्युमिनिटेरियन पुरस्कार: हार्वर्ड विश्वविद्यालयातील हार्वर्ड फाऊंडेशनने मलाला यांना 'पीटर गोम्झ ह्युमिनिटेरियन पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला. +२१, अना पोलिकोवस्कया पुरस्कार: मुलींच्या शिक्षणासाठी जनमानसात जागृती केल्याबद्धल मलाला यांना हा पुरस्कार देण्यात आला. +२२. रिफ्लेक्शन ऑफ होप पुरस्कार: शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल हा पुरस्कार देण्यात आला. +२३. सखारोव्ह प्राईझ फॉर फ्रीडम अँड थॉट: युरोपियन पार्ल्मेंटने खास बुद्धिवान लोकांसाठी दिल्या जाणा-या सखारोव्ह पुरस्कारासाठी मलाला यांची निवड केली. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. +२४. एम. ए.ची सन्माननीय पदवी: २०१३ मध्ये मलाला यांना एडिनबर्ग विद्यापीठाने एम. ए.ची सन्माननीय पदवी प्रदान केली. +२५. प्राईड ऑफ ब्रिटेन: ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्रिटन सरकारने 'प्राईडा ऑफ ब्रिटेन' हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला. +२६. वुमन ऑफ द इयर: ग्लैमर मॅगझीनने मलाला यांना २०१३चा 'वुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. +२७. इंटरनॅशनल प्राईझ फॉर इक्वालिटी ॲण्ड नॉन डिसक्रिमिनेशन: २०१३ साली मलाला यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. +२८. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्ड: मार्च२०१३ मध्ये मलाला यांना ब्रिटनमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्डने गौरवण्यात आले. मलाला यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की, " मी मलालाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले; पण माझ्या मुलीने त्याला जगभर पोहोचवण्यासाठी स्वतःला संपूर्ण समर्पित केले." +२९. 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' गौरव: ८ एप्रिल २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव बान की मून यांनी पाकिस्तानच्या साहसी मुलीला 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' हा किताब देऊन तिचा सन्मान केला. या प्रसंगी ते म्हणाले, "मलालासारख्या मुलींची मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ नेहमीच कटिबद्ध राहील. मलाला अवघ्या विश्वासाठी आशेचं प्रतिक आहे." +३०. ओ. एफ. आय. डी. पुरस्कार २०१३: ओ. एफ. आय. डी. फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या मंत्रालय समितीच्या अध्यक्षांनी मलाला यांना २०१३च ओ. एफ. आय. डी. पुरस्कार देणार असल्याचे घोषित केले. स्वात प्रदेशातील मुली आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्धल त्यांना हा पुरस्कार दिला गेला. +[१] +१. एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन संपूर्ण् जग बदलू शकते. +२. जेव्हा संपूर्ण जग शांत असतं तेव्हा केवळ एक आवाजदेखील शक्तिशाली बनतो. +३. मी भीतीपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. +४. दहशतवाद्यांनी दाखवून दिलं आहे की, त्यांना सर्वाधिक भीती त्या मुलीची वाटते जिच्या हातात पुस्तक आहे. +५. जर एखादा माणूस सर्व काही नष्ट करू शकत असेल, तर एक मुलगी त्यामध्ये बदल का नाही घडवू शकणार? +६. शिक्षण हीना पौर्वात्यांची मक्तेदारी आहेना पाश्चिमात्यांची, शिक्षण हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. +७. चला, पुस्तकं आणि पेन्सिली उचलूया, हीच आपली सर्वाधिक प्रभावी शस्त्रं आहेत. +८. मी जगभरातल्या भगिनींना आवाहन करते की, त्यांनी साहसी बनावं, आपली अंतर्शक्ती जागृत करावी त्यामुळं त्यांना आपल्यामध्ये असणा-या संपूर्ण क्षमतेची जाणीव होईल. +९. मी माझा चेहरा झाकून घेत नाही; कारण मला माझी ओळखा लपवायची नाही. +१०. जर लोक शांत रहिले तर काहीही बदलणार नाही. +११. मी मुलगी असल्यामुळं हे करू शकणार नाही असं जरी लोकांना वाटलं, तरी मला आशा सोडून चालणार नाही. +१२. मला तालिबानच्या हल्ल्याची शिकार झालेली मुलगी म्हणून न ओळखता, शिक्षणासाठी संघर्ष करणारी मुलगी म्हणून ओळखावं असं मला वाटतं. +१३. जर तुम्हाला युद्धं संपावीत असं वाटत असेल तर बंदुकांच्या जागी पुस्तकं, रणगाड्यांच्या जागी पेन आणि सैनिकांच्या जागी शिक्षकांना पाठवा. +१४. आम्ही घाबरलो होतो; पण आमची भीती आमच्या साहसापेक्षा मोठी नव्हती. +१५. मी केवळ माझ्यासाठी बोलत नाही, मी त्यांच्यासाठी बोलते ज्यांचा आवाज दबलेला आहे. +१६. जेव्हा आपला आवाज गप्प केला जातो तेव्हाच अपल्याला आपल्या आवाजाचं खरं महत्त्व जाणवतं. +१७. चला आजच आपलं भविष्य घडवूया आणि आपली आजची स्वप्नं उद्याच्याअ वास्तवात आणूया. +१८. दहशतवाद्यांना वाटलं असेल की, ते माझं ध्येय बदलू शकतील आणि महत्त्वाकांक्षा चिरडून टाकू शकतील; पण माझ्यामधील दौर्बल्य. भीती आणि निराशावादाचा अंत होऊन माझ्या ठायी शक्ती, सामर्थ्य आणि धैर्यानं जन्म घेतला आहे. +१९. लोका म्हणतात की, मलाला केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलत आहे; पण मला असं दिसतय की, मलालाचा आवाज आता जगभर पोहोचू लागला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निनादू लागला आहे. मलालाच्या बोलण्यामागं तिचा काय दृष्टिकोन आहे, ती काय म्हणत आहे याचा तुम्ही विचार करायला हवा. मी फक्त शिक्षण, स्त्रियांचे अधिकार आणि वैश्विक शांततेबद्धल बोलत आहे. +२०. सर्व अतिरेक्यांच्या खास करून तालिबानींच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण मिळायला हवं असं मला वाटतं. +२१. तुम्ही जर एखाद्या तालिबला चपलेनं मारलंत, तर तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक राहणार नाही. तुम्ही इतरांशी क्रूरतेनं आणि निष्ठूरतेनं न वागता, शांततेच्या, सामोपचारच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून संघर्ष करायला हवा. +२२. जर तुम्ही आतंकवादाविरुद्ध बोलला नाहीत, तर तो सर्वत्र पसरायला वेळ लागणार नाही. +व् आपण स्त्रिया बदल घडवून आणणार आहोत. आपण मुलींच्या हक्कांबद्धल बोलत आहोत; पण आपण पुरूषांनी भूतकाळात केलेल्या चुका करणं टाळायला हवं. +२३. शस्त्रामध्ये अजिबात ताकद नाही, असा मला विश्वास आहे. +२४. आपण माणूस आहोत आणि जोपर्यंत एखादी गोष्ट त्याच्या हातून हिरावून घेतली जात नाही तोपर्यंत त्याला त्याचं महत्त्व पतत नाही, हा मानवी स्वभावधर्म आहे. +२५. मी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे आणि मला माहित आहे की, मुलींमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. +२६. त्यांना शिकलेल्या स्त्रीची भीती वाटते. त्यांना ज्ञानाच्या शक्तीची भीती वाटते. +२७. आतंकवादी वर्तन हे इस्लामच्या विरुद्ध आहे; कारण इस्लाम धर्म शांततेचा, समानतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देतो. आपण एकमेकांशी प्रेमानं आणि दयाळूपणे वागायला हवं. +२८. जर दहशतवादी एखाद्याचं मन बदलवू शकत असतील आणि त्यांना आत्मघातकी बॉम्बर बनण्यासाठी त्यांचं मन वळवू शकत असतील तर आपणही त्यांचं मन बदलवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की, मानवता आणि शांतता प्रस्थापित करण्याचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. +२९. आपल्या समोर अनेक समस्या आहेत; पण मला असं वाटतं या सर्व समस्यांचं केवळ एकच आणि एकमेव उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण. तुम्ही मुलांना आणि मुलींना शिक्षण द्यायला हवं. तुम्ही त्यांना ज्ञान संपादनाची संधी द्यायला हवी. +३०. जेव्हा मी माझ्या ध्येयाकडं पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की, शांतता हे माझं ध्येय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण देणं हे माझं उद्दिष्ट आहे. +३१. आपल्यापैकी अर्धे लोक जेव्हा माघार घेतात तेव्हा आपल्याला संपूर्ण यश कधीच मिळू शकत नाही. +३२. एकदा मी माझी उंची एक दोन इंचांनी तरी वाढव अशी देवाची प्रार्थना केली; पण त्याएवजी त्याने मला आभाळाएवढं उंच केलं, इतकं उंच केलं की मी आता स्वतःदेखील माझी उंची मोजू शकत नाही. +३३. परमेश्वर किती महान आहे याची आम्हा मनुष्यप्राण्यांना जाणीवच होत नाही. त्याने आपल्याला असामान्य मेंदू आणि संवेदनशील प्रेमळ ह्रदय दिलं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्याला दोन ओठांची देणगी दिली आहे. त्याने दिलेल्या दोन डोळ्यांनी आपण या जगातील रंग आणि सौंदर्य पाहू शकतो. त्याने आपल्याला जीवनपथावर चालण्यासाठी दोन् पाय दिले, काम करण्यासाठी दोन हात दिले, प्रेमळ शब्द एकण्यासाठी दोना कान दिले. जोपर्यंत आपण आपला एखाद अवयव गमावत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत समजत नाही. +३४. मी ओरडू शकेन म्हणून मी माझा आवाज बुलंद केला नाही तर ज्यांचा आवाज दबला आहे त्यांच्यापर्यंत माझा आवाज मला पोहोचवायचा आहे. +३५. आमच्या पुरुषांना वाटतं की, पैसा कमावणं आणि आजूबाजूच्या लोकांवर हुकूम सोडण्यामध्येच त्यांची शक्ती एकवटली आहे; पण जी स्त्री दिवसभर सगळ्यांची काळजी घेत असते आणि त्यांच्या मुलांना जन्म देते तिच्या हातामध्ये खरी शक्ती आहे असा ते विचारच करत नाहीत. +३६. तालिबान आमची पुस्तकं आणि पेन काढून घेऊ शकतात; पण आमच्या मनातले विचार थांबवू शकत नाहीत. +३७. आयुष्य म्हणजे केवळ श्वासाद्वारा ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणं नव्हे. +३८. शस्त्रांच्या साहाय्यानं तुम्ही दहशतवाद्याला मारू शकता; पण शिक्षणाच्या मदतीनं तुम्ही दहशतवाद नष्ट करू शकता. +३९. पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं एकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. +४०, तुमच्या त्वचेचा रंग कोणता आहे, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता, तुमचा धर्म कोणता या गोष्टींना तितकंसं महत्त्व नाही. आपण सर्वजण माणसं आहोत, आपण एकमेकांचा आदर करायला हवा. आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या मुलांच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी, प्रत्येक मनुष्याच्या हक्कांसाठी लढायला हवं. +४१. शिक्षण हे आयुष्यातील महत्त्वपूर्ण वरदान आहे - आणि एक जीवनावश्याक बाबदेखील. + +[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3114.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87c0fca6ed1ad80f6bff39a4b59cf6cc1e135c36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3114.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) +मलिंदै पुष्पकुमार (२४ मार्च, इ.स. १९८७:कोलंबो, श्रीलंका - ) श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3121.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0c0263a2c61ec973e04383c6f639350a25ee2dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3121.txt @@ -0,0 +1,8 @@ +मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. मलिक अंबर याचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्त्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी / औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली. +मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो अहमदनगर सलतनत पेशवा किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.[५] + +मलिक अंबर हा जन्माने इथियोपिया येथील होता.[६] त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला. +दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[७] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रकमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला. +एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने निजामशाही सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.[८] +मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत राजा होते. या काळात त्यांनी मुर्तझा निजाम शाह II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.[५] 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.[५] पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट जहांगीरच्या राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला. +८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3150.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faf0778ff541ac5ee5a243c3206ba4716a175e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3150.txt @@ -0,0 +1,79 @@ +टी२०आ किट +मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये मलेशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3151.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748729a72f160a6862ba0ab0b83d372bf39e7ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3151.txt @@ -0,0 +1 @@ +मलेशिया फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Malaysia; फिफा संकेत: MAS) हा आग्नेय आशियामधील मलेशिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५४ व्या स्थानावर आहे. मलेशियाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. मलेशिया १९७६, १९८० व २००७ ह्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांमध्ये पात्रता मिळवली आहे. ह्यांपैकी २००७ स्पर्धेमध्ये मलेशिया सह-यजमान देश होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3165.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f3a28329163b4bfda557f75c5d8dd04d79491d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3165.txt @@ -0,0 +1,7 @@ +मलेशिया मधील धर्म (२०१०)[१] +मलेशिया एक बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक देश असून, त्याचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, देशातील लोकसंख्येच्या ६१.३ टक्के लोक इस्लामचे अनुसरण करतात; तर १९.८ टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुसरण करतात; यशिवाय ९.२ टक्के लोक ख्रिश्चन धर्म अनुसरतात; ६.३ टक्के हिंदू धर्म; आणि ३.४ टक्के पारंपरिक चिनी धर्म अनुसरात. उर्वरित इतर धर्मांमधे ॲनिझिझम, लोक धर्म, शिख धर्म, बहाई विश्वास आणि इतर धार्मिक विश्वास प्रणालींचा समावेश आहे.[१][२] मलेशियात स्वतःला निरीश्वरवादी म्हणविणाऱ्यांची संख्या कमी आहे; मलेशियन सरकारद्वारे नास्तिक आणि निरीश्वरवाद्यांवर भेदभाव केल्यासाठी सरकारवर मानवाधिकार संघटनांकडून टीका होत आहे, काही कॅबिनेट सदस्यांनी "धार्मिक स्वातंत्र्य म्हणजेच धर्माचे स्वातंत्र्य नसणे" असे म्हटले आहे.[३][४] +मलेशियामध्ये जगातील सर्व प्रमुख धर्मांचे वास्तव्य आहे. लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना आकडेवारी या धर्मांनुसार लोकसंख्येचे प्रमाण खालीलप्रमाणे दर्शवते: +सर्व मलेशियाई मलाय कायद्यानुसार मुसलमान आहेत.[ संदर्भ हवा ] बहुतेक मलेशियन चीनी महायान बौद्ध धर्माचे किंवा चिनी परंपरागत धर्माचे (ताओवाद, कन्फ्यूशियनिझम, पूर्वज-पूजन किंवा नवीन संप्रदायांसह) पालन करतात.[५] २०१० च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार मलेशियाच्या चीनी व्यक्तींपैकी ८३.६% बौद्ध अनुयायी, ३.४% ताओवादी आणि ११.१% ख्रिश्चन अनुयायी आहेत.[१] +मलेशियातील अनेक स्थानिक जमातींनी ख्रिश्चन धर्मात धर्मातर केले आहे, ख्रिश्चन धर्माचे प्रायद्वीपीय मलेशियामध्ये प्रवेश केला आहे.[५] +इस्लाम हा देशाचा प्रमुख धर्म आहे आणि त्याला राज्य अधिकृत अधिकृत मानले जाते. ६०% मलेशियन लोक या धर्माचे अनुयायी आहेत. अनेक मुस्लिमांचे पवित्र दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित आहेत, यामध्ये रमजानच्या शेवट, हजचा शेवट आणि मुहंमद पैगंबरांचा वाढदिवस समाविष्ट आहे. १२ व्या शतकामध्ये भारतीय व्यापाऱ्यांद्वारे इस्लामला मलेशियात आणले गेले आहे असे मानले जाते. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला मलक्का सल्तनत, प्रायः प्रायद्वीपमधील पहिले स्वतंत्र राज्य मानले गेले. मुसलमान असलेल्या मलाकाचा राजकुमारांच्या नेतृत्वाचा प्रभाव इस्लामचा प्रसार मलय जनतेत करण्यास प्रवृत्त झाला इस्लाम धर्मीयांची संख्या या देशांमध्ये मोठी आहे मलेशिया मध्ये इस्लाम धर्माला मोठी मान्यता मिळालेले आहे इतर अनेक धर्म व संप्रदाय मलेशियामध्ये आहेत.[६] +अनेक मलेशियाई चीनी महायान आणि बौद्ध धर्माचे इतर संप्रदाय, चिनी लोक धर्म, कन्फ्यूशियनिझम आणि दाओझम (ताओधर्म) समेत विविध धर्मांचे अनुसरण करतात. इस्लामच्या आगमनापूर्वी या देशात बौद्ध धर्म प्रभावी व प्रमुख धर्म होता, मात्र सध्याची चिनी लोकसंख्येमधील बहुसंख्य मलय लोक ब्रिटिश राजवटीत येथे आले. चिनी नववर्ष राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच चीनी लोकांसाठी, 'धर्म' त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3168.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5335e8e3f730dcbf31882864e7fa193f1218a0ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3168.txt @@ -0,0 +1,5 @@ +मलेशिया हा आग्नेय आशियामधील देश प्रामुख्याने मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागावर व बोर्नियो बेटाच्या उत्तर भागावर वसला आहे. प्रशासकीय दृष्ट्या मलेशिया १३ राज्ये व तीन संघशासित प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3178.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb15fa2d091aa165ccde9546a4c5961672ce6e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3178.txt @@ -0,0 +1,6 @@ + दक्षिणि द्राविड +  तमिळ्-कन्नडा +   तमिळ्-कोडगु +    तमिळ-मलयाळम् +    'मलयाळम् +मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_320.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c97b8a0d54ba9437d45bbd8b6b76627e96b4b16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_320.txt @@ -0,0 +1,30 @@ +{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र +|प्रकार=गाव +|इतर_नाव= +| स्थानिक_नाव =भुसाणी +| आकाशदेखावा = +| आकाशदेखावा_शीर्षक = +| शोधक_स्थान= right +| अक्षांश = +| रेखांश = +| उंची = +| राज्य_नाव = महाराष्ट्र +|जवळचे_शहर= कळवण +| जिल्हा = नाशिक जिल्हा +|अधिकृत_भाषा=मराठी +| नेता_पद =[[सरपंच]विष्णू जगन्नाथ सोनावणे] +| नेता_नाव = +|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ +| लोकसंख्या_एकूण = +| लोकसंख्या_घनता = +|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = +| क्षेत्रफळ_एकूण = +|पिन_कोड=| एसटीडी_कोड = +| पिन कोड = +| आरटीओ_कोड = एमएच/ +|संकेतस्थळ= +|कोरे_शीर्षक_१ =बोलीभाषा +|कोरे_उत्तर_१ = +| तळटिपा =}} +भुसाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3232.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc5230c90ddc42cd8226d2c129a728272321c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3232.txt @@ -0,0 +1,6 @@ +मल्हारगड चाळीसगाव +मल्हारगड हा अत्यंत दुर्लक्षित असा किल्ला आहे.   या किल्ल्यावर गडावर असणाऱ्या सर्व अवशेषांना पहिले असता एका किल्ल्यावर असणाऱ्या सर्व सोयी इथे पृवीच्या काळी होत्या हे दिसून येते. चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण १५ कि. मी. अंतरावर कन्नड घाटातील सह्याद्री पर्वत रांगेंच्या सुळक्यावर हा किल्ला आहे. +               कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दोन मुखी हनुमान मंदिरापासून वर पहिले असता या किल्ल्याचा बुरुज व तटबंदी स्पष्टपणे दिसते. याच हनुमान मंदिरापासून एक पाय वाट किल्ल्यावर जाते, तर घाटाच्या रस्त्याने गाडीने जाण्यासाठी अर्धा घाट पार केल्यानंतर डाव्याबाजूला दुःचाकी व चारचाकी वाहने जाण्यासाठी रस्ता आहे. तेथे जय मल्हार खंडोबा देवस्थान असा फलक आहे. या रस्त्याने गेले असता मुख्य किल्ल्याच्या आधी एक ब्रिटिश कालीन दगडी विहीर लागते व तिच्या वरच्या बाजूला टेकडीवर पडके दगडी बांधकाम आहे. ब्रिटिश काळात घाटातील जकात वसूल करण्याची चौकी असावी असे सांगितले जाते. पुढे गेल्यानंतर आता नव्याने वन विभागाने बांधलेला निरीक्षण मनोरा आहे.   +               याच्याच पुढे किल्ल्याचा खंदक लागतो. हा खंदक  काही वर्षांपूर्वी  गाडी जाण्यापुरता भराव करून रस्ता केला आहे. खंदकांचे बुरुज आताही भक्कमपणे उभे आहेत. मात्र झाडीमध्ये झाकले गेले आहे. खंदक ओलांड्यालनंतर पडक्या बुरुजाचे अवशेष पाहावयास मिळतात. हा बुरुज आज जरी पडक्या अवस्थेत असला तरी त्याच्या बांधकामाच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. याच्याच बाजूला एक भुयार असून तो भुयारी रस्ता किल्ल्यावरून बाहेर पडण्यासाठी दुसरी चोर वाट असावी. कारण या भुयाराच्या दिशेने पायथ्याला शिवापूर नावाचे गाव काही अंतरावर आहे. या गावाच्या बाजूनेही एक पाय वाट किल्ल्यावर येण्यासाठी आहे. हा भुयारी रस्ता पुढे याच पायवाटेला जाऊन मिळत असावा. भुयार पाहून पुढे गेले असता वरच्या बाजूला छोट्याश्या टेकडीवर एक शेंदूर लावलेले हनुमानाची मूर्ती आहे. मूर्ती समोर छोट्या पटांगणासारखी मोकळी जागा आहे. कदाचित त्याकाळी गडावरील शिबंदी येथे बलोपासना (व्यायाम) करत असावे. हनुमानाचे दर्शन घेऊन समोरच खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वी दगडी होते, परंतु ते मंदिर जीर्ण झाल्याने मागे काही वर्षा पूर्वी येथील खंडोबा भक्त बेडीवाले बाबा (सलीम बाबा ) यांनी काही भक्त व देणगीदारांची वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या मंदिरातील खंडोबा, म्हाळसाई, बाणाई यांच्या पुरातन मुर्त्या आहेत. +                    मंदिराच्या समोरील डाव्या बाजूच्या पायवाटेने थोडे खाली गेल्यास तेथे पिण्याचे शुद्ध पाण्याचे मोठे टाके आहे. या टाक्यात बारमाही स्वछ व थंडगार पाणी असते. त्याचेच बाजूला आणखी एक पाण्याचे टाके आहे मात्र त्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. तर मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतर खाली चालत गेल्यास जवळपास १४ पाण्याचे दगडी टाके  आहेत. हे टाके कोरीव असून काही टाके लेण्यांप्रमाणे दिसतात तर मंदिराच्या समोर सरळ २०० ते २५० फूट चालत गेल्यास एक मोठे पाणीचे टाके वजा तलाव आहे याला येथे घोडेपागा असेही म्हटले जाते. यात  घोडे पाणी पित असावे किंवा त्यांना धुण्यासाठी पृवी याचा वापर होत असावा याच घोडेपागे पासून साधारण १५ ते २० फुटावर खालच्या २ मुखी हनुमान मंदिरापासून दिसणारा किल्ल्याचा बुरुज आहे. +             या बुरुजाच्या लगतच दगडात कोरलेली दगडी पायऱ्यांची वाट आहे. ही पायवाट थेट खाली असलेल्या बोढारे गावाच्या फाट्यापर्यंत जाते. किल्ल्यावर असलेल्या मुबलक पाणी साठ्याच्या टाक्यांची व्यवस्था व विस्तृत पठार यावरून याठिकाणी असे लक्षात येते कि पूर्वी घाट माथ्यवर  जाणाऱ्या सैन्याचा विश्रांतीचा थांबा म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व असावे. आज निश्चित असा या किल्ल्याचा कालखंड यावरून राजवट  व याचा इतिहास उपलब्ध होत नसला तरी किल्ला म्हणून मान्यता मिळण्या इतके सारे अवशेष इथे पाहावयास मिळतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3234.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..affedbeda916af9b8ef0b369ee57c648efdcc5d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3234.txt @@ -0,0 +1,2 @@ +मल्हारपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3254.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..831333d5c3815093e08df67ce11affb15c6fde3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3254.txt @@ -0,0 +1,8 @@ + मालेवाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3272.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f88257bc1d324eada2b8160df5e8cbcb5a8d3952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3272.txt @@ -0,0 +1 @@ +इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळास मशीद असे म्हणतात. मशीद या शब्दाचा अर्थ प्रणाम करण्याची जागा असा होतो. मशिदीमध्ये नमाज पठण केले जाते. मुस्लिम स्थापत्यकला व मुस्लिम विद्यापीठे यांचा निर्मिती व विकास मशिदीमध्येच झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3287.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecd884fc35761073cc807cb3872f02ed4c95a1d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3287.txt @@ -0,0 +1,2 @@ +मसकरवाडी नं१ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3292.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7545c8f36f482223af0a0b61c6168d427d577c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3292.txt @@ -0,0 +1,2 @@ +मसळाखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3294.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c570e8fa06b8b44ae11f2f204781798acf00764b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3294.txt @@ -0,0 +1,23 @@ +मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. +कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[१] + +महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [२] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत. +मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव +संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[३] - +घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं || +असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा || +धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई|| +सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें || +मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा || +वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती || +काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती || +अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें || +एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया || +म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती || +भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई || +त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं || +-राजाई +संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[४][५] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो [६] + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3310.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9d814d3736ef44ada9d7e15dd2d9efc4e83ef01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3310.txt @@ -0,0 +1,6 @@ +धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते. +मसुरकर महाराजांनी 'मसुराश्रम' या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती. मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्‍नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली. +मसुराश्रम येथे गुजरात व गोवा येथील ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य केले व करत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार व बलोपासनेचाही त्यांनी पुरस्कार केला. शुद्धी चळवळीला एक दिशा देण्याचे काम केलेले मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी, वामनमूर्ती व इतर अनेकांनी केले. युखॅरिस्ट काँग्रेस, वादग्रस्त फादर फेरार प्रकरण, केरळमधील नन्सच्या विक्रीचे स्कॅंडल, भिवंडीची व जळगावची दंगल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले भारताचे विभाजन प्रयत्न, आंध्रच्या किनारपट्टीवर मिशनऱ्यांनी ‘ख्रिस्तस्थान’ तयार करण्याची केलेली रचना या विरोधात आश्रमाने कार्य केले आहे. +हिंदू नववर्षाचा पहिला दिवस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. या मध्ये पारंपरिक ध्वजपथक, लेझीम, मानवी मनोरे, तलवारबाजी, मंगळागौर असे देखावे उभारण्यात मसुराश्रम अग्रणी आहे. +तसेच मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन (गोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले गेले आहे. पांडुरंगवाडीत रसिकांसाठी "दीपावली स्वरप्रभात", "पहाटराग मैफल' आयोजित केली जाते. यात शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. मंगला पाध्येंचे शास्त्रीय गायन यात झाले आहे. तसेच डॉ. भालचंद्र फडणवीस यांचे संतुरवादन सादर झाले आहे. येथे 'हिंदू युवा संघटन मेळावा' आयोजित केला जातो. संस्कार भारती-गोरेगाव आणि मसुराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यानेही आयोजित केली जातात. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3314.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28fda9d70a0540bfdf7a4625b5dac51e410cc23b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3314.txt @@ -0,0 +1,13 @@ +मौलाना मसूद अझर (१० जुलै किंवा ७ ऑगस्ट, इ.स. १९६८:बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान - ) हा एक कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत. +मसूद अझरचे वडील नाव अल्ला बख्श शब्बीर सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होते. येथे शिकलेला अझर अफगाणिस्तानात सोवियेत संघाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर साद-ए-मुजाहिदीन या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला. +१९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यानंतर आयएसआयने आझर काश्मीरमधे कामी लावले. काश्मीरमधे घातपात करायचे व काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कामी त्याची नेमणूक करण्यात आली. +याच काळात अझर ब्रिटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौऱ्यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मिर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे, शस्त्रे आणि जिहादींची आवश्यकता आहे. +अझर काश्मीरमधे १९९४ साली पोहचला. परदेशी लोकांचे अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्याने अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हान्स क्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहानने ठार मारले. संयुक्त राष्ट्रांनी १९९७ साली हरकत-उल-अन्सार संघटना दहशतवादी म्हणून घोषित केली. अझरने जुन्या हरकत-उल-मुजाहिद्दीन या नावाने उद्योग सुरू केले. १९९४ साली अझरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले. +१९९९ साली अझरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर याने योजनापूर्वक इंडियन एरलाइन्सचे आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवले आणि कंदहारला नेले. +अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून अझरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलीस अधिकारी एस. पी. वैद्य यांनी सोडवले. भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला. +अझर १९९९ साली पाकिस्तानात पोहचल्या पोहचल्या कराचीत गेला. सिंध, पंजाबमध्ये त्याच्या सत्काराच्या सभा झाल्या. सभांमधे तो काश्मीरमुक्ती, भारताविरोधात आणि हिंदूंच्या विरोधात लढाईचे आवाहन करत असे. +१९९९मधे हरकत-उल-मुजाहिद्दीन वर आरोप व्हायला लागल्यावर अझरने आपल्या संघटनेचे नाव जैश ए महंमद ठेवले. १९९९ मधे जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानावर ताबा मिळवला. आयएसआय आता त्यांच्या हाताखाली आली होती. मुशर्रफ जैशला मदत करून तिचा वापर करू लागले. +अझरने कश्मीर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. असा दहशतवादी अझर पाकिस्तानात मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो. +पठाणकोट हल्ल्याचं नेतृत्व जैश ए महंमदच्या मसूद अझरने केले होते. दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत आल्यानंतर आपल्या टॅक्सीने आतमधे आणणाऱ्या इकागर सिंगला पाकिस्तानातल्या बहवालपूरमधून फोनवरून बोलावण्यात आले होते. गुरदासपूरचे पोलेस सुपरिटेन्डेन्ट सलविंदर सिंग यांचा फोन दहशतवाद्यांनी हिसकून घेतला आणि त्यावरून बहवालपूरला फोन केले. दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या लोकांशी या फोनवरून संभाषणे झाली. बहवालपूर हे जैश ए महंमदचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. दहशतवाद्यांपैकी किमान एकाचा ठावठिकाणा लागला होता. दहशतवाद्यांकडली शस्त्रे आणि इतर वस्तूंवर पाकिस्तानी उत्पादकांचा वा व्यापाऱ्यांचा ठसा होता. +भारत सरकारने हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढे ठेवले. अझर आणि जैश ए महंमदच्या पुढाऱ्यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारने मागवले. पाकिस्तानने ते दिले नाहीत. अझरला पकडा अशी मागणी भारताे केली. पाकिस्तानने ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सने अझरला दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताने केली. चीनने ती मागणी नकाराधिकार वापरून तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली. +याआधी २००१ मध्ये सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'वर बंदी घातली होती.. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००८ मध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी सादर केला होता. त्यावेळीही चीनने नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. आता १ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या युनोच्या बैठकीत पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करून चीनने दहशतवादी अझरवरील बंदी टाळली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3316.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b436914dcc1916ebc4c245a3f8263251f7f4405b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3316.txt @@ -0,0 +1 @@ +मसूद इक्बाल कुरेशी (१७ एप्रिल, १९५२:लाहोर, पाकिस्तान - ३१ ऑक्टोबर, २००३) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3317.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b436914dcc1916ebc4c245a3f8263251f7f4405b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3317.txt @@ -0,0 +1 @@ +मसूद इक्बाल कुरेशी (१७ एप्रिल, १९५२:लाहोर, पाकिस्तान - ३१ ऑक्टोबर, २००३) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3320.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2288d2c73efb3d177770e4be0a8afe773102ce69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3320.txt @@ -0,0 +1 @@ +मसूदा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3321.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46f1b12be61e72ea418f11c8c12bc0125e54a884 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3321.txt @@ -0,0 +1,5 @@ +मसीह अलीनेजाद ( पर्शियन : مسیح علی‌نژاد , जन्म मसूमेह अलीनेजाद-घोमी ( पर्शियन : معصومه علی‌نژاد قمی ), सप्टेंबर ११, १९७६) एक इराणी-अमेरिकन  पत्रकार , लेखक, राजकीय कार्यकर्त्या आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. अलिनजाद सध्या VOA पर्शियन सर्व्हिसमध्ये प्रस्तुतकर्ता/निर्माता, रेडिओ फर्दाचा वार्ताहर, मानोटो टेलिव्हिजनचे आणि इराणवायरच्या संपादक म्हणून काम करतात . +मसीह ने २००१ मध्ये हम्बस्तेगी दैनिकातून पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर इराणी लेबर्न्यूज एजन्सी (ILNA) साठी काम केले. २००९ च्या उन्हाळ्यात, युनायटेड स्टेट्समधील तिच्या वास्तव्यादरम्यान, अलिनजादने बराक ओबामा यांची मुलाखत घेण्याचा खूप प्रयत्न केला. तथापि, तिला मुलाखत नाकारण्यात आली, जरी तिला या मुलाखतीच्या आधारे व्हिसा देण्यात आला होता. तिच्या व्हिसाची मुदत संपली आणि तिला इंग्लंडला परतावे लागले. युनायटेड स्टेट्समध्ये असताना, तिने काही इराणी निषेधांमध्ये भाग घेतला आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भाषण केले. +अलिनजादने म्हटले आहे की तिचा हिजाबला विरोध नाही, परंतु ती वैयक्तिक निवडीची बाब असावी असे तिचे मत आहे. इराणमध्ये हिजाबशिवाय सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या महिलांना अटक होण्याचा धोका असतो. याला विरोध म्हणून मसीह अलिनजादने माय स्टेल्थी फ्रीडम (ज्याला स्टेल्थी फ्रीडम्स ऑफ इराणी महिला म्हणूनही ओळखले जाते) लाँच केले, एक फेसबुक पेज जे इराणी महिलांना हिजाबशिवाय स्वतःचे फोटो पोस्ट करण्यासाठी आमंत्रित करते. या पृष्ठाने त्वरीत आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले आणि शेकडो हजारो लाईक्स मिळवले. +इस्लामिक रिपब्लिक सुरक्षा दलांनी अलिनजादच्या कुटुंबातील तीन सदस्यांना तिच्या महिला हक्कांच्या सक्रियतेचा बदला म्हणून अटक केली. अलीनेजादचा भाऊ, अलिरेझा अलिनजाद, याला तेहरानमध्ये अटक करण्यात आली, तर हादी आणि लीला लोत्फी, तिचा माजी पती, मॅक्स लोटफीचा भाऊ आणि बहीण, या सर्वांना गुप्तचर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरेकडील बाबोल शहरात अटक केली. +अलिनजादने, द विंड इन माय हेअर, नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात उत्तर इराणमधील एका छोट्या गावातून पत्रकार होण्यापर्यंतचा तिचा प्रवास आणि सक्तीच्या हिजाबच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करणाऱ्या ऑनलाइन चळवळीची निर्मिती यावर लेखन केले आहे. लिटल ब्राउनने २०१८ मध्ये हे प्रकाशित केले. न्यू यॉर्क टाइम्सने लिहिले की पुस्तक आधुनिक इराणचे एक चित्र रेखाटते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3336.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa1df779ada65f80e04494cc52ebcdf89eb1cf0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3336.txt @@ -0,0 +1,7 @@ +विदर्भ किंबहुना नागपूरातील प्राचीन परंपरेतील ऐतिहासिक उत्सव म्हणजे 'हाडपक्या गणपती' किंवा मस्कऱ्या गणपती. गणेशेत्सव संपल्यानंतर सुरू होतो तो पितॄपक्ष. पितॄपक्षात सर्व धार्मिक कार्य, उत्सव काही प्रमाणात निषिद्ध असतात; परंतु नागपूरात/ विदर्भात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो. या गणपती उत्सवाचे स्वरूप घरघुती नसून सार्वजानिक आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजानिक रित्या हा उत्सव साजरा होत असत; परंतु आता काही मोजक्याच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे. आजही नागपूर आणि विदर्भातील अनेक तालुक्यात आणि गावागावात हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती उत्सव साजरा करण्यात येते. मोहाडी तालुक्यातील करडी क्षेत्रातील तुमसर-साकोली राज्यमार्ग क्रमांक ३५६ वर असलेल्या निलज बु. या गावात आजही ही भोसलेकालीन मस्कऱ्या गणपतीची परंपरा जपली जात आहे. +विदर्भात पितृपक्षाला हाडपक असे म्हणतात. हाडपकात बसविलेला हा 'हाडपक्या गणपती' होय. याच गणपतीला मस्कऱ्या गणपती या नावाने संबोधले जाते. राजे भोसले यांचे लढाईवरून नागपूरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा परंपरांची सुरुवात नागपूरात झाली व पुढे ही परंपरा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पसरली. भाद्रपद गणपती उत्सव त्यातील एक होय. आज ही परंपरा पूर्व विदर्भातील निलज बु सारख्या अनेक गावांमध्ये अस्तित्वात आहे. +मराठा साम्राज्याची सीमा अटके पासून कटकेपर्यंत पसरली होती असे आपण गर्वाने सांगतो. त्याच अटक ते कटक मधील कटक जिंकणारे पराक्रमी घराणे म्हणजे नागपूरचे भोसले. नागपूरकर भोसल्यांनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्रातील वऱ्हाडापासून पश्चिम बंगाल आणि ओडिशापासून उत्तर प्रदेशापर्यंत आपले साम्राज्य विस्तारले होते. हे एवढं मोठं विस्तीर्ण राज्य जिंकण्यासाठी नागपूरच्या शासकांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. अशाच एका पराक्रमी लढाईमुळे या हडपोक्या गणपतीची सुरुवात झालीय. इ. स. १७५५ मध्ये नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमनाबापू हे बंगाल च्या स्वारीवर होते. बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना कुळाचारी गणपती चे विसर्जन झाले होते. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाही. त्यावेळी राजपुरोहित व अन्य विद्वानांसोबत चर्चा  करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थी (भाद्रपद संकष्टी चतुर्थी) ला गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले, आणि त्यासोबत बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या आनंदोत्सव सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. लावण्या, नकला, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनेक गंमत जमतीचे कार्यक्रम होत असत त्यात थट्टा-मस्करी इत्यादींचा भडीमार होत असत आणि मस्करी चा अपभ्रंश होऊन 'मस्कऱ्या' हे स्थानीय बोलीभाषेतील नाव प्रचलित झाले आणि हा गणपती ला  'मस्कऱ्या गणपती' नावाने सुद्धा प्रसिद्ध झाले. असे म्हणतात की, लोकमान्य टिळकांनी ह्याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद गणपती उत्सव सार्वजानिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. आजही मस्कऱ्या गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे असेच आहे. मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील ३५ वर्षांपेक्षा जुनी मस्कऱ्या गणपतीची परंपरा पाहिल्यास भोसलेकालीन मस्कऱ्या गणपतीची आठवण होते. या गणपती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत गावातील या गणपती उत्सवाला आयोजित करणारी मंडळी बदलली; पण परंपरा मात्र कायम आहे. +आजही 'हाडपक्या गणपती' उत्सवाचा मुख्य सोहळा नागपूरातील सिनियर भोसले राजवाडा, महाल येथे आयोजित करण्यात येतो. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांचे काळात हाडपक्या गणपती ची १२ हाताची,२१ फूट उंच मूर्ती स्थापन केली जात होती. आता सुद्धा त्याच प्रकारची मूर्ती स्थापन करण्यात येते. लावण्या, पोवाडे, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते. नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो.या दरम्यान भव्य महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. भाद्रपद कृष्ण द्वादशी ला गणपती उत्सवाची सांगता होऊन हाडपक्या गणपतीचे विसर्जन करण्यात येते. +मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावात ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून अनंत चतुर्दशी नंतरच्या मस्कऱ्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. तालुक्यातील निलज बु. हे जवळ-जवळ तीन हजार लोकसंख्येच गाव आहे. विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती हालकीची होती. गावात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. अशात गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे पैशाचा नाहक अपव्यय. गावाच्या बाजूला देव्हाडा बु. येथे वैनगंगा साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. कारखान्यातील वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. उभा उत्सवात निलज बु. येथील नागरिक सहभागी व्हायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर गावातील काही युवकांना आपल्याही गावात गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना आली; पण, कारखान्यातील गणेशोत्सवाच्या तुलनेत आपला उत्सव कमी पडण्याची न्यूनगंडाची भावना त्यांच्या मनात आली. यावर उपाय म्हणून त्यांनी अनंत चतुर्दशीनंतर गणपती स्थापन करू असे ठरविले. थोरा-मोठ्यांशी चर्चा करून गावात मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. १९८३ पासून गणपती विराजमान झाले. १९८३ सालीचा निलज बु. येथील प्रथम गणपती स्व. कवडू बडगे यांच्या अंगणात स्थापन करण्यात आले. पुढे पाच वर्षे ही परंपरा अविरत चालू होती. पण, नंतर मस्कऱ्या गणपतीला तीन वर्षांचा खंड पडला. नंतर गावातील काही युवकांनी १९९१ सालपासून पुढाकार घेऊन मोडलेली परंपरा पुन्हा सुरू केली व ही परंपरा जोपासत आहेत. मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळाचे पूर्व सदस्य धनवर बडगे सांगतात की, त्यावेळी आम्ही ५१ रुपयांची गणपतीची मूर्ती स्थापन केली होती. गावातील लोकांनी दिलेल्या वर्गणीतून १२०० रुपये गोळा केले होते. यातून १० दिवसांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा केला होता. मागच्या दोन वर्षांच्या कोरोना काळात मस्कन्या गणपती स्थापन करून उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला होता. नागपूरच्या शासकांनी सुरू केलेल्या बाकी उत्सवांप्रमाणेच या गणेशोत्सवाला सुद्धा पूर्व विदर्भातील लोकांनी आपलंस केलंय. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते आणि थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.[१] +मस्कऱ्या गणपतीच्या निमित्ताने गावात रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, संगीत नाटक, तमाशा, कव्वाल्या, भजन, कीर्तन, विविध प्रकारची मैदानी खेळ इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पूर्वी तर मस्कऱ्या गणपतीच्या या कार्यक्रमात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्याथ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. +https://www.esakal.com/vidarbha/tradition-mascarya-ganeshotsav-nilaj-35-years-345029 diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3348.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dc41755916ccc4eca906d705a5ed2ce36005a3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3348.txt @@ -0,0 +1,2 @@ +मस्त कलंदर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3365.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd2a120151eba533e9e6529c494ca6cc124e4c90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3365.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिहादी जॉन उर्फ महंमद इमवाझी उर्फ अबू मुहारिब अल मुहाजिर हा आयसिसचा प्रमुख दहशतवादी होता. तो उत्तम इंग्लिश बोलत असे. तो आपला चेहरा नेहमी झाकलेला ठेवत असे व अनेक ओलिसांना मारल्याच्या व्हिडिओत तो नखशिखांत काळ्या कपड्यांत दिसला आहे, त्याचे डोळे व आवाज तसेच चाकू हातात धरण्याची पद्धत ही वेगळी वैशिष्ट्ये होती. +जिहादी जॉन हा मूळचा ईशान्य अरबस्तानातला होता. तो तरुण वयात परिवारासह लंडनला आला, तेथे त्याने मूलतत्त्ववादी प्रशिक्षण सुरू केले. नंतर २००९ मध्ये तो टांझानियाला गेला. पूर्व आफ्रिकेतील देशांत तो सफारीवरही गेला होता पण तेथे त्याला पकडण्यात आले. ब्रिटनमध्ये त्याला २०१० मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. सुटका झाल्यावर तो २०१२ मध्ये सीरियात गेला व आयसिसमध्ये सामील झाला. नंतर त्याने लोकांचे अपहरण करून त्यांचे शिरच्छेद केले व त्याची चित्रणे जाहीर केली. त्यामुळे जिहादी जॉनने नाव घेतले की म्हणजे लोकांच्या मनात धडकी भरत असे. २०१४ मध्ये तो जेम्स फोली या अमेरिकी पत्रकाराला धमकावतानाची पहिली चित्रफीत आली होती. फोलीचा त्याने शिरच्छेद केला होता. अमेरिकी पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफ, ब्रिटिश कार्यकर्ता डेव्हिड हेन्स, अलन हेनिंग, अमेरिका कार्यकर्ता अब्दुल रहमान कासीग व जपानी पत्रकार केन्जी गोटो यांचा शिरच्छेदही जॉननेच केला होता. +अमेरिकेने नोव्हेंबर २०१५मध्ये सीरियातील रक्का येथे केलेल्या ड्रोन हल्ल्यात जिहादी जॉन ठार झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3390.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8915e9d2689196eaa0faa4a58035e6b9eb2b359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3390.txt @@ -0,0 +1 @@ +महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून २००९ साली निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3393.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77cfa3d8fafef74e8cb8945e548562640644f7bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3393.txt @@ -0,0 +1,9 @@ +मीर महबूब अली खान ([[१९ ऑगस्ट १८६९ - २९ ऑगस्ट १९११) हे हैदराबाद संस्थान सहावे निज़ाम होते. [१] +अफ़ज़ल उड़ दौला-असफ जहां व्ही। तो फक्त 2 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला ।[२] +असे म्हटले होते की सापाने चाव्याद्वारे त्याला बरे करण्याची शक्ती दिली आहे। त्यांच्या आदेशानुसार, जर सार्वजनिक लोकांपैकी कोणाला सर्पदंश असेल तर ते त्याच्याकडे येऊ शकतील. परिणामी त्याला झोपेतून अनेक वेळा जागृत करण्यात आले। [३] +(ribbon bar, as it would look today) + + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3399.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9397327f3c5dc24b749011fc55145679676736dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3399.txt @@ -0,0 +1 @@ +महबूबाबाद हे भारताच्या तेलंगणा राज्यातील महबुबाबाद जिल्ह्यातील शहर आणि महबूबाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे कृष्णा नदीच्या उपनद्यांपैकी एक असलेल्या मुनेरू नदीच्या पश्चिम तीरावर आहे. महबूबाबाद हे बय्यारम खाणींसाठी ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3415.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0579921c6a2be7779e9403cad4d76d23131818a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3415.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुराद (ओस्मानी तुर्की: مراد خامس‎; २१ सप्टेंबर, इ.स. १८४०:इस्तंबूल, तुर्कस्तान - २९ ऑगस्ट, इ.स. १९०४) हा ओस्मानी सम्राट होता. +हा ३० मे ते ३१ ऑगस्ट, इ.स. १८७६ या तीन महिन्यांसाठी सम्राटपदावर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3486.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c628f6570979846013d7ac70926b7398f5d37e0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3486.txt @@ -0,0 +1 @@ +महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केल्यास महसुली तुट समजते.महसुली तुट = महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च होय. महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करेत्तर उत्पन्न याचा समावेश होतो.तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो.एकीकडे कमी करसंकलन तर दुसरीकडे प्रचंड प्रशासकीय व वित्तीय खर्च यामुळे महसुली तूट नेहमी जास्त राहते ,महसुली खर्चात सर्वाधिक खर्च अनुदानावर होतो . diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3495.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df2230dd878503c11d42fcaa73ec08b65519dcbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3495.txt @@ -0,0 +1,2 @@ +महा शक्तिशाली हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_350.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb9189228952d1c090ed62c784308c938eedc90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_350.txt @@ -0,0 +1,4 @@ +भूकंप पुनर्वसन मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या भूकंप पुनर्वसन मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[१][२] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3506.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b541a6ba148216efeb0568a8b8e27b00bd9aad23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3506.txt @@ -0,0 +1 @@ +सुब्रमण्य भारती (११ डिसेंबर, १८८२ - ११ सप्टेंबर, १९२१) हे तमिळ साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि बहुआयामी विद्वान होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3510.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d15f45e08659f60bdcd02ead4bf3a8521808bba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3510.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाकाल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3551.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..306786aca2728f5ef1e4739b5c7c4dd8bc2b13c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3551.txt @@ -0,0 +1,11 @@ + +महाड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. +महाड तालुक्यात झुंजार चषक ही क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. १९९८पासून सुरू असलेली ही स्पर्धा सुरुवातीस अंडरआर्म स्वरूपात खेळली जायची. २०१०पासून या स्पर्धेत ओव्हरआर्म गोलंदाजी करावी लागते. +[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3556.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c4be266b9a7141a0a1d4f4562315e51e9cf7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3556.txt @@ -0,0 +1 @@ +महाडिक हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3573.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d4730dbe3940fa6ad467dc4f281dc5fc8e7813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3573.txt @@ -0,0 +1,8 @@ +महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली. + +umra yethil panditrao gulabrao deshmukh yanni 2006 la ttakalin mukyamntri vilasrao deshmukh and gurhmantri r.r.aaba patil yana bhetun tajyat mahatma gandhi tanttamukti abhiyan rabvinyasathi nivedan dile ann vinti kilee yawrun 2007 pasun rajyat he abhiyan chlu ahe tyala ata +HBP Panditrao Gulabrao Deshmukh from Umra Deshmukh started the Mahatma Gandhi Dispute Free Campaign in the state in 2007 by following up with the then Chief Minister Vilasrao Deshmukh and Deputy Chief Minister RR Patil Urpa Aba to make the state dispute free. Panditrao Deshmukh was a social worker, non-violent activist and inspirer of Warkari sect. He passed away on March 7, 2018. +Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan was established on 15th August 2007 by the Government of Maharashtra with the inspiration of late HBP Panditrao Gulabrao Deshmukh Umarekar. What is the objective of Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan in MPAC exam? If such a question was asked, the answer would be peace in the village, freeing the village police from patrol. +वाद झाल्यास तंटामुक्त गाव समितीसमोर वादींनी उभे राहायचे आणि वाद सामोपचाराने सोडवायचे असे याचे प्राथमिक स्वरूप आहे. ही संकल्पना महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारलेलि आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेवर तंटामुक्ती ग्राम ही संकल्पना उभी आहे. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजेत ही बाब यामध्ये अधोरेखित केली गेली आणि एकूणच शासकीय स्तरावर ही योजना सर्वांकश रीत्या राबवली गेल्यामुळे त्याला अद्भुत पूर्ण यश देखील मिळाले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री आर. आर. पाटील यांनी या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला +तंटामुक्त गावसाठी एक लाखाचा पुरस्कार दिला जात असे हा पुरस्कार २०१३ नंतर पाच लाख इतका करण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीत तंटामुक्त योजनेतील पुरस्कारांचा निर्णय होतो. +[[वर्ग:महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या गोष्टी /zia khan/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3575.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e44d3bdc5a727e43dcad5c3312c79359e33a6ce6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3575.txt @@ -0,0 +1 @@ +महात्मा गांधी पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित संस्थेला दिला जातो जीने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3596.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32de0eafa5b6cf4fcd3ea79ab60d4e28f9ae44c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3596.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +महात्मा फुले हा १९५४चा प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. +या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१] +(मुख्य लेख: ज्योतिराव फुले) +हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित बायोपिक आहे. फुले हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. एकोणिसाव्या शतकातील जन्मलेल्या फुले यांनी, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि इतरांसह मागास जातीतील जनतेच्या उन्नतीसाठी कार्य केले. ते महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते आणि त्यांनी जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. +21 डिसेंबर 1955 रोजी सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी (रजत कमल) पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती रौप्य पदक जिंकले.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3645.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14852eda95b21db0d2048af46fabc3633931ae86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3645.txt @@ -0,0 +1,3 @@ +महादेवभाई देसाई (जन्म : १ जानेवारी १८९२; - पुणे, १५ ऑगस्ट १९४२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. +देसाई महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते. +मुंबईत बोरीवली (पूर्व) भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3672.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa69711eddb2c437ac28363a76b4ef8fcfde9575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3672.txt @@ -0,0 +1,2 @@ +महादेववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3683.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee5311c54246b5fb7b3f54589291174900355e75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3683.txt @@ -0,0 +1,2 @@ +महान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3689.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d38dbda31c54fd94b5ea7df8da1baba8d24f704c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3689.txt @@ -0,0 +1 @@ +महान पठारांची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3692.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4310dcb6ed9d682b25350cb8033ec9ccea9b4656 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3692.txt @@ -0,0 +1 @@ +महानंदा नदी ही भारतातील बिहार व पश्चिम बंगाल राज्यातून वाहत पुढे बांगलादेशात जाणारी नदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3747.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f31aacf910ad55499dc49724306fe0ce8f77a199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3747.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाबाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_375.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3abbdff315ee0442f6608fa1a486a873316ba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_375.txt @@ -0,0 +1,7 @@ +भूत जोलोकिया किंवा भूत मिरची[२][३] (आसामीमध्ये:भूतान मिरची[४]), ही ईशान्य भारतात लागवड केली जाणारी एक विशिष्ट संकरित मिरचीची जात आहे.[५] [६] ही मिरची कॅप्सिकम चिनेन्स आणि कॅप्सिकम फ्रूटेसेन्सचे या दोन जातीचा संकर करून निर्माण केलेली आहे.[७] +२००७ मध्ये, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स ने भूत जोलोकिया ला जगातील सर्वात तिखट मिरची असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ही मिरची तत्कालीन टॅबॅस्को सॉसपेक्षा १७० पट जास्त तिखट ठरली होती. या मिरचीला दहा लाख स्कोव्हिल हीट युनिट्स (SHUs) (१०,०१,३०४ SHU) पेक्षा जास्त रेट दिले जाते. तथापि कालांतराने, सर्वात तिखट मिरची वाढवण्याच्या शर्यतीत, २०११ मध्ये 'त्रिनिदाद स्कॉर्पियन बुच टी मिरची' आणि २०१३ मध्ये 'कॅरोलिना रीपर'ने भूत जोलोकिया मिरचीला मागे टाकले.[८] +भूत जोलोकिया चा आसामी भाषेत शब्दशः अर्थ 'भूतानची मिरची' असा होतो. यातील भूत हा शब्द 'भूतान' या देशाचे नाव दर्शवतो, परंतु अनवधानाने भूत म्हणजे घोस्ट असा अर्थ गृहीत धरून हिला 'घोस्ट चिली' संबोधल्या जाऊ लागले.[९][१०][११][१२] +आसाममध्ये,[१३] या मिरचीला बिह झोलकिया (বিহ জলকীয়া) म्हणजे 'विष मिरची' म्हणूनही ओळखले जाते. आसामी भाषेत 'बिह' म्हणजे 'विष' आणि 'झोलोकिया' म्हणजे 'मिरची' असा अर्थ होतो. या नावावरून मिरचीची दाहकता लक्षात येते.[१४] +त्याचप्रमाणे, नागालँडमध्ये, या मिरचीला नागा जोलोकिया ('नागा मिरची') आणि भूत जोलोकिया असे म्हणतात.[१४] आसाम आणि मणिपूर सारख्या इतर प्रदेशांमध्ये हे नाव विशेषतः सामान्य आहे.[१४] या उपखंडातील इतर नावे सागा जोलोकिया, इंडियन मिस्ट्री चिली आणि इंडियन रफ चिली अशी देखील आहेत.[१४] +तेजपूर या आसामी शहराच्या नावावर तिला तेजपूर मिरची असे देखील म्हणतात.[१५] मणिपूरमध्ये या मिरचीला उमरोक[१६] किंवा ओ-मोरोक किंवा ट्री चिली असे म्हणतात. +ईशान्य भारतात, या मिरचीला किंग मिरची किंवा किंग कोब्रा मिरची म्हणून देखील ओळखले जाते; ज्यावरून मराठीत हिला राजा मिरची असे म्हटले जाते.[१७][१८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3752.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aeb0922c6205ea704fd36618d66816368f00c60f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3752.txt @@ -0,0 +1,79 @@ +महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[१] या ग्रंथाचे आधीचे नाव जयदिप असे होते. महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे. महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. +महाभारत हा स्मृतींच्या इतिहास श्रेणीमध्ये येतो. त्याला भारत असेही म्हणतात. जगातील हा साहित्यिक ग्रंथ आणि महाकाव्य हिंदू धर्माच्या मुख्य ग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ हिंदू धर्मातील पाचवा वेद मानला जातो. हा ग्रंथ साहित्यातील सर्वात अनोख्या ग्रंथांपैकी एक मानला जात असला तरी आजही हा ग्रंथ प्रत्येक भारतीयासाठी अनुकरणीय स्रोत आहे. हे काम प्राचीन भारताच्या इतिहासाची गाथा आहे. यामध्ये हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीता अंतर्भूत आहे. संपूर्ण महाभारतामध्ये सुमारे १,१०,००० श्लोक आहेत, जे इलियड आणि ओडिसीच्या ग्रीक कवितांपेक्षा दहापट जास्त आहे. +परंपरेने, महाभारताच्या लेखनाचे श्रेय वेदव्यासाला दिले जाते. त्याची ऐतिहासिक वाढ आणि रचनात्मक स्तर जाणून घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. महाभारताचा मोठा भाग बहुधा ख्रिस्तपूर्व ३रे शतक आणि इसवी सन ३ऱ्या शतकादरम्यान संकलित केला गेला होता, ज्यात सर्वात जुने संरक्षित भाग ४०० BC पेक्षा जुने नाहीत. महाकाव्याशी संबंधित मूळ घटना बहुधा ९व्या आणि ८व्या मधील आहेत. शतके. शताब्दी ई.पू. हा मजकूर गुप्त वंशाच्या सुरुवातीच्या काळात (इ.स. चौथे शतक) त्याच्या अंतिम स्वरूपात पोहोचला असावा. महाभारतानुसार, दंतकथा लहान २४,००० श्लोकांमध्ये विभागली गेली होती. आवृत्तीमधून विस्तारित केले आहे, ज्याला फक्त भारत म्हणतात. या कवितेचे लेखक वेद व्यास जी यांनी या अनोख्या कवितेमध्ये वेद, वेदांग आणि उपनिषदांची छुपी रहस्ये सांगितली आहेत. याशिवाय न्याय, शिक्षण, वैद्यकशास्त्र, ज्योतिष, युद्धशास्त्र, योगशास्त्र, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, कामशास्त्र, खगोलशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचेही तपशीलवार वर्णन या काव्यात केले आहे. +महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. आर्यभट्ट आणि इतर भारतीय गणितज्ञांनुसार महाभारत ई.स.पू. ३१३७ या वर्षी घडले. तसेच भारतीय कालगणनेचा स्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हा पासून-च्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. महाभारतातील युद्ध मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, शुभकृत नाम संवत्सर, बुधवार दि. ०५ ऑक्टोबर इ.स.पू. -३१३७ रोजी सुरू झाले. 'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महा-काव्याचा विषय कुरु प्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. +महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत. +महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जैथे सांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरुराजा कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय. +महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सात वेळा झाल्यावर आठव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या आठव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते +शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दशराज कोळ्याकडे गेेला. दशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला. त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले. +इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पांडू राज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला. +पुढे धृृृृतराष्ट्राचा गांधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पांडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला. +पांडू राजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पांडूला शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता.त्या पुत्राचे नाव कर्ण असे होते आणि तोच कर्ण होय. पांडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले. +पुढे वनात असतानाच पंडूने माद्रीशी संग केल्याने तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली. पाच पांडवांसह कुंती हस्तिनापुरास परत आली. +कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. +यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला हिडिंबा, अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेणुमती अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले. +महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे: +महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे. +या खेरीज काही तत्त्वचिंतक भीष्मोपदेश व विदुरोपदेश यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात. +मेनका, विश्वामित्र ऋषि +दुष्यंत, शकुंतला, भरत +शंतनू ,गंगा, मत्स्यगंधा/सत्यवती - देवव्रत/भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य +भगवान व्यास, पाराशर, पराशर +अंबा, अंबिका, अंबालिका +पंडू, कुंती, माद्री - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. पांडव, (यम, वायू, इंद्र अश्विनीकुमार) +धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, दुःशीला, दुर्धर, दुर्जय. युयुत्सु विकर्ण. कौरव, शकुनी +कृपाचार्य, विदुर +द्रोणाचार्य, कृपी - अश्वत्थामा +द्रुपद - द्रौपदी, शिखंडी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतु +विराट - उत्तर, कीचक +सुभद्रा - अभिमन्यु +उत्तरा - परीक्षित - जनमेजय +हिडिंब, बकासुर +हिडिंबा - घटोत्कच +उलूपी +एकलव्य, कर्ण +संजय, सुदामा, सात्यकी +चंद्रवंश +ययाती देवयानी शर्मिष्ठा - पुरू यदु यादव +शुक्राचार्य कच बृहस्पती +उग्रसेन - कंस +वसुदेव रोहिणी देवकी -बलराम कृष्ण +नंद यशोदा +पूतना कालिया नाग +राधा +रुक्मिणी सत्यभामा जांबवंती +भीष्मक रुक्मी +सांब प्रद्युम्न अनिरुद्ध +जांबवंत +बृहन्नडा सैरंध्री +दारूक +देवदत्त गांडीव +वसिष्ठ ऋषि अरुंधती +धौम्य ऋषि +भारद्वाज ऋषि +अष्टावक्र +दुर्वास ऋषि +हनुमान +जरासंध, शिशुपाल +जयद्रथ, कालयवन +हस्तिनापुर, ऋषिकेश, इंद्रप्रस्थ, गांधार, मगध, वृंदावन, मथुरा, द्वारिका, द्वारका +संकेत सूची: +टीपा +पुणे शहरातल्या प्रसिद्ध "भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर"ने काही वर्षांपूर्वी काही विद्वानांच्या खूप संशोधनानंतर महाभारताची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यावेळी, एम. आर. यार्दी यांचा महाभारतासंबंधी एक इंग्रजी ग्रंथही त्या संस्थेने प्रकाशित केला. (रामायण आणि गीता ह्यांविषयीसुद्धा यार्दींनी ग्रंथ लिहिले आहेत.). यार्दींच्या महाभारतासंबंधी संशोधनातले काही ठळक मुद्दे असे : +सुमारे ३,००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जे एक मोठे युद्ध घडले त्याचे त्या युद्धानंतर लवकरच व्यासऋषींनी "जय" नावाच्या ग्रंथात त्याचे वर्णन केले. व्यासांच्या पश्चात सुमारे ५० वर्षांनंतर वैशंपायनऋषींनी "जय"मधले त्या युद्धाचे वर्णन स्वतःची भर घालून "भारत" नावाच्या एका ग्रंथात सादर केले. सुमारे ५०० वर्षांनंतर सुत आणि सौति ह्या पिता-पुत्रांनी "भारता"त भर घालून "महाभारत" तयार केले. त्यानंतर सुमारे २५० वर्षांनी कोणी "हरिवंश"काराने आणि मग १०० वर्षांनी कोणी "पर्वसंग्रह"काराने महाभारतात आणखी भरी घातल्या. +"पर्वसंग्रह"कारर्निर्मित महाभारतात ८१,६७० श्लोक आहेत. त्यांपैकी मूळच्या "जय"मधले श्लोक सुमारे ८,८००; वैशंपायनऋषींनी भर घातलेले सुमारे १२,३६२; सुत आणि सौति पिता-पुत्रांनी प्रत्येकी भर घातलेले १७,२८४ आणि २६,७२८; "हरिवंश"काराने समाविष्ट केलेले ९,०५३; "पर्वसंग्रह"काराने समाविष्ट केलेले १,३६९; आणि "हरिवंश"कारानेच श्रीकृष्णचरित्र कथन करण्याकरता स्वतंत्रपणे घातलेले "हरिवंशा"चे ६,०७४ श्लोक आहेत +. +त्या काळी लोक श्रीकृष्ण देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे शिव ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा "हरिवंश"काराने "हरिवंशा"त प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या "हरिवंशा"तही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.) +वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्‌भगवद्‍गीता रचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य होती. +पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने ५० वर्षे खपून महाभारताची १९ खंडांची चिकित्सक आवृत्ती १९६६ साली काढली. तत्पूर्वी चिं.वि. वैद्य यांनी १९१७ साली मराठी महाभारताचे १८ खंड आणि उपसंहाराचा १९वा खंड लिहून प्रकाशित केले होते. +महाभारतातील पृथ्वीचे भौगोलिक संदर्भ:- +महाभारतात भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थानांचे संदर्भ पण येतात. उदा० चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तमधिल नील नदी, लाल समुद्र तसेच याशिवाय महाभारतातील भीष्म पर्वातील जंबुखंड-विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले गेले आहे. ते असे:- +सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः || +यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले || द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशेच शशो महान् +अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’ आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते. +महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो. +महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :- +आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं +द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् । +लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌ +पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3757.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40902732aab7c87a5abbf05ac6f51957098a6aee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3757.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. ९४ भाग हिंदी मालिकेत डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान मूळ धाव झाली. हे बी.आर. चोप्रा यांनी निर्मित केले होते आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते. व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली. हेच शीर्षकगीत गायले गेले आणि गायक महेंद्र कपूर यांनी सादर केलेले श्लोक. शीर्षक गीता नंतर भारतीय आवाज-कलाकार हरीश भीमानी यांनी एका काळातील व्यक्तिरेखेचे ​​कथन केले, त्यातील सद्य परिस्थितीचा तपशील आणि त्या भागातील सामग्रीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. टेलिव्हिजनसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.महाभारत कथा भाग दुसरा - बर्बरीक आणि वीर बब्रुवाहन यांची कथा ही एक स्पिन ऑफ मालिका होती ज्यात महाभारतातून काही भाग बाकी होते. +१. नितीश भारद्वाज द्वारकाधीश भगवान श्री कृष्णा, भगवान विष्णू / देवकी-वासुदेव यांचा लहान मुलगा / नंद आणि यशोदाचा पुत्र , राधाचा पत्नी, बलाराम आणि सुभद्राचा भाऊ / पांडव यांचे चुलत भाऊ, रुक्मिणी यांचे पती.    +२. किशोर शहा किशोरवयीन कृष्णा म्हणून +३.चक्रवर्ती सम्राट धरमराज युधिष्ठिर म्हणून गजेंद्र चौहान, कुंतीचा मुलगा पहिला पांडव / यम / कुरु कुळचा मुलगा / इंद्रप्रस्थांचा राजा आणि नंतर हस्तिनापुरा / द्रौपदीचा पती   +४. तरुण युधिष्ठिर म्हणून सोनू +५. प्रवीण कुमार म्हणून कुंतीपुत्र भीम, कुंतीचा दुसरा पांडव / कुरू कुळचा मुलगा / वायु / इंद्रप्रस्थचा युवराज (मुकुट प्रिन्स) द्रौपदीचा पति / हिडिंबी / घटोत्कचा पिता +६. अर्जुन कुंतीपुत्र अर्जुन, तिसरा पांडव / कुंतीचा मुलगा आणि इंद्र / द्रौपदीचा उल्लू, आणि सुभद्रा / बलराम-कृष्णाचे भाऊ / अभिमन्यूचे वडील   +७. अंकुर जावेरी युवा अर्जुन म्हणून +८. नकुल म्हणून समीर चित्रे, चतुर्थ पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमारारा / द्रौपदीचा नवरा +९. संजीव चित्रे सहदेव म्हणून पाचवा पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमार / द्रौपदीचा नवरा +१०. रूप गांगुली सम्राग्णी यज्ञसेनी द्रौपदी या नात्याने, सर्व पांडवांची पत्नी / पंचली / यज्ञसेनी / द्रुपदची छोटी मुलगी / पंचलाची राजकन्या / धृष्टद्युम्ना आणि शिखंडी यांची बहीण +११. आलोक मुखर्जी, सुभद्रा म्हणून अर्जुनची दुसरी पत्नी / अभिमन्यूची आई / वासुदेव यांची मुलगी / कृष्णा-बलारामची बहीण / यादव राजकुमारी +१२. धर्मेश तिवारी, कुलगुरू कृपाचार्य diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3772.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27e85ee0b88c7f1fb48be80c7c796da3a35cbf47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3772.txt @@ -0,0 +1 @@ +महामने उस्माने (जानेवारी २०, इ.स. १९५० - ) हा नायजरचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा १६ एप्रिल, इ.स. १९९३ ते २७ जानेवारी, इ.स. १९९६पर्यंत सत्तेवर होता. लष्करी उठावात पदच्युत झालेला उस्माने त्यानंतर विरोधीपक्षनेता होता. हा डिसेंबर १९९९ ते मे २००९ पर्यंत नायजरच्या संसदेचा सभापती होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3784.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aba81529376121a55172baa57fbd8e8c76354c71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3784.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाली साहित्यातील सुत्तासाठी महापरिनिब्बाण सुत्त पहा. +निर्वाण सूत्र किंवा महपरिनिर्वाण सूत्र (चिनी: Nièpán Jīng (涅槃經); जपानी: Nehankyō (涅槃経); तिबेटी प्रमाणभाषा: myang 'das kyi mdo) हे महायान बौद्धमताच्या प्रमुख सूत्रांपैकी एक आहे. बौद्ध धर्मसाहित्यातील पाली भाषेतील महापरिनिब्बान सुत्ताशी त्याचे नामसाधर्म्य असले तरी स्वरूप व घटकांच्या बाबतीत या दोहोंमध्ये मोठे फरक आहेत. म्हणूनच नेहमी त्याचा निर्देश महायान महापरिनिर्वाण महा-सूत्र असा किंवा सुटसुटीतपणे "निर्वाण सूत्र" असा केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3789.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff209340c1e978f04a91b082b75a66190ddfcc08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3789.txt @@ -0,0 +1 @@ +महारकुंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3796.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f58d5a7e4093432070ffe76dd081615fbc48bb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3796.txt @@ -0,0 +1,3 @@ +क.सा. पदार्पण: २७ जून, १९३६ +शेवटचा क.सा.: १५ ऑगस्ट, १९३६ +दुवा: [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_38.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_38.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c2d9c84418f9709c85f30dc3aa40c3a24d543f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_38.txt @@ -0,0 +1,11 @@ + +भिवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +भिवगडाचा किल्ला हा भिवसेन कुआरा म्हणूनही ओळखला जातो. दुर्गम भागातील भिवगड हा नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यामध्ये आहे. पारशिवणी तालुका नागपूरच्या उत्तरेला आहे. या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामधून पेंच नदी वाहते. पेंच नदीवर बांधलेल्या धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे हा परिसर दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या फुगवट्याच्या काठावर असलेलया उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. भिवगडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून त्या भागात जास्त प्रसिद्ध आहे. +नागपूरकडून दोन तीन मार्गाने भिवगडला जाता येते. नागपूर-कामठी मार्गे - पारशिवनी भिवसेन हा एक मार्ग असून दुसरा मार्ग नागपूर सावनेर खापा, कोथूनी मार्गे भिवसेन गाठता येते. +भिवगडाच्या पायथ्याला भिवसेन कुआरा हे स्थान आहे. हे स्थान धार्मिक स्थळ आहे. येथे एप्रिल महिन्यात मोठी यात्रा येथे भरते. यात्रेमध्ये सर्वकाही येथे उपलब्ध होते. + +मंदिराच्या जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर भिवगडाचा किल्ला आहे. याच्या छोट्याशा माथ्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून मार्ग आहेत. किल्ल्याच्या पूर्वबाजूला पाण्याचा वेढा आहे तर पश्चिम बाजूला जंगलाचा वेढा आहे. +पाण्यामध्ये एका महालाचे अवशेष दिसतात. नावेमधून तेथे जाता येते. पावसाळ्यात त्याचा पहिला मजला पाण्याखाली असतो. पाणी कमी झाल्यावर चालतही तेथपर्यंत जाता येते. +या महालाला दोन मजले आहेत. खालच्या मजल्यामध्ये तीन खोल्या असून त्यांची प्रवेशद्वारे अगदी लहान आहेत. एका खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. वरच्या मजल्यावरून धरणाचा परिसर आणि किल्ला न्याहाळता येतो. या वास्तुला स्थानिक लोक राणीचा महाल म्हणतात. +महालाकडून भिवगडाच्या डोंगराकडे जाता येते. इकडून साधारण दोनशे मीटरची चढाई आहे. भिवगडाची तटबंदी ही रचिव दगडांची आहे. त्यातच एक खिडकीवजा दरवाजातून आपण गडात प्रवेश करतो. गडाच्या दक्षिण भागात रचिव दगडांची तटबंदी बांधलेली असून त्याला रचिव दगडांचा बुरुजही आहे. प्रवेशद्वार मात्र नष्ट झालेले आहे. गडावरील पाण्याची टाकी मात्र बुजलेली आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_380.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11e6612d5dee6f7740dc91dac071358c5b83b194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_380.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भूतनाथ हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3804.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7efb19861d03eec6a21e69754e82437d953bba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3804.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख महाराजगंज जिल्ह्याविषयी आहे. महाराजगंज शहराविषयीचा लेख येथे आहे. +महाराजगंज जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र महाराजगंज येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_382.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30da752131445dddc1ad870b6ae874244a65b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_382.txt @@ -0,0 +1,2 @@ +भूतनाथ रिटर्न्स हा २०१४ चा भारतीय हिंदी-भाषेतील अलौकिक विनोदी चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे आणि भूषण कुमार निर्मित आहे.[१] २००८ मधील भूतनाथ या चित्रपटाचा सिक्वेल, हा चित्रपट भूतनाथ (अमिताभ बच्चन) भोवती फिरतो ज्याची भूतवर्ल्डमध्ये टिंगल केली जाते कारण ते मुलांना घाबरवण्यास असमर्थता म्हणून स्वतःला सोडवण्यासाठी पृथ्वीवर परत पाठवण्याआधी. हा चित्रपट ११ एप्रिल २०१४ रोजी प्रदर्शित झाला.[२][३][४] +भारताच्या निवडणूक आयोगाने भूतनाथ रिटर्न्ससाठी करमुक्त दर्जाची मागणी केली, असे सांगून, "राज्य सरकारांनी चित्रपटातून निर्माण होणाऱ्या भक्कम सामाजिक संदेशाला पाठिंबा द्यायला हवा. या चित्रपटाला करमुक्त दर्जा दिल्याने मतदारांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता येईल. मतदार ओळखपत्र किंवा मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून न मानता."[५] उत्तर प्रदेश सरकारने ३० एप्रिल २०१४ रोजी चित्रपटाला करमुक्त दर्जा घोषित केला आहे. भूतनाथ रिटर्न्स: द गेम, व्रुवी (हंगामा आणि गेमशास्त्राचा संयुक्त उपक्रम) द्वारे विकसित केलेला एक निवडणूक मोबाइल व्हिडिओ गेम देखील चित्रपटासाठी एक टाय-इन आयटम रिलीज करण्यात आला.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3833.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..075f4e7672ecebb29c3af0d5b5c670eb3045248f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3833.txt @@ -0,0 +1,54 @@ +१८° ५८′ १२″ N, ७२° ४९′ १२″ E +महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते.पंढरपुर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.या राज्याला खुप मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग खुप आहे. +महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महाराष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[१] चक्रधर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.[२] +या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास +महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. +महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते. +महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे. +त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. +१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली. +शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले. +इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. +महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते. +या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ +ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. +अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत. +महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. +या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. +भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. +महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. +भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता प्रस्थापित झाली आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. +या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे +महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. +भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). +२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे. +हेसुद्धा पहा +महाराष्ट्रातील तालुके +राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.) +सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ]. +राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. +एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो. +मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत. +कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत. +महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (किमी२) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता. +मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. +महाराष्ट्रामधील धर्म (२०११ नुसार)[३] +राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत. +सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.[४] +महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली. +मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा, कलर मराठी, झी मराठी, स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात. +महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते. +मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. +त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे " कोळी ". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे. +भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत. +दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात. +स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते. +राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व दख्खनचे पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते. +भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात. +महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. छत्रपती संभाजीनगर, रत्‍नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत. +महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात. +धार्मिक +त्र्यंबकेश्वर, तुळजापूरची भवानी, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिरे, पंढरपूर येथील भगवान पांडुरंग मंदिर या मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू भाविक येतात.पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबाचे देवाचे खंडोबा मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेकरूंना आकर्षित करतात जेथे उपासक एकमेकांना भांडार (हळद पावडर) ची वर्षाव करतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी यांसारखी वारकरी संप्रदायाशी संबंधित ठिकाणे वर्षभर लोकप्रिय राहतात आणि धार्मिक निरीक्षणादरम्यान राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. +महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:- + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3851.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2afd27e19416b2ce5b74dee2d817ce25763e25ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3851.txt @@ -0,0 +1,6 @@ + +महाराष्ट्र कला रत्न हा सेलेब्स अँड गॉसिप ह्या मॅगझिनची स्वतःची निर्मिती असलेला टीव्ही रियालिटी शो आहे. + +सेलेब्स अँड गॉसिप[१], सिद्धकला मुव्हीज आणि एमआरएस स्टुडिओस ह्या तीन निर्मिती संस्था महाराष्ट्र कला रत्न ह्या रियालिटी शोची निर्मिती करीत आहेत. +महाराष्ट्र कला रत्न ह्या मराठी टीव्ही रियॅलिटी शोचे दिग्दर्शक सतीश गायकवाड असून मूळ संकल्पना आणि निर्माते अशी तिहेरी भूमिका ते सांभाळत आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3857.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..768646296b6cfcccbcbaaba894d93dbffd343652 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3857.txt @@ -0,0 +1,13 @@ + +पूना नेटिव इन्स्टिट्यूशनने (आत्ताची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) महाराष्ट्र कॉलेजची स्थापना इ.स.१८९६ साली केली होती परंतु ब्रिटीशांच्या रोषामुळे हे कॉलेज इ.स.१८९९ मध्ये बंद करावे लागले. +सन १८९६ च्या जानेवारीत कॉलेजचा पहिला वर्ग कसबा पेठेत नाना हौदाजवळ असलेल्या देशमुख यांच्या वाड्यांत सुरू झाला. त्यावेळी कॉलेजचा स्टाफ खालीलप्रमाणे होता. +प्राचार्य विष्णू बळवंत गोखले - गणित व संस्कृतचे प्रोफेसर +रा.शिवराम महादेव परांजपे - संस्कृतचे प्रोफेसर +रा.विनायक रामचंद्र जालनापुरकर - गणिताचे प्रोफेसर +रा.नटेश आप्पाजी द्रविड - इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर +रा.कृष्णाजी हरि केळकर - इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर +रा.इंद्रस्वरूप मुनशी - पर्शियनचे प्रोफेसर +रा.वामन प्रभाकर भावे - लॅटिन व इतिहासाचे प्रोफेसर +हे महाविद्यालय स्थापन झाले त्यावेळी पुण्यात डेक्कन कॉलेज व फर्गुसन कॉलेज ही दोन कॉलेजेस होती. +संदर्भ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - हीरक महोत्सव स्मारक इतिहास ग्रंथ - १९३५ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3902.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bd59ca3c7637f273b3f0ce2e71e0a3df1ff0471 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3902.txt @@ -0,0 +1,637 @@ +बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे- +नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रशासकीय कार्यालय +१००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिसस्टेशन समोर ,पहाडगंज, +नवी दिल्ली – ११००५५ येथे आहे. या कार्यालयाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थांची परिचय सूचीची चवथी आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे. परिचय सूचीत विभिन्न संस्थांची नावे, पत्ते, फोन नंबर, पदाधिकारी, निवासी व्यवस्था याबद्दल माहिती दिली गेली आहे. परिचय सूचीची किंमत रु.२००/- (डिमांड ड्राफ्ट – बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या नावाने पाठवावा) किंवा, +परिचय सूचीसाठी +श्री. वसंत चांदूरकर ४७ बी-१ ए, गौतम नगर, भोपाळ ४६२०२३, मो. ०९९९३००६४८२, manishchandurkar@gmail.com +यांच्याकडे संपर्क करावा . +महाराष्ट्र मंडळ, +कचहरी रोड, महात्मा गांधी मार्ग, अजमेर, राजस्थान ३०५००१ +फोन - (०१४५) २६३२२०० - निवास सुविधा +श्री श्रीरंग समस्त महाराष्ट्रीय ज्ञाति समाज, अमरेली +द्वारा - दत्तात्रेय शं. वैद्य, तुळजाई, जिल्हा लायब्ररीमागे, अमरेली, गुजरात ३६५६०१ +महाराष्ट्र लोकसेवा मंडळ, +टिळक स्मारक भवन, ऑफ जी. टी. रोड, अलोपीबाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६ +दूरध्वनी - (०५३२) २६६७४११ - निवास सुविधा +अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ, +प्रयाग महाराष्ट्र भवन, गोपाळ मंदिर, ११२, मीरागल्ली, दारागंज रेल्वे स्थानकसमोर, दारागंज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६ +महाराष्ट्र समाज, +खरे कॉम्लेक्स, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, अशोकनगर, +मध्यप्रदेश ४७३३३१. +फोन - (०७५४३) २२०६८० +महाराष्ट्र मंडळ, +मराठी प्राथमिक शाळा, बडे मंदिराजवळ, इटारसी, +मध्य प्रदेश ४६११११ +(०७५७२) २३४४८८ +मराठी समाज, +लोहामंडी स्कूलच्या बाजूस, ३१, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००१; +(०७३१) २४४६१३२ - निवास सुविधा +सानंद न्यास, +४१७, ट्रेड हाऊस, १४/३, साऊथ तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००१; फोन - (०७३१) २५१६१६२ +महाराष्ट्र साहित्य सभा, +६९८, म. गांधी मार्ग, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००७, +फोन - (०७३१) २५३६२७७ +श्री अहल्योत्सव समिती, +अहल्या स्मृती सदन, २१, प्रिन्स यशवंत रोड, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००२ +महाराष्ट्र ब्राह्मण सभा, +५९, देवी अहल्या मार्ग, जेल रोड, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००७, फोन +(०७३१) २५३६२७७ +महाराष्ट्र विकास मंडळ, +‘तृप्ती’, जे - १५०, रविशंकर शुक्लनगर, एल. आय. जी. कॉलनी, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००८, +फोन(०७३१) २५७०४९० +महाराष्ट्र मंडळ, +७० बी, वैशालीनगर, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२००९, +मेघदूत महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - प. दि. मुळ्ये, स्कीम नं. ७४, प्लॉट नं. ए. डी. ३९७, विजयनगर, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२०१०, +फोन (०७३१) २५५००७० +आपले वाचनालय, +११ बी, राजेंद्रनगर, इंदूर, +मध्य प्रदेश ४५२०१२, +(०७३१) २३२११९२ +महाराष्ट्र समाज +मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर ४५२०१२, +फोन (०७३१) २३२१०२७ +महाराष्ट्र समाज, +टिळक स्मृती मंदिर, ४९, क्षीरसागर, उज्जैन, +मध्य प्रदेश ४५६००१ +(०७३४) २५५६२८४ +महाराष्ट्र मित्रमंडळ, +६७, एम. आय. जी., इंदिरानगर, आगरा रोड, उज्जैन ४५६००१ +श्री. अच्युतानंद गुरू आखाडा व्यायामशाळा +८ योगीपुरा, रामघाट, उज्जैन ४५६००१ +मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ +के-१८, ‘अस्मिता’, ऋषीनगर, उज्जैन ४५६००१ +महाराष्ट समाज, +३८४, भूपालपुरा, जोधपूर डेअरीजवळ, उदयपूर, राजस्थान ३१३००१ - निवास सुविधा. +श्री संत ज्ञानेश्‍वर माउली मराठी साहित्य मंडळ, +द्वारा - श्री तिरुमला उच्च प्राथमिक विद्यालय, बसवण्ण गल्लीच्या बाजूला, औराद (बा.), +जि. बिदर ५८५३२६ +महाराष्ट्र समाज, +श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश ४५५३३२ +माय मराठी मंडळ, करनाल, हरियाणा. +अध्यक्ष – डॉ. शंकर मोहन शेटे +shankarshete1923@yahoo.co.in +महाराष्ट्र मंडळ, +१५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. +फोन (०३३) २४७५४५३२ +महाराष्ट्र निवास, +१५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. +फोन (०३३) २४७५००७१ - निवास सुविधा. +महाराष्ट्र मंडळ, +१०/४२८, खलासी लाईन, कानपूर, उत्तर प्रदेश २०८००१ +दूरध्वनी - (०५१२) २५२५७०० - ७० जणांसाठी निवास सुविधा. +महाराष्ट्र मंडळ, कोइम्बतूर. +महाराष्ट्र समाज, +डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१ +नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, +द्वारा घ. वा. गोखले, १/ई-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५ +महाराष्ट्र मंडळ, +गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, +हाटकेश्‍वर रोड, खांडवा, +मध्य प्रदेश ४५०००१ +(०७३३) २२४९१११ +आर्य महिला समाज, +वामनराव देव मार्ग,खांडवा ४५०००१ +महाराष्ट्र समाज, +चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, +मध्य प्रदेश ४७०११७ +महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - दत्तात्रेय खोत, न्यू ॲपोस्टॉलिक चर्चच्या मागे, गांधीनगर, अबू रोड, राजस्थान ३०७०२६८ +महाराष्ट्र समाज +सेक्टर २१/३०, बसस्टॅंडजवळ, गांधीनगर, गुजरात ३८२०२१. +महाराष्ट्र मंडळ +गणेश भवन, प्लॉट नं. ५८, सेक्टर-८, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ ३७०२०९ +फोन (०७९) २३२१२१४८ +महाराष्ट्र समाज, +गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, +मध्य प्रदेश ४७३००१ +फोन - (०७५४२) २२०४७१ - निवास सुविधा +मराठी साहित्य मंडळ +वल्लभभाई पटेल चौक, स्टेशन बाजार, +गुलबर्ग ५८५१०२. +फोन - (०८४७२) २३२२०७ +मराठा महासंघ, +मराठा भवन, न्यू राघवेंद्र कॉलनी, ब्रह्मपूर, +गुलबर्ग ५८५१०३ +फोन - (०८४७२) २२२९२९ +नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, +द्वारा - डॉ. अनिल माणके, माणके हॉस्पिटल, एल. आय. सी. रोड, गोधरा, जि. पंचमहाल, गुजरात ३८९००१. +फोन (०२६७२) २४३१२९ +मराठा हितकारिणी सभा, +शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, +द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१. +फोन (०७५१) २३२८०८३ +शारदोपासक मंडळ, +द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +महाराष्ट्र समाज, +जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९ +महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, +श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९ +सरस्वती संघ, +जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९. +फोन - (०७५१) २४२०५५१ +महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, +५ बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००६ +वनिता समाज, +लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +मराठी महिला मंडळ, +लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +अभिनव अभ्यास मंडळ, +द्वारा - अनिल कुंटे, इ - १०, तानसेन मार्ग, गांधीनगर - १, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +महाराष्ट्र ब्राह्मण सभा, +सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +फोन २३३०४४ +महाराष्ट्र समाज, +डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७५११० +महाराष्ट्र समाज, +श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश ४५५३३२ +माय मराठी मंडळ, करनाल, हरियाणा. +अध्यक्ष – डॉ. शंकर मोहन शेटे +shankarshete१९२३@yahoo.co.in +महाराष्ट्र मंडळ, +१५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. +फोन (०३३) २४७५४५३२ +महाराष्ट्र निवास, +१५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. +फोन (०३३) २४७५००७१ - निवास सुविधा. +महाराष्ट्र मंडळ, +१०/४२८, खलासी लेन, कानपूर, उत्तर प्रदेश २०८००१ +दूरध्वनी - (०५१२) २५२५७०० - ७० जणांसाठी निवास सुविधा. +महाराष्ट्र मंडळ, कोइम्बतूर. +महाराष्ट्र समाज, +डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१ +नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, +द्वारा घ. वा. गोखले, १/ई-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५ +महाराष्ट्र मंडळ, +गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, +हाटकेश्‍वर रोड, खांडवा, +मध्य प्रदेश ४५०००१ +(०७३३) २२४९१११ +आर्य महिला समाज, +वामनराव देव मार्ग,खांडवा ४५०००१ +महाराष्ट्र समाज, +चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, +मध्य प्रदेश ४७०११७ +महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - दत्तात्रेय खोत, न्यू ॲपोस्टॉलिक चर्चच्या मागे, गांधीनगर, अबू रोड, राजस्थान ३०७०२६८ +महाराष्ट्र समाज +सेक्टर २१/३०, बसस्टॅंडजवळ, गांधीनगर, गुजरात ३८२०२१. +महाराष्ट्र मंडळ +गणेश भवन, प्लॉट नं. ५८, सेक्टर-८, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ ३७०२०९ +फोन (०७९) २३२१२१४८ +महाराष्ट्र समाज, +गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, +मध्य प्रदेश ४७३००१ +फोन - (०७५४२) २२०४७१ - निवास सुविधा +मराठी साहित्य मंडळ +वल्लभभाई पटेल चौक, स्टेशन बाजार, +गुलबर्ग ५८५१०२. +फोन - (०८४७२) २३२२०७ +मराठा महासंघ, +मराठा भवन, न्यू राघवेंद्र कॉलनी, ब्रह्मपूर, +गुलबर्ग ५८५१०३ +फोन - (०८४७२) २२२९२९ +नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, +द्वारा - डॉ. अनिल माणके, माणके हॉस्पिटल, एल. आय. सी. रोड, गोधरा, जि. पंचमहाल, गुजरात ३८९००१. +फोन (०२६७२) २४३१२९ +मराठा हितकारिणी सभा, +शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, +द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१. +फोन (०७५१) २३२८०८३ +शारदोपासक मंडळ, +द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +महाराष्ट्र समाज, +जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९ +महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, +श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९ +सरस्वती संघ, +जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००९. +फोन - (०७५१) २४२०५५१ +महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, +५ बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००६ +वनिता समाज, +लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +मराठी महिला मंडळ, +लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +अभिनव अभ्यास मंडळ, +द्वारा - अनिल कुंटे, इ - १०, तानसेन मार्ग, गांधीनगर - १, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +महाराष्ट्र ब्राह्मण सभा, +सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७४००१ +फोन २३३०४४ +महाराष्ट्र समाज, +डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, +मध्य प्रदेश ४७५११०==भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (च ते झ)== +महाराष्ट्र मंडळ +प्लॉट नं. २४७, सेक्टर - १९ / डी, चंडीगढ १६००१९ +महाराष्ट्र मंडळ, +सी ८५, प्रदापनगर, चित्तोडगढ, राजस्थान ३१२००१. +फोन - ३०७०२६ +महाराष्ट्र मंडळ, +सी -८५, प्रतापनगर, चित्तोडगढ, राजस्थान ३१२००१ +फोन (०१४७२) २४२६११ +महाराष्ट्र मंडळ +६१, ई. व्ही. के. संपत रोड, व्हेपेरी, चेन्नई ६००००७ +फोन (०४४) २६६१८१२८ - निवास सुविधा. +श्री भवानी महाराष्ट्र मंडळ +महाराष्ट्र भवन, ३ महाराष्ट्र मार्ग, बेनीगंज, छतरपूर, +मध्य प्रदेश ४७१००१. +फोन - (०७६८२) २४३३८९ - निवास सुविधा +महाराष्ट्र भाषिक मंडळ +मार्ग नं. १७ प्लॉट नं. ७२८, शांतिनगर, दमोह नाका, जबलपूर ४८२००२ +आधारताल महाराष्ट्र समाज, +३१ न्यू रामनगर, आधारताल, जबलपूर ४८२००४ +महाराष्ट्र ब्रह्मवृंद समाज, +द्वारा - श्री राधाकृष्ण मंदिर, लार्डगंज, जबलपूर, +मध्य प्रदेश ४८२००२ +महाराष्ट्र हितकारी मंडळ +‘के’ रोड, बिस्टुपूर, जमशेदपूर ८३१००१. +फोन - (०६५७) २४२४०१६ +जयपूर महाराष्ट्र मंडळ, +महाराष्ट्र भवन, विनोबा मार्ग, सी स्कीम, अशोकनगर, जयपूर, राजस्थान +फोन ३०२००१. फोन (०१४१) २३६५८७२ - निवास सुविधा +महाराष्ट्र समाज, +डी - ३१, शास्त्रीनगर, जोधपूर, राजस्थान ३४२००३. +फोन (०२९१) २६१२३६० - निवास सुविधा +महाराष्ट्र समाज, +१२०१, नेहरू मार्ग, झाबुआ, +मध्य प्रदेश ४५७६६१ +महाराष्ट्र सांस्कृतिक एवम् सामाजिक संस्था, +द्वारा - अरुण गोगटे, इ. - २८३, आय. बी., खेतडीनगर, झुनझुनू, राजस्थान ३३५०४. +फोन (१५९२) २१४४ +श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, +टिमरनी, जि. होशंगाबाद, +मध्य प्रदेश ४६१२२८ +महाराष्ट्र समाज, +डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१ +गोमंतक मराठी भाषा परिषद, +‘सूरश्री’, ढवळी फोंडा, गोवा ४०३४०१. +फोन (०८३२) २३१४६७२ +नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, +द्वारा घ. वा. गोखले, १/इ-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५ +महाराष्ट्र मंडळ, +श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, +मध्य प्रदेश ४७०६६१. +फोन - (०७८१२) २२५०५७ +महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, +बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, +दूरध्वनी - (०११) २३६८२४१४ +महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, +बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, +दूरध्वनी - (०११) २३६७९००८, २३६७०५२० +दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, +नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली ११००५५. +दूरध्वनी - (०११) २३६७४१६५, २३५२८९१९ +पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, +बी-८०, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - २, +दिल्ली ११००९२ +दूरध्वनी - (०११) २२१५१२२८ +महाराष्ट्र मित्रमंडळ, +श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-२/ए, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८ +महाराष्ट्र परिचय केंद्र, +ए-८ स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, +बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१ +महाराष्ट्र समाज, +२/१, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, +मध्य प्रदेश ४५५००१ फोन - (०७२७२) २२३१४४ +मराठी सांस्कृतिक मंडळ, +३० एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, +मध्य प्रदेश ४५५००१ +महाराष्ट्र समाज +मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, +मध्य प्रदेश ४५४६६० +महाराष्ट्र परिचय केंद्र, +काकुले इमारत, दादा वैद्य रोड, पणजी ४०३००१. +श्री गजानन मंडळी +भद्र, पाटण - श्री गणेशवाडी, भद्र, पाटण, गुजरात ३८४२६५. +महाराष्ट्र मंडळ, +सर्पंटाइन रोड, दरोगा प्रसाद राय मार्ग, पटना, बिहार ८०००१ +श्री गणेश मंदिर, +सी सेक्टर, पिपलानी जिल्हा - भोपाळ) +महाराष्ट्र मंडळ, +बडी बस्ती, पुष्कर, राजस्थान ३०५०२२ - निवास सुविधा +श्री महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट +पोरबंदर - द्वारा - मीरा वॉच कंपनी, सुदामा चौक, पोरबंदर, गुजरात ३६०५७५, +बंगलोर महाराष्ट्र मंडळ, +२८, न्यू सेकंड क्रॉस, गांधीनगर, बंगलोर ५६०००९. +फोन (०८०) २२२६२१७६ - निवास सुविधा. +http://www.mmbangalore.org.in Archived 2018-06-23 at the Wayback Machine. +अध्यक्ष – स्मिता पोंक्षे +admin@mmbangalore.com +ब्राह्मण सभा, +सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा, गुजरात ३९०००१. +फोन (०२६५) २४१३८८४ +मराठी वाङ्‌मय परिषद, +३०६, सागरिका चेंबर्स, अमृत रसघरसमोर, दांडिया बाजार, बडोदा ३९०००१. +महाराष्ट्र मंडळ, +उद्धव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर, बडोदा ३९०००४. +पश्‍चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, +गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ, सुभानपुरा, बडोदा ३९०००७. +फोन (०२६५) २३४२६६६ +पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, +जे. बी. निंबाळकर, १९, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ, आजवा रोड, बडोदा ३९००१९ +कारेली बाग महाराष्ट्र मंडळ +३१, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा ३९००२२ +गोमंतक मराठी अकादमी, +मराठी भवन, आल्त पर्वरी, बार्देश, गोवा ४०३५२१. +महाराष्ट्र मंडळ, +पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगढ +रेल्वे महाराष्ट्र मंडळ, +रामदासनगर, बिलासपूर, छत्तीसगढ ४९५००१ +महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, +फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७ +श्री तुकाराम महाराज सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट, +२०१, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव ५९००३. +महाराष्ट्र मंडळ, +आर. जी. देशपांडे, एस. बी. आय. समोर, सिव्हिल लाइन्स, बैतुल ४६००१ +महाराष्ट्र समाज, +१६५४ - ए, सरदारनगर, भावनगर, गुजरात ३६४००२ +स्नेहसंवर्धक मंडळ, +प्लॉट नं. ११, डी. ॲव्हेन्यू, सेक्टर ६, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१ +मराठा मित्रमंडळ, +श्रीमॉंतुळजाभवानी मंदिर, कल्याण कॉलेजसमोर , प्लॉट ६-ए, स्टीट ५, सेक्टर ७, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१ +महाराष्ट्र स्नेहसंवर्धक मंडळ, +दुकान नं. ७, म्युनिसिपल शॉपिंग सेंटर, सरपट गेट, भुज ३७०००१ राजस्थान??? +महाराष्ट्र मंडळ, +सी-९, युनिट - ९, इपिकोल हाऊसच्या मागे, भुवनेश्‍वर ७५१००७. निवास सुविधा. +Bhubaneswar / भुवनेश्वर -२ +महाराष्ट्र मंडळ, भुवनेश्वर +अध्यक्ष – श्री विजय कुशारे +maharashtramandalorissa@yahoo.com +मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, +द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ. (२०१६ सालचे पदाधिकारी : नीला करंबळेकर( मोबाईल -९४२५० २८१०४)- अध्यक्ष; विद्या चौधरी- सचिव; घाणेकर- कोषाध्यक्ष) +मध्य प्रदेश ४६२००३, +फोन - (०७५५) २५५७२४१ +महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, +महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, +मध्य प्रदेश ४६२००३, +फोन - (०७५५) २७६५४०५ +मराठी सांस्कृतिक मंडळ, +गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, +मध्य प्रदेश ४६२०२१. +महाराष्ट्र मंडळ, +बी -९, जास्मिन पार्क अपार्टमेंट्स, पिंटोज लेन, कर्नाटक करंगलपाडी, +मंगळूर ५७५००३. +फोन - (0824) 2454732. +(President Prasad Kshirsagar (Rtd. IAS) 9448953723) +गोमंत विद्या निकेतन +पोस्ट ऑफिसजवळ, आबे द फारिया रोड, +मडगाव ४०३६०१ +निवास सुविधा. +महाराष्ट्र समाज +मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर ४५८००१ मध्य प्रदेश???? - निवास सुविधा +महाराष्ट्र समाज, +सौ. नमिता नवीन कर्णिक, ३१, बसस्टॅंड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, +मध्य प्रदेश ४५४४४६ +महाराष्ट्र समाज, +टिळक चौक, महू, +मध्य प्रदेश ४५३४४१- निवास सुविधा +भगिनी समाज, +द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, +मध्य प्रदेश ४५३४४१ +महाराष्ट्र समाज +द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, +मध्य प्रदेश ४७६००१. +श्री स्नेह मंडळ, +२९९२/१, श्रीपाद, वि. वि. मोहल्ला, थर्ड मेन, +म्हैसूर ५७०००२. +फोन - (०८२१) २५१३४७८. +श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, +टिमरनी, जि. होशंगाबाद, +मध्य प्रदेश ४६१२२८ +महाराष्ट्र समाज, +डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१ +गोमंतक मराठी भाषा परिषद, +‘सूरश्री’, ढवळी फोंडा, गोवा ४०३४०१. +फोन (०८३२) २३१४६७२ +नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, +द्वारा घ. वा. गोखले, १/इ-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५ +महाराष्ट्र मंडळ, +श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, +मध्य प्रदेश ४७०६६१. +फोन - (०७८१२) २२५०५७ +महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, +बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, +दूरध्वनी - (०११) २३६८२४१४ +महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, +बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, +दूरध्वनी - (०११) २३६७९००८, २३६७०५२० +दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, +नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली ११००५५. +दूरध्वनी - (०११) २३६७४१६५, २३५२८९१९ +पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, +बी-८०, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - २, +दिल्ली ११००९२ +दूरध्वनी - (०११) २२१५१२२८ +महाराष्ट्र मित्रमंडळ, +श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-२/ए, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८ +महाराष्ट्र परिचय केंद्र, +ए-८ स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, +बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१ +महाराष्ट्र समाज, +२/१, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, +मध्य प्रदेश ४५५००१ फोन - (०७२७२) २२३१४४ +मराठी सांस्कृतिक मंडळ, +३० एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, +मध्य प्रदेश ४५५००१ +महाराष्ट्र समाज +मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, +मध्य प्रदेश ४५४६६० +महाराष्ट्र परिचय केंद्र, +काकुले इमारत, दादा वैद्य रोड, पणजी ४०३००१. +श्री गजानन मंडळी +भद्र, पाटण - श्री गणेशवाडी, भद्र, पाटण, गुजरात ३८४२६५. +महाराष्ट्र मंडळ, +सर्पंटाइन रोड, दरोगा प्रसाद राय मार्ग, पटना, बिहार ८०००१ +श्री गणेश मंदिर, +सी सेक्टर, पिपलानी जिल्हा - भोपाळ) +महाराष्ट्र मंडळ, +बडी बस्ती, पुष्कर, राजस्थान ३०५०२२ - निवास सुविधा +श्री महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट +पोरबंदर - द्वारा - मीरा वॉच कंपनी, सुदामा चौक, पोरबंदर, गुजरात ३६०५७५, +बंगलोर महाराष्ट्र मंडळ, +२८, न्यू सेकंड क्रॉस, गांधीनगर, बंगलोर ५६०००९. +फोन (०८०) २२२६२१७६ - निवास सुविधा. +http://www.mmbangalore.org.in Archived 2018-06-23 at the Wayback Machine. +अध्यक्ष – स्मिता पोंक्षे +admin@mmbangalore.com +ब्राह्मण सभा, +सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा, गुजरात ३९०००१. +फोन (०२६५) २४१३८८४ +मराठी वाङ्‌मय परिषद, +३०६, सागरिका चेंबर्स, अमृत रसघरसमोर, दांडिया बाजार, बडोदा ३९०००१. +महाराष्ट्र मंडळ, +उद्धव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर, बडोदा ३९०००४. +पश्‍चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, +गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ, सुभानपुरा, बडोदा ३९०००७. +फोन (०२६५) २३४२६६६ +पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, +जे. बी. निंबाळकर, १९, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ, आजवा रोड, बडोदा ३९००१९ +कारेली बाग महाराष्ट्र मंडळ +३१, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा ३९००२२ +गोमंतक मराठी अकादमी, +मराठी भवन, आल्त पर्वरी, बार्देश, गोवा ४०३५२१. +महाराष्ट्र मंडळ, +पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगढ +रेल्वे महाराष्ट्र मंडळ, +रामदासनगर, बिलासपूर, छत्तीसगढ ४९५००१ +महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, +फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७ +श्री तुकाराम महाराज सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट, +२०१, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव ५९००३. +महाराष्ट्र मंडळ, +आर. जी. देशपांडे, एस. बी. आय. समोर, सिव्हिल लाइन्स, बैतुल ४६००१ +महाराष्ट्र समाज, +१६५४ - ए, सरदारनगर, भावनगर, गुजरात ३६४००२ +स्नेहसंवर्धक मंडळ, +प्लॉट नं. ११, डी. ॲव्हेन्यू, सेक्टर ६, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१ +मराठा मित्रमंडळ, +श्रीमॉंतुळजाभवानी मंदिर, कल्याण कॉलेजसमोर , प्लॉट ६-ए, स्टीट ५, सेक्टर ७, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१ +महाराष्ट्र स्नेहसंवर्धक मंडळ, +दुकान नं. ७, म्युनिसिपल शॉपिंग सेंटर, सरपट गेट, भुज (कच्छ-गुजराथ) ३७०००१ +महाराष्ट्र मंडळ, +सी-९, युनिट - ९, इपिकोल हाऊसच्या मागे, भुवनेश्‍वर ७५१००७. निवास सुविधा. +Bhubaneswar / भुवनेश्वर -२ +महाराष्ट्र मंडळ, भुवनेश्वर +अध्यक्ष – श्री विजय कुशारे +maharashtramandalorissa@yahoo.com +मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, +द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, +मध्य प्रदेश ४६२००३, +फोन - (०७५५) २५५७२४१ +महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, +महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, +मध्य प्रदेश ४६२००३, +फोन - (०७५५) २७६५४०५ +मराठी सांस्कृतिक मंडळ, +गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, +मध्य प्रदेश ४६२०२१. +महाराष्ट्र मंडळ, +बी -९, जास्मिन पार्क अपार्टमेंट्स, पिंटोज लेन, कर्नाटक करंगलपाडी, +मंगळूर ५७५००३. +फोन - (०८२४) २३२७३२. +(President Kishore M.Kakade +९४४९८५८६१८ ) +गोमंत विद्या निकेतन +पोस्ट ऑफिसजवळ, आबे द फारिया रोड, +मडगाव ४०३६०१ +निवास सुविधा. +महाराष्ट्र समाज +मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर ४५८००१ मध्य प्रदेश???? - निवास सुविधा +महाराष्ट्र समाज, +सौ. नमिता नवीन कर्णिक, ३१, बसस्टॅंड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, +मध्य प्रदेश ४५४४४६ +महाराष्ट्र समाज, +टिळक चौक, महू, +मध्य प्रदेश ४५३४४१- निवास सुविधा +भगिनी समाज, +द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, +मध्य प्रदेश ४५३४४१ +महाराष्ट्र समाज +द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, +मध्य प्रदेश ४७६००१. +श्री स्नेह मंडळ, +२९९२/१, श्रीपाद, वि. वि. मोहल्ला, थर्ड मेन, +म्हैसूर ५७०००२. +फोन - (०८२१) २५१३४७८.==भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)== +महाराष्ट्र समाज +श्री शारदा मंदिर ट्रस्ट, ११/१८९, स्टेशन रोड, रतलाम ४५७००१ मध्य प्रदेश +महाराष्ट्र मंडळ +द्वारा - उदय देशपांडे, एच-१८२, सेक्टर १५, राऊरकेला ७६९००३ +महाराष्ट्र मंडळ, +सुधाकर नाईक - काळे, ६४, सर्क्युलर रोड, रांची ८३४००१ +महाराष्ट्र मंडळ +११४, योगी टॉवर्स, मोटी टाकीजवळ, सदर, सुभाष रोड, राजकोट, गुजरात ३६००१. +फोन - (०२८१) २४८०३४० +महाराष्ट्र मित्रमंडळ, +८४/१६६, कटरा मकबुलगंज, लखनौ, +उत्तर प्रदेश २२६०१९, +दूरध्वनी - (०५२२) २२८१५७९ +महाराष्ट्र तरुण मंडळ, +७ दयानंद पथ, अस्पताल रोड, विदिशा, +मध्य प्रदेश ४६४००१ +महाराष्ट्र मंडळ, +९-२६-६, असिलमेट्टा, विशाखापट्टण ५३०००३. +फोन - (०८९१) २५५४७३१ +विशाखापट्टणम २ : +महाराष्ट्र मंडळ, +विशाखापट्टणम, पिन ?? +http://www.vizagcityonline.com +/MaharashtraMandal +(०८९१) २७५४७३१ +शुजालपूर महाराष्ट्र समाज, +द्वारा - घर नं. ११ वॉर्ड नं. १७, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, शुजालपूर मंडी, जि. शाजापूर, +मध्य प्रदेश ४६५३३३ +महाराष्ट्र समाज, +गणेश मंदिर, फिजिकल रोड, शिवपुरी, +मध्य प्रदेश ४७३५५१ +महाराष्ट्र समाज, +श्री दत्त मंदिर, चंपा बाग, लक्ष्मीपुरा, +सागर ४७०००२ मध्य प्रदेश??? +फोन - (०७५८२) २६८०८१ - निवास सुविधा +महाराष्ट्र मंडळ, +द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, +फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७ +महाराष्ट्र समाज, +चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, +मध्य प्रदेश ४७०११७ +महाराष्ट्र समाज +डी-४, देवभूमीनगर सोसायटी, ‘डी’ केबिन रोड, साबरमती ३८००१९ +महाराष्ट्र मंडळ, +पी. बी. देशपांडे, एन ६, एच. ए. एल., सुनाबेडा, कोरापुट डिव्हिजन, सुनाबेडा ७६३००२. +महाराष्ट्र मंडळ, +हरदा, मध्य प्रदेश ४६१३३१, +फोन (०७५७७) २२३१०० +हावडा महाराष्ट्र समाज, +४ जी. टी. रोड, गोलमोहर रेल्वे क्वार्टर, (द्वारा - सुधीर बापट, ९४, बी. एफ. साइडिंग युनिट - ६, शालिमार, हावडा ७१११०३. +महाराष्ट्र मंडळ, +४-१-८, टिळक रोड, रामकोट चौरस्ता, +हैदराबाद ५००००१. +फोन - (०४०) २४७५४०२९, २४७५९५४३ - निवास सुविधा +मराठी साहित्य परिषद, +आंध्र प्रदेश - ४-६-४५८, इसामिया बाजार, +हैदराबाद ५०००२७. +फोन - (०४०) २४६५७०६३. +भारत गुणवर्धक संस्था, +२३-५-९०२ /१, शालीबंडा, हैदराबाद ५०००६५. +फोन २४३८८८५० +साधना संघ, +द्वारा - के. बी. चिंचोळकर, ४-२-२२४, हेमंत मार्केट, सुलतान बाजार, हैदराबाद ५०००९५. +फोन (०४०) २४७५२३७८ +मराठी ग्रंथ संग्रहालय, +४-६-४५८, इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७ +१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१ च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. +बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३ चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५ चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3912.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d2818e9cd89fa1d5e7edb92c3b7c1c6d3f4c4e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3912.txt @@ -0,0 +1,6 @@ +यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. प्रा.संजीव सोनवणे हे सध्या (मे 2023साली) विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ. दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. हे विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले, त्यामुळे. अशा प्रकारच्या शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या. +देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले. +कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही संस्था जगभरातील ५३ कॉमनवेल्थ देशांच्या सरकारांनी १९८७ साली स्थापित केली. कॅनडाने या संस्थेचे यजमानपद स्वीकारले. शाश्वत व प्रगत विकासासाठी मुक्त व दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे नवे स्रोत निर्माण करणे व जगभरातील वंचीतांपर्यंत आधुनिक ज्ञानाचे भांडार पोचविणे हे उद्दिष्ट ठेवून ह्या संस्थेने अनेक माध्यमातून मुक्तशिक्षण संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यातून मुक्त शिक्षण पद्धतीचा दर्जा, क्षमता आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा विकास करण्याचे कौशल्य संस्थांमध्ये निर्माण झाले. परिणामी मुक्त व दूरशिक्षणाची चळवळ सक्षमपणे उभी राहिली. +अश्या ह्या संस्थेने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अवार्ड ऑफ इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे एका भव्य समारंभात हा पुरस्कार स्वीकारला (सप्टेंबर २०१९). ह्या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीने एकमुखाने प्रशंसा करताना या विद्यापीठाने अत्यंत अल्पावधीत तंत्रज्ञानाचा वापर करून लक्षावधी विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोचल्याचे पाहून आपण प्रभावित झाल्याचे नमूद केले आहे. +नाशिकच्या मुक्त विद्यापीठास सन्मानपूर्वक दिलेल्या मानपत्रात कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने पुढील मुद्द्यांचा उल्लेख करून प्रशंसा केली आहे :- + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3950.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b889a51193dde09fda2d4f621151ad50eb77d488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3950.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ हे दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील मंडळ आहे. याचे मुख्यालय पुणे येथे असून त्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे अखत्यारित चालते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3984.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65935707aaaaf0d124e0fffc317280b85ea26566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3984.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, (एमएनएलयू मुंबई, एमएनएलयूएम) हे मुंबई येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेले राज्यातील हे पहिले विद्यापीठ आहे. भारताच्या हे १८व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती शरद बोबडे आहेत, जे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू भवानी प्रसाद पांडा हे आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3993.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3fa48d8f70506665a72d7f360e4675b2ef7f421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3993.txt @@ -0,0 +1,20 @@ +महाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे उप अध्यक्षस्थान करतात. उप सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. सभापतींची त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष असतात. +२२ जुलै १९३७ - १६ ऑक्टोबर १९४७ +०२) शांतीलाल हरजीवन शहा +०५ मे १९५२ - १८ ऑगस्ट १९५५ +१९ ऑगस्ट १९५५ - २४ एप्रिल १९६२ +२१ जून १९६२ - २८ जुलै १९६८ +३० जुलै १९६८ - १३ जून १९७८ +०१ डिसेंबर १९७८ - २४ एप्रिल १९८४ +१२ जुलै १९८४ - ०७ जुलै १९८६ +०९) सूर्यमान रघुनाथ वहाडणे +१०) प्रा. नारायण सदाशिव फरांदे +११) वसंत शंकर डावखरे +१२) पसंत शंकर डावखरे +१३ जुलै २०१० - ०८ जून २०१६ +०५ ऑगस्ट २०१६ - २७ जुलै २०१८ +(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) +२४ जून २०१९ - २५ एप्रिल २०२० +(शिवसेना) +०८ सप्टेंबर २०२० - पासून +(शिवसेना) व (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3998.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a99c9814092d1f0811ffa873ed8e76a92211a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_3998.txt @@ -0,0 +1,5 @@ +भाजप (१०४) शिवसेना (४०) काँग्रेस (४३) राष्ट्रवादी (४१) शिवसेना उबाठा (१६) बविआ (३) एमआयएम (१)भारिपबम (१) मनसे (१) रासप (१) भाकप (१) अपक्ष (१३)शेकाप (१) +महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. +२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली. +नाना पटोले (२०१९-२०२२)राहुल नार्वेकर (२०२२-) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4011.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c8fbe5918de824422f9b478140368299542ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4011.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्राच्या सातव्या विधानसभेसाठी २ मार्च १९८५ रोजी २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने १६१ जागा जिंकल्या तर पुरोगामी लोकशाही दल या आघाडीचे १०४ आमदार निवडून आले होते. यामध्ये समाजवादी काँग्रेसचे ५५,जनता पक्षाचे २० , भाजपचे १६ व शेकापचे १३ आमदार होते. अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. +काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १० मार्च १९८५ रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे काँग्रेसने त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदी केली आणि ३ जून १९८५ रोजी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. १९७७ मध्ये निलंगेकर यांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालय सांभाळले होते. १९८० मध्ये अंतुलेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, तंत्रशिक्षण, दुग्धविकास व रोजगार खाते निलंगेकरांकडे होते. शिवाजीराव निलंगेकर यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या गुणपत्रिकेतील मार्क्स वाढवण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. काँग्रेस आणि नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अखेर निलंगेकरांनी १३ मार्च १९८६ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकूण ९ महिने १० दिवस ते मुख्यमंत्री पदावर होते. नंतर या आरोपांमागे काहीही नाही असे सिद्ध झाले पण निलंगेकरांचे मुख्यमंत्रीपद गेले ते गेलेच.[१] निलंगेकरांच्या राजीनाम्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १४ मार्च १९८६ ते २४ जून १९८८ अशी जवळपास २ वर्षे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी होते. +डिसेंबर १९८६ मध्ये औरंगाबादमध्ये शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचे राजीव गांधींच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्यानंतर २४ जून १९८८ मध्ये शंकरराव चव्हाणांना दिल्लीत बोलवून केंद्र सरकार मध्ये अर्थमंत्री या पदाची जबाबदारी देण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे सोपविण्यात आले. २५ जून १९८८ रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. १९९० च्या निवडणुकीपर्यंत पवार मुख्यमंत्री होते.[२][३] +२८८ जागांसाठी एकूण २२३० उमेदवार रिंगणात होते.[४] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4052.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95befec72792811bf925e917887934ea4d82ad5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4052.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसला मुंबई ते दिल्ली दरम्यानचे १३६६ किमी अंतर पार करायला १६ तास व ४५ मिनिटे लागतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4056.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bdc5641eed79d9ede0d79db1788b7b49e34bb9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4056.txt @@ -0,0 +1,39 @@ +महाराष्ट्र सरकारी योजना २०२४ +भारतातील मोठी लोकसंख्या असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने आपल्या नागरिकांच्या उन्नतीसाठी विविध सरकारी योजनांद्वारे सातत्याने प्रयत्न केले आहेत. या योजना गरिबी निर्मूलनापासून पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्यसेवा सुलभतेपर्यंतच्या विविध सामाजिक-आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केल्या आहेत. +महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहे, या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्तरांवरील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या आरोग्य योजना तसेच आर्थिक सहाय्य योजना आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून त्याना स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण प्रयत्न सुरू आहे. तसेच राज्यातील उद्योग व्यवसायांना मजबूत आणि प्रगतीशील करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सरकार कडून राबविल्या जात आहे, राज्यातील गरीब आणि वंचित वृद्ध नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार देऊन त्याना स्वावलंबी बविण्यात सरकार मदत करत आहे. +राज्यातील गरीब आणि वंचित मागासवर्गीय नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण केल्या जाते, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. वाचक मित्रहो, आपण या लेखात महाराष्ट्र शासनच्या या विविध योजनांच्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आपल्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते, +महाराष्ट्र सरकारद्वारा जनकल्याणासाठी आणि राज्यातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि गरीब सामान्य नागरिकांसाठी लोक उपयोगी व कल्याणकारी योजना राबविल्या जातात, ही घरकुल योजना आहे +महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राबवत आहे +राज्य सरकार राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवून तरुणांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करत असते, राज्यातील तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, हा रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे +शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते, या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते, ही एक शेततळे योजना आहे +महाराष्ट्र राज्यात मोठ्याप्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुण आहेत, जे रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना रोजगार शोधण्यात अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो, ही सरकारची योजना रोजगार नोंदणी सबंधित आहे +अजूनही स्त्रिया निर्धन आणि निरक्षर असण्याचे मोठे प्रमाण आहे, विशेषत ग्रामीण ग्रामीणभागात हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तसेच ग्रामीण भागांमध्ये अजूनही महिला स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, ही महिला सशक्तीकरण योजना आहे +ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, शहरात आल्यानंतर या लोकांना स्वस्त दरात जेवण कोठे मिळेल याचा शोध घ्यावा लागतो, ही योजना माफक दरात भोजना सबंधित आहे +महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे +अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, ही योजना वसतिगृह सबंधित आहे +महाराज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली आहे +सहकारी पतसंस्थांचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेत मोठा असतो, महाराष्ट्र राज्यात सुमारे 9000 च्या जवळपास पतसंस्था आहेत या पतसंस्था सर्व राज्यात, ग्रामीण भागात तसेच शहरीभागात पसरलेले आहे, +जंगलांचे, वनांचे महत्व जागितक स्तरावर सर्वानीच ओळखले आहे. संपूर्ण जगामध्ये काही देश असे आहे ज्यांची ओळख त्यांच्या देशामध्ये असलेल्या समृद्ध वनांमुळे सर्व जगाला झाली आहे +कधी अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होतो, ही एक कर्जमुक्ती योजना आहे +ग्रामीण तसेच शहरी भागांमधील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहे या बद्दल माहिती नसते तसेच व्यावसायिकांना सुद्धा या समस्यांना समोर जावे लागते, संबंधित माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे +महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी हे पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक शिष्यवृत्त्या एकाच वेबपोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे +राज्यात अनेक प्रकारचे दिव्यांग नागरिक आढळतात, अपंग, मूक बधीर, मानसिक आजाराने ग्रस्त या नागरिकांच्या सहाय्यतेसाठी राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, +महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, +देशातील किंवा राज्यातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर असो अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागते, ही अपघात विमा योजना आहे +नागरिकांच्या गुणवंत विद्यार्थी मुलांसाठी ज्यांचा उद्देश पुढे शिकण्याचा आणि पुढे व्यावसायिक शक्षण घेऊन उच्च शिक्षित होण्याचा आहे त्यांचासाठी ही योजना आहे +असंघटित कामगारांची प्रमुख असुरक्षा म्हणजे आजारपण, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही कामगारांसाठी एक महत्वपूर्ण विमा योजना आहे +महाराष्ट्र सरकार वेळोवेळी समाजातील संपूर्ण घटकांचा सारखा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी आणि अत्यंत उपयोगी अशा योजना राबवीत असते +महाराष्ट्र शासनाने शहरीभागातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांच्या निवासाच्या समस्येकडे लक्ष देऊन. ही योजना राज्यातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे +महाराष्ट्र सरकारच्या योजनांची विशिष्ट उद्दिष्टे ही योजना आणि त्यावेळच्या सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार बदलू शकतात. तथापि, महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या योजनांद्वारे पाठपुरावा केलेल्या काही सामान्य उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे: +गरिबी निर्मूलन: अनेक योजनांचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि इतर प्रकारचे सहाय्य प्रदान करून उन्नत करणे आहे. +ग्रामीण विकास: महाराष्ट्र हे प्रामुख्याने कृषीप्रधान राज्य असल्याने, अनेक योजना ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करतात, ज्यात कृषी, सिंचन, पायाभूत सुविधांचा विकास आणि ग्रामीण भागातील उपजीविका वर्धन यांचा समावेश आहे. +शिक्षण आणि कौशल्य विकास: शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, नावनोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी, गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी तरुणांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. +हेल्थकेअर: आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, स्वस्त आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आणि स्वच्छता, लसीकरण, माता आणि बाल आरोग्य आणि रोग नियंत्रण यासारख्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार योजना राबवते. +महिला सक्षमीकरण: विविध योजना महिलांचे शिक्षण, उद्योजकता, संसाधनांपर्यंत पोहोचणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे लक्ष्य ठेवतात. +समाजकल्याण: महाराष्ट्र सरकारच्या योजनांमध्ये अनेकदा समाजकल्याणासाठीच्या तरतुदींचा समावेश होतो, जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना, दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना, बेघरांसाठी गृहनिर्माण योजना आणि उपेक्षित समुदायांना आधार. +पायाभूत सुविधांचा विकास: जीवनमान सुधारण्यासाठी आणि आर्थिक वाढ सुलभ करण्यासाठी रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, गृहनिर्माण आणि शहरी विकास यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास हा सरकारसाठी मुख्य फोकस क्षेत्र आहे. +पर्यावरण संवर्धन: प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, वनीकरण आणि नवीकरणीय ऊर्जेचा प्रचार यासारख्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी काही योजनांचा उद्देश आहे. +औद्योगिक आणि आर्थिक वाढ: आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योजकतेला चालना देण्यासाठी, औद्योगिक विकास सुलभ करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी योजना लागू करू शकते. +डिजिटल उपक्रम: तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वामुळे, सरकार डिजिटल साक्षरता, ई-गव्हर्नन्स आणि सेवा वितरण आणि प्रशासन सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी योजना आणू शकते. +ही उद्दिष्टे राज्याच्या आणि तेथील लोकसंख्येच्या विविध गरजा आणि प्राधान्यक्रम प्रतिबिंबित करतात आणि या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा सकारात्मक सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकार त्यानुसार योजना आखते आणि अंमलबजावणी करते. विशिष्ट योजना आणि त्यांच्या उद्दिष्टांवरील सर्वात अद्ययावत माहितीसाठी, अधिकृत सरकारी स्रोत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या अलीकडील घोषणांचा संदर्भ घेणे उचित आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा +महाराष्ट्र राज्य सरकारने राबविलेल्या सरकारी योजना सर्वसमावेशक वाढ, दारिद्र्य निर्मूलन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा सुलभता आणि कौशल्य वृद्धी या दिशेने एकत्रित प्रयत्न दर्शवतात. आपल्या नागरिकांच्या कल्याणाला प्राधान्य देऊन आणि महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक आव्हानांना तोंड देऊन, महाराष्ट्र सर्वांसाठी अधिक समान आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, राज्यभर त्यांचा दीर्घकालीन प्रभाव आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी या योजनांचे निरंतर मूल्यमापन, परिष्करण आणि प्रभावी अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4072.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdff2f89fdf790ffc4b670224a711427c28ee559 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4072.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्ष आहे.गोवा मुक्त झाल्याबरोबर मुंबईतील काही मंडळीनी महाराष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचे ठरविले.गोवा हिंदू असोसिशिएनच्या हॉलमध्ये पहिली बैठक घेण्यात आली. बांदोडकर त्या बैठकीला हजर होते. गोव्याच्या राजकारणावर सत्ता गाजवणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोव्याच्या राजकारणात काही काळ विरोधी पक्षाची भूमिका यशस्वीपणे बजावणारा युनायटेड गोवन्स पक्ष या दोन पक्षानी गोव्यातील जनतेमध्ये आपले कार्य सुरू केले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4076.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8b64b3223aacfcefd1edc76bf640da92b74ba4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4076.txt @@ -0,0 +1,7 @@ +२६ जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ’राजपथा’वरून एक मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत सैनिकांचे आणि अन्य गटांचे संचलन होते. भारतातील विविध राज्यांचे, तसेच विविध मंत्रालयांचे आपापली संस्कृती दर्शविणारे चित्ररथ या मिरवणुकीत सामील होतात.. +या विषयांवरील चित्ररथांनी देशात प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक महाराष्ट्राने केली. इ.स. १९८६, १९८८, व २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्‍यात हुकला होता. +शिवराज्याभिषेक' या विषयावर आधारित चित्ररथाची संकल्पना जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांची होती. +राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने कविराज भूषण यांच्या "इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है" या काव्याच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा दर्शवण्यात आला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमूने हा चित्ररथ साकारला.[३] +. +इ.स.२०१९- हा चित्ररथ महात्मा गांधी यांच्या "चले जाव" चळवळीवर आधारित आहे.[४] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4092.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d69df29f5f99667370d34b4c478762310f39606d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4092.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र राज्याची चौदावी विधानसभा २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीद्वारे २१ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. +(२०६) +महाविकास आघाडी(१२१) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4117.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf37a670caf65a9ffea71b99a3e3fe91e48eb5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4117.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ५९ आहे.[१] २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील ५९ प्रकारच्या जातींसाठी एकूण आरक्षण १३% आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार (५७.५%), मांग (२०.३%), भांबी/चांभार (१२.५%) व भंगी (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे. २०११ च्या census नुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनुसूचित जातींचे प्रमाण आहे.[ संदर्भ हवा ] +२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[२] +२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख होते. तर २०११ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये ६०.७% (सुमारे ८०.१२ लाख) हिंदू, ३९.२% (५२,०४,२८४) बौद्ध व ०.१% (१३ हजार) शीख आहेत. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[३] +२००१ मध्ये, महार समुदायाच्या लोकसंख्येत ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघे ०.१% शीख होते. तर २०११ मध्ये, राज्यात सुमारे ७६ लाख महार समाज आहे, महारांत सुमारे ६२% (४७.१२ लाख) बौद्ध, ३७.९% (२८.७३ लाख) हिंदू, तर अवघे ०.१% (७.८ हजार) महार हे शीख धर्मीय आहेत. +२०११ मध्ये, अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ७६ लाख महार, २६.८ लाख मांग, १६.५ लाख चांभार व २.५ लाख भंगी या समाजाचे लोक आहेत. अनुसूचित जातीत या चार जातींचे एकत्रित प्रमाण ९२% आहे. +अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये भारत देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत. +महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_412.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7947e3fdb174307206094f08388d4c2690e0d3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_412.txt @@ -0,0 +1,5 @@ +भुदरगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +भुदरगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे. येथे एक किला आहे, किले भुदरगड जे नाव या तालुकयाला दिले आहे.साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका.गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. +भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व काम काज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे. +क्रांती ज्योत स्मारक +गारगोटीमध्ये 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये शहीद झालेल्या 7 क्रांतिकारीच्या स्मरणार्थ तहसील कार्यालयसमोर एक भव्य अशी देखणी सुरेख क्रांती ज्योत स्मारक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4126.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be418579372f44894a573990ee04dfc6f3f1e340 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4126.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्रात ...... उद्याने आहेत [ संदर्भ हवा ] + +यात लहान मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळे, लहान मुलांची रेल्वेगाडी अशा खेळण्यांची व्यवस्था असते. काही ठिकाणी प्राणी अथवा पक्षी संग्रहालय व क्रीडांगण संलग्न असते अथवा क्रीडांगण, प्राणी अथवा पक्षी संग्रहालयांना बालोद्यान संलग्न असते. +औरंगाबादजवळील पैठण जवळ असलेल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागराजवळ संत ज्ञानेश्वर उद्यान १९८७ साली पर्यंटकांसाठी खुले केले गेल. ते १२५ हेक्टर (३१० एकर) क्षेत्रावर उभारले आहे. त्यात पुष्पोद्यान, निसर्गोद्यान, पवित्र उद्यान, बालोद्यान असे भाग आहेत उद्यानाला लागून संत ज्ञानेश्वर ज्ञानपीठ व पुराणवस्तू संग्रहालय आहे. उद्यानालगत गोदावरी नदीमध्ये नौकाविहाराची सोय आहे. [१] +कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान आहे. राधानगरी येथे काळम्मावाडी धरणस्थळाजवळ उद्यान आहे. काळम्मावाडी धरणस्थळाजवळील उद्यान प्रवेश शुल्कातून वर्षासाठी जलसंपदा विभागाला सहा-सात लाखांचा महसूल मिळतो. [२] +महाराष्ट्रात नगरपालिकांची आणि ग्रामपंचायतींची उद्याने आहेत. +मोठ्या शहरांतल्या उद्यानांच्या मालकीच्या जागेवर खाद्यपदार्थ, फुगेवाले, खेळणी यांच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले असते. [३] उद्यानांमध्ये खाद्य पदार्थ खाल्यानंतर कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यातील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे कचरा प्रदूषण झालेले असणे, सुट्टीच्या दिवशी अती गर्दी असणे, इतरत्र एकांताचा अभाव असल्याने त्याच दाटीवाटीत प्रेमी युगुलांचे असणे, बालोद्यानातील खेळणी, बसण्याची बाके मोडलेली असणे, बालरेल्वे-नौकानयन अशा सुविधा प्रत्यक्षात चालू नसणे, हिरवळी, वनस्पतीआणि दिव्यांची काळजी घेतलेली नसणे, डास आणि उंदरांच्या त्रासावर उपाययोजाना केलेली नसणे. स्वच्छ व दुर्गंधीरहित प्रसाधनगृहांचा आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असणे या उद्यानांच्या समस्या आहेत. शासकीय निधीची तरतुद न करणे, विलंब करणे अथवा केलेली तरतुद इतर कामांकडे वळती करणे. [४] [५] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4133.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3920581fdfcdb33b579e21aae348674b559a1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4133.txt @@ -0,0 +1,41 @@ +खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे.[१] महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने क्षत्रिय धनगर, ९६ कुळी क्षत्रिय मराठे, गडरिया, वंजारी, आगरी कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत, सोनार समाज, गानली(रेड्डी गानलोलु), रोंडु एडला गानलोलु किंवा गानगोलु, गोलकर, बेलदार, पद्मशाली व सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते.[२] परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्‍नी[३]; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.[४] खंडोबाच्या मूर्ती, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो.[४] +एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.[५] +कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे : खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात. +मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी (कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे.[ संदर्भ हवा ] "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे. +खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे.[४] खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.[६] खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.[७] मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला.[८] खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.[९] मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते. +महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.[१०] +जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला.[६] बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्‍नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.[६] +खंडोबाची प्रतीके विविध आहेत. लिंग, तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतीके आज रूढ आहेत. +हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. +देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे. +जेजुरी गडावरील दर्शन परंपरेत देवाची पूजा गोंधळी मंडळी कडून करवून घेण्याची परंपरा प्रचलित आहे. +तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा, सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला आहे. +|| श्री खंडोबा महाराज तळी आरती || +आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी । +निळा घोडा, पाव में तोडा। +मस्तकी तुरा, बेंबी हिरा । +अंगावर शाल, सदाही लाल । +म्हाळसा सुंदरी , आरती करी । +खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका । +बोला सदा आनंदाचा येळकोट । +खंडेराव महाराजकी जय । +हर हर महादेव । +चिंतामणी मोरया । +आनंदीचा उदय उदय । +भैरीचा चांग भले । +सदानंदाचा येळकोट । +खंडेराव महाराज की जय । +हर हर महादेव । +चिंतामणी मोरया । +चिंतामणी मोरया । +आनंदाचा उदय उदय । +भैरीचा चांगभले । +सदानंदाचा येळकोट । +खंडेराव महाराजकी जय ॥ चुका उधृत करा: टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला टॅग नाही सापडला. ही मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येते. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते. +दुसरी पत्‍नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले; आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात. +उमाजीराजे नाईक हे खंडोबाचे परम भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना खंडोबा प्रसन्न असल्याचेही सांगितले जाते त्यांच्याकडे खंडोबाचे कडे असल्याने त्यांना (उमाजीना) इंग्रज फाशी देत असताना फाशी बसली जात नव्हती. कडे काढल्यानंतर नाईकांना फाशी बसली असेही बोलले जाते.[ संदर्भ हवा ] +मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार खंडोबाचे भक्त होऊन गेलेत. +सोमवती अमावस्येस (सोमवारी येणाऱ्या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. खंडोबाच्या पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी (नाईक), धनगर समाजाकडे आहे. नंतर त्यांच्या प्रतिमांना कऱ्हा नदीवर स्नान घातले जाते.[ संदर्भ हवा ] +साचा:संदर्भहिन +भारतात खंडोबाची खालील मंदिरे आहेत - +’मल्हार’ या नावाचे खंडोबाची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4148.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4df400432267dd8c18cc118359d59a8509218a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4148.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत. +भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते. +महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे. +मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग +नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली +नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) +खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4175.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8227500434f7942be05caae85c056548532d267c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4175.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात भटक्या जमाती (Nomadic Tribe) (NT- भ.ज.) ची संख्या ३८ असून या प्रवर्गास २.५% आरक्षण आहे. +भूरे (शा. नि. दि 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट ) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4186.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0a4686d12d1bf32ea8abb7988ce431197228220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4186.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व खाते करते. +भारतीय पुरातत्त्व विभागामार्फतही अशाच महाराष्ट्रातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हटले जाते. या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या देखभाल आणि संरक्षणाचे काम भारत सरकारचे पुरातत्त्व खाते करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4188.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ef9687dc2af7cb987ec8c4f4400de45e78313f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4188.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग. हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे, जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात. काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाना सुद्धा जुळले गेले आहेत व त्यामुळे ते इतर रा़ज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात. महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी. इतकी आहे. प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्र. १,२, ३, ६, ९, १०, ११,५३,५१आणि ६१चासमावेश आहे. +१२७ +खालील यादीतील महामार्ग अपूर्ण माहितीमुळे या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहेत. संपूर्ण माहीती मिळताच मुख्य यादीत त्यांचा समावेश करण्यात येयील. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_419.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..832f1c7654b38a0540ac221fcfa9c876eaddc910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_419.txt @@ -0,0 +1,7 @@ + +भूपतगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या जव्हार जवळचा एक किल्ला आहे. हा किल्ला जव्हारपासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. भूपतगडाची निर्मिती ही त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली असावी. +भूपतगड किल्ला हा जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याने खूप काळ राजवैभव पाहिले आहे. जव्हार संस्थान हे ठाणे जिल्ह्यात असून तेथे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे. +जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे ‘सीतेची पावले’ म्हणतात. +‘सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे. +भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. +हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham's groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4192.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f816cbca658de6bd2ea5967b01e1e219d72f0b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4192.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१] +ह्यात प्रामुख्याने बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4205.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8627bd735381f2eb0b7db93d25822339712b884a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4205.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्रात विमुक्त जातींची (DT- Denotified Tribe) (व्हिजे-Vimukata Jati) संख्या १४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे. +ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण +ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा +इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** +ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी +व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** +स) बंजारी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4225.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b4de25c988dea0aa1e9332953258f3daee2fe08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4225.txt @@ -0,0 +1,5 @@ +द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून १० भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी मालिकेतील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो. + +अभिजीत खांडकेकर + +सुयश टिळक diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4236.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eeeb3be43f6d6978faafc56557498b38d52455a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4236.txt @@ -0,0 +1 @@ +बृहन्महाराष्ट्रात आणि अन्यत्रही अनेक मराठी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात; त्यांपैकी काही संमेलनाची ही यादी :- diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4245.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4df400432267dd8c18cc118359d59a8509218a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4245.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत. +भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते. +महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे. +मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग +नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली +नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) +खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4254.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c6e2bce9a04b9599e4216789a093176b5d5b658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4254.txt @@ -0,0 +1,43 @@ +६५.३१ लाख ते १.१० कोटी (प्रमाणः- ५.८१% ते १०%) (२०११)[१] + +नवयान बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या असलेले राज्य आहे. इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास गौतम बुद्धांच्या हयातीत बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धार्मिक क्रांतीनंतर राज्यात हा धर्म व्यापक प्रमाणात रूढ झाला, व बौद्ध अनुयायांच्या संख्येतही लक्षनीय वाढ झाली. +बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. +२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.[२] महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदू व इस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी (नवबौद्ध) सुमारे ९०% महाराष्ट्रात आहेत.[३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व कोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते. बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेला राज्यातील महार समाज व महाराष्ट्रीय बौद्ध समाज ह्या दोन्ही बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १ कोटींवर (१०-१२%) आहे. +बुद्धांच्या हयातीत इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला.[४] बौद्ध धर्माचे संस्थापक, बुद्ध यांनी उरुवेलाबोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मउपदेश देणे सुरू केले. त्यांनी अनेक शिष्य लाभले, ज्यात भिक्खू-भिक्खुणी व उपासक - उपासिका यांचा समावेश होता. बुद्धांनी आपल्या शिष्यांना (भिक्खू) कल्याणप्रद अशा आपल्या सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांना संचार करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार हजारो भिक्खू भिक्खूणी धम्माचा उपदेश करण्यासाठी ह्या जंबुवदिपातील निरनिराळ्या ठिकाणी गेले. यामुळे महाराष्ट्रात देखील बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार झाला. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रचार होण्याचे दुसरे एक कारण व्यापारीवर्ग होता. सुरुवातीपासून व्यापारीवर्ग तथागतांच्या धम्माकडे आकर्षित झाला होता. जून्या पाली वाङमयात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांबद्दल बरीच माहिती मिळते. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवन्ती-दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता. धम्म प्रचारक भिक्खुंमुळे व व्यापारी वर्गामुळे बुद्ध हयात असतानाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता.[५] +अजिंठा लेण्यांची निर्मिती इ.स.पू. दुसऱ्या शतकात झाली. कार्ला, भाजा, कान्हेरी, नाशिक, पितळखोर, वेरूळ आणि अजिंठा ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्यमार्गावर वसली होती. त्यामार्गाला सार्थवाहपथ असे म्हटले जात असे. चंद्रगुप्त मौर्याने गांधार प्रदेश जिंकून मगध राज्याला जोडल्यावर अशोकाच्या काळात या प्रदेशात बुद्ध धम्माचा व्यापक प्रसार झाला. सम्राट अशोक ह्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता. अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्यांची प्रांतिक राजधानी होती. सुत्तनिपातातील पारायण वग्गावरून धम्मप्रचारक भिक्खुंमुळे आणि व्यापाऱ्यांमुळे बुद्ध हयात असतानाच बौद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात वैशाली येथे दुसरी बौद्ध धम्म संगिनी भरली होती. अपरांत देशांतून आठ अर्हंत आणि अवंती व दक्षिणापथ या देशातून अठ्ठाऐंशी अर्हंत यशाचे निमंत्रण स्वीकारून वैशालीस गेले होते. बुद्ध धम्माची मते मूळ शुद्ध स्वरूपात रहावीत व धम्माचा प्रचार होण्यासाठी उपाय योजना करावी असे दोन मुख्य उद्देश ही संगीनी भरवण्यामागे होते.[६] +त्रिपिटकात निष्णात असलेले भिक्खू थेर मोग्गलीपुत्ततिस्साने एक हजार विद्वान भिक्खुंना निवडून शुद्ध स्वरूपात धम्म लिहून काढण्यास सांगितले. हे काम नऊ महिने चालले होते. तिसऱ्या धम्म संगितीची परिणीती म्हणून धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशांत पाठविण्यात आलेले धर्मोपदेशक होत. त्यात "महारठ्ठ महाधम्म रक्खित थेर नाम कमू" म्हणजे महाधम्म रक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठविले. इ.स.पू. तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार झाला होता. मौर्याचा आणि सात वाहनाचा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्या वेळच्या वाढलेल्या अधिक संपत्तीचा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्याने युक्त असे अनेक बुद्ध विहार योगाचाराचा तत्त्ववेत्ता असंग काही दिवस अजिंठा येथे राहत होता. अजिंठा येथील चित्रकला जवळजवळ एक हजार वर्ष अव्याहत चालली होती. तेथून मध्य प्रदेशातील बाघा, दक्षिणेतील बदमी, सिग्रिया, सित्तनवसाल मध्ये आशियातील बामीयान, तिबेट आणि चीन देशांतील तुनऱ्हुआंग येथे तिचा प्रचार झाला. अजिंठा येथे शिल्पकला व चित्रकला शिकवण्याचे विद्यालय होते.[७] +महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.[८] +अनेक शतके बुद्ध धम्म जंबुव्दीपातील प्रमुख राजधर्म होता. महाराष्ट्रातील संतांवर सुद्धा बौद्ध धम्माचा प्रभाव. संत एकनाथ म्हणतात, "लोक देखोनि उन्मत्त दारांनी असक्ता न बोले बौद्ध रूप ठेविले जधनी हात धर्म लोपला अधर्म जाहला हेतून पाहासी द्या लागे बौद्ध रूपे पंढरी नांदसी”. संत तुकराम महाराज सुद्धा विठ्ठलाला बुद्ध समजतात. ते म्हणतात की "बुद्ध अवतार महिमा अदृष्ठा मैन मुखे निष्ठा धरियली". 'मेमॉयर ऑन द केव्ह टेंपल' या ग्रंथात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बुद्धाचे असल्याचे साक्ष देतो.[९] +भारतात सुमारे १४०० लेणी आहेत, त्यापैकी सुमारे ११०० महाराष्ट्र राज्यात आहेत. देशातील व महाराष्ट्रातील बहुसंख्य लेणी ह्या बौद्ध लेणी आहेत. सर्व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थनास्थळे आहेत. भारतात अनेक बौद्ध लेणी किंवा बुद्ध लेणींची निर्मीती झालेली आहेत त्यातील बहुतांश बुद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मिलेल्या आहेत. +महाराष्ट्रातील बौद्ध लोक बुद्ध पौर्णिमा, भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा, वर्षावास, नामांतर दिन असे अनेक विशेष दिवस उत्सव म्हणून साजरे करतात. +वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला, ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ह्याच पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले त्यामुळे बौद्ध संस्कृतीत बुद्धपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.[१०][११] +१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ६,००,००० अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे साजरा करतात तसेच औरंगाबाद लेणी परिसर यासारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यांतील-शहरातील स्थानिक बौद्ध स्थळांवर देखील हा सण साजरा करतात.[१२][१३][१४] +१४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातून नाहीसा झालेल्या बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले आणि बौद्धांचे ते आदरणीय ठरले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्ध उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. +आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने (बुद्धाने) गृहत्याग केला होता, शिवाय ह्याच पौर्णिमेला वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना बुद्धाने धम्मदीक्षा दिली. सम्बोधी प्राप्तीनंतरचे हे बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय. +वर्षावास ह्या शब्दाचा विग्रह केल्यास 'वर्षा+वास' असा होतो व त्याचा अर्थ 'वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे असा होतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना व उपासिकांना धम्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास 'वर्षावास' असे म्हटले जाते.[१५] +नामांतर आंदोलन इ.स. १९७६ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित-बौद्ध चळवळीचे एक आंदोलन होते. छत्रपती संभाजी नगर येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या लढाईनंतर छत्रपती संभाजी नगरातील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे नाव देण्यात आले. त्यामुळे दरवर्षी १४ जानेवारी रोजी बौद्ध अनुयायांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर दिन साजरा केला जातो.[१६] +महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे (सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक) महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाच्या काही दिवसांपूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. मुंबईत यावेळी बौद्धांची संख्या ३० लाखावर झालेली असते. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात.[१७][१८][१९][२०] +बौद्ध संस्कृतीत विविध पौर्णिमांचे वेगवेगळे महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण राजपुत्र सिद्धार्थ गौतम (बुद्ध) यांचा जन्म, बोधिसत्वाची सम्यक सम्बोधी, धम्मचक्र प्रवर्तन आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण इत्यादी महत्त्वाच्या घटना, वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या आहेत. +बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम, बोधगया (बुद्धगया) येथे निरंजना नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्रर्या करीत बसलेले असताना, सुजाता नावाच्या स्त्रीने सिद्धार्थ गौतमास खीर दिली. त्यामुळे चैत्र पौर्णिमा सुजाताचे खीरदान म्हणून ओळखले जाते. +वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे : +अश्विन पौर्णिमा सुद्धा वर्षावासाच्या कालावधीतच येते. वर्षावासातील अंतिम पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा असते. +वर्षावास : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य नसते म्हणून या कालावधीत बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना धम्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास 'वर्षावास' असे म्हणतात. वर्षावास समाप्तीनंतर बौद्ध भिक्खू धम्म प्रचारासाठी बाहेर पडण्याचा महिना कार्तिक महिना होय. +कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे : +बौद्ध धर्मात जाती नाही. विविध समूह किंवा समाज बौद्ध धर्माचे अनुसरण करतात, ज्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, व ओबीसी यांचा समावेश होतो. प्रामुख्याने अनुसूचित जाती ही बौद्ध धर्मीय असलेला समूह आहे, ज्यात प्रामुख्याने महार, मांग व चांभार हे तीन समाज प्रमुख आहेत. +महाराष्ट्रातील बौद्धांची मातृभाषा ही मराठी आहे. याशिवाय त्यांना हिंदी भाषा देखील समजते, आणि बरेचजण इंग्लिशही बोलतात. मराठी बोलणारे बौद्ध अनेक मराठीतील बोलीभाषा बोलतात, ज्यात मराठवाडी बोलीभाषा अहिराणी, आगरी, काणकोणची कोकणी, कोकणा, कोकणी, कोल्हापुरी, गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली, चंदगडी, जुदाव मराठी, झाडीबोली, तंजावर मराठी, तावडी, दखनी, नारायणपेठी, नॉ लिंग, पद्ये, पावरा, पूर्व मावळी, बेळगावी मराठी, मांगेली, मालवणी, मिंग्लिश, लमाणी, लेवा, वऱ्हाडी, वाघरी, सामवेदी, सोलापुरी इत्यादींचा समावेश होतो. +इ.स. १९५१ मध्ये महाराष्ट्रात अवघे २,४८९ बौद्ध (०.०१%) होते, डॉ. आंबेडकरांच्या सामूदायिक धर्मांतरानंतर इ.स. १९६१ मध्ये ही संख्या १,१५,९९१% वाढून २७,८९,५०१ झाली होती. +२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या खालील प्रमाणे आहे.[२२] +२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील मराठी बौद्ध धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख (४६%) बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये बौद्धांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असून तेथे बौद्धांची प्रमाण ७ ते १०% दरम्यान आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यांमध्ये बौद्धांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोली जिल्ह्यामधील लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, रायगढ, पुणे, सातारा आणि रत्‍नागिरी या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील मुंबई उपनगर जिल्हा आणि रत्‍नागिरी जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांच्या लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत. +बुलढाणा, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये बौद्ध धर्म हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे, यापैकी हिंगोली जिल्हा वगळता बाकीचे सर्व जिल्हे विदर्भातील आहेत. सोलापूर (०.८%), कोल्हापूर (०.८%), अहमदनगर (०.८%), धुळे (०.७) व नंदुरबार (०.३%) या पाच जिह्यांत बौद्धांचे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. मुंबईत (मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्हा) सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या ७,३८,०८२ आहे, जी राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्येचा ११.३०% भाग आहे. +भारतात अनुसूचित जातींमध्ये (दलित) बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये देशात ४१.५९ लाख बौद्ध धर्मीय हे अनुसूचित जाती प्रवर्गातील होते, तर दहा वर्षात इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. भारत देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्रात राहणारे आहेत.[६०] महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ५२,०४,२८४ (७९.६८%) अनुसूचित जातीचे बौद्ध आहेत.[६०] तर महाराष्ट्रातील एकूण १,३२,७५,८९८ अनुसूचित जातींत बौद्धांचे प्रमाण ३९.२०% आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[६१] +महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघापैकी ६३ मतदार संघांत बौद्ध व अनुसुचित जातीचा प्रभाव आहे. +विविध समाजगटांना, समूहांना, जातींना प्रतिनिधित्व देणारे प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणूकीत राज्यात लोकसंख्येने बौद्ध समाजाला कमी उमेदवारी देतात. महाराष्ट्रातील बौद्ध समाज हा मुख्यत: आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीशी जोडलेला आहे. आणि तो रिपाइंच्या प्रमुख चार गटांत तो विभागला गेला आहे. तसेच बौद्ध समाजातील काही लोक हे थेट काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसप यांसारख्या राजकीय पक्षांत प्रवेश करून काम करीत आहेत. मात्र, बहुसंख्य बौद्ध व अन्य दलित जातीतील आंबेडकरी चळवळीला मानणारा समाज हा रिपाइंच्या माध्यमातून आपले राजकारण करीत आहे. आजवर रिपाइं गटांचे राजकारण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर राहिले आहे. त्यामुळे हा बहुसंख्य बौद्ध समाज रिपाइंच्या माध्यमातूनही युती करून दोन्ही काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. तसेच त्यातील काही भाग हा सेना-भाजपसोबतही आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंच्या सर्वच गटांना, त्यांच्या नेत्यांना ज्या प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले, युती-आघाडी केलेल्या पक्षांकडूनच घात झाला होता, त्यानुसार प्रस्थापित पक्षांनी जाणीवपूर्वक रिपब्लिकन नेत्यांचा पराभव केला होता हे मानले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं नेते रामदास आठवले थेट भाजपसोबत जाऊन महायुतीत दाखल झाले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणुका लढवल्या आहेत. दोन्ही काँग्रेस यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांचा पाठिंबा काँग्रेसने, तर रिपाइंच्या उपेंद्र शेंडे व गंगाधर गाडे गटाचा राष्ट्रवादीने पाठिंबा मिळवला होता, मात्र त्या बदल्यात त्यांना लोकसभेच्या जागा सोडण्यात आल्या नव्हत्या. +रामदास आठवले यांनी युतीकडे रिपाइंला लोकसभेसाठी किमान तीन मतदारसंघ व एक राज्यसभेची जागा व विधानसभेसाठी सुमारे ३५ मतदारसंघ मागितले होते. मात्र, प्रत्यक्षात आठवलेंना भाजपने राज्यसभेची एक जागा दिली. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये (आदिवासी भाग वगळून) बौद्ध मतदारांची संख्या ही १० ते ३० हजार वा त्यापेक्षाही काही ठिकाणी अधिक आहे. म्हणजेच प्रत्येक लोकसभा क्षेत्रात बौद्ध मतदारांची लोकसंख्या साठ हजार ते एक लाख असून काही लोकसभा मतदारसंघांत ती चार ते सहा लाख एवढी सर्वाधिकही आहे. विशेषतः बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत बौद्ध समाजाची लोकसंख्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या बौद्ध समाज विखुरला गेल्याने, रिपाइंच्या गटबाजीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना त्याचा फायदा होत आहे. राखीव जागा तसेच सर्वसाधारण जागांवर बौद्ध समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिली जात नाही, त्या सर्व ठिकाणी बौद्धेतर उमेदवाराला उमेदवारी देत बौद्धांना राजकारणात एकाकी पाडले जात आहे, असे राजकीय समीक्षक सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर झालेल्या उमेदवार याद्यांमधून राजकीयदृष्ट्या या बौद्ध समाजावर अघोषित बहिष्कारच घातला जातोय असे दिसते.[६२] +[६३] +१९५६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झालेली आहेत आणि आजही होत आहेत. त्यातील काही धर्मांतरे – +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला. +मुख्यः वर्ग:भारतीय बौद्ध +महाराष्ट्रातील काही उल्लेखनिय बौद्ध व्यक्ती खालील प्रमाणे आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4257.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37efa1d422d40c6f92ad7ad58746eb5e168975e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4257.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत[ संदर्भ हवा ]. +ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला. +काही विद्वानांच्या मते, राजशेखर या इ.स.च्या १०व्या शतकातील नाटककाराने कर्पूरमंजरी हे नाटक महाराष्ट्री प्राकृतात लिहिले आहे[१]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4259.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faface5ab9955912fe114c3b130a5b172a1dcd06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4259.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची स्थापना पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी केली. या शाळेतील शिक्षक संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फरसबंद पारावर बसून, नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे. पुण्यातील सर्वकालिक विद्वान गृहस्थ आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा पाराजवळून जाता जाता शिक्षकांच्या गप्पा ऐकल्या. ते म्हणाले, ’दुसऱ्यांच्या नाटकांवर एवढी टीका करण्यापेक्षा तुम्हीच एखादे निर्दोष नाटक बसवून आणि करून का दाखवत नाही?’ त्या शिक्षकांनी ही सूचना खरोखरच मनावर घेतली आणि ३ ऑगस्ट १९३६ रोजी महाराष्ट्रीय कलोपासक ही हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू केली. दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. +सुरुवातीच्या काळात संस्थेने आंतरशालेय नाटयवाचन स्पर्धा सुरू केली, आणि शिवाय काही नव्या-जुन्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यास आरंभ केला. पुढे महाराष्ट्र सरकारने आंतरशालेय नाटय स्पर्धा चालू केल्यानंतर ‘महाराष्ट्रीय कलोपासक‘ने ही नाट्यवाचन स्पर्धा बंद केली. +महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4371.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a075e54f97bc5f595812a4f0bf759b3bdde414c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4371.txt @@ -0,0 +1,3 @@ +महिंद राजपक्ष (सिंहला: මහින්ද රාජපක්ෂ ; तमिळ: மகிந்த ராசபக்ச ; रोमन लिपी: Mahinda Rajapaksa ;) (नोव्हेंबर १८, इ.स. १९४५ - हयात) हा श्रीलंकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष आहे. १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतलेला राजपक्ष इ.स. २०१० सालांतील निवडणुकींमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडला गेला. पेशाने वकील असलेल्या राजपक्षाने याआधी ६ एप्रिल, इ.स. २००४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या सैन्याने उत्तर श्रीलंकेतील तमिळ फुटीरतावादी गटांचा, विशेषकरून लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम या सशस्त्र बंडखोर संघटनेचा बिमोड करण्यात निर्णायक यश मिळवले. +दोनवेळा राष्ट्राध्यक्ष्पदावर राहिलेला राजपक्ष ९ जानेवारी २०१५ रोजी सत्तेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पायउतार झाला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4376.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c64d312155891a8728cd579f892df75a117959a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4376.txt @@ -0,0 +1 @@ +महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान हे श्रीलंकेच्या हंबन्टोटा शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4387.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41e507bd3a7d5d431742a3082f6955becd7431e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4387.txt @@ -0,0 +1,2 @@ + महितापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4405.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab451e5c9baf33c11516fc0b2d77a1313a161fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4405.txt @@ -0,0 +1,7 @@ +wcd.nic.in +महिला आणि बाल विकास मंत्रालय हे एक भारत सरकारचे मंत्रालय असून महिला आणि बालके यांच्या कल्याणासाठी संबंधित कायदे तयार करणारी आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणारी ही एक शिखर संस्था आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सध्याच्या मंत्री स्मृती इराणी असून त्या ३१मे २०१९ पासून या विभागाचे कामकाज सांभाळत आहेत. +महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढी प्रेरणा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून इ.स. १९९५ साली महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. ३० जानेवारी २००६ पासून या विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला..[३] +मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंत्रालय 'एकात्मिक बाल विकास सेवा' (ICDS)चा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम राबवत आहे ज्यामध्ये पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि रेफरल सेवा, पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण अशा सेवांचे पॅकेज प्रदान केले जाते. मंत्रालयाचे बहुतेक कार्यक्रम बिगर सरकारी संस्थांमार्फत चालवले जातात. स्वयंसेवी संस्थांचा अधिक प्रभावी सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जातात. अलिकडच्या काळात मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये आयसीडीएसचे सर्वत्रीकरण आणि किशोरी शक्ती योजना, किशोरवयीन मुलींसाठी पोषण कार्यक्रम सुरू करणे, बाल हक्कांच्या संरक्षणासाठी आयोगाची स्थापना आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आदित्यादीचा समावेश आहे.[३] +या मंत्रालया तर्फे दरवर्षी 'देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार', 'कन्नगी पुरस्कार', 'माता जिजाबाई पुरस्कार', रा'णी गायदीनलिउ झेलियांग पुरस्कार', 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' आणि 'राणी रुद्रम्मा देवी पुरस्कार (पुरुष आणि महिला दोघांसाठी)' अशा सहा श्रेणींमध्ये वार्षिक नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो .[४] +महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अध्यक्षा स्मृती इराणी आहेत. इंदेवर पांडे महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव आहेत. या मंत्रालयाच्या अंतर्गत सहा स्वायत्त संस्था कार्यरत आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4411.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc61de491a824110575fc42c993b2bc1ec5f04c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4411.txt @@ -0,0 +1,5 @@ + +महिला उद्योजक जगभरातील सर्व उद्योजकांपैकी एक तृतीयअंश व्यापला आहे, असे म्हटले जाते.उद्योजक ही एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेतून हे स्पष्ट होते की एखादी व्यक्ती आहे. ती व्यक्ती एखाद्या उपक्रमांचे आयोजन करते आणि व्यवस्थापन करते. विशेषतः व्यवसायात, सहसा महत्त्वपूर्ण पुढाकार आणि जोखमीसह.गेल्या तीन दशकात स्वयंपूर्ण महिलांची संख्या सातत्याने वाढली आहे. +नक्षीकाम , लॉन्चिंग आणि एक नवीन व्यवसायाची प्रक्रिया म्हणून परिभाषित केली गेली आहे.जी सामान्यतः लहान व्यवसाय म्हणून सुरू होते, जसे की स्टार्टअप कंपनी, विक्री, प्रक्रिया किंवा विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी सेवा ऑफर करते.[१]याचा फायदा "... ... नफा मिळविण्यासाठी क्षमता आणि इच्छा विकसित करणे, आणि व्यवसायाच्या व्यवसायाचा व्यवस्थापन करणे यासाठी कोणत्याही जोखमीसह आहे." उद्योजकताची परिभाषा सामान्यतः व्यवसायाची सुरुवात आणि चालनांवर लक्ष केंद्रित करते. व्यवसायाचा प्रारंभ सुरू होत असताना त्यात काही जोखम येत असतात.त्या  समाविष्ट असलेल्या जोखमांमुळे व्यवसाय मोठया प्रमाणात बंद होण्याची शक्यता असते. निधीची कमतरता, वाईट व्यवसाय निर्णय, आर्थिक संकट  किंवा या सर्व गोष्टींचे मिश्रण "किंवा बाजार मागणीच्या अभाव या कारणांमुळे मोट्या प्रमाणात होतात .[२] + +२०व्या  शतकापूर्वी , महिला त्यांच्या लहान व्यवसायांना त्यांची उत्पन्नाची पूर्तता करण्याचा मार्ग म्हणून चालवत असे.बहुतांश वेळा त्या गरिबी टाळण्यासाठी प्रयत्न करतात. किंवा पती किंवा पत्नीच्या नुकसानीपासून मिळकत मिळवत होते.त्या काळात महिलांनकडून  जे विविध उपक्रम राबवण्यात आले ते उद्योजकांसारखे नव्हते.त्यांच्यापैकी बहुतेकांना त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे लागले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4427.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a4c31c6cef5a9df8b0156cf81141af4af77166f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4427.txt @@ -0,0 +1,8 @@ +महिला ट्वेंटी२० आशिया चषक, २०१६ ही आशियाई क्रिकेट समितीच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची सहावी आणि ट्वेंटी-२० स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी थायलंड येथे सुरू झालेल्या सदर स्पर्धेचे सामने बँकॉक येथील आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदानावर खेळवले गेले.[१] +संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिला, आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला. स्पर्धेमध्ये बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यजमान थायलंड आणि २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिलेला नेपाळ हे सहा संघ सहभागी झाले. नेपाळ किंवा थायलंड संघ असलेले सामने हे आंतरराष्ट्रीय म्हणून नोंद न करता ट्वेंटी२० म्हणून नोंद केले गेले. +  अंतिम सामन्यासाठी पात्र +स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो + + +स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो +स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4453.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ccdd3a3cf5d93e8613eb79ab2463af4059d2c07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4453.txt @@ -0,0 +1 @@ +स्त्रि जीला आपन या विश्वाची जगत जननी मनतो. आज तिचीच आपन अशी अवस्था करवी ही आपनासर्वा सथिच खुप लजिर्वानि बाब आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4455.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18be586db4bd02f78a2159ac9ac202f8af87c357 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4455.txt @@ -0,0 +1,2 @@ +शासन मुलीच्या-महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांचा एक आढावा - +यांसह अन्य महत्त्वाचे कायदे - diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_449.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264aeab469dc2c9b896eaefb9f6329622e87b8ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_449.txt @@ -0,0 +1 @@ +भूमध्य प्रदेश (तुर्की: Akdeniz Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_451.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd13285272063d059af8f873d962b7ba5c429bc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_451.txt @@ -0,0 +1 @@ +भूमध्य समुद्रीय हवामान भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान स्पेन, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया, मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4545.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c0ed0ad11bc0960c922fca398e58a14d595cddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4545.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +महेश हे भारतीय पुरुषाचे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4553.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae570bb57d7421beb0bc43a6bc016987484ae486 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4553.txt @@ -0,0 +1,11 @@ +महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत. +महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत[१]. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले [२]. "ओह डैम इट" हे त्यांचे पेटंट वाक्य आहे. +महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिली देखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकाचे पात्र साकारण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या. +कारकीर्द भरात असताना कोठारेंनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठाऱ्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली. +महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठाऱ्यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. +महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वाऱ्याचे ही मालिका लोकप्रिय ठरली. +महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट + +महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट +महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4569.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e917622db84ccd650bb4bc8acbb4484b79641717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4569.txt @@ -0,0 +1,3 @@ +महेश राऊत हा गडचिरोलीतील आदिवासींसोबत काम करणारे कार्यकर्ते आहेत.[१] २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील तो सर्वात तरुण आरोपी आहे.[२] +राऊत याचा जन्म महाराष्ट्राच्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील लाखापूर गावात झाला. त्याचे शालेय शिक्षण गडचिरोली येथील नवोदय शाळेत झाले. २००९ मध्ये, सामाजिक कार्याचा अभ्यास करण्यासाठी तो ती.आय.एसएस, मुंबईमध्ये दाखल झाले. ती.आय.एसएस  मधून पदवी पूर्ण केल्यानंतर, राऊत याची पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिपसाठी निवड झाली. २०१८ मध्ये, त्याला तीव्र अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास झाला.[३] +राऊत हा विस्थापन विरोध जनविलास आंदोलनाचे सह-संयोजक आहेत, जो उपेक्षित समुदायांच्या विस्थापनाशी लढा देतात. व्हीव्हीजेव्हीए अंतर्गत, त्यानी मध्यस्थांच्या सहभागाशिवाय तेंदूपत्ता थेट बाजारात विकण्यासाठी प्रदेशातील आदिवासी समुदायांसोबत मोहीम राबवली आहे. तो भारत जन आंदोलन या मानवाधिकार स्वयंसेवी संस्थेचे सदस्यही आहेत. त्याने सूरजगड खाण प्रकल्पासह गडचिरोलीतील खाण प्रकल्पांच्या विरोधात प्रचार केला आहे. त्यांनी जातीभेदाविरोधातही मोहीम चालवली आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4580.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4580.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4595.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d74b4609286a8dc18a1ba92045b7a574138b70c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4595.txt @@ -0,0 +1,2 @@ +एम.सी. छगला (?? - फेब्रुवारी ९ १९८१) हे भारतीय वकील आणि कायदेपंडित होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4620.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a358cf833da6fa3bd6386f0c57630b84dfe2326a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4620.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मॉंट ब्लॅंक (फ्रेंच: Mont Blanc, इटालियन: Monte Bianco; पांढरे शिखर) हा आल्प्स पर्वतरांगेमधील मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ४,८१० मीटर (१५,७८० फूट) उंचीचा हा पर्वत इटली व फ्रान्स देशांच्या सीमेवर स्थित असून तो युरोपियन संघाच्या देशांमधील सर्वात उंच पर्वत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4622.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9002eb5834beec51db7d6e9437ed0818ef5e28a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4622.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँटकाम काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4627.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24e2f0566125d61e9b492e3f6653eff03bf25fd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4627.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँटगोमरी काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4637.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e24253675dddd2bb7fb0b45cc29a1d6a4ba06c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4637.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटगोमरी काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +माँटगोमरी काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4642.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3529bb8638707666daafd0222321b2549ecf1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4642.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँटगोमरी काउंटी, मेरीलँड ही अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4655.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc416ab4a14e322f6782a61e97f6597ffd262740 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4655.txt @@ -0,0 +1,55 @@ +लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/व्हरमॉंट" nor "Template:Location map व्हरमॉंट" exists.मॉंतपेलिएचे व्हरमॉंटमधील स्थान +गुणक: 44°15′N 72°34′W / 44.250°N 72.567°W / 44.250; -72.567 + +मॉंतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमॉंट राज्याची राजधानी आहे. केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले मॉंतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे. +मॉंतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_466.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d01b376fea89bcad7a4c54fd9bd924384d469fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_466.txt @@ -0,0 +1,7 @@ +भुरी बाई (नामभेद: भूरी बाई) ह्या एक भारतीय भिल्ल कलाकार आहेत. झाबुआ जिल्हा, मध्य प्रदेश येथील पिटोला गावात जन्मलेल्या भुरी बाई ह्या भारतातील सर्वात मोठा आदिवासी गट भिल्ल समाजाच्या आहेत. त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या सर्वोच्च पुरस्कार शिखर सन्मान सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.[१] त्यांना इ.स. २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देण्यात आला.[२][३] +पिटोलाच्या भुरीबाई त्यांच्या चित्रांसाठी कागद आणि कॅनव्हास वापरणाऱ्या पहिल्या भिल्ल कलाकार आहेत. भारत भवनचे तत्कालीन संचालक जगदीश स्वामीनाथन यांनी त्यांना कागदावर चित्र काढण्यास सांगितले.[४] अशा प्रकारे भुरीबाईंनी भिल्ल कलाकार म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्या दिवशी भुरीबाईंनी त्यांच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित घोडा चितारला आणि श्वेतपत्रिकेवर पोस्टर पेंटचा अद्भुत परिणाम झाला. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. याबद्दल त्यांनी आपला अनुभव पुढील प्रमाणे व्यक्त केला, +“गावाकडे आम्हाला झाडांपासून आणि ओल्या मातीतून रंग काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. परंतु इथे मात्र मला रंगांच्या अनेक छटा आणि तयार ब्रश देण्यात आला."[५] सुरुवातीला भुरीबाईंना बसून चित्र रंगवताना जरा अवघडल्या सारखे वाटले. पण चित्रकलेच्या जादूने त्यांना चांगलेच वेड लावले आणि त्या या आधुनिक पद्धतीने चित्र काढण्यात सरावल्या. +भूरीबाई आता भोपाळमधील आदिवासी लोककला अकादमी मध्ये कलाकार म्हणून काम करतात. त्यांना मध्य प्रदेश सरकारकडून तेथील सर्वोच्च पुरस्कार शिखर सन्मान (१९८६ - ८७) मिळाला. तर इ.स. १९९८ मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांना अहिल्या सन्मानाने सन्मानित केले. तर इ.स. २०२१ मध्ये भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला..[६][७] + +भुरीबाई सांगतात की प्रत्येक वेळी जेव्हा ती चित्रकला सुरू करते, ती तिचे लक्ष भिल्ल जीवन आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर केंद्रित करते आणि जेव्हा एखादी विशिष्ट संकल्पना त्यांना सुचते, तेव्हा त्या ती संकल्पना कॅनव्हासवर उतरवतात. त्यांच्या चित्रांमध्ये जंगलातील प्राणी, जंगल आणि झाडी झुडपे तसेच गाटला (स्मारक स्तंभ), भिल्ल देवता, वेशभूषा, दागिने आणि गोंदण (टॅटू), झोपड्या आणि धान्य, टोप्या, सण आणि नृत्य आणि मौखिक कथांसह भिल्ल समाजाच्या जीवनातील प्रत्येक पैलू समाविष्ट आहेत. भूरीबाईंनी अलीकडेच झाडे आणि प्राणी तसेच विमान, दूरदर्शन, कार आणि बसची चित्रे सुद्धा काढण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील ती पहिली भिल्ल आदिवासी महिला कलाकार आहे, जीने गावच्या झोपड्यांच्या भिंतींच्या पलीकडे थोडी सुधारणा करून पारंपारिक पिथोरा चित्रे काढण्याचे धाडस केले. त्यांनी त्यांची लोक-कला मातीच्या भिंतींपासून विशाल कॅनव्हास आणि कागदावर हस्तांतरित केली.[८] +भुरी बाईना एकूण सहा मुले आहेत. त्यांनी आपल्या मुलांनासुद्धा आपली कला शिकवली आहे. पैकी त्यांच्या दोन मुली, धाकटा मुलगा आणि सून या कलेचा सराव करतात.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4692.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9a6d983ef6db71ca37c58aaf75e6021062d0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4692.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 45°30′N 73°33′W / 45.500°N 73.550°W / 45.500; -73.550 + +माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे. +मॉन्ट्रियॉल शहर क्वूबेक प्रांताच्या नैर्ऋत्य भागात सेंट लॉरेन्स व ओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. +मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात. +माँत्रिऑल शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. माँत्रिऑल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो. +मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ माॅन्ट्रियॉलमध्ये आहे. +आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा मॉंत्रियाॅल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी. व डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात. +१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4707.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df327e35ad8945f8baf49fd09bfc2e12373dc08a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4707.txt @@ -0,0 +1,60 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉंटसेराट हा युनायटेड किंग्डमचा कॅरिबियनमधील प्रदेश आहे. + +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4714.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4714.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4723.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4723.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4726.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4726.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4736.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2705efd63300e9f722399786cc749bfaad32f65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4736.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 50°27′0″N 3°57′0″E / 50.45000°N 3.95000°E / 50.45000; 3.95000 + +मॉंस (फ्रेंच: Mons; डच: Bergen) ही बेल्जियम देशामधील एनो ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात ब्रसेल्सपासून ७० किमी अंतरावर तर फ्रान्सच्या लीलपासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे. +बेल्जियम व युरोपाच्या इतिहासामध्ये मॉंसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले मॉंस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली मॉंसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी चौदाव्या लुईने मॉंसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे मॉंसचा ताबा फ्रान्स, ऑस्ट्रिया व नेदरलँड्स देशांकडे राहिला. १८१४ साली पहिल्या विल्यमने मॉंसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या. +चेक प्रजासत्ताकातील पेलजाईन ह्या शहरासोबत मॉंसची २०१५ सालामधील युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड झाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4750.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0df287aa3164a25da45018a37e157b78f449895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4750.txt @@ -0,0 +1,13 @@ +मांगरूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +मांगरूळ हे गाव शिराळ्याच्या पश्चिमेस राज्य मार्ग क्र. 111 वर शिराळा ते कोकरूड दरम्यान शिराळा येथून 13 किमी अंतरावर आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सविनय कायदेभंग चळवळीत बिळाशी येथे 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात 5 सप्टेंबर 1930 रोजी मांगरूळचे धोंडी संतू कुंभार आणि शंकर उर्फ सिताराम भाऊ चांभार हे दोन जण हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ मांगरूळ गावात हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. 5 सप्टेंबर 1930 रोजी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात दोन हुतात्म्यांचे सहकारी सत्याग्रही ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायाच्या मांडीस गोळी लागली होती. +गावात दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेस चिंचेश्वर (चिंतामणी, चिचूबा) मंदिर येथे दोन दिवसांची यात्रा असते. यावेळेस पंचक्रोशीतील तसेच इचलकरंजी वगैरे ठिकाणांबरोबरच गावातून मुंबई व इतर शहरांत कामानिमित्त गेलेल्या भाविकांची मोठी गर्दी असते. +दि. 1 डिसेंबर 2009 रोजी मांगरूळ गावातील नालंदा बुद्ध विहार येथे गावातील पोलीस उपअधीक्षक दीपक ज्ञानदेव कांबळे यांनी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी नालंदा अभ्यास केंद्र सुरू केले. येथे समृद्ध ग्रंथालय, मुलांबरोबरच मुलींसाठीही विशेष अभ्यासिका उपलब्ध आहे. संपूर्णपणे मोफत असलेला आणि विद्यार्थ्यानी स्वतःच संचलित केलेला हा अभिनव उपक्रम आहे. +नालंदा अभ्यास केंद्र, मांगरूळ येथून अमर मानसिंग मोहिते (AVP/DySP), अभिजित वसंत कुंभार (उपशिक्षणाधिकारी) यांची राज्यसेवेत निवड झाली आहे. 11 जून 2022 रोजी अभिजित वसंत कुंभार यांचा MPSC राज्यसेवा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. +हुतात्मा स्मारक, +चिंचेश्वर (चिंतामणी, चिचूबा) मंदिर, +नालंदा अभ्यास केंद्र, मांगरूळ +बिळाशी +कोकरूड +रिळे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4785.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56e201f3f316add615e8b252b28f900c56647c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4785.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4791.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ce04932b89d8bae5c83ae337e7fa35040764c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4791.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांगुर्डा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4816.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f955465134b2eb86bde84c92548bd846a2a1d3f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4816.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4818.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9403624d22ea3a3e64b7c6ecddeb6867e7296407 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4818.txt @@ -0,0 +1,27 @@ +मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. +प्रकल्पिय साठा क्षमता, +एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), +उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, +मृत साठा = 47.130 दलघमी, +पूर्ण संचय पातळी = 642.37 मी. +मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. +कृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरू आहे. +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची  : 42.10 मी (सर्वोच्च) +लांबी  : ४२०३ मी +प्रकार : S - आकार +लांबी : २६० मी. +सर्वोच्च विसर्ग : ६००० घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : १८, (१२ X ५ मी) +क्षेत्रफळ  : ४३.९२३ वर्ग कि.मी. +क्षमता  : २५०.७० दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : १७३.३२ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : ४३४९.३० हेक्टर +लांबी  : ९० कि.मी. +क्षमता  : ८ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : २३६९० हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : २१३२१ हेक्टर +लांबी  : ७८ कि.मी. +क्षमता  : ८ घनमीटर / सेकंद +लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून "धनेगाव धरण" अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणाऱ्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. +१४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4845.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c5ce4199988937be0300aea71ae4c366bf3cded --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4845.txt @@ -0,0 +1 @@ +मांज‍र्‍या सर्प भारतात आढळणारा बिनविषारी साप आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4892.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8298ced6e73eb24c26f5544822d3e4c3cd92129c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4892.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांडवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4929.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c34276d5ca203438f485ea2143e742893bd9bd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4929.txt @@ -0,0 +1,7 @@ +मांडुक्योपनिषद हे अथर्ववेद शाखेतील एक उपनिषद आहे . हे उपनिषद संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. त्याचे निर्माते वैदिक काळातील ऋषी मानले जातात. उपनिषदांमध्ये सांगितलेले जग आणि भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ आणि त्यांच्या पलीकडे जे काही नित्य घटक सर्वत्र पसरलेले आहेत. हे सर्व ब्रह्म आहे आणि हा आत्मा देखील ब्रह्म आहे. आत्मा चतुष्पाद आहे, म्हणजेच जागरण, स्वप्न, निद्रा आणि तुरिया या त्याच्या प्रकट होण्याच्या चार अवस्था आहेत. या उपनिषद मध्ये, या प्रमाणात एक अद्वितीय स्पष्टीकरण देऊन ओम , मूळ आणि ताल या जिवंत अस्तित्व आणि विश्व पासून ब्राह्मण आणि ओळख किंवा तीन न साजरा सुधारण्यावर जोर दिला करण्यात आले आहे. याशिवाय वैश्वानर या शब्दाचे वर्णन इतर ग्रंथांमध्येही आढळते. +मांडूक्य उपनिषद हे छोट्या उपनिषदांपैकी एक असून त्याचे वर्गीकरण अथर्ववेदासोबत केले जाते. +मुक्तिकोपनिषदात दिलेल्या १०८ उपनिषदांच्या यादीमध्ये या उपनिषदाचा क्रमांक सहावा आहे. हे गद्यात्मक असून यात एकूण १२ मंत्र आहेत. यापैकी काही मंत्रांचा संबंध ऋग्वेदाशीही जोडला जातो. हे उपनिषद् ओम्‌ (ॐ) या अक्षराची चर्चा करते, चेतनेच्या चार अवस्थांचा सिद्धांत मांडते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे प्रतिपादन करते. +मांडूक्य उपनिषदाचे खास वैशिष्ट्य असे की मुक्तिकोपनिषदातील श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील संवादानुसार मोक्षप्राप्तीसाठी हे एकच उपनिषद् पुरेसे आहे असे प्रभू श्रीरामांनी म्हटलेले आहे. मुक्तिकोपनिषदातील ११ मुख्य उपनिषदांमध्ये मांडूक्य उपनिषदाचा पहिला क्रमांक आहे. या उपनिषदावर गौडपादाचार्य यांच्या कारिका आहेत. हिंदू तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांच्यामधील परस्परसंबंध दाखवण्यासाठी ज्या संहितांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांपैकी मांडूक्योपनिषद एक आहे. +मांडूक्य या या शब्दाची उत्पत्ती ‘मंडूक’ या शब्दापासून झाली असावी असे मानले जाते. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. बेडूक, घोड्याची एक विशिष्ट प्रजाती, घोड्याच्या खुरांचे तळ किंवा आध्यात्मिक तणाव असे याचे काही अर्थ होतात. काही लेखकांनी मांडूक्य उपनिषदाच्या नामाभिधानामागे बेडूक हा अर्थ असल्याचे सुचविलेले आहे. +‘मन’ याचा अर्थ हृदय किंवा मन आणि ‘डूक’ याचा दुःख याचा अर्थ तणाव किंवा दुःख निर्माण करणाऱ्या अडचणी. परमेश्वराबाबतचे आकलन चुकीचे असल्यास किंवा असे आकलनच नसल्यास दुःख किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, अशीही व्युत्पत्ती मांडली जाते. +उपनिषदांच्या रचनेच्या काळाबाबत विद्वानांचे एकमत नाही. काही उपनिषदे वेदांच्या मूळ संहितांचा भाग मानली जातात. वेद हे सर्वात जुने आहेत. काही उपनिषदे ब्राह्मण्य आणि आरण्यक ग्रंथांचा भाग मानली जातात. त्यांची रचना संहितांनंतरची आहे. हिंदू धर्मातील श्रुती धर्मग्रंथांमध्ये उपनिषदे महत्त्वाची आहेत. ते वैदिक साहित्याचा अविभाज्य भाग आहेत. उपनिषदांमध्ये, कर्मकांडांना 'कनिष्ठ' संबोधून ज्ञानाला महत्त्व दिले गेले कारण ज्ञान स्थूल (जग आणि पदार्थ) पासून सूक्ष्म (मन आणि आत्मा) कडे घेऊन जाते. ब्रह्म , जीव आणि जगाचे ज्ञान प्राप्त करणे ही उपनिषदांची मूलभूत शिकवण आहे. उपनिषदे हा भारतीय आध्यात्मिक विचारांचा मूळ पाया आहे, भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा स्रोत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4992.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01fed34ebdc9d73befb2af502359cba3de6320b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_4992.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॅड्डियस मायकेल माइक फिंडले (१९ ऑक्टोबर, १९४३:सेंट व्हिन्सेंट - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६९ ते १९७३ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5003.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aeccf494acaf63d19410e12e35675d41e1c63bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5003.txt @@ -0,0 +1,3 @@ +नोव्हेंबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5013.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea905ac35e64fc0106eba19a42b7a9d7199b8a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5013.txt @@ -0,0 +1 @@ +माईन काम्फ (मराठी: माझा लढा) हे ॲडॉल्फ हिटलरने १९२५ मध्ये लिहिलेले त्याचे आत्मचरित्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5055.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df77700685caefbc4d67a7b232566fe51401dd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5055.txt @@ -0,0 +1 @@ +माउंट अबू वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या राजस्थान राज्यातील अभयारण्य आहे. अरवली पर्वतरांगेतील हे अभयारण्य १९८० साली घोषित केले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5064.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3dc21281d3736f462dbf9c693d59a7d59d84da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5064.txt @@ -0,0 +1,2 @@ + +माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केन्याच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5079.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4a60e7179146c8e39861c89db083fcf4a9ee394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5079.txt @@ -0,0 +1,3 @@ +माउंट माउंगानुई हे न्यू झीलंडच्या टौरंगा शहराचे मोठे उपनगर आहे. +येथून जवळ याच नावाचा डोंगर आहे. याला स्थानिक माओरी भाषेत माउआओ म्हणतात. +बे ओव्हल हे न्यू झीलंडचे प्रमुख क्रिकेट मैदान येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5084.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bd540868c72c6f834babd8ac094f9021d546fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5084.txt @@ -0,0 +1,9 @@ + +माउंट मासिव्ह अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२८ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा १२ फुटांनी कमी तर माउंट हार्वर्डपेक्षा ७ फुटांनी जास्त आहे. +१९२९मधील जागतिक मंदीनंतर माउंट एल्बर्ट आणि माउंट मासिव्हच्या उंचीबद्दल अनेक वाद झालेले आहेत. माउंट मासिव्हचे चाहते अनेकदा येथे दगडधोंडे रचून त्याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एल्बर्टचे चाहते हे मोडून पाडतात.[१] +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5104.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62735fe2eb58f7c00f19b16102f97f7f2b4095d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5104.txt @@ -0,0 +1,2 @@ +माउंड दाबकलम (MOUND LAYERING) +ही कलमपद्धत आपल्याकडे प्रचलित नाही. यात झाड जमिनीच्या वर थोड्या ऊंचीवर कापून काढतात. हे कलम झाड सुप्तावस्थेत असताना करतात. त्या कापलेल्या भागावर फुटलेल्या धुमराच्या तळाशी मातीचा किंवा माध्यमाचा छोटासा ढीग करतात. त्यातून निघनाऱ्या धुमाऱ्याना मुळया फुटतात. फुटलेल्या धुमाऱ्यावर माती असल्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी इटीओलेशन होऊन मुळया फुटण्यास मदत होते. युरोपात- सफरचंदाचे खुंट यांच्याकरता या कलमपद्धतीचा वापर करतात. मुळया फुटलेले धुमारे काढल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा नवीन धुमारे फुटतात. त्यावेळी पुन्हा त्यांच्या तळाशी मातीचा ढीगारा केला की त्यांना मुळया फुटतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5180.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da19022ae755e44a037db368f2750dfba747a6d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5180.txt @@ -0,0 +1,18 @@ +माकुणसार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर रामबाग प्राथमिक शाळा सोडल्यानंतर लगेचच हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ६.५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.उन्हाळ्यात येथे भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. येथे दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून केला जातो.सफाळे रेल्वे स्थानकातून भल्या पहाटे येथील दुधवाले मुंबईत दूध घेऊन जात असत.त्या गाडीला दूधवाल्यांची गाडी म्हणून ओळखले जाई. अलीकडे खाणावळ तसेच अन्य दुग्ध उत्पादने उदा.श्रीखंड, पनीर, ताक,चक्का, मावा, लस्सी,दही,पेढे,बासुंदी तयार करून विकली जातात. खाण्यापिण्याचे कंत्राटदार म्हणून येथील नवीन पिढी व्यवसायात उतरली आहे. +माकुणसार ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथमच आपल्या गावातील पक्षीगणना केली आहे.परिसरात ३६ स्थलांतरित प्रजातीसह एकूण ९१ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. माकुणसार खाडी, मालजुई बंधारा, अनेक पाणथळ जागा येथे विविध देशीविदेशी प्रजातींचे पक्षी आढळले.मुख्यतः खालील पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या. अमुर ससाणा, गप्पीदास,तुतारी, करढोक म्हणजेच पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत स्टॉर्क, चमच्या, ग्रे हेरॉन, एरगेटस् हे स्थलांतरित पक्षी तर पाणकावळे, घार, टिटवी, होले, खंड्या, वेडाराघू, सुभग, कोतवाल, बुलबुल, चीरक, शिंजीर, हरोळी हे स्थानिक पक्षी आढळून आले.[१] +शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[२] +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६२६ कुटुंबे राहतात. एकूण २५०० लोकसंख्येपैकी १२४९ पुरुष तर १२५१ महिला आहेत. गावाची साक्षरता ९०.९५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९४.३३ आहे तर स्त्री साक्षरता ८७.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.९२ टक्के आहे. मुख्यतः वाडवळ,भंडारी,आगरी समाजातील लोक येथे राहतात.ते छोट्या प्रमाणावर शेती व दुग्ध व्यवसाय करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा केले जाते.हल्ली मोठ्या प्रमाणावर येथील लोक नोकरी, व्यवसाय, धंदा,कंत्राटी कामानिमित्त मुंबई तसेच सुरत वगैरे ठिकाणी रोज ये-जा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात. +भादवे, चहाडे, वासरे, खडकोळी, तांदुळवाडी, रामबाग, विळंगी, खटाळी, दांडा, उसरणी, दहिसर तर्फे माहीम, टिघरे ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc +३ +https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +५. http://tourism.gov.in/ +६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +७. https://palghar.gov.in/ +८. https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5181.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..540290da6a5d27cc123a4833a9d6faa14a357efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5181.txt @@ -0,0 +1 @@ +माकोतो कोबायाशी हे जपानी भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना टोशिहिदे मस्कावा व योईचिरो नाम्बू यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मूलभूत कणांसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5192.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1648931ec5fe5ab64b52b54c98bd41e04dc4a254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5192.txt @@ -0,0 +1,27 @@ +मॅक्स बॉर्न  (११ डिसेंबर, १८८२ – ५ जानेवारी, १९७०) हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. +मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर, १८८२ रोजी ब्रेस्लॉ (आताचे व्रोत्सवाफ) येथील एका यहुदी कुटुंबात झाला. गुस्ताव बॉर्न हे त्यांचे वडील होते; तर मार्गारेट कॉफमन ही त्यांची आई होती. मॅक्स ४ वर्षांचा असताना २९ ऑगस्ट, १८८६ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. मॅक्सला कॅंथी (जन्म १८८४) नावाची एक बहीण होती; व वुल्फगॅन्ग नावाचा एक सावत्र भाऊ होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5204.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b9287b71876fe97ab511f3bc44b0833faa971f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5204.txt @@ -0,0 +1,2 @@ +माखाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5219.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3900c081c0780a4b369361116abc63079f030bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5219.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 52°8′N 11°37′E / 52.133°N 11.617°E / 52.133; 11.617 + +माक्देबुर्ग ही जर्मनीमधील जाक्सन-आनहाल्ट ह्या राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5233.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d8be3725c9b0a0a8f3eac80f9e88019af3118b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5233.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ कृष्ण द्वादशी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5249.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18c944d0573215b2577b5e9cae475625eb460f47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5249.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ शुद्ध चतुर्थी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5265.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7789af1d512dabee6b92c1ed4e179c863d838f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5265.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5274.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f7867332633576754406893a696bc8d7dd93a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5274.txt @@ -0,0 +1 @@ +माचिकेस वेनेझुएलाच्या झुलिया राज्यातील शहर आहे. कोलंबियाच्या सीमेजवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या अंदाजानुसार १,५०,००० होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5292.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..802490abe40340ae406316e0cdb88b5e80189738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5292.txt @@ -0,0 +1,8 @@ + माजगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5311.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5000931c1583566f8d4909b1588a0b7e699cf67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5311.txt @@ -0,0 +1,2 @@ + माजरे जांभुळपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5313.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d39cab168bb98544f577bfe3bb90e6698d59b6d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5313.txt @@ -0,0 +1,8 @@ + माजरेकाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5314.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f62f96eb5d6e38de2d97efc4e361ab2e6305d900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5314.txt @@ -0,0 +1,2 @@ +माजरेवरवट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5319.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f28dc7e1273ec3a77587c543ad1378347b5e725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5319.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९° ०९′ १८.४७″ N, ७६° १२′ ३५.७″ E +माजलगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर माजलगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. माजलगाव येथे मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. माजलगाव हा महाराष्ट्र विधानसभेचा एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5337.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b78b49139966b491613db158fc88b66bea0f240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5337.txt @@ -0,0 +1,4 @@ +माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.[१] +दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली 'पूर्वा' मासिकात प्रथमतः छापण्यात आले. +कांबळे ह्या जन्माने महार, पुढे १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने धर्मांतर, महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. +या पुस्तकावर आधारीत नाजुका नावाची मालिका आली आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5338.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b78b49139966b491613db158fc88b66bea0f240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5338.txt @@ -0,0 +1,4 @@ +माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.[१] +दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली 'पूर्वा' मासिकात प्रथमतः छापण्यात आले. +कांबळे ह्या जन्माने महार, पुढे १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने धर्मांतर, महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. +या पुस्तकावर आधारीत नाजुका नावाची मालिका आली आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5342.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..613c1c15ce24299a1d33a19064294c8b6fcb7d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5342.txt @@ -0,0 +1,3 @@ + +माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा] +या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5344.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..613c1c15ce24299a1d33a19064294c8b6fcb7d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5344.txt @@ -0,0 +1,3 @@ + +माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा] +या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5358.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69a7e679bba7f6db002eace4f321a33a7d681175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5358.txt @@ -0,0 +1,2 @@ + +माझा पती करोडपती हा सचिन दिग्दर्शित आणि चेलाराम भाटिया व लालचंद भाटिया निर्मितीत १९८८ सालीचा भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. २० जानेवारी १९८८ तारखेला महाराष्ट्र येथे प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, सुहास भालेकर, मच्छिंद्र कांबळी, जयराम कुलकर्णी, शुभा खोटे व निळू फुले ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5372.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..852158ae35d21c37540c255e3b6abdab07f7836e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5372.txt @@ -0,0 +1,3 @@ +माझी चित्तरकथा हे डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेले पुस्तक आहे. अवचट हे चित्रकारही आहेत. या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या चित्रकला प्रवासाविषयी नोंदविले आहे. +अवचट यांनी लहानपणी मोर, हत्ती, दगड, डोंगर, झाडं, माणसं यांची भरपूर चित्रं काढली. स्केचपेन, बाॅल पाॅइंट पेन, मार्कर्स, ‘एच’, ‘बी’चे सुईसारखे शिसं असलेल्या क्लच पेन्सिल्स… ऑइल पेस्टल, साॅफ्ट ड्राय पेस्टल अशी अनेक माध्यमं वापरून सातत्याने प्रयोग करत त्यांनी चित्रांचा अभ्यास केला आहे असे ते नोंदवतात. +या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील मोर वैशिष्ट्यपूर्ण आहे.   सहजसोप्या -साध्या रेषेतून उमटलेली भरपूर चित्रं या पुस्तकात आहेत. एकमेकांशी गप्पा मारणारी एकमेकांना बिलगून बसलेली मायाळू माणसे, आदिमानवाच्या गुहेतील चित्रांची आठवण होईल अशी नाजूक रेषांतील माणसं , पाना - फुलांसारखीच एकमेकांत गुंतून गेलेली युगुलांची चित्र … जाड मार्करच्या रेषांनी वेगवेगळे भाव दाखवणारे भावपूर्ण चेहरे, शिल्प आहेत असा भास होणारे एकमेकांना जोडलेले बारिक टोकाच्या पेनने शेडिंग केलेले चेहरे. डोंगरातून फिरणारे हत्ती, पानांच्या पसा-याचा पिसारा झालेले मोर… आणि खूप खूप झा…. आभाळ व्यापून टाकलेली, घनदाट जंगलातील, गार गार सावली देणारी अशी झाडे, धुक्यात हरवलेली काहीशी गूढ वाटणारी क्लच पेन्सिलने शेडिंग केलेली झाडे , डोंगर. .. म्हातारबाबा … ऑइल पेस्टलमधे केलेली काहीशी अमूर्त वाटणारी मात्र मनाला नवी उमेद देणारी चित्रे अशी विविध प्रकारची अनेक चित्रं या पुस्तकात आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5394.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..188843b0cd24ef35c0a6375d6b4189ba6fd6ab33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5394.txt @@ -0,0 +1,2 @@ + माटवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5401.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99892c78cdb0944bdc12576d0a825c280c008ca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5401.txt @@ -0,0 +1,6 @@ +माटुंगा रोड हे मुंबई शहराच्या माहीम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक येथून जवळच आहे. सर्व मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. प.रे.वरील हे सर्वात लहान स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5406.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5f90e0fdb5af7ecb43c2235de4d42494b005fe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5406.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°48′N 77°82′E / 33.800°N 78.367°E / 33.800; 78.367 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश + +माट्सेलाग हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील कारु तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5414.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..006e87f342af9ee6d57741554daeaecf9defbb21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5414.txt @@ -0,0 +1,2 @@ +माडका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5437.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..347af5f69678d9634703b01096de72f0c76bdab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5437.txt @@ -0,0 +1,8 @@ + माडुरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5452.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..784853c730779add136f88ee1ba908623438a4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5452.txt @@ -0,0 +1 @@ +माण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5455.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ca4cf512ab238a0a82760f6284032fe2effaf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5455.txt @@ -0,0 +1,34 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५५१८०४ असलेले माण हे गाव, ठाणे (एम कॉर्प.) या जिल्ह्यातील २५४.२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २०६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२६३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर ठाणे (एम कॉर्प.) हे ८३ किलोमीटर अंतरावर आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. +आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या प्रेरणेने हे गाव गावकऱ्यांनी ग्रामदानी म्हणून घोषित केले. याची सरकारी सूचना दि.3 ऑक्टोबर 1974 रोजी काढण्यात आली.[२] +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : पदवी महाविद्यालय ओंदे येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा विक्रमगड येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा विक्रमगड येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र विक्रमगड येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय ठाणे (एम कॉर्प.) येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा ठाणे (एम कॉर्प.) येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5461.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e097a3dbfe14a068da94d79b6e925c156020b54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5461.txt @@ -0,0 +1,3 @@ +माणक नगर रेल्वे स्थानक उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील एक लहान रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा  कोड MKG आहे. हे लखनौ शहराची सेवा करते. स्टेशनमध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्मवर चांगले आश्रयस्थान नाहीत. +माणक नगर हे लखनौ मधील स्थानिक स्थानांपैकी एक आहे आणि ते लखनौ-कानपूर उपनगरी रेल्वेवर आहे .[१][२] +माणक नगर येथून धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5473.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f011c8db876beaf7c0db5d31e586cbc882a5ff87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5473.txt @@ -0,0 +1,8 @@ + माणकीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5479.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58c1c8fab2ae1683a9330d902303993bb6a253e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5479.txt @@ -0,0 +1,4 @@ +माणकेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील झोडगे या गावात असलेले शिवमंदिर आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. +झोडगे गावाच्या दक्षिणेस हे शिवालय आहे. मंदिराच्या दक्षिणेस झुटुंबा डोंगर (झोटिंगाचा डोंगर) आहे. झुटुंबा ऊर्फ झोटिंगबाबा या नाथपंथीय साधूच्या वास्तव्यावरून या डोंगराला नाव पडलेम् असे मानले जाते [ संदर्भ हवा ].मंदिराविषयी अधिक जाणुन घेण्यासाठी "माझे गाव" येथे जा. +सारीपाटाच्या चौकटीसारखी देवालयाची रचना आहे. मंदिराच्या भिंतींवर पौराणिक विषयांवरील शिल्पे आहेत. शिवाय मुख्य मंदिराच्या छोट्या प्रतिकृतींप्रमाणे भासणारी उरुशृंगे कळसापर्यंत प्रमाणबद्धपणे बसवली आहेत. भिंतींवरील शिल्पांमध्ये काही कामशिल्पेही आढळतात. मंदिराला दर्शनी भागावर व डाव्या-उजव्या बाजूला प्राण्यांच्या शिल्पाकृती असलेली महिरप आहे. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला सन्मुख असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे. जमिनीपासून ४०-५० फुटांवर साधनेसाठी खोली आहे. माध्यान्हीच्या सूर्याची किरणे शिवलिंगावर पडू शकतील, असे छोटे छिद्र कळसावर आहे. +प्रवेशद्वार ते सभामंडपादरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. सभामंडपात दोन मोठे, अखंड खांब आहेत. सभामंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूला शिल्पशास्त्रात भोगमंडप संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या दोन खोल्या आहेत. या खोल्यांत देवाला अर्पण करावयाच्या वस्तू ठेवल्या जात. सभामंडप ते गाभारा यांदरम्यान दगडी कासव आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही उभ्या बाजूंना यक्ष-किन्नर-गंधर्वाचे शिल्प व वरील आडव्या बाजूच्या मध्यभागी गणपतीचे शिल्प आहे. गाभाऱ्यात उत्तराभिमुखी शिवलिंग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5498.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bdc769cd21478ba6ac31bd45f5e61c052fa5e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5498.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5510.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c4ba677c059b5d3ea8f4863b80f251bd7a12cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5510.txt @@ -0,0 +1,9 @@ +माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे.या भागात माण नावाची वैशिष्ट्यपूर्ण चिकणमाती आढळते. माणदेशाव्यतिरिक्त ही माती इतरत्र सापडत नाही. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. माणदेश च्या मातीतील लेखक जयराम शिंदे यांची अनेक प्रकारची पुस्तके  माणदेश प्रकाशन स्वरूपात आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून. लेखक जयराम शिंदे यांनी माणदेश प्रकाशन मधून सातारा जिल्हा माहिती पुस्तक संपादित केले असून त्यात माणदेशची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे + +माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे. +मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या माणदेशी माणसे या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. शंकरराव खरात हे माणदेशातील थोर साहित्यिक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.शंकरराव खरातांचे तराळअंतराळ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. +• बरिकराव = छोटा दीर +• माय = सर्वात छोटी चुलती +• परडा = गोठा +• अदमाशी = अर्धवट +• कुमाट = कुजका diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5512.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5745f498203a330be7431f69f57acb1e51720337 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5512.txt @@ -0,0 +1,19 @@ +मानमोहाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ मार्गाने गेल्यावर पुढे पिकरस्ता, शिलोतररस्ता, गारगावरस्ता, उज्जैनीआखाडा रस्त्याने गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उज्जैनी शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ५३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६२ कुटुंबे राहतात. एकूण २७७ लोकसंख्येपैकी १४७ पुरुष तर १३० महिला आहेत. गावाची साक्षरता ४४.८० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५६.४१ आहे तर स्त्री साक्षरता ३१.७३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.२२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +पाथर्डी, चौक, मेढे, खिडसे, ऐने, भुरीटेक, धामणी, आसे, स्वामीनगर, शास्रीनगर, ब्रह्मगाव ही जवळपासची गावे आहेत.ऐने ग्रामपंचायतीमध्ये ऐने,खिडसे, मानमोहाडी, मेढा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5543.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bf0b538975d5b3b28d1e1800f623e546cd8b460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5543.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिकनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5578.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ef77769b5f3f068214640ccf3a47850b9e62dc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5578.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5597.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec179dbefec3a0f3da285e9483249006622ccfdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5597.txt @@ -0,0 +1 @@ +माता अमृतानंदमयी तथा सुधामणी इडामन्नेल (२७ सप्टेंबर, इ.स. १९५३:अलप्पाड, कोल्लम जिल्हा, केरळ, भारत - ) या भारतीय गुरू आहेत. यांना त्यांचे अनुयायी अम्मा म्हणून ओळखतात. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था नैसर्गिक आपत्तींनंतर मदत करणे तसेच इतर समाजसेवी कामे करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_561.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..211b1b241a00e8337c2ac96fa1a755942876c7f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_561.txt @@ -0,0 +1 @@ +भय्यूजी महाराज (१९६८: शुजालपुर, इंदूर, मध्य प्रदेश, भारत - १२ जून, २०१८: मुंबई, महाराष्ट्र) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरू, कुशल वक्ता आणि समाजसेवी होते. त्यांचे जन्म नाव उदयसिंह देशमुख होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5623.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..159afb6156c21362f3a68729c8039bf075c52d9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5623.txt @@ -0,0 +1,12 @@ +माणसाच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा अथवा +प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा होय. मातृभाषा ही एक व्यक्ती जन्मापासून उघड केलेली भाषा आहे. भारतातील मातृभाषांची संख्या ही जवळपास १,६५२ आहे. +महात्मा गांधींनी त्यांच्या लेखनात मॅकॉलेच्या या धूर्त योजनेचे वर्णन केले आहे (पहा मॅकॉले ड्रीम्स, यंग इंडिया, 19 मार्च 1928, पृ. 103, ) आणि या घोषणेला "शरारती" म्हटले आहे. गांधीजी स्वतः इंग्रजीचे प्रभावी जाणकार आणि बोलणारे होते हे खरे आहे. एकदा एका इंग्रज अभ्यासकाने सांगितले की भारतात फक्त दीड लोकांना इंग्रजी येते - एक गांधीजी आणि अर्धा मि. जिना. त्यामुळे गांधीजींचे भाषेबाबतचे विचार अत्यंत संतुलित आणि गंभीर आहेत, राजकीय किंवा भावनिक नाहीत. +शिक्षण माध्यमाच्या संदर्भात गांधीजींचे विचार स्पष्ट होते. इंग्रजी भाषा लादणे हे विद्यार्थी समाजाप्रती ‘फसवे कृत्य’ असल्याचे त्यांनी मानले. भारतातील ९० टक्के लोक वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच शिक्षण घेतात, त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान मातृभाषेतच असले पाहिजे, असे त्यांचे मत होते. इ.स. 1909 मध्ये "स्वराज्य" मध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या मते हजारो लोकांना इंग्रजी शिकवणे म्हणजे त्यांना गुलाम बनवणे होय. गांधीजींचा विदेशी माध्यमाला कडवा विरोध होता. त्यांचा असा विश्वास होता की परदेशी प्रसारमाध्यमे मुलांवर अनावश्यक दबाव आणण्याच्या, स्मरणशक्ती आणि अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात आणि त्यांच्यात मौलिकतेचा अभाव निर्माण करतात. देशातील पोरांना आपल्याच घरात परदेशी बनवते. त्यांचे विधान असे होते की- +जर मला काही काळासाठी हुकूमशहा बनवले गेले तर मी लगेच परदेशी माध्यम बंद करेन. +गांधीजींच्या मते परकीय माध्यमाचा आजार विलंब न लावता ताबडतोब थांबला पाहिजे. मातृभाषेची जागा दुसरी कोणतीही भाषा घेऊ शकत नाही, असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते, "गाईचे दूध देखील आईचे दूध असू शकत नाही." +सिडनी, 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी +गांधीजींनी देशाच्या एकात्मतेसाठी इंग्रजीचे वर्चस्व लवकर संपले पाहिजे हे आवश्यक मानले. इंग्रजीचा वापर करून देशाच्या एकात्मतेचा युक्तिवाद त्यांनी मूर्खपणाचा मानला. सत्य हे आहे की भारताच्या फाळणीचे काम फक्त इंग्रजी शिक्षित लोकांचे आहे. गांधीजी म्हणाले होते - "ही समस्या सन 1938 मध्ये सोडवायला हवी होती किंवा 1947 मध्ये ती सोडवायला हवी होती." गांधीजींनी इंग्रजी भाषेला माध्यम म्हणून कडाडून विरोध तर केलाच, पण राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता प्रकट करणाऱ्या राष्ट्रभाषेच्या प्रश्नावरही विचार व्यक्त केले. तो म्हणाला होता, +स्वराज्य इंग्रजी भाषिक भारतीयांसाठी आणि त्यांच्यासाठी असेल, तर निःसंशयपणे इंग्रजी ही राष्ट्रभाषा असेल. पण स्वराज्य जर करोडो उपाशी लोकांसाठी, करोडो अशिक्षित, अशिक्षित भगिनी आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांसाठी असेल आणि ते सर्वांसाठी होणार असेल, तर हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा होऊ शकते. +घरातील मातृभाषा बोलणारी मुले हुशार असतात +परदेशात राहणारी मुले घरात कुटुंबातील सदस्यांसोबत मातृभाषा बोलतात आणि बाहेर दुसरी भाषा बोलतात ते अधिक हुशार असतात. एका नव्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांना असे आढळून आले की जी मुले शाळेत वेगळी भाषा बोलतात आणि कुटुंबातील सदस्यांसह घरात वेगळी भाषा वापरतात त्यांनी केवळ त्यांची मातृभाषा जाणणाऱ्या मुलांपेक्षा बुद्धिमत्ता चाचणीत जास्त गुण मिळवले आहेत. यूकेमध्ये राहणाऱ्या तुर्कीतील सात ते 11 वर्षे वयोगटातील 1999 मुलांचा या अभ्यासात समावेश होता. या IQ चाचणीमध्ये, दोन भाषा बोलणाऱ्या मुलांची तुलना फक्त इंग्रजी बोलणाऱ्या मुलांशी करण्यात आली.[1] +मूळ लेखन, विचार किंवा सर्जनशीलतेची जगभरात दखल घेतली जाते. आजही जगात भारताची ओळख इथल्या भाषेत लिहिलेली उपनिषद, ब्रह्मसूत्रे, योगसूत्रे, रामायण, महाभारत, नाट्यशास्त्र इत्यादींमुळे होते, जी मूळ रचना आहेत. नीरद चौधरी, राजा राव, खुशवंत सिंग यांसारख्या लेखकांकडून नाही. समाजाची सर्जनशीलता आणि मौलिकता मूलत: स्वतःच्या भाषेशी जोडलेली असते. जगात मौलिकता महत्त्वाची आहे, माध्यम नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात मूळ विचार आणि लेखन कमी होत असेल, तर त्याचे कारण 'इंग्रजीचा ओढा' हेच आहे. मूळ लेखन, परदेशी भाषेत विचार करणे अनेकदा अशक्य असते. निदान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या मूळ संस्कृतींप्रमाणे भारताचा सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णपणे नाश होईपर्यंत आणि इंग्रजी ही एकमेव भाषा होईपर्यंत. तोपर्यंत भारतीय बुद्धिजीवी इंग्रजीत जे काही बोलत राहतील, तेच युरोपियन बकवास असेल, जे बाहेर विचारता येणार नाही.[2] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5626.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a9308e274434ee2a93d688030026cb3ea7855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5626.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातृसत्ताक कुटुंबपद्धति ही एक कुटुंबपद्धती आहे. +यात कुटुंबातील मातेची किंवा वडिलधाऱ्या स्त्रीची अधिसत्ता व्यक्ती, मालमत्ता आणि व्यवहार यांच्यावर चालते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5643.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b3932f812920faa08637f3eeca31a62ec3992c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5643.txt @@ -0,0 +1 @@ +मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पंतप्रधानपदावर नियुक्त झालेला रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरुण इटालियन पंतप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5665.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5fe47cef0e559eb28900f6ab0c10b5deb5a0935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5665.txt @@ -0,0 +1 @@ +मादणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5684.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da8e17be5227f3f953787eea7dc7bcc9d04048cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5684.txt @@ -0,0 +1,2 @@ +मादीपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5720.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3208749dab9ebe70f80a095aaa148e0c851128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5720.txt @@ -0,0 +1,5 @@ +कुंजवन हा महाराष्ट्रात भोरजवळ असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे. +भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात. +गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागले. त्यावेळी वयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे गोडबोले यांनी ठरवले. इ.स. २००४ सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्‍नी स्वतः करतात. +माधव गोडबोले हे संगीताच्या खासगी शिकवण्या घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात. +या आश्रमात दूरचित्रवाणी, फ्रीज, आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5722.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c9ba7f69bdf7639982c274c1927e4ec0404470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5722.txt @@ -0,0 +1,5 @@ +माधव गोविंद काटकर हे बालसाहित्याकरता प्रसिद्ध असलेले मराठीतील कवी, कथाकार होते. +काटकरांचा जन्म डिसेंबर २५, १९१४ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावी झाला. १९३८ साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पुढे १९५४ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.टी. पदवीही प्राप्त केली. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या काटकरांनी ’विद्या विकास हायस्कूल’ शाळेत १९४७-१९७३ या काळात अध्यापन केले. या शाळेचे मुख्याध्यपकपदही त्यांनी सांभाळले. शिक्षकी पेशात असतानादेखील काटकरांचे मुक्त लेखन चालूच होते. +मे १६, २००० रोजी काटकरांचे निधन झाले. +काटकरांचे प्रकाशित झालेले साहित्य खालीलप्रमाणे आहे: + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5736.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f8bc26374721951ac4efeb618efa310552a4cce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5736.txt @@ -0,0 +1,5 @@ +माधव देवचक्के (१६ जानेवारी, १९८४:मुंबई, महाराष्ट्र ) हा एक भारतीय दूरदर्शन ,चित्रपट अभिनेता आणि मॉडेल आहे जो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या कामांसाठी ओळखला जातो. याने फू : फ्रेंडशिप अनलिमिटेड, प्रवास, जर्नी प्रेमाची, अग्गंबाई अरेच्चा २ चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१]. २०१९ मध्ये तो रिॲलिटी टेलिव्हिजन शो बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक होता.[२][३][४][५]. देवचक्के यांना मॅडी म्हणूनही ओळखले जाते.[६][७] +माधव यांनी शालेय शिक्षण आय.ए.एस. स्कूल (किंग जॉर्ज) मधून केले. त्यांनी आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून बी.कॉम. मध्ये पदवी मिळविली. तो हिंदू कुटुंबातील आहे. माधव हा चारुदत्त देवचक्के आणि कांचन देवचक्के यांचा मुलगा आहे. माधवने १ डिसेंबर २०१४ रोजी बागेश्री जोशीशी लग्न केले.[८] अभिनयात कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्याने अभिनयातील कौशल्य सुधारण्यासाठी अनेक थिएटरमधे काम केले.[९][१०] +माधव देवचक्के यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००६ पासून केली होती. माधवने २०१३ साली 'ईश्वरी' चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ज्याचे दिग्दर्शन नरेंद्र खुसपे यांनी केले होते. २००६ मध्ये तो पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरील काटा रुते कुणाला या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. मराठी मालिकांसोबतच त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. २००८-२०१२ मध्ये त्यांनी हिंदी टीव्ही सीरियल 'हमारी देवरानी' मध्ये मोहन नानावटीची भूमिका साकारली होती. २०११ मध्ये त्यांनी बिंद बनूंगा घोडी चढुंगा मधील आदर्श पोद्दारची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये त्यांनी निनाद व्हेनेज दिग्दर्शित माझा मी हा चित्रपट केला होता.[११] २०१७ मध्ये त्यांनी मोहन के ढगे या हिंदी मालिकेत अंशुलची भूमिका केली होती. या मालिकेचे प्रसारण सोनी टीव्हीवर केले जात होते.[१२][१३] +माधव यांनी काटा रुटे कुणाला, हा खेळ सावल्यांचा, घे भरारी, खेळ मांडला, देवयानी, दिल्या घर तु सुखी राहा, तुझं माझं जमेना, गोठ, तुझं माझं ब्रेकअप, सरस्वती अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. फू : फन अनलिमिटेड (२०१७), अग्गंबाई अरेच्चा २ (२०१५), सिटीझन (२०१५) यासारख्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते. २०२० मध्ये त्यांनी शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवासी’ या मराठी चित्रपटात काम केले. त्याच वर्षी त्याने विजेता या सिनेमात भूमिका केली होती.[१४][१५] +माधव देवचके आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5740.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb9413999560660eee2afec01f7970413c730b8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5740.txt @@ -0,0 +1 @@ +प्रा. एम.एन. तथा माधव नारायण कामत, (५ मे, इ.स. १८९७:उभादांडा, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी कृषिरोगशास्त्रज्ञ होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5754.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74b92d0326ab0234db2515f49d06ec5656744c88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5754.txt @@ -0,0 +1,22 @@ +माधव विद्या मंदिर ही सेवाभारती संचलित महाराष्ट्राच्या इचलकरंजी शहरातील शाळा आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा प्रकल्प आहे. ही शाळा गणेशनगर भागात आहे. विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी म्हणून हिची ओळख आहे. इचलकरंजी परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ही ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील तसेच सामान्य यंत्रमाग कामगारांची मुले आहेत. या मुलांना वेगवेगळे अनुभव मिळावेत यासाठी सर्व शिक्षक आणि संचालक सतत प्रयत्न करत असतात. +ही मुलामुलींची एकत्रित शाळा आहे. येथे बालवाडीपासून इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग आहेत. मागील वर्षी शाळेला इयत्ता ८ वी पर्यंतची परवानगी मिळाली आहे. शाळा कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालू आहे. शाळेत प्रवेश घेताना कोणत्याही स्वरूपात देणगी घेतली जात नाही. शाळेत सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन २०१७-१८ या काळात सुमारे १५ शिक्षक - शिक्षिका अखंड ज्ञानदानाचे काम करत आहेत. +कु. स्वाती कुरणे या सन २०१७-१८ या काळात मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत. +सौ. अस्मिता ठिकणे या सन २०१७-१८ या काळात +विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. +शाळेत मुलांसाठी ग्रंथालय असून सुमारे २५०० पुस्तके विद्यार्थ्यांसाठी तसेच सुमारे ५०० पुस्तके शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. सन २०१७-१८ या वर्षी आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी या संस्थेने शाळा वाचनासाठी दत्तक घेतली आहे. ५० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. +विज्ञान या विषयाची गोडी वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. +शाळेत खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. रोजचा १ तास मुलांनी मैदानावर खेळावे यासाठी शिक्षक व संचालक प्रयत्नशील असतात. + +ही शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेतील मुले स्पर्धा परीक्षा व इतर अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना शिक्षक वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. काही वेगळे उपक्रम शाळेत राबविले जातात. +ते खालीलप्रमाणे आहेत. +१. विद्यारंभ संस्कार - +२. पाऊस - +३. होतकरू विद्यार्थ्यांना मदत - +४.ओंकार मंत्र - +५. दीपावली - +६. होळी - +७. शालेय शिबीर - +८. लखोटा - +९. पर्यावरण संरक्षण उपक्रम - +तर अशी ही अल्पावधीतच गगनाला गवसणी घालणारी शाळा म्हणजे माधव विद्या मंदिर +या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी असे म्हणत असतो की diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5771.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9ce95bd8b97110924cf93a491561ebdb3ebf55a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5771.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते. +बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली [१] +पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा, परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला. +निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रुपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला. +या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली. +इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरूपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला. +पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुऊन कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले. +मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथेंमराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.[२] +या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले. +इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात. +इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन पुण्याजवळच्या थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.[३] + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5806.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c99522ad430990c88e2b67e466c064902ce134 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5806.txt @@ -0,0 +1,2 @@ + माधाळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5812.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4e64189eb4b355e991852c2b937c92603d61a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5812.txt @@ -0,0 +1,15 @@ +माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. +माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता. +इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली. +इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले. +माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली. +१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली. +एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे. +माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी). +मिळालेली नामांकने +मिळालेली नामांकने +नामांकने +नामांकन diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5817.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b3a0cf0d11e471f51420b322f5537d430776cc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5817.txt @@ -0,0 +1,13 @@ + +माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत.[ संदर्भ हवा ] बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत.[ संदर्भ हवा ] +शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे घेतले.[ संदर्भ हवा ] जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या.[ संदर्भ हवा ] +माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही ज्ञानेश्वरांची रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.[ संदर्भ हवा ] जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले.[ संदर्भ हवा ] +माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता +ज्योत्स्ना प्रकाशन +राजहंस प्रकाशन +प्रथम बुक्स +पुरंदरे प्रकाशन Archived 2014-01-25 at the Wayback Machine. +ॲमेझॉन फ्रान्स +बुक गंगा +टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'[permanent dead link] +विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5829.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80c14ece4773106519d73dd243dcfd5da2e564f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5829.txt @@ -0,0 +1 @@ +माधुरी मिसाळ या महाराष्ट्राच्या १३ व्या आणि १४ व्या विधानसभेचे सदस्य होत्या. त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत आणि वर्तमान आमदार आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5832.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69cc60b06447b7d508b5845d9660e7053a96adef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5832.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधेपुरा भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर माधेपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5853.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f803fd5a9daa84516b2c9fdf7603ce82429f68ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5853.txt @@ -0,0 +1,26 @@ +मान सीगबान हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5854.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..431084e2d06f73ce1181a3ed14f49889e3075d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5854.txt @@ -0,0 +1,11 @@ +कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा, मुंबई, इ.स.१९३८; - मुलुंड, मुंबई), २८ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी चित्रकार असून टॉनिक या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते. +सुरुवातीला टॉनिक हा हस्तलिखित कृष्णधवल स्वरूपात काही महिने आला. मुलांमधील सुप्‍त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्‍न केला होता. कथा, कविता, मुलांनी काढलेली चित्रे हे या अंकाचे बलस्थान होते. +ते रेल्वेतील प्रवास, कार्यक्रम, संमेलन अशा अनेक ठिकाणी ते रेखाचित्रे काढीत असत. ज्याचे चित्र काढले अद्सेल त्याला टॉनिकचा दहा रुपयांचा अंकही भेट देत असत. +मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. एकूण ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी वेळोवेळी पदराला खार लावून आणि वेळ पडल्यावर बायकोचे दागिने विकून नियमित प्रकाशन केले. +’टॉनिक’च्या अंकाचा दर्जा आणि छपाईबाबतही मानकरकाका काटेकोर असत. वेगवेगळे विषय अत्यंत कल्पकतेने त्यांनी ‘टॉनिक’मधून हाताळले. चित्रकला नसानसात भिनलेल्या या कलावंताने "टॉनिक‘च्या अंकात एखाद्या विषयावरील विशेषांक काढताना त्यांनी अनेक प्रयोग केले.लेखकांकडून साहित्य आणण्यासाठी ते लांबचाही प्रवास आनंदाने करीत. अंकाचे गठ्ठे स्वतः वाहत असत. एवढे करूनही अंक नुकसानीतच जात असे; पण त्याची फिकीर न करता पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने मानकरकाका नव्या अंकाची जुळवाजुळव करीत. +'टॉनिक'च्या स्थापनेपासून त्या अंकाच्या सजावटीचे तसेच ते छपाई करून विकण्यापर्यंतची सगळीच कामे मानकरकाका स्वतःच करत सत. दोन खांद्यावर 'टॉनिक'चे अंक असलेल्या दोन झोळया घेऊन काकांनी अनेक वर्षे मुंबई-ठाण्यातील अनेक जुन्या इमारतींचे जिने झिजविले आहेत. मुलांसाठी जे मी छापतो, जे मी निर्माण करतो ते त्या मुलांपर्यंत पोहोचलेच पाहिजे असा त्यांचा कायम अट्टहास असे. पुढील काळात परवडत नसले तरी 'टॉनिक' हा रंगीतच निघाला पाहिजे हा त्यांचा हट्ट होता. +मानकराकाकांची निरलस वृत्ती आणि प्रामाणिकपणा बघूनच डॉ. जयंत नारळीकर ते डॉ. विजया वाड अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंकासाठी कित्येक वर्षे आवर्जून लेखन केले. +मानकरकाकांचे राज कांबळे, श्रीकांत पाटील आदीं शिष्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले. त्यांची चित्रे लाखोंच्या किमतीत विकत घेतली जातात. +भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले मानकरका कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. उत्कृष्ट चित्रांना ते पारितोषिकही देत होते. साहित्यिक चंद्रकांत खोत, दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या व झटणाऱ्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काकांनी ६० वर्षे काम केले. +मुलांसाठी ‘टॉनिक’ नावाचे दैनिकही त्यांनी सुरू केले, मात्र तो प्रयोग फार काळ चालला नाही. +दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेशीही मानकर काका जोडलेले होते. ‘कथाकृष्ण कला केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी त्यांची पत्‍नी कथा मानकर यांच्या मदतीने ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आदी नाटके सादर केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5855.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3aafc8b4fd5725d6ebe5ebafdc44ba0c945bf2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5855.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5857.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a327c45318c8929da00b60053dd457fd473e640e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5857.txt @@ -0,0 +1,3 @@ +मानकरी हे भारतीय उपखंडातील मराठा सरदार [१] [२] आणि सैन्याने [३] वापरलेले आनुवंशिक शीर्षक आहे ज्यांच्याकडे जमीन अनुदान आणि रोख भत्ते होते. [४] ते दरबार येथे अधिकृत पदावर होते आणि त्यांना न्यायालये, परिषदा, विवाहसोहळे, सण, ग्रामसभा इत्यादींमध्ये दिल्या जाणाऱ्या काही औपचारिक सन्मान आणि भेटवस्तूंचा हक्क होता. ते वेगळेपणासाठी पात्र होते आणि त्यांना दिलेला सन्मान हा त्यांच्या किंवा त्यांच्या प्रतिष्ठित पूर्वजांच्या लष्करी, नोकरशाही किंवा आर्थिक महत्त्वाचा परिणाम होता. [५] [६] +मराठा साम्राज्याच्या विविध संस्थानांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या मराठा खानदानी लोकांकडून हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जात होता. [७] [८] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5867.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..add3e39504da3d6a7017fbc6963c49cae89936a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5867.txt @@ -0,0 +1,4 @@ +मानखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ६८ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१० कुटुंबे राहतात.गावातील एकूण ९९४ लोकसंख्येपैकी ५४२ पुरुष तर ४५२ महिला आहेत.गावात ६९४ शिक्षित तर ३०० अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ४२५ पुरुष व २६९ स्त्रिया शिक्षित तर ११७ पुरुष व १८३ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.८२ टक्के आहे. +कोप्रा, केंद्रेवाडी, सोनखेड, विळेगाव, व्होटाळा, धानोरा बुद्रुक, सटाळा, हिप्परगा, पाटोदा, पारचंडा, टाकळगाव ही जवळपासची गावे आहेत.सोनखेड ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5869.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c96fa874544d7c6c1a80bc8d9ba8e954e5fdac10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5869.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानगड हा छोटा किल्ला रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या निजामपूर गावाजवळ आहे. (रायगडाच्या पायथ्याचे छत्री निजामपूर आणि हे निजामपूर वेगळे आहे!) +पुण्याहून ताम्हिणी घाटातून किंवा मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग ६६ मार्गावरील माणगावला येता येते. तेथून निजामपूर १० कि.मी. आहे. निजामपूर ते पाचाड रस्त्याने गेल्यास बोरवाडी आणि नंतर मशीदवाडी म्हणजेच पूर्वीची मानगडवाडी हे खेडे लागते. त्या गावापासून प्रशस्त पायवाटेने पंधरा-वीस मिनिटांच्या सोप्या चढणीने मानगडाच्या अर्ध्या वाटेवरचे विंझाईदेवीचे कौलारू देऊळ लागते. विंझाई देवीच्या मंदिरापासून खोदीव पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुजांमध्ये बंदिस्त झालेला गडाचा दरवाजा दिसतो. आता दरवाज्याची कमान पडून गेली आहे. निजामपूरपासून गडापर्यंत अगदी माथ्यापर्यंत दिशादर्शक फलक लावलेले आहेत. दुर्गवीर नावाची संस्था गडाच्या संवर्धनाचे काम करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_587.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94de60bb692a607b89dc7e4fbefd45b5118ea8bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_587.txt @@ -0,0 +1,2 @@ +भैरोवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5871.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8407a0c1189b1b6ff8691e4d836cf395e322538e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5871.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातील केंद्रशासीत प्रदेश / राज्यांचे मानचिन्ह असलेले पक्षी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5874.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c42a236016d79d6e452c4e3b583515185debb6e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5874.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°8′0″N 78°43′0″E / 33.13333°N 78.71667°E / 33.13333; 78.71667 + +मानपांगोग हा भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील दुरबुक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5880.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dd5890bd3afa0c1aa2809faf1e1a9edc3188bf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5880.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानराड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5881.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..725dc7de8f56243772c8936aea8699b301095900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5881.txt @@ -0,0 +1,4 @@ +मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. +मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते. + मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे . +मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे . \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5885.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd7b2f8b824d8a5481929a74d6da89b60670b4b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5885.txt @@ -0,0 +1 @@ +मानव विज हा हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे.[१] त्याने शहीद-ए-आझम (२००२) मध्ये सुखदेव म्हणून पदार्पण केले आणि क्यूंकी सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. उडता पंजाब, रंगून, फिल्लौरी, नाम शबाना आणि अंधाधुन या चित्रपटात तो दिसला. २०२२ मध्ये, त्याने सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटात भूमिका केल्या.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5892.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83c3c9cfe07ec4f07cbe340bdec455136c2f7002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5892.txt @@ -0,0 +1,5 @@ +मानवजितसिंग संधू ( ३ नोव्हेंबर १९७६) हे एक भारतीय क्रीडा नेमबाज आहेत जे ट्रॅप नेमबाजीत प्रविण आहेत. हे २००६ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते व १९९८ मध्ये अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. २००४ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधीत्व करत होते. २००८ बीजिंग ऑलिंपिक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. ते माजी विश्व नंबर १ मधील ट्रॅप शूटर आहे. +नोव्हेंबर 2016 मध्ये पेरेझीने मानवजीत सिंग संधूची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली. संधू सनव्हरच्या लॉरेन्स शाळेत शिक्षित होते. ते पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील खेडे रट्टा खेरा पंजाबमधील आहेत. त्यांचे वडील गुरबीर सिंग आणि त्यांचे काका आहेत रणधीर सिंग आणि पराबीर सिंग. +2006 एसएसएफ वर्ल्ड नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आणि जागतिक विजेतेपद मिळविणारा पहिला भारतीय शॉटगन नेमबाज ठरला. 1998च्या आशियाई स्पर्धेत, 2002 आशियाई खेळ व 2006 आशियाई स्पर्धेत त्यांनी चार रजत पदक जिंकले आहेत. 1998च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2006च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सापळा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. आशियाई क्ले शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो 12 व्या स्थानावर होता आणि 1 9व्या वर्षी तो 19व्यांदा बांधला होता. 2010 मध्ये त्यांनी कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक जिंकला आणि पुढच्याच आठवड्यात मेक्सिकोतील विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले. 2 एप्रिल 2010 पासून, त्याला जागतिक क्रमवारीत "# 3" म्हणून स्थान मिळाले आहे. 2006 मधील त्याचे सर्वोच्च स्थान जागतिक 1 आहे. शूटिंगमध्ये त्यांचे कारकिर्दीस सुरुवात झाली आणि त्यांचे आवडते प्रामुख्याने त्यांचे वडील गुरबीर सिंग संधू यांच्यामुळे होते जे ऑलिंपियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते, त्यांचे शिक्षण लॉरेन्स स्कूल सानवार यांच्याकडून होते. पुढे त्यांनी YPS चंडीगढ, डीपीएस नवी दिल्ली आणि दिल्ली विद्यापीठ वेंकटेश्वर कॉलेज, येथे अभ्यास केला आहे. +त्यांना 2006-2007च्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, क्रीडाक्षेत्रात मिळालेल्या कामगिरीसाठी भारताचा सर्वोच्च सन्मान दिला गेला. 11 एप्रिल 2014 रोजी झालेल्या विश्वचषक टुक्सन, यूएसए येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. 2016च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या संधूने पुरूषांच्या सापळ्यात पात्रता फेरीत 16 व्या स्थानावर झेप घेतली.   +त्यांनी 124/125च्या लक्ष्यांचे आशियाई रेकॉर्ड ठेवले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5893.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc6eb14c0451ec61db3e047c67b449b380d79731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5893.txt @@ -0,0 +1,19 @@ +मानवत... +परभणी जिह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर मानवत हे गाव आहे. +26 जानेवारी 1998पासून तालुका म्हणून घोषित झाला.याचे पूर्वीचे नाव मणिपूर हे होते. +मंदिरे... +महाराष्ट्रामधील जागृत उभा महादेवाचे मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे. +शिक्षण... +प्राथमिक शाळेपासून उच्चमहाविद्यालय आहे.2 शाळा आहेत.व एक kk M महाविद्यालय आहे. +व्यवसाय... +मानवत हे कापड उद्यागासाठी खूप प्रसिद्ध आहे.आणि जिनिंग 14-15आहेत.आडत हा व्यवसाय प्रामुख्याने आहे. +शेती... +मानवत मध्ये जवळपास 70% लोक शेतीवर आधारित आहेत. +प्रामुख्याने शेतीत गहू,कापूस,सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात. +सण... +मानवत मध्ये गणपती,देवी,दीपावली, ईद हे सण सर्व लोक आनंदाने साजरे करतात... +मानवत मध्ये जवळपास 40,000 लोकसंख्या आहे. +त्यामध्ये मराठा समाज जास्त प्रमाणात आहे.तर बाकी सर्व समाज अल्प प्रमाणात आहेत.त्यामध्ये राजपूत,मुस्लिम,ब्राम्हण असे अनेक समाज आहेत... +आंबेगाव चहारुण अटोळा भोसा (मानवत) बोंदरवाडी देऊलगाव अवचर गोगलगाव हमदापूर (मानवत) हाटकरवाडी (मानवत) हत्तलवाडी इरळद (मानवत) इटाळी जंगमवाडी करंजी (मानवत) केकरजवळा खडकवाडी (मानवत) खरबा किन्होळा बुद्रुक कोल्हा (मानवत) कोल्हावाडी कोथाळा कुंभारी (मानवत) लोहरा (मानवत) मांडेवडगाव मंगरूळ बुद्रुक मंगरूळ पालमपट मानोळी (मानवत) मानवतरोड मानवतग्रामीण मानवत(एमसीआय) नागरजवळा नरळद (मानवत) पाळोदी पार्डी(टाकळी) पिंपळा पोहंडुळ (मानवत) राजुरा (मानवत) रामेटाकळी रामपुरी बुद्रुक रत्नापूर (मावळत) रूढी साखरेवाडी (मानवत) सारंगापूर सावळी (मानवत) सावंगीमगर सावरगाव खुर्द शेवडीजहागिर सोमठाणा (मानवत) सोनुळा ताडबोरगाव टाकळी निळवरणे थार (मानवत) उक्कलगाव वांगी (मानवत) वझुरबुद्रुक वझुरखुर्द +मानवतचे लोकजीवन हे अत्यंत मानवतेचे व नवनवीन शैलीचे आहे. मानवत मधील लोक साधारण मराठी बोली वापरतात ज्यात बहुप्रांतिय भाषेचा उच्चार आढळतो. मानवत मधील लोक हे समानेते रहातात व छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत म्हणून पुजतात. +रत्नापुर,उक्कलगाव, हत्तलवाडी, diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5916.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b52fb20d83fe4eac339b1327f90859337b29bcf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5916.txt @@ -0,0 +1 @@ +मानवी गाग्रू ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांत काम करते. [१] [२] तिने टीव्हीएफ पिचर्स, टीव्हीएफ ट्रिपलिंग आणि फोर मोअर शॉट्स प्लीज यासारख्या प्रसिद्ध वेब मालिकांमध्ये काम केले आहे. [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5929.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f7d82dae066cb8b3a078a8111ca9b08308f409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5929.txt @@ -0,0 +1 @@ +मानवी विभाग वायुमंडलीय पुनःप्रवेश प्रयोग (इंग्लिश: Crew Module Atmospheric Re-entry Experiment (CARE)) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भविष्यातील इस्रो कक्षीय वाहन गगनयानसाठी प्रायोगिक चाचणी वाहन आहे.[१] हे १८ डिसेंबर २०१४ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून, इस्रोने LVM 3X केर मिशन म्हणून नियुक्त केलेल्या LVM3 द्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित केले होते.[२][३] मिशनची एकूण किंमत १५५ कोटी (US$३४.४१ दशलक्ष) (२०२० मध्ये ₹२१० कोटी किंवा US$२६ दशलक्ष समतुल्य) इतकी होती. प्रक्षेपण वाहन आणि केर मॉड्यूलची किंमत १४०कोटी आणि १५ कोटी होती.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5932.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5932.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5936.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28c065cc3aeed66053bbd63873bc6a21956bc327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5936.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत[१]. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.[२] +संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5940.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16e32353049ed9dd9d0a03963b865cf4f8a63296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_5940.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानवेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6009.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..039fadb46017a2c2b04ce4f0273c47fa31275def --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6009.txt @@ -0,0 +1,134 @@ +मानोरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +अजणी +अमदारी +अमगव्हाण +अमकिन्ही +असोळा बुद्रुक +बालाजीनगर +भंडेगाव +भिलडोंगर +भोयणी +भुळी +बिदगाव +बोरव्हाबुद्रुक +चाकुर +चौसळा +चिखाली +चिसतळा +चोंधी (मानोरा) +दहिथाणा +दापुराबुद्रुक +दापुराखुर्द +दरा (मानोरा) +देर्डी +देऊरवाडी (मानोरा) +देवथाणा +धामणीमनोरा +धानोराभुसे +धानोराबुद्रुक +धानोराखुर्द +धावंडा +धोणी +डोंगरगाव (मानोरा) +एकलारा (मानोरा) +फुलुमारी +गडेगाव +गाळमगाव +गारटेक +गव्हा +घोटी (मानोरा) +गिराट +गिरडा +गिरोळी +गोगजाई +गोंदेगाव (मानोरा) +गोसटा +गुंदी +हळदा +हाताणा +हातोळी +हाट्टी +हिवाराबुद्रुक +हिवाराखुर्द +इंगळवाडी (मानोरा) +इंझोरी +जगदंबानगर +जामदरा +जामणी (मानोरा) +जमुनाखुर्द +जावळाबुद्रुक +जावळाखुर्द +जोतिबानगर +काकडचिखली +कमळापुर +करखेडा (मानोरा) +कारळी +कारपा +खंबाळा +खंडाळा (मानोरा) +खपरदरी +खपरी +खेडाआबई +खेरडा +कोळार +कोंदोळी +कुपटा +लोहारा (मानोरा) +महमदशाहपुर +माहुळी +मेंडरा +म्हासणी +मोहगाव +मुंदळा +नायगावबांदी +नायणी +पालोदी +पंचाळा +पारावा (मानोरा) +पिंपळशेंडा (मानोरा) +पिंपरी (मानोरा) +पोहरादेवी +रजितनगर +रामतीर्थ (मानोरा) +रतनवाडी (मानोरा) +रेणकापूर (मानोरा) +रोहणा +रुद्राळा +रूई (मानोरा) +साखरडोह +सावळी (मानोरा) +सावरगाव (मानोरा) +सय्यदपुर +सेवादासनगर (मानोरा) +शेंदोणा +शेंदुर्जणा (मानोरा) +शिंगणापूर (मानोरा) +सिंगडोह +सोईजणा +सोमेश्वरनगर +सोमनाथनगर +सोमठाणा (मानोरा) +ताळपबुद्रुक +टेंभाळा +तेरका +तोरनळा +उज्वलनगर +उमरदरी +उमरीबुद्रुक +उमरीखुर्द +उंबरडा +वसंतनगर (मानोरा) +वटफळ +विळेगाव (मानोरा) +विठोळी (मानोरा) +वडगाव (मानोरा) +वागदरी +वायगुळ +वायगुळतांडा +वंजारखेड +वापटा +वारदा +वारोळी +वातोड +यशवंतनगर (मानोरा) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6061.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b147543a02913bd58540faad3a5f6bc7eef5a11d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6061.txt @@ -0,0 +1,2 @@ +शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी असतो. तहसील म्हणजे वसूली. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की, इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात. जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिन्दीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकारी असतो. त्याला इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात. मामलेदाराची नेमणूक राज्य लोक सेवा आयोगाकडून होते +मामलेदार करवसूलीव्यतिरिक्त तालुक्यातली इतर अनेक सरकारी कामे करतो. तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6070.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c7bdcbb292a4ef160f87f99d21446aaf39f4744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6070.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मामाच्या गावाला जाऊ या हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी बालचित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथालेखक व दिग्दर्शक समीर हेमंत जोशी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6071.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c7bdcbb292a4ef160f87f99d21446aaf39f4744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6071.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मामाच्या गावाला जाऊ या हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी बालचित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथालेखक व दिग्दर्शक समीर हेमंत जोशी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6075.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19a912b843746bbecf2cc48e2432b9a250f718cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6075.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे (इ.स. १९१४ - २१ मार्च, इ.स. १९९०) हे दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक होते[१][२]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6084.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6843878c6c08c2903442e74d2e4da282ce2c1fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6084.txt @@ -0,0 +1,4 @@ +मामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले. +त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, +केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.[१][२] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_610.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b5dad67e670d41b729055df5f154535a14d3b74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_610.txt @@ -0,0 +1,2 @@ + भोईघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6121.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64493dd1b0680bd23204d60f59c62ab3adff1b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6121.txt @@ -0,0 +1,3 @@ +मायकेल हॉवर्ड यार्डी (नोव्हेंबर २७, इ.स. १९८०:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +यार्डी ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा संघनायक आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6147.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f05e7e7f9c6f7ce3957ff1b2b0012c38fb08b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6147.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकल ओवेन याचा जन्म १४ डिसेंबर १९७९ रोजी, चेशायर येथे झाला.तो इंग्लंड व मॅंचेस्टर युनायटेडसाठी फूटबॉल खेळतो. +मायकेल ने आपली कारकीद लिवरपूल् बरोबर १९९६ साली सुरू केली आणि पाहिला गोल १९९७ साली मारला. त्यानी प्रीमियर लिग्च्ह पहिल्याच मौसमात diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6155.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6155.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6174.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298224c1818548f4766dc8d6434649feb8541a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6174.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मायकेल चिनूया (९ जून, इ.स. १९८६:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6183.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b0af3d10e2a17bcb0f13690cfcdfb86ac43d966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6183.txt @@ -0,0 +1,37 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6201.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5398fc76995c1bf303b382a01d47b33fd1bce986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6201.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल ह्यू तिस्सेरा (२३ मार्च, १९३९:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6205.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e66088dcc3fd2a59b8d3fbe5b43887343ffff87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6205.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिखाइल तथा मायकेल पहिला (रशियन: Михаи́л Фёдорович Рома́нов; मिखाइल फ्योदोरोविच रोमानोव्ह) (जुलै १२, इ.स. १५९६ - जुलै १२, इ.स. १६४५) हा रशियाचा झार होता. +हा रोमानोव्ह वंशाचा पहिला झार होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6233.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313bf6d04c0520e48fe07e65ceccf1e93f34028e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6233.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल जॉन रेमंड रिंडेल (फेब्रुवारी ९, इ.स. १९६३:दर्बान, नाताल, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९४ ते १९९९ दरम्यान २२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6263.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372a0196fd0d1ddd808439e63b6d833a702369ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6263.txt @@ -0,0 +1,77 @@ +मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे. +[१] +‡ शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, कारण युरोपियन ग्रांप्रीच्या वेळेत त्याच्या खतरनाक पधतीने गाडी चालवल्यामुळे, त्याचा जॅक्स व्हिलनव्ह सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. त्याचे सर्व गुण रद्द करण्यात आले. जर हे घडले नसते तर तो त्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर आला असता.[१] +† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले. + + +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6277.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64493dd1b0680bd23204d60f59c62ab3adff1b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6277.txt @@ -0,0 +1,3 @@ +मायकेल हॉवर्ड यार्डी (नोव्हेंबर २७, इ.स. १९८०:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +यार्डी ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा संघनायक आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6287.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9fa121a9bbeb1ba6b87fa82829f92d29e41badf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6287.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मायक्रोनेशिया हा प्रशांत महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला देश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_629.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6a528a4926faf502c13f18a0722aa6769da8f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_629.txt @@ -0,0 +1,3 @@ +भोकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. +मुस्लिम बहुसंख्य diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6311.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba31f0bd919e13a4022efcd73b5e7975366d7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6311.txt @@ -0,0 +1,37 @@ + +मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [१]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटू व मोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत. +मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) होय. GUI म्हणजे चित्रमय दृश्यरुप. यावर आधारित सर्व प्रोग्राम चित्रमय असतात. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम सोपी (युजर फ्रेंडली) वाटते. मॉनिटरवर दिसणान्या छोट्या चित्रांच्या सहाय्याने संगणकास सूचना देता येतात. विंडोजमध्ये मेमरीचे व्यवस्थापन अधिक चांगले आहे. यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयाच्या दोन किंवा जास्त प्रोग्रामवर काम करता येते, एकाच वेळी पत्र लिहिणे, स्प्रेडशीट तयार करणे, किंवा गेम्स खेळणे अशी विविध कामे करता येतात. यासाठी आवश्यक ते प्रोग्राम उघडून ठेवले की एका प्रोग्राममधून दुस-या प्रोग्राम विंडोमध्ये सहज प्रवेश करता येतो. विंडोजवर आधारित वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेले सर्व प्रोग्राम्स बरेचसे सारखे असतात. त्यामळे हे प्रोग्राम शिकणे सोपे जाते. प्रोग्राम्स नियमबद्ध व एकमेकांशी संलग्न असतात. त्यामुळे डेटाची देवाणघेवाण सोपी जाते. +हे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी +विंडोज हा शब्द एक वा अनेक मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्यांचे वर्णन करतो. या उत्पादनांचे त्यांच्या वापराच्या दृष्टीने सामान्यपणे तीन वर्ग पडतात. +विंडोजचा इतिहास आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे नेतो, जेव्हा "चेस बिशप" नावाच्या संगणकशास्त्रज्ञाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरण संरचना तयार केली व "अंतरफलक व्यवस्थापक" (इंटरफेस मॅनेजर) हा प्रकल्प सुरू झाला. तो "विंडोज" या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये (अ‍ॅपल लिसा नंतर पण मॅकिंटॉशच्या आधी) घोषित झाला खरा, पण नोव्हेंबर इ.स. १९८५ पर्यंत विंडोज प्रकाशित झाली नाही. विंडोज १.०चे बाह्यावरण एमएस-डॉस एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रोग्रॅम होता. गणकयंत्र, दिनदर्शिका, कार्डफाइल, क्लिपबोर्ड दर्शक, घड्याळ, कंट्रोल पॅनल, नोंदीलेखक (नोटपॅड), पेंट, रिव्हर्सी, टर्मिनल, राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते. विंडोज १.० मध्ये एकावर एक खिडकी (विंडो) आणता येत नसे. केवळ चौकटीच इतर खिडक्यांवर येऊ शकत असत. +ऑक्टोबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित झाली. तिच्यात वापरकर्ता अंतरफलक व स्मृती व्यवस्थापनामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिच्यामध्ये एकावर एक खिडकी आणता येऊ लागली शिवाय तिच्यात आणखी जटिल कळफलक-लघुपथ (कीबोर्ड-शॉटकट) होते. ती विस्तारलेली स्मृतीसुद्धा वापरू शके. +विंडोज २.१ विंडोज/३८६ व विंडोज/२८६ या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली. +विंडोजच्या जुन्या आवृत्त्या केवळ ग्राफिकल यूजर इंटरफेस मानल्या जात कारण त्या जास्त प्रमाणात एम-एस डॉसवरच चालत असत व त्याचा संचिका प्रणाली सेवांसाठी उपयोग करत. तरीही, सर्वात आद्य १६-बिट विंडोजमध्ये अनेक संचालन प्रणाली फंक्शन्स व त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटेबल संचिका प्रकारही स्वीकृत केले होते तसेच त्यांचे स्वतःचे उपकरण चालक (टायमर, ग्राफिक्स, प्रिंटर, माऊस, कळफलक व ध्वनी) अ‍ॅप्लिकेशन्ससाठी प्रदान केले होते. एमएस-डॉसच्या उलट विंडोज वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक चित्रमय अ‍ॅप्लिकेशन्स एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सहकारी माध्यमातून एक्झिक्युट करू देते. +विंडोज ३.० (१९९०) व ३.१ (१९९२) यांनी आभासी स्मृती व लोड करण्यायोग्य आभासी डिव्हाइस चालक यांच्या कारणास्तव रचना सुधारली. विंडोजचे प्रयोग आता सुरक्षित रीतीमध्ये चालू शकत होते, (जेव्हा विंडोज साध्या किंवा ३८६ वाढवलेल्या रीतीमध्ये चालत होती तेव्हा) ज्यामुळे त्यांना स्मृतीचे अनेक मेगाबाइट खुले झाले व सॉफ्टवेर आभासी स्मृती योजनेत भाग घेण्याचे बंधन दूर झाले. विंडोज ३.० साठी मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण कार्ये सी भाषेतून असेंब्ली भाषेत लिहित असे. +विंडोज ९५ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली. तिच्यात नवीन वापरकर्ता व्यक्तिरेखा, २५५ अक्षरांपर्यंत लांब संचिकानामांसाठी समर्थन, व आपोआप स्थापन केलेले हार्डवेर[मराठी शब्द सुचवा] ओळखणे ही नवीन साधने होती. ती ३२-बिट प्रयोग चालवू शकत असे व अनेक तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे तिची स्थिरता विंडोज ३.१ पेक्षा वाढली. तिच्यात अनेक ओईएम सेवा प्रकाशने झाली. त्यातील प्रत्येक प्रकाशन सर्व्हिस पॅकच्या तुल्यबळ होते. +मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन विंडोज ९८ जून १९९८ साली प्रकाशित झाले. मायक्रोसॉफ्टने १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली. तिचे नाव विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (सेकंड एडिशन) होते. त्याचा लघुपथ विंडोज ९८ एसई असा करण्यात आला. +फेब्रुवारी २००० मध्ये विंडोज २००० प्रकाशित झाली. तिच्यापाठोपाठ विंडोज एमई प्रकाशित झाली. (एमई हा मिलेनियम एडिशनचा लघुपथ आहे.) विंडोज एमईने विंडोज ९८ कडून गाभा अद्ययावत केला असला तरी विंडोज २००० कडून काही पैलू अद्ययावत केले व "बूट इन डॉस मोड" हा पर्याय काढला आणि प्रणाली पुनर्स्थापन हा नवीन पर्याय आणला. त्यामुळे वापरकर्त्याला संगणकाच्या सेटिंग्समध्ये तारीख बदलण्याची मुभा मिळाली. +विंडोज एनटी मालिकेतील प्रणाल्या उच्च विश्वसनीयतेच्या व्यावसायिक उपयोगांसाठी बाजारात आणल्या गेल्या. पहिले प्रकाशन होते एनटी ३.१ (१९९३), ग्राहक विंडोज आवृत्तीशी जुळावे म्हणून हा क्रमांक ठेवण्यात आला होता, त्यानंतरची प्रकाशने एनटी ३.५ (१९९४), एनटी ३.५१ (१९९५), एनटी ४.० (१९९६), व विंडोज २०००, उत्पादन सक्रीयीकरण उपलब्ध नसलेले हे शेवटचे एनटी-आधारित प्रकाशन होते. एनटी ४.० ही विंडोज ९५ची वापरकर्ता व्यक्तिरेखा वापरणारी या मालिकेतील पहिली प्रणाली होती. (आणि विंडोज ९५ चे बिल्ट-इन[मराठी शब्द सुचवा] ३२-बिट रनटाइम्स वापरणारी देखील पहिलीच.) +मायक्रोसॉफ्टने नंतर प्रकाशित केलेल्या विंडोज एक्सपीने ग्राहकांना व व्यापारी संचालन प्रणाल्यांना आपल्याकडे खेचले. ती घरगुती व व्यापारी अशा दोन्ही आवृत्त्यांत उपलब्ध होती. (नंतर ती टॅब्लेट संगणक व मीडिया केंद्र या स्वरूपातही उपलब्ध झाली.) सर्व्हर संचालन प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्टने वेळापत्रक बदलले. दीड वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या विंडोज सर्व्हर २००३ ने विंडोज सर्व्हरला विंडोज एक्सपीबरोबर आणले. लांबलचक विकासप्रक्रियेनंतर विंडोज व्हिस्टा २००६ च्या शेवटी प्रकाशित झाली. तिच्याबरोबरची सर्व्हर संचालन प्रणाली विंडोज सर्व्हर २००८ ही २००८ च्या सुरुवातीला प्रकाशित झाली. २२ जुलै २००९ रोजी विंडोज ७ व विंडोज सर्व्हर २००८ आरटू आरटीएम (रिलीज टू मॅन्युफॅक्चरिंग - उत्पादनासाठी प्रकाशित) म्हणून प्रकाशित झाल्या. विंडोज ७ ही २२ ऑक्टोबर २००९ रोजी प्रकाशित झाली. +एक्स८६ आधारित खासगी संगणकांचा जम बसण्यापूर्वी विंडोज एनटी अनेक विविध प्लॅटफॉर्मना समर्थित करे. एनटी ३.१ ते ४.० पर्यंत पॉवरपीसी, डेक अल्फा, एमआयपीएस आर४००० अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना समर्थित करत असत, ज्यांच्यात ६४-बिट प्रक्रियाकारही असत, त्यांना प्रणाली ३२-बिट प्रक्रियाकारांप्रमाणे वागवत असे. +मायक्रोसॉफ्टने इंटेल इटॅनियमच्या (आयए-६४ म्हणूनही ज्ञात) उदयाबरोबर त्यास समर्थन देणारी विंडोज प्रकाशने काढली. विंडोज एक्सपी व विंडोज सर्व्हर २००३ च्या इटॅनियम आवृत्त्या त्यांच्या एक्स-८६ (३२-बिट) आवृत्त्यांबरोबरच प्रकाशित झाल्या. एप्रिल २५, २००५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी एक्स६४-बिट आवृत्ती व विंडोज सर्व्हर एक्स६४ आवृत्त्या प्रकाशित केल्या. विंडोज एक्सपीच्या इटॅनियम आवृत्त्यांसाठीचे समर्थन २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टने काढून घेतले. विंडोज व्हिस्टा ही विंडोजची पहिली आवृत्ती आहे जिच्यात एक्स६४ व एक्स८६ आवृत्त्यांचे प्रकाशन एकदम झाले. विंडोज व्हिस्टा इटॅनियमला समर्थन देत नाही. विंडोज सर्व्हर २००८ आरटू ने ३२-बिट आवृत्ती गाळली पण विंडोज ७ ने तिला समर्थन ठेवले. +विंडोज सीई (अधिकृतरीत्या विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट) ही उपग्रह दिशादर्शक प्रणाल्यांवर व भ्रमणध्वनींवर चालणारी विंडोजची आवृत्ती आहे. विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ही स्वतःचे केर्नेल वापरते. +मुख्य पान: विंडोज ८ +विंडोज ७ची उत्तराधिकारी असलेली विंडोज ८ सध्या विकसनशील आहे. मायक्रोसॉफ्टच्या २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या डच भाषेतील ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे विंडोज ८ आणखी दोन वर्षांनी प्रकाशित होईल. +विंडोज 10 ही सध्या उपलब्ध असलेली सगळ्यात नवीन प्रणाली आहे +विंडोज मोबाइल आता अस्तित्वात नाही +मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते. +नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अ‍ॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. विंडोज २.०ची लोकप्रियता पूर्वाधिकाऱ्याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अ‍ॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले. +१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली. +जुलै १९९३ मध्ये मायक्रोसॉफ्टने नवीन केर्नेलवर आधारित असलेली विंडोज एनटी ही संचालन प्रणाली प्रकाशित केली. एनटी ३.१ ही विंडोज एनटीची पहिली आवृत्ती ठरली. एनटी व्यावसायिक संचालन प्रणाली मानले गेले व ती पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर करु शकणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज एनटी कुळातील विंडोज एक्सपी नंतर गृह संचालन प्रणाली ठरली. +ऑगस्ट २४, १९९५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही नवीन व महत्त्वाची ग्राहक आवृत्ती प्रकाशित केली. तिच्यात सदस्य व्यक्तिरेखेत बदल व पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर केला होता. ती विंडोज ३.१ला नाही तर कार्यगटांसाठीची विंडोज, एमएस-डॉस यांच्या जागी येण्यास प्रकाशित झाली होती व ती "प्लग अँड प्ले" क्षमता वापरणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज ९५ मध्ये झालेले बदल क्रांतिकारी होते. विंडोज ९५ चे मुख्यधारा समर्थन डिसेंबर ३१, २००० रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन डिसेंबर ३१, २००१ रोजी खंडित झाले. +त्यानंतरचे प्रकाशन विंडोज ९८ जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाले. तिच्यानंतर विंडोज ९८ची द्वितीय आवृत्ती (विंडोज ९८ एसई) प्रकाशित झाले. विंडोज ९८ साठीचे मुख्यधारा समर्थन जून ३०, २००२ रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन जुलै ११, २००६ रोजी खंडित झाले. +"व्यावसायिक" संचालन प्रणाल्यांतील विंडोज २००० ही आवृत्ती मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारी २००० मध्ये प्रकाशित झाली. २००४ मध्ये विंडोज २००० च्या स्रोतातील काही भाग आंतरजअलावर आणला गेला. हे मायक्रोसॉफ्टसाठी वाईट होते कारण जो केर्नेल विंडोज २००० मध्ये वापरला गेला होता तोच केर्नेल विंडोज एक्सपी साठी वापरण्यात आला होता. विंडोज ९८ नंतरची ग्राहक आवृत्ती विंडोज एमई (विंडोज सहस्रक आवृत्ती) होती. तिच्यात अनेक नवी तंत्रज्ञाने आणली गेली होती, उदा. "वैश्विक प्लग अँड प्ले". विंडोज एमईची हार्डवेर अडचणी, हळूपणा यांची खूप चिकित्सा करण्यात आली होती. +ऑक्टोबर २००१ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी ही आवृत्ती प्रकाशित केली. संगणक मासिकांमध्ये तिचा प्रचंड उदोउदो करण्यात आला होता. ती दोन आवृत्त्यांत प्रकाशित झाली: "गृह" व "व्यावसायिक". तिसरी आवृत्ती "मीडिया केंद्र" ही २००२ मध्ये करण्यात आली. तिच्यात डीव्हीडी व दूरदर्शन कार्यक्षमता, प्रोग्रॅम साठवणे (रेकॉर्डिंग) या गोष्टींवर भर देण्यात आला होता. विंडोज एक्सपीसाठीचे मुख्यधारा समर्थन एप्रिल १४, २००९ रोजी खंडित झाले. वाढवलेले समर्थन एप्रिल ८, २०१४ रोजी खंडित होईल. +एप्रिल २००३ मध्ये विंडोज सर्व्हर २००३ प्रकाशित झाला. त्याने मागे पडलेल्या विंडोज सर्व्हर संचालन प्रणाल्यांना विंडोज एक्सपीबरोबर आणले. त्याच्यात काही नव्या सुविधा व सुरक्षेवर प्रचंड भर होता. त्याच्यानंतरचे सर्व्हर प्रकाशन विंडोज सर्व्हर २००८ आरटू डिसेंबर २००५ मध्ये प्रकाशित झाले. +जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे. +ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या. +विंडोजच्या मूळ ग्राहक आवृत्त्या नेटवर्क जोडणीविरहित एक-वापरकर्ता संगणकांसाठी निर्माण केल्या होत्या, व सुरुवातीच्या काळात तिच्यात सुरक्षा विशेषता नव्हत्या. +काही विंडोज अ‍ॅप्लिकेशन्स आपल्याला अनुकरणामुळे विंडोज न वापरताही वापरता येतात. त्यापैकी काही: + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6314.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de0195cefca012481fea97f7d6c8d5c563cf47db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6314.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मायक्रोसॉफ्ट सिल्व्हरलाइट हे एक वेब उपयोजन फ्रेमवर्क आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6340.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4eb012754f2fe6b8ed1f843b5e2ba4408255bde --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6340.txt @@ -0,0 +1 @@ +मायर्मिडन्स किंवा मायर्मिडोनेस (Μυρμιδόνες) हे ग्रीक इतिहासातील अख्यायिकी लोक होते. होमरच्या इलियड महाकाव्यात उल्लेखिल्याप्रमाणे ॲचिलिसच्या हाताखाली लढणारे ते कुशल आणि शूर योद्धे होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6347.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc07309ae488ed9d40f8749f6e6992f5a9f077b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6347.txt @@ -0,0 +1,15 @@ +माया Maya (/ˈmɑːjə/; Devanagari: माया, IAST: māyā), literally "illusion" or "magic", ( (Sanskrit: माया) हे नाम असून त्याचा अर्थ चुकीची कल्पना असा होतो. +माया या शब्दाचा वापर - माया हा शब्द रामदासस्वामी प्रायः वापरतात तरी त्यांनी कारणपरत्वे मूळमाया, महामाया, वैष्णवी माया, गुणमाया, गुणक्षोभिणीमाया, अविद्यामाया आणि दृश्यमाया असेही विशिष्ट शब्द वापरलेले आहेत. त्यांचा संक्षिप्त खुलासा येथेच करणे अनुचित होणार नाही. ही माया वैष्णवी म्हणजे विष्णूची अथवा परमात्म्याची आहे, तसेच ती विष्णूच्या मोहिनीईरूपाप्रमाणे मोहात पाडणारी आहे. +प्रकृतीला माया म्हटले आहे. [१] +म ह्या धातूचा अर्थ मावणे असा आहे. म्हणून हे विश्व ज्यात सामावलेले आहे ती माया. +मा ह्या धातूचा मोजणे वा मर्यादित करणे असाही अर्थ आहे. +मा म्हणजे नाहीं आणि या म्हणजे जी. म्हणून जी अस्तित्वात नसून जी भासते ती ' माया ' ! +मायेच्या पलीकडे कसे जायचे?माया ओलांडल्या खेरीज भगवंत दर्शन अशक्य कसे ? +ज्या माणसाला दृष्य जग खरे वाटते,दृश्याच्या मागे सूक्ष्म आहे असे जो मानीत नाहीं, जो या अज्ञानातच सुख मानतो.या क्षणभंगुर सुखा पलीकडे शाश्वत सुख आहे,याचे ज्याला कल्पनेने ही ज्ञान नाहीं. त्याच्या बाबतीत मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीं. +पण ज्याचा नित्यानित्यविवेक निर्माण जागा झाला आहे त्याला मायेच्या पलीकडे जावे असे वाटते. कारण 'माया' ओलांडल्याशिवाय भगवंताचे दर्शन अशक्य आहे.संत मायेचा पडदा दूर सारा असे सांगतात.सद्गुरू वा भगवंत यांनी कृपा केली तरच साधक 'माया' ओलांडू शकतो. +माया सत्याला असत्य करते.ज्ञानावर अज्ञानाचे आवरणं टाकते.त्यामुळे आनंद नाहीसा होवून दुःख निर्माण होते.माया ही भगवंताची शक्ती आहे. ह्या शक्तीला जाणणे कठीण आहे. +माया विश्वाला व्यापून आहे.या विश्वव्यापी मायेला व्यक्तीच्या संदर्भात 'विद्या' म्हणतात. मी +देह आहे असा निच्शय होणे म्हणजे अविद्या होय.घराची भिंत पडली तर भिंत पडली म्हणता +घर पडले म्हणत नाहीं, पण ठेच लागून पडलात तर मी पडलो म्हणतात. माझा देह पडला असं म्हणत नाहीं मायेचे कार्य ते हेच. असे महाराज म्हणत. मायेच्या पलीकडे जाण्यासाठी +भगवंताला शरण जाणे हा राजमार्ग आहे. +माया म्हणजे अज्ञान ( Error ).अज्ञानात असणाऱ्या साधकाला अज्ञानाच्या सहाय्याने त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.म्हणून जे पुरुष मायेला पार करून गेले आहेत त्यांना शरण जावे.त्यांचे ऐकावयाला शिकावे. मन विकाराधीन होवू नये यासाठी भगवंताचे, स्मरण करीत राहावे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6363.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4332e15cec2a571743665d48f553154bb88419f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6363.txt @@ -0,0 +1,4 @@ +माया सीता (संस्कृत: माया सीता, "भयानक सीता") किंवा छाया सीता ही रामायणाच्या काही रूपांतरांमध्ये, ही देवी सीता (ग्रंथातील नायिका)ची भ्रामक प्रतिव्यक्ती आहे. वास्तविक सीतेऐवजी लंकेच्या राक्षस-राजा रावणाने माया सीतेचे अपहरण केले. +रामायणात, सीता – रामाची पत्नी (अयोध्येचा राजकुमार आणि देव विष्णूचा अवतार) – तिला रावणाने पकडले आणि लंकेत कैद केले, जोपर्यंत तिला रामाने सोडवले नाही, ज्याने तिचा बंधक मारला. सीतेला अग्निपरीक्षा (अग्नीपरीक्षा) येते ज्याद्वारे ती रामाने स्वीकारण्यापूर्वी तिची शुद्धता सिद्ध करते. महाकाव्याच्या काही आवृत्त्यांमध्ये, अग्नि-देवता अग्नीने माया सीतेची निर्मिती केली, जी सीतेची जागा घेते आणि रावणाने त्याचे अपहरण केले आणि त्याचे बंदिवास भोगले, तर वास्तविक सीता अग्नीत लपते. अग्निपरीक्षेत माया सीता आणि प्रत्यक्ष सीता यांची पुन्हा देवाणघेवाण होते. काही ग्रंथांमध्ये माया सीतेचा अग्नि परिक्षेच्या ज्वाळांमध्ये नाश झाल्याचा उल्लेख आहे, तर इतरांनी ती कशी आशीर्वादित झाली आणि महाकाव्य नायिका द्रौपदी किंवा देवी पद्मावती म्हणून पुनर्जन्म झाला असे वर्णन केले आहे. काही धर्मग्रंथांमध्ये तिचा मागील जन्म वेदवती असा उल्लेख आहे, रावणाने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. +राम-केंद्रित पंथांची मुख्य देवी सीतेला माया सीतेचा आकृतिबंध रावणाच्या अपहरणाच्या कटाला बळी पडण्यापासून वाचवतो आणि तिच्या पवित्रतेचे रक्षण करतो. सीता आणि इतर देवींच्या तत्सम दुहेरी किंवा सरोगेट्स हिंदू पौराणिक कथांच्या विविध कथांमध्ये आढळतात. +वाल्मिकींच्या रामायणात (5वे ते 4थे शतक) माया सीतेचा उल्लेख नाही. मिथिलाची राजकन्या सीता हिचा विवाह अयोध्येचा राजकुमार रामाशी झाला. रामाला 14 वर्षांच्या वनवासात जाण्यास भाग पाडले जाते आणि त्याच्यासोबत सीता आणि त्याचा भाऊ लक्ष्मण असतो. रावण, लंकेचा राक्षस-राजा, सीतेला पळवून नेण्याचा कट रचतो, ज्याला मारिचाने मदत केली, जी सीतेला मोहित करणाऱ्या जादुई सोन्याच्या हरणात (माया मृगा, एक भ्रामक हरीण) बदलते. दंडकाच्या जंगलात वनवासात असताना राम हरणाच्या मागे जातो आणि त्याचा वध करतो हे स्थान नेवासा जवळील प्रवरा संगम येथेआहे. जादुई हरिण रामाच्या आवाजात मदतीची हाक देते. सीता लक्ष्मणाला एकटे सोडून रामाला मदत करण्यास भाग पाडते. रावण संन्याशाच्या वेशात येतो आणि तिचे अपहरण करतो. युद्धात रावणाचा वध करणाऱ्या रामाकडून तिची सुटका होईपर्यंत तो तिला लंकेच्या अशोक वाटिका उपवनात कैद करतो. जेव्हा रामाला सीतेच्या पवित्रतेवर शंका येते तेव्हा तिची अग्निपरीक्षा (अग्नी परिक्षा) होते. सीता जळत्या चितेत प्रवेश करते आणि घोषित करते की ती जर रामाशी विश्वासू असेल तर अग्नीने तिला इजा करू नये; तिच्या शुद्धतेचा पुरावा म्हणून ती अग्नीदेवता अग्नीसोबत सुरक्षित बाहेर येते. राम सीतेला परत स्वीकारतो आणि अयोध्येला परततो, जिथे त्यांना राजा आणि राणी म्हणून राज्याभिषेक केला जातो.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6440.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc6056e7df1ee321206352a16f941f62ee18932f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6440.txt @@ -0,0 +1,2 @@ + मारवाडी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6456.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461c4f062d90248a0da129c833a392c2cbe7a427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6456.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 31°37′48″N 8°0′32″W / 31.63000°N 8.00889°W / 31.63000; -8.00889 + +माराकेश (अरबी: مراكش‎; फ्रेंच: Marrakech) हे मोरोक्को देशातील एक प्रमुख शहर आहे. मोरोक्कोच्या मध्य भागात ॲटलास पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले माराकेश ऐतिहासिक काळापासून मोरोक्कोमधील सर्वात महत्त्वाच्या ४ शहरांपैकी एक राहिले आहे. सध्या येथील लोकसंख्या सुमारे ९.१ लाख असून माराकेश कासाब्लांका, रबात व फेस खालोखाल मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6472.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81ebe9f4e0d4c78482c26207e5d8f824534ba214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6472.txt @@ -0,0 +1,31 @@ +  +मारिची संस्कृत: मारिची, म्हणजे. "प्रकाशाचा किरण"; चीनी: 摩利支天; पिनयिन: Mólìzhītian ; जपानी: मारिशिटेन ), ही एक बौद्ध देव किंवा देवी आहे, तसेच प्रकाश आणि सूर्याशी संबंधित एक बोधिसत्व आहे. काही ऐतिहासिक स्रोतांनुसार , मारिसी ही एक देवी आहे, तथापि काही प्रदेशांमध्ये तिला पूर्व आशियातील योद्धा वर्गामध्ये आदरणीय पुरुष देवता म्हणून चित्रित केले जाते. [१] तिला बहूभुजांनी, वराह किंवा मादी वराह वर स्वार, तर कधी कधी सात घोडे किंवा सात वराहांनी ओढलेल्या अग्निमय रथावर चित्रित केले जाते. तिला एक डोके आहे तर काही वेळा तीन ते सहा डोके दाखविल्या जातात, ज्याचा आकार वराह सारखा आहे. पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये, तिच्या सर्वात भयंकर स्वरुपात, ती कवटीचा हार घालू शकते. काही निरूपणांमध्ये ती कमळावर बसते. [१] [२] [३] +भारत आणि तिबेटमध्ये मारीसीच्या काही प्राचीन मूर्तीआढळतात, विशेषतः आंध्र प्रदेशातील प्राचीन बंदर शहर आणि बौद्ध साइटसलीहुंडमजवळ,जिथे मारिसीला सूर्याप्रमाणेच सात घोडे ओढलेल्या रथावर स्वार असल्याचे चित्रित केले आहे. (सूर्य देवता उषा आणि छाया देवींसोबत). [१] महायान बौद्ध ग्रंथांमध्ये, मारिसी ही पहाटेची देवी आहे, ज्याची ओळख बुद्धाने श्रावस्ती येथे केली होती. काही बाबींमध्ये, तिची तुलना सूर्याच्या स्त्रीलिंगी आवृत्तीतून आणि इतर मार्गांनी उषा, दुर्गा आणि वज्रवरी यांच्याशी झाली आहे. [१] [२] ती बौद्ध धारणींमध्ये बोलावलेल्या देवी (किंवा देवतां पैकी एक आहे. [३] +तिबेटी बौद्ध धर्मात, तिला पहाट किंवा प्रकाशाची देवी, रोग बरे करणारी किंवा सर्व प्राण्यांचे ज्ञान मिळवणारी देवी म्हणून चित्रित केले आहे. जपानी बौद्ध धर्मात, तिला एक योद्धा देवी - बुशी किंवा सामुराईची संरक्षक आणि न्यायासाठी त्यांची आवड म्हणून चित्रित केले आहे. वैकल्पिकरित्या, ती चुकीच्या अवस्थेपासून अस्तित्वाच्या योग्य स्थितिपर्यंत बरे करणारी आहे. [१] [२] +चिनी बौद्ध धर्मात, ती संरक्षक देवांपैकी एक म्हणून यादीत आहे, विशेषतः सोळा देव (चीनी: 十六諸天; पिनयिन : Shíliù Zhūtiān ), वीस देव (चीनी: 二十諸天; पिनयिन : 二十諸天; पिनयिन) आणि चोवीस देव (चीनी: 二十四諸天; पिनयिन : Èrshísì Zhūtiān ). ताओवाद आणि चीनी लोक धर्मात, डूमू (Chinese) हे चिनी गूढ बौद्ध धर्मात मारीसीचे समानार्थी मानले जाते. +पाश्चात्य जगाने तिचा शोध घेतल्यावर, जिओर्गी सारख्या वसाहती-युगातील लेखकांनी ध्वन्यात्मक कारणास्तव असा अंदाज लावला की ती व्हर्जिन मेरीच्या ख्रिश्चन संकल्पनेतून कॉपी केली गेली असावी किंवा सर्वात जुने स्पॅनिश प्रवासी फिलीपिन्समध्ये पोहोचल्यानंतर ती प्रेरित झाली असावी. तथापि, असंख्य जुन्या कलाकृती आणि ग्रंथांच्या शोधानंतर हे अनुमान नाकारण्यात आले. [१] +मरीसीची उत्पत्ती अस्पष्ट आहे. ती इंडिक, इराणी आणि नॉन- इंडो-इराणी सौर देवींचे एकत्रीकरण असल्याचे दिसते. [४] +तिची उत्पत्ती वैदिक देवी उषा पासून झाली, असे मानले जाते, पहाटेची वैदिक देवी. [५] ती सूर्य, सौर देवाशी काही साम्य देखील सामायिक करते. तिच्या मार्शल किंवा योद्धाच्या चित्रणांमध्ये, ती दुर्गाशी काही साम्य सामायिक करते, कारण दोघेही प्राणी किंवा रथावर स्वार असताना अनेक शस्त्रे घेऊन दिसतात. [१] [२] +  +मारीसीचे अनेक प्रकारे चित्रण केले आहे. काही उदाहरणे समाविष्ट आहेत: +तिबेटी साहित्यात, बारी ग्यात्सामध्ये मारीसीचे पाच भिन्न वर्णन आहेत: +ड्रब टॅब ग्यात्सोचे सहा वर्णन आहेत: +तरानाटाचे नर्तंग ग्यात्सा आणि रिंजंग हे एकाच स्वरूपाचे वर्णन करतात. +वज्रवली आणि मित्र ग्यात्सा मरीसीच्या मंडलाचे वर्णन करतात ज्यात आजूबाजूच्या पंचवीस आकृत्यांचा समावेश आहे. [६] +ही एक संपूर्ण यादी नाही, आणि संपूर्ण बौद्ध जगामध्ये मारीची अनेक चित्रे अस्तित्वात आहेत. +  +तिबेटी कांग्यूरच्या क्रिया तंत्रामध्ये तीन ग्रंथ जतन केले गेले आहेत ज्यात मारीसी (तिबेटी: ओझर चेन्मा) हा प्राथमिक विषय आहे: +डेर्गे टेंग्युर भाष्यांमध्ये आणखी बरेच मजकूर आढळू शकतात. +ओझर चेन्मा कधीकधी ताराचे रूप म्हणून देखील पाहिले जाते. 21 तारांच्या निंग्मा परंपरेत, ती 21वी तारा आहे. +Nyingma शाळा Dzogchen परंपरा मध्ये Ozer Chenma विशेषतः महत्वाचे आहे. तिचे महत्त्व सूर्याचे प्रतीकात्मकता आणि झोगचेन विचारांसाठी त्याची किरण, तसेच थोगलच्या झोगचेन प्रथेमध्ये मदत म्हणून सूर्याचा वापर यामुळे आहे. स्वयं-उत्पन्न विद्या तंत्र म्हणते: "प्रकाश किरणांचे स्रोत प्रदर्शित करण्यासाठी, मरीसी तंत्र म्हणून ओळखले जाणारे तंत्र आहे." या परंपरेत, तिचा मुख्य बीजाक्षर मम आहे आणि तिचा मंत्र ओम मारी झेये मम स्वाहा आहे. +चीनमध्ये, मारीची बौद्ध आणि ताओवादी दोन्ही देवता म्हणून पूजा केली जाते. गूढ बौद्ध धर्मात ती अत्यंत आदरणीय आहे. तिला अनेकदा तिच्या तीन चेहऱ्यांवर तीन डोळे आणि तिच्या शरीराच्या प्रत्येक बाजूला चार हात दाखवले जातात. तिचे दोन हात एकत्र धरलेले आहेत आणि इतर सहा हातात सूर्य, चंद्र, घंटा, सोनेरी शिक्का, धनुष्य आणि हॅल्बर्ड आहेत. ती एकतर कमळावर किंवा डुकरावर उभी आहे किंवा बसलेली आहे किंवा सात डुकरांच्या वर असलेल्या कमळावर आहे. ती 9व्या चंद्र महिन्याच्या 9 व्या दिवशी साजरी केली जाते. चोवीस देवांपैकी एक म्हणून, बहुतेक चिनी बौद्ध मंदिरांच्या महावीर हॉलमध्ये,मध्य वेदीच्या बाजूने ती सामान्यतः इतर देवांसोबत स्थापित केली जाते. +मारीसीला कधीकधी बोधिसत्व कुंडीचा अवतार मानले जाते, ज्यांच्याशी ती समान प्रतिमाशास्त्र सामायिक करते. प्रकाशाची देवी आणि सर्व राष्ट्रांची संरक्षक म्हणूनही तिची पूजा केली जाते, ज्यांचे ती युद्धाच्या रोषापासून संरक्षण करते. [७] +ताओइझममध्ये, डौमू एक लोकप्रिय देवता आहे आणि बहुतेकदा स्वर्गाची राणी म्हणून ओळखली जाते ( Chinese) आणि बेइडोची देवी म्हणून मोठ्या प्रमाणावर पूजली जाते ( उर्सा मेजरच्या चिनी समतुल्य त्याशिवाय त्यात 2 "अटेंडंट" तारे देखील समाविष्ट आहेत). तिला नऊ सम्राट देवांची आई म्हणून देखील आदरणीय आहे ज्यांचे प्रतिनिधित्व बेडो नक्षत्रातील नऊ तारे करतात. [८] वसंत ऋतूच्या एका दिवशी राणीने तलावात स्नान केले अशी आख्यायिका आहे. आंघोळीत प्रवेश केल्यावर, तिला अचानक "हलवले" असे वाटले आणि तलावातून नऊ कमळाच्या कळ्या उगवल्या. यापैकी प्रत्येक कमळाची कळी एक तारा प्रकट करण्यासाठी उघडली, जी बीडो नक्षत्र बनली. तिची ओळख कुंडी आणि महेश्वरीची पत्नी महेश्वरी यांच्याशी देखील आहे आणि म्हणूनच तिला मातृका (佛母 फो mǔ), असंख्य बुद्धांची आई ही पदवी देखील आहे. [९] +ताओवादी आणि बौद्ध दोन्ही प्रभाव असलेल्या व्हाईट क्लाउड टेंपल आणि टॉउ मु कुंग मंदिर यांसारख्या ताओवादी मंदिरांमध्ये आज तिची पूजा केली जाते. +Doumu हे तीन प्रामाणिक दाओझांग ग्रंथांमध्ये क्रॉनिक केलेले आहे, ज्यातून वरील कथा काढल्या गेल्या आहेत. हे तीन मजकूर सॉन्ग-युआन दरम्यान संकलित केले गेले, झेंगटॉन्ग डाओझांगमधील प्रत्येक प्रवेशाच्या प्रस्तावनेनुसार (Schipper, 1975 नुसार क्रमांकित). ते Dz 45 आहेत: 'Yùqīng Wúshàng Língbǎo Zìrán Běidǒu Běnshēng Jīng' 玉清無上靈寶自然北斗本生經, The True and Unsurpassed from the Liningbao Scriping of the Yupperon Scriping of the Northwest Scripone. Dz 621: Tàishàng Xuánlíng Dǒumǔ Dashèng Yuánjūn Běnmìng Yánshēng Xinjīng आणि Dz 1452: Xiāntiān Dǒumǔ Qíngào Xuánkē 先天斗姆秦告玄科, पूर्वीच्या स्वर्गातील डिपर मदरला याचिका करण्याचा रहस्यमय संस्कार.  +मारीसी, शिंगोन आणि तेंडाई शाळांमधील एक महत्त्वाची देवता, 8व्या शतकात बुजिन किंवा सामुराई यांनी संरक्षक आणि संरक्षक म्हणून दत्तक घेतली होती. +मारीसीची भक्ती झेन बौद्ध धर्मापूर्वीची असताना, ते एक समान ध्यान मॉडेल वापरताना दिसतात. [१०] असे वाटले होते की त्या राज्यात, योद्धा विजय किंवा पराभव (किंवा जीवन आणि मृत्यू) च्या मुद्द्यांमध्ये रस गमावतील, मृत्यूच्या पारंपारिक समजांच्या पलीकडे जातील आणि त्यांना चांगले योद्धा बनतील.  +मारीसीची भक्ती ही स्वतःवर प्रभुत्व मिळवून निःस्वार्थता आणि करुणा प्राप्त करण्याचा मार्ग प्रदान करेल अशी अपेक्षा होती. काही मार्शल आर्ट्स शाळांनी त्यांच्या वंशातील पालक देवता म्हणून मारीची पूजा केली. उदाहरणार्थ, तेनशिन शोदेन काटोरी शिंटो- रयूच्या रक्ताच्या तारण चार्ट (केप्पन) शाळेने शिष्यांना फुत्सुनुशी -नो- मिकोटोला सादर करण्याचा आणि शाळेच्या नियमांच्या विरोधात वागल्यास मारीसीची शिक्षा स्वीकारण्याचा आदेश दिला. +विजय मिळवण्यासाठी सामुराई सूर्योदयाच्या वेळी मारीसीला बोलावतील  . Mārīcī, ज्याचा अर्थ "प्रकाश" किंवा मृगजळ आहे, एखाद्याच्या शत्रूंच्या नजरेतून सुटण्यासाठी बोलावले गेले.  परंतु, भ्रम आणि अदृश्यतेची देवी म्हणून, मारिशितेन देखील निन्जाद्वारे विशेषतः आदरणीय होते, ज्याने तिच्या अदृश्यतेची शक्ती प्राप्त करण्यासाठी तिचा मंत्र पाठ केला. [११] +मरीसीची नंतरच्या एडो काळात व्यापारी वर्गाने संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून पूजा केली होती, तसेच डायकोकुटेन (大黒天) आणि बेन्झाइटेन (弁財天) यांच्यासोबत "तीन देवता" (三天Santen ) यांच्या त्रिकूटाचा भाग म्हणून पूजा केली जात होती. एडो युगात तिचा पंथ शिगेला पोहोचला होता पण त्यानंतर सरंजामशाही व्यवस्थेचे उच्चाटन, सामुराई वर्गाचे उच्चाटन आणि बेन्झाईतेनची वाढती लोकप्रियता, ज्याने आधुनिकतेत, तिला पूजेची वस्तू म्हणून स्थान दिले आहे, यामुळे नंतर ती कमी झाली. +साचा:Chinese mythologyसाचा:Jmyth navbox longसाचा:Chinese Buddhist Pantheonसाचा:Buddhist Pantheon \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6479.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..645cef593cefa0e3301e49d425ac949818618d8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6479.txt @@ -0,0 +1,10 @@ + +मारिया (ग्रीक: Μαρία; Aramaic: ܡܪܝܡ, translit. Mariam‎; हिब्रू: מִרְיָם; अरबी: مريم) ;१ल्या शतकातील नासरेथचा गालीलातून ज्यू (यहूदी) [२] स्त्री,व बायबल आणि कुराणानुसार येशू ख्रिस्तची आई होती. नासरेथची पहिल्या शतकातील ज्यू स्त्री, योसेफची पत्नी आणि येशूची आई होती. नवीन करार आणि कुराण दोन्ही मेरीचे वर्णन कुमारी म्हणून करतात. ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार, मेरीने कुमारी असतानाच पवित्र आत्म्याद्वारे येशूची गर्भधारणा केली आणि जोसेफसोबत बेथलेहेमला गेली, जिथे येशूचा जन्म झाला.[ संदर्भ हवा ] +नवीन करारात मत्तय आणि लुकच्या शुभवर्तमानात व कुराणमध्ये मारीयाला कुमारी (ग्रीक: παρθένος) असे तिचे वर्णन केले आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असताना (पुरुषाच्या संपर्काशिवाय) तिच्या पोटी पुत्र आला असा ख्रिस्ती लोक विश्वास धरतात. हा एक अलौाकिक चमत्कार मानला जातो. हा अदभुत जन्म त्यावेळी झाला ज्यावेळी ती योसेफाला वाग्दत्त झाली होती आणि फक्त लग्नाचा विधी बाकी होता.योसेफाने तिच्याशी लग्न केले. बेथलेहेम या गावी तिने येशूला जन्म दिला[३] +लुकच्या शुभवर्तमानात येशूच्या जन्माची घोषणा होते. जेव्हा देवदूत गब्रीएल मारीयाला सांगतो की,या पवित्र कार्यासाठी देवबापाने सर्व स्त्रियातून तिला निवडलेले आहे. येशूच्या मारण्याच्या वेळी तिथे मारिया उपस्थित होती. कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स शिकवणीनुसार, तिच्या पृथ्वीवरील जीवनात शेवटी तिच्या शरीर स्वर्गात नेले गेले याला स्वर्गउन्नयन (म्हणजे सदेह स्वर्गात उचलून घेणे) म्हणतात.[४][५] +मारियाला ख्रिस्ती धर्मात[६][७] पूज्य मानण्यात आले आहे, आणि इतर धर्मांत सर्वात गुणवंत संत असल्याचे मानले जाते. तिचे श्रद्धाळूंना तिच्या दृष्टी(दर्शन) दिली आहे. पूर्व आणि ओरिएंटल ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथोलिक, ॲंग्लिकन, आणि लुथेरन चर्च विश्वास आहे की मरीया येशूची आई म्हणून, देवाच्या आई(ग्रीक: Θεοτόκος) आहे. अनेक दिग्गज ख्रिस्ती मेरीयाचे भूमिका बायबलातील संदर्भ दावा संक्षेप आधारित कमी करते. मारिया (अरबी: مريم) इस्लाम मध्ये परमपुज्य स्थान प्राप्त आहे, जिथे एक मोठा भाग तिला समर्पित केले आहे.[ संदर्भ हवा ] +मरिया (Mary) येशूची आई मारिया. दाविदाच्या राजवंशातील तसेच योसेफाची ती कुमारी पत्नी होती. जोकिम व हन्ना यांची ती कन्या होती. याव्यतिरिक्त शुभवर्तमनामध्ये तिच्या घराण्याचा उल्लेख सापडत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असतानाच पुरुषाच्या संपर्काशिवाय ती गर्भवती राहील व तिला पुत्र होऊन त्याला येशू म्हणतील असा निरोप तिला गब्रिएल या देव्दुताकडून मिळाला होता. तिचा पती योसेफ याला शिरगणतीसाठी बेंथलेहेम गावी जावे लागले. त्याच्या सोबत मारीयेलाही जावे लागले व तेथेच येशूचा जन्म झाला. पुढे हेरोद राजाकडून बाळ येशूच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते इजिप्त देशात पळून गेले. हेरोदाच्या मृत्यूनंतर ते गालीलातील नाझरेथ गावी परत आले.[ संदर्भ हवा ] +काना गावातील लग्नसमारंभाला मारिया येशूसमवेत गेली होती. त्यानंतर एकदम येशूच्या जीवनातील अखेरच्या क्षणी तिचा उल्लेख शुभवर्तमानात आला आहे. ती येशूबरोबर जेरुसलेमला आली. तेथून कालवरी टेकडीवर त्याला क्रुसावर खिळेपर्यंत ती तेथेच होती. नंतर शब्बाथ संपल्यावर मारिया माग्दलीया व इतर महिलांसोबत ती येशूच्या कबरेजवळ आली होती.[ संदर्भ हवा ] +येशूने क्रुसावर आपला प्राण सोडण्याआधी तिथे उभ्या असलेल्या आपल्या शिष्याला (योहानाला) तिची काळजी घेण्यास सागितले होते. त्यानंतर मारिया या शिष्यासोबत राहू लागली. येशूच्या स्वर्हरोहणावेळी ती शिष्यांसोबत होती. तिचा मृत्यू व स्वर्गउन्नयाबददल बायबलमध्ये उल्लेख सापडत नाही. परंतु एफेसस गावात तिला मृत्यू आला असावा असे म्हटले जाते. (मत्तय १,२,२७,२८ :; मार्क १५:१६,; लुक १,२,२४ : योहान १९: प्रे. कृत्ये १) +तिच्या मृत्यूनंतर तिला सदेह स्वर्गात उचलून घेतले गेले व स्वर्ग पृथ्वीची राणी करण्यात आले असे कॅथोलिक चर्च मानते. पहिल्या व दुसऱ्या शतकातील अनेक अप्रमाणित ख्रिस्ती लेखनात तिच्या जीवनाबद्दलचे उल्लेख आले आहेत.[ संदर्भ हवा ] +मुस्लिम धर्मातसुद्धा मारियेला अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. पवित्र कुराणातील एक संपूर्ण अध्याय तिच्या नावाने प्रसिद्ध आहे. (पवित्र कुराण अध्याय १९ : सुरतुल मरियम) या अध्यायात येशूच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. परंतु कुराणातील ख्रिस्तजन्माची हकीकत व शुभवर्तमानातील हकीकत यात बराच फरक आहे. तसेच कुराणातील आलीइमरान या अध्यायातही मारिया व येशूच्या जन्मासंदर्भात उल्लेख आला आहे. (पहा ३ आलीइमरान  : ३३-५२) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6495.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f3537b1f67e1422890064d2908fa00bb7e509b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6495.txt @@ -0,0 +1,6 @@ +मारिया टेल्केस (१२ डिसेंबर, १९०० - २ डिसेंबर, १९९५) एक हंगेरियन-अमेरिकन बायोफिजिस्ट आणि संशोधक होत्या ज्यांनी सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर काम केले. [१] +बायोफिजिस्ट म्हणून काम करण्यासाठी त्या १९२५ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या. त्या १९३७ मध्ये अमेरिकन नागरिक बनल्या आणि १९३९ मध्ये सौरऊर्जेचा व्यावहारिक वापर करण्यासाठी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम सुरू केले [२] एमआयटीमध्ये असताना, टेलकेसने एक पद्धत तयार केली ज्यामध्ये सूर्यापासून ऊर्जा साठवण्यासाठी सोडियम सल्फेटचा वापर केला. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यानी एक सौर ऊर्धपातन यंत्र विकसित केले, जे युद्धाच्या शेवटी तैनात केले गेले, ज्याने खाली पडलेल्या एअरमेन आणि टॉर्पेडोड खलाशांचे प्राण वाचवले. [२] [३] [४] गरीब आणि शुष्क प्रदेशातील गावकऱ्यांसाठी एक आवृत्ती तयार करणे हे तिचे ध्येय होते. [५] टेलकेस, ज्याला अनेकदा द सन क्वीन म्हटले जाते, [६] सौर थर्मल स्टोरेज सिस्टमच्या संस्थापकांपैकी एक मानले जाते. युद्धानंतर, मारिया टेल्केस एमआयटीमध्ये सहयोगी संशोधन प्राध्यापक बनल्या. +१९४० च्या दशकात तिने आणि वास्तुविशारद एलेनॉर रेमंड यांनी दररोज ऊर्जा साठवून पहिले सौर-उष्णतेचे घर तयार केले. [५] [७] १९५३ मध्ये त्यांनी विविध अक्षांशांवर लोकांसाठी सोलर ओव्हन तयार केले जे मुलांसाठी वापरले जाऊ शकते. तिने शेतकऱ्यांसाठी त्यांची पिके सुकवण्याचा मार्ग विकसित केला. [७] +१९५२ मध्ये, टेलकेस सोसायटी ऑफ वुमन इंजिनिअर्स अचिव्हमेंट अवॉर्डची पहिली प्राप्तकर्ता बनली. १९७७ मध्ये, तिला नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस बिल्डिंग रिसर्च अॅडव्हायझरी बोर्डाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [३] +टेलकेसचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे १९०० मध्ये अलादार आणि मारिया लबान डी टेलकेस येथे झाला, तिने बुडापेस्टमधील प्राथमिक आणि हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने Eötvös Loránd विद्यापीठात शिक्षण घेतले, १९२० मध्ये भौतिक रसायनशास्त्रात BA आणि १९२४ मध्ये PhD ची पदवी प्राप्त केली [८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6500.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f56b3b8416bd01c6460aae617cfc190a241d2a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6500.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती. +हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6524.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58211ad1c56afae1ba4de23079b5bb3939561893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6524.txt @@ -0,0 +1,7 @@ +  +मारिओ कँटोन (जन्म 9 डिसेंबर 1959) हा एक अमेरिकन विनोदी कलाकार, लेखक, अभिनेता आणि गायक आहे. ज्याने चॅपेल शोसह कॉमेडी सेंट्रलवर असंख्य भूमिका केल्या आहेत. त्याने सेक्स अँड द सिटीमध्ये अँथनी मॅरेंटिनो आणि मेन इन ट्रीज (2006-2008) मध्ये टेरीची भूमिकाही केली. त्याची शैली वेगवान आणि उत्साही आहे, ज्यामध्ये त्याचा बराचसा विनोद कौटुंबिक सदस्यांपासून सेलिब्रिटीं स्टिरियोटाइप पर्यंतच्या पात्रांच्या नकलातून येतो. +कॅन्टोनचा जन्म मॅसॅच्युसेट्समध्ये झाला आणि तो स्टोनहॅममध्ये वाढला, जिथे तो दोन वर्षांचा असताना त्याचे इटालियन-अमेरिकन कुटुंब स्थलांतरित झाले. [१] बोस्टन रेस्टॉरंटचे मालक मारिओ सीनियर आणि त्याची पत्नी एलिझाबेथ (née Pescione) यांच्या पाच मुलांपैकी तो चौथा होता. [२] 2004 च्या न्यू यॉर्क टाइम्सच्या मुलाखतीत कँटोनच्या मते, तिला तिच्या बुकी नातेवाईकांपासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांनी हे कुटुंब स्टोनहॅमला हलवले. [१] कँटोनने सांगितले की समस्या "ती फक्त बुकी नव्हती तर ती एक जुगारी देखील होती." [१] तारुण्यात मोठी बँड गायिका असलेली त्याची आई तो 21 वर्षांचा असताना वारली. [१] +लहानपणी, कँटोन हे शोचे पूर्नअभिनय दिग्दर्शित करायचे. [३] कॅन्टोनची पहिली छाप ज्युलिया चाइल्ड या भूमिकेची होती, जी त्याने एका कनिष्ठ हायस्कूल टॅलेंट शोमध्ये सादर केली होती . [४] त्यांनी 1978 मध्ये स्टोनहॅम हायस्कूल [५] आणि 1982 मध्ये इमर्सन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. [६] ते 1983 मध्ये न्यू यॉर्क शहरात गेले आणि त्यांना ट्रम्प टॉवर येथे चॉकलेट विक्रेत्याची नोकरी मिळाली. [७] +ट्रम्प टॉवरमध्ये काम करत असताना त्यांनी चॉकलेट ट्रफल्स विकताना लोकांवर छाप पाडली. नंतर त्याने दागिने विक्रेते म्हणून काम केले, एका वर्षानंतर पूर्णवेळ कॉमेडी करियर करण्यासाठी त्यांनी हे कामही सोडले. 1987 ते 1993 या कालावधीत न्यू यॉर्क- न्यू जर्सी सुपरस्टेशन WWOR-TV वर प्रसारित झालेल्या [८] स्टीमपाईपअॅली नावाच्या मुलांच्या शोचे होस्टिंग करून त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. +त्यांच्या स्टँड-अप मैफिलींमध्ये, ते लिझा मिनेली, ज्युडी गारलँड, ब्रूस स्प्रिंगस्टीन, जिम मॉरिसन आणि बेट डेव्हिस यांसारख्या मनोरंजन व्यक्तिमत्त्वांसाठी अधूनमधून कॅम्पी [९] छाप तसेच त्याच्या मूळ गाण्यांसाठी ओळखले जातात. [१०] +त्यांची बरीचशी कॉमेडी ही त्यांच्या उद्दाम इटालियन-अमेरिकन कुटुंबातून आली आहे. [१] [११] कॅन्टोन, जो समलिंगी आहे, [९] त्याने म्हटले आहे की तो स्वतःला एक अभिनेता आणि विनोदकार मानतो जो समलिंगी विनोदांवर अवलंबून असलेल्या गे कॉमिकपेक्षा समलिंगी आहे. [१२] "समलिंगी असण्याबद्दल बोलणे हा माझ्या शोचा एक छोटासा भाग आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा मी स्टेजवर नव्हतो पण मी मर्यादेच्या बाहेर होतो, मी नक्कीच स्टेजवर याबद्दल खोटे बोललो नाही पण जर तुम्ही तुम्हाला ओळखत नसाल तर तुम्ही मूर्ख आहात आणि मला पाहिल्यानंतर तू गुहेत राहाल ...खरंच? ?" [४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6527.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d47ac360ed51f50c4ea6a7fa9ca9628a687f273f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6527.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +मारियो गोमेझ हा जर्मनीचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6532.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecceaac0258c18fd7668e0d4f94ecce68fc5bec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6532.txt @@ -0,0 +1,3 @@ +मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा (रोमन लिपी, पोर्तुगीज: Mario João Carlos do Rosario de Brit de Miranda), अर्थात मारिओ मिरांडा (मराठी लेखनभेद: मारिओ द मिरांडा ; रोमन लिपी: Mario Miranda) (इ.स. १९२६; दमण, पोर्तुगीज भारत - ११ डिसेंबर, इ.स. २०११; लोटली, गोवा) हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्री व इ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचित्रकलेतील यांचे योगदान गौरवण्यात आले. +मिरांडा यांची हास्यचित्रे टाइम्स ऑफ इंडिया तसेच मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या हास्यचित्रांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. +मारिओ मिरांडा याचा जन्म मूळच्या गौड सारस्वत ब्राह्मण, परंतु पुढे रोमन कॅथलिक बनलेल्या गोवेकर घराण्यात इ.स. १९२६ साली दमण येथे झाला [१]. इ.स. १७५० च्या सुमारास रोमन कॅथॉलिक धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पूर्वज सरदेसाई आडनाव लावत असत[२]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6534.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6534.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6535.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6535.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6547.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a55142e7851ba81d84f57f78739e35f835763e51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6547.txt @@ -0,0 +1 @@ +मारी कॉर्निश (१ ऑक्टोबर, १९५६:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८२ दरम्यान ९ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6571.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c37ce38928f84c0ce788a2df3f029729d108ec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6571.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते. +महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मारुतीराव माने यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला. +राजस्थानच्या कुस्तीपटू महिरुद्दीनचा पराभव करून माने यांना 1964 मध्ये हिंद केसरीचा मुकुट देण्यात आला. तो एकेकाळी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये समावेश होता. त्यांना केंद्र शासनाने प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारही प्रदान केला. +दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6607.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2a42e5cbe9abe8ce457a15847e2d18e727b0f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6607.txt @@ -0,0 +1,49 @@ +२०° ०६′ ००″ N, ७८° ४९′ ००″ E +मारेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. +धामणी (मारेगांव) +धानोरा (मारेगांव) +धानपूर +डोल डोंगरगाव +डोंगरगाव (मारेगांव) +डोरली (मारेगांव) +दुर्गाडा +गाडेगाव +गावराळा +घोडदरा (मारेगांव) +घोगुळदरा +गिरजापूर +गोदाणी +गोंदबुरांडा +गोराज +हातवणजरी +हिवारा माजारा +हिवरी (मारेगांव) +इंदिरागाव +जागलोण +जाळका +कानडा +कान्हळगाव +करणवाडी (मारेगांव) +केगाव (मारेगांव) +खडकी (मारेगांव) +खैरगाव (मारेगांव) +खाणदाणी +खापारी +खेकडवाई +किलोणा +किन्हाळा (मारेगांव) +कोळगाव (मारेगांव) +कोसारा +कोथुर्ला +कृष्णापूर (मारेगांव) +कुंभा +लाखापूर +मच्छिंद्र +मदनपार +महागाव (मारेगांव) +माजारा +मांगळी (मारेगांव) +मांगरूळ (मारेगांव) +मारदी +मारेगाव. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6639.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e57509117e18da751fa78fdcfe6f222d2b221e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6639.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क सिंकलेर चॅपमॅन (२७ जून, १९९४:हाँग काँग - हयात) ही  हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०१४ ते २०१६ दरम्यान ३ एकदिवसीय आणि १५ ट्वेंटी२० सामने आणि  न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6657.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b54d1b3e000a69660a829fc928c34afb6c16b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6657.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क हॅमिल्टन डेक्कर (५ डिसेंबर, १९६९:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा  झिम्बाब्वेकडून १९९२ ते १९९६ दरम्यान १४ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6664.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a0efd5e50798dd4fd23b478730252bfab3218d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6664.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मार्क नौल्स (सप्टेंबर ४, इ.स. १९७१:नासाउ, बहामास - ) हा बहामाचा टेनिस खेळाडू आहे. +नौल्स एकेकाळी जगातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6695.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6acea8b9cad51ecc04fdd3f749432ae2d1652eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6695.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्क जेम्स विल्यम्स, एमबीई (२१ मार्च, १९७५ - ) हा व्यावसायिक स्नूकर[१] खेळाडू आहे. हा २०००, २००३ आणि २०१८ असे तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकला[२] आहे. +वयाच्या ४३ व्या वर्षी जेव्हा त्याने मे २०१८ मध्ये विजयी केले, तेव्हा तो क्रूसिबल येथे विश्वविजेतेपदाचा दुसरा सर्वात मोठा विजेता ठरला (रे रेर्डन १९७८ मधील सर्वात जुने विजेता होते, वय ४५ वर्ष). विल्यम्सने त्याच्या एकल-बॉलच्या लांब पॉटिंग क्षमतेसाठी प्रख्यात म्हणून ओळखले जाते, "वेल्श पॉटिंग मशीन" असे टोपणनाव विल्यम्सने मिळवले आहे. +कारकिर्दीत (१९९९-२०००, २०००-२००१ आणि २००२-२००3) विल्यम्सला एकूण तीन हंगामांमध्ये जागतिक क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे. २००२/२००3 हा त्यांचा सर्वात यशस्वी हंगाम होता, जेव्हा त्याने टूर्नामेंट्स (ट्रिपल क्राउन म्हणून ओळखले जाते): यूके चॅम्पियनशिप, मास्टर्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. असे केल्याने, स्टीव्ह डेव्हिस आणि स्टीफन हेन्ड्रीनंतर तो तिसरा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त, जागतिक स्पर्धेच्या तिन्ही आवृत्त्या - वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप, सहा-रेड वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड सीनियर चॅंपियनशिप जिंकणारा तो पहिला खेळाडू (आणि आजपर्यंतचा एकमेव खेळाडू) आहे. +विश्व चॅंपियनशिप जिंकणारा पहिला डावखुरा खेळाडू, विल्यम्सने दोन यूके चॅम्पियनशिपसह ( १९९९ आणि २००२) एकूण २२ रॅंकिंग स्पर्धा जिंकल्या असून, त्याला सर्वांगीण यादीमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे. त्याने दोन वेळा (१९९८ आणि २००३) मास्टर्स जिंकले आहेत. २००३ मध्ये दुसऱ्या विश्वविजेतेपदानंतर त्यांचा फॉर्म कमी होऊ लागला; त्यानंतर २००१ च्या मोसमानंतर तो अव्वल १६ क्रमांकावर आला, परंतु २०१० मध्ये त्याने पुन्हा स्थान मिळवले. २०११ पासून २०१७ पर्यंत स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्याने. विल्यम्सने त्याच्या कारकिर्दीत ४७० पेक्षा जास्त शतके ब्रेक तसेच स्पर्धेत दोन जास्तीत जास्त ब्रेक संकलित केले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6705.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c43a12cc8e6cbfc326ac9bcaf37211828008743a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6705.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्क अँड्रु व्हर्मुलेन (मार्च २, इ.स. १९७९:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6710.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e57509117e18da751fa78fdcfe6f222d2b221e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6710.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क सिंकलेर चॅपमॅन (२७ जून, १९९४:हाँग काँग - हयात) ही  हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०१४ ते २०१६ दरम्यान ३ एकदिवसीय आणि १५ ट्वेंटी२० सामने आणि  न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6716.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..925177ade91fe1fac757af5b3aa4e12d5b4d2516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6716.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्क हॅस्टींग्स (८ मे, १९६८:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे. +मार्क याने कँटरबरीकडून एकूण १० प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_672.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d6890cf3186a20301541c4c082e64d1cdccad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_672.txt @@ -0,0 +1,12 @@ + +भोगावती नदी ही पश्चिम महाराष्ट्रातली एक नदी आहे. ही पंचगंगेची स्रोतनदी आहे. ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाहच होय. नदीची लांबी सुमारे ८२ किमी. असून ती सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहते.. सह्याद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे ४८ किमी.अंतरावरील फोंडाघाटाच्या (फोंडा खिंडीच्या) दक्षिणेस असलेल्या राधानगरीतील दाट जंगलाने व्याप्त अशा डोंगराळ प्रदेशात उगम पावून, ती राधानगरी, कागल,करवीर तालुक्यांतून वाहते. +अंदाजे ४० किमी. वाहत गेल्यावर बीड (कोल्हापूर जिल्हा) गावाजवळ भोगावतीला डाव्या बाजूने तुळशी नदी मिळते. तदनंतर यांच्या संयुक्त प्रवाहास बहिरेश्वर येथे कुंभी व धामणी या नद्यांचा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. हा एकत्रित प्रवाह पुढे प्रयागजवळ कासारी नदीस मिळतो व येथून पुढे हा प्रवाह पंचगंगा नदी या नावाने ओळखला जातो. +भोगावती नदीच्या उगमाकडील भागात, राधानगरी तालुक्यात फेजिवडे येथे १९५४ साली धरण बांधण्यात आले. १,१४३ मीटर लांब व ४२.७ मीटर उंचीच्या या धरणाच्या जलाशयाला ‘लक्ष्मी तलाव’ असे नाव देण्यात आले आहे. +या धरणामुळे वीजनिर्मिती व पाणीपुरवठा हे दोन्ही हेतू साध्य झाले आहेत. धरणामुळे भोगावती नदीखोऱ्यात शेती व औद्योगिक प्रगती होत आहे. या नदीतील पाणी बंधारे बांधून उपसा जलसिंचन पद्धतीने शेतीस पुरविले जाते. +नदीखोऱ्यात गहू, भात तसेच ऊस, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. यांशिवाय विड्याच्या पानांचे मळे व ऐन, हिरडा, बांबू यांची बने आहेत. नदीखोऱ्यात गवा, बिबळ्या, चितळ, सांबर, इ. वन्य प्राण्यांचे अभयारण्य (राधानगरी भागात) असल्याने पर्यटनदृष्ट्याही हे खोरे महत्त्वाचे आहे. राधानगरी, राशीवडे, परिते, बीड इ. भोगावती नदीखोऱ्यातील प्रमुख गावे होत. + +[[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या]] + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6723.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc7439bbd3a5419feafeebe9cf87d0ad8eb47fd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6723.txt @@ -0,0 +1,6 @@ +मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे चंद्रपूर -मूल -चामोर्शी रस्त्यावर आहेत. येथे नागपूर नागभीड या राज्य मार्ग क्र.९ ने ही मूल या गावापर्यंत जाउन मूल-चामोर्शी रस्त्याने मार्कंड्यास जाता येते. मूल ते मार्कंडा हे अंतर सुमारे २७ कि.मी.येते. ही जागा दुर्लक्षित आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे.[ संदर्भ हवा ] सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. यांत मार्कंडऋषी,(ज्यांचेवरून या गावास 'मार्कंडा' हे नाव पडले)मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे चंद्रपूर येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे.[ संदर्भ हवा ]येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. +भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे. म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण 'तीर्थक्षेत्र' म्हणतो. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात. मार्कंडा हे असेच एक तीर्थक्षेत्र आहे. +उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. +अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना 'विदर्भाची काशी' म्हणतात ते उगाच नाही. +या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती 'आम्रपाली'चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो. +मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6760.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75614554e327e887ca9791396545b250ad6a0d12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6760.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कस स्टीवन हाह्नेमन (१५ जून, १९७२:सिॲटल, वॉशिंग्टन, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6785.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aff18867790c7f5c4d95f304885d79daa8792550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6785.txt @@ -0,0 +1 @@ +मार्को आंद्रेस एस्त्रादा क्विंतेरोस (२८ मे, १९८३ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6789.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38b3a65c5045053eb1c6fae3b8e76875535ecd3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6789.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्को गोजानोविक (जन्म १८ एप्रिल १९८० झाग्रेब, क्रोएशिया) हा एक युरोपियन वन सोदबायस रीएलीटी रियल इस्टेट उद्योजक, आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू आणि निर्माता आहे. त्यांना २०२२ मध्ये जीएलटी निर्माता समीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२] +गोजानोविकने २००२ मध्ये क्लेमसन युनिव्हर्सिटीमधून स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये पदवी पूर्ण केली. त्याने २०१८ मध्ये अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले जेथे त्याने बेसा नावाच्या पहिल्या टेलिव्हिजन मालिकेची सह-निर्मिती केली. २०१९ मध्ये, जॉन आर.[३] लिओनेटी सोबत त्याने द सायलेन्स नावाच्या भयपटाची सह-निर्मिती केली. २०१९ मध्ये, तो उसपजेह या दूरदर्शन मालिकेसाठी लाइन निर्माता होता. २०२१ मध्ये, बोगू इझा नोगु नावाच्या क्रोएशियन टेलिव्हिजन मालिका.[४] +जीएलटी निर्माता समीक्षक पुरस्कार (२०२२) +मार्को गोजानोविक आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6801.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f66faee5dc1ee944fc6f7e54acef726b01cfaf48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6801.txt @@ -0,0 +1,5 @@ +मार्को पोलो (१२५४:व्हेनिस - १३२५) हा सध्याच्या इटलीतील व्हेनिस प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता. मंगोल साम्राज्याच्या का़ळात याने चीनला भेट दिली व परतीच्या वाटेवर भारत व इतर आशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन युरोपपुढे केले. त्याने आपल्या भ्रमंतीवर अनेक पुस्तके लिहिली. ज्याचा परिणाम युरोपच्या जनमानसावर झाला. +मार्कोने वयाच्या सोळाव्या वर्षी, १२७० मध्ये प्रवासास सुरुवात केली. त्याने आशिया खंडात चीनपर्यंत प्रवास करून पूर्वेकडील देशांमधील निसर्ग, सांस्कृतिक जीवन, व्यापार इत्यादीविषयी बारीक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारामुळेच युरोपियन लोकांचा आशियाई लोकांशी संवाद आणि व्यापार सुरू झाला. १२७० साली प्रवासास निघालेला मार्को इराण, अफगाणिस्तान, +मामीरचे पठार असा खडतर प्रवास करीत १२७५ मध्ये चीनमध्ये पोहोचला. मार्कोचे विविध भाषांचे ज्ञान, त्याची आकलनशक्ती, प्रवासातील माहितीने प्रभावित होऊन चीनचा सम्राट कुब्लाखान याने मार्कोला सरकारी नोकरीत ठेवले. १७ वष्रे चीनमध्ये राहिलेला मार्को १२९५ साली व्हेनिसला परत आला. +पुढे तीन वर्षांनी १२९८ साली व्हेनिस जिनोआ युद्धात मार्को पकडला जाऊन जिनोआच्या तुरुंगात युद्धकैदी बनून राहिला. आपल्या प्रवासातील विस्मयकारक हकिकती तो इतर कैद्यांना सांगत असे. त्याच तुरुंगातील एका लेखक कै याने मार्कोच्या रोजनिशीवरून ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिले. मूळचे लॅटिनमध्ये लिहिलेले हे पुस्तक पुढे अनेक युरोपियन भाषांमध्येही प्रसिद्ध झाले. मार्कर्ो पोलोचा चीन ते व्हेनिस परतीचा प्रवास इ.स. १२९२ ते १२९५ असा झाला. परतीच्या प्रवासात मार्कोने भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तिथली गूढविद्या याचेही मार्कोच्या पुस्तकात वर्णन आहे. पुढे दोन शतकांनी मार्को पोलोचे पुस्तक ख्रिस्तोफर कोलंबस याच्या वाचनात आले आणि भारतासाठी जलमार्गाचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला! आशियाई देशांची मूलभूत माहिती युरोपियन लोकांना प्रथम मार्को पोलोच्या नोंदीमुळेच झाली. +मार्को पोलोच्या भारत व चीनच्या वर्णनांमुळे युरोपभर भारतभेटीचे वेध लागले व त्याचे पर्यवसान पुढे कोलंबस व वास्को द गामाच्या साहसी शोधांमध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6805.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6805.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6852.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..212aa92afa74341cb09bbd137e9b628b3dc89667 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6852.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6870.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6266b9dd350a6b8d1d562ab16cbe250b6f332e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6870.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6872.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffe3e6831064562d673832053c9084902c394848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6872.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष शुद्ध तृतीया ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील तिसरी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6883.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe0b470320a5bdc1d8d522914c4aab69108fd6f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6883.txt @@ -0,0 +1,2 @@ + मार्गाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6891.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79afc8c4ac2c34e0eb3c9439379e978beff8b8f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6891.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गारेट नाझरेथ-अल्वा ( एप्रिल १४, इ.स. १९४२) या एक भारतीय राजकारणी आहेत, ज्या १४व्या भारतीय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार आहेत. मार्गारेट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत गोव्याच्या १७व्या राज्यपाल, गुजरातच्या २३व्या राज्यपाल, राजस्थानच्या २०व्या राज्यपाल आणि उत्तराखंडच्या ४थ्या राज्यपाल म्हणून काम केले. त्यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले आहे. +त्यांनी राजस्थानमध्ये पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला, ज्यांच्याकडे त्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार होता. राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या संयुक्त सचिव होत्या. त्यांच्या सासू व्हायोलेट अल्वा या १९६० च्या दशकात राज्यसभेच्या द्वितीय उपसभापती होत्या.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6919.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83fc8392f9fdba44b0ca2bf914b11ce2012aeedc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6919.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गारेथा गीर्ट्रुइडा मार्ग्रीट मॅकलिऑड तथा माटा हारी (अन्य लेखनभेद - माताहारी) (७ ऑगस्ट, १८७६:लीउवार्डेन, नेदरलँड्स - १५ ऑक्टोबर, १९१७:व्हिन्सेनेस, फ्रांस) ही डच नर्तिका होती. जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांसने तिला गोळ्या घालून ठार केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6930.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dade1775519cc0b658dada730791c14735dd3e6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6930.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गेरीइटे बर्क (२९ डिसेंबर, १९६५:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००० दरम्यान ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6979.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31c91adeba659cc9723e84186c6dab89276b8b24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6979.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्टा डॉमाचोव्स्का (पोलिश: Marta Domachowska; १६ जानेवारी १९८६) ही पोलंड देशाची एक टेनिसपटू आहे. अग्नियेझ्का राद्वान्स्काच्या आगमनापूर्वी डॉमाचोव्स्का पोलंडची सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू होती. तिने २००६ साली रॉबेर्ता विंचीसोबत कॅनबेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6983.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b904fa46273184fd58865388b84e761229b9c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_6983.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन आंद्रेस सिल्वा लैतेस (मार्च २५, इ.स. १९८३ - ) हा  उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +हा गोलरक्षक असून पेराग्वेच्या क्लब लिबर्ताद साठी क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7003.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd083f19d53817a4f9a3a233f3a93ec2f77d1a33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7003.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्टिन जॉन क्रिस्टोफर फ्रीमन (जन्म ८ सप्टेंबर १९७१) एक इंग्रजी अभिनेता आहे. इतर पुरस्कारांमध्ये, त्याने दोन एम्मी पुरस्कार, एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकले आहेत आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे . +द ऑफिस (२००१-०३) या मॉक्युमेंटरी मालिकेतील टिम कँटरबरी, शेरलॉक (२०१०-१७) या ब्रिटिश गुन्हेगारी नाट्यमालिकेतील डॉ. जॉन वॉटसन, द हॉबिट फिल्म ट्रायलॉजी (२०१२-१४) मधील तरुण बिल्बो बॅगिन्स या फ्रीमनच्या सर्वात उल्लेखनीय भूमिका आहेत. रोमँटिक कॉमेडी लव्ह ॲक्चुअली (२००३), हॉरर कॉमेडी शॉन ऑफ द डेड (२००४), साय-फाय कॉमेडी द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी (२००५), ॲक्शन कॉमेडी हॉट फझ (२००७) या चित्रपटांमध्येही तो दिसला आहे. २०१६ पासून, त्याने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एव्हरेट के. रॉसची भूमिका साकारली आहे, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), आणि ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर (२०२२), या चित्रपटांमध्ये दिसला.[१][२][३][४][५] + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7031.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9cc4a97baf71e223c36f0f852ee45abee2e479a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7031.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन लुथर (जन्म - नोव्हेंबर १०, इ.स. १४८३ - मृत्यु - फेब्रुवारी १८, इ.स. १५४६) हे ख्रिश्चन धर्मगुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म जर्मनीतील आईलबर्न येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी बायबलचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हटले जाई. यातून पुढे ख्रिस्तीधर्मात प्रोटेस्टंट पंथ उदयास आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7034.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9cc4a97baf71e223c36f0f852ee45abee2e479a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7034.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन लुथर (जन्म - नोव्हेंबर १०, इ.स. १४८३ - मृत्यु - फेब्रुवारी १८, इ.स. १५४६) हे ख्रिश्चन धर्मगुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म जर्मनीतील आईलबर्न येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी बायबलचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हटले जाई. यातून पुढे ख्रिस्तीधर्मात प्रोटेस्टंट पंथ उदयास आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7080.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6cd344ff893a412f428037b19a2185fd691d6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7080.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टी अह्तीसारी (फिनिश: Martti Ahtisaari; २३ जून १९४३[काळ सुसंगतता?], विबोर्ग) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च १९९४ ते मार्च २००० दरम्यान ह्या पदावर राहिलेल्या अह्तीसारीला त्याच्या कोसोव्होमधील संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठीच्या अथक प्रयत्नांसाठी २००८ साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7082.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6cd344ff893a412f428037b19a2185fd691d6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7082.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टी अह्तीसारी (फिनिश: Martti Ahtisaari; २३ जून १९४३[काळ सुसंगतता?], विबोर्ग) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च १९९४ ते मार्च २००० दरम्यान ह्या पदावर राहिलेल्या अह्तीसारीला त्याच्या कोसोव्होमधील संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठीच्या अथक प्रयत्नांसाठी २००८ साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7113.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b95ec0c860a9029d9aff40bfd83301d04fd426 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7113.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्दिन (तुर्की: Mardin ili; कुर्दी: Parêzgeha Mêrdînê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख आहे. मार्दिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. +हा प्रांत ऐतिहासिक अनातोलिया व मेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7122.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..406cc44b3be32a7f282ef955f31d00ef48698d3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7122.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्माराचा समुद्र (तुर्की: Marmara Denizi, ग्रीक: Θάλασσα του Μαρμαρά) हा युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारा तुर्कस्तानमधील एक भूमध्य समुद्र आहे. ह्ना समुद्र काळ्या समुद्राला एजियन समुद्रासोबत (पर्यायाने भूमध्य समुद्रासोबत जोडतो. बोस्फोरस ही मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी तर डार्डेनेल्झ ही मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी आहे. +मार्माराचा समुद्र तुर्कस्तानच्या युरोपियन व आशियाई भागांना वेगळा करतो. ह्या समुद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ११,३५० चौरस किमी तर कमाल खोली १,३७० मी आहे. + +गुणक: 40°45′N 28°0′E / 40.750°N 28.000°E / 40.750; 28.000 diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7128.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3def52d1009b0a0e1567da388eba00b6ff206560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7128.txt @@ -0,0 +1,34 @@ +मार्मिक हे मराठी भाषेमधील व्यंगचित्रांनी युक्त असलेले साप्ताहिक आहे. हे साप्ताहिक मुंबईहून प्रकाशित होते. व्यंगचित्र साप्ताहिक अशी ओळख आहे.[२] +१९५० ते १९६० पर्यंतचा संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा हा मराठी माणसाचा एकजुटीचा पहिला लढा. मोर्चा, आंदोलने, निषेध सभा, निवडणुका यांनी भरगच्च भरून गेलेला हा इतिहास. या इतिहासातूनच मराठी माणसाचे असे मत झाले की लढल्याशिवाय मराठी माणसाला काही मिळतच नाही. महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात आकस आहे. आपण संघटीत झालो तर आपले हित साधू शकलो हेही मराठी माणसाला कळून आले आणि नेमकी त्याच वेळी ‘मार्मिक’ची सुरुवात झाली. +शिवसेनेच्या स्थापनेची बीजे ‘मार्मिक’मध्ये दिसून येतात. त्या ‘मार्मिक’चा इतिहास मनोरंजक आहे. +सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ‘फ्री प्रेस’ मध्ये नोकरी करीत असत. त्या नोकरीतून कुटुंब चालविण्याइतकी प्राप्ती होत नसे. मग बाळासाहेब लिंटास कंपनी किंवा वेगवेगळी नियतकालिके, अंक, संख्या यांची कामे घरी घेऊन येत आणि करीत असत. कुणाच्या जाहिरातीचे डिझाईन करून देणे, कुणाचे स्केचिंगचे काम कर, कुणाचे चित्र काढू दे असली कामे करून संसाराला हातभार लावण्याचा खटाटोप ते करीत. ही कामे करण्यासाठी रात्र रात्र जागत असत. हळूहळू प्रपंचाच्या गरजा वाढू लागल्या आणि एक दिवस ते प्रबोधनकारांना म्हणाले, +“दादा, मी स्वतःचं काही तरी नवीन सुरू करीन म्हणतो. मला माझ्या कामाचा पूर्ण मोबदला मिळातो असं वाटत नाही. म्हणून नोकरी सोडाण्याचा विचार करीत आहे.” +दादा म्हणाले, “सोडून दे नोकरी. त्यात कसला विचार करतोस, पण पुढे काय करणार ?” +“एक साप्ताहिक काढीन म्हणतो. व्यंगचित्र साप्ताहिक. असं साप्ताहिक सध्या नाही म्हणून ते चांगलं चालेल असं मला वाटतं.” +“उत्तम विचार आहे. कर सुरू,” दादा म्हणाले. +“पण नाव काय द्यायचं?” बाळासाहेबांनी विचारले. +“मार्मिक”, दादा. +दादांनी सुचविलेले नाव बाळासाहेबांना आवडले. वितरणाची सारी जबाबदारी श्री. बुवा दांगट यांच्यावर टाकण्यात आली. आता फक्तं मजकूर, छापखाना, कागद एवढेच बाकी राहिले. पहिल्या अंकापासून मालक, मुद्रक, प्रकाशन ‘ठाकरे बंधू’ व संपादक ‘बाळ ठाकरे’ अशी मांडणी ठरली. स्वतःचा छापखाना निघेपर्यंत अंक बाहेरून छापून घेण्याचे ठरविण्यात आले. मराठीत त्या काळात एकही व्यंगचित्र साप्ताहिक नव्हते. ‘शंकर्स विकली’ हे दिल्लीहून प्रसिद्ध होणारे व्यंगचित्र साप्ताहिक सोडले तर अन्य कोणतेही व्यंगचित्र साप्ताहिक संपूर्ण भारतात नव्हते. शेवटी ‘मार्मिक’चा प्रकाशनाचा दिवस ठरला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १३ ऑगस्ट, १९६०ला प्रकाशन करावे असाही निर्णय झाला. प्रख्यात मासिक ‘धर्नुधारी’चे मालक व संपादक सगळे बंधू यांच्या छापखान्यात छपाईसाठी ‘मार्मिक’ गेला. अचानक त्यांनी ती जबाबदारी घेऊ शकत नसल्याचे सांगितले. मोठीच अडचण आली परंतु ‘आवाज’ या विनोदी वार्षिकाचे मधुकर पाटकर हे मदतीला धावून आले आणि त्यांनी ‘मार्मिक’ छापण्याची जबाबदारी घेतली. +दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये ‘मार्मिक’च्या प्रकाशनाचा दिमाखानच सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. प्राध्यापक अनंत काणेकरही त्यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना यशवंतराव म्हणाले, +“आज मी येथे रसिक म्हणून उपस्थित आहे. बाळ ठाकरे यांची व्यंगचित्रं मी नेहमीच आवडीने पहातो. अनेकदा मीही त्यांच्या कुंचल्याचा विषय ठरत असतो. त्यांच्या कुंचल्याचे बोचरे फटकारे ते त्यांच्या व्यंगचित्रातून मारत असतात, पण तो सगळा आनंददायी भाग असतो. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे आम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते. जनतेची प्रतिक्रिया कळू शकतेर. त्यांच्या या नव्या साप्ताहिकाला माझ्या शुभेच्छा.” +१९५५ पासून ते १९६० पर्यंतचा कालखंड हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याचा कालखंड होता. १९६० पासून १९६५ पर्यंतचा कालखंड हा ‘मार्मिक’चा कालखंड म्हणावा लागेल. पुढे ‘मार्मिक’ केवळ एक व्यंगचित्र साप्ताहिक राहिले नाही. मुंबई सह संयुक्त’ महाराष्ट्र झाला परंतु मुंबईत मराठी माणसाच्या हाल-अपेष्टा चालूच राहिल्या. हा मराठी माणूस ‘मार्मिक’ कडे फार मोठ्या आशेने पाहू लागला. +१ मे १९६६ च्या मार्मिक मध्ये “मराठी राज्यांत मराठी माणसांची ससेहोलपट” असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. या अग्रलेखात … ‘प्रांतहित की राष्ट्रहित?’ असा प्रश्नठ ज्या ज्या वेळी उपस्थित होईल, त्या त्या वेळी राष्ट्रहितापुढे प्रांतहिण गौणच मानले पाहिजे, असे बाळासाहेब म्हणाले. आपली विशुद्ध राष्ट्रवादीची भूमिका मांडताना ते पुढे म्हणतात, “आम्ही याच विशुद्ध राष्ट्रावादी भूमिकेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण स्वतःच्या प्रांताचीं न्याय्यनी वाजवी गाऱ्हालणी कडाडून मांडणे, त्यासाठी भांडणे हा संकुचित प्रांताभिमान आणि आपल्या प्रांतांतील जनतेचं अकारण नुकसान होत असलं तरी ते मुकाट्याने सहन करणे हा विशाल राष्ट्राभिमान, ही संपूर्णतः तत्त्वदृष्ट, तर्कदृष्ट व व्यवहार दृष्ट भूमिका मात्र आम्हांला साफ नामंजूर आहे.” +त्याच अग्रलेखात त्यांनी, “महाराष्ट्रात असंख्य लोक तांदूळ खाणारे आहेत. पण महाराष्ट्रभर पुरेसा तांदूळ उपलब्ध नाही, महिना महिना लोकांना तांदळाचे दर्शन घडत नाही. केरळनी बंगाल येथील लोकांनी तांदळासाठी दंगे केले आणि मराठी माणूस मात्र सोसत राहीला” अशी तक्रार केली आहे. जसे अन्नाोचे तसेच वस्त्राच्या बाबतीतही. कापड गिरण्या परप्रांतीयांच्या मालकिच्या आहेत. त्या बंद पडतात आणि मराठी माणूस बेकार होतो अशीही तक्रार केली. +“महाराष्ट्रात निघणाऱ्याल सरकारी कारखान्यांना महाराष्ट्र शासनाने जमीन, वीज, पाणी इत्यादी सर्व सोयी मिळवून द्यायच्या आणि कारखाने उभारल्यानंतर त्यामध्ये परप्रांतीय बिगर मराठी लोकांना प्रचंड रोजगार उपलब्ध करून मराठी प्रजेची बेकारीनी उपासमारी वाढवायची हे योग्य आहे का?” असा प्रश्नर निर्माण केला. +याच अंकात त्यांनी ‘तुर्भ्याच्या खत कारखान्यांत परप्रांतीय मुजोर’ असे म्हणून एक यादी प्रसिद्ध केली. +तुर्भ्याच्या खतकारखान्यात परप्रांतीय मुजोर मुंबईला तुर्भे येथे सरकारी खत कारखाना निघाला. +यांत अधिकारी कोण आहेत? +वाचा यादी – +या संपूर्ण यादीत ‘शेळके’ एवढे एकच नाव मराठी आहे. बाकी एकूणएक परप्रांतीय! आता आफळे आणि कर्णिक असे दोघे मराठी अधिकारी घेतले आहेत. पण बहुसंख्य परप्रांतीयच! +हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. +त्याचबरोबर ‘पिंपरीच्या कारखान्यांत सगळे यंडूगुंडू!’ असे म्हणून तेथील अधिकाऱ्यांची यादीसुद्धा त्यांनी छापली व त्या १४ अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सर्व अधिकारी एकूणएक परप्रांतीय असल्याचे निदर्शनास आणले. यादीच्या शेवटी ‘हा महाराष्ट्राचा उपमर्द आहे’ असे ते म्हणाले. +पिंपरीच्या कारखान्यात सगळे यंडूगुंडू +पिंपरी येथील पेनिसिलिन कारखान्यात वरिष्ठ जागेवर काम करण्यास सरकारला कोणते अधिकारी मिळाले? +पहा ही यादी. +हे सर्व अधिकारी एकूणएक परप्रांतीय आहेत. या औषधी कारखान्यात, औषधालाही मराठी माणूस दिसू नये याची काहीच लाजशरम मराठी प्रशासनाला कशी वाटत नाही? +हा महाराष्ट्राचा उपमर्द आहे. हे सर्व सुरू असताना त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपल्या टीकाकारांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बाळासाहेबांचे व्यंगचित्र म्हणजे चाबकाचे फटकारे. +२२ मे, १९६६ रोजीच्या ‘मार्मिक’च्या पहिल्या पानावर ‘कायमचे सूर्यग्रहण’ हे व्यंगचित्र छापले. या सूर्याला ‘यंडूगुंडूंचे लोंढे’ हे ग्रहण लागले होते असे दाखविले आणि मराठी माणूस तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विचारतो आहे, “हे खग्रास ग्रहण केव्हा सुटणार?” असा मजकूर लिहिला, तर ३ जुलै, १९६६ च्या अंकात ‘नागमोडी धोरण’ अशा मथळ्याखाली ठाकरी भाषेत मराठी माणसे नागमोडी धावणाऱ्याी ‘काँग्रेस’च्या बैलाला म्हणाला, “बैलच त्यो. त्यो काय सरल मुतनार?” असे म्हणून काँग्रेसच्या धोरणावर टीका केली. +‘मार्मिक’मधील त्यांची ‘रविवारची जत्रा’ असंख्य व्यंगचित्रांमुळे गाजत असे. ज्यावेळी आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू झाला त्यावेळी या व्यंगचित्रांच्या जोरावर त्यांनी अत्र्यंना नमविले. असे म्हणतात की त्या काळात महाराष्ट्राचे मंत्री सर्वात जास्त घाबरत ते मार्मिकला. ९ जून, १९६८ च्या ‘मार्मिक’मधील त्यांची यशवंतराव चव्हाणांवरील व्यंगचित्रेसुद्धा दीर्घकाळ गाजत राहीली. +‘मार्मिक’च्या पहिल्या पानावरचे ब्रीदवाक्यी “खींचो न कमानको, न तलवार निकालो; जब तोप मुकाबिल है, तो अखबार निकालो” हे खरोखर लेखनाचे आणि कुंचल्याचे सामर्थ्य दाखविणारे वाक्य, ठरले. + +मराठी माणसाला चीड आणण्यासाठी ’मार्मिक’ने सतत काम केले. शिवसेना पुढे जाण्यामध्ये, मोठी होण्यामध्ये आणि यशस्वी होण्यामध्ये ‘मार्मिक’चा सिंहाचा वाटा आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7165.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e6255b30b2e755786a9d43b40ee1f762b98f6c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7165.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्वन अटापट्टू (सिंहला: මාවන් අතපත්තු; २२ नोव्हेंबर १९७० (1970-11-22), कालुतारा) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. अटापट्टूने आपल्या कारकिर्दीमध्ये ९० कसोटी सामन्यांमध्ये ५,५०२ धावा तर २६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८,५२९ धावा काढल्या. एप्रिल २०१४ पासून तो श्रीलंका क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. +अटापट्टू २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील दिल्ली जायंट्स ह्या संघासाठी देखील खेळला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7170.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3085c63fb127be74e66f4e2598590da5ea9ec75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7170.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्व्हेल स्टुडिओझ, एलएलसी [२] (मूळतः १९९३ ते १९९६ पर्यंत मार्व्हल फिल्म्स म्हणून ओळखली जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे, जी डिझ्नी एंटरटेनमेंटचा एक विभाग आहे, जो वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या मालकीचा आहे. हा स्टुडिओ मार्वल कॉमिक्स प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या पात्रांवर आधारित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट आणि मालिका तयार करतात. [३] +२००८ पासून, मार्वल स्टुडिओने MCU मध्ये ३२ चित्रपट प्रदर्शित केले आहेत- आयर्न मॅन (२००८) पासून गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२१) पर्यंत, २०२१ पासून नऊ दूरदर्शन मालिका, वॉंडा व्हिजन (२०२१) पासून सीक्रेट इन्व्हेजन (२०२३) पर्यंत, आणि दोन टेलिव्हिजन स्पेशल, वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) आणि द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल (२०२२). टेलिव्हिजन मालिका व्हाट इफ...? (२०२१) ही स्टुडिओची पहिली अ‍ॅनिमेटेड मालमत्ता आहे, जी त्याच्या "मिनी-स्टुडिओ" मार्वल स्टुडिओ अ‍ॅनिमेशनने तयार केली आहे. [१] स्टुडिओद्वारे निर्मित वन-शॉट्स लघुपटांसह हे चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन स्पेशल सर्व एकमेकांशी सातत्य सामायिक करतात. मार्व्हल टेलिव्हिजनद्वारे निर्मित टेलिव्हिजन मालिकाही सातत्य मान्य करतात. +द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), कॅप्टन मार्वल (२०१९), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) हे सर्व ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत, त्यापैकी अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम हा जुलै २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. MCU व्यतिरिक्त, मार्वल स्टुडिओ हा इतर मार्व्हल-पात्र आधारित चित्रपट मालिकांच्या निर्मितीमध्ये देखील सामील होता, ज्यात उत्तर अमेरिकन तिकीट खिडकीवरील $१ अब्ज कमाई ओलांडणाऱ्या एक्स-मेन आणि स्पायडर-मॅन चित्रपट मालिकेचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7182.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3085c63fb127be74e66f4e2598590da5ea9ec75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7182.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्व्हेल स्टुडिओझ, एलएलसी [२] (मूळतः १९९३ ते १९९६ पर्यंत मार्व्हल फिल्म्स म्हणून ओळखली जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे, जी डिझ्नी एंटरटेनमेंटचा एक विभाग आहे, जो वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या मालकीचा आहे. हा स्टुडिओ मार्वल कॉमिक्स प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या पात्रांवर आधारित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट आणि मालिका तयार करतात. [३] +२००८ पासून, मार्वल स्टुडिओने MCU मध्ये ३२ चित्रपट प्रदर्शित केले आहेत- आयर्न मॅन (२००८) पासून गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२१) पर्यंत, २०२१ पासून नऊ दूरदर्शन मालिका, वॉंडा व्हिजन (२०२१) पासून सीक्रेट इन्व्हेजन (२०२३) पर्यंत, आणि दोन टेलिव्हिजन स्पेशल, वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) आणि द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल (२०२२). टेलिव्हिजन मालिका व्हाट इफ...? (२०२१) ही स्टुडिओची पहिली अ‍ॅनिमेटेड मालमत्ता आहे, जी त्याच्या "मिनी-स्टुडिओ" मार्वल स्टुडिओ अ‍ॅनिमेशनने तयार केली आहे. [१] स्टुडिओद्वारे निर्मित वन-शॉट्स लघुपटांसह हे चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन स्पेशल सर्व एकमेकांशी सातत्य सामायिक करतात. मार्व्हल टेलिव्हिजनद्वारे निर्मित टेलिव्हिजन मालिकाही सातत्य मान्य करतात. +द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), कॅप्टन मार्वल (२०१९), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) हे सर्व ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत, त्यापैकी अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम हा जुलै २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. MCU व्यतिरिक्त, मार्वल स्टुडिओ हा इतर मार्व्हल-पात्र आधारित चित्रपट मालिकांच्या निर्मितीमध्ये देखील सामील होता, ज्यात उत्तर अमेरिकन तिकीट खिडकीवरील $१ अब्ज कमाई ओलांडणाऱ्या एक्स-मेन आणि स्पायडर-मॅन चित्रपट मालिकेचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7204.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49840b9151da7759b6acf9847c90b2ec9eb60892 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7204.txt @@ -0,0 +1 @@ +हर्बर्ट मार्शल मॅकलुहान (२१ जुलै, १९११:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ३१ डिसेंबर, १९८०) हे कॅनडाचे इंग्लिश लेखक आणि तत्त्वज्ञ होते. यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबा आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज येथे शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिका आणि कॅनडातील अनेक विद्यापीठांतून अध्यापन केले. ते १९४६ पासून मृत्युपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटोमध्ये प्राध्यापक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7223.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80668058bec0b9589d1ee2d20aa2e7d673817eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7223.txt @@ -0,0 +1 @@ +मार्सेलो परेरा (२७ मे, इ.स. १९९५ - ) हा हॉन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7224.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80668058bec0b9589d1ee2d20aa2e7d673817eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7224.txt @@ -0,0 +1 @@ +मार्सेलो परेरा (२७ मे, इ.स. १९९५ - ) हा हॉन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7240.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40e34d468db6ffefdd6a6c9b43c78253a50fdc6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7240.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६९६ असलेले मालखेडे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ३१९.१७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १५० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७८० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा बुधगांव येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा बुधगांव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7249.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd63b62345b912174ae574816e7f414197262789 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7249.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालगुडी डेज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे जी १९८६ मध्ये सुरू झाली[१] आणि ती इंग्रजी (पहिले १३ भाग) आणि हिंदी (सर्व ५४ भाग) अशा दोन्ही भाषेत चित्रित करण्यात आली होती. ही मालिका आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज नावाच्या इ.स. १९४३ च्या लघुकथा संग्रहावर आधारित आहे.[२] या मालिकेचे दिग्दर्शन कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केले होते. कर्नाटक संगीतकार एल. वैद्यनाथन यांनी स्कोअर तयार केला, तर आरके नारायण यांचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे रेखाटन कलाकार होते.[३] ही मालिका चित्रपट निर्माते टीएस नरसिंहन यांनी बनवली होती. २००६ मध्ये, या मालिकेचे अतिरिक्त १५ भाग निर्माण करण्यात आले होते, ज्याचे दिग्दर्शन कविता लंकेश यांनी केले होते.[२] +भारतीय रेल्वेने मालगुडी डेज मालिकेच्या स्थानाला आदरांजली म्हणून भारतातील शिमोगा, कर्नाटक मधील अरसालू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मालगुडी रेल्वे स्थानक ठेवण्याचा निर्णय घेतला.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7279.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6484a30b87d9be310378da1548dc58c38fe8447e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7279.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रा. मालतीताई किर्लोस्कर (इ.स. १९२३ - १३ मार्च, इ.स. २०१७) या एक मराठी लेखिका होत्या. त्या शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या आणि मुकुंदराव किर्लोस्करांच्या भगिनी होत. +सांगली येथे विलिंग्डन कॉलेजात शिक्षण घेऊन तेथेच त्या अध्यापक झाल्या. त्या ३८ वर्षे मराठीच्या प्राध्यापक होत्या. दैनिकांमधून आणि साप्ताहिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7296.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6125407546898ff5788a28e311ae8d0032cd79bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7296.txt @@ -0,0 +1 @@ +मालदा विमानतळ (आहसंवि: LDA, आप्रविको: VEMH) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील इंग्लिश बझार येथे असलेला एक लहान विमानतळ आहे. लहान विमाने व हेलिकॉप्टर येथे उतरू शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7311.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba23e4a3778abe99a497b36e2a29141b57496725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7311.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7313.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d8b2a8a7953ab11c5192dcee612c1091a295e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7313.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7318.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3939371a104472bbc1a6f102731d299949e97e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7318.txt @@ -0,0 +1,8 @@ + मालपेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7324.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b421b6bb9c493f31fea37a3f7bf46cccb258a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7324.txt @@ -0,0 +1,84 @@ +मालवण हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्हाच्या मालवण ह्या प्रमुख तालुक्याचे ते ठिकाण आहे. मालवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यात मालवण तालुक्याचे ६०% योगदान होते. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील प्राथमिक शाळा (BANDIWADE KH) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (BANDIWADE BK) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील भंडारी ए. सो. माध्यमिक मालवण (MARDE) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (KANKAVALI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (MALWAN) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (MALWAN) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (SAVANTWADI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (SAVANTWADI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (MARDE) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (MALWAN) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (MALWAN) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (KUDAL) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ इतर खाजगी शैक्षणिक सुविधा आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात इतर पद्धतीने पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४१६६०८ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील शासकीय बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात व्हॅन उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्हॅन ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सायकल रिक्षा (पायचाकी) उपलब्ध नाही.सर्वात जवळील सायकल रिक्षा (पायचाकी) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सायकल रिक्षा (यांत्रिक) उपलब्ध नाही. +गावात बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी उपलब्ध नाही.सर्वात जवळील बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात समुद्र व नदीवरील बोट सेवा उपलब्ध नाही. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध नाही.सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ९९.७३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९ कुटुंबे व एकूण १०९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर MALWAN ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८ पुरुष आणि ६१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६५६६ [१] आहे. पर्यटन +पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7361.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e9da2db37aa5d5f17c190ee6aacd792299c953f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7361.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर) (संक्षिप्त MNIT ) हे जयपूर, राजस्थान, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7364.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96938cc9f45244cf78e3a2d1949efbe96ad0a1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7364.txt @@ -0,0 +1,8 @@ +मालवेअर हे दुर्भावनायुक्त(malicious software) सॉफ्टवेर आहे. त्यामुळे संगणक ऑपरेशन मध्ये व्यत्यय येऊ शकतो, संवेदनशील माहितीची गुप्तता राहत नाही, खाजगी संगणक प्रणाली करीता प्रवेश प्राप्त होऊ शकतो, किंवा अवांछित जाहिरात प्रदर्शित होऊ शकते. त्यासाठी मालवेअर हे सॉफ्टवेर वापरले जाते. मालवेअर त्याच्या दुर्भावनायुक्त हेतू वर्णनीय आहे , संगणक वापरकर्ता आवश्यकता विरुद्ध , अभिनय, आणि त्या मुळे काही कमतरता सहेतुक हानी कारणीभूत सॉफ्टवेर समावेश नाही. टर्म बॅडवेअर कधी कधी वापरले जाते , आणि खरे ( दुर्भावनायुक्त ) मालवेअर आणि अनावधानाने हानीकारक सॉफ्टवेर दोन्ही लागू आहेत. +मालवेअर, गुपचूपपणे केलेला असू शकते, न कळू देता त्यांच्या विस्तारित कालावधीसाठी संगणक वापरकर्ते माहिती किंवा गुप्तचर ठेवणे उदाहरणार्थ Regin म्हणून हेतू , किंवा हानी होऊ रचना केली जाऊ शकते , अनेकदा यंत्रसामुग्री म्हणून (उदा, Stuxnet ), किंवा पैसे उकळण्याचा ( CryptoLocker ). ' मालवेअर ' विरोधी किंवा अनाहुत सॉफ्टवेर फॉर्म, संगणक व्हायरस, वर्म्स, ट्रोजन , ransomware , स्पायवेअर, त्रासदायक प्रोग्राम्स यांना, scareware , आणि इतर त्रासदायक प्रोग्राम्स यांसह अनेक विविध संदर्भ करण्यासाठी वापरले एक छत्री संज्ञा आहे. कार्यान्वीतजोगी कोड , स्क्रिप्ट, सक्रिय सामग्री आणि इतर सॉफ्टवेर स्वरूपात घेऊ शकता. मालवेअर अनेकदा म्हणून छुपी , किंवा दुर्भावनापूर्ण-नसलेल्या फाइल्स बसलेली आहे. 2011च्या सक्रिय मालवेयर धमक्या बहुतांश वर्म्स किंवा ट्रोजन्स ऐवजी व्हायरस होते. +स्पायवेअर किंवा इतर मालवेअर कधी कधी कंपन्या अधिकृतपणे पुरवठा कार्यक्रम एम्बेड सापडला आहे , उदा उदाहरणार्थ, उपयुक्त किंवा आकर्षक दिसणारे , पण असू शकतात विपणन आकडेवारी गोळा , अतिरिक्त लपलेले ट्रॅकिंग कार्यक्षमता संकेतस्थळ, पासून डाउनलोड . अनौरस संतती , असे वर्णन अशा सॉफ्टवेर, उदाहरण, सोनी rootkit , शांतपणे बेकायदेशीर कॉपी प्रतिबंधित उद्देश खरेदीदार 'संगणकावर स्थापित आणि दृष्टीस स्वतः जे सोनी, विक्री सीडी मध्ये एम्बेड एक ट्रोजन आहे; तो देखील वापरकर्ते ' सवयी ऐकत अहवाल आणि अनावधानाने संबंधित मालवेअर शोषण होते की असुरक्षा निर्माण केली. +अशा ॲंटी-व्हायरस , विरोधी मालवेयर आणि फायरवॉल सॉफ्टवेर दुर्भावनायुक्त म्हणून ओळखले क्रियाकलाप संरक्षण करण्यासाठी , आणि हल्ला पासून पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले जातात. +अनेक लवकर संसर्गजन्य कार्यक्रम, पहिल्या इंटरनेट जंत समावेश , प्रयोग किंवा खोड्या म्हणून लिहिले होते. आज , मालवेअर वैयक्तिक , आर्थिक किंवा व्यवसाय माहिती चोरण्यासाठी , दोन्ही हॅट हॅकर्स(black hat hackers) आणि सरकार यांनी वापरले जाते. +मालवेअर कधी कधी सावधगिरीचा माहिती गोळा करण्यासाठी किंवा सामान्य त्यांच्या ऑपरेशन व्यत्यय आणू सरकार किंवा कॉर्पोरेट संकेतस्थळ विरुद्ध सामान्यपणे वापरले जाते. तथापि, मालवेअर अनेकदा अशा वैयक्तिक ओळख क्रमांक किंवा तपशील , बँक किंवा क्रेडिट कार्ड नंबर आणि पासवर्ड माहिती प्राप्त करण्यासाठी व्यक्ती विरुद्ध वापरले जाते. बाकी, असंरक्षित वैयक्तिक आणि नेटवर्क संगणक या धमक्या विरुद्ध सिंहाचा धोका असू शकते. (हे सर्वात वारंवार , ॲंटी-व्हायरस सॉफ्टवेर आणि नेटवर्क हार्डवेर फायरवॉल विविध प्रकारच्या करून विरुद्ध नाही आहेत). +व्यापक ब्रॉडबॅन्ड इंटरनेट ऍक्सेस उदय असल्याने, दुर्भावनायुक्त सॉफ्टवेर अधिक वारंवार नफा डिझाइन केले आहे . 2003 पासून , व्यापक व्हायरस आणि वर्म्स बहुतांश बेकायदेशीर हेतूने वापरकर्ते ' संगणक नियंत्रण घेणे तयार केले आहेत. संसर्ग " स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला असा मनुष्य संगणक " ईमेल स्पॅम पाठविण्यासाठी , अशा बाल अश्लीलता म्हणून माल डेटा होस्ट करणे, किंवा खंडणी एक प्रकार म्हणून वितरित नकार -ऑफ- सेवा हल्ला गुंतण्यासाठी वापरले जातात. +वापरकर्ते ' वेब ब्राउझिंग निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले कार्यक्रम, अनपेक्षित जाहिराती प्रदर्शित किंवा संलग्न विपणन महसूल स्पायवेअर म्हटले जाते पुनर्निर्देशित. स्पायवेअर प्रोग्राम्स व्हायरसप्रमाणे पसरत नाहीत ; त्याऐवजी ते सहसा सुरक्षा राहील शोषण करून स्थापन केले जातात. ते देखील अशा सरदार -ते-सरदार अनुप्रयोग म्हणून, वापरकर्ता -प्रतिष्ठापित सॉफ्टवेरसह एकत्र पॅकेज जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_738.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc7ed0c2ee26d1e793fb1956fe29727183692aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_738.txt @@ -0,0 +1,18 @@ +भोपिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११५ कुटुंबे राहतात. एकूण ४७९ लोकसंख्येपैकी २४९ पुरुष तर २३० महिला आहेत. गावाची साक्षरता ८१.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.२१ आहे तर स्त्री साक्षरता ७४.७६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.२७ टक्के आहे. मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते काही प्रमाणात कुक्कुटपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गाळतरे, नाणे, शेलटे, मुंगुस्ते, देवळीतर्फेकोहज, वैतरणानगर,पिंपळास, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे, सांगे ही जवळपासची गावे आहेत.मांडा-वावेघर ग्रामपंचायतीमध्ये भोपिवळी, देवळीतर्फेकोहज, मांडे, मुंगुस्ते, वावेघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7388.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b0f3c21d86d3ec66652dd513f900baf9badeba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7388.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वाचा हे मलावीचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7394.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87c0fca6ed1ad80f6bff39a4b59cf6cc1e135c36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7394.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) +मलिंदै पुष्पकुमार (२४ मार्च, इ.स. १९८७:कोलंबो, श्रीलंका - ) श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7395.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed0192a1367dec84122102eff87830a5339d1463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7395.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालिकपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_742.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6ef1897fd044ddfbdb94d53883823dff798ee18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_742.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7426.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5436d70537b29860fa2c1d57bb5cfcac093a45bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7426.txt @@ -0,0 +1,2 @@ + माले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7427.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76d3530b2dccadb63e53a72e2ba44ca42d3b6755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7427.txt @@ -0,0 +1,16 @@ +मालेगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातिल महत्वाचे शहर असुन महानगरपालिकेचे ठिकाण आहे. +२०° ३३′ ००″ N, ७४° ३३′ ००″ E +हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली त्यांनी हैदराबादच्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज/मालेगाव असे नाव दिले असून आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ मालेरावांच्या नावाने मालेगाव वसाहत निर्माण केली गेली आहे. +मालेगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला एक पुल देखील अस्तित्वात असुन त्यांच्या कार्याची साक्ष देत आजही उभा आहे +मालेगाव हे शहर मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले नाशिक जिल्ल्यातिल नाशिक नंतरचे सर्वात मोठे शहर तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. नाशिक नंतर मालेगाव या शहरातुन मोठ्या व महत्त्वाच्या रस्त्यांनी बरोडा, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर व असिरगड सारखी शहरे जोडली गेली आहेत. नाशिक, धुळे, मनमाड, शिर्डी, चांदवड, सटाणा ,नांदगाव, देवळा, चाळीसगाव, साक्री ही जवळची शहरे आहेत. +मालेगाव ते दोंडाईचा राष्ट्रीय महामार्ग 160 H , मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग NH3, असे दोन महामार्ग शहरातून जातात. +मालेगाव हे शहर मोसम व गिरणा नदीच्या काठावर वसले आहे. तसेच मोसम व गिरणा संगम याच शहरात होतो. याच संगमावर संगमेश्वर गावाची ची मुख्य बाजारपेठ वसलेली आहे. +हातमाग, यंत्रमाग, +शेती हा मुख्य धंदा आहे. उत्पादन, डाळिंब व कांदा हे मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात. +मालेगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. +१)कर्मवीर भाऊसाहेब हिरे +२)या. ना. जाधव +३) निहाल अहमद +४) भीमा दादा गवळी + +आघार बु., अजांदे, अजंग, अस्ताने, बेलगाव, भारडेनगर, भिलकोट, भुईगव्हाण, बोढे, चंदनपुरी, चौकटपाडा, चिखलाओहळ, चिंचगव्हाण, चिंचवाड, चिंचवे, चोंडी, दाभाडी, दाबली, दहीदी, दहीकुटे, दहिवाळ, दापुर, दसाणे, देवघट, देवारपाडा, ढवळीविहीर, डोंगराळे, डुबगुले, एरंडगाव, गाळणे, गनेशनगर, घाणेगाव (कौ), घोडेगाव, गिगांव, गिलाणे, गुगलवाड, हताणे, हिसवाळ बु., जळगाव बु., जळगाव(निं), जळकु, जाटपाडे, जेउर, ज्वार्डी, कजवाडे, कळवाडी, कंधाणे, कंकराळे, करंजगव्हाण, कौळाणे, खडकी (मालेगाव तालुका), खाकुर्डी, खलाणे, खायदे, कोठरे रावळगाव,रोझ,साजवहाळ,सोनज,वाके ,टाकळी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7428.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f833b3d6f97d541705ce1ccf9261477c85189f43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7428.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघ - ११५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (बाह्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५ यांचा समावेश होतो. मालेगाव (बाह्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे दादाजी दगडु भुसे हे मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7434.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d23a1ff8a8b7dce5345e6d7566978ac88121ef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7434.txt @@ -0,0 +1,123 @@ +मालेगाव, वाशिम हा भारताच्याहा एक तलुका आहे महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. +अमाणा +अमणी +आमखेड +आणसिंग +भामटवाडी +भाऊराड +भेरा (मालेगाव) +भिलदुर्ग +बोल्ही +बोराळा +बोराळाजहागिर +बोरडी +बोरगाव (मालेगाव) +ब्राम्हणवाडाबुद्रुक +ब्राम्हणवाडाखुर्द +ब्राम्हणवाडा नजिक मारसुळ +चांदास +चिवारा +दापुरीकालवे +दापुरीखुर्द +दावहा +दावही +देवठाणाखांब +धामधामी +धरमवाडी (मालेगाव) +धारकारंजी +धारपिंपरी +ढोळी +ढोरखेडा +डोंगरकिन्ही +दुबळवेळ +दुधाळा +एकंबा +गांगळवाडी +घाटा पिर शिरपूर +गिवहा +गोकसावंगी +गुंजा +हणवाटखेड +इराळा +जांभरुणवाडी +जामखेड (मालेगाव) +जामठी +जावुळका +जोडगव्हाण +काळाकामठा +कळंबेश्वर +कारंजी (मालेगाव) +कावरदरी +केळी (मालेगाव) +खडकी इझरा +खैरखेडा (मालेगाव) +खंडाळाशिंदे +खारोडी +खेरडी (मालेगाव) +खिरडा +किन्ही घोडमोड +किन्हिराजा +कोळदरा +कोळगाव बुद्रुक +कोळगाव खुर्द +कोल्ही (मालेगाव) +कोठा (मालेगाव) +कुराळा +कुतरडोह +मायराळडोह +मालेगाव जहांगिर +मालेगाव नजिक किन्ही +माणका +मारसुळ (मालेगाव) +मासळा खुर्द +मेडशी +मिर्झापूर (मालेगाव) +मुंगाळा +मुसळवाडी +मुठा (मालेगाव) +नागरतस +पांगरखेड +पांगराबांदी +पांगरीकुटे +पांगरीनवघरे +पांगरीधनकुटे +पिंपळशेंडा (मालेगाव) +पिंपाळा +पिंपळवाडी (मालेगाव) +राजुरा (मालेगाव) +रामनगर (मालेगाव) +रेगाव +रिधोरा +साकरापुर +सावलाड +शेळगावबागाडे +शेळगावबोंदाडे +शेळगावखावणे +शिरपूर (मालेगाव) +सिरसाळा +सोमठाणा (मालेगाव) +सोनाळा (मालेगाव) +सोनखस (मालेगाव) +सुदी +सुकांडा +ताकतोडा +तपोवनखुर्द +तारोडी (मालेगाव) +तिवाळी +उदी +उमरदरी (मालेगाव) +उमरवाडी +वाडप +वाडीरामराव +वाघलुड +वाघीबुद्रुक +वाकड प्र वाशिम +वाकळवाडी +वाकापूर +वारंगी (मालेगाव) +वारदरीबुद्रुक +वारदरीखुर्द +वासारी +येरांडा +झोडगाबुद्रुक +झोडगाखुर्द diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7445.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1df0fb6a0ee6588139df3f8b5a464ea3f6b95cde --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7445.txt @@ -0,0 +1,8 @@ + मालेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7483.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e570c05016363aa6243c5f128f3b215bed7274d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7483.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगावकाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7515.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61a6b211924699458532169b92f5281ea174c9f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7515.txt @@ -0,0 +1,7 @@ +१० ऑगस्ट, इ.स. २००५ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, तिरक्या बॉलिंग रनपमधे दहशत होती. त्याचा बाउंसर खतरनाक होता. साडेसहा फुटाच्या वेस्टइंडियन बॉलरमधे हा पाच फूट अकरा इंच म्हणजे बुटकाच वाटायचा. माल्कम मार्शलचा राग येईल इतका तो फास्ट होता. एवढं असूनही भारतीयच नव्हे तर समस्तं क्रिकेट जग अजूनही वेस्टइंडियन क्रिकेट बद्दल ममत्वं राखून आहे कारण जिगरबाज, खुल्या दिलाची माणसं होती ही सगळी. खेळाची मजा लुटणारे फक्तं तेच एक होते, बिनधास्तं खेळायचे सगळे. +१९८३ च्या वर्ल्डकप पराजयानंतर विंडीज आपल्याकडे आलेली. धुमसत होते नुसते, वर्ल्डकपची हातातोंडाशी आलेली ह्याट-ट्रिक आपल्यामुळे गेली होती. आपल्या गल्लीत येउन त्यांनी आपल्याला मरेस्तोवर मारले अगदी. त्यांनी पाच टेस्टमधे ३-० (दोन अनिर्णित) आणि वनडेमधे ५-० धुतलं आपल्याला. माणसाची महानता आकड्यांवर कधी बघू नये, समोर कोण होतं, परिस्थिती काय होती त्यावर ठरवावी. महानता समजण्यासाठी, उजेडात येण्यासाठी प्रतिस्पर्धी पण तगडा असावा लागतो, तुमची महानता उजळायला त्याची मदतच होते. गावसकर विंडीजचा त्याअर्थानी ऋणी आहे, असायला हवा. गावसकरनी दिल्लीला ब्र्याडमनला इक्वल केलं होतं त्या सिरीजला आणि मद्रासला ओव्हरटेक. इक्वलचं एकोणतिसावं शतक मी पाहिलंय. हेल्मेट नाही, मार्शल राउंड द विकेट यायचा. गावसकरनी ब-याच कालावधीनंतर हूक मारत चौकार मिळवले होते. स्वतःच्या स्टाईलला काळिमा फासत त्यानी ९४ चेंडूत शतक काढलं होतं (त्याचं सगळ्यात जलद). समोर वेन ड्यानिअल, विन्स्टन डेविस, होल्डिंग आणि मार्शल. मार्शल, होल्डिंग समोर जलद शतक काढणं म्हणजे खायचं काम नाही. गावसकरला इझीली मिळालं नाही म्हणून तो महान आणि ते इझीली मिळू दिलं नाही म्हणून तेच मार्शललाही लागू. +त्या दौऱ्यात त्यानी ३३ विकेट्स घेतल्या. फक्तं बाउंसर टाकून विकेट नाही मिळत. तो दोन्ही स्विंग, इनस्विंगिंग यॉर्कर, लेगकटर पण टाकायचा. आधी तो तिरका रनप, मग वेग, मग स्विंग. आउट होणं किंवा धाव घेऊन समोर उभं रहाणं या दोन गोष्टीच सुखकारक होत्या. एकतर त्या टीममधे चार ते पाच आग्यावेताळ एकावेळी खेळायचे, त्यात दुस-याला पडायच्या आधी डल्ला मारल्यासारख्या विकेट पदरात पाडून घ्याव्या लागायच्या. न कुथता त्यानी ८१ टेस्ट मधे ३७६. १३६ वनडेमधे १५७ आणि फर्स्ट क्लास मधे २१७२ विकेटस काढल्यात. वाचून छाती दडपायला होते. त्याच्या डेब्यू म्याचला तो ब्याटिंग करत असताना वेंगसरकर स्लीप मधून काहीतरी लागेल असं त्याला बोलला, ती खुन्नस त्याने जाहीरपणे शेवटपर्यंत ठेवली. तो पळत यायचा तेंव्हाच जीव घेतो की काय फलंदाजाचा असं वाटायचं. माईक ग्याटिंगचं नाक मोडलं होतं त्यानी बाउंसरवर, मार्शलला त्याच्या नाकाच्या हाडाचा तुकडा चेंडूला चिकटलेला मिळाला असं वाचलंय. +पण माणूस चांगला होता. तेंव्हा बंदी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जाणा-या बंडखोर विंडीज टीममधे सहभागी होण्यासाठी दहा लाख युएस डॉलर्स नाकारणारा मार्शल. त्याला कर्करोग झाला. शेवटी चार नोव्हेंबर नव्याण्णवला वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी तेंव्हा कसबसं पंचवीस किलो वजन भरेल असा नशिबापुढे हतबल झालेला बावीस यार्डातला टेरर माल्कम मार्शल शेवटचा आउट झाला. +--जयंत विद्वांस diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7519.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2362516e6a14046705b7e9461322acc77c3d4bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7519.txt @@ -0,0 +1,2 @@ +माल्कम जेमिसन हिल्टन (ऑगस्ट २, इ.स. १९२८ - जुलै ८, इ.स. १९९०) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7524.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2098cc042ffcee398de0ed5086e0ae6076d48a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7524.txt @@ -0,0 +1,2 @@ +माल्टा क्रिकेट संघ हा माल्टा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. माल्टा संघाने २९ मार्च २०१९ रोजी  स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. +हा संघ १९९८मध्ये आयसीसीचा अॅफिलियेट तर २०१७मध्ये असोसिएट संघ झाला.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7542.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989cccb6c325f6e0950ad108bea770a243159db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7542.txt @@ -0,0 +1 @@ +मालदा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इंग्लिश बझार येथे आहे. मालदा ही एकेकाळी बंगालची राजधानी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7548.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab28b71dd3e2bbd1c62990af57a8b07641f00245 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7548.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२ सप्टेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मलमीगा अमिला अपोन्सो  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7551.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0da7220628f8817a02f4e307ebae7e2209d089f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7551.txt @@ -0,0 +1 @@ +माल्शा शेहानी (५ जून, इ.स. १९९५ - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7562.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b042f073250c3a83cfdf8f865e97e10cb5a50f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7562.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८९ असलेले माळंदा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६४९.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४१२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7649.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8592cd744fc2d2ade1f46a899945973c1f11026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7649.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7671.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09761c57ad937c4347e15c1df926e10746ea5df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7671.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7675.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d23e59d1d279548582c726866893961e4c48ec1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7675.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_768.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3477140752ec4fd0c2813ef5834c035a4bf444cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_768.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक + +भोरटेक रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. या स्थानकावर पाच[१] पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7680.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f41556842b256111d0630885fe04fa1bbd1292c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7680.txt @@ -0,0 +1 @@ +मावडी कडे पठार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7686.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebfa04819cbf8c7e226ea8f2945e885fcf8b9266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7686.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्रात अनेक मावळ आणि नेरे आहेत. उदाहरणार्थ: +हे मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल स.आ.जोगळेकर ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे, की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा(=पर्वतामधले खोरे) किंवा दरी(=लहान दरा) म्हणतात. +नेर हा नदीचे खोरे या अर्थाचा प्रत्यय आहे. हा स्वतंत्र शब्द नाही. +नेर प्रत्यय लागून बनलेली काही ग्रामनामे - +पहा:जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7693.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8caf846640d39a0591d45bb503a46ab93bfad197 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7693.txt @@ -0,0 +1,10 @@ + मावळंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावात पुरातन श्री नृसिंह मंदिर असून ह्य मंदिरातील नृसिंहाची मूर्ती योग नृसिंहांची आहे. या गावात छोटे धरण म्हणजे पाझरतलाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +श्री नृसिंह मंदिर +माखजन, शिवधामापूर. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7697.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1cd445100bd4401c70208039a9e8ebf3b30bba2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7697.txt @@ -0,0 +1,2 @@ +मावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7721.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b71bf143df94384ebc58c072529150076631d0f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7721.txt @@ -0,0 +1 @@ +देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये या विषयीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. Print Media,Electronic Media यांची कार्यपद्धती भिन्न असली तरी पत्रकारितेची तत्त्वे एकच असल्यामुळे उमेदवारांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची सधी उपलब्ध होऊ शकते. ग्रॅज्युएशननंतर मास कम्युनिकेशन या विषयात उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7768.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32fec4885213f3b5c0bfa2f2229eecb32645685e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7768.txt @@ -0,0 +1,7 @@ +मासिलम गाय हा भारतातील एक शुद्ध देशी गोवंश असून हा प्रामुख्याने मेघालय प्रांतात आढळतो.[१] भारतीय कृषी संशोधन परिषद ने मशागतीचा आणि मांसाहारासाठीचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे.[२] +हा गोवंश मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन करतो. खासी भाषेत 'मासी' म्हणजे गुरेढोरे आणि 'लम' म्हणजे टेकड्या असा अर्थ होतो, म्हणून या गोवंशाला "मासिलम" असे म्हणतात.[३] +मासिलम गुरे लहान आकाराची, मजबूत शरीरयष्टीची, बळकट आणि मेघालयाच्या टेकडी परिसंस्थेला अनुकूल अतात. या गोवंशाच्या शरीराचा रंग मुख्यतः काळा, तपकिरी, तपकिरी - राखाडी असा आढळून येतो. गाईमध्ये गळकंबळ आणि खांदा मध्यम आकाराचा तर बैलांमध्ये गळकंबळ आणि खांदा चांगले विकसित दिसून येतात. खांद्यावर केसांचा गुच्छ देखील दिसून येऊ शकतो. शिंगे लहान आणि काळ्या रंगाची असतात.[३][४] +या गोवंशाचे सरासरी दैनंदिन दूध उत्पादन अडीच ते तीन लिटर असून, एका वेतात दूध उत्पादन ३८५ ते ४५० लिटर पर्यंत आढळते. तर दूध उत्पादनाचा +कालावधी १६८ ते १८० दिवस आहे. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन विशेष करून मांसाहार, खतासाठी आणि समजित व सांस्कृतिक परंपरा म्हणून करतो.[३][४] + +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7782.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..475b62acab64191fdffced54860753f2da1ac7a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7782.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 29°18′56″S 27°30′7″E / 29.31556°S 27.50194°E / -29.31556; 27.50194 + +मासेरू ही लेसोथो ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मासेरू शहर लेसोथोच्या वायव्य भागात दक्षिण आफ्रिकेच्या सीमेजवळ वसले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_779.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee63d1cace22eff8e57a2fc436b8692a583470f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_779.txt @@ -0,0 +1,5 @@ +भोरमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ४० ते ४५ सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. येथे मुख्यतः मोसमी प्रकारची शेती केली जाते +. +भोरमाळ येथे जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो ,या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. पालखी सोहळा पार पडला कि प्रवचन व नंतर महाप्रसाद होतो . तसेच येथून थोड्या अंतरावर मोहमाळ (भोरमाळ ) येथे भावेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. +भोकरपाडा, पलविहिर, जामुनमाथा, खोकरी, पातळी, उंबरपाडा, जामूना, मिळनपाडा, उंबरविहिर, भवानदगड, सतखांब, अंबाठा, मोखपाडा, आदी. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7791.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570bf4c2a006318ee4a91af555dc0c98dbf48f44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7791.txt @@ -0,0 +1 @@ +जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7822.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fd233cc7b6fa430b4693dffa89efea6ca4d64f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7822.txt @@ -0,0 +1,73 @@ +म्हणी +नाचता येईना अंगण वाकडे +बुडत्याला काडीचा आधार +चकाकते ते सारेच सोने नसते +अंथरूण पाहून पाय पसरावे +अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. +केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा +गरज सरो नि वैद्य मरो +वासरात लंगडी गाय शहाणी +उथळ पाण्याला खळखळाट फार +चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे +दिव्या खाली अंधार +आरोग्य हेच आश्चर्य +लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. +ऐकावे जनाचे,करावे मनाचे +दाम करी काम +नवी विटी नवे राज्य +गरज ही शोधाची जननी आहे +काट्या वाचून गुलाब नाही +दृष्टी आड सृष्टी +पेरावे तसे उगवते +मुलाचे पाय पाळण्यात दिसतात +चुकणे हा मानवाचा धर्म आहे +वराती मागून घोडे +एकी हेच बळ +आपण चिंतितो एक पण देवाच्या मनात भलतेच +बोलण्या पेक्षा मौन श्रेष्ठ +बळी तो कान पिळी +गतं न शौच्यम! +घी देखा लेकीन बडगा नही देखा +चांगल्या कामाचा शुभारंभ स्वतः:च्या घरा पासून करावा. + +शब्दांच्या शक्ती अभीधा-वाच्यार्थ;लक्षणा-लक्ष्यार्थ;व्यंजना-व्यंगार्थ +स्थायीभाव : रती,उत्साह,शोक,क्रोध,हास,भय,जुगुप्सा,विस्मय,शम +रस :शृंगार,वीर,करुण,रौद्र,हास्य,भयानक,बीभत्स,अद्भुत,शांत +शब्दांचे प्रकार : सिद्ध,साधित, +सिद्ध शब्दांचे तीन प्रकार देशी,तत्सम,तद्भव,परभाषी +साधित उपसर्गघटीत,प्रत्ययघटीत-कृत(क्रुद्धात)/धातुसाधित आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक,संधी,अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त,पुनरूक्त शब्द,द्विरूकत,अंशाभ्यस्त,ध्वन्य अनुकरणवाचक शब्द. +उपसर्ग व प्रत्ययांचे प्रकार :मराठी,संस्कृत,अरबी,फारसी,इंग्लिश,कन्नड,तमिळ,तेलुगू,गुजराथी,हिंदी,इतर +कतृवाचक,साधनार्थक,स्त्रीलिंगी नामे,योग्यार्थक,क्रियावाचक नामे,विशेषणे,भूतकाल वाचक,क्रियावाचक नामे, क्रियेची मजुरी,अव्यये,युक्तार्थक +अपत्यार्थक,संबधार्थक,भावार्थक,भाववाचक,स्थानदर्शक,राखण करणारा,असलेला,खेळणारा ,रमणारा,बांधणारा,ठिकाण/गृह,लिहिणारा,पत्र/ग्रंथ + + + +आ+हार +वि+हार +सं+हार +प्र+हार +परि+हार +अप+हार +उप+हार +उप+आ+हार +जन+क +जन+न +जन+ता +जन+नी +जन+य +समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी +१)एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात +२)समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करावा. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास, +३)मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख +४)भिन्न भाषांतील शब्दांचा समास टाळावा.हेड्शिक्षक(हेडमास्तर ठिक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई(घरजावई बरोबर आहे). +५) +आपल्या तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो.ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो.ब,द,क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला.एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.'बदक पाण्यात पोहते' हे वाक्य आहे.या वाक्यात तीन पदे आहेत.या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत सहसा शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात न वापरता बदल करून वापरले जातात.या बदललेल्या स्वरूपांना सामान्य रूप म्हणतात.मराठीतील एक पद हे एक शब्द ,त्याचे सामान्यरूप किंवा सामान्य रूपातील शब्दांचा समूह अशा स्वरूपात बनते. वाक्य हे पदांचे बनलेले असते. +नाम:प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना नामअसे म्हणतात. +सर्वनाम: जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात.ऊदा. मी,तू,हा,जो,कोण. +विशेषणे : जे शब्दा नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड,कडू,दहा,त्याचा +क्रियापद: जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा.बसतो,आहे,जाईल +क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात. +शब्दयोगी:जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली,तिच्याकरिता ,त्यासाठी +उभयान्वयी: जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्यांना जोडतात तेव्हा त्यांना उभयान्वयी म्हणतात. +केवलप्रयोगी:जे शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे,अबब +लिंग,वचन,विभक्ती,सामान्यरूप,,काळ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7831.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e5ec53f1ff52dbd2fc8561eccced01f633afca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7831.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती व विशेष तंत्रज्ञान विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7834.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..174dfa2caf432308b20b846cf900a1e891251d41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7834.txt @@ -0,0 +1,39 @@ +माहिती व जनसंपर्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. +०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२ +०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ - +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +१४ ऑगस्ट २०२० - पदावर +पुढील गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो. +महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होते. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१] +दृकश्राव्य माध्यमांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपयोग करून घेते. आकाशवाणीच्या केंद्रांवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आहे. आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी प्रसारित होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7838.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ca5f1d5f7edd3bd6594fc2fef608ceb0b1dc4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7838.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7853.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313397ddae893c6ab09de659fa7edb8cbbfffbc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7853.txt @@ -0,0 +1,5 @@ +माहीमचा किल्ला हा माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. हा किल्ला सध्या सभोवतालच्या झोपडपट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामु़ळे सुस्थितीत नाही, दुर्लक्षिल्यामुळेही वास्तूची स्थिती दयनीय झाली आहे. +महिकावतीच्या बखरीत माहिमचा उल्लेख आला आहे, जेंव्हा केळवे माहिम ह्या राजधानीच्या गावातील बिंब राजाची सत्ता शिलाहारांनी नष्ट केली तेंव्हा बिंब राजाने मुंबईतल्या माहिममध्ये दुसरी राजधानी वसवली . + +इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातच्या अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. शेवटी पोर्तुगीजांनी हा किल्ला इ.स. १५३४ मध्ये जिंकून घेतला. हाच किल्ला पुढे इ.स. १६६१ मध्ये पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला.[ संदर्भ हवा ] +हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, कारण हाच किल्ला त्यांना पोर्तुगीजांच्या आणि नंतर मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण देऊ शकत होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7862.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b914e40d83c5548042cecc7287a5ae50ef52c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7862.txt @@ -0,0 +1 @@ +माहिरा इज्जती इस्माईल (जन्म १२ एप्रिल २०००) ही मलेशियाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] तिने ३ जून २०१८ रोजी, २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेत मलेशियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[[२] एप्रिल २०२१ मध्ये, मलेशियन क्रिकेट असोसिएशनने करारबद्ध केलेल्या १५ खेळाडूंपैकी ती एक होती, मलेशियन संघासाठी पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळाडूंना करार देण्यात आला होता.[[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_790.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bd2bfe1846f9259d549de5bc0918527724a0624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_790.txt @@ -0,0 +1 @@ +भोला राऊत (नोव्हेंबर ४, इ.स. १९१४ - ??) हे बिहार राज्यातील भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. ते इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील बगाहा लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.[१] [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_791.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0472469564f2733b4ab54736d398b41dd2e111d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_791.txt @@ -0,0 +1 @@ +भोला सिंग (उत्तर प्रदेशचे राजकारणी) ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7913.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa28f85c0e06dd99ef6a21a7445bf2d439acbf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7913.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +माहेला उदावट्टे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7915.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9a12e128da2922f8bab77b8d61012e8d25e5f52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7915.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7918.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4840310e94bd156541948261a3e21eee63c14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7918.txt @@ -0,0 +1,4 @@ +माह्नोमेन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माह्नोमेन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,४११ इतकी होती.[२] +ही काउंटी व्हाइट अर्थ आरक्षणाचा भाग आहे.[३] +या काउंटीची रचना २७ डिसेंबर, १९०६ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक ओजिब्वे भाषेतील जंगली तांदूळ या शब्दापासून नाव दिले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7933.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2574e3729419b59a21aeb80587726180e0f56a23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7933.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिंडू फिलिप मैदान हे सेंट लुसियाच्या कॅस्ट्रीस शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१२ एप्रिल १९७८ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7953.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171e357c54d87c7bb3e57eccee5826b1f1a780ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_7953.txt @@ -0,0 +1 @@ +मिकी डी बोअर (जन्म दिनांक अज्ञात:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8061.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b89bb7035db73394efa195703116ee758cff701d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8061.txt @@ -0,0 +1,25 @@ +२५ फेब्रुवारी, इ.स. २०१३ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिचेल आरॉन स्टार्क (30 जानेवारी 1990 रोजी जन्मलेले) ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू असून ते ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय संघ आणि स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्ससाठी खेळतात. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि एक सक्षम डावखुरा फलंदाज आहे. 2015 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या विजयी ऑस्ट्रेलियन संघाचा तो एक प्रमुख सदस्य होता आणि त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आला. +15 नोव्हेंबर 2015 रोजी, न्यू जीलैंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात स्टार्कने न्यू झीलंडच्या रॉस टेलर विरुद्ध 160.4 के.एफ.च्या गति ने चेंडू टाकण्याचा विक्रम केल्या. तथापि, त्या डिलिव्हरीवर रडार गनची चूक असल्याचे विवादित आहे कारण त्यातील उर्वरित चेंडू 150 के.पी. पेक्षा जास्त झाली नाही. स्टार्क त्यानंतर 21 ऑगस्ट 2016 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 100 पेक्षा अधिक एकदिवसीय विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला. त्याने 53 डावांत शतक झळकावून सक्लेन मुश्ताकचा 19 वर्षांचा विक्रम मोडला. तथापि, 19 मार्च 2018 रोजी स्टार्कचा रेकॉर्ड रशीद खानने मोडला, त्याने केवळ 44 डावात 100 विकेट घेतल्या. मार्च 2019 पर्यंत, स्टार्क हे यश मिळवण्याचा वेगवान वेगवान गोलंदाज ठरला. +30 डिसेंबर 2016 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये त्याने अ. सायमंड्सचा एक कसोटी सामन्यात एमसीजीच्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला आणि 7 षटकार मारला. +नोव्हेंबर 2017 मध्ये शेफील्ड शील्ड हंगामात वेस्ट साउथ वेल्सविरुद्ध न्यू साउथ वेल्स खेळताना शेफील्ड शील्ड मॅचच्या प्रत्येक डावात त्याने हॅटट्रिक घेणारा प्रथम गोलंदाज बनला. [5] [6] अनेक कारणांमुळे एका सामन्यात कधीही एकत्र खेळले नसले तरी, स्टार पॅट्स जेम्स पॅटिन्सन, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा "बिग फोर" म्हणून ओळखले जाते. +2011 मध्ये न्यू साउथ वेल्ससाठी स्टारक खेळत आहे +9 वर्षांच्या तरुणांनी विकेटकीपर म्हणून स्टार डिस्ट्रिक्टसाठी तरुण वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. [7] ते नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए)चे प्रतिनिधी क्रिकेट खेळाडू होते आणि शाळेच्या प्रथम वर्गीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारे होमबश बॉईज हायस्कूलमध्ये उपस्थित होते. सिडनीमधील बेरला स्पोर्ट्स क्रिकेट क्लबसाठी तो माजी ज्युनिअर क्रिकेट खेळाडू देखील आहे. तिथे त्याने विकेट आणि वाडगा ठेवण्याचा विचार केला होता. +सन 1 9 200 मध्ये 1 9 200 मध्ये स्टार न्यूझीलॅंड न्यू साऊथ वेल्ससाठी पदार्पण केले गेले. वेस्टर्न उपनगरातील त्याच्या कामगिरीमुळे आणि दुसऱ्या क्रमांकातील इलेव्हनने त्याची कामगिरी वाढविली आणि सीझनच्या अंतिम सामन्यासाठी त्यांनी निलंबित ॲरॉन बर्डची जागा घेतली. 200 9 -10च्या हंगामात स्टार्कने सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये स्थान मिळविले. 200 9 -10च्या हंगामात आठ शेफील्ड शील्ड गेम्समध्ये त्याने अर्धशतक केले आणि क्वीन्सलॅंड विरुद्ध 74 धावांत 5 बळी मिळवून 21 बळी घेतले. [8] +2015 मध्ये, स्टारकने ऑस्ट्रेलियाच्या घरेलू एक-दिवसीय स्पर्धेतील विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व राखले जे ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेश दौऱ्याच्या स्थगितीमुळे झाले. स्टारकच्या टूर्नामेंटच्या शुद्ध संख्येने त्याचे वर्चस्व गाजविले: सहा सामन्यांतून 8.12च्या सरासरीने 26 विकेट आणि 12.3च्या स्ट्राइक रेटने. [9] न्यू साउथ वेल्स विजयी झालेल्या स्पर्धेत स्टारकला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून नामांकित करण्यात आले. +ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना अनेक दुखापती झाल्यानंतर स्टारक यांना 2010च्या अखेरीस भारत दौरा करण्यासाठी जोश हझलवूडऐवजी बदलेल. नंतर, पहिल्या कसोटीनंतर डग बोलिंगर जखमी झाल्यानंतर स्टारक आणि सहकारी खेळाडू पीटर जॉर्ज आणि जेम्स पॅटिन्सन यांना एका स्थानासाठी प्रतिस्पर्धाची संधी मिळाली. जॉर्जची निवड झाली आणि पॅटिन्सन जखमी झाल्यानंतर स्टारकने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॉल-अप जिंकला आणि ऑक्टोबर 2010 मध्ये विशाखापट्टणममध्ये भारताविरूद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने फलंदाजी केली नाही आणि विकेटही घेतली नाही. +1 डिसेंबर 2011 रोजी ब्रिस्बेनमधील न्यू झीलंडविरूद्ध दोन कसोटी सामन्यांच्या पहिल्या कसोटीत स्टारकने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण केले. [10] मॅचमध्ये त्याने दोन बळी घेतले [11] आणि होबार्टमधील दुसऱ्या कसोटीत दोन बळी घेतले. [12] भारताविरूद्धच्या मालिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात वगळण्यात आले होते [13] परंतु स्पिनर नाथन ल्योनच्या जागी वेगवान फ्रेंडली वाईएसीए मैदानवरील तिसऱ्या कसोटीसाठी त्याने चार बळी घेतले. 2012-13 मध्ये भारतातील कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात केवळ एक धाव कमी केले. 2012-13 मधील सीमा-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान स्टारकने दोन्ही डावांत 100 चेंडू टिकवून ठेवणारा प्रथम क्रमांक 9, 10 किंवा 11 फलंदाज बनला. [उद्धरण व आवश्यक] +2012-13 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तिसऱ्या कसोटीमध्ये स्टारकची निवड झाली. ऑस्ट्रेलियाने सामना गमावला तेव्हा स्टारकने 6/154 घेतल्या आणि 4 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा दुसरा वेगवान कसोटी अर्धशतक (32 चेंडू) पार केला. [14] अलीकडील फॉर्म असूनही, श्रीलंकेविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टसाठी पदार्पण करण्यासाठी त्याने जॅक्सन बर्डच्या बाजूने विश्रांती घेतली. एक आठवड्यानंतर सिडनी कसोटीसाठी ते दोघे निवडतील. +2015च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत स्टारक यांना मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार मिळाला, ज्याने ऑस्ट्रेलिया जिंकला आणि फाइनलमध्ये न्यू झीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांच्यातील लीग स्टेज सामन्यात स्टार्कने ट्रेंट बोल्टच्या 5/27च्या विरुद्ध एकदिवसीय सामन्यात 6/28चे आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले पण ऑस्ट्रेलियाने 151 धावांचे कमी स्कोर केले असल्याने न्यू झीलंडने अखेरीस 1 बळीने मैच जिंकला. 2014-15च्या हंगामासाठी त्याने प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉर्ममध्ये ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा विकेट घेणारा फलंदाज बनला आणि 2015 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आघाडीचा बळी घेणारा (10.0च्या सरासरीने 22 विकेट व एक विक्रम) 3.5च्या दराने), न्यू झीलँड ट्रेंट बोल्टपेक्षा कमी खेळ खेळला. 2015 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत स्टारकने मॅन ऑफ द टूर्नामेंटचा निर्णय घेतला. ॲडलेड ओव्हल कसोटीच्या उद्घाटन दिवसाच्या / रात्रीच्या दुखापतीनंतर 87 वर्षांच्या अंतराने 87 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो विक्रम करणाराही आहे. [15] +ऑस्ट्रेलियाच्या 2016च्या श्रीलंके दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टारकने आपला 100 वा कसोटी विकेट घेतला. 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या बॉलने केलेल्या कामगिरीबद्दल त्याने सर्वोत्तम कसोटी गोलंदाज म्हणून 2017 ऍलन बोर्डर पदक जिंकला. [16] 2016-17च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत पुणे येथे त्याने 1,000 कसोटी धावा केल्या. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट घेण्यास आणि 1000 पेक्षा अधिक धावा काढण्यासाठी 14 व्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू बनले. +ऑस्ट्रेलियाच्या 2018च्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 1 9 10च्या 9 4 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. [17] +एप्रिल 2018 मध्ये त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2018-19 हंगामासाठी राष्ट्रीय कराराचा पुरस्कार दिला. [18] [1 9] त्याने भारतविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 2018-19 मध्ये 13 विकेट घेतल्या [20] आणि श्रीलंकेविरूद्धच्या पुढील कसोटी मालिकामध्ये त्याने 10 विकेट घेताना ऑस्ट्रेलियाच्या मालिका जिंकण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. +2012 मध्ये, सिडनी सिक्सर्सने बिग बॅश लीग (बीबीएल), चॅम्पियन्स लीग टी -20 स्पर्धेनंतर स्वाक्षरी केली होती. 2011-12च्या ऑस्ट्रेलियन समीकरणाच्या दरम्यान स्टारकने बिग बॅश लीगच्या उद्घाटनप्रसंगी सिडनी सिक्सर्ससाठीही खेळले. सिक्सर्सने टूर्नामेंट जिंकला आणि स्टारकने सहा सामन्यातील 13 सामन्यांत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून काम केले. [22]. +2014च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विकत घेतला आणि आयपीएल 2015च्या आवृत्तीत त्याचा वेगवान गोलंदाज बनला. स्पर्धेच्या सुरुवातीस दुखापत झाल्यानंतर तो परत आला आणि विश्वचषक स्पर्धेत त्याच्या चांगल्या फॉर्मसह पुढे चालू राहिला. [23] +फरवरी 2017 मध्ये आयपीएलच्या 2016च्या आवृत्तीतही चुकले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार्कने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूने मार्ग काढला, ज्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 2017च्या आयपीएल लिलावात त्यांच्या पर्समध्ये 5 कोटींचा अतिरिक्त भर दिला. [24 ] 27 जानेवारी 2018 रोजी, आयपीएलच्या लिलावात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांनी 9 .4 कोटींची खरेदी केली. [25] 30 मार्चला स्टार्कला 2018च्या आयपीएलच्या हंगामात दुखापत झाली होती. 14 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांना केकेआरमधून सोडण्यात आले. [26] +स्टार कप आणि इतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसह पॅट कमिन्सने आयपीएल 201 9च्या ऑक्शनसाठी नामांकन केले नव्हते. +स्टारक स्लोवेन वंशाचे आहे. [27] ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक उच्च जम्पर ब्रॅंडन स्टारकचा तो मोठा भाऊ आहे. [28] +2015 मध्ये स्टारक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू एलिसा हेलीशी [2 9] व्यस्त झाला आणि त्यांनी 15 एप्रिल 2016 रोजी विवाह केला. रॉकर आणि रूथ प्राइडॉक्स यांच्यानंतर 1 9 50च्या दशकात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्टारकस हा कसोटी क्रिकेट खेळणारा तिसरा विवाहित जोडपे आहे. 1 9 60 आणि 1 99 0 आणि 1 99 0च्या दशकातील श्रीलंकाचे प्रतिनिधीत्व करणारे गाई आणि रांजली दे अलविस यांनी 1 9 60च्या दशकाच्या उत्तरार्धात [30] जेव्हा ते 9 वर्षांचे होते, तेव्हा दोघेही उत्तर जिल्ह्यासाठी विकेटकीपर होते. [7] +स्टार्क ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगमधील ग्रेटर वेस्टर्न सिडनी दिग्गजांचा चाहता आहे. +साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8062.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7a36440bb0be1a12710fd4463f6c321fb64fbf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8062.txt @@ -0,0 +1 @@ +मिचेल जोसेफ स्वेपसन (४ ऑक्टोबर, १९९३:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून ४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8075.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b2173a93976c5d9a2fa44bc3cfa11c421344d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8075.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिझोरम राज्य संग्रहालय भारताच्या मिझोरम राज्याचा राजधानी ऐझॉल, मध्ये स्थित आहे. हे मानववंशशास्त्राचे संग्रहालय असून, येथे विविधलक्षी संग्रह आहेत.येथे पाच सज्जे आहेत: वस्त्र सज्जा, मानववंशशास्त्र, सज्जा, मानवशास्त्र, नैसर्गिक इतिहास आणि पुरातत्त्व ओटा. हे संग्रह ४ मजल्यांमध्ये समाविष्ट आहेत. +शिक्षण विभागांतर्गत आदिवासी संशोधन संस्थेने एप्रिल १९७७ [१] मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली [२] . १९८९ पासून हे संग्रहालय कला आणि संस्कृती विभागांतर्गत आहे. यापूर्वी संग्रहालय भाड्याच्या इमारतीत ठेवण्यात आले होते परंतु १ जुलै १९९० रोजी ते मॅक डोनाल्ड हिल येथे एका नवीन इमारतीत गेले. कोलकाताच्या भारतीय संग्रहालयाच्या देखरेखीखाली या संग्रहालयाच्या सज्ज्यांमध्ये बरेच नूतनीकरण झाले आहे. कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलकडूनही या संग्रहालयाला आर्थिक मदत मिळाली. [३] +गुणक: 23°44′17″N 92°42′56″E / 23.7381°N 92.7156°E / 23.7381; 92.7156गुणक: 23°44′17″N 92°42′56″E / 23.7381°N 92.7156°E / 23.7381; 92.7156{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.गुणक: 23°44′17″N 92°42′56″E / 23.7381°N 92.7156°E / 23.7381; 92.7156{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.गुणक: 23°44′17″N 92°42′56″E / 23.7381°N 92.7156°E / 23.7381; 92.7156{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8079.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..516e97982167d21b51e24b325417a5a8bcc4b113 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8079.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिझोरम विधानसभेचे सर्व ४० सदस्य निवडण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ह्यामध्ये १७४ उमेदवार उभे होते आणि ८०.६६% मतदान झाले. ४ डिसेंबर २०२३ रोजी मतांची मोजणी झाली ज्यामध्ये झोराम पीपल्स मूव्हमेंटने ४० पैकी २७ जागा जिंकून विजय मिळवला.[१] +मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे. [२] यापूर्वीच्या विधानसभा निवडणूका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, मिझो नॅशनल फ्रंटने राज्य सरकार स्थापन केले होते व झोरमथांगा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. [३] +भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[४][५] सुरुवातीला मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या निकालांबरोबरच ३ डिसेंबर रोजी निकाल प्रकाशित होणार होते. पण मिझोरममधील ख्रिश्चन बहुसंख्य लोकांसाठी ३ डिसेंबरचा मुख्य सुट्टीचा दिवस असल्याने निकाल ४ डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[६][७][८] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8110.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa8d913b95c8f6fa0a855d87735808210a50179a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8110.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिठ्याफाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8123.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f4a6a2d57af44fb595934d4e5e14b9943bbfa1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8123.txt @@ -0,0 +1 @@ +मिडलटाउन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर मिडलसेक्स काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४७,४८१ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8129.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ead629eb9a76e735d81f04632366e1f76c6370 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8129.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिडलसेक्स काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याची दोन प्रशासकीय केन्द्रे लोवेल आणि कॅम्ब्रिज येथे आहेत. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,३२,००२ इतकी होती.[१] ही संख्या न्यू इंग्लंडमधील काउंट्यांमध्ये सर्वाधिक आहे. +मिडलसेक्स काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १० मे, १६४३ रोजी झाली..[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8144.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5684b202722cb631b1db34365e7391e5cacc45ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8144.txt @@ -0,0 +1 @@ +मिडियाविकी एक मुक्त आणि मुक्त-स्रोत विकी इंजिन आहे. हे विकिपीडियावर २००२ मध्ये वापरासाठी विकसित केले गेले होते आणि २००३ मध्ये त्याला "मिडियाविकी" असे नाव दिले गेले होते.[१] विकिपीडिया, विकिमीडिया कॉमन्स आणि विकिडाटा यासह विकिपीडिया आणि जवळजवळ इतर सर्व विकिमीडिया वेबसाइटवर हे वापरात आहे; या साइट्स मिडियाविकीसाठी सेट केलेल्या आवश्यकतेचा एक मोठा भाग परिभाषित करत आहेत. मिडियाविकि मूळतः मॅग्नस मॅन्स्केने विकसित केली होती आणि ली डॅनियल क्रोकरने सुधारित केली आहे. त्यानंतर त्याचा विकास विकिमीडिया फाउंडेशनने समन्वित केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8155.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46b09bd4d3df105c196385fd0915ba1857ad25b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8155.txt @@ -0,0 +1,6 @@ +मार्च १२, इ.स. २००९ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत. +मिताली राजने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेट खेळाडू आहे. +मिताली राज यांच्या जीवनावर आणि क्रिकेट कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात मिताली राज यांची भूमिका तापसी पन्नू करीत आहे. +साचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8162.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1222445e2851fdaaeefe2995f733c85b4ee2e211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8162.txt @@ -0,0 +1 @@ +मितू मुखर्जी (जन्म दिनांक अज्ञात:कोलकाता, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8179.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb63a59890c01f823e97376c874180985433fc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8179.txt @@ -0,0 +1,3 @@ +११ जानेवारी, १९९३ (1993-01-11) (वय: ३१) +मिथिला पालकर (जन्म:११ जानेवारी १९९३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी टीव्ही मालिका गर्ल इन द सिटी आणि नेटफ्लिक्सच्या लिटिल थिंग्जमधील तिच्या पात्रांसाठी ओळखली जाते . मार्च २०१६ मध्ये ती तिच्या यूट्यूबवरील "कप गाण्याच्या" मराठी आवृत्तीने प्रसिद्ध झाली.[२] +पालकरने २०१४ मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[३] तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता निखिल अडवाणीचा कट्टी बट्टी. २०१८ मध्ये आलेल्या कारवां चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8198.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea04377d087adc150e885440945dee5b2f3862ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8198.txt @@ -0,0 +1 @@ +मिन-सू कांग (हंगुल: 강민수; १४ फेब्रुवारी, १९८६ - ) हा  दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8200.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3afb7bbb7d64026e909c4b4f1b130e98222e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8200.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीनल महेश पटेल ऊर्फ मिन पटेल (जुलै ७, इ.स. १९७०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा इंग्लिश राष्ट्रीय क्रिकेट संघातून क्रिकेट खेळणारा भारतीय वंशाचा, निवृत्त पुरुष खेळाडू आहे. तो  इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो केंट परगण्याचे प्रतिनिधित्व करत असे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करत असे. डाव्या हाताने गोलंडाजी करणारा पटेल फलंदाजी मात्र उजव्या हाताने करत असे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8212.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a36dc0be2bb3b2f5ef9ed4029d1872c01788ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8212.txt @@ -0,0 +1 @@ +रोमन मिथकशास्त्रानुसार मिनर्व्हा ही बुद्धी, कारागिरी व युद्ध व्यूहरचनेची देवता आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8219.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f3d32652ddfa75d196f59c58c7b07cdb8e7e2a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8219.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिनामोटो नो योरिटोमो (源 頼朝, 9 मे, 1147 - 9 फेब्रुवारी, 1199) हा जपानच्या कामाकुरा शोगुनेटचा संस्थापक आणि पहिला शोगुन होता , 1192 ते 1199 पर्यंत राज्य करत होता. +योरिटोमो हा मिनामोटो नो योशितोमोचा मुलगा होता आणि तो सेवा गेन्जीच्या प्रतिष्ठित कवाची गेन्जी कुटुंबातील होता. मिनामोटो कुळाचा योग्य वारस ठरवल्यानंतर, त्याने 1180 मध्ये जेनपेई युद्धाला सुरुवात करून कामाकुरा येथील राजधानीतून तैरा कुळाच्या विरोधात आपल्या कुळाचे नेतृत्व केले. पाच वर्षांच्या युद्धानंतर, शेवटी डॅनच्या लढाईत त्याने तैरा कुळाचा पराभव केला. नो-उरा 1185 मध्ये. योरिटोमोने अशा प्रकारे योद्धा समुराई जातीचे वर्चस्व प्रस्थापित केले आणि कामाकुरा येथे प्रथम शोगुनेट (बाकुफू) , जपानमधील सरंजामशाही युगाची सुरुवात केली, जे 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8227.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d377cd7e87595509b153f20b4a9adffd44b7240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8227.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिनिट मेड पार्क अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. मधील एक मागे घेता येणारे छतावरील स्टेडियम आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या ह्युस्टन ॲस्ट्रोझचे घरचे मैदान आहे. या मैदानाची त्याचीआसन क्षमता ४१,१६८ इतकी आहे. +या मैदानाला छत असून पाहिजे तेव्हा ते उघडता किंवा बंद करता येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8248.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee52359534e849f75743ed744f0a08b55cf55473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8248.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिनोचेम रूस्तम मसानी' उर्फ मिनू मसानी (મીનુ મસાણી) (२० नोव्हेंबर, इ.स. १९०५ - २७ मे, इ.स. १९९८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते. +मीनु मसाणी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि लिकन्स इन या संस्थांत झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईच्या न्यायालयात वकिली सुरू केली. +काही दिवसांनंतर मीनु मसाणी यांनी वकिली करणे सोडून दिले आणि त्यांनी महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मीनु मसाणी यांना भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकदा १९३२मध्ये आणि एकदा १९३३ मध्ये तुरुंगात टाकले होते. +तुरुंगातून बाहेर पडल्यावर मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि युसुफ मेहेर‍अली यांनी मिळून काँग्रेस सोशालिस्ट पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याच सुमारास, म्हणजे इ.स. १९४३ मध्ये मिनू मसानी हे वयाच्या ३८व्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचे मेयर म्हणून निवडून आले. इतक्या तरुण वयात महापौर होण्याचा हा विक्रम १९९० साली मोडला गेला. ते १९६३ मध्ये पोटनिवडणुकीत गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही ते राजकोटमधूनच लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8251.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b6621f7431ec02b27776b2913e797e5a999d6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8251.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिनेसोटा (इंग्लिश: Minnesota) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिनेसोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २१व्या क्रमांकाचे राज्य आहे. +मिनेसोटाच्या उत्तरेला कॅनडाचे मॅनिटोबा व ओंटारियो हे प्रांत, पूर्वेला सुपिरियर सरोवर व विस्कॉन्सिन, दक्षिणेला आयोवा तर पश्चिमेला नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा ही राज्ये आहेत. सेंट पॉल ही मिनेसोटाची राजधानी असून त्याचे जुळे शहर मिनियापोलिस हे सर्वात मोठे शहर आहे. मिनेसोटामधील ६० टक्के रहिवासी मिनियापोलिस-सेंट पॉल ह्या जुळ्या शहरांमध्ये वास्तव्य करतात. येथे स्कॅंडिनेव्हियन व जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वसले आहेत. +मिनेसोटा राज्यामध्ये १०,०००हून अधिक सरोवरे आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8254.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..847bf949f36d74499581527ceab29dc210e92a80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8254.txt @@ -0,0 +1 @@ +मिनेसोटा ट्विन्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मिनेसोटाच्या मिनीयापोलिस शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने टारगेट फील्ड या मैदानात खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8262.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee52359534e849f75743ed744f0a08b55cf55473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8262.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिनोचेम रूस्तम मसानी' उर्फ मिनू मसानी (મીનુ મસાણી) (२० नोव्हेंबर, इ.स. १९०५ - २७ मे, इ.स. १९९८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते. +मीनु मसाणी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि लिकन्स इन या संस्थांत झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईच्या न्यायालयात वकिली सुरू केली. +काही दिवसांनंतर मीनु मसाणी यांनी वकिली करणे सोडून दिले आणि त्यांनी महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मीनु मसाणी यांना भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकदा १९३२मध्ये आणि एकदा १९३३ मध्ये तुरुंगात टाकले होते. +तुरुंगातून बाहेर पडल्यावर मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि युसुफ मेहेर‍अली यांनी मिळून काँग्रेस सोशालिस्ट पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याच सुमारास, म्हणजे इ.स. १९४३ मध्ये मिनू मसानी हे वयाच्या ३८व्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचे मेयर म्हणून निवडून आले. इतक्या तरुण वयात महापौर होण्याचा हा विक्रम १९९० साली मोडला गेला. ते १९६३ मध्ये पोटनिवडणुकीत गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही ते राजकोटमधूनच लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8268.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afa5466790d8887c5923d4e94b58d7787994457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8268.txt @@ -0,0 +1 @@ +मिन्नू मणी (जन्म २४ मार्च १९९९) ही एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जी भारतीय महिला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करते. ती महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, ती केरळ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते. भारताकडून खेळणारी ती केरळची पहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8281.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8399e760e28bd4b6cd3e8e1f1d10b2349267c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8281.txt @@ -0,0 +1,2 @@ +मियर हीथ क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या मियर हीथ शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२१ जुलै १९९३ रोजी नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8282.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8399e760e28bd4b6cd3e8e1f1d10b2349267c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8282.txt @@ -0,0 +1,2 @@ +मियर हीथ क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या मियर हीथ शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२१ जुलै १९९३ रोजी नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8288.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2551dcbce7d3c1657f889ab313208acd6b149c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8288.txt @@ -0,0 +1,5 @@ +मियां मोहम्मद नवाझ शरीफ (पंजाबी, उर्दू: میاں محمد نواز شریف ; रोमन लिपी: Mian Mohammad Nawaz Sharif;) (डिसेंबर २५, इ.स. १९४९; लाहोर, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी, उद्योजक व पाकिस्तानाचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर १, इ.स. १९९० ते जुलै १८, इ.स. १९९३ या कालखंडात पहिल्यांदा व त्यानंतर फेब्रुवारी १७, इ.स. १९९७ ते ऑक्टोबर १२, इ.स. १९९९ या कालखंडात दुसऱ्यांदा, अश्या दोन वेळा त्याने पाकिस्तानाचे पंतप्रधानपद सांभाळले. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) हा त्याचा राजकीय पक्ष आहे. इ.स. १९९८ साली भारताने केलेल्या अण्वस्त्रचाचण्यांच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानाच्या अण्वस्त्रचाचण्या करण्याचे आदेश त्याने दिले. +शरीफने भ्रष्टाचाराद्वारे पैसा गोळा केल्याचे जुलै २०१७मध्ये सिद्ध झाल्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणतेही सार्वजनिक पद घेण्यापासून १० वर्षे बंदी केली. शरीफने ३१ जुलै, २०१७ रोजी पंतप्रधानपद सोडले. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8317.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d566daa8355a12777f0bc7576cb90fb10e318b92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8317.txt @@ -0,0 +1,2 @@ + मिरचोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8355.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d333b49e51aa11ce3acb3e45cddaae34e99c85d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8355.txt @@ -0,0 +1 @@ +मीरा-भाईंदर हे मुंबई भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आणि महानगर पालिका क्षेत्र आहे. हे शहर ठाणे जिल्ह्यात आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8359.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f8c965bff5af94c45a5746571a4088b18b6c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8359.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मिरा अलेक्सांद्रोव्ना आँद्रीव्हा (२९ एप्रिल, २००७:क्रास्नोयार्स्क, रशिया - ) ही एक रशियन टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_844.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a025a0877c5a03810def703ead784cf3d89448a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_844.txt @@ -0,0 +1,3 @@ +भोसे पाटी पंढरपूरपासून 16 किमी. अंतरावर आहे. +हा चौक पंढरपूर टेन्भुर्णी रोडवर आहे. यालाच छञपती चौक असेही म्हणतात. +या चौकातून मेंढापूर, करकंब, शेवते, पंढरपूरकडे जाता येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8467.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7481b9b81427361dd6932e0f8ee973d980ffa5d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8467.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मिलाग्रोस सिक्वेरा (सप्टेंबर ३०, इ.स. १९८०:सान फेलिपे, याराकुय, वेनेझुएला - ) हा वेनेझुएलाची टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8519.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..134e5a6e9c75777c4d7e92027595fdf44345b877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8519.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद पन्ह (मराठी: मिलिंदाचे प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_855.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f13252b085fbf77e136bcc335b96f82cc8a056 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_855.txt @@ -0,0 +1,215 @@ +भारतीय भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. +भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) एक अशी प्रणाली आहे जी स्थानिक किंवा भौगोलिक माहिती संकलन, साठवणूक, विश्लेषण, व्यवस्थापन, आदान-प्रदान आणि प्रदर्शित करते. भौगोलिक माहिती प्रणाली कधीकधी भौगोलिक माहिती विज्ञान या नावाने संबोधली जाते. +भौगोलिक माहिती प्रणाली वापरकर्त्यांना परस्पर संवादी प्रश्न निर्माण करण्यासाठी परवानगी देते (वापरकर्ता-निर्मित शोध), स्थानिक माहितीचे विश्लेषण करते. +भौगोलिक माहिती प्रणाली विविध तंत्रज्ञानाची, प्रक्रियेची आणि पद्धतींचा संदर्भ घेऊ शकते. अभियांत्रिकी, नियोजन, व्यवस्थापन, वाहतूक / पुरवठा, विमा, दूरसंचार आणि अनेक उपयोजन आहेत. +भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) स्थानिक किंवा भौगोलिक डेटा कॅप्चर, स्टोअर, हाताळणी, विश्लेषण, व्यवस्थापन आणि सादर करण्यासाठी डिझाइन केलेली एक प्रणाली आहे. जीआयएस अप्लिकेशन्स अशी साधने आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना संवादात्मक प्रश्नाची (वापरकर्त्याद्वारे निर्मित शोध) तयार करण्यास, स्थानिक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, नकाशेमध्ये डेटा संपादित करण्यासाठी आणि सर्व ऑपरेशन्सचे निकाल सादर करण्यास अनुमती देतात. [1] [2] जीआयएस (सामान्यत: जीआयएस सायन्स) नेहमीच भौगोलिक माहिती विज्ञान (जीआयएस सायन्स), विज्ञान अंतर्निहित भौगोलिक संकल्पना, अनुप्रयोग आणि प्रणाल्यांचा संदर्भ देते. [3] +जीआयएस असंख्य तंत्रज्ञान, प्रक्रिया, तंत्र आणि पद्धतींचा संदर्भ घेऊ शकते. हे बऱ्याच ऑपरेशन्समध्ये संलग्न आहे आणि त्यात अभियांत्रिकी, नियोजन, व्यवस्थापन, वाहतूक / रसदशास्त्र, विमा, दूरसंचार आणि व्यवसाय संबंधित अनेक अनुप्रयोग आहेत. [2] या कारणास्तव, जीआयएस आणि स्थान बुद्धिमत्ता अनुप्रयोग विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशनवर अवलंबून असलेल्या अनेक स्थान-सक्षम सेवांचा पाया असू शकतात. +की इंडेक्स व्हेरिएबल म्हणून स्थान वापरून जीआयएस असंबंधित माहितीशी संबंधित असू शकते. पृथ्वीच्या जागेमधील ठिकाणे किंवा विस्तार-वेळ यादृष्टीने / घटनेच्या वेळेनुसार आणि x, y आणि z निर्देशांक, रेखांश, अक्षांश आणि उत्कर्ष अनुक्रमे निर्देशित करते. सर्व पृथ्वी-आधारित स्थानिक – ऐहिक स्थान आणि विस्तृत संदर्भ एकमेकांशी संबंधित असू शकतात आणि शेवटी "वास्तविक" वास्तविक स्थान किंवा मर्यादेपर्यंत होय. जीआयएसच्या या प्रमुख वैशिष्ट्यामुळे वैज्ञानिक चौकशीचे नवीन मार्ग उघडण्यास सुरुवात झाली आहे. +भौगोलिक माहिती प्रणाली ही संगणकावर आज्ञावलीद्वारे वापरावयाची एक प्रणाली आहे. आज भौगोलिक माहिती प्रणाली वापरण्यासाठी अनेक आज्ञावली उपलब्ध आहेत. +त्यातील बहुतांश आज्ञावली या मोफत उपलब्ध नाहीत. +उदा. +आर्कजीआयएस, ग्लोबल मॅ +पर +परंतु काही मोफत आज्ञावलीदेखील उपलब्ध आहेत. +उदा. क्यूजीआयएस +भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन अनेकविध क्षेत्रात होते जसे की +१. राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (एनाआरएससी), बालानगर, हैद्राबाद, तेलंगण, भारत +२. भारतीय सुदूर संवेदन संस्था, देहरादून, उत्तराखंड, भारत +३. साधनसंपदा अभियांत्रिकी अभ्यास केंद्र, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, पवई, महाराष्ट्र, भारत +भौगोलिक माहिती प्रणाली यास इंग्रजीमध्ये जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम असे नाव आहे ज्याचे संक्षिप्त रूप जीआयएस असे होते. परंतु कित्येकदा जीआयएस या नावात गल्लत होउन जीएसआय असे लिहिले / बोलले जाते.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०][११][१२][१३] +जीएसआय हे 'भारतीय भुशास्त्रीय सर्वेक्षण' विभाग (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) याचे संक्षिप्त रूप आहे. +१. विकासाचा इतिहास:- +"भौगोलिक माहिती प्रणाली" या शब्दाचा प्रथम ज्ञात वापर 1968 मध्ये रॉजर टॉमलिन्सन यांनी "भौगोलिक माहिती प्रणालीसाठी प्रादेशिक नियोजन" या पेपरमध्ये केला होता. [4] टॉमलिन्सन यांना "जीआयएसचा जनक" म्हणून देखील ओळखले जाते. [5] +यापूर्वी, महामारीविज्ञानातील स्थानिक विश्लेषणाच्या पहिल्या अनुप्रयोगांपैकी एक म्हणजे 1832 ""Rapport sur la marche et les effets du choléra dans Paris et le département de la Seine"(रॅपोर्ट सुरला मार्चे एट लेस इफेट्स डु चोलरा डॅन पॅरिस एट ले डापार्टेमेंट डेला सीन"). [6] फ्रेंच भूगोलशास्त्रज्ञ चार्ल्स पिक्वेट यांनी पॅरिस शहरातील 48 जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व केले असून प्रति 1000 रहिवासी कॉलरामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येनुसार, अर्ध्या टोनच्या रंग ग्रेडियंटने याचे प्रतिनिधित्व केले.1854 मध्ये, जॉन स्नोने कॉलराच्या प्रकोपाचा स्रोत कोलेराचा बळी कोठे राहिला आहे हे दर्शविणाऱ्या नकाशावर चिन्हांकित करून आणि जवळच्या पाण्याच्या स्रोतासह सापडलेल्या क्लस्टरला जोडले. महामारीशास्त्रातील भौगोलिक पद्धतीचा हा सर्वात यशस्वी उपयोग होता. टोपोग्राफी आणि थीमचे मूलभूत घटक पूर्वी कार्टोग्राफीमध्ये अस्तित्वात असताना, जॉन स्नो नकाशा अद्वितीय होता, केवळ चित्रित करण्यासाठीच नव्हे तर भौगोलिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या घटनेच्या क्लस्टर्सचे विश्लेषण करण्यासाठी देखील व्यंगचित्र पद्धती वापरली गेली. +20 व्या शतकाच्या सुरुवातीस फोटोझिंग्रोग्राफीचा विकास दिसला, ज्यामुळे नकाशे थरांमध्ये विभाजित होऊ शकली, उदाहरणार्थ वनस्पतीसाठी एक थर आणि पाण्यासाठी दुसरा थर. हे विशेषतः छपाईसाठी वापरले गेले होते - हे रेखाटणे श्रम-केंद्रित काम होते परंतु स्वतंत्र थरांवर ठेवणे म्हणजे ड्राफ्ट्समनला गोंधळात टाकण्यासाठी इतर थरांशिवाय त्यांचे कार्य केले जाऊ शकते. हे काम मूलतः काचेच्या प्लेटवर रेखाटले गेले होते. परंतु,नंतर प्लॅस्टिक फिल्म सुरू करण्यात आली, त्यामध्ये फिकटपणा कमी, स्टोरेजची कमी जागा वापरणे आणि कमी भंगुर होण्याचे फायदे आहेत. जेव्हा सर्व स्तर पूर्ण झाले, तेव्हा मोठ्या प्रोसेस कॅमेऱ्याचा वापर करून ते एका प्रतिमेमध्ये एकत्र केले गेले. एकदा रंगाची छपाई आल्यानंतर प्रत्येक रंगासाठी थरांची कल्पना स्वतंत्रपणे मुद्रण प्लेट्स तयार करण्यासाठी देखील वापरली जात असे. थरांचा वापर नंतरच्या काळातील समकालीन जीआयएसच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक झाला, परंतु नुकतीच वर्णन केलेल्या फोटोग्राफिक प्रक्रियेस स्वतःच जीआयएस मानले जात नाही - कारण नकाशे फक्त त्या प्रतिमा आहेत ज्यांना जोडण्यासाठी कोणताही डेटाबेस नाही. +जीआयएसच्या सुरुवातीच्या काळात दोन अतिरिक्त घडामोडी उल्लेखनीय आहेत: इयान मॅकहर्गचे प्रकाशन "डिझाईन विथ नेचर" [7] आणि त्याचे नकाशा आच्छादन पद्धत आणि अमेरिकन जनगणना ब्युरोच्या डीआयएम (ड्युअल इंडिपेंडेंट मॅप एन्कोडिंग) सिस्टममध्ये एक स्ट्रीट नेटवर्कची ओळख. [8] +विभक्त शस्त्रास्त्र संशोधनातून वाढविण्यात आलेल्या संगणक हार्डवेर विकासामुळे 1960च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात सामान्य हेतूने संगणक "मॅपिंग" अनुप्रयोग प्राप्त केले गेले. [9] +सन 1960 मध्ये,फेडरल वनीकरण आणि ग्रामीण विकास विभागाने कॅनडाच्या ऑन्टवा येथे जगातील पहिल्या ख-या ऑपरेशनल जीआयएसचा विकास पाहिला. डॉ. रॉजर टॉमलिन्सन यांनी विकसित केलेल्या यास कॅनडा भौगोलिक माहिती प्रणाली (सीजीआयएस) म्हटले जाते आणि कॅनडा लॅंड इन्व्हेंटरीसाठी गोळा केलेला डेटा संग्रहित करणे, विश्लेषण करणे आणि हाताळणी करण्यासाठी याचा उपयोग केला जात होता - ग्रामीण कॅनडासाठी जमिनीची क्षमता निश्चित करण्याच्या प्रयत्नांविषयी माहिती मॅपिंगद्वारे.मृदा - माती, शेती, करमणूक, वन्यजीव, पाळीव प्राणी, वनीकरण आणि 1:50,000च्या प्रमाणात जमीन वापर. यात परवानगीच्या विश्लेषणामध्ये रेटिंग वर्गीकरण घटक देखील जोडला गेला. +"संगणक मॅपिंग" अनुप्रयोगांमध्ये सीजीआयएस एक सुधारणा होती. कारण, त्यात आच्छादन, मोजमाप आणि डिजिटायझिंग / स्कॅनिंगसाठी क्षमता प्रदान केली गेली. याने एक राष्ट्रीय समन्वय प्रणाली समर्थित केली. जी खंडामध्ये विस्तारित झाली, आर्कस म्हणून खऱ्या रेषेत कोडेड लाइन बनविल्या गेल्या ज्यायोगे खऱ्या एम्बेडेड टोपोलॉजी असते आणि त्याद्वारे विशेषता आणि स्थानिक माहिती स्वतंत्र फाइल्समध्ये संग्रहित केली जाते. याचा परिणाम म्हणून, टॉमलिन्सन हे "जीआयएसचे जनक" म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेषतः अभिसरण भौगोलिक डेटाच्या स्थानिक विश्लेषणास प्रोत्साहित करण्यासाठी आच्छादनांच्या वापरासाठी केला गेला. [10] +सीजीआयएसने 1990च्या दशकात टिकविले आणि कॅनडामध्ये एक मोठा डिजिटल भू-संसाधन डेटाबेस बनविला. हे फेडरल आणि प्रांतीय संसाधन नियोजन आणि व्यवस्थापनाच्या समर्थनार्थ मेनफ्रेम-आधारित प्रणाली म्हणून विकसित केले गेले. त्याची सामर्थ्य जटिल डेटासेटचे खंड-व्यापी विश्लेषण होते. सीजीआयएस कधीही व्यावसायिकरित्या उपलब्ध नव्हते. +1964 मध्ये, हॉवर्ड टी. फिशर यांनी हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइन (एलसीजीएसए 1991) येथे संगणक ग्राफिक्स आणि स्थानिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळा स्थापन केली, जिथे स्थानिक डेटा हाताळणीतील अनेक महत्त्वाच्या सैद्धांतिक संकल्पना विकसित केल्या गेल्या आणि 1970च्या दशकात वितरीत केली गेली. SYMAP, GRID आणि ODYSSEY सारख्या सेमिनल सॉफ्टवेर कोड आणि सिस्टीम - ज्याने त्यानंतरच्या व्यावसायिक विकासाचे स्रोत म्हणून काम केले - जगभरातील विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि कॉर्पोरेशन. [11] +1970च्या दशकाच्या उत्तरार्धात, दोन सार्वजनिक डोमेन जीआयएस सिस्टम (एमओएसएस आणि ग्रॅस जीआयएस) विकसित झाले आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीस, सीएडी प्लॅटफॉर्मसाठी बेंटली सिस्टम्ससह, एम Sन्ड एस कम्प्युटिंग (नंतर इंटरप्राफ), एन्व्हायर्नमेंटल सिस्टम रिसर्च इन्स्टिट्यूट (ईएसआरआय), कॅरिस (संगणक सहाय्यक संसाधन माहिती प्रणाली), मॅपइन्फो कॉर्पोरेशन आणि ईआरडीएएस (अर्थ रिसोर्स डेटा अ‍ॅनालिसिस सिस्टम) जीआयएस सॉफ्टवेरचे व्यावसायिक विक्रेते म्हणून उदयास आले आणि सीजीआयएस वैशिष्ट्यांपैकी बऱ्याच गोष्टी यशस्वीरित्या समाविष्ट केल्या, स्थानिक आणि गुणविशेष माहिती विभक्त करण्याच्या पहिल्या पिढीचा दृष्टिकोन एकत्रित केला. डेटाबेस रचनांमध्ये विशेषता डेटा आयोजित करण्यासाठी पिढीचा दृष्टीकोन. [12] +1986 मध्ये, डॉस ऑपरेटिंग सिस्टमसाठी मॅपिंग डिस्प्ले आणि अनालिसिस सिस्टम (मिडास), प्रथम डेस्कटॉप जीआयएस उत्पादन [13] जारी केले गेले. जेव्हा मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्मवर पोर्ट केले गेले होते तेव्हा 1990 मध्ये हे विंडोजसाठी मॅपइन्फो असे नाव देण्यात आले होते. याने संशोधन विभागातून जीआयएस व्यवसायाच्या वातावरणात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. +20 व्या शतकाच्या अखेरीस, विविध प्रणाल्यांमध्ये वेगवान वाढ तुलनेने काही प्लॅटफॉर्मवर एकत्रित केली गेली आणि प्रमाणित केली गेली आणि वापरकर्त्यांनी इंटरनेटद्वारे जीआयएस डेटा पाहणे सुरू केले, ज्यास डेटा स्वरूप आणि हस्तांतरण मानकांची आवश्यकता आहे. अलीकडेच, विनामूल्य, मुक्त-स्रोत जीआयएस पॅकेजेसची संख्या वाढत आहे जे ऑपरेटिंग सिस्टमच्या श्रेणीवर चालते आणि विशिष्ट कार्ये करण्यासाठी सानुकूलित केली जाऊ शकते. वर्ल्ड वाईड वेबद्वारे भौगोलिक डेटा आणि मॅपिंग अनुप्रयोग वाढत्या प्रमाणात उपलब्ध केले जात आहेत (जीआयएस सॉफ्टवेरची यादी पहा - सेवा म्हणून जीआयएस). [14] +जीआयएसच्या इतिहासावरील अनेक लेख प्रकाशित केले गेले आहेत. [15] +२.तंत्र आणि तंत्रज्ञान:-     +आधुनिक जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली)तंत्रज्ञान डिजिटल माहिती वापरतात, ज्यासाठी विविध डिजिटल डेटा तयार करण्याच्या पद्धती वापरल्या जातात. डेटा तयार करण्याची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे डिजिटलायझेशन, जेथे हार्ड कॉपी नकाशा किंवा सर्वेक्षण योजना डिजिटल माध्यमात कॅड प्रोग्रामच्या वापराद्वारे आणि भौगोलिक-संदर्भ-क्षमताद्वारे हस्तांतरित केली जाते. ऑर्थो-रेक्टिफाइड इमेजरीच्या विस्तृत उपलब्धतेसह (उपग्रह, विमान, हेलिकाइट्स आणि यूएव्हीमधून), हेड-अप डिजिटलायझेशन हा मुख्य मार्ग बनत आहे ज्याद्वारे भौगोलिक डेटा काढला जातो. हेड्स-अप डिजिटलायझेशनमध्ये भौगोलिक डेटा वेगळ्या डिजिटलायझिंग टॅब्लेटवर (हेड-डाऊन डिजिटायझिंग) भौगोलिक फॉर्म ट्रेस करण्याच्या पारंपारिक पद्धतीने ऐवजी थेट हवाई प्रतिमेच्या शीर्षस्थानी शोधणे समाविष्ट आहे. [स्पष्टीकरण आवश्यक] +भौगोलिक प्रक्रिया जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) ऑपरेशन आहे जी स्थानिक डेटा हाताळण्यासाठी वापरली जाते. एक विशिष्ट जिओप्रोसेसींग ऑपरेशन इनपुट डेटासेट घेते, त्या डेटासेटवर ऑपरेशन करते आणि आउटपुट डेटासेटच्या रूपात ऑपरेशनचा निकाल परत करते. सामान्य भौगोलिक प्रक्रिया मध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये आच्छादन, वैशिष्ट्य निवड आणि विश्लेषण, टोपोलॉजी प्रक्रिया, रास्टर प्रोसेसिंग आणि डेटा रूपांतरण यांचा समावेश आहे. भौगोलिक प्रक्रिया निर्णय तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माहितीच्या व्याख्या, व्यवस्थापन आणि विश्लेषणास अनुमती देते. [16] +2.1 वेगवेगळ्या स्रोतांकडून माहिती:- +संबंधित जीआयएस स्पॉटिओ-टेम्पोरल (स्पेस-टाइम) स्थान इतर सर्व माहितीसाठी की निर्देशांक की म्हणून बदलते. ज्याप्रमाणे मजकूर किंवा संख्या असलेले रिलेशनल डेटाबेस सामान्य की निर्देशांक चल वापरून अनेक भिन्न सारण्या संबंधित करू शकतात.त्याचप्रमाणे, जीआयएस अन्यथा असंबंधित माहितीच्या स्थानास कळ निर्देशांक म्हणून बदलू शकते. उगम स्थान आणि वेळ स्थानातील / किंवा मर्यादा आहे. +अश्या अवस्थेत स्थित असलेल्या आणि वाढत्या तात्पुरत्या स्वरूपाचे कोणतेही बदल जीआयएस वापरून संदर्भित केले जाऊ शकतात. पृथ्वीच्या जागेमधील ठिकाणे किंवा विस्तार - वेळेची तारीख / घटनेच्या रूपात नोंद केली जाऊ शकते आणि अनुक्रमे एक्स, वाय आणि झेड निर्देशांक, रेखांश, अक्षांश आणि उत्थान दर्शवते. हे जीआयएस निर्देशांक टेम्पो-स्थानिक संदर्भातील इतर प्रमाणित सिस्टमचे प्रतिनिधित्व करू शकतात. (उदाहरणार्थ, फिल्म फ्रेम नंबर, स्ट्रीम गेज स्टेशन, हायवे माईल-मार्कर, सर्व्हेअर बेंचमार्क, इमारतीचा पत्ता, रस्ता चौरस, प्रवेशद्वार, पाण्याचे खोली वाजवणे, पीओएस किंवा सीएडी रेखाचित्र) मूळ / युनिट). रेकॉर्ड केलेल्या अस्थायी-स्थानिक डेटावर लागू असलेल्या युनिट्स मोठ्या प्रमाणात बदलू शकतात (अगदी समान डेटा वापरताना, नकाशाचे अनुमान पहा), परंतु सर्व पृथ्वी-आधारित स्थानिक-स्थानिक स्थान आणि मर्यादा संदर्भ, आदर्शपणे, एकमेकांशी संबंधित असावे आणि शेवटी "वास्तविक" भौतिक स्थान किंवा अंतराळ वेळ. +अचूक स्थानिक माहितीद्वारे संबंधित, वास्तविक-जगातील एक अतुलनीय विविधता आणि भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील अंदाजित डेटा विश्लेषित करणे, अर्थ लावणे आणि प्रतिनिधित्व करणे शक्य आहे. [17] जीआयएसच्या या मुख्य वैशिष्ट्यामुळे व्यवस्थित परस्परसंबंध न ठेवलेल्या वास्तविक जगाच्या माहितीचे आचरण आणि नमुन्यांची वैज्ञानिक तपासणीचे नवीन मार्ग उघडण्यास सुरुवात झाली आहे. +2.2 जीआयएस अनिश्चितता:- +जीआयएस अचूकता स्रोत डेटावर अवलंबून असते आणि डेटा संदर्भित करण्यासाठी ते एन्कोड कसे केले जाते यावर अवलंबून असते. जीपीएस-व्युत्पन्न पोझिशन्स वापरून भू-सर्वेक्षणकर्ते उच्च स्तरीय स्थितीत अचूकता प्रदान करण्यास सक्षम आहेत. [18] उच्च-रिझोल्यूशन डिजिटल भूप्रदेश आणि हवाई प्रतिमा, [19] शक्तिशाली संगणक आणि वेब तंत्रज्ञान जीआयएसच्या भव्य प्रमाणात सेवा देण्याची अपेक्षा, उपयोगिता आणि अपेक्षा बदलत आहेत, परंतु असे असले तरी असे काही स्रोत डेटा आहेत जे कागदासारख्या जीआयएसच्या अचूकतेवर परिणाम करतात. नकाशे, इच्छित अचूकता प्राप्त करण्यात या मर्यादित उपयोगाचे असू शकतात. +जीआयएससाठी डिजिटल टॉपोग्राफिक डेटाबेस विकसित करताना, टोपोग्राफिक नकाशे मुख्य स्रोत आहेत आणि डेटा गोळा करण्यासाठी आणि एटेरियल फोटोग्राफी आणि उपग्रह प्रतिमा अतिरिक्त स्रोत आहेत. ज्या स्थानावरील स्तरांवर स्तरांमध्ये मॅप केल्या जाऊ शकतात, नकाशाचे प्रमाण आणि भौगोलिक प्रस्तुतीकरण क्षेत्र प्रतिनिधित्व प्रकार [स्पष्टीकरण आवश्यक] हे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. कारण, माहिती सामग्री मुख्यत्वे स्केल सेटवर अवलंबून असते आणि परिणामी नकाशाच्या प्रतिनिधित्वाचे लोकॅटेबिलिटी होते. नकाशाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी, नकाशाला सैद्धांतिक आयामांमध्ये तपासून घ्यावे लागेल, नंतर रास्टर स्वरूपात स्कॅन केले जाईल आणि परिणामी रास्टर डेटा रबर शीटिंग / वॉर्पिंग तंत्रज्ञान प्रक्रियेद्वारे सैद्धांतिक आयाम द्यावा लागेल. +नकाशेचे परिमाणात्मक विश्लेषण अचूकतेच्या मुद्द्यांना फोकसमध्ये आणते. जीआयएससाठी मोजमाप करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक आणि इतर उपकरणे पारंपारिक नकाशा विश्लेषणाच्या मशीनपेक्षा खूपच अचूक आहेत. सर्व भौगोलिक डेटा मूळतः चुकीचे आहेत आणि या चुकीच्या गोष्टी जीआयएस ऑपरेशन्सद्वारे अंदाज लावण्यास कठीण असलेल्या मार्गाने प्रसारित करतील. +2.3 डेटाचे प्रतिनिधित्व:- +मुख्य लेख: जीआयएस फाइल स्वरूप +जीआयएस डेटा वास्तविक वस्तू (जसे की रस्ते, जमीन वापर, उन्नतीकरण, झाडे, जलमार्ग इ.) अंकांसह दर्शवितो. मिश्रण निश्चित करणारा डेटा. वास्तविक वस्तू दोन अमूर्त गोष्टींमध्ये विभागल्या जाऊ शकतात: स्वतंत्र वस्तू (उदा. एक घर) आणि सतत शेतात (जसे पावसाची आकडेवारी किंवा उंची). पारंपारिकपणे, जीआयएसमध्ये दोन्ही प्रकारच्या अ‍ॅबस्ट्रक्शन मॅपिंग संदर्भांसाठी डेटा संचयित करण्यासाठी दोन विस्तृत पद्धती वापरल्या जातात: रास्टर प्रतिमा आणि वेक्टर. बिंदू, ओळी आणि बहुभुज ही मॅप केलेल्या स्थान विशेषता संदर्भांची सामग्री आहेत. डेटा संग्रहित करण्याची एक नवीन संकरित पद्धत म्हणजे ढग ओळखणे, जे प्रत्येक बिंदूवर आरजीबी माहितीसह त्रि-आयामी बिंदू एकत्र करते आणि " डी रंगाची प्रतिमा" परत करते. त्यानंतर जीआयएस विषयासंबंधी नकाशे ते दर्शविण्यासाठी किंवा निर्धारित करण्यासाठी काय सेट केले त्याबद्दल अधिक आणि अधिक वास्तववादी दृष्टिहीनपणे वर्णन करणारे बनत आहेत. +लोकप्रिय जीआयएस फाइल स्वरूपाच्या यादीसाठी, जसे की शेफफाईल्स, जीआयएस फाइल स्वरूप लोकप्रिय जीआयएस फाइल स्वरूप पहा. +२.४ डेटा कॅप्चर - +सिस्टममध्ये माहिती प्रविष्ट करणे - जीआयएस प्रॅक्टिशनर्सचा बराच वेळ वापरतो. जीआयएसमध्ये डेटा प्रविष्ट करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात जिथे तो डिजिटल स्वरूपात संग्रहित केला जातो. +कागदावर किंवा पीईटी फिल्म नकाशांवर मुद्रित विद्यमान डेटा डिजिटल डेटा तयार करण्यासाठी डिजिटल केला जाऊ शकतो किंवा स्कॅन केला जाऊ शकतो. ऑपरेटर नकाशावरून बिंदू, रेखा आणि बहुभुज सीमा शोधते म्हणून एक डिजिटायझर वेक्टर डेटा तयार करते. नकाशा स्कॅन केल्यामुळे रास्टर डेटाचा परिणाम होतो ज्यावर वेक्टर डेटा तयार करण्यासाठी पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते. +कोऑर्डिनेट भूमिती (सीओजीओ) नावाच्या तंत्राचा वापर करून सर्वेक्षण यंत्रणांवर डिजिटल डेटा संग्रहण यंत्रणेद्वारे जीआयएसमध्ये थेट सर्वेक्षण डेटा प्रविष्ट केला जाऊ शकतो. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) सारख्या ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS-जीएनएसएस) मधील पोझिशन्स देखील संग्रहित केल्या जाऊ शकतात आणि नंतर जीआयएसमध्ये आयात केल्या जाऊ शकतात. डेटा संग्रहातील सध्याचा ट्रेंड वापरकर्त्यांना वायरलेस कनेक्शन किंवा डिस्कनेक्ट केलेले संपादन सत्र वापरून थेट डेटा संपादित करण्याची क्षमता असलेले फील्ड संगणक वापरण्याची क्षमता देते. [21] रिअल टाइममध्ये, डेसिमीटर अचूकतेसह कमी-किंमतीच्या मॅपिंग-ग्रेड जीपीएस युनिट्सच्या उपलब्धतेमुळे हे वर्धित केले गेले आहे. फील्डवर्क जमा झाल्यानंतर कार्यालयात प्रक्रिया करणे, आयात करणे आणि अद्ययावत करणे आवश्यक आहे. यात लेसर रेंजफाइंडरचा वापर करून गोळा केलेली पोझिशन्स अंतर्भूत करण्याची क्षमता समाविष्ट आहे. नवीन तंत्रज्ञान वापरकर्त्यास नकाशे तयार करण्यास तसेच क्षेत्रामध्ये थेट विश्लेषण करण्याची परवानगी देते ज्यायोगे प्रकल्प अधिक कार्यक्षम आणि मॅपींग अधिक अचूक बनतात. +दूरस्थपणे सेन्स केलेला डेटा डेटा संकलनात देखील महत्त्वाची भूमिका बजावते आणि प्लॅटफॉर्मवर संलग्न सेन्सर असतात. सेन्सरमध्ये कॅमेरा, डिजिटल स्कॅनर आणि लिडरचा समावेश आहे, तर प्लॅटफॉर्मवर सहसा विमान आणि उपग्रह असतात. इंग्लंडमध्ये १९९० च्या मध्यास, हायलीकिड पतंग / बलून यांनी हेलिकिट्स नावाच्या कॉम्प्यूटर हवाबांदी डिजिटल कॅमेयांचा वापर हवाई-भौगोलिक माहिती प्रणाली म्हणून प्रथम केला. छायाचित्रांचा दुवा जोडण्यासाठी आणि जमिनीचे मोजमाप करण्यासाठी 0.4 मिमी ते अचूक विमाने मोजण्याचे सॉफ्टवेर वापरले गेले. हेलीकाइट्स स्वस्त असतात आणि विमानापेक्षा अधिक अचूक डेटा गोळा करतात. रस्ते, रेल्वे आणि शहरांमध्ये मानव नसलेल्या हवाई वाहनांवर (यूएव्ही) बंदी घातलेली आहे अशा ठिकाणी हेलिकेटचा वापर केला जाऊ शकतो. +नुकतेच लघु यूएव्हीद्वारे एरियल डेटा संग्रहण शक्य आहे. उदाहरणार्थ, ऐरीऑन स्काऊट केवळ 12 मिनिटांत 1 इंच (2.54 सेमी) अंतर असलेल्या नमुना अंतर असलेल्या 50 एकर क्षेत्राचा नकाशा तयार करण्यासाठी वापरला गेला. [22] +बहुतेक डिजिटल डेटा हवाई फोटोग्राफर्सच्या फोटो स्पष्टीकरणातून येते. सॉफ्ट-कॉपी वर्कस्टेशन्सचा उपयोग डिजिटल फोटोग्राफर्सच्या स्टिरिओ जोड्यांमधून थेट वैशिष्ट्ये डिजिटल करण्यासाठी केला जातो. या सिस्टीम फोटोग्रामेट्रीच्या तत्त्वांचा वापर करून स्टिरिओ जोडीकडून थेट मापन केलेल्या उंचासह, दोन आणि तीन परिमाणांमध्ये डेटा कॅप्चर करण्यास अनुमती देतात. सॉफ्ट-कॉपी सिस्टममध्ये प्रवेश करण्यापूर्वी एनालॉग एरियल फोटो स्कॅन करणे आवश्यक आहे, उच्च-गुणवत्तेच्या डिजिटल कॅमेऱ्यासाठी हे चरण वगळले गेले आहे. +उपग्रह रिमोट सेन्सिंग स्थानिक डेटाचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत प्रदान करतो. रडारसारख्या सक्रिय सेन्सरद्वारे पाठविलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा रेडिओ वेव्हच्या काही भागांचे प्रतिबिंब निष्क्रीयपणे मोजण्यासाठी येथे उपग्रह भिन्न सेन्सर पॅकेजेस वापरतात. रिमोट सेन्सिंग रास्टर डेटा संकलित करते ज्यास जमीन कव्हर सारख्या वस्तू आणि आवडीचे वर्ग ओळखण्यासाठी भिन्न बॅंडचा वापर करून पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते. +जेव्हा डेटा कॅप्चर केला जातो तेव्हा वापरकर्त्याने डेटा अचूकतेने किंवा अचूकतेने हस्तगत केला पाहिजे की नाही याचा विचार केला पाहिजे. कारण यामुळे केवळ माहितीचे वर्णन कसे केले जाईल परंतु डेटा कॅप्चरच्या किंमतीवर देखील परिणाम होऊ शकत नाही. +जीआयएसमध्ये डेटा प्रविष्ट केल्यानंतर, त्रुटी काढण्यासाठी किंवा पुढील प्रक्रिया करण्यासाठी डेटा सामान्यत: संपादन आवश्यक असतो. वेक्टर डेटासाठी काही प्रगत विश्लेषणासाठी वापरण्यापूर्वी ते "टोपोलॉजिकली योग्य" केले जाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, रोड नेटवर्कमध्ये, रेषा एका छेदनबिंदूच्या नोड्ससह कनेक्ट करणे आवश्यक आहे. अंडरशूट्स आणि ओव्हरशूट्स सारख्या त्रुटी देखील दूर केल्या पाहिजेत. स्कॅन केलेल्या नकाशे साठी, स्रोत नकाशावरील डाग परिणामी रास्टरमधून काढण्याची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ, घाणीचा एक भाग दोन ओळी जोडू शकत नाही जो कनेक्ट होऊ नये. +२.५ रास्टर-ते-वेक्टर अनुवाद:- +डेटा पुनर्रचना जीआयएसद्वारे डेटाला भिन्न स्वरूपांमध्ये रूपांतरित करता येते. उदाहरणार्थ, जीआयएसचा उपयोग उपग्रह प्रतिमा नकाशाला वेक्टर स्ट्रक्चरमध्ये रूपांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो जसे समान वर्गीकरण असलेल्या सर्व पेशींच्या सभोवताल रेषा तयार करून, सेल अवकाशासंबंधी संबंध जसे की निकटता किंवा समाविष्ट करणे. +अधिक प्रगत डेटा प्रक्रिया इमेज प्रोसेसिंगसह उद्भवू शकते, हे नासा आणि खाजगी क्षेत्राद्वारे 1960च्या उत्तरार्धात विकसित केले गेले आहे. जे कॉन्ट्रास्ट वर्धित करणे, चुकीचे रंग प्रस्तुत करणे आणि द्विमितीय फूरियर ट्रान्सफॉर्मच्या वापरासह इतर अनेक तंत्रे उपलब्ध आहेत. डिजिटल डेटा विविध प्रकारे संग्रहित आणि संग्रहित केल्यामुळे, दोन्ही डेटा स्रोत पूर्णपणे सुसंगत नसतील. म्हणून जीआयएस भौगोलिक डेटा एका रचनेमधून दुसऱ्या रचनेमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. असे केल्याने भिन्न ऑन्टोलॉजीज आणि वर्गीकरणांमागील अंतर्भूत धारणा विश्लेषणाची आवश्यकता आहे. [22] ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि बॅरी स्मिथ आणि सहकारी-यांनी सतत काम केल्यामुळे ऑब्जेक्ट ऑन्टोलॉजीस वाढती महत्त्व प्राप्त झाले आहे. +२.६ प्रोजेक्शन्स, समन्वय प्रणाली आणि नोंदणी:- +मुख्य लेख: नकाशा प्रोजेक्शन +पृथ्वीचे प्रतिनिधित्व विविध मॉडेल्सद्वारे केले जाऊ शकते. त्यापैकी प्रत्येक पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूसाठी समन्वयांचा एक वेगळा सेट (उदा. अक्षांश, रेखांश, उन्नतीकरण) प्रदान करू शकतो. पृथ्वी एक परिपूर्ण गोल आहे असे गृहित धरणे हे सर्वात सोपे मॉडेल आहे. जसजसे पृथ्वीचे अधिक मोजमाप साठवले गेले तसतसे पृथ्वीचे मॉडेल्स अधिक परिष्कृत आणि अधिक अचूक झाले आहेत. खरं तर, डेटाम नावाची मॉडेल्स आहेत जी यू.एस. मोजमापांसाठी NAD83 आणि जागतिक जिओडॅटिक मोजमापांकरिता सारख्या वाढीव अचूकतेसाठी पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात लागू होतात. +इंटरपोलेशन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे पृष्ठभाग तयार केला जातो, सामान्यत: रास्टर डेटासेट, असंख्य नमुन्यांच्या बिंदूवर गोळा केलेल्या डेटाच्या इनपुटद्वारे. इंटरप्लेशनचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येक डेटाच्या गुणधर्मांवर अवलंबून डेटा वेगळ्या पद्धतीने वागवते. प्रक्षोभक पद्धतींची तुलना करताना, प्रथम डेटा स्रोत डेटा बदलेल की नाही (तंतोतंत किंवा अंदाजे) असावा. पुढे ही पद्धत व्यक्तिनिष्ठ आहे की नाही, मानवी व्याख्या आहे किंवा उद्दीष्ट आहे. मग गुणांमधील संक्रमणांचे स्वरूप आहे: ते अचानक किंवा हळूहळू आहेत. शेवटी, अशी पद्धत आहे की नाही ही पद्धत जागतिक आहे (मॉडेल तयार करण्यासाठी संपूर्ण डेटा सेटचा वापर करते) किंवा स्थानिक जेथे अल्गोरिदमच्या छोट्या छोट्या भागासाठी पुनरावृत्ती केली जाते. +3 भौगोलिक माहिती प्रणालीसह स्थानिक विश्लेषण (जीआयएस):- +पुढील माहितीः स्थानिक विश्लेषण +जीआयएस स्थानिक विश्लेषण हे वेगाने बदलणारे क्षेत्र आहे आणि जीआयएस पॅकेजेस विश्लेषणात्मक साधनांचा समावेश मानक अंगभूत सुविधा, पर्यायी टूलसेट म्हणून tsड-इन्स किंवा 'विश्लेषक' म्हणून करतात. बऱ्याच घटनांमध्ये हे मूळ सॉफ्टवेर पुरवठादार (व्यावसायिक विक्रेते किंवा सहयोगी बिगर व्यावसायिक विकास संघ) पुरवितात, तर इतर बाबतीत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत आणि तृतीय पक्षाद्वारे पुरविल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त, बरीच उत्पादने सॉफ्टवेर डेव्हलपमेंट किट्स (एसडीके), प्रोग्रामिंग भाषा आणि भाषा समर्थन, स्क्रिप्टिंग सुविधा आणि / किंवा स्वतःचे विश्लेषणात्मक उपकरण किंवा रूपे विकसित करण्यासाठी विशेष इंटरफेस ऑफर करतात. वाढत्या उपलब्धतेमुळे "स्थानिक बुद्धिमत्ता" नावाच्या व्यवसाय बुद्धिमत्तेला एक नवीन आयाम तयार झाला आहे, जेव्हा इंट्रानेटद्वारे उघडपणे वितरित केले जाते तेव्हा भौगोलिक आणि सामाजिक नेटवर्क डेटामध्ये लोकशाही प्रवेश करते. जीआयएस अवकाशासंबंधी बुद्धिमत्ता, जीआयएस स्थानिक विश्लेषणावर आधारित, देखील सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा घटक बनला आहे. जीआयएस संपूर्णपणे पशुवैद्यकीय प्रतिनिधीत्व किंवा इतर कोणत्याही डिजिटायझेशन प्रक्रियेचे रूपांतरण म्हणून वर्णन केले जाऊ शकते. +3.1 उतार आणि पैलू:- +उतार हे ड्रेनेस किंवा भूप्रदेशाच्या युनिटचे ग्रेडियंट म्हणून परिभाषित केले जाऊ शकते, सामान्यत: डिग्रीमध्ये किंवा टक्केवारी म्हणून कोन म्हणून मोजले जाते. क्षेत्राचे एकक ज्या दिशेने तोंड करते त्या दिशेने पैलू परिभाषित केले जाऊ शकते. बाजू सहसा उत्तरेकडील अंशांमध्ये व्यक्त केली जाते. उतार, पैलू आणि भूप्रदेश विश्लेषणामधील पृष्ठभागावरील वक्रता सेलच्या जवळच्या शेजाऱ्यांच्या उन्नत मूल्यांचा वापर करून अतिपरिचित क्रियेतून प्राप्त केल्या आहेत. [23] उतार हे रिझोल्यूशनचे कार्य आहे आणि उतार आणि पैलू मोजण्यासाठी वापरले जाणारे स्थानिक रेझोल्यूशन नेहमी निर्दिष्ट केले जावे. [24] विविध लेखकांनी उतार आणि पैलूची गणना करण्यासाठी तंत्रांची तुलना केली आहे. [25] 26 [27]. +उतार आणि पैलू मिळविण्यासाठी खालील पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो: भूभागाच्या एका बिंदू किंवा युनिटवरील उंचीमध्ये पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशेने जाणा point्या लंब स्पर्शिका (उतार) असेल. या दोन स्पर्शिका ∂z / ∂x आणि ∂z / ∂y हे दोन घटक देतात, ज्याचा वापर नंतर उतारांची एकंदरीत दिशा आणि उताराची बाजू निश्चित करण्यासाठी केला जातो. ग्रेडियंटला वेक्टर परिमाण म्हणून परिभाषित केले आहे ज्यासह x आणि y दिशानिर्देशांमधील पृष्ठभागाच्या आंशिक डेरिव्हेटिव्हज समान घटक आहेत. [28] +पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण घटक निश्चित करणाऱ्या पद्धतींसाठी एकूण 3 × 3 ग्रीड उतार एस आणि पैलू एची गणना अनुक्रमे खालील सूत्रांचा वापर करा. +3.2 डेटा विश्लेषण:- +विमानतळ, दूरदर्शन स्थानके आणि शाळा यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी नोंदलेल्या पावसाच्या प्रमाणात, ओलांडलेल्या नकाशाशी संबंधित राहणे अवघड आहे. जीआयएसचा उपयोग पृथ्वीच्या पृष्ठभागाची, उप पृष्ठभागावरील आणि वातावरणाची माहिती बिंदूंमधून होणारी दोन आणि त्रिमितीय वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जीआयएस वेगाने वेगळ्या प्रमाणात पाऊस दर्शविणाऱ्या आयसोपल्थ किंवा समोच्च रेषेसह नकाशा व्युत्पन्न करू शकतो. अशा नकाशाचा विचार पावसाच्या समोराचा नकाशा म्हणून केला जाऊ शकतो. बऱ्याच परिष्कृत पद्धती मर्यादित बिंदू मापनांमधून पृष्ठभागांच्या वैशिष्ट्यांचा अंदाज लावू शकतात. पर्जन्य बिंदू मोजमापांच्या पृष्ठभागावरील मॉडेलिंगपासून तयार केलेला एक द्विमितीय समोच्च नकाशा त्याच क्षेत्राच्या जीआयएसमध्ये अन्य नकाशासह आच्छादित केला जाऊ शकतो आणि त्याचे विश्लेषण केले जाऊ शकते. त्यानंतर हा जीआयएस व्युत्पन्न केलेला नकाशा अतिरिक्त माहिती प्रदान करू शकेल - जसे की नूतनीकरणयोग्य उर्जा स्रोत म्हणून जल उर्जा संभाव्यतेची व्यवहार्यता. त्याचप्रमाणे, जीआयएसचा उपयोग प्रदेशासाठी सर्वोत्तम भौगोलिक क्षमता शोधण्यासाठी इतर नूतनीकरणयोग्य उर्जा संसाधनांची तुलना करण्यासाठी केला जाऊ शकतो. [29] +याव्यतिरिक्त, उतार विश्लेषण, छायांकित आराम आणि इतर उन्नत उत्पादनांसह, त्रिमितीय बिंदू किंवा डिजिटल एलिव्हेशन मॉडेलच्या मालिकेमधून, उन्नत रूपांचे प्रतिनिधित्व करणारे आयसोपॅथ लाइन तयार केल्या जाऊ शकतात. कोणत्याही इच्छेनुसार, सर्व क्षेत्राचे सुसंगत आणि चढाव मोजून पाण्याची सोय कोणत्याही दिलेल्या आवाजासाठी सहजपणे केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, जि.आय.एस. मधील उंचीच्या आकडेवारीवरून पृष्ठभागावरील पाणी मधूनमधून कायमस्वरुपी आणि कायमस्वरूपी प्रवाहात प्रवास करण्याची इच्छा असलेल्या थलवेगची गणना केली जाऊ शकते. +3.3 टोपोलॉजिकल मॉडेलिंग:- +जीआयएस डिजिटल साठवलेल्या स्थानिक डेटामध्ये अस्तित्वातील स्थानिक संबंध ओळखू शकतो आणि त्यांचे विश्लेषण करू शकतो. हे टोपोलॉजिकल संबंध जटिल अवकाशीय मॉडेलिंग आणि विश्लेषण करण्यास अनुमती देतात. भौमितीय घटकांमधील टोपोलॉजिकल संबंधांमध्ये पारंपारिकपणे समीपता (कोणत्याने काय जोडते), कंटेन्ट (कोणत्या गोष्टीस संलग्न केले आहे) आणि निकटता (काहीतरी कशाचे जवळचे आहे) समाविष्ट करते. +3.4 भूमितीय नेटवर्कः- +भौमितीय नेटवर्क हे ऑब्जेक्ट्सचे रेषीय नेटवर्क आहेत जे परस्पर कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यावरील विशिष्ट स्थानिक विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. भौमितीय नेटवर्क हे किनाऱ्यांसह बनलेले आहे, जे जंक्शन पॉइंट्सवर जोडलेले आहेत, जे गणित आणि संगणक विज्ञानाच्या आलेखांसारखेच आहेत. ग्राफ प्रमाणेच, नेटवर्कमध्ये त्याच्या कडांना वजन आणि प्रवाह नियुक्त केला जाऊ शकतो, जो विविध परस्पर जोडलेल्या वैशिष्ट्यांचे अधिक अचूकपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. भौमितिक नेटवर्क बऱ्याचदा रस्ते नेटवर्क आणि सार्वजनिक उपयोगिता नेटवर्क, जसे की इलेक्ट्रिक, गॅस आणि वॉटर नेटवर्कच्या मॉडेलसाठी वापरले जातात. नेटवर्क मॉडेलिंग हे सहसा वाहतूक नियोजन, जलविज्ञान मॉडेलिंग आणि पायाभूत सुविधा मॉडेलिंगमध्ये देखील काम करतात. +3.5 हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग:-  +उतार, आस्पेक्ट आणि वॉटरशेड किंवा पाणलोट क्षेत्र या व्हेरिएबल्सच्या विश्लेषणासह जीआयएस हायड्रोलॉजिकल मॉडेल्स एक स्थानिक घटक प्रदान करू शकतात ज्यामध्ये इतर जलविज्ञान मॉडेलची कमतरता असते. [30] भूप्रदेश विश्लेषण जलविज्ञानासाठी मूलभूत आहे, कारण पाणी नेहमी उतार खाली पावत असते. [30] डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम)च्या मूलभूत भूप्रदेश विश्लेषणात उतार आणि पैलूची गणना समाविष्ट असल्याने जलविज्ञान विश्लेषणासाठी डीईएम खूप उपयुक्त आहेत. नंतर उतार आणि बाजूचा वापर पृष्ठभागाच्या रनऑफची दिशा निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो, आणि म्हणूनच प्रवाह, नद्या आणि तलावांच्या निर्मितीसाठी प्रवाह जमा होतो. विचलित प्रवाहाचे क्षेत्र देखील पाणलोटच्या सीमांचे स्पष्ट संकेत देऊ शकतात. एकदा प्रवाहाची दिशा आणि संचय मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर, क्वेरी केल्या जाऊ शकतात जे एखाद्या विशिष्ट बिंदूवर योगदान देणारी किंवा विखुरलेली जागा दर्शवितात. [30] मॉडेलमध्ये अधिक तपशील जोडला जाऊ शकतो, जसे की भूप्रदेशात उग्रपणा, वनस्पतींचे प्रकार आणि मातीचे प्रकार, जे घुसखोरी आणि बाष्पीभवन दरांवर परिणाम करू शकतात आणि म्हणून पृष्ठभागाच्या प्रवाहावर परिणाम करतात. हायड्रोलॉजिकल मॉडेलिंगचा मुख्य उपयोग म्हणजे पर्यावरण दूषित संशोधन. हायड्रोलॉजिकल मॉडेलिंगच्या इतर अनुप्रयोगांमध्ये भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्याचे मॅपिंग तसेच पूर-जोखीम नकाशे यांचा समावेश आहे.      +3.6 कार्टोग्राफिक मॉडेलिंग :-        +डाना टॉमलिन यांनी कदाचित पीएचडी प्रबंधात (1983) "कार्टोग्राफिक मॉडेलिंग" हा शब्द तयार केला; नंतर त्याने हे आपल्या पुस्तक, भौगोलिक माहिती प्रणाली आणि कार्टोग्राफिक मॉडेलिंग (1990)च्या शीर्षकात वापरले. [31] कार्टोग्राफिक मॉडेलिंग म्हणजे अशा प्रक्रियेस संदर्भित होते जिथे त्याच क्षेत्राचे अनेक थीमॅटिक स्तर तयार केले जातात, त्यावर प्रक्रिया केली जातात आणि त्यांचे विश्लेषण केले जाते. टॉमलीनने रास्टर थर वापरल्या, परंतु आच्छादन पद्धत (खाली पहा) अधिक सामान्यपणे वापरली जाऊ शकते. नकाशा स्तरांवर ऑपरेशन्स अल्गोरिदममध्ये आणि शेवटी सिम्युलेशन किंवा ऑप्टिमायझेशन मॉडेल्समध्ये एकत्र केली जाऊ शकतात. +3.7 नकाशा आच्छादन:-    +अनेक स्थानिक डेटासेटचे संयोजन (बिंदू, ओळी किंवा बहुभुज) एक नवीन आउटपुट वेक्टर डेटासेट तयार करते, जे त्याच क्षेत्राचे अनेक नकाशे स्टॅक करण्यासारखेच आहे. हे आच्छादन गणितीय व्हेन डायग्राम आच्छादनांसारखेच आहेत. युनियन आच्छादन भौगोलिक वैशिष्ट्ये आणि दोन्ही इनपुटच्या विशेषता सारण्या एका नवीन आउटपुटमध्ये एकत्र करते. एक छेदनबिंदू आच्छादन असे क्षेत्र परिभाषित करते जेथे दोन्ही निविष्ट ओव्हरलॅप होते आणि प्रत्येकासाठी विशेषता फील्डचा संच राखून ठेवतात. सममितीय फरक आच्छादित आउटपुट क्षेत्र परिभाषित करते ज्यामध्ये आच्छादित क्षेत्र वगळता दोन्ही इनपुटचे एकूण क्षेत्र समाविष्ट होते. +डेटा एक्सट्रॅक्शन ही जीआयएस प्रक्रिया वेक्टर आच्छादन सारखीच आहे, जरी ती एकतर वेक्टर किंवा रास्टर डेटा विश्लेषणामध्ये वापरली जाऊ शकते. दोन्ही डेटासेटची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्ये एकत्र करण्याऐवजी, डेटा अर्कमध्ये दुसऱ्या डेटासेटच्या अवधीत असलेल्या डेटा सेटची वैशिष्ट्ये काढण्यासाठी "क्लिप" किंवा "मास्क" वापरणे समाविष्ट आहे. +रास्टर डेटा विश्लेषणामध्ये डेटासेटचा आच्छादन प्रत्येक रास्टरच्या मॅट्रिक्सची मूल्ये एकत्रित करणाऱ्या फंक्शनद्वारे "मल्टीपल रॅस्टर ऑन लोकल ऑपरेशन" किंवा "नकाशा बीजगणित" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे पूर्ण केला जातो. या अनुक्रमे भौगोलिक घटनेवर विविध घटकांचा प्रभाव प्रतिबिंबित करणारे “इंडेक्स मॉडेल” वापरून इतरांपेक्षा काही आदानांचे वजन जास्त असू शकते.      +3.८ जिओस्टॅटिस्टिक्स:-       + जिओस्टॅटिस्टिक्स ही आकडेवारीची एक शाखा आहे जी फील्ड डेटा (field data), सतत निर्देशांकासह अवकाशासंबंधी डेटाशी संबंधित असते. स्थानिक अवकाशाचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि अनियंत्रित ठिकाणी (इंटरपॉलेशन) मूल्यांचा अंदाज लावण्याच्या पद्धती प्रदान करतात.जेव्हा घटनेचे मोजमाप केले जाते तेव्हा निरीक्षणाच्या पद्धती त्यानंतरच्या कोणत्याही विश्लेषणाची अचूकता सांगतात. डेटाच्या स्वरूपामुळे (उदा. शहरी वातावरणातील रहदारीचे नमुने; पॅसिफिक महासागरावरील हवामान नमुने), मोजमापमध्ये स्थिर किंवा गतिशील डिग्री नेहमीच गमावले जाते. अचूकतेची ही हानी डेटा संकलनाच्या प्रमाणात आणि वितरणातून निश्चित केली जाते. +विश्लेषणाची सांख्यिकीय प्रासंगिकता निश्चित करण्यासाठी, एक सरासरी निश्चित केली जाते जेणेकरून कोणत्याही अंदाजापेक्षा कोणत्याही वर्तुळाच्या मोजमापच्या बाहेरील बिंदू (ग्रेडियंट्स) त्यांचा अंदाज वर्तणूक निश्चित करण्यासाठी समाविष्ट केला जाऊ शकतो. हे लागू केलेल्या आकडेवारी आणि डेटा संकलन पद्धतींच्या मर्यादांमुळे आहे आणि थेट मोजण्यायोग्य नसलेल्या कण, बिंदू आणि स्थानांच्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी इंटरपोलेशन आवश्यक आहे. +इंटरपॉलेशन एक न्याय्य मोजमाप आहे. कारण, एखाद्या स्थानिक स्वयंचलनाशी संबंधित तत्त्वानुसार हे ओळखले जाते की कोणत्याही स्थितीत गोळा केलेल्या डेटामध्ये त्याच्या जवळपासच्या स्थानांमध्ये किंवा त्या स्थानाचा प्रभाव खूपच साम्य असेल. +डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स, त्रिकोणीकृत अनियमित नेटवर्क, एज-फाइंडिंग अल्गोरिदम, थाईसन बहुभुज, फ्यूरियर विश्लेषण, (भारित) हलणारी सरासरी, व्यस्त अंतर वजन, क्रिगिंग, स्प्लिन आणि ट्रेंड पृष्ठभागाचे विश्लेषण या आंतरजातीय डेटा तयार करण्यासाठी गणिताच्या सर्व पद्धती आहेत. +3.9 जिओ (पत्ता) भू-कोडिंग:- +जिओ कोडिंग रस्ता पत्ते किंवा पिन कोड, पार्सल लॉट्स आणि पत्त्याच्या स्थानांसारख्या अन्य स्थानिक माहितींमधून अवकाशीय ठिकाणी (एक्स, वाय समन्वय) एकत्रित करीत आहे. पत्त्याच्या श्रेणींसह रोड सेंटरलाइन फाईलसारख्या स्वतंत्र पत्त्यांचा भौगोलिक कोड करण्यासाठी एक संदर्भ थीम आवश्यक आहे. रस्ता विभागातील पत्त्याच्या श्रेणींचे परीक्षण करून वैयक्तिक पत्त्याची ठिकाणे ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंत केली गेली आहेत किंवा अंदाज लावली आहेत. हे सहसा टेबल किंवा डेटाबेसच्या स्वरूपात प्रदान केले जातात. सॉफ्टवेर त्या केंद्राच्या भागाशी संबंधित असलेल्या ठिकाणी अंदाजे ठिपके ठेवेल. उदाहरणार्थ, of००चा पत्ता बिंदू एका ओळ विभागाच्या मध्यभागी असेल जो पत्ता १ सह प्रारंभ होईल आणि पत्ता १००० सह समाप्त होईल. विशेषतः नगरपालिका कर नकाशे वरून प्रत्यक्ष पार्सल डेटा विरुद्ध जिओकोडिंग देखील लागू करता येते. या प्रकरणात, भौगोलिक बिंदूच्या विरुद्ध असलेल्या भू-कोडिंगचा परिणाम प्रत्यक्षात स्थित स्थान असेल. अधिक अचूक स्थान माहिती प्रदान करण्यासाठी हा दृष्टिकोन वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे. +3.10 जिओ कोडिंग:- +रिव्हर्स जिओकोडिंग ही अंदाजे पथ पत्ता नंबर परत करण्याची प्रक्रिया आहे कारण ती एखाद्या निर्देशकाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, वापरकर्ता रोड सेंटरलाइन थीमवर क्लिक करू शकतो (अशा प्रकारे समन्वय प्रदान करतो) आणि अंदाजे घर क्रमांक प्रतिबिंबित करणारी माहिती परत मिळू शकेल. हा घर क्रमांक त्या रस्ता विभागासाठी नियुक्त केलेल्या श्रेणीतून गुंडाळलेला आहे. जर वापरकर्त्याने सेगमेंटच्या मध्यभागी क्लिक केले जे पत्ता 1 ने सुरू होईल आणि 100 सह समाप्त होईल, तर मिळविलेले मूल्य कुठेतरी 50च्या जवळ असेल. लक्षात घ्या की रिव्हर्स जिओकोडिंग वास्तविक पत्ते परत करत नाही, फक्त पूर्वनिर्धारित आधारे तेथे काय असावे याचा अंदाज श्रेणी.    +3.11 बहु-निकष निर्णय विश्लेषण:- +जीआयएस सोबत जोडल्या गेलेल्या, बहु-निकष निर्णय विश्लेषणाच्या पद्धती निर्णय घेणा-यांना वैकल्पिक स्थानिक समाधानांच्या सेटचे विश्लेषण करण्यास मदत करतात, जसे की जीर्णोद्धारासाठी बहुधा पर्यावरणीय अधिवास, बहुविध निकषांविरुद्ध, जसे की वनस्पति झाकण किंवा रस्ते. एमसीडीए निकष एकत्रित करण्यासाठी निर्णय नियमांचा वापर करते, जे वैकल्पिक उपायांना क्रमवारीत किंवा प्राधान्य दिले जाऊ शकते. [3२] जीआयएस एमसीडीए संभाव्य जीर्णोद्धार साइट ओळखण्यात खर्च आणि वेळ कमी करू शकते.   +3.12 डेटा आउटपुट आणि कार्टोग्राफी:-  +कार्टोग्राफी म्हणजे नकाशेचे डिझाइन आणि उत्पादन किंवा अवकाशासंबंधी डेटाचे दृश्य प्रतिनिधित्व. बहुतेक आधुनिक कार्टोग्राफी संगणकाच्या मदतीने केली जाते, जीआयएस सहसा वापरली जातात परंतु दर्जेदार कार्टोग्राफीचे उत्पादन देखील परिष्कृत करण्यासाठी डिझाइन प्रोग्राममध्ये स्तरांची आयात करून केले जाते. बऱ्याच जीआयएस सॉफ्टवेर वापरकर्त्यास डेटा दिसण्यावर भरीव नियंत्रण देते. +कार्टोग्राफिक काम दोन प्रमुख कार्ये करते: +प्रथम, ते स्क्रीनवर किंवा कागदावर ग्राफिक्स तयार करतात जे संसाधनांविषयी निर्णय घेणाऱ्या लोकांना विश्लेषणाचे निकाल देतात. भिंत नकाशे आणि इतर ग्राफिक्स व्युत्पन्न केले जाऊ शकतात, ज्यामुळे दर्शक दृश्यमान होऊ शकेल आणि त्याद्वारे संभाव्य घटनांचे विश्लेषण किंवा अनुकरणांचे परिणाम समजू शकेल. वेब-नकाशा सर्व्हर वेब-आधारित programming अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एजेएक्स, जावा, फ्लॅश इ.)च्या विविध अंमलबजावणीचा वापर करून वेब ब्राउझरद्वारे व्युत्पन्न नकाशे वितरित करण्यास सुलभ करतात.      + दुसरे म्हणजे, पुढील विश्लेषण किंवा वापरासाठी अन्य डेटाबेस माहिती व्युत्पन्न केली जाऊ शकते. विषारी गळतीच्या एका मैलाच्या (1.6 किमी) अंतरावर असलेल्या सर्व पत्त्यांची यादी उदाहरण असेल. +3.13 ग्राफिक प्रदर्शन तंत्र:- +पारंपारिक नकाशे वास्तविक जगाचे अमूर्तकरण आहेत, भौतिक वस्तूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चिन्हे असलेल्या कागदाच्या शीटवर चित्रित केलेल्या महत्त्वपूर्ण घटकांचे नमुने. जे लोक नकाशे वापरतात त्यांनी या चिन्हांचे अर्थ लावणे आवश्यक आहे. टोपोग्राफिक नकाशे समोच्च रेषांसह किंवा छायांकित आराम देऊन जमीन पृष्ठभागाचे आकार दर्शवितात. +आज, जीआयएस मधील उंचीवर आधारित शेडिंग यासारखी ग्राफिक डिस्प्ले तंत्र, नकाशाच्या घटकांमधील संबंध दृश्यमान बनवू शकते, माहिती काढण्याची आणि विश्लेषित करण्याची क्षमता वाढवते. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियातील सॅन माटेओ काउंटीच्या भागाचे दृष्टीकोन दर्शविण्यासाठी जीआयएसमध्ये दोन प्रकारचे डेटा एकत्र केले गेले. +थिमॅटिक मॅपर प्रतिमा पिक्सेलचा वापर करून सॅन ॲंन्ड्रिया फॉल्ट खाली शोधत त्रिमितीय परिप्रेक्ष्य दृश्य प्रस्तुत करण्यासाठी दोन प्रतिमा नोंदणी आणि एकत्र करण्यासाठी जीआयएसचा वापर केला गेला, परंतु लॅंडफॉर्मची उंची वापरून छायांकित केले. त्या अक्षांश, रेखांश आणि दिवसाच्या वेळेस सूर्याच्या किरणांनी तयार केलेल्या सावल्या व्यवस्थितपणे सादर करण्यासाठी जीआयएस प्रदर्शन दर्शकांच्या दर्शनाच्या बिंदूवर आणि प्रदर्शनाच्या दिवसाची वेळ यावर अवलंबून असते. +आर्कीओक्रोम स्थानिक डेटा प्रदर्शित करण्याचा एक नवीन मार्ग आहे. हे 3 डी नकाशावरील थीमॅटिक आहे, जे विशिष्ट इमारतीत किंवा इमारतीच्या भागावर लागू होते. हे उष्मा-तोटा डेटाच्या दृश्यात्मक प्रदर्शनास अनुकूल आहे.  +3.14 स्थानिक ईटीएल:-    +     स्थानिक ईटीएल साधने पारंपारिक अर्क, ट्रान्सफॉर्म, लोड (ईटीएल) सॉफ्टवेरची डेटा प्रक्रिया कार्यक्षमता प्रदान करतात, परंतु स्थानिक डेटा व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेवर प्राथमिक लक्ष केंद्रित करतात. ते जीआयएस वापरकर्त्यांना भौगोलिकरित्या डेटाद्वारे मार्गात रूपांतरित करताना भिन्न मानक आणि मालकी स्वरूप दरम्यान डेटाचे भाषांतर करण्याची क्षमता प्रदान करतात. ही साधने स्प्रेडशीट सारख्या विस्तीर्ण हेतू असलेल्या सॉफ्टवेरमध्ये अ‍ॅड-इन्सच्या स्वरूपात येऊ शकतात. +3.15जीआयएस डेटा खाण:- +जीआयएस किंवा स्थानिक डेटा मायनिंग म्हणजे स्थानिक डेटामध्ये डेटा खनन पद्धतींचा वापर. डेटा मायनिंग, जे मोठ्या डेटाबेसमध्ये लपलेल्या नमुन्यांची अंशतः स्वयंचलित शोध आहे, लागू केलेल्या जीआयएस-आधारित निर्णयासाठी मोठे संभाव्य फायदे देते. ठराविक अनुप्रयोगांमध्ये पर्यावरणीय देखरेखीचा समावेश आहे. अशा अनुप्रयोगांचे वैशिष्ट्य म्हणजे डेटा मोजमापांमधील अवकाशी परस्परसंबंधासाठी अधिक कार्यक्षम डेटा विश्लेषणासाठी विशेष अल्गोरिदम वापरणे आवश्यक आहे. [33] +4 अनुप्रयोग:- +जीआयएसची अंमलबजावणी बहुधा कार्यक्षेत्र (जसे की एक शहर), हेतू किंवा अनुप्रयोग आवश्यकतांद्वारे चालविली जाते. सामान्यत: जीआयएस अंमलबजावणी एखाद्या संस्थेसाठी सानुकूलित केलेली असू शकते. म्हणूनच, अनुप्रयोग, कार्यक्षेत्र, एंटरप्राइझ किंवा हेतूसाठी विकसित केलेली जीआयएस उपयोजन एखाद्या अन्य अनुप्रयोग, कार्यक्षेत्र, एंटरप्राइझ किंवा हेतूसाठी विकसित केलेल्या जीआयएसशी आवश्यकपणे परस्पर किंवा सुसंगत असू शकत नाही. [34] +जीआयएस प्रत्येक प्रकारच्या स्थान-आधारित संस्थेसाठी, भौगोलिक डेटा अद्यतनित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध आहे ज्यायोगे फील्डला भेट न देणे वा डेटाबेस स्वयंचलितरित्या अद्यतनित करणे आवश्यक आहे. जीआयएस जेव्हा एसएपी [35] आणि वुल्फ्राम भाषा [36] सारख्या इतर शक्तिशाली एंटरप्राइझ सोल्यूशन्ससह समाकलित होते. तेव्हा एंटरप्राइझ स्तरावर शक्तिशाली निर्णय समर्थन सिस्टम तयार करण्यात मदत करते. [37] [स्पष्टीकरण आवश्यक] +जीआयएस तंत्रज्ञानामुळे बऱ्याच शाखांना फायदा होऊ शकतो. जीआयएसच्या सक्रिय बाजारपेठेमुळे रिअल इस्टेट, सार्वजनिक आरोग्य, गुन्हेगारीचे नकाशे तयार करणे, राष्ट्रीय संरक्षण यासह अनुप्रयोगांसह कमी खर्च होतो आणि जीआयएसच्या हार्डवेर आणि सॉफ्टवेर घटकांमध्ये सतत होणाऱ्या सुधारणा आणि विज्ञान, शासन, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात उपयोग कमी होतो. विकास, नैसर्गिक संसाधने, हवामानशास्त्र, [38] [39] लॅंडस्केप आर्किटेक्चर, पुरातत्त्व, प्रादेशिक आणि समुदाय नियोजन, वाहतूक आणि रसदशास्त्र इ. मध्ये होतो. +जीआयएस स्थान-आधारित सेवांमध्ये देखील बदल आहे. जी जीपीएस-सक्षम मोबाइल डिव्हाइसला निश्चित वस्तू (जवळचे रेस्टॉरंट, गॅस स्टेशन, फायर हायड्रंट) किंवा मोबाइल ऑब्जेक्ट्स (मित्र, मुले, पोलीस कार) किंवा त्यांच्याशी संबंधित त्यांचे स्थान प्रदर्शित करण्यास अनुमती देते. प्रदर्शन किंवा इतर प्रक्रियेसाठी त्यांची स्थिती मध्यवर्ती सर्व्हरवर परत रिले किंवा प्रदेषित होत असते. +4.1 ओपन जिओस्पेशियल कन्सोर्टियम मानक :- +मुख्य लेख: जिओस्पेशियल कन्सोर्टियम उघडा. +ओपन जिओस्पेशियल कन्सोर्टियम (ओजीसी) सार्वजनिक उद्योगात उपलब्ध भौगोलिक वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी एकमत प्रक्रियेत भाग घेणारी 384 कंपन्या, सरकारी संस्था, विद्यापीठे आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय उद्योग संघ आहे. ओपन जीआयएस स्पेसिफिकेशन्सद्वारे परिभाषित ओपन इंटरफेस आणि प्रोटोकॉल वेब, वायरलेस आणि स्थान-आधारित सेवा आणि मुख्य प्रवाहातील आयटी "भौगोलिक सक्षम करा" आणि तंत्रज्ञान विकसकांना सर्व प्रकारच्या अनुप्रयोगांसह प्रवेशजोगी आणि उपयुक्त बनविण्यासाठी सक्षम करतात. ओपन जिओस्पेशियल कन्सोर्टियम प्रोटोकॉलमध्ये वेब नकाशा सेवा आणि वेब वैशिष्ट्य सेवा समाविष्ट आहे. [40] +ओजीसीद्वारे सॉफ्टवेर ओजीसी वैशिष्ट्यांचे पूर्ण आणि अचूक पालन कसे करतात यावर आधारित जीआयएस उत्पादने ओजीसीने दोन प्रकारात मोडली आहेत. +अनुपालन उत्पादने अशी सॉफ्टवेर उत्पादने आहेत जी ओजीसीच्या ओपनजीआयएस वैशिष्ट्यांचे पालन करतात. जेव्हा एखाद्या उत्पादनाची चाचणी घेतली जाते आणि ओजीसी चाचणी प्रोग्रामद्वारे अनुपालन म्हणून प्रमाणित केले जाते तेव्हा उत्पादन या साइटवर स्वयंचलितपणे "आज्ञाकारी" म्हणून नोंदणीकृत होते. +अंमलबजावणीची उत्पादने ही सॉफ्टवेर उत्पादने आहेत. जी ओपनजीआयएस वैशिष्ट्यची अंमलबजावणी करतात. परंतु, अद्याप त्यांनी अनुपालन चाचणी उत्तीर्ण केलेली नाही. सर्व वैशिष्ट्यांसाठी अनुपालन चाचण्या उपलब्ध नाहीत. विकसक ड्राफ्ट किंवा मंजूर केलेल्या वैशिष्ट्यांनुसार अंमलबजावणी म्हणून त्यांची उत्पादने नोंदणीकृत करू शकतात, जरी ओजीसी प्रत्येक एंट्रीचे पुनरावलोकन आणि सत्यापन करण्याचा अधिकार राखून ठेवतात. +4.2 वेब मॅपिंग:-  +मुख्य लेख: वेब मॅपिंग +अलिकडच्या वर्षांत मालकी वेब अनुप्रयोग Google नकाशे आणि बिंग नकाशे तसेच मुक्त आणि मुक्त-स्रोत वैकल्पिक ओपनस्ट्रिटमॅप यासारख्या विनामूल्य वापर आणि सहजपणे प्रवेशयोग्य मॅपिंग सॉफ्टवेरचा प्रसार झाला आहे. या सेवा मोठ्या प्रमाणात भौगोलिक डेटामध्ये सार्वजनिक प्रवेश देते.बऱ्याच वापरकर्त्यांद्वारे विश्वसनीय माहिती म्हणून विश्वासार्ह आणि वापरण्यायोग्य असल्याचे समजले जाते. [41]     +त्यातील काही, जसे Google नकाशे आणि ओपनलायर्स, अनुप्रयोग प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) उघड करतात. जे वापरकर्त्यांना सानुकूल अनुप्रयोग तयार करण्यास सक्षम करतात. हे टूलकिट्स सामान्यत: रस्त्यांचे नकाशे, हवाई / उपग्रह प्रतिमा, जिओकोडिंग, शोध आणि मार्ग कार्यक्षमता देतात.  वेब मॅपिंगने ओपनस्ट्रीटमॅप सारख्या प्रकल्पांमध्ये क्राऊडसोर्सिंग जिओडाटाची संभाव्यता देखील उघड केली आहे. जी, जगाचा एक विनामूल्य संपादनयोग्य नकाशा तयार करण्यासाठी सहयोगी प्रकल्प आहे. हे मॅशअप प्रकल्प पारंपारिक भौगोलिक माहितीद्वारे शक्य त्या बाहेर वापरकर्त्यांसाठी उच्च पातळीचे मूल्य आणि लाभ प्रदान करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. [42] [43] +4.3 काळाचे परिमाण जोडणे:-   +हे सुद्धा पहा: ऐतिहासिक भौगोलिक माहिती प्रणाली आणि वेळ भूगोल +जीआयएस मध्ये उपग्रह डेटा फीड करून पृथ्वीची पृष्ठभाग, वातावरण आणि उप पृष्ठभागाची स्थिती तपासली जाऊ शकते. जीआयएस तंत्रज्ञानामुळे संशोधकांना दिवस, महिने आणि वर्षानुवर्षे पृथ्वीच्या प्रक्रियेतील भिन्नता तपासण्याची क्षमता मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट प्रदेशात दुष्काळ सर्वाधिक होता तेव्हा हे निश्चित करण्यासाठी वाढत्या हंगामात वनस्पतींच्या जोमातील बदल निश्चित केले जाऊ शकतात. परिणामी, ग्राफिक वनस्पतींच्या आरोग्याचे अंदाजे उपाय दर्शवितो. कालांतराने दोन चलांसह कार्य केल्याने संशोधकांना पाऊस कमी होण्याची आणि वनस्पतीवरील परिणामामधील अंतरांमधील क्षेत्रीय फरक शोधू शकतील.   +जीआयएस तंत्रज्ञान आणि प्रादेशिक आणि जागतिक स्केलवर डिजिटल डेटाची उपलब्धता अशा विश्लेषणास सक्षम करते. वनस्पति ग्राफिक तयार करण्यासाठी वापरले जाणारे उपग्रह सेन्सर आउटपुट उदाहरणार्थ प्रगत अत्यंत-उच्च-रिझोल्यूशन रेडिओमीटर (एव्हीएचआरआर) द्वारे तयार केले जाते. ही सेन्सर सिस्टम पृथ्वीच्या पृष्ठभागावरून अंदाजे 1 चौरस किलोमीटरच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रासाठी स्पेक्ट्रमच्या विविध बॅंडमधून प्रतिबिंबित होणाऱ्या उर्जेचे प्रमाण शोधून काढते. उपग्रह सेन्सर दिवसातून दोनदा पृथ्वीवरील विशिष्ट स्थानाची प्रतिमा तयार करतो. एव्हीएचआरआर आणि अगदी अलीकडे मध्यम-रेझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरोडीओमीटर (मोडीआयएस) पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक सेन्सर सिस्टमपैकी केवळ दोन आहेत. +पर्यावरणीय अभ्यासामध्ये वेळ एकत्रित करण्याव्यतिरिक्त, जीआयएस देखील त्याच्या रोजच्या नित्यक्रमात मानवांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची आणि त्याचे मॉडेल लावण्याच्या क्षमतेसाठी शोधला जात आहे. या क्षेत्रातील प्रगतीचे ठोस उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या जनगणनेनुसार वेळ-विशिष्ट लोकसंख्या डेटा प्रकाशित करणे. या डेटा सेटमध्ये, शहरांची लोकसंख्या दिवसा आणि संध्याकाळी दर्शविली गेली आहेत जे उत्तर अमेरिकन प्रवासी प्रवासात निर्माण झालेल्या एकाग्रतेचे आणि फैलावचे नमुना अधोरेखित करतात. हा डेटा तयार करण्यासाठी आवश्यक असलेले हेरफेर आणि जनरेशन जीआयएसशिवाय शक्य झाले नसते. +वेळेत जीआयएसने ठेवलेला डेटा प्रोजेक्ट करण्यासाठी मॉडेल वापरल्याने स्थानिक निर्णय समर्थन सिस्टमचा वापर करून धोरणात्मक निर्णयाची चाचणी घेण्यास नियोजक सक्षम केले. +5 सिमेंटिक (शब्दार्थ:-)   +वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियमच्या सिमेंटिक वेबमधून उद्भवणारी साधने आणि तंत्रज्ञान माहिती सिस्टममधील डेटा एकत्रीकरण समस्यांसाठी उपयुक्त सिद्ध करीत आहेत. त्यानुसार, जीआयएस अनुप्रयोगांमध्ये इंटरऑपरेबिलिटी आणि डेटाचा पुनर्वापर सुलभ करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचे एक साधन म्हणून प्रस्तावित केले गेले आहे. [44] [45] आणि नवीन विश्लेषण यंत्रणा सक्षम करण्यासाठी. [46] +ऑन्टोलॉजीज या अर्थपूर्ण दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. कारण, ते दिलेल्या डोमेनमधील संकल्पना आणि नातेसंबंधांचे औपचारिक, मशीन-वाचनयोग्य स्पष्टीकरण अनुमत करतात. हे एका जीआयएसला त्याच्या सिंटॅक्स किंवा संरचनेऐवजी डेटाच्या उद्दीष्टपूर्ण अर्थांवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते. उदाहरणार्थ, एखाद्या डेटासेटमध्ये पर्णपाती सुई वृक्ष म्हणून वर्गीकृत केलेल्या भूमी उपयोजन प्रकारामुळे दुसऱ्या अधिक अंदाजे वर्गीकृत डेटासेटमध्ये जमीनउपयोजन प्रकारातील जंगलाचे विशेषकरण किंवा उपसंच होय. जीआयएस अधिक सामान्य जमीन कव्हर वर्गीकरण अंतर्गत दोन डेटासेट स्वयंचलितरित्या विलीन करण्यास मदत करते. +जीआयएस अप्लिकेशन्सशी संबंधित भागात टेन्टिव्ह ऑन्टोलॉजीज विकसित केले गेले आहेत. उदाहरणार्थ,युनायटेड किंगडममधील ऑर्डनन्स सर्व्हेद्वारे विकसित केलेली हायड्रोलॉजी ऑन्टोलॉजी [47] आणि नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने विकसित केलेल्या स्वीट ऑन्टोलॉजीज [48] तसेच, वेबवरील भौगोलिक डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डब्ल्यू 3 सी जिओ इनक्यूबेटर ग्रुप [49.] सोप्या ऑनटोलॉजीज आणि सिमेंटिक मेटाडेटा मानदंड प्रस्तावित करीत आहेत. जिओस्पर्क्यूल हे ऑर्डनन्स सर्व्हे, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे, नॅचरल रिसोर्सेस कॅनडा, ऑस्ट्रेलियाचे कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इतरांनी विकसित केलेल्या ओजीसी लिटरल्स (जीएमएल, डब्ल्यूकेटी), टोपोलॉजिकल रिलेशनशिप्स (साधे वैशिष्ट्ये, आरसीसी 8, डीई -9 आयएम), आरडीएफ आणि एसपीएआरसीएल डेटाबेस क्वेरी प्रोटोकॉल. +या क्षेत्रातील अलीकडील संशोधनाचे परिणाम आंतरराष्ट्रीय सिमेंटिक वेब कॉन्फरन्समधील भू-स्थानिक सीमेंटिक्सवरील आंतरराष्ट्रीय परिषद [50] आणि टेरा कॉग्निटा - जिओस्पॅशल सिमेंटिक वेबचे दिशानिर्देश [51] कार्यशाळेमध्ये पाहिले जाऊ शकतात. +6 समाजात जीआयएसचे परिणाम:-   +मुख्य लेखः निओोग्राफी आणि लोकसहभाग जीआयएस  +निर्णय घेताना जीआयएसच्या लोकप्रियतेमुळे, अभ्यासकांनी जीआयएसच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांची छाननी सुरू केली आहे. [52] [53] [41] जीआयएसचा वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी वास्तव विकृत करण्यासाठी देखील गैरवापर केला जाऊ शकतो, [54] [55] असा युक्तिवाद केला जात आहे.यामध्ये भौगोलिक माहितीचे उत्पादन, वितरण, उपयोग आणि त्यांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात सामाजिक संदर्भांशी संबंधित आहे आणि सरकारवर नागरिकांचा विश्वास वाढविण्याची क्षमता आहे. [56] इतर संबंधित विषयांमध्ये कॉपीराइट, गोपनीयता आणि सेन्सॉरशिपवरील चर्चा समाविष्ट आहे. जीआयएस दत्तक घेण्याचा अधिक आशावादी सामाजिक दृष्टीकोन म्हणजे लोकसहभागासाठी एक साधन म्हणून उपयोग करणे. +6.1 शिक्षणात जी.आय.एस.:-       +हे सुद्धा पहा: एसरी एज्युकेशन यूजर कॉन्फरन्स +२० व्या शतकाच्या अखेरीस, जीआयएस वर्गात वापरली जाऊ शकणारी साधने म्हणून ओळखली जाऊ लागली. [57] [58] [59] [60] शिक्षणामध्ये जीआयएसचे फायदे स्थानिक विचारांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात, परंतु जगभरातील शिक्षणामध्ये जीआयएसच्या वापराची ठोस व्याप्ती दर्शविण्यासाठी पुरेसा ग्रंथसूची किंवा सांख्यिकीय डेटा उपलब्ध नाही, जरी अभ्यासक्रमातील त्या देशांमध्ये विस्तार वेगवान झाला आहे. त्यांचा उल्लेख करा. [61]:36 +जीआयएस भूगोल शिकवण्यामध्ये बरेच फायदे प्रदान करतात असे दिसते कारण ते वास्तविक भौगोलिक डेटावर आधारित विश्लेषणास अनुमती देतात आणि वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून बरेच संशोधन प्रश्न उपस्थित करण्यास मदत करतात तसेच स्थानिक व भौगोलिक विचार विकसित करून शिक्षणात सुधारणा करण्यास ते योगदान देतात आणि, बऱ्याच प्रकरणांमध्ये, विद्यार्थ्यांचे प्रेरणा. [61]:38 +6.2 स्थानिक सरकारमधील जी.आय.एस.:-   +जीआयएस हे संस्था-व्याप्ती, एंटरप्राइझ आणि टिकाऊ तंत्रज्ञान म्हणून सिद्ध झाले आहे जे स्थानिक सरकार कसे कार्य करते ते बदलत राहते. []२] सरकारी संस्थांनी खालील प्रमाणे सरकारी संस्थेच्या क्षेत्राचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे: +7 हे सुद्धा पहा:-   +1.क्लार्क, के. सी., १ 198 66. भौगोलिक माहिती प्रणाली, संगणक, पर्यावरण आणि शहरी प्रणालीतील प्रगती, खंड. 10, pp. 175–184. +2.मालिने व्ही, ग्रिगोनिस व्ही, पॅलेव्हियस व्ही, ग्रिफिथ्स एस (२०११). "भौगोलिक माहिती प्रणाली: नवीन क्षमता असलेली जुने तत्त्वे". शहरी डिझाईन आंतरराष्ट्रीय. 16 (1): 1-6. doi: 10.1057 / udi.2010.25. +3.गुडचिल्ड, मायकेल एफ (2010) "वीस वर्षांची प्रगती: 2010 मध्ये जीआयएसज्ञान". स्थानिक माहिती विज्ञान जर्नल (1). doi: 10.5311 / JOSIS.2010.1.2. +4."जीआयएसची 50 वी वर्धापन दिन". ईएसआरआय. 18 एप्रिल 2013 रोजी पुनर्प्राप्त. +5."रॉजर टॉमलिन्सन". यूसीजीआयएस. 21 फेब्रुवारी 2014. 17 डिसेंबर 2015 रोजी मूळकडून संग्रहित केले. 16 डिसेंबर 2015 रोजी पुनर्प्राप्त. +6."रॅपोर्ट सुरला मार्चे एट लेस इफेट्स डू चोलरा डॅन पॅरिस एट ले डीपर्टेमेंट डीला सीने. अ‍ॅनी 1832". गॅलिका. 10 मे 2012 रोजी पुनर्प्राप्त. +7.1920-, मॅकहर्ग, इयान एल. (1971). निसर्गासह डिझाइन करा. नैसर्गिक इतिहास प्रेस. ओसीएलसी 902596436. +8.ब्रूम, फ्रेडरिक आर; मेक्सलर, डेव्हिड बी (जानेवारी १ 1990 1990 ०). "टायगर डेटा बेस स्ट्रक्चर". कार्टोग्राफी आणि भौगोलिक माहिती प्रणाली. 17 (1): 39–47. doi: 10.1559 / 152304090784005859. आयएसएसएन 1050-9844. +9.फिट्जगेरल्ड, जोसेफ एच. "नकाशा मुद्रण पद्धती". मूळ 4 जून 2007 रोजी संग्रहित केले. 9 जून 2007 रोजी पुनर्प्राप्त. +10."जीआयएस हॉल ऑफ फेम - रॉजर टॉमलिन्सन". युरीसा. मूळ 14 जुलै 2007 रोजी संग्रहित केले. 9 जून 2007 रोजी पुनर्प्राप्त. +11.लोव्हिसन-गोलोब, लुसिया. "हॉवर्ड टी. फिशर". हार्वर्ड विद्यापीठ. मूळ पासून 13 डिसेंबर 2007 रोजी संग्रहित. 9 जून 2007 रोजी पुनर्प्राप्त. +12."ओपन सोर्स जीआयएस हिस्ट्री - ओएसजीओ विकी संपादक". 21 मार्च 2009 रोजी पुनर्प्राप्त. +13.झुआन, झू. पर्यावरण अनुप्रयोगांसाठी जीआयएस एक व्यावहारिक दृष्टीकोन. आयएसबीएन 9780415829069. ओसीएलसी 1020670155. +14.फू, पी., आणि जे. सन. २०१०. वेब जीआयएस: तत्त्वे आणि अनुप्रयोग. ईएसआरआय प्रेस. रेडलॅंड्स, सीए. आयएसबीएन 1-58948-245-एक्स. +15.टिम फॉरसमॅन 1997 जीआयएसचा इतिहास (भौगोलिक माहिती प्रणाली): पायनियर्सचे दृष्टीकोन. (भौगोलिक माहिती विज्ञानातील प्रेंटिसेस हॉल मालिका) प्रिंटिस हॉल पीटीआर; पहिली आवृत्ती (10 नोव्हेंबर 1997), 416 पी. +16.जीआयएसचा उल्लेखनीय इतिहास - भौगोलिक माहिती प्रणाली. "जीआयएसचा उल्लेखनीय इतिहास". 5 मे 2015 रोजी पुनर्प्राप्त. +17.वेड, टी. आणि सॉमर, एस. ए टू झेड जीआयएस +18.कोवेन, डेव्हिड (1988) "जीआयएस विरुद्ध सीएडी विरुद्ध डीबीएमएस: काय फरक आहेत?" (पीडीएफ) फोटोग्राममेट्रिक अभियांत्रिकी आणि रिमोट सेन्सिंग. 54 (11): 1551–1555. 24 एप्रिल 2011 रोजी मूळ (पीडीएफ) वरून संग्रहित. 17 सप्टेंबर 2010 रोजी पुनर्प्राप्त. +19."भौगोलिक स्थिती निर्धारण अचूकता मानक भाग 3: स्थानिक डेटा अचूकतेसाठी राष्ट्रीय मानक". मूळ 6 नोव्हेंबर 2018 रोजी संग्रहित केले. +20."एनजेजीआयएनचे माहिती वखार". Njgin.state.nj.us. 13 मे 2012 रोजी पुनर्प्राप्त. +21.मार्विक, बेन; हिसकॉक, पीटर; सुलिवान, मार्जोरी; ह्यूजेस, फिलिप (जुलै 2017). "रखरखीत दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये होलोसिन फॉरेगर लॅंडस्केप वापरावरील लॅंडफॉर्म सीमेवरील प्रभाव". पुरातत्त्व विज्ञानाचे जर्नल: अहवाल. 19: 864-874. doi: 10.1016 / j.jasrep.2017.07.004. +22. "ऐरीयनने एरियन स्काऊट सिस्टम | एरियन लॅब इंकची आवृत्ती 5 जाहीर केली".Aeryon.com. 6 जुलै 2011. 13 मे 2012 रोजी पुनर्प्राप्त. +23.विंथर, रॅमस जी. (2014). सी. केंडिग (एड.) "जीआयएस आणि कार्टोग्राफीमध्ये मॅपिंग प्रकार" (पीडीएफ). वैज्ञानिक प्रकारात नैसर्गिक प्रकार आणि वर्गीकरण. +24.चांग, ​​के. टी. (2008) भौगोलिक माहिती प्रणालीची ओळख. न्यू यॉर्कः मॅकग्रा हिल. पी. 184. +25.लॉंगले, पी. ए ;; गुडचिल्ड, एम. एफ.; मॅकगुइअर, डी. जे.; रिहिंद, डी डब्ल्यू. (2005) "व्युत्पन्न उतार आणि डीईएम डेटा गुणधर्मांशी संबंधित पैलूंच्या त्रुटींचे विश्लेषण". भौगोलिक माहिती प्रणाली आणि विज्ञान. वेस्ट ससेक्स, इंग्लंड: जॉन विली आणि सन्स: 328 +26.चांग, ​​के. टी. (1989). "ग्रिडेड डिजिटल एलिव्हेशन मॉडेलमधील ग्रेडियंट आणि पैलूची गणना करण्यासाठी तंत्राची तुलना". आंतरराष्ट्रीय भौगोलिक माहिती विज्ञान जर्नल. 3 (4): 323–334. doi: 10.1080 / 02693798908941519. +27.जोन्स, के.एच. (1998). "डीईएमच्या मालमत्तेच्या रूपात हिल स्लोप मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्गोरिदमची तुलना". संगणक आणि भौगोलिक विज्ञान. 24 (4): 315–323. बिबकोड: 1998CG ..... 24..315J. doi: 10.1016 / S0098-3004 (98) 00032-6. +28.झोउ, प्र.; लिऊ, एक्स. (2003) "व्युत्पन्न उतार आणि डीईएम डेटा गुणधर्मांशी संबंधित पैलूंच्या त्रुटींचे विश्लेषण". संगणक आणि भौगोलिक विज्ञान. 30: 269–378. +29.हंटर जी. जे.; गुडचल्ड एम. एफ. (1997). "स्थानिक डेटाबेसमधून काढलेल्या उतार आणि पैलूच्या अंदाजाची अनिश्चितता मॉडेलिंग" (पीडीएफ). भौगोलिक विश्लेषण. 29 (1): 35-49. doi: 10.1111 / j.1538-4632.1997.tb00944.x. +30.के. कॅलवर्ट, जे. एम. पियर्स, डब्ल्यू.ई. माबी, "नवीकरणीय उर्जा भौगोलिक माहितीच्या पायाभूत सुविधांकडे: जीआयएस विज्ञान आणि रिमोट सेन्सिंगचे अनुप्रयोग जे संस्थात्मक क्षमता वाढवू शकतात" नूतनीकरणयोग्य आणि टिकाऊ ऊर्जा पुनरावलोकने 18, pp. 416–429 (2013). मुक्त प्रवेश +31.हेवुड मी, कॉर्नेलियस एस, कारव्हर एस (2006) भौगोलिक माहिती सिस्टीमचा परिचय (तिसरा संस्करण). एसेक्स, इंग्लंड: प्रेन्टीस हॉल. +32.टॉमलिन, सी. डाना (१ 1990 1990 ०). भौगोलिक माहिती प्रणाली आणि कार्टोग्राफिक मॉडेलिंग. भौगोलिक माहिती विज्ञानमधील प्रेन्टिस हॉल मालिका. प्रिंटिस हॉल. 5 जानेवारी 2017 रोजी पुनर्प्राप्त. +33.ग्रीन, आर; डेव्हिलर्स, आर; ल्यूथर, जे.ई ;; एडी, बी.जी. (२०११) "जीआयएस-आधारित बहु-निकष विश्लेषण". भूगोल कंपास. 5/6 (6): 412–432. doi: 10.1111 / j.1749-8198.2011.00431.x. +34.मा, वाय.; गुओ, वाय.; टियान, एक्स .; घनिम, एम. (२०११) "डिस्ट्रिब्युटेड क्लस्टरिंग बेस्ड gग्रीगेशन अल्गोरिथ्म फॉर स्पेशियल कॉरिलेटेड सेंसर नेटवर्क" (पीडीएफ). आयईईई सेन्सर जर्नल. 11 (3): 641. बिबकोड: 2011ISenJ..11..641M. साइटसिएरएक्स 10.1.1.724.1158. doi: 10.1109 / JSEN.2010.2056916. +35. कुमार, डॉ दीपक; दास, भूमिका (23 मे 2015) "जीआयएस अनुप्रयोगांमध्ये अलिकडील ट्रेंड". रोचेस्टर, न्यू यॉर्क. +36."एसआयपीसह जीआयएस समाकलित करणे - अत्यावश्यक - आर्कन्यूज स्प्रिंग 2009 इश्यू". www.esri.com. 13 जुलै 2016 रोजी पुनर्प्राप्त. +37."जिओडीसी — वुल्फ्राम भाषा कागदपत्र". संदर्भ.वॉल्फ्राम.कॉम. 13 जुलै 2016 रोजी पुनर्प्राप्त. +38.बॅनर, स्टीव्ह. "जीआयएस एसएपी बरोबर समाकलित करत आहे Imp द इम्पियरेटिव्ह". मूळ पासून 22 ऑक्टोबर 2009 रोजी संग्रहित. 28 मार्च 2017 रोजी पुनर्प्राप्त. +39. "नकाशाबाहेर | आर्किटेक्चरल रेकॉर्ड अँड ग्रीनसोर्समधून | मूळत: मार्च २०१२ च्या आर्किटेक्चरल रेकॉर्ड अँड ग्रीनसोर्स | मॅकग्रा-हिल कन्स्ट्रक्शन - कॉन्टिनेनिंग एज्युकेशन सेंटर"च्या अंकात प्रकाशित केले. Continuingeducation.con تعمیر.com. 11 मार्च २०११. 8 मार्च 2012 रोजी मूळकडून संग्रहित. 13 मे 2012 रोजी पुनर्प्राप्त. +40."आर्कटिक सी आइस एक्स्टेंट तिसऱ्या क्रमांकावरील विक्रम आहे". +41."ओजीसी सदस्य | ओजीसी (आर)". ओपनजेस्पॅटल.ऑर्ग. 13 मे 2012 रोजी पुनर्प्राप्त. +42.पार्कर, ख्रिस्तोफर जे.; मे, अँड्र्यू जे; मिशेल, वॅल (2013) "मैदानी उपक्रमांना समर्थन देणारी व्हीजीआय आणि पीजीआयची भूमिका". लागू केलेले अर्गोनॉमिक्स. 44 (6): 886-94. doi: 10.1016 / j.apergo.2012.0.04.013. पीएमआयडी 22795180. +43.पार्कर, ख्रिस्तोफर जे.; मे, अँड्र्यू जे; मिशेल, वॅल (२०१)). "यूओजी केओडिगोग्राफीची डिझाइन केलेली डिझाइन: ऑनलाईन मॅप 'मॅशअप्सवर ट्रस्ट ऑन वॉलंटर्ड भौगोलिक माहितीचा प्रभाव' (पीडीएफ). अर्गोनॉमिक्स. 57 (7): 987–997. doi: 10.1080 / 00140139.2014.909950. पीएमआयडी 24827070. +44.मे, अँड्र्यू; पार्कर, ख्रिस्तोफर जे.; टेलर, नील; रॉस, ट्रेसी (२०१)). "मर्यादीत गतिशीलता असलेल्या लोकांना सहज प्रवेशयोग्य माहिती प्रदान करणाऱ्या गर्दीमुळे तयार झालेल्या 'मॅशअप'च्या संकल्पनेचे डिझाइन मूल्यांकन करणे". परिवहन संशोधन भाग सी: उदयोन्मुख तंत्रज्ञान. 49: 103–113. doi: 10.1016 / j.trc.2014.10.007. +45.फोन्सेका, फ्रेडेरिको; शेठ, अमित (2002) "जियोस्पाटियल सिमेंटिक वेब" (पीडीएफ). यूसीजीआयएस व्हाईट पेपर. +46.फोन्सेका, फ्रेडेरिको; इजेनहॉफर, मॅक्स (1999) "ऑन्टोलॉजी-ड्राईव्ह भौगोलिक माहिती प्रणाली". प्रॉ. भौगोलिक माहिती प्रणालीवरील एसीएम आंतरराष्ट्रीय परिसंवाद: १–-१–. +47.पेरी, मॅथ्यू; हाकीमपौर, फरशाद; शेठ, अमित (2006) "थीम, स्पेस आणि टाइम विश्लेषित करणे: एक ऑन्टोलॉजी-आधारित दृष्टीकोन" (पीडीएफ). प्रॉ. भौगोलिक माहिती प्रणालीवरील एसीएम आंतरराष्ट्रीय संगोष्ठी: 147-1515. +48."आयुध सर्वेक्षण सर्वेक्षण" 21 मे 2007 रोजी मूळकडून संग्रहित केले. +49."अर्थ आणि पर्यावरणविषयक परिभाषा अर्थशास्त्र वेब". 29 मे 2007 रोजी मूळकडून संग्रहित केले. +50."डब्ल्यू 3 सी जियोस्पाटियल इनक्यूबेटर ग्रुप". +51."जिओस्पेशियल सिमेंटिक्सवर आंतरराष्ट्रीय परिषद". +52."टेरा कॉग्निटा 2006 - जिओस्पेशियल सिमेंटिक वेबचे दिशानिर्देश". मूळ 18 मे 2007 रोजी संग्रहित केले. +53.हक, अखलाक (1 मे 2001) "जीआयएस, लोक सेवा आणि लोकशाही कारभाराचा मुद्दा". सार्वजनिक प्रशासन आढावा. 61 (3): 259–265. doi: 10.1111 / 0033-3352.00028. आयएसएसएन 1540-6210. +54.हक, अखलाक (2003) "माहिती तंत्रज्ञान, जीआयएस आणि लोकशाही मूल्येः सार्वजनिक सेवेतील आयटी व्यावसायिकांना नैतिक परिणाम". नीतिशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान. 5: 39-48. डोई: 10.1023 / ए: 1024986003350. +55.मोमोनियर, मार्क (2005) "नकाशे सह खोटे बोलणे". सांख्यिकी विज्ञान. 20 (3): 215-2222. doi: 10.1214 / 088342305000000241. जेएसटीओआर 20061176. +56.मोमोनियर, मार्क (1991). नकाशे सह कसे खोटे बोलणे. शिकागो, इलिनॉयः शिकागो प्रेस विद्यापीठ. आयएसबीएन 978-0226534213. +57.हक, अखलाक (2015). पाळत ठेवणे, पारदर्शकता आणि लोकशाही: माहिती वयातील सार्वजनिक प्रशासन. टस्कॅलोसा, AL: अलाबामा प्रेस युनिव्हर्सिटी. पीपी. 70-73. आयएसबीएन 978-0817318772. +58.सिंटन, डायना स्टुअर्ट; लंड, जेनिफर जे., एड्स. (2007) समजून घेण्याची जागा: जीआयएस आणि अभ्यासक्रमाचे मॅपिंग. रेडलॅंड्स, सीए: ईएसआरआय प्रेस. आयएसबीएन 9781589481497. ओसीएलसी 70866933.53. +59.मिलसन, अर्न्ड्र्यू जे.; डिमिर्सी, अली; केर्स्की, जोसेफ जे., एड्स. (2012). माध्यमिक शाळांमध्ये जीआयएस सोबत शिकवण्याविषयी शिकण्याचे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन (सबमिट केलेले हस्तलिखित) डोरड्रॅक्ट; न्यू यॉर्कः स्प्रिन्जर-वेरलाग. doi: 10.1007 / 978-94-007-2120-3. आयएसबीएन 9789400721197. ओसीएलसी 733249695. +60.जेकेल, थॉमस; सांचेझ, एरिक; ग्रिल, इनगा; जुनाउ-सायन, कॅरोलिन; लिऑन, जॉन, एड्स. (२०१)). जिओमिडियासह शिकणे आणि शिकवणे. न्यूकॅसल ऑन टायिनः केंब्रिज स्कॉलर्स पब्लिशिंग. आयएसबीएन 9781443862134. ओसीएलसी 885014629. +61.सोलारी, ओस्वाल्डो म्युझिझ; डिमिर्सी, अली; शिही, जूप व्हॅन डर, एड्स. (2015). बदलत्या जगात भौगोलिक तंत्रज्ञान आणि भौगोलिक शिक्षणः भू-स्थानिक पद्धती आणि शिकलेले धडे. भौगोलिक आणि पर्यावरण विज्ञान मध्ये प्रगती. Tōky; न्यू यॉर्कः स्प्रिन्जर-वेरलाग. doi: 10.1007 / 978-4-431-55519-3. आयएसबीएन 9784431555186. ओसीएलसी 900306594. +62.निएटो बर्बेरो, गुस्तावो (२०१)) अ‍ॅन्लिसिस डीला प्रॅक्टिका एज्युकटिव्ह कॉन सिग् एनला एनसेन्झा डेला जिओग्राफिया डेला एज्युकेशन सिकंदरिया: अन् एस्टुडियो डी कॅसो एन बाडेन-वर्टमबर्ग, अलेमानिया (पीएचडी. थीसिस). बार्सिलोना: बार्सिलोना विद्यापीठ. 9 मे 2017 रोजी पुनर्प्राप्त. +63."स्थानिक सरकारमधील स्ट्रॅटेजिक जीआयएस नियोजन आणि व्यवस्थापन". सीआरसी प्रेस. 25 ऑक्टोबर 2017 रोजी पुनर्प्राप्त. +64."होम - सेफसिटी". सेफसिटी 25 ऑक्टोबर 2017 रोजी पुनर्प्राप्त. +65."स्थानिक सरकारसाठी जीआयएस | मुक्त सरकार". www.esri.com. 25 ऑक्टोबर 2017 रोजी पुनर्प्राप्त. +66.पार्कर, सी. जे.; मे, ए; मिशेल, व्ही .; बुरोज, ए (2013). "समावेशी सेवा डिझाइनसाठी स्वयंसेवी माहिती कॅप्चरिंग: संभाव्य फायदे आणि आव्हाने". डिझाइन जर्नल (सबमिट केलेले हस्तलिखित). 16 (2): 197–218. doi: 10.2752 / 175630613x13584367984947. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_856.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3a20b9714ff08e80ed30734ae419e764efb51c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_856.txt @@ -0,0 +1,7 @@ +भौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (इंग्रजी:जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (उदा. एखादे स्थान,गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या रूपात हे प्रमाणित करतो की, त्या उत्पादनात विशिष्ट गुणधर्म आहेत. तो तेथिल प्रचलीत पारंपारिक पद्धतींद्वारे बनविला गेला आहे किंवा त्याचे भौगोलिक स्थानामुळे त्यास विशिष्ठ प्रकारची प्रतिष्ठा आहे. +मूळ स्थानाचे नाव हे भौगोलिक सूचकांकाचा एक उपप्रकार आहे जिथे गुणवत्ता, पद्धत आणि त्या उत्पादनाची प्रतिष्ठा ही 'बौद्धिक संपत्ती अधिकार नोंदणी' अंतर्गत पारिभाषित केलेल्या निर्णायक क्षेत्रापासून बनविली जाते. +वेगवेगळ्या देशातील विविध सरकारे ही खाद्य उत्पादनांसाठी असलेली व्यावसायिक नावे (ट्रेड नेम) व व्यापार चिन्हे (ट्रेडमार्कस्) यांना एकोणिसावे शतकाच्या शेवटापासून संरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.व्यापारात होत असलेला खोटेपणाचा व फसवेगिरीचा विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे केले आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्या भौगोलिक सूचकांकाच्या मक्तेदारीला, ग्राहकांच्या फायद्यासाठी अथवा उत्पादकांच्या फायद्यासाठी ते सरकार प्रमाणित करते. +जागतिक व्यापार संघटना (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) (डब्ल्यूटीओ)चा सदस्य म्हणून भारताने भौगोलिक संकेतांची (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ची रचना १५ सप्टेंबर २००३ पासून लागू केली आहे.ते जा.व्या.सं.च्या करारांतर्गत जीआयच्या अनुच्छेद २२ (१)च्या अंतर्गत त्याला पारिभाषित केले गेले आहे. बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या व्यापार-संबंधित बाबींवर डब्ल्यूटीओ (टीआरआयपीएस) करार खालील प्रमाणे आहे: "सदस्य किंवा त्याचे आधिपत्याखालील प्रदेश किंवा क्षेत्रात उद्भवणाऱ्या चांगल्या गोष्टी या त्या स्थानाचा गुणविशेष म्हणून त्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा चांगली वैशिष्ट्ये ही भौगोलिक सूचकांकाच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे. +भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या 'औद्योगिक धोरण व प्रोत्साहन' विभागातर्फे जारी करण्यात येते. +हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते. +आजवर सुमारे २०० चे जवळपास भारतीय उत्पादनांना हे मानांकन देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8578.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1c53580bcd51ddef455990b939b6cf7cca357c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8578.txt @@ -0,0 +1 @@ +मिल्ने आखात, अर्थात मिल्ने बे, हे पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे प्रांतातील आखात आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यानची मिल्ने आखाताची लढाई येथे लढली गेली होती. ह्या आखाताला सर अलेक्झांडर मिल्नेचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8584.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfefe0c952ddfd5e1a668418f05524900fe694de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8584.txt @@ -0,0 +1 @@ +मिळून सा-याजणी हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_863.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcd781fb949f89d9e72f9ab4a5413c2bb0c80c20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_863.txt @@ -0,0 +1,39 @@ +भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसिक) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले. +हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[१] +दरवर्षी जास्तीत जास्त दोन शोध व तीन व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.[२] इतर नोबेल पारितोषिकांपेक्षा भौतिकशास्त्रातील पारितोषिकाची उमेदवारी व निवड प्रक्रिया जास्त कठीण समजली जाते. यामुळे या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे.[३] +द रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे पाच सदस्य निवडसिमतीवर असतात. सुरुवातीला हजारे व्यक्तींकडून उमेदवारी सूचना मागवल्या जातात. यातून एक-एक करीत नावे गाळली जातात व शेवटी फक्त विजयी उमेदवार यादीत उरतात. ही लांबण लागणारी प्रक्रिया आल्फ्रेड नोबलच्या स्वतःच्या आग्रहाखातर ठरवण्यात आली आहे. कदाचित उमेदवारांचे अशा खोलीत जाउन संशोधन करण्याच्या रिवाजामुळेच या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे. +दरवर्षी सुमारे ३,००० अर्ज निवडक व्यक्तींना पाठविण्यात येतात. या व्यक्ती त्यांच्या माहितीतील संशोधकांची नावे (स्वतःचे नाव घालता येत नाही) व त्यांच्या कार्याबद्दलची माहिती पाठवतात. ही नावे प्रसिद्ध केली जात नाहीत व ज्यांची उमेदवारी लागलेली आहे त्यांना स्वतःलाही याची कुणकुण लागू दिली जात नाही. अर्थात, क्वचित ही नावे बाहेर पडतातच. पाठवण्यात आलेले अर्ज ५० वर्षे जाहीर न करता ठेवण्यात येतात. बऱ्याचदा संशोधक स्वतः किंवा त्यांच्या संशोधन-संस्थेचे भाटशाहीर आपला अर्ज पाठविण्यात आल्याचे जाहीर करतात. यात तथ्य असतेच असे नाही. +प्राथमिक छाननीनंतर या तीनेक हजार नावांतून निवडसमिती साधारण दोनशे नावे ठेवते व बाकी केराच्या टोपलीत जातात. ही नावे भौतिकशास्त्रातील व प्रत्येक संशोधकाच्या कार्यक्षेत्रातील तज्ञ-पंडितांकडे पाठविली जातात. या फेरीनंतर पंधरा नावे उरतात. ही नावे मग इन्स्टिट्युटकडे येतात. येथे शेवटची छाननी होते व त्यावर्षीचे विजेते ठरविले जातात. +हे पारितोषिक मृत्युपश्चात दिले जात नाही पण अर्ज भरला गेल्यावर संशोधकाचा मृत्यू झाला तर ते नाव गाळण्यात येत नाही. +या पारितोषिकाची आणखी एक अट आहे की झालेले संशोधन काळाच्या परीक्षेतही उतरले पाहिजे. त्यामुळे संशोधन झाल्यावर साधारणतः वीसेक वर्षांनी ते पारितोषिकास लायक समजले जाते. उदा. १९८३तील सुब्रमण्यन चंद्रशेखरचे पारितोषिक विजेते संशोधन १९३० च्या सुमारास झाले होते पण १९७०-८० पर्यंत त्याची खात्री पटणेच शक्य नव्हते. या व मृत्युपश्चात न देण्याच्या नियमामुळे बरेच संशोधक या पारितोषिकास मुकतात. +आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[१] +१ कोटी स्वीडिश क्रोनाचे (अंदाजे १० लाख युरो; १४ लाख अमेरिकन डॉलर) बक्षिस त्या वर्षीच्या सगळ्या विजेत्यांत वाटून देण्यात येते. +नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस कारोलिन्स्का इन्स्टिट्युट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व आल्फ्रेड नोबेलचे चित्र असते तर मागच्या बाजूस +ढगांत असलेली व हातात कॉर्नुकोपिया घेतलेली देवीच्या रूपातील पृथ्वी व ग्रीक इतिहासातील जिनियस असतात.[४] +हे पारितोषिक स्टॉकहोम नगरगृहात एका शाही समारंभात देण्यात येते[५] + +१९०१पासून २०१० पर्यंत १८६ व्यक्तींना हे पारितोषिक दिले गेले आहे[६] + फ्रांस + युनायटेड किंग्डम + स्वित्झर्लंड + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + युनायटेड किंग्डम + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + पश्चिम जर्मनी + सोव्हिएत संघ +vention and development of the holographic method" + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिका + नेदरलँड्स + युनायटेड किंग्डम +ब्रायन श्मिट + अमेरिकेची संयुक्त संस्थाने +ॲडम रियेस + +डेव्हिड जे. वाइनलॅंड + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8651.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1611ce375774661ed882987559153fd30af0fd12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8651.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिशेल रॉबिन्सन ओबामा (जानेवारी १७, इ.स. १९६४) ह्या अमेरिकेच्या प्रथम महिला (इंग्लिश: First Lady) (राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नि) आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका आफ्रिकन अमेरिकन महिलेला हा मान मिळाला आहे. +मिशेल रॉबिन्सनचा जन्म व बालपण शिकागो शहरात झाले. त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठ व हार्वर्ड विधी विद्यालयामधून शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर शिकागोमध्ये नोकरी करत असताना त्यांची बराक ओबामांशी ओळख झाली. बराक व मिशेल ह्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया आणि साशा ह्या दोन मुली आहेत. +२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मिशेल ओबामांनी आपल्या नवऱ्याला निवडुन आणण्यात मोठा वाटा उचलला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला. +प्रथम महिला ह्या पदावर मिशेल ओबामांनी जगभरातील लोकांना मोहून टाकले आहे. त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, उच्च शिक्षण, समाजकार्याची कळकळ इत्यादी बाबींच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे उत्कृष्ट कपडे हा फॅशन जगतातील एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8653.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c32c01672e332a6487d8d7d0f4d9832a56636daa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8653.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मिशेल लार्चर दि ब्रितो (पोर्तुगीज: Michelle Larcher de Brito; २९ जानेवारी १९९३) ही एक पोर्तुगीज टेनिसपटू आहे. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेत प्रवेश मिळवून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेमध्ये खेळणारी ती पहिली पोर्तुगीज महिला टेनिस खेळाडू ठरली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_872.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c2dc72cbf4a0eb2d6bdfdf27731b0609818c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_872.txt @@ -0,0 +1,14 @@ +भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. आज भ्रमणध्वनी माणसाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात. +जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात. +आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे, काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. +दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे. +मोबाईल स्थितीचे स्थान स्थान-आधारित सेवांसाठी वापरले जाऊ शकते. याला मोबाईल फोन ट्रॅकिंग असे म्हणतात. +मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. +मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे. +मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार १) ॲड्रॉईड २) ब्लॅकबेरी ३) विंडोज ४) आयफोन +मोटोरोला ही हॅंडहेल्ड मोबाईल फोनची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप आणि बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी ग्राहकांच्या हॅंडहेल्ड उपकरणांतून पहिला मोबाईल टेलिफोन काॅल केला. मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला. हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते. +१)गर्भवती महिलांसाठी आणि त्यांची मुले यांना विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते. +२)पुरुष प्रजनन संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ नये. +३)मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. +४)विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते . +५) डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8732.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..184aad8c67d6eb64d3f0373561280658aff00121 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8732.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिहाएला बुझार्नेस्कु (४ मे, १९८८:बुखारेस्ट, रोमानिया - ) ही रोमानियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बँकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_874.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad8cd78f354415b10c650bcd97ac35a6721960b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_874.txt @@ -0,0 +1,15 @@ +भ्रमणध्वनी मागराखण किंवा मोबाईल फोन ट्रॅकिंग ही मोबाईल फोनचे स्थान ओळखण्यासाठी एक प्रक्रिया आहे. हे स्थानिकीकरण तंत्रज्ञान वापरून अनेक प्रकारे केले जाऊ शकते. रेडिओ सिग्नल सेल टॉवरच्या नेटवर्क आणि फोन, किंवा फक्त जीपीएस वापरून स्थान ओळखण्याची प्रक्रिया होते. मोबाइल फोन शोधण्यासाठी, जवळच्या अँटेना टॉवर्सशी संपर्क साधण्यासाठी कमीतकमी निष्क्रिय मोबाईल सिग्नल सोडणे आवश्यक आहे, परंतु प्रक्रियेस सक्रिय कॉलची आवश्यकता नसते. मोबाईल स्थितीचे स्थान स्थान-आधारित सेवांसाठी वापरले जाऊ शकते. +मोबाइल फोनचे स्थान अनेक मार्गांनी निर्धारित केले जाऊ शकते. +सेवा प्रदात्याच्या नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून मोबाइल फोनचे स्थान निश्चित केले जाऊ शकते. सर्व्हिस प्रदात्याच्या दृष्टीकोनातून नेटवर्क-आधारित तंत्राचा फायदा हा आहे की हँडसेटवर परिणाम न करता ते अनाहुतपणे लागू केले जाऊ शकतात. हँडसेटवर जीपीएसच्या व्यापक उपलब्धतेपूर्वी बऱ्याच वर्षांपूर्वी नेटवर्क-आधारित तंत्रे विकसित केली गेली आहेत.प्रगत प्रणाली मोबाईल फोन कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे निर्धारित करतात आणि बेस स्टेशनच्या अंतराचा अंदाजे अंदाज देखील ठेवतात. जिथे मोबाइल रहदारी आणि अँटेना टॉवर्सची घनता (बेस स्टेशन) पुरेसे जास्त आहे अशी अर्हता असलेल्या सेवा शहरी भागात कमीतकमी ५० मीटरपर्यंत अचूक स्थान प्राप्त करू शकतात. +हँडसेटवर स्थापित क्लायंट सॉफ्टवेर जसे गुगल मॅप्स वापरून मोबाइल फोनचे स्थान निश्चित केले जाऊ शकते. आयओएस किंवा अँड्रॉइड यासारख्या स्मार्टफोनवर असे सॉफ्टवेर उदा. Google नकाशे चालविण्यात याचा उपयोग होतो. +जीएसएम आणि युनिव्हर्सल मोबाइल टेलिकम्युनिकेशन सिस्टम (यूएमटीएस) हँडसेटमधील ग्राहक ओळख मॉड्यूल (सिम) वापरून, हँडसेटमधून स्थान ओळखणे शक्य आहे. +हँडसेटचे स्थान ओळखण्यासाठी क्रॉऊडसोर्स्ड वाय-फाय डेटा देखील वापरला जाऊ शकतो. +ट्रॅकिंगचा आपल्याला वैयक्तिकरित्या कसा फायदा होतो? +तुम्ही मोबाईलचे लोकेशन बंद केले तरी स्थान ट्रॅक करणे थांबवणे अशक्य असते. कारण ते तुमच्या फोनचे लोकेशन, वायफाय लोकेशन वापरून कंपन्या माग काढतातच +त्यामुळे जे लोकेशन ट्रॅकिंगचे वास्तविक फायदे आहेत त्याचा तरी आपल्यासाठी उपयोग करून घेणे उत्तम. +त्यामुळे 'हा गुगल आपल्याला ट्रॅक करतो' अशा आपल्या भीतीपासून दूर रहाणे उत्तम आहे. +गेले काही वर्षे आपण लोकेशन देतो आहोत. आजवर काय वाईट घडले आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्यातून काहीही वाईट निष्पन्न झालेले नाही. +खरे तर दर वळी त्याचा उपयोगच झाला आहे. हरवलेला फोन सापडतो आहे तो केवळ लोकेशन चालू होते म्हणून. +तेव्हा नवीन तंत्रज्ञान स्वतःसाठी वापरा. कंपन्या ते असे नाही तर तसे वापरणारच आहेत. किमान तुम्हाला त्याचा वैयक्तिक उपयोग होईल असे तरी पहाणे योग्य. +चीन सरकारने या तंत्रज्ञानाचा वापर बीजिंग शहर रहिवाशांच्या येणाऱ्या प्रवाहाचा मागोवा घेण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी केला आहे. +फोन चालू असल्यास आपण काय करू इच्छिता ते निवडा. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8759.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67014f7c0ca50ce95c4364c3fbada31b84d088c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8759.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मी सिंधुताई सपकाळ हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सिंधुताई सपकाळांच्या मी वनवासी नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. अनंत महादेवन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे. +चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरून त्या प्रथमच विमान प्रवास करून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_876.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c2dc72cbf4a0eb2d6bdfdf27731b0609818c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_876.txt @@ -0,0 +1,14 @@ +भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. आज भ्रमणध्वनी माणसाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात. +जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात. +आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे, काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. +दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे. +मोबाईल स्थितीचे स्थान स्थान-आधारित सेवांसाठी वापरले जाऊ शकते. याला मोबाईल फोन ट्रॅकिंग असे म्हणतात. +मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. +मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे. +मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार १) ॲड्रॉईड २) ब्लॅकबेरी ३) विंडोज ४) आयफोन +मोटोरोला ही हॅंडहेल्ड मोबाईल फोनची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप आणि बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी ग्राहकांच्या हॅंडहेल्ड उपकरणांतून पहिला मोबाईल टेलिफोन काॅल केला. मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला. हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते. +१)गर्भवती महिलांसाठी आणि त्यांची मुले यांना विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते. +२)पुरुष प्रजनन संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ नये. +३)मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. +४)विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते . +५) डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8767.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799e53087ec9df8318abd4bf1405e05f24bb14b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8767.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीके डी रिडर (१९ जानेवारी, १९९६:क्रॅडॉक, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही दक्षिण पश्चिम जिल्ह्यांकडून खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती पूर्वी पूर्व प्रांताकडून खेळली आहे.[१][२] +तिने सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8779.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb4b07e4515ba9307990d9298980ca201ac30a37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8779.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीड काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_878.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6df41a4568fe2f51ec4b688d2d4faf63a336b56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_878.txt @@ -0,0 +1,42 @@ +डिसेंचेन्टमेंट अमेरिकन अ‍ॅडल्ट फँटसी अ‍ॅनिमेटेड सिटकॉम आहे जो नेटफ्लिक्ससाठी मॅट ग्रॉरिंग यांनी बनविला आहे. मालिका केवळ स्ट्रीमिंग सेवेवर दिसून येणारी ग्रॉनिंगची पहिली निर्मिती आहे; त्याने यापूर्वी फॉक्स ब्रॉडकास्टिंग कंपनीसाठी द सिम्पसन आणि फ्यूचुरमा तयार केले. ड्रीमलँडच्या मध्ययुगीन कल्पनारम्य साम्राज्यात सेट केल्या गेलेल्या या मालिकेत बीन, एक बंडखोर आणि मद्यपी राजकुमारी, तिचा भोळा पिवळ्या साथीदार एल्फो आणि तिचा विध्वंसक "वैयक्तिक राक्षस" ल्युसीची कहाणी आहे. डिसेंचेन्टमेंटमध्ये अबी जेकबसन, एरिक आंद्रे, नॅट फॅक्सन, जॉन डिमॅगिओ, ट्रेस मॅकनीले, मॅट बेरी, डेव्हिड हर्मन, मॉरिस लामार्चे, ल्युसी मॉन्टगोमेरी आणि बिली वेस्ट यांचे आवाज आहेत. +पहिले दहा भाग 17 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध झाले होते आणि पुढील दहा भाग 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये नेटफ्लिक्सने अतिरिक्त 20 भागांसाठी मालिका नूतनीकरण केली. यातील पहिले दहा जण 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध झाले. +डबीझीलँडमधील बीन नावाची एक किशोरवयीन राजकुमारी म्हणून अब्बी जेकबसन. तिचे पूर्ण नाव राजकुमारी टियाबॅनी मारियाबॅनी डीला रोचंबियू ग्रंकविट्झ आहे. तिला मद्यपान करायला मजा येते. ती उभयलिंगी किंवा पॅनसेक्सुअल असू शकते किंवा पुरुषांद्वारे केलेल्या रोमँटिक हावभावांमुळे तिला वारंवार बंड केले जाऊ शकते. +एरिक आंद्रे ल्युसी म्हणून, बीनचा वैयक्तिक राक्षस. +पेंडरगॅस्ट म्हणून, किंग झेगच्या शूरवीरांचा प्रमुख. +एल्फवुडचा नॅट फॅक्सन, एल्फवुडचा 18 वर्षांचा एल्फ. तो आशावादी आहे आणि त्याला कँडी आवडते. +बीनचे वडील आणि ग्रांकविट्झ रॉयल हाऊसच्या ड्रीमलँडचा शासक म्हणून जॉन डायमॅगिओ. +किंग झेगची दुसरी आणि माजी पत्नी आणि बीनची सावत्र आई, राणी औना म्हणून ट्रेस मॅकनीले. राजे यांच्यातील युतीचा भाग म्हणून कुटुंबात लग्न करणा D्या डँकमिरेमधील ती उभयचर प्राणी आहे. +बोनी प्रिन्स डेरेक, झग आणि ओनाचा संकर मुलगा आणि बीनचा सावत्र भाऊ म्हणून. +प्रिंट मर्किमर म्हणून मॅट बेरी, बेंटवुडच्या राज्यातून, ज्याला बीनशी लग्न करण्याची व्यवस्था केली गेली होती, परंतु डुक्करमध्ये बदलली गेली. +ओडवाल म्हणून मॉरिस लामार्चे, ड्रीमलँडचे तीन डोळे असलेले पंतप्रधान आहेत. +शेरॉन हॉर्गन क्वीन डॅगमार म्हणून, बीनची आई आणि राजा झेगची पहिली पत्नी. +1. "एक राजकुमारी, एक योगिनी आणि एक बारमध्ये एक राक्षस चालत जा" +२. "ज्याच्यासाठी डुक्कर ओक्स आहे" +3. "अंधकाराची राजकुमारी" +4. "कॅसल पार्टी नरसंहार" +5. "वेगवान, राजकुमारी! मारा! मारून टाका!" +6. "दलदल व अडचणी" +7. "प्रेमाची निविदा भडकावणे" +8. "अमरत्वाची मर्यादा" +9." आपली स्वतःची पिवळी बनून घ्या " +10. "ड्रीमलँड फॉल्स" +1. "डिसएन्शन्ट्रेस" +२. "नरकाकडे जाण्यासाठी पायऱ्या" +3. "द व्हेरी थिंग" +4. "एकाकी हृदय एक शिकारी आहे" +5. "आमची संस्था, आमचे एल्व्हस" +6. "द ड्रीमलँड जॉब" +7. "प्रेमाची बारीक मिठी" +8. "तिच्या स्वतःच्या लेखनात" +9. "द इलेक्ट्रिक प्रिन्सेस" +10. "टियाबॅनी फॉल्स" +1. "भूमिगत होमस्किक ब्लूज" +२. "तू बीन आहेस" +3. "बीनी तुझी बंदूक मिळवा" +4. "स्टीमलँड गोपनीय" +5. "फ्रीक आउट!" +6. "शेवटचा स्प्लॅश" +7. "बॅड मून राइजिंग" +8. "अहो, डुक्कर खर्च करणारे" +9." किंग झेगचे वेड " +10. "बीन फॉल्स डाउन" diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8783.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5684b202722cb631b1db34365e7391e5cacc45ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8783.txt @@ -0,0 +1 @@ +मिडियाविकी एक मुक्त आणि मुक्त-स्रोत विकी इंजिन आहे. हे विकिपीडियावर २००२ मध्ये वापरासाठी विकसित केले गेले होते आणि २००३ मध्ये त्याला "मिडियाविकी" असे नाव दिले गेले होते.[१] विकिपीडिया, विकिमीडिया कॉमन्स आणि विकिडाटा यासह विकिपीडिया आणि जवळजवळ इतर सर्व विकिमीडिया वेबसाइटवर हे वापरात आहे; या साइट्स मिडियाविकीसाठी सेट केलेल्या आवश्यकतेचा एक मोठा भाग परिभाषित करत आहेत. मिडियाविकि मूळतः मॅग्नस मॅन्स्केने विकसित केली होती आणि ली डॅनियल क्रोकरने सुधारित केली आहे. त्यानंतर त्याचा विकास विकिमीडिया फाउंडेशनने समन्वित केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8797.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3afb7bbb7d64026e909c4b4f1b130e98222e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8797.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीनल महेश पटेल ऊर्फ मिन पटेल (जुलै ७, इ.स. १९७०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा इंग्लिश राष्ट्रीय क्रिकेट संघातून क्रिकेट खेळणारा भारतीय वंशाचा, निवृत्त पुरुष खेळाडू आहे. तो  इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो केंट परगण्याचे प्रतिनिधित्व करत असे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करत असे. डाव्या हाताने गोलंडाजी करणारा पटेल फलंदाजी मात्र उजव्या हाताने करत असे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8816.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1173978254e130840a06af22b6fbdff605605a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8816.txt @@ -0,0 +1,5 @@ +मीना भिवसेन तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपुरा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तुपे यांच्या वडिलांनी त्यांना शिकायला प्रोत्साहित केले, परंतु त्यांच्या आई, शशिकला तुपे यांचा विरोध होता. +तुपे कुटुंबातील चार मुली व एक मुलगा; पैकी मीना तुपे बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठ्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. +मीना तुपे यांना लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली, त्यामुळे त्या काटक झाल्या. त्यांना शिक्षिका व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी शिक्षणशास्त्र पदविकाही मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पोलिसांत भरती झाल्या. त्यांना खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले; त्या हवालदार झाल्या. त्यानंतर त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात महिलांमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत त्यांना ७४९ तरुण-तरुणींमधून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असल्याचा मान मिळाला. हा मिळविणाऱ्या तुपे पहिल्याच महिला प्रशिक्षणार्थी होत. +मीना तुपे आता पोलीस उपनिरीक्षक झाल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8850.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2bfb6c56912ee4eec614f49a60023dda639438f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8850.txt @@ -0,0 +1 @@ +मेरठ हा उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8884.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..256ca5ee2bc6ccaab819afa126e51b60b1c85661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8884.txt @@ -0,0 +1,8 @@ +मीरा बोरवणकर या भारतातील पोलीस अधिकारी आहेत. या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. +यांना लेडी सुपरकॉप असे नामाभिधान आहे. +मीरा बोरवणकर यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिल्का असल्याने बोरवणकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले. +पोलीस अधिकारी झाल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले. +मीरा बोरवणकर यांनी १९९४ साली जळगांवमध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट उघडकीला आणले. या त्यांच्या कामगिरीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. +मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (जेल)- होत्या. परदेशी पळून गेलेल्या वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. +मीरा चड्ढा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयए‍‌एस- प्रशासकीय अधिकारी आहेत. +मीरा बोरवणकर यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ’ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8898.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da96aab375063dce6a2f8ce3d5100ebc5890021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8898.txt @@ -0,0 +1,17 @@ +मॅडेलीन स्लेड (२२ नोव्हेंबर १८९२ - २० जुलै १९८२), ज्यांना मीराबेहन किंवा मीराबेन म्हणूनही ओळखले जाते, ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या भारताच्या समर्थक होत्या ज्यांनी १९२० च्या दशकात महात्मा गांधींसोबत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी इंग्लंडमधील आपले घर सोडले. त्यांनी आपले जीवन मानवी विकासासाठी आणि गांधींच्या तत्त्वांच्या प्रगतीसाठी समर्पित केले. +मीराबेहन यांचा जन्म १८९२ मध्ये एका चांगल्या ब्रिटिश कुटुंबात झाला. त्यांचे वडील, सर एडमंड स्लेड हे रॉयल नेव्हीमध्ये अधिकारी होते.[१] त्यांनी बरेच बालपण आजोबांसोबत एका मोठ्या शेतावरील घरात घालवले व त्यामुळे मीराबेहनला निसर्ग, प्राणी, घोडस्वारीची आवड निर्माण झाली.[२][३] +वयाच्या १५ व्या वर्षी मीराबेहनला लुडविग व्हॅन बीथोव्हेनच्या संगीताची आवड निर्माण झाली.[३] [४] त्यांनी पियानो शिकला आणि संगीत कार्यक्रमांच्या व्यवस्थापनाचा काम केल.[१] +बीथोव्हेन कुठे राहत होता आणि त्यांनी कसे संगीत तयार केले हे पाहण्यासाठी मिराबेहनने व्हिएन्ना आणि जर्मनीला भेट दिली. त्यांनी रोमेन रोलँडची बीथोव्हेनवरील पुस्तके वाचली आणि नंतर व्हिलेन्यूव्ह येथे त्याच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान रोलँडने महात्मा गांधीवरील त्यांच्या नवीन पुस्तकाचा उल्लेख केला. रोलँड यांनी गांधींचे ख्रिस्त आणि २० व्या शतकातील महान व्यक्ती म्हणून वर्णन केले. [१] [२] इंग्लंडला परतल्यावर, त्यांनी रोलँडचे गांधींचे चरित्र वाचले, ज्यामुळे त्यांना महात्माजींचे शिष्य बनण्याची खात्री पटली. मीराबेहनने साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास करून, मांडी मारून बसणे आणि शाकाहारी आहाराचा अवलंब करून स्वतःला बदलासाठी तयार करण्याचे ठरवले. १९२४ मध्ये त्यांनी गांधींना पत्र लिहून त्यांच्यासोबत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि देणगीसाठी २० पाउंड पाठवले. तिच्या संयमाने आणि आधी स्वतःला तयार करण्याच्या इच्छेने गांधी खूश झाले. [३] त्यानंतर मिराबेहनने वाइन, बिअरचा त्याग केला, आहारातून मांस पूर्णपणे काढून टाकले आणि लोकर कातणे आणि विणणे शिकल्या. [३] त्या वर्षी इंग्लंडमध्ये, त्यांनी यंग इंडियाचे सदस्यत्व घेतले आणि पॅरिसमध्ये काही वेळ भगवद्गीता आणि फ्रेंचमध्ये ऋग्वेदाचा काही भाग वाचण्यात घालवला. [५] +६ नोव्हेंबर १९२५ रोजी मिराबेहन मुंबईत आल्या आणि गांधी आणि त्यांचा मुलगा देवदास यांच्या अनुयायांनी त्यांची भेट घेतली. [४] [६] [३] जवळजवळ ३४ वर्षे चाललेल्या भारतातील त्यांच्या वास्तव्याची ही सुरुवात होती. [५] त्यांना भेटल्यावर गांधीने मीराबेहन हे नाव दिले.[४][६] +मीराबेहन यांनी डिसेंबर १९२५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला हजेरी लावली. 1926 चा बहुतेक काळ साबरमतीमध्ये घालवला. [३] +१९२७ चे सुरुवातीचे महिने त्यांनी उत्तर भारतातील आश्रमांना भेट देऊन घालवले. या काळात, त्यांनी गांधींच्या आत्मचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीची भाषा आणि व्याकरण दुरुस्त करण्याचे काम देखील केले, जे विशेष कार्य गांधींनीच दिले होते.[३] साबरमतीला परतल्यानंतर त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला, पांढरी साडी नेसायला सुरुवात केली आणि केस लहान कापले. [६] +१९२९ मध्ये, रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनला त्यांनी भेट दिली व टागोरांची भेट घेतली. [३] +१९३१ मध्ये लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेसाठी त्या गांधींसोबत गेल्या होत्या. [१] +कॉन्फरन्समधून मुंबईला परतल्यावर नवीन व्हाइसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधींना अटक केली. त्यानंतर कोणाला, कुठे आणि का अटक करण्यात आली याचा साप्ताहिक अहवाल तयार करण्याचे काम मीराबेहन यांनी केले. यामुळे लवकरच त्यांनी देखील अटक झाली आणि तीन महिने आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले, जिथे त्यांची भेट सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याशी झाली. सुटका झाल्यानंतर लवकरच, १९३२ मध्ये [७] मुंबईत प्रवेश केल्याबद्दल पुन्हा एकदा अटक करण्यात आली. तेव्हा अहमदाबादमधील साबरमती तुरुंगात बदली करण्यात आली, जिथे त्यांनी गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांच्यासोबत कारावास भोगला. [३] [८] +१९३४ मध्ये त्यांनी लंडन, वेल्स, लँकेशायर आणि न्यूकॅसल, इतर ठिकाणी दौरे केले व भारताच्या स्वातंत्राचे समर्थन केले. [३] [५] +मीराबेहन यांनी सेवाग्राम आश्रमाच्या स्थापनेतही सक्रिय रस घेतला.[५] +ऑगस्ट १९४२ मध्ये मीराबेहन यांना गांधी आणि अनेक काँग्रेस नेत्यांसोबत अटक करण्यात आली कारण त्यांनी ' भारत छोडो ' आंदोलन सुरू केले. [३] त्यांना मे १९४४ पर्यंत पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये तुरुंगात टाकण्यात आले. महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी या दोघांचेही पॅलेसच्या तुरुंगात असताना निधन झाले. [५] +स्वातंत्र्यानंतर, त्यांनी १९५२ मध्ये भिलंगणात बापू ग्राम आणि गोपाल आश्रम नावाची वस्ती स्थापन केली.[५] तिने या आश्रमांमध्ये दुग्धव्यवसाय आणि शेतीचे प्रयोग केले आणि काश्मीरमध्येही काही काळ घालवला. तिने कुमाऊं आणि गढवालमध्ये घालवलेल्या काळात तिथल्या जंगलांचा नाश आणि मैदानी भागातील पुरावर होणारा परिणाम तिने पाहिला. तिने हिमालयात समथिंग रॉंग नावाच्या निबंधात याबद्दल लिहिले होते परंतु वनविभागाने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. 1980 च्या दशकात, या भागात चिपको चळवळ नावाची जंगले वाचवण्यासाठी मोठ्या गांधीवादी पर्यावरणीय मोहिमेचे साक्षीदार होते. [९] +त्या १९५९मध्ये इंग्लंडला परतल्या आणि १९६० मध्ये ऑस्ट्रियाला गेल्या.[१०] [४] त्यांनी २२ वर्षे व्हिएन्ना वुड्स (बाडेन, हिंटरब्रुहल, क्रॅकिंग) मधील लहान गावात घालवली, जिथे १९८२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.[१०] +१९८१ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.[११] +मीराबेहन यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे द स्पिरिच्युअल पिलग्रिमेज . त्यांनी बापूज लेटर्स टू मीरा आणि न्यू अँड ओल्ड ग्लेनिंग्ज हे देखील प्रकाशित केले. [१२] [१३] त्यांच्या मृत्यूच्या वेळी बीथोव्हेनयांचे अप्रकाशित चरित्र देखील मागे सोडले होते; स्पीरीट ॲफ बीथोव्हेन. [१४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8912.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4500f4d15c9f1b97e143ef7de8d24f6f7f10240e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8912.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंजाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8926.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2ff2d6cc8f257ffcade7ead1ca4042c0e884b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8926.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8948.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0d275524057b08ab1e0b76dc93faa8749ffe94a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8948.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_897.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09d0193a186fea2ef4e1afd103acf2408dbe0c4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_897.txt @@ -0,0 +1,12 @@ + +प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर (जन्म : फेब्रुवारी १, १९२७; - जानेवारी २५, २०१५) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी गाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना सांगलीच्या ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते. +मराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्‍वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली. +विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले. +म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एक फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. इ.स. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि सन १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्‌सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, सन १९४८ मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठात एलिस पारितोषिक मिळाले.सन १९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले. +त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे धारवाड येथे ॲग्रिकल्चरल महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. १९५६ साली ते विलिंग्डन मध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ सालापर्यंत काम करीत राहिले. +हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक जी.ए. कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला.'जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपाने प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबऱ्यांचे इंग्रजीत अनुवाद केले. +आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते. +त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कांदबऱ्या आणि साहित्याबाबत त्यांनी आपली मते ठामपणे मांडलेली असायची त्यामुळे त्याविरोधात कोणीसुद्धा ब्र काढू नये इतके ते मत ठाम आणि परिपूर्ण असायचे. त्यामुळेच त्यांच्या स्मीक्षेला मराठी साहित्यात चांगलेच वलय प्राप्त झालेले असे. +म,द, हातकणंगलेकरांनी साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळावरही अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्‍न केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले. +सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. त्यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या भाषणात त्यांचे आवडते लेखक गूढ कथाकार जी.ए. कुलकर्णी यांचे त्यांच्या लौकिकाला साजेशे असे स्मारक जी.ए.च्या कर्मभूमीत धारवाड येथे उभा करण्यासाठी आपण जो प्रयत्‍न करत आहोत त्याला मराठी माणसांनी साथ द्यावी असे आवाहन केले होते. +मराठी साहित्य संमेलनाच्या सुमारास विद्रोही अगर समातंर साहित्य संमेलनाचा विषय फारच गाजतो, त्यामुळे होणारे साहित्य संमेलन हे साहित्यातील सर्व घटकांना घेऊन सर्वसमावेशक असावे असे हातकणंगलेकरांनी स्पष्ट केले होते. विद्रोही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र यावे असे आवाहनही केले होते. त्यांनी मराठी साहित्यातील अनेक चुकीच्या प्रथांवर तसेच चुकीच्या परंपरावरही प्रहार केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8983.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f25635fa4e054a7a5fb46d725534a6f745d2b911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8983.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंढेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8984.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d91c9d41977c01b1860af44428dc4cde967e1854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_8984.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9004.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b89b6878205accbd0735d3c2cb0d3f3723cd4b79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9004.txt @@ -0,0 +1,5 @@ +स्वप्निल जोशी + + +मुंबई पुणे मुंबई ३ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी रोमँटिक-नाट्यमय चित्रपट[१] असून तो ५२ फ्रायडे सिनेमाझ आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २०१५ च्या मुंबई-पुणे-मुंबई या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आहेत. प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत[२]. हा चित्रपट ०७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता[३]. +ह्या चित्रपटाने आरंभिक शनिवार व रविवार मध्ये ₹५ कोटी आणि संपूर्ण नाट्यगृहात ₹१९ कोटी जमा केले[४]. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9009.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daa326f77e35cbb5473ac4426b211b3faaf40531 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9009.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबई-पुणे पॅसेंजर ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक मंदगतीची रेल्वेगाडी होती. ही गाडी रात्री पुण्याहून निघून सकाळी मुंबईस पोचाय्ची. ही गाडी नंतरच्या कळत साईनगर शिर्डी रेल्वे स्तनाकापारेंत वाढवली गेली, तसेच तिचा एक हिस्सा पंढरपूर किव्हा विजापुर परेंत जातो. पंढरपूर किव्हा विजापुर परेंत जाणारा हिस्सा दौंड वरून वेगळा केला जातो. ही गाडी आता फास्ट पॅसेंजर करण्यत आली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9024.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bc62083fb41bed0381966a2e80f6e040fd505ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9024.txt @@ -0,0 +1,7 @@ +इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. सीझनमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.[१][२] +मुंबई इंडियन्स संघाने २०२२ हंगामासाठी ४ खेळाडू राखून ठेवले व इतरांना मोकळे केले.[३] +राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, कीरॉन पोलार्ड +मोकळे केलेले खेळाडू : आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जयंत यादव, कृणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहार, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, पियुश चावला, जेम्स नीशाम, मार्को जेन्सन, युधवीर चरक, नेथन कूल्टर-नाइल, अॅडम मिल्ने, अर्जुन तेंडुलकर +टी२० गणवेश + वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित +गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9025.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15765ca23ec4c4d29016221e824620f6dc43c4c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9025.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे वेळापत्रक म्हणजे मुंबई इंडिकेटर. हा मोबाईलवर सर्रास वापरला जाणारा एक ॲप आहे. त्याद्वारे एखाद्याला मुंबईतील ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट इत्यादींचे मार्ग, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा आणि त्या वाहतुकीसाठी किती पैसे त्या सेवा नागरिकांकडून आकारतात इ. सर्व माहिती कळू शकते. त्यासाठी वापरायचा मोबाईल हा अँड्राॅइड किंवा आय ओस प्रणाली धारण केलेला असावा. अँड्राॅइड किंवा आय ओएस प्रणाली नसेल तरीसुद्धा काही मोबाईल मध्ये हा ॲप सुरू होऊ शकतो. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्ले स्टोर (अँड्राॅइड) किंवा ॲप स्टोर (आय ओएस-iPhone Operating System)मधे जाऊन मुंबई इंडिकेटर डाऊनलोड करता येतो. तिथे एम् - इंडिकेटर (M-Indicator) हा पर्याय दिसतो.. हा ॲप निशु:ल्क आहे, त्यासाठी वापरकर्त्याकडून कुठलेही पैसे आकारले जात नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9047.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5fdd4069d52ba680b7834398e9131921ce1881f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9047.txt @@ -0,0 +1 @@ +मध्य रेल्वेच्या ठाणे ते सानपाडा / जुईनगर दरम्यानच्या मार्गास ट्रान्सहार्बर मार्ग असे संबोधतात. हा विद्युतीकरण झालेला रुंदमापी दुहेरी लोहमार्ग आहे. ठाणे ते सी.बी.डी‌. बेलापूर, पनवेल, नेरुळ, वाशी दरम्यान धावणाऱ्या उपनगरी (लोकल) गाड्या हा मार्ग वापरतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_906.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00b2f4e528ce4e9ef0923127103652c56e6ece96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_906.txt @@ -0,0 +1,4 @@ +डहाणूकर महाविद्यालय या नावाने साधारणपणे ओळखले जाणारे म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय ' हे मुंबई उपनगरातील वाणिज्य शाखेतील अभ्यासासाठीचे एक महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय पार्ले टिळक विद्यालय मंडळाने यांनी १९६०ला स्थापन केले.[१] सध्या महाविद्यालयाला एन.ए.ए.सी Archived 2012-03-16 at the Wayback Machine. द्वारा अ (ए) या गुणाने पुरस्कारित केलं गेला आहे आणि १७००+ विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत . डाॅ. ज्ञानेश्वर डोके येथील प्राचार्य आहेत. +या महाविद्यालयाला पूर्वी पार्ले महाविद्यालय हे नाव होते. डहाणूकर औद्योगिक समूहाकडून ३ लाख रु/-ची देणगी मिळाल्यावर त्याचे नाव महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय करण्यात आले. याला राज्य सरकाराकडूनही आर्थिक मदत मिळते. +डाहाणूकर काॅलेजच्या वाचनालयात ४५००० पुस्तके आहेत.  ग्रंथालयात वाणिज्य विषयासंबंधी ३० नियतकालिके येतात. बाह्य-ग्रंथालयांतूनही पुस्तके मागवता येतात. ग्रंथालयाने गरजू विद्यार्थ्यांनापुस्तक-खात्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हविद्यालयाचा संगणक-कक्ष सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत उघडे असते .महाविद्यालयातील काही विभागांमध्ये स्वतःची संगणक-प्रयोगशाळा आहे. महाविद्यालयामध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ दोन्हींची सोय आहे आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतात. +मुंबई शहरातील इतर महाविद्यालयांसारखा डहाणूकर महाविद्यालयाचा कुरुक्षेत्र नावाचा विशेष वार्षिक सण/महोत्सव  आहे. तो विद्यार्थ्यांना सर्व कठीण प्रसंगांविरुद्ध लढण्यास उद्युक्त करते .या उत्सवामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावतो .डहाणूकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच् साजरा करीत असलेल्या "युवा महोत्सव" यासह विविध आंतर-महाविद्यालयीन प्रसंगांत सहभागी होतो., २०१०-१०११ या शैक्षणिक वर्षात डहाणूकर महाविद्यालयाने या महोत्सवात १६५ इतर महाविद्यालयांविरुद्ध .तिसरे स्थान मिळविले होते diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9060.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140a341bae7ae1a06a136ab26c9e5dfd5a7b2c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9060.txt @@ -0,0 +1,49 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात. +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. +जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली. +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9110.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8e6c4f121f1556f8abdc4f217849b0533463a13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9110.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मुंबई रिफायनरी ही भारत पेट्रोलियमची मुंबई, महाराष्ट्र येथील रिफायनरी आहे. जानेवारी १९५५ मध्ये बर्मा-शेल रिफायनरीच्या मालकीखाली ही सुरू झाली. भारत सरकारने बर्मा-शेलची मालकी घेतल्याने रिफायनरीचे नाव १९७६ मध्ये "भारत रिफायनरी लिमिटेड" असे करण्यात आले. ऑगस्ट १९७७ मध्ये, कंपनीला त्याचे कायमचे नाव देण्यात आले जे होते भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. +रिफायनरीची प्रतिवर्षी १२ दशलक्ष टन क्षमता आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9122.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e85111a623082950fbbf74aa65e157a1863c9622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9122.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंबई रोखे बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्री चे व्यवहार या रोखे बाजारात केले जातात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. +गुणक: 18°55′47″N 72°50′01″E / 18.929681°N 72.833589°E / 18.929681; 72.833589 (मुंबई शेअर बाजार) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9124.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e85111a623082950fbbf74aa65e157a1863c9622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9124.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंबई रोखे बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्री चे व्यवहार या रोखे बाजारात केले जातात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. +गुणक: 18°55′47″N 72°50′01″E / 18.929681°N 72.833589°E / 18.929681; 72.833589 (मुंबई शेअर बाजार) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9127.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179aa9c7550020e4f10bbe9e8d7fb02fe5c3c4ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9127.txt @@ -0,0 +1,8 @@ +जॉन अब्राहम +इमरान हाश्मी +सुनील शेट्टी +काजल अग्रवाल + + +मुंबई सागा हा भारतीय हिंदी भाषेचा अ‍ॅक्शन-गुन्हेगारी श्रेणीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शित आणि टी-सीरीज निर्मित आहे.[१] जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल आणि रोहित रॉय हे मुख्य कलाकार आहेत. १९ मार्च २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.[२] +मुंबई सागा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9149.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad9038fdaa60c1b1d034431c0e3d9d7297c9d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9149.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मुंबईचा डबेवाला हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. यात भरत जाधव, दीपाली सैयद, स्मिता गोंडकर आणि मधू कांबीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9154.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdac8582dfe151f733dc9949ded004e780b83a17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9154.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे नगर सात बेटांनी बनलेले आहे. +पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती. या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले, ज्यापरत्वे आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले. +या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे. +मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी (उदा.,कान्हेरीचे डोंगर, घाटकोपर टेकड्या) व्यापला आहे. या टेकड्यांमधून अनेक लहानलहान नद्या (मिठी, पोईसर, दहिसर इ.) उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे साष्टी बेटावर अरीय नदीप्रणाली निर्माण झाली आहे. पश्चिमेला मिठी नदी व माहीमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे. शिवाय पश्चिमेची वसईची खाडी व पूर्वेची ठाण्याची खाडी ही साष्टी बेटाला मुंबईच्या मुख्य भूभागापासून अलग करते. मोसमी साकव (कॉजवे), सडका, लोहमार्ग, खाडीवरील पूल इत्यादींनी मुंबई व साष्टी ही दोन बेटे आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबईचा मोठा भाग समुद्रात भर घालून तयार केला गेला आहे व आजही बॅक बे, माहीम इत्यादी ठिकाणी हे भरावकार्य दिसते. +अर्नाळा, ऑयस्टर आयलंड, क्रॉस आयलंड, घारापुरी, तुर्भे (ट्रॉम्बे), गल बेट, धारावी, पाणजू बेट, प्रॉंग्ज आयलंड, बुचर आयलंड (जवाहर द्वीप), मढ, मार्वे, मिडिल ग्राऊंड, मुर्ढे, वांद्रे, राई, वेसावे, वगैरे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9178.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6403f3887ab3d9c0637b84834ed21501c2e39f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9178.txt @@ -0,0 +1,24 @@ +मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई व पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही.. +मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. +भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या द्रुतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. +डिसेंबर १९९७मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या. त्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व २००२ सालच्या एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. +मुंबई–पुणे गतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्ग व रा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड. +मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही. +एक्सप्रेस-वेवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत. +दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला. +पुलाचा इतिहास : +मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात (बोर घाटात) असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणीप्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पुलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. +अमृतांजन पूलाचा नागपूर दुवा : +एक ऐतिहासिक घटनाही या परिसराशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा संबंध नागपूरशी आहे. खंडाळ्याच्या पुलावर नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार एम.एच. तिवारी (जयंती ता. २२ एप्रिल; निधन १६ नोव्हेंबर १९९९) यांनी अमृतांजनची जाहिरात साकारली. पुढे याच जाहिरातीमुळे हा पूल अमृतांजन नावाने प्रसिद्ध झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्‍चर्य समजल्या जाणारा हा पूल १९४४ साली पेन्टर एम.एच. तिवारी यांनी 'बी के. नाईक ॲन्ड सन्स होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स' या जाहिरात कंपनीसाठी उभारला होता. विशेष म्हणजे वळणदार रस्ता असल्याने बी.के. नाईक यांनी होर्डिंग लावण्यासाठीच ही जागा विकत घेतली होती. एम.एच. तिवारी यांच्यापुढे खंडाळा घाटातील वाऱ्याचा वेग सहन करणारे फलक उभारण्याचे आव्हान होते. त्यामुळे केवळ अक्षरांचेच कटआऊट उभारण्याचा निर्णय बी.के. नाईक यांनी घेतला. पुढे येथेच नॅरोलॅक पेंट्‌स, ग्वालियर रेयाॅन, साठे बिस्किट्स व दैनिक सकाळचाही फलक उभारण्यात आला. +पूल आणि पर्यटन : +खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते. +पूल आणि वाहतुकीस अडथळा : +६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. +पूल पाडण्याचा निर्णय व वाद : +हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास माध्यमांनी दिलेली साथ यांमुळे हा निर्णय थोपवण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरू झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते. +पुलाचे पाडकाम : +मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. +अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला. +पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती : +दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्त्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.[१] +सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9226.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99af941cd805e7d2aeded111121301a4af2d820e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9226.txt @@ -0,0 +1,52 @@ +बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर (१३ नोव्हेंबर, इ.स. १८७३ – १० मार्च, इ.स. १९५९) हे लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.[१] पुणे करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा समावेश होता. + + +प्रिय विकिसदस्य, +विषयः प्रताधिकार संदर्भात +आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे. + +विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. +वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते. +मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी . +महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे. + +साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते. +आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती. +आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. + +काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा: +१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?) +२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते. +३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो. +४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे" + +५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल. + +असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे. +विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही. +सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते + + + + +खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. +पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा. +एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या +[[चित्र:File.jpg]], +[[चित्र:File.png|alt text]] किंवा +[[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा. +आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा. + +आपले विनीत, +साहाय्य चमू +ता.क.: + +जयकरांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीने ’गांधी–आयर्विन करार (१९३१” आणि ’पुणे करार (१९३२)’ या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. +वकील म्हणून त्यांनी भरपूर पैसे मिळविले. त्यांतून त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी टिळक स्वराज्य फंडालाही मोठी देणगी दिलीे होती. प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते. (१९२६–३०) आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगीरूपाने दिले. मुकुंदराव जयकर हे हिंदू महासभेचे संविधान सभेतील सदस्य होते. +’स्टडीज इन वेदान्त’ या इंग्रजी पुस्तकाचे जयकरांनी संपादन केले. त्यांचे हिंदू धर्माविषयीचे विचार त्यांनी ’मराठी मंदिर’ या नियतकालिकातील लेखांद्वारे प्रकाशित केले. +पुणे येथे १९१८ साली भरलेल्या १४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद बॅ.मुकुंदराव जयकरांनी भूषविले होते. २३ एप्रिल १९२३ रोजी गुलबर्गा येथे झालेल्या हैदराबाद सामाजिक सुधार संघाच्या अध्यक्षस्थानी होते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9258.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d89c481c475043ff55053280e9dd9d4cc9d24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9258.txt @@ -0,0 +1,7 @@ +मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या मते, मार्च २०१९ पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि 13 व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.[१] +मुकेश अंबानी यांचा जन्म अदेन, यमन येथे झाला १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी केमिकल टेक्नॉलॉजीच्या संस्थेतून केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. १९८१ पासून रिलायन्स, रिलायन्स या आपल्या कुटुंबातील व्यवसायात मुकेशने आपल्या वडिलांचे धिरुभाई अंबानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. रिटेल मार्केट्स आणि दूरसंचार सारख्या उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी व्यवसायांनी बऱ्याच वर्षांपासून विस्तार केला आहे. रिलायन्सच्या जियोने ५ सप्टेंबर २०१६ रोजी सार्वजनिक प्रक्षेपणानंतर देशातील दूरसंचार सेवांमध्ये पाच स्थान मिळविले आहे. +२०१६ पर्यंत अंबानी ३८व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान  मिळवले आहे.[२] फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत त्यांनी एकमात्र भारतीय उद्योजक आहे.[२] जानेवारी २०१८ पर्यंत, मुकेश अंबानी यांना फोर्ब्सने जगातील १८ व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले. अलीबाबा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांच्या मागे त्यांनी जुलै २०१८ मध्ये ४४.३ बिलियन डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्ती बनली. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बाहेर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील तो आहे. चीनच्या हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार २०१५ पर्यंत, अंबानी भारताच्या परोपकारी लोकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.[३] बँक ऑफ अमेरिकाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. +रिलायन्सच्या माध्यमातून त्यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्स संघाचे मालक देखील आहेत  आणि भारतातल्या फुटबॉल लीगचे इंडियन सुपर लीगचे संस्थापक आहेत. २०१२ मध्ये, फोर्ब्सने त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून नामांकित केले. १$ अब्जापर्यंतचे मूल्य असलेल्या जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासांपैकी ॲंटिलीया बिल्डिंगमध्ये ते राहतात.[२] +मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी यमनच्या एडन येथे झाला. धीरूभाई अंबानी आणि कोकीलाबेन अंबानी हे त्यांचे आई वडील. त्यांचे तीन भाऊबंद आहेत एक धाकटा भाऊ, अनिल अंबानी आणि दोन बहिणी निना भद्रश्याम कोठारी आणि दिप्ती दत्तराज साळगावकर. १९५८ मध्ये वडिलांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुकेश यांनी यमनमध्ये थोड्या काळासाठी वास्तव्य केले.[४] त्यानंतर ते कुटुंबासह यमनहून भारतात स्थायिक झाले. अंबानी कुटुंब विनयशील होते, त्यामुळे मुकेश यांना सांप्रदायिक समाजात जगणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि कधीही भत्ता मिळालेला नसल्यामुळे अंबानींसाठी भारतात सुरुवातीचे जीवन थोडे कठीण सुरू झाले. धीरूभाई यांनी कोलाबा येथे 'सी विंड' नावाच्या १४ मजल्याच्या अपार्टमेंट ब्लॉकची खरेदी केली, जिथे मुकेश आणि अनिल वेगवेगळ्या मजल्यांवर त्यांच्या कुटुंबांसोबत राहत असे. महेंदरभाई यांनी मुकेश आणि त्यांच्या भावंडांची लहानपणी नीट काळजी घेतली, त्यांचे संगोपन केले. मुकेश फुटबॉल आणि हॉकी सारखे सर्व प्रकारचे खेळ खेळत होते. ते गावांना भेटी देत त्यांना त्यात आनंद मिळत असे. मुकेश यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांचा शोध लावला त्यांची नावे आता बदलली आहेत. हे सर्व महेंदरंभाई यांचा देखरेखीखाली आहे. धीरूभाई मुकेशच्या ग्रेडबद्दल फारच काळजी घेत. मुकेश यांनी आपल्या भावाबरोबर पेडर रोड, मुंबई येथील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये भाग घेतला. आनंद जैन हा त्यांचा जवळचा सहकारी होता. त्यांना केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी), माटुंगा येथील केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई पदवी मिळाली. मुकेशने नंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एमबीएसाठी नामांकन घेतले परंतु १९८० मध्ये रिलायन्स बनवण्यास मदत करण्यासाठी मागे घेतले, जी त्यावेळी अद्याप लहान परंतु वेगवान वाढणारी संस्था होती. धिरुभाईंचा असा विश्वास होता की वास्तविक आयुष्यातील कौशल्यांचा अनुभव वर्गामध्ये बसून येत नाही. त्यांनी आपल्या कंपनीतील धातू निर्मिती प्रकल्पाच्या संचालनासाठी मुकेश यांना स्टॅनफोर्ड येथून भारतात परत आणले. मुकेशच्या महाविद्यालयीन वर्षांत विलियम एफ. शार्प आणि मॅन मोहन शर्मा या प्रोफेसरांवर त्याचा प्रभाव पडला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने पीएफवाय (पॉलिएस्टर फिलामेंट यार्न) खाजगी क्षेत्रासाठी निर्माण केले. पीएफवाय उत्पादन संयंत्र उभारण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी परवान्यासाठी अर्ज केला. परवाना प्राप्त करणे ही मोठी प्रक्रिया होती. नोकरशाही व्यवस्थेमध्ये एक मजबूत जोडणी आवश्यक होती कारण त्यावेळी सरकार मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रतिबंधित करीत होते. कापड, धातू आयात करणे अशक्य होते. टाटा, बिर्लास आणि इतर ४३ कठोर स्पर्धेतही, धीरूभाई यांना परवाना राज म्हणून संबोधित केलेला परवाना देण्यात आला. पीएफवाय प्लांट तयार करण्यास मदत करण्यासाठी धिरुभाईंनी त्याचा मोठा मुलगा मुकेश स्टॅनफोर्डमधून बाहेर काढला, जिथे तो एमबीएचा अभ्यास करत होता, कंपनीत त्याच्याबरोबर काम करायचा. त्यानंतर मुकेश यांनी रिलायन्ससाठी काम चालू ठेवले आणि त्यानंतर विद्यापीठात परतले नाही. १९८१ मध्ये कापडांपासून पॉलिस्टर फायबरमध्ये आणि पुढे पेट्रोकेमिकल्समध्ये धातू बनविल्या गेलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचा बॅकवर्ड समेकन वाढला. आपल्या वडिलांसोबत कंपनीत सामील झाल्यानंतर त्या वेळी कार्यकारी संचालक रासभभाई मेसवानी यांना मुकेशसाठी जबाबदार धरले गेले. मुकेश यांना पहिल्या दिवसापासून कंपनीत योगदान देण्याची संधी देण्यात आली होती, जेव्हा ते दररोज रसिकभाई यांना अहवाल देतील आणि त्यांच्याकडून ऑर्डर घेतील. १९८५ मध्ये राशीभाईंचा मृत्यू झाल्यानंतर १९८६ मध्ये धिरुभाई यांना त्रास सहन करावा लागला तेव्हा ही तत्त्वे खेळायला आली. तेव्हा सर्व जबाबदारी मुकेश आणि अनिलकडे गेली. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड (आता रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड) स्थापन केली, जी माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या पुढाकारांवर केंद्रित होती. २४ वर्षाच्या वयात कंपनीला तेल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असताना पातालगंगा पेट्रोकेमिकल प्लांटच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. मुकेशच्या वडिलांनी त्यांना व्यवसायाचा भागीदार म्हणून मानले आणि त्यांना थोड्या अनुभवाशिवाय योगदान देण्याची स्वातंत्र्य देखील दिले.[ संदर्भ हवा ] +६ जुलै २००२ रोजी, मुकेशचे वडील धीरूभाई १६ वर्षांच्या कालावधीत दुसऱ्या प्रहारानंतर मरण पावले. धीरूभाईंच्या मृत्युनंतर त्यांचा साम्राजाचा वितरणावरून मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात तणाव वाढला. त्यांच्या आई कोकिलाबेन यांना भांडणे थांबविण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी असे ठरवले की, मुकेशला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडची जबाबदारी द्यायची. डिसेंबर २००५ मध्ये मुंबई हायकोर्टाने त्याला मंजुरी दिली. अंबानी यांनी भारतातील जामनगर येथे जगातील सर्वात मोठ्या शहरी पेट्रोलियम रिफायनरीचे दिग्दर्शन केले आणि २०१० मध्ये पेट्रोकेमिकल्स, पॉवर जनरेशन, पोर्ट आणि संबंधित पायाभूत सोयींबरोबर एकीकृत ६६०००० बॅरल्स प्रतिदिन (३३ दशलक्ष टन प्रति वर्ष) उत्पादन क्षमता ठेवली. डिसेंबर मध्ये अंबानी यांनी मोहालीतील प्रोग्रेसिव्ह पंजाब समिट येथे भारतातील फोर जी नेटवर्कसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी भारती २०१३ एअरटेलसह "सहयोगी उपक्रम" करण्याची घोषणा केली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9259.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee64393cde948040fd439d7b1aae94ba9ca2e30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9259.txt @@ -0,0 +1 @@ +मुकेश कुमार (जन्म १२ ऑक्टोबर १९९३) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[२] त्याने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताकडून खेळताना कसोटी पदार्पण केले.[३] कुमार इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9299.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1038bfeaef819075b870ad848e16cee921ab6060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9299.txt @@ -0,0 +1,5 @@ +विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेची येरवडा, पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. याची स्थापना दि.२९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयातील एका वॉर्डमध्ये डॉ.अनिता अवचट व डॉ.अनिल अवचट यांनी केली. पु.ल.देशपांडे यांनी सुरुवातीची आर्थिक मदत दिली. मुक्तांगण हे नावही त्यांनीच सुचविले. +व्यसन हा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. हा गुंतागुंतीचा व जन्मभराचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्‍न आपण करू शकतो. ती ओढ निर्माण होण्याची कारणे समजल्यास त्यावर मात करून माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो. +मुक्तांगणच्या उपचार पद्धतीत पुढील काही पायऱ्या आहेत : +भारत सरकारने ‘मुक्तांगण’ मॉडेलला स्वीकारून विस्तार करण्यासाठी मान्यता दिली. सन १९९९ मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरात या पाच राज्यांतील व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ‘मुक्तांगण’वर सोपवली. त्यातूनच ‘रिजनल रिसोर्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर्स’ तयार झाली. आज पाच राज्यांमध्ये १००हून अधिक केंद्रे आहेत. एखाद्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल, तर मार्गदर्शक होईल असं ‘मिनिमम स्टॅण्डर्ड ऑफ केर’ नावाचं मॅन्युअल सरकारनं करायला सांगितलं. ते करण्यातही ‘मुक्तांगण’चा मोठा वाटा होता. भारतात जी ४००हून अधिक केंद्रे व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत, त्यांना ते वापरणं बंधनकारक आहे. +पुणे येथे जानेवारी २००७ला महिलांसाठीचं वेगळं व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले. महिलांसाठी स्वतंत्र असं हे भारतातलं पहिलं केंद्र आहे. पंजाबमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप वाढत असून तिथे एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. त्यामुळं तिथल्या ‘डॉर्स कॅटल’ या कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून फत्तेह फाऊंडेशन या स्थानिक संस्थेच्या मदतीने केंद्र सुरू झाले. पंजाबमध्येच इन्फोसिसच्या सहाय्याने ‘इन्फोसिस- मुक्तांगण डीअ‍ॅडिक्शन सेंटर’ची सुरुवात झाली आहे. हे केंद्र म्हणजे ‘मुक्तांगण’ची पहिली शाखा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9316.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7282e57be56ba934152cfd1eb224376388c643be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9316.txt @@ -0,0 +1,15 @@ +हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला चार प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात. +मुक्ती म्हणजे बंधनापासून सुटका. अविद्येमुळे जिवाला आपल्या मूळ स्वरूपाचा म्हणजे ईश्वरत्वाचा विसर पडतो आणि तो स्वतःला सांत, मर्त्य समजू लागतो, त्या अविद्येपासून आणि मायेपासून सुटका म्हणजे मुक्ती.[१] +०१) समीपता - भक्त भगवंताच्या समीप, जवळ असतो. नित्य सान्निध्य असते. +ही मुक्ती उपासना अथवा पुण्याई मुळे मिळते, असे परंपरा सांगते. +०२) सलोकता - भक्त आणि भगवंत यांचे नित्य साहचर्य असते. इष्ट देवतेच्या लोकांत निवास करणे म्हणजे सलोकता. +विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कुष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो.ही मुक्ती तपामुळे मिळते. +तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप| चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे +वैकुंठा जावया तपाचे सायास | करणे लागे नाश जीवा बहु || - तुकाराम महाराज +०३) सरूपता किंवा सादृश्य - भक्ताच्या कृतीमध्ये आणि स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये भगवंताशी साधर्म्य आढळते. भक्ताला इष्ट देवतेचे रूप प्राप्त होते. +ही मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते. +ध्यानी ध्याता पंढरीराया| मनासहित पालटे काया || - तुकाराम महाराज +०४) सायुज्य - भक्ताचे भगवंताशी पूर्ण ऐक्य झालेले असते. [१] येथे जीव आत्मरुपात विलीन होऊन जातो. [२] +नामामुळे केवळ या चारही मुक्ती मिळतात असे नाही, तर नामापाशी त्या सेविका म्हणून उभ्या असतात असे संत सांगतात. +तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती | ऐसे बहुता ग्रंथी बोलियले || +नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या || diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9319.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb54a5934158b0642976b5143cdeb27153237bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9319.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुक्ती मोहन ही भारताची एक समकालीन नर्तक आहे. तिने हिंदी भाषेतील स्टार वनच्या डान्स रिॲलिटी शोमध्ये  'जरा नचके दिखा' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. ती "मसक्कली गर्ल्स" या विजेत्या संघाचा भाग होती. सोनी टीव्ही वाहिनीवरील 'कॉमेडी सर्कस का जादू' या कॉमेडी शोमध्ये ती कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता.[१] ती नच बलिये ७ या कार्यक्रमावर देखील दिसली.[२] भारतीय गायक नीती मोहन आणि नर्तक शक्ती मोहन तिच्या मोठ्या बहिणी आहेत. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9326.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..544a86bf44ffc6b004ea9699f63da1b3d0e7f97b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9326.txt @@ -0,0 +1,4 @@ +जगातील शिक्षण व्यवस्था ३० ते ३५ वर्षांपासून खूप बदलते आहे. पारंपारिक शिक्षण व्यवस्था लोकसंख्येच्या फ़ार मोठ्या भागा पर्यंत अद्याप पोचलेलीच नव्हती. त्यामुळे उच्च दर्जाचे शिक्षण ही फ़क्‍त उच्च वर्गातील लोकांचीच मक्‍तेदारी झाली होती. मुक्‍त शिक्षण व्यवस्था हे उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांसाठी मुक्‍त करण्याचा प्रयत्न करते. ह्या व्यवस्थेत शिक्षणासाठी प्रवेशावर कमीतकमी निर्बंध असतात. परंतु परिक्षा पद्धतीत मात्र गुणवत्तेची तीच पारंपारिक मानदंड वापरली जातात. +मुक्‍त शिक्षण ही आता बरीच जुनी संकल्पना झाली आहे. जगातील प्रथम मुक्‍त विद्यापीठ इंग्लंडमध्ये सन १९६९ मध्ये स्थापन झाले. आजही ते अत्यंत प्रतिष्ठित आणि गुणवत्तेसाठी नावलौकिक असलेले मुक्‍त विद्यापीठ आहे. आता तर जगातील २० पेक्षा अधिक देशांमध्ये मुक्‍त विद्यापीठे स्थापन झाली आहेत. +प्रत्येक व्यक्‍ति जीवनाच्या प्रत्येक क्षणी नवीन ज्ञान, क्षमता किंवा कौशल्य आत्मसात करीत असतो किंवा त्याचा वापर तरी करीत असतो. वापर करीत असतांना मिळ्णाऱ्या अनुभवातून शिक्षण हे सखोल होत असते. एका अर्थाने जीवन हे एक निरंतर शिक्षणाची प्रक्रिया असते. चांगल्या शिक्षकाची उपस्थिती ह्या निरंतर शिक्षणाच्या प्रक्रियेला जास्त सोपी, आनंददायक, वेगवान व सखोल करू शकते. परंतु शिक्षण घेण्याची मूळ प्रक्रिया ही नेहमीच विद्यार्थ्याच्या आंतरिक इच्छेवर आणि प्रयत्नावर अवलंबून असते. ह्याच कारणाने कुठलीही व्यक्‍ति शिक्षकाच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत देखील सतत शिकू शकते. +मुक्‍त शिक्षणाची सर्वमान्य अशी एकच व्याख्या नाही. वेगवेगळ्या पद्धतीने मुक्‍त शिक्षणाची व्याख्या करतात. परंतु सर्व व्याख्यांमध्ये पुढील वैशिष्ट्ये आढळतात : diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9329.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e0dfae01979594e98668c1e5aa881d3adf150fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9329.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुखडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9338.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759d43c365640337461181181a97cc99b9fb8c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9338.txt @@ -0,0 +1,201 @@ +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 1 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/1 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/1 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/1 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 2 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/2 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/2 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/2 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 3 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/3 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/3 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/3 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 4 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/4 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/4 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/4 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 5 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/5 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/5 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/5 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 6 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/6 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/6 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/6 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 7 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/7 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/7 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/7 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 8 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/8 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/8 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/8 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 9 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/9 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/9 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/9 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 10 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/10 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/10 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/10 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 11 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/11 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/11 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/11 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 12 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/12 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/12 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/12 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 13 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/13 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/13 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/13 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 14 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/14 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/14 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/14 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 15 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/15 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/15 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/15 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 16 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/16 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/16 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/16 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 17 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/17 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/17 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/17 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 18 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/18 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/18 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/18 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 19 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/19 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/19 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/19 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 20 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/20 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/20 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/20 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 21 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/21 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/21 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/21 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 22 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/22 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/22 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/22 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 23 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/23 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/23 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/23 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 24 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/24 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/24 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/24 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 25 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/25 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/25 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/25 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 26 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/26 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/26 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/26 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 27 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/27 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/27 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/27 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 28 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/28 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/28 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/28 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 29 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/29 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/29 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/29 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 30 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/30 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/30 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/30 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 31 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/31 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/31 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/31 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 32 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/32 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/32 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/32 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 33 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/33 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/33 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/33 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 34 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/34 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/34 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/34 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 35 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/35 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/35 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/35 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 36 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/36 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/36 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/36 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 37 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/37 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/37 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/37 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 38 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/38 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/38 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/38 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 39 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/39 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/39 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/39 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 40 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/40 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/40 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/40 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 41 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/41 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/41 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/41 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 42 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/42 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/42 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/42 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 43 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/43 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/43 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/43 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 44 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/44 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/44 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/44 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 45 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/45 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/45 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/45 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 46 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/46 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/46 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/46 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 47 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/47 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/47 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/47 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 48 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/48 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/48 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/48 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 49 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/49 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/49 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/49 +{{../box-footer|}} +{{../box-header|मुखपृष्ठ:मासिक सदर 50 | विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/50 }} +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/50 +विकिपीडिया:मुखपृष्ठ:मासिक सदर/50 +{{../box-footer|}} + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9339.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..455ef90f7a86bee5301488f07c3df0d95b182084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9339.txt @@ -0,0 +1,70 @@ + सर्व पाने + मुखपृष्ठ सदरे + उदयोन्मुख सदरे + विकिप्रकल्प मोबाईल ? + काय लिहू + इतर काय लिहीताहेत + चावडीवर चर्चा करा + पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा + विविध प्रस्तावांवर कौल द्या +९७,०८२ लेखांमध्ये शोधा +हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. +हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही. +दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला. +ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले. +१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत. +पुढे वाचा... +मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक + मोबाईल ? + + +जन्म: +मृत्यू: +जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५ +संग्रह + +विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: +हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. +हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही. +दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला. +ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले. +१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत. +पुढे वाचा... +मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक + मोबाईल ? +मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा +पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग +जन्म: +मृत्यू: +जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५ +संग्रह + +फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते. +ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले. +रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे. +रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले. +(पुढे वाचा...) +मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा +वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे. +मागील अंक +पुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान +भूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला +नृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक • +श्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते • +• पराश्रद्धा • फलज्योतिष • +• अश्रद्धा • नास्तिकता +तंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी +विज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती +भाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा +क्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड +व्यक्ती आणि वल्ली +व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक +इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये +पर्यावरण +पर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट + +१,००,०००+ : हिंदी , उर्दू , तमिळ, बंगाली. +५०,०००+ : तेलुगू, मल्याळम. +१०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी. +विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9352.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4947b591fc4109ff2521c1f26913bdd88e91c88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9352.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9359.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edfc8699693ea57191c346dcda8a06a36e60c9fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9359.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिंदू धर्मातील सर्वाधिक प्राचीन आणि सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या निवडक उपनिषदांना ‘मुख्य उपनिषदे’ असे म्हणतात. यांची रचना इसवी सन पूर्व आठशे ते इसवी सनाच्या आरंभापर्यंत झाली असावी. या उपनिषदांचा वैदिक परंपरेशी संबंध आहे. वासाहतिक काळातील भारतविदांनी खालील दहा उपनिषदे मुख्य उपनिषदे मानलेली आहेत. +वेदांताच्या प्रमुख संप्रदायांच्या संस्थापकांनी (उदा. आदि शंकर आणि मध्वाचार्य) या दहा मुख्य उपनिषदांवर भाष्ये लिहिलेली आहेत. +होली बुक्स या संकेतस्थळावर दहा मुख्य उपनिषदांची पीडीएफ संचिका आहे. दुवा : https://holybooks-lichtenbergpress.netdna-ssl.com/wp-content/uploads/The-Ten-Principal-Upanishads.pdf[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9392.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0dc77504734353538a94042dde76ba705ddc516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9392.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुग्धा चिटणीस (१८ फेब्रुवारी १९६५ - १० एप्रिल १९९६) ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार होत्या. त्यांनी इ.स. १९८६ मध्ये 'माझं घर माझा संसार' या एकमेव चित्रपटात काम केले होते. ५ डिसेंबर १९९५ साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि १० एप्रिल १९९६ साली वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचा मुंबई येथे राहत्या घरी मृत्यू झाला.[२] +मुग्धा चिटणीसचा जन्म १८ फेब्रुवारी १९६५ साली अशोक चिटणीस आणि शुभा चिटणीस यांच्या पोटी झाला होता. चिटणीस यांनी भारतीय चित्रपट अभिनेते अजिंक्य देव सोबत इ.स. १९८६ मध्ये 'माझं घर माझा संसार' या एकमेव मराठी चित्रपटात काम केले होते.[३] तद्नंतर चिटणीस यांचे उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. भारत आणि अमेरिकेत चिटणीस यांनी जवळपास ५०० पेक्षा जास्त कथाकथनचे कार्यक्रम सादर केले होते. भारतात ऑल इंडिया रेडिओ वर सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले होते.[४] +चिटणीस यांची मुलगी मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती तेव्हा त्यांचा कॅन्सर ने मृत्यू झाला होता. ईशाचा जन्म न्यू यॉर्क मध्ये झाला होता. आईच्या मृत्यू नंतर ईशा काहीकाळ आजोळी आपल्या आजी आजोबा सोबत राहिली होती. त्या नंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.[४] अमेरिकन परराष्ट्रमंत्रालय आणि न्यू यॉर्क युनिव्हसिटी तर्फे मेरिटच्या आधारावर ईशाने आपल्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला. न्यूर्यॉक विद्यापीठासह जगभरात हुशार विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची मानली गेलेली फुलब्राइट नावाची शिष्यवृत्ती सुद्धा ईशाने मिळविली आहे.[१] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मुग्धा चिटणीस चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9398.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011e325fa79a51a1a474dfaa741423dd5f2ec769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9398.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मुघल-ए-आझम (हिंदी: मुग़ल-ए आज़म ; उर्दू: مغلِ اعظم ; रोमन लिपी: Mughal-e-Azam) हा इ.स. १९६० साली चित्रपटगृहांत झळकलेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. के. आसिफ याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार व मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुघल इतिहासातील कथाविषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी ९ वर्षांचा अवधी, तर १.५ कोटी भारतीय रुपये खर्च लागला. या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम केला. हा विक्रम शोले या इ.स. १९७५ सालातल्या हिंदी चित्रपटाने तोडेपर्यंत अबाधित राहिला. मुघल-ए-आझम चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9426.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67ddef3793f077a886ae96ced9a49254d0bdbe10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9426.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुजीब १०० टी२० कप बांगलादेश २०२०[१] ही दोन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय टी२०आ मालिका होती, जी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) द्वारे आयोजित केली जाणार होती. मार्च २०२० मध्ये आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन संघांमध्ये दोन सामने खेळवले जाणार होते.[२] या सामन्यांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी केली असती.[३] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या दोन सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे.[४] २५ फेब्रुवारी २०२० रोजी, बीसीबी ने सामन्यांसाठी दोन तात्पुरती संघांची नावे दिली.[५] तथापि, ११ मार्च २०२० रोजी, कोविड-१९ महामारीमुळे सामने "पुढील सूचना मिळेपर्यंत" पुढे ढकलण्यात आले.[६] +नोव्हेंबर २०१९ मध्ये, बीसीबी ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या सात खेळाडूंना आशिया इलेव्हन संघाचा भाग बनवण्याची विनंती केली.[७] मूलतः, या मालिकेतील पहिला सामना ज्या दिवशी आहे त्याच दिवशी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळणार होता.[८] तथापि, जानेवारी २०२० मध्ये, बीसीबी ने जाहीर केले की पहिला टी२०आ सामना २१ मार्च २०२० रोजी होईल, त्यामुळे वनडे सामना टाळला.[१] २६ डिसेंबर २०१९ रोजी, बीसीसीआय चे संयुक्त सचिव, जयेश जॉर्ज यांनी सांगितले की जर भारतीय खेळाडू आशिया इलेव्हन चा भाग बनणार असतील तर, सध्याच्या भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामुळे पाकिस्तानमधील कोणत्याही खेळाडूला खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. बीसीबी ने विनंती केल्यानुसार सात पैकी पाच भारतीय क्रिकेट खेळाडू, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी निवडलेल्या आशिया इलेव्हन संघासाठी खेळतील.[९] तथापि, बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने हा दावा नाकारला आणि म्हटले की नैतिक आधारावर त्यांचा असा कोणताही हेतू नाही.[१०] त्यानंतर, एका दिवसानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष एहसान मणी यांनी पुष्टी केली की २०२० च्या पाकिस्तान सुपर लीगच्या वेळापत्रकाशी तारखा जुळत असल्याने या स्पर्धेसाठी कोणतेही पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू उपलब्ध होणार नाहीत.[११][१२] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9432.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9781f372cd7c507fc4e73eea5dac0ecd4b6ee967 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9432.txt @@ -0,0 +1 @@ +मुझफ्फर हुसेन बेग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9448.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9448.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9468.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ae9562018a3beb4f08e0049fab332445758e3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9468.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुठावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9486.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..173d78eb9063a44b8160b0b11bd325100ae60858 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9486.txt @@ -0,0 +1 @@ +मुतळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9520.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..812f84973c8928a77cdd08cc7ae820d57a7347a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9520.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मुदखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9531.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fd5e67fdee55fa80c039dbcbb95d2b3f04fdb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9531.txt @@ -0,0 +1 @@ +मुदीगेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघात असून चिकमगळूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9543.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ab10c62372c0fb0749fecfb88ef6955c10b58af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9543.txt @@ -0,0 +1 @@ +मुद्देबिहाळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9570.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3ffc501ae43d534e95a18666bfec9f25e93de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9570.txt @@ -0,0 +1 @@ +मुनाबाओ (लेखनभेद: मुनाबाव) हे भारताच्या राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9598.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16e3fa34628054c013a1cbc004e08712dedc86c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9598.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुबारकपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_96.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_96.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ced18cdd4bd93a95538b60049c3b94fde21c398 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_96.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हटले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत, तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहीर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगीते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांमध्ये वाजवली जातात.[१][२][३][४][५][६][७] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9603.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba5193ce2bb0ecb4339aff1f0360d2d5af6f5220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9603.txt @@ -0,0 +1 @@ +मुमताज (जन्म : ३१ जुलै १९४६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० व १९७० च्या दशकांदरम्यान अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या मुमताजला १९७० सालच्या खिलौना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. राजेश खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेत तिने १० चित्रपटांमध्ये काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9604.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de0ce701ddc4d660cb2adaf524d0937e97af977e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9604.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुमताज अन्सारी ( सप्टेंबर २६,इ.स. १९४७) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कोडर्मा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. +ऑक्टोबर २००३ मध्ये अन्सारी गूढ रित्या गायब झाले. पोलीस तपासामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. अन्सारी ह्यांची हत्या करण्यात आली असल्याची भिती त्यांच्या परिवाराने व्यक्त केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9606.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..970cc13eedfc211ef56a0a5308a115dedf82266c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9606.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोक्षाची तीव्र इच्छा असणाऱ्या व्यक्तीस मुमुक्षु म्हणतात. +या तीव्र इच्छेस मुमुक्षता म्हणतात. मोक्ष म्हणजे ब्रम्हप्राप्ति आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9621.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8cc896c9e77b94ae747b19d5d4a3842340010b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9621.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरंबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9642.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7e5158dbb417e8e7e3c28160f5a50e7974a4d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9642.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुरती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9649.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c017f61106b166f5b38846c660f6849597bab108 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9649.txt @@ -0,0 +1,18 @@ +मुरबाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५३२ कुटुंबे राहतात. एकूण ३००४ लोकसंख्येपैकी १४८० पुरुष तर १५२४ महिला आहेत. गावाची साक्षरता ३४.४२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४२.६१ आहे तर स्त्री साक्षरता २६.६५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६४२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २१.३७ टक्के आहे.वाडवळ, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी,सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +भावडी, कोसेसरी, वेती, पिंपळशेत बुद्रुक, वनगरजे, चिंचणी, थेरुंडे,कवडास, आंबेघर धरमपूर, वनाई, चंद्रनगर ही जवळपासची गावे आहेत.मुरबाड समूह ग्रामपंचायतीमध्ये मुरबाड, पिंपळशेत बुद्रुक,आणि वनगरजे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9681.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83b624144eaed97328d8c02cfaece0f57e77dd37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9681.txt @@ -0,0 +1,19 @@ + + +मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते .याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. +मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. +त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. +गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना [ संदर्भ हवा ] गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. +१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.[१] +बाबा आमटे +आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई तसेच आजही काही लोक ते अंधश्रद्धेमुळे तसे मानतात. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी (तुळशीराम) पाहिला[२]. ते त्याला घरी घेऊन आले. गांधींनी ज्याला गौरविले होते अश्या अभयसाधकाला त्या कुष्ठारोग्याला पाहून भीती वाटली. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.[३]. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. +असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवाऱ्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली. +भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण [ संदर्भ हवा ] ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे. +सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्‍नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो. +बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. +एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती.साचा:Fact गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.साचा:Fact +संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित रहात असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली. +फेब्रुवारी ९, इ.स. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत. +इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या. +बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य  पुढे नेत आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9700.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6efe0fb63e2cea7177a7830489beaf3056b3144f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9700.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट मुराकामी ((村上天皇; मुराकामी तेन्नो) (१४ जुलै, ९२६:क्योतो, जपान - ५ जुलै, ९६७) हा जपानचा ६२वा सम्राट होता. त्याचे मूळ नाव नारिकिरा शन्नो होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9717.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3850469865cda7eacf430074827af75eaf7c3abe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9717.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरादपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9748.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c188bf86946cf455df22408410105e040078a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9748.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 14°5′37″N 74°29′1″E / 14.09361°N 74.48361°E / 14.09361; 74.48361 + +मुरुदेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या १५० किमी उत्तरेस स्थित आहे. मुरुदेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वितीय क्रमांकाच्या उंच शंकराच्या मूर्तीसाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वरची कथा शिवपुराणामध्ये पहावयास मिळते. +मुरुदेश्वर राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9755.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ee916f22221108a634081186094fc35de93a86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9755.txt @@ -0,0 +1,10 @@ +१८° १९′ ४८″ N, ७२° ५७′ ३६″ E + मुरूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक शहर आहे. +मुरूड-जंजिरा किल्ला, समुद्र किनारा लाभला असल्याने विविध ठिकाणा वरून पर्यटक येतात मुरूडला येण्यासाठी मुंबई - पुण्यावरून अलिबाग रेवदंडा मार्गे येता येते तर रोहा वरून भालगाव, व केळघर मार्गे येता येते. इंदापूर - तळा - आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग 548A मुरूड तालुक्यातून जातो. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. येथे मोठ्या प्रमाणावर डोंगर भाग आहे +मुरूड तालुका पर्यटकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा तालुका आहे. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय, शेती, नारळी सुपारी यांचा बाग, मासेमारी याच्यावर येथिल लोकजीवन अवलंबून +मुरूड तालुका हा विविधतेने नटलेला तालुका आहे येथे फणसाड अभयारण्य , मुरूड समुद्र किनारा , काशिद समुद्र किनारा , नवाब राजवाडा, जंजीरा किल्ला , पद्मदुर्ग (कासा), +साळाव येथील बिर्ला समूहाचे गणपती मंदिर, नांदगाव येथे सिद्धीविनायक मंदिर , कोर्लई लाईट हाऊस , कोर्लई किल्ला तसेच पोर्तुगीज चर्च +मुरूड येते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे येथुन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी विविध हॉटेल , कॉटेज आहेत, मुरूडला पाणी पुवठ्यासाठी गारंभी व खाराआंबोली धरण येथून पाणी पुरवठा केला जातो. येथे तहसील कार्यालय, तालुका दिवाणी न्यायालय , पोलीस ठाणे , वन विभाग यांचे कार्यालय आहेत. आगरदांडा हे येथील बंदर आहे. +येथे वसंत राव नाईक कला महाविद्यालय , तसेच विविध शिक्षण संस्था आहेत. मुरूड येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहे व इतर खासगी रुग्णालय व दावाखाने आहेत +साळाव , कोर्लई, बोर्ली, विहुर, काशिद, नांदगाव, माजगाव, राजपुरी, आगरदांडा, शिघ्रे, एकदरा, हजिफखार, मिठागर, भोईघर, महळूंगे, मांडला, फणसाड, सतिर्डे, येसदे, चोरढे, वाळके, सुपेगाव diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_980.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d8442da7d7ddcb74e5cfde36f548f054e09fca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_980.txt @@ -0,0 +1,2 @@ + मंगरूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9800.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363f09718e78d9384ad5646370c6f0d3a0422324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9800.txt @@ -0,0 +1,3 @@ +१९° ४१′ ००″ N, ८०° ००′ ००″ E + +मुलचेरा हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9805.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579eb80ce19d91188db71b22269689294e76b1cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9805.txt @@ -0,0 +1 @@ +राग मुलतानी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9834.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5c80fafe1d055f4d264cbf9c6c31b587917b50d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9834.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुलुंड विधानसभा मतदारसंघ - १५५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुलुंड मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २४८६ ते २४८८ यांचा समावेश होतो. मुलुंड हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे मिहिर चंद्रकांत कोटेचा हे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9841.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eac85eb2c7e346943db00c29dbcb278f38667fcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9841.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मुलैतीवू हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६१७[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मुलैतीवू जिल्ह्याची लोकसंख्या २,२०,३११[४] होती. + +मुलैतीवू जिल्हयात ५[१] विभाग सचिव आणि ४[२] प्रदेश्य सभा आहेत. ५ विभागांचे अजुन १२७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9848.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ad43556547b93e8c4fe441d8a8a85dadcf71b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9848.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुल्ला उमर (इ.स. १९६०:चाह-इ-हिम्मत, कंदाहार प्रांत, अफगाणिस्तान - इ.स. २०१३) हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता. +सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. कंदाहार ही त्यांची राजधानी होती. फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेची पाकिस्तानमधील शाखा होती. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला. +सोव्हिएतच्या फौजांशी झालेल्या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते. +तालिबानने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. तालिबानमधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9854.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ad43556547b93e8c4fe441d8a8a85dadcf71b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9854.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुल्ला उमर (इ.स. १९६०:चाह-इ-हिम्मत, कंदाहार प्रांत, अफगाणिस्तान - इ.स. २०१३) हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता. +सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. कंदाहार ही त्यांची राजधानी होती. फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेची पाकिस्तानमधील शाखा होती. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला. +सोव्हिएतच्या फौजांशी झालेल्या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते. +तालिबानने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. तालिबानमधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9864.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78393704a16206fe692edd3934f329b376d70cfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9864.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_987.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9908edf913f4aaa63d2714339aae8c96badce16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_987.txt @@ -0,0 +1 @@ +मंगरूळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9875.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85df8e8a82f43696399ca5235f5fa709a2e77244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9875.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुळशी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. +आडगाव (मुळशी) आडमाळ अकोले (मुळशी) आमराळेवाडी अंबरवेत आंबावणे (मुळशी) आंबेगाव (मुळशी) आंदेशे आंदगाव अंधाळे आसडे (मुळशी) बारपे बुद्रुक बावधन बुद्रुक बेलवडे बेंभटमाळ भडास बुद्रुक भालगुडी भांबर्डे (मुळशी) भारे भारेकरवाडी भेगाडेवाडी भोडे भोईणी भोईरवाडी (मुळशी) भुगाव भुकुम बोतारवाडी चाळे (मुळशी) चांदे (मुळशी) चांदिवली (मुळशी) चिखलगाव (मुळशी) चिखली बुद्रुक चिंचवड (मुळशी) डाखणे (मुळशी) दारावळी दासवे दत्तावाडी दत्तवाडी (मुळशी) डावजे देवघर (मुळशी) धाडावळी धामणओहोळ डिसाळी डोंगरगाव (मुळशी) एकोळे गडाळे गावडेवाडी (मुळशी) घेराविटणगड घोटावडे (मुळशी) घुटके गोडांबेवाडी हडशी हिंजवडी (मुळशी) होताळे हुळावळेवाडी जांबे जामगाव (मुळशी) जातेडे जावळ (मुळशी) कलमशेत करमोळी कासरआंबोली कासरसई काशिग कातरखडक काटावाडी केमसेवाडी खांबोळी खारवडे खेचरे खुबावळी कोळवडे (मुळशी) कोळवली (मुळशी) कोळोशी (मुळशी) कोळवण (मुळशी) कोंढावळे (मुळशी) कोंढुर कुळे कुंभोरी लवाळे (मुळशी) लव्हार्डे मादेड महाळुंगे (मुळशी) माजगाव (मुळशी) माळे (मुळशी) मालेगाव (मुळशी) माण (मुळशी) मारणेवाडी मरूंजी मातेरेवाडी मोरेवाडी (मुळशी) मोसेखुर्द मुगाव (मुळशी) मुगावडे मुकाईवाडी मुळखेड मुळशीखुर्द मुठे नांदे नांदगाव (मुळशी) नांदिवली (मुळशी)नाणेगाव (मुळशी) नेरे (मुळशी) निवे (मुळशी) पडाळघर पडाळघरवाडी पळसे पठारशेत पौड पेठशहापूर पिंपलोळी (मुळशी) पिंपरी (मुळशी) पिरंगुट पोमगाव रावडे रिहे साईवखुर्द साखरी (मुळशी) साळतर सांभवे सातेसई सावरगाव (मुळशी) शरे शेडणी शिळेश्वर शिंदेवाडी (मुळशी) शिरवली (मुळशी) सूस तैलबैला ताम्हिणी बुद्रुक टाटातलाव ताव टेमघर (मुळशी) उगावळी उरावडे वडगाव (मुळशी) वाळणे (मुळशी) वांद्रे (मुळशी) वेडे वेगरे विसाखर विठ्ठलवाडी (मुळशी) वडवली (मुळशी) वाजळे वाळेण वारक (मुळशी) वातुंडे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9880.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9757f433b38bb0c80b7ed93bd7f5f51bdb683a70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9880.txt @@ -0,0 +1,51 @@ +मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे.[१] ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो.[२] ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते.[ संदर्भ हवा ] +लवासा या गिरिस्थानाकडे जाताना टेमघर धरण लागते. हे मुठेवरचे पहिले धरण आहे. येथून लवासाला जाण्यासाठी डावीकडे वळले की उजवीकडचा दुर्गम कच्चा रस्ता जांभळी गावापासून पुढे निरगुडवाडीला जातो. त्यापुढचा रस्ता मात्र पायी ट्रेकिंग करत जावे असा आहे. साधारण दहा किमी अंतरावर मांडवखडक वस्तीजवळ मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे.[ संदर्भ हवा ] +उगमानंतर काही अंतरावर मुठेचे लहान मुलाप्रमाणे अवखळपणे दुडदुडणारे रुपडे दिसते. नंतर सांगरुणला आंबी नदी मुठेला येऊन मिळते. या जोडनदीला थोड्याच अंतरावर मोसे नदीसुद्धा येऊन मिळते. हा त्रिवेणी संगम आहे. मुठा नदी ही प्राचीन नदी आहे. +संगम +नदी काठची गावे +मुठा नदी पश्चिम घाटातील वेगरे या गावी उगम पावते. वेगरे पुण्यापासून पश्चिमेला सुमारे ३५ कि.मी. आहे. तेथून लवार्डे, माळे, मुठे, सांगरुण, खडकवासला असा प्रवास करत ती पुणे शहरात येते. +खडकवासला धरणाच्या अलीकडे आंबी व मोशी ह्या मुठेच्या उपनद्यांचा संगम होतो व तो एकत्रित प्रवाह मुठेला मिळतो. +पुणे शहरात मुठा ही मुळा नदीला मिळते, ह्या जागेला मुळा-मुठा संगम म्हणतात. तेथे संगमेश्वराचे मंदिर आहे. तेथील घाट अहिल्यादेवी होळकर ह्यानी बांधला आहे, असे म्हणतात. मुळा-मुठा नदी म्हणून ही पुढे जाते, पुणे जिल्ह्यातील रांजणगांव सांडस येथे भीमा नदीला मिळते. हा मुळा आणि मुठा ह्या नद्यांचा शेवट आहे कारण इथून पुढे त्या भीमेचा भाग म्हणून वाहतात. भीमा नदी पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदी आंध्रप्रदेशात विजयवाडा येथे बंगालच्या उपसागराला मिळते. +दख्खनच्या पठाराला पूर्वेकडे उतार असल्याने ह्या भागातील बहुतेक नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात.[ संदर्भ हवा ] +मुठा नदीच्या आंबी व मोशी (किंवा मोसे) ह्या दोन उपनद्या आहेत. +किरकिटवाडी ओढा, कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा, आंबील ओढा, नांदोशी, शिवणे, वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे व नागझरी हे मुठेला मिळणारे काही ओढे आहेत. पूर्वेला नागझरी, पश्चिमेला आंबील ओढा व उत्तरेला मुठा अशा ठिकाणी पुणे शहर वसले. दोन नद्यांचा संगम आपल्या संस्कृतीत पवित्र मानला जातो. मुळा-मुठा नदीच्या संगमाजवळची वस्ती, म्हणून तिचे नाव पुण्यविषय पडले. पुण्यविषय, पुण्यकविषय, पुणेवाडी म्हणून ओळखले जाणारे हे गाव पुढे पुणे म्हणून प्रसिद्ध लागले. +आंबील ओढ्यावरच नानासाहेब पेशव्यांनी बांधून अंमलात आणलेली प्रसिद्ध “कात्रज नळ योजना” होती. या योजनेचे पाणी नाना फडणविसांच्या वाड्यासमोरच्या नाना हौदात येत असे. +नागझरी ही एकेकाळी नदी होती. हिच्या काठावर काही प्रेक्षणीय मंदिरे आहेत. +पुरातत्त्वीय +ऐतिहासिक घटना +१२ जुलै १९६१ साली पानशेत धरण फुटून पुण्यात महाप्रचंड पूर आला आणि पुणे शहराला जी धरणे पुढे वर्षभर पाणी-पुरवठा करणार, ती त्या दिवशी केवळ काही तासांत पूर्ण रिकामी झाली. पानशेत धरण परत बांधावे लागले. हे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले तर खडकवासला धरणाची दुरुस्ती होऊन १९६५ सालपासून त्यात पाणी साठविणे शक्य झाले. तोपर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यात ह्या ओढ्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.[ संदर्भ हवा ] +धरणे +बंधारे +कालवे +उपजीविका +शेती +मासेमारी +उद्योग +पर्यटन + +पूल +दळणवळण +सांडपाणी व्यवस्थापन +जल वाहिन्या +व्यावसायिक वापर +तीर्थक्षेत्र (घाट, इ.) + +परिसंस्था +जैव विविधता +वनस्पती +प्राणी +बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी +पाण्याची गुणवत्ता +मुठा नदी शिवणे येथे कुंठित झाली आहे. आसपासच्या गावांचा कचरा आणि सांडपाणी त्यात मिसळते. येथून पुढे मुठा नदी पुणे शहरात प्रवेश करते. +या नदीत झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे यातील माशांच्या १२० प्रजातींपैकी फक्त १६ प्रजाती आता शिल्लक आहेत. पुणे शहरात आल्यानंतर या नदीमध्ये केवळ दोन जातीचे मासे आढळतात. [३] +मैलापाणी वहन +सांडपाणी +घन कचरा +राडारोडा +उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन +शेतीद्वारे होणारे उत्सर्जन +उघड्यावर शौच +सण, उत्सव, धार्मिक विधी मुळे होणारे प्रदूषण +समाजावर होणारे परिणाम + + आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी  · नाग नदी  · नीरा नदी  · पवना नदी  · भामा नदी  · मांडवी नदी  · मीना नदी  · मुठा नदी  · मुळा नदी  · मोसी नदी  · वेळवंडी नदी diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9884.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ce5aba5bf3904c55f1414d83fd2f90074cc3735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9884.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. ही प्राचीन नदी आहे. उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव((नांदूर) (तालुका राहुरी)(जिल्हा अहमदनगर) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी कॉंक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला 'ज्ञानेश्वर सागर' असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मासेमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.[ संदर्भ हवा ] +पुढे मुळा नदी राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे आणि राहुरीच्या सीमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे प्रवरा नदीला मिळते, त्या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर असून निसर्गरम्य असे वातावरण आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. +पुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे. +पहा: जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9898.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdeafd9217f954721c6297837112ebeaf6500c52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9898.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुळीकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9915.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee90daa178a41613be0c4136c7c423badd156977 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9915.txt @@ -0,0 +1 @@ +मुश्ताक अहमद मलिक (उर्दू: مشتاق احمد ملک ; २८ जून, इ.स. १९७० - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9926.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb31459b972fb4a2e4ff1ca85ec45a2603bfbe51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9926.txt @@ -0,0 +1,6 @@ +आबालाल रहिमान (१८६० - डिसेंबर २८, १९३१) वास्तववादी चित्रशैलीतील चित्रांकरता प्रसिद्ध असलेले एकोणिसाव्या शतकातील मराठी चित्रकार होते. +आबालालांचा जन्म १८६० साली कोल्हापुरात झाला. त्यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखित व सुलेखन, चितारकामाने सजवलेल्या प्रती बनवण्याचे काम पिढीजात केले जात होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात कारकून होते. ते फारसीमध्ये पारंगत होते. बालपणी आबालाल कुराणाची हस्तलिखिते रंगविण्यात वडलांना मदत करीत. त्यातूनच त्यांना बालवयात चित्रकलेची गोडी लागली. त्यांचे शिक्षण सहाव्या इयत्तेपर्यंत राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांना मराठी, संस्कृत, अरबी व इंग्रजी या भाषा येत होत्या. एका ब्रिटिश रेसिडेन्टच्या पत्नीने आबालाल यांची चित्रे पाहिली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईला पाठविण्यासाठी घरच्यांना प्रवृत्त केले. शाहू महाराज व रिजन्सी कौन्सिल यांच्या आर्थिक मदतीने ते मुंबईला गेले.[१] +१८८८ मध्ये त्यांच्या एका चित्राला व्हाईसरॉयचे सुवर्णपदक प्राप्त झाले होते. तेव्हापासून जे. जे. मध्ये सुवर्णपदक देण्याची पद्धत सुरू झाली. रावबहादुर धुरंधर, माधवराव बागल हे चित्रकारदेखील त्यांना आपले गुरू मानत. आबालाल यांची ‘रावणेश्र्वर’ आणि ‘संध्यामठ’ ही दोन चित्रे खूप गाजली. या दोन चित्रांवरून त्यांचे कौशल्य दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता, रसिक या जगात राहिला नाही म्हणून त्यांनी आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली. आबालाल मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा या असामान्य व संवेदनशील चित्रकाराचे १९३१ मध्ये निधन झाले.दिल्लीतील एका कलादालनासह कोल्हापुरातील न्यू पॅलेस व टाऊन हॉल येथील कलादालनांत त्यांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत.[२] +आबालाल रहिमान १८८८ पर्यंत मुंबईत होते. १८८० ते १८८८ या काळात त्यांनी आर्ट स्कूल मध्ये केलेली कामे स्कूलच्या जुन्या रेकॉर्डमध्ये पहावयास मिळतात. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्रांच्या एका संचासाठी त्यांना व्हॉईसरॉयचे (लॉर्ड डफरीन त्यावेळचे व्हॉईसरॉय) सुवर्णपदक देण्यात आले. गुळगुळीत पावडर शेडिंगच्या काळातही आबालाल यांनी रेखाचित्रांमध्ये स्वतंत्रपणे प्रस्थापित केलेली शैली पाहून त्यांच्यातील अभिजात कलागुणाची साक्ष पटते. स्कूल ऑफ आर्टमधील त्या वेळच्या अध्यापक वर्गात आबालालांविषयी किती आदर होता, याचा रावबहादुर धुरंधरांनी आपल्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलेला आहे. कुणा इतर कलावंतांशी तुलना करून आबालाल यांच्यातील कलागुणाची महती पटवून देण्याचे कारण नाही. त्यांच्या चित्रांच्या सान्निध्यात अपरिमित आनंद प्राप्त करून देणाऱ्या ज्या दृक् संवेदना होतात. त्यांतूनच आबालाल यांच्यातील कलासामर्थ्याची प्रचिती येते.[३] +आबालाल हे एक संवेदनाक्षम व प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या तंत्रपद्धती वापरून चित्रनिर्मिती केली असे त्यांचे शिष्य सांगतात. म्हणूनच त्यांची चित्रे ठरावीक ठशाची वाटत नाहीत. चित्रकला त्यांच्या बाबतीत केवळ व्यवसायाची बाब नव्हती तर ती एक प्रेरणाशक्ती होती. त्यांच्या अंतर्दृष्टीपुढे अव्याहतपणे असंख्य प्रतिमा एकामागून एक सरकू लागत. त्यांचे संबंध व्यक्तिमत्त्व त्या व्यापून टाकत. मग ते त्यातील मिळतील तेवढ्या प्रतिमा आपल्या माध्यमामधून अनुभवू पाहत. अशा अव्याहतपणे चाललेल्या मंथनातून कधी पंधरावीस हजार चित्रे घडली हे त्यांनासुद्धा समजले नाही. +पहिल्या चित्रापासून ते अखेरच्या चित्रापर्यंत त्यांचा शोध चालूच होता आणि तरीसुद्धा कोल्हापूरसारख्या कलाक्षेत्रातील घडामोडींच्या दृष्टीने फारशा घटना न घडणाऱ्या अशा एकांतस्थळी सन १९२०-२१ च्या सुमारास आबालालना ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारांत पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले. यावरून त्यांच्या प्रतिभेची झेप केवढी होती हे ध्यानी येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9932.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3055c92636adb7727007d4f399c004b114c6cae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9932.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुसलमान वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9942.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2799bd0ad7dbf9526711db030e853fff8951940c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9942.txt @@ -0,0 +1 @@ +मौसल पर्व महाभारताच्या १८पैकी १६वे पर्व आहे. यात उपपर्वे नसून ८ अध्याय आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9967.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..721a150ceca6970f2ae9b7487f3e4bab85aa15e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9967.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9970.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac286e970590a387afd9aa93161fb3690d784232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9970.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुस्तफिझुर रहमान (६ सप्टेंबर, १९९५:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने जलदगती गोलंदाजी करतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9994.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..034dfbf61629a0e56f571de1897e206ed8012e82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9994.txt @@ -0,0 +1,3 @@ +अखिल भारतीय मुस्लिम लीग हा ब्रिटिश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३० डिसेंबर १९०६ रोजी झाली. +लोकमान्य टिळकांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९१५ च्या दरम्यान महात्मा गांधीचा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला व टिळकांच्या निधनानंतर ते काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले. १९२० ते १९४७ या कालखंडात भारतीय स्वातंत्र्याचा लढा त्यांनी चालविला, भारतीय राजकारणात काँग्रेस ही जशी प्रमुख शक्ती होती, त्याचप्रमाणे दुसरीही एका शक्ती होती. ती शक्ती म्हणजे मुस्लिम लीग होय. +१ ऑक्टोबर १९०६ रोजी आगाखान यांच्या नेतृत्वाखाली व्हाइसराॅय मिंटो यांना भेटले. या लहानशा घटनेतून मुस्लिम लीगच्या स्थापनेस चालना मिळाली व मुसलमानांच्या स्वतंत्र राजकीय जीवनाला संघटनेचे अधिष्ठान प्राप्त झाले. मुसलमानांच्या स्वतंत्र राजकीय संघटनेची स्थापना करण्यास ब्रिटिशही कारणीभूत होते. लॉर्ड मिंटो यांनी लावलेली फुटीरतेची व जातीयवादाची विषवल्ली फोफावण्यास वेळ लागला नाही. स्वतंत्र मतदार संघ व लोकसंखेच्या मानाने जास्तीचे प्रतिनिधित्व यासंदर्भात मिंटोचे आश्वासन मिळताच मुस्लिम नेत्यांनी आपल्या हालचाली वाढविल्या. १९०६ च्या डिसेंबर महिन्यात ' मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स ' चे अधिवेशन भरले. यात डाक्क्याचे नवाब सलीमउलल्ला यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार डाक्का येथे विकार- उल- मुल्क यांच्या ध्यक्षतेखाली मुस्लिम नेत्यांची बैठक झाली. नवाब सलीमउलल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा ठराव मांडला. तर हकीम अजमलखान यांनी त्यास अनुमोदन दिले व अशाप्रकारे डिसेंबर १९०६मध्ये मुस्लिम लीगची विधिवत स्थापना झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9997.txt b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e10fe2685654b4ef742acbf805d0c4e85fc28564 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_1/wiki_s7_9997.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुस्लीमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/