diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10039.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34770485cdbb534e54035cd112ad2dc6d7e974b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10039.txt @@ -0,0 +1,2 @@ +पश्मी ही भारतातील कुत्र्याची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. कुत्र्याची ही जात मुख्यतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. आता हा घर राखण्यासाठी पाळला जातो. +हे श्वान सामान्य कुत्र्यापेक्षा उंच असते, ह्याचे तोंड लांबट असते. शेपटीवर व कानांवर जास्त केस असतात. ही कुत्री आक्रमक असतात. ही श्वाने बहुधा पांढऱ्या,करड्या किंवा काळ्या रंगाची असतात. यांचा आवाज इतर कुत्र्यांपेक्षा मोठा असतो. यांना अनोळखी माणसांनी स्पर्श केलेला फारसा आवडत नाही.ह्या कुत्र्यांना एकटे राहायला आवडते. म्हणजेच कळपात लोकांनं मध्ये राहायला आवडत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1005.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fedcfd54e89ae64a66c2ce23c029feebaa209b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1005.txt @@ -0,0 +1,14 @@ +धामणसे (भारत- महाराष्ट्र- कोकण- रत्‍नागिरी जिल्हा- रत्‍नागिरी तालुका- धामणसे गांव) अरबी समुद्रापासून ४ कोसांवर पूर्वेकडे हे गाव वसलेले आहे. + धामणसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +कसबा धामणसे हे प्राचीन काळापासून आपले महत्त्व जपून आहे. येथे स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. ८४ गावांचा कुलस्वामी म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वयंभू देव इथे वास्तव्य करून आहे. देवरुखे ( देवर्षी) ब्राह्मण समुदायाचा हा कुलस्वामी असल्याने देश विदेशातून ज्ञाती चे लोक दर्शनासाठी इथे गर्दी करत असतात. त्याच प्रमाणे हेच येथील ग्रामदैवत सुद्धा आहे. त्यामूळे गावातील लोक सण उत्सवात येथे भक्तांची रीघ लागलेली असते. या मंदिरास सुमारे १३ व्या शतकापासून चा इतिहास आहे. देवर्षी समुदाय ची आद्य वसाहत धामणसे ही मानली जाते त्यामूळे त्या काळापासून इथे नियमित देवाचे पूजन अर्चन होत आहे. हे मंदिर दुर्मिळ वास्तू रचनेचा नमुना आहे असे म्हणावयास हरकत नाही कारण भारतात केवळ 3 मंदिरे दक्षिणाभिमुख आहेत त्यातील हे एक आहे, येथे नंदी अथवा पार्वती नाही. येथे केवळ दर्शन सेवेने मोक्ष प्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे. मृत्यू दिशेवर विजय मिळवणारे असे हे अत्यंत जागृत स्थान आहे. सोमगंगा नदीच्या काठी असणारे हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. याच देवळात श्री रवळनाथ, श्री महालक्ष्मी, श्री चंडिका, श्री वाघजाई, श्री त्रिमुखी आदी देव विराजमान आहेत +त्याच प्रमाणे गावात मानाई मंदिर,कालिका मंदिर, जाखमाता मंदिर, श्री दत्तगुरू देवस्थान, साई मंदिर, हनुमान मंदिर, बौद्ध समाज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावातील भक्तजन एकोप्याने सर्व उत्सव व सण साजरे करते. +कसबा धामणसे हे सुमारे ७०० वर्ष इतिहास असलेले गाव असून प्राचीन काळातील समाज रचना गावाच्या सद्य आखणीवरून करता येऊ शकते. बारा बलुतेदारी पद्धतीत हा गाव रचनाबद्ध केलेला आहे. त्यामूळे सर्व जातींचे वास्तव्य या गावात आहे. छत्रपती श्री शिवाजीराजे यांच्या राज्य कालावधीत काही काळ हा गाव आदिलशाही मुलुखात होता. त्यामूळे शिव दरबारात ह्या गावाची नोंद आहे. सरकारी पटलावरील कुळकर्णी पद या गावात होते. ब्रिटिश काळात खोतीने हा गाव विभागला होता. कुलकर्णी,जोशी,कानडे,देसाई असे चार समाज घटक समाजव्यवस्था चालवण्यासाठी नियुक्त होते. गावात ब्राह्मण समाज, मराठा समाज, सोनार समाज, लिंगायत समाज, सुतार समाज,तेली समाज,कुणबी समाज,चर्मकार समाज, बौद्ध समाज इत्यादी सर्व समाज वास्तव्य करून आहेत. सर्व जाती व्यवस्था सुशिक्षित व कर्तुत्वाने मोठ्या पदावर विराजमान आहे यातूनच गावातील एकता, बंधुता आणि समता याचे दर्शन इतर गावातील लोकांना होत आहे. प्राचीन काळात कसबा म्हणजेच प्रमुख ठिकाण असल्याने आजही धामणसे गाव त्याचं दर्जाने व मानाने अग्रस्थानी उभा आहे. +गावचा परंपरागत मुख्य व्यवसाय हा शेती आहे. काळानुसार बदल होत असून शेतकरी वर्ग बागायतीकडे वळला आहे. गावात आंबा काजू नारळ सुपारी इत्यादी पिकांचे उत्पन्न घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी व परदेशी आहेत. गावातील लोक गवंडी काम, कंत्राट कामे,चिरे खाण व्यवसाय, घर बांधणी अशा विविध व्यवसायात उतरून काम करत आहेत. फर्निचर बनविणे, वेल्डिंग, प्लुंबिंग इत्यादी कौशल्य आधारित व्यवसायांचे आकर्षण युवा पिढीला असून त्यातून रोजगार प्राप्ती ते करत आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावचा विस्तार मोठा असून पश्चिमेस नेवेरे,गणपतीपुळे उत्तरेस निवेंडी,चाफे, पूर्वेस ओरि , दक्षिणेस खरवते इत्यादी गावे आहेत +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1006.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f6df9774ec21cc9cf09b395d0e7f5883931e6af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1006.txt @@ -0,0 +1 @@ +धामणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1009.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ddbb183102d5a474a5748898f0ee22ed15e0c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1009.txt @@ -0,0 +1,8 @@ + धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10114.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c02324d34402259619d5598cbe38cb68b38ff04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10114.txt @@ -0,0 +1,6 @@ +पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३ – १४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली. +तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते. +तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते. +इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले. + +पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10143.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f127f14f25d5f0d1b4d7f1a073c4124f43715b5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10143.txt @@ -0,0 +1,3 @@ +यशोवर्मन पहिला (ख्मेर: ព្រះបាទយសោវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा चौथा सम्राट होता. यशोवर्मन इ.स. ८८९ ते इ.स. ९१०पर्यंत सत्तेवर होता. +हा पहिला इंद्रवर्मन आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.[१][२] इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता वडिलांच्या हक्काने नव्हे तर आईकडील पूर्वज, जे चेन्ला आणि फुनानचे राज्यकर्ते होते, त्यांच्या हक्काने असल्याचे दाखवले.[३] +आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. इ.स. ८९२मध्ये त्याने इंद्रतटक हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.[४] याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी यशोधरापूरजवळ यशोधरातटक नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10149.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a49784e1a4798e549719e7614e6807c626e57ce0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10149.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिला राज वोडेयार पहिला (२ जून, १५५२ - २० जून, १६१७:मेलिकोटे) हा मैसुरुचा नववा राजा महाराजा होता. हा चौथ्या चामराज वोडेयारचा मोठा मुलगा होता. हा आपल्या चुलत भाऊ पाचव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर १५७८ पासून १६१७ पर्यंत सिंहासनावर होता. +आपल्या काका आणि वडीलांनी सुरू केलेले विजयनगरच्या राजदूतांना मैसुरु राज्यातून हाकलून देण्याचे काम राज वोडेयारने सुरू ठेवले. या दरम्यान त्याला स्वतःच्याच कुटुंबाकडूनही विरोध होता. राज वोडेयारने मैसुरुला विजयनगरपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. असे असताही त्याने विजयनगरच्या सम्राट व साम्राज्याला आदर दिला होता. +पहिल्या राज वोडेयारने दर दसऱ्याच्या दिवशी आपल्या महालापासून बन्नीमंटप मधील शमीच्या झाडा पर्यंत मिरवणूक काढणे सुरू केले. आता याला जगप्रसिद्ध मैसुरु दसऱ्याचे रूप आहे. +ही प्रथा १६१०पासून आजतगायत अखंड सुरू आहे. राज वोडेयारचा युवराज नरसराज नवरात्रीच्या आधी एक दिवस मृत्यू पावला असताही विद्वानांच्या सल्ल्यावरून राजाने यात खंड पाडला नाही व भविष्यातही राजघराण्याील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही या प्रथेत व्यत्यय आणू नये असे फर्मान काढले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10155.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1577683f02835a24880608bfd646e5dd5e60c28d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10155.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिला सातकर्णी (ब्राह्मी लिपी:𑀲𑀸𑀢𑀓𑀡𑀺) हा सातवाहन वंशातील तिसरा सम्राट होता. याचे साम्राज्य दख्खन प्रदेशात पसरलेले होते. याचा राज्यकाल इ.स.पू. ६०-इ.स.पू. ७० दरम्यान मानला जातो.[१] काही विद्वानांच्या मते हा काळ इ.स.पू. १८७-इ.स.पू. १७७ असा होता.[२] अलीकडील संशोधनात पहिल्या सातकर्णीचा राज्यकाल इ.स.पू. ८८-इ.स.पू. ४२ असल्याचा उल्लेख आहे.[३] + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1017.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceba044bf1e5ffa1dbef7b509b4996e94c50d37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1017.txt @@ -0,0 +1 @@ +धामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10189.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77442c765d105af90cd62d6cea686b8a50012680 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10189.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिले चीन–जपान युद्ध प्रामुख्याने कोरियाच्या अधिपत्यावरून चीन व जपान ह्या राष्ट्रांदरम्यान १८९४-९५ साली लढले गेले. सहा महिने चाललेल्या ह्या युद्धात जपानने सातत्याने विजय मिळवले व अखेर फेब्रुवारी १८९५ मध्ये चीनने सपशेल शरणागती पत्कारली. ह्या पराभवामुळे चीनमधील छिंग राजवंशाची जगभर नाचक्की झाली व त्याचवेळी पूर्व आशियामधील प्रादेशिक वरचष्मा प्रथमच चीनकडून जपानकडे आला. +१८६८ सालच्या जपानमधील मैजी पुनर्स्थापनेनंतर जपानची झपाट्याने प्रगती व आधुनिकीकरण होत होते. अनेक शतकांचे एकाकी राहण्याचे धोरण बदलून जपानने जागतिक घडामोडींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व त्याचसोबत साम्राज्यवादाचा देखील अंगिकार केला. तुलनेत शेजारील कोरिया देश मागासलेलाच राहिला होता. जपानला कोरियावर दुसऱ्या महासत्तेचे नियंत्रण नको होते व कोरियामधील नैसर्गिक संपत्तीवर व कृषी उत्पन्नावर जपानचा डोळा होता. पारंपारिक काळापासून कोरियामधील चोसून राजवंशावर चीनचा अंमल होता. १८८० च्या दशकामधील कोरियात घडलेल्या अनेक घटनांमुळे चीन व जपानमध्ये तणाव कायम राहिला. +जून १८९४ मध्ये सोलमधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरुवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला. +ह्या युद्धानंतर १० वर्षांनी मांचुरिया व लायोडॉंग द्वीपकल्पाच्या अधिपत्यावरून रशिया–जपान युद्ध घडले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1023.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507293b849bacc95aef6e67918d270b50f622bf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1023.txt @@ -0,0 +1,8 @@ + धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10235.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f33837347df2e002efe7906f9acaf4aeda33797f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10235.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरखेल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10239.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9009cbaa22937c56a6ec8d78beda9ef841b3f0a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10239.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10249.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c3061c1912f1e2884c26531999222a9aaf7fb7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10249.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10251.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd29d269f28b0f310d571285e99087bceed04d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10251.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10265.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc27b73a24dcab6a930e5f7a697f45f79902f584 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10265.txt @@ -0,0 +1,2 @@ +बग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10294.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f053909f144cdfe317ad1772e5eb64a7c7e2846f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10294.txt @@ -0,0 +1,5 @@ +पांगुळ गरुड (इंग्लिश: Short-toed Eagle; हिंदी: सापमार) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असतो. याचा रंग काळा असून छातीखालचा रंग पांढरा असतो. छातीवर गडद बदामी रंगाच्या कड्या.घुबडसारखे मोठे डोके. उडताना खालचा भाग धूसर चंदेरी दिसतो. डोके काळसर. शेपटीवर काळपट आडवे पट्टे.(नेहमी ३ पट्टे) पायांवर पिसे नसतात. चेहऱ्यावर केसांसारखी दिसणारी पिसे. लहान पक्षी उदी रंगाचा. नर-मादी दिसायला सारखे असले, तरी मादी नरापेक्षा मोठी असते. +भारतात निवासी. अलीकडे नेपाळात नोव्हेंबरमध्ये दिसल्याची नोंद. +डिसेंबर ते मार्च महिन्यात वीण. +विरळ जंगले, माळराने आणि समुद्रकिनारे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1030.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21050e87f3d0fb189f7a368f431b2469d05c5869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1030.txt @@ -0,0 +1,11 @@ + धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे. कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदिर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री. वरदायिनी मंदिर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदिर हे देवालय जुनं आहे. वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +श्री लक्ष्मीकेशव मंदिर व श्री देवी वाघजाई मंदिर ही ग्रामीण यात्रा स्थळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. +लॉज, हॉटेल, पेट्रोलपंप, सीएनजी स्टेशन, मेडिकल स्टोअर +गोळवली, संगमेश्वर, कसबा +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10300.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..663a4ffe9ce77c377268e836f68672adc0a66e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10300.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुऊन त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात. +गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10302.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e6b33a799febe39d3434a1a10409a200d457867 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10302.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांचआंबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10312.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a487c938be44c32775782915f80d0bfefb6ac7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10312.txt @@ -0,0 +1,4 @@ +पांचाळ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते. +उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ नावाचे राज्य होते. महाभारत काळात प्रभावी असलेले हे राज्य यमुना नदीच्या खोऱ्यात आणि कुरू राज्याच्या शेजारी होते. अहिच्छत्र व कांपिल्य या उत्तर-दक्षिण या दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या. +पांडवांची पत्नी द्रौपदी ही पांचाळ नरेश द्रुपद राजाची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते. +कुरू व पांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी मगधाने ही राज्ये जिंकून घेतली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10327.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75129c2653f3305cc2ffe18bc9a685047bb92951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10327.txt @@ -0,0 +1 @@ +पांजरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10340.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42c5a330c3de12a1261040c48ac02e4d1af98e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10340.txt @@ -0,0 +1,5 @@ +पांडव लीला किंवा पांडव नृत्य हा महाभारतातील कथांचे गायन, नृत्य आणि पठण यांच्याद्वारे पुनरुत्थान करण्याची परंपरा आहे. विशेषतः उत्तराखंड येथील गढवाल प्रदेशात हे नृत्य केले जाते.[१][२] +पांडव हे या महाकाव्यातील पाच प्रमुख पात्र आहेत आणि गावातील हौशी लोक त्यांच्या भूमिका घेतात आणि ढोल, दामाऊ आणि भानकोरे नावाच्या दोन लांबलचक कर्णांसोबत घराबाहेर लीला करतात. विविध गावांमध्ये तीन दिवसांपासून ते एका महिन्यापर्यंत कुठेही चालणारे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात गर्दी खेचतात आणि ते वर्षाचे महत्त्वाचे सांस्कृतिक आकर्षण आहे.[३][४] धार्मिक नाटकात असे नट दाखवले जातात जे सहसा उत्स्फूर्तपणे त्यांच्या पात्रांच्या आत्म्याने "वश" होतात आणि नाचू लागतात."[५][६] +पांडव लीलाची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथांशी जुळलेली आहे आणि म्हणून त्याची तारीख सांगता येत नाही. हे नेहमीच गावातील हौशी लोकांद्वारे सादर केले जाते, व्यावसायिक नाही, आणि सामान्यतः उत्तराखंडच्या राजपूतांनी प्रायोजित केले जाते. एखाद्या कामगिरीला अनेकदा श्राद्ध म्हटले जाते, जो पूर्वजांच्या उपासनेचा एक हिंदू विधी आहे आणि लीला पूर्वजांच्या उपासनेचा एक प्रकार म्हणून पाहिली जाते. आज, अनेक गढवाली स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून ओळखतात.[७] प्रदर्शन साधारणपणे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातात, आणि एक विशिष्ट गावात दरवर्षी त्याचे आयोजन करू शकत नाही.[८] लीला पाहण्यासाठी लोक जवळच्या गावात जाऊ शकतात. सॅक्स लिहितात की "गढवालमधील बहुतेक गावकरी कदाचित कोणत्याही वर्षात पांडव लीलेच्या अंतरावर असतील."[९] +प्रत्येक गावाची स्वतःची भिन्नता असू शकते आणि काही गाणे किंवा नाटकावर जास्त भर देऊ शकतात.[१०] सादरीकरण रात्री सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालतात. महाकाव्यातील भाग एका रेखीय क्रमाने सादर केले जाणे आवश्यक नाही, कारण महाकाव्याची कथा सांगणे हा हेतू नसून कलाकार किंवा गावकरी परिचित असलेल्या विशिष्ट दृश्यांना नृत्य करणे किंवा अभिनय करणे हा आहे. जसजशी कथा पुढे सरकते आणि कृती तीव्र होत जाते, तसतसे ते दिवसाच्या सुरुवातीस सुरुवात करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालू ठेवतात. +बहुप्रतीक्षित भाग हा बहुतेक वेळा वडील आणि मुलगा, अर्जुन आणि नागार्जुन यांच्यातील लढाई असतो, ज्याला गेंडा या नावाने ओळखले जाते, कारण त्यात अर्जुन त्याच्या मुलाच्या गेंड्याची हत्या करतो. नाटकात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्यांना कधीही जमिनीला स्पर्श करू दिला जात नाही, त्यामुळे ते त्यांची शक्ती टिकवून ठेवू शकतात आणि पुढील लीला होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. अस्तित्वात असलेले सर्वात मोठे महाकाव्य, संपूर्ण महाभारत साकारणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याने, अभिनयासाठी कलाकार स्वतःचे भाग निवडू शकतात.[११] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10354.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59ecd3e774bbe0e29424a817039a751c672481bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10354.txt @@ -0,0 +1,81 @@ +विठ्ठल (विठोबा (IAST: Viṭhobā), ज्याला विठ्ठल (IAST: Viṭṭhala), आणि पांडुरंग (IAST: Pāṇḍuraṅga) म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी, गैर-विधीवादी भक्ती-चालित[१][२] महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर, पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहासलेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते १३ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.[३] + +हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते.[४][३] विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते. विठोबा, ज्याला वि(त) थल(अ) आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार, कृष्णाचे रूप मानले जाते.[५]कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[४][६] +विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[३] +विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. +गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात. +त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील +संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[९] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत. +पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.[१०]आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार दि. १३ जून इ.स.पु. -३२२८ श्रावण वद्य अष्टमी, श्रीमुख नाम संवत्सर ला पहाटे झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत. +पुराणातील श्लोकाप्रमाणे:- +वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ | +ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे || +अर्थ- +याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत. +दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.[११] +श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे. +द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला. +श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येऊन दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले. +पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला. +पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात || पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा || +महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.[१२] +दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.[३] प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[१३] +दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी +‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा, +कालविला दहीभात आले मिरे लवणा, +साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा, +उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’ +हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो. +नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते. +विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[१५] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[१५] +संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे. +'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[१५] +देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[३]. आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची मुक्ताईनगरहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर तर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[३] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१६] +विठोबा हा देव भक्त भक्तांच्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. श्रीहरी विठ्ठल नामे अवतार घेऊन परमभक्तांना भेटून स्वरूप दाखविले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते. +आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[१७] +मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५ चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे. +अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत. +पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे.[१८][१९] +पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते. त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ] +याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनाचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ] +२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[२०] +विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही - +(अपूर्ण यादी) +१) युगे अठ्ठावीस +युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । +वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । +पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । +चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।। +जय देव जय देव जय पांडुरंगा । +रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।। +तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । +कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । +देव सुरवर नित्य येती भेटी । +गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। +जय देव ।। 2।। +धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । +सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । +राई रखुमाबाई राणीया सकळा । +ओवळिती राजा विठोबा सावळा।। +जय देव ।।3।। +ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । +चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । +दिंड्या पताका वैष्णव नाचती । +पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। +जय देव ।।4।। +आषाढी कार्तिकी भक्तजन येती । +चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। +दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। +केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। +जय देव जय देव ||5|| +२) येई हो विठ्ठले +येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ +निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ +आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ +पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥ +पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ +गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥ +विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ +विष्णूदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10382.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd4152e90d1283d36374f86bfc5ea8bf2eec4f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10382.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांडुर्णी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10422.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705dd3247f85103b89eed905d5120b794042478d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10422.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्वेत समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. बारेंट्स समुद्राच्या दक्षिणेस असलेला व ९०,००० चौरस किमी पसरलेला श्वेत समुद्र संपूर्णपणे रशिया देशाच्या सरहद्दीत आहे व रशियाचा अंतर्गत भाग मानला जातो. प्रशासकीय दृष्ट्या हा समुद्र रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त, मुर्मान्स्क ओब्लास्त व कॅरेलिया प्रजासत्ताक ह्या विभागांदरम्यान वाटला गेला आहे. अर्खांगेल्स्क हे रशियाचे मोठे बंदर ह्याच समुद्रावर स्थित आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1044.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22bf628544b447ebc42099e183a140627f6d8ae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1044.txt @@ -0,0 +1,3 @@ +धामवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +==लोकजीवन= . म्हातारी माणसे व म्हाताऱ्या बाई राहतात सर्व तरुण वर्ग मुंबईला असतो diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10461.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d289bf9d4a09b3cf6d032f4a23f7f43fe7e1606f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10461.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांढुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10462.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b380cbb5f71ef302b4d4f2ea15f5f6f52d79375 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10462.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांढुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10502.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b51c1cfbc884ac3cf6ddfe1baedfeef4ec33bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10502.txt @@ -0,0 +1 @@ +पाईज बास्को हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. बिल्बाओ हे स्पेनमधील मोठे शहर ह्याच संघात वसले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10503.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e278456ce254bdb15280a9dce58659e0235f954 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10503.txt @@ -0,0 +1 @@ +खेड तालुक्यातील पश्चिमभागात महत्वाचे गाव म्हणून पाईट गावाची ओळख आहे.पाईट हा पश्चिमभागाचा कणा म्हटला जातो पाईट हे गाव विस्तीर्ण स्वरूपाचे असून यामध्ये १२ वाड्या (गवारवाडी,लोढूंगवाडी,चिखलवाडी,पापळवाडी,कोमलवाडी,सावंतवाडी,करंडेवाडी,विठ्ठलवाडी,चोरघेवाडी,रौंधळवाडी,ठाकरवाडी,वैतागवाडी) असुन जागोजागी वस्त्या आहेत त्यात सोपावस्ती,घरकुलवस्ती,करंडेवस्ती,गडदेवस्ती इत्यादींचा सामावेश असून यात २ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे (पाईट,रौंधळवाडी). गावाच्या उत्तरेस कुंडेश्वर डोंगर असून त्यावर कुंडेश्वर हे क क्षेत्रातील पर्यटन तळ आहे. पाईटगावच्या दक्षिणेला भामा नदी वाहते त्यावर भामाआसखेड हे मोठे धरण आहे त्या धरणाच्या पाण्यामुळे येथीलभाग जलमय व समृद्ध झालेला दिसुन येतो. पाईट गाव हे आठवडे बाजारी गाव असुन पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडे बाजार गुरुवारी पाईट येथे भरतो. पाईट गावाला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे, शिवाय गावामध्ये शिक्षणाच्याही सुविधा आहेत इंग्लीश मिडीयम बरोबर जिल्हा परीषदेच्या आदर्श शाळेचाही यात सामावेश आहे, आदिवासी शिक्षण संस्था जुन्नरचे कुंडेश्वर विद्यालय पाईट गावात आहे यात १० वी पर्यंत शिक्षण मिळते.पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्युनियर कॉलेज मध्ये १२वी पर्यंत शिक्षण घेता येते पाईट गावाची यात्रा ही या भागातील सर्वात मोठी यात्रा भरते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1051.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..531d152bd2ec0e9f81d6c728688edc0f7cbf989a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1051.txt @@ -0,0 +1,24 @@ +धामारी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ४८०१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +धामारी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ४८०१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८१७ कुटुंबे व एकूण ३९०९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९८६ पुरुष आणि १९२३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १०१ असून अनुसूचित जमातीचे १७ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५५९१ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +ग्रामपंचायतमध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध आहे तसेच गावकऱ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सामान्य सुविधा ग्रामपंचायततर्फे पुरवल्या जातात. गावकऱ्यांना विविध दाखले देणे, त्याच्याकडून विविध कर गोळा करणे ई. कामे ग्रामपंचायत मध्ये केली जातात. +गावात ५ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, १ शासकीय प्राथमिक शाळा, १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा पाबळ येथे ७ किलोमीटर अंतरावर, पदवी महाविद्यालय जातेगाव येथे ७ किलोमीटरहून जास्त अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यवस्थापन संस्था वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, पॉलिटेक्निक वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा कारेगाव येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आणि अपंगांसाठी खास शाळा पुणे येथे ५२ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ खाजगी दवाखाना आणि १ औषधाचे दुकान उपलब्ध आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात खंडोबा मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर आणि मस्जिद आहे. गावातील खंडोबा मंदिर हे गावाचे ग्रामदैवत असून दरवर्षी मार्गशीष महिन्यात येथे यात्रा भरते. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. आणि गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस (४१२४०३), मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा, शासकीय बस सेवा, आणि ऑटोरिक्षा व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहे. +गावात व्यापारी बँक (पुणे मध्यवर्ती सहकारी बँक), विकास कारीकारी संस्था, स्वयंसहाय्य गट आणि रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही. सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती ७ किलोमीटर अंतरावर पाबळ येथे आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात घरगुती वापरासाठी २४ तास वीज उपलब्ध असून शेतीसाठी आठ तास वीज उपलब्ध आहे. +धामारी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +धामारी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते - कांदे, आलू, मेथी, मका, ज्वारी, बाजरी, मुग, तूर, मटकी इ. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10510.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533edf050135df4a9f0ff58bfcf8f4d21b6ffd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10510.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड(मराठीत रत्तल) या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल(चिन्ह lb) = ४५३.५९२ ग्रॅम. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10531.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69de29bb2d1d6434b8b29ae775ad8c2e48c5391 diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10532.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..478bcf260234e9ab901718a8df5873e1bcf61d9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10532.txt @@ -0,0 +1,17 @@ +पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते.सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात. +पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो. +पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठरावीक प्रदेशांतच पडतो.पाऊस पडतो तिथे समृद्धता असते.पाऊस ह्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत . +१. अतिशय जास्त पाऊस ३०० ते ७५० सें.मी. +(किंवा त्याहून अधिक अपवादात्मक पर्जन्यमान) +२ जास्त पाऊस २०० ते ३०० सें.मी. +३ मध्यम पाऊस १०० ते २०० सें.मी. +४ कमी पाऊस ५० ते १०० सें.मी. ( किंवा अपवादात्मक कमी पर्जन्यमान.) +पाऊस (Rain), रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (किंवा सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rain)/(Heavy Downpour)/(Torrential Rain), पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain, Downpour), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस/गारपीट (Hailstorm), अतिवृष्टी (Excessive Rainfall), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scattered Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon Rain), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, Post-Monsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी (किंवा अवकाळ्या) पाऊस (Un-seasonal Rain), रात्रीचा पाऊस (Night Rain), धडकवणी/मृगाचा पाऊस/वळवाचा पाऊस/वळीव (Pre-Monsoon showers), हस्ताचा पाऊस/पर्जन्य ( heavy rainfall ) ,सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainfall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण (Cloud seeding) +अखंडपणे मुसळधार पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते.परिणामतः झड लागल्यावर ओला दुष्काळ पडतो. +१. मौसीनराम (सरासरी वार्षिक पाऊस ११,८७३ मिलीमीटर ) +२. चेरापुंजी (सरासरी ११,७७७ मिमी.) +३. अगुंबे (सरासरी ७६४० मिमी) +४. आंबोली (७५०० मिमी +५. ताम्हिणी (सरासरी वार्षिक पाऊस ६४९८ मिलिमीटर ) +इ.स. १९७६, १९७८, १९९०, १९९४, २००५, २००६, २०११, आणि २०१४ या वर्षी ताम्हिणी घाटात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. +पावसावर लिहिला गेलेल्या काही मराठी कविता आणि गाणी पुढीलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10536.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e3d2df264853c76bfcf0ca4bea1c326b62c0deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10536.txt @@ -0,0 +1 @@ +पाओलो बोइ (१५२८:सिरॅक्यूज, इटली - १५९८:नेपल्स, इटली) हा सोळाव्या शतकातील इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता. याला समकालीन बुद्धिबळ खेळाडूंपैकी श्रेष्ठ समजले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10573.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18a8404f386138d6555feb418ec469b32a248b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10573.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५४ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानचा हा पहिला इंग्लंड दौरा होता आणि कोणत्याही देशाने पहिल्या वहिल्या इंग्लंड दौऱ्यातच एखादा कसोटी विजय मिळवणारा पाकिस्तान पहिला देश ठरला. पाकिस्तानचे नेतृत्व अब्दुल कारदार याने केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10603.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2b3d692a85167db3b080bdfc0cd8916f392938b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10603.txt @@ -0,0 +1,6 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने १९ डिसेंबर २००९ ते ५ फेब्रुवारी २०१० या कालावधीत ३ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] +अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान, स्टँड-इन कर्णधार, शाहिद आफ्रिदी, एका कथित बॉल टॅम्परिंग घटनेत सामील होता, जेव्हा तो क्रिकेटचा चेंडू चावताना दिसला.[२][३][४] सामना संपल्यानंतर त्याला मॅच रेफरीने लगेच बोलावले. तेथे आफ्रिदीने बॉल टॅम्परिंगचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यावर दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली.[५] +ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेटने ऑस्ट्रेलियामध्ये (१६०.७ किमी/ता) रेकॉर्ड केलेली सर्वात वेगवान चेंडू टाकली.[६] पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टेटने हा पराक्रम केला. ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांच्यानंतर रेकॉर्ड केलेली ती तिसरी सर्वात जलद वितरण देखील आहे.[६] +ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ५-० आणि एकमेव टी-२० जिंकून क्लीन स्वीप नोंदवला. +या दौऱ्यादरम्यान, कर्णधार मोहम्मद युसूफ माजी कर्णधार युनूस खान आणि शोएब मलिक यांच्यासोबत सत्ता संघर्षात सामील असल्याची अटकळ पसरली होती आणि संघाचे मनोबल कमी होते. +या दौऱ्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चौकशी केली आणि युसूफ आणि युनिस यांची भविष्यात देशासाठी निवड केली जाणार नाही असे जाहीर केले, आजीवन बहिष्काराचा अर्थ लावला आणि मलिक आणि राणा नावेद-उल-हसन यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातली. आफ्रिदी आणि बंधू उमर आणि कामरान अकमल या सर्वांना दंड ठोठावण्यात आला आणि सहा महिन्यांसाठी प्रोबेशनवर ठेवण्यात आले.[७] दुसऱ्या कसोटीनंतर कामरानला वगळण्यात आले होते कारण त्याने दुसऱ्या कसोटीत झेल सोडले होते, परंतु त्याने निर्णयाच्या विरोधात बोलले आणि त्याला वगळले नाही असा आग्रह धरला, तर उमरवर एकजुटीने संपावर जाण्याच्या प्रयत्नात दुखापतीचे खोटे सांगून व्यत्यय आणल्याचा आरोप होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10612.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99440aff82b0a8823cda49b46c33687a8dd0a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10612.txt @@ -0,0 +1 @@ +२८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०११ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाकिस्तानने झिम्बाब्वे राष्ट्रीय संघाविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि झिम्बाब्वेच्या प्रतिनिधी संघाविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळला.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10624.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed6c3031dacde6bfc16d57794878d853c7a1540e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10624.txt @@ -0,0 +1,10 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. +आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित होती. परंतु तेव्हा जगात कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्येच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा दौरा एप्रिल २०२१ मध्ये होईल असे संकेत दिले. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याला सहमती दर्शवत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन ऐवजी चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांसह सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ४ मार्च २०२१ रोजी क्विंटन डी कॉकला दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्याजागी टेंबा बवुमाकडे कर्णधारपद सोपविले गेले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली. +दक्षिण आफ्रिकेत खेळून झाल्यावर पाकिस्तानी संघ लगेचच दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेस रवाना झाला. + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10657.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34c35cf4044a374957b8c2e9d01b51c408754519 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10657.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी २०१८ मध्ये पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[२][३][४] न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, त्यांचा दुसरा ५-० द्विपक्षीय मालिका विजय, २००० मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला विजय.[५][६] पाकिस्तानने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली. हा पाकिस्तानचा न्यू झीलंडमधील पहिला टी२०आ मालिका विजय होता आणि परिणामी, पाकिस्तान आयसीसी टी२०आ चॅम्पियनशिप क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.[७][८] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10660.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938d6d59d5cb3799d8cdfd1ef9d137daf4fc3050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10660.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10662.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49ada26057e02984f2eeb20e0788fdecb6ca890e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10662.txt @@ -0,0 +1,6 @@ +दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४] +१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला. +दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७] + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10677.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49ada26057e02984f2eeb20e0788fdecb6ca890e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10677.txt @@ -0,0 +1,6 @@ +दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४] +१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला. +दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७] + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10687.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfe3d97705f4b0b724dc4e354b1377c3376ab76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10687.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cf05b2e473518d31269cd7b0f54ee3f0a2afe4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10697.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10703.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a12032ade92535962c8e56e830811e7dfdc3b940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10703.txt @@ -0,0 +1,15 @@ +पाकिस्तान संघ सध्या मार्च २०१७ ते मे २०१७ दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. सदर दौऱ्यावर ३-कसोटी, ३-एकदिवसीय आणि ४-टी२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात आल्या.[१][२][३] ऑगस्ट २०१६ मध्ये भारताविरुद्ध खेळल्याप्रमाणे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क येथे आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्याची शक्यता पडताळून पाहिली होती. परंतु त्यांनी या दौऱ्यावरील सर्व सामने कॅरेबियनमध्येच खेळले गेले.[३] +जानेवारी २०१७ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडीज बोर्डासमोर दोन टी२० सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला.[४] हे सामने १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी लाहोर येथे आणि आणखी दोन टी२० सामने फ्लोरिडा येथे खेळवण्याबाबत विचार केला गेला.[४] परंतु १२ जानेवारी २०१७, रोजी सामने जाहीर केले गेले, तेव्हा त्यात कुठेही पाकिस्तानातील सामन्यांचा उल्लेख नव्हता.[३] त्यादिवशीच नंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीजचा संघ सुरक्षिततेच्या कारणामुळे पाकिस्तानात खेळणार नसल्याचे जाहीर केले.[५] आधी कार्यक्रमानुसार दोन टी२० सामने खेळवण्याचे ठरले होते, परंतु मार्च २०१७ च्या सुरुवातीला वेळापत्रकात आणळी दोन टी२० सामन्यांचा समावेश करण्यात आला.[६] +दौऱ्याआधी, मिसबाह-उल-हकने पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार होण्याचा निर्णय घेतला आणि तो पाकिस्तान बोर्डाने मान्य केला.[७] एप्रिल २०१७ मध्ये, मिसबाहने ह्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.[८] दोन दिवसानंतर, युनिस खाननेसुद्धा मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[९] +पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-१ अशी जिंकली[१०] आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला.[११] त्या नंतर त्यांनी कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला २-१ ने पराभूत करून, वेस्ट इंडीजमधील पहिला मालिका विजय साकारला.[१२] + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10712.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..595291f6978425f57f6aab252d8da7d300e2ef8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10712.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10730.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28958eb6049790b1ef8345c2dd6917de1d77f17f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10730.txt @@ -0,0 +1,3 @@ +महिला कसोटी किट +महिला वनडे किट +पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10733.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ead3d1120ed80deed0e288a5f55a203334bca876 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10733.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१२ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा केला. आयर्लंडमध्ये, ते बांगलादेश विरुद्ध १ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय, तसेच बांगलादेश आणि आयर्लंड विरुद्ध दोन आयर्लंड महिला तिरंगी मालिकेत खेळले. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि २ टी२०आ मध्ये इंग्लंड आणि १ टी२०आ मध्ये वेस्ट इंडीज खेळले.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10761.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2086ab0b96113ce96c2b9fb2faf106950f90eaf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10761.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२][३][४] वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10815.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54475846d0c0fd2af9e987a8b25ec8969c7f6421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10815.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल हे १९४७ ते १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानात ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी व शासनप्रमुख होते. १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक बनल्यावर 'गव्हर्नर जनरल' पद बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष हे पद निर्मिण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10817.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7626fb4ad27fa21341029e807cf8a57b7a910a8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10817.txt @@ -0,0 +1,18 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[२][३] +इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [४] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[५] +कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[६] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली. + + + + + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10868.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f204cb60fc2224333f15b0cad0a8de75be10ea32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10868.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचघरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10875.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8602af9d2da641063d955080a11ae143b0f9822e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10875.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचपिंपळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10892.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c81596d35b0473752ddfaa202560e63acdf86f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10892.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचवा चामराज वोडेयार (? – १५७८) हा मैसुरुचा ८वा राजा होता. हा १५७६मध्ये आपले वडील चौथा चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला. दोनच वर्षांत याचाही मृत्यू झाला. +याच्यानंतर त्याचा चुलतभाऊ व चौथ्या चामराजाचा मुलगा पहिला राज वोडेयार गादीवर बसला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10994.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653f33966fc3d6d1e3625a17e93673c8b27d8e0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10994.txt @@ -0,0 +1 @@ +पाटनेम तथा पाटणे हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11048.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..072214ccff22348758cee9d48e8473612ad283eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11048.txt @@ -0,0 +1,10 @@ +जवळाला येथे तपस्वी काशीगीरजी महाराज यांची समाधी स्थळ प्रशिद्ध आहे. +जवळाला हे पाटोदा तालुक्यातील राजकिय द्रष्ट्या महत्त्वाच गाव. गावाची हद्द ही अहमदनगर बीड महामार्गालगत शंभरचिरा जावळे वस्ती पासून सुरू होते . रोड लगत असलेले उंच उंच निरगिलीची, वडाची झाडे सुंदर निसर्गरम्य वातावरणात शेजारीच असलेले शेततळे पाहण्यासारखे वातावरण आहे. मांजरा नदीची उपनदी जावळे नदीचा येथुनच उगम झालेला आहे. +गहिनीनाथगड +चिंचोली नाथ ता.पाटोदा, जिल्हा बीड हे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामनभाऊ त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. +महाराष्ट्रातील एक समाजसुधारक व संत म्हनुन अाेळख असलेले संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान सावरगाव घाट ही याच तालुक्यात आहे. +चिखली चिंचोली हे थंड हवेचे ठिकाने असून समुद्रसाटीपासून सुमारे ८९२ मीटर ऊंच अपर्णादेवीची टेकडी आहे. +सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिखली चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे. +मांजरा (वांजरा)ही तालुक्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात. +पाटोदा तालुक्यातील चिखली नाथ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11055.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11818817899265262ed70211260e46ca7ef1f0b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11055.txt @@ -0,0 +1,8 @@ + पाट्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11061.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d67a75ea3bc7c67807b91812ff9ff709a4185502 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11061.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाठारे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11062.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2a12203fa4b2c62be2ea38f674d3ea7c34bae67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11062.txt @@ -0,0 +1,3 @@ +पठावे दिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +साल्हेर किल्ला जवळ हत्ती नदीच्या किनारी वसलेले गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11072.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dad620c739136fbb15503c815220f385f51d443 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11072.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण 1988-89 नुसार पाडळसिंगी येथे एक मध्ययुगीन (एकलींगेश्वर) शिवमंदिर आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11081.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edff4ecc246c6fa85cb042f19d38bb7cede437ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11081.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11088.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a728cc3c5d4a32832023dacfa18d5b08b2029b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11088.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +पाडसे रेल्वे स्थानक मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील कल्याण-भुसावळ पट्ट्यातील एक स्थानक आहे. या स्थानकावर चार[१] पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11105.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6fac0f06248fd33fdba11aa6538115dbdf4926a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11105.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11118.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82ada3f226ff6dcb63fefdc090f3eaaae37bfdaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11118.txt @@ -0,0 +1,7 @@ +पाणघार (इंग्लिश: Marsh Harrier; हिंदी: कुतार, कुलेसिर, सफेद सिर; संस्कृत:कच्छपत्री; गुजराती: पट्टाई) हा एक पक्षी आहे. +त्याच्या उदी-तपकिरी वर्णामुळे तो कित्येकदा घारीसारखा वाटतो. +नर:शेपटीवरचा भाग तपकिरी किंवा पांढरा व त्यात उदी रंगाचे मिश्रण असते.छातीपासून शेपटीखालचा रंग तांबूस ते गर्द तांबूस-तपकिरी असतो.त्यावर उदी रेषा असतात. +मादी:पाठीवरचा रंग उदी-तपकिरी.डोके आणि मान पिवळट.पोटाखालील भागावर उदी रेषा नसतात. +हिवाळी पाहुणे.भारत,नेपाळ,श्रीलंका,अंदमान,मालदीव आणि लक्षद्वीप बेटे. +एप्रिल ते जून या काळात पॅलिआर्क्टिक प्रदेशात वीण. +दलदली आणि पाणी असलेली भातशेती तसेच माळराने. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11123.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41727bf6bc926365cf49756bafc91605691ad50a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11123.txt @@ -0,0 +1,17 @@ +पाणजू बेट हे मुंबईच्या अगदी उत्तरेस वसई खाडीतील एक मुहाना बेट आहे. वसई येथील मुख्य भूमीशी सालसेट बेट जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे या बेटाचा वापर केला जातो. येथे स्थित आहे19°19′59″N 72°51′00″E / 19.333°N 72.85°E / 19.333; 72.85 1 च्या कमाल उंचीसह  मी (3 फूट). +पाणजू बेट हे एक प्राचीन ऐतिहासिक बेट आहे. सर चिमाजी अप्पांच्या काळात या बेटावर आर्थिक व्यवहार होत असत. या बेटाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि 23 स्वातंत्र्य सैनिक दिले आहेत. लोकसंख्येच्या क्षमतेनुसार पालघर जिल्ह्यात ते पहिल्या क्रमांकावर आहे. पांजू बेटाचे क्षेत्रफळ सुमारे ६०० एकर आहे आणि येथे आगरी समाज राहतो. या समुदायाचा मुख्य व्यवसाय शेती, मासेमारी, मीठ शेती आणि परंपरेनुसार हाताने वाळू काढणे आहे. येथे एक प्राथमिक शाळा तसेच सरकारी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आहे. +नायगाव फेरी टर्मिनल /नायगाव जेट्टी ते पाणजू बेट ( नायगाव पश्चिम ) आणि पांजू बेट जेटी (नायगाव पश्चिम) ते नायगाव जेट्टी (नायगाव पश्चिम) पर्यंत दर ३० मिनिटांनी बोट सेवा उपलब्ध आहे. +स्वातंत्र्यकाळापासून उपेक्षित असलेल्या वसई तालुक्यातील पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेला पाणजू बेटासंदर्भातील पर्यटन विकास आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या बेटाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होणार असून हे बेट विकसित झाल्यास गावातील अनेक समस्या दूर होऊन येथील स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. +वसई खाडीतील भाईंदर आणि नायगावमध्ये पाणजू नावाचे बेट आहे. ६०० एकर जागेवर वसलेल्या बेटाचा अनेक वर्षांपासून विकास झाला नव्हता. या बेटावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. सन २०१८ मध्ये पर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय़ घेतला होता. यामध्ये देशात असलेल्या एकूण १ हजार ३८२ बेटांपैकी पहिल्या टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्या बेटांमध्ये वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्याचा विकास आराखडा बनविण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोनामुळे विलंब झाल्याने नुकताच हा आराखडा तयार करण्यात आला. पर्यटन विकास तज्ज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, इंजिनीअर यांच्यामार्फत तयार झालेला आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला. +बेट समग्र विकास या कार्यक्रमांतर्गत या बेटाचा पर्यटनविकास करण्यात येणार आहे. पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या प्रकारची जागादेखील या गावात उपलब्ध असल्याने त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यामातून निधी उपलब्ध होणार आहे. या विकास आराखड्यात सांस्कृतिक, ऐतिहासिक, मनोरंजन, पर्यावरणीय, सहासिक खेळ, सोयी सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जवळपास ८० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे या आराखड्यात नमूद केले आहे. त्यामुळे हा आराखडा राज्य सरकारला सादर केल्यानंतर राज्य सरकार तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे सादर करेल. त्यानंतर यासाठी निधी प्राप्त होणार असल्याचे पालघर जिल्हा नियोजन अधिकारी सचिन माघाडे यांनी सांगितले. या बेटाच्या विकासामुळे येथील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच आता पाणजू हे बेट पर्यटनाचे स्थळ होणार असल्याने अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. +- बेटावर यूएसपी मध्यवर्ती सुविधा केंद्र बनविण्यात येणार असून ते माशाच्या आकारात आणि पूर्णपणे पर्यावरणास अनुकूल बांबूपासून बनविण्यात येणार आहे. +- मँग्रोव्ह पार्क असेल, यामधून जंगलाचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होईल. +- जेट्टीचा विकासही प्रस्तावित करण्यात आला आहे. या जेटी टर्मिनलमध्ये तिकीट काऊंटर, सुरक्षा तपासणी, जड सामान ठेवण्यासाठी खोली, शौचालये, प्रतीक्षालय आणि स्मरणिका दुकाने असतील. +- अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माहिती केंद्र असणार आहे. +- बांबूची एक मजली इमारत उभी करणार आहे. यामध्ये संग्रहालय, मत्स्यालय, अॅम्फीथिएटर, मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट आणि इतर पर्यटन सुविधा जसे शौचालय, प्रतीक्षा कक्ष आदी असतील. +- अॅम्फी थिएटरमध्ये सुमारे २०० लोक बसतील आणि लोकनृत्य प्रदर्शन आणि संगीत मैफिलीसारख्या विविध कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. +- बेटावरील दोन तलाव, गोडे तलाव आणि खारे तलाव यांचे सुशोभीकरण केले जाईल. +- साहसी क्रीडा उपक्रम एका साहसी क्षेत्रात आयोजित केले जातील. यामध्ये वॉल क्लायबिंग, नेट क्लायबिंग, कॉन्फिडन्स गेम्स, लांब उडी आणि पोल क्लायबिंगचा समावेश असेल. +- उद्यानात चालण्यासाठी ट्रॅक, निरीक्षण स्थळ आणि पक्षी निरीक्षण गॅलरी असणार आहे. +- खारफुटी, त्याच्या वनस्पती, प्राण्यांविषयी माहिती देणारी चित्रे आणि वस्तू प्रदर्शित करण्यासाठी एक खारफुटी केंद्र असणार आहे. +- बेटावर लाकडी कोरीवकाम आणि चिखलापासून बनवलेले पुतळे आणि शिल्प लावण्यात येणार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11124.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae067fc089ba0f5278549f4be8cbdfb4ccca5f51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11124.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाणजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11129.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5574207a52f152b1a143c7e41ccbf733bc8f04b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11129.txt @@ -0,0 +1,5 @@ +पाणथळ जमीन हे एक भूभाग आहे जेथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडलेला असतो. अशा भागात जलीय वनस्पतींचे प्राबल्य आहे आणि हे पाणथळ जमीन परिभाषित करते. [१] [२] जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून पाणथळ जागा अतिशय संवेदनशील आहेत कारण केवळ विशेष प्रकारची वनस्पती आणि इतर जीव ओलसर जमिनीवर वाढण्यास अनुकूल आहेत. [३] +इराणच्या रामसर शहरात १९७१ मध्ये पार पडलेल्या एका अधिवेशनानुसार, एक पाणथळ जमीन अशी जागा आहे जिथे वर्षातील आठ महिने पाणी असते. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत सध्या जगभरात १,९२९ पेक्षा जास्त पाणथळ जागा आहेत. [४] +भारत सरकारने रामसर पाणथळ जमिनीखाली कोरडवाहू जमिनीचाही समावेश केला आहे. सध्या भारतात एकूण ३७ रामसर पाणथळ जागा अधिसूचित आहेत. २०१० मध्ये भारताने ३८ नवीन पाणथळ जागा समाविष्ट केल्या आहेत. मॉन्ट्रो रेकॉर्ड्स, रामसर पाणथळ भूभागाच्या नोंदवहीत, धोक्यात असलेल्या किंवा धोक्यात येऊ शकणाऱ्या पाणथळ जमिनींचा समावेश होतो. यानुसार भारतातील केवलादेव (राजस्थान) आणि लोकतक तलाव (मणिपूर) यांना धोका निर्माण झाला आहे. या रेकॉर्डमधून चिलिका सरोवर (ओरिसा) वगळण्यात आले आहे. +वर्ष २०११ मध्ये, भारत सरकारने पाणथळ भूसंरक्षण आणि व्यवस्थापन कायदा, २०१० ची अधिसूचना जारी केली आहे. या कायद्यांतर्गत, पाणथळ जमिनीची खालील सहा श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. +या कायद्यांतर्गत केंद्रीय पाणथळ नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणामध्ये अध्यक्षांसह एकूण १२ सदस्य असतील. या कायद्यांतर्गत ३८ नवीन पाणथळ जागा शोधण्यात आल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11146.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b844e4b794245f7ee499977a5bb628ba0b71f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11146.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाणवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11175.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad8dc20f8854195e69f132561ee5705dbab2eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11175.txt @@ -0,0 +1,2 @@ +पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला, ठराविक काळी पडणारया पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे लागे. पिण्यासाठीचे पाणी ,वापरावयाचे पाणी व अन्य कारणासाठी लागणारे पाणी नेहमी उपलब्ध असावे यासाठी पूर्वीपासून अनेक प्रयत्न झालेले दिसतात. +सिंधू संस्कृतीच्या काळातील अनेक विहिरी संशोधकांना मिळाल्या आहेत.त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.विशिष्ट पद्धतीने उंचवट्यावर बांधलेल्या या विहिरी असत.त्यामुळे वरून खालच्या दिशांना असलेल्या शेतांना पाणी पुरवठा करणे सोपे होई.काही विहिरी उभ्या आकाराच्या,उंचीला जास्त पण परीघ कमी असलेल्या बांधत;ज्यामुळे पाण्याची पातळी पसरट न होता वरती चढत असे व पाणी वापरणे सोपे होई.भारतातील सर्वच प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण विहीरी आढळतात. त्या विविध नावानी ओळखल्या जातात . diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11176.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d03365fc4c390dc9bab95629db78795e5fa46c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11176.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती [→जलविद्युत् केंद्र] यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट (टाकाऊ द्रव्ये) वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने असा इशारा दिला आहे की, इ. स. २००० च्या सुमारास जेव्हा जगाची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा १९७० साली लागत होते त्याच्या तिप्पट पाण्याची जरूरी असेल आणि त्या वेळी जगाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागेल. वर निर्दिष्ट केलेल्या पाण्याच्या प्रत्येक प्रकाराच्या वापरासाठी पाण्यामध्ये भौतिकी व रसायनशास्त्र यांच्या नियमांत बसणारे काही विशिष्ट गुणधर्म असण्याची जरूरी असते. त्यामुळे नैसर्गिक रीत्या मिळणाऱ्या पाण्यावर अनेक योग्य प्रक्रिया करूनच ते पाणी वापरावे लागते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न जागतिक महत्त्वाचा झाला असून तो प्रगत राष्ट्रांनाही भेडसावत आहे. प्रस्तुत नोंदीत गृहोपयोगी पाणीपुरवठा आणि औद्योगिक पाणीपुरवठा असे दोन भाग केले आहेत. गृहोपयोगी पाणीपुरवठ्यात त्याचा इतिहास, मागणी, मूळ, उपलब्धता, गुणवत्ता, शुद्धीकरण, वाटप, व्यवस्थापन, संशोधन इ. गोष्टींचा विचार केला असून औद्योगिक पुरवठा विभागात निरनिराळ्या उद्योगधंद्यांना लागणारे विशिष्ट प्रतीचे व प्रमाणातील पाणी, पाण्याचा पुनर्वापर इ. वार्बींचे विवरण केलेले आहे. पिकांच्या पाणीपुरवठ्यासंबंधीच्या माहितीकरिता ‘सिंचाई’ ही नोंद पहावी. +इतिहास : पाणीपुरवठ्याचा इतिहास मानवाइतकाच जुना आहे. पृथ्वीवरील पाण्याचा साठा सु. १.३९ x १०९ किमी. इतका असला, तरी मानवाला शुद्ध पाणी म्हणून उपयोगी पडेल असे त्यापैकी १% सुद्धा नाही. त्यामुळे पृथ्वीवरील लोकवस्ती ही जेथे पिण्यासाठी भरपूर प्रमाणात नैसर्गिक रीत्या पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी म्हणजे झरे, तळी, नद्या इ. ठिकाणांजवळ होत गेली. विहिरी खणून पाणी मिळवणे ही पूर्वापार चालत आलेली सर्वमान्य पद्धत होय. मात्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था गेल्या सहा-सात हजार वर्षापासूनच केली गेली. ईजिप्तमध्ये नाईल नदीवर सहा हजार वर्षांपूर्वी धरण बांधून पाणीपुरवठा केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. बॅबिलोनियात ४,००० वर्षापूर्वी, बल्लुचिस्तानात ३,५०० वर्षांपूर्वी, पर्शियामध्ये ३,००० वर्षांपूर्वी, ग्रीसमध्ये २,५०० वर्षांपूर्वी व रोमनांनी पण २,५०० वर्षांपूर्वी कालवे अथवा जलसेतूमधून [→जलवाहिनी] पाणीपुरवठा केल्याचे सर्वज्ञात आहे. रोम येथील पाणीपुरवठा व्यवस्थेचे अधीक्षक सेक्स्टस जूल्यस फ्राँटिनस यांच्या मूळ हस्तलिखितात. (इ. स. ९७) रोमन जलसेतूचा उल्लेख सापडतो. आफ्रिका व मध्य आशियातील देशांतही इसवी सानाच्या सुरूवतीस पाणीपुरवठ्याविषयी विचार केला गेला होता. पाण्याचा साठा करणे, ते उकळणे वा गाळणे अशा स्वरूपाच्या पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्राथमिक प्रक्रियाही त्या काळी माहीत होत्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11179.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9616be54c78ed2141231acef04c491944546ae4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11179.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाणेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11188.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f77e01bea826e796b2346eb37e2daa3574fa7826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11188.txt @@ -0,0 +1,4 @@ +गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेला समीक्षाग्रंथ. +प्रकाशन वर्ष: १९७९ +१) 'मी आणि मर्ढेकर' - गाडगीळांना एक लेखक म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या काळात, रेडिओत नोकरी करत असताना, वरिष्ठ अधिकारी म्हणून बा.सी. मर्ढेकर यांचा अल्प सहवास घडला. त्यातून आपल्याला त्यांचा कसा परिचय होत गेला यासंबंधी वर्णन प्रस्तुत लेखात आलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11192.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32df5f2933b7367674733a6aa13820a0cf4e037e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11192.txt @@ -0,0 +1,2 @@ +पातळकोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11237.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..294be188607fb41a9497ff0885948524c21b740f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11237.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाथरशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11239.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fcd5737c393111df15d605e941216491d1a8c01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11239.txt @@ -0,0 +1,11 @@ +भौगोलिक माहिती  +पाथरी हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे.  +पाथरी तालुक्याचे मुख्यालय पाथरी हे शहर असून तेथे नगरपालिका आहे. +लोकसंख्या विषयक माहिती  +पाथरी हे गाव १९.२५ अंश उत्तर अक्षांश व ७६.४५ अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. २०११ च्या जणगणनेनुसार पाथरी शहराची लोकसंख्या ३६८५३ असून त्यापैकी पुरुष १९०२५ व स्त्रिया १७८२८ आहेत. शहरातील जनतेपैकी ७८% साक्षर आहेत. अनुसूचित जातीची टक्केवारी १२% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकाहून कमी टक्के आहे.  +वाहतूक विषयक माहिती  +पाथरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग २२२ (कल्याण ते निर्मल)वर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मानवत रोड हे १७ किमी अंतरावर आहे. पाथरी हे शहर जिल्हा मुख्यालय परभणी पासून पश्चिमेला ४३ किमी अंतरावर आहे. आणि विभागीय मुख्यालय औरंगाबादपासून १५१ किमी.वर आहे. सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबाद आणि नांदेड येथे आहे.  +पाथरी तालुका +पाथरी तालुक्याच्या पूर्वेला मानवत, पश्चिमेला माजलगाव व उत्तरेला सेलू व परतूर हे तालुके आहेत. पाथरी तालुक्यात ७३ गावे आहेत. +तीर्थक्षेत्र , मंंदीरे +पाथरी शहरा मध्ये संत साईबाबा यांचा जन्म झाला असे साईबाबांचे भक्त समजतात. मात्र अजूनही विश्वासार्ह व सर्वमान्य असा पुरावा न मिळाल्याने हा वाद कायम आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11270.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3df9e1fe9a12038bafbf5da5a47620e6cdabb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11270.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाथरी विधानसभा मतदारसंघ - ९८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पाथरी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. पाथरी, २. मानवत आणि ३. सोनपेठ ही तालुके आणि ४. परभणी तालुक्यातील पेडगांव, सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11293.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0a186326680d92d4da083cc7d587e67552f69a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11293.txt @@ -0,0 +1 @@ +पानकोबी , पत्ताकोबी (वनस्पतीशास्त्रीय नाव : Brassica oleracea var. capitata Linne ; कुळ: Brassicaceae ; इंग्लिश: Cabbage (कॅबेज) ; हिंदी: बंद गोभी ;) ही एक फळभाजी आहे. पांढरट हिरव्या रंगाची फळासारखी दिसणारी ही फळभाजी बहुसंख्य पानांचा एक गुच्छ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11300.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e0af53429382d3f63db7c5af3f62f9a548732e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11300.txt @@ -0,0 +1,2 @@ +पानडोझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11305.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f0e69349c62d098369c89ee61cf6abe83b1d351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11305.txt @@ -0,0 +1,6 @@ + +Kalanchoe pinnata, पूर्वी Bryophyllum pinnatum म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती, कॅथेड्रल बेल्स, लाइफ प्लांट, मिरॅकल लीफ या नावाने देखील ओळखले जाते आणि गोएथे वनस्पती ही मूळ मादागास्करमधील एक रसाळ वनस्पती आहे, जी एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे आणि उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात नैसर्गिक बनली आहे. महाराष्ट्र राज्यात याला पानफुटी, घायमारी, किंवा जख्मेहयात या नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती म्हणजे एक झुडूप आहे. पानफुटी, घायमारी, किंवा जख्मेहयात (शास्त्रीय नावःBryophyllum calycinum दुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum ) या नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती म्हणजे एक झुडूप आहे. ही वनस्पती व्रणशोधक, व्रणरोपक व रक्तवर्धक औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डोंगरांत व बागांत आढळते. +ही एक रसाळ, बारमाही वनस्पती आहे, सुमारे 1 मीटर (39 इंच) उंच, मांसल दंडगोलाकार देठ आणि लाल रंगाची छटा असलेली तरुण वाढ आहे, जी बहुतेक वर्षभर फुलांमध्ये आढळते.. या प्रजातीची पाने जाड, मांसल, आकारात लंबवर्तुळाकार, वक्र, क्रेनेट किंवा सेरेटेड मार्जिनसह, अनेकदा लालसर असतात. जेव्हा रोपे जमिनीवर पडतात तेव्हा ते रुजतात आणि मोठ्या वनस्पती बनू शकतात. +त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये ब्रायोफिलम पिनाटमचा वापर उच्च रक्तदाबासाठी पारंपारिक उपचार म्हणून केला जात असल्याची नोंद आहे.[15] +पारंपारिक औषधांमध्ये, पानांचा रस मूतखडा विरघळण्याकरता देखील वापरला जातो, डोकेदुखीच्या विरुद्ध स्थानिक वापरात वापरले जाते. क्रेओल्स ते जळजळ आणि कर्करोगावर भाजलेले आणि ओतणे म्हणून आणि तापासाठी लोकप्रिय उपाय म्हणून वापरतात. डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी कालांचोच्या पानांचा रस नारळाच्या तेलात मिसळून त्यांच्या कपाळाला लावतात. +. Mutkhada padto \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1132.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7e780b54fb0f752faaf3e52f8b0a3c1633cba2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1132.txt @@ -0,0 +1,2 @@ +धारूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या उस्मानाबाद तालुक्यातील गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11326.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508ce0b853b0237b0467b7af71b3b8acfcd79e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11326.txt @@ -0,0 +1,4 @@ +१२ जुलै, इ. स. १९६१ रोजी महाराष्ट्रातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो. +१२ जुलै, इ. स. १९६१ या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली. +इ.स. १९५० च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून १३ कि. मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्‍चिमेस पुण्यापासून ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० ऑक्‍टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.[१] पहिल्या टप्प्यात ६ टीएमसी, तर दुसऱ्या टप्प्यात ११ टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून, इ.स. १९६२ पर्यंत बांधून पुरे होणार होते. इ.स. १९५९-१९६० च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला.[२] बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते. बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोऱ्यावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल, अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी इ.स. १९६१ च्या जूनअखेरीसदेखील पूर्ण झाल्या नव्हत्या. बहिर्द्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चा राहिला होता. बहिर्द्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूरपातळीनुसार हा दरवाजा वर-खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11347.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a633c5a0f1a31a06679421784441a40874a927fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11347.txt @@ -0,0 +1,6 @@ +पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला. +बाबराने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले. बाबराने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदीचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबराचा उत्साह प्रचंड वाढ़ला. +बाबराने दिल्ली जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला +‌‍‌ +दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. इतिहासकार श्रीवास्तवांच्या मते बाबर जवळ २५ हजाराचे तर इब्राहिम लोदी जवळ ४० हजाराचे सैन्य होते. २१ एप्रिल १५२६ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. .हे युद्ध सकाळी ९ वाजता सुरू झाले व दुपारी तीन वाजता संपले. बाबरने स्वतःच सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती. +इब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पूर्ण पराभव करून त्याला युद्धात १५,००० सैन्यासह ठार मारले. जेव्हा इब्राहिम लोदीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले. त्यांचा पाठलाग करत बाबराने दिल्ली गाठली. या युद्धात इब्राहिमला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही मारला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11360.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74ba4ccbb0f8848ba3def929ca14fa43378bee3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11360.txt @@ -0,0 +1,2 @@ +पानेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11368.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d68482bbfeba1053aec0a15e9196c152833b38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11368.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाप को जला कर राख कर दूॅंगा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11391.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e3cddfa70e3556d3d59a014bd00fa406c8c142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11391.txt @@ -0,0 +1,81 @@ +वनडे आणि टी२०आ किट +पापुआ न्यू गिनी पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला बारामुंडिस टोपणनाव आहे, हा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पापुआ न्यू गिनी देशाचे प्रतिनिधित्व करतो. +पापुआ न्यू गिनी कधीही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले नाही. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11399.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89e67f5fa889372a1ddb9129d67fe14ddf5fc634 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11399.txt @@ -0,0 +1,4 @@ +पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] +एकदिवसीय सामने पापुआ न्यू गिनीने खेळवलेले पहिले होते.[३] +टी२०आ मालिका २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी झिम्बाब्वेच्या तयारीचा एक भाग बनली.[४][५] +झिम्बाब्वेने वनडे मालिका ३-० ने जिंकली.[६] त्यांनी टी२०आ मालिकेतील पहिला सामना देखील जिंकला आणि पापुआ न्यू गिनीचा ८ गडी राखून पराभव केला.[७] दुसरा टी२०आ बरोबरीत संपला, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनीने सुपर ओव्हर जिंकली.[८] हा पापुआ न्यू गिनीचा फॉर्मेटमधील पूर्ण सदस्यावर पहिला शोध परिणाम होता.[९] झिम्बाब्वेने तिसरी टी२०आ जिंकून मालिका २-१ ने घेतली.[१०] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11415.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..343f9eb48fe4641a66ebc56dfff46958deb81a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11415.txt @@ -0,0 +1,21 @@ +१८° ४९′ ५१″ N, ७४° ०३′ १०″ E +पाबळ हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ३९७८.८१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +पाबळ हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ३९७८.८१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८६० कुटुंबे व एकूण ३८५७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरुर ३५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९५९ पुरुष आणि १८९८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३२२ असून अनुसूचित जमातीचे ५३ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५५८३ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +गावात दोन शासकीय पूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक शाळा, चार शासकीय प्राथमिक शाळा,एक खाजगी प्राथमिक शाळा, एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, एक शासकीय माध्यमिक शाळा,एक खाजगी श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ माध्यमिक शाळा आणि एक शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पाबळ येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक पुणे येथे ७० कि.मी.अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा शिक्रापूर व खेड येथे 20 किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक अपंगांसाठी खास शाळा आहे. +श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या माध्यमिक शाळेमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विज्ञान आश्रम या संस्थेने सुरू केलेला व सध्या दहावीच्या बोर्डला पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम असलेला कार्यक्रम म्हणजेच IBT-Introduction to basic technology सुरू आहे. +]Vigyan Ashram +Padmamani Jain Mahavidyalaya, Pabal. +या गावात विज्ञान आश्रम ही शिक्षणावर काम करणारी संस्था आहे.[२] +या गावात भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ,प्राथमिक आरोग्य केंद्र,प्रसूति व बालकल्याण केंद्र, क्षयरोग उपचार केंद्र व ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,एक दवाखाना, एक पशुवैद्यकीय रुग्णालय व एक फिरता दवाखाना आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एक बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा व एक पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे.गावात अनेक औषधांची दुकाने आहेत. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी /बंधारा जवळच्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावाजवळ वेळ नदीवर थिटेवाडी हा मातीचा बंधारा बांधलेला आहे. याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस, दूरध्वनी,सार्वजनिक दूरध्वनी केंद्र व मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा आहे. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.व खाजगी कूरियर सुविधा आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. गावात टॅक्सी उपलब्ध आहे. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील राज्य महामार्ग ४० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात ५ बँक व ३ एटीम आहेत. सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. गावात शेतकी कर्ज संस्था, स्वयंसहाय्य गट उपलब्ध आणि रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.[३] +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. क्रीडांगण गावात उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय, व वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र आणि जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र आहे. +पाबळ ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +पाबळ या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): +पाबलची जवळपास खेडे गावे अशी आहेत. पुर (३.७ किमी), कन्हेरसर (४.५ किमी), केंदूर (६ किमी), धामारी (३.५ किमी), वडगाव पीर (७.५ किमी), गोसासी (५.२ किमी), कान्हूर मेसाई(३ किमी) ,मोराची चिंचोली, शिरूर, सरदवाडी, शिंदोडी, शिरासगाव काटा, सोनसंगावी, टाकळी भीमा, टाकळी हाजी, तळेगाव धामधेरे, तरदोबाचीवाडी, उरलगाव, विठ्ठलवाडी, शिक्रापूर(१४ किमी). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11421.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8767651ba9311b9856bb8965af1406398c318266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11421.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाब्लो नेरुदा (स्पॅनिश: Pablo Neruda; १२ जून १९०४ - २३ सप्टेंबर १९७३) हे नेफ्ताली रिकार्दो रेयेस बासोआल्तो (Neftali Ricardo Reyes Basoalto) ह्या लोकप्रिय चिलीयन कवी, राजकारणी व मुत्सद्याचे टोपणनाव होते. वयाच्या १४व्या वर्षापासून कविता करणाऱ्या नेरुदाला १९७१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. गॅब्रियेल गार्सिया मार्केझ ह्या कोलंबियन लेखकाच्या मते नेरुदा २०व्या शतकामधील जगातील सर्वोत्तम कवी होता. +चिलीयन कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असलेल्या नेरुदाने १५ जुलै १९४५ रोजी ब्राझीलच्या साओ पाउलो शहरामध्ये १ लाख लोकांसमोर लुइस कार्लोस प्रेस्तेस ह्या कम्युनिस्ट नेत्याच्या स्तुतीकवितांचे वाचन केले होते. १९४८ साली कम्युनिस्टविरोधी नेता गाब्रियेल गोन्झालेस विदेला चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर नेरुदाने चिलीमधून पळ काढला व आर्जेन्टिनामध्ये आश्रय घेतला. १९५२ मध्ये नेरुदा चिलीमध्ये परतला व कालांतराने राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदे ह्याचा निकटवर्ती सल्लागार बनला. कट्टर साम्यवादी विचारांच्या नेरुदाने स्टॅलिनच्या हुकुमशाहीची प्रसह्ंसा केली होती तसेच क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीच्या काळात व व्हियेतनाम युद्धादरम्यान अमेरिकेची यथेच्छ निंदा केली होती. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने नेरुदाची प्रतिष्ठा घटवण्याचे अनेक प्रयत्न केले व त्याला नोबेल पारितोषिक मिळू नये ह्यासाठी देखील कट आखले. नेरुदाला अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यास बंदी होती. परंतु त्याच्या जागतिक लोकप्रियतेमुळे १९६६ साली त्याला न्यू यॉर्क शहरामधील एका साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. +१९७३ साली घडलेल्या लष्करी बंडामध्ये आयेंदेला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलून ऑगुस्तो पिनोचे ह्या लष्करी अधिकाऱ्याने चिलीची सत्ता बळकावली व नेरुदाचे चिलीमध्ये मार्क्सवाद रुजवण्याचे स्वप्न भंग पावले. ह्याच वर्षी त्याचे कर्करोगामुळे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11433.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d1212093d6a8260a215310390f71c583d67c032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11433.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PSP, आप्रविको: KPSP, एफ.ए.ए. स्थळसूचक: PSP) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील पाम स्प्रिंग्ज शहरात असलेला विमानतळ आहे. +या विमानतळावरून मुख्यत्वे हिवाळ्यात वाहतूक होते. येथून अमेरिकेच्या मध्य व पश्चिम भागातील मुख्य शहरांना तसेच पूर्वेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11485.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363604a089e11d3738550b52d772daa1988ece9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11485.txt @@ -0,0 +1,7 @@ + +पायरट्स ऑफ द कॅरिबियन ऍट वल्डर्स एंड हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपट शृखंलेचा शेवटचा भाग आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. +चित्रपटाची सुरुवात होते ती कॅरिबियन अटलांटिक प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोकांची धरपकड व त्यांना लॉर्ड ब्रेकेट चाच्यांच्या गुन्ह्याखाली सामुदायिक रित्या फाशीचे आदेश देत असतो. अश्या प्रकारे अटलांटिकवर इस्ट इंडिया कंपनीचा जुलमी कारभार चालू असतो. लॉर्ड ब्रेकेटला जणू काही सर्व जग चाचेमुक्त करून संपूर्ण जगाचा समुद्री व्यापार आपल्या नियंत्रणा खाली आणायचा असते. जेम्स नॉरिंगट्नने मिळवलेले डेव्ही जोन्सचे हृदय ब्रेकेट ताब्यात घेतो. जर ब्रेकेटच्या इच्छेविरूद्ध काही केले तर ब्रेकेट ते हृदय बंद पाडून डेव्ही जोन्सला केव्हाही ठार मारु शकत असतो त्यामुळे डेव्ही जोन्सला व त्याच्या अतिशय प्रबळ फ्लाईंग डचमनला ब्रेकेटचे इच्छेवि‍रुद्ध ऐकावेच लागते. अश्या तऱ्हेने ब्रेकेट डेव्ही जोन्सला आपले बाहुले बनवतो. +जॅक स्पॅरोला क्रॅकेन ने गिळकंत केल्यामुळे जॅक डेव्ही जोन्सच्या तिजोरीत बंद होतो. त्याच्या बरोबर ब्लॅक पर्ललाही गिळकृत केल्यामुळे चाचे लोकांकडे ब्रेकेटच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ जहाज नसते त्यामुळे जॅकला व ब्लॅक पर्लला डेव्ही जोन्सच्या तिजोरीतून आणणे गरजेचे असते. त्यासाठी जगाच्या शेवटपर्यंत जाण्याची गरज असते व तिथे कसे जावे याचा नकाशा फॅंग या सिंगापूरच्या चाच्या पाशी असतो. इलिझाबेथ, बार्बोसा व विलियम हे फॅंगशी संगनमत करून नकाशा मिळवायचा प्लॅन आखतात. सिंगापूरला फॅंगशी बोलणी चालू असताना कंपनीचे सैनिक आक्रमण करतात. सर्व चाचे बार्बोसा इलिझाबेथ पळून निघतात. विलियम फॅंगशी गोंधळात बोलणी करून फॅंगचे जहाज व माणसे मिळवतो. +बार्बोसा एलिझाबेथ विल व इतर सर्व जगाच्या शेवटच्या टोकाकडे जायला निघतात. अत्यंत थंड समुद्रातील प्रचंड गुहेतून पुढे जातात. सरतेशेवटी त्यांना जगाचे शेवटचे टोक मिळते. त्याठिकाणी प्रचंड धबधबा असतो व अखंड महासागर त्या धबधब्यात कोसळत असतो. जहाज व त्यावरील सर्वजण धबधब्यात कोसळतात. +जॅक् स्पॅरो जगाच्या शेवटच्या टोकावर एका मोठ्या वाळवंटात ब्लॅक पर्लवर एकटा असतो. दीर्घ काळ एकटे राहिल्यामुळे त्याला सर्वत्र भास होण्यास सुरुवात झालेली असते. तो स्वतःच् स्वतःला आदेश देउन जहाजावरील कामे करत असतो. जॅकला आता वाळवंटातून हे जहाज समुद्रावर न्यावयाचे असते. याकामी त्याला वाळवंटातील खेकडे मदत करतात. वाळवंटातून जहाज समुद्रापर्यंत पोहोचते तोवर जहाजावरील सर्व जण समुद्र किनारी पोहोचलेले असतात परंतु धबधब्यात कोसळ्ल्याने जहाज मोडलेले असते. जॅक सर्वांना भेटतो व आपले काही निवडक आवडते लोक सोडून बाकिच्याना ब्लॅक पर्ल वर नेण्यास मनाई करतो कारण एलिझाबेथनेच जॅकला क्रॅकेनच्या दाढेत मरण्यासाठी सोडलेले असते, हे रहस्य सर्वांपुढे उघड करतो. परंतु जॅक कडे नकाशा नसल्याने सर्वांना ब्लॅकपर्लवर न्यावे लागतो. जहाज समुद्रात असले तरी ते समुद्र खरे जग नसते. आता सर्वांना ख‍ऱ्या जगात जायचे असते. परंतु कसे ते कळत नाही. एलिझाबेथला जगाच्या पलिकडच्या पाण्यात तिचे वडील भेटतात, जगापलिकडच्या पाण्यात फक्त मृत व्यक्तीच असतात व तिला चुकुन कळते की लॉर्ड ब्रेकेटने तिच्या वडिलांना ठार मारले आहे.तिचाही लॉर्ड ब्रेकेटवर राग अनावर होतो जॅक व विल तिला सावरतात. +दीर्घ काळ प्रवास करूनही खऱ्या जगात जायचा मार्ग मिळत नाही. सरतेशेवटी जॅकच नकाशामधून शोधून काढतो की खऱ्या जगात जाण्यासाठी सूर्यास्तासमयी जहाजाला उलटे करावे. त्याप्रमाणे जहाजाला हेलकावे देउन मोठ्याप्रयत्नाने जहाजाला उलटे करण्यात यश मिळवतात व सूर्यास्त झाल्य झाल्या ते खऱ्या जगात पोहोचतात. खऱ्या जगात पोहोचल्यावर पहिले सर्वांना पाणी पाहिजे असते. विल सर्वांना फेंगशी संगनमत केल्याप्रमाणे एका बेटावर घेउन जातो जिथे फेंग दबा धरून बसलेला असतो तिथे पोहोचतात जॅक व बार्बोसाला फेंगची माणसे अटक करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11529.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e973e7a1d91d85e2f8016bdb00e153e22ad517a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11529.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11532.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ad03603253e1eddc595dd6f85d50dcc742ddf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11532.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11541.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05b885b8c5306b95697c24c31830bca1464f14b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11541.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारजांब किंवा करंबा ऑलिव वंशातील सदापर्णी वृक्ष असून सदाहरित वनामध्ये हा वृक्ष आढळतो. मुख्यत: पच्छिमघाटामध्ये याचे स्थान आहे. भारतासहित बांग्लादेश व म्यानमार या देशात या वृक्षाचे अस्तित्व जाणवते. या झाडाची उंची १५ मीटर पर्यंत असू शकते. याची पाने काळसर हिरवी रंगाची, आकाराने दीर्घवृत्ताकृती व दातेरी असतात. याची फुले लहान व रंगाने पांढरी असतात तर फळे आकाराने वाटण्याच्या आकाराची आठळीयुक्त व रंगाने काळसर जांभळी असतात. [१] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11553.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40b03683cf7ae85192ca92b21206b1f34f27f135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11553.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11593.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42817defa2fd9579a6dddf0622470aee70f5bc5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11593.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारधाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11597.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c166c27dc5ed9b6dd06d8db5bcc6dce70ce5ddff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11597.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +पारनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील एक शहर आहे. प्रख्यात महाकाव्य महाभारत लिहिणाऱ्या महर्षि वेद व्यास यांचे वडील ऋषि पराशर यांच्या येथील वास्तव्यावरून पारनेर हे नाव पडले, असे सांगितले जाते. +पारनेर शहर हे समुद्रसपाटी पासून ६००-७०० मीटर उंचीवर आहे. पारनेर तालुक्यातील काही खेडी अशी आहेत की तेथील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैनिकी किंवा शिक्षकी पेशामध्ये आहे; या कारणास्तव पारनेर गावाला शिक्षकांचे शहर म्हणतात. पारनेर तालुक्यातील हंगा हे गाव छत्रपति शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक (जाधव)यांचेव मुळगाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11619.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e4978f62530958496f6a7e69e1084abf67fc5f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11619.txt @@ -0,0 +1,8 @@ +कबूतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव:Columba livia, कोलंबा लिविया; इंग्लिश:Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन/रॉक डोव्ह) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो. +हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात. +विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो. वैशिष्टयच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पद्धत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात. भारतात याच्याविषयी शिबी राजाची कथा प्रचलित आहे. +हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडांमध्ये आढळतात. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इत्यादी सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात. +विविध प्रकारची धान्ये हे कबुतरांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाने इ. सर्व मिश्रण. +कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.कबुतर +दोन अंडी एका वेळी देतात... + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11638.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11638.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11656.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a49ed2d5d5b7d6a8d0815347d7ce9aa493365f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11656.txt @@ -0,0 +1,5 @@ +पारशी हा एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झाले. +भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होऊन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत. +महात्मा गांधी पारशी लोकांविषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे. +पारशी लोकांचे जेवण हे गुजराती आणि इराणी खाद्यसंस्कृतींवर आधारित आहे.[१] यात मुख्यत्वे भात आणि दालचा (घट्ट वरण) सामावेश आहे. बहुतांश पारशी लोक मांसाहार देखील करतात. पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली कोंबडी हे काही पारशी मांसाहारी पदार्थ आहेत. अंडी आणि स्क्रॅंबल्ड एग, पारसी आकूरी, पोरो सारखे अंड्याचे पदार्थ हे पारशी नाश्त्यात असतात.[२] +नरिमन पॉईंटसह मुंबईमधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1166.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21e4e0c3514062bbf3d22e752d7b2c4a496239ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1166.txt @@ -0,0 +1,16 @@ +मनुष्य किंवा प्राण्यांना पाय वापरून वेगाने जाण्याची किंवा हालचाल करण्याची क्रिया म्हणजे धावणे होय. +धावणे या क्रियेत दोन्ही पाय हवेत उचलले जातात. तर चालणे या क्रियेत पाय जमीनीला टेकलेले असतात. +मानवाने धावण्याची क्षमता सुमारे चार लाख वर्षांपूर्वी प्राप्त केली असे मानले जाते. हे बहुदा [शिकार]करणे आणि प्राण वाचवणे या साठी विकसित झाले असावे. संस्कृतींचे आगमन झाल्यावर मात्र अनेक कारणांसाठी धावणे होऊ लागले. यात लढाईचे निरोप व धार्मिक कारणे होती. प्राचीन ग्रीस मध्ये अशाच कारणातून मॅरॅथॉन ही धावण्याची स्पर्धा सुरू झाली. इ.स.पूर्व ७७६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत धावण्याचा समावेश होता अशी नोंद आढळते.यग +आपण धावत असताना आपल्या पायाची स्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते,आपण ज्या वेळेस धावत असतो त्या वेळेस आपला दावा पाय व उजवा पाय हे विरुद्ध दिशेने काम करत असतात. +आपला एक पाय जेव्हा पुढे टाकतो त्याच वेळेस आपला दुसरा पाय मागे असतो व नंतर मागचा पाय पुढे आणला असता पुढचा पाय मागे जातो आय क्रियेला आपण धावणे आहे म्हणतो. +आपण धावत असताना आपल्या पायाची स्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते,आपण ज्या वेळेस धावत असतो त्या वेळेस आपला डावा पाय व उजवा पाय हे विरुद्ध दिशेने काम करत असतात. +आपन एक पाय जेव्हा पुढे टाकतो त्याच वेळेस आपला दुसरा पाय मागे असतो व नंतर मागचा पाय पुढे आणला असता पुढचा पाय मागे जातो या क्रियेला आपण धावणे आहे म्हणतो. +धावण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये;- +१०० मी धावणे ,४०० मी धावणे , ८०० मी धावणे ,१२०० मी धावणे , १४०० मी धावणे +तसेच आणखी इतर खेळांमध्ये सुधा धावण्याचा वापर केला जातो जसे खो खो , गोळा फेक,लांब उडी ,उंच उडी. +ज्यावेळेस आपण धावतो त्या वेळेस अपला पायाचा ताल म्हजे पंजा त्याला अपण चावडा असे म्हणतो +धावण्याने शरीर खूप चपळ बनते आणि शरीरामध्ये लवचिकता जास्त प्रमाणामध्ये येते दररोज धावल्याने आपण निरोगी राहतो आणि आपल्याला आनंद मिळतो. शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी धावण्याचा खूप उपयोग होतो आणि दररोज धावण्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया खूप प्रकारे सुधारते आणि आपले शरीर सदृढ व आरोग्यदायी बनते. +20kmperhour +धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी धावण्याची क्षमता सातत्याने वाढवत राहणे आवश्यक असते. त्यासाठी स्नायूंच्या लवचिकतेसाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच भरपूर श्वास घेता यावा म्हणून फुफ्फुसाचे व्यायामही आश्यक असतात. धावताना सुरुवातीला पायात गोळे येणे, शरीर दुखणे हे त्रास होऊ शकतात. परंतु कालांतराने हे त्रास जातात. कर्बोदके, प्रोटीन्स, या गोष्टींबाबत आहारतज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षक यांचा सल्ला महत्त्वाचा असतो. +inno.0 + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11674.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e343009f4c96e76600513fcacc1741653c6d66a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11674.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारसोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11675.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36e546be8253432c1379002713804d2f227e2af5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11675.txt @@ -0,0 +1 @@ +पारसोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11700.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8635a57a9ef215770156e3a32aa9572ad562f78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11700.txt @@ -0,0 +1,27 @@ +पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. [१] +महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[२][१] +प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्ये स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य व चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले. +पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते.[१] +महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे. +महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे. +आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.[३] +धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले.[४] +आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो[५] +पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. ती नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते.[६]महान ऋषि पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. +मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, व तिचे नाव देवी सत्यवती झाले. [७][८] +व्यास जन्माची कथा संक्षेपाने अशी आहे. पराशर ऋषि गंगा पार करण्यासाठी गंगातटावर आले. तटावर एक कोळी होता. परशारांनी कोळ्याला गंगापार करून देण्यास सांगितले. कोळ्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगापार नेण्यास सांगितले. त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षाची बालिका होती. मुलीने गंगापार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालू केली. नाव मध्यधारेत आल्यावर तपस्वी ऋषींचे मन बहकले व त्यांनी त्या सात वर्षाच्या मुलीपाशी संभोगाची इच्छा व्यक्त केली. मुलगी सुद्धा फार धूर्त होती. तिने ऋषींना सांगितले की ती केवळ सातच वर्षाची असल्यामुळे ऋषी तिच्याशी संभोग कसा काय करू शकतील? तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण षोडशवर्षीय करावे. ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या सात वर्षाच्या मुलीला सोळा वर्षाची बनविले. तेव्हा ऋषि त्या युवती मत्स्यगंधेकडून कामतृप्ती करू इच्छिते झाले. परंतु तो दिवसाचा समय होता आणि मुलगी असली म्हणून काय झाले? तिच्या ठायी शालीनता व स्त्रीसुलभ लज्जा होतीच! तिची दिवसाढवळ्या संभोगाला तयारी नव्हती. पण ऋषीतर कामातुर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते. "कामातुराणां न भयं न लज्जा।" तेव्हा ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजे धूम्र वायुमंडल उत्पन्न केले. एवढे गडद की जवळपासचे काहीच दिसत नव्हते. नंतर पराशराने मत्स्यगंधेशी संभोग केला व जो पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव व्यास असे ठेवण्यात आले. +वरवर पाहिल्यास ही कथा अश्लील आणि अनैतिक दिसते. जीवशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर सात वर्षाच्या जीवाचे वय एकदम वाढू शकत नाही. शिवाय आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय? मुळीच नाही. मग या कथेत कोणते रहस्य भरले आहे? ते रहस्य वायुतत्वाच्या अनुभूतीचे आहे. जे साधक साधना करून वायुतत्वाच्या पलिकडे आकाशतत्वाकडे व त्याहीपलीकडे परातत्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास पराशर ऋषी असे म्हणतात. परा अवस्थेला शर मारणारा तो पराशर ऋषी. परातत्वाचा वेध करण्याविषयी उपनिषदात श्लोक आहे. "प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम् उच्चते।" पराशर वायुतत्वाची साधना करण्यास गंगेवर गेले आणि तेथे त्यांना सात वर्षांची बालिका मिळाली. कोळ्याला व मत्स्याला गंगासागर कसा पार करावा, हे ज्ञान आहे कारण दोघेही ऐल तटावरून पैल तटापर्यंत जावू शकतात. म्हणून सात वर्षांची बालिका कोळी व तिचे नाव मत्स्यगंधा दाखविलेले आहे.  मत्स्य + गं + धा म्हणजे ज्ञानाचा वेग धा म्हणजे धारण करणारी अवस्था! बालिका सात वर्षीय का ? तर आपली काया सात यौगिक चक्रांचीच बनलेली आहे आणि जो साधक आपल्या कायेचा, शरीराचा पूर्ण उपयोग म्हणजेच उपभोग घेईल तो गंगासागर, संसारसागर पार करू शकेल. +नंतर युवती सोळा वर्षांची दाखविलेली आहे. याचा आशय हा की साधक जोपर्यंत पूर्णपुरूष बनत नाही तो पर्यंत तो परातत्वाप्रत पोहोचू शकत नाही. पूर्णपुरूष होण्याकरिता त्याला "षोडशकला युक्त" बनले पाहिजे, उपनिषद अशा पूर्ण साधकाला "षोडशकलापुरूषः" म्हणतात. म्हणून कथेमध्ये सात वर्षाच्या बालिकेला संभोग योग्य सोळा वर्षाची बनविलेली आहे. +आता धुके किंवा धूम्र अवस्थेचे प्रयोजन काय? तर वायुतत्वामध्ये प्रवेश करते वेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते. वायुतत्वाच्या या दिव्य अनुभूतीला उद्देशूनच भगवान व्यासांनी पराशर आणि मत्स्यगंधा संभोगाचे समयी कथेत गडद धुके दाखविले. अशा आत्मसंभोगातून म्हणजेच आत्म्याच्या व परमात्म्याच्या मीलनातून वेद म्हणजे ज्ञानाचा जन्म झाला. पुत्र म्हणजे फलप्राप्ती व त्याचे नाव व्यास ठेवले गेले. +वर्तुळाच्या परिघापासून निघून, केन्दबिंदू छेदून, परत परिघापर्यंत जाणारी सरळ रेषा म्हणजे व्यास (diameter) आहे. मनुष्य जन्म-मृत्यूच्या संसार चक्राच्या परिघावर सतत फिरत असतो. एक वेळ येते की ती व्यक्ती विचार करते, नक्की जीवन म्हणजे काय? मी कुठून आलो व कुठे चाललोय? ती परीघावर थांबते व शोध सुरू होतो. ती या चक्राच्या केंद्र बिंदूपर्यंत येते, पूर्ण ज्ञान प्राप्त करते व पुन्हा प्रवास सुरू होतो तो परिघापर्यंत, मिळवलेले ज्ञान समाजाला वाटण्यासाठी! एकूण प्रवास झाला दोन त्रिज्या अंतराचा म्हणजे व्यास अंतर! अशी उच्च अवस्था म्हणजेच भगवान व्यास! जी व्यक्ती संसाराचे पूर्ण ज्ञान प्राप्त करते, ती व्यास होय. व्यास ही उपाधी आहे न की व्यक्तीचे नाव! +कल्की पुराण +प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वतः देवाचे रूप होते. त्यांची स्तुती पुढील श्लोकांनी केली आहे.[११] ====== +नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः। +येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।। +मराठी अर्थ - महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा प्रचंड बुद्धीच्या महर्षि वेदव्यास यांना माझे नमस्कार असो. +व्यासाय विष्णूरूपाय व्यासरूपाय विष्णवे। +नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।[१२] +मराठी अर्थ - +ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे, +वसिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझा नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11701.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f25efbe16793b413371315c50caef24f5bff32b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11701.txt @@ -0,0 +1 @@ +पारास्केवास अँत्झास हा ग्रीसचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11720.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57eaef18170f0e396bbd4001f8e21b6076f30c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11720.txt @@ -0,0 +1 @@ +पारू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील मुद्धा मंदारम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11724.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b29fe8360b1f699c6b3b4fcb0e6673b85f288ccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11724.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारूंदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1173.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..737125bb407603ed9476ca4c03552a2e55cf84d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1173.txt @@ -0,0 +1,2 @@ +धावरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11744.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98eaa4d9558e5589ce09dd8d959be031c2e7fb7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11744.txt @@ -0,0 +1,43 @@ +(झांशी‌च्या नेवाळकरांची जहागीर)महाराष्ट्र • भारत +पारोळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. +पारोळा येथे एन्.ई.एस. हायस्कूल आहे. येथे पोलीस स्टेशन आहे. पारोळा येथे झाशीच्या नेवाळकरांचा किल्ला आहे. झांशीचे राजघराणे नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. कोकणस्थ तांबे हे कालांतराने येथे स्थायिक झाले म्हणून ह्या गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्याचे सांगितले जाते. तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव नेवाळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ साली ह्याच गावात झाला. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. +शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजाचा सुंदर असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे सुंदर गाव आहे. या गावात गणपतीचे पुरातन मंदिर आहे. त्याचे आता बांधकाम सुरू आहे. पारोळा अतिशय सुंदर शहर आहे. पारोळा आता शैक्षणिक केंद्र झाले आहे. पुरातन बालाजी मंदिर आता बांधले जात आहे. + +त्या गावाचे नाव शिरोळे आडनाव असणाऱ्या लोकांनी गावाचे नाव पारोळे ठेवले. नंतर काही दिवसात ते नाव पारोळा झाले. "शिरोळे ते पारोळे" असे शिरोळे कराचे ब्रीद वाक्य आहे. +झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ साली इथेच झाला. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. +पारोळ्याचा भुईकोट किल्ला व राणी लक्ष्मीबाईंची जहागीर +जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा हे गाव तेथील भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पारोळा हे तालुक्याचे ठिकाण जळगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर, एरंडोल, भडगाव आदी गावांशी गाडीमार्गाने जोडले गेलेले आहे. +हा किल्ला हरी सदाशिव दामोदर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती. +"माझी झांशी नाही देणार" हा बाणेदार उदगार काढणारी मर्दानी झाशींची राणी उर्फ मनकर्णिका तांबे ह्यांचे पारोळा ही‌ जहागीर. याच गावात खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट आज काहीश्या पडीक अवस्थेत उभा आहे. याच भुईकोटाची या धाग्यात माहिती घेणार आहोत. +केळी, सोन्याच्या पेठा आणि चित्रपटांच्या वितरणाचे केंद्र अश्या विविध कारणासाठी प्रखात्य असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातून धुळे-नागपुर महामार्ग जातो. याच महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळे गाव वसलेले आहे. पूर्वी या गावातील रस्त्यावर अधूनमधून पिंपळाचे अनेक ' पार ' ओळीने बांधलेले दिसायचे. त्यामुळे या गावाची ओळख पारांच्या ओळी म्हणजेच 'पारोळी' म्हणून झाली. नंतर अपभ्रंशाने पारोळीचे ' पारोळे ' नाव पडले. +पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. पारोळा किल्ला जळगाव जिल्ह्यातील दगडी बांधकामाचा सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे.याच किल्ल्याजवळ बोरी नदीवर बांधलेले सुंदर धरण आहे. +अठराव्या शतकात म्हणजे पेशवाईत उभारलेल्या या भुईकोटाचा इतिहास मोठा दैदिप्यमान आहे. पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ.स.१७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर (राणी लक्ष्मीबाई यांचे आजे सासरे) यांनी बांधल्याची नोंद आहे. या गावाची उभारणी किल्ला बांधणीच्या वेळी सुमारे २९० वर्षांपूर्वी झाली असावी. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत उर्जीतावस्थेला आणले. किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला व हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपुर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा वेळी इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालाभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरून इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. राणीचे कुटुंब म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले व १८६० मध्ये जहागीरी खालसा केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिली. शिवाय किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही आढळतात. राणी लक्ष्मीबाई माहेरचे वंशज म्हणजे कोकणस्थ तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. म्हणून गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणतात. +पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास दिल्ली दरवाजा तर अन्य दरवाजांना धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी नावे होती. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गावाजवळ येताच मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे दर्शन घडते. १७व्या शतकाच्या सुरुवातीस पारोळा भुईकोट बांधण्यात आला. पारोळा बसस्थानकाहुन काही अंतरावर असल्याने किल्ल्यापर्यंत पायी जाता येते. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार असुन किल्ल्याला चारही बाजूला तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे. +सध्या या खंदक व तलावाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही पण आतील बाजूने पाहिल्यास मात्र पाण्यात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. +या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे आतील अवशेष सुस्थितीत आहे +पण किल्ल्याची देखरेख नसल्याने किल्ल्यात अस्वछता आहे. काही स्थानिक आजही किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात. +मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणाऱ्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. +गडाच्या नव्याने बसवलेल्या उत्तराभिमुख दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. +किल्ल्याच्या खंदकावरून जाणाऱ्या या प्रवेशद्वारासमोर पूर्वी उचलता येणारा लाकडी पूल होता असे सांगितले जाते. +आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यासाठी देवड्या दिसतात तर समोर २० फूट उंच तटबंदी दिसते. +या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या असुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. +इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे रणमंडळ असुन गडाच्या मुख्य दरवाजावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी ही रचना आहे +सपाट भुभागावर बांधलेल्या चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्याची लांबीरुंदी ४८० x ४५० फूट असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत अकरा बुरुज आहेत. +दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच गडाच्या मध्यभागी बालेकिल्ला दिसून येतो. +इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे. बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २० फूटी भव्य बुरुज असुन या बुरुजांच्या मध्ये एक ३० फूटी चौकानी बुरुज व त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. +या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी.डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी व तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या कमानींजवळ वरील बाजुस षटकोनी तर आतील बाजुस चौकोनी आकार असणारी विहीर आहे. कमानी पाहुन पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी एकमेव जिना आहे. या जिन्याने वर चढुन संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते पण उतरण्यासाठी पुन्हा येथेच यावे लागते. +गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी असुन तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. आहे. +पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाच्या खाली आतील बाजुला दारुकोठार आहे. तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याचे चोहोबाजूंनी दर्शन घेता येते. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाची कामे निधीअभावी अर्धवट आहेत. +पूर्वेकडील या तटबंदीच्या बाहेरील बाजूस तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी तटबंदीत दोन ठिकाणी दरवाजे आहेत. असेच दरवाजे तलावाच्या विरुद्ध बाजूस दिसून येतात. +या तटबंदी समोर जमिनीच्या खालील पातळीत महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे एक भुयार असून ते ८ कि.मी.वरील नागेश्वर मंदीरात उघडते अशी समजूत आहे. +गडावर अजुन दोन ठिकाणी या भुयाराचा मागोवा दिसतो. एक म्हणजे दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुस व बालेकिल्ल्याच्या चौकोनी बुरुजाच्या पुढे. या ठिकाणी बारकाईने पाहिल्यास या भुयाराचा आतील भाग खुप मोठा दिसतो यावरून हे भुयार नसुन तळघर असावे असे वाटते. +किल्ल्याच्या दक्षिणेला कोपऱ्यात हमामखान्याचे अवशेष असुन या तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेऱ्या असाव्यात. या कचेऱ्याच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते त्याचे अवशेष पहायला मिळतात. त्याकाळात या कोनाड्यात दिवे लावून हा महाल उजळला जात असेल. +महादेव मंदिराच्या पुढे जहागीरदार यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. +बालेकिल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी जे पुर्वाभिमुख महाद्वार आहे, त्याचा मुळ दरवाजा नष्ट झाला आहे, त्यामुळे नवीन लोखंडी महाद्वार बसवले आहे. +येथेच पूर्वेला बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असुन पश्चिमेला लहान दरवाजा आहे. +बालेकिल्ल्याच्या एका मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून गेला असून बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक आहे. किल्ल्यात एकूण दहा विहिरी असुन मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर चार उजव्या बाजुला तर एक डाव्या बाजुला असुन चौकोनी बुरुजाच्या समोर एक, तर दोन दक्षिणेकडे तटबंदीजवळ व दोन विहीर बालेकिल्ल्यात आहे. बालेकिल्ल्यात असलेल्या विहीरीतील पाणी हौदात ओतून ते हमामखान्यापर्यंत खेळवण्यात आले होते ते चर आजही पहायला मिळतात. याशिवाय बालेकिल्ल्यात पाण्याचा अजुन एक हौद दिसून येतो. पाण्याबाबत हा किल्ला संपन्न असल्याचे दिसून येते +पारोळ्यामधील भुईकोट किल्ला उत्तम बांधणीचा आहे. जळगाव जिल्ह्यात एवढ्या चांगल्या बांधणीचा दुसरा भुईकोट किल्ला नाही. पारोळा किल्ला साधारण १६० मी. लांबीला असून रुंदीला १३० मी. एवढा आहे. याची तटबंदी खणखणीत बांधणीची असून भोवताली रुंद असा खंदक आहे. +किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी केलेली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून ८ कि. मी दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगतात. या भुयारातून घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे ते भुयार असल्याची समजूत आहे. +बाहेरच्या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या (छिद्रे) केलेल्या आहेत. तटबंदीवरून बाहेरील खंदक पहाता येतो. खंदक काही ठिकाणी जास्त रुंद आहे. त्यात पाणीही भरलेले असते. किल्ल्याभोवतालीच गावाची वस्ती आहे. या वस्तीच्या रेट्यामुळे किल्ल्याचे देखणेपण नाहीसे झाले आहे. गावची बाजारपेठ ही किल्ल्याला लागून आहे. दरवाजा जवळील खंदकामधे काही टन प्लॅस्टीकचा कचरा तरंगताना दिसतो. +हा देखणा भुईकोट किल्ला झाशीच्या राणीने बांधला अशी अनेक स्थानिकांची समजूत आहे. वास्तविक हा किल्ला राणी लक्ष्मीबाई यांच्या सासरच्या पुर्वजांनी बांधला. राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव तांबे होते. ते मुळ कोकणातले पण कालांतराने ते पारोळ्यात आले म्हणून गावाला राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास लाभला. तांबे यांचे वंशज अजून पारोळ्यात वस्ती करून असल्याचे सांगतात. +पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ. स. १७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी बांधल्याची नोंद आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र दामोदरराव यांचा जन्म इथेच झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11748.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf182c3cfe1172c57791c0c70101042a77560f65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11748.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्क इबिराब्वीरा हे ब्राझिल साओ पाउलो एक प्रमुख उद्यान आहे. इ.स. १९५४ साली हे उद्यान सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले. +स्थानिक तुपी-ग्वारानी भाषेत इबिराब्वीराचा अर्थ कुजलेले झाड असा होतो. या स्थळावर पूर्वी असलेल्या याच नावाच्या खेड्याचे नाव या उद्यानास देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11769.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9013f19678c61b003a13f081be88dcbb56a7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11769.txt @@ -0,0 +1,3 @@ +पार्कर एगर्टन (जन्म १३ मे १९८७ - व्हर्जिनिया) एक अमेरिकन बॉडीबिल्डर आणि अभिनेता आहे.[१] जुलै २०१५ मध्ये तो आयर्नमॅन मासिकमध्ये वैशिष्ट्यीकृत होता .[२]त्याने तू कॅच द प्रीडेटर, आईस कोल्ड किलर्स आणि द परफेक्ट मर्डर अशा अमेरिकन टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले.[३] +एगरटोनने गोल्डच्या जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून कारकीर्द सुरू केली. २०१३ मध्ये त्याने एफबीबी उत्तर अमेरिका चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फिस्कमध्ये १२ वा क्रमांक मिळवला आणि २०१४ मध्ये एनपीसी ज्युनियरच्या यूएसए चॅम्पियनशिपमध्ये त्याने ६ वा क्रमांक मिळविला.[४] २०१५ मध्ये एनपीसी बाल्टिमोर ग्लॅडिएटर क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने १४ वे स्थान मिळविले. २०१९ मध्ये एनपीसी यूएसए चॅम्पियनशिपमध्ये वर्ग-जी प्रकारात ते १३ व्या स्थानावर होते.ऑक्टोबर २०१६ रोजी तो आयर्नमॅन मासिकामध्ये (अमेरिकन संपादन) वैशिष्ट्यीकृत होता. सप्टेंबर २०१६ रोजी तो स्नायू आणि फिटनेस मासिकात दिसला.[५] +पार्कर एगरटोन ग्रेटरफिजिक्सवर diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11780.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52bef5c383a7a32ef1ca5aa0e2311be370c6fec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11780.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11787.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c39e74bdf71a142bd0a78f43500b5a663846339e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11787.txt @@ -0,0 +1,3 @@ +पार्थसारथी हरिश्चंद्र शर्मा. +जुलै १४, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11803.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c990748465183b7ebd22a916b2729503b2a60c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11803.txt @@ -0,0 +1,51 @@ + +१६° ४२′ ००″ N, ७४° १४′ ००″ E + +कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी व कर्नाटक बॉर्डरला लागून असल्याने काही भागात कन्नड बोलली जाते. येथील श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी जयसिंगपूर कुरुंदवाड नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी तसेच धार्मिक क्षेत्र वाडी रत्‍नागिरी येथील जोतिबा खोची येथील भैरवनाथ मंदिर इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. +कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यांसोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते. +कोल्हापूरमध्ये मिळणारे प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ म्हणजे कोल्हापूरची मिसळ. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते. उदा. बावडा मिसळ, फडतरे मिसळ, चोरगे मिसळ, हॉटेल साकोली मिसळ, खासबाग मिसळ वगैरे मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात कोल्हापुरातला तांबडा रस्सा (मटणाचे सूप), पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे), मटणाचे लोणचे, खिमा राईस बॉल्स प्रसिद्ध आहेत. +कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत असलेली राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे. मिरजकर तिकटी, गंगावेस येथे दूध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दूध मिळते. इथले महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. कोल्हापूरची लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हा (जुना) शाहू महाराजांचा जिल्हा म्हणूनही सर्वपरिचित आहे. +एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडले होते म्हणून देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. आश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावे आहेत ती तशीच पुढेही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. +कोल्हापूरचा पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण कोल्हापुरी म्हणजे तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्श्यांप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकाऊ नाही. तांबडा रस्सा तयार करताना कोल्हापुरी चटणी वापरावी लागते. +कोल्हापूरचा अजून एक प्रकार म्हणजे दावणगिरी लोणी डोसा. हा डोसा बऱ्याच ठिकाणी मिळतो. भरपूर लोणी आणि जाळीदारपणा ही त्याची खासियत. कोल्हापुरात मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातली पद्धत जवळपास सारखीच असते. पांढरा तांबडा रस्सा, सुके मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्यांचीही (चपात्या) एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली ही गरम गरम चपाती अप्रतिम लागते. इथली आणखी एक खासियत म्हणजे ‘पोकळा’ नावाची पालेभाजी. तव्यावर केलेली ही भाजी, भाकरी आणि खर्डा यांना तोड नाही. याबरोबरच दूधकट्ट्यावर मिळणारे आणि ग्राहकासमोरच काढण्यात येणारे म्हशीचे धारोष्ण दूध. थेट पेल्यातच धार काढायची व पेला तोंडाला लावायचा! आणखी एक अफलातून प्रकार म्हणजे, ताज्या दुधात सोडा घालून प्यायची पद्धत अशा पद्धतीने दुधाचे निर्जंतुकीकरण होते. +कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे अशा १०८ शक्तिपीठांची सूची तयार केली आहे. यामध्ये जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे, त्या करवीर क्षेत्राच्या महालक्ष्मीचे विशेष महत्त्व आहे. श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते. यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. +क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रूपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे. या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते की श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात. +महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल की हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच इसवी सन ६०० ते ७०० काळातील असावे. मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रत्नांपासून बनवली आहे. हीसुद्धा जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते. महालक्ष्मीची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे. कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे. यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात +कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते. +हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. +इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२५ ते ५५० पर्यंत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स. ५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स. १२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७ मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते. +देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहेत्. +१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले होते. २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे. ३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली. ५ संभाजीराजास पकडणाऱ्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या भूमीत घडला. +शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले. +कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानसाठी स्वतःची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरणपूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती. आज ही सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे. या सिंचन व्यवस्थेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झऱ्याला सुरुवात होते, तीतून तो कळंबा तलाव येथे आणला. तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर ठेवला, जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा किंवा इतर काही जाऊन दूषित होऊ नये. कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्याद्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले. यासाठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहराला पुरवले जात होते. +कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, सांगली पासून ५० किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ इथून जातो. +कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापुराला तलावाचे शहर म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई, वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. यातील फक्त रंकाळा आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत. १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरींमध्ये सोडले गेले. १३० वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव बांधण्यात आला. ओघळणारे पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात आले. शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले. +[१] Archived 2016-03-05 at the Wayback Machine. +कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे. +कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो. येथे गूळ संशोधन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर, स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत. कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे. +कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापुराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे. +कोल्हापूर शहरात खालील काही नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर (छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रिसर्च, कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे. ही एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे आणि ह्या ठिकाणी संशोधनपण होते. पर्यावरण व्यवस्थापन या विषयामध्ये एम.बी.ए. व पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये एम.एस्सी. असे नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. इ.स. १९६२मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. +कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र सरकारने शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे. महावीर कॉलेज, श्रीमती ताराराणी ट्रेनिंग कॉलेज, राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर हे देखील येथील अग्रगण्य शिक्षण केंद्र आहे. +कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत. +मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी "जयप्रभा स्टुडिओ"ची निर्मिती केली. तसेच रंकाळा तलावाच्या पिछाडीस शालिनी सिने स्टोन हा स्टुडिओ होता. सध्या फक्त कोल्हापूर चित्रनगरी हेच शूटिंगसाठी ठिकाण उपलब्ध आहे. +मर्दानी कुस्ती हा कोल्हापुरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वतः एक चांगले पैलवान होते. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहू महाराज हे एक पैलवान होते जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी रोम येथील प्रसिद्ध ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले. खासबाग हे भारतातील एकमेव कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ ६०,००० लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे. +एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-१. कसबा बावडा कुस्ती केंद्र२. खासबाग३. नवी मोतीबाग तालीम४. पंत बावडेकर आखाडा५. मोतीबाग तालीम६. शाहू आखाडा, चंबूखडी७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड८. शाहूपुरी आखाडा९. शाहू विजयी गंगावेस१०.कालाईमाम तालीम. +कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत. चप्पल पूर्णपणे चामड्यापासून बनते. कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले. (२०१९) कोल्हापुरी साज, चपलाहार इत्यादी दागिने प्रसिद्ध आहेत. +कोल्हापूर पासून २२ किमी अंतरावर श्री क्षेत्र जोतीबा (वाडीरत्‍नागिरी) हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ श्री जोतीबाच्या दर्शनाला येतात. जोतिबा चैत्र यात्रेला प्रसिद्ध अशी गर्दी असते आणि मंदिरावर गुलालाचा वर्षाव असतो. +ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तुतः साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी (खासबाग मैदान), गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. आता उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर पर्यटनासाठी सहकुटुंब बाहेर पडण्याचा ट्रेंड रुळला आहे. याच काळात पर्यटकांना कोल्हापूर हे डेस्टिनेशनही खुणावते आहे. शहर परिसरातील, जिल्ह्यातील निसर्ग सर्वांना मोहात पाडतो. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर, एका बाजूला संध्यामठ, पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचे तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात. +निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचे गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण आहे. राधानगरी, चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत फिरता येते. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लिंग चेतवतात. +खासबाग मैदान : +कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत. कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते. कणेरी येथील सिद्धगिरी मठ करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत. कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी.ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत. +कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे. जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. +जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचा परिसर आहे. कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते. +शाहू तलाव व पुरातन शिव मंदिर आणि जागृत हनुमान मंदिर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. +श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर +कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड (?) ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे. +पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूरपासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटीपासून 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढऱ्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणाऱ्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करुण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे, सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातून सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिद्धी जोहारने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचू शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातीर्थी पडले व मरण पावले. किल्ल्यामध्ये अशाच प्रकारची आणखी एक इमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, इसवी सन १५०० मध्ये ही इमारत इब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथून फरार झाले. +येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदिर, सोमेश्वर मंदिर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युद्धकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भूमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकीर्द यादवांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत गडाच्या दुरुस्तीचे काम थांबवले. +1701 मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला, आणि येथुन मग मुघल बादशाह यांच्याकडुन ईंग्रज राज्यकर्ता, सर विल्ल्यमनरिस यांच्या हाती हा गड सुफुर्त करण्यात आला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला, ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकांमध्ये आहे. 1782 मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. 1844 मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडून ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला.गडाच्या मुख्यालयापासून 7 कि.मी. पेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली. ऊतरण असलेल्या मोठ्या भींती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या, ह्या भिंतीमध्ये पाहणीकरिता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. राहिलेल्या भागामध्ये 5 – 9 मी. मोठी तटबंदी, लांबीचे मोठे गोल बुरूज बांधले. पुर्वेकडील दरवाजाला चोर दरवाजा म्हणतात, ज्याच्यामधून गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटिशांनी केला. +प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला टाकिसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजापर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिलशाही पद्धतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण उदाहरण आहे. प्रवेशद्वारातील त्रिज्या खंड वर्तुळाकार आहे. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची उपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजूच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्याची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजूला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत, ह्यांच्यामध्ये संपूर्ण भूदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे. येथे सैनिक मोकळेणाने उभे राहू शकतात. मोठ्या, काही 40m by 10mचे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायऱ्यांवरून बाहेरील छतावर जाता येते. +साचा:विश्वकोशीय परिच्छेद हवा +ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस +लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती,सांगली, नांदेड आणि बंगळूर गोवा अक्कलकोट छत्रपती संभाजीनगर पुणे बेळगाव नाशिक अहमदनगर सातारा बारामती मिरज जत बीड नांदेड इचलकरंजी सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसेच कर्नाटक राज्यातील धारवाड हुबळी निपाणी येथे ही शासकीय बस सेवा उपलब्ध आहेत +कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते. कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबरच्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से.च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11811.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f90d813f7f4420b99693152a302c23298d22d637 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11811.txt @@ -0,0 +1 @@ +पार्वतीपुरम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला येथून चारवेळा लोकसभेवर निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11860.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d93bf5e73b5d503406ec1b56e319543e33e71b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11860.txt @@ -0,0 +1 @@ +पालघाटचा किल्ला तथा पलक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला हा केरळच्या पालघाट जिल्ह्यातील किल्ला आहे. येथे प्राचीन तटबंदी असून सध्याचा किल्ला १७६६मध्ये बांधला गेल्याचे समजले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11908.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5217ae8232a5bae4ae7bfb9f2a376a8f212ef47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11908.txt @@ -0,0 +1,3 @@ +पी. भानुमती रामकृष्ण (७ सप्टेंबर १९२५ - २४ डिसेंबर २००५) या भारतीय अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि कादंबरीकार होत्या. तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] चंदिरानी (१९५३) या तिच्या पहिल्या दिग्दर्शनासह ती तेलुगू सिनेमाची पहिली महिला दिग्दर्शक मानली जाते.[२] भानुमती प्रामुख्याने तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिला २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३] ३० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिला "चित्रपटातील महिला" या भागामध्ये सन्मानित करण्यात आले.[४] +भानुमती यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२५ रोजी आंध्र प्रदेशातील ओंगोलजवळील प्रकाशम जिल्ह्यातील दोड्डावरम गावात झाला. ती बोम्माराजू सरस्वथम्मा, वेंकट सुब्बय्या यांची तिसरी अपत्य आहे.[५][६] ती तिच्या वडिलांना वेगवेगळ्या स्टेज शोमध्ये काम करताना बघत मोठी झाली. भानुमतीचे वडील वेंकट सुब्बय्या हे शास्त्रीय संगीताच्या प्रेमी होते आणि त्यांनी लहानपणापासूनच त्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले.[७] +भानुमतीने १९३९ मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तेलुगू आणि तमिळ भाषेतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. लेखक, अभिनय, दिग्दर्शक, निर्माती, गायिका, संगीत दिग्दर्शक, संपादक आणि स्टुडिओ मालक असल्याने तिला चित्रपटसृष्टीतील लोक अष्टावधानी म्हणूनही संबोधत होते. तिला ज्योतिष आणि तत्वज्ञानाचेही चांगले ज्ञान होते.[८] तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11915.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a928b4d11c55c9d32713391bec525c0620ad92af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11915.txt @@ -0,0 +1,14 @@ +गुणक: 16°31′59″N 81°43′59″E / 16.53306°N 81.73306°E / 16.53306; 81.73306 + +आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसपुरम महसूल विभागातील पालकोल्लू मंडळाचे प्रशासकीय मुख्यालय पाकोकोलु आहे. पालाकोल्लू हे राज्यातील कोस्टल आंध्र भागात आहे. हे साचा:रूपांतरित करते. 19.49. भारताची जनगणना, याची लोकसंख्या 61१,२०० आहे आणि शहरी क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ,१,१ 9 of आहे, जे आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील चौथे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हा एल्रु नागरी विकास प्राधिकरणाचा एक भाग आहे. +२०१ In मध्ये, नगरविकास मंत्रालयाच्या 'स्वच्छ भारत मिशन' नुसार स्वच्छ सर्वेक्षण -२०१ Under अंतर्गत पालकोल्लु नगरपालिका झोनल एव्हल गुण १383838..9 With आणि ११ State Out पैकी २० व्या क्रमांकासह दक्षिण विभागातील rd 43 व्या क्रमांकावर आहे. राज्य सरासरी गुण 1916.2 पालाकोल्लू यूएलबी जनगणना कोड 802966. +सन २०१ 2015-१-16 या वर्षासाठी पालकोल्लू शहर निवडण्यात आली. शहरी भागातील बेघर गरीबांसाठी अखिल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहनिर्माण. +K {रूपांतर | 1.5 | मी | फूट} ofच्या सरासरी उंचीवर, पालाकोल्लू शहर राष्ट्रीय महामार्ग 165 (भारत) आणि राष्ट्रीय महामार्ग 216 (भारत) वर वसलेले आहे. याच्या पश्चिमेस कृष्णा जिल्हा व पश्चिमेस विजयवाडा, पूर्वेला अमलापुरम व बंगालचा उपसागर, दक्षिणेस नरसपुरम व बंगालचा उपसागर आणि उत्तरेस राजमुंद्री व पूर्व गोदावरी जिल्हा आहे. +पलकोलु हे क्षीररामचे घर आहे, पाच महान पंचनामा क्षेत्रांपैकी एक आहे. +पालकोल किंवा पालाकोल्लु मूळतः क्षीरराम, क्षीरपुरम, पलकोलनू किंवा उपमन्यपुरम म्हणून ओळखले जात असे. + +१13१13 मध्ये डच लोकांनी आपला पहिला भारतीय कारखाना पालकोल्लु येथे बांधला, जो १3030० मध्ये तात्पुरते सोडून देण्यात आला. डच कोरोमंडलचा एक भाग, ते कापड, दिवाचे तेल, लाकूड, छताच्या फरशा आणि विटा यासाठीचे एक ट्रेडिंग पोस्ट होते. +१838383च्या पॅरिस कराराच्या अंतर्गत (१8383)) हे शहर ब्रिटिश राजांच्या ताब्यात गेले, परंतु डच लोकांनी १ 180०4 पर्यंत त्यांच्याकडून ते सोडले नाही. १18१18 मध्ये पूर्वी ते डचांना परत देण्यात आले होते ते परत ब्रिटिशांना परत देण्यात आले. 1824. +पालाकोल्लूला त्रिलिंगा देसम या नावाने देखील ओळखले जाते, हा प्रदेश तीन लिंगांनी बांधलेला प्रदेश आहे (श्रीशैलम, द्रक्षरम आणि कालेश्वरम) +सर्वात प्रसिद्ध क्षीरराम पाच पंचाम क्षेत्रांपैकी एक आहे आणि तो पलकोलु येथे आहे. भगवान शिव स्थानिक पातळीवर क्षीरा रामलिंगेश्वर स्वामी म्हणून ओळखले जातात. शिवलिंगची स्थापना भगवान विष्णूने केली होती. +प्रसिद्ध श्री लक्ष्मी गणपती नवग्रह सुब्रह्मण्य आलायम, पालोकोलु मधील ब्रोडीपेटा 2 रा लेन येथे स्थित मंदिर. नक्षत्रगण आणि सुब्रह्मण्य स्वामी देवतांसह लक्ष्मी गणपतीच्या दिव्य स्वरूपाचा प्रमुख देवता गणपती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1192.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef50b1c5ebe9c31c2649b16d656225a9d4fd5e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1192.txt @@ -0,0 +1 @@ +ढिवर ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने महाराष्ट्र (पूर्व भागात), मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, गुजरात मध्ये वास्तव्यास आहे. ढिवरांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील मासेमारी हा आहे. ढिवर मासेमारी अन्य इतरही कामे करतात. संस्कृत ढिवर ह्या शब्दापासून ह्या जमातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. ढिवरांची भारतातील लोकसंख्या १६,५३,००० असण्याचा अंदाज असून त्यापैकी ४,४९,००० महाराष्ट्रात आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11923.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df0322ea8f793e684e74504b3258521453ff84c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11923.txt @@ -0,0 +1,9 @@ + पाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक छोटंस गाव आहे.गावात बारमाही वाहणारी नदी असून स्वयंभू शंकराचे मंदिर सुद्धा आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +मढाळ, कळमुंडी, मर्गताम्हाने, +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11926.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c3e5e39313410b1cad3623d24bf3966bdaa29d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11926.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८° ३२′ २८.९८″ N, ७३° १३′ ११.८७″ E +पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. +शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. [१] +पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1195.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e32607bf0701fbbbfdeb824e746a1a06c563ad04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1195.txt @@ -0,0 +1 @@ +मालदीवचा ध्वज (धिवेही भाषा: ދިވެހިރާއްޖެގެ ދިދަ; धिवेही राज्जेयगे धिधा) हिरवा असून त्याला लाल किनार आहेत. ध्वजाच्या मध्यात पांढरी चंद्रकोर आहे. हा ध्वज २५ जुलै १९६५ रोजी स्वीकारला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11975.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e80ead21e92f335bfc7168338a56d5fab82db98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11975.txt @@ -0,0 +1,2 @@ +पालो आल्टो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सांता क्लारा काउंटीच्या वायव्य कोपऱ्यात असेलेल्या या शहराची स्थापना लेलॅंड स्टॅनफर्डने स्टॅनफर्ड विद्यापीठाबरोबरच केली. येथे ह्युलेट-पॅकार्ड, स्पेस सिस्टम्स, व्हीएमवेर, टेसला मोटर्स, फोर्ड संशोधन केन्द्र, झेरॉक्स पार्क, स्काइप आणि इतर अनेक उच्चतंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्यांची मुख्यालये आहेत. +२०१० च्या जनगणनेनुसार पालो आल्टोची लोकसंख्या ६४,४०३ असून येथे राहणारे अमेरिकेतील सगळ्यात उच्चशिक्षित असून हे शहर देशातील सगळ्यात महागड्या शहरांपैकी एक आहे. हे शहर बे एरियाचा एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11994.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e32f02afa4ca28abbfab76f6f50aab975ef26c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_11994.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाल्म डी'ओर (इंग्रजी: Golden Palm ) हा कान्स चित्रपट महोत्सवात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. [१] महोत्सवाच्या आयोजन समितीने १९५५ मध्ये हा पुरस्कार सुरू केला. [१] यापूर्वी, १९३९-५४ पर्यंत महोत्सवाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रां प्री डु फेस्टिव्हल इंटरनॅशनल डु फिल्म होता. [१] १९६४ मध्ये याची जागा ग्रँड प्रीने याची जागा घेतली, आणि १९७५ मध्ये पुन्हा एकदा पाल्म सुरू केला गेला. [१] +हा पुरस्कार चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. [२] [३] [४] [५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12008.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0dddf79793dd3da59701e66dbd2f9f5a191c0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12008.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12015.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd630fcd3437b1b24790c28c20ac2323a4f56b1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12015.txt @@ -0,0 +1,61 @@ +पाळबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे ३४३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १३० कुटुंबे व एकूण ६५८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ७० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३३१ पुरुष आणि ३२७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ४९ असून अनुसूचित जमातीचे ३ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६१५ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Vazeghar kh) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Vinzar) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (Vinzar) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा सर्व वापरासाठी उपलब्ध आहे. +पाल बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +पाळबुद्रुक या गावी भाताचे उत्पादन होते. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12020.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32cb1196bbf9137cf49fcef31e20f6c1c186dc22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12020.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाळाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12039.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e1c651dfd0f8d9a7c2df5969a99cfd643467c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12039.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पाव या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12047.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f9dbe5139bfffbd7dae730829e70942aa2c92e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12047.txt @@ -0,0 +1,18 @@ +पावण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५१ कुटुंबे राहतात. एकूण १४५० लोकसंख्येपैकी ६९५ पुरुष तर ७५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ३०.२२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३९.४१ आहे तर स्त्री साक्षरता २१.७० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २५२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.३८ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +बांधघर, निंबापूर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव,चारी तर्फे जामशेत,धरमपूर, मणिपूर, देवगाव, सोमनाथ, गणेशबाग ही जवळपासची गावे आहेत.डाह्याळे समूह ग्रामपंचायतीमध्ये चारी तर्फे जामशेत,डाह्याळे, आणि पावण ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12070.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ee77da20eb98eb778d0ec6af4703ac029f108b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12070.txt @@ -0,0 +1 @@ +पावलोव्स्की जिल्हा हा रशियामधील अनेक प्रशासकीय आणि नगरपालिका जिल्ह्यांचे नाव आहे. जिल्ह्यांची नावे सामान्यत: पुरुषाचे पहिले नाव पावेलशी संबंधित किंवा व्युत्पन्न केलेली असतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12129.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33732f0b0a94644e9d60563d1a6dfb34ee34f7c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12129.txt @@ -0,0 +1 @@ +पासवान हे हिंदी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12143.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91459451cce4f55e0bd90313fbb4cda56400dab5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12143.txt @@ -0,0 +1,3 @@ +पास्को काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1215.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbb41ac85fcd3b976802f8c071da780afaaaaa38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1215.txt @@ -0,0 +1 @@ +धीवरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12156.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c666c20ec536816b6937a34a1152eefe4a353390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12156.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +पाहुना: द लिटल व्हिजिटर्स (इंग्लिश: Pahuna: The Little Visitors) हा प्रियांका चोप्रा निर्मित आणि पर्पल पेबल पिक्चर्सच्या बॅनरखाली पाखी टायरवाला दिग्दर्शित भारतीय नेपाळी भाषेचा चित्रपट आहे जो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.[१][२] +त्यांच्या मूळ नेपाळमध्ये अशांततेतून पळ काढत, त्यांच्या पालकांपासून विभक्त झालेल्या तीन तरुण भावंडांना भारतात स्वतःच टिकून राहण्यासाठी परिस्थितीचा सामना करायला हवा. +जर्मनीतील आंतरराष्ट्रीय मुलांच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य फिल्म प्रकारात विशेष उल्लेख मिळाला.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12157.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..775f108c52ee8aae73ad203eab4315882926dc4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12157.txt @@ -0,0 +1,8 @@ + पाहुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12158.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3c1548ab1a283bbdb2eb7583f3f3c34b74c01d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12158.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाहुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12166.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97f415a0342010d3d7d46204f19a2c328c5f6800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12166.txt @@ -0,0 +1,18 @@ +पिंक फ्लॉइड (मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्रजी: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बॅंड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बॅंड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत. +इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६० च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली द पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ डॉन हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक डेव्हिड गिल्मोर या चमूत दाखल झाला. +पिंक फ्लॉइड हा लंडनमध्ये 1965 मध्ये स्थापन झालेला एक इंग्रजी रॉक बँड आहे. पहिल्या ब्रिटिश सायकेडेलिक गटांपैकी एक म्हणून लवकर अनुसरण करून, त्यांच्या विस्तारित रचना, ध्वनि प्रयोग, तात्विक गीत आणि विस्तृत लाइव्ह शो द्वारे ओळखले गेले. ते प्रगतीशील रॉक शैलीतील अग्रगण्य बँड बनले, ज्याला काहींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रगतीशील रॉक बँड म्हणून उद्धृत केले. +पिंक फ्लॉइडची स्थापना 1965 मध्ये सिड बॅरेट (गिटार, लीड व्होकल्स), निक मेसन (ड्रम), रॉजर वॉटर्स (बास गिटार, व्होकल्स) आणि रिचर्ड राइट (कीबोर्ड, व्होकल्स) यांनी केली होती. बॅरेटच्या नेतृत्वाखाली, त्यांनी दोन चार्टिंग सिंगल्स आणि द पाइपर अॅट द गेट्स ऑफ डॉन (1967) हा यशस्वी पहिला अल्बम रिलीज केला. गिटारवादक आणि गायक डेव्हिड गिलमोर जानेवारी 1968 मध्ये सामील झाले; बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे बॅरेट एप्रिल 1968 मध्ये निघून गेले. पिंक फ्लॉइडचे सर्वात यशस्वी अल्बम, द डार्क साइड ऑफ द मून (1973), विश यू वेर हिअर (1975), अॅनिमल्स (1977) आणि द वॉल (1979) या अल्बममागील संकल्पना तयार करून वॉटर्स हे प्राथमिक गीतकार आणि थीमॅटिक नेते बनले. द वॉल, पिंक फ्लॉइड – द वॉल (1982) वर आधारित संगीतमय चित्रपटाने दोन बाफ्टा पुरस्कार जिंकले. पिंक फ्लॉइडने अनेक चित्रपट स्कोअर देखील तयार केले. +वैयक्तिक तणावानंतर, राइटने 1981 मध्ये पिंक फ्लॉइड सोडला, त्यानंतर 1985 मध्ये वॉटर्सने सोडले. गिलमर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइड म्हणून पुढे चालू ठेवले, नंतर राइट पुन्हा सामील झाले. त्यांनी ए मोमेंटरी लॅप्स ऑफ रीझन (1987) आणि द डिव्हिजन बेल (1994) हे अल्बम तयार केले, ज्यांना मोठ्या टूरचा पाठिंबा होता, दीर्घ अंतरावर प्रवेश करण्यापूर्वी. 2005 मध्ये, जागतिक जागरूकता कार्यक्रम Live 8 मध्ये परफॉर्मन्ससाठी बॅरेट सोडून सर्व एकत्र आले. बॅरेट 2006 मध्ये आणि राइट 2008 मध्ये मरण पावले. शेवटचा पिंक फ्लॉइड स्टुडिओ अल्बम, द एंडलेस रिव्हर (2014), डिव्हिजनच्या अप्रकाशित सामग्रीवर आधारित होता. बेल रेकॉर्डिंग सत्र. 2022 मध्ये, गिलमोर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइडमध्ये सुधारणा करून "हे, हे, राइज अप!" हे गाणे रिलीज केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ. +2013 पर्यंत, पिंक फ्लॉइडने जगभरात 250 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकले होते, ज्यामुळे ते सर्व काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या संगीत कलाकारांपैकी एक बनले.पिंक फ्लॉइड हा लंडनमध्ये 1965 मध्ये स्थापन झालेला एक इंग्रजी रॉक बँड आहे. पहिल्या ब्रिटिश सायकेडेलिक गटांपैकी एक म्हणून लवकर अनुसरण करून, त्यांच्या विस्तारित रचना, ध्वनि प्रयोग, तात्विक गीत आणि विस्तृत लाइव्ह शो द्वारे ओळखले गेले. ते प्रगतीशील रॉक शैलीतील अग्रगण्य बँड बनले, ज्याला काहींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रगतीशील रॉक बँड म्हणून उद्धृत केले. +पिंक फ्लॉइडची स्थापना 1965 मध्ये सिड बॅरेट (गिटार, लीड व्होकल्स), निक मेसन (ड्रम), रॉजर वॉटर्स (बास गिटार, व्होकल्स) आणि रिचर्ड राइट (कीबोर्ड, व्होकल्स) यांनी केली होती. बॅरेटच्या नेतृत्वाखाली, त्यांनी दोन चार्टिंग सिंगल्स आणि द पाइपर अॅट द गेट्स ऑफ डॉन (1967) हा यशस्वी पहिला अल्बम रिलीज केला. गिटारवादक आणि गायक डेव्हिड गिलमोर जानेवारी 1968 मध्ये सामील झाले; बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे बॅरेट एप्रिल 1968 मध्ये निघून गेले. पिंक फ्लॉइडचे सर्वात यशस्वी अल्बम, द डार्क साइड ऑफ द मून (1973), विश यू वेर हिअर (1975), अॅनिमल्स (1977) आणि द वॉल (1979) या अल्बममागील संकल्पना तयार करून वॉटर्स हे प्राथमिक गीतकार आणि थीमॅटिक नेते बनले. द वॉल, पिंक फ्लॉइड – द वॉल (1982) वर आधारित संगीतमय चित्रपटाने दोन बाफ्टा पुरस्कार जिंकले. पिंक फ्लॉइडने अनेक चित्रपट स्कोअर देखील तयार केले. +वैयक्तिक तणावानंतर, राइटने 1981 मध्ये पिंक फ्लॉइड सोडला, त्यानंतर 1985 मध्ये वॉटर्सने सोडले. गिलमर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइड म्हणून पुढे चालू ठेवले, नंतर राइट पुन्हा सामील झाले. त्यांनी ए मोमेंटरी लॅप्स ऑफ रीझन (1987) आणि द डिव्हिजन बेल (1994) हे अल्बम तयार केले, ज्यांना मोठ्या टूरचा पाठिंबा होता, दीर्घ अंतरावर प्रवेश करण्यापूर्वी. 2005 मध्ये, जागतिक जागरूकता कार्यक्रम Live 8 मध्ये परफॉर्मन्ससाठी बॅरेट सोडून सर्व एकत्र आले. बॅरेट 2006 मध्ये आणि राइट 2008 मध्ये मरण पावले. शेवटचा पिंक फ्लॉइड स्टुडिओ अल्बम, द एंडलेस रिव्हर (2014), डिव्हिजनच्या अप्रकाशित सामग्रीवर आधारित होता. बेल रेकॉर्डिंग सत्र. 2022 मध्ये, गिलमोर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइडमध्ये सुधारणा करून "हे, हे, राइज अप!" हे गाणे रिलीज केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ. +2013 पर्यंत, पिंक फ्लॉइडने जगभरात 250 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकले होते, ज्यामुळे ते सर्व काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या संगीत कलाकारांपैकी एक बनले.पिंक फ्लॉइड हा लंडनमध्ये 1965 मध्ये स्थापन झालेला एक इंग्रजी रॉक बँड आहे. पहिल्या ब्रिटिश सायकेडेलिक गटांपैकी एक म्हणून लवकर अनुसरण करून, त्यांच्या विस्तारित रचना, ध्वनि प्रयोग, तात्विक गीत आणि विस्तृत लाइव्ह शो द्वारे ओळखले गेले. ते प्रगतीशील रॉक शैलीतील अग्रगण्य बँड बनले, ज्याला काहींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रगतीशील रॉक बँड म्हणून उद्धृत केले. +पिंक फ्लॉइडची स्थापना 1965 मध्ये सिड बॅरेट (गिटार, लीड व्होकल्स), निक मेसन (ड्रम), रॉजर वॉटर्स (बास गिटार, व्होकल्स) आणि रिचर्ड राइट (कीबोर्ड, व्होकल्स) यांनी केली होती. बॅरेटच्या नेतृत्वाखाली, त्यांनी दोन चार्टिंग सिंगल्स आणि द पाइपर अॅट द गेट्स ऑफ डॉन (1967) हा यशस्वी पहिला अल्बम रिलीज केला. गिटारवादक आणि गायक डेव्हिड गिलमोर जानेवारी 1968 मध्ये सामील झाले; बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे बॅरेट एप्रिल 1968 मध्ये निघून गेले. पिंक फ्लॉइडचे सर्वात यशस्वी अल्बम, द डार्क साइड ऑफ द मून (1973), विश यू वेर हिअर (1975), अॅनिमल्स (1977) आणि द वॉल (1979) या अल्बममागील संकल्पना तयार करून वॉटर्स हे प्राथमिक गीतकार आणि थीमॅटिक नेते बनले. द वॉल, पिंक फ्लॉइड – द वॉल (1982) वर आधारित संगीतमय चित्रपटाने दोन बाफ्टा पुरस्कार जिंकले. पिंक फ्लॉइडने अनेक चित्रपट स्कोअर देखील तयार केले. +वैयक्तिक तणावानंतर, राइटने 1981 मध्ये पिंक फ्लॉइड सोडला, त्यानंतर 1985 मध्ये वॉटर्सने सोडले. गिलमर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइड म्हणून पुढे चालू ठेवले, नंतर राइट पुन्हा सामील झाले. त्यांनी ए मोमेंटरी लॅप्स ऑफ रीझन (1987) आणि द डिव्हिजन बेल (1994) हे अल्बम तयार केले, ज्यांना मोठ्या टूरचा पाठिंबा होता, दीर्घ अंतरावर प्रवेश करण्यापूर्वी. 2005 मध्ये, जागतिक जागरूकता कार्यक्रम Live 8 मध्ये परफॉर्मन्ससाठी बॅरेट सोडून सर्व एकत्र आले. बॅरेट 2006 मध्ये आणि राइट 2008 मध्ये मरण पावले. शेवटचा पिंक फ्लॉइड स्टुडिओ अल्बम, द एंडलेस रिव्हर (2014), डिव्हिजनच्या अप्रकाशित सामग्रीवर आधारित होता. बेल रेकॉर्डिंग सत्र. 2022 मध्ये, गिलमोर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइडमध्ये सुधारणा करून "हे, हे, राइज अप!" हे गाणे रिलीज केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ. +2013 पर्यंत, पिंक फ्लॉइडने जगभरात 250 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकले होते, ज्यामुळे ते सर्व काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या संगीत कलाकारांपैकी एक बनले.पिंक फ्लॉइड हा लंडनमध्ये 1965 मध्ये स्थापन झालेला एक इंग्रजी रॉक बँड आहे. पहिल्या ब्रिटिश सायकेडेलिक गटांपैकी एक म्हणून लवकर अनुसरण करून, त्यांच्या विस्तारित रचना, ध्वनि प्रयोग, तात्विक गीत आणि विस्तृत लाइव्ह शो द्वारे ओळखले गेले. ते प्रगतीशील रॉक शैलीतील अग्रगण्य बँड बनले, ज्याला काहींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रगतीशील रॉक बँड म्हणून उद्धृत केले. +पिंक फ्लॉइडची स्थापना 1965 मध्ये सिड बॅरेट (गिटार, लीड व्होकल्स), निक मेसन (ड्रम), रॉजर वॉटर्स (बास गिटार, व्होकल्स) आणि रिचर्ड राइट (कीबोर्ड, व्होकल्स) यांनी केली होती. बॅरेटच्या नेतृत्वाखाली, त्यांनी दोन चार्टिंग सिंगल्स आणि द पाइपर अॅट द गेट्स ऑफ डॉन (1967) हा यशस्वी पहिला अल्बम रिलीज केला. गिटारवादक आणि गायक डेव्हिड गिलमोर जानेवारी 1968 मध्ये सामील झाले; बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे बॅरेट एप्रिल 1968 मध्ये निघून गेले. पिंक फ्लॉइडचे सर्वात यशस्वी अल्बम, द डार्क साइड ऑफ द मून (1973), विश यू वेर हिअर (1975), अॅनिमल्स (1977) आणि द वॉल (1979) या अल्बममागील संकल्पना तयार करून वॉटर्स हे प्राथमिक गीतकार आणि थीमॅटिक नेते बनले. द वॉल, पिंक फ्लॉइड – द वॉल (1982) वर आधारित संगीतमय चित्रपटाने दोन बाफ्टा पुरस्कार जिंकले. पिंक फ्लॉइडने अनेक चित्रपट स्कोअर देखील तयार केले. +वैयक्तिक तणावानंतर, राइटने 1981 मध्ये पिंक फ्लॉइड सोडला, त्यानंतर 1985 मध्ये वॉटर्सने सोडले. गिलमर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइड म्हणून पुढे चालू ठेवले, नंतर राइट पुन्हा सामील झाले. त्यांनी ए मोमेंटरी लॅप्स ऑफ रीझन (1987) आणि द डिव्हिजन बेल (1994) हे अल्बम तयार केले, ज्यांना मोठ्या टूरचा पाठिंबा होता, दीर्घ अंतरावर प्रवेश करण्यापूर्वी. 2005 मध्ये, जागतिक जागरूकता कार्यक्रम Live 8 मध्ये परफॉर्मन्ससाठी बॅरेट सोडून सर्व एकत्र आले. बॅरेट 2006 मध्ये आणि राइट 2008 मध्ये मरण पावले. शेवटचा पिंक फ्लॉइड स्टुडिओ अल्बम, द एंडलेस रिव्हर (2014), डिव्हिजनच्या अप्रकाशित सामग्रीवर आधारित होता. बेल रेकॉर्डिंग सत्र. 2022 मध्ये, गिलमोर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइडमध्ये सुधारणा करून "हे, हे, राइज अप!" हे गाणे रिलीज केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ. +2013 पर्यंत, पिंक फ्लॉइडने जगभरात 250 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकले होते, ज्यामुळे ते सर्व काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या संगीत कलाकारांपैकी एक बनले.पिंक फ्लॉइड हा लंडनमध्ये 1965 मध्ये स्थापन झालेला एक इंग्रजी रॉक बँड आहे. पहिल्या ब्रिटिश सायकेडेलिक गटांपैकी एक म्हणून लवकर अनुसरण करून, त्यांच्या विस्तारित रचना, ध्वनि प्रयोग, तात्विक गीत आणि विस्तृत लाइव्ह शो द्वारे ओळखले गेले. ते प्रगतीशील रॉक शैलीतील अग्रगण्य बँड बनले, ज्याला काहींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रगतीशील रॉक बँड म्हणून उद्धृत केले. +पिंक फ्लॉइडची स्थापना 1965 मध्ये सिड बॅरेट (गिटार, लीड व्होकल्स), निक मेसन (ड्रम), रॉजर वॉटर्स (बास गिटार, व्होकल्स) आणि रिचर्ड राइट (कीबोर्ड, व्होकल्स) यांनी केली होती. बॅरेटच्या नेतृत्वाखाली, त्यांनी दोन चार्टिंग सिंगल्स आणि द पाइपर अॅट द गेट्स ऑफ डॉन (1967) हा यशस्वी पहिला अल्बम रिलीज केला. गिटारवादक आणि गायक डेव्हिड गिलमोर जानेवारी 1968 मध्ये सामील झाले; बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे बॅरेट एप्रिल 1968 मध्ये निघून गेले. पिंक फ्लॉइडचे सर्वात यशस्वी अल्बम, द डार्क साइड ऑफ द मून (1973), विश यू वेर हिअर (1975), अॅनिमल्स (1977) आणि द वॉल (1979) या अल्बममागील संकल्पना तयार करून वॉटर्स हे प्राथमिक गीतकार आणि थीमॅटिक नेते बनले. द वॉल, पिंक फ्लॉइड – द वॉल (1982) वर आधारित संगीतमय चित्रपटाने दोन बाफ्टा पुरस्कार जिंकले. पिंक फ्लॉइडने अनेक चित्रपट स्कोअर देखील तयार केले. +वैयक्तिक तणावानंतर, राइटने 1981 मध्ये पिंक फ्लॉइड सोडला, त्यानंतर 1985 मध्ये वॉटर्सने सोडले. गिलमर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइड म्हणून पुढे चालू ठेवले, नंतर राइट पुन्हा सामील झाले. त्यांनी ए मोमेंटरी लॅप्स ऑफ रीझन (1987) आणि द डिव्हिजन बेल (1994) हे अल्बम तयार केले, ज्यांना मोठ्या टूरचा पाठिंबा होता, दीर्घ अंतरावर प्रवेश करण्यापूर्वी. 2005 मध्ये, जागतिक जागरूकता कार्यक्रम Live 8 मध्ये परफॉर्मन्ससाठी बॅरेट सोडून सर्व एकत्र आले. बॅरेट 2006 मध्ये आणि राइट 2008 मध्ये मरण पावले. शेवटचा पिंक फ्लॉइड स्टुडिओ अल्बम, द एंडलेस रिव्हर (2014), डिव्हिजनच्या अप्रकाशित सामग्रीवर आधारित होता. बेल रेकॉर्डिंग सत्र. 2022 मध्ये, गिलमोर आणि मेसन यांनी पिंक फ्लॉइडमध्ये सुधारणा करून "हे, हे, राइज अप!" हे गाणे रिलीज केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ. +2013 पर्यंत, पिंक फ्लॉइडने जगभरात 250 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकले होते, ज्यामुळे ते सर्व काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या संगीत कलाकारांपैकी एक बनले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12188.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4e1d334a1d7e2d444d6eda6abf4afe13374b6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12188.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंगळेवाडी लांडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12222.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b8324c94595434f2e38c266f31fe904b629d6ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12222.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंमटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12243.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..647d589a46f7e3bfdca649486563c50d916b20f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12243.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12260.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3f9296752849e2a54522d680d3111ea8181e6fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12260.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1227.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..510713aa3b0cb905ecf1bcd04d80395dd4eb8a60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1227.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुईळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12289.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75129cb0e4fb00b7a7d8bd83906486a44b75490f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12289.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1229.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d2d24bf45789b3596dc2b712b5e5b57e0298623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1229.txt @@ -0,0 +1,18 @@ +धुडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १५६ कुटुंबे राहतात. एकूण ८२८ लोकसंख्येपैकी ४०८ पुरुष तर ४२० महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[१] +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +खोडाळा, जोगळवाडी, सायडे, वाकडपाडा, उधाळे, पाथर्डी, बोटोशी, कुरलोड, केवनाळे, सूर्यमाळ, गोमघर ही जवळपासची गावे आहेत.गोमघर ग्रामपंचायतीमध्ये धुडगाव,गोमघर, आणि वाशिंद ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12302.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff8f4012cfe9a7b5e7a59ad429eb421a47f5bf12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12302.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरी त्र्यंबक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12318.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43368ea2e05bd5792d950fda867ac9e8f0b314c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12318.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरीकावळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12341.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8276ca6c843208dd1e020a071aa093696a969298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12341.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12368.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4341d056d2b91bb6b47667399a15f93742098c91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12368.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळखुटा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12386.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c83417f84e8c7a7631c03e9243f0a147de8859a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12386.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12388.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..297449fc109a8ba6d3376f55f9945a01561ddc63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12388.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12396.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2126d01470aba927a864a313fc4192fdff144d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12396.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12409.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33855f79e62464034e4d097cde10754a11bf93ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12409.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12438.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..761027bcd9393c14dda256f406eab08bfc777c02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12438.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव काजले तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12480.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..918a7703d30a0ce53c1c69a400e2616c74f60ed2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12480.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगावनिपाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12485.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a20df47bf54d47d068e97a9cf5383bcaeb70a80d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12485.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळचोंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12498.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..320f636ad8fe2eec7909915fdaf560b6948d5e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12498.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळनेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12523.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbcaf73846fd225de5a5d84fe9f80a49c65a0973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12523.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळशेंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12526.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6df1ac42b7c61077e802739479d9d2f391fb194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12526.txt @@ -0,0 +1 @@ +पिंपळशेंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12555.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de2ab75c82d9e5c52d42754e6e2df095a53fa456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12555.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12571.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb7d97875b4b95a218c172e05095247bc44edfa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12571.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12574.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a44ca0fe8f2f2d8ca2954dd8e9302b8911b18e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12574.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिंपोडे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून हे ओळखले जाते. या गावाला ऐतिहासिक,राजकीय,सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. या गावात कॉलेज नाही. शेतिला पाणी नाही, मोठे व्यवसाय नाहीत त्यामुळे रोजगार निर्मिती नाही ,रोजगारासाठी लोकांना दुसऱ्या शहरात जावे लागते. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +गावात घुमाई देवीचे मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12588.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d78555c6db5e398e65803806ec7d76e5ebb7a82b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12588.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 44°22′5″N 100°20′11″W / 44.36806°N 100.33639°W / 44.36806; -100.33639 + +पियेर (इंग्लिश: Pierre) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर साउथ डकोटा राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे. +२०१० साली पियेरची लोकसंख्या केवळ १३,६४६ इतकी होती. मॉंतपेलिए ह्या व्हरमॉंटच्या राजधानीखालोखाल सर्वात लहान राज्य राजधानी असलेले पियेर हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12596.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac52b9dd90d5696e3e7a7bdbc28bd2696c56529e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12596.txt @@ -0,0 +1 @@ +पिएर प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: PIR, आप्रविको: KPIR, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIR) हा अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील पिएर शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून तीन मैल पूर्वेस ह्युस काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12616.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c12e0524775e59e79278df228a7440dbc3b3c14b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12616.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिएर लव्हाल (जून २८, इ.स. १८८३ - ऑक्टोबर १५, इ.स. १९४५) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता. +लव्हाल एकूण चारवेळा फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. पैकी शेवटच्या वेळी त्याने नाझी जर्मनीधार्जिण्या विची फ्रांस सरकारमध्ये पंतप्रधानपद स्वीकारले. दुसरे महायुद्ध संपल्यावर या कारणास्तव त्याच्यावर शत्रूला साथ दिल्याचा व देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. अपराधी सिद्ध झाल्यावर लव्हालला मृत्युदंड देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12631.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4805f0c428e159845cddd71bfc2578f21794ee00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12631.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार,पैसेवारीच्या अनुपातानुसार,जमीन महसुल तहकुब,कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणुन,शासनाचा महसुल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहु,खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. +यालाच पूर्वी आणेवारी असा शब्द प्रचलित होता. +या साठी, संबंधित तहसीलदार प्रत्येक गावात एक 'ग्राम पिक पैसेवारी समिती' गठीत करतो. या समितीचा अध्यक्ष हा 'राजस्व निरिक्षक' वा तत्सम दर्जाचा शासनाचा अधिकारी असतो.या समितीत, तलाठी व ग्रामसेवक सरपंच ,सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतात. शेतकरी प्रतिनिधी म्हणुन एक प्रगतिशील व दोन अल्पभूधारक शेतकरी (त्यापैकी एक महिला असणे जरुरी) हे पण याचे सदस्य असतात. या शेतकरी प्रतिनिधींची निवड त्या त्या गावाची ग्रामपंचायत करीत असते. +धान्याच्या उत्पादनाशी निगडीत, ही शेतीमधील विशिष्ट पिकांचे उत्पन्न काढण्याची सरकारी पद्धत आहे ही नजर अनुमानाने काढण्यात येते. +यासाठी, प्रत्येक गावात,प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडल्या जातात.पिक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी(तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते.खरीपाची हंगामी पैसेवारी कोकण पुणे नाशिक या राजस्व विभागात दरवर्षी १५ सप्टेंबरला तर नागपूर,अमरावती,औरंगाबाद विभागात,३० सप्टेंबरला जाहीर होते. अंतीम पैसेवारी ही अनुक्रमे १५ डिसेंबर पूर्वी व १५ जानेवारीपूर्वी जाहीर होते. गावांचे शिवारात, एकूण पेरलेल्या वा लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाचे ८० % पर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात. +१० मीटर x १० मीटर (१ आर) असा शेतीतील चौरस भाग घेउन त्यात निघणाऱ्या धान्याचे उत्पादन,राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाने पुरविलेल्या मागील १० वर्षाच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाशी ताडुन, निघणारा अनुपात. यात विविध प्रकारच्या (हलकी/मध्यम/चांगली) अशा प्रकारच्या जमिनी निवडल्या जातात. पैसेवारी कशी काढावी याचे सरकारी निकष/मार्गदर्शक तत्त्वे आहेत.उदा.-शेतीचा नैऋत्य कोपरा घ्यावा,पाणीपुरवठ्याची स्थिती बघावी इत्यादी.त्यानुसार त्यात आवश्यक ती नियमानुसार चढ/घट करण्यात येते.अशा प्रकारे काढलेली पैसेवारीची सरासरी ५० पेक्षा कमी असल्यास दुष्काळ व त्यापेक्षा जास्त असल्यास सुकाळ असे समजल्या जाते. +पूर्वी पिकांच्या आणेवारीची पद्धत होती.परंतु,आणा हे चलन मागे पडल्यामुळे व १०० पैशाचा रुपया, ही गोष्ट टक्केवारीशी सुसंगत असल्यामुळे व अल्पशिक्षितांसह, शेतकऱ्यांना सहज समजण्याजोगी असल्यामुळे पैसेवारी ही पद्धत रुढ करण्यात आली. +पैसेवारीमुळे राज्य शासनास राज्याच्या धान्य स्थितीचा आढावा घेणे सहज शक्य होते.जनसंख्येनुसार मग आवश्यकता तपासुन धान्य आयात वा निर्यात करावयाचे, त्याचा निर्णय करून त्यानुसार धोरण ठरवुन मग कार्यवाही करता येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12644.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a032a21723e6c54e7c1a205c4e16f6ccc6a86c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12644.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिकेन्स काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पिकेन्स काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12648.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..030f67929e83f6d5375d28b87131687d3aa7aa1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12648.txt @@ -0,0 +1 @@ +पिक् दे नोउफोन्स् हा कॅटालोनियाचा डोंगर आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर पायरेनीसमध्ये स्थित, त्याची उंची २,८५१ मीटर (९,३५४ फूट) आहे समुद्रसपाटीपासून वर आहे. [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12663.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eedcb32ab6e5128ac253af1275095726d359e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12663.txt @@ -0,0 +1 @@ +पिझ्झा हट ही एक अमेरिकास्थित रेस्टॉरंट साखळी आणि आंतरराष्ट्रीय फ्रेंचायझी[मराठी शब्द सुचवा] आहे जी डॅन आणि फ्रॅंक कार्नी यांनी १९५८ मध्ये विचिटा, कॅन्सस येथे स्थापित केली होती. पिझ्झा आणि पास्ता तसेच साइड डिश[मराठी शब्द सुचवा] आणि मिष्टान्न यासह कंपनी इटालियन-अमेरिकन पाककृती मेनूसाठी ओळखली जाते. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत जगभरात पिझ्झा हटमध्ये १८,४३१ रेस्टॉरंट्स आहेत, जे स्थानांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी पिझ्झा चेन बनली आहे. जगातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट कंपन्यांपैकी एक, यम! ब्रॅंड्स इंक यांची ती सहाय्यक कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12689.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f704c14cd8c9c37ad666104defb819d359a7af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12689.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिट्स्बर्ग स्टीलर्स हा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्स्बर्ग शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. १९३३ साली स्थापन झालेला स्टीलर्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर सर्वाधिक वेळा (६) सुपर बोल जिंकला असून तो सध्या सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12696.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58e85f17f910c0c049105abff153e12fe2b3bde3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12696.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिठेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfff836aca4c7f1631400f904b37d61bf8ab7cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12697.txt @@ -0,0 +1 @@ +पिठेसुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12724.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec84c9b693e9846838f36f9320e8ef78b4ebc4e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12724.txt @@ -0,0 +1 @@ +लुइस पेद्रो दि फ्रीतास पिंतो त्राबुलो तथा पिते (२२ ऑगस्ट, इ.स. १९९४ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12728.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b9619cf8b5f82de6fe8532d0bac0808a77e09a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12728.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा अल्कलीधर्मी द्रव यकृतपेशींतून तयार होतो. २४ तासांत ५०० ते १०० मिली पित्तरस तयार होतो. +५.५. ते ७.७ +१.०१० ते १.०५० diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1273.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2091b64e8968e0fe271aa90d2f6f65f383cd338a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1273.txt @@ -0,0 +1 @@ +धुरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12738.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1ca4cb4b2227d8c3328f81b6d5767883b55a8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12738.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 32°4′52″N 81°5′28″W / 32.08111°N 81.09111°W / 32.08111; -81.09111 + +सव्हाना (इंग्लिश: Savannah) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. सव्हाना शहर जॉर्जियाच्या पूर्व भागात साउथ कॅरोलायना राज्याच्या सीमेवरील सव्हाना नदीच्या मुखाजवळ व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिशकालीन साम्राज्यात असताना सव्हाना जॉर्जिया प्रांताची राजधानी होती. येथील ऐतिहासिक वास्तूशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सव्हानामध्ये अनेक जुन्या इमारती व चर्चे आहेत. ह्यांसाठी सव्हानाला जॉर्जियाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12756.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b3acbf48111c45ef98e3f85e31d0b13d8007167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12756.txt @@ -0,0 +1 @@ +पिन्नदुवागे वनिंदु हसरंगा डि सिल्वा (२९ जुलै, १९९७:गाली, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12777.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90ec4f3b4d11af6ff46c15f7bf1e6f3d216bace0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12777.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक शैक्षणिक संस्था आहे. +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये[छत्रपती संभाजीनगर] येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवासाठी सुरू केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12778.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ee30dd6ad25d6a639574cf9213fbae7db65fb4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12778.txt @@ -0,0 +1 @@ +पिपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12780.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e4ff8a6a5786dca4ec379821644bb6e6e68a286 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12780.txt @@ -0,0 +1 @@ +पिपळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12797.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2554684618e490075180e213cf342b098d6d4cdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12797.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र तुसॉन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४ं३,४३३ इतकी होती.[२] +पिमा काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या पिमा जमातीचे नाव दिलेले आहे. पिमा काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12817.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c3390e3741b1a8c4cd74b0880944830a5a59d9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12817.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिएर चार्ल्स ले मॉनिये (नोव्हेंबर २३, इ.स. १७१५:पॅरिस - मे ३१, इ.स. १७९९) हा फ्रेंच अतरिक्षशास्त्रज्ञ होता. +याचे आडनाव लेमॉनिये असेही लिहीले जाते diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12824.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b2fff8fdaa760a68c2265a6eb537a3ab3f4b50e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12824.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिया का घर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12826.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b2fff8fdaa760a68c2265a6eb537a3ab3f4b50e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12826.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिया का घर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12845.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78d749c7addc6c4ca622ccc12382087e4e40aa14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12845.txt @@ -0,0 +1,2 @@ +पियॅट काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12846.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30adb0eb252b251d899e5e51aa98afc5984ad4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12846.txt @@ -0,0 +1 @@ +पियेत्रो ॲंतोनियो कॅताल्डी (एप्रिल १५, इ.स. १५४८:बोलोन्या, इटली - फेब्रुवारी ११, इ.स. १६२६:बोलोन्या, इटली) हा इटालियन गणितज्ञ होता. हा गणिताबरोबरच युद्धशास्त्र आणि अंतरिक्षशास्त्रात पारंगत होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12854.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6adc812833d5f1e2ba56158746c7d8a4c40ed21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12854.txt @@ -0,0 +1,2 @@ +पियोरिया काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12876.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a92fda4ef71e777553954a93577027f9ccfced65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12876.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 42°40′N 1°00′E / 42.667°N 1.000°E / 42.667; 1.000 +पिरेनीज (स्पॅनिश: Pirineos, Pirineo, फ्रेंच: Pyrénées, कातालान: Pirineus, ऑक्सितान: Pirenèus, अ‍ॅरागोनीज: Perinés, बास्क: Pirinioak, Auñamendiak) ही नैऋत्य युरोपातील स्पेन व फ्रान्स देशांची नैसर्गिक सीमा ठरवणारी एक पर्वतरांग आहे. सुमारे ४९१ किमी लांबीची ही पर्वतरांग अटलांटिक महासागराच्या बिस्के उपसागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत धावते. आंदोरा हा लहान देश पिरेनीजच्या कुशीत वसला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12877.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a92fda4ef71e777553954a93577027f9ccfced65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12877.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 42°40′N 1°00′E / 42.667°N 1.000°E / 42.667; 1.000 +पिरेनीज (स्पॅनिश: Pirineos, Pirineo, फ्रेंच: Pyrénées, कातालान: Pirineus, ऑक्सितान: Pirenèus, अ‍ॅरागोनीज: Perinés, बास्क: Pirinioak, Auñamendiak) ही नैऋत्य युरोपातील स्पेन व फ्रान्स देशांची नैसर्गिक सीमा ठरवणारी एक पर्वतरांग आहे. सुमारे ४९१ किमी लांबीची ही पर्वतरांग अटलांटिक महासागराच्या बिस्के उपसागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत धावते. आंदोरा हा लहान देश पिरेनीजच्या कुशीत वसला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12879.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1db539924d9d42d69debedbeeb55ab97aba23872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12879.txt @@ -0,0 +1,104 @@ +पिरेने-अतलांतिक (फ्रेंच: Pyrénées-Atlantiques; ऑक्सितान: Pirenèus-Atlantics; बास्क:Pirinio-Atlantiarrak) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात स्पेनच्या सीमेवर वसलेल्या पिरेने-अतलांतिक विभागाचे नाव येथील पिरेनीज पर्वत व अटलांटिक महासागर ह्यांवरून पडले आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12922.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6f4b40b76b531d569a9bdfb60c451ee940127f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12922.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांटेधोत्रा किंवा पिवळा धोत्रा (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने काटेरी असून व फुलांचा रंग पिवळा आहे, त्यामुळे हिला काटे धोतरा असे नाव पडले आहे. या वनस्पतीचा उगम मेक्सिको येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे. +विकिपीडिया:वनस्पती/यादी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12927.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff048d0b3efad582e84c1c4a71eebe272732c611 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12927.txt @@ -0,0 +1,5 @@ +माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे. +माळटिटवी नेहमी आढळणाऱ्या टिटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टिटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते. तर ही माळटिटवी कोरडय़ा प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्याच आसपास आढळते.ही माळटिटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसते. पण क्वचित प्रसंगी आजूबाजूच्या ४/६ टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टिटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठय़ा पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवरच आढळतात आणि तुरुतुरु पळत जाऊन मातीतील किंवा पानांखाली दडलेले कीटक पकडून खातात.माळटिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो, नर-मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मीलन होते आणि मादी घरटय़ात ४ अंडी घालतात. +आकाराने ही टिटवी साध्या टिटवीपेक्षा थोडी लहान असते. हिच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते.त्याचे पाय लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते व काळे डोके असते.उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. हे पक्षी समूहाने राहतात.हिला सहज ओळखायची खूण म्हणजे डोळ्यापासून निघून चोचीवरून ओघळणारा पिवळा धम्मक मांसल भाग. यामुळे तिला अगदी दुरूनही सहज ओळखता येते. +हे पक्षी भारतात हरयाणा आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम बांगला देश, पाकिस्तान सिंध आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात. +ते धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12929.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47c7b8e171eaa1d6a112984fb988d7904fd5e65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12929.txt @@ -0,0 +1,4 @@ +पिवळ्या पाठीचा सूर्यपक्षी (इंग्लिश:Yellowbacked Sunbird) हा एक पक्षी आहे. +==ओळख == आकाराने चिमणीपेक्षा लहान. माथा काशाप्रमाने हिरवा. मान व पाठीची बाजू गर्द गुलाबी. पार्श्व पिवळे शेपटी हिरवि कंठ आणि छातीचा रंग तांबडा. त्यावर पिवळ्या रंगाचा रेषा. पोटाचा रंग पिवळट. मादीचा रंग ऑलीव्ह.खालील भागाचा रंग पिवळा. +नर्मदा नदीपासून, दक्षिणेकडे उत्तर कॅनरा व निलगिरी. +सदाहरितपर्णी वृक्षांची वने अथवा पानगळीची जंगले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12939.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2766fc0f4ac9ab21059d6a9ecd5d9b86580a26f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12939.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12966.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74fd84c366d215bfee1b2a9c18736a17ae6ad6e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12966.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पिसोळी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो +पिसोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12999.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5217ae8232a5bae4ae7bfb9f2a376a8f212ef47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_12999.txt @@ -0,0 +1,3 @@ +पी. भानुमती रामकृष्ण (७ सप्टेंबर १९२५ - २४ डिसेंबर २००५) या भारतीय अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि कादंबरीकार होत्या. तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] चंदिरानी (१९५३) या तिच्या पहिल्या दिग्दर्शनासह ती तेलुगू सिनेमाची पहिली महिला दिग्दर्शक मानली जाते.[२] भानुमती प्रामुख्याने तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिला २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३] ३० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिला "चित्रपटातील महिला" या भागामध्ये सन्मानित करण्यात आले.[४] +भानुमती यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२५ रोजी आंध्र प्रदेशातील ओंगोलजवळील प्रकाशम जिल्ह्यातील दोड्डावरम गावात झाला. ती बोम्माराजू सरस्वथम्मा, वेंकट सुब्बय्या यांची तिसरी अपत्य आहे.[५][६] ती तिच्या वडिलांना वेगवेगळ्या स्टेज शोमध्ये काम करताना बघत मोठी झाली. भानुमतीचे वडील वेंकट सुब्बय्या हे शास्त्रीय संगीताच्या प्रेमी होते आणि त्यांनी लहानपणापासूनच त्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले.[७] +भानुमतीने १९३९ मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तेलुगू आणि तमिळ भाषेतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. लेखक, अभिनय, दिग्दर्शक, निर्माती, गायिका, संगीत दिग्दर्शक, संपादक आणि स्टुडिओ मालक असल्याने तिला चित्रपटसृष्टीतील लोक अष्टावधानी म्हणूनही संबोधत होते. तिला ज्योतिष आणि तत्वज्ञानाचेही चांगले ज्ञान होते.[८] तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13022.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8260651822cfafb1d5cb2962f9ec0786610fbe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13022.txt @@ -0,0 +1 @@ +पैकियासोती सरवणमुट्टू मैदान तथा पी. सारा ओव्हल हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला श्रीलंका क्रिकेटच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13033.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6634898b4816a4756418084c838aae3ff6ddb68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13033.txt @@ -0,0 +1 @@ +पी.आर. नटराजन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13048.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad398dc545a940b6c213a959d6ce2b9d99789d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13048.txt @@ -0,0 +1 @@ +पुथुवाययल नारायणा पणिक्कर (पी. एन. पणिक्कर) यांचा जन्म १ मार्च १९०९ रोजी नीलमपरूर येथे झाला. पुथुवाययल नारायणा पणिक्कर यांना केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचा जनक म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13061.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b1b1c22fa3f3c539acddd92db8f4e9f7c84307a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13061.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेम सिंह तमांग ( ५ फेब्रुवारी १९६८) हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे विद्य्मान मुख्यमंत्री आहेत. १९९४ सालापासून सिक्कीमच्या राजकारणामध्ये सक्रीय असणारे तमांग सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष आहेत. २०१३ साली हा नवा पक्ष स्थापन करण्यापूर्वी ते सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाचे वरिष्ठ नेते होते. +२०१९ मधील सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने ३२ पैकी १७ जागांवर विजय मिळवून बहुमत नक्की केले. मुख्यमंत्रीपदावरील पवनकुमार चामलिंग ह्यांच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर तमांग सिक्कीमचे सहावे मुख्यमंत्री बनले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13063.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed7915e24b02502e3aeb75d75fa65cc2e8ac62b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13063.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीएस २ हा प्ले स्टेशन २ हा सोनी (Sony) या कंपनीने बाजारात आणलेला एक खेळ आहे. या मध्ये कंपनीनेच हार्डवेयर तसेच खेळही पुरवलेले आहेत. +अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. +या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक्सबॉक्स(Xbox) हा खेळ आणला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13070.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a65536bec9db9941862f1eb985a3f7dddb4f79fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13070.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पी.के. हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. राजकुमार हिरानीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, सौरभ शुक्ला, बोमन इराणी व संजय दत्त ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर २०१४ रोजी प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13078.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13078.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13097.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bd1bf436c1170247617f85f1612ac1a4b00a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13097.txt @@ -0,0 +1,10 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) (Public Provident Fund) ही भारतातील स्वेच्छेने घ्यायची सरकारी बचत योजना आहे. करबचतीसाठी तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी या द्वारे मोठा निधी जमवता येतो. याची मुदत १५ वर्षे असते. +या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवता येते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13104.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc2514a85318fa8ed17af4064dc50f4e96011c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13104.txt @@ -0,0 +1,17 @@ +पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. +राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. +त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. +नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. +नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली. +तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. +जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासून अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. +बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले. +उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले. +इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरिसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. +सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. +डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13122.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80c1af8e7d5d077b4ee092b1ccf3ccc624ecf0ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13122.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सरचिटणीस. भारतात कम्युनिस्ट विचार व चळवळ रुजविणाऱ्या नेत्यांमध्ये यांचे योगदान आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13124.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57eb76c427fa1414086ab5727bd8f211a4c7e735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13124.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली. +प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. +इ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13153.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..012d0337906c62e0ce75dc95e6618c042358e9ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13153.txt @@ -0,0 +1,6 @@ +पीएम किसान योजना संपूर्ण माहिती +प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) ही भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000/- आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये ₹2000/- च्या हप्त्यांमध्ये दिली जाते. +योजनेचे उद्दिष्ट: +योजनेची पात्रता: +योजनेचे तोटे: +टीप: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13161.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed7915e24b02502e3aeb75d75fa65cc2e8ac62b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13161.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीएस २ हा प्ले स्टेशन २ हा सोनी (Sony) या कंपनीने बाजारात आणलेला एक खेळ आहे. या मध्ये कंपनीनेच हार्डवेयर तसेच खेळही पुरवलेले आहेत. +अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. +या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक्सबॉक्स(Xbox) हा खेळ आणला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13237.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618987408a7663ca1a7c4c744023f1570a4c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13237.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13246.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13246.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13252.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106d886e3d16ea9677135b3218c713460ae1b983 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13252.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीटर झीमान(डच: Pieter Zeeman) (मे २५, इ.स. १८६५ - ऑक्टोबर ९, इ.स. १९४३) हा डच भौतिकशास्त्रज्ञ होता. +इ.स. १९०२ साली झीमान परिणामाच्या संशोधनाबद्द्ल हेन्ड्रिक लॉरेंट्झ याच्या साथीने भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13272.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..484af9817c6042a7528d09213d0666a38e7f32f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13272.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो. +चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13273.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..484af9817c6042a7528d09213d0666a38e7f32f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13273.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो. +चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13276.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13276.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1332.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..927e13fe20b639ef388a3dc97a19fadf7ba94e20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1332.txt @@ -0,0 +1,2 @@ +धूळघाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13326.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558832b65795f5e7389d7b89379893704d30bd31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13326.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर लॉरेन्स व्हान डेर मर्व्ह (१४ मार्च, १९३७:दक्षिण आफ्रिका - २३ जानेवारी, २०१३:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९६७ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13355.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ae9340751f539928b905721d8bddd98c2666f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13355.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे. +गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते. तर पाय पिठापुरम येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू-माधव, प्रयाग येथे वेणी-माधव, रामेश्वर येथे सेतु- माधव, त्रिवेंदम येथे सुंदर-माधव तर पिठापुरम येथे कुंती -माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने जेथे माधवाची पूजा केली, ते हे स्थान. +हैद्राबाद-विशाखापट्टणमच्या मार्गावरील गाड्या सामलकोट जंक्शनला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13367.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..450c7a8f6328265edabc5fd7ba085dd8fb11008b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13367.txt @@ -0,0 +1 @@ +फीनयीन (नवी चिनी चित्रलिपी: 拼音; जुनी चिनी चित्रलिपी: 拼音; फीनयीन: Pīnyīn; उच्चार: फीऽऽन-ईऽन; अर्थ: एकत्र केलेले ध्वनी), अधिकृत नाव हानयु फीनयीन (नवी चिनी चित्रलिपी: 汉语 拼音; जुनी चिनी चित्रलिपी: 漢語 拼音; फीनयीन: Hànyǔ Pīnyīn; उच्चार: हान्-यूउ-फीऽऽन-ईऽन; अर्थ: चिनी भाषेचे एकत्र केलेले ध्वनी) ही प्रमाण मॅंडरिन भाषेच्या रोमनीकरणाची पद्धत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13389.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ad4fb08568543fdefadd384468140c64d816ae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13389.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीयर्स काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पीयर्स काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_134.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd8bb7851785522baa032bf4c11ce3475ea0f5b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_134.txt @@ -0,0 +1,5 @@ +दोघी (इंग्रजी मधील टू सिस्टर्स) हा १९९५ मधील भारतीय मराठी चित्रपट असून या चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि दूरदर्शनच्या सहकार्याने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्मित केलेले आहे. १९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले; सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि उत्तरा बावकर यांना विशेष उल्लेख पुरस्कार. १९९६ मध्ये ३२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातील नऊ पुरस्कार मिळाले.[१][२] +दोघी बहिणींपैकी मोठी, गौरीचे (रेणुका दफ्तरदार) लग्न आहे आणि घरात उत्सवाचे वातावरण आहे. गावातले वडीलधारे तिला वर येण्यापूर्वीच मंदिरात जाउन दर्शन घेण्याचा सल्ला देतात आणि म्हणूनच तिची लहान बहिण कृष्णा (सोनाली कुलकर्णी) आणि काका (सदाशिव अमरापूरकर) तिच्यासोबत असतात. परत जाताना काकांना वर्तमानपत्रात लक्षात येते की गावात येताना वराच्या कुटुंबाची प्राणघातक दुर्घटना झाली होती. गौरी आणि कृष्णाचे वडिलांना (सूर्यकांत मंधारे) धक्कादायक बातमीनंतर अर्धांगवायू होतो. सर्व ग्रामस्थ गौरीला वाईट शकुन म्हणून दूर ठेवतात. लवकरच, कुटुंबास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या उजाड जमिनीच्या तुकड्यावर शेती करून काही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा काहीही निष्पन्न होत नाही तेव्हा त्यांची आई (उत्तरा बावकर) काकांना गौरीला नोकरीसाठी घेऊन जाण्यासाठी विनंती करते. सुरुवातीला संकोच करणारे काका मनाची खात्री पटवतात पण भविष्यात गौरीच्या ठिकाणाबद्दल आईला आणखी प्रश्न विचारू नका अशी आईला विनंती करतात. +काका गौरीला वेश्या व्यवसायात घालतात आणि ती दरमहा तिच्या कुटुंबियांना पैसे पाठवायला लागतात. कुटुंबाची परिस्थिती अधिक चांगल्या होतात आणि काका कृष्णाला एक स्वयंसेवी संस्थेत काम करणारे तरुण आदर्शवादी शेष वाघमारेचे (अभय कुलकर्णी) लग्नाचे स्थळ घेउन येतात. कृष्णाच्या लग्नासाठी गौरी गावाला भेट देते परंतु गौरीच्या दुर्दैवी विवाह घटनेमुळे आणि पैसे कमावण्याच्या पद्धतीमुळे त्यांची आई तिला कोणत्याही कार्यात भाग घेऊ देत नाही. कृष्णाला जेव्हा हे कळते तेव्हा ती त्यांच्या आईला प्रश्न विचारते आणि तिला गौरीची खात्री पटवून देते. जेव्हा गौरीने लग्न व गाव सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शेषचा कार्यकर्ता मित्र निवृत्ती कांबळे (सुनील सुकथणकर) तिचा भूतकाळ माहित असूनही तिला लग्नासाठी प्रस्तावित ठेवतो. मुंबईतील वेश्या म्हणून तिच्या आयुष्यात कधीच परतू नये म्हणून गौरी गावातच राहते. +रेणुका दफ्तरदार व सोनाली कुलकर्णी ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावतात. बाकी सहकलाकार आहेत: सदाशिव अमरापूरकर (काका), सूर्यकांत मंधारे (वडील), उत्तरा बावकर (आई) व मधू कांबीकर (काकू). सुमित्रा भावे आणी सुनील सुकथणकर ह्या जोडीचा एकत्रित हा पहिला चित्रपट आहे. आधी त्यांनी लघुपट केले होते. उमेश विनायक कुलकर्णीने ह्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.[३] +१९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले. चित्रपटाला इतर सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. "भुई भेगाली खोल" या सुमधुर आणि हृदयस्पर्शी गाण्यासाठी अंजली मराठे यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री उत्तरा बाओकर हिने विशेष उल्लेख पुरस्कार जिंकला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13403.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..452118c6f5cf91c68217395859164de3db2d0b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13403.txt @@ -0,0 +1,9 @@ + +पिलीभीत भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पिलीभीत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. पिलीभीत हा बरेली विभागातील उत्तर-पूर्व जिल्हा आहे. हा नेपाळच्या सीमेवर शिवलिक रेंजच्या पायथ्याशेजारील उप-हिमालयीय पठार पट्ट्याच्या रोहिलखंड प्रदेशात वसलेला आहे. गोमती नदीच्या उत्पत्तीसाठी आणि वनसमृद्ध असलेल्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारे उत्तर भारतातील क्षेत्र आहे. पीलीभीत या शहराला बासरी नगरी म्हणून ओळखले जात असे. भारतातील अंदाजे ९५ टक्के बासऱ्या येथे बनत होत्या. तसेच येथून बासऱ्या निर्यात होत होत्या. [२] +भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि मूलभूत सुविधा निर्देशकांच्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे, पिलीभीत हा भारतातील अल्पसंख्याक प्रदेशांपैकी एक आहे. [३] हा प्रदेश हिमालयापासून थोड्याच अंतरावर आहे तरीही पिलीभीतच्या आजुबाजुचा परिसर वगळाच आहे, येथे जमीन संपूर्ण सपाट आहे. यात उतार असतो परंतु डोंगर नसतात आणि त्यात अनेक प्रवाह दिसतात. [४] पिलीभीत हा उत्तर प्रदेशातील अनेक वनसमृद्ध भागांपैकी एक आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित्करण्याची त्तमच क्षमता आहे सुमारे ५४ किलोमीटर (३४ मैल) लांबीची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने पिलीभीतला अत्यंत संवेदनशील बनवते. [५] भारत सरकारच्या अंदाजानुसार, पिलीभीत मधील ४५.२३% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. [६] वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या भागातील चिंतेचे कारण आहे आणि बऱ्याच अशासकीय संस्था (स्वयंसेवी संस्था) आणि सरकारी संस्थांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प सुरू केले आहेत, परंतु अद्याप मानवी संसाधनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही. हे शहर भारतातील ४२३ शहरे व शहरांच्या शासकीय क्रमवारीत स्वच्छता व स्वच्छतेच्या बाबतीत खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. [७] +पिलीभीत हे काही नरभक्षी वाघांमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होते ज्यामुळे जंगलाच्या व आजूबाजूच्या संपूर्ण भागात भीती पसरली होती. ऑगस्ट २०१० पर्यंत, वाघाने आठ जणांना ठार मारले आणि अर्धवट खाल्ले होते. [८] +पिलीभीत हे २८°६४' आणि २९°५३' उत्तर अक्षांश आणि ७९°५७' आणि ८१°३७' पूर्वेकडील रेखांश यादरम्यान वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) आहे. पिलीभीतची उत्तरेकडील बाजू उत्तराखंड राज्यातील उधमसिंह नगर आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. पिलीभीतच्या दक्षिणेला शाहजहांपूर आहे. पिलीभीतच्या पूर्वेला लखीमपूर खेरी अगदी थोड्या अंतरावर आहे आणि उर्वरित अंतर शाहजहांपूरने वेढलेले आहे. पश्चिमेकडील सीमा बरेलीच्या सीमेस स्पर्श करते. +केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मते, पिलीभीत जिल्ह्याचे क्षेत्रफळ १ सप्टेंबर २००७ रोजी ३,५०४ चौरस किमी (१,३५३ चौ. मैल) होते. यानुसार राज्यामध्ये याचा ४६ व्या क्रमांक होता. पिलीभीत शहराचे एकूण क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) होते. पिलीभीत शहरात प्रति चौरस किलोमीटरवर २३६५.११ लोक रहात होते. तर उर्वरित जिल्ह्यात चौरस किलोमीटरवर मध्ये ४६५.९१ लोक राहतात. +या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या काही विशिष्ट पात्रांमध्ये विभागली जाऊ शकतात. याचा उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात उष्ण कटीबंधीय वातावरण आहे. बिसळपूर तहसीलचा दक्षिणेकडील भाग बरेली व शाहजहांपूरला लागून असलेल्या पर्वाशी संबंधित आहे. पूर्वेचा छोटा विभाग लखीमपूर खेरीच्या अविकसित वनक्षेत्रांच्या जवळपास आहे, जरी लागवडीच्या प्रसारामुळे पूरणपूर आणि उर्वरित क्षेत्रामधील फरक हळूहळू कमी होत चालला आहे. पिलीभीत हद्दीत १२१६ गावे आहेत, त्यापैकी ९८२ गावात वीज पोहचली आहे. [९] +या भागात दहापेक्षा जास्त लहान आकाराच्या नद्या आणि नऊ लहान ते मध्यम आकाराचे जलसाठे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13417.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af489e0757e3d77840da71894b72b27f01fc098e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13417.txt @@ -0,0 +1,30 @@ +मलपृष्ठावरून: “ आजही अनेक मराठी वाचकांच्या लेखी ’आवडता लेखक’ याला मराठीतला समानार्थी शब्द आहे ’पु.ल.’! तब्बल चार पिढ्यांवर पु.लं.नी राज्य केल. बहुरूपी पु.ल.नी आपल्या वेगवेगळ्या रूपांमधून आनंदाची उधळण केली. पु.ल. नावाच्या गारुडाने मराठी माणसाच्या चार पिढ्या अक्षरशः नादावून गेल्या, मंत्रमुग्ध झाल्या. +हे गारुड नेमकं काय आहे? +या प्रश्नाचा अनेक अंगांनी घेतलेला वेध म्हणजे हा ग्रंथ - ’पु.ल. नावाचे गारुड’. पु.लं. विषयी आजवर खूप काही लिहून झालेलं असलं तरी बरंच काही नवं देणारा. आजवर पु.लं. विषयी ज्यांनी अजिबात लिहिलेलं नाही अशा लेखकांना इथं आवर्जून लिहितं केलेलं आहे. …” +अनुक्रमणिका : +पुस्तकाविषयी थोडेसे : सात +विशेषांकाविषयी थोडेसे : नऊ +१. मास्टर परफॉर्मर : सतीश आळेकर १ +२. पु.ल. : सहवासातले आणि पत्रांतले : मधु गानू ८ +३. पु.लं.ची मयसृष्टी : भास्कर चंदावरकर १९ +४. भाई आणि आम्ही भावंडं : रमाकांत देशपांडे/ उमाकांत देशपांडे ३० +५. पु.लं.चं घर : अनिल अवचट ४० +६. पु.ल. नावाचं गारुड : मुकुंद टाकसाळे ५५ +७. स्मरणगंध : सरोजिनी वैद्य ६५ +८. मुखपृष्ठाची एक आठवण : वसंत सरवटे ७७ +९. मधुराधिपते: अखिलं मधुरं : रेखा इनामदार- साने ८१ +१०. मराठी वाङ्मयपरंपरा आणि पु.ल. : सदानंद मोरे ९६ +११. पु.ल. देशपांडे यांची साहित्यमीमांसा : नागनाथ कोत्तापल्ले १०४ +१२. पु.लं.चे डावे- उजवे : जयदेव डोळे ११६ +१३. पु.लं.च्या भ्रमणमंडळाबरोबर एक छोटासा प्रवास : शांता गोखले १२१ +१४. पु.ल. वादनी अनुवाद : अशोक जैन १२५ +१५. दिनेश येईपर्यंत - : सर्वोत्तम (मोहन) ठाकुर १३४ +१६. तुम्ही म्हणाला वाहवा : इंद्रजित भालेराव १५५ +१७. यथार्थनामा ’पुरुषोत्तम’ : सुरेश गजेन्द्रगडकर १६४ +१८. पु.ल. येता माझ्या घरा : सुधीर सवूर १७० +१९. पु.ल. एक आनंददायी अनुभव : शरद पवार। शरद पवार १७६ +२०. ह्या सम हा : जयंत साळगांवकर १७९ +२१. रंगमंचावरील पु.ल. : ज्ञानेश्वर नाडकर्णी १८२ +२२. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे : विद्युल्लेखा अकलूजकर १९५ +२३. ’भाईं' साठी : फ. मुं. शिंदे १९६ +२४. एक पत्र : सुनीता देशपांडे १९७ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13438.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c239a76e367b7c07e333330d0dbec19b0f75fa00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13438.txt @@ -0,0 +1 @@ +पु.ना. गाडगीळ अँड सन्स ही महाराष्ट्राच्या पुणे शहरात मुख्यालय असलेली सराफ पेढी आहे. ही पेढी १८३२ पासून सोनारकामाच्या धंद्यात आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1344.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96bb7322dc4e32b72bf7e81f8d7a6a155fcfc567 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1344.txt @@ -0,0 +1,2 @@ +आपल्या आसमंतातील नैसर्गिक संसाधनांचा वापर अशक्य झाल्यामुळे परिविस्थापित झालेले अनेक दलित आणि आदिवासी आज पश्चिम घाटावरील चहा व कॉफीच्या मळ्यांत मजुरी काम करतात. केरळच्या वायनाड, कोळीकोड व इडुक्की जिल्ह्यांच्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०१९ मध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील पेट्टीमुडी येथे ऑगस्ट २०२० मधल्या भूस्खलनांत अशा अनेक मजुरांचा बळी पडला. या इडुक्की जिल्ह्यातील टाटा टी या ब्रिटिश चहा मळेवाल्यांचा मुख्य अड्डा असलेल्या मूनार या थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या खास श्रीमंतांच्या हाय रेंज क्लबच्या भिंती शिकार केलेल्या वाघ, बिबटे, हत्ती, गौर, सांबर व नीलगिरीतल्या रानबोकडाच्या मुंडक्यानी सजवलेल्या आहेत. एवढेच नाही तर टेबलांचे पाय सुद्धा हत्तीच्या पायाच्या खालच्या तुकड्यांनी बनवलेले आहेत. +तमिलनाडु आणि केरळाच्या सरहद्दीवरील इडुक्की हा मूळचा मुतुवनचा आदिवासींचा मुलुख होता. २५०० वर्षांपूर्वीच्या संगम कालापासून तो तमिलनाडु आणि केरळातील वेगवेगळ्या राजवटींच्या कब्जात आला. इंग्रजांच्या आमदानीत १८७० साली त्यांचा मद्रास मधील प्रतिनिधी जॉन डेनियल मन्रोने २२७ चौरस कि.मी. च्या कन्नन देवन डोंगरावर भाडे पट्टा मिळवला व १८७८ मध्ये कवडी मोलाने त्याचे रूपांतर मालकीमध्ये केले. मग त्याने पद्धतशीर रीत्या इंग्रज मळे वाल्यांना बोलावून त्यातील ८००० हेक्टर जमिनीवर मळे लावले. इंग्रजांच्या काळात वनविभागाची धोरणे आखण्यात या मळेवाल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13464.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f96f4a460583664a2fee936712aecb57cc9b31f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13464.txt @@ -0,0 +1 @@ +पुंडलिक हरी दानवे (१९२६ - १ नोव्हेंबर २०२१) हे भारताच्या ६व्या लोकसभा (१९७७) आणि ९व्या लोकसभेचे (१९८९) सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या जालना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे तसेच जनता पक्षाचे सदस्य होते.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1347.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e0b17df451ff0bdb0a2f811273d3510e4a2109e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1347.txt @@ -0,0 +1,2 @@ +येथील योग्य माहिती योग्य त्या लेखांत घालावी --- अभय नातू (चर्चा) ११:५३, २५ मे २०२० (IST) +ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या रस्त्यांची ही जंत्री: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13472.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c2cc1f7a10f9522b7fbf91eb00ddf2088bd0b56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13472.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंतारेनास हे कोस्टा रिकाच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील पुंतारेनास प्रांतातील एक शहर आहे. [१] [२] प्रांताच्या +पुंतारेनास एफ.सी. शहरातील प्रमुख फुटबॉल संघ असून हा दुसऱ्या विभागात खेळतो. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13475.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0629c209feb181d22748ce711674b87b3b73fdd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13475.txt @@ -0,0 +1,10 @@ +पुथंडु ( तमिळमधे தமிழ்புத்தாண்டு) हे तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे. +हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला 'पुथुवरुषम' असे संबोधिले जाते.[१]ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. +इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील संगम साहित्यात सूर्याच्या मेष राशीतून प्रवेशाचे संदर्भ मिळतात.सिल्लप्पदिकरम् नावाच्या ग्रंथातही या काळातील सूर्याचे भ्रमण आणि त्यानिमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणाचा उल्लेख आलेला आहे.[२]मणिमेखलई या प्रसिद्ध ग्रंथातही या सणाचे उल्लेख सापडतात.[३] +पुत्तांडु वाळत्तुक्कळ (புத்தாண்டு வாழ்த்துக்கள்) +किंवा इनिय पुत्तांडु नल्वाळत्तुक्कळ (இனிய புத்தாண்டு நல்வாழ்த்துக்கள்)असे म्हणत एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.[४] +या दिवसासाठी घराची स्वच्छता केली जाते. आंघोळ करून नवे कपडे परिधान केले जातात. घरातील देवघरासमोर फुले,फळे यांची आरास करून देवपूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.[५] +दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला चैत्तिरीई विशू असे म्हणतात.केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात.सुपारी, विड्याची पाने, सोन्याचा दागिना, पैसे, फुले आणि आरसे मांडून ठेवतात.[६] +नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते.[७] +पुथंडूचा सण श्रीलंकेतही उत्साहाने साजरा होतो.[८] या दिवशी नव्या वर्षातील पहिला आर्थिक व्यवहार केला जातो याला 'काई विशेषम्' म्हटले जाते. या दिवशी लहान मुले ज्येष्ठ मंडळींना वंदन करतात. पैशाचे पाकीट देऊन मुलांना आशीर्वाद दिले जातात. +पुढील हंगामाचे नवे पीक घेण्याची सुरुवात म्हणून जमीन खणण्याचा आणि नांगरण्याचा छोटा विधी या दिवशी केला जातो.याला 'अरपुडु' म्हणतात.या दिवशी गावांमधील युवा मंडळ पारंपरिक खेळांच्या स्पर्धा भरवतात. गाड्याच्या शर्यती, नारळ फेकून खेळला जाणारा खेळ अशा स्पर्धा आयोजित होतात.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13488.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..210f33d6bcbee986dca0a2c1d297b25bf4946d25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13488.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुकार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13495.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ca286f16d920e7302825d15982a49339bfc515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13495.txt @@ -0,0 +1,5 @@ +योनी हे तंतुस्नायुमय नलिकाकृती जननेंद्रिय असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. +मानवी योनी हा स्थितीस्थापक स्नायुमय मार्ग असून तो गर्भाशयाच्या ग्रीवेपासून योनिकमलापर्यंत असतो. योनीचे आतील अस्तर स्तरित पट्टकी उपकलेने बनलेले असते. या अस्तराखाली अरेखित स्नायूंचा स्तर असतो. हा स्तर संभोगादरम्यान आणि अपत्यजन्मावेळी आकुंचन पावू शकतो. स्नायूंच्या स्तराखाली बाह्यस्तर नावाच्या संयोजी ऊतीचा पट्टा असतो. +शारीर भेद असले तरी जननक्षम कालावधीतील स्त्रीच्या अनुद्दिपित योनीची लांबी अग्रभित्तिकेत सुमारे ६ ते ७.५ सेंमी तर पश्चभित्तिकेत सुमारे ९ सेंमी असते. संभोगादरम्यान योनीची लांबी आणि रुंदी वाढते. स्त्री सरळ उभी असताना योनीनलिकेची दिशा ऊर्ध्व-पश्चमुखी असते आणि ती गर्भाशयाशी ४५ अंशांहून थोड्या अधिक मापाचा कोन करते. योनीमुख हे योनिकमलाच्या पुच्छाकडील बाजूस मूत्रनलिकेच्या मुखामागे असते. योनीचा वरचा एक-चतुर्थांश भाग गुदांत्रापासून (मलाशय) गुद-गर्भाशय कोष्ठाने वेगळा झालेला असतो. सस्तनी प्राण्यांमधील इतर बहुतेक निरोगी आंतरिक श्लेष्मल पटलांप्रमाणे योनी व योनिकमलाचा आतला भाग लालसर गुलाबी रंगाचा असतो. +योनीमुखाजवळील बार्थोलिनच्या ग्रंथी व ग्रीवा योनीला वंगणासाठी स्राव पुरवितात. अंडमोचनावेळी आणि त्याआधी ग्रीवेतील श्लेष्मल ग्रंथी वेगळ्या प्रकारचा स्त्राव निर्मितात. हा स्राव योनिमार्गाला अल्कधर्मी बनवितो, त्यामुळे शुक्रजंतूंचा टिकाव सुलभ होतो. +योनिच्छद हे पटल बाह्य योनिमुखाच्या भोवती असते किंवा ते योनिमुखाला काहीसे आच्छादित करते. योनिप्रवेशाने ही ऊती ध्वस्त होतेच असे नाही. योनिच्छद शाबूत असणे हा भूतकाळात संभोग झालेलाच नसण्याचा खात्रीलायक पुरावा नसतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13506.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc935781f77a5677e8613fbbe7baa1228f4000f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13506.txt @@ -0,0 +1 @@ +शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVG, आप्रविको: ZSPD) हा चीन देशाच्या शांघाय शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता. पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत शांघाय मॅग्लेव्ह रेल्वेद्वारे जोडण्यात आला आहे. ४३१ किमी/ता (२६८ मैल/तास) इतक्या वेगाने प्रवास करणारी ही रेल्वे सध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव मॅग्लेव्ह रेल्वेगाडी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13508.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f6b2d9bcc47f8dfbd3a08d2cca34de6febfa214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13508.txt @@ -0,0 +1 @@ +पुडाच्या पातोड्या मराठी खाद्यपदार्थ आहे. हा खानदेशातील अधिक प्रचलित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13510.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dca3bc5fcdb76eff8c0d65333375804c40180c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13510.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुडास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13511.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..752a770d0b0313e6bfa0362d0aee96ce74ccb7c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13511.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] ऐतिहासिकदृष्ट्या पाँडिचेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ०१ ऑक्टोबर २००६ रोजी या प्रदेशाचे अधिकृत नाव बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे. +फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पाँडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२ +पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहे व यानम हे ४ जिल्हे आहेत. +पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13535.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb50785ed082a21425c9a5b11d8b0f621e6f57cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13535.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणतांबे रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. +हे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावर आहे तसेच येथून शिर्डीकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13549.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..028b1387a42fd3e21003ce0b3f9e299e6f06c755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13549.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो. +२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13560.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1790f0f9ded87b940510327461ba33261f1649f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13560.txt @@ -0,0 +1 @@ +पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील शैक्षणिक संस्था आहे. हिचे आवार धनकवडी भागात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13562.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7a98ecff2f12e6e07c2a0bdfab5c849c1769cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13562.txt @@ -0,0 +1,7 @@ +पुणे इट आउट्स हा पुणेरी खाद्य संस्कृतीला आधुनिक स्वरूप देणारे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. [१] [२]पुणेकरांच्या बाण्याबरोबरच पुणेकरांची खवय्येगिरी सर्वश्रुत असल्याने खाद्य चर्चा आणि त्याचसोबत पुण्यातील नवनवीन रेस्टॉरंट्स, उदयोन्मुख शेफ, होम बेकर्स यांच्या कलेची माहिती सर्वदूर पोहोचविणे हाच त्यामागील उद्देश आहे. + +इतिहास +पुणे ईट आऊट्स, हा खाद्यपदार्थ, रेस्टॉरियर्स, होम शेफ, मीडिया कर्मचारी आणि फूड ब्लॉगर्सचा एक संपन्न समुदाय आहे. त्याला १५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. अनिरुद्ध पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी पुणेरी खाद्यपदार्थांच्या अनुभवांची नोंद करून लिहायला सुरुवात केली, आणि त्यामुळेच आज पुणे ईट आउट्स हा जवळपास १.६८ लाखापेक्षा जास्त लोकांचा फेसबुक समुदाय बनला आहे.[३] अनिरुद्ध पाटील यांची अन्नाप्रती असलेली आवडच त्यांना हा ग्रुप सूरु करण्यास प्रेरणा देऊन गेली. [४] [५] [६] +पुणे ईट आऊट्सला २००५ साली सर्वप्रथम ऑरकुट या  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरुवात झाली. त्यांनतर २००९ मध्ये फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ग्रुपची सुरुवात झाली. सुरुवातीला या ग्रुपचा उपयोग इतर लोकांना पुणे शहरात मिळणाऱ्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची सफर घडवून आणण्यासाठी केला जात होता. हळू हळू माणसे आवडीने हा ग्रुप जॉईन करत गेली आणि पुणे ईट आऊट्सचा परिवार वाढत राहिला.[७] +भविष्यातील योजना +पुणे ईट आऊट्सचा परिवार जसजसा वाढत गेला तसतसे त्यामध्ये कालानुरूप बदल घडून आले. पुणेरी संस्कृती पुणेकरांनी जशी जगभर पसरवली तसेच पुण्याचे खाद्यप्रेम सर्वदूर व्हावे यासाठी पुणे ईट आऊट्स वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. आज पुणे ईट आऊट्सच्या वेबसाईटवर पुण्यातील अनेक हॉटेल्सची व रिसॉर्ट्सची माहिती उपलब्ध आहे.  पुणे ईट आऊट्स वेबसाईटला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर पुणे ईट आऊट्सच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा म्हणजे पुणे 'ई-ऑर्डर्स'ची निर्मिती. आज पुणे ई-ऑर्डर्स वर उपलब्ध असलेल्या अनेक रेस्टॉरंट मधून पुणे ई-ऑर्डर्सच्या माध्यमातून कोणत्याही कमिशन आणि अतिरिक्त शुल्काशिवाय पुणेकरांच्या खवय्येगिरीची पूर्तता केली जाते. याशिवाय पुण्यातील अनेक होम शेफ आणि लहान फूड ऑपरेटर्स जे ग्राहकांपर्यंत सहज पोहचू शकत नाहीत अशा अनेक लोकांसाठी  पुणे ई-ऑर्डर्सच्या निमित्ताने एक खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13567.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af8c2231253d0aa641557bd84208ab741924662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13567.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे छावणी ही पुण्यातील एक लष्करी छावणी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश सैन्याने या भागात तळ ठोकला व हळूहळू त्याचा विस्तार होत त्याचे मोठ्या छावणीत रूपांतर झाले. +हा भाग पुणे लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13585.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51ea5d8d995d7fd7838081a5e1107df9e03734e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13585.txt @@ -0,0 +1,5 @@ +पुणे महानगर क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो. +पुणे महानगर क्षेत्राचा विस्तार ७,२५३ चौरस किलोमीटर आहे. +या क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे. +पुणे महानगर क्षेत्रामध्ये खालील संस्थांच्या हद्दीमध्ये येणारा परिसर समाविष्ट होतो: +आणि लगतची सुमारे ८६५ गावे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_136.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..043286d7fff5c4e9e4f955c243a42c2fcf8ef716 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_136.txt @@ -0,0 +1,2 @@ + दोडकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13611.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8edaee43454fb335860eb6f1e2b91ecf50b3d1f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13611.txt @@ -0,0 +1,141 @@ +महानगरपालिका +भारतात ९ वी +MH-१२ पुणे महानगरपालिका +पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्राचे एक शहर आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे हे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ जनगणनेनुसार, शहराच्या हद्दीतील ३.१ दशलक्ष लोकसंख्येसह पुणे हे भारतातील नववे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. महानगर प्रदेशातील ७.२ दशलक्ष रहिवासी लोकसंख्या आहे, यानुसार ते आठवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [११]पुणे शहर पुणे महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. [१२] भारतातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी पुणे एक आहे. [१३] [१४]हे भारतातील सर्वात महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. पुणे हे एक विकसनशील शहर आहे. [१५]या शहराला येथील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून संबोधले जाते. [१६] [१७] [१८] "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे. [१९] [२०] +पुण्यावर राष्ट्रकूट राजघराणे, अहमदनगर सल्तनत, मुघल, आदिल शाही घराणे यांनी राज्य केले आहे .१८ व्या शतकात हे शहर मराठा साम्राज्याचा भाग होते, आणि मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, पेशव्यांची हे आसन होते. [२१]पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक खुणा या कालखंडातील आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील ऐतिहासिक स्थळे शहरभर पसरलेली आहेत. +संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, पहिले बाजीराव पेशवे, बालाजी बाजीराव, माधवराव पहिले, नाना फडणवीस, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसह पुणे ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. पुणे शहरात किंवा पुणे महानगर प्रदेशात येणाऱ्या भागात त्यांचे जीवनकार्य केले. गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या लोकांनी त्यांच्या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावल्याने पुणे हे ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते. +पुणे शहर आणि परिसरात सात नद्या आहेत. त्या अश्या :- मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, राम नदी, देव नदी, नाग नदी. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत. +पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते. +काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते. +पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात. +आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स.७५८चा आहे. त्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी ही लेणी आठव्या शतकातील आहेत. +१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते. +इ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण्याचे[२२] शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.[२३] +शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय. +१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)[२३] यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, छत्रपती शिवाजी महाराज[२४], मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला. +१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा(???) उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते. +१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले. +जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. +पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. +पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, मुळा, मुठा,पवना, राम व देव या नद्या वाहतात. एकेकाळची नाग नदी ही आता नागझरी झाली आहे. +पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही या :- +एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे : +पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत. +एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत. +पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले. +पुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्‌सची संख्या ४२९ आहे. +पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत. +पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही +मुठा नदीवरील पूल एकूण १६ - +या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते. +मुळा नदीवरचे एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे : +मुळा-मुठा नदीवरचे पूल - +ओढ्या-नाल्यांवरील पूल - +दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते. +पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहेत. मराठी लेखक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी उखडून मुठा नदीत टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो नदीतून बाहेर काढला, पण परत बसवला नाही. +गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रस्थापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे. +शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाला. त्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही. +पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून रहदारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मिळतात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, आणि तो पुतळा आहे तेथेच असून रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे. +पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री : +स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी पुढीलप्रमाणे : +पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी: +कसबा पेठ, रविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ (जुने नाव विसापूर), शनिवार पेठ, गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठ, रास्ता पेठ (जुने नाव शिवपुरी पेठ), गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ. +गुरुवार पेठ नवापुरा पेठ, हनमंत पेठ. +कर्वेनगर, कल्याणीनगर (हे नाव उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या रहिवासामुळे मिळाले), गणेशनगर, गोखलेनगर, चव्हाणनगर, फातिमानगर, बालाजीनगर, लिंबोणीनगर, शांतिनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, सहकारनगर क्रमांक १, सहकारनगर क्रमांक २, सुवर्णयुगनगर, लक्ष्मीनगर, वाळेवकरनगर, विमाननगर, संतनगर, संभाजीनगर, +जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत त्यांतल्या काहींची नावे: +शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!) +या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती. +ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता. +आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता. +आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे. +पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी: +अप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कॅंप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा बुद्रुक , कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, बोपोडी, धनकवडी, धायरी, पद्मावती, पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहगांव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर, धानोरी, केशवनगर. +पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात. +जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते. +मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले. +पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात. +दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत. +पुणे महानगरात १९९८ साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :- +दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत. +- पुणे परिसर आणि जंगलात ५०हून अधिक प्रकारच्या वेली आहेत. +- पुण्यात दिसणाऱ्या बहुतांश वेली या दक्षिण अमेरिकेतून आणि आफ्रिकेतून आल्या आहेत. +अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, एरिओलिना, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सात्विणी, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे. +अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आकाशनीम, ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, कॅश्युरिना, खडसावर ऊर्फ सुरू, कांचनराज, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), किलबिली, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गुलमोहर, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, खुरचाफा (अनंत प्रकार), तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चौरीसिया, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, ताम्रवृक्ष (पीतमोहर, पेल्ट्रोफोरम), तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), नीलमोहर, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), वांगीवृक्ष, शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), हुरा क्रेपितान्स, पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे. +पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत. +पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारताच्या बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारताच्या सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत. +पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सॅंडविक एशिया, थायसन क्रूप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी. +विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत. +पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे. +महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत. +महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेर, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे. +पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत. +पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये - +कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९०च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमॅंटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारताच्या एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे. +मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हॉंगकॉंग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कॅंप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. +पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात. +पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अशा चहाच्या दुकानांना अमृततुल्य (मुंबईत शंकर विलास) चहाची दुकाने म्हणतात. खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत. +पुण्यात गाडीवर मिळणारी भेळ आणि वडापाव अन्या कोणत्याही शहरांत मिळत नाही. एकेकाळी गाडीवर भजी मिळायची, आता मिळत नाहीत. उसाच्या रसाची गुऱ्हाळे विशिष्ट मोसमात असतात. +पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात. +अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा +पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. +पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. +पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरून एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे. +नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे. +शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत. +पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते. +पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. +तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते. +पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो. +सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एम.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते. +पुणे रेल्वे स्थानकच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्‌घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता. +इ.स. १९२९ मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- सिंहगड एक्सप्रेस (जुने नाव जनता एक्सप्रेस)- ही पुण्यातूनच निघाली होती. +पुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५ च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते. +पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो. +पुण्यात राहणाऱ्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले. +काही अपवाद वगळता पुणे हे भारताच्या एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते. +ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत - +पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. +इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत. +पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात. +पुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :- +फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते. +पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :- +सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे. +या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे. +एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात. +पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता. +पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटकी गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते. +दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते. +पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे - पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत. +पुण्यात होणारे नाट्योत्सव :- +पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, नगर रस्त्यावरील पी.व्ही.आर व सिनेमॅक्स ,विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड लॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.). +पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :- +अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग, +पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण. +पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे. +काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:- +चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतुःशृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. +शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे. +पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात वारी पोहोचते. +पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. +पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे. +कबरी, मशिदी, दर्गे +काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कॅंप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. पुन्यातील बेडेकर मिसळ प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात. +पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी गोष्टी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते. +शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासून बनवलेले कणीदार साजुक तुप घालुन उकडीचे मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुणेकरांचा वीक पॉईंट. +पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.) +३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.[२५] +सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी ,महाराष्ट्र टाइम्स, केसरी, प्रभात, आपलं महानगर ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, ज्ञानवाणी,रेडियो मिर्ची, रेडियो सिटी, विविध भारती, रेडियो वन व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दूरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात. +भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासून नामांकित होतेच. +पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. तसेच पुणेकर देखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा व अहमदनगर, सातारा, नाशिक या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला येतात. +पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. +यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारताच्या सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियॉंस फ्रॉंसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, अक्षरनंदन, नू.म.वि., साधना विद्यालय हडपसर या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत. +पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत. +पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.[ संदर्भ हवा ] +पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत. +लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस्‌‍ एस्‌ पी एम्‌‍ एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सी एम् ई), आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी), एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत. +क्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डी व खो-खो हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ व इ.स. २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते. +मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू - हेमंत व हृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार आहेत. +पुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहेत. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. +ओशो आश्रम (आचार्य रजनीश आश्रम), कात्रज सर्प उद्यान, खडकवासला धरण, चतुःशृंगीचे मंदिर, डायमंड वाटर पार्क, पर्वती, पाताळेश्वर लेणी, पु.ल.देशपांडे गार्डन, फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, बंड गार्डन, महात्मा फुले वाडा, मुळशी धरण, लवासा सिटी, लक्ष्मी रोड, लाल महाल, विश्रामबाग वाडा, वेताळ टेकडी, शनिवार वाडा, शिंद्यांची छत्री, सारसबाग +पुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13620.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87dafe06f5da25cee22fd8318e282bd7e6fae5f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13620.txt @@ -0,0 +1 @@ +पुणेकर हे मराठीतील एक आडनाव आहे व पुणे हे मूळ गाव असणाऱ्या व्यक्ती सामान्यत: हे आडनाव लावतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13628.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00979b0c0726092820b22a13fdecc4931b02ee9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13628.txt @@ -0,0 +1,70 @@ +पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता. +मे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13630.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e66de562c8d8f687f56fa7f4b4f46824e0cc41b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13630.txt @@ -0,0 +1 @@ +पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. गरीब रथ ह्या किफायती दरात पूर्णपणे वातानुकुलीत प्रवाससेवा पुरवणाऱ्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक ह्यांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेसला पुणे ते नागपूर दरम्यानचे ८९० किमी अंतर पार करायला १५ तास व ४५ मिनिटे लागतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13651.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330987693bbb841ecf03a85cbfed77066eea5644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13651.txt @@ -0,0 +1 @@ +पुण्याचे प्राणिवैविध्य diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13674.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54443dc1c302b03ca24227fed0eb73642df8965a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13674.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुदुकोट्टई (तमिळ: புதுக்கோட்டை) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर पुदुकोट्टई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13714.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc2c547519df46db327fd69db6cbbcdf75ba7a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13714.txt @@ -0,0 +1,8 @@ + पुनाडे तर्फे नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13736.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a93187b2edcf23cf6c68c158fa4c777cbad2d9e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13736.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13743.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4f1d3124c660c80c193cbf1b29a19f98870a748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13743.txt @@ -0,0 +1,127 @@ +छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून पुरंदर(सासवड) किल्ला ओळखला जातो. पुरंदर किल्ल्याच्या नावावरूनच येथील तालुका ओळखला जातो. जेजुरीचा खंडेराया, नारायणपुरचे श्रीदत्त मंदिर, केतकावळे गावातील प्रतीबलाजी मंदिर (700 वर्षे प्राचीन सुंदर स्थापत्यकला व कोरीव नक्षीकाम असलेली शिवमंदिरे (संगमेश्वर,चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,नारायनेश्वर,भुलेश्वर, पांडेश्वर) बोपगावचे कानिफनाथ मंदिर,वीर गावचे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी,लहुजी वस्ताद साळवे, होनाजी बाळा, सगनभाऊ, गुरुवर्य बाबुराव जगताप, शहीद अशोक कामठे, सरसेनापती वीरबाजी पासलकर यांची समाधी, सरदार गोदाजी जगताप, सरदार गणोजी दरेकर, पिलाजी जाधवराव, बाळोबा कुंजीर, सिदोजीराव गायकवाड (थोपटे) प्रसिद्द इतिहासाला ज्ञात असलेली माणसे जन्माला आली. संत सोपानदेवाची समाधी याच क-हाकाठावर सासवड़ येथे आहे. सह्यादि्पवर्तावर यादवकालीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले भुलेश्वर मंदिर याच तालुक्याच्या पुवेला आहे.मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला मल्हारगड व आंबळे येथील ढवळगड याच तालुक्यात आहे, पेशवाई येथील ५२ सरदारांच्या जीवावर तगली. सासवडचा अंबाजी पुरंदरे, बाळोबा कुंजीर व इतर सरदारांचे वाडे आजही लक्ष वेधून घेतात. शंभर चौरस मैलाच्या क-हापठारला साहित्यिकांचा वारसा प्राचीन काळापासून आहे. रामायणकार वाल्मिक ऋषी, संत सोपान देव, पुरंदरदास,स्वामी समर्थांचे पहिले चरित्रकार श्री सखाराम बाळकृष्ण सरनाईक,श्रीधरपंत नाझरेकर, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, महात्मा ज्योतीराव फुले, आचार्य अत्रे, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत यांच्या पासून ते अलिकडच्या पिढीतील प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार दशरथ यादव यांच्या पर्यंत साहित्य लेखनाची मोठी परंपरा आहे. यादवकालीन भुलेश्वर हे संशोधनपर पुस्तक यादव यांनी लिहिले आहे. वारकरी संप्रदायावरील वारीच्या वाटेवर ही महाकादंबरीही त्यांनी लिहिली आहे. + + +पुरंदर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. +घेरापूरंदर +गुळूंचे +गुऱ्होळी +हरगुडे +हरणी +हिवरे +जाधववाडी +जवळार्जुन +जेजुरी (एम क्ल) +जेजुरी ग्रामीण +जेऊर +काळदरी +काळेवाडी +कर्नलवाडी +केतकावळे +खळद +खानवडी +कोडीत बु. +कोडीत खु +कोळविहीरे +कोथळे +कुंभारवळण +कुंभोशी +लपतळवाडी +माहूर +माळवाडी +माळशिरस +मांडकी +मांढर +मावडी सुपे +मावडी कडेपठार +मिसाळवाडी (एन व्ही) +मुंजवाडी +नवलेवाडी +नावळी +नायगाव +नाझरे सुपे +निळूंज +पांडेश्वर +पांगारे +पानवडी +पारगाव +परिंचे +पठारवाडी +पवारवाडी +पिंपळे +पिंपरे खु +पिंपरी +पिंगोरी +पिसर्वे +पिसे +पिसुर्टी +पोखर +पोंढे गाव माहिती +पूर +राजेवाडी +राजुरी +राख +रानमळा +साकुर्डे +सासवड +सासवड ग्रामीण +सटलवाडी +शिंदेवाडी +शिवरी +नीरा शिवतक्रार +सिंगापूर +सोमुर्डी +सोनोरी +सुकलवाडी +सुपे खु +तक्रारवाडी +टेकवडी +थापेवाडी +थोपटेवाडी +तोंडल +उदाची वाडी +उधळे +वनपूरी +वीर +वागदरवाडी +वाघापूर +वाल्हे +आडाचीवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आडाचीवाडी गाव हे गाव आहे. आडाचीवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 56 कि.मी. अंतरावर आहे. आडाचीवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 26 कि.मी. अंतरावर आहे. आडाचीवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 448.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार आडाचीवाडी गावाची एकूण लोकसंख्या 1574 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 356 कुटूंब आडाचीवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 356 गावात पुरुषांची संख्या 828 असून महिलांची संख्या 746 अाहे. आडाचीवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. आडाचीवाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा आडाचीवाडी गावात अाहे. आडाचीवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. आडाचीवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. आडाचीवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. आडाचीवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. आडाचीवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. आडाचीवाडी गावात सहकारी बँका नाहीत. आडाचीवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. आडाचीवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. आडाचीवाडी गावात बचत गट अाहेत. आडाचीवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. आडाचीवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. आडाचीवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. आडाचीवाडी गावात वर्तमानपत्र मिळतात. +आंबळे गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंबळे हे गाव आहे. आंबळे गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 45 कि.मी. अंतरावर अाहे. आंबळे गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 17 कि.मी. अंतरावर अाहे. आंबळे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1883.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार आंबळे गावाची एकूण लोकसंख्या 2276 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 501 कुटूंब आंबळे गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 501 गावात पुरुषांची संख्या 1167 असून महिलांची संख्या 1109 अाहे. आंबळे गावात पोस्ट ऑफिस नाही. आंबळे गावचा पिन कोड 412104 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा आंबळे गावात अाहे. आंबळे गावात रेल्वे स्थानक अाहे. आंबळे राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. आंबळे राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. आंबळे गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. आंबळे गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. आंबळे गावात सहकारी बँका नाहीत. आंबळे गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. आंबळे गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. आंबळे गावात बचत गट अाहेत. आंबळे गावात दैनिक बाजार भरत नाही. आंबळे गावात अाठवडे बाजार भरत नाही. आंबळे गावात सार्वजनिक वाचनालय नाही. आंबळे गावात वर्तमानपत्र मिळतात. +या गावच्या उत्तरेला ढवळगड किल्ला आहे.गावात सुंदर ऐतिहासिक वास्तू आहेत. +गावातील प्रसिद्ध व्यक्ती गुरुवर्य बाबुराव जगताप (जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक) +आंबोडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंबोडी हे गाव आहे. आंबोडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 40 कि.मी. अंतरावर अाहे. आंबोडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 2 कि.मी. अंतरावर अाहे. आंबोडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 236.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार आंबोडी गावाची एकूण लोकसंख्या 650 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 142 कुटूंब आंबोडी गावात राहतात.२०११ च्या जनगणनेनुसार 142 गावात पुरुषांची संख्या 330 असून महिलांची संख्या 320 अाहे. आंबोडी गावात पोस्ट ऑफिस नाही. आंबोडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा आंबोडी गावात अाहे. आंबोडी गावात रेल्वे स्थानक नाही. आंबोडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. आंबोडी राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. आंबोडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. आंबोडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. आंबोडी गावात सहकारी बँका नाहीत. आंबोडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. आंबोडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. आंबोडी गावात बचत गट अाहेत. आंबोडी गावात दैनिक बाजार भरत नाही. आंबोडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. आंबोडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. आंबोडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही.[१] +"आस्करवाडी" +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात अस्कारवाडी हे गाव आहे. आस्कारवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 18 कि.मी. अंतरावर अाहे. आस्कारवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 18 कि.मी. अंतरावर अाहे. आस्कारवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 418.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार आस्कारवाडी गावाची एकूण लोकसंख्या 457 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 100 कुटूंब आस्कारवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 100 गावात पुरुषांची संख्या 226 असून महिलांची संख्या 231 अाहे. आस्कारवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. आस्कारवाडी गावचा पिन कोड 412301 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा अस्कारवाडी गावात अाहे. आस्कारवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. अस्कारवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. आस्कारवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. आस्कारवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. आस्कारवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. आस्कारवाडी गावात सहकारी बँका नाहीत. अस्कारवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. आस्कारवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. आस्कारवाडी गावात बचत गट अाहेत. आस्कारवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. आस्कारवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. आस्कारवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. आस्कारवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +"बांदलवाडी +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बांदलवाडी हे गाव आहे. बांदलवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 55 कि.मी. अंतरावर अाहे. बांदलवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 24 कि.मी. अंतरावर अाहे. बांदलवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 226.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार बांदलवाडी गावाची एकूण लोकसंख्या 406 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 95 कुटूंब बांदलवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 95 गावात पुरुषांची संख्या 193 असून महिलांची संख्या 213 अाहे. बांदलवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. बांदलवाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा बांदलवाडी गावात अाहे. बांदलवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. बांदलवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. बांदलवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. बांदलवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. बांदलवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. बांदलवाडी गावात सहकारी बँका नाहीत. बांदलवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. बांदलवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. बांदलवाडी गावात बचत गट नाहीत. बंधळवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. बांदलवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. बांदलवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. बांदलवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +बेलसर गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसार हे गाव आहे. बेलसार गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 43 कि.मी. अंतरावर अाहे. बेलसार गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 13 कि.मी. अंतरावर अाहे. बेलसार गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1747.61 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार बेलसार गावाची एकूण लोकसंख्या 3741 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 832 कुटूंब बेलसार गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 832 गावात पुरुषांची संख्या 1857 असून महिलांची संख्या 1884 अाहे. बेलसार गावात पोस्ट ऑफिस अाहे. बेलसार गावचा पिन कोड 412303 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा बेलसार गावात अाहे. बेलसार गावात रेल्वे स्थानक नाही. बेलसार राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. बेलसार राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. बेलसार गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. बेलसार गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. बेलसार गावात सहकारी बँका नाहीत. बेलसार गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. बेलसार गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. बेलसार गावात बचत गट अाहेत. बेलसार गावात दैनिक बाजार भरत नाही. बेलसार गावात अाठवडे बाजार भरतो. बेलसार गावात सार्वजनिक वाचनालय अाहे. बेलसार गावात वर्तमानपत्र मिळतात. +भैरववाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भैरववाडी हे गाव आहे. भैरववाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 55 कि.मी. अंतरावर अाहे. भैरववाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 25 कि.मी. अंतरावर अाहे. भैरववाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 307.70 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार भैरववाडी गावाची एकूण लोकसंख्या 624 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 129 कुटूंब भैरववाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 129 गावात पुरुषांची संख्या 321 असून महिलांची संख्या 303 अाहे. भैरववाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. भैरववाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा भैरववाडी गावात अाहे. भैरववाडी गावात रेल्वे स्थानक नाही. भैरववाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. भैरववाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. भैरववाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. भैरववाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. भैरववाडी गावात सहकारी बँका नाहीत. भैरववाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. भैरववाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. भैरववाडी गावात बचत गट अाहेत. भैरववाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. भैरववाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. भैरववाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. भैरववाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +भिवडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भिवडी हे गाव आहे. भिवडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 33 कि.मी. अंतरावर अाहे. भिवडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 5 कि.मी. अंतरावर अाहे. भिवडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 799.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार भिवडी गावाची एकूण लोकसंख्या 3050 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 606 कुटूंब भिवडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 606 गावात पुरुषांची संख्या 1571 असून महिलांची संख्या 1479 अाहे. भिवडी गावात पोस्ट ऑफिस अाहे. भिवडी गावचा पिन कोड 412301 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा भिवडी गावात अाहे. भिवडी गावात रेल्वे स्थानक नाही. भिवडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. भिवडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. भिवडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. भिवडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. भिवडी गावात सहकारी बँका नाहीत. भिवडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. भिवडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. भिवडी गावात बचत गट अाहेत. भिवडी गावात दैनिक बाजार भरत नाही. भिवडी गावात अाठवडे बाजार भरतो. भिवडी गावात सार्वजनिक वाचनालय अाहे. भिवडी गावात वर्तमानपत्र मिळतात. +भोसलेवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भोसलेवाडी हे गाव आहे. भोसलेवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 38 कि.मी. अंतरावर अाहे. भोसलेवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 10 कि.मी. अंतरावर अाहे. भोसलेवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 837.23 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार भोसलेवाडी गावाची एकूण लोकसंख्या 1351 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 323 कुटूंब भोसलेवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 323 गावात पुरुषांची संख्या 691 असून महिलांची संख्या 660 अाहे. भोसलेवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. भोसलेवाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा भोसलेवाडी गावात अाहे. भोसलेवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. भोसलेवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. भोसलेवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. भोसलेवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. भोसलेवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. भोसलेवाडी गावात सहकारी बँका नाहीत. भोसलेवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. भोसलेवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. भोसलेवाडी गावात बचत गट अाहेत. भोसलेवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. भोसलेवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. भोसलेवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. भोसलेवाडी गावात वर्तमानपत्र मिळतात. +बोपगाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोपगाव हे गाव आहे. बोपगाव गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 30 कि.मी. अंतरावर अाहे.बोपगाव गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 6 कि.मी. अंतरावर अाहे. बोपगाव गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1309.00 हेक्टर अाहे.२०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 574 कुटूंब बोपगाव गावात राहतात.२०११ च्या जनगणनेनुसार गावात पुरुषांची संख्या 1512 असून महिलांची संख्या 1424 अाहे.बोपगाव गावात सब पोस्ट ऑफिस अाह. बोपगाव गावचा पिन कोड 412301 हा आहे.बोपगाव राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही.बोपगाव गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही.बोपगाव गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही.बोपगाव गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत.बोपगाव गावात सहकारी बँका नाहीत. बोपगाव गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत.बोपगाव गावात कृषी पणन सोसायटी नाहीत.बोपगाव गावात बचत गट अाहेत.बोपगाव गावात दैनिक बाजार भरत नाही. बोपगाव गावात अाठवडे बाजार भरत नाही.बोपगाव गावात सार्वजनिक वाचनालय नाही.बोपगाव गावात वर्तमानपत्र मिळतात. +काळदरी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात काळदरी हे गाव आहे.काळदरी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 51 कि.मी. अंतरावर अाहे.काळदरी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 23 कि.मी. अंतरावर अाहे. काळदरी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1388.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार काळदरी गावाची एकूण लोकसंख्या 1363 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 328 कुटूंब काळदरी गावात राहतात.२०११ च्या जनगणनेनुसार 328 गावात पुरुषांची संख्या 681 असून महिलांची संख्या 682 अाहे.काळदरी गावात सब पोस्ट ऑफिस अाहे.काळदरी गावचा पिन कोड उपलब्ध नाही.दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा काळदरी गावात अाहे. काळदरी गावात रेल्वे स्थानक नाही.काळदरी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. काळदरी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही.काळदरी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. काळदरी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत.काळदरी गावात सहकारी बँका नाहीत.काळदरी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत.काळदरी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत.काळदरी गावात बचत गट अाहेत.काळदरी गावात दैनिक बाजार भरत नाही.काळदरी गावात अाठवडे बाजार भरत नाही.काळदरी गावात सार्वजनिक वाचनालय नाही.काळदरी गावात सार्वजनिक वाचनालय नाही.काळदरी गावात वर्तमानपत्र मिळतात. +बोरहेलवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोरहेलवाडी हे गाव आहे. बोरहेलवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 36 कि.मी. अंतरावर अाहे. बोरहेलवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 6 कि.मी. अंतरावर अाहे. बोरहेलवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 249.03 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार बोरहेलवाडी गावाची एकूण लोकसंख्या 674 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 141 कुटूंब बोरहेलवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 141 गावात पुरुषांची संख्या 331 असून महिलांची संख्या 343 अाहे. बोरहेलवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. बोरहेलवाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा बोरहेलवाडी गावात अाहे. बोरहेलवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. बोरहेलवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. बोरहेलवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. बोरहेलवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. बोरहेलवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. बोरहेलवाडी गावात सहकारी बँका नाहीत. बोरहेलवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. बोरहेलवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. बोरहेलवाडी गावात बचत गट अाहेत. बोरहेलवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. बोरहेलवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. बोरहेलवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. बोरहेलवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +चांबळी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात चांबळी हे गाव आहे. चांबळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 30 कि.मी. अंतरावर अाहे. चांबळी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 6 कि.मी. अंतरावर अाहे. चांबळी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1411.17 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार चांबळी गावाची एकूण लोकसंख्या 3449 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 738 कुटूंब चांबळी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 738 गावात पुरुषांची संख्या 1769 असून महिलांची संख्या 1680 अाहे. चांबळी गावात पोस्ट ऑफिस अाहे. चांबळी गावचा पिन कोड 412301 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा चांबळी गावात अाहे. चांबळी गावात रेल्वे स्थानक नाही. चांबळी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. चांबळी राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. चांबळी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. चांबळी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. चांबळी गावात सहकारी बँका नाहीत. चांबळी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. चांबळी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. चांबळी गावात बचत गट अाहेत. चांबळी गावात दैनिक बाजार भरत नाही. चांबळी गावात अाठवडे बाजार भरतो. चांबळी गावात सार्वजनिक वाचनालय अाहे. चांबळी गावात वर्तमानपत्र मिळतात. +चिव्हेवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात चिव्हेवाडी हे गाव आहे. चिव्हेवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 45 कि.मी. अंतरावर अाहे. चिव्हेवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 9 कि.मी. अंतरावर अाहे. चिव्हेवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 42.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार चिव्हेवाडी गावाची एकूण लोकसंख्या 738 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 160 कुटूंब चिव्हेवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 160 गावात पुरुषांची संख्या 379 असून महिलांची संख्या 359 अाहे. चिव्हेवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. चिव्हेवाडी गावचा पिन कोड उपलब्ध नाही. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा चिव्हेवाडी गावात अाहे. चिव्हेवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. चिव्हेवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. चिव्हेवाडी राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. चिव्हेवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. चिव्हेवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. चिव्हेवाडी गावात सहकारी बँका नाहीत. चिव्हेवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) नाहीत. चिव्हेवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. चिव्हेवाडी गावात बचत गट अाहेत. चिव्हेवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. चिव्हेवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. चिव्हेवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. चिव्हेवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +दौडज गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात दौडज हे गाव आहे. दौडज गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 56 कि.मी. अंतरावर अाहे. दौडज गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 6 कि.मी. अंतरावर अाहे. दौडज गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1526.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार दौडज गावाची एकूण लोकसंख्या 2378 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 505 कुटूंब दौडज गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 505 गावात पुरुषांची संख्या 1199 असून महिलांची संख्या 1179 अाहे. दौडज गावात सब पोस्ट ऑफिस अाहे. दौडज गावचा पिन कोड 412305 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा दौडज गावात अाहे. दौडज गावात रेल्वे स्थानक अाहे. दौडज राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. दौडज राज्यमार्गा (रोड) जवळ अाहे. दौडज गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे. दौडज गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. दौडज गावात सहकारी बँका नाहीत. दौडज गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. दौडज गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. दौडज गावात बचत गट अाहेत. दौडज गावात दैनिक बाजार भरत नाही. दौडज गावात अाठवडे बाजार भरत नाही. दौडज गावात सार्वजनिक वाचनालय नाही. दौडज गावात वर्तमानपत्र मिळतात. +दवणेवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात दवणेवाडी हे गाव आहे. दवणेवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 63 कि.मी. अंतरावर अाहे. दवणेवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 33 कि.मी. अंतरावर अाहे. दवणेवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 521.51 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार दवणेवाडी गावाची एकूण लोकसंख्या 372 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 82 कुटूंब दवणेवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 82 गावात पुरुषांची संख्या 177 असून महिलांची संख्या 195 अाहे. दवणेवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. दवणेवाडी गावचा पिन कोड ४१२ ३११ हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा दवणेवाडी गावात आहे. दवणेवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. दवणेवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. दवणेवाडी गावात सहकारी बँका नाहीत. दवणेवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) आहे. दवणेवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. दवणेवाडी गावात बचत गट नाहीत. दवणेवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. दवणेवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. दवणेवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. दवणेवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +देवडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात देवडी हे गाव आहे. देवडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 45 कि.मी. अंतरावर अाहे. देवडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 14 कि.मी. अंतरावर अाहे. देवडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1363.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार देवडी गावाची एकूण लोकसंख्या 1201 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 246 कुटूंब देवडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 246 गावात पुरुषांची संख्या 593 असून महिलांची संख्या 608 अाहे. देवडी गावात पोस्ट ऑफिस नाही. देवडी गावचा पिन कोड 412205 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा देवडी गावात अाहे. देवडी गावात रेल्वे स्थानक नाही. देवडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. देवडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. देवडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. देवडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. देवडी गावात सहकारी बँका नाहीत. देवडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अाहेत. देवडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. देवडी गावात बचत गट अाहेत. देवडी गावात दैनिक बाजार भरत नाही. देवडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. देवडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. देवडी गावात वर्तमानपत्र मिळतात. +गुळूंचे गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात गुळूंचे हे गाव आहे. गुळूंचे गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 50 कि.मी. अंतरावर अाहे. गुळूंचे गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 41 कि.मी. अंतरावर अाहे. गुळूंचे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 2670.00 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार गुळूंचे गावाची एकूण लोकसंख्या 2754 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 626 कुटूंब गुळूंचे गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 626 गावात पुरुषांची संख्या 1394 असून महिलांची संख्या 1360 अाहे. गुळूंचे गावात सब पोस्ट ऑफिस अाहे. गुळूंचे गावचा पिन कोड 412102 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गुळूंचे गावात अाहे. गुळूंचे गावात रेल्वे स्थानक नाही. गुळूंचे गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. गुळूंचे गाव राज्यमार्गा लगत नाही. गुळूंचे गाव जिल्हामार्गा लगत नाही. गुळूंचे गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बँका, सहकारी बँका नाहीत. गुळूंचे गावात विविध कार्यकारी सोसायटी अाहेत. गुळूंचे गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. गुळूंचे गावात बचत गट अाहेत. गुळूंचे गावात दैनिक बाजार भरत नाही. गुरूंची गावाचा पिनकोड ४१२१०२आहे.गुळूंचे गावात अाठवडे बाजार ही भरत नाही. त्यामुळे नीरा या ठिकाणी दर बुधवारी आठवडा बाजार भरतो तिथे जावे लागते. गुळूंचे गावात सार्वजनिक वाचनालय आहे. गुळूंचे गावात वर्तमानपत्र मिळतात. [२] +कर्नलवाडी +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कर्नलवाडी हे गाव आहे. कर्नलवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 40 कि.मी. अंतरावर अाहे. कर्नलवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 25 कि.मी. अंतरावर अाहे.कर्नलवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 968.97 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार कर्नलवाडी गावाची एकूण लोकसंख्या 1382 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 314 कुटूंब कर्नलवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 314 गावात पुरुषांची संख्या 718 असून महिलांची संख्या 664 अाहे. कर्नलवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. कर्नलवाडी गावचा पिन कोड 412102 हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कर्नलवाडी गावात अाहे. कर्नलवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. कर्नलवाडी गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. कर्नलवाडी गाव राज्यमार्गा लगत नाही. कर्नलवाडी गाव जिल्हामार्गा लगत नाही. कर्नलवाडी गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बँका नाहीत. कर्नलवाडी गावात सहकारी बँका नाहीत. कर्नलवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी अाहेत. कर्नलवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. कर्नलवाडी गावात बचत गट अाहेत. कर्नलवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. त्यामुळे नीरा या ठिकाणी दर बुधवारी आठवडा बाजार भरतो तिथे जावे लागते. कर्नलवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. कर्नलवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. कर्नलवाडी गावात वर्तमानपत्र मिळतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13756.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee845fdf5e1319b23bb147b68bbee0092d71058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13756.txt @@ -0,0 +1,6 @@ +लाल पूर्णिया गाय किंवा पूर्णिया गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हे मुख्यतः बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यात आणि बिहारच्या लगतच्या अरारिया आणि कटिहार मधेपुरा, पूर्णिया, किशनगंज आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. या गोवंशात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असते.[१] +प्राण्यांचा रंग प्रामुख्याने राखाडी आणि त्यानंतर लाल आणि काळा असतो. या गोवंशाची संख्या सुमारे अडीच लाख असल्याचे मानले जाते.[२] +हा गोवंश लहान ते मध्यम आकाराचा असून याची दुग्धोत्पादन क्षमता देखील कमी आहे. परंतु याचे बैल शेतीच्या कामकाजात आणि भार खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहेत. बैल सरासरी दिवसाचे ७ ते ८ तास काम करतात आणि एक बैलजोडी अंदाजे सहा तासांत एक एकर जमीन नांगरते. गुरांची ही जात प्रामुख्याने दूध, मशागत आणि खतासाठी वापरली जाते आणि त्यात दुष्काळ आणि उष्णता सहन करण्याची क्षमता देखील चांगली आहे. जवळपास ७०% गुरांना स्थानिक पातळीवर लागवड केलेल्या भात, गहू आणि मका यांच्या पेंढ्या खायला दिल्या जातात. क्वचितच हिरवा चारा किंवा कोणत्याही प्रकारचे पशुखाद्य दिले जाते. बहुतेक जनावरे ही कळपाने चराईसाठी फिरवली जातात.[३] +गाईचे दैनंदिन दूध उत्पादन १ ते ५ किलो आणि सरासरी दुग्धजन्य उत्पादन ६०९ किलो आहे (४५२ ते ७८५ किलो पर्यंत) सरासरी दुधाचे फॅट ४.२२% आहे (४ ते ४.५% पर्यंत). या जनावरांची संख्या अंदाजे २,१९,००० आहे.[४][५] +'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[६][२] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13783.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5089a14be17322a34e60a49a91e3de2ac6614d90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13783.txt @@ -0,0 +1,9 @@ + +शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात.  किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आला आहे.  ज्या काळी अनपेक्षित परचक्राची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इ. तटबंदी वा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती.  शत्रूचा हल्ला आल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवीत. नगराप्रमाणे कधी देशाच्या सीमेवरही तटबंदी करीत. चीनची भिंत हे त्याचेच प्रसिद्ध उदाहरण होय.  किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगुदामे, शस्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग इत्यादींची अत्यंत चातुर्याने व काळजीपूर्वक आखणी करावी लागे.  किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना करीत.  एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सहजसुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात येत. +प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा. किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून अमिलापितार्थचिंतामणी ह्या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर ह्याने किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत; ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत. ह्या प्रत्येकाची बांधणी काही एका विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत केलेली असे आणि किल्ल्यांसाठी स्थलसंशोधन करताना दुर्गमता व विपुल जलसंचय यांवर विशेष भर दिला जात असे. बहुतेक भुईकोट किल्ल्यांची रचना दिल्लीचा लाल किल्ला : (१) सलिमगट, (२) जहांगीरने बांधलेला पूल, (३) शाह बुरुज, (४) मोतीमहल, (५) हमामखाना, (६) दीवान-इ-खास, (७) ख्वाबगाह व झरोका, (८) रंगमहल, (९) यमुना नदी, (१०) मुमताजमहल, (११) दीवान-इ-आम, (१२) नौबतखान, (१३) हौद, (१४) कमानी पथ, (१५) असद बुरुज, (१६) शहरपनाह, (१७) मोट (खंदक), (१८) दिल्ली दरवाजा, (१९) द्वारबुरुज, (२०) लहोर दरवाजा, (२१) किल्ल्यातील बाजार. +सपाट जमिनीवर किंवा कृत्रिम छोट्या पठारवजा टेकडीवर केलेली असते.  किल्ल्यांचा आकार चौकोनी, गोलाकार, षट्‌कोनी किंवा अष्टकोनीही असतो.  किल्ल्याभोवतीचा तट दगडविटा, चुना व माती यांचा वापर करून मजबूत केलेला असतो.  काही ठिकाणी तटाबाहेर सभोवती खंदक खणून व त्यात पाणी खेळवून विषारी वनस्पती लावण्यात येते. कधी अल्प अंतरावर दोन किंवा तीन खंदकही असत. पुष्कळदा तटाच्या आतही आणखी एखादी साहाय्यक तटबंदी असे.  तटाची उंची सर्वसाधारणतः १० ते १२ मी. वा त्याहून अधिक आणि रुंदी १ मी. पासून ते रथ वा इतर वाहन सहज रीत्या जाऊ शकेल, एवढी आढळते. तटावर बुरूज, मनोरे हयांचेही निरीक्षणाच्या व संरक्षणाच्या दृष्टीने बांधकाम करण्यात येई.  गिरिदुर्गाचे बांधकामही ह्या पद्धतीने केले जाई; मात्र तटाची उंची व रुंदी भुईकोटापेक्षा कमी असे. काही ठिकाणी तुटलेल्या कडयाचा उपयोग किरकोळ बांधकाम करून तटासारखा करण्यात येई आणि बांधकामासाठी मुख्यत्वे दगडाचाच उपयोग अधिक करीत. तीच गोष्ट जलदुर्गाच्या बाबतीत आढळते. मात्र जलदुर्गाचे तट अधिक रूंद व शिसे अथवा चुना ह्यांचा उपयोग करून अधिक मजबूत करण्यात येत.  बहुधा सतत धडकणाऱ्या पाण्याच्या लाटांपासून किल्ल्याच्या तटांना तडा जाऊ नये, हा त्यामागील उद्‌देश असे.  एकूण वरील प्रकारे किल्ल्यात बुरूज, मेट (पहारा), चिलखत (बुरूजामागील संरक्षक फळी-भिंत), पडकोट (बाहेरील भिंत), मनोरे ह्यांबरोबरच गढी, माची (संरक्षणाचा एक भाग, खलबतखाना (गुप्त गोष्टींची खोली), अंबारखाना (धान्य कोठार), बालेकिल्ला वगैरे महत्त्वाच्या वास्तू असत. किल्ल्यांच्या दरवाजांना व बुरूजांना किल्ल्याच्या बांधणीत अनन्यसाधारण महत्त्व असे.  कारण संरक्षणाच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत.  दरवाजे लाकडी व लोखंडी पट्‌ट्यांनी मजबूत केलेले असत व त्यांवर अणकुचीदार मेखा किंवा खिळे लावलेले असत.  दरवाजे एक किंवा अधिक असत व शिवाय चोरदिंड्या किंवा दिंडी दरवाजे असत.  आत आडणे (अडसर) असत.  दरवाजांना दिशासूचक नावे दिलेली असत.  शिवाय विघ्नहारक व यशदायक अशा सूर्य, चंद्र, गणपती इत्यांदीच्या आकृती दरवाज्यांच्या गणेशपट्‌टीवर मध्यभागी वसविलेल्या असत खेरीज विहिरी, बाजारपेठ, राहण्याची घरे, राजवाडा, मंदिर, सभागृह, तुरूंग इ. लहानमोठ्या वास्तू असत. किल्ल्याच्या बांधणीत चुना, दगड, वीट, माती, लोखंड व लाकूड ह्यांचा सर्रास वापर केलेला दिसतो. दरवाजासाठी आणि इतर बांधकामात लाकडाचा उपयोग करीत, परंतु मध्ययुगात बंदुकीच्या दारूचा शोध लागल्यानंतर लाकडाचा उपयोग हळूहळू कमी होत गेला. बाण व बंदुका यांसाठी बुरूज व तट छिद्रे ठेवून तयार करीत. या छिद्रांना जंग्या म्हणत. बंदुका येथे खोचून शत्रूवर मारा केला जाई. त्यांवरील सपाट जागा तोफ डागण्यासाठी वापरीत. बुरूजांना देखील नावे दिली जात. गिरिदुर्गाच्या बांधणीत दगडाचाच उपयोग अधिक दिसतो. एकंदरीत बदलत्या कालमानाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रांतील सुधारणांबरोबर किल्ल्यांचे स्वरूप बदलून ते सचिवालय, राजवाडे, करमणुकीची पटांगणे आणि क्रीडांगणे, अतिथिगृहे, बागा, प्रेक्षागृहे, हमामखाने अशा विविध सुखसोयींनी सज्ज करण्यात आले. +किल्ल्यांची बांधणी जगात प्रथम केव्हा सुरू झाली, ह्याचा इतिहास ज्ञात नाही.  ईजिप्शियन संस्कृतीच्या (३५०० ते ६०० इ. स. पू.) काळात राजवाडे तटबंदीने, बुरूजांनी व त्याभोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले असत. बाराव्या राजवंशाच्या वेळी (२०००—१७८६ इ. स. पू.) सेम्ना हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे चालू राहिली. ऍसिरियात (इ. स. पू. आठवे-सातवे शतक) तर शहरांना तटबंदी करीत.  खोर्साबाद हे त्यातील प्रसिद्ध शहर होय.  बॅबिलोनियातही (१८००—५०० इ. स. पू.) ह्याच पद्धतीने तटबंदी करून शहरे बसविली जात.  ग्रीकांचा (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक) टायरिन्झ हा बालेकिल्ला, तसेच अक्रॉपलिस हा अथेन्समधील किल्ला प्रसिद्ध आहे.  पुढे रोमन काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले व राजवाडे म्हणजे लहानमोठे भुईकोट किल्लेच तयार होऊ लागले. यूरोपमधील बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीत ग्रीको-रोमन तसेच गॉथिक वास्तुशैली मुख्यत्वे आढळते. यूरोपात १००० ते १५०० या कालखंडात किल्ल्यांचे प्रमाण वाढले; ते नॉर्मनांच्याच प्रोत्साहनामुळे झाले. शिवाय ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरंजामशाही व धर्मयुद्धे. त्यामुळे हेडिंगहॅम, कोल्चेस्टर, पेम्ब्रोक, डील, केनिलवर्थ, कॉन्वे, ऍरंडल, डोव्हर, एडिनबर, विंझर (इंग्लंड), कूसी-ल-शातो, दे शॉंबॉर (फ्रान्स), ब्रॉनफेल्स (जर्मनी), म्युरेन (नेदर्लंड्‌स), सांत आंजीलो (इटली), आल्काथार (स्पेन), रूमेली हिस्सार (तुर्कस्तान), क्रॅक डेस शिव्हॅलिअर्स (सिरिया), कौंतस ऑफ लेंडर्स (बेल्जियम), कल्मार (स्वीडन) ह्यांसारखे प्रसिद्ध किल्ले ह्या युगात बांधले गेले.  ह्यांतच पुढे काही सुधारणा करण्यात आल्या आणि आयलिन डोनान, ऍरंडल, ब्लार्ना, कर्नारव्हन, गेलर्ड वगैरे काही किल्ले; तसेच मेझन्स, लाफीत, शनाझो, आझे-ल-रिदो वगैरे प्रबोधनकाळातील किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली.  पहिल्या महायुद्धात काही किल्ले जमीनदोस्त झाले.  अद्यापि ह्यांतील अनेक किल्ल्यांचे अवशेष पहावयास सापडतात.  रशियातील क्रेमलिन हे अशा बालेकिल्ल्यांचे उदाहरण म्हणावे लागेल. +किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्‌मयात आढळतो. ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीग अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्त्व ह्यांचे विवेचन आढळते. प्राचीन भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात हडप्पा ह्या शहरास तटबंदी होती व शहराच्या मध्यभागी बालेकिल्ला बांधला होता, असे तेथील अवशेषांबरून दिसते. पुढे वेदकाळात, तसेच ब्राह्मणकाळात शहरांभोवती तटबंदी उभारून सभोवती खंदकांची योजना केली जात असे.  ऋग्वेदात ह्याचा `पुर' ह्या शब्दाने उल्लेख केलेला आढळतो.  ऐतरेय ब्राह्मणात अनेक किल्ल्यांचा उल्लेख असून तीन अग्नी हे तीन किल्ले असून असुरांपासून यज्ञाचे संरक्षण करीत आहेत, असे वर्णन केले आहे.  मौर्यकाळात कौटिलीय अर्थशास्त्रातील किल्ल्यांच्या स्थापत्यविषयक वर्णनावरून असे दिसते, की किल्ल्यांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात येई.  पाटलिपुत्र शहराच्या अवशेषांवरून असे दिसते, की त्याभोवती खंदक होता आणि त्याची तटबंदी भक्कम असावी.  गुप्त, वाकाटक, राष्ट्रकुट ह्यांच्या काळात किल्ल्यांस विशेष महत्त्व आलेले नसले, तरी त्यांचे राजवाडे व शहरे तटबंदीने युक्त असत. मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार, यादव ह्या वंशांच्या वेळी गिरिदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले.  एकूण किल्ल्यांपैकी ह्या काळात बांधलेले किल्ले-त्यांचे मूळ स्वरूप आज दिसत नसले तरी-संख्येने सर्वाधिक भरतील. देवगिरी (दौलताबाद), साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, त्रिंबक, रांगणा, पावनगड, पन्हाळा, विशाळगड हे मुसलमानपूर्वकाळातील किल्ले होत.  पुढे मुसलमान काळात अनेक किल्ले बांधण्यात आले.  दिल्लीचा लाल किल्ला, आग्र किल्ला, अहमदनगरचा किल्ला, विजापूरचा किल्ला, बंगलोरचा किल्ला ही तत्कालीन भुईकोट किल्ल्यांची प्रसिद्ध उदाहरणे होत.  तत्कालीन राजपुतांनी चितोड, आंबेर, जोधपूर, ग्वाल्हेर इ. डोंगरी किल्ले बांधले.  सतराव्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले. राजगड, रायगड, पुरंदर, तोरणा, विशाळगड, पन्हाळा, प्रतापगड इ. डोंगरी किल्ले व सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग, अरनाळा, कुलाबा, जंजिरा, पद्‌मदुर्ग, जयगड इ. जलदुर्ग होत.  पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले,बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी करण्यात आली.  मात्र ह्यावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते.  त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधले.  ह्या काळात गोवळकोंडा, त्रिचनापल्ली, पेनुगोंडे, चंद्रगिरी येथील किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झाले. +वरील काळात राजधानीच्या शहराव्यतिरिक्त जहागीरदार-वतनदारांच्या गावात, त्या त्या वतनदारांनी बांधलेल्या गढ्या या किल्ल्यांच्या छोट्या प्रतिमाच होत.  भारतातील किल्ल्यांच्या बांधणीत नॉर्मंडी येथे बांधलेल्या किल्ल्यांच्या रचनेची तसेच सॅरसेनिक वास्तुशैलीची छाप आढळते व तीच पुढे महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पडलेली दिसते. +विसाव्या शतकात शस्त्रास्त्रांच्या व वाहनांच्या आधुनिकीकरणाबरोबर किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले.  दुसऱ्या जागतिक महायुद्धात १९३८ मध्ये जर्मनीने सिगफ्रीड लाइन व फ्रान्सने मॅझिनो लाइन ह्यांसारख्या अवाढव्य तटबंद्या बांधल्या.  रणगाडे, अणुबॉंब ह्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून तळघरात किल्ले बांधले जाण्याची शक्यता आहे. +लेखक / लेखिका : १) कृ. ब. गटणे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13784.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f42a62d6a648383fe62831ab0d6a4669b3af72f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13784.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पुराना किला (अर्थ: जुना किल्ला) हा भारतातील दिल्ली येथील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. दुसरा मुघल सम्राट हुमायून आणि सुरीद सुलतान शेरशाह सूरी यांनी हा किल्ला बांधला असून तो इंद्रप्रस्थ या प्राचीन शहराच्या जागेवर वसलेला असावा असे अनेकांना वाटते. +या किल्ल्याने दिनपनाह शहराचा आतील किल्ला तयार केला होता. हे ठिकाण विस्तारित प्रगती मैदानाजवळ स्थित आहे आणि ध्यानचंद स्टेडियमपासून मथुरा रोड, दिल्लीने वेगळे केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13805.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3116b5302324e086daa06798abafacacd1934e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13805.txt @@ -0,0 +1,84 @@ +पुरी गांधीधाम एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वेची अतिजलद रेल्वेगाडी आहे. ती भारत देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी ते गुजरात राज्यातील गांधीधाम पर्यंत आठवड्यातून एकदा धावते. या ट्रेनची घोषणा सन २०११ च्या अंदाजपत्रकात झाली आणि ही १४ नोव्हेंबर २०११ रोजी धावू लागली. या गाडीचा क्रं. १२९९३/१२९९४ आहे. ही गाडी प्रत्यक शुक्रवारी गांधीधाम पासून निघते आणि रविवारी पुरी येथे पोहचते तर ती सोमवारी पुरी येथून निघते आणि बुधवारी गांधीधाम येथे पोहचते. ही गाडी ओरिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत एकूण २३ थांबे घेत एकूण २,२८३ किमीचा (१४१९ मैल) प्रवास करते. त्या प्रवासासाठी ती सरासरी ४१ तास ३० मिनिटे घेते.[१][२] +या गाडीला १ वातानुकूलित दुहेरी, १ वातानुकूलित तिहेरी, ८ शयनयान, ६ सामान्य आणि २ सामानवाहतूक तथा सामान्य असे डबे लावले जातात. या गाडीला खानपान व्यवस्थेचा डबा नसतो पण त्यासाठी सुविधा पुरवली जाते. वातानुकूलित वर्गाच्या खिडक्या मोठ्या आहेत. बैठकीच्या खाली सामान ठेवण्याची व्यवस्था आहे. +हा गाडी वटवा येथील डब्ल्यूडीएम-३ए (WDM-3A) या डीझेल इंजिनाच्या मदतीने गांधीधाम ते अहमदाबाद दरम्यान ट्रेन धावते आणि तेथून पुढे वडोदरा येथील डब्ल्यूएपी-४इ (WAP-4E)च्या मदतीने रायपूर पर्यंत ट्रेन धावते. पुढे डब्ल्यूडीएम-३ए (WDM-3A)च्या सहाय्याने ती ट्रेन पुरी पर्यंत धावते. + नाव + (कोड) + वेळ + वेळ + वेळ + किमी +(PURI) + km + रोड जंक्शन(KUR) + min + km + (BBS) + min + km + min + km + रोड (TLHD) + min + km + min + km + min + km + रोड(BRGA) + min + km + min + km + (TIG) + min + km + (KBJ) + min + km + रोड(KRAR) + min + km + जंक्शन(R) + min + km + (DURG) + min + km + जंक्शन(G) + min + km + (NGP) + min + km + जंक्शन(BSL) + min + km + जंक्शन(JL) + min + km + (NDB) + min + km + min + km + जंक्शन(BRC) + min + km + जंक्शन (ANND) + min + km + जंक्शन(ADI) + min + km + (DHG) + min + km + बी.जी.(SIOB) + min + km + बीजी(BCOB) + min + km + बीजी(GIMB) + min + km diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13814.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9398e9c34e4ee664c520eafb4fce5c060db943f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13814.txt @@ -0,0 +1 @@ +पुरुलिया हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13822.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..defe729027b7bf3c02e43408bc3178ff945dc30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13822.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वागणूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी समाजात प्रतिमा निर्माण केली आहे. +शैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश असतो. पुरुषत्वाचा अभ्यास हा स्त्रीवादाशी निगडित आहे. पुरुषत्वामुळे पुरुषाला विशेष अधिकार प्राप्त होतात. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांतून पुरुषत्वाचा विचार सातत्याने झिडकारला जात आहे. ह्या विषयाच्या अभ्यासात पुरुषांचे हक्क, स्त्रीवादी विचारसरणी, समलैंगिकता, मातृसत्ता, पितृसत्ता, अश्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13836.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..926fb8b70d420e91de5cb80e2d99e6a78354b5c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13836.txt @@ -0,0 +1,15 @@ +पुरुषोत्तम दारव्हेकर (१९२७ - सप्टेंबर २१, १९९९) हे मराठी नाटककार होते. +कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार दिग्दर्शक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर +त्यांचा जन्म शिक्षण नागपुरातील B. Sc. B. T.,  M. A. LL.B. with Gold Medal एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला +१९५१ मध्ये  रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली , +लहान मुलांचे साठीही त्यांनी नाटकांची निर्मिती केली +१९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले, +ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. +पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. +मास्तरांनी नाटकाला आपल्या अपत्यासारखे जपले. त्यांच्या नाटकांवर विदर्भासह, इंदोर, दिल्ली, जबलपूरच्या रसिकांनीही भरभरून प्रेम केले. +चंद्र नभीचा ढळला नाटकाचे १६ प्रयोग, काळी माती : खारे पाणीचे सहा प्रयोग, वऱ्हाडी मानसंचे २६प्रयोग, नयन तुझे जादुगारचे २९ प्रयोग, वाजे पाऊल आपलेचे 21 प्रयोग त्यांनी केले. व्यावसायिक रंगभूमीवर अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. तात्यासाहेबांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हटले होते. +त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेले ’कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड आहे. +त्यांची गीत संपदा +घेई छंद मकरंद ------- छळतसे काजळ काळी रात-------  जा उडुनी जा पाखरा ------तेजोनिधी लोहगोल ----- दिन गेले भजनाविण सारे ----- मुरलीधर श्याम हे नंदलाल ------  या भवनातिल गीत पुराणे +त्यांची बालनाटिका +उपाशी राक्षस --कबुलीवाला ---मोरूचा मामा ---पत्र्यांचा महाल ------नारदाची शेंडी -----अब्रा -कि-डब्रा diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13847.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7df07b452b1e3d1e82052c433ddb14833fd9f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13847.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. पुरुषोत्तम माळोदे हे एक मराठी लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1385.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ff36b452036adfaf7fe953ee61751b9811955d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1385.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातील २०२१ मधील शहीद झालेले जवान diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13859.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d81f30ef63170eb93e5b996b489362cba1829f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13859.txt @@ -0,0 +1 @@ +पुरूषोत्‍तम निवृत्‍ती भापकर यांचा जन्‍म सालवडगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्‍त्र, एल.एल.बी., पीएच.डी. (कृषी अर्थशास्‍त्र) झाले आहे. सध्‍या ते भारतीय प्रशासकीय सेवेत मराठवाडा विभागाचे आयुक्‍त म्‍हणून कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी आहेत. त्यांलची गीतं सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ, उत्त‍रा केळकर, अतुल दिवे, ज्योत्ना राजोरिया या गायकांनी गायलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13874.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c657f25e1f039f0f297e29a3a2f11e6f9c7037e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13874.txt @@ -0,0 +1,13 @@ +पूर्ण संख्या किंवा पूर्णांक[१] (इंग्लिश: Integer, इंटिजर) म्हणजे नैसर्गिक संख्या (शून्यासह) (म्हणजे ०, १, २, ३, ४, ...), तसेच शून्याखेरीज अन्य नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे [श १] (म्हणजे −१, −२, −३, ..) या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात - म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत; मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्या नव्हेत. +या संख्या वास्तव संख्यांचा[श २] उपसंच [श ३] असून {..., −२, −१, ०, १, २, ...} या संचात बसू शकतात. पूर्णांक संख्यांचा संच ठळक टायपातल्या Z या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या + + + + +Z + + + +{\displaystyle \mathbb {Z} } + +, युनिकोड U+2124 ℤ), दर्शवतात. "अंक" या अर्थाच्या जर्मन भाषेतल्या "त्सालेन" (जर्मन: Zahlen) या शब्दातील "झेड" अक्षरावरून हे चिन्ह आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13917.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..926a81c7f231f87b048f126d3d47e6c345e8c5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13917.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुलास्की काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13936.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a9fd3e2ef405162b72e1d6ace12a36e83f7ce7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13936.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुल्कोवो विमानतळ (रशियन: Аэропорт Пулково) (आहसंवि: LED, आप्रविको: ULLI) हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +पुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1394.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a043165fec4bec10110dff197265eb5daa8b116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1394.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी हेलेना ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची द्वितीय पत्नी होती. महाराणी दुर्धरा हीच्या मृत्यूनंतर हेलेना हीच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सम्राज्ञी होती. सम्राट बिंदुसारच्या काळात ती राजमाता होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13954.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c68bf4427075a057b18f9ef2f5a6bd654e69db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13954.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुशकलवती हे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर जवळील स्वात नदीच्या काठावरील गाव आहे. येथे संस्कृत भाषेचा व्याकरणकार पाणिनी याचा जन्म झाला. +४,०००वर्षांपूर्वी येथे बाला हिसारची वसाहत होती. +[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13969.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a5310950218c8d0caf28bdc6981d9f19cdfc249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13969.txt @@ -0,0 +1,2 @@ +विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.राजस्थानमधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नांव पडले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13989.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c207245e18d529c6bfd69516da75a26c9b7efd0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13989.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अ‍ॅक्शन थरारपट आहे, जो सुकुमार यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे.[१] मुत्तमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने मिथ्री मुव्ही मेकर्सद्वारे याची निर्मिती झाली. यात अल्लू अर्जुन, फहद फासिल (त्याच्या तेलुगु पदार्पणात) आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर जगदीश प्रताप बंदरी, सुनील, राव रमेश, धनंजया, अनसूया भारद्वाज, अजय, अजय, सुनील यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. +दोन भागांपैकी हा पहिला चित्रपट असून चित्रपटात रेड सँडर्सच्या तस्करी करणाऱ्या कुलीची कथा आहे. एक दुर्मिळ लाकूड जे फक्त आंध्र प्रदेश राज्यातील शेषाचलम येथे उगवते, त्याची तस्करी नायक करत असतो. +देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर छायाचित्रण आणि संपादन अनुक्रमे मिरोस्ला कुबा ब्रोझेक आणि कार्तिक श्रीनिवास-रुबेन यांनी केले आहे. मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब केलेल्या आवृत्त्यांसह 17 डिसेंबर 2021 रोजी द राइज तेलुगुमध्ये रिलीज झाला. +चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्रित सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि अल्लूच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखा, अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शनाची प्रशंसा केली गेली. परंतु कालावधी, अंदाज वर्तवली जाणारी कथा आणि स्कोअरवर टीका केली गेली. द राइज व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर ₹342 कोटींची चित्रपटाने कमाई केली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांमध्ये त्याचा क्रमांक लागतो.[२] पुष्पा: द रुल पार्ट 2 या शीर्षकाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती एप्रिल 2022 मध्ये सुरू होणार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13997.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17c1d7b1a0e469af72396a9fa322b37289169a49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_13997.txt @@ -0,0 +1 @@ +पुष्पेंद्र कुमार गर्ग (२२ नोव्हेंबर, १९६३ - ) हे नौकानयनातील एक भारतीय खेळाडू आहे. १९९३-९४ मध्ये त्यांना व होमी मोतीवाला यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14012.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da2dcc4694c5eaf6680e329cd54add3ad0c0edd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14012.txt @@ -0,0 +1,14 @@ + +पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.[२] यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.[३] तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.[४][५] २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.[६][७] +सिंधूने सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळविले.[८] तिने बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांग निंग नंतरची ती दुसरी महिला आहे. +तिने २०१६ उन्हाळी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. येथे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरवून रौप्य पदक जिंकले.[९] २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. तसेच कांस्य पदक जिंकले. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.[१०] +सिंधूने २०१६ चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर २०१७ मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले. तसेच यानंतर उबेर कपमध्येदेखील तिने दोन कांस्य पदके जिंकली. +सिंधूने $8.5 दशलक्ष, $5.5 दशलक्ष आणि $7.2 दशलक्ष कमाईसह अनुक्रमे २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.[११][१२] +भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. तिला जानेवारी २०२० मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[१३][१४][१५] +पुसरला वेंकटसिंधू हिचा जन्म हैदराबाद येथील पी. व्ही. रमन आणि पी. विजया यांच्या घरी झाला.[१६] तिचे वडील रमण हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत जे मूळ तेलंगणचे आहेत तर आई विजया यांचा जन्म विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील आहे.[१७] तिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी १९८६ च्या सोल आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यांना या खेळातील योगदानाबद्दल २००० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.[१८] +सिंधू हैदराबाद येथे राहते. तिचे शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूल आणि सेंट अॅन्स कॉलेज फॉर वुमन येथे झाले. तिचे पालक व्हॉलीबॉल खेळत असले तरी तिने बॅडमिंटन निवडले कारण ती २००१ च्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेता असलेल्या पुलेला गोपीचंद यांच्या यशातून प्रभावी झाली होती.[१९] तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले: + +तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या खेळातील मूलभूत गोष्टी शिकल्या. लवकरच ती पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली. तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले:"The fact that she reports on time at the coaching camps daily, traveling a distance of 56 km from her residence, is perhaps a reflection of her willingness to complete her desire to be a good badminton player with the required hard work and commitment."("तिच्या घरापासून ५६ किमी अंतराचा प्रवास करून ती दररोज कोचिंग कॅम्पमध्ये वेळेवर हजर होते, हे कदाचित आवश्यक कठोर परिश्रम आणि वचनबद्धता यांच्यासह चांगली बॅडमिंटनपटू बनण्याची तिची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रतिबिंब आहे.")[१९] +गोपीचंद यांनी या वार्ताहराच्या मताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की "सिंधूच्या खेळातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिची वृत्ती आणि कधीही न मरणारा आत्मा."[२०] +गोपीचंदच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाल्यानंतर सिंधूने अनेक विजेतेपदे जिंकली. १० वर्षांखालील गटात तिने दुहेरी प्रकारात पाचवी सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप आणि अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये एकेरी विजेतेपद जिंकले. १३ वर्षांखालील गटात तिने पाँडिचेरी येथील सब-ज्युनियर्समध्ये एकेरी विजेतेपद, कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट IOC ऑल इंडिया रँकिंग, सब-ज्युनियर नॅशनल आणि पुण्यातील अखिल भारतीय रँकिंगमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले. +तिने भारतातील ५१ व्या राष्ट्रीय राज्य खेळांमध्ये १४ वर्षांखालील सांघिक सुवर्णपदक देखील जिंकले.[२१] ती नंतर गोपीचंद यांच्याशी विभक्त झाली आणि दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई-सांग यांच्याकडे प्रशिक्षणासाठी गेली.[२२][२३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14028.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd94e0ac7f291cdcd32a59c483dfd0aad3fb4eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14028.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोणत्याही भाषेतील ज्ञानकोशात (भाषाविज्ञानविषयक नोंदीमध्ये किंवा विशेषतः भाषाविज्ञानाच्या ज्ञानकोशात) पाणिनी आणि संस्कृत व्याकरण परंपरेचा अत्यंत गौरवपूर्ण संदर्भ दिसून येतो. उदा. The  Routledge Linguistics Encyclopediaच्या प्रास्ताविकातील नोंद – “ The need to improve language pedagogy was one motivation for the reorientation of linguistic studies in Europe in the early nineteenth century, but so too was the renewal of contact with other traditions, most importantly that of the Sanskrit scolars whose objectivity and sharpness of focus on the linguistic (rather than literary) aspects of the subject seemed to accord with contemporary intellectual trends influenced by the methods and procedures of the natural sciences.”                   +               किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या “Indian Language Traditions and their Influence on Modern Linguistics” या लेखात Laura Craggs यांनी केलेली नोंद अशी आहे, “ Motivated by the to preserve the ritual properties of their sacred texts, phoneticians provided accurate descriptions of the sounds of Sanskrit, while grammarians such as Panini created systematic grammars for the language (Bhargava P.M. & Chakrabarti,C. 1989. ‘Of India, Indians and Science’ in Daedalus Vol. 118 no.4, pp 145). Only in recent times – and as a direct result of the West’s discovery of Sanskrit and its grammarians – has a modern science of linguistics emerged with the capabilities to rival this ancient system.”  +           अशा संदर्भांमुळे संस्कृत व्याकरण – परंपरेविषयी जिज्ञासा जागी होते. या दृष्टीने  मराठीत फारच कमी पुस्तके आहेत. त्यापैकी एक मौलिक पुस्तक आहे, वा. बा. भागवत यांचे ‘पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान’. त्या पुस्तकाचा हा परिचय आहे.     +           ग. ना. जोशी, दे. द. वाडेकर व सुरेंद्र बारलिंगे अशा तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ व जाणत्या प्राध्यापकांनी वामनशास्त्री भागवतांकडून सदर पुस्तक लिहवून घेतले. मराठीतून संस्कृत व्याकरणाची परंपरा समजून घेण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व अनन्य म्हणावे लागेल. +           यामधील पहिले प्रकरण ‘उगम’ हे आहे. या प्रकरणात इन्द्र या तथाकथित पहिल्या व्याकरणकाराने वर्ण व पदे या दोन वाक्य - घटकांचा प्राथमिक विचार केला. तसेच त्यामध्ये सायणाचार्यांच्या विवेचनावरून वाक्यातील पदे, व पदांचे नाम, क्रियापद, उपसर्ग, अव्यय असे वर्गीकरण इंद्राने केले, असे नमूद आहे. वाक्याची घटक पदे व पदांचे घटक वर्ण यांच्या विचारातून पुढे व्याकरणशास्त्राच्या शिक्षा (वर्णविचार), निरुक्त (व्युत्पत्ती) आणि व्याकरण अशा तीन शाखा, परस्परपूरक पण स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून वाढीस लागल्या.          +                “पदे म्हणजे सुबन्त व तिङ्न्त व त्यावर आधारलेले समास, तद्धित-साधित-प्रातिपादिके इत्यादी विषय मुख्यत्वेकरून व्याकरण शास्त्राकडे राहिले व इतर दोन विषय वर्णविचार व व्युत्पत्ती हे अनुक्रमे शिक्षा आणि निरुक्त यांचेकडे गेले. तथापि हे विषय-वर्गीकरण म्हणजे वायुबंद डब्यासारखे पक्के नाही. त्यामुळे एकमेकांचे विषय जरुरीनुसार कमी अधिक प्रमाणात त्यांनी हाताळले आहेत.” असेही भागवत नमूद करतात.              +          मुण्डकोपनिषदात शिक्षा, निरुक्त व व्याकरण ह्यांचा ‘अपरा विद्या’ म्हणून उल्लेख आहे, असेही या प्रकरणात नमूद आहे. अर्थात् या सगळ्यामागे वेदांच्या अभ्यासाचे कारण होते.    +         त्यामुळे व्याकरणशास्त्र ते व्याकरणदर्शन या दुसऱ्या प्रकरणात तर स्पष्ट म्हटलेले आहे की, ‘पद, वाक्य, प्रमाण व प्रमेयशास्त्र या चार प्रकारच्या शास्त्रांच्या मालिकेत पदशास्त्र म्हणजे व्याकरणशास्त्र हा पाया आहे व प्रमेय म्हणजे वेदान्तशास्त्र हा कळस आहे.’ +        भाषेवर कोणाचाच खास हक्क अगर वहिवाट नसते. ती सूर्यचंद्रादींच्या प्रमाणेच दैवी कृपा आहे, अशा स्वरूपाच्या तत्कालीन चर्चेत व्याकरणाला दोन कान असल्याचे रूपक आहे. ‘दोन डोळ्यांनी जशी कोणतीही वस्तू एकच दिसते, दोन वेगळ्या वस्तु दिसत नाहीत, तसेच माणसांच्या कानांचेही आहे. व्याकरणशास्त्राला मात्र एका कानाने ऐकू येणाऱ्या शब्दापेक्षा दुसऱ्या कानाने कळून येणारा शब्द अगदी वेगळा असतो, असे व्याकरणाच्या दोन कानांचे आगळेपण आहे. एका कानाने त्याला शब्दांचे बाह्य स्वरूप म्हणजे शरीर कळते तर दुसऱ्या कानाने शब्दांचे अंतरंग म्हणजेच आत्मा कळतो.’ या प्रकरणात शब्दप्रक्रिया, अर्थप्रक्रिया या संदर्भातील चर्चा आहे.      +             ‘शब्दस्वरूप’ या तिसऱ्या प्रकरणात लक्षणांचे प्रकार, भाषा व शब्द, लिपीरूप शब्द, लिपी शब्द नव्हे, वेद-निरुक्त-पाणिनी, वार्तिककार यांचे मौन, महाभाष्यातील दोन लक्षणे, महाभाष्य लक्षणातील विसंगती, विसंगतीचा परिहार, शब्दनित्यत्व वार्तिकमत , त्यावरील आक्षेप, प्रतिपदपाठ, शब्दरूपांचा अनियमितपणा, वैयाकरण व नैयायिक संघर्ष, शब्दनित्यत्वावर आक्षेप, आक्षेपांचे निरसन, रेखागवयन्याय, सिद्ध म्हणजे नित्य, ‘शब्द नित्य’ ह्याबद्दल उपपत्ती, भर्तृहरीचे मत, स्फोटवादावर आक्षेप, कैपटोपाध्याय मत, नागोजीभट्टांचे समर्थन, प्रतिबंदी, प्रत्यभिज्ञा, शब्दस्वरूपासंबंधी सिद्धांत अशा शीर्षकान्वये केलेली चर्चा आहे. या प्रकरणात स्फोट या संकल्पनेची सुरू झालेली चर्चा पुढील प्रकरणात अधिक आहे. +             ‘शब्द, वाणी व स्फोट’ या प्रकरणात सूक्ष्मतम, सूक्ष्मतर, सूक्ष्म व व्यक्त अशा चार प्रकारच्या वाणींना अनुक्रमे परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी अशा असलेल्या संज्ञांचे स्वरूप, व्याकरणशास्त्राचा खास विषय म्हणून स्फोट संकल्पनेची चर्चा व स्फोटाचे प्रकार यांची चर्चा आहे.‘प्रमाण’ या प्रकरणात महाभाष्याचे कैयटकृत विवरण, त्यावरील आक्षेप, आक्षेप निरसन असे मुद्दे आहेत. येथेही स्फोट या संकल्पनेची मीमांसा आहे. +             ‘शब्दार्थ’ या प्रकरणात संशय व प्रयोजन, अधिकरण या संकल्पनांची चर्चा आहे. अधिकरणाची विषय, संशय, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष व सिद्धांत ही अंगे असतात हे नमूद करून त्या आधारे शब्दार्थस्वरूप या विषयाची चिकित्सा केली आहे. त्यानंतर बौद्ध अर्थ, शब्दार्थ ही जाती का व्यक्ती, भाषाज्ञानाची प्रक्रिया या मुद्द्यांची चर्चा आहे. +              ‘संबंध’  या प्रकरणात शब्द व अर्थ यांच्या संबंधांची चर्चा आहे. या संदर्भात नैयायिक , मीमांसक, वैयाकरण यांची मते विशद केली आहेत. समारोप करताना अर्थाची (व्यावहारिक वस्तूची) व शब्दाची कार्यकारिता, परिणाम यांच्या या चर्चेत पाणी व अग्नी यांचे उदाहरण आहे. ‘ पाण्याने तहान भागेल, दुसऱ्या वस्तूत ओलेपणा येईल. ते कार्य अग्नीने शक्य नाही. तसे पाणी व अग्नी ह्या शब्दांचे नाही. कोणी पाणी हा शब्द दाहक वस्तू ह्या अर्थी वापरायचे ठरविले व त्या वापराला लोकांची मान्यताही मिळाली तर त्यात काहीच बाधा येणार नाही. खुशाल ‘पाण्याने सारे रान जळून गेले,’ असे म्हणावे. +           अर्थात शब्दाची कार्यकारिता त्याच्या स्वरूपावर, लिंगावर किंवा शब्दसिद्धीच्या प्रक्रियेवर अवलंबून नाही. तर ती कार्यकारिता म्हणजे म्हणजेच बोधकता, ही केवळ वापर व सामाजिक मान्यतेवर अवलंबून असते, हा समारोप आधुनिक भाषाविज्ञानातील भाषेबाबतच्या ‘सामाजिक संस्था’, ‘यादृच्छिकता’ अशा संकल्पनांची प्राचीन जाणकारी स्पष्ट करतो. +           ‘संगम’ या अखेरच्या प्रकरणात ‘व्याकरणशास्त्रातील तत्त्वविचारामध्ये, वैदिककवींचा शब्दसृष्टीवाद, वार्तिककार महाभाष्यकारांचा शब्दनित्यवाद, भर्तृहरीचा शब्दाद्वैतवाद, बौद्ध अर्थवाद, तादात्म्यसंबंधवाद व ह्या सर्वांचा व त्यावरील अन्य शास्त्रकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा परामर्श घेऊन नागोजीभट्टांनी मांडलेला समन्वयवाद इतक्या वादांचा म्हणजे विचारधारांचा सुंदर संगम झालेला आहे.’ असा समारोप आहे. +           यातील चर्चेच्या ओघात आलेल्या रूपके, कहाण्या, दृष्टांत यामुळे रुक्ष विषय सहज आकलनाचा होऊ शकतो. तसेच पाणिनीची अष्टाध्यायी मुळातून वाचावी, असे वाटत राहते. पण ती मराठीत नसल्याची खंतही वाटते. +                        पुस्तकाचे नाव - पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान (ले.) पंडित व्याकरणरत्न वामनशास्त्री बा. भागवत, (प्रका.) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई-३२, (१ली आ.) १९८५. +                                   diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14032.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4631796d98608552b995f4831e116868553447d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14032.txt @@ -0,0 +1,18 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +पुष्यमित्र शुंग(इ. स. पूर्व १८७ ते इ.स. पूर्व १५०): हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू सम्राट होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ हा दुर्बल आणि अहिंसक असल्यामुळे त्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.[ संदर्भ हवा ] +पुष्यमित्र शुंग हा बृहद्रथचा सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच पुष्पमित्र शुंगाच्या शासनकाळात लयास जाणाऱ्या हिंदू धर्माचे संवर्धन झाले आणि बौद्ध धर्माचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्माला अस्तंगत होण्यासून वाचविण्याचे महान कार्य पुष्पमित्र शुंगाने केले आहे त्यामुळे पुष्पमित्र शुंग राजाचा हिंदू लोक सन्मान करतात. तसेच १४ एप्रिलला पुष्पमित्र शुंगाची जयंती साजरी करतात.[ संदर्भ हवा ] पुष्यमित्र शुंग हा एक वाईट राजा होता याबद्दल मोठी नोंद: +पुष्यमित्र शुंग हा शुंग वंशाचा संस्थापक होता. त्याने मौर्य साम्राज्याचा शेवट केला आणि स्वतःच्या वंशाची स्थापना केली. पुष्यमित्र याला विविध कारणांमुळे वाईट राजा मानले जाते: +1. **धार्मिक असहिष्णुता**: पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धर्माचे मोठे हानी केली. अनेक बौद्ध मठ आणि विहार याच्या हुकुमाने नष्ट करण्यात आले. बौद्ध भिक्षूंना त्रास देण्याचे अनेक पुरावे आढळतात. +2. **कठोर शासन**: पुष्यमित्र याचे राज्य अत्यंत कठोर आणि निर्दयी होते. त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना शिक्षा देण्यात आल्या, त्यात काही अकारण होत्या. +3. **स्वार्थी राजकारण**: पुष्यमित्र शुंग याने स्वतःच्या सत्ता आणि वर्चस्वासाठी अनेक राजकीय खेळ खेळले. त्याने इतर राज्यांवर आक्रमण करून त्यांची संपत्ती लुटली आणि जनतेचे जीवन कठीण केले. +4. **सामाजिक असंतोष**: त्याच्या कारकीर्दीत सामाजिक असंतोष वाढला. विविध समाजघटकांमध्ये भेदभाव आणि अन्याय वाढला. +अशा विविध कारणांमुळे पुष्यमित्र शुंग हा एक वाईट राजा मानला जातो. त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाला. +चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने स्वतः जैन अजीविका पंथातून दीक्षा घेतली. यानंतर सम्राट बिंदुसारांचा मुलगा अशोक गादीवर बसला. भयंकर हिंसा करून आपल्या साम्राज्याचा विस्तार करणारे सम्राट अशोक अहिंसक बनले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यानंतर अशोकाचे संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रचारात गेले. भारत अहिंसेच्या कचाट्यात पडत होता. बृहद्रथ राजाच्या काळात ग्रीक राज्यकर्ते भारतावर हल्ले करत होते. ग्रीकांचे हे आक्रमण डेमेट्रियस (दिमित्र) च्या नेतृत्वाखाली झाले असावे. प्रसिद्ध व्याकरणकार पतंजली सम्राट पुष्यमित्रांचे समकालीन होते. त्यांनी 'अरुणत यवनः साकेतम्, अरुणत यवनः माध्यमिकम्' (यवनाने साकेतवर हल्ला केला, यवनाने मध्यमिकावर हल्ला केला) लिहून ठेवले आहे. त्यामुळे पतंजली आणि पुष्यमित्र यांच्या काळातही भारतावर यवनांनी आक्रमण केले होते आणि यावेळी यवनांचे सैन्य साकेत येथे होते हे स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] +मौर्य साम्राज्य अधिकाधिक कमकुवत होत चालले होते आणि बृहद्रथाच्या कारकिर्दीत ही अहिंसा शिगेला पोहोचली होती. याच बृहद्रथ राजाचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग! एकीकडे शत्रू आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकत होता आणि दुसरीकडे त्याचा बृहद्रथ राजा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हता. जनतेवर आक्रमकांचे अनाचार चालले होते हे पाहून पुष्यमित्र शुंग अस्वस्थ होता. राजाचे सैन्य पण अस्वस्थ होते. त्याच्या हेरांकडून माहिती मिळाली की ग्रीक सैनिक बौद्ध भिक्षूंच्या वेशात मठांमध्ये लपले आहेत आणि काही बौद्ध धर्मगुरूही त्यांना मदत करत आहेत. या माहितीने व्यथित होऊन पुष्यमित्राने कारवाई केली. या कारवाईदरम्यान पुष्यमित्र आणि त्याच्या सैनिकांची मठांमध्ये लपलेल्या शत्रूंच्या सैनिकांशी चकमक झाली. अनेक शत्रू सैनिकांना ठार मारण्यात आले.[ संदर्भ हवा ] +पुष्यमित्राच्या या कृतीने अहिंसक असलेला बृहद्रथ राजा संतापला, त्याने पुष्यमित्राला सर्व चकमकी थांबवायला सांगितले. भारतावरच हल्ला होत असतांना असे करणे सेनापती पुष्यमित्राला शक्य झाले नाही. आणि सेनापती विरुद्ध राजा असाच संघर्ष उभा राहिला. त्यात राज अहिंसक असल्याने सैन्य पुष्यमित्राकडे आले आणि त्यांनी पुष्यमित्राला राजा घोषीत केले.[ संदर्भ हवा ] +भारतातील मार्क्सवादी इतिहासकारांना मात्र निराळे वाटते. जी. चक्रवर्ती यांनी पुष्यमित्र शुंग यांच्याबद्दल अजेंडा बनवला आहे असे त्यांच्या लिखाणातून दिसून् येते. त्यांनी दिव्यवदन या संहितेवरून पुष्यमित्रला धर्मांध करून टाकले. पुष्यमित्रासारखा धर्मांध ठरवलेला राजा एकही स्तूप उध्वस्त करू शकला नाही, तर मंदिर बांधले नाही.[ संदर्भ हवा ] +पुष्यमित्र शुंगानंतर या वंशात आणखी नऊ राज्यकर्ते होते, त्यांची नावे पुढीलप्रमाणे- diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14048.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a47667f79e1b6c8d6979dd99bef9254a33e778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14048.txt @@ -0,0 +1,11 @@ + +पूजा धांडा (जन्म: १ जानेवारी १९९४) ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुदाना गावातील एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे. पूजाने बुडापेस्ट येथे झालेल्या २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले होते. तिने २०१० च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८ मध्ये गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये अनुक्रमे ६० किलो आणि ५७ किलो वजनगटांत रौप्य पदके जिंकली.२०१४ च्या आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने कांस्य पदक जिंकले होते. [१]क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कारने गौरविले आहे.[२] +पूजाच्या आईचे नाव कमलेश आहे. तिचे वडील अजमेर हे स्वतः एक खेळाडू होते. लहानपणापासूनच पूजाचा कल सर्वसाधारणपणे खेळांकडे आणि कुस्तीकडे असला, तरी सुरुवातीला तिने जुडोमध्ये यश मिळवले. २००७ मध्ये कुस्ती महासंघाद्वारे मान्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एक विशिष्ट वय गाठल्यावर तिला दोनपैकी एक खेळ निवडायचा होता. त्यावेळी पूजाने कुस्ती हा खेळ निवडला आणि का निर्णय सार्थ ठरवत राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. एवढेच नव्हे तर २००७ मध्ये हैदराबाद येथे आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिपमध्ये तिने तिचे पहिले कांस्य पदक मिळवले, आणि २००८ मध्ये तिने आणखी चांगली कामगिरी करत त्याच स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.[३][४] +एवढे यश संपादन करूनही भारताचे माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक कृष्णा शंकर बिश्नोई यांनी तिला जुडोपेक्षा कुस्तीमध्ये कारकीर्द करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी प्रोत्साहनसुद्धा दिले.[५] पूजाने त्यांचा सल्ला ऐकला आणि २००९मध्ये हिसार येथे सुभाष चंदर सोनी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. +त्यानंतर अगदी वर्षभरात पूजाने २०१०मध्ये सिंगापूरमधील समर युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाला गवसणी घातली. +२००९ मध्ये कुस्तीकडे  वळल्यानंतर पूजाने पहिले आंतराष्ट्रीय यश २०१० च्या युवा ऑलम्पिकमध्ये ६० किलो वजन गटात मिळवले.[६] +२०१३ मध्ये तिने प्रथमच जागतिक कुस्ती स्पर्धेत भाग घेतला, पण पहिल्या फेरीत पराभवानंतर ती बाहेर पडली.[७] +मात्र, त्यानंतर त्याच वर्षी तिने बबिता फोगाटचा पराभव करत राष्ट्रीय कुस्ती जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१४ मध्ये अस्ताना येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. +२०१७ मध्ये पूजाने नॅशनल चॅम्पिअनशिपच्या रिंगणात विजयासह शानदार पुनरागमन केले. +२०१८ च्या प्रो-रेसलिंग लीगच्या तिसऱ्या पर्वात तिने ऑलिम्पिक विजेती हेलन मारौलिस हिचा पराभव केला.[८] त्यानंतर तिने राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्यपदक आणि त्याच वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. +कुस्तीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पूजाला २०१९ मध्ये भारत सरकारच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14106.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fff03661adacb0a249dcde219edd3932791fc15b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14106.txt @@ -0,0 +1 @@ +पूरक उपग्रह प्रक्षेपण यान (en:Augmented Satellite Launch Vehicle) हे ५ टप्प्यात चालणारे घन इंधन (सॉलीड प्रोपेलंन्ट) उपग्रह यान आहे. हे यान १५० किलोचे उपग्रह निम्न उपग्रह कक्षेत (लो अर्थ ऑर्बीट)मध्ये ठेवु शकते. ८० च्या दशकात इस्रो ने हा प्रोजेक्ट पेलोड भूस्थिर कक्षेत पाठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने सुरू केला. ह्या यानाची बांधनी उपग्रह प्रक्षेपण यानावर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14113.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc982ca7d2ac28197af4d456b3c30e795de9e829 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14113.txt @@ -0,0 +1,3 @@ +राग पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग मारवा या थाटात आहे. +सर्वसाधारणपणे मारवा थाटातील रागांची वेळ ही संध्याकाळची, किंबहुना सूर्यास्ताच्या जवळची किंवा सूर्यास्ताच्या जराश्या नंतरची असते. +पुरिया रागाशी निगडित अन्य राग : पूरिया कल्याण diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14134.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d9d2ed2a7a00bd18bc282a1c908d2112174645b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14134.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14138.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45126f15bdf300bb8922dd20908d11902b964af6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14138.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्णा तालुका हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातला एक तालुका आहे. पुर्णा हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील पुर्णा रेल्वे स्थानक ह्या भागतील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. +आडगाव लासिणा आडगाव सुगाव आहेरवाडी (पूर्णा) अजदापूर आलेगाव (पूर्णा) आवई बलसाबुद्रुक बाणेगाव (पूर्णा) बरबडी (पूर्णा) भाटेगाव चांगेफळ चुडावा दगडवाडी (पूर्णा) दस्तापूर देगाव (पूर्णा) देऊळगावदुधाटे देवठाणा (पूर्णा) धनगरटाकळी धानोराकाळे धानोरामोत्या धोतरा (पूर्णा) एकरूखा तर्फे गंगाखेड एरंडेश्वर गणपूर (पूर्णा) गौर (पूर्णा) गोळेगावपालम गोविंदपूर (पूर्णा) हटकरवाडी हिवराबुद्रुक इस्माईलपूर (पूर्णा) इठलापूरमाळी कळगाव कलमुला कमलापूर कानडखेडा कान्हेगाव (पूर्णा) कंठेश्वर करजानापूर कातनेश्वर कौडगाव तर्फे पूर्णा कावलगाव कौलगाववाडी खंडाळा (पूर्णा) खांबेगाव खरबडा खुजडा लक्ष्मणनगर लिमला लोणखुर्द महागाव (पूर्णा) महातपुरी (पूर्णा) माहेर मांजलापूर माखाणी ममदापूर मरसूळ तर्फे लसीना माटेगाव (पूर्णा) मीठापूर मुंबर नऱ्हापूर नावकी निळा (पूर्णा) पांढरी तर्फे नावकी पांगरा तर्फे लसीना पेनूर फुकटगाव फूलकळस पिंपळालोखंडे पिंपळगाव बाळापुर पिंपळगाव लिखा पिंपळगाव सारंगी पिंपरण पिंपळाभत्या पुर्णा(एमक्ल) रामापूर रेगाव (पूर्णा) रुंज तर्फे परभणी रूपळा संदलपूर सटेगाव सातेफळ तर्फे कौलगाव सिरकळस सोनखेड सोन्ना तर्फे कौलगाव सुहागण सुकी सुरवाडी ताडकळस तामकळस तारंगळ वडगाव तर्फे नावकी वाई तर्फे लसीना वझुर + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14155.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9aad8600c70e3f6463251a74b9c9f6b6df8bb90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14155.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्णिया विभाग हा बिहार राज्यामधील एक प्रशासकीय व भौगोलिक विभाग आहे. या विभागाची निर्मिती इ.स. २००५मध्ये झाली. +या विभागात खालील जिल्हे आहेत. +पूर्णिया विभागाचे मुखालय पूर्णिया येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14162.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48c179fc0a6f621fb9c6d603c2e1f538e9f1bd06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14162.txt @@ -0,0 +1,2 @@ +अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ - ३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोला पूर्व मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ८ ते १२, ३१ ते ३७, ५४ आणि ५५, आकोट तालुक्यातील कुटासा आणि चोहोट्टा ही महसूल मंडळे आणि आकोला तालुक्यातील महसूल मंडळे - घुसर, पळसो बुद्रुक, बोरगांव मंजू, कापशी, अकोला, उमरी प्रागणे बाळापूर (सीटी) आणि मलकापूर (सीटी) यांचा समावेश होतो. अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्षाचे रणधीर प्रल्हादराव सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14169.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14169.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14182.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..889adbdd933b795949466cafad258d79814efd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14182.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व इम्फाल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पोरोम्पाट येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14214.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89618fbd5ab0f785180974d145e7fbe766013381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14214.txt @@ -0,0 +1,70 @@ +पूर्व तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पूर्व तटीय रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वरच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानक येथे असून संपूर्ण ओडिशा राज्य तसेच छत्तीसगड व आंध्र प्रदेश राज्यांचा काही भाग पूर्व तटीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो. +पूर्व तटीय रेल्वेचे तीन विभाग आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14217.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaefa3c2cff735c7237937e3dd6d02430fb94ba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14217.txt @@ -0,0 +1,5 @@ +पूर्व तिमोर-भारत संबंध हे ओशनिया मधील देश पूर्व तिमोर आणि आशिया मधील देश भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. जकार्ता, इंडोनेशिया येथील भारतीय दूतावास हे पूर्व तिमोरला पण एकाच वेळी मान्यताप्राप्त आहे.[१] पूर्व तिमोरचे भारतात कोणतेही राजनैतिक प्रतिनिधित्व नाही. ७ सप्टेंबर २०२३ रोजी भारताने दिली (पूर्व तिमोरची राजधानी) येथे दूतावास उघडण्याची घोषणा केली.[२] +पूर्व तिमोर आणि भारत यांच्यातील संबंध सुरुवातीच्या आधुनिक काळातील स्थापन झाले आहेत. भारतीय व्यापारी चंदनाच्या शोधात पूर्व तिमोर बेटावर गेले.[३] पूर्व तिमोर आणि भारताच्या काही भागांवर पोर्तुगीज वसाहत झाल्यानंतर व्यापारी संबंध वाढले.[४] हा व्यापार करण्यासाठी पोर्तुगीजांनी भारतात विविध चौकी केंद्रे स्थापन केली आणि आशियातील पोर्तुगालचे सर्व प्रदेश - पूर्व तिमोरसह - गोव्यातील पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या शासनाखाली होते. पोर्तुगीज-प्रशिक्षित गोवन मिशनरी १७ व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्व तिमोरमध्ये आले, आणि देशात कॅथलिक धर्माचा प्रसार करण्याचे कार्य सुरू झाले.[५] भारतीयांनी पूर्व तिमोरला प्रवास केला आनी तिथे ते सैनिक, वसाहतवादी नोकरशहा आणि मिशनरी म्हणून काम करू लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थलांतरित कामगार म्हणून काम करण्यासाठी काही भारतीय पूर्व तिमोरमध्ये आले.[६] +पूर्व तिमोरच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा भारत हा दुसरा देश होता.[६] परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, ओमर अब्दुल्ला यांनी मे २००२ मध्ये पूर्व तिमोरच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.[७] अब्दुल्ला यांनी भारताचे राष्ट्रपती के.आर. नारायणन व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून सत्काराची पत्रे सादर केली. २४ जानेवारी २००३ रोजी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध औपचारिकपणे स्थापित झाले. २००३ मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये, पूर्व तिमोरचे पंतप्रधान मारी अल्कातिरी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या उमेदवारीला आपल्या देशाचा पाठिंबा आहे असे जाहीर केले.[८] +पूर्व तिमोर आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०१५-१६ मध्ये एकूण US$३.४५ दशलक्ष होता.[९] त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३% ने घट झाली होती. भारताने पूर्व तिमोरला $३.४२ दशलक्ष किमतीचा माल निर्यात केला आणि $३०,००० चा माल आयात केला. भारताकडून पूर्व तिमोरला निर्यात केल्या जाणाऱ्या मुख्य वस्तू म्हणजे औषधी, प्लास्टिक आणि इलेक्ट्रिकल मशिनरी आहे. भारताकडून आयात केलेली प्रमुख वस्तू ही रासायनिक उत्पादने आहेत.[८] +काही भारतीय कंपन्यांनी पूर्व तिमोरच्या तेल आणि वायू उद्योगात गुंतवणूक केली आहे. ते पूर्व तिमोरच्या किनाऱ्यावर तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधात सक्रिय आहेत.[१०] रिलायन्स पेट्रोलियमला २००६ मध्ये पूर्व तिमोरच्या किनाऱ्याजवळ दोन ब्लॉक्समध्ये तेल शोधण्याचे अधिकार देण्यात आले.[६] रिलायन्स पेट्रोलियमने २०१० च्या उत्तरार्धात तिमोर समुद्रात नैसर्गिक वायूचा शोध सुरू केला.[११] २००६ मध्ये टाटा मोटर्सने तिमोर पोलिस आणि इतर सरकारी एजन्सींच्या वापरासाठी ४०० वाहने पुरवली होती.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14247.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2855599f6bca29ca7e1d2326b4b5d36383ed4957 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14247.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पूर्व मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पश्चिम मिदनापूर व पूर्व मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. तामलुक हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून ८५ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14261.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37a0b7287bd887faf144b18655f321061a49eeb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14261.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व सिंगभूम हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १६ जानेवारी, १९९० रोजी करण्यात आली. +याचे प्रशासकीय केंद्र जमशेदपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14276.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93cb5b813cb393f765be1600503050284ce39ff3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14276.txt @@ -0,0 +1,6 @@ +पूर्वा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हावडा (पश्चिम बंगाल) आणि नवी दिल्लीच्या मध्ये दररोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आहे. +पूर्वा हा शब्द भारताचा पूर्वेकडील भाग दर्शवितो. ही ट्रेन बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रवाश्यांसाठी राजधानी नंतर सगळ्यात चांगली ट्रेन आहे.[१] या ट्रेनला एल.एच.बी.चे २२ कोच देण्यात आलेले आहे जे ३० एप्रिल २०१३ पासून कार्यरत आहेत. सध्या या ट्रेनचा अधिकतम शक्य वेग १३० कि.मी. प्रतितास आहे. +१२३०३/०४ पूर्वा एक्सप्रेस ही तिच्या हावडा ते नवी दिल्ली (पाटणा मार्गे) ह्या मेन लाईन सेक्शन दरम्यान WAP-४ / WAP ७ ह्या विजेवर चालणाऱ्या एका इंजिनच्या मदतीने चालविली जाते.[२] +१२३०३/०४ पूर्वा एक्सप्रेस ही तिच्या हावडा ते नवी दिल्ली प्रवासादरम्यान WAP ७ ह्या विजेवर चालणाऱ्या एका इंजिनच्या मदतीने चालविली जाते.[३] +सन २००० च्या सुरुवातीला या ट्रेनचा रंग फिकट तपकिरी वरून निळा करण्यात आला. सुरुवातीला या ट्रेनला संपूर्ण फर्स्ट ए.सी. कोच होते. जेव्हा ही ट्रेन सुरू झाली होती तेव्हा त्या ट्रेनला तिच्या प्रवासादरम्यान सर्वोत्तम प्राधान्य दिले जात होते. राजधानी एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर या ट्रेनला पूर्वीइतके प्राधान्य दिले जात नव्हते. +१४ डिसेंबर २०१४ रोजी ८:१५ वाजता १२३८१ अप हावडा - नवी दिल्ली गाडी हावडा स्टेशन सोडल्यानंतर ८:२७ वाजता ट्रेन रुळांवरून घसरली. पूर्वा एक्सप्रेसचे ११ स्लीपर कोच आणि एक पॅन्ट्री कोच हावडा स्टेशन सोडल्यानंतर लिलूह स्टेशनजवळ रुळांवरून घसरले.[४] रेल्वेच्या सूत्रांनुसार कुणीही जखमी किंवा कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार ट्रेनचा वेग खूप कमी होता आणि अपघातामागची कारणे ते शोधत आहेत. ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे सर्व प्रवासी बचावले. सूत्रांनुसार "पूर्वा एक्सप्रेस १० ते १५ कि.मी. प्रतितास या वेगाने धावत होती. जरी ट्रेनचा उच्चतम वेग १२० कि.मी प्रतितास असला तरी तिचा सरासरी वेग ६३ कि.मी. प्रतितास आहे. ट्रेन वेगात असतांना जर ही घटना घडली असती तर खूप मोठी आपत्ती ओढवली असती". diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14305.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a8d19bd10eb8319a7eb73f796556c45aa30135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14305.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), [१] मध्यम श्रेणी हवामान अंदाज राष्ट्रीय केंद्र (NCMRWF), [२] भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) यांच्या विलीनीकरणातून २९ जानेवारी २००६ रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची स्थापना करण्यात आली., पुणे, [३] आणि पृथ्वी जोखीम मूल्यमापन केंद्र (EREC), आणि समुद्र विकास मंत्रालय. [४] +१९८१ मध्ये भारत सरकारने कॅबिनेट सचिवालयाचा एक भाग म्हणून महासागर विकास विभाग (DoD) तयार केला, जो थेट भारताच्या पंतप्रधानांच्या प्रभाराखाली ठेवण्यात आला होता. १९८२ मध्ये तो एक वेगळा विभाग बनला आणि त्याने महासागर विकासाच्या क्षेत्रात आपले कार्य सुरू केले. २००६ मध्ये त्याला महासागर विकास मंत्रालय असे वेगळे मंत्रालय बनवण्यात आले. जुलै २००६ मध्येच मंत्रालयाची पुन्हा पुनर्रचना करण्यात आली आणि नवीन भूविज्ञान मंत्रालय त्याच्या कक्षेत विविध संस्थांसह अस्तित्वात आले. २००६ मध्ये एका ठरावाद्वारे सरकारने भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि मध्यम श्रेणी हवामान अंदाज राष्ट्रीय केंद्र आणि संशोधन (NCMRWF) यांना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणले. ठरावाने अणुऊर्जा आयोग आणि अवकाश आयोगाप्रमाणे पृथ्वी आयोगाची स्थापना केली. [५] +वायुमंडलीय विज्ञान, महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूकंपशास्त्र यांची एकात्मिक पद्धतीने काळजी घेणे हे मंत्रालयाचे कार्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14307.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c5d3a5ede1a724d51e8393c9ad4946f9b673f40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14307.txt @@ -0,0 +1,3 @@ +९ मे, इ.स. २०१९ +दुवा: [१] ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर) +पृथ्वी पंकज शॉ (जन्म ९ नोव्हेंबर १९९९) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14337.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f3f607f5ed018016871533fde96df807866a7f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14337.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +पॅट्रिक जेम्स कमिन्स हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1434.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c79cf73d12ccbcbabbbcd09a5367978bfe159ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1434.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोंडगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14340.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba08c7c6807bf7fe51923291cd8d1ef283131cdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14340.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14360.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14360.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1437.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93e31ac3d8b2dca427587cadefdeb0e07dc0072d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1437.txt @@ -0,0 +1,17 @@ +धोंडमारायचीमेट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२७ कुटुंबे राहतात. एकूण ५३४ लोकसंख्येपैकी २६७ पुरुष तर २६७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +गोंडे बुद्रुक,चरणगाव, साखरी, शिरसोण,खोच, पळसुंदे, सातुर्ली, वाशाळा,पिंपळगाव,शिवाळी, कोशिमशेत ही जवळपासची गावे आहेत.खोच ग्रामपंचायतीमध्ये धोंडमारायचीमेट,खोच, आणि शिरसोण ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14371.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7aab5d228a0ee456aae77a9fde1f2a7dddc31ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14371.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॅट्रिक गॅलन डेम्पसी (जन्म १३ जानेवारी १९६६) [१] एक अमेरिकन अभिनेता आणि रेसिंग ड्रायव्हर आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत ग्रेज ॲनाटॉमी या एबीसी वैद्यकीय नाटक मालिकेत न्यूरोसर्जन डेरेक "मॅकड्रीमी" शेफर्ड या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. एन्चेंटेड (२००७) मधील त्याच्या प्रमुख रोमँटिक चित्रपटांच्या भूमिकांसाठी देखील तो ओळखला जातो.[२][३][४] +डेम्पसीला एक प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे आणि २०२३ मध्ये पीपल्स मासिकाने "सेक्सीएस्ट मॅन अलाइव्ह" म्हणून ओळखले आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14383.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f82ab6771191a3295505f21326ff8e79e0546204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14383.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिक म्युलर (डिसेंबर १७, इ.स. १९७६:जिनिव्हा, स्वित्झर्लंड - )) हा  स्वित्झर्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. +हा बचावफळीत खेळायचा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14385.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..906138ad03a89977a5bce3e871d558f7e145b798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14385.txt @@ -0,0 +1 @@ +पॅट्रिक ऱ्हिस पॅट ब्राउन (२३ ऑगस्ट, १९९८:इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.[१] हा इंग्लंडकडून चार टी२० सामने खेळला आहे.[२] हा वूस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1440.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cfc2ec5fc5d74699d85d7ef6ab0487c62899a13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1440.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोंडळपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14429.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9db5cad91219ec012eca77e5183784585f26c058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14429.txt @@ -0,0 +1 @@ +पॅट्सी क्लाइन तथा व्हर्जिनिया पॅटरसन हेन्सली (८ सप्टेंबर, इ.स. १९३२:विंचेस्टर, व्हर्जिनिया, अमेरिका - ५ मार्च, इ.स. १९६३:कॅम्डेन, टेनेसी जवळ) या अमेरिकन कंट्री गायिका होत्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14447.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd332b9e7f36695ac03549c1352aeaeb3b5103fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14447.txt @@ -0,0 +1,4 @@ +परमनंट अकाउंट नंबर (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.[१][१] +पॅनचे उदाहरण:ARLPA0061H. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी : +परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते. +पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14461.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5d62c68141ccaab6d52b0fb6003e25e809c929d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14461.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्लू मॉरमॉन (शास्त्रीय नाव: Papilio polymnestor) (मराठी उच्चार - ब्ल्यू मॉरमॉन) हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे. याच्या पंखांचा विस्तार १२०-१५० मिमी असतो. देशातील 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असण्याचा मान ब्लू मॉरमॉनला जातो. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. +हे फुलपाखरू केवळ भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. भारतात हे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावरच आढळते. उत्तरेला गुजरात पर्यंत हे सापडल्याच्या नोंदी आहेत. हे बऱ्याचदा अगदी बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरात अगदी वाहतुकीच्या गर्दीत सुद्धा आढळते. +हे सामान्यपणे आढळणारे फुलपाखरू आहे आणि हे धोक्यात असल्याचे मानले जात नाही. हे वर्षभर आढळते, पण विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जास्त आढळते. +जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासारख्या भागात हे खास करून आढळते. पानगळीच्या जंगलात सुद्धा हे आढळते. याचे वसतीस्थान लिंबूवर्गीय वनस्पती असल्यामुळे या वनस्पतींची लागवड असलेल्या शहरी भागात सुद्धा हे आढळते. हे एका दिशेने वेगात उडते आणि उडताना सतत मार्ग बदलते, वर-खाली उडत असते. त्यामुळे याचे छायाचित्र घेणे सुद्धा कठीण जाते. खनिज समृद्ध जमिनीत हे चिखलपान मड पड्लिंग करताना दिसते. सीताफळाचा कुजलेला गर पडलेला असेल तर त्याचा दर्प सुटतो. त्याकडे आकर्षित होऊन राणी पाकोळी हमखास त्यावर आल्याची निरीक्षणे आहेत. मधातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठीच फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात. +पपनस,लिंबू या वनस्पतींची पाने याचे खाद्य आहे. +हे फुलपाखरू जंगलातील वाटा आणि झरे यावर आढळते. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तो सावली टाळतो. विशेषतः अशोकी, मोगरा कुलातील फुले, झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14481.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277e53ca646d09a1a0a7ce9bed573494ca7381a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14481.txt @@ -0,0 +1,4 @@ +द पॅराशूट रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या द पॅराशूट रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +द पॅराशूट रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14496.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d086bbcfc2a0d3077cf7a6f5045c8b841ec5e089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14496.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDG, आप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिस व व्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +, सिॲटल || align="center" | 2E diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14499.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84fdb8648da2a227688f7d3c826200f8fd68197b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14499.txt @@ -0,0 +1,3 @@ +Carte Métro de Paris.jpg +पॅरिस मेट्रो (फ्रेंच: Métro de Paris) ही पॅरिस शहरामधील उपनगरी रेल्वे व जलद वाहतूक सेवा आहे. आपल्या स्थानकांच्या वास्तूशास्त्रासाठी पॅरिस मेट्रो जगभर प्रसिद्ध आहे. मुख्यतः जमिनीखालुन भुयारी मार्गांमध्ये धावणाऱ्या ह्या रेल्वेचे १६ मार्ग आहेत व एकूण ३०० स्थानके आहेत. ह्या १६ मार्गांची एकूण लांबी २१४ किमी एवढी आहे. १९ जुलै १९०० रोजी पॅरिस मेट्रोचा पहिला मार्ग सुरू झाला. +मॉस्कोखालोखाल पॅरिस मेट्रो ही युरोपातील दुसरी सर्वात वर्दळीची रेल्वे सेवा आहे. दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14605.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db0be2e2fd229389cc5ea1fe3fa7f134a8232244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14605.txt @@ -0,0 +1,5 @@ + +पेंढी नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. +पेंढी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1461.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c2ef9960759b760a2df796a9eda1951f59519a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1461.txt @@ -0,0 +1 @@ +धोद विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिकर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14623.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bfcea05e16ce153d64ae16b9e4782c0279aaeb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14623.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथलीन एलैन पेग बॅटी (१५ डिसेंबर, १९२०:ऑकलंड, न्यू झीलंड - १६ डिसेंबर, २००८:न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५४ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14624.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43f687e6957c69139157814f5299ccd0fcb1d105 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14624.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेगरगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14628.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ec533efd1cd35d400ca2976d8bb6b6754efb89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14628.txt @@ -0,0 +1 @@ +एलिसेंट पेगी फेरवेदर (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान १० महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14657.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14657.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14669.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8df2b4bd90c73c5e0002099b648f4eb82f1e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14669.txt @@ -0,0 +1,7 @@ +वरुण श्रीधर (मुख्य कार्यकारी अधिकारी) +अमित नय्यर (अध्यक्ष) +पेटीएम एक भारतीय शॉपिंग वेबसाईट आहे. कंपनीचे २०१० मध्ये उद्घाटन करण्यात आले एक भारतीय ई-कॉमर्स खरेदी साइट आहे कंपनीची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी २०१० मध्ये केली होती. भारतात नोएडा इथे पेटीएम मुख्यालय आहे. हे हळूहळू वीज बिल, वायू बिल तसेच रिचार्जिंग आणि विविध पोर्टलच्या बिल देयका प्रदान करते. पेटीएम ने २०१२ मध्ये भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश केला, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि स्नॅपडील व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि उत्पादने देण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये त्यांनी बसची तिकिटे जोडली. +पेटीएम सध्या ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि मोबाईल रिचार्ज, युटिलिटी बिल पेमेंट्स, ट्रॅव्हल, मूव्हीज आणि इव्हेंट बुकिंग तसेच किराणा स्टोर्स, फळे आणि भाजीपाल्याच्या दुकानांत, रेस्टॉरंट्स, पार्किंग, टोलमध्ये ऑनलाईन वापर प्रकरणे उपलब्ध आहेत. , पेटीएम क्यूआर कोडसह फार्मसी आणि शैक्षणिक संस्था +२०१० मध्ये प्रीपेड मोबाइल रिचार्ज संकेतस्थळ म्हणून पेटीएम २०१० मध्ये स्थापन करण्यात आले. पेटीएम पे थ्रू मोबाईलचे संक्षिप्त रूप आहे. आज प्रीपेड मोबाइल, डीटीएच आणि खरेदी भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन वेबसाईट आहे, आणि पेटीएमला अँड्रॉइड आणि आयोएस एप्लिकेशनला सगळ्यात लोकप्रिय अप्प्स मध्ये स्थान देण्यात आले आहे.स्थापनेच्या तीन वर्षांनंतर, कंपनीने २५ दशलक्ष वॉलेट वापरकर्त्यांची एक वापरकर्ता आधार आणि १ दशलक्ष ॲप डाउनलोड तयार केले. +२०१४ मध्ये, कंपनीने पेटीएम वॉलेटला सुरुवात केली, भारतातील सर्वात मोठी मोबाइल पेमेंट सेवा मंच, ४० लाखांपेक्षा अधिक सेवाना सुरुवात केली. उबेर, बुकमाईशो आणि मेकमाईट्रिप सारख्या इंटरनेट कंपन्यांमध्ये भरणा करण्याचा पर्याय आहे. आता २०१७ मध्ये पेटीएम ने पेटीम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल) नावाची एक नवीन बँक सुरू केली आहे. आता केवायसी पडताळणी अंतर्गत पेटीएम बँक पेटीएम वॉलेट रूपांतरित होईल. +पेटीएम अनुप्रयोग आजच्या स्मार्टफोन कार्य प्रणाली अँड्रॉइड , ऍपल आणि विनडोझ साठी जे डिझाइन तयार केले गेले आहे. यामध्ये आपण खूप कॅशलेस व्यवहार करू शकता. आपण खरेदी, रेल्वे आणि हवाई तिकिटे बुकिंग, मोबाइल आणि डिश रिचार्ज, या ॲप्लिकेशन्सीच्या माध्यमातून फिल्म तिकिटे देखील खरेदी करू शकता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14671.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2044c0b3ba468a51eaf0d03eec461b3c4d60cd5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14671.txt @@ -0,0 +1,2 @@ + पेटुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14672.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1bd42894b3d1a107a1a9d956f45313f35258fe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14672.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेटेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14673.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5237c002a7e56d51fe303edfb01753842e61c2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14673.txt @@ -0,0 +1 @@ +पेट्टपर्ती विधानसभा मतदारसंघ - १५९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. पेट्टपर्ती हा विधानसभा मतदारसंघ हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14679.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e99e589f6df17a8e90b9eb01d04de27132e88ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14679.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पेत्रा क्वितोव्हा (चेक: Petra Kvitová; जन्मः ८ मार्च १९९०, बिलोव्हेच, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००६ साली व्यावसायिक बनलेली क्वितोव्हा २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून प्रसिद्धीझोतात आली. तिने विंबल्डन स्पर्धा दुसऱ्यांदा २०१४ साली जिंकली. सध्या क्वितोव्हा डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. +डाव्या हाताने खेळणारी क्वितोव्हा आपल्या वेगवान सर्व्हिससाठी ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14691.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46d9004e63cce8679e900c821a1bb9b708ede98d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14691.txt @@ -0,0 +1 @@ +पेट्रोनास जुळे मनोरे (किंवा पेट्रोनास ट्विन टॉवर्स) ह्या मलेशियाच्या क्वालालंपूर शहरातील जुळ्या गगनचुंबी इमारती आहेत. ह्या इमारतींचे बांधकाम १९९८ साली पूर्ण झाले व १९९८ ते २००४ ह्या काळात पेट्रोनास मनोरे ह्या जगातील सर्वात उंच इमारती होत्या. दोन्ही इमारतींमध्ये ८८ मजले आहेत व ४१ व्या व ४२ व्या मजल्यांदरम्यान ह्या इमारती एकमेकांना एका दुमजली आकाशपुलाने जोडल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05bd353e0ce00406be046af7825a219ba15605ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14697.txt @@ -0,0 +1,17 @@ +पेट्रोल इंजिन हे पेट्रोल हे द्रवरूप इंधन वापरून चालणारे यंत्र आहे. हे सर्वसाधारणपणे 'आंतरस्फोट' करून चालणारे इंजिन असते.यातील इंधनाचे ज्वलन होण्यासाठी, स्पार्कप्लगचा उपयोग केला जातो. +पेट्रोलचलित इंजिनाचे दोन प्रकार आहेत: +यात आणखी एक सिलेंडर (सिंगल सिलेंडर) आणि अनेक सिलेंडर (मल्टी सिलेंडर) असेही प्रकार आहेत. जेव्हा जास्त उर्जा हवी असते(उदा.-कार) तेंव्हा मल्टी सिलेंडर इंजिन वापरतात. +... +शेजारची आकृती कृपया बघा.ती,एक सिलेंडर असलेले, ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन कसे कार्य करते हे दर्शविणारी आहे.आकृती शेजारील डाव्या बाजुस, बदलणारे इंग्रजी आकडेही बघा. ते स्ट्रोकची स्थिती दर्शवितात. +स्ट्रोक 1 (इनलेट स्ट्रोक): दट्टया(पिस्टन) खाली जाते. पोकळीत निर्वात प्रदेश निर्माण होतो. त्याच सुमारास पेट्रोल व हवेचे मिश्रण (निळा रंग) उजवीकडील झडप (व्हाल्व) उघडल्यामुळे आत येते. +स्ट्रोक 2 (कॉम्प्रेशन स्ट्रोक): दोन्ही व्हाल्व बंद असतात.पिस्टन वर येते.पोकळीतील मिश्रण दाबल्या जाते.तेथे उच्च दाब निर्माण होतो. +स्ट्रोक 3 (पॉवर स्ट्रोक): ते पूर्ण दाबले जाताच स्पार्क प्लग मधुन ठिणगी पडते.उच्च दाबावर असलेल्या त्या मिश्रणाचा स्फोट होतो. त्याने दट्टया (पिस्टन) पूर्ण जोराने खाली ढकलल्या जाते(लाल रंग).या स्थितीत इंजिनाला उर्जा मिळते. +स्ट्रोक 4 (एक्झॉस्ट स्ट्रोक): डावीकडील निकास(एक्झॉस्ट) व्हॉल्व उघडल्या जातो. जळलेल्या मिश्रणाचा धुर त्यातुन बाहेर पडतो.(पिवळसर- कथ्था रंग) +ही क्रिया सतत, लागोपाठ आणि वारंवार होते. याने इंजिनास उर्जा मिळत जाते. इंजिनमध्ये या क्रिया बरोबर वेळेनुसार घडाव्या यासाठी आवश्यक ती रचना केली असते. हे इंजिन प्रत्येक चवथ्या स्ट्रोकला उर्जा देते. + +4 स्ट्रोक इंजिन वंगण कसे केले जाते? + +4 स्ट्रोक इंजिन ऑइल संपमध्ये ठेवलेल्या तेलाने वंगण घालतात. 2 स्ट्रोक इंजिननुसार इंजिनला वंगण घालण्यासाठी 4 स्ट्रोक इंजिन तेल इंधनासह जळत नाही. जाळण्याऐवजी ते इंजिनभोवती पुनर्वापर केले जाते. 4 स्ट्रोक इंजिन ऑइल इंजिनभोवती रिक्रिक्युलेट केल्यामुळे ते वंगण घालते, उष्णता पसरवते, स्वच्छ करते आणि तेल बदलेपर्यंत सस्पेंशनमध्ये अशुद्धता ठेवते. +याचे कार्य वरील ४ स्ट्रोक इंजिनप्रमाणेच असते.फक्त यात दोनच स्ट्रोक असतात.यात वरील स्ट्रोक १ व ४ची क्रिया एकत्र घडते,तसेच २ व ३ची एकत्रपणे घडते. हे इंजिन प्रत्येक दुसऱ्या स्ट्रोकला उर्जा देते.{सविस्तर माहतीसाठी} +साधारणतः मोटरसायकल, स्कुटर मध्ये २ स्ट्रोक पेट्रोल इंजिन वापरतात.(अपवाद- रॉयल एनफिल्ड आणि हीरो होंडा मोटरसायकल) +कोणत्या प्रकारचे इंजिन वापरायचे हे आवश्यकता बघुन उत्पादक ठरवितो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14702.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c090503e76f47b04088c0950c33abf2d1f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14702.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पेट्रोस पीट सॅम्प्रास (१२ ऑगस्ट, इ.स. १९७१ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14714.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f800306c511d48da34874813817c3e7f817d473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14714.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14759.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14759.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14763.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e35d63f61d91d7933ae6b4e56c088725dfe7ef9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14763.txt @@ -0,0 +1,2 @@ + पेढी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14778.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a43d1d914ab842e6b5934ea839e3865770c9e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14778.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेणुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1480.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..257a47b81c751de506180a6108a996135d900d1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1480.txt @@ -0,0 +1,2 @@ + धोत्रा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14801.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e80e12d852500c7c019bf6e3437bb38a35e8ea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14801.txt @@ -0,0 +1,72 @@ +पेद्दापल्ली जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +पेद्दपल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.[२] २०१६ साली करीमनगर जिल्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पेद्दापल्ली जिल्हा तेलगंणाच्या उत्तर भागात स्थित आहे. पेद्दपल्ली येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +रामगुंडम शहर हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. रामागुंडम शहर बहुसांस्कृतिक आणि भाषिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पेड्डापल्ली शहर हे एक शैक्षणिक केंद्र देखील आहे आणि मुख्यतः शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. रामागुंडम हे या जिल्ह्यातील फक्त सर्वात मोठे शहर आहे आणि तेलंगणा राज्यातील ५ वे सर्वात मोठे शहर आहे. एनटीपीसी रामगुंडम हा भारतामधील सर्वात मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ह्याच जिल्ह्यामध्ये आहे. +पेद्दपल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,२३६ चौरस किलोमीटर (८६३ चौरस मैल) आहे. पेड्डापल्ली जिल्हा हा पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्यापासून बनलेला आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा मंचिर्याल, जयशंकर भूपालापल्ली, करीमनगर, जगित्याल जिल्‍ह्यांसह आहेत. गोदावरी नदी पेड्डापल्ले जिल्ह्यातून जाते. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या पेद्दपल्ली जिल्ह्याची लोकसंख्या ७,९५,३३२ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९२ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.५२% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३८.२२% लोक शहरी भागात राहतात. +जनगणनेनुसार, ९२.१% लोक तेलुगू आणि ५.३९% उर्दू ही पहिली भाषा म्हणून बोलतात. +पेद्दपल्ली जिल्ह्या मध्ये १४ मंडळे आहेत: पेद्दपल्ली आणि मंथनी हे दोन महसुल विभाग आहेत.[३] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14808.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d01e531340c75178c30b093501cc031ebf2e45f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14808.txt @@ -0,0 +1 @@ +पेद्रो पासुस कुएलू (पोर्तुगीज: Pedro Manuel Mamede Passos Coelho;) (जुलै २४, इ.स. १९६४ - हयात) हा पोर्तुगालातील एक व्यापारी, अर्थतज्ज्ञ व राजकारणी आहे. जून, इ.स. २०११मध्ये झालेल्या पोर्तुगालातील राष्ट्रीय विधिमंडळ निवडणुकांमध्ये पार्तिदू सुस्याल दिमूक्राता पक्षाने ४०% मते मिळवून बहुमत पटकावले. पक्षाध्यक्ष असलेल्या कुएलूने २१ जून, इ.स. २०११ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14810.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c45d8c53421b7a713d0f57df367fab8a2a22e03c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14810.txt @@ -0,0 +1 @@ +पेद्रो मिगेल दि संताना लोपेस (२९ जून, इ.स. १९५६:लिस्बन, पोर्तुगाल - ) हा २००४-५ मध्ये आठ महिन्यांकरता पोर्तुगालचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14833.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3ab952df8b7332856199d62786b057b8faf2d48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14833.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेनल्टी किक ही फुटबॉलमधील एक खेळी आहे. यात चेंडू गोलपासून अंदाजे १२ मीटर अंतरावर ठेवला जातो. चेंडूला लाथ मारणाऱ्या खेळाडू आणि गोलच्या मध्ये फक्त गोलरक्षक असतो. पंचाने शिट्टी वाजवून खूण केली असता खेळाडू लाथ मारतो व गोलरक्षक चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतो. +गोलच्या जवळच्या भागात बचाव करणाऱ्या खेळाडूद्वारा झालेल्या गंभीर चुकीच्या बदल्यात पंच ही खेळी आक्रमक संघाला बहाल करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14836.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28f2af0bd164f3c8cda7c6cbb7dd69dcbd763ddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14836.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेनिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र थीफ रिव्हर फॉल्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९९२ इतकी होती.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14876.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0372d6e778ffdb871ae841a3ed772ce78224d60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14876.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेपिन काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पेपिन काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14880.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14880.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14888.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8e970bf05f960e956455fb3e52095f581e47f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14888.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ ते १४ एप्रिल भारत, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली. +अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला. + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७-९८ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14900.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0586053dc1b868c6d5a356d8626b91f95b37028c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14900.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेब्लाची लढाई फ्रांस आणि मेक्सिकोमध्ये ५ मे, इ.स. १८६२ रोजी झालेली लढाई होती. मेक्सिको सिटीवर चालून येणाऱ्या फ्रेंच सैन्याला काही काळाकरता थोपवून धरण्यात मेक्सिकन सैन्याला या लढाईमुळे यश मिळाले. पेब्ला शहराजवळ झालेल्या या लढाईत मेक्सिकोचे ८७ तर फ्रांसचे ४९१ सैनिक मृत्यू पावले तर दोन्हीकडील शेकडो सैनिक जखमी झाले. +इतर ठिकाणी मेक्सिकन सैन्याने सपाटून मार खाल्ला तरीही या लढाईमध्ये आपल्यापेक्षा बलाढ्य फ्रेंच सैन्याला हरविल्यामुळे मेक्सिकन सैन्याला हुरूप आला. फ्रांसला मेक्सिकोमधून हुसकावून लावल्यानंतर ५ मेचा दिवस मेक्सिकोमध्ये सिंको दि मायो या नावाने साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14924.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1abff54d420197bcddbe6ece7bd17538513ebc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14924.txt @@ -0,0 +1 @@ +बियाणे किंवा रोप जमिनीत लावणे, या प्रक्रियेला पिकाची लागवड म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14942.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61bbce5386d4da80d8995ed90abbc8c6131314a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14942.txt @@ -0,0 +1 @@ +पेरियाकुलम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००९मध्ये विसर्जित केला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1495.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0c10e4d3d39ae3307f10fa185b65dcb729a6665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1495.txt @@ -0,0 +1,8 @@ + धोपटेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14955.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..550febdba58d622c40ae2c648671b8af21508c8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14955.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेरी काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14967.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..991d638e0b5ca4d94cd15f333f2d81d245264628 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14967.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरून हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो व चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात.तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते.कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते. +खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर "क' जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या "व्हायरस'पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील "क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते. +पेरू पासून आइसक्रीम व गोळ्या बनविल्या जातात.पेरूला इंग्रजी मध्ये guava असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14997.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f496f4274d11b575695ea209ab3bd009d3ec868 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14997.txt @@ -0,0 +1,4 @@ +पेला (इंग्रजी : ग्लास टंब्लर) हे पाणी, सरबत, दूध, ताक, मद्य किंवा तत्सम द्रव पदार्थ पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे आहे. रुप्याच्या, चांदीच्या किंवा सुवर्णाच्या पेल्याला बहुधा 'प्याला' म्हणतात. ज्या पेल्यातून दारू किंवा विष पितात त्यालाही 'प्याला' म्हणतात. अलंकारिक अर्थाने सुखाचा किंवा दुःखाचा प्याला असेही शब्दप्रयोग वापरले जातात. +पाणी पिण्याच्या मराठी पद्धतीच्या भांड्याला फुलपात्र म्हणतात. +पेला हा मुख्यतः तांबे, पितळ, चांदी, स्टेनलेस स्टील या धातूचा, काचेचा, जलाभेद्य कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा असतो. +पेला हा पाणी, आदी पेये पिण्यासाठी घरी, हॉटेल इ. ठिकाणी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14999.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946d787290ab9917802e9d64c3d2e650580a6bc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_14999.txt @@ -0,0 +1,5 @@ +पेलिकन (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेऱ्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत. +झोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.पेलिकन बहुतेक वेळा पाण्याचा तळ्यामध्ये,दबकड्यांमध्ये व नदीच्या आवारातच थांबणे पसंत करतात.चोची सोबत त्यांचे पायसुद्धा मजबूत असतात ज्याने ते पाण्यामध्ये लांबपर्यंत चालतात व आपले भक्ष्य मजबूत पाय पंज्याने जखडतात. +भुरकट पाणकोळी गिधाडापेक्षा मोठा असतो. त्याच्या शरीराची लांबी  १२५–१५२ सेंमी. व वजन ४–६ किग्रॅ. असते. रंग प्रामुख्याने पांढरा असून शरीरावर राखाडी पिसे असतात. पाय आखूड व बळकट असून बोटे पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. या पायांनी ते उत्तम पोहू शकतात. उड्डाण पिसे काळसर तपकिरी आणि भुरकट तपकिरी असून शेपटीत २०–४० पिसे असतात. चोच मोठी, चपटी आणि पिवळसर असते. वरच्या चोचीच्या अर्ध्या भागावर निळसर काळसर ठिपके आणि टोकाला आकडी असते. खालच्या चोचीच्या तळाशी पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाची झोळी लोंबत असते. या झोळीमुळेच पाणकोळी सहज ओळखता येतो. नर आणि मादी दिसायला सारखे असले, तरी नर आकाराने मोठा असतो. +पाणकोळी समूहप्रिय पक्षी असून तलाव, नदीमुखाचा प्रदेश, त्रिभुज प्रदेश व खाजण अशा ठिकाणी राहतात. मासे हे त्यांचे प्रमुख अन्न असले, तरी ते लहान उभयचर प्राणी, कवचधारी प्राणी व क्वचित प्रसंगी लहान पक्षीसुद्धा खातात. पाणकोळी समूहाने मासे पकडतात. पाण्यावर अर्धगोल करून पंख आपटत ते माशांना उथळ पाण्याकडे हाकलतात आणि सर्वजण मान खाली घालून चोचीखालील पिशवीमध्ये मासे भरून घेतात. पाण्याबाहेर येऊन चोचीतून पाणी बाहेर टाकतात आणि मासे गिळतात. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_150.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b394075d5634966bf267e8ff88cf582e798210df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_150.txt @@ -0,0 +1,2 @@ +दोडामार्ग तालुका महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आहे. +१.https://villageinfo.in/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15009.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15009.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15017.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a99a95a3ac26d2e720b99df94d3808940691c3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15017.txt @@ -0,0 +1,38 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवे साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती. +पेशवा हा पर्शियन(फारसी) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात. +खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून; पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले. +भट घराण्यातील पंतप्रधानांनी पेशवे या पदाला महत्त्व प्राप्त करून दिले. पहिला बाजीराव ( १७२०-१७४०) हा ताकदवान व शूर पेशवा होता. त्याचा काळात मराठे संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते. +पेशवे रघुनाथराव यांनी इंग्रजांबरोबर मैत्री केल्याने पेशव्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. नंतरचे पेशवे हे नाममात्र होते व त्यांनी मराठा साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यास उतरती कळा लागली. मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालवले जाऊ लागले. उदा.होळकर,शिंदे,भोसले,गायकवाड,नवलकर,घोरपडे, वगैरे. इंग्रजांनी १८१८ साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि मराठा राज्याचा अस्त झाला आणि त्यामुळे १०४ वर्षांची पेशव्यांचीची कारकीर्द झाकोळली गेली. +श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता : +पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्या विवाहांमुळे सुमारे ५५-६० सुस्वरूप ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्यात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याच स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत. +दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा : (संदर्भ हवा) +'पेशवाई थाट' हा महाराष्ट्रात अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग आहे. मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारा एक कागद प्रसिद्ध आहे. त्या कागदात कामाची एक यादी आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणुका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत. +यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा० +पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात. +पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत. +सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरू केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया, खीर व पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार व पक्वान्ने; पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात अजही वर्षे टिकून आहे +. +ब्राम्हणभोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या - त्यात तोंडली, परवर, पडवळ, वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची-त्यांतील एक साखरेचे गोड लोणचे असे . ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गव्हल्याची), सपिटाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथीची किंवा अंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरींत कोथिंबीर, लसूण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे यांचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड (हे पक्वान्न दुसऱ्या बाजीरावाने प्रचारात आणले), बासुंदी, केशरी साखरभात, जिलबी (हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू , पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.). भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.) +पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हणभोजनाचा मक्ता ६९०० रुपयांचा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्याच्या व थोरल्या पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता . या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणेप्रमाणे भोजनखर्च होत असे. +सदर्हू्ू प्रमाणे साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरांत भोजने होत अशी तजवीज करावी. स्वयंपाक भाज्या वगैरे उष्ण रसाच्या लोणची भाज्या एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारें वरण, क्षीर वगैरेचे थेंबटे मध्ये पाडूं नयेत. गडबड न करतां चतुराईनें वाढावें. हें काम चिंतो विश्वनाथ व मोरो विश्वनाथ भावे व वाकनीस यांणी करावें. +वाढावयास असामी :- +तूप वाढावयास पांडुरंग बाबूराव यांजकडील शहाणे वाढणारे यांनी रुप्याचे तोटीच्या कासंड्यांनी वाढावें. +सदर्हू बंदोबस्त अंताजी मल्हार वांकनीस यांणी राखावा. कमी पडल्यास मशारनिल्हेस पुसावें. दोन अडीच प्रहरां सोयऱ्यांकडे भोजनाचें झाल्यास आधी वाड्यांत फराळास घालावें. भोजनाचें तिकडे होईल. जे दिवशीं रात्रौ सोयऱ्यांकडे भोजनाचें होईल ते दिवशीं दोन प्रहरी भोजनाचे वाड्यांत होईल. +खाशीं पानें कमावीसदारांकडून आणवली आहेत, ती माफजतीने राखावीं. वरकड पानांची तरतूद जाहली न जाहली पाहत जावी व खरेदी करावीं. +सुपारी फुवर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यांपैकी तबकांत मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन, गुलाब घालून, रंगदार करावी; व काही रोठा सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करून ठेवीत जावी. +पाने कळीची गंगेरी व रामटेकी तबकांत घालावी. ती रुमालाने पुसून चांगली निवडून नीट करून ठेवून देत जावी. व काही पाने सोनेरी वर्ख लावून तयार करावी. +विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा. पिकल्या पट्या बाजूच्या सात पानांच्या सुपारीचे पानांची गुंडी उभी घालूनभरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे केळीची पाने लावून दहा पानांचा एक व बारा पानांचा एक. त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यास दुकाडीची खूण करावी. या प्रमाणे कुलपी विडे धुतली सुपारी घालून चुना नेमस्त दुसरे पानास न लागे असा घालून बांंधावे. +ज्या दिवशी ब्राह्मण भोजनास व बायकांकडील जसे विडे लागतील तशी तरतूद करीत जावी. चुना केशरी व साधा पांढरा सफेत खांसा सभेंत तबकांत ठेवण्याकरिता करावा. +साहित्यास कारकून वगैरे :- +१ कारकून +१ ढलाईत +१ प्यादे +१ शिंदे पोरगे व खिजमतगार +१ भोई +१ कामाठी +(अपूर्ण) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15021.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a99a95a3ac26d2e720b99df94d3808940691c3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15021.txt @@ -0,0 +1,38 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवे साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती. +पेशवा हा पर्शियन(फारसी) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात. +खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून; पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले. +भट घराण्यातील पंतप्रधानांनी पेशवे या पदाला महत्त्व प्राप्त करून दिले. पहिला बाजीराव ( १७२०-१७४०) हा ताकदवान व शूर पेशवा होता. त्याचा काळात मराठे संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते. +पेशवे रघुनाथराव यांनी इंग्रजांबरोबर मैत्री केल्याने पेशव्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. नंतरचे पेशवे हे नाममात्र होते व त्यांनी मराठा साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यास उतरती कळा लागली. मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालवले जाऊ लागले. उदा.होळकर,शिंदे,भोसले,गायकवाड,नवलकर,घोरपडे, वगैरे. इंग्रजांनी १८१८ साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि मराठा राज्याचा अस्त झाला आणि त्यामुळे १०४ वर्षांची पेशव्यांचीची कारकीर्द झाकोळली गेली. +श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता : +पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्या विवाहांमुळे सुमारे ५५-६० सुस्वरूप ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्यात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याच स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत. +दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा : (संदर्भ हवा) +'पेशवाई थाट' हा महाराष्ट्रात अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग आहे. मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारा एक कागद प्रसिद्ध आहे. त्या कागदात कामाची एक यादी आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणुका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत. +यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा० +पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात. +पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत. +सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरू केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया, खीर व पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार व पक्वान्ने; पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात अजही वर्षे टिकून आहे +. +ब्राम्हणभोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या - त्यात तोंडली, परवर, पडवळ, वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची-त्यांतील एक साखरेचे गोड लोणचे असे . ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गव्हल्याची), सपिटाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथीची किंवा अंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरींत कोथिंबीर, लसूण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे यांचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड (हे पक्वान्न दुसऱ्या बाजीरावाने प्रचारात आणले), बासुंदी, केशरी साखरभात, जिलबी (हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू , पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.). भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.) +पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हणभोजनाचा मक्ता ६९०० रुपयांचा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्याच्या व थोरल्या पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता . या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणेप्रमाणे भोजनखर्च होत असे. +सदर्हू्ू प्रमाणे साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरांत भोजने होत अशी तजवीज करावी. स्वयंपाक भाज्या वगैरे उष्ण रसाच्या लोणची भाज्या एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारें वरण, क्षीर वगैरेचे थेंबटे मध्ये पाडूं नयेत. गडबड न करतां चतुराईनें वाढावें. हें काम चिंतो विश्वनाथ व मोरो विश्वनाथ भावे व वाकनीस यांणी करावें. +वाढावयास असामी :- +तूप वाढावयास पांडुरंग बाबूराव यांजकडील शहाणे वाढणारे यांनी रुप्याचे तोटीच्या कासंड्यांनी वाढावें. +सदर्हू बंदोबस्त अंताजी मल्हार वांकनीस यांणी राखावा. कमी पडल्यास मशारनिल्हेस पुसावें. दोन अडीच प्रहरां सोयऱ्यांकडे भोजनाचें झाल्यास आधी वाड्यांत फराळास घालावें. भोजनाचें तिकडे होईल. जे दिवशीं रात्रौ सोयऱ्यांकडे भोजनाचें होईल ते दिवशीं दोन प्रहरी भोजनाचे वाड्यांत होईल. +खाशीं पानें कमावीसदारांकडून आणवली आहेत, ती माफजतीने राखावीं. वरकड पानांची तरतूद जाहली न जाहली पाहत जावी व खरेदी करावीं. +सुपारी फुवर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यांपैकी तबकांत मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन, गुलाब घालून, रंगदार करावी; व काही रोठा सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करून ठेवीत जावी. +पाने कळीची गंगेरी व रामटेकी तबकांत घालावी. ती रुमालाने पुसून चांगली निवडून नीट करून ठेवून देत जावी. व काही पाने सोनेरी वर्ख लावून तयार करावी. +विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा. पिकल्या पट्या बाजूच्या सात पानांच्या सुपारीचे पानांची गुंडी उभी घालूनभरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे केळीची पाने लावून दहा पानांचा एक व बारा पानांचा एक. त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यास दुकाडीची खूण करावी. या प्रमाणे कुलपी विडे धुतली सुपारी घालून चुना नेमस्त दुसरे पानास न लागे असा घालून बांंधावे. +ज्या दिवशी ब्राह्मण भोजनास व बायकांकडील जसे विडे लागतील तशी तरतूद करीत जावी. चुना केशरी व साधा पांढरा सफेत खांसा सभेंत तबकांत ठेवण्याकरिता करावा. +साहित्यास कारकून वगैरे :- +१ कारकून +१ ढलाईत +१ प्यादे +१ शिंदे पोरगे व खिजमतगार +१ भोई +१ कामाठी +(अपूर्ण) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1507.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7101a11e065568bea9b615e8aeff196613c0b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1507.txt @@ -0,0 +1,24 @@ +धोम धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या धोम गावाजवळ बांधलेले धरण आहे. हे धरण इ.स. १९६८ ते इ.स. १९७७ सालांदरम्यान बांधण्यात आले. +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची  : ६२.१८ मी (सर् +कृष्णा व्हॅली मधून सुंदर देखावा दिसतो +प्रकार : S - आकार +लांबी : ७१ मी. +सर्वोच्च विसर्ग : १७७८.२९ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ५, ( १२ X ६.५ मी) +क्षेत्रफळ  : २४.९८ वर्ग कि.मी. +क्षमता  : ३८२.३२ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ३३१.०५ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : २४९८ हेक्टर +लांबी  : ११३ कि.मी. +क्षमता  : २१.२० घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : ३८४३९ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : २७५६० हेक्टर +लांबी  : ५८ कि.मी. +क्षमता  : ५.८१ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : १०४६० हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ९१०० हेक्टर +जलप्रपाताची उंची  : १८ मी +जास्तीतजास्त विसर्ग  : १४ क्यूमेक्स +निर्मीती क्षमता  : २ मेगा वॅट +विद्युत जनित्र  : २ X १ मेगा वॅट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15076.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93cb111e3c8153d098362b6925438c8c2ae56315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15076.txt @@ -0,0 +1,4 @@ + +[[]], इ.स. +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15077.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2516dd03210635986b77fd2f3256e7cb83315fd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15077.txt @@ -0,0 +1,6 @@ +पेनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात बुद्नेश्र्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा वाशीम व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर (चंद्रपूर) येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते. ही नदी वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे. पैनगंगाची लांबी ४९५ किमी आहे. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी.पुढे वर्धा आणि पैनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो. +पेनगंगेच्या उजव्या तीराला येऊन मिळणारी एकमेव नदी कयाधू ही आहे,तर डाव्या तीराला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी पूस, अडाण, आरना, वाघाडी, खुनी या पेनगंगेच्या मुख्य उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने ही नदी उपयोगी असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर इसापूर धरण यवतमाळ जिल्ह्यात इसापूरजवळ बांधले आहे. ते १९६८मध्ये बांधले. या धरणाची क्षमता ९६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, या धरणाचा उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत, या कालव्यामुळे नांदेड यवतमाळ हिंगोली या जिल्ह्याला जिल्ह्यातील शेती उपयोग झाला आहे. एवढेच नाही तर या कालव्याचे पाणी आंध्रप्रदेशात पर्यंत पण गेलेली आहे त्यापासून शेतीस पाणीपुरवठा होतो. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत.   +पेनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा  यांना विभागणाऱ्या पेनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य आहे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ किमी२ इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. पेनगंगा नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले किनवट अभयारण्य आहे. +किनवट तालुक्‍यात, पेनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकांमधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे. +पेनगंगा नदी आणि जिल्हा सीमा +१.यवतमाळ-नांदेड २.यवतमाळ-हिंगोली ३.यवतमाळ-चंद्रपूर diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15121.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f489e194e39982ddbd461f1c1b7060adbec03b25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15121.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉटॉटोमी काउंटी (कॅन्सस) ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15124.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d47be39bc55ee169a529c3674a6d28b59de82977 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15124.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 42°26′28″N 19°15′49″E / 42.44111°N 19.26361°E / 42.44111; 19.26361 + +पॉडगोरिट्सा ही माँटेनिग्रो देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15149.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7fa8fc7a9b36e664bf423b5b0996d2a71e5c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15149.txt @@ -0,0 +1,7 @@ +रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय. +रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही. +रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात. +रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते. +२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली. +एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात.[१] आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.[२] +सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15165.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aedf85b614646a1423e0d42a869bd893d43650db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15165.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉल जॉन वॉकर ॲलोट (सप्टेंबर १४, इ.स. १९५६:ॲल्ट्रिंचॅम, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून प्रत्येकी तेरा कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15180.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15180.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15185.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16105da3915446949824c23223b48ccdf0b73f0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15185.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पॉल क्रोनिन (८ जुलै १९३८ - १३ सप्टेंबर २०१९) [२] हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता होता ज्याने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन मालिका मॅटलॉक पोलीस आणि द सुलिव्हन्स मध्ये भूमिका साकारल्या होत्या. मार्टिन सॅक सारखाच तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित अभिनेता ओळखला जातो. त्याने १९७८ पासून सलग तीन वर्षे सलग तीन वेळा सर्वात सन्मानित अभिनेत्याचे पुरस्कार मिळवले आणि पाच रौप्य पुरस्कार जिंकले. [३] +त्याचा जन्म १९३८ मध्ये विस्टो, दक्षिण ऑस्ट्रेलिया मधील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. एक तरुण माणूस म्हणून क्रोनिन मेलबर्नल गेला आणि तिथे त्याने वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. अभिनय कारकिर्दीत त्याने होमिसाईड (ऑस्ट्रेलियन टीव्ही मालिका), डिव्हीजन ४ यासह अनेक क्रॉफर्ड प्रॉडक्शन मध्ये कामे केली. क्रॉफर्ड प्रॉडक्शन्सच्या मॅटलॉक पोलीस (१९७१ – ११७६) मध्ये क्रोनिन मोटरसायकल पोलीस म्हणून गॅरी होगन म्हणून दिसला आणि त्यानंतर सोलो वन (१९७६) म्ध्ये. १९७६ ते १९८३ या काळात लोकप्रिय ऑपेरा द सुलिव्हन्स मध्ये त्याने डेव्हिलीव्हानची मध्यवर्ती भूमिका केली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15218.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ec6a301ee4d8c1c4d97dc701023add448aefc63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15218.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल थॉमस बार्टन (९ ऑक्टोबर, १९३५:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९६१ ते १९६३ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15237.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880ffab0de516837e597f877e5d1745533395e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15237.txt @@ -0,0 +1,8 @@ +पॉल रिचर्ड हॅलमॉस (इंग्लिश: Paul Halmos ) हे एक अमेरिकन गणिती होते. त्यांचा जन्म हंगेरीमधे झाला होता. प्रोबॅबिलीटी थिअरी, मेझर थिअरी, संाख्यकी, ऑपरेटर थिअरी, एरगॉडीक थिअरीनी फंक्शनल ऍनालिसीस या िषयांत त्यांनी काम केले. +त्यांनी लिहीलेली गणितातील काही पुस्तके फार प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही पुस्तकेनी त्यांचे प्रकाशक खालीलप्रमाणे: +पैकी सांतमितीय सदिशावकाश आणि मेझर थिअरी ही पुस्तके आजही पाठ्यक्रमात वापरली जातात. संच सिद्धांताची ओळख हे पुस्तक या प्रकारातील एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. +"मला गणिती व्हायचेय" हे त्यांचे आत्मचरित्र आहे, याचे मुळातील नाव फार मजेदार आहे, ते म्हणजे "I Want to Be a Mathematician: A Mathobiography". +अतिशय ओघवती शौली, सोपी भाषा, गणिती चिह्नांचा कमीत कमी वापर आणि अत्यंत नेमके मुद्दे मांडणे हे त्यांच्या लिखाणाची वैशिट्ये आहेत. +एखाद्या सिद्धांताची सिद्धता लिहून झाल्यावर उजव्या वाजूला भरीव चौरस ∎ काढून सिद्धता संपली असे सुचित करण्याची पद्धती हाल्मोसने सुरू केली असे मानले जाते. त्यामुळे या चौरसास "हाल्मोस" असेही म्हणतात. +आजकल भरीव चौकोनाएवजी पोकळ चौरस काढण्याची प्रथा आहे, तरीही त्यास हाल्मोस असेच म्हणतात. +शिवाय तर्कशास्त्रातील "if and only if" म्हणजेच "फक्त आणि फक्त" या लांबलचक समूहास "iff" असे संक्षिप्त केल्याचे श्रेयही हाल्मोसला दिले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15243.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fff326b9981b17d828fd31be535eb26fc7e40bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15243.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल रॉनल्ड रायफेल (१९ एप्रिल, १९६६:बॉक्स हिल, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हे  ऑस्ट्रेलियाकडून ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत. [१] हे १९९९ विश्वचषक विजेत्या संघाचा तसेच १९९६ च्या उपविजेत्या संघाचा भाग होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर रायफेल क्रिकेट पंच झाले. हे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15246.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fff326b9981b17d828fd31be535eb26fc7e40bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15246.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल रॉनल्ड रायफेल (१९ एप्रिल, १९६६:बॉक्स हिल, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हे  ऑस्ट्रेलियाकडून ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत. [१] हे १९९९ विश्वचषक विजेत्या संघाचा तसेच १९९६ च्या उपविजेत्या संघाचा भाग होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर रायफेल क्रिकेट पंच झाले. हे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1526.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5f61f11a9ba985f883c73c35b164bb893b9c0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1526.txt @@ -0,0 +1,33 @@ + +श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. +हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की येथे जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद,लिंगभेद नाही.त्यामुळेच विठ्ठलाचे विटेवर चरण समान आहेत. +या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे. +काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरू होतो. +यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले. +पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. +[१] +श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. +या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. +येथे ह.भ.प. ऐश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. +ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे. +[१] +सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरू होतो. +भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरू होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. +श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरू होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते. +प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो. +याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. +[२] +भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले. +डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री +भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी,खोकरमोहा,करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. +संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे. +[३] +[४] +महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे. +श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते.[१] +श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[५] +भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[६] +[७] +आवजीनाथ महाराज diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15290.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0215bf227ba5a1aefbb825aa43f28bb76dca45ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15290.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॉलीटीक्स ऑफ द फिमेल बॉडी: पोस्ट कोलोनियल विमेन रायटर्स ऑफ द थर्ड वर्ल्ड[१] हे केटू एच. कातरक द्वारा लिखित पुस्तक असून २००६ मध्ये रूटगर्स युनिव्हार्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित पुस्तक आहे. +या पुस्तकात वसाह्तोत्तर काळातील/ पार्श्वभूमीतील प्राथमिक साहित्यिक लिखाणांचे परीक्षण केलेले आहे. या लिखाणांचे परीक्षण लैंगिकता व स्त्री देह/शरीर याला केंद्रस्थानी ठेवून केलेले आहे. या लिखाणामधून येणाऱ्या वसाहतवाद व प्रतिकाराच्या सामायिक इतिहासाला लेखक अधोरेखित करतात. सुप्रसिद्ध लेखक अनिता देसाई, आम अटा एइडो व मेरले हॉजच्या लिखाणांचाही या पुस्तकात समावेश आहे. +अध्यापनक्षेत्र, स्त्रीवाद व साहित्य क्षेत्रात या पुस्तकाला चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे.[२][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15305.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c6a2296fa456a64aecdf82afd7fda208e7b922 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15305.txt @@ -0,0 +1 @@ +पॉलीवूड (उर्दू: پالېوډ) हा पाकिस्तानातील पेशावर मध्ये असणारा चित्रपट व्यवसाय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15315.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2568737f7e964f3e39638c87ef347d5c5a8671c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15315.txt @@ -0,0 +1 @@ +पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक भारतीय वैधानिक महामंडळ आहे आणि तिचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे आणि मुख्यत्वे भारतातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज प्रेषण करण्यात गुंतलेले आहे. पॉवर ग्रिड भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी सुमारे ५०% वीज त्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कवर प्रसारित करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15343.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875094cb028f50febf8fd21492e7ef136fc8d1b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15343.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असून देवगड पासून ३५ किमी अंतरावर आहे. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, पोंभुर्ले गाव ग्राम पंचायत आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ९२३.९९ हेक्टर आहे. पोंभुर्ले गावाची एकूण लोकसंख्या १,९१० लोकसंख्या आहे या गावात एकूण ३९२ घरे आहेत. राजापूर हे 37 किमी दूर असलेल्या पोंभुर्ले गावाचे सर्वात जवळचे शहर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15350.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ff9e80127cca9723f6bff78fbe677c3c59be57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15350.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोक काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15374.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2c268aa660c5d5c81951749b4e675f7f17eafd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15374.txt @@ -0,0 +1,4 @@ +पॉकेमॉन: ट्विलाइट विंग्स (薄 明 の 翼, हाकुमेइ नो त्सुबासा) एक जपानी मूळ नेट अ‍ॅनिमेशन मालिका आहे जी स्टुडिओ कलर्डोडो द्वारा निर्मित आहे[३] आणि पोकेमॉन कंपनीने यूट्यूबवर प्रदर्शित केले. +मालिका सातव्या भागात ६ ऑगस्ट २०२० रोजी संपली. तथापि, "तार्यांचे एकत्रिकरण" (EXPANSION ~星の祭~) शीर्षक एक विशेष भाग, पोकीमोन तलवार आणि शील्ड गेम्स, द आयल ऑफ आर्मर आणि द किरीट टुंड्रा या डाउनलोडसाठी योग्य सामग्रीवर आधारित, 5 नोव्हेंबर 2020 रोजी जपानीमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये 17 नोव्हेंबर 2020 रोजी झाला. [४] +  +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15378.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b30e9835bc9554f411ef6734b7f4d7b3bb6dcaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15378.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोखरकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15379.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fa8808edccb5142e295fd35cdfbb6cf9b06d6c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15379.txt @@ -0,0 +1 @@ +पोखरण हे भारताच्या राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आणि नगरपालिका आहे. हे थर वाळवंटातील एक दुर्गम स्थान आहे आणि भारताच्या पहिल्या भूमिगत अण्वस्त्र,क्षेपणास्त्र चाचणीचे प्रसिद्ध स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15388.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89b5c780271fca5b0b162352cb1e29be2a85f0ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15388.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा तथा पोखरण-१ हे १८ मे १९७४ रोजी भारताच्या पहिल्या यशस्वी अणुबॉम्ब चाचणीचे सांकेतिक नाव होते. राजस्थानमधील पोखरण टेस्ट रेंज या लष्करी तळावर भारतीय लष्कराने अनेक प्रमुख भारतीय सेनापतींच्या देखरेखीखाली बॉम्बचा स्फोट केला.[१] +युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या पाच स्थायी सदस्यांच्या बाहेरील देशाने पोखरण-I ही पहिली पुष्टी केलेली अण्वस्त्र चाचणी होती. अधिकृतपणे, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) ही चाचणी "शांततापूर्ण अणुस्फोट" म्हणून दर्शविली. या चाचणीनंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. यानंतर 1998 मध्ये पोखरण-2 या नावाने अणुचाचण्यांची मालिका करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15392.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dde63c9a43a4dc47b1d897783800017fd2bfb58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15392.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोखरणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15401.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d511fba5f296efb96ffb5c6963c8d521bea597d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15401.txt @@ -0,0 +1,5 @@ +पोखरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील +बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] + +या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15403.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a58d54ffa0807e23d69cc0e8746ce4781d753c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15403.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15407.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f21976f45dd88d5462e94d31d5db8b11040bebb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15407.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोखरनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15410.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0360c600eee9b884dd0f9789b1dd46b03378239b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15410.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15422.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e7ae908e063ebcc10c9980ad61ad5cec55ee63d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_15422.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉचेफ्स्ट्रूम दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. मूइरिव्हियेर नदीच्या काठी असलेले हे शहर जोहान्सबर्गपासून १२० किमी आग्नेयेस आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४३,४४८ होती. या शहराची स्थापना १८३८मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1548.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7b39f8008c97e426d137535baefd8b7b2491448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1548.txt @@ -0,0 +1,10 @@ +ध्रुव तारा, इंग्रजीत Pole Star, Polaris; Lodestar; North Star; Northern Star; Guiding Staर हा उत्तर गोलार्धात आकाशात उत्तरेकडे दिसणारा तारा आहे. Little Bear किंवा Ursa minor (मराठीत ध्रुवमत्स्य) या नावाने ओळकल्या जाणाऱ्या तारकापुंजातील हा सर्वात टोकाचा तारा असल्याने ध्रुव ताऱ्याला खगोलशास्त्रात Alpha Ursae Minoris -(α उर्सा माईनोरिस किंवा α यूएमआय) असे नाव आहे. पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये हा ४५ वा सर्वात उजळ तारा आहे. ध्रुव तारा पृथ्वीपासून सुमारे ४३४ प्रकाश वर्षे दूर आहे. पृथ्वीवरून जरी तो एक तारा असल्याचे दिसत असला तरी तो प्रत्यक्षात तो एका बहु-तारा प्रणालीचा हिस्सा आहे. या प्रणालीचा मुख्य तारा (ध्रुव "ए") हा एफ ७ श्रेणीतील प्रकाशित राक्षस तारा किंवा सुपरजायंट तारा आहे. सध्याच्या युगात ध्रुव तारा आकाशीय गोलाच्या उत्तर ध्रुवाजवळ स्थिरावलेला आहे, म्हणजेच जगातील उत्तर गोलार्धातील बहुतेक ठिकाणांपासून ध्रुव तारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर स्थित असल्याचे दिसते. या कारणास्तव, समुद्र किंवा वाळवंटासारख्या ठिकाणांहून येणारे प्रवासी तारे एकेकाळी ध्रुव ताऱ्यावरून दिशा ठरवत असत. +रात्री पृथ्वीचे रोटेशन (रोटेशन) जवळजवळ सर्व तारे हळूहळू आकाशात फिरत असतात, परंतु ध्रुव तारा स्थिर उत्तरेकडे जाणारा शोध घेतात. जर रात्रीच्या आकाशात कॅमेराचे लेन्स बऱ्याच दिवसांसाठी खुले ठेवले तर असे दिसते की चित्रातील सर्व तारे ध्रुवाभोवती फिरत आहेत. +(पोलॅरीस, आल्फा उर्सा मायनॉरिस). उत्तर खगोलात खगोलीय उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळचा व ध्रुवमत्स्य या तारकासमूहातील सर्वांत ठळक तारा. खगोलीय ध्रुवापासून फक्त ५५ मिनिटे हा दूर असल्याने नुसत्या डोळ्यांना स्थिर दिसतो, म्हणूनच याला आपण ध्रवतारा म्हणतो. +सप्तर्षीतील मरीची या ताऱ्याने योग्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी ध्रुवतारा ते वृत्त उलट बाजूने ओलांडतो. अगदी सूक्ष्मपणे पाहिल्यास चंद्राच्या दृश्य व्यासाच्या सु. चौपट व्यासाच्या अगदी लहान अशा लघुवर्तुळावर तो दररोज एक प्रदक्षिणा इतर ताऱ्यांप्रमाणेच करतो. याच्या सभोवार १०° पर्यंत नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एकही तारा नाही.  संपातचलनामुळे पृथ्वीचा आस आणि त्यामुळे खगोलीय ध्रुव स्थिर राहत नाही. +पृथ्वीचा आस २५,८०० वर्षांनी खगोलावर कदंबाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे कोणताही एकच तारा अनंतकाळपर्यंत ध्रुव राहणार नाही. ४,६०० वर्षांपूर्वी थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा ध्रुव होता, तर ५,३०० वर्षांनंतर अल्डरामिन (आल्फा सीफाय) हा होईल. हल्लीचा तारा २८,००० वर्षांनी पुन्हा ध्रुवतारा होईल. +हल्ली ध्रुवतारा व खगोलीय ध्रुव यांमधील अंतर कमी कमी होत आहे. १९६५ मध्ये ते ५४ मिनिटे होते, तर २१०२ साली हे २७ मिनिटांपर्यंत कमीतकमी होईल व नंतर ते वाढू लागेल. इ. स. पू. ३०० च्या सुमारास ध्रवतारा खरा स्थिर नसल्याने पिथिअस या ग्रीक खलाशांच्या लक्षात आले होते. +सप्तर्षीतील पहिले दोन तारे पुलह व ऋतू यांना साधणारी रेषा साडे चार पट वाढविली, तर ती ध्रुवताऱ्यातून जाते, ही ध्रुवतारा ओळखण्याची सोपी रीत होय.  ध्रुवतारा २·१ प्रतीचा, सेफीड प्रकारचा चल तारकात्रिकूट आहे. त्यांच्या तेजस्पंदनाचे एक आवर्तन ४ दिवसांत पूर्ण होते. हा सूर्यापेक्षा सु. २००० पट तेजस्वी, सूर्याच्या १०० पट व्यासाचा आणि ६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. +ध्रुव मंडळाचे तारे खालीलप्रमाणे आहेत - [१] +पृथ्वीची अक्ष मंद परंतु निश्चित वेगाने अडकते, ज्यामुळे कोणताही तारा त्याच्या खांबावर स्थिर राहात नाही. ध्रुव तारा सध्या उत्तर ध्रुवाच्या वर आहे परंतु हजारो वर्षांच्या कालावधीत बदलेल. पृथ्वीच्या या अक्षांच्या ट्रेंडमधील बदल असा आहे की दर २६,००० वर्षानंतर एक संपूर्ण चक्र पूर्ण केले जाते. याचा अर्थ असा आहे की जरी ध्रुव तारा पृथ्वीच्या ध्रुवापासून दूर जात असल्याचे दिसून येईल, परंतु आजपासून २६,००० वर्षांनंतर, ध्रुव तारा पुन्हा खांबाच्या वर असेल. सध्याही धुरा ध्रुव ता अक्ष अयनांश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आणत आहे . २१०० मध्ये, ते सर्वात गंभीर स्थितीत असेल आणि त्यानंतर ते ध्रुवापासून पुढे जाण्यास सुरुवात करेल.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_155.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9af4999df99576105be4f53a0b88eed44d8e84d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_155.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर २८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1589.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026dc108b5695914cb3f4951de9dc402da874f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1589.txt @@ -0,0 +1 @@ +डॉक्टर रोमँटिक (कोरियन: 낭만닥터 김사부; Nangmandakteo Gimsabu, इंग्लिश: Dr. Romantic) हान सुक-क्यू अभिनीत दक्षिण कोरियन दूरदर्शन मालिका आहे. त्याचा प्रीमियर 7 नोव्हेंबर 2016 रोजी एसबीएस वर झाला.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1599.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f45f2389f31b1e9ff60384abc504c67a423cae55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1599.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंद (संस्कृत: नंद) एक गाय-कळप प्रमुख आहे, आणि कृष्णाचा पालक-पिता, हरिवंश आणि पुराणांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहे. नंद हा ब्रज प्रदेशातील पर्जन्याचा पुत्र आहे, जो यादव राजा देवमिधाचा पुत्र आहे. तो गोकुलमचा प्रमुख आहे, जो यादव जमातीच्या सर्वात शक्तिशाली प्रदेशांपैकी एक आहे. त्याला कधीकधी राजा म्हणून संबोधले जाते. +नंद हा वसुदेवाचा चुलत भाऊ. मुलाच्या जन्माच्या रात्री वसुदेव आपल्या नवजात मुलाला, कृष्णाला नंदाकडे घेऊन जातो, जेणेकरून नंद त्याला वाढवू शकेल. यशोदेशी विवाह केलेला प्रमुख कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम या दोघांनाही वाढवतो. कृष्णाने त्याच्याकडून नंदनंदन (नंदाचा मुलगा) हे नाव घेतले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1605.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdf8d116556e065fbdc7d85e835e92a2553dfa4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1605.txt @@ -0,0 +1,4 @@ +नंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणाऱ्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती. +महापद्मानंद हा नंद घराण्याचा संस्थापक होता. यालाच अग्रमीन, उग्रसेन अशीही नावे आहेत. त्याला पंडुक, पांडुगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गोविशांक, दाससिद्धक, कैवर्त आणि धनानंद हे आठ पुत्र होते. उग्रसेनासह नऊ नंदराजांनी मगधावर राज्य केले. +महापद्मानंद हा पराक्रमी राजा होता. त्याने इक्ष्वाकु पांचाल, काशी, कलिंग, मिथिला, अश्मक व कुंतल या राज्यांना पराभूत करून विशाल साम्राज्य निर्माण केले. भद्रसाल नावाचा धाडसी सेनापती या राजाकडे होता. धनानंद हा नंद घराण्यातील शेवटचा राजा होय. धनानंदाच्या काळात मगधाचा साम्राज्यविस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बिहार, बंगाल आणि दक्षिणेकडे नांदेड, निझामाबादपर्यंत (अश्मक राज्य) झालेला होता. धनानंदाच्या काळात मगधाचे विशाल साम्राज्य भारतभर पसरलेले होते. हे प्राचीन भारताच्या इतिहासातले पहिले साम्राज्य होते. +नंदराजांनी लोकांवर अमानुष कर लावून प्रचंड संपत्ती गोळा केल्यामुळे प्रजाजनात असंतोष निर्माण झाला. आर्य चाणक्याचा अपमान धनानंदानेच केला होता. शेवटी चंद्रगुप्ताने भारतीय राज्ये व आर्य चाणक्याच्या मदतीने नंद साम्राज्यावर आक्रमण करून इ.स.पू. ३२३ मध्ये नंद घराण्याचा नाश केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1617.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c9d886586f19985f85011ec6edeae9786ac818f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1617.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1639.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a692374dbd9cd940339b782ab5f6ab066cdca23f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1639.txt @@ -0,0 +1,3 @@ +नंदलाल बोस (३ डिसेंबर, इ.स. १८८२:खरगपूर, पश्चिम बंगाल, भारत - १६ एप्रिल, इ.स. १९६६:कोलकाता, पश्चिम बंगाल) हे भारतीय चित्रकार होते. यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने नंदलाल बोस यांची चित्रे प्राचीन नसली तरीही भारतीय संस्कृतीचा वारसा असल्याचे जाहीर केले आहे. +बोस हे अबनिन्द्रनाथ टागोर यांचे शिष्य होते. त्यांच्या चित्रशैलीवर टागोर बंधूंचा तसेच अजिंठ्याच्या चित्रकलेचा प्रभाव आहे. +बोस १९९२मध्ये शांतिनिकेतनचे प्राचार्य झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1649.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3e71339740dca63f247f8fd27240c537acc7455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1649.txt @@ -0,0 +1,3 @@ +नंदा (८ जानेवारी, इ.स. १९४१ - २५ मार्च, इ.स. २०१४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची कन्या होय. त्यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरू आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. हिंदीशिवाय त्यांनी मराठी चित्रपटांतही अभिनय केला. +बेबी नंदा यांनी इ.स. १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरून जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1671.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d13226f4066ba3072d9329f7dad84aefb682c5dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1671.txt @@ -0,0 +1,4 @@ +नंदिनी बेडेकर या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1676.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b9c8c8e9be924fab109a29204697d5475653fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1676.txt @@ -0,0 +1,13 @@ +नंदिनी सत्पथी (९ जून १९३१ – ४ ऑगस्ट २००६) ह्या भारतीय राजकारणी आणि लेखक होत्या. जून १९७२ ते डिसेंबर १९७६ पर्यंत त्या ओडिशाच्या मुख्यमंत्री होत्या. +नंदिनी सत्पथी यांचा जन्म ९ जून १९३१ रोजी कालिंदी चरण पाणिग्रही आणि रत्नमणी पाणिग्रही यांच्या पोटी तटीय पुरीच्या ब्राह्मण कुटुंबात झाला होता परंतु त्या कटक येथील पिठापूर येथे वाढल्या होत्या. [१] सत्पथीचे काका भगवती चरण पाणिग्रही यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ओडिशा शाखेची स्थापना केली. ते नेताजी बोस यांचे निकटचे सहकारी होते. +१९३९ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांना ब्रिटिश पोलिसांनी युनियन जॅक खाली खेचल्याबद्दल आणि कटकच्या भिंतींवर ब्रिटिश राजविरोधी पोस्टर चिकटवल्याबद्दल बेदम मारहाण केली. त्याचीच त्यावेळी सर्वत्र चर्चा झाली होती आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आग ओतण्याचे काम केले होते. +रेवेनशॉ कॉलेजमध्ये ओडिया भाषेमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण घेत असताना, त्या कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेत सामील झाल्या. १९५१ मध्ये, महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाढत्या खर्चाविरोधात ओडिशात विद्यार्थी आंदोलन सुरू झाले, ज्याच्या त्या नेत्या होत्या. पोलिस दलाने आंदोलकांवर हल्ला केला आणि त्यात नंदिनी सत्पथी गंभीर जखमी झाल्या. इतर अनेकांसह त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्यांची भेट देवेंद्र सत्पथीशी झाली जे स्टुडंट फेडरेशनचे आणखी एक सदस्य होते व नंतर त्यांचे पती. +१९६२ मध्ये ओरिसात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते; १४० सदस्यांच्या ओरिसा राज्य विधानसभेत काँग्रेस पक्षाचे ८० पेक्षा जास्त सदस्य होते. राष्ट्रीय स्तरावर भारतीय संसदेत अधिकाधिक महिला प्रतिनिधी याव्यात यासाठी चळवळ सुरू होती. विधानसभेने नंदिनी सत्पथी यांची राज्यसभे निवड केली, जिथे त्यांनी दोन वेळा काम केले. १९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्यानंतर, सत्पथी पंतप्रधानांशी संलग्न मंत्री बनल्या व माहिती आणि प्रसारण मंत्रालयात होत्या. +बिजू पटनायक आणि इतरांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे रिक्त झालेल्या पदांमुळे १९७२ मध्ये सत्पथी ओडिशात परतल्या आणि ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या. [२] [३] सत्पथी यांनी डिसेंबर १९७६ मध्ये पद सोडले [२] १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, त्या जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या गटाचा भाग होत्या जो मे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाला. जून १९७७ मध्ये ढेंकनाल येथून ओरिसा विधानसभेवर त्या निवडून आल्या [४] १९८० मध्ये, त्यांनी काँग्रेस (उर्स) उमेदवार म्हणून ती जागा जिंकली आणि १९८५ मध्ये अपक्ष म्हणून. १९९० मध्ये त्यांचा मुलगा तथागत सत्पथी यांनी जनता दलाचे उमेदवार म्हणून ढेंकनाल विधानसभेची जागा जिंकली. +राजीव गांधींच्या विनंतीवरून सत्पथी १९८९ मध्ये काँग्रेस पक्षात परतल्या. [५] त्यांनी २००० ची निवडणूक लढवली नाही व राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. +१९७७ मध्ये, सत्पथी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आणि त्या वेळी लागू असलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संभाव्य उल्लंघनाबाबत पोलिस तपास सुरू झाला. तपासादरम्यान त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला; व त्यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की भारतीय राज्यघटनेच्या कलम २० (३) ने त्यांना सक्तीच्या आत्म-गुन्हेगारीपासून संरक्षण दिले आहे; जे कोर्टाने मान्य केले. पुढील १८ वर्षांत सत्पथीने त्यांच्याविरुद्धचे सर्व खटले जिंकले.[६] +सत्पथी ह्या ओडिया भाषेतील लेखीका होत्या व त्यांचे काम इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित आणि प्रकाशित झाले आहे. ओडिया साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९९८ चा साहित्य भारती सन्मान पुरस्कार मिळाला. [७] [८] तस्लिमा नसरीन यांच्या लज्जाचे उडियामध्ये भाषांतर हे त्यांचे शेवटचे प्रमुख साहित्यिक काम होते.[९] +४ ऑगस्ट २००६ रोजी त्यांच्या भुवनेश्वर येथील घरी त्यांचे निधन झाले. [१०] +दोन मुलांपैकी तिचा धाकटा मुलगा तथागत सत्पथी बिजू जनता दलाचे ४ वेळा खासदार होते आणि दैनिक वृत्तपत्र (धरित्री आणि ओरिसापोस्ट)चे संपादक होते.[११][१२][१३] +९ जून, सत्पथी यांचा वाढदिवस, हा राष्ट्रीय कन्या दिन – नंदिनी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.[१४][१५] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1691.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a1fceae71828432948dbef0b8cf78ce62101f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1691.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदुरबार हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील ४ व धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1714.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72a7669f70890570929996c1949cf4e58d05c894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1714.txt @@ -0,0 +1 @@ +नंद्याल विधानसभा मतदारसंघ - १३९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. नंद्याल हा विधानसभा मतदारसंघ नंद्याल लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1728.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ea5db2531ae5dab97036bd6724c9fa2118a45c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1728.txt @@ -0,0 +1,3 @@ +काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही साडी नेसण्याची एक शैली आहे. महाराष्ट्रीय धोतर ज्या प्रकारे परिधान केली जाते त्याचप्रकारची ही शैली आहे. काष्ट या शब्दाचा अर्थ साडीला पाठीमागे बांधणे असा होतो.[१][२] ही साडी सामान्यतः नऊ गजांचे एकच कापड वापरून नेसली जात असल्याने तिला नऊवारी असे देखील संबोधले जाते.[३] त्याला अखंड वस्त्र असे संबोधले जाते, याचा अर्थ त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही पोशाखाची आवश्यकता नसते. हा पोशाख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण विविध क्षेत्रातील महिलांनी तो परिधान केला आहे.[४][५] हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परिधान केला जात नाही, तर महिलांनी भूतकाळात या पोशाख युद्धे देखील लढली आहेत आणि अजूनही नऊवारी परिधान करून अनेक महिला शेतात काम करतात.[६] +नऊवारी साडी ही पुरुषाच्या धोतराप्रमाणे दिसते. हिची लांबी नऊ वार अथवा गज -(९ यार्ड (८.२ मी) अंदाजे)-[७] असल्याने हिला नऊवारी साडी असे म्हटले जाते. ह्या नऊवारी साड्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील व शेतकरी महिला नेसतात. ही साडी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इ. राज्यात मुख्यत्वे आढळून येते. +शेतात किंवा इतर कामे करणाऱ्या बायका ही साडी घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखालपर्यंत नेसतात; तर घरांत, समारंभांसाठी किंवा इतर ठिकाणी ही साडी घोट्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे काम करण्यास, जलद वावर करण्यास, इतकेच नव्हे तर घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी सुरक्षित समजली जाई/ जाते. इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची नऊवारी साडी ही वेशभूषा होती आणि या वेशभूषेतूनच त्या रणांगणावर लढल्या.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1731.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..307fe2f40773e005825f9eccb8235996c033f9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1731.txt @@ -0,0 +1,4 @@ + ९०० - नऊशे   ही एक संख्या आहे, ती ८९९  नंतरची आणि  ९०१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: +900 - Nine hundred . + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1763.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..821ceb4b5123cb8d26d304755022b9049f85a32e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1763.txt @@ -0,0 +1,7 @@ + +नगमा (जन्म-२५ नोव्हेंबर १९७४ ) एक भारतीय राजकारणी आणि माजी अभिनेत्री आहे.[१] तेलुगू आणि तमिळ मधील घराण्या मुोगुडू (चित्रपट), कादलान, बाशा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहे. तिने बॉलिवूडमधून अभिनय सुरुवात केली आणि काही बॉलिवुड चित्रपट आणि इतर भाषांमध्ये काम केले. नगमा हिने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, भोजपुरी, पंजाबी आणि मराठी अश्या वेगवेगळ्या भाषेत काम केले आहे.[२] +नगमाचे पिता अरविंद प्रतापसिंह मोरारजी, त्यांचे पूर्वज राजस्थानमधील जेसलमेरचे असून शाही पार्श्वभूमीचे होते. पुढे ते गुजरात, पोरबंदर, नंतर मुंबईत स्थायिक झाले. तिचे महान आजोबा गोकुळदास मोरारजी हे शिपिंग, टेक्सटाईल, शेती आणि फार्मास्युटिकल उद्योगाचे एक प्रख्यात व्यापारी होते.त्यांची आई महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रातील होती. ती काझी स्वतंत्रता सेनानी कुटुंबातील होती आणि तिचे मूळ नाव श्यामा काझी होते, परंतु तिला आता सीमा म्हणून ओळखले जाते.[३]१९६९ मध्ये त्यांनी मुंबईत सीसीआय क्लबमध्ये मोरारजीशी विवाह केला. +नगमा हिचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे, तिला तिच्या मूळ नावाप्रमाणेच नंदिता म्हणतात.[४] ऑगस्ट १९७४ मध्ये मोरारजीच्या घटस्फोटानंतर नगमाची आई यांनी मार्च १९७५ मध्ये एक चित्रपट निर्माते चंदर सदन यांच्याशी विवाह केला.चंदन सदन यांना तीन मुले होती.[५] +नगमाचे दोन भाऊ,धनराज आणि युवराज असे आहे.तिने एका मुंबई रिपोर्टरला सांगितले की, "मला अभिमान आहे की मी एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. माझ्या आईने कायदेशीरपणे माझ्या वडिलांशी लग्न केले, दिव्य श्री अरविंद मोरारजी, सीसीआय क्लब, मुंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले.नगमाची आईने तिला त्साहित केली.[६] +१९९० मध्ये नगमाची पहिली फिल्म 'बागी: ए रिबेल फॉर लव' हा हिंदी सिनेमाचा सातवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. करिश्मा कपूरसोबत, १९९४ च्या सुमारास अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर तीही महिला नेतृत्वाची एक होती. या चित्रपटांनंतर, तिने आपल्या मित्र दिव्या भारतीच्या आज्ञेनुसार तेलुगु आणि तमिळ चित्रपटांत काम केले. तिचे स्थानांतर समजावून सांगताना, तिने संपूर्ण देशभरातून अभिमानी होण्यासाठी विविध संस्कृती आणि तिच्या हालचाली आणि उत्कटतेची जाणीव करून संपूर्ण भारतभर प्रवास करण्याची भावपूर्ण भूमिका आणि तिच्या स्वभावाच्या दृष्टीने ती काम करण्याच्या गुणवत्तेबाबत अधिक जाणीवपूर्वक आहे. +तिची तेलगू चित्रपटांमधे १९९२चा चिरंजीवीसह घराना मुोगुडी, नागार्जुन अकुनीनी आणि अब्दुल अब्दुल्ला आणि एन. टी. राम राव आणि मोहन बाबू यांच्यासोबत मेजर चंद्रकांतचा समावेश आहे. तिचे तमिळ चित्रपटांमध्ये रजनीकांत व बाशाने १९९४ च्या काद्लानमध्ये प्रभू देव यांचा समावेश केला होता.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1771.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbbb4f4fecef01f8859ea836b02b60d443ce53ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1771.txt @@ -0,0 +1 @@ +नागरकुर्नूल हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1772.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e519ecbafc7441f9e2649f903410ea36614426a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1772.txt @@ -0,0 +1,2 @@ + नगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1796.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b04452413cce3452683c6451e59c47243984ccf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1796.txt @@ -0,0 +1,12 @@ +'नग्नसत्य' लेखीका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा आंतरवेध घेणारे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.[१] या ग्रंथामध्ये मुख्यत्वे बलात्कारासबंधीत अनेक घटनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बलात्काराच्या प्रश्नाचा शोध लेखीका मुक्ता मनोहर यांनी घेतलेला आहे. +मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. ज्यात त्या अनेक केसेस चा आढावा घेऊन अशा घटनांना राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसे हाताळले जाते याची सविस्तरपणे मांडणी करतात. या पुस्तकात बलात्कारी वेताळाची कहाणीच्या स्वरुपात मांडणी केली आहे. बलात्कारी वास्तवाचा वेध म्हणजे बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरा आणि स्वतः स्त्रीयांनाच अशा घटनांना कारणीभूत ठरवल्या जाते, असा प्रयत्न समाज पातळीवर सुरू आहे, हे त्या लक्षात आणून देतात. आणि पुरुष हा कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे लक्षात आणून देतात. +“बलात्काराच्या घटना जेव्हा न्याय मागण्यासाठी न्यायालयाकडे नेल्या जातात, तेव्हा त्यांची कशा प्रकारे खिल्ली उडवली जाते आणि बलात्कारित स्त्रिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, किवा ती स्त्रीच पुरुषांना मोहात पाडते आणि पुरुष विकृतीतून बलात्कार होतो अशी कारणे पुढे येत असल्याचे लेखिका सिद्ध करतात."बलात्काराच्या समस्येचा शोध घेताना, अशा घटना सत्ता-संबंधातून, जातीच्या कारणावरून, किवा बाजारपेठीय वर्चस्ववाद याला कारणीभूत ठरतात हे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले गेले आहे. परंतु बलात्काराच्या घटने मध्ये पिढीत झालेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना, जनसमुदाय, माध्यमे , आणि काही निवडक लोकांनी घेतलेला आक्षेप यांची भूमिका महत्त्वाची असते. +या पुस्तकात बलात्कारी पुरुषाशी काल्पनिक स्वरुपात संवाद साधून प्रत्यक्षात त्याची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. +प्रकाशक पाटकर यांच्या मते चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करताना ते अश्‍लील न होऊ देता कमालीचे भेदक होईल याची काळजी घेतली आहे.[२] पुस्तक लेखनासाठी लेखिकेने विक्रम-वेताळ या लोककथेचा स्वरूप वापरले आहे.[३] प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार सुरुवातीला या स्वरुपामध्ये हा विषय वाचताना अवघडलेपण येते. पण नंतर त्याच्या लवचीकपणाचे फायदे लक्षात येतात. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून कथन करता येणे, विश्लेषण करत केलेली चर्चा, तर कधी आत्मसंवाद, तर . बलात्कारी वेताळाशी पंचवीस रात्रींमध्ये झालेला संवाद असे रूप घेऊन पुस्तक समोर येत असल्यामुळे बलात्काराचे भयानक रूपही थोडे सौम्य आणि वाचनीय होते. लेखनाच्या वेताळ पंचविशी या फॉर्ममुळे लेखन अतिभडक व कर्कश होण्याचा धोका, अथवा दुसरीकडे अतिहळवे होण्याचा आणि विषयाचे गांभीर्य कमी होण्याची भीती आणि तोचतोपणाही येण्याचा धोकाही टळला आहे.[४] +मुक्ता मनोहर यांच्या म्हणण्यानुसार व्यापक सामाजिक संदर्भात त्यांनी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. "स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरे नाही. टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत" अशी टीका लेखिका मुक्ता मनोहर त्यांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून करतात. [३] +दीपा कदम यांच्या मतानुसार बलात्काराच्या सत्यघटना कथा स्वरूपामध्ये वाचताना बलात्काराच्या विविध कंगोऱ्यांचा विचार केला गेला आहे. स्त्री आणि पुरुष संबंधाच्या नाण्याची चिकित्सा केवळ बलात्कारापुरती सीमित न ठेवता लेखिकेने मानवी इच्छा, पुरुषी वर्चस्व, भांडवलशाही, चंगळवाद यांच्या चष्म्यातूनदेखील बलात्काराशी संवाद साधला आहे. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, हे प्रमाण मान्य करून बलात्काराच्या घटनेची चिरफाड केली आहे. पुरुषाने जबरदस्तीने स्त्रीवर केलेले आक्रमण किंवा संभोग या वर्तुळाच्या बाहेर जाऊन बलात्काराविषयीची केलेली चर्चा या विषयावर वाचकास विचार करायला भाग पाडते. +नीला शर्मा यांच्या मते घरांघरातल्या लेकी-सुनांना सावधपणाचा मंत्र देण्याबरोबरच पुरुषांना बलात्काराच्या मोहापासून रोखण्याची क्षमतासुद्धा मुक्ता मनोहर यांनी मांडलेल्या कथानकांतून जाणवते.[२] +म.टा.सतंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या सांगण्यानुसार विकासाच्या फूटपट्ट्या लावताना आयटी हब आणि बीपीओजचे चकाकते मनोरे दाखवण्याची पद्धत आहे. पण त्यापाठोपाठ आलेला भयंकर चंगळवाद बलात्काराच्या रूपात प्रकटतो त्याची उदाहरणं देत मुक्ता मनोहर लिखित वेताळ पंचविशी सुरू होते. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरात घडलेल्या घटनांचा संदर्भ देताना या शहरांवर विश्वास टाकत कारकीर्द करायला आलेल्या मुलींच्या वाट्याला आलेले बलात्कार नयना, प्रतिमा आणि ज्योतीच्या उदाहरणांमधून भेटतात. बाणखेले यांच्या मतानुसार गुडगाव तर गुंडांचंच शहर, तर राजधानी दिल्ली आता देशाचं रेप कॅपिटल झालीय. या भागातल्या गॅंग रेपच्या घटना विकासाच्या रंगीत चित्रांमागचं नग्नसत्य उघड करतात.[४] रक्षकच भक्षक होतात हे तर वारंवार दिसणारं वास्तव आहे. पोलिस कोठडीत होणारे मुलीवर बलात्कार, वेश्येचा तिच्या शरीरावर हक्कच नाही अन् तिच्याशी संग करायला तिच्या संमतीचीही गरज नाही, अशा आशयाच्या चर्चा या देशातल्या कोर्टात झडतात. त्याही पुढे जात न्याययंत्रणाही बलात्कारित स्त्रियांकडे पुरुषी नजरेनं पाहते.[४] +मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.[४] बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात. +भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.[४] +साप्ताहिक सकाळ मध्ये दीपा कदम यांनी त्यांच्या लेखातून, 'पुस्तकात अनेकदा नको इतकी खोलातली माहिती दिली जाते अशी टीका केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार, 'बलात्कारी वेताळ पुस्तकात सतत तो निर्गुण निराकार असल्याचा (कंटाळा यावा इतक्या वेळा) दावा करतो. पण त्याचे सगळे चेहरे लेखिकेने उघड केले आहेत. युद्धखोरी, दहशतवाद, पुरुषसत्ताकता, बाजारपेठेची हुकूमशाही, चंगळवाद, मूलतत्त्ववाद या सगळ्यांशी नाते सांगणाऱ्या बलात्कारी वेताळाला संपवण्यासाठी काय करायचे, हे मात्र थोडक्यात गुंडाळले आहे..[४] बुकगंगा डॉट कॉमवरील सर्वसामान्य वाचक संतोष पाटील यांच्या पुस्तक-समीक्षणानुसार पुस्तकाच्या मलपृष्ठावरील दाव्यास अनुसरून बलात्कारी संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली याची माहिती प्रत्यक्ष पुस्तकात मिळत नाही. पुस्तक भारतीय पुरुष प्रधान संस्कृती आणि धर्मग्रंथांवर पुरेशी टीका करत नाही. लेखिकेने एक गंभीर विषय बालिशपणे हाताळला आहे.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1829.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6bc8aaa2e5dfa78b5a95ab97e3e315ce44da651 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1829.txt @@ -0,0 +1,2 @@ +नजूबाई गावित (जन्म- १० जानेवारी, इ.स. १९५० बोद्रेपाडा, साक्री, धुळे)या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत.'श्रमिक महिला संघ' स्थापन केला.आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. +सत्यशोधक मार्क्‍सवादी चळवळीत आदिवासी स्त्रियांचं नेतृत्व करण्याचे कार्य नजूबाई गावितांनी केल.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1844.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..736a128c2e4d9f26a4d77809d16b4a060cbf5250 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1844.txt @@ -0,0 +1,14 @@ +झी टॉकीज +निखिल साने +अमित फाळके +झी टॉकीज, + +नटरंग हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. +या चित्रपटात चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या एका सृजनशील माणसाची संघर्ष-कथा मांडलेली आहे. एक तरुण पहिलवान गुनवंतराव कागलकर उर्फ़ 'गुणा' (अतुल कुलकर्णी) याला तमाशामध्ये राजाची मध्यवर्ती भूमिका करायची मनापासून इच्छा असते. ती न मिळाल्याने शेवटी तो स्वतःच तमाशाचा फड काढतो. आणि पुढे... +या चित्रपटाची कथा आनंद यादव यांच्या 'नटरंग' या कादंबरीवर आधारलेली आहे. +नटरंग १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. +प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २१ दिवसात नटरंगने ७ कोटी रु.ची कमाई केली.[ संदर्भ हवा ] +रवी जाधव ( १९७१) यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समधून कला शाखेची पदवी घेतलेली आहे. त्यांनी अनेक भाषांमधील जाहिरात क्षेत्रात कला-दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. त्यांना जाहिरात क्षेत्रातील कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. नटरंग हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होत. +या चित्रपटाचे संगीत ही सर्वात जमेची बाजू आहे. आजच्या काळातले आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा / पटकथा मुख्यत्वे लोककला आणि लोकसंगीत (तमाशा) यावर आधारलेली असल्यामुळे त्या अनुषंगाने संगीत रचण्यात आलेले आहे. पिंजरा नंतर मराठीमधला हा एक महत्त्वाचा तमाशावर आधारित संगीत असलेला हा चित्रपट आहे. 'नटरंग'चे संगीत बरेच गाजले. +हा चित्रपट मामि (मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज)मध्ये प्रदर्शनापूर्वी दाखवला गेला. या चित्रपटाला चित्रपट रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. +मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असतानाच या चित्रपटाने परत एकदा जादू करून दाखवली व मोठी कमाई केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_185.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9096813032ae2c2eec2569d7976c0fa76221b3c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_185.txt @@ -0,0 +1,8 @@ + दोनवाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_186.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..368b9b708a36f58c9bec2359797aa704f8264053 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_186.txt @@ -0,0 +1,8 @@ + दोनवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1870.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12251954ca2ec246ab365b166f8dd54702206d3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1870.txt @@ -0,0 +1,2 @@ +नडगदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_188.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbdcb76c46da10d56a8de225ae35eb5d53cd38d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_188.txt @@ -0,0 +1,2 @@ +दोनवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1880.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e10cfa9032eb00c65d9fa03b5b5c21c71a920667 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1880.txt @@ -0,0 +1 @@ +नडियाद विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ खेडा जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_190.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfaa433b142cf9fade780423f61833c0f861d3d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_190.txt @@ -0,0 +1,3 @@ + २०० - दोनशे   ही एक संख्या आहे, ती १९९  नंतरची आणि  २०१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: +200 - Two hundred . + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1930.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a5f9d87b1953e6cc9fbfe6f337b22ef6352fa8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1930.txt @@ -0,0 +1,4 @@ +नदीमधील डॉल्फिन हे फक्त दक्षिण आशियातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांमध्ये मिळतात. भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांत हे डॉल्फिन असतात. हे डॉल्फिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या डॉल्फिनांसाठी बिहारमध्ये विक्रमशीला मरीन पार्क नावाचा प्रदेश राखीव ठेवला गेला आहे. इ.स. १९९८ पर्यंत ही एक प्राण्यांची वेगळी जात म्हणून ओळखली जात होती. पण १९९८ मध्ये हे डॉल्फिन आहेत असे जाहीर झाले. या डॉल्फिनांमध्ये मध्ये दोन जाती आहेत, गंगा डॉल्फिन आणि सिंधू डॉल्फिन. गंगा डॉल्फिन हे ब्रह्मपुत्रा, गंगा व त्यांच्या उपनद्यांमध्ये मिळतात. सिंधू डॉल्फिन हे सिंधूबरोबरच सतलज आणि बियास या नद्यांमध्येपण मिळतात. हा प्राणी भारताने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे. +तरुण भारत मधील बातमी[permanent dead link] +इंडियन एक्सप्रेस +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1965.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d8f844c09a851792be7e09b3642b89f1e6d7183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1965.txt @@ -0,0 +1,3 @@ +नवाब मलिक हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] +नवाब मलिक सध्याचे गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री देखील आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आहेत.[ संदर्भ हवा ] +ते 1996, 1999, 2004 मध्ये नेहरू नगर (विधानसभा मतदारसंघ) आणि 2009 मध्ये मुंबईतील अणुशक्ती नगर (विधानसभा मतदारसंघ) येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1979.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6753afda5b7570c72fe164d2ccc085c1a8015f03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1979.txt @@ -0,0 +1,3 @@ + +इ.स. १९८० साली प्रदर्शित झालेला नमक हलाल हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, वहीदा रहमान व शशी कपूर यांनी काम केले आहे. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1983.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6753afda5b7570c72fe164d2ccc085c1a8015f03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1983.txt @@ -0,0 +1,3 @@ + +इ.स. १९८० साली प्रदर्शित झालेला नमक हलाल हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, वहीदा रहमान व शशी कपूर यांनी काम केले आहे. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1998.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..339b8142685caac6e7c07e5c75329d923ef65f05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1998.txt @@ -0,0 +1,8 @@ + नमसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2000.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c2f210663719b73005ac7912eff9f85543c1338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2000.txt @@ -0,0 +1 @@ +नमसाई भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2006.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af7009e2942182f3d7b628c18f0ed63e2aba0b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2006.txt @@ -0,0 +1,11 @@ +नमाज (उर्दू: نماز) किंवा सालाह (अरबी: لوة), हा प्रार्थनेसाठी एक पर्शियन शब्द आहे, जो उर्दू मध्ये सलत या अरबी शब्दाचा समानार्थी आहे. कुराण शरीफमध्ये नमाज शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे आणि प्रत्येक मुस्लिम स्त्री आणि पुरुषाला ताकीदसह नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. इस्लामच्या सुरुवातीपासून नमाजची प्रथा आहे आणि ती वाचण्याचा आदेश आहे. हे मुस्लिमांचे मोठे कर्तव्य आहे आणि त्याचे नियमित पठण करणे पुण्य आहे आणि त्याग करणे हे पाप आहे. इस्लाममध्ये प्रत्येक मुस्लिमावर पाच कर्तव्ये आहेत, जी प्रत्येक मुस्लिमावर आवश्यक आहेत, म्हणजेच ते कर्तव्य आहे. या पाच फर्दांपैकी एक फर्ज नमाज आहे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते, प्रत्येक प्रार्थनेची वेळ वेगळी आहे, पुरुष, मुस्लिम, मशिदीत नमाज अदा करणे आवश्यक आहे आणि महिलांनी घरी नमाज अदा करणे आवश्यक आहे. महिला मशिदीत नमाज अदा करावी. पुरुषाने घरी नमाज अदा करणे आवश्यक नाही, जर काही कारणास्तव मशिदीत जाणे शक्य नसेल, तर माणूस घरी नमाज अदा करू शकतो, इस्लाममध्ये ही अट आहे. +प्रत्येक मुस्लिमाला दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचा कायदा आहे. +नमाज अदा करण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिम वुधू करतो म्हणजे घोट्यांसह दोन्ही हात धुणे, नाक धुणे, नाक स्वच्छ करणे, चेहरा धुणे, कोपरापर्यंत हात धुणे, ओले हात डोक्याच्या केसांवर घासणे आणि दोन्ही हात धुणे. पाय फर्ज नमाजसाठी "अजान" दिली जाते. नमाज आणि अज़ानमध्ये काही मिनिटांचे अंतर असते.[2] +उर्दूमध्ये अझानचा अर्थ (कॉल) असा होतो. नमाजपूर्वी अजान दिली जाते जेणेकरून जवळच्या मुस्लिमांना नमाजची माहिती मिळेल आणि ते सांसारिक कामे सोडून देवाची उपासना करण्यासाठी काही मिनिटांसाठी मशिदीत येतात. सुन्नत/नफल नमाज एकट्याने आणि फर्ज गटासह (जमात) पठण केले जाते. फर्ज नमाज एकत्र (जमात) पठण केले जाते ज्यामध्ये एक व्यक्ती (इमाम) समोर उभा असतो, ज्याला इमाम म्हणतात आणि बाकीचे एका ओळीत उभे असतात आणि मागे उभे असतात. इमाम प्रार्थना करतो आणि इतर त्याच्या मागे जातात. +नमाज अदा करण्यासाठी, एक मुस्लिम मक्का (किब्ला) तोंड करून उभा राहतो, नमाजची इच्छा करतो आणि नंतर "अल्लाह अकबर" म्हणत तकबीर म्हणतो. यानंतर दोन्ही हात कानापर्यंत वर करून नाभीजवळ उजवा हात डाव्या हाताला असेल अशा प्रकारे बांधा. तो मोठ्या आदराने उभा आहे, त्याचे डोळे त्याच्या समोर जमिनीवर आहेत. त्याला समजते की तो अल्लाह समोर उभा आहे आणि अल्लाह त्याला पाहत आहे. +काही दुआ वाचतो आणि कुराण शरीफचे काही पठण करतो, ज्यामध्ये फातिह (कुराण शरीफचा पहिला सूरा) वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर इतर सूर आहेत. कधी उच्च तर कधी कमी स्वरात वाचा. यानंतर तो खाली नतमस्तक होतो ज्याला रुकू म्हणतात, नंतर तो उभा राहतो ज्याला क्वमा म्हणतात, नंतर त्याचे डोके साष्टांग नमस्कार करतो. काही क्षणांनंतर तो गुडघे टेकतो आणि मग सिजदामध्ये डोके टेकवतो. मग थोड्या वेळाने ती उभी राहते. या सर्व क्रियाकलापांमध्ये, तो लहान प्रार्थना देखील करतो ज्यामध्ये अल्लाहची स्तुती केली जाते. अशा प्रकारे नमाजची एक रकात संपते. मग तो त्याच प्रकारे दुसरी रकत पठण करतो आणि सिजदा नंतर तो गुडघे टेकतो. मग तो प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे नमस्कार करतो. यानंतर, तो अल्लाहकडे हात वर करतो आणि प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे दोन रकात प्रार्थना पूर्ण करतो. वितर नमाज तीन रकात पठण केले जाते. सर्व नमाज अदा करण्याची पद्धत कमी-अधिक आहे. +अजान (अरबी: أَذَان [ʔaˈðaːn]), अथान, अधाने (फ्रेंचमध्ये)[१], अजान/अजान, अझान/अझान (दक्षिण आशियामध्ये), अजान (आग्नेय आशियामध्ये), आणि इझान (बाल्कन आणि तुर्कीमध्ये) म्हणून लिप्यंतरित केले जाते. ), इतर भाषांमध्‍ये, मस्जिदमध्‍ये इस्लामिकसार्वजनिक प्रार्थनेसाठी आवाहन (सालाह) दिवसाच्या विहित वेळी मुएझिनद्वारे केले जाते. +एखाद्या विश्वासातील सहभागींना सामूहिक उपासनेला उपस्थित राहण्यासाठी किंवा प्रार्थनांचा आवश्यक संच सुरू करण्यासाठी एक समन्स आहे. कॉल हा दूरसंचाराच्या सर्वात प्राचीन प्रकारांपैकी एक आहे, मोठ्या अंतरावरील लोकांशी संवाद साधणारा. सर्व धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे आणि अनेक प्रमुख धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे.[२] +दिवसाच्या पाच वेळेच्या नमाज व्यतिरिक्त, इतर काही प्रार्थना आहेत, ज्या सामूहिक आहेत. पहिली नमाज जुम्हा (शुक्रवार) आहे, जी झहराच्या ठिकाणी सूर्यास्तानंतर अदा केली जाते. यामध्ये इमाम नमाज अदा करण्यापूर्वी भाषण देतो, त्याला खुत्बा म्हणतात; यामध्ये अल्लाहच्या स्तुतीशिवाय मुस्लिमांना धार्मिकतेची शिकवण दिली जाते. दुसरी नमाज ईदुल फित्रच्या दिवशी अदा केली जाते. हा मुस्लिमांचा सण आहे, ज्याला उर्दूमध्ये ईद म्हणतात. रमजानच्या संपूर्ण महिन्यासाठी उपवास (संपूर्ण दिवस उपवास) केल्यानंतर नवीन चंद्र उगवल्यानंतर रात्रीच्या दुसऱ्या दिवशी मानले जाते. तिसरी नमाज ईद अल-अधाच्या निमित्ताने अदा केली जाते. या ईदला त्यागाची ईद म्हणतात. या प्रार्थना सामान्य प्रार्थनेप्रमाणेच पठण केल्या जातात. फरक एवढाच आहे की पहिल्या रकात तीन वेळा, सूराच्या आधी आणि पुन्हा दुसऱ्या रकात आणखी तीन वेळा, रुकूच्या आधी हात कानापर्यंत वर उचलावा लागतो. प्रार्थनेनंतर, इमाम खुत्बा देतो, जो ऐकणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये धार्मिकता आणि चांगुलपणा करण्याचे निर्देश आहेत. +अशा काही प्रार्थना देखील आहेत ज्यांचे पठण न केल्याबद्दल कोणताही मुस्लिम दोषी नाही. यातील सर्वात महत्त्वाची नमाज तहज्जुद नमाजला दिली जाते. ही प्रार्थना रात्रीच्या शेवटच्या प्रहरात केली जाते. आजही अनेक मुस्लिम या नमाजचे जोरदार पठण करतात. इस्लाममध्ये अंत्यसंस्कारालाही खूप महत्त्व आहे. त्याची स्थिती प्रार्थनेसारखी आहे. मुस्लीम मरण पावला की त्याला आंघोळ करून दोन पांढऱ्या कपड्याने झाकले जाते, ज्याला कफन म्हणतात, आणि नंतर अंत्यसंस्कार मोकळ्या मैदानावर नेले जाते, जर पाऊस पडत असेल तर मशिदीमध्ये अंत्यसंस्कार करता येतात. तिथे इमाम जिनाझाच्या मागे उभा असतो आणि इतर त्याच्या मागे रांगेत उभे असतात. या प्रार्थनेत रुकू किंवा सिजदा नाही, फक्त एक हात जोडून उभा राहतो आणि दुआ पाठ केली जाते. +रकात (अरबी: ركعة rakʿah, उच्चारित [ˈrakʕah]; अनेकवचन: ركعات rakaʿāt) मुस्लिमांनी विहित अनिवार्य प्रार्थनेचा भाग म्हणून केलेल्या विहित हालचाली आणि विनवण्यांचा एकच पुनरावृत्ती आहे ज्याला सालाह किवाँ नमाज़ म्हणून ओळखले जाते. मुस्लिमांद्वारे पाळल्या जाणाऱ्या पाच रोजच्या नमाजांपैकी प्रत्येकामध्ये अनेक रकात असतात.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2007.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5f29c4059d91b03c8f47e27d530760e18f0a5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2007.txt @@ -0,0 +1,20 @@ +नमाज वेळा (Namaz Time) म्हणजे प्रार्थनेच्या वेळा जेव्हा मुस्लिम नमाझ करतात. हा शब्द प्रामुख्याने शुक्रवारच्या प्रार्थनेसह पाच दैनंदिन प्रार्थनांसाठी वापरला जातो, जी सामान्यतः धुहरची नमाझ असते परंतु शुक्रवारी सामूहिक नमाझ करणे बंधनकारक असते. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की मोहम्मद पैगंबर यांना अल्लाहने सलाहची वेळ शिकवली होती. +जगातील मुस्लिमांसाठी नमाझ वेळा मानक आहेत, विशेषतः फरद नमाझ वेळा. ते सूर्य आणि भूगोलाच्या स्थितीवर अवलंबून असतात. नेमक्या सालाहच्या वेळांबाबत वेगवेगळी मते आहेत, इस्लामिक विचारांच्या शाळा किरकोळ तपशीलांमध्ये भिन्न आहेत. सर्व विचारसरणी सहमत आहेत की कोणतीही नमाझ निर्धारित वेळेपूर्वी केली जाऊ शकत नाही. +मुस्लिम दिवसातून पाच वेळा नमाझ करतात, त्यांच्या नमाज फजर (पहाटे), धुहर (दुपारनंतर), अस्र (दुपार), मगरीब (सूर्यास्तानंतर), ईशा (रात्री) म्हणून ओळखल्या जातात, मक्काकडे तोंड करून. प्रार्थनेच्या दिशेला किब्ला म्हणतात; मुहम्मदच्या मदिना येथे स्थलांतरानंतर सुमारे एक वर्षानंतर, 624 सीई मध्ये मक्का बदलण्यापूर्वी सुरुवातीच्या मुस्लिमांनी सुरुवातीला जेरुसलेमच्या दिशेने नमाझ केली. +पाच प्रार्थनेची वेळ ही रोजच्या खगोलीय घटनांद्वारे परिभाषित केलेले निश्चित अंतराल आहेत. उदाहरणार्थ, मगरीबची नमाझ सूर्यास्तानंतर आणि पश्चिमेकडून लाल संधिप्रकाश गायब होण्यापूर्वी कधीही करता येते. मशिदीमध्ये, मुएझिन प्रत्येक मध्यांतराच्या सुरुवातीला प्रार्थनेची आह्वान प्रसारित करतो. कारण प्रार्थनेची सुरुवात आणि शेवटची वेळ सौर दैनंदिन गतीशी संबंधित आहे, ती वर्षभर बदलत असतात आणि स्थानिक वेळेनुसार व्यक्त केल्यावर स्थानिक अक्षांश आणि रेखांशावर अवलंबून असतात. +[टीप 1] आधुनिक काळात, विविध धार्मिक किंवा वैज्ञानिक मुस्लिम देशांतील एजन्सी प्रत्येक परिसरासाठी वार्षिक नमाझ वेळापत्रक तयार करतात आणि स्थानिक नमाझ वेळा मोजण्यासाठी सक्षम इलेक्ट्रॉनिक घड्याळे तयार केली गेली आहेत. भूतकाळात, काही मशिदींमध्ये खगोलशास्त्रज्ञांना मुवाक्किट म्हणतात जे गणितीय खगोलशास्त्र वापरून नमाझ वेळेचे नियमन करण्यासाठी जबाबदार होते. +इस्लामिक संदेष्ट्याच्या हदीस (कथित म्हणी आणि कृती)च्या आधारे, 632 मध्ये मुहम्मदच्या मृत्यूनंतरच्या दशकांमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांनी पाच मध्यांतरांची व्याख्या केली होती. अबू बकर आणि मुहम्मदच्या इतर सुरुवातीच्या अनुयायांना अ‍ॅबिसिनियामधील सीरियन ख्रिश्चनांच्या प्रार्थनेच्या या निश्चित वेळेस सामोरे जावे लागले आणि बहुधा त्यांनी त्यांचे निरीक्षण मुहम्मदला सांगितले, ख्रिश्चन प्रभावाची संभाव्यता थेट पैगंबरांच्या अनुयायी आणि नेत्यांच्या वर्तुळात ठेवली. +रोजच्या पाच नमाज अनिवार्य (फर्द) आहेत आणि त्या आकाशातील सूर्याच्या स्थितीनुसार निश्चित केलेल्या वेळेस केल्या जातात. म्हणून, पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी सलतच्या वेळा बदलतात. सर्व नमाजांसाठी वुडू आवश्यक आहे. +फजरची सुरुवात सुभ सादिकपासून होते—खरी पहाट किंवा संध्याकाळची सुरुवात, जेव्हा सकाळचा प्रकाश आकाशाच्या संपूर्ण रुंदीवर दिसतो—आणि सूर्योदयाला संपतो. +झुहर किंवा धुहरच्या नमाजाची वेळ सूर्यास्तानंतर सुरू होते आणि आसरच्या प्रार्थनेसाठी आह्वान होईपर्यंत टिकते. कामाचा दिवस, आणि लोक सहसा त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीमध्ये नमाझ करतात. +जुहरच्या समाप्तीबद्दल शिया भिन्न आहेत. सर्व प्रमुख जाफरी विधिज्ञांच्या मते, दुहरच्या वेळेची समाप्ती सूर्यास्ताच्या सुमारे 10 मिनिटे आधी असते, ही वेळ केवळ अस्रच्या प्रार्थनेशी संबंधित असते. धुहराच्या पहिल्या 5 मिनिटांव्यतिरिक्त, धुहर आणि asr वेळ ओव्हरलॅप होते, जे केवळ त्यासाठी नियुक्त केले जाते. जुहरच्या वेळेत जुहरच्या आधी अस्रची नमाज अदा करता येत नाही. +जेव्हा एखाद्या वस्तूची सावली त्या वस्तूइतकीच लांबीची असते (किंवा, हनाफी मतानुसार, त्याच्या लांबीच्या दुप्पट) तसेच जुहरच्या वेळी सावलीची लांबी असते आणि सूर्यास्तापर्यंत टिकते तेव्हा अस्रची नमाझ सुरू होते. अस्र दोन विभागांमध्ये विभागले जाऊ शकते; सूर्य केशरी होण्यास प्राधान्य दिलेला वेळ आहे, तर आवश्यक वेळ सूर्य केशरी होण्यापासून सूर्यास्तापर्यंत आहे. +शिया (जाफरी मधब) अस्रच्या वेळेबाबत भिन्न आहेत. सर्व प्रमुख जाफरी न्यायवैद्यकांनुसार, अस्रची वेळ सूर्याच्या शिखरावरून जाण्याच्या वेळेनंतर सुमारे 5 मिनिटे आहे, ती वेळ केवळ जूहरच्या प्रार्थनेशी संबंधित आहे. दुहर आणि अस्रच्या प्रार्थनेची वेळ एकमेकांशी जुळते, परंतु सूर्यास्ताच्या 10 मिनिटांपूर्वीची वेळ वगळता झुहरची नमाज अस्र आधी अदा करणे आवश्यक आहे, जे केवळ अस्रला दिले जाते. जर नमूद केलेली वेळ आली असेल तर, अस्रची नमाज आधी अदा करावी (अदा - वेळेवर) आणि दुहर (कडा - मेकअप, उशीरा) नमाझ अस्र नंतर अदा करावी. +सूर्यास्त झाल्यावर मगरीबची नमाझ सुरू होते आणि पश्चिमेला लाल दिवा निघेपर्यंत ती असते. +जेव्हा पश्चिम आकाशातून लाल दिवा निघून जातो तेव्हा ईशा किंवा ईशाची नमाझ सुरू होते आणि पूर्वेला "पांढरा प्रकाश" (फजर सादिक) येईपर्यंत टिकते. ईशासाठी प्राधान्य दिलेली वेळ मध्यरात्रीपूर्वी आहे, म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय दरम्यानचा अर्धा रस्ता. +शुक्रवारची नमाज आठवड्याच्या इतर सहा दिवसांच्या दुहराच्या प्रार्थनेची जागा घेते. या सामूहिक प्रार्थनेची अचूक वेळ मशिदीनुसार बदलते, परंतु सर्व बाबतीत ती दुहर नंतर आणि अस्रच्या वेळेपूर्वी केली पाहिजे. जर एखादी व्यक्ती मंडळीत सामील होऊ शकत नसेल तर त्यांनी त्याऐवजी दुहरची नमाज केली पाहिजे. ही नमाज पुरूषांसाठी जमातसोबत करणे अनिवार्य आहे. महिलांना मशिदीमध्ये जुम्मा अदा करण्याचा किंवा जुहरची नमाज अदा करण्याचा पर्याय आहे. +मुख्य लेख: ईदची नमाज +मुख्य लेख: तरावीह +सलात क़ियाम अल्लायल या नावानेही ओळखले जाते, ही सलत नफिलाह (अरबी: صلاة نفل म्हणजे 'स्वैच्छिक/वैकल्पिक सलह (औपचारिक पूजा)') मानली जाते आणि रमजान महिन्यात केली जाते. इशाच्या प्रार्थनेनंतर, मंडळीत नमाज केली जाते. 20 रकात सामान्यतः केले जातात; दर चार रकातांनी थोडी विश्रांती घेतली जाते. तरावीह हा शब्द तरविहा या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ एक वेळ राहत (विश्रांती); दोन वेळची राहात (विश्रांती) तरविहतैन म्हणून ओळखली जाते, जी आठ रकात येते; तीन किंवा त्याहून अधिक वेळा राहात 12 किंवा त्याहून अधिक रकात येतात म्हणून त्याला तरावेह म्हणतात. +समुदायातील मुस्लिम मृतांसाठी क्षमा करण्यासाठी सामूहिक नमाजकरण्यासाठी एकत्र येतात. या प्रार्थनेला सामान्यतः नमाज जनाजा असे म्हटले जाते. नमाज एका विशिष्ट पद्धतीने अतिरिक्त (चार) तकबीरांसह अदा केली जाते परंतु रुकू आणि सुजुद नाही. कोणत्याही मुस्लिमाच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुस्लिम प्रौढ पुरुषावर अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे, परंतु जेव्हा ते काही मोजके करतात तेव्हा ते सर्वांसाठी बंधनकारक नसते. महिलाही प्रार्थनेला उपस्थित राहू शकतात. +देवाकडून पावसाचे पाणी मागण्यासाठी हा नफील मानला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2043.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e715379006c7ef958c696155bf711b139f21b0e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2043.txt @@ -0,0 +1,2 @@ +नया ज़माना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2053.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee60788adf4b06ea69d5976bb8abb37a9768864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2053.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +नयीम हसन (२ डिसेंबर, २०००:चितगांव, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने वेस्ट इंडीज विरुद्ध २२ नोव्हेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2057.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..527231eb768ae3980fa37eb16dfe59cd01809bb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2057.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारंगळ खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2079.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21dd9ac846dcb64094936726c86c807cedccd752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2079.txt @@ -0,0 +1,13 @@ + +नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपुत राजा नारणाल सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले. पुढे याच नारणाल सिंह स्वामींचे वंशज, रावराणा नारणाल सिंह सोलंकी द्वितीय इथले किल्लेदार झाले. +अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग आहे. +अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही. +गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत. +गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात. त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळ-फुटाणे वाहावे व तडक गड उतरावा तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.[ संदर्भ हवा ] +तेलियागड आणि जाफराबाद हे नरनाळा किल्ल्याचे उपदुर्ग आहेत. +गडावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहेत. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तुपाच्या टाक्या लागतात. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे; युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असे. +गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातूची असून इमादशहाच्या काळात गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानूर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरण आहे. +किल्ल्याच्या पायथ्याशी धारुळ गावात धरुळेश्वराचे एक सुंदर शिवालय आहे. या शिवालयाचे बांधकाम इसवी सन १५२१ साली झालेले आहे. पण हे शिवालय कोणी बांधले याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. हे शिवालय नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिणेस आहे. या शिवालयाचे बांधकाम हेमाडपंथी असून ते शिवालय दक्षिणमुखी आहे. या शिवालयाच्या पूर्वेस भग्नावस्थेत काही वास्तू आहेत. अश्या बऱ्याचश्या वास्तू तेथे सापडतात. त्यांच्या अवशेषांवरून आपण अंदाज लावू शकतो की यांचं वैभव कसं असेल. +या शिवालयाचे संपूर्ण बांधकाम दगडी असून चौरसाकार आहे व मंदिरांचे कळस हे गोलाकार आहेत. या कारणाने याला गुम्मद असे म्हणतात.शिवालयाचा परिसर खूप मोठा असून रमणीय असा आहे. शिवालयाला पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. शिवालयाकडे जाण्यासाठी विविध असे मार्ग आहेत. त्यामध्ये सहज मार्ग म्हणजे कोट ते रामापूर (धारुळ) या रस्त्यावर पडते. +गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला याबाबत नक्की माहिती नाही, पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राजपुत राजा नारणाल सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरूज बांधले. गडावर नागपूरकर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. +या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2122.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2cefa612338e9cf914170708eb37b2c909fe887 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2122.txt @@ -0,0 +1 @@ +नरसिंगपूर-नीरा हे गाव पुणें जिल्ह्यातील इंदापूरच्या आग्नेयेस १२ मैलांवर भीमा व नीरेच्या संगमावर आहे. येथें श्री लक्ष्मीनरसिंहाचें देवालय आहे. विंचूरकरांनीं हें देवालय शके १६७८ मध्ये बांधिलें. वैशाख शुद्ध चतुर्दशीपासून येथें दोन दिवस जत्रा भरते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2136.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc2514a85318fa8ed17af4064dc50f4e96011c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2136.txt @@ -0,0 +1,17 @@ +पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. +राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. +त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. +नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. +नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली. +तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. +जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासून अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. +बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले. +उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले. +इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरिसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. +सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. +डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2151.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db89ed3f9cb7328c9eb5c1f1d8adf05533fdf625 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2151.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरसिहपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2175.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..639b5a3b09b9818e16525112aa8e04bd72813b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2175.txt @@ -0,0 +1,3 @@ +नरहर शंकर रहाळकर (१८८२:भडगाव, खानदेश - ७ डिसेंबर, १९५७) हे एक मराठी कवी होते. त्यांनी बालपणापासूनच काव्यरचना केल्या. जेव्हा त्यांच्या गावी केशवसुत शिक्षक म्हणून आले तेव्हा त्यांनी अधिक कविता रचल्या. त्यांचे लेखन मुख्यतः १८९८ ते १९०४ या कालखंडात झाले. ते केशवसुतांचे एक आद्य रसिक चाहते, आणि केशवसुतांच्या कवितेचे समीक्षक म्हणून ओळखले जातात. +रहाळकरांच्या कवितांमध्ये माझी आई आणि माझ्या आईची तसबीर' ही विलापिका गाजली. यानंतर पुष्पांजली, बिल्वदलसह पाच कवितासंग्रह, वीरधर्मदर्पण (महाभारतातील अभिमन्यूवधापासून जयद्रथवधापर्यंतच्या कथाभागावर आधारित संस्कृत नाटक) व उत्तररामचरित या नाटकांची भाषांतरे व मानाजीराव हे नाटक लिहिले. त्यांचा शाकुंतलसौंदर्य हा टीकात्मक निबंधही गाजला. त्यांचे लिखाण त्याकाळी मासिक मनोरंजनमधून प्रसिद्ध होत असे. +रहाळकरांनी केशवसुतांच्या काव्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. ते लेख पुढे केशवसुत आणि त्यांच्या कविता या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2189.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1289ec9adf89c303cc4cf56a95b6e4b4ffc59349 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2189.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नरीमन हाऊस, चाबड हाऊस म्हणून नियुक्त (हिब्रू: בית חב"ד Beit Chabad), [१][२] दक्षिण मुंबई, महाराष्ट्र, भारतातील कुलाबा परिसरातील पाच मजली खूण आहे.[१] या इमारतीत चाबड हाऊसचे घर होते, जे गॅव्ह्रिएल आणि रिव्का होल्ट्झबर्ग यांनी चालवलेले ज्यू आउटरीच सेंटर होते, जे सुमारे २००६ पासून या इमारतीचे मालक होते. या केंद्रात एक शैक्षणिक केंद्र, एक सभास्थान, औषध प्रतिबंधक सेवा,[३][४][५] आणि वसतिगृह होते.[६][७] २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी या इमारतीवर हल्ला झाला होता आणि सहा महिन्यांची गरोदर असलेल्या होल्ट्जबर्ग आणि त्यांची पत्नी यांच्यासह सहा रहिवासी ठार झाले होते. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे त्याच्या भारतीय आया, सॅन्ड्रा सॅम्युअल आणि झाकीर हुसेन यांनी वाचवल्यानंतर या हल्ल्यातून बचावला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2194.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ead24bbc2f020768ad41e4b665fe79f7d04ae2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2194.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: २ डिसेंबर, १९५५ +शेवटचा क.सा.: ७ मार्च, १९६२ +दुवा: [१] +नरीमन जमशेदजी तथा नरी कॉॅंट्रॅक्टर. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2203.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..963d1e93a26ba99a4fdd3bcb2b0cc13b9f46c445 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2203.txt @@ -0,0 +1 @@ +नारुएमोल चैवाई (२ जुलै, इ.स. १९९०:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_221.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bb8dc135878b2de2a1464d45e15255fee095498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_221.txt @@ -0,0 +1,104 @@ +दोर्दोन्य (फ्रेंच: Dordogne; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. दोर्दोन्य फ्रान्सच्या आग्नेय भागात पिरेनीज पर्वतरांग व लाऊआर खोरे ह्यांच्या मधे वसला आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_222.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8a9176153e21ae9bc57845ae0245a703e0427d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_222.txt @@ -0,0 +1 @@ +दोर्लान पाबॉन  कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2232.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b064851c93711b235cd442a5aa2dba96a39b47a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2232.txt @@ -0,0 +1,6 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +हा लेख नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या यादीतील आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांची यादीही आहे. +नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :- diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2257.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63fed40ee84be4395b3c0c98568879fb0af2008b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2257.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरेला विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2261.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c5b4cdd87e81e7a8cb62e6bc6889c2624be31e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2261.txt @@ -0,0 +1 @@ +नरेश बलियान हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या उत्तमनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2263.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..229ace18c76c6a5b791cb5201857a42fd633e69e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2263.txt @@ -0,0 +1,4 @@ +नरेश बेदी हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, बेदी बंधूंमधील ज्येष्ठ बंधू आहेत.[१] 'वाईल्डस्क्रीन पांडा पुरस्कार' मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती आहेत.[२] २०१५ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[३] +नरेश बेदी यांचा जन्म हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील रमेश बेदी वन्यजीव छायाचित्रकार तसेच लेखक होते. त्यांनी या विषयावर ७४ पुस्तके लिहिली. +लहानपणापासूनच नरेश बेदी यांना छायाचित्रण कलेत रुची निर्माण झाली. आपले धाकटे बंधू, राजेश बेदी यांच्यासह त्यांनी वडिलांनी भेट दिलेल्या रोलेकॉर्ड कॅमेऱ्यावर छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. लहान असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हरिद्वार भेटीची छायाचित्रे काढण्याची संधी त्यांना मिळाली. +बेदी यांनी काढलेल्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन वयाच्या १८ व्या वर्षी मॅक्समुल्लर भवनच्या प्रायोजकत्वाखाली भरवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2264.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc049f97de09c249ce1a679e141b6f4d4fdc2eae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2264.txt @@ -0,0 +1 @@ +नरेश मेहता हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2288.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfa28c9547ab46baf3d31fe71feedb4f72c51f14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2288.txt @@ -0,0 +1,18 @@ +नर्मदा नदी (Nerbada) ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी), महाराष्ट्र (54 कि.मी), गुजरात (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते. +नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या : तापी व मही). +अगस्ती ऋषींनी काशी सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर नर्मदा नदी ओलांडून ते दक्षिणेतच स्थायिक झाले. नर्मदा ओलांडणारे व आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते. +अमरकंटक (शाडोल जिल्हा, मध्य प्रदेश ) येथील नर्मदाकुंडातून. मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून नर्मदा नदी उगम पावते. नदी सोनारामडपासून पश्चिमेकडे वाहते, खडकावरून खाली वाहते आणि कपिलधारा नावाचा धबधबा बनवते. वळणदार मार्गाने आणि जोरदार वेगाने घनदाट जंगल आणि खडकांना ओलांडून रामनगरच्या जीर्ण राजवाड्यात पोहोचते. दक्षिण-पूर्वेस, रामनगर आणि मंडला (२५ कि.मी. (१५.५ मैल ) दरम्यान, येथील जलमार्ग तुलनेने खडकाळ असून, सरळ व खोल पाण्यात अडथळ्यांपासून मुक्त आहे. बंजर नदी डावीकडून येऊन मिळते. ही नदी वायव्येकडील अरुंद वळणावर जबलपूरपर्यंत पोहोचते. शहराजवळील नदी भेडाघाटाजवळ सुमारे ९ मीटर धबधब्याचे रूप धारण करते, हे धुवाधार म्हणून प्रसिद्ध आहे, पुढे एक खोल अरुंद जलवाहिनीद्वारे सुमारे ३ कि.मी.पर्यंत मॅग्नेशियम चुनखडी व बेसाल्ट खडकांद्वारे संगमरवरी खडक म्हणून ओळखले जाते. येथे नंदीची रुंदी ८० मीटर वरून केवळ १८ मीटर आहे. या प्रदेशापासून अरबी समुद्राच्या मिलनापर्यंत, नर्मदा उत्तरेकडील विंध्यान पर्वत व दक्षिणेस सतपुरा श्रेणी दरम्यान तीन अरुंद खोऱ्यांमध्ये प्रवेश करते. दरीचा दक्षिणेकडील विस्तार बहुतेक ठिकाणी पसरलेला आहे. संगमरवरी खडकांमधून उगम पावत नदी नर्मदाघाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतील सुपीक प्रदेशात प्रवेश करते. हे क्षेत्र अंदाजे ३२० किमी (१९९ मैल)पर्यंत पसरलेले आहे, येथे दक्षिणेकडील या भागाची सरासरी रुंदी ३५ किमी (२२ मैल) आहे. उत्तरेकडील भाग, बरना-बरेली खोऱ्यातच मर्यादित आहे. हा भाग हुशंगाबादच्या बरखरा टेकड्यांनंतर संपतो. तथापि, कन्नोडच्या मैदानावरून ती पुन्हा डोंगरांकडे वळते. हे नर्मदाच्या पहिल्या खोऱ्यात आहे. तिथे दक्षिणेकडील बऱ्याच उपनद्या तिच्यामध्ये सामील होतात आणि सातपुडा टेकड्यांच्या उत्तरेकडील उतारातून पाणी आणतात. या उपनद्यांमध्ये शेर, साखर, दुधी, तवा (सर्वात मोठी उपनदी) आणि गंजल, साहिल याचा समावेश होतो. हिरन, बार्णा, कोरल, करम आणि लोहार यासारख्या महत्त्वाच्या उपनद्याही उत्तरेकडून सामील झाल्या आहेत. +नर्मदा नदी ही उत्तरी भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधली सीमाारेषा आहे. भारतातील नद्यांपैकी फक्त नर्मदेची परिक्रमा करण्यात येते. +नर्मदा नदीच्या काठी मार्कंडेय, कपिल, भृगू, व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी, दुर्वास ऋषी, वशिष्ठ, कृतू, अत्री, मरिची, गौतम, गर्ग, चरक, शौनक यांसाख्या अनेक ऋषींनी तप केल्याचे सांगितले जाते. यांपैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. +नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंभायतच्या आखातास मिळते. +नर्मदेचे खोरे विंध्य व सातपुडा पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणाऱ्या आहेत. [१] +नर्मदेचे खोऱ्याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात. + +नर्मदेचे खोरे भूदोषामुळे (पृथ्वीचे भूकवच प्रसारण पावताना तयार झालेला चर) तयार झाले आहे. +सातपुड्याचा उत्तरेकडील उतार व विंध्य पर्वताचा दक्षिणेकडील उतार यांनी नर्मदेचे पाणलोट क्षेत्र तयार झाले आहे. विंध्य पर्वताचे पठार मात्र उत्तर दिशेला झुकलेले असल्याने तेथील पाणी गंगा किंवा यमुना या नद्यांना जाते. +जीवाश्म विज्ञानाच्या दृष्टीने नर्मदेचे खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे. +नर्मदेच्या खोऱ्यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहेत. (उदा. Titanosaurus indicus आणि Rajasaurus narmadensis.) +नर्मदा नदीच्या प्रदेशात असलेले भीमबेटका येथील पूर्वैतिहासिक गुंफाचित्रे आणि मानवी निवासस्थाने (इ.पू. १५०००) संयुक्त राष्ट्र संघटनेने 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली आहेत. +धबधबा- नर्मदा नदीवर जबलपूर येथे धुवांधार नावाचा धबधबा आहे. +==पर्यटन==Narmada bachao anndolan nishkarsh +भारतातील त्रिभुज प्रदेश निर्माण न होणारी नदी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2292.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47e3ec305ee25a9246119cafd11b357e38127266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2292.txt @@ -0,0 +1,3 @@ +नर्मदा ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मधून वाहणारी भारतामधील एक प्रमुख नदी आहे. नर्मदा बचाओ आंदोलन हे नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन आहे. +चित्रपट तारकांच्या पाठिंब्यामुळे ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. चित्रपट नायकांमधील उल्लेखनीय नाव म्हणजे आमीर खान. या आंदोलनाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांना Right Livelihood Award [१] देऊन १९९१ मध्ये गौरवण्यात आले आहे. +या चळवळीत अनेक आदिवासी,गावे,पर्यावरण कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांनी नर्मदा नदीच्या तुलनेत मोठ्या संख्येने असलेल्या धरणाबद्दल त्यांची मते मांडली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2296.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd109132e91bda0cf5d2ca7266141b6892ffd73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2296.txt @@ -0,0 +1,3 @@ +नर्मदापुरम विभाग हा मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. +या विभागात हे जिल्हे येतात. +या विभागाचे मुख्यालय हुशंगाबाद येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2330.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1691bdbf68141809739b1499e5b2726cd87c86b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2330.txt @@ -0,0 +1,5 @@ +नलिनी मालानी या महाराष्ट्रातील चित्रकार आहेत.[१] +नलिनी मालानी यांचा जन्म फाळणीपूर्व भारतात कराची येथे इ.स. १९४६ साली झाला.[२] +फाळणीनंतर नलिनी मालानी या एक वर्षाच्या असताना त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन भारतात आले आणि त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. बालवयात निर्वासित म्हणून त्यांना जे अनुभवावे लागले त्याचा प्रभाव त्यांच्या कलानिर्मितीत कायम राहिला. +नलिनी मालानी यांचे शालेय शिक्षण दक्षिण मुंबईतील व्हिला थेरेसा आणि वाल्सिंगहॅम स्कूलमध्ये झाले. त्यांनी इ.स. १९६४ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि इ.स. १९६९ मध्ये फाईन आर्ट विषयातील पदविका प्राप्त केली. +जे.जे.मध्ये शिकत असताना १९६४ ते १९६७ या काळात त्यांचा भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडिओ होता. १९८४ ते १९८९ या काळात त्यांना भारत सरकारतर्फे कला विषयातली आर्ट फेलोशिप मिळाली. अमेरिका, इटली, जपान, सिंगापूर या देशांमध्ये त्यांनी निवासी चित्रकार म्हणून वास्तव्य केले. भारतात आणि परदेशात त्यांची एकल प्रदर्शने झालेली आहेत. समूहप्रदर्शनांमध्ये ‘सिटी ऑफ डिझायर्स’ हे त्यांचे पहिले प्रदर्शन झाले. मुंबईमध्ये १९९९ साली ‘रिमेम्बरिंग टोबाटेक सिंग’ हे त्यांचे प्रदर्शन भरले. व्हिडिओ इन्स्टॉलेशन हा या प्रदर्शनाचा विषय होता. अमेरिकेतल्या पीबॉडीइसेक्स म्युझियममध्ये २००५-०६ मध्ये नलिनी मालानी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘एक्स्पोजिंग द सोर्स’ हेरेस्ट्रो स्पेक्टिव्ह हे प्रदर्शन भरले होते. ‘लिव्हिंग इन एलिस टाइम’ (२००६), ‘लिसनिंग टू द शेड्स्’ (२००८), ‘कॅसान्ड्रा’ (२००९), ‘स्प्लिटिंग द अदर’ (२०१०) ही त्यांची महत्त्वपूर्ण प्रदर्शने आहेत. ५२ व्या व्हेनिस बिनाले आणि लॉसान येथे भरलेल्या १९९२-२००९ या कालखंडातील नलिनी मालानी यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन या दोन्ही प्रदर्शनांचे शीर्षक ‘स्प्लिटिंग द अदर’ हे होते. या निमित्ताने त्यांच्या कलानिर्मितीची समीक्षा करणारे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झाले. नलिनी मालानी यांनी मांडणशिल्प, मल्टीप्रोजेक्शन वर्क, व्हिडिओ शॅडो प्ले, नाटक या माध्यमांचा कलानिर्मितीसाठी सातत्याने वापर केला. जातीय दंगे, कामगारांचे जीवन, पर्यावरणाचा नाश, समाजात होणारी स्त्रियांची कुचंबणा अशा सामाजिक विषयांचे चित्रण त्यांच्या कलाकृतींमधून येते. त्यामुळे राजकीय चित्रकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नलिनी मालानी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगतात, ‘त्यांची इच्छा असो वा नसो, सर्व चित्रकार राजकीयच असतात. कलेसाठी कला यावर माझा विश्वास नाही. चित्रकार-प्रेक्षक-कलाकृती या त्रिकोणी नात्यामध्ये आपण कलाकृतीच्या माध्यमातून संवादाबद्दलच बोलत असतो.’ नलिनी मालानी यांनी आपल्या चित्रांमधून स्त्रीचे चित्रण करण्यासाठी सीता, मेडिआ, एलिसया सारखी भारतीय व ग्रीक पुराण कथा यांमधील मिथके अथवा एलिससारखी बालसाहित्यातील पात्रे वापरली आहेत. ‘कॅसान्ड्रा’ या त्यांच्या प्रदर्शनात त्यांनी कॅसान्ड्रा या ग्रीक मिथकाच्या आधारे स्त्रीच्या अद्याप पूर्णत्वाला न गेलेल्या क्रांतीबद्दल भाष्य केले आहे. ‘युनिटीइनडायव्हर्सिटी’ या व्हिडिओमध्ये राजा रविवर्मा यांच्या ‘गॅलॅक्सी ऑफ म्युझिशियन्स’ यांच्या चित्राचा वापर केलेला आहे. या चित्रात वेगवेगळ्या प्रांताच्या वेषभूषा असलेल्या अकरा स्त्रिया दाखवलेल्या आहेत. ‘स्प्लिटिंग द अदर’ प्रदर्शनात विभाजन ही मध्यवर्ती कल्पना आहे. चौदा पॅनेल्समध्ये विभागलेल्या या चित्रात नलिनी मालानी यांनी महाकाव्यात असतात तसे विविध संस्कृतींचे आणि विविध कालखंडामधले संदर्भ एकत्र आणले आहेत. मानवी आकृती, देवदूत आणि राक्षस, तरंगणारे मेंदू, नाळ आणि भ्रूण, हाडे, दृष्टिहीन डोळ्यांनी पाहणारे विचित्र जीव अशांनी बनलेले विश्व या चित्रात येते. या सृष्टीचा निर्माता असलेल्या एका स्त्रीची मोठी प्रतिमा या चित्रामध्ये आहे. त्या ‘क्युरेटर्स आर्टिस्ट’ म्हणूनच ओळखल्या जातात. अरुण खोपकर यांनी तीन चित्रकारांवर काढलेल्या माहितीपटामध्ये भूपेन खख्खर, विवान सुंदरम यांच्याबरोबर नलिनी मालानी यांचाही समावेश आहे. त्यांना २०१० मध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे अधिकृत भित्तिचित्र (पोस्टर) करण्याचा मान मिळाला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2332.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0e1dcb847fe70262dd935d41c01ce9849f9ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2332.txt @@ -0,0 +1,2 @@ +नलिनीबाला देवी या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बारपेटा या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते. नलिनीबाला देवींनी आपल्या वडिलांचे एक चरित्र लिहिले आहे. नलिनीबाला देवीं यांचे  शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत)   हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता .त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. +नलिनीबाला देवींना लहानपणीच वैधव्य आले, त्याची छाया त्यांच्या जीवनावर कायमची पडली.गीता, उपनिषदे, आसाममधील वैष्णव संतांचे साहित्य ह्यांच्या वाचनातून मानसिक समाधान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातील व्यथा-वेदनांचा खोल ठसा नलिनीबाला देवीं यांच्या  कवितेवर उमटलेला आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून आणण्याची तीव्र इच्छा, गूढगुंजनाची ओढ आणि निसर्गातील यच्चयावत वस्तूंमधील चिरंतन सौंदर्याची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य ह्यांकडेही त्या ओढल्या गेल्या. ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो.काही उत्कट देशभक्तिपर कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी ‘भारती', ‘रवींद्र तर्पण’, ‘जन्मभूमी’ ह्या अशा काही कविता आहेत .स्वर्गापेक्षाही महान असलेल्या मातृभूमीची सेवा आपणास मृत्युनंतरही करता यावी, अशी इच्छा त्यांनी ‘जन्मभूमी’ ह्या कवितेत व्यक्त केली आहे. अलकनंदा ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास १९६८ रोजी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला.नलिनीबाला देवीं या आसाम मध्ये १९५४ रोजी झालेल्या साहित्य सभेच्या तेविसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या.भारत सरकारने १९५७ साली ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.२४ डिसेंबर १९७७ रोजी गौहाती येथे त्यांचे दुःखद निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2346.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2a5956ca2486196a4c40fd64207cf576c66d41c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2346.txt @@ -0,0 +1,6 @@ + +नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे. +नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ४८ कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले. नंतर नळ राजाने हा किल्ला काबीज केला व आलीयाबादचे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले. +स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. +सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. बंधाऱ्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. +नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरूज, त्यावरील लांब तोफ,धबधबा, दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2347.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf6cce107e2135e2b2507297998b41b97cceccf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2347.txt @@ -0,0 +1,2 @@ +नळदुर्ग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2363.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af81146fc1bb38c340e7f082e03b135ef6b5f2e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2363.txt @@ -0,0 +1 @@ +नव-असिरियन साम्राज्य लोहयुगतील सर्वात मोठ्या साम्राजयापैकी एक होते. त्यांनी लोखंडी शस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली[१]. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2365.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a3e56feb14da99f177a51d70caa0112fbb2d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2365.txt @@ -0,0 +1,6 @@ +नवबौद्ध (Neo-Buddhist) ही भारतीय धर्मांतरित बौद्धांना किंवा आंबेडकरवादी बौद्धांना दिलेली एक 'शासकीय संज्ञा' आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेतून इ.स. १९५६ मध्ये व त्यानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 'नवबौद्ध' म्हटले जाते. इ.स. १९५६ पासूनच्या बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात आढळत नाही, हे लोक स्वतःला केवळ 'बौद्ध' समजतात. बहुतांश नवबौद्ध हे विशेषतः पूर्वाश्रमीचे दलित (आजचे अनुसूचित जाती) आहेत. समस्त नवबौद्ध हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत. +नवबौद्ध हे नवयान किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दशः अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो, पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो महायान किंवा थेरवाद बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. नवयान एक आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हटले आहे. +इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत. ते इतर धर्मांतून धर्मांतरित होऊन झालेले बौद्ध आहेत, आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपरिक बौद्ध आहेत.[१][२] भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध महाराष्ट्रात आहेत.[३] महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी साधारणपणे ९९.९८% नवबौद्ध आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा सांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे. +इ.स.१९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील कोट्यवधी अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसानंतर बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध बनलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी बौद्ध म्हटले जाते. +धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरित बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांत नवबौद्ध धर्माचे सार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2376.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e51f68756ac5938973ee9f8184465753c6aa7b03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2376.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2378.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e0c5374d38342baf76bda7c50c9de54e926bc5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2378.txt @@ -0,0 +1,42 @@ +आकाशातील आपल्या सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे. नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचिले आहे. यात सूर्यमालेतील नवग्रहांचे वर्णन आहे. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशात्राच्या प्रगतीचा अंदाज येतो. +॥ नवग्रहस्तोत्रम् ॥ +अथ नवग्रहस्तोत्रम्। श्री गणेशाय नमः। +जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महदद्युतिम्। +तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम्॥१॥ +दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम्। +नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्॥२॥ +धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। +कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम्॥३॥ +प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम्। +सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥४॥ +देवानाञ्च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभम्। +बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥५॥ +हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। +सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥६॥ +नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। +छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥७॥ +अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम्। +सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम्॥८॥ +पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकम्। +रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥९॥ +इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः। +दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति॥१०॥ +नरनारीनृपाणां च भवेत् दुःस्वप्ननाशनम्। +ऐश्वर्यमतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम्॥११॥ +ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुद्भवा:। +ता: सर्वाः प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशयः॥१२॥ +॥इति श्रीवेदव्यासविरचितम् आदित्यादिनवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्॥ +१. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो. +२. दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, क्षीरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो. +३. धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो. +४. अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो. +५. देवांचा आणि ऋषींचा गुरू, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो. +६. हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरू असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो. +७. निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो. +८. अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणाऱ्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो. +९. पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणाऱ्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो. +१०. याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. +११. नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल. +१२. ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही, असे श्रीव्यास ऋषी म्हणतात. +अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले. +नवग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र हे व्यास ऋषींनी रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते. यातील पहिले नऊ श्लोक हे ज्योतिष शास्त्रातील नवग्रहांचे मंत्र असून, पुढील तीन श्लोक हे या स्तोत्राची फलश्रुती आहे. या फलश्रुती नुसार नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा. त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीश्या होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत. उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2384.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6602e662275f3848facb81f30dbee10708d5ef7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2384.txt @@ -0,0 +1,7 @@ +नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, व त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ते ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था व ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात. +जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते. +बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर ४८ तासांपर्यंत कधीही असू शकते. ४ ते ५ दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून १२-१५ वेळा शी करतात. याउलट काही बाळे ४ ते ७ दिवसात एकदाच शी करू लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते. +आपल्या देशात नवजात बाळाचे वजन सामान्यतः २ किलोग्रॅम ते ३ किलोग्रॅम (सरासरी २.५ किलोग्रॅम) असते. ते तिसऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षापर्यंत तिप्पट होणे अपेक्षित असते. +कोणत्याही बाळाचे हास्य बघितले कि, आपला थकवा नाहीसा होतो. +बाळाचे रडणे एक स्वाभाविक क्रिया आहे, जे त्यांच्यासाठी संवादाचे साधन आहे. बाळ रडून भूक, अस्वस्थता, उब, एकटेपणा यांसारख्या अनेक भावनांना व्यक्त करण्याचा प्रयत्न करित असते. +स्तनपानाचा सल्ला सगळ्या प्रमुख बाल आरोग्य संघटना करतात. जर काही कारणाने स्तनपान शक्य नसेल, तर बाळाला बाटलीने दूध पाजायला हवे, ज्यासाठी आईचे काढलेले दूध किंवा डब्यातील दूध फॉर्म्युला द्यावा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_239.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a58d27414f0ef07b3b48062d17a6b5ab9d9d6271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_239.txt @@ -0,0 +1 @@ +अली दोस्त खान () हा अर्काटचा चौथा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७३२ ते इ.स. १७४० इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2390.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f35b8afd5f47216aab5adac369bee93bf436ab4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2390.txt @@ -0,0 +1,14 @@ +नवज्योतसिंग सिद्धू (पंजाबी: ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ ਸਿੱਧੂ ; रोमन लिपी: Navjot Singh Sidhu) (२० ऑक्टोबर, इ.स. १९६३; पतियाला - हयात) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू व पंजाबी राजकारणी आहे. इ.स. १९८३ ते इ.स. १९९९ या कालखंडात हा भारतीय संघाकडून ५१ कसोटी व १३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. हा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करत असे. +व्यावसायिक क्रिकेटजगतातून निवृत्त झाल्यावर सिद्धूने क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रांत प्रवेश केला. इ.स. २००४ व इ.स. २००५ सालांतील लोकसभा निवडणुकींत तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिला व लोकसभेवर निवडून आला. मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे त्याने संसदसदस्यत्वाचा राजीनामा दिला[ संदर्भ हवा ]. +इ.स. २००४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत अमृतसरच्या जागेवरून भक्तीया जानता पक्षाच्या तिकिटावर सिधू विजयी झाले. त्यांच्याविरोधात कोर्टाच्या खटल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर निकाल थांबल्यानंतर तो पुन्हा उभे राहिला. त्यांनी चांगली बहुमताने पोटनिवडणूक जिंकली. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आयएनसीच्या ओम प्रककाश सोनीला 5 6858 मतांनी पराभूत केले. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत अमृतसर यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्या नंतर सिधूचे हेच म्हणणे होते. +माझे कार्य आणि कृती स्वतःच बोलते असे अमृतसर हे एक ठिकाण आहे. या पवित्र ठिकाणाहून मी निवडणुका लढवण्यास सुरुवात केली असल्याने मी स्वतःला वचन दिले आहे की हे स्थान कधीही सोडू नका. एकतर मी अमृतसरकडून स्पर्धा करीन, नाहीतर मी निवडणुका लढवणार नाही. +स्वतःला अरून जैटलीचा प्रखर मानत असल्याने या निर्णयाला त्याचा विरोध नाही, हे सांगून. तथापि, पक्षाने जाहीर केलेला निर्णय मनापासून घेताना कोणत्याही मतदार संघातून भाग न घेण्याच्या आपल्या भूमिकेवर ते ठाम होते. +28 एप्रिल 2016 रोजी राजोठ सिधू यांनी राजिया सबाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. अहवालानुसार, आम आदमी पक्षात जाण्यापासून रोखण्यासाठी सिधूला राज्या सबाचा उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. तथापि त्यांनी 18 जुलै 2016 रोजी राज्या सबाचा राजीनामा दिला +2 सप्टेंबर 2016 रोजी, परगत सिंह आणि बेन्स बंधूंसह सिधू यांनी एक नवीन राजकीय आघाडी तयार केली - आवाझ-ए-पंजाब यांनी पंजाबविरूद्ध काम करणा against्यांविरूद्ध लढा देण्याचा दावा केला. +जानेवारी 2017 मध्ये, सिधू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2017च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्वेकडून स्पर्धा करत त्यांनी 42,809 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांच्या यादीतील तिसरे म्हणजे मागील वर्षी बीजेपी सोडणारे क्रिकेट खेळाडू-टर्न-पॉलिटिशियन नाव्होट सिंह सिधू होते.[ संदर्भ हवा ] +पर्यटन आणि स्थानिक संस्था मंत्री म्हणून, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीवरील भारताच्या एकमेव हस्तकलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सिधू यांनी प्रकल्प विरसॅट अंतर्गत उल्लेखनीय काम केले.पितळ भांडी बनवण्याच्या या हस्तकलेचा दावा जंदियाला गुरू भागातील थथेरांनी केला आहे, जो अमृतसरच्या त्यांच्या पूर्वीच्या लोकसभेच्या मतदारसंघात येतो. +23 एप्रिल 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने मॉडेल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सिडूला 72 तास निवडणूक प्रचारावर बंदी घातली. यापूर्वी बिहार जिल्ह्यातील कातिहार जिल्ह्यातील मेळाव्यात धर्म धर्तीवर मत मागण्याबाबत आयोगाने सिधूला नोटीस बजावली.[ संदर्भ हवा ] +18 जुलै 2019 रोजी, सिधूने पंजाबच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची प्रत १० जून 2019 रोजी चिमटावी आणि राहुल गांधींना उद्देशून दिली.२० जुलै 2019 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंह आणि पंजाबचे राज्यपाल व्ही.पी. सिंग बडनोरे यांनी सिधूचा राजीनामा स्वीकारला.नंतर पुंजाब सरकारने त्यांच्यावर सेक्रिलिज प्रकरण हाताळल्याबद्दल उघडपणे टीका केली, तथापि पक्षाने त्यास मतांचे वैविध्य म्हणून संबोधले.[ संदर्भ हवा ] +18 जुलै 2021 रोजी, नवजोत सिंह सिधू यांनी त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांचा तीव्र विरोध असूनही पंजाब काँग्रेस प्रमुख म्हणून घोषित केले.[१] +2 महिन्यांनंतर त्याच वर्षी 28 सप्टेंबर रोजी, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या मुख्य पदाचा राजीनामा दिला[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_24.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_24.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad85d6bbc9a07803e622c42510ee927183fd67b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_24.txt @@ -0,0 +1,2 @@ +देहेरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2409.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0b9b664bcee9b99ad898221152177e9cd96955f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2409.txt @@ -0,0 +1,8 @@ + नवनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_242.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16bb8a5b5dc16307407ab822ffbd5c157d96fbb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_242.txt @@ -0,0 +1,2 @@ +दोस्ताना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2431.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a3e56feb14da99f177a51d70caa0112fbb2d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2431.txt @@ -0,0 +1,6 @@ +नवबौद्ध (Neo-Buddhist) ही भारतीय धर्मांतरित बौद्धांना किंवा आंबेडकरवादी बौद्धांना दिलेली एक 'शासकीय संज्ञा' आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेतून इ.स. १९५६ मध्ये व त्यानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 'नवबौद्ध' म्हटले जाते. इ.स. १९५६ पासूनच्या बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात आढळत नाही, हे लोक स्वतःला केवळ 'बौद्ध' समजतात. बहुतांश नवबौद्ध हे विशेषतः पूर्वाश्रमीचे दलित (आजचे अनुसूचित जाती) आहेत. समस्त नवबौद्ध हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत. +नवबौद्ध हे नवयान किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दशः अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो, पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो महायान किंवा थेरवाद बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. नवयान एक आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हटले आहे. +इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत. ते इतर धर्मांतून धर्मांतरित होऊन झालेले बौद्ध आहेत, आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपरिक बौद्ध आहेत.[१][२] भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध महाराष्ट्रात आहेत.[३] महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी साधारणपणे ९९.९८% नवबौद्ध आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा सांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे. +इ.स.१९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील कोट्यवधी अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसानंतर बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध बनलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी बौद्ध म्हटले जाते. +धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरित बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांत नवबौद्ध धर्माचे सार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2456.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94a22b3567aab32a8b0ccd76a86e316ea6c825de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2456.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५३७ असलेले नवरगाव (मक्ता) हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २५८.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ९५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३३५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा कुलकुली येथे आहे. माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय आरमोरी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय बोडणी येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय बोडणी येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा नागपूर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2460.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3605472287ae579e406938aa4cddaf061bd26e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2460.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५३६ असलेले नवरगाव अलियास रामतोला हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४३०.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा नवरगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा कुलकुली येथे आहे. माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय आरमोरी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय बोडणी येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय बोडणी येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा नागपूर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2467.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b15b28cd9aaf128f6d88a67344ba4b55ba1c014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2467.txt @@ -0,0 +1,54 @@ +पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्‍नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्‍नांचा उल्लेख नवरत्‍ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱ्या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्‍न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात. +खालील रत्‍नांचा नवरत्‍नांमध्ये समावेश होतो. +समुद्रात राहणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या कालवाच्या शिंपल्यामध्ये मोती नैसर्गिकरीत्या तयार होतो. तो मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो[१]. या शिंपल्यामध्ये घुसलेल्या कणाभोवती शिंपल्यातील जीव एका खास पदार्थाचे थर चढवतो. असे थर जमा होऊन जी गोळी बनते तिलाच मोती असे म्हणतात. नैसर्गिकरीत्या समुद्रात तयार होणारे मोती (एकवचन - मोती, अनेकवचन - मोती, मोते किंवा मोत्ये) अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मानले जातात. नैसर्गिक मोती रंगाने श्वेत (पांढरा) असतो. चंद्र ग्रह हा मोत्याचा स्वामी आहे अशी समजूत आहे. +इराकी "बसरा" मोत्यास पूर्वी भारतातील बाजारपेठेत खूप मागणी असे. हा मोती पिवळट आणि चमकदार असतो असे सांगितले जाते. अलिकडे व्हेनेझुएला येथील मोत्यांना चांगली मागणी आहे. व्हेनेझुएला येथील मार्गेरिटा बेट हे मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे मोती सप्टेंबर ते मे या महिन्यांमध्ये काढतात, मोत्यांच्या एका शिंपल्यात एकाहून अधिक मोती असू शकतात, परंतु मोठा गोलाकार असा मोती बहुधा एकच असतो असे काही जुन्या नोंदीं[२]वरून समजते. त्याचप्रमाणे जपानी किंवा कल्चर्ड मोती यांनादेखील बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. कल्चर्ड मोती तयार करण्याची पद्धत जपानमध्ये सुरू झाली असे सांगितले जाते. ह्या पद्धतीत काही खास शिंपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या जिवांचे तंतू टाकले जातात. शिंपल्यातील प्राणी या तंतूंभोवती गोलाकार आवरण तयार करतो, असे सांगितले जाते[३] . या पद्धतीवर मानवी नियंत्रण करता येत असल्याने मोत्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येते. +कृत्रिम मोती हे काच, प्लास्टिक किंवा इतर द्रव्यांपासून बनवले जातात. +मोती एका फरशीच्या तुकडयावर खडूसारखे घासले तर खडूसारखीच पांढरट पूड (चूर्ण) बाहेर पडते. खऱ्या मोत्यांचे चूर्ण पडते, आणि तरीही मोत्याला चरे न पडता तो तसाच चमकदार आणि गुळगुळीत रहातो अशी समजूत आहे. नकली मोत्यांवर हा प्रयोग केल्यास त्यांना चरे पडतात आणि वरचे प्लास्टिक निघून आतली काच दिसते असेही म्हणतात. +"असतील स्वाती तर पडतील मोती": स्वाती नक्षत्रावर पाऊस पडला की शिंपल्यात मोती बनतात अशी एक समजूत आहे.. +"मोत्यांसारखी अक्षरे": दाणेदार, सुंदर, अक्षरांना मराठीत मोत्यांची उपमा दिली जाते. +प्रवाळ (संस्कृत नाव: विद्रुम) (Red Coral) किंवा पोवळ्यांना जगभर दागिन्यांसाठी मागणी आहे. भारतातील प्रचलित समजांमध्ये प्रवाळाचे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी महत्त्व सांगितले जाते. पण ही समजूत प्राचीन नसून अलीकडच्या शतकांमधली असावी असा अंदाज आहे. दागिन्यांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ किंवा पोवळे हे साधारणपणे लाल रंगाचे असते. प्रवाळ मिळवण्यासाठी समुद्रात कित्येक मीटर खोल जावे लागते असे म्हणतात. प्रवाळाचे दागिन्यांमध्ये वापरताना असलेले आकार आखीवरेखीव असले तरी मूळ प्रवाळ हे शाखायुक्त असते. दागिन्यांमध्ये वापर करण्यासाठी असे प्रवाळ पॉलिश करून तसेच विशिष्ट आकारांमध्ये कापून वापरले जाते. +प्रवाळ (विद्रुम:) या नावाचे इतर अर्थ, भारतीय साहित्यातील संदर्भ आणि इतर उपयोग:[४] +काही संस्कृत जाणकारांच्या मते विद्रुम - विचित्र द्रुम, (द्रुम = झाड, विद्रुम = विचित्र झाड, विशेष अर्थ प्रवाळ) त्यातून मिळवलेले ते वैद्रुम.[५] +त्रिकाण्डशेषकोशात, +रक्तकन्दलो विद्रुमश्च सः । लतामणि: प्रवालः स्यात्‌ || अशी ओळ आहे आणि त्यावर शील-अखंड महाथेर यांची टीका आहे. तिच्यात रक्तकंद: हाही शब्द दिला आहे. महाथेर यांच्या मते विद्रुमः म्हणजे विशिष्टो द्रुमः. +आयुर्वेदीय शब्दकोशांत प्रवा(बा)ल:/प्रवा(बा)लम्‌ आणि त्याच अर्थाचा विद्रुमः हा शब्द आला आहे. वैद्रुम(विशेषण) म्हणजे विद्रुमासंबंधी. उदाहरणार्थ, विद्रुमचूर्ण म्हणजे प्रवाळभस्म. +प्रवाल(नाम)चे इतर अर्थ : पालवी, अंकुर, वीणेचा दांडा, वगैरे. +वीणादण्डः प्रवालः स्यात्‌ ।--अमरकोश १.७.७ +विद्रुमः पुंसि प्रवालं पुन्नपुंसकम्‌ ।-- अमरकोश २.९.९३ +प्रवालमङ्कुरेप्यsस्त्री ।--अमरकोश ३.३.२०५ +वाल्मीकी रामायणातील बालकांडामध्ये जनकाने लग्नानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी (रामाला) सोने, चांदी, मोती आणि पोवळी (विद्रुमे) दिली असे दिसते (ददौ कन्या शतं तासां दासी दासं अनुत्तमम्‌। हिरण्यस्य सुवर्ण्यस्य मुक्तानां विद्रुमस्यच ॥ (वाल्मीकिरामायण १.७४.५) [६] +गीतेच्या पंधराव्या (१५व्या) अध्यायात "अधश्चोर्ध्वम् प्रसृतास्तस्य शाखा: गुणप्रवृद्धा विषय प्रवाला:" असे अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे तेथे हा शब्द आला आहे. प्रवाला: या शब्दाचा येथील अर्थ अंकुरे असा असावा. याचा भावार्थ जाणकारांनी असा सांगितला आहे: (सत्त्व, रज आणि तम या प्रकृतीच्या तीन गुणांनी पोसलेल्या) गुणप्रवृद्धा (या संसाररूपी पिंपळवृक्षाच्या) तस्य शाखा अधःच ऊर्ध्वःच (वरखाली) प्रसृताः (पसरलेल्या आहेत) (त्यांना शब्द, रूप, गंध रस या विषय़ांचे) विषयप्रवालाः (धुमारे फुटले आहेत). विनोबा भावे यांच्या गीताईमध्ये याचे वर्णन "वरी ही शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥[७] असे आले आहे. +वराहमिहिराच्या बृहत्‌-जातकामध्ये (काळ - इसवी सनाचे सहावे शतक) आलेले उल्लेख : - +माणिक्यं तरणेः सुजात्यममलं मुक्ताफलं शीतगोः +माहेयस्यच विद्रुमं मरकतं सौम्यस्य गारुत्मतम् +देवेज्यस्यच पुष्पराजमसुराचार्यस्य वज्रं शनेः +नीलं निर्मलमन्ययोश्च गदिते गोमेदवैदूर्यके +काही अधिक पंक्ती ( स्रोत हवा आहे) +सुवर्णं रजतं मुक्ता राजावर्तं प्रवालकम्‌ । +रत्‍नपञ्चकमाख्यातं शेषं वस्तु प्रचक्षते ॥ +अर्थ : सोने, चांदी, मोती, राजावर्त आणि पोवळे ही पंचरत्ने म्हणून प्रसिद्ध आहेत. +आणखी : +माणिक्यं मौक्तिकं वज्रं नीलं मरकतं तथा । +पञ्चरत्नम् इति प्रोक्तं पाप्मालक्ष्मीविषापहम् ।। (मंथान भैरव लिखित 'आनंदकंद-- २.८.१६४') +गोमेदकं पुष्परागं वैडूर्यमपि विद्रुमम् । +पञ्चरत्नैः सहैतानि नवरत्नानि निर्दिशेत् ।। (आनंदकंद--२,८.१६५) +अर्थ : माणिक, मोती, हिरा, नीलम आणि मरकत(पन्ना/पाचू) ही पंचरत्ने आणि गोमेद, पुष्कराज, वैडूर्य आणि पोवळे ही चार धरून झालेल्या एकूण ९ रत्नांना, नवरत्ने म्हणतात. +आणखी : +कनकं कुलिशं नीलं पद्मरागंच मौक्तिकम्‌ । +एतानि पञ्चरत्‍नानि रत्‍नशास्त्रविदो विदुः ॥ +अर्थ : सोने, हिरा, नीलम, पद्मराग आणि मोती यांना रत्नशास्त्रात पंचरत्ने म्हटले आहे. +भारतामध्ये प्रवाळाचा उपयोग आयुर्वेदिक औषधे तयार करण्यात होत आला आहे. प्रवाळयुक्त गुलकंद किंवा च्यवनप्राश प्रसिद्ध आहे. प्रवाळाचा उपयोग शरीराला कॅल्शियम मिळावे यासाठी होतो असे समजते. +समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांवर प्रवाळाची वाढ होते. प्रवाळ जरी वनस्पतीप्रमाणे भासले तरी खरे तर प्रवाळ ही समुद्रात दगडांना चिकटून वाढणाऱ्या सूक्ष्म समुद्री जीवांची वसाहत असते. यातील काही प्रकारचे सूक्ष्म प्रवाळजीव मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम कार्बोनेटचे (CaCO3) उत्सर्जन करतात आणि यामुळे या कठीण अशा स्तराच्या निर्मितीमुळे समुद्रातळाशी जेथे प्रवाळ आढळते तेथे प्रवाळाची विस्तीर्ण बेटे तयार होऊ शकतात, तसेच योग्य तापमान, आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची वाढ उत्तम होते. अशी प्रवाळबेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली (मालवण), गुजरात मधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप (लखदीव) व मालदीव येथे आढळतात असे समजते. याखेरीज भूमध्यसमुद्रात असे प्रवाळ आढळते. जगातील काही ठिकाणच्या प्रवाळबेटांना अलीकडच्या काळात हानी पोचली आहे असे दिसून आले आहे. प्रवाळाची हानी होत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे प्रवाळांचे रंग बदलणे (ब्लीचिंग - coral beaching). ह्याची कारणे समुद्रातील पाण्यात अतिनील किरणांचे वाढलेले प्रमाण, तापमानातील बदल, पाण्यातील धूळ /कचरा यांचे वाढते प्रदूषण अशी दिली जातात.[८] ह्या हानीमुळे या बेटांवर अवलंबून असलेल्या सजीव साखळीला (मासे, वनस्पती आणि इतर सागरी जीव) देखील धोका निर्माण होतो.[९] +लसण्या किंवा वैदूर्य (Cat's Eye) (संस्कृत : वैडूर्य) +पुष्कराज (Yellow Sapphire) +गोमेद (इंग्रजी:Hessonite) [ चित्र हवे ] +माणिक (इंग्रजी:Ruby) +हिरा (इंग्रजी: Diamond) (संस्कृत: हीरक, वज्र, कुलिशम्) +पाचू (इंग्रजी: Emerald) (संस्कृत: मरकत) + +नीलम (इंग्रजी:Blue Sapphire) हा रत्नश्रेणीतला खडा समजला जातो.जेव्हा नीलम हा अल्युमिनियम भस्म (ऑक्साइड) (Al2O3) असतो जेव्हा तो लाल रंगाशिवाय इतर रंगाचा असतो. हा खडा नैसर्गिकरीत्या मिळू शकतो अथवा कृत्रिम रितीनेही बनवता येतो. काश्मीर येथे सापडणारा नीलम सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याचप्रमाणे चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, थायलंड, जावा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि काबूल (अफगाणिस्तान) येथेही नीलम सापडतो. हा खडा शनी ग्रहाशी संबंधित आहे अणि खूप कमी कालावधीत आपला शुभ अथवा अशुभ प्रभाव दाखवतो असे समज आहेत. +भारतीय साहित्यातील उल्लेख - (स्रोत हवा आहे). +कनकं कुलिशं नीलं पद्मरागंच मौक्तिकम्‌ । +एतानि पञ्चरत्‍नानि रत्‍नशास्त्रविदो विदुः ॥१॥ +कनकं कुलिशं नीलं पद्मरागोथ मौक्तिकं । एतानि पंचरत्‍नानि कुंभेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहम् । इति पंचरत्‍नानि । +कलशात पंचरत्‍ने व पैसे घालावेत.--पुण्याहवाचन या विधीमधला एक मंत्र. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2470.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafc1669f3538d83590098a4d642768edcb8652f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2470.txt @@ -0,0 +1,4 @@ +नवरा बायको हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2476.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2476.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_248.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad49d227a2c7d6f582c6fc72f98ea06a33d997a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_248.txt @@ -0,0 +1,13 @@ +दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये १३ आणि सम क्रमांकाच्या चरणांत ११ मात्रा असतात. विषम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण ( । ऽ ।-- लघुगुरूलघु ) असू नये. सम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरू आणि शेवटचे अक्षर लघु असणे आवश्यक आहे. +सोरठा हा छंद दोह्याच्या अगदी विरुद्ध असतो. त्याच्या विषम क्रमांकाच्या ओळीत ११ आणि सम क्रमांकाच्या ओळीत १३ मात्रा असतात. दोहा हा काव्यरचनेचा एक प्रकार आहे. संत कबीर यांनी त्यांची सर्व रचना या प्रकारात केली आहे. या प्रकारातील 'बीजक' हा त्यांचा एकमेव ग्रंथ आहे. याचे संपादन शिष्य धर्मदास यांनी केले आहे. + +दोह्याचे उदाहरण - +मुरली वाले मोहना, +मुरली नेक बजाय । +तेरी मुरली मन हरो, +घर ॲंगना न सुहाय॥ +सोरठाचे उदाहरण - +जो सुमिरत सिधि होय, +गननायक करिबर बदन। +करहु अनुग्रह सोय, +बुद्धि रासि सुभ गुन सदन॥ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2491.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3797f2ca6e6bd51a6321552d13ffcf0814bac04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2491.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2501.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67f477f5adf8b448319a3d4323d92d84fbbe2bb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2501.txt @@ -0,0 +1 @@ +नवलकोल (इंग्लिश: Knolkhol, Kohlrabi) किंवा जर्मन टर्निप ही एक भाजी आहे. ही भाजी कोबीच्या कुळातील आहे. शास्त्रीय नाव - Brassica caulorapa diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2508.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31cc425f20dce2a816b8f17d7c53a9a1785f1b1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2508.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2552.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aa57def28851c0c7cbee2e97931b1faa9985992 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2552.txt @@ -0,0 +1,5 @@ +नवा मराठी चित्रपट ही संकल्पना विशिष्ठ काळामध्ये प्रदर्शीत केलेल्या मराठी सिनेमाच्या वर्णन करताना वापरली गेलेली संकल्पना म्हणून मांडता येईल .मराठी सिनेमाचे बदलेले स्वरूपाची ओळख ही काळानुरूप बदललेले आहे . विषयाची विविधता त्यात दिसून येते . ही संकल्पना समजून घेताना आरती वाणी यांनी लिहिले आहे कि, नवा मराठी चित्रपट हा मराठी चित्रपटाचे स्वरूप बदललेले दिसून येते. "डिजिटल तंत्रज्ञानाच्या स्वीकार ,माध्यम विश्व बदलल्यामुळे आपले जीवन हे ढवळून निघाले आहे ., असे आरती वाणी मांडतात . मराठी चित्रपट हे भारतीय सिनेमायुगाच्या प्रारंभ काळात प्रादेशिक सिनेमातील एक सशक्त प्रवाह होता .परन्तु गेल्या काही दशकात मात्र त्याची दखल घेतली गेली नाही .श्वास हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाल्यानंतर मराठी सिनेमाची दखल घेतली गेलि. मराठी सिनेमातील नव्या प्रवाहातील प्रत्येक सिनेमा हा नवीन विचाराचा असला आणि नवीन प्रयोग करणारा असला तरी तो कथेच्या बाबतीत मात्र वेगळी दिशा शोधताना दिसतो . अर्ध्या दशकाच्या कालावधीमध्ये डोंबवली फास्ट [२००५] , वळू [२००८] , ग्राभीचा पाऊस , जोगवा , हरीश्चन्दाची फक्टरी [२००९], विहीर , नटरंग [२०१०] असे आणि इतरही खूप संख्येने सिनेमे आता आजवर दुर्लक्षित अशा विषयाकडे आणि परिघबाहेरिल विषयांकडे वळले आहेत मराठीतील सिनेमा पाहण्यारयाची संख्या आता वाढताना दिसून येत आहे ही वाढ मल्टीप्लेक्स , विविध चित्रपट महोत्सव यातून आवड निर्माण होताना दिसून येते आहे . +श्वास हा लो- बजेट सिनेमा एक आजोबा आणि एक कॅन्सर ने दुष्टी गमावणाऱ्या त्याचा नातू याचे कथानक आहे . जे मराठी सिनेमातील कथानक आणि सिनेमातील भावूक वास्तव वादाचे चित्रण प्रत्येकाला सिनेमाच्या कथेमध्ये खिळवून ठेवतात. या चित्रपटाने २००४ साली मराठी चित्रपटाला मुख्य प्रवाहात आणले. +आरती वाणी यांनी केलेल्या नवा मराठी सिनेमाचा अभ्यास करताना नटरंग आणि जोगवा या दोन मराठी सिनेमाचा केलेला अभ्यास पाहता येईल .पहिला सिनेमा हा लोकप्रिय तमाशा परंपरेतील आहे तसेच गाणी आणि नाच आला आहे . तर दुसरा सत्तरीच्या दशकातील समांतर सिनेमातील सामाजिक वास्तवाचे सत्य कथन करतो . तरल आणि व्दिधाभावी पुरुषाना त्यांच्या अस्मिताना मोकळे करतात . +नटरंग आणि जोगवा हे दोन्ही सिनेमे मराठी सिनेमाचा पुरुष सैल करत, विस्तारतात आणि प्रवाहीही बनवतात . समलिंगी संबंधाना मान्यता देण्यापर्यंत हे सिनेमा येत नाही तर सिनेमातील दोन्ही नायक हे समलिंगी संबंधाला त्याच्या त्याच्या परीने विरोध करताना पुढे येतात .तरीही विरोधालिंगी पोशाख प्रधान करतात परलिंगी प्रतिमा याच्या वापराने सिनेमातून एक नवे अवकाश निर्माण करतात . जोगवा सिनेमामध्ये आलेले गाणे हे वेगळ्या शैलीतून पुढे येतात . यातील 'जीव रंगला ' हे गाणे वेगली मांडणी करते कारण यामध्ये दोघे ही साडीत आहेत पण आपल्याला माहीतही असते कि , ते भिन्न लिंगी आहेत . यात मराठी सिनेमांचा नव्या अवकाशाचा आणि अस्मिताचा धांडोळा जरी केला असला तरी प्रेक्षक हा समलिंगी जवळकीचे , सुखदेखील त्यात समाविष्ट करतो. [१] +नवा मराठी सिनेमा मध्ये येणाऱ्या विषयांची विविधता पाहताना आरती वाणी यांनी केलेल्या नटरंग आणि जोगवा या दोन नवीन मराठी चित्रपटांची मांडणी पाहिली . मराठी चित्रपटामध्ये येणारे विषय आता त्याची सीमारेषा ओलांडत आहेत . ज्यामुळे परीघाबाहेरील , केद्रबाहेरील लोकांचे जीवन चित्रपटांतून दिसत आहे आणि त्याच बरोबर जनसामान्याचे विषयही आणि अडचणी , समस्याही चित्रपटांतून आले आहे. बालगंधर्व हा मराठी सिनेमा संगीतनाटकाचा काळाचे वर्णन करतो . ज्याची कथा ही बालगंधर्व या व्यक्तीच्या संगीत नाटकामध्ये कार्यरत असणाऱ्या यश - अपयशाची आहे . नवीन तंत्रज्ञनाचा म्हणजे मराठी चित्रपट निर्मितीचा परिणाम हा नाट्यगृहावर कसा झाला याचेही वर्णन करतो .७२ मैल , ग्राभ्रीचा पाउस , प्रकाश आमटे , प्रियतमा , इतर सारखे चित्रपट विविध विषयाची मांडणी करतात .या विषयाची विविधता ही एकाच पातळीवर मयादित राहत नाही .समाजातील बहुतांश गोष्टी त्यात मांडल्या जात आहे . नवा मराठी सिनेमा हा त्याच्या महत्त्वाच्या विषयातून समाजातील इतर घटकापर्यंत प्रश्न ,समस्या पोहोचवण्याचे कामही करत आहे . शेतकऱ्याचे प्रश्न , गरिबांचे प्रश्न , तरुण पिढीचे प्रश्न , इतर ही त्याच्या अख्यातरीत आलेले आहेत . diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2568.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..514f44bc43be173e19c4ddcb237be4ee5560e12f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2568.txt @@ -0,0 +1 @@ +नवाहो अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात आहे. त्यांनी व्यापलेला प्रदेश नाबीहो बिनाहासझो नावाने ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2625.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8700478c7c0cf1d2ce8a229ae82d1f0971340cb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2625.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2633.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350994fb72d1c6f4157fec92ae5715cce187b9b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2633.txt @@ -0,0 +1 @@ +नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (Navi Mumbai Municipal Transport; संक्षेप: एन.एम.एम.टी.) ही महाराष्ट्र राज्याच्या नवी मुंबई शहरामधील एक परिवहन सेवा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवली जाणारी ही सेवा २३ जानेवारी १९९६ रोजी सुरू झाली. २०१५ साली एन.एम.एम.टी.च्या ताफ्यातील ३०८ बसेस नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, खारघर-तळोजे, पनवेल इत्यादी अनेक भागांमध्ये कार्यरत आहेत. एन.एम.एम.टी.द्वारे अनेक मार्गांवर वातानुकुलित बसेस देखील चालवल्या जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_27.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_27.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eed592177c481d49532171a0c9e51244d9368af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_27.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दिल्ली ६ (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2703.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a459176f65a14ea3974e182730ce6c5dad46ac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2703.txt @@ -0,0 +1,8 @@ + नवेनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2723.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b21e61a06fa22abb2e452f339c5275ed15911e71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2723.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +नसबंदी हा आय.एस. जोहर दिग्दर्शित १९७८ चा बॉलीवूड व्यंगचित्रपट आहे. यामध्ये त्या काळातील सर्व लोकप्रिय नायकांची नकली भूमिका होती. [२] इंदिरा गांधींच्या राजवटीत भारत सरकारच्या नसबंदी मोहिमेवर हे व्यंगचित्र आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र नसबंदी प्रकरणे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. +इंदिरा गांधी सरकारचे चित्रण आणि आणीबाणीच्या काळात सक्तीच्या नसबंदीच्या धोरणामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. [३] तथापि, चित्रपटाने घरगुती चित्रफिती आणि उपग्रह प्रसारणाद्वारे (शासन बदलल्यानंतर बंदी उठवण्यात आली) द्वारे कल्ट लोकप्रियता प्राप्त केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2737.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf23f0421ad06ef1d6e84808e3f2dbe481fc2dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2737.txt @@ -0,0 +1 @@ +नसिर हमीद (एप्रिल ४, इ.स. १९६९:रावळपिंडी, पाकिस्तान - ) हा हॉंग कॉंगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2743.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd6b1c2a52d8cc442953e08385b00892eef9c1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2743.txt @@ -0,0 +1,2 @@ +नसीब हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2763.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7779b8f81e46d38b30102b6aa4579d7b1897bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2763.txt @@ -0,0 +1,2 @@ +विना-नफा संस्था अशा संस्था आहेत ज्यांचे ध्येय समाजकल्याण असून आर्थिक फायदा हे ध्येय नसते. +लाभ निरपेक्ष संघटन (लानिसं) अशा संघटनाला म्हणतात जे आपल्या जवळील अतिरिक्त धन-संपत्तीला समभागधारकांत किंवा मालकांत वाटत नाहीत तर याचा उपयोग आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी करतात. धार्मिक संस्था, मजूर संघटन आणि सार्वजनिक कला संघटन याच्या अंतर्गत येतात. बहुतांश देशांत नफा निरपेक्ष संघटनांना आयकर व संपत्ती कर यापासून मुक्त ठेवण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2766.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bf56efd8dbe1a4ec88e15fe2ca8073d6a35b30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2766.txt @@ -0,0 +1,18 @@ +नामदेव धोंडो महानोर (ना.धों. महानोर नावाने प्रसिद्ध; १६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी कवी आणि गीतकार होते.[२] १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात.[३] मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.[४] +१९९१ भारत सरकारने पद्मश्री हा देशातला चौथा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[२] +ना.धों. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी ब्रिटिश भारतातील औरंगाबादच्या पळसखेड गावी झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण पळसखेडला घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णी गावच्या शाळेते गेले. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.[५] परंतु आर्थिक समस्यांमुळे एका वर्षात त्यांनी शिक्षण सोडले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.[६] +रानातल्या कविता (१९६७) हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी ही त्यांची कादंबरी १९७२ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गपसप (१९७२) आणि गावातल्या गोष्टी (१९८१) हे लोककथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध केले आहे.[५] महानोरांनी गद्यलेखन देखील केलेले असले तरी प्रामुख्याने ते निसर्गावरच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. + +"या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो... आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..." +"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे... आणि या मातीतूनी चैतन्य गावे... कोणती पुण्ये येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे..." +अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांची गाणी खूप गाजली आणि आजही प्रसिद्ध आहेत. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांतील त्यांची गाणी आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात.[७] +१)मी रात टाकली, +२)जांभूळ पिकल्या झाडाखाली, +३)लिंबोणीचं लिंबू, +४)चिंब पावसानं रान झालं आबादानी, +५)दूरच्या रानात केळीच्या बनात, +६)आम्ही ठाकरं ठाकरं +७)बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं +८)राजसा जवळी जरा बसा इत्यादी अजरामर गीते त्यांनी लिहली. +महाराष्ट्र सरकारने १९७८ मध्ये साहित्यिक−कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली.[२][३] साहित्यिक प्रश्नांबरोबरच त्यांनी शेती क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले. त्यांनी जलसंधारण पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव सभागृहात मांडले, जे पारित देखील झाले. १९७८-८४ या काळाबरोबरच १९९०-९५ मध्ये देखील ते विधान परिषदेवर होते.[८] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2803.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799ac0227a87845139ded955c8fe6cf3f4c029ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2803.txt @@ -0,0 +1,4 @@ + +लि ना अथवा ली ना (चिनी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà, फेब्रुवारी २६, इ.स. १९८२) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिस खेळाडू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली. +विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली. +२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजय मिळवून ली ने आपले दुसरे एकेरी ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_287.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f7437f47c960b45e5ffacc3a9d2ff162108d35e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_287.txt @@ -0,0 +1 @@ +दौलतराव गायकवाड" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान साथीदार होते.स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी पासून दौलतराव गायकवाड हे शिवरायांचे फक्त साथीदार नसून ,त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते दौलतराव गायकवाड यांच्या मोठ्या आईसाहेब ( आत्या) शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या (संभाजीराजे शहाजीराजे भोसले) पत्नी होत्या.त्यानंतर दौलतराव गायकवाड यांची मोठी बहीण शिवरायांच्या पत्नी होत्या (सक्वारबई गायकवाड).अफजलखानाच्या वधानंतर भूपाळगडाची किल्लेदारी दौलतराव गायकवाड यांच्या कडे देण्यात आली व त्यांनी ती चोखपणे पार पाडली.दौलतराव गायकवाड यांना थोरले बंधू होते ते म्हणजे विश्वासराव गायकवाड.दोघे बंधू पन्हाळा जवळ झालेल्या पेशव्यांच्या व करवीर छत्रपतींच्या युद्धात धारातीर्थी पडले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2870.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c21a14c38062aa263c9446ae5b86d5adb5903ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2870.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०° ४१′ ००″ N, ७७° ५०′ ००″ E + +नांदगाव खंडेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथे श्री खंडेश्वराचे पुरातन शिवालय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2903.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26bf905289f77df3bf3df42a83f7871cb57feb19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2903.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2918.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd44fa0d66af822c52d0b0be603ebfd7afab3b2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2918.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदळामाकटा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2919.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..877f6d96996b46f2f975e02572f8aa0d924a820f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2919.txt @@ -0,0 +1,2 @@ + नांदळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_293.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b77b43e2090fc0f0a8337d420c5c0ce1062208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_293.txt @@ -0,0 +1 @@ +दौळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2936.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cf6df572f1264e5fc1434d3341943c98dfe72dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2936.txt @@ -0,0 +1,3 @@ +१९° १२′ ४४″ N, ७३° ०७′ ५६″ E +नांदिवली तर्फे पाचानंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2939.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..523b783a186bcb4bc80bc5ab49d5a95398c635fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2939.txt @@ -0,0 +1,7 @@ +नांदीश्राद्ध किंवा नांदीमुखी श्राद्ध हा एक प्रचलित हिंदू धार्मिक विधी आहे. पुत्रजन्म, विवाह आदि मंगलकार्यावेळी अभ्युदयासाठी हा विधी केला जाई. याला वृद्धिश्राद्ध असेही म्हणत. पुत्र-कन्या जन्म, विवाह, उपनयन, गर्भाधान, यज्ञ, पुंसवन, राज्याभिषेक, अन्नप्राशन विधी इत्यादी प्रसंगी नांदीमुख श्राद्ध केले पाहिजे, असे निर्णयसिंधु ग्रंथात लिहिले आहे. ज्या कार्यामध्ये अभ्युदय किंवा वृद्धि संभवते त्या कार्याच्या आधीही हे श्राद्ध करत. नांदीश्राद्धामध्ये आधी आईचे, मग वडलांचे आणि मग आजी-आजोबांचे श्राद्ध करीत. पुत्रजन्माच्या वेळी करायचे नांदीश्राद्ध दिवसाच्या कोणत्याही वेळी केले तरी चाले, परंतु नांदीश्राद्धातील अन्य श्राद्धे सकाळीच करायची पद्धत होती. +हे संकृत-हिंदीमधील एक १४ अक्षरी गणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात न नतत ग ग असे गण येतात. या प्रकारच्या काव्याचे उदाहरण :— नित गहि दुइ पादै गुरू केर जाई। दशरथ सुत चारी लहे भोद पाई। हिय मॅंह धरि कै ध्यान शृंगी ऋषि को। मुदित मन कियो श्राद्ध नांदीमुखी को। +दुर्वांकुर अक्षता पाणी घेऊन ॥ सत्यवसु संज्ञा असलेले ( नांदी मुखाचे ) देव यांना ( वृद्धि श्राद्धा पैकीं ) पाद्य देतो. ( अर्पण असो ) +आई, बापाची आई, आजाची आई यांनां पूर्वीप्रमाणेच पाद्य ० ॥ बाप, आजा, पणजा यांना पाद्य ० ॥ +आईचा बाप, आजा, पणजा ( यांच्या ) पत्नीसह यांनां पाद्य ० ॥ ( म्हणून अक्षता पाणी दूर्वा प्रत्येक वेळीं पात्रांत सोडावें. याचप्रमाणे सत्यवसु पासून मातामहा पर्यंत प्रत्येक वेळी अक्षता दूर्वा गंध फ़ुले व पाणी सोडून आसन गंधादि उपचार कल्पून पात्रांत सोडावे. +पुनःगौर्यादि १६ ब्राह्मणादि ७ गणपती दुर्गा क्षेत्रपाल यांना ( या नांदीश्राद्धांतील ) दोन ब्राह्मण आतृप्त भोजन करतील इतक्या अन्नाचे किंमती बरोबर मी किंचित् द्रव्य देतो ( ह्मणून कांहीं द्रव्य पाण्यासह पात्रांत सोडावें ) तसें सत्यवसु, मातृ पितामही, पितृ पितासह, मातासह, मातृपितामह० सपत्निक यांना पार्वणासही वरील प्रमाणें द्रव्य सोडून उमास्मै, (१) प्रजापते (२) हे मंत्र म्हणावेत, व केलेल्या नांदीश्राद्धाचें ( श्रेष्ठ ) फ़ल मिळण्यासाठी द्राक्ष व आवळा यांचें किंमती इतके द्रव्य मी देतो म्हणून सोडावे. नंतर मातादिक सर्वत्र प्रसन्न होऊन मंगल देवोत असे म्हणून इळामग्ने (३) हा मंत्र म्हणावा. व इळा मुपह्वयते (४) हाही मंत्र म्हणून हिरण्यानें पात्र वाजवावे. व या नांदीश्राद्धानें नांदीं मुखदेवता प्रसन्न होवोत. या ठिकाणीं विवाह उपनयनाचेवेळीं मंडपदेवता स्थापन करितात व नंतर अहेर करावा. +नंतर केलेल्या कर्माची सांगतां होण्याकरितां अनेक गोत्रांच्या ब्राह्मणांची गंधादिकांनीं पूजा करतो व त्यांना भूयसी दक्षिणा देतो म्हणून पाणी सोडावे नंतर उत्तिष्ठ (५) हा मंत्र व यांतुदेव (६) हाही मंत्र म्हणून अक्षता टाकाव्या व आवाहितदेवतांचें उत्थापन करावे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2948.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f4946335da1bddab2bdcda7c9fabe9653927792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2948.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदुर माध्यमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2958.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..294e1db98c19d09b6ffa68c7a993e36af7da1e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2958.txt @@ -0,0 +1,2 @@ + नांदुरा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2959.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79370b46843df2a53760abbaf9a83b9a6a08714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2959.txt @@ -0,0 +1,4 @@ +नांदुरा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव 8 +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४० कुटुंबे राहतात.गावातील एकूण १६६६ लोकसंख्येपैकी ८८८ पुरुष तर ७७८ महिला आहेत.गावात १०७९ शिक्षित तर ५८७ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ६३२ पुरुष व ४४७ स्त्रिया शिक्षित तर २५६ पुरुष व ३३१ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६४.७७ टक्के आहे. +तळेगाव, नांदुरा खुर्द, ब्रह्मपुरी, सावरगाव रोकडा, गोठळा, भुतेकरवाडी,हसर्णी, जांब, उन्नी, कोकंगा, जवळगा ही जवळपासची गावे आहेत.नांदुरा बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2985.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e7817e3b642c689584fcee90228b4b7896b7aaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_2985.txt @@ -0,0 +1,21 @@ +शिलालेख हे प्राचीन भारताच्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. प्राचीन कालखंडाच्या इतिहाससाधनांत मुख्यतः पुरातत्त्वीय निरनिराळ्या वस्तूंचा समावेश होतो. उत्खननांमुळे मिळालेली भांडी, शस्त्रे, घरे व त्यांची बांधणी, ग्राम-नगरव्यवस्था, अलंकार इ. तत्कालीन समाजिक, धार्मिक व आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहेत. प्राचीन कालखंडात तयार झालेले विविध भाषिक ग्रंथ हेही इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. या ग्रंथांचे समकालीन व उत्तरकालीन असे दोन भेद पडत असले, तरी ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकतात. राजतरंगिणी, राष्ट्रौढवंशमहाकाव्य, शिवभारत इ. ग्रंथ प्रत्यक्ष इतिहास सांगतात तर हर्षचरित, विक्रमांकदेवचरित पंपभारत, मणिमेखलै इ. ग्रंथ रूपक शैलीने इतिहासकथन करतात. काही ग्रंथांच्या आरंभी किंवा अंतर्भागी किंवा अंती इतिहासविषयक माहिती मिळते. उदा., हेमाद्रिलिखित चतुर्वर्गचिंतामणि, जल्हणचा सुक्तिमुक्तावलि व प्रसिद्ध कानडी कवी पंप याचा विक्रमार्जुनविजय अथवा पंपभारत ह्या ग्रंथांच्या प्रस्तावनांत ऐतिहासिक माहिती आढळते. बसबभूपालने शिवतत्त्वरत्नाकरात मधूनमधून ऐतिहासिक माहिती गुंफली आहे तर सोमदेव सुरीने यशस्तिलकचंपूमध्ये ग्रंथाच्या शेवटी काही ऐतिहासिक माहिती दिली आहे. तथापि इतिहासकाळातील प्राचीन विभागाची साक्षात माहिती देणारे ग्रंथ एकंदरीत थोडेच आहेत. +तत्कालीन राजकीय इतिहाससंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ अपुरे पडत असले, तरी इतिहासाच्या धार्मिक, सामाजिक, भाषिक ह्या विविध अगांसंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ उपयुक्त आहेत. पुराणे, रामायण, महाभारत, ही महाकाव्ये, तत्कालीन सामाजिक आचारविचार, राहणीमान, वस्त्रे, अलंकार इत्यादीसंबंधी माहिती देण्यास उपयुक्त व महत्त्वाची साधने आहेत. भारताच्या पारंपरिक इतिहासकाळातील निरनिराळ्या राजवंशांसंबंधी माहिती देण्यास पुराणे हेच एकमेव व महत्त्वाचे साधन आहे. +गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि विशेषतः नांदेड जिल्ह्याच्या परिसरातील शिलालेखांचा शोध घेता, आजपावेतो ५० शिलालेख सापडलेले आहेत. यापैकी काहींची नोंद एपिग्राफिया इंडिया या संशोधनपर ग्रंथमालेत झाली आहे.[१]तरीही मौर्य, सातवाहन, गुप्त व वाकाटक या प्राचीन राजघराण्याचे शिलालेख अजून पर्यंत सापडलेले नाहीत. + +नांदेड जिल्ह्यातील उपलब्ध शिलालेखांचा अभ्यास करता असे आढळते की, आठव्या शतकांपासून अठराव्या शतकांपर्यंत म्हणजेत या एक हजार वर्षाच्या कालावधीत हे शिलालेख कोरले गेले आहेत. दक्षिण भारतातील प्रमुख राजघराण्यापैकी राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य, कलचुरी आणि यादव या घराण्यांचे हे शिलालेख होत. या शिलालेखात एका ओळीच्या शिलालेखापासून ते सविस्तर वर्णन असणाऱ्या विस्तृत अशा शिलालेखापर्यंत अनेक प्रकारचे आढळतात. काही राजांचे प्रशस्तिपर शिलालेखही या परिसरात उपलब्ध झाले आहेत.या प्रशस्तीपर शिलालेखाची भाषा बी अत्यंत लालित्यपूर्ण आहे. तसेच गद्य आणि पद्यातल्या अप्रतिम रचना काही शिलालेखातही आढळतात.[२] +या परिसरातील उपलब्ध शिलालेखांपैकी बहुसंख्य शिलालेख हे कानडी लिपीत आहेत. ते सर्वच चालुक्यवंशीय असून काही शिलालेखांची भाषा आणि लिपी दोनिही कानडी आहेत. तर काहींची लिपी कानडी आहे आणि भाषा संस्कृत आहे. तर काही शिलालेख मराठी भाषेत आहेत, लेखन नागरी लिपीत केले आहेत.संस्कृत शिलालेखांची अक्षरवाटीका अत्यंत प्रमाणबद्ध असून कानडी लिपीतील शिलालेख कोरताना कोरवयांनी तीच कसब दाखवली आहे. [३] +कंधार येथे इसवी सन १९५८ साली सापडलेला प्राचीनतम् शिलालेख हा आतापर्यंत उपलब्ध झालेल्या शिलालेखांपैकी एक होय. हा शिलालेख कंधार गावच्या वेशीजवळ असलेल्या बौद्ध मंदिरात असलेल्या बुद्धमुर्तीच्या आसनपीठावर कोरलेला आहे. हा शिलालेख नागरी लिपीतील असून फक्त दोन ओळींचा आहे. ह्या शिलालेखात बौद्ध तत्त्वज्ञानातील हेतुवादाचे विवेचन संस्कृत रचनेत करण्यात आले आहे. [४] +'हे धर्मा हेतुप्रभवा हेतु तेषां तथा गतोहयवदत +तेषांच यो निरोध:एवं वादी महाश्रमण' ह्या रचना असलेला शिलालेख राष्ट्रकुट काळातील असून सध्या कंधार शहराच्या मध्यभागी बौद्धद्वार वेशीजवळ असलेल्या बौद्धविहारात आहे. हा शिलालेख आठव्या शतकातील असून ती आजही बुधवार वेस म्हणून परिचित आहे.[५] +नांदेड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन प्रभावी सत्ता राष्ट्रकुटांच्या स्वरूपात प्रस्थापित झाली. प्रारंभीच्या काळात राष्ट्रकुटाच्या हालचाली वेरूळच्या परिसरात केंद्रित झाल्या तसेच याच काळात नांदेड आणि उस्मानाबाद परिसरातही राष्ट्रकुटांचा प्रभाव दर्शविणारे काही संदर्भ ताम्रपटातून उपलब्ध झाले. + +१९५७ साली नांदेड जिल्ह्यातील कंधार या ठिकाणी राष्ट्रकुटकालीन सापडला. कंधारचा हा राष्ट्रकुटकालीन शिलालेख एका दगडी चौकोनी खांबावर- खांबाच्या तीन बाजूस कोरलेला असून या खांबाचा खालचा भाग तुटलेला असल्याने उपलब्ध झाला नाही. अडीच-तीन फूट उंचीचा जो भाग उपलब्ध झाला त्या भागातील शिलालेखाच्या अक्षरवाटिकेवरून हा शिलालेख राष्ट्रकुट राजा तिसरा कृष्ण(इ. स. ९३९-९६८) यांच्या कालखंडातील असावा असा निष्कर्ष डॉ. डी. सी. सकरार, आणि जी. भट्टाचार्य यांनी काढला आहे. [६] या शिलालेखात कंधारचे अप्रतिम वर्णन करण्यात आले आहे. कंधार येथील शिलालेखांमध्ये राष्ट्रकूटकालीन नगररचनेचा आराखडा एकप्रकारे नोंदविला गेला होता व जाणीवपूर्वक या स्थानाचा विकास केला होता. या स्थानाचे भौगोलिक महत्त्व, भूस्थळ रचना व पर्यावरणाचा अभ्यास करून, जलाशयांसाठी सुयोग्य अशा स्थानाची निवड करून 'हत्तीनाला' हा एक जलप्रवाह अडवून तेथे कृष्ण दुसरा यांच्या काळातच 'जलतुंग समुद्र' या जलाशयाची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी जवळपास ८५० मी. लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला व या परिसरातील 'मण्यार नदी' व हा जलाशय यातील उंच-सखल भागाचा योग्य उपयोग करून बंधारे तसेच विविध बारवांची एक शृंखला निर्माण केली गेली. परिणाम म्हणून मण्यार ही मांजरीची उपनदी व त्या काठावर असलेला हा संपूर्ण परिसर हा पाणलोट क्षेत्राचा भाग बनवून विकसित केला गेला.[७] प्राचीन भारताच्या इतिहासात उल्लेखनीय भर टाकणारा एक महत्त्वाचा शिलालेख म्हणून ह्या शिलालेखाचा उल्लेख करावा लागेल. ह्या शिलालेखाच्या उपलब्धतेमुळेच कंधार हे राष्ट्रकुटांची राजधानी होती हे सिद्ध झाले आहे. कारण या काळी अस्तित्वात असलेल्या देवळांचे, मकरतोरणांचे आणि सर्वलोकेश्वर मंडपाचे वर्णन या शिलालेखात करण्यात आलेले आहे. राष्ट्रकुट राजांनी केलेल्या लोकोपयोगी कामांचे उल्लेख शिलालेखातून येतात.[८] +नांदेड परिसरात उत्तर चालुक्याचे एकूण बत्तील शिलालेख आजपर्यंत उपलब्ध झाले आहेत. यातील बहुसंख्य शिलालेख हे कानडी भाषेतील आहेत. राष्ट्रकुटाच्या नंतर नांदेड जिल्ह्यात कल्याणीच्या चालुक्याची राजवट सुरू झाली. ही बाब ह्या शिलाेखामुळे सिद्ध होते. हे सर्व शिलालेख कल्याणीच्या चालुक्य नृपती संबंधीचे आहेत. कल्याणी येथे उत्तर चालुक्याची राजधानी स्थापन करणारा पहिला सोमेश्वर[इ.स. १०४३-१०६८] यांच्या कालखंडापासून ते जगदेकमल्ल दुसरा [११३८-११५१] यांच्या कालखंडापर्यंत जवळपास शंभर वर्षाच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ३६ शिलालेख सापडले आहेत.[९] +या घराण्यातील पहिला शिलालेख देगलूर तालुक्यातील तडखेल या गावी सापडला. हा शिलालेख तडखेल या गावच्या पूर्वेस महादेवाच्या मंदिराजवळ ठेवलेला आहे. [१०] हा शिलालेख कूपच विस्तृत असून सोश्वर व नागवर्मा यांच्या विजयाचे सविस्तर वर्णन यात केले आहे. लिखनाचे स्वरूप प्रशस्तिपर असून सोमेश्वरांच्या एकूण कार्याचा यात आढावा घेण्यात आला आहे. ह्या शिलालेखाचे वैशिष्ठ्ये म्हणजे हा शिलालेख कोरल्याचे वर्ष त्यात स्पष्टपणे नोंदवले असून सर्वजित संवत्सरातील शके ९६९ या वर्षात वैशाख शुद्ध तृत्तीयेस बुधवारी हा शिलालेख कोरवला गेला अशा प्रकारची नोंद ह्या शिलालेखात आहे. या शिलालेखामुळे चालुक्य सेनापती नागवर्मा ह्यांचे कर्तृत्व प्रकाशात आले एसून त्यांनी मिळवलेल्या अनेक विजयाचा उल्लेख ह्या शिलालेखात येतो. +मुखेड तालुक्याचील मुखेड या गावीच विक्रमादित्याचा एक शिलालेख सापडला आहे. विक्रमादित्यांचे बहुतांश सिलालेख हे कानडी लिपीत व कानडी भाषेत लिहिले गेले असून एकमेव अपवाद संगम येथील शिलालेखाचा असून हा शिलालेख नागरी लिपीत व संस्कृत भाषेत कोरवला गेला आहे. +बाराव्या शतकाच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातून चालुक्याची राजवट नाहिशी झाली. चालुक्य राजवटीस हुसकावून लावून कलचुरींनी काही काळ आपला प्रभाव नांदेड येथे प्रस्थापित केला असावा. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील जुन्नी या गावी कलचुरींचा एकमेव शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख म्हणजे एक स्तंभलेखच असून खांबाच्या तीन बाजूस तो कोरण्यात आला आहे.[११] जुन्नवलीगे म्हणजेच आजचे जुन्नी. या ठिकाणच्या काही देवालयांना दिलेल्या दानाचा उल्लेख ह्या शिलालेखात आहे. सुवर्णवृषभध्वज आणि कालिंजरपूरवराधिश्वर यासारख्या उपाधींचा वापर या शिलालेखात आठळतो. +कलचुरीनंतर नांदेड जिल्ह्यावर यादवांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले. नांदेड जिल्ह्यात सापडलेल्या शिलालेखावरून असे स्पष्ट होते की यादवांचे मांडलिक रट्टवंशीय बल्लाळ हे या परिसरात राज्य करीत होते. या बल्लाळ राजाची राजधानी अमरदकपूर येथे होती. तर राज्यातील एक प्रमुख केंद्र अर्धापूर हे होते. यादव नृपती भिल्लम पाचवा यांचा एक शिलालेख नांदेड शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर सलेल्या अर्धापूर या ठिकाणी सापडला आहे. [१२] या सिलालेखात रट्टवंशीय बल्लाळांची वंशावळ आणि त्यांनी दिलेल्या भूमिदानाचे उल्लेख केलेले आहेत. इ. स. बाराव्या शतकातील अर्धापूरचे सविस्तर वर्णन या शिलालेखात आढळते. या शिलालेखाचा रचयिता, लेखक आणि कोरक ह्यांचे उल्लेखही यात आलेले आहेत. हा शिलालेख अर्धापूर गावाच्या पश्चिमेस एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली असलेल्या उद्धस्त मंदिराजवळ ठेवण्यात आला आहे. +किनवट तालुक्यातील उनकेश्वर या ठिकाणी रामचंद्र यादवाच्या काळातला एक शिलालेख उपलब्ध झाला आहे. प्राचीन मराठी कोरीव लेखातील एक महत्त्वपूर्ण लेख म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. [१३] इ. स. १२८०-८१ सालातील हा शिलालेख म्हणजे नांदेड परिसरातील शेवटचा यादवकालीन शिलालेख होय. +इ.स. चौदाव्या शतकात नांदेड परिसरावर मोहम्मद तुघलक यांचा प्रभाव प्रस्थापित झाला. कालांतराने बहामनी वर्चस्वाखाली नांदेड परिसर आला, आणि बिदर प्रांतातील भाग म्हणून नांदेड सुभा प्रस्तापित झाला. या बहामनी कालखंडातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी कंधार परिसरात सापडल्या आहेत. त्याचप्रमाणे निझामशाही, बरीदशाही आणि इमादशाही या दक्षिणी सत्तांनीही नांदेड परिसरात शिरकाव केलेला होता. पुढे मोघलांचाही प्रभाव नांदेड परिसरात राहिला. +कंधार या गावी या कालखंडातील काही शिलालेख उपलब्ध असून हे सर्व शिलालेख पर्शियन व अरेबिक या भाषेत असून कंधारच्या किल्ल्यात आणि गावातील दर्ग्यावर आढळतात.[१४] कंधारच्या किल्ल्यात असलेल्या शिलालेखावरून या परिसरातील मध्ययुगीन कालखंडाच्या अनेक घडामोडीवर प्रकाश पडतो. कंधारच्या किल्ल्यावरील बुरूजांची बांधणी, डागडुगी या विषयीचे संदर्भ या शिलालेखातून आढळतात. +https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/history-of-kandhar/articleshow/59399344.cms[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_303.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dade5db727d230887e9e541ac25c094491829f83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_303.txt @@ -0,0 +1 @@ +द्जामेल अब्दून (१४ फेब्रुवारी, १९८६:मॉंत्र्यूल, सीन-सेंत-देनिस, फ्रांस - ) हा  अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3031.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..709a44dd36e4283bf3e8993c274f8c8bfc86da55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3031.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +नाईक हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3052.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8525281711dc941fa2bdda656acbd8cfc46a5ca2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3052.txt @@ -0,0 +1 @@ +नाओ हिबिनो (जपानी:日比野 菜緒 ;२८ नोव्हेंबर, १९९४:इचिनोमिया, ऐची प्रभाग, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3053.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea56c247063f7260f1afaeafbbd86c7e478beb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3053.txt @@ -0,0 +1 @@ +नेओनाई वारे (२८ मे, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_307.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39310993f4e404464ef87d549fef3b52d58341a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_307.txt @@ -0,0 +1,4 @@ +दिल्मा व्हाना रूसेफ (पोर्तुगीज: Dilma Vana Rousseff) (जन्म: १४ डिसेंबर १९४७) ह्या ब्राझिल देशाच्या ३६व्या व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. गतराष्ट्राध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याच्या मंत्रीमंडळामध्ये प्रमुख सचिव राहिलेल्या रूसेफ ब्राझीलच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ऑक्टोबर २०१० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्या ५६ टक्के मते मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आल्या व ऑक्टोबर २०१४ मधील चुरशीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने विजय मिळवून त्यांनी सत्ता राखली. +बल्गेरियामधून स्थलांतर केलेल्या कुटुंबामधून आलेली रूसेफ अर्थतज्ज्ञ असून देशातील इ.स. १९८५ पूर्वीच्या हुकुमशाहीविरोधातील बंडखोरीमध्येही तिने सहभाग घेतला होता. मावळता लोकप्रिय अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याने रूसेफची राजकीय वारसदार म्हणून निवड करून निवडणुकीमध्ये तिला पाठिंबा दिला होता. +रूसेफ ब्राझीलमध्ये लोकप्रिय असून तिच्या ब्राझीलमधील पायाभुत सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक झाले आहे. जर्मनीची चान्सेलर आंगेला मेर्कल व माजी अमेरिकन परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन ह्यांच्या समवेत रूसेफचा जगातील बलाढ्य व लोकप्रिय महिला नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो. +२०१५ साली ब्राझीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचार चौकशीत रूसेफ ह्यांनी आपल्या पदाचा अवैध वापर करून राष्ट्रीय अर्थसंकल्पातील तूट कमी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. ह्याबद्दल रूसेफ ह्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर खटला भरण्याचा निर्णय ब्राझीलच्या संसदेने घेतला. १२ मे २०१६ रोजी संसदेमध्ये झालेल्या मतप्रदर्शनात ५५-२२ ह्या संख्येने संसदेने रूसेफला निलंबित करून खटला भरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार रूसेफच्या जागेवर उपराष्ट्राध्यक्ष मिशेल तेमेर हे कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून काम सांभाळतील. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3079.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860d1421634bf6c88d57741d2d4b79461586b65d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3079.txt @@ -0,0 +1,2 @@ + नाखेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3094.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a88d2a263b9dc56f6710b08879b662b853697cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3094.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागचाफा किंवा नागकेशर हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले व कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे. +चार दिवसात परत नवीन कवळी नवीन पाने झुपक्यानी कवेत घ्यायला झाडांवर हजर होतात. हे झाड उंच वाढते. याचा पसारा खाली जास्त नसतो. ५० ते ७५ फुट उंच वाढणाऱ्या या झाडाच्या १५ ते २० फुटपर्यंत खोडाला फुले व फळे लागतात. तशा या झाडाला खोल पर्यत तारुण्य पीठिका येतात. खोडाच्या चारी बाजूंनी हिरवी कोंब येतात. त्यातून मंग फांदी फुटते. ती २ ते ५ फुटपर्यंत मोठी सुद्धा होते. त्यालाच लागुन २० - २५ काळ्याचे झुमके वाटण्याच्या आकारापासून लिंबाच्या अकरापर्यंत ह्या काळ्या मोठ्या होत जातात. पाकळी खालच्या बाजूला आतून जाड असते. आतील गोल भाग जो शंकराची पिंड समजली जाते. त्याचे संरक्षण कारायचे बहुदा पाटी पुसायचा गोल डबीतला स्पंज दिसतो तसा दिसणारा हा भाग म्हणजे या फुलातील श्रीकेसर आहे. हे केशर म्हणजेच औषधांमध्ये मूल्यवान गणले जाणारे नागकेशर. पाकळ्या उमलल्या की मग तो दिसतो. याची पाने सारखी गळतात. त्यामुळे कचरा होतो. या झाडाची मुळे वेडीवाकडी खोलवर जातात यामुळे हे झाड त्रासदायक ठरते. आणखी एका कारणासाठी हे झाड फक्त देवळे, सार्वजनिक बागा, हॉस्पिटल कंपनी अशा आवारातच दिसते. ते म्हणजे त्याचे फळ! एका वेळी तोफ गोळयाच्या आकाराची शे दीडशे फळे झाडाला लागतात. फळाचे वजन असते एक दीड किलो. फळ मोठे असल्यामुळे झाडावर आठ नऊ महिने लागतात. त्या फळाचा अतिशय घाण वास येतो. म्हणूनच हे झाड सर्वत्र दिसत नाही. भारतात ह्या फळाचा उपयोग माहित नाही. गीयानात मात्रे ही फळे गाई, गुरे माकडे खातात काही ठिकाणी त्याचे पेय बनवतात. +कैलासपतीची दोन सुंदर झाडे चर्चगट प्रदान कार्यालया समोर आहेत. एक प्रचंड वृक्ष बोरवली पार्क समोरच्या ओंकारेश्वराच्या मागे आहे. नागचाफ्याचे हे झाड आपल्याला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये मिळेल तसेच कस्तुरबा हॉस्पिटल, एच पी पार्क, कुलाबा या ठिकाणही कैलासपतीची सुंदर झाडे आपल्याला पाहायला मिळतील. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3103.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0c3c4054c267f6cd9eddfce736d43d1f3519fe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3103.txt @@ -0,0 +1,7 @@ + नागझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3131.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..828ad394ebf627a5a35876d1107d0ae8410dfff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3131.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागठाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3171.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc995fe407804c7b58dfe9784418b6c6ad401f25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3171.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपट्टिनम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नागपट्टिनम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3177.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc995fe407804c7b58dfe9784418b6c6ad401f25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3177.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपट्टिनम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नागपट्टिनम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3186.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad3bfa5b1863fb1485300ac25efe3ef00e85762 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3186.txt @@ -0,0 +1,9 @@ +नागपूर जंक्शन हे भारत देशाच्या नागपूर शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. नागपूर शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे नागपूर हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचे पूर्व-पश्चिम धावणारा मुंबई-कोलकाता व उत्तर धावणारा दिल्ली-चेन्नई हे सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी दोन रेल्वेमार्ग नागपूरमध्ये भेटतात. तसेच उत्तर भारतामधून दक्षिणेकडे जाणाऱ्या बव्हंशी रेल्वेगाड्या नागपूरमधून जातात. नागपूर रेल्वे विभागाचा मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ह्या दोन क्षेत्रांमध्ये समावेश होतो. +१८६७ सालापासून चालू असलेल्या नागपूर स्थानकावर ८ फलाट असून दररोज सुमारे २३९ गाड्या येथे थांबतात. नागपूरमध्ये मिळणारे सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. +हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्थानक आहे.[१] नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपूर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणाऱ्या रेल्वे स्थानकचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्थानक होते. +पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणाऱ्या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणाऱ्या एकूण २३९ ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकवर थांबतात.[२] यापैकी ५३ दररोज आणि १५ तेथूनच मार्गस्त होणाऱ्या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे.[३] येथा पार्किंग व्यवस्था आहे. +नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्थानक आहे.[४] +भारत देशातील २२ रेल्वे स्थानकचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे.[५] हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्थानकचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे.[६] येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे. +नागपूर ही उपराजधानी असल्यामुळे येथून जुनी दिल्ली साठी उपराजधानी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे. +याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्थानक करण्याचीही योजना आहे त्यात अजनी , इतवारी, कळमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजनी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ किमीआहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजनी येथे वर्कशॉप पर्यत जाण्याची ही व्यवस्था आहे. +हावडा-नागपूर-मुंबई, दिल्ली-चेन्नई, नागपूर- हैदराबाद, नागपूर-बिलासपुर सेक्शन, नागपूर- नागभीड (NG) आणि नागपूर-छिंदवाडा (NG) हे मार्ग आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3193.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4be28b78c0db3c190caa0754c463a01bdefa6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3193.txt @@ -0,0 +1,4 @@ +नागपुरी ज्याला ऐतिहासिकदृष्ट्या सदन म्हणून संबोधले जाते, हा एक इंडो-आर्यन वांशिक भाषिक गट आहे जो परंपरेने नागपुरीला त्यांची मातृभाषा म्हणून बोलतात आणि भारतीय राज्य झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि ओडिशामधील पश्चिम छोटा नागपूर पठार प्रदेशात राहतात. [१] +ऐतिहासिकदृष्ट्या सदरी/नागपुरी भाषेचे मूळ बोलणारे सदन म्हणून ओळखले जातात. सदन म्हणजे गैर-आदिवासी इंडो-आर्यन भाषा बोलणारे जे पारंपारिकपणे नागपुरी, खोरथा, पंचपरगानिया आणि कुरमाळी बोलतात. [१] ‘नागपुरी’ हे नाव कवी-लेखकांनी प्रचारात आणले आहे. अलीकडच्या काळात सदरी/नागपुरी भाषेचे मूळ बोलणारे पाश्चात्य अभ्यासात नागपुरी म्हणून ओळखले जातात. [२] स्फ्ब् द्फ्व् +दगडी अवजारे, छोटा नागपूर पठारी प्रदेशातून सापडलेल्या मायक्रोलिथ्स जे मेसोलिथिक आणि निओलिथिक काळातील आहेत. [३] निओलिथिक काळात दक्षिण आशियामध्ये शेती सुरू झाली. झुशी, लहुराडेवा, मेहेरगड, भिराणा, राखीगढ़ी, कोल्डिहवा, चोपाणी मांडो आणि चिरंद या ठिकाणी अनेक नवपाषाणकालीन वसाहती आढळून आल्या आहेत . BC २ रा सहस्राब्दी दरम्यान, कूपर साधनांचा वापर छोटानागपूर पठार प्रदेशात पसरला होता आणि हे शोध-संकुल गेरू रंगीत भांडी संस्कृतीशी संबंधित कॉपर होर्ड कल्चर म्हणून ओळखले जाते. [४] अस्र्व् स्फ्व्स् +पलामू जिल्ह्यात सोन आणि उत्तर कोएल नदीच्या संगमावर काबरा-काला टेकडीवर विविध पुरातन वास्तू आणि कला वस्तू सापडल्या आहेत ज्या निओलिथिक ते मध्ययुगीन काळातील आहेत आणि रेडवेरचे भांडे, काळे आणि लाल भांडे, काळी भांडी, काळी घसरलेली भांडी. वेर आणि एनबीपी वेर हे चाल्कोलिथिक ते मध्ययुगीन कालखंडातील आहेत. [५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3201.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f619c2c5901334386fa5a82b032df2df71638d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3201.txt @@ -0,0 +1,2 @@ +११४०३ नागपूर-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर रेल्वे स्थानक ते कोल्हापूर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी नागपूर आणि कोल्हापूर  या स्थानकांमधील १८४ किमी अंतर हे ४ तास २० मिनिटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण २ थांबे आहेत.  [१] +परतीच्या प्रवासात ११४०४ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कोल्हापूर रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कोल्हापूर आणि  नागपूर या स्थानकांमधील ८५४ किमी अंतर हे १९ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १७ थांबे आहेत.  [२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3224.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d17fe70e615541ea66def3f91b42eadd3ffb7c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3224.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपूर जिल्हा साहित्य संघाचे २रे साहित्य संमेलन ११-१३ फेब्रुवारी १९८३ दरम्यान नागपूर शहरात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_323.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c070299259218be1136064b8e9e453416f585d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_323.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +द्रविड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_325.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c070299259218be1136064b8e9e453416f585d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_325.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +द्रविड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3251.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69dc5494d0fc8459c8252bff1c38b6354660cfce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3251.txt @@ -0,0 +1 @@ +नागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] आठवे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_327.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..437636bdc06473c4999484db773728e29babe215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_327.txt @@ -0,0 +1,36 @@ +द्राविड भाषाकुळ हे जगभरातील अंदाजे २०० कोटी लोकांमार्फत वापरल्या जाणाऱ्या सुमारे ८५ विभिन्न भाषांचे भाषाकुळ आहे. या भाषाकुळातील भाषा प्रामुख्याने दक्षिण भारतात बोलल्या जातात. दक्षिण भारताशिवाय पूर्व व मध्य भारतात, तसेच भारताबाहेर ईशान्य श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराण व अन्य देशांमध्येही द्राविड भाषक विखुरले आहेत. द्राविड भाषाकुळांतर्गत तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या भाषा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रमुख गणल्या जातात. +तमिळ +मलयाळम +कोडावा +कुरुंबा +कोटा +टोडा +कन्नड +बडगा +कोरगा +तुळू +कुडिया +गोंडी +मारिया +मुरिया +पर्धान +नागरचल +खिरवार +कोंडा +मुखा-डोरा +कुई +कुवी +कोया +मंदा +पेंगो +तेलुगू +सवरा +चेंचू +नैकी +कोलमी +ओल्लारी +दुरुवा +कुडुख +कुमारभाग पहाडिया +सौरिया पहाडिया +ब्राहुई diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3277.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd625116d28e25588a716b8500b0d4c44aabe9ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3277.txt @@ -0,0 +1 @@ +हे नदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3289.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189e02f8666ac8a01feb981bda414a330301c952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3289.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागरकोविल (तमिळ: நாகர்கோவில் ) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,७५९ होती. येथील दर १०० पुरुषांमागे १०५ स्त्रिया होत्या. राष्ट्रीय सरासरी ९२ स्त्रियांची आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3290.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef31a9159cb7065cf97b0614061e01d30fef6159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3290.txt @@ -0,0 +1 @@ +नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3323.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ee293bab818efdbb5810fc80aeba8ffef5733ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3323.txt @@ -0,0 +1,13 @@ +नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरी भारताचे नागरिकत्व मिळते. +‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१६ ’ याने १९५५ सालाच्या कायद्यात दुरूस्ती केले गेले, ज्याद्वारे या मुस्लिम देशांमधुन भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही - अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. +अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत अखेर मंजूर झाले. 'या विधेयकातील तरतुदी राज्यघटनेच्या विरोधात नाहीत. त्यामुळे या विधेयकास आसाममधून होत असलेला विरोध आणि धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्यास होत असलेला विरोध हा निराधार आहे. आसामच्या जनतेची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असून, त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,' असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या वेळी स्पष्ट केले. +संसदेत २०१६ साली पहिल्यांदा सादर करण्यात आलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात आले होते. या समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशींनुसार पुन्हा हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान, हे विधेयक घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग, राष्ट्रीय जनता दल, एमआयएम या पक्षांनी विधेयकाला विरोध केला होता.[१] +राज्यसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक- २०१९ ’ संमत करण्यात आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतेच मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-१९५५ ’ मध्ये बदल करण्यात येणार.[२] +‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-२०१९ ’ यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात आलेल्या इतक्या समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद आहे – सहा (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी).br> +‘१२४ वी घटनादुरुस्ती विधेयक-२०१९ ’ मधून सवर्णांना आरक्षण देण्यासाठी भारतीय घटनेच्या या अनुच्छेदात बदल केला जाणार - अनुच्छेद १५ आणि १६ . +शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला होता आणि सभात्याग् केला.[३] +नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरी भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. 'या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही शेजारील देशातील अल्पसंख्यकांना आसरा देण्याच्या बाजूने होते. +माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही भाजप सरकारच्या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेते असताना बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर उदार हेतूने विचार करावा, अशी भूमिका मांडली होती. भारताने पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांशी अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावे, यासाठी करारही केला होता. [४] +जुलै २०१८ मध्ये आसाममधील सुमारे दोन कोटी नागरिकांची नावे असलेला ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या मसुद्यात राज्याच्या २,८९,८३,६७७ नागरिकांच्या नावांची नोंद आहे. NRC अद्ययावत करावयाच्या प्रक्रियेतून एकूण ३,२९,९१,३८४ व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी मसुद्यामध्ये ४०,०७,७०७ लोकांची नावे यात नव्हती. 2.४८ लक्ष शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस आणि असे व्यक्ती ज्याचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधीकरणात प्रलंबित आहेत अश्यांना यातून वगळण्यात आले होते.[५] +सवलत +राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात नमूद केलेल्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम राज्यांमधील आदिवासीबहुल भागांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू होणार नाही. तसेच, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आणि मिझोरम या इनरलाइन परमिट पद्धत लागू असलेल्या राज्यांमध्येही विधेयक लागू होणार नाही. याच धर्तीवर मणिपूरलाही सवलत देण्यात आली आहे. [६] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3332.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..072ea22ccf1b9b5e97f339a2bbf14ef94928b626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3332.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतातील नागरी विमान वाहतूक मंत्रालय हे नागरी विमान वाहतूक विकास आणि नियमन यासाठी राष्ट्रीय धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी जबाबदार मंत्रालय आहे. हे देशातील नागरी हवाई वाहतुकीच्या सुव्यवस्थित वाढ आणि विस्तारासाठी योजना आखते आणि लागू करते. त्याची कार्ये विमानतळ सुविधा, हवाई वाहतूक सेवा आणि प्रवासी आणि मालवाहतुकीवर देखरेख करण्यासाठी देखील विस्तारित आहेत. हे मंत्रालय विमान कायदा, १९३४, विमान नियम, १९३७ची अंमलबजावणी देखील करते आणि रेल्वे सुरक्षा आयोगासाठी प्रशासकीयदृष्ट्या जबाबदार आहे. +सचिव, एक आयएएस अधिकारी, मंत्रालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि त्याला एक अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार, तीन सहसचिव, संचालक/उपसचिव/वित्तीय नियंत्रक स्तरावरील सात अधिकारी आणि त्याखालील स्तरावरील दहा अधिकारी मदत करतात. सचिव हे राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली येथे आहे . diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3346.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f32cf34249c135ff686a0fa56ee94e11070dc667 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3346.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक वृक्ष आहे. याला कैलासपती किंवा तोफगोळयाचे झाड या नावाने ओळखले जाते .याची फुले शिवास वाहण्याची प्रथा आहे. तसेच ह्या झाडाला कळ्या व फुले येण्यासाठी झाडाचे वय 12 वर्ष पूर्ण झाले की येतं तो पर्यंत झाडाला फुल येत नाही. झाडाची पाने सर्व येत जात असता हे झाड पाने एकदा जायला लागले की पूर्ण पाने जाता व पुन्हा सर्व पाने नवीन येता.. ह्या झाडाचा फुलांचा वास खूप छान असतो .[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3359.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85256c30a28cd713449ef9991a0b919da99a1d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3359.txt @@ -0,0 +1,7 @@ +पानवेल (नागवेल, नागवल्ली, म. हिं. गु.: पानवेल,पान क.: यल्ली बळ्ळी सं.: नागवल्ली, तांबूली इं.: बीटल व्हाइन, बीटल पेप्पर लॅ.: पायपर बीटल; कुल-पायपरेसी) ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हिच्या पानांपासून विडे करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही एक लागवडयोग्य वेल आहे. याचे पान विडा करण्यासाठी वापरतात. भोजनोत्तर विडा खाल्याने भोजनाचे निट पचन होते.विडा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे. +पानांचा मुख्य उपयोग तांबुलाकरिता असल्याने त्याकरिता फक्त नर वेलीची लागवड विशेषेकरून करतात. पाने सुगंधी, पाचक, वायुनाशी व उत्तेजक असून पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल जंतुनाशक असते. तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यास पानांचा रस उपयुक्त असतो. डोके दुखत असल्यास व रातांधळेपणात पानांचा रस वापरतात. फळे मधाबरोबर कफ विकारांत देतात. पाने फुप्फुसाच्या विकारांतही गुणकारी असून गळू व सूज यांवर त्यांचे पोटीस बांधतात. विड्याचे पान हे विशेषकरून जड अथवा पोटभर जेवणा नंतर खायला हवे. अधिक पान खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे. काळ्या मिरीबरोबर नागवेलीच्या कोवळ्या मुळांचे चूर्ण घेतल्याने स्त्रियांना गर्भधारणा टाळणे शक्य असते.[१] +याचे मूळ स्थान जावा बेटे आहे. त्यानंतर ती जगभरात गेली. +यासाठी भुसभुसीतजमीन व सुपीक जमीन हवी. भारताच्या दक्षिण भागात मलबार प्रदेशात, आणि बंगाल, गुजरात, महाराष्ट्रामधे नागवेलीची शेती होते. +या पिकासाठी उबदार व दमट हवामान उत्तम आहे. अति पाऊस होतो, तेथे याचे मळे चांगले टिकतात. क्वचितच हे मिश्र पीक म्हणूनही लावतात. हिला अल्कधर्मी अथवा क्षारीय (अल्कलाइन) जमीन चालत नाही. +निरनिराळ्या राज्यांत नागवेलीचे निरनिराळे सु. ३५प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गंगेरी, कुऱ्हे, नाबकर, पांढरी, काळी, बांगला आणि कपुरी या प्रकारांची लागवड होते. गंगेरी व पांढरी हे प्रकार सांगली व इस्लामपूर भागात लागवडीत आहेत आणि नाबकर हा प्रकार ठाणे जिल्ह्याच्या वसई भागात आहे. नागपूर व रामटेक भागांत काळी आणि पुणे भागात काळी व कुऱ्हे हे दोन प्रकार लागवडीत आहेत. काळी प्रकाराची पाने जाड आणि काळ्या रंगाची असून कुऱ्हे प्रकारातील पाने नाजूक असतात. नाबकरची पाने लांब व टोकाकडे निमुळती असतात. गंगेरी प्रकाराची पाने काळपट हिरवी व खाण्यास चवदार असतात. बांगलाची पाने जाड व तिखट आणि कपुरीची पाने मध्यम जाड व तिखट असतात.[१] +उत्पादनाच्या प्रदेशावर आधारलेले पानांचे पुढील प्रकार ओळखले जातात : ‘देशी’ (स्थानिक), ‘मघई’ (बिहार), ‘बांगला’ (पं. बंगाल), ‘जगन्नाथी’ (ओरिसा) व ‘कपुरी’ (तमिळनाडू). आंध्र प्रदेशात पहिल्या प्रतीच्या पानांना ‘कळ्ळी’, दुसऱ्या प्रतीस ‘पापडा’ व मध्यम प्रतीस ‘कळगोठा’ म्हणतात. ‘कळ्‌ळी’ प्रकार बाजूच्या फांद्यांवरील पानांचा असून त्यांचा मुख्यतः उपयोग स्थानिक असतो पापडा प्रकारची मोठी पाने निर्यात करतात. सालेम जिल्ह्यात (तमिळनाडू) ‘मार’ पाने कोवळी व बाजूकडील असून ‘चक्कई’ प्रकार मुख्य खोडावरील जून पानांचा असतो. याशिवाय उत्पादनाच्या प्रदेशावरून वा अन्य कारणाने रामटेकी, बनारसी, सांची, कपुरी, मालवी, मंगेरी इ. प्रकारांची नावेही प्रचलित आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_337.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f987bb0503a5de8dffd0c6cf23ce27a1c74a8097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_337.txt @@ -0,0 +1,5 @@ +द्रवीकृत नैसर्गिक वायू ("द्रनैवा") (CNG-compressed natural gas) हा मिथेन (CH4) या नैसर्गिक वायूपासून बनवतात. हा वायू समुद्रतळातून नळाने द्रवीकरण प्रकल्पापर्यंत आणला जातो. तेथे हा वायू द्रवरूपात बदलला जातो. द्रवरूपात आल्यामुळे वायूचे आकारमान एकाच्या सहाशेव्या भागाएवढे कमी होते. आकारमान कमी झाल्याने वायूचा साठवणूक व वाहतूक खर्च कमी होतो. हा वायू गंधहीन तसेच रंगहीन असतो. +नैसर्गिक वायू मध्ये ९० टक्के मिथेन वायू असतो. तसेच अतिशय लहान प्रमाणात इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि नायट्रजन वायू असतात. द्रवीकरण प्रकल्पात यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून १०० टक्के मिथेन वायू तयार केला जातो व द्रवरूपात बदलला जातो. जगभरात या वायूची निर्यात करण्यासाठी खास करून बनवलेल्या समुद्री जहाजांचा वापर करण्यात येतो. +२०११ मध्ये कतार(७५.५ अब्ज घ्न मीटर), मलेशिया(२५ अब्ज घन मीटर) आणि इंडोनेशिया(२१.४ अब्ज घन मीटर) हे द्रवरूप नैसर्गिक वायूचे तीन सर्वात मोठे निर्यातदार देश होते. +२००६ मध्ये कतार हा द्रवीकृत नैसर्गिक वायूचा जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार देश बनला. २०१२ पर्यंत, एकूण जागतिक निर्यातीपैकी २५ टक्के वाटा एकट्या कतारचा होता. +जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रांस, इटली आणि तैवान हे देश सर्वात जास्त द्रवीकृत नैसर्गिक वायूची आयात करतात. २००५ मध्ये जपानने ५.८६ कोटी टन द्रनैवाची आयात केली. ती त्या वर्षीच्या एकूण जागतिक व्यापाराच्या ३० टक्के होती. तसेच २००५ मध्ये दक्षिणकोरियाने २.२ कोटी टन आणि २००४ मध्ये तैवानने ६८ लाख टन द्रनैवाची आयात केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3370.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f855216c224890063967a05c07e1048e0f7a3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3370.txt @@ -0,0 +1 @@ +नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) हा भारताच्या नागालँड आणि मणिपूर राज्यांमध्ये सक्रिय असणारा राजकीय पक्ष आहे. या पक्षाने भारतीय जनता पक्षासह नागालँडचे सरकार २००३ ते २०१८ या काळात चालविले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3380.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f91ac9b14884727990698c2f4f789faeb69e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3380.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागाझारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3381.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bc8e3ac3b23dbd4f9066d0e10d80c339c26f24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3381.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागाझारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3399.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78667fa89b92ee06758600e4b2c52f3bcd3fab32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3399.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3430.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83a42ab8230cd7f07052bb8da393d9ebf3c91412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3430.txt @@ -0,0 +1,8 @@ + नागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3434.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc20dfdfe163f6ac6976421edc970bcfc26c44a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3434.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3438.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd85664b210d213f46405048960d28b7bee2266d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3438.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +सरळगाव बाजारपेठ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3443.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bbb6e0ad18bbe4c66f4c7902b3fa5fab65933db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3443.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागावनिमाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3470.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f15cba12f6ceaf8403e98db07d0e466674973fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3470.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. +जटगिरबाबा diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3482.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82fdcca16adc204f7b2f5d39d62cf8b03131f7ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3482.txt @@ -0,0 +1,8 @@ + +नागेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे हे स्थान हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथे आहे. +शिव महापुराणुसार, ब्रह्मा (सृष्टिकर्ता) आणि विष्णू (द रीडररव्हर) एकदा त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ होते याबद्दल असहमत होते. त्यांची चाचणी करण्यासाठी, शिवने तीन जगातील प्रकाशाचा अष्टपैलू स्तंभ, ज्योतिर्लिंग हे भेदले. खांबाच्या प्रत्येक टोकाचा विस्तार निर्धारित करण्यासाठी विष्णू व ब्रह्मा हे दोन होते. ब्रह्मा पुढे म्हणाले की त्याने खांबांच्या वरच्या टोकाचा शोध लावला होता, पण खांबांच्या पायाच्या दिशेच्या दिशेने गेलेल्या विष्णूंनी कबूल केले की त्यानी तसे केलेले नाही. शिव नंतर दुसरे ज्योतिर्लिंग म्हणून दिसू लागले आणि ब्रह्माजींना शाप दिला, त्यांना सांगितले की त्यांना समारंभात कोणतीही जागा नाही, पण विष्णूंची 'अनंत कालखंड' होईपर्यंत पूजा केली जाईल. ज्योतिर्लिंग हे सर्वोच्च अविभाज्य वास्तविकता आहे जिथे शिव प्रकट होतात. ज्योतिर्लिंगाचे मंदिर त्या काळात पूजले जात असे. असे मानले जाते की येथे चौथ्या ज्योतिर्लिंगांचा जन्म झाला. बारा विशेषतः शुभ आणि पवित्र मानले जातात. [2] प्रत्येक बारा साइट्स प्रसाध्य देवतेचे नाव घेतात आणि प्रत्येकाला शिवांचे वेगळे रूप मानले जाते. [5] या सर्व ज्योतिर्लिंग तिर्थस्थळांवर, प्राथमिक देवता शिवांच्या असीम स्वभावाचे प्रतीक म्हणून सुरुवातीला कमी व अंतहीन स्तंभ दर्शविणारा एक लिंग आहे. बारा ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये सोमनाथ, आंध्र प्रदेशातील श्रीसेमेलमधील मल्लिकार्जुन, मध्यप्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर, मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर, हिमालयातील केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील विश्वनाथ, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ जि बीड, हिंगोली जिल्ह्यात नागेश्वर ज्योतिर्लिंग (औंढा नागनाथ) आहे , देवघर येथे वैद्यनाथ येथे आहेत. झारखंड, नागेश्वर ज्योतिर्लिंगा, रामेश्वर, तामिळनाडूतील रामेश्वरम आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील घृष्णेश्वर. +पौराणिक कथेनुसार, पाच पांडवांचा कौरवांकडून धूताच्या खेळात पराभव झाला तेव्हा फासे खेळाच्या अटींनुसार पांडवांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. दरम्यान, पांडवांनी भारतभर फिरले. फिरत फिरत ते एका घनदाट जंगलात पोहोचले. या ठिकाणी एक गाय राहायची; ती गाय रोज तलावात उतरून दूध द्यायची. एकदा भीमाने हे पाहिले, दुसऱ्या दिवशी तो गाईच्या मागे सरोवराकडे गेला आणि महादेवाला पाहिले; तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गाय दररोज शिवलिंगाला दूध पाजत होती. मग पाच पांडवांनी त्या तलावाचा नाश करण्याचे ठरवले. भीमाने त्या तलावाच्या सभोवतालच्या पाण्यावर गदा मारली आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले. श्रीकृष्णाने त्यांना त्या शिवलिंगाची माहिती दिली आणि ते नागेश्वर ज्योतिर्लिंग असल्याचे सांगितले. त्यानंतर पाच पांडवांनी त्या ठिकाणी तळमजल्यावर ज्योतिर्लिंगाचे भव्य अखंड दगडी मंदिर बांधले. +शिव पुराण म्हणतात नागेश्वर ज्योतिर्लिंग 'द दारूकवन' मध्ये आहे, जो भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. 'द्रुकनाव' या नावाने भारतीय महाकाव्य मध्ये उल्लेख आढळतो, जसे कामकावन, द्वैतावंत, दंडकवण +नागेश्वर ज्योतिर्लिंग बद्दल शिव पुराणात एक गोष्टीचा उल्लेख आहे, ज्याचे नाव दारुका असे आहे, ज्याने शिवभक्त सुप्रिया नावाच्या एका भक्तावर आक्रमण केले आणि इतर अनेकांसह त्याच्या शहरातील दारुकावनातील समुद्रात, ज्यात समुद्रात समुद्र आणि समुद्रात राक्षस आहेत. सुप्रियाच्या प्रोत्साहनाने कैदींनी शिवच्या पवित्र मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि तत्काळ नंतर भगवान शिव दिसले आणि राक्षस पराभूत झाला [9] नंतर तेथे ज्योतिर्लिंगच्या रूपात स्थापित झाले. भूतपाशी पत्नी होती, दारुकी नावाची एक राक्षसी होती जी माता पार्वतीची पूजा करते. तिचे तपश्चर्येचे आणि भक्तीचे परिणाम म्हणून, माता पार्वतीने तिला तिच्या भक्तांचे पालन केले आणि तिच्या सन्मानार्थ जंगल 'दारुकवाना' असे म्हणून नामकरण केले. जिथे डारुकुला गेला तिथे जंगलात तिचे अनुकरण केले देवतांच्या दयेतून दारुकानाचे भुते वाचवण्याकरिता, दारुकाने पार्वतीने तिला दिलेली शक्ती समजावून सांगितली. त्यानं संपूर्ण जंगल समुद्रात हलवलं, जिथं त्यांनी आपल्या मुलींच्या अपहरणांचं अपहरण केलं, आणि अपहरण करून त्यांना त्यांच्या नव्या कुटूंबाला समुद्रात ठेवून ठेवलं, ते म्हणजे महान शिव भक्त, सुप्रिया, तेथेच जखमी झाले होते. + +सुप्रियाच्या आगमनाने क्रांती घडली. त्यांनी एक लिंगाची स्थापना केली आणि शिवाच्या सन्मानार्थ कैद्यांना ओम नम: शिवाय असे संबोधले ज्याने त्याठिकाणी त्याग केला. जप हे राक्षसांच्या प्रतिसादाने सुप्रियाला मारण्याचा प्रयत्न करणे होते, परंतु शिवाचे दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे दैवी शस्त्र उद्ध्वस्त केले. Daaruki आणि भुते पराभूत होते आणि पार्वती उर्वरित भुते जतन सुप्रिया यांनी ज्या लिंगगिरीची स्थापना केली होती त्याला नागेश म्हणतात. हा दहावा भाग आहे. शिवांनी एकदा नागेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाचा आकार ग्रहण केला, तर देवी पार्वती नागेश्वरी म्हणून ओळखली जात असे. मग भगवान शिवांनी अशी घोषणा केली की जे त्याची पूजा करतील त्यांना योग्य मार्ग दाखवेल.वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3483.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04145810031e4a76b80f484fee13bfcd077b28de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3483.txt @@ -0,0 +1,4 @@ +नागोठणे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. +१८° ३१′ ४८″ N, ७३° ०७′ ४८″ E + नागोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3489.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..608a730d1937b623b84bd102217d8f0531e12a2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3489.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागोरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3494.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cf5551bec1ba9a98719d4097cf914e66629440d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3494.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागौर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नागौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3520.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4131e7da8de35184638b6d527ad3d9992c0a004 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3520.txt @@ -0,0 +1 @@ +नाझरागाव हे महाराष्ट्राच्या सांगोला तालुक्यातील गाव आहे. येथे श्रीधरस्वामींची समाधी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3553.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e582570fb9eadd89a3728026dcaf92940f928aa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3553.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाटाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3576.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da2624948fad0e23102729c27054831b2085ead --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3576.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाट्यदर्पण नावाची एक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था फारशी प्रसिद्ध नसली तरी तिने संत तुकारामांनी लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथ प्रकाशित केला आहे. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली होती असे या प्रकाशकांचे म्हणणे आहे. तुकारामांच्या या तथाकथित भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ ’नाट्यदर्पण’ने प्रसिद्ध केला आहे.. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे, असे प्रकाशक म्हणतात. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथ लिहिला आहे.. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत. +नाट्यदर्पण या प्रकाशनसंस्थेचे आणखी एक पुस्तक आहे. ते म्हणजे कविता गाडगीळ यांनी लिहिलेले ’भरारी राजहंसाची’ या नावाचे [[जे.आर.डी. टाटा] यांचे चरित्र. ही दोन्ही पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत, असे समजते. +’नाट्य दर्पण’ नावाचे एक नियतकालिकही आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_358.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70140b8ccda80f35ac8928521357478158aa1898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_358.txt @@ -0,0 +1 @@ +द्रविड लोक दक्षिण भारतातील रहिवासी आहेत. हे लोक प्रामुख्याने तामिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड या भाषा बोलतात. आनुवंशिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रोटो-द्रविड लोक आधुनिक इराणमधील झाग्रोस पर्वतातील नवपाषाण काळातील शेतकऱ्यांशी जवळून संबंधित होते. दुसरा अभ्यास असे सूचित करतो की निओलिथिक शेतकरी पूर्वज घटक हा आधुनिक दक्षिण आशियाई लोकांचा मुख्य वंश आहे. दक्षिण आशियाई लोक इतर पश्चिम-युरेशियन लोकसंख्येशी जवळून संबंधित आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3593.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365008b4458f0894d3cf568dbcd37f0976d56ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3593.txt @@ -0,0 +1 @@ +नाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3633.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc7fb2531c7506ccd4bf547bfe9c3a70547445a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3633.txt @@ -0,0 +1 @@ +नात म्हणजे एखाद्याच्या मुलाची किंवा मुलीची मुलगी होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3645.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f6cb13b079af3c7857460f5ab7479e4954f9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3645.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँड व मोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे. येथे झुलू वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. +१९व्या शतकाच्या पूर्वार्धादरम्यान हा भूभाग झुलू राजतंत्राच्या अधिपत्याखाली होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकन सरकारने वर्णभेद काळात तयार केलेल्या क्वाझुलू भूभागाला नाताल प्रांतामध्ये विलीन करून क्वाझुलू-नाताल प्रांताची निर्मिती केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3653.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ec77ec99c1d4fe36ee7994545b22a2a773f6233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3653.txt @@ -0,0 +1 @@ +नातू हा एखाद्या व्यक्तीच्या सख्ख्या मुलीचा किवा मुलाचा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3657.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c58f8c0c007e253f23624fbdbae8309bf257a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3657.txt @@ -0,0 +1,5 @@ +नातेपुते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.नातेपुते येथे सध्या नगरपंचायत अस्तित्वात आहे +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +Shambhu Mahadev Mandir +==जवळपासची गावे==माळशिरस 18 किमी += अकलुज 32 किमी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3665.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bebcedee48a5fa30efdf37445cf79679c1b18ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3665.txt @@ -0,0 +1 @@ +संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3693.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2c10a452d47f46f96ad58496d18844a7c576cd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3693.txt @@ -0,0 +1,8 @@ + नादगाव तर्फे तुडीळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5448c19e3ae7c2517501555a6dd5eccb9a0c31c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3697.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नादिया पेत्रोवा (रशियन: Надежда Петрова; उच्चार: नाद्जिएश्द पेत्रोवा) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3698.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c433855988344c3be72c43cb0ca8bd2724c833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3698.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन डि क्लर्क (१६ जानेवारी, २००० - हयात) ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. २०१७ साली दक्षिण आफ्रिकन संघाकडून पदार्पण केलेल्या डि क्लर्कने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3702.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356b4bd6878561950c911e49abd6556f4df46d7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3702.txt @@ -0,0 +1,2 @@ +नादिया एलेना कोमानेची (रोमेनियन उच्चार:ˈnadi.a koməˈnet͡ʃʲ, नादिया कोमानीच) (नोव्हेंबर १२, इ.स. १९६१ - ) रोमेनियन-अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. कोमानेचीने १९७६ च्या मॉंत्रियाल ऑलिंपिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकताना ऑलिंपिक जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवत जागतिक उच्चांक केला. याशिवाय तिने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवली. कोमानेची जगप्रसिद्ध जिम्नॅस्टांपैकी एक आहे.[१][२][३] इ.स. २०००मध्ये लॉरियस जागतिक क्रीडा अकादमीने तिचा समावेश विसाव्या शतकातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये केला.[४] +नादिया कोमोनेचीचा जन्म जॉर्ज आणि स्टेफानिया-अलेक्झांड्रियाना कोमोनेची यांच्या घरात रोमेनियाच्या ओनेश्टी शहरात झाला.[५][६] स्टेफानिया-अलेक्झांड्रिया नादियाच्या वेळी गर्भवती असताना तिने एक रशियन चित्रपट पाहिला होता. त्यातील नायिकेचे नाव नादेझ्दा (आशा) असे होते. त्याने प्रभावित झालेल्या स्टेफानियाने आपल्या मुलीचे नाव नादेझ्दाचे लघुकरण करून नादिया असे ठेवले.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3718.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42eb48fe26c059506e6e813a21327c839ffc74f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3718.txt @@ -0,0 +1,2 @@ + नादे सावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3734.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..172b4c834a95c0a11add9ee658215d65212c9df8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3734.txt @@ -0,0 +1,3 @@ +नानखटाई (हिंदी: नानख़टाई, उर्दू: نان خطائی) ही भारतीय उपखंडातून उगम पावलेली शॉर्टब्रेड बिस्किटे आहेत. ही उत्तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार (पूर्वीचा बर्मा) मध्ये लोकप्रिय आहेत.[१] +नानखताई हा शब्द नान म्हणजे ब्रेड आणि खताई या दारी पर्शियन शब्दातून आला आहे ज्याचा अर्थ बिस्किट असा होतो. नानखताईला बर्मी भाषेत नानकाहताईंग (နံကထိုင်) म्हणून उधार घेण्यात आले आहे. त्याला श्रीलंकेतील सिंहली भाषेत "ज्ञानकथा" (ඤාණකතා) म्हणतात. अफगाणिस्तान आणि ईशान्य इराणमध्ये या बिस्किटांना कुलचा-ए-खताये म्हणतात. कुलचा हा अफगाण, इराणी आणि भारतीय ब्रेडचा प्रकार आहे जो नानसारखाच असतो. +नानखाताईंचा उगम 16 व्या शतकात सुरत येथे झाला असे मानले जाते, जेव्हा डच आणि भारतीय हे महत्त्वाचे मसाले व्यापारी होते. स्थानिक डच रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका डच जोडप्याने सुरतमध्ये एक बेकरी सुरू केली. डच लोकांनी भारत सोडल्यावर त्यांनी बेकरी एका इराणीच्या ताब्यात दिली. बेकरीची बिस्किटे स्थानिकांना नापसंत होती. आपला व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी सुकी भाकरी कमी किमतीत विकण्यास सुरुवात केली. तो इतका लोकप्रिय झाला की तो ब्रेड विकण्याआधी सुकवायला लागला. कालांतराने, ब्रेडवरील त्यांच्या प्रयोगामुळे त्यांना शेवटी नानखताईचा शोध लावण्याची प्रेरणा मिळाली. नानखताईतील मुख्य घटक म्हणजे परिष्कृत पीठ, चण्याचं पीठ आणि रवा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3736.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c96b07f2050df25e74844d6f86a74ebfb2f58920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3736.txt @@ -0,0 +1,2 @@ +नानगीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3748.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e8cdeb6b865b8e9b4f8633682fb675e073e0659 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3748.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व आहे. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कामन मॅन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थाचा कारभारात त्यांचा मोलाचा हातभार आहे. +इ.स. २००५ साली त्यांच्या समाजकार्या साठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने संन्मानीत करण्यात आले. +मोजक्या शब्दांत देश-विदेशातील घटनेवर मामिर्क टिप्पणी करणाऱ्या बॅनरमुळे ते ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3749.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0123851f6dd552366c38de938b74a3f3485ff49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3749.txt @@ -0,0 +1,4 @@ +पद्मनाभ गोविंद तथा नाना जोशी. +जुलै ७, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +नाना जोशी (ऊर्फ पद्मनाभ गोविंद जोशी) (ऑक्टोबर ७, १९२२ - ?) हे क्रिकेटच्या कसोटी सामन्यातील भारतीय यष्टिरक्षक होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3750.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64c53aac69140d73dcccb8339fd70f811bd40514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3750.txt @@ -0,0 +1,16 @@ +डॉ. श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : मार्च १ , १९२२; मृत्यू : जुलै ८ , २००८) हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. +नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. +*घराण्याचा इतिहास* +धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव "शांडिल्य" असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले. +*वारसा* +डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव डॉ. दत्तात्रेय तथा अप्पासाहेब व नातू डॉ. सचिनदादा यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहेत. +*जीवनकार्य* +धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू आदरणीय रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत . +*बैठक* +या कामासाठी त्यांनी १९४३ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर १९४३ ( विजयादशमी ) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्रीबैठक सुरू करण्यात आली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. +त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली. +अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. +अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. +*पुरस्कार* +इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८) +डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3752.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9868130fd49172864e36eacf4a73cc48c0c8f112 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3752.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाना फाल्गुनराव पटोले (नानाभाऊ नावाने प्रसिद्ध) हे भारतीय काँग्रेस सदस्य आहेत. पाटोळे ह्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले. त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला. ८ डिसेंबर २०१७ला त्यांनी शेतकरी व इतर मागास वर्गाच्या प्रश्नावर लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला. +स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे व इतर मागास वर्गावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_38.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_38.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49c6f6d52381e851c0195d8b7808b12b201b42ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_38.txt @@ -0,0 +1,2 @@ +देहू रोड रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक पुणे-मुंबई महामार्गाजवळ आहे. येथून देहू गाव जवळ आहे. भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथून जवळ आहे. +या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय सह्याद्री एक्सप्रेस येथे थांबते. एकेकाळी मुंबई-मद्रास जनता एक्सप्रेस येथे थांबे. सध्या न वापरले जाणारे फलाट पूर्वी सेन्ट्रल आॅर्डनन्स डेपो (सीओडी)साठी असलेल्या खास पुणे-देहूरोड लोकल गाडीसाठी होते. ही गाडी कोळशाच्या इंजिनवर चाले, व थेट डेपोपर्यंत जाई. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3834.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98a305eed194a8857c84eef2fc45c5f9d4c11215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3834.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाम-इल किम (कोरियन:김남일; १४ मार्च, इ.स. १९७७ - ) हा  दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. २००२ फिफा विश्वचषकातील त्याच्या बचावफळीतील कामगिरीआधी हा फारसा प्रसिद्ध नव्हता. +खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर किम फुटबॉल मार्गदर्शक म्हणून काम करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3872.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e59f8c3d046fe2b0d24d71483b3facf0c1e3d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3872.txt @@ -0,0 +1,10 @@ +नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला. +१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्यानी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण, उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षितनी कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५०ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यवाचक नावे होती. व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने काही लोकांचे पित्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक - युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगिनीवर बलात्कार झाले तर काही गावांत दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. कित्येक गावातून दलित आया-भगिनींच्या भरचौकातून उघड्या - नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”'. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून "जिंकू किंवा मरू ", जळतील नाहीतर जाळून टाकतील " अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे ही (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित, पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. +तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर... चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव 'मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद' असे होते. नामांतरानंतर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद" एवढेच झाले. +नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. +नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला . +नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचं "वारं' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सूर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लॉंगमार्च.' काढला गेला. +या लॉंगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे. +नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लॉंगमार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. +मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली, जाळपोळ करू लागले. +सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3881.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5088eabf45fe9f0ae065c5fb7ef90d6185bb4ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3881.txt @@ -0,0 +1,2 @@ +नामिबिया पुरुष क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये ओमानला पाच ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[१] या मालिकेने २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक तसेच २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप स्पर्धेसाठी ओमानच्या तयारीसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनवला.[२][३] +नामिबियाने कमी धावसंख्येचा पहिला टी२०आ ४ गडी राखून जिंकला.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3891.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db7d36d0d10aaeac879d1754e739bd8b36472ddd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3891.txt @@ -0,0 +1,79 @@ +वनडे आणि टी२०आ किट +नामिबिया क्रिकेट ही नामिबिया देशातील क्रिकेट खेळाची राष्ट्रीय नियामक संघटना आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलाची १९९२ सालापासून सहयोगी सदस्य संघटना आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3892.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08800f285d51d2ef8a3c07240e7969f5dce30e5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3892.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला ॲंगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +इ.स. १८८४ साली ओटो फॉन बिस्मार्कच्या नेतृत्वाखालील जर्मन साम्राज्याने येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर इ.स. १९२० साली लीग ऑफ नेशन्सने नामिबियाचा ताबा दक्षिण आफ्रिकेकडे दिला. इ.स. १९६६ साली येथे स्वातंत्र्यचळवळ चालू झाली. पुढील २३ वर्षे स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिल्यानंतर अखेरीस १९९० साली दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले. +नामिबिया नामिब व कालाहारी ह्या वाळवंटांदरम्यान वसला असून येथील बव्हंशी भूभाग रूक्ष ते अतिरूक्ष प्रकारात मोडतो. ह्या कारणास्तव नामिबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे प्रति चौरस किमी केवळ २.५ लोक राहतात. सध्या येथे लोकशाही सरकार असून नामिबियाला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. नामिबिया संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ, राष्ट्रकुल परिषद इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3909.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c627ea5e4ec2d453c1030bab565a8f0172b1b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3909.txt @@ -0,0 +1,3 @@ + +नायक राजविंदर सिंह हे घातक कमांडो मध्ये होते. ते २९ वर्षाचे आसताना देशासाठी शहिद झाले. +नायक राजविंदर सिंह हे २४ पंजाब रेजिमेंटच ५३ राष्ट्रीय राइफल्स मध्ये कार्यरत होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_391.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a140dc0c9ff0d3d7b27ef83a3f1e848bcbcfc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_391.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापर युग. माघ वद्य चतुर्दशी या दिवशी या युगाची सुरुवात झाली अशी पुराणात नोंद आहे. +वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०१ मध्ये झाला असे मानले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3932.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3932.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_394.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a140dc0c9ff0d3d7b27ef83a3f1e848bcbcfc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_394.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापर युग. माघ वद्य चतुर्दशी या दिवशी या युगाची सुरुवात झाली अशी पुराणात नोंद आहे. +वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०१ मध्ये झाला असे मानले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3942.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c7f4221ea619320b4f31b8e0a649a0cf9840c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3942.txt @@ -0,0 +1,2 @@ + नायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_396.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a322975c740735a9404dead14ac6d80c1b1e75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_396.txt @@ -0,0 +1 @@ +द्वारका विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देवभूमी द्वारका जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3970.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4a0b44cd919dfc3b59e07e57e5b59912d5ab11c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_3970.txt @@ -0,0 +1,3 @@ +नायजेरिया एरवेझ ही नायजेरियामधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९५८मध्ये झाली. १९७१पर्यंत या कंपनीला डब्ल्यूएएसी नायजेरिया असे नाव होते. याचे मुख्य ठाणे अबुजामधील मुर्तला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते व पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख शहरे आणि युरोप, उत्तर अमेरिका आणि अरब देशांतील निवडक शहरांना येथून विमानसेवा होती. +१९६१पर्यंत नायजेरियाच्या सरकारकडे याची ५१% मालकी होती. १९६१मध्ये सरकारने सगळी कंपनी विकत घेतली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला. +ही कंपनी २००३मध्ये बंद पडली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4001.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a0c28aab6dfe408d5e53f2fa47aac6c7685fbef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4001.txt @@ -0,0 +1 @@ +नायजेल लॉंग (फेब्रुवारी ११, इ.स. १९६९:ॲशफोर्ड, केंट, इंग्लंड - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4017.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d65530679efee3f41682f8b3da451c44887b8054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4017.txt @@ -0,0 +1,2 @@ +नायणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4035.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..041d9a2b96a2c78ed9cfb66477bb98008c61b30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4035.txt @@ -0,0 +1,8 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4046.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..930f499d06f3b4a4e234a78e917155be1ee2f147 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4046.txt @@ -0,0 +1,6 @@ +नायोबियम (Nb) (अणुक्रमांक ४१) हे एक मूलद्रव्य आहे. +ज्या ज्या ठिकाणी कमी तपमानात ताकद टिकविण्याची गरज पडते त्या प्रत्येक ठिकाणी नायोबियमचा प्रवेश झाला आहे. विशेषतः जेट इंजिनच्या टर्बाइन यंत्रातील पाते, येथे तापमान वाढून चालत नाही म्हणून नायोबियम हाच सक्षम पर्याय आहे. नायोबियम अनेक धातूंसोबत मिळून मिस्ळून यांत्रिक सामानाचे सुटे भाग बनविण्याच्या कार्यात उपयोगी पडतो. +मिश्रधातूंचा एक घटक म्हणून नायोबियम महत्त्वाची भूमिका बजावतो. नायोबियम ऍल्युमिनियम, टायटॅनियम, मॉलिब्डेनम, झिर्कोनियम इ. धातूंचा मित्र आहे. या धातूच्या अंगी न्युट्रॉन पारदर्शकता आहे. उच्च वितळणबिंदू, उत्तम उष्णता रोधकता, रासायनिक परिणामास रोखणारे गुणही याच्याजवळ आहेत. चांदीऐवजी अनेक क्षेत्रात नायोबियम वापरण्याकडे आता कल असून नायोबियमची नाणीही करण्याचा विचार गंभीरपणे होत आहे. या दोन्ही धातूंची किंमत सारखीच असून चांदी दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने नायोबियम त्यास उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. +१७ व्या शतकाच्या मध्यात उत्तर अमेरिकेतील कोलंबिया नदीच्या पात्रात सोनेरी शिरा असणारा, कृष्णवर्णी, वजनदार खनिज प्रकार आढळला. इतर अनेक नमुन्यांसह तो ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाकडे पाठविला गेला आणि पुढे सुमारे १५० वर्षे तो तेथेच पडून होता. इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हॅचेट यांनी त्याचे पहिल्यांदा पृथक्करण करून त्यास कोलंबियम असे नाव दिले. पुढच्याच वर्षी स्वीडनचे रसायनशास्त्रज्ञ अँड्रिस एकबर्ग यांना स्कॅंडिनेव्हियात सापडलेल्या खनिजावर संशोधन करून त्यास टांटालम असे नाव दिले. पण कोलंबियम आणि टांटालम असे दोन वेगळे धातू नसून एकाच धातूस दोन ठिकाणी दोन वेगवेगळी नावे ठेवल्या गेली असे रसायनशास्त्रज्ञांचे मत होते. १८४४ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ हेन्रिक रोझ यांनी सिद्ध केले की कोलंबियम आणि टांटालम हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. हेन्रिक रोझ यांनीच मग कोलंबियम धातूस नायोबियम असे नाव दिले. +१८६६ मध्ये स्वीस रसायनशास्त्रज्ञ जे. सी. गॅलिसर्ड द मेरिग्नॅक यांनी पहिल्यांदा या जुळ्या धातूंना वेगळे करण्याची औद्योगिक स्वरूपाची पहिली रीत प्रत्यक्षात आणली. त्यांना या मूलद्रव्यांच्या संयुगाची वेगवेगळ्या प्रकारे विरघळण्याची रीत कळली आणि ही दोन्ही मूलद्रव्ये वेगळी असल्याचे सिद्ध तर झालेच पण त्यांच्या औद्योगिक उत्पादनास सुरुवातही झाली. १९ व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री मॉइसन यांनी पहिल्यांदा नायोबियमची शुद्ध प्रत मिळविली. +ग्रीक पुराणकथेप्रामाणे टॅंटलस राजाची मुलगी निओब हिच्या नावावरून नायोबियम हे नाव कोलंबियम धातूला देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4077.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596e72392dbf8b854cc5c98c50f6477f255ce76e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4077.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + +[ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4081.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c92eb7390935c1bffd4d31df2e51e34d77620852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4081.txt @@ -0,0 +1,17 @@ +खोबरेल तेल हे नारळाच्या आत असलेल्या खोबऱ्यासून बनवले जाते. दक्षिण भारतात या तेलाचा उपयोग बहुतेक लोक खाद्यतेल म्हणून करतात. नारळाच्या तेलामध्ये +र (?)ॲसिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. नारळामधील लॅरिक एसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास साहाय्यभूत असते. नारळाच्या तेलामध्ये बरीच जीवनसतत्त्वे आणि खूप काही नैसर्गिक औषधी गुण असतात.नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप लाभ होऊ शकतो. +यासाठी नारळाचे तेलास नैसर्गिक तेल असे म्हटले जाते. +खोबऱ्याचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामूळे केसांना लावण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. +नारळ तेल नारळापासून कोरड्या किंवा ओल्या प्रक्रिया या दोनही प्रकाराने काढता येते. +या प्रक्रियेत एक चांगला नारळ घेऊन त्यातील आतील भाग काढून घेतात व त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतात. ते तुकडे बारीक वाटले जातात व त्यात थोडे पाणी मिसळून एका मलमलचा कपड्यामध्ये बांधून ठेवतात. त्यानंतर ते पिळून किंवा दाबून त्यांतून तेल काढले जाते. त्यानंतर नारळाचे दूध वेगळे केले जाते. पाण्यापेक्षा तेल हलके असल्याने ते पाण्यावर तरंगू लागते. याला १२ ते २४ तास लागतात. त्यानंतर नारळाचे तेल काढले जाते. दक्षिण भारतात बहुतेक लोक घरीच तेल बनवतात. +कोरड्या प्रकियेमध्ये नारळाचे तुकडे केले जातात व ओव्हनमध्ये त्यातील सुमारे १० ते १२% ओलावा सुकवला जातो.त् यानंतर लगेच त्या नारळाचा तुकड्यांना दाबून तेल काढले जाते. +नारळाचे तेल सामान्यतः अन्न शिजवताना फोडणीसाठी वापरतात. विशेषतः पदार्थ तळताना तेलाचा जास्त वापर करतात. दक्षिण आशियाई भाज्यांमध्ये सुगंध येण्याकरता नारळाचे तेल वापरतात. +नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर स्रीने आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित ‍प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. ओले तसेच सुके खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे, अर्थात बद्धकोष्ठाचा नाश करणारे आहे. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते. मात्र, नारळाच्या अतिवापराने कोलॅस्टेराॅल वाढते व हार्टअटॅकचा संभव वाढतो. +नारळाच्या तेलाप्रमाणेच नाराळाच्या दुधाचे उपयोग आहेत. घोव्यातल्या पाककृती कारावायास नाराळाचे दूध अत्यावश्यक असते. +कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दूधाने चेहऱ्याला मसाज केला तर, त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे एक वरदानच आहे. +या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरतात. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. +त्वचेप्रमाणे डोक्यावरील केसांसाठीही नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी ठरते. टाळूची त्वचा आणि केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ईची गोळी फोडून घातली व त्या मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज केल्यास लाभदायक ठरतो. असे आठवड्यातून किमान दोनदा केल्यास निश्चितच केसांचे आणि टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारते. +[१] +[१][permanent dead link] +[२] +[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4101.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e3b49dc2d4d1fcef98f4a6d7636d0b10e7dc61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4101.txt @@ -0,0 +1,4 @@ +नारायण सदोबा काजरोळकर (?? - इ.स. १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. [२][३] +त्यांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा १५,००० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीआधी काजरोळकर आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते.[४] १९६२ च्या निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले..[५] +काजरोळकर यांचा जन्म अनुसूचित जाती जमातीमध्ये झाला होता. अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती म्हणून त्यांना १९५३ च्या पहिल्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य नेमल्या गेले.[१][६] मागासवर्गीय लोकांची संघटना असलेल्या दलित वर्ग संघाचे ते सदस्य होते आणि त्यांनी ५ एप्रिल १९५३ रोजी जगजीवन राम यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी समितीचे सचिव म्हणून काम केले.[७] समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७० मध्ये पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.[८] +इस १९८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4105.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb87f8c839f418c8cbeb3dfeb5d6df80387ffba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4105.txt @@ -0,0 +1,6 @@ +नारायण कृष्ण गद्रे (जन्म ७ मार्च १८७०[१] - मृत्यू १४ जुलै १९३३[२]) हे मराठी लेखक आणि चरित्रकार होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते[३]. गद्रे ह्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. +गद्रे ह्यांचा जन्म वाई येथे झाला. त्यांचे वडील कृष्णंभट गद्रे ह्यांनी वेदाध्ययन केले होते आणि ते अध्ययनअध्यापनाचे काम करून उदरनिर्वाह करत असत. गद्रे ह्यांचे पाळण्यातील नाव दिनकर असे होते. मात्र आई त्यांना नानू ह्या नावाने हाक मारत असल्याने त्यांचे प्रचलित व कागदोपत्री नाव नारायण असे झाले. मात्र काही लेखन त्यांनी दिनकर किंवा कृष्णात्मज दिनकर ह्या नावानेही केेलेले आढळते.[१] +गद्रे ह्यांचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने पंतोजींच्या शाळेत झाले. तसेच त्यांच्या वडिलांकडे पुरुषसूक्त इ. आवश्यक त्या नित्य ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. इ.स. १८८१पासून त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. वाई, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जावे लागले. त्यातील काही काळ ते पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी होते व ह्या काळात टिळक आणि आगरकर हे त्यांना शिक्षक म्हणून लाभले. इ.स. १८८८ साली गद्रे यू. ए. एफ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. इ.स. १८९० ते इ.स. १९२३ ह्या काळात गद्रे ह्यांनी मुंबई येथे हवामानखात्यात नोकरीस होते.[४] +लोकमान्य टिळक ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गणेशोत्सवात विविध मेळे असत. त्याचे अनुकरण करून गद्रे ह्यांनी एक मेळा इ.स. १८९५ साली सुरू केला. तो इ.स. १९१४ पर्यंत सुरू होता. ह्या मेळ्यांत म्हणण्यासाठी विविध विषयांवरील व राष्ट्रभक्तिपर पदांचे लेखन गद्रे करत असत.[५] +मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी गद्रे हे एक होते. इ.स. १९२३पर्यंत ते ह्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सभासद होते. मुंबईतील वास्तव्याच्या काळात गद्रे हे आपल्याकडील पुस्तके व मासिके ह्या संस्थेला देत असत.[६] +इ.स. १९०१ मध्ये पुणे येथे षण्मासिक म्हणून निघालेल्या व पुढे कालांतराने मासिक स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या सरस्वतीमंदिर ह्या नियतकालिकाच्या प्रकाशनात गद्रे ह्यांचा सहभाग होता. ह्या नियतकालिकातूनच गद्रे ह्यांचे महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग ह्यांसारखे लेखन प्रकाशित झाले.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4123.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe963c3b04c82f705a55e984b618279e45cb626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4123.txt @@ -0,0 +1 @@ +नारायण दत्त शर्मा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या बदरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4126.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fb62428b63192be4a6f2d2e93999367d13d540d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4126.txt @@ -0,0 +1,15 @@ +नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, इ.स. १९२५ - ऑगस्ट १८, इ.स. २००८; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.[ संदर्भ हवा ] +धारपांचा जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली [१]. +धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते [२]. +त्यांनी मराठीत 100 हून अधिक पुस्तके लिहिली, प्रामुख्याने भयपट प्रकारातील. धारप यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथा स्टीफन किंगसह समकालीन अमेरिकन लेखकांकडून प्रेरित आहेत . शपथ ही किंगच्या "IT" आणि " Gramma " (नंतर तुंबाड (चित्रपट) +बनलेली) द्वारे प्रेरित कथा होती. नारायण धारप हे एचपी लव्हक्राफ्टचे चतुल्हू मराठी वाचकांसाठी आणणारे पहिले मराठी लेखक होते .[ संदर्भ हवा ] +समर्थ, आप्पा जोशी, कृष्णचंद्र, पंत आणि जयदेव या त्यांच्या कथा किंवा कादंबऱ्यांमध्ये अनेकदा आढळणारी मुख्य पात्रे आहेत. वेगवेगळ्या कथा देखील आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक नायक/नायिका असू शकतात ज्यांनी परिस्थितीवर मात केली, कधीकधी थोड्या बाह्य मदतीसह, कधीकधी त्याशिवाय. त्याच्या बहुतेक कथा चांगल्या आणि वाईट यांच्यातील एक महान लढाई दर्शवतात, सहसा चांगल्या विजयाने समाप्त होतात. धारप यांच्या काही कथा आणि स्टीफन किंग यांच्या कथांमध्ये काही साम्य आढळते.[ संदर्भ हवा ] तथापि, धारप यांच्या कथा मराठी संस्कृती आणि मराठी वाचकांकडून आल्याचे दिसते, त्यामुळे कथानक आणि भूगोल या क्षेत्रामध्ये काही कथांमध्येच साम्य दिसून येते. मराठी साहित्यात इतर प्रकारच्या लेखनाकडे ज्या आदराने पाहिलं जातं तसं अजूनही भयपट लेखनाकडे पाहिलं जात नाही. नारायण धारप बहुतेक मराठी वाचकांना आवडतात ज्यांना हॉरर प्रकारात काही रस आहे. त्यांनी काही खास मौलिक कथांवर आधारित लेखन केले मराठीतील विचित्र कथा , तसेच त्यांनी प्रथमच मराठी भयपट साहित्यात काल्पनिक पौराणिक कथा सादर केल्या.[ संदर्भ हवा ] +धारप यांच्या पुस्तकांच्या सामान्य वैशिष्ट्यांमध्ये "वाईटावर चांगल्याचा विजय", "पुस्तकातील संकल्पनांची उत्पत्ती मराठी संस्कृतीतून", "कथेला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संदर्भांपासून दूर ठेवणे (कोणत्याही गोष्टींमध्ये हा महत्त्वाचा घटक मानला जातो") लोकप्रिय" हॉरर किंवा सस्पेन्स साहित्य)", "पुस्तके भयपट शैलीची असूनही, सामग्रीला 'चांगल्या अभिरुची' विरुद्ध कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गुन्ह्यापासून दूर ठेवणे".[ संदर्भ हवा ] +धारप यांच्या कथांमध्ये आढळणारी मुख्य पात्रे आहेत: +समर्थ : समर्थ हे धारप यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये आढळणारे मुख्य पात्र आहे. तो एक शक्तिशाली संत सारखा माणूस आहे, जो वाईट अलौकिक शक्तींचा समावेश असलेल्या कठीण परिस्थितीतून लोकांना मदत करतो. तो स्वतः महान अलौकिक शक्तीचा मालक आहे, जो त्याने मोठ्या प्रयत्नांनी कमावला आहे. त्याला सामान्यतः आप्पा जोशी मदत करतात , जे एक सामान्य माणूस आहेत जे चांगल्या मनाचे आहेत आणि समर्थांना खूप आदर देतात. +कृष्णचंद्र : समर्थांप्रमाणेच, कृष्णचंद्र देखील महान अलौकिक शक्तींचा मालक आहे, ज्याचा वापर तो संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी करतो (पुन्हा वाईट अलौकिक शक्तींसह / त्या शक्तींचे मालक / या वाईट शक्तींना मदत करणारे लोक). तथापि, समर्थांप्रमाणेच, तो सांसारिक सुखांचाही उपभोग घेतो. त्याला कधीकधी ओंकार नावाच्या पात्राची मदत होते . +पंत : पंत हे आणखी एक पात्र आहे जे काही धारप कथांमध्ये आढळते. तथापि, समर्थ आणि कृष्णचंद्र यांच्याइतक्या पुस्तकांत तो दिसत नाही. तो एक महान तांत्रिक आहे , ज्याची प्रार्थना कक्ष त्याला पाहिजे तेथे दिसू शकतो. त्या खोल्यांतील विविध प्राण्यांच्या पुतळ्यांमागे काही क्रूर शक्ती लपलेल्या असतात, ज्या त्याला कथेतील क्रूर वाईटाशी लढण्यास मदत करतात. +जयदेव : जयदेव हे अलौकिक शक्ती असलेले जादूगार आहेत. तो लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना वाईट शक्तींच्या हल्ल्यांपासून बरे करण्यासाठी त्याच्या दैवी क्षमतांचा वापर करतो. त्याचे स्वरूप समर्थांसारखेच आहे. +नारायण धारप यांच्या गूढकथांवर आधारित, तसेच त्यांच्या एका गूढकथासंग्रहाचेच नाव असलेली "अनोळखी दिशा" नावाची दूरचित्रवाहिनी मालिका इ.स. २०११मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर झाली [३]. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. +नारायण धारप यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला "तुंबाड" हा हिंदी चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले, तर निर्मिती आनंद एल. राय यांनी केली.[ संदर्भ हवा ] +अखेरच्या काळात धारपांना फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे १८ ऑगस्ट २००८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले [१]. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4136.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88785b31b270ddb74391becb542c59fe09257483 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4136.txt @@ -0,0 +1 @@ +नारायण भवानराव पावगी (२५ फेब्रुवारी, इ.स. १८५४ - ८ डिसेंबर, इ.स. १९३५) हे ११ खंडांत 'भारतीय साम्राज्य' हा इतिहासग्रंथ लिहिणारे इतिहासकार होते. 'भाषाशास्त्र' आणि 'भारतीय नाटकशास्त्र' हे अन्य ग्रंथही त्यांनी लिहिले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4167.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..772c56a70f543532b08dd8a74245c9ffd02f8374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4167.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेंकटरामन नारायण स्वामी ऊर्फ नारायण स्वामी (रोमन लिपी: Venkatraman Narayan Swamy, Narain Swamy ;) (मे २३, इ.स. १९२४; केरळ - मे १, इ.स. १९८३; देहरादून, उत्तराखंड) हा भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. तो प्रामुख्याने उजव्या हाताची द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करत असे. भारताकडून तो एकच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने सर्विसेस क्रिकेट संघ संघाकडून प्रथमश्रेणी सामने खेळले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_417.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10eb676aded4c0217c9fa89e6a79ef630cf32cc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_417.txt @@ -0,0 +1,2 @@ +सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांना नाव देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात. वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचा गोंधळ त्यामुळे होत नाही. जीवांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करतांना त्यांना वैश्विक नावे देता येतील अशी कल्पना कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या आद्य जीवशास्त्रज्ञाने प्रथम मांडली. +त्यानुसार इ.स.१९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत सजीवांना शास्त्रीय द्विनाम देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती स्वीकारली गेली. त्यानंतर वाढत जाऊन ही त्री नाम पद्धती पर्यंत विकसित झाली. या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला जीववर्गीकरणशास्त्र असे म्हणतात. द्विनाम पद्धतीत प्रत्येक वनस्पती जातीला दोन अथवा तीन नावांनी ओळखण्याची पद्धत आहे. रोमन लिपीत लिहितांना यामध्ये प्रमुख प्रजातीचे पहिलं अक्षर मोठे लिहितात आणि वैशिष्ट्याचे पहिले अक्षर लहान लिहितात. तिसरे नाव त्यानंरची उप-जाती सांगते. जर उप-जात नसेल तर पहिली दोनच नावे लिहिली जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4200.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc2fc5f6ff7399795f7332a30ebf41a6ac5f4fd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4200.txt @@ -0,0 +1,14 @@ +१६° ४३′ ४८″ N, ७७° ३०′ ००″ E +गुणक: 16°43′48″N 77°30′0″E / 16.73000°N 77.50000°E / 16.73000; 77.50000 +नारायणपेट (Narayanpet) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या नारायणपेट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे ठिकाण पूर्वी ‘नारायणपेटा’ म्हणून ओळखले जात असे. नारायणपेट त्याच्या उत्कृष्ट आणि अद्वितीय सुती हातमाग आणि सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. या साड्यांवर स्पष्ट महाराष्ट्रीय प्रभाव दिसून येतो. (नारायणपेठ साडी किंवा नारायणपेठी) +हे राजधानी हैदराबादपासून १६७ किमी आणि महबूबनगरपासून ६२ किमी अंतरावर आहे. +छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे आपल्या सीमा विस्तारत होते. आपल्या मोहिमेच्या धावपळीत, शिवाजीने दख्खनी देशभक्तीच्या भावनेचे आवाहन केले की दक्षिण भारत एक मातृभूमी आहे आणि ते बाहेरील लोकांपासून संरक्षित केले पाहिजे. त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीने एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोलकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला, विजापूरशी असलेली आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना संयुक्तपणे विरोध करण्याचे मान्य केले. या काळात त्यांनी तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावात काही वेळा तळ ठोकला. +पौराणिक कथेनुसार, त्याच्या सैन्याचा एक भाग लढाई आणि युद्धे करून थकला होता आणि अशा प्रकारे त्यांनी नारायणपेठेतच राहण्याचा निर्णय घेतला. हे लोक प्रशासनाची काळजी घेणारे, योद्धे तसेच सैन्यासाठी स्वयंपाक करणारे आणि विणकामाचे कौशल्य जाणणारे आणि व्यापारात निपुण असलेले लोक होते.[२] +२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ७,९१४ कुटुंबांसह ४१,७५२ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २०,६९७ पुरुष आणि २१,०५५ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे १०१७ स्त्रिया.०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ४,९९७ आहे जी कामारेड्डीच्या एकूण लोकसंख्येच्या ११.९७% आहे. सरासरी साक्षरता दर ७२.१८% होता. +७२.९६% लोक हिंदू आणि (२५.८६%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (०.३६%), शीख (०.०१%), बौद्ध (०.००%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.७९%) यांचा समावेश होतो.[३] +तेलुगू नारायणपेटमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[४] +नारायणपेट हे उत्तर अक्षांशाच्या १६° ४३′ ४८″ N, आणि पूर्व रेखांशाच्या ७७° ३०′ ०″ E वर स्थित आहे. नारायणपेटची सरासरी उंची ४४६ मीटर आहे.[५] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६७.२ मिलिमीटर (२२.३३ इंच) आहे.[६] नारायणपेठ हे कर्नाटक राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. +नारायणपेट इथली नारायणपेठ साडी किंवा नारायणपेठी ही खूप प्रसिद्ध आहे. +नारायणपेट नगरपालिकेची स्थापना १९४७ मध्ये करण्यात आली, ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र १८.४८ किमी२ मध्ये पसरलेले असून २३ निवडणूक प्रभाग असलेली द्वितीय श्रेणी नगरपालिका म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.[७] नारायणपेट हे शहर नारायणपेट विधानसभा मतदारसंघात येते. जो महबूबनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. +नारायणपेट येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. +जवळचे रेल्वे स्थानक: नारायणपेट रोड रेल्वे स्थानक.[८] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4226.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8176b234fd8fc29b746fc5a19edab04648b6f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4226.txt @@ -0,0 +1,3 @@ +नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे. +प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे. +गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639 diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4233.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba60c277c3de8b07148b08364a55007ddbcc88b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4233.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१] +कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून +अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१] +या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध +स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५] +१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी +प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित. +१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित. +२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित. +झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित. +१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित। diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4238.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22cca3bb35a94d487bdcce6765360a041ee2f7c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4238.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारू (इंग्रजी:Dracunculiasis;) हा गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युंक्यूलस मेडिनेन्सिस अथवा गिनी वर्म ह्या सुतासारख्या दिसणाऱ्या व मीटरभर लांब वाढणाऱ्या परजीवी कृमींमुळे होणारा रोग आहे. +ब्रह्मदेश, अरबस्थान, इराण, आफ्रिका, वेस्ट इंडीज, दक्षिण अमेरिका, रशियातील तु्र्कस्थान विभाग, भारतातील राजस्थान[१], मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र वगैरे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4241.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3043d18559b00eb0a01c5db250416cd5753a53d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4241.txt @@ -0,0 +1,18 @@ +नारुळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने 'विनोद मोबाईल'आणि 'महेंद्र बीअर दुकान'गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६३ कुटुंबे राहतात. एकूण १३९८ लोकसंख्येपैकी ६४३ पुरुष तर ७५५ महिला आहेत. गावाची साक्षरता २७.१७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३७.४७ आहे तर स्त्री साक्षरता १८.२८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३३८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २४.१८ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +आंबिवळीतर्फेबहारे, पांढरतारागाव, करंजवीरा, शिसणे, आष्टे, सायवण, चाळणी, गांगोडी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी ही जवळपासची गावे आहेत.सायवण ग्रामपंचायतीमध्ये नारुळी,रामपूर, सायवण, आणि व्याहाळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4250.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e580da2df5af274c14662e703f030b89e872288 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4250.txt @@ -0,0 +1,3 @@ +नारोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. +==जवळपासची गावे== चास, घोडेगाव , वडगाव काशिंबेग , लांडेवाडी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4255.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff5d306c7efb923c7a559289b106968bb9b94e7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4255.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्वेजियन ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची राष्ट्रभाषा आहे. जर्मेनिक भाषासमूहामधील ही भाषा उत्तर युरोपामधील स्वीडिश व डॅनिश भाषांसोबत पुष्कळशी मिळतीजुळती आहे. नॉर्वेजियन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लिहिली जाते. बूक्मोल (Bokmål, पुस्तकी बोली) व नायनोर्स्क (Nynorsk, नवी नॉर्वेजियन) ह्या दोन्ही अधिकृत नॉर्वेजियन भाषा आहेत. २००५ सालच्या एका चाचणीनुसार येथील ८६.३% लोक बूक्मोल, ७.५% लोक नायनोर्स्क तर ५.५% लोक दोन्ही भाषा वापरतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4279.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e24ed0671a1f3302b1ffe26d3c8e22c5f3fca3eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4279.txt @@ -0,0 +1,3 @@ +गर्भावस्थेत गर्भ व अपरा (वार) यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ होण्याकरिता आवश्यक असलेली पोषकद्रव्ये, ऑक्सिजन, संप्रेरके इत्यादी घटकांचा पुरवठा करणे, गर्भाच्या चयापचयातून उत्पन्न झालेले कार्बन डाय-ऑक्साइड, यूरिया इत्यादी टाकाऊ पदार्थ वाहून नेणे ही महत्त्वाची कार्ये नाळेमार्फत घडत असतात. गर्भ जेव्हा चलनक्षम बनतो तेव्हा तो वारेला जोडलेला असूनही नाळेद्वारे गर्भाशयात मोकळेपणे फिरू शकतो. नाळेमध्ये प्रामुख्याने रक्तवाहिन्या, संयोजी ऊती व मूलपेशी असतात. मात्र नाळेत चेता नसते. +ऑक्सिजनविरहित व पोषकहीन रक्त गर्भापासून वाहून नेले जाते. गर्भावधिकाल पूर्ण होण्याच्या सुमारास नाळेची लांबी सु. ५० सेंमी. आणि व्यास सु. १.५ सेंमी. असून तिचे ताणबल ३.६ किग्रॅ. इतके असते. तसेच नाळेला वारेच्या टोकाकडून पीळ पडू लागतात. प्रसूतीनंतर नाळ कापून अर्भकाला मातेपासून वेगळे केले जाते. नाळेत चेता नसल्यामुळे ती कापतात तेव्हा मातेला अथवा अर्भकाला कोणतीही वेदना होत नाही. +याचे प्रमाण ५०० गर्भांमागे १ असते. त्यामुळे अर्भकाला कोणताही धोका नसतो. परंतु नियमितपणे गर्भाची श्राव्यातीत ध्वनिप्रतिमादर्शन(सोनोग्राफी) करून योग्य ती काळजी घेतली जाते. काही वेळा अर्भक जन्माला येण्याआधी नाळ गर्भाशयातून बाहेर येते. त्यामुळे अर्भकाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी तत्काळ प्रसूती करावी लागते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4301.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b5e0627e974f2877a9d2d78d7c9f8e5e6d0da88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4301.txt @@ -0,0 +1 @@ +नावंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4305.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946e4402353dbd4bf2e09597fce89dd23555dfad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4305.txt @@ -0,0 +1,5 @@ +नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री केदारनाथाचे(ज्योतिबाचे) भक्त होते.देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता. +जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी साळुंखे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे. +श्री ज्योतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर कराडजवळच्या किवळ येथील संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. +नावजीनाथाचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.त्यांनी गावात तळे,विहीर,विठ्ठ्ल ,मारुती मंदिर,ग्रामपंचायत कट्टा,मुस्लिम समाजासाठी मशिद ही कामे केली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4325.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8266146741fe517afb170701351cf6f9a43cd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4325.txt @@ -0,0 +1,2 @@ +नावांड्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4326.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea56c247063f7260f1afaeafbbd86c7e478beb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4326.txt @@ -0,0 +1 @@ +नेओनाई वारे (२८ मे, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4337.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90e8e9e14546705b28d3c51f7e119946ccc33760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4337.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवेद अंजुम (२७ जुलै, इ.स. १९६३:लाहोर, पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून २ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4351.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df27662eb2e29ab8b170a5966998be73fdb69946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4351.txt @@ -0,0 +1 @@ +नाशिक हे धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4364.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebedaf495ab9d6d20cfa110a3602ea2a37f4c0a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4364.txt @@ -0,0 +1,8 @@ +सार्वजनिक वाचनालय नाशिक, हे नाशिक येथील प्रमुख वाचनालय आहे. हे वाचनालय सावाना म्हणूनही ओळखले जाते. येथे सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ हे असे मानले जाते. हे वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह हा वाचनालय याचाच एक भाग आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा यासाठी सावाना वाचनालयात मुक्तद्वार विभाग आहे. वाचनालयाची सरकार वाडा येथेही एक शाखा आहे. मुख्य ग्रंथालय आणि त्याचबरोबर सरकार वाडा शाखा अशा दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार वाचक दररोज या विभागांचा विनामूल्य लाभ घेतात. +या वाचनालयाची स्थापना सरकारवाड्यात झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. इ.स. १८८३च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. हा काळ ग्रंथाच्या वाढ आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचादेखील सहवास काही काळ नाशिकला होता. त्यांचादेखील या सार्वजनिक +वाचनालयातील काही अतिशय जुन्या ग्रंथांत व कागदपत्रांवर असलेल्या हस्तलिखित नोंदींनुसार या वाचनालयाची खालील नावे आढळतात. सुरुवातीच्या काळात काही ब्रिटिश अधिकारी ग्रंथालयाची संबंधित असल्याचा पुरावा देखील उपलब्ध होतो. +तसेच 'नाशिक पुस्तकालय' हा मराठी मजकूर असलेला जुना शिक्का येथे संग्रही आहे. इ.स. १९२४ साली वाचनालयाची घटना नव्याने तयार केली गेली. या घटनेमध्ये सर्वप्रथम 'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' असे नाव आले आहे. +इ.स. १९०५ मध्ये कवी गोविंद व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला. इ.स. १९४७ मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला कुसुमाग्रज, डॉ. अ.वा. वर्टी, वसंत कानेटकर अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो. साहित्यिक आणि सुधारकांच्या सहवासामध्ये या ग्रंथालयाची मोठी जडणघडण झाली कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथालयाचा मोठा विकास झाला जे सुरुवातीला या ग्रंथालयाचे वाचक म्हणून या ग्रंथालयात येत होते तेच पुढे नाशिककर साहित्यिक नटसम्राट कार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे या ग्रंथालयाचे दहा वर्ष अध्यक्ष राहिले या त्यांच्या कार्यकाळात मध्ये अनेक राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी या ग्रंथालयाला भेटी दिल्या तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी या ग्रंथालयासाठी शासनाकडून मोठी मदत देऊ केली एकूणच हा कालखंड ग्रंथालयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला +या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. डिजिटलायझेशने उर्वरित काम इ.स. २०११ मध्येही सुरू होते. वाचनालयाच्या संदर्भ विभागात अनेक प्रकारची दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’ योजना सुरू केली आहे. गंगापूर रोड येथे सावानाचे ‘उद्यान वाचनालय’ आहे. +इ.स. १९६२ मध्ये कुसुमाग्रज यांनी विनंती केल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नव्या इमारतीसाठी आर्थिक मदत दिली. मे ३१ इ.स. १९६८ या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, नव्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली. तर ६ ऑगस्ट रोजी नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास 'नगरपालिका दालन' असे नाव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले. +आद्य साहित्यिक संस्था असलेल्या वाचनालयात इ.स. १९२४ पासून नाशिक बाहेरील विद्वान, तपस्वी, साहित्यिक अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4366.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af3e6c9d5da646d10b086597035e91158a47ed6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4366.txt @@ -0,0 +1,11 @@ +नाशिक +येथे मध्यवर्ती बस स्थानक, महामार्ग बस स्थानक, ठक्कर बाजार बस स्थानक, नासिकरोड/नाशिकरोड बस स्थानक व मेळा बस स्थानक अशी प्रमुख स्थानके आहेत. शहरी परिवहनासाठी बस व रिक्षा हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. +नाशिकरोड बस स्थानका जोडूनच रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. नाशिक येथील परिवहनासाठी एस्टी महामंडळाच्या बस बहुतेक रेल्वेंच्या वेळापत्रकांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरातील बहुतेक सर्व भागांसाठी येथून बसेस सुटतात. तसेच येथे रिक्षा स्टॅंडही आहे. मात्र रिक्षा मीटरप्रमाणेच चालतील असे नाही. त्यामुळे प्रथम भाडे ठरवून घेणे योग्य. रात्री बेरात्री अवास्तव भाडे मागितले जाऊ शकते. + +नाशिकरोड येथून सिडको भागात जाण्यासाठी पांडवलेणे, अंबड, गणेश चौक, लेखा नगर आदी बसेसने जाणे योग्य ठरावे. मात्र या बसेस मध्यवर्ती बस स्थानक सी. बी. एस.हून न जाता द्वारका येथून जातात. पंचवटीला जाणाऱ्या बसेसही द्वारका येथूनच जातात. यातील काही बसेस महामार्गावरून हिरे महाविद्यालया मार्गे पंचवटीतही जातात. महामार्ग बस स्थानक येथून मुंबईच्या कसारा लोकलला जोडणारी टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. तसेच पंचवटी स्टॅंडवरून मालेगाव धुळे आदी ठिकाणी जाणारी टॅक्सी सेवाही उपलब्ध असते. भाडे दर माणशी याप्रमाणे आकारले जाते. +पुणे, मुंबई व इतर सर्व बाहेरगावी जाणाऱ्या बहुतेक बसेस ठक्कर बाजार बस स्थानक व महामार्ग बस स्थानक, येथून सुटतात. मेळास्थानक हे त्र्यंबकेश्वर व ओझर येथे जाणाऱ्या बसेस साठी आहे. + +नाशिकचे सार्वजनिक परिवहन हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4376.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..077eccd9234218cb62c7e83faed68602cf8f052a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4376.txt @@ -0,0 +1,35 @@ + +नासदीय सूक्त (ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९) हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे. यात एकूण सात ऋचा आहेत. या सूक्ताची रचना त्रिष्टुप् या छंदात असून देवता हे भाववृत्त आहे. यामध्ये विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला दिलेले नसून, सर्व देव हे उत्पत्तीच्या नंतर आले आहेत, असे मत मांडले आहे. या सूक्तात विश्वाच्या उत्पत्तीविषयी शंका व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांची उत्तरे बरोबर आहेत की नाहीत अशाही शंका आहेत. एकमेवाद्वीतीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम ‘काम’ म्हणजे इच्छा निर्माण झाल्याने विश्वाचा जन्म झाला आणि पुढे सृष्टी वाढत गेली असा विचार यात मांडला आहे. +शंकराचार्य तसेच मध्वाचार्य यांनी याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावर सायण या विजयनगर साम्राज्यातील विचारवंताने, तेराव्या शतकात रचलेली टीका 'सायणाचे भाष्य' या नावाने उपलब्ध आहे. या नासदीय सूक्ताचे लोकमान्य टिळक यांनी गद्य भाषांतर केले होते. हिंदी रूपांतर प्रा. वसंत देव यांनी केले आहे. ते भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. या सूक्ताचा उल्लेख प्रसिद्ध नासाचे वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी त्यांच्या कॉसमॉस ह्या पुस्तकात केला आहे. +मानवी इतिहासात जगदुत्पत्तीसंबंधी जे अनेक सिद्धान्त किंवा तर्क मांडले गेले आहेत त्यातील नासदीय सूक्त हा सर्वात प्राचीन सिद्धान्त असावा. जगदुत्पत्तीच्या अंगाने प्रश्न निर्माण करून त्यासंबंधी काही तर्कसिद्धान्त मांडले आहेत. या सूक्तामधली कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा यासाठी हे सूक्त नावाजलेले आहे. यातील अनेक सूक्तांचे कवी (ऋषी) वेगवेगळे होते असे मानले जाते. काही ठिकाणी प्रजापतिपुत्र परमेष्ठी असा ऋषीचा उल्लेख आहे. +सूक्ताचे उदाहरण (पहिली द्विपदी/ ऋचा): +मराठी रूपांतरण +नासदीय सूक्ताचे श्री धनंजय यांनी केलेले समश्लोकी भाषांतर उपक्रम Archived 2021-01-22 at the Wayback Machine. या संकेतस्थळावर आहे, ते असे :- +तेव्हाना असणेना नसणे होते, +धूळही नव्हती,ना आकाश पल्याड +कुठे, काय आश्रय, काय आवरण होते? +होते का पाणी गहन आणि गाढ? ||१| +ना होता मृत्यू,ना अमृतत्त्व तेव्हा +रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते +निर्वाताने एका स्वतःला आणले जेव्हा, +आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते. ||२|| +अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी +अंधाराने होते ते सगळे लपवले - +हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि +त्यात तपातून एक महान उपजले ||३| +पुढे उद्भवला प्रथम तो काम +काम म्हणजे काय तर रेत मनाचे +मनीषेने हृदयात कवींना ये ठाव - +कळे नसण्याशी नाते असण्याचे ||४|| +ओढलेले आडवे किरण... यांपैकी +काय होते खालीनी काय बरे वर? +महिमान होते, होते रेतधारी, +स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर ||५|| +कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून +कुठून उद्भवली, ही झाली कुठून? +देवही त्यापुढचे, झाले हे होऊन +कोण मग जाणतो, ही झाली कुठून? ||६|| +उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून +धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत? +बघणारा जो आहे परम आकाशातून, +तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत? ।।७।। diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4410.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4410.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4447.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b708ba0b7dda6510c8f1cf0b6c279a68c2bbf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4447.txt @@ -0,0 +1,18 @@ +निंबापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७० कुटुंबे राहतात. एकूण १९०३ लोकसंख्येपैकी ८८७ पुरुष तर १०१६ महिला आहेत. गावाची साक्षरता ३५.१६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४४.९७ आहे तर स्त्री साक्षरता २६.३९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.२९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +नारुळी,सायवण, चाळणी, गांगोडी, बांधघर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव, पावण, चारी तर्फे जामशेत,धरमपूर ही जवळपासची गावे आहेत.निंबापूर समूह ग्रामपंचायतीमध्ये बांधघर आणि निंबापूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_445.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9da5a1408b2be39d3143967bacccbca2ba1a4067 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_445.txt @@ -0,0 +1,2 @@ +धगा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4451.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9944fd3dd31ce8a53ce5faafb9083bdfc872e467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4451.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबार्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4472.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b15af9cc9c1e00a25247e0e9f2589323e00a8fc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4472.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबोणी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4477.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c683d8d9c26384de6359225c099be718fee87202 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4477.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबोळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4479.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2864cc577eabf1b48e60d635fa25feb2ca030e28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4479.txt @@ -0,0 +1 @@ +निंभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4482.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a30a6ac68787292575cc44e384cae6eadfa22b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4482.txt @@ -0,0 +1 @@ +निंभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4489.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1840a3d3519472b7d1af6972656c909ef613cdd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4489.txt @@ -0,0 +1 @@ +निंभोरे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव तरडगाव व फलटण यांदरम्यान आहे. गावातील प्रशासन ग्रामपंचायत सांभाळते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4521.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9601d99fdee010d2ad9662bc2f4d1f01e31fadc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4521.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलस रॉय वेल्च (जन्म ५ फेब्रुवारी १९९८) हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे जो मॅशोनालँड ईगल्सकडून खेळला होता.[१] झिम्बाब्वेमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर, सप्टेंबर २०२० मध्ये लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबसाठी खेळण्यासाठी तो इंग्लंडला गेला.[२][३] त्याच महिन्यात त्याला यूकेचे नागरिकत्वही मिळाले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4550.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..585832500e6e901d725abde1596cb62a9e3d9455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4550.txt @@ -0,0 +1 @@ +निकी जे. टर्नर (२५ डिसेंबर, १९५९:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९९१ दरम्यान ६ कसोटी आणि २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4555.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27aad351d9fb8090cfb0031db58af0fc871b860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4555.txt @@ -0,0 +1,71 @@ +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4572.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4b5d46f1c83fcbe69f85d0e3b9d6653bdf5c46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4572.txt @@ -0,0 +1 @@ +निको हल्केनबर्ग (१९ ऑगस्ट, १९८७:एमेरिक आम ऱ्हाइन, जर्मनी - ) हा व्यावसायिक फॉर्म्युला वन कारचालक आहे. याने २०१५ची ले मॉं ही २४ तासांची शर्यत पदार्पणातच जिंकली होती.[१] हा रेनॉल्ट एफ१ साठी शर्यतींमध्ये भाग घेतो. याशिवाय हल्केनबर्गने फोर्स इंडिया आणि सौबेरसह अनेक संघांसाठी कार चालविलेली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4578.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b7a08b56dbad0a17dc55016a2fe16847d45ee23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4578.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे. +या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो - diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4592.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7a2540e1798343bf762e7d5db62106f09444db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4592.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकोल मार्टिनेझ (जन्म २० जुलै १९९० एंगलवुड, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे जी बिटवीन द माइल्स, टुटोक आणि मालिका २फुर१ आणि स्वीट सरप्राईज सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.[१][२] +निकोलने २००८ साली 'स्वीट सरप्राईज' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ मध्ये तिने टेलिव्हिजन मालिका २फुर१  मध्ये साराची भूमिका साकारली होती.[३] २०१४ मध्ये तिने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली , तिचा पहिला चित्रपट होता द पाल्मर शुप्रेमकय .ती सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या ब्रॅडीफायच्या संस्थापक आहेत .[४][५] +निकोल मार्टिनेझ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4605.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae05cd0649e4a2ed96f7f485279ae99d94d47033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4605.txt @@ -0,0 +1,2 @@ + +निकोलस अल्माग्रो सांचेझ (२१ ऑगस्ट, इ.स. १९८५:मुर्सिया, स्पेन - ) हा स्पेनचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4610.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e582579135ab15523b1f0c8f59c3c2b09c73fbec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4610.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकोलस काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +निकोलस काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4616.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453d73783b40e19e217af9f690addc2dec873d4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4616.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलस ग्रँट बिल्सन कूक (१७ जून, १९५६:लेस्टर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८३ ते १९८९ दरम्यान १५ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4668.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b65d39520a6330164aa80dd67adb7dd41f1c39f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4668.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलाइ चाउसेस्कु (जानेवारी २६, इ.स. १९१८ - डिसेंबर २५, इ.स. १९८९) हा इ.स. १९६५ ते डिसेंबर इ.स. १९८९ दरम्यान रोमेनियाचा सत्ताधीश व राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4684.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4684.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4731.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c96c8418c9dc9ab5f7bdc0e0443e6e5216043da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4731.txt @@ -0,0 +1 @@ +निक्सन अलेक्सेई मॅकनामरा मॅकलीन (२० जुलै, १९७३:ग्रेनेडा - ) हा  वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदविसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4736.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..849833f0d449da468e0e5c702829ce01d6b2fd6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4736.txt @@ -0,0 +1,2 @@ +निखर्व ही एक संख्या आहे. +हा शब्द संस्कृतोद्भव असून १ निखर्व= १,००,००,००,००,००० diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4737.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac353f633b0ae99cf5ab2f2c9ce52eae9addf51d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4737.txt @@ -0,0 +1,8 @@ + निखारेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4743.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e78b3fda39d02d920c382ba7e90538f48fc1062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4743.txt @@ -0,0 +1,2 @@ +---, इ.स. --- +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4748.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a4d7e73cd6cadbe593a671b2e085b42e58e6ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4748.txt @@ -0,0 +1,3 @@ +निखिल रत्‍नपारखी हे एक मराठी नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते आहेत. टॉम आणि जेरी हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाचे नाव. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात १० ऑगस्ट २०१३ रोजी झाला. +निखिल रत्‍नपारखी हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांनी प्राथमिक शाळेत सर्वप्रथम नाटकात काम केले. त्यानंतर कॉलेजला असताना रत्‍नपारखींनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतही नाटके केली. त्यांच्या गटाने १९९३ साली केशवराव दाते पुरस्कार जिंकला होता. पुढे ते समन्वय संस्थेतर्फेही पुण्यात नाटके करू लागले. +निखिल रत्‍नपारखी यांनी सुरुवातीला मुंबईत जाहिरातीच्या क्षेत्रात कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे ते जाहिरातींमध्ये व्यक्तिशः भूमिका करू लागले. आता ते जाहिराती, सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका तसेच व्यावसायिक रंगभूमीवरही काम करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4752.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9598b5927d87188265d88dd9b39c655bc29129 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4752.txt @@ -0,0 +1,4 @@ +निखिल वागळे (जन्म : २३ एप्रिल १९५९)[१] हे मराठी पत्रकार आहेत. ते मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या महानगर या मराठी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशक, संपादक होते. +निखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. +निखिल वागळे यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. +सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार १६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4772.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a182a08f2bfeebe453212be07dfdc4d557462fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4772.txt @@ -0,0 +1,24 @@ +निगडे हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ७६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५९ कुटुंबे व एकूण २७४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ८४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२८ पुरुष आणि १४६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ८ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६२२ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +स्वच्छेतेच्या बाबतीत हे गाव स्वच्छता अभियानात समाविष्ट करण्यात आले आहे. +सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +== बाजार व पतव्यवस्था = गावात रेशन दुकान आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +२० तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +२० तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +निगडे ख ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +निगडे गावी बांबूच्या बास्केटचे उत्पादन होते.तसेच गहु,ह्ररभ्ररा,ज्वारि,वाटाणा,ही उत्पाद्ने घेतली जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4775.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40cde2df1852cb283db669a801bee6febf63988d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4775.txt @@ -0,0 +1,8 @@ + निगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4776.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fdde241868ab4739c836edd9a62b4645f1d3951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4776.txt @@ -0,0 +1,2 @@ +निगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4777.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4013a13c5e63a02a6fad430b7c7fb6171286a6c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4777.txt @@ -0,0 +1,2 @@ + निगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4798.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce1db9c0124803a2379d6d8a1531c70311092a88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4798.txt @@ -0,0 +1,2 @@ +निगुडघर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4802.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3799fe31fe658740af220f752bde20d8607cb422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4802.txt @@ -0,0 +1,8 @@ + निगुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_484.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ccc6f22c635dbf5cdc16d867cdcb862e1c942c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_484.txt @@ -0,0 +1,4 @@ + + धनकवडी हा पुण्याच्या दक्षिणेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो +क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकः पाण्याचं कारंज्यं आणि त्यासोबत असलेल्या तीन हत्तींमुळं याला तीन हत्ती चौक असं टोपण नाव पडलं आहे. चौकाच्या एका बाजूला बसण्यासाठी खास पायऱ्यांची जागा उपलब्ध करून दिली आहे. इथं संध्याकाळी बसायला फारच छान वाटतं. चौकात मुख्यतं तीन रस्ते एकत्र येतात. पहिला रस्ता धनकवडी गावातून येतो तर दुसरा रस्ता पद्मावतीकडून आणि तिसरा रस्ता सी.डी देशमुख(सातारा रोड) रस्ताकडून येतो. +धनकवडी शेवटचा बसथांबा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उपनगरातील शेवटचा बसथांबा म्हणून ओळखला जायचा. आजही तो शेवटचा बस थांबा आहे, परंतु इतर नवीन मार्गांनी बसेस धनकवडीच्या टेकडीवरील भागातदेखील जातात. बसथांब्याजवळ धनकवडी गावाची बाजाराची जागा आहे. जुनं मारुती मंदिर आणि पोलीस स्टेशन देखील आहे. या बस थांब्यावरून पुण्यातील महत्त्वाच्या सर्व ठिकाणी जाण्यासाठी चांगली सोय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4878.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313e026516b1b496da1a57e8499f390c95f8aeed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4878.txt @@ -0,0 +1,7 @@ +निडी हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4892.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f754ba374089354df3cfa6d20a94ea5162633a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4892.txt @@ -0,0 +1,2 @@ +नितीन बोस (२६ एप्रिल १८९७ - १४ एप्रिल १९८६) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक होते. त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला आणि त्याच शहरात त्यांचे निधन झाले. १९३० आणि १९४० च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी न्यू थिएटर्ससोबत काम केले, ज्यांनी द्विभाषिक चित्रपट बनवले: बंगाली आणि हिंदी दोन्हीमध्ये. नंतर ते बॉम्बेला गेले आणि बॉम्बे टॉकीज आणि फिल्मिस्तानच्या बॅनरखाली दिग्दर्शन केले. +भारतीय चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाचा पहिला वापर १९३५ मध्ये बोस दिग्दर्शित चित्रपटांमध्ये झाला: प्रथम भाग्य चक्र या बंगाली चित्रपटात आणि नंतर त्याच वर्षी त्याचा हिंदी रिमेक, धूप छाव चित्रपटात. गंगा जमुना हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4894.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b2b2100fcc05c8be21a77710554fdbfa19c6727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4894.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. नितिन लवंगारे हे एक मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. लवंगारे यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भाग घेतला होता. ७-८ वर्षांनतर त्यांनी परत प्रॅक्टिस सुरू केली. त्या कालखंडात डॉक्टरी व्यवसायाचे बदललेले स्वरूप पाहून ते अस्वस्थ झाले. अशा मनःस्थितीत असताना त्यांनी हेन्‍री डेन्कर यांची ’एरर ऑफ जजमेन्ट’ ही कादंबरी वाचली. त्या कादंबरीत त्यांना भारतात रूढ होऊ पाहू लागलेल्या विकृत डॉक्टरी प्रवृत्तीची झाक दिसली. झपाटून जाऊन लवंगारे यांनी त्या कादंबरीला भारतीय पेहराव चढवून तिचे मराठी रूपांतर केले. +कादंबरीचे नाव ’निष्कर्ष’. पहिली आवृत्ती १९९५ साली निघाली. कादंबरी अतिशय खपते आहे हे पाहून, प्रकाशकाने डॉ. नितिन लवंगारे यांना न सांगता दुसरी आवृत्ती काढली. लवंगारे यांनी काही हालचाल करायच्या आत तो प्रकाशक दुसऱ्या एका गुन्ह्यासाठी तुरुंगात गेला. त्यानंतर पुण्याच्याच डायमंड प्रकाशनाने २०१०साली हे पुस्तक परत छापले. डॉ. श्रीराम लागू यांनी या कादंबरीवर चांगली दूरचित्रवाणी मालिका निघेल असे सुचविले. डॉ.जब्बार पटेल, राज काझी इत्यादींनी विचारणा केली, पण मालिका निघू शकली नाही. अखेर अभिनेते विक्रम गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली नितिन लवंगारे यांच्या ’निष्कर्ष’ या कादंबरीवर ’आघात’ नावाचा चित्रपट निघाला. पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. विक्रम गोखले यांचे पहिलेच चित्रपट दिग्दर्शन होते. चित्रपटात त्यांची भूमिकाही होती. चित्रपट अतिशय गाजला. महाराष्ट्र सरकारचा १९८९सालचा वर्षातील सर्वोत्तम चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार ’आघात’ला मिळाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4916.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a796eb1e63cf046547b6765c305f6866ea95b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4916.txt @@ -0,0 +1,5 @@ +नितीन मुकेश माथूर हे एक हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक आहेत.[१] त्यांनी चित्रपट गितांव्यतिरिक्त भजने व इतर प्रकारचे गायन देखील केले आहे. पार्श्वगायक मुकेश हे त्यांचे वडील, तर अभिनेते नील नीतिन मुकेश हे त्यांचे पुत्र आहेत. वडील मुकेश यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी १९९३ मध्ये युनायटेड स्टेट्ससह आंतरराष्ट्रीय दौरे केले,[२] आणि २००६ मध्ये त्यांच्या कल की यादें[३] या कार्यक्रमासह जागतिक दौरा केला.[४] +नितीन मुकेश यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात खय्याम, आरडी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद यांसारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी विशेष करून मनोज कुमार, शशी कपूर, जितेंद्र, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि इतर कलाकारांना आवाज दिला आहे. +नितीन मुकेश यांनी १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम आणि अलका याज्ञिक यांसारख्या प्रसिद्ध गायकांसोबत हिट युगल गाणी गायली आहेत . त्यातील काही गाणी अशी: +नितीन मुकेशचे वडील मुकेश हे दिल्लीचे माथुर कायस्थ होते, तर त्यांची आई सरल त्रिवेदी गुजराती श्रीमाली ब्राह्मण आहे.[६][७][८][९] +त्यांचे लग्न निशी मुकेश यांच्या सोबत झाले आहे.[१०] त्यांचा मुलगा नील नितीन मुकेश हा अभिनेता आहे.[११] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_492.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e14db1417933a2b8a33dd7866a32286e5a4cd7c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_492.txt @@ -0,0 +1,2 @@ + धनगरखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4959.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17fee7a20bf679793563f53fff2277db0cf45b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4959.txt @@ -0,0 +1,2 @@ + निदी तर्फे अष्टमी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4966.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab984c4ee76b7a842b3bcc59993f87db66d32450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4966.txt @@ -0,0 +1,2 @@ + निधा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4973.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb7ad45cf247ccbf5b239a635025d6ef9eb47b53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4973.txt @@ -0,0 +1,4 @@ + +निधी राजदान (जन्म: ११ एप्रिल १९७७) या एक भारतीय पत्रकार आणि दूरदर्शन व्यक्तिमत्त्व आहेत.[१] त्या एनडीटीव्हीच्या कार्यकारी संपादक आणि एनडीटीव्ही 24x7 न्यूजचा डिबेट शो लेफ्ट, राईट अँड सेंटर आणि साप्ताहिक डिबेट शो द बिग फाईटच्या सादरकर्त्या होत्या.[२] +१९९९ पासून राझदान यांनी विविध बातम्यांचे कार्यक्रम कव्हर केले आहेत आणि कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. भारत-अमेरिका अणुकरार, सार्वत्रिक निवडणुका, अनेक राज्यांच्या निवडणुका, सर्व प्रमुख बातम्यांच्या घडामोडी यासह भारतीय राजकारण आणि परराष्ट्र व्यवहार जवळून कव्हर करणाऱ्या भारतीय उपखंडातील प्रमुख राजकीय, आर्थिक आणि सामाजिक कथांच्या विस्तृत श्रेणीवर त्यांनी विस्तृतपणे अहवाल दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुका, २००१ मध्ये गुजरात भूकंप आणि २००५ मध्ये काश्मीरमधील भूकंप इत्यादी अनेक घडामोडी कव्हर केल्या आहेत.[३][४] +राजदान या एनडीटीव्ही 24x7च्या राजनयिक वार्ताहर आहेत, जे भारतातील बातम्या आणि चालू घडामोडींचे प्रसारण करणारे इंग्लिश भाषेतील दूरदर्शन चॅनेल आहे.[५][६][७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4984.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1b97f866a6e40e6c88800195b430ad5e411f1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_4984.txt @@ -0,0 +1,8 @@ + निनावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_50.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_50.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e84974bd1b0531c5360a26c7d563d764d47637 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_50.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 35°52′N 128°36′E / 35.867°N 128.600°E / 35.867; 128.600 + +दैगू (कोरियन: 대구) हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे (सोल, बुसान व इंचेवॉन खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5005.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b150a32888c2d0be7eba5287cea7e8d1e2510c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5005.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 16°24′17″N 74°22′45″E / 16.40472°N 74.37917°E / 16.40472; 74.37917 + +निपाणी हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक नगर आहे. निपाणी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर स्थित असून ते बेळगावच्या ७५ कि.मी. उत्तरेस, तर कोल्हापूरच्या ३८ कि.मी. दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ४वर आहे. निपाणी येथे मराठी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. निपाणी हे तंबाखूचे एक मोठे व्यापारकेंद्र आहे. +तो मी नव्हेच ह्या प्रसिद्ध मराठी नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र निपाणीचा रहिवासी असल्याचे रंगवले गेले आहे. + +महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर मात्र कर्नाटकाच्या हद्दीत वसलेल्या निपाणी शहराला दोन्ही राज्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. लोकदैवतांच्या जत्रा (यात्रा) हा या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरातील यात्रांना "म्हाई" म्हणून संबोधले जाते घोडेश्वर (सुरूपली), हिटणी मलीकवाड या गावामध्ये जागृत समजले जाणारे "म्हसोबा" हे लोकदैवत परिसरातील लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा अविभाज्य भाग आहेत. सुगीचा हंगाम संपल्यावर या दैवतांच्या म्हाया सुरू होतात. पाहुण्यारावळ्यांना, नातेवाईकांना आमंत्रणे धाडली जातात. बकरी, कोंबड्याचे बळी दिले जातात. झणझणीत मांसाहारी जेवण ही वर्षातून एकदा येणारी पर्वणी असते. वरील तीन म्हसोबा हे एकमेकांचे भाऊ आहेत असे मानले जाते. हा म्हसोबा शेत शिवाराचे रक्षण करतो असा समज आहे. या लोकदैवताच्या नावाचे विश्लेषण महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या ग्रंथात मार्मिकपणे केले आहे. म्हसोबा म्हणजे "महासुबा" - एक मोठया सुब्याचा अधिकारी पूर्वीच्या काळी होऊन गेले होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5006.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1505865e512fbedde9bc5bc19562c80e70faa83c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5006.txt @@ -0,0 +1,2 @@ +निपाणी पिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5007.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b991136a9dbb993e14eee8312371d42e823e0e61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5007.txt @@ -0,0 +1 @@ +निपाणी वडगांव रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निपाणी वडगांव गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_502.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d0e8a8e274ee843aaeba1997ae702e4ef79ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_502.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_505.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..504934aca0ec5df26852fc97a50baae6bae4acba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_505.txt @@ -0,0 +1,16 @@ +धनगरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +धनगरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६० कुटुंबे व एकूण ३१२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १५९ पुरुष आणि १५३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २१ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०३८[१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, एक शासकीय प्राथमिक शाळा आहे. जवळील शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा माण येथे ८ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय मलकापूर येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा कोल्हापूर येथे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +धनगरवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +महाराष्ट्र सरकारच्या नागपूर येथील भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाने[permanent dead link] हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला, धनगरवाडी गावाच्या परिसरातील ४१.८० हेक्टर क्षेत्र बॉक्साईट या खनिजाच्या उत्खननासाठी लीजवर दिले आहे. हा लीज इ.स. २०३८ साली संपेल.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_506.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..504934aca0ec5df26852fc97a50baae6bae4acba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_506.txt @@ -0,0 +1,16 @@ +धनगरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +धनगरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ६१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६० कुटुंबे व एकूण ३१२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १५९ पुरुष आणि १५३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २१ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०३८[१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, एक शासकीय प्राथमिक शाळा आहे. जवळील शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा माण येथे ८ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय मलकापूर येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा कोल्हापूर येथे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +धनगरवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +महाराष्ट्र सरकारच्या नागपूर येथील भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाने[permanent dead link] हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला, धनगरवाडी गावाच्या परिसरातील ४१.८० हेक्टर क्षेत्र बॉक्साईट या खनिजाच्या उत्खननासाठी लीजवर दिले आहे. हा लीज इ.स. २०३८ साली संपेल.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5087.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e852300c7e840f631beeb3ca9e20022a32e1966d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5087.txt @@ -0,0 +1,4 @@ +निमसोड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. गावची लोकसंख्या अंदाजे २००० - २१०० पर्यंत असुन मतदार १४५० इतके आहे. निमसोड हे गांव जिल्हाठिकणापासुन ८० कि.मि. आहे तर तालुक्यापासुन ३.५ कि.मी. आहे. गांवचे भौगोलिक क्षेत्र ३८४ हेक्टर असुन ९०% क्षेत्र बागायती आहे. गावचे मुख्य पिक ऊस असुन आले हे पिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते .त्याचबरोबर सोयाबिन,भुईमुग,ज्वारी,गहु, हरबरा, मुग, उडीद, इ. पिकेही घेतली जातात. +गावापासुन तालुका ठिकाण जवळ असलेने गावचे खरेदी-विक्री व्यवहार कडेगांव येथे होतात. गावामध्ये दोन अंगणवाडी असुन एक इ.७ वीपर्यंत मराठी माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी कडेगांव , कराड किंवा विटा या शहरांमध्ये जावे लागते. शाळेला जिल्हा परिषदेचा स्वच्छ-सुन्दर शाळा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दोन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. आपटे गुरुजी व श्री.मंगेश बणसोडे गुरुजी यांना मिळाला आहे. +गावामध्ये ग्रामपंचायत आहे. त्याची स्थापना सन १९५६ साली झाली.गावचे पहिले सरपंच होण्याचा बहुमान श्री. गणपती मारुती मुळिक यांना मिळाला.तसेच गावच्या शेतीविकासासाठी सहकारी विकास सोसायटी स्थापना केलेली आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5096.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4372a391711b0db0cd7fe57cbf0d6bf20f109a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5096.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +निमि या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5098.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79814580bc6298cc7bd1b3870d29707197003fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5098.txt @@ -0,0 +1 @@ +निमि विदेह (देवनागरी लेखनभेद: निमि विदेह ; संस्कृत: निमि विदेह ;) हा विदेह राज्य स्थापणारा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. तो अयोध्येचा संस्थापक राजा इक्ष्वाकु याच्या शंभर पुत्रांपैकी बारावा पुत्र होता. त्याच्या मिथि जनक या पुत्राने मिथिला ही विदेहाच्या राजधानीची नगरी वसवली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5132.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97c76c9cd5de60824df16e22023550ce998bf41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5132.txt @@ -0,0 +1,9 @@ +नियोग ही संततीप्राप्तीसाठी अवलंबलेली एक पद्धती होती. ही पद्धत प्राचीन भारतीय संस्कृतीत प्रचलित होती. या पद्धतीने स्त्रीला विधवा झाल्यावर संतती नसल्यास अथवा पति जिवंत असतांना त्याच्या नपुसंकतेमुळे अथवा असाध्य आजाराने संतती प्राप्ती शक्य होत नसल्यास. पतीच्या संमतीने अथवा ज्येष्ठांच्या आणि गुरूंच्या संमतीने दुसऱ्या योग्य पुरुषाची नेमणुक करून त्याच्याशी होणाऱ्या संमागमाद्वारे संतती प्राप्ती करून घेण्याचा मार्ग होत +पतीचा मृत्यू, असाध्य रोग, क्लीबत्व, निर्वीजत्व इ. कारणांमुळे स्त्री निपुत्रिक असेल, तर तिने केवळ पुत्रोत्पत्तीसाठी आपद्धर्म म्हणून अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची प्राचीन भारतीय प्रथा. ‘नियोग’ या शब्दाचे आज्ञा, नियुक्ती व कर्तव्य हे तीनही अर्थ अभिप्रेत आहेत. सधवेला पतीने व विधवेला वडीलधाऱ्या माणसांनी पुत्रोत्पादनाची ‘आज्ञा’ द्यावी (किंवा तिने त्यांची संमती घ्यावी), नंतर तिची व अन्य पुरुषाची पुत्रोत्पादनासाठी तात्कालिक ‘नियुक्ती’ करावी आणि त्यानंतर त्या स्त्रीपुरुषांनी ‘कर्तव्य’ भावनेने समागम करावा, अशी पद्धत होती. निपुत्रिक पत्नी ही ‘क्षेत्र’ (जमीन), तिचा निपुत्रिक पती हा ‘क्षेत्री’ आणि नियुक्त पुरुष हा ‘बीजी’ मानला जाई, बीजी म्हणून स्त्रीच्या दिराची आणि तो नसेल, तर पतीच्या बाजूने अग्रक्रमाने सपिंड, सगोत्र, सप्रवर, सजातीय वा उच्चवर्णीय पुरुषाची नियुक्ती केली जाई. जननक्षम, निरोगी आणि सद्‌गुणी पुरुषासच बीजी म्हणून केले जाई. +नियोगाला स्त्रीचीही संमती आवश्यक असे. नियोगापूर्वी ती व्रतस्थ असे. देव, ब्राह्मण, पितर व अतिथी यांना भोजन दिल्यानंतर गुरुजनांदेखत नियोगाचा विचार जाहीर करून वडीलधारी माणसे बीजीची नियुक्ती करीत. ऋतुस्नात, शुक्लवस्त्रा व संयमी स्त्रीकडे बीजीने रात्री किंवा ब्राह्म मुहूर्त असताना (पहाटे) जावे. विलासाची इच्छा होऊ नये म्हणून त्याने अंगाला तुप (वा तेल) चोपडावे, तिच्याशी संभाषण, चुंबन, आलिंगन इ. वासनायुक्त वर्तन न करता समागम करावा. प्रत्येक वेळी ती ऋतुस्नात झाल्यानंतर फक्त एकदाच या पद्धतीने गर्भ राहीपर्यत समागम करावा, इच्छित पुत्रप्राप्तीसाठी नियोग असल्यामुळे जन्मलेले मूल मृत, अयोग्य वा कन्या असल्यास पुन्हा नियोग करावा, पुत्रप्राप्तीनंतर दोघांनी सून व सासरा या नात्याने वागावे इ. नियम होते. +नियोगाने एक, दोन आणि क्कचित तीन पुत्र प्राप्त करण्यास संमती असे. नियोगापूर्वी काही करार झाला नसेल, तर होणारा पुत्र क्षेत्रीचा ‘क्षेत्रज’ पुत्र ठरे. बीजी हा केवळ निमित्तमात्र मानला जाई. औरस पुत्राप्रमाणे क्षेत्रज पुत्राला क्षेत्राची संपत्ती व गोत्र आणि पिंडदानाचा व वंश चालविण्याचा अधिकार प्राप्त होई. ‘होणारा पुत्र दोघांचा’ असा आधी करार झाल्यास किंवा बीजीला स्वतःच्या भार्येपासूनचा पुत्र नसल्यास तो पुत्र बीजी व क्षेत्री या दोघांचाही ठरून त्याला दोघांच्याही संपत्ती वगैरेंचा हक्क प्राप्त होई. क्षेत्रीने क्षेत्रज पुत्र निर्माण करून घेतल्यानंतर त्याला औरस पुत्र झाला, तर अशा पुत्रांनी आपापल्या जनक पित्याची संपत्ती घ्यावी; परंतु औरस पुत्राने क्षेत्रज पुत्राला उपजीविकेसाठी पाचवा वा सहावा हिस्सा द्यावा, असे मनूने म्हटले आहे. +अर्थलाभ वा कामतृप्ती यांकरिता नियोग करण्यास मान्यता नव्हती. कुमारिका, पुत्रवती, सधवा वा विधवा, रुग्ण, वेडी, पतिनिधनाच्या दुःखाने बेभान झालेली, मूल होण्याचा काळ निघून गेलेली वृद्धा, वंध्या व गर्भवती यांना नियोगाचा अधिकार नव्हता. नियुक्त नसलेले, आवश्यकता नसताना नियुक्त केलेले, नियुक्त केलेले परंतु विलासमग्न होणारे व उद्दिष्टपूर्तीनंतरही गमन करणारे दीर-भावजय हे अगम्य आप्तसंभोग करणारे ठरतात, राजाने त्यांना शिक्षा द्यावी; त्यांना होणारा पुत्र बीजीचा असल्यामुळे क्षेत्रीच्या संपत्तीत त्याला वाटा नाही इ. मते होती.नियोग म्हणजे पुनर्विवाह नव्हे. उलट, स्त्रीने पुनर्विवाह करून परक्या कुलात जाऊ नये यासाठी नियोगाचा पर्याय होता. विवाहाने स्त्रीपुरूष पत्नी व पती बनतात. परंतु नियोगाने स्त्री ही बीजीची पत्नी बनत नाही, तर सदैव विवाहप्राप्त पतीचीच पत्नी राहते. पुनर्विवाहात विधवेच्या कामपूर्तीचा विचार असतो, परंतु नियोगात त्याला मुळीच स्थान नसते. नियोग हा व्यभिचारही नव्हे; कारण तो विधिपूर्वक नियुक्त स्त्रीपुरुषांचा संबंध असून तो तत्कालीन धर्म, शास्त्रे, नीती व शिष्टाचार यांना संमत होता. शिवाय, नीतीच्या कल्पना सदैव बदलत असल्यामुळे नियोगाला आजचे निकष लावणे योग्य नाही. +पुत्रप्राप्ती हाच नियोगामागचा प्रमुख उद्देश होता. पुत्रोत्पत्तीद्वारा पितृऋण फेडणे हे कर्तव्य आहे, पुत्राच्या अभावी वंश व स्वर्गही बुडतो, पुत्राने श्राद्धतर्पणादी विधी केल्याशिवाय पितरांना उत्तम गती मिळत नाही, ऐहिक समृद्धीसाठीही पराक्रमी पुत्राची गरज आहे इ. समजुतींमुळेच निपुत्रिक पुरुष स्वतःच्या पत्नीला प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटणाऱ्या नियोगाची आज्ञा वा संमती देत असे. जॉन मकलेन्‌नच्या मते बहुपतित्वाची चाल, जॉलीच्या मते आर्थिक उद्देश व विंटरनिट्‌सच्या मते दारिद्रय, स्त्रियांची दुर्मिळता व एकत्र कुटुंबपद्धती ही नियोग प्रथेची कारणे होत. +स्त्रीपारतंत्र्याची व पितृप्रधान संस्कृतीची द्योतक असलेली ही प्रथा वेदपूर्वकालापासून चालत आलेली होती. पूर्वी केव्हातरी कन्यादान व्यक्तिशः वराला न करता कुलाला करीत असावेत व नियोग हा त्या प्रथेचा अवशेष असावा, असे एक मत आहे. थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर धाकट्याने त्याची संपत्ती व विधवा पत्नी यांचा स्वीकार करण्याची पद्धत होती. यास्काचार्यांनी दीर (देवर) या शब्दाचा द्वितीय वर असा अर्थ दिला आहे. दीर व विधवा भावजय यांचा संबंध अजूनही काही ठिकाणी मान्य आहे. जावयाच्या धाकट्या भावाला पाणजावई व ‘वरधवा’ (कनिष्ठ वर) म्हणण्याची प्रथा आहे. या गोष्टी नियोग प्रथेच्या उगमाचा विचार करताना महत्त्वाच्या ठरतात. +नियोग हा काहींनी धर्मसंमत, तर काहींनी धर्माविरुद्ध मानलेला होता. ऋग्वेदादी वेद, गौतम-वसिष्ठादींची धर्मसूत्रे, स्मृती, पुराणे, अर्थशास्त्र, महाभारत इ. वाङ्‌मयातून नियोगाला मान्यता असल्याचे निर्देश आढळतात. धृतराष्ट्र, पंडू व पांडव यांचा जन्म नियोगानेच झाला होता. याउलट आपस्तंब धर्मसूत्राचा मात्र नियोगाला विरोध होता. मनूने आधी नियोगाचे वर्णन केले आहे, परंतु नंतर वेन राजाने मानवात आणलेला व वर्मसंकराला कारणीभूत होणारा पशुधर्म म्हणून त्याचा धिक्कार केला आहे. त्याच्या मते कन्येच्या वाङ्‌निश्चयानंतर; परंतु विवाहापूर्वीच नियोजित वर मृत्यू पावला, तर तिने त्याच्या भावाकडून पुत्रप्राप्ती करणे, हा खरा प्राचीनांच्या नियोगाचा अर्थ होता. +बृहस्पतीच्या मते कृत व त्रेता युगांतील लोक तपस्वी असल्यामुळे त्यांना नियोगाचा अधिकार होता, परंतु नंतरच्या लोकांना तो उरलेला नाही. काही धर्मनिबंधांनी नियोग हा वैकल्पिक होता किंवा शास्त्रांनी तो फक्त शुद्रांसाठी सांगितलेला होता, असे म्हटले आहे. ही चाल उत्तर हिंदुस्थानातील काही भागांत ब्रिटिश अमदानीपर्यंत चालू होती; परंतु इसवी सनाच्या पाचव्यासहाव्या शतकापासून 'कलिवर्ज्य' प्रकरणात नियोगाचा समावेश झाला आणि ही प्रथा नामशेष झाली. आधुनिक काळात आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी मात्र अक्षतयोनी विधवेप्रमाणेच अक्षतवीर्य विधुरानेही पुनर्विवाह न करता संतानोप्तत्तीसाठी नियोग करावा, असा विचार मांडला; परंतु त्यांच्या अनुयायांनीही याबाबतीत त्यांची मते मानलेली नाहीत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5135.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3cb93535e844b0d512d2297ad47cbfced9753d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5135.txt @@ -0,0 +1,5 @@ +नियोजन मंत्रालय हे भारतातील एक मंत्रालय आहे. जबाबदार मंत्री भारताचे माननीय पंतप्रधान आहेत . मंत्रालयाची संस्थात्मक क्षमता केंद्रीय एजन्सीद्वारे वापरली जाते: नीती आयोग (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया). +१ जानेवारी २०१५ रोजी, नियोजन आयोगाच्या जागी नव्याने स्थापन झालेल्या नीती आयोगाची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्र सरकारने १ जानेवारी २०१५ रोजी NITI आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक झाली. +नीती आयोगाचा आदेश म्हणजे तळापासून वरचा दृष्टीकोन वापरून आर्थिक धोरण-निर्धारण प्रक्रियेत भारतातील राज्य सरकारांचा सहभाग वाढवून सहकारी संघराज्यवादाला चालना देऊन भारताचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना पाठिंबा देणे. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, त्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर असतात. याशिवाय, आघाडीच्या विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधून तात्पुरते सदस्य निवडले जातात. या सदस्यांमध्ये एक मुख्य कार्यकारी अधिकारी, चार माजी अधिकारी सदस्य आणि दोन अर्धवेळ सदस्यांचा समावेश आहे. एजन्सीचे उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्री समतुल्य दर्जाचे असतात. +नीती आयोग प्रामुख्याने सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थांना धोरण इनपुट प्रदान करते. त्याच्या देखरेख आणि मूल्यमापन विभागाद्वारे, ते पंतप्रधान आणि भारताच्या अर्थसंकल्पाचा वार्षिक आढावा देण्यासाठी सर्व राष्ट्रीय आणि राज्य योजनांचे निरीक्षण करते. ते वित्त मंत्रालयाकडून मंजूर होण्यापूर्वी सर्व प्रमुख योजनांवर आपली प्रतिक्रिया देखील देते. +भारतासाठी काम करा या उपक्रमाद्वारे जगभरातील आयव्ही-लीग तज्ञांच्या नियुक्तीसाठी ही संस्था ओळखली जाते. बॉडीची लॅटरल एंट्री ही सरकारी संस्थांमध्ये देशातील सर्वात मोठी आहे, ज्यामध्ये पार्श्विक हायर हा मुख्य कार्यबलाच्या अर्ध्याहून अधिक आहे. शरीराच्या अत्यंत यशस्वी यंग प्रोफेशनल कार्यक्रमाचे सर्व केंद्रीय मंत्रालये आणि सैन्याने अनुकरण केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5149.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d391754be82c3b4d40601df7a9c836af15fdf2c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5149.txt @@ -0,0 +1,6 @@ +साध्वी निरंजन ज्योती (जन्म १ मार्च १९६७) ह्या भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या राजकारणी आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ३० मे २०१९ रोजी, त्यांची नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. +२०१२ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेश विधानसभेत हमीरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.[२] २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[३] +निरंजन ज्योती यांचा जन्म १ मार्च १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील पटेवरा गावात झाला. त्यांचे वडील अच्युतानंद आणि आई शिव काली देवी आहे. [३] त्यांचा जन्म निषाद जातीच्या कुटुंबात झाला. [१] +१४ जून २०१४ रोजी भानू पटेल नावाच्या एका व्यक्तीने आणि त्याच्या तीन साथीदारांनी ज्योतीवर गोळीबार केला जेव्हा त्या लखनौ येथील आवास विकास कॉलनीमध्ये एका कार्यक्रमातून परतत होत्या. त्या सुरक्षितपणे बचावल्या पण त्यांचा अंगरक्षक जखमी झाला. [४] +त्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या राज्य सचिव होत्या. मे २०१९ मध्ये, ज्योती ग्रामीण विकास राज्यमंत्री बनल्या. [५] +१ डिसेंबर २०१४ रोजी, [६] त्यांनी एका जाहीर सभेत, "दिल्लीतील सरकार रामाच्या मुलांनी चालवायचे की हरामीच्या हे तुम्हीच ठरवायचे आहे" असे विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखात त्या बोलल्या. [७] या विधानामुळे संसदेत गदारोळ झाला. [८] त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आणि माफी मागीतली.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5167.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8402b8e50d6cfc7115d29dcae631a3cecd7e0678 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5167.txt @@ -0,0 +1 @@ +पहा : निरयन सायन diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5199.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bff8ea39aec802f2ce900ab47af8fa45754dda19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5199.txt @@ -0,0 +1,20 @@ +निरूळ महाराष्ट्राच्या हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील गाव आहे. +या गावाचे क्षेत्रफळ ११३५.४९ हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १९९ कुटुंबे व एकूण ७७२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३६८ पुरुष आणि ४०४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे दोनजण आहेत. या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५६३७ आहे.[१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा,एक शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळापावस येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पावस येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय)१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१९ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +निरूळ ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत. +रत्‍नागिरी शहराच्या पूर्वेला २० किमी.वर असलेले निरूळ हे गाव निसर्गाने समृद्ध आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीच्या काठावरील हे गाव पर्यटकांसाठी एक वरदान आहे. पशुतिनाथाचा संदर्भ असलेल्या आख्यायिका व त्याच्याशी निगडित पुराणकालीन मंदिरे येथे लक्ष वेधून घेतात. त्या पैकी सांब मंदिर एक आहे. +गावातील शिमगा हा विशेष सण आहे.[२] +निरूळ या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते (महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): आंबा, काजू, नारळ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5206.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92650f46f81f130d6a95c86c3a81d32f170c2727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5206.txt @@ -0,0 +1,7 @@ +निरोदबरन चक्रवर्ती : (१७ नोव्हेंबर १९०३ – १७ जुलै २००६, पाँडिचेरी ) +निरोदबरन, किंवा 'निरोददा' या नावाने ते ओळखले जात. ते श्रीअरविंद यांचे जवळचे शिष्य होते. तसेच श्रीअरविंद यांचे ते वैयक्तिक डॉक्टर आणि सचिव होते. आणि 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होते. ते श्रीअरबिंदो आश्रमातील ज्येष्ठ सदस्य होते. +निरोदबरन यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केली. पॅरिसमध्ये असताना दिलीप कुमार रॉय यांनी त्यांना श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याबद्दल सांगितले होते. १९३० मध्ये, त्यांनी आश्रमाला भेट दिली आणि त्यांची श्रीमाताजी यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव प्राप्त झाला. पुढे म्हणजे इ.स. १९३३ मध्ये त्यांनी श्रीअरविंद आश्रमात प्रवेश घेतला. आश्रमात त्यांनी नवीन जीवनात प्रवेश केला आणि त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आले. योगाभ्यास करण्याच्या उद्देशाने ते आश्रमात परतले आणि निवासी डॉक्टर म्हणून कामाला लागले. +आश्रमाच्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन श्रीअरविंद एकांतवासात राहत होते तेव्हा ते साधकांशी पत्रांद्वारे संवाद साधत असत, साधनेसंबंधीच्या सूचना पत्रांद्वारे देत असत. १९३३ ते १९३८ या कालावधीत श्रीअरविंद यांच्याशी निरोदबरन यांनी पाच वर्षांचा विपुल पत्रव्यवहार केला, ज्याचे वर्णन पत्रव्यवहारात्मक इतिहास (एपिस्टोलरी हिस्ट्री) असे केले जाते. सुमारे १२०० पृष्ठांचे हे लेखन आहे. या पत्रांच्या द्वारे, श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्या काव्यलेखनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे, मार्गदर्शन केले आहे. +नोव्हेंबर १९३८ मध्ये श्रीअरविंद पाय घसरून त्यांच्या खोलीत पडले आणि त्यांच्या उजव्या पायास फ्रॅक्चर झाले. तेव्हा निरोदबरन 'फिजिशियन' या नात्याने त्यांच्या सोबत उपस्थित राहू लागले. श्रीअरविंद यांनी समाधी घेईपर्यंत म्हणजे १९३८ ते १९५० या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये निरोदबरन यांनी श्रीअरविंदांची सेवा केली. +निरोदबरन यांची खालील ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यात आली आहे.[१] +निरोदबरन यांचे १७ जुलै २००६ रोजी संध्याकाळी पाँडिचेरी येथे निधन झाले. त्यावेळी ते १०२ वर्षांचे होते. त्यांची समाधी आश्रमाच्या कॅझानोव्ह गार्डनमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5234.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..184fa060be0e2a02cff9fb487d814d96ecceaabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5234.txt @@ -0,0 +1,4 @@ +निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक टंकशाळा (टाइप-फाउण्ड्री) तसेच प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली.[१] सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. +जावजी दादाजी चौधरी हे त्यांची घरची आर्थिक स्थिती बरी नसल्यानेे साधारणतः वयाच्या दहाव्या वर्षापासून अमेरिकन मिशन प्रेसमध्ये मुद्राक्षर (टाइप) घासण्याचे काम करत असत[२]. त्यांनी त्या कामातले कौशल्य आत्मसात करून घेतले होते. अन्य काही ठिकाणीही काही काळ नोकऱ्या केल्यानंतर आपण स्वतःचीच टंकशाळा काढावी असे त्यांनी ठरवले[३]. १८६४ च्या सुमारास जावजींनी स्वतःची टंकशाळा सुरू केली[४]. राणूजी रावजी आरू हे त्यांचे सहकारी होते. + +या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराठी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध होत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदेशातील नीमच येथून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5242.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84aaf2b8955624e67b00f4dca73166812e6ef2a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5242.txt @@ -0,0 +1,4 @@ +दिनांक १६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी ज्योती सिंग पांडे,[२] या दिल्लीतील भौतिकोपचार (इंग्लिश: Physiotherapy )[३] शिकणाऱ्या मुलीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून हलविण्यात आले होते. +ज्योती व तिचा मित्र दक्षिण दिल्लीमध्ये चित्रपट पाहून रात्री घरी परतत होते. सार्वजनिक बस समजून बाजूने जाणाऱ्या एका अनधिकृत बसमध्ये ते चढले. त्या बसमध्ये त्यांच्याशिवाय चालक व इतर पाच व्यक्ती, ज्यानां २० मार्च २०२०ला सकाळी ५.३०ला फाशी झाली. बसचालकाचे मित्र होते, हे प्रवास करत होते. बस योग्य दिशेने जात नसल्याचे कळल्यावर ज्योती व तिचा मित्राने त्याबद्दल विचाराले. मात्र त्यावर इतर प्रवाशांनी तिला व तिच्या मित्राला एका लोखंडी सळीने मारले व नंतर गाडीच्या मागच्या बाजूला तिच्यावर सामुहिक बलात्कार केला व नंतर त्यांना जखमी अवस्थेत बसमधून फेकून दिले. +तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या हल्यात तिच्या लहान आतड्यांना इजा झाली होती व त्यामुळे ते काढून टाकावे लागले. २६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी तिला पुढील उपचारासाठी सिंगापूरला हलविले गेले मात्र तिथे तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. +या बलात्काराचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पडिसाद पडले. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला, यातील काही मोर्च्यांमध्ये सुरक्षा यंत्रणेवर हल्ले केले गेले. त्या सहाही जणांना हल्ला व बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे व त्यांच्यावर फास्ट ट्रॅक (इंग्लिश: Fast Track) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5244.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429e9da7a638c4dd9071e341def150b995868ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5244.txt @@ -0,0 +1,4 @@ +निर्भया समरोह हा महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी ऑनर फॉर वुमन राष्ट्रीय मोहिमेद्वारे आयोजित वार्षिक नृत्य आणि संगीत महोत्सव आहे. २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावावर असलेला उत्सव महिलांवरील हिंसाचाराच्या सर्व पीडितांना श्रद्धांजली म्हणून सादर केला जातो.[१][२] +महिला हक्क कार्यकर्त्या मानसी प्रधान यांनी स्थापन केलेला महोत्सव पहिल्यांदा ९ जुलै २०१३ रोजी आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाची दुसरी आवृत्ती ९ एप्रिल २०१५ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.[३] +२०१३ मध्ये महिलांच्या सन्मानासाठी राष्ट्रीय मोहिमेतील प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून निर्भया समरोहाची संकल्पना करण्यात आली. स्त्रियांच्या हक्कांबद्दल लोकांना संवेदनशील करण्यासाठी भारतीय नृत्य आणि संगीताचा सर्वोत्तम वापर करणे आणि महिलांवरील हिंसाचार समाप्त करण्याच्या चळवळीच्या समर्थनार्थ जनमत एकत्रित करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. +उत्सवाच्या निमित्ताने, महिलांच्या सक्षमीकरणात योगदान दिल्याबद्दल भारतातील एका आघाडीच्या संस्थेला निर्भया सन्मान प्रदान केला जातो. ९ जुलै २०१३ रोजी आयोजित पहिल्या निर्भया समारंभात ब्रह्मा कुमारी जागतिक अध्यात्म विद्यापीठास पहिला निर्भया सन्मान प्रदान करण्यात आला.[१] ९ एप्रिल २०१५ रोजी आयोजित २रा निर्भया समारंभ येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीला दुसरा निर्भया सन्मान प्रदान करण्यात आला.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5255.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd9cf133738ed24d3bedfffc33b51066bc63bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5255.txt @@ -0,0 +1,3 @@ + +निर्मल हे गाव लहान मुलांचे खेळण्यासाठी व पेंटीग्ससाठी  प्रसिद्ध आहे, तसेच हस्तकले साठी हे गाव प्रसिद्ध आहे .येथे लाकडाचे भुश्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात . " पोंकी चक्का "या स्थानिक भाषेतीलनावाने स्थानिक भाषेतील  ही खेळणी प्रसिद्ध आहेत .हैद्राबादचा निजाम एकदा येथे भेटीसाठी आला होता .त्यावेळी येथील कलाकारांनी त्याचे केलेल्या स्वागताने  तो भारावून गेला होता . +निर्मल येथील किल्ले  :निर्मल गाव हे काकतीय ,चालुक्य ,निजामशाहीपासून  कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते .ब्रिटिश  येई पर्यंत येथे काही काळ फ्रेंचांचेंहि वास्तव्य होते . शामगड ,छत्तीसगड व बत्तिसगड हे तीन किल्ले आसपास १० ते १५ km परिसरात आहेत diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_527.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..677a1d794464477cc2f1f40bf54f0dd8c5245ebf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_527.txt @@ -0,0 +1,4 @@ +धनराज पिल्ले (जन्म : १६ जुलै, इ.स. १९६८) हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत. +धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणाऱ्या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत. +भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचा तो कर्णधार होता. ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. +धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बँक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर अँडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5290.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869b84c32cae4f5cd2b3f722fa6bdc8a07fba95e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5290.txt @@ -0,0 +1 @@ +निर्यात ही एका देशात उत्पादित केलेली चांगली वस्तू आहे जी दुसऱ्या देशात विकली जाते किंवा दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय किंवा रहिवाशासाठी एका देशात प्रदान केलेली सेवा आहे. अशा वस्तूंचा विक्रेता किंवा सेवा प्रदाता हा निर्यातदार असतो; परदेशी खरेदीदार एक आयातदार आहे. [१] आंतरराष्ट्रीय व्यापारातील सेवांमध्ये आर्थिक, लेखा आणि इतर व्यावसायिक सेवा, पर्यटन, शिक्षण तसेच बौद्धिक संपदा अधिकार यांचा समावेश होतो. वस्तूंच्या निर्यातीसाठी अनेकदा सीमाशुल्क अधिकाऱ्यांचा सहभाग आवश्यक असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5291.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a41497bb299f75516f7f90f9e0c1c74dd69638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5291.txt @@ -0,0 +1,4 @@ +निर्वाण (पाली : निब्बान; प्राकृत : णिव्वाण) ही मोक्षासोबत मनाला मिळणाऱ्या असीम शांतीसाठी भारतीय धर्मांमध्ये वापरली गेलेली प्राचीन संस्कृत संज्ञा आहे. श्रमण मतात ही दुःखापासून मुक्त झाल्याची अवस्था आहे. हिंदू तत्त्वज्ञानात ही ब्रह्माशी (सर्वोच्च सत्तेशी) झालेल्या एकरूपतेची अवस्था आहे.[१] +निर्वाणाचा शब्दशः अर्थ "विझून जाणे" (मेणबत्तीप्रमाणे) असा होतो आणि बौद्धमताच्या संदर्भात त्याचा अर्थ इच्छा, माया, भ्रम यांच्या आगी विझून गेल्यानंतर मिळणारी मनाची अक्षुण्ण शांतता असा होतो.– भारतीय दर्शन शास्त्रातील नास्तिक दर्शनामध्ये बौद्ध दर्शनाचा समावेश होतो. बौद्ध तत्त्वज्ञानात जीवन विषयक जो विचार मांडला आहे त्यामध्ये निब्बाण – निर्वाण हा शब्द येतो. या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्यातील एक अर्थ समाधान, तृप्ती, सुख, आनंद असाही आहे. वस्तुतः निब्बाण म्हणजे विझणे, नष्ट होणे, मृत्यू, मोक्ष इत्यादी. निर्वाण शब्दा्चे समाधान, तृप्ती, सुख, आनंद हेही अर्थ आहेत. +तथागतांनी निब्बान विषयी भंते पटीसेन यांना उपदेश करताना म्हटले जो राखूण बोलतो,विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो. +बौद्ध तत्त्वज्ञानात निर्वाणाचे उपाधिशेष व निरूपाधिशेष असे दोन प्रकार मानले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_532.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3fdf99e619f84fbac9e322f66cec1a932254b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_532.txt @@ -0,0 +1,2 @@ + धनसाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5341.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58c2b27c52a6d1892bd0febde987988029e740b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5341.txt @@ -0,0 +1,2 @@ +निशांका निलाक्षी दमयंती डि सिल्व्हा (२७ सप्टेंबर, इ.स. १९८९:पानादुरा, श्रीलंका - ) ही  श्रीलंकाकडून सात एकदिवसीय आणि १० टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ३ नोव्हेंबर, २०१५ रोजी  न्यूझीलंडविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5379.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a1cc25fb28978a05a40149d95589eded87920ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5379.txt @@ -0,0 +1 @@ +निळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5416.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdfd24c96dca03cda017678e43fc8b2139c7fdee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5416.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळ्या छातीचा लावा, गरंज लावा, पेपट लावा, कानेली किंवा लहान टुरी (इंग्लिश: Blue-breasted Quail; हिंदी:चीना बटेर, गोबल बुटई) हा भारतात आढळणारा एक पक्षी आहे. +गरंज लावा आकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो. नर उडत असताना इतर कुठल्याही लावा पक्ष्यापेक्षा गडद रंग ठळकपणे दिसतो. मादी:भुवया फिक्कट, पिवळसर तांबूस छाती आणि कुशीवर काळसर पट्टे असतात. स्थायिक संचार करणारा स्थायिक पक्षी आहे. श्रीलंका आणि भारतात मुंबई, तसेच सिमला येथे हा पक्षी आढळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5424.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb8a177ca358a1bffc4b1c018178e60a9f470a22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5424.txt @@ -0,0 +1,8 @@ + निवखोलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5429.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77c574917f3e58631e704bcaef04460f1f6ae4e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5429.txt @@ -0,0 +1,2 @@ + निवडणुकीचे तिकीट ही राजकीय पक्ष याचेशी संबंधीत संकल्पना आहे. निवडून येण्यासाठी राजकीय पक्षाचा वापर करण्याने अथवा त्या पक्षाचे तिकीट मिळविणे हे निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आलेली एक युक्ती असते. त्याने, एखाद्या विशिष्ट पक्षाशी संलग्न असणारे मतदारांची हमखास मते मिळण्याची शक्यता असते. +अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी एकच तिकीट देण्यात येते, कारण त्यांची निवडीसाठी एकच मत टाकावे लागते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5455.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17d396b47e4b54a2daced3b9c819d9e83bdf1865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5455.txt @@ -0,0 +1,2 @@ + निवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5494.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da571dbe11a9048974324e950eb55af42bb6757a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5494.txt @@ -0,0 +1,8 @@ + निवेंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5513.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0832926a36882006cbf36f0658bfb7a9ccb3b9c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5513.txt @@ -0,0 +1,3 @@ + +निशब्द हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5514.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0195ab786bd98937e882cd11d85ecbf0d06dae09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5514.txt @@ -0,0 +1 @@ +निशा अली (९ ऑगस्ट, १९८६:भोपाळ, मध्य प्रदेश, भारत - हयात) ही भारतीय वंशाची पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5539.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30efc32b08af94fce493220d6cee5254e8435a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5539.txt @@ -0,0 +1,14 @@ +डाॅ. निशिकांत मिरजकर (जन्म : ४ डिसेंबर १९४२) हे लेखक आणि समीक्षक आहेत. दिल्ली विद्यापीठात त्यांनी तुलनात्मक भारतीय साहित्य आणि मराठी साहित्याचे तीस वर्षे अध्यापन केले. त्यांनी मराठीत बारा, हिंदीत सात व इंग्रजीत तीन संशोधनपर ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यात संतसाहित्य, तुलनात्मक साहित्य आणि भारतीय साहित्यावरील समीक्षात्मक पुस्तकांचा समावेश आहे. विश्वविद्यालय अनुदान आयोग, लोकसेवा आयोग, सरस्वती सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.   +मराठी +हिंदी +1.      संत नामदेव: जीवन और साहित्य (प्रकाशक: नामदेव जागृती मिशन, गुरुग्राम) +2.      नियतिदान (संपादन) (प्रकाशक: जी.ए. मित्रमंडल, दिल्ली) +3.      विज्ञानेश्वरी (अनुवाद) (प्रकाशक: भारतीय ज्ञानपीठ, दिल्ली) +4.      सावरकर समग्र भाग 1 से 10 (संपादन) (प्रकाशक: प्रभात प्रकाशन, दिल्ली) +5.      महाभारत: एक चींटी का (अनुवाद) (प्रकाशक: साहित्य अकादमी, दिल्ली) +6.      क्रांतिदर्शी कुसुमाग्रज (संपादन) (प्रकाशक: महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली)  +7.      सावरकर की कविताए (अनुवाद) (प्रकाशक: प्रभात प्रकाशन, दिल्ली) +English +1.     Marathi Literature: An Outline Published by Maharashtra Information Centre, New Delhi +2.     Kusumagraj Published by Sahitya Akademi, New Delhi +3.     Women’s Literature in Indian Languages (Ed. Vol : I and II, सहलेखिका - मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर, शुभांगी रायकर) Published by Sahityapremi Bhagini Mandal, Pune diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5550.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c8f5cfedc0d92c58da6865ccde1b19d79aa6e1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5550.txt @@ -0,0 +1 @@ +निषाद तरंगा परानविताना (१५ एप्रिल, इ.स. १९८२:केगाले, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5576.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74ddbc131cb752d6bfb378fee3abf6d36cac25d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5576.txt @@ -0,0 +1,7 @@ +निसाबा आदी गोदरेज,जिला निसा असेही म्हटले जाते,ती गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष आहे. +गोदरेज इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांसाठी ती कॉर्पोरेट धोरण आणि मानवी भांडवलाचे संचालन देखील करते.ती निसा गोदरेज ग्रुपच्या 'गुड ॲण्ड ग्रीन' (सीएसआर) उपक्रमांना चालविते.गोदरेज कौटुंबिक कौन्सिलिंगच कामकाज ही पाहते.ती सध्या जीसीपीएल, गोदरेज एग्रोवेट आणि शीट फॉर इंडियाच्या बोर्डांवर कामकाज पाहते.[१] +निसा हिने तिचे शालेय शिक्षण जॉन कॉनन स्कूल ह्या शाळेतून पूर्ण केले.त्यानंतर तिने तिची बॅचलर डिग्री बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ मधून केली.आणि एमबीए हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले. +निसा गोदरेज ग्रुपच्या पूर्वी गोदरेज एग्रोवेटचे कामकाज पाहत असे.गोदरेज इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांसाठी त्यांनी विविध प्रकल्पांचे,नूतनीकरण,योजना आणि एचआरची देखरेख केली आहे.[२][३] +गोदरेज समूहाने प्रमुख आदी गोदरेज यांनी आपली ३९ वर्षाची छोटी मुलगी हिच्यावर गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) ग्रुपची प्रमुख म्हणून निवड केली. +निसाबा ही त्या अल्पवयीन महिलांपैकी एका मोठ्या कंपनीचे प्रमुख आहेत.७५ वर्षीय पिता हे कंपनीचे चेरमन होते.त्यांनी १७ वर्ष जबाबदारी पार पाडली.त्यानंतर त्यांनी ती जबाबदारी निसा हिला दिली.निसा ही १० मे २०१७ रोजी त्या कंपनी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत झाली.[४] +निसाचे पती केल्पेश मेहता आणि मुलगा झोरान यांच्याबरोबर मुंबईत राहतात. तिचे वडील आदी गोदरेज हे गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5581.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7829dac7baeb64a008c5a1b477434f38f4b14b72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5581.txt @@ -0,0 +1,2 @@ +आंतरराष्ट्रीय स्टेडियम योकोहामा (जपानी: 横浜国際総合競技場) किंवा निसान मैदान हे जपान देशाच्या योकोहामा शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. ७२,३२७ आसनक्षमता असलेले हे जपानमधील सर्वात मोठे स्टेडियम असून निसान मोटार कंपनीने ह्याच्या नावाचे हक्क विकत घेतल्यामुळे ह्याचे अधिकृत नाव निसान स्टेडियम असे आहे. +२००१ फिफा कॉन्फिडरेशन्स चषक तसेच २००२ फिफा विश्वचषकामधील पहिल्या फेरीचे ३ सामने व अंतिम सामना ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते. २००५-२००८ व २०११-२०१२ दरम्यान फिफा क्लब विश्वचषकाचे महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5594.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20633e1c4250d07ffde79857249d47d5487caf94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5594.txt @@ -0,0 +1,2 @@ +निहारिका सिंग (३१ ऑगस्ट, इ.स. १९८२ - ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने मिस लव्हली सह चार चित्रपटांत अभिनय केला आहे. +ही फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची २००५ची विजेती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5615.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5615.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5618.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66ceb18fb086896aa13f994a62dd0e62dc7fb36a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5618.txt @@ -0,0 +1 @@ +नीडरओस्टराईश हे ऑस्ट्रिया देशातील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5619.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66ceb18fb086896aa13f994a62dd0e62dc7fb36a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5619.txt @@ -0,0 +1 @@ +नीडरओस्टराईश हे ऑस्ट्रिया देशातील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5627.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..520fac4063429c068351992547dc4e126a47df3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5627.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीतिशास्त्र ज्याला वर्तन तत्त्वज्ञान असेही म्हणतात. ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. जरी प्रत्येक युगात नैतिकतेची व्याख्या आणि व्याप्ती हा फरकाचा विषय झाला असला तरी, असे व्यापकपणे म्हटले जाऊ शकते की नैतिकता त्या सामान्य तत्त्वांशी संबंधित आहे ज्याच्या आधारे मानवी कृती आणि हेतूंचे मूल्यमापन शक्य आहे. बहुतेक लेखक आणि विचारवंत हे देखील मान्य करतात की नैतिकता मुख्यत्वे निकष आणि मूल्यांशी संबंधित आहे, आणि परिस्थितीचा अभ्यास किंवा शोध नाही, आणि हे निकष केवळ वैयक्तिक जीवनाच्या विश्लेषणासाठीच नव्हे तर सामाजिक जीवनाच्या विश्लेषणामध्ये वापरले जावेत. खूप नैतिकता योग्य निर्णय घेण्याची मानवी क्षमता विकसित करते. +चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, योग्यता आणि अवगुण, न्याय आणि गुन्हा यासारख्या संकल्पनांची व्याख्या करून, नैतिकता मानवी नैतिकतेच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. बौद्धिक समीक्षेचे क्षेत्र म्हणून, तो नैतिक तत्त्वज्ञान, वर्णनात्मक नीतिशास्त्र आणि मूल्य सिद्धांत या क्षेत्रांशी देखील व्यवहार करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5629.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e340c4c41aaf8934e529023b303ccb8d34f52b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5629.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीती मोहन ( १८ नोव्हेंबर १९७९) ही एक भारतीय गायिका आहे. २०१२ सालच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या बॉलिवुड चित्रपटामधील इश्क वाला लव्ह व जब तक है जान मधील जिया रे ह्या दोन गाण्यांसाठी नीती प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या दोन्ही गाण्यांसाठी गाण्यासाठी तिला एकत्रितपणे फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला. +नीतीने २००५ सालच्या सोचाना था ह्य चित्रपटामध्ये एक सहाय्यक भूमिका देखील केली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5641.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4112ae3d459922b68dc460e36dc74a93baf65d34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5641.txt @@ -0,0 +1 @@ +द्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5643.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1db22804ae2fb78bf90ee2b5b340b6e2f302aa82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5643.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख राजस्थानमधील नीम का थाना जिल्ह्याविषयी आहे. नीम का थाना शहराच्या माहितीसाठी पहा - नीम का थाना. +नीम का थाना हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र नीम का थाना येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5659.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6687a4e55a1910df16bc18ea8cbae4f016065a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5659.txt @@ -0,0 +1,18 @@ + +नीरजा भानोत (सप्टेंबर ७, इ.स. १९६३:चंदिगढ, भारत - सप्टेंबर ५, इ.स. १९८६:कराची, पाकिस्तान) [१], ही पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमानप्रवास सेविका होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. नीरजा भानोत ही एक भारतीय विरांगना होती. तिने १९८६ साली जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हाे वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली. तिला (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेलीही ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.[२] +नीरजाचा जन्म भारतातील चंदीगड येथे झाला. ती रमा भानोत व हरीश भानोत यांची मुलगी. हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील 'सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल', मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल व सेंट झेविअर्स महाविद्यालय यांमधून झाले [१] +मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये खानपान सेविका (पर्सर) म्हणून दाखल झाली.[१] +नीरजा पॅन ॲम ७३ या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता कराची विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे फ्रांकफुर्ट द्वारा न्यू यॉर्कला जात होते. नीरजाने कॉकपिटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली. +अपहरणकर्ते पॅलेस्टाईन येथील अबू निदाल या गटाचे सदस्य होते व त्यांना लिबियाचा पाठिंबा होता. प्रवाशांपैकी एका व्यक्तीची, तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली. त्यांनी नीरजाला नंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपवून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खुर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पन्हळीत टाकून दिले. +जवळपास १७ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी विमानात गोळीबार चालू केला व स्फोट घडवून आणले. तेव्हा नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. ती स्वतः इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. अंदाधुंद गोळीबार सुरू असताना तिने ३ मुलांना गोळीबारापासून वाचविण्यासाठी तिने स्वतःला त्यांच्या अंगावर झोकून दिले. तसे केल्याने गोळ्या मुलांना न लागता तिला लागल्या व त्याने तिचा मृत्यू झाला. जगभरात या शौर्यासाठी तिचे कौतुक झाले व तिला भारत सरकारने मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले.[३] +नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर नीरजा नावाचा हिंदी चित्रपट निघाला. यात नीरजाची भूमिका सोनम कपूर यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी होते. +नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. +५ सप्टेंबर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. +विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देऊन पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. +निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देऊन पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले. +नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरू केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. +अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देऊन गेला. +नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.' +भारताने नीरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. +पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला. +अमेरिकेने जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5676.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..621612622151ed3f51f60dfe22a2eeea70fc8b36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5676.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीरा शिवतक्रार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5682.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2bbb3767aedb5bf7cfd70d5da319e9f866db0d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5682.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नील 'एन' निक्की हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनेक लैंगिक दृष्यांनी भरलेला हा चित्रपट ह्या कारणास्तव चर्चेत राहिला होता. चित्रपट समीक्षकांनी नालस्ती केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर देखील अपयशी ठरला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..335c5255e875dcfc7337f9705de4ba99e12f68ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5697.txt @@ -0,0 +1 @@ +नील क्रिस्टोफर मॅकगॅरेल (१२ जुलै, १९७२, जॉर्जटाउन, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5736.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..584c7c48e69ef2460ac5b767dd91f9137b8c629e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5736.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील डग्लस मॅककेन्झी (२४ नोव्हेंबर, १९७५:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5746.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3024baa726febc9495f1f0e9602e9fa3f7c8b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5746.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील ॲलन स्टॅन्ले (१६ मे, १९६८:बेडफर्डशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. +स्टॅन्ले नॉरदॅम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून एकूण २१ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5749.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cca0f94bc8760c3649e1ade9ad89f2143438c9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5749.txt @@ -0,0 +1 @@ +नील हार्वे फेयरब्रदर (९ सप्टेंबर, १९६३:इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८७ ते १९९९ दरम्यान १० कसोटी आणि ७५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5780.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadcae820faeda0cab03f21289a2d0d9d2cd4b72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5780.txt @@ -0,0 +1,8 @@ +नीलम कोठारी सोनी किंवा नीलम ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मुंबई मधील एक ज्वेलरी डिझायनर आहेत. नीलम ने नवोदित अभिनेता करण शाह सह इस १९८४ साली जवानी या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर, गोविंदा सोबत जोडी जमवून लव्ह 86 (१९८६), इलझाम (१९८६), सिंदूर (१९८६), खुदगर्ज (१९८७), हात्या (१९८८), फर्ज की जंग (१९८९), ताकतवार (१९८९) आणि दो कैदी (१९८९)यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केले. तर, आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), बिल्लू बादशाह (१९८९), घर का चिराग (१९८९), आणि मिट्टी और सोना (१९८९) या चित्रपटांमध्ये चंकी पांडे सोबत काम केले. +नीलम यांचा जन्म हाँगकाँगमध्ये गुजराती वडील शिशिर कोठारी आणि इराणी आई परवीन कोठारी यांच्या पोटी झाला.[१][२][३][४] लहानपणी नीलम ने कीबोर्ड वाजवणे आणि जॅझ बॅले नृत्य इत्यादी मध्ये आपले कलागुण दाखवले. कोठारी कुटुंबाचा पारंपारिक दागिने बनवण्याचा व्यवसाय असुन ते उच्च दर्जाचे दागिने बनवतात. नीलम यांचे शिक्षण आयलँड स्कूलमध्ये झाले. बालपण हाँगकाँगमध्ये घालवून नंतर त्या कुटुंबासह कुटुंब बँकॉकला गेल्या. नीलम मुंबई येथे आपली सुट्टी घालवत असताना त्यांना दिग्दर्शक रमेश बहल यांनी संपर्क केला.[५] चित्रपट अभिनयात एक प्रयत्न करण्याचे ठरवून त्यांनी नवोदित अभिनेता करण शाहसोबत 'जवानी' (१९८४) चित्रपटात काम केले.[६] पण हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरला.[६] +नीलम यांच्या या पहिल्या चित्रपटातील अभिनयाची चित्रपट वर्तुळात दखल घेतली गेली आणि त्यांना अजून काही ऑफर मिळाल्या. नंतर १९८६ मध्ये तत्कालीन नवोदित अभिनेता, गोविंदा सोबत इलझाम चित्रपटात काम केल्या नंतर त्यांना चांगली प्रसिद्ध मिळाली. यानंतर त्यांनी गोविंदासोबत लोकप्रिय जोडी बनवत अजून १४ चित्रपटांमध्ये काम केले. यात लव्ह 86 (१९८६), खुदगर्ज (१९८७), हत्या (१९८८) आणि ताकतवर (१९८९) या चित्रपटांचा समावेश आहे. नंतर त्यांनी चंकी पांडेसोबत ८ चित्रपटांपैकी आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), मिट्टी और सोना (१९८९) आणि घर का चिराग (१९८९) यांसारखे ५ हिट चित्रपट दिले होते. तर ३ चित्रपट जखम (1989 चित्रपट), खुले-आम आणि एक बंगाली चित्रपट, मंदिरा (चित्रपट) हे फ्लॉप झाले. नंतर आणखी एक बंगाली चित्रपट बदनाम (१९९०) मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी सोबत त्यांनी काम केले. +१९९८ मध्ये शाहरुख खान आणि काजल अभिनित कुछ कुछ होता है या चित्रपटात पाहुण्या भूमिकेसाठी देखील तिची दखल घेण्यात आली होती. तर १९९९ मधील कौटुंबिक चित्रपट हम साथ साथ है मध्ये त्यांनी अजून एक सहाय्यक भूमिका केली होती. नीलम चा शेवटचा चित्रपट कसम (२००१) चंकी पांडेच्या सह विलंबित रिलीज झाला. [७] +२०२० साली, तिने महीप कपूर, भावना पांडे आणि सीमा सजदेह सोबत रियलिटी टेलिव्हिजन मालिका फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज तसेच सीझन 2 (2022) मध्ये काम केले, जे दो.्या नेटफ्लिमालिका क्सवर प्रवाहित केले गेझाल्या[८] [९] +अभिनयात कारकीर्द करत असतानाही त्यांनी दागिने निर्मिती मध्ये देखील रस घेत आपल्या कौटुंबिक व्यवसायात काम केले. नीलम यांनी मुंबईत ज्वेलरी-डिझाइनिंग [१०] मध्ये औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि २००१ मध्ये चित्रपटात तात्पुरती रजा घेऊन, नीलम ज्वेल्स या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. इस. २००४ साली त्यांनी मुंबईत एक दागिन्यांचे शोरूम उघडले [११] त्यानंतर त्यांनी २५ ऑगस्ट २०११ रोजी मुंबईत नीलम कोठारी फाइन ज्वेल्स नावाने एक स्वतंत्र दागिन्यांचे दुकान सुरू केले. +ऑक्टोबर २००० मध्ये, नीलमने यूकेमधील एक व्यावसायिकाचा मुलगा ऋषी सेठियाशी लग्न केले.[१२] अल्पावधीतच त्यांचा घटस्फोट झाला.[१३] अभिनेता समीर सोनी सोबत काही काळ घालवल्या नंतर[१४] त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.[१५] लग्नाच्या २ वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी एक मुलगी, 'अहाना' दत्तक घेतली.[१६] +१९९८ मध्ये, सहकलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह नीलमवर हम साथ साथ है च्या चित्रीकरणादरम्यान कांकणी येथे दोन काळवीटांची शिकार केल्याबद्दल वन्यजीव कायदा आणि आयपीसीचा आरोप ठेवण्यात आला होता. ५ एप्रिल २०१८ रोजी जोधपूर येथील CJM न्यायालयाने यातून नीलामची निर्दोष मुक्तता केली.[१७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5781.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadcae820faeda0cab03f21289a2d0d9d2cd4b72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5781.txt @@ -0,0 +1,8 @@ +नीलम कोठारी सोनी किंवा नीलम ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मुंबई मधील एक ज्वेलरी डिझायनर आहेत. नीलम ने नवोदित अभिनेता करण शाह सह इस १९८४ साली जवानी या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर, गोविंदा सोबत जोडी जमवून लव्ह 86 (१९८६), इलझाम (१९८६), सिंदूर (१९८६), खुदगर्ज (१९८७), हात्या (१९८८), फर्ज की जंग (१९८९), ताकतवार (१९८९) आणि दो कैदी (१९८९)यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केले. तर, आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), बिल्लू बादशाह (१९८९), घर का चिराग (१९८९), आणि मिट्टी और सोना (१९८९) या चित्रपटांमध्ये चंकी पांडे सोबत काम केले. +नीलम यांचा जन्म हाँगकाँगमध्ये गुजराती वडील शिशिर कोठारी आणि इराणी आई परवीन कोठारी यांच्या पोटी झाला.[१][२][३][४] लहानपणी नीलम ने कीबोर्ड वाजवणे आणि जॅझ बॅले नृत्य इत्यादी मध्ये आपले कलागुण दाखवले. कोठारी कुटुंबाचा पारंपारिक दागिने बनवण्याचा व्यवसाय असुन ते उच्च दर्जाचे दागिने बनवतात. नीलम यांचे शिक्षण आयलँड स्कूलमध्ये झाले. बालपण हाँगकाँगमध्ये घालवून नंतर त्या कुटुंबासह कुटुंब बँकॉकला गेल्या. नीलम मुंबई येथे आपली सुट्टी घालवत असताना त्यांना दिग्दर्शक रमेश बहल यांनी संपर्क केला.[५] चित्रपट अभिनयात एक प्रयत्न करण्याचे ठरवून त्यांनी नवोदित अभिनेता करण शाहसोबत 'जवानी' (१९८४) चित्रपटात काम केले.[६] पण हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरला.[६] +नीलम यांच्या या पहिल्या चित्रपटातील अभिनयाची चित्रपट वर्तुळात दखल घेतली गेली आणि त्यांना अजून काही ऑफर मिळाल्या. नंतर १९८६ मध्ये तत्कालीन नवोदित अभिनेता, गोविंदा सोबत इलझाम चित्रपटात काम केल्या नंतर त्यांना चांगली प्रसिद्ध मिळाली. यानंतर त्यांनी गोविंदासोबत लोकप्रिय जोडी बनवत अजून १४ चित्रपटांमध्ये काम केले. यात लव्ह 86 (१९८६), खुदगर्ज (१९८७), हत्या (१९८८) आणि ताकतवर (१९८९) या चित्रपटांचा समावेश आहे. नंतर त्यांनी चंकी पांडेसोबत ८ चित्रपटांपैकी आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), मिट्टी और सोना (१९८९) आणि घर का चिराग (१९८९) यांसारखे ५ हिट चित्रपट दिले होते. तर ३ चित्रपट जखम (1989 चित्रपट), खुले-आम आणि एक बंगाली चित्रपट, मंदिरा (चित्रपट) हे फ्लॉप झाले. नंतर आणखी एक बंगाली चित्रपट बदनाम (१९९०) मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी सोबत त्यांनी काम केले. +१९९८ मध्ये शाहरुख खान आणि काजल अभिनित कुछ कुछ होता है या चित्रपटात पाहुण्या भूमिकेसाठी देखील तिची दखल घेण्यात आली होती. तर १९९९ मधील कौटुंबिक चित्रपट हम साथ साथ है मध्ये त्यांनी अजून एक सहाय्यक भूमिका केली होती. नीलम चा शेवटचा चित्रपट कसम (२००१) चंकी पांडेच्या सह विलंबित रिलीज झाला. [७] +२०२० साली, तिने महीप कपूर, भावना पांडे आणि सीमा सजदेह सोबत रियलिटी टेलिव्हिजन मालिका फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज तसेच सीझन 2 (2022) मध्ये काम केले, जे दो.्या नेटफ्लिमालिका क्सवर प्रवाहित केले गेझाल्या[८] [९] +अभिनयात कारकीर्द करत असतानाही त्यांनी दागिने निर्मिती मध्ये देखील रस घेत आपल्या कौटुंबिक व्यवसायात काम केले. नीलम यांनी मुंबईत ज्वेलरी-डिझाइनिंग [१०] मध्ये औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि २००१ मध्ये चित्रपटात तात्पुरती रजा घेऊन, नीलम ज्वेल्स या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. इस. २००४ साली त्यांनी मुंबईत एक दागिन्यांचे शोरूम उघडले [११] त्यानंतर त्यांनी २५ ऑगस्ट २०११ रोजी मुंबईत नीलम कोठारी फाइन ज्वेल्स नावाने एक स्वतंत्र दागिन्यांचे दुकान सुरू केले. +ऑक्टोबर २००० मध्ये, नीलमने यूकेमधील एक व्यावसायिकाचा मुलगा ऋषी सेठियाशी लग्न केले.[१२] अल्पावधीतच त्यांचा घटस्फोट झाला.[१३] अभिनेता समीर सोनी सोबत काही काळ घालवल्या नंतर[१४] त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.[१५] लग्नाच्या २ वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी एक मुलगी, 'अहाना' दत्तक घेतली.[१६] +१९९८ मध्ये, सहकलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह नीलमवर हम साथ साथ है च्या चित्रीकरणादरम्यान कांकणी येथे दोन काळवीटांची शिकार केल्याबद्दल वन्यजीव कायदा आणि आयपीसीचा आरोप ठेवण्यात आला होता. ५ एप्रिल २०१८ रोजी जोधपूर येथील CJM न्यायालयाने यातून नीलामची निर्दोष मुक्तता केली.[१७] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5795.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c80f593030abb7edbab8df1e5c7da13b50e3ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5795.txt @@ -0,0 +1 @@ +नीलमंगल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5800.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a10fcce01cd5d91e87d33cc4d9f3a6b8fde7c56d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5800.txt @@ -0,0 +1 @@ +नीलसागर किंवा नीलवर्ण ही जल्पकाद्य पक्षिकुळातील हिमालयात आढळणाऱ्या पक्ष्यांची जात आहे. उन्हाळ्यात नीलसागर भारतीय उपखंडाच्या दक्षिण भागाकडे स्थलांतर करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5801.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d30697e3cae61859ff4f68a565934fb3745afb44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5801.txt @@ -0,0 +1 @@ +एखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट निळ्या रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) नीलसृती (ब्लूशिफ्ट) असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5841.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4adbb6a3167781fb914a36f0e3096cd1be3d41b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5841.txt @@ -0,0 +1,3 @@ +नीव्ह एड्रियेन कॅम्पबेल (३ ऑक्टोबर, १९७३:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) ही केनेडियन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने स्क्रीम चित्रपटशृंखलेमध्ये सिडनी प्रेस्कॉटची भूमिका केली आहे. +कॅम्पबेलने द क्राफ्ट, वाइल्ड थिंग्ज सारख्या चित्रपटांत तर हाउस ऑफ कार्ड्स या दूरचित्रवाणी मालिकेतही अभिनय केला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5855.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7878caba68110babeab7a14e94cae95649bb3a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5855.txt @@ -0,0 +1,36 @@ +नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5859.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7878caba68110babeab7a14e94cae95649bb3a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5859.txt @@ -0,0 +1,36 @@ +नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5888.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..009450c92053012b20cbb6af3f9f9289992fe92f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5888.txt @@ -0,0 +1,2 @@ +नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नुमालीगढ रिफायनरी हा ऑईल इंडिया लिमिटेडचा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. हे भारतातील आसाममधील नुमालीगढ, गोलाघाट जिल्हा येथे आहे. नुमालीगढ रिफायनरी हा भारत पेट्रोलियम चा विभाग होता. ते १९९९ मध्ये उघडले गेले व १ ऑक्टोबर २००० पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले.[१] +त्याची प्रतिवर्षी 3 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता होती.[२] जानेवारी २०१९ मध्ये, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने रिफायनरीची क्षमता दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याच्या योजनांना मंजुरी दिली.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5890.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..707132f90f4c5695e3c1876dbbc952a39ae0324d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5890.txt @@ -0,0 +1,2 @@ +नूमेआ (फ्रेंच: Nouméa) ही  न्यू कॅलिडोनिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नूमेआची लोकसंख्या साधारण ९१,३८६ इतकी आहे. +गुणक: 22°16′33″S 166°27′29″E / 22.27583°S 166.45806°E / -22.27583; 166.45806 diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5898.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5898.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5927.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c33f70ff88a8ced27efe33474abeb0a81e32631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5927.txt @@ -0,0 +1,2 @@ +नूह हे भारताच्या हरियाणा राज्यातील नूह उपविभाग आणि नूह जिल्ह्याचे एक शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे [१] . हे शहर राष्ट्रीय महामार्ग २४८वर आहे. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [२] नूहची लोकसंख्या ११,०३८ होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5942.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e095f36666b660014154b4c6a0d25243715329a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5942.txt @@ -0,0 +1,5 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, (१९५७, ६०, ६४, ६८, ७९) +नूतन (माहेरचे आडनाव समर्थ/सेन, सासरचे बेहल)(४ जून १९३६ - २१ फेब्रुवारी १९९१) ह्या प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत, ती ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात रोमान्सपासून सामाजिक-वास्तववादी नाट्य चित्रपटांपर्यंतचे प्रकार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतनला अनेकदा अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या संघर्षग्रस्त स्त्रियांच्या पात्रांमध्ये तिच्या नैसर्गिक अभिनय शैलीसाठी ओळख मिळाली होती. तिच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी विक्रमी पाच फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.[१][२] १९७४ मध्ये नूतन यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.[३][४] +चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि चित्रपट अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी मुंबईत जन्मलेल्या नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या आईने दिग्दर्शित हमारी बेटी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने नगीना (१९५१) आणि हम लोग (१९५१) चित्रपटांमध्ये काम केले. सीमा (१९५५) मधील तिच्या भूमिकेने तिला व्यापक मान्यता मिळवून दिली आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ती १९६० च्या दशकात व १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रमुख भूमिका बजावत राहिली आणि सुजाता (१९५९), बंदिनी (१९६३), मिलन (१९६७) आणि मैं तुलसी तेरे आंगन की (१९७८) मधील भूमिकांसाठी तिने इतर चार प्रसंगी फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. या काळातील तिच्या इतर काही चित्रपटांमध्ये अनाडी (१९५९), छलिया (१९६०), तेरे घर के सामने (१९६३), खानदान (१९६५), सरस्वतीचंद्र (१९६८), अनुराग (१९७२) आणि सौदागर (१९७३) यांचा समावेश होतो. +१९८० च्या दशकात, नूतनने व्यक्तिरेखात्मक पात्र साकारण्यास सुरुवात केली आणि तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीपर्यंत ती काम करत राहिली. साजन की सहेली (१९८१), मेरी जंग (१९८५) आणि नाम (१९८६) यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्यतः आईच्या भूमिका साकारल्या. मेरी जंग मधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत सहावा आणि अंतिम फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नूतन यांनी नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये विवाह केला होता. १९९१ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहनीश बहल हा अभिनेता आहे.[५] +१९४५ मध्ये तिच्या वडिलांच्या नल दमयंती या चित्रपटात नूतन पहिल्यांदा लहानपणी कॅमेऱ्यासमोर दिसली.[६][७] तिने वयाच्या १४ व्या वर्षी तिची आई दिग्दर्शित हमारी बेटी (१९५०) मध्ये नायिकेची भूमिका करून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.[८][९] त्यानंतर रवींद्र दवे यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नगीना (१९५१) आला आणि या चित्रपटातील नूतनच्या अभिनयाने तिला अधिक ओळख मिळाली. हा चित्रपट तिचा पहिला व्यावसायिक यश ठरला. प्रकाशनाच्या वेळी ती १५ वर्षांची होती, व तिला प्रीमियरला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती कारण चित्रपट "ए: (प्रौढांसाठी प्रतिबंधित)" प्रमाणित करण्यात आला होता आणि ती अल्पवयीन होती.[१०] त्याच वर्षी प्रदर्शित झालेला सामाजिक नाट्य चित्रपट हम लोग होता ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये ती लोकप्रिय झाली. झिया सरहादी दिग्दर्शित हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संकटे आणि संकटांचा सामना करतो आणि नूतनने क्षयरोगाने ग्रस्त असलेली एक महत्त्वाकांक्षी लेखिका पारोची भूमिका केली होती. नगीना आणि हम लोग यांनी एक उगवता तारा म्हणून तिचे स्थान मजबूत केले.[६][११] पुढील वर्षी, तिने १९५२ च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिला मिस मसूरीचा मुकुट देण्यात आला, पण पुढील अभ्यासासाठी तिला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले.[११][१२][१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5957.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5ec23a194d6f2df7b724f413ae2097b7e5571af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5957.txt @@ -0,0 +1,2 @@ +नूर दानिया स्युहादा (जन्म ११ सप्टेंबर २००५) एक मलेशियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] जानेवारी २०२२ मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी, तिने बांगलादेशविरुद्ध टी२०आ मध्ये पदार्पण केले.[२] +ऑक्टोबर २०२२ मध्ये, तिने महिला आशिया कपमध्ये कसोटी खेळणाऱ्या संघांविरुद्ध काही टी२०आ सामने खेळले.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5989.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e385f52e2f07ea1faf761859814dbf9365ddfd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_5989.txt @@ -0,0 +1,9 @@ +नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात.[१] नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. +वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे-- नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ॐकाराचा उच्चार केला. परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. +वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. +त्यानंतर गाणगापुरी ते चोवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. +नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. +महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे कारंजा , औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. +नृसिंह सरस्वती इ.स. १३८८ ते १४२१ या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी (इ. स. १४२१), इ. स. १४२२ ते १४३४ या काळात नरसोबावाडीत व इ. स. १४३५ ते १४५८ या काळात गाणगापूर येथे राहिले. 'गुरुचरित्र' हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. +नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नृसिंहसरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीनवन दिले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_599.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8ee7617e080ded9901a45d71ed67bde26e1ca4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_599.txt @@ -0,0 +1,3 @@ +धपाटे हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. +साहित्यः पालक;कांदा कोशिंबीर लसुण पाकळ्या कणिक पाणी तिखट मिठ जिरे गोडतेल +कृती: हे सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे व त्यात कनीक योग्य प्रमाणात घ्यावी चवीनुसार तिखट नमक जिर घालाव व नंतर छोटे छोटे गोले करून तव्यावर योग्य प्रकारे टाकावेत चवीनुसार खरपुस खमंग तेलात भाजावेतनी दह्याबरोबर सर्व्ह करण्यास द्यावे धपाटे तयार. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6000.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ad8358bae32751877dab196462f46528ea531bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6000.txt @@ -0,0 +1 @@ +नॅटली पोर्टमन (इंग्लिश: Natalie Portman; हिब्रू: נטלי הרשלג) (जून ९, इ.स. १९८१ - ) ही एक इस्रायली-अमेरिकन सिने-अभिनेत्री आहे. स्टार वॉर्स शृंखलेच्या पहिल्या तीन चित्रपटांमधील भूमिकेसाठी तसेच २०१० साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक स्वान ह्या चित्रपटासाठी ती प्रसिद्ध आहे. ब्लॅक स्वानमधील भूमिकेकरिता तिने ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार पटकावले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_601.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2887eeb832a57775d1320065a33f419aaebe99c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_601.txt @@ -0,0 +1 @@ +धमणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6017.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..412b7b8ee05b980c49902ee2d787453a76d3aa81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6017.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑक्टोबर २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6018.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..412b7b8ee05b980c49902ee2d787453a76d3aa81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6018.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑक्टोबर २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6036.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29df8dfa0671ef2aa799e49e08628f21fcc30af7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6036.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॅपा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॅपा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३८,०१९ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. नॅपा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6042.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152817975f1949928170f691fde66116b1e6d662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6042.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॅश काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॅश काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6050.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52f8f833f8d680d022fb2fab96148f6bb488e70f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6050.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क ( एनआयआरएफ ) ही मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) भारत सरकारच्या उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी स्वीकारलेली एक पद्धत आहे. फ्रेमवर्क एमएचआरडीने मंजूर केले आणि 29 सप्टेंबर २०१५ रोजी मानव संसाधन विकास मंत्री यांनी लाँच केले. [१] विद्यापीठ आणि महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र संस्था आणि वास्तुविद्या संस्था जसे त्यांच्या कार्यक्षेत्रांवर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांसाठी स्वतंत्र रँकिंग आहेत. संसाधने, संशोधन आणि भागीदार समज यासारख्या रँकिंग हेतूंसाठी फ्रेमवर्क अनेक मापदंडांचा वापर करते. या पॅरामीटर्सचे पाच क्लस्टरमध्ये वर्गीकरण केले गेले आहे आणि या क्लस्टर्सना काही विशिष्ट वजन दिले गेले आहेत. वेटेज संस्थेच्या प्रकारावर अवलंबून असतात. पहिल्या मानांकनात सुमारे 3500 संस्थांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. [२] + +यादृष्टीने अपूर्ण, विसंगत आणि सीमा नसल्याबद्दल या यादीवर टीका केली गेली. [३] भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसीने एनआयआरएफ रँकिंगवर अपूर्ण आकडेवारीवर आधारित असल्याचा आरोप करत आक्षेप नोंदविला. [४] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6055.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54617b108d5c5b7c8decec110c8b6b1f1773c5c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6055.txt @@ -0,0 +1,3 @@ +राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट) ही एक स्वायत्त [१] संस्था आहे जी फॅशन, टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमध्ये अभ्यासक्रम देते. त्याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे.[२] +निफ्टची स्थापना १९८६ मध्ये भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली. हे २००६ मध्ये वैधानिक संस्था म्हणून घोषित करण्यात आले आणि भारतीय संसदेच्या निफ्ट कायद्याद्वारे तिला स्वतःची पदवी प्रदान करण्याचा अधिकार दिला गेला.[३] +२०२२ मध्ये भारतीय सैन्याने घेतलेला नवीन डिजिटल विघटनकारी पॅटर्न कॅमफ्लाज युनिफॉर्म निफ्टच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6067.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63418539d9f9561b0c7ce5789faaf87de8495862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6067.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९३९ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय श्रीनगर येथे असून त्याचा उदेश काश्मीरचा विकास हा आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अनेक वेळा नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य सरकार राहिले असून केंद्र सरकारमध्ये देखील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. +ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला ह्यांनी ऑल जम्मू ॲन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स ह्या पक्षाची स्थापना केली. १९३९ साली पक्षाचे नाव बदलून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. स्थापनेपासून अबदुल्ला कुटुंबाने नॅशनल कॉन्फरन्सवर वर्चस्व कायम ठेवले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6068.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63418539d9f9561b0c7ce5789faaf87de8495862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6068.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९३९ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय श्रीनगर येथे असून त्याचा उदेश काश्मीरचा विकास हा आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अनेक वेळा नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य सरकार राहिले असून केंद्र सरकारमध्ये देखील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. +ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला ह्यांनी ऑल जम्मू ॲन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स ह्या पक्षाची स्थापना केली. १९३९ साली पक्षाचे नाव बदलून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. स्थापनेपासून अबदुल्ला कुटुंबाने नॅशनल कॉन्फरन्सवर वर्चस्व कायम ठेवले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_609.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c103d1babf07cb207877993f5528be75eda935ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_609.txt @@ -0,0 +1,2 @@ + धमोते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6093.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c1aeb21bbfe7f7b10adbbe10c7e1ced60cf699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6093.txt @@ -0,0 +1,19 @@ +राष्ट्रीय शेअर बाजार (संक्षेप: एन.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर सध्या १,६९६ कंपन्या रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. +एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सी.एन.एक्स. निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजारच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो. +राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे, जे मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन, डेरिव्हेटिव्हज व्यापार संस्था, द्वारे राखलेल्या आकडेवारीच्या आधारे व्यापार केलेल्या करारांच्या संख्येनुसार २०२१ मध्ये हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. वर्ष २०२१ साठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेस द्वारे राखलेल्या आकडेवारीनुसार रोख समभागांमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. हे काही आघाडीच्या वित्तीय संस्था, बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीखाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारची स्थापना १९९२ मध्ये देशातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून झाली. राष्ट्रीय शेअर बाजार हे देशातील पहिले एक्सचेंज होते ज्याने एक आधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम प्रदान केली ज्याने देशभरात पसरलेल्या गुंतवणूकदारांना सुलभ व्यापार सुविधा देऊ केल्या. विक्रम लिमये हे राष्ट्रीय शेअर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. +राष्ट्रीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल US$३.४ ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते ऑगस्ट २०२१ पर्यंत जगातील १०वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा फ्लॅगशिप इंडेक्स, NIFTY 50, 50 स्टॉक इंडेक्सचा भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराचा बॅरोमीटर म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करतात. NIFTY 50 निर्देशांक १९९६ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने लाँच केला होता. तथापि, वैद्यनाथन (२०१६) यांचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या / GDP पैकी फक्त ४% ही भारतातील स्टॉक एक्स्चेंजमधून प्राप्त होते. +युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या विपरीत जेथे देशाच्या GDP पैकी जवळपास ७०% कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून मिळवले जाते, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा राष्ट्रीय GDP (ऑक्टोबर 2016 पर्यंत) फक्त १२-१४% वाटा आहे. यापैकी फक्त ७,४०० कंपन्या सूचीबद्ध आहेत त्यापैकी फक्त 4000 कंपन्या BSE आणि NSE येथील स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करतात. त्यामुळे बीएसई आणि एनएसई येथे व्यापार करणाऱ्या शेअर्सचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेच्या फक्त 4% आहे, जे तथाकथित असंघटित क्षेत्र आणि कौटुंबिक खर्चातून उत्पन्नाशी संबंधित बहुतेक क्रियाकलाप प्राप्त करतात. +इकॉनॉमिक टाईम्सचा अंदाज आहे की एप्रिल 2018 पर्यंत, 6 कोटी (60 दशलक्ष) किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची बचत भारतातील समभागांमध्ये थेट खरेदीद्वारे किंवा म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवली होती. तत्पूर्वी, बिमल जालान समितीच्या अहवालाचा अंदाज आहे की भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.3% लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत युनायटेड स्टेट्समधील 27% आणि चीनमधील 10% लोकसंख्या आहे. +भारतीय शेअर बाजारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. ट्रेडिंग मेंबरशिप ब्रोकर्सच्या एका गटापुरती मर्यादित न ठेवता, NSE ने याची खात्री केली की जो कोणी पात्र, अनुभवी आणि किमान आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो त्याला व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. या संदर्भात, जेव्हा SEBIच्या देखरेखीखाली एक्स्चेंजची मालकी आणि व्यवस्थापन वेगळे केले तेव्हा NSE त्याच्या वेळेच्या पुढे होती. स्टॉकच्या किमतीची माहिती जी पूर्वी फक्त मोजक्या लोकांद्वारे ऍक्सेस केली जाऊ शकत होती ती आता क्लायंटला दूरस्थ ठिकाणी त्याच सहजतेने पाहता येईल. कागदावर आधारित सेटलमेंटची जागा इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी-आधारित खात्यांनी घेतली आणि व्यवहारांचे सेटलमेंट नेहमी वेळेवर केले गेले. सेटलमेंट गॅरंटी ब्रोकर डिफॉल्टपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करतील याची खात्री करण्यासाठी सर्वात गंभीर बदलांपैकी एक मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली समाविष्ट आहे. +भारतीय भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारच्या आदेशानुसार आघाडीच्या भारतीय वित्तीय संस्थांच्या गटाने NSEची स्थापना केली. फेरवानी समितीने मांडलेल्या शिफारशींवर आधारित, NSEची स्थापना देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण शेअरहोल्डिंगसह करण्यात आली. प्रमुख देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, IFCI लिमिटेड, IDFC लिमिटेड आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गॅगिल एफडीआय लिमिटेड, जीएस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, SAIF II SE इन्व्हेस्टमेंट्स मॉरिशस लिमिटेड, अरंडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) Pte लिमिटेड, आणि PI अपॉर्च्युनिटीज फंड I यांचा समावेश आहे. +एक्स्चेंज 1992 मध्ये एक कर भरणारी कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आणि 1993 मध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) ऍक्ट, 1956 अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखले गेले, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. NSE ने जून 1994 मध्ये घाऊक डेट मार्केट (WDM) विभागामध्ये कामकाज सुरू केले. NSEच्या भांडवली बाजार (इक्विटी) विभागाचे कामकाज नोव्हेंबर 1994 मध्ये सुरू झाले, तर डेरिव्हेटिव्ह विभागातील कामकाज जून 2000 मध्ये सुरू झाले. NSE ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑफर करते. इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, डेट, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागातील सेवा. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुविधा सादर करणारे हे भारतातील पहिले एक्सचेंज होते ज्यामुळे संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आधार जोडला गेला. NSE कडे 2500 VSAT आणि 3000 लीज्ड लाइन्स भारतातील 2000हून अधिक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. +नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तयार करण्यातही NSEची भूमिका होती जी गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे त्यांचे शेअर्स आणि बाँड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवू आणि हस्तांतरित करू देते. हे गुंतवणुकदारांना एक शेअर किंवा बाँड इतकेच कमी ठेवण्याची आणि व्यापार करण्याची परवानगी देते. यामुळे केवळ आर्थिक साधने ठेवणे सोयीचे झाले नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कागदी प्रमाणपत्रांची गरज नाहीशी झाली आणि बनावट किंवा बनावट प्रमाणपत्रे आणि फसव्या व्यवहारांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या ज्यांनी भारतीय शेअर बाजाराला त्रास दिला. NSDLची सुरक्षा, पारदर्शकता, कमी व्यवहार किंमती आणि NSE ने ऑफर केलेल्या कार्यक्षमतेसह, भारतीय शेअर बाजाराचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षण खूप वाढवले. +नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने 12 जून 2000 रोजी इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करून डेरिव्हेटिव्हमध्ये व्यापार सुरू केला. NSEच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटने जागतिक ठसा उमटवला आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि सिंगल स्टॉक फ्युचर्समध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहे. मिनी निफ्टी फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधील ट्रेडिंग आणि निफ्टी 50 वर दीर्घकालीन पर्याय देखील उपलब्ध आहेत. एप्रिल 2013 ते मार्च 2014 या आर्थिक वर्षात एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल ₹1.52236 ट्रिलियन (US$20 अब्ज) होती. +29 ऑगस्ट 2011 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जगातील सर्वाधिक फॉलो केलेल्या इक्विटी निर्देशांक, S&P 500 आणि Dow Jones Industrial Average वर व्युत्पन्न करार सुरू केले. जागतिक निर्देशांक सुरू करणारे NSE हे पहिले भारतीय विनिमय आहे. S&P 500 इंडेक्सवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या मूळ देश, यूएसए बाहेरील एक्सचेंजमध्ये सादर आणि सूचीबद्ध करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. नवीन करारांमध्ये DJIA आणि S&P 500 वरील फ्युचर्स आणि S&P 500 वरील पर्यायांचा समावेश आहे. +3 मे 2012 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने FTSE 100 वर व्युत्पन्न करार (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) लाँच केले, यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा व्यापकपणे ट्रॅक केलेला निर्देशांक. यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा हा अशा प्रकारचा पहिला निर्देशांक भारतात लाँच झाला. FTSE 100 मध्ये यूके-सूचीबद्ध ब्लू-चिप कंपन्यांपैकी 100 सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांनी तीन वर्षांत गुंतवणुकीवर 17.8 टक्के परतावा दिला आहे. हा निर्देशांक यूकेच्या इक्विटी मार्केट कॅपच्या 85.6 टक्के आहे. +10 जानेवारी 2013 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जपान एक्सचेंज ग्रुप, इंक. (JPX) सोबत ओसाका सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनीवर भारताचा प्रतिनिधी स्टॉक प्राइस इंडेक्स निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करण्याच्या तयारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली, जेपीएक्सची उपकंपनी. +पुढे जाण्यासाठी, दोन्ही पक्ष येन-नामांकित निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्सची यादी मार्च 2014 पर्यंत, OSE आणि टोकियो स्टॉक एक्सचेंज, Inc. (TSE), JPXची उपकंपनी यांच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्सच्या एकत्रीकरणाची तारीख तयार करतील. . ही पहिलीच वेळ आहे की जपानमधील किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सध्याच्या ETF व्यतिरिक्त, त्यांच्या स्वतःच्या चलनात आणि त्यांच्या स्वतःच्या टाइम झोनमध्ये भारतीय बाजारांवर नजर टाकू शकतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही चलन जोखमीचा सामना करावा लागणार नाही, कारण त्यांना डॉलर-मूल्यांकित किंवा रुपया-मूल्यांकित करारांमध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही. +ऑगस्ट 2008 मध्ये, NSE द्वारे USD-INR मध्ये करन्सी फ्यूचर्स लाँच करून भारतात चलन डेरिव्हेटिव्ह्ज सादर केले गेले. यात युरो, पाउंड आणि येनमधील चलन फ्युचर्स देखील जोडले गेले. 20 जून 2013 रोजी एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल फ्युचर्समध्ये अनुक्रमे ₹419.2616 अब्ज (US$5.6 अब्ज) आणि पर्यायांमध्ये ₹273.977 अब्ज (US$3.6 अब्ज) होती. +डिसेंबर 2013 मध्ये, भारतातील एक्स्चेंजना बाजार नियामक SEBI कडून एकल GOI बाँडवर व्याजदर फ्यूचर्स (IRFs) लाँच करण्यासाठी मान्यता मिळाली आहे किंवा रोखीने सेटल केले जातील अशा बाँडची टोपली. बाजारातील सहभागी उत्पादन रोखीने सेटल होण्याच्या आणि एकाच बाँडवर उपलब्ध असण्याच्या बाजूने होते. NSE 21 जानेवारी रोजी अत्यंत तरल 7.16 टक्के आणि 8.83 टक्के 10-वर्षीय GOI बाँडवर NSE बाँड फ्युचर्स लॉन्च करेल. करन्सी फ्यूचर्स लाँच झाल्याच्या ठीक एक वर्षानंतर, 31 ऑगस्ट 2009 रोजी NSE द्वारे भारतात व्याजदर फ्यूचर्स सादर केले गेले. SEBI-RBI समितीने शिफारस केल्यानुसार व्याज-दर फ्युचर्ससाठी मान्यता मिळवणारे NSE हे पहिले स्टॉक एक्सचेंज बनले. +13 मे 2013 रोजी, NSE ने कर्ज-संबंधित उत्पादनांसाठी एक तरल आणि पारदर्शक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी भारतातील पहिले समर्पित कर्ज व्यासपीठ सुरू केले. +डेट सेगमेंट किरकोळ गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बाँडमध्ये लिक्विड आणि पारदर्शक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याची संधी देते. हे कॉर्पोरेट बाँडधारक असलेल्या संस्थांना देखील मदत करते. इष्टतम किमतीत खरेदी आणि विक्री करण्यासाठी आणि कॉर्पोरेट्सना बाँड जारी करताना त्यांना पुरेशी मागणी मिळविण्यात मदत करण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6104.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c7d089b2bb4de4334cb620e2dea1457bd965d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6104.txt @@ -0,0 +1,56 @@ +गुणक: 36°10′N 86°49′W / 36.167°N 86.817°W / 36.167; -86.817 + +नॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलॅंड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बॅंड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. +खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ नॅशव्हिलमध्ये स्थित आहेत. +जगातील खालील शहरांचे नॅशव्हिलसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6135.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1aff26bfa73b88fe004ebfcbc8a9164a33b3330 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6135.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेडवूड सिटी, अमेरिका +नेक्स्ट सॉफ्टवेर इन्कॉ. (इंग्लिश: Next Software, Inc. ;) ही अमेरिकेतील रेडवूड सिटी येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञान कंपनी होती. इ.स. १९९६ साली या कंपनीचे अ‍ॅपल कंपनीत विलीनीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6147.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c338cd3a39255a638f1768c2613f3f854b9d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6147.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटकऱ्यांचे पहिले ई-साहित्य संमेलन ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (२५डिसेंबर २०१०ते २७ डिसेंबर २०१०) काही दिवस आधी, म्हणजे १४ नोव्हेंबर २०१०ला ठाण्यातच झाले. + +पहा: मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6165.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6bc2e4ec1c14900c1dd8568e30bbd2ddec4f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6165.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. +गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6168.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6bc2e4ec1c14900c1dd8568e30bbd2ddec4f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6168.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. +गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6179.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..737f49f7b03be84c21a76fab37a01a4c45d7050f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6179.txt @@ -0,0 +1,68 @@ +सुभाषचंद्र बोस (बंगाली : সুভাষ চন্দ্র বসু ; जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. +नेताजी असे त्यांना प्रथम १९४२ च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते. आता संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हटले जाते.[१][२] + +सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी १९२१ मध्ये भारतात परत आले. बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. १९३८ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३९ मध्ये पुन्हा निवडून आले, पण पुढे ते आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.[३][४] +एप्रिल १९४१, मध्ये बोस नाझी जर्मनीमध्ये पोहोचले. बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी त्यांनी वापरला. बोस यांच्या नेतृत्वात एर्विन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या ३,००० भारतीयांची भरती फ्री इंडिया लीजनमध्ये करण्यात आली. एडॉल्फ हिटलरने मे १९४२ च्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली. याच काळात बोस हे वडीलही झाले[५][६]; त्यांची पत्नी, किंवा सोबती, एमिली शेंकल यांनी एका मुलीला जन्म दिला. नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले. त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे १९४३ मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले.[५][७] जपानच्या पाठिंब्याने, बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली, ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता.[८] जपान-व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानने त्याचे प्रमुखपद बोस यांना दिले. +जरी बोस असामान्य आणि प्रतिभाशाली होते, तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते[९], तसेच त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळच टिकला. १९४४ च्या उत्तरार्धात आणि १९४५ च्या सुरुवातीस, ब्रिटिश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला. यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली.[१०] यानंतर बोस हे सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले. +१८ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.[११][१२] काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही, बोस भारतात परत येतील अशी अपेक्षा ते करत होते.[१३] +भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले. ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही.[१४][१५] ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या ३०० अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला, पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले.[१६][१०] +भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत. पण हुकूमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे, हे टीकेचे एक कारण होते.[५][१७] जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्यांचारावर जाहीरपणे टीका करण्याचे त्यांनी टाळले. तसेच पीडितांना भारतात आश्रय देण्याचीही अनिच्छा दर्शवली. पण हे सर्व जागरूकतेच्या अभावामुळे घडले असेही म्हणता येणार नाही.[१८][१९] +सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.[२०] जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते.[२१] आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते.[ संदर्भ हवा ] इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. [२०]प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.[ संदर्भ हवा ] प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.[ संदर्भ हवा ] सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.[२२] आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.[ संदर्भ हवा ] +लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.[२३] वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.[ संदर्भ हवा ] वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.[ संदर्भ हवा ] गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.[ संदर्भ हवा ] महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.[ संदर्भ हवा ] कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.[ संदर्भ हवा ] म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.[ संदर्भ हवा ] +१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ] परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.[ संदर्भ हवा ] +कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. +रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. +गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले. +१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली. +लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला. +१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल. +जानेवारी २६, १९३१च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. +२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.[२१] +आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. +१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. +नोव्हेंबर ५, १९२५च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली. +मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले. +१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. +१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले. +१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते. +युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंडचे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले. +सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले. +पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले. +विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली. +१९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले. +१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले. +ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल. +आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली. +१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. +१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते. +१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. +सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. +पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले. +१९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही. +अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. +मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. +दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. +नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला. +काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले. +बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. +अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही. +काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले. +शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली. +पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले. +नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले. +ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. +आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली. +पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला. +द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. +आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला. +जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. +दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. +ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. +ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. +अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या. +स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता. +१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला. +ऑगस्ट १८, १९४५च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे. +सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या. २०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बऱ्याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत. +१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे. +अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :- diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6190.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47596c4da06d8b2f5488aa5e333e76591184a5e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6190.txt @@ -0,0 +1 @@ +नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्याअसे म्हटले जाते. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा सातत्याने विस्तार होत गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विविध संघटना निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा सर्व संघटनांसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते. 'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय’.[१] नेतृत्वाच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत. मेरी पार्कर फॉलेट नेतृत्वासंबंधी विचार मांडतांना म्हणतात 'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही’ ' Leader & Export' या शोध निबंधात त्या म्हणतात 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते’.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6201.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc3c5011021e16d5439349eaa8ea8a2c56b6adc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6201.txt @@ -0,0 +1 @@ +नेथन जॉन ॲस्टल (१५ सप्टेंबर, १९७१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6202.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc3c5011021e16d5439349eaa8ea8a2c56b6adc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6202.txt @@ -0,0 +1 @@ +नेथन जॉन ॲस्टल (१५ सप्टेंबर, १९७१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6215.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb06549ecd4051b5ae7a5abc6ded3ac67fafdafe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6215.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +नेथन मिचेल कूल्टर-नाइल हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6233.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8492dd7e73a3234695ea26a56c75e421c73a904f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6233.txt @@ -0,0 +1 @@ +डच क्रिकेट संघाने २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान संयुक्त अरब अमिराती खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात प्रथम श्रेणी सामने दोन लिस्ट अ खेळ आणि ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[१] टी२०आ सामना भारतामध्ये मार्चमध्ये झालेल्या जागतिक ट्वेंटी२० च्या तयारीत होता आणि नेदरलँड्सने एकतर्फी सामना ८४ धावांनी जिंकला. प्रथम-श्रेणी सामना हा २०१५-१७ आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपचा भाग होता आणि लिस्ट ए गेम्स हे २०१५-१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचा भाग होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6255.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76d67fbbea5ff8eb2d0383b6121fb649dd1421cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6255.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेदरलँड्स क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. दोन्ही संघांनी मे २०१३ नंतर प्रथमच एकमेकांबरोबर वनडे सामने खेळले. ही मालिका पहिलीच वेळ अशी होती की दोन्ही संघ एकमेकांसोबत दक्षिण आफ्रिकेत खेळले. मालिकेपूर्वी नेहमीचा कर्णधार टेंबा बवुमा अनुपस्थित असल्याने केशव महाराजला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार नियुक्त केले गेले. +पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सला २७८ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु पावसामुळे नेदरलँड्सचा डाव केवळ २ षटकांनंतर थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस न थांबल्याने सामना अनिर्णित राहिला. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाचा ओमिक्रॉन नामक वेगळ्या प्रकारचा विषाणूचा झपाट्याने फैलाव होण्यास सुरुवात झाली. युरोपीय देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकी खंडामधून होणारी प्रवासी विमान वाहतूक स्थगित केली. नेदरलँड्स सरकारने ही अश्या विमानसेवा स्थगित केल्या. त्यामुळे उर्वरीत दौऱ्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर २७ नोव्हेंबर रोजी उर्वरीत दोन सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड उर्वरीत दोन सामने येणाऱ्या मोसमात खेळविण्यासाठी प्रयत्न करतील असे जाहीर करण्यात आले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_626.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ba4f0ed1f66a50d5bdc20548d3ceadee1c4fdc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_626.txt @@ -0,0 +1 @@ +वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात.अनेक ठिकाणी मोठी धरणे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6262.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9972e1bdb5709968b2a5065214e8a62f40aa6a12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6262.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेदरलँडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २००६ मध्ये आयर्लंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या महिला एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने २१-२३ ऑगस्ट दरम्यान सलग ३ तारखांमध्ये आयोजित करण्यात आले होते.[१] +पहिला महिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि तो ४० षटकांचा सराव सामना म्हणून बदलण्यास प्राधान्य देण्यात आले. उर्वरित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकून आयर्लंडने ३ सामन्यांची महिला वनडे मालिका २-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6285.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6285.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6305.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ca3e45e84d478f4287e07c0b391f44da4044b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6305.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेदुरूमल्ली जनार्दन रेड्डी ( फेब्रुवारी २०,इ.स. १९३५) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९२ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.ते १४व्या लोकसभेत विशाखापट्टणम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6309.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ec595289634ac10d9e7c50630faff092cd1079f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6309.txt @@ -0,0 +1 @@ +नेनाद मिलियाश (सर्बियन सिरिलिक लिपी: Ненад Милијаш ; रोमन लिपी: Nenad Milijaš ;) (एप्रिल ३०, इ.स. १९८३ - हयात) हा सर्बियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे. तो मधल्या फळीतील खेळाडू असून इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत वोल्व्हरहॅंप्टन वॉंडरर्स एफ.सी. संघाकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6312.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303d94f23823a632218d2cc2735bb20538ec537a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6312.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरुनलवेली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर तिरुनलवेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +या शहराला नेन्लई किंवा तिन्नेवेल्ली या नावांनेही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6318.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51d85d951e6e02e8307de7a51b760b5f130990b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6318.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेपच्यून (लॅटिन: Neptūnus) हा रोमन मिथकशास्त्रांनुसार पाणी व समुद्रांचा अधिपती असलेला देव आहे. तो ज्युपिटर व प्लूटो यांचा भाऊ आहे. ग्रीक मिथकशास्त्रांमधील पोसायडनाशी नेपच्युनाच्या व्यक्तिरेखेचे साधर्म्य आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6319.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecbfa0d2231851260432852342d373a6f783bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6319.txt @@ -0,0 +1,12 @@ + +नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह दुर्बिणीनेच पाहता येतो. +नेपच्यून हा ग्रह युरेनसच्याही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४,४९८,२५२,९०० कि.मी. ( 30.06896348 A.U.) एवढे आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः ४९,५२८ कि.मी. आहे. +अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवतीदेखील कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते वर्तुळाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आहे. ज्यामुळे ते घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही. +नेपच्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेपच्यून ग्रहास एकूण १३ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास चुंबकीय क्षेत्रदेखील आहे. +गॅलिलिओने इ.स. १६६२मध्ये केलेल्या काही पहिल्या संशोधनांच्यावेळी त्याने आखलेल्या चित्रांकनांतील एका बिंदूत नेपच्यूनची कक्षा आढळली. एकूण १३ चंद्र आहेत +नेपच्यून हा दिसायला निळ्या रंगाचा आहे. +एकूण १३ चंद्र +पृथ्वीवरून दिसणाऱ्या नेपच्यूनची दृश्य प्रत(भासमान प्रत) +७.७ ते +८.० इतकी असते. हा आकडा +६पेक्षा जास्त असल्याने नेपच्यून नुसत्या डोळ्याने दिसत नाही. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_632.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1656dbfe1c0a4e022e8bfb5c3bc14dbdd5fc4ec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_632.txt @@ -0,0 +1 @@ +धरणगांव रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर दोन एक्सप्रेस, दोन सुपरफास्ट आणि सात पॅसेंजर गाड्या[१] थांबतात. या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण विभाग आणि पुस्तक विक्रेते आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रतीक्षालये सुद्धा आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6325.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76d5bc54361d3c4e31476d28f2d83d858e5e75c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6325.txt @@ -0,0 +1,15 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदूबहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४२ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नसून तो त्रिकोणी आहे. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. काठमांडू भागात सुमारे ५० लाखांची वस्ती आहे. नेपाळ भौगोलिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातील सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, (नेपाळी : सागरमाथा) नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २०००० फूट (६०९६ मीटर) उंचीवरील सुमारे २४० पर्वतशिखरे आहेत. दक्षिण नेपाळमध्ये जमीन शेतीसाठी अतिशय समृद्ध असल्याने दाट लोकवस्तीचा शहरी भाग अधिक आहे. +नेपाळमधील सुमारे ८०% लोक हिंदू असून टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळी जातींचा विचार केला तर येथे ३० प्रकारचे गट आढळतात. त्यात-क्षेत्री (पहाडी(पर्वतीय/डोंगरी) क्षत्रिय), बाहुन (पहाडी ब्राह्मण), मगर, थारू, नेवार, गुरूंग, तामाड, किरॉंत राई, लिंबू, यादव, शेर्पा, नेपाळी मियॉं, इत्यादींचा समावेश होतो. नेपाळी कामकाज देवनागरी लिपीत चालते. पण त्यांच्या लिपी व भाषेत ३० बोली आहेत. मात्र ‘नेवारी’ ही काठमांडूमध्ये प्रमुख भाषा आहे. नेपाळमध्ये जगातील १४ उंच शिखरांपैकी ८ आहेत. ही सर्व शिखरे ८००० मीटरपेक्षा उंच आहेत. एव्हरेस्ट शिखर ८८५० मीटर उंचीचे येथेच आहे. याला सागरमाथा म्हणतात. हवामान पाहता नोव्हेंबर ते मार्च काठमांडू थंड असते. जानेवारीमध्ये मात्र कमालीची थंडी असते. एप्रिल ते जून ३२ अंश सेल्सिअस तापमान असते. जून –जुलै मात्र येथे संपूर्ण पावसाळा असतो. इतर महिन्यात मात्र हवामान उत्तम असते.सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत इथली कार्यालये चालतात आणि शनिवार-रविवार त्यांना सुटी असते. इथले , ९०% लोक शेती आणि पर्यटन उद्योगावर आपली गुजराण करतात.यातूनच ते परकीय चलन मिळवतात. त्यांचे दरडोई २१० यु.एस .डॉलर म्हणजे १०,५००/-रुपये उत्पन्न आहे. +बौद्ध धर्माचे येथे सुमारे १५% आहे, बौद्ध लोक जरी अल्पसंख्य असले तरी नेपाळशी बौद्ध धर्माचे दृढ आणि अतूट नाते आहे. नेपाळमध्ये बहुतांश वेळा राजेशाही होती. १७६८ पासून शाह घराण्याची राजवट होती. राजा पृथ्वी नारायण शाह यांच्या राजवटीमध्ये अनेक छोट्या स्वतंत्र राज्यांना एकसंध नेपाळमध्ये समाविष्ट केले गेले. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सुमारे दहा वर्ष चाललेल्या लोकचळवळीचा आणि नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्षांनी सतत काही आठवडे केलेल्या संपानंतर अखेर २२ नोव्हेंबर, २००५ रोजी एक १२ कलमी मसुदा तयार करण्यात आला. २८ मे, २००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकशाही नेपाळची स्थापना केली. २३ जुलै, २००८ रोजी राम बरन यादव यांनी नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. +नेपाळ येथील राजांची तलेजूभवानी कुलदेवता आहे. तलेजूभवानी म्हणजेच तुळजा भवानी होय. +=== चतुःसीमा === +नेपाळ देश हा १४ अंचलांमध्ये विभागला गेलेला आहे.- +नेपाळ एक धर्मनिरपेक्ष देश असून तेथे बहुसंख्याक लोक हिंदू आहेत. याशिवाय तेथे बौद्ध, मुसलमान, ख्रिस्ती धर्मीय सुद्धा आहेत. +तिथे पैशांची खुप अडचण येते म्हणून नेपाल येथुन कामगार बाहेर देशात कामाला जातात , मुख्य भारतात कामाला येतात +नेपाळ किंवा नेपाळचा प्रवास या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी सर्वात जुने पुस्तक संपतराव गायकवाड यांनी लिहिलेले ’नेपाळचा प्रवास’ हे आहे. हे पुस्तक इ.स. १९२८ साली प्रकाशित झाले होते. + +बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका + +क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6334.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71f80f6bae2ed7c46083ae0e4d749b7a5b2cc6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6334.txt @@ -0,0 +1,80 @@ +वनडे आणि टी२०आ किट +नेपाळ पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ (नेपाळी:नेपाल पुरुष राष्ट्रिय क्रिकेट टोली) [८][९] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळ देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनद्वारे नियंत्रित केला जातो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6353.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c9892c22734c9b000ed39a69f2cf0410169914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6353.txt @@ -0,0 +1 @@ +नेपाळ स्काउट्स ही नेपाळ देशातील स्काउटिंग आणि गाइडिंग संस्था आहे. याची स्थापना १९५२मध्ये झाली. यात १९,९५२ (२०११) स्काउट आणि ११,९६२ गाइड (२००३) सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_640.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d00d01046a526be5153ee15af423a06b3464b8f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_640.txt @@ -0,0 +1,2 @@ +धरमतर [१] भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यात असलेले अतिशय छोटे बंदर आहे. ते अंबा नदीमुळे बनलेल्या धरमतर खाडीच्या उजव्या काठावर नदीच्या मुखापासून १६ किलोमीटर आत आहे. ही खाडी अंबा नदी, कारंजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम आहे. मुंबई खाडीच्या पलीकडे व नाव्हा शेवा ह्या मोठ्या बंदरापासून २६ किलोमीटर असलेले धरमतर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील वडखळ नाक्यापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. ते रस्ता व रेल्वे ह्या दोन्ही तऱ्हेने बंदराशी जोडलेले आहे. +मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून धरमतर पर्यंत ३६ किलोमीटर पोहून जाणे हे लांब पल्ल्याच्या पोहणाऱ्यांना एक आव्हान असते[२]. विशेषतः ज्यांना इंग्लिश खाडी पोहायची असते त्यांच्या उमेदवारीसाठी ही एक महत्त्वाची पायरी असते. मिहीर सेन ह्या प्रसिद्ध जलतरण पटूने प्रथम धरमतर आणि मग इंग्लिश खाडी पार केल्यावर ह्या आव्हानाना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक पोहाणाऱ्यांनी हा लांब पल्ला पोहून दाखविला आहे व त्यात १० ते २० वर्षे गटातली मुले व मुलीही आहेत. राष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रभू ही धरमतर पोहणारी पहिली महिला होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6402.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad2f95bfef1a8c4a11c292c44bc15ff4cae682c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6402.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Np) (अणुक्रमांक ९३) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6408.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bf27fa192220939ddfe6b5fc2954853bc15217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6408.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेफर्टिटी एरलाइन्स, किंवा नेफर्टिटी एव्हिएशन म्हणून एक अल्पायुषी विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी १९८० ते१९८२ पर्यंत सक्रिय होती. [१] इजिप्तएरला वाहतूक करण्याची परवानगी नसणाऱ्या कैरो-तेल अवीव मार्गावर ही कंपनी भाड्याने विमाने पुरवायची. आता या मार्गावर एर सिनाई सेवा देते.[२] [३] +इजिप्तमधील माजी मानद समुपदेशक एल्हमी एल्झायत यांना इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पर्यटन प्रस्थापित करण्यात मदत करण्याचे श्रेय दिले जाते. [४] आणि ही उड्डाणे इस्रायली-इजिप्शियन संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली आहे . [५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_641.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d00d01046a526be5153ee15af423a06b3464b8f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_641.txt @@ -0,0 +1,2 @@ +धरमतर [१] भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यात असलेले अतिशय छोटे बंदर आहे. ते अंबा नदीमुळे बनलेल्या धरमतर खाडीच्या उजव्या काठावर नदीच्या मुखापासून १६ किलोमीटर आत आहे. ही खाडी अंबा नदी, कारंजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम आहे. मुंबई खाडीच्या पलीकडे व नाव्हा शेवा ह्या मोठ्या बंदरापासून २६ किलोमीटर असलेले धरमतर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील वडखळ नाक्यापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. ते रस्ता व रेल्वे ह्या दोन्ही तऱ्हेने बंदराशी जोडलेले आहे. +मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून धरमतर पर्यंत ३६ किलोमीटर पोहून जाणे हे लांब पल्ल्याच्या पोहणाऱ्यांना एक आव्हान असते[२]. विशेषतः ज्यांना इंग्लिश खाडी पोहायची असते त्यांच्या उमेदवारीसाठी ही एक महत्त्वाची पायरी असते. मिहीर सेन ह्या प्रसिद्ध जलतरण पटूने प्रथम धरमतर आणि मग इंग्लिश खाडी पार केल्यावर ह्या आव्हानाना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक पोहाणाऱ्यांनी हा लांब पल्ला पोहून दाखविला आहे व त्यात १० ते २० वर्षे गटातली मुले व मुलीही आहेत. राष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रभू ही धरमतर पोहणारी पहिली महिला होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6448.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..010a687d3b8b8fe46d6a945b86467038bd9abd33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6448.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुंबई-चेन्नई मार्ग +3 ब्रॉड गेज +नेरळ जंक्शन हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक रुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. उपनगरी मार्गावरील धिम्या गतीच्या लोकल गाड्यांखेरीज पुण्याकडे जाणा-या डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस व मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील नेरळ येथे थांबतात. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_645.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0970032d9ba187443c2c539dce9a298890869a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_645.txt @@ -0,0 +1,3 @@ +धरमपुरी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६८२८७५ पुरुष मतदार, ६४७०८३ स्त्री मतदार व ७६ अन्य मतदार असे मिळून एकूण १३३००३४ मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6454.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0b3cd20bbb2244bc127cceadb26125182d5c233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6454.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेरळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6455.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8274c1122ebabc049070dd0da810cfc1a2f8d6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6455.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेरळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6456.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9fd72b08a5e5f720a17bb5ad50e6a217869e871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6456.txt @@ -0,0 +1,3 @@ +माथेरान डोंगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान रेल्वेची सुरुवात होते. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किमी अंतर सुमारे २ तास २० मिनिटांमध्ये पार करते. +इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वतःचे १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. +२००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या ह्या रेल्वेच्या दररोज ५ सेवा चालवल्या जातात. तसेच अमन लॉज ते माथेरानदरम्यान अतिरिक्त फेऱ्या देखील चालवल्या जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6472.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..439b7fb140b076cab318fdbd0c325042eaf430a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6472.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेरूळ हे नवी मुंबई शहराचे एक रहिवासी उपनगर आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित विभाग आहे. + +मुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळ व सीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्ये आहेत. +डी.वाय. पाटील स्टेडियम diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6476.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45dce44dc0b0f9af33980e9c2ede7a00d8f0a258 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6476.txt @@ -0,0 +1,2 @@ + नेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6512.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66ba65a74856011017c2c1ba5575158aac6a6b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6512.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 41°16′15″S 173°17′2″E / 41.27083°S 173.28389°E / -41.27083; 173.28389 + +नेल्सन हे न्यू झीलंड मधील टास्मान बेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक शहर आहे, तसेच ते नेल्सन क्षेत्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे . १८४१ मध्ये स्थापन झालेले हे न्यू झीलंडमधील दुसरे सर्वात जुने आणि दक्षिण बेटावरील सर्वात जुने स्थायिक शहर आहे आणि रॉयल चार्टरने १८५८ मध्ये हे शहर घोषित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6523.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4def99370708701a960c6631b6058bd9a9b299f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6523.txt @@ -0,0 +1 @@ +नेल्सन बेटनकोर्ट (४ जून, १८८७:त्रिनिदाद व टोबॅगो - १२ ऑक्टोबर, १९४७:त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6535.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150da8eb66e7b51a036d7580856c1a9e2b0932cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6535.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6583.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356f988bc3710d367deef36eeb2543cbc7d0da79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6583.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेव्हादो देल रुइझ तथा ला मेसा देल हेर्वेओ हा कोलंबियामधील एक जागृत ज्वालामुखी आहे. देशाची राजधानी बोगोतापासून १२९ किमी पश्चिमेस असलेला हा ज्वालामुखी गेली अठरा लाख वर्षे सुप्त जागृतावस्थेत असल्याचे मानले जाते. याला स्थानिक प्राचीन भाषेत कुमांडे असे नाव आहे. +१३ नोव्हेंबर, १९८५ रोजी झालेल्या विस्फोटात जवळचे आर्मेरो शहर नेस्तनाबूद झाले व तेथील रहिवाशांपैकी २३,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. त्याचवेळी पर्वताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चिनचिना गावातील १,८०० व्यक्ती मृत्यू पावल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6592.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6592.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6594.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152d8b8cc897d2097b8502a3350e8fbce95a80b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6594.txt @@ -0,0 +1,26 @@ +नेव्हिल फ्रांसिस मॉट हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6612.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6612.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6615.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4080921d7f7df3a70039509a88433bd9c9175a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6615.txt @@ -0,0 +1,6 @@ +नेस्ले SA [a] ( इंग्रजी: Nestlé S.A. फ्रेंच: [nɛsle]; जर्मन: [ˈnɛstlə] [४]) ही एक स्विस बहुराष्ट्रीय खाद्य आणि पेय प्रक्रिया कंपनी आहे. तिचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील वेवे, वौड येथे आहे. +२०१४ पासून महसूल आणि इतर निकषांद्वारे मोजली जाणारी ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक खाद्य कंपनी आहे. [५] [६] [७] [८] [९] २०१७ मध्ये फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत ही ६४ व्या स्थानावर होती. [१०] फोर्ब्स ग्लोबल २००० च्या सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या २०१६ च्या यादीनुसार ही कंपनी ३३ व्या क्रमांकावर आहे. [११] +नेस्लेच्या उत्पादनांमध्ये बालकांचे अन्न ( बेबी फूड; काही ठिकाणी मानवी दूध ऑलिगोसॅकराइड्ससह ), वैद्यकीय अन्न, बाटलीबंद पाणी, नाश्ता तृणधान्ये, कॉफी आणि चहा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, गोठलेले अन्न, पाळीव प्राणी आणि स्नॅक्स यांचा समावेश आहे. नेस्लेच्या २९ ब्रँडची वार्षिक विक्री १ अब्ज CHF (सुमारे US$१.१ billion )पेक्षा जास्त आहे. [१२] यामध्ये नेस्प्रेसो, नेस्काफे, किट कॅट, स्मार्टीज, नेस्क्विक, स्टॉफर्स, विटेल आणि मॅगी यांचा समावेश आहे. नेस्लेचे ४४७ कारखाने आहेत, ते १८९ देशांमध्ये कार्यरत आहेत आणि सुमारे ३,३९,००० लोकांना रोजगार देतात. [१३] ही जगातील सर्वात मोठी सौंदर्यप्रसाधने कंपनी लॉरियल (इंग्रजी: L'Oreal) च्या मुख्य भागधारकांपैकी एक आहे. [१४] +जॉर्ज आणि चार्ल्स पेज बंधूंनी १८६६ मध्ये स्थापन केलेली "अँग्लो-स्विस मिल्क कंपनी" आणि हेन्री नेस्ले यांनी १८६७ मध्ये स्थापन केलेली "फॅरीन लॅक्टी हेन्री नेस्ले" यांच्या विलीनीकरणाद्वारे नेस्ले कंपनी १९०५ मध्ये स्थापन करण्यात आली. [१५] पहिल्या महायुद्धादरम्यान आणि दुसर्‍या महायुद्धानंतर कंपनीची लक्षणीय वाढ झाली, तिने सुरुवातीच्या कंडेन्स्ड मिल्क आणि इन्फंट फॉर्म्युला उत्पादनांच्या पलीकडे आपल्या उत्पादनांचा विस्तार केला. कंपनीने १९५० मध्ये Crosse & Blackwell, १९६३ मध्ये Findus, 1971 मध्ये Libby's, १९८८ मध्ये Rowntree Mackintosh, १९९८ मध्ये Klim आणि २००७ मध्ये Gerber यासह अनेक कॉर्पोरेट अधिग्रहणे केली आहेत. +ही कंपनी विविध विवादांशी संबंधित आहे. विकसनशील देशांमध्ये (जेथे स्वच्छ पाण्याची कमतरता असू शकते, तेथे) स्तनपानाला पर्याय म्हणून बेबी फॉर्म्युलाची मार्केटिंग, कोको उत्पादनात बालमजुरीवर अवलंबून राहणे, तसेच बाटलीबंद पाण्याचे उत्पादन आणि प्रोत्साहन यांसारख्या अनेक ठिकाणी कंपनीला टीका आणि बहिष्काराचा सामना करावा लागला आहे. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6668.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dc034d2512f7dd7de70365de96f9a9dc909307a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6668.txt @@ -0,0 +1,3 @@ +शबाना रझा उर्फ नेहा बाजपाई किंवा निव्वळ नेहा[१] या एक हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहेत. +शबाना रझा यांनी इस १९९८ साली बॉबी देओल सोबत 'करीब' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांचा पुढील चित्रपट 'होगी प्यार की जीत' हा १९९९ साली प्रदर्शित झाला, ज्यात त्यांनी अजय देवगणसोबत प्रमुख भूमिका साकारली. यानंतर फिजा (२०००), राहुल (२००१) आणि आत्मा सह विविध चित्रपटात काम केले. हिंदी व्यतिरिक्त २००१ साली 'अल्ली थंढा वानम' या तामिळ तसेच 'मुस्कान' या कन्नड भाषेतील चित्रपटात देखील त्यांनी काम केले. छोट्याशा विश्रांतीनंतर, त्यांनी 'ॲसिड फॅक्टरी' (२००८) आणि 'अलिबाग' ( २०११) चित्रपटात अभिनय केला. अलिबाग या चित्रपटात त्यांनी आपले मूळ नाव 'शबाना रझा' वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार करीब या पहिल्या चित्रपटात त्यांचे 'नेहा' असे त्यांच्या मनाविरुद्ध नामकरण झाले होते.[२] +रझा यांचा जन्म १८ एप्रिल १९७५ साली महाराष्ट्रातील नांदेड येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. आपला पहिला चित्रपट करीब च्या निर्मिती दरम्यान त्या अभिनेते मनोज बाजपेयी जवळ आल्या आणि मग एप्रिल २००६ मध्ये हे जोडपे विवाहबद्ध झाले.[३] या जोडप्याला आवा नायला ही मुलगी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6703.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c17b6335ccb65be7a84780bb2401c57688febfa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6703.txt @@ -0,0 +1,5 @@ +नैतिक मूल्यांचे शिक्षणाची तत्संबधी शिस्त आणि नियमनाची जबाबदारी पालक सांभाळत असतात.हे करतानासुद्धा पाल्यास अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करणे आणि स्वतःकरिता चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याची निर्णयक्षमता निर्माणकरण्या करिता पालक पाल्यांची पाठराखण करत असतात. +मुक्त लोकशाही समाजांमध्ये आपली बुद्धी वापरून बरेवाईट ठरवण्याचे आणि निवड स्वातंत्र्य वापरण्याचे आणि अभिव्यक्ती स्वतांत्र्याची कक्षा अविष्कार स्वातंत्र्य अधिकाधिक जोपासेल हे पहाणे अभिप्रेत असते.पण समाजातील काही घटक इतर व्यक्ती किंवा इतर समाज घटकांवर त्यांचे स्वांत्र्य नाकारत स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करतात तेव्हा त्यास नैतिक सुभेदारी असे म्हटले जाते. नैतिक सुभेदारीची अमलबजावणीकरण्याकरिता बऱ्याचदा उपद्रव मुल्याचा आणि सार्वजनिक उपद्रवाचा उपयोग केला जातो. +विशीष्ट वाद, विचारप्रणाली किंवा धर्माधारानी समाजाचे भलेच होणार आहे अशी धारणा असते अथवा करून दिली जाते.संस्कृतीरक्षणाच्याच नावाखाली बऱ्याचदा देशांचा, संस्थांचा, प्रसारमाध्यमाचा आणि शिक्षणपद्धतींचा ताबा घेतला जातो.या मागे शुद्ध हेतु असु शकतो अथवा बऱ्याचदा या मागे स्वार्थ असण्याची अथवा हुकुमशाही मनोवृत्ती यामागे दडली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.[१] + +ठेकेदार हर धर्म, जात और सम्प्रदाय में मिल जाते हैं। पाकिस्तान की स्वात घाटी में तालिबान एक रेडियो स्टेशन चलाता है। उसके माध्यम से वह संदेश प्रसारित करता है की लडकियों को स्कूल नहीं भेजना है। उन्हें ऐसे कपडे पहनने हैं जिसमें उनका पोर-पोर ढका हो। अब स्वात घाटी की क्या बात करें पिछले दिनों तक तो धरती का स्वर्ग कहे जाने वाले अपने कश्मीर में ही लडकियों के जींस पहनने पर पाबंदी थी। वहां से थोडा नीचे उतरें तो पांच नदियों के प्रदेश में एक फरमान जारी किया गया की लडकियां सलवार कमीज के अलावा कुछ नहीं पहनेंगी। लडकी का जींस टोप पहनना नैतिकतावादियों की आंख में खटकता है। अब जरा देश के दक्षिण में चलें। अपने संगठन के आगे ईश्वर का नाम जोडकर नैतिक बनने वालों ने एक शहर में लडकियों को जम कर पीटा। उनके बाल पकड- पकड कर घसीटा। मजे की बात यह की यह तमाशा नैतिकता के नाम पर किया गया। कसम भोलेनाथ की। हमें तो अब नैतिकतावादियों से डर लगने लगा है। लगता है की किसी भी वाद की ऐसी-तैसी उसे मानने वाले "वादियों" ने उस वाद के आलोचकों से ज्यादा की है। चाहे गांधीवाद हो या साम्यवाद। पूंजीवाद का बेडा गर्क उस महान देश में ही हो रहा है जो अपने आपको स्वतंत्रता का सबसे बडा अलम्बरदार मानता रहा है।[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6750.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6cc3802f05d4c96d4a74211e5b175da022691c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6750.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैसर्गिक उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारी खगोलीय वस्तू (उदा. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.). अशा नैसर्गिक उपग्रहास मराठीमध्ये साधारणत: चंद्र म्हणतात. (उदा. पृथ्वीचा चंद्र, गुरूचे चंद्र, वगैरे) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6753.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95fa739263136d328a5982399f4f0be48a01b78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6753.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्रूड तेल हे जमीनीच्या पोटातून काढले जाणारे खनिज तेल आहे. याच्या शुद्धीकरणा नंतर पेट्रोल, डीझेल व इतर उत्पादने मिळतात. +जमिनीखालच्या गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षांपूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्याच्यावर माती व वाळूचा थर तयार झाले, जास्त दाब व उष्णता यामुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतरण झाले. खनिज तेल हे भूगर्भातील विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वाळुकाश्म व चुन खडक यामध्ये भूभागामध्ये सुमारे १००० ते ३००० मीटर खोलीवर सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते ते हिरवट, तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाने मिश्रण असून त्यामध्ये आँक्सीजन, नायट्रोजन तसेच अनेक गंधकाची संयुगेही असतात. तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून, प्रभाजी उर्ध्वपतनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक बनवले जातात, त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे तयार करण्यासाठी देखील केला जातो. +खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात.त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला–तेल असा आहे. +निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरूपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6766.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b1d8cd5c680b414e55696da19a7f6251e29658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6766.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैऋत्य ही दक्षिण व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात. +या दिशेकडून भारतात (पर्जन्य) ऋतू येतो, म्हणून हिला नैऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैऋत्य. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6777.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b25b69f2a1c50ab746b17082be1abe2cbf49126d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6777.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉक्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉक्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6778.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b558095d92cc8dad0edcd3ee3e53f0c3ab45287d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6778.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉक्स काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉक्स काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6780.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78a72cfde26bd8de1b4a7d01ded2b6ac92aa83df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6780.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉक्स काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉक्स काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_680.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21cf665204cbaf3309f4bf7e63896139f2d640d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_680.txt @@ -0,0 +1,8 @@ +धर्माचे स्वातंत्र्य हे एक तत्त्व आहे जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या, सार्वजनिक किंवा खाजगीरित्या, धर्म किंवा त्याच्या शिक्षण, सराव, उपासना आणि पाळण्यात विश्वास दर्शविण्याच्या स्वातंत्र्यास समर्थन देते. यात एखाद्याला स्वतःचा धर्म किंवा श्रद्धा बदलण्याचे स्वातंत्र्य देखील समाविष्ट आहे. +धर्माचे स्वातंत्र्य हा बहुतेक लोक आणि बहुतेक सर्व राष्ट्रांद्वारे मूलभूत व मानवी हक्क मानला जातो. राज्य धर्म असलेल्या देशात, धर्मातील स्वातंत्र्याचा सामान्यत: असा विचार केला जातो की सरकार राज्य धर्माव्यतिरिक्त इतर पंथांच्या धार्मिक प्रथांना परवानगी देतो आणि इतर धर्मातील विश्वासणाऱ्यांचा छळ करीत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या, धर्माचे स्वातंत्र्य वेगवेगळ्या धार्मिक प्रणालींच्या सहिष्णुतेचा संदर्भ म्हणून वापरले जाते; तर उपासना स्वातंत्र्यास वैयक्तिक कृतीचे स्वातंत्र्य असे परिभाषित केले गेले आहे. +२७ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य दिन आहे. +प्राचीन भारतीय बौद्ध मौर्य साम्राज्यात धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य इ.स.पू. ३ऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी स्थापित केले होते जे शिलालेखात दिसते. २,५०० वर्षांपूर्वी आपल्या भूमीवरील छळापासून पळ काढणारे प्राचीन यहुदी लोक भारतात स्थायिक झाले आणि त्यांनी कधीही ज्यूविरोधचा सामना केला नाही.[१] +कोणत्याही धर्माचा सराव, उपदेश आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हा आधुनिक भारतात घटनात्मक हक्क आहे. समकालीन भारतातील धर्म स्वातंत्र्य हा देशाच्या घटनेच्या कलम २५ अंतर्गत हमी मिळालेला मूलभूत हक्क आहे. त्यानुसार, भारतातील प्रत्येक नागरिकास स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा हक्क आहे. +बहुतेक प्रमुख धार्मिक उत्सवांना राष्ट्रीय सुट्टीच्या यादीमध्ये समाविष्ट केले जातात.[२] भारतात ८०% लोक हिंदू असूनही, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. बऱ्याच विद्वान आणि विचारवंतांचा असा विश्वास आहे की भारताचा प्रमुख धर्म, हिंदू धर्म हा बऱ्याच काळापासून एक सहनशील धर्म आहे. १४ वे दलाई लामा म्हणतात कि, "केवळ हिंदू, जैन, बौद्ध, शीख धर्म, जे मूळ भारतीय धर्म आहे, परंतु ख्रिश्चन आणि इस्लामची पण येथे भरभराट झाली आहे. भारतीय परंपरेत धार्मिक सहिष्णुता मूळात आहे."[३] +दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यू प्रवासी लोकांसाठी इस्त्राईल राज्य स्थापन केले गेले. इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत धार्मिक स्वातंत्र्यावर मूलभूत तत्त्व म्हणून जोर देण्यात आला आहे. जेरुसलेममध्ये वाजणाऱ्या सार्वजनिक मुस्लिम प्रार्थना आणि ख्रिश्चन प्रार्थना घंटा यासह इतर धर्म आणि धार्मिक प्रवृत्तीकडे इस्रायल खूप खुला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6807.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33e2b2418f46ce003011ef8958dbe5c97bdc8e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6807.txt @@ -0,0 +1 @@ +नॉनकुलुलेको लाबा (२७ जून, २०००:डर्बन, क्वाझुलू-नाताल, दक्षिण आफ्रिका - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6815.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b08bef4ca92c344f5c76f18327b28f1414ae97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6815.txt @@ -0,0 +1 @@ +नॉब क्रीक फार्म हे अमेरिकेच्या केंटकी राज्यातील एक भाग आहे. हे शेत अब्राहम लिंकनच्या वडिलांनी भाडेपट्ट्यावर कसायला घेतले होते व अब्राहम लिंकनचे लहानपण येथे व्यतीत झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6832.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85d191da99609f7c5ff2ea3c9be1cbd3f18753ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6832.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉरफोक हा पूर्व इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6844.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eab0151781410cd212a519ad8dc023c7742b054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6844.txt @@ -0,0 +1,4 @@ +नॉर्टन आंतरजाल सुरक्षा हे सिमॅन्टेच कॉर्पोरेशन या कंपनीचे फायरवॉल सॉफ्टवेर आहे. +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6845.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6845.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6848.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9e5d7b1bce646ca834052bcc6766dc20cf87e11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6848.txt @@ -0,0 +1,44 @@ +NordVPN ही एक VPN सेवा आहे जी नॉर्डसेक लिमिटेड कंपनीने Microsoft Windows, macOS, Linux, Android, iOSआणि Android TV साठी ॲप्लिकेशन्ससह प्रदान केली आहे.[४][५] मॅन्युअल सेटअप वायरलेस राउटर, NAS डिव्हाइसेस आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे.[६][७] +NordVPN हे नॉर्ड सिक्युरिटी (नॉर्डसेक लिमिटेड) कंपनीने विकसित केले आहे, जी सायबर सुरक्षा सॉफ्टवेर तयार करते आणि सुरुवातीला लिथुआनियन स्टार्टअप ॲक्सीलरेटर आणि बिझनेस इनक्यूबेटर टेसोनेटद्वारे समर्थित होते.[८] NordVPN पनामाच्या कार्यक्षेत्रात कार्य करते, कारण या देशाचे कोणतेही अनिवार्य डेटा धारणा कायदे नाहीत आणि तो फाइव्ह आइज किंवा फोर्टीन आइज इंटेलिजन्स शेअरिंग अलायन्समध्ये सहभागी नाही. त्याची कार्यालये लिथुआनिया, युनायटेड किंग्डम, पनामा आणि नेदरलँड्समध्ये आहेत.[९] NordVPN ने त्यांचा Linux क्लायंट केवळ GPLv3 च्या अटींनुसार जारी केला आहे.[१०] +NordVPN ची स्थापना 2012 मध्ये बालमित्रांच्या गटाने केली होती ज्यात टॉमस ओक्मानसचासमावेश होता.[११] मे 2016 च्या उत्तरार्धात, त्याने एक Android ॲप सादर केले, त्यानंतर त्याच वर्षी जूनमध्ये एक iOS ॲप सादर केले.[१२] ऑक्टोबर 2017 मध्ये, त्याने Google Chrome साठी ब्राउझर एक्स्टेन्शन लॉन्च केले.[१३] जून 2018 मध्ये, सेवेने Android TV साठी एक ॲप्लिकेशन लॉन्च केले.[१४] जून 2021 पर्यंत, NordVPN 59 देशांमध्ये 5,600 सर्व्हर ऑपरेट करत होती.[१५] +मार्च 2019 मध्ये, असे सांगण्यात आले की NordVPN ला रशियन अधिकाऱ्यांकडून बंदी घातलेल्या वेबसाइट्सच्या राज्य-प्रायोजित रजिस्ट्रीमध्ये सामील होण्याचे निर्देश प्राप्त झाले, जे रशियन NordVPN वापरकर्त्यांना राज्य सेन्सॉरशिपचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करेल. NordVPN चे पालन करण्यासाठी किंवा ब्लॉक केले जाण्याचा सामना करण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनीएका महिन्याची मुदत दिली होती.[१६] प्रदात्याने विनंतीचे पालन करण्यास नकार देऊन 1 एप्रिल रोजी त्याचे रशियन सर्व्हर बंद केले. परिणामी, NordVPN अजूनही रशियामध्ये कार्यरत आहे, परंतु त्याच्या रशियन वापरकर्त्यांना स्थानिक सर्व्हर्सचा ॲक्सेस नाही.[१७] +सप्टेंबर 2019 मध्ये, NordVPN ने NordVPN टीम्सची घोषणा केली, जे एक VPN सोल्यूशन असून त्याचा उद्देश लहान आणि मध्यम व्यवसाय, रिमोट टीम्स आणि फ्रीलांसर्स आहेत, ज्यांना कामाची संसाधने सुरक्षितपणे ॲक्सेस करणे आवश्यक असते.[१८] दोन वर्षांनंतर, NordVPN टीम्सला NordLayer म्हणून रिब्रँड केले गेले आणि SASE बिझनेस सोल्युशन्सकडे वाटचाल केली.[१९] प्रेस सूत्रांनी SASE तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेतील वाढ हा रिब्रँडमधील एक महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले.[२०] +29 ऑक्टोबर 2019 रोजी, NordVPN ने अतिरिक्त ऑडिट आणि सार्वजनिक बग बाउंटी प्रोग्रॅम जाहीर केला.[२१] बग बाउंटी डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली, ज्यात सेवेतील गंभीर त्रुटींची माहिती दिल्याबद्दल संशोधकांना आर्थिक बक्षिसे ऑफर केली गेली.[२२] +डिसेंबर 2019 मध्ये, NordVPN नव्याने स्थापन झालेल्या 'VPN ट्रस्ट इनिशिएटिव्ह'च्या पाच संस्थापक सदस्यांपैकी एक बनले, ज्याने ऑनलाइन सुरक्षितता तसेच उद्योगात अधिक स्व-नियमन आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.[२३][२४] 2020 मध्ये, या उपक्रमाने लक्ष केंद्रित करण्याच्या 5 प्रमुख क्षेत्रांची घोषणा केली: सुरक्षा, गोपनीयता, जाहिरात पद्धती, प्रकटीकरण आणि पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी.[२५] +ऑगस्ट 2020 मध्ये, ऑस्ट्रेलियन वेब सुरक्षा तज्ञ आणि हॅव आय बीन पॉन्ड? चे संस्थापक ट्रॉय हंट, यांनी धोरणात्मक सल्लागार म्हणून NordVPN सह भागीदारीची घोषणा केली. त्यांच्या ब्लॉगवर, हंटने या भूमिकेचे वर्णन केले आहे की "NordVPN ला एक उत्कृष्ट उत्पादन आणखी चांगले बनवण्यास मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत त्यांच्या साधनांवर आणि संदेशांवर काम."[२६] +2022 मध्ये, VPN कंपन्यांनी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा पाच वर्षांच्या कालावधीसाठी संचयित करण्याच्या CERT-Inच्या आदेशाला प्रतिसाद म्हणून NordVPN ने भारतातील त्यांचे भौतिक सर्व्हर बंद केले.[२७] +एप्रिल 2022 मध्ये, NordVPN ची मूळ कंपनी Nord Security ने Novator च्या नेतृत्वात फंडिंगच्या फेरीत $100 दशलक्ष जमा केले. कंपनीचे मूल्य $1.6 अब्ज झाले.[२८] +NordVPN सर्व वापरकर्त्यांच्या इंटरनेट ट्रॅफिकला सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिमोट सर्व्हरद्वारे राउट करते, ज्यायोगे त्यांचा IP पत्ता लपवला जातो आणि सर्व येणारा आणि बाहेर जाणारा डेटा एन्क्रिप्ट केला जातो.[२९] एनक्रिप्शनसाठी, NordVPN त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये OpenVPN आणि इंटरनेट की एक्सचेंज v2/IPsec तंत्रज्ञान वापरत आहे[३०] आणि 2019 मध्ये त्याचे मालकीचे NordLynx तंत्रज्ञान देखील सादर केले.[३१] NordLynx हे वायरगार्ड प्रोटोकॉलवर आधारित एक VPN साधन आहे, ज्याचे उद्दिष्ट IPsec आणि OpenVPN टनेलिंग प्रोटोकॉलपेक्षा चांगली कामगिरी करणे हे आहे.[३२] Wired UKने केलेल्या चाचण्यांनुसार, NordLynx "काही परिस्थितींमध्ये शेकडो MB/s चा स्पीड बूस्ट" करते.[३३] +एप्रिल 2020 मध्ये, NordVPN ने त्याच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर वायरगार्ड-आधारित NordLynx प्रोटोकॉल हळूहळू रोल-आउट करण्याची घोषणा केली.[३४] या व्यापक अंमलबजावणीपूर्वी एकूण 256,886 चाचण्या करण्यात आल्या, ज्यात 19 शहरे आणि आठ देशांमधील नऊ वेगवेगळ्या प्रदात्यांवरील 47 व्हर्च्युअल मशीन्सचा समावेश होता. या चाचण्यांमध्ये OpenVPN आणि IKEv2 या दोन्हीपेक्षा जास्त सरासरी डाउनलोड आणि अपलोड गती दिसून आली.[३५] +एकेकाळी NordVPN ने राउटरसाठी L2TP/IPSec आणि पॉईंट-टू-पॉइंट टनेलिंग प्रोटोकॉल (PPTP) कनेक्शन देखील वापरले होते, परंतु नंतर ते काढले कारण ते मोठ्या प्रमाणात कालबाह्य आणि असुरक्षित होते. +NordVPN मध्ये Windows, macOS आणि Linux साठी डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स तसेच Android आणि iOS आणि Android TV ॲपसाठी मोबाइल ॲप्स आहेत. सदस्यांना Chrome आणि Firefox ब्राउझरसाठी एन्क्रिप्टेड प्रॉक्सी एक्स्टेन्शन्सचादेखील ॲक्सेस मिळतो.[३६] सदस्य एकाच वेळी सहा डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतात.[३७] +नोव्हेंबर 2018 मध्ये, NordVPN ने दावा केला की PricewaterhouseCoopers AG ने ऑडिटद्वारे त्यांची नो-लॉग पॉलिसी सत्यापित केली.[३८][३९] +2020 मध्ये, NordVPN ने PricewaterhouseCoopers AG द्वारे दुसरे सुरक्षा ऑडिट केले. चाचणी NordVPN च्या स्टँडर्ड VPN, डबल VPN, अस्पष्ट (XOR) VPN, P2P सर्व्हर्स आणि उत्पादनाच्या मध्यवर्ती पायाभूत सुविधांवर केंद्रित होती. ऑडिटने पुष्टी केली की कंपनीचे गोपनीयता धोरण कायम आहे आणि नो-लॉगिंग धोरण पुन्हा खरे आहे.[४०] +2021 मध्ये, NordVPN ने एक ॲप्लिकेशन सिक्युरिटी ऑडिट पूर्ण केले, जे सुरक्षा संशोधन गट VerSprite द्वारे केले गेले. VerSprite ने पेनिट्रेशन चाचणी केली आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोणतीही गंभीर असुरक्षा आढळली नाही. ऑडिटमध्ये सापडलेला एक दोष आणि काही बग्ज नंतर पॅच करण्यात आले आहेत.[४१][४२] +ऑक्टोबर 2020 मध्ये, NordVPN ने हार्डवेअर परिमिती सुरक्षित करण्यासाठी फिनलँड मध्ये त्याचे पहिले कोलोकेटेड सर्व्हर्स आणण्यास सुरुवात केली. पूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात RAM-आधारित सर्व्हर्स पूर्णपणे NordVPN च्या मालकीचे आणि ऑपरेट केले जातात.[४३][४४] +डिसेंबर 2020 मध्ये, NordVPN ने पूर्वीच्या 1 Gbit/s स्टँडर्डपासून अपग्रेड करून 10 Gbit/s सर्व्हर्सचे नेटवर्क-व्यापी रोलआउट सुरू केले. कंपनीचे ॲमस्टरडॅम आणि टोकियोमधील सर्व्हर्स 10 Gbit/s ला पहिल्यांदा सपोर्ट करणारे होते आणि 21 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीचे 20% पेक्षा जास्त नेटवर्क अपग्रेड केले गेले होते.[४५][४६] +जानेवारी 2022 मध्ये, NordVPN ने GitHubवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेले ओपन-सोर्स VPN स्पीड टेस्टिंग टूल जारी केले.[४७] +सामान्य-वापराच्या VPN सर्व्हर्स व्यतिरिक्त, प्रदाता P2P शेअरिंग, डबल एन्क्रिप्शन आणि Tor निनावी नेटवर्कशी कनेक्शनसह विशिष्ट हेतूंसाठी सर्व्हर ऑफर करतो.[४८] NordVPN तीन सदस्यता योजना ऑफर करतेः मासिक, वार्षिक आणि द्वि-वार्षिक. +NordVPN Windows, macOS आणि Linux प्लॅटफॉर्म्ससाठी CyberSec देखील विकसित करते, एक सुरक्षा वैशिष्ट्य जे ॲड-ब्लॉकर म्हणून कार्य करते आणि मालवेअर होस्टिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेबसाइट्स स्वयंचलितपणे ब्लॉक करते.[४९] +नोव्हेंबर 2020 मध्ये, NordVPN ने एक वैशिष्ट्य लॉन्च केले जे वापरकर्त्याचे वैयक्तिक क्रेडेन्शियल्स उघड झाले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी डार्क वेब स्कॅन करते. जेव्हा डार्क वेब मॉनिटर वैशिष्ट्यास कोणतीही लीक झालेली क्रेडेन्शियल्स आढळतात, तेव्हा ती रिअल-टाइम लर्ट पाठवते, वापरकर्त्यास प्रभावित पासवर्डबदलण्याची सूचना देते.[५०] +फेब्रुवारी 2022 मध्ये, NordVPN ने नियमित VPN परवान्याचा भाग म्हणून उपलब्ध अँटीव्हायरस कार्यक्षमता सादर केली. ऑप्ट-इन थ्रेट प्रोटेक्शन वैशिष्ट्य वेब ट्रॅकर्स ब्लॉक करते, वापरकर्त्यांना दुर्भावनायुक्त वेबसाइट्सबद्दल सावध करते आणि मालवेअर असलेल्या डाउनलोड केलेल्या फाइल्स ब्लॉक करते.[५१] मार्च 2022 पर्यंत, हे वैशिष्ट्य Windows आणि macOS ॲप्सवर उपलब्ध आहे आणि VPN सर्व्हरशी कनेक्ट न करता कार्य करते.[५२] +जून 2022 मध्ये, NordVPN ने मेशनेट हे वैशिष्ट्य लॉन्च केले ज्याद्वारे वापरकर्ते 60 पर्यंत डिव्हाइसेस लिंक करून त्यांचे स्वतःचे खाजगी नेटवर्क तयार करू शकतात. प्रमोट केलेल्या काही वापर प्रकरणांमध्ये भिन्न डिव्हाइसेसमधील, फाइल शेअरिंग, मल्टीप्लेअर गेमिंग आणि व्हर्च्युअल रूटिंग समाविष्ट आहे.[५३] +2021 मध्ये, NordVPN ने सायबर सिक्युरिटी साक्षरतेवर एक अभ्यास केला, ज्यात 192 देशांमधील 48,063 प्रतिसादकर्त्यांचे त्यांच्या डिजिटल सवयींबाबत सर्वेक्षण केले आणि त्यांच्या ज्ञानाला 1 ते 100 पर्यंत रेट केले. या यादीत जर्मनी पहिल्या स्थानावर असून त्यानंतर नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंड यांचा क्रमांक लागतो. एकंदर जागतिक स्कोअर 65.2/100 होता.[५४] +जुलै 2021 मध्ये, NordVPN ने स्मार्ट डिव्हाइसेसच्या प्रसाराची रूपरेषा आणि त्यांच्या सुरक्षेबद्दल ग्राहकांच्या भावना दर्शवणारा अहवाल जारी केला.[५५] 7000 लोकांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की युकेमधील 95% लोकांच्या घरात कोणत्या तरी प्रकारचे IoT डिव्हाइस आहे, जवळजवळ एक पंचमांश लोकांनी त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. इतर देशांतील प्रतिसादकर्त्यांचेही असेच प्रतिसाद आढळले.[५६] त्याच वर्षी, NordVPN ने कामाच्या ठिकाणी डिव्हाइस शेअरिंगबद्दल अहवाल जारी केला. अभ्यासात असे आढळले आहे की व्यवस्थापक त्यांच्या कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांच्या कामाची डिव्हाइसेस शेअर करण्याची पाच पट अधिक शक्यता असते.[५७] +NordVPN ने लोक ऑनलाइन किती वेळ घालवतात याचा अभ्यास देखील केला. युकेमधील 2,000 प्रौढांच्या सर्वेक्षणात, NordVPN ला आढळले की, सरासरी, ब्रिटिश लोक दर आठवड्याला 59 तास ऑनलाइन घालवतात, जे एका आयुष्यभरात 22 वर्षे इतके असते.[५८] +2023 मध्ये, NordVPN ने डार्क वेब मार्केटप्लेसेस बेकायदेशीरपणे विकल्या गेलेल्या सहा दशलक्ष चोरीच्या पेमेंट कार्ड तपशीलांचे विश्लेषण करणारा एक अभ्यास केला. धोक्यात आलेली अर्ध्याहून अधिक कार्डे अमेरिकेत देण्यात आली, त्यानंतर भारत आणि युकेमध्ये दिली. चोरी झालेल्या कार्डांपैकी दोन तृतीयांश कार्डे ही पत्ते, फोन नंबर आणि ईमेल पत्ते यासारख्या वैयक्तिक माहितीशी जोडलेली होती, ज्यामुळे पीडितांना ओळख चोरीचाधोका निर्माण झाला होता.[५९][६०] +NordVPN ने सायबर गुन्हे प्रतिबंध, शिक्षण, इंटरनेट स्वातंत्र्य आणि डिजिटल अधिकारांसह विविध सामाजिक कारणांना समर्थन दिले आहे.[६१][६२][६३][६४] NordVPN इंटरनेट स्वातंत्र्यास सेन्सॉर करणाऱ्या राजवटींमध्ये कार्यकर्ते आणि पत्रकारांसाठी आपत्कालीन VPN सेवा प्रदान करते.[६५] 2020 मध्ये, NordVPN ने हाँगकाँग मधील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांना 470 हून अधिक आपत्कालीन VPN खाती दान केल्याचे सांगितले आणि विविध संस्थांना अतिरिक्त 1,150 VPN परवाने दिले.[६६] +2020 मध्ये, NordVPN ने इंटरनेट फ्रीडम फेस्टिव्हलला पाठिंबा दिला, जो डिजिटल मानवी हक्क आणि इंटरनेट स्वातंत्र्याचा प्रचार करणारा प्रकल्प आहे. [६७] NordVPN सायबर क्राईम सपोर्ट नेटवर्कला देखील प्रायोजित करते, जी सायबर गुन्ह्यांमुळे प्रभावित लोकांना आणि कंपन्यांना मदत करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे.[६८] COVID-19 साथीच्या रोगास प्रतिसाद म्हणून, NordVPN ची मूळ कंपनी Nord Security ने प्रभावित स्वयंसेवी संस्था, कंटेंट निर्माते आणि शिक्षकांना विनामूल्य ऑनलाइन सुरक्षा साधने (NordVPN, NordPass आणि NordLocker) ऑफर केली.[६९] +2021 मध्ये, NordVPN ने आंतरराष्ट्रीय VPN दिवस प्रस्तावित केला, जो लोकांच्या डिजिटल गोपनीयता, सुरक्षा आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराकडे लक्ष वेधण्याचा दिवस आहे. तो दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा प्रस्ताव आहे[७०] सायबर सुरक्षेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि इंटरनेट वापरकर्त्यांना ऑनलाइन गोपनीयता साधनांचे महत्त्व आणि एकूणच सायबर सुरक्षा याबद्दल शिक्षित करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.[७१] +ऑक्टोबर 2019 मध्ये टॉमचे गाईड यात प्रकाशित केलेल्या सकारात्मक समीक्षणात, समीक्षकाने असा निष्कर्ष काढला की "NordVPN परवडणारे आहे आणि हार्डकोअर VPN एलिटिस्ट्सना देखील योग्य वाटेल अशी सर्व वैशिष्ट्ये ऑफर करते ".[७२] समीक्षकाने असेही नमूद केले की त्याच्या सेवेच्या अटींमध्ये अधिकारक्षेत्राच्या कोणत्याही देशाचा उल्लेख नाही, कंपनी त्याच्या मालकीबद्दल अधिक पारदर्शक असू शकते. असेही लिहिले आहे.[७३] +PC मॅगझिनद्वारे, फेब्रुवारी 2019 च्या समीक्षणात, NordVPN चे मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि "सर्व्हर्सचे प्रचंड नेटवर्क" यासाठी कौतुक केले, मात्र ते महाग असल्याचेही नोंदवले.[७४] त्याच मासिकाच्या नंतरच्या समीक्षणात, NordVPN चे इतर VPNs मध्ये क्वचितच आढळणारी त्याची अतिरिक्त वैशिष्ट्य, त्याचा वायरगार्ड प्रोटोकॉल, सर्व्हर्सची मोठी निवड आणि मजबूत सुरक्षा पद्धतींचे पुन्हा कौतुक केले गेले. आउटलेटचे एडिटर चॉइस अवॉर्ड जिंकूनही, NordVPN ला तरीही महाग म्हणून नोंदवले गेले. +CNETच्या सप्टेंबर 2021 च्या समीक्षणात NordVPN चे स्मार्टप्ले वैशिष्ट्य, अस्पष्ट सर्व्हर्स आणि सुरक्षा प्रयत्नांची सकारात्मक नोंद घेतली गेली. CNET ने NordVPN च्या युजर-फ्रेंडली इंटरफेसची प्रशंसा करताना, नकाशाचे डिझाइन सुधारले जाऊ शकते याची नोंद घेतली.[७५] +TechRadar ने NordVPN ची त्याच्या सुरक्षा आणि अलीकडील सुधारणांसाठी शिफारस केली. NordVPN ने चीनमधील ग्रेट फायरवॉलसह इंटरनेट सेन्सॉरशिप असलेल्या देशांमध्ये चांगले काम केले, असेही यात नमूद करण्यात आले आहे.[७६] +2021 मध्ये, Wired च्या सकारात्मक समीक्षणात नोंदवले आहे की NordVPN ची किंमत अधिक परवडणारी झाली आहे आणि असा निष्कर्ष काढला की "NordVPN हा सध्याचा सर्वात वेगवान जॅक-ऑफ-ऑल-ट्रेड्स VPN प्रदाता आहे." मात्र, लेखात असेही नोंदवले आहे की अजूनही स्वस्त VPN पर्याय उपलब्ध आहेत.[७७] +2019 मध्ये, NordVPN ने ProPrivacy.com च्या VPN पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट ओव्हरऑल’ श्रेणी जिंकली.[७८] +2020 मध्ये, NordVPN ने जर्मन CHIP मासिकाच्या ‘VPN सेवांची सर्वोत्तम सुरक्षा’ श्रेणी जिंकली.[७९] +सप्टेंबर 2021 मध्ये, NordVPN ने CNETचा ‘विश्वासार्हता आणि सुरक्षिततेसाठी सर्वोत्कृष्ट VPN’ पुरस्कार त्यांच्या वार्षिक ‘सर्वोत्कृष्ट VPN सेवा’ पुरस्कारांमध्ये जिंकला.[८०] +2022 मध्ये, NordVPN चा CNET च्या सर्वोत्कृष्ट एकंदर VPN यादीमध्ये समावेश करण्यात आला.[८१] +21 ऑक्टोबर 2019 रोजी, एका सुरक्षा संशोधकाने Twitterवर NordVPN च्या सर्व्हर उल्लंघनाचा खुलासा केला ज्यामध्ये लीक झालेल्या खाजगी कीचा समावेश होता.[८२][८३][८४] सायबर हल्ल्याने हल्लेखोरांना रूट ॲक्सेस दिला, ज्याचा उपयोग HTTPS प्रमाणपत्र तयार करण्यासाठी केला गेला ज्यामुळे हल्लेखोरांना NordVPN वापरकर्त्यांची संप्रेषणे मध्येच पकडण्यासाठी मॅन-इन-द-मिडल हल्ले करता आले. प्रत्युत्तरादाखल, NordVPN ने पुष्टी केली की मार्च 2018 मध्ये फिनलँडमधील त्याच्या एका सर्व्हरचे उल्लंघन झाले होते, परंतु प्रत्यक्ष मॅन-इन-द-मिडल हल्ला झाल्याचा कोणताही पुरावा नव्हता. हे उल्लंघन कंत्राटी डेटा सेंटरच्या रिमोट ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टिममधील असुरक्षिततेचा परिणाम होता ज्याने 31 जानेवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान फिनलँड सर्व्हरवर परिणाम केला. NordVPN च्या म्हणण्यानुसार, डेटा सेंटरने 13 एप्रिल 2019 रोजी NordVPN ला उल्लंघनाची माहिती दिली आणि NordVPN ने त्या डेटा सेंटरशी आपले संबंध संपुष्टात आणले. सुरक्षा संशोधक आणि मीडिया आउटलेट्सनी NordVPN वर कंपनीला हे लक्षात आल्यानंतर त्वरित उल्लंघन उघड न केल्याबद्दल टीका केली. NordVPN ने नमूद केले की कंपनीने सुरुवातीला यासारख्याच जोखमींसाठी आपल्या 5,000 सर्व्हरचे ऑडिट पूर्ण केल्यानंतर उल्लंघन उघड करण्याची योजना आखली होती. +1 नोव्हेंबर 2019 रोजी, एका वेगळ्या घटनेत, NordVPN खात्यांची अंदाजे 2,000 वापरकर्तानावे आणि पासवर्ड क्रेडेन्शियल स्टफिंगद्वारेउघडकीस आल्याची नोंद झाली. +2019 मध्ये, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड अथॉरिटी (युनायटेड किंग्डम) (ASA) ने NordVPN ला सांगितले की सार्वजनिक WiFi तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या सभोवतालच्या लोकांना देण्याइतके असुरक्षित आहे या दाव्यांची पुनरावृत्ती करू नका. ASA ने असा निर्णय दिला की HTTPS आधीच "सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण स्तर" प्रदान करते आणि जाहिरातीने वापरकर्त्यांना डेटा चोरीमुळे महत्त्वपूर्ण धोका असल्याचे दिलेले मत चुकीचे होते. 2023 मध्ये, ASA ने पुन्हा NordVPN च्या विरोधात निर्णय दिला, यावेळी NordVPN "स्विच ऑफ... मालवेअर" करू शकते, असा दावा करणाऱ्या जाहिरातीवर, या संदर्भात, श्रोते असे "समजण्याची शक्यता" होती की याचा अर्थ हे उत्पादन सर्व मालवेअर थांबवेल, जे NordVPN ने ASA च्या प्रतिसादात सिद्ध केले नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6855.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32883571675cbc6e6a631ea091c716d9f1a8b218 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6855.txt @@ -0,0 +1,4 @@ +नॉर्थ कॅरोलिना (इंग्लिश: North Carolina, पर्यायी उच्चार: नॉर्थ कॅरोलायना) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले नॉर्थ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. +नॉर्थ कॅरोलिनाच्या उत्तरेला व्हर्जिनिया, पूर्वेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला टेनेसी, दक्षिणेला साउथ कॅरोलिना तर नैऋत्येला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॉर्थ कॅरोलिनाची भौगोलिक रचना उंचसखल स्वरूपाची आहे. पूर्वेकडील भाग समुद्रसपाटीवर असून पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. ६,६८४ फूट उंचीवरील माउंट मिचेल हा नॉर्थ कॅरोलिनामधील डोंगर पूर्व अमेरिकेमधील सर्वात उंच स्थान आहे. रॅले ही नॉर्थ कॅरोलिनाची राजधानी, शार्लट हे सर्वात मोठे शहर तर ग्रीन्सबोरो, विन्स्टन-सेलम ही येथील इतर मोठी शहरे आहेत. +जगातील सर्वात पहिले विमान राईट बंधूंनी नॉर्थ कॅरोलिनाच्या आउटर बँक्स ह्या भागात उडवले. अमेरिकन यादवी युद्धामध्ये नॉर्थ कॅरोलिना दक्षिणेकडील राज्यांच्या बाजूने लढला. +गेल्या अनेक शतकांपासून नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान शार्लट येथे मुख्यालय असणाऱ्या अनेक मोठ्या बँका, रॅले-डरहॅम परिसरामधील उच्च संशोधन व तंत्रज्ञान औग्योगिक प्रदेश तसेच पश्चिम भागातील पर्यटन स्थळे ह्यांमुळे नॉर्थ कॅरोलिनाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असून सध्या अमेरिकेमध्ये ती नवव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये नॉर्थ कॅरोलिनाचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6867.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0adea44db469fb532c39071f18ba4d9924d28fca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6867.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉर्थ यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील आकाराने सर्वात मोठा परगणा (काउंटी) आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_688.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8ad9ccfd6661c1023ba1d5ba35a01e27c145088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_688.txt @@ -0,0 +1,3 @@ +धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे.[१]मात्र धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे एवढेच की, ऐहिक जीवनाची व्यवस्था लावताना धर्मकल्पना अप्रस्तुत होत त्यांच्याऐवजी शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा यांचे साहाय्य घेणे. [२] +धर्माने आपले स्वातंत्र्य अबाधित राखून उरलेली जी काही कक्षा आहे ती राजसत्तेची. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना जनतेला स्वातंत्र्य देत नाही, तर जनतेचे स्वातंत्र्य नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य धर्माला देते. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना प्रतिगामी कल्पना आहे. धर्मनिरपेक्षतेची दुसरी कल्पना अशी आहे की, राजसत्तेला धर्माबाबत उदासीन राहायला लावते. सगळ्याच धर्माबाबत समान आदर, समान प्रतिष्ठा आणि कोणत्याच धर्मकार्यात हस्तक्षेप न करण्याचे धोरण हे या धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आहे. ज्या राज्यात एकाच धर्माची प्रजा तिथे वरील धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि ज्या राज्यात भिन्नधर्मीय लोक राहतात तिथे हे दुसऱ्या प्रकारचे स्वरूप. म्हणजे पहिल्याचीच थोडीशी सुधारित आवृत्ती. धर्मनिरपेक्षतेची तिसरी कल्पना या दोहोंहून निराळी असते. राजसत्ता ही धर्म व्यवस्थेची शत्रूच असते. धर्म ही मागास संस्था असल्याने तिचा पाडाव करणे, हेच यात अपेक्षित असते. धर्माचा नाश करणे हे या कल्पनेत अंतर्भूत आहे. ही कल्पना व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या विरोधी जाणारीही कल्पना आहे आणि आता धर्मनिरपेक्षतेची चौथी कल्पना. भारतीय संविधानाने स्वीकारलेली कल्पना आहे. [३] +भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6891.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f9a1c995f1dabcd35fca9c55f5ec0430141db8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6891.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉर्थम्बरलँड काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉर्थम्बरलँड काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6897.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..576a7885241221d9711ba88c83c7f1752da18318 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6897.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्थवेस्ट टेरिटोरीज हा कॅनडाच्या वायव्य भागातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश जुलै १५, इ.स. १८७० रोजी कॅनडाचा भाग झाला. एप्रिल १, इ.स. १९९९ रोजी याची पुनर्रचना झाली. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,४६२ इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6905.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0596430571a24e9c6eeba5fc8be7f3fe78dc0d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6905.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉर्थहॅम्प्टन काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉर्थहॅम्प्टन काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6915.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f089689ac8b935ad5f5e60e0e6bb145aaa013a12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6915.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +उत्तर मेरियाना द्वीपसमूह हे पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचे एक राष्ट्रकुल आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6969.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..070b19b7d344259e0959ce040ea54da21e6301ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6969.txt @@ -0,0 +1 @@ +बेट्टी नॉर्मा जॉन्सन तथा बेट्टी नॉर्मा व्हाइटमन (२८ डिसेंबर, १९२७:ऑस्ट्रेलिया - ९ जानेवारी, २०२३) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_697.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649157d52a3cce54c5420999dfa9e288edd46856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_697.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख धर्मपुरी जिल्ह्याविषयी आहे. धर्मपुरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +धर्मपुरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धर्मपुरी येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6971.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f7edcf7e8085088a45a298fb2c153386113b32b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6971.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्विक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४०,४९३ आहे. हे शहर रोझ ऑफ न्यू इंग्लंड (न्यू इंग्लंड कौंटीचा गुलाब) म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6974.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dfda29fc0824dee0087c429e68d921cb7c12d0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6974.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत. +अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.[५][६][७] नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.[८] +नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात. +जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात. +नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6979.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_6979.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7013.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..552fa152547a044f0b74bc2ba3c7f477f8626fd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7013.txt @@ -0,0 +1 @@ +नोआह वेब्स्टर, जुनियर (१६ ऑक्टोबर, १७५८, हार्टफर्ड, कनेटिकट वसाहत, ब्रिटिश अमेरिका[१][२] - २८ मे, १८४३:न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका) हे अमेरिकन लेखक, भाषासुधारक, पाठ्यपुस्तक लेखक आणि शब्दकोशकार होते. यांनी १८०६ साली प्रकाशित केलेला अ कंपेन्डियस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा अमेरिकेतील पहिला शब्दकोश होता. यानंतर १८२८ साली त्यांनी ॲन अमेरिकन डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा शब्दकोश प्रकाशित केला.[३] याची दुसरी आवृत्ती तयार होत असताना १८४३मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या शब्दकोशाचे हक्क जॉर्ज आणि चार्ल्स मरियम यांनी विकत घेतले. कालांतराने या शब्दकोशाचे रूपांतर मरियम-वेब्स्टर डिक्शनरीमध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7038.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf23b30b674af51a47e04cc41e07d9b112dcc85e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7038.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया आशा ३०३ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०११ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7094.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45f7e52e106557799ccee297a054ab9ba9d52dce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7094.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी२-०१ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो नोकियाच्या थ्रीजी भ्रमणध्वनींपैकी एक आहे. या भ्रमणध्वनीमध्ये मागील छायाचित्रक ३.२ मेगापिक्सल क्षमतेचा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7095.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89c95ecce4aea6832cddf68c371b8b6a11a0b123 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7095.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी२-०२ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०११ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7096.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db45fc523d55497126d963e9ace7c14c270cb8a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7096.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी२-०३ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०११ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_711.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd8b468fa81feb14336324b5b732425da45bb8db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_711.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रसाद ओक, + + +धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा इ.स. २०२२ मधील एक मराठी चित्रपट असून याची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.[२] +या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली. हा चित्रपट शिवसेना नेते स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला असून मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक हे दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये आणि श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹१३.८७ कोटी कमावले आणि ब्लॉकबस्टर हिट ठरला.[३][४] दिघे वापरत असलेली 'एमएच ०५ - जी - २०१३' क्रमांकाची आर्माडा गाडी ही या चित्रपटात वापरण्यात आली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे.[५] +या चित्रपटात आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आहे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख होते. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील हा चरित्रपट असून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी कथन केलेल्या विविध कथा आणि घटनांद्वारे या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7139.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..540c3d83016220bf49a326c77d973ee370016605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7139.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३१०० हा नोकियाचा लोकप्रिय भ्रमणध्वनी होता. तो १९९९ मध्ये प्रकाशित झाला. इतिहासातील सर्वांत लोकप्रिय व यशस्वी भ्रमणध्वनींपैकी तो एक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7141.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa639788aa34d91d2efbd1525c1d48ee73cb29fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7141.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३२३० हा नोकियाचा जीएसएम भ्रमणध्वनी असून तो २००४ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7146.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01927251746e058476f70a021791192331b2936c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7146.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३५०० क्लासिक हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7152.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f90125624a245af7217d25a3d3fa3028d148de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7152.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३७२० क्लासिक हा नोकियाचा भ्रमणध्वनी आहे. हा २००९ पासून विकण्यास सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_716.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41e98dc84890657d4f54337fa37d3adab6520ec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_716.txt @@ -0,0 +1 @@ +अण्णुर आनंदन वल्लल धर्मवीर नांबूरार श्री के. गोविंदस्वामी नायडू (१२ जुलै, १९०७ - २८ जानेवारी, १९९५) हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरात स्थित उद्योजक होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7175.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e4e1c00a850bb32bdc72eb027a69cce22adcd89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7175.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ५७०० एक्सप्रेसम्युझिक हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7193.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..602076814c9b8b5f6e7661c366c5f4fac5575643 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7193.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६१३६ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7200.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160e424ad36833db39c406f5d59487ca89802844 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7200.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६२३०आय हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००५ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7217.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5cd3767ca354c759989d14c403c680667e3450d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7217.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६५०० स्लाइड हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7227.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2269472eb358dd47290a8a2eebb502abcba7dde7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7227.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६६५० फोल्ड हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7240.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a403256bfcc03a99ee22c589d61be4dbaad23423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7240.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ७०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०११ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7247.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..977ae382eddaf7aa0c60b8466b79d8895a185e05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7247.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ७३८० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7262.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a21f719fcbe72d537bf477a8f2f3d5989d9942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7262.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ८८०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००५मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7265.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25536a069388425b4b1e327ca174817eadd804a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7265.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ८९१० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००२ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_735.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c9e43f526d2c7e9fbc88f3626c38b38a3c43098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_735.txt @@ -0,0 +1,12 @@ +भागवत पुराण (Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa) श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात[१] हा एक कृष्ण भक्तिग्रंथ आहे +भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय. या पुराणात, भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.[२] या पुस्तकात, भक्ती योग,आध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे. +सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्‍नांचे उलटेच फळ मिळते असा विचार, मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप, प्राण्यांमध्ये आणि विशेषेकरून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणे, संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परम धर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात. (८-१२) +॥ एकश्लोकी भागवतम् ॥ +आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनम् +मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् । +कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतां पालनम् +एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् । +इति श्रीभागवतसूत्र ॥ +'भागवत' हे नाव असलेली आणखी दोन पुराणे उपलब्ध आहेत : +संदर्भ : + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7381.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4736886f25b822ba7c86b92e748222e4a7344d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7381.txt @@ -0,0 +1,5 @@ + +नोव्हेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०७ वा किंवा लीप वर्षात ३०८ वा दिवस असतो. + +नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर महिना + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7382.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4952704d7d15cec55895038f1e0b10120e907fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7382.txt @@ -0,0 +1,4 @@ + +नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३४ वा किंवा लीप वर्षात ३३५ वा दिवस असतो. + +नोव्हेंबर २८ -नोव्हेंबर २९ -नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - (नोव्हेंबर महिना) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7385.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d42e3527dd3b131038c4f3ecdef453114556c5ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7385.txt @@ -0,0 +1,5 @@ + +नोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो. + +नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7390.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7390.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7393.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a288dd2cb5f5c4fac2a4c8102cda73d210664382 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7393.txt @@ -0,0 +1 @@ +नोशतुश प्रदीप केंजीगे (२ मार्च, १९९१:अलाबामा, अमेरिका - ) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7421.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4da9cfe8aa0417889739fec050e174b5bb9145b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7421.txt @@ -0,0 +1 @@ +नौशाद अली रिझवी (१ ऑक्टोबर, १९४३:ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान, ब्रिटिश भारत - २० ऑगस्ट, २०२३) हा  पाकिस्तानकडून १९६५ मध्ये ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7439.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f47bb824bcb789daf39d53f040b65576eedb0fb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7439.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +न्जाबुलो न्क्युबे (१४ ऑक्टोबर, इ.स. १९८९:बुलावायो, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7451.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa258b7ac664bb1bfcd6a243b9fb6209e212d0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7451.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यायदाता हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7471.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c4cb2e5f641b888423be52543dd40e7ab1864b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7471.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या स्वरावर गाणं किंवा राग समाप्त होतो त्याला 'न्यास स्वर' असे म्हणतात. उदाहरणार्थ यमन रागात गंधार हा न्यास स्वर मानला जातो. एकंदरीत २१ प्रकारचे न्यास स्वर असतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7483.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e6f7e84ea295e924aa81a1fbf04625ade026bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7483.txt @@ -0,0 +1,18 @@ +न्याहाळेबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर गोरवाडी बस थांब्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४१५ कुटुंबे राहतात. एकूण १९०४ लोकसंख्येपैकी ९६७ पुरुष तर ९३७ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.२३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५४.९६ आहे तर स्त्री साक्षरता ३७.६० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.१२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +गराडवाडी, ग्रामीण जव्हार, गणेशनगर, नंदनमाळ, रायतळे, राधानगरी, श्रीरामपूर, केळघर, न्याहाळेखुर्द, रामपूर, आपटाळे ही जवळपासची गावे आहेत.न्याहाळेबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये न्याहाळेबुद्रुक, पिंपळगाव, राधानगरी, श्रीरामपूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_749.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09fd49ec2f4ab1fa684688d542d77ba394319e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_749.txt @@ -0,0 +1,2 @@ +धर्मावरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. धर्मावरम आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात अनंतपूरच्या ४० किमी दक्षिणेस तर बंगळूरच्या १८० किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली धर्मावरमची लोकसंख्या १.२१ लाख होती. धर्मावरम येथील रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. +धर्मावरम जंक्शन हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_750.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84e07aa06b04473b56469410e0eef534c3f97cb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_750.txt @@ -0,0 +1,2 @@ +धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (डिसेंबर ८, इ.स. १९३५; साहनेवाल, पंजाब - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओल व ईशा देओल ही त्याची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत. +धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत तो राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7505.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60eac0af363594e822b07474cac0e30313889121 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7505.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्युबन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7520.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fefd0163c7bcb8b2133a8d2a8024c24dff0338a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7520.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू आर्टस् कॉलेजची स्थापना १९७० साली अहमदनगर येथील लालटाकी परिसर येथे झाली.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7539.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0822253fb20c3fe86d8811ef2ad4a0929d46cf10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7539.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 29°57′53″N 90°4′14″W / 29.96472°N 90.07056°W / 29.96472; -90.07056 + +न्यू ऑर्लिन्स (इंग्लिश: New Orleans; फ्रेंच: La Nouvelle-Orléans) हे अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे. या शहरास 'क्रेसेंट सिटी', 'नोला' वा 'द बिग ईझी' असेही संबोधतात. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदी व पॉंचरट्रेन सरोवराच्या काठावर वसले असून ह्या शहराचे अनेक भाग समुद्रसपाटीच्या खाली स्थित आहेत. सुमारे १२.३५ लाख लोकसंख्या असलेले न्यू ऑर्लिन्स महानगर क्षेत्र अमेरिकेत ४६व्या क्रमांकावर आहे. न्यू ऑर्लिन्सची स्थापना फ्रेंच शोधकांनी केली व आजही येथील फ्रेंच वास्तूशास्त्र व फ्रेंच पाककलेसाठी न्यू ऑर्लिन्स प्रसिद्ध आहे. +इ.स. २००५ साली आलेल्या विनाशकारी हरिकेन कट्रिनामुळे न्यू ऑर्लिन्सचे अतोनात नुकसान झाले. ह्या नैसर्गिक धक्क्याच्या खुणा आजही येथे जाणवतात. +न्यू ऑर्लिन्स सेंट्स व न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स हे दोन येथील प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7546.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc3c2cebf86c9d0ba9bbf1d24d8b0ed901bbc06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7546.txt @@ -0,0 +1,2 @@ +काउंटी क्रिकेट मैदान, होव हे इंग्लंडच्या होव शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९९९ क्रिकेट विश्वचषकात भारत वि दक्षिण आफ्रिका असा एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या मैदानावर झाला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला सुद्धा एक सामना या मैदानावर झाला. या मैदानावर महिला कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामने देखील आयोजित केले गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7548.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..220d627720f8ee58c1a643cf5ff0c4e13e0655ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7548.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्याच्या कूच बिहार शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेले कूच बिहार न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी मार्गावर स्थित असून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या कूच बिहारमार्गेच धावतात. +१९०१ साली कूच बिहार संस्थानाचे राजे नृपेंद्र नारायण ह्यांनी नॅरोगेजवर चालणाऱ्या कूच बिहार रेल्वेचे उद्घाटन केले. १९१० साली हा मार्ग मीटर गेजमध्ये रूपांतरित करण्यात आला. १९४७ सालच्या भारताच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या भूभागातून धावणारे अनेक मार्ग बंद पडले व ह्या भागतील रेल्वे व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर नवे रेल्वेमार्ग बनवले व १९६६ साली न्यू कूचबिहार स्थानक कार्यान्वित झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7593.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adafc6125f1af0fa20491848a366bac5f72e1e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7593.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८० मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला ज्यात न्यू झीलंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_76.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_76.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb89e977f2cbe714d307683672e6b3a507261f40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_76.txt @@ -0,0 +1,33 @@ + +सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. +सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे. +सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने : +दैनिके: +नियतकालिके: +दूरचित्रवाणी : +न्यूझ पोर्टल : +'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या : +'सकाळचे संपादक +सकाळ टुडे +स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले. +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7606.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa8a606130790b3047e5389b198392ae638eb65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7606.txt @@ -0,0 +1,5 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले. +मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7645.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..098a063a71b577626ee283d8f013ed2393b2948a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7645.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7657.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..014787c6ea80497687fef16e4bf29bd0e4a322fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7657.txt @@ -0,0 +1,15 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली. +एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११] +सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५] +दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०] +कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१] + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7690.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5883641eaf14a8cab4b51f265c49be8477fa5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7690.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५४ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली. न्यू झीलंड महिलांनी प्रथमच इंग्लंडचा दौरा केला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7722.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2576ef7c43a473784ba178fd92cac145b4158923 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7722.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१] सर्व सामने अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियममध्ये खेळविण्यात आले.[२] एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते.[३][४] +पहिला एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु तो १९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि उष्णकटिबंधीय वादळ फिओनाच्या प्रभावामुळे उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.[५] + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7724.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25c85f3134d0e9338590034805a6e04b54ba70f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7724.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलँड महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात न्यू झीलँडचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7727.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b0ee22271a8dd35d1a087463b541be65ed8cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7727.txt @@ -0,0 +1,11 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१] +पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7733.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acf9c8e85aaa56af63135eda5f5c22686b10c0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7733.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी येथे आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. +सर्व माहिती २६ मार्च २००८ पर्यंतची आहे. +Note: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7749.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..489f9661bcd22295466e997cc9b7f2f1cb95e3b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7749.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८३ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका जून मध्ये पार पडलेल्या १९८३ क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर खेळविण्यात आली. मालिकेतील दुसरी कसोटी जिंकत न्यू झीलंडने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय संपादन केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7753.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b119f164a4b7555210ba302779401d5cd23013e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7753.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९९९ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, १२ प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळले. +न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे विस्डेन कसोटी क्रमवारीत इंग्लंडची घसरण झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7761.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e95618299795c88cd6fe68aa7dcb0e783c9dee60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7761.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. याआधी दोन्ही संघांनी मार्च १९४६ला न्यू झीलंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दौऱ्यापासून दोन्ही देशांमध्ये परत क्रिकेट संबंध सुरळीत झाले. ऑस्ट्रेलियात खेळून झाल्यावर लगेचच परतफेड म्हणून मार्च १९७४मध्येच ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_777.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c52011da584dcf29994a8d5e95439d37ce6a27c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_777.txt @@ -0,0 +1 @@ +जे जळण भुरुभुरु जळून जाते, ज्यातून अन्न शिजवण्यासाठी ताव येत नाही म्हणजेच पुरेशी उष्णता येत नाही अशा बारीक काड्याकाटक्यांना धसट म्हंटले जाते. हे धसट भुरुभुरु जळून जात असले तरी पटकन पेट घेते म्हणून चूल पेटवताना सुरुवातीला त्याचा वापर करतात. धसट म्हणजे बारीक काड्या वाळलेलं गवत असे चुलीत आधी घातले कि फाटा पेटण्यास मदत होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7797.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872d5e0b957d8e3127c76b5b3d2c637815d664c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7797.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांनी केले. पाकिस्तानने घरच्या मैदानावर प्रथम कसोटी मालिका जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंड संघ भारतासाठी रवाना झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7818.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a41b707a5967c5d2f433f909ba92e5a49ef7a7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7818.txt @@ -0,0 +1,8 @@ + न्यूझीलंड क्रिकेट संघाचा २००८मधील  बांगलादेशचा दौरा ७ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर २००८ दरम्यान पार पडला. या काळात हे संघ दोन कसोटी सामने व तीन एकदिवसीय सामने खेळले. + + + + + + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांचे बांगलादेश दौरे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7820.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..098a063a71b577626ee283d8f013ed2393b2948a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7820.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7856.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ca8f0b0885b9d74425f11cd2799217d7311721c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7856.txt @@ -0,0 +1 @@ +२७ मे ते १३ जून १९९८ या काळात न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९८ च्या हंगामात श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंगकडे होते तर श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा यांच्याकडे होते. श्रीलंकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7883.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d88c7c0144d1cfb8f4030f6afce7148a3fd84cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7883.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८५ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. डेनिस एमरसनने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड यांच्या महिला क्रिकेट संघांमधल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रोझ बाऊल चषक या नावाने खेळवले गेले. +महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकत पहिला वहिला रोझ बाऊल चषक जिंकला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7889.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4850b4c6171d77da4b6272950bb714732e2d9de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7889.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी २००० मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउल लढवायचे होते. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7901.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb32f861bd44be98e5e3099ce8491fbf93b2624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7901.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि सराव सामन्यांचा समावेश होता. सात पैकी तीन महिला एकदिवसीय सामने चालू २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.[१][२] +मालिकेतील तिसरा सामना हा महिलांचा १,००० वा एकदिवसीय सामना होता.[३] न्यू झीलंडने मालिका ५-२ ने जिंकली.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7915.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ca407c70fbca5b65299b7f6c2bae138dcced959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7915.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड माओरी क्रिकेट संघ हा २००१ पॅसिफिका कप क्रिकेट स्पर्धेत न्यू झीलंडच्या माओरी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. त्यांचे रग्बी युनियन आणि रग्बी लीग समकक्ष अनेकदा खेळत असताना, क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा हा एकमेव देखावा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7920.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25c85f3134d0e9338590034805a6e04b54ba70f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7920.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलँड महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात न्यू झीलँडचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7922.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a936860c824aa3cd43a7380953acfdec7667e62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7922.txt @@ -0,0 +1,5 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो. +या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7929.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5f3c39c4299da276c0472ec6436a6c4d4690b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7929.txt @@ -0,0 +1 @@ +हि न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. न्यू झीलंड महिलांनी १६ फेब्रुवारी १९३५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7930.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5f3c39c4299da276c0472ec6436a6c4d4690b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7930.txt @@ -0,0 +1 @@ +हि न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. न्यू झीलंड महिलांनी १६ फेब्रुवारी १९३५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7947.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de6434b321ccf4cc0df566755ad2f7dd48e9e2c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7947.txt @@ -0,0 +1,10 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली. +२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7952.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a6facebc6bfb3d4e9264f27aa842d1ca30ac03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7952.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. +ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7961.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd6e80d50dbd67b4f7fa92cc913b6d89a7e06386 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7961.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू प्लिमथ न्यू झीलंडच्या उत्तर बेटावरील तारानाकी प्रदेशातील शहर आहे. हे शहर न्यू प्लिमथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून येथील लोकसंख्या अंदाजे ५६,८०० आहे. +या शहराचे माओरी नाव न्गामोटू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7962.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd6e80d50dbd67b4f7fa92cc913b6d89a7e06386 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7962.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू प्लिमथ न्यू झीलंडच्या उत्तर बेटावरील तारानाकी प्रदेशातील शहर आहे. हे शहर न्यू प्लिमथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून येथील लोकसंख्या अंदाजे ५६,८०० आहे. +या शहराचे माओरी नाव न्गामोटू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7970.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6bd75bd4b7362be17a6bf80e10b051f2b90e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7970.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू फाउंडलंड हे उत्तर अटलांटिक महासागरातील कॅनडा देशाचे एक बेट आहे. हे बेट कॅनडाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांताचा एक भाग आहे. +१,०८,८६० चौरस किमी (४२,०३१ चौ. मैल) विस्ताराचे हे बेट जगातील १६व्या तर कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7975.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f36065defd30df0845724b3257579f4c299755f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7975.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू ब्रिटन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर हार्टफर्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००६ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ७१,२५४ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7995.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7995.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7998.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508b2a7bedd485302e318724760ca17832e4304d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_7998.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +न्यू यॉर्क मिल्टन मीडटाउन हे न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात उंच 101 वे हॉटेल आहे. याची मालकी संघ स्वरूपाची आहे आणि याचे जगभरातील व्यवस्थापन हिल्टन पहातात. 47 मजल्याचे हे हॉटेल रॉकफेलर केंद्राच्या 6 व्या मार्गावरील उत्तरपछिम कोपऱ्यावर आहे. U.S.चे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी पासूनचे पुढील सर्व अध्यक्षांनी 53 व्या रस्त्यावरील या हॉटेल मध्ये अथितींचे आथित्यपन केलेले आहे. सन 1973 मध्ये जगातील पहिला सेल फोन याच हॉटेलमध्ये मार्टिन कूपर या हॉटेल मधील पाहुण्यांनी हॉटेलचे पुढील जागेत वापरला. +या योजनेचा विकास हिल्टन हॉटेल्स संघ, रॉक फेलर ग्रुप, आणि उरीस वास्तु संघटन यांनी केला. +विल्लियम बी यांनी स्लॅब पद्दतीने याचा आराखडा तयार केला आणि योजना पूर्णत्वास नेली. 26 जून 1963 मध्ये न्यू यॉर्क हिल्टन[१] नावाने याचे उद्घाटन झाले. यात 2153 खोल्या आहेत आणि हे न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठे हॉटेल आहे. जॉन लेन्नोन यांनी सन 1971 मध्ये येथेच भावगीते लिहिली होती असे हिल्टन हॉटेल आणि रिसॉर्ट[२] यांनी खात्रीपूर्वक विधान केले. +सन 1990,1991-1994,1998-2000 आणि 2007 मध्ये चौथे आवश्यक ती दुरूस्ती व पुंनर्रजीवन केले. त्यानंतर या हॉटेल[३] मध्ये 42 ते 44 मजल्यापर्यंत 47 सुट्स, तयार झाले. प्रत्येक सूट मध्ये साधारणपणे 600 ते 2000 sq.ft जागा उपलब्ध झाली. +आणि अशाच प्रकारच्या व विविध कितीतरी रूम्स ! या सर्व रूम्स वातानुकूलित. तसेच सर्व रूम्स[४] मध्ये टेलिफोन, हेयर ड्रायर,आयर्न, स्वतंत्र बाथरूम, सुविधा आहेत. +वायफाय,वातानुकूलित हॉटेल, रेस्टारंट,कॅफे,रूमसेवा,इंटरनेट,व्यवसाय केंद्र, पाण्याचा लहान कुंड, व्यायाम शाळा, 24 तास स्वागत कक्ष,एटीएम, कॅश मशीन, लौंडरी, पार्किंग, प्रदूषणरहित रूम्स, ग्रिटींग शॉप, दुतर्फा शॉपिंगसाठी दुकाने, व्हलेटपार्किंग,या सुविधा आहेत. तसेच मेजवानी देणेसाठी सुविधा आहे. +हॉटेल परिसरात 8000 sq.ft. जागेवर जीम, खानपान व्यवस्था, प्रत्येक रूम मध्ये फ्लॅटTV, मापल वूड फर्निचर, देखनी रंग सजावट, बाथरूममध्ये संगमरवर, लॉबी मध्ये अल्पोपहार व्यवस्था, तिकिटे आणि पिकनिक आरक्षण व्यवस्था ! 7वे रस्त्यावरील सबवे स्टेशन आणि 5वे रस्त्यावरील आल्हाददायक दुकाने चार मिनिटाच्या पाई प्रवासाच्या अंतरावर ! +सन 2013 पासून हर्ब इन किचन रेस्टारंट चालू आहे त्यात हंगामी सल्याड्स, कृत्रिम सॅंडवीचेस,पिझ्झा,आणि स्पेशल कॉफीचा आस्वाद घेता येतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8004.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca5611f8022ac34751c8ae4847edc657d61e480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8004.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (इंग्लिश: New York Stock Exchange) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक रोखे बाजार आहे. मॅनहॅटनच्या दक्षिण भागातील वॉल स्ट्रीट ह्या रस्त्यावर स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मुल्य १६.६१३ निखर्व अमेरिकन डॉलर इतके आहे. +एन.वाय.एस.ई.ची सुरुवात ८ मार्च, इ.स. १८१७ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_805.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd683c12067ad332bc12f3bcf69be1bba1e224c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_805.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद वसिम (२५ ऑगस्ट, २००१:पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8053.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e611be34344970c98f3f3c0f82b9e5b464050640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8053.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: EWR) अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यूअर्क शहरात आहे. हा विमानतळ न्यू यॉर्क शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर आहे व अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या १० विमानतळांपैकी एक आहे. +, ह्युस्टन-हॉबी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिन्स, फीनिक्स, सेंट लुइस || align="center" | A +, डब्लिन, एडिनबर्ग, एडमंटन, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, जिनीव्हा, ग्लासगो-आंतरराष्ट्रीय, ग्वातेमाला सिटी, हांबुर्ग, हाँग काँग, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगास, लिमा, लिस्बन, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, माद्रिद-बराहास, मॅंचेस्टर (युनायटेड किंग्डम), मेक्सिको सिटी, मायामी, मिलान-माल्पेन्सा, मॉंटेगो बे, मुंबई, म्युन्शेन, नासाऊ, न्यू ऑर्लिन्स, ऑरेंज काउंटी, ओरलॅंडो, ऑस्लो-गार्डेरमोएन, पनामा सिटी, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फीनिक्स, पोर्ट ऑफ स्पेन, पोर्टलॅंड, ऑरेगन, प्रोव्हिदेन्सियालेस, पोर्तो प्लाता, पोर्तो व्हायार्ता, पंटा काना, सेंट थॉमस, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे दि कॉस्ता रिका, सान होजे देल काबो, सान हुआन, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, सांतो दॉमिंगो-लास अमेरिकास, साओ पाउलो-ग्वारुल्होस, सिॲटल-टॅकोमा, शांघाय पुदॉंग, शॅनन, सेंट लुसिया, सेंट मार्टेन, स्टॉकहोम-आर्लांडा, श्टुटगार्ट, टॅंपा, तेल अविव-बेन गुरियन, तोक्यो-नरिता, वेस्ट पाम बीच, झुरिकमोसमी: अकापुल्को, ॲंकरेज, बेलीझ सिटी, बोनेर, बोझमन, कोझुमेल, ईगल/व्हेल, ग्रॅंड केमन, हेडन/स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, लायबेरिया, कॉस्ता रिका, मॉंट्रोझ, रोआतान, रोम-फ्युमिसिनो, सांतियागो दे लॉस काबायेरोस जून ५, २०१४पासून,[२१] सेंट जॉन्स, सेंट थॉमस, व्हॅंकूव्हर, जोहान्सबर्ग || align="center" | C diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8061.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72682b1b915a9e9acc8e4faec66523304b92d514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8061.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 54°58′N 1°36′W / 54.967°N 1.600°W / 54.967; -1.600 + +न्यूकॅसल अपॉन टाईन (संक्षेप नाव: न्यूकॅसल) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. न्यूकॅसल शहर इंग्लंडच्या टाईन व वेयर काउंटीमध्ये टाईन नदीच्या तीरावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8088.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a770a15202d2dfdd8357e17e6925201976266e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8088.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ८ ऑगस्ट १९८४ रोजी एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. हा न्यू झीलंड महिलांचा पहिला नेदरलँड्स दौरा होता. नेदरलँड्स महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. हा दौरा न्यू झीलंड महिलांच्या १९८४ इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच झाला. +नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाला स्थापना होऊन ५० वर्षे झाल्याने हा एकमेव सामना अयोजित केला गेला होता. बाबेट व्हान थिउनेनब्रूक हिला सोडून सर्व नेदरलँड्स संघातील खेळाडूंनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. बाबेट यापूर्वी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून १ महिला एकदिवससीय सामना खेळला होता. या सामन्याद्वारे बाबेटने नेदरलँड्सतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. +हार्लेम शहरातील स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी या मैदानावर ८ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ६७ धावांनी विजय मिळवला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8089.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a198fe2a266df2ff3fbd66c1191db518704fca55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8089.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता. +माओरी जमातीचे लोक येथे इ.स. १२५० - १३०० दरम्यान दाखल झाले व त्यांनी येथील माओरी संस्कृतीची स्थापना केली. इ.स. १६४२ साली आबेल टास्मान हा डच शोधक व खलाशी येथे पोचला. त्यानंतर १७६९ सालच्या जेम्स कूकच्या येथील सफरीनंतर येथे युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर भेट देऊ लागले. इ.स. १८४० मध्ये ग्रेट ब्रिटनने माओरी लोकांसोबत करार करून न्यू झीलंडला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिन केले. इ.स. १९०७ मध्ये राजा सातव्या एडवर्डने न्यू झीलंडला साम्राज्यामध्ये एका स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला व १९४७ साली न्यू झीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. सध्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही न्यू झीलंडची संविधानिक राष्ट्रप्रमुख असून जॉन की हे पंतप्रधान आहेत. वेलिंग्टन ही न्युझीलंडची राजधानी तर आॅकलॅंड हे सर्वात मोठे शहर आहे. +न्यू झीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. +क्रिकेट, रग्बी, फुटबॉल व नेटबॉल हे न्यू झीलंडमधील लोकप्रिय खेळ असून रग्बी युनियन, रग्बी लीग व क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघांना यश लाभले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8104.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b119f164a4b7555210ba302779401d5cd23013e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8104.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९९९ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, १२ प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळले. +न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे विस्डेन कसोटी क्रमवारीत इंग्लंडची घसरण झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8114.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..263a884c1f51952d05ccff748ffeeecf1f0b0201 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8114.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जॉन राइटने पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व केले. +न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले. कसोटी सामना पर्थ मधील वाका मैदानवर खेळविण्यात आला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला. त्याच वर्षी मार्च मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8119.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5749d97d54336d1c66246b32b5fb8654b1c5e22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8119.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने १८ नोव्हेंबर - १३ डिसेंबर २०११ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] या दौऱ्यात ट्रान्स-टास्मान ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या दोन कसोटींचा समावेश होता. +मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली, त्यामुळे ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने राखून ठेवली. न्यू झीलंडचा होबार्टमधील दुसऱ्या कसोटीतील विजय हा १९८५ नंतरचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी विजय आणि १९९३ नंतरचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय होता.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8120.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61c9897c763adb349f787870f6b5102339c90a4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8120.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने २३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१५ या कालावधीत तीन कसोटी सामने आणि चार दौरे सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] अॅडलेड ओव्हल येथील मालिकेतील तिसरा सामना हा पहिला दिवस-रात्र कसोटी होता.[२][३] मायकल हसीने या दौऱ्याच्या सामन्यासाठी पंतप्रधान इलेव्हन संघाचे नेतृत्व केले आणि दिवस-रात्र कसोटीच्या तयारीसाठी या खेळात गुलाबी चेंडू वापरण्यात आला.[४] ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन आणि अॅडलेडमधील विजयांसह, पर्थमधील दुसरी कसोटी अनिर्णित राहून मालिका २-० ने जिंकली. +अॅडलेड कसोटीच्या समाप्तीनंतर, न्यू झीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅककुलम म्हणाला की दिवस-रात्र कसोटी क्रिकेट "येथे राहण्यासाठी" आहे आणि "ही एक उत्तम संकल्पना आहे".[५] ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दिवस-रात्र कसोटी सामन्याचे कौतुक केले होते की, "संपूर्ण कसोटी सामना एक उत्कृष्ट नावीन्यपूर्ण होता, तो एक महान तमाशा होता".[५] पहिल्या दिवस-रात्र कसोटीला मीडियाची प्रतिक्रिया देखील सकारात्मक होती, अनेक वृत्तवाहिन्यांनी या नावीन्याची प्रशंसा केली.[६] तथापि, सामन्यानंतर खेळात भाग घेतलेल्या बहुसंख्य खेळाडूंनी सांगितले की फ्लडलाइट कसोटी क्रिकेटवर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे.[७] प्रतिसाद देणाऱ्या बावीस खेळाडूंपैकी वीस खेळाडूंनी दिवस-रात्र कसोटी क्रिकेटच्या संकल्पनेला पाठिंबा दिला, परंतु गुलाबी चेंडूवर काम करण्यासाठी आणखी सुधारणा आवश्यक आहे.[७] +मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा निर्माण झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांच्या शतकांच्या जोरावर आणि जो बर्न्स आणि अॅडम व्होजेस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांचा डाव ५५६/४ वर घोषित केला. प्रत्युत्तरात न्यू झीलंडची सुरुवात चांगली झाली आणि दुसऱ्या दिवसाअखेर मधल्या फळीतील गडबड झाली. तथापि, केन विल्यमसनच्या १४० धावांचा अर्थ ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन लागू केला नाही. मात्र, वॉर्नरचे दुसरे शतक आणि बर्न्सच्या पहिल्या शतकामुळे न्यू झीलंडसमोर ५०४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. आणखी एक मधली फळी कोसळली याचा अर्थ असा की तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतरही ऑस्ट्रेलियाने २०८ धावांनी कसोटी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8142.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c709170c341480f45825ef7dbbbf08e286dd0a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8142.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९० मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8152.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b77dbba012a70365792c2529042c8553591e063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8152.txt @@ -0,0 +1,7 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका फक्त तीन सामन्यांची होती. परंतु नंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या विनंतीनुसार न्यू झीलंडने आणखी दोन सामने खेळण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार पाच ट्वेंटी२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व सामने राजधानी ढाका मधील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले. +बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. न्यू झीलंडने तिसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. परंतु बांगलादेशने चौथ्या सामन्यात विजय मिळवत एक सामना शेष असताना मालिका जिंकली. बांगलादेशने न्यू झीलंडविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. न्यू झीलंडने पाचवा सामना जिंकला परंतु त्याआधीच बांगलादेशने मालिकाविजय निश्चित केला असल्याने बांगलादेशने ३-२ ने मालिका जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8156.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39acc73853d96482d49443bf97c4d350fd337d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8156.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ग्लेन टर्नर यांच्याकडे होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8161.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de6434b321ccf4cc0df566755ad2f7dd48e9e2c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8161.txt @@ -0,0 +1,10 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली. +२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8196.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbde88bd46961e6f2e299f5963ba50c40c8e6123 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8196.txt @@ -0,0 +1,10 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका दोन्ही संघांनी २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती. +इंग्लंडने ट्वेंटी२० मालिका २-१ तर महिला एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8225.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cdf6d3b8d54a82c35f2348f573e301d7c7a2d65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8225.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. ते वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका २-१ ने गमावली. त्यानंतर ते २०१३-१४ वेस्ट इंडीज महिला टी२०आ तिरंगी मालिकेत, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध खेळले, जी वेस्ट इंडीजने जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8232.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a198fe2a266df2ff3fbd66c1191db518704fca55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8232.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता. +माओरी जमातीचे लोक येथे इ.स. १२५० - १३०० दरम्यान दाखल झाले व त्यांनी येथील माओरी संस्कृतीची स्थापना केली. इ.स. १६४२ साली आबेल टास्मान हा डच शोधक व खलाशी येथे पोचला. त्यानंतर १७६९ सालच्या जेम्स कूकच्या येथील सफरीनंतर येथे युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर भेट देऊ लागले. इ.स. १८४० मध्ये ग्रेट ब्रिटनने माओरी लोकांसोबत करार करून न्यू झीलंडला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिन केले. इ.स. १९०७ मध्ये राजा सातव्या एडवर्डने न्यू झीलंडला साम्राज्यामध्ये एका स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला व १९४७ साली न्यू झीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. सध्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही न्यू झीलंडची संविधानिक राष्ट्रप्रमुख असून जॉन की हे पंतप्रधान आहेत. वेलिंग्टन ही न्युझीलंडची राजधानी तर आॅकलॅंड हे सर्वात मोठे शहर आहे. +न्यू झीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. +क्रिकेट, रग्बी, फुटबॉल व नेटबॉल हे न्यू झीलंडमधील लोकप्रिय खेळ असून रग्बी युनियन, रग्बी लीग व क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघांना यश लाभले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8257.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88cbaf6a6b71f746369902494b16c0e7792c7715 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8257.txt @@ -0,0 +1,18 @@ +भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत. +{ इथे एक नोट की वरील तीनही नियम एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. हे नोट महत्वाचा का आहे?, तर कधी कधी विद्यार्थी न्यूटनच्या पहिल्या नियमाला न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचा एक special case म्हणून ओळखतात.त्यांना वाटते की त्वरण=० केले तर तो झाला Newton चा पहिला नियम. हे पहा असं होत नाही. तर Newton चा पहिला नियम हा दोन गोष्टी सांगतो +१) net force=० असणारी object सापडा +२) एक अशी फ्रेम ऑफ रेफरन्स सोडा जी त्या object च acceleration zero सांगेल यालाच inertial frame सुद्धा म्हणतात. +आणि +न्यूटनचे दुसरा नियम inertial frame मध्येच अधिकृत आहेत.non inertial frame असेल तर Newton चा दुसरा नियम वापरू शकत नाही. +न्यूटनच्या पहिल्या नियामाचे दोन काम आहेत +१) असा object सापडणं ज्यावर net force zero असेल +२) inertial frame ची संज्ञा. } +न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले. यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले. तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत. तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात in +या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि चाल न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची गती ही सदिश गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग) बदलत नाही. +न्यूटनचा पहिला नियम हा जडत्वीय संदर्भचौकटीची व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागू पडतो. +दुसऱ्या नियमानुसार, जडत्वीय संदर्भचौकटीमध्ये पदार्थावर प्रयुक्त होणारे एकूण बल हे त्या पदार्थाच्या रेषीय संवेगाच्या (p) कालिक विकलजाच्या (भैदिक कलनाच्या) समप्रमाणात असते. गणितीय भाषेत हे खालीलप्रमाणे लिहिता येते. +हा नियम पदार्थाच्या त्वरणाच्या परिभाषेत देखील सादर करता येतो. न्यूटनचा दुसरा नियम फक्त वस्तुमान अक्षय्य असणाऱ्या संहतींसाठीच वापरता येत असल्याने वरील समीकरणातून वस्तुमान (m) विकलजाच्या बाहेर काढता येईल. त्यामुळे त्वरणाच्या परिभाषेत हा नियम खालीलप्रमाणे लिहीता येईल. +या समीकरणात F हे पदार्थावर प्रयुक्त होणारे एकूण बल आहे, m हे पदार्थाचे वस्तुमान आहे आणि a हे पदार्थाचे त्वरण आहे. यातून असे लक्षात येते की जर एखादी वस्तू त्वरणित होत असेल तर त्या वस्तूवर त्वरणाच्या समप्रमाणात बल प्रयुक्त होत असते. पहिल्या नियमाशी हे सुसंगत आहे कारण दुसऱ्या नियमानुसार जर बल शून्य असेल तर त्वरणदेखील शून्य असणार म्हणजेच पदार्थ गती न बदलता मार्गक्रमण करत राहील. +या नियमानुसार विश्वातील सर्व बले अन्योन्यक्रियेच्या स्वरूपातच आढळतात. जर अ ही वस्तू ब या वस्तूवर बल प्रयुक्त करत असेल तर ब ही वस्तूदेखील अ या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात आणि उलट दिशेने बल प्रयुक्त करते. या नियमानुसार "एकदिशीय बल" अस्तित्वात नाही. म्हणजे असे कधीच होऊ शकत नाही की अ ही वस्तू ब वर काहीतरी बल प्रयुक्त करते परंतु अ वर काहीही परिणाम होत नाही. +प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याचा भौतिक पदार्थांच्या हालचालींसंबंधीचा दृष्टिकोन आजच्या आपल्या दृष्टिकोनापेक्षा अतिशय वेगळा होता. ॲरिस्टॉटलचे असे म्हणणे होते की जड वस्तूंना (उदा. दगड) पृथ्वीवर स्थिर राहायला आवडते आणि धुरासारख्या हलक्या वस्तूंना वर आकाशात जाउन स्थिर व्हायला आवडते. याखेरीज तारकांना अंतराळातच राहायला आवडते. ॲरिस्टॉटलनुसार प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक स्थिती ही त्याची स्थिर स्थिती असते आणि पदार्थाला सरळ रेषेत स्थिर वेगात मार्गक्रमित ठेवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या साधनाची गरज असते. ॲरिस्टॉटलचा हा दृष्टिकोन कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून नव्हता. +आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यता, ऊर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणून मान्यता पावल्या आहेत. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरले जात नाहीत. त्याऐवजी संवेग, ऊर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टींना मूलभूत मानून काम केले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8259.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cc0507dae71470cdf90428b58a13ae8873daadd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8259.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यूटाउन हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. हे शहर १७०५मध्ये वसवले गेले. फेरफील्ड काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २७,५६० होती.[१] या शहराचा विस्तार ६०.३८ वर्गमैल आहे. +या शहराची जागा १७०५मध्ये पॉह्टाटक या स्थानिक जमातीकडून विकत घेतली गेली. त्यावेळी या वसाहतीचे नाव क्वॉनीपेग असे होते. १८८१ च्या सुमरास येथील लोकसंख्या ४,००० इतकी होती तर १९३० च्या दशकात हा आकडा २,६३५ इतका खाली गेला होता. +येथे चहाची पाकिटे, कंगवे, अग्निशमन उपकरणे, बटन, टोप्या, कागदी डबे, इ. तयार करण्याचे उद्योग आहेत. याशिवाय जवळ अभ्रक व फेल्डस्पारच्या खाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8296.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ae7f59a723cdf8b919cab674041a9ff29bfb27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8296.txt @@ -0,0 +1 @@ +न्यूलँड्स क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरामधील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान केप कोब्राझ संघाचे घरचे मैदान असून न्यूलँड्स स्टेडियमच्या जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8308.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5d14ecb3f65cd8601712ab7426733f6e4bb50c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8308.txt @@ -0,0 +1,104 @@ +न्येव्र (फ्रेंच: Nièvre) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या ह्याच नावाच्या नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ३ शहरे १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8325.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60addb2de039b201cff4620cb0a901f56523a4f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8325.txt @@ -0,0 +1,15 @@ +न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. +मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात. गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात. +सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते. गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत. +न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात.राजा महापद्मानंद नाभिक समाजाचे होते. +प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग : +आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। +विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। +उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। +भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। +सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना या संकेतस्थळावर आहेत. +शिवाजी महाराजांचा मावळा जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही बलुतेदार न्हावी घराण्यातील होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. + +[१] +[२] +[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8343.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c121597ef695fc7099e30f05243b4fac70a921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8343.txt @@ -0,0 +1 @@ +परशुराम कृष्ण गोडे (इ.स. १८९१ - इ.स. १९६१) हे भारतीय प्राच्यविद्या संशोधक होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8349.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c67d804613021bb3b500b778b8334039de2009c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8349.txt @@ -0,0 +1,3 @@ +परशुराम सदाशिव देसाई (जन्म : किंजवडे, देवगड तालुका, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत, २१ मे १८९२; - पुणे, महाराष्ट्र, भारत, २६ एप्रिल १९८२) हे एक मराठी लेखक होते. देसाई तीन वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या २६ वर्षांच्या विधवा विकेशा आईने त्यांचे आणि त्यांच्या दोन भावंडांचे शिक्षण केले. +देसाई १९०७मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी सातवी पास झाले आणि लागलीच नऊ रुपये पगारावर एका खेड्यात शाळामास्तर झाले. नऊ रुपये पगार असला, तरी खाणावळीला १० रुपये द्यावे लागत, म्हणून त्यांनी शिकवण्या केल्या. त्याचवेळी त्यांनी मराठी लेखन सुरू केले. बिहारमधील आरा या संस्थानिकांचे जमीनदार कुॅंवरसिंह आणि त्यांचे छोटे बंधू अमरसिंह यांनी १८५७ सालच्या बंडाचा फायदा घेऊन कंपनी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले होते. या सत्य घटनेवर आधारित ’१८५७चा बंडाचा वणवा’ ही कादंबरी पसंनी लिहिली. +१९२२मध्ये प.स. देसाई त्यांनी माझी ओळख या नावाची छोटी पुस्तिका प्रकाशित केली. तीत त्यांनी त्या वर्षापर्यंत मासिकांतून १४ व वर्तमानपत्रांतून ११ लेख प्रकाशित झाल्याचे लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8356.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c91f0572f45e68ac30fe7f5cc1a61686e6f9411d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8356.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॉ. पद्माकर विष्णू वर्तक (जन्म : २५ फेब्रुवारी, १९३३; निधन : पुणे, २९ मार्च २०१९) हे व्यवसायाने डॉक्टर. वर्तक कुटुंबाचा तपकीर बनवण्याचा पिढीजात व्यवसाय होता. मात्र व्यवसायात स्वतःला झोकून न देता वर्तक यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस.ची पदवी संपादन केली. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी. केल्यावर त्यांनी शल्यचिकित्सा विषयाचा अभ्यास केला. ससून रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे शल्यविशारद म्हणून त्यांनी काम केले. सन १९५९ मध्ये त्यांनी स्वतःचे विष्णूप्रसाद नर्सिंग होम सुरू केले. मात्रा काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन हेच कार्यक्षेत्र निवडले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. +असे म्हणतात की सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली[१].[ संदर्भ हवा ] +प.वि. वर्तक १९४९ साली ते विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक झाले. त्यांनी संस्कृतच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ते मुंबई इलाख्यात पहिले आले होते. लंडन चेंबर ऑफ कॉमर्स या परीक्षेत, तसेच शरीरसौष्ठव स्पर्धेतसुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. १९५६ साली ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाले. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये त्यांना डिस्टिंक्शन मिळाले. पुढे त्यांनी सर्जरीचा अभ्यास केला. ससून हॉस्पिटल, लोकमान्य टिळक आयुर्वेद विद्यालय व शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून त्यांनी काम केले. १९५९ मध्ये त्यांनी स्वतःचे विष्णूप्रसाद नर्सिग होम सुरू केले. +वर्तकांनी १९५६ पासून अध्यात्म व योग यांचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय शास्त्रे, महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला व पातंजल योगाचे अनुशासन आरंभिले. १९७५ मध्ये त्यांनी योग व अध्यात्म यांच्या संशोधनासाठी ‘अध्यात्म संशोधन मंदिर’ स्थापन केले. पुढे १९७६ मध्ये प्राचीन भारतीय विज्ञानाचा शोध घेण्यासाठी वर्तकांनी ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले. +१. १० ऑगस्ट १९७५ या दिवशी त्यांनी ध्यानधारणा करून मंगळ भ्रमणाचा प्रयोग केला. हा प्रयोग २१ मे १९७६ च्या ‘संतकृपा’ व १ जून १९७६ च्या ‘धार्मिक’ या मासिकांतून प्रसिद्ध केला. +२. वर्तकांनी ध्यानांतून दुसरी मंगळ यात्रा १२ ऑगस्ट १९७६ रोजी केली. मंगळ ग्रहाच्या माहितीचा, तोपर्यंत अज्ञात असलेला, तपशील २२ ऑगस्ट १९७६ च्या ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एकूण २१ मुद्दे प्रसिद्ध केले होते. पुढे एक वर्षांने ‘नासा’ने यानांकडून मिळालेली मंगळ ग्रहाची माहिती प्रसिद्ध केली. डॉ. वर्तकांनी प्रसिद्ध केलेल्या २१ मुद्यांपैकी २० मुद्दे नासाच्या माहितीशी जुळले. २१ वा मुद्दा पुढे ११ वर्षांनी, म्हणजे १९८७ साली ‘नासा’च्या परीक्षणाप्रमाणे खरा ठरला. +३. ऑगस्ट १९७६ मध्ये डॉ. वर्तकांनी ध्यानातून गुरूभ्रमणाचा प्रयोग केला व एकूण २० नोंदी त्यांनी मासिकात व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या. यापैकी नऊ मुद्दे नंतर ‘नासा’ने केलेल्या परीक्षणामध्ये बरोबर आले. १० वा मुद्दा जुळण्यासारखा आहे. इतर १० मुद्दे ‘नासा’च्या परीक्षणामध्ये नव्हते व अजून शास्त्रज्ञांनी ते विचारात घेतलेले नाहीत. पुढे कधीतरी हे मुद्देही सिद्ध होतील, अशी वर्तकांना आशा होती. +४. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्ञात झालेली शनी ग्रहाची माहिती वर्तकांनी त्यांच्या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली आहे. शनीभोवतीच्या कड्यांमध्ये तरंगणारे खडक असल्याचे त्यांनी सांगितले. तेही नंतर खरे ठरले आहे. आणखी विशेष गोष्ट म्हणजे दुसऱ्या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवलेले आहे. आधुनिक विज्ञान याबद्दल आजही अनभिज्ञ आहे. +डॉ. वर्तक यांच्या संशोधनाननुसार १६ ऑक्टोबर (इ.स.पू) ५५६१ या दिवशी रविवारी महाभारताचे युद्ध झाले. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्य द्विधा झाला अ्रसे व्यासांनी म्हटले आहे. ग्रहणामध्ये काळी तबकडी आणि भोवती प्रभामंडळ असे दोन भाग दिसतात. त्यावेळी सूर्याने ज्वाळा बाहेर फेकण्याचे कार्य केले हे व्यासांचे सांगणेसुद्धा विज्ञानाने मानले आहे ‘व्हॉएजर सॉफ्टवेर वापरून अमेरिकेतील निलेश ओक यांनी वर्तकांनी शोधून काढलेल्या तारखा अचूक असल्याचे निष्कर्ष सिद्ध केले आहेत, असे म्हणतात. व्यासांनी अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे गेला असा जो उल्लेख केला आहे यावरून संपूर्ण महाभारताचा कालखंड निश्चितपणे शोधून काढता येईल, हे विधान डॉ. वर्तक यांनी १९७१ साली केले होते. +डॉ. प.वि. वर्तक यांची ‘वर्तक प्रकाशन’ नावाची एक पुस्तक प्रकाशन संस्था होती. ही संस्था वर्तकांची पुस्तके प्रकाशित करी. या पुस्तकांशिवाय त्या संस्थेने प्रकाशित केलेली काही पुस्तके :- + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8377.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5dc6b97d0335e53a0a813aa7929621565822c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8377.txt @@ -0,0 +1,5 @@ +महादेवशास्त्री सीताराम जोशी (जन्म : आंबेडे गोवा, १२ जानेवारी १९०६; - १२ डिसेंबर १९९२) हे मराठी भाषेतील लेखक व कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली. यानंतर गोव्यामध्ये 'सत्तरी शिक्षण संस्थे'ची स्थापना करून स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतले. चैतन्य मासिकाचे ते संपादक होते. त्या मासिकातच 'राव्याचे बंड, ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. 'वेलविस्तार' हा त्यांच्या पहिला कथासंग्रह. यानंतर त्यांचे 'खडकातील पाझर', 'विराणी', 'कल्पवृक्ष' मिळून १६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ते गोव्याचे असल्याने गोमंतकीय प्रदेशातल्या चालीरीतींसह जगणाऱ्या चांगल्या वाईट माणसांची जिवंत आणि रसरसीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या काही कथांवर 'कन्यादान', 'धर्मकन्या', वै'शाख वणवा', 'मानिनी', 'जिव्हाळा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' हे चित्रपट तयार झाले. +१९५७ साली स्थापन झालेल्या भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते. या संस्थेसाठी भारतीय संस्कृतिकोशाचे दहा खंड लिहून त्यांनी पूर्ण केले. याशिवाय चार खंडांचा मुलांचा संस्कृती कोशही त्यांनी तयार केला. +भारतदर्शन ही प्रवासवर्णनमाला, आईच्या आठवणी हे बालसाहित्य, मुलांचा नित्यपाठ, श्री आद्य शंकराचार्य आदी साहित्य त्यांच्या नावावर जमा आहे. 'आत्मपुराण, आणि 'आमचा वानप्रस्थाश्रम ' या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले. +महादेव शास्त्री जोशी ह्यांचा गोवा मुक्ती संग्रामात महत्वाचा वाटा होता.ते v त्यांच्या पत्नी सुधाताई यांनी अनेक सत्याग्रह केले. महादेव शास्त्री जोशींनी धावे चा सत्याग्रह व्हावा यासाठी प्रयत्न केले. +महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला. महादेवशास्त्रींनी पुण्यात धायरी येथे घर व शेती विकत घेतली होती. त्यांचे सुपुत्र अशोक जोशी यांना त्यामुळे शेतीमध्ये रस निर्माण झाला. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले. आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा अशोक जोशी यांनी पुढे चालू ठेवला. त्यांच्या २५-२-२०१४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी .झालेल्या निधनापूर्वी अशोक जोशींनी ’कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या १५ खंडापैकी ८ खंड प्रकाशित केले. ’अ’पासून ते ’क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8383.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cc9d6f2a4398f087bf359dceb30d2ba17c96b63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8383.txt @@ -0,0 +1 @@ +पंकज (राजकारणी) ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8416.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..976da125d67a8c2dd1ae4800b9188f7ed0cd249a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8416.txt @@ -0,0 +1,2 @@ +पंगारपहाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_842.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b83fb2b38039f7e2558b9f697b0688ed56ca612 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_842.txt @@ -0,0 +1,2 @@ +धाधरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8420.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3250d4fb56194701a2840877cd696ff7fc2574ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8420.txt @@ -0,0 +1 @@ +मॅच रेफरी एक व्यावसायिक क्रिकेट सामने खेळण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी सामन्यांसाठीचे सामनाधिकारी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामकांची नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुतांश सामन्यांमध्ये रेफरीची आवश्यकता नाही. मॅच रेफरी सर्वसाधारणपणे खेळांच्या क्षेत्राबाहेर खेळतो, प्रेक्षक क्षेत्रातून घडलेल्या घटनांचे निरीक्षण करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8422.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3250d4fb56194701a2840877cd696ff7fc2574ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8422.txt @@ -0,0 +1 @@ +मॅच रेफरी एक व्यावसायिक क्रिकेट सामने खेळण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी सामन्यांसाठीचे सामनाधिकारी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामकांची नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुतांश सामन्यांमध्ये रेफरीची आवश्यकता नाही. मॅच रेफरी सर्वसाधारणपणे खेळांच्या क्षेत्राबाहेर खेळतो, प्रेक्षक क्षेत्रातून घडलेल्या घटनांचे निरीक्षण करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_843.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5323969072f35016b22176b9a93a715eb39b48cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_843.txt @@ -0,0 +1,4 @@ +धान तिरचिमणी (इंग्लिश:Indian paddy Field Pipit ; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे. +माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच पाय लांब असतात. +निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पर्व व दक्षिण भारत, नेपाळचे खोरे व तराई जलपैगुरी, भूतान, बंगला देश व आसाम. +विरळ गवती कुरणे आणि दगडाळ प्रदेश. पडीत राने. कृषीक्षेत्राच्या हद्दी, रस्त्यांच्या कडेला आणि गायराने. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8430.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c06e355eac1d4f744d16b7f1a737bfc11fdb62bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8430.txt @@ -0,0 +1,3 @@ +मद्यपान, ब्राह्मणहत्या, सुवर्ण-चोरी, गुरूस्त्रीगमन आणि विश्वासघात ही पाच महापापे करणारे,  +संदर्भ +श्रीमद् भागवत महापुराण diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8432.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c1d81f484fe9ffd6ffc397fb86e6397f5c9204f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8432.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पंचक हा २०२३चा[१] राहुल आवटे आणि जयंत जठार दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे आणि माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी RnM मूव्हिंग पिक्चर्स अंतर्गत निर्मिती केली आहे.[२] या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, संपदा कुलकर्णी आणि दीप्ती देवी यांच्या भूमिका आहेत.[३] अंधश्रद्धा आणि मृत्यूची भीती असलेल्या कुटुंबाभोवती ही कथा फिरते.[४] हे ५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8437.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63df6e0ed1d80b80b1e2bdae7d4f6f2591b3a4ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8437.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू पुराणांतील पाच स्त्री व्यक्तिरेखांना एकत्रितपणे पंचकन्या म्हणून संबोधतात. +पतीव्रता diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8451.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13366d959793a8a1e7c5beb5b2e6ca93a14b49ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8451.txt @@ -0,0 +1,2 @@ +पंचगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_847.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e11275e58986073f76ca3080dc62a4c97318bd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_847.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8475.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01dc9df7674a8ffa0013245d8a0b9206edb4308 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8475.txt @@ -0,0 +1 @@ +पंचमहाल हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. पंचमहालमध्ये भूतपूर्व गोधरा मतदारसंघामधील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8488.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1fa0969c7a0a61547d3f49dc2f04ddb216fe316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8488.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पंचवार्षिक योजना यावरील पुढील लेख आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8511.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bbf9a38f0a971f0a10c0c0a1071d3880a86930e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8511.txt @@ -0,0 +1,2 @@ +५५-पंचावन्न  ही एक संख्या आहे, ती ५४  नंतरची आणि  ५६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 55 - fifty-five. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8512.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bbf9a38f0a971f0a10c0c0a1071d3880a86930e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8512.txt @@ -0,0 +1,2 @@ +५५-पंचावन्न  ही एक संख्या आहे, ती ५४  नंतरची आणि  ५६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 55 - fifty-five. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8533.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c3aa293a7d117411495c6eaa34ecf39edbde48d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8533.txt @@ -0,0 +1,2 @@ +पंजाब केसरी हे भारतातून प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. ते पंजाब, हरियाणा इत्यादी भारतीय राज्यांतील अनेक शहरांमधून प्रकाशित होते. +जालंधर (1965) [१], दिल्ली (1983) [२], अंबाला (1991), पालंपूर (2004), लुधियाना (2004), जयपूर (2006), पानिपत (2006), हिसार (2006), जम्मू (2007), मोहाली, (2008), चंदीगड (2009), आणि सिमला (2009) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8544.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a2224905cc8ffc523ba5a7ba29d9f760f648a45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8544.txt @@ -0,0 +1,63 @@ +पंजाब हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. १९४७ मध्ये हा प्रांत भारत व पाकिस्तान यांत विभागाला गेला. ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांताचे एकूण क्षेत्रफळ १,३३,७४१ चौ.मैल इतके होते. +पंज(पाच) आणि आब(पाणी) या दोन फारसी शब्दांपासून पंजाब हा शब्द बनला आहे. सतलज, बियास, झेलम, रावी व चिनाब या पाच नद्यांनी हा प्रदेश व्यापला आहे. +१. दिल्ली विभाग +२. जालंधर विभाग +३. लाहोर विभाग +४. रावळपिंडी विभाग +५. मुलतान विभाग +या सर्व विभागांचे एकूण क्षेत्रफळ हे ९७,२०९ चौ. मैल इतके होते. + +पंजाब प्रांतातील जिल्हे- +अ] दिल्ली विभाग - +१. हिस्सार +२. रोहतक +३. गुडगाव +४. दिल्ली +५. कर्नाल +६. अंबाला +७. सिमला +आ] जलंदर विभाग - +८. कांग्रा +९. होशियारपूर +१०. जलंदर +११. लुधियाना +१२. फिरोजपूर + +इ] लाहोर विभाग - +१३. मोंटगोमरी +१४. लाहोर +१५. अमृतसर +१६. गुरुदासपूर +१७. सियालकोट +१८. गुजरॉंवाला +ई] रावळपिंडी विभाग - +१९. गुजरात +२०. शाहपूर +२१. झेलम +२२. रावळपिंडी +२३. अटक +उ] मुलतान विभाग - +२४. मियॉंवाली +२५. मुलतान +२६. झांग +२७. मुझ्झफराबाद +२८. डेरा गाझी खान +पंजाब प्रांतातील संस्थाने:- +१. पटियाला +२. जिंद +३. नाभा +४. बहावलपूर +५. सिरमुर +६. लोहारू +७. दुजाना +८. पटौदी +९. कल्सिया +१०. सिमला +११. कपुरथला +१२. मंडी +१३. मुलोर कोटला +१४. सुकेत +१५. फरीदकोट +१६. चंबा +या सर्व संस्थानांचे एकूण क्षेत्रफळ ३६,५३२ चौ. मैल इतके होते. +स्वातंत्र्यानंतर पंजाब हा भारत वा पाकिस्तानात विभागाला गेला. सध्या या प्रांताचा भाग भारतातील पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात व दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8565.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..826bce13182a19f9badbf07af6d21e64cbc22906 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8565.txt @@ -0,0 +1,23 @@ + + +पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; - दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. +'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते. +डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) +मूळ आडनाव - कदम +१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले. +वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट. +१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. +१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले. +१९२७ - शेतकरी संघाची स्थापना. +१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. +? - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना. +१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले. +१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना. +१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना. +१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह . +१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री +लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड. +१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री. +देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले. +प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना. +१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8590.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3df60c45f07a2b54436b0a96aaf2bbadcbe12ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8590.txt @@ -0,0 +1,12 @@ +पं. त्र्यंबकराव जानोरीकर (इ.स. १९२१ - नोव्हेंबर २३, इ.स. २००६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते व भेंडीबाजार घराण्याच्या शैलीत ते गायन करत असत. +पंडित जानोरीकरांचा जन्म गुजरात राज्यात अमदावाद येथे इ.स. १९२१ मध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्‍नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. +इ.स. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. +पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर इ.स. १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. +पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७० च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत इ.स. १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. नंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना ते काम सोडावे लागले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते. जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. +दिनांक २३ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी त्यांचे निधन झाले. +पंडित जानोरीकरांनी मैफिलीतले गाणे गाण्यासाठी अनेक खास शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांची कन्या व शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत. +पं जानोरीकरांना संगीतक्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान - पुरस्कारांनी गौरविण्यात आले. +त्यातील काही पुरस्कार : + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8592.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6de4e31b30a5f4f3a8f1407705dc8d793afe7153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8592.txt @@ -0,0 +1,7 @@ +निखिल बॅनर्जी (जन्म : कलकत्ता, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - - कलकत्ता, २७ जानेवारी, इ.स. १९८६) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक होते. ते सार्वकालिक सर्वोत्तम सतार वादकांमधील एक गणले जातात. +निखील बॅनर्जी यांचा जन्म १९१४ साली कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरू केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरू म्हणजे मैहरचे अलाउद्दीन खान. +अलाउद्दीन खान साहेबांनी निखिल यांची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून अतिशय कठीण प्रकारे रियाज करून घेतला. त्यांच्याकडून, थोडी विश्रांती वगळता सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत रियाज करून घेण्यात येत असे. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याच्याही पलीकडील सांगीतिक ज्ञान अलाउद्दीन खानसाहेबांकडून निखिल यांना मिळाले. पुढे निखिल बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. या सर्व शिक्षणानंतर निखिल बॅनर्जींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. +मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिल बॅनर्जी यांनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रम केले. आकाशवाणीवर ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांचा पहिला परदेश दौरा १९५५ साली झाला असला तरी पहिला मोठा अमेरिका दौरा १९६७ साली झाला. त्यानंतर मात्र त्यांना कार्यक्रमांसाठी नियमित परदेशी जावे लागल्याने ते आपल्या कारकिर्दीत अतिशय व्यस्त झाले. ध्वनिमुद्रणांपेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. परंतु ह्या व्यस्त वेळापत्रकाचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला व त्यांना १९७०-८० च्या उत्तरार्धात हृदयविकाराचा त्रास जडला. +२७ जानेवारी १९८६ला कलकत्त्याला सतार वादन चालू असतानाच त्यांना अखेरचा हृदयविकाराचा झटका आला. +निखिल बॅनर्जी यांच्या सतार वादनात गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसे. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळे. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. +निखिल बॅनर्जी यांचा भर पारंपरिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इत्यादी राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8593.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79b03b004594f9f8523c34d5921bddf3919f2286 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8593.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंडित निवृत्तीबुवा सरनाईक (जुलै ४, इ.स. १९१२ - फेब्रुवारी १६,इ.स. १९९४) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते. +निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले. +बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते कोल्हापूर संस्थानाचे दरबार-गायक होते. इ.स. १९७० चे दरम्यान ते मुंबई विद्यापीठात संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली. +इ.स. १९९३ मध्ये त्यांची तब्येत खालावल्याने ते मुंबईस परतले. १६ फेब्रुवारी, इ.स. १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8611.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6d450a866fabcf280f77269e7711e031dc56605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8611.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे माजी कुलगुरू आहेत. त्यांनी जैवभौतिकशास्त्र आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयांवर संशोधनकेले आहे. विद्यासागर हे मराठीत विज्ञानसाहित्यही लिहितात. सुपरक्लोन आणि आंतराळी या त्यांच्या विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या त्यांच्या ग्रंथास अनेक पुरस्कार मिळाले. +स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी कुलगुरू पदावर असताना एक शिक्षक एक कौशल्य आणि श्वास या योजना सुरू केल्या. श्वास या योजनेद्वारे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. +ते भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मराठी विज्ञान परिषद, तसेच लोकविज्ञान संघटना या संस्थांनी आयोजित केलेल्या कामांमध्ये सहभाग घेतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8614.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fe0493dd2311d916f1864b670467214ae88c343 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8614.txt @@ -0,0 +1,9 @@ +पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर (सप्टेंबर १९, इ.स. १८६७ - जुलै ३१, इ.स. १९६८) हे मराठी चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे पुत्र होते. +वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले. +धर्माला मर्यादा नाही. जेथे मानव तेथे धर्म आहे. वेद-उपनिषदे –रामायण-महाभारत या ग्रंथात दिसणारी आपली संस्कृती जगावर प्रभाव पाडणारी आहे. ती जागती ठेवणे आवश्यक आहे.उपनिषदातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.[१] +या पुस्तिकांमध्ये माणसाच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता, त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे. +मननाशिवाय नुसता शब्दोच्चार हा शब्दांचा ‘गोंगाट ‘ होईल . त्यामुळे त्या मननातून आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे” या हेतूने या पुस्तिकेमध्ये जे विचार दिले आहेत त्यांचे भाषांतर आणि आशय आवर्जून नोंदविले आहेत. +प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे. +मुलांसाठी धर्म-शिक्षण असे म्हणत असताना धर्म म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचा एक विशेष प्रकारचा उच्च दृष्टीकोण. शिक्षण असे म्हणत असताना पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहे – नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य भारतीय अध्यात्मविद्येत आहे. वेदाने ते सांगितले आहे म्हणून ते अंतिम आहे असे मी मानीत नाही. ते मूळ आहे. सर्वानी त्यात वाढ करायची आहे आणि व्यक्ती-समाज-राष्ट्र उन्नतीचा मार्ग म्हणून त्यातील बोधही पहायचा आहे. [२] +वेदव्यास पं सातवळेकर (पु.पां. गोखले) + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8619.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d9c8c9f83279a022673e971537ae0f40c64d5df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8619.txt @@ -0,0 +1,7 @@ +पं सुरेश तथा भाई गायतोंडे. भारतातील एक ज्येष्ठ तबलावादक. +जगन्नाथबुवा पुरोहीत, विनायकबुवा घांग्रेकर, उस्ताद अहमदजान तिरखवा हे यांचे गुरू. +भारतात अनेक ठिकाणी एकल तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. मुंबई, पुणे, खैरागड इत्यादी विद्यापिठातून तबलाविषयक कार्यशाळा घेतल्या आहेत, चर्चासत्रातून मार्गदर्शन केले आहे. वाशी येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात अनेक वर्ष तबला शिकवत आहेत. +यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.लिख रहा हूँ मौं अंजान जिसका +स्वतंत्र भारताची संरचना त्यांच्या विचारातून स्पष्ट पणे दिसत होती. एक कल्याणकारी व्यवस्थाच विविधतेने नटलेल्या भारताला स्वयंपूर्ण करू शकते यावर त्यांचा विश्वास होता. सर्वांना समान हक्क,न्याय, अधिकार, आणि संधी मिळावी याचा त्यांनी कायम पुरस्कार केला. सशस्त्र लढ्या मागे त्यांची एक वैचारिक बैठक होती, तो लढा हा हल्ला, लूटमार,जाळपोळ अशा प्रकारचे अविवेकी आणि माथेफिरू कृत्य नव्हते, तर तो लढा हा स्वतःच्या हक्क साठी व अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होता, त्यात नियोजन होते आणि सर्वसमावेशक लोक कल्याणासाठी राजेशाही, हुकूमशाही, कडून लोकशाही कडे जाणाऱ्या शासन व्यवस्थे बद्दल त्यांना आदर होता. +" देश के लिये शहीद होणे जा राहें हैं, अच्छा तो दिखना चाहिये ". +🍁 diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8621.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..409f287a29c0142b9983b9fb05eecc9a507b1494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8621.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पंडित हरिप्रसाद चौरसिया (जुलै १, इ.स. १९३८; अलाहाबाद, उत्तर प्रदेश; भारत - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले. +चौरसियांचा जन्म १ जुलै, इ.स. १९३८ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात [ संदर्भ हवा ]. +वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8643.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f677c4557dffaeefc3be27fc69b8e4c2558b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8643.txt @@ -0,0 +1 @@ +१६५४२ पंढरपूर-यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते यशवंतपूर  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दर शुक्रवारी धावणारी ही गाडी पंढरपूर आणि  यशवंतपूर या स्थानकांमधील ८८० किमी अंतर हे १५ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ११ थांबे आहेत.  [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8651.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..592308eedce62893c23f4e0b7ddf0a34fa6b598e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8651.txt @@ -0,0 +1 @@ +पंढरपूर महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_867.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bb97e8b3f467529ef6a096934d0619f716b2fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_867.txt @@ -0,0 +1,18 @@ +धानिवरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने गेल्यानंतर 'सोळंकी कार केर' नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०३ कुटुंबे राहतात. एकूण १३९० लोकसंख्येपैकी ६५५ पुरुष तर ७३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ३३.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४४.०१ आहे तर स्त्री साक्षरता २५.०४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.०५ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +देवगाव, सोमनाथ, गणेशबाग, दहीगाव,देऊर, ओसरविरा, कांदरवाडी, डाह्याळे, खाणिव, सोनाळे, विवळवेढे ही जवळपासची गावे आहेत.धानिवरी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8673.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ce665abacb019f625e8ec67682e627de237aec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8673.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंतप्रधान एक असा राजकिय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करीत असतो. सामान्यपणे, पंतप्रधान आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो. +पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनावे लागेल. जर मंत्री या कालावधीत सदस्य बनण्यात अयशस्वी राहिले तर त्यांना राजिनामा द्यावा लागतो. परंतु याचा असा अर्थ अजिबात नाही की प्रत्येक वेळी सहा महिन्यांसाठी नेता सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री पदावर विराजमान राहू शकतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे. +प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_870.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e35c819dd4ca0f09efdff5c04e10c622ade50a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_870.txt @@ -0,0 +1 @@ +राग धानी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8704.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2588b808b41133b23621d8ff1c9bf4c88494aba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8704.txt @@ -0,0 +1 @@ +पंस्कुरा हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8726.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8afd2d8c36866264c7fc9a57bc7f782399b87b5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8726.txt @@ -0,0 +1,3 @@ +पक्षीशास्त्र ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. +भारतामध्ये डॉ. सलीम अली हे या मधील अध्यगुरू म्हणून संबोधले जातात, त्याचप्रमाणे श्री. मारुती चित्तमपल्ली यांची अनेक पुस्तके या बाबत विवेचन करतात. +नव्या पिढीत सचिन मेन हे नाव प्रचलित आहे त्यांचे पक्षिजगत हे पुस्तक प्रकाशित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8727.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..804895bcb1b50a087309c96f6e5900f94d0daa33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8727.txt @@ -0,0 +1 @@ +सर्वच पक्ष्यांची मादी अंडी घालते आणि पक्ष्यांची पिले अंड्यातून जन्माला येतात. पक्ष्याला संस्कृतमधे द्विज असा शब्द आहे. अंडे हा पक्ष्याचा पहिला जन्म तर अंड्यातून पिलू बाहेर येते तो दुसरा जन्म. पक्ष्यांच्या प्रजातीनुसार अंड्याचा आकार, बाह्य रूप, रंग, वजन, उबवण्यासाठी लागणारा काळ, एका वीणीच्या काळात घातलेली अंड्यांची एकूण संख्या इत्यादी गोष्टीत खूप विविधता आढळते. पक्ष्यांच्या अंड्यांच्या शास्त्रीय अभ्यासास 'ऊलॉजी' (Oology) असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8736.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..823ccb4cd574390de6db929919149cfbbae72b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8736.txt @@ -0,0 +1,2 @@ +पगार हा नोकरदाराने केलेल्या कामाचा नियतकालाने देण्यात येणारा मोबदला होय. यासाठी काम देणारा व काम करणारा यांच्यात मोबदला व करण्याचे काम यांबद्दल करार झालेला असणे अपेक्षित असते. अशा करारात नोकरीचा काळ सहसा अमर्याद असतो परंतु काही वेळेस ठराविक मुदतीच्या करारासाठी काम करताना या मुदतीपेक्षा कमी वेळाने असा मोबदला दिला जातो. +असा मोबदला सहसा मासिक, द्वैमासिक (महिन्यातून दोन वेळा) द्विसाप्ताहिक किंवा साप्ताहिक दिला जातो. रोज दिला जाणाऱ्या मोबदल्यास रोजंदारी म्हणले जाते. रोजंदारीमध्ये नोकरीचा कालावधी दर दिवशी संपतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8738.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44425f8c254f5e23287cdbeab38be7d70a138e99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8738.txt @@ -0,0 +1,3 @@ +पगोसा स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे[१]. आर्चुलेटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,७२७ होती.[२] +या शहरात वर्षातील ३०० दिवस ऊन पडते.[३] +या शहराला जवळच्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचे नाव दिलेले आहे. यातील एक झरा जगातील सगळ्यात खोल नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8742.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92bdb8f813db5e8e54d5bddc9e024f45eb0586ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8742.txt @@ -0,0 +1 @@ +सजीवांनी खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्ये आणि शक्तीमध्ये रूपांतर होण्याची चयापचय क्रिया. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8752.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..480ff9c27e5c191388908737f808b9bafd21ff75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8752.txt @@ -0,0 +1,8 @@ +पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मूळ कथावस्तू तशीच ठेवून तिचे चित्रपटासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरण केल्यानंतर जे बनते त्याला पटकथा असे म्हणतात. प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे हे पटकथा लेखकही होते. तसेच प्रवीण दवणे हेही पटकथा लेखक आहेत. गुलजार हे हिंदी चित्रपटांचे पटकथाकार आहेत. +मूळ कथेवरून नाटक बनवण्याच्या कृतीला नाट्यरूपांतर म्हणतात. +कथालेखकाने कथा लिहिल्यानंतर पटकथालेखक हा कथेचे संशोधन करून, कथा फुलवून, स्क्रिप्ट लिहून, पटकथा, संवाद लिहून आणि अन्या आवश्यक बदल करून ती सुधारित कथा निर्माता-दिग्दर्शक यांच्यापर्यंत पोचवितो. म्हणून पटकथा लेखकांचा सर्जनशील दिग्दर्शनावर,भावनिक प्रभावावर आणि निश्चितपणे तयार झालेल्या चित्रपटावर चांगला प्रभाव असतो. पटकथा लेखक एकतर ती निवडली किंवा विकली जाईल या आशेने लिहिलेली पटकथाेची मूळ कल्पना निर्मात्याला देतात किंवा निर्माते एखादी कादंबरी, कविता, नाटक, गंमतीदार पुस्तक किंवा लघुकथा यासारख्या साहित्यिक संकल्पना, पटकथा तयार करण्यासाठी पटकथाकाराकडे सोपवतात. +पटकथालेखनाची कृती करमणूक उद्योगात अनेक रूप धारण करते. बऱ्याचदा, एकाधिक लेखक वेगवेगळ्या कार्यांसह विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समान स्क्रिप्टवर कार्य करतात. यशस्वी कारकिर्दीत, पटकथा लेखक विविध भूमिकांमध्ये लिहिण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते. +एक स्पिप्ट स्क्रिप्ट लेखकाचे प्रदर्शन आणि त्याच्या शैली आणि अधिवेशनांचे अनुकरण करण्याची क्षमता याबद्दलचे ज्ञान दर्शविण्यासाठी लिहिलेली एक नमुना टेलीप्ले असते. शोच्या भविष्यातील भाग लिहिण्यासाठी नियुक्त केले जावे या आशेने तो शोच्या निर्मात्यांकडे सबमिट केला आहे. व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होतकरू पटकथा लेखक सामान्यत: एक किंवा अधिक विशिष्ट स्क्रिप्ट लिहून प्रारंभ करतात. +हे कोणत्याही लेखकाच्या कारकिर्दीचा एक भाग असला तरी अमेरिकेच्या राइटर्स गिल्डने सदस्यांना "सट्टावर" लिहिण्यास मनाई केली. फरक हा आहे की लेखकाने स्वतःच्या स्वतःच्या नमुना म्हणून एक "स्पिप्ट स्क्रिप्ट" लिहिलेली आहे; एखाद्या कराराशिवाय विशिष्ट निर्मात्यासाठी स्क्रिप्ट लिहणे म्हणजे काय प्रतिबंधित आहे. अनुमानांवर स्क्रिप्ट लिहिण्याव्यतिरिक्त, सामान्यत: कॅमेरा ॲंगल किंवा इतर दिशात्मक शब्दावली लिहिण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. दिग्दर्शक स्वतः किंवा स्वतःचे शूटिंग स्क्रिप्ट लिहू शकते, स्क्रिप्ट कशी दिसावी याविषयी दिग्दर्शकाची दृष्टी पार पाडण्यासाठी टीमला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारी स्क्रिप्ट. दिग्दर्शक मूळ लेखकास त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर लेखन करण्यास किंवा फिल्म / टीव्ही शोचे दिग्दर्शक आणि निर्माता दोघांनाही समाधानी करणारी स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यास सांगू शकतो. +हे देखील अद्वितीय आहे की लेखकाने कल्पना निर्मात्यांकडे आणणे आवश्यक आहे. स्क्रिप्ट विकण्यासाठी, त्यास एक किलर शीर्षक, चांगले लेखन आणि एक उत्कृष्ट लॉगलाइन असणे आवश्यक आहे. लॉगलाइन हे एक वाक्य आहे जे चित्रपट काय आहे हे दर्शवितो. चांगली लिखित लॉगलाइन चित्रपटाचा सूर सांगेल, मुख्य पात्राची ओळख करून देईल आणि प्राथमिक संघर्षाला स्पर्श करेल. सामान्यत: लोकांना आकर्षित करण्यासाठी लॉगलाइन आणि शीर्षक काम करतात आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यामध्ये विचित्रपणाचा समावेश करण्यास सूचविले जाते. निर्मात्याने विशिष्ट लिपी उचलली की नाही या छान आणि स्वच्छ लिखाणासह या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8753.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7865e6bea30c10cd17af5358127afe4f43a36a3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8753.txt @@ -0,0 +1,8 @@ +पटकी (महामारी अथवा कॉलरा) हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलऱ्याची लागण होते. कॉलऱ्याचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो. +पटकी (कॉलरा) हा आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. स्वल्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलऱ्याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात कॉलऱ्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. व्यापारी मार्गाने जमिनीवरून जलमार्गाने कॉलरा इ.स. १८१७ च्या सुमारास रशियात व रशियामधून युरोपमार्गे उत्तर अमेरिकेमध्ये पसरला. जगात गेल्या दोनशे वर्षामध्ये सातवेळा कॉलऱ्याची साथ आली आहे. 1१९६१मधील इंडोनेशियातील साथ ही सातवी होती.laprin +पटकी रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. पटकीची लागण दूषित पाणी आणि अन्नामधून होते. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता ओढवून निर्जलीकरण होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देणे आणि ते शक्य न झाल्यास सलाइनवाटे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण पूर्ववत करावे लागते. इ.स. २०१०मध्ये जगभरात सुमारे साठ लाख व्यक्तींना पटकीची लागण झाली होती, त्यांतील एक लाख तीस हजार व्यक्ती मरण पावल्या. +पटकीच्या जिवाणूंचा शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसामध्ये भाताच्या पेजेसारखे जुलाब होतात. उपचार केले नाहीत तर दिवसाकाठी दहा ते वीस लिटर पाणी जुलाब आणि उलट्यांवाटे शरीरातून बाहेर पडते. जुलाबास माशासारखा वास येतो. फक्त तीन टक्के व्यक्तीमध्ये पटकीची लक्षणे दृश्य स्वरूपात दिसतात. इतर व्यक्ती पटकीच्या वाहक असतात. वेळीच उपचार चालू केले नाहीत तर झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी होण्याच्या प्रकारास वैद्यकीय भाषेमध्ये जलशुष्कता (डीहायड्रेशन) असे म्हणतात. जलशुष्कतेमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. +पटकीचे जिवाणू निसर्गत: पाण्याच्या साठ्यात असतात. निरोगी व्यक्तीमध्ये शंभर दशलक्ष जिवाणू अन्ननलिकेत गेल्यास पटकीची लक्षणे दिसतात. ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये पटकीचा धोका अधिक असतो. काहीं कारणाने जठराची आम्लता कमी झाल्यास पटकीच्या संसर्गाचा धोका वाढतो. चार ते पाच वर्षाच्या मुलामध्ये पटकीच्या संसर्गाची शक्यता अधिक असते. पटकीचे जिवाणू जठरामध्ये असलेल्या आम्लामुळे नष्ट होतात. पण काहीं शिल्लक राहिलेले जिवाणू लहान आतड्यामध्ये पोहोचल्यानंतर लहान आतड्याच्या अंतःत्वचेतील पेशीमध्ये प्रवेश करतात. तेथे शरीरातील लवक प्रथिन तयार करण्याचे थांबवून शरीरामधून जीवविष प्रथिनाच्या स्वरूपात बाहेर टाकतात. या जीवविषामुळे H2O, Na+, K+, Cl−, HCO3− आयने लहान आतड्याच्या पोकळीमध्ये साठतात. याबरोबर आतड्याच्या अंतःत्वचेच्या पेशींचा नाश होतो आणि जुलाब चालू होतात. +पाण्याच्या साठ्यामध्ये मलमूत्र येणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रादुर्भाव होत नाही. निसर्गत: सागरी कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर व्हिब्रिओ कॉलेरी जिवाणू आढळतात. त्यामुळे सागरी खेकडे, तिसऱ्या आणि खुबे यांच्याबरोबर पटकी जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी ते स्वच्छ पाण्यात धुऊन घेतात. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यावरील क्लोरिनीकरणामुळे पटकी जिवाणू नष्ट होतात. त्याचप्रमाणे विषाणू आणि जिवाणू प्रतिबंधक अतिनील किरण उपचार, आधुनिक फिल्टर सारख्या उपायामुळे पटकी जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सार्वजनिक आरोग्य खाते यासाठी अधूनमधून पाण्याच्या साठ्याची पाहणी करते. पटकी झाल्यानंतर जलसंजीवनी, शिरेतून सलाइन आणि नॉरफ्लॅसॉसिन, इरिथ्रोमायसिन, क्लोरेरफिनेकॉल टेट्रासायक्लिन सारखी प्रतिजैविके वेळीच दिल्यास रुग्ण वाचतो. आता कॉलऱ्याची साथ नसल्यास पटकीची लस दिली जात नाही. +या रोगात जिवाणू आतड्याला सूज आणतात त्यामुळे आतड्यातील पेशींकडून अनियंत्रितपणे पाणी सोडले जाते व खूप जुलाब होतात. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी खूप कमी झाले तर गुंतागुंत होते. होतात व १ आठवड्यात रुग्ण मरू शकतो. कॉलरा झाल्यानंतर रुग्णाला प्रथमतः उकळलेले पाणी दिले पाहिजे. रुग्णाची त्वचा चिमटीत घेऊन सोडावी. जर ती परत पूर्ववत होत असेल तर शरीरातील पाण्याचा स्तर योग्य आहे असे समजावे. अन्यथा अजून पाणी द्यावे. रुग्णाला उलट्यासुद्धा होऊ शकतात. अशा वेळी त्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे व सलाईन[मराठी शब्द सुचवा]द्वारे पाणी द्यावे. +जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स्ची) योग्‍य मात्रा (डोस) देण्‍यात यावी. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8782.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77882bb424dd858a3055616f23832ab4082079ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8782.txt @@ -0,0 +1 @@ +पटवर्धन हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते. सांगली, मिरज, जमखिंडी इत्यादी संस्थानांचे संस्थानिक पटवर्धन घराण्यातील होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8785.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b56f0385b5fb2ae4a9e3eac75c4d416a7ebd63eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8785.txt @@ -0,0 +1,6 @@ +केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग हे दृक्‌प्रत्यय देणारे हिंदू मराठी पंचांग आह. हे पंचांग महाराष्ट्रात शके १७८७ पासून छापून प्रसिद्ध होऊ लागले. यात मुंबईचे अक्षांश आणि रेखांश प्रमाण म्हणून घेतले होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे हे याचे कर्ते असून आबासाहेब पटवर्धन हे प्रवर्तक होते. या पंचांगास आधी नवीन पंचाग हे नाव होते. +या केरोपंती पंचांगाचे गणित प्रथम काही वर्षे स्वतः केरोपंतांनी केले असावे. परंतु पुढे त्यांच्या देखरेखीखाली हे गणित वसई येथील आबा जोशी-मोघे हे करीत असत. शेवटी शेवटी केरोपंतांचे वंशज नीलकंठ विनायक छत्रे यांच्या देखरेखीखाली हे पंचांग बनत असे. +या पंचांगाच्या गणिताचा खर्च आबासाहेब पटवर्धन करीत. म्हणून शके १७९९ पासून पटवर्धनांच्या स्मरणार्थ ह्या पंचांगास पटवर्धनी पंचांग असे नांव ठेवण्यात आले. आबासाहेब यांस खगोलशास्त्राची आवड असल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने आकाशाचा वेध घेण्याचे साहित्य विकत घेतले होते. +शके १७९१ पासून १८११ पर्यंत रत्‍नागिरी येथील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन हरि आठले यांना केरोपंती पंचांगाचा अभिमान असल्यामुळे, ते स्वतःच्या खर्चाने ते पंचांग छापवीत. शके १८१२ पासून पुणे येथील चित्रशाळेचे मालक वासूकाका जोशी हे पंचांग छापू लागले. स्वखर्चाने छापले गेल्याने या पंचांगाचे प्रकाशन चालू राहिले. +त्या काळच्या इतर पंचांगांहून केरोपंती पंचांग वेगळे होते. या पंचांगाच्या गणितासाठी रेवती नक्षत्रातला मुख्य तारा हा शके ४९६ मध्ये संपाती होता असे मानले होते.. म्हणून त्या वर्षी अयनांश शून्य मानून गणित केले जात असे. +या पंचांगात दाखविलेली ग्रहस्थिती प्रत्यक्षात जवळपास तशीच दिसे. म्हणून हे पंचांग दृक्‌प्रत्यय देणारे पंचांग म्हणून ओळखले जाई. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8796.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0999b28d31b5857b4a99de6801e71416e673df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8796.txt @@ -0,0 +1,3 @@ +पटुआखाली हे बांगलादेशच्या पटुआखाली जिल्ह्यातील शहर आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या अंदाजानुसार ६५,००० होती. येथील वस्तीमध्ये ८६% मुस्लिम तर १३.८३% हिंदू आहेत. +हे शहर गंगेच्या मुखप्रदेशात आहे. +येथील नगरपालिकेची स्थापना १ एप्रिल, १८९२ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_88.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_88.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb11ec5495c15398ec7637b05ed790c9f36b4820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_88.txt @@ -0,0 +1,2 @@ +दॉन (रशियन: Днепр) ही पश्चिम रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी तुला ओब्लास्तमधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती अझोवच्या समुद्राला मिळते. वोरोनेझ व रोस्तोव दॉन ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी वोल्गा नदीसोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे. +दॉन नदी रशियाच्या खालील ओब्लास्तांमधून वाहते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8843.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d051e9a740e3fc1973bf02112e9d1679f466214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8843.txt @@ -0,0 +1,205 @@ +पठाणकोट विमानतळ (आहसंवि: IXP, आप्रविको: VIPK) हे भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट येथे असलेला विमानतळ आहे.हे सेनेचे विमानतळ असून नुकतीच येथे वाणिज्यिक विमानसेवा सुरू झाली आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8862.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7367019423f3da01b993288704b5ec377de1818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8862.txt @@ -0,0 +1,8 @@ + पडतळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8864.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f568ef256c452a9cd4739aab7a172e2521b4f1e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8864.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पडदा हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो - diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8865.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d8c6c2846437476886915f0b11150f2d9225388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8865.txt @@ -0,0 +1,2 @@ +विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन वाद्ये विकसित केली जात आहेत. तसेच प्रचलित वाद्यांमध्ये आवश्यक बदल होऊ लागले आहेत. आपल्या वाद्यसंस्कृतीमध्ये परंपरागत चालत आलेली अनेक वाद्ये आहेत. ज्या त्या काळात संबंधित वाद्यांना विशेष महत्त्व असे. त्यांना त्याकाळचे प्रमुख वाद्य म्हणूनही ओळखले जायचे. संस्कृतीचा एक घटक म्हणून त्यांचा अभ्यास केला जायचा. मात्र, आज अशी वाद्ये काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागली आहेत. संगीतप्रेमी मंडळी अशा वाद्यांचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज परंपरागत किंवा प्राचीन वाद्यांचे अस्तित्व केवळ सांस्कृतिकोश आणि वस्तुसंग्रहालये इत्यादी ठिकाणीच राहिल्याचे पाहायला मिळते. +सर्वांत जुन्या वाद्यांना प्राथमिक वाद्ये असे म्हटले जाते. वाद्यांच्या इतिहासानुसार प्राथमिक वाद्ये ही प्राचीन आहेत आणि आजही जगातील वेगवेगळ्या भागांतील आदिवासी जमातींत ती प्रचारात आहेत. आद्य प्राचीन संस्कृतीत प्रचारात असलेल्या पण आज नष्ट झालेल्या वा परिष्कृत रूपात अस्तित्वात असलेल्या अशा दोन्ही प्रकारांतील वाद्यांची गणना प्राचीन या सदराखाली करता येईल. पहिल्या वर्गात जास्त वाद्ये आघाती व घनवाद्ये आहेत. निरनिराळ्या जमातींच्या नृत्यप्रसंगी त्यांचा वापर होत असावा. खुळखुळणारी, हलवून वाजविण्याची (वाळक्या शेंगा, भोपळे वगैरेंसारखी वाद्ये), घर्षणाची (करकऱ्यासारखी) एकमेकांवर आपटून वाजविण्याची (करताल, चिपळ्या यांसारखी), हाताने आघात करून वाजविण्याची (निरनिराळ्या आकारांचे ढोल, किंवा खंजिऱ्यांसारखी), काठ्यांनी वाजविण्याची (नगारा, ताशा यांसारखी) लयवाद्ये आणि निरनिराळ्या स्वरांत लावलेल्या लाकडी पट्ट्यांची, दगडी तुकड्यांची, घंटांची, झायलोफोन (आजही प्रचारात असलेले), मारिंबा, सांसा, पियेनचिंग यांसारखी स्वरवाद्ये, किसोर ओंबी, नांगा यांसारखी मूळ धनुष्यापासून निघालेली ततवाद्ये आणि तोंडाने किंवा नाकाने फुंकून वाजविण्याची, जिव्हाळीची, हरतऱ्हेची सुषिर वाद्ये प्राथमिक वाद्यांत होती. काही अद्यापही रुढ आहेत. आदिमानवाच्या संगीताच्या प्राथमिक गरजा या वाद्यांमुळे पुऱ्या होत असाव्यात. वेदकाळात भूमिदुंदुभी हे प्राचीन वाद्य प्रचारात होते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8890.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106c40a73d914bbc3960d3704c94708ef1910404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8890.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8925.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a631e89296f73a7cd8bb6349258e657c41af7c17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8925.txt @@ -0,0 +1 @@ +पतनमतिट्टा भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8931.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82df82655a0d9bd95962c23af81c5d89b6194e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8931.txt @@ -0,0 +1,20 @@ +अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय. +अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असीरियन, सुमेरियन, चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे. +असीरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीत इ.स पूर्व २००० मध्ये मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्याना कर्जे दिल्याचे  उल्लेख आढळतात. या संस्कृतीमधल्या शिलालेख आणि मातीच्या छोट्या टॅब्लेट्सवर कोरलेल्या हम्मुराबी सांकेतिक भाषेत बँकिंगविषयक नियमांचा  उल्लेख आढळतो. बँकिंग इतिहासातील हा सर्वात जुना उल्लेख आहे. भारतात मौर्य काळात "आदेश" नावाचे कागदपत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असते. हुंडी व्यवहाराचा हा भारतातील पहिला उल्लेख आहे.ग्रीक तसेच रोमन साम्राज्यात मंदिरात बसणारे सावकार पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे व्यवहार करत असत. +आधुनिक अधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमधील फ्लाॅरेन्स, जिनोआ, व्हेनिस या शहरांत झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील युरोपमध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोषांच्या शाखा अनेक शहरांत होत्या. १३९७साली उघडलेली जिओव्हानी मेडिची यांची मेडिची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी लेखांकनाची पद्धत शोधून काढली. +१७७० साली सुरू झालेली 'बँक ऑफ हिंदुस्तान ' ही भारतातील पहिली बँक. १८२६ साली ही बँक बंद पडली. जून १८०६मधे कलकत्ता येथे सुरू झालेली बँक ऑफ कलकत्ता हिचे नाव बदलून १८०९ मध्ये बँक ऑफ बेंगाल ठेवले गेले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४० मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास सुरू केल्या. १९२१ मध्ये या तिन्ही बँका एकत्र करून 'इम्पीरियल बँक ऑफ इंडिया ' बनवली गेली. १९५५मध्ये या बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक केले गेले +अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या खालील सुविधा ग्राहकांना दिल्या जातात +१) बचत खाते +२) चालू खाते +३) रोख पत खाते +४) विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना +५) विविध प्रकारच्या कर्ज योजना +६) सुरक्षा जमा कक्ष +७) बँक हमी +८) पत पत्र व्यवहार +९) हुंडी व्यवहार +१०) विमा विक्री +११) परदेशात पैसे पाठवणे +१२) कर संकलन +१३) देय रकमांची वसुली (इंग्लिश : Bill Collection) +१४ ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरण सुविधा diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8942.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..207797db75fd86213b31f7145b01bf5c858bd20e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8942.txt @@ -0,0 +1 @@ +पतियाळा घराणे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले एक घराणे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_896.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b10ff47fdd3397a7b48842d47db3b4dadb268b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_896.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8969.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33cf194acd5043d38c648382f461494c6a547fdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_8969.txt @@ -0,0 +1 @@ +पत्रावळ ही पळसाची पाने टाचून बनवतात.मधोमध एक पळसाचे मोठे पान ठेवून त्याभोवताली पळसाची पाने ठेवत जाऊन व त्यास बांबूच्या अतिशय पातळ शिळकांनी टाचत जाऊन साधारण गोलाकार असा आकार करण्यात येतो. पत्रावळीचा भोजन वाढण्यास करतात. लग्न प्रसंगी तसेच अनेक लोक जेवायला बसतांना याचा उपयोग होतो. नैसर्गिक साधनांपासून बनवलेली असल्याने यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही. याच प्रकारे द्रोण पण करतात. महाराष्ट्रात याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. केळीचे पानही भोजनासाठी वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_90.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_90.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b02ec461ce3241a8c3c95f87d5b165e7e77ceec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_90.txt @@ -0,0 +1,3 @@ +दॉन्या आना काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +दॉन्या आना काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9002.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9934e760ed038c9e1b107743e15cc256bc7d386f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9002.txt @@ -0,0 +1,15 @@ +पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (PGDip, PgDip, PG Dip., PGD, PgD, PDE) हे एक पदव्युत्तर शिक्षण असून ते विद्यापीठाची पदवी झाल्यानंतर देण्यात येते. ती ग्रॅज्युएट पदविका नंतर ही दिली जाऊ शकते. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम देणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बार्बाडोस, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चिली, जर्मनी, हॉंगकॉंग, जमैका, स्पेन, दक्षिण अमेरिका, भारत, आयर्लंड, नेदरलँड्स, न्यू झीलंड, नायजेरिया, फिलिपिन्स, पोर्तुगाल, रशिया, श्रीलंका, पाकिस्तान, पोलंड, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्वीडन, युनायटेड किंग्डम, आणि त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशांचा समावेश होतो. + +जर पदवीधर विद्यार्थ्यांना दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी +(Postgraduate Degree) करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर त्यांना पदव्युत्तर पदविका (Postgraduate Diploma) एक वर्षांचा कालावधी अभ्यासक्रम पूर्ण करता येते. + + +पहिला टप्पा पुर्व प्राथमिक दुसरा टप्पा प्राथमिक तिसरा टप्पा पुर्व माध्यमिक चौथा टप्पा माध्यमिक पाचवा टप्पा उच्च माध्यमिक सहावा टप्पा उच्च शिक्षण सातवा टप्पा पदव्युत्तर शिक्षण आठवा टप्पा सर्वोच्च शिक्षण. (डॉक्टरेट) असे शिक्षणाचे एकूण ८ टप्पे करण्यात आले आहेत. +ऑस्ट्रेलियन आणि न्यू झीलंड विद्यापीठे पदव्युत्तर पदविका शिक्षण (PostGradDip) देतात. पदव्युत्तर पदविका हे एक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे असे दर्शवितो. सामान्यत: पदव्युत्तर पदविका हा पदव्युत्तर पदवीच्या दोन वर्षापैकी पहिले वर्ष म्हणून मानला जातो. विद्यापीठ पदवी ही जरी आवश्यक असली तरी काही क्वचित प्रकरणांमध्ये प्रगत पदविका ही पदवी पुरेशी आहे. +कॅनडामध्ये, एक पदव्युत्तर कार्यक्रम हा दोन ते तीन सेमिस्टर्सचा असतो तर, काही वेळेस तो कमीत कमी एक वर्षात पूर्ण केला जाऊ शकतो. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचा फायदा असा होतो कि प्रबंध लिहिण्याची आणि एका संक्षिप्त विषयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नसते. हा कार्यक्रम व्यावसायिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे श्रमिक बाजारामध्ये प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यावर भर द्यावी अशी शिफारस केली जाते. प्रांत आधारीत पोस्ट-ग्रॅज्युएट पदविका, स्नातकोत्तर प्रमाणपत्र, विद्यापीठाच्या पदवी नंतरचा किंवा डी.इ.एस.एस. (क्विबेक प्रांतामध्ये ) अशी नावे बदलू शकतात. +भारतामध्ये , विविध संस्था आणि विद्यापीठे पदव्युत्तर पदविका कार्यक्रम ठेवतात.[१] पदव्युत्तर पदविका कार्यक्रम, हा मुख्यत्वे एक वर्षाचा कार्यक्रम असून प्रशिक्षण, क्षेत्रात काम आणि क्रेडिट आवश्यकता यांवर अवलंबून, दोन ते चार सेमिस्टरर्स मध्ये विभागला गेला आहे. (या कार्यक्रमामध्ये फक्त आवशक्यतेचा विचार केला जातो). अशा पदव्युत्तर पातळीच्या कार्यक्रमामध्ये आवश्यक गोष्टींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने चांगली रोजगार संधी आणि उद्योग तयारी मिळावी, यासाठी त्यांना चांगले व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण देणे हेच त्यांचे ध्येय असते. या कार्यक्रमाचा उद्देश, नवीन पद्धतीच्या संकल्पना, वैज्ञानिक सिद्धांत, नवीन पद्धती अंमलबजावणी करण्याची रीत याचं सखोल प्रदर्शन पुरवण्यासाठी केला आहे. भारतात व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये रिमोट सेन्सिंग [२] आणि जीआयएस, रोबोटिक्स[३], औद्योगिक देखभाल अभियांत्रिकी आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान[४] यांचा समावेश होतो. पदव्युत्तर पदविका कार्यक्रम प्रदान करणाऱ्या अशा काही संस्था आहेत कि ज्या पदव्युत्तर कार्यक्रमांचे क्रेडिटचे निकष 2 वर्षाच्या कमी क्रेडिटच्या अभ्यासक्रमांची संख्या वाढवून पूर्ण करतात, हे अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पदव्युत्तर पातळीशी समकक्ष मानले जातात. प्रगत तांत्रिक आकलन प्राप्त करण्यासाठी एका बॅचलर पदवी असणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटरडिसीप्लीनरी / ट्रान्सलेशनल आकलन वाढविण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट पदविका कार्यक्रम आयोजित केले जातात. +जून 2005 पासून उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण पुरस्कार परिषद यांच्यातर्फे परिषद संबंधित संस्था मध्ये पदव्युत्तर पदविकाला सन्मानित केले गेले. सुरुवातीला कला , व्यवसाय , अभियांत्रिकी आणि विज्ञान या क्षेत्रात देऊ केलेला, पदवी पदविकाच्या तुलनेत हा एक पूर्णतः व्यावसायिक प्रकार आहे. +पोर्तुगाल मध्ये पदव्युत्तर पदविका ही दोन परिस्थितीत प्रदान करण्यात येते. +1) स्वतंत्र अभ्यास कार्यक्रमाचा भाग म्हणून +2) पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाचा पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर.[५][६] +पदव्युत्तर पदविका हे एक पदव्युत्तर शिक्षण असून ते विद्यापीठाच्या पदवी नंतर घेण्यात येते . ही पदवी सहसा करून विद्यापीठ किंवा पदवीधर शाळेत दिले जाते . यामध्ये विविध क्षेत्राचे अभ्यासक्रम असून ते पूर्ण करण्यासाठी सहसा दोन किंवा अधिक अभ्यास सत्र देण्यात येतात. एका पदव्युत्तर पदविका धारक असलेल्याला पदव्युत्तर पदवी घेणे देखील शक्य आहे. फक्त शिक्षण मंत्रालय (सिंगापूर) येथे नोंदणी असलेल्या पदव्युत्तर पदविकांनाचा औद्योगिक क्षेत्राकडून वैध मानले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9009.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1faaed49900caa82d05d266660cd3fda75fe995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9009.txt @@ -0,0 +1,74 @@ +बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि [१]; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[१]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.: +, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलक व संकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.: +सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ : +रेषीय पदावली: + + + +8 +x +− +5 + + +{\displaystyle 8x-5} + +. +द्विघात पदावली: + + + +7 + + + +x + + +2 + + + ++ +4 +x +− +10 + + +{\displaystyle 7{{x}^{2}}+4x-10} + +. +गुणोत्तरीय पदावली: + + + + + + +x +− +1 + + + + + +x + + +2 + + + ++ +12 + + + + + +{\displaystyle {\frac {x-1}{{{x}^{2}}+12}}} + +. +गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ : diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9074.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69732a266c8acdfb057a067e2d715c83818cfb80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9074.txt @@ -0,0 +1,4 @@ +पद्माकर वळवी महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार होते. +व महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री होते. +सध्याच्या स्थितीतही ते राजकारणी आहेत. व आता त्यांची सुपत्री सिमा पद्माकर वळवी हे देखील राजकारणात सक्रिय झाल्या असून 2019च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये त्या अमोनी गटा मधून निवडून आल्या व सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. +पद्माकर वळवी हे उत्तर महाराष्ट्रतील कॉग्रेसचे मोठे नेते मानले जात होते, मात्र त्यांनी काँग्रेसला सोडून आता भाजप मध्ये प्रवेश केला आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9096.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b1ee97892fe063f898cc303d51e9ca94c4c5217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9096.txt @@ -0,0 +1 @@ +पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना असे पद्याचे लक्षण माधवराव पटवर्धन ह्यांनी आपल्या छंदोरचना ह्या ग्रंथात दिले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9102.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7586a53a65aee52d31be50168885b5a29f381ceb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9102.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू चांद्र पंचांगानुसार कोणत्याही वर्षातील अधिक महिन्याच्या शुक्ल एकादशीस पद्मिनी एकादशी असे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9111.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb02d2a1126c3895dba5d1d6181d8cf499149245 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9111.txt @@ -0,0 +1,8 @@ +पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे. +नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुंबई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे, खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत. +पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडी संस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारताच्या विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात, पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हे विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे. +पनवेल शहर हे गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे. प्रबळगड, कर्नाळा किल्ला हे शिवकालिन दुर्ग शहरापासुन काही अंतरावर आहेत. +२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३ % तर महिला ४७ % आहेत. शहरातील ७८ % लोक साक्षर (पुरुष ८१ %, महिला ७४ %) असून १३ % लोकसंख्या ६ वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल महानगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन काम करते. +आगरी कोळी व कराडी संकृती असलेले पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत. +पनवेल मध्ये जन्माला आलेल्या मोठ्या व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत- +पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल (वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9149.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66adb34c494ed15836e1b16a4c09aa09b94bacfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9149.txt @@ -0,0 +1,21 @@ + +कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्यांचे महत्व सांगताना कौटिल्य लिहतो, 'भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्लापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गाची संख्या फार मोठी होती व आहे.[१] +पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस २१ कि. मी. अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश १६.४८° व पूर्व रेखांश ७४.८° यावर वसलेले आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची ७०० फूट असून, पन्हाळाच्या पायथ्यापासूनची उंची २७५ फूट आहे. या गडाचा घेर ४२ मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून ३२ फूटापर्यंत तयार केली आहे. काही ठिकाणी तो १५ ते ३० फूट उंचीची दगडानी बांधलेली तटबंदी आहे." तटाची रुंदी सर्वसाधारणपणे ५ फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती १५ फूट रुंदीची ठेवण्यात आली आहे. अशा ठिकाणी आत एक व बाहेर एक असे दुहेरी तट आहेत. डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची. पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला हा उभारला जातो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत. कारण, या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी व भोगावती या नद्यांनी हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर 'सादोबा तलाव' व 'सोमाला तलाव' हे अदिलशहाच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळयावर अनेक विहीरी आहेत यात उल्लेखनीय विहीरी 'कर्पुर बाव' (अश्वलायन तीर्थ), 'अंधार बाव' (श्रीनगर / शृंगारबाव), श्री सभाजी मंदीरातील विहीर इत्यादी आहेत. त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही.[२] +पन्हाळगड हा वेगवेगळया राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गडाची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळतात. पन्हाळगडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यापाठीमागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की, पन्हाळगडावर पराशर ऋषीनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सुचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला, तेंव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ 'पन्नगालय' (पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर) यावरून या गडास 'पन्नगालय' असे नाव पडले. जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषन कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हटले आहे. ग्रैंडप च्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख 'पनाला' असा करण्यात आला आहे. तर मेजर ग्रॅहमने पन्हाळगडाचा उल्लेख 'पनाला' किंवा 'पुनाला' असा केला आहे.[३][४] + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. व पाली भाषेतील आहे.येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. +मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. +६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. +चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजामार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. +गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे +गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. +जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते. +येथील झुणका-भाकरी सुप्रसिद्ध आहे . +कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो. +कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा kmt बस स्टॅंड येथुन kmt बस मधुन पन्हाळा तीन दरवाजा येथे अर्ध्या तासात पोहचते . +पन्हाळा या पिकनिक पॉइंटला यायचे असे : +कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल उद्यानापासून २२ किलोमीटर इतके पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानकातून दर ४५ मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमाणसी २६ रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास एक ते दीड हजार रुपये खर्च येईल. कोल्हापूरमधून अंतर : २३ किलोमीटर व जाण्यासाठी लागणारा वेळ ४० मिनिटे. राहण्याची सोय आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे. +गडाबद्दलची माहिती : पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडवदरा, सोमेश्वर तलाव, आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजीने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते. सह्याद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_917.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1695e67894b83e6c83cddb89c63dcd4894b2050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_917.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोराकाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9170.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8d2627b9809ac95ff30c8ecdc9dfee3f701695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9170.txt @@ -0,0 +1,4 @@ +पन्हाळ्याची लढाई जून १७१९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झाली. ही लढाई पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्यात झाली. या लढाईत यशवंतरावाचा पराभव झाला आणि त्यातच तो मृत्यू पावला. +मे १७१९मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ दिल्लीतून सनदा प्राप्त करून साता-यात आले. त्यावेळेस छत्रपती शाहूंनी बाळाजींना कोल्हापूरकर छत्रपती संभाजींचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण मोहीम सांगितली. तेव्हा बाळाजीने अष्टप्रधानातील पिलाजी जाधवराव, काही मंत्री आणि सैन्य घेऊन दक्षिणेत कूच केली. +त्यावेळेस वारणा खो-याचा प्रदेश हा सातारा व कोल्हापूर राज्याच्या सीमेलगतचा महत्त्वाचा प्रदेश होता. आष्ट्याचे ठाणे हे वारणा खो-यातील मुख्य ठिकाण होते, म्हणून बाळाजीने आष्ट्याच्या ठाण्यावर हल्ला करण्याचे योजिले. त्यावेळेस वारणा खो-याचा प्रदेश आणि आष्ट्याचे ठाणे हे कोल्हापूरकर छत्रपतींच्या मंत्रीमंडळातील यशवंतराव थोरात याच्या ताब्यात होता. तेव्हा यशवंतराव विजापूर प्रांतात मोहीमेवर होता. त्याला बाळाजीच्या हल्ल्याची माहिती समजताच तो स्वतःच्या सैन्यासहीत आष्ट्याच्या ठाण्यात आला. बाळाजीच्या हल्ल्याची बातमी कोल्हापूरकर छत्रपतींना कळवण्यासाठी काही सैन्य आष्ट्याच्या ठाण्यात ठेवून यशवंतरावाने पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. बाळाजीने आणि पिलाजीने आष्ट्याच्या ठाण्याला वेढा घातला. काही दिवसातच आष्ट्याचे ठाणे काबीज झाले. +पन्हाळ्याची लढाई झाल्यानंतरही बाळाजीने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. परंतु लढाईत झालेल्या हानीमुळे बाळाजीला माघार घ्यावी लागली. या लढाईनंतर शाहु आणि कोल्हापुरकर संभाजी यांच्यात यह. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9172.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..def78e9e5b0f77bd048738a21dde007d948bc48b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9172.txt @@ -0,0 +1,24 @@ +पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. +हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात. +पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कूळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे +पपईचा औषधी उपयोग आहे. +पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. +पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले. +उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. +पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. +आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते. +धूळ व धूरामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते. +आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते. + +पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. +पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय विकारामध्ये उपयोगी असतो. +दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. +कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. +मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते. पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. +तसेच आंबट ढेकर येण बंद होते. +खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते. +कच्चा पपईचा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात. पपई पांढऱ्या पेशींची वाढ करणारी आहे. +गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो. +पपई हे पित्तनाशक फळ आहे. ज्या लोकांना कायम पित्त होते अश्या लोकांनी पपई खाण्याचे फायदे असे कि त्यांचे पित्त कमी होते आणि पित्ताचा त्रास होत नाही. +पपई खाल्याने यकृताला आलेली कमजोरी कमी होते. पपई मुळे यकृताला ताकद येते आणि यकृत मजबूत बनते. +पपई हे जंतुनाशक फळ आहे. पोटात जर जंत झालेले असतील तर पपई खा, पोटातील जंत नष्ट होतील.https://www.shaikhdoctor.com/2022/02/Papai-khanyache-fayde.html diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9197.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3d08442220766ade99e2dab56d80f58785d71b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9197.txt @@ -0,0 +1,2 @@ +O=Br(=O)(=O)OInChI=1S/BrHO4/c2-1(3,4)5/h(H,2,3,4,5) YKey: LLYCMZGLHLKPPU-UHFFFAOYSA-N YInChI=1/BrHO4/c2-1(3,4)5/h(H,2,3,4,5)Key: LLYCMZGLHLKPPU-UHFFFAOYAZ +परब्रोमिक आम्ल हे हायड्रोजन, ऑक्सिजन व ब्रोमिन यांपासून एक शक्तिशाली पण अस्थिर आम्ल असून त्याचे रासायनिक सूत्र HBrO4 आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9233.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e86989a4c571827715136d81dd142daf81feb727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9233.txt @@ -0,0 +1,3 @@ +परदेशी चलन नियंत्रण कायदा १९७३ (इंग्लिश: Foreign Exchange Regulation Act (FERA), 1973) भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी चलन नियंत्रण १९३९ अंमलात आला. इ.स. १९४७ साली त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. १९७३ साली त्याजागी हा कायदा[१] भारत सरकारने इ.स. १९७३ मध्ये पास केला व तो जानेवारी १ इ.स. १९७४पासून अमलात आला. +भारतीयांकडून परदेशी चलनात देणी देणे, परदेशी रोख्यांशी संबंधित व्यवहारांवर नियंत्रण ठेवून, उपलब्ध परदेशी चलनाचा भारताच्या आर्थिक विकासाला गती मिळेल अशा दृष्टीने अधिकाधिक कार्यक्षम रितीने वापर करून घेणे. +....... diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_929.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8075bc4a70836f9cc2178e66df9ec9f9753b1ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_929.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५१२ असलेले धानोरे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील २४३.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ११४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ५६४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मारवड येथे आहे. माध्यमिक शाळा मारवड येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9290.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e71432ad74c5be8190dea3c74e4f3a5ff0b78c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9290.txt @@ -0,0 +1 @@ +परमार्थलिंग थनुलिंग नाडर (फेब्रुवारी १७, इ.स. १९१५-नोव्हेंबर २, इ.स. १९८८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.ते इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील नागरकॉईल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9312.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf1538b7924449c444c97bb4f952276bf4a6533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9312.txt @@ -0,0 +1,2 @@ +परळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9322.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a2cc6e75ed4be3e25fa71573bb12576931a8ad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9322.txt @@ -0,0 +1 @@ +परळी वैजनाथ रेल्वे स्थानक हे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण झोनमधील सिकंदराबाद रेल्वे विभागांतर्गत येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_936.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b39a82853091327cfb3687cb2253984679902be --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_936.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9364.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0ec42eaac51f3bbda5e344c96b9ce61d1b7376 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9364.txt @@ -0,0 +1,23 @@ +प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू +परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[१] त्यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [२] +जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. +त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. +त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. +त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. या युद्धात कोणाचाही विजय झाला नाही शेवटी भगवान शंकरानी यामधे मध्यस्थी करून युद्धात थांबवले, तरीही भीष्मांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. +परशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. [३]सबंध भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत. +केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.[३] तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.[४] +परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी--- +"एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला." +या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. +परशुराम मंदिरामध्ये एक सजवलेला पलंग असून, त्यावर सोनेरी चादर व इतर सामान आहे आणि परशुरामांची प्रतिमा आहे. पलंगाच्या चारही बाजूला रॉड लावलेले आहेत. असं म्हणतात की, हा पलंग अतिशय रहस्यमय आहे. कारण रोज सकाळी पलंगावरील चादर चुरगळलेली दिसते. +या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव आहे. परशुरामांचा जन्म अक्षय्य तृतीयेचा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे. +महाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[५] +दापोली तालुक्यात आडे या गावी पेशवेकालीन मंदिर आहे, येथे रेणुकामाता, परशुराम, रामेश्वर, गणपती, वेताळ, मारुती, शनी अशी सात मंदिरे आहेत. +माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.[६] +उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे. +परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला. +अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । +इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।। +अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम.[७] +परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते. भगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातल्या परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात असे सांगितले जाते. +पहा :जयंत्या diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9365.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0ec42eaac51f3bbda5e344c96b9ce61d1b7376 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9365.txt @@ -0,0 +1,23 @@ +प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू +परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[१] त्यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [२] +जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. +त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. +त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. +त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. या युद्धात कोणाचाही विजय झाला नाही शेवटी भगवान शंकरानी यामधे मध्यस्थी करून युद्धात थांबवले, तरीही भीष्मांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. +परशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. [३]सबंध भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत. +केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.[३] तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.[४] +परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी--- +"एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला." +या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. +परशुराम मंदिरामध्ये एक सजवलेला पलंग असून, त्यावर सोनेरी चादर व इतर सामान आहे आणि परशुरामांची प्रतिमा आहे. पलंगाच्या चारही बाजूला रॉड लावलेले आहेत. असं म्हणतात की, हा पलंग अतिशय रहस्यमय आहे. कारण रोज सकाळी पलंगावरील चादर चुरगळलेली दिसते. +या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव आहे. परशुरामांचा जन्म अक्षय्य तृतीयेचा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे. +महाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[५] +दापोली तालुक्यात आडे या गावी पेशवेकालीन मंदिर आहे, येथे रेणुकामाता, परशुराम, रामेश्वर, गणपती, वेताळ, मारुती, शनी अशी सात मंदिरे आहेत. +माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.[६] +उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे. +परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला. +अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । +इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।। +अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम.[७] +परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते. भगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातल्या परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात असे सांगितले जाते. +पहा :जयंत्या diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9368.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050abfda6e61c23e6f9f9b718f876f1012953a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9368.txt @@ -0,0 +1,4 @@ +परशुराम नारायण गोडबोले (१७९९:वाई, महाराष्ट्र - १८७४:पुणे) हे संस्कृत पंडित व मराठी लेखक होते. त्यांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील पावस गोळप हे होते. त्यांचे शिक्षण वाईला झाले. त्यानंतर ते पुण्याला आले व जोगांच्या पेढीवर कारकून म्हणून काम करू लागले. हे काम करीत असतानाच गोडबोले मराठी काव्यांचा भाषादृष्ट्या अभ्यास करीत. तेथेच त्यांचा परिचय कॅप्टन थाॅमस कॅंडी यांच्याशी झाला. इ.स. १८५५ सालीं जेव्हां कॅंडीला मराठी ट्रान्सलेटरचे पद मिळाले तेव्हा त्याने परशुरामतात्यांची नेमणूक आपला खास पंडित म्हणून केली. ह्या जागेवर तात्या अखरेपर्यंत होते. +माधव चंद्रोबांना त्यांचे 'सर्वसंग्रह' नावाचे संपादित ग्रंथ लिहिण्यास परशुराम गोडबोले यांची मदत होत असे. +त्यांना परशुरामतात्या गोडबोले, परशुरामपंत गोडबोले, पंततात्या गोडबोले या नावांनीही ओळखले जायचे. +याशिवाय, परशुरामपंत गोडबोले यांनी कादंबरीसार, नामार्थदीपिका, पाठावली, बालबोधामृत, मराठ्यांच्या इतिहासावर सोप्या कविता, वृत्तदर्पण, इत्यादी पुस्तकेही लिहिली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9370.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f65b5fa2ed7acce0aeedc475923c13246b8a900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9370.txt @@ -0,0 +1,2 @@ +परशुराम जन्मोत्सव (जयंती नाही ) भगवान परशुराम हे चिरंजीव आहेत . ही भगवान परशुराम याची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते.वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते. प्रदोषकाली परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते. +१. भारतीय संस्कृती कोश खंड १. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9376.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050abfda6e61c23e6f9f9b718f876f1012953a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9376.txt @@ -0,0 +1,4 @@ +परशुराम नारायण गोडबोले (१७९९:वाई, महाराष्ट्र - १८७४:पुणे) हे संस्कृत पंडित व मराठी लेखक होते. त्यांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील पावस गोळप हे होते. त्यांचे शिक्षण वाईला झाले. त्यानंतर ते पुण्याला आले व जोगांच्या पेढीवर कारकून म्हणून काम करू लागले. हे काम करीत असतानाच गोडबोले मराठी काव्यांचा भाषादृष्ट्या अभ्यास करीत. तेथेच त्यांचा परिचय कॅप्टन थाॅमस कॅंडी यांच्याशी झाला. इ.स. १८५५ सालीं जेव्हां कॅंडीला मराठी ट्रान्सलेटरचे पद मिळाले तेव्हा त्याने परशुरामतात्यांची नेमणूक आपला खास पंडित म्हणून केली. ह्या जागेवर तात्या अखरेपर्यंत होते. +माधव चंद्रोबांना त्यांचे 'सर्वसंग्रह' नावाचे संपादित ग्रंथ लिहिण्यास परशुराम गोडबोले यांची मदत होत असे. +त्यांना परशुरामतात्या गोडबोले, परशुरामपंत गोडबोले, पंततात्या गोडबोले या नावांनीही ओळखले जायचे. +याशिवाय, परशुरामपंत गोडबोले यांनी कादंबरीसार, नामार्थदीपिका, पाठावली, बालबोधामृत, मराठ्यांच्या इतिहासावर सोप्या कविता, वृत्तदर्पण, इत्यादी पुस्तकेही लिहिली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9393.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192a279c878cd8dec40115eb4ed85595e2583754 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9393.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७८ असलेले परसवाडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४७२.३३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ५३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २२४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा दूधमाळा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_94.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_94.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bff24042ae91640beecda2c6b79e3dce0e08115 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_94.txt @@ -0,0 +1 @@ +दॉमिंगो जॉन्ही व्हेगा उर्झुआ तथा अमेरिको (डिसेंबर २४, इ.स. १९७७:अरिका, चिले - ) हा चिलेचा गायक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9403.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83dd144947903954630493ecfe40f1cb0559eaa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9403.txt @@ -0,0 +1,2 @@ + परसोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9415.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a529e04a2a52772c343d803ee7f57707b9d28a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9415.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° १८′ ००″ N, ७५° २९′ ००″ E +ऐनापूरवाडी आलेश्वर आनाळा आंधोरा आंधोरी अरणगाव (परांडा) आसु आवारपिंपरी [[बंगाळवाडी]बावची (परांडा) भांडगाव (परांडा) भोईंजा भोत्रा बोडखा (परांडा) ब्रह्मगाव (परांडा) चिंचपूर बुद्रुक चिंचपूर खुर्द दहिटणा (परांडा) देवगाव बुद्रुक देवगाव खुर्द देऊळगाव (परांडा) ढगपिंपरी धोत्री (परांडा) डोमगाव डोंजा दुधी (परांडा) घारागाव गोसावीवाडी (परांडा) हिंगणगाव बुद्रुक (परांडा) हिंगणगाव खुर्द (परांडा) इनगोंदा जगदाळवाडी (परांडा) जेकटेवाडी जाकेपिंपरी जामगाव (परांडा) जावळा (परांडा) काळेवाडी (परांडा) कंडारी कांदलगांव कपिलापुरी कारंजा (परांडा) कार्ला (परांडा) काटेवाडी (परांडा) कात्राबाद कौंडगाव खानापूर (परांडा) खांडेश्वरवाडी खासापुरी खासगाव (परांडा) कोकरवाडी कुक्कडगाव कुंभेजा कुंभेफळ लाखी (परांडा) लोहारा (परांडा) लोणारवाडी (परांडा) लोणी (परांडा) मलकापूर (परांडा) माणिकनगर (परांडा) मुगाव (परांडा) नालगांव पाचपिंपळा पांढरेवाडी (परांडा) परांडा पारेवाडी (परांडा) पिंपळवाडी (परांडा) पिंपरखेड (परांडा) पिस्तामवाडी पिठापुरी राजुरी (परांडा) रत्नापूर (परांडा) रोहकळ (परांडा) रोसा रूई (परांडा) साकत बुद्रुक साकत खुर्द सक्करवाडी सरणवाडी सावरदरवाडी शेळगाव (परांडा) शिराळा (परांडा) सिरसाव सोनारी (परांडा) सोनगिरी (परांडा) टाकाळी (परांडा) ताकमोडवाडी तांदुळवाडी (परांडा) उंडेगांव (परांडा) वाडीराजुरी वडनेर (परांडा) वाकडी (परांडा) वाणेवाडी (परांडा) वांगेगव्हाण वाटेफळ येणेगाव +परंडा किल्ला - +ऐतिहासिक पार्श्वभूमी : +परंडा किल्ला परंडा शहरात स्थित आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.[१] + • लोणी  • डोंजा  • शेळगाव  • अनाळा  • जवळा diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9425.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a321f94c5195ea4eefdfdc7b9e11f8c4fcdba7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9425.txt @@ -0,0 +1 @@ +पराग मधुसूदन आळवणी मराठी राजकारणी आहेत. हे विले पार्ले मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9445.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f89593ec6d7ee5ecc7b1ee823cbf13a28c9aa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9445.txt @@ -0,0 +1,2 @@ +परातपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9460.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9460.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9470.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaeeb104200046b5d388875f80f98e341cd1aa27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9470.txt @@ -0,0 +1,3 @@ +परिणय फुके (५ जानेवारी, १९८१ - ) हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार होते.[१] +फुके यांनी राज्यस्तरावर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केले. +हे २००७ मध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ४००० मतांच्या आधिक्याने जिंकले. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9489.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e7d84361adc69cd9344c9e4dc204a9a1067488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9489.txt @@ -0,0 +1,4 @@ + +परिनिर्वाण स्तूप हा उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर येथील एक बौद्ध विहार आहे. हे ठिकाण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.[१] याला महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही संबोधिले जाते.[२][३] +अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, व गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध केले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग)च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत उत्तर दिशेला उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने निद्रावस्थेत पडलेली दिसते. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडी पलंगावर ठेवलेला आहे.[४] +बुद्धांच्या ह्या वर्षांच्या धम्मप्रचाराच्या घडामोडीनंतर, बुद्ध गंभीर अवस्थेत कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला आपले शेवटचे शब्द उच्चारून इ.स.पू. ४८४ मध्ये महापरिनिर्वाण केले. मौर्य राजा अशोक यांनी इ.स.पू. २६० मध्ये कुशीनगरला भेट दिली व तेथे त्यांनी बुद्धांच्या निर्वाणाच्या स्थानाशी संबंधित अनेक पवित्र स्थळे - चैत्ये व स्तूपे बांधली.[५] पुढे कुषाण साम्राज्याच्या दरम्यान कुशीनगरचे महत्त्व वाढले, तर गुप्त साम्राज्याच्या काळात (इ.स. ३२० - ६४७ मध्ये) कुशीनगरने सुवर्णयुग पाहिले. तेव्हा ह्या परिनिर्वाण स्तूपाचा मोठा विस्तार होऊन त्यात विशाल बुद्ध पुतळा स्थापून परिनिर्वाण विहार पुनः उभारला गेला. कुशीनगर येथील हा विहार इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून पवित्र स्थळ म्हणून मान्यता पावला आहे.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9495.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ecbbdef96ad89d72a84eb9f06468286da71d52f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9495.txt @@ -0,0 +1,16 @@ +त्रिकोणाची परिमिती = तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज +टीप : वर्तुळाच्या परिमितीला परीघ म्हणतात. +a = मोठी त्रिज्या; b = छोटी त्रिज्या. +Approximation 1 : +This approximation is within about 5% of the true value, so long as `a' is not more than 3 times longer than `'`b' (in other words, the ellipse is not too "squashed"): +ellipse perimeter (approx) = 2pi into square root of [(a squared+b squared)/2]. +उदा० a = १०; b = ६. तर परिमिती = ५१.८१२४७३३७.(approximate). +Approximation 2 : +ellipse perimeter (approx) = pi into [ 3(a+b) - square root of ((3a+b)(a+3b))] +उदा० a = १०; b = ६. तर परिमिती = ५१.०५३९७२७९.(approximate). +The famous Indian mathematician Ramanujan came up with this better approximation : +Approximation 3 : +रामानुजमचे सूत्र : First we calculate "h": +h = (a-b)2/(a+b)2 +Then, ellipse perimeter (approx) = pi(a+b)(1 + 3h/(10+square root of (4-3h)) +उदा० a = १०; b = ६. तर परिमिती = ५१.०५३९९७७३ (Most accurate) diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9500.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a81aa588f4b265b2c563bbe514db14bc393bcc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9500.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + +भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9509.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd5c0bedabcae0f6520de7dd9093c5b7336211f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9509.txt @@ -0,0 +1,2 @@ + +परी तेलंग (जन्म १२ फेब्रुवारी १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आणि आवाज कलाकार आहे जिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांमध्ये काम केले आहे. स्टार प्रवाहच्या लक्ष्य मधील सब-इन्स्पेक्टर दिशा सूर्यवंशी या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते. तिने मोरया आणि गुलदस्ता या चित्रपटात काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9526.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9aaf265639e66120df59dd59eac405452752ff1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9526.txt @@ -0,0 +1 @@ +परेड ग्राऊंड हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9532.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bb6b061339937b8b434c21907e23b10cab47463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9532.txt @@ -0,0 +1,3 @@ +परेश रावळ (जन्म ३० मे १९५५) हे एक भारतीय अभिनेते, विनोदी अभिनेते, चित्रपट निर्माते आणि राजकारणी आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत. +रावल हे सन २०१४ पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. इ.स. २०१४ मध्ये रावळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[२] ते २४० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहेत आणि त्याना विविध पुरस्कार मिळाले आहेत. १९९४ मध्ये, 'वो चोकरी' आणि 'सर' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नंतरच्यासाठी, त्याना नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. यानंतर केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली, या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली. +रावल यांचा जन्म मुंबई येथे झाला. १९७९ मध्ये अभिनेत्री आणि मिस इंडिया स्पर्धेची विजेती स्वरूप संपत यांच्याशी त्यांचे लग्न झाले. परेश आणि स्वरूप यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुले आहेत. ते नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9537.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4830825947e1a0f7cdaa4adaa4b2ba343400f6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9537.txt @@ -0,0 +1,3 @@ +पर्किन्स काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पर्किन्स काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9550.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1688a5a2762900af35c1b05f4bfad976943cf73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9550.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता १,५०,००० डॉलर्सची देणगी दिली म्हणुन त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. पर्ड्यू विद्यापीठाचे पहिले वर्ग सप्टेंबर १६ १८७४ रोजी ३ इमारतींमध्ये ६ शिक्षक व ३९ विद्यार्थ्यांमध्ये भरवले गेले. +पर्ड्यू विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वांत महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. क्रॅनर्ट व्यापारमहाविद्यालय हे देखील देशातील सर्वोत्कृष्ट व्यापारमहाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २००हून अधिक विषयांमध्ये पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळते. +नील आर्मस्ट्रॉंग, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अतंराळवीर तर युजीन सेर्नन, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अतंराळवीर हे दोघेही पर्ड्यू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9551.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1688a5a2762900af35c1b05f4bfad976943cf73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9551.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता १,५०,००० डॉलर्सची देणगी दिली म्हणुन त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. पर्ड्यू विद्यापीठाचे पहिले वर्ग सप्टेंबर १६ १८७४ रोजी ३ इमारतींमध्ये ६ शिक्षक व ३९ विद्यार्थ्यांमध्ये भरवले गेले. +पर्ड्यू विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वांत महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. क्रॅनर्ट व्यापारमहाविद्यालय हे देखील देशातील सर्वोत्कृष्ट व्यापारमहाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २००हून अधिक विषयांमध्ये पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळते. +नील आर्मस्ट्रॉंग, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अतंराळवीर तर युजीन सेर्नन, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अतंराळवीर हे दोघेही पर्ड्यू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9556.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b39dc86fe6a332bf30089dfabbbbe0652fc52aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9556.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 31°57′8″S 115°51′32″E / 31.95222°S 115.85889°E / -31.95222; 115.85889 + +पर्थ ही ऑस्ट्रेलिया देशाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. पर्थ हे ऑस्ट्रेलियातील चौथे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना इ.स. १८२९ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे वाजूक नुगर नावाची आदिवासी जमात नांदत होती. +वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खनिज उद्योगामुळे या शहराची अतिशय वेगाने वाढ होत आहे. +पर्थ मधील क्रिकेटचे मैदान वाका या नावाने ओळखले जाते. या मैदानाची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी असल्याचे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9570.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd332b9e7f36695ac03549c1352aeaeb3b5103fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9570.txt @@ -0,0 +1,4 @@ +परमनंट अकाउंट नंबर (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.[१][१] +पॅनचे उदाहरण:ARLPA0061H. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी : +परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते. +पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9571.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a99c6973e4305aaf08ccae62167064153ff26c92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9571.txt @@ -0,0 +1,3 @@ +आपल्या नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागांस भेट देणारा व काही काळ तेथे वास्तव्य करणारा प्रवासी हा पर्यटक होय. +पर्यटकाची प्रवास करण्याची कारणे: +मनोरंजन किंवा विरंगुळा, शिक्षण, वैद्यकीय उपचार, धार्मिक विधी इत्यादी. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9593.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34e82eca7fbd17d87ed57cffca75520e65d32424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9593.txt @@ -0,0 +1,4 @@ +पर्यावरणपूरक किंवा परिमैत्रीपूर्ण ही संज्ञा परिसंस्थापूरक या अर्थाने मानवी वर्तनाला, कृतीला किंवा उत्पादनांना लावली जाते. या संज्ञेतून पृथ्वीवरील सजीवांना अपाय होणार नाही, परिसंस्थेतील कोणत्याही घटकावर दुष्परिणाम होणार नाही, असे मानवी वर्तन किंवा कृती असणे अभिप्रेत आहे. ही संज्ञा प्रामुख्याने ऊर्जा, जल व मृदा अशा नैसर्गिक संसाधनांच्या संधारणाच्या कृतीसाठी वापरली जाते. +मुळात पर्यावरणपूरक (environment friendly) आणि परिसंस्थापूरक किंवा परिमैत्रीपूर्ण (eco friendly) हे दोन वेगवेगळे विषय असून बहुतेक वेळा या दोन्हींचा पर्यावरणपूरक असाच अर्थ घेतला जातो. पर्यावरण (environment) हे आपल्या भोवताली असलेले सर्व सजीव (सर्व जीव) आणि निर्जीव (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांच्या मिश्रणातून बनते. तर परिसंस्था (ecology) म्हणजे अजैविक आणि जैविक घटक यांचा एकमेकांसोबत असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होत. या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणातून जैवविविधता, अन्नसाखळी ईत्यादिंची निर्मिती होते. यातून सजीवसृष्टीस पोषक असे पर्यावरण तयार होते. प्राचीन काळातील मानव हा निसर्गाचे नियम पाळत होता, ज्यामुळे निसर्ग तसेच पर्यावरण सुरक्षित होते.[१] +परिमैत्रीपूर्ण उत्पादन पर्यावरणपूरक असते. अशा उत्पादनांमुळे जल, भूमी आणि मृदा यांच्या प्रदूषणास प्रतिबंध होतो. संसाधनांच्या वापरासाठी योग्य जाणीव ठेवून तसे कार्य करणे अशा कृतींची सवय असणे, हे परिमैत्रीचे वर्तन होय. +पर्यावरण व मानवी जीवन यांची सुरक्षा लक्षात घेऊन परिमैत्र उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने विषारी नसतात. शाश्वत रीत्या वाढणारे, वाढविल्या जाणाऱ्या घटकांचा वापर करणे आणि परिसंस्था टिकून राहतील अशा रीतीने उत्पादने घेणे, हे परिमैत्रीमध्ये घडते. यात सेंद्रिय घटक किंवा पदार्थांची वाढ ही विषारी कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर न करता केलेली असते. काही उत्पादने काच, लाकूड, धातू किंवा प्लॅस्टिक ही पुनर्चक्रीकरणाने तयार होतात. त्यांच्या अपशिष्टापासून नव्या वस्तू वापरासाठी तयार केल्या जातात. स्वतःजवळील असलेल्या संसाधनांचा कमीत कमी वापर करून परिमैत्रीपूर्ण सवयी जोपासता येतात.[२][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9630.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ecf13562c4c9787c0354f85d2b2cde6905a0718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9630.txt @@ -0,0 +1,2 @@ +पर्वती विधानसभा मतदारसंघ - २१२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पर्वती मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२७ ते ३०, ३२ ते ४०, ४२, ८६ ते ९०, १५० यांचा समावेश होतो. पर्वती हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सतीश मिसाळ ह्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9654.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78bad9bd0ae8540735eb2422c61e3b7e283dec55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9654.txt @@ -0,0 +1 @@ +पर्सिस खंबाटा (२ ऑक्टोबर, इ.स. १९४८ - १८ ऑगस्ट, इ.स. १९९८) ही मॉडेल तसेच हॉलिवूडमधील कलावंत व लेखिका होती.[१] मिस इंडिया हा किताब इ.स. १९६५ साली मिळविल्यानंतर हॉलिवूड येथे स्थायिक झालेल्या पर्सिसने स्टार ट्रेक तसेच अन्य चित्रपटात अभिनय केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9662.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ec638f9a3eb13332860412a45870f194623fb9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9662.txt @@ -0,0 +1,2 @@ +पर्सी लुइस (२ ऑक्टोबर, १८८४:केपटाउन, केप वसाहत - ३० जानेवारी, १९७६:दर्बान, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9665.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7643eaab20cad3dfdf886dcbc92286f4fb24c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9665.txt @@ -0,0 +1,2 @@ +पर्सी जॉर्ज हर्बर्ट फेंडर (ऑगस्ट २२, इ.स. १८९२:बॅलहॅम, लंडन, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:एक्झेटर, डेव्हन) हा  इंग्लंडकडून १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9666.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7643eaab20cad3dfdf886dcbc92286f4fb24c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9666.txt @@ -0,0 +1,2 @@ +पर्सी जॉर्ज हर्बर्ट फेंडर (ऑगस्ट २२, इ.स. १८९२:बॅलहॅम, लंडन, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:एक्झेटर, डेव्हन) हा  इंग्लंडकडून १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9679.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf202de3e261488ca811fbff7d77780919f3d0be --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9679.txt @@ -0,0 +1 @@ +पर्सेफनी (ग्रीक : Περσεφόνη) ही ग्रीक प्राक्कथांमधील झ्यूस व सुगीची देवता डिमिटर यांची कन्या आणि ग्रीक अधोलोकाची राणी आहे. पर्सेफनी हेडीसची पत्नी असून हिचा संबंध वनस्पतींच्या प्रजननाशी लावला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9692.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e763cd6b89341ff1326ae1d3ec11d9a69a225db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9692.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख पलवल जिल्ह्याविषयी आहे. पलवल शहराबद्दलचा लेख येथे आहे. +पलवल हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पलवल येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9705.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3f79aa6377747b2645b29e191fb2abd047ecc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9705.txt @@ -0,0 +1 @@ +पलानी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9718.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1c79db467da2e9e0dc56c53182a1d4727ea6368 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9718.txt @@ -0,0 +1,5 @@ +पलाश सेन (बंगाली: পলাশ সেন ; रोमन लिपी: Palash Sen) (२३ सप्टेंबर, इ.स. १९६५ ; वाराणसी, उत्तर प्रदेश - हयात) हा बंगाली-भारतीय गायक, रॉक संगीतकार, अभिनेता, डॉक्टर आहे. हा युफोरिया या भारतीय रॉक बॅंडचमूतील एक गायक आहे. रॉक संगीतासोबतच याने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिकाही रंगवल्या आहेत. शिक्षणाने व पेशाने तो वैद्यकशास्त्रातील डॉक्टर आहे. +पलाश सेन पेशाने वैद्य असून त्याने दूरदर्शन वरील विविध कार्यक्रमात गुरूंची भूमिका साकार केली आहे. +एक्स फॅक्टर या संगीत गुरुकुल कार्यक्रमात त्याने मुख्य गुरूची भूमिका निभावली आहे. +सेन याने फिलहाल या इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात नायकाची भूमिका केली. इ.स. २०१० सालातल्या मुंबई कटिंग या हिंदी चित्रपटातही त्याने अभिनय केला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9734.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88467bf7303b05941db1f58a1b3ef7628e2dbe08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9734.txt @@ -0,0 +1 @@ +कँडी श्रीलंकेतील एक प्रमुख शहर आहे. हे श्रीलंकेतील मध्य प्रांत भागातील प्राचीन शहर आहे. सन १९८८ मध्ये या शहराला जागतिक वारसा स्थान घोशीत केले गेले.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9754.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..810095c01844da1418266114b45aee43289ce117 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9754.txt @@ -0,0 +1 @@ +पल्लीपूरम भारताच्या केरळ राज्यामधील अलेप्पी शहराजवळचे छोटे गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_978.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c885cfa2291ef7f63db4f0f926efe378db5b505d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_978.txt @@ -0,0 +1 @@ +धामणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9783.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c77349c7ef6afacd2a415394c50547bfe2f5ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9783.txt @@ -0,0 +1,19 @@ +पळशीण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळीरस्त्याने गेल्यानंतर दापट-राजवाडा-कोगदे -पाटीलपाडा-अनंतनगरनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५ कुटुंबे राहतात. एकूण २२८ लोकसंख्येपैकी ११२ पुरुष तर ११६ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.२० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५३.१९ आहे तर स्त्री साक्षरता ३८.८९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.३० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +भागाडा, खारोंदा, तिलोंदे, चांभारशेत, पिंपळशेत, देवगाव, देहरे, पिंपरुण, दाभोसे, वाडोळी, हिरडपाडा ही जवळपासची गावे आहेत.दासकोड ग्रामपंचायतीमध्ये भागाडा, दासकोड, मोर्चाचापाडा आणि पळशीण गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9784.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef617a4660ab0dff83894bedc65ac6112c07832a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9784.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळशीण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9786.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b60148b718d29fb6f3307a67726062b8bda64bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9786.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळशीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9789.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0073839a9ef2fd181120401b043ce0f640b49510 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9789.txt @@ -0,0 +1,3 @@ +पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो. भारतात या झाडास वसंत ऋतूत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३) या दिवशी याच्या पत्रावळींचा वापर विदर्भात जरूर होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समूहातच असतात, यावरून पळसाला पाने तीनच ही म्हण मराठी भाषेत रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार आणि रंग असतो. संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते . +ही वनस्पती बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हियेतनाम, मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये वाढते. +हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9815.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bfe6f8991c63e889c57dfc0204c5b1978717d8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9815.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9816.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bfe6f8991c63e889c57dfc0204c5b1978717d8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9816.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9830.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c0a5ea904207dc3323fa22eddbde34b5a30bbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9830.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळसवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9831.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c0a5ea904207dc3323fa22eddbde34b5a30bbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9831.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळसवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9843.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b462eb48c7c00578e4cc47c781fa91fc5db9b09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9843.txt @@ -0,0 +1,4 @@ +पळस्पे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ आणि ४ च्या तिठ्यावर वसलेले आहे. +येथून २५ किमी अंतरावर न्हावा शेवा बंदर विकसित झाल्यावर येथील सगळ्या शेतजमिनी व कुरणांवर कंटेनर डेपो झाले आहेत. + पळस्पे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9859.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0ef8de37d00b1e8e623568e2108b17ba8ca4eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9859.txt @@ -0,0 +1 @@ +पवन मावळ किंवा पौन मावळ हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. तत्कालिन पौन मावळात ८० गावे होती. पवना ही ह्या भागातील मुख्य नदी. ह्या नदीवरूनच ह्या भागास पवन किंवा पौन मावळ हे नाव पडले आहे. पौन मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही थोडी गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण , मोरवे ही गावे ; पूर्वेला चांदखेड , बेबडवोहोळ तर दक्षिणेला दखणे , सावरगाव ह्या पवन मावळच्या सीमा होत्या. शिंदे देशमुख व भोपतराव घारे देशमुख हे पौनमावळचा कारभार पाहणारे वतनदार होते. तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे ह्या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंतसचिवांच्या भोर संस्थानात होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9873.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..769a9ccf931f0b30b701d6dc4837b8d99d38444a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9873.txt @@ -0,0 +1,43 @@ +पवना नदी पुणे व पिंपरी चिंचवड येथून वाहणारी एक नदी आहे. सह्याद्रीमध्ये उगम होउन ही नदी साधारणतः पश्चिमेस वाहते व पुण्याजवळ मुळा नदीस मिळते. +१९९० नंतर पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे नदी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. ही नदी धरणामधून सोडल्या जाणा:या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते. पवनेचे पात्र अंदाजे दोनशे फूट रुदीचे आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले कॉलनी, ब्राrाणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, कडधे, आर्डव, करंज, थुगाव, बऊर, सडवली, ओझर्डे, शिवणो, उर्से या गावांच्या हद्दीतून पवनेचा प्रवाह सुरू होतो. नैसर्गिक उतार असल्याने उन्हाळय़ातही पाणी वाहत असते. +नदी काठची गावे पुढे मजल दरमजल करीत पवना पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करते. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीची लांबी अंदाजे २५ किलोमीटर. शहरातील किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या भागातून पवना नदी वाहत जाते. +धन्य ती पवना माई - चिंचवड तीर्थक्षेत्री महान साधू मोरया गासावी यांची पवनातीरी संजीवन समाधी आहे. अष्टविनायक यात्रेत मोरया मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.सदर मंदिर दर्शनाने यात्रेचा शेवट करण्याची प्रथा आहे. ह्या मंदिराला ४२५ वर्षापेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे पवनातीरी प्राचीन शिवमंदिर शेकडो वर्षांपासून धनेश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध असून ते सुद्धा चिंचवड गावाची महत्वपूर्ण ओळख आहे. +या नदीवर पवनानगर येथे धरण आहे. +पवनेवर १९७१ मध्ये पवना धरण बांधण्यात आले. पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्मिेकडील व रायगड-पुणे जिल्हय़ाच्या हद्दीजवळ आहे. तुंग किल्ला व लोहगडाच्या किल्याच्या खो:यात गेव्हंडे, आतवण, आपटी या गावांच्या हद्दीतून वाहणारा छोटासा पाण्याचा झरा. हे पवनेचे उगमस्थान. पवनानगर म्हणून हा परिसर ओळखला जातो. कालांतराने आजुबाजूचा परिसर हा तर पर्यटकांसाठी ‘पर्यटकांची पंढरीच’ होऊ लागला. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, हाडशी, मुळशीधरण असा सर्व परिसर पर्यटकांना साद देऊ लागला. पवना धरणावर जाऊन बोटींगचा मनसोक्त आनंद घेऊन फोटो सेशन करून मंडळी पुढील वर्षी परत येण्याचा निश्चिय करून घरी परतू लागली. पावसाळय़ात तर या ठिकाणी पर्यटकांची पंढरीच होऊ लागली आहे. मात्र, या पवना धरणातून वाहणा-या पवना नदीचे पुढे काय होते. हे मात्र, कोणीही पाहत नाही किंवा पाहूनही त्याबद्दल मला काय त्याचे? असा त्रयस्तपणा अंगी बाळगला जातो. +Ravet Bandhara +पवनानगर येथील पवना डॅम परिसर पावसाळ्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठया प्रमाणात पुणेकर व मुंबईकर ह्या धरण परिसरात वर्षा विहार करण्यासाठी येत असतात.निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेण्यासाठी जरूर ह्या परिसराला भेट द्या. मावळातील ह्या परिसराला युगप्रवर्तक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श मिळालेला आहे. अनेक धुरंधर मावळे ह्याच सहयाद्रीच्या परिसरात जन्मास आले. मुघलशाही असो की इंग्रजशाही ह्याच भूमीत त्यांना सुरुंग लावला गेला. +पूल +दळणवळण +सांडपाणी व्यवस्थापन +जल वाहिन्या +व्यावसायिक वापर +तीर्थक्षेत्र (घाट, इ.) - पवना घाट संवर्धन मोहिमेअंतर्गत गौरी गणेश विसर्जन तसेच छट पूजा व धार्मिक कार्यक्रमानंतर घाट स्वच्छता व साफसफाई मोहीम दरवर्षी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने राबविण्यात येते अनेक पर्यावरण प्रेमी व पालिका स्वच्छता कर्मचारी सहभागी होत असतात.त्यामुळे आपले घाट संवर्धित होण्यास हातभार लागत असतो.शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी व सामाजिक संस्था पवना नदी संवर्धन करीता विविध उपक्रम राबवित आहेत.पालिकेने गंभीरपणे आता पवना प्रदूषणरहीत करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. +बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी +पाण्याची गुणवत्ता +प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण जनजागृती करणारी अग्रगण्य संस्था असून नुकतेच पवना नदी काठी केलेल्या पक्षी निरीक्षण संपन्न केले (दिनांक १० नोव्हेंबर२०२२ ते १० डिसेंबर २०२२)त्यामध्ये पाणकोंबडी, बगळे, धनेश, खंड्या, गव्हाणी घुबड, बुलबुल ह्या पक्ष्यांमध्ये रावेत, वाल्हेकरवाडी नदी परिसरामध्ये वाढ नोंदवण्यात आली परंतु जलचर प्राण्यांमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली. +नदीच्या शेजारील लहान-मोठय़ा नाल्यांचे पाणी थेट पवनेत सोडले जाते. काही ठिकाणी सांडपाणी स्वच्छ करून पुन्हा नदीत सोडण्याचे तेवढे काम पालिका करते. वेळोवेळी नदी साफ करण्यासाठी टेंडर काढले जातात. अमाप पैसे ओतून सुद्धा नदी पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थितीत राहते. पवना नदीची अक्षरशः गटारगंगा झाली असल्याचे दिसून येते. +नदीतील गाळाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही घाणपाणी, मैला, सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर घट झाली. +नदीपात्रत मासे मरून पडल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. +जलपर्णीचे तर प्रमाण पवनेत प्रचंड प्रमाणात आहे. जलपर्णीवर तर नवीन लेखच लिहायला हवा. जलपर्णीमुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला. पवनेकाठच्या लोकांना या जलपर्णीचा डासांच्या स्वरूपात त्रस होऊ लागला आहे. अर्थातच आरोग्यास धोका निर्माण झाला. +नदीत मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. +पवना नदीचा सर्वाधिक प्रदूषित भाग सांगवीत आहे. असल्याचा अहवाल खुद्द महपालिकेनेच दिला आहे. मैला, सांडपाणी, कारखान्यांमधून थेट नद्यांमध्ये घाण पाणी सोडल्यानं पाण्यात रसायनं आहेत. नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय.[१] +मैलापाणी वहन +सांडपाणी +घन कचरा +राडारोडा +उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन +शेतीद्वारे होणारे उत्सर्जन +उघड्यावर शौच +सण, उत्सव, धार्मिक विधी मुळे होणारे प्रदूषण +समाजावर होणारे परिणाम +वाल्हेकरवाडी, चिंचवड,पिंपरी रावेत,पिंपरी ,पिंपळे सौदागर,कासारवाडी,पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील पवना नदी पात्रात (ब्लू लाईन) मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने कारवाई करणे महत्वाचे आहे तरच नदी श्वास व्यवस्थित घेऊन वाहू शकेल. +प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी आवाज उठविला. जनजागृती केली. परंतु महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. इंद्रायणी बचाव कृती समिती सारख्या पर्यावरण समितीलाही केवळ महापालिकेला विनंत्या करण्यात वेळ घालवावा लागत आहे. त्यांच्याकडून नदी स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या सूचनांना केराची टोपली तेवढी मिळती. +प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती शहरातील नदी प्रदूषण साठी वेळोवेळी महापालिकेला सूचित करत असते. उद्योगांकडून होत असलेले प्रदूषण, रहिवाशी सांडपाणी व नाले मोठया प्रमाणात नदीमध्ये प्रदूषण करत आहेत.रावेत व वाल्हेकरवाडी गाडी धुण्याचे मोठ्या प्रमाणात काम चालते ते बंद होणे महत्वाचे.वाढत्या जलपर्णी काढण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर स्वतःचे जलपर्णी काढण्याचे मशीन घेणे महत्वाचे आहे.कोट्यवधी रुपये गेल्या १० वर्षात पालिकेने खर्च करूनही जलपर्णी ही जैसे थेच असते.सप्टेंबर ते मार्च ह्या महिन्यात वेगाने फोफावते. प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणेश विसर्जन पूर्णतः बंद होणे आवश्यक.नदीच्या प्रदूषणाची अशी महत्वाची 5 कारणे मुळासकट संपने महत्वाची आहेत. महाराष्ट्र नदी प्रदूषण मंडळानेही पालिकेला कडक शिक्षा करून प्रदूषण नष्ट करण्यासाठी थोड्या कालावधीची अंतिम मुदत द्यावी. (विजय पाटील - अध्यक्ष pnsks महाराष्ट्र राज्य) + +रोटरी क्लब ऑंॅंफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई (उगम ते संगम)' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पहिले पर्व २०१७-२०१८ तब्बल २१५चालले. या अभियानामध्ये एकूण १४५५ ट्रक जलपर्णी पवना नदीतून बाहेर काढण्यात आली.जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने जून महिन्यात या अभियानाला थांबविण्यात आले होते. आता पावसाळा संपला असल्याने या अभियानाला पुन्हा सुरू करण्यात आले आहे.[२] + +पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीला स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांना सोबत घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे.[३][४] + आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी  · नाग नदी  · नीरा नदी  · पवना नदी  · भामा नदी  · मांडवी नदी  · मीना नदी  · मुठा नदी  · मुळा नदी  · मोसी नदी  · वेळवंडी नदी +चित्रे +नाटक +चित्रपट diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9885.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c08ce856a355905d4f005d7fb6dd1ba05d34a20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9885.txt @@ -0,0 +1,13 @@ + +२०° ४६′ ४८″ N, ७९° ३७′ ४८″ E +पवनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. +Pauni (Pauni राजा "Pavan" पासून साधित) वैंगंगा नदीच्या तटावर दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. हे आसपासच्या छोट्या गावांसाठी बाजारपेठेचे केंद्र आहे आणि लहान गावांमध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंधिया या शहरांशी जोडलेले आहे. प्राचीन काळात, पूनी हेडलूम वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध होते. हे तीर्थस्थान आहे आणि अनेक मंदिरे, शाळा हायस्कूल आणि विज्ञान महाविद्यालयाचा गौरव करतात. पावनीलाही हवामानाच्या तीव्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. +किंग पवन वर्षांपूर्वी या शहरावर राज्य केले. शहरात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा एक मोठा प्रवेशद्वार दिसतो. हे शहर तीन बाजूंनी पर्वताने व चौथ्या बाजूने नदीने घसरलेले आहे. पाणीची मुख्य भाषा मराठी आहे, जो महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक भाषा आहेसाचा:Shree +Information by lokmat is as follows +पवनी : मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवन राजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे. वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते. भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा सांगणारा हा किल्ला आजही अभ्यासकांसाठी पर्वणी आहे. +भंडारा जिल्हा मुख्यालयापासून ४२ कि़मी. अंतरावर पवनी तालुक्याचे ठिकाण आहे. पवन राजाच्या नावावरूनच या गावाला पवनी असे नाव पडले. पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात भरभराटीस आले होते. सम्राट अशोकांचे येथे काही काळ वास्तव्य केले. त्यांची मुलगी संघमित्रा याच ठिकाणावरून श्रीलंकेला धर्म प्रसारासाठी गेल्याचे इतिहास सांगते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स. पूर्व पहिल्या शतकातला शत्रकुमार रूपाअंम्माचा स्तंभलेख येथे उत्खननात आढळला. आज तो नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात या परिसराचे वैभव सांगते. १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तु संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली या परिसराचे उत्खनन झाले. यात इ.स. पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याच्या अलंकार, तांब्यांची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाºया वस्तु आढळल्या. डॉ. मिराशे यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेला उत्खननास राजा भगदत्त यांना शिलालेख मिळाला. +गावाचा मुख्य रस्ता या किल्ल्याच्या दरवाज्यातूनच जातो. आजही हा किल्ला सुस्थितीत असून किल्ल्याची भिंत आणि तिचा पायथ्याशी असलेला बालसमुद्र तलाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. पवनीचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा किल्ला आजही पर्यटकांना खुणावत आहे. याच परिसरात अशोक स्तंभ, अनेक घाट, हाकेच्या अंतरावर रुयाळ येथे महासमाधी महाभूमी बोधीस्तुप पवनी-कºहांडला वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय प्रकल्प असलेले इंदिरा गांधी धरण (गोसीखुर्द) आहे. विदर्भाच्या वैभवात भर टाकणाºया या परिसराला पर्यटकांना भेट देऊन निसर्गासोबतच ऐतिहासिक वैभवही जवळून अनुभवता येईल. +पवनीचा वैभवशाली इतिहास +पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकाटक, गोंडराजे, भोसले आणि इंग्रजांनी राज्य केले. यादवांचे राज्य इ.स. १३१८ मध्ये लयास गेल्यावर देवगडच्या गवळीराजाने सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर चांध्यांच्या गोंड राज्याने हा प्रदेश जिंकला. इ.स. १७३९ मध्ये नागपुरच्या रघुजी भोसल्यांनी पवनीचा प्रदेश वलीशहा या गोंड राज्याचा पराभव करून जिंकला. त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. त्यांचे वंशज तुराणकर आजही आहेत. पवनीवर पेंढाºयांनी तिनदा आक्रमण केले. दोनदा पवनीकरांनी पराभव स्विकारला. तिसºयांदा मात्र एकजुट करून लोकांनी पेंढाºयांना पिटाळून लावले. तर २५ सप्टेंबर १८१८ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून पवनी हस्तगत केली. +भदंत सुरई ससाई यांच्यामार्फत १४ एप्रिल २०२३ रोजी ५७ फूट बुद्ध. मूर्तीची इथे स्थापना करण्यात आली.तसेच नदी ओलांडली की हायवे वरून १च किमी दूर 'शिंदपुरी' +हे बुद्ध स्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9886.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fae4a46508cabfc2cadd0fa7e1df60b602b082e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9886.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवनी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9894.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f52d7a0a0551cf0003a276379081d067f28bfb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9894.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवहर खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9900.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..524b913359bbc047303653bbcbe7e550d79ce01c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9900.txt @@ -0,0 +1,3 @@ +पवारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका एक गाव आहे. +हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. याच नावाची इतर जिल्ह्यातही गावे आहेत. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9905.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63816139bfb4d7584049c3ed544acaa6d59ce5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9905.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9917.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3346fbd2ddd8ab212919953342ce99d6fed50904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9917.txt @@ -0,0 +1,5 @@ + +पवित्र रोमन साम्राज्य हे मध्य युरोपमधील राज्य/देशांना एकत्रित केलेले राष्ट्र होते. त्याची रचना इ.स. ८४३मध्ये त्यावेळच्या फ्रॅंकिश साम्राज्याचा पूर्वेकडील भागातून व्हर्दुनच्या तहात झाली. +या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रान्स व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते. +याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी होती. जवळजवळ १,००० वर्षांच्या अस्तित्वानंतर इ.स. १८०६मध्ये याचे विभाजन झाले. अठराव्या शतकात या साम्राज्याच्या पडतीच्या काळात व्होल्तेरने थट्टेने म्हणले होते की पवित्र रोमन साम्राज्य हे आता पवित्र नाही, रोमन नाही व साम्राज्य तर मुळीच नाही. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9923.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35905ea12bbd9afaa252bf867da14b95544df1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9923.txt @@ -0,0 +1,4 @@ +पशुधन विमा योजना ही शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या अकाली मृत्यूमुळे होत असलेल्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्यासाठी भारत सरकारद्वारे राबविण्यात येणारी विमा योजना आहे. यात भारतातील ३०० जिल्ह्याचा समावेश आहे. +यांचा विमा काढल्या जाऊ शकतो. + +पण हा विमा कोठे उतरवायचा या बद्दल नक्की माहिती नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9932.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a447afa12b2e082e434fda46e6648639dc8a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9932.txt @@ -0,0 +1 @@ +पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9933.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82c9be0665d70079fed556bdf117be267fcc61d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9933.txt @@ -0,0 +1,3 @@ +पशुसंवर्धन विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या पशुसंवर्धन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9946.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bac4c3eb66b2ca3507582f3efde9f24057035b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9946.txt @@ -0,0 +1,7 @@ +पश्चिम आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पश्चिम आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9951.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a6d8ff8a215c8c9798d3b8cd50b68e9d7228c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9951.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम इम्फाल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र लाम्फेलपाट येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,१७,९९२ इतकी होती. हे सुमारे केप व्हेर्दे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळ आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9976.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb092f49996aecdabce7b7f70b74328c83f3a02d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9976.txt @@ -0,0 +1,2 @@ +पश्चिम जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Barat) हा इंडोनेशिया देशाचा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सुमारे ४.५ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या आग्नेयेला वसला आहे. बांडुंग ही पश्चिम जावाची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9995.txt b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfddceeee9a00ec5d4f48180716854ccc28a5da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_9995.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम फ्लांडर्स (डच: West-Vlaanderen ) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रांत मुख्यतः डच भाषिक आहे. + +गुणक: 51°00′N 3°00′E / 51.000°N 3.000°E / 51.000; 3.000