diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10001.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42475605765332e22c64a428b4198624a212c1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10001.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेन्झी काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10011.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..056594febb9f8cde626accff0d00f7b76d7cfa3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10011.txt @@ -0,0 +1,5 @@ + +एलिझाबेथ "बेप" वॉस्कुइल (किंवा एली वॉसन) (५ जुलै, इ.स. १९१९ - ६ मे १९८३) ही एक डच नागरिक होती. तिने ओपेक्टातील इतर कर्मचाऱ्यांसोबत मिळून ॲन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते. +बेपचा जन्म ॲम्स्टरडॅम शहरात झाला होता. ती योहान्स हेन्ड्रिक वॉस्कुइल यांच्या आठ मुलांपैकी एक होती. तिला इ.स. १९३७मध्ये ऑटो फ्रॅंक यांनी ओपेक्टा कंपनीत नौकरी दिली होती. फ्रॅंक कुटुंब तिथे लपण्यास आल्यावर केवळ निवडक लोकांना त्याच्याबद्दल माहिती होती. त्यात बेप एक होती. त्या काळात बेप त्यांच्यासाठी किराणामाल आणून देत असे. तिने ॲन, मार्गो व पीटर यांच्यासाठी स्वतःच्या नावावर लघुलुपी व लॅटिन भाषेचा पत्रद्वारा अभ्यासक्रम मागवला होता. +१५ मे, इ.स. १९४६ला तिने कॉर्नेलिअस व्हान विक याच्यासोबत लग्न केले. यानंतर तिने ओपेक्टात काम करणे सोडून दिले. पुढे तिला चार मुले झाली; टॉम, कॉर, जूप आणि एक मुलगी, ॲन-मारी; जिचे नाव ॲन फ्रॅंकवरून ठेवले होते. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान तिच्या कामांसाठी तिचा सन्मान केला गेला. मात्र तिला प्रसिद्धी व मुलाखती देणे आवडत नसे. मात्र ती शेवटपर्यंत ऑटो फ्रॅंकच्या संपर्कात होती. तिने ॲन व तिच्या दैनंदिनीवर प्रकाशित लेखांची एक कात्रणवही केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10025.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901dee86871b5041bdcd18c39273d9ce689a08fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10025.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेबी कांबळे (माहेरच्या काकडे) (जन्म : वीरगाव-पुरंदर, इ.स. १९२९; - फलटण, २१ एप्रिल २०१२) या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत.[१][२][३] +वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कोंडिबा कांबळे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिले.पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-प्रेरणेचे वारे अधिक प्रखरतेने वाहू लागले. याच काळात स्वतःही समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे या विचाराने बेबीताई लिखाण करू लागल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10037.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57bac3bfa6e1e0fdce4f0b1007631cfcb4bb6381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10037.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेर लेक काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरिस येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३७२ इतकी होती.[२] +या काउंटीला जवळच्या बेर लेक सरोवराचे नाव दिलेले आहे. बेर लेक काउंटीची रचना १८७५मध्ये झाली diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10043.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15d0adeaaa550d39b9b787fc73fa17bcad51411c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10043.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेरळी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10044.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc86a4600dac4bc302d9f7920561ed6b935981a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10044.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेरळी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10091.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc84e2c2be6167385328d5e0c3e1a500cf86662a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10091.txt @@ -0,0 +1,8 @@ + बेर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10096.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fadbfe392cfb9f93dd20908096e2efbe98cd2777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10096.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10106.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd23d915326a4acde58b186a8f4abdc0695f6165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10106.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेलखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10117.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e78f597cc3811fbbe064b150a209284ac4cb23b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10117.txt @@ -0,0 +1 @@ +बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEG, आप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10130.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..929282d7afd27f9ee78eb1f61bcadbb3a6674b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10130.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेलदारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10150.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..844a19954608f8c2af46a156b24e9fb36baf211a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10150.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. +बेलवडे हवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10170.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aec2eb83b2098b29c60adfdeda06f416b1ceccc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10170.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेला चौथा (इ.स. १२०६ - मे ३, इ.स. १२७०) हा हंगेरी, क्रो‌एशिया व स्लोव्हेकियाचा राजा होता. +याने क्रोएशियावर बेला तिसरा, तर स्लोव्हेकियावर बेला चौथा या नावाने राज्य केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1021.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92e13370fd73038ed929720238717d0c6f4c680c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1021.txt @@ -0,0 +1,20 @@ +प्रतापराव गुजर (जन्म:१६१५ - मृत्यू:२४ फेब्रुवारी, १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो. +५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे. [१] +प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास) +महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला. +काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन थडकल्या.प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’[२] +२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'[३] +या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.[४] +मराठ्यांच्या इतिहासात हा एक नवीन अध्यायचं घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर कवी कुसुमग्राज लिखित आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरात स्वरबद्ध "वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता आणि लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "वेडात मराठे वीर दौडले सात" हे व्यवसायिक नाटक प्रसिद्ध आहे.[५]. +'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, १९ मे १९७७ रोजी मळगंगा नाट्य निकेतन द्वारे सादर करण्यात आला. यात प्रतापराव यांची प्रमुख भूमिका श्री. फक्कड जोशी तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः बशीर मोमीन यांनी केली होती. नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून लेखक श्री. मोमीन कवठेकर यांनी नाटकाचे रूपांतर वगनाट्यात सुद्धा केले, जे विविध तमाशा फडांनी ग्रामीण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले. +सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला. +आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती) +" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते +स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्याना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली. +खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर,देशमुख,इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा +सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार +आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे . +या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे +. +प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.[ संदर्भ हवा ] तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.[ संदर्भ हवा ][६] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10211.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d1985e469b51592d55f3ce95b9a0387f81abf72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10211.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेलावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10254.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..420338de4b50cc45040ac9501f37c81197a78890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10254.txt @@ -0,0 +1,6 @@ +बेलुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावाला सेलू व मंठा या दोन तालुक्याच्या सीमा आहेत तर, जालना जिल्हा ची सीमा आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +येथील लोकजीवन हे सुरळीत असून शेती वर आधारित आहे, या गावातील बरेचसे लोक बाहेर गावी आपला उदार निर्वाह करण्यासाठी राहतात, ऊसतोड करण्याकरिता देखील या गावातील नागरिक जात असतात.. +या गावात मराठा, माळी,कासार, बंजारा, बौद्ध व मातंग समाजाचे लोक गुन्या-गोविंदाने राहतात +बेलुरा या गावात बरचसे मंदिरे आहेत पण एक महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरात तीन मूर्ती असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी होत असते. +या गावाच्या पूर्व दिशेस वाडी मोहाडी आग्नेय दिशेला चारठाणा दक्षिणेस दगडचोप वाव्याय दिशेला माळकिनी बोरकिनी पश्चिम दिशेला अंभोडा कदम diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10290.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42d4731aa3d70ce9f06e5e72eaee6e93b7e35531 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10290.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेलोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10294.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed44739ef72ceb6c3c0a7aa61433507c8a2cf98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10294.txt @@ -0,0 +1,6 @@ +बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +बेलोशी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गाव आहे. ते पांचगणीपासून १० मिनिटाच्या अंतरावर, पांचगणी - पाचवड या मार्गावर आहे. बेलोशीच्या वरच्या बाजूला काटवली हे गाव आहे तर खालच्या बाजूला दापवड़ी हे गाव आहे. गावामधे जावळी सहकारी बँकेचे संस्थापक कै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांची समाधी आहे. काळ भैरवनाथ हे गावाचे ग्राम दैवत आहे.एप्रिल महिन्यामधे गावची यात्रा (दिंडी) असते +बाजूला काटवली आणि रूईघर ही गावे आहेत या गावांमधे ८० % बेलोशे आहेत तसेच खाली मेढ़ा भागात केळघर हे गाव आहे तिथे पण ८० % बेलोशे आहेत ही सगळी एकच भावकी +सातारा जिल्हा वगळता बेलोशे कुटुंब  रत्‍नागिरी जिल्ह्यामधे खेड़ तालुक्यात ३ गावांमधे आहेत त्या पैकी नातूनगर हे १ गाव जे पोलादपुर पासून अवघ्या ३० मिनिटावर आहे  तसेच रायगड जिल्ह्यामधे सुधागड़ तालुक्यात पण आहेत ते आडनाव लिहताना मात्र बेलोशे ऐवजी बेलोसे अस लावतात हे सगळे पूर्वीच्या काळात स्थाईक झालेले. +बेलोशीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेली पर्यटन स्थळे :- +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10308.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98d6a7a5302ce4879d3d7390afa1a4b46a7a235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10308.txt @@ -0,0 +1,77 @@ +बेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10309.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f914fc2d870dac7ceffd3852f431a7b04f6b6b02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10309.txt @@ -0,0 +1 @@ +बेल्जियन क्रिकेट फेडरेशन (बीसीएफ), सध्या क्रिकेट बेल्जियम म्हणून ओळखले जाते, ही बेल्जियममधील क्रिकेट या खेळाची प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10324.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb3d53f9e16fe069e4111dc8b7e2763fe2737708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10324.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेल्जियमचा ध्वज काळा, पिवळा व लाल ह्या तीन रंगांच्या उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10343.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2627fdc17b7656eff4f622afcda663935c2fded8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10343.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 15°08′N 76°55′E / 15.133°N 76.917°E / 15.133; 76.917 + +बेल्लारी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बेल्लारी शहर कर्नाटकच्या मध्य-पूर्व भागात बंगळूरच्या ३०६ किमी उत्तरेस कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळ वसले आहे. २०११ साली बेल्लारीची लोकसंख्या ४.११ लाख होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10352.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c0c301233c7f378dc2d6c495e3bf6136acadc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10352.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बेल्स हे क्रिकेटच्या खेळात वापरले जाणारे उपकरण आहे. प्रत्येक बेल हा एक लाकडाचा, सहसा कोरीवकाम केलेला, तुकडा असतो. असे एकूण चार तुकडे एका वेळी वापरले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10373.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82f1718e0bbbb4dfa68f9897962d089c81ae75ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10373.txt @@ -0,0 +1 @@ +बेळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10375.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a79eb8dd70c3151b3ff8f0dde0973e86c942136a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10375.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत. +बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत- +बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१] +\ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10406.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c2d3962ca21a7b303e747799946b45c8688dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10406.txt @@ -0,0 +1,29 @@ + + +बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे. +सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते. +इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. +बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते. +अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न +बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे. +बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत- +२००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७] +सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे. +बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८] +बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९] +कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये. +[1] +केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी) +कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी +केएलई एमसी +[1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली. +सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम +कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे अनेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे. +दक्षिण महाराष्ट्र ‍शिक्षण मंडळ ही बेळगाव ‍जिल्हा्यातील एक महत्त्वाची ‍शिक्षण संस्था +बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे. +बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक) +बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत. +बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१] +इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10412.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63e0c1c9350f330d17c900d236479bf796f15437 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10412.txt @@ -0,0 +1 @@ +बेळगावी मराठी कन्नडच्या प्रभावामुळं हेल काढून बोलली जाणारी बेळगावी मराठी होय. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10414.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ab59f4b9deaa7713f2e2e17f984b92c47cf219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10414.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेळगांव विभाग कर्नाटकातील चार प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. +या विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र व कोल्हापूर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा विभाग, उत्तरेस महाराष्ट्र राज्य व दक्षिणेस बंगळूर विभाग आहे. +बेळगाव विभागातील खालील जिल्हे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10431.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e525f85d4c20b611fec9947d89741a62267afbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10431.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10448.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106b035a11e002366fe3090a2e00e6dd27588abc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10448.txt @@ -0,0 +1 @@ +बेवकूफियां हा २०१४ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो नुपूर अस्थाना दिग्दर्शित आहे, हबीब फैसल लिखित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, सोनम कपूर आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका आहेत.[१] हा व्यावसायिकरित्या अपयशी ठरला.[२][३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10450.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade58d05a782ae256ae653677141210d781be235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10450.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेवणूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10455.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f469ce82196ad7a0ecb16657e468cf15deccc96f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10455.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन बेव्हर्ली निकोल्स (९ सप्टेंबर १८९८ - १५ सप्टेंबर १९८३) एक इंग्रज लेखक, नाटककार, पत्रकार, संगीतकार आणि सार्वजनिक वक्ता होते. त्यांनी ६०हून अधिक पुस्तके आणि नाटके लिहिली.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10461.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3ef8643cdeb810d278bc10c6bac0bc3e515ceb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10461.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेशरम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10467.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee3f2565630aba33d8e3e466c598326df1291a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10467.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेस ॲलिस मे हीथ (जन्म २० ऑगस्ट २००१) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर, नॉर्दर्न डायमंड्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी डर्बीशायर, तसेच महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये यॉर्कशायर डायमंड्स आणि महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळली होती.[१][२] +तिने सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10476.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac087af91824d5de6c32bd89229969fd6eeb3631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10476.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°34′00″N 7°36′10″E / 47.56667°N 7.60278°E / 47.56667; 7.60278 + +बासल (जर्मन: Basel) ही स्वित्झर्लंड देशाच्या बासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिक व जिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात फ्रान्स व जर्मनी देशांच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10484.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7077ebd1f65ce88db9bd7234513e84db51d35111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10484.txt @@ -0,0 +1,5 @@ +संगणकाची एक भाषा +संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. +प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते . +कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages) +उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10496.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75deb99a938b9662c0de6be7cccd54cdd528de1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10496.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेसिल आर्थर फायरब्रेस ग्रीव्ह (मे २८, इ.स. १८६४:किल्बर्न, मिडलसेक्स, इंग्लंड - नोव्हेंबर १९, इ.स. १९१७) हा १९८८-८९मध्ये  इंग्लंड}कडून  दक्षिण आफ्रिका विरुद्ध दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10499.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e76ce456601796c51de71a675e59a9b8ac3e692f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10499.txt @@ -0,0 +1 @@ +बसिल बुचर (३ सप्टेंबर, १९३३:गयाना - १६ डिसेंबर, २०१९:फ्लोरिडा, अमेरिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६९ दरम्यान ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10508.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b61b301c5247b7392952b34c546a7b92ab7da49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10508.txt @@ -0,0 +1,14 @@ +बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) (English:Brihanmumbai Electricity Supply and Transport, (BEST)) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्ट ने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९२६ पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो +बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". +बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये "बॉम्बे ट्रामवे १८७४" नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली. +बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. +सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. +पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. +दुसऱ्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट"च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले. +२०१३ च्या आकडेवारीप्रमाणे बेस्टकडे ४६८० बस आणि ३६५ वाहतूक मार्ग आहेत आणि त्यातून त्या वर्षी ५० लाख लोकांनी प्रवास केला. +बेस्टच्या बससेवांचे प्रकार : +१. साधारण बस - बस क्रमांक पांढऱ्या रंगात आणि बाकीचा भाग काळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या सर्व स्थानकांवर थांबतात. +२. मर्यादित बस - बस क्रमांक लाल रंगाचा असतो. या बस आपल्या मार्गातल्या प्रमुख स्थानकांवरच थांबतात. +३. एक्सप्रेस बस - बस क्रमांक लाल रंगात आणि बाकीचा भाग पिवळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या मोजक्याच स्थानकांवर थांबतात. या गाड्या मुख्यतः लांब पल्ल्याच्या असतात. या गाड्या सगळ्या उड्डाणपुलांवरून जातात. +४. वातानुकूलित बस - काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर वातानुकूलित बस धावतात. +५. फेरी सेवा - बेस्टची मुंबईच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर वरसोवा, मनोरी, मड, मार्वे येथे जलमार्गाने जाणारी फेरी सेवा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10522.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2beb2381731628a18a3c62218ec0111562c31c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10522.txt @@ -0,0 +1 @@ +बेहेर ह्या कंपनीचे मुख्यालय स्टुट्गार्टमध्ये आहे. ही कंपनी गाड्यांना लागणारे रेडिएटर व वातानुकुलन यंत्रणा बनवते. युरोप तसेच अमेरिकेतील बहूतांशी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना ही कंपनी वरील सुटे पार्ट्स बनवते. कंपनीचे युरोपमध्ये फ्रांस, स्पेन, चेक प्रजासत्ताक तसेच अमेरिकेत डेटन, साउथ अफ्रिका, भारतात पुणे, व चिन मध्ये कारखाने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1054.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06f586b2bf9280adad64a755d94b6859e813ce75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1054.txt @@ -0,0 +1,6 @@ +करकंब हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +राजे छत्रपती शिवाजी यांच्या पदपावलांनी करकंब हे गाव पावन झाले आहे. +करकंबमध्ये प्रसिद्ध कनकंबा मंदिर आहे. कनकंबा हा अंबाबाईचा अवतार समजला जातो. करकंब हे नाव कनकंबा देवीच्या नावावरून आले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २०,०००-२२,००० आहे.कनकंबा या देविच्या नावाने यात्रा भरते. +कनकंबा मंदिर व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे. +करकंब मधील बाजार आमटी प्रसिद्ध आहे. +प्रतिबिंब मंच ही या गावातील संस्था शिवकालीन शास्त्रकला मोफत शिकवते. यात तलवारबाजी, दांडपट्टा, काठीलाठी यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे आणि स्वसंरक्षणकलाही शिकवली जाते. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यसनापासून दूर ठेवले जाते. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच व्याख्याने आयोजित करून समाजप्रबोधन केले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10557.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30f0af345e9189f3848236daedfb17af590ed03a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10557.txt @@ -0,0 +1 @@ +बैरागवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10561.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f111469c0231a821fc62e14619576b6ea6a2489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10561.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 33°53′13″N 35°30′47″E / 33.88694°N 35.51306°E / 33.88694; 35.51306 + +बैरूत (अरबी: بيروت; हिब्रू: ביירות; लॅटिन: Berytus; फ्रेंच: Beyrouth; तुर्की: Beyrut; आर्मेनियन: Պէյրութ) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. +इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे. +बैरूत शहर एका नैसर्गिक द्वीपकल्पावर वसले असून त्याच्या पूर्वेकडून बैरूत नदी वाहते तर पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. बैरूत इस्रायल-लेबेनॉन सीमेच्या ९४ किमी (५८ मैल) उत्तरेस स्थित आहे. +बैरूतचे हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे कोरडे असतात. +बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बैरूतमधील प्रमुख विमानतळ आहे. हा लेबेनॉनमधील सध्या चालू असलेला एकमेव विमानतळ असून २०१३ साली सुमारे ६२ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. लेबेनॉनची जलवाहतूक बैरूत बंदर हे देशामधील सर्वात मोठे बंदर हाताळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10590.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf71db402caaedb29499e896a373b316dddbe185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10590.txt @@ -0,0 +1,101 @@ + +मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६] +मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२] +मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात. +मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. +मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ] +मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत. +आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०] +माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते.. +मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ] +१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ] +पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या. +१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ] +१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत. +मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे. +मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत. +मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. +फोर्ट परिसर - +गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन +नरिमन पॉइंट परिसर - +हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT +वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी +गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय +दादर - शिवाजी पार्क +प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर +महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा +भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार +भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय +ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन +मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन) +पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व +जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व +संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली +मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ] +या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ] +याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत. +एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला +जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला +जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला +एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला +एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला +एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला +एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट +एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला +एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी +एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला. +के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला +के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला +पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला +पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला +आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली +आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली +आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला +मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता. +नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे. +मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. +मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. +मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात. +मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. +मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात. +मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे. +मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत. +मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या. +वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे. +मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: +१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे). +२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर). +३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग. +४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर). +मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ] +मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ] +मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर. +२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले. +भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात. +नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ] +बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते. +बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व +घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ] +मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ] +मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे. +विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ] +१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ] +२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत. +मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत. +मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ] +मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. +न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५] +मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. +मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. +दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत. +मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. +क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत. +फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात. +वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10605.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2ff2d6cc8f257ffcade7ead1ca4042c0e884b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10605.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10631.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ddea9fed1bd64489e444ed6c81e854ba271c5ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10631.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बॉनर काउंटी (आयडाहो) ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10654.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b305f80d6847813df4ace4691d186728d22ce852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10654.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बॉब ब्रॅडले हे अमेरिकेतील 5 टॅलेंट'स संस्थेचे संस्थापक व उद्योगपती आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10697.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d199090adffc2c215aeecda6a2604ef353cc986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10697.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९०० +बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत - diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_107.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a4a423cb11b6dd5b7764de093593536fc135249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_107.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप कॅलिक्स्टस तिसरा (३१ डिसेंबर, इ.स. १३७८:कानाल्स, आरागोन - ६ ऑगस्ट, इ.स. १४५८:रोम, इटली) पंधराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव आल्फोन्स दि बोर्या होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10705.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b1e3bfbcc2a8be13b872ba357e6bc943c14610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10705.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई उच्च न्यायालय (अधिकृत नाव: बॉम्बे हायकोर्ट[१], इंग्रजी: The High Court of Bombay) हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.[२] +मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो. +१९९५ मध्ये शहराचे नाव बदलून बॉम्बे वरून मुंबई असे करण्यात आले असले तरी, कोर्टाने एक संस्था म्हणून त्याचे पालन केले नाही आणि बॉम्बे हायकोर्ट हे नाव कायम ठेवले. तथापि, मुंबई उच्च न्यायालय असे नाव देण्याचे विधेयक 'केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 जुलै 2016 रोजी कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचे नाव अनुक्रमे कोलकाता उच्च न्यायालय आणि चेन्नई उच्च न्यायालय असे बदलण्यास मान्यता दिली. ते भारताच्या संसदेसमोर मंजुरीसाठी प्रलंबित आहे परंतु काही काळासाठी ते लागू केले जाणार नाही.[३][४] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10709.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f48f84e64afb655526501bc846d3ac66ce9af592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10709.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोम्बे टू गोवा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10714.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ee55b3b9fe70f3620355b608bf38a261d496b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10714.txt @@ -0,0 +1,57 @@ + +बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती. +मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत. +ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते. +मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- +१. उत्तर किंवा गुजरात +२. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) +३. दक्षिण किंवा कर्नाटक +४. सिंध +मुंबई प्रांतातील जिल्हे:- +१. मुंबई शहर +२. अहमदाबाद +३. भरूच +४. खेडा +५. पंच महाल +६. सुरत +७. ठाणे +८. कुलाबा +९. रत्‍नागिरी +१०. अहमदनगर +११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) +१२. नाशिक +१३. पुणे +१४. सातारा +१५. सोलापूर +१६. बेळगाव +१७. विजापूर +१८. धारवाड +१९. उत्तर कानडा +२०. कराची +२१. हैदराबाद +२२. शिकारपूर +२३. थर आणि पारकर +२४. उत्तर सिंध सीमान्त +मुंबई इलाख्यातील संस्थाने - +अ] डेक्कन स्टेट एजन्सी - +१. कोल्हापूर +२. अक्कलकोट +३. औंध +४. जमखिंडी +५. जंजिरा +६. कुरुंदवाड (थोरले) +७. कुरुंदवाड (धाकटे) +८. मिरज (थोरले) +९. मिरज (धाकटे) +१०. मुधोळ +११. फलटण +१२. रामदुर्ग +१३. सांगली +१४. डफळापूर +१५. जत +१६. सावंतवाडी +१७. सावनूर +१८. भोर +मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते. +भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. +स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10715.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ee55b3b9fe70f3620355b608bf38a261d496b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10715.txt @@ -0,0 +1,57 @@ + +बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती. +मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत. +ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते. +मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- +१. उत्तर किंवा गुजरात +२. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) +३. दक्षिण किंवा कर्नाटक +४. सिंध +मुंबई प्रांतातील जिल्हे:- +१. मुंबई शहर +२. अहमदाबाद +३. भरूच +४. खेडा +५. पंच महाल +६. सुरत +७. ठाणे +८. कुलाबा +९. रत्‍नागिरी +१०. अहमदनगर +११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) +१२. नाशिक +१३. पुणे +१४. सातारा +१५. सोलापूर +१६. बेळगाव +१७. विजापूर +१८. धारवाड +१९. उत्तर कानडा +२०. कराची +२१. हैदराबाद +२२. शिकारपूर +२३. थर आणि पारकर +२४. उत्तर सिंध सीमान्त +मुंबई इलाख्यातील संस्थाने - +अ] डेक्कन स्टेट एजन्सी - +१. कोल्हापूर +२. अक्कलकोट +३. औंध +४. जमखिंडी +५. जंजिरा +६. कुरुंदवाड (थोरले) +७. कुरुंदवाड (धाकटे) +८. मिरज (थोरले) +९. मिरज (धाकटे) +१०. मुधोळ +११. फलटण +१२. रामदुर्ग +१३. सांगली +१४. डफळापूर +१५. जत +१६. सावंतवाडी +१७. सावनूर +१८. भोर +मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते. +भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. +स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10719.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf71db402caaedb29499e896a373b316dddbe185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10719.txt @@ -0,0 +1,101 @@ + +मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६] +मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२] +मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात. +मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. +मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ] +मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत. +आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०] +माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते.. +मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ] +१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ] +पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या. +१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ] +१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत. +मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे. +मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत. +मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. +फोर्ट परिसर - +गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन +नरिमन पॉइंट परिसर - +हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT +वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी +गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय +दादर - शिवाजी पार्क +प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर +महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा +भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार +भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय +ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन +मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन) +पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व +जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व +संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली +मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ] +या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ] +याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत. +एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला +जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला +जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला +एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला +एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला +एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला +एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट +एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला +एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी +एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला. +के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला +के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला +पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला +पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला +आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली +आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली +आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला +मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता. +नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे. +मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. +मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. +मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात. +मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. +मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात. +मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे. +मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत. +मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या. +वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे. +मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: +१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे). +२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर). +३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग. +४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर). +मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ] +मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ] +मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर. +२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले. +भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात. +नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ] +बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते. +बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व +घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ] +मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ] +मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे. +विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ] +१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ] +२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत. +मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत. +मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ] +मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. +न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५] +मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. +मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. +दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत. +मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. +क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत. +फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात. +वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1072.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fab76dca913cea7190882724deaf800acc7124e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1072.txt @@ -0,0 +1 @@ +रोखा (इंग्लिश: Security, सिक्युरिटी), अर्थात प्रतिभूती (मराठी लेखनभेद: प्रतिभूति) हा वित्तीय मूल्य दर्शवणारा विनिमय करण्याजोगा, परक्राम्य[१] वित्तीय संलेख[२] असतो. रोख्यांचे ढोबळ मानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण होते : diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10731.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2ff2d6cc8f257ffcade7ead1ca4042c0e884b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10731.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10774.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eefe4f5f8bcd7478062844b4bbe476184aa270f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10774.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[३] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले. +लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[४] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[५] +हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे. +* - यात अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेसचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10795.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cc274e012d9d53a3de4d13dea3153448ca2c03f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10795.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंगानी जेले (१ एप्रिल, १९८६:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच आहेत.[१][२] +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१६ साली होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10796.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..214a69558f7e0d5fda21d25e1b7aa2a8a2683f9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10796.txt @@ -0,0 +1 @@ +बोंगानी सॅंडिले खुमालो (६ जानेवारी, इ.स. १९८७:मांझिनी, स्वाझीलँड - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सुपरस्पोर्ट युनायटेडकडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10806.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7d37793097e9173e6608186c6b97598565b64cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10806.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंडाळे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांत आढळून येते. यांचे मूळ उपनाम पाध्ये असे असून, सध्या काही कुटुंबे पाध्ये बोंडाळे असे देखील आडनाव वापरतात. +बोंडाळे हे आडनाव बंडाळे या शब्दाचा अपभ्रंश आहे. या घराण्याचे पुर्वज वेद चर्चांमध्ये भाग घेत असत. त्यात ते आग्रहाखातर बंडही करत म्हणून त्यांना बंडाळे म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10817.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed62b28542dd455e47fd7ca04eb819a00dae5870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10817.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंदापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10854.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..413330504f64129cf5aab3b2326b1390cf5144ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10854.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉन्डोर कंपनीचे ७६७-३००ईआर प्रकारचे विमान फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना +बोईंग ७६७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10857.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61a3d809cb835354470c95b2f4b3014d5803272b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10857.txt @@ -0,0 +1 @@ +बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ हे मोठ्या क्षमतेचे सैनिकी मालवाहू विमान आहे. मॅकडोनेल डग्लस या कंपनीने (आता बोईंगचा एक भाग) या विमानाची रचना १९८० व १९९० च्या दशकात अमेरिकन वायुसेनेसाठी केली. आता बोईंग कंपनी ही विमाने तयार करून अमेरिकेबरोबरच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, संयुक्त अरब अमिराती, नाटो तसेच भारताच्या वायुसेनांना विकते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10866.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..521c3b0bcc0ad4cd15aec3218c08ac27d38d35a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10866.txt @@ -0,0 +1 @@ +बोईंग ७२७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. हे विमान १४९ ते १८९ प्रवाशांना ४,४०० ते ५,५०० किमी अंतर वाहून नेऊ शकते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1087.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa7378f9873dab438fead6b3120357fe1190903 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1087.txt @@ -0,0 +1 @@ +प्रतिश घर्ती छेत्री तथा प्रतिश जीसी (२२ मे, २००४:प्युतान, नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10870.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee6ee82bc04e6e7d58362b8c577ab93378b43ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10870.txt @@ -0,0 +1,7 @@ +एर बर्लिनचे बोईंग ७३७-८०० +बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे. +या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत - +यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल. +या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[१][२] +त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10873.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee6ee82bc04e6e7d58362b8c577ab93378b43ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10873.txt @@ -0,0 +1,7 @@ +एर बर्लिनचे बोईंग ७३७-८०० +बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे. +या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत - +यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल. +या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[१][२] +त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10874.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee6ee82bc04e6e7d58362b8c577ab93378b43ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10874.txt @@ -0,0 +1,7 @@ +एर बर्लिनचे बोईंग ७३७-८०० +बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे. +या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत - +यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल. +या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[१][२] +त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10897.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d26b8e4d4660599076e928627292dc5a15bfa40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10897.txt @@ -0,0 +1,7 @@ +युनायटेड एअरलाइन्सचे ७७७-२०० +बोईंग ७७७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.[१] या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. बोईंग ७६७ या मध्यम क्षमतेच्या व बोईंग ७४७ या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते. +जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लॅंडिंग गियर्स[मराठी शब्द सुचवा] आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन[मराठी शब्द सुचवा] ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली. +७७७ चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना जी.ई. ९०, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० किंवा रोल्स-रॉइस ट्रेंट ८०० प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान मुंबई तसेच दिल्लीपासून न्यूअर्क, न्यू जर्सी पर्यंत न थांबता जाते. +१९९५मध्ये युनायटेड एरलाइन्सच्या सेवेत रुजू झाल्यानंतर नोव्हेंबर इ.स. २०१०च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.[२] ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. एमिराट्स एरलाइन्सकडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला. +ईतर विमानांपेक्षा प्रतिप्रवासी-प्रतिकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो. जानेवारी २०२२पर्यंत ६० वेगवेगळ्या विमानवाहतूक कंपन्यांनी २,०९५ नमून्यांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १,६७८ विमाने गिऱ्हाइकांना हस्तांतरित झालेली होती.[२] +एरबस ए-३३०, एर बस ए-३४० तसेच एरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. या प्रकारची विमाने ७७७ चे थेट स्पर्धक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10907.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47df0107a4cecf5bf33284f9ff9b2a2fe49da65d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10907.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए) +बोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +याचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले. +बोईंग ७८७चे तीन उपप्रकार आहेत. मूळ ७८७-८ प्रकारचे विमान ५७ मीटर (१८६ फूट) लांबीचे असून हे साधारणतः २४२ प्रवासी १३,६२० किमी (७,३५५ समुद्री मैल) वाहून जाऊ शकते. ७८७-९ उपप्रकाराची लांबी ६३ मीटर (२०६ फूट) असून हे विमान २९० प्रवाशांना १४,१४० किमी (७,६३५ समै) वाहून जाऊ शकते. सगळ्यात मोठ्या ७८७-१० प्रकारचे विमान ६८ मीटर (२२४ फूट) लांबीचे आहे आणि हे ३३० प्रवाशांना ११,९१० किमी (६,४३० समै) नेऊ शकते. -९ उपप्रकार पहिल्यांदा एएनए विमानकंपनीने ७ ऑगस्ट, २०१४ रोजी उडविला तर -१० उपप्रकारचे पहिले विमान सिंगापूर एअरलाइन्सने ३ एप्रिल, २०१८ रोजी उडविले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10952.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc798089bae53340351cfc322de9197ce77c5764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10952.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोटाद हे गुजरातच्या बोटाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि मोठे शहर आहे. हे भावनगरपासून ९२ किमी तर अहमदाबादपासून १३३ किमी अंतरावर आहे.'[१] +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३०,३०२ होती.[२] येथील साक्षरता प्रमाण ८३.२१% होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10960.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4e842692d96bb53dd81429bc5e426bdcd41d43e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10960.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोटोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11002.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dd2d084dc07f5fb932ee4c1d0292c6debc0f57d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11002.txt @@ -0,0 +1 @@ +बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन (बीसीए) ही बोत्सवानामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11018.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6d21c512048c138bb9c71eadb57f0c7354512a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11018.txt @@ -0,0 +1 @@ +बोत्स्वाना देशाचा ध्वज फिक्या निळ्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पांढरे काठ असलेला काळ्या रंगाचा आडवा पट्टा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11041.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a88ef4e2d4aad83fe3283ddeb2b04c743de90a4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11041.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोथुडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11073.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e7ac558ba059512c567f9368f0a712ccfe01117 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11073.txt @@ -0,0 +1,11 @@ +बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू. दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता. +चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[१] +बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.[२] इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली. +गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून “बुदू सरणयी” (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. + प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो +डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.[३]तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला.[४][५] अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात. “मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती.” +[६] +‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ नामक मराठी पुस्तक हेमा सानेंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते. +सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला. +दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत. +दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदंब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11085.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98932fcd8368c380d61d538637cef2ca1c926040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11085.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोनशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11133.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96c8b5ce4c02c83a7adcf8f9b3d180f2c995613c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11133.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोमनाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1115.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205f34e96ed0a6591318eabe2d60dd074b9b9bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1115.txt @@ -0,0 +1,36 @@ +साचा:१९४७ पूर्वीच्या काळात हिंदुंचा छळ +प्रत्यक्ष कृती दिन (१ ऑगस्ट १९४६), ज्याला कलकत्ता किलिंग्ज म्हणून ओळखले जाते, हा कलकत्ता शहरात मुस्लिम आणि हिंदू यांच्यात व्यापक जातीय दंगलीचा दिवस होता. बंगाल ब्रिटिश भारत प्रांतात आता कोलकाता म्हणून ओळखले जाते. +[१] +त्या दिवसाला वीक ऑफ द लाँग नाइव्हज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवसाची सुरुवात देखील झाली. +[३][४] +१९४० च्या दशकात मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन भारतीय राजकीय मतदार संघात सर्वात मोठे राजकीय पक्ष होते. मुस्लिम लीगने १९४० लाहोर ठराव पासून उत्तर-पश्चिम आणि पूर्वेकडील भारतातील मुस्लिम-बहुल भाग 'स्वतंत्र राज्ये' म्हणून स्थापन करण्याची मागणी केली होती. १९४६ च्या कॅबिनेट मिशन टू इंडिया ने ब्रिटिश राज पासून भारतीय नेतृत्वाकडे सत्ता हस्तांतरणाच्या योजनेसाठी तीन-स्तरीय रचना प्रस्तावित केली: एक केंद्र, प्रांतांचे गट आणि प्रांत. "प्रांतांचे गट" म्हणजे मुस्लिम लीगची मागणी पूर्ण करणे. मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनीही कॅबिनेट मिशनची योजना तत्त्वतः मान्य केली. तथापि, मुस्लिम लीगला संशय आहे की काँग्रेसची स्वीकृती खोटी आहे. +[५] +यामुळे जुलै १९४६ मध्ये त्यांनी या योजनेशी केलेला करार मागे घेतला आणि १६ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण संप ('हर्ताळ') जाहीर केला आणि त्यानुसार आपली मागणी ठामपणे मांडण्यासाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून घोषित केले. स्वतंत्र मुस्लिम जन्मभुमी. +[६][७] +जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या निषेधामुळे कलकत्त्यात प्रचंड दंगल पेटली.[२][८] कलकत्त्यात ७२ तासांत ४,०००हून अधिक लोक आपले प्राण गमावले आणि १००,००० रहिवासी बेघर झाले. +[१][२] या हिंसाचारामुळे नोआखली, बिहार, संयुक्त प्रांत (आधुनिक उत्तर प्रदेश), आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये आणखी धार्मिक दंगल उसळल्या. पंजाब आणि उत्तर पश्चिम सीमांत प्रांत. या कार्यक्रमांनी अंतिम विभाजन बीज पेरले. बंगाली हिंदूंचा छळ भारतात मुस्लिमांवरील हिंसाचार}} +१९४६ मध्ये, ब्रिटिश राज विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ निर्णायक टप्प्यावर पोहोचला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी ब्रिटिश राज ते भारतीय नेतृत्वात सत्ता हस्तांतरण करण्याच्या योजनांवर चर्चा आणि अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशाने तीन सदस्य कॅबिनेट मिशन यांना भारतात पाठविले.[९] +१६ मे १९४६ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग - संविधान लोकसभा मधील दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर मिशनने प्रस्तावित केले. भारत आणि त्याचे सरकार यांच्या नवीन डोमिनियनच्या रचनाची योजना.[२][१०] +मुस्लिम लीगने वायव्य आणि पूर्वेतील 'स्वायत्त आणि सार्वभौम' राज्यांची मागणी केली होती. प्रांतीय स्तर आणि केंद्र सरकार यांच्यात 'प्रांतांचे गट' तयार करण्याचे एक नवीन स्तर तयार केले गेले. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण या विषयांवर केंद्र सरकारने हातभार लावावा अशी अपेक्षा होती. इतर सर्व शक्ती गटांकडे वळविल्या जातील. +[५] +एकेकाळी काँग्रेसचे नेते आणि आता मुस्लिम लीगचे नेते असलेले मुहम्मद अली जिन्ना यांनी काँग्रेसच्या केंद्रीय अध्यक्ष प्रमाणे १६ जूनची कॅबिनेट मिशन योजना स्वीकारली होती.[२][११]१० जुलै रोजी, जवाहरलाल नेहरू, काँग्रेस अध्यक्षांनी बॉम्बे मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन घोषित केले की काँग्रेसने संविधान सभेत भाग घेण्यास सहमती दर्शविली असली, तरी त्यांनी कॅबिनेट मिशनमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला. योग्य वाटल्यास योजना करा.[११] Fearing Hindu domination[१२] संविधान सभामध्ये, जिना यांनी अंतरिम सरकारकडे सत्ता हस्तांतरित करण्याची ब्रिटिश कॅबिनेट मिशन योजना नाकारली ज्यामुळे मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या दोन्ही संघटना एकत्र येतील आणि त्यांनी संविधान सभा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. जुलै १९४६ मध्ये जिन्ना यांनी मुंबई येथे त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी जाहीर केले की मुस्लिम लीग "संघर्ष सुरू करण्याची तयारीत आहे" आणि त्यांनी "योजना आखली आहे". [७] ते म्हणाले की जर मुस्लिमांना वेगळा पाकिस्तान मंजूर झाला नाही तर ते "थेट कारवाई" करतील. विशिष्ट विचारण्यास सांगितले असता, जिन्ना यांनी अशी प्रतिक्रिया दिली: "काँग्रेसकडे जा आणि त्यांची योजना त्यांना विचारा. जेव्हा ते तुम्हाला विश्वासात घेतील तेव्हा मी तुम्हाला माझ्याकडे नेईन. तुम्ही मला एकटेच हात जोडून घेण्याची अपेक्षा का करता? मीसुद्धा जात आहे." त्रास देणे "[७] +दुसऱ्या दिवशी, जिन्ना यांनी १६ ऑगस्ट १९४६ हा "प्रत्यक्ष कृती दिन" म्हणून घोषित केला आणि कॉग्रेसला इशारा दिला की, "आम्हाला युद्धाची इच्छा नाही. आपल्याला युद्ध हवे असेल तर आम्ही आपली ऑफर निर्लज्जपणे स्वीकारू. आमचा एकतर विभाजित भारत विभाजित असेल किंवा नष्ट झालेला भारत असेल." [७] + एचव्ही हडसन यांनी त्यांच्या द ग्रेट डिव्हिड पुस्तकात नमूद केले आहे की, "१६ ऑगस्टला 'प्रत्यक्ष कृती दिन' म्हणून पाळण्यासाठी भारतभरातील मुस्लिमांना आवाहन करून कार्यकारी समितीने पाठपुरावा केला. त्या दिवशी बैठका लीगच्या ठरावाचे स्पष्टीकरण देण्यासाठी देशभर हे आयोजन केले जाईल. या बैठक व मिरवणुका पार पडल्या - केंद्रीय लीग नेत्यांचा हेतू होता - सामान्य आणि मर्यादित गडबड्यांशिवाय, एक विशाल आणि दुःखद अपवाद वगळता ... काय झाले कोणालाही जास्त माहिती असू शकते."[१३] +सातो त्सुगीताकांनी संपादित केलेल्या मुस्लिम सोसायटीज: ऐतिहासिक आणि तुलनात्मक पैलू मध्ये नाकाझतो नरियाकी लिहितात: +संस्थात्मक राजकारणाच्या दृष्टीकोनातून, कलकत्त्याच्या गडबडीत एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे की ते संक्रमणकालीन काळात सुरू झाले जे शक्ती शून्य आणि प्रणालीगत बिघाड म्हणून चिन्हांकित होते. हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की त्यांनी एका राजकीय संघर्षाचा एक भाग बनविला होता ज्यात नवीन राष्ट्र-राज्य स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम लीगने एकमेकांशी स्पर्धा केली होती, तर ब्रिटिशांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांच्यासाठी सर्वात कमी संभाव्य राजकीय किंमतीवर डीकोलोनाइझेशन करा. +बंगालमधील प्रमुख राष्ट्रवादी पक्षांमधील राजकीय स्पर्धा ही नवी दिल्लीपेक्षा वेगळी होती. मुख्यत: त्या संघटनांचा व्यापक जनसमूह आणि त्यांनी पार पाडलेल्या लवचिक राजकीय व्यवहाराची परंपरा. दंगलीच्या प्रारंभीच्या टप्प्यावर, काँग्रेस आणि मुस्लिम लीगला खात्री होती की राजकीय पडद्याआड एखादी कठीण परिस्थिती उद्भवली तरीदेखील ते या परंपरेकडे आकर्षित होऊ शकतात. बहुधा, कलकत्तामध्ये प्रत्यक्ष कृती दिन मोठ्या प्रमाणात हड़ताल आणि 'जनसभा' (जो कलकत्त्यातील राजकीय संस्कृतीचा स्वीकारलेला भाग आहे) 'बनवण्याची योजना आखली गेली होती, ज्याला त्यांना नियंत्रित कसे करावे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. तथापि, जनतेकडून मिळालेला प्रतिसाद कोणत्याही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. नव्या परिस्थितीत ‘राष्ट्र’ या शब्दाचा अर्थ लावल्या गेलेल्या तीव्र भावनात्मक प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी गंभीरपणे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वर्तविल्या. ऑगस्ट १९४६ मध्ये 'राष्ट्र' यापुढे केवळ राजकीय घोषणा नव्हती. हे रियलपॉलिटिक आणि लोकांच्या कल्पनेतही वेगाने 'वास्तव' बनत आहे. बंगालच्या राजकीय नेत्यांनी दशकांपासून ज्या व्यवस्थेची सवय लावली होती, ती या गतिशील बदलाला तोंड देऊ शकली नाही. आम्ही पाहिल्याप्रमाणे, गडबडण्याच्या पहिल्या दिवशी ते द्रुत आणि सहजपणे तुटले. +[६] +११-१४ फेब्रुवारी १९४६ कलकत्त्यात झालेल्या दंगलीपासून जातीय तणाव जास्त होता. हिंदू आणि मुस्लिम वृत्तपत्रांनी जनतेच्या भावना भडकावलेल्या आणि अत्यंत कट्टर वृत्तीच्या वृत्ताने जाहीर केल्या की दोन समुदायांमधील वैराग्य वाढले आहे.[१४] +१६ ऑगस्टला प्रत्यक्ष कृती दिन म्हणून जिन्नाच्या घोषणेनंतर बंगालचे तत्कालीन मुख्य सचिव, मुस्लिम लीग मुख्यमंत्री, बंगालचे हुसेन शहीद सोहरावर्दीच्या सल्लेनुसार, आर.एल. वॉकर यांच्या सल्ल्यानुसार, राज्यपाल यांना विनंती केली गेली. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यासाठी बंगाल सर फ्रेडरिक बुरोस. राज्यपाल बुरोज यांनी मान्य केले. १६ ऑगस्ट रोजी कलकत्तामध्ये सरकारी कार्यालये, व्यावसायिक घरे आणि दुकाने बंद राहिल्यास संघर्षाचा धोका कमी होईल, या आशेने वॉकर यांनी हा प्रस्ताव मांडला.[१][६][१५] बंगाल काँग्रेसने सार्वजनिक सुट्टीच्या घोषणेचा निषेध केला आणि असे मत मांडले की मुस्लिम लीगचे नेतृत्व अनिश्चित असलेल्या भागात 'सुट्टी' यशस्वीपणे 'हर्टल्स' लागू करू शकेल . काँग्रेसने लीग सरकारवर “जातीय राजकारणामध्ये अरुंद ध्येयासाठी” गुंतल्याचा आरोप केला.[१६] काँग्रेस नेत्यांनी असा विचार केला की जर सार्वजनिक सुट्टी पाळली गेली तर स्वतःच्या समर्थकांना कार्यालये आणि दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि मुस्लिम लीगच्या 'हरताल'मध्ये हात देण्यासाठी त्यांच्या इच्छेविरूद्ध सक्ती केली जाईल.[६] १४ ऑगस्ट रोजी, बंगाल विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते किरोन शंकर रॉय यांनी हिंदू दुकानदारांना सार्वजनिक सुट्टी पाळण्यास नकार देऊ नये व “धंद्याच्या विरोधात” त्यांचे व्यवसाय उघडे ठेवण्याचे आवाहन केले.[१७] थोडक्यात, यामध्ये अभिमानाचा एक घटक होता की काँग्रेसने आतापर्यंत हर्टल्स, संप इत्यादींची अंमलबजावणी आणि अंमलबजावणी करताना ज्या मक्तेदारीवादी भूमिका घेतली होती त्याला आव्हान दिले जात होते.[६] तथापि, या घोषणेसह लीग पुढे गेली आणि मुस्लिम वृत्तपत्रांनी आजचा कार्यक्रम प्रकाशित केला.[ संदर्भ हवा ] +कलकत्ताचे रघुब अहसन मुस्लिम लीगचे संपादन केलेल्या स्थानिक मुस्लिम वृत्तपत्राच्या 'स्टार ऑफ इंडिया' ने त्या दिवसाचा सविस्तर कार्यक्रम प्रकाशित केला. या कार्यक्रमात आवश्यक सेवा वगळता नागरी, व्यावसायिक आणि औद्योगिक जीवनातील सर्व क्षेत्रात संपूर्ण 'हड़ताल' आणि सामान्य संप पुकारण्याची मागणी केली गेली. कलकत्ता, हावडा, हुगली, मेटियाब्रुज आणि २४ परगनाच्या अनेक भागांतून मिरवणुका सुरू होतील आणि त्या ठिकाणी एकत्र येतील असे या सूचनेत घोषित केले आहे. ऑक्टर्लोनी स्मारकच्या पायथ्याशी (ज्याला आता शहीद मीनार म्हणून ओळखले जाते) जेथे हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त जनसभा घेण्यात येणार आहे. मुस्लिम लीग शाखांना ' जुमा'च्या प्रार्थनेपूर्वी लीगची कृती योजना समजावून देण्यासाठी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक मशिदीत तीन कामगारांची नेमणूक करण्याचा सल्ला देण्यात आला. शिवाय, मुस्लिम भारताच्या स्वातंत्र्यासाठी 'जुमा' प्रार्थना नंतर शुक्रवारी प्रत्येक मशिदीत विशेष नमाजांची व्यवस्था केली गेली.[१८] ' रमजान' या पवित्र महिन्यासह थेट कृती दिनाचे योगायोग यावर जोर देण्यात आला आणि या अहवालात कुरआनची दैवी प्रेरणा घेण्यात आली असून असा दावा केला आहे की आगामी निषेध हे प्रेषित मुहम्मद यांचे प्रतिपादन होते कट्टरतावाद आणि त्यानंतरच्या मक्काचा विजय आणि अरब मध्ये स्वर्ग राज्याची स्थापना यांच्याशी संघर्ष.[१८] +अखंड हिंदुस्थान (संयुक्त भारत) घोषणेभोवती हिंदूंचे मत एकत्र केले गेले. +[१९] बंगालमधील काही काँग्रेस नेत्यांनी हिंदूंच्या अस्मितेची तीव्र जाणीव बाळगली, विशेषतः पाकिस्तान चळवळीच्या हल्ल्याविरोधात अल्पसंख्यांकांमध्ये स्वतःला दुर्लक्षित करण्याच्या संभाव्य धोक्यामुळे.[२] जातीयवादी धर्तीवर अशा प्रकारची जमवाजमव काही अंशतः यशस्वी प्रचार मोहिमेमुळे झाली ज्याच्या परिणामी 'जातीय एकतांना कायदेशीरपणा मिळाला'.[२] +दुसरीकडे, आय.एन.ए. चाचणी नंतर ब्रिटिशांविरूद्ध झालेल्या निषेधानंतर, त्यांच्या "आपत्कालीन कारवाई योजना" नुसार ब्रिटिश प्रशासनाने भारतीय लोकांमध्ये जातीय हिंसाचाराच्या व्यवस्थापनाऐवजी सरकारविरूद्ध निषेधांना अधिक महत्त्व देण्याचा निर्णय घेतला.[६]फ्रेडरिक बुरोज, बंगालचे राज्यपाल यांनी लॉर्ड वेव्हलला दिलेल्या अहवालात "सार्वजनिक सुट्टी" घोषित करण्यास तर्कसंगत केले - सीलदाह रेस्ट कॅम्पमधून सैन्य बोलावण्याविषयी अनिच्छेने ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणण्यासाठी सोहरावर्डीने खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १.४५ पर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सैन्य पाठवले नाही.[६] + लबाडी करणारे बरेच लोक असे लोक होते ज्यांचे कसेही हात घालवले असता. जर सर्वसाधारणपणे दुकाने आणि बाजारपेठा खुली झाली असती तर मला विश्वास आहे की त्यापेक्षा त्यापेक्षा अधिक लूटमार व हत्या झाली असती; सुट्टीमुळे शांततापूर्ण नागरिकांना घरीच राहण्याची संधी मिळाली. +१६ ऑगस्टच्या सकाळी त्रास सुरू झाला. रात्री १० वाजेपूर्वीच लालबाजार येथील पोलीस मुख्यालयाने शहरभर खळबळ उडाली आहे, दुकाने बंद करण्यास भाग पाडले जात आहे, तसेच दगड व वीटबॅट फेकल्याची घटना घडल्याची बातमी मिळाली होती. हे मुख्यत: राजाबाजार, केलाबागान, कॉलेज स्ट्रीट, हॅरिसन रोड, कोलोटोला आणि बुरबाबाझर यासारख्या शहरातील उत्तर-मध्य भागात केंद्रित होते. या भागात हिंदू बहुसंख्य होते आणि उच्च आणि शक्तिशाली आर्थिक स्थितीत देखील होते. या त्रासानं सांप्रदायिक चारित्र्य गृहीत धरून ठेवलं होतं जे त्यांनी कायम राखलं पाहिजे.[१] लीगची रॅली दुपारच्या ऑचर्लोनी स्मारक पासून अगदी सुरुवात झाली. त्यावेळी या मेळाव्याला बंगालमधील सर्वात मोठी मुस्लिम असेंब्ली मानली जात असे. +दुपारी अडीचच्या सुमारास कलकत्ताच्या सर्व भागांतील मुस्लिमांच्या मिरवणुका मध्यरात्रीच्या प्रार्थना पासून एकत्र होण्यास सुरुवात झाली होती. सहभागी झालेल्यांपैकी मोठ्या संख्येने लोखंडी बार आणि लाथीस (बांबूच्या काठ्या) सशस्त्र असल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय इंटेलिजन्स ऑफिसरच्या रिपोर्टरने ३०,००० आणि कलकत्ता पोलिसांच्या विशेष शाखा निरीक्षकांनी ५००,००० हजेरी लावली होती. नंतरचे आकडे अशक्य आहे आणि 'स्टार ऑफ इंडिया'च्या रिपोर्टरने ते सुमारे १०,००,००० ठेवले. मुख्य वक्ते ख्वाजा नाझीमुद्दीन आणि मुख्यमंत्री हुसेन शहीद सुहरावर्दी होते. ख्वाजा नाझीमुद्दीन यांनी आपल्या भाषणात शांतता आणि संयम उपदेश केला परंतु त्याचा परिणाम खराब झाला आणि ते म्हणाले की सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व जखमी लोक मुस्लिम होते आणि मुस्लिम समुदायाने केवळ स्वसंरक्षणात प्रत्युत्तर दिले होते. [१] +कलकत्ता पोलिसची विशेष शाखा मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे कोणतेही उतारे उपलब्ध नसल्याचा परिणाम म्हणून बैठकीला एकच शॉर्टहँड रिपोर्टर पाठविला होता. परंतु सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर आणि एक पत्रकार, ज्याला फ्रेडरिक बुरोस विश्वासार्ह मानत होते, सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना एका वक्तव्यावर सहमती दर्शविली (कलकत्ता पोलिसांनी नोंदवलेलं नाही ). यापूर्वीच्या अहवालातील आवृत्ती होती- "त्यांनी [मुख्यमंत्री] हस्तक्षेप करणार नाही अशा पोलिसांना आणि सैन्य दलाला पाहिले होते".[१] नंतरच्याची आवृत्ती होती- "तो सक्षम होता सैन्य आणि पोलिसांवर अंकुश ठेवा."[१] तथापि, पोलिसांना" रोखण्यासाठी "कोणताही विशिष्ट आदेश मिळाला नाही. तर, याद्वारे सुहरावर्दी जे काही सांगू इच्छित होते, मोठ्या संख्येने अशिक्षित प्रेक्षकांवर अशा प्रकारच्या विधानाची भावना काही लोकांना विकृतीचे खुला निमंत्रण मानले जाते [१] खरंच, बरेच श्रोते आहेत त्यांनी सभा सोडताच हिंदूंवर आक्रमण करणे आणि हिंदूंची दुकाने लुटणे सुरू केल्याची बातमी दिली आहे. [१] [२०] त्यानंतर, कलकत्तामध्ये हॅरिसन रोड खाली उतरलेल्या लॉरी (ट्रक्स) खाली आल्याच्या बातम्या आल्या. त्यामध्ये कठिण मुस्लिम गुंडांनी विटाच्या बोटांनी आणि बाटल्यांनी सशस्त्र शस्त्रे आणि हिंदूंच्या मालकीच्या दुकानांवर हल्ला. [२१] +ज्या भागात दंगल सुरू होती त्या भागात संध्याकाळी ६ वाजता कर्फ्यू लागू करण्यात आला. रात्री आठ वाजता मुख्य मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि त्या रक्तवाहिन्यांमधून गस्त ठेवण्यासाठी सैन्य तैनात केले गेले होते, ज्यायोगे झोपडपट्ट्या व इतर अविकसित विभागातील कामासाठी पोलीस मोकळे होते. [२२] +१७ ऑगस्ट रोजी गार्डन रीच टेक्स्टाईल कामगार संघटनेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला फारुकी यांनी, एलिआन मिस्त्री यांच्यासह कट्टरपंथी मुस्लिम गुंड, मेतिब्रुजच्या लिचूबागन परिसरातील केसोराम कॉटन मिलच्या गिरणी कंपाऊंडमध्ये प्रचंड सशस्त्र जमावाचे नेतृत्व केले. [ संदर्भ हवा ]. गिरणी कामगार, ज्यांपैकी ओडियसची बरीच संख्या होती, गिरणीच्या आवारातच राहत असत. २५ ऑगस्ट रोजी चार बचावलेल्यांनी फारुकीविरोधात मेतीब्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. [२३] विश्वनाथ दास , ओरिसा मधील मंत्री, केशोरम कॉटन मिलच्या मजुरांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी लिकुबागानला भेट दिली.[२४] काही स्त्रोतांचा अंदाज आहे की मृतांचा आकडा १०,००० किंवा त्याहून अधिक होता. [३]. अनेक लेखक असा दावा करतात की हिंदू प्राथमिक बळी पडले होते तर अनेकांचा असा दावा आहे की मुस्लिम कामगारही मारले गेले.[२५] +१७ ऑगस्ट रोजी दिवसभरात ही हत्या झाली. दुपार उशिरापर्यंत सैनिकांनी सर्वात वाईट भागात नियंत्रणात आणले आणि सैन्याने रात्रीपर्यंत त्याचा ताबा वाढविला. झोपडपट्ट्या व इतर भागात लष्करी नियंत्रणाबाहेर असलेल्या भागात अजूनही अधुनमधून आणि दंगली वाढत गेल्या. १७ ऑगस्टच्या दिवशी सकाळी "तलवारी, लोखंडी पट्टे आणि बंदुकीच्या शस्त्रास्त्रांनी भरलेली शीख आणि हिंदूंनी भरलेली बस आणि टॅक्सी आकारत होते." "[२६] +समुदायांमधील संघर्ष जवळजवळ आठवडाभर चालू होता. अखेर २१ ऑगस्ट रोजी बंगालला व्हायसरॉयच्या अंमलाखाली आणण्यात आले. ब्रिटिश सैन्याच्या बटालियन, ज्यात भारतीय आणि गुरखा यांच्या बटालियन समर्थीत आहेत, शहरात तैनात करण्यात आले. लॉर्ड वेव्हल यांनी असा आरोप केला आहे की आधी अधिक सैन्य मागवायला हवे होते आणि अधिक ब्रिटिश सैन्य उपलब्ध नसल्याचा कोणताही संकेत नाही. [२५] २२ ऑगस्ट रोजी दंगल कमी झाली. [२७] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11161.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e828a393b349d86c1f50ef1386b715fef236a69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11161.txt @@ -0,0 +1,9 @@ + बोरखत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथील कातळ खोदशिल्पे मार्च २०२४ मध्ये उजेडात आली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11167.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..547a43337f1dbacb60e3e5e0a949d8e2afe6c911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11167.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरखेडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11179.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5247ae9754b004b243b14ee133caa42b7039b731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11179.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11183.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fae6fe60aba9b28db02c891a6d31a673a97bf4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11183.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11194.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3eee06ec515e0fb064f5431e780247b0d57f0b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11194.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_112.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55a78e0863077a3c27f534f008b41dbfd4714bee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_112.txt @@ -0,0 +1 @@ +पोप क्लेमेंट आठवा (फेब्रुवारी २४, इ.स. १५३६ - मार्च ३, इ.स. १६०५:रोम, इटली) हा जानेवारी ३०, इ.स. १५९२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11204.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..703236e7f42a08a402023cdb2dc256c9264724f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11204.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11208.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb774b2b56065c40778597555b084482491befd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11208.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1122.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e347a33c93b13e7568a732e31d33abba208fbd49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1122.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रथम माहिती अहवाल( इंग्रजी: First Information Report/FIR ) हा दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर तयार केलेला दस्तऐवज असतो, जो भारतीय उपखंडातील आणि आग्नेय आशियाई देशांपैकी भारत, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान येथील पोलीसांद्वारे तयार केला जातो. सिंगापूरमध्ये कोणत्याही गुन्हेगारी गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पोलीस हा अहवाल तयार करतात. +हे दस्तावेज सामान्यत: दखलपात्र गुन्ह्यातील पीडित व्यक्तीने किंवा त्यांच्या वतीने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनंतर तयार केले जाते, परंतु कोणीही अशी तक्रार तोंडी किंवा लेखी पोलिसांना करू शकते, म्हणून दखलपात्र गुन्ह्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे गुन्हे गंभीर असतात जसे की खून, बलात्कार किंवा दरोडा, जे समाजासाठी तत्काळ धोका निर्माण करतात +अदखलपात्र गुन्ह्यासाठी समुदाय सेवा रजिस्टरमध्ये किंवा स्टेशन डायरीमध्ये नोंद केली जाते. +प्रत्येक एफआयआर महत्त्वाचा असतो कारण ती फौजदारी न्यायाची प्रक्रिया गतीमान करते. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतरच पोलीस बहुतेक प्रकरणांचा तपास करतात. पोलिस अधिकाऱ्यांसह, दखलपात्र गुन्ह्याबद्दल माहिती असलेल्या कोणालाही एफआयआर दाखल करता येईल. +कायद्यात वर्णन केल्याप्रमाणे: +एफआयआरमध्ये तारीख, वेळ, ठिकाण, घटनेचे तपशील आणि गुंतलेल्या व्यक्तीचे वर्णन समाविष्ट असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11235.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f1e5226fbf9b173ed5cb3edca95ebf1249c986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11235.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11243.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee883c5c24d64f0ca4d22668c2d5e89d9fe5a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11243.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव चेक नंबर १ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11259.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7544463b97b80ef032559bbbcaceee36b6f0d885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11259.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगावजहागिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11290.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28e2b3bc7b7ca487bfee621c961f38637927f08e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11290.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरझार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11298.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c4666cc952a3d490677e22479123b69a78769fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11298.txt @@ -0,0 +1 @@ +बोरडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11303.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc5c4ba54d1dc184315b9921662a9df6225256a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11303.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे. साताऱ्यातील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1133.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1cae5fa3ef35664c116563aefb02ab518638089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1133.txt @@ -0,0 +1 @@ +प्रदातुरु विधानसभा मतदारसंघ - १३२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. प्रदातुरु हा विधानसभा मतदारसंघ कडप्पा लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11358.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c23239fabaf56b3e78eb1f5157631fc2dfe50f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11358.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11390.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc811d5be343e0b6f79bbf1809603d42ece03644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11390.txt @@ -0,0 +1 @@ +बोरिस त्रायकोव्स्की (मॅसिडोनियन: Борис Трајковски; २५ जून, इ.स. १९५६ - २६ फेब्रुवारी, इ.स. २००४) हा १९९९ ते २००४ पर्यंत मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11398.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31ae81087edc4d338cc6f4a34b41789fe3cdf339 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11398.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक (रशियन: Бори́с Леони́дович Пастерна́к; १० फेब्रुवारी १८९० - ३० मे १९६०) हा एक रशियन लेखक व कवी होता. पास्तरनाकने १९१७ साली रचलेला माझी बहीण, जीवन नावाचा कवितासंग्रह रशियन साहित्यामध्ये मौल्यवान मानला जातो. पास्तरनाकने योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, फ्रीडरिश शिलर, विल्यम शेक्सपियर इत्यादी अनेक विदेशी कलावंतांनी लिहिलेली नाटके रशियन भाषेत अनुवादित केली. +१९५६ साली पास्तरनाकने डॉक्टर झिवागो नावाची एक कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीचे कथानक १९०५ सालच्या रशियन क्रांती व दुसरे महायुद्ध ह्यादरम्यानच्या कालावधीमधील होते. पास्तरनाकचे समाजवादावरील स्वतंत्र विचार सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाला पटले नाहीत व सोव्हिएत सरकारने ह्या कादंबरीचे प्रकाशन करण्यास नकार दिला. डॉक्टर झिवागोचे हस्तलिखित चोरून इटलीच्या मिलान येथे आणले गेले व १९५७ साली ही कादंबरी इटलीमध्ये प्रकाशित केली गेली. ही कादंबरी रातोरात जगप्रसिद्ध झाली व १९५८ साली पास्तरनाकला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाल्याचे घोषित करण्यात आले. ह्यामुळे खवळून उठलेल्या सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास मनाई केली. ह्या बंदीनंतरही सोव्हिएत सरकारचा राग शांत झाला नाही व राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्हने पास्तरनाकची देशामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. पास्तरनाकच्या मुलाच्या मतानुसार भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांनी ख्रुश्चेव्हला ह्याची अंमलबजावणी करण्यापासून थांबवले. १९६० साली पास्तरनाकचे निधन झाले. +अखेर १९८८ साली पास्तरनाकच्या वंशजांनी नोबेल पारितोषिक स्वीकारले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11408.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875f9cb552d8099a14cb9d082a0414a6a4fb62ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11408.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1141.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a354c6a2e4a8d50868f603c319b428b75ec9e141 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1141.txt @@ -0,0 +1 @@ +प्रदीप कुमार चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11415.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cffd4ad358d28aea339271b495611e222f4c43ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11415.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५३ असलेले बोरी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३१३.४६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ६३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २७४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा निमगाव येथे आहे. माध्यमिक शाळा निमगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11420.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ba10709091257cffcbb7bd0d9d0155ac967c8d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11420.txt @@ -0,0 +1 @@ +बोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11434.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de787c87fe32018d79be8d294c75168bb5e04d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11434.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11455.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb036bfd4402145f3951f6d0ac1696ef4712ff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11455.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरी बंदर हे मुंबई, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक क्षेत्र आहे. ते दक्षिण मुंबई मध्ये आहे. +या जागेचा वापर मुंबईतून आयात-निर्यात होणाऱ्या मालाचे भांडार म्हणून केला जात असे. +१८५० च्या दशकात, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने या भागात आपले रेल्वे टर्मिनस बांधले आणि स्थानकाचे नाव बोरी बंदर असे ठेवले.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11485.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e089705d93f929d5c1198b023acb252ec3f66e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11485.txt @@ -0,0 +1 @@ +क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBP, आप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1150.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bfca2ff374314336744af3c8f1c453e5157dade --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1150.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रदीप दळवी (जन्म : इ.स. १९५४; - २० जानेवारी २००५) हे एक मराठी साहित्यिक व नाटककार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11504.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01f7c4bb000ce316df6c250a823699fd910a20ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11504.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[१] +इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे. +बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11533.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aca7147e00a61edc0e54ae0211c1742d6fcbd1d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11533.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11537.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b069dc829234441182c3bc678f787084ea6dc588 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11537.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11564.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b6890e9121c25b332a7e58ebbe3b2bb9abd65e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11564.txt @@ -0,0 +1 @@ +बोला अहमद अदेकुनले टिनूबू (जन्म २९ मार्च १९५२) [१] एक नायजेरियन लेखापाल, राजकारणी आणि नायजेरियाचे निर्वाचित अध्यक्ष आहेत. [२] त्यांनी १९९९ ते २००७ या कालावधीत लागोस राज्याचे राज्यपाल आणि थर्ड रिपब्लिकच्या संक्षिप्त काळात लागोस वेस्टचे सिनेटर म्हणून काम केले. [३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11580.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce21d4f18d0c83be8a7eba0f1b17304e47fd0f29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11580.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोलेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11607.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fc9531abc301aed305498ec4e3f951e182fa433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11607.txt @@ -0,0 +1 @@ +पुंजवादानुसार बोसॉन हा बोस-आईनस्टाईन संख्याशास्त्राचे पालन करणारा मूलकण आहे. फर्मियॉन्सव्यतिरिक्त हा एक वेगळा गट आहे. पॉल डिरॅक यांनी भारतीय शास्त्रज्ञ सत्येन्द्र नाथ बोस यांच्या स्मरणार्थ या मूलकणाला 'बोसॉन' असे नाव दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11615.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e51f36c6dde242d720fb7f0c20d63c97e1544124 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11615.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. +बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या उत्तरेला, दक्षिणेला व पश्चिमेला क्रोएशिया, पूर्वेला सर्बिया व आग्नेयेला मॉंटेनिग्रो हे देश आहेत. +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे दोन राजकीय व स्वायत्त विभाग आहेत: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11617.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e51f36c6dde242d720fb7f0c20d63c97e1544124 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11617.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. +बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या उत्तरेला, दक्षिणेला व पश्चिमेला क्रोएशिया, पूर्वेला सर्बिया व आग्नेयेला मॉंटेनिग्रो हे देश आहेत. +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे दोन राजकीय व स्वायत्त विभाग आहेत: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11640.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea507b85a135529486f88582b7b0c413699e41ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11640.txt @@ -0,0 +1,57 @@ + +बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism / बुद्धिझम) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म (जीवन जगण्याची विचारधारा) आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्म हा एक सत्य अनादि शुद्ध सद्धम्म आहे.याचे वर्णन धम्मपदा मध्ये आणि याच सद्धम्मामार्गापासुन अनेक पंथाची उत्पति झाली आहे. तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यासबौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माचे धम्मचक्कपरिवर्तन करून महान उपदेश दिले आहे बौद्ध धर्माची स्थापना स्वतः बुद्धत्वापासुन झाली आहे कारण बुद्धांची परंपरा ही अनादि आहे भगवान गौतम बुद्धाच्या पहिल्या पण बुद्ध होउन गेले आहेत त्यामुळे तीच अनादि परंपरा गौतम बुद्धानी पुढे नेली आहे याचा उल्लेख त्रिपीटक ग्रंथ (बुद्ध वंश) यामध्ये आढळून येतो. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच जगभरात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.[१] +एका अहवालानुसार, जगातील सुमारे १.८ अब्ज ते २.१ अब्ज (२५% ते २९%) लोकसंख्या बौद्ध धर्माची अनुयायी आहे.[२][३] लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा ख्रिश्चन धर्मानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.[४] सर्वाधिक बौद्ध अनुयायी चीन राहतात. काही अहवालांनुसार, ८०% ते ९१% चिनी लोकसंख्या (११० कोटी ते १२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे.[५] बौद्ध धर्म हा जगातील २०० पेक्षा अधिक देशांत असून २० देशांत बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडांत तथागत बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्मानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू, दलित धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायित्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्मसुद्धा ठरतो. +कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास +(इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००) + भारतप्रारंभिकसंघ        श्रीलंका आणि दक्षिण आशिया        तिबेटी प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म +   पूर्व आशियाप्राचीन बौद्ध संस्कृतीआणि महायान रेशीम मार्गद्वारेचीन, आणि रोमन साम्राजाशी संपर्क भारत ते व्हियेतनामTangmiनांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū)शिंगोन बौद्ध धर्म   निचिरेनज्युदो शू  मध्य आशिया ग्रीक बौद्ध धर्म रेशीम मार्ग बौद्ध धर्म ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्म हा भारतातील एक अतिप्राचीन, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ व परिवर्तनशील धर्म आहे. बौद्ध धम्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला मोठे स्थान आहे.बुद्ध धम्म हा अति प्राचीन आहे , गौतम बुद्ध यांचे पूर्वी पन 21 बुद्ध होउन गेले , त्यांची माहिती ही त्रिपिटक या बुद्ध ग्रंथामध्ये सापड़ते। शिवाय पूर्व बुद्ध यांची नावे सुद्धा शिलालेखावर लिहिलेलेली आहेत। मोहोंजोदडो तसेच हड़प्पा या संस्कृति मध्ये बुद्ध स्तूप , चैत्य , शिल्पकला सापड़ली आहेत । त्यावरुण हे सिद्ध होते की बुद्ध धम्म हा साधारण ४००० ते ५००० ई. पू.उदयास आला आहे। त्यानुसार बुद्ध धम्म हा दोन कलावधित मांडला जाइल। पूर्व बुद्ध युग आनी गौतम बुद्ध युग । पूर्व बुद्ध युगविषयी पूर्ण माहिती अजुन प्राप्त नाही झाली । गौतम बुद्ध यांच्या नंतर च्या इतिहासाची बरीच माहिती उपलब्ध आहे। त्यानुसार गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धम्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यांत आढळते. तर बौद्ध धम्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने जगातील अनेक देशांमध्ये पसरले. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, चैत्य, चैत्य व लेण्या ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवनविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धम्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. +बौद्ध धम्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धम्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात मुसलमानांची आक्रमणे भारतात झाली. भारतातून बौद्ध धम्माचा प्रभाव कमी करून लापविन्याचे काम हिंदू धर्म (वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म) याने केला आहे। बुद्ध मूर्ति चे हिंदूकरण केले । हिंदू राजांनी केलेले अत्याचारही कारणीभूत आहेत। .[६] +तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला. +बौद्ध अनुयायी लोक गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली, अशा मागील १० हजार वर्षामधील जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या गेलेल्या १०० विश्वमानवांची यादी तयार केली होती. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’ +‘शाक्यमुनी’ (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बुद्ध हे बौद्ध धर्माचे मुख्य स्तंभ आहेत. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. +गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता, इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात. +ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. +इ.स.पू. ४८३मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. +उत्तर प्रदेशातील कुशीनगरयेथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांचा अत्यंसंस्कार जेथे झाला,तेथे रामाभर स्तूप उभारला आहे. +भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेले आहेत. +भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. +महान बौद्ध विद्वान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे ही दोनच आर्यसत्त्वे महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे. +बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालील पाच शीलांची शिकवण दिलेली आहे. +या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो. +महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. +अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. +बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता ह्या शील मार्ग होत. +बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी / विज्ञाननिष्ठ आहे. खालील बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे - ‘सत्याचा शोध’. +विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे. +विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही. +नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो, कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पुत्र आहे. परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’ +विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास, धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो. +भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे. +उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्विन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धान्त आधी २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय. +भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्वीकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे. +जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो. +प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्याना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले. +बौद्ध धर्माचा जगातील सर्व समाज जीवनावर प्रभाव पडलेला आढळतो. कारण बौद्ध धर्म सर्व श्रेष्ठ धर्म आहे . +बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले. +वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला. +बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे. +तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला. +विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे. +करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे. +वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुंफा) - खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. +बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे. +बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे. +बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खु हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. +बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हॉंगकॉंग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. +बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. +म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांची ब्रह्मी भाषेत भाषांतरे झाली आहेत. +बौद्ध धर्माचे बुद्ध, धर्म, संघ या प्रमाणेच अन्य महत्त्वाची प्रतीके वा चिन्हे आहेत. +महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान इत्यादी बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय किंवा पंथ आहेत. यांच्याशिवाय शेकडो बौद्ध संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत. +संपूर्ण जगात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि उर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथसुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहुसंख्याकांच्या रूपात राहतात. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और युरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणतीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. +बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्याविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खाललप्रमाणे आहेत. +तुकोबा शरीरी प्रवेशला ।। +बौद्ध अवतार पांडुरंग ।। +मौन्य मुखे निष्ठा धरियली । +तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । +शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे ।। +वर्णावया मात नामा म्हणे ।। diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1167.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b882a69d75ae024a6e126006cda320336f70fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1167.txt @@ -0,0 +1,32 @@ +१६ एप्रिल, इ.स. २००८ +दुवा: [cricinfo.com] (इंग्लिश मजकूर) + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11671.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca9e42fe1f8154385a6f68d9bf1c4532176a5cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11671.txt @@ -0,0 +1,2 @@ +बौद्ध साहित्य संमेलन या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी अंबाजोगाईची बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने एकाहून अधिक संमेलनांचा समान अनुक्रमांक असू शकतो. आणि त्यामुळे कोणत्याही विशिष्ट संमेलनाचा नक्की अनुक्रमांक सांगता येत नाही. +इ.स. १९६८ साली बेळगावला एक बौद्ध साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष रतनलाल सोनग्रा होते. संमेलनाला कोणताही अनुक्रमांक नव्हता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11672.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7235cbbe60f16798b2e453d9c171aa19ab06a014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11672.txt @@ -0,0 +1 @@ +बौद्ध स्मारक समिती ही महागाव ह्या गावाच्या आसपासची गावे मिळून ही एक संघटना बनली आहे. महागाव हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. इथे बौद्ध धर्मीय लोकांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांनी ही समिती बनविली आहे. महागाव हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा मोठे आहे. गावात दोन मुख्य महाविद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11676.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a74f8ca09cbd9bbe3660deb48da73000dbaf864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11676.txt @@ -0,0 +1,2 @@ +बौद्धाचार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा पूर्ण आचार्य असतो. ज्यांना बुद्धांच्या संपूर्ण धम्माचे तत्त्वज्ञान संपादन केले आहे त्यांना बौद्धाचार्य (बौद्ध आचार्य) असे म्हणतात. +विश्वात आतापर्यंत प्राचीण काळात बुद्धांनंतर दोनच बौद्धाचार्य झाल्याचे नोंद मिळते. प्रथम बौद्धाचार्याचे नाव बुद्धघोष तर दुसऱ्या बौद्धाचार्याचे नाव नागार्जुन असे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11678.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..055f82a4ecac1f8fcc70afcc8d3c1beb2053db34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11678.txt @@ -0,0 +1,3 @@ +काही हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णुचा नववा अवतार आहे. तसेच काही हिंदू जणांच्या मते, हा (बुद्ध) विरोधी अवतार असून सनातन वैदिक धर्माच्या विसंगत अशी शिकवण या अवताराद्वारे करण्यात आली. मात्र याचा मूळ हेतू हा अनाधिकारांच्या हाती गेलेला वैदिक धर्म त्यांच्यापासून निराळा करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शाखा प्रस्थापित करणे, हा होता. इतर जणांच्या मते, गौतम बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार नसून कलियुगात संतांच्या माध्यमातून वेळोवेळी होत असलेली धर्मसंस्थापना हाच विष्णूचा अवतार आहे. त्यांच्या मते, कलियुगात सर्व सामान्यांची बुद्धी सनातन वैदिक धर्मापासून भ्रष्ट झालेली आहे. ती सन्मार्गाला लावून कलियुगातील आर्त, दुःखी जीवांना साधनेच्या मार्गाला लावणे, त्यांना मुमुक्षू, नंतर साधक व शेवटी मोक्षास नेणे, हे संतांचे कार्य आहे. यात समाजात वेळोवेळी होणारे रज-तमाचे प्रदूषण दूर करणे, हा या अवताराचा क्षात्रधर्म आहे. हे कार्य संतांच्या हातूनच होईल आणि हाच बौद्धावतार असेल.[ संदर्भ हवा ] +श्रीमद्भागवत्महापुराणामते गौतम बौद्धच हे भगवान विष्णूचे नववे बौद्धावतार होते आणि ते महात्मा गौतम बुद्ध भारतात होऊन गेले. त्यान्चा जन्म हा कीकट क्षेत्रात म्हणजेच बोधगया येथे झाला, कारण श्रीमद्भागवत्महापुराणात "बुद्धो नामाम्जनसुतः कीकटेशु भविष्यति" असा श्लोक आहे. यज्ञात धार्मिक गैरसमजुतीतून होणाऱ्या पशुहत्येस ह्यानी विरोध केला होता. +बौद्ध अनुयायांच्या मते, हा हिंदू धर्मातील बुद्धावतार हा बौद्ध तत्त्वज्ञानाला धरून नाही व बौद्ध धर्माशी सुसंगतही नाही. चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचे नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादी अवैदिक देवतांना विष्णूचे अवतार बनवून टाकलेच, पण गौतम बुद्धालाही नववा अवतार बनवून टाकले. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादी तत्त्वे उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. तसेच गौतम बुद्ध अवतार नसण्याचे कारण म्हणजे त्याची अवैदिक शिकवण सर्व अवतार हे वेदसंस्कृतीला धरून कार्य करणारे होते, तर बुद्ध हा आचार धर्माला मानणारा होता. आचार धर्माला आत्म्याचे अधिष्ठान लागत नाही. 'आत्म्याचे अस्तित्व मानणे हे सर्व अनर्थांचे मूळ आहे’, अशी त्याची धारणा असल्याने तो ईश्वर या संकल्पनेच्या विरुद्ध होता. याला अनीश्वरवादी प्रवृत्ती, असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11684.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..647ce85197bdc3650c1f453edad7c8743d046cb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11684.txt @@ -0,0 +1,2 @@ +बौधायन धर्मसूत्र ही एक धर्मशास्त्रीय वचनांचा संग्रह आहे.[१] +इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर या ग्रंथाची रचना बौधायन याने केली आहे असे मानले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11701.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38bbbbf97c958669806341dce9c019ee364ac146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11701.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 53°7′N 23°9′E / 53.117°N 23.150°E / 53.117; 23.150 + +ब्याविस्तोक (पोलिश: Białystok ) ही पोलंड देशाच्या पोडाल्स्का प्रांताची राजधानी व ईशान्य पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11756.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b58a4908dde6773e5d7ca68ecbf5f48f14f493d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11756.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रँक ब्रंटन ब्रुन स्मिथ (१३ मार्च, १९२२:न्यू झीलंड - ६ जुलै, १९९७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४७ ते १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11762.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9914edecdc714d712059f57e37489f5dda49bc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11762.txt @@ -0,0 +1,29 @@ +ब्रह्मचर्य हा योगाच्या आधारभूत स्तंभांपैकी एक आहे. ब्रह्मचर्याश्रम हा वैदिक धर्माश्रमानूसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे. हा काळ साधारणतः वयाच्या ०-२५ वर्षे या कालखंडात असतो. आणि या आश्रमाचे पालन करत प्रत्येक विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी विद्याग्रहण करावी लागते. +ब्रम्हचर्य आश्रमांचे नियम - +नारद म्हणतात – गुरुकुलात निवास करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे, +गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. +सायंकाळी आणि प्रातःकाळी गुरू, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळेची संध्या करावी. (१-२) +गुरुजी जेव्हा बोलावतील, तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे. +पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करावा. +शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवित आणि हातामध्ये दर्भपवित्र धारण करावे. +सायंकाळी आणि प्रातःकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी. त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे, नाहीतर उपास करावा. +आपल्या शीलाचे रक्षण करावे. +थोडे खावे, +आपले काम निपुणतेने करावे, +श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. +स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल, तेवढाच व्यवहार करावा. +जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे, त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे. +इंद्रिये अतिशय बलवान आहेत. प्रयत्‍न करणाऱ्यांचे मनसुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात. +तरुण ब्रह्मचाऱ्याने तरुण गुरुपत्‍नीकडून +भांग पाडणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उटणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत. +स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत. +आपल्या कन्येबरोबरसुद्धा एकांतात राहू नये. +इतर वेळी सुद्धा जरुरीपुरतेच तिच्याजवळ असावे. +जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिये केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत “हा पुरुष आणि ही स्त्री” हे द्वैत संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते. हे निश्चित. (३-१०) +शील-रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत. +गृहस्थाश्रम्याने गुरुकुलात राहून गुरूची सेवा करणे हे (समयानुसार) ऐच्छिक आहे. कारण पत्‍नीच्या ऋतुकाळी त्याला तेथून घरी जावे लागते. +ब्रह्मचाऱ्याने काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे, स्त्रियांची चित्रे काढणे, मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार घालणे, अत्तर, सुवासिक तेल, चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा. +अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद, त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे, अध्ययन करावे. तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा. तसेच जर सामर्थ्य असेल, तर गुरू मागतील तेवढी दक्षिणा द्यावी. नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ, वानप्रस्थ किंआ संन्यास आश्रमात प्रवेश करावा किंवा जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे. +जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणेजाणे असू शकत नाही, तरीसुद्धा अग्नी, गुरू, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, असे पाहावे. +अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञानसंपन्न होऊन परब्रह्मतत्त्वाचा अनुभव घेतो. +श्रीमद् भागवत महापुराण diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11788.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b695b90224fa81ab0c48279baaa3b43bec9c1e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11788.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्रम्ही विकिपीडिया ( ब्रम्ही : မြန်မာဝီကီပီးဒီးယား उच्चार : [mjəmà wɪkɨˈpiːdiə] ) विनामूल्य ऑनलाइन ज्ञानकोश विकिपीडियाची ब्रम्ही भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जुलै २००४ मध्ये सुरू केली गेली होती आणि एप्रिल २०२१ पर्यंत यात जवळपास १,००,००० लेख आहेत. +एप्रिल २०२१ मध्ये यात ९१,००० वापरकर्ते, ४ प्रशासक आणि २,८४४ संचिका होत्या आणि लेखसंख्येनुसार हे ८५व्या क्रमांकाचे विकिपीडिया होते.[१] +म्यानमार संगणक व्यावसायिक संघटनेने २०१० मध्ये विकिपीडियाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने विकिपीडिया म्यानमार प्रकल्प सुरू केले.[२] +जून २०१४ मध्ये ब्रम्ही विकिपीडिया समुदायाने टेलेनॉर म्यानमारच्या सहाय्याने यंगून, म्यानमार येथे नवीन स्वयंसेवक भरती करण्यासाठी त्यांची प्रथम संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती.[३] जुलै २०१४ मध्ये डॅगन विद्यापीठात ब्रम्ही विकिपीडिया फोरम आयोजित करण्यात आला होता, त्यात विद्यार्थ्यांसह २,०००हून अधिक लोक आकर्षित झाले.[४] +बर्मीचे बहुतेक इंटरनेट वापरकर्ते नॉन-युनिकोड झॉग्यी फॉन्ट वापरतात म्हणून त्यांना बर्मी विकिपीडिया पाहण्यात अडचण येते.[२][४][५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11794.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4be6d9ed55c04f79820fa9a8c6fba4803395d4a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11794.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्रसेल्स साउथ शार्लरुआ विमानतळ [a] ( बीएससीए ) तथा ब्रसेल्स-शार्लरुआ विमानतळ [b] किंवा शार्लरुआ विमानतळ [c] (आहसंवि: CRL, आप्रविको: EBCI) हा बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहराजवळील शार्लरुआ उपनगरात आहे +या विमानतळावरून खालील विमानकंपन्या नियमित प्रवासी आणि भाड्याची उड्डाणे चालवतात: [१] + + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1183.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ce665abacb019f625e8ec67682e627de237aec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1183.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंतप्रधान एक असा राजकिय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करीत असतो. सामान्यपणे, पंतप्रधान आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो. +पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनावे लागेल. जर मंत्री या कालावधीत सदस्य बनण्यात अयशस्वी राहिले तर त्यांना राजिनामा द्यावा लागतो. परंतु याचा असा अर्थ अजिबात नाही की प्रत्येक वेळी सहा महिन्यांसाठी नेता सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री पदावर विराजमान राहू शकतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे. +प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11841.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5834a0279b128ea1f457812608237a1d764a2481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11841.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11861.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67f6f424552440684a13de0cd96fc98e7a071d59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11861.txt @@ -0,0 +1,12 @@ +महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे (जन्म : १३ जून १९४०; मृत्यू : पुणे, ६ ऑगस्ट, २०१३) हे एक मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक होते. +औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक असलेले डॉ. देशपांडे निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्यास होते. +ब्रह्मानंद देशपांडे हे मूळचे वाशीम जिल्ह्यातले. मराठवाड्यातील एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण नागपूर आणि मध्य प्रदेशातील सागर येथे झाले. महाराष्ट्रातील शिलालेख - ताम्रपटांचा अभ्यास करून नागपूर विद्यापीठातून आधुनिक इतिहास या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट संपादन केली होती. +ब्रह्मानंद देशपांडे यांनी पैठण, औरंगाबाद आणि नागपूर येथील महाविद्यालयांत इतिहास हा विषय शिकला. त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती महाविद्यालयात सलग ३१ वर्षे अध्यापनाचे काम केले. शिक्षणाबरोबरच इतिहास संशोधनात उतरलेल्या देशपांडे यांनी पुढे महाराष्ट्रातील सातवाहनपासून ते मराठ्यांच्या कालखंडांचा मोठा अभ्यास केला. या बरोबरच अजिंठा-वेरूळची लेणी, पैठण, सातवाहन समाज, महानुभाव पंथ, संतवाङ्‌मय, कवी भूषण हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. +वेरूळ आणि अजिंठा लेण्यांचे ते भाष्यकार होते. आजपर्यंत हजारो पर्यटकांना अजिंठय़ाची चित्रसृष्टी आणि वेरूळचे शिल्पवैभव यांचे दर्शन त्यांनी घडविले. +मिळाला आहे. +मराठी, हिंदी, इंग्रजीशिवाय संस्कृत, गुजराती, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी आणि छत्तीसगढी अशा दहाहून अधिक भाषांवर देशपांडे यांचे प्रभुत्व होते. महाराष्ट्रातील बऱ्याच बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. ब्राह्मी, फारसी, मोडी लिपीचे ते तज्ज्ञ होते. +ब्रह्मानंद देशपांडे यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय परिषदांमधून दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो लेख, स्मरणिकांचे संपादन व प्रकल्पांमधील सहभाग त्यांच्या नावावर जमा आहेत. +नागपूर विद्यापीठाशी आणि मराठवाडा विद्यापीठाशी त्यांचा जवळचा संबंध होता. खानदेश इतिहास परिषदेचे आणि कर्नाळा दुर्ग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद, नटनागर शोधसंस्थान (मध्य प्रदेश), यक्षायतम प्रतिष्ठान, अखिल महानुभाव परिषद, हिंद-उर्दू सोसायटी, छत्तीसगड शोधसंस्थान आदी संस्थांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथसंपदा आणि दुर्मीळ वस्तू भारत इतिहास संशोधक मंडळाला देणगी म्हणून बहाल केल्या होत्या. +महानुभाव या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते. +आकाशवाणीवर रूपके आणि परीक्षणणही त्यांनी सादर केली आहेत. महानुभाव आणि जैन या साहित्याचे डॉ. देशपांडे हे अभ्यासक होते. ओजस्वी वक्ता, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11867.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d20faaea22b5d6ed85512bf42aeba880f798cf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11867.txt @@ -0,0 +1,2 @@ + ब्रह्मी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11878.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c111151de0355e70acc5899a363cb8345098cf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11878.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रांडेनबुर्ग हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. पोट्सडाम ही ब्रांडेनबुर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान ब्रांडेनबुर्ग हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11888.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bb5bee6093088421c076b8b3d62484bf153f46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11888.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राउन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11901.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e4ac9f7eacf8a7493adfc02ba30e7e5157c0a91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11901.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 4°16′S 15°17′E / 4.267°S 15.283°E / -4.267; 15.283 + +ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसऱ्या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11909.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08def3490354bf5f18d0994aa23141f4d75c31fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11909.txt @@ -0,0 +1 @@ +ब्राझिल महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात ब्राझिलचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1192.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1adc86fc013f25e213bc566050de91aa2b47231c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1192.txt @@ -0,0 +1,6 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना(इं:Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana लघुरुप: (PMKVY))ही एक भारत सरकारची कौशल्य विकास करण्यासाठीची योजना आहे.15 जुलै 2015रोजी सुरू.याद्वारे कौशल्ये ओळखणे व त्यांना दर्जा देणे अशी कामे केल्या जातील. +या योजनेद्वारे दैनिक वेतन मिळणाऱ्या कामगारांचे कौशल्याचा विकास करणे असा उद्देश आहे जेणेकरून त्यांना योग्य रोजगार मिळू शकेल. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11921.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da137796b5d966fa389f75d9bd47f0e65b8e7f2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11921.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी ब्राझील क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ब्राझीलने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी चिली विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11927.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08def3490354bf5f18d0994aa23141f4d75c31fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11927.txt @@ -0,0 +1 @@ +ब्राझिल महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात ब्राझिलचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1193.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..209a06a8ee7c40df8c6d10ad9cb3c63842a7a326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1193.txt @@ -0,0 +1,7 @@ +प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ( PMGKAY) म्हणजे गरीबांसाठीची अन्न सुरक्षा योजना, ही भारतातील कोविड-१९ साथीच्या काळात भारत सरकारने २६ मार्च २०२० रोजी घोषित केलेली अन्न सुरक्षा कल्याणकारी योजना आहे.[१] हा कार्यक्रम ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाद्वारे चालवला जातो. +सर्व प्राधान्य कुटुंबांना (रेशन कार्डधारक आणि अंत्योदय अन्न योजना योजनेद्वारे ओळखले गेलेले) सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे भारतातील सर्वात गरीब नागरिकांना अन्न पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पीएमजीकेवाय प्रत्येक व्यक्तीला ५ किलो तांदूळ किंवा गहू (प्रादेशिक आहाराच्या प्राधान्यांनुसार) आणि रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक कुटुंबाला १ किलो डाळ प्रदान करते.[२] या कल्याणकारी योजनेच्या व्याप्तीमुळे हा जगातील सर्वात मोठा अन्न सुरक्षा कार्यक्रम ठरला आहे.[३] +ही योजना प्रारंभी २६ मार्च २०२० रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेद्वारे सुरू करण्यात आली होती. मोदींनी कोविड-१९ महामारीच्या दरम्यान राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात विद्यमान प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या कल्याणकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाची घोषणा केली होती. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून २०२० या कालावधीसाठी ₹१.७० लाख कोटी (US$22 अब्ज) च्या खर्चासह सुरू करण्यात आली होती.[४] +नंतर मोदींनी राष्ट्राला दिलेल्या संबोधनात ही योजना नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली. मे २०२० च्या अखेरीस, अन्न मंत्रालयाचा अंदाज आहे की हा कार्यक्रम ७४९ दशलक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. कार्यक्रमाचे कौतुक करताना, एका सरकारी अधिकाऱ्याने कल्याणकारी योजनेतील व्याप्ती "प्रभावी" असल्याचे नमूद केले.[५] दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याने या योजनेवर भाष्य करताना म्हटले: "हे सुनिश्चित करेल की देशात कोणीही उपाशी झोपणार नाही..."[६] +जून २०२० च्या अखेरीस या उपक्रमाची मुदत संपत असताना, देशातील दहा राज्यांनी यात मुदत वाढ करण्याची विनंती केली.[७] भारतात कोविड-१९ सुरू झाल्यापासून मोदींनी देशाला केलेल्या त्यांच्या सहाव्या संबोधनात याची पुष्टी केली. भारतातील आगामी सणांच्या हंगामाचा विचार करून, मोदींनी PMGKAY ची मुदत नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्याची घोषणा केली, ज्याचा सरकारी अंदाजानुसार ८०० दशलक्ष लाभार्थ्यांना फायदा होईल. त्यांनी पुढे नमूद केले की कार्यक्रमाच्या विस्तारासाठी ₹ ९०,००० कोटी (US$12 बिलियन) अतिरिक्त खर्च येईल. योजनेचे प्रमाण हे जगातील सर्वात मोठे अन्न सुरक्षा कार्यक्रम बनवते.[३] मोदींच्या भाषणाचे वृत्तांकन, फायनान्शियल एक्सप्रेस ने "ही योजना यूएसच्या लोकसंख्येच्या २.५ पट, यूकेच्या लोकसंख्येच्या १२ पट आणि युरोपियन युनियनच्या लोकसंख्येच्या दुप्पट असू शकते" असा दावा केला.[८] मोदींनी या योजनेच्या यशाबद्दल आपल्या भाषणात "कष्टकरी शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांचे" आभार मानले.[९] मोदींच्या घोषणेनंतर लगेचच, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी या योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मंत्री वर्गाची बैठक बोलावली.[१०] +अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या विस्तारासाठी राज्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून, अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पुढे टिप्पणी केली की सरकारची आणखी एक प्रमुख योजना, "एक राष्ट्र - एक शिधापत्रिका" ची योजना आखली जात आहे आणि ती मार्च २०२१ मध्ये सुरू होणार आहे. नवीन प्रस्तावित योजना, विशेषतः स्थलांतरित मजुरांना देशभरातील कोणत्याही "स्वस्त धान्य दुकानातून" अनुदानित धान्य मिळण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. +रामविलास पासवान, तत्कालीन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणाले की, "काही राज्ये गरिबांना धान्य वितरित करत नाहीत. वितरणातील समस्या समजत नाही. आम्ही ही समस्या गांभीर्याने घेत आहोत." अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी धान्य वितरणात अपयशी ठरण्यासाठी स्थलांतरित कामगारांच्या कमतरतेला जबाबदार धरले. ऑक्सफॅम इंडियाच्या संचालक राणू भोगल यांनी खाद्यपदार्थ विक्रेते आणि ग्राम परिषद सदस्यांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला.[११] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11931.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08def3490354bf5f18d0994aa23141f4d75c31fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11931.txt @@ -0,0 +1 @@ +ब्राझिल महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात ब्राझिलचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11937.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470731d62f7b5924fc7135859b0f09a87420e0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11937.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ब्राझीलियन ग्रांप्री (पोर्तुगीज: Grande Prêmio do Brasil) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील इंटरलागोस ह्या जिल्ह्यामधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +१९७२ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमधील सर्वात कठीण व मानाच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11942.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fa6cc19f243ace94b7acf199723a90470845465 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11942.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्राझोरिया काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ब्राझोरिया काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11950.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01dada24faddcbb488fce335ccf9900b9b1604e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11950.txt @@ -0,0 +1,4 @@ +पापलेट (Pomfret) या प्रकारचा मासा आशिया खंडातील लोक खातात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागरात, अटलांटिक महासागरात आणि प्रशांत महासागरात आढळतो. +पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पॉँफ्रेट मासे पापलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पॉंफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा कॉंड्रोप्लायटिस वंशातला आहे. काळा पाँफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असून फोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पाँफ्रेटचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढऱ्याचे कॉंड्रोप्लायटिस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पाँफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पॉंफ्रेट नव्हे. या काळ्या पाँफ्रेटला इंग्रजीत ब्राऊन पाँफ्रेट म्हणतात. + +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11957.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30722d935e44f8eb718c113aef945f351fd0dce6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11957.txt @@ -0,0 +1,2 @@ + ब्राम्हणखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11994.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4e9d5698191fa0d162a6442e0d44f7d755ead7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_11994.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन अँड्रु यंग (नोव्हेंबर ३, इ.स. १९६४:व्हांगेराई, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून ३५ कसोटी आणि ७४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12000.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a8c02fabd031dc6e3d6ce9551687e15ac7bef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12000.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन अँड्र्यूझ (४ एप्रिल, १९४५:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७३ ते १९७४ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12004.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86c5dce7f978b5b8d154f4a6d2cd508ec95be4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12004.txt @@ -0,0 +1,3 @@ + +इंग्लिश: Bryan Guy Adams +ब्रा‍‌‌यन ॲडम्सआपले समाजहिताचे कार्य विशेषकरून द ब्रा‍‌‌यन ॲडम्स फाऊंडेशनद्वारे करतो,जी जगभरात लहान तसेच तरू‍ण मुलांसाठी अद्ययावत शिक्षण आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कामी वाहिलेली संस्था आहे.शिक्षण हे मुलांसाठी अनमोल देणगी आहे,अशी त्याची धारणा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12024.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12024.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12042.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52bf0c51db744268503a1d46659793b7a24ddcc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12042.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रायन ॲलन मॅकफॅड्ने (३ ऑक्टोबर, १९६८:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +ब्रायन १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12081.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db3ccc9d64752883170192f26cddc5d2b5a95f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12081.txt @@ -0,0 +1,16 @@ +गुणक: 15°48′S 47°54′W / 15.800°S 47.900°W / -15.800; -47.900 + +ब्राझीलिया ही ब्राझील देशाची राजधानी आहे. येथील लोकसंख्या २४,५५,९०३ आहे. + आसुन्सियोन + काराकास + कायेन + क्वितो + जॉर्जटाउन + पारामारिबो + बुएनोस आइरेस + बोगोता + ब्राझिलिया + मोन्तेविदेओ + ला पाझ / सुक्रे + लिमा + सान्तियागो diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12087.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c860f9ed3012125647e1abccabe383a4776d4b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12087.txt @@ -0,0 +1,33 @@ +ब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे. +यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे, +जन्मना जायते शूद्रः +संस्कारात्‌ भवेत्‌ द्विजः। +वेद पाठात्‌ भवेत्‌ विप्रः +ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।। +आणखी, +तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं । +ऋणदाताच वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥ +मराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज +देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण +(म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील +तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये) +याशिवाय, +जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते || +विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||......बहुतेक रघुवंशातील. +आणखी, +क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | +तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|| .....मुण्डकोपनिषद +ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत. +गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार अगस्त्य, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ आणि विश्वामित्र, या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ] +गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.[ संदर्भ हवा ] +प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा. +धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात. +अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्‌, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत. +यास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात. +खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत. +अध्यापनं अध्यययनम् +यज्ञम् याज्ञम् तथा +दानम् प्रतिग्रहम् चैव +ब्राह्मणानामकल्पयात्‌ +शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कामे आहेत. +कामचालू diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12103.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f63d06facc316a7a6f676b72c3450295f02ebf20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12103.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राह्मणघर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12119.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd9033b62ae32115af6ef52204592dea2df29889 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12119.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणवाडाबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12124.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91fa1acb1b27df24c1e01ff2ef4d3137e59c5384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12124.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12154.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b0649a35158651e1e319abfcf9055eb8b2e58ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12154.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रिगहॅम यंग (१ जून, १८०१:व्हिटिंगहॅम, व्हरमॉंट, अमेरिका - २९ ऑगस्ट, १८७७:सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिका) हा ख्रिश्चन धर्मातील मॉर्मन पंथाचा धर्मगुरू होता. याने सॉल्ट लेक सिटी शहराची स्थापना केली तसेच युटा विद्यापीठ आणि ब्रिगहॅम यंग विद्यापीठाच्या पूर्वसंस्थांचीही स्थापना केली. +याने मॉर्मन लोकांना आयोवातून युटा येथे नेले व तेथे वसाहती स्थापल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1218.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ace0770be1b761f74011317b124c6fc3acfd99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1218.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रफुल्ल मनोहरभाई पटेल ( १७ फेब्रुवारी १९५७) हे महाराष्ट्रामधील एक राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री आहेत. आजवर ४ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पटेल राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत. +२०१२ पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12229.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10beb9cc9cc55f7f1aaf454214ec1c92a90b234f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12229.txt @@ -0,0 +1 @@ +बीमफथपी (जुने नावः ब्रिटिश पेट्रोलियम) ही एक बीपी मराठी गावठी परंतु मुळची ब्रिटिश खनिज तेल कंपनी आहे. बीपी ही जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12280.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6dab9978f2b2f6884b514d486f62c499ff3f082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12280.txt @@ -0,0 +1,3 @@ +इंग्लंडची संसद हे १२६५ ते १७०७ पर्यंत इंग्लंडचे विधिमंडळ होते. १२१५मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने मॅग्ना कार्टाला मंजूरी दिल्यावर इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना शासनात त्यांच्या शाहीर सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे भाग पडले. त्यांच्या संमतीशिवाय राजाने कोणताही नवीन कर लादता येणार नाही अशी यातील एक मुख्य तरतूद होती. या शाही मंडळाचे पुढे संसदेत रूपांतर झाले. +या सभागृहाने हळूहळू इंग्लंडच्या राज्यकर्त्यांकडे असलेली अमर्याद सत्तेला अंकुश घातला. याच्याविरुद्ध लढलेल्या पहिल्या चार्ल्सचा शिरच्छेद झाल्यावर संसदेची सत्ता ही इंग्लंडमधील प्रमुख सत्ता झाली. चार्ल्स दुसऱ्याला राजेपदी बसविल्यावर संसदेने भविष्यातील राजे नाममात्र असतील असे जाहीर केले. +१७०७ साली इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या राज्यांचे एकत्रीकरण झाल्यावर इंग्लंडची संसद आणि स्कॉटलंडची संसद एकत्र झाल्या आणि त्यांचे ग्रेट ब्रिटनच्या संसदेत रूपांतर झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12283.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea9be3693ac8c264af321bb709461109ce58bda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12283.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंद महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे. +डिएगो गार्सिया हे ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12314.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96cab0eb653e70430e366bdfa1fb6f2d70387fb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12314.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिस्बेन हिट क्रिकेट संघ, ब्रिस्बेन शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12320.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a40c9b550e48107d9e4f74996a5446f71b2155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12320.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 51°27′N 2°35′W / 51.450°N 2.583°W / 51.450; -2.583 + +ब्रिस्टल (इंग्लिश: Bristol ही इंग्लंड देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख लोकसंख्या असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या तर युनायटेड किंग्डममधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +इ.स. ११५५ साली शहराचा दर्जा मिळालेले ब्रिस्टल १३व्या ते १८व्या शतकांदरम्यान लंडन खालोखाल यॉर्क व नॉरविकसोबत इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचे शहर होते. औद्योगिक क्रांतीदरम्यान मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल इत्यादी शहरांची झपाट्याने प्रगती झाली व ब्रिस्टलचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीही सध्या ब्रिस्टल इंग्लंड देशामधील एक प्रगत व सुबत्त शहर आहे. +ब्रिस्टल विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12323.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e3898417d8bf1cd45876005ebc911d1acd9f659 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12323.txt @@ -0,0 +1,11 @@ +ब्रुकच्या लढाया या लढाया १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होत्या. +पोर्तुगाल  • माद्रिद  • ब्रुक  • वाल्दापेन्यास  • अल्कोलेआ  • काबेझॉन  • गेरोना  • ला रोमाना डिव्हिजनची सुटका  • झारागोझाचा वेढा  • गेरोनाचा वेढा  • मेदिना दे रियोसेको  • व्हालेन्सिया  • कादिझ बंदर  • बैलेन  • रोलिसा  • व्हिमैरो +पांकोर्बो  • व्हाल्मासेडा  • बर्गोस  • रोझेस  • एस्पिनोसा  • टुडेला  • सोमोसियेरा  • कार्दाद्यू  • मोलिन्स दि रे  • साहागुन  • बेनाव्हेंते  • झारागोझा (दुसरा वेढा)  • कास्तेलॉन  • मान्सिया  • कोरुना +व्हियाफ्रांका  • ब्रागा  • अमारांते  • लुगो  • पोर्तोची पहिली लढाई  • व्हिगो  • ग्रिहो  • पोर्तोची दुसरी लढाई  • सांतियागो  • सानपायो +उक्लेस  • मियाहादास  • येवेनेस  • सिउदाद-रेआल  • मेदेयीन  • आल्कांतारा  • तोराल्बा  • तालाव्हेरा  • आल्मोनासिद  • बान्योस  • तमामेस  • ओकान्या  • कार्पियो  • आल्बा दि तोर्मे  • कादिस  • मुर्सिया +कास्तेयो दे'एंपुरीस  • व्हाल्स (१)  • माँझोन  • गेरोना (३)  • आल्कान्यिझ  • मरिया  • बेल्चिते  • ओस्तालरिच (१)  • मोले  • व्हिच  • मान्रेसा  • लेरिदा  • सान क्विंतिन  • ला बिस्बाल  • तोर्तोसा  • व्हाल्स (२)  • तारागोना (१)  • सेर्व्हेरा  • फिगेरास  • सागुंतुम  • मासाने दे काब्रेनिस  • व्हालेन्सिया  • कास्ताया (१)  • कास्ताया (२)  • तारागोना (२)  • सांता एंग्रेसिया  • झारागोझा (३)  • ओर्दाल +1st Astorga  • 1st Ciudad Rodrigo  • Barquilla  • River Côa  • 1st Almeida  • Trant's raid  • Bussaco  • Torres Vedras  • Pombal  • Redinha  • Condeixa  • Casal Novo  • Foz d'Arunce  • Sabugal  • Fuentes de Onoro  • 2nd Almeida +कादिस  • Montellano  • Fuengirola  • Baza  • Barrosa  • Zujar  • 1st Bornos  • Tarifa  • 2nd Bornos +1st Badajoz (Gebora)  • 2nd Badajoz  • Campo Maior  • Úbeda  • Albuera  • Usagre  • 1st Arlabán  • Durán's action  • Cogorderos  • Riego de Ambrós  • Arroyo dos Molinos  • Tarifa  • Navas de Membrillo  • Orbigo  • Cerdagne (France)  • El Boden  • 2nd Ciudad Rodrigo  • Rocaforte  • Sangüesa  • 3rd Badajoz  • 2nd Arlabán  • Villagarcia  • Almarez  • Maguilla  • Salamanca  • Garcia Hernandez  • Guadalajara  • 2nd Astorga  • Majadahonda  • 1st Bilbao  • 2nd Bilbao  • Burgos  • Mañeru  • Villodrigo  • Venta del Pozo  • Tordesillas  • Tafalla +Vitoria  • 2nd Pancorbo  • 1st San Sebastián +Pyrenees Offensive (Maya  • Roncesvalles  • Lizasso  • Sorauren) Buenza  • 2nd San Sebastián  • San Marcial  • Bidassoa  • Pamplona  • Nivelle  • Nive  • Garris  • Orthez  • Toulouse  • बायोने diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12325.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a853330fcd426935e072aa8c72e4144d779522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12325.txt @@ -0,0 +1,8 @@ +ब्रुकलिन नाईन-नाईन ही अमेरिकन पोलिस प्रक्रियात्मक विनोदी टेलिव्हिजन मालिका आहे जी फॉक्सवर आणि नंतर एनबीसी वर प्रसारित झाली. हा शो १७ सप्टेंबर २०१३ ते १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण आठ सीझन आणि १५३ भागांसाठी प्रसारित झाला. डॅन गोर आणि मायकेल शूर यांनी तयार केलेला, हा परिसर सात न्यू यॉर्क शहर पोलीस विभाग (एनवायपीडी) गुप्तहेरांच्या भोवती फिरतो जे त्यांच्या नवीन कमांडिंग अधिकारी, गंभीर आणि कठूर कॅप्टन रेमंड होल्ट ( आंद्रे ब्राफर ) यांच्या अंतर्गत आयुष्याशी जुळवून घेत आहेत. ब्रॅगर आणि अँडी सॅमबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कलाकारांचा सामावेश असलेल्या या कलाकारांमध्ये स्टेफनी बीट्रिझ, टेरी क्रू, मेलिसा फ्युमेरो, जो लो ट्रुग्लिओ, चेल्सी पेरेटी, डर्क ब्लॉकर आणि जोएल मॅककिनन मिलर यांचाही सामावेश आहे . +सिंगल-कॅमेरा विनोद म्हणून निर्मित, फॉक्सने मूळतः त्याच्या पहिल्या सीझनसाठी १३ भागांची ऑर्डर दिली, शेवटी ती २२ भागांपर्यंत वाढवली. ब्रुकलिन नाईन-नाईनचा प्रीमिअर १७ सप्टेंबर २०१३ रोजी झाला. १० मे २०१८ रोजी फॉक्सने पाच हंगामानंतर मालिका रद्द केली; दुसऱ्या दिवशी, एनबीसी ने १० जानेवारी २०१९ रोजी प्रीमिअर झालेल्या सहाव्या सीझनसाठी तो उचलला. फेब्रुवारी २०२० मध्ये सातव्या सीझनचा प्रीमिअर झाला. १०-एपिसोडचा आठवा आणि शेवटचा सीझन १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रीमिअर झाला [१] [२] +या मालिकेची समीक्षकांनी कौतुक केले आहे. पहिल्या सत्राला सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिकेसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. संगीत किंवा विनोदी, आणि त्याच रात्री, सॅमबर्गने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. टेलिव्हिजन मालिका संगीत किंवा विनोदी . विनोदी मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासाठी ब्रॉगरला चार वेळा नावनिर्देशन मिळाले आहे आणि विनोदी मालिकेतील सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा समीक्षक चॉइस टेलिव्हिजन पुरस्कार दोनदा जिंकला आहे. विनोदाची भावना स्थायी ठेवत गंभीर समस्यांच्या चित्रणासाठी या मालिकेची विशेष कौतुक देखील झाला आहे. एलजीबीटीक्यु+ लोकांच्या चित्रणासाठी, मालिकेने उत्कृष्ट विनोदी मालिकेसाठी २०१८ GLAAD मीडिया पुरस्कार जिंकला. +ब्रुकलिन मधील न्यू यॉर्क शहर पोलिस विभागाच्या काल्पनिक ९९ व्या परिसरामध्ये आधारित केलेले, ब्रुकलिन नाईन-नाईन गंभीर आणि बौद्धिक कॅप्टन रेमंड होल्ट यांच्या नेतृत्वाखाली गुप्तहेरांच्या पथकाचे अनुसरण करते, ज्याला पायलट(प्रारंभिक) भागामध्ये त्यांचे नवीन कमांडिंग अधिकारी म्हणून नेमले आहे. सीमेच्या बाहेरील भाग ब्रुकलिनमधील ७८ व्या प्रीसिंक्टवर आधारित आहे, कारण ९९ वा परिसर वास्तविक नाही. +रोटेन टोमॅटो ने ५७ आढाव्यांच्या आधारे पहिल्या सीझनला ८९% गुण दिले. एकमत आहे: "अँडी सॅमबर्ग आणि आंद्रे ब्रॉगर यांच्या आश्चर्यकारकपणे प्रभावी जोडीच्या नेतृत्वाखाली, ब्रुकलिन नाईन-नाईन हे कॉप शोच्या स्वरूपावर एक लक्षवेधक, शहाणपणाने लिहिलेले आहे." सीझन २ साठी, त्याला १७ आढाव्यांवर आधारित १००% गुण मिळाले आहेत. त्या सीझनचे एकमत आहे: " ब्रुकलिन नाईन-नाईनचे ' कलाकार, लक्षवेधक पात्रे आणि विक्षिप्त गँग्स हे उत्तम आरामदायी अन्न बनवतात." मेटाक्रिटिक शोच्या पहिल्या सीझनला ३३ आढाव्यांवर आधारित ७०/१०० ची भारित सरासरी रेटिंग देते, जे "सर्वसाधारणपणे अनुकूल आढावे" दर्शवते. +द वॉशिंग्टन पोस्टच्या एलिसा रोसेनबर्गने ब्रुकलिन नाईन-नाईन "टीव्हीवरील सर्वात मज्जेशिर, सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक" मानले आणि "समकालीन पोलिसिंगमधील समस्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये अप्रत्याशित मार्ग शोधण्याची क्षमता" हायलाइट केली. [४] व्हॅनिटी फेअरसाठी लिहिताना, ग्रेस रॉबर्टसन यांनी या मालिकेला "सरळ आनंद देणारे [...] कामाच्या ठिकाणी असलेल्या सिटकॉमचे उत्तम प्रतिदर्शी" मानले. [५] स्लेटच्या आयशा हॅरिसने या मालिकेला "कायद्याच्या राबावणीबद्दलच्या सध्याच्या सांस्कृतिक वृत्तींशी फारसा स्पष्ट संबंध नसलेली एक चांगली रचलेली काल्पनिक गोष्ट" म्हटले आहे, पण तिच्या "प्रतिभावंत" ' कौतुक केले आहे. [६] रोलिंग स्टोनच्या ' च्या ५० सर्वोत्कृष्ट टीव्ही शोच्या यादीत याला २४ क्रमांक मिळाला होता, ज्यामध्ये त्याचे क्युरेटर, अॅलन सेपिनवॉल यांनी सॅमबर्ग आणि ब्राफरच्या पात्रांच्या "कॉमेडिक यिन आणि यांग" चे कौतुक केले होते. [७] +ब्रुकलिन नाईन-नाईनने एलजीबीटीक्यु लोकांचे स्पष्टपणे चित्रण केल्याबद्दल आणि विनोदाची भावना टिकवून ठेवत त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल कौतुक मिळाले आहे. [८] समलिंगी आंतरजातीय लग्नामध्ये कॅप्टन रेमंड होल्ट या मुख्य पात्राची, एक उघडपणे समलिंगी, मूर्खपणाची नसलेली कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून चित्रित करणे सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये अभूतपूर्व आहे. [९] [१०] मालिकेच्या ९९व्या भाग " ९९ " मध्ये गुप्तहेर रोझा डायझने उभयलिंगी म्हणून बाहेर येणे, लैंगिक प्रवृत्तीचे महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व म्हणून वर्णन केले आहे. [११] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12352.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3034cf2e332bd1f27fe769466a42b0e3d34ff7df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12352.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रुस अलेक्झांडर ग्रीनफेल मरे (१८ सप्टेंबर, इ.स. १९४०:जॉन्सनव्हिल, न्यू झीलंड - १० जानेवारी, २०२३) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करायचा. +मरेची नात आमेलिया केर  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12382.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2161e1db26f247f8c7986b9d4d3012f6668f3d05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12382.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रुस हॅमिल्टन पिरौडो[१] (१४ एप्रिल, १९३१:गयाना - ९ ऑक्टोबर, २०२२[२]) हा  वेस्ट इंडीजकडून १९५३ ते १९५७ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12383.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb7d1f77a440f52821a70a35b6a5a55bb7a52777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12383.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळनाडूची राजधानी चेन्नईतील एक उपनगरीय पेठ. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12430.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb488a8cb2ab3610c4007375c6a3966ff7bed53f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12430.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्रगांझाची कॅथेरीन ( पोर्तुगीज: Catarina de Bragança; २५ नोव्हेंबर, १६३८:व्हिला व्हिसोसा, पोर्तुगाल - ३१ डिसेंबर, १७०५:बेम्पोस्ता महाल, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही इंग्लंडच्या दुसऱ्याचार्ल्सची राणी होती व त्याद्वारे ती इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होती. +कॅथेरीन पोर्तुगालच्या चौथ्या होआवची मुलगी होती. चार्ल्सच्या मृत्यूनंतर कॅथरीन पोर्तुगालला परतली आणि तिचा भाऊ पेद्रो दुसरा अनुपस्थित असताना १०७ आणि नंतर परत १७०४-०६ दरम्यान पोर्तुगालची कारभारीण होती. +कॅथरीनला मुले नव्हती. तिचे तीन गर्भपात झाले. [१] तिच्या पतीने अनेक उपवस्त्रे ठेवली होती. यांपैकी बार्बरा पामर, क्लीव्हलँडची पहिली डचेस हिला कॅथरीनने आपल्या महालातील सोबतीण म्हणून स्वीकारणे भाग पाडले गेले. [२] या बायकांद्वारे चार्ल्सला अनेक मुले झाली. +कॅथेरीन आणि चार्ल्सच्या लग्नाचा भारताच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या तद्नंतरच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाला. लग्नात हुंडा म्हणून मिळलेली मुंबईची सात बेटे चार्ल्सने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली. कंपनीने आपले मुख्यालय तेथे हलविले. कालांतराने मुंबई हे भारतातील मुख्य शहरांपैकी एक झाले. +कॅथेरीनला ब्रिटनमध्ये चहा पिणे प्रचलित केल्याचे श्रेय दिले जाते. [३] [४] याशिवाय तिने ऊस, लाख, कापूस आणि चिनी मातीच्या वस्तूं वापरात आणल्या. याने इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांत चव, शिष्टाचार आणि कारागिरीत मोठे बदल घडून आले. +साचा:इंग्लंडच्या राज्यकर्त्यांचे जोडीदार diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12433.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf51decf6c1e270a989d16bd056e103a03added --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12433.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॅडली नील ब्रॅड एव्हान्स (२४ मार्च, १९९७:हरारे, झिम्बाब्वे - हयात) ही  झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12444.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e4d2e0130bad9cdc95c7b7c69e6367e1bc0a14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12444.txt @@ -0,0 +1,30 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12454.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f30f4410be9d5ffc882124164c2d12ca4a72d31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12454.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +बी.जे. वॅटलिंग हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12473.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d57caa4571422545b47cec24a8ee64fbd0e35279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12473.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॅन्डन जेरेमी बेस (१३ डिसेंबर, १९८७:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12479.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d76309b5464a571a3bf41aa37fb05a0528eeff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12479.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईच्या चर्चगेट भागातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1248.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fcf381ed9ad86f8a1d21d135a2ac2915e7f4145 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1248.txt @@ -0,0 +1,6 @@ +कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + +कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे.[१] कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.[२] +प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी. +कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते.[३] वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात. +आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल.[४] या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12482.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31a18ee7d8cedadfa61981c66e82ca5e1105fe90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12482.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेंटन अँथनी पार्चमेंट (२४ जून, १९८२:सेंट जेम्स, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12499.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a66caf807da111632589b74f797972683e98a559 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12499.txt @@ -0,0 +1,31 @@ +१६ मार्च, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_125.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..240fc88edaed67ae56d38ca28e19014923846ffb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_125.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप गेलाशियस पहिला (--,--:कबिलिया, आफ्रिका - नोव्हेंबर १९, इ.स. ४९६:रोम) हा पाचव्या शतकातील पोप होता. +मूळचे आफ्रिकेतील पोपपैकी हा तिसरा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12505.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf165c26779e927bd6c1e5f2dc5cfdfb18c3f3ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12505.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेंडा ताउ (१७ जून, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12532.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12532.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1256.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3311ef8fd6784f223f1dca2dd0062ccac3d035bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1256.txt @@ -0,0 +1,4 @@ + +प्रा.डॉ. प्रभा रामचंद्र गणोरकर (८ जानेवारी, इ.स. १९४५ - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. +गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर द्वारका ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे. +अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी इंदिरा संत, करंदीकर, केशवसुत, गोविंदाग्रज, पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12562.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e941ec8887e91e36052cfcb1fbf8af49fea4a84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12562.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रेमर काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12581.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98e4c8b11aeec7865a97ad9c3bcfdd4bb0ad0679 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12581.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रॉड पीक हे पृथ्वीवरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. हे चीन व पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या बाल्टिस्तान परिसरामध्ये आहे. या शिखराची उंची ८०५१ मी. आहे. याला आधी के-३ या नावाने ओळखले जात असे. +काराकोरम पर्वत रांगेमध्ये, ‘माउंट के-२’ पासून अवघ्या आठ किलोमीटरवर ‘माउंट ब्रॉड पीक’ उभे आहे. या शिखराच्या माथ्याची रुंदी साधारण दीड किलोमीटर आहे. एवढ्या अवाढव्य रुंदीमुळे याचे नाव ‘ब्रॉड पीक’ असे ठेवण्यात आले आहे. ९ जून १९५७ रोजी फ्रित्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मुक, कर्ट डेमबर्गर व हरमौन बुहल यांच्या ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघाने हे शिखर पहिल्यांदा सर केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12585.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe12b75a07344d29c0b16179445d11bfa8454fbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12585.txt @@ -0,0 +1,4 @@ +ब्रॉडरिक स्टीवन स्टीव हार्वी थोरला (१७ जानेवारी, १९५७ - ) हा एक अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, निर्माता, अभिनेता आणि कॉमेडियन आहे. तो स्टीव्ह हार्वे मॉर्निंग शो, फॅमिली फ्यूड, सेलिब्रिटी फॅमिली फ्यूड, फॅमिली फ्यूड आफ्रिका, लवाद-आधारित कोर्ट कॉमेडी जज स्टीव्ह हार्वे आणि यापूर्वी मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन करतो.[१] +हार्वेने कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. त्याने १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला स्टँड-अप कॉमेडी सादर केली आणि डबलयेवू  वर अपोलो आणि स्टीव्ह हार्वे शोमध्ये शोटाइम होस्ट केला. किंग्स ऑफ कॉमेडी टूरमध्ये अभिनय केल्यानंतर तो नंतर द ओरिजिनल किंग्स ऑफ कॉमेडीमध्ये वैशिष्ट्यीकृत झाला. त्याचा शेवटचा स्टँडअप शो २०१२ मध्ये झाला होता.[२] +स्टीव्ह हार्वेचा जन्म ब्रॉडरिक स्टीफन हार्वे म्हणून १७ जानेवारी १९५७ रोजी वेल्च, वेस्ट व्हर्जिनिया येथे झाला आणि तो कोळसा खाण कामगार जेसी हार्वे आणि एलॉइस व्हेरा यांचा मुलगा आहे. त्याचे पहिले नाव ब्रॉडरिक आहे, टीव्ही मालिका हायवे पेट्रोलमधील अभिनेता ब्रॉडरिक क्रॉफर्डच्या नावावर आहे. हार्वेला लहानपणी तोतरेपणाची गंभीर समस्या होती, ज्यावर त्याने शेवटी मात केली. हार्वेचे कुटुंब क्लीव्हलँड, ओहायो येथे स्थायिक झाले, ते पूर्व ११२व्या रस्त्यावर राहात होते, ज्याचे २०१५ मध्ये स्टीव्ह हार्वे वे असे नामकरण करण्यात आले. त्याने १९७४ मध्ये ग्लेनविले हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली.[३] +हार्वेने २०१७ मध्ये स्टीव्ह हार्वे ग्लोबल (एसएचजी) अंतर्गत त्याचे सर्व व्यवसाय एकत्र केले. एसएचजी अंतर्गत ब्रँड्समध्ये ईस्ट वन ट्वेल्व्ह, हार्वेची इन-हाउस प्रोडक्शन कंपनी समाविष्ट आहे जी डिजिटल सामग्री, चित्रपट आणि टेलिव्हिजन विकसित करण्यासाठी वापरली जाते. कंपनीकडे कौटुंबिक भांडणाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्त्यांचे हक्क देखील आहेत, त्यापैकी शोची एक आफ्रिकन आवृत्ती २०२० मध्ये सुरू होण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याने २०१७ मध्ये सँड अँड सोल फेस्टिव्हल देखील लाँच केले. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्यात थेट संगीत दिले जाते, विनोदी, आणि हार्वे आणि त्याची पत्नी मार्जोरी यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचे सत्र. त्यांनी त्यांची मुलगी मॉर्गन हॉथॉर्न आणि जावई करीम हॉथॉर्न यांच्या नेतृत्वाखाली हार्वे इव्हेंट्स ही एक विशेष कार्यक्रम कंपनी सुरू केली. २०१८ मध्ये अटलांटा येथे फ्रोरिबियन फेस्ट सारख्या कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12591.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..639a241884df739eb9a157e7bed1378f3086699b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12591.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॉनविन लिॲन कॅल्व्हर (२२ सप्टेंबर, १९६९:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते १९९८ दरम्यान ३ महिला कसोटी आणि ३४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12599.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3653d861206eef517e2dd1fdf4aefdff32f56fa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12599.txt @@ -0,0 +1,15 @@ + +माउंट ब्रॉस अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. +या शिखराला विल्यम ब्रॉस या स्थानिक व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे.[१] ९ मार्च, १८६९ रोजी डॅनियल प्लमर आणि जोसेफ मायर्स या अल्मा गावातील व्यक्तींनी माउंट ब्रॉसवरील पहिल्या चांदीच्या खाणीचा दावा नोंदवला. +अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून माउंट ब्रॉस ट्रेल या पायवाटेने शिखरापर्यंत जाता येते. ही वाट डोंगरावरील मुख्य घळीच्या बाजुने चढत जाते व साधारण तीन चतुर्थांश वाटेवर डावीकडे वळत घळीची दुसरी बाजू चढून जाते. तेथून एक फाटा खाजगी खाणींच्या मधून माउंट लिंकन व कॅमेरोनकडे जातो तर दुसरा फाटा खाजगी जमीनीवरून शिखरापाशी जातो. हे शिखर साधारण सपाट आहे. +या डोंगराचे शिखर व आसपासचा भाग अद्पाय खाजगी मालकीचा आहे. २००५मध्ये या मालकांनी इतरांना माउंट ब्रॉसवर जाण्यास मनाई केली.[२] +[३] +[४] १ ऑगस्ट, २००६ रोजी अल्मा गावाने खाजगी मालकांकडून माउंट ब्रॉसवरील बरीचशी जमीन नाममात्र आकार देउन जमीन मालकांकडून भाडेपट्ट्याने घेतली व शिखराकडे जाणारा मार्ग पुन्हा एकदा मोकळा करून दिला. आजही शिखर व आसपासच्या भागाच्या मालकाने अधिकृतपणे खुला केलेला नाही.[५] +}} +हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट लिंकन आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12622.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0ed8b58947ca868c995de526bc03aaa255aed56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12622.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 15°47′10″S 35°0′21″E / 15.78611°S 35.00583°E / -15.78611; 35.00583 + +ब्लॅंटायर तथा मंडाला हे मलावी ह्या देशातील एक मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12630.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee2fb8010e99122df057beb00caa7be7ad44ee91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12630.txt @@ -0,0 +1,2 @@ +द ब्लिट्झ ही जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४०-४१मध्ये युनायटेड किंग्डमवर केलेल्या बोम्बफेक मोहीम होती. बॅटल ऑफ ब्रिटन या लढाईच्या अंतापासून सुरू झालेल्या या मोहिमेत लुफ्तवाफेने इंग्लंडमधील औद्योगिक वसाहती, शहरे व गावांवर तुफान बॉम्बफेक केली होती. याची सुरुवात लंडनवरील हल्ल्यांनी झाली. बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये मात खाल्लेल्या लुफ्तवाफेने या हल्ल्यांनी रॉयल एर फोर्सच्या विमानांना मोकळ्या मैदानात खेचण्यासाठीचा हा व्यह होता. ६ सप्टेंबर १९४० पासून ५७ पैकी ५६ दिवस लंडनवर बॉम्बफेक झाली. +या मोहीमेत इंग्लंडमधील ४३,००० ते ४६,००० नागरिक ठार झाले आणि सुमारे सव्वा लाख नागरिक जखमी झाले. याशिवाय अंदाजे वीस लाख घरे व इमारती सुद्धा उद्ध्वस्त झाल्या. या तुफान हल्ल्यांनतरही लुफ्तवाफेला इंग्लंडवर हवाई वर्चस्व मिळवता आले नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12637.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8ff00e0b2d6471ae6bda563267b7cebc158b38d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12637.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लू अर्थ काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅन्कॅटो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६९,११२ इतकी होती.[२] +ब्लू अर्थ काउंटीची रचना ५ मार्च, १८५३ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या निळसर हिरव्या मातीचे व ब्लू अर्थ नदीचे नाव देण्यात आले आहे. ही काउंटी मॅन्कॅटो-न्यू उल्म महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12646.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0196b312d3850402d5480c58f1a9e6c3f458a151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12646.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 29°6′S 26°13′E / 29.100°S 26.217°E / -29.100; 26.217 + +ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिका देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12653.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f64134432451eb3fb7c67751efbd6bf8c43b2b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12653.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.[१] +या शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12656.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f64134432451eb3fb7c67751efbd6bf8c43b2b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12656.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.[१] +या शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12677.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..358dbf07f924daa3c918e2cd127c5502266f1d41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12677.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्लॅक बीनस् +इंग्रजी नाव –castanospermum austraie A.Cunn fabaceae +हे झाड ३०-४०असून त्या मानाने छोटे आहे.या छोट्या झाडाच्या फांद्यांवर लाल –पिवळ्या रंगाची फुले येतात.या झाडाचे शास्रीय नाव कॅस्टनोस्पर्मम ऑस्ट्राले. 'ब्लॅक बीनस' किंवा 'मोरेटॉन–बे चेस्टनट' म्हणून सुपरिचित असलेला हा वृक्ष ऑस्ट्रेलियामधील सदाहरित पर्जन्यमय जंगलात तर सापडतोच पण त्याची समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशातही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतात हा वृक्ष शोभिवंत वृक्ष म्हणून काही शहरामधून रस्त्याच्याकडेला लावलेला आढळतो. कोलकत्ता, लखनऊ , बेंगलोर या शहरांमधील उद्यानानमध्ये याची थोडी झाडे आढळतात. जिजामाता उद्यान येथेही एक झाड आहे.सदाहरित वर्गामध्ये मोडणारा हा वृक्ष शहरांमध्ये ५०-६० फुट उंच वाढतो. जंगलात याची वाढ १३० फुट झाल्याची नोंद आहे. झाडांची पाने गडद पण चमकदार हिरव्या रंगाची असून ‘संयुक्तपर्णी ‘ गटात मोडतात. फांद्या आसुपालवसारख्या .याची फुले खोडावर येतात व फांद्यांवरील पानांमुळे झाकली गेल्यामुळे सहसा दुरून दिसत नाही. फुले लाल पिवळ्या रंगाची असून पाकळ्या गडद व लाल रंगाच्या असतात. पुंकेसर सुरुवातीला लाल व नंतर पांढरे दिसतात. ओस्ट्रेलियामध्येहा वृक्ष सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये तो फुलतो. मुंबईत मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फुले येतात. फुलांमध्ये मध असून पक्षांमार्फत परागनाचे कार्य पार पाडते. ओस्ट्रेलियामध्ये मार्च-एप्रिलमध्ये झाडाला शेंगा येतात. हा वृक्ष शोभिवंत म्हणून लावला जात असला तरी त्याच्या मूळ देशात त्याचा पुरेपूर वापर करतात.झाडांची पाने व बिया दोन्हीही गाई-म्हशींना अपायकारक आहे.ओस्ट्रेलियातील आदिवासी बिया फोडून १० दिवस वाहत्या पाण्यात भिजत ठेवतात.असे केल्यामुळे त्यातील ‘सॅपोनीन ‘ नावाचे हानिकारक द्रव्य पाण्यात विरघळते. १० दिवसानंतर सॅपोनीनचा पूर्ण नायनाट करण्याकरिता बिया भाजून घेतात व नंतर त्याची भुकटी बरेच दिवस साठवून ठेवता येते.या भुकटीपासून नंतर केक बनवून खाल्ला जातो. या बियांमध्ये ‘कॅस्टनोस्परमाइन’ नावाचे अल्कलॉईड आहे. सध्या त्यावर HIV-AIDSच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन सुरू आहे.HIV विषाणूची इतरांवर मारा करण्याची क्षमता या कॅस्टनोस्परमाइनमध्ये आढळून आली आहे. +वृक्षराजी मुंबईची +डॉ. मुग्धा कर्णिक diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12703.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ac13c011aef4498ea4679103ca8fea6f2cb1df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12703.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लेन काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेली येथे आहे.[१][२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,२७२ इतकी होती.[३][३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12713.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a04bff5fa5cb138145a4289d96ada0ac62aed5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12713.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्लेझ पास्कल (देवनागरी लेखनभेद: ब्लेस पास्काल; फ्रेंच: Blaise Pascal ; जून १९, इ.स. १६२३ - ऑगस्ट १९, इ.स. १६६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपदलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमॉं-फेरॉं येथे झाला. १६२६ मध्ये त्यांची आई मृत्यू पावली व १६३१ मध्ये पास्काल कुटुंबाने पॅरिसला प्रयाण केले. +ब्लेझ पास्कालचे वडील उत्तम गणितज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पास्कार अभ्यास न करता प्रथम लॅटिन व ग्रीक भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तथापि वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी भूमितीच्या अभ्यासास सुरुवात केली व चौदाव्या वर्षापासून ते वडिलांसह रोबेर्व्हाल, मेर्सेन इ. भूमितिविज्ञांच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहू लागले. १६३९ मध्येच त्यांनी ‘शांकवामध्ये शंकुच्छेद अंतर्लिखित केलेल्या षट्कोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्यांचे छेदबिंदू एकरेषीय असतात’ हे आता त्यांच्यात नावाने ओळखण्यात येणारे व प्रक्षेपय भूमितीत महत्त्वाचे म्हणून मानण्यात येणारे प्रमेय मांडले. १६४० साली पास्कार कुटुंब या भूमितिविज्ञांच्या Brouillon project या ग्रंथाच्या आधारे शांकवांवरील निबंधांचा एक ग्रंथ (Essai pour les coniques) लिहून पूर्ण केला. या असामान्य ग्रंथामुळे त्यांना लहान वयातच पुष्कळ प्रसिद्धी लाभली व देकार्तसारख्या गणितज्ञांना सुद्धा त्यांचा हेवा वाटला. +वडिलांच्या हिशेबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने पास्कार यांनी बेरीज व वजाबकी करणारे एक यंत्र तयार करण्याची योजना १६४२ मध्ये आखली; हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा एकाधिकार त्यांना १६४९ मध्ये प्राप्त झाला, तथापि ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार होऊ शकला नाही. +एव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली (१६०८-४७) यांनी पाऱ्याच्या वायुदाबमापकांसंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती १६४६ मध्ये मिळाल्यावर पास्कार यांनी निरनिराळ्या उंचीवर वायुदाबमापकातील पाऱ्याच्या उंचीचे निरीक्षण केले व वाढत्या उंचीबरोबर वातावरणीय दाब कमी होत जातो, असा निष्कर्ष काढला. तसेच ‘स्थिर द्रायूमधील (द्रव वा वायूमधील) एखाद्या बिंदूपाशी बाह्य दाब लावला असता तो सर्व दिशांना सारखाच प्रेषित होतो’, हा द्रायुयामिकीतील त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा महत्त्वाचा नियम मांडला. वायुदाबमापकातील पाऱ्याच्या वर निर्वात (पोकळी) असतो असे त्यांनी प्रतिपादन केले व त्यासंबंधी त्यांचा ई. नोएल यांच्याबरोबर वादविवादही झाला. या संदर्भात पास्काल यांनी एखाद्या गृहीतकाची परीक्षा पाहण्यासंबंधीच्या अटींविषयी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीच्या इतिहासात उद्‍बोधक ठरले आहे. एखादाच विरोधी आविष्कारसुद्धा गृहीतकाच्या असत्याचा पुरावा म्हणून पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी द्रायुस्थितिकीचे (स्थिर द्रायूंच्या गुणधर्मांच्या शास्त्राचे) नियम व हवेच्या वजनामुळे होणारे विविध परिणाम यांसंबंधीचा एक ग्रंथ १६५४ च्या सुरुवातीस लिहून पूर्ण केला; परंतु तो त्यांच्या मृत्यूनंतर १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला. +त्यांनी १६५४ मध्ये अंकगणितीय त्रिकोणाचा ((क+ख)न याच्या विस्तारातील सहगुणकांनी बनलेल्या संख्यांच्या त्रिकोणाकार मांडणीचा; न=०,१,२,…) अंकगणित व समचयात्मक विश्लेषण यांतील प्रश्नांच्या संदर्भात सखोल अभ्यास केला. हा त्रिकोण ‘पास्काल त्रिकोण’ याच नावाने ओळखण्यात येतो. याविषयी त्यांनी लिहिलेला Trait du triangle arithmetique हा ग्रंथ व त्यांनी प्येअर द फेर्मा (१६०१-६५) या गणितज्ञांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांच्याद्वारे त्यांनी संभाव्यता कलनशास्त्राचा संभाव्यता सिद्धांत पाया घातला. +कॉर्नेलिस यानसेन (१५८५-१६३८) या धर्मशास्त्रवेत्त्यांच्या अनुयायांबरोबर १६४६ साली त्यांचा निकटचा संबंध आला व त्यामुळे यानसेन यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची बहीण १६५१ मध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध पोर्ट रॉयल येथे मठवासिनी (नन) झाली. १६५२-५४ या काळात पास्काल यांचे धार्मिक गोष्टींवरील लक्ष उडाले आणि त्यांनी हा काळ जुगारी व बदफैली लोकांच्या संगतीत घालविला. तथापि या आयुष्याला व पराकाष्ठेच्या वैज्ञानिक कार्याला कंटाळून पुन्हा त्यांना धार्मिक बाबींमध्ये रस उत्पन्न झाला. २३ नोव्हेंबर १६५४ रोजी त्यांना आलेल्या गूढ धार्मिक अनुभवामुळे (nauit de feu) वैज्ञानिक कार्य सोडून देऊन चिंतन व धार्मिक कार्य यांनाच वाहून घेऊन यानसेन पंथाच्या अनुयायांना लेखाद्वारे व अन्य प्रकारे मदत करण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि १६५८ मध्ये त्यांनी चक्रजासंबंधीचा (एका सरळ रेषेवरून फिरत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूद्वारे रेखाटल्या जाणाऱ्या वक्रासंबंधीचा) आपला प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी चक्रजाचे अनेक गुणधर्म आणि चक्रज अक्षाभोवती, पायाभोवती व शिरोबिंदूजवळील स्पर्शरेषेभोवती फिरविला असता तयार होणाऱ्या भ्रमण प्रस्थांचे (घनाकृतींचे) गुणधर्म चर्चिले होते. त्यामध्ये पास्काल यांनी वापरलेली पद्धत बरीचशी सध्या वापरात असलेल्या समाकलन पद्धतीशी अवकलन आणि समाकलन जुळणारी आहे. १६५४ नंतर ते पोर्ट रॉयल येथेच स्थायिक झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12721.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abd858166d7927806d26dee0bb7377a7a8ab2f78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12721.txt @@ -0,0 +1,21 @@ +आम्ही सर्वजण क्रिप्टोकोइन्समधील गुंतवणूकीबद्दल ऐकत आहोत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी ही नवीन आर्थिक पैलू किती क्रांतिकारक आहे याबद्दल लोक ऐकत आहेत. पण प्रथम, ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय? आणि दुसरे म्हणजे, ते जग बदलेल? धीर धरा आणि अधिक जाणून घ्या. नवनिर्मिती ही उत्क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. एकदा लोकांनी नाविन्यावर लक्ष केंद्रित केले की जग आणखी बरेच काही साध्य करेल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जसे फोर्ब्सच्या लेखात स्पष्ट केले आहे, असे तंत्रज्ञान आहे जे आपण मध्यस्थ भागांमध्ये जाहिर करू इच्छित नसलेले संवेदनशील डेटा संग्रहित करण्यासाठी आणि स्थानांतरित करण्यासाठी एक व्यासपीठ वापरते, जे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही असू शकते. एक उदाहरण म्हणून, बऱ्याच कंपन्यांद्वारे वापरलेले डेटाबेस इतर कंपन्यांच्या मालकीचे असतात, अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या बँकेचा तपशील लिहिता तेव्हा नंतरचे त्यांच्याकडे प्रवेश घेतील. लोकांनी या डेटाबेसवर विश्वास ठेवणे थांबवले, अशाप्रकारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जन्म झाला. अर्थात अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु भावनिक परिणामासाठी हे इतरांसमोर सांगितले गेले. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, देणगी, ऑनलाइन अभ्यासक्रम, होस्टिंग, पुनर्प्राप्ती, सॉफ्टवेर, बँक, कॅसिनो, ऑनलाईन गॅम्बलिन, फायनान्स रिअल इस्टेट, मनी ट्रान्सफर, विमा +दुसऱ्या शब्दांत, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा शोध लोकांना आवश्यकतेनुसार त्यांची गोपनीयता टिकवून ठेवण्यासाठी करण्यात आला. +“ब्लॉकचेन ही आर्थिक व्यवहाराची एक अविभाज्य डिजिटल लेजर आहे जी केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर अक्षरशः मूल्य असलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद करण्यासाठी प्रोग्राम केली जाऊ शकते." +डॉन आणि अ‍ॅलेक्स टॅपस्कॉट, लेखक ब्लॉकचेन रेव्होल्यूशन (२०१)) +समानता वापरण्यासाठी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान एक व्यासपीठ वापरते जे संगणकाचा वापर करणा computers्या संगणकांमधून हजारो वेळा डुप्लिकेट करतो आणि ते नियमितपणे अद्यतनित केले जाते आणि ते कधीही केंद्रीकृत नसते. हे बऱ्याच डेटासारखे आहे जे पारदर्शकपणे आणि हॅकर्ससाठी प्रवेश करण्यायोग्य नसते. +या नेटवर्कमध्ये प्रवेश करणारा एक नोड आहे जो प्रशासक आणि इतर नेटवर्कमध्ये सामील होतो. +अधिक स्पष्ट करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे डेटा सामायिक करण्याच्या प्रक्रियेची कल्पना करा. या क्षणी आपण कोणाबरोबर कागदजत्र सामायिक करता किंवा आपण बँकेत हस्तांतरण करता किंवा तसे करता, तो कागदजत्र केवळ त्या व्यक्तीस उपलब्ध असेल ज्यास त्यास संपादित करणे आवश्यक आहे. +ब्लॉकचेन तंत्रज्ञान गुंतलेल्या लोकांना एकाच वेळी समान प्रवेश करण्याची परवानगी देते. काहीही क्लिष्ट नाही, बरोबर? आणि असे तंत्रज्ञान तयार करण्याची आणखी एक गरज म्हणजे पारंपारिक डेटाबेस ते वापरत असलेल्या रिलेशनल टेबल्समधून बदलण्यासाठी, संपादित करण्यासाठी किंवा इतर काहीही करण्यासाठी विनंत्यांचा वापर करीत आहेत. +2008 मध्ये बिटकॉइनचा शोध लागला असल्याने लोकांनी ब्लॉकचेनला क्रिप्टोकर्न्सीशी जोडण्यास सुरुवात केली. तथापि, बिटकॉइन हे नाणे आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान असे आहे जे बिटकॉइनला प्रवास करण्यास आणि देवाणघेवाण करण्यास अनुमती देते. याचा शोध लागला असल्याने त्याचे ब्लॉकचेन निर्दोषपणे चालले आहे, त्यावेळेस लोकांनी हा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आहे. +“जितके क्रांतिकारक वाटते तितकेच, ब्लॉकचेन खरोखरच प्रत्येकास जबाबदाऱ्याच्या सर्वोच्च पातळीवर आणण्याची यंत्रणा आहे. यापुढे गमावलेला व्यवहार, मानवी किंवा यंत्रामधील त्रुटी, किंवा एखादे एक्सचेंज देखील यात सामील झालेल्या पक्षांच्या संमतीने केले गेले नाही. याशिवाय, ब्लॉकचेन ज्या सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्राला मदत करते ते म्हणजे एखाद्या व्यवहाराची वैधता केवळ मुख्य रजिस्टरवरच नोंदवून ठेवून नोंदणीकृत प्रणालीने जोडलेल्या वितरित प्रणालीची हमी देणे, जे सर्व काही सुरक्षित प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे जोडलेले आहे. +इयान खान +ब्लॉकचेन नेटवर्क आपली अखंडता टिकवून ठेवण्यासाठी ते कसे व्यवस्थापित करते? दर दहा मिनिटांनी ते स्वयंचलितपणे स्वतःचे परीक्षण करीत आहे आणि या धनादेशांमधील व्यवहारांमध्ये सामंजस्य करते. धनादेशांदरम्यानच्या अशा अवधीला ‘ब्लॉक’ असे म्हणतात. +अशा प्रकारे, प्रत्येक गोष्ट सार्वजनिक आणि खाच करणे कठीण आहे. नंतरचे म्हणजे नेटवर्कमध्ये प्रवेश करणे आणि त्याच वेळी व्यवहाराचे मूल्य नष्ट करणे होय. +"मला वाटते विकेंद्रित नेटवर्क तंत्रज्ञानाची पुढील मोठी लाट असेल." +मेलानी स्वान +आता शेवटी आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीची मूलभूत गोष्टी समजली आहेत की ती आपली आर्थिक परिस्थिती बदलेल की नाही? गोल्डमॅन सॅक्सच्या म्हणण्यानुसार, हे नवीन तंत्रज्ञान व्यवहारांच्या बाबतीत आणि आमच्या वर्षाकाठी billion अब्ज डॉलर्सपर्यंतचे सर्व शब्द खर्च कमी करू शकेल. +मध्यस्थ भागांसाठी खर्च केलेला हा एक मोठा पैसा आहे. +पहिल्यांदा हा शोध लावल्यापासून लोकांना त्यात रस निर्माण झाला आणि ते फक्त बिटकॉईनमध्येच गुंतवणूक करीत नाहीत तर या तंत्रज्ञानाबरोबरच निर्माण होणा the्या शक्यतांबद्दलही अधिकाधिक शोध घेण्यास इच्छुक आहेत. परिणामांची कल्पना करा! +परिणाम हा व्यवसाय अनुप्रयोग आहे जो सहजपणे वापरू शकतो जसे कीः +या अविष्काराचे होस्ट करणे शक्य होईल अशा विशाल प्रमाणात लोक त्याचा गैरफायदा घेत नाहीत तर नक्कीच माहित नाही. म्हणून, ब्लॉकचेन तंत्रज्ञान जगात बदलणार आहे काय? हे निश्चितपणे कसे हाताळता येईल आणि लोकांना शक्य त्या मार्गाने कसे एक्सप्लोर करावे हे लोकांना माहित असेल. +ब्लॉकचेनचे काम diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12739.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14ab4cdac7cff625a598c9018c58f798da276fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12739.txt @@ -0,0 +1,19 @@ +ब्लूटूथ हे मोबाइल डिव्हाइस पासून कमी अंतरावरील (2.4 पासून 2,485 जीएचझेड मार्ग बॅंड अल्प- तरंगलांबी UHF रेडिओ लहरी वापरून) देवाणघेवाण, आणि वैयक्तिक एरिया नेटवर्क ( PAN ) निर्माण करण्यासाठी वायरलेस साधन आहे. याचा शोध 1994 मध्ये दूरसंचार विक्रेता एरिक्सन शोध लावला. हा शोध मुळात RS-232 डेटा केबल्स वायरलेससाठी पर्यायी म्हणून लावला होता. मात्र ब्लूटूथ अनेक साधने कनेक्ट करू शकते. +ब्लूटूथ दूरसंचार, कम्प्युटिंग, नेटवर्किंग, आणि असेच काम करणाऱ्या 25000 पेक्षा अधिक सदस्य कंपन्या आहेत, ब्लूटूथ आवड ग्रुप ( SIG ) द्वारे व्यवस्थापित केली आहे. IEEE IEEE 802.15.1 ब्लूटूथ छान , पण यापुढे मानक कायम राखते. ब्लूटूथ SIG ने वर्णन विकास जबाबदारी पात्रता कार्यक्रम सांभाळते, आणि ट्रेडमार्क संरक्षण होते. एक निर्माता एक साधन एक Bluetooth डिव्हाइस म्हणून बाजारात पूर्ण ब्लूटूथ SIG ने मानके( Bluetooth SIG standards) करणे आवश्यक आहे. पेटंट नेटवर्क वैयक्तिक पात्रता साधने परवाना आहेत जे तंत्रज्ञान लागू होतात. +" लहान -दुवा " रेडिओ तंत्रज्ञान विकास, नंतर ब्लूटूथ नावाचा तसे एरिक्सन मोबाईल आणि डॉ जॉन Ullman डॉ Nils Rydbeck चीफ टेक्नॉलॉजी अधिकारीपदाच्या द्वारे 1989 मध्ये सुरू झाला . उद्देश , वायरलेस हेडसेट जोडा विकसित होते जॉन Ullman , शॉन 8902098-6 जारी 1989-06-12 शॉन 9202239 दोन मार्ग शोधून काढणारे, त्यानुसार, जारी 1992-07-24 . Nils Rydbeck विकास आणि Jaap Haartsen आणि स्वेन Mattisson निर्देशीत सह Tord Wingren लढाई . दोन्ही तसे , स्वीडन मध्ये एरिक्सन काम करत होते. तपशील वारंवारता प्रसार स्पेक्ट्रम तंत्रज्ञानावर आधारित आहे. +नाव "bluetooth" तसेच ख्रिस्ती ओळख, स्कॅन्डेनेव्हीयन Blåtand / Blåtann ( पुरातन नॉर्स blátǫnn ) , एकच राज्यात प्रवेश dissonant डॅनिश जमाती एकत्र आणि कोण दहाव्या शतकातील राजा हॅराल्ड ब्लूटूथ ख्यातनाम एक Anglicised आवृत्ती आहे आख्यायिके , . हे नाव कल्पना मोबाइल फोन संगणक संपर्क साधण्याची परवानगी असे एक प्रणाली विकसित केली. कोण जिम Kardach करून 1997 मध्ये प्रस्तावित होते . या प्रस्तावाच्या वेळी तो फ्रांस जी Bengtsson ऐतिहासिक कादंबरी वाचून वायकिंग्ज आणि राजा हॅराल्ड ब्लूटूथ लांब बीटाचे होते. परिणाम ब्लूटूथ एक सार्वत्रिक मानकामध्ये त्यांना एकत्र, संचार प्रोटोकॉल त्याच करते आहे. +ब्लूटूथ लोगो बांधणी प्राचीन उत्तर युरोपीय वर्णमालेतील वर्ण , धाकटा Futhark Runes ( Hagall ) एकत्र करणे आहे ( ᚼ ) आणि ( Bjarkan ) ( ᛒ ), हॅराल्डच्या आद्याक्षरे . +ब्लूटूथ 2402 आणि 2480 मेगाहर्ट्‌झ , किंवा 2400 आणि 2483,5 मेगाहर्ट्‌झ दरम्यान फ्रिक्वेन्सी गार्ड बॅंड तळाशी शेवटी रुंद 2 मेगाहर्ट्‌झ आणि शीर्षस्थानी रुंद 3.5 मेगाहर्ट्‌झ समावेश संचालन. या जागतिक स्तरावर विना परवाना औद्योगिक , वैज्ञानिक आणि वैद्यकीय ( मार्ग ) 2.4 GHz लहान- श्रेणी रेडिओ फ्रिक्वेन्सी बॅंड आहे. ब्लूटूथ वारंवारता (Adaptive frequency hopping) प्रसार स्पेक्ट्रम नावाच्या रेडिओ तंत्रज्ञान वापरते. ब्लूटूथ पॅकेट मध्ये प्रसारित डेटा विभाजीत , आणि 79 नियुक्त ब्लूटूथ चॅनेल एक प्रत्येक पॅकेट प्रसारित. प्रत्येक वाहिनी 1 MHz एक बॅंडविड्थ आहे. हे सहसा , प्रति सेकंद 1600 hops करते अनुकूलन वारंवारता ( AFH ) सह सक्षम. ब्लूटूथ कमी ऊर्जा 2 मेगाहर्ट्‌झ अंतर, 40 चॅनेल राहता वापरते, जे . +मुळात, गॉसियन वारंवारता -शिफ्ट दाबत ( GFSK ) स्वरनियमन उपलब्ध स्वरनियमन योजना होती. ब्लूटूथ 2.0 + EDR परिचय / 4- DQPSK ( भिन्नता Quadrature टप्पा Shift दाबत ) π आणि 8DPSK स्वरनियमन असल्याने देखील सुसंगत साधने दरम्यान वापरले जाऊ शकते. GFSK सह काम साधने 1 Mbit /चे एक समकालीन डेटा दर शक्य आहे जेथे मूलभूत दर कार्य (BR) मोड केले आहेत. वर्धित डेटा दर टर्म (EDR) π / 4- DPSK आणि 8DPSK योजना वर्णन करण्यासाठी , प्रत्येक 2 आणि 3 Mbit देत / अनुक्रमे वापरले जाते. या ब्लूटूथ रेडिओ तंत्रज्ञान (बीआर आणि EDR) रीती संयोजन एक " बाबासाहेब / EDR रेडिओ ' म्हणून वर्गीकृत आहे. +ब्लूटूथ मास्टर- गुलाम इमारतीसह(master-slave structure) एक पॅकेट -आधारित प्रोटोकॉल आहे. एक मालक piconet मध्ये सात गुलाम संवाद करू शकता. सर्व साधने मालक घड्याळ शेअर करा. पॅकेट विनिमय मालक , ज्यामुळे 312,5 μs कालांतराने ticks व्याख्या मूलभूत घड्याळ, आधारित आहे. दोन घड्याळ 625 μs एक स्लॉट करा ticks, आणि दोन क्रमांकात 1250 μs एक स्लॉट जोडी करा. सिंगल- स्लॉट सोपे बाबतीत अगदी स्लॉट मास्टर प्रसारित पॅकेट आणि विचित्र क्रमांकात प्राप्त होतो. गुलाम , उलट, अगदी स्लॉट प्राप्त आणि विचित्र क्रमांकात प्रसारित. पॅकेट 1, 3 किंवा 5 स्लॉट लांब असू शकते, पण सर्व प्रकरणांमध्ये मध्ये पदव्युत्तर प्रसार विचित्र स्लॉट अगदी स्लॉट मध्ये सुरू होते आणि गुलाम आहे. +सर्व साधने या कमाल पोहोचण्याचा तरी मुख्य ब्लूटूथ साधन आहे, piconet (ब तंत्रज्ञानाचा वापर करून तात्पुरते कॉम्प्यूटर नेटवर्क ) सात साधने कमाल संवाद करू शकता. साधने, भूमिका स्विच करू शकता करार, आणि गुलाम मालक होऊ शकतात (उदाहरणार्थ, एक फोन जोडणी सुरू हेडसेट अपरिहार्यपणे मास्टर- म्हणून इनीशीएटर म्हणून सुरू कनेक्शन - मात्र नंतर गुलाम म्हणून चालू शकते ). +ब्लूटूथ कोअर तपशील एक scatternet , काही साधने एकाच वेळी एक piconet आणि दुसरे गुलाम भूमिका मास्टर भूमिका जे तयार करण्यास दोन किंवा अधिक piconets कनेक्शने उपलब्ध आहेत. +कोणत्याही वेळी , डेटा मास्टर आणि अन्य एक साधन दरम्यान हस्तांतरित केली जाऊ शकते जे गुलाम साधन पत्ता मास्टर निवडते (थोडे वापरले प्रसारण मोड वगळता [संदर्भ द्या] . ); विशेषतः , तो एक साधन पासून एक साखळी फॅशन दुसऱ्या वेगाने स्विचेस. प्रत्येक ऐकण्यासाठी नवं पुस्तक घेऊन येतो , जे गुलाम पत्ता निवडतो दास आहे तर ( सिद्धांत ) मास्टर असल्याने स्लॉट , एक मास्टर जात एक गुलाम जात पेक्षा एक फिकट ओझे आहे प्राप्त. सात गुलाम एक मास्टर असल्याने शक्य नाही, एकापेक्षा अधिक मास्टर गुलाम जात तपशील scatternets आवश्यक वर्तन म्हणून अस्पष्ट आहे कठीण आहे. +अनेक USB ​​ब्लूटूथ अडॅप्टर किंवा " dongles, " उपलब्ध आहेत, जे काही एक आयआरडीए अडॅप्टर यांचा समावेश आहे. + + +(m) +ब्लूटूथ मानक वायर- बदलण्याची शक्यता संचार प्रोटोकॉल प्रामुख्याने कमी-पावर वापर डिझाइन प्रत्येक साधन कमी किंमतीची निवड transceiver microchips आधारित एक लहान श्रेणी आहे. साधने रेडिओ ( प्रसारण ) या संचार प्रणालीचा वापर कारण , ते एकमेकांना दृष्टीने व्हिज्युअल ओळ असणे नाही , तथापि दिसायला ऑप्टिकल वायरलेस मार्ग व्यवहार्य असणे आवश्यक आहे. श्रेणी वीज- वर्ग अवलंबून आहे , पण प्रभावी श्रेणी सराव बदलू; उजवीकडे तक्ता पहा . +अधिकृतपणे वर्ग 3 रेडिओ पर्यंत 1 मीटर (3 फूट) , वर्ग 2 श्रेणी आहे, सर्वात सामान्यपणे , मोबाइल डिव्हाइस आढळले प्रामुख्याने औद्योगिक वापर प्रकरणे साठी 10 ​​मीटर (33 फूट ), आणि इयत्ता 1 , 100 मीटर (300 फूट) . ब्लूटूथ विपणन इयत्ता 1 श्रेणी बहुतांश घटनांमध्ये 20-30 मीटर ( 66-98 फूट) आहे पात्र , आणि वर्ग 2 श्रेणी 5-10 मीटर ( 16-33 फुट) . +प्रभावी श्रेणी वंशवृद्धी अटी, साहित्य कव्हरेज, उत्पादन नमुना चढ, स्पर्शा संरचना व बॅटरी परिस्थितीमुळे असते. सर्वात ब्लूटूथ अनुप्रयोग घरातील परिस्थिती, भिंती रोग प्रतिबंधक लस तयार करण्याची जंतुशास्त्रातील रित आणि सिग्नल प्रतिबिंबे श्रेणी ब्लूटूथ उत्पादने निर्दिष्ट ओळ ऑफ दृष्टीने श्रेणी पेक्षा खूप कमी करण्यासाठी सिग्नल योग्य fading जेथे आहेत. सर्वात ब्लूटूथ अनुप्रयोग बॅटरी समर्थित वर्ग 2 साधने कमी शक्तीशाली साधन श्रेणी मर्यादा निश्चित झुकत दुवा इतर शेवटी एक वर्ग 1 किंवा वर्ग 2 साधन आहे की नाही हे श्रेणीत थोडे फरक आहेत. काही बाबतींत एक वर्ग 2 साधन ठराविक वर्ग 2 साधन पेक्षा दोन्ही उच्च संवेदनशीलता आणि प्रसार शक्ती एक इयत्ता 1 transceiver कनेक्ट केला जात आहे तेव्हा डेटा दुवा प्रभावी श्रेणी वाढविता येऊ शकतो. मुख्यतः मात्र इयत्ता 1 साधने वर्ग 2 साधने समान संवेदनशीलता आहे. दोन इयत्ता 1 उच्च संवेदनशीलता आणि उच्च पॉवर दोन्ही साधने कनेक्ट आतापर्यंत ठराविक 100 मीटर अधिक श्रेणी परवानगी देऊ शकतात अर्ज आवश्यक प्रक्रिया करून अवलंबून. काही साधने फार कायदेशीर उत्सर्जन मर्यादा न 1 किमी आणि दोन समान साधने दरम्यान पलीकडे खुल्या शेतात श्रेणी परवानगी देते. +ब्लूटूथ कोर तपशील पेक्षा कमी नाही 10 मीटर (33 फूट) श्रेणी करणे सक्तीचे केले आहे , पण वास्तविक श्रेणी नाही वरच्या मर्यादा आहे. उत्पादक ' लागूकरण श्रेणी प्रत्येक बाबतीत आवश्यक प्रदान पुन्ह जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12752.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..708fa256fbaa16a26c9a8d8841063e661f5bc695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12752.txt @@ -0,0 +1,2 @@ +भंडारकुमठ्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12754.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bdd1926a7b2cbb114b0c879c692d13943a81fe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12754.txt @@ -0,0 +1,10 @@ +भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व. +भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. +भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. +भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते. +भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.) +भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. कळसुबाई ही आदिवासी कोळी महादेव तसेच वारली, कातकरी या जमातींची कुलदेवी आहे. सध्या वाढत्या बदलामुळे येथे देखील नवरात्रात दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरून दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे. +विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरू असताना खुप दुरवरूनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो. +शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे. +भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे. +शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. तसेच येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कुलदेवीचे देखील मंदिर आहे तिचे नाव घाटन देवी आहे. याच नावावरून गावाचे नाव घाटघर असे पडले आहे. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12756.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eb032eaabcc9784c02edb1474e6d42ade108626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12756.txt @@ -0,0 +1,27 @@ +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम +उंची  : ८२.३ मीटर +लांबी  : ५०७ मीटर +प्रकार : S - आकार +लांबी : १९८ मी. +सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर +संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर) +क्षेत्रफळ  : १५.५४ चौरस कि.मी. +क्षमता  : ३१२५.९५ लक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ३०४१ लक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : १५५५ हेक्टर +लांबी  : ७७ कि.मी. +क्षमता  : २६.३६ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : ५९६२५ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ४००९० हेक्टर +लांबी  : ४५ कि.मी. +क्षमता  : सेकंदाला ६.८२ घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : २९८६६ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : २३६५० हेक्टर +जलप्रपाताची उंची  : ६५ मीटर +जास्तीतजास्त विसर्ग  : १९.२६ क्युमेक्स +निर्मीती क्षमता  : १० मेगावॅट +विद्युत जनित्र  : १ X १० मेगावॅट +जलप्रपाताची उंची  : ५० मीटर +जास्तीतजास्त विसर्ग  : ७७ क्युमेक्स +निर्मीती क्षमता  : ३४ मेगावॅट +विद्युत जनित्र  : १ X ३४ मेगावॅट diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12765.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1252c122d70178acc65819951c5ec66acbea9643 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12765.txt @@ -0,0 +1,8 @@ + भंडारवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12779.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f001f35a59994194c720a13ad3d8a4c4acce577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12779.txt @@ -0,0 +1 @@ +भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12795.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7a53e1a9372825b888055d2d51dfe5c1b31bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12795.txt @@ -0,0 +1,2 @@ +भंसाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12813.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..485fa30a7d833cdc2e2008f776fd4623c003bbfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12813.txt @@ -0,0 +1,6 @@ +भक्ती बर्वे-इनामदार (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या. +त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण. +पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या. +मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले[१]. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. फेब्रुवारी १२ इ.स. २००१ रोजी त्यांना मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरअपघाती मृत्यू आला. +आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12828.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f0c230f271843ad2f8074becbea5bf0576a7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12828.txt @@ -0,0 +1,45 @@ +भगतसिंग (पंजाबी उच्चारण: (ऐका) २८ सप्टेंबर, १९०७ - २३ मार्च, १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. +डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.[ संदर्भ हवा ] +त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले. +इटालीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग इटाली' नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगाने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेला. एका पत्रात त्याने लिहिले आहे की, 'माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमि़ष असू शकत नाही'.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्डचे 'व्हेरा-दि निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते. +भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी'नी अलाहाबादचे 'चॉंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॉंद'च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावाने अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. +९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.[File:Statues of Bhagat Singh, Rajguru and Sukhdev.jpg|thumb|भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे ] +खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय. +"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली. +हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :- +१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसेनी पैसा तसेच दारुगोळा जमवणे. +२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे. +३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलीस वा इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे. +४) आगगाड्या उडविणे. +५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे. +६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे. +७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि, +८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे. +सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. +बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. +समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये. +समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.[ संदर्भ हवा ] +हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरों के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं. +'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, +सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान' +भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. . +महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.[ संदर्भ हवा ] +कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली. +भगतसिंग हे नास्तिक होते. भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी सुद्धा ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] +"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती. +'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?[ संदर्भ हवा ] +एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. + +जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलॉं येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे. +भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या. +भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांतली काही निवडक पुस्तके :- +जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणाने मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचे चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला. +भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्‍न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्‍न केला. मात्र, तो प्रयत्‍नही निष्फळ ठरला. +नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ ॲन्ड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचे लेनिन आणि रशियन क्रांती यांच्याशी जे वैचारिक-राजकीय नाते जुळले होते, ते आजही तितकेच दमदार आणि ताजे वाटण्यासारखे आहे. रशियात समाजवादी क्रांती झाली, तेव्हा भगतसिंग दहा वर्षांचा होता. लहानपणापासून काका सरदार अजितसिंह, लाला हरदयाळ आणि गदर चळवळ यांच्यामुळे क्रांतिकारक विचारांशी त्याचा संपर्क येत होता. भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या "विश्वप्रेम' या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. "लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा..."असे म्हणत तो स्पष्ट करतो, की "विश्वबंधुता! याचा अर्थ मी जगामध्ये समानता (साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.' +भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी "गांधीवादी राष्ट्रवादी', मग "स्वप्नाळू क्रांतिकारी', अल्पकाळ "अराज्यवादी साम्यवादी' असलेले आपण शेवटी "मार्क्‍सवादी-शास्त्रीय समाजवादी' झालो असे तो स्पष्ट नमूद करतो. पुढे सामूहिक वैचारिक मंथनातून "हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटने'च्या नावात १९२८मध्ये "समाजवादी' हा शब्द घालण्यात आला. पुढे शेवटपर्यंत भगतसिंहाचा आणि संघटनेचा वैचारिक आधार समाजवाद तर राजकीय कार्याचा आदर्श रशियन क्रांती हा राहिला. +लाला लाजपतराय यांनी मध्ये क्रांतिकारी तरुणांवर "हे तरुण खूपच धोकादायक आणि क्रांतीचे समर्थक आहेत; त्यांना लेनिनसारखा नेता हवा आहे. पण माझ्यात लेनिन बनण्याची ताकद नाही,' असे म्हणून या तरुणांना "काही परदेशी चिथावणीखोर घटकांनी भडकवले आहे,' असा आरोप केला. तेव्हा भगतसिंगाने उत्तरादाखल लिहिलेल्या लेखात लालाजींना इटलीच्या मॅझिनीने (स्वातंत्र्यासाठी) रस्ता दाखवलेला चालतो; मग आमच्या देशातील समस्यांवर उत्तरे शोधताना रशियन क्रांती व लेनिनसारख्या विचारवंतांकडून नवे विचार घेण्यात काय चूक आहे?' अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला होता.[ संदर्भ हवा ] +१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हटले होते : "सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. "या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : "साम्राज्यवाद मुर्दाबाद', "सर्वहारा झिंदाबाद' आणि "इन्किलाब झिंदाबाद'. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्‍लेषण हेदेखील होते. भगतसिंगाच्या तुरुंगातील नोंदवहीत लेनिन यांच्या लिखाणातील याविषयीच्या नोंदी आढळतात. या वैचारिक-राजकीय स्पष्टतेमुळेच हा छोटा क्रांतिकारी गट ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेशी अत्यंत प्रखरपणे झुंज देऊन तिला राजकीय-नैतिकदृष्ट्या निष्प्रभ करू शकला. +फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, "ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.' हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, "चलो'. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12830.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f0c230f271843ad2f8074becbea5bf0576a7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12830.txt @@ -0,0 +1,45 @@ +भगतसिंग (पंजाबी उच्चारण: (ऐका) २८ सप्टेंबर, १९०७ - २३ मार्च, १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. +डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.[ संदर्भ हवा ] +त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले. +इटालीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग इटाली' नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगाने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेला. एका पत्रात त्याने लिहिले आहे की, 'माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमि़ष असू शकत नाही'.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्डचे 'व्हेरा-दि निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते. +भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी'नी अलाहाबादचे 'चॉंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॉंद'च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावाने अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. +९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.[File:Statues of Bhagat Singh, Rajguru and Sukhdev.jpg|thumb|भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे ] +खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय. +"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली. +हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :- +१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसेनी पैसा तसेच दारुगोळा जमवणे. +२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे. +३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलीस वा इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे. +४) आगगाड्या उडविणे. +५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे. +६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे. +७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि, +८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे. +सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. +बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. +समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये. +समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.[ संदर्भ हवा ] +हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरों के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं. +'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, +सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान' +भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. . +महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.[ संदर्भ हवा ] +कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली. +भगतसिंग हे नास्तिक होते. भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी सुद्धा ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] +"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती. +'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?[ संदर्भ हवा ] +एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. + +जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलॉं येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे. +भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या. +भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांतली काही निवडक पुस्तके :- +जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणाने मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचे चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला. +भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्‍न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्‍न केला. मात्र, तो प्रयत्‍नही निष्फळ ठरला. +नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ ॲन्ड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचे लेनिन आणि रशियन क्रांती यांच्याशी जे वैचारिक-राजकीय नाते जुळले होते, ते आजही तितकेच दमदार आणि ताजे वाटण्यासारखे आहे. रशियात समाजवादी क्रांती झाली, तेव्हा भगतसिंग दहा वर्षांचा होता. लहानपणापासून काका सरदार अजितसिंह, लाला हरदयाळ आणि गदर चळवळ यांच्यामुळे क्रांतिकारक विचारांशी त्याचा संपर्क येत होता. भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या "विश्वप्रेम' या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. "लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा..."असे म्हणत तो स्पष्ट करतो, की "विश्वबंधुता! याचा अर्थ मी जगामध्ये समानता (साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.' +भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी "गांधीवादी राष्ट्रवादी', मग "स्वप्नाळू क्रांतिकारी', अल्पकाळ "अराज्यवादी साम्यवादी' असलेले आपण शेवटी "मार्क्‍सवादी-शास्त्रीय समाजवादी' झालो असे तो स्पष्ट नमूद करतो. पुढे सामूहिक वैचारिक मंथनातून "हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटने'च्या नावात १९२८मध्ये "समाजवादी' हा शब्द घालण्यात आला. पुढे शेवटपर्यंत भगतसिंहाचा आणि संघटनेचा वैचारिक आधार समाजवाद तर राजकीय कार्याचा आदर्श रशियन क्रांती हा राहिला. +लाला लाजपतराय यांनी मध्ये क्रांतिकारी तरुणांवर "हे तरुण खूपच धोकादायक आणि क्रांतीचे समर्थक आहेत; त्यांना लेनिनसारखा नेता हवा आहे. पण माझ्यात लेनिन बनण्याची ताकद नाही,' असे म्हणून या तरुणांना "काही परदेशी चिथावणीखोर घटकांनी भडकवले आहे,' असा आरोप केला. तेव्हा भगतसिंगाने उत्तरादाखल लिहिलेल्या लेखात लालाजींना इटलीच्या मॅझिनीने (स्वातंत्र्यासाठी) रस्ता दाखवलेला चालतो; मग आमच्या देशातील समस्यांवर उत्तरे शोधताना रशियन क्रांती व लेनिनसारख्या विचारवंतांकडून नवे विचार घेण्यात काय चूक आहे?' अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला होता.[ संदर्भ हवा ] +१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हटले होते : "सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. "या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : "साम्राज्यवाद मुर्दाबाद', "सर्वहारा झिंदाबाद' आणि "इन्किलाब झिंदाबाद'. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्‍लेषण हेदेखील होते. भगतसिंगाच्या तुरुंगातील नोंदवहीत लेनिन यांच्या लिखाणातील याविषयीच्या नोंदी आढळतात. या वैचारिक-राजकीय स्पष्टतेमुळेच हा छोटा क्रांतिकारी गट ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेशी अत्यंत प्रखरपणे झुंज देऊन तिला राजकीय-नैतिकदृष्ट्या निष्प्रभ करू शकला. +फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, "ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.' हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, "चलो'. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12844.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..827c5739fe37573326322954a5d16713611d205a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12844.txt @@ -0,0 +1,46 @@ + +भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. +५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. +भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते. +कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. +भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!) +भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. इस्कॉन संघटना भगवद्गीता सर्व लोकांना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. +महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते. +उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते. +छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही. +भगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[१] +सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८.६६ ॥ +सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. +ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. +[२] +१ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत. +हिंदू धर्मातील धार्मिक महत्त्वाबरोबरच भगवद्गीतेने अनेक विचारवंत, संगीतकारांना प्रभावित केले आहे, जसे की अरविंद घोष, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आल्डस हक्सली, हेन्री थोरो, जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, राल्फ वाल्डो इमर्सन, कार्ल गुस्टाफ युंग, ब्युलेंट एसेव्हिट हेर्मान हेस, हाइनरिश हिमलर, जॉर्ज हॅरिसन, निकोला टेस्ला आणि इतर. सध्याच्या स्वरूपातील कर्मयोगाच्या सिद्धांताचा मुख्य स्रोत भगवद्गीता ही आहे.[३][४][५] +भगवद्गीतेबद्दल शंकराचार्यांचे मत: +"भगवद्गीतेच्या स्पष्ट ज्ञानाने मानवी अस्तित्वाची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतात. भगवद्गीता हे वैदिक धर्मग्रंथातील सर्व शिकवणींचे प्रकट रूप आहे." +आचार्य रामानुज (1017-1137) हे आदि शंकराचार्यांसारखे होते, जे विशिष्ठद्वैत वेदांताचे महान प्रतिपादक होते. +"भगवान कृष्णाने सर्व आध्यात्मिक ज्ञानाचे सार असलेल्या ईश्वराच्या भक्तीचे विज्ञान प्रकट करण्यासाठी भगवद्गीतेचे ज्ञान अवतरित केले होते." अवतरण आणि अवतार घेण्यामागील परम भगवान श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश अध्यात्मिक विकासाला विरोध करणार्‍या कोणत्याही राक्षसी आणि नकारात्मक, अनिष्ट प्रभावांपासून जगाला मुक्त करणे हा आहे, तरीही त्याच वेळी सर्व मानवजातीच्या आवाक्यात राहणे हा त्यांचा अतुलनीय हेतू आहे."[६] +भगवद्गीता जशी आहे तशी चे लेखक: "आमचा एकमेव उद्देश, भगवद्गीता जशी आहे तशी मांडणे हा आहे, ज्या उद्देशाने कृष्ण ब्रह्मदेवाच्या दिवसातून एकदा किंवा दर ८,६०,००,००,००० वर्षांनी या ग्रहावर अवतरतात त्याच उद्देशासाठी कंडिशन केलेल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे. हा उद्देश भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे, आणि तो जसा आहे तसा स्वीकारावा लागेल. अन्यथा भगवद्गीता आणि त्याचे वक्ते भगवान कृष्ण, यांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही. भगवान कृष्णाने काही शे कोटी वर्षांपूर्वी प्रथम भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितली. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे आणि अशा प्रकारे भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व चुकीचा अर्थ न लावता समजून घेतले पाहिजे. कृष्णाच्या इच्छेचा कोणताही संदर्भ न घेता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा सर्वात मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःला वाचवायचे असेल तर भगवंताला परमात्मस्वरूप समजले पाहिजे. जे की भगवान कृष्णाचे पहिले शिष्य अर्जुनाने प्रत्यक्षपणे समजून घेतले होते. भगवद्गीतेची अशी समज खरोखर फायदेशीर आहे आणि जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मानवी समाजाच्या कल्याणासाठी अधिकृत आहे."[७] +स्वामी विवेकानंदांना भगवद्गीतेमध्ये खूप रस होता. असे म्हटले जाते की, भगवद्गीता त्यांच्या दोन सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक होती (दुसरा एक होता ख्रिस्ताचे अनुकरण). १८८८-१८९३ मध्ये जेव्हा विवेकानंद संन्यासी म्हणून संपूर्ण भारतभर भटकंती करत होते, तेव्हा त्यांनी फक्त दोनच पुस्तके आपल्याजवळ ठेवली - गीता आणि इमिटेशन ऑफ क्राइस्ट.[८] +'भगवद्गीतेचा निःस्वार्थ सेवेवर भर' हा महात्मा गांधी यांच्यासाठी प्रमुख प्रेरणास्रोत होता. गांधीजीनी म्हटले होते की- "जेव्हा मला काही शंका सतावतात, निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकावते आणि मला आशेचा एकही किरण क्षितिजावर दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा श्लोक शोधतो; आणि प्रचंड दुःखाच्या सगरात मी लगेच हसायला लागतो. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवनवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतील."[९] +श्री अरबिंदो यांच्या म्हणण्यानुसार, " भगवद्गीता हा मानवजातीचा खरा धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये प्रत्येक युगासाठी नवीन संदेश आणि प्रत्येक सभ्यतेसाठी नवीन अर्थ आहे."[९] +भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी असे म्हटले आहे की " भगवद्गीता मूलत: मानवी अस्तित्वाच्या आध्यात्मिक पायाशी संबंधित आहे. ती जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पूर्ण करण्यासाठीच्या कृतीची साद आहे."[१०] +"अध्यात्मिक माणसाला एकांतवासात राहण्याची गरज नाही, दैवी जीवनाशी एकरूप होणे आणि सांसारिक घडामोडींमध्ये टिकून राहणे शक्य आहे. त्या मिलनाचे अडथळे आपल्या बाहेर नसून आपल्या आत आहेत - हा भगवद्गीतेचा मुख्य धडा आहे." - अ‍ॅनी बेझंट[११] +"हे लक्षात घ्या, अध्यात्माला कोणतेही धार्मिक अभिव्यक्ती नसतात. अध्यात्माचे सार हे माणसाला त्याचे मन आणि त्याचे विचार शुद्ध करणे असे आहे. जेव्हा मी "भगवद्गीता" सारखे जुने धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली तेव्हा मला ते दैनंदिन जीवना करिता उपयुक्त वाटले. आणि म्हणून मग मी त्याचा सराव करू लागलो. मी याला प्रशासकीय अंतिम सत्य मानतो, जे तुम्हाला संस्था चालवण्यासारख्या गोष्टी करण्यात मदत करेल."[१२] + -ई. श्रीधरन +एपीजे अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती, हे मुस्लिम असूनही भगवद्गीता वाचायचे आणि मंत्रांचे नियमित पठण करायचे.[१३][१४] +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता "जगाला भारताची सर्वात मोठी देणगी" असे ठामपणे मांडले आहे.[१५] मोदींनी २०१४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 'भगवद्गीता ॲक्कॉर्डींग टू गांधी' ची एक प्रत भेट म्हणून दिली होती.[१६][१७] +सुनीता विल्यम्स, अनिवासी भारतीय अमेरिकन अंतराळवीर जिने एक महिला म्हणून सर्वात जास्त काळ अंतराळात उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे, तिने तिच्यासोबत भगवद्गीता आणि उपनिषदांची प्रत अंतराळात नेली होती. ती म्हणते, "स्वतःवर, जीवनावर, आपल्या सभोवतालच्या जगावर चिंतन करण्‍यासाठी आणि इतर मार्गाने पाहण्‍याच्‍या या अध्‍यात्मिक गोष्टी आहेत, मला वाटले की ते अगदी योग्य आहे." तिच्या अंतराळातील कलावधीवर बद्दल बोलताना असे तिने प्रतीपादित केले.[१८] +मॅनहॅटन प्रकल्पाची ट्रिनिटी चाचणी ही अण्वस्त्राचा पहिला स्फोट होता, ज्याने ओपेनहाइमरला भगवद्गीतेतील श्लोक आठवण्यास प्रवृत्त केले. +जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक, यांनी १९३३ मध्ये संस्कृत भाषा शिकली आणि मूळ संस्कृत भगवद्गीता वाचली. तत्पश्चात त्यांच्या जीवनाच्या तत्त्वज्ञाला वळण देणारे सर्वात प्रभावशाली पुस्तक म्हणजे भगवद्गीता होय असे त्यांनी उद्धृत केले.[१९] ओपेनहायमरने असे सांगितले की, ट्रिनिटी अणुचाचणीचा स्फोट पाहत असताना, त्यांना भगवद्गीतेतील एक श्लोक उत्स्फूर्तपणे उच्चारला (XI,12): +काही वर्षांनंतर त्यांनी असे देखील म्हटले की त्या वेळी त्यांच्या डोक्यात आणखी एक श्लोक आला होता: +आपल्याला माहित आहे की हे जग एकसारखे राहणार नाही. काही लोक हसले, काही लोक रडले आणि बहुतेक लोक गप्प होते. मला भगवद्गीता या हिंदू धर्मग्रंथातील एक श्लोक आठवला; विष्णू राजपुत्राला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला प्रभावित करण्यासाठी, त्याचे विराटरूप धारण करतो आणि म्हणतो, 'आता मी मृत्यू; जगाचा नाश करणारा आहे.' मला असे वाटते की आम्ही सर्वांनी येनकेन प्रकारे हाच विचार केला.[२३][a] +हॉलिवूड अभिनेता, विल स्मिथ: मी येथे (भारतात) अनेक वेळा आलेलो आहे. मला इतिहासाची आवड आहे. माझे ९० टक्के व्यक्तिमत्व 'भगवत गीता'द्वारे आहे... आणि ती वाचण्यासाठी आणि येथे येण्यासाठी, माझ्या अंतरंगातील अर्जुनाला दिग्दर्शित केले जात आहे. पुढच्या वेळी मी ऋषिकेशला जाणार आहे. मी नक्कीच इथे अधिक काळ घालवणार आहे.[२५] +हेन्री थोरो यांनी असे लिहिले की,"सकाळी मी माझ्या बुद्धीला भगवद्गीतेच्या अद्भूत आणि वैश्विक तत्त्वज्ञानाने स्नान घालतो ज्याच्या तुलनेत आपले आधुनिक जग आणि त्याचे साहित्य तुच्छ आणि क्षुल्लक वाटते."[२६] +हर्मन ग्राफ कीसरलिंग, जर्मन तत्ववेत्ता भगवद्गीता "कदाचित जगातील साहित्यातील सर्वात सुंदर कार्य" असे मानतात.[२७] +हेर्मान हेस यांना असे वाटले की," भगवद्गीतेचे चमत्कार हे जीवनातील ज्ञानाचे खरोखर सुंदर प्रकटीकरण आहे जे तत्वज्ञानाला धर्मात फुलण्यास सक्षम करते."[९] +राल्फ वाल्डो एमर्सन यांनी भगवद्गीतेबद्दल असे म्हटले: "मला भगवद्गीतेचा एक भव्य दिवस लाभला आहे. जणू काही एक साम्राज्य आपल्याशी बोलले, लहान किंवा अयोग्य असे काहीही नसते, परंतु विशाल, शांत, सुसंगत प्राचीन बुद्धिमत्तेची अशी साद आहे ज्याने दुसर्‍या युगात आणि वातावरणात विचार केला होता आणि अशा प्रकारे त्याच प्रश्नांचे निराकरण केले आणि आपल्याला एक धडा शिकवला."[२८] +विल्हेल्म फॉन हम्बोल्ट यांनी गीता असे उच्चारले: "सर्वात सुंदर, कदाचित कोणत्याही ज्ञात भाषेत अस्तित्वात असलेले एकमेव खरे तात्विक गाणे... कदाचित जगाला दाखविण्याची सर्वात खोल आणि उदात्त गोष्ट आहे."[२९] +तुर्कीचे माजी पंतप्रधान मुस्तफा ब्युलेंट एसेव्हिट यांना विचारले असता त्यांना तुर्कीचे सैन्य सायप्रसला पाठवण्याचे धैर्य कशामुळे मिळाले. त्यावर त्याचे उत्तर असे होते की,"त्यांना भगवद्गीतेने बळ दिले होते, जी शिकवते की जर कोणी नैतिकदृष्ट्या योग्य असेल तर, अन्यायाविरुद्ध लढण्यास संकोच करू नये".[३०] +ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स यांनी लिहिले: "मी गीतेचा उच्चार करण्यास संकोच करत नाही, ही उत्कृष्ट मौलिकता, संकल्पनेची उदात्तता, तर्क आणि शब्दलेखन जवळजवळ अतुलनीय आहे; आणि मानवजातीच्या सर्व ज्ञात धर्मांमध्ये एक अपवाद आहे..."[३१] +"आम्हाला भगवद्गीतेसारख्या उदात्त सृष्टीकडे पूर्ण समज देऊन जायचे असेल तर आपल्या आत्म्याला त्याच्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे." - रुडॉल्फ स्टेनर[३२] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12864.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330e43f30f01b49108acefd470c5432723791009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12864.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. भगवान दास (१२ जानेवारी, इ.स. १८६९ - १८ सप्टेंबर, इ.स. १९५८) हे भारतीय स्वांत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. यांच्या प्रयत्नांमुळे काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. दास यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12877.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5f61f11a9ba985f883c73c35b164bb893b9c0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12877.txt @@ -0,0 +1,33 @@ + +श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. +हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की येथे जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद,लिंगभेद नाही.त्यामुळेच विठ्ठलाचे विटेवर चरण समान आहेत. +या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे. +काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरू होतो. +यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले. +पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. +[१] +श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. +या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. +येथे ह.भ.प. ऐश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. +ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे. +[१] +सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरू होतो. +भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरू होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. +श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरू होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते. +प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो. +याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. +[२] +भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले. +डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री +भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी,खोकरमोहा,करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. +संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे. +[३] +[४] +महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे. +श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते.[१] +श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[५] +भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[६] +[७] +आवजीनाथ महाराज diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12904.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748cf16b00d5728b650e43704a4dd9ae0b734854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12904.txt @@ -0,0 +1,6 @@ +. +भट चंडोल, गायक चंडोल, भात चंडोल (शास्त्रीय नाव:Mirafra Javanica Cantillans(Blyth); इंग्लिश:Singing Bush Lark; हिंदी:अगन, अगिन, चरचरा; संस्कृत:अग्निकंठ, क्रकराट, मधुर क्षुपकृकराट; गुजराती:अगन; कन्नड: हाडुव भारद्वाज) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी मध्यम आकाराच्या लाव्याएवढा असतो व हा पक्षी पंख फडफडवीत मंद गतीने उडणारा चंडोल म्हणून ओळखला जातो.त्याच्या पंखावर तम्बुस पट॒टे असतात त्याची शेपटीची बाहेरील पिसे पंढरी असतात व हा पक्षी झुडपांत बसलेला असताना किव्हा उडताना गात असतो. +भट चंडोल हा पक्षी जास्तीत जास्त नावासी,पाकिस्तान,काश्मीर,हिमाचल प्रदेश,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार,पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील भारतीय द्वीपकल्प येथे आढळतो.हा पक्षी मार्च ते सप्टेंबर या काळात विशेषतः जूनच्या मध्यात तो दिसतो. + +याचे राहण्याचे ठिकाण हे माळराने,भातशेतीचा प्रदेश आणि गवती कुरणे ही आहेत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12913.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f204a835eea41d4ac9574a90a5c353db671029b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12913.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्रात भटक्या जमाती (ड) (एनटी-डी किंवा एनटी-३) ची संख्या ०१ असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1293.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b450d9979fbb079d5786950592ef4831b47b0834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1293.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +प्रभाकर पाध्ये या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12937.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a68e6be0e3081fc6c14b4ffe855287f32a4c3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12937.txt @@ -0,0 +1,8 @@ + भडकंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12958.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..857905ce8928dc7ee2b317f81c57b80a57e55ede --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12958.txt @@ -0,0 +1,2 @@ + भडाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12965.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622550e62e9b7889605a5b6169b87c11c5bc2d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_12965.txt @@ -0,0 +1,2 @@ +भणंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13006.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5abf473d2038e0feb4897ee9f1a4cc80c0f4b33c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13006.txt @@ -0,0 +1 @@ +भद्रावती विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13008.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5abf473d2038e0feb4897ee9f1a4cc80c0f4b33c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13008.txt @@ -0,0 +1 @@ +भद्रावती विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1302.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b11d80ebb86385e9022852f474c82a21b8438e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1302.txt @@ -0,0 +1 @@ +प्रभाकर मोरे हे मराठी चित्रपट कलाकार आहेत. महाराष्ट्राची हस्य जत्रा ह्या विनोदी अभिनय करत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13031.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..767ceb44f6272b1ee4ed628358e5b9aa5603c69f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13031.txt @@ -0,0 +1,2 @@ +भरणी (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे. नक्षत्रांच्या पारंपारिक यादीत याचा दुसरा क्रमांक लागतो. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1304.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61d64f12de592f51c13f3026027ab491b54670b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1304.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली. +मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले. मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली. +प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो. +वसंत कानेटकर यांची नाटके करणाऱ्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली. +कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले. +प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला. +लेखक वि.वा.शिरवाडकर यांच्या कथेवर हा लघुपट आधारित होता. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13044.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76dd71a0ae1bde5abd2af00ea3c4ccc7ac817274 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13044.txt @@ -0,0 +1,7 @@ +भरत जाधव (१२ डिसेंबर १९७३) हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मूळचा कोल्हापूरचे असला तरी त्याचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले. +३००० प्रयोग करणाऱ्या ऑल द बेस्ट या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला.[१] त्यांने नंतर 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले.[२] जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. जाधव यांनी २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली.[३] +भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट आणि ८ मालिका केल्या आहेत. ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. सही रे सही या एकाच नाटकात भरत जाधवने चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले. हे नाटक गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.[२] +भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.[४] +सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.[५] +‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले. गुजराथी नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराथी रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते. याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भरत जाधव चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13074.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c70c810dd64d92fa50627974e4744e63204b5df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13074.txt @@ -0,0 +1,22 @@ +रस विचार हा भारतीय साहित्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा विचार आहे. भरतपूर्व काळापासून काव्यातील रसाच्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल साहित्यशास्त्रकारांनी निश्चिती केली आहे. परंतु काव्यातून ही रसनिष्पत्ती कशी होते याविषयी भरतमुनींनी मांडलेल्या सूत्राला संस्कृत साहित्यशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. भरतोत्तर काळात या रससूत्राचे अनेक भाष्यकारांनी आपापल्या परीने अर्थ लावण्याचे प्रयत्न केले आहेत. +भरतमुनींचे प्रसिद्ध रससूत्र पुढीलप्रमाणे : +विभावानुभाव व्यभिचारी संयोगात् रसनिष्पत्ती | +विभाव, अनुभाव व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसाची निष्पत्ती होते. +दैनंदिन व्यवहारात आपण अनेक घटना कार्यकारणनिबद्ध अशा घडताना पाहतो. परंतु लौकिक व्यवहारातील हे कार्यकारणादी निकष जसेच्या तसे रसविषयक व्यापाराला लावणे अयोग्य ठरेल. त्यामुळे काव्यात किंवा नाट्यात एखाद्या रसाची प्रतीती आपल्याला येते तेव्हा ती कशी येते, तिचे स्वरूप कसे असते, हे समजावून घेताना रसनिष्पत्तीस कारणीभूत ठरणारी कारणे, त्यामुळे घडणारी आणि सामान्यतः प्रतीतीला येणारी कार्ये आणि ती कार्ये घडून येण्यास सहाय्यभूत होणारी कारणे या गोष्टींना नाटकात अनुक्रमे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव असे म्हणतात. भरतमुनींच्या रससूत्रानुसार विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसाची निष्पत्ती होते. +भरतमुनींना येथे संयोग म्हणजे केवळ एकत्र येणे अपेक्षित नसून विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या एकजीवतेतून होणारा संयोग अपेक्षित आहे. हा संयोग वरवरचा नसून पानक रसांसारखा असतो. ज्याप्रमाणे पानामध्ये विविध घटकांचे मिश्रण असते. परंतु त्यापासून एक वेगळीच रुची तयार होते. ही रुची एकजीव मात्र अन्य घटकांपेक्षा स्वतंत्र असते. त्याचप्रमाणे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून या घटकांपेक्षा भिन्न मात्र एकरूप अशा रसाची निष्पत्ती होते. येथे भरताने जाणीवपूर्वक निष्पत्ती हा शब्द वापरला आहे. तो निर्मिती हा शब्द वापरत नाही. कारण रस हे मानवी मनात मुळातच वास करत असतात. फक्त त्यांना चेतना मिळाली की हे रस मनात पुन्हा उफाळून येतात. यालाच रसाची निष्पत्ती असे म्हणतात. रसाच्या निष्पत्तीत कारक चेतना देण्याचे काम विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव हे घटक करतात. भरतमुनींच्या रससूत्रात केवळ विभाव, अनुभव आणि व्यभिचारी यांचा उल्लेख झालेला असला तरी त्यामध्ये स्थायीभाव अनुस्यूत आहेत. कदाचित भरतपूर्व काळात झालेल्या आचार्यांनी स्थायीभावाचा विस्तृत विचार केलेला असावा. त्यामुळेच रससूत्रात स्थायीभावाची पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता भरतमुनींना वाटली नसावी. मात्र त्यांनी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भावांसोबतच  अष्टसात्त्विक भावांचेही विवेचन केले आहे. हे अष्टसात्त्विक भाव दृश्य स्वरूपात प्रचितीला येणारे शारीरिक स्वरूपाचे आणि व्यभिचारी भावांशी समतुल्य असतात. भरतमुनींचे रससूत्र समजून घेण्यासाठी हे सर्व घटक समजावून घेणे गरजेचे आहे. +स्थायीभाव म्हणजे रसाचा प्रारंभबिंदू. मानवी मनात काही काही विशिष्ट भाव किंवा चित्तवृत्ती नित्य वास करीत असतात. त्यांना चेतक भेटला की त्या प्रकट होतात, जागृत होतात. पुन्हा पुन्हा चेतना मिळाल्यास वस्तुस्थितीचा विसर पडून हे स्थायीभाव / चित्तवृत्ती परिपुष्ट होतात. त्यामुळे आपल्याला रसाची प्रतीती येते, रसास्वाद जाणवतो. कोणत्याही विरुद्ध व अविरुद्ध भावांनी त्यांचा विच्छेद होत नाही. म्हणूनच भरतमुनींनी 'यथा नराणां नृपतिः शिष्याणांच यथा गुरूः | एवं ही सर्व भावानां स्थायी भावः महान् इह ||' अशा शब्दात स्थायीभावाचे महत्त्व सांगितले आहे. तर विश्वनाथाने स्थायीभावांना आस्वादरुपी अंकुर पसरविणारे कंद असे म्हटले आहे. (आस्वादाङ्कुरकन्दः असौ भावः स्थायी इति संमतः |) मात्र हे स्थायीभाव म्हणजे लौकिक जीवनातील मुलभूत प्रेरणा किंवा उपजत भावना नव्हेत तर ते फक्त लौकिक भावनांशी संवादी असतात हे लक्षात ठेवावे लागते. हे स्थायीभाव आठ प्रकारचे आहेत. +रतिहासेश्च शोकश्च क्रोधोत्साहौ भयं तथा | +जुगुप्सा विस्मयश्चेति स्थायिभावाः प्रकीर्तितः || +भरतमुनींनी चार प्रमुख रस सांगितले आहेत. या चार प्रमुख रसांपासून चार उपरस निर्माण होतात. यातील प्रमुख रस आणि उपरसांपासून रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय हे आठ स्थायीभाव निर्माण होतात. ते असे : +भरतप्रणीत मूलभूत रस आणि उपरस यांपासून निर्माण झालेले आठ स्थायीभाव : +रस    :     शृंगार         वीर          हास्य          अद्भुत        रौद्र         करुण         बीभत्स     भयानक +भाव  :      रती         उत्साह         हास           विस्मय       क्रोध         शोक          जुगुप्सा        भय +साहित्यकृती किंवा नाट्यकृतीचा आस्वाद घेत असताना हे भाव मनात जागृत होऊन त्यांची रसिकाच्या मनात सुखमय चर्वणा झाली की रसाची निष्पत्ती होते. +विभाव म्हणजे रसाच्या निष्पत्तीचे कारण होय. विभावामुळे वाचिक, आंशिक आणि सात्त्विक अशा तीन प्रकारच्या अभिनयाची प्रचिती येते. लोकव्यवहारात एखाद्या चित्तवृत्तीचा उद्भव झाल्याचा आपण अनुमान करतो, हा अनुमान आपण कार्यकारणभावाच्या आधारे करत असतो. उदा० एका उद्यानात एक तरुणी आपल्या प्रियकराची वाट पाहत आहे. तिचा प्रियकर तिला दुरून येताना दिसतो. त्याला पाहताच तिच्या डोळ्यांचे विलास सुरू होतात. तिच्या गालावर लाली उमटते. ती आपल्या पदराशी चाळा करते. तेवढ्यात तो प्रियकर तिच्या जवळ येतो. येथे प्रियकराचे दर्शन हे प्रेयसीच्या प्रणयोद्भवाचे कारण आहे. तर हे दृश्य पाहणारे रसिक हे प्रेयसीची चित्तवृत्ती आणि तिच्या अवयवांची हालचाल पाहून तिच्या प्रियकराच्या येण्याचे अनुमान करतो. येथे प्रेयसीच्या प्रणयोद्भवाचे कारण आणि आपण केलेला तर्क हे दोन्ही लौकिक आहेत. लौकिक व्यवहारात ज्या गोष्टींना कारण असे म्हणतात त्यांना काव्यात / नाट्यात विभाव असे म्हणतात. हे विभाव दोन प्रकारचे असतात. १) आलंबन विभाव २) उद्दीपन विभाव +ज्यांवर रसाची निष्पत्ती अवलंबून असते त्याला आलंबन विभाव असे म्हणतात. उदा: प्रेयसी आणि तिचा प्रियकर यांच्या एकमेकांना भेटण्यातून रती या स्थायीभावाची निष्पत्ती होते. त्यामुळे ते दोघे आलंबन विभाव ठरतात. +आलंबन विभावाच्या उद्दीपनास उपयुक्त ठरणाऱ्या अन्य परिस्थितीस उद्दीपन विभाव असे म्हणतात. (थोडक्यात काव्यगत पात्राचे भाव ज्या कारणांमुळे उद्दीपीत होतात त्यांना उद्दीपन विभाव असे म्हणतात.) उदा: प्रेयसीस तिच्या प्रियकराचे दर्शन उद्यानात होते. येथे उद्यान, तेथे उमललेली फुले आदी उद्दीपन विभाव ठरतात. +अनुभाव म्हणजे विभावांमध्ये निष्पन्न झालेल्या चित्तवृत्तींचे दृश्य परिणाम होत. उपरोक्त उदाहरणात प्रेयसीच्या डोळ्यांचे विभ्रम, गालावर चढणारी लाली, पदराशी होणारा चाळा हे नाट्यगत अनुभाव आहेत. रती, हास, शोक इ. स्थायीभावांना व्यक्त करणाऱ्या आशयाची कृती व हालचाली म्हणजे अनुभाव होय. ते विभावांमध्ये निष्पन्न भावांच्या मागोमाग येतात म्हणून त्यांना अनुभाव असे म्हणतात. एखाद्याच्या कृतीवरून, हालचालींवरून आपण त्याच्या भावनांची ओळख करून घेत असतो. उदा: विरहव्याकूळ नायिकेचे हुंदके देणे, क्रोधात डोळे लाल होणे इत्यादीवरूनच प्रेक्षकाच्या लक्षात येते की अनुभाव म्हणजे भावजन्य कार्ये होत. या अनुभावांचे अंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य असे चार प्रकार पडतात. यातील अंगिकमध्ये शारीरिक कृती, हालचाली आणि हावभाव यांचा समावेश होतो. तर वाचिकमध्ये संवाद, संभाषण यांचा समावेश होतो. सात्त्विक अनुभावांमध्ये सूक्ष्म मानसिक क्रियांचा समावेश होतो. तर आहार्य अनुभावांमध्ये वेशभूषेतील पर्यावरण अभिप्रेत आहे. +हे भाव कोणत्याही एका रसाशी एकनिष्ठ नसतात. ते अनेकविध रसांमध्ये कायम संचार करत असतात. त्यामुळेच त्यांना व्यभिचारी किंवा संचारी भाव असे म्हणतात. स्थायीभाव हे स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात, मात्र व्यभिचारी भाव हे स्वतंत्रपणे न उद्भवता कोणत्याही स्थिर स्वरूप असलेल्या चित्तवृत्तीच्या अनुषंगाने उद्भवत असतात. भरताने तेहतीस प्रकारचे व्यभिचारीभाव सांगितले आहेत. यांचे चौदा शारीरिक अवस्था, तीन ज्ञानात्मक अवस्था आणि सोळा भावनात्मक मनोविकार असे प्रकार पाडता येतात. यातील शारीरिक अवस्थेत मरण, व्याधी, ग्लानी, श्रम, आलस्य, निद्रा, स्वप्न, अपस्मार, उन्माद, मद, मोह, जडता, चपलता, प्रबोध यांचा, ज्ञानात्मक अवस्थेत स्मृती, मति, वितर्क यांचा तर भावनात्मक मनोविकारांमध्ये हर्ष, अमर्ष, धृती, उग्रता, आवेग, निर्वेद, विषाद, औत्सुक्य, चिंता, शंका, असूया, त्रास, गर्व, दैन्य, अवहीथ्त आणि क्रीडा यांचा समावेश होतो. मुख्य स्थायी नाट्यभावाला पोषक आणि त्याच्या अनुषंगाने आस्वाद्य होणारे नाट्यभाव म्हणजे उपरोक्त व्यभिचारी भाव होत. +विशिष्ट चित्तवृत्तीच्या अभिनयाच्या वेळी प्रकट करावयाचे भाव म्हणजे अष्टसात्त्विक भाव होत. हे भाव अनुभावाप्रमाणेच परिणामरूप आहेत. मात्र भारताने त्यांचा अनुभावातच समावेश करण्याऐवजी त्यांची स्वतंत्र चर्चा केली आहे. सात्त्विक भावांची महती सांगताना भरताने नाट्यं सत्त्वे प्रतिष्ठितम् असे म्हटले आहे. श्रेष्ठ अभिनय हा सत्त्वातिरिक्त असावा असा भरताचा आग्रह आहे. सत्त्व म्हणजे समाहित किंवा साम्यावस्थत झालेले मन सत्त्वामुळे नाट्यातील केवळ नाट्यधर्मी अशा सुखदुःखांचा परिणामही खऱ्या शारीरिक क्रियेतून प्रकट होतो. त्यामुळेच रसोत्कर्ष अधिक उत्कट होऊ शकतो. या सात्त्विक भावांची संख्या ८ आहे. यात स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा राहणे), स्वरभंग (आवाजात बदल होणे), कंप (शरीराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मूर्च्छित होणे) यांचा समावेश होतो. +भरतमुनींच्या मते उपरोक्त विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव आणि अष्टसात्त्विक भाव यांच्या संयोगातून रसिकाच्या मनातील स्थायीभाव परिपुष्ट होतात आणि रसाची निष्पत्ती होते. ज्याप्रमाणे वाळलेल्या लाकडाला अग्नीचा स्पर्श होताच ते पेट घेते त्याप्रमाणे रसिकाशी हृदयसंवादी असणाऱ्या भावाचा काव्यनाट्यात अविष्कार होताच रसिकाच्या मनाला तो व्यापून टाकतो. नाट्यभाव म्हणजे मानवी मनोविकार नसले तरी ते या मनोविकारांशी संवादी असतात. मानवी भावनांशी ते पूर्णतः जुळतात म्हणूनच रसिकाला त्यापासून प्रत्यय येतो. लाकडात मुळचा अग्नी असतोच, बाहेरच्या अग्नीशी संपर्क येताच सर्व लाकूड पेट घेते. त्याचप्रमाणे सर्व नाट्यशरीर रसाने फुलून जाते. रसिकाच्या हृदयामध्ये बीजरूपाने असलेल्या मानवी भावनांचा संवादी अशा कविगत भावनांशी संयोग होताच त्याला रसाची प्रतीती येते. नाट्यभाव हे लौकिक भावांना संवादी असले तरी ते कार्यकारण भावाने निष्पन्न होत नाहीत. विभावादींच्या योगे त्यांचे अभिनयन होते. रसिकाच्या अंतःकरणात त्याचे व्यक्तिगत भाव जागृत झालेले नसतात. तर तो साधारण्याच्या पातळीवरून अभिव्यक्त भावांचा आस्वाद घेत असतो. +भरतमुनींच्या या रससूत्रावर दृहिणीच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. या रससूत्राचे आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचे प्रयत्न अनेक साहित्यशास्त्रकारांनी केलेले आहेत. यांमध्ये भट्टलोल्लट, श्रीशंकुक, भट्टनायक आणि अभिनवगुप्त या भाष्यकारांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. यात भट्टनायकाने उपचित किंवा परिपुष्ट स्थायी म्हणजे रस अशी मांडणी केली आहे. तर श्रीशंकुक रसाच्या निष्पत्तीस रसाची अनुमिती मानतो. भट्टनायकाने रसनिष्पत्तीच्या व्यापाराला भोगीकरण व्यापार असे संबोधले आहे. अभिनवगुप्ताने मात्र रसनिष्पत्तीच्या सिद्धांताला प्रथमच मानवी मनाची जोड देत साधारणीकरणाच्या सिद्धांताची मांडणी केली आहे. यावरूनच भारतीय साहित्यशास्त्रातील भरतमुनींच्या रससूत्राचे महत्त्वपूर्ण स्थान आपल्या लक्षात येते.  [१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13083.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a70427e8adb56d9b7ad4b215210fc64edd8bce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13083.txt @@ -0,0 +1,27 @@ +चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणाऱ्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या हालचालीस भरती असे म्हणतात. +भरतीचा पल्ला -भरती आणि ओहोटी यांच्या उंचीतील फरकास भरतीचा पल्ला असे म्हणतात. +आंतरभरती -भरतीच्या वेळेस समुद्र किनाऱ्याचा भाग पाण्याखाली बुडतो तर ओहोटीच्या वेळेस उघडा पडतो. समुद्र किनाऱ्याच्या अशा उघडा पडणाऱ्या भागास आंतरभरती विभाग असे म्हणतात. समुद्र किनारा जर मंद उताराचा असेल तर आंतरभरती विभाग विस्तृत असतो आणि जर किनारा तीव्र उताराचा असेल तर आंतरभरती विभाग अरुंद असतो +भरती ओहोटी होण्याची करणे -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रत्यागी (Centrifugal Force-अपकेंद्री बल) शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तींच्या परिणामामुळे भरती-ओहोटी होते.विश्वात दोन खगोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भरती ओहोटी निर्मितीला थोड्याशा कमी प्रमाणात कारणीभूत ठरते. +जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते. +भरती ओहोटीच्या वेळा - १. ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद एवढा कालावधी लागतो. +२.ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भरती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात. +३.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भरती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते. +४. ज्या ठिकाणी ओहोटी येते, पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे कालावधी लागतो. +भरती-ओहोटीचे प्रकार - ही चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती-ओहोटीचे दोन प्रकार पडतात +१.उधानाची भरती-ओहोटी = अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरी भरतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते. त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी व ओहोटी नेहमीच्या ओहोटीपेक्षा लहान असते. +२.भांगाची भरती = चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी ही चंद्र व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनाच्या कोनबिंदूवर येते. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते. या दिवशी भरती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशी भरती सरासरी भरतीपेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोटीच्या पातळीपेक्षा उंच असते. अशा भरती-ओहोटीस भांगाची भरती-ओहोटी म्हणतात. +भरती ओहोटीचे महत्त्व=१) काही आंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात. अशा आंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ मिळवतात.. +२) भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात. ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाळे लावून मोठ्या प्रमाणावर मासे पकडता येतात +३) भरतीमुळे समुद्रातील जहाजांची किनाऱ्यालगतच्या बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते. भरती-ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते +४) भरतीमुळे निर्माण झालेल्या पाणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धोकादायक असतात +५) मुंबईसारख्या किनाऱ्यावरील शहरातील सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व गटारांतून वाहणारे मलमूत्र हे भरती-ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते +६) भरती-ओहोटीच्या शक्तीचा ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो +समुद्रातले प्रवाह - सागराच्या निश्चित दिशेने होणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागीय हालचालीस समुद्री प्रवाह म्हणतात. +समुद्री प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो.:- +१ ग्रहीय वारे- ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर विषुववृत्ताकडे ढकलत नेतात. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या विषुववृत्तीय प्रवाहांची निर्मिती होते. +२ पृथ्वीचे परिवलन - पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. त्यामुळे विषुववृत्तावरील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तीय प्रवाहाच्या रूपाने वाहते. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात समुद्र प्रवाह आपल्या उजवीकडे वळतात. त्यामुळे त्यांची वळण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. +३ सागरातील पाण्याच्या तापमानातील भिन्नता-सागरजलाचे तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होत जाते. उष्ण कटिबंधातील सागरजल उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशातील सागरजल थंड असते. शीत समुद्राचा प्रवाह जड असल्यामुळे तो सागरजलाच्या पृष्ठभागाखालून वाहतो. +४ समुद्राच्या पाण्यामधल्या क्षारतेतील भिन्नता - कमी क्षारता असलेले समुद्राचे पाणी हलके असते तर जास्त क्षारता असलेले समुद्राचे पाणी जड असते. त्यामुळे कमी क्षारता असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाकडून जास्त क्षारता असलेल्या समुद्राकडे पाणी कमी क्षारता असलेल्या जलपृष्ठाखालून वाहू लागते. +५ भूशिराचा अडथळा - समुद्र प्रवाहाच्या मार्गात एखाद्या भूशिराचा अडथळा आल्यास तो प्रवाह विभागला जाऊन त्याच्या दोन शाखा होतात. उदा० अटलांटिक महासागरातील दक्षिण विषुववृत्तीय समुद्री प्रवाह ब्राझीलच्या भूशिराजवळ विभागला गेला आहे. +भरतीमध्ये व ओहोटीमध्ये चंद्राचा मोठा कार्यभाग आहे. +{विस्तार}} diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13091.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb58e99758f5e3b0074a7dfc91bff9c790f08283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13091.txt @@ -0,0 +1,2 @@ +भरहुत (भरहट) भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, जे तिथल्या बौद्ध स्तूप आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘भरहुत स्तूप’ सम्राट अशोकांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात निर्माण केला असावा, पण सुंग राजवटीदरम्यान अनेक शोभेच्छा पट्ट्या वापरून या स्तूपामध्ये कलाकुसरीच्या अनेक कामांची भर घातलेली आहे. कनिंघम यांनी इ.स. १८७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला. +भरहुतमधील स्तूपाचे एक वैशिष्ट्य असे की, तेथील भिंतींवर किंवा दाराच्या लाकडी, अरूंद चौकटींवर काही मजकूर कोरलेला आहे, ज्यात अधिकतर काही व्यक्तींची ओळख दिलेली आहे. या स्तूपातील पुराणसंशोधनातल्या सर्व वस्तू आता कोलकात्याच्या वस्तुसंग्रहालयात नेऊन ठेवलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13147.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa6c6242b632945224cdc2f3f475f9ba58a1321 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13147.txt @@ -0,0 +1,2 @@ +भवानीतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1315.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e86416269f8c5876be88536841cf822f2b4c6015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1315.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रभाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13153.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa10c0737243ac5cffbce95cce91eb478b1ea7fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13153.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +भवानीबाई महाडीक यांचा जन्म इ.स. १६७८ साली शृंगारपूर येथे झाला. भवानी बाई या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांच्या नात व छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांच्या जेष्ठ कन्या होत्या. भवानीबाई यांचा विवाह महाडिक कुटुंबात हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचा पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी झाला. +शंकराजींच्या मृत्यूनंतर भवानीबाई सती गेल्या.तारळे गावातील तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे.भवानी बाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी हे दोन पुत्र होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1317.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bc9f6da343a6502e878c985578d9cab31d87c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1317.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +प्रभात जयसुर्या हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने श्रीलंकेतर्फे एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13174.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b4fd2bfb4a379e1c5c3fb428ecdd5823606324b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13174.txt @@ -0,0 +1,2 @@ +भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे. +कवी भा.रा. तांबे यांच्या नावाने उत्तमोत्तम पुस्तकांना अनेकजणांनी पुरस्कार ठेवले आहेत; त्यांपैकी काही पुरस्कार हे :- diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13176.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11210f913175166c0c6697c5accdd4ca26e3099b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13176.txt @@ -0,0 +1,10 @@ +भास्कर रामचंद्र भागवत (३१ मे, इ.स. १९१०; इंदूर - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषतः कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रूपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले. +भा.रा. भागवतांनी १८४हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :- +४९ कथासंग्रह, १०० कादंबऱ्या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके. +भा.रा.भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी इंदुरात निरीश्वरवादी सुधारकी कुटुंबात झाला [१]. त्यांचे वडील, रामचंद्र भागवत, सरकारी शाळेचे -सुधारकी विचार असलेले- मुख्याध्यापक होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या, 'सेंट झेवियर्स महाविद्यालया'तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचे दूरचे नाते होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काही लेखनाचा उपक्रम केला होता; पण तो प्रकाशित झाला नाही. +लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णूशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. +भागवतांनी इ.स. १९३० च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते [२]. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते. महात्मा गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती भागवत यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम. जोशी यांच्यासोबत भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला[२]. त्याच काळात त्यांची आई वारली. त्यांच्या थोरल्या मुलाचा - रवींद्र याचा - जन्मही ते तुरुंगात असतानाच झाला. या स्वातंत्र्यचळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना पुढे सरकारी निवृत्तिवेतन मिळत असे. +तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे. +बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते [२]. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते. [३] इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. +रघुवीर कुलकर्णी ऊर्फ 'रघुवीर कूल' यांनी भा.रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित 'लगी शर्त' [४] आणि 'रॉंग मॉरिशस' [५] हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. 'चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया Archived 2015-04-12 at the Wayback Machine.' या संस्थेने या चित्रपटांसाठी अनुदान दिले आहे. [६] +भा.रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने ऐसी अक्षरे या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात भा.रां.चे अप्रकाशित साहित्य, कुटुंबीयांच्या मुलाखती, पूर्वप्रकाशित लेखन, भा.रां.च्या साहित्याची चिकित्सा करणारे लेख, फॅनफिक्शन, फास्टर फेणेच्या गोष्टींमधून येणाऱ्या ठिकाणांचा धांडोळा असे विषय हाताळले आहेत. [७] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13225.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..476d999f007f81ccd1a49bce50987036425b23f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13225.txt @@ -0,0 +1,16 @@ +भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. +प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. +पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला. +प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. 'भांडारकर'मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा.ल. मंजुळ हा इतिहास लिहीत आहेत. २०१७ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. +'भांडारकर'मध्ये झालेले संशोधनाचे कार्य, त्यामध्ये आपापला वाटा सक्षमपणे उचललेल्या व्यक्तींचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, यासाठी हा इतिहास लिहिला जात आहे. +संस्थेच्या स्थापनेसाठी 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली बैठक, डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. नरहर सरदेसाई, डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे योगदान, संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश होणार आहे. संस्थेमध्ये झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते. हे पुस्तक सुमारे तीनशे पानांचे असेल. +काही महत्त्वाच्या नोंदी +१९१६ : 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली पहिली बैठक. +१९१७ : डॉ. भांडारकरांकडील साडेतीन हजार हस्तलिखितांच्या संग्रहातून संस्थेची स्थापना +१९१९ : 'भांडारकर'चेच अपत्य असलेल्या 'ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स'ची स्थापना आणि पहिली द्वैवार्षिक परिषद. +१९२० : डेक्कन कॉलेजमधील १८ हजार हस्तलिखितांचा भांडारकरच्या हस्तलिखितांमध्ये झालेला समावेश. +१९६५ : महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रकाशन +अतिथिगृहाची इमारत बांधण्यासाठी व महाभारत हे हिंदू महाकाव्य प्रकाशित करण्यासाठी पैशाची गरज होती.तेव्हा संस्थेने हैद्राबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान याला विनंती केली. तेव्हा त्याने कोणताही वेळ न दवडता लगेच प्रतिवर्षी रु.१०००ची मदत ११ वर्षासाठी मंजूर केली. त्याबरोबरच अतिथिगृहासाठी रु.५०,०००ची मदत जाहीर केली. [१][२] +संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते. +अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत. +भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13287.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ea13c1e038892d752d35289f67444ae9eb6e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13287.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्रात कुटुंबातील सर्वात मोठ्या भावाला दादा आणि त्याच्यापेक्षा धाकट्या भावाला भाऊ या नावांनी हाक मारण्याची प्रथा आहे. भाऊ जीव लावतो. याशिवाय व्यक्तिबद्दलचा आदर दाखविण्यासाठी व्यक्तिनामानंतर राव, पंत, साहेब याच प्रमाणे भाऊ हे उपपदही वापरले जाते. उदा० रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कुंदगोळकर, रामभाऊ रुईकर, रामभाऊ दत्तात्रेय रानडे वगैरे. त्याशिवाय महाराष्ट्रात स्वतःचे ’भाऊ असेच नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-भावाचा खूप आधार असतो diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13302.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7786b2e32e23205287f6eb23ae41e0110e919a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13302.txt @@ -0,0 +1,11 @@ +भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, - २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते[ संदर्भ हवा ], तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३०च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे. +अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. +संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते +कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे शेतकऱ्यांसाठी कार्य +१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. +इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. इ.स. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. +भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती. +१९३७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे १९५७ ते १९६२ आणि १९६२ ते १९६८ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता. मृत्यू – २९ डिसेंबर, १९७१. +सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली. +दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे --- diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13311.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6145739c68656c12b71da93c335f17c62c9f86d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13311.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाऊरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13320.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f146c2b5eaef0c80f5a5082e804230ad423125b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13320.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाऊसाहेब नंदुरकर इंजिनियरिंग कॉलेज महाराष्ट्राच्या यवतमाळ शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. +डॉ भाऊसाहेब नंदुरकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि यवतमाळची स्थापना २००७ला झाली +श्री सत्य साई क्रीडा नगरी वाघापुर रोड यवतमाळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13323.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78eb3d31efcac3e9e5118b7c671c4a110a8e7604 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13323.txt @@ -0,0 +1,7 @@ +वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते. +वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते. +इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१]. +उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२]. +पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२]. +रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्याऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[३] +ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13342.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d4999c8267710d7dac346638861ce3935176416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13342.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५६४ असलेले भाकरोंडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७८९.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३१९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३१५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मानापूर येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय वैरागड येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय वैरागड येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य केन्द्र, -१प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, -१क्षयरोग रुग्णालय, -१अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१कुटुंब कल्याण केन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13355.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c70189fcf5eee0091d6614550c0d6d83acd6f550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13355.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याविषयी आहे. भागलपुर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +भागलपूर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र भागलपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13386.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1f2cbbafdae8483209dd7c0ed1bb0941696a3da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13386.txt @@ -0,0 +1 @@ +भागीमहारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13392.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30e8fe1f367517d201319e9e54367fffac718277 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13392.txt @@ -0,0 +1,2 @@ +भागेबोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नेरी, जांभुर्डा, डोंगरगाव, भिवापूर, मोखाळा, कान्हळगाव, मांगळी, नाक्षी, भुमकोटरगाटा, पारसोडी, चिखली ही जवळपासची गावे आहेत.भागेबोरी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13415.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78d0aa35dbf0f6985de7594f008fc3acd19e8b78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13415.txt @@ -0,0 +1,5 @@ +भाग्यश्री ठिपसे (४ ऑगस्ट, १९६१ सांगली - ) (लग्नापूर्वी: भाग्यश्री साठे) या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. या महिला इंटरनॅशनल मास्टर असून त्यांनी पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. +साठे ठिपसे यांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. +भागश्री ठिपसे या जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू असल्यामुळे त्यांना नुकतेच फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. +भागश्री ठिपसे या जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू आहेत. या मुंबई येथे राहतात. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळातील मानाचा असा राष्ट्रीय चॅंपियनशीपचा मान मिळविला आहे तसेच,त्या साल १९११ मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. राष्ट्रकुल देशांच्या खेळात व स्पर्धेत त्यांना तीन वेळा रजत पदक प्राप्त झाले आहे. १९८६ सालातील जागतिक बुद्धिबळ संघाचा 'जागतिक महिला मास्टर' हा बहुमान त्यांनी मिळविला आहे. +बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे हे त्यांचे पती आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13436.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9df8da94a8294809c777263f9253f65c2112847f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13436.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाटमरळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13454.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f7fc0a513d5ae460cc2aa17198cfed06630101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13454.txt @@ -0,0 +1,5 @@ +संस्कृत भाषेतल्या दहा नाट्यप्रकारांपैकी भाण हा एक प्रकार आहे. ही एकांकी नाट्यरचना असून ती एकच पात्र सादर करीत असे. हे पात्र म्हणजे धूर्त किंवा विट. हा एक तर स्वतःचे अनुभव कथन करी किंवा इतरांच्या अनुभवांचे वर्णन करी. एकाचेच भाष्य असलेल्या ह्या नाट्यप्रकारात बोलण्यावर भर असून त्यात एकाच पात्राच्या उक्ति-प्रयुक्तींच्या रूपाने नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचे असे. +मिश्रभाण हा भाणाचाच एक उपप्रकार आहे. +भाण या नाट्यप्रकारात वीररस आणि शृगाररस यांना प्राधान्य असे, हे खाली दिलेल्या भाणांच्या नावांवरून सहज समजून यावे. + +. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13465.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e98d3b7a23907ece496615a503da13f43de1547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13465.txt @@ -0,0 +1,2 @@ +भातगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13500.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e4929e378f1e700b3b3dc1093029ff89406d20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13500.txt @@ -0,0 +1,2 @@ +भादर नदी भारताच्या गुजरात राज्यातील नदी आहे. संपूर्णपणे सौराष्ट्रात असलेली ही नदी पोरबंदर येथे अरबी समुद्रास मिळते. भादर नदी वर दोन धरणे आहेत. जेतपूर व जसदण शहरे या नदीकाठी आहेत.[१] +या नदीचे खोरे ७,०९४ किमी२ विस्ताराचे आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13519.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f373e9f07489e887e45ab64b2f287f413b6759b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13519.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद कृष्ण अष्टमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13563.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f924f4091fb7ce52d5b1de5b25ae6ea0f2cf94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13563.txt @@ -0,0 +1,3 @@ + +भानामती काळ्या जादूचा प्रकार समजला जातो. +यात ज्या व्यक्तीवर प्रयोग होतो त्याचे कपडे पेटतात, त्याच्या वस्तू नाहीशा होतात असा समज आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13571.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f320e6a59da6434af3c7e1d54c74c13a55af274 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13571.txt @@ -0,0 +1 @@ +भानुबेन मनोहरभाई बाबरिया या भारतीय राजकारणी आणि सध्याच्या गुजरात सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. ते 2017 पासून गुजरात विधानसभेतील राजकोट ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1359.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c340bba82abf21f726fc0744aab6c9ad2c1dacb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1359.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रमाण प्रतिकृती हा मूलकण भौतिकशास्त्रातील एक सिद्धांत आहे जो विद्युतचुंबकीय, सौम्य नाभिकीय आणि कठोर नाभिकीय आंतरक्रियांचे वर्णन करतो व मूलकणांचे वर्गीकरण करतो. याचा विकास विसाव्या अर्धशतकात, जगभरातील वैज्ञानिकांच्या सहायक प्रयत्नांनी झाला. सद्यकालीन सिद्धांताचे निश्चितीकरण १९७० मध्ये 'क्वार्क'च्या प्रायोगिक पुष्टीकरणानंतर झाले. टॉप क्वार्क(१९९५), टाऊ न्यूट्रिनो(२०००) आणि हिग्स बोसॉन(२०१२) अशा मूलकणांच्या शोधांनी या सिद्धांतावरील विश्वास वाढवण्यासाठी मदत केली आहे. प्रमाण प्रतिकृतीच्या अनेक विस्तीर्ण प्रयोगांच्या यशस्वी स्पष्टीकरणामुळे याला "जवळपास सर्वस्वाचा सिद्धांत" असेही म्हणतात. +जरीही 'प्रमाण प्रतिकृती' हा सिद्धांत सैद्धांतिक रूपाने स्वसुसंगत समजला गेला असला व अनेक प्रयोगांचे यशस्वी भाकित करण्यात यशस्वी ठरला असला तरीही हा अनेक घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही व त्यामुळे हा 'मूलभूत अनोन्यक्रियांचा संपूर्ण सिद्धांत' असण्यापासून कमी पडतो. 'प्रमाण प्रतिकृती' हा व्यापक सापेक्षतावादानुसार स्पष्ट केलेल्या गुरुत्वाकर्षण अनोन्यक्रियेचे समावेश करत नाही, तसेच (कदाचित गडद शक्तीद्वारे वर्णन केलेल्या) विश्वाच्या प्रवेगानाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. 'प्रमाण प्रतिकृतीत' निरीक्षण खगोलशास्त्राद्वारे वर्णन केलेले सर्व गुणधर्म असणारा असा कोणताही संभाव्य 'गडद पदार्थ' कण नाही. प्रमाण प्रतिकृती 'न्यूट्रिनो हेलकावे' (आणि त्यांचे विना-शून्य वस्तुमान) यांचा समावेश करत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13598.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..194bc3a735e3b465cddb501511f1ddd6c549141f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13598.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील आद्य अणुसंशोधन केंद्र आहे. ते डॉ. होमी भाभा यांनी इ.स. १९५४ मध्ये सुरू केले. +भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) ही भारताची प्रमुख अणु संशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. बीएआरसी हे बहु-शिस्तीचे संशोधन केंद्र आहे ज्यामध्ये अणू विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13639.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ef778fa31988fe75cb0e101604675eb62f41692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13639.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13669.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d95023af80ee346f87f4bfc9f2d6d191e5df71da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13669.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध हे भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९६५ मध्ये झालेले दुसरे युद्ध होते. +इ.स. १९६० चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATOच्या छत्राखाली अमेरिका समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्‍न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणाऱ्या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. अमेरिका त्यामुळे बऱ्याच प्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता. +त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देऊ केल्याने अमेरिका पाकिस्तानला खूप मदत करू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. त्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रू झाला. अमेरिका-पाक-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली. +१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५ च्या अखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येऊ लागला. एकदा का भारताचे लष्कर आहे त्याहून शक्तीशाली झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या बळावर रेटणे अशक्यप्राय होईल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने केली पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात भारताला आपण सहज हरवू असे त्यांना वाटत होते.इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी भारताचे सामरिक करार होतेच. शिवाय इराण, इजिप्त, लेबानॉन, अफगाणिस्तान हे मुस्लिम जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. काश्मीरचा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत पाकिस्तान दोघांनाही होती. पण उर्वरित काश्मीरही घेऊन टाकावा अशी महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच चीनकडून मार खाणाऱ्या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवू असा विश्वास त्यांच्यात येऊ लागला. +पाकिस्तानने वेष बदललेल्या सैनिकांना मुजाहिदीन (स्वातंत्र्यसैनिक) म्हणून काश्मिरात पाठवले. असे केले की घडलेली घटना काश्मिरी "जनतेचा उठाव" असे दाखवून काश्मीर भारतापासून तोडता येईल. ते तथाकथित मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोचलेसुद्धा. त्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचारही केला. भारतीय सैनिकांवर हल्ले केले. उद्देश हाच की काश्मिरी जनताच कशी "बंड" करून उठली आहे व आता भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये कसे आराजक माजले आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मिरात कसे सगळे आलबेल आहे हे दाखवणे. म्हणजेच, भारताला अचानक उठाव करून काश्मीरमधून हुसकावून लावणे व काश्मीर अलगद घशात घालणे शक्य होईल. जर काश्मिरी लोकांनी पाकिस्तानात सामील होण्यास विरोध केलाच तर ताबडतोब त्यांना तथाकथित स्वातंत्र्य देऊन स्वतःचे अंकित राष्ट्र बनवणे हा उद्देश. +पहिले काही असे तथाकथित "स्वातंत्र्यसैनिक" भारतात पोचताच ह्याचा सुगावा लागला, व रागाचा पारा चढलेल्या भारताने ताबडतोब मग थेट राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाब यांमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत फारशा प्रतिकाराशिवाय लाहोर-सियालकोटाच्या अगदी जवळपर्यंत धडक मारली व अचानक घोडदौड थांबवली. याचे कारण तर भारतीय लष्कराला थेट निर्विरोध इतका आत प्रवेश मिळणे म्हणजे कदाचित एखादा मोठा सापळा असू शकत होता. निदान तशी शंका भारतास आली आणि अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. एवढा वेळ मिळाल्याने पाकिस्तानने लागलीच सैन्याची जमवाजमव करून लाहोरच्या पिछाडीपर्यंत सैन्य आणले. व आख्खे शहर काही दिवस का असेना पण ताब्यात ठेवायचा भारताचा प्रयत्‍न हुकला. +पण मुळात असे झालेच कसे? लाहोर आणि सियालकोट ही महत्त्वाची शहरे संरक्षणहीन कशी ठेवली गेली? कारण भारत मुळात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडेल हेच मुळात लश्करशहा अयुबखान ह्याला वाटत नव्हते. त्याची अपेक्षा ही होती की मुळात काश्मीर हा भारत-पाक ह्यांच्या ताब्यात अर्धा-अर्धा असा आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरून (LineOfControl) म्हणजे काश्मीरमधून भारत हल्ला करेल. ह्या भागात लढाई करणे पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते कारण युद्धमान स्थितीत (दोन्ही बाजूंच्या ताब्यातील भौगोलिक रचना लक्षात घेता)भारताला आपल्या सैन्याला रसद पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे होते. तेच पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते. हे लक्षात घेऊन भारताने तिथे युद्ध करणे टाळले. इतकेच काय, तर भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या काही चौक्याही भारताने दुर्लक्षित केल्या. +खेमकरण सेक्टर मध्ये अमेरिकेकडून पाक ने मिळवलेले पॅटन रणगाडे भारतीय सैनिक अब्दुल हमीद सारख्यांच्या पराक्रमामुळे आपण थांबवू शकलो.. पाकसीमेवरील गुजरात राज्यातील कच्छच्या रणातील ५०० चौरस किलोमीटरच्या आसपासचा भाग पाकिस्तानने मिळवला. मॅकमोहन लाईन जशी चीनसोबतचा वादग्रस्त मुद्दा आहे तसाच काश्मीरवरून पाकसोबत वाद आहेत. कच्छच्या रणाबद्दलही पाकिस्तानशी वाद आहेत. तिथेही स्पष्ट आणि उभयपक्षी मान्य अशी आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाही. शिवाय आता त्याच भागाच्या आसपास भरपूर नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने एक नवेच वळण त्या वादाला लागू शकते. +पाकिस्तानातला पंजाबकडला काही भाग भारताच्या ताब्यात तर काश्मीरकडचा भारताचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात. असल्याने स्टेलमेट स्थिती निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वतःहून हस्तक्षेप करत समेटासाठी दोन्ही बाजूंवर दबाव टाकला. तेव्हाच्या U S S R मधील ताश्कंद(आजच्या उझबेकिस्तान) येथे दोन्ही बाजूंना समेटासाठी बोलावण्यात आले. युद्धपूर्व स्थिती आणि कब्जा दोन्ही देशांनी जवळपास जशा होता तसा मान्य करण्याचे ठरले. १९६५ च्या पूर्वी जसे नकाशे होते, तसेच ते नंतरही राहिले. ज्या दिवशी ताश्कंदमध्ये तह झाला, त्याच रात्री भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. +दोन्ही देशातल्या काही लोकांनी हे युद्ध आपणच जिंकले असा दावा करायला सुरुवात केली. युद्धोत्तर जेवढी वर्षे गेली तितका हा दावा करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे दोन्ही देशात. प्रत्यक्षात युद्धात झालेल्या नुकसान, मानहानी ह्यामुळे जनमत आणि लष्करातील काही शक्ती पाकिस्तानी सत्ताधीश अयुबखान ह्यांच्या विरोधात गेल्या. राज्य करणे कठीण होऊन बसल्यामुळे काही काळाने अयुबखान ह्यांना सत्ता सोडावी लागली. ती सत्ता अप्रत्यक्षपणे तेव्हा नुकत्याच लंडनमध्ये शिकून आलेल्या पुढारलेली राहणी असलेल्या झुल्फिकार अली भुत्तो या नव्या नेत्याकडे येऊ लागली. प्रत्यक्षात ह्या नेत्यास पंतप्रधान होण्यास बराच अवकाश लागला. +भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अडचणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाई होती, ती अधिकच जाणवू लागली. म्हणूनच भारताने हरित क्रांतीच्या दिशेने प्रयत्‍न करण्याचे मनावर घेतले. सुरुवातीची काही वर्षे पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा खूपच जास्त होता. तो हळूहळू घसरू लागला. पाकिस्तान परकिय मदतीवर अधिकाधिक अवलंबुन होउ लागले. पाकिस्तानी लश्करात सर्वाधिक भरणा पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी लोकांचा होता. ते अधिकाधिक सामुग्री स्वतःकडे जमवु लागले.त्यासाठी पूर्व पाकिस्तान (आताचा बांगला देश)मधील महसूल बंगाली लोकांकडुन सर्रास हिसकावुन थेट पश्चिम पाकिस्तानात वळवण्यात येऊ लागला. आधीच उपेक्षित जिणे जगणाऱ्या बंगाली पाकिस्तान्यांना अधिकच एकटेपण जाणवले. अलगवाद वाढू लागला. स्वतंत्र बांगला देशाच्या निर्मितीची बीजे रोवली जाऊ लागली. +इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत मोठी कामगिरी युद्धदकालात तसेच शांतताकालातही बजावली. ह्यामुळे भारत वाटतो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट रशिया म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. रशिया-चीन ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरून होतेच. ते वाढायला सुरुवात झाली. १९७१ला रशियाच्या विरुद्ध म्हणुन माओशासित चीन आणि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांची ऐतिहासिक भेट झाली. अमेरिका ह्या भांडवलशाही जगताच्या नेत्याशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्‍न कम्युनिस्ट चीनमध्ये सुरू झाले आणि पुढे दशकभरातच सर्वात मोठा कम्युनिस्ट देश, चीन हा भांडवलशाही अमेरिकेचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामरिक भागीदार बनला. +भारताने युद्धात फारसे गमावले नाही. लालबहादुर शास्त्रींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालाच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्‍न केला असे झाले नाही. तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. अयुबखान ह्यांना होणारा अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली; पण सत्ताधारी बदलले तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13702.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd7eac32d161f389b3b3d2cbfb5ea5f99ae07147 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13702.txt @@ -0,0 +1 @@ +भारत कुमार चिकारा (१० ऑक्टोबर, १९८५:हरयाणा, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13703.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd7eac32d161f389b3b3d2cbfb5ea5f99ae07147 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13703.txt @@ -0,0 +1 @@ +भारत कुमार चिकारा (१० ऑक्टोबर, १९८५:हरयाणा, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13736.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32417004fc45aeb349646037789301af13d6aab0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13736.txt @@ -0,0 +1 @@ +भारत बाला तथा भारत गणपती हा तमिळ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13737.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13737.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती: diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13744.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b969dbcf2e32bc8dfb048eec81b06a763f9211ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13744.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.[१] +सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे. +भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपी मध्ये सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे. +भारतातील राज्यांना त्यांची स्वतःची प्रतीके आहेत. +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13772.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701d2c3d1b598c8c038888a03bee5b924c84122c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13772.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतकन्या कल्पना चावला हे पंकज किशोर लिखित मराठी चरित्र आहे. [१] हे भारतीय-अमेरिकन अंतराळयात्री कल्पना चावलाच्या जीवनाबद्दलचे लेखन आहे. +पुस्तकाच्या सुरुवातीला अनुवादकाने प्रस्तावना दिली आहे. त्यानंतर कल्पना चावलाच्या आयुष्यातील सारांश पूर्वपीठिका स्वरूपात मांडला आहे. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आहेत व पुस्तकाच्या शेवटी चावलाची विविध छायाचित्रे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_138.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee7e48a563666080e69fe508d7675bb40c931d11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_138.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ग्रेगोरी चौदावा (फेब्रुवारी ११, इ.स. १५३५:सोमा लॉॅंबार्डो, इटली - ऑक्टोबर १६, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव निकोलो स्फॉॅंद्रेति असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13805.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a38d75e99069af5b43232ead6f69d9b11803aabd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13805.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (पुर्वी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व वेस्ट इंडीज मध्ये खेळवला गेला. +या मैदानावर होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अदल्या दिवशी स्टेडियमला भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13828.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0abc30d7be2b3662cd2ab420c3dade446948c19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13828.txt @@ -0,0 +1,423 @@ +भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले. +भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९३५ मध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी बनली, सी. राजगोपालाचारी १५ नोव्हेंबर १९३९. रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठविला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट १९४० मध्ये हे मान्य केले. +८ ऑगस्ट १९४० रोजी राज्यपाल-जनरल कार्यकारी परिषद आणि युद्ध सल्लागार. +परिषद स्थापना याबद्दल व्हायसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी एक विधान केले. ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑफरमध्ये अल्पसंख्यांकांच्या मतांना पूर्ण वजन देण्यात आले आणि भारतीयांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. १९४६ च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत संविधानसभेसाठी प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा संविधानसभेने तयार केला आणि त्याची अंमलबजावणी १ मे १९४६ रोजी कॅबिनेट मिशन योजनेंतर्गत करण्यात आली. संविधान सभा सदस्य प्रांतीय संमेलनाद्वारे एकल, हस्तांतरणीय-मत द्वारे निवडले गेले. प्रमाणिक प्रतिनिधित्व प्रणाली. संविधान सभाचे एकूण सदस्यत्व ३८९ होते, त्यापैकी २९२ राज्यांचे प्रतिनिधी होते,९३ हे संस्थानाचे प्रतिनिधी होते आणि चार दिल्लीचे मुख्य आयुक्त प्रांत, अजमेर-मेरवाडा, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तानचे होते. +ऑगस्ट १९४६ पर्यंत ब्रिटीश भारतीय प्रांतांना देण्यात आलेल्या २९६ जागांसाठी झालेल्या निवडणुका पूर्ण झाल्या. काँग्रेसने २०८ जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने ७३. जागा जिंकल्या. या निवडणुकीनंतर मुस्लिम लीगने काँग्रेसला सहकारण्यास नकार दिला. सप्टेंबर २०१}}} आणि राजकीय परिस्थिती ढासळली. हिंदू-मुस्लिम दंगल सुरू झाली आणि मुस्लिम लीगने भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. ३ जून १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन, भारताच्या शेवटच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने कॅबिनेट मिशन योजनेला भंग करण्याचा आपला हेतू जाहीर केला; याचा शेवट भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ आणि भारत आणि पाकिस्तानच्या स्वतंत्र राष्ट्रांमध्ये झाला. भारतीय स्वातंत्र्य कायदा १८ जुलै १९४७ रोजी संमत झाला आणि जून १९४७ मध्ये भारत स्वतंत्र होईल अशी घोषणा केली गेली असली तरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या घटनेने स्वातंत्र्य मिळवून दिले. संविधान सभा प्रथमच ९ डिसेंबर १९४६ रोजी पुन्हा एकत्र येऊन बैठक झाली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातील ब्रिटिश संसदेच्या अधिकाराच्या सार्वभौम संस्था आणि उत्तराधिकारी म्हणून. फाळणीच्या परिणामी, माउंटबेटन योजनेत, ३ जून १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तानची संविधान सभाची स्थापना केली गेली. पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील प्रतिनिधींनी भारतीय संविधान सभा सदस्य म्हणून काम करणे थांबवले. पश्चिम पंजाब आणि पूर्व बंगाल (जे पाकिस्तानचा एक भाग बनले, जरी पूर्व बंगाल नंतर नंतर] होण्यासाठी बांगलादेश) होण्यासाठी नवीन निवडणुका घेण्यात आल्या; पुनर्रचनेनंतर संविधान सभाचे सदस्यत्व २९९ होते आणि ३१ डिसेंबर १९४७ रोजी त्याची बैठक झाली. +घटनेचा मसुदा वेगवेगळ्या जाती, प्रदेश धर्म, लिंग इत्यादींच्या २९९ प्रतिनिधींनी तयार केला होता. हे प्रतिनिधी ११४ दिवसांपर्यंत ३ वर्षात (२ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांचे) नेमके काय असावेत बसले आणि घटनेत काय असावे आणि काय काय काय कायदे यावर चर्चा केली.. +भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे कारण त्यात इतर देशांच्या घटनांमधील कायद्यांचा समावेश आहे. +अप्रत्यक्षपणे निवडलेल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्यासभेधान सभेची स्थापना भारताच्या घटनेच्या मसुद्यासाठी (आताचे पाकिस्तान आणि बांगलादेशातील स्वतंत्र देशांसह) केली गेली. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षे, भारतातील पहिले संसद. सार्वभौम प्रौढ मताधिकारांच्या आधारे ही विधानसभा निवडली गेली नव्हती आणि मुस्लिम आणि शीख यांना अल्पसंख्याक म्हणून विशेष प्रतिनिधित्व प्राप्त झाले. मुस्लिम लीगने आपली निर्मिती रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर विधानसभेवर बहिष्कार टाकला. मतदार संघाचा एक मोठा भाग काँग्रेस पक्षाकडून एकपक्षीय वातावरणात काढला गेला असला तरी काँग्रेस पक्षाने पुराणमतवादी उद्योगपतींपासून ते कट्टरपंथी मार्क्सवादी ते हिंदू पुनरुज्जीवनवादी अशा विविध मतांचा समावेश केला. +९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत प्रथमच संविधान सभेची बैठक झाली आणि त्याचे शेवटचे अधिवेशन २४ जानेवारी १९५० रोजी झाले.[१] +जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेबाबत आशा व्यक्त केली: +या संमेलनाचे पहिले काम म्हणजे एका नवीन राज्यघटनेच्या माध्यमातून भारत मुक्त करणे, उपासमार लोकांना खायला घालणे, आणि नग्न लोकांना वस्त्रे घालणे आणि प्रत्येक भारतीयाला त्याच्या क्षमतेनुसार स्वत:चा विकास करण्याची संपूर्ण संधी देणे हे या विधानसभेचे पहिले काम आहे. हे नक्कीच एक उत्तम कार्य आहे. आज भारत बघा. आम्ही बऱ्याच ठिकाणी निराशेच्या ठिकाणी बसलो आहोत आणि बऱ्याच शहरांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या भांडणे आणि कलहांद्वारे वातावरणात अधिग्रहण होते ज्याला जातीय त्रास होतो आणि दुर्दैवाने आम्ही कधीकधी त्या टाळू शकत नाही. पण सध्या गरीब आणि उपासमारची समस्या कशी सोडवायची हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जिथे जिथे वळू तिथे आपण या समस्येचा सामना करतो. आम्ही लवकरच ही समस्या सोडवू शकत नसल्यास, आमची सर्व कागद घटने निरुपयोगी आणि निरुपयोगी ठरतील. हा मुद्दा लक्षात घेऊन पुढे ढकला आणि प्रतीक्षा करण्यास कोणी सुचवू शकेल?भारतीय नेते आणि ब्रिटनमधील १९४६ चे कॅबिनेट मिशनच्या सदस्यांमधील वाटाघाटीनंतर संविधान सभा स्थापन झाली तेव्हा भारत अजूनही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. प्रांतिक विधानसभा निवडणुका १९४६ च्या मध्यावर घेण्यात आल्या. संविधान सभा सदस्य अप्रत्यक्षपणे नव्याने निवडलेल्या प्रांतीय असेंब्लीच्या सदस्यांद्वारे निवडले गेले आणि पाकिस्तानचा भाग बनविणाऱ्या प्रांतांसाठी प्रारंभी प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातील काही आता बांग्लादेश मध्ये आहेत. संविधान सभेचे २९९ प्रतिनिधी होते, ज्यात पंधरा +[२] महिला. +अंतरिम सरकारची स्थापना २ सप्टेंबर १९४६ रोजी नवनिर्वाचित मतदार संघातून झाली. काँग्रेस पार्टी यांनी विधानसभेत (बहुतेक ६९ टक्के जागा) आणि बहुतेक जागा मुस्लिम लीग यांनी विधानसभेत राखीव ठेवली होती. मुसलमान. तेथे अनुसूचित जाती महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि युनियनवादी पार्टी सारख्या छोट्या पक्षांचे सदस्यही होते. +जून १९४७ मध्ये सिंध, पूर्व बंगाल, बलुचिस्तान, पश्चिम पंजाब आणि उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत यांचे प्रतिनिधी मंडळे उत्तर पश्चिम फ्रंटियर प्रांत कराची मध्ये बैठक घेऊन पाकिस्तानची संविधान सभा स्थापन करण्यासाठी माघार घेतली. १५ ऑगस्ट १९४७. रोजी भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व स्वतंत्र राष्ट्र बनले आणि कराचीमध्ये माघार न घेतलेल्या संविधान समितीचे सदस्य भारताचे संसद झाले. मुस्लिम लीगचे २८ सदस्य भारतीय विधानसभेत सहभागी झाले आणि नंतर संस्थानिकांची यादी मधून ९३ सदस्य नामित झाले; काँग्रेस पक्षाने बहुमत ८२ टक्के मिळविले. + +९ डिसेंबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले, तेथे २११ सदस्य उपस्थित होते. १९४७ च्या सुरुवातीस, मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी सामील झाले नव्हते आणि संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली. २४ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचा परिणाम झाला ( प्रजासत्ताक दिन ) म्हणून आणि संविधान सभा ही भारताची अस्थायी संसद बनली (१९५२ मध्ये नव्या राज्यघटनेअंतर्गत झालेल्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत सुरू). +भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ अन्वये, संविधान सभा सार्वभौम बनवली व आणि तिला कायदेमंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला. यानुसार संविधान सभेला दोन प्रमुख कार्ये देण्यात आली ती म्हणजे : स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे करणे. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. जेव्हा संविधान सभा संविधान निर्मितीचे कार्य करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करतांना ग.वा. मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असत. +वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली. +डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मुखर्जी हे बंगालमधील ख्रिश्चन आणि कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. विधानसभेच्या अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्षपदी, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यायशास्त्रज्ञ बी.एन. राव विधानसभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले; बी.एन. राव यांनी घटनेचा मूळ मसुदा तयार केला आणि नंतर हेग मधील हेग मधील कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. +संविधान सभेच्या कामाचे पाच टप्पे होते: +संविधान सभेने संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २२ समित्या नेमल्या होत्या. यापैकी आठ प्रमुख समित्या आणि इतर उपसमित्या होत्या. +प्रमुख समित्या +घटनेची अलीकडील काळात टीका केली गेली आहे की घटनात्मक सदस्यांची निवड सार्वभौम मताधिक्याने नव्हे तर उलट ते मुख्यत: काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. असा युक्तिवाद केला जात आहे की काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचे नव्हे तर त्यांची सत्ता भारतीयांच्या हाती हस्तांतरित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. भारतीय संविधान: चमत्कारी, आत्मसमर्पण, आशा, ”या त्यांच्या पुस्तकात राजीव धवन यांनी असा युक्तिवाद केला आहे की राज्यघटना तयार करण्यात भारतीय लोकांचा फारसा विचार नव्हता जो त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. संविधान सभासद हे बहुतेक प्रबळ जातींचे हिंदू पुरुष होते, ज्यांनी शेवटी घटनेतील काही विशिष्ट हिंदू, वर्चस्व-जाती आणि पुरुषप्रधान पक्षांना अंतर्भूत केले. +[३] +[४] +एनी मस्करेन, +ओ.व्ही.अलगेसन, +सौ. अम्मू स्वामीनाथन, +एम.अनंतहासं आयंगर, +मोटुरी सत्यनारायण, +सौ. दक्षयानी वलयुद्धन, +श्रीमती जी. दुर्गाबाई, +कला वेंकटराव, +एन. गोपालास्वामी अय्यंगार, +डी. गोविंदा दास, +रेव्ह. जेरोम डिसोझा, +पी. कक्कन, +टी.एम. कालियानान गौंडर, +के. कामराज, +व्ही.सी. केसावा राव, +टी.टी. कृष्णामचारी, +अल्लादी कृष्णस्वामी अय्यर +एल. कृष्णस्वामी भारती, +पी.कुनिरामन, +मोसालीकांती तिरुमाला राव, +व्ही. आय. मुनुस्वामी पिल्लई, +एम. ए. मुथिय्या चेटियार, +व्ही. नादिमुथु पिल्लई, +एस. नागप्पा, +पी एल एल नरसिंह राजू, +बी. पट्टाभी सितारामाया, +सी. पेरूमलस्वामी रेड्डी, +ट. प्रकाशन, +एस. एच. प्रॅटर, +बॉबीबिलीचा राजा स्वेताचलपती रामकृष्ण रेंगा रोआ, +आर. के. शानमुखम चेट्टी, +ट. उ. रामलिंगम चेतियार, +रामनाथ गोएंका, +ओ.पी.रामास्वामी रेडियार, +एन. जी. रंगा, +नीलम संजीवा रेड्डी, +शेक गॅलिब साहिब, +के. संधानम, +बी. शिवराव,, +कल्लूर सुब्बा राव, +यू. श्रीनिवास मल्ल्या, +पी. सुब्बारायण, +सी. सुब्रमण्यम, +व् सुब्रमण्यम, +एम. सी. वीरबाहू पिल्लई, +पी. एम. वलयुदापाणी, +ए. के. मेनन, +टी. जे. एम. विल्सन, +कदे मिलथ मोहम्मद इस्माईल साहिब, +के. टी. एम. अहमद इब्राहिम, +महबूब अली बेग साहिब बहादूर, +बी. पोकर साहिब बहादूर, +पट्टम तनुपिल्लई +बालचंद्र महेश्वर गुप्ते, +हंस मेहता, +हरि विनायक पाटस्कर, +डॉ. बी. आर. आंबेडकर, +जोसेफ अल्बान डिसोझा, +कन्यालाल नानाभाई देसाई, + केशवराव मारुतीराव जेधे, +खंडूभाई कसनजी देसाई, + बाळ गंगाधर खेर, + एम.आर. मसाणी, +के.एम. मुंशी, +नरहर विष्णू गाडगीळ, +एस. निजलिंगप्पा, +एस. के. पाटील, +रामचंद्र मनोहर नलावडे, +आर. आर. दिवाकर, +शंकरराव देव, +जी. व्ही. मावळणकर, +वल्लभभाई पटेल, +अब्दुल कादर मोहम्मद शेख, +ए. खान +मोनो मोहन दास, +अरुण चंद्र गुहा, +लक्ष्मी कांता मैत्र, +मिहिर लाल चट्टोपाध्याय, +सतीस चंद्र सामंता, +सुरेशचंद्र मजूमदार, +उपेंद्रनाथ बर्मन, +प्रभुदयाल हिमसिंगका, +बसंत कुमार दास, +रेणुका रे, + एच. सी. मुखर्जी, +सुरेंद्र मोहन घोसे, +स्यामा प्रसाद मुखर्जी, +अरि बहादुर गुरूंग, +आर. ई. प्लॅटेल, +के. सी. नोगी, +रघिब अहसन, +सोमनाथ लाहिरी, +जसीमुद्दीन अहमद, +नजीरुद्दीन अहमद, +अब्दुल हमीद, +अब्दुल हलीम घुझनवी +मौलाना हिफझुर रहमान सेहोरवी, +अजित प्रसाद जैन, +अल्गु राय शास्त्री, +बाळकृष्ण शर्मा, +बंशी धर मिसरा, +भगवान दिन, +दामोदर स्वरूप सेठ, +दयाल दास भगत, +धर्म प्रकाश, +ए. धरम दास, + आर. व्ही. धुळेकर, +फिरोज गांधी, +गोपाल नारायण, +कृष्णचंद्र शर्मा, +गोविंद बल्लभ पंत, +गोविंद मालवीय, +हर गोविंद पंत, +हरिहर नाथ शास्त्री, +हृदय नाथ कुंजरू, +जसपत रॉय कपूर, +जगन्नाथ बक्षसिंग, +जवाहरलाल नेहरू, +जोगेंद्र सिंह, + जुगल किशोर, +ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, + बी. व्ही. केसकर, +कमला चौधरी, +कमलापती त्रिपाठी, +जे. बी कृपलानी, +महावीर त्यागी, +खुर्शेद लाल, +मसूर्या दिन, +मोहन लाल सकसेना, +पदमपत सिंघानिया, +फूल सिंह, +परागी लाल, +पूर्णिमा बॅनर्जी, +पुरुषोत्तम दास टंडन, +हीरा वल्लभ त्रिपाठी, +राम चंद्र गुप्ता, +शिब्बन लाल सक्सेना, +सतीश चंद्र, +जॉन मठाई, +सुचेता कृपलानी, +सुंदर लॉल, +वेंकटेश नारायण तिवारी, +मोहनलाल गौतम, +विश्वभार दयाल त्रिपाठी, +विष्णू शरण दुब्लीश, +बेगम ऐजाज रसूल, +हैदर हुसेन, +हसरत मोहनी, +अबुल कलाम आझाद, +मुहम्मद इस्माईल खान, +रफी अहमद किदवई, +झेड एच लारी +बक्षी टेक चंद, +जयरामदास दौलतराम, +ठाकूरदास भार्गव, +बिक्रमलाल सोंधी, +यशवंत राय, +रणबीरसिंग हूडा, +लाला अचिंत राम, +नंद लाल, +बलदेव सिंह, +ज्ञानी गुरमुख सिंह मुसाफिर, +सरदार हुकम सिंह, +सरदार भोपिंदरसिंग मान, +सरदार रतनसिंग लोहगड +चौधरी सूरज माल +अमीयो कुमार घोष, +अनुग्रह नारायण सिन्हा, +बनारसी प्रसाद झुंझुनवाला, +भागवत प्रसाद, +बोनिफास लाकरा, +ब्रजेश्वर प्रसाद, +चंडिका राम, +के. टी. शाह, +देवेंद्र नाथ सामंता, +दिप नारायण सिन्हा, +गुप्तनाथ सिंह, +जादुबान सहाय, +जगत नारायण लाल, +जगजीवन राम, +जयपालसिंग मुंडा, +कामेश्वर सिंग दरभंगाचे, +कमलेश्वरी प्रसाद यादव, +महेश प्रसाद सिन्हा, + कृष्णा बल्लभ सहाय, +रघुनंदन प्रसाद, +राजेंद्र प्रसाद, +रामेश्वर प्रसाद सिन्हा, +रामनारायण सिंह, +सच्चिदानंद सिन्हा, +सारंगधर सिन्हा, +सत्यनारायण सिन्हा, +बिनोदानंद झा, +पी. के. सेन, +श्रीकृष्ण सिन्हा, +श्री नारायण महठा, +सायमानंदन मिश्रा, +हुसेन इमाम, +सय्यद जाफर इमाम, +लतीफुर रहमान, +मोहम्मद ताहिर, +ताजामुल हुसेन, +चौधरी आबिद हुसेन. +हरगोविंद मिश्रा +सरोजिनी नायडू +अंबिका चरण शुक्ला, +रघु विरा, +राजकुमारी अमृत कौर, +भगवंतराव मांडलोई, +बृजलाल बियाणी, +ठाकूर चीडीलाल, +सेठ गोविंद दास, +हरि सिंह गौर, +हरी विष्णू कामथ, +हेमचंद्र जागोबाजी खांडेकर, +रतनलाल किशोरीलाल मालवीय, +घनश्यामसिंह गुप्ता, +लक्ष्मण श्रावण भटकर, +पंजाबराव देशमुख, +रविशंकर शुक्ला, +आर. के. सिद्धवा, +दादा धर्माधिकारी, +फ्रँक अँथनी, +काजी सय्यद करीमुद्दीन, +गणपतराव दानी +निबरन चंद्र लस्कर, +धरणीधर बसू-मातारी, +गोपीनाथ बारदोलोई, +जे. जे. एम. निकोलस-रॉय, +कुलधर चालिहा, +रोहिणी कुमार चौधरी, +मुहम्मद सादुल्ला, +अब्दूर रौफ +विश्वनाथ दास, +कृष्णचंद्र गजपती नारायण देव, +हरेकृष्ण महताब, +लक्ष्मीनारायण साहू +लोकनाथ मिश्रा, +नंदकिशोर दास, +राजकृष्ण बोस, +संतानू कुमार दास, +युधिशिर मिश्रा +देशबंधू गुप्ता +मुकुट बिहारी लाल भार्गव +सी. एम. पूनाचा +के.सी. रेड्डी, +टी. सिद्दलिंगिया, +एच. आर. गुरूव रेड्डी, +एस. व्. कृष्णमूर्ती राव, +के. हनुमंथैया, +एच. सिद्धवीरप्पा, +टी. चन्न्या +शेख मुहम्मद अब्दुल्ला, +मोतीराम बैगरा, +मिर्झा मोहम्मद अफझल बेग, +मौलाना मोहम्मद सईद मसूदी +पाटम ए. थानू पिल्लई, +आर. शंकर, +पी. टी. चाको, +पानमपल्ली गोविंदा मेनन, +Ieनी मस्करेन, +पी.एस. नटराज पिल्लई, +के.ए. मोहम्मद, +पी.के.लक्ष्मणान +विनायक सीताराम सरवते, +बृजराज नारायण, +गोपीकृष्ण विजयवर्गीय, +राम सहाय, +कुसुम कांत जैन, +राधावल्लभ विजयवर्गीय, +सीताराम एस जाजू +बलवंत राय गोपाळजी मेहता, +जयसखलाल हठी, +अमृतलाल विठलदास ठक्कर, +चिमणलाल चकुभाई शाह, + समलदास लक्ष्मीदास गांधी +व्ही. टी. कृष्णामचारी, +हिरालाल शास्त्री, +खेत्रीचे सरदारसिंहजी, +जसवंतसिंगजी, +राज भादूर, +माणिक्य लाल वर्मा, +गोकुळ लाल आसावा, +रामचंद्र उपाध्याय, +बलवंत सिन्हा मेहता, +दलेल सिंग, +जैनारायण व्यास +रणजितसिंग, +सोचेत सिंग, +भगवंत रॉय +विनायकराव बलशंकर वैद्य, +बी. एन. मुनावल्ली, +गोकुळभाई दौलतराम भट्ट, +जीवराज नारायण मेहता, + गोपाळदास ए देसाई, +परानलाल ठाकूरलाल मुंशी, +बी.एच.खर्डेकर, +रत्नप्पा भारमप्पा कुंभार बी.एन.दातार +लाल मोहन पति, +एन. माधव राऊ, +राज कुंवर, +सारंगाधर दास, +युधिष्ठिर मिश्रा +आर.एल.मालवीय, +किशोरीमोहन त्रिपाठी, +रामप्रसाद पोटाई + बी. एच. जैदी, + कृष्णा सिंह +व्ही. रमायाह, + रामकृष्ण रंगराव] +अवदेश प्रताप सिंह, +शंभू नाथ शुक्ला, +राम सहाय तिवारी, +मन्नूलालजी द्विडेदी +महेश्वरी हिम्मतसिंग के +गिरजा शंकर गुहा +लालसिंग +भवानी अर्जुन खीमजी +यशवंतसिंग परमार +पूर्व बंगाल +अब्दुल्ला अल महमूद, +मौलाना मोहम्मद अब्दुल्ला अल बाकी, +अब्दुल हमीद, +अब्दुल कसीम खान, +मोहम्मद अक्रम खान, +ए.हमीद, +अझीझुद्दीन अहमद, +मुहम्मद हबीबुल्ला बहार, +प्रेम हरि बरमा, +राज कुमार चक्रवर्ती, +श्रीसचंद्र चट्टोपाध्याय, +अब्दुल मतीन चौधरी, +मुर्तजा रझा चौधरी, +हमीदुल हक चौधरी, +अक्षय कुमार दास, +धीरेंद्र नाथ दत्ता, +भूपेंद्र कुमार दत्ता, +इब्राहिम खान, +फजलुल हक, +फजलूर रहमान, +घायसुद्दीन पठाण, +बेगम शाइस्ता सोहरावर्दी इक्रमुल्ला, +लियाकत अली खान, +माफीझुद्दीन अहमद, +महमूद हुसेन, +ज्ञानेंद्रचंद्र मजुमदार, +ए. एम. मलिक, +बिराट चंद्र मंडळ, +जोगेंद्र नाथ मंडळ, + मोहम्मद अली, +ख्वाजा नाझीमुद्दीन, +एम.ए.बी.एल. नूर अहमद, +नूरुल अमीन, +इश्तियाक हुसेन कुरेशी, +श्री धनंजय एम.ए. बी.एल. रॉय,, +माऊडी भाकेश चंदा, +बी.एल. सेराजुल इस्लाम, +मौलाना शब्बीर अहमद उस्मानी, +शहाबुद्दीन ख्वाजा, +एच.एस. सुहरावर्डी, +हरेंद्र कुमार सुर, +तमीझुद्दीन खान, +कविवि केरवार दत्ता, गुलाम मोहम्मद +पश्चिम पंजाब + मियां मुमताज मोहम्मद खान दौलताना, +गंगा सारण, +जफरउल्ला खान, +इफ्तिखार हुसेन खान, +मियां मुहम्मद इफ्तिखरुद्दीन, +मुहम्मद अली जिन्ना, +शेख करमत अली, +नजीर अहमद खान, +सरदार अब्दुर रब निस्तार, +फिरोज खान नून, +ओमर हयात मलिक, +शाह नवाज बेगम जहां आरा, +सरदार शौकत हयात खान, +वायव्य सीमावर्ती प्रांत +खान अब्दुल गफर खान, +खान सरदार बहादूर खान, +सरदार असद उल्लाह जान खान +सिंध +अब्दुस सत्तार अब्दुर रहमान, +आल्हाज मुहम्मद हाशिम गॅझडर, +एम.ए. खुहरो +बलुचिस्तान +एस. बी. नवाब मोहम्मद खान जोगझई +मद्रास +दुर्गाबाई देशमुख +बॉम्बे +हंसा मेहता +मध्य प्रांत आणि बेरार +राजकुमारी अमृत कौर + जवाहरलाल नेहरू आणि अन्य सदस्य १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी आयोजित केलेल्या भारतीय संविधान सभेच्या मध्यरात्री अधिवेशनात प्रतिज्ञा घेत होते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अन्य सदस्यांसह, २९ ऑगस्ट १९४७ रोजी. +२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +भारताच्या संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +जवाहरलाल नेहरू १९४६ मध्ये संविधान सभेला संबोधित करताना. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13899.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e11374e0ce9b11481badef32144e2c8f3b64c35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13899.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारताच्या सांस्कृतिक क्षेत्र हे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने नियुक्त केलेले ७ क्षेत्र आहे [१] भारताच्या विविध क्षेत्रांमधील सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि वाढ करतात . [२] यापैकी प्रत्येक क्षेत्राला एक क्षेत्रीय केंद्र प्रदान केले गेले आहे. [३] १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान , राजीव गांधी यांनी बहुतेक विभागीय केंद्रांची घोषणा केली आणि १९८६-८७ कालावधीत औपचारिकपणे कार्य करणे सुरू केले. "भारतीय संस्कृतीची प्राचीन मुळे मजबूत करणे आणि संयुक्त राष्ट्र संस्कृती विकसित करणे आणि समृद्ध करणे ". हा त्यांचा उद्देश्य आहे [४] +कोलकाता शहर, पूर्वी ब्रिटिश भारत आणि पश्चिम बंगालची राजधानी, "भारत सांस्कृतिक राजधानी" म्हणून ओळखले जाते. [५] [६] +प्रत्येक विभागात एक विभागीय मुख्यालय आहे जेथे एक क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र स्थापन केले गेले आहे. [३] अनेक राज्य एकाधिक विभागांमध्ये सदस्यता अहेत पण क्षेत्रीय विभागांमध्ये कोणतेही राज्य उपविभाजन वापरले जात नाहीत. क्षेत्राच्या संस्कृतीचा प्रचार करण्याव्यतिरिक्त, प्रत्येक क्षेत्रीय केंद्र इतर क्षेत्रांचे क्रॉस-प्रमोशन करण्यासाठी कार्य करतत आणि कलाकारांना इतर क्षेत्रांमधून आमंत्रित करून व कार्यक्रम आयोजित करून करून भारताच्या इतर सांस्कृतिक क्षेत्रां सोबत संसर्ग करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13901.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875a867b904457a16c1145cd6772ece42ba5c453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13901.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारताचे महान्यायअभिकर्ता किंवा भारताचे सॉलिसिटर जनरल[१] हे भारतासाठी महान्यायवादी (इं:ॲटर्नी जनरल)च्या अधीन आहेत. महान्यायअभिकर्ता हे देशाचे दुसरे कायदे अधिकारी असून ते महान्यायवादीला मदत करतात आणि त्यांना 'अतिरिक्त महान्यायअभिकर्ता' सहाय्य करतात. सध्या भारताचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता हे आहेत.[२] भारताच्या महान्यायवादी प्रमाणे, महान्यायअभिकर्ता आणि अतिरिक्त महान्यायअभिकर्ता हे सरकारला सल्ला देतात आणि 'कायदा अधिकारी (अटी व शर्ती) नियम, १९७२' नुसार भारत संघाच्या वतीने हजर राहतात.[३] तथापि, भारतासाठी महान्यायवादी या पदाच्या विपरीत, जे भारतीय राज्यघटनेच्या कलम ७६ अंतर्गत एक घटनात्मक पद आहे, महान्यायअभिकर्ता आणि अतिरिक्त महान्यायअभिकर्ता ही पदे केवळ वैधानिक आहेत. 'मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती' (ACC) यांच्या नियुक्तीची शिफारस करते आणि महान्यायअभिकर्त्याची अधिकृतपणे नियुक्ती करते.[४] महान्यायअभिकर्ता आणि अतिरिक्त महान्यायअभिकर्ता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सामान्यत: कायदेशीर व्यवहार विभागातील संयुक्त सचिव/कायदा सचिवांच्या स्तरावर हलविला जातो आणि कायदा आणि न्याय मंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर, मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती आणि नंतर अध्यक्षांकडे हा प्रस्ताव जातो. +भारताचे महान्यायअभिकर्ता हे महान्यायवादीच्या अंतर्गत कार्य करतात महान्यायअभिकर्त्याचे कर्तव्य 'कायदा अधिकारी (सेवेच्या अटी) नियम, 1987' मध्ये दिलेले आहेत:[५] +कायदा अधिकारी भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतात म्हणून त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसवर काही निर्बंध आहेत. कायदा अधिकाऱ्याला पुढील परवानगी नाहीत: diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13903.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154346ea758ddb338371baca51c9756ef9ec563d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13903.txt @@ -0,0 +1,21 @@ +भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी आणि हिंदी या दोन केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र शासन माहिती इंग्लिश भाषेत महाराष्ट्र शासनाकडे पाठवते. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते. +भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत. केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सेवांच्या परीक्षांसाठी, कोणताही उमेदवार या २१ पैकी एक किंवा हिंदी/इंग्रजी भाषेची निवड परीक्षेचे माध्यम म्हणून करू शकतो. +भारतीय राज्यघटना किंवा कायद्याने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्ये मान्यता देत नाहीत तोपर्यंत कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करता येणार नाही. +घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र शासनाच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या केंद्र शासनाशी व्यवहार करताना उपरोल्लेखित दोन भाषांपैकी एका भाषेचा वापर करण्यात येतो. +वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव यामुळे इंग्रजी हीच आता केंद्र शासनाशी व्यवहाराची प्रमुख भाषा झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाशी व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करणे अवघड झाले आहे. +केंद्र सरकारतर्फे प्रशासनामध्ये दोन भाषांचा वापर केला जातो. +इंग्रजी आणि हिंदीप्रमाणेच खाली दिलेल्या २१ भाषांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत आणि राजभाषा असा दर्जा दिला आहे. +खालील भाषा या विशिष्ट राज्यांच्या अधिकृत भाषा आहेत. मात्र त्यांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत दर्जा दिलेला नाही. +खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही ५० लाखांपेक्षा जास्त आहे. या भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. यातील बहुतेक भाषा या हिंदीच्या बोलीभाषा आहेत. +खालील बिहारी भाषांच्या भाषिकांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. +राजस्थान राज्यातील ५ कोटी लोक हे राजस्थानी भाषिक आहेत. मात्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये फरक आहे. यातील बहुतेक लोक हिंदी बोलू शकतात. अनेकांचे मते राजस्थानी ही हिंदीचीच एक बोलीभाषा आहे. राजस्थानी भाषेचे खालील प्रकार आहेत. +१.कच्छी — गुजरातमधील कच्छ प्रदेश. +२.कोडवा टाक, कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यात बोलली जाते. +३.गोंडी (गोंड टोळ्या) +४.तुळू — कर्नाटक व केरळमधील तुळू लोकांकडून बोलली जाते. +५.भिल्ली (भिल्ल टोळ्या) +६संकेती — कर्नाटक, केरळ व तमिळनाडूतील संकेती लोकांकडून बोलली जाते. +७.हरयाणवी - हरयाणामधील एक बोलीभाषा. +खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही दहा लाखांपेक्षा कमी आहे. +१.महल — लक्षद्वीप प्रदेशातील मिनिकॉय बेटावर ही भाषा बोलली जाते. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13981.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa1386a25c14d827b283ded516dbeb7c877860a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13981.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारताची अर्थव्यवस्था आपल्या ऐतिहासिक कृषी परंपरेला बांधलेली आहे.[१] उत्तरेकडे, सिंधु, ब्रह्मपुत्रा व गंगा हे पाणी पुरवठा करणारे प्रमुख स्रोत आहे व ह्यांच्या सिंचनाचे हे मुख्य कृषी क्षेत्र आहे. भारतातील बहुसंख्य लोकांसाठी शेती हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. २०११ च्या जागतिक बँकेच्या आकडेवारीवर आधारित, भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) फक्त १७.५% कृषी उत्पादनाचा वाटा आहे. स्त्रिया ह्या भारताच्या कृषी उत्पादनात गुंतलेला महत्त्वाचा परंतु अनेकदा दुर्लक्षित लोकसंख्या घटक आहे. त्या भारतातील बहुसंख्य कृषी कामगारांचे प्रतिनिधित्व करतात.[२] कृषी कामगार दलातील महिलांचा सहभाग विविध मार्गांनी दिसून येतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर, निर्णय घेण्याची क्षमता, त्यांची संस्था आणि शिक्षण आणि आरोग्य सेवांवर परिणाम होतो. शेतकरी समुदायातील अनेक महिलांना गरिबी आणि उपेक्षितपणा आणि लैंगिक असमानतेच्या समस्यांचा सामना करावा लागतो.[२] +हरित क्रांती आणि नंतर उदारीकरणाच्या आगमनाने, पुरुष कामगार अधिकाधिक शहरी केंद्रांकडे खेचले गेले, ज्यामुळे शेतमजुरीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढली.[३] +ग्रामीण भारतात, चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या महिलांची टक्केवारी ८४% इतकी आहे. स्त्रिया सुमारे ३३% शेतकरी आणि सुमारे ४७% शेतमजूर आहेत.[४] ही आकडेवारी देशातील पशुधन, मत्स्य पालन आणि अन्न उत्पादनाच्या इतर विविध सहायक प्रकारांमध्ये काम करत नाही. २००९ मध्ये, पीक लागवडीतील ९४% महिला कृषी कामगार तृणधान्य उत्पादनात होते, तर १.४% भाजीपाला उत्पादनात आणि ३.७२% फळे, दाणे, पेये आणि मसाल्याच्या पिकांमध्ये गुंतलेली आहे.[५] +कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग दर चहाच्या मळ्यात ४७%, कापूस लागवडीत ४६.८४%, तेल बियाणे ४५.४३% आणि भाजीपाला उत्पादनात ३९.१३% आहे.[६] या पिकांना श्रम-केंद्रित कामाची आवश्यकता असताना, हे काम अत्यंत अकुशल मानले जाते. स्त्रिया देखील सहाय्यक कृषी कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. खाद्य व कृषी संस्थेच्या मते, भारतीय महिलांनी सर्व मच्छिमार आणि मत्स्यपालकांमध्ये अनुक्रमे २१% आणि २४% वाटा दर्शविला आहे. +कामगार शक्तीवर त्यांचे वर्चस्व असूनही भारतातील महिलांना अजूनही वेतन, जमिनीचे हक्क आणि स्थानिक शेतकरी संघटनांमध्ये प्रतिनिधित्व या बाबतीत अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो. शिवाय, त्यांच्या सशक्तीकरणाच्या अभावामुळे त्यांच्या मुलांसाठी कमी शैक्षणिक प्राप्ती आणि खराब कौटुंबिक आरोग्य यासारख्या नकारात्मक बाह्य गोष्टींचा परिणाम होतो. +कृषी क्षेत्रात गुंतलेल्या अंदाजे ५२ - ७५% भारतीय स्त्रिया निरक्षर आहेत. हा शिक्षणाचा अडथळा आहे जो महिलांना अधिक कुशल कामगार क्षेत्रात सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करतो. महिलांना सामान्यत: त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाबाहेर निर्माण होणाऱ्या शेतीविषयक माहितीपर्यंत पोहोचणे हे अवघड होते. हे प्रामुख्याने साक्षरतेचा कमी दर आणि गतिशीलतेच्या अभावामुळे आहे. परंतु स्त्रिया इतर घरातील, अगदी इतर गावातील महिलांनाही माहिती सहजतेने पसरवतील. कर्नाटकातील काही जिल्हा सरकार महिलांसाठी स्वयं-सहायता गट स्थापन करण्याचा विचार करत आहेत, ज्याद्वारे स्त्रिया कमी साक्षरतेचे दर रोखून, कृषी पद्धतींविषयी माहिती प्रसारित करू शकतील, असे मोठे सामाजिक जाळे तयार करू शकतील.[७] सर्व कामांमध्ये, सरासरी लिंग मजुरी असमानता आहे व स्त्रिया पुरुषांच्या वेतनाच्या फक्त ७०% कमावतात.[८] शिवाय, अनेक स्त्रिया बिनपगारी निर्वाह मजूर म्हणून शेतीच्या कामात सहभागी होतात. रोजगाराची गतिशीलता आणि शिक्षणाचा अभाव यामुळे भारतातील बहुसंख्य महिला असुरक्षित बनतात, कारण ते कृषी बाजाराच्या वाढीवर आणि स्थिरतेवर अवलंबून असतात.[९] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13983.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6952275dcf87ef9f8cbdc5a4dbce67e3937b75eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_13983.txt @@ -0,0 +1,93 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. +१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला . +भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा +|} +सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे. +भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे. +इराणी करंडक · +चॅलेंजर करंडक · +दुलीप करंडक · +रणजी करंडक · +रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · +देवधर करंडक + +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14013.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0631af694fd9fa31ba9d5758e4c8d2ab15684cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14013.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय पत्रकारांच्या या यादीमध्ये भारतात काम करणाऱ्या उल्लेखनीय पत्रकारांचा समावेश आहे जे भारतातील अनेक अधिकृत भाषांपैकी एका/अनेक भाषेत लिहितात आणि बोलतात. ही यादी इंग्रजी भाषेतील वर्णमालेनुसार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14014.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3550e4aa25fe2cb54ddcc57d3d03c88a614f9739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14014.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारताच्या पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलने असे अनुमान काढले आहे की २०१८ मध्ये पर्यटनाने १६.९१ लाख कोटी रुपये (यूएस डॉलर २४० अब्ज) किंवा भारताच्या जीडीपीच्या ९.२% उत्पन्न कमावले.[१] पर्यटनाने ४२.६७३ दशलक्ष रोजगारांना पाठिंबा दिला, जे एकूण रोजगारातील ८.१% आहे. या क्षेत्राची वार्षिक वाढ ६.९% दराने होईल असा अंदाज आहे.[२] हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या एकमेव विमानतळ आहे जे जगातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक आहे.[३] ऑक्टोबर २०१५ मध्ये भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राची किंमत ३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.[४] २०१४ मध्ये १.८ लाख परदेशी रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी भारतात प्रवास केला.[५] +२०१४ मध्ये, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही पर्यटकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय राज्ये होती.[६] २०१५ या वर्षात परदेशी पर्यटकांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई, आग्रा आणि जयपूर ही पाच सर्वाधिक भेट दिलेली शहरे होती. जगभरात परदेशी पर्यटकांच्या संख्येने दिल्ली २८व्या स्थानावर आहे, तर मुंबई ३०व्या स्थानावर आहे, चेन्नई ४३व्या, आग्रा ४५व्या, जयपूर ५२व्या आणी कोलकाता ९०व्या क्रमांकावर आहे.[७] +पर्यटन मंत्रालयाने पर्यटनाच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय धोरणांची आखणी केली आहे. या प्रक्रियेत मंत्रालय विविध केंद्रीय मंत्रालये, संस्था, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसह या क्षेत्रातील अन्य भागधारकांशी सल्लामसलत व सहयोग करतात. ग्रामीण, समुद्रपर्यटन, वैद्यकीय आणि इको टूरिझम यासारख्या पर्यटन उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन मंत्रालयाने भारताच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देऊन अतुल्य भारत मोहीम कायम ठेवली आहे. +भारताची आवश्यकता आहे की बहुतेक देशांतील नागरिकांचा वैध पासपोर्ट असला पाहिजे व त्यांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक भारतीय दूतावासत प्रवासी व्हिसासाठी अर्ज करावा. प्रवासी थेट टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः किंवा त्यांच्या स्थानिक प्रवासी सेवा कंपनीद्वारे अर्ज करू शकतात. ई-टूरिस्ट व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी भारताने अलीकडेच १६८ देशांच्या नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धत लागू केली आहे.[८] +भूतान, मालदीव आणि नेपाळच्या नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी प्रवासी व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. अफगाणिस्तान, अर्जेन्टिना, बांगलादेश, उत्तर कोरिया, जमैका, मालदीव, मॉरिशस, मंगोलिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि उरुग्वे येथील नागरिकांना भारतीय व्हिसा मिळविताना शुल्क भरणे आवश्यक नाही. +ऑगस्ट २०१९ पर्यंत भारतात ३८ जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यांना युनेस्को द्वारे मान्यता प्राप्त आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्यानुसार ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा महत्त्वाची स्थाने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14038.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b83fe57fd885312e912fdc9db2923805fb4f37eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14038.txt @@ -0,0 +1,3 @@ +ही भारतीय मिठाईंची यादी आहे. मिठाई हा भारतीय पाककृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय लोक त्यांच्या अनोख्या चवीसाठी आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत प्रायोगिक वर्तनासाठी ओळखले जातात. अनेक भारतीय मिष्टान्न हे साखर, दूध किंवा कंडेन्स्ड दुधाने बनवलेले आणि तळलेले पदार्थ असतात. +पदार्थ आणि मिठाईचे प्राधान्य प्रकार प्रदेशानुसार बदलतात. उदाहरणार्थ भारताच्या पूर्व भागात बहुतेक पदार्थ हे दूध उत्पादनांवर आधारित आहेत. अनेकांना बदाम आणि पिस्त्याची चव असते, वेलची, जायफळ, लवंग आणि काळी मिरी यांचा मसालेदार आणि मेव्यांनी तसेच सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटांमध्ये सजवलेले असते.[१] +तेल diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14049.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6e61245de12faadf3f22418552bda5c7432da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14049.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारताच्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही भारताचे राज्य चालवण्यासाठी संस्थांना दिलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा तत्त्वे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या भाग IV (अनुच्छेद 36-51) मध्ये ही तत्त्वे प्रदान केली आहेत. ही तत्त्वे कोणत्याही न्यायालयाद्वारे लागू केले जाऊ शकत नाहीत, परंतु तेथे दिलेली तत्त्वे देशाच्या कारभारात 'मूलभूत' मानली जातात, ज्यामुळे देशात न्याय्य समाज प्रस्थापित करण्यासाठी कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य बनते.[१] सामाजिक न्याय, आर्थिक कल्याण, परराष्ट्र धोरण आणि कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींशी संबंधित असलेल्या आयर्लंडच्या राज्यघटनेत दिलेल्या निर्देशात्मक तत्त्वांद्वारे तत्त्वे प्रेरित आहेत. +मार्गदर्शक तत्त्वे खालील श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत: आर्थिक आणि सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय, न्याय आणि कायदेशीर, पर्यावरण, स्मारकांचे संरक्षण, शांतता आणि सुरक्षा. आयरिश राष्ट्रवादी चळवळ, विशेषतः आयरिश होमरूल चळवळ; म्हणून, भारतीय राज्यघटनेच्या निर्देशक तत्त्वांचा सामाजिक धोरणाच्या निर्देशक तत्त्वांवर खूप प्रभाव पडला आहे. अशा धोरणांची कल्पना "क्रांतिकारक फ्रान्सने घोषित केलेल्या मनुष्याच्या आणि नागरिकांच्या हक्कांच्या घोषणा आणि अमेरिकन वसाहतींनी केलेल्या स्वातंत्र्याच्या घोषणेमध्ये शोधली जाऊ शकते." भारतीय राज्यघटनेवर संयुक्त राष्ट्रांच्या सार्वभौमिकतेचाही प्रभाव होता. +संविधान सभेत DPSP वर चर्चा करताना, डॉ. आंबेडकरांनी 19 नोव्हेंबर 1948 रोजी खाली दिलेल्या उच्च प्रकाशात नमूद केले की DPSP हा देशाच्या भविष्यातील शासनाचा आधार असेल: +भविष्यात विधिमंडळ आणि कार्यकारिणी या दोघांनीही या भागात अंमलात आणलेल्या या तत्त्वांना नुसती तोंडं देऊ नयेत, तर त्यांना यापुढील काळात होणाऱ्या सर्व कार्यकारी आणि विधायी कृतींचा आधार बनवावा, असा या विधानसभेचा हेतू आहे. देशाच्या कारभाराचा मुद्दा. +राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण करणे आहे ज्या अंतर्गत नागरिक चांगले जीवन जगू शकतील. कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे त्यांचे ध्येय आहे. मार्गदर्शक तत्त्वे हे लोकांचे न्याय्य हक्क नसले तरी देशाच्या कारभारात मूलभूत असले तरी, कलम ३७ नुसार कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. याशिवाय, केंद्र आणि राज्यांच्या सर्व कार्यकारी संस्थांनी या तत्त्वांद्वारे देखील मार्गदर्शन करा. न्यायपालिकेनेही खटल्यांचा निर्णय घेताना त्यांना लक्षात ठेवावे लागते. +DPSP च्या अनुषंगाने विद्यमान धोरण उलट केले जाऊ शकत नाही, तथापि DPSP च्या अनुषंगाने ते आणखी विस्तारित केले जाऊ शकते. DPSP अंतर्गत लागू होणारे धोरण बदल जोपर्यंत लागू होणारे DPSP घटनादुरुस्तीने हटवले जात नाही तोपर्यंत बदलता येणार नाही (उदा. राज्यात एकदा लागू केलेली बंदी DPSP चा भाग असेपर्यंत ती नंतर रद्द केली जाऊ शकत नाही). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14055.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5366b0a2e93155a320b5edcdb4b2dd24eb9375c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14055.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतातील राष्ट्रीय उद्याने ही इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरनुसार वर्ग II मधील संरक्षित क्षेत्र आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान १९३६ मध्ये स्थापन झाले, जे आता उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. १९७० मध्ये भारतात फक्त पाच राष्ट्रीय उद्याने होती. १९७२ मध्ये भारताने वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला आणि १९७३ मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्रप्रकल्प सुरू केले. १९८० च्या दशकात वन्यजीवांचे संरक्षण मजबूत करणारे आणखी कायदे आणले गेले. सध्या भारतात १०६ राष्ट्रीय उद्याने आहेत जे एकूण ४४,४०२.९५ चौरस किमी (१७,१४४.०७ चौ. मैल) क्षेत्र व्यापतात.[१] +मध्य प्रदेश राज्यामध्ये ११ अशी सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहे. त्या खालोखाल आसाम मध्ये ७; तर केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चीम बंगाल व अंदमान आणि निकोबार येथे प्रत्येकी ६ राष्ट्रीय उद्याने आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेले लडाखयेथील हेमिस राष्ट्रीय उद्यान हे सर्वाधील मोठे असे ३,३५० चौरस किमी (१,२९० चौ. मैल) क्षेत्रफळाचे आहे. +ही भारतातल्या राष्ट्रीय उद्यानांची यादी आहे: diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14057.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..052c4659865860200f2f6ddf1c05fb68fd9ed7c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14057.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही संस्था भारतातील महामार्गांची बांधणी व देखभाल करते. भारताच्या अर्थव्यवस्थेत या महामार्गांच्या जाळ्याचा मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. या महामार्गांची एकूण लांबी सुमारे ५८,००० कि.मी आहे, पैकी ४,८८५ कि.मी. लांबीचा रस्ता जाण्या-येण्याच्या मार्गिकांमध्ये दुभागलेला आहे. +यातील बहुतेक महामार्गांवर २+२ मार्गिका असतात. विकसित भागात अनेकदा हे ४+४ मार्गिकांइतके रुंद होतात तर मोठ्या शहरांमध्ये ८+८ मार्गिकांचे महामार्गही आहेत. भारतातील एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी फक्त २% रस्ते महामार्ग आहेत पण त्यांवरून सुमारे ४०% वाहनांची वाहतूक होते. राष्ट्रीय महामार्ग (सुधारित) कायदा, १९९५नुसार महामार्गांची बांधणी व देखभालीसाठी खाजगी उद्योगांनाही मुभा मिळाली आहे. +रा.म. ७ हा वाराणसीपासून कन्याकुमारी पर्यंतचा महामार्ग सगळ्यात जास्त लांबीचा आहे. जबलपूर, नागपूर, हैदराबाद व बंगलोर मार्गे जाणारा हा रस्ता २,३६९ कि.मी. लांबीचा आहे. रा.म. ४७अ हा महामार्ग सगळ्यात छोटा आहे. ६ कि.मी. लांबीचा हा रस्ता एर्नाकुलमला कोचीन बंदराशी जोडतो. मनालीपासून लेहला जाणारा महामार्ग जगातील सगळ्यात उंचीवरचा महामार्ग आहे. +भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी अशी : + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14063.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..180ac34fe2236e936ab3cf2ef32c28068929b6b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14063.txt @@ -0,0 +1,19 @@ +भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. ह्यातील ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे. +स्थापना - फेब्रुवारी ५, १८७७ +अधिकृत मान्यता - ऑगस्ट ३१, १९५७ +स्वरूप - नफा न मिळवणारी स्वेच्छा संस्था. +संचालन - नियंत्रण मंडळावर १९ संचालक असतात. +मुंबई रोखे बाजारावर नोंदणी होण्यासाठी कंपनीचे भांडवल किमान ५ कोटी असावे. +अ) सेन्सेक्स - यात ३० कंपन्यांच्या रोखे्सच्या किंमतींचा समावेश होतो. यासाठी १९७८-७९ हे आधारभूत वर्ष मानले जाते . +ब) BSE 200 - यात २०० कंपन्यांच्या (२१ सार्वजनिक कंपन्यांसहित ) रोखे्सचा समावेश होतो. आधारभूत वर्ष १९८९-९०. +क) Dollex - BSE 200चा डॉलर मधील निर्देशांक . आधारभूत वर्ष १९८९-९० +१९ ऑगस्ट २००५ रोजी BSEचे रूपांतर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये करण्यात आले आहे. आता ती BSE Ltd. म्हणून ओळखली जाते. +NSEचे दोन विभाग आहेत +रोखे बाजारात व्यक्तींना परस्पर खरेदी विक्री करता येत नाही. ती त्यांना रोखेबाजारावर नोंदणी करण्यात आलेल्या अधिकृत सभासदांच्या मार्फतच करावी लागते. अश्या सभासदांना काही निकष पूर्ण केल्यासच त्यांना व्यवहार करण्याची अधिकृती मिळते. +अश्या सभासदांचे प्रकार पुढील प्रमाणे +रोखे बाजारात काम करणाऱ्या दलालांचे पुढील चार प्रकार आहेत. +भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते.- +मात्र तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष / उणीवा होत्या. १९८० नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता. मात्र तो शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. +स्थापना- जी एस् पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून १२ एप्रिल १९८८ रोजी सेबीची स्थापना करण्यात आली. ३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत. +सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते. +मनोगतावरील माहिती diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14083.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df36b7888dcfd6df58a5a2ce4b2f38fdf03c4095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14083.txt @@ -0,0 +1 @@ +श्री महिपाल सिंगजी दुसरे साहिब बहादूर, डुंगरपूरचे महारावळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14093.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9231a321dc1b4d30c932243007805ec27ad55675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14093.txt @@ -0,0 +1,4 @@ +ही भारतातील सर्वात उंच इमारतींची यादी आहे. यामध्ये किमान १९० मीटर (६२३ फूट) उंच इमारती आहेत. फक्त राहण्यायोग्य इमारतींना सूचीबद्ध केले जाते, ज्यामध्ये रेडिओ मास्ट आणि टॉवर, निरीक्षण मनोरे, मंदिरे, चिमणी आणि इतर उंच वास्तू संरचना वगळल्या जातात. [१] +भारतातील गगनचुंबी इमारतींच्या युगाची सुरुवात १९५९ मध्ये चेन्नईतील एलआयसी बिल्डिंग पूर्ण झाल्यापासून झाली. सुरुवातीला १२ मजली असलेली ही इमारत देशातील पहिली गगनचुंबी इमारत होती आणि १९६१ पर्यंत ती देशातील सर्वात उंच इमारत राहिली. नंतर मुंबईतील २५ मजली उषा किरण बिल्डिंगने तिला मागे टाकले. [२] तेव्हापासून देशातील विविध शहरांमध्ये अनेक उंच इमारती दिसू लागल्या. पॅलेस रॉयलने २०१८ मध्ये ३२० मीटर उंचीची देशातील सर्वात उंच इमारत म्हणून संरचनात्मकदृष्ट्या अव्वल स्थान पटकावले होते, परंतु इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू आहे. ३०१ मीटर (९८८ फूट) आणि ७८ मजले असलेली लोखंडवाला मिनर्व्हा ही देशातील सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. [३]अनेक उंच इमारतींचे बांधकाम सुरू आहे, [४] आणि काही होल्डवर आहेत. [५] प्रत्येक शहरातील सर्वात उंच इमारती अनुक्रमे : +भारतातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती आणि उंच इमारती मुंबईत आहेत; तेथे २०० पेक्षा जास्त गगनचुंबी इमारती आहेत. [६] तसेच [७] [८] [९] मुंबई महानगर प्रदेशात सध्या ५,६०० उंच इमारती आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या २० वर्षांत सुमारे १८ गगनचुंबी इमारती [१०] [११] आणि ५,२०० [१२] [१३] [१४] [१५] [१६] [१७] उंच इमारती आहेत. कोलकातामध्ये १४:विद्यमान गगनचुंबी इमारती आहेत [१८] आणि सुमारे ८०० [१९] पूर्ण झालेल्या उंच इमारती आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, पुणे, सुरत आणि कोची येथेही अनेक उंच इमारती आहेत. +या यादीमध्ये पूर्ण झालेल्या किंवा भूमिपूजन झालेल्या इमारतींचा समावेश आहे. यामध्ये स्पायर्स आणि आर्किटेक्चरल तपशील समाविष्ट आहेत, परंतु अँटेना मास्ट समाविष्ट नाहीत. या यादीतील इमारती १९० मीटर (६२३ फूट) पेक्षा जास्त उंचीच्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1411.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3ab995f3a10e346ea32322222a17f9dae49bfbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1411.txt @@ -0,0 +1 @@ +अनेक शास्त्रांमधील स्थापित प्रयोग जेथे करून बघितल्या जातात व ते विद्यार्थ्यांना शिकविण्यास विविध उपकरणांची सोय जेथे केलेली असते त्या ठिकाणास प्रयोगशाळा असे म्हणतात.रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र मूर्तीकलाशास्त्र आदींच्या प्रयोगशाळा सहसा राहतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14110.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b40473147a68d1ec67d65af5e213f096a2fff91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14110.txt @@ -0,0 +1,6 @@ +हत्याकांड म्हणजे एका गटाच्या सदस्यांची दुसऱ्या अधिक शक्तिशाली गटाच्या एक किंवा अधिक सदस्यांनी जाणीवपूर्वक केलेली कत्तल. हत्याकांड हे अविवेकी किंवा अत्यंत पद्धतशीर असू शकते. हत्याकांड ही एकाच वेळी झालेली घटना मानेली जाते. ती विस्तारित लष्करी मोहीम किंवा युद्धादरम्यान घडलेली घटना असू शकते. हत्याकांड हे लढाईपासून वेगळे असते. लढाईमध्ये विरोधी पक्ष एकमेकांशी लढतात. जेव्हा एक बाजू शरणागती पत्करते किंवा लढण्याची क्षमता गमावते तेव्हा लगेचच त्याचे परिणाम दिसून येतात. हत्याकांडामध्ये विजयी गट त्यांच्या विरोधकांना ठार मारणे चालूच ठेवते. +खालील यादी पुर्ण नाही. यात काही नोंदी गहाळ असू शकतात. + दिल्ली सल्तनत +२० हजारांपेक्षा अधिक हिंदू आणि शीख[४०][४१] +[७२][७३] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14122.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7912f62fa5eb63712cddaf66107732cfc4481bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14122.txt @@ -0,0 +1,19 @@ +८४,४२,९७२ (०.७०%) - (इ.स. २०११) +इतर लक्षणीय लोकसंख्या +पश्चिम बंगाल  • मध्य प्रदेश  • उत्तर प्रदेश  • सिक्किम  • अरूणाचल प्रदेश  • त्रिपुरा  • जम्मू आणि काश्मिर +मुख्यः- मराठी + +बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे बिहार, भारत) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" ("जागृत व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला. +बौद्ध मौर्य सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान. +प्राचीन भारतात सम्राट अशोक नंतर पुढे, बौद्ध धर्म आणि बौद्ध मठांच्या प्रथांना १२ व्या शतकादरम्यान सामान्य लोक आणि राजेशाही यांचा पाठिंबा प्राप्त झाला होता परंतु सामान्यतः इ.स. १ सहस्र वर्षामध्ये यात घट झाली होती, ज्यात त्यांच्या अनेक पद्धती आणि विचार हिंदू धर्मातील होत्या. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात इस्लामचे आगमन झाल्यानंतर हिमालयीन भाग आणि दक्षिण भारताव्यतिरिक्त बौद्ध धर्म भारतात जवळजवळ विलुप्त झाला. +हिमालयाच्या परिसरातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग पर्वतरांग आणि उच्च हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीति भागात बौद्ध धर्म हा मुख्य किंवा मोठा धर्म आहे. याव्यतिरिक्त बौद्ध अवशेष आंध्रप्रदेशात आढळतात, जे महायान बौद्ध धर्माचे मूळ आहे. गेल्या शंभर वर्षांपासून बौद्ध धर्माची भारतामध्ये पुनर्निर्मिती होत आहे, कारण बऱ्याच भारतीय बुद्धिमतांनी बौद्ध, तिबेटी निर्वासित लोकांचे स्थलांतर केले आणि लक्षावधी हिंदू दलितांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले. २०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत. +बुद्धांचा जन्म शाक्य राज्याच्या शुद्धोधन नावाच्या राजाकडे नेपाळमधील लुंबिनी येथील कपिलवस्तु मध्ये झाला. सामाना पद्धतीचे साधना आणि ध्यान केल्यानंतर, बुद्धांनी स्व-आनंद आणि आत्म-संवेदनांच्या कणांपासून दूर राहण्याचा मार्ग बौद्ध मध्यममार्ग शोधला. +सिद्धार्थ गौतम यांनी बोधगयामधील पिंपळ वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले, त्या पिंपळ वृक्षास बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून गौतमला परिपूर्णपणे स्वयं जागृत करणारा असे ‘सम्यकसंबुद्ध’ म्हणून ओळखले जाते. बुद्धांनी मगधच्या शासक, सम्राट बिंबिसाराकडे संरक्षण प्राप्त केले. या सम्राटाने बौद्ध धर्माला वैयक्तिक विश्वास म्हणून स्वीकारले आणि अनेक बौद्ध विहाराची स्थापना करण्याची परवानगी दिली. अखेरीस संपूर्ण क्षेत्राचे पुनर्नामित बिहार म्हणून झाले. +बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात. +२००१-११ दरम्यान, बौद्ध हे शीख आणि जैनाप्रमाणेच, हिंदूंपेक्षा खूप कमी दराने वाढले आहेत. भारतात बौद्धांचे दोन भिन्न वर्ग आहेत – नवयानी बौद्ध (८७%) व परंपरागत बौद्ध (१३%). +पहिला वर्ग, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि काही इतर पूर्वोत्तर राज्यांमधील अनुसूचित जमाती; जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर हिमाचल प्रदेशात; आणि, दार्जिलिंग आणि सिक्कीमचे लोक हा परंपरागत बौद्ध समुदायांचा लहान वर्ग आहे; इ.स. २०११ मध्ये एकूण ८४ लक्ष बौद्धांची गणना झाली त्यापैकी ११ लाख या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकतात. +दुसरा वर्ग म्हणजे, इ.स. १९५१ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्मीयांचे धर्मपरिवर्तन झालेला नवयानी बौद्ध (नव-बौद्ध) या नावाचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वर्गात सुमारे ७३ लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी अवघे ६५ लाख (९०% नवबौद्ध) महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत जवळजवळ ६% बौद्ध आहेत. उर्वरित सुमारे ९ लाख नव-बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत. +साचा:बौद्ध लोकसंख्या +२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या केवळ सिक्कीम, (२७.३९%), अरुणाचल प्रदेश (११.७७%), मिझोरम (८.५१%), महाराष्ट्र (५.८१%), त्रिपुरा (३.४१%) व हिमाचल प्रदेश (१.१०%) या सहा राज्यात बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण १% पेक्षा अधिक आहे.[२] +बौद्ध लोकसंख्येची सरकारी आकडेवारी पेक्षा वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[३] +भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्मात प्रवेश करतात. या धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14167.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dfbce97e617101a52a9d272738e1eb5378e4abf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14167.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावातील महाविद्यालय आहे. याची स्थापना १७ जुलै १९९० रोजी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी केली. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी येथे आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन विद्याशाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण मिळते. महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. महाविद्यालयाचे नॅक कडून पुनर्मुल्यांकन झाले असून अदर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाची स्वतःची इमारत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुमारे ३५० विद्यार्थिनींची राहण्याची सोय आहे. खेळासाठी क्रीडांगण तसेच जिमखाना उपलब्ध आहे तसेच प्रयोगशाळा आणि ग्रंथालयही आहेत. +वनस्पतीशास्त्र आणि मराठी या विषयातील पदवीत्तर शिक्षणाची सोय केली आहे. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे मिळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14172.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d04aacaea9e073047d5a210b44f62e30ef9ef93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14172.txt @@ -0,0 +1,8 @@ +३ जुलै, १९८४ (1984-07-03) (वय: ४०) +भारती सिंह (जन्म: ३ जुलै १९८४)[१] ह्या एक दूरचित्रवाहिनी तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार आहेत. सिंह यांनी असंख्य 'हास्यप्रधान लघुमालिका (कॉमेडी स्केच शो)' तयार केल्या आहेत. तसेच विविध 'पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे' सूत्रसंचालन देखील केले आहे. +त्यांनी 'झलक दिखला जा' (२०१२)[३], 'नच बलिये-८' (२०१७)[४] आणि 'फियर फॅक्टर:खतरों के खिलाडी-९' (२०१९)[५] या 'वास्तव प्रदर्शनी (रिअ‍ॅलिटी शो)' मध्ये भाग घेतला होता. 'कलर्स टिव्ही' वरील 'खतरा खतरा खतरा' या कार्यक्रमातील भारतीचा सहभाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.[६] या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती भारतीचेचे पती हर्ष लिंबाचिया यांची होती. इ.स. २०१६ मधील 'फोर्ब्स इंडिया'च्या 'प्रसिद्ध १०० भारतीय व्यक्तिमत्त्वे' (टॉप १००-सेलिब्रिटी)च्या यादीत प्रथमच भारतीचा समावेश झाला. त्यानंतर सलग २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये भारतीचे नाव या यादीत कायम राहिले.[७][८] +भारती सिंहचे वडील नेपाळी वंशाचे होते, तर त्यांच्या आई पंजाबी हिंदू आहेत. भारती दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच भारतीला एक बहीण आणि एक भाऊ आहे[९] +३ डिसेंबर २०१७ रोजी भारतीने पटकथा लेखक हर्ष लिंबाचिया यांच्याशी लग्न केले.[२] भारती सिंह यांनी तिरंदाजी आणि पिस्तूल नेमबाजीमध्येही राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे.[१०] +२१ नोव्हेंबर २०२१ रोजी, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) भारती यांच्या निवासस्थानी एक झडती घेतली, त्यात ८६.५ ग्रॅम भांग नावाचा मादक पदार्थ सापडला. भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी नेण्यात आले आणि नंतर एनसीबीने अटक देखील केली. दोन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना २३ नोव्हेंबर २०२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला.[११][१२][१३] +भारती 'स्टार वन' दूरचित्रवाहिनी वरील उत्स्फूर्त विनोदी (स्टँड-अप कॉमेडी रिअ‍ॅलिटी) मालिका 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज (सीझन ४)'ची दुसरी उपविजेता होती, या कार्यक्रमातील भारतीच्या 'लल्ली' नावाच्या पात्राचे मोठे कौतुक झाले. त्यानंतर विविध सहकलाकारांसह भारती 'कॉमेडी सर्कस ३ का तडका', 'कॉमेडी सर्कस महासंग्राम', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'ज्युबिली कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी सर्कस के तानसेन' मध्ये दिसली.[१४][१५] +भारती ने 'इंडियाज गॉट टॅलेंट ५ (२०१४)', इंडियाज गॉट टॅलेंट ६ (२०१६) आणि इंडियाज गॉट टॅलेंट ७ (२०१६) आदित्यादी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14180.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..039157dd3e267a49c3775d2a0001e8b9c734e9f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14180.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारत अ क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान तीन प्रथम श्रेणी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारत अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाल याने केले. सर्व सामने ब्लूमफाँटेन मधील मानगुआंग ओव्हल येथे झाले. +कर्णधार पीटर मलानच्या अफलातून शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या प्रथम-श्रेणी सामन्यात पहिल्या डावामध्ये ५०९ धावांचा डोंगर उभा केला. भारत अ संघाने धिम्या गतीने फलंदाजी करत सामना अनिर्णित सोडवला. भारताकडून देखील अभिमन्यू इस्वरन याने शतक झळकावले. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाचा ओमिक्रॉन नामक वेगळ्या प्रकारचा विषाणूचा झपाट्याने फैलाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरीत दौऱ्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु दोन दिवसांनीच दौरा वेळेप्रमाणे होईल असे बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले. ही घोषणा करण्यास विलंब झाल्याने दुसरा प्रथम-श्रेणी सामना २९ नोव्हेंबरच्याऐवजी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला. शेवटचे दोन्ही सामने अनिर्णित सुटल्याने तीन सामन्यांची प्रथम-श्रेणी मालिकादेखील ०-० अशी बरोबरीत सुटली. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14191.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebab88ed53c042a50fee5b728ab1746f4a558b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14191.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIST) ही एक सरकारी अनुदानित संस्था आहे आणि अवकाश विज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी मानले जाणारे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ केरळमधील वलियामाला, नेदुमंगड, तिरुवनंतपुरम येथे आहे. हे आशियातील असे पहिले विद्यापीठ आहे जे केवळ बाह्य अवकाशाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी समर्पित आहे.[१] त्याचे उद्घाटन १४ सप्टेंबर २००७ रोजी इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी केले होते. IIST ची स्थापना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत केली होती. ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, आयआयएसटीचे कुलपती होते. IIST मध्ये अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करून नियमित अभियांत्रिकी पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम राबवले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14196.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f140771fec23e0e7dd4ff154d143e262dc82a3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14196.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील जुना आणि भारतामधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात इ.स. १९५२ पासून प्रारंभ झालेली आहे.[१] +जगभरातली वेगवेगळ्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट कला सादर करण्यासाठी व चित्रपटाना सामायिक मंच पुरवण्याचा या चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्याच्या संदर्भातून विविध देशातली वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट संस्कृती जाणून त्यासाठी योगदान देण्यासाठी व जगभरातल्या लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव आयोजित केला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14207.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67630c7cf246519d3f292585714d5863c8f347d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14207.txt @@ -0,0 +1,53 @@ +भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास २,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होते या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. +मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले.[१]. इसवी सन पूर्व ३५००चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला. काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला.पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ, गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.[२] साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती.हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.या जनसमूहांच्या प्रमुखा मध्ये रावी नदीच्या तीरावर झालेले "दशरज्ञ युद्ध" प्रसिद्ध आहे.या वैदिक लोकांच्या जनसमुहांबरोबर "दास" किंवा "दस्यू" लोकांचे वास्तव्य होते. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार, बंगाल,ओडीसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वा मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई '''गौतम बुद्ध''' नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये चेतवणी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.कोसलप्रमाणेच वत्स, अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस लिच्छवीचे व्रुज्जी हे गणराज्य होते.वैशाली ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी होईल हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या त्याच्या प्रदेशांमध्ये क्या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले. +इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदर (अलेक्झांडर)च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने गंगेच्या खोऱ्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय प्रदेशात उठाव सुरू झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्ययांच्या साथीने /मदतीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्त्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले.शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्राता याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.सातवाहननांचीची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.महाराष्ट्रातील प्रतिष्ठान(आजचे पैठण) ही त्यांची राजधानी होती. इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर प्रतिहारांची राजवट स्थापन झाली.कन्नोज ही त्यांची राजधानी होती. साहित्य,गणित,शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतीलपांड्य, चोल साम्राज्य,चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.चालुक्य,राष्ट्रकूट,परमार,काकतीय,होयसळ राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणानीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. +११ व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील दाहीर राजाचा पराभव करून तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताच्या अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.अफगाण शासक महंमद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे अजमेर) एक राजपूत राजा प्रुथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला.आठ युद्धानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्याविरुद्ध उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे. दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशाहा/सम्राट शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य,स्वराज्य ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबच्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला . त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले.मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.गादीसाठी शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला.मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी,फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख राज्य/साम्राज्य व जाट राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी पॅडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले.भारताच्या त्यांची मांडलिक संस्थाने/राज्ये दत्तक वारस नामंजूर करून खालसा केली.[६]. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला. +लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या.[७] सरते शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.[८] आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.भारत संघराज्य बनले.भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली.फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहतीमध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या.पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले.१९६१मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले. +स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर,पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम,मणिपूर,मिझोरम,नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या आतंकवाद/दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९६२,१९४७, १९६५,१९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.खासकरून सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.[१०] गोल गम इस्लामिक आर्किटेक्चर. +सिंधु संस्कृती ही भारताच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे[११]. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली.[१२],[१३][१४][१५] सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला. यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले[१६]. +सिंधू संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सुरू केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरून सिंधू संस्कृतीची ओळख मिळते. +सिंधु संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत. परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतु पुरातत्त्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्दल भरपूर पुरातत्त्वीय पुरावे आहेत परंतु त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही. +वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली. +ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.[१७] +वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले. +या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८] +वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता,वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते.वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात.[१९]. हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात. +गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१] +बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली. +इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमे अंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकिय आक्रमणांची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली. झेलम नदीच्या लढाईत त्याने पोरस राजाचा पराभव केला परंतु अलेक्झांडरला बरेच नुकसान सहन करावे लागले. पुढील एका लहान लढाईत अलेक्झांडर चांगलाच जखमी झाला होता. ११ वर्षांच्या सातत्याचा लढाईंमुळे अलेक्झांडरची सेना चांगलीच कंटाळली होती व तत्कालीन मगध साम्राज्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्याच्या तुलनेत जास्त होती व भारतीयांशी पहिल्या काही लढायातील अनुभवांमुळे मगधशी टक्कर महाग पडेल या कल्पनेने अलेक्झांडरच्या सैन्यात परतीची लाट उफाळून आली. सैन्यात फूट उफाळू नये यासाठी अलेक्झांडरने प‍रतीचा निर्णय घेतला. अलेक्झांडर परतीच्या प्रवासात आजारपणाने मरण पावला त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. अलेक्झांड‍रने भारताचा थोडाच भाग जिंकला असला तरी त्याच्या आक्रमणाने भारतात मोठी राजकीय उलथापालथ झाली. +मुख्य पान: मौर्य साम्राज्य +अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा(सिकंदर) सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार त्याचा मुलगा/पुत्र बिंदुसाराच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात (इसपूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान॰, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा(आजचा म्यानमार) काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग राज्य मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर विदीशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती . अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला सम्राट अशोक आणि ठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा-वेरूळ येथील ठिकाणांच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसून येते गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला तामिळनाडूमधील महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारित प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम हेदेखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे +मुख्य पान शुंग वंश, शक राज्यकर्ते ,सातवाहन +मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मिक शांतता टिकवून ठेवली. +मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे. +याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते. +अलेक्झांडरच्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व बॅक्ट्रीया (अफगाणिस्तान) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इ.स. पूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगाणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधिक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलिंद अथवा मिनॅंडर हा एक महान ग्रीक भारतीय राज्यकर्ता होऊन गेला. ग्रीक राज्यकर्त्यांनंतर इसपूर्व शतकात या भागात शक राज्यकर्त्यांचे वर्चस्व वाढले. शक हे मूळतः दक्षिण सायबेरियातून स्थलांतरित झालेले लोक होते. सर्वप्रथम बॅक्ट्रीय (अफगाणिस्तान), काश्मीर, गांधार, पंजाब असा प्रवास करत भारतात शक टोळ्यांनी प्रवेश केला व पश्चिम भागात आपले प्रस्थ वाढवले. यानंतरच्या काळात कुषाण हे वायव्य भागात प्रभावी बनले. कुशाण राज्यकर्त्यांचे एके काळी कझाकस्तानापासून ते मथुरेपर्यंत राज्य होते. +पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमन साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. +इस १३० मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला. हा व्यापार मुख्यत्वे रोमशी सरळपणे न होता, मध्य आशियातील अरब,इजिप्त या मधल्या व्यापारांमार्फत होत असे. (II.5.12.[२२]), ऑगस्टस या रोमन सम्राटाच्या काळापर्यंत प्रतिवर्षी १२० जहाजे मायोस होर्मोस पासून ते भारतापर्यंत ये जा करत. या काळात येणाऱ्या सोन्याचा उपयोग भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या नावाच्या सोन्याच्या मोहऱ्या पाडण्यात केलेला दिसतो. + +मुख्य पान गुप्त साम्राज्य +गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले. याकाळात भारताने गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याच्या शासकांनी आपल्या सैन्य शक्तीच्या जोरावर भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. श्रीगुप्त या गुप्त राज्यकर्त्याने गुप्त राज्याची स्थापना केली त्यानंतर काही वर्षातच चंद्रगुप्त ने गुप्त राज्याचे साम्राज्य बनवले. समुद्रगुप्त चंद्रगुप्त विक्रमादित्य यांसारख्या महान राज्यकर्त्यांनी गुप्त साम्राज्य वाढवले. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इस २४० ते ५५० पर्यंत मानला जातो. कालिदास हा महान कवी गुप्त सम्राटांच्या दरबारी होता असे मानतात. पुराणांची रचना याच काळात झाली असेही मानतात. गुप्त साम्राज्याच्या नंतरच्या काळात पश्चिम अशियातील हूण आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्य क्षीण झाले. +गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौजच्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारताच्या बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओ़ळखली जात, त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते. +या राजपूत राज्यांनी उत्तर भारताच्या मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली. भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली. +या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता. चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती. आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला. चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले. राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली. या काळात दक्षिण भारताच्या राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले.[२४][२५] १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली. या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले. ई. स. वी सन १७५७ रोजी झालेली +गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर व दक्षिण भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उदयास आली. उत्तरेस प्रतिहार,पाल,वर्धन,गहडवाल इत्यादी तर दक्षिणेस राष्ट्रकूट,होयसळ,पांड्य,चेर,कदंब,यादव इत्यादी साम्राज्ये होऊन गेली. +अरबस्तानात सहाव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी स्पेन, उत्तर अफ्रिका, तुर्कस्तान ते इराण बलुचिस्तानपर्यंत भाग इस्लामय करून टाकला होता. उमय्यद खलीफाच्या काळात बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व भारतात इस्लामी राज्याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इस्लामी आक्रमकांना प्रतिहारीं कडून मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली त्यामुळे इस्लामी राज्याचा पूर्वेकडचा विस्तार थांबला. परंतु भारताशेजारील इराण तोवर पूर्णपणे इस्लाममय झाला होता. शेजारील (भारत) संपन्न व गैर इस्लामी राज्य आक्रमणासाठी खूणवत होते. दहाव्या शतकात इस्लामी आक्रमणांची व्याप्ति वाढली व भारतात लहान इस्लामी सल्तनते तयार होउ लागली. या आक्रमणांच्या आगोदरही भारतात अरबी व्यापाऱ्यामार्फत इस्लाम पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पोहोचला होता. सुरुवातीची इस्लामी आक्रमणे प्रामुख्याने लूटीवर आधारित होती. या लूटींचे मुख्य लक्ष्य मंदिरे व संपन्न शहरे होती. गझनीचा महमूदने भारतावर लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. +१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घौरीने पराभव केला व भारतात अधिकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली.[२६] भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारताच्या अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. शेरशहा सूरी ने बांधलेला कलकत्ता काबूल रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले. +१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील तैमूरलंग या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.[२७] त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.[२८] तैमूरलंगच्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये बाबर या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला. + +इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.[२९] मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाचा आकारा पर्यंत मर्यादित राहून टिकली. १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षिण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराऐवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मिक सलोखा ठेवला. यात सम्राट अकबरने पुढाकार घेतला होता. त्याने स्वता:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा झिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परिवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरून होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट शहाजहॉंने बांधला तसेच फत्तेपूर सिक्री हे पूर्ण शहर वसवले. दिल्ली व आग्रामधील मधील बहुतेक जुन्या वास्तू या मोघल स्थापत्याची ओळख करून देतात. हिंदूच्या बरोबर सलोखा वाढवला तरीही शाहजहॉं व औरंगजेबच्या काळात हा धार्मिक सलोखा खालवला. औरंगजेबने हिंदूंविषयी दाखवलेल्या कडवट धोरणांमुळे मराठे, राजपूत व शीख दुखावले व मुघल राज्याविरुद्ध बंडाळी वाढली व मुघल साम्राज्याचे पतन होण्यास कारणीभूत ठरले. खासकरून शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडून मोठा प्रतिकार झाला. औरंगजेबने आपल्या आयुष्याची शेवटची २७ वर्षे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यात घालवली जे साध्य झाले नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार वाढला व मोघलांचा क्षीण झाला व दिल्ली आग्रापुरते त्यांचे राज्य मर्यादित राहिले हा काळ मुघलांच्या दृष्टीने खूपच अस्थैर्याचा राहिला. ५० वर्षांच्या काळात १७ मुघल राजे होऊन गेले. .[३०] +मुख्य पान: मराठा साम्राज्य +१७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांचे वर्चस्व झाले होते. अनेक राजपूत हिंदू संस्थाने अस्तित्वात असली तरी मुघलराज्यकर्त्यांना अंकित होती. महाराष्ट्रातही मराठा सरदार हे निजाम व अदिलशाही पदरी काम करत. या परिस्थितीत १६४७ मध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकिय राज्यकर्त्यांचे वर्चस्व झुगारून देउन पुण्या जवळील किल्यांवर स्वतंत्र राज्याची स्थापना केली जे पुढे मराठा साम्राज्य म्हणून विकसित झाले. मराठा राज्याची सुरुवात मोघल व अदिलशाहीशी सघर्षरत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रभावी नेतृत्वाखाली मराठी सेनेने अदिलशाहीचे वर्चस्व नमवले व मोघलांशी उघड-उघड वैर पत्करले. मोघलांशी झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती जयसिंग यांच्याबरोबर तह केला व आग्रा येथे औरंगजेब शी बैठकीचे निमंत्रण मान्य केले. औरंगजेबशी झालेल्या भेटीत औरंगजेबने शिवाजींचा अपमान केला व नजरकैदेत ठेवले. या कैदेतून छत्रपती शिवाजींनी सहिसलामत सुटका करून घेतली जी औरंगजेबच्या जिव्हारी लागली. १६७४ मध्ये शिवाजींनी अधिकृतरित्या राज्याभिषेक करवून घेउन मराठा साम्राज्याची स्थापना केली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर काही अस्थिर काळानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे घेतली. परंतु औरंगजेबने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी दक्षिणेत आला. १६८९ मध्ये  संभाजी महाराजांना अटक करण्यात औरंगजेबला यश आले व अतिशय मारहानी करून संभाजी महाराजांची  हत्या केली. यानंतर राजाराम महाराजांनी सुत्रे घेतली व दक्षिणेत जिंजी येथून औरंगजेब विरुद्ध लढा चालू ठेवला. १७०७ पर्यंत मराठ्यांनी अतिशय चिकाटीने हा लढा चालू ठेवत मुघल साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. १७०७ मध्ये औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर हा लढा संपला पण तोपर्यंत मराठ्यांनी विस्तार सुरू केला होता व मुघलांची उत्तर भारतातून माघार सुरू झाली. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सूरु झाला भोसले घराणे अधिकृतरित्या राज्यकर्ते असले तरी खरी सुत्रे पेशव्यांच्या कडे आली. पहिला बाजीराव, शिंदे व होळकरांनी मिळून भारताचा मोठा भूभाग मराठ्यांच्या अख्यात्यारित आणला. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांचा दारुण पराभव झाला व साम्राज्याचे पतन चालू झाले. यामुळे इंग्रजांचे चांगलेच फावले व त्यांनी विस्तार चालू केला. १७७७ ते १८१८ पर्यंत इंग्रजांशी तीन युद्धे झाली व शेवटी १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला. +ऑटोमन साम्राज्याने भारताशी व्यापाराचे मार्ग बंद केल्यानंतर अनेक धाडशी दर्यावर्दींनी भारताला मार्ग शोधण्याचे प्रयत्न सूरु केले. या प्रयत्नात अमेरिका खंडाचा शोध लागला, वास्को दा गामाने दक्षिण अफ्रिकेहून वळसा घालून भारताला येण्याचा मार्ग शोधला व युरोपीयन साम्राज्य वाद सूरु झाला असे मानतात. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताशी व्यापार करण्यात रस दाखवला. सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नंतर आपल्या व्यापारी मालाचे संरक्षण व वाहतुकीसाठी व्यवस्था म्हणून यांनी भारताच्या किनाऱ्या वर अनेक ठिकाणी वखारी व लहान किल्ले उभारले. उदा. पोर्तुगीजांनी गोवा दीव दमण येथे तर इंग्रजांनी मुंबई व सुरत येथे आपली केंद्रे स्थापिली होती. भा‍रतीय राज्य कर्त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धतंत्रे देण्यात इंग्रज व फ्रेंचांमध्ये चढाओढ चालली होती. या प्रयत्नात इंग्रज फ्रेंच यांच्यात स्पर्धा तीर्व होती. संरक्षणाच्या नावाखाली छोट्या छोट्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. १७५७ मध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला त्यामुळे प्रथमच युरोपीयांना मोठ्या भागावर राज्य करायला मिळाले व त्यानंतर विस्तार धोरण चालू ठेवले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचे सत्ताकेंद्र विभागले याचा चांगलाहच फायदा इंग्रजांनी घेतला. प्रमुख संस्थानिकांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्यांनी वर्चस्व मिळवायला चालू केले. या राज्यांना एकमेकांविरुद्ध लढण्यास तैनाती फौजेची आमिषे दिली अश्या रितीने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर केला. मराठे व म्हैसूरचा टिपू सुलतान यांच्याशी युद्धे करून ती राज्ये संपवली व १८१८ पर्यंत भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. इंग्रजांची आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रात्रे यांचा सामना करण्यात भारतीयांना सपशेल अपयश आले. +१८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणल्यावर ब्रिटीशांची भारताच्या मोठ्या भागावर सत्ता स्थापन झाली. + +सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. ३ जून १९८४ रोजी सकाळी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेला प्रारंभ झाला. ६ जून राेजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून +कामगिरी केली. भिंद्रानवाले याच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. त्यानंतर १९८६ मध्ये सुवर्णमंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला 'ऑपरेशन ब्लॅक थंडर ' असे म्हणतात. येथुन पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली. +धार्मिक आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम (आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते. इ.स. १९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले. +१५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होते तर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. १९५२ मध्ये पहिल्या सार्वजनिक लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले. १९५५ ते १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला. आंदोलने व जनाग्रहास्तवामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली. पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली. पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. हरितक्रांतीवर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. यानंतर १९६५मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशातील घडामोडींमुळे १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वंतत्र बांगलादेशची निर्मिती केली. +१९६६ नंतरची १८ वर्षे भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचे वर्चस्व राहिले. १९७४ साली इंदिरा गांधीनी राजस्थानातील पोखरणमध्ये पहिली भूमिगत अणूचाचणी केली. १९७५-७६ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत १९७७ साली काँग्रेसच्या अबाधित सत्तेला धक्का दिला व भारतीय राजकारणात नवीन पर्व चालू झाले. मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाची सत्ता भारतात आली. १९८० साली अंतर्गत बेबनावामुळे जनसंघाचे ते सरकार कोसळले आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत परत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता आली. पाकिस्तानने १९७१ च्या बांगलादेशच्या पराभवानंतर छुपे दहशतवादी युद्ध भारताबरोबर करण्यास आरंभ केला. १९७० च्या दशकात प्रामुख्याने पंजाब व इतर राज्यातील फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहन दिले. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद संपविण्यासाठी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई करून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकून लावले गेले. यानंतर काही काळातच इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधी नंतर राजीव गांधींंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ने सहानभूतीपोटी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका व मालदीव मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दकशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती बाबरी मशीदीच्या विध्वंसात झाली. +१९९१ मध्ये डॉ.पी.व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सरकारने गॅट-करारावर स्वाक्षरी करून खुल्या आणि काही प्रमाणात भांडवलशाहीशी मिळत्याजुळत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारून सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. आता सध्या भारताची मिश्र अर्थव्यवस्था आहे. +१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयीनी पोखरणमध्ये दुसरी अणूचाचणी केली. +१९९९ मध्ये पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारताचे पाकिस्तानबरोबर तिसरे युद्ध झाले. +२००८ मध्ये डॉ.मनमोहनसिंग सरकारच्या काळात भारत आणि अमेरिकेत अणूकरार झाला. +इ.स. २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशाची पुनरावृत्ती केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14218.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..548d20bf749ec5b067f8b61939b733ad2b31f868 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14218.txt @@ -0,0 +1,4 @@ +एम. वैंकय्या नायडू +भाजप + +भारतीय उपराष्ट्रपतीपदा साठी ६ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे उपराष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची नियुक्त झालि. [१] या निवडणुकीतील विजेता विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची जागा घेईल. १६ जुलै २०२२ रोजी, पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. [२] १७ जुलै २०२२ रोजी, मार्गारेट अल्वा यांना यूपीएने विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14241.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f836d3f8a4aa261574cd5b46f75c2f8747e00197 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14241.txt @@ -0,0 +1,2 @@ +या पुस्तकात कुंभार समाजाच्या स्थितीगतीचे वर्णन आले आहे. +तसेच संत गोरा कुंभार, राका कुंभार, कुबा कुंभार यांचे चरित्र व कार्य देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14265.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faaec5f1714c1cc20285958c5f35a95f3aa43748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14265.txt @@ -0,0 +1,41 @@ +भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला. +दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकूण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकूण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णित राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकूण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले. + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14284.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83698be425508d9c742b676a8b7d412ddf6f38d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14284.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारत क्रिकेट संघाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. भारताने इंग्लंड मालिकेपूर्वी जून २०२१ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध साउथहॅंप्टनमध्ये २०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा सामना खेळला. ज्यात न्यू झीलंडने भारताला ८ गडी राखून हरविले होते. +२०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौरा सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताच्या दुय्यम संघाने श्रीलंकेचा दौरा केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताने दोन सराव सामने खेळले. +पहिली कसोटी सातत्याने पावसाचा व्यत्यत आल्याने अनिर्णित सुटली. भारताने दुसरी कसोटी १५१ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे तिसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत भारताचा डावाने पराभव झाला. चौथ्या कसोटीत अनपेक्षितरित्या भारताने १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-१ ने पुन्हा आघाडी घेतली. सन १९८६ नंतर भारताने इंग्लंडमध्ये एका मालिकेत प्रथमच दोन कसोटी सामने जिंकले. चौथ्या कसोटी दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्या दोघांना लागलीच विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. पाचवी कसोटी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी भारताच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. जरी सर्व खेळाडूंच्या चाचण्या नकारात्मक आल्या तरी पाचवी कसोटी सुरू व्हायच्या फक्त तीन तास आधी सामना रद्द झाल्याचे ईसीबीकडून जाहिर करण्यात आले. +ईसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावरील बातमीनुसार भारताने पाचवा सामना त्याग करून इंग्लंडला बहाल केला असे नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. परंतु भारताने यावर आक्षेप घेत सामन्याचा निकाल काय लावावा यासाठी आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या एका वृत्तानुसार अशीही चर्चा चालू होती की शेष कसोटी सामना हा पुढील वर्षी खेळविण्यात यावा आणि ही मालिका तोपर्यंत स्थगित करण्यात यावी. आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीने जर भारताने सामना त्याग करून बहाल केला असा निर्णय दिला तर ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल आणि सामना रद्द करावा लागला असा निर्णय झाला तर भारत मालिका २-१ ने जिंकेल. +जानेवारी २०२२ मध्ये इसीबीने जाहीर केले की जुलै २०२२ मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पाचवी कसोटी खेळविण्यात येईल. पाचवी कसोटी १ जुलै २०२२ रोजी एजबॅस्टन येथे खेळविण्यात आली. भारताने पहिल्या डावात ऋषभ पंतच्या शतकाच्या मदतीने ४१६ धावा केल्या. जसप्रीत बुमराह याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये तब्बल ३५ धावा करत कसोटीत एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा २८ धावांचा आधीचा विक्रम मोडला. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. भारताने इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य दिले. जॉनी बेअरस्टो आणि माजी कर्णधार ज्यो रूट यांच्या नाबाद २६९ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने पाचवी कसोटी ७ गडी राखून जिंकली. हा इंग्लंडचा कसोटीतील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होता. पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडचा ज्यो रूट आणि भारताचा जसप्रीत बुमराह या दोघांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14287.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be7746829eddbaf2eafb68ee65aa276f930b1b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14287.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९६७-जानेवारी १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. +कसोटी मालिकेदरम्यान भारताने ६ प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यातले भारताने २ हरले, ३ सामने अनिर्णित राखले तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाची मालिका संपताच भारतीय क्रिकेट संघ ४ कसोटी खेळण्यास न्यू झीलंडला रवाना झाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14327.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55ad0e0e5f2f3a1a6fe974bb5e023897cc13c439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14327.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारत क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली. +या मालिकेतूनच दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी या दोन दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14334.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a4d4235f769284670fa57adb0538a0fb7bf021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14334.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले. +न्यू झीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14357.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d445911aeb6388e69d13e7700724f2fcd93b6214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14357.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने पहिल्यांदाच न्यू झीलंडचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांच्याकडे होते. विदेशी भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14359.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4caf584c842b32e4a23f4517b938b84fe663480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14359.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० अशी जिंकली. दौरा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात भारतीय संघाने फिजीसोबत दोन-दिवसीय सामना खेळला ज्यात भारताने फिजीचा २२० धावांनी पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14367.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b2a86c5fb7cc1ecca82a44e9277bae075741e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14367.txt @@ -0,0 +1 @@ +भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धामुळे तब्बल १४ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. भारताचा हा दुसरा पाकिस्तान दौरा होता. पाकिस्तानी भूमीवर भारताने पहिल्यांदा एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. हा भारताविरुद्धचा पाकिस्तानचा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. एकदिवसीय मालिकादेखील पाकिस्तानने २-१ अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सरफ्राज नवाझच्या गोलंदाजीवर सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूंना पंच वाईड देत नाहीत हे बघून भारतीय संघ संतापला. भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी याने निषेध म्हणून संघासह मैदानत्याग केला. आयसीसीने तिसरा सामना पाकिस्तानला बहाल करत विजयी घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्या पद्धतीने निकाल लागलेला हा एकमेव सामना आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14369.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bc63b6269284d2c9db8af4dd945f774b453375c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14369.txt @@ -0,0 +1 @@ +भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येमुळे रद्द करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1438.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a47723628a16ff1efe5d98495b809bd37b3753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1438.txt @@ -0,0 +1,12 @@ +प्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था (ecosystem) आहे. ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो. +सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीत वाढणाऱ्या सिलेंटरेटा (phylum coelenterata) या वर्गातील (class Anthozoa)मधील लहान आकाराच्या प्राण्यांच्या वसाहती म्हणजे प्रवाळ. +१)आरोग्यपूर्ण(सक्षम)प्रवाळ +२)तानलेले प्रवाळ +३)पांढरे(मृत) प्रवाळ +मालदीव व लक्षद्वीप येथे प्रवाळाची बेटे आहेत. +आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते बेटांवर आढळणारे प्रवाळ हे तापमान बदलासंदर्भात अतिशय संवेदनशील असतात. समुद्राच्या पृष्ठभागाशी झालेल्या थोड्या बदलाने त्यांच्या रंगावर परिणाम होतो, म्हणूनच प्रवाळ हे जागतिक हवामान बदलाचे अतिसंवेदनक्षम निर्देशक आहेत.:-संदर्भ- +(महाराष्ट्र राज्य शिक्षणमंडळाचे १० चे भूगोलाचे पुस्तक) +प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अतिउपयोगाने काही प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका आहे. हे लक्षात घेऊन दागिन्यांमध्ये पोवळे/प्रवाळ वापरू नयेत. काही कंपन्या मृत प्रवाळ वापरत असल्याचा दावा करतात मात्र प्रवाळाचे स्थान केवळ अन्नसाखळीत नसून प्रवाळ हे अनेक जिवांचे घरही असते हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. + +== जेव्हा तापमानात बदल होतो तेव्हा प्रवाळ आपल्या पेशात राहणाऱ्या शेवाळंना बाहेर काढतात आणि याच शेवाळामुळे प्रवाळांना रंग प्राप्त होतो. सागरी तापमानाची जर दीर्घकाळ वाढ होत राहिली तर विरंजनाची प्रक्रिया घडते ज्यामुळे प्रवाळ रंगहीन होतात. जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे (समूह) नष्ट झाले आहेत. (ganehsraut) +== diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14383.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90835a37b1fe4161ee39fed5862d58017f09d745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14383.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेचा दौरा करून दोन कसोटी, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले.[१] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली.[२][३] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात या दौऱ्याची पुष्टी केली.[४] +मूलतः, वेस्ट इंडीजमध्ये तीन टी२०आ सामने होणार होते.[५] तथापि, मार्च २०२३ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट वेस्ट इंडीजच्या (सीडब्ल्यूआय) या दौऱ्यात आणखी दोन टी२०आ सामने समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली.[६][७] एप्रिल २०२३ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज जाहीर केले की दोन अतिरिक्त टी२०आ सामने फ्लोरिडा, अमेरिका येथे होतील.[८] १२ जून २०२३ रोजी, क्रिकेट वेस्ट इंडीज ने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[९][१०] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14412.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90835a37b1fe4161ee39fed5862d58017f09d745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14412.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेचा दौरा करून दोन कसोटी, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले.[१] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली.[२][३] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात या दौऱ्याची पुष्टी केली.[४] +मूलतः, वेस्ट इंडीजमध्ये तीन टी२०आ सामने होणार होते.[५] तथापि, मार्च २०२३ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट वेस्ट इंडीजच्या (सीडब्ल्यूआय) या दौऱ्यात आणखी दोन टी२०आ सामने समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली.[६][७] एप्रिल २०२३ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज जाहीर केले की दोन अतिरिक्त टी२०आ सामने फ्लोरिडा, अमेरिका येथे होतील.[८] १२ जून २०२३ रोजी, क्रिकेट वेस्ट इंडीज ने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[९][१०] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14414.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee8980ad537c41dd1403ca85baf9a5a998219d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14414.txt @@ -0,0 +1 @@ +भारत क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. भारताचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका श्रीलंकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका तिसरा सामना पावसामुळे अर्धवट रद्द केला गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटी श्रीलंकेने मिळवलेला श्रीलंकेचा पहिला वहिला कसोटी विजय होता. तसेच श्रीलंकेने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14424.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88ac1dfab2c369c539ec9114c2c345d36a771a68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14424.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत तीन कसोटी सामन्याची मालिका ६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान खेळला. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. +२७ जून रोजी दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर, श्रीलंकेचा फलंदाज आणि माजी कर्णधार कुमार संघाकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14437.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11013055b952aa2cf6b4ed27936003b7b0fe02d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14437.txt @@ -0,0 +1,3 @@ +ह्या विभागाचा प्रमुख लेख पाहण्यास येथे जा ..भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14442.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11013055b952aa2cf6b4ed27936003b7b0fe02d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14442.txt @@ -0,0 +1,3 @@ +ह्या विभागाचा प्रमुख लेख पाहण्यास येथे जा ..भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14451.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd40910d9e70d6412e5e9919bb62a2d649c27a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14451.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14470.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fc7266c4e0efa7b4ca31fd503834c4a64dcb178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14470.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारतीय चित्रकलेची भारतीय कलेत खूप मोठी परंपरा आणि इतिहास आहे. परंतु हवामानाच्या परिस्थितीमुळे फार कमी उदाहरणे टिकून आहेत.[१] सर्वात जुनी भारतीय चित्रे प्रागैतिहासिक काळातील गुहाचित्रे होती, जसे की भीमबेटका गुहा सारख्या ठिकाणी सापडलेली चित्रे. भीमबेटका गुहेत सापडलेल्या काही पाषाण युगातील चित्रे अंदाजे दहा हजार वर्षे जुनी आहेत. + +भारतातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध साहित्यात अनेक राजवाडे आणि चित्रांनी सजवलेल्या इतर इमारतींचे उल्लेख आहेत, परंतु अजिंठा लेण्यांमधील जी काही चित्रे जिवंत आहेत त्यापैकी सर्वात लक्षणीय आहेत. पांडुलिपीत लहान प्रमाणात चित्रकलेचा सराव कदाचित या काळात केला गेला होता, जरी सर्वात जुने अस्तित्व मध्ययुगीन काळातील आहे. जुन्या भारतीय परंपरांसह पर्शियन लघुचित्राचे मिश्रण म्हणून मुघल काळात एक नवीन शैली उदयास आली आणि १७ व्या शतकापासून तिची शैली सर्व धर्मांच्या भारतीय रियासतांमध्ये पसरली, प्रत्येकाने स्थानिक शैली विकसित केली. ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश ग्राहकांसाठी कंपनी पेंटिंग्ज बनवली गेली. तसेच त्यांनी १९ व्या शतकापासून पाश्चात्य धर्तीवर कला शाळा देखील सुरू केल्या. यामुळे आधुनिक भारतीय चित्रकला झाली, जी अधिकाधिक आपल्या भारतीय मुळांकडे परत येत आहे. + +पटुआचे पटुआ संगीताचे प्रदर्शन, पटचित्र स्क्रोलसह, कोलकाता +भारतीय चित्रांचे स्थूलमानाने म्युरल्स, लघुचित्रे आणि कापडावरील चित्रे असे वर्गीकरण करता येते. अजिंठा लेणी आणि कैलाशनाथ मंदिराप्रमाणेच भित्तीचित्रे ही भक्कम वास्तूंच्या भिंतींवर साकारलेली मोठी कामे आहेत. कागद आणि कापड यांसारख्या नाशवंत साहित्यावरील पुस्तके किंवा अल्बमसाठी सूक्ष्म चित्रे फारच कमी प्रमाणात साकारली जातात. भित्तीचित्रांचे अवशेष, फ्रेस्को सारख्या तंत्रात, भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरसह अनेक ठिकाणी टिकून आहेत, किमान 2,000 वर्षे मागे जात आहेत, परंतु अजिंठा लेणीतील पहिले आणि ५ व्या शतकातील अवशेष सर्वात लक्षणीय आहेत.[२] +कापडावरील चित्रे बहुतेक वेळा लोककला म्हणून अधिक लोकप्रिय संदर्भात तयार केली जात होती. उदाहरणार्थ, राजस्थानातील भोपस आणि चित्रकथी यासारख्या महाकाव्यांचे प्रवासी पाठक वापरतात आणि तीर्थक्षेत्रांच्या स्मरणिका म्हणून विकत घेतात. २०० वर्षांहून जुने असलेले फार थोडे जिवंत आहेत, परंतु हे स्पष्ट आहे की परंपरा खूप जुन्या आहेत. काही प्रादेशिक परंपरा अजूनही कामे निर्माण करत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14485.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..669008375bf185fd0d4e278b6d22214615e530cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14485.txt @@ -0,0 +1,38 @@ +भारतीय राज्यव्यवस्थेनुसार भारत देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ६४० जिल्हे होती, तर २००१ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ५९३ जिल्ह्याची नोंद करण्यात आली होती. शासनाकडून या जिल्ह्यांच्या प्रशासनासाठी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते, जसे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर.[१] आणि जिल्हा हा पुन्हा उपविभाग, तालुका, तहसील आणि मंडळ यामध्ये विभागला जातो. +आंध्र प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २६ +अरुणाचल प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या आसाम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या बिहार राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या छत्तीसगढ राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या गोवा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या गुजरात राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या हरियाणा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या झारखंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या कर्नाटक राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३१ जिल्हे आहेत. यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. +त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप. +केरळ राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या मध्यप्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ५२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारतातील महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३६ जिल्हे आहेत. ही जिल्हे पाच मुख्य विभागामध्ये विभागली आहेत त्यांवर एक दृष्टिक्षेप. + +भारताच्या मणिपूर राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १६ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या मेघालय राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या मिझोरम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या नागालॅंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १५ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या ओडिशा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३० जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या पंजाब राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या राजस्थान राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या सिक्किम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ६ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या तमिळनाडू राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या तेलंगणा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.[९] +भारताच्या त्रिपुरा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ७५ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या उत्तराखंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १७ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या सिक्किम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या अंदमान आणि निकोबार मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या जम्मू आणि काश्मीर मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत २० जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या लडाख मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत २ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या लक्षद्वीप मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत १ जिल्हा आहे. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +दिल्ली मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. +भारताच्या पुडुचेरी मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14486.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6184d383fac76370733891a4eeb11b46db1d8f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14486.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतीय आयुर्विमा महामंडळ (रोजच्या वापरातील संक्षेपः एलआयसी; इंग्लिश: Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी ,१९२८ मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला. १९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले . १९ जून १९५६ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ला एल आय सीची स्थापना करण्यात आली .एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत. +गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सीची मक्तेदारी राहिली आहे . +मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात. +उद्देश ; +-जीवन विम्याचा प्रसार सर्वत्र ,विशेषतः ग्रामीण भागात करणे ,जेणेकरून देशातील प्रत्येक विमा उतरविण्यायोग्य व्यक्तीपर्यंत ही सेवा पोहचेल आणि वाजवी दरात त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण देता येईल +योगक्षेमं वहाम्यहम्. ( तुमची समृद्धी ,आमचे कर्तव्य )हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे. +हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा : +अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। +तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ ... भगवद्गीता ९-२२ +अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14504.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d7e9d777d18c7fc2b271722370e5ff0f2df3556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14504.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (संक्षिप्त IIT गांधीनगर किंवा IITH) हे गांधीनगर जिल्ह्यात, गुजरात, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14506.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4989a064ff90293951851a6859b02475d83a7f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14506.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा (संक्षिप्त IIT गोवा किंवा IITG) हे गोवा, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14534.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2a68e03b1bc062cf1b77d87311f97340af73bf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14534.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (दिल्ली) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Delhi) ही दिल्ली येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14535.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88836eac589701321ec83d088d231c8ea17f0c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14535.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, धारवाड (संक्षिप्त IIT धारवाड) हे धारवाड, कर्नाटक, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14538.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a622263f7865b1f302e9f1fe4028ec4bb1ca6940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14538.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (भारतीय खाणी विद्यापीठ) धनबाद (संक्षिप्त IIT- ISM धनबाद) हे धनबाद, झारखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14564.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f209612e19f842c96c62720a138add49ba1372c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14564.txt @@ -0,0 +1,13 @@ +भारतीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे. +चैत्र - चैत्र शुद्ध प्रथमा चैत्र शुद्ध द्वितीया चैत्र शुद्ध तृतीया चैत्र शुद्ध चतुर्थी चैत्र शुद्ध पंचमी चैत्र शुद्ध षष्ठी चैत्र शुद्ध सप्तमी चैत्र शुद्ध अष्टमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध दशमी चैत्र शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध द्वादशी चैत्र शुद्ध त्रयोदशी चैत्र शुद्ध चतुर्दशी चैत्र पौर्णिमा चैत्र वद्य प्रथमा चैत्र वद्य द्वितीया चैत्र वद्य तृतीया चैत्र वद्य चतुर्थी चैत्र वद्य पंचमी चैत्र वद्य षष्ठी चैत्र वद्य सप्तमी चैत्र वद्य अष्टमी चैत्र वद्य नवमी चैत्र वद्य दशमी चैत्र वद्य एकादशी चैत्र वद्य द्वादशी चैत्र वद्य त्रयोदशी चैत्र वद्य चतुर्दशी चैत्र अमावस्या +वैशाख +ज्येष्ठ +आषाढ +श्रावण +भाद्रपद +आश्विन +कार्तीक +मार्गशीर्ष +पौष +माघ +फाल्गुन diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14578.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bacac9f9314ebe2fdb3ec0d961c4e206dd63e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14578.txt @@ -0,0 +1,34 @@ +हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपयाच्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या. +भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे.[१] रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य (रुप्याचे नाणे) किंवा रौप्य (रुपे) या शब्दापासून आला आहे.(रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत.) +पूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती पैसा  असा  नव्हताच एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू दिली जायची ,प्राथमिक स्वरूपात हत्तीचे दात ,प्राण्यांचे केस ,झाडांच्या साली,बिया शंख ,शिंपले इत्यादी पैसा म्हणून वापरले जाऊ लागले ,बक्सरच्या लढाई नंतर सन १७६४-६५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात मोगल बादशाह शाह आलमची नाणी पाडून देण्यास सुरुवात केली. त्यावेळची नाणी हाताने तयार करण्यात येत असत. त्यामुळे ती गोल, साचेबद्ध, एकसारखी नसत. पुढे सन १७९० मध्ये भारत देशात यासाठी मशीन मागविण्यात आले. त्याद्वारे तयार करण्यात आलेली नाणी बरीच सुबक झाली. +भारतात गोल, सुबक, सारख्या वजनाची, प्रमाणित नाणी (Uniform Coinage) तयार करण्याचा मान जेम्स प्रिन्सेप (James Princep) यांना जातो. जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नाणक शास्त्राचे (Numismatics) जनक मानले जाते. त्यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभ्यास करून भारतीय नाणी साचेबद्ध आणि सारख्या वजनाची असावीत म्हणून एक अहवाल तयार केला आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठविला. तो अहवाल मंजूर झाला आणि प्रिन्सेप यांनी पाठविलेल्या सहा नमुन्यांपैकी एक मंजूर करण्यात आला. त्या पहिल्या नाण्यावर तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा होती. तेव्हापासून भारतीय नाणी यंत्रांद्वारे तयार करण्यात येऊ लागली. प्रिन्सेप यांनीच भारतात वजन आणि मापे प्रमाणित असावीत (Standard Weights & Measures) म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला. तोही अहवाल मंजूर होऊन भारतात वजन आणि मापे प्रमाणित झाली. +या सोबतच कोणते नाणे कुठे तयार करण्यात आले ते समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खूण (मिंट मार्क) करण्यात येऊ लागली. अशी खूण पाहून नाणी जमा करणे हा या छंदातला एक महत्त्वाचा भाग समजला जातो. +सन १८३३-३४ पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे (१) बंगाल, (२) मुंबई आणि (३) मद्रास या प्रांतात अनेक नवीन टांकसाळी तयार करण्यात आल्या. तांबे, चांदी आणि सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला. +सगळ्यात लहान नाणे म्हणजे १ पै, ३ पैचा १ पैसा, ६ पैसे मिळून १ आणा, १६ आण्यांचा १ रुपया, १५ रुपये म्हणजे १ मोहर (सोन्याचे नाणे) असे प्रमाण ठरविले गेले. त्यावर एका बाजूला राजा/राणीच्या भावमुद्रा (छाप = Obverse side) तर दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) ईस्ट इंडिया कंपनी, नाण्याची किंमत वगैरे माहिती लिहिली जात असे. +ब्रिटिश कालीन भारतीय नाणी दोन मुख्य प्रकारात मोडतात. पहिला काळ सन १८३३ पासून १८५७ पर्यंतचा. या काळातील नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव दिसून येते, तर दुसरा काळ सन १८५७ पासून १९४७ पर्यंतचा. १८५७ साली झालेल्या राष्ट्रीय उठावानंतर कंपनी सरकारचे अधिकार कमी करण्यात आले आणि राज्य सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. त्यामुळे नवीन नाण्यांवरील ईस्ट इंडिया कंपनीचे नाव लुप्त झाले. तर व्हिक्टोरियाची नाणी व्हिक्टोरिया राणी (क्वीन) आणि व्हिक्टोरिया सम्राज्ञी (एम्प्रेस) अशा दोन मुख्य प्रकारांत निघाली. +भारताच्या स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला. एकीकडे सहावे जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० पर्यंत ही नाणी सुरू रहिली. १९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आले. ब्रिटिश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले. आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. १९५७ सालानंतर आणखी बदल करून एक रुपयाचे १०० पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नाण्यांच्या धातू, वजन वगैरे मध्ये वेळोवेळी बदल होत गेले. मुख्य म्हणजे दर्शनी भागावर काहीही फरक झालेले नाहीत. +फुटी कौडी पासून कौडी आली. कौडी पासून दमडी आली.दमडी पासून धेला आला. धेला पासून पाई आली.पाई पासून पैसा आला. पैसा पासून आणा आला. आणा पासून रुपया आला. + +जुनी भारतीय चलन प्रणाली कशी मोजले जात होती ते खालील विभक्तीकरणा वरून लक्षात येईल +फुटकी कवडी - कवडी + +कवडी- दमडी +दमडी- धेला +ढेला - पाई +पाई - पैसा +पैसा- रुपया +२५६ दमडी= १९२ पाई= १२८ ढेला= ६४ पाई= १६ आणे= १ रुपया +यातील आणि पद्धती पन्नासच्या दशकानंतर बाद केली जाऊ पैसे पद्धत सुधारण्यात आली व १०० पैशाचा एक रुपया अशी मोजदाद होऊ लागली +भारतात रुपयास प्रत्येक प्रांतात विविध स्थानिक नावांनी संबोधले जाते: + + +भारतीय रुपयासाठी प्रतीकचिन्ह (₹) तयार करण्यात आले आहे. डी.उदयकुमार या आय आय टीच्या विद्यार्थ्याने केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली.[२] या प्रतीकचिन्हाच्या वापराने,भारतीय रुपयाला जागतिक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळणार आहे.दिनांक १५ जुलै २०१० रोजी झालेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली.आयएसओ-आयईसी १०६४६ व आयएस १३१९४ याअंतर्गत युनिकोडित केल्यावर हे प्रतीकचिन्ह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारासाठी उपयोगात आणले जाईल. रुपया अशा रीतीने चिन्हांकित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये यास स्थान दिले जाईल.[३] +२००५ साली बनवली जाणारी चलने (नाणी व नोटा) खालीलप्रमाणे आहेत: +सध्या ५ रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत. +भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय[४] +नोव्हेंबर २०१६मध्ये मोदी सरकारने त्याकाळी चलनात असलेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा रातोरात रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याऐवजी ५०० रुपयांची नवीन नोट व २,००० रुपयांची नोट चलनात आणली गेली. +येथील चित्रे ०.७ पिक्सेल प्रति मिलिमीटर, या प्रमाणात चित्रित केलेली आहे. हे प्रमाण जगातील सर्व चलनी नोटांच्या बाबतीत लागू होते. +२०१६मध्ये वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ :०० वाजल्या पासून रद्द केल्या गेल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचे जाहीर केले गेले. +खालील चलने नाण्यांच्या रूपांत वापरली जातात: +पहा : जुने भारतीय चलन +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14603.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f213da556c9cd4ef919f6d141d786406dedf98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14603.txt @@ -0,0 +1,34 @@ +मूलभूत हक्क +कार्यकारिणी: +राष्ट्रपती +उपराष्ट्रपती +पंतप्रधान +मंत्रीमंडळ +संसद: +राज्यसभा +लोकसभा +चेअरमन +अध्यक्ष +न्यायव्यवस्था: +सर्वोच्च न्यायालय +सरन्यायाधीश +उच्च न्यायालये +राज्यस्तरीयपक्ष +राष्ट्रीय आघाड्या: +डावी आघाडी +राष्ट्रीय लोकशाही आघाडी +विधान सभा +विधान परिषद +पंचायत +ग्राम पंचायत +पंचायत समिती +भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकार चे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे. +पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. +नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत. +भारताला १९४७ साली [ ब्रिटिश भारत ]ब्रिटिश राजवटीपासून भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने युनायटेड किंग्डम ब्रिटनमधील संसदीय प्रजासत्ताक ह्या प्रकारच्या सरकारचे अंगीकरण केले. ह्यामध्ये राष्ट्रप्रमुखाला केवळ औपचारिक अधिकार असून बव्ह्ंशी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानाद्वारे घेतले जातात. +भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो. +भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. +पंतप्रधानपद ग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधानाला राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये खालील शपथा घ्याव्या लागतात: (इंग्लिश मजकूर) +पदाची शपथ: +I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as prime minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.गुप्ततेची शपथ: +I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as prime minister for the Union except as may be required for the due discharge of my duties as such Minister.पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते व त्यात वेळोवेळी बदल केले जातात. जुलै २०१२ मध्ये पंतप्रधानाचे मासिक वेतन ५०००० व भत्ते ह्यांची रक्कम एकूण १६०००० (१.६ लाख) इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14645.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16022208313ccbf9e9d6773976570b6e82459178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14645.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1465.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4aacd51cfc11e505e1861e55dfeac9d27173f9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1465.txt @@ -0,0 +1,38 @@ +प्रवीण कल्याण आम्रे. +२८ मे, इ.स. २०१२ +दुवा: क्रिकैंफो ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14651.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16022208313ccbf9e9d6773976570b6e82459178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14651.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14661.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16022208313ccbf9e9d6773976570b6e82459178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14661.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14671.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7f7b1a43e85b7b84d4da916be2d5c5f41acd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14671.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.  +हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.  + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे. +संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत. +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत +३ विद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14673.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7f7b1a43e85b7b84d4da916be2d5c5f41acd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14673.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.  +हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.  + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे. +संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत. +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत +३ विद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14675.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..698e681875f3a08e3c37cb6e12cf1c1aa3866a32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14675.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुटबॉल हा भारतातील तीन सर्वाधिक लोकप्रिय सांघिक खेळांपैकी एक आहे.[१] +एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने इंडियन सुपर लीगला भारतातील अधिकृत फुटबॉल स्पर्धा असल्याची मान्यता दिलेली आहे.[२] +भारतातील राज्य फुटबॉल संघटना आणि सरकारी संस्था संतोष ट्रोफी या स्पर्धेत भाग घेतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14691.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01b06200b48eb35c52749d902c7b0f4659529b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14691.txt @@ -0,0 +1,70 @@ +मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात. +मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14697.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9031eebe56df103183a086085e0cd829581d8fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14697.txt @@ -0,0 +1,6 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला वुमन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते,[८] महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. +२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. +या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14708.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ec0ef20b2ca25760a189b5da93570fa9ce42885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14708.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताच्या महिला क्रिकेट संघाने २०१४ च्या हंगामात इंग्लंडचा दौरा केला होता जिथे त्यांनी इंग्लंडला एका कसोटीत पराभूत केले होते.[१] २००६ नंतर भारताची ही पहिलीच कसोटी होती आणि इंग्लंडविरुद्धचा त्यांचा दुसरा विजय होता.[२][३] +तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील होती जी २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. तिसरा सामना वाया गेल्याने इंग्लंडने मालिका २-० ने जिंकली.[४][५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14749.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9031eebe56df103183a086085e0cd829581d8fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14749.txt @@ -0,0 +1,6 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला वुमन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते,[८] महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. +२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. +या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14774.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfb673076c4e9e634425229ebe14a827b5514373 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14774.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय योगशास्त्रा मध्ये योगाचे पाच प्रकार सांगितले आहेत. +पतंजलींनी योगाचा अर्थ चित्ताच्या वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) असा सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ भाग अथवा अंगे आहेत. ती खालील प्रमाणे आहेत:- +योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे - योग हा देह आणि चित्त यांची ओढाताणीमध्ये मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्मदर्शना पासून वंचित रहाण्यापासून वाचवतो. +• चित्तवृत्तींचा निरोध (दमनाने)नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे हा होय. +• योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे हा होय. +• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमद्ध्ये - महाभारत, उपनिषदे, पतञ्जलींचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका यांमध्ये मिळतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14799.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed16b6c951f2bfb2a63e007bf2a877e58000e0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14799.txt @@ -0,0 +1 @@ +२००२ मधील भारतीय राष्ट्रपती निवडणूकांमध्ये, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली, ते हे प्रतिष्ठित पद भूषवणारे देशातील पहिले शास्त्रज्ञ बनले. त्यांच्या उमेदवारीला राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची आणि प्रामाणिकपणाची देशाची पावती दिसून आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_148.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7036be604ddb6719ac57ad9f4bc2ce722120d0cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_148.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ग्रेगोरी सातवा (लॅटिन: ग्रेगोरियस; इटालियन: ग्रेगोरियो) (इ.स. १०१५/इ.स. १०२८ - मे २५, इ.स. १०८५) हा एप्रिल २२, इ.स. १०७३ ते मृत्युपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव इल्देरब्रांदो दा सोआनो होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14802.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c3002a53369e0267a9c03207b3a3d61ed1e23c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14802.txt @@ -0,0 +1,10 @@ +डॉ. राजेंद्र प्रसाद +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस +डॉ. राजेंद्र प्रसाद +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस +भारतीय निवडणूक आयोगाने २ मे १९५२ रोजी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेतल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेंद्र प्रसाद हे ५०७,४०० (८३.८१%) मतांसह या निवडणूकीत विजयी झाले. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता मात्र ४ अपक्ष उमेदवार ह्या निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार के. टी. शहा यांना ९२,८२७ (१५.३%) मते मिळाली होती.[१][२] डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांनी १३ मे १९५२ रोजी भारताचे पहिले निर्वाचित राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. +भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर डाॅ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान सभेने देशासाठी संपूर्णपणे नवीन राज्यघटना केली आणि ती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली आणि भारत प्रजासत्ताक बनला. राजा आणि गव्हर्नर जनरलची कार्यालये भारताच्या राष्ट्रपतींच्या नवीन कार्यालयाने बदलली. डॉ. राजेंद्र प्रसाद हे १९४६ पासून संविधान सभेचे अध्यक्ष होते. घटनेच्या अस्थायी व संक्रमणी तरतुदींनुसार राष्ट्रपती पदासाठी संविधानानुसार रीतसर निवडणूक होईपर्यंत घटना समितीने तिचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत राष्ट्रपती म्हणून निवडले. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना पहिले भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रस्तावित केले होते आणि वल्लभभाई पटेल यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. इतर कोणतेही नामांकन नसल्यामुळे राजेंद्र प्रसाद यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी विधिवत निवडले गेले आहे असे असेंब्लीचे सचिव, एच.व्ही.आर. आयंगार यांनी घोषित केले. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या प्रजासत्ताक दिनी, भारताचे गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी, भारताचे सरन्यायाधीश हरिलाल कानिया यांच्या उपस्थितीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ दिली. +१९५१-१९५२ या दरम्यान झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ४८९ पैकी ३६४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी काँग्रेस उमेदवार असणे ही एकमेव अट होती. या निवडणुकीनंतर नवीन प्रतिनिधी संसदेत आले आणि पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणुक घेण्यात आली. १९५१ मध्ये राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू हिंदू कोड बिलांबाबत एकमेकांच्या विरोधात होते. तरीपण इतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे राजेंद्र प्रसाद यांनाच काॅंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. +राजकीयदृष्ट्या तटस्थ व्यक्ती अध्यक्ष व्हावी, असे मानत असल्याने इतर पक्षांनी प्राध्यापक अपक्ष उमेदवार केटी शहा यांना पाठिंबा दिला. प्राध्यापक शाह हे कामगार संघटनांशी संबंधित होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले होते. १९१४ पासून ते मुंबईत वकिली करत होते. प्रोफेसर शाह १९३८ मध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्यही होते. ते संविधान सभेचेही सदस्य होते. शाह हे अर्थशास्त्रज्ञ व गुजराती नाटककारही होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेत अनेक दुरुस्त्यांचे प्रस्ताव मांडले होते, त्यातील बहुतांश फेटाळण्यात आले. परंतु, काही मंजूरही करण्यात आले. त्यांना राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द हवा होता. यासाठी त्यांनी दोनदा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. नंतर इंदिरा गांधींनी घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला. +तिसरे उमेदवार लक्ष्मण थाटे हे हिंदू महासभेशी संबंधित होते, परंतु ह्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून लढवत होते. चौथे अपक्ष उमेदवार चौधरी हरी राम हे पुढील दोन निवडणुकांमध्येही उभे राहिले होते. दोनदा त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम त्यांनी केले. १९२३ मध्ये त्यांनी जमीनदार पक्षाची स्थापना केली होती. चौथे अपक्ष उमेदवार कृष्णकुमार चटर्जी हे कोलकाता येथील होते. +या निवडणुकीत राजेंद्र प्रसाद यांना ५०७,४०० मते मिळाली, तर केटी शहा यांना केवळ ९२,८२७ मते मिळाली. या आधी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये सगळीकडेच काॅंग्रेसने चांगलाच विजय मिळवला असल्याने राजेंद्र प्रसाद यांचा विजय निवडणुकीआधीच निश्चित होता. त्यामुळे असे घडले की काँग्रेसच्या ६५ खासदार आणि ४७९ आमदारांनी मतदानच केले नाही. नंतर असे सांगण्यात आले की राजेंद्र प्रसाद यांचा विजय निश्चित असल्याने अनेकांनी मतदान करण्याची तसदीच घेतली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14824.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5834d7d51df4bc893d57fc62b5b9bbce4f38b5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14824.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ किंवा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC किंवा काँग्रेस)ची विद्यार्थी शाखा आहे, जी ९ एप्रिल १९७१ रोजी स्थापन करण्यात आली. केरळ विद्यार्थी संघ आणि पश्चिम बंगाल राज्य छात्र परिषद यांचे विलीनीकरण करून या संघटनेची स्थापना इंदिरा गांधी यांनी केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14830.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1067b238aa67a7e48df632a84ecd8af74ac2edf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14830.txt @@ -0,0 +1,30 @@ + +भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात बनली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा १७७३ सालापर्यंतचा एक मोठा इतिहास सापडला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे की इतर अनेक देशांप्रमाणेच, चलन आणि विनिमय संबंधी बाबी जसे की आर्थिक मानक आणि विनिमय दराच्या प्रश्नावर बँकिंग, विशेषतः केंद्रीय बँकिंग या विषयापेक्षा जास्त लक्ष दिले गेले. +तसेच, बऱ्याच काळासाठी चलन आणि बँकिंगमधील आंतर-कनेक्शन व्यापक प्रमाणात आकलन झालेला दिसत नाही.यासाठी संसदेत ६ मार्च १९३४ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते. +रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात. भारतीय रिझर्व बँक ने भारतातील पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे नियमन करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना त्यांच्या विशेष विभागांपैकी एक म्हणून केली. ठेवींचा विमा आणि सर्व भारतीय बँकांना पत सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने आरबीआयने आपल्या विशेष विभागांपैकी एक म्हणून ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशनची स्थापना केली. +२०१६ मध्ये चलनविषयक धोरण समितीची स्थापना होईपर्यंत, देशातील चलनविषयक धोरणावरही तिचे पूर्ण नियंत्रण होते. १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ नुसार त्याचे कामकाज सुरू झाले. मूळ भागभांडवल १०० समभागांमध्ये विभागले गेले होते जे प्रत्येकी पूर्ण भरलेले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. +भारतीय रिझर्व बँकची एकंदर दिशा २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळाकडे असते, ज्यात: गव्हर्नर; चार डेप्युटी गव्हर्नर; दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी (सामान्यत: आर्थिक व्यवहार सचिव आणि वित्तीय सेवा सचिव); दहा सरकारने नामनिर्देशित संचालक; आणि चार संचालक जे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीसाठी स्थानिक मंडळांचे प्रतिनिधित्व करतात. या प्रत्येक स्थानिक मंडळामध्ये प्रादेशिक हितसंबंधांचे आणि सहकारी आणि देशी बँकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारे पाच सदस्य असतात. +ही एशियन क्लियरिंग युनियनची सदस्य बँक आहे. बँक आर्थिक समावेशन धोरणाला चालना देण्यासाठी देखील सक्रिय आहे आणि आर्थिक समावेशासाठी आघाडीची (AFI) सदस्य आहे. बँकेला अनेकदा 'मिंट स्ट्रीट' या नावाने संबोधले जाते. +१२ नोव्हेंबर २०२१ रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीचा विस्तार करणे आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे दोन नवीन योजना सुरू केल्या. दोन नवीन योजनांमध्ये आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व बँक रिटेल डायरेक्ट योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी सिक्युरिटीजमध्ये सहज गुंतवणूक करण्यासाठी लक्ष्यित करते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांचे सरकारी सिक्युरिटीज खाते विनामूल्य उघडण्याची आणि देखरेख करण्याची परवानगी मिळेल. भारतीय रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे उद्दिष्ट मध्यवर्ती बँकेद्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणेत आणखी सुधारणा करणे आहे. +भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत: +उद्दीष्ट: विकासाचे उद्दीष्ट लक्षात ठेवून किंमतीची स्थिरता राखणे. +उद्दीष्ट: प्रणालीवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि लोकांना कमी खर्चात बँकिंग सेवा प्रदान करणे. परकीय विनिमय व्यवस्थापक +उद्दीष्ट: बाह्य व्यापार आणि पेमेंट सुलभ करणे आणि भारतातील परकीय चलन बाजाराची सुव्यवस्थित विकास आणि देखभाल वाढवणे. +उद्देशः जनतेला चलन नोटा आणि नाण्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे आणि चांगल्या प्रतीमध्ये देणे. +उद्दीष्ट: पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर लोकांचा विश्वास कायम ठेवा‌. +१ एप्रिल इ.स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली . भारतीय रिझर्व बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. ह्या बँकेची संस्थापना १९२६ च्या राॅयल संस्थेच्या शिफारसेच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह - म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होत.पण त्या चिन्हात बदल करण्यात आले आणि सिंहा ऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणि वाघ याचा चिन्हात समावेश झाला. प्रधान कार्यालय सर्वोत्तम बाबी चलन आणि क्रेडिट प्रणाली ऑपरेट चलन जारी नियमन, भारतातील आर्थिक चलनाची स्थिरता सुरक्षित साठा ठेवणे आणि सामान्यतः असे त्याच्या कामे वर्णन होते. कलकत्ता (आता कोलकाता) मध्ये स्थापन, पण १९३७ मध्ये बॉम्बे (आता मुंबई) करण्यात आले आहे. रिझर्व बँकेलाही, ब्रह्मदेश मध्यवर्ती बँकेच्या नात्याने ब्रह्मदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून (१९४२-४५) काम करत होती. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर १९३५. भारतीय केंद्रीय पासून बँके स्टेट बँक ऑफ पाकिस्तान साठी जून १९४८ पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केले. रिझर्व बँकेचे १९४९ मध्ये भारत सरकार द्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे. +१९५० मध्ये भारत सरकारने पहिल्या तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अंतर्गत कृषी क्षेत्राचा लक्ष केंद्रित एक मध्यवर्ती नियोजित आर्थिक धोरण विकसित केले आहे. प्रशासन व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि १९४९ बँकिंग कंपनी कायदा आधारित स्थापन रिझर्व्ह बँकेने एक भाग म्हणून मध्यवर्ती बँक नियम (नंतर बँकिंग नियमन अधिनियम म्हणतात). शिवाय, मध्यवर्ती बँक कर्ज आर्थिक योजना समर्थन करण्यासाठी आदेश दिले होते. +बँक क्रॅश एक परिणाम म्हणून, रिझर्व्ह स्थापन ठेव विमा प्रणाली निरीक्षण विनंती केली आहे. राष्ट्रीय बँक प्रणाली विश्वास परत करणे आवश्यक आहे आणि डिसेंबर १९६१ भारतीय सरकारने अर्थव्यवस्था प्रोत्साहन निधी आढळले आणि घोषणा "विकास बँकिंग" वापरले ७ सुरू होते. भारत सरकारने राष्ट्रीय बँक बाजार चेहरामोहरा बदलला, आणि संस्था भरपूर राष्ट्रीयकृत. एक परिणाम म्हणून, रिझर्व्ह बँक नियंत्रण आणि या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील पाठिंबा मध्यवर्ती भागात खेळायला जावं लागलं. +१९६९ मध्ये इंदिरा गांधी व्यवहारी सरकार १४ मोठी व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. १९८० मध्ये आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते गांधी यांनी परत आल्यावर. अर्थव्यवस्था आणि विशेषतः आर्थिक क्षेत्रातील नियमन १९७० मध्ये भारत सरकारने पुनरावृत्ती होते आणि १९८०. मध्यवर्ती बँक केंद्रीय प्लेअर ठरला आहे आणि रूची, राखीव निधीचे प्रमाण आणि दृश्यमान ठेवी सारखे कार्ये भरपूर त्याच्या धोरणे वाढ झाली आहे. या उपाययोजना चांगले आर्थिक विकास उद्देश आणि संस्था कंपनी धोरण एक प्रचंड प्रभाव होता. बँका निवडले क्षेत्रात पैसा दिला आहे शेती व्यवसाय आणि लहान व्यापार कंपन्या. +शाखा गावात प्रत्येक नव्याने स्थापन कार्यालय देशात दोन नवीन कार्यालये स्थापन करणे भाग होते. +१९७३ मध्ये तेल धोके महागाई वाढते परिणाम, रिझर्व्ह बँक आणि प्रभाव कमी करण्यासाठी चलनविषयक धोरण रोखले. +समित्या भरपूर १९८५ आणि १९९१ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था विश्लेषण त्यांचे परिणाम आरबीआय एक प्रभाव होता. औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना, डेव्हलपमेंट रिसर्च आणि भारत सुरक्षा & एक्स्चेंज बोर्ड इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ बोर्ड संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्था तपास सुरक्षा आणि विनिमय बोर्ड आणि अधिक प्रभावी बाजारात चांगले पद्धती गुंतवणूकदार हितसंबंधांना संरक्षण प्रस्तावित . भारतीय आर्थिक बाजारात त्यामुळे-म्हणतात "आर्थिक दडपशाही" साठी आणि शॉ. या सवलत आणि भारतीय वित्त एप्रिल, १९८८ मध्ये आर्थिक बाजारात त्याचे कार्यान्वित झाला एक अग्रगण्य उदाहरण होते; जुलै १९८८ मध्ये स्थापना केली नॅशनल हाऊसिंग बँक, मालमत्ता बाजारात गुंतवणूक करणे भाग होते आणि एक नवीन आर्थिक कायदा अधिक सुरक्षा उपाय आणि उदारीकरण थेट ठेव अष्टपैलुत्व सुधारली. +भारतीय रुपया चलन गमावले १८% अमेरिकन डॉलर नातेवाईक म्हणून राष्ट्रीय अर्थव्यवस्था जुलै १९९१ मध्ये संकुचन आणि समिती ऐहिक कमी राखीव निधीचे प्रमाण तसेच वैधानिक तरलता प्रमाण आर्थिक क्षेत्रातील पुनर्रचनेचे कार्य सल्ला दिला. नवीन मार्गदर्शक तत्त्वे खाजगी बँकिंग क्षेत्रातील स्थापन करण्यासाठी १९९३ मध्ये प्रसिद्ध झाले. या टर्निंग पॉईंट बाजार अधिक मजबूत करणे आवश्यक आहे आणि अनेकदा मूळ कशात आहे असे म्हणतात. मध्यवर्ती बँकेच्या आवडी आणि विश्वास आणि मालमत्ता बाजारात वित्तीय बाजारात काही क्षेत्रात नियंत्रणमुक्त. या पहिल्या टप्प्यात एक यशस्वी होता आणि केंद्र सरकारने १९९८ मध्ये मालक संरचना भांडवल गुंतवणे एक विविधता उदारीकरण भाग पाडले. +भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराचा जून १९९४ मध्ये व्यापार घेतला आणि भारतीय रिझर्व्ह बँक त्यांची राजधानी बेस अधिक मजबूत करण्यासाठी भांडवल बाजारात संवाद साधता जुलै राष्ट्रीयकृत बँका परवानगी दिली. मध्यवर्ती बँक उपकंपनी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक टीप खाजगी उत्पादन स्थापना केली मर्यादित-३ फेब्रुवारी १९९५. +विदेशी विनिमय व्यवस्थापन १९९९ पासून कायदा जून २००० मध्ये अंमलात आला तो २००४-२००५ (नॅशनल इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण) आयटम सुधारणा केली पाहिजे. इंडिया लिमिटेड, नऊ संस्था एक विलीनीकरण, सुरक्षा मुद्रण आणि कॉर्पोरेशन २००६ मध्ये स्थापना केली आणि नाणी निर्माण होते. +राष्ट्रीय आर्थिक विकास दर २००८-२००९ च्या शेवटच्या तिमाहीत ५.८% पर्यंत खाली आले आणि मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक विकास चांगला होतो. +भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात. +सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. +त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले. +आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत. +नुकताच, दि. ०४-०९-२०१६ला उर्जीत पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये शक्तिकान्त दास हे आर बी आयचे २५ वे गव्हर्नर झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14832.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1067b238aa67a7e48df632a84ecd8af74ac2edf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14832.txt @@ -0,0 +1,30 @@ + +भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात बनली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा १७७३ सालापर्यंतचा एक मोठा इतिहास सापडला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे की इतर अनेक देशांप्रमाणेच, चलन आणि विनिमय संबंधी बाबी जसे की आर्थिक मानक आणि विनिमय दराच्या प्रश्नावर बँकिंग, विशेषतः केंद्रीय बँकिंग या विषयापेक्षा जास्त लक्ष दिले गेले. +तसेच, बऱ्याच काळासाठी चलन आणि बँकिंगमधील आंतर-कनेक्शन व्यापक प्रमाणात आकलन झालेला दिसत नाही.यासाठी संसदेत ६ मार्च १९३४ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते. +रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात. भारतीय रिझर्व बँक ने भारतातील पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे नियमन करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना त्यांच्या विशेष विभागांपैकी एक म्हणून केली. ठेवींचा विमा आणि सर्व भारतीय बँकांना पत सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने आरबीआयने आपल्या विशेष विभागांपैकी एक म्हणून ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशनची स्थापना केली. +२०१६ मध्ये चलनविषयक धोरण समितीची स्थापना होईपर्यंत, देशातील चलनविषयक धोरणावरही तिचे पूर्ण नियंत्रण होते. १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ नुसार त्याचे कामकाज सुरू झाले. मूळ भागभांडवल १०० समभागांमध्ये विभागले गेले होते जे प्रत्येकी पूर्ण भरलेले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. +भारतीय रिझर्व बँकची एकंदर दिशा २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळाकडे असते, ज्यात: गव्हर्नर; चार डेप्युटी गव्हर्नर; दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी (सामान्यत: आर्थिक व्यवहार सचिव आणि वित्तीय सेवा सचिव); दहा सरकारने नामनिर्देशित संचालक; आणि चार संचालक जे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीसाठी स्थानिक मंडळांचे प्रतिनिधित्व करतात. या प्रत्येक स्थानिक मंडळामध्ये प्रादेशिक हितसंबंधांचे आणि सहकारी आणि देशी बँकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारे पाच सदस्य असतात. +ही एशियन क्लियरिंग युनियनची सदस्य बँक आहे. बँक आर्थिक समावेशन धोरणाला चालना देण्यासाठी देखील सक्रिय आहे आणि आर्थिक समावेशासाठी आघाडीची (AFI) सदस्य आहे. बँकेला अनेकदा 'मिंट स्ट्रीट' या नावाने संबोधले जाते. +१२ नोव्हेंबर २०२१ रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीचा विस्तार करणे आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे दोन नवीन योजना सुरू केल्या. दोन नवीन योजनांमध्ये आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व बँक रिटेल डायरेक्ट योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी सिक्युरिटीजमध्ये सहज गुंतवणूक करण्यासाठी लक्ष्यित करते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांचे सरकारी सिक्युरिटीज खाते विनामूल्य उघडण्याची आणि देखरेख करण्याची परवानगी मिळेल. भारतीय रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे उद्दिष्ट मध्यवर्ती बँकेद्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणेत आणखी सुधारणा करणे आहे. +भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत: +उद्दीष्ट: विकासाचे उद्दीष्ट लक्षात ठेवून किंमतीची स्थिरता राखणे. +उद्दीष्ट: प्रणालीवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि लोकांना कमी खर्चात बँकिंग सेवा प्रदान करणे. परकीय विनिमय व्यवस्थापक +उद्दीष्ट: बाह्य व्यापार आणि पेमेंट सुलभ करणे आणि भारतातील परकीय चलन बाजाराची सुव्यवस्थित विकास आणि देखभाल वाढवणे. +उद्देशः जनतेला चलन नोटा आणि नाण्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे आणि चांगल्या प्रतीमध्ये देणे. +उद्दीष्ट: पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर लोकांचा विश्वास कायम ठेवा‌. +१ एप्रिल इ.स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली . भारतीय रिझर्व बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. ह्या बँकेची संस्थापना १९२६ च्या राॅयल संस्थेच्या शिफारसेच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह - म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होत.पण त्या चिन्हात बदल करण्यात आले आणि सिंहा ऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणि वाघ याचा चिन्हात समावेश झाला. प्रधान कार्यालय सर्वोत्तम बाबी चलन आणि क्रेडिट प्रणाली ऑपरेट चलन जारी नियमन, भारतातील आर्थिक चलनाची स्थिरता सुरक्षित साठा ठेवणे आणि सामान्यतः असे त्याच्या कामे वर्णन होते. कलकत्ता (आता कोलकाता) मध्ये स्थापन, पण १९३७ मध्ये बॉम्बे (आता मुंबई) करण्यात आले आहे. रिझर्व बँकेलाही, ब्रह्मदेश मध्यवर्ती बँकेच्या नात्याने ब्रह्मदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून (१९४२-४५) काम करत होती. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर १९३५. भारतीय केंद्रीय पासून बँके स्टेट बँक ऑफ पाकिस्तान साठी जून १९४८ पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केले. रिझर्व बँकेचे १९४९ मध्ये भारत सरकार द्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे. +१९५० मध्ये भारत सरकारने पहिल्या तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अंतर्गत कृषी क्षेत्राचा लक्ष केंद्रित एक मध्यवर्ती नियोजित आर्थिक धोरण विकसित केले आहे. प्रशासन व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि १९४९ बँकिंग कंपनी कायदा आधारित स्थापन रिझर्व्ह बँकेने एक भाग म्हणून मध्यवर्ती बँक नियम (नंतर बँकिंग नियमन अधिनियम म्हणतात). शिवाय, मध्यवर्ती बँक कर्ज आर्थिक योजना समर्थन करण्यासाठी आदेश दिले होते. +बँक क्रॅश एक परिणाम म्हणून, रिझर्व्ह स्थापन ठेव विमा प्रणाली निरीक्षण विनंती केली आहे. राष्ट्रीय बँक प्रणाली विश्वास परत करणे आवश्यक आहे आणि डिसेंबर १९६१ भारतीय सरकारने अर्थव्यवस्था प्रोत्साहन निधी आढळले आणि घोषणा "विकास बँकिंग" वापरले ७ सुरू होते. भारत सरकारने राष्ट्रीय बँक बाजार चेहरामोहरा बदलला, आणि संस्था भरपूर राष्ट्रीयकृत. एक परिणाम म्हणून, रिझर्व्ह बँक नियंत्रण आणि या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील पाठिंबा मध्यवर्ती भागात खेळायला जावं लागलं. +१९६९ मध्ये इंदिरा गांधी व्यवहारी सरकार १४ मोठी व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. १९८० मध्ये आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते गांधी यांनी परत आल्यावर. अर्थव्यवस्था आणि विशेषतः आर्थिक क्षेत्रातील नियमन १९७० मध्ये भारत सरकारने पुनरावृत्ती होते आणि १९८०. मध्यवर्ती बँक केंद्रीय प्लेअर ठरला आहे आणि रूची, राखीव निधीचे प्रमाण आणि दृश्यमान ठेवी सारखे कार्ये भरपूर त्याच्या धोरणे वाढ झाली आहे. या उपाययोजना चांगले आर्थिक विकास उद्देश आणि संस्था कंपनी धोरण एक प्रचंड प्रभाव होता. बँका निवडले क्षेत्रात पैसा दिला आहे शेती व्यवसाय आणि लहान व्यापार कंपन्या. +शाखा गावात प्रत्येक नव्याने स्थापन कार्यालय देशात दोन नवीन कार्यालये स्थापन करणे भाग होते. +१९७३ मध्ये तेल धोके महागाई वाढते परिणाम, रिझर्व्ह बँक आणि प्रभाव कमी करण्यासाठी चलनविषयक धोरण रोखले. +समित्या भरपूर १९८५ आणि १९९१ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था विश्लेषण त्यांचे परिणाम आरबीआय एक प्रभाव होता. औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना, डेव्हलपमेंट रिसर्च आणि भारत सुरक्षा & एक्स्चेंज बोर्ड इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ बोर्ड संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्था तपास सुरक्षा आणि विनिमय बोर्ड आणि अधिक प्रभावी बाजारात चांगले पद्धती गुंतवणूकदार हितसंबंधांना संरक्षण प्रस्तावित . भारतीय आर्थिक बाजारात त्यामुळे-म्हणतात "आर्थिक दडपशाही" साठी आणि शॉ. या सवलत आणि भारतीय वित्त एप्रिल, १९८८ मध्ये आर्थिक बाजारात त्याचे कार्यान्वित झाला एक अग्रगण्य उदाहरण होते; जुलै १९८८ मध्ये स्थापना केली नॅशनल हाऊसिंग बँक, मालमत्ता बाजारात गुंतवणूक करणे भाग होते आणि एक नवीन आर्थिक कायदा अधिक सुरक्षा उपाय आणि उदारीकरण थेट ठेव अष्टपैलुत्व सुधारली. +भारतीय रुपया चलन गमावले १८% अमेरिकन डॉलर नातेवाईक म्हणून राष्ट्रीय अर्थव्यवस्था जुलै १९९१ मध्ये संकुचन आणि समिती ऐहिक कमी राखीव निधीचे प्रमाण तसेच वैधानिक तरलता प्रमाण आर्थिक क्षेत्रातील पुनर्रचनेचे कार्य सल्ला दिला. नवीन मार्गदर्शक तत्त्वे खाजगी बँकिंग क्षेत्रातील स्थापन करण्यासाठी १९९३ मध्ये प्रसिद्ध झाले. या टर्निंग पॉईंट बाजार अधिक मजबूत करणे आवश्यक आहे आणि अनेकदा मूळ कशात आहे असे म्हणतात. मध्यवर्ती बँकेच्या आवडी आणि विश्वास आणि मालमत्ता बाजारात वित्तीय बाजारात काही क्षेत्रात नियंत्रणमुक्त. या पहिल्या टप्प्यात एक यशस्वी होता आणि केंद्र सरकारने १९९८ मध्ये मालक संरचना भांडवल गुंतवणे एक विविधता उदारीकरण भाग पाडले. +भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराचा जून १९९४ मध्ये व्यापार घेतला आणि भारतीय रिझर्व्ह बँक त्यांची राजधानी बेस अधिक मजबूत करण्यासाठी भांडवल बाजारात संवाद साधता जुलै राष्ट्रीयकृत बँका परवानगी दिली. मध्यवर्ती बँक उपकंपनी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक टीप खाजगी उत्पादन स्थापना केली मर्यादित-३ फेब्रुवारी १९९५. +विदेशी विनिमय व्यवस्थापन १९९९ पासून कायदा जून २००० मध्ये अंमलात आला तो २००४-२००५ (नॅशनल इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण) आयटम सुधारणा केली पाहिजे. इंडिया लिमिटेड, नऊ संस्था एक विलीनीकरण, सुरक्षा मुद्रण आणि कॉर्पोरेशन २००६ मध्ये स्थापना केली आणि नाणी निर्माण होते. +राष्ट्रीय आर्थिक विकास दर २००८-२००९ च्या शेवटच्या तिमाहीत ५.८% पर्यंत खाली आले आणि मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक विकास चांगला होतो. +भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात. +सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. +त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले. +आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत. +नुकताच, दि. ०४-०९-२०१६ला उर्जीत पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये शक्तिकान्त दास हे आर बी आयचे २५ वे गव्हर्नर झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14836.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a08ddcf2f5f1c90842610846ea95fa8d4192f229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14836.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. बापू चंद्रसेन कांबळे या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14861.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01b06200b48eb35c52749d902c7b0f4659529b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14861.txt @@ -0,0 +1,70 @@ +मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात. +मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14868.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79e06753788a8bbda66af6a66ffe268650e56df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14868.txt @@ -0,0 +1,2 @@ +८ डिसेंबर २०२१ रोजी, भारतीय हवाई दलाद्वारे संचालित एका Mil Mi-17V-5 वाहतूक हेलिकॉप्टर अपघात झाला. तामिळनाडूमधील कोइंबतूर आणि वेलिंग्टन दरम्यान, सुलूर एअर फोर्स स्टेशनवरून निघाल्यानंतर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलप्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य १३ जण होते. +या अपघातात हेलिकॉप्टरमधील तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा एका आठवड्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14870.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac37f2cfe6702ce740e73fc1ae1638c016e2d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14870.txt @@ -0,0 +1,18 @@ +भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.[ संदर्भ हवा ] +नभ:स्पृशं दीप्तम्। +हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा - +नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं +व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । +दृष्ट्वा ही त्वां प्रव्यथितान्तरात्मा +धृतिं न विन्दामि शमंच विष्णो॥ +....भगवद्गीता ११.२४ +---भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले. +अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.[ संदर्भ हवा ] +८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एर फोर्स झाले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली. +सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत. +तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.[ संदर्भ हवा ] + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14901.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b47144ebfdd0ee53c4efcd2f71eef28c50e7e132 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14901.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14924.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8bec21627b8c4d2d7bf46e9f707399e32e047a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14924.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (बोधगया) (Indian Institute of Management Bodh Gaya संक्षिप्त IIM-BG ) हे बोधगया, बिहार, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14937.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..669294143fd4a71f009ced2d42b188f4bac909c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14937.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (काशीपूर) (Indian Institute of Management Kashipur संक्षिप्त IIM-Kashipur ) हे काशीपूर, उत्तराखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2011 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + संस्थेमार्फत खालील कार्यक्रम प्रदान केले जातात. + 2020 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे IIM काशीपूरला भारतात 33 वा क्रमांक देण्यात आला.[२] + अग्नित्रय हा IIM काशीपूरचा वार्षिक प्रमुख कार्यक्रम आहे. हा तीन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन महोत्सव आहे ज्यामध्ये व्यवस्थापन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांचा समावेश आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14947.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c22e9b7dcd1a3396717e683ca7536e0b36a8172c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14947.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (रांची) ( संक्षिप्त IIM-Ranchi ) हे रांची, झारखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2010 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14950.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..923a48231a5fa6258fd661925e32ec0ef3bfbccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14950.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (लखनौ) (संक्षिप्त IIM-L ) हे लखनौ, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1984 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14971.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0abc30d7be2b3662cd2ab420c3dade446948c19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14971.txt @@ -0,0 +1,423 @@ +भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले. +भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९३५ मध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी बनली, सी. राजगोपालाचारी १५ नोव्हेंबर १९३९. रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठविला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट १९४० मध्ये हे मान्य केले. +८ ऑगस्ट १९४० रोजी राज्यपाल-जनरल कार्यकारी परिषद आणि युद्ध सल्लागार. +परिषद स्थापना याबद्दल व्हायसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी एक विधान केले. ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑफरमध्ये अल्पसंख्यांकांच्या मतांना पूर्ण वजन देण्यात आले आणि भारतीयांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. १९४६ च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत संविधानसभेसाठी प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा संविधानसभेने तयार केला आणि त्याची अंमलबजावणी १ मे १९४६ रोजी कॅबिनेट मिशन योजनेंतर्गत करण्यात आली. संविधान सभा सदस्य प्रांतीय संमेलनाद्वारे एकल, हस्तांतरणीय-मत द्वारे निवडले गेले. प्रमाणिक प्रतिनिधित्व प्रणाली. संविधान सभाचे एकूण सदस्यत्व ३८९ होते, त्यापैकी २९२ राज्यांचे प्रतिनिधी होते,९३ हे संस्थानाचे प्रतिनिधी होते आणि चार दिल्लीचे मुख्य आयुक्त प्रांत, अजमेर-मेरवाडा, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तानचे होते. +ऑगस्ट १९४६ पर्यंत ब्रिटीश भारतीय प्रांतांना देण्यात आलेल्या २९६ जागांसाठी झालेल्या निवडणुका पूर्ण झाल्या. काँग्रेसने २०८ जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने ७३. जागा जिंकल्या. या निवडणुकीनंतर मुस्लिम लीगने काँग्रेसला सहकारण्यास नकार दिला. सप्टेंबर २०१}}} आणि राजकीय परिस्थिती ढासळली. हिंदू-मुस्लिम दंगल सुरू झाली आणि मुस्लिम लीगने भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. ३ जून १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन, भारताच्या शेवटच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने कॅबिनेट मिशन योजनेला भंग करण्याचा आपला हेतू जाहीर केला; याचा शेवट भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ आणि भारत आणि पाकिस्तानच्या स्वतंत्र राष्ट्रांमध्ये झाला. भारतीय स्वातंत्र्य कायदा १८ जुलै १९४७ रोजी संमत झाला आणि जून १९४७ मध्ये भारत स्वतंत्र होईल अशी घोषणा केली गेली असली तरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या घटनेने स्वातंत्र्य मिळवून दिले. संविधान सभा प्रथमच ९ डिसेंबर १९४६ रोजी पुन्हा एकत्र येऊन बैठक झाली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातील ब्रिटिश संसदेच्या अधिकाराच्या सार्वभौम संस्था आणि उत्तराधिकारी म्हणून. फाळणीच्या परिणामी, माउंटबेटन योजनेत, ३ जून १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तानची संविधान सभाची स्थापना केली गेली. पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील प्रतिनिधींनी भारतीय संविधान सभा सदस्य म्हणून काम करणे थांबवले. पश्चिम पंजाब आणि पूर्व बंगाल (जे पाकिस्तानचा एक भाग बनले, जरी पूर्व बंगाल नंतर नंतर] होण्यासाठी बांगलादेश) होण्यासाठी नवीन निवडणुका घेण्यात आल्या; पुनर्रचनेनंतर संविधान सभाचे सदस्यत्व २९९ होते आणि ३१ डिसेंबर १९४७ रोजी त्याची बैठक झाली. +घटनेचा मसुदा वेगवेगळ्या जाती, प्रदेश धर्म, लिंग इत्यादींच्या २९९ प्रतिनिधींनी तयार केला होता. हे प्रतिनिधी ११४ दिवसांपर्यंत ३ वर्षात (२ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांचे) नेमके काय असावेत बसले आणि घटनेत काय असावे आणि काय काय काय कायदे यावर चर्चा केली.. +भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे कारण त्यात इतर देशांच्या घटनांमधील कायद्यांचा समावेश आहे. +अप्रत्यक्षपणे निवडलेल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्यासभेधान सभेची स्थापना भारताच्या घटनेच्या मसुद्यासाठी (आताचे पाकिस्तान आणि बांगलादेशातील स्वतंत्र देशांसह) केली गेली. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षे, भारतातील पहिले संसद. सार्वभौम प्रौढ मताधिकारांच्या आधारे ही विधानसभा निवडली गेली नव्हती आणि मुस्लिम आणि शीख यांना अल्पसंख्याक म्हणून विशेष प्रतिनिधित्व प्राप्त झाले. मुस्लिम लीगने आपली निर्मिती रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर विधानसभेवर बहिष्कार टाकला. मतदार संघाचा एक मोठा भाग काँग्रेस पक्षाकडून एकपक्षीय वातावरणात काढला गेला असला तरी काँग्रेस पक्षाने पुराणमतवादी उद्योगपतींपासून ते कट्टरपंथी मार्क्सवादी ते हिंदू पुनरुज्जीवनवादी अशा विविध मतांचा समावेश केला. +९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत प्रथमच संविधान सभेची बैठक झाली आणि त्याचे शेवटचे अधिवेशन २४ जानेवारी १९५० रोजी झाले.[१] +जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेबाबत आशा व्यक्त केली: +या संमेलनाचे पहिले काम म्हणजे एका नवीन राज्यघटनेच्या माध्यमातून भारत मुक्त करणे, उपासमार लोकांना खायला घालणे, आणि नग्न लोकांना वस्त्रे घालणे आणि प्रत्येक भारतीयाला त्याच्या क्षमतेनुसार स्वत:चा विकास करण्याची संपूर्ण संधी देणे हे या विधानसभेचे पहिले काम आहे. हे नक्कीच एक उत्तम कार्य आहे. आज भारत बघा. आम्ही बऱ्याच ठिकाणी निराशेच्या ठिकाणी बसलो आहोत आणि बऱ्याच शहरांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या भांडणे आणि कलहांद्वारे वातावरणात अधिग्रहण होते ज्याला जातीय त्रास होतो आणि दुर्दैवाने आम्ही कधीकधी त्या टाळू शकत नाही. पण सध्या गरीब आणि उपासमारची समस्या कशी सोडवायची हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जिथे जिथे वळू तिथे आपण या समस्येचा सामना करतो. आम्ही लवकरच ही समस्या सोडवू शकत नसल्यास, आमची सर्व कागद घटने निरुपयोगी आणि निरुपयोगी ठरतील. हा मुद्दा लक्षात घेऊन पुढे ढकला आणि प्रतीक्षा करण्यास कोणी सुचवू शकेल?भारतीय नेते आणि ब्रिटनमधील १९४६ चे कॅबिनेट मिशनच्या सदस्यांमधील वाटाघाटीनंतर संविधान सभा स्थापन झाली तेव्हा भारत अजूनही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. प्रांतिक विधानसभा निवडणुका १९४६ च्या मध्यावर घेण्यात आल्या. संविधान सभा सदस्य अप्रत्यक्षपणे नव्याने निवडलेल्या प्रांतीय असेंब्लीच्या सदस्यांद्वारे निवडले गेले आणि पाकिस्तानचा भाग बनविणाऱ्या प्रांतांसाठी प्रारंभी प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातील काही आता बांग्लादेश मध्ये आहेत. संविधान सभेचे २९९ प्रतिनिधी होते, ज्यात पंधरा +[२] महिला. +अंतरिम सरकारची स्थापना २ सप्टेंबर १९४६ रोजी नवनिर्वाचित मतदार संघातून झाली. काँग्रेस पार्टी यांनी विधानसभेत (बहुतेक ६९ टक्के जागा) आणि बहुतेक जागा मुस्लिम लीग यांनी विधानसभेत राखीव ठेवली होती. मुसलमान. तेथे अनुसूचित जाती महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि युनियनवादी पार्टी सारख्या छोट्या पक्षांचे सदस्यही होते. +जून १९४७ मध्ये सिंध, पूर्व बंगाल, बलुचिस्तान, पश्चिम पंजाब आणि उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत यांचे प्रतिनिधी मंडळे उत्तर पश्चिम फ्रंटियर प्रांत कराची मध्ये बैठक घेऊन पाकिस्तानची संविधान सभा स्थापन करण्यासाठी माघार घेतली. १५ ऑगस्ट १९४७. रोजी भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व स्वतंत्र राष्ट्र बनले आणि कराचीमध्ये माघार न घेतलेल्या संविधान समितीचे सदस्य भारताचे संसद झाले. मुस्लिम लीगचे २८ सदस्य भारतीय विधानसभेत सहभागी झाले आणि नंतर संस्थानिकांची यादी मधून ९३ सदस्य नामित झाले; काँग्रेस पक्षाने बहुमत ८२ टक्के मिळविले. + +९ डिसेंबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले, तेथे २११ सदस्य उपस्थित होते. १९४७ च्या सुरुवातीस, मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी सामील झाले नव्हते आणि संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली. २४ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचा परिणाम झाला ( प्रजासत्ताक दिन ) म्हणून आणि संविधान सभा ही भारताची अस्थायी संसद बनली (१९५२ मध्ये नव्या राज्यघटनेअंतर्गत झालेल्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत सुरू). +भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ अन्वये, संविधान सभा सार्वभौम बनवली व आणि तिला कायदेमंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला. यानुसार संविधान सभेला दोन प्रमुख कार्ये देण्यात आली ती म्हणजे : स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे करणे. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. जेव्हा संविधान सभा संविधान निर्मितीचे कार्य करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करतांना ग.वा. मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असत. +वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली. +डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मुखर्जी हे बंगालमधील ख्रिश्चन आणि कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. विधानसभेच्या अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्षपदी, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यायशास्त्रज्ञ बी.एन. राव विधानसभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले; बी.एन. राव यांनी घटनेचा मूळ मसुदा तयार केला आणि नंतर हेग मधील हेग मधील कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. +संविधान सभेच्या कामाचे पाच टप्पे होते: +संविधान सभेने संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २२ समित्या नेमल्या होत्या. यापैकी आठ प्रमुख समित्या आणि इतर उपसमित्या होत्या. +प्रमुख समित्या +घटनेची अलीकडील काळात टीका केली गेली आहे की घटनात्मक सदस्यांची निवड सार्वभौम मताधिक्याने नव्हे तर उलट ते मुख्यत: काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. असा युक्तिवाद केला जात आहे की काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचे नव्हे तर त्यांची सत्ता भारतीयांच्या हाती हस्तांतरित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. भारतीय संविधान: चमत्कारी, आत्मसमर्पण, आशा, ”या त्यांच्या पुस्तकात राजीव धवन यांनी असा युक्तिवाद केला आहे की राज्यघटना तयार करण्यात भारतीय लोकांचा फारसा विचार नव्हता जो त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. संविधान सभासद हे बहुतेक प्रबळ जातींचे हिंदू पुरुष होते, ज्यांनी शेवटी घटनेतील काही विशिष्ट हिंदू, वर्चस्व-जाती आणि पुरुषप्रधान पक्षांना अंतर्भूत केले. +[३] +[४] +एनी मस्करेन, +ओ.व्ही.अलगेसन, +सौ. अम्मू स्वामीनाथन, +एम.अनंतहासं आयंगर, +मोटुरी सत्यनारायण, +सौ. दक्षयानी वलयुद्धन, +श्रीमती जी. दुर्गाबाई, +कला वेंकटराव, +एन. गोपालास्वामी अय्यंगार, +डी. गोविंदा दास, +रेव्ह. जेरोम डिसोझा, +पी. कक्कन, +टी.एम. कालियानान गौंडर, +के. कामराज, +व्ही.सी. केसावा राव, +टी.टी. कृष्णामचारी, +अल्लादी कृष्णस्वामी अय्यर +एल. कृष्णस्वामी भारती, +पी.कुनिरामन, +मोसालीकांती तिरुमाला राव, +व्ही. आय. मुनुस्वामी पिल्लई, +एम. ए. मुथिय्या चेटियार, +व्ही. नादिमुथु पिल्लई, +एस. नागप्पा, +पी एल एल नरसिंह राजू, +बी. पट्टाभी सितारामाया, +सी. पेरूमलस्वामी रेड्डी, +ट. प्रकाशन, +एस. एच. प्रॅटर, +बॉबीबिलीचा राजा स्वेताचलपती रामकृष्ण रेंगा रोआ, +आर. के. शानमुखम चेट्टी, +ट. उ. रामलिंगम चेतियार, +रामनाथ गोएंका, +ओ.पी.रामास्वामी रेडियार, +एन. जी. रंगा, +नीलम संजीवा रेड्डी, +शेक गॅलिब साहिब, +के. संधानम, +बी. शिवराव,, +कल्लूर सुब्बा राव, +यू. श्रीनिवास मल्ल्या, +पी. सुब्बारायण, +सी. सुब्रमण्यम, +व् सुब्रमण्यम, +एम. सी. वीरबाहू पिल्लई, +पी. एम. वलयुदापाणी, +ए. के. मेनन, +टी. जे. एम. विल्सन, +कदे मिलथ मोहम्मद इस्माईल साहिब, +के. टी. एम. अहमद इब्राहिम, +महबूब अली बेग साहिब बहादूर, +बी. पोकर साहिब बहादूर, +पट्टम तनुपिल्लई +बालचंद्र महेश्वर गुप्ते, +हंस मेहता, +हरि विनायक पाटस्कर, +डॉ. बी. आर. आंबेडकर, +जोसेफ अल्बान डिसोझा, +कन्यालाल नानाभाई देसाई, + केशवराव मारुतीराव जेधे, +खंडूभाई कसनजी देसाई, + बाळ गंगाधर खेर, + एम.आर. मसाणी, +के.एम. मुंशी, +नरहर विष्णू गाडगीळ, +एस. निजलिंगप्पा, +एस. के. पाटील, +रामचंद्र मनोहर नलावडे, +आर. आर. दिवाकर, +शंकरराव देव, +जी. व्ही. मावळणकर, +वल्लभभाई पटेल, +अब्दुल कादर मोहम्मद शेख, +ए. खान +मोनो मोहन दास, +अरुण चंद्र गुहा, +लक्ष्मी कांता मैत्र, +मिहिर लाल चट्टोपाध्याय, +सतीस चंद्र सामंता, +सुरेशचंद्र मजूमदार, +उपेंद्रनाथ बर्मन, +प्रभुदयाल हिमसिंगका, +बसंत कुमार दास, +रेणुका रे, + एच. सी. मुखर्जी, +सुरेंद्र मोहन घोसे, +स्यामा प्रसाद मुखर्जी, +अरि बहादुर गुरूंग, +आर. ई. प्लॅटेल, +के. सी. नोगी, +रघिब अहसन, +सोमनाथ लाहिरी, +जसीमुद्दीन अहमद, +नजीरुद्दीन अहमद, +अब्दुल हमीद, +अब्दुल हलीम घुझनवी +मौलाना हिफझुर रहमान सेहोरवी, +अजित प्रसाद जैन, +अल्गु राय शास्त्री, +बाळकृष्ण शर्मा, +बंशी धर मिसरा, +भगवान दिन, +दामोदर स्वरूप सेठ, +दयाल दास भगत, +धर्म प्रकाश, +ए. धरम दास, + आर. व्ही. धुळेकर, +फिरोज गांधी, +गोपाल नारायण, +कृष्णचंद्र शर्मा, +गोविंद बल्लभ पंत, +गोविंद मालवीय, +हर गोविंद पंत, +हरिहर नाथ शास्त्री, +हृदय नाथ कुंजरू, +जसपत रॉय कपूर, +जगन्नाथ बक्षसिंग, +जवाहरलाल नेहरू, +जोगेंद्र सिंह, + जुगल किशोर, +ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, + बी. व्ही. केसकर, +कमला चौधरी, +कमलापती त्रिपाठी, +जे. बी कृपलानी, +महावीर त्यागी, +खुर्शेद लाल, +मसूर्या दिन, +मोहन लाल सकसेना, +पदमपत सिंघानिया, +फूल सिंह, +परागी लाल, +पूर्णिमा बॅनर्जी, +पुरुषोत्तम दास टंडन, +हीरा वल्लभ त्रिपाठी, +राम चंद्र गुप्ता, +शिब्बन लाल सक्सेना, +सतीश चंद्र, +जॉन मठाई, +सुचेता कृपलानी, +सुंदर लॉल, +वेंकटेश नारायण तिवारी, +मोहनलाल गौतम, +विश्वभार दयाल त्रिपाठी, +विष्णू शरण दुब्लीश, +बेगम ऐजाज रसूल, +हैदर हुसेन, +हसरत मोहनी, +अबुल कलाम आझाद, +मुहम्मद इस्माईल खान, +रफी अहमद किदवई, +झेड एच लारी +बक्षी टेक चंद, +जयरामदास दौलतराम, +ठाकूरदास भार्गव, +बिक्रमलाल सोंधी, +यशवंत राय, +रणबीरसिंग हूडा, +लाला अचिंत राम, +नंद लाल, +बलदेव सिंह, +ज्ञानी गुरमुख सिंह मुसाफिर, +सरदार हुकम सिंह, +सरदार भोपिंदरसिंग मान, +सरदार रतनसिंग लोहगड +चौधरी सूरज माल +अमीयो कुमार घोष, +अनुग्रह नारायण सिन्हा, +बनारसी प्रसाद झुंझुनवाला, +भागवत प्रसाद, +बोनिफास लाकरा, +ब्रजेश्वर प्रसाद, +चंडिका राम, +के. टी. शाह, +देवेंद्र नाथ सामंता, +दिप नारायण सिन्हा, +गुप्तनाथ सिंह, +जादुबान सहाय, +जगत नारायण लाल, +जगजीवन राम, +जयपालसिंग मुंडा, +कामेश्वर सिंग दरभंगाचे, +कमलेश्वरी प्रसाद यादव, +महेश प्रसाद सिन्हा, + कृष्णा बल्लभ सहाय, +रघुनंदन प्रसाद, +राजेंद्र प्रसाद, +रामेश्वर प्रसाद सिन्हा, +रामनारायण सिंह, +सच्चिदानंद सिन्हा, +सारंगधर सिन्हा, +सत्यनारायण सिन्हा, +बिनोदानंद झा, +पी. के. सेन, +श्रीकृष्ण सिन्हा, +श्री नारायण महठा, +सायमानंदन मिश्रा, +हुसेन इमाम, +सय्यद जाफर इमाम, +लतीफुर रहमान, +मोहम्मद ताहिर, +ताजामुल हुसेन, +चौधरी आबिद हुसेन. +हरगोविंद मिश्रा +सरोजिनी नायडू +अंबिका चरण शुक्ला, +रघु विरा, +राजकुमारी अमृत कौर, +भगवंतराव मांडलोई, +बृजलाल बियाणी, +ठाकूर चीडीलाल, +सेठ गोविंद दास, +हरि सिंह गौर, +हरी विष्णू कामथ, +हेमचंद्र जागोबाजी खांडेकर, +रतनलाल किशोरीलाल मालवीय, +घनश्यामसिंह गुप्ता, +लक्ष्मण श्रावण भटकर, +पंजाबराव देशमुख, +रविशंकर शुक्ला, +आर. के. सिद्धवा, +दादा धर्माधिकारी, +फ्रँक अँथनी, +काजी सय्यद करीमुद्दीन, +गणपतराव दानी +निबरन चंद्र लस्कर, +धरणीधर बसू-मातारी, +गोपीनाथ बारदोलोई, +जे. जे. एम. निकोलस-रॉय, +कुलधर चालिहा, +रोहिणी कुमार चौधरी, +मुहम्मद सादुल्ला, +अब्दूर रौफ +विश्वनाथ दास, +कृष्णचंद्र गजपती नारायण देव, +हरेकृष्ण महताब, +लक्ष्मीनारायण साहू +लोकनाथ मिश्रा, +नंदकिशोर दास, +राजकृष्ण बोस, +संतानू कुमार दास, +युधिशिर मिश्रा +देशबंधू गुप्ता +मुकुट बिहारी लाल भार्गव +सी. एम. पूनाचा +के.सी. रेड्डी, +टी. सिद्दलिंगिया, +एच. आर. गुरूव रेड्डी, +एस. व्. कृष्णमूर्ती राव, +के. हनुमंथैया, +एच. सिद्धवीरप्पा, +टी. चन्न्या +शेख मुहम्मद अब्दुल्ला, +मोतीराम बैगरा, +मिर्झा मोहम्मद अफझल बेग, +मौलाना मोहम्मद सईद मसूदी +पाटम ए. थानू पिल्लई, +आर. शंकर, +पी. टी. चाको, +पानमपल्ली गोविंदा मेनन, +Ieनी मस्करेन, +पी.एस. नटराज पिल्लई, +के.ए. मोहम्मद, +पी.के.लक्ष्मणान +विनायक सीताराम सरवते, +बृजराज नारायण, +गोपीकृष्ण विजयवर्गीय, +राम सहाय, +कुसुम कांत जैन, +राधावल्लभ विजयवर्गीय, +सीताराम एस जाजू +बलवंत राय गोपाळजी मेहता, +जयसखलाल हठी, +अमृतलाल विठलदास ठक्कर, +चिमणलाल चकुभाई शाह, + समलदास लक्ष्मीदास गांधी +व्ही. टी. कृष्णामचारी, +हिरालाल शास्त्री, +खेत्रीचे सरदारसिंहजी, +जसवंतसिंगजी, +राज भादूर, +माणिक्य लाल वर्मा, +गोकुळ लाल आसावा, +रामचंद्र उपाध्याय, +बलवंत सिन्हा मेहता, +दलेल सिंग, +जैनारायण व्यास +रणजितसिंग, +सोचेत सिंग, +भगवंत रॉय +विनायकराव बलशंकर वैद्य, +बी. एन. मुनावल्ली, +गोकुळभाई दौलतराम भट्ट, +जीवराज नारायण मेहता, + गोपाळदास ए देसाई, +परानलाल ठाकूरलाल मुंशी, +बी.एच.खर्डेकर, +रत्नप्पा भारमप्पा कुंभार बी.एन.दातार +लाल मोहन पति, +एन. माधव राऊ, +राज कुंवर, +सारंगाधर दास, +युधिष्ठिर मिश्रा +आर.एल.मालवीय, +किशोरीमोहन त्रिपाठी, +रामप्रसाद पोटाई + बी. एच. जैदी, + कृष्णा सिंह +व्ही. रमायाह, + रामकृष्ण रंगराव] +अवदेश प्रताप सिंह, +शंभू नाथ शुक्ला, +राम सहाय तिवारी, +मन्नूलालजी द्विडेदी +महेश्वरी हिम्मतसिंग के +गिरजा शंकर गुहा +लालसिंग +भवानी अर्जुन खीमजी +यशवंतसिंग परमार +पूर्व बंगाल +अब्दुल्ला अल महमूद, +मौलाना मोहम्मद अब्दुल्ला अल बाकी, +अब्दुल हमीद, +अब्दुल कसीम खान, +मोहम्मद अक्रम खान, +ए.हमीद, +अझीझुद्दीन अहमद, +मुहम्मद हबीबुल्ला बहार, +प्रेम हरि बरमा, +राज कुमार चक्रवर्ती, +श्रीसचंद्र चट्टोपाध्याय, +अब्दुल मतीन चौधरी, +मुर्तजा रझा चौधरी, +हमीदुल हक चौधरी, +अक्षय कुमार दास, +धीरेंद्र नाथ दत्ता, +भूपेंद्र कुमार दत्ता, +इब्राहिम खान, +फजलुल हक, +फजलूर रहमान, +घायसुद्दीन पठाण, +बेगम शाइस्ता सोहरावर्दी इक्रमुल्ला, +लियाकत अली खान, +माफीझुद्दीन अहमद, +महमूद हुसेन, +ज्ञानेंद्रचंद्र मजुमदार, +ए. एम. मलिक, +बिराट चंद्र मंडळ, +जोगेंद्र नाथ मंडळ, + मोहम्मद अली, +ख्वाजा नाझीमुद्दीन, +एम.ए.बी.एल. नूर अहमद, +नूरुल अमीन, +इश्तियाक हुसेन कुरेशी, +श्री धनंजय एम.ए. बी.एल. रॉय,, +माऊडी भाकेश चंदा, +बी.एल. सेराजुल इस्लाम, +मौलाना शब्बीर अहमद उस्मानी, +शहाबुद्दीन ख्वाजा, +एच.एस. सुहरावर्डी, +हरेंद्र कुमार सुर, +तमीझुद्दीन खान, +कविवि केरवार दत्ता, गुलाम मोहम्मद +पश्चिम पंजाब + मियां मुमताज मोहम्मद खान दौलताना, +गंगा सारण, +जफरउल्ला खान, +इफ्तिखार हुसेन खान, +मियां मुहम्मद इफ्तिखरुद्दीन, +मुहम्मद अली जिन्ना, +शेख करमत अली, +नजीर अहमद खान, +सरदार अब्दुर रब निस्तार, +फिरोज खान नून, +ओमर हयात मलिक, +शाह नवाज बेगम जहां आरा, +सरदार शौकत हयात खान, +वायव्य सीमावर्ती प्रांत +खान अब्दुल गफर खान, +खान सरदार बहादूर खान, +सरदार असद उल्लाह जान खान +सिंध +अब्दुस सत्तार अब्दुर रहमान, +आल्हाज मुहम्मद हाशिम गॅझडर, +एम.ए. खुहरो +बलुचिस्तान +एस. बी. नवाब मोहम्मद खान जोगझई +मद्रास +दुर्गाबाई देशमुख +बॉम्बे +हंसा मेहता +मध्य प्रांत आणि बेरार +राजकुमारी अमृत कौर + जवाहरलाल नेहरू आणि अन्य सदस्य १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी आयोजित केलेल्या भारतीय संविधान सभेच्या मध्यरात्री अधिवेशनात प्रतिज्ञा घेत होते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अन्य सदस्यांसह, २९ ऑगस्ट १९४७ रोजी. +२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +भारताच्या संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +जवाहरलाल नेहरू १९४६ मध्ये संविधान सभेला संबोधित करताना. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14975.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a85a70f235c6ff8117aa5b5b06ef44acfd40e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14975.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय संविधानाच्या १०४व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यांसाठी जागा राखून ठेवण्याच्या समाप्तीची अंतिम मुदत १० वर्षांच्या कालावधीने वाढवली. +९५व्या घटनादुरुस्तीने अनिवार्य केल्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण 25 जानेवारी 2020 रोजी कालबाह्य होणार होते.[१] परंतु दिलेल्या कारणास्तव ते आणखी 10 वर्षांसाठी वाढविण्यात आले -अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींनी गेल्या 70 वर्षात बऱ्यापैकी प्रगती केली असली, तरी वरील आरक्षणासंदर्भात तरतूद करताना संविधान सभेला जी कारणे मोजावी लागली ती अद्यापही संपलेली नाहीत. त्यामुळे राज्यघटनेच्या जनकांच्या संकल्पनेनुसार सर्वसमावेशक चारित्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षण आणखी दहा वर्षे म्हणजे २५ जानेवारी २०३० पर्यंत चालू ठेवण्याचा प्रस्ताव आहे. +- रविशंकर प्रसाद, कायदा आणि न्याय मंत्री +तथापि, या दुरुस्तीमुळे अँग्लो-इंडियन समुदायाच्या सदस्यांसाठी राखीव असलेल्या लोकसभेच्या 2 जागा आणि राज्य विधानसभेतील जागांच्या आरक्षणाचा कालावधी वाढवला जात नाही आणि अशा प्रकारे अँग्लो-इंडियन समुदायाच्या दोन सदस्यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित करण्याची प्रथा भारताच्या पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार प्रभावीपणे रद्द करण्यात आली. +संविधान (एकशेचारवी दुरुस्ती) विधेयक, 2019 हे 9 डिसेंबर 2019 रोजी कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सादर केले. या विधेयकात घटनेच्या कलम ३३४ मध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. +हे विधेयक लोकसभेने 10 डिसेंबर 2019 रोजी एकमताने मंजूर केले होते ज्याच्या बाजूने 355 आणि विरुद्ध 0 मते पडली होती. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आणि 12 डिसेंबर 2019 रोजी एकमताने 163 मते आणि विरुद्ध 0 मतांनी मंजूर करण्यात आले. 21 जानेवारी 2020 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून या विधेयकाला संमती मिळाली आणि दुसऱ्या दिवशी भारताच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आले. ही दुरुस्ती 25 जानेवारी 2020 पासून लागू झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1498.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc5dabf8ae8c5ac8b2eedc0bc48dd15d68396b14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1498.txt @@ -0,0 +1 @@ +प्रशांत रामशेठ ठाकुर मराठी राजकारणी आहेत. हे पनवेल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14996.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6e61245de12faadf3f22418552bda5c7432da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14996.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारताच्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही भारताचे राज्य चालवण्यासाठी संस्थांना दिलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा तत्त्वे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या भाग IV (अनुच्छेद 36-51) मध्ये ही तत्त्वे प्रदान केली आहेत. ही तत्त्वे कोणत्याही न्यायालयाद्वारे लागू केले जाऊ शकत नाहीत, परंतु तेथे दिलेली तत्त्वे देशाच्या कारभारात 'मूलभूत' मानली जातात, ज्यामुळे देशात न्याय्य समाज प्रस्थापित करण्यासाठी कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य बनते.[१] सामाजिक न्याय, आर्थिक कल्याण, परराष्ट्र धोरण आणि कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींशी संबंधित असलेल्या आयर्लंडच्या राज्यघटनेत दिलेल्या निर्देशात्मक तत्त्वांद्वारे तत्त्वे प्रेरित आहेत. +मार्गदर्शक तत्त्वे खालील श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत: आर्थिक आणि सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय, न्याय आणि कायदेशीर, पर्यावरण, स्मारकांचे संरक्षण, शांतता आणि सुरक्षा. आयरिश राष्ट्रवादी चळवळ, विशेषतः आयरिश होमरूल चळवळ; म्हणून, भारतीय राज्यघटनेच्या निर्देशक तत्त्वांचा सामाजिक धोरणाच्या निर्देशक तत्त्वांवर खूप प्रभाव पडला आहे. अशा धोरणांची कल्पना "क्रांतिकारक फ्रान्सने घोषित केलेल्या मनुष्याच्या आणि नागरिकांच्या हक्कांच्या घोषणा आणि अमेरिकन वसाहतींनी केलेल्या स्वातंत्र्याच्या घोषणेमध्ये शोधली जाऊ शकते." भारतीय राज्यघटनेवर संयुक्त राष्ट्रांच्या सार्वभौमिकतेचाही प्रभाव होता. +संविधान सभेत DPSP वर चर्चा करताना, डॉ. आंबेडकरांनी 19 नोव्हेंबर 1948 रोजी खाली दिलेल्या उच्च प्रकाशात नमूद केले की DPSP हा देशाच्या भविष्यातील शासनाचा आधार असेल: +भविष्यात विधिमंडळ आणि कार्यकारिणी या दोघांनीही या भागात अंमलात आणलेल्या या तत्त्वांना नुसती तोंडं देऊ नयेत, तर त्यांना यापुढील काळात होणाऱ्या सर्व कार्यकारी आणि विधायी कृतींचा आधार बनवावा, असा या विधानसभेचा हेतू आहे. देशाच्या कारभाराचा मुद्दा. +राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण करणे आहे ज्या अंतर्गत नागरिक चांगले जीवन जगू शकतील. कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे त्यांचे ध्येय आहे. मार्गदर्शक तत्त्वे हे लोकांचे न्याय्य हक्क नसले तरी देशाच्या कारभारात मूलभूत असले तरी, कलम ३७ नुसार कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. याशिवाय, केंद्र आणि राज्यांच्या सर्व कार्यकारी संस्थांनी या तत्त्वांद्वारे देखील मार्गदर्शन करा. न्यायपालिकेनेही खटल्यांचा निर्णय घेताना त्यांना लक्षात ठेवावे लागते. +DPSP च्या अनुषंगाने विद्यमान धोरण उलट केले जाऊ शकत नाही, तथापि DPSP च्या अनुषंगाने ते आणखी विस्तारित केले जाऊ शकते. DPSP अंतर्गत लागू होणारे धोरण बदल जोपर्यंत लागू होणारे DPSP घटनादुरुस्तीने हटवले जात नाही तोपर्यंत बदलता येणार नाही (उदा. राज्यात एकदा लागू केलेली बंदी DPSP चा भाग असेपर्यंत ती नंतर रद्द केली जाऊ शकत नाही). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14999.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0195f103d6a0b1216b4506d561e767c9e081890a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_14999.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.[१]g +भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ आहे. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात.[२] +भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील २८ घटकराज्ये आणि ८ संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. करते. याचा अर्थ असा की, राज्यसभेत घटकराज्यांचे राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २५० आहे. यांपैकी २३८ सदस्य विविध घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटकराज्यांची सदस्यसंख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या १२ सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले १/३ सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय ३० वर्षे पूर्ण असले पाहिजे. [३] +आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला ‘कायदानिर्मितीची प्रक्रिया’ असे म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. +संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. +विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जाते. +दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. +केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. +राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1500.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..144b03b44f7cdded74e1c6cac8ca83546feb6a99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रशांत त्यागराजन ( इंग्रजी: Prashanth Thiagarajan तमिळ : பிரசாந்த் தியாகராஜன்) (born 6 April 1973 in Chennai, India) is an Indian actor. एक भारतीय तमिळ अभिनेता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15006.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050535e70fd75795e5489f967e2d5a65424cb1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15006.txt @@ -0,0 +1,9 @@ +श्रीअरविंद लिखित 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' [१] या ग्रंथाचा मराठी अनुवाद 'भारतीय संस्कृतीचा पाया' या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. या विषयावरील लेख आधी 'आर्य' मासिकात १५ डिसेंबर १९१८ ते १५ जानेवारी १९२१ या कालावधीत सदर रूपाने प्रकाशित करण्यात आले होते. नंतर श्रीअरविंद यांनी त्यावर परिष्करण केले आणि मग सुधारित आवृत्ती 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या नावाने १९५३ साली न्यू यॉर्क येथे प्रकाशित करण्यात आली. त्याची भारतीय आवृत्ती १९५९ साली प्रकाशित झाली. [१] सेनापती पां.म.बापट यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. +या ग्रंथामध्ये खालील विभाग आहेत. +०१) वादाचा प्रश्न: भारत सुधारणासंपन्न अर्थात विचारसंपन्न आहे का? +विल्यम आर्चर या लेखकाने बुद्धिवादी दृष्टिकोन घेऊन, भारतीय संस्कृतीवर टीका केली होती. ती टीका खोडून काढण्यासाठी सर जॉन वूड्रॉफ याने एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने भारतीय संस्कृती ही संस्कृतींच्या अटळ संघर्षात टिकून राहण्यासारखी आहे का, हा प्रश्न उपस्थित केला होता. या विभागामध्ये एकंदर तीन प्रकरणे आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणामध्ये श्रीअरविंद यांनी जॉन वूड्रॉफने आपल्या पुस्तकात जे लिहिले होते, त्याचा गोषवारा दिला आहे. तो गोषवारा विषयप्रवेश करण्यासाठी उपयुक्त ठरतो. [१] +०२) भारतीय संस्कृतीचा एक बुद्धिवादी टीकाकार +या विभागामध्ये एकंदर सहा प्रकरणे आहेत. श्रीअरविंद यांनी पहिल्या प्रकरणात, विल्यम आर्चर या लेखकाचा दृष्टिकोन लक्षात का घ्यावासा वाटला याचे स्पष्टीकरण केले आहे. +०३) भारतीय संस्कृतीचे समर्थन +या विभागामध्ये पुढील उपविभाग आहेत. +०४) पुरवणी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15010.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5289c100c143954929636c9cdda5ab2324a34d26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15010.txt @@ -0,0 +1,51 @@ + + भारतीय सनदी लेखाकार संस्थान (दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा आयसीएआय ICAI) ही भारताची राष्ट्रीय व्यावसायिक लेखा संस्था आहे. त्याची स्थापना १ जुलै १९४९ रोजी चार्टर्ड अकाऊंटंट अ‍ॅक्ट,१९४९ अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून झाली. आयसीएआय ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक लेखा व वित्त संस्था आहे. आयसीएआय ही भारतातील वित्तीय लेखा परिक्षण आणि लेखा व्यवसायाची एकमेव परवाना मिळणारी नियमित संस्था आहे. असे मानदंड तयार करण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे भारत सरकार , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी जवळून कार्य करते. +इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ही जगातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक लेखा संस्था आहे आणि भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मालकीची भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक लेखा संस्था आहे. भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी संसदेने अधिनियमित केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून 1 जुलै 1949 रोजी त्याची स्थापना करण्यात आली.[5] +भारतात, लेखा मानके आणि लेखापरीक्षण मानकांची शिफारस नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी (NFRA) द्वारे भारत सरकारला केली जाते जी भारतातील आर्थिक स्टेटमेंट्सच्या ऑडिटमध्ये पाळली जाणारी ऑडिटिंग (SAs) मानके सेट करते. भारतातील इतर नामांकित लेखा संशोधन संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (ICMAI) आणि दिल्ली विद्यापीठ, कालिकत विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ. +संस्थेचे सदस्य ICAI चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICAI अकाउंटंट (एकतर फेलो किंवा असोसिएट) म्हणून ओळखले जातात. तथापि, चार्टर्ड हा शब्द कोणत्याही रॉयल चार्टरचा संदर्भ देत नाही किंवा त्यातून प्रवाहित होत नाही. ICAI चार्टर्ड अकाउंटंट प्रकाशित आचारसंहिता आणि व्यावसायिक मानकांच्या अधीन आहेत, ज्याचे उल्लंघन शिस्तभंगाच्या कारवाईच्या अधीन आहे. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून केवळ ICAIच्या सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते. संस्थेचे व्यवस्थापन तिच्या कौन्सिलकडे निहित आहे आणि अध्यक्ष त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. एखादी व्यक्ती ICAIचा सदस्य बनू शकते आणि भारतीय कंपन्यांची आर्थिक (म्हणजे वैधानिक) लेखापरीक्षक बनू शकते. व्यावसायिक सदस्यत्व संस्था तिच्या ना-नफा सेवेसाठी ओळखली जाते. ICAI ने परस्पर सदस्यत्व ओळखीसाठी जगभरातील इतर व्यावसायिक लेखा संस्थांसोबत परस्पर मान्यता करार केला आहे. ICAI इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (IFAC), साउथ एशियन फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (SAFA), आणि कॉन्फेडरेशन ऑफ एशियन अँड पॅसिफिक अकाउंटंट्स (CAPA)च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. ICAI हे पूर्वी भारतातील XBRL इंटरनॅशनलसाठी तात्पुरते अधिकारक्षेत्र होते. 2010 मध्ये, त्यांनी एक्सटेन्सिबल बिझनेस रिपोर्टिंग लँग्वेज (XBRL) इंडियाला विभाग 8 कंपनी म्हणून पदोन्नती दिली आणि तिच्याकडून ही जबाबदारी घेतली. आता, एक्सटेंसिबल बिझनेस रिपोर्टिंग लँग्वेज (XBRL) भारत हे XBRL इंटरनॅशनल इंकचे स्थापित अधिकार क्षेत्र आहे. +भारतातील लेखा व्यवसायाचे नियमन करण्याच्या उद्देशाने भारतीय सनदी लेखापाल कायदा, 1949च्या अंतर्गत भारताच्या संसदेने पारित केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था स्थापन करण्यात आली.[6] ICAI ही AICPA नंतरची सदस्य संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत जगातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक लेखा संस्था आहे.[7] हे चार्टर्ड अकाउंटंटसाठी पात्रता निर्धारित करते, आवश्यक परीक्षांचे आयोजन करते आणि सरावाचे प्रमाणपत्र देते. +इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त 2018चे स्टॅम्प +सरकारी डिप्लोमा इन अकाउंटन्सी प्रमाणपत्र +कंपनी कायदा, 1913 पूर्वी स्वतंत्र भारतात पारित करण्यात आला होता, ज्याची विविध पुस्तके त्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपनीने ठेवली पाहिजेत. अशा नोंदींचे लेखापरीक्षण करण्यासाठी विहित पात्रता असलेल्या औपचारिक लेखापरीक्षकाची नियुक्ती देखील आवश्यक होती. लेखापरीक्षक म्हणून काम करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला स्थानिक सरकारकडून विहित केलेल्या अटींवर प्रतिबंधित प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. प्रतिबंधित प्रमाणपत्र धारकास केवळ समस्येच्या प्रांतामध्ये आणि प्रतिबंधित प्रमाणपत्रामध्ये निर्दिष्ट केलेल्या भाषेत सराव करण्याची परवानगी होती. 1918 मध्ये सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ऑफ बॉम्बे (आता मुंबई म्हणून ओळखले जाते) मध्ये गव्हर्नमेंट डिप्लोमा इन अकाउंटन्सी नावाचा कोर्स सुरू करण्यात आला. हा डिप्लोमा उत्तीर्ण केल्यावर आणि मान्यताप्राप्त अकाउंटंटच्या हाताखाली तीन वर्षांचे आर्टिकल प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, एखाद्या व्यक्तीला अनिर्बंध प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र ठरवले जाते. हे प्रमाणपत्र धारकाला संपूर्ण भारतात ऑडिटर म्हणून सराव करण्यास पात्र आहे. पुढे १९२० मध्ये प्रतिबंधित प्रमाणपत्रे देणे बंद करण्यात आले. +1930 मध्ये, भारत सरकारने रजिस्टर ऑफ अकाउंटंट नावाचे एक रजिस्टर ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा नोंदवहीत ज्या व्यक्तीचे नाव नोंदवले गेले होते, त्याला नोंदणीकृत लेखापाल म्हटले जाते.[8] नंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला अकाउंटन्सी आणि ऑडिटर्सच्या पात्रतेबद्दल सल्ला देण्यासाठी भारतीय अकाउंटन्सी बोर्ड नावाच्या मंडळाची स्थापना करण्यात आली. तथापि, असे वाटले की अकाउंटन्सी व्यवसाय मोठ्या प्रमाणात अनियंत्रित आहे, आणि यामुळे लेखापरीक्षकांच्या पात्रतेच्या संदर्भात बराच गोंधळ निर्माण झाला. म्हणून 1948 मध्ये, स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये, या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती तयार करण्यात आली.[9] या तज्ज्ञ समितीने या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी लेखापालांची स्वतंत्र स्वायत्त संघटना स्थापन करावी, अशी शिफारस केली. भारत सरकारने ही शिफारस स्वीकारली आणि भारत प्रजासत्ताक होण्यापूर्वीच सन 1949 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा पास केला. उक्त कायद्याच्या कलम ३ अन्वये, ICAIची स्थापना शाश्वत उत्तराधिकार आणि सामाईक शिक्का असलेली संस्था म्हणून केली जाते. +इतर कॉमनवेल्थ देशांप्रमाणेच, चार्टर्ड हा शब्द रॉयल चार्टरचा संदर्भ देत नाही, कारण भारत हे प्रजासत्ताक आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा पास करताना, इतर देशांतील समान व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदव्यांचा विचार केला गेला, जसे की प्रमाणित सार्वजनिक लेखापाल. सनदी लेखापालांकडे नोंदणीकृत लेखापालांपेक्षा चांगली पात्रता असल्याची सामान्य लोकांची धारणा या पदनामाने वारशाने घेतली.[10] त्यामुळे भारतीय लेखापालांना केवळ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नियुक्त केले जावे, अशी त्यांची भूमिका अकाऊंटंट अत्यंत कठोर होती. भारतीय संविधान सभेत बराच चर्चेनंतर, चार्टर्ड हा वादग्रस्त शब्द स्वीकारण्यात आला. सनदी लेखापाल कायदा, 1949 1 जुलै 1949 रोजी अंमलात आला तेव्हा चार्टर्ड अकाउंटंट या संज्ञेने नोंदणीकृत लेखापाल या पदाची जागा घेतली. हा दिवस दरवर्षी चार्टर्ड अकाउंटंट दिवस म्हणून साजरा केला जातो.[11] +चार्टर्ड अकाउंटंट्सच्या खास वापरासाठी नवीन CA लोगो +ICAIचे ब्रीदवाक्य म्हणजे Ya Aeshu Suptaeshu Jagruti (संस्कृत),[12] ज्याचा शाब्दिक अर्थ आहे "जो झोपलेल्या लोकांमध्ये जागृत आहे". हे उपनिषदांचे (कथोपनिषद) अवतरण आहे. ICAIला 1949 मध्ये त्याच्या स्थापनेच्या वेळी श्री अरबिंदो[13] यांनी त्याच्या प्रतीकाचा एक भाग म्हणून दिले होते. सीए. चेन्नई येथील सनदी लेखापाल सी.एस. शास्त्री श्री अरबिंदो यांच्याकडे गेले आणि त्यांनी दक्षिण भारतातून निवडून आलेल्या सदस्य असलेल्या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेला बोधचिन्ह देण्याची विनंती पत्राद्वारे केली. या विनंतीला उत्तर म्हणून, श्री अरविंदांनी त्यांना गरुडाचे प्रतीक, मध्यभागी पौराणिक गरुड आणि उपनिषदातील एक अवतरण दिले: या एषु सुप्तेषु जागृति. संस्थेच्या परिषदेच्या पहिल्या बैठकीत बोधवाक्यांसह बोधचिन्ह ठेवण्यात आले होते आणि परिषदेच्या इतर सदस्यांनी ठेवलेल्या इतर अनेक प्रतीकांमध्ये ते स्वीकारले गेले. +त्याच्या चिन्हाव्यतिरिक्त, ICAIचा सदस्यांसाठी वेगळा लोगो देखील आहे. ब्रँड बिल्डिंग व्यायामाचा एक भाग म्हणून, ICAI ने 2007 मध्ये आपल्या सदस्यांच्या वापरासाठी हा वेगळा नवीन CA लोगो सादर केला.[14] लोगो ICAIच्या सर्व सदस्यांसाठी काही अटींच्या अधीन राहून वापरण्यासाठी विनामूल्य आहे.[15] आयसीएआयचे तत्कालीन अध्यक्ष सुनील तलाटी यांच्या उपस्थितीत चार्टर्ड अकाउंटंट डे (१ जुलै)च्या निमित्ताने तत्कालीन कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, प्रेम चंद गुप्ता यांच्या हस्ते लोगोचे लोकार्पण करण्यात आले. ICAIचे सदस्य ICAI चिन्ह वापरू शकत नाहीत, परंतु त्यांना त्यांच्या अधिकृत स्टेशनरीवर CA लोगोऐवजी वापरण्यास प्रोत्साहित केले जाते. +ICAI इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (IFAC),[16] साउथ एशियन फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (SAFA),[17] आणि Confederation of Asian and Pacific Accountants (CAPA) [18] आणि इंटरनॅशनल इनोव्हेशन नेटवर्क (IIN)चे संस्थापक सदस्य आहेत. . ICAI जगभरातील चार्टर्ड अकाउंटंट्सचा सहयोगी सदस्य आहे, इंटरनॅशनल व्हॅल्युएशन स्टँडर्ड्स कौन्सिल (IVSC)चा सदस्य आहे. +संस्थेचे सदस्य चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ओळखले जातात. सभासद होण्यासाठी विहित परीक्षा उत्तीर्ण होणे, 36 महिन्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि अधिनियम आणि नियमांनुसार इतर आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. संस्थेचे सध्या ३,२५,००० पेक्षा जास्त सदस्य आहेत. +साधारणपणे, सहयोगी हे पाच वर्षांपेक्षा कमी सदस्यत्व असलेले संस्थेचे सदस्य असतात ज्यानंतर ते सहकारी सदस्य म्हणून अर्ज करण्याचा अधिकार प्राप्त करतात. काही सहयोगी सदस्य, विशेषतः जे प्रॅक्टिसमध्ये नाहीत, त्यांनी अनेकदा स्वेच्छेने विविध कारणांमुळे फेलो होण्यासाठी अर्ज न करणे निवडले. +एक सहयोगी सदस्य जो भारतात सतत सराव करत आहे किंवा किमान पाच वर्षे व्यावसायिक किंवा सरकारी संस्थेसाठी काम करतो आणि विहित केलेल्या इतर अटी पूर्ण करतो तो "फेलो" म्हणून नियुक्त होण्यासाठी संस्थेकडे अर्ज करू शकतो. दोन्ही प्रकारच्या सदस्यांच्या जबाबदाऱ्या आणि मतदानाचे अधिकार सारखेच राहतात परंतु ICAIच्या परिषद आणि प्रादेशिक परिषदांसाठी फक्त फेलो निवडले जाऊ शकतात. फेलो त्यांच्या दीर्घ व्यावसायिक अनुभवामुळे उच्च दर्जाचा आनंद घेत असल्याचे समजले जाते. +सार्वजनिक सरावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही सदस्यास प्रथम अर्ज करावा लागतो आणि ICAIच्या कौन्सिलकडून सराव प्रमाणपत्र (COP) प्राप्त करावे लागते.[19] केवळ सराव प्रमाणपत्र असलेले सदस्य भारतीय कंपन्यांचे वैधानिक लेखा परीक्षक म्हणून काम करू शकतात. एकदा का सदस्याने सरावाचे प्रमाणपत्र मिळवले की त्याची समाजाप्रती जबाबदारी अनेक पटींनी वाढते. +भारतात, वैयक्तिक लेखापाल, एक फर्म किंवा लेखापालांची मर्यादित दायित्व भागीदारी लेखापालनाचा व्यवसाय करू शकते.[20] +भारतातील कंपन्या अकाउंटन्सीचा व्यवसाय करू शकत नाहीत. +सनदी लेखापालांना सध्या कंपनी कायदा, 2013 अंतर्गत वित्तीय विवरणांच्या ऑडिटमध्ये वैधानिक मक्तेदारी आहे. भारतीय कंपनीचे वैधानिक लेखा परीक्षक होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचा (ICAI) सदस्य असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) भारतातील चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायाचे नियमन करते. +ICAIच्या पाच प्रादेशिक परिषदांचे अधिकार क्षेत्र दर्शविणारा भारताचा नकाशा +संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन चार्टर्ड अकाउंटंट्स अॅक्ट, 1949 अंतर्गत स्थापन केलेल्या कौन्सिलद्वारे केले जाते.[6] कौन्सिलमध्ये 32 निवडून आलेले सहकारी सदस्य आणि भारत सरकारने नामनिर्देशित केलेले 8 सदस्य असतात. परिषदेचे निवडून आलेले सदस्य हे संस्थेच्या सदस्यांद्वारे एकल हस्तांतरणीय मतप्रणाली अंतर्गत निवडले जातात. दर तीन वर्षांनी परिषद पुन्हा निवडली जाते. परिषद तिच्या दोन सदस्यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडते जे एका वर्षासाठी पद धारण करतात. अध्यक्ष हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.[21] +ICAIचे पाच क्षेत्र आहेत: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य. 15 जुलै 2019 पर्यंत, ICAIच्या आतापर्यंत 164 शाखा आहेत. एकूण 164 शाखांपैकी 99 शाखांचे स्वतःचे परिसर आहेत ज्यात 14 शाखांचा समावेश आहे (सध्या भाड्याने घेतलेल्या जागेतून कार्यरत आहेत) ज्यांनी जमीन खरेदी केली आहे ज्यावर बांधकाम सुरू आहे किंवा बांधकाम चालू आहे. 16 शाखांनी (स्वतःच्या जागेतून काम करणाऱ्या) जमीन खरेदी केली आहे जेथे बांधकाम सुरू झाले आहे किंवा बांधकाम सुरू आहे. 51 शाखांच्या मालकीची जमीन किंवा इमारत नाही. +ICAIचे पहिले अध्यक्ष श्री G.P. कपाडिया (1949 ते 1952). श्री निहार निरंजन जंबुसारिया हे विद्यमान अध्यक्ष आहेत. डॉ. देबाशिस मित्रा हे परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, आणि विद्यमान अध्यक्ष श्री. निहार निरंजन जंबुसारिया यांच्या कार्यालयाच्या सुट्टीनंतर ते परिषदेचे पुढील अध्यक्ष असतील. +संस्थेकडे सविस्तर आचारसंहिता आहे आणि अशा आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कृतींचा परिणाम चुकीच्या सदस्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईत होतो. संस्था चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा 1949, चार्टर्ड अकाउंटंट्स रेग्युलेशन 1988, सदस्यांसाठी व्यावसायिक संधी – एक मूल्यमापन, आचारसंहिता आणि सदस्यांसाठी नियमपुस्तिका असलेली सदस्यांची पुस्तिका प्रकाशित करते. हे एकत्रितपणे व्यवसायाच्या नियमनाचा आधार बनतात. कौन्सिलकडे एक पीअर रिव्ह्यू बोर्ड देखील आहे जे हे सुनिश्चित करते की त्यांच्या व्यावसायिक प्रमाणीकरण सेवा असाइनमेंट पार पाडताना, संस्थेचे सदस्य (अ) संस्थेने घालून दिलेल्या तांत्रिक मानकांचे पालन करतात आणि (ब) त्यांच्याकडे योग्य प्रणाली (दस्तऐवजीकरणासह) आहे. सिस्टम्स) ते करत असलेल्या प्रमाणीकरण सेवांच्या कामाची गुणवत्ता राखण्यासाठी.[22] +शिस्तपालन संचालनालय, शिस्तपालन मंडळ आणि शिस्तपालन समिती संस्थेच्या शिस्तपालन प्रक्रियेचा पाया तयार करतात. या संस्था अर्ध-न्यायिक आहेत आणि त्यांना समन्स आणि हजेरी लागू करण्यासाठी किंवा प्रतिज्ञापत्रावर किंवा अन्यथा दस्तऐवजांचा शोध आणि उत्पादन आवश्यक करण्यासाठी दिवाणी न्यायालयासारखे ठोस अधिकार आहेत.[23] शिस्तपालन संचालनालय हे संचालक (शिस्त) म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली असते. एखाद्या सदस्याने कोणत्याही गैरवर्तनाचा आरोप केल्याची कोणतीही माहिती किंवा तक्रार मिळाल्यावर, संचालक (शिस्त) प्रथमदर्शनी अभिप्राय प्राप्त करतील की काही गैरवर्तन आहे की नाही. सनदी लेखापाल कायदा, 1949च्या पहिल्या शेड्यूलमध्ये सूचीबद्ध केलेल्या बाबींमध्ये गैरवर्तणूक समाविष्ट असल्याचे संचालक (शिस्त) यांचे मत असल्यास, त्यांनी प्रकरण शिस्त मंडळाकडे पाठवावे. केस दुसऱ्या शेड्यूल किंवा CA कायद्याच्या दोन्ही शेड्यूलमध्ये समाविष्ट असल्याचे त्याचे मत असल्यास, तो प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठवेल. शिस्त मंडळाला एखादा सदस्य व्यावसायिक किंवा इतर गैरवर्तनासाठी दोषी आढळल्यास, ते आपल्या विवेकबुद्धीनुसार सदस्याला फटकारू शकते, सदस्यांच्या नोंदणीतून तीन महिन्यांपर्यंत सदस्याचे नाव काढून टाकू शकते किंवा ₹1,00,000 पर्यंत दंड आकारू शकते. /-. शिस्तपालन समितीला एखादा सदस्य व्यावसायिक किंवा इतर गैरवर्तनासाठी दोषी आढळल्यास, ती तिच्या विवेकबुद्धीनुसार सदस्याला फटकारू शकते, सदस्यांच्या नोंदणीतून सदस्याचे नाव कायमचे काढून टाकू शकते किंवा ₹5,000/- पर्यंत दंड आकारू शकते. कोणत्याही आदेशामुळे नाराज झालेला कोणताही सदस्य अपील प्राधिकरणाकडे संपर्क साधू शकतो. +हे लक्षात घेतले पाहिजे की ही शिस्तभंगाची कार्यवाही न्यायालयातील फौजदारी कार्यवाहीच्या बदल्यात किंवा पर्यायी नाही. चार्टर्ड अकाउंटंट विरुद्ध फौजदारी कारवाई आणि ICAIची शिस्तभंगाची कारवाई या दोन स्वतंत्र समस्या आहेत आणि एक आधी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.[24] +2009-2010 या कालावधीतील ICAI शिस्तपालन समितीच्या सार्वजनिक कृतींपैकी एक म्हणजे सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​आर्थिक विवरण चुकीचे ऑडिट आणि वाढवल्याबद्दल फर्म प्राइस वॉटरहाऊस भागीदारांकडील दोन लेखा परीक्षकांविरुद्ध व्यावसायिक गैरवर्तनाची कारवाई. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (नोव्हेंबर 2010) ICAI शिस्तपालन समितीच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची दोन आरोपित लेखा परीक्षकांची विनंती नाकारली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 20 (3) नुसार स्वतःची दोषारोपण करण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्धच्या अनुशासनात्मक कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या आरोपित लेखा परीक्षकांच्या विनंतीला उत्तर म्हणून न्यायालयाचा आदेश आला. +SEBI ने कार्वी या ब्रोकरेज फर्मचा संदर्भ दिला, ज्यात अंतर्गत लेखा परीक्षक, हरिभक्ती अँड कंपनी (BDO ग्लोबलचा सहयोगी) यांचा समावेश आहे. एकाच पत्त्यावर हजारो डिमॅट खाती उघडण्यात अयशस्वी झाल्याबद्दल निष्काळजीपणासाठी दोषी धरण्यात आले. समितीने मेटास प्रॉपर्टीज आणि मेटास इन्फ्रा यांच्या पुस्तकांमध्ये कथित अनियमितता आणि त्यांच्या लेखा परीक्षकांच्या भूमिकेसाठी सदस्यांवर कारवाई देखील केली आहे.[25] गैरवर्तनासाठी दोषी आढळलेल्या सदस्यांची नावे ICAIच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ICAI संकेतस्थळ फेब्रुवारी 2010 पासून गेल्या एका वर्षात शिस्तपालन समितीने चौकशी पूर्ण केलेल्या प्रकरणांची संख्या म्हणून 35 सूचीबद्ध करते. व्यावसायिक किंवा इतर गैरवर्तनासाठी दोषी असलेल्या सदस्यांची यादी वेळोवेळी प्रकाशित केली जाते.[26] +अलीकडील अनेक [टाइमफ्रेम?] आर्थिक फसवणूक आणि घोटाळे ज्या संस्थांचे लेखापरीक्षक म्हणून बहुराष्ट्रीय लेखा संस्था होत्या. या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात कायदेशीररित्या सराव करू शकत नाहीत परंतु ते सरोगेट पद्धतीने भारतात सराव करत आहेत, स्थानिक कंपन्यांशी टाय-अपद्वारे काम करत आहेत, जरी त्यात सहभागी भागीदार भारतातील आहेत, कारण केवळ संस्थेचा सदस्य भारतीय घटकाचा लेखा परीक्षक असू शकतो. . याचे उदाहरण म्हणजे विस्तृत यादी, ग्लोबल ट्रस्ट बँक घोटाळ्याच्या बाबतीत प्राइस वॉटरहाऊस, सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस लिमिटेड घोटाळ्यातील पुन्हा प्राइस वॉटरहाऊस, मायटास प्रकरणात अर्न्स्ट आणि यंग. ICAI कडे या किंवा त्या प्रकरणासाठी कोणत्याही फर्मला शिक्षा करण्याचे अधिकारक्षेत्रीय अधिकार नाहीत, कारण सध्याच्या नियमांनुसार त्यांना केवळ वैयक्तिक सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आहे. संस्थेने भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला अतिरिक्त अधिकार देण्यास सांगितले आहे जेणेकरून ज्या कंपन्यांचे भागीदार किंवा कर्मचारी वारंवार अपराधी असतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येईल.[27] ICAI ने सनदी लेखापाल कायदा, 1949 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव देखील भारत सरकारला पाठवला आहे जेणेकरून ऑडिट फर्म कंपन्यांशी संगनमत केल्याबद्दल दोषी आढळल्यास त्यांना ₹1,00,00,000/-चा दंड ठोठावता येईल. फसवणूक करणे.[28] +एखादी व्यक्ती ICAI ने निर्धारित केलेल्या तीनही स्तरांच्या परीक्षा (फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल) उत्तीर्ण करून आणि 36 महिन्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण पूर्ण करून किंवा परस्पर ओळख करार (MRAs) अंतर्गत सूट मिळवून सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास पात्र आहे. +ICAI कडे CPA कॅनडा, ICAEW, CPA ऑस्ट्रेलिया, CPA आयर्लंड सोबत MRA आणि MOU आहेत [२९] +भारतातील जागतिक अकाऊंटन्सी संस्थांकडून कठोर स्पर्धेला तोंड देत, ICAI आपली शिक्षण आणि प्रशिक्षण संरचना अद्यतनित करत आहे आणि आजच्या जगात अनुपयुक्त असलेली पारंपारिक रचना बदलण्यासाठी 2023 मध्ये नवीन जागतिक स्तरावरील शिक्षण आणि प्रशिक्षण संरचना आणत आहे. सध्या सीए परीक्षा ही जगभरातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप कठीण असते जी काही विद्यार्थ्यांना अशक्य वाटते. यामध्ये आधुनिक संगणक आधारित परीक्षा (CBEs) आणि पेपरनिहाय उत्तीर्ण प्रणाली असेल, परीक्षेचा नमुना पूर्णपणे केस स्टडी आणि ओपन बुक होईल[30] आणि IFRS, टेक्नॉलॉजी आणि फायनान्समधील विषय जोडले जातील आणि अर्थशास्त्र, गणित, प्रगत विषय जोडले जातील. कंपनी कायदा आणि धोरणात्मक खर्च व्यवस्थापन आणि कार्यप्रदर्शन मूल्यमापन हटवले जाईल.[उद्धरण आवश्यक] +आंतरराष्ट्रीय लेखा शैक्षणिक मानकांशी जुळण्यासाठी गटनिहाय उत्तीर्ण प्रणाली रद्द केली जाईल.[उद्धरण आवश्यक] +कमिटी ऑफ रिव्ह्यू ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (CRET) आपला अंतिम अहवाल फेब्रुवारी २०२२ पर्यंत ICAI परिषदेला सादर करेल. त्यानंतर परिषद सार्वजनिक टिप्पण्यांसाठी खुला करेल.[उद्धरण आवश्यक] +ICAI ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) सोबत करार केला आहे, ज्यामुळे CA विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा पेपर/पाच पेपर लिहून बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्री मिळवण्यात मदत होईल. उदाहरणार्थ, वाणिज्य शाखेतील पदवी IGNOU मधून अकाऊंटिंग आणि फायनान्समधील प्रमुख विषयांसह मिळवता येते बशर्ते विद्यार्थ्याने फाउंडेशन आणि इंटरमीडिएटमध्ये मिळालेले ग्रेड प्रदान केले असतील आणि IGNOU द्वारे घेतलेली टर्म एंड परीक्षा उत्तीर्ण होईल. त्याचप्रमाणे मास्टर्ससाठी फायनलमधील ग्रेडच्या आधारे घेतले जाईल. या उपक्रमामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना विषय आणि श्रेय यांचे कोणतेही डुप्लिकेशन न करता दोन्ही पदव्या प्राप्त करण्यात मदत झाली आहे.[31][32] +ICAI अभ्यास साहित्य देते आणि प्रॉस्पेक्टसद्वारे अभ्यासक्रमाचे विस्तृत वर्णन करते.[33] ICAIचा दावा आहे की संकेतस्थळवरील ही अभ्यास सामग्री अभ्यासासाठी प्रेरित विद्यार्थ्यांना पुरेशी आहे, बहुतेक विद्यार्थी तोंडी कोचिंग क्लासला उपस्थित राहणे किंवा ई-लर्निंग पोर्टल्समधून शिकणे निवडतात. +सदस्यत्व मिळविण्याची दुसरी पद्धत म्हणजे परस्पर ओळख करार किंवा MRAs. ICAI ने जागतिक स्तरावर अनेक संस्थांसोबत MRAs मध्ये प्रवेश केला आहे, समतुल्य स्थान असलेल्या, त्या संस्थांच्या सदस्यांना ICAIचे सदस्यत्व प्राप्त करण्यास आणि ICAIच्या सदस्यांना इतर देशांमध्ये त्याच्या समकक्ष सदस्यत्व मिळविण्यास सक्षम करण्यासाठी. परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या नियमित योजनेत काही सूट देऊन हे केले जाते. +ICAI ने विविध देशांच्या व्यावसायिक लेखा संस्थांसोबत एक सामंजस्य करार (MOU) केला आहे. या सामंजस्य करारांचे उद्दिष्ट लेखाविषयक ज्ञान, व्यावसायिक आणि बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या संबंधित सदस्यांच्या हितसंबंधांच्या प्रगतीसाठी आणि लेखा व्यवसायाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी दोन संस्थांमध्ये परस्पर सहकार्य प्रस्थापित करणे हा आहे.[45] +संस्था पात्र सदस्यांसाठी आणि अंशतः पात्र विद्यार्थ्यांसाठी तिच्या वेबसाईटवर प्लेसमेंट पोर्टल ठेवते.[49] हे कॅम्पस प्लेसमेंट इव्हेंट्स आणि त्याच्या व्यावसायिक जर्नल्स आणि संकेतस्थळद्वारे जाहिरातीसह पूरक आहे. +2010च्या सुरुवातीस, ICAI ने सिंगापूरस्थित कृषी पुरवठा शृंखला प्रमुख ओलाम इंटरनॅशनल येथे प्रत्येकी US$260,000च्या विक्रमी वार्षिक पगारावर तीन नवीन पात्र सहयोगींना नियुक्त केले.[50] +ICAI सनदी लेखापाल आणि इतरांनी पाळले जाणारे तांत्रिक मानक तयार करते आणि जारी करते. सदस्यांनी या मानकांचे पालन न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. ICAI द्वारे जारी केलेल्या तांत्रिक मानकांमध्ये लेखा मानके, प्रतिबद्धता आणि गुणवत्ता नियंत्रण मानके, अंतर्गत लेखापरीक्षणाची मानके, कॉर्पोरेट व्यवहार मानक, स्थानिक संस्थांसाठी लेखा मानके इ. +2010 पर्यंत, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने 32 लेखा मानके जारी केली आहेत. हे AS-1 ते AS-7 आणि AS-9 ते AS-32 असे क्रमांकित आहेत (AS-8 आणि AS-6 आता लागू नाहीत कारण ते AS-26 आणि AS-10 मध्ये विलीन झाले आहेत).[51] ICAI द्वारे जारी केलेल्या लेखा मानकांचे पालन करणे ही भारत सरकारच्या कंपनीज (लेखा मानक) नियम, 2006च्या अधिसूचनेसह एक वैधानिक आवश्यकता बनली आहे.[52] नॅशनल अॅडव्हायझरी कमिटी ऑन अकाउंटिंग स्टँडर्ड्स (NACAS)च्या स्थापनेपूर्वी, ही संस्था भारतातील एकमेव लेखा मानक सेटर होती. तथापि NACAS ही स्वतंत्र संस्था नाही. ते फक्त ICAI द्वारे शिफारस केलेल्या लेखा मानकांचा विचार करू शकते आणि भारत सरकारला त्यांना कंपनी कायदा, 2013 अंतर्गत अधिसूचित करण्याचा सल्ला देऊ शकते. पुढे, म्हणून अधिसूचित लेखा मानके केवळ कंपनी कायदा, 2013 अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांना लागू आहेत. इतर सर्व संस्थांसाठी, ICAI ने जारी केलेली लेखा मानके लागू होतात. +मुख्य लेख: भारतीय लेखा मानक +भारतीय GAAPचे IFRS सह अभिसरण करण्याच्या कल्पनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी G20 मध्ये IFRS सह भारतीय लेखा मानकांचे संरेखन करून केली होती. भारत सरकारने जारी केलेल्या IFRS-कन्व्हर्ज्ड Ind ASच्या अंमलबजावणीसाठी मूळ रोडमॅपनुसार, सुरुवातीला, Ind ASची अंमलबजावणी 2011 पासून होणे अपेक्षित होते. तथापि, हे लक्षात घेऊन कर समस्यांसह काही समस्या अजूनही बाकी होत्या. संबोधित करणे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने Ind ASच्या अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. IFRS मध्ये सुरळीत संक्रमणासाठी, ICAI ने लेखा मानकांवरील राष्ट्रीय सल्लागार समिती आणि RBI, SEBI आणि IRDA, CBDT सारख्या विविध नियामकांसोबत अभिसरणाची बाब हाती घेतली आहे. IASB, IFRS जारीकर्ता, देखील ICAIला त्याच्या अभिसरणाच्या प्रयत्नात समर्थन देत आहे. ICAI ने फेब्रुवारी 2011 नंतर IASB द्वारे जारी केलेल्या सुधारणा आणि नवीन IFRSच्या आधारावर Ind AS मध्ये सुधारणा/सूत्रित केले आहे. IFRS-कन्व्हर्ज्ड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स (Ind AS) भारतात 1 एप्रिल 2015 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आले आहेत. Ind AS दत्तक घेण्याची ऐच्छिक तारीख. Ind ASचा अनिवार्य अर्ज रु.ची निव्वळ संपत्ती असलेल्या सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांपुरता मर्यादित आहे. 1 एप्रिल 2016 किंवा त्यानंतरच्या लेखा वर्षापासून 500 कोटी आणि त्याहून अधिक. 250 कोटी आणि त्याहून अधिकची आर्थिक विवरणपत्रे लागू Ind AS नुसार तयार करणे आवश्यक आहे. बँका आणि NBFC ने देखील 1 एप्रिल 2018 पासून नेट वर्थच्या निकषांवर आधारित Ind AS लागू करणे आवश्यक आहे. +ही मानके ज्या भावनेने तयार केली गेली आहेत त्याच भावनेने या मानकांची अंमलबजावणी केली जाते याची खात्री करण्यासाठी, ICAI आपल्या विविध उपक्रमांद्वारे सदस्यांना मार्गदर्शन करत आहे जसे की Ind AS वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) असलेले शैक्षणिक साहित्य जारी करणे. संक्रमण आणि अंमलबजावणी संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी ICAI द्वारे वेळेवर स्पष्टीकरणे देखील जारी केली जात आहेत. इंड एएसच्या अंमलबजावणीसाठी सपोर्ट-डेस्कद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण देखील केले जाते. याशिवाय, सदस्यांना या मानकांवर शिक्षित आणि प्रशिक्षित करण्यासाठी कॉर्पोरेट आणि नियामक संस्थांसाठी Ind AS वर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, Ind AS वर इन-हाउस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. +प्रतिबद्धता आणि गुणवत्ता नियंत्रण मानकांमध्ये खालील मानकांचा समावेश आहे: 1 लेखापरीक्षणावरील मानके (SAs), ऐतिहासिक आर्थिक माहितीच्या ऑडिटमध्ये लागू केली जातील. 2 पुनरावलोकन प्रतिबद्धता (SREs) वरील मानके, ऐतिहासिक आर्थिक माहितीच्या पुनरावलोकनामध्ये लागू केली जातील. ऐतिहासिक आर्थिक माहितीचे लेखापरीक्षण आणि पुनरावलोकनांव्यतिरिक्त, अॅश्युरन्स एंगेजमेंट्समध्ये (SAEs) 3 मानके लागू केली जातील. 4 संबंधित सेवांवर (SRSs) मानके, ICAI द्वारे निर्दिष्ट केल्याप्रमाणे, माहिती, संकलन प्रतिबद्धता आणि इतर संबंधित सेवा प्रतिबद्धतेसाठी सहमतीनुसार कार्यपद्धती लागू करणे समाविष्ट असलेल्या प्रतिबद्धतेवर लागू करणे. उपरोक्त मानके एकत्रितपणे प्रतिबद्धता मानक म्हणून ओळखली जातात. 5. गुणवत्ता नियंत्रणावरील मानके (SQCs) - ही मानके वर वर्णन केल्याप्रमाणे प्रतिबद्धता मानकांद्वारे समाविष्ट असलेल्या सर्व सेवांसाठी लागू केली जातील. ऑक्‍टोबर 2017 पर्यंत ICAI ने 46 एंगेजमेंट आणि क्वालिटी कंट्रोल स्टँडर्ड्स जारी केले आहेत (पूर्वी ऑडिटिंग आणि अॅश्युरन्स स्टँडर्ड्स म्हणून ओळखले जाणारे) ऑडिटिंग आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित विविध विषय समाविष्ट आहेत.[53] ही मानके ISA 600 आणि ISAE 3000 या दोन मानकांशिवाय IFACच्या IAASB द्वारे जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत आहेत.[54] +इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने FAIS वर विचारमंथन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, जी या वर्षाच्या 2020च्या अखेरीस तयार केली जाण्याची अपेक्षा आहे. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था ही अकाउंटिंग जगातील पहिली संस्था असेल. फॉरेन्सिक व्यावसायिक आणि भागधारकांसाठी FAIS मानकांचा संपूर्ण संच विकसित करणे, प्रस्तावित मानके फॉरेन्सिक लेखा आणि तपास व्यावसायिकांना त्यांच्या परीक्षा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आयोजित करण्यास आणि न्यायालयामध्ये उच्च स्तरीय छाननीच्या अधीन असणारे पुरावे गोळा करण्यास मदत करतील. [५५] +23 सप्टेंबर 2019 रोजी चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय शिक्षक CA प्रवीण शर्मा यांच्या नेतृत्वाखाली "डियर ICAI कृपया बदला" नावाने भारतभरातील 200हून अधिक संस्था शाखांमध्ये आणि सोशल मीडियावर CA परीक्षेच्या उत्तरांची पुनर्तपासणी करण्याच्या अधिकाराची मागणी करत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. पत्रके.[56] सध्या CA नियमांनुसार, उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची परवानगी नाही.[57] 2018 पासून विद्यार्थी या अधिकाराची मागणी करत होते. डिसेंबर 2018 मध्ये आंदोलनही पुकारण्यात आले होते, परंतु परिषदेने आश्वासन दिल्यानंतर आणि परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कोणतीही बैठक न घेता किंवा कोणताही अहवाल सादर न करता विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ही समिती लवकरच निकामी झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, ICAIचे माजी अध्यक्ष श्री. एन.डी. गुप्ता, प्रसिद्ध लेखापाल श्री. मोतीलाल ओसवाल, श्री. मोहनदास पै, श्री. राघव चढ्ढा, इत्यादींचा सोशल मीडियावर समावेश असलेल्या अनेक सार्वजनिक व्यक्तींचा पाठिंबा विद्यार्थ्यांना मिळू शकला.[ ५८] अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर उत्तरपत्रिका अपलोड करून मूल्यांकनात घोर चुका झाल्याचा आरोप केला. एकाधिक निवडी प्रश्न देखील चुकीच्या पद्धतीने तपासले गेले.[59] प्रत्येक दिवसागणिक, भारताच्या विविध भागातून समर्थक निषेधात सामील होण्यासाठी दिल्लीला पोहोचू लागल्याने गर्दी वाढत होती. आजकाल, प्रत्येक वर्षी ICAI मध्ये कायदेशीर समस्या येतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15018.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b016260a0f87b87e89a254e4a103a48056ffb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15018.txt @@ -0,0 +1,15 @@ +मनमोहन सिंग +मनमोहन सिंग +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस map = +भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका एप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६ इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे.[१] या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुकांपेक्षा ही संख्या ४ कोटी ३० लाखांनी जास्त आहे. या निवडणुकीसाठी २००९ च्या अंदाजपत्रकात ११ अब्ज २० कोटी रुपयांची (१ कोटी ८० लाख युरो) तरतूद करण्यात आलेली आहे.[२] या निवडणुकी बरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये त्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेण्यात येतील. +भारतीय संविधानानुसार पाचवर्षात एकदा लोकसभा निवडणुका घेणे आवश्यक आहे. १४व्या लोकसभेची मुदत जून १, २००९ रोजी संपेल. १५वी लोकसभा त्याआधी अस्तित्वात येईल. या निवडणुका भारतीय निवडणुक आयोग घेते. +२००९ एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा + संदर्भ: निवडणुक आयोग Archived 2009-05-16 at the Wayback Machine. आयबीएन लाइव Archived 2009-05-19 at the Wayback Machine. +मार्च २ २००९ रोजी भारतीय निवडणुक मुख्यायुक्त एन. गोपालास्वामीने खालील कार्यक्रम जाहीर केला: +[३] +[४] +भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपदासाठी थेट निवडणुक नसते तर निवडलेले संसदसदस्य पंतप्रधान निवडतात. तरीही प्रमुख पक्षांनी जर त्यांना बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदी कोण असेल याची जाहीतार केली आहे. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधीच्या वक्तव्यानुसार यु.पी.ए.कडून सद्य पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असतील.[५] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवारने आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले आहे.[६] यानंतर मनमोहनसिंग यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली[७] व त्यामुळे पुढील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल नव्याने अटकळी सुरू झाल्या आहेत. याला खीळ घालण्यासाठी फेब्रुवारी ६, २००९ रोजी सोनिया गांधीने आपल्या लेखात मनमोहनसिंगच यु.पी.ए.चे पंतप्रधान उमेदवार असल्याचे प्रतिपादन केले.[८] +संसदेतील मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाने डिसेंबर ११, २००७ रोजी जाहीर केले की लालकृष्ण अडवाणी त्यांचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार असतील.[९] जानेवारी २३, २००८ रोजी अडवाणींना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली.[१०]. रा.लो.आ.मधील इतर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. +कम्युनिस्ट पक्ष व इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी वरील दोन आघाड्यांना पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की जर त्या पक्षाला पुरेश्या जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाशी जुळवून घेउन सरकार स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यास त्यांची तयारी आहे.साचा:Fact. मायावती या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. मायावतीने पंतप्रधानपद मिळवण्यासाठी कोणाशीही संधान बांधण्याची तयारी दाखवली आहे.[११] इतर कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. +या चाचण्या निवडणुक आयोगाशी संलग्न नसतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1503.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e3f4fed9ccfe255a8ec1a93cd508ab57ef5aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1503.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रशांत नाकती[१] महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध असे नाव, ज्याच्या गाण्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. गीतकार, संगीतकार, गायक, निर्माता, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकेतून प्रशांत संगीत सृष्टीत काम करत आहे. महाराष्ट्रातील मूळच्या रायगड जिल्ह्यातील असलेल्या प्रशांतच्या एकाहून एक अशा दर्जेदार मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले आहे.. + + +कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, प्रशांत नाकती ने हळूहळू ओळख मिळवून आणि चाहता वर्ग तयार करण्यास सुरुवात केली. आज, प्रशांत नाकती ला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते, जे त्यांच्या मनाला चटका लावणारे सादरीकरण आणि मनापासून सादरीकरणासाठी ओळखले जाते. त्याचा भावपूर्ण आवाज आणि भावनिक वितरणामुळे त्याला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही प्रशंसा मिळाली आहे. यशस्वी अल्बम आणि हिट गाण्यांच्या[२] प्रशांत नाकती ने स्संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या यशानंतरही, प्रशांत नाकती ग्राउंड आणि नम्र राहतो, त्याच्या प्रवासाला आकार देणारे संघर्ष आणि त्याग कधीही विसरत नाही. असे प्रेक्षक आणि कलाकार आवर्जुन सांगतात. +छोट्या गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रशांत नाकती[३] यांना संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला. मर्यादित संसाधने आणि संधींसह, त्याला उद्योगात आपला ठसा उमटवण्यासाठी त्याच्या प्रतिभा आणि दृढनिश्चयावर अवलंबून रहावे लागले. त्याच्या विरुद्ध अनेक प्रतिकूल परिस्थिती असूनही, नक्तीने चिकाटी ठेवली आणि त्याच्या कलाकुसरला सुधारण्यासाठी आणि त्याचे गायन कौशल्य परिपूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. प्रशांत नाकती साठी हा प्रवास सोपा नव्हता[४]. त्याला वाटेत नकार आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला, परंतु त्याने कधीही त्याला त्याच्या ध्येयापासून रोखू दिले नाही[५]. त्याऐवजी, त्याने स्वतःला आणखी कठोर करण्यासाठी आणि त्याच्या टीकाकारांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी प्रेरणा म्हणून वापरले.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1505.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef2a31c598b88d023358e336e8b9356f45d7436b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1505.txt @@ -0,0 +1,7 @@ +प्रशांत पुरुषोत्तम दामले [१] हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे. +मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. +छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली. +लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत. +प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (६ नोव्हेंबर २०२२) एकूण १२,५०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६ वा होता. +प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15064.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8824f83fc5b27fe29f0955265a200fa6955c5ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15064.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतीय २०००-रुपयांची नोट (₹२०००) ही भारतीय रुपयाचे मूल्य आहे आणि १९ मे २०२३ रोजी तिचे विमुद्रीकरण करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ₹ ५०० आणि ₹ १००० च्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर हे नवीन चलन १० नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केले होते आणि तेव्हा पासून ते चलनात आले.[१] संपूर्णपणे नवीन डिझाईन असलेल्या बँक नोटांच्या महात्मा गांधी नवीन मालिकेचा हा एक भाग आहे. +नोव्हेंबर २०१६ मध्ये १,००० रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यापासूनची भारतीय रिझर्व बँकने छापलेली ही सर्वोच्च चलनी नोट आहे.[२][३][४] भारतीय रिझर्व बँकच्या अधिकृत घोषणेपूर्वी, मीडियाने वृत्त दिले की ऑक्टोबर २०१६ च्या अखेरीस म्हैसूरमधील करन्सी प्रिंटिंग प्रेसमधून ₹ २००० च्या नोटा छापल्या गेल्या होत्या.[५] २०१६ च्या भारतीय नोटांच्या नोटाबंदीनंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹२०००, ₹५००, ₹२००, ₹१००, ₹५०, ₹२० आणि ₹१० च्या सात नवीन नोटा जाहीर केल्या आहेत.[६][७] +भारतीय रिझर्व बँकच्या आकडेवारीनुसार, मार्च २०१७ च्या अखेरीस ₹ २००० च्या ३,२८५.८७ दशलक्ष नोटा चलनात होत्या. एका वर्षानंतर (३१ मार्च २०१८ रोजी) ३,३६३.२८ दशलक्ष तुकड्यांमध्ये केवळ किरकोळ वाढ झाली. मार्च २०१८ च्या अखेरीस ₹१८,०३७ अब्ज चलनात असलेल्या एकूण चलनापैकी ₹२००० च्या नोटांचा वाटा ३७.३ टक्के होता, जो मार्च २०१७ च्या अखेरीस ५०.२ टक्के होता.[८] मार्च २०२० अखेरीस हा हिस्सा २२.६ टक्क्यांवर आला आहे.[९] +₹ २००० ची नोट एक द्रुत निराकरण म्हणून तयार करण्यात आली होती, जेणेकरून चलन पुरेसा प्रसारित होईल.[१०] चलनात कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध असल्याने, भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बँकने चलनातून ₹२००० च्या नोटा मागे घेतल्या आहेत.[१०] +₹ २००० ची नोट साठेबाजी आणि कर चुकवेगिरीसाठी वापरली जात असल्याच्या भानगडीत, भारतीय रिझर्व बँकने ₹ २००० च्या नोटांची छपाई थांबवली आहे.[११] आणि २०१९-२० आर्थिक वर्षात या मूल्याच्या कोणत्याही नवीन नोटा छापल्या गेल्या नाहीत.[१२] +मे २०२३ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹२००० च्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. असे असूनही, नोटा कायदेशीर निविदा राहतील आणि ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँक खात्यांमध्ये बदलून किंवा जमा करता येतील.[१३][१४] +रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी नोटा काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर 30 जूनपर्यंत भारतीय बँकांना 2.72 लाख कोटी रुपयांच्या 2,000 नोटा मिळाल्या. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 76 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत आणि बदलून दिल्या आहेत.[ संदर्भ हवा ] +नवीन २००० ची नोट ६६ आहे मिमी × १६६ mm किरमिजी रंगाची नोट, ज्याच्या समोरच्या बाजूला महात्मा गांधींचे चित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. दृष्टिहीनांना चलन ओळखण्यात मदत करण्यासाठी त्यावर ब्रेल प्रिंट आहे. याच्या उलट बाजूस भारताच्या पहिल्या आंतरग्रहीय अंतराळ मोहिमेचे प्रतिनिधित्व करणारे मंगळयान आणि स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि टॅग लाईन आहे.[१] + २००० च्या नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, खाली सूचीबद्ध आहेत:[१] +इतर भारतीय रुपयाच्या नोटांप्रमाणे, २००० च्या नोटेची रक्कम १७+१ भाषांमध्ये लिहिलेली असते ( दृष्टीहीन लोकांसाठी नवीन चलनी नोटांवर ब्रेल भाषा जोडली जाते). समोर इंग्रजी आणि हिंदीमध्ये संप्रदाय लिहिलेला आहे. उलट बाजूस एक भाषा फलक आहे जो भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी १५ मध्ये नोटचे मूल्य प्रदर्शित करतो. भाषा वर्णक्रमानुसार प्रदर्शित केल्या जातात. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू, उर्दू आणि ब्रेल या पॅनेलवर समाविष्ट केलेल्या भाषा आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15072.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4e3a5494c0d0400eeb0f8c89e56cf45db60d366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15072.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऋषी भारद्वाज हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. दंडकारण्याजवळ त्यांचा आश्रम होता. ते आयुर्वेदनिपुण होते. +मुद्‌गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथांत दिलेल्या कथांनुसार, अंगारक किंवा मंगळ हा ऋषी भारद्वाज यांचा पुत्र आहे. +चरक संहिता नुसार त्यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले होते. ब्रम्हदेव, बृहस्पति व इंद्रा नंतर ते चौथे व्याकरण प्रवक्ता होते. त्यांनी व्याकरण, आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतिशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण, शिक्षा इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. +ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ, विज्ञान व्यक्ता व मंत्रद्रष्टा होते. भारद्वाज ऋषी हे विमान शास्त्रामध्ये निपुण होते, त्यांनी विमानाचे प्रकार जसे प्रवासी विमान, लश्करी विमान, अंतराळ यान वर्णन केले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15098.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0462d6e6b26c2db38b4458c230719bf9af0c1b22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15098.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15112.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d77e96c205273949a8a8b0ea4462ac347c2c76d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15112.txt @@ -0,0 +1 @@ +भालगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. भालगाव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15148.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4d0c1eb0ea62459c8e4cf2cf801e2fb7e90d1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15148.txt @@ -0,0 +1,8 @@ + भालावळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15182.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30f7a4c7be7365351871a4641231c69d44d79c89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15182.txt @@ -0,0 +1,2 @@ +भावडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15219.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f993a662b062b62b3334d3616f165334d227b29c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15219.txt @@ -0,0 +1,2 @@ +भावळी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15280.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b364773e5a8576b57dab6792f960d6b3cfc233c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15280.txt @@ -0,0 +1,10 @@ +भास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. हा इसवी सनपूर्व चौथ्या शतकात होऊन गेला. +संस्कृत नाटककारांच्या यादीत महाकवी भास याने जन्माने आणि गुणांनीही पहिले स्थान मिळवले आहे. +श्रेष्ठ नाटककार म्हणून भासाचे कौतुक संस्कृत वाङ्मयात ठायी ठायी केलेले दिसते. भासासारख्या प्रथितयश कवीच्या उत्तमोत्तम कलाकृती समोर असताना आपल्या नवीन नाटय़कृतीचे स्वागत रसिक मंडळी कसे काय करतील, अशी काळजी प्रत्यक्ष कालिदासालाही पडली होती. दंडीने ‘मृत्यूनंतरही आपल्या नाटकांच्या रूपाने अमर झालेला महाकवी’ म्हणून भासाची स्तुती गायली आहे. बाणभट्टाने भासाच्या नाटकांची मंदिरांशी तुलना करून त्यांची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. +नाटकांची संख्या हा निकष लावला तरी भासाचे स्थान पहिलेच आहे. कारण भासाच्या उपलब्ध नाटकांची संख्या तेरा आहे. +भासाची नाटके काळाच्या उदरात गडप झाली होती, ती महामहोपाध्याय टी.गणपती शास्त्री या विद्वानाला १९१२ साली सापडली. त्रावणकोर संस्थानातील एका मठात मल्याळी लिपीत ताडपत्रांवर ती लिहिलेली आढळली. +रामायण- महाभारत या प्राचीन महाकाव्यांतून वेचक नाटय़बीजे उचलून भासाने आपल्या स्वतंत्र प्रतिभेने ती नाट्यरूपाने फुलविली. त्याशिवाय लोकवाङ्मयाच्या आधाराने त्याने दोन नाटके रचली; त्यांतले ‘चारुदत्त’ हे नाटक ‘संगीत मृच्छकटिक’च्या रूपाने मराठी रसिकांना चांगलेच परिचित आहे. उदयन हा भासाच्या आधी इतिहासात होऊन गेलेला लोकप्रिय राजा. त्याच्याविषयी प्रचलित असलेल्या आख्यायिकांना अनुसरून भासाने दोन नितांत सुंदर नाट्यकृती रचल्या. याखेरीज कृष्णचरित्रावर आधारित आणखी एक नाटक त्याने लिहिले आहे. नुसते नाट्यविषयांचे वैविध्य हेच भासाचे वेगळेपण नसून भासाचे प्रत्येक नाटक आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारे आहे. +कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची नाटके १९३१ साली पहिल्यांदा मराठीत आणली. (पुस्तकाचे नाव - भासाची नाटके अर्थात भासकवीचा मराठीत अवतार). त्यानंतर बळवंत रामचंद्र हिरगांवकर ह्यांनी भासनाटकांचे गद्यपद्यात्मक मराठी भाषांतर केले आहे (पुस्तकाचे नाव - भास कवीची नाटके). मृच्छकटिक आणि पिया बावरी ही मराठी नाटके भासाच्या नाटकांवर आधारित आहेत. +भास यांच्या १३ नाट्यकृती 'भासनाटकचक्रम् ।' म्हणून प्रसिद्ध आहेत. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15281.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb7c04176f8482787247295c70385e4d99ff82c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15281.txt @@ -0,0 +1 @@ +भास् म्ह् न्जे मेन्दुत् आलेल्या क्ल्पनान्चे प्रत्य्क्ष् दिसणे.एखादि काल्प्निक गट्ना प्रतक्ष गडत् आहे असे वातणे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15287.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2b2e06e406e53658f95a466d274738966f4e77a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15287.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहासा इंडोनेशिया (इंडोनेशियन भाषा) ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता. +इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे. आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १००% आहे. त्यामुळे "बहासा इंडोनेशियन" ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक गणली जाते. बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशिया बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशिया हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते. पूर्व तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही बहासा इंडोनेशिया ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे. बऱ्याच जुन्या इंग्लिश भाषा दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ "बहासा" असा केलेला आढळेल. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15288.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..796300ad309e05c6e17d37260403e0b9cbe36b8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15288.txt @@ -0,0 +1 @@ +मलाय ही मलेशिया व ब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15290.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18b2a2fffdec4f420d9a2d1173a53369a0b0ad3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15290.txt @@ -0,0 +1,9 @@ + + +दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. इ.स. १९५८ सालापासून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र भारतातील ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे. +दैनिक भास्कराच्या मराठी आवृत्त्या दिव्य मराठी या नावाने, महाराष्ट्रातील औरंगाबाद(पहिला अंक २८ मे २०११), नाशिक आणि जळगांव(पहिला अंक १० सप्टेंबर २०११) या ठिकाणांहून प्रकाशित होतात. कुमार केतकर(की अभिलाष खांडेकर?) हे मराठी आवृत्त्यांचे मुख्य संपादक आहेत. गुजराती आवृत्ती दिव्य भास्कर या नावाने आहे. इ.स.२०११ सालच्या स्थितीनुसार रमेशचंद्र अग्रवाल हे दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आहेत. +दैनिक भास्कर पहिल्यांदा भोपाळमधून 'सुबह सवेरे' या नावाने इ.स. १९५६ साली, आणि 'गुड मॉर्निंग इंडिया' या नावाने इ.स. १९५७ सालापासून ग्वाल्हेरमधून प्रकाशित होऊ लागले. दोन्ही आवृत्त्या हिंदी होत्या. वृत्तपत्राचे नाव इ.स. १९५८ साली 'भास्कर समाचार' झाले आणि नंतर 'दैनिक भास्कर'. आज दैनिक भास्कर हे खपाच्या बाबतीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे आणि जगातले अकराव्या क्रमांकाचे दैनिक वृत्तपत्र आहे[ संदर्भ हवा ]. +दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन जयपूरमधून आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरातील आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली, तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. परिणामी, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर, इ.स. १९९६ रोजी जयपूरमध्ये दैनिक भास्करच्या तब्बल १,७२,३४७ प्रति खपल्या[ संदर्भ हवा ]. त्या शहरातील 'राजस्थान पत्रिका' या आघाडीच्या वृत्तपत्राचा खप त्या काळी मात्र एक लाख प्रति इतका होता. त्याहून जास्त प्रति खपवण्याचा नवा उच्चांक दैनिक भास्करने प्रस्थापित केला. +त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची आदि शहरांतून निघतात. २०१०-११ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांतून दिव्य मराठी या नावाखाली भास्कर निघू लागले. एसेल ग्रुपच्या सहभागाने मुंबई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांमधून भास्कर गटाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनए या नावाखाली निघते. +दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड, दिल्ली, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, आदि १३ राज्यांतून आणि ६४ शहरांतून होणारा रोजचा खप ३५ लाख प्रतींच्या वर आहे(सन २०११). + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15298.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74dc9aeffb00c09f43ce3360b584c4bcd1ab0e37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15298.txt @@ -0,0 +1,5 @@ +भास्कर तात्याबा चंदनशिव ( :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय. +[१] +प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला. +इ.स. १९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले.[२] +त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1533.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1533.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15340.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a6fd897e17b82c7a92ef491baa115843201888 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15340.txt @@ -0,0 +1 @@ +भिंगोली हे गाव शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आहे.गावाची ऐकून लोकसंख्या 970 आहे.प्रामुख्याने लोक शेतीकडे वळलेले आहेत शेती हा मुख्य व्यवसाय आहे.गावामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15386.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4464b2c096b17395bda7c678b662b14440e82962 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15386.txt @@ -0,0 +1,5 @@ + +भिडेवाडा ही पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[१] या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती.[२][३] भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी एक ही शाळा होती. यामध्ये शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले.[४] +सध्या या ठिकाणी पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. फुले दांपत्याने शाळा सुरू केली तो काळ, त्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा इतिहास स्मारकाच्या रूपात उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींसाठी शाळा देखील पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे . [५] +अनेक वर्षे या जागेवर स्मारक व्हावे ही मागणी होती. परंतु भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित राहिला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर भिडे वाड्याच्या जागेवर स्मारक उभारण्यास परवानगी देण्यात आली. एकूण तेरा वर्षे न्यायालयात हे प्रकरण होते. न्यायालयीन निकालानंतर पुणे महापालिकेने ही जागा स्वतःकडे घेतली. +भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवार, ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा यंत्रांच्या साहाय्याने ही जागा मोकळी करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15408.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..398b4adbcf7dd080ef1da6a976ab5a4faf3a79cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15408.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ३८′ ४४″ N, ७४° ०३′ ३३″ E +कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. कोरेगांव भिमा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते. +१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिश(महार बटालियन)व पेशव्यांचे सैन्य लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ त्यापैकी (५००महार) , काही मराठा, अरबी मुस्लिम सैनिक, ब्रिटिश व पेशव्यांचे २८००० हजार सैनिक ज्यामध्ये महारांचा,मराठ्यांचा, मुस्लिम सैनिकांचा समावेश होता.यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ही लढाई अनिर्णित राहिली.[१][२][३][४] +इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे.[५] गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[६] +गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15409.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0242a469cc36a607b36e62bff867fb695c12d4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15409.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. भिमा शिवय्या स्वामी (१५ ऑक्टोबर, १९४३:सोनसांगवी, केज तालुका, बीड जिल्हा - ) हे वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनेसांगवीतच झाले, तर हायस्कूलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी काॅलेजचे शिक्षण आधी पुण्याच्या एस.पी. कॉलेजमधून नंतर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्‌सी. केले. पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून स्वामी औरंगाबाद विद्यापीठातून बी.ए. व एम.ए.च्या पदव्या मिळवल्या. डॉ. यू.म. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याच विद्यापीठात पीएच.डी. साठी 'लक्ष्मण महाराज : व्यक्ती आणि वाड्. मय' या विषयावर संशोधन केले. +१. https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_25.html diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15427.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1426a09572dd4506a6e4ca8ec95ce5dd5ba5fb57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_15427.txt @@ -0,0 +1,2 @@ + भिलपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1550.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74cd7acd8b6c4ef682ccb306c6f99c30feb65b0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1550.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रसाद जवादे हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करतो. तो कलर्स मराठीच्या रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.[१] +प्रसाद याचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तो पुणे येथील एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला होता. २०१० मध्ये, तो झी मराठीच्या माझिया प्रियाला प्रीत कळेनामध्ये दिसला. २०११ मध्ये, त्याला झी मराठीच्या अरुंधतीमध्ये प्रथम एक मुख्य भूमिका मिळाली. २०१२ मध्ये, त्याने पुन्हा स्टार प्रवाहच्या लक्ष्मी वर्सेस सरस्वतीमध्ये मुख्य भूमिका मिळवली. २०१५ मध्ये तो असे हे कन्यादानमध्ये दिसला होता. २०१५ मध्ये तो बाबासाहेब आंबेडकरची भूमिका बजावल्यानंतर +प्रसिद्धीच्या झोतात एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर मालिकेमुळे आला.[२] तो बिग बॉस मराठी ४मध्ये देखील झळकत होता.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1551.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c6c565378a8cb0b0a8e09dd17ecdc412994d3a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1551.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रसाद तनपुरे (२१ जुलै, १९४२ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] [२] +तनपुरे १९८० मध्ये काँग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1552.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c6c565378a8cb0b0a8e09dd17ecdc412994d3a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1552.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रसाद तनपुरे (२१ जुलै, १९४२ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] [२] +तनपुरे १९८० मध्ये काँग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1560.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df0bdb8c7e6f361192a0c1b80ab337b22317150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1560.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरलीकृष्ण प्रसिद्ध कृष्ण (१९ फेब्रुवारी, १९९६:बंगळूर, भारत - हयात) हा  भारतकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. प्रसिद्धने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २३ मार्च २०२१ इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याद्वारे केली. +प्रसिद्ध स्थानिक क्रिकेट मध्ये कर्नाटक क्रिकेट संघ तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याने भारत अ संघासाठी देखील अनेक लिस्ट-अ सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1576.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c637543984e87b385d77f3fd3c4895605889a131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1576.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रहसन किंवा फार्स हा नाटकाचा तसेच चित्रपटाचा एक विशिष्ट प्रकार आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे प्रहसन हा दहा रूपकांपैकी (नाट्यप्रकारांपैकी) एक प्रकार आहे. भरताने प्रहसनाचे दोन भेद सांगितले आहेत. शुद्ध आणि संकीर्ण. आणखी एक वैकृत नावाचा संकीर्ण प्रहसनाचा उपप्रकार आहे. प्रहसनात यथोचित 'वीथ्यंगे' उपयोजावीत, त्यात मुख व निर्वहण हे दोन 'संधि' असावेत आणि आवश्यकतेनुसार एक वा दोन अंक असावेत, असे भरताने म्हटले आहे. प्रहसनांत कैशिकी आणि आरभटी वृत्तींना थारा असू नये असे नाट्यशास्त्र व इतर सहग्रंथ म्हणतात. +प्रहसनाचे दोन्ही प्रकार हास्यरसप्रधान असतात. शुद्ध प्रहसनात पात्रे अनेक असली तरी हास्यकारण वागणूक बहुधा एकाचीच असते. संकीर्ण प्रहसनात वेश्य, चेट, विट, धूर्त, हिजडे आणि छिनाल स्त्रिया असू शकतात, तर शुद्ध प्रहसनात तपस्वी, साधू भिक्षू वगैरे.असतात. +शुद्ध प्रहसनाची उदाहरणे : शशि-विलास, सागरकौमुदी, कंदर्पकेलि वगैरे. भगवज्जुका, सैरंधिका आणि लटकमेलक ही संकीर्ण प्रहसनाची भरताने सांगितली उदाहरणे आहेत. +फार्स या इंग्रजी नाट्यप्रकावरून मराठीत आलेला प्रहसन हा आधुनिक प्रकार भरतप्रणीत प्रहसनापेक्षा वेगळा आहे. अतिशयोक्त, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांना मनसोक्त हसवणे हा या प्रहसनांचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा प्रहसनभर चालू असतो. या प्रकारच्या मराठी प्रहसनांची उदाहरणे : +वगैरे वगैरे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1593.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28e1669abf6e2fc5c9a8dad1159cefea56e9924 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1593.txt @@ -0,0 +1,7 @@ +मराठीचे उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक कै.श्री.विवेक रामचंद्र जोग यांचे विद्यार्थी एक अभिनव वाचकस्पर्धे आयोजित करीत असतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे हा प्रा. वि.रा.जोगांच्या महाविद्यालयीन कार्याचा एक महत्त्वाचा घटक होता.म्हणूनच त्यांचे कोणतेही पार्थिव स्मारक न उभारता वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हेच त्यांचे उचित स्मारक होईल या विचाराने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. +प्रस्तुत स्पर्धा युवागट (१८ ते २५ वर्षे) व प्रौढगट (२६ ते ५५ वर्षे) अशा दोन गटात घेतली जाते व दोन गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतात. स्पर्धेसाठी कोणताही विवक्षित अभ्यासक्रम नेमलेला नसतो. प्रश्नपत्रिकेत विविधांगी वाचनाची चाचणी घेतली जाते; साहित्यप्रकारांविषयी वैयक्तिक आवडनिवड असते हे लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेत पुरेसे पर्यायही देण्यात येतात. +स्पर्धेच्या पहिल्या फेरीत वाचकाच्या वाचनाची व्याप्ती एका लेखी चाचणीने तपासली जाते. शंभर गुणांची लघु-उत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्नांची प्रश्नपत्रिका स्पर्धकाला एका तासात सोडवायची असते +. +दुसरी फेरी व अंतिम फेरी प्रश्नमंजूषा ह्या प्रकारच्या व मौखिक असतात, अंतिम फेरीत सामान्य वाचनाच्या चाचणी बरोबरच वाचकाला ज्या प्रांतात विशेष रस आहे अशा प्रांतातील त्याच्या परिपूर्ण, साक्षेपी वाचनाची परीक्षा घेतली जाते. +लेखी स्पर्धा-फेरीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे तसेच मौखिक परीक्षा घेणे ही जबाबदारीया क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक पार पाडतात. आजवर अंबरीश मिश्र,रवींद्र लाखे, सतीश काळसेकर, माधुरी पुरंदरे आदि मान्यवरांनी सल्लागार परीक्षक या नात्याने या उपक्रमात सहभाग दिला आहे. +प्रवेशनोंदणीसाठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या समन्वयकांशी संपर्क केला जातो diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1717.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..008e17b87ab930716bcf195b8f171d5ff7a1a52c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1717.txt @@ -0,0 +1 @@ +प्रायर अर्स्किन वेवर्ली जोन्स (६ जून, १९१७:त्रिनिदाद - २१ नोव्हेंबर, १९९१:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५२ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1724.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22af510a628f2cb807d3308e6c7860dcbf522d11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1724.txt @@ -0,0 +1,5 @@ +न्यायालयाचे प्रारंभिक अधिकारक्षेत्र किंवा मूळ अधिकारक्षेत्र सामान्य कायदा कायदेशीर प्रणालींमध्ये प्रथमच एखाद्या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार असतो. अपिलाच्या अधिकारक्षेत्राच्या विरोधात उच्च न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार असतो. +भारतीय सर्वोच्च न्यायालयाला मूळ, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्र आहे.[१] त्याचे अनन्य मूळ अधिकार क्षेत्र भारत सरकार आणि भारत राज्यांमधील किंवा भारत सरकार आणि एका बाजूला राज्ये आणि दुसऱ्या बाजूला एक किंवा अधिक राज्ये किंवा विविध राज्यांमधील प्रकरणांमध्ये विस्तारित आहे. मूळ अधिकार क्षेत्र थेट सर्वोच्च न्यायालयात आणलेल्या प्रकरणांशी संबंधित आहे. राज्यघटनेचा अर्थ लावणे आवश्यक असणारी प्रकरणे किंवा मूलभूत हक्क नाकारण्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात केली जाते. दोन किंवा अधिक राज्यांमध्ये किंवा केंद्र आणि राज्यांमध्ये वाद असल्यास, सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणांचा निकाल देते. याशिवाय, भारतीय राज्यघटनेचे कलम १३१ नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीशी संबंधित असलेल्या सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाला मूळ अधिकार प्रदान करते.[1] त्यांना निर्देश, आदेश किंवा रिट जारी करण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये बंदी घालणे, आदेश, प्रतिबंध, क्वो वॉरंटो आणि सर्टिओरी यासारख्या रिटची ​​अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. +सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राला राज्यघटनेच्या कलम 132(1), 133(1) किंवा 134 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निकाल, हुकूम किंवा अंतिम आदेशाच्या संदर्भात उच्च न्यायालयाने प्रदान केलेल्या प्रमाणपत्राद्वारे लागू केले जाऊ शकते. दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणे, ज्यात भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी कायद्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. +भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 अंतर्गत भारताचे राष्ट्रपती विशेषतः संदर्भित करू शकतील अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाला विशेष सल्लागार अधिकार क्षेत्र आहे. +युनायटेड स्टेट्समध्ये, मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयांना ट्रायल कोर्ट म्हणून संबोधले जाते. विशिष्ट प्रकारच्या प्रकरणांमध्ये, यू.एस. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारक्षेत्र कनिष्ठ न्यायालयांसोबत असते. यू.एस. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र कलम III, युनायटेड स्टेट्स राज्यघटनेचे कलम 2[2] आणि युनायटेड स्टेट्स कोड, कलम 1251 चे शीर्षक 28 द्वारे शासित आहे. सामान्यतः, मूळ अधिकारक्षेत्रातील प्रकरणांमध्ये पक्षकार म्हणून राज्यांमधील खटले समाविष्ट असतात, सहसा प्रादेशिक किंवा पाणी हक्क विवादांवर. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1732.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af4416bda7f716e1c6fcf5fe472d5cbb6543cc57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1732.txt @@ -0,0 +1 @@ +प्रार्थनास्थळ किंवा उपासना स्थळ हे असे स्थळ असते जेथे आपापल्या धर्मानुसार धार्मिक प्रार्थना केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1744.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191b0bdf299eba9ed117dc75002b8517da4eef04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1744.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिन्स रॉजर्स नेल्सन (जून ७, इ.स. १९५८ - २१ एप्रिल, इ.स. २०१६) हा अमेरिकन संगीतकार होता. हा अनेक वाद्ये वाजवू शकत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1761.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191b0bdf299eba9ed117dc75002b8517da4eef04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1761.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिन्स रॉजर्स नेल्सन (जून ७, इ.स. १९५८ - २१ एप्रिल, इ.स. २०१६) हा अमेरिकन संगीतकार होता. हा अनेक वाद्ये वाजवू शकत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1763.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e23dae2354ada76687c8062adb147a933d116ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1763.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिन्स एडवर्ड आयलंड (फ्रेंच: इले दु प्रिन्स एदुआर्द) हा कॅनडाचा सर्वात लहान प्रांत आहे. हा प्रांत अनेक बेटांचा मिळून बनलेला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1799.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f102651b2e5f07bf95ae0d15243219b3dbcf334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1799.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रियंका चोप्रा-जोनास ( १८ जुलै १९८२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती ५ भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियंका चोप्राने २००३ साली द हीरो नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी व सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियंका चोप्राला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिस वर्ल्ड २००० स्पर्धेची विजेती, चोप्रा ही भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये, भारत सरकारने तिला पद्मश्री देऊन सन्मानित केले आणि टाइमने तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आणि पुढील दोन वर्षांत, फोर्ब्सने तिला जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सूचीबद्ध केले. +जरी चोप्रा सुरुवातीला एरोनॉटिकल अभियांत्रिकी शिकण्याची आकांक्षा बाळगत असली तरी, तिने भारतीय चित्रपट उद्योगात सामील होण्याच्या ऑफर स्वीकारल्या, ज्या संधी तिच्या स्पर्धा जिंकल्यामुळे निर्माण झाल्या. तिने तामिळ चित्रपट थामिझन (२००२) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय (२००३) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बॉक्स ऑफिस हिट अंदाज (२००३) आणि मुझे शादी करोगी (२००१) मध्ये प्रमुख स्त्रीची भूमिका बजावली आणि २००४ च्या थ्रिलर ऐतराजमधील तिच्या ब्रेकआउट भूमिकेसाठी तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. चोप्राने क्रिश आणि डॉन (दोन्ही २००६) या सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रॉडक्शनमध्ये मुख्य भूमिकांसह स्वतःला स्थापित केले आणि नंतर तिने त्यांच्या सिक्वेलमध्ये तिच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली. +एका छोट्या धक्क्यानंतर, चोप्राने २००८ मध्ये फॅशन या नाटकात अडचणीत सापडलेल्या मॉडेलच्या भूमिकेसाठी यश मिळवले, ज्याने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोस्ताना मधील ग्लॅमरस पत्रकार म्हणून सन्मानित केले. चोप्राला कमिने (२००९), ७ खून माफ (२०११), बर्फी या चित्रपटांमध्ये अनेक पात्रे साकारण्यासाठी व्यापक ओळख मिळाली. मेरी कोम (२०१४), दिल धडकने दो (२०१५) आणि बाजीराव मस्तानी (२०१५). २०१५ ते २०१८ पर्यंत, तिने एबीसी थ्रिलर मालिका क्वांटिकोमध्ये ॲलेक्स पॅरिश म्हणून काम केले आणि द स्काय इज पिंक (२०१९) या बायोपिकसह हिंदी चित्रपटसृष्टीत परतली. चोप्राने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, विशेषतः द व्हाईट टायगर (२०२१) आणि द मॅट्रिक्स पुनरुत्थान (२०२१). +चोप्रा पर्यावरण आणि स्त्रियांच्या हक्कांसारख्या सामाजिक कारणांना प्रोत्साहन देते आणि लैंगिक समानता, लैंगिक वेतनातील तफावत आणि स्त्रीवाद याबद्दल बोलते. तिने २००६ पासून युनिसेफ सोबत काम केले आहे आणि अनुक्रमे २०१० आणि २०१६ मध्ये बाल हक्कांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक युनिसेफ सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आरोग्य आणि शिक्षणासाठी तिचे नेमसेक फाउंडेशन वंचित भारतीय मुलांना आधार देण्याचे काम करते. रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून, चोप्राने तीन एकेरी रिलीज केले आहेत आणि तिच्या अनेक चित्रपट गाण्यांसाठी गायन प्रदान केले आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या प्रोडक्शन कंपनीच्याही त्या संस्थापक आहेत, ज्या अंतर्गत तिने प्रशंसित मराठी चित्रपट व्हेंटिलेटर (२०१६) सह अनेक प्रादेशिक भारतीय चित्रपटांची निर्मिती केली आहे. गोपनीयता राखूनही, चोप्राचे अमेरिकन गायक आणि अभिनेते निक जोनास यांच्याशी लग्नासह तिचे ऑफ-स्क्रीन जीवन, मीडिया कव्हरेजचा विषय आहे. २०२१ मध्ये, तिने तिचे संस्मरण अनफिनिश्ड प्रकाशित केले, जे न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत पोहोचले.[१] +प्रियंका चोप्राचा जन्म १८ जुलै, १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. प्रियंका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा, तर आईचे नाव मधु चोप्रा. प्रियंका चोप्राचे वडील लष्करामध्ये असल्यामुळे त्यांचं कुटुंब नेहमी फिरतीवर असायचं. त्यामुळे प्रियांका चोप्राला पूर्ण भारतीय संस्कृतीची ओळख झाली. प्रियंका चोप्राने आपल्या शिक्षणाची सुरुवात 'ला मार्टीनियर कन्या महाविद्यालय', लखनौ येथे निवासी विद्यार्थी म्हणून केली. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी तिने 'मारिया गोरेटी महाविद्यालय', बरेलीमधूनही शिक्षण घेतले. प्रियंका चोप्राने दहावीचे शिक्षण बोस्टन, अमेरिका येथून पूर्ण केले. त्यावेळी तिची महत्त्वाकांक्षा सॉफ्टवेर अभियांत्रिकी किंवा गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ होण्याची होती. बोस्टनवरून परतल्यानंतर तिने 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला व ही स्पर्धा जिंकली. यानंतर प्रियंका चोप्राच्या कारकिर्दीची पूर्ण दिशाच बदलून गेली. +तिचे वडील अंबाला येथील पंजाबी हिंदू होते. तिची आई, झारखंडमधील मधु चोप्रा या डॉ. मनोहर किशन अखौरी, माजी काँग्रेसचे दिग्गज आणि बिहार विधानसभेच्या माजी सदस्या मधु ज्योत्स्ना अखौरी यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. तिची दिवंगत आजी, श्रीमती अखौरी, मूळची मेरी जॉन नावाची जेकोबाइट सीरियन ख्रिश्चन होती, ती केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुमारकोम येथील कवलप्पारा कुटुंबातील होती. चोप्राला सिद्धार्थ नावाचा एक भाऊ आहे, जो तिच्या सात वर्षांनी कनिष्ठ आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा, मीरा चोप्रा, आणि मन्नारा चोप्रा या चुलत बहिणी आहेत. +चोप्राच्या पालकांच्या लष्करी डॉक्टरांच्या व्यवसायामुळे, कुटुंबाला भारतातील दिल्ली, चंदीगड, अंबाला, लडाख, लखनौ, बरेली आणि पुण्यासह अनेक ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. लखनौमधीलला मार्टिनिएर गर्ल्स स्कूल आणि बरेली येथील सेंट मारिया गोरेटी कॉलेज ही ती ज्या शाळांमध्ये शिकली होती, त्यात त्यांचा समावेश होता. डेली न्यूझ अँड ॲनालिसिसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत चोप्रा म्हणाल्या की, तिला नियमित प्रवास करणे आणि शाळा बदलण्यात काहीच हरकत नाही; एक नवीन अनुभव आणि भारताच्या बहुसांस्कृतिक समाजाचा शोध घेण्याचा एक मार्ग म्हणून तिने याचे स्वागत केले. ती राहात असलेल्या अनेक ठिकाणी, चोप्राच्या लहानपणी लडाखच्या थंड वायव्य भारतीय वाळवंट प्रदेशातील लेहच्या खोऱ्यात खेळण्याच्या गोड आठवणी आहेत. ती म्हणाली होती, "मला वाटतं, मी लेहमध्ये असताना मी चौथीच्या वर्गात होते. माझ्या भावाचा नुकताच जन्म झाला. माझे बाबा सैन्यात होते आणि तिथंच पोस्टिंग झाले होते. मी एक वर्ष लेहमध्ये राहिलो आणि तिथल्या माझ्या आठवणी आहेत जबरदस्त. आम्ही सर्व लष्करी मुले तिथे होतो. आम्ही घरात राहत नव्हतो, आम्ही दरीत बंकरमध्ये होतो आणि एका टेकडीच्या माथ्यावर एक स्तूप होता जो आमच्या दरीकडे दुर्लक्ष करत असे. आम्ही माथ्यापर्यंत धावायचो. ती आता बरेलीला तिचे मूळ गाव मानते आणि तेथे मजबूत संबंध ठेवते. +१३ व्या वर्षी, चोप्रा अभ्यासासाठी युनायटेड स्टेट्समध्ये स्थलांतरित झाली, तिच्या मावशीसोबत राहिली आणि न्यूटन, मॅसॅच्युसेट्स आणि सीडर रॅपिड्स, आयोवा येथील शाळांमध्ये प्रवेश घेतला, क्वीन्स, न्यू यॉर्क येथे थांबल्यानंतर, तिच्या मावशीचे कुटुंब देखील वारंवार स्थलांतरित होते. मॅसॅच्युसेट्समध्ये असताना, तिने अनेक थिएटर प्रॉडक्शनमध्ये भाग घेतला आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि समूहगायनाचा अभ्यास केला. युनायटेड स्टेट्समध्ये तिच्या किशोरवयीन काळात, चोप्राला कधीकधी वांशिक समस्यांना सामोरे जावे लागले आणि एका आफ्रिकन-अमेरिकन वर्गमित्राकडून भारतीय असल्‍याबद्दल त्यांना त्रास दिला गेला. तिने म्हटले आहे की, "मी एक मूर्ख मुलगा होतो, कमी आत्मसन्मान होता, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेली होती, माझ्या पायावर पांढरे डाग होते. पण मी खूप मेहनती होते. आज माझे पाय १२ ब्रँड विकतात." तीन वर्षानंतर, चोप्रा बरेली येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून भारतात परतली. +या कालावधीत, चोप्राने स्थानिक मे क्वीन सौंदर्य स्पर्धा जिंकली, त्यानंतर चाहत्यांनी तिचा पाठलाग केला; तिच्या सुरक्षेसाठी तिच्या कुटुंबाने त्यांचे घर बारने सुसज्ज केले. तिच्या आईने तिला २००० च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश दिला; तिने दुसरे स्थान पटकावले, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड खिताब जिंकला. चोप्राने पुढे मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली, जिथे तिला ३० नोव्हेंबर २००० रोजी लंडनमधील मिलेनियम डोममध्ये मिस वर्ल्ड २००० आणि मिस वर्ल्ड कॉन्टिनेंटल क्वीन ऑफ ब्यूटी-आशिया आणि ओशनियाचा मुकुट देण्यात आला. चोप्रा मिस वर्ल्ड जिंकणारी पाचवी भारतीय स्पर्धक होती आणि सात वर्षात अशी कामगिरी करणारी चौथी होती. तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, परंतु मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर ती निघून गेली. चोप्रा म्हणाल्या की मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड या खिताबांमुळे तिला ओळख मिळाली आणि तिला चित्रपटातील भूमिकांसाठी ऑफर मिळू लागल्या. +फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियंका चोप्राने विश्वसुंदरीचा किताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'द हीरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचे पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होते. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मते मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियंकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली. +यशाबरोबरच प्रियंका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड द्यावे लागले, आणि त्यावेळी प्रियंका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती. प्रियंका चोप्रा ही एकमेव अभिनेत्री आहे जिने हॉलिवूडमध्ये ही आपली अभिनयाची कामगिरी बजावली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1814.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96904b42d0cf936e261dbbd8a737b54575befc07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1814.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रियदर्शिनी कुलकर्णी या जयपूर-अत्रौली घराण्याच्या एक प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून विशेष प्रावीण्यासह मायक्रो-बायाॅलॉजी विषयात एम.एस्‌सी व पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठातून कॉलेजमधून संगीत विषय घेऊन एमए केले. +प्रियदर्शिनी कुलकर्णी यांचा जन्म सामाजिक विचारवंत, साहित्यिक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि समाजसेवक यांच्या घरात झाला. त्यांचे आजोबा आर्. दिवाण हे मराठवाड्यातून निवडून गेलेले पहिले लोकसभा सदस्य होते, तर मावशी अनुराधा वैद्य मराठीची प्रख्यात लेखिका होती. आई संगीताचा आणि संगीतकारांचा सन्मान करीत असे आणि थोडेफार शास्त्रीय संगीतही जाणतही होती. मुलीचा संगीतातला रस पाहून ती प्रियदर्शिनीला सबंध मराठवाड़ा विभागातले सर्वाधिक प्रख्यात और गुणी गायक पंडित नाथराव नरेलकर यांच्याकडे घेऊन गेली. पुढची दहा वर्षे म्हणजे एम.एस्‌सी पास हीईपर्यंत प्रियदर्शिनी त्यांच्याकडेच शास्त्रोक्त कंठसंगीत शिकली. +सन १९८० च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले. त्याच काळात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी पुण्याच्या एसएनडीटी कॉलेजमधून संगीत विषय घेऊन एमए केले. तेथे त्यांना प्रख्यात व्हायोलीन वादक गजाननराव जोशी यांच्या कन्या सुचेता बिडकर ऊर्फ मालूताई शिक्षिका होत्या. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांना उस्ताद भूरजी खान यांचे पुत्र बाबा अजीजुद्दीन खान और शिष्य मधुसूदन कानिटकर यांच्याकडून त्यांच्या मृत्यूपर्यंत गाण्याचे मार्गदर्शन मिळाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1832.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44b29440feb62e3798e4d8b0cf907eab14ccb5a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1832.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रिया पुनिया (६ ऑगस्ट, इ.स. १९९६ - ) ही  भारतकडून टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्री सामना ६ फेब्रुवारी, २०१९ रोजी  न्यूझीलंडविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1835.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179eaa620e34b1604f89f2f9e482b5942f7c13f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1835.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रिया शरद बापट ( १८ सप्टेंबर १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०“८ च्या डिसेंबरमध्ये प्रिया बापट हिने नाटक रंभूमीवर निर्माती म्हणून एक नवे पाऊल टाकले. 'दादा एक गुड न्यूझ आहे ' हे नाटक तिने प्रक्षकांसमोर आणले. +ती सिटी ऑफ ड्रीम्स(मायानगरी) या वेबसीरीजमध्येही काम करत आहे.त्यामधे तिला मुख्यमंत्री पौर्णिमा राव गायकवाड (आमदार,विधानपरिषद) ही भूमिका दिलेली आहे. +रंगमंच +दूरचित्रवाणी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1873.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52679613a3fca077c2573c0877131be3b0bb8c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1873.txt @@ -0,0 +1,48 @@ +प्रियोळ हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या फोंडा तालुक्यातील शहर आहे. हे शहर राज्याची राजधानी पणजी पासून २० किलोमीटर अंतरावर आहे. +या शहराचे क्षेत्र १३.९२ चौ.किमी असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या शहरात १८१४ कुटुंबे व एकूण ८१६४ लोकसंख्या आहे. यामध्ये ४१४७ पुरुष आणि ४०१७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३६ असून अनुसूचित जमातीचे ३१४२ लोक आहेत. ह्या शहराचा जनगणना स्थल निर्देशांक ६२६८६८ [१] आहे. +लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा V (लोकसंख्या_एकूण ५,००० ते ९,९९९). या शहराला सर्वेक्षण शहर (Census Town) असा दर्जा आहे.. +१ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे बेळगांव हे शहर १४१ किमी अंतरावर आहे. ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे पुणे हे शहर ५१७ किमी अंतरावर आहे. येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक १५ किमी अंतरावर करंबोळी आहे. +शहरामध्ये उघडी आणि बंद गटारव्यवस्था आहे. +छोट्या धरणातून पाणीपुरवठा होतो. शहराला शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाणी पुरवठ्याची क्षमता 1400 किलो लिटर आहे. +सर्वात जवळील अग्निशमन सुविधा फोंडा (९ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ९ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १२ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना ७ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ९ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ९ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति केंद्र ९ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १२ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १२ किमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील इतर वैद्यकीय सुविधा ३२ किमी अंतरावर आहे. +शहरात १ खाजगी बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +शहरात १ खाजगी निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +शहरात ३ खाजगी औषधाचे दुकान आहेत. +शहरात ९ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. शहरात १ खाजगी प्राथमिक शाळा आहे. +शहरात ३ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. +शहरात ३ खाजगी माध्यमिक शाळा आहेत. +सर्वात जवळील खाजगी उच्च माध्यमिक शाळा बांदोडा (३ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (फक्त वाणिज्य) फोंडा (१० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (कला आणि शास्त्र) पणजी (२० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (कला आणि वाणिज्य) बांदोडा (८ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पदवी महाविद्यालय (कला. शास्त्र आणि वाणिज्य) कांदोळी (१५ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय - विधी पणजी (३० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पदवी महाविद्यालय - विद्यापीठ पणजी (३६ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय - अन्य फोंडा (९ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी (३६ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा (७ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी व्यवस्थापन संस्था पणजी(३० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पॉलिटेक्निकपणजी(३० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा बांदोडा (७ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र फोंडा (९ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी इतर शैक्षणिक सुविधा केळा (९ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी अनाथाश्रम केळा (९ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे सरकारी निवास (होस्टेल) पेन्हा डी फ्रान्का (३६ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी वृद्धाश्रम बांदोडा (३ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय क्रीडांगणमडगाव (१५ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी चित्रपटगृह उसगाव (२४ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय सभागृह फोंडा (९ किमी) येथे आहे. +शहरात १ शासकीय सार्वजनिक ग्रंथालय आहे. +प्रियोळ ह्या शहरात पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): प्लास्टिकच्या बाटल्या, लोखंडी वस्तूंचे उत्पादन, हस्तकला +शहरात ३ राष्ट्रीय बँक आहेत. +शहरात १ शेतकी कर्ज संस्था आहे. +शहरात ४ बिगर शेतकी कर्ज संस्था आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1875.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cce31672a1e6681ba20c7f71ef4dd5bc458ae74d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1875.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिव्हेटेर तथा प्रिव्हेट एर ही स्वित्झर्लंड देशात मुख्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जिनीव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाहून सुटणाऱ्या बिझनेस जेट विमानांची सोय करते. याशिवाय प्रिव्हेटेर ही चार्टर सेवेसाठी तसेच इतर विमानकंपन्यांसाठीही विमाने पुरवते.[१][२] यात लुफ्तांसा, ईसी एर आणि स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1878.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a570d7f20494d1e036a5b4de2fd204172138462 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1878.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 42°40′N 21°10′E / 42.667°N 21.167°E / 42.667; 21.167 + +प्रिस्टिना ही दक्षिण युरोपातील कोसोव्हो ह्या अंशतः मान्य देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1890.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5774b292a46cadbf46f8ba96d9e66decc2939808 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1890.txt @@ -0,0 +1 @@ +प्रितम सिंग (१९४५:सिंगापूर - हयात) हा  सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1892.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d375f59869565be7901379aa06077bbb6cd92930 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1892.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. हे हॉस्पिटल भारतातील सर्वात मोठ्या इस्पितळांपैकी एक आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये, वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी मेडिट्रोनिकच्या स्वतंत्र संचालक म्हणून रेड्डी यांची निवड करण्यात आली.[१][२] +प्रीता रेड्डी यांनी मद्रास विद्यापीठामध्ये रसायनशास्त्रातील बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी पूर्ण केली आणि अन्नामलाई विद्यापीठातून लोक प्रशासन पदवी प्राप्त केली.[३][४] +त्यांच्या तीन बहिणी आहेत, सुनीता रेड्डी, संगीता रेड्डी आणि शोबाना केमिनिनी आणि सर्व अपोलो हॉस्पिटलमधील संचालक म्हणून सेवा देत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1894.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3d08cd2a9477c76320927566ba6cfe3dd0e17d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1894.txt @@ -0,0 +1 @@ +प्रीति सिंग (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७१) हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आणि कादंबरीकार आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1895.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3d08cd2a9477c76320927566ba6cfe3dd0e17d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1895.txt @@ -0,0 +1 @@ +प्रीति सिंग (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७१) हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आणि कादंबरीकार आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1927.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470b431cf4e5433c4c9932a86b9428ff12fdffd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1927.txt @@ -0,0 +1 @@ +प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीने तयार केलेले जेट विमान इंजिन आहे. याची क्षमता २,५२२ हॉर्सपॉवर (१,८८१ किलोवॅट) असते. या इंजिनाचे पीडब्ल्यु१२३ किंवा पीडब्ल्यु१२७मध्ये रूपांतर सहजगत्या करता येते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1929.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f58260bcf7921b7d06f1fd84c12d620af7e0522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1929.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रॅट काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1944.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1944.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_198.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcf68bb6e59ad3a71898c4d5a13f38bce2d22bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_198.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप पायस बारावा (मार्च २, इ.स. १८७६ - ऑक्टोबर ९, इ.स. १९५८:व्हॅटिकन सिटी) हा २६०वा पोप होता. +याचे मूळ नाव युजेनियो मरिया जियोव्हानी पसेली असे होते. हा मार्च २, इ.स. १९३९ ते मृत्यूपर्यंत पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1994.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf703aaa7ca50287ad29a290b9f0278b05d3d342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1994.txt @@ -0,0 +1 @@ +प्रेशियस मरान्गे (२६ नोव्हेंबर, १९८२:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1996.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf703aaa7ca50287ad29a290b9f0278b05d3d342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1996.txt @@ -0,0 +1 @@ +प्रेशियस मरान्गे (२६ नोव्हेंबर, १९८२:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2005.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e423a2f4dc6583c1ada34594434cc164929f2c41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2005.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांतर्फे देण्यात येणारा नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राष्ट्रीय हित, सुरक्षा, जागतिक शांतता, सांस्कृतिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये मोठी सार्वजनिक अथवा खाजगी कामगिरी करणाऱ्यांस दिला जातो. हा पुरस्कार अमेरिकेच्या नागरिकांपुरता मर्यादित नसून जगातील कोणत्याही व्यक्तीस देता येतो. हा नागरी पुरस्कार असूनही सैनिकी पेशातील व्यक्तींना देता येतो व त्यांना आपल्या गणवेशावर हा लावण्याची मुभा असते. +अमेरिकेच्या काँग्रेसद्वारे देण्यात येणाऱ्या कॉंग्रेशनल गोल्ड मेडल या पुरस्काराशी समान महत्त्व असणारा हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. +जॉन एफ. केनेडी यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_205.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feaaed54b2686c57879981dfb9d2f72aacaa059 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_205.txt @@ -0,0 +1 @@ +पोप पॉॅंटियानस तथा पॉॅंटियान ( - ऑक्टोबर, इ.स. २३५:सार्डिनिया, इटली) हा तिसऱ्या शतकातील पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2069.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21ee3b1e5d9cc1218a60dd4308a9ad79b0baea71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2069.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रोटेस्टंट सुधारणा (Protestant Reformation) ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती. मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ युरोपभर पसरली व जर्मनी, बाल्टिक व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशांमध्ये ल्युथरन चर्च स्थापण्यात आली. फ्रान्स, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, हंगेरी इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच प्रोस्टेस्टंट धर्माला चालना मिळाली. +कॅथलिक चर्चने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच तीस वर्षांच्या युद्धाची मुळे रोवली गेली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2104.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3649f4608d00a43617ef6eab36410a43a32fb2ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2104.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणसाच्या आयुष्याचे वाढ व विकासाच्या दृष्टीने चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व व वृद्धावस्था (म्हातारपण). +त्यातील तारुण्यानंतरच्या व वृद्धावस्थेच्या आधीच्या कालखंडाला सर्वसाधारणपणे प्रौढत्व असे म्हणतात. आयुष्याच्या साधारण चाळीसाव्या वर्षापासून पासष्ठाव्या वर्षापर्यंतचा (40 ते 65 वर्षे) हा कालखंड असतो. ही वयोमर्यादा स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलती असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2108.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c87f08fd6004b4ad25362117321ee38fcecfaa9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2108.txt @@ -0,0 +1,38 @@ +प्लांकचा स्थिरांक (h), हा पुंजाच्या शक्तीचे (quantum energy चे) कंप्रतेशी गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. पुंज यामिकाच्या सिद्धान्तात या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, पुंजवादाच्या जनकांपैकी एक असलेल्या माक्स प्लांक यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे: +E ही प्रारणातील फोटॉनची पुंजशक्ती (quantized energy) असून, nu( + + + +ν +  + + +{\displaystyle \nu \ } + +) +ही फोटॉनची हर्‍ट्झमधील कंप्रता आहे, तर omega( + + + +ω +  + + +{\displaystyle \omega \ } + +) +ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंदकोनीय कंप्रता (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत + + + +ℏ +  + + +{\displaystyle \hbar \ } + += १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे. +प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद. +प्लांकच्या स्थिरांकाच्या आणखी काही सोप्या व्याख्या: १. फॉटॉन(प्रकाशपुंज)च्या ऊर्जेचा, त्या फॉटॉनच्या वारंवारतेशी असणाऱ्या गुणोत्तराचा स्थिरांक. +२. रेडियेशनच्या एकापुंजाचे त्याच्या वारंवारतेशी असणारे न बदलणारे गुणोत्तर. +३. विद्युत्-चुंबकीय तरंगाची कंप्रता आणि तिच्यातली ऊर्जा यांचा गणिती संबंध दाखवणारा स्थिरांक. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2127.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42a41eb133008d8e6cdcbb2fce12fb40df90636a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2127.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भौतिकशास्त्र वा रसायनशास्त्राच्या संदर्भात,प्लाझ्मा हा अशा प्रकारचा वायु आहे ज्याचे काही कण आयनीकृत असतात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2146.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad9dec9d2576ca1ee05a42076030734fbae903ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2146.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 50°22′17″N 4°8′32″W / 50.37139°N 4.14222°W / 50.37139; -4.14222 + +प्लिमथ (इंग्लिश: Plymouth हे इंग्लंडच्या डेव्हॉन ह्या काउंटीमधील प्रमुख शहर आहे. हे शहर लंडनच्या १९० मैल (३१० किमी) नैऋत्येस अटलांटिक महासागराच्या काठावर वसले आहे. गेली अनेक शतके जहाज बांधणी हा येथील प्रमुख व्यवसाय राहिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_215.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..361e04cfaf81b4a8a164078a369c49bae01721c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_215.txt @@ -0,0 +1 @@ +पोप फेलिक्स तिसरा (??:रोम, इटली - १ मार्च, इ.स. ४९२:रोम, इटली) हा १३ मार्च, इ.स. ४८३ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता. याने हेनोटायकॉन हा दस्तावेज ख्रिश्चनांना बंधनकारक नसल्याचे ठरवले. हा निर्णय अकेशियन फूटीचे मूळ असल्याचे समजले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2153.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75fc44a9775732afec612bff66b9fac9c790755b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2153.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +तुम्हाला हे हवे आहे का? diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2160.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ec4e3dada9bccf5370e7ee487629853dc4e214a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2160.txt @@ -0,0 +1,44 @@ + +प्लूटो (चिन्ह: [१] आणि [२]) हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला प्रदक्षीणा मारणारी आकाराने नववी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने (एरिस नंतर) दहावी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो.[३] प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे. +कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतीयांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. +प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते +२०१५ सालच्या जुलै महिन्यात प्लूटोजवळून गेलेल्या NASAच्या न्यू होरायझन्स् (New Horizons) संशोधन यानाच्या निरीक्षणांवरून प्लूटोला पुन्हा एकदा ग्रहाच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. +.[४] प्लूटोला अजून दोन छोटे उपग्रह आहेत - निक्स व हायड्रा - ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[५] +प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण २०व्या शतकाच्या शेवटीशेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.[६] ऑगस्ट २४, २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिस व सेरेससोबत बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.[७] या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला.[८][९] मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.[१०] +१८४० च्या दशकामध्ये उर्बैन ली व्हेरियेने न्यूटोनियन गतिशास्त्राच्या (Newtonian mechanics) सहाय्याने युरेनसच्या कक्षेतील उतारचढावांचा अभ्यास करून नेपच्यूनच्या जागेचे भाकित केले होते.[११] नेपच्यूनच्या नंतरच्या निरिक्षणानंतर शास्त्रज्ञांनी असा तर्क केला की युरेनसची कक्षा नेपच्यूनशिवाय अजून एका ग्रहामुळे बदलत आहे. १९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेलने फ्लॅगस्टाफ, अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व संभाव्य नववा ग्रह हुडकण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला. या ग्रहाला त्याने प्लॅनेट एक्स असे नाव दिले होते.[१२] १९०९ पर्यंत लॉवेल व विल्यम हेन्री पिकरींग यांनी या ग्रहासाठी अनेक संभाव्य जागा सूचित केल्या.[१३] लॉवेलच्या १९१६मधील मृत्यूपर्यंत हा शोध चालू होता पण हाती काही यश आले नव्हते. पण लॉवेलला माहित नव्हते की त्याच्या नकळत मार्च १९ १९१५ला वेधशाळेने प्लूटोचे दोन अंधुक छायाचित्र घेतले होते.[१३][१४] +यानंतर १० वर्ष हा शोध थांबला होता. याला कारण होते पर्सिव्हाल लॉवेलची बायको, कॉन्स्टंस लॉवेलने, लॉवेलचा वेधशाळेतील हिस्सा हस्तगत करण्यासाठी दाखल केलेला खटला.[१५] १९२९ मध्ये वेधशाळेचे संचालक व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी प्लॅनेट एक्सला हुडकण्याची जबाबदारी २३ वर्षाच्या कॅन्सास येथून आलेल्या क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली.[१५] टॉमबॉघचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे. ब्लिंक सेपरेटर नावाचे यंत्र वापरून तो दोन चित्रांमध्ये जलदगत्या मागे-पुढे जाऊ शकत असे. यामुळे जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर त्याच्या हालचालीचा आभास (illusion) निर्माण होत असे. जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८, १९३० रोजी टॉमबॉघला जानेवारी २३ व जानेवारी २९च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली. जानेवारी २१ला काढलेल्या कमी दर्जाच्या अजून एका छायाचित्राने ही हालचाल सिद्ध केली.[१६] हे पडताळण्यासाठी वेधशाळेने अजून काही छायाचित्र काढली व त्यानंतर शोधाची बातमी हार्वर्ड कॉलेज वेधशाळेला मार्च १३, १९३० तारखेला पाठविली.[१३] +या नवीन वस्तूला नाव देण्याचे अधिकार लॉवेल वेधशाळेकडे होते. टॉमबॉघने स्लिफरला इतर कोणी करण्याच्या आधी लवकरात लवकर हे नामकरण करावे अशी विनंती केली.[१२] सर्व जगातून नावासाठी प्रस्ताव आले. कॉन्स्टंस लॉवेलने आधी झ्यूस, नंतर लॉवेल, आणि शेवटी स्वतःचे नाव मांडले. हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.[१७] +प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले.[१८] व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या (Underworld) देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले.[१९] +या नवीन वस्तूला मार्च २४, इ.स. १९३० रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले.[२०] लॉवेल वेधशाळेचा प्रत्येक सदस्यांचे तीन प्रस्तावित नावांवर मत घेण्यात आले. ही तीन नावे होती - "मिनर्वा" (जे आधीच एका लघुग्रहाला देण्यात आले होते), "क्रोनस" (हे नाव त्याकाळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी या खगोलशास्त्रज्ञाने सुचविले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते) व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली.[२१] नावाची घोषणा मे १, १९३० रोजी करण्यात आली.[१८] या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला पाच पाऊंड बक्षिस म्हनून दिले.[१८] +प्लूटो (Pluto) हे नाव पार्सिवाल लॉवेल यांच्या नावाच्या अद्याक्षराने सुरू होते. तसेच त्याची अद्याक्षराची आकृती (monogram) P-L हे प्लूटोच्या खगोलशास्त्रीय चिन्हात आहे. +().[२२] +प्लूटोचे फलज्योतिष चिन्ह() हे नेपच्यूनच्या चिन्हा ()सारखेच आहे, फक्त त्यात मध्यभागी वर्तूळ आहे तर नेपच्यूनच्या चिन्हात मध्यभागी त्रिशूळ आहे. +होउई नोजिरी यांच्या १९३०मधील सूचनेनुसार चायनीज, जापनीज व कोरियन भाषांमध्ये या नावाचे भाषांतर पाताळभूमीचा राजा तारा (冥王星),[२३][२४] असे केले जाते.[२५] अनेक अयुरोपियन भाषा प्लूटो हेच नाव त्यांच्या लिपितून लिहितात (transliteration).परंतु काही भारतीय भाषा पाताळदेव यम हे नाव वापरतात. व्हिएतनामीज भाषेमध्येपण यमाचे नाव (Diêm Vương) प्लूटोचे नाव म्हणून वापरतात.[२३] +प्लूटोचे पृथ्वीपासून असलेले दीर्घ अंतर त्याचा तपशीलवार अभ्यास करणे कठीण बनविते.प्लूटोची अनेक गुपिते २०१५ पर्यंत अज्ञातच राहतील, जेव्हा न्यू होरायझन्स प्लूटोजवळ पोहोचेल.[२६] +प्लूटोच्या वर्णपटीय पृथक्करणातून असे आढळून आले आहे की प्लूटो हा ९८% नायट्रोजन बर्फ व थोड्या प्रमाणात मिथेन व कार्बन मोनॉक्साईड यांच्यापासून बनला आहे.[२७][२८] दीर्घ अंतर व सद्ध्याच्या दूर्बीण तंत्रज्ञानाच्या मर्यादा यामुळे प्लूटोच्या पृष्ठभागाच्या तपशीलांचे छायाचित्र घेणे अशक्य आहे. तसेच हबल दूर्बिणितून मिळालेली चित्रे पूर्ण तपशील दाखवत नाहीत.[२९] +सुरुवातीला प्लूटोला लॉवेलचा "प्लॅनेट एक्स" समजून शास्त्रज्ञांनी त्याच्या नेपच्यून व युरेनसवरील प्रभावावरून त्याचे वस्तुमान काढले. १९५५ मध्ये प्लूटोचे वस्तुमान जवळपास पृथ्वीच्या वस्तुमानाइतके आहे असा हिशेब करण्यात आला होता. अधिक काळजीपूर्वक गणनेनंतर ते मंगळाच्या वस्तुमानाइतके आहे असे मांडण्यात आले.[३०] पण १९७६ मध्ये हवाई विद्यापीठाचे डेल कृशॅंक, कार्ल पिल्चर व डेव्हिड मॉरिसन यांनी प्लूटोच्या अल्बेडोचे (albedo)[मराठी शब्द सुचवा] (वस्तूचे सूर्याचा प्रकाश परावर्तित करण्याचे प्रमाण) पहिल्यांदाच मोजमाप केले. व हे त्यांना मिथेनच्या बर्फाइतके आढळले. यावरून असे स्पष्ट झाले की प्लूटो त्याच्या आकाराच्या मानाने खूप प्रकाशमान आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १% पेक्षा जास्त असणे शक्य नाही.[३०][३१] +खारॉन शोध लागल्यावर केपलरचा तिसऱ्या नियमाचे न्यूटननी केलेल्या सूत्रीकरणाचा उपयोग करून प्लूटो-खारॉन जोडीचे वस्तुमान काढण्यात आले. जेव्हा खारॉनच्या गुरुत्वाकर्षणाचा प्लूटोवरील परिणाम मोजण्यात आला तेव्हा प्लूटोचे वस्तुमान १.३१×१०२२ किलोग्रामवर आले, जे पृथ्वीच्या ०.२४% आहे.[३२] खारॉन-प्लूटोच्या ग्रहण व संक्रमणांदरम्यान केलेल्या निरिक्षणांवरून प्लूटोचा व्यास २३९० कि.मी. असावा असा निकष मांडण्यात आला आहे.[३३] अडाप्टिव प्रकाशशास्त्राच्या(adaptive optics)[मराठी शब्द सुचवा] शोधानंतर खगोलशास्त्रज्ञांना प्लूटोचा आकार अचूकपणे मोजणे शक्य झाले आहे.[३४] +प्लूटो हा सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा तर लहान व हलका आहेच पण यासोबत तो ७ नैसर्गिक उपग्रहांपेक्षाही छोटा आहे. हे सात उपग्रह म्हणजे गनिमिड, टायटन, कॅलिस्टो, आयो, पृथ्वीचा चंद्र, युरोपा, आणि ट्रायटन. प्लूटोचे वस्तुमान चंद्राच्या ०.२ पट आहे. लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वांत मोठ्या सेरेसपेक्षा प्लूटोचा व्यास दुप्पट तर वस्तुमान १२ पट आहे. पण प्लूटो एरिसपेक्षा लहान आहे, ज्याचा शोध २००५ मध्ये लागला. +प्लूटोचे वातावरण नायट्रोजन, मिथेन व कार्बन मोनॉक्साईड यांच्या पातळ आवरणाने बनले आहे. हे आवरण त्याच्या पृष्ठभागावरील बर्फापासून बनले आहे.[३५] जसा प्लूटो सूर्यापासून दूर जातो, तसे त्याचे वातावरण गोठत जाते व त्याच्या पृष्ठभागवर पडते. आणि जसा प्लूटो सूर्याजवळ येत जातो तसे प्लूटोच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व बर्फाचे वायूंमध्ये रूपांतरण होते. हे रूपांतरण प्रति-हरितगृह परिणामासारखे (anti-greenhouse effect)[मराठी शब्द सुचवा] काम करते व प्लूटोचा पृष्ठभाग थंड करते. ज्याप्रमाणे घामामुळे शरिराचे तापमान कमी होते. सब्लिमिटर ऍरे (Submillimeter Array) वापरून अलिकडेच शास्त्रज्ञांनी प्लूटोचे तापमान ४३ केल्व्हिन आहे असा शोध लावला आहे, जे अपेक्षेपेक्षा १० केल्व्हिन ने कमी आहे.[३६] +जेव्हा एखादा वातावरण नसलेला ग्रह एखाद्या दूरवरच्या ताऱ्याला झाकतो (याला ऑकल्टेशन (occultation)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात), तेव्हा तो तारा एकाएकी दृष्टिआड होतो. याविरूद्ध जेव्हा वातावरण असलेला ग्रह एखाद्या ताऱ्याला झाकतो तेव्हा तो तारा हळुह्ळू अंधुक होत जात नजरेआड जातो. त्याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून त्या ग्रहाच्या वातावरणाबाबत माहिती मिळू शकते. १९८५च्या प्लूटोच्या एका ऑकल्टेशन (occultation)च्या अभ्यासातून प्लूटोला वातावरण आहे हे सिद्ध झाले होते. हा शोध १९८८ मधील अजून एका ऑकल्टेशनवरून अधिक दृढ झाला.[३७] ताऱ्याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून प्लूटोचा वातवरणीय दाब ०.१५ पास्कल इतका निश्चित करण्यात आला होता, जो पृथ्वीच्या जवळपास १/७,००,००० पट आहे.[३८] +२००२ मध्ये अजून एक ऑकल्टेशन पॅरिस वेधशाळेच्या ब्रुनो सिकार्डी यांच्या नेतृत्वाखालील गटाने,[३९] तसेच एम.आय.टी.च्या जेम्स एल. इलियट[४०] व विल्यम कॉलेजच्या जे पासाचॉफ [४१] यांनी बघितले व अभ्यासले. यावरून वातावरणीय दाब ०.३ पास्कल असावा असा अंदाज करण्यात आला. हे थोडे अनपेक्षित होते कारण प्लूटो सूर्यापासून १९८८ पेक्षा आता जास्त दूर होता व यामुळे वातावरणातील वायू थंड होऊन ते अधिक विरळ होणे अपेक्षित होते. याचे एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की, १९८७ मध्ये प्लूटोचा दक्षिण ध्रूव १२० वर्षांनंतर सावलीतून बाहेर आला होता. यामुळे बराच नायट्रोजन वातावरणात उत्सर्जित झाला असावा, जो थंड होण्यास बरीच दशके लागतील.[४२] अजून एक ऑकल्टेशन एम.आय.टी.-विल्यम कॉलेजचा संयुक्त गट (ज्यामध्ये जेम्स एलिएट व जे पासाचॉफ होते) व साउथवेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या लेसली यंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने जून १२, २००६ मध्ये ऑस्ट्रेलियामधून बघितले.[४३] +प्लूटोची कक्षा इतर ग्रहांपेक्षा बरीच वेगळी आहे. इतर ग्रहांच्या क़क्षा जवळपास वर्तुळाकार असून त्या एकाच इलिप्टिक प्रतलामध्ये आहेत. मात्र प्लूटोची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती या प्रमाण प्रतलापासून बरीच कललेली आहे (१७° पेक्षा जास्त) . ही उत्केंद्रता (eccentricity) प्लूटोला काही काळ सूर्यापासून नेपच्यूनपेक्षाही जास्त जवळ आणते.प्लूटो फेब्रुवारी ७, १९७९ पासून फेब्रुवारी ११, १९९९ पर्यंत सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जास्त जवळ होता. याआधी अशी स्थिती केवळ चौदा दिवसांसाठी जुलै ११, १७३५ ते सप्टेंबर १५, १७४९ पर्यंत होती. त्याही आधी अशी स्थिती एप्रिल ३०, १४८३ पासून जुलै २३, १५०३ (जवळपास २० वर्षे) टिकली होती. +प्लूटोचा जन्म व मूळ यांनी खगोलशास्त्रज्ञांना नेहमीच बुचकळ्यात टाकले आहे. १९५०च्या दशकात असा सुचविण्यात आले होते की प्लूटो हा आधी नेपच्यूनचा उपग्रह होता पण त्याला नेपच्यूनच्या आत्ताचा सर्वांत मोठा उपग्रह ट्रायटनने त्याच्या कक्षेतून उडवून लावले. ही . हे मत आता पूर्णपणे अमान्य आहे कारण, प्लूटो कधीच नेपच्यूनच्या जवळ येत नाही.[४४] +१९९२च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकित करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू म्हणून वर्गीकृत करतात.[३] कायपरच्या पट्ट्यातील इतर वस्तूंप्रमाणे प्लूटो व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[४५] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेवटी तयार होईल.[४६] +जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी ट्रायटनचे, जो प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे, अनेक गुणधर्म (वातावरण तसेच भूरचना याबाबतीतील) प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवतीच्या कक्षेत अडकला.[४७] एरिस हासुद्धा प्लूटोपेक्षा मोठा आहे, पण तो विखुरलेली चकती या वर्गात गणला जातो. (खाली पहा) +प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्स व हायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[४८] +प्लूटो-खारॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वांत मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्त्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[४९] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष खारॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[५०] +या जोडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्लूटो व खारॉन हे एकमेकांना नेहमी स्वतःची एकच बाजू दाखवतात. याचा अर्थ असा की प्लूटोवर खारॉनकडील बाजूवर उभ्या असलेल्या व्यक्तीला खारॉनची एकच बाजू दिसेल आणि जर ती व्यक्ती दुसऱ्या बाजूला गेली तर तिला खारॉन कधीच दिसणार नाही. हेच खारॉनवरच्या व्यक्तीलाही लागू होते.[५१] +हबल दुर्बिणीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना मे १५, इ.स. २००५ रोजी प्लूटोच्या आणखी दोन उपग्रहांचा शोध लागला. त्यांना अनुक्रमे "एस/२००५ पी १" व "एस/२००५ पी २" ही तात्पुरती नावे देण्यात आली. आय.ए.यू. ने जून २१, २००६ रोजी त्यांना निक्स (तुलनेने जवळचा, पी १) आणि हायड्रा (तुलनेने दूरचा, पी २) ही नावे दिली.[५२] हे दोन छोटे उपग्रह खारॉनच्या जवळपास दोन आणि तीन पट अंतरावरून वर्तुळाकार कक्षेत खारॉनच्याच कक्षीय प्रतलावरून (Orbital plane) प्लूटोभोवती फिरतात.[५३] +प्लूटोचा लहान आकार व पृथ्वीपासूनचे दीर्घ अंतर यामुळे प्लूटो हे अंतरिक्षयानांसाठी एक आव्हान ठरले आहे. व्हॉयेजर १ प्लूटोपर्यंत पोहोचू शकले असते पण शेवटी शनीचा उपग्रह टायटन याच्याजवळून त्याला नेण्याचे ठरविण्यात आले व यामुळे ते यान प्लूटोजवळून जाऊ शकले नाही. व्हॉयेजर २च्या मार्गाला तर प्लूटोजवळून जाणे शक्यच नव्हते.[५४] प्लूटोजवळून जाण्याचा एकही गंभीर प्रयत्न २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत केला गेला नव्हता. ऑगस्ट १९९२ मध्ये जे.पी.एल.मधले शास्त्रज्ञ रॉबर्ट स्टाएहल यांनी क्लाईड टॉमबॉघला दूरध्वनी करून प्लूटोला भेटण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. या घटनेचे स्मरण करतांना टॉमबॉघ म्हणाले होते, मी त्यांना सांगितले, तुम्ही खुशाल जाऊ शकता, पण एका लांब व थंड प्रवासासाठी तयार रहा.[५५] या शुभारंभानंतरपण नासाने २००० मध्ये खर्च व प्रक्षेपकातील विलंबाचे कारण देऊन प्लूटो कायपर एक्सप्रेस हे यान रद्द केले.[५६] +तीव्र राजनैतिक भांडणानंतर अम्रेरिकेच्या सरकारने न्यू होरायझन्स या प्लूटोला जाणाऱ्या नवीन अंतरिक्ष मोहिमेला निधी देण्याचे मंजूर केले.[५७] न्यू होरायझन्स जानेवारी १९, २००६ रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. दिवंगत क्लाईड टॉमबॉघ (जे १९९७ मध्ये मरण पावले) यांच्या काही अस्थी या यानावर ठेवल्या गेल्या आहेत, याची पुष्टी मोहिमेचे प्रमुख असलेले एस. ॲलन स्टर्न यांनी केली आहे.[५८] +२००७च्या सुरुवातीला या यानाने आपल्या मार्गक्रमणासाठी गुरूच्या गुरुवत्वाकर्षणाचा उपयोग करून घेतला. जुलै १४, २०१५ रोजी हे यान प्लूटोच्या सर्वाधिक जवळ असेल. प्लूटोची शास्त्रोक्त निरिक्षणे याच्या पाच महिने आधीपासून चालू होतील व पुढे कमीत कमी एक महिना चालू राहतील. न्यू होरायझन्स ने सप्टेंबर २००६ मध्ये प्लूटोची लॉंग रेंज रिकनायसन्स इमेजर (Long Range Reconnaissance Imager (LORRI)) वापरून पहिली छायाचित्रे घेतली.[५९] ही चित्रे जवळपास ४२० कोटी किलोमीटर अंतरावरून काढली गेली आहेत व यामुळे यानाची दूरवरच्या वस्तूंचा वेध घेण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. याचा उपयोग यानाला प्लूटो व कायपरच्या पट्ट्यातील इतर खगोलीय वस्तूंजवळ जाण्यासाठी होईल. रिमोट सेंन्सिंग[मराठी शब्द सुचवा] तंत्रज्ञानाचा उपयोग करून न्यू होरायझन्स प्लूटो व त्याचा उपग्रह खारॉन यांची भूरचना (geology) व स्वरूप अभ्यासण्याचा, त्यांच्या पृष्ठभागाची संरचना मानचित्रित करण्याचा तसेच प्लूटोचे उदासीन (neutral)[मराठी शब्द सुचवा] वातावरण व मुक्तिवेग अभ्यासण्याचा प्रयत्न करेल. न्यू होरायझन्स प्लूटो व खारॉनच्या पृष्ठभागाची छायाचित्रेपण घेईल. +निक्स व हायड्रा यांच्या शोधामुळे यानासमोर अशी अनेक आव्हाने उभी ठाकण्याची शक्यता आहे ज्यांचा आधी विचार करण्यात आला नव्हता. कायपर पट्ट्यातील वस्तूंमध्ये होणाऱ्या टकरी तसेच त्यांचा कमी असलेला मुक्तिवेग यामुळे निर्माण झालेला अंतराळातील कचरा एकप्रकारचे धुळीचे कडे बनवू शकतो. जर यानाला अशा कड्यातून जावे लागले तर त्याला हानी होण्याची शक्यता वाढते व यामुळे ते यान निकामीपण होऊ शकते.[६०] +प्लूटोचा ग्रह म्हणून असलेला दर्जा १९९२ पासून विवादात आला जेव्हा कायपर पट्ट्यातील पहिली खगोलीय वस्तू (१५७६०) १९९२ QB१ शोधली गेली. तेव्हापासून अनेक शोधांनी हा वाद वाढवतच नेला आहे. +प्लूटो हा पायोनियर पाटीवर ग्रह म्हणून दाखवण्यात आला आहे. ही कोरलेली पाटी पायोनियर १० व पायोनियर ११ या १९७१ साली अवकाशात सोडलेल्या अंतराळ यानांना जोडली गेली होती. परग्रहावरील एखाद्या जीवसृष्टीला जर ही याने भविष्यात कधी भेटली तर त्यांना पृथ्वीबद्दल माहिती देण्यासाठी ही पाटी या यानांना जोडण्यात आली होती. या पाटीवर सूर्यमालेचे नऊ ग्रह दाखवणारे चित्र आहे.[६१] +तसेच १९७० च्या दशकातच अंतराळात सोडलेल्या व्हॉयेजर १ व व्हॉयेजर २ या अंतराळयानांवर असलेल्या व्हॉयेजर सुवर्ण तबकडी या फोनोग्राफ तबकडीवरपण प्लूटोचे चित्र होते व ते चित्र प्लूटो हा नववा ग्रह आहे असे दर्शवित होते.[६२] डिस्नीच्या ऍनिमेशनपटांमधील प्लूटो या पात्राला प्लूटोच्या गौरवार्थच ते नाव देण्यात आले होते.[६३] तसेच १९४१मध्ये नवीन बनविलेल्या एका रासायनिक मूलतत्त्वाला ग्लेन टी. सीबॉर्ग यांनी प्लूटोनियम हे नाव दिले.[६४] +कायपर पट्ट्याचा शोध व प्लूटोचा त्याच्याशी असलेला संबंध यामुळे अनेकजण प्लूटोला कायपर पट्ट्यातील इतरांपेक्षा वेगळे गणले जावे वा नाही असा प्रश्न मांडू लागले. २००२ मध्ये कायपर पट्ट्यातील ५०००० क्वावारचा शोध लागला. याचा व्यास सुमारे १२८० कि.मी. आहे जो प्लूटोच्या जवळपास अर्धा आहे.[६५] २००४ मध्ये १८०० कि.मी व्यास असलेला ९०३७७ सेडनाचा शोध लागला.[६६] सेरेसच्या शोधानंतर त्याला ग्रहाचा दर्जा द्यावा असे काहींचे मत होते, पण वर नमूद केलेल्या तसेच इतर लघुग्रहांचा शोध लागल्यामुळे त्याला ग्रह दर्जा देण्याचे रद्द करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर प्लूटोलासुद्धा क्युपर पट्ट्यातील वस्तू म्हणून वर्गिकृत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. +जुलै २९, २००५ रोजी एरिस या नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूचा शोध लागला. हा प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे.[६७] ट्रायटनच्या १८४६ मधल्या शोधानंतर एरिस हा सूर्यमालेत सापडलेली सर्वांत मोठी खगोलीय वस्तू होती. त्याच्या शोधकांनी व वार्ताहारानी त्याला दहावा ग्रह असे संबोधले पण यावर औपचारिक एकमत नव्हते.[६८] इतर काही जणांचे म्हणणे होते की एरिसचा शोधामुळे आता प्लूटोला लघु ग्रह म्हणून गणण्यात यावे.[६९] +प्लूटोला वेगळे ठरविणारे शेवटचे घटक होते, त्याचा चंद्र खारॉन व त्याच्याभोवतीचे वातावरण. पण हेपण बहुदा चूक आहे कारण अनेक नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूंना उपग्रह आहेत तसेच एरिसच्या वर्णपटावरून असे प्रतित होते की एरिसचा पृष्ठभाग हा प्लूटोसारखाच असावा.[७०] एरिसचा एक उपग्रहपण आहे, डिस्नोमिया नावाचा, ज्याचा शोध सप्टेंबर २००५ मध्ये लागला. +२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे. +प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही. त्याचे वस्तूमान त्याच्या कक्षेतील इतर वस्तूंच्या केवळ ०.०७ पट आहे. (पृथ्वीचे वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेतील वस्तूंच्या १७ दशलक्ष पट आहे.)[७३][७४] आय.ए.यू.ने पुढे ठरविले की प्लूटोला बटु ग्रह या नवीन तयार केलेल्या वर्गात टाकले जावे तसेच तो नेपच्यून पलीकडील वस्तू या वर्गातील प्लूटॉईड या उपवर्गाचा मूळ नमुना (prototype)सुद्धा मानण्यात यावा. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2178.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3661afb5f996104bea1f5343f1f2c3913f131df1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2178.txt @@ -0,0 +1,12 @@ +प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज हा पॉपकॅप गेम्स यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो ओएस एक्स व मायक्रोसॉफ्ट विंडोजवर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. आयओएस व आयपॅडसाठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. आयपॅडमध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. एक्सबॉक्स लाइव्ह आर्केडसाठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक निटेन्डो डीएस आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीजची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची ब्लॅकबेरी प्लेबुकसाठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन गेम ऑफ द इयर आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. १५ ऑगस्त २०१३ रोजी या खेळाची दुसरी आवृत्ती प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज २: इट्स अबाउट टाइम ही आयओएससाठी प्रकाशित झाली. +या खेळात खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरून झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.) +बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारून व झेन गार्डन मधील झाडे विकून मिळू शकतात. +खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणाऱ्या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरून उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रीच्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते. +झोम्बींचेही अनेक प्रकार असून त्यांच्या विशेषता, गती, कठीणता व आक्रमण करण्याची शक्ती वेगवेगळ्या असतात. डॉल्फिन रायडर झोम्बी हा सर्वांत गतिमान तर डॉक्टर झोम्बॉस हा सर्वांत जास्त टिकाव धरण्याची क्षमता असलेला झोम्बी आहे. काही झोम्बी त्यांच्याजवळील उपकरणांच्या सहाय्याने झाडांवरून उड्या मारु व उडू शकतात. डिगर झोम्बी हा झाडांखाली खोदत दुसऱ्या टोकाशी जाऊ शकतो. जुन्या आवृत्तीत मायकेल जॅक्सनशी साधर्म्य असलेला डान्सिंग झोम्बी असून तो जमिनीतून झोम्बी बोलावू शकतो. नव्या आवृत्तीत त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. काही विशिष्ट प्रसंगी खेळाडूला झोम्बींचा प्रचंड समुदाय चाल करून येत असल्याचे सांगितले जाते. काही झोम्बींचे "गीगा" (अधिक शक्तिशाली) प्रकार असून त्यांची टिकाव धरण्याची शक्ती जास्त असते. जसे की: फुटबॉल झोम्बी व गार्गान्ट्युअर. एक झाम्बोनी चालवणारा झोम्बी, झोम्बॉनी हाही या खेळात आहे. +ह्या खेळात बहुतेक प्रकार एक-खेळाडू असून "व्हर्सेस मोड" हा फक्त दोन-खेळाडू प्रकार आहे. या प्रकारात एक एक खेळाडू झाडांची तर दुसरा झोम्बींची बाजू घेऊन लढतो. काही विशिष्ट झाडे व झोम्बी खेळाडूंना प्रथमच निवडून दिलेली असतात. सूर्य वापरून झाडे तर मेंदू वापरून झोम्बी ठेवता येतात. झोम्बींकडून खेळणाऱ्या खेळाडूला झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूचा आभासी मेंदू खायचा असतो तर झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यापासूनच असलेले टार्गेट झोम्बी नष्ट करावयाचे असतात. +झेन गार्डन मध्ये आपण खेळताना बक्षीस म्हणून मिळालेली झाडे ठेवू शकतो. ती खेळातील झाडेच असून या प्रकारात झोम्बी मात्र नसतात. सर्व झेन गार्डनमधील झाडांना आभासीरीत्या खते, पाणी, कीटकनाशके द्यावी लागतात, परंतु त्यांच्या या गरजांकडे दुर्लक्ष केल्यास काहीही विपरीत घडत नाही. +सर्व्हायव्हल मोड मध्ये खेळाडूला झोम्बींच्या अनेक (५ ते १०) समुदायांना तोंड द्यावे लागते. ॲडव्हेंचर मोड पूर्ण केल्याशिवाय हा प्रकार खेळता येत नाही. +ॲडव्हेंचर मोड हा प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीजमधील प्रमुख खेळण्याचा प्रकार असून तो खेळण्यासाठी पहिल्यापासूनच उपलब्ध असतो. यात पातळ्यांचे पाच संघ असून प्रत्येक संघात दहा लघुपातळ्या असता. +ॲडव्हेंचर मोडमध्ये प्रगती केल्यावर मिनी-गेम्स प्रकार (उप-खेळ) उपलब्ध होतो. यात एकून २० उपखेळ असून त्यातील काही पॉपकॅपच्या इअतर खेळांवर आधारित आहेत. (बीज्वेल्ड व इन्सॅनिक्वेरियम) +खेळाडूला गेम ऑफ द इयर आवृत्ती व त्यानंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये काही अचिव्हमेन्ट्स मिळवता येतात. मूळ पीसी आवृत्ती व आंतरजालावरील मोफत आवृत्ती यांत ही सुविधा उपलब्ध नाही. +प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज त्याच्या पायऱ्यांच्या नावांसाठी व इतरांसाठी अनेक संदर्भ वापरते. मृत्युशिलांवरील मजकूर ("मृत", "अस्तित्व समाप्त", "फक्त विश्रांती घेत आहे" - "Expired", "Ceased to Exist", "Just Resting", इत्यादी) हा मॉन्टी पायथॉन यांच्या "डेड पॅरट स्केच" वरून घेण्यात आला आहे. उप-खेळांपैकी दोन खेळ, "झोम्बीक्वेरियम" व "बीघॉउल्ड" हे पॉपकॅपच्याच इतर दोन खेळांवर आधारित आहेत: इन्सॅनिक्वेरियम व बीज्वेल्ड (अनुक्रमे). "व्हेसब्रेकर" कोड्यांमधल्या दोन पातळ्या "स्केरी पॉटर" व "एस ऑफ व्हेस" यांची नावे "हॅरी पॉटर" व "एस ऑफ बेस" यांवर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2201.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da7bf23d42a591de7b9d527f19dca33020b495d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2201.txt @@ -0,0 +1,4 @@ + +प्लेयर्स हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. २००३ सालच्या द इटालियन जॉब ह्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. ह्याची कथा संपूर्णपणे इटालियन जॉबवरून घेतली असली तरी प्रसंग व स्थाने वेगळी दाखवली आहेत. अब्बास–मस्तान ह्या जोडगोळीने दिग्दर्शन केलेल्या प्लेयर्समध्ये बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन, सोनम कपूर, बिपाशा बासू, नील नितीन मुकेश, बॉबी देओल, विनोद खन्ना, ओमी वैद्य, सिकंदर खेर इत्यादी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केले असून आफताब शिवदासानी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत चमकला आहे. +प्लेयर्सचे कथानक भारत, रशिया व न्यू झीलंड ह्या तीन देशांमध्ये घडते व त्यामध्ये चोरी, शह, काटशह इत्यादी रोमांचकपूर्ण पटकथा आहेत. ह्यामधील काही चित्रीकरण उत्तर ध्रुवावर देखील केले गेले होते. +प्लेयर्स प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये व टीकाकारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ह्या चित्रपटाची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. परंतु २०१२ सालामधील पहिला प्रदर्शित झालेल्या प्लेयर्सला तिकीट खिडकीवर अपयशाचा सामना करावा लागला. अति ताणलेली कथा हे टीकाकारांच्या मते अपयशाचे मोठे कारण होते. ह्याचबरोबर वर्षामध्ये सर्वप्रथम प्रदर्शित झालेला चित्रपट आपटण्याचा इतिहास चालूच राहिला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2212.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f77b3f4132e54864244a556705a659bded095c21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2212.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रा. फ. म. शहाजिंदे ‍‍(‍‍फकीरपाशा महेबूब शहाजिं‌‌दे) (F. M. Shahajinde) (ایف. ایم شاہجندی) महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे. ३ जुलै १९४६ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव फकीरपाशा महेबूब शहाजिंदे असं आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामच्या वेळी रझाकारांनी सशस्त्र उठाव केला. ज्या निजाम सरकारविरोधी अनेक बंडखोर मारले गेले. यानंतर सूड म्हणून हिंदूू समुदायाची दंगल उसळली ज्यात हल्लेखोरांनी शहाजिंदे यांच्या वडिलांवर हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका हिंदू कुटुंबाने त्याच्या आई व इतर कुटुबांचे संरक्षण केले. +फ. म. शहाजिंदे यांची ‘निधर्मी’ आणि ‘आदम’मधील कविता क्रांतिकारकरीत्या विद्रोही आणि ज्या व्यवस्थेने इथल्या मुसलमानांचे जगणे कठीण करून सोडले आहे, त्या व्यवस्थेला व त्याच्या इतिहासाला आणि वर्तमानाला आव्हान देणारी कविता आहे. त्यांच्या कविता जशा नव्या वाटा शोधणाऱ्या आहेत, तशाच नव्या वाटा प्रस्थापित करणाऱ्या आहेत. शहाजिंदेच्या कवितेमधून व्यक्त होणारा विद्रोह आक्रस्ताळी नसून या व्यवस्थेला अस्तित्वाच्या आत्मसामर्थ्याने आणि इथल्या मातीने दिलेल्या सार्थ आत्मविश्वासाने आव्हान करणारा आहे. +औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे त्यांनी मराठीचे अध्यापन कार्य केले आहेत. २००६ साली मराठीचे विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पूर्णवेळ लेखनाचं काम त्यांनी सुरू केलं. फ.म. शहाजिंदे यांनी मराठवाड्यात भूमी प्रकाशन संस्थेची उभारणी केली आहे. आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक स्थानिक कवी व लेखकांचे साहित्य शहाजिंदे यांनी प्रकाशित केले आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, डॉ. जनार्दन वाघमारे, सूर्यनारायण रणसुभे, राजेखान शानेदिवान, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. जावेद कुरेशी आणि ललिता गादगे या मान्यवर लेखक मंडळीचे निवडक साहित्य भूमी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. +१९९० च्या काळात स्थापन झालेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य' चळवळीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मार्च १९९० साली सोलापूर येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. समाजातील प्रबोधनाच्या चळवळीत अग्रेसर असे कार्य प्रा.शहाजिंदेनी केलं आहे. आत्तापर्यंत त्यांची एकूण १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +मराठवाड्यातील कवी व लेखकांच्या लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी २००0 साली भूमी प्रकाशनची स्थापना करण्यात आली. प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या पुढाकाराने सहकार तत्त्वावर ही प्रकाशन संस्था उभी करण्यात आली आहे. सभासदांकडून ठराविक प्रकारचा निधी संकलित करून प्रकाशन सुरू करण्यात आलं. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, डॉ. जनार्दन वाघमारे, सूर्यनारायण रणसुभे, राजेखान शानेदिवान, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. जावेद कुरेेेशी आणि ललिता गादगे या मान्यवर लेखक मंडळीचे निवडक साहित्य भूमी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. आत्तापर्यत १०० पेक्षा जास्त प्रकाशने भूमी प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2215.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1bab3f7163a3ad09fd8edf71b5f058e4d69b3a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2215.txt @@ -0,0 +1,30 @@ + +फ.मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजी शिंदे. १९४८ - हयात) हे मराठी कवी, लेखक आहेत. +त्यांची आई ही कविता खूप प्रसिद्ध आहे +आई एक नाव असतं +घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! +सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही +आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही +जत्रा पांगते पालं उठतात +पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात +आई मनामनात तशीच जाते ठेवून काही +जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही +आई असतो एक धागा +वातीला उजेड दावणारी समईतली जागा +घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान +विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान +पिकं येतात जातात +माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान +दिसत नसलं डोळ्यांना तरी +खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण +याहून का निराळी असते आई? +ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी? +आई खरंच काय असते? +लेकराची माय असते +वासराची गाय असते +दुधाची साय असते +लंगड्याचा पाय असते +धरणीची ठाय असते +आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही! +महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील 'रुपूर' गावी कळमनुरी तालुनक्यात १९४८ साली शिंद्यांचा जन्म झाला. +पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत.ते सध्या औरंगाबाद मधील पदंपुरा येथे राहतात. ' आई ' कविता प्रसिद्ध असुन वाचकांच्या अंतकरणाला भिडणारी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2218.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efc2b15815c19b3fb91d42a13b532ba6f800ffce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2218.txt @@ -0,0 +1,4 @@ + +फँड्री (मराठी अर्थ: डुक्कर) हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट आहे. +सुदर्शन देवानंद सरदार,किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे +विंचू मला चावला सुदर्शन सरदाऱ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2220.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558c86e5b74149c3c4193ebe368ba2db7ea06e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2220.txt @@ -0,0 +1,3 @@ +फंदेबाज़ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2235.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1172aca1da82ccc543235e939d8a3df978cf227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2235.txt @@ -0,0 +1,2 @@ +फकिरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2236.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d61391afaf60bfd874be843f896e4ed0995f922b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2236.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फक्त लढ म्हणा हा २०११ वर्षी चित्रपटगृहांत झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय जाधव याने दिग्दर्शिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2242.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130d21efa9ab0acf0c68f64dd6b32ec7958b021a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2242.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +फखर झमान (१० एप्रिल, १९९०, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे व पुर्वी पाकिस्तानी नौसेनेत जवान म्हणून सेवा केली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2244.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9028ddc55022240dd0422385c2a5389954d4e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2244.txt @@ -0,0 +1 @@ +फग्गन सिंग कुलस्ते ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2253.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f4512601ca58a29e5748d8b36cf270148e6760a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2253.txt @@ -0,0 +1 @@ +फजिल्का हा पंजाबमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2257.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94a381a4fe60a60052a35f91156e040e3e914e11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2257.txt @@ -0,0 +1 @@ +फझल उर रहमान (११ जून, १९३५:अमृतसर, ब्रिटिश भारत - हयात) हा  पाकिस्तानकडून १९५८ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_226.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ea103c1aed0dedfb26cce6eff7886756345e1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_226.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप बेनेडिक्ट पहिला (--- - जुलै ३०, इ.स. ५७९:रोम) हा सहाव्या शतकातील पोप होता. +याच्या जन्माबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2270.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c374e960130b9e282086aedba5cee6a4525c4027 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2270.txt @@ -0,0 +1,2 @@ +फडतरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2298.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c10a7b6e45c000943183ab2fa7ea03c07c5ed60f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2298.txt @@ -0,0 +1,2 @@ +फणेपुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2306.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..825eb9919661ff5e3610495cc8eb379236f987cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2306.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख फतेहगढ साहिब जिल्ह्याविषयी आहे. फतेहगढ साहिब शहराबद्दलचा लेख येथे आहे. +फतेहगढ साहिब हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र फतेहगढ साहिब येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_231.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38c13902446ec08e73822e5297d64a4513e7a314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_231.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप बॉनिफेस दुसरा (? - १७ ऑक्टोबर, इ.स. ५३२) हा सहाव्या शतकातील पोप होता. +याची पोपपदी वर्णी नेहमीप्रमाणे निवडणुका न होता त्याच्या पूर्वाधिकारी फेलिक्स चौथ्याने केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2313.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f84d98f25452ab499122d2b6964ecde314f9e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2313.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिकर जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2314.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ba9ab72f8af5189c45dcdfcd65eb7a856fba4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2314.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2316.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ba9ab72f8af5189c45dcdfcd65eb7a856fba4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2316.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2327.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f93b9129efe5b41215877b7206bac26777cfed5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2327.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +फत्तेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2329.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..187ba980db197aa320db38dde2a26a92e06b0645 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2329.txt @@ -0,0 +1,2 @@ + फत्तेपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2374.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83cb5929ce8cc0fe28b2ec753da7751f0f6e8f22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2374.txt @@ -0,0 +1,2 @@ +फरदापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2389.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee83e73306b381ae48d14271c23bdb204610cc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2389.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +फरहान बेहार्डीन (९ ऑक्टोबर, इ.स. १९८३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2394.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3240a59b3f212ae4e6fe397a081b58754ea82845 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2394.txt @@ -0,0 +1,3 @@ +फरार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_240.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12fe7a369340914da9bece096832014c8260cbe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_240.txt @@ -0,0 +1 @@ +पोप संत मार्क (लॅटिन: Papa MARCUS) हा इ.स. ३३६ साली अल्प काळाकरिता पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2423.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d1d69f1dd1a8a73407361d8afc6596dffcc490 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2423.txt @@ -0,0 +1,2 @@ +फरीदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_243.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4483698c346d1fc77fe40458b2cce7343f0060f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_243.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप मार्सेलस दुसरा (मे ६, इ.स. १५०१:मॉॅंतेपुल्सियानो, इटली - मे १, इ.स. १५५५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा एक महिन्याहून कमी काळ पोपपदावर होता. +याचे मूळ नाव मार्सेलो सर्व्हिनी देगिल स्पानोची असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2440.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80e26de742ef5e67c35732c8debbcca7043acea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2440.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + +फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. +एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. +फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. +फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. +फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे. +फर्ग्युसन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी होळकर राज घराण्याने त्यांचा वाडा दान केला होता आणि आर्थिक मदत सुद्धा केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2441.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80e26de742ef5e67c35732c8debbcca7043acea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2441.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + +फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. +एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. +फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. +फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. +फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे. +फर्ग्युसन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी होळकर राज घराण्याने त्यांचा वाडा दान केला होता आणि आर्थिक मदत सुद्धा केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2473.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48fe7d8a54b8b4d018804396bf6dff1499cee453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2473.txt @@ -0,0 +1,4 @@ +फर्डिनांड मेजेलन (पोर्तुगीज: Fernão de Magalhães; स्पॅनिश: Fernando de Magallanes; १४८० ते २७ एप्रिल १५२१) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते. वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्समधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला. +मेजेलनची सामुद्रधुनी हे नाव मेजेलनवरूनच देण्यात आले आहे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2484.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e06731e7f6aae3d85058346e098a3c1c9db777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2484.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फर्नांदो गोन्झालेस (स्पॅनिश: Fernando González; २९ जुलै १९८०) हा एक निवृत्त चिलीयन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2489.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d1bb33ed45c054a05f8b92a5a7b5ffc1bd8871e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2489.txt @@ -0,0 +1 @@ +फर्नांडो मुस्लेरा (स्पॅनिश: Diego Alfredo Lugano Morena; १६ जून १९८६, बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. मुस्लेरा उरुग्वे संघाचा विद्यमान खेळाडू असून तो गोलरक्षक ह्या जागेवर खेळतो. मुस्लेरा २००७-२०११ दरम्यान एस.एस. लाझियो तर २०११ पासून गालातसराय एस.के. ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2530.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a0bfcf4d1d8e287e2c09a906e39a58cacd4f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2530.txt @@ -0,0 +1,2 @@ +फरयाब प्रांत (दारी/पश्तो:فاریاب) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १४ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,०९,२२३ आहे.[१] यांतील बहुसंख्य लोक उझबेक आणि ताजिक आहेत. याशिवाय येथे पश्तून आणि हजारा लोकही राहतात.[२] There have been occasional ethnic clashes reported between Uzbeks and Pashtuns.[३][४] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मैमाना आहे. +बल्ख प्रांताच्या सीमा तुर्कमेनिस्तान, जौझजान प्रांत, घोर प्रांत, बदघिस प्रांत आणि सर-ए-पोल प्रांतांना लागून आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2531.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a0bfcf4d1d8e287e2c09a906e39a58cacd4f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2531.txt @@ -0,0 +1,2 @@ +फरयाब प्रांत (दारी/पश्तो:فاریاب) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १४ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,०९,२२३ आहे.[१] यांतील बहुसंख्य लोक उझबेक आणि ताजिक आहेत. याशिवाय येथे पश्तून आणि हजारा लोकही राहतात.[२] There have been occasional ethnic clashes reported between Uzbeks and Pashtuns.[३][४] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मैमाना आहे. +बल्ख प्रांताच्या सीमा तुर्कमेनिस्तान, जौझजान प्रांत, घोर प्रांत, बदघिस प्रांत आणि सर-ए-पोल प्रांतांना लागून आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2538.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eacb8529dbb53d75a17222178123e7bb5458895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2538.txt @@ -0,0 +1,4 @@ +फर्स्ट चॉईस एअरवेज लिमिटेड ही युरोपियन टूर ऑपरेटर टीऊआय ट्रॅव्हल पीएलसीची ब्रिटिश चार्टर एअरलाइन होती, जी क्रॉली, इंग्लंडमध्ये २००८ मध्ये थॉमसन एअरवेज (आताची टीऊआय एअरवेज) बनवण्यापर्यंत तिचे विलीनीकरण होईपर्यंत होती. तिने १४ यूकी पासून जगभरातील ६० हून अधिक गंतव्यस्थानांवर उड्डाण केले. आणि आयरिश विमानतळ. एअरलाइनच्या ७०% सेवा त्याच्या मूळ कंपनीसाठी चालवल्या गेल्या, उन्हाळ्याच्या हंगामात ८५% पर्यंत वाढल्या, उर्वरित सुमारे १२० इतर टूर ऑपरेटर्सच्या वतीने. ते सायप्रस आणि स्पेन आणि पोर्तुगालच्या रिसॉर्ट्ससाठी अनुसूचित वर्षभर विश्रांतीचे मार्ग देखील चालवते.[१] +२००२ मध्ये एअरलाइनने ६.५ दशलक्ष प्रवासी प्रवास केला. २००५ मध्ये एकूण ६.० दशलक्ष प्रवासी होते - कोणत्याही यूके एअरलाईनमधील पाचव्या क्रमांकाचे प्रवासी संख्या. २००४ मध्ये त्यांनी आणखी सहा बोईंग ७६७-३०० विमानांचे दीर्घ पल्ल्याच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी नूतनीकरण करण्याची योजना जाहीर केली. त्यांच्या ७६७ फ्लीटमध्ये बोईंग ७७७-शैलीतील इंटीरियर वापरणारी ही एअरलाइन यूकेमधील पहिली कंपनी होती. कंपनीकडे २००७ मध्ये ६३ प्रीमियम, १९५ इकॉनॉमी अशा दोन श्रेणीच्या लेआउटमध्ये लांब पल्ल्याची सहा विमाने होती. स्टार क्लास प्रीमियरमध्ये सर्व सीटवर पॅनासोनिक सीट बॅक मनोरंजन आणि मूड लाइटिंग आहे.[२] +२३ एप्रिल २००७ रोजी, फर्स्ट चॉईसने पुष्टी केली की ती १ नोव्हेंबर २००७ पासून लंडन ल्युटन विमानतळ आणि कार्डिफ येथील आपले तळ बंद करणार आहे, परंतु थॉमसनफ्लाय सोबत विलीन झाल्यामुळे, जे या तळांवरून देखील कार्य करतात, संयुक्त विमान कंपनी अजूनही या तळांवरून कार्य करेल.[३] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2539.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eacb8529dbb53d75a17222178123e7bb5458895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2539.txt @@ -0,0 +1,4 @@ +फर्स्ट चॉईस एअरवेज लिमिटेड ही युरोपियन टूर ऑपरेटर टीऊआय ट्रॅव्हल पीएलसीची ब्रिटिश चार्टर एअरलाइन होती, जी क्रॉली, इंग्लंडमध्ये २००८ मध्ये थॉमसन एअरवेज (आताची टीऊआय एअरवेज) बनवण्यापर्यंत तिचे विलीनीकरण होईपर्यंत होती. तिने १४ यूकी पासून जगभरातील ६० हून अधिक गंतव्यस्थानांवर उड्डाण केले. आणि आयरिश विमानतळ. एअरलाइनच्या ७०% सेवा त्याच्या मूळ कंपनीसाठी चालवल्या गेल्या, उन्हाळ्याच्या हंगामात ८५% पर्यंत वाढल्या, उर्वरित सुमारे १२० इतर टूर ऑपरेटर्सच्या वतीने. ते सायप्रस आणि स्पेन आणि पोर्तुगालच्या रिसॉर्ट्ससाठी अनुसूचित वर्षभर विश्रांतीचे मार्ग देखील चालवते.[१] +२००२ मध्ये एअरलाइनने ६.५ दशलक्ष प्रवासी प्रवास केला. २००५ मध्ये एकूण ६.० दशलक्ष प्रवासी होते - कोणत्याही यूके एअरलाईनमधील पाचव्या क्रमांकाचे प्रवासी संख्या. २००४ मध्ये त्यांनी आणखी सहा बोईंग ७६७-३०० विमानांचे दीर्घ पल्ल्याच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी नूतनीकरण करण्याची योजना जाहीर केली. त्यांच्या ७६७ फ्लीटमध्ये बोईंग ७७७-शैलीतील इंटीरियर वापरणारी ही एअरलाइन यूकेमधील पहिली कंपनी होती. कंपनीकडे २००७ मध्ये ६३ प्रीमियम, १९५ इकॉनॉमी अशा दोन श्रेणीच्या लेआउटमध्ये लांब पल्ल्याची सहा विमाने होती. स्टार क्लास प्रीमियरमध्ये सर्व सीटवर पॅनासोनिक सीट बॅक मनोरंजन आणि मूड लाइटिंग आहे.[२] +२३ एप्रिल २००७ रोजी, फर्स्ट चॉईसने पुष्टी केली की ती १ नोव्हेंबर २००७ पासून लंडन ल्युटन विमानतळ आणि कार्डिफ येथील आपले तळ बंद करणार आहे, परंतु थॉमसनफ्लाय सोबत विलीन झाल्यामुळे, जे या तळांवरून देखील कार्य करतात, संयुक्त विमान कंपनी अजूनही या तळांवरून कार्य करेल.[३] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2546.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0772642dc3bb2fd98101295ff14bc7b9edf57fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2546.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय. फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला (तो फलंदाजी मध्ये कुशल नसला तरीही) बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या क्रिकेट पिचवर खेळताना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. तसेच त्याची शारीरिक क्षमता उत्कृष्ट असावी लागते, त्याचबरोबर वरच्या स्तरावरील फलंदाजामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता तसेच निर्णय क्षमता आणि चांगली रणनीती करण्याचे कौशल्य असते. [१]==फलंदाजी स्किल्स==information in marathi + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2593.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a6eb3803ef729a061e58675effeb7aa1f87b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2593.txt @@ -0,0 +1,2 @@ +फवाद अफझल खान (जन्म २९ नोव्हेंबर १९८१) हा पाकिस्तानी अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक आणि गायक आहे जो चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. एक फिल्मफेअर अवॉर्ड, दोन लक्स स्टाइल अवॉर्ड्ससह त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे. +खानने रोमँटिक कॉमेडी, खूबसूरत (२०१४) द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[१][२][३] कपूर अँड सन्स (२०१६) या कौटुंबिक नाटकात अभिनय केल्याबद्दल त्यांना टीकात्मक प्रशंसा मिळाली, ज्याने त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2603.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95d2edc3fd2cc710728edee58d1e725d327d44a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2603.txt @@ -0,0 +1 @@ +फह्द बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी:فهد بن عبد العزيز آل سعود‎)(इ.स. १९२३ - ऑगस्ट १, इ.स. २००५) हा १९८२पासून मृत्यूपर्यंत सौदी अरेबियाचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_261.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6720715f14c0e82fea13bd07d4a4d651ffe6ddc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_261.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप लिओ दहावा (डिसेंबर ११, इ.स. १४७५ - डिसेंबर १, इ.स. १५२१) हा इ.स. १५१३पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिची होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2618.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..985a2d253036569efc025e1c9016e71d6bd56f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2618.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2623.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44da99cd579d7b9ca3dd2f47f24ba3d9c7b9b267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2623.txt @@ -0,0 +1,2 @@ +फांगुळगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_264.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b4d74a6b8400748480bcd7fb01f853e6fbb9362 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_264.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिओ बारावा (ऑगस्ट २२, इ.स. १७६० - फेब्रुवारी १०, इ.स. १८२९) हा इ.स. १८२३ ते मृत्युपर्यंत पोप होता. +याचे मूळ नाव ऍनिबेल फ्रांसेस्को क्लेमेंते मेल्चिओर गिरोलामो निकोला डेला गेंगा असे होते. त्याने रोमच्या अकेडेमिया डेइ नोबिलि एक्लेसियास्टिसी येथे शिक्षण घेतले व इ.स. १७८३ साली धर्मगुरुपद प्राप्त केले. +यानंतर त्याने पोप पायस सहाव्याचे व्यक्तिगत सचिवपद मिळवले. पोप म्हणून लिओ असहिष्णु व कठोर होता. स्वतःच्याच प्रजेविरुद्ध त्याने अनेक कट-कारस्थाने केली. कदाचित त्यामुळे त्याच्या मृत्युनंतर त्याच्या राज्यात आनंदच व्यक्त केला गेला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2645.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2645.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2656.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5b77ea5bc208139b16d9ce000a2bc77927c8f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2656.txt @@ -0,0 +1,29 @@ + +फातिमा लोधी ( २९ सप्टेंबर १९८९) या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] त्यांना "चॅम्पियन ऑफ डायव्हर्सिटी" म्हणून ओळखले जाते, कारण तिने 'डार्क इज डिवाइन' नावाची मोहीम सुरू केली. ही पाकिस्तानातून रंगविरोधी असलेली पहिली मोहीम आहे. तिला वुमन ऑफ एक्सलन्स आणि यंग वुमन लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[२] फातिमा लोधी या पहिल्या पाकिस्तानी आहेत ज्यांनी "रंगवादाच्या" विरोधात भूमिका घेतली आहे.[३] +फातिमा या माजी अखिल भारतीय क्रिकेट खेळाडू आणि कराचीचे निवडक अब्बास खान लोधी यांची नात आहे. तिचा जन्म कराचीत झाला आणि त्या इस्लामाबादमध्ये मोठ्या झाल्या. +त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण कराची येथील सेंट पॅट्रिक शाळेतून सुरू केले.[४] द सिटी स्कूलमधून हायस्कूल पूर्ण केले आणि इस्लामाबादमधील शहीद जुल्फिकार अली भुट्टो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथून आंतरराष्ट्रीय संबंधातील पदवी प्राप्त केली. फातिमा यांनी युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स कडून अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. +फातिमा यांनी २००८ मध्ये सक्रिय झाल्या. त्यांनी अपंग व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि समावेशासाठी बाजु मांडायली सुरुवात केली. त्यांनी "सर्वसमावेशक आपत्ती जोखीम", "अपंगत्व समानता", "समुदाय आधारित समावेशक पुनर्वसन", "सांकेतिक भाषा" आणि "सर्वसमावेशक शिक्षण" या विषयांसह ब्रिटिश कौन्सिलच्या "सक्रिय नागरिक" कार्यशाळांसह प्रशिक्षणाची सोय केली. तसेच ज्युनियर लीडर्स कॉन्फरन्स "बाय वी कॅन एन्ड हिंसा अगेन्स्ट विमेन" ही कार्यशाळा केली. २०११ मध्ये त्यांचा रोटारॅक्टचा प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी तिच्या क्लबमध्ये तसेच रोटारॅक्ट जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर काम केले. त्या एक समर्पित स्वयंसेविका आहेत. त्यांनी विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थांसाठी सेवा केली आहे. एचआयव्ही/ एड्स, एसआरएचआर आणि महिलांवरील हिंसाविरोधात ॲसिड बर्न पीडितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. +लहानपणापासूनच त्या "रंगवाद"च्या विरोधात होत्या. २०१३ मध्ये तिने 'डार्क इज डिवाइन' ही रंगसंगतीविरोधी एक मोहीम सुरू केली, ज्याचा उद्देश समाजाच्या सौंदर्याच्या अवास्तव मानकांची पुन्हा व्याख्या करणे अशी होती. +फातिमा ह्या आशियातील सर्वात तरुण वाढते रंगविरोधी आणि विविधतेच्या वकील आहेत. त्या विविध, स्वतःची स्वीकृती आणि सकारात्मक शरीराची प्रतिमा या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करतात. +फातिमा ह्या स्वतः एक प्रेरक वक्त्या आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंचांवर त्यांचे विचार मांडले आहेत. +त्यांनी २०१४ मध्ये टेड-एक्स मध्ये भाषण दिले. स.न. २०१५ मध्ये "आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण परिषदे" मध्ये पॅनेल चर्चेचे संचालन केले. +त्यांना रंगभेदावर व्याख्यान देण्यासाठी "महिला जागरूकता सेमिनार" मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. +जागतिक स्वीकृती दिनानिमित्त पीटीव्ही वल्ड द्वारे अतिथी वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. +रंगवादाबद्दल बोलण्यासाठी एफएम-१०० या राष्ट्रीय रेडिओ वाहिनीने अतिथी म्हणून आमंत्रित केले होते . +फातिमा यांची मुलाखत घेण्यात आली आहे आणि जगभरातील विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. "डार्क इज डिवाइन" अंतर्गत तिच्या कार्याचा प्रसार करण्यात आला आहे. त्या द न्यूझ मधील ५० शक्तिशाली महिलांसाठी नामांकित व्यक्तींपैकी एक होत्या. +रोटेरियन या मासिकाने त्यांची मुलाखत घेतली,[५] +बीबीसीने त्यांची मुलाखत घेतली. +यूके-आधारित रेडिओद्वारे वुमन ऑफ द वीक आणि विशेषतः अफगाण व्हॉईस रेडिओद्वारे मुलाखत घेण्यात आली. +यूएईच्या उद्योजकाने मुलाखत घेतली.[६] +वोमेनस् व्हॉइसेस नाऊ याने मुलाखत घेतली.[७] +"ब्राउन गर्ल मॅगझिन" मध्ये "फातिमा लोधी" यांची रंगवादाशी लढण्याबद्दलची कथा होती.[८] +यांना "द न्यूझ" मध्ये वैशिष्ट्यीकृत करण्यात आले होते.[९] +डॉन वृत्तपत्रात वैशिष्ट्यीकृत करण्यात आले होते.[१०] +श्रीलंकेच्या द नेशन या वृत्तपत्रात यांचा लेख प्रकाशित झालेला होता. +अफगाण व्हॉईस रेडिओच्या वेबसाइटवर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[३] +भारताच्या मीडिया प्लॅटफॉर्म युवा की आवाज वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[११] +हिंदुस्तान टाइम्सने यांची मुलाखत घेतली होती.[१२] +वुमेनस् ओन नियतकालिकाने मुलाखत घेतली.[१३] +भारताच्या ऑनलाइन न्यूझ पोर्टल पंजाब खबर वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[१४] +एनआरआय न्यूझ इंडिया वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[१५] +खबरफीड तर्फे यांची मुलाखत घेतली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2671.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2671.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2673.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e4f16e7512f994b83949660460746a0021ebd26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2673.txt @@ -0,0 +1,4 @@ +५ एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2684.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372793545b0c14a28b37574d8647f5c23d873ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2684.txt @@ -0,0 +1 @@ +फाबियो कॅनाव्हारो इटलीच्या फुटबॉल संघाचा नायक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2709.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8afc19eabcdd3e01757c6118dd5577ab825e660c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2709.txt @@ -0,0 +1,29 @@ + +— मार्च २०१२ +मोझिला फायरफॉक्स (इंग्रजी: Mozilla Firefox) हे मोझिला कॉर्पोरेशन कंपनीने विकसित केलेला आंतरजाल न्याहाळक अथवा विचरक (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेर आहे. हे मराठी भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेर आहे. मार्च २०११ मध्ये मोझिला फायरफॉक्स जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास इंडोनेशिया, जर्मनी व पोलंडमध्ये बरेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६७%, ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव न्याहाळक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे. +तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या गेको लेआउट इंजिन या एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा वापर करतो. फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, अ‍ॅपल मॅक ओएस एक्स व युनिक्स प्रणालीशी साधर्म्य असणाऱ्या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्सची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती जुलै ११, २०११ पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स मोझिला सार्वजनिक परवाना ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा मोझिला सार्वजनिक परवाना आणि जी.पी.एल. ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.[२] +फायरफॉक्साचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय, अर्थात टॅब्ड ब्राउझिंग, होय. हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोररापेक्षा सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे. +मराठी अथवा देवनागरी टंक बदलण्याची सोय फायरफॉक्समध्ये आहे. +दुवा: http://tdil.mit.gov.in/download/GISTYogeshN.htm Archived 2009-01-21 at the Wayback Machine. +येथून उतरवून घ्या. येणारी फाईल बहुदा संचित अथवा झिप केलेली असते. अन-झिप करून घ्यावी लागते. त्यातल्या टीटीएफ एक्स्टेंशनाच्या फायली CDACOTYGB.TTF, CDACOTYGN.TTF, CDACYGIT.TTF कंट्रोल पॅनल मध्ये फॉंट्स नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करून घ्याव्यात. +फायरफॉक्स सुरू करून त्याच्या +टुल्स > ऑप्शन्स > कंटेंट्स +मधील टाइम्स अथवा जो असेल तो टंक काढून टाकावा. व फॉंट फोल्डर मध्ये जोडलेला टंक घ्यावा. योग्य तो आकार घेता येईल. +उपक्रम अथवा इतर युनिकोड टंक वापरणारी संकेतस्थळे या टंकात चांगली दिसतात. + + +वैशिष्ट्ये ब्राउझिंग टॅब समावेश शब्दलेखन तपासणी, वाढीव शोध, लाइव्ह बुकमार्क, स्मार्ट बुकमार्क, एक डाउनलोड व्यवस्थापक, खाजगी ब्राउझिंग, स्थान जागृत ब्राउझिंग एका Google सेवेला [51] आणि एकाग्र शोध प्रणालीवर आधारित (देखील "भौगोलिक स्थान" म्हणून ओळखले जाते) की [52] याव्यतिरिक्त, फायरफॉक्स वातावरण वेब विकसकांसाठी उपलब्ध आहे. Yahoo! शोध, सर्वात स्थानीयकरणांमध्ये, जे पूर्वनिर्धारीतपणे मायक्रोसॉफ्ट शोध इंजिन बिंग एक फ्रंट एंड वापरते, जे., ते करू शकता अंगभूत साधने, जसे त्रुटी कन्सोल किंवा वापर DOM निरीक्षक, किंवा विस्तार, जसे की फायरबग आणि अलीकडे कप्पा एक संकलन वैशिष्ट्य झाली आहे. फायरफॉक्स हॅलो, लागूकरण होते ऑक्टोबर 2014 मध्ये, स्क्रीन / फाइल शेअरिंग अतिरिक्त वैशिष्ट्य, एकमेकांना एक दुवा पाठवून जोडले 2 फायरफॉक्स वापरकर्ते एक व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी आहे. +कार्य तृतीय-पक्ष विकासकांनी(Third party) तयार केलेले ऍड-ऑन माध्यमातून जोडले जाऊ शकते. ऍड-ऑन प्रामुख्याने त्यांना थेट प्रवेश आणि ब्राउझरच्या अंतर्गत कार्यक्षमता जास्त हाताळू करण्याची परवानगी कोणत्याही XUL आणि XPCOM API, अर्थ लागू आहेत. ऑगस्ट 21, 2015, फायरफॉक्स विकासक की फायरफॉक्स अंतर्गत ऑपरेशन नियोजित बदल, codenamed "इलेक्ट्रोलिसिस" एक नवीन मल्टि-प्रक्रिया आर्किटेक्चर नियोजित अंमलबजावणी समावेश झाल्यामुळे, फायरफॉक्स WebExtensions म्हणून ओळखले एक नवीन विस्तार आर्किटेक्चर अवलंब घोषणा केली. WebExtensions HTML व जावास्क्रिप्टचा API वापरत आणि Google Chrome आणि मायक्रोसॉफ्ट काठ विस्तार प्रणाली प्रमाणेच असेल, आणि एक मल्टि-प्रक्रिया वातावरणात चालवा डिझाइन केलेले आहे, पण ब्राउझरमध्ये प्रवेश समान पातळीवर सक्षम नाही. उपाय जुन्या ऍड-ऑन नवीन आर्किटेक्चर आत ऑपरेट करण्याची परवानगी उपलब्ध असेल, पण 2017 पर्यंत, XPCOM आणि XUL ऍड-ऑन यापुढे समर्थित जाईल. [53] +त्यामुळे वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक प्रकारे फायरफॉक्स अनुभव येऊ शकतो फायरफॉक्स, तो जोडले थीम असू शकतात. वापरकर्त्यांना आणि वैयक्तिक थीम डाउनलोड रंग आणि प्रतिमा त्यांच्या पर्याय शकता, जेथे संकेतस्थळ्स आहेत. या फायरफॉक्स अधिक अद्वितीय आणि सानुकूल अंगभूत थीम अर्पण करु नका इतर वेब ब्राउझरमध्ये तुलनेत मजा वापरून अनुभव करू शकता. फायरफॉक्स ॲड-ऑन संकेतस्थळ वापरकर्त्यांना खेळ, जाहिरात-ब्लॉकर, स्क्रीनशॉट ॲप्स आणि इतर अनेक उपयुक्त ॲप्स इतर अनुप्रयोग जोडण्याची क्षमता देते. [54] [चांगले स्रोत गरज] +फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी शब्दकोशाचे विस्तारक जोडून घ्या. +फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग"च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल. +एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता. +विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प : डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल. सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. +(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्समधील हेच एक्सटेन्शन वापरून केलेली आहे.)[३] + +फायरफॉक्स HTML4 (आंशिक HTML5), एक्स एम एल, एक्स.एच.टी.एम.एल, MathML, SVG 1.1 (आंशिक), [55] (विस्तार) सीएसएस, [56] ECMAScript (जावास्क्रिप्ट), DOM, XSLT, एक्सपाथ आणि APNG अनेक वेब मानके, लागू (सजीव पीएनजी) अल्फा पारदर्शकता प्रतिमा. [57] फायरफॉक्स देखील WHATWG जसे क्लायंट-बाजूच्या संचयन बनवले मानके प्रस्ताव [58] [59] आणि कॅनव्हास लागू. [60] +फायरफॉक्स [61] Mozilla मूलतः फायरफॉक्स पूर्णपणे पास करण्यासाठी Acid3 चाचणी त्यांनी विश्वास ठेवला कारण चाचणी SVG फॉन्ट भाग कालबाह्य आणि असंबद्ध झाले होते की ते हेतू नाही की म्हटले होते आवृत्ती 3.0 पासून Acid2 मानके पालन चाचणी झाली आहे., मुळे WOFF सर्व प्रमुख ब्राउझर निर्मात्यांना एक दर्जेदार म्हणून मान्य आहे. [62] SVG फॉन्ट चाचण्या सप्टेंबर 2011 मध्ये Acid3 चाचणी काढले होते कारण, फायरफॉक्स 4 मोठे 100/100 धावा केल्या. [63] [64] +देखील फायरफॉक्स अवजारे [65] एक विशिष्ट मालकी युक्त प्रोटोकॉल [66] Google कडून म्हणतात "सुरक्षित ब्राउझिंग" फिशिंग आणि मालवेयर संरक्षण संबंधित डेटा अदलाबदल करण्यासाठी वापरले. +Windows Vista आणि नवीन आवृत्ती 38 पासून, फायरफॉक्स करून HTML5 एक कूटबद्ध माध्यम विस्तार (EME) संरक्षित व्हिडिओ सामग्री प्लेबॅक करीता समर्थन पुरवतो. Adobe प्राइमटाइम सामग्री डिक्रीपश्न मॉड्यूल (सीडीएम) - सुरक्षा आणि गोपनीयता कारणांसाठी, EME ओपन सोअर्स कोड आवरण करण्यार्यांना Adobe सिस्टमनुसार एक विशिष्ट मालकी युक्त डिजिटल अधिकार व्यवस्थापन विभागात अंमलबजावणी परवानगी देते आत राबविण्यात येत आहे. DRM विभाग प्रणाली त्याचा प्रवेश मर्यादित, आणि तो अद्वितीय ट्रॅकिंग हेतूने साधन वर्णन सेवा टाळण्यासाठी यादृच्छिकरित्या साधन आयडी प्रदान एक "सॅंडबॉक्स" पर्यावरण आत धावा. DRM विभाग, हे डाऊनलोड केले की, सक्षम आणि इतर प्लग-इन समान रीतीने अक्षम केला आहे. EME समर्थन परिचय यावर, विंडोज फायरफॉक्स देखील EME समर्थन निष्कासित लावण्यात आली बनवतो. [67] [68] +२४ ऑक्टोनबर २००६ रोजी ही आवृत्ती निघाली. या आवृत्तीत गेको १.८ वापरले होते. +यामध्ये गेको २.० वापरले असून त्याची सर्वांत नवी आवृत्ती मोझिला फायरफॉक्स ४.० आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2714.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b2c11ad18df407c44170b7c34bafdeae77875e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2714.txt @@ -0,0 +1,2 @@ +फायरफ्लाय ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. २००७ साली स्थापन झालेली व पेतालिंग जया ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये मुख्यालय असलेली फायरफ्लाय पूर्णपणे मलेशिया एरलाइन्सच्या मालकीची आहे. फायरफ्लायचे मुख्य वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळ व पेनांग विमानतळ येथे असून जोहोर बारू व कोटा भारू ही तिची प्रमुख शहरे आहेत. +मलेशियाखेरीज इंडोनेशिया, सिंगापूर व थायलंडमधील शहरांना देखील फायरफ्लाय प्रवासी विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2719.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2719.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2756.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b3f672fb45e558d3eaa0f5725192c130f3bebd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2756.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 46°52′38″N 96°47′22″W / 46.87722°N 96.78944°W / 46.87722; -96.78944 + +फार्गो (इंग्लिश: Fargo) हे अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिनेसोटा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2760.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acb26199098dc02f37ea66549678d357d8c324d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2760.txt @@ -0,0 +1,2 @@ +हेक्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: FAR, आप्रविको: KFAR, एफ.ए.ए. स्थळसूचक: FAR) अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील फार्गो शहराचा विमानतळ आहे. याला मार्टिन हेक्टरचे नाव दिलेले आहे. हेक्टरने विमानतळासाठीची जागा शहरास दान केली होती. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. फार्गो एर नॅशनल गार्ड सुद्धा या विमानतळाचा उपयोग करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2768.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c393cefbe0d7fe49f6e85ec97474fa921f64e44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2768.txt @@ -0,0 +1,6 @@ +फार्मिंग्टन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे. डीट्रॉइट महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७९,७४० होती.[१] +अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंगटन हिल्सचा समावेश होतो. +फार्मिंग्टन हिल्स (मिशिगन) हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2785.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e0a16349329cf58426320b39a8fde661f27712e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2785.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन कृष्ण अमावास्या ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2789.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d120ee065175b4bc4b0338d5718b48b8fa4ae44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2789.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौदावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2794.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70131262d2a36311032b3e753d52abd7dad72186 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2794.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन कृष्ण द्वितीया ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दुसरी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2806.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f525f84bcce961ccd83e2e166b3fcf7ca016a49d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2806.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन शुद्ध चतुर्दशी ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौदावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2808.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aedf61fa421490438e44fea5b94c2229803b5f50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2808.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन शुद्ध त्रयोदशी ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2862.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6f3209ddccae3204768c3ce167dafb5394beba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2862.txt @@ -0,0 +1,9 @@ +मूल्य ठेवी +(अन्य नावे: फिक्स्ड डिपॉझिट; इंग्लिश: Fixed Deposit Receipts, Time deposit ; ) ही एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत पैसे अधिक काळासाठी ठेवल्यास बहुधा अधिक व्याजदराने अधिक परतावा मिळतो. +मुदत ठेवीचे प्रकार +१) मासिक व्याज मुदत ठेव - या ठेवीवर दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. अर्थात संपूर्ण वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही रक्कम थोडी कमी असते उदा. १०००० रुपयावर १० टक्के दराने दर वर्षी १००० रुपये मिळू शकतात. परंतु हीच रक्कम १० टक्के दराने मासिक व्याजावर ठेवली तर मिळणारी रक्कम रुपये ८३.३३ दर महा पेक्षा कमी असते. व्याज तीन महिन्यांनी मिळणे पेक्षित असताना इथे दरमहिन्याला मिळते म्हणून थोडी रक्कम कमी केली जाते. +२) त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव - दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. पेन्शन धारक ग्राहकांमध्ये आवडती योजना आहे. +३) पुनर्निवेश योजना - दर तीन महिन्यांनी मिळणारी व्याजाची रक्कम पुन्हा मुदलात गुंतवली जाते अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते. +मुदत ठेवीवर नाम निर्देशन करता येते. मुदत ठेवीवर स्त्रोताशीच उत्पन्नाचा कर कापण्याची भारतामध्ये पद्धत आहे. +ठेवी ठेवणाऱ्या बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ‘डिपॉझिट इन्श्युरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ ही कंपनी इ.स. १९६८मध्ये सुरू केली. सुरुवातीला या कंपनीतर्फे बँकेत ठेवलेल्या ५ हजार रुपयांच्या मुदत ठेवीला विम्याचे संरक्षण मिळत असे. विम्याची सुविधा मिळण्यास पात्र असलेल्या मुदत ठेवीची रक्कम हळूहळू वाढवली जाऊन १९७०मध्ये ही विमा संरक्षण मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत, १९७६मध्ये २० हजार रुपयांपर्यंत, १९८०मध्ये ३० हजार रुपयांपर्यंत, तर १९९३मध्ये ती एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी करण्यात आली. १९९३ नंतरच्या २३ वर्षांत या संरक्षण रकमेत एक रुपयाचीसुद्धा वाढ करण्यात आली नाही. २३ वर्षांपूर्वीच्या एक लाख रुपयांच्या किंमतीचे मूल्य आज वीस हजार रुपयेसुद्धा राहिलेले नाही, त्यामुळे या विमा संरक्षण रकमेत किमान पाचपट वाढ होण्याची म्हणजेच ठेवीवरील विमासंरक्षण किमान पाच लाखांपर्यंत नेण्याची गरज आहे. डिपॉझिट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या विमा कंपनीकडे २०१६ साली २२०० राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांची नोंदणी आहे. या बँका ग्राहकांच्या मुदत ठेवींमधील प्रत्येक हजार रुपयांवर एक रुपया एवढा विम्याचा हप्‍ता या कंपनीकडे भरतात. बँकांमधील फक्त एक लाख रुपयांपर्यंतच्या नाही, तर सर्व ठेवींच्या पूर्ण रकमेवर हा हप्‍ता घेतला जातो. २०१४-१५ या वर्षात विमा कंपनीने ८२२९ कोटी रुपये हप्‍ता गोळा केला. मात्र, एक रुपयाही परतावा दिला नाही. त्या आधीच्या ५ वर्षांत ३२,००० कोटी रुपयांचा विमा हप्‍ता गोळा करून या विमा कंपनीने फक्त २१७१ कोटी रुपये म्हणजे जमा हप्‍त्याच्या ७ टक्के रक्कम भरपाई म्हणून दिली आहे. आजमितीला या कंपनीकडे ५४,८४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक आहे. या कंपनीकडे होणारी गुंतवणूक आणि जमा होणारा महसूल मोठा आहे, असे दिसते. हे सर्व आकडे बघता कोणताही विमा हप्‍ता न वाढवता पाच लाखांपर्यंतच्या बँक ठेवींना संरक्षण देणे सहज शक्‍य आहे. रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या दामोदर समितीनेही पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याची शिफारस इ.स. २०११मध्ये केली आहे. मात्र आजवर या संदर्भात काहीही झालेले नाही. +यासाठी पुण्यातील सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. (दिनांक २-१-२०१७ची बातमी). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2882.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5b93af4fe66211fb0026ece0acd4c1a14d8b468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2882.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९९३ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही जॅन टिमन व अनातोली कार्पोव यांच्यात झाली. तीत कार्पोव विजयी झाला. +या स्पर्धेच्या उपांत्य फेऱ्या लिनारेस येथे तर अंतिम फेरी सान लोरेंझो देल एस्कोरियाल येथे खेळविण्यात आल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2892.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289fbe3cb20a97efd0f29ef3f498c1620dc303f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2892.txt @@ -0,0 +1,23 @@ + +फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; - २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. [१] हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते. +१३ ऑगस्ट १९२६ रोजी क्युबा देशातील बिरान येथे फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल व आईचे नाव लिना होते. त्यांचे वडील ॲंजल कॅस्ट्रो हे एक श्रीमंत जमीनदार होते. तर आई लिना या शालेय शिक्षिका होत्या. [२] +कॅस्ट्रो यांनी क्यूबातील सॅन्टिॲगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरुवात केली. +फिडेल कॅस्ट्रोने सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला करण्याआधी आपल्या १५५ सहाकाऱ्यांना उद्देशून केलेले स्फूर्तीदायक भाषण (२५जुलै १९५३)- +"आणखी काही तासांत आपण विजयी होऊ किंवा पराभूत होऊ. हे उघड होईलच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपली चळवळ यशस्वी ठरेल यात शंकाच नाही. जर आपण विजयी झालो तर मार्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जर आपल्याला अपयश आले, तरी आपल्या कृतीमुळे क्युबातील लोकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यातूनच क्युबासाठी मरायला तयार असलेले तरुण निर्माण होतील. हे तरुण आपल्या क्रांतीची ज्योत हाती घेऊन आपला लढा पुढे नेतील. ओरीएंट (क्युबातील एक स्थळ) आणि संपूर्ण बेटातील (क्युबातील) लोक आपल्याला पाठींबा देतील. १८६८ आणि १८९२ प्रमाणेच, ओरिएंट येथूनच आपण स्वातंत्र्य किंवा मृत्यू अशी आपली पहिली घोषणा देत आहोत." [३] +सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर त्यांना अटक झाली आणि सुटका झाल्यानंतर ते मेक्सिकोमध्ये गेले व तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले. +या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली. +क्यूबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणुकरारानंतर युनायटेड स्टेट्सने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके क्यूबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले. रशियाच्या विचारप्रणालीशी जवळीक असल्याने अमेरिकेचा फिडेलला विरोध होता. अमेरिका सतत त्याविरुद्ध कारवाया करत असे. असाच एक प्रयत्न १९६०साली करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर याने अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या मदतीने फिडेलचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर १३ ऑक्टोबर, १९६०साली अमेरिकेने क्युबावर व्यापार बंदी लादली.अमेरिकेच्या कुरघोड्या सुरूच होत्या. एप्रिल १९६१मध्ये अमेरिकेच्या निमलष्करी दलाचा गट जो सीआयएद्वारे प्रशिक्षित होता तो दक्षिण क्युबातील पिग्सच्या आखातात घुसला व तिथून क्युबावर हल्ला करण्याची योजना होती. पण क्युबाने निव्वळ तीन दिवसात त्यांचा पराभव केला. +१९६२मध्ये अमेरिकासारख्या महासत्तेविरुद्ध अमेरिकेच्या शत्रूचा; म्हणजेच रशियाचा क्षेपणास्र तळ क्युबामध्ये उभारण्याची हिंमत फिडेलने दाखवली. नंतर रशियाच्या निकिता ख्रूश्चेवच्या कमजोर नितीमुळे वा अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडीच्या मुत्सद्देगिरीमुळे तो तळ क्युबातून काढून टाकण्यात आला. [४] +फिडेलने आपल्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कार्य केले. पहिल्या कृषिक्रांतीत त्याने दोन लाख शेतकऱ्यांना जमिनीचे स्वामित्व दिले. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. एका वर्षात निरक्षरता नष्ट करून ९९% क्युबन जनता साक्षर केली. बालमृत्यूचे प्रमाण ४२% वरून ४% वर आणले. सत्तेत येताच पहिल्या सहा महिन्याच्या काळात १००० किमीचे रस्ते बांधले. दर महिन्याला ८०० घरांची उभारणी केली. अखेरच्या काळात त्याने क्यूबाच्या जीडीपीपैकी १२% उत्पन्न आरोग्यसेवेवर खर्च केले. खेळांना प्रोत्साहन दिले. +क्युबाच्या प्रगतीसाठी फिडेलने सर्वप्रथम आरोग्य, शिक्षण, घरे, अन्न ह्या प्राथमिक गरजांकडे लक्ष पुरवले. आजही क्युबाची आरोग्यसेवा जगातील सर्वोत्कृष्ट मानली जाते. +२०००-०६ दरम्यान व्हेएनझुलिया-क्युबामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला. त्यानुसार क्युबाने २०हजार डॉक्टर व्हेएनझुलियामध्ये पाठवावे व त्याबदल्यात व्हेएनझुलियाने क्यूबाला ५३ हजार बॅरल खनिजतेल (प्रतिदिन) सवलतीच्या दरात पाठवावे. २००४मध्ये हे प्रमाण ४० हजार डॉक्टर व ९० हजार बॅरल इतके वाढवले गेले. यामुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. +१९७६ साली फिडेल अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटाचा (Non-Aligned movement) जनरल सेक्रेटरी झाला. ही तीच अलिप्ततावादी चळवळ; जी सुरू करण्यात भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा महत्त्वाचा वाटा होता. +१९५९ साली स्वतंत्र झाल्यानंतर क्युबाला राष्ट्र म्हणून मान्यता देणारे जे सुरुवातीचे देश होते त्यात भारतही होता. +पंडित नेहरुंबद्दल एक आठवण भारताचे माजी परराष्ट्रमंत्री के.नटवरसिंग यांना सांगताना फिडेल म्हणाला की “१९६०साली न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी आलो असताना हॉटेलमध्ये मला भेटायला येणारी पहिली व्यक्ती पंडित नेहरू होते. मी त्यांचे प्रभावी हावभाव कधीच विसरू शकत नाही. मी फक्त ३४ वर्षांचा होतो. तणावात होतो. नेहरुंनी माझी हिंमत, मनोधैर्य वाढवले व त्यामुळे माझा तणाव नाहीसा झाला.” [५] +त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे.[६] +१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० टन गहू व १०,००० टन तांदूळ क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.[७] +इ.स. १९४८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी मिर्टा डाएज - बलार्ट यांच्याशी विवाह केला. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट असे आहे. १९५५ साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते. +"नेहमी मानवी हक्कांबद्दल बोललं जातं, परंतु मानवतेच्या हक्कांबद्दल बोलणे देखील आवश्यक आहे. इतरांना महागड्या गाड्यांतून प्रवास करता यावा म्हणून काही लोकांनी अनवाणी चाललं पाहिजे का? इतरांना ७०वर्षे जगता यावं म्हणून काहींनी ३५ वर्षेच का जगायचं? इतरांनी गडगंज श्रीमंत होण्यासाठी काहींनी दीनदुबळं का असावं ? +ज्यांच्याकडे खायला भाकरीचा तुकडाही नाही अशा जगभरातल्या मुलांच्या वतीने मी बोलत आहे व ज्यांच्याकडे औषध नाही अशा आजारी लोकांच्या वतीने मी बोलत आहे. आणि त्यांच्याही वतीने, ज्यांचे जगण्याचे हक्क आणि आत्मसन्मान नाकारले गेले आहेत." +अतुल कहाते यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय अरुण साधू यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल,चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे. Ignacio Ramonet याने Fidel castro with Ignacio Ramonet MY LIFE हे फिडेल कॅस्ट्रोचे स्पॅनिश आत्मचरित्र लिहिले आहे व Andrew Hurley याने त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे. +[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2909.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05ab85bc0d9ee0b482644d1043d64f470d23bec3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2909.txt @@ -0,0 +1,20 @@ +फिनएअर (फिनिश: Finnair Oyj, स्वीडिश: Finnair Abp) ही फिनलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ सालापासून कार्यामध्ये असलेली फिनएअर ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी विमानकंपनी आहे. +फिनएअरचे मुख्यालय हेलसिंकीच्या व्हंटा ह्या उपनगरात असून हेलसिंकी विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. +फिनलंड सरकार प्रमुख भागधारक (५५.८%) असलेली फिनएर आणि त्याच्या उपकंपन्यांचा फिनलंडमधील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी सेवेवर मोठा प्रभाव आहे. २०१५ मध्ये या कंपनीची सेवा युरोपमधील ६० देश, आशिया खंडातील १३ देश आणि उत्तर अमेरिका खंडातील ४ देशातील ठिकाणी १ कोटी प्रवाशांनी वापरली. जानेवारी २०१६ मध्ये या कंपनीचे ४,८१७ कर्मचारी होते.[१] +फिनएरला १९६३ पासून अपघातात विमान किंवा जीवितहानी झालेली नाही.[२] +फिनएरची स्थापना १ नोव्हेंबर, १९२३ रोजी एरो ली या नावाने झाली. सुरुवातीस या कंपनीच्या उड्डाणांचा संकेत एवाय होता. हा संकेत एरो इहितो (फिनिश भाषेत विमानकंपनी) वरून घेतला गेला होता. फिनएरचा स्थापक बृनो लुकंदर त्याआधी एरोनॉट ही एस्टोनियामधील विमानकंपनी चालवित असे. +दुसऱ्या महायुद्धात हेलसिंकीवर झालेल्या हल्ल्याने फिनएर अडचणीत आली होती. फिनलंडच्या वायुसेनेने १९३९-४० च्या हिवाळ्यात फिनएरची अर्धीअधिक विमाने हस्तगत केली व मोठ्या संख्येने लहान मुलांना स्वीडनमध्ये स्थलांतरित केले. +१९४६मध्ये फिनिश सरकारने डग्लस डीसी-३ प्रकारची विमाने खरेदी करण्यासाठी समभाग विकले व फिनएरच्या मार्गांची व्याप्ती वाढवली. १९५३मध्ये फिनएरने कॉन्व्हेर-४४० प्रकारची विमाने वापरून लंडनपर्यंतची सेवा सुरू केली. +फिन एर कार्गो ओवाय आणि फिन एर कार्गो टर्मिनल या दोन फिन एरच्या सहाय्यक कंपनी की ज्या मालवाहतुकीचे काम पहातात. यां दोन्ही एरलाइनची कार्यालये हेल्शिंकी विमान तळावर आहेत. सध्या फिनएर त्यांची स्वताःची विमाने मालवहातुकीसाठी वापरतात. +फिन एरची हेल्शिंकी एर पोर्ट, ब्रुसेल्स एरपोर्ट,लंडन हिथ्रो एर पोर्ट ही मालवाहतुकीची तीन केंद्रे आहेत. +ही एक फिनएरची सहाय्यक विमान कंपनी आहे. फिनएरचीच ATR-७२-५०० आणि एम्ब्रायर इ१९० ही विमाने भाड्याने घेऊन ही एर वापर करते. या सर्व विमानाची छबी फिनएरचीच आहे. ही एरलाइन २० ऑक्टोबर २०११ रोजी Flybe आणि फिनएर हा एकत्रित करार (जाइंट वेंचर) होऊन चालू झाली. १ मे २०१५ पासून फिनएरचे विमान नियमांनुसार ही विमान कंपनी चालू आहे. +डिसेंबर २०१० मध्ये या एरलाइन ने विमानांची छबी बदलली. विमानांच्या मुख्य भागावर ठळक आणि मोठ्या अक्षरात नाव कोरले. इंजींनाना सफेद रंग दिला. शेपटीचे बाजूस सफेद रंगात नीळा लोगो ठेवला. शेपटीवरील पृथ्वीगोल हटविला. +फिनएरचे नियमांनुसार सेवकांची स्थिति आहे. केबिन मधील सर्वसाधारण सेवकाला खांद्यावर एक पट्टी, जे सेवक सीनियर आहेत, त्यांना परसर हुद्दा आहे आणि हाँग काँग,सिंगापूर आणि स्पेन कडे जाणाऱ्या विमानात सेवा देतात त्यांना दोन पट्ट्या, व मुख्य परसरला तीन पट्ट्या आहेत. शिवाय स्त्री परसरला तिच्या ड्रेस किंवा ब्लाऊज वर सफेद उभी पट्टी आहे. फिनएरचे सेवकांनी विमान उड्डाण आणि लॅंडींगचे वेळी सुरक्षा म्हणून मोजे घालण्याचे बंधन आहे. +फिनएर एशिया, युरोप, उत्तर अमेरिका या खंडातील ३७ देशातील ११० ठिकाणी त्यांचे हेल्शिंकी या मुख्य केंद्रातून विमान सेवा देते.[३] +फिनएरने खालील विमान कंपनीशी भागीदारी करार केलेले आहेत. +जे नियमित विमान प्रवाशी आहेत त्यांना त्या त्या विमान वर्गवातील प्रवासासाठी गुण दिले जातात आणि त्यांचे एकत्रीकरण करून त्यांची स्वर्ण, रजत, रौप्य वर्गवारीत गणना केली जाते. अशा प्रवाशांना पुढील प्रवासात स्वागत कक्षात प्राधान्य दिले जाते. शिवाय करारबद्द इतर विमानात देखील त्यांना प्राधान्य दिले जाते. विविध हॉटेलमधील सेवेत तसेच वाहनात देखील प्राधान्य दिले जाते. खानपान व्यवस्थाही विमानात तसेच विमान तळावर समाधानकारक ठेवलेली आहे. +विमानात एलसीडी विडियो मॉनिटर, त्यात मूवीज, व्यवस्था ठेवलेली आहे. दैनिक, साप्ताहिक,या सुविधाही आहेत.[४] +सन २००९ मध्ये स्कायट्रक्स जागतिक एर लाइन अवॉर्ड कडून ४-स्टार लाइन अवॉर्ड प्राप्त झाला.[५] +सन २०१० ते २०१६ पर्यन्त सतत प्रत्येक वर्षी उत्तर युरोपची बेस्ट एर लाइन आणि बेस्ट यूरोपियन एर लाइन हे अवॉर्ड अनुक्रमे TTG वार्षिक प्रवाशी अवॉर्ड आणि AFTA राष्ट्रीय प्रवाशी उध्योग अवॉर्ड यांचे कडून प्राप्त झाले. +सन २०१३ मध्ये AFTA राष्ट्रीय प्रवाशी व्यवसाय अवॉर्ड कडून बेस्ट इंटरनॅशनल एरलाइन- ऑफ लाइन कॅरियर आणि २०१६ मध्ये बेस्ट ट्रॅवल अवॉर्ड कडून बेस्ट एरलाइन व्यवसाय अवॉर्ड व जागतिक प्रवाशी अवॉर्ड कडून विमानातील खानपान व्यवस्था अवॉर्ड प्राप्त झाले.[६] +सन १९४० मध्ये जेयु ५२ कलेवा एरलाइनचे विमान सोविएत एर फोर्स ने पाडले होते. तसेच सन १९६१ आणि १९६३ मध्ये डीसी-३ या विमानाचे अपघात होऊन जीवित हानी झाली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2910.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7160c20488ee2fb8553a969573d4a4d322b6d0b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2910.txt @@ -0,0 +1 @@ +फिनकॉम एरलाइन्स (Finncomm Airlines) ही फिनलंडमधील एक विमान वाहतूक कंपनी होती. फिनलंडच्या इल्मायोकी येथे मुख्यालय असलेली ही कंपनी १९९३ साली स्थापन केली गेली व २०११ साली बंद झाली. हेलसिंकी विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या फिनकॉम एरलाइन्सला फिनएअर व फ्लायबी ह्या कंपन्यांनी एकत्रितपणे विकत घेतले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2911.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7160c20488ee2fb8553a969573d4a4d322b6d0b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2911.txt @@ -0,0 +1 @@ +फिनकॉम एरलाइन्स (Finncomm Airlines) ही फिनलंडमधील एक विमान वाहतूक कंपनी होती. फिनलंडच्या इल्मायोकी येथे मुख्यालय असलेली ही कंपनी १९९३ साली स्थापन केली गेली व २०११ साली बंद झाली. हेलसिंकी विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या फिनकॉम एरलाइन्सला फिनएअर व फ्लायबी ह्या कंपन्यांनी एकत्रितपणे विकत घेतले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2940.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..745f0d047cdac8fa06ea794d830d22340173faaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2940.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिनिश कारेलिया किंवा स्वीडिश कारेलिया हा कारेलिया प्रदेशाचा पश्चिम भाग आहे. हा पश्चिम फिनलंडचा भूतकाळातील एक प्रांत होता. +कारेलियाच्या पूर्व भागाला रशियन कारेलिया म्हणले जायचे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2957.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ca372e2e5be821452b3328d6ce6c16f6f9b3b57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2957.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मिळवणारा संघ क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचतो. आजवर आर्जेन्टिना, जर्मनी, ब्राझील, स्पेन, नेदरलँड्स, इटली व फ्रान्स ह्या सात संघांनी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे. +जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धतीवर आधारित क्रमवारी देखील फुटबॉल संघांसाठी वापरली जाते. +९ एप्रिल २०१५ रोजी क्रमवारीमधील पहिले २० संघ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2964.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e054bcae8f45f0c66cdd3571a6da39e1fe655d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2964.txt @@ -0,0 +1,243 @@ + + +At the end of each FIFA World Cup final tournament, several awards are attributed to the players and teams which have distinguished from the rest, in different aspects of the game. +There are currently six awards: +An All-Star Team (currently commercially termed "Mastercard All-Star Team") comprising of the best players of the tournament, is also announced for each tournament since १९९०. +प्रत्येक फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूस सोनेरी बूट पुरस्कार दिला जातो. जर दोन किंवा अधिक असे खेळाडू असतील तर इतर खेळाडूंना केलेले सहाय्य हे निर्णायक ठरते. जर यातूनही एक खेळाडू निवडता नाही आला तर उरलेल्यांपैकी कमीतकमी वेळ स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूस हा पुरस्कार दिला जातो. +The award was introduced at the १९३० World Cup for the first time. The २००६ World Cup in Germany was the first time that the Silver and Bronze shoe awards were added to reward the second and third top scorers in the tournament. If there is more than one player with the same amount of goals, the tie-breaker goes to the player who has contributed the most number of assists. If there is still more than one player, the tie-breaker goes to the player who has played the least amount of minutes. + Oleg Salenko +साचा:Unreferencedsection +The Golden Ball award is presented to the most valuable player at each FIFA World Cup finals, with a shortlist drawn up by the FIFA technical committee and the winner voted for by representatives of the media. Those who finish as runners-up in media voting receive the adidas Silver Ball and Bronze Ball awards as the २nd and ३rd most outstanding players in the tournament respectively. +This Award was first awarded in १९८२. +साचा:Unreferencedsection +The Yashin Award for the Best Goalkeeper is named in honor of the late goalkeeper Lev Yashin (USSR). The FIFA Technical Study Group recognizes the top goalkeeper of the tournament based on the player’s performance throughout the final competition. Although goalkeepers have this specific award for their position, they are still eligible for the Golden Ball as well, as when Oliver Kahn was awarded in २००२. Although the Yashin was first awarded in १९९४, every All-Star Team in World Cups prior to १९९८ included only one goalkeeper: +The Yashin Award was first awarded in १९९४ +The FIFA Fair Play Trophy is given to the team with the best record of fair play during the World Cup final tournament. Only teams that qualified for the second round are considered. The winners of this award earn the FIFA Fair Play Trophy, a diploma, a fair play medal for each player and official, and $५०,००० worth of football equipment to be used for youth development. +The FIFA Award for the Most Entertaining Team is a fairly new accolade for the FIFA World Cup. It is a subjectively awarded prize for the team which has done the most to entertain the public with a positive approach to the game. The award is always organized through public participation in a poll. Recent awards have been determined by an Internet vote which may not fairly and accurately represent fan demographics. +साचा:Unreferencedsection +The Best Young Player (commercially termed "Gillette Best Young Player") award was awarded for the first time at the २००६ FIFA World Cup in Germany and given to Germany's Lukas Podolski. The award is given to the best player in the tournament who is at most २१ years old. For the २००६ FIFA World Cup this means that the player had to have been born on or after १ January, इ.स. १९८५. The election took place on FIFA's official World Cup website with the help of The FIFA Technical Study Group. +The Best Young Player Award was first awarded in २००६ +साचा:Unreferencedsection +The All-Star Team, currently named after its current sponsor MasterCard All-Star Team, is a team of the best २३ players, chosen by FIFA's technical study group, from the World Cup Finals. The number of players was expanded from ११ to १६ at the १९९८ finals, and then to the current २३. +Before १९९८, journalists and experts chose a "Dream Team" with outstanding players from each playing position. The teams were chosen mostly by European and South American journalists. + Enrique Ballesteros + José Nasazzi + Milutin Ivković + Luis Monti + Alvaro Gestido + José Andrade + Pedro Cea + Héctor Castro + Héctor Scarone + Guillermo Stabile + Bert Patenaude + Ricardo Zamora + Jacinto Quincoces + Eraldo Monzeglio + Luis Monti + Attilio Ferraris + Leonardo Cilaurren + Giuseppe Meazza + Raimundo Orsi + Enrique Guaita + Matthias Sindelar + Oldrich Nejedly + Frantisek Planicka + Pietro Rava + Alfredo Foni + Domingos da Guia + Michele Andreolo + Ugo Locatelli + Silvio Piola + Gino Colaussi + György Sárosi + Gyula Zsengellér + Leônidas + Roque Máspoli + Erik Nilsson + José Parra + Schubert Gambetta + Obdulio Varela + Walter Bahr + Ghiggia + Zizinho + Ademir + Jair + Schiaffino + Gyula Grosics + Ernst Ocwirk + József Bozsik + José Santamaría + Fritz Walter + Bauer + Helmut Rahn + Nándor Hidegkuti + Ferenc Puskás + Sándor Kocsis + Zoltan Czibor + Lev Yashin + Djalma Santos + Bellini + Nílton Santos + Danny Blanchflower + Didi + Pelé + Garrincha + Just Fontaine + Raymond Kopa + Gunnar Gren + Antonio Carbajal + Djalma Santos + Cesare Maldini + Valeriy Voronin + Karl-Heinz Schnellinger + Zagallo + Zito + Josef Masopust + Vavá + Garrincha + Leonel Sanchez + Gordon Banks + George Cohen + Bobby Moore + Valeriy Voronin + Silvio Marzolini + Franz Beckenbauer + Coluna + Bobby Charlton + Florian Albert + Uwe Seeler + Eusébio + Ladislao Mazurkiewicz + Carlos Alberto + Piazza + Franz Beckenbauer + Giacinto Facchetti + Gérson + Gianni Rivera + Bobby Charlton + Pelé + Gerd Müller + Jairzinho + Jan Tomaszewski + Berti Vogts + Wim Suurbier + Franz Beckenbauer + Marinho Chagas + Wolfgang Overath + Kazimierz Deyna + Johan Neeskens + Rob Rensenbrink + Johan Cruijff + Grzegorz Lato + Ubaldo Fillol + Berti Vogts + Ruud Krol + Daniel Passarella + Alberto Tarantini + Dirceu + Franco Causio + Rob Rensenbrink + Teofilo Cubillas + Daniel Bertoni + Mario Kempes + Dino Zoff + Claudio Gentile + Luizinho + Fulvio Collovati + Júnior + Zbigniew Boniek + Falcão + Michel Platini + Zico + Paolo Rossi + Karl-Heinz Rummenigge + Harald Schumacher + Josimar + Manuel Amoros + Maxime Bossis + Jan Ceulemans + Felix Magath + Michel Platini + Diego Maradona + Preben Elkjær Larsen + Emilio Butragueño + Gary Lineker + Sergio Goycoechea + Andreas Brehme + Paolo Maldini + Franco Baresi + Diego Maradona + Lothar Matthäus + Roberto Donadoni + Paul Gascoigne + Salvatore Schillaci + Roger Milla + Tomas Skuhravy + Michel Preud'homme + Jorginho + Márcio Santos + Paolo Maldini + Dunga + Krasimir Balakov + Gheorghe Hagi + Tomas Brolin + Romário + Hristo Stoichkov + Roberto Baggio + Fabien Barthez + José Luis Chilavert + Roberto Carlos + Marcel Desailly + Lilian Thuram + Frank de Boer + Carlos Gamarra + Dunga + Rivaldo + Michael Laudrup + Zinedine Zidane + Edgar Davids + Ronaldo + Davor Šuker + Brian Laudrup + Dennis Bergkamp + Oliver Kahn + Rüştü Reçber + Roberto Carlos + Sol Campbell + Fernando Hierro + Hong Myung-Bo + Alpay Özalan + Rivaldo + Ronaldinho + Michael Ballack + Claudio Reyna + Yoo Sang-Chul + Ronaldo + Miroslav Klose + El Hadji Diouf + Hasan Şaş + Gianluigi Buffon + Jens Lehmann + Ricardo + Roberto Ayala + John Terry + Lilian Thuram + Philipp Lahm + Fabio Cannavaro + Gianluca Zambrotta + Ricardo Carvalho + Zé Roberto + Patrick Vieira + Zinedine Zidane + Michael Ballack + Andrea Pirlo + Gennaro Gattuso + Luís Figo + Cristiano Ronaldo + Hernán Crespo + थिएरी ऑन्री + Miroslav Klose + Francesco Totti + Luca Toni +Only one player has been named in three separate All-Star teams: Franz Beckenbauer of West Germany, who was included in the १९६६, १९७०, and १९७४ editions of the All-Star Team. Eighteen others have been named to two separate All-Star teams: Luis Monti (१९३० and १९३४; however in १९३० he was representing Argentina while in १९३४ he represented Italy); Garrincha, Valeriy Voronin and Djalma Santos (१९५८ and १९६२); Pelé (१९५८ and १९७०); Bobby Charlton(१९६६ and १९७०); Berti Vogts (१९७४ and १९७८); Michel Platini (१९८२ and १९८६); Diego Maradona (१९८६ and १९९०); Paolo Maldini (१९९० and १९९४); Dunga (१९९४ and १९९८); Roberto Carlos, Rivaldo, and Ronaldo (१९९८ and २००२); Lilian Thuram and Zinedine Zidane (१९९८ and २००६); Michael Ballack and Miroslav Klose (२००२ and २००६). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2978.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffa0940921f151afa7e9cf22cb203a453705ec7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_2978.txt @@ -0,0 +1,9 @@ +मेरी ॲन एव्हान्स, मेरी एव्हान्स वाडिया तथा फियरलेस नादिया (८ जानेवारी , १९०८:पर्थ, ऑस्ट्रेलिया – ९ जानेवारी, १९९६:मुंबई, महाराष्ट्र, भारत) भारतीय फिल्म जगतातील एक अभिनेत्री आणि स्टंट नायिका होती. हिने १९३०-४० दरम्यान चित्रपटांत कामे केली. ही स्वतःची धाडसी दृश्ये स्वतःच करत असे +हिने हंटरवाली या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. २०१७मध्ये प्रदर्शित झालेला रंगून हा हिंदी चित्रपट हिच्या जीवनावर काहीसा आधारित आहे. +१९०८ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे एक ब्रिटिश सैनिक आणि ग्रीक आईच्या पोटी जन्माला आलेली नादिया (मूळ नाव : मेरी ॲन एव्हान्स) १९१३ मध्ये वडिलांच्या बरोबर भारतात आली. पेशावरमध्ये रहात असताना तिच्या वडिलांचा युद्धात मृत्यू झाला. त्यानंतर मेरी वयाच्या विशीतच घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बालेनृत्य, टॅपनृत्य अशी अनेक कौशल्ये शिकली. एका सर्कसमध्ये नोकरी पत्करून मेरीने भारतभर भ्रमंती सुरू केली. नावात बदल करून तिने स्वतःसाठी नादिया असे नाव घेतले. +वाडिया मूव्हीटोन या चित्रपट निर्मिती कंपनीचे मालक जमशेद बोमन होमी वाडिया आणि त्यांचे भाऊ होमी वाडिया हे दोघेजण नादियाच्या कौशल्याने प्रभावित झाले. १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या देश दीपक या चित्रपटातील नादियाची छोटी भूमिका खूपच गाजली. १९३५ मध्ये 'हंटरवाली' या होमी बंधूंच्या चित्रपटात नादीयाला प्रमुख भूमिका मिळाली. आपल्या वडिलांच्या राज्यात अन्यायाविरुद्ध लढा देणारी रोबिनहूड सारखी नायिका प्रचंड लोकप्रिय झाली. १९६८ मध्ये आलेला जेम्स बॉंड सदृश्य 'खिलाडी' हा तिचा शेवटचा चित्रपट. +एक युरोपियन गोरी स्त्री भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देते आहे ही बाब तत्कालीन भारतीय प्रेक्षकांना बहुतेक फारच रुचली असावी. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील नादियाचे चित्रपट आणि त्यातील हाणामाऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या. +नूर-ए-यमन, डायमंड क्वीन, जंगल प्रिन्सेस, बगदाद का जादू, लेडी रोबिनहूड, हंटरवाली की बेटी अशा सुमारे ५५ चित्रपटात नादियाने काम केले. या पैकी ३३ चित्रपटांत तिचा नायक जॉन कावस हा होता. +१९६१ मध्ये नादियाने होमी वाडिया यांच्याशी विवाह केला. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती पत्करल्यावर नादियाने शर्यतीच्या घोड्यांची पैदास या व्यवसायाकडे लक्ष दिले. 'निजीन्स्की' या नावाचा तिचा घोडा भारतीय रेस शौकीनांमध्ये भयंकर गाजला होता. +८ जानेवारी १९९६ मध्ये मुंबईतील खंबाला हिल रुग्णालयात नादियाचे निधन झाले. +नादियाचा पणतू रियाद विन्ची वाडिया याने 'फियरलेस : द हंटरवाली स्टोरी' हा माहितीपट १९९३मध्ये बनवला. विशाल भारद्वाज यांच्या रंगून (२०१७) या चित्रपटातील कंगना राणावत हिचे पात्र नादियाच्या भूमिकेवरून सुचलेले आहे. गुगल ने ८ जानेवारी १९१८ रोजी नादियाच्या ११०व्य जयंतीनिमित्त डुडल बनवून तिला श्रद्धांजली वाहिली.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3025.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcac183f3dce0cd63355ff0cc433c002310ff188 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3025.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिरोजपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. +हे शहर फिरोजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3054.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c5af1ab5a8f6b4c2be05fba36f3858ecec6be23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3054.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप व्हेरांट फिल सिमन्स (१८ एप्रिल, १९६३:त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८७ ते १९९९ दरम्यान २६ कसोटी आणि १४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3057.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18fc384948d1dbf6fa5afdcef65a5f54815016d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3057.txt @@ -0,0 +1,4 @@ +फिलिप जेरोड हेथ (जन्म १८ डिसेंबर १९७९, वॉशिंग्टन, अमेरिका) एक अमेरिकन आयएफबीबी व्यावसायिक बॉडीबिल्डर आहे. तो सात वेळा मिस्टर ओलंपियाचा विजेता आहे (२०११-२०१७)[१]. +फिलिप जेरोड हेथचा जन्म सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला होता. त्यांनी सिएटलमधील रेनिअर बीच हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि तेथे तो संघाचा कर्णधार आणि वर्षा बास्केटबॉल संघाचा नेमबाजी गार्ड होता.त्यांनी व्यवसाय प्रशासनाच्या अभ्यासासाठी डेन्व्हर विद्यापीठात शिक्षण घेतले[२]. +२००२ मध्ये त्याने बॉडीबिल्डिंगमध्ये प्रवेश केला. २००५ मध्ये त्यांनी नॅशनल फिजिक कमिटी यूएसए चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद जिंकले. पुढच्या वर्षी कॉलोराडो प्रो चँपियनशिप आणि न्यू यॉर्क प्रो चॅम्पियनशिप अशा पहिल्या दोन आयएफबीबी व्यावसायिक स्पर्धेत त्याने जिंकले.२००७ मध्ये, हीथने अर्नोल्ड क्लासिकमध्ये पाचवे स्थान मिळविले.२००८ मधील आयर्न मॅन शो हेथने जिंकला २००९ मधील मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेत त्याने पाचवे स्थान मिळविले[३]. +फिल हेथ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3065.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11efbd914c5ed4952132f5162c276d883c367002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3065.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 39°57′12″N 75°10′12″W / 39.95333°N 75.17000°W / 39.95333; -75.17000 + +फिलाडेल्फिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात न्यू जर्सी राज्याच्या सीमेवर डेलावेर नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या नैऋत्येला ९० मैल अंतरावर तर वॉशिंग्टन डी.सी.च्या ईशान्येला १४० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली फिलाडेल्फियाची लोकसंख्या १५.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती. +ऑक्टोबर २७, इ.स. १६८२ रोजी विल्यम पेन ह्या ब्रिटिश व्यापाऱ्याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. जुलै ४, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा येथेच लिहिला गेला. वॉशिंग्टन डी.सी. पूर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती. +फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पेन्सिल्व्हेनियामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ फिलाडेल्फिया शहरामध्येच स्थित आहे. येथून अमेरिकेच्या बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच युरोप, कॅरिबियन, लॅटिन अमेरिका येथील काही प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. इंटरस्टेट ९५ व इंटरस्टेट ७६ हे दोन प्रमुख इंटरस्टेट महामार्ग फिलाडेल्फियामधून जातात. नागरी परिवहनासाठी येथे सेप्टा ह्या सरकारी संस्थेद्वारे अनेक बसमार्ग, जलद परिवहन रेल्वेमार्ग, उपनगरी रेल्वेमार्ग चालवले जातात. ॲमट्रॅक ह्या अमेरिकेतील प्रमुख रेल्वे कंपनीच्या मार्गावरील फिलाडेल्फिया हे प्रमुख स्थानक आहे. +खालील चार प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ फिलाडेल्फिया महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फिलाडेल्फिया हे १२ पैकी एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3076.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8abba3ba2a9880d9fbcd69361906e6e0ed201fb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3076.txt @@ -0,0 +1 @@ +फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स (इंग्लिश: Philadelphia 76ers) हा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3091.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28ca2c3ac113a9a5384962a32002c8181076093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3091.txt @@ -0,0 +1,2 @@ +फील्ड मार्शल फिलिप वालहाउस चेटवूड, १ला बॅरन चेटवूड, ओकलीचा ७वा बॅरोनेट , जीसीबी , ओएम , जीसीएसआय , केसीएमजी , डीएसओ (२१ सप्टेंबर १८६९ - ६ जुलै १९५०) हा एक ब्रिटिश लष्करी अधिकारी होता. +दुसऱ्या बोअर युद्धाच्या वेळी त्याने कारवाईत भाग घेतला होता. त्यावेळी तो १ डिसेंबर १८९९ मध्ये वेढल्या गेलेल्या लेडीस्मिथचा वेढा येथे उपस्थित होते. पश्‍चिम मोर्चावरील पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने यॅप्रेसच्या पहिल्या लढाईत भाग घेतला आणि त्यानंतर सीनाय येथे आणि पॅलेस्टाईन मोहिमेदरम्यान त्याने आपल्या कॉर्प्सचे नेतृत्व केले. या मोहिमा ऑक्टोबर १९१७ मध्ये बेर्शेबाची लढाई आणि नोव्हेंबर १९१७ मध्ये जेरुसलेमची लढाई मार्च १९१७ मध्ये गाझाची पहिली लढाई अशा होत्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3109.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ff3b0edab5d7ad9b8e27e6151d3dd380810a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3109.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला फिलिप (फ्रेंच: Philippe Ier;) (मे २३, इ.स. १०५२ - जुलै २९, इ.स. ११०८) हा इ.स. १०६० सालापासून मृत्यू पावेपर्यंत फ्रान्साचा राजा होता. त्याने स्वतःचा बाप पहिला हेन्री याच्या कारकिर्दीत क्षीण झालेल्या राज्याची पुनरुत्थानाची प्रक्रिया आरंभली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3128.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c5af1ab5a8f6b4c2be05fba36f3858ecec6be23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3128.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप व्हेरांट फिल सिमन्स (१८ एप्रिल, १९६३:त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८७ ते १९९९ दरम्यान २६ कसोटी आणि १४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_314.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..391bce748e6c779470a3480fabb26497a241804c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_314.txt @@ -0,0 +1,8 @@ +पोपट (शास्त्रीय नाव: Psittacula krameri, सिटाक्युला क्रामेरी; इंग्लिश: Rose-ringed Parakeet, रोझ-रिंग्ड पॅराकीट;) ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आढळणारी पॅराकिटांची एक मोठी प्रजाती आहे. नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात. +सिट्टॅसिडी या पक्षिकुलात ज्या पक्ष्यांचा समावेश केलेला आहे त्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे ‘पोपट’हे नाव दिलेले आहे. या कुलात ८२ वंश आणि त्यांच्या ३१६ जाती दिसून येतात मॅको, लोरी, काकाकुवा, बजरीगार, पॅराकीट, कॉन्यर इत्यादींचा यातच समावेश होतो. पोपट बव्हंशी उष्ण कटिबंधात राहणारे आहेत; पण उपोष्ण आणि थंड प्रदेशातही त्यांचा प्रसार झालेला आहे. त्यांचा उगम ऑस्ट्रेलियन प्रदेशात झाला असावा असे मानतात; तथापि त्यांचे प्रथम सापडलेले काही जीवाश्म (शिळारूप अवशेष) फ्रान्समधील असून ते दीड कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या जितक्या विविध जाती आणि प्रकार आढळतात तितके दुसरीकडे कोठेच आढळत नाहीत.हे पक्षी विविध रंगाचे व आकारमानाचे असतात; पण दिसायला व शरीर-रचनेच्या दृष्टीने ते सारखेच असतात. यांची लांबी १० सेंमी. पासून १०० सेंमी.पर्यंत असते. चोच आखूड, मजबूत वा बाकदार असते. चोचीचा वरचा अर्धा भाग कवटीला जोडलेला असून तो थोडाफार हालविता येतो. मान आखूड व शरीर आटोपशीर असल्यामुळे हा गुबगुबीत किंवा स्थुल दिसतो. यांचे पंख मजबूत व गोलसर असतात. थोड्या अंतरापर्यंत हा अतिशय वेगाने जरी उडू शकत असला, तरी फार दूरवर याला उडता येत नाही. ऑस्ट्रेलियातील भूचर पोपटासारख्या काही पोपटांना तर जवळजवळ उडताच येत नाही. काही पोपटांची शेपटी फार आखूड तर काहींची बरीच लांब असते. पायाच्या चार बोटांपैकी दोन पुढे व दोन मागे असतात आणि त्यांवर बारीक खवले असतात. बहुतेक जातींच्या पोपटांचे रंग भडक असतात. हिरवा हा या पक्षांचा सामान्य रंग होय; पण पुष्कळ जाती बहुरंगी असतात. त्यांच्या शरीराचे निरनिराळे भाग लाल, पिवळे, हिरवे, निळे, काळे इ. रंगांचे असतात. नर व मादी यांचे रंग सारखेच असतात; पण याला काही अपवाद आहेत; उदा; ऑस्ट्रेलियातील इलेक्टस पोपटाच्या नराचा रंग हिरवा तर मादीचा तांबडा असतो.त्यांच्या बोटांच्या विशिष्ट व्यवस्थेमुळे ते झाडावर झपाट्याने चढू शकतात किंवा फांद्यांवर हिंडू शकतात. झाडांच्या खोडांवर चढतांना किंवा फांद्यांवर इकडून तिकडे जाताना ते आपल्या चोचीचा देखील उपयोग करतात. पण काही पोपट (उदा. ऑस्ट्रेलियातील पोपटांच्या काही जाती) मुख्यतः जमिनीवरच राहतात; पण जरूर पडेल तेव्हा ते झाडांवर चढून बसू शकतात व आपली घरटीही तेथेच करतात.पोपट मुख्यतः शाकाहारी आहे; पण क्वचित प्रसंगी काही पोपट किडेही खातात. निरनिराळे धान्ये आणि सर्व प्रकारची लहानमोठी फळे हे त्यांचे खाद्य होय. फुलातला मधही ते शोषून घेतात. कठीण कवचीचे फळ, एक पाय वर उचलून त्याच्या बोटात घट्ट पकडून, आपल्या चोचीने फोडतात व वरचे टरफल काढून टाकून आतला गर खातात. सबंध फळ ते कधीच खात नाहीत; फळाचा थोडासा भाग खाऊन बाकीचा टाकून देतात. अशा तऱ्हेने फळबागेची, शेतातील उभ्या पिकाची व झाडांवरीलमध असणाऱ्या फुलांची ते फार नासाडी करतात. ऑस्ट्रेलियातील नेस्टर नोटॅबिलिस या जातीचा पोपट मेंढीच्या पाठीला चोच मारून मेंढीच्या मूत्रपिंडापर्यंत जातो व त्यामुळे मेंढी मरते. +झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. बहुतेक जाती घरट्याकरिता बाहेरच्या कोणत्याही पदार्थाचा उपयोग करीत नाहीत. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी घालतात. ऑस्ट्रेलियातील रानटी बजरीगार मात्र ढोलीत किंवा भोकात थोडेसे गवत घालून घरटे बनवितात. अर्जेंटिनातील एका जातीचे हिरवे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतात. वसाहतीच्या स्वरूपाच्या या घरट्यात प्रत्येक जोडप्याकरिता एक स्वतत्र खोली असते. ऑस्ट्रेलियातला एका जातीचा भूचर पोपट जमिनीवरील गवताच्या झुपक्यात घरटे तयार करतो. +मादी प्रत्येक खेपेस २–५ अंडी घालते; कधीकधी त्यांची संख्या ८ पर्यंतही असते. ती सापेक्षतया लहान असून पांढरी असतात. सर्वसाधारणपणे तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती केवळ मासांच्या गोळ्यांसारखी असून दुबळी असतात. आईबाप आपल्या अन्नपुटातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहेर् काढून त्यांना भरवितात. +पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परंतु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात इतकेच नव्हे, तर दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामुळे पुष्कळ लोक पोपट पाळतात. आफ्रिकेतील काही जातींचे पोपट (उदा., सिटॅकस एरिथॅकस) फार स्पष्ट शब्दोच्चार करतात. इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. काही पोपट ८० वर्षे जगल्याचीही नोंद आहे. +सिटॅकोसिस हा व्हायरसजन्य रोग पोपटामुळे माणसाला होतो व त्यामुळे बरेच लोक पोपट पाळण्यास नाखूश झाले होते. हा रोग फक्त पोपटांनाच होतो असा पूर्वी समज होता; पण तो इतर पाळीव पक्ष्यांनाही होतो असे आता आढळून आले आहे. प्रतिजैव (ॲंटिबायॉटिक) औषधांच्या शोधांमुळे या रोगांचा प्रतिबंध झाल्याने पोपटाची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली आहे. +बजरीगार हा छोटा ऑस्ट्रेलियन पोपट जगातील सर्व देशांच्या बाजारांत थोड्या किंमतीला विकत मिळतो. पुष्कळ लोक या छोट्या गोजिरवाण्या पक्ष्यांची जोडपी पिंजऱ्यात पाळतात. बंदिवासात देखील याची वीण होत असल्यामुळे माणसाने याचा फायदा घेऊन अनेक रंगांच्या बजरीगारांची निपज केली आहे. या पक्ष्यांचा रानटी अवस्थेतील मूळ रंग गवती हिरवा असतो; पण हल्ली बाजारात गडद हिरवा, करडा, पिवळा, पांढरा, निळा, जांभळा इ. रंगांचे बजरीगार वाटेल तितके मिळतात. +पिकाची व फळांची नासाडी करणारा पक्षी म्हणून माणसाने यांची बेसुमार हत्या केल्यामुळे पोपटांच्या कित्येक जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही त्या वाटेवर आहेत. मॅस्करीन आणि त्याच्या जवळपासच्या इतर बेटांवर आज एकही पोपट शिल्लक नाही. अमेरीकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य भागात एके काळी विपुल असणारा कॅरोलायना पोपट विसाव्या शतकात पूर्णपणे लोप पावला आहे. भारतातील जाती : भारतात पोपटांच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी तीन सर्वत्र आढळणाऱ्या असून बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशांपुरत्याचा मर्यादित आहेत.राघू : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. दाट पाने असलेले मोठाले वृक्ष जेथे असतील अशा सर्व प्रकारच्या प्रदेशांत हा राहतो. मनुष्यवस्तीतली मोठाली झाडे, बागा, आणि आसपासची शेते यांत तो वरचेवर येतो. साधारणपणे कबुतराएवढा हा असतो; रंग वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा; चोच लाल, आखूड, मजबूत आणि वाकडी; डोके मोठे; मानेच्या भोवती गुलाबी कडे असून पुढच्या बाजूला ते काळ्या पट्ट्याने चोचीच्या बुडाला जोडलेले असते; खांद्यावर तांबडा पट्टा; शेपूट लांब व टोकदार; मादीच्या मानेभोवती गुलाबी वलय नसते.यांची लहान लहान टोळकी किंवा मोठाले थवे असतात.ते उभ्या पिकांवर व फळबागेतील फळांवर हल्ला चढवून त्याची खाण्यापेक्षा नासधूसच जास्त करतात. धान्य किंवा फळे खात असताना मधून मधून ओरडून ते गोंगाट करीत असतात. यांचे उडणे जलद व डौलदार असते. ठराविक झाडीमध्ये रात्री झोपण्याकरिता यांचे थवे गोळा होतात व गोंगाट करीत करीत तेथे झोपी जातात. पुष्कळ लोक पिंजऱ्यात राघू बाळगतात व त्यांना बोलायला शिकवितात. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ डिसेंबर ते एप्रिल असतो.कीर : या पोपटाच्या आवाजावरून त्याला कीर असे नाव दिले असावे असे दिसते. याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला क्रॅमरी असे आहे. मैदानी प्रदेशात व डोंगरांवर १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो. विरळ जंगलांत, शेतांत, त्याचप्रमाणे गावांत व खेड्यांत हा नेहमी आढळत असल्यामुळे हा सगळ्यांच्या माहितीचा आहे.सांळुकीपेक्षा हा मोठा असतो. राघूची ही लहान आवृत्ती असते, असे म्हणावयास हरकत नाही; परंतु याच्याखांद्यावर राघूप्रमाणे तांबडा पट्टा नसतो; मादीच्या मानेभोवती नराप्रमाणे गुलाबी काळे वलय नसते. सामान्यतः हा झाडावर असतो; पणपण कधीकधी भक्ष्य मिळवण्याकरिता तो जमिनीवर उतरतो. राघूप्रमाणेच यांचे थवे असतात व ते शेतांत व बागांत नासधूस करतात. राघूप्रमाणेच यांचे थवे दाट झाडीमधील ठराविक झाडांवर रात्री झोप घेतात. उडताना किंवा बसला असताना हा कर्कश आवाज काढीत असतो.पुष्कळ लोक हा बाळगतात. हा बोलायला शिकतो; त्याचप्रमाणे कसरतीचे बरेचसे खेळ, बंदूक उडविणे, मशाल वाटोळी फिरविणे वैगेरे खेळ त्याला शिकविले, तर तो ते करून दाखवतो. प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत असतो.तोता : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हा मुख्यतः अरण्यात राहणारा असला, तरी लागवडीखाली असलेल्या झाडीच्या प्रदेशातही हा आढळतो. हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. तोता साळुंकीएवढा असतो. बांधा सडपातळ व शेपटी लांब, टोकदार असते; नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे; मानेभोवती हनुवटीपासून निघालेले बारीक काळे वलय; खांद्यावर मोठा तांबडा डाग; शेपटीची मधली पिसे निळी व त्यांची टोके पांढरी; मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा; मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय; खांद्यावर तांबडा डाग नसतो. चोच शेंदरी रंगाची असते.दाट जंगलात यांचे थवे आढळतात. बी व रानफळे हे यांचे मुख्य खाद्य होय. राघू किंवा कीर यांच्यापेक्षा हा जास्त वेगाने उडतो. याचा आवाज ‘ट्युई ट्युई’असा काहीसा असून मंजूळ असतो. इतर पोपटांप्रमाणे हा पिंजऱ्यातून बाळगीत नाहीत.यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3153.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ff752cc986ccffe712f8887e8c8c22af69a314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3153.txt @@ -0,0 +1,14 @@ +फिलिपाईन एरलाइन्स (टागालोग: Philippine Airlines) ही आग्नेय आशियातील फिलिपिन्स ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एरलाइन्स आशियामधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एरलाइन्सचे मुख्यालय पासाय ह्या शहरात तर प्रमुख हब मनिलाच्या निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. आज, २०१५ साली फिलिपाईन एरलाइन्स ही कंपनी देशांतर्गत ३१ तर देशाबाहेरील ३६ शहरांना प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरवते. +ही विमान कंपनी पल या संक्षिप्त नावाने आणि फिलिपाईन एअरलाईन या नावाने बराच काळं ओळखली जात होती. या एअरलाईनच्या ध्वजावर वायुसेवा हे चिन्ह आहे. या एअरलाईनचे मुख्य कार्यालय, फिलिपाईन्स देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या, पैसे या शहरातील राष्ट्रीय बँकेच्या केंद्रात आहे.[१] +या विमान कंपनीची स्थापना सन १९४१ मध्ये झाली. फिलिपाईन एअरलाईन नावाने चालणारी ही सर्वात पहिली व जुनी व्यापारी कंपनी आहे.. या विमान कंपनीची अन्य कार्यालये मनिला शहरात निनोय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे, तर सेबू शहरातले कार्यालय माइकटेन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. या विमानतळांवरून फिलिपाईन्समधील ३१ ठिकाणी आणि आग्नेय आशियातील देश, मध्य-पूर्व ओशॅनिया, उत्तर अमेरिका, आणि युरोपसह ३६ इतर देशाना विमानसेवा देली जात आहे.[२] +आशिया खंडातील सर्वात जुनी असणारी ही कंपनी सन १९९७ मध्ये फार मोठ्या संकटात सापडली होती. ही कंपनी इतर विमान कंपन्याशी संमीलित असल्याने त्यांच्या नियोजनाप्रमाणे हिला युरोप, मध्य पूर्व, तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा नाईलाजाने कमी कराव्या लागल्या होत्या. मनिला या नियंत्रण कक्ष-मार्गातील विमान सेवा सोडून देशांतर्गत सेवा, तसेच कर्मचारी आणि आरमारी विमानसेवा इत्यादी कमी करणे यासारखे निर्णय घ्यावे लागले होते. सन १९९८मध्ये हळूहळू कांही ठिकाणची ही सेवा काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्यात आली. सन २००७ मध्ये ही विमान सेवा (पल) पूर्णपणे नियंत्रणमुक्त झाली. +सन २०१२ साली सेंन मिगुएल निगमने ताब्यात घेतल्यानंतर ही कंपनी, आशिया खंडातील एक प्रमुख विमान सेवेच्या रूपात पुन्हा कार्यान्वित होण्याच्या दिशेने पावले टाकू लागली. +दि. १४-११-१९३५ रोजी फिलीपाइन्स कोंग्रेसने लुजण बेटावर टपाल, माल, व प्रवासी वाहतूक या सेवांसाठी फिलीपाईन हवाई टॅक्सी कंपनीला मंजुरी दिली. या विमान कंपनीने त्यानंतर मनिला – बगुइओ आणि मनिला – पेराकोल ही उड्डाणे निश्चित केली. या ठरविलेल्या मार्गांवर अनेक अडचणी आल्याने ती उड्डाणे ६ वर्षांत निष्क्रिय झाली.[३] +फिलिपाईन्स देशातील व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने देशाचे माजी अध्यक्ष व एक प्रमुख उद्योगपती ॲन्ड्रेस सोनारिओ, तसेच माजी सिनेटर व देशाचे अणखी एक माजी अध्यक्ष +रेमन फर्नांडिस यांना या विमान कंपनीत सामावून घेतले. या कंपनीने फिलिपिन हवाई टॅक्सी कंपनी आपल्यात सम्मिलीत करून घेतली. याने या कंपनीचा उदय झाला. या कंपनीचे बीच क्राफ्ट मॉडेल 18 +एन.पी.सी.-५४ या विमानाने मनिला शहरातील निल्सन फील्ड विमान तळावरून पहिली झेप घेतली आणि देशातीलच बगुइयो या शहरातील विमानंतळावर दि. १५ मार्च १९४१ रोजी उतरले. +या विमान कंपनीने दि.२२ जुलै (सन?) रोजी फिलिपाईन हवाई टॅक्सी कंपनीचे सर्व हक्क ताब्यात घेतले. +सरकारी वटहुकूमाने माहे सप्टेंबर (सन?) मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण होण्यासाठी सर्व मार्ग खुले झाले. +फिलिपाीन विमान कंपनीचे विमानतळावर'मबुहाय' विश्राम कक्ष आहेत. मबुहाय, विशेष वर्ग आणि व्यावसायिक वर्ग यांचेसाठी ही व्यवस्था आहे. मात्र पलच्या अन्य प्रवाशांनी याचा वापर करावयाचा नाही असा दंडक आहे. या विश्राम कक्षात मदिरा हॉल तसेच खानपान व्यवस्था आहे. +खालील विमानतळांवर विश्राम कक्ष आहेत.[४] +आंतरराष्ट्रीय विमान परिवहन संघटनेने ( IATA ने), फेब्रुवारी २००७मध्ये, या कंपनीची सुरक्षित सेवा देणारी एअरलाईन अशी शिफारस केली आहे. ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट विभागानेही ते मान्य केले आहे. [६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_316.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..850dcb740f3987fcb4197f12934b7f402550c22c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_316.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादीत आजवरच्या इतिहासामधील सर्व अधिकृत पोप दर्शवले आहेत. ही यादी Annuario Pontificio नावाच्या दरवर्षी व्हॅटिकन सिटीद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकावरून घेतली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3162.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59e1d49e89beef851c89d0c718cf69fcd8bce5e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3162.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिपिन्स फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये फिलिपिन्सचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3174.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afe6ea6825035a9620beb288c798a490679b0e37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3174.txt @@ -0,0 +1,7 @@ +फिलीपिन्स क्रिकेट संघाने २२ ते २६ डिसेंबर २०२३ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. फिलीपिन्सने मालिका ४-२ अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3178.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59e1d49e89beef851c89d0c718cf69fcd8bce5e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3178.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिपिन्स फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये फिलिपिन्सचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_321.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f84ba8484478ef6885fc5b5d51084d906fa14211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_321.txt @@ -0,0 +1,8 @@ + पोफलवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3212.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93b936b8f4cf909ed86ee4e80d692bbd9d9f0c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3212.txt @@ -0,0 +1,16 @@ +फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया हे समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी अभ्यासक राका रे लिखित पुस्तक काली फॉर वुमेन यांनी २००० मध्ये प्रकाशित केले आहे.[१] सदर पुस्तक हे स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी राजकीय कृती समजून घेण्यासाठी स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या अभ्यास विषयांसाठी उपयुक्त आहे. भारतातील स्त्री आंदोलनांचे असंख्य पदर समजून घेण्यासाठी सदर पुस्तकाचे योगदान आहे. +रे यांनी सदर पुस्तकामधून मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरांच्या केसेसच्या माध्यमातून स्त्री चळवळी आणि आंदोलनांचा उगम, संदर्भ, त्यांनी घेतलेले प्रश्न आणि धोरणे समजून घेण्यासाठी १९७० आणि १९९० च्या दशकातील स्त्री चळवळी आणि आंदोलनांच्या प्रारंभाचा मागोवा घेतलेला आहे. सदर पुस्तकामध्ये लेखिकेने चार संघटनेचा मागोवा घेतला आहे. त्यातील दोन राजकीय संलग्नित अशा दोन संघटना आहेत पश्चिमबंगा गंगात्रिक महिला समिती आणि जनवादी महिला संघटना तर दोन स्वायत्त संघटना आहेत सचेतना आणि कलकत्ता, मुंबई मधील फोरम. +फिल्ड ऑफ प्रोटेस्ट या नावातून एकूणच राजकीय संदर्भात या चळवळींचे स्थान समजते. ज्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून चळवळी येतात आणि त्याचबरोबर त्यात ही जी उपक्षेत्र निर्माण होतात त्याविषयी सदर पुस्तक भाष्य करते. बोर्दीयू यांच्या फिल्ड या संकल्पनेपासून रे राजकीय फिल्ड ही संरचित, असमान आणि सामाजिकरित्या घडवलेले वातावरण आहे या दृष्टीकोनातून बघतात की ज्याला स्त्रीया प्रतिसाद देतात. उदा. आंदोलनासाठी स्त्रिया जे प्रश्न पुढे आणतात त्याला क्षेत्र आकारही देते आणि त्यावर परिणामही करतात. [२] +सदर पुस्तकामध्ये लेखिकेने चार संघटनेचा मागोवा घेतला आहे. त्यातील दोन राजकीय संलग्नित अशा दोन संघटना आहेत पश्चिमबंगा गंगात्रिक महिला समिती आणि जनवादी महिला संघटना तर दोन स्वायत्त संघटना आहेत सचेतना आणि कलकत्ता, मुंबई मधील फोरम. सदर पुस्तक १९९० च्या आधीच्या दशकामध्ये केलेल्या संशोधनावर आधारित आहे. हिंसा, दारिद्र्य, भेदभाव, कामातील सहभाग यातून येणारे जिवंत अनुभव यातून राजकीय कृती पुढे जातात याचा आढावा सदर पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कशाप्रकारे कलकत्तामधील राजकीय संदर्भ जसे डावे जहाल राजकारणाचा या योगदानावर परिणाम झाला आणि कार्यकर्त्यांनी त्या काळातील वर्चस्व असलेल्या राजकीय कृती कार्यक्रमांशी वाटाघाटी करण्यासाठी वापरलेली धोरणे याची नोंद घेतली आहे. कलकत्त्याची एकजिनसी राजकीय संस्कृती आणि मुंबईची बहुजिनसी राजकीय संस्कृती या दोन्हीतील फायदे आणि वाटाघाटीमध्ये येणारे अडथळे याचा आढावा सदर पुस्तकामध्ये घेतला आहे. +रे दाखवून देतात की, कशाप्रकारे कलकत्ता मध्ये स्त्रियांचे साक्षरता किंवा रोजगार विषयक सार्वजनिक प्रश्न साम्यवादी विचारसरणी आणि पक्ष निर्देशित करतात तर मुंबई मध्ये लिंग निदान किंवा हिंसे सारखे प्रश्न स्त्रिया स्वतः स्वतंत्रपणे मांडतात. मुंबईतील पुरुषसत्तेने लिंगभावात्मक हिंसा समजून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले होते तर कलकत्त्यामधील आंदोलनांनी पक्षाच्या कृतीकार्यक्रमांवर आणि स्त्री आणि पुरुषांमधील भेदभाव समोर न आणण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. +सदर पुस्तक स्त्रिया या नेहमी अत्याचाराच्या बळी ठरतात या चौकटीला छेद देते आणि स्त्रियांच्या जीवनातील बारकावे आणि गुंतागुंत याचे विवेचन करते तसेच स्त्रियांच्या साक्षरता, पाणी, सुरक्षित गर्भनिरोधक साधने आणि लैंगिक हिसाचाराविरोधी लढयांना पाठिंबा देते. +प्रकरण पहिले स्त्री चळवळीचे संदर्भ तसेच राजकीय कृती आणि संकल्पना, स्थान आणि सिद्धांत याचा वापर निर्देशित करते. +दुसऱ्या प्रकरणामध्ये कलकत्ता आणि मुंबई मधील स्त्री चळवळीच्या संघटना दोन्ही स्वायत्त आणि राजकीय संलग्नित गट आहेत हे दर्शविले आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये राजकीय क्षेत्राचे स्वरूप हे चळवळ कशाला म्हणायचे याची परिभाषा देते आणि प्रत्येक शहरात चळवळ ही विभिन्न पद्धतीने विकसित होते हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. हा मुद्दा उदाहरणासहीत स्पष्ट केला आहे की कशाप्रकारे कलकत्त्यामध्ये रोजगाराच्या प्रश्नासाठी संघटन झाले, तर मुंबई मध्ये स्त्रियांविरुद्ध हिंसाचार हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. +तिसऱ्या प्रकरणामध्ये कलकत्ता मधील राजकीय क्षेत्र डाव्या एकसंध राजकीय संस्कृतीतून घडवले आहे की ज्यावर कलकत्त्यातील भद्रलोकी संस्कृतीचा परिणाम असलेला दिसतो या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. +चौथ्या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, कशाप्रकारे पक्ष हा पश्चिम बंगा गणतांत्रिक महिला समितीशी संलग्नित आहे आणि सचेतना स्त्रियांचा स्वायत्त गट विचारप्रणाली आणि राजकीय संस्कृती वेगळ्या पद्धतीने परिभाषित करतो. त्याचबरोबर कशाप्रकारे कलकत्तामधील राजकीय संदर्भ जसे डावे जहाल राजकारणाचा या योगदानावर परिणाम झाला आणि कार्यकर्त्यांनी त्या काळातील वर्चस्व असलेल्या राजकीय कृती कार्यक्रमांशी वाटाघाटी करण्यासाठी वापरलेली धोरणे याची नोंद घेतली आहे. उदा. PBGMSच्या मते आर्थिक पर्याय हा कौटुंबिक हिंसाचारावरचा तोडगा असू शकतो तर सचेतना ही संघटना कौटुंबिक हिंसाचार होण्यामागच्या समजुतींवर टिका करते. +पाचवे प्रकरण PBGMS, CPI (M) स्त्रियांची शाखा, सचेतना या स्वायत्त संघटनेतील कार्यकर्त्यांची संघटनात्मक आणि खाजगी धोरणे सुचित करते. तसेच हे प्रकरण या संघटनांच्या अडचणी आणि सामर्थ्य आणि त्याचबरोबर कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्षेत्रावर कशाप्रकारे निर्णय घेतात यावर प्रकाश टाकते. +मुंबई मध्ये जे विखुरलेले आणि संघर्षात्मक राजकीय क्षेत्र आहे आणि ज्याच्या परिणामातून बहुविध राजकीय संस्कृती निर्माण झाली आहे या विषयक सहाव्या प्रकरणामध्ये मांडणी केलेली आहे. +सातवे प्रकरण Forum Against Oppression of Women या संघटनेचे बहुजिनसीत्व, प्रवाहीपणा, सामाजिक दर्जा आणि धोरणे तसेच जनवादी महिला संघटनेने कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, काम या अशा अनेक प्रश्नांविषयक जाणीव निर्माण करण्यामध्ये निर्माण केलेले उपाय यावर प्रकाश टाकते. +प्रकरण आठवे शहरातील अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर मोर्चे आणि युती निर्माण करण्यामध्ये फोरम आणि जनवादी महिला संघटना यांनी अनेक वेगवेगळे पर्याय वापरले याकडे लक्ष वेधते. मुंबई मधील स्त्री चळवळीमध्ये फोरम हा स्वायत्त, सांस्कृतिक दबाव गट आहे आणि जनवादी महिला संघटना PBGMSची शाखा आहे. +नवव्या प्रकरणामध्ये सारांश स्वरूपात मांडणी केली आहे की, कलकत्ता आणि मुंबई येथील स्त्री चळवळीच्या अनुभवातून असे लक्षात येते की, स्त्री चळवळ ही विशिष्ठ इतिहास आणि स्थानामध्ये रुतलेली असते. सदर पुस्तकात स्त्रियांच्या संघर्षासाठीच्या कारणांना संदर्भ हे कशाप्रकारे परिभाषित करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमधील फरकांना आकार देतात हे दर्शविले आहे. स्त्री चळवळीच्या आकलनासाठीचे क्षेत्र खुले करण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनांमध्ये संवादाचे समर्थन करते. +भारतातील स्त्री चळवळ आणि आंदोलनांवरील अत्यंत परिणामकारक कामामध्ये या सदर पुस्तकाचे योगदान आहे. [३] १९९० च्या दशकातील स्त्री चळवळी समजून घेणाऱ्यांसाठी आणि या संदर्भातील समकालीन परिस्थितीमधील विरोध स्थानांकित करणाऱ्यांसाठी सदर पुस्तक महत्त्वाचे आहे. चळवळींचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी ऐतिहासिक संशोधन आणि चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुलाखती एकत्र आणल्यास पद्धतीशास्त्रीयदृष्टया अद्भूत काम होऊ शकते याविषयक सदर पुस्तक प्रभावीपणे मांडणी करते. सदर पुस्तक हे स्त्रियांच्या संघर्षासाठीच्या कारणांना संदर्भ हे कशाप्रकारे परिभाषित करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमधील फरकांना आकार देतात हे दर्शविले आहे.स्त्री चळवळीच्या आकलनासाठीचे क्षेत्र खुले करण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनांमध्ये संवादाचे समर्थन करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3216.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a19c29729aa2b83d47cd90f30753e6d1375717a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3216.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (इंग्रजी: Film and Television Institute of India, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ; लघुरूप: FTII, एफ.टी.आय.आय.) ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे. इ.स. १९६० साली ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था सायलेक्ट [१] ह्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे. +सद्याचे अध्यक्ष बी.पी.सिंग आहेत. +इतिहास +संस्थेची स्थापना १९६० मध्ये झाली आणि १९६१ मध्ये तिचे अभ्यासक्रम सुरू झाले. पूर्वी नवी दिल्ली येथे कार्यरत असलेली दूरचित्रवाणी प्रशिक्षण शाखा १९७४ मध्ये पुण्यात स्थलांतरित झाली. त्यानंतर, संस्थेला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पूर्णपणे मदत मिळाली. जुलै २०११ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले की FTII ला 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून विकसित करण्यासाठी संसदेत एक विधेयक सादर केले जाईल. यामुळे संस्थेला विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि विशेषाधिकारांचा आनंद घेता येईल. +फेब्रुवारी २०१५ मध्ये, गजेंद्र चौहान यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, [२] ज्याने संस्थेतील विद्यार्थ्यांनी निषेध केला. +१८ ऑगस्ट २०१५ रोजी, पोलिसांनी - रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत - FTII संचालक प्रशांत पाठराबे आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात आठ तास कोंडून ठेवलेल्या संप करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थ्यांनी आपला छळ केला आणि मानसिक छळ केला, असा दावा दिग्दर्शकाने केला आहे. विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संचालकाला घेराव घालत आणि आरडाओरडा करतानाचा व्हिडिओ व्यवस्थापनाने जारी केला. प्रत्युत्तरादाखल, विद्यार्थ्यांनी संचालकांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण करताना आणि काचा फोडल्याचा एक अप्रसिद्ध व्हिडिओ जारी केला. पुणे पोलिसांनी मध्यरात्री येऊन विद्यार्थ्यांना अटक करण्याच्या कृत्याचा प्रहार विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. [३] [४] +व्यवस्थापन +FTII १८६० च्या सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे. सोसायटीचे अध्यक्ष अध्यक्ष असतात, जे गव्हर्निंग कौन्सिल, शैक्षणिक परिषद आणि स्थायी वित्त समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. गव्हर्निंग कौन्सिलची स्थापना सोसायटीच्या सदस्यांमधून निवडून केली जाते. गव्हर्निंग कौन्सिल ही FTII ची सर्वोच्च संस्था आहे आणि संस्थेचे सर्व प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ती जबाबदार आहे. परिषद, त्या बदल्यात, शैक्षणिक परिषद आणि स्थायी वित्त समितीची नियुक्ती करते, या दोघांचे सदस्य शैक्षणिक व्यवहार आणि आर्थिक बाबींशी संबंधित धोरणात्मक बाबींमध्ये FTII ला सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात. [५] [६] +एक संचालक संस्थेचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो आणि त्याची धोरणे आणि कार्यक्रम राबवतो. भारतीय माहिती सेवा (IIS) चे १९९२ बॅचचे अधिकारी प्रशांत पाठराबे यांना डीजे नारायण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक म्हणून तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. [७] गजेंद्र चौहान, गव्हर्निंग कौन्सिलचे पदसिद्ध अध्यक्ष, त्यांच्या नियुक्तीच्या विरोधामुळे, अद्याप सामील झालेले नाहीत. [८] ९५ दिवसांहून अधिक काळ विरोध सुरू आहे, परंतु नियुक्तीबद्दलचा गोंधळ अद्यापही कायम आहे. [९] +उल्लेखनीय प्राध्यापक diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3233.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e52587031f74ad25b73146e7f62b7fb6689e6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3233.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१६ (इंग्लिश: Filmfare Awards) जिओने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१६ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी हा सोहळा पार पडला. +[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3258.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b38840b86dd037d0d525121a7757b24f8731c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3258.txt @@ -0,0 +1,7 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे. +प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती.[१] पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोल व आलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे. +१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडिया व जया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे. +तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार सर्वाधिक असा पाच वेळा मिळाला आहे: नूतन (१९५७, १९६०, १९६४, १९६८ व १९७९), काजोल (१९९६, १९९९, २००२, १००७ व २०११) आणि आलिया भट्ट (२०१७, २०१९, २०२०, २०२३ व २०२४). त्यांच्या खालोखाल तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार चार वेळा मिळाला आहे: मीना कुमारी (१९५४, १९५५, १९६३ व १९६६), माधुरी दिक्षीत (१९९१, १९९३, १९९५ व १९९८) आणि विद्या बालन (२०१०, २०१२, २०१३ व २०१८). लागोपाठ अशे दोन वेळा पुरस्कार मिळवण्यास सहा अभिनेत्रींना यश मिळाले आहे: मीना कुमारी (१९५४-५५), जया बच्चन (१९७४-७५), शबाना आझमी (१९८४-८५), राणी मुखर्जी (२००५-०६), विद्या बालन (२०१२-१३) आणि आलिया भट्ट (२०१९-२० व २०२३-२४). २०२४ मध्ये विजेताहोऊन भट्ट अश्या एकमेव अभिनेत्री झाल्या ज्यानी लागोपाठ दोन वेळा पुरस्कार मिळवला आहे. +माधुरी दिक्षीतला सर्वात जास्त वेळा (१४) नामांकन मिळाले आहे पण फक्त चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल मीना कुमारी आणि विद्या बालन यांना १२ नामांकन आहे; हेमा मालिनी, काजोल व राणी मुखर्जी यांना ११ नामांकन; ऐश्वर्या राय, श्रीदेवी व दीपिका पडुकोण यांना १० नामांकन मिळाले आहेत. १९९० च्या दशाकापासून अभिनेत्री तब्बूला सातवेळा नामांकन मिळाले असून एकदाही पुरस्कार मिळाला नाही. १९८४ मध्ये शबाना आझमी यांना एकाच वर्षी असे सर्वाधिक ४ नामांकन मिळाले असून अर्थ चित्रपटातील कामगिरीसाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. तसेच १९६३ मध्ये मीना कुमारी यांना तीन पैकी तीन नामांकन प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये काजोलला देखील तीन नामांकन मिळाले व कुछ कुछ होता है साठी पुरस्कार मिळाला होता. १९८९ ते १९९६ या सात वर्षात सलग अशे १० नामांकन मिळवण्याचा विक्रम माधुरी दिक्षीत यांनी केला आहे. +या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २००२ मध्ये त्या दोघी त्यांच्या झुबेदा आणि अशोका चित्रपाटातीला कामांसाठी नामांकीत होत्या. श्रीदेवी आणि जान्हवी कपूर ही एक माय-लेकीची जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. +शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी परिणीता वर आधारीत असलेल्या "ललिता" ह्या पात्राच्या अभिनयासाठी मीना कुमार यांना १९५५ चा हा पुरस्कार मिळाला व पुन्हा २००६ मध्ये विद्या बालन यांना नामांकन मिळाले आहे. १९७३ मध्ये पाकीजा चित्रापाटातील भुमीकेसाठी मीना कुमारींना मरणोत्तर नामांकन मिळाले होत. पण मरणोत्तर न देण्याच्या फिल्मफेअरच्या नियमामुळे त्यांना पुरस्कार न देण्याचा निर्णय झाला.[४] या श्रेणीतील पुरस्कार कधीही कोणी नाकारला नाही. तथापि, २०२३ मध्ये, त्यांच्या थलायवी चित्रपटासाठी कंगना राणावतने पक्षपाती मतदानाचा फिल्मफेअर पुरस्कारांवर आरोप केला आणि त्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3260.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..039a836c032203924a831b8a2976edf376772bc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3260.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर गुलजार ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ११ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे. +"काल का पहिया" diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3264.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b891aa1857b800e9d304c37096983f6adba979ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3264.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर बिमल रॉयने हा पुरस्कार सर्वधिक वेळा (७) जिंकला असून यश चोप्राला सर्वाधिक वेळा (१२) नामांकन मिळाले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3295.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e166bd2c42c53491bae9bf2f92c44f99fcfa0834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3295.txt @@ -0,0 +1,10 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो जे विजेता ठरवतात. +१९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे. १९९२ मध्ये डिंपल कापडियाला तिच्या गोविंद निहलानी दिग्दर्शित दृष्टी चित्रपटातील कामगिरीसाठी पहिला पुरस्कार मिळाला. सर्वात अलीकडील पुरस्कार २०२४ मध्ये राणी मुखर्जी आणि शेफाली शाह यांना त्यांच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि थ्री ऑफ अस या चित्रपटांसाठी संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. तब्बूच्या नावावर या श्रेणीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे कारण तिने पाच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. +१९९१ मध्ये फिल्मफेर पुरस्कारांनी सर्वोत्तम अभिनयासाठी समीक्षकांचा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्या वेळी ह्याला "गैर-व्यावसायिक चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी" असे ह्याचे नाव होते. पहिला पुरस्कार हा १९९१ मध्ये अनुपम खेरला दिला गेला व १९९२ मध्ये डिंपल कापडिया पहिली विजेता अभिनेत्री ठरली. १९९३ पासून ह्याचे नाव "उत्कृष्ट कामगिरीसाठी समीक्षक पुरस्कार" असे झाले. पुढे १९९८ पासून अभिनेते व अभिनेत्री असे वेगळे गट झाले. १९९१ ते १९९७ पर्यंत या सात वर्षात फक्त २ वेळा हा पुरस्कार अभिनेत्याला दिला गेला.[१] २०१८ पासून या श्रेणीतील नामांकन देखील जाहिर करण्यास सुरुवात झाली. +तब्बूने या श्रेणीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम ५ वेळा केला आहे (१९९८, २०००, २००१, २००८ आणि २०२३) मध्ये. त्यानंतर मनीषा कोईराला (१९९६, १९९७ आणि २००३) आणि राणी मुखर्जी (२००३, २००६ आणि २०२४)) यांचा क्रमांक लागतो ज्यांनी प्रत्येकी ३ वेळा पुरस्कार जिंकला आहे. सलग वर्षात ३ अभिनेत्रींनी पुरस्कार पटकावला आहे; कालक्रमानुसार, डिंपल कपाडिया (१९९२-९३), मनीषा कोईराला (१९९६-९७) आणि तब्बू (२०००-०१). +नीना गुप्ता या वयाच्या ५९ व्या वर्षी २०१९ मध्ये बधाई हो चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात ज्येष्ठ आहेत आणि झायरा वसीम ही वयाच्या १७ व्या वर्षी २०१८ मध्ये सिक्रेट सुपरस्टार चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण प्राप्तकर्ता आहे.[२] +असे एकदाच झाले आहे की २००६ मध्ये राणी मुखर्जीला तिच्या ब्लॅक चित्रपटातील कामासाठी दोन्ही सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक व सर्वोत्तम अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले होते. +१९९७ मध्ये जव्हा मनीषा कोईरालाला चित्रपट खामोशी: द म्युझिकल साठी पुरस्कार मिळाला, तेव्हा तिला फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे देखील नामांकन मिळाले होते. असे परत अनेक वेळा झाले; १९९८ मध्ये तब्बू (विरासत), २००० मध्ये तब्बू (हु तू तू), २००३ मध्ये राणी मुखर्जी (साथिया), २००४ मध्ये उर्मिला मातोंडकर (भूत), २००७ मध्ये करीना कपूर (ओंकारा), २०११ मध्ये विद्या बालन (इश्किया), २०१२ मध्ये प्रियांका चोप्रा (७ खून माफ), २०१५ मध्ये आलिया भट्ट (हायवे), २०१६ मध्ये कंगना राणावत (तनु वेड्स मनू रिटर्न्स), २०१७ मध्ये सोनम कपूर (नीरजा), २०१८ मध्ये झायरा वसीम (सिक्रेट सुपरस्टार), २०१९ मध्ये नीना गुप्ता (बधाई हो), २०२२ मध्ये विद्या बालन (शेरनी), २०२३ मध्ये दोघी भूमी पेडणेकर (बधाई दो) व तब्बू (भूल भुलैया २), आणि २०२४ मध्ये राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे). +अनेक वेळा असे झाले आहे की अभिनेत्रीला तिच्या कामासाठी सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्काराचे विजेते न होता फक्त नामांकन मिळाले आहे पण सर्वोत्तम अभिनेत्रीच्या श्रेणीत विजय मिळाला आहे जसे की; २०१८ मध्ये विद्या बालन (तुम्हारी सुलू), २०१९ मध्ये आलिया भट्ट (राझी)। आणि २०२१ मध्ये तापसी पन्नू (थप्पड). +२०१८ पासून असे अनेक वेळा झाले की अभिनेत्रील दोन्ही सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक व सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन मिळाले पण दोन्ही पुरस्कार मिळू शकले नाही जसे की; २०१८ मध्ये श्रीदेवी (मॉम), २०१९ मध्ये तब्बू (अंधाधुन), आणि २०२१ मध्ये विद्या बालन (शकुंतला देवी). +१९९९ मध्ये जव्हा शेफाली शहाला चित्रपट सत्या साठी पुरस्कार मिळाला, तेव्हा तिला फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचे देखील नामांकन मिळाले होते. असे परत २००९ मध्ये झाले शहाना गोस्वामी (रॉक ऑन!!). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3301.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fce9c1861833a6b2266aa195594603672b767d2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3301.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली ह पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3314.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ed9ff9704682d772739951b2346ed22790d4d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3314.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिशहोक तथा फिशहूक (आफ्रिकान्स: Vishoek) हे दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे एक उपनगर आहे. हे उपनगर केप टाउनच्या पूर्व भागात समुद्रकिनाऱ्यावर असून येथे व्यावसायिक तसेच अव्यावसायिक मासेमारीचे उद्योग आहेत. येथे प्राचीन मानवी वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत. +१८८३मध्ये एडमंड रॉबर्ट्सने तत्कालीन गावाचे वर्णन देवमासे मारण्याच्या उद्योग असलेले गरीब वस्तीचे गाव असे केले होते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3315.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e56ea0016f897bb6a3ecd58bb423bd5f3b936aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3315.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिशर काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फिशर काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3318.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a23b31c087b4b603b5d5796d21ebcd39720d6bb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3318.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिश्त ऑलिंपिक मैदान रशियाच्या सोत्शी शहरातील मैदान आहे. सोत्शी ऑलिंपिक पार्कमध्ये असलेले हे मैदान २०१४ हिवाळी ऑलिंपिकसाठी बांधले गेले. या स्पर्धेचे उद्घाटन आणि समाप्ती सोहळे येथे पार पडले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४०,००० आहे. +सुरुवातीस या मैदानाला छत होते. २०१६मध्ये हे छत काढून येथे फुटबॉल मैदान करण्यात आले. २०१७ फिफा कॉन्फेडरेशन चषक आणि २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामने येथे खेळले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3324.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebee42f01c301811107661750a485f05d12eb7bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3324.txt @@ -0,0 +1,56 @@ +गुणक: 33°26′54″N 112°04′26″W / 33.44833°N 112.07389°W / 33.44833; -112.07389 + +फीनिक्स हे अमेरिका देशातील अ‍ॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १५ लाख शहर लोकसंख्या व ४० लाख महनगर लोकसंख्या असलेले फीनिक्स शहर ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात सोनोराच्या वाळवंटामध्ये वसलेल्या फीनिक्स शहराचे हवामान अत्यंत रुक्ष व उष्ण आहे. +खालील चार व्यावसायिक संघ फीनिक्स महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फीनिक्स हे १२ पैकी एक शहर आहे. +फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे. अमेरिकेमधील इंटरस्टेट १० हा प्रमुख इंटरस्टेट महामार्ग फीनिक्स शहरामधून जातो. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3328.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33247a276c2e27b8e82bb1d8c3c93e4fccc0e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3328.txt @@ -0,0 +1 @@ +फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Phoenix Sky Harbor International Airport) (आहसंवि: PHX, आप्रविको: KPHX, एफ.ए.ए. स्थळसूचक: PHX) अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ॲरिझोना राज्यामधील सर्वात मोठा असलेला हा विमानतळ प्रवाशांच्य संख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील १०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3336.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..392412dcfa74a7cdcb3d0680aafecb02a366420b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3336.txt @@ -0,0 +1,9 @@ + + युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (इंग्लिश: United States Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या देशाच्या ऑस्टिन शहरामधील सर्किट ऑफ द अमेरीकाज ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3339.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02eeb5cfb8b27056d11b724641baef1291f284cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3339.txt @@ -0,0 +1,2 @@ +फीबी ई.एस. लिचफिल्ड (१८ एप्रिल, २००३:ऑरेंज, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी डावखुरी फलंदाज आणि अधूनमधून उजव्या हाताची लेग ब्रेक गोलंदाज म्हणून खेळते.[१] ती महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग (डब्ल्यूएनसीएल) मध्ये न्यू साउथ वेल्स ब्रेकर्स आणि महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये सिडनी थंडरसाठी खेळते.[२] तिने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी वयाच्या १६ व्या वर्षी डब्ल्यूबीबीएल क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २२ चेंडूत २६ धावा केल्या.[३] थंडरच्या दुसऱ्या सामन्यात, ती डब्ल्यूबीबीएल मध्ये अर्धशतक करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली.[४] लिचफिल्डचे संगोपन ऑरेंज, न्यू साउथ वेल्स येथे झाले आणि किन्रॉस वोलारोई शाळेत शिक्षण घेतले.[५][६] +जानेवारी २०२२ मध्ये, लिचफिल्डची इंग्लंड अ विरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या अ संघात नाव देण्यात आले होते, हे सामने महिलांच्या ऍशेस सोबत खेळले जात होते.[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3345.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e7f165de2b6ff695cccef41b6301a33d4ca1fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3345.txt @@ -0,0 +1,3 @@ +फील्ड मार्शल हा भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पण मानद किताब आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे आधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर जनरल करिआप्पा व सॅम माणेकशॉ यांनाच आजवर फील्ड मार्शल हा किताब बहाल करण्यात आला आहे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3351.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04dbe3c97e179e63a3a9fb362cd8981c97a6c776 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3351.txt @@ -0,0 +1,13 @@ +फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) हे भारताचे लष्करप्रमुख होते. +माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते. +माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय सैनिकी अकादमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. +माणेकशॉनी ब्रिटिश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते. +माणेक्षा यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसऱ्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटिश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी.च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले. +७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल पी.पी. कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. +या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात. +१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लिम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला. +एकदा पाकचे लष्करप्रमुख जनरल टिकाखान यांच्याशी चर्चा करण्यास माणेकशॉ लाहोरला गेले होते. लाहोरच्या गव्हर्नरने माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माणेकशॉ यांची भेट घेतली. माणेकशॉ प्रत्येकाशी बोलत-हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. माणेकशांनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला- +“ सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी पाचही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मला पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे, आमचे सैनिक बराकीत राहत असताना तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे, हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत जर कोणी मला सांगितलं तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही” [१] +माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले. +माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3355.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8064bf0eb10472c763043c11c8328dc077fd8210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3355.txt @@ -0,0 +1,2 @@ + फुंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3360.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a5dcb95ea42c47483d7538cf63cea74ea464a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3360.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे१९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती. +हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3364.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28aa5bb354264b908c22254950faee1e14138b27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3364.txt @@ -0,0 +1 @@ +फुकी-जी (जपानी: 富貴 寺) हे जपानच्या ओइटा प्रांताच्या बुंगोटकडा मधील एक तेंदई मंदिर आहे. या मंदिराची स्थापना स.न. ७१८ मध्ये झाली. आमिडा-डो ज्याला सामान्यत: फुकी-जी ओ-डो असेही म्हटले जाते. ही कुयूषा बेटावरील सर्वात जुनी लाकडी रचना आहे. या रचनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. ओ-डो मध्ये असलेली अमिदा-न्यराई यांची बसलेली प्रतिमा राष्ट्रीय सरकारने महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मालमत्ता म्हणून घोषित केली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3370.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9f1666aa2dafd2368f872dad89befee1e6daaa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3370.txt @@ -0,0 +1,5 @@ +फुकुओका पेपे डोम (福岡ペイペイドーム?) हे एक बेसबॉलचे मैदान आहे. जपानच्या चौकु, फुकुओका येथे स्थित आहे. १९९३ मध्ये बांधलेल्या या स्टेडियमचे मूळ नाव फुकुओका डोम (福岡ドーム?) होते. याची प्रेक्षक क्षमता ३८,५८५ आसनांची आहे.[१][२] याच्या मैदानाचा व्यास २१६ मीटर आहे. फुकुओका पेपे डोम हा जगातील सर्वात मोठा भौगोलिक घुमट आहे.[३] मागे-पुढे होणारे छत असणारे जपानचे हे पहिले स्टेडियम आहे. २००५ मध्ये, याहू! जपान, सॉफ्टबँकच्या सहाय्यक कंपन्यांपैकी एक, या कंपनीने स्टेडियमचे नामकरणाचे हक्क संपादन केले आणि त्याचे नाव फुकुओका याहू जपान डोम (福岡Yahoo! JAPANドーム?) आणि याचे छोटे नावे याहू डोम (ヤフードーム?) असे ठेवले.[४] जानेवारी २०१३ मध्ये त्याचे नाव फुकुओका याफुओकु डोम (福岡 ヤフオク! ドーム?) असे ठेवण्यात आले.[५] जपान मध्ये याफुओकू म्हणजे याहू! लिलाव . ३० ऑक्टोबर २०१९ रोजी घोषित करण्यात आले होते की २९ फेब्रुवारी २०२० पासून स्टेडियमचे नाव फुकुओका पेपे डोम असे होईल.[६][७] हे नाव पेपे नावाच्या कंपनीला समर्पित आहे, या कंपनीत सॉफ्टबँकचे ५०% आणि याहू जपानचे २५% समभाग आहेत. +फुकुओका डोम हे फुकुओका सॉफ्टबँक हॉक्स या टीमचे होम स्टेडियम आहे. हिल्टन फुकुओका सी हॉक हॉटेल समवेत हॉक्स टाऊन मनोरंजन संकुलाचा एक भाग आहे.[४] तो मोमोची बीच जवळ आहे. तोजिनमाची सबवे स्टेशनपासून सुमारे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. +२००६ मध्ये, स्टेडियमचा मुख्य स्कोअरबोर्ड "हॉक्स व्हिजन"च्या मोनो-कलर मध्ये अपग्रेड झाला. त्याच्या पूर्वी असलेल्या स्कोअरबोर्डचे देखील "हॉक्स व्हिजन" असेच टोपणनाव होते. नवीन स्कोअरबोर्डचा आकार १० मी (३२.७६ फूट) उंच आणि ५३ मी (१७३.८६ फूट) रुंद आहे. तो त्यावेळचा सर्वात मोठ्या हाय-डेफिनिशन इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्डपैकी एक होता. तो दोन १२३-इंच रुंद-स्क्रीनच्या बरोबरीचा होता. २०१० मध्ये, दोन ५.७ मी (१२०.६५ फूट) × ३३ मी (१०८.२७ फूट) फलकांची भर पडली. याचे एकूण क्षेत्र ९०५.२ वर्गमटर किंवा ९,७४३.४९ वर्गफूट ईतके झाले. या स्टेडियमने सर्व बेसबॉल स्टॅडियात एचडी डिस्प्लेचे सर्वात मोठा स्कोअरबोर्ड आहे.[१] +फुकुओका डोमने प्रत्येक मेजर लीग बेसबॉल जपान ऑल-स्टार मालिकेमधील एक गेम आयोजित केला आहे. यात २००६ च्या मालिकेचा अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे. जपानच्या इव्हेंटच्या इतिहासात पहिल्यांदा जपान अंतिम सामन्यात हरला होता.[८] +एक्स्ट्रीम इंजिनीअरिंग या टीव्ही मालिकेत डॅनी फोर्स्टर फुकुओका डोमचा संदर्भ देताना असे म्हणतात की त्यास "फ्लोटिंग" फील्ड आहेत. जपानमधील इनडोअर बेसबॉल स्टेडियम ज्यामध्ये खरोखरच तरंगते मैदान आहे ते म्हणजे सप्पोरो डोम). तथापि, या स्टेडियममध्ये असे मैदान नाही. २००९ मध्ये, जुने अ‍ॅस्ट्रोटर्फ फील्ड बदलून सामान्य फील्डटर्फ ब्रँड टाकण्यात आला. हा नवीन टर्फमुळे खेळाडूंना कमी जखमा होतात. जपानमधील इतर संघांपेक्षा हॉक्सच्या खेळाडूंना जास्त दुखापत झाल्याची आढळून आली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3375.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0abc249992fdaf86b1109f66d0d62072c549f53c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3375.txt @@ -0,0 +1 @@ +फुकुरोई (जपानी: 袋井市) हे जपानच्या शिझुओका प्रांतातील शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_339.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b617425e26ae9f76d765e6029d5672ffc9a0316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_339.txt @@ -0,0 +1 @@ +नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध (किंवा पोमेरानियन युद्ध) हे फ्रांस व स्वीडन यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. ऑक्टोबर ३१, इ.स. १८०५ ते जानेवारी ६, इ.स. १८१० दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात फ्रांसचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3398.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69d653c15dbf0244e3f55a50d88d6b61ec0464b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3398.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुगळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_341.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff30020cae64be96c4efeceae9356887fea467c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_341.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्नैयस पोम्पेयस मॅग्नस' (२९ सप्टेंबर, 106 इ.स.पू - २८ सप्टेंबर ४८ बीसी), इंग्रजीमध्ये पोम्पी ( /ˈpɒmpiː/, POM -pee ) किंवा पॉम्पी द ग्रेट म्हणून ओळखला जातो, हा रोमन प्रजासत्ताकचा सेनापती आणि राजकारणी होता। रोमच्या प्रजासत्ताक ते साम्राज्यात परिवर्तन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस, तो रोमन सेनापती आणि हुकूमशहा सुल्लाचा पक्षपाती आणि आश्रित होता; नंतर, तो ज्युलियस सीझरचा राजकीय मित्र आणि शेवटी शत्रू बनला । diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3457.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a16e15ef7a4dba5e406acc94a8b78d4c1b7e457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3457.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुलंब्री विधानसभा मतदारसंघ - १०६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, फुलंब्री मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील १. फुलंब्री तालुका आणि २. औरंगाबाद तालुक्यातील चौका, लाडसावंगी, करमाड ही महसूल मंडळे आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.९ ते १३ यांचा समावेश होतो. फुलंब्री हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ किसनराव बागडे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3459.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4e394359f9c6721b019386d0af46a82704e58fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3459.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3476.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6337086afb7d7558ffabfbed9014aa0f936458e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3476.txt @@ -0,0 +1,11 @@ +फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे. कीटकांना डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.[१] फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाची, आकाराची ही असतात. +फुलपाखरांचे आयुष्य हे १४ दिवसांच असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य १४ दिवस असू शकते.[१] +फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू या अवस्था असतात. +अंडे/अंडी - +विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो. फुलपाखराचे रंग वेगवेगळे असतात. +अळी किंवा सुरवंट-अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा, कोवळ्याड्याचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात. काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लार्व्हा खातात.ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात. +कोष - +अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते. कोष करताना ती तिची त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करते. काही कोष झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. +फुलपाखरू कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते. +बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. +मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3490.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7951596b8cd5d845b16c0f002afa32754f7a5d03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3490.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फुलराणी: अविस्मरणीय प्रेम कहाणी हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे जो विश्वास जोशी यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे आणि फिनक्राफ्ट मीडिया, अमृता फिल्म्स आणि थर्ड एस एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे.[१] वायाकॉम१८ स्टुडिओ द्वारे वितरित या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] हा चित्रपट १९६४ च्या अमेरिकन म्युझिकल कॉमेडी ड्रामा माय फेअर लेडीचा रिमेक आहे, जो स्वतः १९१३ च्या पिग्मॅलियन नाटकाचे रूपांतर आहे.[३] हे २२ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3494.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f398981c7f3b73a0be0910ad1f246d2d02f0fb5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3494.txt @@ -0,0 +1,2 @@ + फुलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3496.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d61d828927f79b56fa84960c1e73770d34906e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3496.txt @@ -0,0 +1,2 @@ + फुलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3510.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06510a18e557927592512970078669d1bfccd29b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3510.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुलारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3522.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61d8215ea3e2701a484f5e7cebbb5e28edbdeb3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3522.txt @@ -0,0 +1 @@ +हे सुद्धा पहा :- साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3540.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5415baf4b27c85e53bcb3acd0f558da031233725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3540.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुसबॉल-बुंडेसलीगा (जर्मन: Fußball-Bundesliga) ही जर्मनी देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची २. फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते. +इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून बायर्न म्युनिक ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग व ला लीगा खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3567.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8f998e5adebb8dabc77b6a83684f58e68e2295d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3567.txt @@ -0,0 +1,2 @@ +फूलबसन बाई यादव (जन्म : धनगांव, राजनांदगाव, छत्तीसगड-भारत, ५ डिसेंबर, १९६९; - ) या एक भारतीय समाजसेविका आहेत. यादव यांचे लग्न दहाव्या वर्षीच लावून देण्यात आले व त्यांनी सातव्या इयत्तेनंतर शाळा सोडली होती. +या मां बमलेश्वरी जनहित करे समिती या संस्थेच्या संस्थापिका असून त्याद्वारे त्या छत्तीसगढमधील गरीब व दलित महिलांची मदत करतात. या संस्थेचे अंदाजे २,००,००० सदस्य असून दरमहिना दोन रुपये वर्गणी घेऊन त्यांनी १५ कोटी रुपये उभे केले आहेत. ही संस्था हे पैसे लसीकरण, बालसंगोपन केंद्र आणि इतर अनेक समाजसेवी उपयोगांसाठी वापरते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3585.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..675eb2ab4993baa3c3d4f2a486c8fbca70bf88f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3585.txt @@ -0,0 +1,7 @@ +फॅब लॅब (फॅब्रिकेशन प्रयोगशाळा) ही एक लहान प्रमाणात वर्कशॉप ऑफर (वैयक्तिक) डिजिटल फॅब्रिकेशन आहे.[१][२] फॅब लॅब सामान्यत: लवचिक संगणक-नियंत्रित साधनांच्या अ‍ॅरेसह सुसज्ज असते. ज्यामध्ये "जवळजवळ काहीही" बनविण्याच्या उद्देशाने अनेक वेगवेगळ्या लांबीचे माप आणि विविध सामग्रीचा समावेश असतो.[३] +यात तंत्रज्ञान-सक्षम उत्पादनांचा समावेश आहे. ज्यांना सामान्यपणे मोठ्या प्रमाणात उत्पादनात मर्यादित समजले जाते.फॅब लॅब ने  मोठ्या प्रमाणात उत्पादन स्पर्धा सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात वितरित उत्पादनांना फॅब्रिक बनवण्याच्या प्रमाणात संबंधित अर्थव्यवस्थेचा संबंध येतो. त्यांनी स्वतःसाठी अद्ययावत उपकरणे तयार करण्यासाठी व्यक्तींना सक्षम बनवण्याची क्षमता यापूर्वीच दर्शविली आहे. +फॅब लॅब चळवळ DIY(Do It Yourself) चळवळीशी जवळून जुळली आहे. मुक्त-स्रोत हार्डवेर, निर्मिती संस्कृती आणि विनामूल्य आणि मुक्त-स्रोत चळवळी आणि तत्त्वज्ञान तसेच तंत्रज्ञान त्यांच्यासह सामायिक करते. +माहितीची सामग्री तिच्या भौतिक प्रतिनिधित्वाशी कशी संबंधित आहे हे विस्तृतपणे विस्तार करण्यासाठी फॅब लॅब प्रोग्राम सुरू केला होता. तळागाळातील स्तरावरील तंत्रज्ञानाद्वारे एक कमकुवत सेवा देणारा समुदाय कसा चालविला जाऊ शकतो.[४] मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मीडिया लॅबमध्ये ग्रासरूट्स इन्व्हेन्शन ग्रुप आणि सेंटर फॉर बिट्स अँड अ‍ॅक्टस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २००१ मध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशन (वॉशिंग्टन, डी.सी.)च्या अनुदानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.[५] +एमआयटीच्या बाहेर उभारण्यात आलेली पहिली फॅब लॅब भारतातील विज्ञान आश्रम ही होती.परंतु त्याची स्थापना आत्ता अनेक ठिकाणी आहेत. याची स्थापना २००२ मध्ये झाली आणि एनएसएफ-यूएसए आणि आयआयटीके यांनी भांडवली उपकरणे घेतली.ग्रासरूट्स इनव्हेन्शन ग्रुप यापुढे मीडिया लॅबमध्ये नसले तरी, सेटर फॉर बिट्स अँड अ‍ॅटम्स कन्सोर्टियम अद्याप वर्णनाशी संबंधित भागात संशोधन चालू ठेवण्यात सक्रियपणे सहभागी आहे. आणि बनावट परंतु जगभरातील कोणत्याही लॅबचे संचालन किंवा देखरेख करत नाही (एक्समोबाईल फॅब लॅबसह)."हाऊ टू मेक (जवळजवळ) काहीही" या नावाच्या एमआयटी (एमएएस .863) मधील लोकप्रिय वर्गातून फॅब लॅब संकल्पना देखील वाढली.क्लास अजूनही फ्री सेमेस्टर मध्ये दिले जाते. +फॅब लॅबमधील लवचिक उत्पादन साधनांमध्ये हे समाविष्ट असू शकते: +फॅब ॲकॅडमी हॅन्ड-ऑन, डिजिटल बनावट कौशल्ये शिकविण्यासाठी फॅब लॅब नेटवर्कचा लाभ घेते.शैक्षणिक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी विद्यार्थी १९ आठवड्यांच्या कोर्ससाठी फॅब लॅब "सुपरनोड्स" वर बोलतात. काही प्रकरणांमध्ये, डिप्लोमा अधिकृत केला जातो किंवा शैक्षणिक क्रेडिट ऑफर करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3593.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f96db32315a7d0d7da7c9d89b8944ff06c8ab62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3593.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फॅमिली - टाईझ ऑफ ब्लड हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चनने अभिनय केला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3605.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff926dad9c2e6fd61b2d6cea2acc421d046b0c76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3605.txt @@ -0,0 +1,2 @@ +फॅयेट काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_361.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a22161ef8c70472e8e19e57694f5d7fbd184fb61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_361.txt @@ -0,0 +1,69 @@ +पोरसकडे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील १७८.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +पोरसकडे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील १७८.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १६७ कुटुंबे व एकूण ६७५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पेडणे ५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३६० पुरुष आणि ३१५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १५२ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ६२६६४० [१] आहे. +सर्वात जवळील पूर्व-प्राथमिक शाळा पेडणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ३ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा पेडणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळापेडणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पेडणे ग्रामीण येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक पणजी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा तुये येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पेडणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश नाही. +गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४०३५१२ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध आहे. +गावात व्हॅन उपलब्ध आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही. +सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील वाहतुकीयोग्य जलमार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही. +गावात घरगुती व व्यापारी वापरासाठी प्रतिदिनी २४ तास आणि शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा होतो. +पोरसकडे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +पोरसकडे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात,देशी दारू,मिरची,काजू diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3615.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5080c4ba811bb84d443012977830839f484966b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3615.txt @@ -0,0 +1 @@ +फॅरिस आल्मास ली रॉस्मानिझाम (डिसेंबर ३, इ.स. १९८९:कुआलालंपुर - ) हा  मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3629.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da324a9ce3da3f2458013416a6e092864a01b76b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3629.txt @@ -0,0 +1,20 @@ +फॅसिझम हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य-युरोपात ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी अधिकारशाही राष्ट्रवादाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणाऱ्यांना "फॅसिस्ट" म्हटले जाते. राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीमध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा उजव्या विचारसरणीच्या भूमिकेचा आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य उदारमतवाद, मार्क्सवाद आणि पारंपरिक पुराणमतवाद ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपरिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते, पण काही समीक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे. +राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका सर्वंकषसत्तावादी राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. जो पक्ष फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनःस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल अशा पक्षाची निर्मिती हे फॅसिस्टांचे ध्येय होते. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करसत्तावादावर विशेष जोर, वगैरे.. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि साम्राज्यवाद ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे. +फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. इटली येथील बेनितो मुसोलिनी आणि जर्मनी येथील अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तिमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुश सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धान्त, संकल्पना आणि संज्ञा हे समाजसत्तावादाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी वर्गसंघर्षाचा मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि वंशवाद ह्यांना स्वतःचा आधार बनवले. स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधणे ह्या मुख्य उद्देशाने फॅसिस्ट लोक मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करतात. +दुसऱ्या महायुद्धानंतर काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. असे असले तरी, "फॅसिस्ट" ही संज्ञा राजकीय विरोधकांद्वारे बहुधा तिरस्कारवाचक म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ह्या संज्ञा वापरल्या जातात. +लॅटिन भाषेतील "fasces" (फॅसेस) ह्या शब्दापासून इटालियन भाषेत "fascismo" (फॅसिझ्मो) ही संज्ञा वापरात आली. फॅसेस म्हणजे एका कुऱ्हाडीभोवती बांधलेला काड्यांचा गुच्छ., हे प्राचीन रोमन नागरी दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराचे चिन्ह होते. त्याचे लिक्टर्स स्वतःबरोबर फॅसेस बाळगत व दंडाधिकाऱ्याच्या आदेशावरून लोकांना शारीरिक शिक्षा आणि मृत्युदंड देऊ शकत. फॅसिझमो ह्या संज्ञेचा संबंध इटलीमधील "fasci" (फॅसी) नामक राजकीय संघटनांसोबत सुद्धा आहे. फॅसी हे गिल्ड्स किंवा सिंडिकेट्स सारखे गट होते. +फॅसेस हे चिन्ह एकतेच्या बळाचे प्रतीक होते : एकटी काडी सहज मोडेल, पण त्यांचा गुच्छ मोडायला कठीण असतो. विविध फॅसिस्ट चळवळींनी अनेक तत्सम चिन्हे विकसित केली होती. उदाहरणार्थ, "falange" (फॅलांज) ह्या चिन्हात एका जोखडाला एकत्र जोडलेले पाच बाण असत. +"Fascismo" (फॅसिझ्मो)चे इटालियन मधून इंग्रजीत भाषांतर करताना "Fascism" (फॅसिझम) झाले. इंग्रजीतून "फॅसिझम" ही संज्ञा मराठी साहित्यात जशीच्या तशी वापरण्यात आली. पण मराठीत "फॅसिस्टवाद" असाही समानार्थी शब्दप्रयोग केला जातो. हिंदी भाषेत ह्याला "फ़ासीवाद" ही संज्ञा वापरली जाते. +इतिहासकार, राज्यशास्त्र तज्ज्ञ व इतर विद्वानांमध्ये फॅसिझमच्या तंतोतंत स्वरूपावर मतभेद आहेत. फॅसिझमचे प्रत्येक रूप वेगळे आहे, ज्यामुळे त्याच्या केल्या गेलेल्या अनेक व्याख्या एकतर फारच ढोबळ किंवा फारच संकुचित जाणवतात. +फॅसिझमची एक सामान्य व्याख्या पुढील तीन संकल्पनांवर केंद्रित आहे : +अनेक विद्वानांनुसार, फॅसिझमने (विशेषतः सत्तेत आल्यानंतर) ऐतिहासिकपणे साम्यवाद, पुराणमतवाद आणि सांसदीय उदारमतवादावर हल्ला चढवून प्रामुख्याने कट्टर उजव्या विचारसरणीच्या ताकदींकडून समर्थन मिळवले आहे. +राष्ट्रवाद हा फॅसिझमचा मुख्य पाया आहे. फॅसिस्ट दृष्टिकोनानुसार राष्ट्राची संकल्पना म्हणजे जनतेला त्यांच्या समान पूर्वजांच्या नावाखाली संघटित करणारा, जनतेच्या एकजुटीसाठी नैसर्गिक आधार वाटणारा एकमेव घटक. मिलेनारियन राष्ट्रीय पुनर्जन्म साध्य करून, राष्ट्र किंवा वंशाचे इतर सर्व बाबींपेक्षा उदात्तीकरण करून आणि एकता, शक्ती आणि शुद्धतेच्या निष्ठेचा प्रसार घडवून फॅसिझम आर्थिक, राजकीय आणि सामाजिक समस्यांना सोडवू पाहतो. युरोपियन फॅसिस्ट चळवळी विशेषतः अशी वंशवादी संकल्पना अंगीकारतात की गैरयुरोपियन लोक हे युरोपियनांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. असे असले तरी, युरोपियन फॅसिस्टांचा वंशवादी दृष्टिकोन सरसकट एकसारखा नाही. ऐतिहासिकरीत्या, जरी काही फॅसिस्ट चळवळींनी साम्राज्यविस्तारामध्ये विशेष रुची बाळगली नसली, तरीसुद्धा बऱ्याच फॅसिस्टांनी साम्राज्यवादाचा प्रसार केला आहे. +फॅसिझम सर्वंकषसत्तावादी राज्याच्या स्थापनेचे समर्थन करतो. डॉक्ट्रीन ऑफ फॅसिझम ह्या दस्तावेजात सांगितल्याप्रमाणे "फॅसिस्टांची राज्याबद्दलची संकल्पना सर्वसमावेशक असते; त्याबाहेर कोणत्याही मानवी किंवा आध्यात्मिक मूल्याचे अस्तित्व असू शकत नाही, (त्याला मूल्य असणे तर दूरच). अशाप्रकारे, फॅसिझम हा सर्वंकषसत्तावादी आहे, आणि फॅसिस्ट राज्य - एक कृत्रिम रचना आणि सर्व मूल्यांना सामावून घेणारी एक संस्था - जनतेच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ लावते, त्याचा विकास घडवते आणि त्याला समर्थ बनवते." द लीगल बेसिस ऑफ द टोटल स्टेट ह्या दस्तावेजात नाझी राजकीय तत्त्वज्ञ कार्ल श्मिट ह्याने "जर्मन लोकांना एकमेकांपासून तोडणाऱ्या प्रलयंकारी विविधतेला" टाळण्यासाठी "सर्व प्रकारच्या वैविध्यापलीकडे जाऊन राजकीय एकतेच्या संपूर्णतेची हमी देणाऱ्या एका बळकट राज्याची" निर्मिती करण्याच्या नाझी मनसुब्याचे वर्णन केले आहे. +फॅसिस्ट राज्ये समाजावर त्यांची तत्त्वे बिंबवण्यासाठी शिक्षणातून आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रचारतंत्र चालवत असत व ह्यासाठी ते शैक्षणिक साहित्य आणि प्रसारमाध्यमांचे नियंत्रण करत. फॅसिस्ट चळवळीचे उदात्तीकरण करण्यासाठी व राष्ट्रासाठी त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम विशिष् टप्रकारे निर्माण केला जात असे. फॅसिस्ट चळवळीच्या विचारांशी अनुरूप नसलेल्या इतर सर्व विचारांचे दमन करणे व विद्यार्थ्यांना राज्याप्रती आज्ञाधारक बनण्यास शिकवणे असा त्याचा उद्देश होता. +फॅसिझम उदारमतवादी लोकशाहीचा विरोध करतो. तो बहुपक्षीय व्यवस्थेला नकारून एकपक्षीय राज्याचे समर्थन करतो. तरीसुद्धा, त्याने लोकशाहीच्या एका रूपाचे समर्थक असल्याचा दावा केला होता. +दुसऱ्या महायुद्धात ध्रुवीकरण झालेल्या शक्तींच्या पराभवानंतर शिल्लक राहिलेल्या पॉप्युलर संस्कृतीत फॅसिझमवर भरपूर टीका केली जाते आणि अशा प्रवृत्तींचा सातत्याने निषेध केला जातो. +फॅसिझमवर होणारी सर्वसामान्य आणि सर्वांत मोठी टीका ही आहे की फ~सिझम ही प्रत्यक्षतः जुलूमशाही आहे. +फॅसिझमला सामान्यपणे हेतुपुरस्सर आणि संपूर्ण गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून लेखले जाते. ॲंथनी आर्ब्लास्टर नामक एका लोकशाही विद्वानाने फॅसिस्टांच्या ’ते लोकशाहीच्या एका स्वरूपाचे समर्थक आहेत’ अशा एका दाव्याची नोंद केली आहे. पण आर्ब्लास्टर ह्यांनी मात्र त्या दाव्याला एक हेतुपुरस्सर असत्य वचन आणि एक पोकळ वक्तृत्व म्हणून संबोधले आहे, आणि असे विशद केले आहे की फॅसिझमचा लोकशाही हा कधीच उद्देश नव्हता. त्यांनी फॅसिझमवर गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. +काही विद्वानांनी ह्या सर्वसामान्य टीकात्मक दृष्टीकोनाला विरोध दर्शवला आहे. वॉल्टर लॅक्युअर म्हणतात की फॅसिस्ट लोक +'लोकशाही-विरोधी' असल्याचा शिक्का मान्य करतीलच असे नाही. खरे म्हणजे, त्यांपैकी अनेक लोक असा युक्तिवाद करतात की फॅसिस्ट लोक, ज्यात एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक राजकारणाचा, कारकुनी प्रभावाचा व प्रसारमाध्यमांच्या उपलब्धतेचा हस्तक्षेप राहणार नाही, अशा एका अधिक शुद्ध आणि अधिक अस्सल लोकशाहीसाठी लढत होते. राजकीय चळवळीत वैयक्तिक व जवळपास पूर्णवेळ सहभाग असणाऱ्या आणि संपूर्ण जनतेच्या भावनांचे व संवेदनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याचा आदर्श त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा होता. +इटॅलियन फॅसिझमच्या अनेक टीकाकारांचे प्रतिपादन आहे की त्यांची बहुतांश विचारधारा ही निव्वळ मुसोलिनीच्या तत्त्वशून्य संधिसाधूपणाचे उप-उत्पादन होती. मुसोलिनी त्याच्या राजकीय भूमिका निव्वळ स्वतःच्या खाजगी आकांक्षांना जपण्यासाठी बदलत असे व लोकांसमोर सांगताना त्यामागे अर्थपूर्ण हेतू असल्याचा आव आणत असे. इटलीचा अमेरिकन दूत रिचर्ड वॉशबर्न चाइल्ड हा मुसोलिनीसोबत काम करत असताना त्याचा मित्र व प्रशंसक बनला, व तो खालील शब्दांमध्ये मुसोलिनीच्या संधिसाधूपणाची संभावना करतो : जे स्वतःचे हितसंबंध टिकवण्यासाठी परिस्थितीनुसार बदलतात, त्या लोकांसाठी "संधिसाधू" ही तिरस्कारवाचक संज्ञा लागू पडते . मुसोलिनीला ज्याप्रकारे मी ओळखतो, त्यावरून तो ह्या अर्थाने संधिसाधू आहे. त्याचा विश्वास होता की मानवजातीने तत्त्वज्ञानाला चिकटून बसण्याऐवजी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्येच बदल घडवायला पाहिजेत, मग त्या तत्त्वज्ञानांवर आणि कार्यक्रमांवर कितीही आशा आणि प्रार्थना अवलंबून अ्सेनात का. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3640.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7b8c1764ad38fb3ec13f0b4a4dbb253153a1d3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3640.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेरबँक्स अमेरिकेच्या अलास्का राज्यातील शहर आहे. फेरबँक्स नॉर्थ स्टार बरोचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर उत्तर धृव वृत्तापासून १९० किमी दक्षिणेस वसलेले आहे. सध्याच्या अंदाजानुसार शहराची वस्ती ३२,३२४ तर महानगराची वस्ती १,००,८०७ इतकी होती. त्यानुसार ॲंकोरेजनंतर फेरबँक्स अलास्कातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. +हे शहर पुण्याचे भगिनी शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3654.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38076fab2df93392a9ff0cd4288923da25c4947d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3654.txt @@ -0,0 +1 @@ +फेटरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3672.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98cc7672def87a90f94f91d4200f91d81e994c6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3672.txt @@ -0,0 +1 @@ +फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) ( Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)) ही भारतातील विविध उद्योगांचे, त्यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3681.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b3e79b6a1113742512c7d1c3544715f2124fb55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3681.txt @@ -0,0 +1,2 @@ +जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस किंवा द इंटरनॅशनल चेस फेडरेशन[१] (इंग्रजी लघुरूप : FIDE) याची स्थापना २० जुलै, इ.स. १९२४ रोजी पॅरीस येथे झाली.[२] सध्या याचे मुख्यालय ग्रीसमधील अथेन्स येथे आहे. +फीडे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना असून ती राष्ट्रीय बुद्धिबळ संस्थांचे एकीकरण करून त्यांना मार्गदर्शन करते. सुमारे १५३ देश या महासंघाचे सभासद आहेत आणि या देशातील राष्ट्रीय बुद्धिबळ संस्था फीडेने केलेले कायदे व नियम पाळतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3701.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b970c207a6f569866f8f9a7eddc34a9f6d7b394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3701.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फेनविक फेन क्रेसवेल (२२ मार्च, १९१५:न्यू झीलंड - १० जानेवारी, १९६६:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५१ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_371.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb73d4f82df664b34e9826967577fa74bb6f8fe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_371.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 10°40′N 61°31′W / 10.667°N 61.517°W / 10.667; -61.517 + +पोर्ट ऑफ स्पेन, अधिकृतपणे पोर्ट ऑफ स्पेन ही त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी आहे. विस्तार तुलनेत सॅनफर्नांडो नंतर दुसऱ्या क्रमांकावर आणि चागुआनास नंतर तिसरी सर्वात मोठी महानरपालिका आहे. शहराची महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 37,074 (2011 जनगणनेनुसार), शहरी लोकसंख्या 81,142 (2011 जनगणनेनुसार) आणि क्षणिक लोकसंख्या 250,000 इतकी आहे. शहराचा विस्तार त्रिनिदाद बेटाच्या वायव्य दिशा किनाऱ्यापासून पॅरीयाच्या आखातापर्यंत आणि पश्चिमेकडे चागुआरामास पासून पूर्वेकडे अरिमा पर्यंत पसरलेल्या द्वीपसमुहाचा भाग आहे. +हे शहर प्रामुख्याने किरकोळ आणि प्रशासकीय केंद्र म्हणून काम करते आणि १७५७ पासून या बेटाच्या राजधानीचे शहर आहे. तसेच कॅरिबियन साठीचे एक महत्त्वपूर्ण आर्थिक सेवा केंद्र असून या प्रदेशातील दोन सर्वात मोठया बँकांचे घर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3721.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96f1fc6e70a79609a68c8cb4cf562f5eda6fe910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3721.txt @@ -0,0 +1,4 @@ +फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो. + + +फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3732.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1df1d3bfa061a9fc6731eca06bb7901c0891f878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3732.txt @@ -0,0 +1,3 @@ +फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो. + +फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3745.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33b169f02dbc536d5e40865f847da139a08ccaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3745.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेमिना मिस इंडिया (इंग्लिश: Femina Miss India) ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, फेमिना मिस इंडिया अर्थ मिस अर्थ स्पर्धेमध्ये तर फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. २००५ सालापर्यंत फेमिना मिस इंडियाकडून मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल तसेच २००९ सालापर्यंत मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धांसाठी स्पर्धक पाठवल्या जात. +खालील बॉलिवूड अभिनेत्रींनी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळवला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_375.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f455df030d5c823d60aa5e10d47a19647d125011 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_375.txt @@ -0,0 +1,3 @@ +पोर्ट कॅनेव्हरल अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील बंदर आहे. येथे क्रुझनौका आणि मालवाहू नौकांचे धक्के तसेच अमेरिकेच्या आरमाराचा तळ आहे. येथील समुद्री मार्गिकेची खोली १३ मी (४४ फूट) आहे. +जगातील सगळ्यात व्यस्त क्रुझ बंदरांपैकी एक असलेल्या या बंदरातून २०१४ साली ३९ लाख प्रवाशांनी ये-जा केली. येथे डिस्नी क्रुझ लाइन, कार्निव्हल क्रुझ लाइन आणि रॉयल कॅरिबियन क्रुझ लिमिटेड या कंपन्याच्या क्रुझ नौकांचा तळ असतो. +दरवर्षी येथून २.७ लाख टन मालसामानाची वाहतूक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3760.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d23522a8e1473992cf8241e1786fd057924861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3760.txt @@ -0,0 +1,17 @@ +फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च[१] हे शेरलिन नेगी हेसे बैबर व मिशेल येईसेर द्वारा २००४ मध्ये संपादित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित केले गेले. तीन भागांमध्ये विभागलेल्या या संपादित पुस्तकाद्वारे संपादक स्त्रीवादी संशोधनात येणारे ज्ञानमीमांसा (epistemology), पद्धतीशास्त्र (methodology) व पद्धती (methods) याबाबतीतील प्रश्नांना सामोरे जातात. +पारंपारिक पद्ध्तीशास्त्रासोबत झालेल्या सातत्याच्या संवादातून स्त्रीवादी पद्धतीशास्त्र विकसित होत असताना स्त्रीवादी भाष्यकारांनी समाज विज्ञानातून केले गेलेले स्त्री, पुरुष आणि सामाजिक जीवनाच्या विश्लेषणाला मुलभूत आव्हान दिले आहेत.[२] स्त्रीवादी संशोधकांमध्ये स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राचं वेगळेपण काय किंवा स्त्रीवादी अभ्यासपद्धती पारंपारिक अभ्यास पद्धतीनां कोणत्या प्रकारे आव्हान देते किंवा पूरक ठरते, ते वेगळेपण स्त्रीवादी संशोधनात् कसे प्रतिबिंबित होते?, संशोधनासाठी अशी काही विशिष्ठ स्त्रीवादी पद्धत आहे का?, असे व अशा तऱ्हेची चर्चा विविध विषयांवर सातत्याने चालू आहे. तसेच स्त्रीवादी संशोधन बहुतेक वेळा आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) पद्धतीनी होत असले तरीही आंतरविद्याशाखीय पद्धतीने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे पद्ध्तीशास्त्र व तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके कमी आहेत असे दिसते. वरील सर्व मुद्यांवर चर्चा या पुस्तकातून केलेली दिसते. संशोधन पद्धती, स्त्रीवादी पद्धती, गुणात्मक संशोधन पद्ध्तीशास्त्र, स्त्रीवादी तत्त्वज्ञान व स्त्री अभ्यास या ज्ञानशाखांमधील अभ्यासक्रमात सदरचे पुस्तक विशेषतः उपयोगी ठरेल. +पुस्तकातील भाग १ मध्ये स्त्रीवादी संशोधन करताना येणारे ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती संबंधी प्रश्न हाताळले गेलेले आहेत. यामध्ये स्त्रीवादी संशोधनाच्या वेळी येणारे तात्त्विक मुद्दे व चर्चेचा आढावा घेतलेला आहे तसेच स्त्रीवादी संशोधनाने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेतलेली आहे. विज्ञान व समाजविज्ञान या दोन्ही शाखांमधील संशोधनातील प्रत्यक्षज्ञानवाद (positivism) व पुरुषकेन्द्री पूर्वग्रहांना (androcentrism) सामोरे जात स्त्रीवादी संशोधन कसे विकसित झाले व निरपेक्षतावाद, प्रत्यक्षतावाद व स्त्रीवादी पद्धती यासंदर्भातील वादविवादांचा येथे आढावा घेतलेला आहे. +या पुस्तकात संपादक, विविध लेखांच्या संकलनातून विज्ञान व समाजविज्ञानातील संशोधनामधील प्रत्यक्षतावादाला व पुरूषकेन्द्री पूर्वग्रहांना, स्त्रीवाद्यांनी दिलेल्या विविध प्रतिक्रिया, विशेषतः ज्यांना सॅन्ड्रा हार्डिंग (१) स्त्रीवादी भूमिदृष्टी (Feminist Standpoint) व (२) उत्स्फूर्त स्त्रीवादी अनुभववादी (Spontaneous Feminist empiricists)[३] असे संबोधितात, त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवतात. दोन्ही विचारप्रवाहांनी कशा प्रकारे वैज्ञानिक संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये दिसणाऱ्या लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रहांची कारणं मांडली आहेत हे स्पष्ट करत ते स्त्रीवादी भूमिदृष्टी कशाप्रकारे संशोधनाला स्त्रीवादी बनवते याची मांडणी करतात. +जिथे एकाबाजूला उत्स्फूर्त स्त्रीवादी अनुभववादी, संशोधनातील मुलभूत तर्काला विरोध न करता, स्त्रीवादी अभ्यासाला 'चांगले विज्ञान' व 'चांगले तत्त्वज्ञान' मधील उपलब्ध निकषांमध्ये बसवू पाहतात तेथे दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी भूमिदृश्टीचे समर्थक प्रत्यक्षतावादातील ज्ञानमीमांसा व पद्धतीशास्त्रालाच लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रहांचे कारण सांगून त्याला आव्हान देतात. +उत्स्फूर्त अनुभववादी, वैज्ञानिक संशोधनात दिसणाऱ्या पुरुषकेंद्री पूर्वग्रहांच कारण, अस्तित्वात असलेल्या पद्धती व नियमांचं अपूर पालन मानतात. त्यांच्या मते त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पूर्वग्रह टाळण शक्य आहे. याउलट भूमिदृष्टीवादी याला समस्येच केवळ एक भाग मानतात. त्यांच्या मते संपूर्ण वैज्ञानिक समुदायाचे भाग असलेले सामाजिक मुल्य, हितसंबंध व उद्देश समजण्यास व संशोधनाच्या निष्कर्षात त्याचे परिणाम उमटू न देण्यास, उपलब्ध पद्धती आणि नियम अपुरे व कमकुवत आहेत. संशोधनामधील लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रह शोधून काढण्याइतपत निरपेक्षतावादाची व्याख्या अजून झालेली नाही. स्त्रीवादी भूमिदृश्तीचे समर्थक या प्रश्नाचे उत्तर, अधिक चांगले व सशक्त पद्धती निर्माण करून देतात जे संशोधनामधील निरपेक्षता वाढवण्यासाठी अधिक चांगले प्रयत्न करण्यास मार्गदर्शन देतील. +तसेच संशोधन प्रश्नांची निर्मिती स्त्रियांच्या अनुभवविश्वातून करून, व 'स्त्री' हा एकजिनसी कोटिक्रम नाकारत, स्त्रीवादी भूमिदृष्टी 'भिन्नतेचा मुद्धा पुढे आणते व सामाजिक पातळीवर निर्माण झालेले कोटिक्रम उदा. वर्ण, जात इत्यादी कसे तुमच्या लिंगभावात्मक अनुभवांवर परिणाम पाडतात याचा स्वीकार कशा प्रकारे प्रत्यक्षतावादी ज्ञानमीमांसेला आव्हान देते याचा आढावा या पुस्तकाद्वारे घेतलेला दिसतो. +पुस्तकातील दुसऱ्या भागात भिन्नतेच्या मुद्यावर स्त्रीवाद्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आढावा घेतलेला दिसतो. स्त्री व पुरुषांमधील भिन्नता दाखवून स्त्रीवाद्यांनी प्रत्यक्षतावादातील सार्वत्रिकतेच्या मूल्याला आव्हान दिले. पुढे स्त्रीवादी अभ्यासकांवर, वंश, वर्ग, लिंगभाव, लैंगिकता, लैंगिक निवड, राष्ट्रीयत्व व मानववंशीय पार्श्वभूमीवर आधारित भिन्न्तेचा आढावा घेत नसल्याचे किंवा घेतलेच तर त्यातील अंतरसंबंधांचे विश्लेषण न करण्याबाबत टीका केली गेली. या टीकेला प्रतिक्रिया देत स्त्रीवादी अभ्यासात भिन्नतेचा मुद्दा कसा सामावला गेला याबाबत सदरचा भागात भाष्य केलेले दिसते. भिन्न्तेला संबोधण्यासाठी प्रचलित 'स्त्रिया घाला व ढवळा' या पद्धतीच्या थोडक्यात मर्यादा सांगत सदरचे भाग वेबरच्या[४] लेखाद्वारे आपल्या समोर वंश, वर्ग, लिंगभाव, लैंगिकता समजून घेण्यासाठी उपयुक्त तात्त्विक चौकाट मांडतात. भिन्न्तेला हाताळण्यासाठी वेबर आपल्याला खालील प्रमाणे सहा मुद्धे सांगतात: +१. भिन्न्तेला संदर्भ असतो. +२. त्या सामाजिक पातळीवर घडवण्यात आलेल्या आहेत. +३. भिन्नता ही सत्ता संबंधांची व्यवस्था आहे. +४. भिन्नतेचा अभ्यास करताना सामाजिक संरचना व सामाजिक मानसिक संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे. +५. विविध भिन्नतेचे अवकाश एकाचवेळी कार्यरत असतात. +६. ज्ञान व कृती यामधील परस्परावलम्बित्व ते अधोरेखित करतात. +या विभागात, संपादक मांडतात की, स्त्रीवादी संशोधनात भिन्नता व त्यातील आंतरसंबंधांचा स्वीकार हा यशस्वी व अर्थपूर्णरित्या भिन्नतेवर काम करण्याची पहिली पायरी मात्र आहे. त्यावर यशस्वीपणे काम करण्यासाठी हे पुस्तक विमर्षतेला (संशोधन प्रक्रियेत संशोधकाचे सामाजिक स्थान व पार्श्वभूमी मांडणे) एक महत्त्वपूर्ण साधन मानते. यामध्ये दाखवून दिलेले आहे कि भिन्नतेचा अभ्यास व अभ्यासात 'कोणती स्त्री' हा प्रश्न विचारणे संशोधकासाठी भिन्न सत्य बघण्यासाठी उपयुक्त साधन ठरतात. भिन्नतेचा अभ्यास व अभ्यासात 'कोणती स्त्री' हा प्रश्न विचारणे संशोधकासाठी भिन्न सत्य बघण्यासाठी उपयुक्त साधन ठरतात. उदाहरणार्थ वंश, वर्ग व लिंगभावाच्या संवादातून कशा प्रकारे काळे व गोऱ्या कुटुंबातील पालकत्वाची पद्धती व मुलं व स्वतः कडील अपेक्षा वेगळ्या ठरतात तसेच यावर हिल व् स्प्रेग[५] प्रकाश टाकतात्. गुंतागुंतीचे व बहुअंगी सत्याच्या स्वीकारातून संशोधक व 'ज्यांच्यावर संशोधन होत आहे' ते दोघेही एकाच पातळीवर येतात व पारंपारिक संशोधनातील सत्ता संबंधाना आव्हान देतात. प्रत्यक्षतावादात काही पद्धतीनां तटस्थ मानण्यात आलेले आहे, पण बहुअंगी सत्याच्या स्वीकारामुळे या विचारांना शह मिळाले. संशोधन पद्धती तटस्थ नसून त्यांच्यावर संशोधकाचे स्थान व उद्देशांचा परिणाम पडतो. त्यामुळे भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी विमर्षता हे उपयुक्त तंत्र ठरते. विमर्षतेच्या उपयोगाचे एक चांगले उदाहरण आपल्याला काथ वेस्टन[६]च्या लेखात मिळते जिथे ती विमर्षतेचा उपयोग करून तिच्या अभ्यासात तिचे 'लेसबियन' असणे कसे उपयुक्त ठरले हे दाखवून देते. +स्त्रीवादी संशोधनात विशिष्ठ अशी पद्धती नाही. याउलट स्त्रीवादी संशोधनात ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती या तिघांमध्ये एक आंतरबद्धतेची प्रक्रिया घडते ज्याचा परिणाम पद्धतीच्या निवडीवर पडतो. म्हणून स्त्रीवादी कुठल्याही पद्धतीचा वापर करू शकतात व संशोधनामागील उद्देश त्या पद्धतीला स्त्रीवादी संशोधनाचा भाग बनवतात. उदा. थोमसन व केथ[७] संख्याशास्त्रीय पद्धतीशास्त्रात महत्त्वाचे मानले गेलेले सांख्यिकीय माहितीचा उपयोग स्त्रीवादी ज्ञान निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला आहे. येथे थोमसन व केथ काळ्या अमेरिकिंच्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील (National Survey of Black Americans)[८] सांख्यिकीय माहितीच्या आधारावर लिंगभाव, त्वचेचा रंगाचा, स्वाभिमान व सामर्थ्य यातील आंतरसंबंध दाखवून देतात. संशोधनात असे दिसून येते कि त्वचेच्या रंगाचा काळ्या पुरुषांपेक्षा काळ्या स्त्रियांवर जास्त नकारात्मक परिणाम दिसून येतो व त्यामुळे काळ्या स्त्रियांवर सर्वात जास्त शोषण होत असल्याचे दिसून येते. स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे वेगळेपण पद्धतीत नसून ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती यांचे समन्वयात्मक वापरात आहे. पद्धतीच्या वापरामागील उद्देश म्हणजेच संशोधनाची मुळे स्त्रियांच्या प्रश्नात असणे किंवा नसणे ज्यामुळे एकंदरीतच ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धतीं मध्ये साजेसे बदल होतात, संशोधनाला व त्या पद्धतीला स्त्रीवादी ठरवतात. +लियामपुतोंग[९] आपल्या पुस्तकात सदर पुस्तकाचा संदर्भ घेत म्हणतात कि स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्र हे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या व अंधारात असलेल्या सर्व शोषित गटांबाबत ज्ञान निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते कारण ते नवीन ज्ञान निर्मितीस प्रोत्साहन देते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3765.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72a7629c79cf5cc852b3808ce23da1e0ee00f9c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3765.txt @@ -0,0 +1,11 @@ +फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस ॲन्ड चॉइसेस[१] हे २००२ मध्ये केरोलीन रमाझानोग्लु व जेनट होलेंड द्वारा लिखित व 'न्यू सेज प्रकाशनाने' प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात लेखक स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला विविध विचारधारेकडून मिळालेले आव्हान व यातून निर्माण झालेले स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे वेगळेपण अधोरेखित करतात. +या पुस्तकात तीन महत्त्वाच्या मुद्यांचा उहापोह झालेला दिसतो: (1) स्त्रीवादी पद्धतीशास्त्र, हे पाश्चात्य तत्त्वज्ञानात सत्य शोधण्यासाठी 'समाजाबाबतीतील विचार, लोकांचे समाजजीवनाबाबतीतील अनुभव व वास्तविक सामाजिक परिस्थिती' या तिन्हींचा एक दुसऱ्याशी संबंध कसा जोडावा या प्रश्नाभोवतीच्या मतभेदांनी घडले आहे. (2) या चर्चेला स्त्रीवाद्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे स्त्रीवाद्यांमध्ये वैविध्य तसेच पद्धतीशास्त्राबाबतीतील मतभेद निर्माण झालेले आहे. (3) सदरचे वैविध्य असून देखील स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात काही वैशिष्ट्य ठळकपणे दिसते कारण काही विशिष्ठ तात्त्विक, राजकीय व नैतिक मुद्दे या सर्व स्त्रीवादी विचारपद्धतींचा आधार असलेले दिसते. +पुस्तकातील पहिल्या भागात लेखकांनी स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच, प्रबोधनकाळातील मूल्यांशी असलेले नातं टिपलेल आहे. त्यांच्या मते स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे ‘संशोधन पद्धती’ (प्रबोधनकाळाच फलित) विरुद्धच्या संघर्षाने (वैज्ञानिक पद्धती या ज्ञानशाखेनी स्त्रियांना तुच्छ व दुय्यम लेखलेले दिसते व या विरोधातील संघर्षाने स्त्रीवादी पद्धतीशास्त्र घडलेले दिसते) घडले असले तरीही प्रबोधनकाळातील व मानवतावादातील काही धारणांचा (तर्क, विज्ञान, विकास, सत्यशोधन, मुक्ती)आग्रह स्त्रीवादीही पूर्णपणे सोडू शकलेले नाहीत. त्यामुळे स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात अंतर्गत विरोधाभास निर्माण झालेले आहेत. याआधारावर स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची पाळ-मूळ हे युरोपियन प्रबोधनकाळ व मानवतावादात असल्याचे ते मांडतात. +वैज्ञानिक पद्धतीचे मुलभूत घटक ‘वैश्विक सत्याचा शोध (truth claim)’ व वस्तुनिष्ठतेला स्त्रीवाद्यांनी सातत्याने आव्हान दिले परंतु त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या सामाजिक जीवनाबाबतीतील ज्ञानाला, या वैज्ञानिक जगतात सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुठले विविध मार्ग निवडले हे पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणात लेखक मांडतात. ज्ञान व वास्तव यामधील संबंध सिद्ध करताना स्त्रीवाद्यांनी ४ वेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसतात. पहिल्या व दुसऱ्या भूमिकेत वस्तुनिष्ठता व व्यक्तीनिष्ठता हे भिन्न व सत्य सिद्ध करण्यास विरोधाभासी मार्ग असल्याचे दिसते. तिसऱ्या भूमिकेत सत्याप्रत पोहचण्यास दोन्हींची गरज असल्याचे मांडतात व सापेक्षतावादी हे ज्ञान व वास्तव यामधील संबंध जोडणे संशोधकाला शक्य नाही अशी भूमिका मांडतात. +पहिल्या भागातील ४थ्या प्रकरणात लेखक सापेक्षतावादाच्या दाव्याला (अनेक सत्य असतात व व्यक्तीच्या सामाजिक स्थानावरून सत्याची आवृत्ती बदलते) स्त्रीवादी कशे सामोरे जातात याचे स्पष्टीकरण देतात. त्यांच्या मते स्त्रीवाद्यांनी मांडले कि 'जाणणारा स्त्रीवादी (संशोधक)' व त्याने निर्माण केलेले सत्य या समाजातील असलेल्या त्याच्या स्थानाचा परिणाम असते (स्त्रीवादी भूमिदृष्टी). लेखकांनी दाखवून दिले कि सापेक्षतावादाच्या दाव्याला सामोरे जाताना स्त्रीवादी हे निरपेक्षतावादाच्या व 'सत्य' या धारणांच्या पलीकडे जाऊन स्त्रीवादी भूमिदृष्टी पुढे आणतात. +पुस्तकातील दुसऱ्या भागात लेखक आधुनिकोत्तरवादी व उत्तर संरचनावाद्यांनी स्त्रीवाद्यांवर केलेली टीका व स्त्रीवाद्यांनी त्याला दिलेले उत्तर स्पष्ट करतात. जिथे एका बाजूला आधुनिकोत्तरवाद्यांनी स्त्रीवादी विचारधारेच्या मुलभूत कोटीक्रमांनाच (स्त्री, स्त्रीवाद) आव्हान केलेले दिसते तिथे स्त्रीवाद्यांनी याला लिंगभाव, सत्ता व ज्ञान निर्मितीवर पुर्नचिंतन करण्याची सकारात्मक संधी म्हणून पाहिलेले दिसते. +तसेच येथे वैज्ञानिक पद्धती व मानवतावादाला संपूर्णपणे सोडण्याने स्त्रीवाद्यांवर कुठले राजकीय व नैतिक परिणाम पडतील याबाबतीतील चिंता स्त्रीवाद्यांमध्ये दिसून येते हे ही त्या दाखवून देतात. या वारसाला संपूर्णपणे न सोडल्याकारणान स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात दोन प्रकारचे परिणाम दिसतात. एकाबाजूला स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या गाभ्यात विरोधाभास निर्माण झाले व दुसऱ्या बाजूला आधुनिकोत्तर विचारांना स्त्रीवाद्यांनी विविध पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या (एक पद्ध्तीशास्त्रातील धोरणाद्वारे नव्हे). +स्त्रियांमधील भिन्नत्वाच्या स्वीकारामुळे स्त्रीवद्यांमधील विभागणी किंवा त्याने तुकडे करण्याचे राजकीय परिणाम व स्त्रियांमध्ये युतीच्या शक्यता निर्माण करण्याचे मुद्दे स्त्रीवादी संशोधकांपुढे येतात ज्याबाबत या पुस्तकात भाष्य केलेले दिसते. याच मुद्द्याला धरून संशोधनकर्ता व ‘ज्यांच्यावर संशोधन होत आहे’ यामधील संबंधांबाबतही या पुस्तकात चर्चा केलेली दिसते. स्त्रीवादी संशोधकाचे नैतिक मूल्य /कर्तेपणा हा संशोधन प्रक्रियेमधील सत्ता संबंधांबाबत चिकित्सक पद्धतीने चिंतन (reflect) करण्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्या हे ही दाखवून देतात कि स्त्रीवादी ज्ञान निर्मितीचे निर्माते म्हणून संशोधका समोर जे पर्याय उपलब्ध असतात ते आजही राजकीय व ज्ञानमीमांसाशास्त्राच्या दृष्टीने एक समस्या आहेत. +पुस्तकातील तिसऱ्या भागात एक छोटे स्त्रीवादी संशोधन करताना स्त्रीवादी संशोधका पुढे येणाऱ्या पर्यायांबाबत मांडणी केलेली दिसते. लेखकांनी येथे योग्य उत्तर किंवा आदर्श प्रक्रिया नोंदवण्याचा प्रयत्न केलेला नाही तर संशोधन प्रश्नापासून ते संशोधनाचे निष्कर्ष काढण्यापर्यंत, संशोधन प्रक्रियेच्या एका आवृतीला उलगडण्याचा येथे प्रयत्न दिसतो. तसेच स्त्रीवादी ज्ञान निर्मिती व त्याला सिद्ध करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयामधून संशोधकाला सदरचे पुस्तक नेते. +एकंदरीत ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेत विविध स्वरूपाचे स्त्रीवादी योगदान व स्त्रीवादी चर्चाविश्वातून व बाहेरून निर्माण झालेले विविध मतभेद लेखक दाखवून देतात. प्रबोधनकाळातील काही धारणा स्वीकारल्यामुळे स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात निर्माण झालेले काही विरोधाभास, सत्य व वस्तुनिष्ठता या धारणांना स्त्रीवाद्यांनी दिलेले आव्हान, सापेक्षवादाचा दावा (relativist claims), स्त्रीवादी पद्धतीशास्त्राला आधुनिकोत्तरांनी दिलेले आव्हान, स्त्रियांमधील भिन्नत्वाचा मुद्धा व या सर्व मुद्यांमधून स्त्रीवादी संशोधकांनी केलेल्या निवडींबाबत या पुस्तकात भाष्य केलेले दिसते. या पद्धतीने लेखक स्त्रीवादी 'पद्धतीशास्त्रातील गोंधळ (methodological confusion)'[२] उलगडून दाखवण्यासाठी विविध समकालीन वादविवादांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच या पद्धतीशास्त्रातील वाद- विवादांना स्त्रीवादी संशोधन करताना व्यवहारात कसे आणायचे हे ही दाखवून देते. +पेटी लथेरच्या[३] मते समाज विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रीवादी संशोधनासाठी हे पुस्तक एक परिचय म्हणून उपयोगी आहे. त्यांच्या मते हे पुस्तक आधुनिकोत्तर विचारांना, आधुनिक विचारांकडून मिळालेली प्रतिक्रिया आहे.[४] तसेच या पुस्तकात उत्तर वास्तवतावादी ज्ञानमीमांसाशास्त्र(post realist epistemologies), ज्यात सापेक्षतावाद (relativism) विरुद्ध वास्तववाद (reaslism), भाषिक (linguistic) विरुद्ध भौतिक (material), या द्वैतांच्या मर्यादांचा, तसेच बहुसंख्यांकांच्या बाजूने नसलेले स्त्रीवादी विचार(non-majoritarian feminist thought) व व्यवहार, मनोविश्लेषणात्मक (psychoanalytic) दृष्टीकोणाचाही यात समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3766.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..566825c9a4ab20055005eead771b797aa011db62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3766.txt @@ -0,0 +1,12 @@ +फेमिनिस्ट रिसर्च मेथोडोलोजी : मेकिंग मिनिंग ऑफ मिनिंग मेकिंग[१] हे मैथ्री विक्रमसिंघे[२] द्वारा लिहिलेले पुस्तक असून २०१४ मध्ये जुबान प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. हे पुस्तक स्वतःला दक्षिण आशियाई देश श्रीलंके मध्ये स्थापित करते. +स्त्रीवादी पद्धतीशास्त्रावर भाष्य करण्यासाठी ते पद्धतीशास्त्राच्या दृष्टीकोनातून, यष्टी पद्धतीचा (case study approach) वापर करून स्त्री अभ्यास/ संशोधन चळवळीचा शोधात्मक सैद्धांतिक अभ्यास करतात. या पुस्तकात लेखिका स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे विविध पद्धती, सिद्धांत, सत्संबंधीशास्त्र (ontology), ज्ञानमीमांसाशास्त्र, नैतिकता व राजकारणाचा शोध व विश्लेषण करू पाहतात. +वरील उद्देशास साध्य करण्यासाठी लेखिका इतर संशोधन व लिखाणाचा अभ्यास करतात. त्याद्वारे श्रीलंकेतील स्त्रीवादी संशोधक कार्यकर्त्या कशा पद्धतीने व साधनांद्वारे स्त्रियांचे जीवन जगतात, त्याची पकड घेतात व त्याचे प्रतिनिधित्व करतात व त्यामाध्यमातून संशोधनाद्वारे स्त्रियांचे व समाजाचे अनेक सत्य घडवतात याकडे लेखिका लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. संशोधक कशा पद्धतीने सत्याचे अर्थ लावतात व त्याद्वारे वैयक्तिक व सामाजिक बदलासाठी राजकीय, सैद्धांतिक व नैतिक जबाबदारी पार पाडतात हे लेखिका शोधण्याचा प्रयत्न करतात. +हे पुस्तक २ भागांमध्ये विभागलेले आहे. पुस्तकातील पहिल्या भागात लेखिका श्रीलंका व जगभरात पद्धतीशास्त्राबाबातीतील समाज व व्यवहारामागील पार्श्वभूमी प्रदान करतात. तर दुसऱ्या भागात लेखिकेला जे स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राच्या सहा बाजू वाटतात, क्रमशः संशोधनकर्त्याची व्यक्तीनिष्ठता, सत्संबंधीशास्त्र( ontology), ज्ञानमिमांसाशास्त्र, पद्धती, सिद्धांत व नैतिकता/राजकारण. +पहिल्या प्रकरणात विक्रमसिंघे या श्रीलंकेतील संशोधनाची पार्श्वभूमी समजण्यासाठी फुकोल्टच्या (१९७२) लवचिक संकल्पनात्मक साधन -'अर्थ लावणे -पुरातत्त्वशास्त्र(making meaning-archaeology) याच्या मदतीने श्रीलंकेतील स्त्री अभ्यास व स्त्रीवादी संशोधनातील चळवळीशी ओळख करून देतात. हे साध्य करण्यासाठी त्या १९७५ ते वर्तमानापर्यंतची श्रीलंकेतील स्त्रीवादी संशोधन व लेखनाला घडवतात , त्याचा शोध घेतात व त्याचा एक ढाचा देतात, स्त्री चळवळ व संशोधनकर्त्यांची ओळख करून देतात, संशोधन निर्मितीचे अर्थकारण व प्रत्यक्ष जमिनीवरील राजकारणाचा वेध घेतात व स्त्रीवादी संशोधन चळवळीतील ज्ञानमीमांसाशास्त्रात्मक व सैद्धांतिक मुद्यांना हात लावतात. +दुसऱ्या प्रकरणात जगभरात ज्ञान निर्मितीच्या पद्धतीत व ज्ञानमीमांसाशास्त्रात स्त्री या कोटीक्रमाने कसा बदल घडवून आणला याचा आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे. स्त्रीयांला एक नमुन्याच्या स्वरूपात बघून संशोधन क्षेत्रात कुठले महत्त्वाचे बदल घडले याला अधोरेखित करून त्या श्रीलंकेतील स्त्री अभ्यास व संशोधन चळवळीला एक ज्ञानमीमांसाशास्त्राची पार्श्वभूमी देऊ पाहतात. +तिसऱ्या प्रकरणात विक्रमसिंघे या स्त्रीवादी संशोधन पद्धतीशास्त्राच्या संकल्पीकरणात व्यक्तीनिष्ठ्तेची अपरिहार्यता मांडतात. तसेच संशोधनात व्यक्तीनिष्ठता आणण्यासाठी परवर्तिततेचे (reflexivity) महत्त्व मांडतात. या प्रकरणात हे पुस्तक लिहिण्याची व संशोधनाच्या प्रक्रियेवर लेखिका परावर्तन करतात. अनेक मांडणी व परिणाम ज्यामध्ये लेखिकेचे कार्य घडले/ स्थापित आहे, अर्थ लावण्याची प्रक्रिया, विशिष्ट सैद्धांतिक मांडणी स्वीकारण्याची कारणं, ज्ञानमिमांसाशास्त्र, सत्संबंधीशास्त्र(ontology), संशोधन पद्धतीचे समर्थन त्या या परावर्तनाच्या प्रक्रियेत करतात व शेवटी माहितीचे विश्लेषण व सैद्धांतीकरणावर भाष्य करतात. +प्रकरण ४ मध्ये लेखिका सत्संबंधीशास्त्रावर (ontology) भाष्य करतात. ज्या स्थानिक परिस्थिती किंवा जगण्याची परिस्थिती संशोधनकर्त्यांच्या मनात खदखदते किंवा ज्यात ते भाग घेतात, त्यावर लेखिकेनी भर दिलेला आहे. यामध्ये संशोधन करताना समोर येणारे विविध स्पर्धात्मक सत्य किंवा सत्संबंधीशास्त्रासंबंधीचे राजकारणाचा समावेश आहे. सत्संबंधीशास्त्रासंबंधीचे राजकारणामध्ये १) आंतरराष्ट्रीय प्रभाव/ कायद्याचे मापदंडांचा प्रभाव, २) विद्याशाखा व संस्थांमध्ये लिंगभावाचे मुख्यप्रवाहीकरणाचे ज्ञानमीमांसाशास्त्र, ३) समकालीन सामाजिक -राजकीय बदल, ४) संशोधनकर्त्याचे आंतरिक वैयक्तिक राजकीय प्रेरणांचा समावेश आहे. येथे लेखिका मांडतात कि संशोधनाची सत्संबंधीशास्त्राचे राजकारण हे संशोधनाच्या ज्ञानमीमांसाशास्त्राचे प्रतिकात्मक स्वरूप आहे. +प्रकरण ५ संशोधनातील एक सबळ ज्ञानमीमांसाशास्त्र - लिंगभावावर केंद्रित आहे. यामध्ये लेखिका लिंगभावासंदर्भातील सत्य किंवा लिंगभावात्मक जगणे किंवा असणे हे एकाबाजूला ज्ञानमीमांसाशास्त्राचे एक घटक आहे तसेच लिंगभाव समजून घेण्याची एक पद्धती आहे. +प्रकरण ६ मध्ये विक्रमसिंघे संशोधन पद्धतीकडे स्वतःचे लक्ष केंद्रित करतात. येथे त्या साहित्याच्या आढाव्याला एक संशोधन पद्धती म्हणून मांडतात. त्यांच्या मते साहित्याच्या आढावा हे माहिती गोळा करण्यासाठी किंवा विषयाला पार्श्वभूमी देण्यासाठी एक भिन्न अशी संशोधन कृती तर आहेच पण तसेच संशोधन विषयाच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व किंवा जडण-घडण सुद्धा आहे. त्यामुळे साहित्याच्या आढाव्याला चिकित्सा म्हणून नाही तर अर्थ लावण्याची एक पद्धत म्हणून बघितलेले आहे. +सातवे प्रकरण हे लेखिकेच्या सैद्धांतीकरणाचा गाभा आहे. या प्रकरणात लेखिका पद्धतीशास्त्रावरील सैद्धान्तिकरण मुख्यतः संशोधनकर्त्यांच्या मुलाखतींच्या आधावारावर करते पण जेथे स्थानिक परिस्थितीला साजेसे असेल तेथे पाश्चिमात्यांच्या सैद्धांतीकरणाला सूक्ष्मपणा आणून सुधा केलेला आहे. व येथे लेखिका मांडतात कि संशोधनात अर्थ लावणे याचा अर्थ प्रक्रियेला पूर्णपणे समजण्यासाठी आधुनिक व उत्तर आधुनिक दृष्टिकोनाच्या मिश्रणाचे स्वीकार असा आहे. +प्रकरण ८ हे अंतिम प्रकरण असून श्रीलंकेतील संशोधन प्रक्रियेचे राजकीय व नैतिक परिणाम काय आहेत याबाबतीतील संशोधनकर्त्यांच्या चिंतेवर लेखक मांडणी करतात. त्यांच्या मते एक स्त्रीवादी होण्याच्या नात्यांनी संशोधन प्रक्रियेत राजकारण व नैतिकता यांची घट्ट वीण घालणे गरजेचे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3772.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b151a07cdcf5438e2ed11f3b2627e50cebb267e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3772.txt @@ -0,0 +1 @@ +फेम्टोमीटर हे एसआय पद्धतीतील लांबीचे एकक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3776.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f504a479b05db8aefbfa111d69533cb310bda7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3776.txt @@ -0,0 +1,9 @@ +डोरोथी फे डनवे (जन्म १४ जानेवारी १९४१)[१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिला एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक बाफ्टा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०११ मध्ये, फ्रान्स सरकारने तिला ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सची अधिकारी बनवले. +तिची कारकीर्द १९६० च्या सुरुवातीस ब्रॉडवेवर सुरू झाली. तिने १९६७ च्या द हॅपनिंग चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले. त्याच वर्षी तिने अनेक कलाकारांसह हरी सनडाउन मध्ये काम केले आणि आर्थर पेनच्या बोनी अँड क्लाइड मधील अमेरिकन डाकू बोनी पार्करच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवली. ह्यासाठी तिला बाफ्टा पुरस्कार मिळाला व पहिले अकादमी पुरस्कार नामांकन देखील. तिच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये द थॉमस क्राउन अफेअर (१९६८), द अरेंजमेंट (१९६९), लिटल बिग मॅन (१९७०), अलेक्झांड्रे ड्यूमासचा क्लासिक द थ्री मस्केटियर्स (१९७३), १९७४ मधील द फोर मस्केटियर्स, निओ-नॉयर चायनाटाउन (१९७४), ज्यासाठी तिने तिचे दुसरे ऑस्कर नामांकन मिळवले, ॲक्शन-ड्रामा द टॉवरिंग इन्फर्नो (१९७४), राजकीय थ्रिलर थ्री डेज ऑफ द कॉन्डोर (१९७५), विडंबन चित्रपट नेटवर्क (१९७६) ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला, आणि थ्रिलर आईज ऑफ लॉरा मार्स (१९७८) हे आहेत. +१९८१ च्या मॉमी डिअरेस्ट या चित्रपटातील जोन क्रॉफर्डच्या (एक अमेरिकन अभिनेत्री) वादग्रस्त चित्रणापासून तिच्या कारकीर्दीत अधिक परिपक्व पात्र भूमिका साकारल्या गेल्या. सुपरगर्ल (१९८४), बारफ्लाय (१९८७), द हँडमेड्स टेल (१९९०), ॲरिझोना ड्रीम (१९९४), डॉन जुआन डीमार्को (१९९५), द ट्वायलाइट ऑफ द गोल्ड्स (१९९७), जिया (१९९८) आणि द रुल्स ऑफ अट्रॅक्शन (२००२) यांचा इतर उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे. ड्युनावेने अनेक नाटकांमध्ये रंगमंचावर सादरीकरण केले आहे, ज्यात अ मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६१-६३), आफ्टर द फॉल (१९६४), होगन्स गोट (१९६५-६७), आणि अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९७३) यांचा समावेश आहे. मास्टर क्लास (१९९६) मधील ऑपेरा गायिका मारिया कॅलासच्या भूमिकेसाठी तिला सारा सिडन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +तिच्या खाजगी जीवनाचे संरक्षण करून, ती क्वचितच मुलाखती देते आणि खूप कमी सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावते. +डनवेचा जन्म फ्लोरिडा येथील बास्कोम येथे झाला. ती ग्रेस एप्रिल (गृहिणी ) आणि जॉन मॅकडोवेल डनवे जूनियर (युनायटेड स्टेट्स आर्मीमधील अधिकारी) यांची मुलगी. तिच्या पालकांनी १९३९ मध्ये लग्न केले आणि १९५४ मध्ये घटस्फोट घेतला. तिला एक लहान भाऊ होता, वकील मॅक सिमियन ड्युनावे.[२]तिने तिचे बालपण संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये प्रवासात घालवले, ज्यात मानहाइम, जर्मनी आणि युटा येथे ती दीर्घकाळ राहिली.[३] +१९६२ मध्ये, डनवेचे स्टँड-अप कॉमेडियन लेनी ब्रूससोबत संबंध सुरू झाले जे एक वर्ष टिकले.[४] १९६७ ते १९६८ या कालावधीत छायाचित्रकार जेरी स्चॅट्झबर्गशी तिचं लग्न झाल. नंतर ते दोघे मित्र राहिले आणि डनवेने स्चॅट्झबर्गच्या दिग्दर्शनातल्या पदार्पण चित्रपटात (पझल ऑफ अ डाउनफॉल चाइल्ड - १९७०) मध्ये अभिनय केला. ए प्लेस फॉर लव्हर्स (१९६८) च्या चित्रीकरणादरम्यान, डनवे तिच्या सह-कलाकार मार्सेलो मास्ट्रोइन्नीच्या प्रेमात पडली. दोघांचे दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप होते. डनवेला लग्न करायचं होतं पण मास्ट्रोइन्नी कायदेशीररित्या विवाहित होता. शेवटी डनवेने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. +डनवे १९७१-७२ दरम्यान अभिनेता हॅरिस युलिन सोबत होती. १९७४ मध्ये, तिने पीटर वुल्फशी विवाह केला, जो रॉक ग्रुप द जे. गील्स बँडचा प्रमुख गायक होता . त्यांच्या कारकिर्दीतील वचनबद्धतेमुळे ते वारंवार विभक्त होत होते आणि दोघांचा १९७९ मध्ये घटस्फोट झाला. तिचा दुसरा पती, ब्रिटिश छायाचित्रकार टेरी ओ'नील सोबत १९८३ मध्ये लग्न केले. +ओ'नीलपासून घटस्फोट घेतल्यानंतर डनवे ही इंग्रजी लेखक फ्रेडरिक फोरसाइथशी संबंधीत होती.[५] त्यानंतर वॉर्नर ब्रदर्सचे होम व्हिडिओचे अध्यक्ष वॉरन लीबरफार्ब, सोबत तिचे तीन वर्षांचे नाते होते.[६][७] +डनवे एक धर्माभिमानी कॅथलिक आहे आणि तिने सांगितले की ती नियमितपणे सकाळच्या मासला उपस्थित राहते. तिने १९९६ मध्ये धर्मांतर केले, तोपर्यंत ती प्रोटेस्टंट होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3778.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca8bcefecb3d1852d48b004ee13e15d3108476dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3778.txt @@ -0,0 +1,7 @@ +फेय डिसूझा एक भारतीय पत्रकार आणि दूरचित्रवाणी बातम्या अँकर आहेत. तिने टाइम्स ग्रुपच्या मालकीच्या मिरर नाऊच्या कार्यकारी संपादक म्हणून काम केले. तिने अर्बन डिबेट ऑन मिरर नाऊ या शोद्वारे प्रसिद्धी मिळवली[१], जिथे तिने भ्रष्टाचार, सांप्रदायिक हिंसा आणि स्वतंत्र प्रेस या विषयांवर अँकरिंग केले. डिसूझा यांनी यापूर्वी ईटी नाऊवरील गुंतवणूकदार मार्गदर्शकावर अँकर आणि संपादकीय प्रमुख म्हणून काम केले आहे ते सीएनबीसी टीव्ही १८ न्यूजरूमचे सदस्य आहेत. तिला २०१८ मध्ये 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' साठी रेडइंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. +डिसूझा यांचा जन्म कर्नाटकातील मंड्या येथे झाला. +तिने बेंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमध्ये पत्रकारितेचा अभ्यास केला आणि पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तिने आपले पदव्युत्तर शिक्षण बेंगळुरूमधील कमिट्समधून पूर्ण केले.[२] +डिसूझाने आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात ती विद्यार्थी असताना आकाशवाणीवर केली. त्यानंतर तिने २००३ मध्ये सीएनबीसी टीव्ही १८ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट जर्नलिस्ट म्हणून काम केले आणि नंतर म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि पर्सनल फायनान्सबद्दलच्या रिपोर्टिंगकडे गेले. तिने ईटी नाऊ वर तीन साप्ताहिक शो चालवले - इन्व्हेस्टर गाइड, ऑल अबाउट स्टॉक आणि द प्रॉपर्टी गाईड. +टाइम्स नेटवर्कने एप्रिल २०१७ मध्ये मिरर नाऊ ही इंग्रजी वृत्तवाहिनी सुरू केली. डिसूझा यांना त्याचे वरिष्ठ संपादक बनवण्यात आले. मिरर नाऊ, द अर्बन डिबेट वर फ्लॅगशिप शो सुरू करण्यात आला होता, तिच्या मते "उदासीनता, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यावर स्पॉटलाइट चमकवण्यासाठी, जे आज आपण भारतीय म्हणून ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्याचे मूळ कारण आहे." २०१८ मध्ये 'द जर्नलिस्ट ऑफ द इयर' साठी रेडइंक पुरस्कार फेय डिसूझा यांना प्रदान करण्यात आला. सामान्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या समस्यांच्या तिच्या कवच कव्हरेजसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कॅलेंडर २०१७ मध्ये भ्रष्टाचार, राजकीय संधीवाद, महागाई आणि जातीयवाद यासारख्या विषय हाताळण्याच्या तिच्या शैलीमुळे तिला आणि तिचा कार्यक्रम 'द अर्बन डिबेट' जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे. तिने ९ सप्टेंबर २०१९ रोजी मिरर नाऊच्या दैनंदिन कामकाजाचा राजीनामा दिला.[३] विनय तिवारी यांनी त्यांची जागा वृत्तवाहिनीवर नवीन व्यवस्थापकीय संपादक म्हणून घेतली. तिच्या अचानक राजीनाम्यामुळे तिचा निर्णय राजकीय दबावाचा परिणाम आहे का असा अनेकांचा कयास होता. +जानेवारी २०२० मध्ये, फेय डिसूझा यांनी फायरवॉर्क नावाच्या ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्मसह एक लहान व्हिडिओ क्लिप तयार आणि रिलीज करण्यासाठी एकत्र केले ज्यामध्ये ती वर्तमान बातम्यांबद्दल बोलते.[४] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3796.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6565b32fe7094985f04c535e4d69894db8ba9d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3796.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 44°50′N 11°37′E / 44.833°N 11.617°E / 44.833; 11.617 + +फेरारा (इटालियन: Ferrara, उच्चार ) हे इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या प्रदेशामधील एक शहर व ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. फेरारा शहर इटलीच्या उत्तर भागात बोलोन्याच्या ५० किमी ईशान्येस पो नदीच्या काठावर वसले आहे. +येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे व सांस्कृतिक महत्त्वामुळे फेरारा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3813.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9b0a337a59f0feaf07fa215a934a271c9c0db98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3813.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीरा स्याल (जून २७, इ.स. १९६१ - ) ही ब्रिटिश लेखिका व अभिनेत्री आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3815.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7a1a0cedc454499834d827822234452f76a89d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3815.txt @@ -0,0 +1,3 @@ +फेर्दीनां फॉश हे एक पहिल्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांचा सर्वोच्च. ओत-पीरेने प्रांतातील तार्ब गावी एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म. तत्कालीन कॅथलिकविरोधी वातावरणामुळे त्याच्या व्यावसायिक प्रगतीत अडथळे आले. शालेय शिक्षणानंतर १८७० सालच्या ⇨ फ्रँको–प्रशियन (जर्मन) युद्धाच्या वेळी फ्रेंच पायदळात तो भरती झाला व पुढे १८७३ मध्ये फ्रेंच तोफखान्यात अधिकारी बनला. १८९५ ते १९०० या काळात एकॉल द गॅर या सैनिकी विद्यालयात प्राध्यापक असताना अभिजात युद्धतंत्रज्ञ म्हणून त्याचा लौकिक झाला. १९०३ मध्ये त्याचा दे प्रँसीप दला गॅर हा युद्धतंत्रावरील सैद्धांतिक विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध झाला. + +या ग्रंथात त्याने सैन्याच्या मनोधैर्याचा विचार प्रभावीपणे मांडला होता. या ग्रंथाखेरीज त्याचा दला काँद्युईत दला गॅर हा युद्धशास्त्रावरील ग्रंथही अभ्यासनीय आहे. रायफल आणि मशिनगन या अस्त्रांमुळे पायदळाचे आक्रमकबळ दुर्दम्य असते, असे त्यास वाटे. सेनेने सतत आक्रमणशील असावे, या तत्त्वाचा पुरस्कार तो आवर्जून करी पण दुर्दैवाने महायुद्धाच्या आरंभीच्या महिन्यांतच फ्रेंच सैन्याची फार हानी झाली व त्याच्या या तंत्रांतील त्रुटी उघड झाल्या. फेरविचारांती त्याने पुढे त्यांत योग्य ते बदल केले. तत्कालीन फ्रेंच सर सेनापती जे. जे. सी. झॉफ्र याने फॉशची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यास नवव्या सेनेचे सेनापतिपद दिले. १९१६ साली त्याच्या डावपेचांमुळे दोस्तराष्ट्रांच्या कोलमडू लागलेल्या इटलीतील सैनिक-आघाडीला स्थैर्य मिळाले. १९१७ साली रशिया जर्मनीला शरण गेल्यामुळे व १९१८ च्या प्रारंभी जर्मनांनी जोरदार चढाई केल्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. दोस्तराष्ट्रांच्या सैनिकी कारवायांचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असावे, असे ब्रिटिश सेनापती डग्‍लस हेग याने फ्रेंच पंतप्रधान ⇨ झॉर्झ क्लेमांसो व ब्रिटिश पंतप्रधान लॉइड-जॉर्ज यांना सुचविले. त्यामुळे फॉशला सर्वोच्च म्हणून नेमण्यात आले. फॉशने जर्मन चढाईस पायबंद घातला. जर्मनीची पीछेहाट सुरू झाली. फॉशने जर्मन सेनेच्या सर्व आघाड्यांवर प्रतिहल्‍ले चढवून दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून दिला. फ्रान्स, पोलंड व ब्रिटन या देशांनी त्यास मार्शलचा हुद्दा दिला, तर फ्रेंच अकादमीने त्यास सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. पॅरिस येथे त्याचे निधन झाले. लंडनमधील व्हिक्टोरिया रेल्वे स्थानकाजवळ (येथूनच १९१४-१८ या कालात लाखो ब्रिटिश सैनिक फ्रान्सच्या रणांगणावर गेले होते.) त्याचा पुतळा उभारण्यात आला. विशेष म्हणजे पुतळा ज्या भूभागावर उभा आहे, तो भूभाग फ्रेंच राष्ट्राच्या ताब्यात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3820.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..342edc655bab1bfda85cf13cf8376bd3fac252bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3820.txt @@ -0,0 +1,77 @@ +फर्नांदो अलोन्सो (देवनागरी लेखनभेद: फेर्नांदो अलोन्सो ; स्पॅनिश: Fernando Alonso ;) (जुलै २९, इ.स. १९८१ - हयात) हा स्पॅनिश फॉर्म्युला १ चालक आहे. त्याने आजवर दोन वेळा फॉर्म्युला वन शर्यती जिंकल्या असून, अशी शर्यत जिंकणारा तो आजवरचा सर्वांत तरुण चालक आहे (२४ वर्ष, ५८ दिवस). फेलिपी मासा याच्यासोबत तो सध्या स्कुदेरिआ फेरारी संघाचे प्रतिनिधित्व करतो. +* सद्य हंगाम. +* सद्य हंगाम. +† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले. + + +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3888.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640f12f4557d12f65114ad6b4232f9f0901cb347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3888.txt @@ -0,0 +1,3 @@ +फैझाबाद ( फारसी: فيض آباد ) हे ईशान्य अफगाणिस्तानातील एक शहर आहे, हे बदखशान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे ३९,५५५ आहे. . +फैझाबाद हे पामीर प्रदेशाचे मुख्य व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कोकचा नदीच्या काठावर वसलेले आहे. फैझाबाद विमानतळ या शहराचा मुख्य विमानतळ आहे. [२] [३] +या शहराला १६८० पर्यंत या शहराला जाउझ गन असे नाव होते. हे या भागातील मुबलक अनेक अक्रोडाच्या झाडांमुळे होते. या प्रदेशाची इस्लामीकरण झाल्यावर याला फैझाबाद नाव देण्यात आले. येथे पैगंबर मुहम्मद यांचा झगा आहे.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3897.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8597ba326a4097a6a4d9408178fd7088b02a063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3897.txt @@ -0,0 +1,8 @@ +फैय्याज (जन्म : ५ जानेवारी, इ.स. १९४८) या नावाने ओळखली जाणारी फैय्याज इमाम शेख ही एक नामवंत मराठी नाट्य-अभिनेत्री आणि गायिका आहे. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. +इ.स. १९६६पासून त्या मराठी नाटकांत कामे करीत आहेत. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले. +फैय्याज यांनी गद्य नाटके, संगीत नाटके, पार्श्वगायन, काव्यवाचन, संगीत शिक्षण, हिंदी-मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द करणाऱ्या नाट्यकलावंतांला मिळणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. +फैय्याज यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाट्यसंगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाट्य-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येत तेव्हा तेव्हा त्या फैय्याज यांना गाणे शिकवीत. +‘अश्रूंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंतच्या नाटकांत फैय्याज यांच्या भूमिका आहेत. . ‘कट्यार’मधील झरीना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. +दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पंडित सी.आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. २०१०सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन फैय्याज यांच्या हस्ते झाले होते. आजही (इ.स.२०१४) त्या त्याच तडफेने कला क्षेत्रात कार्यरत आहेत. +‘एक उनाड दिवस’, ‘दायरे’, ‘पैंजण’, ‘महानंदा’, ‘वजीर’, या हिंदी-मराठी चित्रपटांत फैय्याज यांनी काम केले आहे. +फैय्याज यांची काही स्मरणीय गाणी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3914.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efe8c36ffa44e6a8d0be869ededfa3f4c2d8bd32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3914.txt @@ -0,0 +1,3 @@ +फॉक काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फॉक काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3916.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a48322baa186ee84365aeb8d9386020a3f31171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3916.txt @@ -0,0 +1,3 @@ +फॉकनर काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॉनवे येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१३,२३७ इतकी होती.[२] +फॉकनर काउंटीची रचना १२ एप्रिल, १८७३ रोजी झाली. या काउंटीला सॅनफर्ड सी. फॉकनरचे नाव दिलेले आहे. फॉकनर काउंटी लिटल रॉक-नॉर्थ लिटल रॉक-कॉनवे महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3931.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce2dae5241bcfc41195ac7ec6c2c802629f1713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3931.txt @@ -0,0 +1,12 @@ +फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. +लेखक : - पंकज कालुवाला +प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे +पृष्ठे....134 किंमत .......200/- +मनिष्यं समाजशील प्राणी बनल्यानंतर गुन्ह्यांविषयी अधिकाधिक सजग होऊ लागला किंवा दुसऱ्या शब्दात समाजाबरोबरच गुन्हेगारीचाही उदय झाला. कारण समाजाचे आपले म्हणून नियम असतात अन् ते मोडण्याचे प्रयत्न करणारे गुन्हेगार अशी सर्वसाधारण ढोबळ अशी गुन्हेगारीची व्याख्या आहे. माणूस जितका विकसित होत गेला तितकाच गुन्हेगारीचाही विकास होत गेला हे वास्तव आहे. ती रोखण्यासाठी आता फॉरेन्सिक विज्ञानाची मदत घेतली जाते. गुन्हेशोधनासाठी ही शाखा तपासयंत्रणांना बहुमोल मदत करत असली तरी तिचं यश हे नेहमीच संमिश्रं स्वरूपाचे आहे. कारण तिच्या यशावर गुन्हेगारांची हुशारी, तपासयंत्रणांची कार्यक्षमता, कायदा व न्यायदानाच्या पद्धती इत्यादी बाबींचाही प्रभाव पडत असतो. या सगळ्या बाबी फॉरेन्सिक विज्ञानापुढे आव्हान उभे करत असतात. अशाच काही निवडक घटनांचा धांडोळा येथे घेण्यात आला आहे. +1) नेपोलियन बोनपार्टचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? +2) अल्फ्रेड पॅकर – कोलोरॅडोचा नरभक्षक ? +3) डोनल्ड मेरेट्ट- गुन्हेगाराला गुन्हेशास्त्राची मदत +4) विलियम लॅंकेस्टरला मिळालेला अजब न्याय +5) सर हेन्री ब्रॉटन यांच्यावरील खून खटला +6) बोटाचा ठसा आणि मरिग्नी +7) डॉ. सॅम्युएल शेपर्ड्वरील तीन खटले diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3944.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e81774ddfc925f04572f8c24a8086060320258c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3944.txt @@ -0,0 +1,45 @@ +श्टायरमार्क ग्रांप्री: २ (२०२०-२०२१) +अझरबैजान ग्रांप्री: ६ (२०१७-२०१९, २०२१-२०२३) +साखिर ग्रांप्री: १ (२०२०) +साओ पाउलो ग्रांप्री: ३ (२०२१-२०२३) +स्विस ग्रांप्री: १ (१९८२) +युरोपियन ग्रांप्री: १२ (१९८४, १९९५-१९९६, १९९९-२००७) +लक्झेंबर्ग ग्रांप्री: २ (१९९७-१९९८) +आयफेल ग्रांप्री: १ (२०२०) +पेस्कारा ग्रांप्री: १ (१९५७) +सान मरिनो ग्रांप्री: २६ (१९८१-२००६) +टस्कन ग्रांप्री: १ (२०२०) +एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री: ४ (२०२०-२०२२, २०२४)* +पॅसिफिक ग्रांप्री: २ (१९९४-१९९५) +मेक्सिको सिटी ग्रांप्री: ३ (२०२१-२०२३) + +युरोपियन ग्रांप्री: ७ (१९९४, १९९७, २००८-२०१२) +युरोपियन ग्रांप्री, ३ (१९८३, १९८५, १९९३) +७०वा वर्धापन ग्रांप्री, १ (२०२०) +युनायटेड स्टेट्स ग्रांप्री, ४४ (१९५९-१९८०, १९८९-१९९१, २०००-२००७, २०१२-२०१९, २०२१-२०२३) +युनायटेड स्टेट्स ग्रांप्री पश्चिम, ८ (१९७६-१९८३) +सीझरस पॅलेस ग्रांप्री, २ (१९८१-१९८२) +डेट्रॉईट ग्रांप्री, ७ (१९८२-१९८८) +डॅलस ग्रांप्री, १ (१९८४) +मायामी ग्रांप्री, ३ (२०२२-२०२४) +लास व्हेगस ग्रांप्री, १ (२०२३) +अझरबैजान ग्रांप्री, ६ (२०१७-२०१९, २०२१-२०२३)* +युरोपियन ग्रांप्री, २ (१९८३, १९८५) +स्विस ग्रांप्री, १ (१९८२) +मेक्सिको सिटी ग्रांप्री, ३ (२०२१-२०२३)* +सान मरिनो ग्रांप्री, २६ (१९८१-२००६) +एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री, ४ (२०२०-२०२२, २०२४)* +युनायटेड स्टेट्स ग्रांप्री, ८ (२०००-२००७) +साओ पाउलो ग्रांप्री, ३ (२०२१-२०२३)* +युरोपियन ग्रांप्री, २ (१९९४, १९९७) +युरोपियन ग्रांप्री, १२ (१९८४, १९९५-१९९६, १९९९-२००७) +लक्झेंबर्ग ग्रांप्री, २ (१९९७-१९९८) +आयफेल ग्रांप्री, १ (२०२०) +साखिर ग्रांप्री, १ (२०२०) +७०वा वर्धापन ग्रांप्री, १ (२०२०) +श्टायरमार्क ग्रांप्री, २ (२०२०-२०२१) +२०२३ + जर्मनी + स्पेन + अझरबैजान + फ्रांस diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3983.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9f6e0ab6a02aec8692f1a57f1cadf9c6bd84ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3983.txt @@ -0,0 +1,8 @@ + फोंड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3996.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62fc6d0f61f854bc16cd28093b61d52e18c3db2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_3996.txt @@ -0,0 +1 @@ +फोटियोस अपोस्टोलेलिस तथा फोटिस कॉंटोग्लू (ग्रीक:Φώτιος Αποστολέλης तथा Φώτιος Αποστολέλης; ८ नोव्हेंबर, इ.स. १८९५:ऐवाली, ग्रीस - १३ जुलै, इ.स. १९६५:अथेन्स, ग्रीस) हा ग्रीक लेखक आणि चित्रकार होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4001.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6a8590bb91dc4d0701f12d059fc2ed9b7dc378 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4001.txt @@ -0,0 +1,16 @@ +प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करून टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे. +छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते. +छायाचित्रण ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते. +कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे. +पूर्वी यासाठी फिल्म कॅमेऱ्याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत. +उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो. +छायाचित्रण ही आपला इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आहे. +सध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये कॅमेरा हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने लाइट ही खूप महत्त्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरुद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही. + +फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवादव्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे. + + +[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी]] +http://www.floridamemory.com/photographiccollection/photo_exhibits/photographic-processes/ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4005.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4005.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4018.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eefd3e23e85fa9e005fcc7d6a194eaeb19b8ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4018.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळाचा उपग्रह. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4043.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2018d60562562ab69c40b3e2fad497e2b60ca686 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4043.txt @@ -0,0 +1,2 @@ +फोर्ट कॉलिन्स अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. केशेला पूडर नदीच्या काठी वसलेले हे गाव लारिमर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ५७ मैल (९२ किमी) असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३,९८६ आहे. त्यानुसार हे शहर कॉलोराडोत चौथ्या क्रमांकावर आहे. +येथे कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य आवार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_406.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b64ada6ec7bbe64dc865891497095562ebbf4d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_406.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 45°31′12″N 122°40′55″W / 45.52000°N 122.68194°W / 45.52000; -122.68194 + +पोर्टलंड हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील २९वे मोठे शहर आहे. पोर्टलंड हे अमेरिकेतील सर्वात हरित तर जगातील दुसरे सर्वात हरित शहर म्हणुन ओळखले जाते. +पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_409.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e4ee64c5583642e128878bd166ba02fa67e0df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_409.txt @@ -0,0 +1,4 @@ +पोर्टलँड गुलाब महोत्सव हा अमेरिकेच्या पोर्टलँड शहरात आयोजित होणारा वार्षिक उत्सव आहे. जून महिन्यात होणाऱ्या या उत्सवाचे आयोजन पोर्टलँड गुलाब महोत्सव असोसिएशन ही स्वयंसेवी ना-नफा संस्था करते. यात तीन स्वतंत्र परेडचा समावेश असतो. [१] +१८८८ मध्ये जॉर्जियाना पिटॉक आणि मित्रांनी स्थापन केलेल्या पोर्टलँड रोज सोसायटीची सुरुवात पिटॉकच्या बागेत घरामागील गुलाब शोने झाली. वार्षिक निधी उभारणी कार्यक्रमाने दरवर्षी अधिक गर्दी केली. १९०४ पर्यंत, रोझ सोसायटी त्याच्या वार्षिक रोझ शोचे आयोजन करत होती, तसेच परेड आणि तमाशासह अतिरिक्त उत्सवांचे आयोजन करत होते. १९०५ मध्ये, पोर्टलँडचे महापौर हॅरी लेन यांना लुईस आणि क्लार्क प्रदर्शनातील त्यांच्या उत्साहपूर्ण भाषणासाठी लक्षात ठेवले जाते, त्यांनी मोठ्या जनसमुदायाला सांगितले की पोर्टलँडला "गुलाबांचा उत्सव" आवश्यक आहे. १९०६ मध्ये पोर्टलँड येथे पहिला रोझ फेस्टिव्हल आणि फ्लॉवर परेड आयोजित करण्यात आली होती. पिटॉक आणि शेजाऱ्यांनी परेडसाठी फ्लोट्स, वॅगन, लोक आणि घोडे सजवण्यासाठी त्यांच्या बागांमधून गुलाबांचे योगदान दिले. १९०७ मध्ये, पोर्टलँडने पहिला अधिकृत पोर्टलँड रोझ फेस्टिव्हल आयोजित केला. +ग्रँड फ्लोरल परेड हा उत्सवाचा केंद्रबिंदू आहे आणि युनायटेड स्टेट्समधील रोझेस परेडच्या स्पर्धेनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्व-फुलांची परेड आहे . ५,००,००० पेक्षा जास्त प्रेक्षक मार्गावर रांगेत उभे आहेत, ज्यामुळे ही फ्लॉवर परेड ओरेगॉनमधील सर्वात मोठी एक दिवसीय प्रेक्षक कार्यक्रम बनते. १९०७ मध्ये पहिल्या परेडला रोझ कार्निव्हल असे संबोधले गेले, परंतु कालांतराने ते रोझ फेस्टिव्हल परेड आणि नंतर ग्रँड फ्लोरल परेड म्हणून ओळखले जाऊ लागले. १९०७ च्या उत्सवामध्ये प्रकाशित फ्लोट्ससह "इलेक्ट्रिक परेड" देखील समाविष्ट होती; हे मेरीखाना परेडमध्ये विकसित झाले परंतु दोन-हंगामी निलंबनानंतर १९७६ मध्ये स्टारलाईट परेड असे नामकरण करण्यात आले. +१९३० पासून परिसरातील प्रत्येक शाळेतील हायस्कूल वरिष्ठांच्या कोर्टातून राणीची निवड करण्यात आली आहे. [१] [२] दरबारातील सदस्यांना राजकन्या म्हणतात. १९९७ पासून सुरू झालेल्या थोड्या काळासाठी त्यांना अधिकृतपणे "राजदूत" असे संबोधण्यात आले, [३] परंतु जानेवारी २००७ मध्ये "राजकन्या" हा शब्द पुन्हा स्थापित करण्यात आला. १४ सदस्यांच्या "रॉयल्टी" ला महाविद्यालयीन शिष्यवृत्ती दिली जाते. २००९ पासून, रोझ फेस्टिव्हल फाउंडेशनने पोर्टलँड शहराच्या हद्दीबाहेरील शाळेतील एखाद्यासाठी कोर्टवर एक जागा उघडली. [४] प्रिन्सेससाठी ड्रायव्हर आहेत, जे प्रत्येक हायस्कूलमधून निवडले जातात. पहिला आफ्रिकन अमेरिकन ड्रायव्हर (एस्कॉर्ट) १९५४ मध्ये बेन्सन हायस्कूलमधील सॅम व्हिटनी होता. लहान मुलांवर केंद्रित असलेला ज्युनियर रोझ फेस्टिव्हल, शहराच्या पूर्वेकडील, १९२१ मध्ये अनधिकृतपणे सुरू झाला आणि त्यात स्वतःची परेड आणि कनिष्ठ न्यायालयाचा समावेश होता. १९३६ मध्ये हा रोझ फेस्टिव्हलचा अधिकृत भाग बनला. [१] महोत्सवाची वार्षिक ज्युनियर परेड शहरातील हॉलीवूड जिल्ह्यात होते. ज्युनियर परेड जवळपास १०,००० मुलांचा समावेश असलेल्या इव्हेंटमध्ये वाढली आहे, ज्यामुळे ती मुलांसाठी जगातील सर्वात मोठी परेड बनली आहे. [५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4095.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d9125fde5f419a776b572736201f1aae5dd781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4095.txt @@ -0,0 +1,29 @@ +फोर्मोसा (स्पॅनिश: Provincia de Formosa) हा आर्जेन्टिना देशाच्या उत्तर भागातील पेराग्वे देशाच्या सीमेवरील एक प्रांत आहे. + + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4114.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ff8249d9aad83e37d5bfabacada429c65886d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4114.txt @@ -0,0 +1 @@ +फौझी खलीली (१० ऑक्टोबर, १९५८:मद्रास, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८२ दरम्यान ८ महिला कसोटी आणि १३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4157.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c2471b402a76e61e9c3e74ce09a350cfadb577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4157.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रॅंक एडवर्ड वूली (मे २७, इ.स. १८८७:टनब्रिज, केंट, इंग्लंड - ऑक्टोबर १८, इ.स. १९७८:चेस्टर, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा) हा  इंग्लंडकडून ६४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4164.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e3e3df89dc55d1b2006eb586987bb93d7a41fa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4164.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रॅंक जेम्स मार्शल (१० ऑगस्ट, १८७७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ९ नोव्हेंबर, १९४४) हा एक अमेरिकन बुद्धिबळपटू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4165.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4165.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4193.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4193.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4198.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4198.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4206.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4206.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4210.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f257cdd1a4dfee2dc73cafe402f0b2ea137e36e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4210.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रॅंक लॉईड राइट (जून ८, इ.स. १८६७ - एप्रिल ९, इ.स. १९५९) हा एक अमेरिकन स्थापत्यकार होता. राइटने आपल्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक वास्तू विकसित केल्या ज्यांमध्ये अनेक शाळा, कचेऱ्या, संग्रहालये, हॉटेल व गगनचुंबी इमरती होत्या. इ.स. १९९१ साली अमेरिकन स्थापत्यकार संस्थेने त्याला आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन स्थापत्यकार असे गौरवले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4213.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7be054665103077ce352eaf1b66a43310845a960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4213.txt @@ -0,0 +1,26 @@ +फ्रँक विल्चेक हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4215.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c2471b402a76e61e9c3e74ce09a350cfadb577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4215.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रॅंक एडवर्ड वूली (मे २७, इ.स. १८८७:टनब्रिज, केंट, इंग्लंड - ऑक्टोबर १८, इ.स. १९७८:चेस्टर, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा) हा  इंग्लंडकडून ६४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_423.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be1b52157457f3b4ca2c0055add0113c2807ab66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_423.txt @@ -0,0 +1,3 @@ +पोर्टेज काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पोर्टेज काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4233.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68845919ebc054caff35a6fb79c25888d375268d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4233.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 38°11′50″N 84°51′47″W / 38.19722°N 84.86306°W / 38.19722; -84.86306 + +फ्रॅंकफोर्ट ही अमेरिका देशाच्या केंटकी राज्याची राजधानी आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात केंटकी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली केवळ २७ हजार लोकसंख्या असणारे फ्रॅंकफोर्ट अमेरिकेमधील पाचवे सर्वात लहान राजधानीचे शहर आहे. + + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4238.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8631e6e400c53736cdbec94bafa53e42ecdf008 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4238.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रँकलिन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4241.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c35848e5bd738e1d0c5c971755141e9e2199ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4241.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रँकलिन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4245.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49d60bd20665bcfd6abb3aba3b7ec1e544cf3baf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4245.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रँकलिन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4265.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97a999aac743c1ec5009fbc3039fc889b1778e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4265.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रँकलिन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट आल्बान्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,९४६ इतकी होती.[२] +फ्रँकलिन काउंटीची रचना १७९२ मध्ये झाली.[३][४] या काउंटीला अमेरिकेचे मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे नाव दिलेले आहे. +फ्रँकलिन काउंटी बर्लिंग्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4267.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f3397515fbf26235d1717e4354421dea557404e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4267.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यू यॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले. +इ.स. १९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील न्यूयोर्क राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. +१९२९ च्या महामंदी नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4275.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..237ec503b789101a8122b08158a2d01e4bca4879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4275.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांस्वा बारे-सिनूसी यांना लुक मॉंतेग्नियर यांच्या समवेत एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4277.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88b132c8d926fa05f740bea72c3ac4648712fe46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4277.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रँको फ्रँक सुबुगा (२८ ऑगस्ट, १९८०:कंपाला, युगांडा - ) हा  युगांडाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4286.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..920bb772d40630c372bfc3147912f0b1a2cba032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4286.txt @@ -0,0 +1,9 @@ +फ्रंटियर एरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतात. रिपब्लिक एरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन, कॅन्सस सिटी, मिसूरी आणि ओमाहा, नेब्रास्का येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एरलाइन्स ही रॉकी माउंटन प्रदेशात ग्रेट लेक्स एरलाइन्स या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, मेक्सिको आणि कोस्टा रिका देशांतून एकूण ८३ शहरांना उड्डाणे करतात.[१] +डेन्व्हरमध्ये इ.स. १९५० ते इ.स. १९८६ दरम्यान फ्रंटियर एरलाइन्स याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. इ.स. १९९३मध्ये कॉंटिनेन्टल एरलाइन्सने आपले डेन्व्हरच्या स्टेपलटन विमानतळावरील हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येउन फ्रंटियर एरलाइन्स याच नावाने फेब्रुवारी ८, इ.स. १९९४ रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.[२] जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे बोईंग ७३७ विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एरबसशी संधान बांधले व एरबस ए३१९ विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टिव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर एरबस ए३१८ प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.[३] एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एारबस विमाने वापरण्यास सुरुवात केली. +कंपनीची वाढ होत असताना फ्रंटियरने आपल्या विभागांची पुनर्रचना करण्याचे ठरवले. एप्रिल ३, २००६ रोजी फ्रंटियर एरलाइन्स होल्डिंग्स, इं या कंपनीची डेलावेर राज्यात स्थापना करण्यात आली. डेलावेरमध्ये असलेल्या व्यावसायिक करांतील सवलतींचा लाभ घेण्यासाठी ही चाल होती. फ्रंटियर एरलाइन्सची सगळी मालमत्ता या नवीन कंपनीच्या हवाली करण्यात आली. कंपनीचे मुख्यालय मात्र डेन्व्हरमध्येच ठेवण्यात आले.[४] नोव्हेंबर २००६ मध्ये फ्रंटियरने एरट्रान एरवेजशी संधान बांधले व दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना त्यांचे फ्रीक्वेंट फ्लायर मैल[मराठी शब्द सुचवा] एकमेकांवर वापरता येण्याची सोय केली. ज्याठिकाणी फ्रंटियरची सेवा नव्हती तेथे जाणाऱ्या प्रवाशांना एरट्रानकडून तिकिटे काढण्यास उत्साहित करणे सुरू केले. एरट्राननेही फ्रंटियरसाठी ही सेवा उपलब्ध केली. ही सेवा जुलै २०१० मध्ये मिडवेस्ट एरलाइन्स फ्रंटियरमध्ये विलीन होईपर्यंत सुरू होती. जानेवारी २४, २००७ रोजी अमेरिकेच्या सरकारच्या वाहतूक खात्याने फ्रंटियरला मोठी विमानकंपनी म्हणून मान्यता दिली.[५] मार्च २००७मध्ये फ्रंटियरने होरायझन एरशी असलेले फ्रंटियर एक्सप्रेस या नावाखाली जवळची प्रवासी सेवा पुरवण्याचे कंत्राट हळूहळू कमी करणे सुरू करून तेथे रिपब्लिक एरलाइन्सला कंत्राट देणे सुरू केले. नोव्हेंबर ३०, २००७ रोजी रिपब्लिक एरलाइन्सने ही सगळी कंत्राटे हस्तगत केली. त्यानंतर पाचच महिन्यात एप्रिल २००८मध्ये रिपब्लिक एरलाइन्सने फ्रंटियर एरलाइन्सशी केलेले कंत्राट बंद केले व जून २३ पासून आपली सेवा फ्रंटियरला देणे बंद केले.[६] +फ्रंटियर एरलाइन्सच्या मार्गांची रचना हब-अँड-स्पोक[मराठी शब्द सुचवा] तत्त्वावर आधारित आहे. यात बव्हंश मार्ग डेन्व्हरसारख्या मोठ्या विमानतळाहून सुरू होतात आणि संपतात. यामुळे कोणत्याही शहरातून इतर शहरास डेन्व्हर, मिलवॉकी, इ. विमानतळापर्यंत एक आणि मग तेथून इच्छित शहरापर्यंत दुसरी अशा दोन धावांमध्ये पोचता येते. या प्रकारच्या मार्गरचनेमुळे विमानांचा सांभाळ व निगा करणे सुद्धा सोपे जाते कारण बहुतेक सगळी विमाने रोज नाही तरी दर काही दिवसांनी मोठ्या तळावर येत असतात. + +फ्रंटियर एरलाइन्सने आपल्या ताफ्यात फक्त एरबसची विमाने राखली आहेत. +[७] +फ्रंटियर एरलाइन्स ही एरबस ए३१८ प्रकारचे विमान वापरणारी पहिली कंपनी होती. या प्रकारची फ्रंटियरची सगळी विमाने आता निवृत्त झाली आहेत. पैकी दहा विमानांतून सुटे भाग काढून ते दुसऱ्या विमानांत वापरण्यात आले किंवा इतर कंपन्यांना विकण्यात आले होते. +[११] २०११मध्ये रिपब्लिक एारवेज होल्डिंग्स या फ्रंटियर एरलाइन्सच्या पालक कंपनीने ६० एरबस ए३२०निओ आणि २० एरबस ए३१९निओ प्रकारच्या विमानांची मागणी नोंदवली.[१२] २०१४मध्ये ९ ए३२१निओ प्रकारच्या विमानांचीही मागणी नोंदवली गेली.[१३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4287.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e65e95e307f23c7b6f0afb1560c9ccb16a07ce2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4287.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रंटियर काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4299.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f64b5a3cc84718d6f3c83033c2fc4da64fea89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4299.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांकफुर्ट आम माइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (जर्मन: Flughafen Frankfurt am Main) (आहसंवि: FRA, आप्रविको: EDDF) हा जर्मनी देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ हेसेन राज्यामधील फ्रांकफुर्ट शहरामध्ये स्थित आहे. ८ जुलै १९३६ रोजी बांधून पूर्ण झालेला व २०१२ साली सुमारे ५.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा फ्रांकफुर्ट हा लंडन हीथ्रो व पॅरिस चार्ल्स दि गॉलखालोखाल युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या तर जगात दहाव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +फ्रांकफुर्ट विमानतळापासून रोज १,३६५ उड्डाणे १११ देशांतील २७५ शहरांस जातात. पैकी ७७% उड्डाणे लुफ्तांसा आणि स्टार अलायन्सच्या इतर कंपन्यांची असतात.[१] जर्मनीतून जाणाऱ्या आंतरखंडीय उड्डाणांपैकी ६५% उड्डाणे या विमानतळावरून होतात.[१] +२०११ च्या शेवटापर्यंत फ्रांकफुर्ट विमानतळावर तीन धावपट्ट्या वापरात होत्या. येथील वाहतूकीच्या मानाने धावपट्ट्या कमी पडत असल्याने छोट्या विमानवाहतूक कंपन्या फ्रांकफुर्ट विमानतळ वापरत नव्हत्या. अशा कंपन्यांची उड्डाणे शहरापासून १२० किमी दूर असलेल्या फ्रांकफुर्ट-हान विमानतळावरून होत असे. २०१२मध्ये चौथी धावपट्टी सुरू झाल्यानंतर यातील काही कंपन्या आता येथे उड्डाणे आणू लागल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4305.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffc1cb587f73971fd4fbddaddbecc826ae3cd4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4305.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_431.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6087fff0ff85bcd03557bf309b378aa523efc50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_431.txt @@ -0,0 +1,11 @@ + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +पोर्तुगाल हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +पोर्तुगाल हा स्पेनचा एक भाग होता.नंतर तो स्वतंत्र झाला. +पोर्तुगालच्या उत्तर व पूर्वेस स्पेन तर पश्चिम व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4323.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1317a9c1cd6087877984c909462895c563a181d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4323.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांश-कोंते (फ्रेंच: Franche-Comté) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्व भागात स्वित्झर्लंड देशाच्या सीमेवर वसला आहे. बेझॉंसों ही फ्रांश-कोंते प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. +फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4331.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11d23f97095bcd07c5604fdfe9fcc74d4285dbe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4331.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांस महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात फ्रांसचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4355.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efa861c769bb5cd8af264cddaf24990e1b93d608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4355.txt @@ -0,0 +1 @@ +नववा चार्ल्स (फ्रेंच उच्चार: नववा शार्ल ; फ्रेंच: Charles IX de France, शार्ल ०९ द फ्रॉंस) (२७ जून १५५० - ३० मे १५७४) हा इ.स. १५६० ते इ.स. १५७४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_436.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61720c300a826dc4f7a0cb0e0586b3d0a6864dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_436.txt @@ -0,0 +1 @@ +पोर्तुगीज राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोर्तुगाल देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_437.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d3477c954b65ce46814f2026d7c5613b40c226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_437.txt @@ -0,0 +1 @@ +पोर्तुगाल फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Selecção Nacional de Futebol de Portugal) हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4379.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0e29faa53d7216623866f65bc274efc7267fd2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4379.txt @@ -0,0 +1,3 @@ + +फ्रान्सिस आर्सेन्टिव्ह (18 जानेवारी, 1958 - 24 मे 1998) 22 मे, 1998 रोजी ऑक्सिजनच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी अमेरिकेतील पहिली महिला ठरली. [१] मात्र शिखर सर करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. चुका उधृत करा: चुकीचा कोड; रिकाम्या संदर्भांना नाव असणे गरजेचे आहे +फ्रान्सिस यार्ब्रो डिस्टेफॅनो-अर्सेन्टिव्हचा जन्म जन्म 18 जानेवारी 1958 रोजी हवाईच्या होनोलुलू येथे जॉन यार्ब्रो आणि मरिना गॅरेट यांच्या पोटी झाला. वयाच्या सहाव्या वर्षी तिचे वडील तिला कॉलोराडो पर्वतावर घेऊन गेले. मोठी झाल्यावर तिने स्वित्झर्लंडमधील अमेरिकन स्कूल आणि अमेरिकेतल्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. शेवटी लुइसविले विद्यापीठातून पदवीधर होण्यापूर्वी आर्सेन्टिव्ह स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत घेतले . त्यानंतर तिला फीनिक्समधील इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्टमधून पदव्युत्तर पदवी मिळाली. आर्सेन्टिव्हने 1980च्या दशकात कॉलोराडोच्या टेलुरिडे येथे अकाउंटंट म्हणून काम केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4397.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5be53731113ce9dedac69a96facfcdf1aac4be8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4397.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला फ्रांस्वा (१२ सप्टेंबर १४९४ - ३१ मार्च १५४७) हा इ.स. १५१५ ते इ.स. १५४७ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_44.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_44.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a65d8291b3027566ea42f00a2606c563c358449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_44.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे. +ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स.च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4406.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4406.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4412.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4412.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4425.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4333760e642247a17a6e46744f78b1d54ce35f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4425.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रान्सिस्को पास्कासियो मोरेनो (मे ३१, इ.स. १८५२ - नोव्हेंबर २२, इ.स. १९१९) हा आर्जेन्टिनियन अन्वेषक होता. याने पॅटेगॉनिया प्रदेशाच्या विकासात मोठे योगदान दिले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4429.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9acc3d20a6dd2bffee2ccfda88b93d61968311d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4429.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला. +गृहयुद्धामध्ये नाझी जर्मनी व इटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते. +फ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4458.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2d53d5341cf8d6740d7356163d1a4fa19c2b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4458.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रांस्वा अबांदा (५ फेब्रुवारी, १९९७:मॉंत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) ही कॅनडाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. +अबांदाचे आईवडील कामेरूनचे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4472.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b958dbb22d6d3009609dd4aedee2eae2351ce536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4472.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4481.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e56d7480646aee00515cdbefa19695978137e90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4481.txt @@ -0,0 +1 @@ +फ्राउनहोफर गेजेलशाफ्ट ही जर्मनीतील संशोधन संस्था आहे. या कंपनीद्वारे जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी ५८ शाखांमध्ये संशोधन चालते. प्रत्येक शाखेचे संशोधन ठराविक विषयावर असते. फ्राउनहॉफरचे संशोधन मुख्यत्वे तांत्रिक स्वरूपाचे असून विविध उद्योग क्षेत्रांशी निगडित तंत्रज्ञान सुधारणांवर जास्त भर असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4490.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3860c890299d051f5342ead87f9816856773dfcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4490.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +फ्रान्स राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्रान्स देशाचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_450.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..845c8b44bb54065952c1674ac2cf58959d0d89d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_450.txt @@ -0,0 +1 @@ +होआव पहिला तथा जॉन पहिला (एप्रिल ११, इ.स. १३५७:लिस्बाओ, पोर्तुगाल - ऑगस्ट १४, इ.स. १४३३:लिस्बाओ, पोर्तुगाल) हा इ.स. १३८५-इ.स. १४३३ दरम्यान पोर्तुगालचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4514.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f018be3e8730992a9f24affcf5cb3ebf28e66a2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4514.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडिलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4519.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8956c84174d8a453c756d77224bcececb052b64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4519.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा फ्रांस्वा (१९ जानेवारी १५४४ - ५ डिसेंबर १५६०) हा इ.स. १५५९ ते इ.स. १५६० दरम्यान केवळ १८ महिने फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4542.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39bbe428d02db16ff08df17da85a56e39a23284e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4542.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रान्स देश १८ प्रदेशांमध्ये (Région) विभागला गेला आहे, ज्यापैकी १३ प्रदेश संलग्न आहेत (France métropolitaine, महानगर प्रदेश) तर उर्वरित ५ बाहरी (Régions d'Outre-mer, परकीय) प्रदेश आहेत. १९८२ ते २०१५ सालापर्यंत फ्रान्सचे २७ प्रदेश होते परंतु २०१६ साली ह्यांपैकी काही प्रदेशांचे एकत्रीकरण करून नवे प्रदेश बनवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_455.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb3c49859296dc863c43593ac1709297d22ad60d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_455.txt @@ -0,0 +1,11 @@ +फ्रांसच्या शाही सैनिकांनी नोव्हेंबर १८०७ च्या दुसऱ्या भागात पोर्तुगालवर आक्रमण केले. पोर्तुगीज शासनाकडे प्रतिकार करण्याची इच्छा नसल्याने पोर्तुगालवर फारसा रक्तपात न होता फ्रान्सने पोर्तुगाल जिंकला. +पोर्तुगाल  • माद्रिद  • ब्रुक  • वाल्दापेन्यास  • अल्कोलेआ  • काबेझॉन  • गेरोना  • ला रोमाना डिव्हिजनची सुटका  • झारागोझाचा वेढा  • गेरोनाचा वेढा  • मेदिना दे रियोसेको  • व्हालेन्सिया  • कादिझ बंदर  • बैलेन  • रोलिसा  • व्हिमैरो +पांकोर्बो  • व्हाल्मासेडा  • बर्गोस  • रोझेस  • एस्पिनोसा  • टुडेला  • सोमोसियेरा  • कार्दाद्यू  • मोलिन्स दि रे  • साहागुन  • बेनाव्हेंते  • झारागोझा (दुसरा वेढा)  • कास्तेलॉन  • मान्सिया  • कोरुना +व्हियाफ्रांका  • ब्रागा  • अमारांते  • लुगो  • पोर्तोची पहिली लढाई  • व्हिगो  • ग्रिहो  • पोर्तोची दुसरी लढाई  • सांतियागो  • सानपायो +उक्लेस  • मियाहादास  • येवेनेस  • सिउदाद-रेआल  • मेदेयीन  • आल्कांतारा  • तोराल्बा  • तालाव्हेरा  • आल्मोनासिद  • बान्योस  • तमामेस  • ओकान्या  • कार्पियो  • आल्बा दि तोर्मे  • कादिस  • मुर्सिया +कास्तेयो दे'एंपुरीस  • व्हाल्स (१)  • माँझोन  • गेरोना (३)  • आल्कान्यिझ  • मरिया  • बेल्चिते  • ओस्तालरिच (१)  • मोले  • व्हिच  • मान्रेसा  • लेरिदा  • सान क्विंतिन  • ला बिस्बाल  • तोर्तोसा  • व्हाल्स (२)  • तारागोना (१)  • सेर्व्हेरा  • फिगेरास  • सागुंतुम  • मासाने दे काब्रेनिस  • व्हालेन्सिया  • कास्ताया (१)  • कास्ताया (२)  • तारागोना (२)  • सांता एंग्रेसिया  • झारागोझा (३)  • ओर्दाल +1st Astorga  • 1st Ciudad Rodrigo  • Barquilla  • River Côa  • 1st Almeida  • Trant's raid  • Bussaco  • Torres Vedras  • Pombal  • Redinha  • Condeixa  • Casal Novo  • Foz d'Arunce  • Sabugal  • Fuentes de Onoro  • 2nd Almeida +कादिस  • Montellano  • Fuengirola  • Baza  • Barrosa  • Zujar  • 1st Bornos  • Tarifa  • 2nd Bornos +1st Badajoz (Gebora)  • 2nd Badajoz  • Campo Maior  • Úbeda  • Albuera  • Usagre  • 1st Arlabán  • Durán's action  • Cogorderos  • Riego de Ambrós  • Arroyo dos Molinos  • Tarifa  • Navas de Membrillo  • Orbigo  • Cerdagne (France)  • El Boden  • 2nd Ciudad Rodrigo  • Rocaforte  • Sangüesa  • 3rd Badajoz  • 2nd Arlabán  • Villagarcia  • Almarez  • Maguilla  • Salamanca  • Garcia Hernandez  • Guadalajara  • 2nd Astorga  • Majadahonda  • 1st Bilbao  • 2nd Bilbao  • Burgos  • Mañeru  • Villodrigo  • Venta del Pozo  • Tordesillas  • Tafalla +Vitoria  • 2nd Pancorbo  • 1st San Sebastián +Pyrenees Offensive (Maya  • Roncesvalles  • Lizasso  • Sorauren) Buenza  • 2nd San Sebastián  • San Marcial  • Bidassoa  • Pamplona  • Nivelle  • Nive  • Garris  • Orthez  • Toulouse  • बायोने diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4585.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09628deb50377e9b238fae70e021d0e5f2425f67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4585.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुद्ध योद्फा चुलालोक तथा फ्राफुत्तयोत्फा चुलालोक तथा राम पहिला (मार्च २०, इ.स. १७३७ - सप्टेंबर ७, इ.स. १८०९) सयामचा (आताचे थायलंड) राजा होता. +हा चक्री वंशाचा पहिला राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4586.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ebb4a065a6916e791f973a448600586f5159fb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4586.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रायडे कास्टेनी (२५ मार्च, १९८८:काडोमा, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करतो. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_462.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dc9fdd279a75bf42dae75cb06227afcde8f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_462.txt @@ -0,0 +1,11 @@ + +१९९८-९९ • +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4660.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57cbb68048133bb4dad113c665c3a11877692faa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4660.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रीडरीश हेर्मान शॉट्की (जुलै २४, इ.स. १८५१:बेर्सलाऊ, जर्मनी - ऑगस्ट १२, इ.स. १९३५:बर्लिन, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता. +याचा मुलगा वॉल्टर शॉट्की याने अर्धवाहकविज्ञानात मूलभूत काम केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4662.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7520fbd15c776d716918a44b9c7a39e60623a05f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4662.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्राफी हा एक क्रिकेट ट्रॉफी आहे जी गांधी-मंडेला कसोटी मालिकेच्या विजेत्याला दिली जाते, ही मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका यांमध्ये खेळली जाते.[१] हि मालिका सर्वात प्रथम २०१५ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा दरम्यान खेळली गेली होती. हि ट्रॉफी महात्मा गांधी अँड नेल्सन मेंडेला यांना समर्पित केली आहे, ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[२] +बीसीसीआय आणि क्रिकेट सौथ आफ्रिकाने जाहीर केले कि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या भविष्यातील द्विपक्षीय दौऱ्यांना महात्मा गांधी-नेल्सन मेंडेला मालिका असे नाव दिले जाईल.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4663.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e5c34ddddd0975c398ef735893b744f4782856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4663.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्रीबीएसडी ही मोफत आणि युनिक्ससारखी संगणक प्रणाली आहे. फ्रीबीएसडी ही एटी&टी युनिक्स आणि बीएसडी युनिक्स पासून बनलेली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_468.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60f72412de8d34ced03b23dd20954d279db937ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_468.txt @@ -0,0 +1,6 @@ +पोर्तुगीज भारत (पोर्तुगीज: Índia Portuguesa किंवा Estado da Índia;) या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या. +वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ.स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ.स. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. इ.स. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोर व तिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. इ.स. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर इ.स. १९६१ सालातील डिसेंबरात गोवा, दीव व दमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता इ.स. १९७५ साली मिळाली. याकाळा पासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. +पोर्तुगीजांनी १५३० सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी ॲंतोनियो दि सिल्व्हेरियाने वसई शहर लुटून जाळले आणि तेथून तो पुढे मुंबईच्या बेटांवर चालून गेला. पोर्तुगीजांसमोर हार पत्करून ठाण्याच्या राजाने माहीमसह मुंबईतील बेटे पोर्तुगीजांच्या हवाली केली..[१] पुढील वर्षी गुजरातच्या बादशहा बहादुरशाहने दीवचे बेट पोर्तुगीजांना न दिल्यामुळे अंतोनियो दि साल्दान्हाने पुन्हा एकदा वसई लुटली. +१५३३मध्ये दियोगो दि सिल्व्हेरियाने वांद्र्याच्या बेटापासून गुजरातमधील सुरते पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..[२] +पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4681.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d33cff7b62fe45670915d3ed88ac2ff572ece09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4681.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रुटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव राज्याच्या पश्चिम भागातील ग्रॅंड जंक्शन या शहराजवळ मेसा काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4685.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c86de7059fd082fcfa9c94a2e56b57e3546ee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4685.txt @@ -0,0 +1,27 @@ +फ्रॅंक फ्रीडमन ऑपनहाइमर (ऑगस्ट १४, इ.स. १९१२ - फेब्रुवारी ३, इ.स. १९८५) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता. +हा मॅनहॅटन प्रकल्पाचा सदस्य होता. याचा मोठा भाऊ जे. रॉबर्ट ऑपनहाइमर सुद्धा भौतिकशास्त्रज्ञ होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_469.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..151e4c2a1c0e406f1d1f888d1cc191e7f2dde617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_469.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोर्तुगीज ही जगातील अनेक देशांमध्ये वापरली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4707.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68845919ebc054caff35a6fb79c25888d375268d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4707.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 38°11′50″N 84°51′47″W / 38.19722°N 84.86306°W / 38.19722; -84.86306 + +फ्रॅंकफोर्ट ही अमेरिका देशाच्या केंटकी राज्याची राजधानी आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात केंटकी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली केवळ २७ हजार लोकसंख्या असणारे फ्रॅंकफोर्ट अमेरिकेमधील पाचवे सर्वात लहान राजधानीचे शहर आहे. + + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4708.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f3397515fbf26235d1717e4354421dea557404e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4708.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यू यॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले. +इ.स. १९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील न्यूयोर्क राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. +१९२९ च्या महामंदी नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4722.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28c9f837d64ca7b338cce4edf5070d24670bd74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4722.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रेंच इंडोचीन (फ्रेंच: Indochine française, ख्मेर: សហភាពឥណ្ឌូចិន, व्हियेतनामी: Đông Dương thuộc Pháp) ही फ्रेंच वसाहती साम्राज्याची आग्नेय आशियामधील एक मोठी वसाहत होती. १८८७ साली फ्रान्सने व्हियेतनामचे उत्तर, मध्य व दक्षिण प्रदेश तसेच कंबोडिया समवेत ह्या वसाहतीची स्थापना केली. १९८३ साली लाओसला फ्रेंच इंडोचीनमध्ये विलिन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रेंच इंडोचीनचे नियंत्रण विशी फ्रान्सकडे होते. युद्धाच्या उत्तरार्धात जपान हा भूभाग आक्रमण करून बळकावला. ह्यादरम्यान उत्तर व्हियेतनाममध्ये हो चि मिन्ह ह्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्ह ह्या गटाने स्वातंत्र्यचळवळ चालवण्यास सुरुवात केली. +महायुद्ध संपल्यानंतर ऑगस्ट १९४५ मध्ये फ्रान्सने पुन्हा येथे अधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर व्हियेत मिन्हने त्यास विरोध केला ज्याची परिणती पहिल्या इंडोचीन युद्धामध्ये झाली. १९५४ साली ह्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर जिनिव्हा येथील एका परिषदेमध्ये फ्रेंच इंडोचीनचे विघटन करण्याचे ठरले. ह्यामधून कंबोडिया व लाओस हे स्वतंत्र देश तर व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण हे दोन तुकडे निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4733.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6368fa9314afa6e322407fdc24f4e6cbc933e034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4733.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेंच किस तथा फ्रेंच चुंबन यात हळुवारपणे एकमेकांच्या ओठांना स्पर्श करत आनंद घेत जाणे ।।यामद्ये जीभ आणि ओठ यांचं मिलन होत असत ।। हा एक हळुवारपणे केलेला स्पर्श आणि त्यातून निर्माण झालेला हा एक आनंददायी क्षणच असतो diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4751.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c463682f9ece884b8d93bd05607b57d5de62e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4751.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१] +हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लॅंकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत +स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत. +ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4761.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4091594afd3ed04cbb4e4f169f0ae4f1861526e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4761.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्रेड क्लासेन हा नेदरलॅंड्सचा क्रिकेटपटु आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4768.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c52ce46480c01a4d85217528ff57db4365f4fabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4768.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक क्राइस्ट फ्रेड ट्रम्प (११ ऑक्टोबर, इ.स. १९०५:वूडहेवन, क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका - २५ जून, इ.स. १९९९:न्यू हाइड पार्क, न्यू यॉर्क) हा अमेरिकन उद्योगपती होता. याच्या कंपनीने न्यू यॉर्क शहरात २७,०००पेक्षा जास्त सदनिका बांधल्या तसेच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आरमारी वसाहतींमध्ये अनेक इमारती बांधल्या. फ्रेड ट्रम्पच्या मुलांपैकी डोनाल्ड ट्रम्पने फ्रेडचा धंदा सांभाळला तर मेरीॲन ट्रम्प बॅरी ही न्यायाधीश आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4779.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ca975a365205d638cb90f962350c2c87de61d98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4779.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स फ्रेडरिक फ्रेड रूट (१६ एप्रिल, १८९०:डर्बीशायर, इंग्लंड - २० जानेवारी, १९५४:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२६ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4807.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2c8c85775a9ec9b7c814dcc2ef7d9bae8b8833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4807.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4835.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4835.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4853.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61212a26ee376bfe2eab4b158f2636bc3b6a6400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4853.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडी मर्क्युरी तथा फारोख बलसारा (५ सप्टेंबर, १९४६ - २४ नोव्हेंबर, १९९१) हा ब्रिटिश संगीतकार होता. हा क्वीन या संगीतसमूहाचा मुख्य गायक होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4866.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96344c86d98152ff04b8d9c27162d9d4b462cfe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4866.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेदेरिको चावेझ ग्वेदेझ उर्फ फ्रेड (पोर्तुगीज: Frederico Chaves Guedes; ३ ऑक्टोबर १९८३ (1983-10-03)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००५ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फ्रेड २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००७ व २०११ कोपा आमेरिका तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फ्रेड २००५-०९ दरम्यान फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक ल्यों तर २००९ पासून ब्राझीलमधील फ्लुमिनेन्स ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4878.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e1ba86a571799511d7dd88d102188b330d2905a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4878.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°44′52″N 119°46′21″W / 36.74778°N 119.77250°W / 36.74778; -119.77250 + +फ्रेस्नो हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या मध्य भागात सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेच्या दक्षिणेस वसले आहे. २०१० साली ५.१० लाख लोकसंख्या असणारे फ्रेस्नो कॅलिफोर्नियातील पाचव्या तर अमेरिकेमधील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4901.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b05f6b539052955aae6bdcfea532af21b295128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4901.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लाइट डेटा रेकॉर्डर किंवा हे विमानांत बसविण्यात येणारे उपकरण आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाच्या यांत्रिक कार्याची नोंद ठेवली जाते. त्यात इंजिनचे तापमान, जमिनीपासून उंची, वेग या सगळ्या बाबींचा समावेश असतो. वैमानिकांनी केलेल्या विमान चालन सूचना यात मुद्रित होतात. यामुळे विमान चालवताना वैमानिकांनी कोणते निर्णय कधी घेतले याची माहिती मिळते. तसेच उपकरणांनी त्या सूचनांना कसा प्रतिसाद दिला हे सुद्धा यात नोंदवले जाते. काही वेळा याला ॲक्सिडेंट डेटा रेकॉर्डर असेही म्हणतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर या दोन्हीचा मिळून ब्लॅक बॉक्स बनतो. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक डेव्हिड वॉरेन यांनी कॉमेट या विमानाला झालेल्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स या उपकरणाची रचना केली. या द्वारे विमानांमध्ये दोष असतील किंवा वैमानिकांच्या चालनात चुका होत असतील तरी त्या फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहितीचा अभ्यास केल्यानंतर समजतात. हवामान कसे होते, विमानाचा वेग किती होता, किती उंचीवरून विमान चालले होते इत्यादी सर्व माहिती यात भरली जात असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4910.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d596d93fd7dcafa4a28bceb95848c09b668e114b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4910.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लायवे हे एक मुक्तस्रोत डेटाबेस मायग्रेशन टूल आहे. हे वापरण्यास फार सोपे आहे. +ह्यामध्ये फक्त ६ आज्ञा आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4918.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f77c5532fd669e765346619b97bfa306d0063b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4918.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लाव्हियस यस्टीनस (लॅटिन: Flavius Justinus ;) ऊर्फ पहिला जस्टिन (रोमन लिपी: Justin I ;) (इ.स. ४५० - ऑगस्ट १, इ.स. ५२७) हा इ.स. ५१८ ते मृत्यू पावेपर्यंत बायझेंटाइन साम्राज्यावर राज्यारूढ असलेला सम्राट होता. साधा शिपाई म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या व निरक्षर असलेला जस्टिन बायझेंटाइन सैन्यात वरचे हुद्दे चढत वयाच्या ७०व्या वर्षी सम्राटपदापर्यंत पोचला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_496.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e724c6fa320c6078f26e4aeffc1780ceef29c1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_496.txt @@ -0,0 +1,2 @@ +सालोथ सार उर्फ पोल पोट (ख्मेर: ប៉ុល ពត; १९ मे १९२५ - १५ एप्रिल १९९८) हा कंबोडियामधील एक कम्युनिस्ट व ख्मेर रूज ह्या संघटनेचा म्होरक्या होता. एप्रिल १९७५ ते जानेवारी १९७९ दरम्यान तो कंबोडियाचा राष्ट्रप्रमुख होता. पोल पोट हा एक क्रुर हुकूमशहा होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यवाद अंगिकार करण्याचा घाट घातला होता. त्याच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत कंबोडियामधील २५ टक्के जनता मृत्यूमुखी पडली व सर्वच बाबतीत देशाची अतोनात हानी झाली.त्याने कंबोडियामध्ये त्याला विरोध करणाऱ्या विद्वानांची सामूहिक हत्याकांडे घडवून आणली. +१९७९ साली व्हियेतनामने केलेल्या लष्करी हल्ल्यामध्ये ख्मेर रूजची कंबोडियावरील सत्ता संपुष्टात आली व पोल पोटने जंगलाकडे पलायन केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4969.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0257c7447e918e7cfb927612996e68eb2db59c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4969.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.[१] +फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. +नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी +रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4977.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bca29badbc139adc104877ccf0377ed9bafcadf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_4977.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लोरीन हे वायुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. त्याची रासायनिक  संज्ञा F असून त्याचा अणुक्रमांक ९ आहे. फ्लोरीन हॅलोजन गटात मोडते. तो स्वतःच्याच icd8दुसऱ्या अणूशी रासायनिक संयोग करून F2 रेणू बनवतो. F2 हा अतिसंवेदनशील, विषारी व पिवळसर तपकिरी रंगाचा वायू असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5000.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a033846d4906eabf269c72045b71022743c34725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5000.txt @@ -0,0 +1,2 @@ +सल्फ्युरोफ्लोरिडिक आम्लफ्लोरोसल्फ्युरिक आम्लफ्लोरोसल्फोनिक आम्लफ्लोरिनसल्फोनिक आम्लफ्लोरिनसल्फोनिक आम्लफ्लोरिडोसल्फोनिक आम्लसल्फ्युरिक फ्लोरोहायड्रिनइपॉक्सिसल्फोनिल फ्लोराइडOS(F)(=O)=OFS(=O)(=O)OInChI=1S/FHO3S/c1-5(2,3)4/h(H,2,3,4) YKey: UQSQSQZYBQSBJZ-UHFFFAOYSA-N YInChI=1/FHO3S/c1-5(2,3)4/h(H,2,3,4)Key: UQSQSQZYBQSBJZ-UHFFFAOYAW +फ्लोरोसल्फ्युरिक आम्ल हे फ्लोरिन, सल्फर व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले अत्यंत शक्तिशाली आम्ल असून त्याचे रासायनिक सूत्र HSO3F आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_501.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce1678a4c6e094b78c04eecad1cbdac1003bdb5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_501.txt @@ -0,0 +1,4 @@ +पोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले. +२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे. +यजमान असल्यामुळे पोलंडला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5010.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dab1d9208818a6b8188e1bbfa69e99ace15ced28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5010.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब बळीचा ही राजन गवस यांची मराठी कादंबरी आहे. पॉप्युलर प्रकाशन यांनी २०१५ साली ही कादंबरी प्रकाशित केली. पटकथा संरचनेच्या पद्धतीने लिहीलेली ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. +या कादंबरीतून गवस यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची पुनर्मांडणी केली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_502.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15ac0900995d3d411c140351df4a4a4e49bbada7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_502.txt @@ -0,0 +1 @@ +पोलंड हॉकी संघ पोलंड देशाचे आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5020.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63fbb954a8c27c89d898d53be0757768b5eced36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5020.txt @@ -0,0 +1,18 @@ +बँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात. +बँक मेळपत्रक हे एक असे विवरण आहे की जे रोख पुस्तकातील बँक रकान्याची शिल्लक तसेच बँक खातेपुस्तकातील शिल्लक यातील फरकाचा मेळ घालण्यासाठी तयार केले जाते आणि दोन्ही शिल्कांमध्ये फरक का पडला याची कारणे दर्शवते.[१] +१) बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर तसेच कर्मचाऱ्यांनी रोख नोंदी अद्ययावत ठेवल्या आहेत की नाही यावर बँक मेळपत्रकामार्फत लक्ष ठेवता येते. कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी वाढते. +२) रोख रकमेची हाताळणी तसेच बँकेतील शिल्लक रक्कम यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता कमी होते. +३) रोख पुस्तक किंवा बँकेचे खाते पुस्तक यामध्ये गाळलेल्या नोंदी तसेच चुका ओळखण्यासाठी बँक मेळपत्रक उपयुक्त ठरते. +४) केवळ बँकेच्या खाते पुस्तकात असणाऱ्या नोंदी समजतात.[२] +१) काळामधील तफावत - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या धनकोला दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत समाशोधन होऊन त्या धनादेशाचे शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश. +२) बँकेत परस्पर नोंदवले गेलेले व्यवहार - व्याजाची रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे लाभांश, विमा रक्कम, सेवा शुल्क इत्यादी व्यवहार, खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , दूरध्वनी देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल) +३) मानवी चुका - व्यवहार नोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे. +बँक मेळपत्रक बनवणे ही एका व्यवसायाची गरज असते.[३] +१) मेळपत्रक बनवण्याची सुरुवात रोख पुस्तक किंवा बँक खाते पुस्तकातील शिल्लक रक्कम घेऊन शेवट दुसरी शिल्लक कशी आली तो शोधण्यामध्ये होतो.त्यामुळे एक कुठली तरी शिल्लक मेळपत्रकासाठी घ्यावी. उदाहरणासाठी आपण रोख पुस्तकातील शिल्लक रकमेने सुरुवात करू. +२) समजा रोख पुस्तकातील रक्कम एखाद्या व्यवहारामुळे वाढत असेल तर त्या व्यवहारासमोर + चिन्ह करतात. आपण दिलेला धनादेश बँकेत अजून वटवला गेला नाही म्हणजेच रोख पुस्तकातील शिल्लक वाढेल. किंवा बँक खात्यामध्ये मुदत ठेवीची रक्कम जमा झाली तर रोख पुस्तकातील शिलकीत ती वाढवावी लागेल. +३) त्याच प्रमाणे रोख पुस्तकातील शिल्लक कमी करणाऱ्या व्यवहारांसमोर - (वजा ) चिन्ह करतात. कर्जाचा हप्ता बँक खात्यातून वळता केला गेला. याची नोंद रोख पुस्तकात करून शिल्लक कमी करावी लागेल. +४) अशा प्रकारे एका पुस्तकात दिसणाऱ्या पण दुसरीकडे न दिसणाऱ्या सर्व व्यवहारांची मोजणी करून बँक खाते पुस्तकाची शिल्लक कशी आली हे समजू शकते. +५) रोख पुस्तका प्रमाणे बँक खात्याच्या नावे असणारी शिल्लक बँकेत मात्र ग्राहकाच्या खात्यावर जमा शिल्लक म्हणून दाखवली जाते. त्याच प्रमाणे व्यापाऱ्याने बँकेतून उचल (ओव्हरड्राफ्ट) घेतली असेल व्यापाऱ्याच्या रोख खात्यामध्ये बँकेची शिल्लक जमा दिसते म्हणजेच त्या धंद्याच्या दृष्टीने बँक ही धनको बनते. थोडक्यात आपण बँकेच्या पुस्तकाप्रमाणे की व्यापाऱ्याच्या पुस्तकाप्रमाणे शिल्लक बघतो आहोत यावर शिल्लक रकमेचा अर्थ लावावा लागतो. +रोख पुस्तकाची नावे शिल्लक ही अनुकूल शिल्लक म्हणून ओळखली जाते. तर रोख पुस्तकातील जमा शिल्लक बँकेतून घेतलेली उचल (ओव्हरड्राफ्ट ) दर्शवते. +रुपये. +रुपये diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5025.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05dbab4694143d83437f0a947a0c4a8ed899646b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5025.txt @@ -0,0 +1,7 @@ +बँकिंग कार्मिक निवड संस्था (इंग्रजी उच्चार:इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन) (लघुरूप:IBPS) ची भारतातील सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. १९७५ मध्ये स्थापन झाल्यापासून, IBPS भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. बँकिंग क्षेत्रातील विविध शैक्षणिक स्तरांवर कुशल व्यक्तींची नियुक्ती सुलभ करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्याच्या स्पर्धात्मक परीक्षांद्वारे, IBPS ब्लॉक A विभाग, B विभाग आणि C विभागातील पदांसाठी उमेदवारांची निवड करते.[ संदर्भ हवा ] +पूर्वी, बँकिंग उद्योगात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक बँकेद्वारे स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या अनेक स्पर्धात्मक परीक्षांमधून मार्गक्रमण करावे लागे. तथापि, २०१२ मध्ये एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडले जेव्हा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ने चार भिन्न श्रेणींमध्ये स्पर्धात्मक परीक्षा सुरू केल्या: बँक व्यवस्थापन अधिकारी, विशेष अधिकारी, लिपिक आणि कार्यालय सहाय्यक. या प्रस्तावनेने भरती प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडवून आणला, कारण त्याने परीक्षा केंद्रीकृत करून प्रणाली सुव्यवस्थित केली. परिणामी, हा दृष्टिकोन सर्व उमेदवारांसाठी निष्पक्षता आणि समान संधींची हमी देतो.[ संदर्भ हवा ] +बँक स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत, स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे ज्याचा उद्देश बँकिंग क्षेत्रातील लिपिक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आहे. सर्वात योग्य उमेदवारांच्या ओळखीला प्राधान्य देऊन, बँकिंग उद्योगातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यात आयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.[ संदर्भ हवा ] +बँकिंग भूमिकांसाठी आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी उमेदवारांच्या सूक्ष्म मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करून हा आयोग एक समर्पित प्राधिकरण म्हणून काम करतो.[ संदर्भ हवा ] +श्रेणी:भारतातील शिक्षण +श्रेणी:शिक्षण +श्रेणी:भरती एजन्सी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5026.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec4ebaf8012f1341a0c275b52beeb213fd89472a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5026.txt @@ -0,0 +1,36 @@ +फायदे +आपली कमाई सुरक्षित ठेवणे, +बचत केलेल्या रकमेवर व्याज प्राप्त करण्यासाठी, +तिस-या  पक्षाकडून पैसा जमा करून घेण्यासाठी (चेक, बँक ड्राफ्ट, रोख किंवा ऑनलाईन) +यूटिलिटी बिलाचा भरणा करण्यासाठी (उदा. एलआयसी प्रीमियम, ट्रेनचे तिकीट बुकींग) +बँकेत खाते उघडण्यासाठी काय गरजेचे आहे +भरलेला अर्ज (हा संबंधित बँकेच्या शाखेतून घेता येतो) +दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो. +ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी +राहत्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी +रोख रु. १००० (ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार बदलते) +एक गॅरंटर (ज्याचे त्या आगोदर बँकेत खाते आहे) जो आपल्या अर्जावर सही करेल +सूचना: ओळकखपत्र आणि राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी दोन वेगवेगळे कागद प्रस्तूत केले जावेत. +ओळखपत्र म्हणून दिल्या जाणा-या प्रमाणासाठी खालीलपैकी कोणतीही वस्तू वापरता येते : +पासपोर्ट (पत्ता वेगळा असतो अशा वेळी), +मतदान ओळखपत्र, +पॅनकार्ड, +सरकारी/ सैनिक ओळखपत्र, +एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र, +वाहन परवाना +पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो आयडी कार्ड +राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी खालील पैकी कोणताही कागद लावता येतो : +क्रेडिट कार्ड स्टेटमेंट +पगार-पावती (पत्त्यासकट) +आयकर/ संपत्ति कर निर्धारण आदेश +वीज बिल +दूरध्वनी बिल +बँक खाते स्टेटमेंट +एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र +कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाकडून पत्र +रेशन कार्ड +एलपी गॅस बिल +एकदा खाते उघडल्यावर, आपल्याला खालील कागदपत्र मिळतील : +आपल्या नावाचे फोटो असलेले पासबुक +एटीएम आणि डेबिट कार्ड (ह्यासाठी कमीतकमी दोन आठवडे लागतात) +चेक बुक (ह्यासाठीदेखील दोन आठवडे कमीतकमी लागतात) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5030.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce0252191aec08b4a604c5d0fc7c047ddb17304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5030.txt @@ -0,0 +1 @@ +बँकॉक एअरवेज ही थायलंडच्या बँकॉक शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी बँकॉकपासून थायलंड, कंबोडिया, चीन, हॉंगकॉंग, लाओस, मालदीव, म्यानमार, भारत आणि सिंगापूरमधील शहरांपर्यंत सेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5049.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be38a8607fc75b5b578de907bc61cf786c621be5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5049.txt @@ -0,0 +1 @@ +बॅम्बी (इंग्लिश: Bambi) हा एक इ.स. १९४२ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5055.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..865c00c740f8b4af0c94bcee629c9be3aa25aba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5055.txt @@ -0,0 +1,7 @@ +बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जन्म : २६ जून १८३८; - ८ एप्रिल १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. +बंकिंमचंद्रचा मूळ पिंड लेखकाचा होता. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (इंग्रजी) (१८६४) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी. +वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे. +देशभक्तीचा धर्म ही बंकिमचंद्रांच्या लिखाणाची प्रमुख कल्पना आहे असे श्रीअरविंद घोष यांनी म्हटले आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आणि देशभक्तीचा धर्म या दोन गोष्टी म्हणजे त्यांनी राष्ट्राला दिलेले योगदान आहे असे ते म्हणतात. बंकिमचंद्रांनी भारतीयांना भारताकडे माता या रूपात पाहण्याची दृष्टी दिली हे त्यांचे आणखी एक योगदान आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आणि म्हणून बंकिंमचंद्र हे नवभारताचे प्रेरणास्रोत आणि राजकीय गुरू आहेत, असे श्रीअरविंद म्हणतात. [१] +ऋषी बंकिम चंद्र या नावाचा बंदे मातरम् या नियतकालिकामधील १६ एप्रिल १९०७ साली श्रीअरविंद घोष यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेला लेख. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5065.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb3c054adfc0365d2b895dda6e043bd1101e83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5065.txt @@ -0,0 +1,26 @@ +१२° ५८′ ४४.८३″ N, ७७° ३५′ २८.६८″ E +बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे. +बंगळूर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत. +बंगळूरचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या सुमारास चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधून केली. दुसऱ्या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. बंगळूर विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केंपे गौडा 1 यांच्याद्वारे १५३७ मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला १६३८ मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रणदुल्लाखान यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाही एका विजापूरच्या सेनेद्वारे बंगळूरवर आक्रमण केले गेले होता, ज्यांनी तिसरा केंपेगौडा यांना पराजित केले आणि बंगळूरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिक्कपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासीमखानाने मोगलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसऱ्या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.[ संदर्भ हवा ] +बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या आग्नेय भागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळ्यांची निर्मिती केली. +बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले. +बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. +बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे. +मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत वाहतूक करतात. ऑटोरिक्षा आणि खासगी बससेवाही प्रचलित आहेत. +मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जावे व त्याला कर्णधार विराट कोहली ह्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. +केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. शिवाय भारतीय वायुसेनेचा एक विमानतळ बंगलोरमध्येच येलहंका येथे आहे. +क्रिकेट हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत. +इ.स. १९०९ साली भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना येथे झाली. +बंगलोर हे हे १९८४ सालापासून भारतातील विविध राज्यांतील पक्षातून फुटलेल्या, फुटू पाहणाऱ्या, दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्या राज्याचे सरकार पाडण्यास उत्सुक असलेल्या अशा आमदारांचे बिनखर्चात चैनीत राहण्याचे ठिकाण आहे. बंगलोरमधील विलासात राहण्यास बांधलेल्या अनेक आश्रयस्थानांमध्ये वरील प्रकारच्या आमदारांना, सुखाचे, चैनीचे आणि आरामाचे आयुष्य देण्याच्या मिशाने कैदेत ठेवतात. सन १९८४पासून हा प्रकार चालू आहे. या आमदारांना बाहेरच्या कोणाशीही टेलिफोननेही संपर्क करता येत नाही, कुणाही बाहेरच्या व्यक्तीला भेटता येत नाही, किंवा आश्रयस्थानांतून बाहेर पडता येत नाही. त्यांना आतल्या आत हवी ती चैन करता येते आणि हवी तितकी फुकत दारू ढोसता येते. आश्रयस्थानाचे भाडे प्रतिदिवशी प्रतिआमदार ६ ते ७ हजार रुपये असते. आश्रमस्थानात राहणाऱ्या या सर्व आमदारांचा खर्च अंदाजे आठवड्याला प्रतिआमदार ५० ते ७५ कोटी रुपये असतो. हा खर्च त्यांंना ज्या पक्षाने पळवून आणले आहे तो पक्ष करतो, आणि नंतर तो सामान्य जनतेकडून वसूल करतो. +तेलुगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी, रामकृष्ण हेगडे हेकर्नाटकचे मुख्यमंत्री असताना, आपल्याच NTD पक्षाच्या १६१ आमदारांना, ते फुटीर नेते नरेंद्र भास्कर राव (Nadendra Bhaskar Rao) यांच्या गटात सामील होतील करतील या भीतीने बंगलोरला नेऊन ठेवले होते. +जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीया सरकारला, विधानसभेत अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या ४० आमदारांना बंगलोरला नेऊन ठवले होते. त्यावेळी एस.एम. कृष्ण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आमदारांची नेण्या-आणण्याची, राहण्याची, त्यांची खातिरदारी करण्याची सर्व जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली होती. +२००४ साली कर्नाटक राज्यात भारतीय पक्षाला ७९ जागा मिळवून तो सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा पक्ष ठरला. पण स्पष्ट बहुमत नसल्याने व इतर आमदारांची साथ न मिळाल्याने भाजपला सरकार बनवता आले नाही. अश्या वेळी ६५ जागा मिळवणाऱ्या कॉंंग्रेसने आणि ५८ आमदार असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाने युती करण्याचे ठरवले. पण ती होईपर्यंत आपले आमदार फुटून भारतीय जनता पक्षाला मिळू नयेत म्हणून जद(से)ने आपले ५८ आमदार बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. ही सर्व परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +काँग्रेसबरोबरची ही युती अल्पकाळच टिकली. २००६ साली जदसेने भाजपबरोबर युती केली. +कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांच्या जनता दल (सेक्युलर) या पक्षाने भाजपशी युती करण्यापूर्वी आपले आमदार फुटून काँग्रेसला मिळू नयेत म्हणून त्यांना बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. हीही परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +पूर्ण बहुमत न मिळू शकल्याने सरकार बनवता न येण्याच्या परिस्थितीत, भाजप पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी जी. जनार्दन रेड्डी व अरविंद लिंबावली यांच्या मदतीने पहिल्यांदाच कॉंंग्रेसचे व जद(से)चे ७ आणि काही अपक्ष आमदार यांना लुभावून बंगलोरच्या हाॅटेलात नेऊन बंदोबस्तात ठेवले. +बेल्लारीच्या रेड्डी बंधूंनी भाजपच्या १८ आमदारांना पळवून नेऊन बंगलोरला नेऊन ठेवले. यामुळे कर्नाटकामधील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सरकार धोक्यात आले. काँग्रेसने आणि जद(से)नेही आपल्या आमदारांना त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून बंगलोरच्या एका वेगळ्याच हाॅटेलात ठेवले. +काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या दुसऱ्यांदा होऊ घातलेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत, काँग्रेसने राज्यातील आपले आमदार बंगलोरजवळच्या बिदादी या गावात नेऊन ठेवले. हे काम त्यावेळी डी.के. शिवशंकर यांनी पूर्णात्वास नेले. +विभाजित बहुमतामुळे कर्नाटक विधानसभेत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला तोंड देण्यासाठी जद(से)ने आणि काँग्रेसने आपले आमदार बंगलोरमधील एका सुरक्षित निवासस्थानात नेऊन ठेवले. त्यांना योग्य वेळी विधानसभेत हजर केल्याने मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला. +कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस-जद(से) युतीच्या १३ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांनी परत जाऊन कर्नाटक सरकार वाचवू नये म्हणून विरोधी पक्षाने (भारतीय जनता पक्षाने) काँग्रेसचे आपले व जद(से)चे एकूण १७ आमदार पळवले आणि त्यांना बीजेपीचे राज्यसभा सभासद राजीव चंद्रशेखर यांच्या खासगी विमानाने मुंबईला नेले. (६ जुलै २०१९) अशीही बातमी होती की त्यांना मुंबईहून गोव्याला नेण्यात येणार होते. काँग्रेसने बीजेपीवर खुल्लमखुल्ला आमदार खरेदीचा आरोप ठेवूनही भाजपने आपले 'कमळ अभियान' चालूच ठेवले. .. त्याचा परिणाम म्हणून बीजेपीच्या सी.एन. अश्वत् नारायण आणि सीपी योगेश्वर या या विश्वासू नेत्यांचा उदय झाला. +बीजेपीने मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्या काँग्रेस पक्षातून १६ आमदारांना फूस लावून १० मार्च २०२० रोजी बंगलोरला नेऊन बंदिवासात ठेवले आहे. अजूनही (१९-३-२०२०पर्यंत) त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी हजर करण्यात येईल, असे भाजपने आश्वासन दिले आहे. राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी अधिवेशन बोलावून ताबडतोब विश्वासदर्शक ठराव पास करून घेण्याचा धोशा मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामागे लावला आहे. कमलनाथ आणि विधानसभेचे सभापती (श्री.प्रजापती) हे या धोश्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढत आहेत. बंगलोरहून आमदार परतल्यावर त्यांंची व्यक्तिशः मुलाखत घेऊन त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती झालेले नाही याची खात्री झाल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्याचा सभापतींचा निर्धार आहे. या १६ आमदारांपैकी मंत्री असलेल्या ६ आमदारांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे. +(तूर्त अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5066.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb3c054adfc0365d2b895dda6e043bd1101e83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5066.txt @@ -0,0 +1,26 @@ +१२° ५८′ ४४.८३″ N, ७७° ३५′ २८.६८″ E +बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे. +बंगळूर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत. +बंगळूरचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या सुमारास चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधून केली. दुसऱ्या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. बंगळूर विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केंपे गौडा 1 यांच्याद्वारे १५३७ मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला १६३८ मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रणदुल्लाखान यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाही एका विजापूरच्या सेनेद्वारे बंगळूरवर आक्रमण केले गेले होता, ज्यांनी तिसरा केंपेगौडा यांना पराजित केले आणि बंगळूरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिक्कपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासीमखानाने मोगलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसऱ्या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.[ संदर्भ हवा ] +बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या आग्नेय भागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळ्यांची निर्मिती केली. +बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले. +बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. +बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे. +मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत वाहतूक करतात. ऑटोरिक्षा आणि खासगी बससेवाही प्रचलित आहेत. +मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जावे व त्याला कर्णधार विराट कोहली ह्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. +केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. शिवाय भारतीय वायुसेनेचा एक विमानतळ बंगलोरमध्येच येलहंका येथे आहे. +क्रिकेट हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत. +इ.स. १९०९ साली भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना येथे झाली. +बंगलोर हे हे १९८४ सालापासून भारतातील विविध राज्यांतील पक्षातून फुटलेल्या, फुटू पाहणाऱ्या, दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्या राज्याचे सरकार पाडण्यास उत्सुक असलेल्या अशा आमदारांचे बिनखर्चात चैनीत राहण्याचे ठिकाण आहे. बंगलोरमधील विलासात राहण्यास बांधलेल्या अनेक आश्रयस्थानांमध्ये वरील प्रकारच्या आमदारांना, सुखाचे, चैनीचे आणि आरामाचे आयुष्य देण्याच्या मिशाने कैदेत ठेवतात. सन १९८४पासून हा प्रकार चालू आहे. या आमदारांना बाहेरच्या कोणाशीही टेलिफोननेही संपर्क करता येत नाही, कुणाही बाहेरच्या व्यक्तीला भेटता येत नाही, किंवा आश्रयस्थानांतून बाहेर पडता येत नाही. त्यांना आतल्या आत हवी ती चैन करता येते आणि हवी तितकी फुकत दारू ढोसता येते. आश्रयस्थानाचे भाडे प्रतिदिवशी प्रतिआमदार ६ ते ७ हजार रुपये असते. आश्रमस्थानात राहणाऱ्या या सर्व आमदारांचा खर्च अंदाजे आठवड्याला प्रतिआमदार ५० ते ७५ कोटी रुपये असतो. हा खर्च त्यांंना ज्या पक्षाने पळवून आणले आहे तो पक्ष करतो, आणि नंतर तो सामान्य जनतेकडून वसूल करतो. +तेलुगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी, रामकृष्ण हेगडे हेकर्नाटकचे मुख्यमंत्री असताना, आपल्याच NTD पक्षाच्या १६१ आमदारांना, ते फुटीर नेते नरेंद्र भास्कर राव (Nadendra Bhaskar Rao) यांच्या गटात सामील होतील करतील या भीतीने बंगलोरला नेऊन ठेवले होते. +जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीया सरकारला, विधानसभेत अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या ४० आमदारांना बंगलोरला नेऊन ठवले होते. त्यावेळी एस.एम. कृष्ण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आमदारांची नेण्या-आणण्याची, राहण्याची, त्यांची खातिरदारी करण्याची सर्व जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली होती. +२००४ साली कर्नाटक राज्यात भारतीय पक्षाला ७९ जागा मिळवून तो सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा पक्ष ठरला. पण स्पष्ट बहुमत नसल्याने व इतर आमदारांची साथ न मिळाल्याने भाजपला सरकार बनवता आले नाही. अश्या वेळी ६५ जागा मिळवणाऱ्या कॉंंग्रेसने आणि ५८ आमदार असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाने युती करण्याचे ठरवले. पण ती होईपर्यंत आपले आमदार फुटून भारतीय जनता पक्षाला मिळू नयेत म्हणून जद(से)ने आपले ५८ आमदार बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. ही सर्व परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +काँग्रेसबरोबरची ही युती अल्पकाळच टिकली. २००६ साली जदसेने भाजपबरोबर युती केली. +कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांच्या जनता दल (सेक्युलर) या पक्षाने भाजपशी युती करण्यापूर्वी आपले आमदार फुटून काँग्रेसला मिळू नयेत म्हणून त्यांना बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. हीही परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +पूर्ण बहुमत न मिळू शकल्याने सरकार बनवता न येण्याच्या परिस्थितीत, भाजप पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी जी. जनार्दन रेड्डी व अरविंद लिंबावली यांच्या मदतीने पहिल्यांदाच कॉंंग्रेसचे व जद(से)चे ७ आणि काही अपक्ष आमदार यांना लुभावून बंगलोरच्या हाॅटेलात नेऊन बंदोबस्तात ठेवले. +बेल्लारीच्या रेड्डी बंधूंनी भाजपच्या १८ आमदारांना पळवून नेऊन बंगलोरला नेऊन ठेवले. यामुळे कर्नाटकामधील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सरकार धोक्यात आले. काँग्रेसने आणि जद(से)नेही आपल्या आमदारांना त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून बंगलोरच्या एका वेगळ्याच हाॅटेलात ठेवले. +काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या दुसऱ्यांदा होऊ घातलेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत, काँग्रेसने राज्यातील आपले आमदार बंगलोरजवळच्या बिदादी या गावात नेऊन ठेवले. हे काम त्यावेळी डी.के. शिवशंकर यांनी पूर्णात्वास नेले. +विभाजित बहुमतामुळे कर्नाटक विधानसभेत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला तोंड देण्यासाठी जद(से)ने आणि काँग्रेसने आपले आमदार बंगलोरमधील एका सुरक्षित निवासस्थानात नेऊन ठेवले. त्यांना योग्य वेळी विधानसभेत हजर केल्याने मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला. +कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस-जद(से) युतीच्या १३ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांनी परत जाऊन कर्नाटक सरकार वाचवू नये म्हणून विरोधी पक्षाने (भारतीय जनता पक्षाने) काँग्रेसचे आपले व जद(से)चे एकूण १७ आमदार पळवले आणि त्यांना बीजेपीचे राज्यसभा सभासद राजीव चंद्रशेखर यांच्या खासगी विमानाने मुंबईला नेले. (६ जुलै २०१९) अशीही बातमी होती की त्यांना मुंबईहून गोव्याला नेण्यात येणार होते. काँग्रेसने बीजेपीवर खुल्लमखुल्ला आमदार खरेदीचा आरोप ठेवूनही भाजपने आपले 'कमळ अभियान' चालूच ठेवले. .. त्याचा परिणाम म्हणून बीजेपीच्या सी.एन. अश्वत् नारायण आणि सीपी योगेश्वर या या विश्वासू नेत्यांचा उदय झाला. +बीजेपीने मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्या काँग्रेस पक्षातून १६ आमदारांना फूस लावून १० मार्च २०२० रोजी बंगलोरला नेऊन बंदिवासात ठेवले आहे. अजूनही (१९-३-२०२०पर्यंत) त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी हजर करण्यात येईल, असे भाजपने आश्वासन दिले आहे. राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी अधिवेशन बोलावून ताबडतोब विश्वासदर्शक ठराव पास करून घेण्याचा धोशा मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामागे लावला आहे. कमलनाथ आणि विधानसभेचे सभापती (श्री.प्रजापती) हे या धोश्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढत आहेत. बंगलोरहून आमदार परतल्यावर त्यांंची व्यक्तिशः मुलाखत घेऊन त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती झालेले नाही याची खात्री झाल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्याचा सभापतींचा निर्धार आहे. या १६ आमदारांपैकी मंत्री असलेल्या ६ आमदारांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे. +(तूर्त अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5078.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5b2b85ee370808884634551ed0a31a5c33f5a02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5078.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर ग्रामीण (इंग्रजीत Bangalore Rural) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर ग्रामीण मतदारसंघामध्ये रामनगर जिल्ह्यातील ४, बंगळूर जिल्ह्यातील ३ तर तुमकूर जिल्ह्यातील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5084.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c247ba1955f535831dc6b3853b0bfe0ba98f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5084.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5094.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26999d1a4c1a41b22a863f01ce16dd4209725a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5094.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ९ जिल्ह्यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5097.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e92dab324db66cfc57498753aaf68369680c6525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5097.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर सिटी रेल्वे स्थानक हे बंगळूर महानगरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या बंगळूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज १०० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या सुटतात. हे स्थानक बंगळूरच्या मध्यभागात मॅजेस्टिक बस स्टॅंडच्या जवळच स्थित आहे. नम्मा मेट्रोच्या जांभळ्या मार्गिकेवरील स्थानक येथून जवळ बांधण्यात आले आहे ज्यामुळे बंगळूर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. बंगळूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी शहराच्या उत्तर भागात यशवंतपूर रेल्वे स्थानक उघडण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5108.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cc7f1e25e073af45272049ca5681056e7557aed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5108.txt @@ -0,0 +1,7 @@ +बंगाल प्रांत अथवा बंगाल प्रेसिडेन्सी (बंगाली: বেঙ্গল প্রেসিডেন্সি) ; इंग्लिश: Bengal Presidency; ) हा ब्रिटिश भारताच्या पूर्वेकडील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा हे भूप्रदेश, वर्तमान बांग्लादेश यांचा भूप्रदेश बंगाल प्रांतात समाविष्ट होता. इ.स. १८६७ साली शाही वसाहतींचा दर्जा मिळण्याच्या आधी पेनांग व सिंगापूर या ब्रिटिश वसाहतीदेखील बंगाल प्रांतात मोडत असत. +बंगाल प्रांताचे पाच प्रशासकीय विभाग होते. ते विभाग व त्यातील जिल्हे खालीलप्रमाणे- +अ] बरद्वान विभाग- +आ] प्रेसिडेन्सी (कलकत्ता) विभाग +इ] ढाका विभाग +ई] राजशाही विभाग +उ] चितागंज विभाग diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5126.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..420065bd2a3035787dbc179acb119d6f52c31453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5126.txt @@ -0,0 +1,3 @@ +बंगाली लिपी बंगाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. सध्याचा बिहार, प. बंगाल, बांगला देश, आसाम, नेपाळ व ओरिसा या प्रदेशात दहाव्या शतकानंतर सापडणाऱ्या शिलालेखांतून आणि बाराव्या शतकानंतरच्या हस्तलिखितांतून ही लिपी आढळून येते. +ही लिपी नागरी लिपीपासून उत्पन्न झाली. दहाव्या शतकातील बंगालचा राजा नारायणपाल याच्या लेखात जवळजवळ सर्व लिपी नागरी आहे; फक्त ‘ए’ आणि ‘ख’ ही अक्षरे बंगाली लिपिकडे झुकणारी आहेत. अकराव्या शतकातील पालवंशी विजयपाल याच्या देवपाडा लेखात ‘ए’, ‘ख’, ‘ञ’, ‘त’, ‘थ’, ‘म’, ‘र’, ‘ल’ आणि ‘स’ ही अक्षरे नागरी लिपीपेक्षा वेगळ्या वळणाची आहेत. यानंतरच्या काळात उपलब्ध झालेल्या लेखांतून नागरी अक्षरांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आणि त्यातूनच बंगाली लिपी उत्क्रांत झाली. बाराव्या शतकातील वैद्यदेवाच्या लेखात ‘ॠ’, ‘ए’, ‘ऐ’, ‘ख’, ‘ग’, ‘ञ’, ‘त’, ‘थ’, ‘न’, ‘म’, ‘य’, ‘र’, आणि ‘व’ ही बंगाली अक्षरे आली आहेत.त्या लिपीस प्राक् बंगाली म्हणता येईल. प्राक् बंगाली व आधुनिक बंगाली लिपीमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे या काळात अक्षरांच्या डोक्यावर त्रिकोण दिसू लागले. याशिवाय अक्षरावर डावीकडे आडवी रेघ असे आणि ती ‘हूक’ प्रमाणे म्हणजे आकड्यांप्रमाणे वळलेली असे. त्यास ‘नेपाळी हूक’ असे म्हणत. देवपाडा लेखात ‘क’ आणि ‘त’ या अक्षरांवर असे हूक दिसून येतात. लक्ष्मणसेनाच्या बाराव्या शतकातील तर्पणदिघी लेखात नेपाळी हूक एका आड एक अक्षरांवर दिसून येतात. +बंगाली लिपीतील ‘अ’, ‘आ’, ‘क’, ‘ञ’, आणि ‘र’ या अक्षरांतील उभा दंड डाव्या बाजूला वळला आहे. ‘ए’, ‘ॠ’, ‘र’, या अक्षरांचे दाक्षिणात्य लिपीशी साम्य आहे. त्याचप्रमाणे ‘ख’, ‘ग’, आणि ‘श’ ही अक्षरेही दाक्षिणात्य तमिळ लिपीमध्ये सापडतात. मुसलमानी आक्रमणामुळे भारताचे सामाजिक व राजकीय जीवन ढवळून निघाले. या काळात लिपीतही फरक पडला. अठराव्या शतकात पाश्चात्त्य संस्कृतीच्या संपर्कामुळे व मुद्रण कलेमुळे पुन्हा अक्षराच्या वळणात फरक पडला. बंगाली लिपीपासूनच मैथिली लिपीची उत्पत्ती झाली. मिथिला भागातील ब्राह्मणवर्ग या लिपीमध्ये संस्कृत ग्रंथ लिहीत असत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5127.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..404ea96ad4b3c100293ad0368b92796ffe0e9726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5127.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेंगाल टायगर अथवा भारतीय वाघ (Panthera tigris tigris) ब्रिटिश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पे़क्षाही कमी वाघ आहेत. सध्याच्या गणनेनुसार भारतात २९६७ वाघ आहेत. २००२ मध्ये भारतात ३,६४२ वाघ होते[१]व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.[२] भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. परंतु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत.[३] इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. +बंगालच्या वाघाचा कोट पिवळ्या ते फिकट केशरी असून गडद तपकिरी ते काळ्या पट्ट्यासह; पोट आणि अंगांचे अंतर्गत भाग पांढरे आहेत आणि शेपटी काळ्या रिंगांसह नारंगी आहे. पांढरा वाघ हा वाघाचा एक निरंतर उत्परिवर्तन आहे, जो जंगलीमध्ये आसाम, बंगाल, बिहार, आणि विशेषतः पूर्वेकडील रीवा राज्यातील अधूनमधून आढळतो. तथापि, अल्बनिझमची घटना म्हणून चुकीचे ठरू नये. खरं तर, 1946 मध्ये चटगांवमध्ये तपासल्या गेलेल्या एका मृत नमुनाचा अपवाद वगळता खरा अल्बिनो वाघाचा केवळ एक पूर्णपणे अधिकृत केलेला केस आहे आणि काळे वाघ काहीही नाही. [२२] +पुरुष वाघाची शेपटीसह सरासरी लांबी 270 ते 310 सेमी (110 ते 120 इंच) असते, तर मादी सरासरी 240 ते 255 सेमी (90 to ते 110 इंच) मोजतात. [2] शेपटी सामान्यत: 85 ते 110 सेमी (33 ते 43 इंच) लांबीची असते आणि सरासरी वाघ खांद्यावर उंच 90 ते 110 सेमी (35 ते 43 इंच) पर्यंत असतात. पुरुषांचे वजन १ to० ते २88 किलो (7 7 to ते 9 56 l पाउंड) पर्यंत आहे, तर महिलांचे प्रमाण 100 ते 160 किलो (220 ते 350 पाउंड) पर्यंत आहे. [२] बंगालच्या वाघांसाठी सर्वात लहान नोंदवलेले वजन बांगलादेश सुंदरबनमधील आहे, जेथे प्रौढ स्त्रिया 75 ते 80 किलो (165 ते 176 पाउंड) आहेत. [2] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5129.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3683d3da32f6fc07cb3b52c37bba64e742135ecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5129.txt @@ -0,0 +1,11 @@ +हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली संगीतकारांचे योगदान अनन्य आहे. या संगीतकारांमध्ये प्रामुख्याने हेमंतकुमार, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन आणि सलील चौधरी यांचा समावेश होतो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या संगीतकारांनी अतिशय जिव्हाळ्याने हिंदीबरोबरच आपल्या मातृभाषेतील संगीत क्षेत्रातही काम केले आहे. कित्येकदा एक चाल (धून) दोन्ही भाषांमध्ये वापरली आहे. दोन भाषांत (हिंदी आणि बंगाली) एकाच चालीवर बांधलेली काही सुंदर गाणी त्यांच्या संगीतकारासह खालीलप्रमाणे आहेत. +संगीतकार हेमंतकुमार +संगीतकार सलील चौधरी +संगीतकार सचिन देव बर्मन + +संगीतकार राहुल देव बर्मन +याशिवाय वडील सचिन देव बर्मन यांच्या काही बंगाली चीजा राहुल देव बर्मन यांनी हिंदीत आणल्या आहेत त्या अशा +याशिवाय बंगालीत आहा ओई आंका बांका जे पोथ जाए शुदूरे हिंदीत शामल मित्रांचं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये म्हणून आढळतं. आणि शामल मित्र यांचंच बंगाली गीत आमाय श्वप्नो तुमी ओगो चिरोदिनेर शाथी हिंदीत सारा प्यार तुम्हारा मैंने बांध लिया है आंचलमें या शब्दात भेटतं. +सचिन देव बर्मन यांच्या आराधना चित्रपटातील जवळपास सर्वच गाण्यांची बंगाली रूपांतरे झालेली आहेत. +वरील सर्व गीते यू ट्यूब वर उपलब्ध आहेत. +लेखिकेने प्रत्येक बंगाली ओळीचे मराठी रूपांतर दिले तर रसिकांना छान वाटेल. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5137.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..638bdb988e1e02eb40777d9b4ba3905901de8c33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5137.txt @@ -0,0 +1,37 @@ +डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी , डॉ. राहुल सांस्कृत्ययान यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी सहिष्णूतेची एक मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ती मानवीय नातं जपणारी हृदयाची बोली आहे. ती निसर्गाच्या कुशीत बहरून धरती ,आकाश , चंद्र, तारे , पशू-पक्षी, नदी-नाले, झरे , वृक्ष-वेलीशी संवाद साधणारी निसर्गाची बोली आहेे" या शब्दात बंजारा भाषेचे वर्णन‌ केले आहे.[२] + +बंजारा साहित्य-संस्कृती विश्वात अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कवी, लेखक, समिक्षक, गीतकार तर काही इतिहास संशोधक देखील लाभले आहे. ज्यामुळे बंजारा भाषा साहित्य आणि संस्कृती अबाधित राहण्यास फार मोठी मदत झाली. बंजारा साहित्य व इतिहासाचे आदयसंशोधक , साहित्यिक व इतिहासकार म्हणून स्मृ.बळीराम पाटील यांना मानले जाते. तांडाकार स्मृ. आत्माराम राठोड उपाख्य डॅनियल राणा यांनी बंजारा साहित्याला पुढे आणले. आत्माराम राठोड यांची सर्वप्रथम बंजारा बोलीभाषेत साहित्यकृती प्रकाशित झाली. "या पुढची घटना आम्हीही लिहू, आमची बंजारा बोली अजून लिपीबद्ध व्हायची आहे." असे 'लदेणी' मध्ये त्यांनी म्हटले. भिमणीपुत्र मोहन नाईक यांनी बंजारा भाषा सौंदर्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. बंजारा भाषिक अस्मिता जागवणारा हा प्रवास आजच्या एकविसाव्या शतकातही कायम टिकून आहे. बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी बंजारा भाषेचे गौरवगीत लिहिले.[३] +"केसूला नै मोरा री । मायड भाषा बंजारा री। +चांदा सुर्यास्यूं अमरारी। जीवे जीवेस्यू प्यारी।।"[४] +(मराठी भावार्थ : पळस फुलाप्रमाणे बहरवणारी माझी मातृभाषा बंजारा आहे. चंद्र सूूूूर्याप्रमाणे अजरामर , अशी माझी बंजारा बोली जीवाहुन प्रिय आहे.) +भारतीय विविधतेला समृद्ध करणारी ऐतिहासिक बंजारा संस्कृती आणि बंजारा बोलीभाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी सन २०१५ मध्ये पहिल्यांदा भक्तीधाम पोहरादेवी येथे एकनाथ पवार-नायक यांनी 'बंजारा साहित्य अकादमी' स्थापन करण्याची संकल्पना मांडली. [५]यासाठी त्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली होती.[६] गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना, पायाभरणी पाठपुरावा आणि प्रसार असे चौफेर पातळीवर योगदान दिल्याने गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार मानले जाते.[७] +बंजारा बोली ही भारतभर बोलली जाणणारी बंजारा समाजाची मायबोली आहे. संविधानाच्या आठव्या सुचीत समावेश करण्यात यावे, यासाठी सर्वप्रथम लोकसभेत खासदार हरिसिंग उर्फ हरिभाऊ राठोड यांनी शासनाकडे मागणी केली. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी देखील लोकसभेत मागणी रेटून बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळण्याबाबत लढयाला गती दिली. कर्नाटक येथील खासदार उमेश जाधव , खासदार सुरेश धानोरकर यांनी देखील तशी मागणी शासनाकडे केली. 'तांडेसामू चालो' अभियान अंतर्गत पहिल्यांदाच बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, याबाबत 'चांदा ते बांदा' स्वाक्षरी मोहीम राबवली. प्रसिद्ध लेखक भिमणीपूत्र मोहन नाईक यांनी पत्रव्यवहार केले. पुढे राष्ट्रीय बंजारा परिषद व इतर सामाजिक संघटनांकडून जागृती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांनी शासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला. राज्यातील विधान परिषदेचे आमदार हरिसिंग राठोड व तत्कालीन मंत्री संजय सिंह राठोड यांनी शासनाकडे जोरकस मागणी रेटल्याने बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडे तशी शिफारस देखील करण्यात आली. बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड, बंजारा साहित्य संस्कृतीचे अभ्यासक , विचारवंत एकनाथ पवार यांनी भेट घेऊन निवेदनही दिले. [८] बंजारा समाजाकडून सातत्याने ही मागणी आता सुरू झालेली आहे. तथापि अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनात देखील या संदर्भात अनेकदा ठराव मंजूर करण्यात आले आहे. +बळीराम पाटील ते एकनाथ पवार ('पाटील-पवार') पर्यंतचा साहित्य कालखंड हा बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. बळीराम पाटील ते एकनाथ पवार पर्यंतचा बंजारा साहित्य संस्कृतीचा प्रवास हा एकूणच बंजारा साहित्य, संस्कृतीसाठी मौलिक ठरला असून बंजाराचा आधुनिककालीन कालखंड ठरतो. ज्याअर्थी महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय, सामाजिक क्षेत्रात 'पाटील-पवार' हा एक ब्रॅंड मानला जातो, त्याच अर्थी बंजारा साहित्य संस्कृती क्षेत्रात देखील 'पाटील-पवार' (बळीराम पाटील ते एकनाथ पवार) हा वारसा समर्पक ठरतो. तथापि पुरोगामी विचारसरणीचे मात्र 'तांडाकार ते वेदनाकार' अर्थात 'प्रतिभावंत साहित्यिक आत्माराम कनिराम राठोड ते नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक एकनाथ पवार' पर्यंतचा काळ 'आधुनिक बंजारा साहित्य चळवळीचा एक समृद्ध पुरोगामी वारसा' म्हणून संबोधतात.[९] +प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार नंतरचा बंजारा साहित्याचा द्वितीय कालखंडात मात्र मोठ्या प्रमाणात नवोदितांची भरणा दिसून येते. ज्यात भाषिक आणि जातीय अस्मितापर लेखन मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. बंजारा साहित्य जगतात कोणत्याही एका विशिष्ट विचारसरणीचा सर्वार्थाने पगडा दिसून येत नाही. बंजारा साहित्यिक, लेखक, कवी, गीतकार , समिक्षक, नाटककार, कथाकार यांचे साहित्य लेखनप्रकार हा विविधांगी स्वरुपाचा आहे. जुन्या व नव्या पिढीतील साहित्य रसिक, साहित्य संस्कृतीशी निगडीत सर्व प्रज्ञावंत घटकांनी बंजारा साहित्याचा वारसा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. +• बळीराम हिरामण पाटील +• आत्माराम कनिराम राठोड +• पद्मश्री सोमलाल नायक खेतावत +• जयराम सिताराम पवार +• सुरेश कापडिया +• डा.वी.रामकोटी पंवार +• डा.इंदलसिंह जाधव +• भिमणीपुत्र मोहन नाईक +• प्रा. अशोक पवार +• डॉ. सुभाष राठोड +• डॉ. गणपत राठोड +• एकनाथ पवार-नायक +• महेशचंद्र बंजारा +• राजूसिंग बाणोत +• डा. रमेश आर्या +• जयपाल सिंह राठौड +• हरिभाऊ राठोड +• हरलाल सिंह पवार +• वीरा राठोड +• इंदरसिंह बालजोत +• डॉ.विजया चांदावत +• डॉ.धनंजय नाईक •चिनीया नाईक • पंजाबराव चव्हाण +• विजय जाधव +• प्रा.प्रकाश राठोड +• प्रा.दिनेश राठोड +• रतन बाणोत +• बी.सुग्रीव जुन्या नव्या काळातील अशा अनेक साहित्यिक व लेखकांचा बंजारा भाषा, साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. आज नवोदितांचे बंजारा भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होतांना दिसून येते. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे सोमलाल नायक खेतावत हे पहिले बंजारा साहित्यिक ठरले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_514.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e418957cc46dff42f1a1603207f3b6e001c1d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_514.txt @@ -0,0 +1,2 @@ +धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (P.S.L.V) ( Polar Satellite Launch Vehicle ) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीय नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवुन परकीर चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. +या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रो (ISRO - Indian Space Reasearch Orgnization) ने केली आहे. पी.एस.एल.व्ही. भुस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ भूस्थिर उपग्रह इस्त्रोने अवकाशात यशस्वी रित्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ करोड अमेरिकन डॉलर इतका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5196.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5196.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5203.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80e25f2e0145465fb6455c5cceeca88a7ee3213c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5203.txt @@ -0,0 +1,4 @@ +बंदूक (इंग्लिश: Gun, गन ;) हे स्फोटक दारू वापरून गोळी डागणारे शस्त्र आहे. बंदुकांचे खूप प्रकार आहेत आणि वेगवेगळे देश त्यांची वेगवेगळी व्याख्या करतात. + + +तिरपी मुद्राक्षरे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5226.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6864404f7088a2c98ab0d7e4b7818bb5c812910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5226.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बंसी बिरजू हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी काम केले होते.हा सन १९७२ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश वर्मा यांचे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_523.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0d100ba87788997ea825e3735b523337f829e62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_523.txt @@ -0,0 +1,30 @@ +पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे मज्जारज्जू, तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते. +हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले, आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. पोलियोच्या लसी विकसित करण्याचे श्रेय जोनस सॉल्क (१९५५) व अल्बर्ट सेबिन (१९५८) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ व रोटरी इंटरनॅशनल या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे. +२००० मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील चीन आणि ऑस्ट्रेलिया मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. २००२मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता (२००६ नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त भारत, पाकिस्तान, नायजेरिया, व अफगाणिस्तान या चार देशांमध्येच आढळून येत होते. (मार्च २७,२०१४ ला) जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे भारत देशाला १०० प्रतिशत पोलियोमुक्त जाहीर करण्यात आले. भारतात सरकारने (१९९५) साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त होऊ शकला. +-लस : दोन लसींचा वापर केला जातो. +पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता सस्थेवर परिणाम करतो. लक्षणामध्ये सौम्य पक्षाघात विरहित किंवा पूर्ण पक्षाघात असे सर्व परिणाम या आजारामुळे काहीं तासात होतात. +वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप वन या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर २०० रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर १००० संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशींच्या आवरणाला दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेहऱ्याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो. +पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषिता आहे. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. पण पोलिओ प्रौढाना होऊ शकतो. पोलिओचे कारण दाट लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान व स्वच्छतेचा अभाव हे आहे. अशा वातावरणात पोलिओ सहज पसरू शकतो. पोलिओचा धोका वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारा शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, नुकत्याच टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती याना अधिक असतो. +पोलिओच्या विषाणू (व्हायरस)चे तीनही प्रकारचे जिवाणू हे ’आरएनए‘वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे हातांपायांतील शक्ती जाऊन अपंगत्व येते. तिन्ही विषाणू फक्त मानवाला घातक आहेत. प्राण्यांना पोलिओ (आणि देवीच्या) विषाणूंचा काही त्रास होत नाही. फ्रॅंकलिन रुझव्हेल्ट हे १९३३ ते १९४५ सालापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी पोलिओच्या संशोधनासाठी प्रोत्साहन आणि निधी उपलब्ध करून दिला. ते स्वतःच पोलिओग्रस्त होते आणि तेथे त्याकाळी पोलिओग्रस्तांचे प्रमाण खूप होते. पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी १९५१मध्ये पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली. त्यांच्या लशीमध्ये पूर्णतः निष्प्रभ विषाणू होते. अल्बर्ट सॅबिन यांनीही न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये १९६१मध्ये पोलिओची लस तयार केली. त्यामध्ये तिन्ही प्रकारचे, पण अर्धवट विकलांग, क्षीण विषाणू होते. ही लस "टोचावी‘ लागत नव्हती. ती चवीला गोड होती. तिचे दोन थेंब तोंडाने घ्यायचे होते. त्यासाठी डॉक्‍टरांची उपस्थिती गरजेची नव्हती. +भारतातील प्रशिक्षित स्वयंसेवक बालकांना लशीचे दोन थेंब देत असे. मुख्य म्हणजे या लशीचा प्रभाव जन्मभर टिकणारा आहे. पल्स पोलिओचा डोस द्यायच्या दिवशीच काही बालके रेल्वे आणि बसच्या प्रवासात असत. अशा वेळी स्वयंसेवक गाडीत शिरून चटकन पोलिओच्या लशीचे थेंब बालकांच्या जिभेवर ठेवायचे. एकूण पाच डोस द्यायची योजना होती. त्यात खंड पडू नये, म्हणून उत्साही तरुण स्वयंसेवकांनी मनोभावे या मोहिमेत भाग घेतला. सव्वाशे कोटी लोकसंख्या, अस्वच्छता, पाणीटंचाई, अंधश्रद्धेचा पगडा, खडतर हवामानाचे उंच-सखल भूभाग, पर्वतीय-वाळवंटी प्रदेश असे अडथळे पार करून भारत पोलिओमुक्त झालाय. जगातील ८० टक्के नागरिक आता "पोलिओविरहित‘ देशांमध्ये राहतात. +आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. थोडक्यात पोलिओ दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतो. घाण गटारी, आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. एकदा षोषला गेल्यानंतर विषाणू शरीरभर पसरतो. शरीरामधून मज्जारजू आणि केंद्रीय चेतासंस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो. एकाकडून दुसऱ्याकडे विषाणू पसरण्याचे एक कारण म्हणजे अस्वच्छ हात. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात घुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. जोपर्यंत विषाणू घाणीत आहे तोपावेतो विषाणू घशात किंवा शौचामध्ये जिवंत राहतो. आजाराचे दृश्य परिणाम दिसण्यास तीन ते एकवीस दिवस लागतात.पण लक्षणे दिसू लागल्यानंतर सात ते दहा दिवसात पोलिओ होतो. +विषाणू संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा . (पक्षाघातनज्य आणि पक्षाघात विरहित). सौम्य आजार 80-90% टक्के व्यक्तीना होतो. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. आजाराच्या लक्षणामध्ये थोडा ताप, अशक्तपणा, घसा खवखवणे आणि उलट्या होतात. ही लक्षणे विषाणू संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात दिसू लागतात. सौम्य आजार २४ ते ७२ तासांत बरा होतो. पूर्वीच्या सौम्य आजाराची लक्षणे आधी दिसत असल्यास गंभीर स्वरूपाचा पोलिओ होतो. शक्यतो मोठ्या वयाच्या मुलाना आणि प्रौढाना गंभीर आजार होतो. +पोलिओची लागण झालेल्या १० टक्के व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, पाठीत वा मानेमध्ये वेदना सुरू होतात. ही लक्षणे दिसण्याचे कारण म्हणजे मेंदूआवरण दाह. मेंदूआवरण मज्जारज्जू आणि मेंदूवरील चिवट आवरण आहे. या प्रकारास ‘आसेप्टिक मेंनिंजायटिस’ म्हणतात. याला आसेप्टिक म्हणण्याचे कारण म्हणजे हा मेंदूआवरण दाह विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य आहे. थोड्या दिवसात यामधून रुग्ण पूर्णपणे बरा होतो. +एक टक्का रुग्णामध्ये आजार गंभीर स्थितीमध्ये जातो. त्याला पोलिओ होतो. दोन ते तीन दिवस त्याला कोणतीही पोलिओची लक्षणे जाणवत नाहीत. पोलिओची पूर्वलक्षणे न दिसता एकाएकी पोलिओ होण्याआधी तीव्र डोकेदुखी, पाठदुखी आणि मानदुखी सुरू होते. पोलिओ विषाणूच्या तडाख्यात मुख्य प्रेरक चेता आल्याने ही लक्षणे दिसतात. स्नायूंच्या हालचालीस या प्रेरक चेता कारणीभूत आहेत. विषाणूमुळे चेतांचा दाह आणि चेता नष्ट होतात. स्नायूना प्रेरक संवेद न मिळाल्याने स्नायू दुर्बल, शिथिल होतात. याचा शेवट स्नायूंच्या पक्षाघातामध्ये होतो. स्नायूंचा सामान्यपणा नष्ट झाल्याने अवयव शिथिल होतात. .काहीं दिवसानी स्नायू आकाराने लहान होतात. अशी स्थिती शरीराच्या दोन्ही बाजूस असल्यास द्विपारश्वसममित आणि एकाच बाजूस असल्यास एका बाजूचे अवयव काम करीत नाहीत. पक्षाघात झालेल्या अवयवामधील संवेदनामध्ये फरक पडत नाही. +पोलिओ विषाणूचा प्रवेश मज्जास्तंभामध्ये (मेंदू आणि मज्जारजू याना जोडणारा मेंदूचा महत्त्वाचा भाग) झाल्यास रुग्णाचे श्वसन आणि गिळण्यास त्रास होतो. मज्जास्तंभावर तीव्र परिणाम झाल्यास ह्रदयक्रिया रक्तदाब यावर परिणाम होतो आणि मृत्यू ओढवतो. +पक्षाघाताची शेवटची स्थिति थोड्याच दिवसामध्ये येते. ज्या चेतावर विषाणूचा प्रभाव पडला नाही त्या बिघाड झालेल्या चेतांचे कार्य आपापल्या परीने सुधारून घेतात. त्यांच्या नव्या शाखा नष्ट झालेल्या चेतांचे कार्य करतात. सुदैवाने चेतापेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या नसल्याने महिन्याभरात प्रेरक आणि संवेदी चेता कार्य करू लागतात. सहा महिन्यांच्या काळात रुग्ण पूर्ण बरा होतो. चेतापेशीवर कायमचा परिणाम झाला असल्यास कायमचा पक्षाघात राहतो. +ताप आणि असममित स्नायू शिथिलता व पक्षाघात संवेदी चेतांचे कार्य चालू असणे हे पोलिओचे लक्षण आहे. लहान मुले किंवा तरुणामधील या लक्षणानंतर कमरेच्या पोकळीमधून मज्जारजूभोवती असलेल्या मेरुद्रवाच्या परीक्षणामध्ये वाढलेल्या पांढ-या पेशी आणि जिवाणू न दिसल्यास आसेप्टिक मेंदूदाहाचे निदान होते. पक्षाघातविरहित पक्षाघातविरहित पोलिओचे निदान होत नाही. घशातील पेशींचे किंवा शौच परीक्षणामधून पोलिओ संबंधित प्रतिपिंड परीक्षण केल्यासच पोलिओचे निदान पक्के होते. +जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरीत्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूंमार्फत टोचून दिले जात. पुढे, अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली. +पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विषाणूंना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत .या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले की मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मूलनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा की गेल्या २० वर्षांमध्ये पोलिओच्या रुग्णांची संख्या ३,५०,००० रुग्णांपासून १५०० रुग्णांपर्यंत खाली आली आहे. १९५८ साली भारतातील National Institutes of Healthने 'जिवंत पोलिओ लसींवर' एक विशेष समिती नेमली. या समितीने माकडांना विविध लसीं देत प्रयोग करून त्या लसींची पोलिओ जिवाणूंना प्रतिकार करण्याची क्षमता तपासली. या प्रयोगांच्या निकालांवरून सबिन यांच्या लसी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झले व सर्व देशांमध्ये ह्या लसींचा वापर करावयाचे ठरले. +१९५० साली विल्यम हॅमोन यांनी पोलिओ रुग्णांच्या रक्तातून गामा ग्लोब्युलिन काढून त्यावर संशोधन केले. हॅमोन यांनी असे सांगितले कि हे गाम्मा ग्लोब्युलीन्मध्ये पोलिओ विरुद्ध प्रोटीन्स आहेत आणि हे गामा ग्लोब्युलीन पोलिओ विरुद्ध आपण वापरू शकतो .आणि +पोलिओ हा रोग अजूनही साऊथ आशिया आणि आफ्रिका मध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो . १९५० मध्ये पोलिओच्या लसीच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्धीमुळे पोलिओ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली .१९८८ मध्ये World Health Organisation ,UNICEF आणि Rotary Foundation या संस्थांनी सुरू केलेल्या कामामुळे जागतिक स्तरावरील पोलिओ निर्मूलनाचा प्रयत्न यशस्वी होत आहे . +पोलिओवर नेमके उपचार नाहीत. फक्त लक्षणावरून उपचार करण्यात येतात. रुग्णास वेदना कमी करता येतील आणि स्नायूंना आराम मिळेल एवढे उपचार शक्य आहेत. श्वास घेण्यासाठीच्या स्नायूवर परिणाम झाला असल्यास कृत्रिम श्वासयंत्रावर रुग्णास ठेवावे लागते. पोलिओचे नक्की निदान झाले असल्यास रुग्णास कडक बिछान्यावर झोपविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण बरा होत असता भौतिक चिकित्सा आणि उपचारांचा रुग्णास फायदा होतो. +पोलिओ सौम्य असल्यास किंवा आसेप्टीक मेंदूदाहाचे निदान झाल्यास रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाचा पोलिओ झाल्यास पन्नास टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. 25% रुग्णामध्ये थोडा परिणाम शिल्लक राहतो. पण उरलेल्या 25% रुग्णामध्ये गंभीर विकृति शिल्लक राहते. गंभीर आजार झालेले 1% रुग्ण मरण पावतात. स्नायू दुर्बलता पहिल्या सहा महिन्यात पूर्ववत होते. रुग्णामधील सुधारणा दोन वर्षापर्यंत होत राहते. +नुकताच पोलिओचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे त्यामध्ये पोलिओनंतर अनेक वर्षे स्नायू दुर्बल होत राहतात. स्नायूची शक्ती या आजारात हळू हळू कमी होत जाते. +प्रतिबंध-पोलिओपासून संरक्षण मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पोलिओच्या दोन लसी मुळे पोलिओच्या विषाणूविरुद्ध प्रतिपिंड तयार होतात. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये कायमची आयुष्यभरासाठी प्रतिकारशक्ती हे याचे वैशिष्ट्य आहे. +सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. लहान बालकाना ही तीन डोसमध्ये देण्यात येते. या लसीमध्ये दुर्बल पोलिओच्या विषाणूचा वापर केला आहे. पुढील आयुष्यात पोलिओपासून या लसीने संरक्षण मिळते. या लसीमध्ये जिवंत पण दुर्बल पोलिओ विषाणूंचा वापर केला असल्याने ज्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती क्षीण आहे अशा व्यक्तीमध्ये पोलिओ सारखी लक्षणे उद्भवू शकतात. असा प्रकार क्वचितच होतो. 68 लक्षडोसेस पैकी एका व्यक्तीमध्ये असा परिणाम दिसला आहे.तीन +साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते. या लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने लस दिलेल्या व्यक्तीमध्ये लसीमुळे प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भविष्यकाळात पोलिओ विषाणूशी संपर्क आल्यानंतर रुग्णाचा पोलिओपासून बचाव होतो. +पोलिओच्या परिणामांचे ज्ञान आदिमानवाच्या काळापासून तयार झालेले आहे. इजिप्शियन कलाकृतींमध्ये पोलिओचे अवशेष सापडतात. पोलिओचे पहिले वर्णन मायकेल अंडरवुड यांनी १७८९ साली केले. ह्या आजाराला Infantile Paralysis असे नंतर म्हणण्यात आले. विसाव्या शतकाच्या आधी पोलिओ आजार सहा महिन्यांहून कमी वयाच्या मुलांना आगदी कमी वेळा होत असे. कारण त्याकाळी लोकाचे राहणीमान अतिशय खालावलेले होते आणि म्हणून लोकांना सततच पोलिओच्या विषाणूंशी संपर्क होता आणि म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती परंतु विसाव्या शतकानंतर चांगल्या राहणीमानामुळे लहान मुलांना देखील पोलिओ रोग होऊ लागला. युरोपे व अमेरिकेमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीला छोट्या प्रमाणात पोलिओची साथ आली होती. १९५०पर्यंत पोलिओने आपल्या साठीचे शिखर गाठले होते. पोलिओने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. Itensive Care Medicineची सुरुवात पण पोलिओ विरुद्ध चाललेल्या लढ्यातच झाली. पोलिओ रुग्णांना मदत करण्यासाठी ज्या मोहिमा काढण्यात आल्या त्या मोहिमा जगात पहिल्या मदत कार्य असणाऱ्या ठरल्या. जे रुग्ण पोलिओमधून वाचले त्यांचे अवघे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या यशामागे पोलिओच खूप मोठा वाटा आहे. पोलिओ ही १९६० च्या दशकातली सर्वात मोठी गोष्ट बनली व त्यामुळे पोलिओवर काम करणारे शास्त्रज्ञ सर्वात प्रतिष्ठित झाले. Polio Hall of Fameची सुरुवातही ह्याच कारणावरून झाली. +पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारताच्या आजूबाजूचे देश आता पोलिओमुक्त झालेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर "तालिबान‘कडून प्राणघातक हल्ले होतात. परिणामी ते देश पोलिओग्रस्त आहेत. विषाणूंना कोणत्याही देशाच्या सीमारेषांचे बंधन नसल्याने भारतासारख्या अनेक पोलिओमुक्त देशातील बालकांना म्हणूनच यापुढेही पोलिओची लस घ्यावी लागणार आहे. +टाईप २ विषाणूचे पृथ्वीवरून १९९९मध्ये कायमचे उच्चाटन झाले. त्यामुळे २५ एप्रिल २०१६पासून जगात "टीओपीव्ही‘ऐवजी "बीओपीव्ही‘ लस देण्यास सुरुवात झाली आहे. याला भारताने "नॅशनल स्विच डे‘ म्हटले आहे.. "टीओपीव्ही‘ म्हणजे "ट्रायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्‍सिन‘. यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूंचा समावेश होता. "बीओपीव्ही‘मध्ये टाईप २ (लॅन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला "बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्‍सिन‘ म्हणतात. "टीओपीव्ही‘ची लस देणे ९ मे २०१६पासून पूर्ण बंद होईल. +पहा : साथीचे आजार diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_524.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d39db90b7288acd409a90225ccdf157ae6a287e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_524.txt @@ -0,0 +1 @@ +पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १५६९ साली पोलंड व लिथुएनियाच्या राज्यकर्तांनी ह्या संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. इ.स. १७९५ साली पोलंडच्या तिसऱ्या फाळणीनंतर हे राष्ट्र संपुष्टात आले. १६व्या व १७व्या शतकादरम्यान युरोपामधील सर्वात मोठ्या व सर्वाधिक लोकसंख्येच्या साम्राज्यांपैकी एक असलेले पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल प्रामुख्याने कृषीप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5247.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a09c350f4da11295b9fa2baab46ac2b6053964b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5247.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बकिंगहॅमशायर (इंग्लिश: Buckinghamshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिचा काही भाग लंडन महानगरामध्ये मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5277.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5e6d902869c18919612feaeb8e417eceabc9db --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5277.txt @@ -0,0 +1 @@ +बगदाद बूनेदजाह (३० सप्टेंबर, इ.स. १९९१ - ) हा अल्जिरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5283.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3daad8fef45f9c47364cdc0a87fbafae564a1edf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5283.txt @@ -0,0 +1,4 @@ +बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे.[१] त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक आळ्या, काही प्रकारचे शेवाळी असे आहे.याला इंग्रजीत इग्रेट (Egret) असे म्हणतात. +नर बगळा - बगळा +मादी बगळा - बगळी +भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळून येतात खालील प्रमाणे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5288.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80ca47603d60397587db77b3e2c027d78e559cf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5288.txt @@ -0,0 +1,12 @@ +बचत खाते ही बँका आणि इतर वित्तसंस्थांची सर्वात लोकप्रिय सेवा आहे. +विशिष्ट अपवाद वगळता कोणीही व्यक्ती किंवा व्यवसाय आपले पैसे बँकेला देते. हे पैसे बँक तिसऱ्या व्यक्तीस कर्ज म्हणून वापरावयास देते व त्यासाठी व्याज आकारते. या व्याजातील पैशातून बँक मूळ ठेवदारास व्याज देते. घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित रहावे म्हणूनही पैसे बचत खात्यात ठेवले जातात. +ग्राहकाने आपली ओळख पत्रे आणि पत्त्याचा पुरावा बँकेला अर्जासोबत देऊन बचत खाते उघडता येते. बचत खाते उघडल्यास ग्राहकाला धनादेश (चेक बुक) , ए टी एम कार्ड, नेट बँकिंग अशा अनेक सोयी उपलब्ध होतात. ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो तसेच धनादेश , आर टी जी एस, एन इ एफ टी असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे देऊ शकतो. +बचत खात्या बरोबर मिळणाऱ्या विविध सोयीसाठी ग्राहकाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. काही वेळा ग्राहकाच्या खात्यावर मोठी रक्कम शिल्लक असेल तर बँका हे शुल्क माफ करू शकतात. +बचत खाते उघडण्या साठी काही किमान रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागते. अशी किमान रक्कम खात्यात न ठेवल्यास बँक अशा ग्राहकास दंड करू शकते. +जन धन योजने अंतर्गतभारत सरकारने शून्य किमान रक्कम आणि कुठलेही शुल्क नसलेली बचत खाती उघडण्याची सोय भारतीय जनतेला करून दिली. या योजने अंतर्गत कोट्यावधी बचत खाती उघडली गेली. +बचत खात्याला नामनिर्देशन करण्याची सोय उपलब्ध आहे. +बँकेत बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील व्यवहारांची माहिती देणारे "खाते पुस्तक" दिले जाते. खातेपुस्तकात खातेदाराचे नाव, पत्ता, खात्याचा क्रमांक, खात्याचा प्रकार, बँक शाखेचा पत्ता, शाखेचा IFSC आय एफ एस सी कोड, पेन्शन ऑर्डर क्रमांक असे तपशील पहिल्या पानावर असतात. खाते पुस्तकावरील इतर पानावर व्यवहारांची माहिती उदा. तारीख, तपशील, रक्कम, धनादेश क्रमांक, जमा कि नावे आणि व्यवहारानंतर खात्यातील शिल्लक रक्कम असते. +खाते पुस्तक हरवले तर बँकेला अर्ज करून नवीन खातेपुस्तक मिळू शकते. या साठी काही शुल्क भरावे लागते. काही वेळा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पैसे काढताना खाते पुस्तक बरोबर असणे सक्तीचे केले जाते. गैर व्यक्तीने खात्यातील पैसे काढू नयेत या साठी हे आवश्यक आहे. +खाते उतारा आणि खाते पुस्तक यांचा उद्देश एकाच आहे, ग्राहकाला त्याच्या खात्यातील व्यवहारांची माहिती होणे. खातेपुस्तक ग्राहक कधीही भरून घेऊ शकतो व त्यामुळे व्यवहारांची माहिती क्षणात होऊ शकते. खाते उतारा हा ठराविक कालावधी नन्तर दिला जातो. +भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ग्राहकाच्या खात्यावर रोज दिवसाखेरी शिल्लक असणाऱ्या रकमेवर ठराविक दराने व्याज दिले मोजले पाहिजे. व्याजाचा दर सर्व बचत खाते ग्राहकांना समान असावा असा रिझर्व्ह बँकेचा दंडक आहे. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम दर तीन महिने किंवा दर सहा महिन्यांनी देण्याची मुभा बँकांना आहे. +जर खात्यामध्ये नावे रक्कम असेल म्हणजेच खात्यामध्ये ओव्हर ड्राफ्ट असेल तर व्याजाची रक्कम दर महिनाअखेरीस वसूल करता येते. नावे रकमेवरील व्याजसुद्धा दर दिवसा अखेरीच्या नावे रकमेवर मोजले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5298.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74df0c227004d3b6cc389f41a2e33b10edc2f62c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5298.txt @@ -0,0 +1,4 @@ +बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत. +त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. +त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे: +आय बी एन लाईव्ह वरील मुलाखत Archived 2009-11-13 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5307.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1bc7f1b4f943109b8c16955551e917b8e55a61c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5307.txt @@ -0,0 +1 @@ +बच्छाव यांची कुलदेवी विन्द्यासिनी देवी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5326.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcb646f935f2ab4a9a3f948f7b2e1cd7ba66f10b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5326.txt @@ -0,0 +1,2 @@ +बजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. [२] ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते . बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण ( पुणे ), वाळूज ( औरंगाबाद जवळ) आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. [३] आकुर्डी ( पुणे ) येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे. +बजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. [४] ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे. [५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5332.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b69498180e45f6865b6887885048cea4e0a49d31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5332.txt @@ -0,0 +1,3 @@ +जमनालाल बजाज पुरस्कार हा ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मृत्यर्थ बजाज फाऊंडेशनतर्फे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात शास्त्र व तंत्रज्ञानाचा वापर तसेच विधायक कार्य या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान केला जातो. +महिला व बालकल्याण या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या महिलांना जानकिदेवी बजाज पुरस्कार प्रदान केला जातो. +गांधीजीच्या विचारांचा भारताबाहेर प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बजाज पुरस्कार प्रदान केला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5333.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e219ba19793182167bb6e0ab60d6f85c9e7ae2fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5333.txt @@ -0,0 +1,2 @@ +बजाज फायनान्स लिमिटेड, [१] बजाज फिनसर्व्हची उपकंपनी, भारतातील पुणे शहरात मुख्यालय असलेली एक भारतीय बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. कंपनी ग्राहक वित्त, लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग आणि व्यावसायिक कर्ज, आणि संपत्ती व्यवस्थापनात व्यवहार करते. +पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेल्या, कंपनीच्या २९४ ग्राहक शाखा आणि ३३,००० पेक्षा जास्त विक्री केन्द्रे आहेत. यांतील ४९७ ग्रामीण भागात आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ०.८%चा ROA आणि ५.१%चा ROE व रु.626 कोटींचा करपूर्व नफा आणि रु. ४०८ कोटी [२] करोत्तर नफा नोंदवला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5351.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a21494d009d24b98ec00cf5d72fce32dc20a0e5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5351.txt @@ -0,0 +1,3 @@ +बटलर काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बटलर काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5375.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a127a006367746c531b0c61081f708fa3f083a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5375.txt @@ -0,0 +1,2 @@ +बटाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5378.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac52671d07429ca7fdb776172d7f1c6f6091f578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5378.txt @@ -0,0 +1,3 @@ +बटुकेश्वर दत्त एक भारतीय क्रांंतिकारी होते. त्यांनी ८ एप्रिल, इ.स. १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारणाच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरोधात निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले आणि अखेरीस त्यांच्यासाठी काही हक्क मिळवले. +दत्तांना बी.के. दत्त, बट्टू आणि मोहन या नावानेही ओळखले जायचे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी बंगालमधील पूर्व बर्दमान जिल्ह्यातील ओरी या गावातील गोठा बिहारी दत्त यांचे घरी झाला. त्यांनी कॉवनपूरमधील पी.पी. एन हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. +भगतसिंगसारख्या क्रांतिकारकांचा उदय रोखण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकारने भारतीय संरक्षण कायदा १९१५ (the Defence of India Act 1915) लागू केला, ज्याने पोलिसांना अनेक अधिकार दिले. फ्रेंच अराजकतावाद्यांनी केलेल्या फ्रान्सच्या चेंबर ऑफ डेप्युटीजच्या घटनेपासून प्रेरणा घेऊन भगतसिंघांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब स्फोट करण्यासाठी योजना आखली. सुरुवातीला असे ठरविण्यात आले की बटुकेश्वर दत्त आणि सुखदेव हे बॉम्ब लावतील आणि सिंग युएसएसआरच्या दिशेने प्रवास करतील. तथापि, नंतर योजना बदलली आणि दत्तला सिंह यांच्यासमवेत बॉम्ब लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ८ एप्रिल १९२९ रोजी सिंग आणि दत्त यांनी दर्शदीर्घतेतून धाव घेत विधानसभा परिसरात दोन बॉम्ब फेकले. बॉम्बच्या धुराने हॉल भरले आणि त्यांनी "इन्कलाब जिंदाबाद"च्या घोषवाक्यांचा जयघोष करीत कायद्याचा निषेध करणारी पत्रके फेकायला सुरुवात केली. या पत्रकानुसार दावा केला की केंद्रीय विधानसभेत ठेवण्यात आलेला हा कायदा व्यापार विवादांचा आणि सार्वजनिक सुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहे आणि त्यात लाला लाजपत राय यांच्या मृत्यूच्या निषेध नोंदवण्यात आला आहे. स्फोटात काही लोक जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही. सिंग व दत्तानी हे जाहीर केले कि हे कृत्य नियोजित होते व स्वतःला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5386.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fba67b8b5bc13f1b6b5df0e051b61325de522e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5386.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख भटिंडा जिल्ह्याविषयी आहे. भटिंडा शहराबद्दलचा लेख येथे आहे. +भटिंडा हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र भटिंडा येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,८८,५२५ होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5389.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad7dc60db7742a1442626df694bc7f367d88b622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5389.txt @@ -0,0 +1,2 @@ +बडगाम भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,५३,७४५ होती. हे शहर बडगाम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5401.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..163593cd81c32feda8216cdaaffdff44a5c9a555 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5401.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडोदरा गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ आहे. +२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेन्द्र मोदीने हा मतदारसंघ जिंकला diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_543.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c51550d13b959c132bac172f2205f32f5386fd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_543.txt @@ -0,0 +1 @@ +पोलीस शिपाई हे पोलीस बलाचे एक पद आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5436.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34e3c98089b42b248edc81a063d72d1f52c17934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5436.txt @@ -0,0 +1,3 @@ +सैयदा बतूल फातिमा नक्वी (१४ ऑगस्ट, इ.स. १९८२:कराची, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ९ एप्रिल, इ.स. २००१ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली. +साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5440.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b621621eb306c9431eb432019178eb2832ad69c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5440.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासावा किंवा मित्सिवा (गीझ भाषा: ምጽዋዕ;मिसिवा, अरबी भाषा: مصوع;मसावा, इटालियन भाषा:मस्सौआ) किंवा पूर्वीचे बत्सी[१] (गीझ भाषा: ባጽዕ;बासी) किंवा बडी (अरबी भाषा: بِضع) हे इरिट्रियामधील लाल समुद्रकिनाऱ्यावर असलेले शहर व बंदर आहे. +इ.स. १९९१मध्ये इरिट्रिया देश उदयास येण्याआधी या शहरावर अक्सुमी साम्राज्य, उम्मयी खिलाफत, बेजा जमाती, ऑट्टोमन साम्राज्य, इजिप्त, युनायटेड किंग्डम, इटली आणि इथियोपियाची सत्ता होती. इ.स. १९००पर्यंत हे शहर इटलीच्या इरिट्रिया प्रांताची राजधानी होते. त्यानंतर राजधानी अस्मारा येथे हलविण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5451.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1013303367feb2acfa3a8d87c90e3aaee525574 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5451.txt @@ -0,0 +1,14 @@ +बदनापूर हे जालना जिह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जालना जिल्हा होण्यापूर्वी हे बदनापूर औरंगाबाद जिह्यातील जालना तालुक्यातील शहर होते . बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर आहे जे की जिह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे . तालुक्यातील दुधना नदी ही प्रमुख नदी असून त्या नदीवरील दुधना मध्यम प्रकल्प ही सोमठाना गडाला लागूनच आहे +दुधना नदीवर जवळपास 3 किमी अंतरावर अकोला हे भव्य गावं वसलेले आहे . +अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे +आणि वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे. बदनापूर हा मुंबई नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे। + +बदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. +हा तालुका औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे . +बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे रेणुका माता देवीचे मंदिर आहे तसेच जवळच सोमठाना धरण आहेजे निसर्ग सौंदर्यनि परिपूर्ण आहे . +बदनापूर मध्ये मार्केट कमिटी हे देखील एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. +बदनापूर पासून 10 किमी वर असलेले नूर हॉस्पिटल व परिसर हे जवळपासच्या लोकांसाठी मनोरंजाचे ठिकाण बनले आहे . +कसे पोहचाल: +रस्ते :-हे ठिकान जालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेले आहे +रेल्वे :-काचिकुडा-मनमाड रेल्वमार्गावरील बदनापूर हे महत्वाचे स्थानक आहे . +हवाई :- 40 किमी वर चिकलठाणा(औरंगाबाद) हवाईअड्डा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5457.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28cb0e65b753bbb441b5fb2bc68b041385ff6630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5457.txt @@ -0,0 +1 @@ +मौलाना बदरुद्दीन अजमल (असमीया: বদৰুদ্দিন আজমল) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभेचे सदस्य व आसाममधील अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा ह्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. २००९ पासून लोकसभा सदस्य असलेले अजमल २००६ ते २००९ दरम्यान आसाम विधानसभा सदस्य देखील होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_547.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f3f528254187d20c70564adabcd1cafa556ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_547.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 23°54′00″S 29°27′00″E / 23.90000°S 29.45000°E / -23.90000; 29.45000 + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5484.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..595fcacebd8ed09ee46144144b6923028d6eb57e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5484.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बदायूं जिल्ह्याविषयी आहे. बदायूं शहराविषयीचा लेख येथे आहे. +बदायूं जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बदायूं येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5500.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..530936af905fdfc6a20fbe0fc569886fb7f7a791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5500.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉनी वॉकर तथा बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी (१९२३:इंदूर, ब्रिटिश भारत – २९ जुलै, २००३), हा एक भारतीय अभिनेता होता. याने सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले. तो भारतीय चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होता. सहसा हा गडबड्या दारुड्याच्या भूमिकेत असे. +काझी यांचा जन्म इंदूर, ब्रिटिश भारत (सध्याचे मध्य प्रदेश, भारत ) येथे झाला. हा एका विणकाम शिक्षकाच्या बारा मुलांपैकी एक होता. [१] [२] [३] [४] +आपल्या वडिलांनी नोकरी गमावली बद्रुद्दीनने बस थांब्यांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नकला करून पैसे मिळविणे सुरू केले. [५] +जॉनी वॉकरने भारतीय अभिनेत्री शकिला हिची बहीण नूरजहानशी तिच्या घरून विरोध असतानाही लग्न केले. [६] त्यांना तीन मुली आणि तीन मुलगे होते, त्यापैकी एक अभिनेता नसीर खान आहे. [६] सहाव्या यत्तेत शाळा सोडण्यास भाग पाडले गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आपल्या मुलांना शालेय शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. [७] +अनेकदा दारुड्याच्या भूमिका करत असूनही, जॉनी वॉकर हा दारू पीत नसे. त्याने आयुष्यात कधीही दारू प्यायली नसल्याचा दावा केला. [५] जॉनी वॉकरचे २९ जुलै, २००३ रोजी आजारपणानंतर निधन झाले. [१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5509.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da9a158627b85447e2a0eb74f7cca60227ec6703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5509.txt @@ -0,0 +1 @@ +बनगांव हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5519.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5399ca53dc8a39a655e4b3a28355afffcf2f013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5519.txt @@ -0,0 +1,11 @@ +१४° ३२′ ०२.७६″ N, ७५° ०१′ ०३.७२″ E +[[वर्ग:कर्नाटक राज्यातील शहरे व गावे]] +बनवासी हे दक्षिणी भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव वरदा नदीच्या काठी वसले आहे. या गावाला कोंकणपुरा या नावाने देखील ओळखले जाते. हे गाव तेथील प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. +बनवासी हे कर्नाटकातील एक सर्वात जुने गाव म्हणून परिचित आहे. +कन्नड भाषेतील आद्यकवी 'पंप' याने बनवासी येथेच साहित्यनिर्मिती केली. +कर्नाटकातील प्राचीन राजवंश 'कदंब' यांची राजधानी बनवासी येथे होती. +प्राचीन चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने बनवासी गावाला भेट दिली होती. त्याने या गावाचे नाव चिनी लिपीमध्ये कोंकणपुलो असे लिहिले होते. +बनवासी गावाचा परिसर जंगलांनी व्यापला आहे. बनवासी हे सिरसी नगरापासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. +बनवासी परिसर तांदूळ, ऊस, सुपारी, अननस, मसाले इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. +बनवासी येथील मधुकेश्वर हे ९ व्या शतकातील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. +प्रतिवर्षी राज्य सरकारद्वारे येथे डिसेंबर महिन्यात 'कदंबोत्सव' आयोजित केला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5521.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d0dcf0da8791a4e7fdd5d4b50e1f3997595b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5521.txt @@ -0,0 +1 @@ +बनस्तारी (लेखनभेद: बनस्तारिम) हे गोव्यातील एक शहर आहे. हे शहर पणजीपासून १६ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5524.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e552e2c93747e22a11bc589fd376b80e9b29902d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5524.txt @@ -0,0 +1,2 @@ +बनाबा द्वीप[१] तथा ओशन आयलंड हे किरिबाटीमधील एक प्रवाळी बेट आहे. प्रशांत महासागरात गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या पश्चिमेस आणि नौरूच्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.[२] ६.५ किमी२ विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबाटीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते. +फ्रेंच पॉलिनेशियातील नौरू, माकाटेआ या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे फॉस्फेटचे बेट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5532.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5922ebe9c39d76bd8357253f3e28063fcc02c2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5532.txt @@ -0,0 +1 @@ +बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरातील विद्यापीठ आहे. याला काशी विश्वविद्यालय किंवा बीएचयू नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा आयटी-बीएचयू नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये आयआयटीचा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला आयआयटी-बीएचयू असे नाव दिले गेले. 1960च्या सुमारास हैदराबाद निज़ाम- मीर उस्मान अली खानने 10 लाख रुपये दान केले. [१] याची स्थापना १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5545.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58049367aa79cf828fd0e00274dce4708b544c15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5545.txt @@ -0,0 +1,5 @@ + +बनासकांठा जिल्हा गुजरातमधील उत्तर भागात असलेला एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण पालनपूर येथे आहे. या जिल्ह्यातून बनास नदी वाहते. राजस्थानच्या अरवली पर्वतातून उगम पावलेली ही नदी जिल्ह्यातून वहात वहात शेवटी कच्छच्या रणात विलीन होते. + +बनास नावाची आणखी एक नदी राजस्थानात आहे, ती चंबळ नदीची उपनदी असून तिच्यासह यमुना नदीला मिळते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_555.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7fb4f46509c7490f54a8b2331c91530d4d49cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_555.txt @@ -0,0 +1 @@ +पोल्गाम्पोला रलालागे चामरी सरोजिका कुमारीहामी तथा चामरी पोल्गाम्पोला (२० मार्च, इ.स. १९८१:वरकपोला, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5557.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b73b3cebea81cf09d335e4f88e03671cb5a8c1f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5557.txt @@ -0,0 +1,2 @@ +बन्नाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5567.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed1590bf5d0c32491a6f915931a9d276f526bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5567.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 42°54′17″N 78°50′58″W / 42.90472°N 78.84944°W / 42.90472; -78.84944 + +बफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. +न्यू यॉर्क राज्यामधील इतर ठिकाणांप्रमाणे बफेलो शहर येथील हिमवर्षेसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिवाळे अत्यंत थंड तर उन्हाळे सौम्य असतात. + +खालील व्यावसायिक संघ बफेलोमध्ये स्थित आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5570.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf399ce6ca213e275820e7aa2d6235d22ed7d07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5570.txt @@ -0,0 +1,2 @@ +बफेलो अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील छोटे शहर आहे. जॉन्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,५८५ होती. +शेती आणि पर्यटन या गावातील मुख्य व्यवसाय असून २०१० च्या दशकात येथून जवळ सापडलेल्या मिथेन वायूच्या साठ्यांमुळे त्याच्याशी निगडीत व्यवसायही सुरू झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5593.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b85b42760a575ea8d239a15b18e9a6fa52a43c97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5593.txt @@ -0,0 +1,5 @@ +बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२ - २८ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते.[१] त्यांचे वडील ही कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे ही गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.[२] +बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे +बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला. +'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. +बबनराव नावडीकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त दिनांक २८ मार्च २०१९ला साथी एस्.एम् जोशी सभागृहात अेडव्होकेट बाबुराव कानडे यांचे भाषण. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5597.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2621d2a5acf230468868bd0dd0faf94bc6e054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5597.txt @@ -0,0 +1,2 @@ +बबनराव विठ्ठलराव शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे माढा मतदारसंघातून काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. +या आधी ते नवव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_56.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_56.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3162bcf36b72c2a2ab57d6cbfa7ed33180c32d8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_56.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप अर्बन दुसरा (इ.स. १०४२:फ्रांस - जुलै २९, इ.स. १०९९:रोम, इटली) हा मार्च १२, इ.स. १०८८ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव चॅटियॉंचा ओडो किंवा ओथो दि लागरी होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5604.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1524367ab172168754e33c04bdc8f234bbb02fb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5604.txt @@ -0,0 +1,2 @@ +बबिता ललित मंडलिक (१६ जुलै, १९८१:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २००३-१० दरम्यान ३ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. मंडलिक मध्य प्रदेश, रेल्वे आणि दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] +मंडलिकला एक मुलगी आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5609.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffea6044c4af613fd681a1cdf735fd63e2fc936a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5609.txt @@ -0,0 +1,2 @@ +बभ्रुवाहन अर्जुनाचा मुलगा होता. त्याची पत्नी किमवेका होती जे अवंती साम्राज्यची एक राजकुमारी होती. त्याने तिला वाचवलं दुर्योधनशी.बभ्रुवाहन ने ही पण शपथ घेतली होती कि तो किमवेकाशी लग्न करणार पण अनेक स्त्रीशी नाही. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5628.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d1ad028e16b71f19f7adce9691d9be119500c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5628.txt @@ -0,0 +1,2 @@ +बरगड्या ह्या कणाधाऱ्यांच्या शरीरशास्त्रानुसार, लांब वळलेली हाडे असतात, जी छातीचा एक प्रकारचा पिंजरा म्हणून काम करतात. बहुदा सर्व चतुष्पादी प्राण्यांत, बरगड्या या छातीभोवती असतात. त्यामुळे हृदयाचे आकुंचन व प्रसरण योग्य रितीने होते. त्यांचेमुळे हृदयास व तत्संबंधी इतर अवयवांना एक प्रकारे संरक्षण मिळते. सापासारख्या प्राण्यांत, बरगड्या या त्याच्या पूर्ण शरीराचे संरक्षण करतात व त्या त्याचे शरीरभर असतात. +बरगड्यांमुळे, त्या ठिकाणी झालेला कोणताही आघात, थेट हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवापर्यंत पोहोचू शकत नाही, अथवा त्याची तीव्रता कमी होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5636.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9729e1f2018a73986bd8b208d38dfa4ad0f27d5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5636.txt @@ -0,0 +1,3 @@ +बरबँक हे अमेरिकेच्या लॉस एंजेलस काउंटी, कॅलिफोर्निया येथील सॅन फर्नांडो व्हॅलीच्या आग्नेय टोकावरील एक शहर आहे. [७] शहराचे नाव डेव्हिड बरबँक या न्यू हॅम्पशायरमध्ये जन्मलेल्या दंतवैद्य आणि उद्योजक याच्या नावावरून ठेवण्यात आले ज्याने १८६७ मध्ये तेथे मेंढीपालनाचा व्यवसाय स्थापन केला होता. [८] +हे शहर "जगातील मीडिया कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. [९] हॉलीवूडच्या केवळ काही मैल ईशान्येला असलेल्या बर्बँकमध्ये अनेक माध्यम आणि मनोरंजन कंपन्यांचे मुख्यालय आहे, तसेच महत्त्वपूर्ण उत्पादन सुविधा आहेत. महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये वॉर्नर ब्रदर्स, एंटरटेनमेंट, द वॉल्ट डिस्ने कंपनी, निकेलोडियन अ‍ॅनिमेशन स्टुडिओ, द बरबँक स्टुडिओ, कार्टून नेटवर्कच्या वेस्ट कोस्ट शाखेसह कार्टून नेटवर्क स्टुडिओ आणि इन्सोम्नियाक गेम्स यांचा समावेश होतो. हॉलीवुड बरबँक विमानतळ हे लॉकहीडच्या स्कंक वर्क्सचे स्थान होते, ज्याने ऑक्टोबर १९६२ मध्ये क्युबामध्ये सोव्हिएत युनियनच्या क्षेपणास्त्र घटकांचा पर्दाफाश करणाऱ्या U-2 गुप्तचर विमानांसह काही अत्यंत गुप्त आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत विमाने तयार केली होती. याव्यतिरिक्त, शहरात यूएस मधील सर्वात मोठा IKEA आहे. [१०] +बरबँकमध्ये दोन वेगळ्या क्षेत्रांचा समावेश आहे: एक डाउनटाउन/फूटहिल विभाग, वर्दुगो पर्वताच्या पायथ्याशी आणि सपाट प्रदेश. रोवन अँड मार्टिनच्या लाफ-इन आणि जॉनी कार्सन अभिनीत द टुनाईट शोवर शहराला "ब्युटीफुल डाउनटाउन बरबँक" म्हणून संबोधले गेले, कारण दोन्ही शो एनबीसीच्या पूर्वीच्या स्टुडिओमध्ये टेप केले गेले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5689.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a8eac78f7d47eb5814642d2264665259bfc21d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5689.txt @@ -0,0 +1,2 @@ +बरेली भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बरेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5698.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc60c5b4e0f2ed7a451c8857482cbb53dc0d2afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5698.txt @@ -0,0 +1 @@ +बरेली हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5703.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee037941f25749dcd4050716fffa2236de6495f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5703.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडोदरा क्रिकेट संघ हा भारतातील क्रिकेट स्पर्धांमध्ये वडोदराचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +या संघाची स्थापना १९३०मध्ये झाली diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5711.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c41e6d276e4c17d27671b6aa75c962627e97ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5711.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 37°52′18″N 122°16′22″W / 37.87167°N 122.27278°W / 37.87167; -122.27278 + +बर्क्ली हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. बर्क्ली शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात ओकलंडच्या ५ मैल उत्तरेस तर सॅन फ्रान्सिस्कोच्या १४ मैल ईशान्येस स्थित आहे. २०१० साली बर्क्लीची लोकसंख्या १.१२ लाख होती. +कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पहिले आवार बर्क्ली येथे इ.स. १८६८ मध्ये स्थापन केले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5744.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a98b8dd32cf0fc2300d928901a87127685a69848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5744.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट हॉवर्ड बर्ट व्हॅन्स (३१ मार्च, १९५५:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९८८ ते १९८९ दरम्यान ४ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5750.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72429a120727a3d93de064c1afdef6d02e198577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5750.txt @@ -0,0 +1,2 @@ +हर्बर्ट बर्ट स्ट्रडविक (जानेवारी २८, इ.स. १८८०:मिचॅम, सरे, इंग्लंड - फेब्रुवारी १४, इ.स. १९७०:शोरहॅम-बाय-सी, ससेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5837.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5e616bddf28181148259653a4e88e288f5d9524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5837.txt @@ -0,0 +1,6 @@ +साचा:Infobox project +बर्फाचे स्तूप हे हिमनदीचे शंकूच्या आकाराच्या बर्फाच्या ढीगां स्वरूपात कलमबनवण्याचे तंत्र आहे जे कृत्रिम हिमनदी तयार करते. हे हिवाळ्यातील पाणी साठवण्यासाठी वापरले जाते (जे अन्यथा वाहून जात असे). उन्हाळ्यात, जेव्हा पाण्याची कमतरता असते, पिकांसाठी पाणीपुरवठा वाढवण्यासाठी या बर्फाच्या स्तुपांचा वापर होतो. बर्फ स्तूपांचा शोध लडाख (भारत) येथील सोनम वांगचुक यांनी लावला आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी विद्यार्थी 'शैक्षणिक आणि लडाख सांस्कृतिक चळवळ या स्वयंसेवी संस्थे ने केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरू झालेल्या या प्रायोगिक प्रकल्पाची सुरुवात जानेवारी २०१४ in मध्ये ‘आईस स्तूप’ या प्रकल्प नावाखाली आरंभ झाली. १५ नोव्हेंबर २०१६ रोजी सोनम वांगचुक यांना बर्फ स्तूपवरील कार्याबद्दल एंटरप्राइझसाठी रोलेक्स पुरस्काराने गौरविण्यात आले. +लडाख हा एक थंड वाळवंट आहे आणि हिवाळ्यामध्ये गोठलेल्या माती आणि येथे हवेच्या कमी तापमानामुळे शेती करता येत नाही. वसंत ऋतू मध्ये, पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता वाढते तर ओढे कोरडे पडतात. वार्षिक ५० मिलीमीटर (२.० इंच) पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे लडाखमधील शेती पूर्णपणे बर्फ आणि हिमनदी वितळण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलांमुळे या प्रदेशातला अधिक उष्ण उन्हाळा, वितळण्याची वेळ तसेच पर्जन्यवृष्टीमध्ये बदलासह बर्फ अधिक वितळतो. त्यानंतर वसंत ऋतू मध्ये पाणी जास्त प्रमाणात मिळत नाही ज्याचा परिणाम शेती व अन्न पुरवठ्यावर होतो.[१][२][३] +मे महिन्यात सोनम वांगचुकला पुलाखालील बर्फ दिसला. उन्हाळा आणि लडाखमध्ये सर्वात कमी उंची असूनही, थेट सूर्यप्रकाशाखाली नसल्यामुळे बर्फ वितळला नव्हता. वानचुकला लक्षात आले की बर्फापासून उन्हात छटा दाखविल्यास बर्फ जास्त काळ टिकेल. मोठ्या पाणवठ्यांना सावली प्रदान करणे शक्य नसल्यामुळे, वांगचुकने पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवताना सूर्यासाठी कमीतकमी पृष्ठभागाचे क्षेत्र देणारी शंकूच्या आकारात पाणी गोठवण्याचा आणि साठवण्याचा विचार केला.[२] +ऑक्टोबर २०१३ मध्ये सोनम वांगचुकने ६ मीटर (२० फूट) उंचीचा १,५०, ००० लिटर पाणी गोठवून सूर्यापासून कोणतीही सावली न घेता लेहमध्ये पहिला बर्फाच्या स्तूपाचा नमुना तयार केला. गुरुत्वाकर्षणाचा वापर करून उत्स्त्रोत्रामधून पाणी सोडण्यात आले. पाणी पंप करण्यासाठी वीज किंवा यंत्रसामग्री वापरली जात नव्हती. तापमान २० °से (६८ °फॅ)च्या वर असतानाही १८ मे २०१४ पर्यंत बर्फ स्तूप पूर्णपणे वितळला नाही [१][२][३][४] +कृत्रिम हिमनद्यांना प्रोत्साहन आणि सिंचनासाठी पाणी वाचविण्याच्या उद्दीष्टाने २०१९ पासून बर्फ स्तूप स्पर्धा घेण्यात येत आहे.[५] २०१९ मध्ये १२ बर्फाचे स्तूप बांधले गेले. २०२० मध्ये जवळपास २५ स्तूप बांधले जात आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5856.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7ebf57d65a154e9b6871c561d3f0718af3f57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5856.txt @@ -0,0 +1 @@ +बर्मुडियन क्रिकेट संघाने २८ जून ते १ जुलै २००८ दरम्यान कॅनडा दौरा केला. दोन्ही संघांनी ३ एकदिवसीय सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5861.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e525923b96e17ab4b278bd587c685930accb578e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5861.txt @@ -0,0 +1 @@ +बर्म्युडा राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला होता. ते नेदरलँड्सविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5862.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7db4e4050f4a9cc320099d6b161470c9e57480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5862.txt @@ -0,0 +1,4 @@ +The Bermudian cricket team toured the Netherlands during the २००७ season. They played a First-class match for the २००७-०८ ICC Intercontinental Cup and two One-Day Internationals. The Dutch team took an innings and ४४ run win षटक Bermuda in the First-class game and won the ODI series २-०. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5898.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87a85135da3c5e4e45222db3023e19fc4f5d7c0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5898.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्लिंग्टन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. किट कार्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या बर्लिंग्टनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ३,१७२ होती.[२] +हे शहर इंटरस्टेट ७० वरील कॉलोराडोमधील सगळ्यात पूर्वेकडचे गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5920.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb8adfe98dd6e1590ec91ca48c788d7b2bec7a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5920.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ (आहसंवि: SXF, आप्रविको: EDDB) जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस ब्रांडेनबुर्ग राज्यात शोनेफेल्ड शहरात असलेला हा विमानतळ टेगेल विमानतळापाठोपाठ बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे. +जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ पूर्व बर्लिनमध्ये होता. हा विमानतळ पूर्व जर्मनीचा मुख्य विमानतळ होता. +येथून युरोप आणि जगातील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_593.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6c4de322b509f0c4a657619ef46ac6726813725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_593.txt @@ -0,0 +1,8 @@ + पोसरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5932.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2049d6b78b8374cdf72a96fa726883f10c2394cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5932.txt @@ -0,0 +1,2 @@ + बऱ्हाणपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5963.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ffe84588ad4c8511c386a6790025f3274edbf91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5963.txt @@ -0,0 +1,8 @@ +मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना जून १९६० रोजी झाली. +ही संस्था मराठवाड्यातील एक अग्रगण्य आणि दर्जेदार शिक्षण देेणारी संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे. +बलभीम महाविद्यालय हे दर्जेदार शिक्षण देणा-या व वाणिज्य महाविद्यालये, २ विधी महाविद्यालये, १ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय आहे. +ही शिक्षणशास्त्र महाविद्यालय, १ देवगिरी इन्स्टिट्युट ऑफ संस्था मराठवाड्यातील एक अग्रगण्य आणि दर्जेदार शिक्षण टेक्नॉलॉजी, +१ अभियांत्रिकी महाविद्यालय, १ तंत्रनिकेतन देणारी संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे. +आम्हा सर्वांसाठी महाविद्यालय, १ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आहे. [[ +एकूण ७५ प्राथमिक व माध्यमिक विद्यालये व ४० उच्च अभिमानास्पद बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष २०१८ मध्ये संस्थेच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत. +संस्थेचे माध्यमिक विद्यालये आहेत. संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अध्यक्ष मा. प्रकाशदादा सोळंके (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) विद्यार्थ्यांची साधारणत: संख्या एक लाखाच्या जवळपास आणि सरचिटणीस मा.आ.सतीशभाऊ चव्हाण यांच्या कुशल आहे. संस्थेमध्ये चार हजारापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयात आहेत. गेल्या ५९ वर्षात संस्थेने दैदीप्यमान प्रगती केली आहे. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे कार्यक्रम सुरू प्रारंभी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा संस्थेने आहेत. मराठवाड्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानात सातत्याने प्रयत्न केला आहे. संस्थेचे भरीव आत्मीय योगदान आहे. संस्थेच्या हीरक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. महोत्सवी वर्षात मागे वळून पाहत असतांना संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा एक भव्य रजतपट आमच्या नजरेसमोर येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5967.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..348febc50f6bcec71129ce2a53d8bbaf47c8cb9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5967.txt @@ -0,0 +1,7 @@ +बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[१] +बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. +लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[२] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला. +पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[३] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. +'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[४] +बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_597.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f66c81a5419281c8b6f34787c54ae53fe9c89fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_597.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5980.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05129ec29674e5be3606952b7750bb466684aeef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5980.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बलरामपूर रामानुजगंज हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून बलरामपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा सुरगुजा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5995.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad15e5edaacb54872e2a46186f07f6ba5955b6bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_5995.txt @@ -0,0 +1,2 @@ +बलसाबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6001.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f6df314064743808cd7ba1c677637e41cad0c57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6001.txt @@ -0,0 +1,11 @@ +व्यक्तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय. यात पीडित व्यक्ती ही पुरुष किंवा बहुतांशी स्त्री असते. हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा आहे. जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला तर मग त्याला 'सामूहिक बलात्कार' म्हणतात. बलात्कार हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा आयुष्याभर किंवा मृत्यूपर्यंत होण्याची शक्यता आहे.[ संदर्भ हवा ] बलात्काराचे न्यायालयीन अहवाल, सुनावणी आणि दंड ठोकरणे दर वेगळे आहे. +बलात्कार[१] गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार +स्त्रियांवरच होवू शकतो. शारीरिक रचनेमुळे बलात्कारितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक +यातनांना तोंड द्यावे लागते. +भारतात बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेमध्ये कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या केली आहे. सदर कलमात गुन्ह्याची आणि शिक्षेची चर्चा करण्यात आली आहे.[२] +केलेला बलात्कार. +अनेक पुरूषांनी केलेला बलात्कार) +जीविताला धोका निर्माण करणे +आहे. +केल्यास २ वर्षे तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा होवू शकते. +नोंदविण्यात यावा. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6026.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e3b877f7fe9088afe635b88b63a0a4636be642e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6026.txt @@ -0,0 +1 @@ +बलुची ही आशियामधील बलुचिस्तान ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक भाषा आहे. इराणी भाषासमूहामधील ही भाषा प्रामुख्याने इराण व पाकिस्तान देशांमध्ये वापरली जाते व ती पाकिस्तानच्या ९ अधिकृत भाषांपैकी एक आहे. बलुची कुर्दीसोबत काहीशी मिळतीजुळती आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6033.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e03ed99a408b5b4082ddf984a850254cb263d8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6033.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्‌पिढ्या तेच ठरावीक काम करीत. +बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती. +12 जोशी + +क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत. तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6039.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07579caaba7ece151aa1470af3027a4d638cb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6039.txt @@ -0,0 +1,4 @@ + बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण, पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात बलुची नावाच्या जमाती राहतात. त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे ५४ हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारावर आली. ही हिंगलाज माता, हिंगला किंवा हिंगुला देवी हे आजच्या बलुचिस्तानातले एक हिंदू देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू विशेषतः मारवाडी आणि कच्छी पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात. बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ‘बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असे कालीमातेचे स्थान आजही आहे. +जग जिंकण्याच्या ईर्ष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इत्यादी प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झाले आणि पर्शियन सम्राट दुसरा दरायस याच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला.. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळले आणि गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ अनेक छोट्या छोट्या गणराज्यांशी पडली. एक नगर म्हणजे एक राज्य, इतकी छोटी असणारी ही गणराज्ये तलवारीला भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवले आणि रडवले. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरू किंवा पोरसाची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमध्ये एक किरात जमातीचे राज्य होते. म्हणजेच आधुनिक जगातले पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले कलात नावाचे एक शहर. ऋग्वेद काळातली भलान जमात आणि बौद्ध ग्रंथांमधला बलोक्ष यांचा देश म्हणजेच आजचा बलोक्षस्थान किंवा बलुचिस्तान. +प्राचीन किरातांप्रमाणेच आधुनिक बलुची देखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ‘लढवय्या जाती-मार्शल रेसेस’ असं नाव दिले होते. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे रॉयल इंडियन आर्मीमध्ये नियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये एक बलुच रेजिमेंट होती. +इ.स. १०० ते ३०० पर्यंतच्या काळात या प्रदेशात परता राजांचे राज्य होते. आपल्याला त्यांची माहिती त्यांच्या काळातील नाण्यांवरून मिळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6054.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b23c86e6bfaf79154ec7d5e6a067dd0c6e9a4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6054.txt @@ -0,0 +1,2 @@ +बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. +२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी  सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6059.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..354e91395c098a23414b55016e455feeb411337f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6059.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +बल्गेरिया युरोपियन संघाचा तसेच नाटो, युरोपियन परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. +बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. +बल्गेरिया देशाचे एकूण २८ प्रांत आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6081.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca9c884e32618032b23ec1016ec0d65ebe2ef91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6081.txt @@ -0,0 +1 @@ +बल्लिया हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6096.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19e7d38cb177a2ec7c5e0e536b1854c75beb4790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6096.txt @@ -0,0 +1,2 @@ +बळदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6111.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8eea95e789dee5955a74f43dc9d03df1eb0089a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6111.txt @@ -0,0 +1,5 @@ +बळाड बंधारा उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. +बळाड बंधारा हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6121.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0815c15236296cdf35cfa87e47283538bc0fcd65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6121.txt @@ -0,0 +1 @@ +बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.[१] सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6175.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74995294a03c34128e17a88cee39f933f594adb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6175.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°30′N 47°49′E / 30.500°N 47.817°E / 30.500; 47.817 + +बसरा (अरबी: البصرة) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर व सर्वात मोठे बंदर आहे. इस्लाममधील एक महत्त्वाचे मानले जाणारे बसरा प्रागैतिहासिक काळात सुमेर संस्कृतीचे केंद्र होते. लोकसंख्येच्या दृष्टीने बसरा बगदाद खालोखाल इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6215.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9068a36fcb85fab6bb22654a024691b9c67e12de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6215.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 17°18′N 62°44′W / 17.300°N 62.733°W / 17.300; -62.733 + +बासेतेर ही सेंट किट्स आणि नेव्हिस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6218.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..306d3a39da9a5d86c48d3a1b34d96ce4da0342bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6218.txt @@ -0,0 +1 @@ +आयुल्फ पीटर बस्टर नुपेन (१ जानेवारी, १९०२ - २९ जानेवारी, १९७७) हा दक्षिण आफ्रिकेकडून १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6224.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6224.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_623.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b687c5152c56d1dd1967ca32d95b1b9a518975b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_623.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6231.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf60da0c0376e3d9397c465963e1a375f15785fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6231.txt @@ -0,0 +1 @@ +बस्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6241.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96ccd4681aedd6f1fdfe6e7a4de201cd72e36bf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6241.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या देवीपाटन विभागातील हा जिल्हा भारत--नेपाळ सीमेवर वसला असून बहराईच हे ह्या जिल्हाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक अवध प्रदेशात असलेल्या बहराईच जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली सुमारे ३४.८८ लाख इतकी होती. भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून येथील ३६ टक्के लोकसंख्या राखीव जातीजमातीमधील आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6243.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5155d631d1fa73b7ff634e5d571e792c3665e215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6243.txt @@ -0,0 +1 @@ +बहराम चोबिन तथा सहावा बरहाम (फारसी:वहराम चोबेन; ?? - ५९१) हा सासानी साम्राज्याचा सम्राट होता. याला मिह्रेवंदाक (मित्राचा सेवक) असे नामाभिधान होते.[१] हा मृत्यूपूर्वी दोन वर्षे सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6256.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83efc202191493d0f3e810b42349cc6f63b97ca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6256.txt @@ -0,0 +1,3 @@ +बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांसाठी खुला असलेल्या ह्या मतदारसंघात बहराईच जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. +भारतीय जनता पक्षाच्या सावित्री बाई फुले ह्या येथील विद्यमान खासदार आहेत +संपूर्ण माहिती diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6258.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8723432d89a591621aa485fa403f62b83fbd94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6258.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहरैन आणि भारत यांच्यात राजकीय, सामाजिक-आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. भारत हा बहारैनचा जवळचा मित्र आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, बहारैन हे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या उमेदवारीच्या प्रमुख समर्थकांपैकी एक आहेत.[३] इराणच्या आण्विक कार्यक्रमाविषयीच्या चिंतेबद्दल, बहरीनच्या क्राउन प्रिन्सने भारताला या संकटाचे निराकरण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची विनंती केली. +भारत आणि बहरीनमधील संबंध पिढ्यानपिढ्या आहेत. बहरीनमधील अनेक प्रमुख व्यक्तींचे जवळचे संबंध आहेत जसे कवी आणि घटनाकार इब्राहिम अल-अरायद हे मुंबईत मोठे झाले, तर १७ व्या शतकातील बहरीनचे धर्मशास्त्रज्ञ शेख सालीह अल-कर्जकानी आणि शेख जाफर बिन कमाल अल -दिन हे गोवळकोंडा साम्राज्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते आणि भारतीय उपखंडातील शिया विचारांचे विकासक.[४] मोहम्मद हसन कमालउद्दीन हे १९७४ मध्ये बहरीनचे भारतातील पहिले महावाणिज्यदूत होते, त्यांनी मुंबईतील वाणिज्य दूतावासातून सेवा दिली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6262.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2290f57d2b9a1857d8ad0e4826d6bcf1ae061f81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6262.txt @@ -0,0 +1 @@ +बहरीन क्रिकेट असोसिएशन ही बहरीनमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6289.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5cecd2a6b51d8427303b631cbccb658469ceebb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6289.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहादरपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6306.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b491929f65bcf5c8c6ce7ec6bbf6caa51c6e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6306.txt @@ -0,0 +1,5 @@ +अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर ऊर्फ बहादूरशाहा जफर (उर्दू: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ;) (ऑक्टोबर २४, इ. स. १७७५ - नोव्हेंबर ७, इ. स. १८६२) हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमूरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर २८, इ. स. १८३७ रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध झालेल्या इ. स. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूरशाहाला ब्रिटिश बर्म्यात रांगून येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. नोव्हेंबर ७, इ. स. १८६२ रोजी रांगून येथेच स्थानबद्धतेत त्याचा मॄत्यू झाला. +बहादूरशहा जफर हा १८५७ च्या उठावाच्या वेळी पूर्ण चळवळीचे नेतृत्व करीत होता. त्यावेळी तो दिल्लीचा नवाब होता. यास मंगल पांडे , तात्या टोपे, झाशीची राणी, १८४९ साली निवर्तलेल्या पंजाबच्या रणजीतसिंह या राजाच्या पत्नीने देखील पाठिंबा दिला होता. भारतातील तमाम संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्व राजांच्या मनातही असंतोष खदखदत होता व अशा राजांनीही १८५७ च्या उठावास सक्रिय पाठिंबा दिला होता. यावेळी संस्थानांची अवस्था बिकट होती. या सर्व कारणांमुळे स्फोट होणे साहजिकच होते म्हणून उठावाचे केंद्र दिल्ली असावे असे ठरले. त्यावेळी बहादूरशहा जफर हा नवाब असल्याने त्यांच्याकडे हे नेतृत्व आले. यावेळी त्याचे वय 82 होते. +[ संदर्भ हवा ] + +वर्ग:भारताचा इतिहास diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6317.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d6a41692473be7641e97c25572158051e8ebe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6317.txt @@ -0,0 +1 @@ +बहामास राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहामासचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6318.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df7e10742828ae600fc67ff8cbbc3611ded20464 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6318.txt @@ -0,0 +1 @@ +बहामास क्रिकेट असोसिएशन ही बहामासमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. बहामास क्रिकेट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत बहामाची प्रतिनिधी आहे आणि ती एक सहयोगी सदस्य आहे[१] आणि १९८६ पासून त्या संस्थेची सदस्य आहे. आयसीसी अमेरिका क्षेत्रामध्ये त्याचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6326.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d6a41692473be7641e97c25572158051e8ebe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6326.txt @@ -0,0 +1 @@ +बहामास राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहामासचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6333.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d36e76e1a2a49bbb317ca5761872a376317b4e5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6333.txt @@ -0,0 +1 @@ +बहारुद्दीन युसुफ हबिबी ( जून २५, इ.स. १९३६) हा इंडोनेशियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. रुडी हबीबी किंवा बी.जे. हबीबी या नावांनी ओळखल्या जाणारा हबीबी १९९८ ते १९९९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_634.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82cbec49c5a511f8da71aaf104f1f9ce39a36c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_634.txt @@ -0,0 +1,2 @@ + पौंडखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6350.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afc0bf1079427e2d272b00d0455e635985e4232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6350.txt @@ -0,0 +1,17 @@ + +संत बहिणाबाई (इ.स. १६२८ (शके १५५१) - २ऑक्टोबर, १७००) या एक वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते . बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या. स्वप्नात तुकारामांनी त्यांना दृष्टान्त दिला. पुढे प्रत्यक्ष तुकारामांचे त्यांना दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. तथापि एका ब्राम्हण स्त्रीने तुकारामांचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी आपली तुकाभक्ती सोडली नाही. बहिणा आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत. बहिणा म्हणते 'तुका सद्गुरू सदोहर l भेटतो अपार सुख होव ll तुकारामा भेटला धन्य जिने माझे कृत्यकृत्य झाले सहजाचि ' +बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्‍यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या ३० वर्षाच्या रत्नाकर फाटक नावाच्या बिजवरांशी. त्यांना आधीची दोन मुले होती. +संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्‍हापूरच्या वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्‍वप्‍नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. तिने आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात, "पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...". त्यांच्या अभंगांंपैकी 'संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥' हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि 'घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥' हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.[१] +अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगांतून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून 'ब्राम्हण कोण' हा विषय उपस्थित करून ब्राम्हण आणि ब्राम्हणी सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राम्हण असून त्या काळात सडेतोड टीका केली. त्यांचे अभंग १७व्या शतकातील, पण ते प्रसिद्ध झाले विसाव्या शतकात. त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे. +असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय. संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. +या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा : नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, "ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते. +एका दिवशी बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीने तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने तीर्थ पिले सध्या ती मूर्ती शिऊर गावातील त्यांचा निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे. +ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे. +संपूर्ण अभंग असा - +संत कृपा झाली। इमारत फळा आली। +ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया। +नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार। +जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत। +तुका झालासे कळस। भजन करा सावकाश। +बहिणा फडकती ध्वजा। +तेणे रूप केले ओजा॥ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6354.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c46132a5696686ebf94223378a048c16f614592b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6354.txt @@ -0,0 +1 @@ +बहीर शाह (जन्म २१ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो स्पीन घर टायगर्सकडून खेळतो आणि तो अफगाणिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाकडूनही खेळला आहे.[१] २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून, बहिरने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6357.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cf535e538701ee019f67e81627388725895bb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6357.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहिरपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6378.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee69d232d91557501bb75acefb463ebf4ec90f53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6378.txt @@ -0,0 +1,2 @@ +अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेवून, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. आपल्या समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली. त्यात त्यांनी भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली. +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत हितकारिणी संघटनेची’ स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे जानेवारी ४, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6383.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4714ef97ef02774d1c693db2dc4490ee327e064 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6383.txt @@ -0,0 +1,8 @@ +शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्याच्या  व्यक्तिमत्त्वाचा  विकास  व  व्यावसायिक  कार्यक्षमता  या दोन्ही उद्दिष्टांना धरून अभ्यासक्रम असावेत, ही बहुउद्देशी शिक्षणामागील  मूळ  कल्पना  आहे. भारतात  १९५०  नंतर  बहुउद्देशी शिक्षणाची कल्पना पुढे आली. तथापि अशा प्रकारच्या शिक्षणाचा  पाठपुरावा  त्यापूर्वीही  करण्यात  आला  होता, असे दिसून येईल. भारतात इंग्रजी अमदानीत माध्यमिक शिक्षणाचा जो अभ्यासक्रम होता, त्याचे उद्दिष्ट विद्यापीठात व सरकारी नोकरीत प्रवेश मिळविणे एवढेच होते. त्यामुळे व्यावसायिक कौशल्य, ज्ञान, वा प्रशिक्षण लाभण्याची संधी तसा कल असलेल्या विद्यार्थ्यांना लाभत नसे. ही उणीव १८८२ मध्ये हंटर आयोगाने प्रथम निदर्शनास आणली व असे सुचविले की, माध्यमिक शाळेतील वरच्या विद्यापीठप्रवेशासाठी व व्यावहारिक  ज्ञानासाठी  असे  दोन  प्रकारचे  अभ्यासक्रम  असावेत. १९२९ साली हारटॉख समितीने, वाणिज्य व उद्योग या व्यवसायांसाठी पूर्वप्राथमिक शिक्षण माध्यमिक शाळांतील वरच्या वर्गांतून द्यावे व पुढील शिक्षणासाठी वाणिज्यविषयक व औद्योगिक विषयांचे शिक्षण देणाऱ्या शाळा काढाव्यात, अशी सूचना केली. १९३७ साली वूड व अँबॉट या तज्ञांनी कनिष्ठ व वरिष्ठ व्यवसायशाळा काढण्याचा सल्ला दिला. १९३८ साली आचार्य नरेन्द्र देव समितीने विद्याप्रधान व उद्योगप्रधान असा दुहेरी अभ्याक्रम सुचविला पण या सर्व शिफारशी कधीच अंमलात आल्या नाहीत. +स्वातंत्र्याप्राप्तीनंतर देशातील माध्यमिक शिक्षणात सुधारणा करण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागली. मानसशास्त्रातील संशोधनाने मानवी बुद्धीला अनेक पैलू असतात व बुद्धीच्या प्रकाराला अनुसरून शिक्षण व व्यवसाय मिळणे व्यक्तीस व समाजास उपकारक असते, ही जाणीव निर्माण झाली. केवळ विद्याप्रधान शिक्षण घेतल्यामुळे सुशिक्षितांत बेसुमार बेकारी वाढत होती. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय सरकारला औद्योगिक क्रांती घडवून आणावयाची होती. त्यासाठी यांत्रिक व तांत्रिक व्यवसायांत कौशल्याची कामे करणारे कामगार हवे होते. या सर्व कारणांमुळे भारत सरकारने माध्यमिक शिक्षणाची पाहणी करून सुधारणा सुचविण्यासाठी १९५२ साली मुदलियार आयोगाची नेमणूक केली. +मुदलियार आयोगाने माध्यमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांनी चर्चा करून काही कल्पना मांडल्या : माध्यमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांत व्यक्तिविकास व व्यावसायिक कार्यक्षमता या दोन बांबीचा समावेश अवश्य असावा. व्यक्तिविकास साधण्यासाठी व्यक्तीच्या प्रकृतीला अनुसरून शिक्षण मिळावे यासाठी व्यक्तिभिन्नता लक्षात घेऊन विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू कारवेत आणि व्यावसायिक कार्यक्षमतेसाठी भिन्न व्यवसायांच्या प्राथमिक शिक्षणाचा अंतर्भाव माध्यमिक शिक्षणात व्हावा. बहुउद्देशी शिक्षणाच्या या संकल्पनेत व्यक्तिविकास व व्यावसायिक कार्यक्षमता या दोन्ही उद्दिष्टांती परिपूर्ती होते. म्हणून मुदलियार आयोगाने अशी शिफारस केली की, बालकांच्या ध्येयास, अभिवृत्तीस व बुद्धीस अनुसरून विविध प्रकारचे रंजक अभ्यासक्र अनुसरणाऱ्या बहुउद्देशी शाळांची तरतूद सर्वत्र करण्यात यावी. या शिफारशीस अनुसरून भारतभर माध्यमिक शाळांची पुनर्घटना करण्यात आली. हे शिक्षण इयत्ता ९ ते ११ पर्यंत देण्याची सुविधा होती. १९६५-६६ सालाअखेर १८,००० बहुउद्देशी प्रशाळा भारतभर काढण्यात आल्या. या प्रशाळांत भाषा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास सक्तीचा असून त्यात पुढील सात शाखांपैकी एका शाखेचा अभ्यास ऐच्छिक असतो. (१) मानव्यविद्या, (२) विज्ञाने, (३) तांत्रिक विषय, (४) वाणिज्य, (५) कृषी, (६) ललितकला व (७) गृहशास्त्र. +बहुउद्देशी शिक्षणाचा हेतू अशा रीतीने कुमारवयातील मुलांच्या शिक्षणाची  तरतूद  गुणकर्मविभागाप्रमाणे  करण्याचा  असून  तो  अत्यंत स्पृहणीय  आहे.  तथापि  या  संदर्भात  काही  अडचणीही  आहेत. मुख्यतः  मुलांच्या  प्रकृतिविशेषांची  निश्र्चिती  करण्याचा  प्रश्र्न  अवघड आहे. त्यातही असा निर्णय केव्हा, कोणी व कसा करावयाचा असे उपप्रश्र्न  उपस्थित   होतात.  इंग्लंडमध्ये  विद्यार्थ्यांच्या  वयाची  अकरा वर्षे पूर्ण  होताच हा निर्णय कसोट्यांच्या साहाय्याने करतात व कसोट्यांतील  गुणाप्रमाणे  मुलाला विद्याप्रधान, तंत्रप्रधान अथवा साधारण अभ्यासक्रम निवडावा लागतो. पण या पद्धतीवरही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. हा निर्णय फार लवकर घेतला जातो ११ वर्षे पूर्ण होण्याच्या सुमारास बालकाची बुद्धी परिणत झालेली नसते, तेव्हा हा निर्णय दोन वर्षे तरी उशिरा घ्यावा, अशी टीका करण्यात आलेली आहे. शिवाय  तथाकथित  कसोट्या  शंभर  टक्के  विश्र्वसनीय  नसतात  व म्हणून त्यांवरून घेतलेल्या निर्णयात प्रमाद राहून मुलांचे नुकसान होण्याचा संभव असतो. याखेरीज या पद्धतीमुळे आपल्या मुलांस स्वच्छेनुसार शिक्षण देण्याच्या पालकांच्या हक्कावर गदा येते, असाही आक्षेप घेण्यात आलेला आहे. +मुलांस स्वेच्छेप्रमाणे शिक्षण देण्याचा हक्क असावा की नाही, हाच खरा प्रश्र्न आहे. प्रत्येक बालकास शिक्षण देणे हे आता पालकाचे कर्तव्य राहिले नसून ते सामाजाचे कर्तव्य झाले आहे. शिक्षण देताना बालकांची शैक्षणिक पात्रता पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अपा-त्रांना दिलेले शिक्षण फुकट जाते आणि या खटाटोपात समाजाचा पैसा तसेच शिक्षकाची व विद्यार्थ्यांची शक्ती यांचा अपव्यय होतो. विविध व्य-वसायांसाठी कार्यक्षम व्यक्ती तयाक करणे, सामाजिक प्रगतीस आवश्यक आहे. शिक्षणाची शाखा निवडण्याची मुभा बालकास अथवा पालकास दिल्यास काही शाखांत फार गर्दी होऊन काही शाखा ओस पडतील. म्हणून शिक्षणाच्या शाखेची निवड सरकारनेच म्हणजे सरकराच्या वतीने शिक्षकांनी करावी, हेच उचित होय. ही निवड करण्याची योग्य वेळ म्हणजे विद्यार्थ्याच्या वयाचा १२ ते १४ वर्षांचा कालखंड होय. या दोन वर्षांच्या सर्वसामान्य शिक्षणाच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांचा अनेक व्यवसायांशी प्राथमिक परिचय करून द्यावा, अनेक प्रकारच्या कसोट्यांचा वापर करावा व शेवटी बालकांच्या गुणविशेषांचा निर्णय करावा, असे अपेक्षित आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्याने माध्यमिक शिक्षणाची शाखा निवडायाची आहे. +वरील विवेचनात असे गृहीत धरले आहे, की मुलांच्या गुणविशेषांचा निर्णय करण्यासाठी पुरेशी साधने शिक्षकांस उपलब्ध असतील व त्या साधनांचा उपयोग करून वस्तुनिष्ठ शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची पात्रता शिक्षकांत असेल. अशा रीतीने बहुविध मानसशास्त्रीय व व्यावसायिक कसोट्यांची उपलब्धता तसेच शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची शिक्षकांची पात्रता या गोष्टी बहुउद्देशी शिक्षणाच्या यशास आवश्यक होत. शिक्षणाच्या समान संधीच्या तत्त्वाविषयी जो गैरसमज पसरला आहे, तो दूर करण्याचे एकमेव साधन म्हणजे मुलांच्या गुणवत्तेची वस्तुनिष्ठ साधनांच्या साहाय्याने केलेली चोखंदळ चिकित्सा व तदनुरूप शैक्षणिक मार्गदर्शन हे होय. आपल्या कुवतीपलीकडचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्याला अपयश येते व को वैफल्यग्रस्त होतो. याउलट कुवतीपेक्षा कमी प्रतीचे शिक्षण घेतल्यास त्याच्या कर्तृत्वास आव्हान न मिळाल्यामुळे त्याची शक्ती वाया जाते. म्हणून स्वतःच्या गुणवत्तेस अनुसरून स्वेच्छेने शिक्षण घेण्यास मुलांची मने वळविणे, हे बहुउद्देशी शिक्षणातील शिक्षकांचे मुख्य कार्य ठरते. +अगदी न्याय्य तत्त्वावर निःपक्षपातीपणे मुलांची निवड शिक्षणाच्या त्या त्या शाखांसाठी झाली, तरी आणखी एक समस्या उभी राहते. विद्याप्रधान शिक्षण व तंत्रप्रधान शिक्षण यांस समाजात विशेष महत्त्व आहे. यामुळे या शाखांसाठी ज्यांची निवड झाली असेल, त्यांच्यात अहंगंड व इतरांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल, अशी भीती शिक्षणतज्ञांस वाटते. वैविध्य साधूनही शिक्षणाच्या सर्व शाखांचा दर्जा समान कसा ठेवावयाचा, हा कूट प्रश्र्न आहे. यावर असा एक उपाय सुचविण्यात आला आहे, की अनेक शाखांचे शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक प्रशाला काढाव्यात. अशा प्रशालांत विविध शाखांचे विद्यार्थी बहिःशाल कार्यक्रमांसाठी एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये समभाव व बंधुभाव निर्माण होईल. अशा प्रशालांत एका शाखेतील विद्यार्थ्यांस दुसऱ्या शाखेमध्ये सहज वर्ग करता येईल व अशा रीतीने प्रारंभीच्या निवडीत चूक झाली असल्यास ती सुधारणे कठीण जाणार नाही. तथापि अशा प्रशांलाच्या बाबतीतही अडचणी आहेतच : उदा., अशा प्रशालांतील विद्यार्थ्यांची संख्या फार होऊन एका मुख्याध्यापकास नियंत्रण करणे. कठीण जाईल. तसेच प्रत्येक शाखेचे शिक्षण वेगवेगळ्या संस्थांमध्ये झाल्यास ते जितके कार्यक्षम होईल, तितके सर्वसमावेशक संस्थेमध्ये होणार नाही. सर्वसमावेशक प्रशाला व विशिष्ट प्रशाला यांमधील विचारसंघर्ष अमेरिकाव इंग्लंडमध्ये चालू असून प्रयोगांद्वारा या समस्येची उकल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तथापि मोठ्या शहरांत विशिष्ट प्रशाला तसेच लहान शहरांत ग्रामीण भागात सर्वसमावेशक प्रशाला, असे दृश्य साधारणपणे दिसून येते. भारतात मात्र तांत्रिक व कृषिशिक्षणासाठी विशिष्ट प्रशाला तसेच इतर दोन तीन शाखांचे शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक शाळा आढळतात. हीच व्यवस्था आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीस जुळती आहे, असे म्हटले जाते. +कोठारी आयोगाने (१९६६) मात्र इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत कार्यानुभवयुक्त, व्यापक पायावर आधारलेले सर्वसामान्य शिक्षण आणि इयत्ता ११ वीक व १२ वीत व्यवसायाभिमुख शिक्षण, अशा योजनेची शिफारस केली. शासनाने ती आता स्वीकारली असून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत कार्यानुभवयुक्त, व्यापक पायावर आधारलेला सर्वसामान्य शिक्षणाचा अभ्यासक्रम भारतभर चालू झाला आहे. इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये व्यावसायिक शिक्षणाची जोड महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांत जून १९७८ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे व लवकरच इतर जिल्ह्यांत या योजनेची कार्यवाही सुरू होईल. यामुळे बहुउद्देशी शाळांचे प्रमाण प्रत्यही घटत आहे आणि कालांतराने ते संपुष्टात येईल, असे दिसते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6405.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2c66da97fcaa62b586427355bf58b288861b310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6405.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरत. ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत. परंतु आता चित्रपट गृह आणि करमणुकीची साधने वाढल्याने आणि नवीन पिठीला या गोष्टीची माहिती नसल्याने,तसेच या लोकांवर उपसमारीची वेळ आली आहे. +बहुतेकवेळी मी याना शहरामधे आपली कला दाखवताना पाहिले आहे,मुख्यत्वे करून हे पोलिसाच्या वेषात येताता यामुळे याना फसवेगीरी किंवा भामटे समजुन लोकांच्या रोशाला समोरे जावे लागते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6426.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d57e39300000d47c91a11bb60d7997ec76ff3220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6426.txt @@ -0,0 +1 @@ +बह्मणी हे भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याच्या तिरोडी तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हा गाव महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर बावनथडी नदीच्या उत्तरेस आहे. या गावात मराठी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असली तरी प्रशासकीय भाषा हिंदी भाषा आहे. या गावाचा कारभार ग्रामपंचायत सांभाळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6433.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9d1f7a5a8158b0a65b347d18c9e79be4125a7c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6433.txt @@ -0,0 +1,8 @@ +बाळासाहेब गंगाधर खेर (ऑगस्ट २४, इ.स. १८८८ - मार्च ८, इ.स. १९५७) हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. +बाळासाहेब खेरांचा जन्म ऑगस्ट २४, इ.स. १८८८ साली रत्‍नागिरी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण कुंदगोळ (त्या काळातील जमखंडी) येथे गेले. नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आज्ञेवरून त्यांनी आपले शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. विल्सन कॉलेज, मुंबई येथून १९०८ साली त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. तेव्हा त्यांना संस्कृतामध्ये प्रथम आल्याबद्दल 'भाऊ दाजी लाड पुरस्कार' मिळाला. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले. +मुंबईतूनच १९२२ साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांची हुशारी, वक्तव्य आणि विचार यांच्या जोरावर पदार्पणातच त्यांना स्वराज्य पक्षाचे सचिवपद बहाल करण्यात आले. असहकार चळवळीच्या वेळी १९३० आणि १९३२ साली त्यांनी पहिल्यांदा आठ महिने आणि त्यानंतर दोन वर्षे कारावास भोगला. +ब्रिटिशांनी १९३५ साली कायद्यात काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काही अंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. नव्या मुंबई प्रांतात निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही ठिकाणी पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले. सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सन १९४० नंतर परत एकदा ते भातीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले. +स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आणि नंतर १९५२ सालापर्यंत ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिले. याच काळात ते शिक्षणमंत्रीही होते. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय (उदा० शालेय वर्ष जून ते मे ऐवजी एप्रिल ते मार्च करणे, शाळेत पाचवीपासून इंग्रजी न शिकवता ते आठवीपासून शिकवणे, वगैरे) त्यांना एकतर मागे घ्यावे लागले किंवा पुढच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकाने ते रद्द केले. +बाळासाहेबांना त्यांच्या साध्या आणि विनयशील स्वभावामुळे सज्जन म्हटले जात असे. त्यांच्या सज्जनपणामुळे त्यांनी महात्मा गांधींसहित काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मने जिंकली होती. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणात खुसखुशीतपणा असायचा. एरवी बोलतानाही ते मिस्कील टीका-टिप्पणी करण्यात प्रसिद्ध होते. +१९५४ साली पहिल्यांदा नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +त्यांच्या शेवटच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेच ८ मार्च १९५७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6434.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f415ca7a71e0215dac5fd598ed5146f7c75a206 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6434.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (ऊर्फ बा.द. सातोस्कर) (जन्म : मार्च २६, इ.स. १९०९ - - नोव्हेंबर २७, २०००) हे मराठी पत्रकार, संपादक होते. 'दैनिक गोमंतक' या दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते. +बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, म्हणजे २६-३-२००९ला डॉ. भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथाचे संपादक प्रा. रवींद्र घवी आहेत. +बा.द. सातोस्कर तथा बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (२६ मार्च, इ.स. १९०९ - २७ नोव्हेंबर, इ.स. २०००) +हे म्हापसे,गोवा येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. +लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज, कोकणी व हिंदी भाषा या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून आणि त्या भाषांत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. गाव तिथे ग्रंथालय या चळवळीचे बा.द.सातोस्कर जनक होते.. गोमंतक दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते व सागर प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था होती. +लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादसायन' हे त्यांचे आत्मचरित्र. रामायण काळातील जमाती व संस्कृती, अभिराम, वासुदेव, ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास, पारिसचे भविष्य इत्यादी. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_649.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9a50847c9e64f698e9cfcbae95c847d44acbcf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_649.txt @@ -0,0 +1,3 @@ +पौराणिक नाटक हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात रामायण, महाभारतातील यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत. +हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, 'ईडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - सॉफोक्लीस, मराठीत राजा ईडिपस, लेखक - पु.ल. देशपांडे). शांता वैद्य यांनीही हे नाटक ‘राजा इडिपस’ या नावाने मराठीत आणले आहे. हेच नाटक विवेक आपटे यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - चिन्मय मांडलेकर होत.. या नाटकाचे पन्‍नासहून अधिक प्रयोग झाले आहेत. +ॲंटिगॉन या ग्रीक पौराणिक नाटकाचा त्याच नावाचा अनुवाद श्रीराम लागू यांनी केला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6494.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3bb3237a462dafd883a8dce7c72621480f3043a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6494.txt @@ -0,0 +1,4 @@ +बांगलादेश-भारत संबंध हे पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश आणि भारतीय प्रजासत्ताक यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत, जे दोन्ही दक्षिण आशियाई शेजारी-राष्ट्र आहेत. १९७१ मध्ये भारताने स्वतंत्र बांगलादेश (ज्याला पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखले जात असे) मान्यता दिल्याने दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध औपचारिकपणे सुरू झाले. ६ डिसेंबर रोजी, बांगलादेश आणि भारत दोन्ही देशांमधील सतत मैत्रीचे स्मरण म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केरतात. [१] +बांगलादेश आणि भारत हे सार्क, बिमस्टेक, आयओआरए आणि कॉमनवेल्थचे सामाईक सदस्य आहेत . दोन्ही देशांमध्ये अनेक सांस्कृतिक संबंध आहेत. विशेषतः, बांगलादेश आणि पूर्व भारतीय राज्य पश्चिम बंगाल हे बंगाली भाषिक आहेत. १९७१ मध्ये, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये बांगलादेश मुक्ती युद्ध सुरू झाले; भारताने डिसेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानच्या समर्थनार्थ हस्तक्षेप केला आणि बांगलादेशला देश म्हणून पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यास मदत केली. [२] +काही वाद अद्यापही सुटलेले नसले तरी दोन्ही देशांमधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत.[३] [४] [५] ६ जून २०१५ रोजी ऐतिहासिक जमीन सीमा करारावर स्वाक्षरी करण्यात आली ज्याने दशके जुने सीमा विवाद मिटवले. [६] +दोन देशांमधल्या सीमापार नद्यांच्या पाण्याच्या वाटाघाटीबाबत अद्याप चर्चा सुरू आहेत. अलिकडच्या वर्षांत, भारतीय बीएसएफकडून बांगलादेशींची हत्या, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भारतात हिंदुत्वाचा उदय यासारख्या भारत सरकारच्या कथित मुस्लीमविरोधी आणि बांगलादेशविरोधी कारवायांमुळे बांगलादेशी नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना वाढत असल्याचे दिसून आले आहे. [७] [८] २०१९ मध्ये, भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला प्रतिसाद म्हणून अनेक बांगलादेशी मंत्र्यांनी भारतातील त्यांच्या नियोजित राज्य भेटी रद्द केल्या. [९] २०२१ मध्ये, बांगलादेशमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या राज्य दौऱ्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि कमीतकमी १४ लोकांचा मृत्यू झाला. [१०] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6504.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02a5de7504d8d009ea4df7eef8344df5d10434b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6504.txt @@ -0,0 +1,4 @@ +Note: +This is a list of cricketers who have captained the Bangladeshi Under-19 cricket team for at least one Under-19 One Day International. The table of results is complete to the third Under-19 ODI against England in 2004. Bangladesh's greatest success in the Under-19 World Cup has been winning the plate, which is the competition for teams failing to progress past the first qualifying round of the Under-19 World Cup. They achieved this in both 1997/8and 2003/4, and during the latter tournament, beat Australia in doing so. +The ICC Trophy is the leading one-day tournament from non-Test teams, and Bangladesh participated in the tournament before they gained Test status. This is a list of the men who captained Bangladesh in the ICC Trophy. +ऑस्ट्रेलिया | बांगलादेश | इंग्लंड | भारत | न्यू झीलँड | पाकिस्तान | दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | वेस्ट ईंडीझ | झिम्बाब्वे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6553.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a40e40b7e198cff20dd665ed5dbfdd188e03e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6553.txt @@ -0,0 +1,7 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. वेळापत्रकानुसार हा दौरा ऑक्टोबर २०२० मध्येच होणार होता परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. २९ सप्टेंबर २०२० रोजी न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा मार्च २०२१ मध्ये होईल असे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी वेळापत्रक जाहीर केले गेले. ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड महिला संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. +एकदिवसीय मालिकेआधी दुखापत झाल्याने न्यू झीलंडचा नियमीत कर्णधार केन विल्यमसन हा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. त्याच्याजागी टॉम लॅथमकडे न्यू झीलंडचे कर्णधारपद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील न्यू झीलंडने ३-० ने जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_657.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c12ddea11f42d48756a30ed6839cc3ddbfaedc24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_657.txt @@ -0,0 +1,4 @@ +ईस्टर्न ऑर्थोडॉक्स तथा पौर्वात्य पारंपारिक हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे. +जुन्या रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात आणि हल्लीचे पोलंड आणि स्वीडन यांच्या पूर्वेकडील भागात वस्ती करणाऱ्या ख्रिस्ती लोकास स्वतंत्र शाखाश्रयी ऑर्थोडॉक्स मंडळे असे म्हणतात. हे लोक प्रामुख्याने इसवी सन १०५३ साली कॅथोलिक महामंडळापासून अलग झाले. हल्लीची प्रमुख ऑर्थोडॉक्स मंडळे पुढीलप्रमाणे आहेत. पश्चिमेकडील सीरियन मंडळे, पूर्वेकडील सीरियन मंडळे, इजिप्तमधील कॉप्टिक मंडळे, आर्मेनियन मंडळे, कॉन्स्टॅन्टिनोपालची ग्रीक मंडळे, कॉन्स्टॅन्टिनोपालची अरेबियन मंडळे, रशियन ऑर्थोडॉक्स मंडळ इत्यादी. आणखी स्लाविक, रुमानियन व अंत्योखची ही ऑर्थोडॉक्स मंडळे आहेत. आजपर्यंत ही सर्व भिन्नभिन्न ऑर्थोडॉक्स मंडळे कॅथोलिक ख्रिस्तमहामंडळात परत आलेली नाहीत. तरी त्यांतील काही लहान मंडळे कॅथोलिक महामंडळात सामील झाली आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे : सीरियन कॅथोलिक मंडळ, सिरो मलन्कार मंडळ (भारत), मारोनाईट कॅथोलिक मंडळ, खाल्डियन कॅथोलिक मंडळ, सिरो मलबार कॅथोलिक मंडळ (भारत), कॉप्टिक कॅथोलिक मंडळ, अबिसिनियान कॅथोलिक मंडळ, आर्मेनियन कॅथोलिक मंडळ, ग्रीक कॅथोलिक मंडळ, अरेबिअन कॅथोलिक मंडळ, स्लाव्हिक कॅथोलिक मंडळ इत्यादी. [१] +प्रारंभीच्या ख्रिस्तसभेचा जसजसा प्रसार होत गेला, तसतसे ख्रिस्तसभेमध्ये प्रेषितांच्या पठडीत तयार झालेले नेतृत्व विकसित होत गेले. प्रभू येशूचा एकच संदेश विविध भाषांत, प्रांतांत आणि संस्कृतींत मूळ धरू लागला, तसा त्या संदेशावर त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीचा पगडा दिसू लागला. त्यातूनच रोमच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य ख्रिस्तमंडळे फोफावू लागली. रोमन साम्राज्य फक्त इटली आणि रोमपर्यंतच मर्यादित नव्हते. ग्रीक रोमन संस्कृतीचा पगडा इटलीच्या भोवती पसरलेल्या व रोमन साम्राज्याच्या अंमलाखाली असलेल्या अनेक प्रांतांत दिसून येत होता. रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात ग्रीक भाषा आणि संस्कृती इतर भागांपेक्षा अधिक प्रमाणात पसरलेली होती. या इतर भागांत लॅटिन भाषेचे प्राबल्य होते. एकीकडे ख्रिस्तसभेचा प्रसार होत होता तर दुसरीकडे याच ख्रिस्तसभेच्या उदरात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील ख्रिस्तमहामंडळांचा अंकुर वाढत होता. +रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात कॉन्स्टॅन्टिनोपाल (इस्तंबूल, तुर्कस्तान), अलेक्झान्ड्रिया. अन्तीयोक, पर्शिया आणि आर्मेनिया या ठिकाणी उदयास आलेल्या मंडळाना पौर्वात्य चर्च अशा नावाने ओळखले जाऊ लागले. तिथेच अलेक्झांड्रियन, अन्तिओखिअन (किवा पश्चिम सीरियन ), बिझान्ताईन, पूर्व सीरियन आणि आर्मेनियन या पाच मूलभूत उपासना विधीचा उगम झाला. दरम्यानच्या काळात रोम हे शहर पश्चिमात्य भागातील ख्रिस्तमंडळाची राजधानी म्हणून उदयास आली. तेथील चर्चेसनी लॅटिन ही आपली भाषा प्रमाणभूत मानली. त्यातही रोमन सम्राट कॉन्स्टॅनटाईन द ग्रेट याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यामुळे (इसवी सन ३१३) राजाश्रय मिळालेला हा धर्म रोमपासून कॉन्स्टॅन्टिनोपालपर्यंत वेगाने पसरत गेला. मात्र त्याच्या आयुष्याच्या अखेरीस रोमन साम्राज्याचे दोन तुकडे पडले. पूर्वेकडील कॉन्स्टॅन्टिनोपाल तर पश्चिमेकडे रोम अशा स्वतंत्र सत्ता उदयास आल्या. ग्रीक आणि लॅटिन भाषा, पवित्र आत्म्याविषयी शिकवण, धर्मगुरूंचे ब्रम्हचर्य, दृढीकरण सॅक्रॅमेन्टचे विधिचालक अशा विविध विषयांवर दोन्ही ख्रिस्त्यांमध्ये वाद सुरू झाले. शेवटी इसवी सन १०५४ मध्ये पूर्वेकडील चर्चेस आणि लॅटिन कॅथोलिक चर्च यांच्यात मोठी फूट पडली. (The Great Schism). पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स चर्च यांनी रोममधील पोपची सत्ता अमान्य केली. मात्र पौर्वात्य उपासनेची परंपरा खंडित न करता काही चर्चेस रोमच्या अधिकाराखाली ख्रिस्ती जीवन जगत राहिली. याचा परिणाम म्हणजे या चर्चेसनी रोमन कॅथोलिक चर्चच्या पोपची सत्ता मान्य करीत असताना धर्मगुरूंना विवाहाची परवानगी देणे सुरूच ठेवले. या चर्चना ईस्टन कॅथोलिक चर्चेस असे (पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स मंडळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सर्वोच्च धर्माधिकाऱ्यांना पॅट्रिआर्क या नावाने ओळखले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6573.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d00f93a7c5f301dee53d05ae2de6c394fcda15e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6573.txt @@ -0,0 +1,4 @@ +बांगलादेश क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकाचा दौरा करणार आहे. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6592.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fd982bed66329680f3b74c7c13a0de2890a5622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6592.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेशच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी-२० सामने खेळले, दोन्ही मालिका ३-० ने गमावल्या.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6603.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce0d4b6db6326e4c2656724d2c4095f18474bae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6603.txt @@ -0,0 +1,20 @@ +डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली. +१९७० च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लीग ने १६९ मधील १६७ जागा जिंकल्या व इस्लामाबादमध्ये संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील खास करून पंजाबी व पठाणी राजकारण्यांना बंगाली वर्चस्व होणे मान्यच नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले. +पूर्व पाकिस्तानात यानंतर सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. पूर्व पाकिस्तानी सैनिक व पोलिसांना निःशस्त्र करण्यात आले. पूर्व पाकिस्तानमध्ये यामुळे बंद, हरताळ, मोर्चे यासारखे प्रकार वारंवार होऊ लागले. पाकिस्तानी सेनेने हे सर्व प्रकार दडपून मार्च २५ १९७१ रोजी डाक्क्याचा ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली. पूर्व पाकिस्तानातील हिंदूचे मोठ्या प्रमाणात शिरकाण सुरू झाले. +मार्च २७ १९७१ रोजी झिया उर-रहमान यांनी मुजिबूर रहमान यांच्या वतीने बांगला देशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व एप्रिलमध्ये छुप्या सरकारची स्थापना केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोक मुक्तिवाहिनीमध्ये (एक स्वतंत्र सैन्यदल) सामिल झाले. +मार्च २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. पूर्व पाकिस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमुळे भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले.[१] सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकाऱ्यांनी लगेचच मुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली. +पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणाऱ्या आश्रितांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले. +एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला, ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. या मैत्रीने चीनची युद्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले. +दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.[१] +नोव्हेंबर पर्यंत घडामोडींना आणखीनच वेग आला व युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बऱ्यापैकी कोरडी झाली होती.तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. नोव्हेंबर २३ १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार डिसेंबर ३ रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसऱ्या दिवशीच इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले व भारताने अौपचारिकरित्या युद्धाची घोषणा केली . +भारतीय आक्रमणाचे दोन उदिष्टे होती. १) पूर्व पाकिस्तानात जास्तीत जास्त आत घुसून पूर्व पाकिस्तानचा ताबा मिळवणे. २) पश्चिम सीमेवर पश्चिम पाकिस्तानातून येणाऱ्या पाकिस्तानी फौजेला फक्त रोखून धरायचे. पश्चिम पाकिस्तानात घुसून कोणत्याही परिस्थितीत आक्रमण करायचे नाही असा भारताचा बेत होता. +या उलट पाकिस्तानी सेनेची उदिष्टे होती. १) भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखणे. पूर्व पाकिस्तानात आत खोलवर घुसणे बरेच अवघड होते व भारतीय सेनेला त्यात जास्तीत जास्त वेळ लागेल असे पहाणे २) दरम्यान पश्चिमेकडून भारतात घुसून जास्तीत जास्त भूक्षेत्राचा ताबा मिळवणे. भारताने पश्चिम सीमेवर त्यामानाने कमी सैन्य तैनात केले होते. त्यामुळे त्यात पाकिस्तानी सेनेला यश मिळेल असा विश्वास होता. या दोन्हीत यशस्वी झाल्यावर भारताची कोंडी होईल अशी पाकिस्तानी लष्कराची चाल होती. +पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना त्याचा संवेग राखता आला नाही. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एका पुढे प्रसिद्ध झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला. +भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या. +भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने डाक्का शहर काबीज केले. ९०,०००हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. डिसेंबर १६ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली. +अमेरिका पहिल्यापासूनच पाकिस्तानचा मित्रदेश होता व भारताने सोविएत संघाशी मैत्रीचा करार केल्याने भारत आता त्याच्या शत्रुपक्षात गेला. भारताने जर पाकिस्तानवर विजय मिळवला व पाकिस्तानवर कब्जा मिळवला तर अमेरिकेचा दक्षिण अशियामध्ये प्रभाव कमी होऊन सोव्हिएट प्रभाव वाढेल असा कयास होता. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर मदत केली. अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला यु.एस.एस. एंटरप्राईझ ही विमानवाहू नौका बंगालच्या उपसागरात पाठवली. रशियानेही दोन युद्धनौका भारताच्या मदतीला व्हलाडिओस्टॉकयेथून पाठवल्या व अमेरिका अण्वस्त्रांची चाल चालवणार नाही ही काळजी घेतली. भारतानेदेखील अमेरिकेच्या भावना लक्षात घेऊन पश्चिम पाकिस्तानात फारसा रस दाखवला नाही. सोव्हिएट संघाने बांगलादेशी स्वातंत्र्यलढ्याला मान्यता देऊन एक प्रकारे भारतीय आक्रमणाला मान्यता दिली. +भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. जानेवारी १० १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले. +भारताचे जवळपास ४ हजार सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. पाकिस्तानने केलेले मानवी शिरकाण हे उपखंडातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मानले जाते पाकिस्तानी सेनेने अंदाजे २० ते ३० लाख लोक सामुहिक संहारात मारले असण्याची शक्यता आहे. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले. +भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. शरणार्थी कॅम्प आणि इतर राज्यात पसरलेल्या बांगलादेशी नागरिकांमुळे भारतात रोगराई देखील पसरली. एकंदरीत परिस्थितीमुळे भारतावर आर्थिक ताण पडू लागला. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारने आपले बजेट २१९२ कोटी वरून २८३९ कोटी वर नेले. याकरिता आर.आर.टी. (रिफ्यूजी रिलीफ टॅक्स) देखील लागू केला. याच सोबत पाच आणि दहा पैशांची पोस्टची तिकिटे देखील मोठ्या प्रमाणात छापण्यात आली.[१] +बांगला देशच्या या स्वातंत्र्यलढ्यावर व इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तानमधील युद्धावर अनेक पुस्तके लिहिली गेली. ती अशी :- + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_661.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2172d0046772ce9ffec2a742f5339b946644ada --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_661.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल निकोलास ॲग्विलार (स्पॅनिश: Paul Aguilar; ६ मार्च १९८६, सिनालोआ) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्लब अमेरीका व मेक्सिको ह्या संघांमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6622.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43330f7e4c042b7fb026477d5f5a98c93429347a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6622.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेशमधील शहरांच्या यादीमध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश देशामधील ११ प्रमुख शहरांची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाची लोकवस्ती असलेल्या बांगलादेशातील शहरी लोकसंख्या २०११ साली केवळ २८ टक्के होती. १ लाखाहून अधिक वस्ती असलेल्या एकूण ४२ शहरांपैकी ११ शहरांना महानगर निगमाचा दर्जा देण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_665.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e06958924b21cf0ccb2da8e1aeaa484595113420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_665.txt @@ -0,0 +1,8 @@ +पौलोमी घटक (बंगाली:পৌলমী ঘটক) यांचा जन्म ३ जानेवारी १९८३ साली झाला.त्या पश्चिम बंगालमधील एक टेबल टेनिस खेळाडू आहे. १९९८ ते १९९६ दरम्यान त्यांनी तीन ज्युनियर राष्ट्रीय विजेतेपद (१९९६,१९९८ व १९९९) तसेच सात वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले.१९९८ मध्ये त्यांनी दोन्ही वरिष्ठ राष्ट्रीय व कनिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. पौलोमी ने २००६ मध्ये मेलबर्न येथे राष्ट्रकुल खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.आणि तसेच २००० ते २००८ च्या दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. त्या १६ वर्षांच्या असताना सिडनी ऑलिंपिकमध्ये खेळल्या होत्या.त्या २००७ मध्ये इंडियन ओपन स्पर्धेतही खेळले.[१] +पौलोमी घटक हया भारत पेट्रोलियममध्ये सामील झाल्या आणि आता त्या सहाय्यक व्यवस्थापक म्हणून खेळत आहे.त्या पीएसपीबीचे प्रतिनिधित्व करतात. +पौलोमी घटक यांनी नवा नालंदा हायस्कूल येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.आणि नंतर कोलकत्ता विद्यापीठात जोगमयया देवी महाविद्यालयात अभ्यास केला. +भारतातील वरिष्ठ महिला खेळाडूंमध्ये पौलोमी हया 2 व्या क्रमांकावर आहेत.[२] +पौलोमी घटक यांचा जन्म ३ जानेवारी १९८३ पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे झाला.त्या सुभाष चंद्र घटक यांची मुलगी आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर सतत आधार दिला.टेबल टेनीस खेळण्याव्यतिरिक्त त्यांना पेंटिगचीहि आवड आहे. ९ वर्षांच्या वयात त्यांनी टेबल टेनिसच्या करियरला सुरुवात केली. कॉमनवेल्थ गेम्स २०११ नंतर सौम्यदीप रॉयशी विवाह झाला.[३] +१९९२ मध्ये त्या ९ वर्षाच्या असताना त्यांनी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.त्या टॉलीगोंग वासिका संघामध्ये नियमितपणे सराव करतात. १६ व्या वर्षी त्यांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी अचंता शरद कमल आणि अंकिता दास यांच्यासह अनेक सामने खेळले. त्या महिला वरिष्ठ टेबल टेनिस खेळाडू मध्ये शीर्ष २ क्रमांकावर होत्या.[४] +त्यांनी कोरियाच्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.रशिया ओपन,जपानमधील टोयोटा कप, जर्मन आणि पोलिश ओपन,२००६ च्या दोहा आणि चिली ओपनमध्ये १५ वे अशे आशियाई खेळ खेळले. २००७ मध्ये, त्यांनी क्रोएशियामध्ये वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप खेळले.इंडोनेशियातील सुवर्ण रॅकेट चॅम्पियनशिप, व्हिएतनाम व इंटरनॅशनल ओपन टूर्नामेंट. त्याच वर्षी त्यांनी ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि जर्मन ओपनमधील देशांचे प्रतिनिधित्व केले. कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले.त्यांनी आशियाई स्पर्धेत २०१२ च्या टेबल टेनिसच्या क्वार्टरफायनलमध्येही आपले काम केले होते.[५] +२०१४ मध्ये त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत अंकिता दाससह पाकिस्तानविरुद्ध खेळून विजय मिळवला होता.याच स्पर्धेत त्यांनी अचंता शरद कमलसोबत मिश्र दुहेरीची भूमिका बजावली. १९९८-२००८ दरम्यान त्यांच्या नावावर तीन ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि पाच सीनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_666.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d623a2cedd0718a6f145622e3eabd1465ceb7828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_666.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_667.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..304d9bed4848fa99a0eebb668cbae078b79b454e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_667.txt @@ -0,0 +1,3 @@ +पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. +प़ौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत येतो. पौष महिन्यात येणारी मकर संक्रांत ही १४ जानेवारी या तारखेच्या आसापास असते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6670.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfd2e59f02deedecd6b3e3bb3dac36502f33a663 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6670.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बांदा जिल्ह्याविषयी आहे. बांदा शहराविषयीचा लेख येथे आहे. +बांदा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बांदा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6701.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..590a529cc686b62d0721185ac66cafd7d61342b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6701.txt @@ -0,0 +1,2 @@ +बांधवाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6713.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f24a3f247768f2639df43c2d6dddd992d40c92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6713.txt @@ -0,0 +1,8 @@ + बांबर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6715.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fad691f7a9c6643dbc8c918892f697f464106a98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6715.txt @@ -0,0 +1,8 @@ + बांबर्डे तर्फे माणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6724.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc0fad668e184fe33fa37f68fdfd6354e811825f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6724.txt @@ -0,0 +1,2 @@ +बांबू श्वसनमार्ग एक व्हिएतनामी हवाई परिवहन आहे. तो 2017 मध्ये स्थापना केली आणि पहिले ऑक्टोबर 1 9 08 रोजी पहिल्या फ्लाइट्स सुरू करेल. हे व्हिएतनाममध्ये समुद्रकिनारा रिसॉर्ट्सला पर्यटक करेल. हे आशिया आणि युऑटॉप मधील ठिकाणासाठी उडेल.[१][२] +2018 मध्ये, कंपनीने 24 बोईंग 787 ड्रीमलायनरसाठी बोईंग बरोबरच्या करारानुसार 24 एअरबस ए 321 नौओसाठी एअरबससह एक करार केला आहे.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6730.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533c5f18341b211202a36311d61d5ee70b7a2e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6730.txt @@ -0,0 +1 @@ +बांसवाडा हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6740.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce1a63edcb21e42dcf93b99d491ff2db35a52fcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6740.txt @@ -0,0 +1,9 @@ + बाईंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +डाफळे, कोचरी, माचळ, चिंचुर्टी, सालपे, शिपोशी, आडवली, बुद्धवाडी तर्फे सालपे, केळवली, नामे, पालू ही जवळपासची गावे आहेत.शिपोशी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6743.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2134431ed7c6d9e0a058847c8acde0fe9057bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6743.txt @@ -0,0 +1,13 @@ + + +बाईपण भारी देवा हा २०२३ मधील केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे.[३] चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडियाद्वारे करण्यात आली असून यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[४] +शीर्षक गीत ‘बाईपण भारी देवा’च्या चित्रीकरणापर्यंत या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर ’ असे होते. सहनिर्माते अजित भुरे यांनी केदार शिंदेंना चित्रपटाचे शीर्षक बदलून बाईपण भारी देवा असे सुचवले. [५] +चित्रपटाने तिकीट खिडकीवर ५० दिवसांमध्ये ₹९०.५० कोटींहून अधिक कमाई केली.[६][७][८] हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.[९] हा चित्रपट पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट[१०] आणि २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून उदयास आला. याने मराठी चित्रपट उद्योगासाठी एका दिवसात ₹६.१० कोटींपेक्षा जास्त कमाईचा नवा विक्रम देखील रचला.[११] हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा महिला केंद्रित चित्रपट आहे.[१२] +बाईपण भारी देवा हा समीक्षणात्मक तसेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ठरला. चित्रपटाचे लेखन, कथा, संगीत आणि दिग्दर्शनासाठी प्रशंसा केली गेली आहे. बाईपण भारी देवा हा "ब्लॉकबस्टर" चित्रपट ठरला.[१२][१०] +हा चित्रपट सर्व प्रथम २८ मे २०२१ ला प्रदर्शित होणार होता.[१३] त्यानंतर तो २८ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[१४] पुढे ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित तारीख ठरवण्यात आली.[१५] परंतु शेवटी ३० जून २०२३ ला चित्रपट प्रदर्शित झाला.[१६] +हा चित्रपट अशा सहा बहिणींची कथा आहे ज्या काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त होतात आणि कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांनाही तोंड देतात. [१७] +जिओ स्टुडिओने आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ रोजी चित्रपटाची घोषणा केली. [१८] EmVeeBee मीडियाच्या माधुरी भोसले यांनी बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली आहे . [१९] [२०] +चित्रपटाची कथा सहा बहिणींवर महिला केंद्रीत असून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, [२१] वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, शिल्पा नवलकर [२२] प्रमुख भूमिकेत आहेत. [२३] +भारतात कोरोना टाळेबंदीपूर्वी मुख्य छायाचित्रण सुरू करण्यात आले होते, परंतु महाराष्ट्रात कोविड-१९ साथीच्या आजारामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. केदार शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, टाळेबंदीपूर्वी चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते. [२४] टाळेबंदीनंतर उत्तर-निर्मितीचे (पोस्ट-प्रॉडक्शन) काम पूर्ण झाले. [२५] +चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत साई-पीयूष यांनी दिले आहे आणि संगीताचे पुनर्मुद्रण स्वरूप जोशी यांनी केले आहे. अदिती द्रविड आणि वलय मुलगुंद यांची अतिरिक्त गाणी व बोल आहेत, तर सावनी रवींद्र आणि मानसी हेदाऊ यांनी गायन केले आहे. +८ मार्च २०२३ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. [२६] २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला [२७] यानंतर ६ जून २०२३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या टीमसोबत शीर्षक गीत सादर करण्यात आले. [२८] चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर १३ जून २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपूर्ण टीम आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. [२९] हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6751.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c04c64ef241570e754c8c6a1885f632576df1fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6751.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाका काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या आग्नेय टोकावरील ही काउंटी ओक्लाहोमा आणि कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३,७८८ होती.[१] स्प्रिंगफील्ड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +बाका काउंटीची रचना १६ एप्रिल, १८८९ रोजी लास अॅनिमास काउंटीच्या पूर्व भागातून केली गेली. या काउंटीला कॉलोराडोच्या विधायक फेलिपे बाकाचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6766.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eab338be4c1fada81ebe7fc93de919bbe8d10518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6766.txt @@ -0,0 +1 @@ +बाग-ए-जीना हे पाकिस्तानच्या लाहोर शहरातील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6773.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ad5663919a19d29184dd7ab763acbf46998758 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6773.txt @@ -0,0 +1,8 @@ + बागडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6777.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bea11bbc054d9ca9e1e7c23f6bd152db1db12580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6777.txt @@ -0,0 +1,205 @@ +बागडोगरा विमानतळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील सिलिगुडी येथे असलेला विमानतळ आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6782.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9aea1f2ceebc45fac7739fe9bee307f8d1c8270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6782.txt @@ -0,0 +1 @@ +बागपत हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6783.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbfb2a6b753168bfd96e4b24c7adeae623f4128f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6783.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बागपत जिल्ह्याविषयी आहे. बागपत शहराविषयीचा लेख येथे आहे. +बागपत जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बागपत येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6784.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9aea1f2ceebc45fac7739fe9bee307f8d1c8270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6784.txt @@ -0,0 +1 @@ +बागपत हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6800.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03f97dd07a4fdb4f823172092326513fe950c07c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6800.txt @@ -0,0 +1 @@ +बागलकोट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_681.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39fd7fde9ce10100f855b9c2a56b8006fcd2ccc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_681.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौष कृष्ण पंचमी ही पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पाचवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6833.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51cc3b4842e8773172be023ac73aeb23f88b3c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6833.txt @@ -0,0 +1,9 @@ +राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा काफी थाटाचा राग आहे. +या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे. +ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां +सां नि॒ ध, म ग॒ रे सा +या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे. +धनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा। +१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर. +बागेश्री रागात अनेक मराठी भावगीते आहेत. उदा० diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6862.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e05f6d5fb01b49c185e4bdbcba76cd3ce56735e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6862.txt @@ -0,0 +1,3 @@ +बाज़ी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6869.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c52fb8f98596210e71adcd8c710642b0c5e33026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6869.txt @@ -0,0 +1 @@ +बाजार तरलता (इंग्लिश: market liquidity) म्हणजे एखाद्या मत्तेची तिच्या मूल्यात फारशी घट न होता किंवा दरात फारशा चढउताराविना बाजारात विकली जाण्याचा गुणधर्म होय. रोकड पैसा ही सर्वाधिक तरल मत्ता होय, कारण खरेदीसारख्या आर्थिक क्रिया त्यायोगे तातडीने पुऱ्या करता येतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_687.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09d7b67c96b8052930063772df0e1524941f3888 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_687.txt @@ -0,0 +1,4 @@ +पौष मेळा (बंगाली : পৌষ মেলা) हा बंगाल राज्यातील शांतिनिकेतन येथील वार्षिक आनंदोत्सव आहे.[१] यानिमित्त येथे जत्रेचे आयोजन केले जाते. सुगीच्या हंगामाचा आनंद घेणे हा या उत्सवाचा हेतू मानला जातो. बंगाली कालदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या सातव्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होते. शांतिनिकेतन विद्यापीठात या निमित्ताने बंगाली लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बाऊल, काव्यवाचन, नृत्य अशा कलांचे सादरीकरण आयोजित केले जाते.[२] +देवेंद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या वीस अनुयायांसह ब्राह्मो समाजाचे सदस्यत्व स्वीकारले तो दिवस ७ पौष (२१ डिसेंबर १८४३) हा होता. या दिवसाचे स्मरण म्हणून मेळ्याचे आयोजन केले जाते. शांतिनिकेतन परिसरात ब्रह्मा मंदिराची स्थापना करण्यात आली (इ.स. १८९१) तो दिवसही ७ पौष हाच होता. या दिवशी एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी येथे सार्वजनिक सांस्कृत उत्सव आयोजित केला जातो.[३] +पौष मेळा उत्सवाची सुरुवात २३ डिसेंबरच्या आसपास होते. पहाटे सनई वादनाने सुरुवात होते. आश्रम परिसराला गायकांच्या प्रभातफेरीने प्रदक्षिणा केली जाते. यानंतर प्रार्थना होते. यानंतर पुढील सर्व दिवस बाऊल कलेचे सादरीकरण, लोककला सादरीकरण, आदिवासी खेळ यांचे आयोजन होते. शांतिनिकेतन येथे शिकत असलेले विद्यार्थी आपापल्या कलांचे सादरीकरणं करतात.[४] शेवटचा दिवस हा शांतिनिकेतन विद्यापीठाशी संबंधित सदस्यांसाठी राखीव असतो. +या उत्सवी जत्रेत सुमारे १५०० छोटी मोठी दुकाने असतात. स्थानिक कापड आणि हस्तकला यांची विक्री येथे केली जाते. वस्तूंच्या जोडीने खाद्यपदार्थ विक्री येथे केली जाते.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6875.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f203b37b251c83af0019f591f99d36987acf07ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6875.txt @@ -0,0 +1,2 @@ +लश्करासोबत प्रवास करणाऱ्या पण लढाईत भाग न घेणाऱ्या व्यक्तीला बुणगा किंवा बाजारबुणगा म्हणले जाते. +सहसा अशा व्यक्ती सैनिकांच्या स्त्रीया, बालके, सेवक, इ. असतात. अनेकदा या व्यक्ती सैनिकांची निगा व सेवा करण्यासाठी असल्या तरी केवळ सहप्रवासी म्हणूनही अनेकदा अशा व्यक्ती सैन्यांबरोबर असत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_690.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b63ed5abf43345435cdd5555d9d8d713f6f6387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_690.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौष शुद्ध चतुर्थी ही पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6900.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0deebfaa25225c2dc5c22a7ca9c2e4fd16aa0d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6900.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +दुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ] +बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.[१] +सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली. +१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्‍यकारभार चालविण्‍याचे शिक्षण मिळालेले नव्‍हते. त्‍याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्‍या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्‍याच्‍या अंमलामध्‍ये प्रजेला आपल्‍या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्‍ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्‍यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्‍या वडिलांच्‍या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्‍यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्‍या कल्‍याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्‍या काळात झपाट्याने राज्‍यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्‍याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्‍व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले. +इ.स. १८०० च्‍या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्‍या. मोठमोठे सरदार आपल्‍याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्‍ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्‍याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्‍या पायाशी बांधून ठार मारिला. त्‍यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्‍याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्‍यामुळे त्‍याने शक्‍य तेवढे सबुरीने घ्‍यायचे धोरण ठेवले. त्‍याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्‍यासाठी माणसे पाठविली. मात्र त्‍या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्‍ये मोरोबादादा, समस्‍त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्‍यांच्‍यापैकी कित्‍येकांस कैद होऊन त्‍यांची रवानगी अवघड किल्‍ल्‍यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्‍यावर हल्‍ला चढवला तेव्‍हा त्‍याच्‍याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्‍य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्‍या आश्रयाला गेला. त्‍यावेळी जगाच्‍या राजकारणात वरचष्‍मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्‍यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले. +२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. +डिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. +दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. +सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला +शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. +इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. +इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते." +मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे - +''एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत. +(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.) +हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही. +[१] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.'' +ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३ +ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९ +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन +ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली त्‍यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्‍यास करता आला. सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6904.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac087af91824d5de6c32bd89229969fd6eeb3631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6904.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°34′00″N 7°36′10″E / 47.56667°N 7.60278°E / 47.56667; 7.60278 + +बासल (जर्मन: Basel) ही स्वित्झर्लंड देशाच्या बासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिक व जिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात फ्रान्स व जर्मनी देशांच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6926.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5054239d6ce5ea85e239e9309339fd5d3a258e72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6926.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाडेन-व्युर्टेंबर्ग हे जर्मनीचे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. ऱ्हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे नेकार नदीच्या किनारी वसलेली आहेत. (उदा: स्टुटगार्ट , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, मानहाइम ). याची राजधानी स्टुटगार्ट असून हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे. +बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीलगत फ्रान्सची सीमा आहे व दक्षिणेला स्वित्झर्लंडची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पूर्वेला बायर्न, तर उत्तरेला ऱ्हाइनलॅंड-फाल्त्स व हेसेन या राज्यांच्या सीमा आहेत. +राज्यातील प्रमुख नदी - ऱ्हाइन नदी - फ्रान्सच्या सीमेलगत वाहते. राज्यातील इतर प्रमुख नद्यांमध्ये नेकार व डोनाउ यांचा समावेश होतो. नेकार नदी मानहाइम या शहराजवळ ऱ्हाइन नदीला मिळते. डोनाउ नदी ही पूर्ववाहिनी असून तिचा युरोपातील प्रमुख नद्यांत समावेश होतो. ती बायर्नमधून पुढे जाऊन युरोपातील अनेक देशांतून वाहते व सरतेशेवटी रोमानियामध्ये काळ्या समुद्राला जाऊन मिळते. नेकार व डोनाउ या दोन्ही नद्या ब्लॅक फॉरेस्टनजीकच्या पर्वतरांगेत उगम पावतात. +ब्लॅक फॉरेस्ट अथवा जर्मन भाषेत श्वार्झवाल्ड ही राज्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. या डोंगररांगामध्ये असलेले पाईन वृक्षांच्या घनदाट जंगलांमु़ळे याचे नाव ब्लॅक फोरेस्ट असे पडले. यामध्ये फेल्डबर्ग हे सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची १४९३ मी आहे. ब्लॅक फॉरेस्टने डोंगररांगेनी राज्याचा पश्चिम भाग व्यापला आहे तर पूर्व भागात स्वेबियन आल्प्स ( अथवा श्वाबन आल्प्स) ही डोंगररांग आहे. या दोन डोंगररांगांमुळे हे राज्य बहुतांशी उंच-सखल आहे. +दक्षिणेला स्वित्झर्लंडच्या सीमेलगत बोडेन्जी हे तळे असून जर्मनीतील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6945.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed434bc1f95e8dc50db27ea64948fd21f06ad666 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6945.txt @@ -0,0 +1,6 @@ +बाणगंगा महोत्सव [१] +हा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव या नावाने सुद्धा ओळखला जातो. [२] हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मलबार हिल्स, मुंबई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसीय संगीत महोत्सव साजरा केला जातो.[३] +मलबार हिल्समधील वाळकेश्वर मंदिराच्या संकुलात असलेल्या बाणगंगा टाकी हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.  “Live Music To Save Heritage” [४]या संकल्पनेच्या आधारित महोत्सवाचे आयोजन बाणगंगा तलावाकाठी केले जात असे. इ.स. १९९२ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात भारतातील नामवंत कलाकार हरिप्रसाद चौरसिया ,[५] झाकिर हुसेन [६] यांच्या मैफिली आणि संगीत सादरीकरणाचा साक्षीदार आहे, त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. तथापि +इ.स. २००८ पासून ध्वनिप्रदूषणाच्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने या महोत्सवचे ठिकाण बदलून एशियाटिक सोसायटी , टाउन हॉल , मुंबई येथे हलवण्यात आले. सोबतच महोत्सवचे ‘बाणगंगा फेस्टिव्हल’ या नावात बदल करून ‘मुंबई संस्कृती’ असे ठेवण्यात आले. +वाळकेश्वर हे दक्षिण मुंबईतील एक समृद्ध क्षेत्र आहे. हे वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा टाकीसाठी लोकप्रिय आहे. हे मंदिर बाणगंगा कुंडाच्या अगदी जवळ भगवान शिवाला समर्पित आहे.[७] +टाक्याच्या पश्चिमेला गौडा सारस्वतांचे प्रसिद्ध धार्मिक आसन असलेल्या श्री काशी मठाची शाखा आहे. मठ परिसरात दोन समाधी आहेत. 1.श्री माधवेंद्र तीर्थ (७ वे स्वामीजी, समाधी वर्ष १७७५: श्री स्वामीजी, ते जिवंत असताना समाधीत प्रवेश केला असे म्हणतात आणि म्हणून ही एक शक्तिशाली जीव समाधी आहे) आणि श्री वरदेंद्र तीर्थ (१८वे स्वामीजी: समाधी वर्ष १९१४) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6962.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1f42d489bf2d520d7c0a6f040d8349a77f918ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6962.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाणाची कादंबरी हे मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. संस्कृत कादंबरीकार बाणभट्ट यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे.[१] +बाणभट्टाने संस्कृतमध्ये लिहिलेली 'कादंबरी' ही जगातली पहिली गद्य कादंबरी आहे.या कादंबरीत लांबलचक शब्दांच्या लांबीचा आणि संख्येचा उच्चांक आहे. नमुन्यादाखल हा शब्द पहा - हरिनखरभिन्नमत्तमातंगकुंभमुक्तरक्तार्द्रमुक्ताफलत्विंषि खंडितानि दाडिमबीजानि । diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6968.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a210308b65a59d67da855747a99452cbd5779a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6968.txt @@ -0,0 +1,8 @@ + +किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते. +'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायानी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाच्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी दौलतराव गायकवाड या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली. +पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार (गनिमी कावा) मोगलास जाऊन मिळाले, त्यावेळी त्यांना सप्तहजारी मनसबदारी मिळाली. या घटनेनंतर दिलेरखान संभाजीराजांना बरोबर घेऊन मराठी मुलखावर हल्ला करत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळगडावर मोगलानी हल्ला चढविला. या युद्धात दिलेरखानाने शेजारील डोंगरावरून तोफा डागून गडाचा एक बुरूज पाडला व एका प्रहरात भूपाळगड मोगलांच्या ताब्यात गेला. (मराठी मुलखाची जीवितहानी होऊ नये म्हणून व दिलेरखानाचा शंभुराजेंवर विश्वास बसावा म्हणून शंभुराजेंनी हा किल्ला मुघलांना दिला.) पुढे या घटनेचा खटला शंभूराजे विरोधात कारभारी मंडळींनी दरबारात बसवला व शंभूराजे यांच्याकडून किल्ल्याचा किल्लेदार दौलतराव गायकवाड यांच्या पुराव्याने शंभुराजाना दोष मुक्त करण्यात आले. +भूपाळगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. याच्या एका कोपऱ्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचते. या तलावाजवळूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची वाट आहे. टेकडीसमोरच महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग असून ते बाणूर्लिंग या नावाने ओळखले जाते. +मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते. बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला; तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडले. पण ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. समाधी समोरून जाणाऱ्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर गजची तटबंदी पहायला मिळते; दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत. +पहा: महाराष्ट्रातील किल्ले +कालिदास 64618 diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6969.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d82a7db3ea8b4b78eac3531a2a073e9475b8a802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6969.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6974.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..271b19c2933d6a98c5188c66510524ea229eaa10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6974.txt @@ -0,0 +1 @@ +बाणेरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6977.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..401611a9ab96caff815d3bb9ab1d69de962a602f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6977.txt @@ -0,0 +1 @@ +बाणोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6980.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9529b2061bdfa436efc1090342e175e39360eb3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6980.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 41°39′0″N 41°39′0″E / 41.65000°N 41.65000°E / 41.65000; 41.65000 + +बातुमी (जॉर्जियन: ბათუმი) हे जॉर्जिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी व कुतैसी नंतर). हे शहर जॉर्जियाच्या नैऋत्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते जॉर्जियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6998.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ee0952c182a159fdc059d49ac6ab54377dbfe62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_6998.txt @@ -0,0 +1,2 @@ +बादशहातलाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7029.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a75681fd0c2449adbb767a921b165d7269fbb6ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7029.txt @@ -0,0 +1,2 @@ +बापसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7064.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f44d9278e765db3ea9e866ae3b08fcbd6564bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7064.txt @@ -0,0 +1,11 @@ +वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म : नरखेड, १६ जुलै १९१४; मृ्त्यू : १ डिसेंबर १९९५] हे मराठी लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके, इ. लिहिले किंवा त्यांत योगदान दिले. +वामन चोरघडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. सर्वात धाकटे म्हणजे बापू ऊर्फ वामन. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठय़ा भावाने घेतली, आणि त्यांना काटोल गावातल्या एका प्राथमिक शाळेत घातले. पुढचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या शाळेत, आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस कॉलेजात झाले. +कॉलेजात असताना चोरघडे त्यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली प्रसिद्ध केली. त्यांच्या कथा वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या. +चोरघडे यांनी डॉ. वेणू साठे यांच्याशी विवाह केला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत. +वामन चोरघडे यांनी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत पदवी मिळवली होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेक्सरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. +ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. +महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. +एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा परिचय झाला. तुरुंगात त्यांनी खादीचे व्रत घेतले व मृत्यूपर्यंत पाळले. चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वतः धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या वेषातच असत. +चोरघडेंना हे नियमित व्यायाम करीत असून त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. त्यांचे उच्चार स्पष्ट होते. चोरघडे हे उत्तम वक्ते मानले जात. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सक्सेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, इ.स. १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. +महाराष्ट्रातचे मंत्री रामकृष्ण पाटील यांनी चोरघड्यांना मानद अन्नपुरवठा अधिकारी हे पद दिले होते. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांनी सांभाळली. +त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरघडे यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले होते. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एर थिएटर बांधून घेतले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7080.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c7ce165900c3c6266df9537910584ccae8f4f3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7080.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7082.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d45ae696ec4869c93d481d978fefb31f229dd9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7082.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +बाबरी मस्जिद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती. +१५२७ साली मोगल सम्राट बाबर ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद इ.स. १९९२ साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उद्‌ध्वस्त झाली/करण्यात आली.[१] हिंदू देवता राम ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उद्‌ध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर ह्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे. +१९९२ सालापासून ते आजवर गेल्या २३ वर्षांत कोर्टाला पुराव्यांची छाननी करता आलेली नाही, असे समजले जाते. छाननी झाली तर त्या जागेवर रामाचे मंदिर होते की नाही याची शहानिशा होईल, आणि मग सगळेच वाद संपुष्टात येतील. बाबरी मशिदीला मशीद म्हणायचे की नाही याबद्दलच वादंग आहेत. त्या इमारतीत कोणतेही मुस्लिम धार्मिक विधी होत नव्हते. कागदोपत्री ही मशीद नसून एक विवादास्पद पडायला आलेली इमारत होती, असे काहींचे म्हणणे आहे. कोर्टालाही ही भूमिका मान्य असावी. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7100.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f5bb2acc7532ed4877076a08fec4e77ce494f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7100.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबा पदमनजी मुळे ऊर्फ बाबा पदमनजी (इ.स. १८३१ - ऑगस्ट २९, इ.स. १९०६) हे मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते. ते मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात. त्यांनी लिहिलेली शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची यमुनापर्यटन ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचे मानले जाते. 'अरुणोदय' या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. महात्मा फुले यांचा ब्राह्मणांचे कसब ग्रंथाला प्रस्तावना दिली.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7121.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..521d665886f88184001ddc965f3e207258f13fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7121.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबाजानी दुरानी हे महाराष्ट्रातील पाथरी शहरातील एक राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत[१] +दुरानी यांनी पाथरी नगरपरिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर पाथरी नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी (विधानसभा मतदारसंघ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तीन वेळाचे आमदार, शिवसेनेचे हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला. २०१२ मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदार संघातून ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. १० जुलै २०१८ रोजी ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आले[२]. त्यांचा कार्यकाळ जुलै २०२४ पर्यंत आहे . diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7176.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..565448bdcb2ece71244f1802264d7fee8385839a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7176.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बाबुलनाथ मंदिर हे मुंबई, भारतातील एक प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले, हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे,[१] बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे. विश्वासू लोक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेतात. मंदिरापर्यंत लिफ्टने जाणेही शक्य आहे. वार्षिक महाशिवरात्री उत्सवात लाखो भाविक मंदिरांना भेट देतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7184.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be552e58f65db274b9382849a391e303e8e6cda8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7184.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबुळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_72.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_72.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05bf4edec97f1f9f7b64c1fbbd7ef100db8b9275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_72.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप इनोसंट चौथा(इ.स. ११९५:मनारोला, इटली - डिसेंबर ७, इ.स. १२५४) हा तेराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव सिनिबाल्दो फियेशी होते. जहागीरदार घराण्यात जन्मलेल्या सिनिबाल्दोचे शिक्षण पार्मा व बोलोन्या येथे झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7202.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c126c807152196337e60b4657a36d3614e7f3ee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7202.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाबूराव रामचंद्र घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४ - ) हे महाराष्ट्रातील ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या खासगी शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.[ संदर्भ हवा ] +वकिलीचा व्यवसाय करताकरता बाबूराव घोलप यांना शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे कष्टाचे झाले आहे याचा अनुभव आला. इ.स. १९३३साली ते पुणे जिल्हा लोकल बोर्डात ‘चीफ ऑफिसर’ झाले. या ऑफिसच्या कामानिमित्त ते पुण्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांत फिरले.[ संदर्भ हवा ] कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी अनुभव घेतला.[ संदर्भ हवा ] +बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी घोलपांनी ७ सप्टेंबर, १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची सुरुवात ‘गावठी शाळा’ काढण्यापासून झाली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे श्री शिवाजी विद्यालयाची स्थापना करून त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणप्रसाराच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ते स्वतः गावोगावी बैलगाडीने, सायकलीवरून, एस्‌टीच्या बसने आणि प्रसंगी पायी प्रवास करून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. बहुजन समाजातल्या मुलांसाठी त्यांनी शाळा काढल्या या शाळा देवळांत, गुरांच्या गोठ्यांत किंवा झाडाखाली भरत असत.[ संदर्भ हवा ] +शिक्षणयोगी बाबूराव घोलपांची शिक्षणाबद्दलची तळमळ पाहून त्यांच्यासाठी गावोगावी मदतीचे हात पुढे आले. लोकांनी श्रमदानाने शाळांच्या इमारती बांधल्या.[ संदर्भ हवा ] +बाबूराव घोलप यांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेची २०१६ सालापर्यंत ९ प्राथमिक विद्यालये, ६१ माध्यमिक, व ३१ उच्च माध्यमिक विद्यालये सुरू झाली आहेत. शिवाय ८ उच्च महाविद्यालये, व्यवसाय अध्यापनाच्या २५ शाळा, १२ व्यावसायिक महाविद्यालये आणि एकएक वैद्यकीय, इंजिअनिअरिंग, फार्मसी कॉलेज, एक एम.बी.ए. कॉलेज, एक विधी महाविद्यालय आणि एक बी.एड. कॉलेज आहे; शिवाय सेवक कल्याण निधीमधून निर्माण झालेली एक सहकारी पतसंस्था व एक ग्राहक विद्यार्थी भांडार आहे.[ संदर्भ हवा ] +बाबूराव घोलपांनंतर मामासाहेब मोहोळ संस्थेचे प्रमुख झाले. अजित पवार हे सध्या (२०१७ साली) संस्थाप्रमुख आहेत.[ संदर्भ हवा ] +घोलपांचे ‘मी बाबूराव घोलप’ नावाचे आत्मचरित्र ग्रामविकास व समता विचार व्यासपीठ या संस्थेने प्रकाशित केले आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7256.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533f31e1c395fbca9f76de3e92b337ef90158b3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7256.txt @@ -0,0 +1,9 @@ + +बामटी (मान) नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + +बामटी (मान) नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_727.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daab40c4a87a3ea133bf21461b9eccc207aaff14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_727.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्यारी-यारी ही मराठी मधील गोष्ट रूपाने प्रदर्शित केली जाणारी पहिलीवेबसीरीज असून ती नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाली. अमेय रमेश परुळेकर यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले असून, लेखन अमेय रमेश परुळेकर आणि हर्षल आल्पे यांनी लिहिली आहे. +ही मालिका परुळेकर यांच्या युट्युब वाहिनीवर [१] प्रदर्शित करण्यात आलीआहे. ह्या मालिकेचे प्रथम सत्र हे  एकूण ८ भागांचे आहे. या मालिकेचे चित्रांकन पुणे परिसरात केले गेले. शिवेंदू मेनन यांनी मालिकेचे चित्रांकन व संकलन केले आहे. मालिकेचे पार्श्वसंगीत विपुल वर्तक, शीर्षक गीत प्रसाद ओझरकर, डीजे सनी, डीजे सीड, अखिलेश केळकर तर हिंदी गीत यश मखिजा यांनी दिले आहे. +या मालिकेला एक लाखांहून अधिक प्रेक्षक आहेत. [१] + + +प्यारी-यारीची कथा एकाच घरात राहणाऱ्या ४ तरुण मित्रांची आणि त्यांच्या एकमेकां मधल्या नात्याची आहे. एक पत्रकार सुरेश बगळे , एक कवी देवदत्त , एक दिलफेक प्रेमिक राहुल आणि एक ऍक्टर रॉंनी असे हे चार जण व त्यांच्या शेजारी नुकतीच नव्याने राहावयास आलेली एक तरुण मुलगी प्रीशा यांच्या भोवती कथानक फिरते. +त्यानंतर शेजारी आलेल्या नायिकेच्या प्रेमात पडणाऱ्या या चार मुलांना कळते कि प्रीशा ही अगोदरच एका नात्यात असून त्याचे नाव भूषण आहे, हे कळल्या वर चौघांची होणारी घालमेल आणि त्यातच एका नवीन नायिकेने केलेला केलेला प्रवेश आणि त्यातूनच होणाऱ्या घडामोडी यात दाखविलेल्या आहेत. +या मालिकेतील अभिनेते मुंबई, पुणे, बेळगावचे आहेत. +चिरागच्या भूमिकेत सागर जोशी व धन्नोच्या भूमिकेत धनश्री येडगावकर हे सहायक अभिनेते आहेत. शैलेश लेले, अमेय रमेश परुळेकर, अश्विन होले, प्रियेशा सिंह व सुबोध अहिरराव यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7294.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eecbc4d89b55956936502c254669b3c6a309cb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7294.txt @@ -0,0 +1,2 @@ +बामनोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7300.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2a67e6c77631df9e83518a2c12fc4bdcd4c97e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7300.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 12°37′N 8°0′W / 12.617°N 8.000°W / 12.617; -8.000 + +बमाको ही माली ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे १८,००,००० इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7323.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a60a6530f68465b6e9142c861937a9169b158a2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7323.txt @@ -0,0 +1 @@ +बायतू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7330.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0e9cbce575272f94b23a167ee0b90e8ba2ee6de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7330.txt @@ -0,0 +1,5 @@ +बायपोलर डिसऑर्डर, हा पूर्वी मानसिक नैराश्यम्हणून ओळखला जात आहे, जो एक मानसिक विकार आहे ज्यामुळे नैराश्य कालावधी येतात आणि असाधारणतेचे कालावधी उच्चतम मनस्थितीयेते.[३][४][६] उच्चतम मनस्थिती ही महत्त्वाची असते आणि त्याच्या तीव्रतेवर, खूळ किंवा खुळेपणाअवलंबून असतो, किंवा मानसिकतेच्या लक्षणांवर अवलंबून असतो.[३] खुळेपणाच्या दरम्यान, व्यक्ती वागते किंवा असाधारणपणे उत्साही, आनंदी किंवा चिडचिडेपणा अनुभवते.[३] बरेचदा परिणामांकडे दुर्लक्ष करून व्यक्ती खराब विचार करून निर्णय घेतात.[४] खुळेपणाच्या टप्प्यात झोपण्याची गरज सहसा कमी होते.[४] निराशेच्या कालावधीत, रडणे, जीवनाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, आणि इतरांकडे चुकीच्या नजरेने होऊ शकते.[३] आजारी असलेल्या अशा लोकांमध्ये आत्महत्येचा धोका 20 वर्षांमध्ये 6 टक्के पेक्षा खूप जास्त, तर स्वयं-इजा 30– मध्ये 40 टक्के घडते.[३] इतर मानसिक आरोग्य समस्या जसे की चिंतातुरता विकार आणि पदार्थाच्या वापराचा विकार या सामान्यपणे बायपोलर डिसऑर्डराशी संबंधित असतात.[३] +कारणे स्पष्टपणे समजू शकत नाहीत, परंतु पर्यावरणीय आणि अनुवांशिकता हे दोन्हीही घटक भूमिका बजावतात.[३] छोट्या प्रभावाच्या अनेक जीन्समध्ये धोका निर्माण होतो.[३][७] पर्यावरणीय जोखीम घटकांमध्ये बालशोषण आणि दीर्घ-कालीन तणावयांच्या इतिहासाचा समावेश होतो.[३] जोखमींपैकी सुमारे 85% अनुवांशिकतेच्या कारणानेअसल्याचे दिसते.[८] या स्थितीचे कमीतकमी एक खुळेपणाचे प्रकरण हे नैराश्याचे प्रकरण किंवा त्याशिवाय असेल तर बायपोलर I विकार आणि जर कमीतकमी एक अतिखुळेपणाचे प्रकरण (परंतु खुळेपणाचे प्रकरण नसेल) आणि एक मुख्य नैराश्याचे प्रकरण असेल तर बायपोलर II विकार असे वर्गीकरण केले आहे.[४] दीर्घ काळातील कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्यांमध्ये सायक्लोथिमिया विकार स्थितीचे निदान केले जाऊ शकते.[४] लक्षणे जर औषधे किंवा वैद्यकीय समस्यांमुळे असतील तर ती स्वतंत्रपणे वर्गीकृत केली गेली आहेत.[४] यासारख्याच असलेल्या इतर स्थितींमध्ये क्रियाशीलतेमधील कमी लक्ष असण्याचा विकार, व्यक्तिमत्त्वाचा विकार, स्किझोफ्रेनिया आणि पदार्थांच्या वापराचा विकार तसेच अनेक वैद्यकीय स्थितींचा समावेश होतो.[३] निदानकरण्यासाठीवैद्यकीय चाचणीकरणे आवश्यक नसली, तरीही इतर समस्या घालवण्यासाठी रक्त चाचण्या किंवा मेडिकल इमेजिंग केले जाऊ शकते.[९] +उपचारांमध्ये सामान्यत: मानसोपचार तसेच औषधोपचार जसे की मनस्थिती स्थिर करणे आणि मानसोपचारविरोधकसमाविष्ट असतात.[३] मनस्थिती स्थिर करण्यासाठी सामान्यतः वापरल्या गेलेल्या उदाहरणांमध्ये लिथियम आणि विविध आळसविरोधकयांचा समावेश होतो.[३] एखादी व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना जोखीम वाटत असेल परंतु उपचार नाकारत असेल तर रुग्णालयात अनैच्छिक उपचार घेणे गरजेचे असू शकते.[३] वागणुकीची तीव्र समस्या जसे की वळवळ किंवा लढाऊपणा, अल्प मुदतीच्या मानसोपचारविरोधकासह किंवा बेन्झोडियाझेपाइन्ससह व्यवस्थापित केली जाऊ शकते.[३] खुळेपणाच्या कालावधीमध्ये, निराशा अवरोधक थांबले पाहिजे अशी शिफारस केली जाते.[३] निराशा अवरोधक नैराश्याच्या कालावधीत वापरले, तर ते मनस्थिती स्थिर करण्यासाठी वापरले पाहिजे. [३] इलेक्ट्रोकोनव्हलसिव्ह चिकित्सा (ईसीटी), जिचा खूप चांगला अभ्यास केला जात नसेल तर अशा लोकांसाठी प्रयत्न केला जाऊ शकतो जे इतर उपचारांना प्रतिसाद देत नाहीत.[३][१०] जर उपचार थांबवले, तर ते हळूहळू केले जावेत अशी शिफारस केली जाते.[३] बऱ्याच व्यक्तींना आजारपणामुळे आर्थिक, सामाजिक किंवा कार्या-संबंधित समस्या आहेत.[३] या अडचणी सरासरी एका तिमाहीत एक तृतीयांश वेळा होतात.[३] खराब जीवनशैलीच्या निवडीने आणि औषधोपचारांच्या आनुषंगिक परिणामांमुळे, हृदय रोग नैसर्गिक कारणामुळे मृत्यूची जोखीम सामान्य लोकसंख्येपेक्षा दुप्पट आहे.[३] +बायपोलर डिसऑर्डर जगातील अंदाजे 1% लोकसंख्येवर परिणाम करते.[११] युनायटेड स्टेट्समध्ये, सुमारे 3% लोक त्यांच्या जीवनात कोणत्यातरी वेळी परिणाम झालेले असल्याचा अंदाज आहे; हे दर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सारखेच असल्याचे दिसते.[१२][५] लक्षणे सुरू होण्याचे सर्वात सामान्य वय 25 हे आहे.[३] 1991 मध्ये यूनायटेड स्टेट्ससाठी विकारांवरील आर्थिक खर्चाचा अंदाज $45 अब्ज इतका होता.[१३] यापैकी मोठ्या हिश्श्याचा अंदाज हा दरवर्षी 50 बुडालेल्या कामाच्या दिवसांशी संबंधित होता.[१३] बायपोलर विकार असलेल्या लोकांना नेहमी सामाजिक कलंकाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.[३] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7333.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c3a827214093d9fe23eee405fe54e0603a18db9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7333.txt @@ -0,0 +1,3 @@ +बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. +ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7337.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277097b5332b1f7954bea0fa909e9471b656c232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7337.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत. +फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7338.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277097b5332b1f7954bea0fa909e9471b656c232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7338.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत. +फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7350.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de78fd65711c43a5ded02a0ee17ed8b18b4c2cd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7350.txt @@ -0,0 +1,5 @@ +बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन. +कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रूपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे. +अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. +भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] +मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायोडिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत. मर्सिडीजच्या बायोडिझेल कारच्या रॅलीचे आयोजन करण्यात येते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7356.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce370c9a370d9d72e969bf1dfff2d919c4ea60c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7356.txt @@ -0,0 +1,2 @@ +बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध, पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते. +भारतातील बायोस्फियर रिझर्व diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7361.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51c2a7c9a7052f0699f753bc7a6851988ed1720f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7361.txt @@ -0,0 +1 @@ +वस्तूवर दर्शवलेल्या बार कोडमधील पहिल्या दोन-तीन आकड्यांवरून तो जिन्नस कोणत्या देशात बनला आहे ते सांगता येते. उदा० diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7376.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e9514a3bcbc2e9362f5e9d1391ec815b91d9bbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7376.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_738.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73664bceba5443b509661e9d0789ec4f0158f3e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_738.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्यू संशोधन केंद्र तथा प्यू रिसर्च सेंटर (Pew Research Center) अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये स्थित एक संशोधनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९० मध्ये झाली, ही प्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची संस्था आहे.[१] ही संस्था युनायटेड स्टेट्स आणि जगाला आकार देणाऱ्या सामाजिक समस्या, जनमत आणि लोकसंख्याशास्त्रीय कल याविषयी माहिती प्रदान करते. तसेच ही संस्था सार्वजनिक मत सर्वेक्षण, लोकसंख्याशास्त्रीय संशोधन, यादृच्छिक नमुना सर्वेक्षण संशोधन आणि पॅनेल आधारित सर्वेक्षणे,[२] मीडिया सामग्री विश्लेषण आणि इतर सामाजिक बाबींवर संशोधन करते.[३][४] +संस्थेच्या संशोधनामध्ये खालील विषयांचा समावेश असतो:[५][६] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7400.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a6339f4238e5dea7eb43aaae952ab449327bb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7400.txt @@ -0,0 +1,11 @@ +बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. [१] भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत. +क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे. +बाराबती मैदान कटक [२]येथे देशातील तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवून मालिकेत २-१ असे यश मिळवले. पाच मोसमांनंतर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला गेला, ज्यामध्ये अंदाज करता न येण्याइतकी उसळी मिळणाऱ्या, काम पुर्णपणे न झालेल्या खेळपट्टीने श्रीलंकेच्या संघाचे स्वागत केले. दिलीप वेंगसरकर, त्यावेळी आपल्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर होता, त्याने त्याची कसोटी क्रिकेटमधील १६६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सामन्यात दोन्ही संघांमधील इतर कुणालाही ६० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचा दोनवेळा सर्वबाद करून भारताने १ डाव आणि ६७ धावांनी विजय मिळवला. कपिल देवने त्याचा ३००वा बळी ह्याच सामन्यात रुमेश रत्नायकेच्या रूपाने मिळवला. +१९९५-९६ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध ह्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकमेव कसोटी सामन्यावर पावसाचा खूप वाईट परिणाम झाला. सामन्यात केवळ १७७.५ षटकांचा खेळ होऊ शकला. पुनरागमन करणाऱ्या नरेंद्र हिरवाणीने न्यू झीलंडचा एकमेव डावात ५९ धावांमध्ये ६ बळी घेऊन ह्या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. +ह्या मैदानावर कसोटी सामने आता नियमित होत नसले तरीही त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने नियमित पणे होतात. दोन कसोटी सामन्यांतून भारताने एक कसोटी जिंकली आहे. तर, १७ एकदिवसीय सामन्यांपैकी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. +मैदानावर रिलायन्स विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे आणि नेहरू चषक, १९८९ स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय बाराबती स्टेडियममध्ये १९९६ विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील काही सामने खेळवले गेले होते. +२०१२ मध्ये, ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बाराबती मैदानावरील इनडोअर हॉलला सचिन तेंडुलकरचे नाव दिले. +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]: +आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]: + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7402.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..129543fcb853dd0e44049a5dc3835cef64916d4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7402.txt @@ -0,0 +1,2 @@ + बारबाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7406.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2415f06516fb53cc9c67db0d310b705fd429e755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7406.txt @@ -0,0 +1 @@ +रुथ बार्बरा वूड (१९ मार्च, १९१७:इंग्लंड - १९९८:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7414.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b4f0165727294d308cf18e404042a242415c2e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7414.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील बारमेर जिल्ह्याविषयी आहे. बारमेर शहराच्या माहितीसाठी पहा - बारमेर. +बारमेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बारमेर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7438.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc613370cdeac63623a4a320a272425336db6abf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7438.txt @@ -0,0 +1,14 @@ + बारसू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक मध्यम आकाराचे गाव असून येथे एकूण १०३ कुटुंबे राहतात.[१] + +बारसू हे गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रापासून ~१२ कि.मी. वर आहे. ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.येथील कातळ शिल्प जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.[२] +बारसू येथील पठारात ६२ कातळशिल्पे आहेत. कोकणच्या किनारी पट्ट्यातील भूगोलांचा हा सर्वात मोठा समूह आहे. त्यापैकी एकावर माणसाचे आणि दोन वाघांचे जीवनापेक्षा मोठे कोरीवकाम आहे. कोरीव काम 17.5 x 4.5 मीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. तो माणूस वाघांच्या दोन आकृत्यांच्या मध्ये उभा असलेला दाखवला आहे. मानवी आकृतीची उंची चार मीटर आहे. या वाघांना थोपवून धरण्यासाठी त्या माणसाला हात पसरलेले दाखवले आहेत. रुंद उघड्या तोंडाने दाखवलेल्या आयताकृती स्वरूपात वाघांना शैलीबद्ध केलेले जाते. आक्रमण करत असले तरी ते कमी-अधिक प्रमाणात स्थिर दिसतात. सर्वात्मवादवर शैलीकरणाचे वर्चस्व असल्याचे दिसते. वाघांवरील पट्टे देखील आडव्या आणि उभ्या रेषांनी बनलेले आहेत ज्यापासून आयत आणि त्रिकोण तयार होतात. वाघांना भौमितिक आकारात दाखवण्याच्या शैलीच्या बरोबर विरुद्ध मानवी आकृतीत मात्र डोके गोल, वक्र कंबर आणि गोलाकार पाय दाखवलेले आहेत. मानवी आकृतीची छाती भौमितिक अमूर्त रुपात दर्शविली आहे. हा छाती भौमितिक अमूर्त आकार लज्जागौरीची आकृती असा अंदाज आहे.[३] कोरीव काम 2 इंचांपेक्षा जास्त खोल नाही, तसेच बाहेरील आणि आतील रेषांमधील अंतर 3-4 सेंटीमीटर रुंद आहे. मानवी धडाच्या डाव्या बाजूला मासे, ससा आणि मोर यांच्या आकृत्यांचे चित्रण केलेले आहे. मानवी धडाच्या दुसऱ्या बाजूचे चित्र ओळखण्यापलीकडे झिजले गेले आहे. तज्ञांनी हडप्पा संस्कृती-हडप्पा आणि मोहेंजो-दारोच्या उत्खनन केलेल्या ठिकाणांवरून नोंदवलेल्या किमान दोन सीलवर चित्रित केलेल्या आकृतिबंध व बारसू येथील रचनेत साम्य असल्याचे सांगितले आहे.[४] +युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने कोकणातील कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये होण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी तात्पुरती यादी सादर केली आहे.[४] +रत्‍नागिरी ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स रत्‍नागिरी येथे विकसित करण्याची भारत सरकारची योजना आहे. ठिकाण सदर ठिमुंबईच्या दक्षिणेस अंदाजे 346 किमी वर आहे. या रिफायनरीची खनिज तेल शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिन 1.2 दशलक्ष बॅरल म्हणजेच, प्रतिवर्ष 60 दशलक्ष टन (MTPA) आहे. या प्रकल्पावरील अंदाजे गुंतवणूक 44 अब्ज अमेरिकी डाॅलर एवढी आहे.[५] +सदर रिफायनरी प्रकल्प रत्‍नागिरी जिल्ह्यात नाणार येथे होणार होता. मात्र त्याला शिवसेना पक्ष व स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प स्थगित करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथेसुद्धा स्थानिक लोकांचा विरोध होता.[६] +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नाचणीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7447.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9b5b4b7a8ed45f197fdfe7c11fe43da8a3a253c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7447.txt @@ -0,0 +1,20 @@ + +नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात असा स.आ.जोगळेकर ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत संदर्भ आहे. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा (=पर्वतामधले खोरे) किंवा दरी (=लहान दरा) म्हणतात. +सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली एकूण १२ मावळ आहेत. काही ठिकाणी असेही वाचायला मिळते की शिवाजी राजांचे मावळे म्हणजे सैनिक हे पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळ प्रांत असे म्हटले जाई, पण त्याला भक्कम पुरावा नाही, तसेच स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजेच सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला ‘मावळ’ म्हणतात, अशीही कथा सांगितली जाते. हेही बरोबर नाही. हा मावळ प्रांत विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले. +१. आंदर मावळ : या भागातून आंध्र नदी उगम पावते व वाहते, म्हणून या प्रदेशाला आंदर मावळ म्हणतात. आंदर मावळातली गावे : आंबळे, इंगळूण, उकसाण, कचरेवाडी, करंजगाव, कल्हाट, कशाळ, कांब्रे, कांब्रेनामा, किवळे, कुणे-अनसुटे, कुसावळी, कुसूर, कोंडिवडे अमा, कोंडिवडे नामा, खांड(खांडी), गोवित्री, घोणशेत, जाधववाडी, जांभवली, टाकवे बुद्रुक, डाहूली, थोराण, नवलाख उंबरे, नागाथली, नाणे, निगडे, निळशी, पवळेवाडी, पाले, पिंपरी, फळणे, बधलवाडी, बेलज, बोरवली, ब्राम्हणवाडी, भाजगाव, भोयरे, मंगरूळ, माऊ, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मिंडेवाडी, मोरमारवाडी(मोरमारेवाडी), राकसगाव, वडिवळे, वडेश्वर, वहाणगाव, वळवंती, वाउंड, शिरदे, शिरे, सावळा, सोमवडी, वगैरे. + +२. कानद खोरे : या भागातून कानंदी नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला कानंद मावळ म्हणतात. कानंद मावळाच्या सीमेवर तोरणा हा किल्ला आहे. कादवे व भट्टीची ह्या खिंड, तर देवराई अशी ठिकाणे आहेत. + +३. कोरबारसे मावळ : मुळशी नदीच्या खोऱ्याला कोरबारसे मावळ नाव होतं, मुळशी नदी आताच्या नकाशावर बिलकुल सापडणार नाही. तैलबैला, घनगड, कोरीगड, सुधागड हे किल्ले त्या प्रांतामधले आहेत. + +४. गुंजन मावळ : हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ.या मावळात 84 गावे होती. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, आग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैर्ऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळ प्रांताची देशमुखी सरसेनापती हैबतराव शिळीमकर यांच्या घराण्याकडे होती. त्यांचा किताब हैबतराव असा आहे. +५. नाणे मावळ : हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. नाणे मावळ हा भाग सध्याच्या मावळ तालुक्यात येतो. मध्ययुगीन तर्फे नाणे मावळात एकूण ८८ गावे होती. ह्या तर्फेचे मुख्य गाव कसबे नाणे होते व ह्या गावावरूनच नाणे मावळ हे नाव ह्या तर्फेस मिळाले आहे. लोहगड, विसापूर, राजमाची हे किल्ले ह्या मावळात मोडत. लोहगड-विसापूर ज्या डोंगर रांगेवर आहेत, ती रांग नाणे मावळची दक्षिण सीमा होती. तर जांभिवली, उकसान, माऊ ही उत्तर सीमेवरील गावे. खंडाळा, कुरवंडे ही गावे पश्चिम सीमेवर व मंगरूळ, वडगाव ही गावे पूर्व सीमेवर होती. नाणे मावळात इंद्रायणी व कुंडलिका ह्या मुख्य नद्या आहेत. +देशमुख हे तत्कालीन तालुक्यांचे प्रमुख असत. नाणे मावळचा कारभार दोन देशमुख पाहत असत. गरुड देशमुख ४४ गावांचा व दळवी देशमुख ४४ गावांचा कारभार पाहत असत. तसेच देशमुखांच्या मदतीसाठी देशपांडे किंवा देशकुलकर्णी हे वतनदार असत. नाणे मावळात दळवी देशमुखांचे दोन व गरुड देशमुखांचे दोन असे चार देशपांडे प्रत्येकी २२ गावांचा कारभार पाहत असत. +६. पवन मावळ : पवन मावळ किंवा पौन मावळ हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. तत्कालिन पौन मावळात ८० गावे होती. पवना ही ह्या भागातील मुख्य नदी. ह्या नदीवरूनच ह्या भागास पवन किंवा पौन मावळ हे नाव पडले आहे. पौन मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही थोडी गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण, मोरवे ही गावे; पूर्वेला चांदखेड, बेबडवोहोळ तर दक्षिणेला दखणे, सावरगाव ह्या पवन मावळच्या सीमा होत्या. शिंदे देशमुख व भोपतराव घारे देशमुख हे पौनमावळचा कारभार पाहणारे वतनदार होते. तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे ह्या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंतसचिवांच्या भोर संस्थानात होती. या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत. या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव, उर्से, बऊर, आपटी व दुधिवरे खिंड येणाऱ्याचे स्वागत करतात. निसर्गाने संरक्षित केलेल्या या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली, त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला. ही या मावळाची खासियत आहे. या मावळातील भाजे, कार्ले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीची आभूषणे होत. +७. पौड खोरे : यामध्ये पौड गाव, बावधन, पाषाण, कोथरूड, लवळे गाव, पिरंगुट, भूगांव, मुळशी गाव, ताम्हिणी घाटाचा भाग, दिसली गाव, चाचीवली गाव, अंबडवेट गाव इ. गावांचा समावेश होतो. +८. मुठा खोरे : हे मुठा नदीच्या उगमापासून पुढील काही भागात वसलेले आहे. मुठा खोरे हे शिवकाळातील बारा मावळातील एक मावळ आहे. शिवकालीन पत्रात मुठा खोऱ्याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेने वाहत येणारी ही पुण्याची जीवनगंगा मुळशी तालुक्यात वेगरे या गावी उगम पावते आणि खाली वाहत येऊन सांगरून डावजे या गावाजवळ तिला मोशी आणि आंबी या तिच्या दोन उपनद्या मिळतात. मुठा खोऱ्यात ऐकून १९ गावे आहेत. वेगरे, भोडे, वेडे, आंदगाव, लव्हार्डे, कोळावडे, खारवडे, माळेगाव, मुठा, कोंढुर, भरेकरवाडी, दिघेवाडी, हाळंदेवाडी, जातेडे, बहुली ही त्यातील काही गावे होत. बहुलीच्या पुढे कर्यात मावळ सुरू होते. मुठा खोऱ्याची देशमुखी मारणे घराण्याला होती. त्यांचा किताब गंभीरराव हा आहे. +९. मुसे खोरे : हा प्रांत वेल्हे तालुक्यात मोसे / मुसे नदी जवळ येतो. सरसेनापती यशवंराव (बाजी) पासलकरांकडे या प्रांताची देशमुखी होती, निगडे-मुसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या अखत्यारीत होती. +१०. रोहिड खोरे : रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. +११. वळवंड खोरे : हे वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे, याच नदीला येळवंती (Yelwanti), येलवंती, किंवा येळवंडी म्हणतात. वळवंड धरण आणि भोर तालुक्यातले भाटघर धरणही याच नदीवर आहे. +१२.हिरडस मावळ :हिरडस मावळ : भोर तालुक्यातील आळंदे ते उंबर्डे या 53 गावच्या भागाला हिर्डस मावळ म्हणून ओळखले जाते. या 53 गावाच्या देशमुखीचा कारभार बांदल नाईक देशमुख यांच्याकडे होता. बांदल देशमुख कधीही निजामशाही आणि आदिलशाहीला जुमानत नसत. या बांदल घराण्याचे कर्तबगार पुरुष कृष्णाजी नाईक बांदल देशमुख होते. कृष्णाजी आणि कारीचे जेधे यांच्यात एकूण सात युद्धे विविध कारणावरून झाली. त्यात सातवे युद्ध रोहीड आणि हिर्डस मावळाच्या सीमेवर असणा-या कासारखिंडीत झाले. त्यात बंदलांचा विजय झाला पण दोन्ही कडील एकूण 300 लोक धरातीर्थी पडले. अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पाहून बांदल आणि जेधे यांनी सलोखा केला. आणि त्यांच्यातली कटकट वारली. पुढे दादोजी कोंडदेव आदिलशाह चा सिंहगडाचा (कोंढाणा) किल्लेदार म्हणून काम पाहू लागला. दादोजी आणि बांदलांचे खटके उडाले.कृष्णाजी नाईक बांदल यांनी दादोजीचे घोडे बुंढे करून पाठवले. हा राग मनात ठेवून एकदा कृष्णाजी व इतर देशमुख गोत सभेसाठी 1636 ला भेटले असता दादोजी ने कपाटाने कृष्णाजींना कैद केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कृष्णाजी नाईक बांदल यांच्या पत्नी मुलगा बाजी बांदल यांना घेऊन माहेरी फलटणला जाऊन राहिल्या. बाजी हे राजेनिंबाळकर यांच्या तालमीत वाढू लागले. एकदा शहाजीराजे यांनी बाजींना लढतांना पाहिले व निंबाळकरांना विचारले हा योद्धा कोण? त्यावर त्यांनी शहाजीमहाराजांना सर्व हकीकत सांगितली. शहाजी महाराजांनी बाजींना बोलवून घेतले आणि परत हिर्डस मावळात जाऊन देशमुखी चालवण्यास सांगितले. पुढे हे बाजी बांदल आणि दीपाऊ आपल्या फौजेनीशी स्वराज्यात सामील झाले. खळद-बेलसरच्या लढाईत बांदल घराण्याचे 250 वीर स्वराज्याच्या कामी आले. जावलीच्या दोन्ही स्वारी मध्ये बांदल वीर सहभागी झाले होते. अफजल खानाच्या वधा प्रसंगी बांदलसेना पार घाटात तैनात केली होती. या सेनेने बाजींचा मुलगा रायाजींच्या नेतृत्वात कोल्हापूर च्या विशालगड पर्यंत मजलं मारली आणि पन्हाळा आणि विशालगड मजबूतीकरण करून स्वराज्याची नवी सिमा निश्चित केली. पुढे सिद्धी जोहर स्वराज्यावर चालून आल्यावर बांदलसेनेने स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देऊन महाराजांना पन्हाळ्यावरून विशालगड ला सुखरूप पोहचवले. या युद्धात बांदलांचे दिवान बाजीप्रभू आणि 300 बांदल वीर स्वराज्याच्या कामी आले. हे बांदलांचे शौर्य पाहुन महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या तलवारीचा मान रायाजी बांदल यांना दिला. +शाहिस्तेखान पुण्यात आल्यावर महाराजांनी लाल महालावर छापा टाकला या छाप्यात कोयाजीराव बांदल सहभागी होते.त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांना चार वार लागले. त्यांची समाधी नेकलेस पॉईंट जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7492.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef10669079ba68705f980462017fa30ec5e90bed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7492.txt @@ -0,0 +1 @@ +१९९७ हंगेरियन ग्रांप्री किंवा बारावी मार्लबोरो माग्यार नागिदिज ही १० ऑगस्ट, इ.स. १९९७ रोजी भरलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरामध्ये झालेल्या या ७७ फेऱ्यांच्या शर्यतीतत जाक व्हियेनुएव्ह विल्यम्स-रेनॉल्ट चालवित पहिल्या, डेमन हिल ॲरोझ-यामाहामध्ये दुसऱ्या तर जॉनी हर्बर्ट आपल्या सॉबर-पेट्रोनासमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7537.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa5dc76d454a825f302f97e290ff3f05490eda5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7537.txt @@ -0,0 +1,2 @@ +बार्टन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7559.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26b495cf077d1586efa89d2e7eb5baf0fd38e138 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7559.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +.बार्नस्ले एफ.सी. हा इंग्लंडच्या बार्नस्ले शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7575.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..256673d40b483b30bd80d39e5b5a5377244e2087 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7575.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बरा पेडेन (२ ऑगस्ट, १९०७:ऑस्ट्रेलिया - ३१ जुलै, १९८४:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ ते १९३७ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7612.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f7923b20afe239362f7141cb11e5827b11ce682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7612.txt @@ -0,0 +1,4 @@ +जव, यव, सातू किंवा बार्ली ही एक धान्य आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare असे आहे. याचे कूळ -पोएसी (poaceae) आहे . याचे इंग्रजी नाव बार्ली असे आहे . जव म्हणजे ओट नाही आणि जवसही नाही. +जव ही भारतात प्राचीन काळीही माहीत असलेली आणि देशात आजही उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती तथा एक भरड धान्य आहे. भारतातापेक्षा परदेशांतच या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते. तेथे जनावरांचे खाद्य म्हणून वापरात आहे. +जवाचे रोप ७० ते ९० सेंटिमीटर उंचीचे असून पुष्कळ अंशी गव्हाच्या रोपासारखे असते. याची पाने गव्हाच्या पानापेक्षा खरखरीत असतात. पर्णपत्राची लांबी १५ ते ३० सेंटिमीटर असते. रोपाला तुरे (मंजिऱ्या) येतात. तुऱ्यांचा देठ चपटा असतो आणि त्या देठावर रांगेने कळ्या लागाव्यात तशा जवाच्या साळी लागतात. एका देठावर दोन्ही बाजूंना १० ते १५ साळी असतात. साळीमधे जवाचे दाणे असतात. जवापासून माल्ट बनवतात. सातूची खीर आणि लापशीही करतात. +आजारी लोकांना विशेषतः मधुमेही रोग्यांना पथ्यकर म्हणून या धान्याचा उपयोग होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7613.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b516ce97d5b9f30e2abb3b60a7a0e63bd0739e92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7613.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम बार्लो कार्कीक (इंग्लिश: William Barlow Carkeek) (ऑक्टोबर १७, इ.स. १८७८ - फेब्रुवारी २०, इ.स. १९३७) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला खेळाडू होता. संघामध्ये यष्टिरक्षकाची भूमिका बजावणारा कार्कीक डाव्या हाताने फलंदाजीही करत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7617.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60230d9a7041d7833f04098f82f0e42d8683bc7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7617.txt @@ -0,0 +1,4 @@ +बार्शीटाकळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या सात पैकी एक तालुका आहे. +अजणी खुर्द, अजणी महाला, आलंदा, अंजणी बुद्रुक,असरटेक, अशरफपूर, अशकरीपूर, अटकळी, बागायत बार्शीटाकळी, बहिरखेड, बखारपूर, बार्शीटाकळी, बेलखेड,भांबोरा, भरतपूर, भेंडगाव, भेंडीकाजी, भेंडीमहाला, भेंडी सुतरक, बोरमाळी, ब्राम्हणदरी, चेळका, चिंचखेड, चिंचखेड बुद्रुक, चिंचोळी देवदरी, चिंचोळी रुद्रयाणी, चोहागाव, दगडपारवा, दौचाका, दावदरी, धाबा, ढाकळी, धामणदरी, धानोरे, धारागिरी, धोतरखेड, दोनाड बुद्रुक, दोनाड खुर्द, फेतरा, घोटा, गोरव्हा, हळडोली, हातोळा, हिरकणी, इसापूर, जलालाबाद,जांभरुण, जांबवासु, जामकेश्वर, जानुणा, जोगळखेड, काजळेश्वर, कान्हेरी, करडू, कासरखेड, कासमर, कातखेडा, खडकी, खांबोरा, खेरडा बुद्रुक, खेरडा खुर्द, खोपडी, खोरी कुडवंतपूर, किनखेड, कोठळी बुद्रुक, कोठळी खुर्द, लखमापूर, लोहगड, लोहगड तांडा, महागाव,माहण, मांडोळी, मंगरूळ, मानमतखेड, मिर्झापूर, मोरगाव काकड, मोरहळ, मोझरी बुद्रुक, मोझरी खुर्द, नशीराबाद,निहीडा, निंभारा, निंबी, निंबी बुद्रुक, निंबी खुर्द, पडमीन, पाराभवानी, पारंडा, पारडी, पाटखेड, पिंपळशेंडा, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, पिंपळकुटा, पिंजार, पुनोटी बुद्रुक, पुनोटी खुर्द, राहीट, राजनखेड, राजंडा, राजणखेड तांडा, रामगाव, रेढवा, रुस्तमाबाद, सादळापूर, साफेपूर, साहिट, साकणी, साखरविहिरा, साळपी, सारव, सारकिन्ही,साटळी, सावरखेड, सायखेड, सय्यदपूर, सेवानगर, शहापूर, शेळापूर, शेळगाव, शेलू बुद्रुक, शेलू खुर्द, शिंदखेड, शिवापूर, सोनगिरी, सुकळी, सुलतानपूर, टाकळी छबीला, ताकरखेड, तामसी, तवकाळपूर, टेंभी, टिटवा, तिवसा बुद्रुक, तिवसा खुर्द, उजळेश्वर, उमरदरी, वडाळा, वाडगाव, वाघा बुद्रुक, वाघा खुर्द, वाघजाळी, वाई, वाळपी, वानखेडपूर, वारखेड, वारखेड बुद्रुक, वारखेड खुर्द, वास्तापूर, विझोरा, यावळखेड, येरंडा, झोडगा + +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7624.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae43672ec06e9a80d394c1221e62686f9676203b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7624.txt @@ -0,0 +1,2 @@ +एफ.सी. बार्सिलोना (कातालान व स्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. +जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7635.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d146666b4caf24f2c8d23c6c789f25afa3c424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7635.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + •  बाला (नाव/ आडनाव), बाल (नाव/ आडनाव) आणि बाली (नाव/ आडनाव) लेखसुद्धा निःसंदिग्धीकरणासाठी या लेखाकडे पुर्ननिर्देशीत होतात. बालाजी (निःसंदिग्धीकरण) हे स्वतंत्र निःसंदिग्धीकरण पान आहे. +मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हेच नाव अनेकदा प्रसिद्ध होते. इतर भाषांमध्येसुद्धा हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते. +महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7637.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ae37cb9ffd7bad64fc418bb94665518b8da6a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7637.txt @@ -0,0 +1 @@ +प्रख्यात साहित्यिक आतिश सोसे यांनी मान्यवर सहकारी मंडळींसोबत दि.१३ सप्टेबर १९९५ रोजी स्थापन केलेल्या आणि पंचवीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अकोला जिल्ह्यात स्थापन झालेल्या शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळ बाल,कुमार, युवा व नवोदित मराठी साहित्य संंमेलन भरवते, सन २०२०पर्यंत अशी ९ संमेलने झाली आहेत. ९ वे शुभम बाल,कुमार,युवा व नवोदित मराठी साहित्य संमेलन, धुळे येथे २०२० सालच्या मार्चमध्ये झाले. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व साहित्यिक तुषार बैसाने हे संमेलनाध्यक्ष होते.दहावे संमेलन लवकरच आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7643.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8d39869377892f4fbfb528428e9cd1a728351ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7643.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाल वीर ही एक भारतीय कल्पनारम्य दूरदर्शन मालिका आहे.[१] सोनी सबवर या मालिकेची सुरुवात ८ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली. यात देव जोशी याने मुख्य भूमिका साकारली होती.[२] याची पटकथा रोहित मल्होत्रा याने लिहिली आहे. ही मालिका ऑप्टिमेस्टिक्स एंटरटेनमेंटद्वारे तयार केली आहे.[३] +ही मालिका ११११ भागांसह प्रसारित झाली. याचा शेवटचा भाग ४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसारित झाला.[४][५] देव जोशी बालवीर रिटर्न्समध्ये पुन्हा अभिनय करणार आहे. या सिक्वेलचा वेश सयानी सोबत १० सप्टेंबर २०१९ रोजी पहिला भाग प्रकाशित झाला.[६] +ही गोष्ट बाल वीर या मुलाच्या भोवती फिरते. याला परिंनी दत्तक घेतलेले असते. त्याला ७ परीचे सामर्थ्य लाभलेले असते. गाल परी, विझधर परी (इलेक्ट्रिक फेरी), बाल परी, अटकाटी परी (अडथळ्यांची परी), आरपार परी, भटकती परी (भटकी परी), नटखट परी आणि राणी परी बाल वीरला जादूची शक्ती देते. यामुळे त्याला परी लोकांची राणी बनण्याची इच्छा असलेल्या भयानक परी (भयानक परी) विरुद्ध लढा देण्यास मदत होत असते. +वर्षांपूर्वी, मा परी (परी लोकांची निर्माते) परी पळ्यांनी (लोकांच्या परीचे) सिंहासन भैणकर परीऐवजी बहूरोपी परी (वेश परी)ला दिले होते, त्यावेळी ती भली परी (चांगली परी) होती, म्हणून ती मा परी आणि राणी पारीकडून सूड घेण्यासाठी परत तिला सिंहासन देण्यात आले नाही कारण मा परीला हे माहित होते की भाली परी राणी झाली तर ती संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. बाल-वीरांना पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे आणि भायणकर परीपासून पृथ्वीवरील बचावासाठी आणि इतर कुटिल आणि क्रूर, वाईट परीक्षांचा राग. बाल वीर पृथ्वीवर डगली कुटुंबात बल्लू म्हणून राहतो. मानव आणि मेहेर अशा कठीण परिस्थितीतसुद्धा या कुटुंबात सात सदस्य आहेत जे कधीही खोटे बोलत नाहीत. त्यांनाही राणी परी कडून शक्ती प्राप्त होतात (त्यांना अनुक्रमे बाल मित्र आणि बाल सखी बनविण्यात आले होते) आणि बाल-वीरांना त्याच्या सामर्थ्यात आणि साहसीत वाईट शक्तीशी लढण्यासाठी आणि पृथ्वीला सर्व समस्यांपासून वाचविण्यात मदत करतात. +२०१९ मध्ये बालवीर रिटर्न्स ही मालिका एसएबी टीव्हीवर प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7657.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e51fcde7fbfe30bf48518a301ddad45e6eedb097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7657.txt @@ -0,0 +1,4 @@ +बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांनी २० नोव्हेंबर १९५९ रोजी प्रसूत केला. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे, असा या जाहीरनाम्याचा हेतू आहे. उद्देशिका, प्रत्यक्ष ठराव आणि बालकहक्कांच्या कार्यवाहीसाठी सुचविलेली दहा तत्त्वे असे त्याचे तीन भाग पडतात. +संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेमध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक मनुष्य हा सर्व हक्क व स्वातंत्र्ये मिळविण्यास पात्र आहे. मग त्या बाबतीत जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय वा अन्य मतप्रणाली, राष्ट्रीय वा सामाजिक उत्पत्ती, मालमत्ता, जन्म वा अन्य दर्जा ह्यांचा विचार केला जाणार नाही. शारीरिक वा मानसिक अपरिपक्वतेमुळे बालकाची अधिक काळजी व संगोपन करावे लागते त्याचप्रमाणे त्याला कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते. बालकाच्या प्रसवपूर्व व प्रसवोत्तर स्थितींचा विचार करण्यात येतो. अशा प्रकारे बालकाची योग्य ती काळजी व निगा घेण्याची तरतूद १९२४ च्या बालकहक्कासंबंधीच्या जिनीव्हा घोषणेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. +बालकाला समृद्ध बाल्य लाभावे, स्वतःसाठी तसेच समाजाच्या भल्याकरिताही त्याला सर्व अधिकार व स्वातंत्र्ये उपलब्ध करण्यात यावीत त्याचप्रमाणे पालक, ऐच्छिक संघटना, स्थानिक संघटना, राष्ट्रीय सरकारे यांनी बालकांच्या हक्कांची जाणीव लक्षात घेऊन त्यांचे विधिवत पालन करावे. +प्रत्येक जन्मजात बालकास जन्मसिद्ध अधिकार व हक्क प्राप्त करून देणारे कायदे प्रगत राष्ट्रांनी वेळोवेळी केल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९३० साली बालकांच्या शिक्षणासंबंधी एक सनद तयार करण्यात आली. १९४२ मध्ये लंडन येथे १९ राष्ट्रप्रतिनिधींच्या विचारविनिमयांतून बालक सनद जाहीर करण्यात आली. १९४६ मध्ये स्थापन करण्यात आलेली ‘संयुक्त राष्ट्रे बालक निधी’ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड-युनिसेफ) ही संस्था प्रथमतः द्वितीय महायुद्धोत्तर काळात उद्ध्वस्त यूरोपच्या पुनर्रचना कार्यात गुंतली सांप्रत या संस्थेने विकसनशील देशांमधील बालक कल्याण कार्यक्रमावर प्रामुख्याने भर दिलेला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7663.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9e0e208353c3b5d984f2772e1dd164460dda2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7663.txt @@ -0,0 +1,5 @@ +बालकृष्ण विठ्ठलदास दोशी (२६ ऑगस्ट, १९२७:पुणे, महाराष्ट्र - २४ जानेवारी, २०२३:अहमदाबाद, गुजरात) हे भारतीय वास्तुविशारद होते. [१] ते भारतीय स्थापत्यशास्त्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व समजले जातात आणि भारतातील स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीमधील त्यांचे योगदानही महत्वाचे आहे. ले कॉर्बुझियर आणि लुई कान यांच्या हाताखाली काम केल्यामुळे, ते भारतातील आधुनिकतावादी आणि क्रूरवादी वास्तुकलेचे प्रणेते होते. +त्यांच्या कृतीमध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी, आयआयएम बंगलोर, आयआयएम उदयपूर, एनआयएफटी दिल्ली, अमदावाद नी गुफा, सीईपीटी युनिव्हर्सिटी आणि इंदूरमधील अरण्य लो कॉस्ट हाऊसिंग डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे, ज्यासाठी आगा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . [२] +२०१८मध्ये प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय वास्तुविशारद ठरले. [३] [४] त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, [५] आणि २०२२ साठी रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे रॉयल गोल्ड मेडल देखील प्रदान करण्यात आले [६] +दोशी यांचा जन्म पुण्यातील गुजराती वैष्णव हिंदू कुटुंबात झाला. [७] ते १० महिन्यांचा असताना त्यांची आई मरण पावली आणि त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केले. आजोबा आणि काकूंनी त्याला वाढवण्यास मदत केली. [८] [९] वयाच्या अकराव्या वर्षी ते एका आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आणि त्यानंतर ते थोडेसे लंगडत चालले. [१०] १९४७ ते १९५० दरम्यान त्यांनी मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले [११] +दोशी यांचे २४ जानेवारी, २०२३ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. [१२] [१३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7689.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b641687f7084e508f97ae2d796325110223837 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7689.txt @@ -0,0 +1,3 @@ +पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना कऱ्हाड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये होते. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7693.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..979905a932be7209ca7fac7180c30a4ac0454816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7693.txt @@ -0,0 +1,9 @@ + + +बालमोहन विद्यामंदिर ही शाळा मुंबई मध्ये दादर भागात शिवाजी पार्क येथे आहे. + +महाराष्ट्र टाईम्स वाचकांचा पत्रव्यवहार-१ एप्रिल +[१][permanent dead link] +इ.स. २००६ हे दादरला 'बालमोहन विद्यामंदिर'ची स्थापना करून अविरत 'ज्ञानयज्ञ' चालू ठेवणाऱ्या ज्ञानमहर्षी दादासाहेब रेगे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 'बालमोहन'चा विद्यार्थी असणे हा एक गौरव आहे व ही गौरवास्पद परंपरा भावी पिढ्याही चालूच ठेवणार, ही खात्री आहे. +आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्ती घडवणाऱ्या व बालमोहनसाठी तनमनधन अर्पण करणाऱ्या दादासाहेबांवरूनच बहुधा पु. ल. देशपांडे यांना व्यक्ती व वल्लीमधील 'चितळे मास्तर' ही व्यक्तिरेखा सुचली असावी. देशासाठी बलिदान करणाऱ्या (कै.) लेफ्टनंट दिलीप गुप्तेंपासून राजकारणातील उगवता तारा राज ठाकरे व अनेक डॉक्टर्स, वकील, लेखापाल, उच्च पोलीस व सनदी अधिकारी बालमोहनने देशाला अर्पण केले. दादासाहेबांनी लावलेल्या रोपाचा दादर येथील भव्य बालमोहन विद्यामंदिर व तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतनच्या [स्थापना: २२ जून १९७०] रूपाने महावृक्ष होऊन पिढ्यान् पिढ्या आदर्शत्वाची सुमधुर फळे देत राहणार आहे. +बालमोहनच्या संस्थाचालकांनी व शिक्षकांनी संगणक क्रांती, मायबोली मराठीची होणारी उपेक्षा, ऱ्हास होणारी संस्कृत भाषा व आधुनिक शिक्षण पद्धती ही आव्हाने स्वीकारून शिक्षण क्षेत्रात 'बालमोहन' हा परवलीचा शब्द करून दाखवावा, हाच खरा दादासाहेब रेगे यांच्या वत्सल स्मृतीस मानाचा मुजरा ठरेल. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7732.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd4221215e96d7a759d6bb48c983c16290d44224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7732.txt @@ -0,0 +1 @@ +बाळाजी प्रल्हाद किणीकर मराठी राजकारणी आहेत. हे अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7734.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..583181b99833447b471258ed91f6bb61797fc7c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7734.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हापूर - इचलकरंजी रस्त्यावर कोल्हापूरहून साधारणत : २५ कि . मी . अतरावर असलेल्या रूई या छोट्याशा टुमदर गावी असलेल्या प्राचीन व्यंकटेश ( बालाजी ) मंदिरास भेट देणे हा एक आनंददायी अनुभव आहे . इचलकरंजीहा हे मंदिर तर अवघ्या पाच ते सहा कि . मी . अंतरावर आहे . कोल्हापूर - इचलकरंजी रस्त्यावर रूई फाट्याने आपण आतमध्ये गावात प्रवेश करताच आपणास वर भव्य मंदिराच्या सुबक शिखराचे दर्शन होते . मंदिरासमोरच असलेल्या पुरातन पिंपळाचा वृक्षही आपल्या नजरेत भरतो . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंचक्रोशीतील उंच अशा ठिकाणी हे मंदिर आहे . काळ्या दगडामधील हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतात ते म्हणजे मोठ - मोठ्या काळ्या शिळेतून घडवलेले खांब व छताचे दगड व त्यावरील नक्षी . दगडी चौकट असलेल्या दरवाज्यातून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो . दरवाज्याची उंची कमी असल्यामुळे साहजिकच वाकून नम्रपणे गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो . मंदिराचे पूर्ण बांधकाम हे काळ्या कभिन्न दगडामध्ये असल्यामुळे तेथे एक नैसर्गिक थंडावा जाणवतो . परंतु थंडीच्या दिवसात मात्र मंदिरामध्ये बोचरी थंडी जाणवतो नाही , तर उबदारपणा जाणवतो , गाभाऱ्याचे छतही वैशिष्टयपूर्ण असून गाभाऱ्याच्या भिंतीपासून वर चढत जाऊन मध्यभागी चारी बाजूने एकत्र आलेल्या शिळा पाहून आश्चर्य वाटणे साहजिक आहे . या मंदिरात सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे येथील असलेली श्री व्यंकटेश यांची नितांत सुंदर मूर्ती होय . या मूर्तीचे वैशिष्टय म्हणजे ही मूर्ती वालुकामय पर असून सजीव भासते . या मूर्तीची आख्यायिकाही खूप विलक्षण आहे . ती अशी पुरातन काळी रूई येथील देवजीबीन कुलकर्णी हे निस्सीम व्यंकटेश भक्त होते . दरवर्षी ते चालत तिरूपती वारी करत . नंतर वृद्धापकाळामध्ये एका वारीचे वेळी तिरूपतीमध्ये त्यांच्या मनात असा विचार आला की , यापुढे वृद्धापकाळामुळे आपल्याला वारी करणे शक्य होणार नाही व व्यंकटेशाचे दर्शन यामुळे होणार नाही . याच विचारात ते झोपी गेले असता स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की , उद्या सकाळी तिरूपती समोरील पुष्करणीत ( तलावामध्ये ) तुला माझी मूर्ती सापडेल . अशाप्रकारे भवताच्या आर्त हाकेमुळे श्री व्यंकटेश या मूर्तीरूपाने रूई येथे आलेले आहेत . मंदिराचा परिसरही भव्य व हवेशीर आहे . मंदिराच्या आवारात उभे राहिल्या येथील उंचीमुळे पूर्ण पंचक्रोशीचे दर्शन होते . आवारात असलेल्या प्रचीन पिंपळवृक्षाची भव्यता मनास भावते . पिंपळाच्या कट्टयावर बसल्यास आजुबाजुच्या शेत शिवारातील हिरवाई व येथून येणारा ताजा गार वारा यामुळे , मनाचा थकवा कुटच्या कुठे पळून जातो . मन प्रसन्न होते . या मंदिराजवळच श्री विठ्ठलाचे टुमदार मंदिर बांधलेले आहे . . श्री हरी मंदिर हत्तरगी येथल बम्हीभूत श्री हरीकाका गोसावी यांच्या आदेशाने , बृम्हीभूत श्री . एकनाथदादा गोसावी यांच्या प्रेरणेने व मठाचे विद्यमान पिठाधिश श्री . आनंदआण्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जिर्णोद्धार व दैनंदिन धार्मिक विधी सुरू आहेत . रूई येथीर ज्येष्ठ ग्रामस्थ व निस्सिम व्यंकटेश भवत श्री . रामचंद्र दत्त कागले यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भगिरथ प्रयत्न केले आहेत . मंदिराचे स्थानिक पुजारी कै . राmaचंद्र नारायण कुलकर्णी यांच्या प्रेरणेने श्री . सुहाsa रामचंद्र कुलकर्णी हे मंदिराच्या इतर मान्यवर ट्रस्टी , पाटील कुलकर्णी परिवार , ग्रामस्थ भक्त मंडळ यांच्या मदतीने पूजा अर्चा दैनंदिन कामे पाहतात . मंदिराच्या जिर्णोद्धार कामी इचलकरंजी कार्यक्षम माजी आमदार श्री . प्रकाशआण्णा आवाडे यांनी वैयक्तिय व शासकीय पातळीवर मोठी मदत केली आहे . आपल्या कामातून वेळ काढून आपण नेहमीच श्री तिरूपतीsa जाऊ शकतao असे नाही . परंतु रूई येथे मात्र आपण अध्या - पाऊण तासाच्या ड्राईव्हमध्ये पोहचू शकाल . यामुळे येत्या आठवडी सुट्टीत रूईला चला सहकुटुंब बालाजी दर्शनाला . +जाण्याचा मार्ग diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7738.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdaa9fa364489f029f959b4f379b6503e8ebc89e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7738.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालाजीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7774.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6364de9a35fcbed260b1bb0a12d553d85342ee86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7774.txt @@ -0,0 +1 @@ +बालुरघाट विमानतळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील बालुरघाट येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या वापरात नाही.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7777.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78c409be12b4a7c8d1d08754d15ab76f93ec888d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7777.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7810.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c92243226e20faf8eab0246f6155ba9dae0c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7810.txt @@ -0,0 +1 @@ +बाल्टिमोर/वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWI, आप्रविको: KBWI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7827.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c1780bad81157ca254cc5b915bb426fb9b334a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7827.txt @@ -0,0 +1,25 @@ +(असंबद्ध, अर्थशून्य, निरर्थक, अर्थहीन लेख) +बालपण ही मानवाच्या शरिराच्या वाढीतील जन्मानंतरची व पौगंडावस्थेपूर्वीची अवस्था होय. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःबद्दल फारशी जाणीव नसते. बालपण हा जिवनाचा असा भाग आहे जिथे +बालपणातील आयु +शब्द बालपण हे अविशिष्ट आहे(म्हणजे काय?). मानवीय विकासात वयाच्या भिन्न-भिन्न टप्प्यासाठी प्रयुक्त होऊ शकतो (म्हणजे काय?). विकासात्मक रूपात हे बालपण आणि वयस्कच्या मधील कालावधीला दर्शवते. सामान्य शब्दात बालपणला जन्मापासून आरंभ झाल्याचे मानले जाते. अवधारणेच्या रूपात (म्हणजे काय?) काही लोक बालपण याला खेळ आणि मनाच्या निर्मळपणात जोडुन पाहातात, जे किशोरवयात समाप्त होते. अनेक देशात, एक बालिग (म्हणजे काय?) होण्याचे वय असते जेव्हा बालपण आधिकारिक रूपात समाप्त होते आणि व्यक्ती क़ानूनी द्रुष्टी ने वयस्क होतो. हे वय 13 ते 21च्या सुमारास कोठे ही असू शकते आणि 18 सगळ्यात सर्रास आहे. +बालपणाचे विकासात्मक चरण +अधिक माहितीसाठी पहा: Child development stages and Child development +प्रारंभिक बालपण +शैशवावस्था नंतर हे प्रारंभिक बालपण येते आणि बालकाचे डगमगते चालण्या बरोबर सुरू होते जेव्हा मुल बोलने आणि स्वतंत्र रूपात चालतो जेथे शैशवावस्था तीन वर्ष वयात समाप्त होते, जेव्हा मुल मूलभूत गरजांसाठी आपल्या आईवडिलांवर कमी निर्भर राहु लागतो. प्रारंभिक बालपण है सात ते आठ वय वर्षा पर्यंत असते. लहान मुलांच्या शिक्षणा साठी राष्ट्रीय संगठनानुसार पण प्रारंभिक बालपणची कालावधी जन्म ते आठ वय वर्ष आहे. +मध्य बालपण +मध्य बालपण सरासरी सात किंवा आठ वयापासून सुरू होते जे अनुमाने प्राथमिक शाळेचे वय आहे आणि सरासरी पौगंडावस्था मध्ये संपते मग आता किशोरावस्था सुरू होते. +किशोरावस्था +किशोरावस्था, ही बालपणची अंतिम अवस्था, यौवना पासून सुरू होते. किशोरावस्थाचे शेवटा आणि प्रौढची सुरुवात मध्ये देशवार आणि क्रियावार भिन्नता आहे आणि एकाच देश-राज्य किंवा संस्कृति मध्ये वेगवेगळे वय वर्षे असतात जेणेकरून व्यक्तिला तेवढे परिपक्व (कालक्रमानुसार तथा कानूनी रूप ने) मानले जाते की समाज द्वारे त्यांच्या वर कार्ये सौपवता येईल. +बालपणचा इतिहास +तर्क दिले जाते की बालपण एक प्राकृतिक घटना नसून समाजची रचना आहे. एक महत्त्वपूर्ण मध्यवादी आणि इतिहासकार फिलिप एरीस ने अापल्या पुस्तकात सेंचुरीज़ ऑफ़ चाइल्डहुड मध्ये या गोष्टी कडे लक्ष वेधले आहे या विषयाला कनिंघम द्वारे अपनी पुस्तक इनवेन्शन ऑफ़ चाइल्डहुड (2006) मध्ये पुढे वाढविले जे मध्य काळा पासून बालपणाच्या ऐतिहासिक बाबीवर प्रकाश टाकते ज्याला ते विश्व युद्धाच्या नंतरच्या 1950, 1960 आणि 1970 दशकातील कालावधीच्या रूपात संदर्भित करते. +एरीस ने पेंटिग, समाधि-पत्थर, फ़र्नीचर आणि शाळा अभिलेखाच्या अध्ययनाला 1961 मध्ये प्रकाशित केले होते (काय संबंध?). त्यांनी पाहिले की 17वीं शताब्दीच्या पहिले बालकांचे प्रतिनिधित्व अल्प-वयस्कांप्रमाणे केले जायचे. तेव्हापासून इतिहासकारांनी पूर्वीच्या बालपणावर खूप शोध केले. एरीसचे पहिले जार्ज बोआस ने दी कल्ट आफ़ चाइल्डहुड प्रकाशित केले होते. +नवजागरण काळात, यूरोप मध्ये बालकांचे कलात्मक प्रदर्शन नाटकीय रूपाने वाढले तरी याने बालकांच्या प्रति सामाजिक वागणूकला प्रभावित नाही केले. बाल श्रम वर आलेख पहा (कुठे?) +जीन जैक्स रूसो असे व्यक्ती आहे ज्याला साधारणपणे बालपणाच्या आधुनिक धोरणाच्या उत्पत्तिचे श्रेय दिले जाते - किंवा त्यांच्या वर आरोपित (!) केले जाते. जान लॉक आणि अन्य 17व्या शताब्दीच्या अन्य उदार विचारकांच्या विचारांच्या आधारे रूसो ने बालपणाला प्रौढ धोका आणि व्यत्ययला सामोरे जाण्यापूर्वीची लघु अभयारण्य अवधि म्हणले आहे. रूसो ने निवेदन केले "या निरागसांच्या आनंदाला का लुटायचा जे ऐवढ्या लवकर व्यतीत होते. "सुरुवाती बालपणातील लवकर संपणारे या कालावधी मध्ये कडवटपणा का भरावा? जे सुंदर दिवस न तर बालकांसाठी परत येतील आणिना ही तुमच्या साठी परत येतील? +विक्टोरिया काळाला बालपणातील आधुनिक संस्थाच्या स्रोतच्या रूपात वर्णित केले आहे. विडंबना ही आहे की या काळातील औद्योगिक क्रांति ने बाल श्रमाला वाढविले होते, परंतु ईसाई सुसमाचार लेखक आणि लेखक चार्ल्स डिकेन्स आणि अन्यच्या अभियानामुळे बाल मजदूरी उत्तरोत्तर कम होत गेली आणि 1802-1878च्या कारख़ाना अधिनियम द्वारे समाप्त झाली. विक्टोरिया कालीन लोकांनी एकजुट होऊन कुटुंबाची भूमिका आणि बालकाच्या पवित्रते वर ज़ोर दिला आणि और ठळकपणे, तेव्हापासूनच पश्चिमी समाजात हे प्रस्थ चालू राहिले. [मूल शोध?] +समकालीन युगात, जो एल.किन्चेलो आणि शर्ली आर. स्टीनबर्ग ने बालपण आणि बालपणचे शिक्षण वर एक टीकात्मक सिद्धांत निर्माण केले ज्याला त्यानी किंडरकल्चर असे म्हटले. किन्चेलो आणि स्टीनबर्ग ने बालपणातील अध्ययन साठी अनेक शोधांचे आणि सैद्धांतिक विमर्श (ब्रिकोलेज)चे उपयोग विभिन्न दृष्टिकोणात - इतिहास लेखन, नृवंशविज्ञान, संज्ञानात्मक अनुसंधान, मीडिया अध्ययन, सांस्कृतिक अध्ययन, राजनीतिक आर्थिक विश्लेषण, हेर्मेनेयुटिक्स, सांकेतिकता, सामग्री विश्लेषण इत्यादीच्या आधारावर केले. या हुपरिपेक्षीय तपासणीच्या आधारावर किन्चेलो आणि स्टीनबर्ग ने दृढ़ता पूर्वक म्हणले की आधुनिक काळात बालपणाच्या नव्या युगात प्रवेश केले. या नाटकीय सांस्कृतिक परिवर्तनाचे साक्ष्य सर्वव्यापी आहे, परंतु 20वीं शताब्दीच्या शेवटी आणि 21वीं शताब्दीच्या सुरुवातीत अनेक व्यक्तींनी याला अजून पाहिले नाही. जेव्हा की बालपणाच्या लवकर निघून जाणारे या दिवसांमध्ये कड़वटपणा का भरावा जे दिवस न त्यांच्या साठी परत माघारी परततील न आपल्या साठी परततील. +समकालीन युग में, जो एल.किन्चेलो और शर्ली आर. स्टीनबर्ग ने बचपन और बचपन की शिक्षा पर एक आलोचनात्मक सिद्धांत का निर्माण किया, जिसे उन्होंने किंडरकल्चर का नाम दिया। किन्चेलो और स्टीनबर्ग ने बचपन के अध्ययन के लिए कई अनुसंधान और सैद्धांतिक विमर्शों (ब्रिकोलेज) का उपयोग विभिन्न दृष्टिकोणों - इतिहास लेखन, नृवंशविज्ञान, संज्ञानात्मक अनुसंधान, मीडिया अध्ययन, सांस्कृतिक अध्ययन, राजनीतिक आर्थिक विश्लेषण, हेर्मेनेयुटिक्स, सांकेतिकता, सामग्री विश्लेषण आदि के आधार पर किया। इस बहुपरिपेक्षीय जांच के आधार पर किन्चेलो और स्टीनबर्ग ने दृढ़ता पूर्वक कहा कि आधुनिक काल ने बचपन के नए युग में प्रवेश किया है। इस नाटकीय सांस्कृतिक परिवर्तन के साक्ष्य सर्वव्यापी है, लेकिन 20वीं सदी के अंत और 21वीं सदी की शुरुआत में कई व्यक्तियों ने इसे अभी तक देखा नहीं है। जब किन्चेलो और स्टीनबर्ग ने किंडरकल्चर का पहला संस्करण लिखा: दी कोर्पोरेट कल्चर ऑफ़ चाइल्डहुड इन 1997 (द्वितीय संस्करण, 2004), अनेक लोग जो बच्चों से संबंधित अध्ययन, अध्यापन या उनकी देखभाल करके अपनी जीविका चला रहे थे, वे रोज़ा +बालपणाची भौगोलिकता +बालपणातील भूगोलात सम्मिलित आहे की कशा प्रकारे (वयस्क) समाज बालपणाच्या विचारांना ग्रहण करताे आणि अनेक रूपात वयस्कांचे आचरण बालकांच्या जीवनाला प्रभावित करतात. यात बालकांच्या जवळ पासचे वातावरण आणि वातावरणा संबंधी दृष्टिकोण तसेच तत्संबंधी गोष्टी येतात. काही विषयात हे बालकांच्या भूगोला सारखे आहे जे त्या वेळीच्या वेळ आणि स्थळाचे परीक्षण करते ज्यात बालक जीवन व्यतीत करतात. +बचपन की आधुनिक अवधारणाएं +बचपन की अवधारणा जीवन-शैलियों में परिवर्तन और वयस्क अपेक्षाओं के परिवर्तनों के अनुसार विकसित होती और आकार बदलती प्रतीत होती है। कुछ लोगों का मानना है कि बच्चों को कोई चिन्ता नहीं होनी चाहिए और उन्हें काम करने की ज़रूरत नहीं होनी चाहिए; जीवन ख़ुशहाल और परेशानियों से मुक्त रहना चाहिए। आम तौर पर बचपन ख़ुशी, आश्चर्य, चिंता और लचीलेपन का मिश्रण है। आम तौर पर यह संसार में वयस्कों के हस्तक्षेप के बिना, अभिभावकों से अलग रहकर खेलने, सीखने, मेल-मिलाप, खोज करने का समय है। यह वयस्क जिम्मेवारियों से अलग रहते हुए उत्तरदायित्वों के बारे में सीखने का समय है। +बचपन को अक्सर बाहरी तौर पर मासूमियत के काल के रूप में देखा जाता है, जिसे सामान्यतः सकारात्मक संदर्भ में लिया जाता है, जो विश्व के सकारात्मकक दृष्टिकोण की ओर संकेत करता diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7828.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c1780bad81157ca254cc5b915bb426fb9b334a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7828.txt @@ -0,0 +1,25 @@ +(असंबद्ध, अर्थशून्य, निरर्थक, अर्थहीन लेख) +बालपण ही मानवाच्या शरिराच्या वाढीतील जन्मानंतरची व पौगंडावस्थेपूर्वीची अवस्था होय. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःबद्दल फारशी जाणीव नसते. बालपण हा जिवनाचा असा भाग आहे जिथे +बालपणातील आयु +शब्द बालपण हे अविशिष्ट आहे(म्हणजे काय?). मानवीय विकासात वयाच्या भिन्न-भिन्न टप्प्यासाठी प्रयुक्त होऊ शकतो (म्हणजे काय?). विकासात्मक रूपात हे बालपण आणि वयस्कच्या मधील कालावधीला दर्शवते. सामान्य शब्दात बालपणला जन्मापासून आरंभ झाल्याचे मानले जाते. अवधारणेच्या रूपात (म्हणजे काय?) काही लोक बालपण याला खेळ आणि मनाच्या निर्मळपणात जोडुन पाहातात, जे किशोरवयात समाप्त होते. अनेक देशात, एक बालिग (म्हणजे काय?) होण्याचे वय असते जेव्हा बालपण आधिकारिक रूपात समाप्त होते आणि व्यक्ती क़ानूनी द्रुष्टी ने वयस्क होतो. हे वय 13 ते 21च्या सुमारास कोठे ही असू शकते आणि 18 सगळ्यात सर्रास आहे. +बालपणाचे विकासात्मक चरण +अधिक माहितीसाठी पहा: Child development stages and Child development +प्रारंभिक बालपण +शैशवावस्था नंतर हे प्रारंभिक बालपण येते आणि बालकाचे डगमगते चालण्या बरोबर सुरू होते जेव्हा मुल बोलने आणि स्वतंत्र रूपात चालतो जेथे शैशवावस्था तीन वर्ष वयात समाप्त होते, जेव्हा मुल मूलभूत गरजांसाठी आपल्या आईवडिलांवर कमी निर्भर राहु लागतो. प्रारंभिक बालपण है सात ते आठ वय वर्षा पर्यंत असते. लहान मुलांच्या शिक्षणा साठी राष्ट्रीय संगठनानुसार पण प्रारंभिक बालपणची कालावधी जन्म ते आठ वय वर्ष आहे. +मध्य बालपण +मध्य बालपण सरासरी सात किंवा आठ वयापासून सुरू होते जे अनुमाने प्राथमिक शाळेचे वय आहे आणि सरासरी पौगंडावस्था मध्ये संपते मग आता किशोरावस्था सुरू होते. +किशोरावस्था +किशोरावस्था, ही बालपणची अंतिम अवस्था, यौवना पासून सुरू होते. किशोरावस्थाचे शेवटा आणि प्रौढची सुरुवात मध्ये देशवार आणि क्रियावार भिन्नता आहे आणि एकाच देश-राज्य किंवा संस्कृति मध्ये वेगवेगळे वय वर्षे असतात जेणेकरून व्यक्तिला तेवढे परिपक्व (कालक्रमानुसार तथा कानूनी रूप ने) मानले जाते की समाज द्वारे त्यांच्या वर कार्ये सौपवता येईल. +बालपणचा इतिहास +तर्क दिले जाते की बालपण एक प्राकृतिक घटना नसून समाजची रचना आहे. एक महत्त्वपूर्ण मध्यवादी आणि इतिहासकार फिलिप एरीस ने अापल्या पुस्तकात सेंचुरीज़ ऑफ़ चाइल्डहुड मध्ये या गोष्टी कडे लक्ष वेधले आहे या विषयाला कनिंघम द्वारे अपनी पुस्तक इनवेन्शन ऑफ़ चाइल्डहुड (2006) मध्ये पुढे वाढविले जे मध्य काळा पासून बालपणाच्या ऐतिहासिक बाबीवर प्रकाश टाकते ज्याला ते विश्व युद्धाच्या नंतरच्या 1950, 1960 आणि 1970 दशकातील कालावधीच्या रूपात संदर्भित करते. +एरीस ने पेंटिग, समाधि-पत्थर, फ़र्नीचर आणि शाळा अभिलेखाच्या अध्ययनाला 1961 मध्ये प्रकाशित केले होते (काय संबंध?). त्यांनी पाहिले की 17वीं शताब्दीच्या पहिले बालकांचे प्रतिनिधित्व अल्प-वयस्कांप्रमाणे केले जायचे. तेव्हापासून इतिहासकारांनी पूर्वीच्या बालपणावर खूप शोध केले. एरीसचे पहिले जार्ज बोआस ने दी कल्ट आफ़ चाइल्डहुड प्रकाशित केले होते. +नवजागरण काळात, यूरोप मध्ये बालकांचे कलात्मक प्रदर्शन नाटकीय रूपाने वाढले तरी याने बालकांच्या प्रति सामाजिक वागणूकला प्रभावित नाही केले. बाल श्रम वर आलेख पहा (कुठे?) +जीन जैक्स रूसो असे व्यक्ती आहे ज्याला साधारणपणे बालपणाच्या आधुनिक धोरणाच्या उत्पत्तिचे श्रेय दिले जाते - किंवा त्यांच्या वर आरोपित (!) केले जाते. जान लॉक आणि अन्य 17व्या शताब्दीच्या अन्य उदार विचारकांच्या विचारांच्या आधारे रूसो ने बालपणाला प्रौढ धोका आणि व्यत्ययला सामोरे जाण्यापूर्वीची लघु अभयारण्य अवधि म्हणले आहे. रूसो ने निवेदन केले "या निरागसांच्या आनंदाला का लुटायचा जे ऐवढ्या लवकर व्यतीत होते. "सुरुवाती बालपणातील लवकर संपणारे या कालावधी मध्ये कडवटपणा का भरावा? जे सुंदर दिवस न तर बालकांसाठी परत येतील आणिना ही तुमच्या साठी परत येतील? +विक्टोरिया काळाला बालपणातील आधुनिक संस्थाच्या स्रोतच्या रूपात वर्णित केले आहे. विडंबना ही आहे की या काळातील औद्योगिक क्रांति ने बाल श्रमाला वाढविले होते, परंतु ईसाई सुसमाचार लेखक आणि लेखक चार्ल्स डिकेन्स आणि अन्यच्या अभियानामुळे बाल मजदूरी उत्तरोत्तर कम होत गेली आणि 1802-1878च्या कारख़ाना अधिनियम द्वारे समाप्त झाली. विक्टोरिया कालीन लोकांनी एकजुट होऊन कुटुंबाची भूमिका आणि बालकाच्या पवित्रते वर ज़ोर दिला आणि और ठळकपणे, तेव्हापासूनच पश्चिमी समाजात हे प्रस्थ चालू राहिले. [मूल शोध?] +समकालीन युगात, जो एल.किन्चेलो आणि शर्ली आर. स्टीनबर्ग ने बालपण आणि बालपणचे शिक्षण वर एक टीकात्मक सिद्धांत निर्माण केले ज्याला त्यानी किंडरकल्चर असे म्हटले. किन्चेलो आणि स्टीनबर्ग ने बालपणातील अध्ययन साठी अनेक शोधांचे आणि सैद्धांतिक विमर्श (ब्रिकोलेज)चे उपयोग विभिन्न दृष्टिकोणात - इतिहास लेखन, नृवंशविज्ञान, संज्ञानात्मक अनुसंधान, मीडिया अध्ययन, सांस्कृतिक अध्ययन, राजनीतिक आर्थिक विश्लेषण, हेर्मेनेयुटिक्स, सांकेतिकता, सामग्री विश्लेषण इत्यादीच्या आधारावर केले. या हुपरिपेक्षीय तपासणीच्या आधारावर किन्चेलो आणि स्टीनबर्ग ने दृढ़ता पूर्वक म्हणले की आधुनिक काळात बालपणाच्या नव्या युगात प्रवेश केले. या नाटकीय सांस्कृतिक परिवर्तनाचे साक्ष्य सर्वव्यापी आहे, परंतु 20वीं शताब्दीच्या शेवटी आणि 21वीं शताब्दीच्या सुरुवातीत अनेक व्यक्तींनी याला अजून पाहिले नाही. जेव्हा की बालपणाच्या लवकर निघून जाणारे या दिवसांमध्ये कड़वटपणा का भरावा जे दिवस न त्यांच्या साठी परत माघारी परततील न आपल्या साठी परततील. +समकालीन युग में, जो एल.किन्चेलो और शर्ली आर. स्टीनबर्ग ने बचपन और बचपन की शिक्षा पर एक आलोचनात्मक सिद्धांत का निर्माण किया, जिसे उन्होंने किंडरकल्चर का नाम दिया। किन्चेलो और स्टीनबर्ग ने बचपन के अध्ययन के लिए कई अनुसंधान और सैद्धांतिक विमर्शों (ब्रिकोलेज) का उपयोग विभिन्न दृष्टिकोणों - इतिहास लेखन, नृवंशविज्ञान, संज्ञानात्मक अनुसंधान, मीडिया अध्ययन, सांस्कृतिक अध्ययन, राजनीतिक आर्थिक विश्लेषण, हेर्मेनेयुटिक्स, सांकेतिकता, सामग्री विश्लेषण आदि के आधार पर किया। इस बहुपरिपेक्षीय जांच के आधार पर किन्चेलो और स्टीनबर्ग ने दृढ़ता पूर्वक कहा कि आधुनिक काल ने बचपन के नए युग में प्रवेश किया है। इस नाटकीय सांस्कृतिक परिवर्तन के साक्ष्य सर्वव्यापी है, लेकिन 20वीं सदी के अंत और 21वीं सदी की शुरुआत में कई व्यक्तियों ने इसे अभी तक देखा नहीं है। जब किन्चेलो और स्टीनबर्ग ने किंडरकल्चर का पहला संस्करण लिखा: दी कोर्पोरेट कल्चर ऑफ़ चाइल्डहुड इन 1997 (द्वितीय संस्करण, 2004), अनेक लोग जो बच्चों से संबंधित अध्ययन, अध्यापन या उनकी देखभाल करके अपनी जीविका चला रहे थे, वे रोज़ा +बालपणाची भौगोलिकता +बालपणातील भूगोलात सम्मिलित आहे की कशा प्रकारे (वयस्क) समाज बालपणाच्या विचारांना ग्रहण करताे आणि अनेक रूपात वयस्कांचे आचरण बालकांच्या जीवनाला प्रभावित करतात. यात बालकांच्या जवळ पासचे वातावरण आणि वातावरणा संबंधी दृष्टिकोण तसेच तत्संबंधी गोष्टी येतात. काही विषयात हे बालकांच्या भूगोला सारखे आहे जे त्या वेळीच्या वेळ आणि स्थळाचे परीक्षण करते ज्यात बालक जीवन व्यतीत करतात. +बचपन की आधुनिक अवधारणाएं +बचपन की अवधारणा जीवन-शैलियों में परिवर्तन और वयस्क अपेक्षाओं के परिवर्तनों के अनुसार विकसित होती और आकार बदलती प्रतीत होती है। कुछ लोगों का मानना है कि बच्चों को कोई चिन्ता नहीं होनी चाहिए और उन्हें काम करने की ज़रूरत नहीं होनी चाहिए; जीवन ख़ुशहाल और परेशानियों से मुक्त रहना चाहिए। आम तौर पर बचपन ख़ुशी, आश्चर्य, चिंता और लचीलेपन का मिश्रण है। आम तौर पर यह संसार में वयस्कों के हस्तक्षेप के बिना, अभिभावकों से अलग रहकर खेलने, सीखने, मेल-मिलाप, खोज करने का समय है। यह वयस्क जिम्मेवारियों से अलग रहते हुए उत्तरदायित्वों के बारे में सीखने का समय है। +बचपन को अक्सर बाहरी तौर पर मासूमियत के काल के रूप में देखा जाता है, जिसे सामान्यतः सकारात्मक संदर्भ में लिया जाता है, जो विश्व के सकारात्मकक दृष्टिकोण की ओर संकेत करता diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7853.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..714120b0e563005d63c6e3f1f7cb7e822ee38bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7853.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले (२८ डिसेंबर, इ.स. १९३४ - ३० जुलै, इ.स. २०१२: इचलकरंजी, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत. +भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बॅंडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7871.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11fa4284d693c927dbc05a1eb2ebe537b818d702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7871.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ( बीकेटी ) ही मुंबई, भारत येथील टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज विशेष विभागांत वापरले जाणारे टायर बनवतात उदा खाणीत काम करणारी वाहने, जमीन खोदणारी यंत्रे, शेती आणि बागकाम. या कंपनीचे पाच कारखाने औरंगाबाद, भिवंडी, चोपांकी, डोंबिवली आणि भूज येथे आहेत. स.न. २०१३ मध्ये, जगातील टायर उत्पादकांमध्ये हे ४१ व्या स्थानावर होते. [४] +बाळकृष्ण इंडस्ट्रीज सध्या जेसीबी, जॉन डीरे आणि सीएनएच इंडस्ट्रियलसारख्या अवजड उपकरण उत्पादकांसाठी एक OEM विक्रेता आहे. या कंपनीचा सध्या ग्लोबल ऑफ-द-रोड टायर सेगमेंटमध्ये २% मार्केट शेअर आहे. [५] +बाळकृष्ण इंडस्ट्रीज मुख्यत: उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बदली बाजारात आहे. त्यांचे उत्तर अमेरिकन कार्यालय अक्रॉन येथे आहे. व्हेन्डो, दक्षिण कॅरोलिना येथे एक गोदाम आहे. [६] अमेरिकेतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा जवळपास ८५ टक्के व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. [७] +बीकेटी टायर्स २०१४ पासून मॉन्स्टर जॅमसाठी अधिकृत आणि विशेष टायर प्रायोजक आहेत. [८] जुलै २०१८ मध्ये, बीकेटीने करारानुसार लीगला सेरी बीकेटी म्हणून ओळखले जाणारे तीन वर्षांसाठी इटालियन फुटबॉलच्या दुसऱ्या विभागातील सेरी बीचे नामकरण अधिकार खरेदी केले. [९] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7884.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..569adcbe2166488be67488822e95646a1b5367e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7884.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाळकृष्ण रामचंद्र वासनिक (१२ ऑगस्ट १९२९[१] - १० सप्टेंबर २०१५) एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. +१९५७ मध्ये वयाच्या २८व्या वर्षी ते भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. १९६२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर बुलडाणा येथून (१९८०). +ते स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक होते. १९६७ मध्ये ते महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी आंदोलन केले. +ते आंबेडकरी बौद्ध कुटुंबातील जन्मलेले होते.[२] [३] ते अनुसूचित जाती (दलित) समाजातील होते आणि त्यांना एक मुलगा मुकुल वासनिक आणि दोन मुली दीप्ती वासनिक सक्सेना आणि सीमा वासनिक आहेत.[४] +१० सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचे वयाच्या ८६व्या वर्षी नागपुरात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7897.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6879346506f1cdf0104ee354775903058160e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7897.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी (जन्मदिनांक अज्ञात - अज्ञात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7907.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39b80e0c3c239c6b50c12202dc1f353e8ad66885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7907.txt @@ -0,0 +1,36 @@ +दासबोध हा श्री समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला. +दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समास एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात. +समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत. +दासबोध हा असा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो सर्व ग्रन्थाचे सार आहे. +दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, अशी पठडीतली न होता, माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते. +श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें +जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१|| +हा कोणता ग्रंथ आहे? याचे नाव काय? यात प्रामुख्याने काय सांगितले आहे? हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात, +ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद | +येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||२|| +या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. हा ग्रंथ गुरू-शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे, आणि मी यात मुख्यत्वेकरून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे. +पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे. ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे, याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या दोन ओव्यांतच पटते. +नवविधा भक्ती म्हणजे काय? खरे ज्ञान म्हणजे काय? वैराग्य कसे असते? अध्यात्म म्हणजे काय या सर्वाचा ऊहापोह मी येथून पुढे केलेला आहे असे सांगत रामदासस्वामी पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादीच सादर करतात. व या दासबोध ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचे असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारून ठेवतात. +दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याल स्पर्श करणारे अक्षरशः शेकडो विषय येऊन जातात. +पण तो वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला, जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात. +१) मी कोण आहे? +२) मी इथे जन्माला का व कसा आलो? +३) माझ्या जन्माचा हेतू काय? +४) देव म्हणजे काय? +५) देव कसा आहे व काय करतो? +६) मूर्तिपूजा खरी आहे का? देव खरेच दर्शन देतो का? +७) आत्मा म्हणजे काय? +८) मृत्यूनंतर जीवाचे काय होते? +९) ही सृष्टी निर्माण कशी झाली? +१०) मुक्ती म्हणजे काय?, वगैरे. +समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथघळ येथे बसून लिहिला. शिवथरघळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. धुळ्याचे इतिहासतज्ज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९१६मध्ये झाडाझुडपांत लपलेली ही घळ शोधून काढली. +समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.[१] :- +भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥ +वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥ +वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥ +ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥ +॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ + +मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे. +अशा पुस्तकांची यादी. :- +दासबोध.भारत Archived 2020-01-28 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_792.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ff6f7f07fd802b8b482d1726c0916fb6fffaf73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_792.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते. +त्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7920.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3797f2ca6e6bd51a6321552d13ffcf0814bac04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7920.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7931.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd181227cf28c17b237107812a16ba840ba4223d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7931.txt @@ -0,0 +1 @@ +बाळाजी कल्याणकर मराठी राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7939.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc533087dc6f8abf80422ae136f0a38def6a81db --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7939.txt @@ -0,0 +1,74 @@ + +बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६२ – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ पराक्रमी योद्धा व मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. +महादजी विसाजी देशमुख हे बाळाजींचे पणजोबा व भट घराण्याचे ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथांचे वडील व आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणतात. १५७५ च्या सुमारास महादजींकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजींस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजींस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हे बाळाजीचे पिता. बाळाजींना ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. +देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजींस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ ह्यांच्याशी बाळाजींचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजींला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्‍ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्दने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. +बाळाजींबरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाऊ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हे "नाना फडनीस" यांचे आजोबा. (भट) देशमुख -फडनीस-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्यांच्या हत्येच्या प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथांचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्यांचा पालखीत बसले आणि कटवाल्यांकडून मारले गेले. स्वामिनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती. +बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वतः अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्याने हाल-हाल करून मारले. अशाच अस्मामी-सुलतानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होते. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभवत होते. १७०५ च्या दरम्यान त्यानी देखील आपली समशेर गाजवली.ती बहुतेक जास्तच परजली असावी, कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली. आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।" +छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले गेले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंगजेबाशी झुंजत होती. सातारा, परळी(सज्जनगड), सिंहगड(कोंडाणा), पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणून प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडित" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कमी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्यासंबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहिलेले आढळते. +२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला. +अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्‍ऱ्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे. १७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले. अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले. +बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले. +श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम :- +या कार्यकाळातील कार्ये +अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार सेनापती धनाजी जाधव यांच्या सेवेत. फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली. +शाहूमहाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी सुटका. +ऑक्टोबर सन १७०७ च्या खेडच्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्याविरूद्ध न लढण्याचाबाळाजींचा सल्ला. सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट. +सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल. खेडची लढाई. सातारा शाहूमहाराजांकडून काबीज. +दिनांक १२ जानेवारी सन १७०८ सातारा येथे शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती. +दिनांक २७ जून सन १७०८ सेनापती धनाजी जाधव यांचे निधन. +दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते किताब व सेना उभारणीसाठीच्या खर्चास पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा सरंजाम बहाल. +सन १७१२-१३ छत्रपती शाहूमहाराज यांचे पेशवा बहिरोपंत पिंगळे यांची सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर स्वारी. स्वारीत पेशवा बहिरोपंत पिंगळे यांचा सरखेल कान्होजी आंग्रे यांजकडून पराभव. पेशवा बहिरोपंत पिंगळे कैदेत. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती. +पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३ ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त. +दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची शाहूमहाराज यांच्याकडे शिफारस. +दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती. +सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी भेट घेऊन सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहूमहाराजांच्या पक्षात आणण्यात यश आले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली. +नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला. +चंद्रसेन जाधव याने शाहूमहाराज यांना व दमाजी थोरात याने बाळाजी विश्वनाथ यांना कपटाने कैद करण्याचा कट रचला. +५ ऑगस्ट सन १७१६ रोजी दमाजी थोरात यांजकडून पेशवा बाळाजी विश्वनाथ, अंबाजीपंत पुरंदरे आदी यांना कपटाने कैद केले. खंडणी देऊन सुटका झाली. +बाळाजी विश्वनाथ यांनी पिलाजी जाधव यांच्यावर दमाजीची मोहीम सोपवली. पिलाजी जाधव यांनी दमाजी थोरात याचा पराभव करून त्यास अटक करून या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला. +सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले. +सन १७१७ - १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी कोल्हापूरकर संभाजींचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली. +सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहिमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी तीस लाख रुपये व शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी अर्पण केल्या. +सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण - भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे, डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांचा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली. +मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. अखेर दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची प्राणज्योत मावळली. +बाळाजीच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले[ संदर्भ हवा ]. कारण हा बाजीराव फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडू नये म्हणून शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले गेले. मात्र पडत्या काळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती, त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यांत माळवा(डिसेंबर,१७२३), धार(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) +उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(१७ मे १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती, आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉंटगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादीइतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारीकुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले. +दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्याच्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजान्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. खुद्द गढीत बंदिस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजूद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली. +या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ], जेणेकरून बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील. +या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडून समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरिता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला. +चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. +बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले. +बाजीराव आणि चिमाजीने खरोखरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशेपावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीरजंगने हांडिया व खरगोण हे प्रदेश बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फूट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वतः बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वतःची कामे शक्यतो स्वतः करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वतः बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते. +बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खऱ्या अर्थाने शहराचे रूप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरून बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणून यानेच "कात्रज" वसवले. +नानासाहेबाने खऱ्या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करू. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुलतान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरशः नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेऊन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतील. आम्ही आपले राज्य कंदाहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." बाजीरावापासून राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधू नदी आणि कश्मीरपर्यंत, पूर्वेला ओरिसापर्यंत, नैर्ऋतेला गोव्यापर्यंत आणि दक्षिणेला म्हैसूरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटून काढले. सदाशिवराव भाऊनेही हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करून सोडले. दिल्लीचे सिंहासन मराठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क पेशव्यांनीच प्रस्थापित केला. याच घटनेवर वीर सावरकरांसारख्या प्रतिभावान कवीने तर "अटकेवर जरीपटका म्हणून २६० ओळींचा पोवाडाच लिहून काढला". तो संपूर्ण पोवाडाच वीरश्रीने भरला आहे, सगळा पोवाडा इथे देता येत नसला तरी त्याच पोवाड्यातील काही मोजक्या ओळी पुढील प्रमाणे - +ऐका ऐका हिंदुमात्र हो! वार्ता विजयाच्या आल्या, +उभ्या सात शतकांचा उगवे सुड जिंकिले जेत्याला॥१॥ +जो जो मागे आला आसुर शक्तीच्या की भरावरी, +भारतीय यज्ञाश्व नाचला त्याच्या त्याच्या उरावरी॥४३॥ +कुठे आज ते शक? वा बर्बर? बाल्हीकही? वा हूण कुठे? +भारतीय जठरग्नीत जळुनी भस्म जाहले द्रुत ते ते॥४४॥ +परी आज ते शल्य उपटले आज तोडिला ध्वज तो रे, +आज जिंकिली तीही लढाई, आजि महंमद-मद उतरे॥६४॥ +हिंदूवीरांचा कीं श्रीशे असे यशस्वी हट केला, +आज हिंदवी जरिपटका की पुन्हा पोचला अटकेला॥८०॥ +पठाण मोंगल तुर्क इराणी-दाढी तितुकी सामोरी, +पुर्तुगिज वलंदाज फिरंगी टोपी तितुकी पाठिवरी॥१३१॥ +परी तितुक्यांहीसहित मराठा-वीर झुंज करी, +एक्या ह्स्ते उपटित दाढी टोपी उडवी दुज्या करी॥१३२॥ +पालखेडसी निजाम पिटला अल्ली पिटिला बंगाली, +अर्काटासी नबाब पिटला, पिटिला सिद्दी जली स्थली॥१६४॥ +बादशहाच्या बादशाहिची जाळुनि दाढी दिल्लीवरी, +होता की नव्हतासा केला निजाम पिटूनि भोपळी॥१८०॥ +जयजयकारे भरा अंबरा करा महोत्सव घरोघरी, +मांगलिका कीं हिंदुमात्र हो वार्ता आतांची आली॥२२०॥ +आज सात शतकाने विजयी मिरवित सोनेरी तोडा, +पिई सिंधुचे पाणी पुनरपि हिंदू सैनिकांचा घोडा॥२५२॥ +मात्र राघोबादादाची पाठ फिरताच दिल्लीतील शहा, अहमदशहा अब्दालीशी चुंबाचुंबी करू लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊ(चिमाजी अप्पाचा पुत्र) शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे असे तोलामोलाचे सरदार घेउन जाट व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर चालुन गेला. दिल्ली ताब्यात येताच त्याने विश्वासरावाला आपल्या पुतण्याला सिंहासनावर बसवण्याचे ठरवले. मात्र उद्या हिंदू राजा बसवुन भाऊ निघुन जाईल, पण अफगाणांनी चिडुन आक्रमण केले तर उत्तरेतिल सगळी राज्ये त्या खाली भरडली जातिल ही भीती जाट-शिख-रजपुतांना वाटली, त्यांनी या गोष्टीला नकार दिला. मात्र मराठ्यांची दहशत रहावी म्हणून सदशिवरावभाऊने घणाचे घाव घालुन दिल्लीचे तख्त फोडले. +पण जाट-रजपुतांची भीती खरी ठरली. राघोबाने डिवचलेला अब्दाली संधीची वाटच बघत होता. मराठ्यांनी दिल्लीवर आक्रमण करताच दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणून त्याने मोर्चा बांधणी चालु केली. १७ ऑक्टोबर १७६० रोजी त्याने दिल्लीच्या दिशेने कुच केले. अगदि २४-२५ तारखेपर्यंत तो भागपतपर्यंत आला. मराठी सैन्य या वेळी धान्याच्या चणचणी मुळे कुंजपुराकडे वळली होती. मराठी सैन्याने अब्दालीने यमुना ओलांडु नये म्हणून फारसे काही प्रयत्न केले नाहीत. आधीच आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच प्रभावाखाली असलेल्या भूमीवर अब्दालीला अंगावर घेऊ असा विचार भाऊने केला. हे अब्दालीच्या पथ्यावरच पडले, त्याचे सैन्य अगदी सोनपत आणि पानिपत नजीक येउन ठेपले. भाऊला त्या भागाची फारशी माहिती नव्हती, उत्तरेतिल त्याची पहीलीच मोहीम होती. सुरुवातिला छोट्या-छोट्या चकमकीत मराठी सैन्याने हिसका दाखवला असला तरी अनुभवी अब्दालीच्या सैन्याने १४ जानेवारी १७६१ रोजी मुख्य लढाईला तोंड फ़ोडले. या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दोहो बाजुचे मोठे नुकसान झाले. +यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. लाखापेक्षा पेक्षा जास्त मराठी सैन्य कापले गेले. १८ वर्षांचा कोवळा विश्वासराव लढाईत मारला गेला. सदशिवरावभाऊ देखिल कामी आला. दोघांची प्रेते अफगाणी सैनिकांच्या हाती लागली. कोवळ्या विश्वासरावाचे प्रेत बघून तर अब्दाली चाटच पडला "सुभान अल्लाह, क्या नुर है? मरनेके बाद इतना हसीन है तो जिंदा कैसा होगा?" अश्या आशयाचे उद्गार त्याच्या तोंडुन निघाले. म्हणूनच अब्दाली विश्वासरावाच्या प्रेताला आपल्या बरोबर घेऊन जाणार होता असे म्हणतात. ब्रिटिश पत्रे देखिल विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात. असे समजतात की पानिपतच्या लढाई नंतर पुणे भागातील एकही घर असे नव्हते की ज्या घरातला पुरुष कामी आला नव्हता पेशवाईची पत्रे याचा उल्लेख घरोघरी बांगड्या फुटल्या असे करतात. नानासाहेबाला जे पत्र आले त्यात लिहीले होते "दोन ही्रे हरवले, काही मोती हरवले आणि मोहोरा किती हरवल्या याला गणानाच नाही". पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला खरा पण मराठ्यांनी अब्दालीला देखिल असा फटकावला की त्या नंतर दिल्लीकडे परत तो कधीच फिरकला नाही. आजही तेथील माणसे जिंकलेल्या अब्दालीपेक्षा हरलेल्या मराठ्यांना मान देतात, भाऊने जेथुन लढाईची सुरुवात बघितली होती तिथे हरीयाणा सरकारने एक स्मृतीस्तंभ उभा केलाय. मात्र पानिपतचा पराभव मराठ्यांच्या सत्तेवरचा मर्मप्रहार ठरला. त्यानंतर मराठी सत्ता परत पुर्वीच्या तडफेने कधीच उठली नाही. मराठ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. +आपल्या स्वकीयांच्या आणि मुलाच्या मृत्युची बातमी ऐकुन नानासाहेब खचले. त्यांनी त्याची हाय खाल्ली हेच दुःख उराशी कवटाळुन हा महान पेशवा २३ जून १७६१ रोजी वारला. त्यांच्या धाकट्या मुलाने माधवराव पेशवा १ला याने मात्र पुढच्या काही वर्षात दक्षीणेत मराठी सत्तेचा दरारा परत प्रस्थापित केला. माधवरावास २० जुलै, १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी - १७६२ उरळी, नोव्हेंबर १७६२ घोडनदी, ऑगस्ट १७६३ राक्षसभुवन या लढाया केल्या. निजामाला १७५९ला उदगीरला सदाशीवरावभाऊने निजामाला हरवुन ८५ लाखाचा मुलुख हस्तगत केला होता. त्याचा सुड घेण्यासाठी मराठयांच्या नाजुक परीस्थितीचा फायदा घेत नळदुर्ग, अक्कल्कोट या ठिकाणी निजामाने धुडगुस घालत होता. माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ रोजी मोहिम हाती घेतली. पण २९ डिसेंबर, सन १७६१ मध्ये राघोबादादांनी अनपेक्षीत तह केला. या नंतर पेशव्यांनी हैदरालीखान विरुद्ध मोहिम उघडली, मात्र रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी करून घरभेदीपणा केल्याने माधवरावांनी तात्पुरती शरणागती पत्करली. मात्र निजाम व राघोबादादा यांच्यात बेबनाव सुरू झाला निजामाने पुण्यावर हल्ले केले. या नंतर औरंगाबादवर मराठ्यांनी हल्ले केले. पुढे राक्षसभुवन येथे १० ऑगस्ट १७६३ च्या युद्धात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. निजामाकडून उदगीरचे ६० लाख आणि नवीन २२ लाख असा एकूण ८२ लाखांचा मुलुख मरठ्यांनी मिळवला. माधवरावाने हैद्राबादच्या निजामाला दाती तृण धरायला लावले. या नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकवर एकंदर ५ स्वाऱ्या केल्या. या मोहिमांमुळे अगदी शहाजीराजांच्या वेळचा जहागिरीचा सर्व मुलुख परत मराठ्यांना मिळाला. या मोहिमांत माधवरावाचे शिस्त, चिकाटी, शौर्य, जरब हे गुण हे गुण उजळुन निघाले. १२ वर्षांत त्याने मराठी सत्तेचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मराठ्यांचा ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफ हा माधवराव पेशव्याची तुलना त्याचाच आजा पहिला बाजीराव याच्या बरोबर करतो. राघोबादादाने मात्र माधवरावाच्या पेशवा बनण्याला विरोध केला. राघोबादादाला पेशवेपद त्याच्याकडे पाहिजे होते. म्हणजे शाहुराजे - ताराराणी मधला जुना वादच परत या दोघात चालु झाला. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत टाकले. पुढे आतड्याच्या क्षयाच्या आजाराने माधवरावांचे १७ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर येथे गणपती मंदीराच्या ओसरीतच निधन झाले. ग्रँड डफ म्हणातो - "पानिपतापेक्षाही माधवरावाचा मृत्यु हा पेशवाईसाठी दुस्वप्न ठरला." माधवराव गोरेपान, उंचपुरे, आणि थोराड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी असून एरवी बोलताना रोखठोक आणि ठासुन बोलत. लेखन रेखिव होते. राज्याच्या कर्जफेडीसाठी स्वतःचे लाखो रुपये, जडजवाहिर दिले. बाजीरावाप्रमाणेच माधवरावांना देखिल चैन, आळस, लबाडि बिलकुल खपत नसे. +त्या नंतर डिसेंबर १७७२ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. १७७३ मध्ये राघोबादादाच पेशेवे झाले. नारायणरावांच्या मृत्युची चौकशी करून न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्याचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमुटपणे पेशवेपदावर नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकुन राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमले तेव्हा अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवुन पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुनः पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकिय व लष्करी आक्रमणे परतवुन लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले. +सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर पेशवेपदावर राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीराव आला, हाच तो पळपुटा बाजीराव. यशवंतराव होळकराला भिउन हा पुणे सोडून पळाला आणि वाई येथील इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इथुन प्रत्येक बाबतित इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. ३१ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या करारा नुसार बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारुन, त्या फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख इंग्रजांच्या घशात घातला. १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर पेशवाईतील उरले-सुरले शहाणपण संपले. १७९९ मध्ये टिपु सुलतान आणि १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर इंग्रजांना पुणे हे सोपे आणि एकुलते एक लक्ष झाले. १८०३ च्या तहा नंतर देखिल बाजीराव आणि ब्रिटिश यांच्यात धुसफुस चालुच राहीली. शेवटी त्याची परीणीति ५ नोव्हेंबर १८१७ या दिवशी खडकी येथील लढाईत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल बर(Burr) याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केला. १८१८ मध्ये अशीरगडजवळ धोलकोट येथे John Malcolm याच्या समोर मराठ्यांनी शरणागती दिली. काही इतिहासकार याची २ कारणे देतात १)२रा बाजीराव हा नजरकैदेतच वाढला असल्याने त्याला दरबारी कामकाज व राजकारण आणि युद्धातले छक्के-पंजे माहीत नव्हते, २)पेशव्यांच्याच हाताखाली मोठे झालेले सरदार आता पेशवाईलाच धाक दाखवत होते. अशी संकटे या आधीच्या कोणत्याच पेशव्यावर आली नव्हती. इंग्रजांनी त्याचे राज्य हिसकावुन त्यास वार्षिक ८ लक्ष रुपयांचे पेन्शन चालु केले, त्याची रवानगी कानपूरजवळ ब्रह्मवर्तास झाली. इंग्रजांनी रायगड देखिल ताब्यात घेतला, रायगडवर त्यांनी सगळी हिशेब आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमिनदोस्त केल्या. +इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. बाजीरावास अनेक लग्नांनंतर देखिल मूल झाले नव्हते, शेवटी वेणगांव(कर्जत-रायगड) येथील माधवराव भट जे बाजीरावाच्या सांगण्यावरून ब्रह्मवर्तास स्थायिक झाले होते त्यांच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचेच नाव धोंडोपंत ठेवले, हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" या शिवाय बाजीरावाने २ मुले दत्तक घेतली होती - गंगाधर उर्फ बाळासाहेब आणि सदाशिव उर्फ दादासाहेब. २रा बाजीराव २८ जानेवारी १८५१ मध्ये वारला, मात्र ११ डिसेंबर १८३९ च्या त्याच्या मृत्युपत्रा प्रमाणे इंग्रजांनी नानासाहेबास उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली तरी पदव्या आणि पेन्शन देण्यास नकार दिला. नानासाहेबच नव्हे तर भारतातील बऱ्याच संस्थानांना इंग्रजांनी तनखा नाकारला, काहांची तर संस्थानेच वारसाहक्का वरून किंवा दत्तकविधानावरून खालसा करावयास घेतली. +सगळीकडे असंतोष पसरत चालला होता. १८३०पासूनच इंग्रजांचे कंपनी सरकार भारतीय उद्योगांची जाणून बुजून गळचेपी करत होते. माल निर्यातीवर जबर कर लादला होता, आणि इंग्लंडमधून येणारा माल आयात अत्यल्प बसविल्याने स्वस्तात विकला जाई. भारतीय उद्योगांचे तीनतेरा वाजले. १८३०-३१ सालचा विनिमय दर होता १५ भारतीय रु. = १ स्टर्लिंग पाउंड. यावरून भारतीय धंदे का बुडित गेले याचे सुस्पष्ट कारण समजते. आर्थिक आघाडी अशी पिछाडली होती तर भारतीय सैनिकाचे पगार देखील इंग्रज सैनिकांपेक्षा कित्येक पटींनी कमीच होते, त्यांना बढती अशी कधी मिळतच नसे. यातच भर म्हणून सामाजिक स्थित्यंतरे घडत होती हिंदूंच्या धार्मिक रिवाजांत कायद्याने आडकाठी करण्यात आली, समुद्रयात्रेला हिंदू धर्माने धर्मबाह्य ठरवल्याने ही समुद्रयात्रेची अट शिपायांना जाचक ठरू लागली. मात्र या असंतोषाला वाढवण्याचे मुख्य कारण घडले - काडतुसांना लावलेली चरबी, ही गायीची किंवा डुकराची असे. गाय हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असल्याने सैनिकांमधे प्रचंड असंतोष पसरला होता. या सर्व थरांतील असंतुष्ट घटकांना नानासाहेब पेशव्यांनी एकत्र आणले. यात त्यांना केवळ पेन्शन मिळाले नाही म्हणून संस्थानिकांनी भारतीय सैनिकांना चिथवुन हे बंड घड्वून आणले किंवा मुसलमानांना आपली सत्ता परत पाहिजे होती म्हणून त्यांनी हिंदूंना धाक घालून हा "जिहाद" घडवला असे म्हणणाऱ्यांनी १८५७ च्या आधीची नानासाहेबांनी - झाशीची राणी किंवा आसाम, जयपुर, चांदा, ग्वाल्हेर, रेवा, संबलपूर या आणि अशा शेकडो राजे-राजवाड्यांना १८५४पासूनच या युद्धाबाबत लिहीलेली पत्रे वाचावीत. किंवा लष्करी छावणीत सैनिकांकडून कमळावर आणि नागरिकांकडून भाकऱ्यांवर हात ठेवून घ्यायला लावलेली शपथ बघता यात नानासाहेबांनी किती गुप्तता ठेवली होती हे लक्षात येते. केवळ वार्षिक ८ लाखाच्या तनख्यासाठी लढणारे नाना नव्हतेना झाशीची राणी. २ऱ्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर नानासाहेबांच्या आई नेपाळ येथे राहिल्या, तेथे त्यांनी ८० गावे ’खरेदी’ केली या वरून नानासाहेबांसाठी बाजीरावाने ७ पिढ्या पुरेल इतका पैसा सोडला होता हे समजते, त्यापुढे ८ लाखाचे पेन्शन ते काय? + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_794.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_794.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7951.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d14467337657ace0b65e0d2bc0a13e70299835a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7951.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7961.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b47ab6909c1c771275a97e3a328b04617fdeb45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7961.txt @@ -0,0 +1,10 @@ +प्रकाश यशवंत आंबेडकर ( १० मे, १९५४), बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[१] आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.[२] +प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) मध्ये झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. इ.स. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[३] +इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[४] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[५] १९९३-९४ च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली.[६] +प्रकाश आंबेडकर हे इ.स. १९९० ते १९९६ दरम्यान राज्य सभेचे सदस्य (खासदार) होते.[१२][१३] ते अकोला लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९८ (ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा इ.स. १९९९ (ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले.[१४][१५] आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.[१६][१७] +१ जानेवारी २०१८ रोजी, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचारास येथील "जय स्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बौद्ध, अनुसूचित जाती व ओबीसी लोकांवर हिंदुत्ववादी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. आंबेडकरांनी या हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप संभाजी भिडे व मिलींद एकबोटे या दोघांवर ठेवला आणि दोघांची पोलीस चौकषी व कडक कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र शासन व पोलीस यंत्रणा दोषींवर काहीही कारवाई करत नाही म्हणून त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रीय जनतेस "महाराष्ट्र बंद"चे आवाहन केले. या बंदास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरुण वर्ग त्यांचा समर्थक बनला.[१८][१९] +आंबेडकर यांनी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापन केली.[२०] जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत.[२१] ह्या पक्षाने, एआयएमआयएम या मित्रपक्षासह सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या होत्या. एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार निवडूण आला मात्र वंबआचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बऱ्यांच उमेदवारांवर १ लाखांवर मते घेतली होती.[२२][२३] प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापुर मतदारसंघातून उभे होते, परंतु त्यांचा दोन्ही जागेवर पराभव झाला.[२४] +१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[२५][२६][२७][२८] +प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीराबाई आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहीण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला.[२९] अंजली आंबेडकर ह्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दाम्पत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.[३०] +मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रुपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रुपये इतकी संपत्ती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[३][३१][३२] +प्रकाश आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7981.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c03ef78cbd3498a2b1bbe559b54e7a93a6160dd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7981.txt @@ -0,0 +1,18 @@ +बाळीवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून हनुमान मंदिर मार्गाने गेल्यावर पुढे पिककॉलनी,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ आणि तिळसा रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ८.३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९२ कुटुंबे राहतात. एकूण ४१० लोकसंख्येपैकी १९७ पुरुष तर २१३ महिला आहेत. गावाची साक्षरता ७३.७३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.६६ आहे तर स्त्री साक्षरता ६७.१९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.०२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +धाधरे, कोळीमसरोवर, शेळे, धापड, कळंभोळी,कासघर,शिरसाड,तिळसे,कापारी, वाडवळीतर्फेसोनाळे,सोनाळेखुर्द ही जवळपासची गावे आहेत.बाळीवळी ग्रामपंचायतीमध्ये बाळीवळी आणि कळंभोळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7998.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305a0be519193ffa10573c8ff691a36dec25abcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_7998.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_800.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..828e94c9a60b8cc40df87e45ea0c345011832834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_800.txt @@ -0,0 +1,5 @@ + +प्रकाश त्रिभुवन[१] (१४ जून १९५४) हे मराठीतील लेखक, दिग्दर्शक आणि आंबेडकरवादी विचारवंत आहेत.[२] महाराष्ट्रातील " दलित साहित्यिक चळवळ" चे ते अग्रगण्य आहेत. [३] प्रकाश त्रिभुवन यांनी लिहिलेले नाटक “थांबा, रामराज्य येतेय!” दलित रंगभूमी चळवळीतील मैलाचा दगड आहे. प्रकाश त्रिभुवन यांच्या “थांबा, रामराज्य येतेय!” या नाटकाचा उल्लेख मराठी विश्वकोश खंड १५ मधील "वग" या लेखात आहे.“थांबा, रामराज्य येतेय!” ५०० वेळा विविध नाट्यगृहात सादर केले आहे. प्रसिद्ध फ्रेंच लेखक दिग्दर्शक प्रीटर ब्रूक यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" चा गौरव केला आहे.[४] जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या महाराष्ट्र शासन निर्मित महाराष्ट्राच्या माहितीपटात "थांबा, रामराज्य येतेय!" चा समाविष्ट आहे. "थांबा, रामराज्य येतेय!" ला कामगार कल्याण विभाग आणि महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कृत केले गेले आहे. “थांबा, रामराज्य येतेय!” आणि "गणनायिका आम्रपाली" या नाटकांचा विविध विद्यापीठ अभ्यासक्रमात समविष्ट केलेलं आहे. [५]"थांबा, रामराज्य येतेय!" नाटकाचा हिंदीत ही अनुवाद झाला आहे. यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या नामांतर लढ्याची पाश्वभूमी आहे. [६] प्रकाश त्रिभुवन हे नामांतर लढ्यात सहभागी होते तसेच दलित आंदोलनातही प्रकाश त्रिभुवन सक्रिय आहेत. अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचं अकरावं दोन दिवसीय अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभुवन यांनी भूषविले आहे. [७] +प्रकाश त्रिभुवन यांचा जन्म १४ जून १९५४ रोजी कांगोणी, तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे वडील खंडेराव त्रिभुवन पोलिस कर्मचारी होते आणि नंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या वडिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनातही योगदान दिले. प्रकाश त्रिभुवन यांनी सातवी वर्गापर्यंत विविध गावातील शाळांमध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी मिलिंद बहुउद्देशीय हायस्कूल, औरंगाबादमध्ये प्रवेश घेतला जी शाळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती . दहावीनंतर प्रकाश त्रिभुवन यांना मिलिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळावली. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारिता पदवी , नाट्यशास्त्र पदवीका , एम.ए. आणि एम. फील. पदवी पूर्ण केली. नाटकातील पदवीकामध्ये ते प्रथम श्रेणीत प्रथम आले.त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५ वर्ष काम केले आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले +मिलिंद महाविद्यालयात अभ्यास करताना प्रकाश त्रिभुवन आंबेडकरी चळवळीला प्रेरित झाले. मिलिंद महाविद्यालयाने लेखक, राजकारणी, कवी, नेत्यांची निर्मिती केली आहे. प्रकाश त्रिभुवन यांची नाटक "थांबा, रामराज्य येतेय!" (१९८२), एक होता राजा (१९८३)[८], धन नको वन हवे (१९९३), अडीच फुटाचा राक्षस (२००१), गणनायिका आम्रपाली (२००५), सत्तेमेव जयते! (२०१५), दिग्विजय आणि इतर एकांकिका (२०१४), [९]कथासंग्रह जातक कथा (१९९४) आणि कादंबरी बाळकडू (२००६), नागार्जुन (२०१८) .[१०] प्रकाशित झाल्या आहेत. प्रकाश त्रिभुवन यांना लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी विविध नियतकालीकांमध्ये लेख लिहिले आणि अनुवादित केले आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) साठी देखील कार्यक्रम लिहिले आहे. त्यांनी "दलित रंगभूमी " आणि "सिद्धवैभव " नियतकलिक संपादित केले आहे. २०१५ मध्ये प्रकाश त्रिभुवन यांनी "अवलोकितेश्वर प्रॉडक्शन" ही संस्था सुरू केली. प्रकाश त्रिभुवन यांनी “धन नको वन हवे” आणि “गारुड” या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे . प्रकाश त्रिभुवन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य भारतातील पहिला बौद्ध नाट्य महोत्सव औरंगाबाद येथे आयोजित केला. [११]या नाट्य महोत्सवात प्रकाश त्रिभुवन लिखित , निर्मित आणि दिग्दर्शित “गुरुदक्षिणा”, “दिग्विजय” आणि “गणनायिका आम्रपाली” या तीन नाटकांचे सादरीकरण झाले. +प्रकाश त्रिभुवन यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8002.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f08ea0b52e693b2b7d6dac0232ddfd3d9ae5fe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8002.txt @@ -0,0 +1,8 @@ + बाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8014.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d4af370cd2c05bfa563b2ff0b35a10a61b15eb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8014.txt @@ -0,0 +1 @@ +बावडा संस्थान महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थान होते. या संस्थानाचा प्रदेश अंदाजे २४३ किमी[१] इतका होता diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_805.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a2bbb1176b103de2d943c4cb69ff9fc51a2ab0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_805.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. प्रकाश गोळे (जन्म : इ.स. १९३८; - पुणे, २७ नोव्हेंबर २०१३) हे एक मराठी पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. +प्रकाश गोळे यांचे घराणे हे पेशवेकालीन सरदार घराणे होते. पुण्याच्या शनिवार पेठेतील गोळे वाड्यात ते रहात. त्यांचेव महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयातून झाले. मूळचे ते कला शाखेचे विद्यार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए. आणि नंतर अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवीही त्यांनी संपादन केली. विशेष म्हणजे त्याच काळात त्यांनी ‘इतिहास’ विषयावर एक पुस्तक लिहिले होते, +कॉलेजच्या दिवसांपासूनच प्रकाश गोळे यांना प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले. पुढे त्यांना पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. +डॉ. प्रकाश गोळे यांनी पुण्यात १९८२ साली ’इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली. सोसायटीच्या करवी त्यांनी नैसर्गिक पुनर्जीवनाचे असंख्य प्रयोग केले. त्यांच्या या संस्थेने निसर्ग संवर्धनावरील पदव्युत्तर पदविकेचा एक वर्षाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. हा मूलस्रोताच्या व्यवस्थापनाचा अभ्यास पुढे सरकारमान्य झाला. मात्र गोळे यांचा पर्यावरणीय अर्थशास्त्राचा विचार प्रस्थापित सरकारच्या गळी उतरवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी राजकीय पक्षांसाठी एक ’पर्यावरण प्रश्नांचा जाहीरनामा’ काढला होता. डॉ. प्रकाश गोळे यांचे अतिशय्म्प्ठेकार्य म्हणजे त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सकारात्मक काम करणारे असंख्य तरुण कार्यकर्ते निर्माण केले आहेत. +डॉ. गोळे यांच्या संस्थेने सारस क्रौंच आणि पट्टे कादंब हंस (Bar Headed Gill) या पक्ष्यांचा अभ्यास केला. माळढोक पक्ष्यांवरही संशोधन केले. +डॉ. प्रकाश गोळे यांनी + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8066.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..491d59da0c29c2f2218c8c674f4e0fd43aa53a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8066.txt @@ -0,0 +1,13 @@ +९२ वंश आणि ५००० जाती +बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. +वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.[१] +पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळ जवळ १४०० बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. +चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात. +जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. [१]बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो. +बांबूचे आशियामधले उत्पादन गेल्या वीस वर्षांत झपाट्याने वाढले आहे. २००८ मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन २००० मधल्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे. +बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते. +बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते. +बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात. +बांबूची अशी उत्पादने किती कठीण असतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्‍ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते. +बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत. उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेले, रेस्टॉरंट, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. ज्यावेळी बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल असा दिवस फारसा दूर नसावा.बांबू बासरी बनवण्या साठी उपयोगी पडतो +बांबूची कोवळी पाने, फांद्या, कोंब हे चीनमधील जायंट पांडा व नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे. काही वेळेस उंदीर याची फळे खातात. आफ्रिकेतील जंगलातील गोरिलासुद्धा बांबूचे सेवन करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8083.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43d84820ff9461e5e19819c9515ed27633d5916a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8083.txt @@ -0,0 +1,16 @@ +बासरी हे वेळुपासुन बनलेले एक फुंकून वाजविण्याचे वाद्य आहे . हे श्रीकृष्णांचे आवडते वाद्य होते.भारतात हे वाद्य फार पुरातन काळापासून प्रचलीत आहे. बासरीची लांबी 12" ते जवळजवळ 40" असते. +बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. हे भारतीय संगीतातील वाद्यांमधील आद्य वाद्य मानले जाते. +भुंग्यांनी भोक पाडलेल्या बांबुमधून वारा जाताना आलेल्या आवाजामुळे या वाद्याची कल्पना सुचल्याचे मानले जाते. +सामान्यतः, बासरी ही बांबूपासून बनवली जाते. एका टोकाला बांबू कॄत्रिम बुचाने बंद केला जातो, अथवा बांबूच्या पेराच्या सांध्याचाच वापर करून ते टोक बंद राखले जाते. बासरीला हाताच्या बोटांनी +घडी ठेवून स्वर काढण्यासाठीची ६/७/८ छिद्रे (स्वररंध्रे) असतात, आणि एक फुंकरीचे छिद्र (मुखरंध्र) असते हे बंद टोकाजवळ असते. त्याखाली सामान्यतः म, ग, रे, सा, नी, ध आणि प या स्वरांची स्वररंध्रे असतात. काही वेळा 'प'च्या स्वररंध्राखाली 'म'चे स्वररंध्र बनवले जाते. बासरीवादक श्री केशवराव गिंडे यांनी केलेल्या नव्या संरचनेमध्ये मुखरंध्राकडील मच्या स्वररंध्राच्या वर पचे एक स्वररंध्र बनवलजाते. +हिदुस्तानी संगीत 3 सप्तकांमधे वाजवले जाते- मंद्र(खालची पट्टी), मध्य(मधली पट्टी), तार(वरची पट्टी). +बासरीच्या मुखरंध्रावर फुंकर घालून आणि दोन्ही हातांची तीन तीन बोटे (तर्जनी,मध्यमा आणि अनामिका) स्वररंध्रांवर ठेवून आणि पूर्ण अथवा अर्धी उचलून स्वरनिर्मिती केली जाते. बासरीमधून सामान्यतः दोन सप्तकांत (मंद्र पंचम ते मध्य षड्ज हे अर्धे सप्तक्, मध्य षड्ज ते तार षड्ज हे पूर्ण सप्तक, तार षड्ज ते तार पंचम हे अर्धे सप्तक) वादन करता येते (प्रगत वादक तार पंचम ते अतितार षड्ज असे अर्धे सप्तक अधिक वाजवू शकतो). +बासरीत एकूण 15 सूर वाजवता येतात, ते खालीलप्रमाणे : +ध्रांच्या सामान्य बासरीच्या वादनामध्ये स्वर खालील पद्धतीने काढले जातात. +मुखरंध्राकडील पहिले स्वररंध्र (मचे स्वररंध्र) डाव्या हाताच्या तर्जनीने झाकले जाते. +त्या खालील स्वररंध्रे अनुक्रमे डाव्या हाताची मध्यमा, अनामिका, उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटांनी झाकली जातात. +(हे वर्णन आणि खालील स्थिती डावा हात मुखरंध्राजवळ आणि उजवा हात खाली अश्या प्रकारे वाजवतानाच्या स्थितीचे आहे. अश्या वेळी बासरी ही वादकाच्या उजव्या बाजूला असते. हात उलट घेऊन्, डाव्या बाजूला बासरी धरून वादन करताना खालील वर्णनामध्ये डावा आणि उजवा हे शब्द उलट होतील, बोटे तीच राहतील. ) +सप्तक बदलण्यासाठी फुंकरीच्या जोरामध्ये बदल केला जातो, बोटे तशीच राहतात. मात्र तार पंचम ते अतितार षड्ज या स्वरांकरता बोटांची स्थिती वेगळी असते. +==प्रकार==royal +Cheap +बासरी हे वाद्य सुशीर वाद्य आहे .या वाद्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.तसेच बासरी ही बांबू ,पितळ,अक्रालिक या पदार्थांपासून बनवली जाऊ शकते हे वाद्य जबराट असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8096.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c548d983817bf8c6e47bf80cb72c45453c83aa02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8096.txt @@ -0,0 +1 @@ +बासा सुंडा ही इंडोनेशिया देशाच्या जावा ह्या बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सध्या इंडोनेशियामधील ३.७ कोटी (१४ टक्के) लोक ही भाषा वापरतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8118.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadeb819ad0c5651104fea8245c2aecc72c7d6a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8118.txt @@ -0,0 +1,5 @@ +बास्टियान बास झुइडेरेंट (३ मार्च, १९७७ - ) हा नेदरलॅंड्सकडून ५३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8125.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efe44c7014afd7970fd2abb31a31b03c09104b0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8125.txt @@ -0,0 +1 @@ +बास्तीय [१] (मराठी लेखनभेद: बॅस्तीय [१]; चुकीचा रूढ नामभेद: बॅस्टिल; (फ्रेंच: Bastille) हा पॅरिस शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला होता. इ.स.च्या १४व्या शतकात शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान बांधल्या गेलेल्या या किल्ल्याचा वापर फ्रेंच सम्राटांनीं मुख्यत: एक तुरुंग म्हणून केला. १४ जुलै, इ.स. १७८९ रोजी सुमारे १००० विरोधकांनी याच्यावर चढाई केली व ह्यातच फ्रेंच राज्यक्रांती मुळे रोवली गेली. त्याच वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सरकारी आदेशांवरून हा किल्ला पाडून टाकण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8138.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13a29b34a9ff754544699de11d21673141d16810 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8138.txt @@ -0,0 +1,3 @@ +बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आहे. +बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे. +त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६ फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुद्ध दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर जैन तीर्थक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. बाहुबली नावाचा सिनेमाचा याच्याशी काहीही संबंध नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8151.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c8d86190e5cebbfe2e7278b248db6a1ec4054c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8151.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाहुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8174.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1f38a3b59c1e999e949ca4ff6ea24953d0196eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8174.txt @@ -0,0 +1,7 @@ +बिंदादिन महाराज (१८३०:हांडिया तालुका,उत्तर प्रदेश, भारत - १९१८) हे भारतीय कथक नर्तक होते. त्यांनी कथकचे लखनौ घराणे स्थापन केले.[१] +बिंदादिन (मूळ नाव: वृंदावन प्रसाद) [२]महाराजांचा जन्म १८३० मध्ये अलाहाबाद जिल्ह्याच्या हांडिया तालुक्यात झाला. त्यांच्या कुटुंबात काही पिढ्या कथक नृत्याची परंपरा होती. त्यांचे वडील दुर्गाप्रसाद हेसुद्धा कथक नर्तक होते. बिंदादिन यांनी कथक नृत्याची तालीम वडील दुर्गाप्रसाद आणि काका ठाकूरप्रसाद यांच्याकडून घेतली. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून कथक नृत्य शिकायला सुरुवात केली आणि तीन वर्षे केवळ "तिग दा दिग दिग" या बोलांचा सराव केला.[१] +लखनौचे नवाब वाजिदअली शाह यांच्या दरबारात पखवाज वादक कुडाऊ सिंग यांच्याबरोबर झालेल्या जुगलबंदीत बारा वर्षाचे बिंदादिन सरस ठरले आणि त्यांच्यावर खुश होऊन नवाबाने त्यांना संपत्ती देऊन त्यांचा गौरव केला, अशी कथा सांगितली जाते. +बिंदादिन महाराज हे उत्तम गायकसुद्धा होते. त्यांनी खास कथकसाठी हजारो ठुमऱ्या आणि बंदिशी रचल्या आहेत. त्यांनी ठुमऱ्यांच्या बरोबरच दादरा, धृपद, होरी, खयाल, टप्पा, भजने अशा प्रकारच्या काव्यरचनासुद्धा केल्या. त्यांच्या काव्यात हिंदी, उर्दू, ब्रज आणि मैथिली अशा अनेक भाषा आढळतात. खास कथकसाठी ही काव्ये लिहीलेली असल्यामुळे त्यात नृत्याची बढत करण्यासाठी जागा निर्माण केलेल्या आहेत. ही काव्ये विशेषतः कृष्ण-लीलांवर आधारित आहेत. 'बिंदा कहत' या ओळी या रचनाच्या शेवटी आढळतात. त्यांच्या रचनांचे संकलन 'रस गुंजन' या पुस्तकामध्ये पंडित बिरजू महाराज यांनी केले आहे.[३] +बिंदादिन महाराज यांनी लखनौ येथे कथक नृत्याचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली. आपले बंधू कालिकाप्रसाद यांच्याबरोबर त्यांनी कथक नृत्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. [४]भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान त्यांनी लखनौबाहेर पडून भोपाळ, नेपाळ अशा ठिकाणी प्रवास केला आणि आपल्या कलेचे सादरीकरण करून रसिकांची दाद आणि मोठी बिदागीही मिळवली.[५] त्या काळातील ठुमरी गायिका गौहर जान, जोहरा बाई या बिंदादिन महाराजांच्या शिष्या होत्या.[६] +बिंदादिन महाराजांना अपत्य नव्हते. त्यांचे बंधू कालिकाप्रसाद यांना अच्छन महाराज, लच्छन महाराज आणि शंभू महाराज हे तीन मुलगे होते. बिंदादिन महाराजांनी आपले पुतणे अच्छन महाराज यांना कथक नृत्याची सर्वात जास्त तालीम दिली. बिरजू महाराज हेसुद्धा बिंदादिन महाराजांच्या कुटुंबातीलच आहेत. +प्रसिद्ध रचना diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8195.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0b309030c251369e286e16866d7ecf40f1359b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8195.txt @@ -0,0 +1,4 @@ +सम्राट बिंबिसार (इ.स.पू. ५४४ - इ.स.पू. ४९१) हा मगध साम्राज्याचा संस्थापक व अजातशत्रूचा पिता होता. मगधचा राजा बिंबिसार याला काशी हे महाजनपद हुंड्यात मिळाले होते. +इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू, पांचाल, गांधार, अवंती, मगध अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रूपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली. त्याने मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. +बिंबिसार वयाच्या १५ वर्षी इ.स. पूर्व ५४३ मध्ये मगधच्या गादीवर आला. तो हुशार, मुत्सद्दी, धोरणी व पराक्रमी होता. सुपीक व संपन्न देश, भौगोलिक संरक्षण लाभलेला विभाग आणि सुसज्ज सैन्य यांचा सुयोग्य उपयोग करून साम्राज्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने अवतीभोवतीची महाजनपदे वेगवेगळ्या मार्गांनी वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. +'अंग' या महाजनपदावरती 'ब्रह्मदत्त' या राजाची सत्ता होती. तो कुशल संघटक होता. बिंबिसारने अंगवर आक्रमण करून तो प्रदेश पादाक्रांत करून आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतला. त्या प्रदेशाची 'चंपा' ही बाजारपेठ व राजधानी मगधच्या ताब्यात आली. त्याने आपल्या कुणाल या मुलाची तेथे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8198.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14674198a7ef6bd6f609a7624a2a9cef80b4b33f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8198.txt @@ -0,0 +1 @@ +बिआट्रिक्स (डच: Beatrix Wilhelmina Armgard) ही नेदरलँड्सच्या राजतंत्राची राणी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8211.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fb2acc644de4f851a8416661520fd68721c1e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8211.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याविषयी आहे. बिकानेर शहराच्या माहितीसाठी पहा - बिकानेर. +बिकानेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बिकानेर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8218.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9309f6640756739242d2257505728c71e4e4cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8218.txt @@ -0,0 +1,3 @@ +बिकिनी एटोल हे मार्शल द्वीपसमूहातील प्रवाळाच्या बेटांचा समूह आहे. [१] १८०० आणि १९४६ दरम्यान यांना एश्शॉल्ट्ज एटोल म्हणून नाव होते. [२] एकूण २२९.४-चौरस-मैल (५९४.१ चौ. किमी) क्षेत्रात ही २३ बेटे आहेत व मध्ये समुद्रसरोवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४६ मध्ये येथील मूळ रहिवाशांना बळजबरीने स्थलांतरित करण्यात आले, [३] त्यानंतर १९५८ पर्यंत अमेरिकेने येथे २३ अणुचाचण्या केल्या होत्या. +हा द्वीपसमूह अमेरिकेच्या आधिपत्याखाली असून याचे प्रशासकीय केन्द्र माजुरो येथे आहे. +हा द्वीपसमूह रॅलिक साखळीच्या उत्तरेकडील टोकावर आहे, १९७० मध्ये बिकिनी बेटावर तीन कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले, एकूण सुमारे १०० रहिवासी. परंतु शास्त्रज्ञांना मे १९७७ मध्ये विहिरीच्या पाण्यात स्ट्राँशियम-९०ची पातळी धोकादायक असल्याचे आढळले तसेच तेथील रहिवाशांच्या शरीरात सिझियम-१३७ चे प्रमाण असामान्यपणे जास्त होते. १९८० मध्ये त्यांचे स्थलांतरित करण्यात. आते येथे तात्पुरती तुरळक वस्ती असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_822.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec1d733cdf7cdb149883bb840013d9bf2fd74575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_822.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई विद्यापीठ, मुंबई +प्रकाश विश्वनाथ परांजपे (२८ जुलै १९४७ - २० फेब्रुवारी २००८) हे शिवसेना पक्षाकडून १९९६ ते मृत्यूपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. परांजपे यांचा जन्म पनवेल, महाराष्ट्र येथे २८ जुलै १९४७ रोजी झाला. संसदेत निवडून येण्यापूर्वी त्यांनी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदे भूषवली. १५ मे १९७२ रोजी त्यांनी सुप्रिया प्रकाश परांजपे यांच्याशी विवाह केला. कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी परांजपे यांचे २० फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.[१] +http://loksabhaph.nic.in/Members/memberbioprofile.aspx?mpsno=२९०&lastls=१४ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8237.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10262f5359b9e47fb6b48d5a50ba76e4b9c72833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8237.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +साचा:Fnb रवी was automatically put up for eviction by Bigg Boss for swearing and for refusing to wear a microphone. +साचा:Fnb राहुल is the Sarpanch and is only allowed to have 1 nomination this week. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8246.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c88d24c8917ee6e883f0a4222d0a9539519e66fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8246.txt @@ -0,0 +1,89 @@ +बिग बॉस मराठी २ हा बिग बॉस मराठीचा दुसरा हंगाम आहे. हा हंगाम २६ मे २०१९ साली कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला होता. या हंगामाचे विजेतेपद शिव ठाकरे याने मिळवले. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार होते. +किशोरी +पराग +रुपाली +वीणा +किशोरी +अभिजीत के. +वीणा +शिव +वीणा +(वाचवण्यासाठी) +नेहा +अभिजीत बि. +सुरेखा +वीणा +(दिवस ९८) +किशोरी +सुरेखा +शिवानी +(दिवस ९८) +दिगंबर +अभिजीत के. +नेहा +(दिवस ९७) +पराग +(दिवस २०) +शिव +हीना +माधव +हीना +(दिवस ९८) +नेहा +सुरेखा +(दिवस ९८) +शिवानी +दिगंबर +नेहा +अभिजीत बि. +(दिवस २६) +(दिवस ९२) +(दिवस ९२) +सुरेखा +वीणा +(दिवस ८४) +वीणा +(दिवस ८४) +किशोरी +अभिजीत बि. +रुपाली +वीणा +हीना +माधव +नेहा +शिव +वैशाली +(दिवस ७७) +शिव +(दिवस ७७) +दिगंबर +वैशाली +(दिवस ७०) +शिवानी +पराग +(दिवस ६३) +शिवानी +(दिवस ६३) +पराग +रुपाली +(दिवस ५६) +शिव +(दिवस ५६) +शिव +शिव +(दिवस ४२) +शिवानी +(दिवस ४२) +दिगंबर +(दिवस ३५) +वीणा +(दिवस २८) +शिवानी +(दिवस २८) +वीणा +(दिवस २१) +शिवानी +(दिवस २१) +(दिवस १४) +वीणा +(दिवस १४) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8266.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..985da983994ba25d1e4bd7a661d77b39869a73ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8266.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिचुकले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8267.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..975c551444a4f48c7758064f638b8821f42c4e7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8267.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिचुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8271.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c17c1de6f467389f51be39c1ea1d08ec97410fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8271.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8309.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c343c8dcd44040a484f53026a7445abf04c8e820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8309.txt @@ -0,0 +1 @@ +बिजेवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8312.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e4860724b0756e04876b612583e5462face044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8312.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिजोटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8321.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9485cc22ac5ac1868f0b1968286a2aa6d380d048 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8321.txt @@ -0,0 +1,9 @@ +बेहराम कॉन्ट्रॅक्टर तथा बिझीबी (१९३० - ९ एप्रिल, २००१), हे एक भारतीय पत्रकार, विनोदकार आणि १९८५ ते २०१९ दरम्यान मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या 'द आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते. +कॉन्ट्रॅक्टरने फ्री प्रेस जर्नल, द टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई), आणि मिड-डे येथे काम केले. त्यांनी त्यांचा विशिष्ट पारशी [१] वारसा, चालीरीती आणि खाद्यपदार्थ याबद्दल विपुल लेखन केले. [२] +१९८५ मध्ये त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र द आफ्टरनून डिस्पॅच आणि कुरियर तथाआफ्टरनून सुरू केले. +स्वतःच्या वृत्तपत्राचे संपादक असतानाही कॉन्ट्रॅक्टरनी टाइम्स ऑफ इंडिया आणि मिडडेसाठी बिझीबी या टोपण नावाने लेख लिहिणे सुरू ठेवले आणि राऊंड आणि अबाउट हा स्तंभ लिहिला. +कॉन्ट्रॅक्टरनी "ईटिंग आऊट" ही मुंबईतील रेस्टॉरंट आणि खाद्यसंस्कृतीबद्दलची मालिका देखील लिहिली. +त्यांना १९९० मध्ये पद्मश्री, [३] आणि १९९६ मध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. + +१९८५मध्ये, त्यांनी फरझाना कॉन्ट्रॅक्टरशी लग्न केले. त्या देखील एक पत्रकार होत्या. [४] +बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांचे २००१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8342.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13167428d5082f9f812177d953ac8b6a1df83a31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8342.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिड बोरखेडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8356.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a42b40ac25ec83f1f33fd2d237b8d47c72121788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8356.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिदाल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8367.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40fa93280566a606af14f32575f696942b5f8b5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8367.txt @@ -0,0 +1,2 @@ +बितेरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8406.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3cbbbcd2cb7f13ed58b8f3f7bb56d897a3079c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8406.txt @@ -0,0 +1,3 @@ +बिनायक सेन (४ जानेवारी, इ.स. १९५० - हयात) हे पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे (पीयूसीएल) उपाध्यक्ष आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते बालरोगतज्ज्ञ आहेत. बिनायक सेन यांना माओवाद्यांसोबत देशविरोधी कट रचल्याच्या आणि राजदोहाच्या आरोपाखाली अडिशनल डिस्ट्रिक्ट अण्ड सेशन्स कोर्टाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यांवरील देशद्रोहाचा गंभीर आरोप मागे घेऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. +देशद्रोहाचा आरोप ठेवत छतीसगढ हायकोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने सेन हे देशद्रोही ठरत नाही असे सांगत त्यांना जामीन देण्यात आल्याचे सांगितले. न्या. एच.एस. बेदी आणि न्या. सी. के. प्रसाद यांनी हा निर्णय दिला. माओवाद्यांविषयी सहानभूती बाळगणे हा देशद्रोह ठरत नाही अशी टिपण्णी केली त्यांनी केली.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_841.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec1d733cdf7cdb149883bb840013d9bf2fd74575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_841.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई विद्यापीठ, मुंबई +प्रकाश विश्वनाथ परांजपे (२८ जुलै १९४७ - २० फेब्रुवारी २००८) हे शिवसेना पक्षाकडून १९९६ ते मृत्यूपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. परांजपे यांचा जन्म पनवेल, महाराष्ट्र येथे २८ जुलै १९४७ रोजी झाला. संसदेत निवडून येण्यापूर्वी त्यांनी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदे भूषवली. १५ मे १९७२ रोजी त्यांनी सुप्रिया प्रकाश परांजपे यांच्याशी विवाह केला. कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी परांजपे यांचे २० फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.[१] +http://loksabhaph.nic.in/Members/memberbioprofile.aspx?mpsno=२९०&lastls=१४ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8412.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5677f3060c83ca6ffb6c685dc6b377f54a380227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8412.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +सम्राट बिंदुसार मौर्य वंशाचे द्वितीय सम्राट होते. हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र व चक्रवर्ती सम्राट अशोकांचे वडील होते. मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आखून मौर्य साम्राज्याच्या सीमा वाढवल्या. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि महाराणी दुर्धरा यांचा मुलगा बिंदुसार यांना जहागीरमध्ये प्रचंड राज्य मिळाले. त्याने दक्षिण भारतापर्यंत राज्याचा विस्तार केला. चाणक्य त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान राहिले. बिंदुसाराच्या राजवटीत तक्षशिलेच्या लोकांनी दोनदा उठाव केला. बिंदुसाराचा मोठा मुलगा सुशीम याच्या चुकीच्या कारभारामुळे पहिल्यांदाच उठाव झाला. दुसऱ्या बंडाचे कारण माहीत नाही पण बिंदुसाराचा मुलगा अशोक याने ते दडपले होते. बिंदुसाराचा मृत्यू BCE 273 मध्ये झाला (काही तथ्ये BCE 268 ला सूचित करतात). बिंदुसाराला 'वडिलांचा मुलगा आणि मुलाचा पिता' म्हणून ओळखले जाते कारण तो प्रसिद्ध मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा आणि सम्राट अशोकचा पिता होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8419.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19e0a49d2a82774b78d7b49110c3a677d445ab8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8419.txt @@ -0,0 +1 @@ +बिपलब कुमार देब (বিপ্লব কুমার দেব; २५ नोव्हेंबर १९७१) हे भारताच्या त्रिपुरा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१८ त्रिपुरा विधानसभा निवडणूकीमध्ये देब ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ६० पैकी ३६ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्रप्त केले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माणिक सरकार ह्यांची २० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आणली. ९ मार्च २०१८ रोजी देब ह्यांनी त्रिपुराचे नववे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8434.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a078de27caae1a0b761824307a2f1c0b271b44c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8434.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिब काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8439.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ae2578e36a95d0d3c731cc09f15ee68f7a3412d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8439.txt @@ -0,0 +1,11 @@ +बिबट्या ,बिबळ्या किव्हा वाघरू (Leopard) हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. +बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात. +याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. +महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात, यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे. +बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलो पर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते. +बिबट्यांच्या ठिपक्यांमधे देखील विविधता असते. त्यांचा पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते, तर वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते; थंड प्रदेशांमधे थोडी करडी असते. +काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. +काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केन्याच्या जंगलांमध्ये आहेत. +इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात. +बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे, हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात[२]. रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची (ॲन्टिलोप्सची) शिकार करतात. बिबट्या ची चावण्याची क्षमता ही सिंह व वाघ यांच्या पेक्षा जास्त असते म्हणजे एखाद्या तगड्या जवान बिबट्या ची चावण्याची क्षमता ही १५०० पि एस आय इतकी असते. +महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खेडेगावात ऊसाच्या शेतात बिबटे आढळून येत आहेत. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत. म्हणून मादा बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसुती करत आहेत. जे की फार धोकादायक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8470.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a7b2c9b31cbde471d5e2879ab3ea5616ce0ae64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8470.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बियांका व्हेनेसा अँद्रीस्कु (१६ जून, २०००:मिसिसॉगा, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) ही कॅनडाची टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8511.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b534843fea62effe91786fdc1e23a3751775dfe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8511.txt @@ -0,0 +1,206 @@ +बिरसी विमानतळ हा गोंदिया शहरापासून ईशान्येस सुमारे १२ किमी अंतरावर असणारा एक विमानतळ आहे. यास गोंदिया विमानतळ असेही म्हणतात. या विमानतलावर १३ अप्रैल २०२२ पासून यात्री प्रवासाला सुरुवात झाली आहे. तसेच याचा वापर खास व्यक्तींची विमाने व पायलट प्रशिक्षणसाठी सुद्धा करण्यात येतो. तसे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे पण त्याचा वापर सध्या (२०१८ साल) पूर्ण क्षमतेने करण्यात येत नाही.[१] +मूलतः हा विमानतळ फक्त एक धावपट्टी होती. ती ब्रिटिशांनी सन १९४०मध्ये तयार केली होती. पूर्वी हिची देखरेख महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.[२] पण नंतर सन १९९८मध्ये ही धावपट्टी महाराष्ट्र इंडस्ट्रियल काॅर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात आली.[३] त्यानंतर सन २००५मध्ये भारतीय विमान प्राधिकरणाने या धावपट्टीचा ताबा घेतला. त्या प्राधिकरणाने मग या धावपट्टीचा विस्तार केला व तिला एअरबस व बोईंगसारखी विमाने उतरण्यास सक्षम बनविले.[४] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8527.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4dfdcb02de81cc929a76ff7bad8469753d80cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8527.txt @@ -0,0 +1 @@ +बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (मराठी लेखनभेद: बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी अँड सायन्स ; इंग्लिश: Birla Institute of Technology & Science ;) ही भारतातील तंत्रज्ञान-शिक्षण संस्था आहे. भारताच्या राजस्थान राज्यातील पिलानी या शहरात या संस्थेचे मुख्य केंद्र असून ते बिट्स-पिलानी या संक्षिप्त नावानेही ओळखले जाते. बिट्स-गोवा, बिट्स-हैदराबाद, बिट्स-दुबई येथे प्रावार आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8531.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ec5af97a237a8f8b89d561cc85f7b28fc740b7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8531.txt @@ -0,0 +1,5 @@ +गांधी स्मृती, (पूर्वी बिर्ला हाऊस किंवा बिर्ला भवन या नावाने ओळखले जाणारे) हे नवी दिल्ली येथील टीस जानेवारी रोड, पूर्वीच्या अल्बुकर्क रोडवर असणारे महात्मा गांधी यांना समर्पित संग्रहालय आहे. याच ठिकाणी महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 144 दिवस घालवले होते आणि 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या झाली होती. हे मूळतः बिर्ला या उद्योगपतींचे घर होते. ते आता 2005 मध्ये स्थापन झालेल्या गांधी संग्रहालयाची वास्तू आहे.[१] +सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्या वगळता संग्रहालय दररोज उघडे असते. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असतो.[२] +12 बेडरूमचे घर 1928 मध्ये घनश्यामदास बिर्ला यांनी बांधले होते. सरदार पटेल आणि महात्मा गांधी हे बिर्लांचे नेहमीचे पाहुणे होते. त्यांच्या शेवटच्या मुक्कामादरम्यान, महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा ते 9 सप्टेंबर 1947 ते 30 जानेवारी 1948 पर्यंत येथे राहिले. जवाहरलाल नेहरूंनी घनश्यामदास बिर्ला यांना पत्र लिहून बिर्ला हाऊसचा काही भाग स्मारकात बदलण्याची मागणी केली. घनश्यामदास निगडीत आठवणी असलेले घर सोडून देण्यास तयार नव्हते. प्रदीर्घ आणि खडतर वाटाघाटीनंतर, 1971 मध्ये, केके बिर्ला यांच्याकडून बिर्ला हाऊस खरेदी करण्यात आले होते, ज्यामध्ये, काही अहवालांनुसार, त्यांनी विक्री किंमतीत फळझाडांची किंमत देखील समाविष्ट केली होती. अखेरीस के.के. बिर्ला यांनी सरकारला मालमत्ता 5.4 दशलक्ष रुपयांना विकली आणि त्याबदल्यात सात एकर शहरी जमीन विकली, जो एक अतिशय फायदेशीर करार मानला गेला. 15 ऑगस्ट 1973 रोजी बिर्ला हाऊस जनतेसाठी उघडण्यात आले, त्याचे नाव गांधी स्मृती (किंवा गांधी स्मरण) ठेवण्यात आले. इमारतीतील संग्रहालयात गांधींच्या जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक लेख आहेत. अभ्यागत इमारत आणि मैदानावर फेरफटका मारू शकतात, जिथे गांधी राहत होते ते संरक्षित खोली आणि त्यांच्या रात्रीच्या सार्वजनिक वॉक करताना त्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या मैदानावरील जागा पाहतात. ज्या ठिकाणी शहीद स्तंभ उभा आहे तेथे गांधींना त्यांच्या प्रार्थनेदरम्यान गोळ्या घालण्यात आल्या. +गांधी स्मृती किंवा बिर्ला हाऊस 5 तीस जानेवारी मार्गावर स्थित आहे, कॅनॉट प्लेसपासून दोन किलोमीटर अंतरावर, नवी दिल्लीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टपैकी एक. +घराच्या बाहेर एक खांब उभा आहे ज्यामध्ये स्वस्तिक चिन्ह आहे. स्तंभाच्या प्रमुखतेचा अर्थ असा आहे की 20 व्या शतकात स्वस्तिक चिन्हाचा नैतिक अर्थ पश्चिमेत ज्या प्रकारे बदलला आहे त्याचे दृश्य उदाहरण म्हणून त्याचा वापर केला गेला आहे. त्याच स्तंभामध्ये ओमदेखील कोरलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8610.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b458eb6cc29bfdeed231cf8c9f92dce63994627e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8610.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूर शहराविषयी आहे. बिलासपूरच्या इतर संदर्भांसाठी पहा - बिलासपूर-निःसंदिग्धीकरण. +बिलासपूर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बिलासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8613.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7af9f7781f08fd8583a17f630d346ad9cbb638a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8613.txt @@ -0,0 +1 @@ +बिलासपूर लोकसभा मतदारसंघ भारताच्या छत्तीसगढ राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8616.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901b9b404e13e2fabd39f0de9ccdae9a3d761ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8616.txt @@ -0,0 +1 @@ +बिलासपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याच्या बिलासपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8628.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e4cc26368637d4bef6a5fe9df132084677cdab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8628.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 45°47′12″N 108°32′14″W / 45.78667°N 108.53722°W / 45.78667; -108.53722 + +बिलिंग्स हे अमेरिका देशाच्या माँटाना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8631.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45f8e2e6a5964d2ef024341ba55b835544a430a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8631.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिलिगिरीरंगन पर्वतरांग (कन्नड: ಬಿಳಿಗಿರಿರಂಗನ ಬೆಟ್ಟ) (अथवा बी.आर. हिल्स) ही दक्षिण-पूर्व कर्नाटक राज्यातील एक पर्वतरांग आहे. +या पर्वतरांगेत बिलिगिरीरंगनाथ स्वामी अभयारण्य आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_864.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..509ce114132a14b69599485fa8fa43ed96e770c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_864.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रकाश स्रोतातून उत्सर्जित होणारी प्रकाश ऊर्जा मोजण्यासाठी अनेक पद्धती प्रचलित आहेत. यामध्ये विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. उदाहरणार्थ, जेव्हा प्रकाश स्रोतातून उत्सर्जित होणारा प्रकाश थर्मोपाइलच्या काळ्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा त्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. ज्याच्या सहाय्याने प्रकाश ऊर्जा मोजता येते. दोन प्रकाश स्रोतांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेच्या परिमाणांची तुलना त्या स्रोतांना थर्मल बीमपासून समान अंतरावर ठेवून आणि बीमच्या तळाशी वाढलेल्या तापमानामुळे गॅल्व्हानोमीटरच्या उंचीशी त्यांच्याद्वारे निर्माण झालेल्या थर्मोइलेक्ट्रिक प्रवाहांची तुलना करून केली जाऊ शकते. . परंतु या सर्व पद्धती केवळ उर्जेच्या सापेक्ष प्रमाणांची तुलना करू शकतात, त्या प्रकाश स्रोतांच्या तेजाची तुलना करू शकत नाहीत, कारण प्रकाश स्रोतांची चमक त्यांच्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. आपल्या डोळ्यांद्वारे आपल्याला प्रकाशाचे सापेक्ष ज्ञान खूप चांगले मिळते, परंतु आपले डोळे देखील फारसे विश्वासार्ह साधन नाहीत. वेगवेगळ्या व्यक्तींच्या डोळ्यांना वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रमाणात जाणवतो. म्हणून, दोन प्रकाश स्रोतांच्या ब्राइटनेसची मानक स्त्रोताच्या ब्राइटनेसशी तुलना करून आणि त्या मानकाच्या ब्राइटनेसचा एक युनिट म्हणून विचार करून त्यांची चमक मोजणे आवश्यक आहे, अन्यथा ऑप्टिकल ब्राइटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येकजण सहमत होऊ शकत नाही. दुसरी पद्धत अशी असू शकते की त्या स्त्रोतांच्या प्रकाशाची तुलना त्यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या पृष्ठभागावरील प्रकाशाच्या तीव्रतेची तुलना करून. प्रकाश स्रोतांच्या प्रदीपन किंवा प्रदीपन शक्तींची किंवा प्रकाशित पृष्ठभागाच्या प्रकाशाच्या तीव्रतेची तुलना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना किंवा उपकरणांना फोटोमीटर म्हणतात आणि ऑप्टिक्सचा जो भाग ही कार्ये करतो. त्याला फोटोमेट्री म्हणतात . +फोटोमेट्रीच्या प्रक्रियेत मानक प्रकाश स्रोताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा मानकांची प्रारंभिक पात्रता अशी आहे की त्याद्वारे उत्सर्जित होणारा प्रकाश स्थिर किंवा खूप परिवर्तनशील असावा आणि त्याचे स्पेक्ट्रल वितरण देखील प्रकाश स्रोतांच्या वर्णक्रमीय वितरणाच्या मर्यादेच्या जवळ असावे ज्यासाठी तो तुलना करण्यासाठी वापरला जात आहे. याव्यतिरिक्त, मानक प्रकाश स्रोत सहजपणे पुनरुत्पादित करणे आवश्यक आहे आणि प्रत्येक बाबतीत त्याच्या विविध भागांमध्ये पुरेशी स्थिरता असणे आवश्यक आहे. या पात्रता पूर्ण करण्यासाठी अनेक मानक स्रोत वापरले गेले आहेत. सर्वात जुने मानक म्हणजे स्पुमॅन्सेटी मेणबत्ती, किंवा ब्रिटिश मेणबत्ती, जी 7/8 इंच आणि १/६ पाउंड व्यासाची आहे आणि प्रति तास ११० धान्ये जळते. पण त्यामध्ये वापरण्यात आलेली वात आणि प्रयोगाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणातील पाण्याचे प्रमाण यामुळे त्याच्या प्रकाशमानतेवर अपरिहार्यपणे परिणाम होतो. त्यामुळे ते यापुढे वारंवार वापरले जात नाही आणि विविध विद्युत मानक प्रकाश स्रोतांद्वारे बदलले जाते. यापैकी व्हर्नन हार्कोर्ट पेंटेन दिवा, दहा मेणबत्ती दिवा आणि हेफनर दिवा इत्यादी विशेषतः उल्लेखनीय आहेत. वर नमूद केलेल्या व्हर्नन हार्कोर्ट दिव्यामध्ये अशी व्यवस्था आहे की ज्योतीचा आकार नेहमी निश्चित असतो. १९०९ पर्यंत, मानक प्रकाशमान तीव्रता या दिव्याच्या प्रकाशाच्या एक दशांश समान मानली जात होती. , १९२१ मध्ये, अशा अनेक विद्युत दिव्यांच्या गटाची सरासरी प्रदीपन किंवा प्रकाशमानता आंतरराष्ट्रीय मानक मानली गेली. ब्रिटन, फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स या तीन प्रमुख मानकीकरण प्रयोगशाळांमध्ये अशा मानकांद्वारे इतर दिवे प्रमाणित केले जात राहिले. परंतु शुद्ध पेटेनची कमतरता (इतर हायड्रोकार्बनपासून मुक्त) आणि ज्योतीच्या दीर्घायुष्यात होणारे अनियंत्रित बदल, ज्या बर्नरमधून ज्वाला बाहेर पडते, त्या बर्नरमधील तापमानात वाढ झाल्यामुळे या दिव्याचा प्रसारही कमी झाला आहे. वर नमूद केलेल्या हेफनर दिव्यामध्ये, अमाइल एसीटेटच्या ज्वलनाने एक ज्योत निर्माण होते, जी लाल रंगाची असते आणि साधारणतः 4 सेमी लांबीची असते. सुलभ, सहज उपलब्ध आणि पुनरुत्पादन करण्यायोग्य असल्यामुळे, आजकाल हा दिवा फोटोमेट्रिक हेतूसाठी अधिक वापरला जातो, त्याचा प्रकाश पेंटेन दिव्याच्या आंतरराष्ट्रीय मानकाच्या ९/१० पट आहे. १९३९ मध्ये, आंतरराष्ट्रीय कराराद्वारे एक नवीन आणि सर्वोत्तम प्राथमिक मानक वापरला जात आहे, ज्याचे नाव प्लांकियन रेडिएटर आहे. यामध्ये, प्लॅटिनम त्याच्या वितळण्याच्या बिंदूपर्यंत विद्युतरित्या गरम केले जाते. त्याचा प्रकाश विशेष रेडिएशन सिस्टमद्वारे फोटोमीटरमध्ये प्रसारित केला जातो. या रेडिएशनच्या आधारे चमकदार तीव्रतेचे आंतरराष्ट्रीय एकक देखील निश्चित केले गेले, परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्याचा सराव पुढे ढकलण्यात आला. १ जानेवारी १९४८ पासून जगातील काही देशांनी त्याचा पुन्हा वापर सुरू केला आहे. प्लँकियन किरणोत्सर्गाच्या प्रति युनिट सेंटीमीटर चमकदार तीव्रतेच्या सोळाव्या भागाला आंतरराष्ट्रीय कॅन्डेला किंवा कॅन्डेला म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8643.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b92bc29fa8072ebc4d4e01c55caff412fbb17de5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8643.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बिली जीन मॉफिट-किंग अमेरिकेची अव्वल टेनिस खेळाडू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8647.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..824899d698f46fb6faa400ca4a76158ee2652cdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8647.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम ह्यूस बाउकर बिली फ्रॅंक (२३ नोव्हेंबर, १८७२:दक्षिण आफ्रिका - १६ फेब्रुवारी, १९४५:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8651.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8391fe96e78b262ca302b9f9f0cb07151fa2737 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8651.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम बिली बार्न्स (मे २७, इ.स. १८५२:सटन-इन-ॲशफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - मार्च २४, इ.स. १८९९:मॅन्सफील्ड वूडहाउस, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8655.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba5a7e02cfad9ecebca75759e3134ed673a9ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8655.txt @@ -0,0 +1,3 @@ +बिली बॉब थॉर्न्टन (४ ऑगस्ट, १९५५:हॉट स्प्रिंग्ज, आर्कान्सा, अमेरिका - ) हा अमेरिकन अबिनेता, लेख, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. याने स्लिंग ब्लेड, द अपॉसल, पुशिंग टिन, आर्मागेडन, प्रायमरी कल्रर्स, मॉन्स्टर्स बॉल, बॅड सँटा, द अलामो यांसह अनेक चित्रपटांतून काम केले आहे. +थॉर्न्टनला स्लिंग ब्लेड चित्रपटासाठी पटकथालेखनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते +थॉर्न्टनने सहा वेळा लग्न केले आहे व त्याला तीन बायकांपासून चार मुले आहेत. त्याच्या भूतपूर्व पत्नींपैकी अँजेलिना जोली एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8673.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f480c6676646d4bb97d5037ddc18b742b60aaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8673.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिल्टॉंग हा दक्षिण आफ्रिकेमधील खाद्यपदार्थ आहे. हे तयार करण्यासाठी मांसात मसाले घालून वाळविले जाते व नंतर त्याचे लांबट तुकडे केले जातात. यासाठी सहसा गाय, शहामृग किंवा इतर वन्य श्वापदांचे मांस वापरले जाते. +बिल्टॉंग साधारण बीफ जर्कीसारखेच असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_87.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_87.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..555315706650969e7cab82db55f9f030da670108 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_87.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप एड्रियान सहावा (२ मार्च, १४५९ - १४ सप्टेंबर, १५२३) हा १६व्या शतकातील पोप होता. हा ९ जानेवारी, १५२२ ते मृत्युपर्यंत या पदावर होता. +एड्रियानस हा एकमेव डच पोप आहे. त्याच्यानंतर जॉन पॉल दुसरा पोपपदावर येई पर्यंत ४५५ वर्षे हा शेवटचा बिग-इटालियन पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8716.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5791588edf485da3fc8a2587245ea811ce2ec9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8716.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 42°52′29″N 74°36′44″E / 42.87472°N 74.61222°E / 42.87472; 74.61222 + +बिश्केक (किर्गिझ: Бишкек; रशियन: Бишкек) ही किर्गिझस्तान ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते जरी शहराला वेढणाऱ्या चूय ओब्लास्ताच्या प्रशासकीय राजधानीचे ठिकाण असले, तरीही ते चूय ओब्लास्तात मोडत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8719.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9676be0c16818ce6722038b2d831161d5f50a542 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8719.txt @@ -0,0 +1,3 @@ +बिश्नुपुर हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बिश्नुपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०४ होती. +बिश्नुपूर शहराचे प्रशासन १२ वॉर्डमध्ये विभागलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8726.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..681097f8abbaaa638dc63b987daa2ecc429971ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8726.txt @@ -0,0 +1,2 @@ +विष्णूपूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8741.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36f7ac37b105b7c68ec71614943dda9290aec0f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8741.txt @@ -0,0 +1,51 @@ +बिस्मार्क हे अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ७२,४१७ तर महानगराची लोकसंख्या १,३१,६३५ होती. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8759.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192f79cf25571d23b4f21fa54da27a0d1a197aba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8759.txt @@ -0,0 +1,4 @@ +२५° २२′ १२″ N, ८५° ०७′ ४८″ E +बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे.भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत. +यावरील विस्तृत लेख पहा - बिहारमधील जिल्हे +बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8779.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a653a520fac07d27fec44a1c69cad07d7abeb5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8779.txt @@ -0,0 +1 @@ +बी. अंजनप्पा ( जून १,इ.स. १९१८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8798.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c91677897eaafe978a83019b7f1c1bfcb726e19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8798.txt @@ -0,0 +1,2 @@ +बी. विजयालक्ष्मी या नव्या पीढीच्या संशोधिका होत. (मृत्यु : मे १२ इ.स. १९८५). तिरुचिरापल्ली येथे एम.एस्सी. केले चेन्नई येथे पदार्थविज्ञानाच्या शाखेत संशोधन. सामाजिक भान असलेली शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध. +एकेरी भार असणारे कण आणि त्यांचे भ्रमण याविषयीची समीकरणे ज्ञात होती. बी. विजयालक्ष्मी यांनी सापेक्ष समीकरणाचे याव्यतिरिक्त मोठे समूह दाखवून दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8806.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48bf75a5606539efd50a118ab9c66bec982edb46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8806.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सुमीत रेड्डी बस (२६ सप्टेंबर, इ.स. १९९१ - ) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8820.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6a8842a7fae23ef84b43bc543bb2e657c697065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8820.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बी.एस.ई.: 500103, एन.एस.ई.: BHEL; संक्षेप: बी.एच.इ.एल.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली बी.एच.इ.एल. वीजनिर्मिती केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीचे उत्पादन करते. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देखील बी.एच.इ.एल.ने मुसंडी मारली असून भारतामध्ये व जगभर अनेक नवे प्रकल्प उभारण्यात बी.एच.इ.एल. सहाय्य करते. १९६४ साली स्थापन झालेली बी.एच.इ.एल. १९७१ सालापासून सतत नफा कमवत आहे. +विद्युतनिर्मितीसाठी लागणारे सर्व प्रकारचे टर्बाईन, बॉयलर, स्वीचगियर इत्यादी बी.एच.इ.एल.ची प्रमुख उत्पादने आहेत. त्याच बरोबर बी.एच.इ.एल. भारतीय रेल्वेसाठी विद्युत इंजिने देखील बनवते. +भारतामधील खालील शहरांमध्ये बी.एच.इ.एल.चे प्रमुख कारखाने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8829.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbec6f8075de4e8e3edd896a7a1db7b3f6304470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8829.txt @@ -0,0 +1,2 @@ +बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८ ही २००८ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, बी.एम.डब्ल्यू. सौबर संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_885.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d7d9d93ea52adfc32c05b9095d288e2b5ecebd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_885.txt @@ -0,0 +1,9 @@ + +प्रकृती हा इ.स. २०१० मधील ॲनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आहे, जी बुद्धांचा शिष्य आनंदच्या प्रेमात पडते. आणि ब्रह्मचर्यव्रत घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम बुद्धांच्या ही बाब लक्षात येते तेव्हा प्रकृतीला ते तिच्या प्रेमातील अशाश्वत गोष्टी तिला समजावून सांगतात. आपण भौतिक सुखांकडे आकर्षित झाल्याचे कळल्यावर प्रकृती बुद्धांशी क्षमा मागून आनंदशी मंगल मैत्रीचे नाते जपत भिक्खूणी बनून संघात सामील होते. +एक युवती नदीतून आपल्या घागरीत पाणी भरून रत्याने आपल्या घराकडे निघते. तेथून थोडे दूर भिक्खू आनंद त्यांच्या एका भिक्खू सहकाऱ्यासोबत भ्रमण करित असतात व वाटेत त्यांना तहान लागते. तेव्हा भिक्खू आनंद पाण्याचा शोध घेऊ लागतात व तेव्हा त्यांना ती घागरीत पाणी घेऊन येणारी युवती दिसते. आनंद त्या युवतीला पिण्याचे पाणी देण्याची विनंती करतात. तेव्हा ती युवती म्हणते की, "माझे नाव प्रकृती आहे व मी एक चांडालिका (अस्पृश्य) आहे, म्हणून मी पिण्याचे पाणी तुम्हाला देऊन तुम्हाला भ्रष्ट करू इच्छित नाही.” यावर आनंद म्हणतात की, " माझा संबंध पाण्याशी आहे, तुमच्या जातीशी नाही, म्हणून कृपया मला पाणी पाजा.” प्रकृती आनंदाला घागरीतले पाणी पिण्यास देते. +त्यानंतर प्रकृती अनेक दिवस आनंदाचा विचार करू लागते. दुसऱ्या कोणत्याही कामात तिचे लक्ष लागत नाही. ही प्रकृतीची अवस्था पाहून तिची आजी तिला याबद्दल विचारते, तेव्हा ती आपण बुद्ध शिष्य आनंदाच्या प्रेमाड पडलो असल्याचे सांगते. आनंदाशी लग्न करण्याची इच्छाही ती आजीला सांगते. हे ऐकूण आजी आपल्या नातीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. आजीला चेटकणीची कला अवगत असते व आनंदाला त्याद्वारे ती अडकण्याच्या प्रयत्न करते पण ती बुद्धापुढे तीची ही विद्या काम करत नाही. तेव्हा दुसरे प्रयत्न म्हणून आजी आनंदाला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करते. भोजन करून आनंद जेव्हा घरातून बाहेर पडू लागतात तेव्हा आजी आनंदाला थांबवून प्रकृतीची त्यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाची भावना व लग्नाची इच्छा सांगते. आनंद आपण ब्रह्मचर्याचे व्रत घारण केल्याचे सांगून आपण कुठल्याही स्त्रीशी विवाह करू शकत नसल्याचे सांगून प्रकृतीशी लग्नास नम्रपणे नकार देतात. व घराबाहेर जाण्यास निघतात तेव्हा आजी घराची कडी लावून घेते व प्रकृती दुसऱ्या खोलित नेऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करते. परंतु आनंद तिच्याकडे आकर्षितला जात नाही व तो तिचा हात झटकून घरातून निघून जातात. +चित्रपटात शेवटी एक शिकवण दिलेली आहे :- +ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो, +त्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तर... +त्या व्यक्तिला नष्ट करणे म्हणजे विकृती! +त्या व्यक्तिशी मंगल मैत्री करणे म्हणजे प्रकृती!! diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8850.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f30f4410be9d5ffc882124164c2d12ca4a72d31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8850.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +बी.जे. वॅटलिंग हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_886.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d5ec7b2a2ef66af6e635d47bbb9fe634a739770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_886.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रकृती (पाली-पक्कति) ही गौतम बुद्धांच्या समकालीन एक बौद्ध भिक्खुणी होती. तत्कालीन सामाजिक समजानुसार एका हीन कुळात जन्म घेऊनही गौतम बुद्धांनी तिला संघात प्रवेश दिला होता. +प्रकृती यांचा जन्म एका मातंग कुटुंबात झाला होता. एक दिवस बुद्धांचे शिष्य आनंद चारिका करत असतांना तहान लागल्यामुळे एका विहिरीवर गेले. तेथे पाणी भरत असलेल्या प्रकृती यांना त्यांनी पाणी मागितले. प्रकृती यांनी आनंदांना आपल्या चांडाळ असल्याची माहिती देऊन त्यांना आपण पाणी देणे योग्य होणार नाहे असे सांगितले. आनंदांनी आपणास तिच्याकडून तिचे कूल नको असून केवळ पाणी हवे असे आहे असे सांगितले. आनंद यांच्या नम्रतेमुळे प्रभावित होऊन प्रकृती यांनी आनंद यांच्याबरोबर विवाहित होण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आनंद यांनी आपण श्रमण असल्यामुळे असे करू शकत नसल्याचे सांगितले. अनेक प्रयत्न करूनही आनंद विवाहास तयार होत नाही असे पाहून त्यांनी गौतम बुद्धांकडे आपली तक्रार मांडली. गौतम बुद्धांनी तिला योग्य उपदेश देऊन तिला एका श्रमणासोबत विवाहाच्या विचारापासून परावृत्त केले. त्यावेळी प्रकृती यांनी त्यांना संघात प्रविष्ट करून घ्यावे अशी बुद्धांकडे मागणी केली व बुद्धांनी त्यांना संघात प्रवेश दिला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8880.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f63304d3ec70f4f0e1e35ac72aedc3f24be6c636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8880.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबुकोडी वेंकटरमण कारंथ (१९ सप्टेंबर १९२९ - १ सप्टेंबर २००२) हे भारतातील प्रख्यात चित्रपट आणि नाट्य व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यभर ते कन्नड तसेच हिंदी नाटक व चित्रपटात दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार होते.[१] त्यांचा जन्म दक्षिणा कन्नड येथे झाला. +ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (१९६२)चे माजी विद्यार्थी आणि नंतरचे संचालक होते. त्यांनी अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन केले आणि कन्नड सिनेसृष्टीत पुरस्कृत अनेक कामांचे दिग्दर्शन केले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कराने सन्मानित केले . diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8934.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51d376afd90ffee814a9545656ea4f15a449519a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8934.txt @@ -0,0 +1 @@ +काही झाडांच्या बियाण्यामध्ये बी काढल्यानंतर बी रुजवणीकरता बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे अशा बियान्याचे बीजपरीक्षण कठीण होऊन बसते. अशा वेळी आतला बीजगर्भ (Embryo) काढून त्याचे परीक्षण केले जाते. जर तो बीजगर्भ जननरूप असेल टीआर तो रूजन्याची प्रतीक्रिया दाखवतो. अन्यथा त्याचा रंग बदलतो. बीजगर्भ बियाण्यातून खूप काळजीपूर्वक काढला पाहिजे. नाहीतर बीजगर्भाला धक्का लागून त्याच्या रुजण्यात अडथळा येईल. ज्या बियांचे कवच टणक व घट्ट असते ते फोडून त्यातून बीजगर्भ अलग करावा. कठीण बीजकवच धारदार तीक्ष्ण पात्याच्या चाकूने कापून काढावे. त्यानंतर बीजगर्भ रूजव्ण्याच्या पद्धती नेहमीच्या बियाणे रूजवण्याप्रमाणेच असतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8946.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19e0d7eeb77c525bb725833e5c0dee7dfbd23408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8946.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ आशिया खंडामधील सर्वात वर्दळीचा तर अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता. +जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे. ह्या विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत बीजिंग सबवेच्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8953.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f00a47973d4a4a27ecf5a8ae2d8c4482d3d42e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8953.txt @@ -0,0 +1 @@ +बीजिंग नॅशनल स्टेडियम किंवा नॅशनल स्टेडियम, जे बर्ड्स नेस्ट (पक्ष्याचे घरटे) या नावानेही ओळखले जाते, हे बीजिंग, चीन येथील एक स्टेडियम आहे. इ.स. २००८ सालच्या ऑलिंपिक्स व अपंगांच्या ऑलिंपिक खेळांसाठी हे स्टेडियम वापरले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_896.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b818eb29df6feab6e1973d8296b6bc57751640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_896.txt @@ -0,0 +1,64 @@ +गणित आणि सिग्नल प्रोसेसिंगमध्ये, प्रगत z-ट्रान्सफॉर्म हे z- ट्रान्सफॉर्मचा विस्तार आहे, आदर्श विलंब समाविष्ट करण्यासाठी जे सॅम्पलिंग वेळेचे पटीत नाहीत. तो फॉर्म घेतो +कुठे +हे सुधारित z-ट्रान्सफॉर्म म्हणून देखील ओळखले जाते. +प्रगत z-ट्रान्सफॉर्म मोठ्या प्रमाणावर लागू केले जाते, उदाहरणार्थ डिजिटल नियंत्रणातील विलंब प्रक्रिया अचूकपणे मॉडेल करण्यासाठी. +जर विलंब पॅरामीटर, m, निश्चित मानले गेले तर झेड-ट्रान्सफॉर्मचे सर्व गुणधर्म प्रगत झेड-ट्रान्सफॉर्मसाठी धरून ठेवतात. +खालील उदाहरणाचा विचार करा कुठे + + + +f +( +t +) += +cos +⁡ +( +ω +t +) + + +{\displaystyle f(t)=\cos(\omega t)} + + : +तर + + + +m += +0 + + +{\displaystyle m=0} + + नंतर + + + +F +( +z +, +m +) + + +{\displaystyle F(z,m)} + + रूपांतर करण्यासाठी कमी करते +जे स्पष्टपणे फक्त झेड -परिवर्तन आहे + + + +f +( +t +) + + +{\displaystyle f(t)} + + . diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8981.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b542f929150e4c39d6cbbed26a1093d5940071bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_8981.txt @@ -0,0 +1,6 @@ + +बीड तालुका बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे. +बीड जिल्ह्यात कपिलधार हे पर्यटन स्थळ आहे. +येथे धबधब्याचे पडणारे पाणी जागेवर गायब होते. + +तेथे कन्लकालेस्वर् जुने महादेवाचे मन्दिर् आहे.जिल्हयातील शांतीवन प्रकल्प प्रसिद्ध आहे तो मंझरी हवेली या गावांमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9014.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e385d9c9610ff2bfca91102a093add5aedc8420d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9014.txt @@ -0,0 +1 @@ +बिना तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बीना रिफायनरी हा भारतातील मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बीना येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हा प्रकल्प भारत ओमान रिफायनरी लिमिटेडच्या (BORL) मालकी होता जी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी होती.[१] या रिफायनरीची क्षमता वार्षिक ६ दशलक्ष मेट्रिक टन होती जी ७.८ दशलक्ष मेट्रिक टन करण्यात आली आहे.[२] २०२१ मध्ये भारत पेट्रोलियमने ह्याचे शेअर्स विकत घेतले आणि पुर्णपणे ही भारत पेट्रोलियमच्या मालकीची झाली.[३][४] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9039.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..699282619244dc4c6e71427c6f762076f122eb4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9039.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (जन्म - १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ मृत्यू - ६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे साहित्यिक होते. +इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9046.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca08d7b28a3889aed36f3c9c73ac4182e095da14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9046.txt @@ -0,0 +1 @@ +बिलिमोरा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील बिलिमोराशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून डांगमधील वघईला जाणारा रेल्वेमार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9095.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f46b12eef6ac2a00422548eb65bacdfdb405d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9095.txt @@ -0,0 +1 @@ +बुकोव्हिना हा मध्य युरोपातील एक भाग आहे. कार्पेथियन पर्वतरांगेच्या पूर्वेस असलेला हा प्रदेश सध्याच्या रोमेनिया आणि युक्रेन देशांत मोडतो. १९४०मध्ये या प्रदेशाचा उत्तर भाग सोवियेत संघाने बळकावला होता. याआधी तो रोमेनिया, ऑस्ट्रियाचे साम्राज्य आणि हाब्सबर्ग साम्राज्याचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9114.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad9d7cf42e46d2e353d2bab62c6be59bb76c5b2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9114.txt @@ -0,0 +1 @@ +बुगुडा धबधबा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. बुगुडा गावाजवळ असलेला हा धबधबा गंजम जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9115.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aed4bb44df63c3551cd6c417a1f9b358d599e1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9115.txt @@ -0,0 +1,8 @@ +बुगुन लिओचिकला (इंग्रजी: Bugun Liocichla; शास्त्रीय नाव: Liocichla bugunorum; लिओचिकला बुगुनोरम) हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याला सर्वात पहिल्यांदा १९९५ मध्ये ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये पाहण्यात आले होते आणि २००६ मध्ये नवीन त्याला पक्ष्यांची नवीन प्रजात घोषित करण्यात आले.[२] या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांचा नमुना घेण्यात आला नाही. या पक्ष्यांची स्थिती अतिशय चिंताजनक असून २००६ मध्ये या प्रजातीचे फक्त १४ पक्षी अस्तित्वात होते. त्याचबरोबर त्यांच्या अधिवासाच्या भागामध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे.[३] +बुगुन लिओचिकला एक लहान (२२ सेंमी) सातभाई कुळातील पक्षी आहे. त्याचा पिसारा पिवळट-हिरवट-राखाडी रंगाचा आहे आणि डोक्याचा वरचा भाग काळा आहे. त्याच्या चेहऱ्यावर नारंगी-पिवळ्या रेषा आणि पंखांवर पिवळे, लाल, पांढरे पट्टे आहेत. शेपूट काळी असून तिचं टोक लाल रंगाचे आहे. त्याचे पाय गुलाबी रंगाचे आहेत तर चोच तोंडापाशी काळ्या रंगाची असून टोकाकडे पांढऱ्या रंगाची होते. +हा पक्षी अतिशय दुर्मीळ आहे. हा पक्षी फक्त भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातल्या ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये लामा आणि बोम्डीला या भागात समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर सापडतो. तो प्रामुख्याने सदाहरित जंगलाचे किनारे, बांबूच्या रांजी, डोंगरउतारावरील झाडोरा अशा ठिकाणी वास्तव्य करतो. २००६ च्या जानेवारीमध्ये त्यांचा एक थवा दिसला होता आणि मे २००६ मध्ये एक नर-मादेची जोडी दिसली होती, तर त्यांची एकूण संख्या १४ वर्तवण्यात आली होती. या पक्ष्याच्या शोधानंतर त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. आता त्यांची संख्या ५०-२५० च्या आसपास असावी, असे पक्षीशास्त्रज्ञांचे अनुमान आहे.[४] +बुगुन लिओचिकला ईगलनेस्ट अभयारण्याबरोबरच अरुणाचल प्रदेशातील इतर भागात आणि शेजारील भूतानमध्ये सापडण्याची शक्यता आहे. +खगोलशास्त्रज्ञ रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये हा पक्षी आढळल्यावर त्यांनी याचे शास्त्रीयदृष्ट्या वर्णन केले. हा पक्षी पहिल्यांदा १९९५ साली दिसला होता. रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये पुन्हा दिसेपर्यंत मधली दहा वर्ष तो पुन्हा दिसला नव्हता. हा नवीन प्रजातीचा पक्षी आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी या प्रजातीच्या दोन पक्ष्यांना पकडून त्यांचा अभ्यास केला आणि २००६ साली नवीन पक्ष्याची प्रजात सापडल्याचे घोषित केले. पक्षीशास्त्रात नवीन पक्षी शोधण्याची घटना अतिशय दुर्मीळ आहे, कारण प्राणीशास्त्रात आतापर्यंत पक्ष्यांचा अभ्यास सर्वात जास्त झाला आहे असे समजले जाते.[४] +या पक्ष्याला त्याचे नाव तिथे राहणाऱ्या बुगुन जमातीच्या नावावरून देण्यात आले आहे. +या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की तो अभ्यासकांच्या नजरेतून सुटणे कठीण आहे. त्यामुळे याचे अस्तित्व लपून राहू शकत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, हा पक्षी निसर्गत: दुर्मीळ आहे. त्यामुळेच त्यांच्या वास्तव्याच्या भागात होणारी विकासकामे, विशेषतः त्यांच्या मुख्य अधिवास क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रस्तावामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. +अलीकडे रमणा अत्रेय आणि काही संस्था स्थानिक बुगुन जमातीच्या सहाय्याने हा पक्षी आणि तिथले जंगल वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9134.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a503aa00819c8d5e40bf4660668d3e377ef4285 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9134.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुटी बोरी हे महाराष्ट्रातील नागपूरचे औद्योगिक उपनगर असलेल्या बुटीबोरी येथे स्थानिक शहरी रेल्वे स्थानक आहे .[१][२] +हे रेल्वे स्थानक नागपूर रेल्वे स्थानकापासून २८ कि.मी. वर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9139.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59eb209e03e7dbb05834eafddb918a39b7b44d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9139.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 47°28′19″N 19°03′01″E / 47.47194°N 19.05028°E / 47.47194; 19.05028 + +बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. +डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मध्य युरोपातील एक महत्त्वाचे केंद्र असलेले बुडापेस्ट शहर युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9190.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c4ce559c6a0c19d1808187c95678551a8f4c53c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9190.txt @@ -0,0 +1,41 @@ + बुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे विविध प्रकारची ठिकाणे होत. यामध्ये मठ वा विहार ही सर्वात महत्त्वाचे ठिकाणी होते जे त्याच्या (किंवा संघास) वापरासाठी दिले होते. कधी कधी त्यांना एखाद्याच्या बागेत किंवा घरी आमंत्रित करण्यात आले होते, ते कधी फक्त वाळवंटात अथवा जंगलात राहिले. ती ठिकाणे उत्तर भारत आणि दक्षिण नेपाळ येथील होत.  +संघ जी केवळ बुद्धांसाठी होती . +श्रावस्ती: +राजगीर: +कोसंबी: +वैशाली: +कपिलवस्तू: +साकेत: +बुद्धांनी राहण्यासाठी कधी उद्याने किंवा जंगलाचा वापर केला. +कोसंबी: +नालंदा: +Thullakotthika: +Kammassadhamma: +या ठिकाणी कोणीही मालक नव्हते अथवा तेथे कोणीही राहत नसे,. +बोधगया: +- महाबोधी झाड आणि आसपासच्या +Benares: +- Isipatana (Sarnath) +गया: +- Gayasisa हिल +Savatthi: +- Andhavana +Kosambi: +- Simsapavana +Campa: +- ग्रोव्ह Champaka-झाडे +Saketa: +- Anjanavana +वैशाली: +- Beluvagama गाव +मथुरा: +- Gundavana +आणि इतर अनेक ठिकाणी. +Mithila: +Alavi: +Pataligama: +Bhaddiya: +Kajangala: +Kimbila: +Rajagaha (इतर ठिकाणी): +Vesali: diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9201.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5b280f2654d0199206f894c1cd7b843d4891aaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9201.txt @@ -0,0 +1,15 @@ +बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात. बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism). +आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी. +बुद्धी हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. +त्याची फोड करणे महत्त्वाचे आहे.बुद्+धि. +धि ही प्रत्येक प्राण्याकडे असते. बुद्धीच्या मार्गाने पंचेंद्रियाकडून आलेली माहिती एकगठ्ठा मेंदूत येते तिथे तिचे सूक्ष्म अलगीकरण (fragmentation) होऊन पुढील क्रिया केली जाते.हे सूक्ष्म अलगीकरण म्हणजे इंग्रजीमध्ये ratio. एखाद्या व्यक्तींची +बुद्धी ही या सूक्ष्म अलगीकरण करणाच्या क्षमतेवरून ओळखतां येते. +इंग्लिशमधील Reason या शब्दाचे मूळ Rational या शब्दात आहे. Reason हा शब्द ॲंग्लो-नॉर्मन भाषेतील raisun किंवा जुन्या फ्रेंच भाषेतील raison पासून बनतो. तो लॅटीनमधील rationem पासून निष्पादित होतो. या सर्वांचे मूळ ratus, reor ‎(“think”) यात आहे. त्यांचा अर्थ 'विचार करणे' असा होतो.[१] वेब्स्टर शब्दकोशानुसार Ratio, Ration, Ration, Rational Rationale, Rationalism, Rationalist, Rationalistic, Rationalistical, Rationalness इत्यादींचे मूळ Reason मध्येआहे.[२] ऑनलाईन डिक्शनरीनुसार ॲंग्लो- फ्रेंच भाषेत resoun असा शब्द आहे. त्याचा अर्थ द्रव्य, विषय, भाषा, विचार, भाषण, मत असा आहे. त्यापासून rationem बनतो. Reor हा शब्द ratusचे भूतकालीन रूप असून तो reri "to reckon, think पासून तयार होतो. तर reriचे मूळ प्रोटो-इंडियन-इंग्लिश मधील re(i)- "to reason, count" यात आहे. इंग्लिशमधील readचे मूळ या re/ reriत आहे.[३] त्यापासून resunmen, raisoner, rationare म्हणजे प्रश्न उपस्थित करणारा हे शब्द निष्पादित होतात. या सर्वांचा सामायिक अर्थ बोलणे, युक्तिवाद करणे, चर्चा करणे इत्यादी आहे. या सर्वातून व्यक्त होणारा reasonचा अर्थ 'सुज्ञता, पशुपासून माणसाचे भिन्नत्व दर्शविणारी बुद्धीची उच्च इयत्ता हा अर्थ तेराव्या शतकात प्रस्थापित झाला, 'तार्किक रितीने विचार करणे' हा अर्थ १५९० च्या दरम्यान सर्वमान्य करण्यात आला. त्यानंतर त्यात फारसा बदल झाला नाही. +हे अर्थ लक्षात घेऊन सतराव्या शतकास 'प्रज्ञेचे युग' म्हंटले गेले. Age of Reason "the Enlightenment ही म्हण १७९४ मध्ये प्रचलित झाली. थॉमस पेन (०९ फेब्रुवारी १७३७- २९ (किंवा जानेवारी १७३६ – ०८ जून १८०९) या इंग्लिश-अमेरिकन राजकीय सिद्धांतकर्ता, तत्त्ववेत्ता आणि क्रांतिकारकाने १७९४ साली लिहिलेल्या एका छोट्या ग्रंथाला दिलेल्या नावावरून हे नाव दिले गेले. त्याच्या ग्रंथाचे मूळ व संपूर्ण नाव होते The Age of Reason; Being an Investigation of True and Fabulous Theology. पेनने देववाद स्वीकारला पण प्रज्ञा आणि मुक्त विचार यांचा पुरस्कार केला. त्यामुळे त्याच्यावर ख्रिश्चन धर्मगुरूंचा रोष झाला.[४] +reason पासून निष्पन्न होणारा दुसरा शब्द म्हणजे rational. हा शब्द जुन्या फ्रेंच rationel, rational अथवा मध्ययुगीन लॅटीन भाषेतील rationale, rationalis पासून बनतो. त्याचा अर्थ बुद्धीशी निगडीत, योग्य कारणासहित.[५] Rationalला ism हा प्रत्यय लागून rationalism हा शब्द निष्पन्न होतो. नंतर rationalist, rationality या संज्ञा होतात. त्याचा समानार्थी शब्द intellectualism.[६] Ismचे मूळ प्राचीन ग्रीक भाषेतील एका संज्ञेत आहे की ज्याचा इंग्लिश उच्चार एकतर ismós असा होतो किंवा isma असा होतो. पहिल्याचा अर्थ कृती, अट, सिद्धान्त आणि दुसऱ्याचा अर्थ पूर्ण केलेली कृती' असा होतो.[७] त्यास icism हा प्रत्यय लागून इतर शब्द बनतात. जसे की criticism. +भारतात ration card किंवा coupon हा शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ नियंत्रित दराने मिळणारे नियंत्रित मोजमापाचे अन्नधान्य. अमेरिकन यादवी युद्धात[८] आणि पहिल्या महायुद्धात सैनिकांना अन्नधान्य, मद्य, सिगारेट, कपडे इत्यादी वस्तू देण्यासाठी मुख्यतः हा शब्द वापरण्यात आला. त्यासाठी सैनिक व अधिकारी वर्गास त्यांच्या दर्ज्यानुसार वस्तूंच्या पुरवठ्याचे प्रमाण ठरवून ज्या नोंदपत्रकावर पुरवठ्याची ही नोंद केली जात असे त्यास ration card असे नाव देण्यात आले. देशातील एकूण उत्पादनापैकी प्रथम सैनिकांना हा पुरवठा होई. त्यानंतर नागरिकांना पुरवठा केला जाई. त्यामुळे नागरिकांनाही असे ration card देण्यात आले.[९] अर्थात सैनिकांना जास्त आणि नागरिकांना कमी पुरवठा असे धोरण असते. येथे rationचा अर्थ 'अमुक कारणामुळे नियंत्रित प्रमाणात देण्यात येणारे अन्नधान्य' असे समर्थन गृहीत धरले आहे. समर्थन ही बौद्धिक, तार्किक कृती आहे. तिच्यामागे निश्चित कारण असते. त्यामुळे यास rationalization असे म्हणतात. +'बुद्धी' हा Reason या इंग्लिश शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आपण मान्य करतो(?); मात्र ते फारसे योग्य नाही, असे मत महाराष्ट्रातील विवेकवादी तत्त्ववेत्ते दि. य. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, इंग्लिशमधील intellect, intelligence आणि reason या तिन्ही शब्दांचे मराठी भाषांतर 'बुद्धी' असे केले जाते(?) पण मुळात या तिन्ही इंग्लिश शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. 'बुद्धी' या शब्दातून ते तीन भिन्न अर्थ व्यक्त होऊ शकत नाहीत. बुद्धी (intelligence) ही शक्ती सर्व प्राण्यात थोड्याफार प्रमाणात असते आणि म्हणून ती मानवप्राण्यातही आहेच. पण पशुपक्ष्यांच्या ठिकाणी intellect आणि reason आहे, असे आपण म्हणत नाही. Intellect आणि Reason हे दोन्ही शब्द स्थूलमानाने समानार्थी शब्द आहेत. त्यांनी बुद्धीची श्रेष्ठ दर्जाची शक्ती व्यक्त होते. त्यामुळे या शब्दांना 'बुद्धी' हा पर्याय न वापरता 'प्रज्ञा' हा मराठी शब्द वापरावा, असे ते सुचवितात. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी 'बुद्धी' आहे, पण त्यांच्या ठिकाणी 'प्रज्ञा' आहे, असे आपण म्हणत नाही.[१०] +वेगळ्या भाषेत हे अधिक स्पष्ट करावयाचे तर 'बुद्धी'चे अधिक प्रगल्भ रूप म्हणून 'प्रज्ञा' (Reason) या शब्दाचे उपयोजन केले जाते. बुद्धी ही क्षमता ज्ञानाचा विषय असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तू, व्यक्ति, घटना यात फरक करू शकते. या बुद्धिचा विकास माणसाने केला. ज्ञानाचा विषय असणाऱ्या ज्ञेयातील चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, सत्य-असत्य असा भेद करून निवड करते आणि त्या निवडीचे कारणासहीत समर्थन (Justification) देते, ती बुद्धिची अधिक प्रगत अवस्था समजली जाते, या अवस्थेला 'प्रज्ञा' म्हणावे, असा संकेत आहे. निवड करणे ही जाणीवपूर्वक केलेली कृती असते. या पार्श्वभूमीवर Reason या शब्दाचे भाषांतर 'प्रज्ञा' असे करणे योग्य ठरेल. या विश्लेषणानुसार 'प्रज्ञा' हाच ज्ञानाचा मार्ग आहे असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism)[११] होय. +'बुद्धी' या शब्दासाठी प्रज्ञा, विवेक आणि बुद्धिप्रामाण्य(?) असे शब्द मराठीत वापरले जातात, म्हणून प्रज्ञावादास विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद असेही नाव आहे. +विवेक हा संस्कृत शब्द 'विच्' या धातूपासून बनतो. विच् म्हणजे भेद करणे. भेद करण्याचे सामर्थ्य असणे, हा विवेक मानला जातो. विच् म्हणजे अभ्यास. विविच् < विवेक.[१२] प्रज्ञा निवड करते, विवेक करते. म्हणून विवेकवाद असे नाव आहे.'विवेकिन्', -विवेक्तृ म्हणजे विचारी, समंजस आणि म्हणून न्यायाधीश, तत्त्ववेत्ता.[१३] +अनुभववाद \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9205.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94565af6be1e0183482ee973e4265d6c1e84c797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9205.txt @@ -0,0 +1 @@ +बुद्धी बहादुर प्रधान (१५ डिसेंबर, १९७८:विराटनगर, नेपाळ - हयात) हे नेपाळचे क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9282.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a18d2e3cae1002322ed69bb46d58e65050889a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9282.txt @@ -0,0 +1,5 @@ +बुरहानपुर हे मध्य प्रदेश राज्यातील मध्य आकाराचे शहर आहे. हे बुरहानपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. तो ताप्ती नदीच्या उत्तर किनारपट्टीवर, भोपाळच्या 340 कि.मी. (211 मैल) आणि मुंबईच्या 540 कि.मी. (336 मैल) वर स्थित आहे. शहराकडे एक महानगरपालिका आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा मुख्यालय देखील आहे. +753–982 पासून राष्ट्रकूट राजवटीत बुर्हानपुर हे एक महत्त्वाचे शहर होते. ताप्ती नदी आणि असिर्गगळ किल्ल्यातील खोदकामामुळे अनेक नाणी, देवी मूर्ति आणि प्रागैतिहासिक काळापासून मंदिरे सापडली आहेत. तथापि, मध्ययुगीन काळामध्ये बुर्हानपुरचा उल्लेख प्रामुख्याने आला. +1388 मध्ये, खान्देशच्या फरुकी राजवंश सुल्तान मलिक नासीर खान यांनी शेख जैनुद्दीन यांच्या आज्ञाने आणि प्रसिद्ध मध्ययुगीन सूफी संत बुरहान-उद-दीन यांच्या नावाने बुरहानपुर असे नाव बदलले. बुर्हानपुर खानदेश सल्तनतीची राजधानी बनली. नंतर, मिरन आदिल खान दुसरा (इ.स. 1457-1501) या राजघराण्याचा एक सुलतान याने बुरहानपूरमधील एक राजवाडा आणि अनेक राजवाडे बांधले. आपल्या दीर्घकाळादरम्यान, बुरहानपूर हे व्यापार आणि कापड उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले. +1601 मध्ये, मुगल सम्राट अकबरने खानदेश वर कब्जा केला आणि बुर्हानपुर मुघल साम्राज्यातील तीन नवीन उच्चस्तरीय प्रांतांपैकी एक, खान्देशाची राजधानी बनले, प्रारंभिक अकबराचा पुत्र दानियल याचा नावावरून खानदेशचे नामकरण दानेश असे केले होते (1609). 1609 मध्ये, मुघल सम्राट जहांगीर यांनी दख्खनच्या मुघल प्रांताचे राज्यकारभारास आपला दुसरा पुत्र परविज नियुक्त केला आणि राजाने त्याचे मुख्यालय आणि त्यांचे निवासस्थान म्हणून बुरहानपुरला निवडले. +बुर्हानपुर एक सुंदर शहर बनले आणि अनेक ऐतिहासिक स्मारके त्याच्या अंतरावरच टिकून राहिली, प्रामुख्याने महान मुगल शासक शाहजहांप्रमाणे बुऱ्हाणपूर एक महत्त्वाचा मुघल चौकी होता. शाहजहांमुळे या शहरामध्ये बराच वेळ घालवला, आणि शाही किलांना मदत केली. शाही किला ही बुद्धानगरमधील एक भव्य राजवाडा आहे, ताप्ती नदीच्या पश्चिमेला आहे. दिवाण-ए-आम आणि दिवाण-इ-खास हे किल्लाच्या टेरेसवर बांधलेले होते. आज कालिला अवशेषांमध्ये आहेत . तथापि, अजूनही उज्ज्वल शिल्पाकृती आणि कोरीव काम असलेल्या या राजवाड्यावरील भाग. राजवाड्यात मुख्य आकर्षण हमाम किंवा शाही बाथ आहे.हे विशेषतः शाहजहांची पत्नी बेगम मुमताज महल यांच्यासाठी बनविले गेले होते, जेणेकरून ते आल्हाददायक स्नान करू शकतील. असे म्हटले जाते की तिच्या चौदाव्या मुलाला जन्म देताना ती तिथेच मरण पावली. आजही, छतावर अनेक जटिल चित्रे आहेत. यातील एक पेंटिंग एक स्मारक आहे जी ताजमहालची प्रेरणा आहे असे म्हटले जाते. बेगम मुमताजला ताजमहालl स्थानांतरित कारण्याआधी सहा महिने येथेच पुरण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9287.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6df6b4dcca07acefa92eae228d12c89af3390dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9287.txt @@ -0,0 +1,3 @@ +बुराकुमीन (जपानी: 部落民) किंवा बुराकू हा जपान मधील एक समाज आहे, जो जपानच्या पारंपारिक जातीव्यवस्थेतील एक अस्पृश्य समाज होता. २०१५ मध्ये या समाजाची लोकसंख्या जवळपास तीस लाख होती.[१] +बुराकुमीन वर्ग परंपरागत व्यवसाय म्हणून जपानमध्ये हलकी समजली जाणारी कामे करत असत; जसे की, डोंब किंवा चांडाळ, चर्मकार, खाटीक काम इत्यादी. कालांतराने जपानमधील इडो कालखंडात किंवा टोकूगावा समाजव्यवस्थेत हा समाज जातीव्यवस्थेतील अस्पृश्य वर्ग म्हणून गणल्या जाऊ लागला. त्यामुळे बुराकुमीन लोकांना गंभीर भेदभाव, तुच्छतेची वागणूक, सामाजिक आणि आर्थिक शोषण तसेच बहिष्काराचा सामना करावा लागत असे. +नंतर इ.स. १८६८ मध्ये मेइजी पुनर्स्थापना नावाच्या चळवळीमुळे बुराकुमीन लोकांना जातीव्यवस्थेत भेदभाव रहित योग्य स्थान देण्यात आले. परंतु त्यानंतर बराच काळ समाजातील पूर्वदूषित मानसिकतेमुळे अस्पृश्यतेची भावना मिटल्या गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यता निर्मूलनाची व जातीअंताच्या लढ्याची चळवळ इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा देत गेली. बुराकुमीन जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. आणि तेव्हापासून बुराकुमीन जमातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानण्यास सुरुवात केली.[२][३] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9319.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..034aa53e676e4b13967de2bbbcad6f06854d7f2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9319.txt @@ -0,0 +1,4 @@ +बुर्यातिया प्रजासत्ताक (रशियन: Республика Бурятия, रेस्पुब्लिका बुर्यातिया; बुर्यात: Буряад Республика) हे रशियाच्या संघातील २१ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक आहे. मंगोलियाच्या उत्तरेस वसलेल्या या प्रजासत्ताकाची राजधानी उलान-उदे येथे आहे. बैकाल हे मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बुर्यातियाच्या पश्चिमेस स्थित आहे. +बुर्यातियाची लोकसंख्या २०१० साली ९.७२ लाख असून येथील ६० टक्के लोक रशियन तर ३० टक्के लोक बुर्यात वंशाचे आहेत. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9337.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..948c578ff663a48db70873160e5271ecef76c8fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9337.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुलक काउंटी, अलाबामा ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9351.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a41b0e2f3448a6a947f82a825d99d0b6efa29441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9351.txt @@ -0,0 +1,7 @@ +बुलबुल अर्थात वल्गुवदाद्य (शास्त्रीय नाव: Pycnonotidae, पिक्नोनोटिडी ;) हे चटकाद्या श्रेणीतील पक्ष्यांचे एक कूळ आहे. +बुलबुल मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजूस केसांसारखी विकसित पिसे असतात. बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. हे जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात. + लाल बुडाच्या बुलबुलाचा आवाज (सहाय्य·माहिती) +या पक्षिकुळातील जाती मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडांत आढळतात. +फळे, कीटक, मध हे बुलबुलांचे मुख्य खाद्य आहे. +बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9358.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab62f7216192dc5cc39e8d2d30e2145821b61973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9358.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुलिट काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_936.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fbadbbf9771dba9ec3053a3cace3c9353ef8e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_936.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रज्ञा सिंग ठाकूर तथा साध्वी प्रज्ञा (२ फेब्रुवारी, १९७० - ) एक भारतीय राजकारणी व धर्मगुरू आहे. ठाकूर ही भारतीय जनता पक्षाची राजकारणी आहे. महाविद्यालयाच्या काळापासून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) सक्रिय सदस्या होती आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाली. +२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा त्यांच्यावर आरोप आहे, ज्यात १० लोक मारले गेले होते आणि ८२ जण जखमी झाले होते. गुन्हेगारीच्या वेळी तिची बाईक सापडल्यानंतर तिला दहशतवादी कारवाईचा सामना करावा लागला, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेने काही गंभीर आरोप मागे घेण्याआधी आरोग्य आधारांवर जामीन मंजूर केला.[१][२] +2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटांचा [३]तिच्यावर आरोप आहे, ज्यात १० लोक ठार झाले आणि ८२ हुन अधिक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटात तिची दुचाकी वापरल्याचे आढळून आल्यानंतर तिला दहशतवादी आरोपावरून अटक करण्यात आली होती. सध्या तिच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत एकाधिक शुल्कासाठी खटला चालू आहे. २०१७ मध्ये, राष्ट्रीय तपास एजन्सीने काही गंभीर आरोप सोडल्यानंतर तिला आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर झाला. +ठाकूर यांनी भोपाळ मतदारसंघातून २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध लढले. तिने पदार्पणातील निवडणूक  ३६४८२२ मतांच्या फरकाने जिंकली. राजकीय शास्त्रज्ञ क्रिस्तोफ जाफ्रेलोट यांच्या म्हणण्यानुसार, ती २०१९ च्या निवडणुकीची "प्रतीक" बनली आहे, ज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे असंतुलित घटक मुख्य प्रवाहात आणले गेले आहेत. +२१ नोव्हेंबर २०१९ रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संरक्षणविषयक २१-सदस्यीय संसदीय सल्लागार समितीचा सदस्य बनविण्यात आला आहे, ज्याचे अध्यक्ष संरक्षणमंत्री राजनाथ सिंह[४] आहेत. संसदेत तिच्या टिप्पणीनंतर, जिथे त्यांनी नथुराम गोडसे (गांधींचा मारेकरी) यांना देशभक्त म्हटले, तेथे विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली. २ नोव्हेंबरला त्यांना संरक्षण समिती तसेच भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतून काढून टाकण्यात आले. +बालपण आणि पार्श्वभूमी +ठाकूर यांचा जन्म २ फेब्रुवारी १९७० रोजी झाला. तिचे वडील चंद्रपालसिंग हे मध्य प्रदेशातील भिंड येथे आयुर्वेदिक अभ्यासक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामगार होते. लहानपणीच ती लहान मुलांसारखी होती, लहान केस ठेवत होती आणि मुलांसारखा ड्रेस घालत होती. तिला बऱ्याचदा 'बालिश मुलगी' असे संबोधले जात असे. तिला बाईक चालविणे खूप आवडायचे. तिच्या नावावर ही मोटारसायकल नोंदविण्यात आली होती ज्यामुळे मालेगाव स्फोटांबद्दल[५] तिला अटक करण्यात आली. +कारकीर्द +ठाकूर यांनी लहर[६] महाविद्यालय (भिंड) येथे शिक्षण घेतले आणि १९९३ मध्ये त्यांनी संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अखिल भारतीय[७] विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्य सचिवाच्या पदावर काम पाहिले आणि १९९७ मध्ये त्यांनी ही संघटना सोडली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सेना आणि हिंदू जागरण मंच यांच्यासाठी काम केले. त्या हिंदू बजरंग दलाच्या महिला संघटनेच्या दुर्गा वाहिनीचीही सदस्य होत्या. तसेच वंदे मातरम जन कल्याण समितीची संस्थापक सदस्य देखील त्या होत्या, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली आणि संघ परिवारातील आहे संस्था आहे. +२०१९ सार्वत्रिक निवडणुका +ठाकूर १७ एप्रिल २०१९ रोजी भारतीय जनता पक्षात[८] दाखल झाल्या आणि २०१९ च्या निवडणुकीसाठी भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या. ठाकूर असे म्हणत चर्चेत होत्या की २००८ च्या बॉम्बस्फोटांनंतर अटकेनंतर तुरुंगात तिच्यावर हेमंत करकरे[९] यांनी वाईट वागणूक धिली. भाजप नेते फातिमा रसूल सिद्दीकी म्हणाल्या की, त्यांच्या जातीयवादी आणि चुकीच्या टीकेमुळे शिवराजसिंह चौहान [१०]आणि मुस्लिमांची प्रतिमा डागाळली आहे आणि ठाकूर यांच्यासाठी ती प्रचार करणार नाही. १९९२ मध्ये त्यांनी बाबरी मशिदी विध्वंसात सहभागी झाल्याच्या आरोपा  वरून ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले. नंतर जातीय भावनांना भडकवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने ७२ तास प्रचार करण्यास बंदी घातली. नंतर भाजपा पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली की महात्मा गांधींचा खून, नथुराम गोडसे हा नेहमीच देशभक्त होता. तथापि, ठाकूर यांनी मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले विरोधी उमेदवार दिग्विजय सिंह यांचा पराभव करून ४३६४८२  मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9379.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d26eef8fcffa0693d123e03750f09fd2d21b0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9379.txt @@ -0,0 +1 @@ +बूकर टॅलियाफेरो वॉशिंग्टन (एप्रिल ५, इ.स. १८५६ - नोव्हेंबर १४, इ.स. १९१५) हा अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ, लेखक व अमेरिकेतील श्यामवर्णीय समाजाचा नेता होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9382.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e2f6624471e8c9c30206730c8410d2f425e125 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9382.txt @@ -0,0 +1 @@ +मॅन बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9459.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6db8bb057e43c1e4ea5506d69087ad01e15ae4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9459.txt @@ -0,0 +1,7 @@ +रामराव उर्फ अण्णासाहेब माधवराव देशमुख (नोव्हेंबर २५, इ.स. १८९२ - एप्रिल २०, इ.स. १९८१) +शिक्षण : +हे अमरावतीमधील एक बॅरिस्टर होते. यांचे शिक्षण अमरावती येथील स्कूलमधून झाले, तर उच्च शिक्षण केंब्रिजमधून.. +राजकीय जीवन:- +राजकीय कार्यः +तत्कालीन मध्यप्रांत व वऱ्हाडातील एक प्रमुख पुढारी, राजकारणी व मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा प्रांत बनविण्यात यावा ही मागणी सर्वप्रथम करणारे नेते होते. +त्याचप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानातील एक प्रमुख राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील विदर्भातील फार मोजक्या बॅरिस्टरांपैकी (कायदेपंडित) पैकी ते एक होत. स्थापण करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९२५-२६ वेरार लॅन्ड रेव्हेन्यू कोड सी.पी अँड बेरार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने मंजूर केले होते. त्याचा आराखडा तयार करतांना बॅ. रामराव माधवराव देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य करण्याची सचोटी पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची सन १९४७-४८ या कालखंडात रेवा राज्याचे मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9474.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce0252191aec08b4a604c5d0fc7c047ddb17304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9474.txt @@ -0,0 +1 @@ +बँकॉक एअरवेज ही थायलंडच्या बँकॉक शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी बँकॉकपासून थायलंड, कंबोडिया, चीन, हॉंगकॉंग, लाओस, मालदीव, म्यानमार, भारत आणि सिंगापूरमधील शहरांपर्यंत सेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9519.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82df82655a0d9bd95962c23af81c5d89b6194e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9519.txt @@ -0,0 +1,20 @@ +अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय. +अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असीरियन, सुमेरियन, चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे. +असीरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीत इ.स पूर्व २००० मध्ये मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्याना कर्जे दिल्याचे  उल्लेख आढळतात. या संस्कृतीमधल्या शिलालेख आणि मातीच्या छोट्या टॅब्लेट्सवर कोरलेल्या हम्मुराबी सांकेतिक भाषेत बँकिंगविषयक नियमांचा  उल्लेख आढळतो. बँकिंग इतिहासातील हा सर्वात जुना उल्लेख आहे. भारतात मौर्य काळात "आदेश" नावाचे कागदपत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असते. हुंडी व्यवहाराचा हा भारतातील पहिला उल्लेख आहे.ग्रीक तसेच रोमन साम्राज्यात मंदिरात बसणारे सावकार पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे व्यवहार करत असत. +आधुनिक अधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमधील फ्लाॅरेन्स, जिनोआ, व्हेनिस या शहरांत झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील युरोपमध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोषांच्या शाखा अनेक शहरांत होत्या. १३९७साली उघडलेली जिओव्हानी मेडिची यांची मेडिची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी लेखांकनाची पद्धत शोधून काढली. +१७७० साली सुरू झालेली 'बँक ऑफ हिंदुस्तान ' ही भारतातील पहिली बँक. १८२६ साली ही बँक बंद पडली. जून १८०६मधे कलकत्ता येथे सुरू झालेली बँक ऑफ कलकत्ता हिचे नाव बदलून १८०९ मध्ये बँक ऑफ बेंगाल ठेवले गेले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४० मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास सुरू केल्या. १९२१ मध्ये या तिन्ही बँका एकत्र करून 'इम्पीरियल बँक ऑफ इंडिया ' बनवली गेली. १९५५मध्ये या बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक केले गेले +अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या खालील सुविधा ग्राहकांना दिल्या जातात +१) बचत खाते +२) चालू खाते +३) रोख पत खाते +४) विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना +५) विविध प्रकारच्या कर्ज योजना +६) सुरक्षा जमा कक्ष +७) बँक हमी +८) पत पत्र व्यवहार +९) हुंडी व्यवहार +१०) विमा विक्री +११) परदेशात पैसे पाठवणे +१२) कर संकलन +१३) देय रकमांची वसुली (इंग्लिश : Bill Collection) +१४ ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरण सुविधा diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9523.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1accc6643230e2f3607fb11611eb302c263f7021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9523.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॅफिन (इनुक्टिटुट: ᕿᑭᖅᑖᓗᒃ, फ्रेंच: Île de Baffin or Terre de Baffin) हे कॅनडा देशातील आकाराने सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. बॅफिन बेटाच्या दक्षिणेस हडसन सामुद्रधुनीच्या पलीकडे कॅनडाचा क्वेबेक हा प्रांत तर पूर्वेस बॅफिनचा उपसागर व त्याच्या पलीकडे ग्रीनलॅंड हे बेट आहेत. इंग्लिश शोधक विल्यम बॅफिन ह्याचे नाव ह्या बेटाला दिले गेले आहे. +राजकीय दृष्ट्या बॅफिन बेट कॅनडाच्या नुनाव्हुत ह्या प्रदेशाचा भाग आहे. नुनाव्हुतची राजधानी इक्वाल्युईत ह्याच बेटावर स्थित असून येथील बव्हंशी लोकवस्ती इक्वाल्युईत परिसरारामध्येच आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9527.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c482de9837e587bc38f04e74e285db3991afc0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9527.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॅबिलोन (अरबी:بابل बाबिली;हिब्रू:בָּבֶל बाबेल;ग्रीक:Βαβυλών बॅबिलोन)हे मेसोपोटेमियामधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. +या शहराची स्थापना इ.स.पू. १८९४मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली. याचे अवशेष अर्वाचीन इराकच्या बॅबिलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9540.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdbb93fd80d9739116f0a6b08537ddce3582d390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9540.txt @@ -0,0 +1,5 @@ +बॅराकुडा हा म्युजिलिफॉर्मिस गणाच्या स्फिरीनिडी कुलातील मासा आहे. या कुलातस्फिरीना हा एकच वंश असून त्यातील २० जातींच्या माशांना बॅराकुडा हे नाव देतात, तसेच त्यांना ‘सी पाइक’ असेही म्हणतात. त्यांचा प्रसार उष्ण सागरांत जगभर सर्वत्र आहे, काही जाती समशीतोष्ण कटिबंधातही आढळतात. +मोठ्या किंवा हिंस्त्र बॅराकुड्याचे शास्त्रीय नाव स्फिरीना थॅराकुडा असे आहे. तो पिक्युडा किंवा बेक्युना या नावानेही ओळखला जातो. त्याची लांबी २ मी. पर्यंत असते. त्याचे डोके लांबलचक व टोकदार असते. शरीर पाइक माशासारखेच काहीसे गोलसर व लांब असते. ते चक्रज (चक्राकार) खवल्यांनी आच्छादिलेले असते व त्याची पार्श्विक रेखा [शरीराच्या दोन्ही बाजूंवर असलेली व संवेदनाक्षम पेशींची जागा दाखविणारी लांबीच्या दिशेत असलेली रेषा; ⟶ पार्श्विक रेखा] सुस्पष्ट असते. त्याचे दोन्ही जबडे लांब असतात व खालचा जबडा वरच्या पेक्षा पुढे आलेला असतो. दोन्ही जबड्यांवर व टाळूवर अगदी तीक्ष्ण व बळकट सुळ्यासारखे भयानक दात असतात. तो खादाड असून लहान माशांवर उपजीविका करतो. तो बहुधा एकटाच फिरत असतो. उष्ण कटिबंधी शैलभित्तींमध्ये (पाण्याच्या पृष्ठालगतच्या खडकाळ भागामध्ये) तो लपून स्थिर राहतो किंवा मंद गतीने पाण्यात सरकत जातो; त्या वेळी तो बहुधा आपल्या सावजाच्या शोधात असतो. पाण्यात वाहत जाणाऱ्या किंवा हलणाऱ्या कोणत्याही वस्तूवर तो झडप घालतो. अल्पसे अंतर का होईना तो अत्यंत वेगाने जाऊ शकत असल्यामुळे तो लहान माशांवर सहज झडप घालू शकतो. +सागरस्नान करणाऱ्‍यांना मोठ्या बॅराकुड्यापासून धोका असतो कारण तो माणसावरही हल्ला करतो; परंतु तो शार्क एवढा धोकदायक नाही, तरीही जनमानसात त्याबद्दल बऱ्याच अतिशयोक्त कल्पना असल्याचे दिसते. तो एक उत्तम क्रीडामत्स्य आहे. काही सागरांत बॅराकुड्याच्या शरीरात विषारी द्रव्य जाते व असे मासे खाण्यात आल्यास ‘सिग्वाटेरा’ नावाने ओळखली जाणारी विषबाधा होते. तीमध्ये तीव्र स्वरूपाचा जठरांत्रदाह (जठर व आतड्याचा दाह) होतो. अशी विषवाधा मध्य व दक्षिण अमेरिकेत झाल्याचे ऐकिवात आहे. +स्फि. कॉमरसोनी, स्फि. ॲंक्युटिपेनिस, स्फि. ऑब्युसेटा व स्फि. जेलो या जाती भारतात आढळतात. भारताच्या सागरी मासेमारी बॅराकुड्याचे प्रमाण ०.२ टक्के असते. बॅराकुडा उत्तम खाद्य मत्स्य आहे. +स्फि. जेलो ह्या जातीचे हे मराठी नाव आहे. तो द. भारतातील समुद्रात आढळतो व दोन्ही किनाऱ्‍यावर त्याची मासेमारी चालते. तो १.५२ मी. पर्यंत लांब असतो. शरीर करड्या रंगाचे असून त्यावर लोंबत्या हारासारखे पट्टे किंवा दोन्ही बाजूंवर उभे पट्टे असतात व खालची बाजू पांढरट असते. श्रोणिपक्ष (कमरेवरील पर) पांढरट असतात व इतर पर पिवळे असून त्यांवर काळे ठिपके असतात. असे ठिपके विशेषतः परांच्या कडांवर असतात. हा मासाही उत्तम खाद्य मत्स्य आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9548.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..151146eef37bb90ff0ee44c940ded51b143fa8fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9548.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॅरी काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_959.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6350f05be459a6ccaf4b0e6d380ecc97c99949dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_959.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रणब मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५- ३१ ऑगस्ट २०२०, नवी दिल्ली[१]) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला. +भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9605.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb3c054adfc0365d2b895dda6e043bd1101e83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9605.txt @@ -0,0 +1,26 @@ +१२° ५८′ ४४.८३″ N, ७७° ३५′ २८.६८″ E +बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे. +बंगळूर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत. +बंगळूरचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या सुमारास चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधून केली. दुसऱ्या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. बंगळूर विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केंपे गौडा 1 यांच्याद्वारे १५३७ मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला १६३८ मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रणदुल्लाखान यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाही एका विजापूरच्या सेनेद्वारे बंगळूरवर आक्रमण केले गेले होता, ज्यांनी तिसरा केंपेगौडा यांना पराजित केले आणि बंगळूरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिक्कपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासीमखानाने मोगलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसऱ्या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.[ संदर्भ हवा ] +बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या आग्नेय भागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळ्यांची निर्मिती केली. +बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले. +बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. +बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे. +मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत वाहतूक करतात. ऑटोरिक्षा आणि खासगी बससेवाही प्रचलित आहेत. +मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जावे व त्याला कर्णधार विराट कोहली ह्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. +केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. शिवाय भारतीय वायुसेनेचा एक विमानतळ बंगलोरमध्येच येलहंका येथे आहे. +क्रिकेट हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत. +इ.स. १९०९ साली भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना येथे झाली. +बंगलोर हे हे १९८४ सालापासून भारतातील विविध राज्यांतील पक्षातून फुटलेल्या, फुटू पाहणाऱ्या, दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्या राज्याचे सरकार पाडण्यास उत्सुक असलेल्या अशा आमदारांचे बिनखर्चात चैनीत राहण्याचे ठिकाण आहे. बंगलोरमधील विलासात राहण्यास बांधलेल्या अनेक आश्रयस्थानांमध्ये वरील प्रकारच्या आमदारांना, सुखाचे, चैनीचे आणि आरामाचे आयुष्य देण्याच्या मिशाने कैदेत ठेवतात. सन १९८४पासून हा प्रकार चालू आहे. या आमदारांना बाहेरच्या कोणाशीही टेलिफोननेही संपर्क करता येत नाही, कुणाही बाहेरच्या व्यक्तीला भेटता येत नाही, किंवा आश्रयस्थानांतून बाहेर पडता येत नाही. त्यांना आतल्या आत हवी ती चैन करता येते आणि हवी तितकी फुकत दारू ढोसता येते. आश्रयस्थानाचे भाडे प्रतिदिवशी प्रतिआमदार ६ ते ७ हजार रुपये असते. आश्रमस्थानात राहणाऱ्या या सर्व आमदारांचा खर्च अंदाजे आठवड्याला प्रतिआमदार ५० ते ७५ कोटी रुपये असतो. हा खर्च त्यांंना ज्या पक्षाने पळवून आणले आहे तो पक्ष करतो, आणि नंतर तो सामान्य जनतेकडून वसूल करतो. +तेलुगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी, रामकृष्ण हेगडे हेकर्नाटकचे मुख्यमंत्री असताना, आपल्याच NTD पक्षाच्या १६१ आमदारांना, ते फुटीर नेते नरेंद्र भास्कर राव (Nadendra Bhaskar Rao) यांच्या गटात सामील होतील करतील या भीतीने बंगलोरला नेऊन ठेवले होते. +जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीया सरकारला, विधानसभेत अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या ४० आमदारांना बंगलोरला नेऊन ठवले होते. त्यावेळी एस.एम. कृष्ण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आमदारांची नेण्या-आणण्याची, राहण्याची, त्यांची खातिरदारी करण्याची सर्व जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली होती. +२००४ साली कर्नाटक राज्यात भारतीय पक्षाला ७९ जागा मिळवून तो सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा पक्ष ठरला. पण स्पष्ट बहुमत नसल्याने व इतर आमदारांची साथ न मिळाल्याने भाजपला सरकार बनवता आले नाही. अश्या वेळी ६५ जागा मिळवणाऱ्या कॉंंग्रेसने आणि ५८ आमदार असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाने युती करण्याचे ठरवले. पण ती होईपर्यंत आपले आमदार फुटून भारतीय जनता पक्षाला मिळू नयेत म्हणून जद(से)ने आपले ५८ आमदार बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. ही सर्व परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +काँग्रेसबरोबरची ही युती अल्पकाळच टिकली. २००६ साली जदसेने भाजपबरोबर युती केली. +कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांच्या जनता दल (सेक्युलर) या पक्षाने भाजपशी युती करण्यापूर्वी आपले आमदार फुटून काँग्रेसला मिळू नयेत म्हणून त्यांना बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. हीही परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली. +पूर्ण बहुमत न मिळू शकल्याने सरकार बनवता न येण्याच्या परिस्थितीत, भाजप पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी जी. जनार्दन रेड्डी व अरविंद लिंबावली यांच्या मदतीने पहिल्यांदाच कॉंंग्रेसचे व जद(से)चे ७ आणि काही अपक्ष आमदार यांना लुभावून बंगलोरच्या हाॅटेलात नेऊन बंदोबस्तात ठेवले. +बेल्लारीच्या रेड्डी बंधूंनी भाजपच्या १८ आमदारांना पळवून नेऊन बंगलोरला नेऊन ठेवले. यामुळे कर्नाटकामधील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सरकार धोक्यात आले. काँग्रेसने आणि जद(से)नेही आपल्या आमदारांना त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून बंगलोरच्या एका वेगळ्याच हाॅटेलात ठेवले. +काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या दुसऱ्यांदा होऊ घातलेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत, काँग्रेसने राज्यातील आपले आमदार बंगलोरजवळच्या बिदादी या गावात नेऊन ठेवले. हे काम त्यावेळी डी.के. शिवशंकर यांनी पूर्णात्वास नेले. +विभाजित बहुमतामुळे कर्नाटक विधानसभेत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला तोंड देण्यासाठी जद(से)ने आणि काँग्रेसने आपले आमदार बंगलोरमधील एका सुरक्षित निवासस्थानात नेऊन ठेवले. त्यांना योग्य वेळी विधानसभेत हजर केल्याने मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला. +कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस-जद(से) युतीच्या १३ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांनी परत जाऊन कर्नाटक सरकार वाचवू नये म्हणून विरोधी पक्षाने (भारतीय जनता पक्षाने) काँग्रेसचे आपले व जद(से)चे एकूण १७ आमदार पळवले आणि त्यांना बीजेपीचे राज्यसभा सभासद राजीव चंद्रशेखर यांच्या खासगी विमानाने मुंबईला नेले. (६ जुलै २०१९) अशीही बातमी होती की त्यांना मुंबईहून गोव्याला नेण्यात येणार होते. काँग्रेसने बीजेपीवर खुल्लमखुल्ला आमदार खरेदीचा आरोप ठेवूनही भाजपने आपले 'कमळ अभियान' चालूच ठेवले. .. त्याचा परिणाम म्हणून बीजेपीच्या सी.एन. अश्वत् नारायण आणि सीपी योगेश्वर या या विश्वासू नेत्यांचा उदय झाला. +बीजेपीने मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्या काँग्रेस पक्षातून १६ आमदारांना फूस लावून १० मार्च २०२० रोजी बंगलोरला नेऊन बंदिवासात ठेवले आहे. अजूनही (१९-३-२०२०पर्यंत) त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी हजर करण्यात येईल, असे भाजपने आश्वासन दिले आहे. राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी अधिवेशन बोलावून ताबडतोब विश्वासदर्शक ठराव पास करून घेण्याचा धोशा मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामागे लावला आहे. कमलनाथ आणि विधानसभेचे सभापती (श्री.प्रजापती) हे या धोश्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढत आहेत. बंगलोरहून आमदार परतल्यावर त्यांंची व्यक्तिशः मुलाखत घेऊन त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती झालेले नाही याची खात्री झाल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्याचा सभापतींचा निर्धार आहे. या १६ आमदारांपैकी मंत्री असलेल्या ६ आमदारांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे. +(तूर्त अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9619.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a95e6e8acdffe849c3984898dd5f1f98ef321b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9619.txt @@ -0,0 +1,5 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +बेंजामिन अँड्रु स्टोक्स (४ जून, इ.स. १९९१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +हा २०१७ च्या आयपीएल मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट संघातून खेळला. यासाठी त्याला १४ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते. +हा २०१८ च्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने साडे 12 कोटी रुपयांत विकत घेतले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9648.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c22d568cf9a2309c65f2aaa8f2e1e696b06fe25d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9648.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन हॅरिसन (इंग्लिश: Benjamin Harrison) (२० ऑगस्ट, इ.स. १८३३ - १३ मार्च, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणाऱ्या युनियन सैन्यात हा ब्रिगेडियर जनरल पदावर होता. यादवीनंतर इंडियाना संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून हा अमेरिकेची सेनेट सभागृहावर निवडून गेला. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9659.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b46ec3e9dba820e4eea002f213227e31ae22f39f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9659.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेंटन काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बेंटन काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9661.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af01e0d41e6b90fa6e77510a6582e3f8a6bbb802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9661.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेंटन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फोली येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,३७९ इतकी होती.[२] +बेंटन काउंटी सेंट क्लाउड नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9675.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508d87e7a638ae3620351709a1e224a0ce2c71e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9675.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 31°42′11″N 35°11′44″E / 31.70306°N 35.19556°E / 31.70306; 35.19556 + +बेथलेहेम हे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक प्रदेशातील एक शहर आहे. इस्रायलमधील जेरुसलेमहुन बेथलेहेम केवळ १० किमी अंतरावर आहे. बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते. +जेरुसलेमच्या दक्षिणेस जुडिया डोगरावर वसलेले हे बेंथलेहेम गाव. येथे गव्हाचे पिक फार मोठया प्रमाणात येते. जुन्या करारात या नगरीला “एफ्राता” म्हणत. जुन्या कराराच्या अगदी सुरुवातीपासून या नगरीस महत्त्वाचे स्थान मिळाले. याकोबाची लाडकी पत्नी रेचेल हिला याकोबाने येथेच पुरले. तिच्या स्मरणार्थ उभा केलेला स्तंभ आजही तेथे आहे. हिब्रू भाषेत बेंथलेहेम या शब्दाचा अर्थ होतो “भाकरीचे घर”. +मवाब देशातून आलेली नामीची विधवा सून रुथ येथील शेतात कणसे वेचीत असें. नामीच्या प्रयत्नामुळे तिचा बवाजाबरोबर पुनर्विवाह झाला. या रुथच्या वंशात दावीद राजाचा जन्म झाला. रुथ ही दावीद राजाची पणजी होय. दावीद हा बेंथलेहेमचा मेंढपाळ. गुरे राखणारा होता. पण देवाच्या आदेशानुसार शमुवेल भविष्यवाद्याने त्याला इस्राएलचा राजा होण्यासाठी तेलाने अभिषिक्त केले. त्यानुसार हाच दावीद इस्रायलचा पराक्रमी राजा बनला. याच दावीद कुळात योसेफ जन्मास आला. तो पवित्र मरीयेचा(मेरीचा) पती व प्रभू येशूचा पालक पिता होय. जणगणनेसाठी आपली नाव नोंदणी करण्यास योसेफ आपल्या या मूळ गावी आला होता. यावेळी पवित्र मरीयेचे दिवस भरले होते. अशा रीतीने या गावी पवित्र मरीयेच्या उदरी प्रभू येशूचा जन्म झाला. बेंथलेहेम गाव प्रभू येशूच्या जन्माने अजरामर झाले. या गावात ख्रिस्ती लोकवस्ती जास्त असून चर्च व मठवासीयांच्या खूप इमारती आहेत. सांजसकाळ चर्चचा घंटानाद व मठवासीयांच्या गायनाचे सूर कानी पडतात.[१] +मधील शहरे]] +[[वर्ग:पॅलेस्टाईन diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9683.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b8f9086bc9bf2ca44a6efe4ac70f13e62ee586b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9683.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेंद्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9695.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1acfd61db2768e8f56bd9c936deeb356e063f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9695.txt @@ -0,0 +1 @@ +बियंत सिंग (फेब्रुवारी १९, १९२२ - ऑगस्ट ३१, १९९५) हे इ.स. १९९२-९५ सालांदरम्यान भारताच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. बियंत सिंग काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9702.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..123bf0f0467f6ed73cf3e18d28ea2af83e4db80d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9702.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेकन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9769.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9769.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9774.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da3beff6e851023131ab67b31be38e6ada3c41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9774.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बेटा हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. इंद्र कुमारने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित व अरुणा इराणी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9781.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09a763699c7e58eaae39690f53519717530cd39c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9781.txt @@ -0,0 +1 @@ +हेलन एलिझाबेथ बेटी आर्चडेल (२१ ऑगस्ट, १९०७:लंडन, इंग्लंड - १ जानेवारी, २०००:ऑस्ट्रेलिया) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. आर्चडेलने इंग्लंडच्या पहिल्या वहिल्या महिला कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9796.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee12d63a29e677ba1490d3b2bd62fdc496410ca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9796.txt @@ -0,0 +1,6 @@ +बेटेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. +हे पालघर शहरापासून १५ किमी अंतरावर वसलेले आहे.बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ५ किमी अंतरावर आहे. बोईसरला औद्योगिक वसाहत तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असल्याने मुंबईवरून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आगगाड्या बोईसर ह्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर थांबतात. बोईसरवरून अॉटोरिक्क्षा/डमडमची सोय सुद्धा उपलब्ध आहे. +मुख्यतः शेती व्यवसाय असणारे येथील लोक बोईसर औद्योगिक विकास क्षेत्रात नोकरी तसेच उद्योग उपलब्ध झाल्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता लहान मोठे व्यवसाय सुरू करून स्थिरस्थावर झाले आहेत. येथे नामांकित कंपन्यांनी घरबांधणी प्रकल्प उभे केले आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9802.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a1e05b44f9010665e7408f78e6bcde21ce00204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9802.txt @@ -0,0 +1 @@ +बेट्टी आयरीन थॉर्नर (२३ फेब्रुवारी, १९३८:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9806.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a1e05b44f9010665e7408f78e6bcde21ce00204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9806.txt @@ -0,0 +1 @@ +बेट्टी आयरीन थॉर्नर (२३ फेब्रुवारी, १९३८:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9830.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c11a9b3395255596f64b68a883abf7e80c028ebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9830.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेडफर्ड काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बेडफर्ड काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9832.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87e453a70f00cfc55d0e60cabc4e4f202b022d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9832.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेडर यांना कर्नाटकी आदिवाशी धेड किंवा ढेड म्हणून ओळखले जाते . विजापूरच्या पुर्वेला असणाऱ्या भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्यभागात बेडर लोकांचे राज्य होते .यांची संभावना हिंदू जातीव्यवस्थेत खालच्या आणि अस्पृश्य वर्गात होते . हे लोक अतिशय शक्तिशाली आणि कष्टकरी असतात . ऐतिहासिक दस्ताऐवजात बेरड लोक गाय, बकरे, डुक्कर , कोंबडे यांचे मांस खातात अशी नोंद आढळते . यांचा रंग सावळा, शरीरयष्टी सुगठीत, चेहरा गोल, ओठ चपटे, उंची मध्यम अशी सांगितली आहे. हे लोक कठिण जीवन जगतात . मराठा सैनिकांमध्ये पट्टीचे निशाणेबाज म्हणून बेडर लोकांची भरती होत असे . औरंगजेबाच्या कितीतरी सैनिकांना बेडर नेमबाजांनी ठार केले होते .20 जानेवारी 1696ला बसवापट्टणच्या लढाईत हिम्मतखाँ नावाच्या औरंगजेबाच्या सरदाराला बेरड जातीच्या नेमबाजांनी खुप +दुरून मस्तकावर गोळी घालून ठार केले होते .मराठा सेनानायक संताजी घोरपडे यांच्या सैनिकांमध्ये अधिकांश बेडर सैनिकांची भरती होत असे. युद्धात ज्याप्रमाणे हे लोक शौर्य़ दाखवत त्याच्यामुळे समकालीन इतिहासकार यांना बेडर ( निर्भिक ) म्हणत होते . विजापुरपासून 75 किलोमीटर अंतरावर सागर या ठिकाणी बेडर लोकांची राजधानी होती . इसवी सन 1687 मध्ये मुघलांनी सागर जिंकून घेतल्यावर बेडर राजाने जवळच्या वाघिणखेडा या ठिकाणी आपली नवी राजधानी बनवली. जेव्हा हेही स्थान मुघलांनी जिंकून घेतले तेव्हा बेरड राजाने राजधानी शोरापुर येथे बनवली. पाम नायक (नाईक), पिडीया नायक(नाईक) यासारखे उल्लेखनीय बेडर राजे यांचा इतिहासात उल्लेख सापडतो. राजा पिडीया नाईक ( नायक ) याच्या सैन्यात बारा हजार बंदुकधारी निशाणेबाज होते . diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9888.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75b78c1902453f0b281038e83e11c0b9edc31bac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9888.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड बेन-गुरियन (हिब्रू: דָּוִד בֶּן-גּוּרִיּוֹן; १६ ऑक्टोबर, १८८६ - १ डिसेंबर, १९७३) हा इस्रायल देशाचा संस्थापक व पहिला पंतप्रधान होता. बेन-गुरियन कट्टर ज्यू राष्ट्रीयवादी होता व त्याने १४ मे १९४८ रोजी पॅलेस्टाइन भूभागावर स्वतंत्र इस्रायल देशाची घोषणा केली. +विसाव्या शतकात कार्यरत असलेल्या जगातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते. बेन-गुरियनच्या स्मरणार्थ तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ तसेच इस्रायलमधील असंख्य महत्त्वाच्या इमारती व वास्तूंना त्याचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9902.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bebd5a41937e4733b472bb4ceed895493b3d26c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9902.txt @@ -0,0 +1,6 @@ + +ऑस्कर पुरस्कार +ॲंजेला मोरांत(१९६६-१९७२) +ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२) +अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५) +बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटिश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9922.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9922.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9934.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d74785fd39592f32d67de63dbef8b197dee5075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9934.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन जेम्स बेन सीली (१२ ऑगस्ट, १८९९:त्रिनिदाद व टोबॅगो - १२ सप्टेंबर, १९६३:त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९३३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9961.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082fa473a940bf2ef551d9c55d9b18b6058c4e57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9961.txt @@ -0,0 +1,5 @@ +१२L/३०R +१२,९६६ +३,९५२ +डांबरी +बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MEX, आप्रविको: MMMX) अथवा मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरातील मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9973.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b501392ea03fd8031c301d1013c9bc63a35bb32a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9973.txt @@ -0,0 +1 @@ +बेनी बेहानन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9978.txt b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f23d872e5b45d0649697909ae6fb25ad9cac8259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_9978.txt @@ -0,0 +1,6 @@ +बेने इस्रायल (हिब्रू : בני ישראל‎) म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. प्रचलित समज असा आहे की, दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील धार्मिक जाचाला कंटाळून समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग-नागावच्या किनाऱ्यावर आली. +स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही. +बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात. +मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात. +हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. ठाण्याच्या परिसरात अशी सिनेगॉग आहेत. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत. +बेने इस्रायलीपैकी फक्त पोक्त माणसे जुदाव मराठी ही भाषा बोलतात.