Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10006.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10037.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10049.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10053.txt +35 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10073.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10077.txt +9 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10084.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10087.txt +49 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10119.txt +45 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10149.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10155.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10158.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10174.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10176.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10180.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10188.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_1019.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10200.txt +9 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10207.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10217.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10224.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10240.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10248.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10251.txt +11 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10267.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10297.txt +14 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10301.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10313.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10322.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10329.txt +10 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10355.txt +207 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10379.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10381.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10446.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10448.txt +7 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10462.txt +14 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_1047.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10483.txt +13 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10491.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10494.txt +9 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10513.txt +19 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10524.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10528.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10535.txt +24 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10537.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10573.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10584.txt +12 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10586.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10594.txt +70 -0
- dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10607.txt +2 -0
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10006.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.
|
| 2 |
+
छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते.
|
| 3 |
+
हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.[१]
|
| 4 |
+
प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.[२]
|
| 5 |
+
ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10037.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०१८ हे भारतीय राज्य छत्तीसगड विधानसभेच्या सदस्यांना निवडण्यासाठी आयोजित करण्यात आली. एकूण ९० जागांसाठी निवडणूक दोन टप्प्यात करण्यात आली; दक्षिण छत्तीसगढमधील १८ जागा प्रथम १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या आणि उर्वरित ७२ जणांसाठी २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा मतदान झाले होते. छत्तीसगड हे आदिवासीबहुल राज्य आहे अधून-मधून या राज्यांमध्ये माओवादी किंवा नक्षलवादी त्यामुळे पायाभूत सुविधांची शिक्षणाची तसेच रोजगाराची कमतरता असल्याने येथील आदिवासी मुख्य प्रवाहापासून तुटलेला आहे त्यांना या संकटातून सोडविण्याचे आमिष दाखवून माओवाद्यांकडून त्यांची जबरदस्तीने चळवळीत भरती करून घेतली जाते त्याचप्रमाणे पोलिसांचा कायमचा ससेमिरा त्यांच्या मागे लागतो. अशा अनेक अडचणीवर मात करून तेथील आदिवासी महिलांनी नुकताच एक मूलभूत अधिकार मिळवलेला आहे. कुटुंबनियोजनाच्या संदर्भामध्ये येथील महिला दक्ष झालेल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून या लोकांना वेगवेगळी आश्वासनं निवडणुकांच्या वेळेस दिली जातात. मात्र अद्यापही पुरेशा सुविधा किंवा अनेक उपाययोजना, विकासाची दिशा यापासून हे राज्य बरेच दूर राहिलेले आहे.
|
| 3 |
+
बहुतेक एक्झिट पोलने भाजप आणि आयएनसी यांच्यात "कडक समाप्ती" असल्याचे भाकीत केले. दि वायर ने भाजपसाठी ४४ जागा, आयएनसीसाठी ४२, बसपासाठी २ आणि जेसीसीसाठी प्रत्येकी एक आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून अनुमान केले.
|
| 4 |
+
आसन आणि मत शेअर होता खालील प्रमाणे -
|
| 5 |
+
एकूण
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10049.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती ही एक भारतीय शाही उपाधी आहे.ती राज्याभिषेक झालेल्या हिंदू राजाच्या नावाआधी वापरली जाते. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेच छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा होय.(छत्रपती म्हणजे चक्रवर्ती राजा)
|
| 2 |
+
|
| 3 |
+
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर लिहिलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या एक अभंगात छत्रपती शब्दाचा उल्लेख आहे.
|
| 4 |
+
“शिव तुझे नाव। ठेविले पवित्र।
|
| 5 |
+
छत्रपती सूत्र। विश्वाचे की।”
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10053.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,35 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले (१६७५ - १७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला.
|
| 7 |
+
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
|
| 8 |
+
ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.
|
| 9 |
+
दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
|
| 10 |
+
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
|
| 11 |
+
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
|
| 12 |
+
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
|
| 13 |
+
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
|
| 14 |
+
प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभा��ा || "
|
| 15 |
+
असे तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे वर्णन केले आहे.
|
| 16 |
+
ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.
|
| 17 |
+
सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे वारसाहक्काने जायला हवे होते. त्यावेळी शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.
|
| 18 |
+
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या लढाईत बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली.[१] ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहूला मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे , पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. परंतु १७१४ मध्ये राजारामची दुसरी विधवा, राजसाबाई यांनी ताराबाई पदच्युत करून स्वतःचा मुलगा संभाजी (दुसरा) याला गादीवर बसवले. ताराबाई आणि तिच्या मुलाला दुसऱ्या संभाजीने कैद केले. शिवाजी (दुसरा) १७२६ मध्ये मरण पावला. ताराबाई नंतर १७३० मध्ये छत्रपती शाहूंशी समेट करून कोणताही राजकीय अधिकार न ठेवता सातारा येथे राहायला गेल्या. [२]
|
| 19 |
+
सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. ३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे ,पिलाजी गोळे, गिरजोजी यादव आदी मातबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.
|
| 20 |
+
राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले, सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले.[३] मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले, व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.[४]
|
| 21 |
+
सन १७०७ साली औरंगजेबाचा अहमदनगरजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला. महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.
|
| 22 |
+
त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
|
| 23 |
+
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसें���र १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.
|
| 24 |
+
संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकिर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.
|
| 25 |
+
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या.
|
| 26 |
+
१७४० च्या दशकात शाहूच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत ताराबाईंनी त्यांच्याकडे एक मूल आणले: राजाराम दुसरा (ज्याला रामराजा देखील म्हटले जाते). तिने मुलाला आपला नातू आणि शिवाजी महाराजांचा थेट वंशज म्हणून सादर केले तिने असा दावा केला की त्याच्या संरक्षणासाठी तो जन्मल्यानंतर लपविला गेला होता आणि एका राजपूत सैनिकाच्या पत्नीने त्याला वाढवले होते.[५] ह्या मुलाला शाहूने दत्तक घेतले कारण त्याला स्वतःचा मुलगा नव्हता..
|
| 27 |
+
१७४९ मध्ये शाहूच्या मृत्यूनंतर, राजाराम द्वितीय त्याच्यानंतर छत्रपती झाला. जेव्हा पेशवा बालाजी बाजीराव मुघल सरहद्दीवर रवाना झाले तेव्हा ताराबाईंनी राजाराम द्वितीयला बालाजी बाजीराव यांना पेशव्याच्या पदावरून काढून टाकण्यास उद्युक्त केले. जेव्हा राजाराम यांनी नकार दिला, तेव्हा 24 नोव्हेंबर 1750 रोजी तिने त्याला सातारा येथील अंधारकोठडीत कैद केले. तिने दावा केला की तो एक ढोंगी आहे आणि तिने शाहूसमोर राजाराम आपला आपला नातू म्हणून खोटी साक्ष दिली होती..[६] यापूर्वी, ऑक्टोबर १ 1750० मध्ये ताराबाईंनी पेशवाविरोधी, उमाबाई दाभाडे यांची भेट घेतली होती. उमाबाईंनी ताराबाईंच्या समर्थनार्थ दामाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात १५,००० सैन्य पाठवले. गायकवाड यांनी साताऱ्याच्या उत्तरेस निंब येथे एका लहानशा गावात पेशवाईचा निष्ठावंत त्र्यंबकराव पुरंदरे यांच्या नेतृत्वात असलेल्या २०,००० बलाढ्य सैन्याचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी साताऱ्याला कूच केले, जिथे त्यांचे ताराबाईंनी स्वागत केले. तथापि, त्र्यंबकरावांन��� पुन्हा आपले सैन्य स्थापन केले आणि १ मार्च रोजी वेण्णा नदीच्या काठावर असलेल्या गायकवाडच्या सैन्यावर हल्ला केला. या युद्धात गायकवाड यांचा पराभव झाला व त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले..[७]
|
| 28 |
+
दरम्यान, पेशवे मोगल सीमेवरून परत आले आणि २४ एप्रिल रोजी सातारा येथे पोहोचले. त्यांनी ताराबाईच्या सैन्यांचा पराभव करीत सातारा येथील यवतेश्वरच्या चौकीवर हल्ला केला. त्यांनी सातारा किल्ला घेरला, आणि ताराबाईंना छत्रपती राजारामला सोडण्यास सांगितले. त्यावेळी राजारामाची शारीरिक व मानसिक स्थिती खूपच खालावली होती. ताराबाईंनी नकार दिला आणि पेशवे पुण्याला निघून गेले कारण सुसज्ज आणि मजबूत सातारा किल्ला घेण्यास सोपा होणार नव्हता. दरम्यान, पेशवाईच्या माणसांनी दामाजी गायकवाड, उमाबाई दाभाडे आणि त्यांच्या नातेवाईकांना अटक केली.
|
| 29 |
+
त्याचवेळी सातारा सैन्याच्या तुकडीने तिच्याविरुद्ध बंड केले. तिने बंडखोरांचे नेते आनंदराव जाधव यांचा शिरच्छेद केला. तथापि, तिला समजले की ती पेशव्यांविरुद्ध लढू शकणार नाही आणि शांततेच्या करारासाठी पुण्यात भेटण्याची तयारी दर्शविली. पेशव्यांचा प्रतिस्पर्धी जानोजी भोसले हा पुष्कळ सैन्य घेऊन पुण्याजवळ होता आणि त्यामुळे पेशव्यानी तिचे संरक्षण करण्याचे मान्य केले. पुण्यात पेशवे तिच्याशी आदराने वागले आणि, काही नाखुषीनंतर ताराबाईंनी पेशव्याचे श्रेष्ठत्व स्वीकारले. पेशवे यांना नापसंत करणारे सरदार जाधव यांना काढून टाकण्याचे तिने मान्य केले. त्या बदल्यात पेशवाईने तिला माफ केले. १ सप्टेंबर १७५२ रोजी दोघांनी परस्पर शांततेचे वचन देऊन जेजुरीतील खंडोबा मंदिरात शपथ घेतली. या शपथविधीत ताराबाईंनीही शपथ घेतली की राजाराम दुसरा तिचा नातू नाही. तथापि, पेशव्यांनी राजारामला एक शक्तीहीन छत्रपती म्हणून कायम ठेवले.[५][२]
|
| 30 |
+
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
|
| 31 |
+
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
|
| 32 |
+
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
|
| 33 |
+
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
|
| 34 |
+
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
|
| 35 |
+
डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर, डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. सदाशिव शिवदे अशा अनेक लेखकांनी महाराणी ताराबाईंवर ग्रंथ लिहिले आहेत.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10073.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर व हैदराबाद पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
|
| 2 |
+
कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10077.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला.
|
| 7 |
+
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
|
| 8 |
+
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्त्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, सेखोजी थोरात, चिमणाजी दामोदर, सुभानजी आटोळे, पुरंदरे यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंच्या मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.
|
| 9 |
+
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10084.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४७ साली शिक्षणाचा प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत व्हावा या उद्देशाने १९४७ साली कॅंप भागात ह्या महाविद्यालयाची स्थापना केली. भाऊराव पाटलांना विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करायची होती मात्र मागणीनुसार त्यांनी कला महाविद्यालय स्थापन केले. पण लवकरच त्यांनी विज्ञान व वाणिज्य विभागाची अनुक्रमे १९५८ व १९५९ साली स्थापना केली. नंतर या विभागांची १९६५ व १९७१ साली यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय अशी स्वतंत्र महाविद्यालये सुरू केली.
|
| 2 |
+
रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले महाविद्यालय असून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. बहुजन समाजाचा उद्धार व्हावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून तळागाळातील समाजाला उच्च शिक्षण मिळावे या उद्दात्त हेतूने हे महाविद्यालय अण्णांनी स्थापना केली. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडून विविध अधिकार पदावर कार्यरत आहेत.
|
| 3 |
+
या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असून या केंद्रामधून सुमारे ६००हून अधिक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10087.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,49 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
{{{1}}} {{{5}}}
|
| 2 |
+
{{{2}}} {{{6}}}
|
| 3 |
+
{{{3}}} {{{7}}}
|
| 4 |
+
{{{4}}} {{{8}}}
|
| 5 |
+
मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
|
| 6 |
+
|
| 7 |
+
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
|
| 8 |
+
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
|
| 9 |
+
जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.
|
| 10 |
+
विश्व विपस्सना पॅगोडा ·
|
| 11 |
+
अजिंठा लेणी ·
|
| 12 |
+
कास पठार ·
|
| 13 |
+
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ·
|
| 14 |
+
दौलताबादचा किल्ला ·
|
| 15 |
+
रायगड किल्ला ·
|
| 16 |
+
लोणार सरोवर
|
| 17 |
+
आग्रा किल्ला •
|
| 18 |
+
अजिंठा लेणी •
|
| 19 |
+
सांचीचा स्तूप •
|
| 20 |
+
चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •
|
| 21 |
+
छत्रपती शिवाजी टर्मिनस •
|
| 22 |
+
वेल्हा गोवा •
|
| 23 |
+
घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •
|
| 24 |
+
वेरूळची लेणी •
|
| 25 |
+
फत्तेपूर सिक्री •
|
| 26 |
+
चोल राजांची मंदिरे •
|
| 27 |
+
हंपी •
|
| 28 |
+
महाबलिपुरम •
|
| 29 |
+
पट्टदकल •
|
| 30 |
+
हुमायूनची कबर •
|
| 31 |
+
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •
|
| 32 |
+
केवलदेव राष्ट्रीय उद्यान •
|
| 33 |
+
खजुराहो •
|
| 34 |
+
महाबोधी विहार •
|
| 35 |
+
मानस राष्ट्रीय उद्यान •
|
| 36 |
+
भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •
|
| 37 |
+
दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •
|
| 38 |
+
निलगिरी पर्वतीय रेल्वे •
|
| 39 |
+
कालका−सिमला रेल्वे) •
|
| 40 |
+
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •
|
| 41 |
+
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •
|
| 42 |
+
सह्याद्री पर्वतरांग •
|
| 43 |
+
कुतुब मिनार •
|
| 44 |
+
लाल किल्ला •
|
| 45 |
+
भीमबेटका •
|
| 46 |
+
कोणार्क सूर्य मंदीर •
|
| 47 |
+
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •
|
| 48 |
+
ताजमहाल •
|
| 49 |
+
जंतर मंतर
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10119.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,45 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
१९° ५२′ ४८″ N, ७५° १९′ १२″ E
|
| 3 |
+
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[२] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[३]
|
| 4 |
+
पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून "औरंगाबाद" केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिट��श राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[४]
|
| 5 |
+
|
| 6 |
+
औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता.
|
| 7 |
+
इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे.
|
| 8 |
+
इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला.
|
| 9 |
+
इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला.
|
| 10 |
+
निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले.
|
| 11 |
+
हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.
|
| 12 |
+
या शहराला "औरंगाबाद" हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव "खडकी" होते.[५] शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती.[६][७]
|
| 13 |
+
२९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असे शहराचे नामांतर केले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला नरेंद्र मोदी सरकार कडून सुद्धा औरंगाबाद या शहराला 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णयास मंजूरी देण्यात आली.[८] तथापि, यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुका यांचे नामकरण झाले नव्हते.
|
| 14 |
+
भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश १९°५३'४७" - पूर्व रेखांश ७५°२३'५४" याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते.
|
| 15 |
+
तापमान : छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.[९]
|
| 16 |
+
पर्जन्यमान : पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन��यमान हे ७२५ मिलीमीटर असते.
|
| 17 |
+
साचा:Infobox Weather
|
| 18 |
+
औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
|
| 19 |
+
औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते.
|
| 20 |
+
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे.
|
| 21 |
+
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत
|
| 22 |
+
गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो
|
| 23 |
+
कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.
|
| 24 |
+
येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे.
|
| 25 |
+
प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे.
|
| 26 |
+
जेष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, साहित्यिक प्र . ई. सोनकांबळे, कवी वीरा राठोड, कविवर्य प्रा.दासू वैद्य, बालकवी गणेश घुले आदी अनेक नावे उल्लेखनीय आहेत.
|
| 27 |
+
ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यान पर्यटनाच्या दृष्टीतून अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याच औरंगाबादने कितेक वर्षांपासून नाट्य व सिने क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम अव्वल स्थानी राखून आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अजित दळवी द्वारा लिखित अनेक नाटकांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर कोरलीत. अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. शिवाय प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चला हवा फेम योगेश सिरसाठ, बाळू मामांच्या नावाने चांगभल, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची ग जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दिपक अंभुरे, प्रविण डाळिंबीकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे, आदी दिग्गज कलावंतानी आपल्या करीयरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार देशमुख, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक नामवंत कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्यातह��. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.
|
| 28 |
+
नामांकित असे यशराज मुखाटे उत्कृष्ट संगीत करणारे हे देखील संभाजीनगर चे आहेत .
|
| 29 |
+
छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे.
|
| 30 |
+
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे.
|
| 31 |
+
छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे.
|
| 32 |
+
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ.
|
| 33 |
+
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिले���्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने "मराठवाडा विद्यापीठ" याचे नाव बदलून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे केले. या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत.
|
| 34 |
+
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापण करण्यात आले. हे मुंबई व नागपूर नंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे भारताच्या २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे.
|
| 35 |
+
बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरू झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात.
|
| 36 |
+
|
| 37 |
+
इथे अंदाजे १५०० सुफी संतांना दफनविण्यात आलेले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 38 |
+
देवगड - दत्ताचे देवस्थान. मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत
|
| 39 |
+
|
| 40 |
+
हॉस्पिटल
|
| 41 |
+
घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ, खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते.
|
| 42 |
+
भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "सिटी ऑफ गेट्स" म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाते.
|
| 43 |
+
52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस (पॅलेस ऑफ निजाम) जवळ भडकल गेट आहे.
|
| 44 |
+
वाडीचा किल्ला.
|
| 45 |
+
सोयगाव शहारा पासून 4 किमी अंतरावर वडीचा किल्ल��� आहे येथील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षणीय आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10149.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रीवाली ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10155.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10158.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छपारा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10174.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.
|
| 2 |
+
छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते.
|
| 3 |
+
हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.[१]
|
| 4 |
+
प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.[२]
|
| 5 |
+
ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10176.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
या पद्धतीत मुळया न फुटलेल्या छाट्यावर कलमफांदीच्या छाट्याचे भेटकलम करून टे रुजवणमाध्ममात रुजवणीला ठेवतात. पूर्वी ही पद्धत खुंट व कलमफांदी यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यासाकरता वापरत. मात्र ही रूजवण सूक्ष्मफवारापद्धतीच्या सहायाने करतात . कारण यात खुंटछाटे व कलमफांदी दोन्हीवर पाने असतात. आता ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. लिंबूवर्गीय फळझाडांच्या बाबतीत शाकिय खुंट वापरून अभिवृद्धी करतात. जिभली-कलम पद्धतीने कलमफांदी खुंट ट्याछावर बांधून खुंटछाट्याला संजीवकाचा वापर करून रूजवण माध्यमात व सूक्ष्मफवारागृहात रूजवणीला ठेवतात. या पद्धतीत खुंट व फांदीकलमाचा एकजीव होतो . व खुंटछाट्याला मुळया फुटतात . नंतर हे कलम माध्यमातून काढून कुंडीत लावतात.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10180.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छाया गांगुली ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. २६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "आपकी याद आती राही रात भर" या तिच्या पहिल्या चित्रपट गीतासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१][२] याच गाण्यासाठी, तिला २७ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकचा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[३]
|
| 2 |
+
गांगुलीचा जन्म १९५२ मध्ये मुंबईत झाला. तिने बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून वनस्पतिशास्त्रात एम.एससी पदवी मिळवली.[१] तिने ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठी ३५ वर्षे मुंबईत ब्रॉडकास्टिंग प्रोग्रामर म्हणून काम केले आणि २०१२ मध्ये त्या निवृत्त झाल्या.[४]
|
| 3 |
+
१९७८ मध्ये आलेल्या गमन या हिंदी चित्रपटात तिला पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी मिळाली. हा चित्रपट दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यात फारुख शेख, स्मिता पाटील यांनी भूमिका केल्या होत्या आणि नाना पाटेकर यांचाही हा पहिला चित्रपट होता. चित्रपटाचे संगीत जयदेव यांनी दिले होते आणि "आप की याद आती राही" हे गाणे मकदूम मोहिउद्दीन यांनी लिहिलेली गझल होती. या गाण्याला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्येही नामांकन मिळाले होते, पण मीरा (१९७९) चित्रपटातील तिच्या "मेरे तो गिरिधर गोपाल" या गाण्यासाठी वाणी जयरामला हा पुरस्कार देण्यात आला. जयदेवयांना पण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन हा पुरस्कार मिळाला व मुझफ्फर अली यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला.[१] गांगुलीने गझल गायिका मधुराणी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले, जिची तिची भेट जयदेव यांच्यामार्फत झाली, ज्याने गमनाचे संगीत दिले. मात्र, इतके यशस्वी गाणे रेकॉर्ड केल्यानंतर ती अंधारातच राहिली.
|
| 4 |
+
तिने मधुसूदन दिग्दर्शित १९८३ मधील त्रिकोन का चौथा कोन या हिंदी चित्रपटातील "पिया पिया" हे गाणे गायले. दीर्घ विश्रांतीनंतर, ती १९९० मध्ये परतली आणि भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अमोल पालेकरच्या थोडासा रूमानी हो जायें या चित्रपटासाठी ती शीर्षकगीत गायले. ही रचना तिच्या बास आवाजाची आणि तिच्या श्रेणीची चाचणी करते, उच्च आणि निम्न दोन्ही स्वर समान च��ुराईने तिने सादर केले आहे.[४] १९९२ च्या करंट चित्रपटात तिने एल. वैद्यनाथन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांसाठी आणि के. हरिहरन दिग्दर्शित चित्रपटासाठी "घडी घडी होये मन मेरे" हे गाणे गायले. ओम पुरी आणि दीप्ती नवल यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून हा चित्रपट ग्रामीण भारतातील शेतकऱ्याच्या दुर्दशेवर केंद्रित आहे.
|
| 5 |
+
गैर-फिल्मी अल्बममधील तिची गाणी दीर्घ आयुष्य जगली आहेत. गांगुलीने चित्रपट निर्माता आणि संगीतकार मुझफ्फर अली यांच्यासोबत हसन-ए-जाना (१९९७) आणि पैगाम-ए-मोहब्बत (२०००) या अल्बममध्ये काम केले आहे. तिने अहमद फराज, इब्न-ए-इंशा, नजीर अकबराबादी, अमीर खुस्रोची आणि मीर तकी मीर यांच्या कविता गायल्या आहे. हसन-ए-जाना अल्बममधील "झिहाल-ए-मिस्किन" हे तिचे सर्वात लोकप्रिय सूफी गाणे आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10188.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छायाचित्रकार म्हणजे छायाचित्रे काढणारी व्यक्ति आहे.जी व्यक्ति छाया उपकरण(कॅमेरा) वापरून अथवा सध्या मोबाईल वापरून छायाचित्रे काढते अश्या व्यक्तिस छायाचित्रकार म्हणतात.
|
| 2 |
+
चित्रपट किंवा दूरचित्रवाणीच्या मालिका या संदर्भात त्या संपूर्ण चित्रपटाचे किंवा मालिकेचे चित्रीकरण करते ती व्यक्ति म्हणजे छायाचित्रकार. याबद्दलचे ऋणनिर्देश चित्रपटाचे अथवा मालिकेचे प्रारंभी अथवा शेवटी करण्यात येतात.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_1019.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गडवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10200.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.
|
| 2 |
+
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे फार पराक्रमी होते. असे म्हणतात की ते एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूशी मुकाबला करीत.
|
| 3 |
+
छत्रपती संभाजी महाराजान वर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा ' या कादंबरीचा समावेश होतो.
|
| 4 |
+
१४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितींशी निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनला.
|
| 5 |
+
जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.
|
| 6 |
+
राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
|
| 7 |
+
पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगझेबचा मुलगा सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने करून औरंगझेबला शह द्यायचा या साठी ते दिलेरखानाच्या छावणीत स्वराज्यावर नाराज असल्याचे दाखवून गनिमीकावा खेळला. या त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का ही होत्या. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे.
|
| 8 |
+
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत ���ंभाजीराजांपेक्षा जास्त होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्यांचे व लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करते.
|
| 9 |
+
पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10207.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 36°4′1″N 120°22′58″E / 36.06694°N 120.38278°E / 36.06694; 120.38278
|
| 2 |
+
|
| 3 |
+
छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद : क्विंगदाओ) हे चीन देशातील पूर्वेच्या षांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षी ओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.
|
| 4 |
+
विकिव्हॉयेज वरील छिंगदाओ पर्यटन गाईड (इंग्रजी)
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10217.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिद्रता (इंग्रजीत पोरोसिटी Porosity). कुठलीही घन वस्तूचे दिखाऊ वस्तुमान हे छिद्रतेवर अवलंबून असते व खऱ्या वस्तूमानापेक्षा कमी असते. छिद्रता जितकी जास्ती तितके दिखाऊ वस्तूमान कमी भरते. उदा स्पंज स्पंजची छिद्रता ही खूप असते त्यामूळे त्याचे खऱ्या वस्तूमानापेक्षा स्पंज बराच हलका असतो. तसेच छिद्रता जितकी जास्त तितके त्या वस्तूत पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10224.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिन षी ह्वांग (देवनागरी लेखनभेद: छिन ष ह्वांग, छिन्-ष हुआंग, च्हिन ष हुआंग ; नवी चिनी चित्रलिपी: 秦始皇; जुनी चिनी चित्रलिपी: 秦始皇; फीनयीन: Qín Shǐ Huáng; उच्चार: छिन्-षऽ-हुआऽऽङ्ग) (इ.स.पू. २५९ - सप्टेंबर १०, इ.स.पू. २१०) हा छिन् राज्याचा राजा, एकीकृत चिनाचा पहिला सम्राट, छिन् राजवंशाचा आणि पहिल्या चिनी साम्राज्याचा संस्थापक होता.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10240.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छोटा आर्ली (इंग्लिश: Small Pratincole)हा प्रॅंटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे. हा आकाराने चिमणीएवढा असतो. करड्या रंगाचा नदीकाठचा पक्षी. पाकोळीसारखे टोकदार पंख असतो. त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते. तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवाघुळासारखा दिसतो. त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला, धुरकट तपकिरी असतो. पोटाचा रंग पांढरा असतो. डोळे आणि चोचीला सांधणारी काळी पट्टी असते वर उडताना खालचा भाग पांढुरका आणि त्यावर काळ्या रेषा दिसतात. आखूड पांढऱ्या शेपटीवर काळा ठिपका असतो. छोटा आर्ली हे समूहाने राहतात.
|
| 2 |
+
हे पक्षी पश्चिम पाकिस्तान, भारत, नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते.
|
| 3 |
+
त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10248.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छोटा खरूचि, चिनी ससाणा, चिमण नारझी किंवा चिमण नारझिनक (इंग्लिश: Lesser Kestrel) हा एक पक्षी आहे.
|
| 2 |
+
चिनी ससाणा हा पक्षी कबुतरापेक्षा आकाराने मोठा आहे. त्यात नराचे पंख मोठे असतात व त्यांचा रंग निळा करडा असतो. पोटाखालील भाग तांबूस पिवळट रंगाचा असतो. पंखांखालचा भाग पांढरा असतो. त्यावर कसलीही चिन्हे नसतात.
|
| 3 |
+
मादी: अस्पष्ट मिशा ,आकार लहान आसतो .मादी ही बेधडकपणे उड्डाण करते. ती उडणारे कीटक हवेतच पकडते. मादी शुभ्र अथवा पिवळसर वर्णाची असते. ती फांदीवर बसून पंखांच्या सहाय्याने घास चोचीजवळ नेते. हे पक्षी थव्याने किंवा एकटेही राहतात.
|
| 4 |
+
गिलगीट हरियाना आणि नेपाळ ते आसाम व आजूबाजूच्या प्रांतात आढळतात. दक्षिणेकडे महाराष्ट्र (सोलापूर, अहमदनगर) तामिळनाडू, ओरिसा या भागात हिवाळ्यात आढळतात त्यामुळे त्यांना हिवाळी पाहुणे म्हणतात.
|
| 5 |
+
तुर्कस्तान ते पूर्वेकडे मांचुरिया आणि उत्तर चीन मध्ये आढळतात.
|
| 6 |
+
माळराने, गवती कुरणे आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10251.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती.
|
| 2 |
+
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे (415021) या गावी १० मार्च, इ.स. १९१८ रोजी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.
|
| 3 |
+
कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणाऱ्या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.
|
| 4 |
+
प्र.के. अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला[१]. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला[२]. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.
|
| 5 |
+
छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व इतक्या सुंदर करायचे की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले होते.
|
| 6 |
+
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत[३].
|
| 7 |
+
इ.स. १९६३मधे त्यांनी काही कलाकारांसह छोट्या गंधर्वांनी 'कलाविकास' (छोटा गंधर्व कन्सर्न) ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
|
| 8 |
+
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.
|
| 9 |
+
वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते 'दुसरे बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.
|
| 10 |
+
संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ'मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
|
| 11 |
+
हे सुद्धा पहा : छोटा गंधर्व याची ”आठवणीतली गाणी"
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10267.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
छोटी सी बात हा इ.स. १९७६ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10297.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,14 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंगम विक्री अधिनियम : जंगम मालाच्या खरेदीविक्री व्यवहाराचे नियमन करणारा अधिनियम. १९३० साली भारतीय जंगम विक्री अधिनियम स्वतंत्रपणे अस्तित्वात आला व त्यान्वये तत्पूर्वी या व्यवहाराचे नियमन करीत असलेली संविदा अधिनियमाची ७३ ते १२३ कलमे रद्द करण्यात आली. १९६३ च्या सुधारित अधिनियमाने भारतीय शब्द वगळण्यात येऊन फक्त जंगम विक्री अधिनियम हे नाव राहिले.
|
| 2 |
+
विक्रीकरार हा या अधिनियमाचा गाभा आहे. विक्रेता ज्या कराराने ठराविक किंमतीत वस्तूंची मालकी ग्राहकास हस्तांतरित करतो किंवा हस्तांतरित करण्याचे कबूल करतो, त्यास या अधिनियमाने विक्रीकरार मानले आहे. हा करार परिपूर्ण वा सशर्तही असू शकतो. विक्रीकरारान्वये मालकी हस्तांतरित झाली, म्हणजे या करारास विक्री म्हणतात परंतु वस्तूची मालकी नंतरच्या काळात किंवा एखाद्या अटीची पूर्तता झाल्यानंतर हस्तांतरित होणार असेल, तर अशा करारास सौदा म्हणतात. अशा वेळी निर्दिष्ट काळ संपल्यानंतर किंवा हस्तांतरित करण्याच्या अटी पूर्ण झाल्यानंतर या सौद्याचे विक्रीत रूपांतर होते. विक्रेत्याच्या मालकीच्या किंवा ताब्यातील मालाबद्दल त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या किंवा संप्राप्य (फ्यूचर) मालाबद्दलही विक्रीकरार होऊ शकतो. विक्री वैध होण्याकरिता विक्रीकरार करणाऱ्यांची क्षमता, परस्परांची संमती, मालाचे हस्तांतरण व पैशातील मूल्य दिले जाणे किंवा आश्वासित करणे या गोष्टी आवश्यक आहेत.
|
| 3 |
+
विक्रीकरारातील संकेत अटीच्या किंवा समाश्वासनाच्या स्वरूपात असतो. साधारणतः अट ही करारपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक असते, तिचा भंग झाला तर करार प्रत्यादिष्ट करण्याचा अधिकार प्राप्त होतो. समाश्वासनाचे तसे नाही. त्याचा भंग झाला, तर फक्त झालेली नुकसानी मागता येते. कोणता संकेत अट आहे किंवा समाश्वासन आहे, याचा निर्णय सामान्यपणे कलम ११ ते १८ यांंन्वये करण्यात येतो.
|
| 4 |
+
विक्रीकरारावरून भिन्न हेतू दिसून येत नसेल, तर विक्रेत्यास विक्रीच्या बाबतीत व सौद्याच्या बाबतीत वस्तू हस्तांतरित करते वेळी विक्रीचा अधिकार गर्भित अट म्हणून असतो, त्याचप्रमाणे ग्राहकास मालाचा ताबा मिळून तो शांतपणे उपभोगेल, असे समाश्वासन असते. मालावर कोणाचा बोजा नाही व त्याबद्दल ग्राहकास विकत घेते वेळी वा तत्पूर्वी काही माहीत नाही, असेही समाश्वासन अस���े. असे असले, तरी इंग्लिश विधीचे ‘क्रेत्या सावधान’ हे सूत्र ग्राहकाने लक्षात ठेवणे जरूरी आहे.
|
| 5 |
+
विक्रीकराराचा परिणाम साधारणतः मालाचे व हक्कांचे हस्तांतरण होण्यात होतो. मालाचे प्रदान, हक्क किंवा मालकी विक्रेत्याकडून ग्राहकाकडे हस्तांतरित करणे, हाच खरा विक्रीचा उद्देश असतो. हे हस्तांतरण नक्की केंव्हा होते, हे ठरविणे व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचे, पण कठीण असते. रोमन विधी या बाबतीत स्पष्ट आहे. या विधीप्रमाणे जोपर्यंत ग्राहकाला मालाचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत मालकीचे हस्तांतरण होत नाही परंतु ही कसोटी इंग्लिश विधीला मान्य नाही. इंग्लिश विधीप्रमाणे विक्रेता व ग्राहक यांच्या इच्छित वेळेस हे हस्तांतर होते. जंगम विक्री अधिनियम इंग्लिश विधीच्या धर्तीवर असल्यामुळे त्यात हे इच्छित वेळेस हस्तांतर होण्याचे तत्त्व अनुस्यूत आहे. इच्छित वेळेसंबंधीचे संकेत स्पष्ट नसल्यामुळे ही इच्छा विक्रेता व ग्राहक यांच्या वागणुकीवरूनच समजून घ्यावयास पाहिजे (अधिनियमातील १८ ते २४ ही कलमे या दृष्टीने महत्त्वाची आहेत).
|
| 6 |
+
मालाचे प्रदान हे मालकी हस्तांतरित करण्याचा हेतू सिद्ध करण्याच्या दृष्टीने बळकट पुरावा असला, तरी तो निर्णायक समजण्यात येत नाही. परतीकरिता, विक्रीकरिता वा पसंतीकरिताही मालाचे प्रदान होऊ शकते.
|
| 7 |
+
विनिर्दिष्टित मालाच्या विक्रीकराराप्रमाणे जर विक्रेत्याने एखादी अट घातली असेल, तर ती अट पूर्ण होईपर्यंत विक्रेता मालाच्या विल्हेवाटीचा अधिकार राखून ठेवू शकतो. अशा परिस्थितीत ग्राहकाला अथवा लोकवाहकाला किंवा निक्षेपग्राहीला ग्राहकाकडे माल पोहोचता करण्याकरिता दिला, तर विक्रेत्याने लादलेल्या अटी पूर्ण होईपर्यंत मालकी ग्राहकाकडे हस्तांतरित होत नाही व जोपर्यंत वस्तूची मालकी हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत वस्तूची जबाबदारी विक्रेत्यावरच असते (कलम २५-२६).
|
| 8 |
+
कराराची अंमलबजावणी व ग्राहक आणि विक्रेता यांची जबाबदारी व अधिकार या संबंधींची तरतूद साधारणतः ३१ ते ४४ या कलमांत करण्यात आली आहे. करारातील अटींप्रमाणे विक्रेत्याने माल ग्राहकाच्या स्वाधीन करावयास पाहिजे व ग्राहकाने मालाचा स्वीकार करून किंमत द्यावयास पाहिजे. जर अन्य काही ठरले नसेल, तर मालाचे किंवा किंमतीचे आदानप्रदान बरोबरच होते. उभयपक्षी ठरल्याप्रमाणे विक्रेता कोणत्या���ी रीतीने माल ग्राहकाच्या स्वाधीन करू शकतो. ग्राहकाच्या अभिकर्त्याला माल दिला, तरी ग्राहकाला माल दिल्यासारखे असते. प्रदानाचे स्वरूप व प्रकार यांनुरूप उभयपक्षी जबाबदारी कमी किंवा अधिक होऊ शकते. अवजड किंवा स्थूल किंवा शारीरिक रीत्या प्रदानास अवघड असणाऱ्या मालाची किंवा जो माल विक्रेत्याच्या स्वतःच्या ताब्यात नाही, अशा मालाचे प्रदान प्रतीकात्मक रीत्या होऊ शकते. उदा., गोदामाच्या मालाची किल्ली, विक्रीचिठ्ठी, गोदी अधिपत्र, प्रमाणपत्र इ. देणे. अंशतः मालाचे प्रदान पूर्ण मालाचे प्रदान होऊ शकते पण विक्रेत्याचे उद्दिष्ट मात्र पूर्ण माल पोहोचविण्याचे असले पाहिजे.
|
| 9 |
+
काही वेळा मालक नसलेली व्यक्तीही माल विकते. उदा., दलाल किंवा अडत्या. अशा वेळी विक्रेत्याला जेवढे अधिकार असतील, तेवढेच अधिकार ग्राहकास मिळतात. त्याला दिलेल्या दृष्य अधिकारकक्षेत जर ही विक्री असेल, तर ती वैध असते. ग्राहकाने माल स्वतः ताब्यात घ्यावयाचा, का विक्रेत्याने तो ग्राहकाकडे पोहोचता करावयाचा, हे उभयपक्षी केलेल्या करारावर अवलंबून असते. जर असा करार झाला नसेल, तर ज्या ठिकाणी माल विकला असेल, त्या ठिकाणी माल द्यावयाचा असतो. विक्रीच्या वेळी जर माल तिऱ्हाईत व्यक्तीच्या ताब्यात असेल, तर जोपर्यंत ती व्यक्ती ग्राहकाच्या वतीने माल ठेवण्याचे कबूल करीत नाही, तोपर्यंत साधारणतः विक्रेत्याने ग्राहकाला माल प्रदान केला, असे होत नाही. मागणी किंवा प्रदान वाजवी वेळेत केले नाही, तर ते परिणामशून्य असते. कराराप्रमाणे माल आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. योग्य मालकी–हक्क प्रदान करणे ही विक्रेत्याची जबाबदारी असते. जर अन्य काही ठरले नसेल, तर प्रदानयोग्य माल बनविण्याच्या खर्चाची त्याचप्रमाणे परिस्थित्यनुरूप आणि मालाच्या स्वरूपाप्रमाणे वाहकाशी किंवा धक्कावाल्याशी करार करण्याची जबाबदारी साधारणतः विक्रेत्याची असते.
|
| 10 |
+
रोख माल घेण्यात आला नाही, तर या अधिनियमाने विक्रेत्याचे अधिकार दोन प्रकारे संरक्षित केले आहेत : (१) येणे रकमेचा बोजा विक्रेत्यास मालावर ठेवता येतो, (२) मार्गस्थ मालाला विक्रेत्यास प्रतिबंध घालता येतो. मालाचे पैसे येणे असणारा ग्राहक नादार झाला, तर मार्गस्थ माल थांबविण्याचा व मालाची विक्री करण्याचा अधिकार विक्रेत्यास आहे. परंतु त्रयस्थाच्या हि���संबंधास बाध येणार असेल, तर मार्गस्थ माल रोखण्याचा अधिकार त्यास वापरता येत नाही. मार्गस्थ माल विक्रेता दोन तऱ्हेने रोखू शकतो : (१) स्वतः माल ताब्यात घेऊन, (२) निक्षेपग्राहीला सूचना देऊन (कलम ४५ ते ५४).
|
| 11 |
+
करारभंगाबद्दल करावयाच्या उपाययोजनेची तरतूद ५५ ते ६१ या कलमांत करण्यात आली आहे. विक्रेत्यास रकमेकरिता दावा करण्याचा अधिकार आहे. नुकसान म्हणून व्याजही मागता येते. करारपूर्तीचा दावा कोणत्याही पक्षास करता येतो व त्याऐवजी नुकसानही मागता येते. विक्रेत्याने कराराप्रमाणे मालाचे प्रदान न केल्यास ग्राहकास नुकसानीचा दावा करता येतो.
|
| 12 |
+
अधिनियमाच्या प्रकरण सातमध्ये विक्रीविषयक संकीर्ण बाबींसंबंधी तरतुदी आहेत. कलम ६४ लिलावाने माल विक्री करण्याचे आहे. ही एक प्रकारची सार्वजनिक विक्री असते. हातोड्याचा आवाज करून किंवा अन्य रूढिमान्य मार्गाने लिलाव करणारा मालाची विक्री पूर्ण झाल्याचे घोषित करतो. तत्पूर्वी बोली परत घेतली जाऊ शकते. या कलमाने विक्रेत्यास वस्तूंची किंमत वाढविण्याकरिता कृतक बोली लावण्यास मनाई केली आहे. अशा कृतक बोलीने झालेली विक्री शून्यनीय ठरविण्याचा पर्याय ग्राहकास आहे.
|
| 13 |
+
भिन्न रूढी व कायदेपद्धतींच्या देशांनी परस्परांत केलेल्या विक्री व्यवहारांमुळे निर्माण होणारे कायद्याचे प्रश्न सोडविण्याकरिता व आंतरराष्ट्रीय व्यापारातील गैरसमज थांबविण्याकरिता यूरोपच्या आर्थिक आयोगाने पुष्कळशा वस्तूंच्या (उदा., यंत्रसामग्री, धान्य इ.) सविस्तर प्रमाणभूत संविदा तयार केल्या आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तिगत विधीचे एकत्रीकरण करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्थाही आहे. तिचे मूळ कार्यालय रोमला आहे. या संस्थेने आंतरराष्ट्रीय जंगम विक्रीकरिता एका समान कायद्याचा पुरस्कार केला. १९६४ साली हेगमध्ये जागतिक मुत्सद्यांची एक परिषद भरली होती. या परिषदेने या समान कायद्याचा मसुदा पुन्हा तयार केला. जगातील राष्ट्रांची संमती घेण्याच्या दृष्टीने संमेलन भरविण्याचा प्रस्ताव केला. आंतरराष्ट्रीय जंगम विक्रीकरिता संविदा रचनेचा समान कायदा या संमेलनाने तयार केला. प्रत्येक कायदा अंमलात येण्याच्या दृष्टीने पाच राष्ट्रांच्या संमतीची गरज या कायद्यात नमूद करण्यात आली आहे. भिन्न कायद्यांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य आहे.
|
| 14 |
+
Pritt, D. N. Ed. Pollock and Mulla on The sale of Goods Act and The Partnership Act, Bombay, 1966.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10301.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंग्ल तित्तिर किंवा काळा तीतर (इंग्लिश: southern painted partridge; हिंदी:काला तितर)हा एक पक्षी आहे.
|
| 2 |
+
हा पक्षी आकाराने गावतित्तिराएवढा असतो. याचा रंग काळा असतो, त्यावर ठिपके व पट्टे असतात. डोके व पंखांचा काही भाग गंजल्या सारखा तांबडा गळपट्टा नसतो. उडताना शेपटीच्या सुरुवातीचा काळा भाग दोन्ही बाजूना दिसतो. पंख काळसर तांबूस असतात. मादी नरापेक्षा वेगळी दिसते. तिचा गळा पांढरा असतो. ते एकटा किवा जोडीने आढळतात.
|
| 3 |
+
हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात झुडपी जंगले ,गवती कुरणे आणि माळरानांवर आढळतो.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10313.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंगली महाराज रस्ता पुण्यातील हमरस्ता आहे. हा रस्ता डेक्कन जिमखान्यापासून शिवाजीनगर पर्यंत पूर्व-पश्चिम जातो. या रस्त्यावर अनेक उपहारगृहे आहेत.या रस्त्यावर मॉडर्न प्रशाला व महाविद्यालय ही आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10322.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जांजगिर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.
|
| 2 |
+
हे शहर जांजगिर-चांपा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जरी जांजगिर-चांपा असे संयुक्त नाव असले तरी प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये या गावी आहेत.[१]
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10329.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
|
| 2 |
+
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
|
| 3 |
+
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
|
| 4 |
+
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
|
| 5 |
+
पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स 1734 अशी 117 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमजीआप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला .जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्भमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."
|
| 6 |
+
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.
|
| 7 |
+
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९ बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५९२ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.
|
| 8 |
+
किल्���्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
|
| 9 |
+
जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'
|
| 10 |
+
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10355.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,207 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जक्कुर विमानतळ हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ आहे.
|
| 2 |
+
जक्कुर एर डेक्कनच्या विमानांचा तळ आहे.येथे त्यांच्या विमानांची देखभाल करण्यात येते.येथे कर्नाटक राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारी शासकीय उड्डाण प्रशिक्षण शाळा आहे.त्यांची चार प्रकारची विमाने येथे आहेत. सेसना १७२पी, दोन सेसना १५२ए विमाने तर एक हंस विमान.
|
| 3 |
+
ही आपले उड्डाण कारकीर्द सुरू करण्यास आदर्श जागा आहे.उत्तम देखभाल असलेली धावपट्टी ही प्रशिक्षणार्थी तसेच खासगी विमानांसाठी वापरण्यात येते.
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
| 6 |
+
आग्रा •
|
| 7 |
+
अराक्कोणम •
|
| 8 |
+
अंबाला •
|
| 9 |
+
बागडोगरा •
|
| 10 |
+
भूज रुद्रमाता •
|
| 11 |
+
कार निकोबार •
|
| 12 |
+
चबुआ •
|
| 13 |
+
छत्तीसगढ •
|
| 14 |
+
दिमापूर •
|
| 15 |
+
दुंडिगुल •
|
| 16 |
+
गुवाहाटी •
|
| 17 |
+
हलवारा •
|
| 18 |
+
कानपूर •
|
| 19 |
+
लोहगांव •
|
| 20 |
+
कुंभिरग्राम •
|
| 21 |
+
पालम •
|
| 22 |
+
सफदरजंग •
|
| 23 |
+
तंजावर •
|
| 24 |
+
येलहंका
|
| 25 |
+
|
| 26 |
+
|
| 27 |
+
बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
|
| 28 |
+
|
| 29 |
+
|
| 30 |
+
जोगबनी विमानतळ •
|
| 31 |
+
मुझफ्फरपूर विमानतळ •
|
| 32 |
+
पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
|
| 33 |
+
पूर्णिया विमानतळ •
|
| 34 |
+
रक्सौल विमानतळ
|
| 35 |
+
|
| 36 |
+
|
| 37 |
+
बिलासपूर विमानतळ •
|
| 38 |
+
जगदलपूर विमानतळ •
|
| 39 |
+
Raipur: विमानतळ
|
| 40 |
+
|
| 41 |
+
|
| 42 |
+
चकुलिया विमानतळ •
|
| 43 |
+
जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
|
| 44 |
+
|
| 45 |
+
|
| 46 |
+
बारवानी विमानतळ •
|
| 47 |
+
भोपाळ: राजा भोज विमानतळ •
|
| 48 |
+
ग्वाल्हेर विमानतळ •
|
| 49 |
+
इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
|
| 50 |
+
जबलपूर विमानतळ •
|
| 51 |
+
खजुराहो विमानतळ •
|
| 52 |
+
ललितपूर विमानतळ •
|
| 53 |
+
पन्ना विमानतळ •
|
| 54 |
+
सतना विमानतळ
|
| 55 |
+
|
| 56 |
+
|
| 57 |
+
भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
|
| 58 |
+
हिराकुद विमानतळ •
|
| 59 |
+
झरसुगुडा विमानतळ •
|
| 60 |
+
रूरकेला विमानतळ
|
| 61 |
+
|
| 62 |
+
|
| 63 |
+
आग्रा: खेरीया विमानतळ •
|
| 64 |
+
अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
|
| 65 |
+
गोरखपूर विमानतळ •
|
| 66 |
+
झांसी विमानतळ •
|
| 67 |
+
कानपूर: चकेरी विमानतळ •
|
| 68 |
+
ललितपूर विमानतळ
|
| 69 |
+
|
| 70 |
+
|
| 71 |
+
अलाँग विमानतळ •
|
| 72 |
+
दापोरिजो विमानतळ •
|
| 73 |
+
पासीघाट विमानतळ •
|
| 74 |
+
तेझू विमानतळ •
|
| 75 |
+
झिरो विमानतळ
|
| 76 |
+
|
| 77 |
+
|
| 78 |
+
दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
|
| 79 |
+
जोरहाट: रौरिया विमानतळ •
|
| 80 |
+
उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
|
| 81 |
+
सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
|
| 82 |
+
तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
|
| 83 |
+
|
| 84 |
+
|
| 85 |
+
इंफाल: तुलिहाल विमानतळ
|
| 86 |
+
|
| 87 |
+
|
| 88 |
+
रुपसी विमानतळ •
|
| 89 |
+
शेला विमानतळ •
|
| 90 |
+
शिलाँग: उमरोई विमानतळ
|
| 91 |
+
|
| 92 |
+
|
| 93 |
+
ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
|
| 94 |
+
|
| 95 |
+
|
| 96 |
+
दिमापूर विमानतळ
|
| 97 |
+
|
| 98 |
+
|
| 99 |
+
पाकयाँग विमानतळ
|
| 100 |
+
|
| 101 |
+
|
| 102 |
+
अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
|
| 103 |
+
कैलाशहर विमानतळ •
|
| 104 |
+
कमलपूर विमानतळ •
|
| 105 |
+
खोवै विमानतळ
|
| 106 |
+
|
| 107 |
+
|
| 108 |
+
बालुरघाट विमानतळ •
|
| 109 |
+
बेहाला विमानतळ •
|
| 110 |
+
कूच बिहार विमानतळ •
|
| 111 |
+
इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
|
| 112 |
+
|
| 113 |
+
|
| 114 |
+
चंदिगढ विमानतळ
|
| 115 |
+
|
| 116 |
+
|
| 117 |
+
धरमशाला: गग्गल विमानतळ •
|
| 118 |
+
कुलू: भुंतार विमानतळ •
|
| 119 |
+
शिमला विमानतळ
|
| 120 |
+
|
| 121 |
+
|
| 122 |
+
जम्मू: सतवारी विमानतळ •
|
| 123 |
+
कारगिल विमानतळ •
|
| 124 |
+
लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
|
| 125 |
+
|
| 126 |
+
|
| 127 |
+
लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
|
| 128 |
+
पठाणकोट विमानतळ
|
| 129 |
+
|
| 130 |
+
|
| 131 |
+
अजमेर विमानतळ •
|
| 132 |
+
बिकानेर: नाल विमानतळ •
|
| 133 |
+
जेसलमेर विमानतळ •
|
| 134 |
+
जोधपूर विमानतळ •
|
| 135 |
+
कोटा विमानतळ •
|
| 136 |
+
उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
|
| 137 |
+
|
| 138 |
+
|
| 139 |
+
देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
|
| 140 |
+
पंतनगर विमानतळ
|
| 141 |
+
|
| 142 |
+
|
| 143 |
+
पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
|
| 144 |
+
|
| 145 |
+
|
| 146 |
+
कडप्पा विमानतळ •
|
| 147 |
+
दोनाकोंडा विमानतळ •
|
| 148 |
+
काकिनाडा विमानतळ •
|
| 149 |
+
नादिरगुल विमानतळ •
|
| 150 |
+
पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
|
| 151 |
+
राजमुंद्री विमानतळ •
|
| 152 |
+
तिरुपती विमानतळ •
|
| 153 |
+
विजयवाडा विमानतळ •
|
| 154 |
+
विशाखापट्टणम विमानतळ •
|
| 155 |
+
वारंगळ विमानतळ
|
| 156 |
+
|
| 157 |
+
|
| 158 |
+
बेळगाव: सांबरे विमानतळ •
|
| 159 |
+
बेळ्ळारी विमानतळ •
|
| 160 |
+
विजापूर विमानतळ •
|
| 161 |
+
हंपी विमानतळ •
|
| 162 |
+
हस्सन विमानतळ •
|
| 163 |
+
हुबळी विमानतळ •
|
| 164 |
+
मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
|
| 165 |
+
विद्यानगर विमानतळ
|
| 166 |
+
|
| 167 |
+
|
| 168 |
+
अगत्ती विमानतळ
|
| 169 |
+
|
| 170 |
+
|
| 171 |
+
पाँडिचेरी विमानतळ
|
| 172 |
+
|
| 173 |
+
|
| 174 |
+
मदुरै विमानतळ •
|
| 175 |
+
सेलम विमानतळ •
|
| 176 |
+
तुतिकोरिन विमानतळ •
|
| 177 |
+
वेल्लोर विमानतळ
|
| 178 |
+
|
| 179 |
+
|
| 180 |
+
दमण विमानतळ •
|
| 181 |
+
दीव विमानतळ
|
| 182 |
+
|
| 183 |
+
|
| 184 |
+
भावनगर विमानतळ •
|
| 185 |
+
भूज: रुद्र माता विमानतळ •
|
| 186 |
+
जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
|
| 187 |
+
कंडला विमानतळ •
|
| 188 |
+
केशोद विमानतळ •
|
| 189 |
+
पालनपूर विमानतळ •
|
| 190 |
+
पोरबंदर विमानतळ •
|
| 191 |
+
राजकोट विमानतळ •
|
| 192 |
+
सुरत विमानतळ •
|
| 193 |
+
उत्तरलाई विमानतळ •
|
| 194 |
+
वडोदरा: हरणी विमानतळ
|
| 195 |
+
|
| 196 |
+
|
| 197 |
+
अकोला विमानतळ •
|
| 198 |
+
औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
|
| 199 |
+
हडपसर विमानतळ •
|
| 200 |
+
कोल्हापूर विमानतळ •
|
| 201 |
+
लातूर विमानतळ •
|
| 202 |
+
मुंबई: जुहू विमानतळ •
|
| 203 |
+
नांदेड विमानतळ •
|
| 204 |
+
नाशिक: गांधीनगर विमानतळ •
|
| 205 |
+
रत्नागिरी विमानतळ •
|
| 206 |
+
शिर्डी विमानतळ •
|
| 207 |
+
सोलापूर विमानतळ
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10379.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगतापवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10381.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगतियाल हे हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे करीमनगर जिल्ह्यात आहे.
|
| 2 |
+
जगतियालमधील किल्ल्याचे बांधकाम फ्रेंच वास्तुरचनाकारांनी इ.स. १७४७मध्ये केले होते. त्यावेळी तेथे जफरुद्दौला राज्य करीत होता. त्या काळात तेथे बांधली गेलेली एक मशीद आजही चांगल्या स्थितीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जगतियालची लोकसंख्या ९६,४७० असून तेथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.[१]
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10446.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगन्नाथ भगवान शिंदे (१९०६-१९३१) हे सोलापुरातील स्वातंत्र्यलढ्यातील युवक नेते होते. त्यांच्यावर गाधीजींच्या आवाहनाचा प्रभाव पडला होता. त्यांना फाशी दिली गेली.
|
| 2 |
+
शहरातील गिरण्यांमुळे मजूर वर्गाच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. १९२५ साली कॉग्रेस कार्यकर्ते शिवलाल बोरामणीकर आणि परशुरामजी राठी यांना सिटी कोर्टाने दीड वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यावेळी कोर्टाच्या दारातच श्री शिदे यांनी निषेधाची सभा घेऊन जोरदार भाषण केले व निषेध केला. शिंदे हे तालीम संघाचे सभासद होते. हिंदू समाज शक्तिमान असावा अशी त्याची धारणा होती. युवक संघाच्या अधिवेशनातील ठरावावर त्याचे विचार स्पष्ट होतात.
|
| 3 |
+
सार्वजनिक गणपती व शिवजयंती यामध्ये श्री शिंदे हे प्रामुख्याने भाग घेत असत. बाळ गणेश मेळाव्याचे ते एक आधार होते.१० मे हा स्वतंत्र दिन म्हणून यूथ लीग साजरा करीत होते. त्यावेळी सर्वश्री शिंदे, बेके, डॉ अत्रीळीकर यांच्याबरोबर मुलांनाही भाषणाची संधी मिळत असे. [१]
|
| 4 |
+
मिठाचा सत्याग्रह सुरू झाल्यापासून शहरात दररोज सभा होत असत. या सभामधून काही वक्ते भडक भाषणे देत असत. याचा परिणाम हिंसाचारात होईल असे शिंदे यांना वाटत असे. त्यासाठी गिरण्या बंद पाडू नका, हुल्लडबाजी करू नका असे आवाहन त्यांनी सभांमधून केले होते. १९३० सालच्या ८ मेला जमनालाल बजाज आणि वीर नरीमन यांना अटक केल्याची बातमी सोलापुरात येऊन थडकली. त्यावेळी युवक संघाने महामिरवणूक काढली. त्यात जगन्नाथ शिंदे, कवी कुंजविहारी, तुळशीदास जाधव, मल्लप्पा धनशेट्टी, शेठ गुलाबचंद सहभागी झालेले होते. त्यादिवशी निघालेल्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. परंतु जमावातील काही लोक आणि गिरणीतील मजूर शिंदीची झाडे तोडण्यासाठी रूपाभवानी मंदिर परिसराकडे गेले, त्यावेळी हिंसाचार आणि गोळीबार झाला. परंतु त्या हिसाचारात शिंदे याचा अजिबात सहभाग नव्हता. कारण मिरवणुकीनंतर ते घरी गेले होते. परंतु सरकारच्या रोषाला ते बळी पडले. त्यांना अटक करून वयाच्या २५ व्या वर्षी फासावर लटकवून तरुणाच्या मनात दहशत बसविण्याचा प्रयत्न ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केला.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10448.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगन्नाथ महाराज पवार नाशिककर हे विष्णुबुवा जोगांचे प्रशिष्य मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य होत. जगन्नाथ महाराज हे गुरे वळणारे, खेडेगावातले शेतकरी होते. दीर्घ प्रयत्नांनी ते वेदान्तवाचस्पती आणि काव्यतीर्थ झाले.चेउत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर गाजलेल्या जगन्नाथ महाराजांचं स्वरयंत्र कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निकामी होऊन त्यांची कीर्तनसेवाच खंडित झाली. तेव्हा त्यांनी जिद्द न सोडता लेखणी हातात धरली व ग्रंथरचनेस सुरुवात केली.
|
| 2 |
+
जगन्नाथ महाराजांनी आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथच प्रसिद्ध केला आहे. (इ.स. २०१६). विष्णूसहस्रनामावर दहा खंडांचे मराठी भाष्य प्रसिद्ध करून त्यांनी एक विक्रमच केला आहे. ‘वटवृक्ष’ ही त्यांची साठावी कृती आहे. वटवृक्ष या ग्रंथात जगन्नाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर हे या वटवृक्षाचे बीज असून जोग महाराज त्याचा बुंधा आहेत; जोग महाराजांचे शिष्य चतुष्टय-बंकटस्वामी, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मारोतीबुवा गुरव आणि सोनोपंत दांडेकर म्हणजे वटवृक्षाच्या मुख्य शाखा असल्याचे सांगून त्या शाखांना फांद्या, डहाळ्या, पाने, पारंब्या व वृक्षावर विहरणारे पक्षी आहेत, असे सगळे रूपक रचले आहे.[१]
|
| 3 |
+
फडांच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायाचा विचार करणाऱ्यांची परंपरा स्पष्ट करताना जगन्नाथ महाराज ती ऐतिहासिक दृष्टीने करतात. ’संतवाङ्मय व समाज यांच्या समन्वय प्रक्रियेचा प्रारंभ साखरे घराण्यापासून झाला पण तो सनातनी वृत्तीतून वेदान्ताच्या परिभाषेत व त्यांच्याकडे शरणागत अशा अधिकारी श्रोत्यांपर्यंतच असल्याने काहीसा मर्यादितच राहिला. ही कोंडी जोग महाराजांनी फोडली’, असे जगन्नाथ महाराजांनी लिहिले आहे.
|
| 4 |
+
१८ फेब्रुवारी २००९ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जगन्नाथ महाराजांना राज्य शासनाचा २००९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार एक परिपत्रक काढून जाहीर केला. यात त्यांना एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह अशा स्वरूपात पुरस्कार दिला. हा पुरस्कारदेण्याचा निर्णय राज्य सरकारची एक समिती ठरवते, जो की आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला पंढरपूर किंवा मुंबई येथे देण्यात येतो.[२]
|
| 5 |
+
जगन्नाथ महाराज प���ार यांनी माघ वद्य द्वितीया दि. १२ फेब्रुवारी २०१७ श्रीक्षेत्र देवगिरी (दौलताबाद) येथे देह ठेवला. त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यांची प्रकल्प, प्रबंध आणि प्रबोधन परंपरा त्यांचे पट्टशिष्य आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज हे चालवित आहेत. त्यांचे नेतृत्वात संतधाम, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जगन्नाथ महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक साकारणार आहे.
|
| 6 |
+
|
| 7 |
+
(अपूर्ण)
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10462.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,14 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 19°48′38″N 85°49′53″E / 19.81056°N 85.83139°E / 19.81056; 85.83139
|
| 2 |
+
|
| 3 |
+
पुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे 'जगन्नाथपुरी' म्हणून अधिक ओळखले जाते.
|
| 4 |
+
सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली. त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला.[१]
|
| 5 |
+
जगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर आहे. हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र, पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्य नावेही आहेत.जगन्नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात. (म्हणून फार मोठे काम करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हणतात,)
|
| 6 |
+
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय.(कलेवर म्हणजे देह.) या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र नीलमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव, नव-कलेवर उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
|
| 7 |
+
काही जाणकारांच्या मते, ओरिसामधील हिंदू राजांच्या पतनानंतर व काही विशिष्ट कारणवश मूर्ती बदलण्याची आवश्यकता भासली. मुसलमानी राजवटीत बंगालचा नबाब करानीचा सेनापती काळा पहाडने ओरिसावर स्वारी केली. भुवनेश्वरची अनेक मंदिरे पाडून तो जगन्नाथपुरीकडे वळला. तेव्हा श्रीजगन्नाथाच्या भक्तांनी सगळ्या मूर्तीना देवळातून हलवले. पण त्याआधी भक्तांनी त्यामधील ‘ब्रह्म’ काढून ते मृदुंगात लपवून कुजंगगडावर लपवून ठेवले होते. काळा पहाडने मूर्ती हाताला लागल्यावर त्या जाळून टाकल्या. या घटनेनंतर २० वर्षांनी कुजंगगडाच्या राजांनी नव्या मूर्ती घडवून, त्यात ‘ब्रह्म’ची स्थापना करून त्यांची पुरीच्या मंदिरात स्थापना केली. त्यानंतरच्या मुसलमानी राजवटींत अनेकदा जगन्नाथ मंदिराबाहेर गेले आणि ‘नव-कलेवर’ होऊन परत आले. औरंगजेबाच्या काळात तर मंदिर आणि जगन्नाथ दोघांचेही खूप हाल झाले. त्यानंतर १७३३ साली जगन्नाथ ‘नव कलेवर’ होऊन देवळात परत आले.
|
| 8 |
+
त्यानंतर ओरिसावर मराठ्यांचे राज्य होते. त्यांच्या कारकिर्दीत जगन्नाथपुरी आणि मंदिरातही शांती प्रस्थापित झाली. पुरीच्या देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठ्यांच्या राजवटीत झाली. कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भग्न अवशेष जगन्नाथपुरीला आणून त्यांनी जगन्नाथाच्या देवळातील भोग मंडपाचे आवर, स्नान मंडप, मंदिराभोवतालची भिंत तसेच अनेक देवळे बांधली. सोन्याची लक्ष्मी घडवून या देवळात तिची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर व या कंपनीच्या काळातही ‘नव-कलेवर’ झाल्याच्या नोंदी आहेत. गेल्या १०० वर्षांत १९३१, १९५०, १९६९, १९७७ आणि १९९६ साली ‘नव कलेवर’ झाले. १८ जुलै २०१५ रोजी एकविसाव्या शतकातले पहिले नव कलेवर झाले.
|
| 9 |
+
नव-कलेवराची तयारी चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारुयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाड्यावर जातात. राजा तिथे भिल्लांचा नायक-विश्वावसूवर कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी दैतापती निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य दैतापतीला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारु) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य दैतापतीला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागण��� होऊन दैतापतींचे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या-त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारु’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो.
|
| 10 |
+
हे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत. झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्यांनी जवळच्या दुसऱ्या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसऱ्या कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे, झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक आहे.
|
| 11 |
+
अशा लक्षणांनी युक्त असे झाड सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोट्या छोट्या राहुट्या उभारून त्यात दैतापती राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणाऱ्या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन दैतापती व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोट्या कुऱ्हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.
|
| 12 |
+
झाडापासून मिळालेले ओंडके जगन्नाथपुरीच्या देवळात नेतात. त्यासाठी लाकडाचीच चारचाकी गाडी तयार केली जाते. चाकांसाठी वडाचे लाकूड वापरतात. मुख्य दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. ओंडका लाल कापडात गुंडाळून गाडीवर ठेवतात व ही गाडी वेताच्या अथवा काथ्याच्या दोराने माणसे ओढ��� नेतात. चारही ओंडके जगन्नाथपुरीला उत्तरेच्या दारातून (याला ‘वैकुंठद्वार’ म्हणतात.) कोयली वैकुंठमध्ये आणून ठेवतात. तिथे चार खोल्यांमध्ये हे चार ओंडके ठेवून त्यांची पूजा होते.
|
| 13 |
+
मूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नेवैद्य वगैरे झाल्यावर आधीचे देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारुशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. दैतापतींखेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.
|
| 14 |
+
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात, पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून व हातालाही कापड गुंडाळून जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_1047.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गहडवाल वंश याची स्थापना प्रतिहार साम्राज्याच्या अस्तानंतर चंद्रदेवाने इ.स. १०८५ मध्ये कनौज येथे केली.
|
| 2 |
+
चंद्रदेवाने इ.स. १०८५ ते इ.स. ११०० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने काशी, कनौज, व इंद्रप्रस्थावर प्रभुत्व निर्माण केले. बंगालच्या विजयसेनाने त्याच्यावर केलेले आक्रमणही त्याने परतवून लावले. चंद्रदेवानंतर गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा झाला. त्याने गझनीच्या राजाचे परकीय आक्रमण परतवून लावले. पालवंशीयांच्या ताब्यातील मगधचा प्रदेश जिंकून घेतला. त्याच्यानंतर इ.स. ११५४ मध्ये विजयचंद्र हा राजपदावर आला. यानेही बिहारपर्यंत आपला प्रभाव वाढवला. याच्यानंतर याचा मुलगा जयचंद याने इ.स. ११७० ते इ.स. ११९२ पर्यंत कनौजवर राज्य केले. पृथ्वीराज चौहानाने जयचंदाची मुलगी संयोगिता हिला स्वयंवर मंडपातून पळवून नेल्याने दोघात संघर्ष सुरू झाला होता.[१]
|
| 3 |
+
| जयचंदाने पृथ्वीराजाचा पराभव करण्यासाठी तुर्की आक्रमक शहाबुद्दीन घोरीची मदत घेतली होती. पण पृथ्वीराजाने इ.स. ११९१ मध्ये झालेल्या तराईच्या पहिल्या लढाईत घोरीचा पराभव केला. नंतर परत इ.स. ११९२ मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईत घोरीने जयचंदाच्या मदतीने पृथ्वीराजाला पराभूत केले.
|
| 4 |
+
पृथ्वीराज चौहानाचा पराभव करण्यासाठी जयचंदाने ज्या घोरीची मदत घेतली होती त्या घोरीनेच विश्वासघात करून जयचंदावरच स्वारी करून कनौजचे राज्य जिंकून घेतले आणि गहडवाल वंशाचा शेवट झाला.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10483.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,13 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगाच्या पाठीवर (१९६०) -
|
| 2 |
+
हा राजा परांजपे दिग्दर्शित आणि (श्रीपाद चित्र) निर्मित चित्रपट आहे. ह्यातील गाणी अतिशय गाजली. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
|
| 3 |
+
निर्माती संस्था : श्रीपाद चित्र
|
| 4 |
+
निर्माता : राजा परांजपे
|
| 5 |
+
दिग्दर्शक : राजा परांजपे
|
| 6 |
+
कथा : राजा परांजपे
|
| 7 |
+
पटकथा : ग. दि. माडगूळकर
|
| 8 |
+
संवाद : ग. दि. माडगूळकर
|
| 9 |
+
गीतलेखन : ग. दि. माडगूळकर
|
| 10 |
+
कलाकार : राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ, ग. दि. माडगूळकर (छोटी भूमिका), बालनट राजा, राजा गोसावी, रमेश देव, राजा पटवर्धन, शरद तळवलकर, ग्रामोपाध्ये, दत्ता मायाळू (राजदत्त), सुरेखा जोशी, वसंत ठेंगडी, कुसुम देशपांडे, सुधीर फडके, रेखा
|
| 11 |
+
संगीत : सुधीर फडके
|
| 12 |
+
पार्श्वगायक : सुधीर फडके, आशा भोसले
|
| 13 |
+
ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी [२] :
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10491.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10494.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
खालील यादीत जगातील सर्व देश त्यांच्या एकूण लोकसंख्येनुसार क्रमबद्ध केले आहेत.
|
| 2 |
+
National Population Statistics of Mexico Archived 2011-05-26 at the Wayback Machine.[२]
|
| 3 |
+
National Statistics Office projection Archived 2011-08-11 at the Wayback Machine.
|
| 4 |
+
UN estimate
|
| 5 |
+
Ethiopia Central Statistics Agency
|
| 6 |
+
Statistical Center of IRAN
|
| 7 |
+
Official Thai Statistics estimate विदागारातील आवृत्ती
|
| 8 |
+
UN estimate
|
| 9 |
+
UN estimate
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10513.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,19 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
५२,००,००,००० (प्रमाणः- ९%) (२०११) १,६०,००,००,००० (प्रमाणः- २४%) (२०११) २,१०,००,००,००० (प्रमाणः- २९%) (२०११)
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.
|
| 4 |
+
बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम व हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.
|
| 5 |
+
दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे.
|
| 6 |
+
अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[४] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे.
|
| 7 |
+
इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[५]
|
| 8 |
+
आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळ��� रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती.
|
| 9 |
+
बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[६]
|
| 10 |
+
महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे
|
| 11 |
+
बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[७]
|
| 12 |
+
वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्र व रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत.
|
| 13 |
+
नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत.
|
| 14 |
+
संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.
|
| 15 |
+
जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी
|
| 16 |
+
आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.
|
| 17 |
+
जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.
|
| 18 |
+
[९१]
|
| 19 |
+
[१७२][१७३][१७४][१७५]
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10524.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जटणी हे भारताच्या ओडिशा राज्यातील शहर आहे.
|
| 2 |
+
यास खुर्दा रोड या नावानेही ओळखतात.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10528.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
रामायणानुसार, जटायू (संस्कृत: जटायु) हा गृध जातीचा एक पक्षी होता. गरुडाचा भाऊ अरुण व त्याची पत्नी अरुणा यांच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र होता. (दुसरा पुत्र संपाती). हा अयोध्येचा इक्ष्वाकुकुलीन राजा दशरथ याचा जुना मित्र होता. रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न त्याने केला; पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले.
|
| 2 |
+
बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
|
| 3 |
+
जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे [१].
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10535.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,24 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूल्यवान धातू व रत्ने यांपासून दागिने तयार करण्याची कला मानवाइतकीच प्राचीन आहे. अश्मयुगात दगड, हाडे, शिंपले हीच मानवाला मूल्यवान वाटत होती. त्यांच्या मण्यांपासून तो कंठभूषणे, कर्णभूषणे, बाहुभूषणे, बिंदी इ. अलंकार बनवीत असे. प्राचीन ईजिप्तमध्ये पहिल्या राजघराण्याच्या काळात (ख्रि. पू. ३१०० ते २८८०) राजपुरुष वा प्रतिष्ठित लोक सुवर्णमुकुट अथवा इतर शिरोभूषणे वापरीत. अकराव्या राजघराण्यापर्यंत म्हणजे ख्रि. पू. २१३३ ते १९९१ पर्यंत ही भूषणे सोन्याचांदीची, परंतु साधी असत. अठराव्या राजघराण्याच्या काळी (ख्रि. पू. १३६१ ते १३५२) हे अलंकार अधिक सौंदर्यपूर्ण, झगझगीत व शोभिवंत बनले. तुतांखामेनच्या काळातील असे अलंकार कैरोच्या वस्तुसंग्रहालयात आहेत.
|
| 2 |
+
कर्णभूषणे ख्रि. पू. १५०० नंतर वापरात आली, ती साध्या आकाराची असत. दुसऱ्या रॅमसीझच्या काळात (ख्रि. पू. १४०४ ते १२३७) या कर्णभूषणांच्या आकारात वैचित्र्य आले. कंठहार-माला ख्रि. पू. ३००० वर्षांपासून वापरात होत्या. श्रीमंत लोक अनेकपदरी मणिमाला घालीत. सोन्याच्या किंवा रुप्याच्या तारांत गुंफलेले निळे, पिवळे व तांबडे मणी, अर्धमूल्यवान तसेच पारदर्शक किंवा अपारदर्शक खडे यांच्या तुतांखामेनकालीन माळा सुंदर आहेत. मध्यकाळात (इ. स. पू. सु. १५००) मण्यावरही नक्षीकाम करीत.
|
| 3 |
+
कंठहाराच्या मध्यभागी विशेष नक्षीकाम केलेले सुंदर पदक लटकत असे. त्या पदकावर तारका अथवा फुले यांच्या प्रतिमा कोरलेल्या असून त्यांत रत्ने बसविलेली असत. याच काळात गळ्यातील मालादी अलंकार वज्रटीके प्रमाणे रुंद व सुंदर झाले. उत्तर राजकालातील या गळपट्ट्याची रुंदी आणखी वाढून ते रत्नजडित करण्यात आले. तुतांखामेनचा गळपट्टा प्रेक्षणीय आहे. त्यावर तत्कालीन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गळपट्ट्याखालील उरस्त्राण चौकोनाकृती असे. काही उरस्त्राणे सोन्याची व रत्नजडित असत. जुन्या काळात कंकणे मण्यांची वा पाटल्यांसारखी घडीव सोन्याची होती. मध्यकाळात त्यांची रुंदी आणखी वाढलेली असून ती मनगटावर बसविण्यासाठी त्यास सोन्याची कडी असे.
|
| 4 |
+
उत्तरकाळात ही कंकणे भरीव सोन्याची आणि रत्नजडित बनली. त्याचे दोन अर्धवर्तुळाकार भाग बिजागरीने जोडलेले असत. पैंजणही त्या काळी रूढ होते. त्यातील रत्ने व इतर अलंकारातील रत्ने यांची रंगसंगती साधलेली असे. त्यांच���या कड्या वाघ, सिंह यांच्या तोंडाच्या आकाराच्या असत. अंगठीवर वापरणाराचे नाव, पदवी वा शुभसूचक चिन्ह कोरलेले असे. याच काळात विशेषतः सोने, चांदी व ब्राँझच्या अंगठ्या रूढ झाल्या. तुतांखामेनच्या काळात राजाचा कमरपट्टा विशेष प्रकारचा असे. त्याला एक शेपटासारखा मागे लोंबणारा भाग असे. पट्टा सोन्याचा आणि अरुंद असून त्याचा पुच्छभाग मण्यांचा असे.
|
| 5 |
+
ग्रीसमध्ये जडजवाहीर व दागिन्यांची कला सु. ३००० वर्षे विकसित होत गेली. ख्रि. पू. २६०० ते १९०० हा पूर्व ब्राँझकाळ किंवा विशेषतः ख्रि. पू. २३०० पासूनचा काळ जडजवाहिराच्या दृष्टीने प्रगत होता. येथील सर्वांत महत्त्वाच्या कलावस्तू ट्रॉयमधून व त्याजवळच्या लेम्नॉस बेटावरून आल्या आहेत. यांच्यावर मेसोपोटेमियन व ॲनातोलियन कलेचा प्रभाव आहे. तत्कालीन ड्रेसपिन, कर्णभूषणे व मुकुट इ. वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सोन्याचा पातळ पत्रा, हलक्या हाताने बनविलेल्या नाजुक साखळ्या व त्यांवरील तारकाम व उठावाचे नक्षीकाम असे कलाकामाचे मूळ स्वरूप होते. विशेषतः कणदार उठावाचे काम फारच सुबक असे. मध्य ब्राँझयुगात (ख्रि. पू. १९०० ते ११००) हे दागिने रत्नजडित होऊ लागले. या काळातील ‘मधमाश्यांच्या पोळ्यावरील परस्पराभिमुख मधमाश्यांची जोडी’ ही कलाकृती उल्लेखनीय आहे. उत्तर ब्राँझयुगात या कलेला बहर आला. या काळातील मुख्य प्रकार म्हणजे घडीव मण्यांच्या माळा आणि त्यांतून लोंबणारी पदके. त्यांवर कोरीवकामाच्या जोडीला ⇨मीनाकामही दिसून येते. ख्रि. पू. ८०० ते ६०० या काळात ग्रीकांनी आपल्या सुसंस्कृत शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविले. त्यामुळे फिनिशियन कारागीर ग्रीसमध्ये येऊन राहिले. त्यांनी स्थानिक लोक या कलेत तयार केले. पुन्हा ही कला ग्रीसमध्ये विकसित होऊ लागली. ख्रि. पू. ६०० ते ३३० या काळात मीनाकामास पुन्हा प्रारंभ होऊन ख्रि. पू. चौथ्या शतकात कर्णभूषणे, कंठहार व अंगठ्या यांचा वापर सार्वत्रिक झाला. या काळात जडजवाहिराचे दागिने वापरत होते. प्राणी व पक्षी यांच्या आकाराची पदके गळ्यातील हारात लटकविलेली असत, तर सोन्याच्या पातळ पत्र्याची वाऱ्याने हलणारी पानेफुले तत्कालीन कर्णभूषणात लावलेली असत.
|
| 6 |
+
ख्रि. पू. ३३० ते २७ या काळात अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांमुळे ग्रीक जगताचे स्वरूप पालटले. पूर्वेकडे ग्रीक साम्राज्य विस्तारले. सुवर्णालंकाराचा वा���र सार्वत्रिक बनला. कारण अलेक्झांडरने इराणमधून अफाट संपत्ती जिंकून आणली होती. या काळात जडजवाहिराच्या दागिन्यांचे मूळ स्वरूप जुनेच राहिले पण ख्रि. पू. २०० च्या सुमारास नवे आकार-प्रकार पुढे आले. जडावकामाच्या पद्धतीमध्ये बदल झाला. पूर्वीची कला सुवर्णावरील कोरीवकामातच मर्यादित होती. आता सोन्याच्या जोडीला रत्ने आल्याने दागिन्यांत रत्नांच्या जडावकामाला वाव मिळाला.
|
| 7 |
+
रोममधील आभूषणांची कला, रंगाच्या परिणामकारकतेमुळे, अर्धमूल्यवान रंगीत खडे वापरण्यावर केंद्रित झाली होती. खड्याचा आकार लंबवर्तुळाकार असे. कोरीवकामातून पौराणिक व शाही दृश्ये कोरलेली असत. राजकुलातील व्यक्तींची चित्रे कोरलेले काही नमुने फारच सुबक आहेत. रोमन लोकांना मीनाकामही अवगत होते. ब्राँझच्या कोरलेल्या भागात अपारदर्शक लाल व पांढऱ्या काचेची पूड वापरून ते मीनाकाम करीत.
|
| 8 |
+
ख्रि. पू. ३२०० ते ३००० या काळात मेसोपोटेमिया आणि इराण यांमधील व्यापार वाढला. मेसोपोटेमियात अर्धमूल्यवान खड्यांच्या दंडगोलाकृती मुद्रा रूढ असल्याचे आढळून आले आहे. टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यातही जडजवाहिराच्या दागिन्यांची कला अस्तित्वात होती . सुमेरियन लोकांच्या कबरीत याचे पुरावे सापडले आहेत. या काळात जवाहिरे व सुवर्णकार यांनी ही कला संघटित रीतीने प्रगत केली. मेसोपोटेमियातील सुमेरियन सुवर्णकारांना आणि जवाहिऱ्यांना प्रत्येक प्रकारचे तांत्रिक ज्ञान अवगत होते. धार्मिक जीवनात जडजवाहिराचे स्थान महत्त्वाचे होते. रत्नांच्या ठिकाणी असलेल्या अद्भुत शक्तीमुळेच नव्हे, तर देवदेवतांना अलंकृत करण्यासाठीही जडजवाहिराच्या दागिन्यांचा उपयोग आवश्यक ठरला. युफ्रेटीसच्या तीरावरील अर या नगरराज्यातील कबरीत सापडलेल्या दागिन्यांवरून या कलेचा दर्जा उच्च होता, असे दिसून येते. त्यांतील शिरोभूषणे, कंठहार, कर्णफुले, केशालंकार, कंकणे इ. कलावस्तूंवरून अर हे या कलेचे तत्कालीन केंद्रच असावे.
|
| 9 |
+
ख्रि. पू. दुसऱ्या व तिसऱ्या सहस्त्रकात ही कला आशियातील इतर प्रदेशांतही पसरली कारण त्या वेळी वाहतुकीच्या सोयी व व्यापार वाढलेला होता. गुंफणकाम, उठावाचे आणि जडावाचे काम या काळात दर्जेदार होई. कलात्मक दर्जा व तांत्रिक क्षमता चांगलीच वाढली व तिचा प्रसार आशियाई प्रदेशात झाला. ख्रि. पू. तेराव्या शतकात ॲसिरियन जडजवाहिराच्या कलेचे नमुने तेथील पहिली राजधानी आशुर येथे मिळाले आहेत. त्यातील कलेचा दर्जा व तंत्र उत्तम आहे. ॲसिरियन साम्राज्याच्या उत्तरकालात राजे, राण्या, न्यायाधीश आणि सेनाप्रमुख यांनी वापरलेले अलंकार व देवदेवतांचे अलंकार यांच्या दर्जेदारपणाची कल्पना तत्कालीन नमुन्यांवरून येते. ख्रि. पू. नवव्या शतकात इराणमध्येही या कलेची अनेक केंद्रे होती, असे त्या काळातील सापडलेल्या साच्यांवरून दिसते. ख्रि. पू. पहिल्या शतकात ब्राँझचे दागिने इराणमध्ये रूढ होते, त्यांवर प्राणिचित्रे कोरलेली होती. घोड्याच्या खोगिरावरील शोभेचे धातुकाम पश्चिम इराणमधील लुरिस्तान प्रदेशात आढळून आले आहे.
|
| 10 |
+
प्राचीन काळापासून भारतात जडजवाहीर व त्यांचे दागिने वापरात आहेत. ऋग्वेदात याचे उल्लेख आढळतात. चेन्हु-दडो हे रत्नजडित दागिन्यांच्या निर्मितीचे केंद्र होते, येथील दागिने ख्रि. पू. ३००० पासून निर्यात होत.
|
| 11 |
+
सिंधू संस्कृतीच्या ख्रि. पू. २५०० ते १५०० या काळातील अलंकार उत्खननातून मिळाले आहेत. त्यांत सोन्याची शिरोभूषणे, सोन्याची व ब्राँझची वर्तुळाकृती व कमलाकृती कर्णभूषणे, निरनिराळ्या रंगांचे मणी ओवलेले अनेकपदरी कंठहार तसेच खापरी, ब्राँझ, सोने व चांदीच्या पोकळ बांगड्या व अंगठ्या इत्यादींचा समावेश होतो. कमरपट्टे, पायातील साखळ्या, तोरड्या व पैंजण हेही वापरात असावे. तत्कालीन कारागिरांना धातू वितळविणे, शुद्ध करणे, मिश्रधातू बनविणे. साच्यातील ओतकाम, खोदकाम, उठावाचे व जडावाचे काम इ. प्रक्रिया ज्ञात असाव्या. तसेच तार ओढणे, मणी तयार करून त्यांना भोके पाडणे, खड्यांना झिलई देणे ही कामेही ते करीत. ख्रि. पू. १५०० या काळात भारतात मुकुट, उरोभूषणे, कंठहार, कर्णभूषणे, कमरपट्टे आणि कंकणे इ. अलंकार वापरात होते. वधूंनी घातलेल्या अलंकारांचे वर्णन ऋग्गवेदात आहे. तसेच सोन्यामधील अद्भुत शक्तीचे वर्णन यजुर्वेदात आहे. ख्रि. पू. ४५० या काळातील अलंकार नेपाळात बुद्धाच्या अवशेषासमवेत सापडलेले असून त्यांत सोन्याची फुले, अर्धमूल्यवान रत्नांचे मणी, पोवळे व मोती इ. आढळतात. मौर्यकाळात (ख्रि. पू. ३२१ ते २००) व त्यानंतरच्या सुंगकाळात पुरुष व स्त्रिया जडजवाहिरांचे भारी अलंकार वापरीत असत. तक्षशिला येथे सापडलेल्या ख्रि. पू. पहिल्या शतकातील अलंकारात सोन्याची सुशोभित शिरोबंध व केश��ंध होते. मध्य युगात (इ. स. दुसरे ते अकरावे शतक) भटक्या जातीच्या टोळ्यांनी आपले मूल्यवान जडजवाहीर बरोबर घेतले आणि ते पश्चिम यूरोपकडे गेले. त्यामुळे यूरोपात ही जडजवाहिराची कला प्रचलित झाली व पुढे वाढीस लागली. तिकडील अलंकारांत पक्ष्यांच्या प्रतिमा व इतर सुंदर आकृत्या यांवर रत्ने जडविलेली असत. तसेच बाहुभूषणांवर पिळाचे नक्षीकाम करीत. फ्रान्स, ब्रिटन व आयर्लंडमधील उत्खननांतून याचे पुरावे सापडले आहेत. तारेचे गुंफणकाम व उठावाचे काम यांचे मिश्रण आयरिश कलेत झालेले होते. या कलांत रत्नांना पैलू पाडण्याचे कामही पुढे रूढ झाले. वैयक्तिक वापरापेक्षा कुमारी मेरीचे किंवा इतर ख्रिस्ती संतांचे पुतळे अलंकृत करण्यासाठी मूल्यवान रत्नांचा वापर अकराव्या शतकापर्यंत होई.
|
| 12 |
+
भारतात कुशाणकाळात (इ. स. ३०० पर्यंत) कर्णभूषणे अधिक लांबीची झाली. कंठहार पीळदार साखळीचे असून त्यांत निरनिराळ्या आकारांचे मणी गुंफलेले असत. बाहुभूषणे रुंद व जडावकाम केलेली होती. बांगड्या सोने, ब्राँझ व काच यांच्या बनवित. अंगठी नक्षीदार असून तिच्यावर पैलूदार हिरा जडविलेला असे. पायांतील पैंजण, साखळ्या यांच्या जोडीला वाळेही वापरात होते.
|
| 13 |
+
गुप्तकाळ (३०० ते ६००) हा सुवर्णकाळ असल्यामुळे त्या काळातील लोकांत दागदागिन्यांचा वापर अधिक होता. कर्णभूषणांमध्ये विविध प्रकारची चक्राकार कर्णफुले होती. ५०० ते १२०० या काळातील कंठहारांमध्ये नक्षीकाम केलेली व रत्नजडित गोल पदके असत तसेच कर्णभूषणे कानाजवळ केसात गुंतविलेली असत. बांगड्या सोन्या-रुप्याच्या व अंगठी खड्याची असे. कमरपट्टा मण्यांचा बनविलेला व त्यावर लोंबत्या साखळ्यांचे नक्षीकाम केलेले असे. पायांतीले पैजण, वाळे व तोडे सुंदर नक्षीचे असत.
|
| 14 |
+
इ. स. १२०० नंतर भारतात आलेल्या मुसलमानी आक्रमकांनी आपले अवजड पोशाख इकडील उष्ण हवामानामुळे टाकून हलके कपडे आणि दागिने वापरण्यास सुरुवात केली. जडजवाहिराचे दागिने राजमान्यता पावले. मोगल बादशाह अकबर (१५५६ ते १६०५) मोत्यांचा व रत्नांचा कंठा दरबारात वापरी. त्याच्या डोक्यावरील पगडीवर दुहेरी पदरांच्या मोतीमाळांनी बांधलेला शिरपेच व बोटांत पाचूच्या अंगठ्या असत. जहांगीर (१६०५ ते १६२७) कानांत हिऱ्यामोत्यांची कर्णफुले, गळ्यात रुळणारे लांब रत्नहार आणि मोतीहार वापरीत असे. शहाजहानच्या (१६२८ ते १६६६) शिरपेचात कोहिनूर हिरा व इतर रत्ने बसविलेली होती. त्याच्या कंठहारात हृदयाकार रत्नजडित पदक शोभत असे. मध्यभागी लाल रत्ने जडविलेली बाहुभूषणेही तो वापरी. शहाजहानच्या काळात खंजीर व तलवारीच्या मुठी आणि त्यांच्या म्यानाही रत्नजडित असत. तसेच त्याचे मयूरासन रत्नजडित सोन्याचे होते. औरंगजेबानंतरचे बादशाहा रत्नखचित कंकणेही वापरीत. राजस्त्रिया कपाळावर रत्नजडित बिंदी वापरीत. त्यांची कर्णभूषणे व केशभूषणे रत्नजडित व मोत्यांची असत. विवाहीत स्त्रिया मोत्यांची रत्नजडित नथ वापरीत. या काळातील कंठहार, वाकी (भुजभूषणे), बांगडया, अंगठ्या, कमरपट्टे, पैजण, शिरबंध, कर्णफुले, बिंदी व नथ हे सर्व स्त्रियांचे अलंकार सुवर्णाचे व रत्नजडित असत.
|
| 15 |
+
चीनमध्ये जडजवाहिरांचे दागिने वापरण्याऐवजी ते पोशाखावर जडविण्याकडेच त्यांचा कल होता कारण त्यांचे कपडे संपूर्ण शरीर झाकणारे असत. त्यामुळे पाश्चात्त्य देशांच्या तुलनेने चीनमध्ये ही कला अप्रगत वाटते. कंठहार, कंकणे, कर्णभूषणे हे प्रकार चीनमध्ये क्वचितच दिसत पण शिरोभूषणे व केशभूषणे यांचा वापर आहे. स्त्रिया मणिमाळांचा उपयोग गळ्यात, डोक्यावर किवां कमरेस बांधण्यास करीत. हे अलंकार वापरण्यामागील त्यांचा हेतू वैभवप्रदर्शनाचा नसून निव्वळ वैयक्तिक सौंदर्यदृष्टी हाच असावा. शांग राजकाळात (ख्रि. पू. १२०० ते १०००) हाडे व हस्तिदंताचे [→ हस्तिदंतशिल्पन] कचबंध लोकप्रिय होते. त्यांवर प्राणी किंवा पक्ष्यांचे आकार कोरलेले असत. ख्रि. पू. चारशेच्या काळात चिनी स्त्रीपुरुष कमरपट्टे वापरीत असावेत, असे दिसते. पट्ट्यांच्या आकड्यावर काल्पनिक सौंदर्याकृती, पक्षी किंवा ड्रॅगनचे आकार ब्राँझमध्ये कोरलेले असून त्यांवर सोने, चांदी व रत्ने यांचे जडावकाम केलेले असे. थांग राजकाळात (६१८ ते ९०६) तारेचे गुंफणकाम व कणदारीकाम केलेले केसातील आकडे, कंगवे, कर्णफुले वापरात होती. कपड्यावरील भरतकामासाठीही अशीच कलाकुसर केलेली फुले वापरीत. सुंगकाळात (९६०–१२७९) या केशभूषणांवर फुलपाखरे किंवा फुलांचे आकार आले व काहींवर मोती किंवा लहान खडे जडविले जाऊ लागले. याच काळात चालताना हालणारी केशभूषणेही वापरात होती. मिंगकाळात (१३६८ ते १६४४) उठावाचे व जडावाचे काम केलेले दागिने होते पण ते साध्या आकाराचे व हलक्या प्रकारचे असून त्यांवर अर्धमूल्यवान खडे वापरलेले असत. एकंदरीत चीनमध्ये मूल्यवान रत्नांचा वापर फार कमी आहे. ख्रि. पू. २०० ते इ. स. ६०० या काळात जपानमध्ये अंगभर कपड्यांमुळे दागिन्यांचा वापर फारसा नसे. १६१६ ते १८६८ या काळात गेशा आणि राजस्त्रिया केशभूषणे वापरीत. सामान्य लोकांत दागिन्यांचा वापर नसल्यामुळे ही दागिन्यांची कला जपानमध्ये अप्रगत राहिली. इ. स. १६४० मध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचा शोध हॉलंडमध्ये लागला व त्यामुळे जडजवाहिराच्या दागिन्यांचे स्वरूपच पालटून गेले. स्पेनमध्ये ही कला अधिक प्रगत झाली. पानाफुलांनी युक्त अशा सौंदर्याकृती तयार करून त्यांवर पैलू पाडलेले हिरे बसवित. इतर यूरोपीय प्रदेशात सतराव्या शतकात सोन्याऐवजी चांदीचा उपयोग करून त्यावर रत्न जडवित. हिऱ्याला २४ ते ३६ पैलू असत. त्यांमुळे त्यांचे तेज व चमक वाढली. पुढे हिऱ्याचे पैलू आणखी वाढून ते ५० पर्यंत झाले. रत्नलंकार किंवा अंगठीमध्ये आता पूर्वीप्रमाणे एकच मोठे रत्न जडविण्याऐवजी अनेक पैलूदार लहान लहान खडे वापरले जाऊ लागले. त्यांतील वैचित्र्य व विविधता वाढली. कंठहार व त्यांतील रत्नजडित पदके, डोक्यावरील केसांत किंवा टोपीवर एक खडा व पिसे इ. वापरण्याचा प्रघात रूढ झाला. धनुष्याकृती अलंकार अधिक लोकप्रिय होते. सतराव्या शतकाच्या अखेरीस हिऱ्याच्या पैलूंची संख्या ५८ पर्यंत वाढली व तो अधिकच तेजस्वी बनला. हिरेमोती जडविलेल्या उठावाच्या प्रतिमा कंठहारात व पदकात असत.
|
| 16 |
+
अठराव्या शतकांत कर्णभूषणे व कंकणे यांची रंगसंगती साधण्याकडे लोकांचा कल वाढला. खरे हिरे सामान्य लोकांना घेणे व वापरणे अशक्य होत गेल्यामुळे कृत्रिम हिरे प्रचारात आले. या शतकाच्या मध्यकाळात जडजवाहिराच्या दागिन्यांमध्ये पूर्वीपेक्षा साधेपणा अधिक वाढला व रत्नांतील रंगसौंदर्याबाबतची अभिरुचीही बदलली. आता फुलापानांचे नैसर्गिक आकार बनविताना हिऱ्याभोवती पाचू, माणिक, लाल, पुष्कराज, नील अशी इतर रत्ने जडवून ती अधिक वास्तव बनविण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला. एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये अर्धमूल्यवान जडजवाहिराला महत्त्व आले. रोजच्या वापरासाठी सामान्य मध्यमवर्गीय लोकांना त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. उठावाचे नाजुक नक्षीकाम–तारकामयुक्त आणि काळ्या वा निळ्या रंगाचे मीनाकाम केलेल्या कोंदणात बसविलेल्या रत्नांचे अलंकार (���ॅमीओ) वापरात आले. रत्नजडित कंकणे आणि लोंबती कर्णभूषणे रंगसंगती सांधलेल्या लांबलचक कंठहाराबरोबर लोकप्रिय झाली. ब्राझील व मेक्सिकोमधून अर्धमूल्यवान पुष्कराज (टोपाज), जांभळी व हिरवी रत्ने (ॲमेथिस्ट्स, ॲक्वामरिन्स) यूरोपमध्ये येऊ लागली. नकली सोने वापरून जडजवाहिराचे दागिने आता मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले व वापरात आले. विसाव्या शतकात सोन्यासारख्याच मूल्यवान अशा प्लॅटिनम धातूचा उपयोग दागिने बनविण्यासाठी होऊ लागला. अमेरिकेत जडजवाहिराच्या दागिन्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यंत्रांचाही उपयोग जडण–घडणीच्या कामात होऊ लागला. घडणीचे तंत्र व साहित्य यांत अतिशय वाढ व प्रगती झाली आहे. स्त्रियांच्या दागिन्यांच्या संचाप्रमाणे पुरुषांचेही रत्नसंच प्रचलित झाले. त्यांत सिलाच्या अंगठ्या, तपकिरीच्या डब्या, टायपिन, स्कार्फपिन, सिगारेटच्या डब्या, प्रज्वलक व होल्डर, बटने किल्ली–साखळ्या, घड्याळांची आवरणे व साखळ्या इ. विविध नित्योपयोगी वस्तू असतात. अमेरिकेतील अंगठ्यांमध्ये रंगसंगत हिरे बसविलेले असतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्लॅटिनम दुर्मिळ झाल्यामुळे पॅलॅडियम धातूचा उपयोग होऊ लागला. आता सोन्या–चांदीचा मुलामा दिलेल्या मिश्रधातूचा उपयोग केला जातो. कृत्रिम हिरे व मोती अलिकडे खऱ्या हिऱ्यामोत्यांपेक्षा तेजस्वी व चमकदार बनतात व माफक किंमतीमुळे ते लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे रत्नजडित सेफ्टीपिनची जागा रत्नकंकणांनी घेतली आहे. आधुनिक पद्धतीच्या जडजवाहिरांच्या दागिन्याचे उत्पादन आता अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर होते.
|
| 17 |
+
भारतात मोगल सत्ता नष्ट होऊन ब्रिटिश राजसत्ता आली, त्यामुळे कलाकारांना राजाश्रय उरला नाही. तसेच पूर्वीप्रमाणे जडजवाहिराच्या दागिन्यांच्या कलाकुसरीचे काम होईनासे झाले. शुद्ध सोन्याचे पण साधे व हलके दागिने तयार होऊ लागले व ते लोकप्रिय झाले. चांदीचा वापर अधिक होऊ लागला. मीनाकामाचा दर्जाही खालावला. या काळात म्हैसूर, सावंतवाडी, विशाखापट्टणम् आणि विजयानगर या ठिकाणी जडावाच्या दागिन्यांचे परंपरागत प्रकार फार सुबक तयार होत. कमीत कमी सोन्याचा व अल्पमूल्य रत्नांचा वापर करूनही तेथील कलाकारांनी या दागिन्यांचे कलात्मक मूल्य वाढविले. उठावाच्या कामातील दर्जेदारपणामुळे हे दागिने पोकळ व हलके ��सले, तरी भरगच्च व ठसठशीत दिसत. पंजाब व काश्मीर येथेही उच्च दर्जाचे दागिने तयार होत. तांबूस सोन्यामधील तारकाम, जडावाचे काम व मीनाकाम हे त्यांचे विशेष होते. कलेच्या दृष्टीने हलके, परंतु मनमोहक असे दिल्लीचे दागिनेही लोकप्रिय होते. चांदीसोन्याचे तारगुंफणयुक्त जाळीदारकाम कटकप्रमाणेच डाक्का, मुर्शिदाबाद, तंजावर व त्रिचनापल्ली येथेही होत असे. दक्षिण भारतात तयार होणाऱ्या दागिन्यांचा विशेष म्हणजे त्यांवरील पौराणिक घटनाप्रसंगाचे चित्रण. ख्रिस्ती धर्मपंथियांना आवडणारे क्रॉस किंवा हृदयकार असलेले ताईत तसेच जपमाळा व मणिबंध हे त्रिचनापल्ली येथील जवाहिऱ्यांचे खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानमधील जुन्या संस्थानांमध्ये दागिन्यांच्या रूपात जडजवाहीर विपूल प्रमाणावर आहे. त्यात स्त्रीपुरुषांचे सर्व प्रकारचे अलंकारच नव्हे, तर मिरवणुकीच्या हत्ती–घोड्यांचेही अलंकार आहेत. जयपूर येथील महाराजांच्या कंठ्यातील मोती गोटीएवढे मोठे आहेत.
|
| 18 |
+
भारतीय स्त्रियांचे अलंकार डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत वापरता येतील, इतक्या विविध प्रकारचे आहेत. उदा डोक्यावर मोत्यांची जाळी व पिंपळपान कपाळावर बिंदी नाकात नथ वा चमकी कानात डूल, कुडी, बाळी, भोकरे, वाळी किंवा बुगडी केसांच्या वेणीवर मूद, अग्रफुले व गोंडे गळ्यात मंगळसूत्र, डोरले, साज, लफ्फा, तन्मणी, वज्रटिका, सरी, चंद्रहार, चपलाहार, एकदाणी व इतर अनेक प्रकारचे कंठहार दंडात वाकी, बाजूबंद मनगटात पाटल्या, गोठ, तोडे, बिलवर बोटात अंगठी पायात साखळ्या (तोडे), पैंजण, वाळे, तोरड्या पायाच्या बोटात जोडवी, विरोदी व मासोळी इत्यादी. भारतीय पुरुषांचे अलंकारही विविध आहेत. उदा., पागोट्यावर कलगी–तुरा, शिरपेच कानात भिकबाळी गळ्यात कंठा हातात सलकडी, पोची बोटात अंगठी व छल्ले इत्यादी. परंतु बोटात अंगठी व गळ्यात लॉकेट यांशिवाय पुरुषी अलंकार फारसे वापरात नाहीत. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यानच्या काळात जपानी कल्चर्ड मोती भारतात आले. त्यानंतर अमेरिकन कृत्रिम मोती आणि रत्ने आली. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे त्याचा कमीत कमी वापर करून जडजवाहिराचे दागिने नवीन, सुंदर व आकर्षक घाटांचे तयार होऊ लागले आहेत व ते लोकप्रिय होत आहेत. अलिकडे स्त्रियांची दागिन्यांची फॅशन वाढत आहे. सातत्याने नवीन प्रकार येत आहेत. पूर्वीचे अनेकपद���ी चंद्रहार, चपलाहार इ. मागे पडले असून त्यांची जागा अनारकली, चंपाकली, अभिनेत्री या हारांनी घेतली आहे. गोठ–तोड्यांऐवजी फुगीर कंगन लोकप्रिय होत आहे. आता आकृतिबंध आणि खडे यांची रंगसंगती साधणारे या दागिन्यांचे संच अधिक लोकप्रिय होत आहेत. जुन्या प्रकारांपैकी लफ्फ्याची लोकप्रियता अजून टिकून आहे. मोत्यांची नथ व खड्यांचा साज असलेले जडावाचे कारवारी मंगळसूत्र नव्यानेच लोकप्रिय होत आहे.
|
| 19 |
+
दागिने घडविण्याचे सर्व काम सोनार हाताने करतो. सोने तापविण्यासाठी भट्टी (शेगडी) व भाता असतो. सोने वितळविण्यासाठी मूस लागते. तीतून सोन्याचा झालेला द्रव साच्यात ओततात. तो थंड झाल्यावर त्यातून सोन्याची लांब पट्टी तयार होते. ती ऐरणीवर हातोडीने ठोकून ठोकून तिला आवश्यक तो आकार व जाडी दिली जाते. चिमटा, पकड, कात्री, छिन्नी व कानस यांचे लहान मोठे प्रकार लागतात. एक बाकदार टोकाची फूंकनळी व नक्षीकामाचे विविध ठसे सोनाराजवळ असतात. सोन्याचांदीची तार ओढण्याचे उपकरण असते. तसेच झाळकाम व झिलई करण्यासाठी काही रसायने वापरतात. ग्रामीण सोनार दागिने घडविण्याचे काम एकटाच करतो. जवळच्या तुटपुंज्या साधनसामग्रीमुळे तो आपल्या कसबी हातावरच विसंबून असतो. शहरांमधून दागिन्यांचे उठावकाम, जडावकाम, नक्षीकाम, गुंफणकाम, मीनाकाम व जोडकाम करणारे निरनिराळे कलाकार आपापल्या कामांत निष्णांत असतात. परिणामतः त्या सर्वांच्या संघटित कामामुळे तयार होणारा दागिना निर्दोश परिपूर्ण होतो.
|
| 20 |
+
मुंबई भारताचे प्रवेशद्वार असल्यामुळे तेथिल जडजवाहिराचे दर्जेदार दागिन्यांचे उत्पादन सर्वात अधिक आहे. येथील जवाहिरे प्राचीन व आधुनिक दोन्ही पद्धतींचे दागिने तयार करतात. जडजवाहिराच्या दागिन्यांचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या अनेक उद्योगसंस्था मुंबईत आहेत. देशातील सर्व थरांमधील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संस्था आवश्यक त्या त्या प्रकारचे कसबी कलाकार पदरी ठेवतात. जडजवाहिरांच्या दागिन्यांचे आधुनिक प्रकार मुंबईत चांगले तयार होत असले, तरी जुन्या प्रकारच्या दागिन्यांच्या बाबतीत दिल्ली, जयपूर, लखनौकडील कला अजुनही उच्च दर्जाची मानली जाते. मूल्यवान नव्हे, तर सौंदर्यवर्धक म्हणून जडजवाहिराचे दागिने भारतात गरीब व श्रीमंत सर्वांना सारखेच प्रिय आहेत.
|
| 21 |
+
भारतातून रत्ने व जडजवाहिरांची फार म��ठी निर्यात होऊ लागलेली आहे. निर्यात होणाऱ्या एकूण मालामध्ये रत्ने व जवाहिर यांच्या निर्यातीच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा ३०० टक्के वाढ झाली आहे. ती १९७१–७२ मध्ये ७२ कोटींची व १९७३–७४ मध्ये १०५ कोटी रूपयांपर्यंत वाढली. जडजवाहिरांच्या निर्यातीमध्ये खरे हिरे, पाचू, निल, माणिक, रत्ने व कृत्रिम जवाहीर इत्यादींचा समावेश आहे.
|
| 22 |
+
|
| 23 |
+
[१]
|
| 24 |
+
[२]
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10537.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के जड किंवा वजनदार असते. त्याचा उत्कलन बिंदू पाण्यापेक्षा एका अंशाने जास्त असतो.
|
| 2 |
+
हायड्रोजन या मूलद्रव्याची एकूण तीन समस्थानिके आहेत. निसर्गातील अनेक संयुगांचा घटक असणाऱ्या नेहमीच्या हायड्रोजनच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन असून एक इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरत असतो.
|
| 3 |
+
हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाला ड्यूटेरिअम असे नाव आहे. ड्यूटेरिअमच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असे दोन कण असतात व एकच इलेक्ट्रॉन या अणुकेंद्राभोवती भ्रमण करतो.
|
| 4 |
+
हायड्रोजनच्या तिसऱ्या समस्थानिकमध्ये अणुकेंद्रामध्ये एकंदर तीन कण असतात, एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन. या अणुकेंद्राभोवतीसुद्धा एकच इलेक्ट्रॉन फिरत असतो. हायड्रोजनचे हे दुसरे दोन प्रकार निसर्गात सापडत नाहीत.
|
| 5 |
+
साधे पाणी न्यूट्रॉन्सना पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट करते, जड पाणी न्यूट्रॉन्सना पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट करत नाही. यामुळे अणुभट्टीतील आण्विक प्रक्रियांतील साखळी टिकवून ठेवण्यासाठी जड पाणी वापरले जाते. (न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर करतात.)
|
| 6 |
+
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10573.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्लेख रामायणात सीतेचा पिता व रामाचा सासरा म्हणून आला आहे. कुशध्वज जनक हा भरत-शत्रुघ्न यांचा सासरा.
|
| 2 |
+
इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचे आद्य पुरुष होते. या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली. मिथि जनकावरून या कुळास जनक हे नाव मिळाले.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10584.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,12 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनक कृत्रिम बुद्धीमत्ता ( जनरेटिव्ह अेआई, जेन अेआई, [१] किंवा GAI ) ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी जनरेटिव्ह मॉडेल्सचा वापर करून मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ किंवा इतर दत्तांश तयार करण्यास सक्षम आहे, [२] अनेकदा सूचना प्रतिसाद म्हणून. [३] [४] जनक कृत्रिम बुद्धीमत्ता प्रतिमाने त्यांच्या निविष्ट प्रशिक्षण डेटाचे नमुने आणि संरचना शिकतात आणि नंतर साम्य वैशिष्ट्ये असलेला नवीन दत्तांश तयार करतात. [५] [६]
|
| 2 |
+
रूपांतरण -आधारित सखोल चेतनी संजाळ(डीप न्यूरल नेटवर्क), विशेषतः विशाल भाषा प्रतिमाने (LLM) मधील सुधारणांमुळे २०२० च्या दशकाच्या प्रारंभी जनक अेआई प्रणालींची अेआई वृद्धी सक्षम झाली. यामध्ये चॅटजीपीटी, कोपायलट, जेमिनी आणि अॅलअॅलएअॅमए सारखे चॅटबॉट्स, मजकूर-टू-प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिमा निर्मिती प्रणाली जसे की स्टेबल डीफ्युझन, मिडजर्नी आणि डॉल-इ, आणि मजकूर-ते-दृकचित्र अेआई जनित्र जसे की सोरा यांचा सामावेश आहे. [७] [८] [९] [१०] ओपनअेआई, अॅन्थ्रोपिक, मायक्रोसॉफ्ट, गूगल, आणि बाइडू सारख्या कंपन्या तसेच असंख्य लहान कंपन्यांनी जनक अेआई प्रतिमाने विकसित केली आहेत. [३] [११] [१२]
|
| 3 |
+
कृत्रिम बुद्धिमत्तेची शैक्षणिक शिस्त १९५६ मध्ये डार्टमाउथ महाविद्यालयात आयोजित केलेल्या संशोधन कार्यशाळेत स्थापित करण्यात आली होती आणि त्यानंतरच्या दशकांमध्ये प्रगती आणि आशावादाच्या अनेक लाटा अनुभवल्या आहेत. [१३] त्याच्या स्थापनेपासून, क्षेत्रातील संशोधकांनी मानवी मनाचे स्वरूप आणि मानवासारख्या बुद्धिमत्तेसह कृत्रिम प्राणी निर्माण करण्याच्या परिणामांविषयी तात्विक आणि नैतिक तर्क मांडले आहेत; या मुद्द्यांचा पुरातन काळापासून पुराणकथा, काल्पनिक कथा आणि तत्त्वज्ञानाद्वारे शोध घेतला गेला आहे. [१४] स्वचलित कलेची संकल्पना किमान प्राचीन ग्रीक सभ्यतेच्या ऑटोमॅटा पर्यंतची आहे, जिथे डेडालस आणि अलेक्झांड्रियाचा हिरो सारख्या शोधकांना मजकूर लिहिण्यास, ध्वनी निर्माण करण्यास आणि संगीत वाजविण्यास सक्षम यंत्र सुरचित केलेले असल्याचे वर्णन केले गेले. [१५] सृजनशील ऑटोमॅटन्सची परंपरा संपूर्ण इतिहासात भरभराटीला आली आहे, ज्याचे उदाहरण १८०० च्या दशकाच्या प्रारंभी तयार करण्यात आलेल्या मेलर्डेटच्या ऑटोमॅटनने दिले आहे. [१६]
|
| 4 |
+
कृत्रिम बुद्धीमत्ता ही एक कल्पना २०व्या शतकाच्���ा मध्यापासून समाजाला मोहित करत आहे. या संकल्पनेची जगाला ओळख करून देणाऱ्या विज्ञान कल्पनेने त्याचा प्रारंभ झाला पण ॲलन ट्युरिंग या बहुपयोगी व्यक्तीला या संकल्पनेच्या व्यवहार्यतेविषयी आतुरता वाटेपर्यंत ही कल्पना पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने दिसली नाही. ट्युरिंगचा १९५० चा अभूतपूर्व संशोधनपत्र, " संगणक यंत्रे आणि बुद्धिमत्ता ," मानवी बुद्धिमत्तेप्रमाणेच यंत्राच्या तर्कांविषयी पायाभूत प्रश्न विचारला, ज्याने अेआई च्या संकल्पनात्मक पायाभरणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. उच्च खर्चामुळे आणि संगणक आदेश संचयित करण्यास सक्षम नसल्यामुळे अेआई चा विकास सुरुवातीला फारसा वेगवान नव्हता. अेआई वर १९५६ च्या डार्टमाउथ अुन्हाळी संशोधन प्रकल्पादरम्यान हे बदलले जेथे अेआई संशोधनासाठी एक प्रेरणादायी हाक होती, ज्याने या क्षेत्रात दोन दशकांच्या त्वरित प्रगतीचा आदर्श ठेवला. [१७]
|
| 5 |
+
१९५० च्या दशकात अेआई ची स्थापना झाल्यापासून, कलाकार आणि संशोधकांनी कलात्मक कामे तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. १९७० च्या दशकाच्या प्रारंभी, हॅरोल्ड कोहेन चित्रे तयार करण्यासाठी कोहेन या संगणक प्रोग्रामने तयार केलेल्या आरोन् द्वारे तयार केलेल्या जनकसूत्री अेआई कार्यांची निर्मिती आणि प्रदर्शन करत होते. [१८]
|
| 6 |
+
२०व्या शतकाच्या प्रारंभी रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांनी विकसित केल्यापासून मार्कोव्ह साखळ्यांचा वापर नैसर्गिक भाषांच्या प्रतिमानांसाठी केला जात आहे. मार्कोव्हने १९०६ मध्ये या विषयावर आपला पहिला शोधनिबंध प्रकाशित केला, [१९] [२०] [२१] आणि मार्कोव्ह साखळी वापरून युजेनी वनगिन या कादंबरीतील स्वर आणि व्यंजनांच्या पद्धतीचा विश्लेषण केले. एकदा मार्कोव्ह साखळी मजकूर कॉर्पसवर शिकल्यानंतर, ती नंतर सशक्य मजकूर जनित्र म्हणून वापरली जाऊ शकते. [२२] [२३]
|
| 7 |
+
यंत्र शिक्षणाचे क्षेत्र अनेकदा दत्तांश प्रतिमान आणि अनुमान लावण्यासाठी जनकसूत्री प्रतिमानांसह सांख्यिकीय प्रतिमाने वापरते. २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात, सखोल शिक्षणाच्या उदयाने प्रतिमा वर्गीकरण, उच्चार ओळखणे, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि इतर कार्यांमध्ये प्रगती आणि संशोधन केले. जनकसूत्री प्रतिमानीकरणाच्या अडचणीमुळे या युगातील चेतनी संजाळांना विशेषतः भेदभावी प्रतिमाने म्हणून प्रशिक्षित केले गेले. [२४]
|
| 8 |
+
२०१४ मध्ये, परिवर्तनात्मक स्वसंकेतक आणि जनकसूत्री प्रतिकूलात्मक संजाळासारख्या प्रगतीने प्रतिमांसारख्या क्लिष्ट दत्तांशासाठी, भेदभावाच्या विरूद्ध जनकसूत्री प्रतिमाने शिकण्यास सक्षम असलेले पहिले व्यावहारिक सखोल चेतनी संजाळ तयार केले. हे सखोल जनकसूत्री प्रतिमाने केवळ प्रतिमांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रतिमांसाठी वर्ग नावे निष्पन्न करणारे पहिले होते.
|
| 9 |
+
२०१७ मध्ये, ट्रान्सफॉर्मर संजाळाने जुन्या दीर्घ-लहान कालीन स्मरणशक्ती प्रतिमानांच्या तुलणेत जनकसूत्री प्रतिमानांमध्ये प्रगती सक्षम केली, [२५] ज्यामुळे २०१८ मध्ये जीपीटी-१ म्हणून ओळखले जाणारे पहिले जनकसूत्री पूर्व-प्रशिक्षित रूपांतरक (GPT) आले [२६] याचे अनुसरण २०१९ मध्ये जनकसूत्री पूर्व-प्रशिक्षित रूपांतरक-२(GPT-2) द्वारे केले गेले ज्याने पायाभूत प्रतिमाने म्हणून अनेक भिन्न कार्यांसाठी पर्यवेक्षणाशिवाय सामान्यीकरण करण्याची क्षमता प्रदर्शित केली. [२७]
|
| 10 |
+
2021 मध्ये, DALL-E, रूपांतरक-आधारित पिक्सेल जनकसूत्री प्रतिमान, त्यानंतर मिडजर्नी आणि स्टेबल डिफ्यूजनचे प्रकाशन नैसर्गिक भाषेच्या सुचनेमधून व्यावहारिक उच्च-गुणवत्तेच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कलेचा उदय झाला.
|
| 11 |
+
मार्च २०२३ मध्ये, जनकसूत्री पूर्व-प्रशिक्षित रूपांतरक-४(GPT-4) विमुचित झाला. मायक्रोसॉफ्ट संशोधनाच्या एका संघाने असा युक्तिवाद केला की "याला कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (एजीआय) प्रणालीची प्रारंभिक (अजूनही अपूर्ण) आवृत्ती म्हणून पाहिले जाऊ शकते". [२८] इतर विद्वानांनी विवाद केला आहे की GPT-4 या उंबरठ्यावर पोचते, जेनकसूत्री अेआईला २०२३ पर्यंत "सामान्य मानवी बुद्धिमत्तेच्या आदर्शमानापर्यंत पोचण्यापासून अतिशय दूर" म्हणाले. [२९] २०२३ मध्ये, मेटा ने इमेजबाईंड नावाचे अेआई प्रतिमान अनुसृत केले जे मजकूर, प्रतिमा, दृकपट, उष्ण दत्तांश, ३डी दत्तांश, श्राव्य आणि मोशन मधील दत्तांश एकत्र करते जे अधिक अवगाहक जनकसूत्री अेआई आशयासाठी मुभा देईल अशी अपेक्षा आहे. [३०] [३१]
|
| 12 |
+
जनकसूत्री कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासामुळे शासन, व्यवसाय आणि व्यक्तींकडून चिंता वाढली आहे, परिणामी निषेध, कायदेशीर कारवाई, अेआई प्रयोग थांबवण्याचे आवाहन आणि अनेक शासनांच्या कृती. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदाच्या जुलै २०२३ च्या ब्रीफिंगमध्ये, सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की "जनकसूत्री अेआई मध्ये चांगल्या आणि वाईटाची मोठ्या प्रमाणात क्षमता आहे", की अेआई "जागतिक विकासाला टर्बोचार्ज" करू शकते आणि जागतिक स्तरावर $१० ते $१५ सहस्त्रकोटीचे योगदान देऊ शकते. २०३० पर्यंत अर्थव्यवस्था, पण त्याच्या दुर्भावयुक्त वापरामुळे "मरण आणि विनाश, व्यापक आघात आणि अकल्पित प्रमाणात खोल मानसिक अवहानी होऊ शकते". [३२]
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10586.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहिले जनकोजी शिंदे (इ.स. १७४५ - इ.स. १७६१) हे शिंदे घराण्यातील ग्वाल्हेर संस्थानाचे राजे होते. इ.स. १७६१ सालातील पानिपताच्या तिसऱ्या लढाईत त्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले व मारण्यात आले.
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10594.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,70 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
जनगाव हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचना होण्यापूर्वी हा वरंगल जिल्हा आणि नलगोंडा जिल्ह्याचा एक भाग होता. जनगाव येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
|
| 3 |
+
जनगाव हे नाव “जैनगाव” यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ “जैनांचे गाव”, हा भारताचा धर्म आहे.[१]
|
| 4 |
+
जनगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा यदाद्रि भुवनगिरी, सिद्दीपेट, हनमकोंडा, वरंगल आणि महबूबाबाद जिल्ह्यांसह आहेत.
|
| 5 |
+
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जनगांव जिल्ह्याची लोकसंख्या ५,६६,३७६ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.४४% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १२.६% लोक शहरी भागात राहतात.
|
| 6 |
+
जनगांव जिल्ह्या मध्ये १२ मंडळे आहेत: जनगांव आणि घणपूर स्टेशन ही दोन महसूल विभाग आहेत.
|
| 7 |
+
|
| 8 |
+
•
|
| 9 |
+
करीमनगर
|
| 10 |
+
•
|
| 11 |
+
कामारेड्डी
|
| 12 |
+
•
|
| 13 |
+
कुमुरम भीम आसिफाबाद
|
| 14 |
+
•
|
| 15 |
+
खम्मम
|
| 16 |
+
•
|
| 17 |
+
जगित्याल
|
| 18 |
+
•
|
| 19 |
+
जनगांव
|
| 20 |
+
•
|
| 21 |
+
जयशंकर भूपालपल्ली
|
| 22 |
+
•
|
| 23 |
+
जोगुलांबा गदवाल
|
| 24 |
+
•
|
| 25 |
+
नलगोंडा
|
| 26 |
+
•
|
| 27 |
+
नागरकर्नूल
|
| 28 |
+
•
|
| 29 |
+
नारायणपेट
|
| 30 |
+
•
|
| 31 |
+
निजामाबाद
|
| 32 |
+
•
|
| 33 |
+
निर्मल
|
| 34 |
+
•
|
| 35 |
+
पेद्दपल्ली
|
| 36 |
+
•
|
| 37 |
+
भद्राद्री कोठगुडम
|
| 38 |
+
•
|
| 39 |
+
मंचिर्याल
|
| 40 |
+
•
|
| 41 |
+
महबूबनगर
|
| 42 |
+
•
|
| 43 |
+
महबूबाबाद
|
| 44 |
+
•
|
| 45 |
+
मुलुगु
|
| 46 |
+
•
|
| 47 |
+
मेडचल-मलकाजगिरी
|
| 48 |
+
•
|
| 49 |
+
मेदक
|
| 50 |
+
•
|
| 51 |
+
यदाद्रि भुवनगिरी
|
| 52 |
+
•
|
| 53 |
+
रंगारेड्डी
|
| 54 |
+
•
|
| 55 |
+
राजन्ना सिरिसिल्ला
|
| 56 |
+
•
|
| 57 |
+
वनपर्ति
|
| 58 |
+
•
|
| 59 |
+
वरंगल
|
| 60 |
+
•
|
| 61 |
+
विकाराबाद
|
| 62 |
+
•
|
| 63 |
+
संगारेड्डी
|
| 64 |
+
•
|
| 65 |
+
सिद्दिपेट
|
| 66 |
+
•
|
| 67 |
+
सूर्यापेट
|
| 68 |
+
•
|
| 69 |
+
हनमकोंडा
|
| 70 |
+
•
|
dataset/scraper_3/batch_4/wiki_s3_10607.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
|
| 2 |
+
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-
|