diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fc0e318e3d2d40ac53092afae52c0a52a33777e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10.txt @@ -0,0 +1,2 @@ +भौतिकीत विद्युत द्विध्रुव जोर प्रभाराच्या व्यवस्थेतील धन आणि ऋण विद्युतप्रभारामधल्या अंतराचे मापन आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण कुलोंब-मीटर (C m) मध्ये मोजले जाते +सोप्या प्रकारात, +q आणि −q ह्या दोन प्रभारबिंदू d एवढ्या अंतराने लांब असतील तर विद्युत द्विध्रुव जोर p पुढीलप्रमाणे असते: diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10000.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5e20d05bfe66b74e01172f352e1404d7f0618d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10000.txt @@ -0,0 +1,51 @@ +छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. +छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. +संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. +त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[१] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[२] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. +अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ संदर्भ हवा ] +शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ] +तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ] +दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ] +श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | +यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || +अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ] +संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्‌प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे : +|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || +|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री || +यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ] +दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ] +संतजनांस राजाश्रयः +१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ] +२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ] +४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ] +६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ] +७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ] +८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ] +सक्तीने धर्मांतरास विरोध: +छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ] +अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख: +छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ] +'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...' +सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले) +श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले +(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) +औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. +इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[३] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. +छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ] +मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ] +अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. +संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ] +बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे : +'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः । +जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥ +अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास +तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ " +याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ] +(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या) +संभाजी महाराजांवरील नाटके diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10001.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b219ce80839dd8396563fe54c4f6f8a67cb26585 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10001.txt @@ -0,0 +1,32 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. +लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली +या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद +हे ग्रंथ उपलब्ध आहेत.श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी +छ.येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत,फारसी,उर्दु,अरबी,ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते.इंग्रजीतुन त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला.अतिशय हुशार,कर्तबगार,दुरदरषी,अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते. +या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितात यावरूनच ते सुसंस्कृत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते. +शिवाजीराजे स्तुती - +कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः । +जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥ +अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास +तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ " +शहाजी राजे स्तुती- +भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| +अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: || +अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता. +असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले. +श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक (संभाजी राजे स्तुती) - +तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:| +यःकाव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी || +अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.) +क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक- +येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति | +प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा|| +यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: | +पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: || +अर्थ: ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले. +बुधभूषण +लेखक.छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10006.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319661da099b5368e7bc9680b61a6c540dc2338e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10006.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +छत्रपती संभाजी द्वितीय(1698 - 18 डिसेंबर 1760) भोसले वंशजातीचा कोल्हापूरचा राजा होता. छत्रपती थोरले शिवाजी महाराजांचे नातु आणि छत्रपती पहीले राजाराम महाराजांचे द्वितीय पुत्र (थोरले राजाराम व महाराणी राजसबाई यांचे पुत्र) होते. दुसऱ्या सम्भाजींच्या सावत्र आई महाराणी ताराबाई यांनी थोरल्या शाहूच्या पराभवानन्तर कोल्हापूर येथे 1710 ते 1714 पर्यन्त आपल्या पुत्र शिवाजी द्वितीयसह कोल्हापूरचे राज्य म्हणून कोल्हापूर राजगादीची स्थापना केली. त्या वेळी, राजसाबाईंनी ताराबाईंच्या विरोधात बण्ड केले आणि स्वतःचा पुत्र दुसऱ्या सम्भाजीला गादीवर बसवले. कोल्हापूरचे सिंहासनावर सम्भाजी द्वितीय ने 1714 ते 1760 पर्यन्त राज्य केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, सम्भाजींनी आपल्या चुलत भावाकडून म्हणजे थोरल्या शाहूकडून मराठा साम्राज्य प्रस्थापित करण्यास सहमती दर्शवली. 1731 मध्ये वारणेच्या तहात दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी केली तेव्हा राज्याच्या वाटणीचा संघर्ष सम्पला. या करारानुसार दोन्ही बाजूंनी कृष्ण आणि तुंगभद्रा नद्यांमधील प्रदेश दुसरा सम्भाजी व थोरल्या शाहू महाराजांनी वाटून घेतला. दुसऱ्या सम्भाजी नन्तर गादीवर आलेल्या तिसऱ्या शिवाजीच्या काळात राजमाता म्हणून जिजीबाईंनी त्यांचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10040.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79871a1de384a7a5536957b358bb2534130a6fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10040.txt @@ -0,0 +1,2 @@ +संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी नेपाळचा दौरा केला.[१][२] तिन्ही सामने त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळले गेले.[३] या मालिकेने नेपाळला डिसेंबर २०२२ मध्ये नामिबियामध्ये क्रिकेट विश्वचषक लीग २ चा भाग असलेल्या तिरंगी मालिकेसाठी तयारी केली.[४] +पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांचा ८४ धावांनी पराभव झाला.[५] नेपाळने दुसरा एकदिवसीय सामना तीन गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली, आरिफ शेख आणि गुलसन झा यांच्यात सातव्या विकेटसाठी ६२ धावांच्या भागीदारीमुळे त्यांना टॉप ऑर्डरच्या पडझडीतून सावरण्यात मदत झाली.[६] नेपाळने तिसरा एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला, आसिफ शेखने यशस्वी पाठलाग करताना नाबाद ८८ धावा करून, घरच्या द्विपक्षीय वनडे मालिकेतील पहिला विजय मिळवला.[७] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10061.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c072b2f1fcbcc1ecc9a0b620b4383bfd40bd3107 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10061.txt @@ -0,0 +1,3 @@ +संयुक्त राष्ट्रे आमसभा हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्त्व असते. संयुक्त राष्ट्रांचा अर्थसंकल्प सांभाळणे, सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेची प्रमुख कर्तव्ये आहेत. +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10062.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cf1eb3fe802d92c56030a5fe30417b9b91b4a35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10062.txt @@ -0,0 +1 @@ +३० एप्रिल२०१९ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालावर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात एकूण शांतता रक्षक योगदान केल्यानुसार देशांची यादी आहे. [१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10110.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fff03661adacb0a249dcde219edd3932791fc15b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10110.txt @@ -0,0 +1 @@ +पूरक उपग्रह प्रक्षेपण यान (en:Augmented Satellite Launch Vehicle) हे ५ टप्प्यात चालणारे घन इंधन (सॉलीड प्रोपेलंन्ट) उपग्रह यान आहे. हे यान १५० किलोचे उपग्रह निम्न उपग्रह कक्षेत (लो अर्थ ऑर्बीट)मध्ये ठेवु शकते. ८० च्या दशकात इस्रो ने हा प्रोजेक्ट पेलोड भूस्थिर कक्षेत पाठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने सुरू केला. ह्या यानाची बांधनी उपग्रह प्रक्षेपण यानावर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10122.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a4edf68c362071b0eb2e343418ecedc814fa917 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10122.txt @@ -0,0 +1,6 @@ +यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. यशवंत मनोहर हे स्वतः, संविधान निर्माता आणि संविधान चिंतन या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनांच्या तारखा अश्या-- +पहिले संविधान निर्माता साहित्य संमेलन, सांगली, १६-१७ जानेवारी २०१०. +भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन, उमरेड (नागपूर जिल्हा), २५-२६ एप्रिल २०१०. +या संमेलनांत डॉ. यशवंत मनोहर यांनी दिलेली अध्यक्षीय भाषणे त्यांच्या ’बत्तीस भाषणे’ या पुस्तकात छापली आहेत. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10127.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c2693b8a2b3ab9b988fa58704add2ccdeab8e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10127.txt @@ -0,0 +1,5 @@ +अभिजात यामिकानुसार रेषीय संवेग (इंग्लिश: Momentum, मोमेंटम) (आंगप एककः किग्रा.•मी./से., किंवा, न्यू.•से.) हे एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाचा व वेगाचा गुणाकार असतो. +वेगाप्रमाणेच संवेगदेखील सदिश राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. संवेग अक्षय्यतेचा नियम या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो. +← ऐक … भैद → +(अचल वस्तुमान गृहीत धरून) +संवेग | बल | जोर | घिसड | हादरा | दणका diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10128.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52b2fba58569a4b3ae7bcd027d32ba00a360ff0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10128.txt @@ -0,0 +1,2 @@ +अभिजात यामिकानुसार एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. या गुणधर्माला संवेग अक्षय्यतेचा नियम (इंग्लिश: Law of conservation of linear momentum, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम) असे म्हणतात. +"हा न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम आहे" diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10130.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7379ee4e63205cb7b8b61dfb7a60ca33ad1886f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10130.txt @@ -0,0 +1,4 @@ +संवेदक (जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्लिश:Sensor) म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन. हे साधन प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रूपांतर करते. हे संवेदक पारंपरिक मापन यंत्रांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, पाऱ्याच्या उष्णतेच्या कमी अधिक होण्याने प्रसरण आणि आकुंचन होण्याच्या गुणधर्मावर आधारित [[तापमापी]च्या ऐवजी आता तापमानानुसार विद्युत्‌विरोध बदलणारी थर्मिस्टर नावाची वस्तू वापरून तापमापीचा संवेदक बनतो. याला रेडियो सर्किट जोडून दूरवरून तापमान वाचता येते. +बाजारात विविध प्रकारचे संवेदक भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांचा वापर रोजच्या वापरातील अनेक उपकरणात केला जातो. +डोळे, कान, त्वचा हे जैव संवेदक आहेत. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10148.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e0f5886f2c086f861348919dbb6e0a98362d1ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10148.txt @@ -0,0 +1,6 @@ +संसदीय कामकाज मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. संसदीय कामकाजाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री याचे नेतृत्व करतात. +हे भारताच्या संसदेशी संबंधित व्यवहार हाताळते आणि लोकसभा ("लोकांचे सभागृह," खालचे सभागृह ) आणि राज्यसभा ("राज्यांची परिषद," वरचे सभागृह ) या दोन सभागृहांमधील दुवा म्हणून काम करते. हे १९४९ मध्ये एक विभाग म्हणून तयार केले गेले परंतु नंतर ते पूर्ण मंत्रालय बनले. +संसदीय कामकाज मंत्री हे मंत्रीपरिषदेचे सदस्य म्हणून कॅबिनेट दर्जाचे असतात. सध्याचे मंत्री प्रल्हाद जोशी आहेत. संसदीय कामकाज मंत्रालय संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या संपूर्ण निर्देशानुसार काम करते. +'सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि इतर संस्थांवरील संसद सदस्यांचे नामनिर्देशन' हा विषय संसदीय कामकाज मंत्रालयाला भारत सरकार (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ अन्वये राष्ट्रपतींनी कलम ७७(३) दिलेला आहे. +भारत सरकारच्या (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ अंतर्गत राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेच्या कलम ७७(३) अंतर्गत मंत्रालयाला नियुक्त केलेली कार्ये:- +संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलावणे आणि स्थगित करणे, लोकसभा विसर्जित करणे, राष्ट्रपतींचे संसदेला अभिभाषण. दोन्ही सभागृहातील विधान आणि इतर अधिकृत कामकाजाचे नियोजन आणि समन्वय. सदस्यांनी सूचना दिलेल्या प्रस्तावांवर चर्चेसाठी संसदेत सरकारी वेळेचे वाटप. संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध पक्ष आणि गटांचे नेते आणि व्हिप यांच्याशी संपर्क. विधेयकांवरील निवडक आणि संयुक्त समित्यांच्या सदस्यांच्या याद्या. सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि इतर संस्थांवर संसद सदस्यांची नियुक्ती. विविध मंत्रालयांसाठी संसद सदस्यांच्या सल्लागार समित्यांचे कार्य. संसदेत मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी. खाजगी सदस्यांच्या विधेयकांवर आणि ठरावांवर सरकारे उभी असतात. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीला सचिवीय सहाय्य. प्रक्रियात्मक आणि इतर संसदीय बाबींवर मंत्रालयांना सल्ला. संसदीय समित्यांनी केलेल्या सर्वसाधारण अर्जाच्या शिफारशींवर मंत्रालयांद्वारे कारवाईचे समन्वय. संसद सदस्यांच्या प्रेक्षणीय स्थळांना अधिकृतरीत्या प्रायोजित भेटी. संसद सदस्यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि प्रतिकारशक्ती यांच्याशी संबंधित मुद्दे. संसदीय सचिव - कार्ये. देशभरातील शाळा/महाविद्यालयांमध्ये युवा संसद स्पर्धांचे आयोजन. अखिल भारतीय सचेतक सम्मेलनचे आयोजन. इतर देशांसोबत संसद सदस्यांच्या सरकार प्रायोजित शिष्टमंडळांची देवाणघेवाण. लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम ३७७ अन्वये आणि राज्यसभेत विशेष उल्लेखांद्वारे उपस्थित केलेल्या प्रकरणांबाबत धोरण निश्चित करणे आणि पाठपुरावा करणे. मंत्रालये/विभागांमध्ये संसदीय कामकाज हाताळण्यासाठी नियमपुस्तिका. संसद कायदा, १९५३ (१९५३चा २०) वेतन आणि भत्ते. संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन अधिनियम, १९५४ (१९५४चा ३०). संसद कायदा, १९७७ (१९७७चा ३३) मध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते. संसदेतील मान्यताप्राप्त पक्ष आणि गटांचे नेते आणि मुख्य चाबूक (सुविधा) अधिनियम, १९९८ (१९९९चा ५). diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10160.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a2fa1f1c96fe89df213c6a783184e7b2c9ff050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10160.txt @@ -0,0 +1 @@ +संसार diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1018.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..822545cae182edac28b763090a6d4505baa8e55d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1018.txt @@ -0,0 +1 @@ +विवारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10183.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5fc7a1f6f6f7ca6dde65c418ef92120e4b20587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10183.txt @@ -0,0 +1,42 @@ +संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत, म्हणूनच संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटले जाते.[ संदर्भ हवा ] +संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती,इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे. +कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. कवी कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् आणि ऋतुसंहार ही महाकाव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +भारताच्या सांस्कृतिक वारशात संस्कृतचा दर्जा, कार्य आणि स्थान भारताच्या आठव्या अनुसूची भाषांच्या संविधानात समाविष्ट करून ओळखले जाते. तथापि, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करूनही, भारतात संस्कृतचे प्रथम भाषक नाहीत. भारताच्या अलीकडील प्रत्येक दशवार्षिक जनगणनेमध्ये, हजारो नागरिकांनी संस्कृत ही त्यांची मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे, परंतु ही संख्या भाषेच्या प्रतिष्ठेशी जुळवून घेण्याची इच्छा दर्शवते असे मानले जाते. प्राचीन काळापासून पारंपरिक गुरुकुलांमध्ये संस्कृत शिकवली जाते; हे आज माध्यमिक शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिकवले जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत १७९१ मध्ये स्थापन केलेले बनारस संस्कृत महाविद्यालय हे सर्वात जुने संस्कृत महाविद्यालय आहे. हिंदू आणि बौद्ध स्तोत्रे आणि मंत्रांमध्ये संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर औपचारिक आणि धार्मिक भाषा म्हणून वापर केला जात आहे. +पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात. +संस्कृत भाषेतील शब्द भांडार अतिशय समृद्ध आहे.धातूपासून शब्द,अनेक धतुसादिते आणि एका शब्दापासून अनेक शब्द अशी ही भाषा शब्द प्राचूर्याच्या शिखरावर दिसते.या भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिसून येतात. +जसे :- +‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे. +संस्कृत भाषेत एकेका देवाला ही अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णूसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही अनेक जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम हे त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते. +संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत. +संस्कृत भाषेचे मुख्य वेगळेपण म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही. +वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्‌।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) याचं अर्थ निश्चिती मुळे ही भाषा अंतराल क्षेत्रात उपयोगी ठरू शकते. +प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून श्रीलंकापर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले. +राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती... +‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राजभाषा, (संपर्क भाषा) व्हावी असे वाटे.[ संदर्भ हवा ] +कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते, यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. +ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही. +जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे. +मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ] +पूर्वी संस्कृत लोकभाषा असावी. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक मानतात. +संस्कृत ही सर्व भाषांची मातृभाष, आहे असे सुद्धा काही लोक मानतात . +संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलीले जात असत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.[ संदर्भ हवा ] +ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.त्यात अ , उ , मचा समावेश केला आहे. +अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ +क् ख् ग् घ् ङ् +च् छ् ज् झ् ञ् +ट् ठ् ड् ढ् ण् +त् थ् द् ध् न् +प् फ् ब् भ् म् +य् र् ल् व् श् +ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.) +सूत्र - अकुहविसर्जनीयानां कण्ठः +कण्ठ्यवर्ण - अ क् ख् ग् घ् ङ् ह् +सूत्र - इचुयशानां तालुः +तालव्यवर्ण - इ च् छ ज् झ् ञ य् श् +सूत्र - ऋटुरषानां मूर्धा +संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्‍येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्‍यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत. +संस्कृतभाषेत उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात. +एके काळी भारताची ज्ञानभाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे. बाणभट्ट- कादंबरी; महाकवी कालिदास- अभिज्ञानशाकुन्तलम्, मेघदूत, कौटिल्य-अर्थशास्त्र, अश्वघोष-बुद्धचरितम् हे काही संस्कृत साहित्यामधील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे ग्रंथ आहेत. +२१व्या शतकात माहाराष्ट्रात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा फारसा प्रयत्‍न करत नाहीत, शाळेत केवळ एक विषय या हेतूने संस्कृत शिकली जाते. +संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे. +इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत नियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10195.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa664cd600f95fd276f23fac86f4c406175df1af --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10195.txt @@ -0,0 +1,3 @@ +सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१] सई मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला. सई ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न बंधनात अडकली.[२] + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10214.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8260c4dc2a646e4fd89fda2ac6b9141e50aeb08d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10214.txt @@ -0,0 +1,2 @@ +सकनेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10215.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dfcba1d0443ff1722395fc1e0ef76b48e89394e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10215.txt @@ -0,0 +1,3 @@ +सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[१] +जीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते. +जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10248.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b90dbe429b1d2460ea72ded526577df76d689bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10248.txt @@ -0,0 +1,5 @@ + +सखाराम कलाल उर्फ सखा कलाल (जन्म:१० डिसेंबर १९३८; - मृत्यू:१४ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते. +सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून श्री.पु. भागवतांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. वि.स. खांडेकर आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले. +लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले. +सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10254.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a5ed733e079eaa77dc004d742d6c4823ecf547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10254.txt @@ -0,0 +1,9 @@ +सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. +निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग इ.स. १९७२ मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेत याचे भाषांतरही झाले न्यू यॉर्क शहरात दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले. +नाटकाचा विषय असलेला बाईंडर हा खरोखरच वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्यातुकड्यांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. +एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाइंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला. +तेंडुलकरांचे हे नाटक श्री. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. नाटक पाहिलेल्यांनी, आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी 'या नाटकात अश्लीलता आहे', 'या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे', 'हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे', असा ओरडा करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला. +नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक श्री. कमलाकर सारंग कोर्टात गेले, आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर केस जिंकले. 'सखाराम बाईंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. +निळू फुले आणि लालन सारंग यांनी १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी ध्वनिचित्रफीतीसाठी हे नाटक केले होते. +या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. +२००१ साली ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना तेथील २०-२२ वर्षाच्या मुलांनी स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बाईंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. पुन्हा त्याच टीमसोबत २०१७ साली, हे स्त्री-पुरूष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक परत रंगभूमीवर येणार आहे. यावेळी नाटकाचे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असे दोनच प्रयोग होणार आहेत. नाटकात मुक्ता बर्वे, संदीप पाठक, सुहास शिरसाट, यांच्या भूमिका असतील. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10268.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59a41edc8527f5d61ada262c8890b1454dead0a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10268.txt @@ -0,0 +1,25 @@ + +माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.६९ फूट)[१] इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. +सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या आधी हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌ऱ्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले. +माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यू झीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत. +नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा [२] असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. तिबेटी भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे म्हणतात. चिनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰) असे आहे. +सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्‌ऱ्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये देहरादून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XVची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्‍यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.[३] १८५६मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले. +चीन, तिबेट व नेपाळ यांनी आपापल्या परीने एव्हरेस्टला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्‍न केले. परंतु इतर सर्व देशांत शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते. या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणाऱ्या राधानाथ सिकदार याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटलबिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो मंजूर होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले. +सर्वप्रथम ॲन्ड्‌ऱ्यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XVची)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते. +सर्वात अलीकडे एव्हरेस्टची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.[४] ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली.[५] व खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. +एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतु अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कॅंप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेसकॅंप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे. (साधारणपणे ४,२०५ मीटर)[६] +जर बेसकॅंप पासूनची उंची ग्राह्य धरण्यात येत असेल तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच आहे.[६] हा पर्वत त्याच्या तळापासून ५,६०० मीटर इतका उंच आहे तर परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६,१९३ मीटर इतकीच आहे.[७] तर एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकॅंपपासूनची उंची ४,६५० मीटर इतकी आहे.[८] +माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[९] या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[९] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.[१०] +चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[११][१२] काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्‍न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते. + सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[१३] +जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले. +पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले. +१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकॅंपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे आधीच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकाऱ्यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरून त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे. +१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्‍न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनॉं यांनी केले होते. डुनॉं यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लॅंबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.[१४][१५] +१९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्‍न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे [१६] व न्यू झीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी [१७] या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.[१८]. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाऊन आनंद साजरा केला. +एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यू झीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. +८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.[९][९][१९] +पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही. जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लक्षणीय आहे. पहिले चढाई करणारे तेनसिंग नोर्गे त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदलातर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहीम १९६०मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसऱ्या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे. +१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.[२०] यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले [२१]. १९ मे, २०१६ रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले. +एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू [२२] झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही वृतपत्रांत हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली. +मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासान्ती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.[२३][२४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1027.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c57548a7a0623446eff825a2a5bd6eca351f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1027.txt @@ -0,0 +1,11 @@ +हा लेख 53 सेकंद पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +योग ही एक उत्कृष्ट जगण्याची कला आणि विज्ञान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून योगविज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. योगामुळे आपले मन, शरीर बलवान आणि सुंदर बनते. योग हा मानसिक आणि शारीरिक पातळीवर असणारे आजार मुळापासून बरे करण्यास मदत करतो. +पुरातन काळात भारतीय संस्कृतीमध्ये राजे, ऋषी, मुनी,सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात योगशास्त्र वापरत असत. त्यमुळे त्यांचे जगणे अजून आनंदमय होत असे.आजही हिमालयात अनेक ऋषी-मुनी योगसाधना करतात. +आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक लहान - थोर मंडळीनी योगविज्ञान शिकले पाहिजे . योगाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे ध्यानधारणा करून आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन,ताडासन,मास्य्सान ,धनुरासन हे काही प्रकार होत. अनुक्रमे मंड्या,उंची वाढवणे,पोट,शरीर यासाठी ही आसने फार लाभ दायक आहेत. आजकाल शाळेत शारीरिक शिक्षण तासाला योगासने शिकवली जातात. हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वाढत्या वयातले उत्तम औषध आहे. शारीरिक संतुलनाचा एक महामार्ग आहे. +दुर्धर आजारांनी त्रासलेल्या लोकांना, मानसिक आजारी असलेले लोक,कामाच्या ताणापासून मुक्ती हवी असलेल्यांना ध्यानधारणा हा एक राजमार्ग आहे. थोड्याश्या जागेतही, रोज थोडा वेळ दिला तरी आपण ध्यानधारणा करू शकतो. +येथे विविध आसनांचे चित्रदालन तयार केले आहे.[१] + +[९] +[१३३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10284.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1602f2e5283999bf8e94985c1aee122a48f64036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10284.txt @@ -0,0 +1,3 @@ +सचिंद्र चौधरी (२४ फेब्रुवारी १९०३[१] - ????) भारतीय वकील व राजकारणी होते. १९६५ पासून ते १३ मार्च १९६७ पर्यंत ते लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे अर्थमंत्री होते. ते अनेक कंपन्यांचे संचालक होते, सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदस्य, लॉ कमिशनचे सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.[१] +सचिंद्र चौधरी घाटळ मतदारसंघातून भारतीय संसदचे सदस्य होते. ते भारताचे अर्थमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्था दोन वर्षांच्या मंदीत गेली. वास्तविक जीडीपी वाढ १९६५ मध्ये २.६% आणि १९६६ मध्ये ०.०६% नी कमी झाली. परिणामी रुपया प्रथमच घटला गेला. +सचिंद्र चौधरी यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९०३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील प्रमोद चंद्र चौधरी होते. त्यांनी कलकत्ता येथील रानी भांबानी विद्यालयात शिक्षण घेतले, नंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकले आणि त्यानंतर केंब्रिज येथील फित्झविल्यम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते लिंकन्स इन येथे देखील होते. ११ डिसेंबर १९३० रोजी त्यांनी सीता मित्तरशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1030.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..089acb82a723768973d8b907d8ece7d3079d19bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1030.txt @@ -0,0 +1,2 @@ +विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली. +विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10300.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c6ef6afa7a2265d236020fa8462eab5c6c93d48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10300.txt @@ -0,0 +1,7 @@ + +सचिन गंगाधर लोकापुरे  (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना केली. +बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[१], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते  संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. [२]असून वेगवेगळली  १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[३][४] +भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[५] आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय मायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. संशोधन हाच त्यांचा छंद आहे. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. +नुकतेच यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड ने नोंद घेतली आहे.[६][७] + +"" \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1031.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d865c12d4976fac1de431e11512b30d3bea75c80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1031.txt @@ -0,0 +1,4 @@ +विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२]. +इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३]. +शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४]. +जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक Archived 2016-08-12 at the Wayback Machine. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10317.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c6ef6afa7a2265d236020fa8462eab5c6c93d48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10317.txt @@ -0,0 +1,7 @@ + +सचिन गंगाधर लोकापुरे  (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना केली. +बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[१], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते  संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. [२]असून वेगवेगळली  १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[३][४] +भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[५] आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय मायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. संशोधन हाच त्यांचा छंद आहे. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. +नुकतेच यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड ने नोंद घेतली आहे.[६][७] + +"" \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10321.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..044018243291d393fd55dda53aca71c3f2b63a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10321.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सचिवालय इमारत किंवा केंद्रीय सचिवालय येथे भारत सरकारची महत्त्वाची मंत्रालये आहेत. रायसीना हिल, नवी दिल्ली येथे स्थित असलेले सचिवालय इमारतींचे दोन ब्लॉक (उत्तर ब्लॉक आणि दक्षिण ब्लॉक) आहेत. या इमारती कर्तव्य पथाच्या विरुद्ध बाजूस आणि राष्ट्रपती भवन च्या बाजूला आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10335.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b245d7bff5363464eb9c5811274981c9cbfe7679 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10335.txt @@ -0,0 +1 @@ +सजदा अहमद (२२ जून, १९६२ - ) या भारतीय राजकारणी आहेत. या तृणमूल काँग्रेसच्या सदस्य असून आपले पती सुलतान अहमद यांच्या मृत्यूनंतर १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या. या १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1036.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b51beb1b55e3667df290ee468c33761bd4e1a7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1036.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार[श १] असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय[श २] असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक[श ३] कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे.[१] हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला.[२] लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10363.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2cd7608b1ffe06e24657ff1fe3b15dbd541b44f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10363.txt @@ -0,0 +1,2 @@ +सटेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10386.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a3c14979ab784763f123277c7b0e458f7d57275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10386.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय सण आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. विशेषतः हिंदू सणांचा उल्लेख करावा लागेल.गुढीपाडवा - हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा असतो.आपण सर्व आर्य आहोत हे सर्वमान्यच आहे. वेद आपले मूळ धर्मग्रंथ आहेत. लोकमान्य टिळक यांचे मते वेदांचे जन्मस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने २१ मार्च रोजी सूर्य् विषुववृत्तावर असून उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशांत ही तर आनंदाची सुरुवातच. म्हणून ही वर्षाची सुरुवात. बर्फाळ भागातून उठून् दिसावे म्हणून उंच काठीस रंगिबेरंगी कापड लटकविले जात असे. झाडांना अद्याप पालवी फुटलेली नसली तरी कडूनिंबास पानें शिल्लक असतात. कडूनिंब उपलब्ध व वाढत्या तापमानामुळे जलद वाढणाऱ्या जंतुंच्या प्रादुर्भावास अटकाव करणारा म्हणून खाल्ला व सानिद्ध्यात राखला जातो.अक्षय तृतीया - +हा दिवस वैशाख शुद्ध तृतीया असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10388.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..537a4586859a43b290131bc103f014ca4fdea8c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10388.txt @@ -0,0 +1 @@ +सणसवाडी ही आर्वीची वाडी आहे.ह्या वाडीला तानाजी नगर असेही म्हणतात. या गावात डोंगरावर पानालोताचे काम झाले आहे. गावातील तरून मंडल कार्यरत आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_104.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acc1162ddf529f2e077dc90718fa1ac2d2c76601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_104.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ जून, इ.स. २०१३ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) +रंगनाथ विनय कुमार (जन्म - १२ फेब्रुवारी इ.स. १९८४) हा भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय व टी२० क्रिकेट सामने खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10435.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..323a9dbf9893f6e36fea363c5a9806da64b66644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10435.txt @@ -0,0 +1,13 @@ +सतीश वसंत आळेकर (जन्म: दिल्ली, ३० जानेवारी, १९४९) हे मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ] +आळेकरांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्‌सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्‌सी. झाले होते.[ संदर्भ हवा ] +शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्यांचे मामा काकासाहेब गाडगीळ यांच्यामुळे काँग्रेस, साधना कार्यालयाजवळ घर असल्याने राष्ट्र सेवा दल आणि शेजारेच मोतीबाग असल्याने संघविचार असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.[ संदर्भ हवा ] +शाळकरी वयात 'शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होते. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.[ संदर्भ हवा ] +फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली.[ संदर्भ हवा ] ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये ('पीडीए'मध्ये)आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.[ संदर्भ हवा ] +'मेमरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला.[ संदर्भ हवा ] 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अंमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ] +'घाशीराम कोतवाल' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.[ संदर्भ हवा ] याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकी आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते.[ संदर्भ हवा ] १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला.[ संदर्भ हवा ] जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे.[ संदर्भ हवा ] +सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महान व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.[ संदर्भ हवा ] +सतीश आळेकर यांनी 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', बेगम बर्वे,’ओळख', 'काळोख' या नाटकात आणि 'चिंटू', 'चिंटू - २','व्हेंटिलेटर','भाई', 'भाई - २', 'मी शिवाजी पार्क', 'अय्या', 'चि व चि सौ कां. राजवाडे अँड सन्स', 'स्माईल प्लिज', 'हाय वे', 'देऊळ बंद' तसेच 'जाऊंद्याना बाळासाहेब' इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच जैत रे जैत, कथा दोन गणपतरावांची ह्या चित्रपटांचे लेखनही केले.[ संदर्भ हवा ] +आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे.[ संदर्भ हवा ] प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.[ संदर्भ हवा ] +२९ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर तीन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले आणि नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.[ संदर्भ हवा ] आळेकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अतुल पेठे दिग्दर्शित ’नाटककार सतीश आळेकर’ हा माहितीपट दाखवला गेला.[ संदर्भ हवा ] +रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत.[ संदर्भ हवा ] +रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्ये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे.[ संदर्भ हवा ] १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10451.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32483f0d75cad5b8fe9b6a26181f408fd907a551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10451.txt @@ -0,0 +1,2 @@ +13°43′12″N 80°13′49″E / 13.72000°N 80.23028°E / 13.72000; 80.23028 +सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथे असलेले इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. इ.स. २००२ साली इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन यांच्या मृत्यूनंतर या प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10454.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cba1a713e8302ec42d620dfa986952fdd5fc319d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10454.txt @@ -0,0 +1,12 @@ +सतीश नाईक (५ एप्रिल, इ.स. १९५५ - ) हे मराठी चित्रकार आहेत. +यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट्‌स व इंटीरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली. +सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वतःची स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली. पॉल क्लीच्याच दृक् प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटून गेल्यामुळे सतीश नाईक यांनीे २००७ साली गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’चा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे. +नोकरीमुळे महिन्याची आर्थिक विवंचना दूर होण्याच्या दृष्टीने सतीश नाईक यांनी पत्रकार होण्याचा मार्ग पत्करला. त्यांनी ‘लोकप्रभे’त उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, ‘चित्ररंग’मध्ये उपसंपादक, ‘वेध’चा संपादक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी कलाकीर्द नावाची कलाकारसूचीदेखील संपादित केली आहे. सतीशचे वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील परखड लेखन अनेकदा वादळी ठरले. +‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात दोन वर्षे काम केल्यानंत सतीश नाईक यांनी चित्रकार पत्‍नी नीता नाईक यांच्यासह कालविषयाला वाहिलेल्या ’चिन्ह’ नावाच्या वार्षिकाचा अंक काढायला सुरुवात केली. इ.स. १९८७ साली पहिला अंके प्रसिद्ध झाला. +’चिन्ह’मध्ये चित्रकार दत्तात्रय पाडेकर, सुहास बहुळकर, सुधीर पटवर्धन, पद्माकर कुलकर्णी, सतीश काळदाते, माणिक वालावलकर, नीलिमा कढे, शर्मिला फडके, सुधाकर यादव, वासुदेव कामत, मनिषा पाटील, दिलीप रानडे, महेंद्र दामले, शुभदा पटवर्धन, कमलेश देवरुखकर, शिरीष मिठबावकर, आशुतोष आपटे अशा अनेक कलावंत-लेखकांचे लेख प्रसिद्ध झाले. +’चिन्ह’चे सुरुवातीचे तीन अंक हे चित्रकारांच्या मुलाखतींनी गाजले. त्यांतली नीलिमा कढे व केशव कासार ह्यांनी घेतलेली, आणि २००३ च्या ’चिन्ह’मध्ये आलेली चित्रकार माधव सातवळेकर यांची मुलाखत वाचकांना मनापासून भावली. +’...आणि मी’ हे सतीश नाईक यांच्या लेखणीतून प्रसवलेले ’चिन्ह’मधील लोकप्रिय सदर. या सदराद्वारे सतीश नाईक यांनी प्रिया तेंडुलकर, चित्रकार बाबुराव सडवेलकर, ‘आवाज खिडकी’चे कर्ते व्यंगचित्रकार चंद्रशेखर पत्की यांचा वाचकांना नव्याने परिचय करून दिला. +सतीश नाईक यांनी कलाशिक्षणानंतर पूर्णवेळ चित्रकार होण्याच्या उमेदीच्या काळातील पहिली जवळ जवळ वीस वर्षे ‘चिन्ह’ नियतकालिकाच्या उभारणीत घालवली. ‘चिन्ह’चा ध्यास, त्यातून उद्भवलेले आर्थिक, सामाजिक प्रश्न आणि काही व्यक्तींशी विसंवाद वगैरे संकटे व प्रश्न सोडवत त्यांनी इतकी वर्षे नेटाने ते काम चालवले आहे. असे काम झपाटलेपणानेच होऊ शकते. झपाटलेपण हे वेडेपणच असते. सडेतोड टीका, काही वेळेस अस्पष्ट, अव्यावहारिक वृत्ती ह्यामुळे नाईक ह्यांचे कौटुंबिक जीवन सतत नव्या प्रश्नांना सामोरे जात राहिले आहे. त्यामुळे सतीश नाईक हे एरवी कलाक्षेत्रातील लोकांना अडचणीचे वाटतात. +सतीश नाईक यांची एकट्याची चित्रप्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोनदा झाली – १९८७ साली व १९९७ साली - मात्र त्याने संयुक्तरीत्या अथवा गटागटांतून चित्रे अनेक वेळा व अनेक ठिकाणी प्रदर्शित केली व त्यामुळे त्याची चित्रे अनेक मान्यवर चित्रसंग्रहांमध्ये पोचली आहेत. त्याने माळशेज घाट, जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर अशा ठिकाणी ललित कला ॲकॅडमी व आर्टिस्ट्स सेंटर यांच्या वतीने कला कार्यशाळा घेतल्या आहेत. +१४ ते २८ मार्च २००८ का काळात सतीश नाईक यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दादर-मुंबई येथील ’वेह’ कलादालनात भरले होते. +सतीश नाईक यांना लेखन व चित्रकारिता या दोन्ही क्षेत्रात प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10464.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02bd06f368a0653d60ae44a9f3a5f1ba490ca945 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10464.txt @@ -0,0 +1 @@ +सतीश शाह ( २५ जून १९५१) हा एक भारतीय अभिनेता आहे. सतीशने आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये तसेच दूरचित्रवाणीवर विनोदी भूमिका केल्या आहेत. गम्मत जम्मत, जाने भी दो यारों, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इत्यादी चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10469.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d14a91c3b7438662cd5db9990c842089faada4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10469.txt @@ -0,0 +1 @@ +सतीश सोळांकूरकर हे एक मराठी कवी आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10478.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b81695a794e32d57c55a16ceb29b617ac159b87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10478.txt @@ -0,0 +1,2 @@ +७०-सत्तर  ही एक संख्या आहे, ती ६९  नंतरची आणि  ७१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 70 - seventy. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10484.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc7d43e377b58c87063828a66e3b83d9119a6a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10484.txt @@ -0,0 +1,3 @@ +सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची एक कादंबरी आहे. +'सत्तांतर' मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळयांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळयांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी, नरांनरांतले, माद्यामाद्यांतले संघर्ष, सर्व वानरांची जंगलातील हिस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्याचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत आहे. +सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानराच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्ति-प्रवृत्तींचाही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. 'काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो... जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो.... संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.' ही ह्या कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10505.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff8bab3a63855c218e26c69e3899e113da85c499 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10505.txt @@ -0,0 +1,17 @@ +सत्पाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८६५ कुटुंबे राहतात. एकूण ३७५१ लोकसंख्येपैकी १८८१ पुरुष तर १८७० महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +मुक्काम, कळंब, टेंभी, कोल्हापूर, कोपरी,भातपाडा, खर्डी, डोळीवपाडा, पाटीलगाव, सकवार, अर्नाळा ही जवळपासची गावे आहेत.सत्पाळे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10512.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..885a5d7b1e2b1242578a99bc94a0042350a66832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10512.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. सत्यपालसिंह (२९ नोव्हेंबर, १९५५:बसौली, मीरत जिल्हा, उत्तरप्रदेश - ) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे. हे २०१७ त२ २०१९ पर्यंत भारताचे मनुष्यबळ राज्यमंत्री होते. +सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10518.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9586e4c2e50d0c831fdfb6cccde727b35c5462b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10518.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्रपटगीत ज्योतिबाचा नवस चित्रपटाकरिता गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिल ,संगीतकार सुधीर फडके यांची ही पहिली संगीत रचना त्यांनी स्वतःच गायक सुधीर फडके गायली. +दान दिल्याने ज्ञान वाढते त्या दानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे +चिरा चिरा हा घडवावा। कळस कीर्तीचा चढवावा। अज्ञानी तो पढवावा। diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10536.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..473ae546c61bfd04b42cee07eea2b838794da4b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10536.txt @@ -0,0 +1 @@ +सत्यदेव नारायण आर्य (१ जुलै, १९३९ - ) हे त्रिपुराचे वर्तमान आणि १९वे राज्यपाल आहेत. त्यांनी हरियाणाचे १६वे राज्यपाल म्हणूनही काम केले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10542.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ad0127656d9e3538eb3d25382961334675f9f88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10542.txt @@ -0,0 +1,2 @@ +सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. +सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[२] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[३][४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10581.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264248e1751856c16e8dbb7a98769804a89e2b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10581.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावित्री आणि सत्यवान हे हिंदू धर्मातील एक पौराणिक जोडपे आहे. हे जोडपे सावित्रीचे तिच्या पती सत्यवानावरील प्रेम आणि भक्तीसाठी ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, राजकुमारी सावित्रीने सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजकुमाराशी लग्न केले, ज्याचा लवकर मृत्यू होईल अशी भविष्यवाणी झालेली असते. आख्यायिकेचा नंतरचा भाग सावित्रीच्या बुद्धी आणि प्रेमावर केंद्रित आहे, ज्याने तिच्या पतीला यमापासून वाचवले.[१] +सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेची सर्वात जुनी आवृत्ती महाभारताच्या वनपर्वात आढळते. मार्कंडेय ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ही कथा महाभारतातील बहुगुणित कथनाच्या रूपात घडते. जेव्हा युधिष्ठिराने मार्कंडेयाला विचारले की, द्रौपदीच्या भक्तीशी जुळणारी अशी स्त्री आहे का, तेव्हा मार्कंडेयाने ही कथा सांगून उत्तर दिले.[२][३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10584.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbb7f838fc965caccd113193a5912d1c84bc27a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10584.txt @@ -0,0 +1 @@ +सत्यव्रत शास्त्री हे संस्कृत साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10597.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49a957b1cae83428a38c446f17d5796d85c63110 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10597.txt @@ -0,0 +1,2 @@ +सत्या व्यास (जन्म १ जानेवारी १९८०, बोकारो, झारखंड) हे आधुनिक हिंदीचे लेखक आहेत.[१] बनारस हिंदू विद्यापीठातून ते कायद्याचे पदवीधर आहेत. तो बोकारो स्टील सिटीमध्ये जन्मला आणि वाढला आणि त्याने ५ सर्वाधिक विकल्या गेलेल्या हिंदी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.[२] +व्यास यांचे पहिले पुस्तक बनारस टॉकीज, २०१५ मध्ये प्रकाशित झाले. दिल्ली दरबार, चौरासी / ८४, बागी बलिया, आणि उफ कोलकाता ही त्यांची इतर पुस्तके आहेत.[३] सत्या व्यास विस्तृत शैलीत आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीत लिहितात. त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. बनारस टॉकीजचे आसामी, मणिपुरीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.दिल्ली दरबारचे इंग्रजीत भाषांतर वेस्टलँड प्रकाशकांनी केले आहे.त्याचे चौरासी या पुस्तकाचे उर्दू आणि पंजाबीमध्ये भाषांतरही झाले आहे आणि ते ओटीटीवरील टेलि सिरीजमध्ये रूपांतरित केले जात आहे.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10607.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d651b9314b0d0840e70d82692e28be20ab7516e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10607.txt @@ -0,0 +1,4 @@ +सत्यापन ही एखाद्या कागदपत्राची प्रत किंवा नक्कल ही त्याच्या मूळ प्रतीप्रमाणेच आहे याची दिलेली साक्ष आणि घेतलेली जबाबदारी होय. +एखाद्या व्यक्तीची सही सुद्धा सत्यापित केली जाते. म्हणजे सत्यापन करणारा माणूस हे स्वतःच्या जबाबदारीवर सांगतो कि सदर सही, सही करणाऱ्या इसमाने माझ्या समोर केली आहे. +कागदपत्रांचे सत्यापन करण्या साठी राज्य सरकारने विशेष कार्यकारी दंडाधिकारी हे मानद पद नेमले आहे. शाळांचे मुख्याधापक, सरकारी नोकरीतील वर्ग १ अधिकारी यांना सुद्धा सत्यापनाचा अधिकार असतो. ही सेवा फुकट देणे अपेक्षित आहे. +ज्या व्यक्तीची कागदपत्रे आहेत त्या व्यक्तीनेच कागदपत्राच्या नकलेवर सही करून ही कागदपत्रे मूळ प्रती प्रमाणे आहेत याची जबाबदारी घेणे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10648.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a137367506e475dee6b0a6d93a97faf1a0d9f68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10648.txt @@ -0,0 +1,8 @@ +सआदत हसन मंटो (जन्म : समराला-लुधियाना, ११ मे १९१२; - लाहोर, १८ जानेवारी १९५५) हे एक हे एक संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील भळाळती जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडले. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्ऱ्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. [१] लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी व इतर फुटकळ साहित्य लिहिले.[२][३] मंटो याच्या टोबा टेकसिंह या कथेवर एक चित्रपट निर्माणाधीन आहे. (२००९ साल)[४] +मंटो यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील समराला इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर इथे झाले. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी व्हिक्टर ह्युगो यांच्या The Last Days of a Condemned Man या कादंबरीच्या अनुवादाने केली. या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर व्हिक्टर ह्यूगो, मॅक्झिम गॉर्की, आंतोन चेखव, इत्यादी फ्रेंच व रशियन लेखकांचा प्रभाव होता.[५] +भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये मुंबई सोडून लाहोरला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले.[५] मंटो यांचा मृत्यू १८ जानेवारी १९५५ रोजी लाहोर इथे झाला. +मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखाऱ्यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यिकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडिलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि दारूच्या जबरदस्त आहारी गेलेला होता. +मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठित आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मंटोला वाचनाची जबरदस्त आवड होती. वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून तो उंची सिगारेटी ओढायचा. तरुण वयात शिक्षणावरून लक्ष उडाल्याने तो बेछूटपणे जगत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघे तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसे. तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनॆ केलेल्या मंटोला एकदा लेखन हेच आपले खरे काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा त्याणे तुफानी वेगाने नाटके, निबंध, व्यक्तिचित्रेरं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कथा लिहिल्या. +मंटोने विशेषतः परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरुवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल त्याच्या पुस्तकांत फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधाऱ्या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघितले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते. +१९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारूनेच त्याला प्यायला सुरुवात केली’. +पाकिस्तानी टपाल खात्याने मंटोंच्या सन्मानार्थ जानेवारी १८, २००५ रोजी एक टपाल तिकिट प्रकाशित केले.[६] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10654.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ce655ba2aa37168f62ce4198ae2816da2d4596 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10654.txt @@ -0,0 +1 @@ +देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (कन्नड: ದೇವರಗುಂಡ ವೆಂಕಪ್ಪ ಸದಾನಂದ ಗೌಡ; १८ मार्च १९५३) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कायदा व न्यायमंत्री आहेत. ह्यापुर्वी २०११ ते २०१२ दरम्यान कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले गौडा कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10672.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5b56d363f7b07bcb21ee03c5ff1d2b4feb2d7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10672.txt @@ -0,0 +1 @@ +सदाभाऊ खोत (जन्म:१ जून, १९६४) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. ते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष होते.[२] त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक माढा (लोकसभा मतदारसंघ) येथून SWP/NDA उमेदवार म्हणून लढवली.[३] १० जून २०१६ रोजी ते महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य जागेवरून विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. ८ जुलै रोजी त्यांचा महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10687.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50a777da4badd2c583822cf06dee7bb3b97f5a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10687.txt @@ -0,0 +1,6 @@ +सदाशिव पांडुरंग केळकर (१८४८:चाकण, महाराष्ट्र - २० डिसेंबर, १९०६) हे एक मराठी निबंधकार, पत्रकार आणि नियतकालिकांचे संपादक-लेखक होते. आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांचे संगोपन पुण्यात राहणाऱ्या मावशीने केले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर ते एका कापड गिरणीत लागले आणि त्याकाळी जे काम फक्त युरोपियन लोकांना जमत असेे वीव्हिंग मास्टरचे काम, त्यांच्याइतक्याच कुशलतेने करू लागले. जरी काही वर्षांनी स.पां केळकरांनी गिरणीतील नोकरी सोडली, तरी त्यांना कामगारांबद्दल वाटणारा जिव्हाळा कमी झाला नाही. कामगारांसाठी त्यांनी ’कामगार’, हितोपदेश कामगार’ यांसारखी साप्ताहिके चालवली. ज्ञानदीप नावाच्या मासिकाचे ते संस्थापक होते. ’सुबोध पत्रिका’ या साप्ताहिकाचेही ते संपादन करीत. +इ.स. १९००मध्ये केळकर पॅरिस येथे विणकामाचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले. पॅरिसहून इंग्लंडला जाऊन त्यांनी. तेथे वर्षभर विणकामाचा अभ्यास केला. तेथून त्यांनीे काही यंत्रसामग्रीही खरेदी करून भारतात आणली. या सर्व प्रवासासाठी, शिक्षणासाठी आणि यंत्र सामग्रीसाठी त्यांच्या मित्रांनी केळकरांना आर्थिक मदत केली होती. +भारतात आल्यावर सदाशिव पांडुरंग केळकर यांनी स्वतःच एक कापड विण्ण्याचे यंत्र तयार केले. हातमागाचा प्रसार करण्याचा आणि त्यासाठी नवीन प्रकारची यंत्रे बनवण्याचा त्यांचा इरादा होता. पण त्यापूर्वीच २० डिसेंबर १९०६ रोजी केळकरांचे निधन झाले. +सदाशिव पांडुरंग केळकर यांचे लहानपणीच लग्न झाले होते. पण त्यांची पहिली पत्नी लवकरच वारली. दुसरे ल्ग्न त्यांनी मिरजेच्या सीतारामपंत अलूरकर यांच्या दुर्गा नावाच्या विधवा कन्येशी केले(इ.स. १८७८). हे त्या काळात मोठेच धाडस होते. या विवाहासाठी डॉ. रामकृष्ण भांडारकरांनी प्रार्थनासमाजाच्या तत्त्वांप्रमाणे एक खास विवाहविधी तयार केला होता. लग्नाचे पौरोहित्यही भांडारकरांनी केले. कन्यादान न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सौ. रमाबाई रानडे यांनी केले. लग्नानंतर केळकरांनी पत्नीचे नाव उमाबाई ठेवले. उमाबाई सदाशिवरावांप्रमाणेे अतिशय बुद्धिमान होत्या. +लग्नानंतर उमाबाईंनी खासगीरीत्या इंग्रजीचे शिक्षण घेतले. सदाशिवराव प्राथनासमाजाचे सभासद होते. उमाबाईही झाल्या. लग्नानंतर तीन वर्षांनी म्हणजे १८८१ साली केळकरांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून देऊन, पूर्णवेळ प्रार्थनासमाजाचे काम करण्यास सुरुवात केली, तर उमाबाईंनी सुईणीच्या कामाचे रीतसर शिक्षण घेतले, आणि संसाराची आर्थिक जबाबदारी उचलली. उमाबाईंनी सुईणीच्या कामात इतके कौशल्य प्राप्त केले की राजेरजवाड्यांकडेही त्यांना या कामासाठी बोलावणी येऊ लागली. +सदाशिवराव आणि उमाबाई यांना नऊ अपत्ये झाली; त्यांतली तीन अगदी लहान वयातच वारली. उरलेल्या सहा अपत्यांमध्ये चार मुलगे आणि दोन मुली होत्या. मुलींमधल्या थोरलीचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी झाला. हीच मुलगी पुढे ताराबाई मोडक म्हणून प्रसिद्ध पावली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10703.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b9dbb2bbf8250341723ddd67e028fba9fbf9f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10703.txt @@ -0,0 +1,6 @@ +दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते. +अठराव्या शतकातील गोव्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग असणारा सदाशिवगड सध्या कर्नाटक राज्याचा एक भाग आहे. राज्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुक्‍याच्या पोळे सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर काळी नदीच्या अलीकडच्या काठावर उंच टेकडीवर सदाशिवगड वसला आहे. सदाशिवगड पाहायच्या आधी सदाशिवगडविषयी माझ्या कल्पना वेगळ्या होत्या. परंतु सदाशिवगड पाहिल्यावर माझ्या कल्पनांना धक्काच बसला. सदाशिवगड पाहण्यासाठी आम्ही प्रथम माझे परिचित सुरेश काणकोणकर काकांकडे कारवारला गेलो. तिथे मी त्यांना सदाशिवगड पाहायला आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही कारवारला येताना सदाशिवगडातूनच आलात. तेव्हा मी म्हटले आम्हाला वाटेत सदाशिवगड गाव लागले, पण गड काही दिसला नाही. त्यावर काणकोणकर काका म्हणाले काळी नदी तुम्ही पार करून आलात तेव्हा नदीच्या अलीकडे पुलासाठी जो उंच डोंगर कापला आहे तोच सदाशिवगड. काळी नदीवरील पुलासाठी आणि कारवारच्या विकासासाठी सदाशिवगड शहीद झाला आहे. हे सर्व ऐकून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. +सदाशिवगडावर जाण्यासाठी काळी नदीच्या पुलाच्या अलीकडे चित्ताकुल नावाचे गाव लागते. या गावातून बेळगावला जाणारा फाटा आहे. या फाट्याला लगेच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उजवीकडे छोटा फाटा सदाशिवगडाकडे जातो. या फाट्यावर सदाशिवगडावर जाणारा रस्ता आहे. वाटेत दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिराच्या बाहेर ब्रिटिश राजचिन्हाचा तुटलेला दगडी भाग ठेवला आहे. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे. सदाशिवगड सन १७१७ साली सौंधेकर राजा बसवलिंग यांनी बांधून आपल्या पराक्रमी पित्याचे नाव सदाशिव या गडास दिल्याची नोंद आहे. १७९९ साली ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश राजचिन्ह या ठिकाणी लावले. दुर्गादेवी देऊळ गडाच्या मध्यास आहे तर खाली भव्य दर्गा आहे. हा दर्गा मध्ययुगात ऍबिसिनियातून आलेल्या एका अवलियाचा आहे. +दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते. समोर काळी नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. समुद्रात कूर्मगड. अंजदीव आणि इतर छोटी बेटे दिसतात. +सदाशिवगडचा अठराव्या शतकातला इतिहास फार रंजक आहे. सन १७५० मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी-द-ताव्हरने पोर्तुगीज राज्य विस्तारासाठी सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु काही काळाने परत तो सौंधेकरांच्या ताब्यात दिला. सन १७६४ साली हैदर अलीने सौंधेकरांचे राज्य जिंकत सदाशिवगडही मिळविला. सन १७६८ मध्ये पोर्तुगिजांनी हैदरच्या सैन्याकडून सदाशिवगड घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान सौंधेकर राजा पोर्तुगिजांच्या आश्रयास बांदोडा येथे येऊन राहिला. पोर्तुगिजांनी सौंधेकरास हैदर अलीकडून राज्य परत मिळवून देण्याचा करार केला होता. परंतु पोर्तुगीज राज्य परत मिळवून देण्याच्या बाबतीत बराच काळ स्वस्थ बसले. तेव्हा सौंधेकराने पुणे दरबारात पेशव्यांशी पत्र व्यवहार करून राज्य हैदरकडून परत मिळविण्यासाठी विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी सौंधेकरांस पुण्यास वास्तव्यास येण्याचे कळविले. ही गोष्ट पोर्तुगिजांना कळल्यावर सौंधेकर राजास पुण्यास जाण्यास प्रतिबंध केला आणि पोर्तुगीज देत असलेल्या तनख्यावर कायमस्वरूपी बांदोडा येथेच राहावे, असा करार करून घेतला. हा करार होण्यापूर्वीच पोर्तुगिजांनी टिपू सुलतानच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सदाशिवगड ताब्यात घेतला. २४ जानेवारी १७९१ रोजी पेशव्यांच्या आरमाराने पोर्तुगिजांकडून किल्ला जिंकून घेतला. पण लगेच ३० जानेवारीस परत पोर्तुगिजांनी ताब्यात घेतला. तेव्हा पुणे दरबारातून पोर्तुगिजांस सदाशिवगड ताब्यात घेतल्याबद्दल समज देण्याविषयी अनेक पत्रे आली. परंतु पोर्तुगिजांनी आपण सौंधेकरांसाठी सदाशिवगड ताब्यात घेतला आहे असे कळवले. पण पोर्तुगिजांना हा किल्ला काही सौंधेकरांना द्यायचा नव्हता. पोर्तुगिजांनी सदाशिवगड ताब्यात घेतल्यापासून पुढे दीड वर्ष पुणे दरबारातून सदाशिवगडाविषयी बरेच राजकारण झाले. पेशव्यांचे सरदार पर +शुरामभाऊ पटवर्धन टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेनिमित्ताने कारवार भागात आले होते. तेव्हा त्यांनी आणि काणकोण भागातील देसाई निळू नाईक यांनी पोर्तुगिजांकडे सदाशिवडगडाबाबत बरेच राजकारण केले. परंतु पोर्तुगिजांनी टिपू सुलतानशी स्नेह संबंध वाढवून टिपूस सदाशिवगड देण्याचे ठरविले. तेव्हा परशुराम भाऊंबरोबर पेशव्यांचे आरमार दर्यासारंग बाबूराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कारवारजवळच होते. मराठा आरमाराने सदाशिवगडावर हल्ला करत सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु पुढे लवकरच टिपू आणि पेशवे यांच्यात तह झाला. तहाच्या अटीनुसार सदाशिवगड परत टिपूस मिळाला. पुढे लवकरच इंग्रजांनी टिपूचे राज्य जिंकले. त्यात सदाशिवगडही मिळाला. सदाशिवगडाच्या अलीकडे पोळे येथे पोर्तुगिजांची चौकी पोर्तुगीज ब्रिटिश राज्यांची सीमा बनली. वरील सर्व घडामोडींत अठराव्या शतकातील राजकारण किती अस्थिर होते हे कळते. या सर्व राजकारणाचा साक्षीदार सदाशिवगड मात्र फार थोड्या अवशेषांसह शिल्लक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10713.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed061dd634205875fa9d6693cdf3f7c969bc36bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10713.txt @@ -0,0 +1,19 @@ +सदिश एकक ही गणितातील एक संकल्पना असून ते कुठल्याही सदिशाचे एकक दाखविते. कुठलाही सदिश दोन गुणधर्म दाखविते - किंमत आणि दिशा. त्यापैकी किंमत ही अदिश असते तर त्याची दिशा सदिश एककाच्या मदतीने दाखवितात. +एखादा सदिश u असेल तर त्याचे सदिश एकक खालीलप्रमाणे काढले जाते- +येथे u वरील टोपी किंवा हॅटचे चिन्ह ( + + + + + + +u +^ + + + + + +{\displaystyle \mathbf {\hat {u}} } + +) हे uचे सदिश एकक असल्याचे दाखविते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10748.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b21eec39d43d6645d3b5eb2338fb66142b75040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10748.txt @@ -0,0 +1,13 @@ + +सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे.[१] या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.[२] सन मराठी ही सनची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय मार्केटमधील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे. महिन्यांच्या प्रत्येक रविवारी सन मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात. +सन मराठीचे अधिकृत संकेतस्थळ +सह्याद्री (वाहिनी)  +• झी मराठी  +• कलर्स मराठी  +• मी मराठी  +• झी २४ तास  +• ए.बी.पी. माझा  +• झी टॉकीज  +• आयबीएन-लोकमत  +• साम मराठी  +• स्टार प्रवाह  diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10785.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc7c202adc3857acc549034a0c12f11003193b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10785.txt @@ -0,0 +1,2 @@ +सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधीत्व करतो [१]. सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत[२]. कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.[३] टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[४][५] +संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला[६]. या संघाने २०१८ च्या आय.पी.एल.साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे. २०१६ या वर्षी या संघाने आय.पी.एल.चे विजेते पद पटकावले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10800.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31ba632598e2c816b4571a4fce64fbdc7ac67326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10800.txt @@ -0,0 +1 @@ +सनीव्हेल हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10807.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4c02a0a5931680d5764bee99b69095284c8577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10807.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +सनी लिओनी (करेन मल्होत्रा - करनजीत कौर), ( मे १३, १९८१) ही भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१०मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते. २०११मध्ये भारतीय दूरदचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली.[१]. +डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वतःची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत रणरागिणी शाखेने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. +सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे, असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्‍न सनी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. +हा गुन्हा सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपासाकरिता ठाणे पोलिसांनी लिओनीला बोलाविले होते. त्यासाठी पोलिसांनी तिला नोटीस पाठविली होती. त्यानुसार लिओनी, तिचा पती आणि तिचा वकील असे तिघे २७ मे २०१५ रोजी दुपारी ठाणे पोलीस मुख्यालयात आले होते. तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची त्यांनी भेट घेतली. तिची वैयक्तिक,, तिच्या व्यवसायाविषयी, तसेच रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी तिचे स्पष्टीकरण, आदी माहिती या वेळी पोलिसांनी घेतली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10827.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40603aa932fc956b616b5f1168d4103d853169a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10827.txt @@ -0,0 +1 @@ +संतोष कुमार हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10837.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbbc68e05d81d745d69fff28737d6c4f3cadffb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10837.txt @@ -0,0 +1,2 @@ +सपार्मुरात अतायेविच नियाझोव (रशियन:Сапармурат Атаевич Ниязов; तुर्कमेनी: Saparmyrat Ataýewiç Nyýazow; १९ फेब्रुवारी, १९४० - २१ डिसेंबर, २००६) हे १९८५ ते मृत्यूपर्यंत तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10848.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42856458a738277bf5ca0560305e6321a1e6cdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10848.txt @@ -0,0 +1,3 @@ +सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण २,९७४ बळी गेले. +ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरू केलेल्या युद्धात झाली. +मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे बोस्टन व वॉशिंग्टन ह्या विमानतळांवरून सान फ्रान्सिस्को व लॉस एंजेल्स कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता न्यू यॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1085.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f18370c5ab8872affd36f3fb54bf020bd9936b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1085.txt @@ -0,0 +1 @@ +विव्हालीन लॅटी-स्कॉट (१९४०:जमैका - १० जानेवारी, २०२१:फ्लोरिडा, अमेरिका) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान १० महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10850.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42856458a738277bf5ca0560305e6321a1e6cdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10850.txt @@ -0,0 +1,3 @@ +सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण २,९७४ बळी गेले. +ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरू केलेल्या युद्धात झाली. +मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे बोस्टन व वॉशिंग्टन ह्या विमानतळांवरून सान फ्रान्सिस्को व लॉस एंजेल्स कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता न्यू यॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10859.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d49d9895bcd44f18cfd6fdbd951434bd72e3806d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10859.txt @@ -0,0 +1,6 @@ +साचा:सप्टेंबर२०२४ +सप्टेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४५ वा किंवा लीप वर्षात २४६ वा दिवस असतो. + + + +ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर महिना diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10879.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4712a0e4f632b95baf5135844f76192d9622aec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10879.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हटले जाते.[१] +या श्लोकात सप्तचिरंजीवांची नावे आली आहेत. +कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥ +अर्थ: अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्तचिरंजीव आहेत. +काही प्राचीन ग्रंथांत मार्कंडेय ऋषी हे दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे, मात्र ते चिरंजीव म्हणजे अमर नसल्याने त्याचे नाव वरील श्लोकात नाही. मार्कंडेय ऋषींना वयाच्या सोळाव्या वर्षी येणाऱ्या अपमृत्यू वर विजय मिळवला आणि दीर्घायुष्य प्राप्त केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा श्लोक आहे. +वरील ओळींचा अर्थ असा होतो की या ८ अमरांचे (अश्वत्थामा, राजा महाबली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि ऋषी मार्कंडेय) दररोज स्मरण केल्याने माणूस सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकतो आणि १०० वर्षांहून अधिक जगू शकतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10889.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..105e6ff78e00f95bb7c8a81f06481aac23d761e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10889.txt @@ -0,0 +1,14 @@ +सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. सदाहरित आणि आकर्षक ठेवण इत्यादींमुळे या वृक्षाची लागवड बाग-बगीचे, निवासी संकुल, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, रस्त्याच्या दुतर्फा, इ. ठिकाणी मुद्दामहून केलेली आढळते. +"सप्तपर्णी' या वृक्षास त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि गुणानुसार अनेक नावे आढळतात. "ब्लॅक बोर्ड ट्री', "इंडियन डेव्हिल ट्री', "डीटा बार्क ट्री' मिल्कवूड पाइन ट्री, व्हाइट चेस वूड, पुलाई इ. इंग्रजी नावांनी आणि हिंदीत "चेतून' या नावाने "सप्तपर्णी' हा वृक्ष ओळखला जातो. कण्हेर, पांढराकुडा, पांढरा चाफा इ. वनस्पतींच्या "अपोसायनेशी' (Apocynacae) या कुळातील हा वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रात हा "अल्स्टोनिया स्कॉलरिस' (Alstonia scholaris) या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष पश्‍चिम बंगाल या राज्याचा "राज्य वृक्ष' म्हणून मानला आहे. +साप्तपर्णी हा वृक्ष उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. भारतीय उपखंड आणि दक्षिण- पूर्व आशियामध्ये कमी अधिक प्रमाणात हा वृक्ष पसरलेला आहे. काही खंडात आणि देशात या वृक्षाची मुद्दामहून लागवड केलेली आढळते. भारत, जपान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इ. ठिकाणी निमसदाहरित आर्द्र पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. उंच वाढणारा हा वृक्ष ४० ते ६० फुटांपर्यंत वाढतो. या वृक्षाच्या वाढीसाठी आर्द्रतेचे वातावरण जास्त असलेले ठिकाणे, जास्त पाऊसमान, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आणि जास्त तापमान नसलेली ठिकाणे उत्तम असतात. समुद्रसपाटीपासून ते १२५० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळून येतो. +या वृक्षास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर या महिन्यांत फुले येतात. शेंगा मार्च महिन्यापर्यंत परिपक्व होतात. फुले रातराणीसारखी सुवासिक असतात. आलेली फुले चटकन दिसत नाहीत, मात्र फुलांच्या सुगंधावरून ती आल्याचे कळते. सप्तपर्णीचे हे वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ शोधल्यावरच सापडतात. +पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने व गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात. +ही झाडे मुंबई शहरात दिसून येतात. +हा वृक्ष दिसायला सुंदर असल्याने तॊ उद्याने, बागा, रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकांमध्ये आणि सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालये यांच्या परिसरात लावतात. लाकडाचा उपयोगी पेपर निर्मितीसाठी, खोकी बनविण्यासाठी आणि पेन्सिल, आगकाड्या व पेटी, शाळेच्या पाट्या इत्यादी बनविण्यासाठी केला जातो. +ह्या वृक्ष्याच्या खोडाची साल कडवट तुरट असते. खोडाची साल आणि पाने विविध रोग, व्याधी बऱ्या करण्यासाठी आयुर्वेद, युनानी, सिद्ध इत्यादी परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते. ही साल मलेरियातील तापासाठी उत्तम असते. मलेरिया या खोडाच्या सालीपासून बरा होत असल्याने या वृक्षास "इंडियन सिंकोना" असेही म्हणतात. खोडाची साल हगवण, जुलाब, मलेरियातील ताप, फीट, अस्थमा, कातडी विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. खोडाची साल दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यांवर आणि विषाणू प्रतिबंधक (ॲन्टी-वायरस) म्हणून वापरली जाते. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. +सप्तपर्णी झाडाच्या सालीच्या चूर्णाचा वापर एका भारतीय औषध कंपनी "भारवी फार्मास्यूटिकलस्" ने "सिंकोना कंपाउंड टॅबलेट" या आयुर्वेदिक उत्पादनामधे केलेला आढळतो. +या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यापैकी ३ मुख्य रासायनिक घटक Ditamine, Echitenine, Echitamine की जे अल्कलॉइड आहेत. त्यांचा वापर मलेरियावरील प्रसिद्ध औषध क्विनाईनचा पर्याय म्हणून केला जातो. क्विनाईन हे सिंकोना या वृक्षापासून प्राप्त केलं जाते. म्हणून सप्तपर्णी या वृक्षास "इंडियन सिंकोना" असेही म्हणतात. + +{{विस्तार}] +https://www.britannica.com/plant/Apocynaceae +https://www.easyayurveda.com/2013/10/08/saptaparna-alstonia-scholaris-benefits-usage-in-ayurvedic-treatment/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10901.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aebe5e9e996cd990b0f2ed5d9e60df3bb2c6bc4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10901.txt @@ -0,0 +1,15 @@ +आठवडा किंवा सप्ताह हे एक कालमापन एकक आहे. एका आठवड्यामध्ये ७ दिवस असतात. +प्रत्येक आठवड्यात सात वार असतात, ते पुढील प्रमाणे - १.रविवार, २.सोमवार, ३.मंगळवार, ४.बुधवार, ५.गुरुवार, ६.शुक्रवार, ७.शनिवार. +प्रत्येक वार दर आठव्या दिवशी परत येतो. त्यामुळे या चक्राला आठवडा असे म्हणतात. +हिंदू पंचांगानुसार सूर्योदयापासून नवीन वार सुरू होतो. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात, तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते. +वारांची ही नावे त्याकाळी माहीत असलेल्या आकाशस्थ 'ग्रहांवरून घेतली आहेत. माणसाचे भविष्य सांगण्यासाठी त्याच्या जन्मवेळी आकाशातील ग्रहांच्या स्थितींवरून जी जन्मकुंडली बनवतात, तिच्यातच हेच सात ग्रह (आणि राहू-केतू) असतात. +रवि-सोम...शनी हा क्रम खालील सूत्रावरून ठरला : +आ मंदात्‌‌ शीघ्रपर्यंतम् होरेशा: +अर्थ - आकाशात मार्गक्रमण करताना दिसणाऱ्या मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात. +मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी (सर्वात मंद), गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम, सर्वात जलद). +एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते. +वारांची इंग्रजी नावे : Sunday (सूर्याच्या नावावरून), . Monday (चंद्राच्या नावावरून), Tuesday (Týr or Tiw या देवाच्या नावावरून), Wednesday (Odin या देवाच्या नावावरून), Thursday (Thor या देवाच्या नावावरून), Friday (Frigg या देवीच्या नावावरून), Saturday (शनीवरून). +वारांची हिंदी-उर्दू नावे : इतवार, पीर, मंगल. बुध, जुमेरात, जुम्मा, शनीचर + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10902.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75623090aa58295f45e0c0f95a1c7f5b70bb2a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10902.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 43°4′N 141°21′E / 43.067°N 141.350°E / 43.067; 141.350 + +सप्पोरो (जपानी: 札幌市; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे जपान देशाच्या उत्तर भागातील होक्काइदो ह्या बेटावरील सर्वात मोठे शहर व होक्काइदो प्रांताची राजधानी आहे. १९७२ सालच्या हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सप्पोरो शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10906.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d6080459682b4c23dfa59b6534ef028437f6e3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10906.txt @@ -0,0 +1 @@ +सप्पोरो डोम (जपानी:札幌ドーム, सप्पोरो डोमु) जपानच्या सप्पोरो शहरातील बेसबॉल व फुटबॉलचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10908.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04460f6f1dd7229b44b79c3b86dff3ba7defec2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10908.txt @@ -0,0 +1,3 @@ +सप्तरंगी (इंग्रजी:Salacia chinensis) ही भारतात, प्रामुख्याने पश्‍चिम घाटात सापडणारी व मधुमेहावर औषध म्हणून वापरली जाणारी एक वनस्पती आहे. ही वनस्पती तुलनेने कमी पाऊस पडणाऱ्या भागांतही तग धरते, असे आढळले आहे. +सप्तरंगी ही महाराष्ट्राच्या काही भागांत इंगळी किंवा निसूल या नावानेही ओळखली जाते. हिचे शास्त्रीय नाव सॅलॅसिया चायनेन्सिस (Salacia chinensis) असे आहे. +संशोधकांना सप्तरंगीच्या मुळांबरोबरच खोड आणि पाना-बियांतही औषधी गुणधर्म सापडल्याने औषध निर्मितीच्या दृष्टीने सप्तरंगीचे उत्पादन महत्त्वाचे ठरले आहे[१] . यासंबंधी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागातील डॉ. अंकुर पटवर्धन, मकरंद पिंपुटकर आणि राधिका जोशी या संशोधकांचे सप्तरंगी वनस्पतीतील मधुमेहावर नियंत्रण ठेवणाऱ्या गुणधर्मावरील संशोधन बायोडायव्हर्सिटी बायोस्पेक्‍टिंग ॲन्ड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे[१]. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10909.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a75aa73bd6be50c300343599c5a35133a47832a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10909.txt @@ -0,0 +1 @@ +सफदर अली खान () हा अर्काटचा पाचवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४० ते इ.स. १७४२ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10917.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec093f867e1ac47f169f93cb5fe5d24af2947a68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10917.txt @@ -0,0 +1,8 @@ +मार्गशीर्ष कृष्ण एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे. + +एकादशी व्रताला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकारमास किंवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या २६ पर्यंत वाढते. पद्मपुराणात पौषमासातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल युधिष्ठिराच्या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले - एकादशी व्रताच्या विधीने जेवढे समाधान मला मोठ्या यज्ञातून मिळत नाही. म्हणूनच एकादशीचे व्रत अवश्य करावे. पौषमासातील कृष्ण पक्षात सफला नावाची एकादशी असते. या दिवशी भगवान नारायणाची विधिवत पूजा करावी. ही एकादशी कल्याण करणार आहे. सर्व व्रतांमध्ये एकादशी ही सर्वश्रेष्ठ आहे. +सफला एकादशीच्या दिवशी श्रीहरीच्या विविध नामांचा आणि मंत्रांचा जप करून त्याची फळांनी पूजा करावी. देवदेवेश्वर श्री हरी यांची उदबत्ती व दीप लावून पूजा करावी. सफला एकादशीच्या दिवशी दिवे दान जरूर करा. वैष्णवांसोबत नामस्मरण करीत रात्री जागृत राहावे. एकादशीला रात्री जागरण करून जे फळ मिळते ते हजारो वर्षे तपश्चर्या करूनही मिळत नाही. +व्रताच्या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे दशमीच्या तिथीला शुद्ध व शुद्ध अन्न एकदाच घ्यावे. या दिवशी आचरण देखील पुण्यपूर्ण असावे. उपवास करणाऱ्याने उपभोग आणि सुखाचा त्याग करून नारायणाची प्रतिमा मनात ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून कपाळावर श्रीखंड चंदन किंवा गोपी चंदन लावावे आणि कमळ किंवा वैजयंतीची फुले, फळे, गंगाजल, पंचामृत, धूप, दीप आणि आरतीने लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. संध्याकाळी इच्छित असल्यास, दिवा दान केल्यानंतर आपण फळे खाऊ शकता. द्वादशीच्या दिवशी देवाची आराधना करून कर्मकांडाच्या ब्राह्मणाला जनेयू व दक्षिणा अर्पण करून अन्नदान करावे. +जे भक्त अशा प्रकारे सफला एकादशीचे व्रत पाळतात आणि रात्री जागरण व भजन कीर्तन करतात, त्यांना उत्तम यज्ञातून जे पुण्य मिळते, त्यापेक्षा कितीतरी अधिक फळ मिळते. उपवासात फक्त फळे, गाईचे दूध घेता येते, साबुदाणा नाही. सर्व प्रकारचा तांदूळ निषिद्ध आहे. +सफला एकादशीच्या व्रताची कथा पद्मपुराणातील उत्तराखंडात सविस्तर वर्णन केलेली आहे. या एकादशीच्या महिमामुळे पापी लुंभकभावाच्या बंधनातून मुक्त झाला. सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला ऋतुफळ अर्पण करावे. जो व्यक्ती एकादशी-व्रत भक्तीभावाने पाळतो, तो निश्चितच श्री हरिकेचा आशीर्वाद प्राप्त करणारा माणूस बनतो. एकादशीचे माहात्म्य श्रवण केल्याने राजसूय यज्ञाचे फळ मिळते. +सफला एकादशीचा उपवास त्याच्या नावानुसार सानुकूलित फल देणार आहे. भगवान श्रीकृष्ण या व्रताचा मोठा महिमा सांगतात. या एकादशीचे व्रत केल्याने माणसाला जीवनात उत्तम फळ मिळते आणि जीवनातील सुखांचा उपभोग घेतल्यानंतर त्याला मृत्यूनंतर विष्णुलोकाची प्राप्ती होते (ब्रह्मविवर्त पुराण, पद्म पुराण). हे व्रत अत्यंत शुभ आणि पुण्यपूर्ण आहे. (ब्रह्मविवर्त पुराण, पद्म पुराण) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10922.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b20110f6e137c3f3e3716436ede3a552464b8809 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10922.txt @@ -0,0 +1,7 @@ +सफाळे हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या थांबतात. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +सफाळे रेल्वे स्थानकावर पश्चिमेला सुसज्ज आधुनिक पद्धतीची इमारत बांधून पश्चिमेकडील प्रवाश्यांसाठी चार तिकीट खिडक्या, व्यवस्थापक कार्यालय, पँनेल कार्यालय, सुंदर बाग निर्माण करण्यात आलेले आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10926.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4755fc1342f4925538e851a83530784321082e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10926.txt @@ -0,0 +1 @@ +सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते. यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1094.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e52aca5205bbbdd609659df9ca99aaae86a0c8b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1094.txt @@ -0,0 +1,4 @@ +विशाखा हा वि. वा. शिरवाडकर यांचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवितासंग्रह आहे. १९४१ साली हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मराठी लेखक वि.स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे. +विशाखा या काव्यसंग्रहात एकूण ५७ कविता आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे- +१. दूर मनोऱ्यात२. हिमलाट३. स्वप्नाची समाप्ती४. ग्रीष्माची चाहूल५. अहि-नकूल६. किनाऱ्यावर७. अवशेष८. मातीची दर्पोक्ती९. गोदाकाठचा संधिकाल +१०. स्मृति११. हा काठोकाठ कटाह भरा!१२. आगगाडी व जमीन१३. क्रांतीचा जयजयकार१४. जालियनवाला बाग१५. जा जरा पूर्वेकडे१६. तरीही केधवा१७. मूर्तिभंजक१८. कोलंबसाचे गर्वगीत१९. आस२०. बळी२१. लिलाव२२. पृथ्वीचे प्रेमगीत२३. गुलाम२४. सहानुभूती२५. सात२६. माळाचे मनोगत२७. ऋण२८. उमर खय्याम२९. विजयान्माद३०. शेवटचे पान३१. उषःकाल३२. तू उंच गडी राहसि-३३. प्रीतिविण३४. नदीकिनारी३५. पाचोळा३६. बंदी३७. आव्हान३८. बायरन३९. प्रतीक्षा४०. आश्वासन४१. प्रकाश-प्रभु४२. मेघास४३. भाव-कणिका४४. ध्यास४५. निर्माल्य४६. जीवन-लहरी४७. पावनखिंडीत४८. सैगल४९. कुतूहल५०. अससि कुठे तू-५१. भक्तिभाव५२. नेता५३. बालकवी५४. वनराणी५५ . देवाच्या दारी५६. टिळकांच्या पुतळ्याजवळ५७. समिधाच सख्या या- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10952.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1bef084eaddad01fe09c68b000ab616b1371a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10952.txt @@ -0,0 +1 @@ +सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह (इ.स. १९१३ - ३१ डिसेंबर, इ.स. १९७७) हा कुवैतचा दुसरा अमीर होता. हा इ.स. १९६५पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याने ऑगस्ट १९७६ मध्ये कुवैतची संसद देशहिताविरुद्ध असल्याची सबब सांगून चार वर्षांकरता बरखास्त केली होती.[१] हा त्याच्या कुळाचा १२वा शासक होता.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10961.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b203e4dd2a85ef85c3ceb10ffb57f2096df1ee1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10961.txt @@ -0,0 +1,2 @@ +इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे. +१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10964.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98e23c0ce65afdc3819c3706253ae0ac75fd912c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10964.txt @@ -0,0 +1 @@ +सबाइना पार्क हे जमैकामधील क्रिकेटचे मैदान आहे. हे पूर्वी कोणा एका श्रीमंत माणसाची इस्टेट होती. ३० एकर जागेच्या या इस्टेटील एक भाग किंग्सटन क्रिकेट क्लबला विकला गेला आणि त्यातून हे मैदान तयार केले गेले.[१][२] The Great House at Sabina Park Pen was named Rosemount.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10965.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53720324d65f70c30f2c151a19b5c04fbf1f03b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10965.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°13′N 77°63′E / 34.217°N 78.050°E / 34.217; 78.050 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश + +सबू हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लेह तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10975.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f33d8430020a14eba0bc292a41281563242f2f0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10975.txt @@ -0,0 +1 @@ +सभ्भीनेणी मेघना (७ जून, १९९६:आंध्र प्रदेश, भारत - ) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10985.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301da822b22336e8721ae6fb8eb852283fda3758 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10985.txt @@ -0,0 +1,8 @@ +समंथा रुथ प्रभू (पूर्वीचे अक्किनेनी; जन्म २८ एप्रिल १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले आहे. चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, सहा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन CineMAA पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. +अभिनयासोबतच ती अनेक ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी चेहरा आहे. तसेच तिने २०१२ मध्ये महिला आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी प्रत्युषा सपोर्ट ही स्वतःची एनजीओ देखील सुरू केली. फाऊंडेशनला सहाय्य देण्यासाठी ती जाहिराती, उत्पादन लॉन्च आणि उद्घाटन कार्यक्रमांमधून मिळालेली कमाई दान करते. तिने स्वतःच्या मालकीचा साकी नावाचा महिलांच्या कपड्यांचा ब्रँड स्थापन केला.[१] समंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली.[२] +समंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी तेलगू वडील जोसेफ प्रभू आणि मल्याळी आई निनेट प्रभू यांच्या पोटी केरळच्या अलाप्पुझा येथे झाला.[३] तिचे संगोपन चेन्नईजवळच्या पल्लवरम येथे झाले.[४] ती कुटुंबातील सर्वात लहान मूल असून तिला जोनाथन आणि डेव्हिड हे दोन मोठे भाऊ आहेत. पुढे ती अस्खलित तमिळ भाषा शिकली. मिश्र प्रादेशिक पार्श्वभूमी असूनही तिने स्वतःला तमिळ म्हणूनच उद्धृत केले.[५][६] +समंथाचे शालेय शिक्षण होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल येथे झाले. त्यानंतर चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये तिने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीच्या शेवटी ती मॉडेलिंगमध्ये काम चालू केले. तिने विशेषतः नायडू हॉलमध्ये काम केले, जिथे ती पहिल्यांदा चित्रपट निर्माता रवि वर्मनच्या नजरेत आली.[७] +समंथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात गौतम वासुदेव मेनन यांच्या तेलुगु चित्रपट, ये माया चेसावे (2010) मधून केली. तमिळमध्ये विनैतांडी वरुवाया (2010) या नावाने बनवलेल्या चित्रपटाने गौतम मेनन आणि संगीतकार ए.आर. रहमान यांच्यातील एकत्र कामामुळे रिलीज होण्यापूर्वी खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या.[८] समंथाने यशस्वीपणे ऑडिशन दिले. हा चित्रपट 26 फेब्रुवारी 2010 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समांथाला तिच्या भूमिकेसाठी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली.[९] "ये माया चेसवे"ने तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, तसेच प्रतिष्ठित नंदी पुरस्कार मिळवून दिला.[१०][११] +सामंथाचा पुढचा चित्रपट रोमँटिक ड्रामा असलेला बाना काठडी (2010) होता. हा चित्रपट खरंतर अभिनेत्रीने साइन केलेला तिसरा तमिळ प्रकल्प होता, परंतु पहिल्या दोन चित्रपटांच्या आधी प्रदर्शित झाला होता ज्यांच्या पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे तिला करारबद्ध करण्यात आले होते. ही तमिळ सिनेमातील अशी पहिली भूमिका होती.[१२] +रवि वर्मनचा मॉस्कोविन कावेरी (2010) हा तिचा पुढचा चित्रपट होता, मूळत: तिने काम सुरू केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने समीक्षकांकडून खराब पुनरावलोकने मिळविली, तरीही समंथाच्या कामगिरीला चित्रपटातील एकमेव ठळक वैशिष्ट्य म्हणून श्रेय देण्यात आले.[१३] +समंथाने नंतर तेलुगु चित्रपट वृंदावनम (२०१०) मध्ये काम केले, ज्यामध्ये तिची एनटीआर जूनियर आणि काजल अग्रवाल यांच्यासोबत सहाय्यक भूमिका होती. इंदूच्या भूमिकेला तिच्या मागील चित्रपटांपेक्षा कमी स्क्रीन वेळ असूनही तिला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट तिचा तेलगूमधील दुसरा यशस्वी चित्रपट ठरला.[१४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10994.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5ffa00c19765e2f26bd5883374714a6449605f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10994.txt @@ -0,0 +1,40 @@ +निवेदिता मेनन स्त्रीवादी लेखिका आहेत्, आणि सध्या त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठा मध्ये प्राध्यापक आहेत. तुलनात्मक राजकारण आणि राजकीय थिअरी तसेच राजकीय विचार हे विषय शिकवतात. [1] [2] [3] [4] +त्यांचे लिखाण भारतीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक जर्नल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे. त्यांनी रीकव्हरीग सबव्हरशन्:फेमिनिस्ट बिऑण्ड द् लॉ (२००४),सीइंग लाइक ए फेमिनिस्ट् (२०१२) या सारखी पुस्तके लिहली आहेत.जेंडर ऐंन्ड पॉलिटिक्स इन् इंडिया (१९९९) सेक्श्युऑलिटिज् (२००८) ही पुस्तके संपादित केली आहेत. त्या समकालिन परिस्थितीवर द इकॉनॉमिक् एण्ड् पोलिटिकल वीकलीत, काफिला डोट ऑरग आणि वर्तमानपत्रे यांत लेख लिहित् असतात. +राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतो. +व्ही.गीथा या एक लेखक,सामाजिक इतिहासकार,भाषांतरकार,कार्यकर्त्या आहेत.वि.गीथा यांनी वेगवेगळ्या संशोधनपर नियतकालिकांमध्ये संपादक म्हणून काम केले आहे.वि.गीथा या तमिळनाडूमधून येणा-या प्रमुख विचारवंत आहेत.१९८८ पासून त्यांचा भारतातील स्त्रियांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे.वि.गीथा यांचे लिखाण हे तमिळ आणि इंग्रजी या भाषांमध्ये आहे.त्यांनी तमिळ आणि इंग्रजी या भाषांमधून लिंगभाव,लोकप्रिय संस्कृती,जात,आणि तमिळनाडूचे राजकारण इ.विषयांवर लेखन केलेले आहे. + +डॉ प्रेम चौधरी ही एक भारतीय सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि स्त्रीवादी, ऐतिहासिक स्ंशोधक, नवी दिल्ली भारतीय कौन्सिल येथे वरिष्ठ शैक्षणिक फेलो.समाजाच्या नियमांचे उल्ल्घंन् करून् विवाह करणारे जोड्प्याच्या विरुद्ध होणार् हिंसेची समीक्षा केली. तिने लिंगभाव् अभ्यासाची एक सुप्रसिद्ध अभ्यासक् आहे. भारतातील राजकीय अर्थव्यवस्था आणि हरियाणा राज्यातील सामाजिक इतिहास याचाही अभ्यास् केला आहे आणि हरदवारी मुलगी, यश शिक्षणतज्ज्ञ आणि हरियाणा साठी संसदेच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सदस्य. +अनुक्रमणिका +1 व्यावसायिक योगदान् +2 कला कारकीर्द +3 कार्य +3.1 पुस्तके +3.2 पेपरची +4 बाह्य दुवे +5 संदर्भ + व्यावसायिक योगदान् +चौधरी महिला अभ्यास केंद्र लाइफ सदस्य आहे. ती देखील समकालीन अभ्यास, नवी दिल्ली केंद्र समर्थित सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेने येथे काम केले आहे.नेहरू मेमोरियल म्युझियम व वाचनालय प्रगत अभ्यास एकक. +चौधरी एक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे शाळा,व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्राध्यापकांसबंधीचा सहकारी आहे. +'कला कारकीर्द +चौधरी सुद्धा स्वतःची शिकवले कलाकार आहे ज्याचे चित्रकला राष्ट्रीय गॅलरी, भारत ललित कला अकादमी, ललित कला भारतातील राष्ट्रीय अकादमी आयोजित केली जाते. तिने 1970 मध्ये प्रदर्शनच सुरू केले आणि तिच्या चित्रे अनेकदा भारतातील महिला स्थिती चिंतन. +कार्य करते [संपादन] +पुस्तके [संपादन] +चौधरी, प्रेम (1994). आपले मस्तक आच्छादित महिला: ग्रामीण हरियाणा मध्ये लिंग समीकरण स्थलांतर. ऑक्सफर्ड विद्यापीठ भारत. +चौधरी, प्रेम (2000). बांधता भारत आणि साम्राज्य सिनेमा उभारणीविषयी: प्रतिमा, विचारप्रणाली आणि ओळख. मँचेस्टर विद्यापीठ +चौधरी, प्रेम (2010). जमीन मालकी लिंग भेदभाव. सेज प्रकाशने. पी. 314. कोपीराइट 8178299429. +चौधरी, प्रेम (जुलै 2009). वादग्रस्त विवाह, Eloping जोडप्यांना: लिंग, जात, आणि उत्तर भारतात पितस्त्ता. ऑक्सफर्ड विद्यापीठ. +चौधरी, प्रेम (1984). पंजाब राजकारण: सर छोटा राम भूमिका. मिशिगन विकास / विद्यापीठ. +चौधरी, प्रेम (2011). उत्पादन आणि पुनर्निर्माण राजकीय अर्थव्यवस्था. ऑक्सफर्ड विद्यापीठ. +चौधरी, प्रेम (2011). उत्पादन आणि पुनर्निर्माण राजकीय अर्थव्यवस्था. ऑक्सफर्ड विद्यापीठ. +चौधरी, प्रेम (2011). समजून घेणे राजकारण आणि सोसायटी - Hardwari लाल. Manak प्रकाशने. +पेपर : +चौधरी, प्रेम (जानेवारी-जुलै 2001). "Lustful महिला, चटकन प्रेमी स्त्री इच्छा 'च्या ऑब्जेक्ट्स म्हणून पुरुषांची ओळखणे". लिंग इंडियन जर्नल ऑफ 8 अभ्यास +चौधरी, प्रेम (एप्रिल-जून 1996). "समजून contours: दक्षिण पश्चिम पंजाब मध्ये धर्म, जात आणि ओळख". सामाजिक शास्त्रज्ञ +चौधरी, प्रेम (ऑगस्ट 1996). "विवाह, लैंगिकता आणि स्त्री 'संन्यासी': हिंदू तयानी आत डोकावून बिघतलं समजून घेणे." आर्थिक आणि राजकीय साप्ताहिक +चौधरी, प्रेम (जुलै 2010). "लष्कर महिला". आर्थिक आणि राजकीय साप्ताहिक +चौधरी, प्रेम (1993). "Conjugality, कायदा आणि राज्यः वारसा हक्क उत्तर भारत, स्त्रीवादी जाणिवांचा आणि कायदा विशेष समस्या कंट्रोल मुख्य म्हणून". नॅशनल लॉ स्कूल जर्नल +प्रा. डॉ. अनघा तांबे या पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र [१] येथे प्राध्यापक व केंद्राच्या संचालक आहेत. 'लिंगभाव आणि लैंगिकता', 'लिंगभाव परिप्रेक्षातून सामाजिक इतिहास' हे विषय त्या शिकवतात. काही इंग्रजी व मराठी जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.[२]. +DEBATES AND MOBILIZATIONS ON THE ISSUE OF PROSTITUTION SINCE 1980 : A SOCIOLOGICAL ANALYSIS हा त्यांच्या पीएच.डीच्या प्रबंधाचा विषय होता. +अनघा तांबे यांच्या 'स्त्री चळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसूरी कथन ' या लेखातून त्यांनी पुढील काही ठळक मुद्दे मांडले आहेत . +१. लैगिकतेच्या पितृसत्ताक आयामांबरोबरच भांडवली ब्राम्हणी आयाम पहिले तर आज केवळ लैगिक हिंसेच्या जातवर्गीय पैलूंच्या अदृश्यतेचा प्रश्न इथे केंद्रस्थानी आहे. या बरोबरच स्त्रियांची लैगिकता एकसाची पद्धतीने अभ्यासता येणार नाही, तर त्याचा चिकित्सक अभ्यास करणे आवश्यक आहे . +२. लैंगिक आनंदासाठीचे शब्द व त्यांतून पुरुषांना मिळणारा आनंद हा त्यांच्या कर्तेपणाचा भाग आहे असे स्त्री चळवळ म्हणत असताना' आणि शहरी मध्यमवर्गीय भांडवली चौकटीत असा खुलेपणा मान्य असला, तरी बहुतांश स्त्रियांसाठी तो छेडछाड, अवमान याच चौकटीत अभिव्यक्त होतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11002.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c0d2e88b3b5957795991e259bbf2d66a765104c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11002.txt @@ -0,0 +1,3 @@ +समता पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे जो जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी 1994 मध्ये स्थापन केला होता. 2000 मध्ये पहिल्यांदा नितीश कुमार 8 दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांनी 2003 मध्ये जनता दल (युनायटेड)ची स्थापना केली आणि समता पक्षाचे विलीनीकरण केले, परंतु ब्रह्मानंद मंडळाच्या विरोधामुळे समता पक्ष विलीनीकरण झाले नाही.निवडणूक आयोगाने पक्ष चालवण्यास परवानगी दिली, त्यानंतर ब्रह्मानंद मंडल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले[२]. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020[३] मध्ये, पक्षाने उदय मंडल[४] यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा लढवल्या पण पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही. समता पक्षाची संघटनात्मक निवडणूक नोव्हेंबर 2021 मध्ये झाली ज्यामध्ये पुन्हा ब्रह्मानंद मंडल राष्ट्रीय अध्यक्ष आणि उदय मंडल राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवडून आले[५]. +शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल या चिन्हाचे वाटप केले, ज्यावर समता पक्षाने दावा केला आहे. समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे,तिथे ही मागणी फेटाळली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे,परंतु अंतरीम स्थगितीसुद्धा मिळाली नाही. +ऑफिसियल वेबसाइट diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11011.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7801aa4ed343001d6be9b2d05f36ac9cb78a212a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11011.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी सारखीच असेल तर त्या‍ त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजूंसमोरील कोन समान असतात, म्हणजेच या त्रिकोणातले दोन कोन सारख्या मापाचे असतात, आणि तिसरा वेगळ्या मापाचा. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11029.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5943c10ce08779f158aa0400753114ecc241f377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11029.txt @@ -0,0 +1,3 @@ +समरसता एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. +समरसता एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, रुरकेला, टाटानगर, खरगपूर व कोलकाता ही आहेत. +या गाडीत एक वातानुकुलित प्रथमवर्गाचा, एक वातानुकुलित प्रथम/दुसऱ्या वर्गाचा, दोन वातानुकुलित दुसऱ्या वर्गाचे, पाच वातानुकुलित तिसऱ्या वर्गाचे, नऊ तिसऱ्या वर्गाचे, तीन बसण्याची सोय असलेले, दोन बसण्याची सोय तथा सामानवाहक डबे असतात. याशिवाय खानपानासाठीचा एक वेगळा डबा जोडलेला असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11030.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9526062c215d315db0a97361b51fb58bcd36e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11030.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पहा : विद्यार्थी साहित्य संमेलन ; साहित्य संमेलने; समरसता साहित्य संमेलन diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11044.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..166ea90f7d6170caf6e426f2caa2a732ade0d910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11044.txt @@ -0,0 +1,32 @@ +समर्थ विद्यालय, ही हेल्पर्स ऑफ दि हँडकॅप्ड या संस्थेद्वारा संचालित, इतर विद्यार्थ्यांसोबत अपंग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करणारी उंचगाव (कोल्हापूर) येथील विनाअनुदानित शाळा आहे. +जून २००८ +सुदृढ व अपंग विद्यार्थ्यांचे एकात्म शिक्षण; उपक्रम व अभ्यास दोन्हींचा समतोल; सहल, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांतून सामाजिक भान देण्याची तत्परता; इंग्लिश स्पीकिंगसाठी मार्गदर्शन; सर्व विषयांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे अध्यापन ; व यक्तिमत्त्व विकासासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन; विज्ञान दिन, गणित दिवस, इंग्लिश डे इत्यादींचे आयोजन वगैरे. +हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड या संस्थेद्वारा ही शाळा चालवली जाते. अपंग व सुदृढ मुलांना एकात्मिक शिक्षण सुरू करताना अपंगांना जवळ शाळा असावी त्याचबरोबर समाजात कसे जगावे याचे भान त्यांना यावे, शाळेत असणाऱ्या सुदृढ मुलांनाही सजग सामाजिक भान द्यावे असा हेतू स्थापनेच्या वेळी होता. अभ्यासापासून ते खेळापर्यंत सर्व गोष्टीत अपंग मुलांना सहभागी करून घेतले जाते. +२०१० च्या मार्चमध्ये शाळेची दहावीची पहिली तुकडी शालान्त परीक्षेला बसली. यानंतर फक्त २०११ सालचा अपवाद वगळता आतापर्यंत शाळेचा निकाल १००% लागला आहे. गुणवंतांचे विविध पुरस्कारानी कौतुक केले जाते. विज्ञान विषयासाठी सरोजिनी शुक्ल स्मृती पुरस्कार, इंग्लिश विषयासाठी दादा नाईक स्मृती पुरस्कार दिला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याला सौ.सुचेता नाईक जिद्द पुरस्कार दिला जातो. +शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभते. मान्यवरांच्या भेटीचा योग पालकांसाठीही उपलब्ध करून दिला जातो. रवींद्र नाईक या समुपदेशकांची दोन दिवसांची कार्यशाळा पालक, शिक्षक व विद्यार्थी ठेवण्यात आली होती. जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे 'यजुर्वेंद्र महाजन यांची मुले' तसेच शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा झाली. दरवर्षी अशा विविध कार्यशाळा होतात. समर्थ विद्यालयात नवनवीन उपक्रम राबवले जातात. +शाळेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रशस्त क्रीडांगण आहे.अपंग व् सुदृढ विद्यार्थ्यांना एकात्म शिक्षण देणारी शाळा म्हणून खास ओळख शाळेने निर्माण केलेली आहे. कोल्हापुर पासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर उंचगाव या ठिकाणी आहे. अपंग मुलांच्यासाठी घरोंदा वसतिगृहाची सोय आहे. +हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित समर्थ विद्या मंदिर व समर्थ वाचनालय या शाळेच्या ग्रामीण परिसरात वसलेले आहे. +विस्तृत जागेमध्ये अंतर्गत सजावटीत विद्यार्थ्याच्या हस्तलिखिताव्ंद्वा सुविचार लावले आहेत. तसेच चित्कला कुलकर्णी यांनी मुलांमध्ये मराठी भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी ऋतूंवर लिहिलेल्या कवितांच्या भित्तीपत्रांनी भिंती बोलक्या केल्या आहेत. +ग्रंथालयातील कपाटे कुलूप नसलेली असून त्यांना काचेची दारे आहेत, जेणेकरून वाचकांना पुस्तके सहज लक्षात येतील. वृत्तपत्रे ठेवण्यासाठी लाकडी स्टँड असून विद्यार्थी मोकळ्या वेळेत वृत्तपत्रांचे वाचन करतात. वाचनकक्षाकरिता आकर्षक टेबलांची व खुर्च्यांची सोय आहे. हे सर्व फर्निचर रोटरी क्लब, कोल्हापूरकडून देणगीस्वरूपात मिळाले आहे. +इयत्ता १० वीच्या सकाळ तासिकेसाठी, मोकळ्या वेळेत, तसेच परीक्षेदरम्यान अभ्यासिकेचा जास्त वापर करण्यात येतो. +मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील एकूण ७५०० ग्रंथसंख्या असून विषयानुसार रचनात्मक मांडणी केली आहे. ज्याचा वापर ३ री ते १० वी तील विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वसतिगृहातील अपंग विद्यार्थी व कर्मचारी घेत आहेत. +शिक्षक व विद्यार्थी यांना अद्ययावत ठेवण्यासाठी जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, ऋग्वेद, मुलांचे मासिक, निर्मळ रानवारा, किशोर, चंपक, Child Friendly News, National Geography, Tinkle Digest इत्यादी नियतकालिकांचा संग्रह आहे. +येथे वाचकांना मुक्त प्रवेशद्वार पद्धत आहे. विद्यार्थ्याना हवा असणारा ग्रंथ ते स्वतः घेतात यामुळे त्यांना एका विषयांशी संबंधित अनेक ग्रंथांची ओळख होते. +१. अभिप्राय वही :- इ. ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकावर सारांश लिहिण्यास सांगितले जाते. पुस्तक जमा करताना अभिप्रायवही आणणे बंधनकारक असते. +२. डोकॅलिटी :- लोकसत्तामध्ये येणारी डोकॅलिटीचे कात्रण काढून स्कॅनिंग करून संगणकाद्वारे खेळ खेळला जातो. मुले प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वहीत लिहितात. +३. वाचन पेटी :- शालेय तासिकात वाचनतास हा वर्गानुसार असतो. यामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार ग्रंथ निवडले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचा सतत ग्रंथालयाशी संपर्क वाढवा या उद्देशाने वाचनतास सुरू करण्यात आला. वर्गातील अधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोन ग्रंथालय मंत्री स्वतंत्रपणे वाचनतासाचे कार्य करीत असतात. +४. ग्रंथ व नियतकालिकांचे प्रदर्शन :- नवीन ग्रंथांची यादी नोटीस बोर्डला लावण्यात येते तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त मासिकांचे वेळोवेळी प्रदर्शन भरते. +५. ग्रंथालय एक अभ्यास सहल :- मुलांना इतर ग्रंथालयांचे ज्ञान व्हावे तसेच तेथील कार्यप्रणाली समजावी याकरिता सार्वजिक करवीर वाचन मंदिर कोल्हापूर येथे नेण्यात आले. +६. अधिक वाचन व उत्तम लेखन :- स्नेहसंमेलनात अधिक वाचन करणाऱ्या ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्याना व शिक्षकांना, तसेच उत्तम लेखन करणाऱ्या ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याना बक्षीस देण्यात येते. +१. लांजेवार, नरेंद्र. एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा. औरंगाबाद : साकेत प्रकाशन, आ. २०१२. +२. जोशी, एन. एम. “वाचाल तर वाचाल” ऋग्वेद मार्च २०१६. +३. दैनिक लोकसत्ता +हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित असलेली ही शाळा आहे. +अंशतः अनुदानित +बालवाडी ते आठवी +४४५ +!! ज्ञान हेच सामर्थ्य !! +संस्थेच्या अध्यक्षा मा. नसीमा दीदींचे पहिल्यापासून स्वप्न आहे –‘एकात्मता हा धर्म सर्वांकडून जीवनाचा धर्म म्हणून पाळला जावा’ त्याचदृष्टीने सुदृढ व अपंग विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम वयात एकत्र शिक्षण घ्यावे म्हणून हेल्पर्स तर्फे सुयोग्य अशी जागा उपलब्ध होताच घरौंदा वसतिगृहाशेजारी समर्थ विद्यामंदिर सुरू झाले. अपंग व सुदृढ मुलांना एकत्रित शिक्षण घेता यावे, अपंग मुलांच्या मनातील न्यूनगंड कमी व्हावा, समाजालाही अपंग हा समाजाचाच एक घटक आहे याची जाणीव व्हावी तसेच आजुबाजूच्या परिसरातील विद्यर्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा शाळा स्थापनेमागील हेतू होता व आहे. +शाळेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच ‘समर्थ संकल्प’ वाचलात की शाळेच्या एकूण कार्याबाबत माहिती मिळते. रॅम्प्वरून आत प्रवेश करताच अपंग व सुदृढ विद्यर्थ्यांचे प्रतिक असलेले दोन पुतळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सहशिक्षण ध्येय साध्य करीत असल्याचे हे द्योतक आहे. +सर्वांसाठी सदैव खुले वाचनालय * इंटरनेट सुविधेसह संगणक कक्ष * सुसज्ज प्रयोगशाळा *दृकश्राव्य सभागृह * उपक्रम हॉल * विविध खेळ व खेळण्यांनी समृद्ध टॉइज लायब्ररी * स्वचछ व सुलभ शौचालय* अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर* समुपदेशक व उपचारात्मक अध्यापनाचे विशेष वर्ग * इतर भौतिक सुविधा* विविध खेळांचे तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण * सुट्टीतील छंद वर्ग * उपक्रम व कृतियुक्त +विशेष विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील फासेपारधी समाजातील विद्यार्थी व इतर सामाजिक घटकांनाही या सुविधांचा लाभ मिळतो. शाळा विभाग प्रमुख म्हणून पी. डी. देशपांडे सर, मार्गदर्शक सुचित्राताई तसेच कार्यमग्न शिक्षक यांच्या सहकार्यातून समर्थ विद्या मंदिराची वाटचाल सुरू आहे. शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम, विविध दिन, बाह्य स्पर्धेतील सहभाग व यश, अनेक स्पर्धा परीक्षा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध प्रशिक्षणे, नव्या तंत्रज्ञानाच्या वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. उपक्रमातून सादरीकरण, धाडस, संभाषण, नाट्य, अभिनय कौशल्य, नियोजन, संयम, सहकार्य इत्यादी धडे विद्यार्थी अनुभवांतून शिकतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11057.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f7dc7cc81802546e232e5088ae31b7657b592a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11057.txt @@ -0,0 +1,3 @@ +समर्स काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +समर्स काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11060.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cebc0d09ad54b57a0387c82f891d591ee8092ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11060.txt @@ -0,0 +1,3 @@ +समलिंगी विवाह दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह. +जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिलेला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व आर्जेन्टिना ह्या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेटिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्स व व्हरमाँट ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे. +भारतीय घटनेच्या कलम ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यक्तींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणला जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[१] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11062.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fae3a7aa2e17a407adc4cbdace492dacf84faa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11062.txt @@ -0,0 +1,29 @@ +एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता' (इंग्लिश: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' (इंग्लिश: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".[१] [२] +समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.[३] व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,[३] तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे[४] : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. [५] अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही[५] पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे,[६] जरी काही जण समलैँगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात,[७][८] तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. [३][९] बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. [३] लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.[१०] +समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, कला व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात अमेरिकेतील 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि 'अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन' ह्या महत्त्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या. +पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना 'लेस्बिअन' (इंग्लिश: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना 'गे' (इंग्लिश: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे. +समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच लिंगाच्या संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरून लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे. +काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषतः लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रियतेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. कार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे. +हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या कामसूत्र या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. [११] + +मनुस्मृतीमध्ये समलैँगिकतेसाठी दिलेली शिक्षा कठोर किंवा प्राणघातक अशी नसून सौम्य आहे अशी म्हटली जाऊ शकते.   +ब्राह्मणस्य रजः कृत्वा घ्रातिर् अघ्रेयमद्ययोः । +जैह्म्यंच मैथुनं पुंसि जातिभ्रंशकरं स्मृतम् ॥ ११.६७ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.६८) +... +अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु । +रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥ ११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३) +... +गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पि: कुशोदकम् । +एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥ ११.२१०-२१२[१२] +पहिल्या उताऱ्यात अन्य कार्यांसोबत, द्विज माणसाने पुरुषासोबत मैथुन केल्यावर जातिभ्रंश म्हणजेच जात गमावणे ही शिक्षा सांगण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या उताऱ्यात अमनुष्यांत, मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये वीर्य शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे असे म्हटले आहे. गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही, तूप कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय. वरील ११.१७२ (किंवा ११.१७३) हा उतारा अगदी तसाच्या तसाच कूर्म पुराणात (उत्तरभाग, ३३.१०) पण आहे.[१३][१४] +स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे. +कन्यैव कन्यां या कुर्यात् तस्या: स्याद द्विशतो दमः । +शुल्कंच द्विगुणं दद्यात शिफाश्चाप्नुयाद दश ॥ +या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति । +अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥ ७.३६९-३७० +जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात. +पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल. +१९७०/८० च्या दशकांपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता ही कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आली होती. २०१० च्या सुरुवातीस, कॅनडा, स्पेन, नॉर्वे, स्वीडन, बेल्जिअम, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांमध्ये समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता आहे. काही युरोपियन देशांमध्ये, विवाहांस अधिकृत मान्यता नसली तरी काही प्रमाणात 'सिव्हिल युनियन'च्या स्वरूपात वैवाहिक जोडप्यांसारखे काही हक्क दिले गेले आहे. अमेरिकेत समलैंगिक विवाहास कायदेशीर दर्जा दिला जावा की नाही हा एक वादाचा विषय असून विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान ह्या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळी चर्चा घडून येतात. समलिंगी विवाहाची अधिकृतरित्या कायदेमान्यता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. कनेटिकट,आयोवा, मॅसेच्युसेट्स, व्हर्मॉँट व न्यू हँपशायर ह्या पाच राज्यांमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर आहे, (इतर राज्यांमध्ये समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधांना अटकाव नाही). कॅलिफोर्नियामध्ये सन २००८ प्रथम समलिंगी विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर झाला होता, मात्र नोव्हेंबर २००८ मधील निवडणुकांमध्ये 'प्रपोझिशन ८' हे कलम सार्वमताने मंजूर झाले ज्याद्वारे वरील कायदा बाद ठरवला गेला. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकमुळे एखाद्या व्यक्तीला डावलले जाणे (नोकरी, सामाजिक, शासकीय, शैक्षणिक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी व्यवसायांमध्ये) हे बेकायदेशीर ठरवले गेले आहे. +भारतीय घटनेच्या प्रभाग ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[१५] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले होते मात्र १२ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा रद्द करण्यात आली.समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे आणि त्यासाठी भारतीय दंड विधानातील ३७७ नुसार १० वर्षं ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. निसर्ग नियमांच्या विरुद्ध लैंगिक संबंध (सेक्स) करणं फौजदारी गुन्हा आहे असं कायदा सांगतो आणि हा कायदा बदलायचा असेल तर सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकणार नाही. कारण कायदा बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे असं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे. +अनेक आशियाई, आखाती देशांमध्ये समलैंगिकता अजूनही गुन्हा आहे. सहा देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा जन्मठेप-पात्र गुन्हा आहे; १० देशांत तर समलैंगिकतेस मृत्युदंडाची शिक्षा आहे.[१६] +भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 06/09/2018 रोजी भारतीय दंडविधान संहितेचे 377 हे कलम आता एकमेकांच्या संमतीने खाजगीत होणाऱ्या समलिंगी लैंगित संबंधानां लागू करता येणार नाही असा निर्णय दिला. ह्या कलमा अंतर्गत आता फक्त पौढ नसलेल्या व्यक्तिंशी केलेल्या लैंगिक क्रियाच गुऩ्हा ठरतील.[१७] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11087.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe4a019435027002874ae96b57e5b5825ba315d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11087.txt @@ -0,0 +1,3 @@ +समांतर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन मालिका आहे जी १३ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झाली.[१] या मालिकेत स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित हे मुख्य कलाकार आहेत.[२] या मालिकेचे प्रसारण एमएक्स प्लेयरवर केले गेले. +समांतर ही कुमार कुमार या एका युवकाची कहाणी आहे, जिच्या शोधात प्रवास केल्यावर त्याचे जीवन बदलत जाते, सुदर्शन चक्रपाणी, त्याच्याबरोबर हेच नशिब सामायिक करणारा माणूस. कुमार जे जीवन जगत आहेत तेच जीवन चक्रपाणी आधीच जगले आहे.[३] +समांतर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11095.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..076a11146d33da802f2ad961f84131b5fa8a9986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11095.txt @@ -0,0 +1 @@ +समांथा क्लेर टेलर (सप्टेंबर २५, इ.स. १९७५ - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच क्वचित यष्टिरक्षणही करते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11105.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d395b7f10ce8d7ace308f609566b8d8b11634e80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11105.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11108.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11108.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11112.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4474ac98585faa4b9000bcc2a5d4402c56f243a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11112.txt @@ -0,0 +1,2 @@ +समाजवाद ही एक तत्त्वप्रणाली आहे ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. हे नियमन कामगार समिती सारख्या प्रत्यक्ष पद्धतीने असू शकते, अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी ही वैयक्तिक नसून सर्व समाजाची अथवा देशाची मिळून असते. +वर्ग:समाज diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11141.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2dabe253318d0b7020933a2b67e29cc46c8a25d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11141.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 53°12′10″N 50°8′27″E / 53.20278°N 50.14083°E / 53.20278; 50.14083 + +समारा (रशियन: Самара) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. समारा शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याची सोव्हिएत संघात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी मॉस्कोहून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली. +रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11178.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7465ed57a0de1aeacbfea3784206d4cfeafcbc65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11178.txt @@ -0,0 +1 @@ +समीर त्रिंबकराव कुणवार मराठी राजकारणी आहेत. हे हिंगणघाट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11205.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2911028afffaddb5ea22b8173412efce4bdc6b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11205.txt @@ -0,0 +1 @@ +वरधारा (अन्य नावे: वृद्धदारु ; शास्त्रीय नाव: Argyreia nervosa / Argyrea nervosa var. speciosa ; इंग्लिश: Woolly Morning Glory (वूली मॉर्निंग ग्लोरी), Elephant Creeper (एलिफंट क्रीपर) ;) ही बारमाही उगवणारी, उंचावर चढणारी वेल आहे. ही मूलतः भारतीय उपखंडातील असून आधुनिक काळात हवाई बेटे, आफ्रिका, कॅरिबियन बेटे व जगभरात अन्यत्र पसरली आहे. हिच्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातील काही औषधोपचारांत वरधारा वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11209.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..725929e1d8fefc9780c5314b4d2af1a5137c1753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11209.txt @@ -0,0 +1,3 @@ +समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश:Beach) म्हणतात. पुळणाच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. पुळण हे भौगोलिक क्रियांनी तयार होते. पुळणावरील रेती ही पिवळसर असते. +वाळुमय नसलेला किनारा खडकाळ असतो. अशा किनाऱ्यावर बंदर बांधता येते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11237.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1973b982248ad9bceb2f1ae6577c9a926eb2427d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11237.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +समन्था ऱ्यान ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1124.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e72036e37dce814dcb7c95b0eb6a36ad516871f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1124.txt @@ -0,0 +1,2 @@ +विशाखापट्टणम वायुदुर्घटना किव्हा विझग वायुदुर्घटना आर. आर. वेंकटापुरम गावात एलजी पॉलिमर केमिकल प्लांटमध्ये हा एक औद्योगिक अपघात आहे[१][२]. हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या सीमेवर गोपाळपटणम जवळ आहे. ही घटना ७ मे २०२० च्या पहाटे घडली. परिणामी वाष्प ढग सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल)च्या त्रिज्येवर पसरला, ज्यामुळे आसपासच्या भाग आणि खेड्यांचा परिणाम झाला. ८ मे रोजी मृतांची संख्या १३ होती, आणि १०००हून अधिक लोक प्रभावित झाले होते.[३] +प्राथमिक तपासणीनुसार, स्टायरिन गॅस साठवण्याच्या युनिट्सची अयोग्य देखभाल, अयोग्य स्टोरेज आणि ऑपरेशनच्या त्रुटी गळतीचे कारण असल्याचा संशय आहे. आंध्र प्रदेश सरकारने मृतांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची घोषणा केली आहे, आणि पीडित सर्व व्यक्तींसाठी ३० कोटी रुपयांच्या मदत केली आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11247.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..316fcb356eaa52151f87dbbc054657b3ae115084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11247.txt @@ -0,0 +1,3 @@ +सम्टर काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +सम्टर काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1125.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32b02c82c1011cd99c7a3bdfffda96a58f11bc5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1125.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 17°41′18″N 83°13′7″E / 17.68833°N 83.21861°E / 17.68833; 83.21861 + +विशाखापट्टणम (तेलुगू: విశాఖపట్నం) (जुने नाव विजगापट्टण Vizagapattan) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे. +विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे. +ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम कलिंग साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे विजयनगर तर १६व्या शतकात मुघलांची सत्ता होती. १८व्या शतकात फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे ब्रिटिशांची राजवट आली. ती भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती. +यिशाखापट्टणम या शहराला लोक अजूनही वैझॅग (Vizag) या संक्षिप्त नावाने ओळखतात. +२०११ सालच्या जनगणनेनुसार विशाखापट्टणमची लोकसंख्या १७,३०,३२० इतकी होती. येथील लिंग गुणोत्तर ९७७ तर साक्षरता दर ८२.६६% होता. +विशाखापट्टणम शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राच्या विशाखापट्टणम विभागाचे मुख्यालय येथील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता इत्यदी अनेक प्रमुख शहरांसाठी येथून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. +सुवर्ण चतुष्कोणाचा भाग असलेला राष्ट्रीय महामार्ग ५ विशाखापट्टणममधून धावतो. +विशाखापट्टणम विमानतळ येथील प्रमुख विमानतळ येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच दुबई, क्वालालंपूर इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11255.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f229b10ede3ffa8cc9f6bd2ae4269912fe3ca58c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11255.txt @@ -0,0 +1,18 @@ +सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते. +पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यांच्या हस्ते झाले होते. परशुराम आठवले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात, १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात ३रे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला. +संमेलनात पास झालेले ठराव : +१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. +२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्‍न पुरस्कार द्यावा. +३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी. +"या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या." +साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला. +ही सम्यक साहित्य संमेलने दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते. +हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे. +त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे. +आरग (मिरज) येथे २००४साली एक पारिवारिक साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा.डाॅ. रवींद्र ठाकूर होते. +दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये होतात ती सम्यक बौद्ध संमेलने वेगळी आहेत. या संमेलनात दरवर्षी 'गीतोंभरी शाम बाबासाहेब के नाम' नावाचा भीमगीतांचा कार्यक्रम असतो. + + + +पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित संस्था diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11268.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a60663b07946f1829e4ecff0cae3b690b76aa7dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11268.txt @@ -0,0 +1 @@ +कोतोकू (जपानी:孝徳天皇;कोतोकू तेन्नो; ५९६ - २४ नोव्हेंबर, ६५४) हा जपानच्या पारंपारिक उत्तराधिकारी क्रमवारीनुसार[१] जपानचा ३६वा सम्राट होता.[२] त्याने सन ६४५ ते ६५४ या कालावधीत राज्य केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11272.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..964c0f3c5fecbd8ad5392bc9d6f058fe28555e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11272.txt @@ -0,0 +1 @@ +चू छीचन (चिनी लिपी: 朱祁鎮 ;पिन्यिन: Zhu Qizhen) (नोव्हेंबर २९, १४२७ - फेब्रुवारी २३, १४६४) हा चीनवर राज्य करणारा सहावा मिंग वंशीय सम्राट होता. सम्राट चंगथाँग (देवनागरी लेखनभेद: चंगतोंग; सोपी चिनी लिपी: 正統; पारंपरिक चिनी लिपी: 正統; पिन्यिन: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्ग; अर्थ: सुशासन) या बिरुदाने त्याने १४३५ ते १४४९ सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला मंगोलांनी कैदेत टाकले व त्याचा भाऊ चू छीयू यास सम्राट जिंग्ताय या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. १४५७ साली सम्राट त्यांशुन या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने १४६४ साली मृत्यूपर्यंत राज्य केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11281.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd24a22cf20c3d3c0bacf58024716b0d3e7adbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11281.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चोंगचन (नवी चिनी चित्रलिपी: 崇祯; फीनयीन: Chóngzhēn; उच्चार: चोंङ्ग-चऽऽन्) (फेब्रुवारी ६ १६११ - एप्रिल २५ १६४४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला १६ वा आणि शेवटचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11302.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f4ac3e4d660dd4fd63fc736302551411462757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11302.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट शोको (称光天皇; शोको-तेन्नो) (मे १२, इ.स. १४०१ - ऑगस्ट ३०, इ.स. १४२८) हा जपानचा १०१वा सम्राट होता.[१] हा इ.स. १४१२ ते मृत्युपर्यंत सम्राटपदी होता.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11303.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ab8f7ad09e31c90ed174e43392e9c8080b8b3b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11303.txt @@ -0,0 +1,5 @@ + +इचितोमिया हिरोहितो (१९०१ १९८९) जपानच्या पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत. +हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्त्वज्ञ व विचारवंत होते. +जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलेला होता. हिरोहितो यांना शोवा हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता. +दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11306.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e8298de1fae2dffe9898ee265a8bdf6c69709a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11306.txt @@ -0,0 +1,7 @@ +सम्राट हर्षवर्धन किंवा हर्ष (इ.स. ५९० – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धननंतर इ.स. ६०६ मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहिती मिळते. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपुरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधीन केले. हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना करून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.[१] +सम्राट हर्षवर्धन एक प्रस्थापित नाटककार आणि कवी होते. त्यांनी 'नागानंद', 'रत्नावली' आणि 'प्रियदर्शिका' नावांच्या नाटकांची रचना केली. त्यांच्या दरबारात बाणभट्ट, हरिदत्त आणि जयसेन यांसारखे प्रसिद्ध कवी व लेखक दरबाराची शोभा वाढवत होते. सम्राट हर्षवर्धन हे बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाचे अनुयायी होते. असे मानले जाते की, हर्षवर्धन दरदिवशी ५०० ब्राह्मणांना आणि १००० बौद्ध भिक्खुंना भोजन दान करीत होते. हर्षवर्धन यांनी इ.स. ६४३ मध्ये कनोज आणि प्रयाग या शहरांमध्ये दोन विशाल धार्मिक सभांचे आयोजन केले होते. हर्षवर्धनाने प्रयागमध्ये आयोजित केलेल्या सभेला मोक्षपरिषद् असे म्हटले जाते. +हर्षवर्धन स्वतः प्रशासकीय व्यवस्थेत व्यक्तिगत रूपात रुची ठेवित असे. सम्राटाच्या मदतीसाठी एक मंत्रिपरिषद स्थापण्यात आली होती. बाणभट्टानुसार अवंती हा युद्ध आणि शांतीचा सर्वोच्च मंत्री होता. सिंहनाद हा हर्षवर्धनाचा महासेनापती होता. बाणभट्टाने हर्षचरितात या पदांबद्दल म्हटले आहे : +हर्षवर्धनांच्या काळात अधिकाऱ्यांना नगद वा जहागिरीच्या रूपात वेतन दिले जात असे, पण ह्युएन्संगाच्या म्हणण्यानूसार, मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना वेतन हे भूमी अनुदानाच्या रूपात दिले जात होते. +हर्षवर्धनांच्या काळात राष्ट्रीय उत्पन्‍नाचा एक चतुर्थांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कर्मचाऱ्यांना वेतन किंवा बक्षिसाच्या रूपात, एक चतुर्थांश भाग धार्मिक कार्यांच्या खर्चांसाठी, एक चतुर्थांश भाग शिक्षणासाठीच्या खर्चासाठी आणि बाकी एक चतुर्थांश भाग हे सम्राट स्वतः आपल्या खर्चासाठी उपयोगात आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे विवरण मिळते - भाग, हिरण्य, आणि बली. 'भाग' किंवा भूमिकर (सारा) पदार्थाच्या रूपात घेतले जात होते. 'हिरण्य' नगदाच्या रूपात घेतला जाणारा कर होता. या काळात भूमिकर कृषि उत्पादनाच्या १/६ इतका वसूल केला जात असे. +ह्युएन्संगनुसार हर्षवर्धनांच्या सैन्यात जवळपास ५,००० हत्ती, २,००० घोडेस्वार व ५,००० पायदळ सैनिक होते. कालांतराने ही संख्या वाढून हत्ती ६०,००० व घोडस्वारांची संख्या १,००,००० (एक लाख) पर्यंत पोहोचली. सम्राट हर्षवर्धनांच्या सैन्यातील साधारण सैनिकांना चाट व भाट, अश्वसेनेच्या अधिकाऱ्यांना हदेश्वर, पायदळ सैन्याच्या अधिकाऱ्यांना बलाधिकृत आणि महाबलाधिकृत म्हटले जात होते. +सम्राट हर्षवर्धनांचा दिवस तीन भागात विभागला गेला होता. प्रथम भाग सरकारी कार्यांसाठी तथा इतर दोन विभागात धार्मिक कार्य संपन्न केले जात होते. सम्राट हर्षवर्धन यांनी इ.स. ६४१ मध्ये एका व्यक्तीला आपला दूत बनवून चीनला पाठवले. इ.स. ६४३ मध्ये चिनी सम्राटाने 'ल्यांग-होआई-किंग' नावाच्या दूताला हर्षवर्धनांच्या दरबारात पाठवले. सुमारे इ.स. ६४६मध्ये 'लीन्य प्याओं' आणि 'वांग-ह्नन-त्से'च्या नेतृत्वात तिसरे दूत मंडळ हर्षवर्धनांच्या दरबात पोहोचण्यापूर्वीच हर्षवर्धनांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11309.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ecf72df40613f1220761ede812df7c80fbbecd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11309.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[ ]], [[{{{वर्षमृत्यू}}}|{{{वर्षमृत्यू}}}]] (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{वर्षमृत्यू}}} मधील मृत्यू]] +९ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11311.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7ecea40d5ec7801bf5f6d482a0bfe31f83d9f8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11311.txt @@ -0,0 +1,3 @@ +सयाजी शिंदे (जन्मदिनांक 13 जानेवारी 1959 साखरवाड़ी,सातारा जिल्हा, महाराष्ट्र,भारत. - हयात) हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. कॉलीवुड-टॉलीवुड चित्रपटसृष्टींत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर याने कॉलीवुड व टॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत. +अभिनयासोबत याने चित्रपटनिर्मितीही केली आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी (इ.स. २००९), डांबिस (इ.स. २०११) या मराठी चित्रपटांचा हा सहनिर्माता होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11339.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cf37a84059754d383e44b383daa798fd1bd57d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11339.txt @@ -0,0 +1,4 @@ +सय्यद बंडा हा अफजलखानाच्या सैन्यातील एक सरदार होता. सय्यद बंडा ने अफजलाखानास् प्रतापगडाच्या लढाईत सोबत कलेली होती. +प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीदरम्यान अफजलखानाने दगा केला व शिवाजी महाराजांवर बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. +सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. +पहा प्रतापगडाची लढाई diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1135.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54aa33f456caef51b93d33a322459e0c576c76a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1135.txt @@ -0,0 +1,3 @@ +भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11368.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f7e802e55d2ecdb86486c17d24b3b405198159a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11368.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. +१८ ऑगस्ट, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11376.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eed12773aeafc3d05456b5ead10fe5b313a528af --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11376.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२ ऑगस्ट, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1138.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4b21f4fb915a2493b821d0170e46bf6382d45cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1138.txt @@ -0,0 +1,3 @@ +विशाल रस्किन्हा (जन्म २६ मार्च १९९३ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय एमसी, व्हॉईस ओव्हर कलाकार आणि अँकर आहे. तो विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध झाला.[१] त्याला वेडिंग सूत्राद्वारे भारतातील सर्वोत्कृष्ट वेडिंग एमसी २०२०-२०२१ ने सन्मानित करण्यात आले.[२] +रस्किन्हा यांनी २००८ मध्ये सेंट एंन्स हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये त्यानी हंसराज मोरारजी कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. २०१३ मध्ये त्यानी मुंबई विद्यापीठातून मास मीडिया आणि जाहिरात या विषयात पदवी घेतली.[३] रस्किन्हाने २०१७ मध्ये झिनेदिन झिदान आणि कनिका हॉलीवूडसह कनिका पॅरिसच्या लॉन्चसाठी काम करून इव्हेंट सल्लागार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१६-२०१९ या कालावधीत त्यांची एमटीवी इंडिया चॅनलचे अधिकृत एमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथे त्यानी इंडिया म्युझिक समिट, कलर्स ऑफ युथ आणि एमसी अनप्लग्ड यासारखे शो होस्ट केले.[४] २०१७ ते २०१९ च्या कार्यकाळात त्यानी बकार्डीच्या बारटेंडर डेला त्यांच्या एमसी म्हणून जागृत केले. २०१७ - २०१९ पासून ते वेडिंग सूत्रासाठी अधिकृत कार्यक्रम सल्लागार आणि एमसी बनला जो त्याच्या प्रभावशाली आणि फोटोग्राफी पुरस्कारांसाठी भारतातील सर्वात मोठे वेडिंग पोर्टल आहे. २०१५ आणि २०१८ मध्ये तो भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघासाठी एमसी होता. तसेच २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्स टीमचा आवाज आणि चेहरा बनला. २०१८ मध्ये त्यानी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन पुरस्कारांसाठी संयुक्त राष्ट्र भारताचे आयोजन केले.[५][६] +विशाल रस्किन्हा वेडिंग सूत्रावर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11384.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f478bd80b44a0db6610e05b03c7a007c829cd956 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11384.txt @@ -0,0 +1,2 @@ +एडवर्ड मुतेसा दुसरा (नोव्हेंबर १९, इ.स. १९२४ - नोव्हेंबर २१, इ.स. १९६९) हा इ.स. १९३९ पासून मृत्युपर्यंत आफ्रिकेतील बुगांडा या प्रदेशाचा राजा व इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ या कालखंडात युगांडाचा राष्ट्राध्यक्ष होता. +याचे पूर्ण नाव सर एडवर्ड फ्रेडरिक विल्यम डेव्हिड वालुगेम्बे मुटेबी लुवांगुला मुतेसा असे होते. त्याचा उल्लेख किंग फ्रेडी असाही होत असे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1139.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7666abbb18f11685d1ee5f71f7d22790f1f67494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1139.txt @@ -0,0 +1,5 @@ +विशाल देवगण भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांना अजय देवगण या नावाने ओळखले जाते. त्यांनी १००हून अधिक हिंदी चित्रपटांमधे अभिनय केलेला आहे. तसेच ते चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. त्यांनी काही सिनेमांमध्ये दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे[१]. +अजय वीरु देवगण ज्यांना सर्व त्यांच्या स्टेज, चित्रपटातील व्यावसायिक नावाने ओळखतात त्यांचं खरं नाव विशाल देवगण आहे. फिल्मसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपले नाव अजय देवगण ठेवले कारण जेव्हा अजय देवगणने पदार्पण केले तेव्हा अनेक दुसरे अभिनेते पदार्पण करत होते त्यांचं नाव सुद्धा विशाल होतं. त्यापैकी एक प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांच्या मुलाचे नाव पण विशाल होतं.[२] अजयचे वडील वीरु देवगण आणि त्यांची आई वीणा देवगण आहे. चित्रपट अभिनेत्री काजोल ही त्यांची पत्नी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना एक भाऊ पण आहे. अजयचे +पूर्वज हे पंजाब मधील अमृतसर येथील होते. +अजयचे बाबा वीरु देवगण हे हिंदी चित्रपट सृष्टीतील फाइट कोरिओग्राफर होते. +अजय देवगणने फूल और काटे (१९९१) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिलवाले, जिगर, दिल जले, सुहाग अश्या हिट चित्रपटांत भूमिका साकारली. तसेच गोलमाल चित्रपट शृंखलेत हास्य अभिनय केला. सिंघम, रास्कल्स, सन ऑफ सरदार, तान्हाजी, भूज ह्या सिनेमांमध्ये अभिनय केला. अजय देवगणने यू मी और हम आणि शिवाय हे सिनेमा दिग्दर्शित केलेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11427.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa2de42a02f4b491da10ea90602327c7037705e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11427.txt @@ -0,0 +1 @@ +सर जॉन डेव्हीस (? - डिसेंबर ८, इ.स. १६२६) हा एक इंग्लिश कवी, वकील आणि राजकारणी होता. हा इ.स. १५९७ आणि इ.स. १६२१ दरम्यान अनेक वेळा हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य होता तसेच आयर्लंडचा ॲटर्नी जनरल होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11436.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26e53738dfb6dcd252b48c17cbb4b518c2aa7bcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11436.txt @@ -0,0 +1,29 @@ +जे.जे. थॉमसन हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञहोते +== संशोधन ==df +इलेक्ट्रॉनच्या शोधाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांच्या मुलासह त्यांच्या सात विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट +अणुला सर्वप्रथम भेदनारा माणूस म्हणून त्यांना ओळखले जाते. बव diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11437.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b3ee2f8eb3782859ff61ae2c6bf26a2531501f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11437.txt @@ -0,0 +1 @@ +सर जोसेफ जॉर्ज वॉर्ड (इंग्लिश: Joseph George Ward; २६ एप्रिल १८५६ - ८ जुलै १९३०) हा न्यू झीलँड देशाचा १७वा पंतप्रधान होता. तो ह्या पदावर ऑगस्ट १९०६ ते मार्च १९१२ तसेच डिसेंबर १९२८ ते मे १९३० दरम्यान होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11456.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcd705f9ad83ea097b70b1c3e2c4fb13cde1685c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11456.txt @@ -0,0 +1 @@ +सर फ्रँक वॉरेल मेमोरियल मैदान हे त्रिनिदाद आणि टॉबेगोच्या सेंट ऑगस्टीन शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला  वेस्ट इंडीजच्या खेळाडू सर फ्रँक वॉरेलचे नाव देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11470.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4906cfd44af5b73c36415925487b2beec0724f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11470.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्कर पुरस्कार +रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11476.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52f211ecc72218b7f3acdfe0ead0e3fa7457f64c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11476.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर रॉबर्ट लेर्ड बोर्डेन (जून २६, इ.स. १८५४ - जून १०, इ.स. १९३७) कॅनडाचा आठवा पंतप्रधान होता. हा ऑक्टोबर १०, इ.स. १९११ ते जुलै १०, इ.स. १९२० दरम्यान पंतप्रधानपदी होता. त्यानंतर बोर्डेन क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुपदी होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11477.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dcd0362eb338ba96109c0bd71695479ae63bc8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11477.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा  इंग्लंड व यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला. +याचा मुलगा रिचर्ड हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11481.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93dd30f12c5de8c81301781ecd233b5faae71326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11481.txt @@ -0,0 +1 @@ +सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11484.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..326b22e1c3e397d17dde7d32ae67a57ed2a285d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11484.txt @@ -0,0 +1,4 @@ +विल्यम गोल्डिंग (१९ सप्टेंबर, इ.स. १९११ - १९ जून, इ.स. १९९३) हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने त्याचा सन्मान करण्यात आला.[१] +इंग्लंडमध्ये विल्टरशायरमधील ग्रामर स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विल्यम गोल्डिंग याने ऑक्सफर्डच्या ब्रेसनोज महाविद्यालयात एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. +इ.स. १९४० ते इ.स. १९४५ या काळात विल्यम गोल्डिंगने ब्रिटिश नौदलातून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. युद्धापूर्वी एक वर्ष आणि युद्धानंतर सहा वर्षे त्याने शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणूनही काम केले. +गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ही कादंबरी इ.स. १९५४ साली लिहिली. अज्ञातस्थळी जाणारे एक विमान कोसळून एका बेटावर सक्तीने एकत्र राहावे लागलेल्या काही मुलांची कथा त्याने या कादंबरीत मांडली. कादंबरीतील या मुलांच्या वागण्यातून व बोलण्यातून हुकूमशाहीवादी प्रवृत्तींकडून लोकशाहीवाद्यांचा कसा पराभव होत जातो याचे चित्रण 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'मध्ये गोल्डिंगने केलेले आहे.जी.ए.कुलकर्णींनी त्याचे मराठी भाषांतर केले आहे.(१९८७,पॉप्युलर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11495.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3636ccb8a32e56c73174d11711698f6697190cf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11495.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम (Sir Vivian Richards स्टेडियम) हे कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा ह्या देशामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. हे स्टेडियम २००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठी बांधण्यात आले. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व्हिव्ह रिचर्ड्स ह्याचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले आहे. +सध्या क्रिकेटसोबत हे स्टेडियम फुटबॉल सामन्यांसाठी देखील वापरले जाते. अँटिगा आणि बार्बुडा आपले काही सामने येथून खेळतो. +गुणक: 17°6′11.79″N 61°47′5.46″W / 17.1032750°N 61.7848500°W / 17.1032750; -61.7848500 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11497.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dbfb7d57708d39f4638e192e0f9adef60b602d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11497.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल (जन्म : १७ ऑगस्ट १९३२; - लंडन, ११ ऑगस्ट २०१८) हे व्ही. एस. नायपॉल अशा नावाने ओळखले जात. त्यांना इ.स. २००१ सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इ.स. १९९० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली. इ.स. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11502.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b2b3e9e7bea0d3be943bb74562f66277e8f1d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11502.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर सीवूसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MRU, आप्रविको: FIMP)(फ्रेंच:Aéroport International Sir Seewoosagur Ramgoolam ) हा मॉरिशस मधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पोर्ट लुईसच्या आग्नेयेस ४८ किमी अंतरावर आहे. याला पूर्वी प्लेसांस विमानतळ असे नाव होते. +येथून आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील अनेक शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ मॉरिशसची राष्ट्रीय विमान कंपनी, एअर मॉरिशसचे मुख्य ाणे आहे. +या विमानतळाला मॉरिशसचे पहिले पंतप्रधान सर सीवूसागुर रामगुलाम यांचे नाव देण्यात आले आहे. +साचा:Airports in Mauritius \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1151.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eaebfb8a4bddf10e35860076aedb1d48c6b5ee3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1151.txt @@ -0,0 +1 @@ +भाषाशास्त्रात, क्लासिव्हिटी [१] हे सर्वसमावेशक आणि अनन्य प्रथम- पुरुषी सर्वनाम आणि मौखिक रूपशास्त्र यांच्यातील व्याकरणात्मक फरक आहे, ज्याला सर्वसमावेशक " आम्ही " आणि अनन्य "आम्ही" देखील म्हटले जाते. सर्वसमावेशक "आम्ही" मध्ये विशेषतः पत्त्याचा समावेश होतो (म्हणजे "आम्ही" शब्दांपैकी एक म्हणजे "तुम्ही आणि मी आणि शक्यतो इतर"), तर अनन्य "आम्ही" विशेषतः पत्त्याला वगळतो (म्हणजे, "आम्ही" साठी दुसरा शब्द याचा अर्थ "तो/ती/ते आणि मी, परंतु तुम्ही नाही"), इतर कोणाचा सहभाग असू शकतो याची पर्वा न करता. इतर व्यक्तींमध्ये (विशेषतः दुसरा) असा भेद केला जाऊ शकतो अशी कल्पना करत असतानाच, खरं तर नैसर्गिक भाषांमध्ये द्वितीय-व्यक्ती क्लासिव्हिटीचे (तुम्ही विरुद्ध तुम्ही आणि ते) अस्तित्व विवादास्पद आहे आणि ते प्रमाणित नाही. [२] क्लासिव्हिटी हे प्रमाणित इंग्रजी भाषेचे वैशिष्ट्य नसले तरी ते जगभरातील अनेक भाषांमध्ये आढळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11523.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c01630dd61617dfd852f1058d669110ae18b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11523.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +सरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व के के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे नावाच्या मुंबईमधील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे. +तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या सरकारचा दुसरा भाग सरकार राज २००८ साली प्रदर्शित करण्यात आला. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11524.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c01630dd61617dfd852f1058d669110ae18b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11524.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +सरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व के के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे नावाच्या मुंबईमधील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे. +तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या सरकारचा दुसरा भाग सरकार राज २००८ साली प्रदर्शित करण्यात आला. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11526.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da3a45c0d9e1f3177218cc9a4ed2cf28a9ae9f7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11526.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सरकार राज हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार राज हा २००५ सालच्या सरकार ह्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11531.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c543a6f84d8af6dd68df8679209836a0580ac79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11531.txt @@ -0,0 +1 @@ +सरकारटोला हे महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील गाव आहे. ते गोंदिया शहरापासून १९ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11557.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..536208f5927de85f3c29d4558c6fcac6a8a3e8ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11557.txt @@ -0,0 +1,2 @@ +सरगोधा क्रिकेट स्टेडियम हे पाकिस्तानच्या सरगोधा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१० जानेवारी १९९२ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमध्ये खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11577.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d54d700a425be69161a6991645b349c684fb424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11577.txt @@ -0,0 +1,7 @@ +सरतचंद्र मित्र ( त्यांच्या इंग्रजी लेखनात सरतचंद्र मित्रा) (15 नोव्हेंबर 1863 - 15 डिसेंबर 1938) एक बंगाली लोकसाहित्यकार आणि विद्वान होते. त्यांनी भारतीय शास्त्रातील वनस्पती आणि प्राण्यांवर विस्तृतपणे अभ्यास केला आणि त्याबद्दल लिहिले. कायदेशीर सरावाचे प्रशिक्षण घेतले असले तरी, नंतरच्या आयुष्यात त्यांची कलकत्ता विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागाचे संस्थापक प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. +सरतचंद्र हे सुतानिती तालुक्यातील होगुलकुरिया येथील कुटुंबातून आले होते. जेथे त्यांचे पूर्वज राममोहन मित्र हे त्यांचे मूळ घर बोरीशा येथे महारत्त्यांनी टाकलेल्या छाप्यांमुळे सोडून गेले होते. सरतचंद्राचे वडील नरसिंहचंद्र मित्र हे हथवा राजचे कायदेशीर सल्लागार आणि वकील होते. त्यांची आई निस्तारिणी दासी होती. सरतचंद्राचा मोठा भाऊ अमुल्यचंद्र लहानपणीच मरण पावला आणि बहीण सैलाबाला दासी हिचा विवाह सिमला येथील पूर्णचंद्र चौधरी यांच्याशी झाला होता.[१] +सरतचंद्र यांनी १८७५ मध्ये छपरा येथील कलकत्ता ट्रेनिंग अकादमी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर १८८० मध्ये कलकत्ता येथील सिटी स्कूलमधून प्रथम श्रेणीतील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी ईश्वरचंद विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये शिष्यवृत्तीसह अभ्यास केला होता. त्यांनी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमधून १८८५ मध्ये इंग्रजीमध्ये ऑनर्ससह बीए आणि शिष्यवृत्तीसह पुर्ण केले. १८८६ मध्ये इंग्रजीमध्ये एमए आणि १८८८ मध्ये बीएल प्राप्त केले . मे १८८९ मध्ये ते छपरा बारमध्ये सामील झाले आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांनी न्यायिक सेवांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरीही १८९४ पर्यंत त्यांनी बारमध्ये काम सुरू ठेवले. फेब्रुवारी १८९४ ते मार्च १९०३ पर्यंत त्यांनी हुथवा राजमध्ये सर्वेक्षण आणि सेटलमेंटचे अधीक्षक म्हणून काम केले. तथापि, कोर्ट ऑफ वॉर्ड्स रद्द करण्यात आले आणि ते १९०४ मध्ये छपरा बारमध्ये परत आले (सरतचंद्रचे वडील येथे काम केले होते आणि ११ जुलै १९०५ रोजी त्यांचे निधन झाले) आणि नोव्हेंबर १९११ पर्यंत काम केले. १९११ पासून त्यांनी हथुआच्या महाराणीने नियुक्त केलेले सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम केले. १९२१ मध्ये त्यांची कलकत्ता विद्यापीठात नव्याने तयार करण्यात आलेल्या मानववंशशास्त्र [२] विभागाचे प्रभारी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि दृष्टी कमी झाल्यामुळे ते १९२६ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे स्थान अमेरिकन प्रशिक्षित बिराजा शंकर गुहा यांनी घेतले होते, जे मात्र सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी विद्यापीठातून बाहेर पडले.[१] +प्रवास, इतिहास, लोककथा, चरित्र आणि मानववंशशास्त्र यात सरचंद्र यांना आवड होती. हर्बर्ट रिस्ले यांच्या अंतर्गत १९०५ मध्ये सुरू झालेल्या एथनोग्राफिक सर्व्हे ऑफ इंडिया तसेच जॉर्ज गियरसन यांच्या भाषिक सर्वेक्षण ऑफ इंडियाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी इंडो-हेलेनिस्टिक आर्टमधील द लिजेंड्स ऑफ बुद्धा ( इस्ट अँड वेस्ट, ऑगस्ट १९१३ मध्ये बॉम्बे-आधारित मासिकात) यासारख्या अनेक विषयांवर लिहिले ज्याचे एबरडीनच्या इव्हनिंग गॅझेटने पुनरावलोकन केले. उत्तर बिहारमधील पोस्टिंग आणि प्रवासादरम्यान त्यांनी स्थानिक लोकांकडून माहिती गोळा केली. ते एक विविध विषयात लिहिणारे लेखक होते. त्यांनी जर्नल ऑफ द अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी ऑफ बॉम्बेमध्ये जवळपास १८३ शोधनिबंध प्रकाशित केले. मिथिक सोसायटीच्या त्रैमासिक जर्नलमध्ये ९७ , नॅशनल मॅगझिन, कलकत्तामध्ये ३७, मॅन-इन-इंडिया (रांची) मध्ये ३४ पेपर प्रकाशित केले. प्रत्येक जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल आणि हिंदुस्तान रिव्ह्यू आणि इतर अनेक विद्यापीठांच्या जर्नल्समध्ये. त्यांनी कलकत्ता रिव्ह्यूला "एस्कायम" (त्याच्या आद्याक्षरांसाठी) टोपणनावाने लिहिले. १८९५ पासून ते बॉम्बेच्या मानववंशशास्त्रीय संस्थेचे संबंधित सदस्य होते. १९१२ मध्ये सोसायटीने मित्रा यांच्या संग्रहित लेखनाचे पुस्तक म्हणून पुनर्मुद्रण करण्याचा निर्णय घेतला.[१] +सरचंद्र मित्र हे शाळांमध्ये बाहेरच्या नैसर्गिक इतिहासाच्या शिक्षणाचे प्रवर्तकही होते. [३] +सरचंद्र मित्र यांनी शोधलेल्या विषयांपैकी लोकगीते, गझल, किस्से, कोडे आणि श्रद्धा असे आहेत. त्यांनी पौराणिक कथा आणि वनस्पती आणि प्राणी यांच्या भोवती असलेल्या दंतकथांमध्ये विशेष रस घेतला आणि अनेक उपदेशात्मक आणि एटिओलॉजिकल मिथकांची नोंद केली.[१] +सरचंद्र यांनी गया जिल्ह्याच्या अधीनस्थ न्यायाधीश दिनेशचंद्र रे यांची मुलगी सरसीबाला रे यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुले होती.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11583.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72a3db6075714cac26d4051d18f81c6f1e7c52fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11583.txt @@ -0,0 +1,9 @@ +वजीर-उद्‌-दौला रावबहादुर सरदार माधवराव विनायकराव किबे (जन्म : इंदूर, ४ एप्रिल १८७७, - इंदूर, १२ ऑक्टोबर १९६३), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांनी अनेक मार्गदर्शनपर लेख लिहिले. इंदूर संस्थानात मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. इंदूरमधील सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत त्यांचा पुढाकार असे. +मूळचे कोकणातले संगमेश्वर येथे राहणारे किबे यांचे पूर्वज उत्तर पेशवाईत होळकरांच्या इंदूर संस्थानात स्थलांतरित झाले व तेथे होळकरांच्या संस्थानात अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथेच या घराण्याला सरदार हा किताब मिळाला. +सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्यूर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले. +त्यांचा विवाह रत्‍नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील कमलाबाईशी झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या. +सरदार किबे यांनी इंदूरात मराठी साहित्याची फार सेवा केली. इंदूर येथे मराठी भाषिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते एक सदस्य होते. किबे यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासाबरोबरच राजकारण, अर्थकारणाचाही अभ्यास होता. याचबरोबर पुराण वास्तुशास्त्राचा व संस्कृत-मराठी- हिंदी साहित्याचा व्यासंग होता. पुराणवास्तुशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधनात्मक असे विवेचनात्मक निबंधलेखन केले. +सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत. +http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 Archived 2013-11-26 at the Wayback Machine. (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन) + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11596.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f4898356d3368113b3cc3801e25f09aba334d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11596.txt @@ -0,0 +1 @@ +अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९६० मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८१ मध्ये भारत आणि इंग्लंड संघांमध्ये खेळवण्यात आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11632.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81b373ab7112a37189c6c3169e2723ea7dcc100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11632.txt @@ -0,0 +1 @@ +सरफराज अली (२० ऑक्टोबर, १९८१:बहरैन - हयात) हा  बहरैनच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11638.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb174bc5227841674b84f50020069d892363d024 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11638.txt @@ -0,0 +1 @@ +सरफराज अहमद (उर्दू: سرفراز احمد; जन्म २२ मे १९८७) हा पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. तो पाकिस्तानच्या टी२० संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधारसुद्धा आहे. सरफराज हा आक्रमक शैलीचा फलंदाज असून तो चपळाईने धावा करण्यात तरबेज आहे. शकिल ब्रदर्स ह्या नावजलेल्या प्रकाशनाचे मालक स्व. शकील अहमद मेमन ह्यांचा तो मुलगा आहे. भारतातील आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ नंतर त्याला पाकिस्तानच्या टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11657.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..190fdcff83a9e4546de80071d6247bfd1a7dd91e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11657.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुफी पेंटल (४ ऑक्टोबर, १९४४ - ५ जून, २०२३), मुळनाव सरबजीत सिंग पेंटल अहलुवालिया हे एक भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक होते. गुफी पेंटल हे शिक्षणाने एक अभियंता होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धात ते भारतीय सेनेत गेले होते. चीनच्या सीमेवर कार्यरत असताना तेथे रामलीला आयोजित केली जात असे, ज्यात गुफी पेंटल हे सीतेची भूमिका करत असत. यातून त्यांना अभिनयाची ओढ लागली. त्यांचे धाकटे बंधू पेंटल यांच्या पाठोपाठ गुफी देखील अभिनय क्षेत्राकडे वळले.[२] १९६९ मध्ये मुंबईत आल्यावर, गुफी यांनी मॉडेलिंग, चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक तसेच चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. गुफी यांची बीआर चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका खूप गाजली होती. स्वतः पेंटल यांनी त्यांची आपल्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट भूमिका आहे असे म्हटले होते.[३] महाभारतातील त्यांच्या शकुनी पात्राशी ते इतके जोडले गेले होते की त्यांनी सहारा समय या वृत्तवाहिनीवर शकुनीच्या पात्रात राजकीय चर्चेचा कार्यक्रम सादर केला होता.[४] +पेंटल यांनी चैतन्य महाप्रभू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट १६व्या शतकातील कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाला रवींद्र जैन यांचे संगीत होते. तर या चित्रपटाचे पवन कुमार हे निर्माते होते.[५] २०१० मध्ये महाभारत मालिकेतील सहकलाकार पंकज धीर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील अभिन्नय अ‍ॅक्टिंग अकादमीमध्ये सुविधा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. [६][७] +पेंटल यांचे ५ जून २०२३ रोजी मुंबईतील रुग्णालयात उतार वयातील आजारणामुळे निधन झाले. [८] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11663.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..712a4a72bad4d81c6f5ea67fd6f9ccb5fbe1f436 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11663.txt @@ -0,0 +1,8 @@ + सरमाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11665.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..712a4a72bad4d81c6f5ea67fd6f9ccb5fbe1f436 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11665.txt @@ -0,0 +1,8 @@ + सरमाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11676.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a4f4fc5ad24db391fe68dbf4a1fd47c07b5c7ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11676.txt @@ -0,0 +1,2 @@ +सरलेदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11698.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c96ef87737004ee808c63f24ed18e46cfa1c9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11698.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो. +सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11708.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac961ae50293b2b21b994764cea836d6425bf40a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11708.txt @@ -0,0 +1 @@ +हे शहापूर या उपनगरात आहे. वाचनयाकडून कुमार गंधर्व स्मृती संमेलन आयोजित केले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1172.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4424b788dbe1dcaf73e0298faf5f0137dc373c49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1172.txt @@ -0,0 +1,3 @@ +विशेष सहाय्य मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या विशेष सहाय्य मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11739.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d835f9ef8f3a311146f0158999ee0495ad53af44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11739.txt @@ -0,0 +1,46 @@ +फील्ड मार्शल सरित धनरात (थाई: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; रोमन लिपी: Sarit Thanarat ;) (जून १६, इ.स. १९०८ - डिसेंबर ८, इ.स. १९६३) हा इ.स. १९५७ ते मृत्यूपर्यंत थायलंडचा हुकूमशाह व पंतप्रधान होता. +धनरातने इ.स. १९५७ साली लष्करी उठाव केला व स्वतःला पंतप्रधान घोषित केले. इ.स. १९५८मध्ये लष्करी कायदा लागू करून विरोध मोडून काढला. त्याचबरोबर त्याने थायलंडच्या राजाला महत्त्वाचे स्थान दिले व अनेक विकासकामांना सुरुवात केली. + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11760.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad4aa991fc1cd6f4fa7871343528e5ab542098e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11760.txt @@ -0,0 +1,7 @@ +सरे व्हिलेज क्रिकेट मैदान हे मग्गोना,  श्रीलंका +येथील, २०११ मध्ये खुले झाल्यापासून, प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि इतर क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. +मैदान सरे व्हिलेज, मग्गोना येथे समुद्र आणि मग्गोना रेल्वे स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे. मग्गोना कालुताराच्या दक्षिणेस सुमारे १० किमी अंतरावर आहे. +२००४ च्या त्सुनामी मधून बचावलेल्या श्रीलंकेच्या काही नागरिकांसाठी, इंग्लंडमधील सरे काउंटी क्रिकेट क्लब आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ, एक गाव तयार करण्यासाठी पैसे उभारण्याच्या दृष्टीने एकत्र आले. सरेचे होम ग्राउंड द ओव्हल येथे २० जून २००५ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू एका ट्वेंटी२० सामन्यात सहभागी झाले,[१] आणि प्रकल्पासाठी सुमारे १० लाख पाऊंड उभारले गेले.[२] वनक्षेत्र साफ करून सरे व्हिलेज नावाचे गाव तयार केले गेले आणि सरेच्या क्रिकेट खेळाडूंची नावे त्या गावातील रस्त्यांना देण्यात आली.[३] +मैदान अधिकृतपणे मे २०११ मध्ये खुले करण्यात आले.[४] तेव्हापासून श्रीलंकेच्या पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंच्या अनेक क्रिकेट स्पर्धा आणि दौरा करणाऱ्या संघांचे सराव सामने येथे खेळवले जातात.[५] +ह्या मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना फेब्रुवारी २०१२ मध्ये बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब, ज्यांनी ह्या मैदानाला आपले होम ग्राऊंड बनवले आणि मूर्स स्पोर्ट् क्लब यांच्या दरम्यान खेळवला गेला..[६] पहिला लिस्ट अ सामान येथे रागामा क्रिकेट क्लब आणि श्रीलकां एयर फोर्स क्लब दरम्यान डिसेंबर २०१३ रोजी खेळवला गेला.[७] +ह्या मैदानावरील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या जानेवारी २०१६ मध्ये सिंहलीज स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळताना मिनोद भानूका ह्याने बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब विरुद्ध, ३४२ धावा फटकावून स्थापित केली. [८] सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा मान बादुरेलियाच्या गयान सिरिसोमा ह्याला मिळाला. त्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये श्रीलंका एर फोर्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध ४६ धावांत ७ गडी बाद केले.[९] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11790.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b02ee4eabccfd60f5435978d363ec413b08f3c1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11790.txt @@ -0,0 +1 @@ +सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी (१५ ऑगस्ट, १९१७ - १३ नोव्हेंबर, २००१) या एक मराठी लेखिका होत्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11798.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7c171fa10b3303fefe9210b24b5f32bc52a8321 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11798.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर्कलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +सर्कलवाडी हे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील छोटे गाव आहे. हे गाव डोंगरात वसलेले आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_118.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9844ccacc7dd3bbe2ed8ab7892f3781882525453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_118.txt @@ -0,0 +1,12 @@ + +विनयपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकचा एक भाग आहे. या ग्रंथांत बौद्ध भिक्खू-भिक्खूणी संघांच्या दैनंदिन आचारासंबधीचे नियम-आचार-विचार इत्यादींचे संकलन करण्यात आले आहे. +विनयपिटकातील ग्रंथ पुढीलप्रमाणे +(१). विनयपिटक : +सामान्यतः विनयपिटकामध्ये +(अ) महावग्ग +(ब) चुलवग्ग +(क) पाराजिक +(ड) पाचित्तिय +(इ) परिवार. +या पाच ग्रंथांचा समावेश आहे. +सुत्तविभागात भिक्षू व बौद्ध संघाच्या नियमांच्या उत्पत्तीच्या कथा आहेत. खंदकातील महावग्गात बुद्ध व संघ यांच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत तर परिवारात विनयपिटकातील विषय प्रश्नोत्तररूपाने हाताळले आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1180.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4033a36f329db665592a2d8295636c0772464d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1180.txt @@ -0,0 +1,2 @@ +विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर,एम्‌. ए. एल्‌एल.बी. (जन्म : अमरावती, ऑगस्ट १३, १९०६ - - पुणे, ऑक्टोबर ३०, १९९८) हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत. +मराठी रंगभूमीवरील नट चिंतामणराव कोल्हटकर व गायक नट मास्टर दीनानाथ यांनी स्थापन केलेल्या केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या ’कृष्णार्जुन युद्ध’ ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले (१९३४). त्याअगोदर मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी (१९३३) हे नाटक त्यांनी लिहिले होते. ’बलवंत पिक्चर्स’ ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी ’कृष्णार्जुन युद्धा’चे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी यांच्या ’ठकीचे लग्न’ आणि चि.वि. जोशी यांच्या ’सत्याचे प्रयोग’ या विनोदी कथांवर त्यांनी चित्रपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी चित्रपट होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11805.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11805.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11828.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be3fdbef16904ce3bd29b67c7e5656744174dda1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11828.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर्गेई इव्हानोविच वाव्हिलोव्ह (रशियन:Серге́й Ива́нович Вави́лов;२४ मार्च, १८९१:मॉस्को, रशिया - २५ जानेवारी, १९५१:मॉस्को, सोवियेत संघ) हे सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ होते. हे १९४५पासून मृत्यूपर्यंत रॉसीस्काया अकादेमिया नाउकचे अध्यक्ष होते. +त्यांनी पावेल चेरेंकोव्हबरोबर वाव्हिलोव्ह-चेरेंकोव्ह परिणामाचा शोध लावला. याबद्दल चेरेंकोव्ह यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. काशा-वाव्हिलोव्ह नियम हा सर्गेई वाव्हिलोव्ह यांच्या नावे आहे. +वाव्हिलोव्ह यांनी गॅलिलियो, लुक्रेटियस, न्यूटन, मिकाइल लोमोनोसोव्ह आणि मायकेल फॅराडे यांसह अनेक शास्त्रज्ञांच्या कार्यावर आणि जीवनावर पुस्तके लिहिली. +सर्गेई वाव्हिलोव्ह यांचे भाऊ निकोलाई वाव्हिलोव्ह जनुकशास्त्रज्ञ होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11869.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b79903ef3465ac003d446380987fb4affee9f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11869.txt @@ -0,0 +1 @@ +सरफराज अहमद (डिसेंबर १५, इ.स. १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील गिरिदीह लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11875.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e4f0ef13d90f1fb8340312b6c96abbf92ee597 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11875.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. +१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11887.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e4f0ef13d90f1fb8340312b6c96abbf92ee597 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11887.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. +१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11913.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f7cc551efb05534cbe276f100e0e57735983d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11913.txt @@ -0,0 +1 @@ +सर्वपल्ली विधानसभा मतदारसंघ - ११९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. सर्वपल्ली हा विधानसभा मतदारसंघ तिरुपती लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11935.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fa8cca6fb9ed411a582846341ab636be51498c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11935.txt @@ -0,0 +1,6 @@ +ही यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय संगीत व्हिडिओंची यादी आहे. चूचू टीव्ही (ChuChu TV) या लहान मुलांच्या वाहिनीचे टू वर्ड्स फोनिक्स गाणे हा भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला आणि जगातील ७वा सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्यूब व्हिडिओ आहे. +व्हाय धिस कोलावेरी डी हा १०० दशलक्ष अवलोकने (व्ह्यूज) पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. फुक्रा इंसान आणि जिया शंकर यांचा जुद्द्यान हा २०० दशलक्ष आकडेवारी पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला. [१] [२] "स्वॅग से स्वागत" हा ५०० दशलक्ष व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. [३] [४] [५] "कीड्सटीव्ही हिंदी - नर्सरी राइम्स आणि किड्स गाणी" यांचा "हंप्टी द ट्रेन ऑन अ फ्रूट्स राइड" हा १ अब्ज पार करणारा पहिला हिंदी व्हिडिओ आहे (२६ डिसेंबर २०१९). "खान्देशी मूव्हीज" द्वारे अपलोड केलेला "छोटू के गोलगप्पे" हा भारत आणि जगात १ अब्ज आकडा पार करणारा पहिला बिगर-संगीत आणि मुलांसाठी नसलेला व्हिडिओ आहे. १ अब्ज आकडा पार करणारा हा भारतातील आणि जगातील पहिला कॉमेडी स्किट व्हिडिओ आहे. +२४ मे २०२२ पर्यंत, भारतातील ३८ व्हिडिओंनी १ अब्ज व्ह्यूज ओलांडले आहेत. +खालील तक्त्यामध्ये यूट्यूब वरील शीर्ष ३० सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंची सूची आहे. प्रत्येकाची एकूण संख्या जवळच्या १० दशलक्षांपर्यंत समायोजित केली आहे तसेच यादीत अपलोडर आणि अपलोड तारीख दिली आहे. +[८] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11936.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fa8cca6fb9ed411a582846341ab636be51498c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11936.txt @@ -0,0 +1,6 @@ +ही यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय संगीत व्हिडिओंची यादी आहे. चूचू टीव्ही (ChuChu TV) या लहान मुलांच्या वाहिनीचे टू वर्ड्स फोनिक्स गाणे हा भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला आणि जगातील ७वा सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्यूब व्हिडिओ आहे. +व्हाय धिस कोलावेरी डी हा १०० दशलक्ष अवलोकने (व्ह्यूज) पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. फुक्रा इंसान आणि जिया शंकर यांचा जुद्द्यान हा २०० दशलक्ष आकडेवारी पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला. [१] [२] "स्वॅग से स्वागत" हा ५०० दशलक्ष व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. [३] [४] [५] "कीड्सटीव्ही हिंदी - नर्सरी राइम्स आणि किड्स गाणी" यांचा "हंप्टी द ट्रेन ऑन अ फ्रूट्स राइड" हा १ अब्ज पार करणारा पहिला हिंदी व्हिडिओ आहे (२६ डिसेंबर २०१९). "खान्देशी मूव्हीज" द्वारे अपलोड केलेला "छोटू के गोलगप्पे" हा भारत आणि जगात १ अब्ज आकडा पार करणारा पहिला बिगर-संगीत आणि मुलांसाठी नसलेला व्हिडिओ आहे. १ अब्ज आकडा पार करणारा हा भारतातील आणि जगातील पहिला कॉमेडी स्किट व्हिडिओ आहे. +२४ मे २०२२ पर्यंत, भारतातील ३८ व्हिडिओंनी १ अब्ज व्ह्यूज ओलांडले आहेत. +खालील तक्त्यामध्ये यूट्यूब वरील शीर्ष ३० सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंची सूची आहे. प्रत्येकाची एकूण संख्या जवळच्या १० दशलक्षांपर्यंत समायोजित केली आहे तसेच यादीत अपलोडर आणि अपलोड तारीख दिली आहे. +[८] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11941.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b856ff4b76d1d6040e93db74a65d1d76a686250 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11941.txt @@ -0,0 +1 @@ +सर्वे सत्यनारायण ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11948.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7f8a0058f0fe6f8ab946b67ce79a14e30564ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11948.txt @@ -0,0 +1,2 @@ +{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;) +चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणाऱ्या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबऱ्यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11951.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b6646cb9667077ee6beef003eb54f1e714bf9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11951.txt @@ -0,0 +1,4 @@ +गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरुवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.[१] +भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील 22 हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चातील शोध व निदान करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. या तंत्राद्वारे भारतासारख्या विकसनशील देशातील गरीब रुग्णांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यास्वच्तेच्या या कर्करोगाचे निदान आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे.[ संदर्भ हवा ] +महिलांनी आपल्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्व्च्तेच्या सवयींमुळे होते त्यामुळेत्याकडे लक्ष देणेआवश्यक आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11954.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b002ecf1a3b00489e710ddf93c303a153e4850fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11954.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा (डिसेंबर २४, इ.स.पू. ३ - जानेवारी १५, इ.स. ६९) हा जून ८, इ.स. ६८ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +याला सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा सीझर ऑगस्टस या नावानेही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11955.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b002ecf1a3b00489e710ddf93c303a153e4850fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11955.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा (डिसेंबर २४, इ.स.पू. ३ - जानेवारी १५, इ.स. ६९) हा जून ८, इ.स. ६८ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +याला सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा सीझर ऑगस्टस या नावानेही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11957.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..865c24a4f730da3950b305a792b1941159ed813b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11957.txt @@ -0,0 +1,2 @@ +भरतनाट्यममध्ये नृत्या साठी जे घुंगरू वापरले जातात त्याला सलंगाई असे म्हणतात. सलंगाई दोन प्रकारची असते . +शिष्याच्या शिक्षणाची सुरुवात सलंगाई पूजेने होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11973.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1c9753e88e4985311fd0e3ac391320b9370518f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11973.txt @@ -0,0 +1,25 @@ +सलमान रश्दी हे मूळ भारतीय असलेले एक जागतिक कीर्तीचे लेखक आहेत. +पुस्तकात महंमद पैगंबरांची निदा आहे असा आरोप ठेवून भारतातील त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सलमान रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर बंदी घातली. अशी बंदी घालणे ही राजीव गांधी यांची चूक होती, असे काँग्रेस नेते व माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी नुकतेच २८-११-२०१५ रोजी कबूल केले. +सर अहमद सलमान रश्दी एफआरएसएल (जन्म १९ जून १९४७) हा ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि निबंधलेखक आहे. मिडनाइट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीने १९८१ मध्ये त्याने बुकर पुरस्कार जिंकला. २५व्या आणि ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दोन वेगवेगळ्या प्रसंगी " सर्वोत्कृष्ट कादंबरी" मानली. (????) त्याने ऐतिहासिक कल्पन भारतीय उपमहाद्वीप वर सेट केले आणि जादुई वास्तविकता एकत्र केली; (????)त्याचे कार्य पूर्वीच्या आणि पाश्चात्य संस्कृतींच्या दरम्यान अनेक कनेक्शन, व्यत्यय आणि स्थलांतरांशी संबंधित आहे.(??) +द चौथे कादंबरी (??) द सैटॅनिक व्हर्सेस (१९८८) हा एक मोठा वादविवाद (?) होता आणि अनेक देशांमध्ये मुसलमानांच्या निषेधाची प्रेरणा देत होता. १४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहुल्ला खोमेनी यांनी फतवा यांच्या (कुणाच्या? फतव्याच्या?) विरोधात मृत्यूची धमकी देण्यात आली. ब्रिटिश सरकारने रश्दी यांना पोलिसांच्या संरक्षणाखाली ठेवले होते. +१९८३ मध्ये रश्दी यांची यूकेची ज्येष्ठ साहित्य संस्था रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरची (म्हणजे काय?) निवड झाली. जानेवारी १९९९ मध्ये फ्रान्सचे कमांडर डी एल ऑर्ड्रे डेस आर्ट्स (की आर्ट्‌स?) आणि डे लेट्रेस यांची नियुक्ती झाली. ( असंबद्ध वाक्य.)[१] जून २००७ मध्ये, क्वीन एलिझाबेथ ने त्यांना साहित्यासाठी सेवा दिल्या.(कोणत्या सेवा?)[२] २००८ मध्ये द टाइम्सने १९४५ पासून ५० महान ब्रिटिश लेखकांच्या यादीत तेरावे स्थान मिळविले.[३] +२००० पासून रश्दी अमेरिकेत रहात आहेत. २०१५ मध्ये न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या आॅर्थर एल. कार्टर जर्नलिझम इन्स्टिट्यूट येथे त्यांचे (निवासी नावाचे लेखक?) निवासी म्हणून नामांकित लेखक होते. पूर्वी, त्यांनी एएमरी विद्यापीठात शिकवले. ते अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्समध्ये निवडून आले. २०१२ मध्ये, त्यांनी जोसेफ एंटोन प्रकाशित केलेः ए मेमोयर, हे त्यांच्या जीवनातील एक वृत्त आहे. द सैटेनिक व्हर्सेसवरील विवादानंतर. ( हे सर्व कुणाचे वर्णन आहे, निवासी यांचे की अन्य कोणाचे?) +अहमद सलमान रश्दी[४] (कुणी? )१९ जून १९४७ रोजी बॉम्बे, ब्रिटिश भारतात काश्मिरी कुटुंबात जन्म घेतला.[५][५] ते केंब्रिज-शिक्षित वकील-व्यवसायातील अनीस अहमद रश्दी यांचे पुत्र आहेत, आणि नेगिन भट्ट (कोण नगिन भट्ट?) हे शिक्षक आहेत. आनीस रश्दी यांना इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आयसीएस) कडून निष्कासित करण्यात आले.[६] रश्दीला तीन बहिणी आहेत.[७] त्यांनी २०१२ च्या स्मृती(?)मध्ये लिहिले की, त्यांच्या वडिलांनी एव्हरोस (इब्न रश्ड) यांच्या सन्मानार्थ रश्दी यांचे नाव स्वीकारले. +त्यांना कॅथेड्रल जॉन कॉनन स्कूल, बॉम्बेमधील रग्बी स्कूल, वॉरविकशायर आणि किंग्स कॉलेज, केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण मिळाले जेथे त्यांनी इतिहास वाचला. (वा!वा!वा!) +रग्दीने एजन्सी ऑगिलव्ही अँड माथेर या जाहिरात एजन्सीसाठी कॉपीराइटर म्हणून काम केले (कुणी?), जेथे त्याने एरोसाठी "अनिरिसिबल" आणि एजअर बार्कर या संस्थेसाठी "स्मरणशक्ती" तयार केली. संगीतकार रोनी बाँड यांच्या सहकार्याने रश्दी यांनी लंडनच्या गुड अर्थ स्टुडिओजमध्ये जाहिरात रेकॉर्डसाठी शब्द लिहिले. गाणे "द बेस्ट ड्रीम्स" म्हटले गेले आणि जॉर्ज चांडलर यांनी गायन केले.[८] ओडिली येथे असताना त्यांनी मिडनाइट्स चिल्ड्रेन लिहिले.[५][९][१०] +प्रमुख कार्ये +रश्दीची सर्वप्रथम कादंबरी, ग्रिमस (१९७५), एक भाग-विज्ञान कथा, सार्वजनिक आणि साहित्यिक टीकाकारांनी दुर्लक्ष केली. त्याची पुढील कादंबरी, मिडनाइट्स चिल्ड्रन (१९८१), कॅटपल्टेड टू साहित्यिक नोटिबिलिटी. १९९१ आणि २००९ च्या बुकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[५] आणि २५ आणि ४० वर्षांच्या कालावधीत सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून बेस्ट ऑफ द बुकर्सना सन्मानित करण्यात आले. लेखकाने स्वतःचे चरित्र लिहून ठेवण्याचा विचार नाकारला आहे, "लोक असे मानतात की काही विशिष्ट गोष्टी आपल्या स्वतःच्या अनुभवातून काढल्या गेल्या आहेत. त्या अर्थाने मला असे वाटले की मी एक आत्मकथा लिहिली आहे.[११] +मिडनाइट्स चिल्ड्रेननंतर रश्दी यांनी शम (१९८३) लिहिली, ज्यात त्यांनी पाकिस्तानमध्ये राजकीय अशांति दर्शविली, जल्फिकार अली भुट्टो आणि जनरल मुहम्मद झिया-उल-हक यांच्यावर त्यांचे पात्र आधारले. शमने फ्रान्सच्या प्री डु मेइलर लिव्ह्रे एट्रेंजर (बेस्ट फॉरेन बुक) जिंकली आणि बुकर प्राईझसाठी जवळजवळ धावपटू म्हणून काम केले. औपनिवेशिक साहित्याचे हे दोन्ही काम जादूच्या यथार्थतेच्या शैलीने आणि कश्मीरी प्रवासींच्या रूपात सदैव जागरूक असणारे आश्रित दृष्टीकोन आहे.(म्हणजे काय?) +रश्दी यांनी १९८७ मध्ये निकारागुआ बद्दल एक गैर-काल्पनिक पुस्तक "द जगुआर स्माईल" लिहिले. या पुस्तकात राजकीय लक्ष केंद्रित केले आहे आणि सॅन्डिनिस्टा राजकीय प्रयोगांच्या दृश्यांवर आधारित आहे. +पुस्तके व्यतिरिक्त, रुश्दीने पूर्व, पश्चिम (१९९४) मधील एकत्रित गोष्टींसह अनेक लघु कथा प्रकाशित केल्या आहेत. द मूर'स लास्ट साईग, १९९५ मध्ये भारताच्या इतिहासाच्या सुमारे १०० वर्षांपासून पारिवारिक महाकाव्य प्रकाशित झाले. यू 2 द्वारे समान नावाचे गाणे पुस्तकांमध्ये समाविष्ट असलेल्या बऱ्याच गाण्यांच्या गीतांपैकी एक आहे; म्हणूनच रश्दी यांना गीतकार म्हणून श्रेय दिले जाते. त्यांनी १९९० मध्ये द सी ऑफ स्टोरीज लिहिले.[१२] +२००२ च्या गैर-काल्पनिक संकलन स्टेप अँक्रॉस द लाइनमध्ये त्याने इटालियन लेखक इटालो कॅल्व्हिनो आणि अमेरिकन लेखक थॉमस पायंचन यांच्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जॉर्जच्या लुईस बोर्गेस, मिखाईल लुईस कॅरोल, गनटर ग्रास, आणि जेम्स जॉयस त्याच्या लवकर प्रभाव समाविष्ट. रश्दी एंजेल कार्टर यांचे वैयक्तिक मित्र होते आणि बर्निंग अप बोट्सच्या संग्रहाच्या प्रारंभी त्यांची प्रशंसा करतात. +नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांच्या कादंबरी लुका आणि द फायर ऑफ लाइफ प्रकाशित झाले. त्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी घोषित केले की, त्यांनी जोसेफ एंटोनः ए मेमोअर हा किताब लिहिला होता,[१३] जे सप्टेंबर २०१२ मध्ये प्रकाशित झाले होते. +२०१२ मध्ये बॉलट्रॅक (एक कंपनी जी कस्टमाइज्ड साउंडट्रॅकसह ईबुक सिंक्रोनाइझ करते) गृहित धरून सलमान रश्दी हा प्रथम प्रमुख लेखकांपैकी एक बनला. जेव्हा त्याने त्याच्या लघुपट "इन द साउथ" या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केले. +२०१५ मध्ये रश्दीच्या कादंबरी २ वर्ष, आठ महिने आणि २८ दिवस या पुस्तकाचे प्रकाशन पाहिले गेले, ही कादंबरी एका चिनी रहस्यमय बॉक्सच्या संरचनेमध्ये तयार केलेली आहे. +रश्दीने तरुण भारतीय आणि वंशीय-भारतीय लेखकांचे मार्गदर्शन केले आहे, संपूर्ण इंडो-एंग्लियन लेखकांच्या संपूर्ण पिढीला प्रभावित केले आहे आणि सर्वसाधारणपणे औपनिवेशिक साहित्यात प्रभावी लेखक आहे.[१४] युरोपियन युनियनचे ऍरिस्टियन पुरस्कार, प्रेमीओ ग्रिझेन कॅव्हूर (इटली), जर्मनीतील रायटर ऑफ द इयर अवॉर्ड आणि अनेक साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांसह त्यांच्या लेखनासाठी अनेक प्रशंसा मिळाल्या आहेत.[१५] रश्दी २००४ ते २००६ पर्यंत पेन अमेरिकन सेंटरचे अध्यक्ष होते आणि पेन वर्ल्ड व्हॉइस फेस्टिवलचे संस्थापक होते.[१६] +नोव्हेंबर २००९ मध्ये पेंग्विनने प्रकाशित केलेल्या अनेक लेखकांच्या निबंधांचे संकलन, फ्री एक्स्प्रेस इज ऑफन्सेस मधील त्यांच्या योगदानांत लिहिलेल्या रेसियल अँड रिलिजिअस हॅट्रेड ऍक्टची ब्रिटिश सरकारची नेमणूक त्यांनी केली. +२००७ मध्ये त्यांनी जॉर्जियाच्या अटलांटा येथील एएमरी विद्यापीठातील निवासस्थानातील प्रतिष्ठित लेखक म्हणून पाच वर्षांची कार्यपद्धती सुरू केली, जिथे त्यांनी त्यांचे संग्रहण देखील जमा केले आहे.[१७] +मे २००८ मध्ये त्यांना अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे विदेशी मानद सदस्य म्हणून निवडले गेले.[१८] +सप्टेंबर २०१५ मध्ये, त्यांनी न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी जर्नलिझम फॅकल्टीमध्ये प्रतिष्ठित लेखक म्हणून सामील झाले. +लिखित स्वरूपाचा आनंद घेत असताना सलमान रश्दी म्हणतात की त्यांचे लेखन कारकीर्द यशस्वी झाले नाही. तो एक अभिनेता बनला असता. अगदी लहानपणापासून त्याचे हॉलिवुड चित्रपटांमध्ये दिसण्याचे स्वप्न होते. (जे नंतर त्याने त्याच्या नेहमीच्या कॅमेरा प्रदर्शनामध्ये अनुभवले). +रश्दी यांच्या काही लेखांमध्ये काल्पनिक दूरदर्शन आणि चित्रपट पात्रांचा समावेश आहे. त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित ब्रिजेट जोन्स'स डायरी या चित्रपटात त्यांचा एक देखावा होता जो स्वतःच साहित्यिक विनोदाने भरलेला आहे. १२ मे २००६ रोजी, रश्दी चार्ली रोज शो येथे पाहुण्यांचे होस्ट करत होते, त्यांनी इंडो-कॅनेडियन फिल्म निर्माता दीपा मेहता यांची मुलाखत घेतली, २००५ चित्रपट वॉटर हिंसक निषेधांचे सामना करत होते. एलिनॉर लिपमनच्या कादंबरी नंतर ते शेफ फाउंड मीच्या फिल्म ॲप्टीप्शन (हंट्स डायरेक्टोरियल पदार्पण) मध्ये हेलन हंटच्या प्रेतवंश-स्त्रीवंशीय भूमिकेत ते दिसतात. सप्टेंबर २००८ आणि मार्च २००९ मध्ये एचबीओ प्रोग्राम रिअल टाइम विद बिल माहेरवर त्यांनी पॅनेलिस्ट म्हणून काम केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11985.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea913d47b85f977ccbb7bc2f346a0c6ca28dc1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11985.txt @@ -0,0 +1,2 @@ +सालाबाद जंग किंवा मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी हा निजाम-उल-मुल्क याचा तिसरा पुत्र होता. हा १७५१ ते १७६२ पर्यंत हैदराबादचा निजाम होता. +२२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि सलाबतजंग याच्यात कुकडी नदीवर लढाई झाली. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11997.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e47e6ebec5352e0522cbd7ee0e4e3f3742929fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_11997.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्यॉॅं-बेडेल बोकासा (फेब्रुवारी २२, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ३, इ.स. १९९६) हा मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा व सम्राट होता. +जानेवारी १, इ.स. १९६६ रोजी बोकासा सैन्याच्या मदतीने सत्तेवर आला व त्याने स्वतःला राष्ट्राध्यक्ष करून घेतले. डिसेंबर ४, इ.स. १९७६ रोजी त्याने स्वतःला बोकासा पहिला (अथवा पहिला बोकासा) या नावाने मध्य आफ्रिकेचा सम्राट घोषित केले. सप्टेंबर २०, इ.स. १९७९ रोजी त्याची सत्तेवरून हकालपट्टी झाली. याला सलाह एद्दिन अहमद बोकासा या नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12013.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebbae7a2e2013c5369f00a5956d3c18041b4d17c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12013.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रँकलिन सलिया अहंगामा (१९५९:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12016.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96032afa1add1bce58deb90737a28e11506aee50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12016.txt @@ -0,0 +1 @@ +सलील चौधरी हे बंगाली, हिंदी आणि मलयालम चित्रपटांतून संगीत देणारे संगीतकार होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12024.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a73fca2f9ed9e04a00b2c9d1598e4aee4cad505 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12024.txt @@ -0,0 +1,3 @@ +सलिव्हन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटिचेलो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७८,६२४ इतकी होती.[२] +सलिव्हन काउंटीची रचना १९०९ मध्ये झाली. या काउंटीला खंडीय सेनापतीमधील जनरल जॉन सलिव्हन यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12039.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97a0485057a3aa9ea43844377e255fd36474731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12039.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा सेलीम (ओस्मानी तुर्की: سليم ثانى सेलीम-इ स्सानी ; तुर्की: II.Selim ;) (मे २८, इ.स. १५२४ – डिसेंबर १२, इ.स. १५७४), हा इ.स. १५६६ सालापासून मृत्यूपर्यंत ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. मद्यासक्तीबद्दल कुख्यात असलेला दुसरा सेलीम राज्यकारभार व सैन्यमोहिमांबद्दल उदासीन होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12059.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8b1967c2e492fb162239ada4da71578d5ef8963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12059.txt @@ -0,0 +1,5 @@ +सलिल पारेख हे इन्फोसिसचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. पारेख यांनी २ जानेवारी २०१८ रोजी अंतरिम सीईओ यू बी प्रवीण राव यांच्याकडून पदभार स्वीकारला. +ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT बॉम्बे) मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. कॉर्नेल विद्यापीठातून संगणक विज्ञान आणि यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी. +पारेख हे कॅपजेमिनी येथील समूह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य होते, जिथे त्यांनी २००० पासून काम केले होते, अर्न्स्ट अँड यंगच्या कन्सल्टन्सी विभागाचे, जिथे ते आधी काम करत होते, कंपनीमध्ये विलीन करण्यात आले होते. +अगदी अलीकडे, ते समूह कार्यकारी मंडळाचे सदस्य होते, आणि मार्च २०१५ मध्ये त्यांची उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऍप्लिकेशन सर्व्हिसेस आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचा समावेश असलेल्या बिझनेस क्लस्टरची देखरेख करण्यासाठी ते जबाबदार होते. +इन्फोसिस च्या एका बोर्ड सदस्याला इन्फोसिस मधील अनैतिक व्यवहारांच्या दोन निनावी व्हिसलब्लोअर तक्रारी प्राप्त झाल्या ज्यात सलील पारेख यांच्यावरही आरोप झाले. संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने निनावी व्हिसलब्लोअर तक्रारींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोपांची स्वतंत्र तपासणी केली आणि हे निर्धारीत केले की आरोप योग्यतेशिवाय आहेत. लेखापरीक्षण समितीने स्वतंत्र कायदेशीर सल्लागार शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी आणि प्राइसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहाय्याने सखोल तपास केला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12086.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2686936933056f42b312098590b5e2628641eaac --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12086.txt @@ -0,0 +1 @@ +सळईधाबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12096.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4b8a5e6250c0a555f0ee9686e2437df6d6c9f24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12096.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सवत माझी लाडकी हा स्मिता तळवलकर दिग्दर्शित व निर्मितीत झालेला १९९३ साली प्रदर्शित झालेला विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्यात मोहन जोशी, नीना कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, प्रशांत दामले आणि रमेश भाटकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. +पुरुषाला मोहाचा शाप तर स्त्रीला संयमाचा वर. युगानुयुगे चालत असलेली ही गोष्ट या विसाव्या शतकातल्या स्त्री-पुरुषाचा बाबत ही खरी ठरणारी. डॉ. मधुकर हिरवे (मोहन जोशी) आणि सीमा हिरवे (नीना कुलकर्णी) हे एक सुखी जोडपं. सीमा अत्यंत कर्तव्यदक्ष, चालक, सूज्ञ गृहिणी तर मधु नावाजलेला, हुषार डॉक्टर आणि त्याहीपेक्षा एक रसिक पुरुष. त्याचा सहकारी डॉ. दिनेश कीर्तिकर (प्रशांत दामले) अविवाहित आणि मिश्कील वृत्तीचा व मित्र प्रदीप भावे (रमेश भाटकर) हॉटेलवाला. डॉ. बीना कर्णिक (वर्षा उसगांवकर) नावाची एक सुंदर तरुणी मधुच्या हॉस्पिटलमध्ये त्याची असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करते आणि मधुची रसिकवृत्ती जागी होते. प्रेमाच्या या शर्यतीत दिनेशही सामील होतो. बघता बघता मधुच्या प्रयत्नांना यश येतं आणि बीना त्याच्याकडे आकर्षित होते. नवऱ्याची प्रेमातील प्रगती जेव्हा सीमाला कळते तेव्हा त्या गृहिणीतली एक बुद्धिमान स्त्री जागी होते आणि ती एक भन्नाट प्रयोग करते. ती बीनाला सवत म्हणुन घरात तर आणतेच पण नवऱ्याला धडा शिकवता शिकवता सवतीलाही लाडकी करून टाकते. विसाव्या शतकातील ह्या गृहिणीचा हा अनोखा प्रयत्न चालू असताना मधुचा असा गैरसमज निर्माण होतो की सीमा व प्रदीप ह्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मधु आणि सीमा पुन्हा एकत्र येतील का? diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1210.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1b36133559b9ba7f1005684213d1c606137f06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1210.txt @@ -0,0 +1 @@ +इ.स. १९७५ पासून ते इ.स. २०१२पर्यंत नऊ विश्व हिंदी संमेलने झाली आहेत. पहिले संमेलन नागपूर येथे भरले होते. त्याचे आयोजन वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीने केले होते. त्या सर्व संमेलनांचे तपशील असे :- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12105.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ac712d03e6ad54e6403b08a87526a6c0644bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12105.txt @@ -0,0 +1,12 @@ +पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले. +पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरू सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरूबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता. +हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले. +गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे. +प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो. +महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. +कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली. +रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला. +महोत्सवाची सांगता पूर्वी स्वतः पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. +उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीरची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते. +महोत्सवात हजारोंच्या संख्येने रसिक सहभागी होतात, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावातून, तसेच परदेशातूनही ह्या महोत्सवासाठी रसिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12106.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ac712d03e6ad54e6403b08a87526a6c0644bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12106.txt @@ -0,0 +1,12 @@ +पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले. +पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरू सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरूबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता. +हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले. +गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे. +प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो. +महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. +कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली. +रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला. +महोत्सवाची सांगता पूर्वी स्वतः पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. +उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीरची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते. +महोत्सवात हजारोंच्या संख्येने रसिक सहभागी होतात, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावातून, तसेच परदेशातूनही ह्या महोत्सवासाठी रसिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12109.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9cd43bac2902141900679fe1b4e9b5b7d425c17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12109.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराजा दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंह (नोव्हेंबर ३, इ.स. १६८८ - सप्टेंबर २१, इ.स. १७४३) हा राजपुतान्यातील आंबेर (उत्तरकाळातील जयपूर) राज्याचा राजा होता. तो कछवाहा या राजपूत कुळात जन्मला होता. त्याचा पिता महाराजा बिशनसिंह याच्या मॄत्यूनंतर इ.स. १६९९ साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो आंबेराच्या गादीवर बसला. मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला. दुसऱ्या जयसिंहापासून वापरात आलेली ही उपाधी कछवाहांच्या वंशजांसाठी आजतागायत वापरली जाते. +इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान महाराजा जयसिंह ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12115.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51aa3f826dd41dd8262ca419ac3dd0305056d0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12115.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख राजस्थानमधील सवाई माधोपुर जिल्ह्याविषयी आहे. सवाई माधोपुर शहराच्या माहितीसाठी पहा - सवाई माधोपुर. +सवाई माधोपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र सवाई माधोपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12152.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b24a342b3da844ac05e652357522697aa868253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12152.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारत देश्याचे चेन्नई शहरात मिलपोरे येथे सवेरा हॉटेल हे फोर स्टार अकरा मजली हॉटेल आहे. याची आणखी दोन यूनिट आहेत त्यातील एक वालनट हॉटेल हे हैदराबाद येथे आणि दुसरे लोटस पार्क हे बंगलोर येथे आहे. +सवेरा हॉटेल सह भागीदारीत 1965 साली सुरू झाले. याचे संस्थापक ए. वेंकटकृष्ण रेड्डी, एम. रामराघवा रेड्डी आणि ए. श्यामसुंदरा रेड्डी, हे तिघेही मालमत्तेचे तसेच हॉटेल व्यवसायाचे अतिशय अनुभवी व जाणंकार होते. त्यांनी चेंन्नईतील मिलपोरे या शहरातील प्रमुख भर वस्तीत 20 खोल्या आणि उपहार ग्रह असे हॉटेल बांधण्यासाठी साधारण 5000 sq.mi. जमीन खरेदी केली. सन 1969 मध्ये या हॉटेल संस्थापकांनी त्यांच्या वाढत्या व्यवसायाची गरज लक्षात घेऊन “सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड” या नावाने कंपनी स्थापन केली. सन 1971 मध्ये या संबंधित भागीदारांनी त्यांची 1757 sq.mi. जमीन या सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड कंपनीला विकली त्याच बरोबर मूळं हॉटेल जवळची 4684 sq.mi. जमीन खरेदी केली. सन1972 मध्ये कंपनिने जेव्हा कामकाज चालू केले तेव्हा नवीन 125 खोल्यांची त्यात भर पडली होती. मुळचे 20 खोल्यांचे रूपांतर हॉटेलचे कार्यालय आणि सभाग्रहात केले. पोहण्याचे तलावाचे बांधकाम अगोदरच केलेले होते. हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने सर्व त्या बाबी सामान्य होत्या. सन 1975 मध्ये मीनार उपहार ग्रह चालू केले की जे मोघलाई पद्दतीचे अन्न पुरविण्याची सुविधा देते. तेथील विशेषतः म्हणजे ताज्या तंदूर डीशेष ! येथे 120 अतिथि एकावेळी बसू शकतात. येथे रात्री गायनाचे कार्यक्रम केले जातात.[१] +हे 4 स्टार हॉटेल अतिशय सुंदर,व्यवसाइकासाठी आदर्श तसेच प्रवाश्यांसाठी आरामदाई आहे. या हॉटेलची विशेषतः म्हणजे येथे आधुनिक पद्धतीची 7 प्रकारची भोजन व्यवस्था आणि मदीरा व्यवस्था आहे. येथे विविध प्रकारचे जेवण बनविण्याचे उपहार ग्रह आहे त्यात पियानो, मालगुडी (साऊथ इंडियन उपहार ग्रह) करी टाउन, बे-146, बांबू बार, ब्रेव-रूम आणि बेकर्स बास्केट नावाचे केक शॉप यांचा समावेश आहे. या हॉटेलची 10 सभाग्रह आहेत.[२] +पियानो – हे उपहार ग्रह विविध पदार्थांचे माहेरघर आहे. विविध देश्यांचे अल्पोपअहार, लंच, डिंनर, येथे मिळतात. +बे-146 - हे शीतल आहे. येथे रात्री हिप लायटिंग, डिजे, मिक्स ऑफ मेट्रो,हिप होप,क्लब आणि हाऊस म्यूजिक व्यवस्था आहे. येथील नाइट क्लब मध्ये मेरी मोमेंट्स रविवार ते शुक्रवार पर्यन्त संध्याकाळी 6 ते 9 पर्यन्त चालू असतो. +फोंडू - हे विविध विशेष रुचकर प्रकारचे मिटक्या मारत खाण्याचे उपहार ग्रह आहे. +बांबू बार - येथे विविध कॉकटेल शीतल पेये आणि कॉकटेल मदिरा पेये मिळतात. +बेकर्स बास्केट - या केक शॉप मध्ये कांही स्वादिष्ट पेस्ट्रीस आहेत की जे तुमच्या जेवणानंतर ते तुमच्या तोंडाची चव वाढवतील. +31 डिसेंबर 2007 रोजी नवीन वर्षाचे स्वागताप्रीत्यर्थ नांच गाण्यासाठी स्विमिंग तलावावर मंडप उभारला होता तो कोसळला आणि त्यात 3 व्यक्ति ठार झाल्या आणि 2 जखमी झाल्या.[३] +या हॉटेलचे ठिकाण शोधण्यास अतिशय सोपे म्हणजेच चेंन्नईत 146, डॉ.राधाकृष्णन सलाई, मिलपोरे, चेन्नई, तामिळनाडू पिन कोड 600004 येथे आहे. अतिथिना u.s.कांसोलेट (अंदाजित 3किमी),थाऊजंड लाइट्स आणि टी नगर (अंदाजित 7किमी), मरीना बीच,st. George किल्ला, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंदाजित19 किमी), चेन्नई रेल्वे स्थानक (अंदाजित 8 किमी) अंतरावर आहेत. +हे हॉटेल सामाजिक जबाबदारी जाणते आणि त्यासाठी सवेरा हॉटेल अकॅडमी स्थापन केलेली आहे व त्यामार्फत आदरपूर्वक विध्यार्थ्यांन्चे स्वागत करून त्यांचे कारकीर्द उज्ज्वल करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. +या 4 स्टार हॉटेल मध्ये 3 उपहार ग्रह आहेत. उच्चतम प्रतीची स्वयपांक व्यवस्था, केक व केक शॉप, बार सेवा आहेत. तेथे एकटा सुद्दा आरामात आनंद घेऊ शकतो. या हॉटेलमध्ये ज्यांना बाहेर कामासाठी जावे लागणार नाही त्यांचेसाठी पोहण्याचा तलाव,स्वास्थ्य केंद्र, चित्रकार कलाग्रह, मालीश,सेवा उपलब्ध आहेत. येथे सुंदर देखावा केलेले मेजवानीसाठी प्रशस्त हॉल (Banquet) आहेत की जेथे अंदाजित 300 व्यक्ति सामाऊ शकतात. येथे तुम्ही लग्नाची मेजवानी (रिसेप्शन) आणि वाढदिवस साजरे करू शकता.यथायोग्य पद्दतीने व्यवसायिक अतिथींच्या गरजेनुसार सजविलेले सभाग्रह आहे. येथे अतिथींच्या सोईनुसार ब्वुटी सलून, मागणीनुसार डॉक्टर, कमानी करून सजविलेली सभाग्रह आणि फुलांची दुकाने आहेत. +येथे विविध प्रकारच्या खोल्या, त्यात एक्झिक्युटिव्ह, डिलक्स,स्टँडर्ड,व्यावसायिक खोल्यांचा समावेश आहे. वातानुकूलित सेवा, मोफत Wi-Fi, मिनी बार, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मेनू कार्ड, चहा / कॉफी मेकर, रायटींग टेबल,या सुविधा खोलीत उपलब्ध आहेत. हॉटेल एक्झिक्युटिव्ह, व्यवसाय क्लब,आणि स्टँडर्ड खोलीत विनंती नुसार DVD प्लेअर दिला जातो. +सेफ, इस्त्री, वर्तमानपत्र, वाहन तळ, 24 तास स्वागत कक्ष, 24 तास चेक-इन चेक-आऊट, धोबी, चलन बदली, ATM, GYM,व्यायाम शाळा, मश्याज केंद्र, शॉपिंग मॉल, इ. सेवा आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12154.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b24a342b3da844ac05e652357522697aa868253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12154.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारत देश्याचे चेन्नई शहरात मिलपोरे येथे सवेरा हॉटेल हे फोर स्टार अकरा मजली हॉटेल आहे. याची आणखी दोन यूनिट आहेत त्यातील एक वालनट हॉटेल हे हैदराबाद येथे आणि दुसरे लोटस पार्क हे बंगलोर येथे आहे. +सवेरा हॉटेल सह भागीदारीत 1965 साली सुरू झाले. याचे संस्थापक ए. वेंकटकृष्ण रेड्डी, एम. रामराघवा रेड्डी आणि ए. श्यामसुंदरा रेड्डी, हे तिघेही मालमत्तेचे तसेच हॉटेल व्यवसायाचे अतिशय अनुभवी व जाणंकार होते. त्यांनी चेंन्नईतील मिलपोरे या शहरातील प्रमुख भर वस्तीत 20 खोल्या आणि उपहार ग्रह असे हॉटेल बांधण्यासाठी साधारण 5000 sq.mi. जमीन खरेदी केली. सन 1969 मध्ये या हॉटेल संस्थापकांनी त्यांच्या वाढत्या व्यवसायाची गरज लक्षात घेऊन “सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड” या नावाने कंपनी स्थापन केली. सन 1971 मध्ये या संबंधित भागीदारांनी त्यांची 1757 sq.mi. जमीन या सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड कंपनीला विकली त्याच बरोबर मूळं हॉटेल जवळची 4684 sq.mi. जमीन खरेदी केली. सन1972 मध्ये कंपनिने जेव्हा कामकाज चालू केले तेव्हा नवीन 125 खोल्यांची त्यात भर पडली होती. मुळचे 20 खोल्यांचे रूपांतर हॉटेलचे कार्यालय आणि सभाग्रहात केले. पोहण्याचे तलावाचे बांधकाम अगोदरच केलेले होते. हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने सर्व त्या बाबी सामान्य होत्या. सन 1975 मध्ये मीनार उपहार ग्रह चालू केले की जे मोघलाई पद्दतीचे अन्न पुरविण्याची सुविधा देते. तेथील विशेषतः म्हणजे ताज्या तंदूर डीशेष ! येथे 120 अतिथि एकावेळी बसू शकतात. येथे रात्री गायनाचे कार्यक्रम केले जातात.[१] +हे 4 स्टार हॉटेल अतिशय सुंदर,व्यवसाइकासाठी आदर्श तसेच प्रवाश्यांसाठी आरामदाई आहे. या हॉटेलची विशेषतः म्हणजे येथे आधुनिक पद्धतीची 7 प्रकारची भोजन व्यवस्था आणि मदीरा व्यवस्था आहे. येथे विविध प्रकारचे जेवण बनविण्याचे उपहार ग्रह आहे त्यात पियानो, मालगुडी (साऊथ इंडियन उपहार ग्रह) करी टाउन, बे-146, बांबू बार, ब्रेव-रूम आणि बेकर्स बास्केट नावाचे केक शॉप यांचा समावेश आहे. या हॉटेलची 10 सभाग्रह आहेत.[२] +पियानो – हे उपहार ग्रह विविध पदार्थांचे माहेरघर आहे. विविध देश्यांचे अल्पोपअहार, लंच, डिंनर, येथे मिळतात. +बे-146 - हे शीतल आहे. येथे रात्री हिप लायटिंग, डिजे, मिक्स ऑफ मेट्रो,हिप होप,क्लब आणि हाऊस म्यूजिक व्यवस्था आहे. येथील नाइट क्लब मध्ये मेरी मोमेंट्स रविवार ते शुक्रवार पर्यन्त संध्याकाळी 6 ते 9 पर्यन्त चालू असतो. +फोंडू - हे विविध विशेष रुचकर प्रकारचे मिटक्या मारत खाण्याचे उपहार ग्रह आहे. +बांबू बार - येथे विविध कॉकटेल शीतल पेये आणि कॉकटेल मदिरा पेये मिळतात. +बेकर्स बास्केट - या केक शॉप मध्ये कांही स्वादिष्ट पेस्ट्रीस आहेत की जे तुमच्या जेवणानंतर ते तुमच्या तोंडाची चव वाढवतील. +31 डिसेंबर 2007 रोजी नवीन वर्षाचे स्वागताप्रीत्यर्थ नांच गाण्यासाठी स्विमिंग तलावावर मंडप उभारला होता तो कोसळला आणि त्यात 3 व्यक्ति ठार झाल्या आणि 2 जखमी झाल्या.[३] +या हॉटेलचे ठिकाण शोधण्यास अतिशय सोपे म्हणजेच चेंन्नईत 146, डॉ.राधाकृष्णन सलाई, मिलपोरे, चेन्नई, तामिळनाडू पिन कोड 600004 येथे आहे. अतिथिना u.s.कांसोलेट (अंदाजित 3किमी),थाऊजंड लाइट्स आणि टी नगर (अंदाजित 7किमी), मरीना बीच,st. George किल्ला, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंदाजित19 किमी), चेन्नई रेल्वे स्थानक (अंदाजित 8 किमी) अंतरावर आहेत. +हे हॉटेल सामाजिक जबाबदारी जाणते आणि त्यासाठी सवेरा हॉटेल अकॅडमी स्थापन केलेली आहे व त्यामार्फत आदरपूर्वक विध्यार्थ्यांन्चे स्वागत करून त्यांचे कारकीर्द उज्ज्वल करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. +या 4 स्टार हॉटेल मध्ये 3 उपहार ग्रह आहेत. उच्चतम प्रतीची स्वयपांक व्यवस्था, केक व केक शॉप, बार सेवा आहेत. तेथे एकटा सुद्दा आरामात आनंद घेऊ शकतो. या हॉटेलमध्ये ज्यांना बाहेर कामासाठी जावे लागणार नाही त्यांचेसाठी पोहण्याचा तलाव,स्वास्थ्य केंद्र, चित्रकार कलाग्रह, मालीश,सेवा उपलब्ध आहेत. येथे सुंदर देखावा केलेले मेजवानीसाठी प्रशस्त हॉल (Banquet) आहेत की जेथे अंदाजित 300 व्यक्ति सामाऊ शकतात. येथे तुम्ही लग्नाची मेजवानी (रिसेप्शन) आणि वाढदिवस साजरे करू शकता.यथायोग्य पद्दतीने व्यवसायिक अतिथींच्या गरजेनुसार सजविलेले सभाग्रह आहे. येथे अतिथींच्या सोईनुसार ब्वुटी सलून, मागणीनुसार डॉक्टर, कमानी करून सजविलेली सभाग्रह आणि फुलांची दुकाने आहेत. +येथे विविध प्रकारच्या खोल्या, त्यात एक्झिक्युटिव्ह, डिलक्स,स्टँडर्ड,व्यावसायिक खोल्यांचा समावेश आहे. वातानुकूलित सेवा, मोफत Wi-Fi, मिनी बार, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मेनू कार्ड, चहा / कॉफी मेकर, रायटींग टेबल,या सुविधा खोलीत उपलब्ध आहेत. हॉटेल एक्झिक्युटिव्ह, व्यवसाय क्लब,आणि स्टँडर्ड खोलीत विनंती नुसार DVD प्लेअर दिला जातो. +सेफ, इस्त्री, वर्तमानपत्र, वाहन तळ, 24 तास स्वागत कक्ष, 24 तास चेक-इन चेक-आऊट, धोबी, चलन बदली, ATM, GYM,व्यायाम शाळा, मश्याज केंद्र, शॉपिंग मॉल, इ. सेवा आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12156.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1ca4cb4b2227d8c3328f81b6d5767883b55a8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12156.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 32°4′52″N 81°5′28″W / 32.08111°N 81.09111°W / 32.08111; -81.09111 + +सव्हाना (इंग्लिश: Savannah) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. सव्हाना शहर जॉर्जियाच्या पूर्व भागात साउथ कॅरोलायना राज्याच्या सीमेवरील सव्हाना नदीच्या मुखाजवळ व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिशकालीन साम्राज्यात असताना सव्हाना जॉर्जिया प्रांताची राजधानी होती. येथील ऐतिहासिक वास्तूशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सव्हानामध्ये अनेक जुन्या इमारती व चर्चे आहेत. ह्यांसाठी सव्हानाला जॉर्जियाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12166.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a67c7ac73a0cdbaeff648a6d2549212fdaf2701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12166.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 44°18′0″N 8°29′0″E / 44.30000°N 8.48333°E / 44.30000; 8.48333 + +सव्होना (इटालियन: Savona) हे इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशामधील एक शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सवोना एकेकाळी इटलीच्या लोखंड निर्मितीचे मोठे केंद्र होते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12178.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b04c34cb8698548496ca499eaf868a5c2f8a42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12178.txt @@ -0,0 +1,8 @@ + ससाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12191.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9932710f5036f1caad8455e62c9f81ab6da6c81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12191.txt @@ -0,0 +1 @@ +सस्किआ केइझर-क्लीन (जन्म दिनांक अज्ञात:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1220.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f90fe13485c32b0f83e2b3de26a2aa88149e97c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1220.txt @@ -0,0 +1,21 @@ +ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे. +ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे. +मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते. +ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्साय्क्लोपीडिया   (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने मराठीत विश्वकोश, महाकोश[१], माहितीकोश अशा संज्ञाही वापरण्यात येतात. उदा. मराठी विश्वकोश किंवा कुमार विश्वकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश तसेच वस्त्रनिर्मिती माहितीकोश इ. +ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ[विशिष्ट अर्थ पहा] (compendium) होय. ज्ञानकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा विषयविशिष्ट अशा दोन्ही तऱ्हेचा असू शकतो. सर्वसाधारण ज्ञानकोशात त्याच्या रचनेच्या हेतूनुसार विविध विषयांवरील माहिती दिलेली असते तर विषयविशिष्ट ज्ञानकोशात एखाद्या विशिष्ट विषयातील विविध अंगांविषयीची माहिती दिलेली असते. ज्ञानकोशाच्या व्याप्तीनुसार आणि त्यातील लेखांची संख्या ठरते आणि ही संख्या व नोंदींचे आकारमान ह्यांनुसार ज्ञानकोश लहान वा मोठा असू शकतो. मोठे ज्ञानकोश अनेकदा विविध खंडांत विभागण्यात येतात. ही खंडांतील विभागणी विषयानुसार किंवा इतर निकषांनुसार करण्यात येते. मुद्रित स्वरूपाच्या ज्ञानकोशांत नोंदींची मांडणी अकारविल्हे करण्याची प्रथा असल्याने त्यांची खंडांतील विभागणी त्यांच्या नोंदींच्या पृष्ठसंख्येचा विचार करून आद्याक्षरांनुसार करण्यात येते असे आढळते. +शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो. +अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते. +ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधीना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते. +इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो. + +सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते.. +ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते .ज्ञानकोशब्रिटानिका ज्ञानकोशाप्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बऱ्याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो. +आधुनिक संगणक, इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून विकिपीडिया, इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात. +ज्ञानकोश किंवा त्या अर्थाच्या इतर संज्ञा जरी आधुनिक काळातील असल्या तरी त्यांच्या अर्थाशी नाते सांगणारे साहित्य विविध देशांत आणि तेथील संस्कृतींत पूर्वीपासून आढळणे शक्य आहे. त्यामुळेच ज्ञानकोशांचे सध्याचे स्वरूप हे जरी एकोणिसाव्या शतकातील युरोपीय ज्ञानकोशाच्या प्रभावातून साकारलेले असले तरी जगभरात तसेच भारतात त्यापूर्वीच्या काळात निर्माण झालेल्या ज्ञानकोशसदृश अशा साहित्याची उदाहरणे दाखवून देता येणे शक्य आहे. +इ.स.च्या १२व्या शतकात, भारतातील एक राजा सोमेश्वराने 'अभिलाषितार्थ चिंतामणी' हा सुमारे शंभर प्रकरणे असलेला ज्ञानकोष लिहवून घेतला.हा जगातील प्रथम विश्वकोश म्हणून मानला जाते.[ संदर्भ हवा ] +मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली. [२] [३] त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत. +१९०६मधील मराठी साहित्यसंमेलनातल्या आपल्या भाषणात विष्णू गोविंद विजापूरकर ह्यांनी मराठीत 'विश्वकोश' निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आढळते.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. [४] +कोश,मुक्त ज्ञानकोश,विकिपीडिया +साचा:Wiktionary + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12208.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a3b5267581bb0405f6428bc30a671ef1b77c211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12208.txt @@ -0,0 +1,14 @@ +सहकारी मनोरंजन मंडळ ही परळ येथील एक नाट्यसंस्था आहे' +सन १९२० च्या काळात परळ-पोयबावाडी ह्या भागात माडांच्या वाड्या, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटून गेला होता. +दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जिवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती ज्या दर्जाची असेल त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टीिनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून या संस्थेद्वारे कामगारांचे जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगार नेते कै. ना.म. जोशी यांच्या मनात होते. +याच काळात गिरगावांत राष्ट्रभूषण नाटक कंपनी होती. त्या संस्थेत गंगाराम कदम भूमिका करत असत. शिवाय 'हिंद सेवक नाट्य समाज' या नावाची एक संस्था होती. या संस्थेत शिवाजी पाटकर, द्वारकानाथ पाटील, दाजी मसुरकर, पाडावे, इत्यादी नट भूमिका करीत असत. या सर्वांच्या सहकार्याने संघाने, करीमभाई मिलमध्ये कच्ची रंगभूमी उभारण्यात आली होती व तेथे नाटके होऊ लागली होती. +'करीमभाई मिलच्या रंगभूमी'वर होत असलेल्या नाटकांमुळे ना.म. जोशी यांचा नटांशी संबंध येऊ लागला. त्यांना संघाचे इतर कार्यकर्ते पु. गो. नाईक, सहस्रबुद्धे, चित्रे, फासे, बडे, काणेकर, फणसे, यांचे सहकार्य मिळाले. या सर्व गोष्टींचा समन्वय घडून, जेव्हा परळमध्ये दामोदर हॉल बांधला गेला, त्यासुमारास दि. २० सप्टेंबर १९२२ रोजी त्या हाॅलमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ स्थापन झाले. दामोदर हॉलसारखी भव्य जागा विनाभाड्याने बाराही महिने वापरण्यास मिळू लागली व कामाला सुरुवात झाली. +करीमभाई रंगभूमीवरील दुसरे नट दाजिबा परब हेही 'सहकारी मनोरंजन'मध्ये सामील झाले. +अप्पा टिपणीस यांच्या 'राधा माधव' या नाटकाने सुरुवात झाली. शिवाजी पाटकर यांनी तालीम मास्तर म्हणून काम पाहिले. विविध संस्थांच्या मदतीसाठी नाटकांचे प्रयोग केले. सहकारी तत्त्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे, हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारीमध्ये सामील झाल्यामुळे त्या मंडळाच्या सामानाची किंमत ठरवून ती रक्कम ह्या सभासदांच्या भागापोटी जमा करण्यात आली. +प्रसिद्ध कामगार नेते ना . म . जोशी यांनी कै. गंगाराम बाबाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा संघाला पूरक अशा सहकारी मनोरंजन मंडळाची दि . २० सप्टेंबर १ ९ २२ रोजी स्थापना केली +दिनांक ३० नोव्हेंबर १९२५ रोजी सहकारी मनोरंजन मंडळ सहकारी तत्त्वावर रजिस्टर करण्यात आले. +कै. आप्पासाहेब टिपणीसांच्या ‘संगीत राधामाधव’ या नाटकाने मंडळाची नाट्यसेवा सुरू झाली. इतरत्र गाजलेल्या त्राटिका, मत्स्यगंधा, पुण्यप्रभाव, भावबंधन, शारदा , संशयकल्लोळ, हाच मुलाचा बाप,सौभद्र, सावित्री इ. असंख्य नाटकांबरोबरच कै. गं . ब . कदम यांचे प्रचंड गाजलेले नाटक ‘ ललाटलेख ‘, कै. दाजीबा परब यांचे ‘ गिरणगावात ‘ ही मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची नाटकं, तसेच मामा वरेरकरांचे ‘ द्वारकेचा राजा ‘ , रा बा गावडे लिखित ‘अशी होती मराठी माणसं’ इ. खास मंडळाकरिता लिहिलेल्या नाटकांचे प्रयोगही यशस्वीरित्या केले गेले. या काळात संस्थेने राधामाधव, मत्स्यगंधा, चंद्रग्रहण, त्राटिका, संशयकल्लोळ, भावबंधन, पुण्यप्रभाव, हाच मुलाचा बाप, तुकाराम, दामाजी, व सावित्री ही नाटके सादर केली. +सन १९२६-२७ साली मंडळाने सर वेस्ली विल्सन हॉस्पिटल फंडास नाटकाच्या उत्पन्नातून मदत केली. त्याबद्दल मुंबईच्या गव्हर्नरांचे हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक मिळाले. इतर संस्थांकडून व जनतेकडून वाहवा मिळाली व आणखी पदके मिळाली. त्यावेळी एकूण बारा पदके सहकारी मनोरंजन मंडळाला मिळाली. +ल. ग. सुळे लिखित ‘लग्नसोहळा’ या नाटकापासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पुरस्कार मंडळाने सुरू केला. नटवर्य नानासाहेब फाटक, मा . दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, राजाराम शिंदे, बाबासाहेब नाईक, मनोहर चव्हाण, अनंत दामले, शंकर घाणेकर, श्री. जोगळेकर, किशोरी पाठक, सौ. ललिता पेंढारकर, शालिनी भालेकर, सुमन मराठे, जयश्री शेजवाडकर, कुसूम चव्हाण असे असंख्य कलाकार वसंत शेणई, बाळ पवार सारखे दिग्दर्शक, नट, पार्वती कुमार सारखे नृत्यदिग्दर्शक हे मंडळाचे सभासद मराठी रंगभूमीवर गाजले व त्यांनी मंडळाचे सभासदत्व अभिमानाने मिरविले. +१९३५ पर्यंत गंधर्वयुगाचा प्रभाव मराठी रंगभूमीवर होता . त्यानंतर चित्रपटाच्या आक्रमणाने मोठमोठे नाट्यदिग्गज उन्मळून पडले, अशा उतरत्या कालखंडात १९६० पर्यंत कामगार रंगभूमीने मराठी रंगभूमीला तगवले, जगवले व वर्धिष्णू ठेवले व त्यात सहकारी मनोरंजन मंडळाचा वाटा सिंहाचा होता. नुसती नाटकेच करून मंडळ थांबले नाही, तर अत्यल्प मोबदल्यात आपदस्तांना, दुष्काळ पीडितांना व नाट्यसंस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत केली. +सध्या सुरू असलेल्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या निम्मिताने हे मंडळ पुन्हा चर्चेच्या झोतात आले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12221.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bea8a0b2af9e0c163cc94510ca84112cd79e807 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12221.txt @@ -0,0 +1 @@ +सहदेव महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतीय युद्धात सहदेवाने शकुनीस मारले. हातकु्र्हाड हे त्याचे युद्धाचे प्रमुख हत्यार होते. महाभारतातील संदर्भांनुसार सहदेवाला कोणतीही वाईट गोष्ट होण्याआधी त्या गोष्टीचा पूर्वाभास होत असे असे म्हटले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12231.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf2fe9997541e049a75d8a8e434f03853b1d3932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12231.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा एक अंशतः मान्य व स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. हा देश पश्चिम आफ्रिकेतील पश्चिम सहारा ह्या वादग्रस्त भूभागावर आपला हक्क सांगतो. परंतु पश्चिम सहारा हा आपल्या देशाचा एक भाग असल्याचा मोरोक्को देशाचा दावा आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12236.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..744c20a68e39eac266467699dbb0fe9e2cca7773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12236.txt @@ -0,0 +1,2 @@ +सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या (पुस्तक) हे मराठीतील पुण्याच्या परिसरात एक दिवसाच्या सहली बद्दल माहिती देणारे पुस्तक आहे. +पुणे हे साधारण सहलीच्या सुरुवातीचे ठिकाण मानून एका दिवसात म्हणजे सकाळी निघुउन रात्रीपर्यंत पुण्यात परत येत येईल अशा ठिकाणाची माहिती या पुस्तकात दिली आहे. शक्य असेल तिथे मुंबई, नाशिक अशा मोठ्या गावांपासुंची माहिती नमूद केली आहे. बऱ्याच ठिकाणी त्या गावाचे नकाशे, फोटो दिले असून चांगली माहिती दिली आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12237.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac5391878041f2fa02e71883f2adab7834e4e9af --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12237.txt @@ -0,0 +1 @@ +सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक) हे पावसाळ्यातील सहलींची ठिकाणे आणि त्या विषयी माहिती देणारे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12269.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9152b645929036a60984e61fa7f1deb17ebd2e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12269.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुटबॉल मध्ये, सहाय्यक पंच, मुख्य पंचाला सामना सुरळीत पाडण्यासाठी मदत करतात. दोन सहाय्यक पंचाना सहसा लाईन्समन (महिला असल्यास लाइन्सवूमन) म्हणले जाते व ते टच लाइन जवळ उभे असतात. चौथा अधिकारी पंचाला अधिकारीक किंवा तत्सम कार्यात मदत करतो. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12283.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..070dbfbe8900feeeeaa0ee1d666297a37080dc85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12283.txt @@ -0,0 +1,3 @@ +सहारनपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०५,४७८ होती. यांपैकी ३,७१,७४० पुरुष तर ३,३३,७३८ महिला होत्या. +हे शहर सहारनपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12287.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c1980122d93458fee017440ac18c4ed67b989b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12287.txt @@ -0,0 +1 @@ +सहारनपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12292.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ae7f59a723cdf8b919cab674041a9ff29bfb27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12292.txt @@ -0,0 +1 @@ +न्यूलँड्स क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरामधील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान केप कोब्राझ संघाचे घरचे मैदान असून न्यूलँड्स स्टेडियमच्या जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12312.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154bc3192bc10ddbeb9bc3d322a7f867423dccfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12312.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता. +हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12316.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c94ed24d7ed78bf9a610521c09277ac19adf775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12316.txt @@ -0,0 +1,6 @@ +साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे.[१] ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते. साडी ही वेगवेगळ्या कापडांच्या प्रकारात उपलब्ध असतात. +साडी कमरेभोवती गुंडाळल्यावर जास्तीचा राहिलेला भाग घड्या घालून नाभीपाशी खोचला जातो त्याला निऱ्या म्हणतात. +साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचा काठ होय. साडीच्या काठावर असणाऱ्या विवक्षित नक्षीमुळे काही साड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात. +कमरेला गुंडाळल्यावर उरणाऱ्या साडीच्या आकर्षक तुकड्याला साडीचा पदर, पालव किंवा पल्लू म्हणतात. हा भाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. काहीजणी त्याला समोरच्या बाजूनेही घेतात. पदराची जास्तीची लांबी कबरेभोवती लपेटतात व उरलेली कमरेशी खोचतात. +भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा १.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटिमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1232.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4a40c4dc48f924fcf2c94498137440e34839947 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1232.txt @@ -0,0 +1 @@ +विश्वनाथ आत्माराम भोईर मराठी राजकारणी आहेत. हे कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12331.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f22845999e2dca7495b6a35a3335da8ed1127cfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12331.txt @@ -0,0 +1,68 @@ + + +सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र(६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१] +या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे. ही खिंड तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची उंची सर्वात कमी आहे (३०० मी). +पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैववैविध्य असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातील अर्धे केवळ सह्याद्रीवर सापडतात; बेडकांच्या शंभर जातींपैकी ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाऊबंधू आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती केवळ सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा अधिक फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३] +पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४]. +गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५] +बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे. चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.[६] +उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे.. +काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे. +पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात. +पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरूपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात. +पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत. +अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण. +पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. +पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५] +पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५] +पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात. +केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात. +पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली. +१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. +भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.[१०] +नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे. +२००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील. +पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. +ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१८]. +सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[१९] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. +भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात. +गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे. ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली - +संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती. अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले. +सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतदार, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली. +१९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.[२१] +पहा : + + + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12365.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d222674af7b943248110415c21c2bb3537a6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12365.txt @@ -0,0 +1,4 @@ +साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे. + +साँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12399.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4d9852a9089eacc3e7064d42d9dff0beda1bf2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12399.txt @@ -0,0 +1,6 @@ + +सांगत्ये ऐका हा एक मराठी भाषेतील कृष्णधवल चित्रपट असून मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त काळ, म्हणजे सलग १३१ आठवडे चाललेला चित्रपट आहे.[१] +गो. गं. पारखी यांनी इ.स. १९५५ मध्ये 'सांगते ऐका' नावाची एक कादंबरी लिहिली होती. कादंबरी लिहिण्या पूर्वी याच कथेवर पारखी यांनी सिनेमा काढण्याचा एक असफल प्रयत्न केला होता. नंतर अनंत माने यांनी या कादंबरीवर हा चित्रपट निर्माण केला. कादंबरीची दुसरी आवृत्ती १९६१ मध्ये प्रकाशित झाली. नंतर मात्र ही कादंबरी पुन्हा प्रकाशित आणि उपलब्ध झाली नाही. शेवटी ही कादंबरी ५८ वर्षांनी परत एकदा प्रसिद्ध झाली.[२] +हा चित्रपट पुणे येथील विजयानंद या चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील हा विक्रम अजूनही कुणीही मोडला नाही. चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला’ या लावणीला संगीतकार राम कदम यांनी चाल दिली होती. त्यावेळेस कदम हे संगीतकार वसंत पवारचे सहाय्यक होते. मात्र या लावणीने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटापासून मराठी चित्रपट सृष्टीत लावणीपटाची लाट सुरू झाली होती.[३] +राजुरी या गावचा महादेव पाटील हा पैसा आणि अहंकार यामुळे गावाला अतिशय तापदायक पद्धतीने वागवत असतो. त्याची पत्नी जानकी मात्र याउलट सगळ्यांची काळजी घेणारी असते. या गावात सखाराम आणि हौसा हे सामान्य जोडपे राहत असते. गावात एकदा बैलांची शर्यत होणार असते. महादेव पाटलाला सखारामच्या खिलारी जोडीची भीती वाटते. आपल्या माणसाच्या, सावळ्याच्या मदतीने पाटील सखारामची झोपडी जाळतात. त्यात सखाराम आणि त्याचे बैल मरण पावतात. पाटलीन बाई हौसाला आपल्या घरी आणून ठेवतात. एक दिवस संधी साधून पाटील हौसावर बलात्कार करतो. त्यातून हौसाला दिवस जातात. हौसा वणवण फिरत असताना तमासगीरांच्या फडात आश्रयाला जाते. शेवटी तेथे एका मुलीला जन्म देऊन हौसा मरण पावते. ही मुलगी तमाशात नाचायला लागते. महादेव पाटलाचा मुलगा मोठा होतो आणि तो या मुलीच्या प्रेमात पडतो. शेवटी सत्य सामोरे येते आणि पाटलाची हत्या देखील एका शत्रूच्या हातून होते.[३] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सांगत्ये ऐका चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12406.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df4055279f1ed65470c34d7943455ccdb10b2685 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12406.txt @@ -0,0 +1,27 @@ + +१६° ५२′ ००″ N, ७४° ३४′ ००″ E +सांगली उच्चार (सहाय्य·माहिती) हे महानगर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे. +सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी. वर आहे. सांगली येथे इ.स १८७६ ते ८ फेब्रुवारी १९९८ पर्यंत नगरपालिका होती. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली. इ.स २०११ च्या जनगणनेनुसार या महापालिकेची एकूण लोकसंख्या ५,०२,७९३ असून त्यामध्ये २,४९,१५३ पुरूष व २,५३,६४० स्त्रिया होत्या. [१] एकूण क्षेत्रफळ ११८ चौ. किमी. असून प्रभागांची संख्या +२० आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालय सांगली येथे असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे जिल्हास्तरावरील केंद्र व राज्यस्तरावरील शासकीय, निमशासकीय व महामंडळांची कार्यालये येथे आहेत. वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने सांगलीला प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा व्यापार मोठा आहे. हळदीची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते. शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही सांगली प्रसिद्घ आहे. कला वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, औषधनिर्माणशास्त्र, आयुर्वेदिक, वैद्यक, दंतविज्ञान, पर्यावरण विज्ञान इ. शाखांची महाविद्यालये सांगलीत आहेत. मराठी नाटकाचे हे उगमस्थान असल्याने सांगलीला ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. सांगलीचे अधिपती सर चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी राजाश्रय दिल्यामुळेच विष्णुदास भावे यांनी इ.स १८४३ साली लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रथम प्रयोग सांगली येथे झाला. [२] सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने [३] तसेच बिजली या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणारे माजी आमदार कै. संभाजी पवार हेही याच मातीतले. [४] कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. +सांगली गावाच्या नावाची व्युत्पत्तीविषयी अनेक ग्रह प्रचलित आहेत. काहींच्या मते कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या पवित्र संगमाजवळ वसलेलं गाव म्हणून गावाचं नाव र्संगमहल्ली. काहींच्या मते मूळ नांव संगलगी या कानडी नावाचा अपभ्रंश होऊन 'सांगली' नाव रूढ झाले. जुन्यात जुना कागदोपत्री पुरावा गांवकामगार पाटील कै. पद्माण्णा वीरगोंडा यांच्या इ.स. १८५६-५७ सालची जमाखर्चाच्या वहीत “सा-ग-ली असे "सा" वर अनुस्वार नसलेले गावाचे नाव आढळते. तथापि कृष्णा नदीकाठी सहा गल्ली ( गांव भाग , पेठ भाग , गवळी गल्ली , चांभार वाडा , वखार भाग , जांभवाडी ) असलेलं गाव म्हणजे `सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य असलेली समजूत. सांगलीच्या नावाविषयी अशा अनेक समजुती, आख्यायिका दिसून येतात. [५] +सांगली शहराला सुंदर चेहरा मिळाला तो इ.स. १८०१ साली. त्याच्या आधी गाव अस्तित्वातच नव्हतं असं नाही, पण ते अगदीच नगण्य होतं. पेशवाई काळात पटवर्धन राजाची मिरज ही जहागिरी होती.[६] त्यांच्या २२ कर्यातींपैकी सांगली एक होती. या पटवर्धन घराण्यात मालमत्तवरून वाद झाल, आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या संमतीने पटवर्धन घराण्यात वाटण्या झाल्या. त्यापैकी थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी आपला हिस्सा घेऊन बाहेर पडले. कृष्णातटाकी आणि उंचवट्यावर सांगली हे गाव त्यांना आवडलं. इ.स. १८०१ साली चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली संस्थान स्थापन केलं.[७] तरी सुरुवातीची काही वर्षे, धोंडजी वाघ , करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध 'गणेशदुर्ग' त्यानी बांधून घेतले. चारी बाजूंनी खंदक असलेला म्हणजे 'भुईकोट किल्ला'  सांगलीचे एक वैशिष्ट्य होतं ! (गणेशदुर्गाच्या तुरुंगातून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी खंदकात उड्या टाकून ऐतिहासिक पलायन केलं होतं.) [८] संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी आता देऊळ हवंच. पटवर्धन राजे हे परम गणेशभक्त. म्हणून इ.स. १८११ साली चिंतामणराव पटवर्धन नी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं.[९] इ.स. १८१४ मध्ये पायाभरणी झाली. ३० वर्षानंतर काम पूर्ण होऊन . अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती बनविण्यात आल्या. इ.स. १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे इ.स. १८४७ साली मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. इ.स. १८४७ साली मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. [१०]सुशिक्षितांचं गाव म्हणून पुण्याच्या खालोखाल नाव घेतल्या जाणाऱ्या सांगलीत १८६१ मध्ये सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात झाली. १९०३ साली सांगली संस्थानच्या गादीवर आलेल्या दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत. सांगलीचा खरा पाया घातला गेला. १९०५ ते १९१० या पाच वर्षात दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत, तसेच नगरपालिका आणि सांगली हायस्कूलची सध्याची इमारत. संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कल्पकतेतून. बांधकामे झाली आणि सांगलीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली.[११]सांगलीचं व्यापारीदृष्ट्या विकास सन इ.स. १९२९ साली आयर्विन पूलाच्या उभारणीनंतर सुरू झाला. आयर्विन पुलाला त्र्याण्णव हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.[१२] +कृष्णाकाठची अतिशय सुपीक अशी जमीन सांगलीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला पिकवला जातो. ऊस व द्राक्षे इथे पिकतात. ज्वारी व बाजरी इथे बहरतात.तासगाव तालुक्यातील द्राक्षे व बेदाणे तर जगभर प्रसिद्ध आहेत. +सांगली मिरज हे जुळे शहर म्हणुन ओळखले जाते. अमराई बाग( Garden ) फार सुंदर आहे. सध्या बापट मळा म्हणजेच महावीर उद्यान शहरवासीयांचे आवडते ठिकाण झाले आहे. +सांगली परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे. कृष्णा नदी आणि लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृद्ध आहे. +सांगलीचे अर्थकारण मुळ व्यापार आहे. सबंध जिल्ह्यातून तसेच शेजारील जिल्ह्यातील व कर्नाटकातील काही भागाचा दैनंदिन व्यवहार सांगलीतूनच चालतो. येथील अर्थकारण व राजकारण यांचा मिलाप येथे दिसून येतो. येथील ऊस, द्राक्ष तसेच दूध याभोवती समाजकारण व त्याभोवती राजकारण फिरते.  +सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष उत्पादनातही सांगली आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे. सांगली व तासगावची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे. +अधिक माहितीसाठी पहा - http://sangli.nic.in/ +सांगली रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे अनेक महालक्ष्मी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. रत्‍नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, इचलकरंजी कोल्हापूर सातारा मिरज दहीवडी अहिल्रियानगर छत्रपती संभाजीनगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्‍नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो +सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात. सांगली शहरात ब-याच जातीचे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने वागत असतात. +मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला.विष्णूदास भावे हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त अशी नाट्यगृहं उभारण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ] नाटकांमुळे कलाकारांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. [१३] +शैक्षणिक विकासाबरोबरच वृत्तपत्रांचा विकासही या शहरात दिसून येतो. १९३७ मध्ये सांगलीत दक्षिण महाराष्ट्र आणि विजय ही साप्ताहिके प्रकाशित होत असत.[१४] तेंव्हापासून सांगलीमध्ये वृत्तपत्रांची परंपरा आहे. आजमितीला सांगलीतून लोकमत, पुढारी, सकाळ, दक्षिण महाराष्ट्र , केसरी ,राष्ट्रशक्ती, जनप्रवास आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे प्रकाशित +होतात. सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणीचे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात. त्याच बरोबर ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल सुद्धा अग्रभागी आहेत. +सांगली शहरात अनेक नावाजलेल्य प्राथमिक शिक्षण संस्था आहेत +सिटी हायस्कूल, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कुल, रामदयाल मालु हायस्कुल, कै.ग.रा. कन्यापुरोहित प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर ,सिटी इंग्लिश मिडीयम स्कूल, इत्यादी . +सांगली हायस्कूल, आरवाडे हायस्कूल +सांगलीतील पर्यटनस्थळे ही अगदी मोजकीच आहेत, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे आध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश होतो. +आमराई ही सांगलीतील सर्वात मोठी बाग आहे. आणि सुमारे १७३ वर्षांपूर्वी श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी वसवली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मोठ्या संख्येने असलेल्या आंब्याच्या झाडांवरून त्याचे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. हे जवळजवळ ६.०७ हेक्टर ( १५ एकर) क्षेत्र व्यापते आणि ३०४, ८० मीटर (१,००० फूट) लांब प्रवेशद्वार आहे ज्यात भव्य झाडे आहेत. यात औषधी मूल्याची विविध झाडे आणि झुडपे अशा तब्बल २०० प्रकारांचा समावेश आहे. प्रमुख झाडांपैकी चिंच, बदाम, देवदार, कासुरिना, आंबा आणि इतर अनेक जाती आहेत. या उद्यानाची देखभाल आता शासनाकडून केली जाते आणि ती उद्यान व उद्यान अधीक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आहे. एक रोपवाटिका विभागही स्थापन करण्यात आला असून सांगलीतील वनस्पती शास्त्रात संशोधन करणाऱ्या महाविद्यालयांना आवश्यक रोपांचा पुरवठा केला जातो. वन-महोत्सवाला २४ विविध जातींची एक ते चतुर्थांश लाख रोपे पुरवण्याबरोबरच रोपवाटिका दोन लाख अतिरिक्त रोपे तयार करते जी नाममात्र दरात विकली जातात. विविध प्रकारच्या फुलझाडांच्या बिया आणि रोपेही विकली जातात. उद्यानाच्या देखभालीवर शासन दरवर्षी सुमारे दोन लाख रुपये खर्च करते.[१५] +सांगलीचे दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन राजाने दान केलेली बाग महानगरपालिकेच्या इमारतीजवळ आहे. ही बाग १४८१.२२ मीटर २ (१७५० चौ. यार्ड) क्षेत्रफळात पसरलेली आहे. मध्यभागी प्रतापसिंहाचा संगमरवरी अर्धपुतळा बसवला आहे आणि बागेला शोभा देणारे तीन कारंजे पैकी दोन आहेत. कोयनेल वनस्पतींच्या मदतीने मार्ग आणि क्रॉस-पाथ सोडून चौरस तयार केले जातात. काही सुबक लॉनही तयार करण्यात आले आहेत. क्रॉस-पाथ लताच्या कुंड्यांनी सजवलेले आहेत. मानव आणि प्राणी आकृत्या कलात्मकरित्या वनस्पतींमधून कापल्या गेल्या आहेत आणि आकारात ठेवल्या आहेत. त्यातील काही भाग महिलांसाठी बाजूला ठेवला आहे. पण बागेचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे चाकरव्यूहा किंवा कोयनेल वनस्पतींनी बनलेला एक प्रकारचा लढाईचा प्रकार.[१६] +गणपती मंदिर हे सांगलीचे आराध्य दैवत आहे. पेशव्यांच्या काळात चिंतामणराव पटवर्धन यांनी इ.स. १८४५ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिराचे शिखर ८०० फूट उंच आहे. मंदिराचा परिसर अडीच एकर असून. मंदिर दिशा साधन तंत्राचा वापर आणि राजस्थानच्या लाल दगडांनी बांधले आहे. मंदिरात चतुर्भूज मूर्ती हे डाव्या सोंडेची असून सोबत रिद्धी – सिद्धीही आहेत. मंदिर हे तीन मुख्य चौकात विभागला आहे. मधल्या चौकात मुख्य मंदिर असून भोवताल श्री चिंतामणीशेश्वर (श्री शंकर), श्री सूर्यनारायण, श्री चिंताणेश्वरी देवी , श्री लक्ष्मी – नारायण अशी पाच मंदिरे आहेत.[१७] +छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ स्थिती, पूर्वेकडील कांस्य. त्यांच्या नावावर असलेल्या भाजी मंडईसमोर बसवले आहे. इतर अनेक पुतळ्यांप्रमाणे, येथे तो सरपटत्या स्थितीत चित्रित केलेल्या घोडीवर स्वार होताना दाखवला आहे. हे ३.६५ मीटर (१२') रुंद आणि २.४३ मीटर (८') उंचीच्या पायथ्याशी बसवले आहे. महाराजांची पुतळ्याची स्थिती ३.२० मीटर (१० १/२) उंच आहे आणि अतिशय भव्य आणि आकर्षक दिसते. त्याची स्थापना इ.स ३१ जुलै १९६२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भारताचे विद्यमान गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.[१८] +आयर्विन पुलाला 93 वर्ष पूर्ण झाले.[१९] पुलाच्या परिसरामध्ये माई घाट, [२०] श्री स्वामी समर्थ मठ आणि स्वर्गवासी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची समाधी सुद्धा याच परिसरामध्ये आहे.[२१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12417.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7604313e845366c1aa1a7fac8a55db64f2260c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12417.txt @@ -0,0 +1 @@ +सांगलीकर हे मराठीतील एक आडनाव आहे व सांगली हे मूळ गाव असणाऱ्या व्यक्ती सामान्यत: हे आडनाव लावतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12466.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f04c48bcc4cde410e0debcf103fdcb35cd2b4d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12466.txt @@ -0,0 +1,8 @@ + सांगवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12487.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceefc29f1107bb7d88766dc998ba8d461bd55b1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12487.txt @@ -0,0 +1,2 @@ +सांगोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12488.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2322aca5811dbcd58107caf1f96b7ddaa024f549 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12488.txt @@ -0,0 +1 @@ +सांगोद विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1249.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28bf97855e451fc68291a894b514808770a18877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1249.txt @@ -0,0 +1,7 @@ +विश्वनाथ प्रताप सिंग (जून २५, इ.स. १९३१ - नोव्हेंबर २७, इ.स. २००८) हे भारताचे दहावे पंतप्रधान (कार्यकाळ: डिसेंबर २, इ.स. १९८९ - नोव्हेंबर १०,इ.स. १९९०) होते. +सिंगचा जन्म २५ जून १९३१ रोजी, अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांना दोन मोठे भावंड होते.[१][२] लवकरच मांडा येथील राजा गोपाळसिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. १९४१ साली वयाच्या १० व्या वर्षी ते मांडाचे शासक झाले.[३] त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली.[४][५] +सिंग हे १९६९ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. १९७१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९७६-७७ मध्ये त्यांनी वाणिज्यमंत्री म्हणून काम पाहिले. +१९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधी जनता सरकारच्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडून आल्या तेव्हा त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सिंगची नियुक्ती केली. मुख्यमंत्री म्हणून (१९८०-८२) त्यांनी दरोडेखोरीवर जोरदार तडाखा लावला, ही समस्या दक्षिण व पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये तीव्र होती. १९८३ मध्ये त्यांनी या भागातील सर्वात भयावय दरोडेखोरांच्या आत्मसमर्पणांवर वैयक्तिकपणे नजर ठेवली. या समस्येवर योग्य आळोखा न घातल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवीली तेव्हा त्यांना बरीच अनुकूल राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. +१९८३ मध्ये वाणिज्यमंत्री म्हणून त्यांनी पुन्हा काम सुरू केले.[४] सिंग यांनी नंतर रथ यात्रेमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्याविरूद्ध अटक वॉरंट काढुन धैर्याने काम केले. +सिंग यांनी २ डिसेंबर १९८९ रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सिंग यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा सांभाळली. सिंग यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला संपविण्याचा निर्णय घेतला जे राजीव गांधींनी तामिळ फुटीरतावादी चळवळीचा मुकाबला करण्यासाठी पाठविले होते. काश्मिरी अतिरेक्यांनी तेव्हा गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद (जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री) यांच्या मुलीचे अपहरण केले. त्याच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली; त्यानंतर झालेल्या टीकेचे वादळ संपवण्यासाठी त्यांनी लवकरच भारतीय जनता पक्षाच्या आग्रहावरून जगमोहन मल्होत्रा ​​या माजी नोकरशहाची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. +सिंग यांनी स्वतः सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. या मंडल आयोगाने सुचविले की सार्वजनिक क्षेत्रातील सर्व नोकऱ्यांचा निश्चित कोटा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या सदस्यांसाठी राखीव असावा. या निर्णयामुळे उत्तर भारतातील शहरी भागातील उच्चवर्णीय तरुणांमध्ये व्यापक निषेधाचे वातावरण निर्माण झाले. २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12491.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0728d6b3cf9be0edd2251b91ce2fb89a9ce6357e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12491.txt @@ -0,0 +1,4 @@ +this is second of asia's profitable spinning mill. +सांगोला तालुकयातिल चालू सहकारी सूतगिरण्या-- १) शेतकरी सहकारी सूतगिरणी लि,सांगोला +सांगोला तालुकयातिल चालू खजगि सूतगिरण्या-- ३) फ॔बटेक प्रोजेक्ट लि, सांगोला +this is not the current diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12494.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd11aca38d1e839ce79e566aee47edce6a1a9fe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12494.txt @@ -0,0 +1,16 @@ +सांगोला महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील एक उच्च महाविद्यालय आहे.[१][२] हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[३] पूर्वी हे महाविद्यालय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न होते. + + + +१९७८ साली महाविद्यालयाची स्थापना झाली होती. सुरुवातीला फक्त कला शाखा कार्यरत होती. १९८१ साली वाणिज्य तर १९९१ साली विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पुढे बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून बी.सी.एस्. आणि बी.सी.ए. या अभ्यासक्रमांंची सुरुवात अनुक्रमे २००० आणि २००३ साली करण्यात आली.[४] महाविद्यालयाच्या संकेतस्थळानुसार[४], शिवाजी विद्यापीठात संगणकीय अभ्यासक्रम याच महाविद्यालयामुळे समाविष्ट केले गेले. २००३ साली एम्.एस्सी(संगणक शास्त्र) ह्या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला गेला. +२०२० सालापर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १२ विद्यार्थी नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडले गेले आहेत. तसेच आजवरचे अनेक माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. +१९७८ साली महाविद्यालयाची स्थापना झाली. "सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ" अंतर्गत स्थापना करण्यात आली. हे मंडळ दादासाहेब शेंडे, बापूसाहेब झपके, बजरंगआबा लोखंडे यांनी १९७० साली स्थापन केले होते. सुरुवातीला महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित होते. नंतर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न झाले. +१. पदवी + +२. पदव्युत्तर पदवी + +त्यासोबतच विद्यापीठांतर्गत मराठी, अर्थशास्त्र आणि भूगोल अशी तीन संशोधन केंद्रे आहेत. +महाविद्यालयाच्या नोंदीनुसार, ग्रंथालयात एकूण ५०,८६२ पुस्तके आहेत. हा आकडा ३१ मार्च, २०१९ पर्यंतचा आहे.[५] +या पुस्तकांत संदर्भ ग्रंथ २७,२६२ आहेत, तर क्रमिक पुस्तकांची संख्या २३,६०० इतकी आहे. याबरोबरच ई-पुस्तकेही उपलब्ध आहेत. ७५ नियतकालिके आणि १४ वर्तमानपत्र उपलब्ध करून दिली जातात. +बऱ्याच वेळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या अव्वल यादीमध्ये आले आहेत. २०२० सालापर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १२ विद्यार्थी नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडले गेले आहेत.[ संदर्भ हवा ] युवा महोत्सव या विद्यापीठाच्या वार्षिक स्पर्धांमध्ये महाविद्यालय दरवर्षी सहभागी होते. +महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील अनेक माजी विद्यार्थी देश-परदेशात मोठ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो या प्रमुख कंपन्यांमध्ये बरेच माजी विद्यार्थी कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12502.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6e296be403ba55220a6c66b55134c85eee6ea27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12502.txt @@ -0,0 +1,2 @@ +सांग्शाक किंवा शांग्शाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील दोन गावांना दिले गेलेले नाव आहे. शांग्शाक खुलेन आणि शांग्शाक खुनौ ही दोन गावे राष्ट्रीय महामार्ग १५०वर उख्रुल शहराच्या दक्षिणेस १५ किमी वर आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०२५ होती. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्च १९४४मध्ये भारतीय भूमिवरील पहिली लढाई येथे झाले. ऑपरेशन उ-गो तहत जपानी सैन्य व ब्रिटिश भारतीय सैन्यात झालेल्या या घनघोर लढाईत शेकडो सैनिक मृत्युमुखी पडले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12510.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2267a302ddcfddc1fa8f258add50e41575141e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12510.txt @@ -0,0 +1,40 @@ +सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून ४५ कि.मी. तर विदिशापासून ९ कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे. +इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तूपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे. +या सांचीच्या स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तूपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तमप्रकारे केलेले आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो. +भूगोल व जनसांख्यिकी- +उदयगिरी पासून साँची जवळच आहे. येथे बौद्ध स्तुप आहे सगळ्या स्तुपांची कला प्रख्यात आहे. येथे रेल्वे मार्ग, बस मार्ग ने जाता येते. रेल्वे मार्गाने येताना विदीशा या गावात उतरावे लागते तसेच हवाई मार्गाने येताना भोपाळला उतरावे लागते व तेथून बस ने साँचीला जाता येते. + + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12524.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3e6d74948e26b0142239325007a819ff628e371 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12524.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°27′0″S 70°40′0″W / 33.45000°S 70.66667°W / -33.45000; -70.66667 + +सान्तियागो ही चिले देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. सान्तियागो हे दक्षिण अमेरिकेतील सर्वांत आधुनिक व सुबत्त शहरांपैकी एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12528.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3fbde9d9305feaab3aea583ae70f76b1948ff1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12528.txt @@ -0,0 +1,11 @@ +सांडपाणी म्हणजे अशुद्ध, वापरलेले पाणी. सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो. +पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणाऱ्या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.पाणी आडवा पाणी जिरवा +सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुऱ्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो १ , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात. +सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे +==सांडपाणी नियोजन== सांस्कृतिक भागामध्ये महत्त्वाचे असते +घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्‍यात येतो त्यामध्ये ऍक्टिवेटेड स्लज ऍण्ड ट्रिकलिंग फिल्टर पद्धत, ऑक्सिडेशन/वेस्ट स्टॅबिलाझेशन पॉण्ड्स, एरेटेड लॅगून्स आणि विविध अनऍरोबिक प्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. +या सर्व पद्धतींपासून प्रेरित होऊन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध शाखांद्वारा मिळालेल्या नवनव्या माहितीचा आधार घेऊन घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी “जलसंवर्धन” ही संकल्पना तयार आणि प्रमाणित करण्यात आली आहे. +https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/effluent-management-of-waste-water/articleshow/36727291.cms[permanent dead link] +http://hindi.indiawaterportal.org/node/55728 Archived 2018-05-05 at the Wayback Machine. +http://www.marathiworld.com/sanskruti-m/waste-water-planning +http://krushnajal.blogspot.in/2016/03/blog-post_53.html diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12529.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e83563fdae6aabb39d1a52c0453a63611425780 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12529.txt @@ -0,0 +1,31 @@ +जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. +आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनाला वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage). अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage). +अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढीस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दूषित दुर्गंधी वायूंची निर्मिती होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होवू शकतात. +जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजनचा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते. +सांडपाणी शुद्धीकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठी होईल. +सांडपाणी शुद्धीकरणामध्ये पहिली पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदूषण पातळी किती आहे यावर ठरते की कोणते शुद्धीकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठी माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाह मानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबून असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाही जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अशा पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात तो १०० लिटरपेक्षाही कमी आहे. म्हणून हा अंदाज हा वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पूर्णतः: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापनासाठी खालील प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. +नागरी विभाग- वर नमूद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात. +औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबून असते. पाण्याचा वापर किती आहे या संबंधीची माहिती त्या त्या उद्योगाकडून गोळा केली जाते अथवा इथेही उद्योग प्रकाराप्रमाणे ठोकताळे लावून सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो. +पाण्याचे प्रदुषण मोजणे हे त्या सांडपाण्याला साफ करायला कोणते तंत्रज्ञान वापरावे यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कुठवर पोहोचली आहे हे देखील समजते. पाण्याचे प्रदुषण मोजण्यासाठी खास तंत्रे आहेत. या पैकि सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे पाण्याची जैविक ऑक्सिजन गरज ज्याला इंग्रजीत (Biological oxygen demand) अथवा बी.ओ.डी. असे म्हणतात व दुसरे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन गरज (Chemical oxygen demand) अथवा सी.ओ.डी. असे म्हणतात. हे दोन्ही दर्शक पाण्याची प्रदुषण पातळी दर्शवणारी मापदंडे आहेत. बी.ओ.डी म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतुना पाण्यातील प्रदूषक घटक विघटन करायला लागणार ऑक्सिजन. सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधील एकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन. ह्या दोन्ही पातळ्या मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात. बी.ओ.डी. व सी.ओ.डी. दोन्ही मोजायला वेगवेगळ्या पद्धती आहेत. बी.ओ.डी. मोजायला कमीत कमी ५ दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात मोजता येते. बी.ओ.डी. हे जैविक विघटन किती होवू शकेल याची नोंद देतो. तर सी.ओ.डी. प्रदुषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो. पाण्याचे प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच प्रदुषण निकष ठरवण्यासाठी बी.ओ.डी. व सी.ओ.डी.चा वापर होतो. साधारण पणे सी.ओ.डी. १०० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदूषित आहे असे मानण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी बी.ओ.डिची पातळी ० असली पाहिजे. +जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनासाठी वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage). +असे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषित द्रुर्गंधि वायुंची निर्मिति होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउ शकतात. +जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजनचा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते. +सांडपाणी शुद्दिकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठि होईल. +सांडपाणी शुद्धीकरणामध्ये पहिलि पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदुषण पातळि किती आहे यावर ठरते कि कोणते शुद्धीकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठि माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाहमानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबुन असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाहि जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अश्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात तो १०० लिटरपेक्षाहि कमी आहे. म्हणून हा अंदाज हा वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पुर्णत: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापना साठि खालिलप्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. +नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात. औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबुन असते. पाण्याचा वापर किती आहे या संबधिची माहिती त्या त्या उद्योगा कडून गोळा केली जाते अथवा इथेहि उद्योग प्रकारा प्रमाणे ठोकताळे लावून सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो. +उद्योग सांडपाणी प्रवाह +(लि/टन उत्पादन) +पेपर व पल्प २ ते ५ लाख +कापड उद्योग ब्लिचिंग १.८ लाख ते २. ७ लाख +कापड उद्योग डाइंग २५ हजार ते ५० हजार +दुध उत्पादने १० ते २० हजार +अल्कोहोल उत्पादने ५० ते ७५ हजार +[संपादन] प्रदुषण पातळि मापन +पाण्याचे प्रदुषण मोजणे हे त्या सांडपाण्याला साफ करयला कोणते तंत्रज्ञान वापरावे यासाठि महत्त्वाचे आहे. तसेच प्रदुषणाची पातळि कुठवर पोहोचली आहे हे देखील समजते. पाण्याचे प्रदुषण मोजण्यासाठि खास तंत्रे आहेत. या पैकि सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे पाण्याची जैविक ऑक्सिजन गरज ज्याला इंग्रजीत (Biological oxygen demand) अथवा बी.ओ.डी. असे म्हणतात व दुसरे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन गरज (Chemical oxygen demand) अथवा सी.ओ.डी. असे म्हणतात. हे दोन्हि दर्शक पाण्याची प्रदुषण पातळि दर्शवणारी मापदंडे आहेत. बी.ओ.डी म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतुना पाण्यातील प्रदुषक घटक विघटन करायला लागणार ऑक्सिजन. सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधिल एकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठि लागणारा ऑक्सिजन. ह्या दोन्हि पातळि मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात. बी.ओ.डी. व सी.ओ.डी. दोन्हि मोजायला वेगवेगळ्या पद्दति आहेत. बी.ओ.डी. मोजायला कमीत कमी ५ दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात मोजता येते. बी.ओ.डी. हे जैविक विघटन किती होउ शकेल याची नोंद देतो. तर सी.ओ.डी. प्रदुषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो. पाण्याचे प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठि तसेच प्रदुषण निकष ठरवण्यासाठि बी.ओ.डी. व सी.ओ.डी.चा वापर होतो. साधारण पणे सी.ओ.डी. १०० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदुषित आहे असे मानण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठि बी.ओ.डिची पातळि ० असलि पाहिजे. +[संपादन] प्राथमिक प्रक्रिया +[संपादन] द्वितीय स्तर प्रक्रिया +[संपादन] तृतीय स्तर प्रक्रिया +[संपादन] गाळाची विल्हेवाट +[संपादन] ऍनेरोबिक प्रक्रिया +[संपादन] इतर प्रक्रिया + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12555.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aa84633fccd6b155acfaf8ce7b5284c463018ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12555.txt @@ -0,0 +1,3 @@ +सांता क्रुझ काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नोगालेस येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,६६९ इतकी होती.[२] +सांता क्रुझ काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १५ मार्च, १८९९ रोजी झाली. या काउंटीत उगम पावणाऱ्या सांता क्रुझ नदीचे नाव यास दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12567.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d449437ea52b957c8c02bac743a0021aad78f8aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12567.txt @@ -0,0 +1,11 @@ +सांता क्लॉज (मराठी नामभेद: सँटा क्लॉज ; इंग्लिश: Santa Claus) हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे.[१] सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे.[२] +जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे.[३] +पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधीपासून या सणानिमित्त आयोजन सुरू होते. +सांता क्लॉज हा सेंट निकोलस, क्रिस क्रीनगल, नाताळ बाबा किंवा नुसताच संता अशा विविध नावांनी ओळखला जातो. चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत. त्यांच्यापासूनच सांता क्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा, असे मानले जाते.[४] ब्रिटिश आणि डच संस्कृतींमध्ये उदयाला आलेली "सांता क्लॉज" जी संकल्पनाही तेथूनच आलेली असावी. नाताळचा उगम प्राचीन पगान संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पगानच्या हिवाळी सणाशीही सांताचे नाते मानले जाते. +सांता क्लॉज ही व्यक्तिरेखा लाल रंगाचा आणि पांढरा फरचा पोशाख घालते. त्याला पांढरी लांब दाढी असते. वयस्कर रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा लावलेला असतो. पायात काळे बूट कमरेला काळा पट्टा, हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असे याचे रूप असते. १९व्या शतकात अमेरिका आणि कॅनडा मध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले.[५] +मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ ६ डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही सुरूच राहिली फक्त संत निकोलस यांच्या ऐवजी सांता क्लॉज असे नाव झाले आणि मुलांना भेटवस्तू देण्यासाठी नाताळची पूर्वसंध्या हा दिवस निवडला गेला.[८] +संत निकोलस आणि नाताळ बाबा (Father Christmas) या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन त्यातून सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा प्रचारात आली आहे असे मानले जाते. +थॉमस नास्त नावाच्या लेखकाने सांताक्लॉजचे घर ही नवी संकल्पना मांडली. उत्तर ध्रुवाच्या बर्फ़ाळ प्रदेशात सांताक्लॉजचे निवासस्थान आहे. जगभरातील हजारो मुले सांताक्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्रे पाठवीत असतात.[१०] आणि नाताळच्या रात्री बर्फ़ावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो ही कल्पना लहान मुलांच्या कथा, गाणी यामधून अधिक लोकप्रिय झाली. आपल्या हातातील घंटा वाजवत, मेरी ख्रिसमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत सांताक्लॉज येतो अशी काल्पनिक धारणा आहे.[११] +सांताक्लॉज या विषयावरील विविध पुस्तकेही लेखकांनी लिहिलेली आहेत.[१२][१३] +आपल्या निवासस्थानातून सांताक्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवितो.[१४] चित्रपट, मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांताक्लॉज व्यक्तीरेखेचे चित्रण केले जाते.[१५] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1259.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..347daf3bd48c540d43968f01ffb5874e7f44f342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1259.txt @@ -0,0 +1,3 @@ +विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार [१] व साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव शोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. +सत्यनारायणांनी लिहिलेल्या "वेयिपंगलु" या कादंबरीचा पी.व्ही. नरसिंहराव यांनी हिंदीत "सहस्रफण" या नावाने अनुवाद केला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12603.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a709e5107f1936c815848945c49149643e285c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12603.txt @@ -0,0 +1,223 @@ +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[१][२] +यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. +या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे. +इ.स. २०१४ चे सरासरी आकडे- +हा विमानतळ एर इंडिया यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स , विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. +मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते. +प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे. +२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला. +हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्‍ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे. +एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[३] विमानतळावरून ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[४] +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात. + +गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे. +विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[६] +नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत: +मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरूनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे. +भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्‍यात अनेक चीजवस्तू आहेत. +यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ] +यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12654.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c4d4218e756e6eb6858a6073668859853f7c19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12654.txt @@ -0,0 +1,2 @@ +सांबार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12689.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b22d43bc88c1596484642a1a462d13809a4d6fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12689.txt @@ -0,0 +1 @@ +भारद्वाज साई सुदर्शन (जन्म १५ ऑक्टोबर २००१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे,[१] जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू आणि आयपीएल मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12692.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ad5be39d163562b37ca459107ffc155f96fa73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12692.txt @@ -0,0 +1,2 @@ +साईखेडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12699.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5826e8bed4f24e34d95f2562b14155e29e8eed97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12699.txt @@ -0,0 +1 @@ +साईतेजा मुक्कामल्ला (९ एप्रिल, २००४:प्लेन्सबोरो, न्यू जर्सी, अमेरिका - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12716.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5334dacf89ea7dd89cd0f66c86159d88767c3cca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12716.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +साईस्नेह हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12727.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e055cc894854745e3e0a69ea33f695acc3f76528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12727.txt @@ -0,0 +1,19 @@ +साउथ एशियन फेमिनिझम हे जुबान प्रकाशनाने २०१२ साली प्रसिद्ध केलेले पुस्तक असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान येथे गेल्या चार दशकात स्त्रीवादी सिद्धांकनाची पुर्नमांडणी करणाऱ्या परंपरेतील लेखांचे पुस्तक आहे. हे पुस्तक अनिया लुम्बा[१] आणि रीट्टी अ. लुकोस यांनी संपादित केले आहे. +वसाहत काळानंतर दक्षिण आशियामधील स्त्रीवादी विचार आणि चळवळी यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. या प्रश्नांच्या चर्चेमधून अनेक दिशादर्शन झाले. अंतर्गत आणि सीमापार पसरत चाललेल्या धार्मिक मुलतत्त्ववादामुळे धोक्यात आलेले स्त्रियांचे स्वातंत्र्य, जागतिकीकरणामुळे स्त्रियांचे विस्थापन आणि त्यांच्या रोजगाराची झालेली विषमतापूर्ण पुर्नरचना आणि राष्ट्र आणि शासनाने वापरून बोथट केलेल्या स्त्रीवादी संज्ञा व संकल्पना अशा पर्यावरणातून स्त्रीवादी चळवळीने स्वतःला पुर्नघटीत केले. कायदाविषयक पुर्नरचनेच प्रचार – प्रसार आणि अधिकारांच्या लढाया या व अशा मुद्यांशी स्त्रीवादी चळवळीने थोड्या प्रमाणात अंतर निर्माण केले तर; वेश्या व्यवसाय, लैंगिक समानता, सैनिकीकरनाविरोधी व जागतिकीकरणामुळे निर्माण झलेल्या शोषक रोजगारांविरोधी अशा नव्या रचनांमुळे सिद्धांकन व चळवळी यामध्ये नवीन महत्त्वपूर्ण आंतरसंबंध निर्माण झाले. असाच आंतरसंबंध ‘दक्षिण आशिया’ आणि ‘पश्चिमी’/ ‘पाश्चिमात्य’ यातही निदर्शनास आला ज्यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. +या पुस्तकात १६ लेख असून ते ६ विभागांत विभागण्यात आले आहेत. +पहिल्या विभागात भारत आणि पाकिस्तानातील स्त्रीवादी सिद्धांकन व चळवळीपुढील धार्मिक मुलतत्त्ववाद आणि निधर्मीवाद (सेक्युलारीझम) यांच्या आव्हानांची चर्चा केली आहे. या विभागात फ्लेविया ॲग्नेस, अमिना जमाल आणि अमर्त्य सेन यांचे लेख आहेत. +फ्लेविया ॲग्नेस त्यांच्या फ्रॉम शाहबानू टू कौसरबानू या लेखात राज्याची संरचना आणि जमातीचे कायदेकानून यांना मुस्लिम स्त्रीस कसे तोंड देते? संस्कृती, धर्म, कायदा आणि राजकारणाचे तिच्या जीवनावर काय परिणाम होतात आणि अ सगळ्यांच्या विरोधाभासात ती कशी तगून राहते? राजकीय परिप्रेक्षात तिला नेहमी ‘बळी’ का समजले जाते? मुस्लिम स्त्रियांनी काही विरोध व स्वत्व दाखवले नाही का? आणि असल्यास ते का झाकले गेले? तिच्या जगण्या – तागण्याच्या लढाईत तिच्या सोबत आणि तिच्या विरोधात कोण आहेत? आणि मुख्यत: ‘जे’ व्यक्तिगत ते राजकीय या स्त्रीवादी चळवळीच्या घोषणेला तिचा प्रतिसाद काय आहे? या सर्व प्रश्नांवर चर्चा केली आहे. +अमिना जमाल यांच्या ‘ग्लोबल डिस्कोर्सेस सिच्यूएटेड ट्रेडिशन्स ॲण्ड वुमेन्स एजन्सी इन पाकिस्तान’ या लेखात पाकिस्तानातील धर्मनिरपेक्ष आणि इस्लामी स्त्रीवादी यांच्या भूमिका आणि त्यांचे परिणाम यांची सखोल चर्चा केली आहे.इस्लामी स्त्रीवादी कुराणाच्या अंगाने आपले स्वतःचे म्हणणे मांडतात. सबा मेहमूद, तलाल असद अशा काही स्त्रीवादी अभ्यासकांनी धर्मनिरपेक्ष आणि इस्लामिक स्त्रीवादातील विरोधाभास मांडले आहेत. परंतु लेखिका हे मानक पाकिस्तानी स्त्रियांना लावू इच्छित नाही. ‘आधुनिक’ आणि ‘श्रद्धाळू’ मुस्लिम स्त्रीवाद्यांच्या वेगवेगळ्या परंतु ठाम असलेल्या भूमिकांची चर्चा आणि त्यांचे परिणाम या लेखात मांडले आहे. +तिसरा लेख ‘मार्शल टेल, राईट – विंग हिंदू वुमेन, ॲण्ड ‘’हिस्ट्री टेलिंग” इन द बॉम्बे स्लम्स’ हा लेख अमर्त्य सेन यांनी लिहिलेला असून या लेखात त्यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये शिवसेनेच्या महिला आघडीच्या कार्यकर्त्या ऐतिहासिक कथांचा आधार घेऊन त्याही लढवय्या असल्याचे कसे अधोरेखित करतात याचा अभ्यास मांडला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक लोककथा. दंतकथा यातून स्त्रिया आपले सामुदायिक व्यक्तित्व कशा उभ्या करतात याचे दाखले देऊन कथाकथन हे हिंसा वाढवणारे कसे ठरते याचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पारंपारिक हिंदू स्त्रीच्या चौकटीतून त्या बाहेर पडल्या आहेत. +या दुसऱ्या विभागात भारत आणि श्रीलंकेतील नव्याने गठीत झालेल्या जागतिकीकरणामुळे स्त्रीवादासमोरील प्रश्नांचा उहापोह केला आहे. ‘ऑफ मोमेन्ट्स, नॉट मोमेन्ट्स: फेमिनिझम ॲण्ड लेबर ॲक्टीव्हीझम इन पोस्ट नॅशनल श्रीलंका’ या सोनाली परेरा लिखित लेखात श्रीलंकेतील वस्त्र उद्योगात असलेल्या स्त्रियांच्या लिखाणाबद्दल संशोधन केले आहे.१९७८ पासून श्रीलंकेमध्ये मुक्त व्यापारी झोन आहे, त्यामुळे तिथे व्यावसायिक संघटना बांधता येत नाहीत परंतू, या व्यावसायातील स्त्रियांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. या व्यावसायातील स्त्रियांचे म्हणणे मांडण्यासाठी काही एन.जी.ओ, सांस्कृतिक गट यांनी मिळून ‘द्बिंदू’ हे मुखपत्र सुरू केले त्यातील लिखाणातून या व्यावसायातील स्त्रिया आपले जीवन, व्यथा, संघर्ष शब्दांकित करतात. या लिखाणातून त्यांच्या श्रमाचा इतिहास हा त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासापेक्षाही जुना आहे हे अधोरेखित करतात. +फेमिनिझम, मायग्रेशन ॲण्ड लेबर या अनन्या भट्टाचारजीच्या लेखात स्थलांतरीत कामगारांच्या विशेषतः स्त्री कामगारांच्या संघटना बांधताना निर्माण होणारे सैधान्तिक, राजकिय आणि प्रत्यक्ष प्रश्न मांडले आहेत. स्त्रीवादी सिद्धांकन आणि वैयक्तिक अनुभव या दोन मानकांच्या आधारे लेखिका विषयाची मांडणी करते. स्थलांतरीत कामगारांना स्वतःची अशी ओळख नसते, ते नागरिक, मतदार, योजनांचे लाभार्थी इतकेच काय तर नव्या समुहाचे सदस्यही नसतात हो मुद्दा या लिखाणात प्रकर्षाने पुढे येतो. एच – २ बी व्हिसावर अमेरिकेत काम करायला जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानातील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांनाही स्थलांतरीतांचे हे प्रश्न भेडसावत असतात. +या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात वांशिक लढयांमुळे अस्थिर असलेल्या भूप्रदेशातील स्त्रिया, स्त्रीवाद, स्त्रीवादाची राजकीय व सामाजिक रूपे यांचा आढावा घेतला आहे. दक्षिण आशियातील असे दोन महत्त्वाचे भूप्रदेश म्हणजे श्रीलंका आणि काश्मीर. संयुक्त राष्ट्र संघाने २००० साली स्त्रिया, युद्ध आणि शांतता या विषयावर ठराव क्रमांक १३२५ मान्य केला. या विभागातील पहिल्या लेखात वासूकी नेसीह यांनी श्रीलंकेमध्ये चालू असलेल्या नागरी युद्धामध्ये तामिळ आणि सिंहली या दोन्हीही युद्धावर असलेल्या समुदायांमधील स्त्रियांची अवस्था आणि त्यांनी घेतलेले पुढाकार या विषयी विस्ताराने लेहिले आहे. ठराव १३२५ वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळ्या समुदायांमध्ये कसा राबवला जाती, त्याची राजकीय अंगे कोणती असतात आणि त्यासाठी अनेक नको असलेल्या तडजोडी कराव्या लागतात याचा गोषवारा या लेखात आहे. +श्रीलंकेवरील दुसऱ्या लेखात मालथी – दे- अल्विस यांनी नागरी युद्धाच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच पक्षिय राजकारणासाठी स्त्रियांच्या मातृत्वाचे राजकारण कसे केले गेले याचा आढावा घेतला. या आढाव्यात एल.टी.टी.ई आणि इतर राजकीय पक्षांनी मातृत्वाच्या प्रश्नावर उभे केलेले अस्मितेचे राजकारण ठळकपणाने दिसून येते. +अंगना चटर्जी काश्मीर बद्दल तिसऱ्या लेखात लिहिताना काश्मीरमध्ये काम करताना प्रत्यक्ष आलेले अनुभव लिहितात. काश्मीरमध्ये चाललेल्या दहशतवादी आणि भारतीय सैन्य पुरस्कृत हिंसाचाराचे भयाण चित्र तिच्या अनुभवातून उभे राहते. काश्मीरमधील जनता आणि विशेषतः स्त्रिया यांच्यावर या सतत चालू असलेल्या हिंसेचा सामाजिक व मानसिक परिणाम लेखिका स्वानुभवातून मांडते. +या चौथ्या विभागात वाङ्मयीन व ऐतिहासिक अवकाशात स्त्रीवादासमोर लमिया करीम ‘ट्रान्सनॅशनल पॉलिटिक्स ऑफ रिडींग ॲण्ड द (अन) मेकिंग ऑफ तस्लिमा नसरीन या लेखात तस्लिमा नसरीन यांच्याकडे स्त्रीवादाचे प्रतिक म्हणून आणि त्याचवेळी धर्म बुडवी म्हणून पाहिले जाते या विषयी लिहिले आहे. तस्लिमा नसरीन यांना आणि त्यांच्या लिखाणाला त्यांच्या देशातील स्त्रीवाद्यांचा पाठिंबा नाही आणि भारतात मात्र त्यांच्याविषयी आदराची भावना आहे, हे असे का आहे याचा शोध या लेखात घेण्यात आला आहे. +‘ॲट द इंटरसेक्शन ऑफ जेंडर ॲण्ड कास्ट’ या दुसऱ्या लेखात लॉरा ब्रुक या साहित्यातील विशेषतः हिंदी कथांमधील ‘बलात्कार’ कसा लिहिला जातो आणि त्यच्या भाषेतून काय सांगितले जाते याचे विश्लेषण करतात. या विषयावर साहित्यिक आणि स्त्रीवादी यांच्यामध्ये झालेल्या चर्चांचा सारांशही त्या देतात. पुढे दलित महिलांच्या निवेदनातून मात्र वेगळा आशय पुढे आल्याचे निरीक्षण त्या नमूद करतात यासाठी त्या मंगली, अंगारा अशा कथांचे उदाहरण देतात. +या विभागातील तिसऱ्या लेखात ‘सब्जेक्ट टू सेक्स’ हा लेख अंजली आरोंदेकर यांनी लिहिला असून १९२७ साली स्थापन झालेल्या गोमंतक मराठा समाज या देवदासींच्या धर्मादाय न्यासाच्या अनुशंगाने या लेखात लेखिकेने १९१८ सालापासून माहित असलेल्या आणि स्वातंत्र्यपुर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या देवदासी प्रथा आणि समाजाबद्दल तौलानिक अभ्यास मांडला आहे. +या पाचव्या विभागात वेश्या व्यवसायातील स्त्रियांचे संघटन बांधताना उभे राहिलेले प्रश्न आणि घडामोडींचा इतिहास विचारात घेतला आहे. यातील पहिला लेख ‘किपिंग सेक्शुआलीटी ऑन द अजेंडा’ हा फिरदोस अजीम यांनी लिहिला आहे. १९९० साली बांग्लादेशात वेश्या व्यवसायाला लैंगिक श्रमाचा दर्जा देण्यासाठी झालेल्या चळवळीचे यश – अपयश आणि त्या अनुशंगाने निर्माण झालेले मानवाधिकार व नागरिकत्वाचे अधिकार या घडामोडींचा आढावा या लेखात घेतला आहे. +‘पॉलिटिसायझिंग पॉलिटिकल सोसायटी’ हा कलकत्यातील सोनागाची परिसरात असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीयाच्या ‘दुरबार’ या संघटनेविषयी तुरजो घोष यांनी लिहिलेला लेख आहे. दुरबार या संघटनेमुळे एक व्यवस्थित, टिकाऊ आणि मोठे प्रभाव क्षेत्र असलेली संघटना राजकीय दृष्ट्या कार्यान्वित आहे. याचे फायदे सभासदांना मिळतात परंतू, अशा प्रकारच्या रचनांमध्ये काही धोकेही असतात. उदा. योग्य प्रतिनिधित्व न मिळणे, जाणिव – जागृती झाल्याचा आभास असणे ई. शिवाय अशा प्रकारची संस्था सहजतेने शासकीय किंवा राजकीय व्यवस्थेचा भाग होऊ शकते या सर्व प्रश्नांचा मागोवा या लेखात घेण्यात आला आहे. +‘क्विरिंग अप्रोचेस टू सेक्स’ हा अश्विनी सुखटनकर यांनी लिहिलेला असून वेश्या व्यवसायातील कामगार संघटना उभारणे, त्या उभारताना अधिकारांचे, श्रमाचे सिद्धांकन करणे या अवकाशात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची चर्चा केली आहे. मुंबईतील भारतीय बार गर्ल असोशिएशन, कलकत्यातील सोनागाची, बंगलोरमधील हिजडे आणि कोती यांची संगमा ही संघटना यांची उदाहरणे घेऊन विविध प्रश्नांना कसे हाताळले गेले आणि वेश्या व्यवसाय निर्मुलन करू इच्छीणाऱ्या दबाव गटांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाची नोंद यात घेतली आहे. +या सहाव्या विभागात स्त्रीवादी सैद्धांतिक काम उभे करण्यासाठी दक्षिण आशिया हा विभाग निवडल्यामुळे निर्माण झालेल्या शक्यता आणि मर्यादा यांची चर्चा केली आहे.हेक्लर्स टू पॉवर: द वानिंग ऑफ लिबरल राईट्स ॲण्ड चॅलेंजेस टू फेमिनिझम इन इंडिया या लेखात रत्ना कपूर भारतातील स्त्रिवादापुढील आव्हानांची चर्चा करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12747.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33f1b3ea97760f5851bbd62188bf644fb98f34c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12747.txt @@ -0,0 +1,5 @@ +साउथ हॉलंड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. शिकागोचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २२,०३० होती. +१८४६ च्या सुमारास नेदरलँड्सच्या झुइडहॉलंड भागातून आलेल्या लोकांनी येथे वसाहत केली व त्यास आपल्या मूळ प्रदेशाचे नाव दिले. १८९४ साली १,००० लोकवस्तीसह येथील नगरपालिकेची स्थापना झाली. +अमेरिकेतील आय-९४, आय-९० आणि आय-८० या महामार्गांचा तिठा या शहरात आहे. +साउथ हॉलंडने आपल्या स्थापनेच्यावेळी असलेले धार्मिक कायदे आजतगायत बाळगलेले आहेत. या शहराचे घोषवाक्य चर्चांचे शहर असे आहे. येथील सगळी दुकाने व उद्योगधंदे रविवारी बंद ठेवण्यात येतात. फक्त उपाहारगृहे, पेट्रोलपंप, हॉटेल, इ.ना रविवारी धंदा करण्यास मुभा आहे. साउथ हॉलंड कोरडे शहर असून संपूर्ण शहरात मद्यविक्रीस मनाई आहे. शहरात रतिचित्रण असलेले चित्रपट व इतर साहित्य विकण्यास किंवा भाड्याने देण्यास मनाई आहे. दूरचित्रवाणीसेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना या अटीवरच शहरात प्रसारण करण्यास परवानगी दिली जाते. शहरात कोठेही बहुमजली इमारती बांधण्यास मनाई असून सगळी नवीन घरटी एककुटुंबीयच असली पाहिजेत असा नियम आहे. +सुरुवातीस जरी डच लोकांनी हे शहर वसवले असले तरी २०१० च्या सुमारास येथील बहुसंख्य वस्ती कृष्णवर्णीय अमेरिकनांची (७३.८%) होती. १८.३% श्वेतवर्णीय लोक असून उरलेले इतरवंशीय होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12749.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83bc32c08b786f40f16a7530eeca7b853d6213eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12749.txt @@ -0,0 +1,3 @@ +साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या कराची शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१ डिसेंबर १९९३ रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर +२४ ऑक्टोबर २००८ रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला आणि ३० सप्टेंबर २०१५ रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1277.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3a41dd3a6adb39b4e2910dd8b3c67ff63a00d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1277.txt @@ -0,0 +1,6 @@ +२१व्या शतकात चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरात जे सप्तर्षी सांगितले आहेत, त्यांपैकी एक विश्वामित्र आहे. बाकीचे सहा - अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज व वसिष्ठ. +विश्वामित्रांनी खूप कडक तपश्चर्या केली, पण त्यांना ब्रह्मर्षी मिळू शकले नाही. महर्षिपद पदावर त्यांना समाधान मानावे लागले. +एका तप पूर्ण झाल्यावर विश्वामित्रांना खूप भूक लागली. खायला दुसरे काहीच न मिळाल्याने, त्याने मेलेल्या कुत्र्याची तंगडी चोखली.[ संदर्भ हवा ] +विश्वामित्रांच्या तपश्चर्येला घाबरून इंद्राने त्याच्या तपभंगासाठी मेनका अप्सरेला पाठवले. तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतला (कन्या) झाली. +विश्वामित्रांनी त्यांच्या तपोबलाच्या जोरावर त्रिशंकुला सदेह स्वर्गाला पाठवण्याचा बेत केला. इंद्राने तो हाणून पाडला. त्याला उत्तर म्हणून, अंतराळात ज्या ठिकाणी त्रिशंकू लटकत होता, त्याच्या आसपास विश्वामित्रांनी नवी सृष्टी, नवा स्वर्ग निर्माण केला. मात्र, तेथे नवा इंद्र निर्माण करायचा त्याचा प्रयत्न देवांनी विफल केला. हा त्रिशंकू अजूनही आकाशात एका ताऱ्याच्या रूपात लटकत आहे. इंग्रजीत या ताऱ्याला Crux म्हणतात. त्रिशंकुला The Upside Down King असेही म्हणतात. +त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत. भारतातील राज्याामध्ये किंवा परदेशातल्या एखाद्या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण होते. इंग्लंडमध्ये २०१० साली अशी स्थिती आली होती; भारतात अनेकदा होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12783.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2632402d60a754e00414a812772d627aa0fa5410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12783.txt @@ -0,0 +1 @@ +साएब सलाम (अरबी: صائب سلام‎‎; १७ जानेवारी १९०५ - २३ जानेवारी २०००) हा लेबेनॉन देशामधील एक राजकारणी व १९५२ ते १९७३ सालांदरम्यान सहा वेळा लेबेनॉनचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12788.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceffcdcc71970afd9fa02eea136fd7d868ff8f53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12788.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनाऱ्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12796.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f12005fd3be4c651e82f7d04d76d88f746e1ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12796.txt @@ -0,0 +1 @@ +साओ पाउलो फुटबॉल क्लब हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला साओ पाउलो ब्राझील फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना १९३०मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12797.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c0f4f0ac1627e45c93ae29262dc4a6ba943d9f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12797.txt @@ -0,0 +1 @@ +साओ पाउलो कला संग्रहालय (पोर्तुगीज: Museu de Arte São Paulo ;) हे ब्राझील देशातील साओ पाउलो येथील मोठे कला संग्रहालय आहे.[१][२] लॅटिन अमेरिकेतील हे प्रसिद्ध संग्रहालय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12814.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..369621a0de6de43e3d269efdfc990430b2f62dca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12814.txt @@ -0,0 +1,2 @@ + साकरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12819.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d818a509c2904f65c31435313fde0fae4fa2546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12819.txt @@ -0,0 +1,2 @@ + साकरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12873.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be0d32b4b583996dc2869f29406bff78cbb6fd85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12873.txt @@ -0,0 +1,57 @@ +गुणक: 38°33′20″N 121°28′8″W / 38.55556°N 121.46889°W / 38.55556; -121.46889 + +सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोऱ्याच्या उत्तर +अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले सॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे. +साक्रामेंटो किंग्ज हा एन.बी.ए. संघ येथील सर्वात मोठा व्यावसायिक संघ आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12875.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be0d32b4b583996dc2869f29406bff78cbb6fd85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12875.txt @@ -0,0 +1,57 @@ +गुणक: 38°33′20″N 121°28′8″W / 38.55556°N 121.46889°W / 38.55556; -121.46889 + +सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोऱ्याच्या उत्तर +अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले सॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे. +साक्रामेंटो किंग्ज हा एन.बी.ए. संघ येथील सर्वात मोठा व्यावसायिक संघ आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12885.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a421756d6d29b22962e6d3d3d30d024ef97447c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12885.txt @@ -0,0 +1 @@ +साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरता ही दोन प्रकारे व्यक्त केली जाते कार्यिक साक्षरता या स्वरूपात , म्हणजे साक्षरतेचा वापर शिकलेल्या लिपीचा वापर व्वोविध कामकाजात करणे आणि अभिजन साक्षरता म्हणून आपले मत व्यक्त करणे, अन्वयार्थ लावणेसाठी . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12892.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddebd0ea046f39c01bc68800cec019a203eb7f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12892.txt @@ -0,0 +1,8 @@ + साखर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_129.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..794fc01b1ebf1e6f1a9029be6cd9f8d5ef0e80a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_129.txt @@ -0,0 +1,4 @@ +विन्स्लो (लोकसंख्या: ९,८३२) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक गाव आहे. +ईगल्स या संगीतसमूहाच्या टेक इट ईझी या गाण्यातील उल्लेखाने या गावाला प्रसिद्धी मिळाली. + +गुणक: 35°1′43″N 110°42′3″W / 35.02861°N 110.70083°W / 35.02861; -110.70083 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12904.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3a0ee2b99a153bdc4adff7bd94685934a87cea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12904.txt @@ -0,0 +1,9 @@ +कैरी किंवा आंब्याच्या फोडींना साखरेच्या पाकात मुरवून केलेल्या खाद्यपदार्थास साखरआंबा म्हणतात. + +१वाटी कैरीचा कीस +२ ते ३ वाट्या साखर +१चमचा वेलचीपूड +चमचाभर तूप +५ ते ६ लवंगा +छोटा दालचिनीचा तुकडा +कैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .साखरआंबा तयार . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1291.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84be1f34180463d96cb5e10dd8c15dfa26e98614 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1291.txt @@ -0,0 +1,2 @@ +विश्वास रघुनाथ पाटील (१३ नोव्हेंबर, इ.स. १९२८-१२ डिसेंबर, इ.स. २००२) हे एक मराठी लेखक होते.[१] +पाटील, विश्वास. फ्रेडरिख नित्शे जीवन आणि तत्त्वज्ञान. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12916.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed4ee1ad76ccb3ebbd80dfdc901b3721265d605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12916.txt @@ -0,0 +1,18 @@ +साखरशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळीरस्ता आणि नंतर साखरशेत रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे फार मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४९० कुटुंबे राहतात. एकूण २२६९ लोकसंख्येपैकी ११३८ पुरुष तर ११३१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.७२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.५५ आहे तर स्त्री साक्षरता ५४.६१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.७८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +बारावडपाडा, ओझर, मेढा, तलासरी, खंबाळे, दाधारी, जांभुळमाया, वांगणी, माळघर, दादरकोपरापाडा, उंबरखेडा ही जवळपासची गावे आहेत.साखरशेत ग्रामपंचायतीमध्ये साखरशेत आणि उंबरखेडा गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12923.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce7e4c3f9d22c36dcba3f9b16d1765d22e123aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12923.txt @@ -0,0 +1,2 @@ + साखरा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12924.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3a0ee2b99a153bdc4adff7bd94685934a87cea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_12924.txt @@ -0,0 +1,9 @@ +कैरी किंवा आंब्याच्या फोडींना साखरेच्या पाकात मुरवून केलेल्या खाद्यपदार्थास साखरआंबा म्हणतात. + +१वाटी कैरीचा कीस +२ ते ३ वाट्या साखर +१चमचा वेलचीपूड +चमचाभर तूप +५ ते ६ लवंगा +छोटा दालचिनीचा तुकडा +कैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .साखरआंबा तयार . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13001.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cca838e7f11bc675e37d3b19a9032fd6e3778da --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13001.txt @@ -0,0 +1,8 @@ + सागरतिर्थ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13022.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ac6ad43816b0e561cea3608dd1c56c8bfe61519 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13022.txt @@ -0,0 +1 @@ +सागवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13026.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..791d95583240af9230d1a86be542d854d1866bfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13026.txt @@ -0,0 +1,3 @@ +सागा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे. +सागा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे. +गुणक: 33°17′N 130°10′E / 33.283°N 130.167°E / 33.283; 130.167 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1303.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbdd207507ec4f9860fa42255b5c72d43aad7b5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1303.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (लघुनाव: व्हीएनआयटी; पूर्वीचे नाव: विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग) ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतामधील ३१ स्वायत्त राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. +या संस्थेचा परिसर, नागपूरच्या पश्चिमेस असलेल्या अंबाझरी तलावाजवळ आहे. याचा विस्तार सुमारे २२० एकर आहे. या संस्थेच्या परिसरास तीन प्रवेशद्वार आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13045.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..586be286aa3b6e55d9318cfb5b898b020560da1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13045.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचिया व्हिकेरी (११ मे, १९९५:हॉलिवूड, फ्लोरिडा, अमेरिका - ) ही अमेरिकेची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते. +व्हिकेरीची आई मूळची गयानाची असून वडील अमेरिकन आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13047.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b851b8a79ef4dc3a10de7cb9b304dd0d78504296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13047.txt @@ -0,0 +1,29 @@ +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + +साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. विकिपीडियावर काही संदेश अथवा सारखी माहिती वारंवार वापरावी लागते. असे संदेश व माहितीसाच्यात घातल्यास ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो. इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात. +हा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो. साचा पाने इतर पानात वापरता येतात त्यामुळे साचा पानातील माहिती इतर एक किंवा अनेक पानात एकाच वेळी प्रतिबिंबीत[१] होते. +साचांचा उपयोग विविध पानात विविधपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नाव हा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा. अर्थात वर दिलेल्या साच्याचा वाक्यातील उपयोग उदाहरणादाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साच्याचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलला तर वाक्यातील 'अर्थाचा अनर्थ' होण्याची भिती असते. +साचा:helpme हेसुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे. तांत्रीक अडचणीबद्दल मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्याकरता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो. +नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्ग:साचे येथे एकत्रित केले आहेत. +[[साचा:साच्याचे नाव]] असे लिहा. +(साचा बनवताना साचा पुढे अर्धविरामाचे : हे चिन्ह वापरून साचाचे नाव लिहावे.: चिन्ह चूकीने विसर्गाचे चिन्ह बनले तर साचा बनत नाही म्हणून आपण मराठी सॉफ्ट्वेअर वापरत असाल तर मराठी बंद करून इंग्रजीत या चिन्हाचा वापर करून पुन्हा मराठीत वापस जा.) +किंवा +{{साच्याचे नाव}} याप्रमाणे दुहेरी महिरपी कंसात साच्याचे नाव लिहावे (महिरपी कंसात साचा हा शब्द लिहू नये) असा साचा आपल्याला हव्या असलेल्या विवीध सुयोग्य लेखात एकाच वेळी वापरता येतो. +साधारणतः लेखातील शिर्षकाच्या भागात वाचकांना सूचना, संदेश देण्याकरीता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वेकरुन साच्याचा वापर केलेला आढळतो. +साचा पद्धतीचा उपयोग विकिपीडियातील इंग्रजी सॉफ्ट्वेअर मधील सुचना मराठी किंवा संबंधीत भाषेत दिसाव्यात म्हणून पण केला जात असे. अर्थात, सध्याच्या पद्धतीत हीच संकल्पना MediaWiki नामविश्वाच्या स्वतंत्र स्वरूपात वापरली जाते. +माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन साच्यांमध्ये तक्ते,सारणी (टेबल्स) चा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामूळे साचे बनवितांना सारणी कशी बनवावी हे शिकून घेणे उपयूक्त ठरते. +काही साचे अधिक तांत्रिक कौशल्य वापरून बनवलेले तसेच त्यांचा प्रभाव विवीध पानात/लेखात सर्वदूर पडत असल्यामुळे आधी पासून अस्तीत्वात असलेल्या साचांमध्ये दुरुस्त्या करतांना अधीक काळजी घेण्याची आवश्यकता असते.येथे काय जोडले आहे आणि साच्याच्या आत इतर कोणते साचे आहेत , काही एच.टी.एम.एल. लिखाण आहे का?, सारणी नेमकी कशी बनलेली आहे या सर्वांचा दूरूस्ती करण्यापुर्वी सवीस्तर विचार करावा लागतो. आपण नवीन किंवा विकिपीडिया संपादनांच्या बाबतीत अननुभवी असाल तर जुन्या साच्यांमध्ये बदल स्वतः करण्यापेक्षा तशी विनंती चर्चा पानावर करणे अधिक सयुक्तीक ठरू शकते. +साचा पान हे विकिपिडीयाकरिता वापरल्या जाणार्‍या मेडियाविकि प्रणालीत आंतर्न्यास पद्धतीने दुसर्‍या पानांमध्ये भरण्याकरीता वापरलेले पान असते. हि विकिची उपपरिपाठ/उपशिरस्ता (सबरूटीन) सुविधा #इनक्लुड स्टेटमेंट किंवा मॅक्रो सदृश्य असते.बदली/ऐवजी मुळे साचा मॅक्रो सुविधा म्हणून वापरणे शक्य होते.प्रगत साचे हा लेख इंग्रजी विकिपीडियावर अभ्यासून शक्य असेल तर मराठीत भाषांतरीत करा. +सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्गीकरण करून येथे एकत्रित केले आहेत. +साच्यांवर काम करण्यासाठी विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्याला आपण हातभार लावू शकता. +विकिपीडियावर संवाद साधताना विविध साचे वापरता येतात. काही साचे हे केवळ विशिष्ट लेखांतच वापरता येतात. उदा. शहर साचा केवळ शहरांवरील लेखांत वापरता येईल, इतरत्र नाही. पण काही साचे अनेक वेळा वापरले जातात. +साच्यांचा वापर लेखातील बहुधा शीर्षकाच्या भागातच वाचकांना विषयाचा थोडक्यात परिचय करून देण्याकरिता होतो. त्याशिवाय साच्याचा वापर तळटिपा, माहिती चौकटी , मार्गक्रमण, सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यांतही केला जातो. असे साचे केव्हा वापरावेत ही माहिती खाली दिली आहे. +मला मदत हवी आहे! +मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा + + +हा लेख 18 महिन्यां पूर्वी सदस्य:Usernamekiran (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +सूचना: येथे तुमची सूचना दिसेल + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13079.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d131f8dd995dcab8b82a5396649fb029c6d751 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13079.txt @@ -0,0 +1,2 @@ +६०-साठ  ही एक संख्या आहे, ती ५९  नंतरची आणि  ६१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 60 - sixty. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13085.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558042234ce1bd87fae3cbdf2c5ba38d9e79dd5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13085.txt @@ -0,0 +1 @@ +मी, वसंत साठे (शब्दांकन चिंतामणी भिडे) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13090.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13090.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13095.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcc4a91d865d85bc358be282371633b4d40822f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13095.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेत: +हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. तर +हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.[१] +[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13098.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcc4a91d865d85bc358be282371633b4d40822f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13098.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेत: +हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. तर +हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.[१] +[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13161.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f1df0d86451f210ddfd6897dfb98cb2dc79e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13161.txt @@ -0,0 +1,22 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +सातवाहन (मराठी: सातवाहन साम्राज्य ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले पशुपालक राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. +इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून असल्याचे पैठण येथील मिळालेल्या नाण्यावरून त्याची ओळख पटते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा आधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वाशिष्टीपुत्र पुळूमावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. सातवाहन हे बौद्ध धर्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते. सातवाहन हे बौद्ध धर्मीय मरहट्ट (महारथी ; आजचे महार) असल्याचे नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होते. त्यांनी बौद्ध स्तुपांसाठी आर्थिक मदत केल्याचेही आढळते. नाशिकच्या पांडवलेणी मध्ये गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने म्हणजेच माता बलश्रीने शिलालेख कोरून घेतला आहे, ज्यात गौतमीपुत्र सातकर्णीनी क्षत्रप(शक) यांना हरवून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अबाधित ठेवली असा स्पष्ट उल्लेख आढळतो. आणि त्या काळात राज्यव्यवस्था सूत्र क्षत्रिय सांभाळत असत. मराठा समाजातील साळवे हे कूळ सातवाहनांचेच वंशज आहे असं माहितीतून समोर येत. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली +सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ४६० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता महाराष्ट्राट गोदावरीच्या खोऱ्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली आणि नंतर दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पसरली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे +कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारताच्या पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरूनच पडलेली आहेत, यावरून या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरून बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. +बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली. +पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. +सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जुन्नर जिल्हा पुणे येथील नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे. +नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात : +हे अतिशय समृद्ध असे राज्य होते. +महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो. +सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून कण्वाची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती. +सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली. +सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती. +अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणाऱ्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते. + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13193.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b2930deaeb161065920c1ed8d560901149390f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13193.txt @@ -0,0 +1,2 @@ + साताळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13194.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..240f01d16d5cd2197a1fe9e7eeca8e6cd78d015c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13194.txt @@ -0,0 +1,2 @@ +साटाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13235.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bcbc2ad399a551b5da4aba1b3bddd0bd24855d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13235.txt @@ -0,0 +1,2 @@ +सात्रेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13248.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872b6ebe8b0e605def4f1db6c43fd0ef2e1fd3a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13248.txt @@ -0,0 +1 @@ +साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13310.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e09763f57332d761c72d12c06d1d3f06a73cadd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13310.txt @@ -0,0 +1,2 @@ +सान अँटोनियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SAT, आप्रविको: KSAT, एफ.ए.ए. स्थळसूचक: SAT) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सान अँटोनियो शहराचा विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13315.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ab77c324e321cae64492c4db462bd7aa7129f5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13315.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 29°32′01″N 98°28′11″W / 29.53361°N 98.46972°W / 29.53361; -98.46972 + +सॅन अँटोनियो हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १३.२७ लाख वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. मध्य टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते. +येथील अलामो हा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. +सॅन अँटोनियो शहर टेक्सासच्या मध्य-दक्षिण भागात १,०६७.३ वर्ग किमी एवढ्या क्षेत्रफळाच्या भागावर वसले आहे. +दक्षिण अमेरिकेमधील इतर भागांप्रमाणे येथील हवामान देखील उष्ण व रुक्ष आहे. +२०१० सालच्या जनगणनेनुसार सॅन अँटोनियोची लोकसंख्या १३,२७,४०७ इतकी होती जी २००० सालच्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे. टेक्सासमधील इतर शहरांप्रमाणे येथे देखील मेक्सिकन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत. +सॅन अँटोनियो स्पर्स हा एन.बी.ए. संघ सॅन अँटोनियोमधील प्रमुख व्यावसायिक संघ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13333.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4b01be9c3afd5545ad61e90325326f3eb479ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13333.txt @@ -0,0 +1,2 @@ +'सान फ्रांसिस्को जायंट्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एटीअँडटी पार्क या मैदानात खेळले जातात. +या संघाची स्थापना १८८३मध्ये न्यू यॉर्क शहरात न्यू यॉर्क गॉथॅम्स नावाने झाली. तीन वर्षांनी या संघाने न्यू यॉर्क जायंट्स नाव घेतले व १९५३मध्ये हा संघ सान फ्रांसिस्कोला आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13348.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2ca9a5cd02e018cbc8f54f731a8483b619d4d9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13348.txt @@ -0,0 +1,2 @@ +सान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे. +येथे यूट्यूबचे मुख्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13378.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1566cdc9eefcb6b9108b841ea58fe71c5dd4b176 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13378.txt @@ -0,0 +1,36 @@ +सान लुइस पोतोसी (संपूर्ण नाव:सान लुइस पोतोसीचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de San Luis Potosí) हे मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागातील एक राज्य आहे. सान लुइस पोतोसी ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्सचा राजा नववा लुई ह्याचे नाव ह्या राज्याला व शहराला देण्यात आले आहे. +मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात ६०,९८३ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १५व्या क्रमांकाचे मोठे आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13428.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..956c99fcce1274097f5bf03e89530f3a085302ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13428.txt @@ -0,0 +1,12 @@ +सानपाडा हे नवी मुंबई शहराच्या सानपाडा नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1344.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff61d96e8d3f8fdf538ee4d802c700913fea9353 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1344.txt @@ -0,0 +1,37 @@ +विष्णु पुराण (IAST:Viṣṇu purāṇa, संस्कृत: विष्णुपुराण) हे अठरा महापुराणांपैकी एक आहे, हिंदू धर्माच्या प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथांचा एक प्रकार आहे. वैष्णव साहित्यातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. +विष्णु पुराणातील हस्तलिखिते आधुनिक युगात अनेक आवृत्त्यांमध्ये टिकून आहेत. इतर कोणत्याही प्रमुख पुराणांपेक्षा, विष्णू पुराणात त्याची सामग्री पंचलक्षण स्वरूपात सादर केली जाते - सर्ग (विश्वविज्ञान), प्रतिसर्ग (विश्वविज्ञान),वंश (देव, ऋषी आणि राजांची वंशावली), मन्वंतर (वैश्विक चक्र), आणि वंशानुचरितम (विविध राजांच्या काळातील कथा) असे ,मजकुराच्या काही हस्तलिखितांमध्ये इतर प्रमुख पुराणांमध्ये आढळणारे महात्म्य आणि तीर्थयात्रेवरील सहल मार्गदर्शन या सारख्या विभागांचा समावेश न केल्यामुळे उल्लेखनीय आहेत,परंतु काही आवृत्त्यांमध्ये मंदिरांवरील अध्याय आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या प्रवास मार्गदर्शकांचा समावेश आहे. 1840 मध्ये एच.एच.विल्सन यांनी अनुवादित केलेले आणि प्रकाशित केलेले सर्वात जुने पुराण म्हणूनही हा मजकूर उल्लेखनीय आहे, त्यानंतर उपलब्ध हस्तलिखितांवर आधारित, पुराण काय असावेत याविषयीचे अनुमान आणि त्या काळातील परिस्थिती व परिसर दर्शविते. +विष्णु पुराण हे लहान पौराणिक ग्रंथांपैकी एक आहे, ज्यात सुमारे 7,000 श्लोक आहेत. हे प्रामुख्याने हिंदू देव विष्णू आणि कृष्णासारख्या त्याच्या अवतारांभोवती केंद्रित आहे, परंतु ब्रह्मा आणि शिव यांची स्तुती करते आणि ते विष्णूवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन करते. विल्सन सांगतात की, पुराण हे सर्वधर्मीय आहे आणि त्यातील कल्पना, इतर पुराणांप्रमाणेच, वैदिक विश्वास आणि कल्पनांवर आधारित आहेत. +विष्णु पुराण, सर्व प्रमुख पुराणांप्रमाणे, त्याचे लेखक वेद व्यास ऋषी असल्याचे श्रेय देते. वास्तविक लेखक आणि त्‍याच्‍या रचनेची तारीख अज्ञात आणि विवादित आहे. त्याच्या संरचनेचा अंदाज 400 BCE ते 900 CE पर्यंत आहे. हा मजकूर बहुधा कालांतराने अनेक थरांमध्ये रचला गेला आणि पुन्हा लिहिला गेला, ज्याचे मूळ कदाचित प्राचीन १ल्या सहस्राब्दी बीसीई ग्रंथांमध्ये आहे जे आधुनिक युगात टिकले नाहीत. पद्म पुराणात विष्णू पुराणाचे वर्गीकरण सत्व पुराण (पुराण जे चांगुलपणा आणि शुद्धतेचे प्रतिनिधित्व करते) असे केले जाते. + + +विष्णु पुराणाची रचना तारीख अज्ञात आणि विवादित आहे, अंदाज मोठ्या प्रमाणात असहमत आहेत. विविध विद्वानांनी विष्णू पुराणाच्या सुरुवातीच्या आवृत्तीसाठी काही प्रस्तावित तारखा [टीप 1] समाविष्ट केल्या आहेत: +व्हिन्सेंट स्मिथ (1908): 400-300 BCE +सीव्ही वैद्य (1925): ~9वे शतक, +मोरिझ विंटर्निट्झ (१९३२): शक्यतो पहिल्या सहस्राब्दीच्या प्रारंभी, परंतु रोचर म्हणतात, "इतर कोणत्याही पुराणापेक्षा विष्णू पुराणाला निश्चित तारीख देणे आता शक्य नाही". +राजेंद्र चंद्र हाजरा (1940): 275-325 CE +रामचंद्र दीक्षितर (1951): 700-300 BCE +रॉय (1968): 9व्या शतकानंतर. +होरेस हेमन विल्सन (१८६४): यांनी हे मान्य केले की परंपरेनुसार हा बीसीई 1ल्या सहस्राब्दीचा मजकूर आहे आणि मजकुराचे मूळ वैदिक साहित्यात आहे, परंतु त्याच्या विश्लेषणानंतर असे सुचवले गेले की विद्यमान हस्तलिखिते 11 व्या शतकातील असू शकतात. +वेंडी डोनिगर (1988): सी. 450 CE +सध्याच्या मजकुरात सहा अंश (भाग) आणि १२६ अध्याय यांचा समावेश आहे. पहिल्या भागात 22 प्रकरणे, दुसऱ्या भागात 16 प्रकरणे, तिसऱ्या भागात 18 प्रकरणे आणि चौथ्या भागात 24 प्रकरणे आहेत. पाचवा आणि सहावा भाग मजकूराचा सर्वात लांब आणि सर्वात लहान भाग आहे, ज्यात अनुक्रमे 38 आणि 8 अध्याय आहेत. +मूळ विष्णू पुराणात 23,000 श्लोक आहेत, परंतु हयात असलेल्या हस्तलिखितांमध्ये यापैकी फक्त एक तृतीयांश म्हणजे सुमारे 7,000 श्लोक आहेत असा दावा मजकूर परंपरेने केला आहे. मजकूर मेट्रिक श्लोक किंवा श्लोकांमध्ये बनलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक श्लोकात 32 अक्षरे आहेत, त्यापैकी 16 अक्षरे प्राचीन साहित्यिक मानकांनुसार मुक्त शैली असू शकतात. +विष्णू पुराण हा एक अपवाद आहे कारण त्यात ते विष्णू पूजाशी संबंधित पंचलक्षाना स्वरूपात सादर करते- सर्ग(कॉसमोगोनी), प्रतिसर्ग (कॉस्मोलॉजी), वंश (देवता, ऋषी आणि राजे),मानवांतर (कॉस्मिक सायकल्स) आणि वंशानुचरितम् (विविध राजांच्या काळातील कथा) . +विष्णु पुराणाची सुरुवात, ऋषी मैत्रेय आणि त्यांचे गुरु, पराशर यांच्यातील संभाषणाने होते, ऋषी विचारतात , "या विश्वाचे आणि त्यातील सर्व घटकांचे स्वरूप काय आहे ?" +विष्णु पुराणातील पहिला सर्ग (भाग) ब्रह्मांडाची उत्पत्ति , देखभाल आणि लय अर्थात नाश यांच्याशी संबंधित विश्वविज्ञान प्रस्तुत करते.[36] रोचर म्हणतात, पौराणिक कथा हिंदू तत्त्वज्ञानाच्या सांख्य दर्शनाशी संबंधित अनेक सिद्धांतांनी विणलेल्या असतात. +इतर काही पुराणांमध्ये, जसे कि शिव किंवा ब्रह्मा किंवा देवी शक्ती यांना महत्त्व दिले जाते. +हिंदू देवता विष्णू यांस या ग्रंथातील विश्वविज्ञानाचा मध्यवर्ती घटक म्हणून प्रस्तुत केले गेले आहे. हरी, जनार्दन, माधव, अच्युत, हृषिकेश आणि इतर सारख्या विष्णूच्या समानार्थी नावांच्या विपुल वापरासह, पहिल्या भागाच्या 22 अध्यायांमध्ये विष्णूचा आदर आणि उपासना मुक्तीचे साधन म्हणून वर्णन केले आहे. +विष्णु पुराणातील अध्याय 1.16 ते 1.20 मध्ये दयाळू आणि विष्णू भक्त प्रल्हादाची आख्यायिका आणि त्याचा राक्षसी राजा पिता हिरण्यकश्यपु यांनी केलेला छळ सादर केला आहे, ज्यामध्ये विष्णूच्या नृसिंह अवताराने, भक्त प्रल्हादाला शेवटी वाचवले आहे.[9] [3] ही कथा इतर पुराणांमध्येही आढळते. +विल्सन म्हणतात, विष्णू पुराणाच्या पहिल्या पुस्तकात विष्णूचे वर्णन  केले आहे, सर्व घटक, जगातील सर्व पदार्थ, संपूर्ण विश्व, सर्व प्राणी, तसेच प्रत्येक जीव, निसर्ग, बुद्धी यामधील आत्मा (आत्मस्व, सार) असे भाषांतरित केले आहे. , अहंकार, मन, इंद्रिये, अज्ञान, शहाणपण, चार वेद, जे काही आहे आणि जे नाही ते सर्व. +पौराणिक मजकुराचा दुसरा भाग पृथ्वी, सात महाद्वीप आणि सात महासागरांच्या सिद्धांताचे वर्णन करतो. यामध्ये मेरू पर्वत, मंदार पर्वत आणि इतर प्रमुख पर्वत, तसेच भारत वर्ष (शब्दशः भारताचा देश) आणि त्याच्या असंख्य नद्या आणि त्यातील विविध लोकांचे वर्णन आहे. सात खंडांना जंबू, प्लाक्षा, सलमाला, कुश, क्रौंच, शक आणि पुष्करा अशी नावे आहेत, प्रत्येक खंड वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्यांनी वेढलेले आहे (मीठाचे पाणी, ताजे पाणी, वाइन, उसाचा रस, तुप , दही आणि दूध). +विष्णु पुराणातील हा भाग पृथ्वी, ग्रह, सूर्य आणि चंद्राच्या वरच्या गोलाकारांचे वर्णन करतो. मजकूराच्या दुसऱ्या  पुस्तकातील चार प्रकरणे (२.१३ ते २.१६) राजसिंहासन सोडून संन्यासी जीवन जगण्याऱ्या राजा भरताच्या आख्यायिका सादर करतात,आणि ह्या कथा भागवत पुराण 5.7 ते 5.14 मध्ये आढळणाऱ्या दंतकथांप्रमाणेच आहेत.  या पुस्तकात आणि इतर पुराणांमध्ये मांडलेल्या मेरू पर्वताच्या पूर्वेला असलेल्या मंदारा पर्वताचा भूगोल, मंदिर (हिंदू मंदिर) या शब्दाशी आणि "प्रतिमा, ध्येय आणि गंतव्यस्थान" या शब्दाशी संबंधित असू शकतो. +विष्णु पुराणाच्या तिसऱ्या पुस्तकातील प्रारंभिक अध्याय मन्वंतरस किंवा मनुष्य युगाचा (प्रत्येक 306.72 दशलक्ष वर्षे लांब) सिद्धांत मांडतात. हे सर्व काही चक्रीय आहे, आणि युगे सुरू होतात, परिपक्व होतात आणि नंतर विरघळतात या हिंदू विश्वासावर आधारित आहे. मजकूर सांगते की सहा मन्वंतर आधीच होऊन गेले आहेत आणि सध्याचे वय सातवे आहे. प्रत्येक युगात, मजकुराचे प्रतिपादन केले जाते, वेदांची चार भागात मांडणी केली जाते, त्याला आव्हान दिले जाते आणि हे यापूर्वी अठ्ठावीस वेळा घडले आहे. प्रत्येक वेळी, एक वेद व्यास प्रकट होतो आणि तो आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने, शाश्वत ज्ञानाचे परिश्रमपूर्वक आयोजन करतो. +विष्णु पुराणात पुस्तक 3 मध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या संस्कारांवर अनेक अध्याय समाविष्ट आहेत. अंत्यसंस्कार विधीवर प्रकरणे समाविष्ट आहेत. +वैदिक शाळांच्या उदयानंतर, मजकूर अध्याय २.८ मध्ये चार वर्णांची नैतिक कर्तव्ये, अध्याय २.९ मध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील चार आश्रम अर्थात टप्पे, अध्याय २.१० मध्ये विवाह विधींसह उत्तीर्ण विधी सादर करतो. २.१२, आणि २.१३ ते २.१६ या अध्यायात श्राद्ध म्हणजेच पूर्वजांचे संस्कार. + + + + + +सत्यव्रत म्हणाला, ते ऐकून मासा समुद्राच्या मधोमध गेला आणि एका मोठ्य़ा डोंगरासारखा वाढत वाढत त्याने सर्व महासागर व्याप्त केला व म्हणाला - ‘‘सत्यव्रता! पाहिलेस? तू म्हणालास ते अमोघ ठरले, पाहातो आहेस ना! आणखी काम चालूच आहे. असा आणखी वाढत वाढत काय होतो, नकळे!’’ तेव्हां सत्यव्रत हात जोडून नमस्कार करीत म्हणाला - ‘‘मत्स्यरूपांत असलेल्या हे नारायणा! मी रक्षण कर म्हणताच आलांस आणि माझ्या रक्षणार्थ मत्स्यावतार धारण केलांस. तुझी अगाध लीला कळण्याइतका मी मोठा आहे कां रे?’’ अशाच तऱ्हेने अनेक प्रकारे नारायणाचा स्तुतिपाठ केला. +तेव्हां मत्स्यावतार धारण केलेला विष्णू म्हणाला - ‘‘अरे राजा! सात दिवसांत कल्पान्त होणार आहे. व सर्व जग जलमय होईल. ज्ञान, औषधी वनस्पती व बीजें नष्ट होता कामा नयेत. पुढे येणाऱ्या कल्पान्ता या सर्वांचे रक्षण झाले पाहिजे. तुझ्यासाठी एक मोठी नौका, अंधकारात जसा दिवा असावा, तशी येत आहे. त्या नौकेमध्ये सप्तर्षी असतील ती ज्योती त्यांचीच समज!’’ +‘‘औषधी वनस्पती, बियाणाच्या राशी, वगैरे तू आपल्याबरोबर नौकेत भर! माझ्या नाकावरच्या शिंगाने मी तुम्ही ज्या नावेत असाल ती नाव बुडू नये व तिचे रक्षण व्हावे, यासाठी सर्व प्रयत्न करीन. म्हणून मी असा अवतार धारण केला आहे. ब्रह्मदेव जागा होईपर्यंत नाव ध्रुव ताऱ्याच्या दिशेने तरंगत जात राहील. येणाऱ्या कल्पांत तू वैवस्वत या नांवे मनू होशील!’’ असा नारायणाने आदेश दिला. सत्यव्रताने विष्णूला गुडघे टेकून नम्रपणे नमस्कार केला. मत्स्यावतार आपल्या चारही कल्ल्यांनी पोहत आणि शेपटी पाण्यावर आपटीत वेगाने लाटांना कापीत खोल निघून गेला. ब्रह्मदेव गाढ झोपेत होता. सर्वत्र अंधकार पसरला व जग काळोखांत बुडाले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13442.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e2899de0f43004b9262c5f370fc46e7b904a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13442.txt @@ -0,0 +1 @@ +सानी अबाचा (२० सप्टेंबर, १९४३ - ८ जून, १९९८) हे नायजेरियाचे सरसेनापती आणि १९९३-९८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13474.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14be8f5e5f50a9c51f53a2d51c1896f71f75e331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13474.txt @@ -0,0 +1,3 @@ +साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठे भक्ष्यदेखील गिळू शकतात, यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते . +सापांशी निगडित अनेक गैरसमज आहेत. साप माणसांना खातो, साप डूक धरून बसतो व तो बदला घेतो, काही साप मेंददू खातात. पण ह्यांत काहीही तथ्य नाही. भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1349.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1acdd4adbe2929618df87bac362dde0ab542a52a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1349.txt @@ -0,0 +1,4 @@ +विष्णू सूर्या वाघ (जन्म : तिसवाडी-गोवा-भारत, २४ जुलै १९५४; - केपटाऊन, दक्षिण आफ्रिका, ८ फेब्रुवारी २०१९) हे गोव्यातील कवी, नाटककार होते, आणि २०१२ ते २०१७ या काळात ते गोवा विधानसभेचे आमदार व नंतर उपसभापती होते.[१] +साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरोधात प्रखर लढा दिला. शोषितांचे कैवारी अशीही प्रसिद्धी त्यांना लाभली होती.[२] +१०वीच्या परीक्षेच्या निकालात त्यांचे नाव गुणवत्ता यादीत होते. त्यावेळी ते वास्कोमध्ये आपल्या मावशीकडे राहात. त्यांनी वास्कोच्या एम.ई.एस. काॅलेजात विज्ञान विषयातील पदवीसाठी प्रवेश घेतला. तेथे असताना ते त्यांच्या प्राध्यापकांच्या उत्तेजनामुळे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. वास्कोच्या स्थानिक गंथालयामध्ये त्यांची अनेक साहित्यिकांशी आणि कलावंतांशी मैत्री झाली. ते एकांकिका आणि नाटके लिहू आणि दिग्दर्शित करू लागले. पण शेवटी ते ढेंपे काॅलेजातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. काॅलेजात असताना त्यांनी नंदकुमार कामत यांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. गोवा विद्यापीठातून बायोकेमिस्स्ट्री विषयात एम.एस्‌सी.साठी त्यांनी प्रवेश घेतला, पण वडिलांच्या १९८७साली झालेल्या निधनानंतर त्यांनी काॅलेजच्या दुसऱ्या वर्षीच सायन्सचा अभ्यासक्रम सोडून पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला.[३] +शर्मिला राव या वाघ यांच्या पहिल्या पत्नी आणि अरुणा चोडणकर-वाघ या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत. वाघ यांना प्रत्येकीपासून दोन-दोन अपत्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_135.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c69e4ad3f955f43be22a3c98b46d22bc063c94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_135.txt @@ -0,0 +1 @@ +व्ही.के. गोकाक, तथा विनायक कृष्ण गोकाक किंवा वि.कृ गोकाक (९ ऑगस्ट, १९०९ - २८ एप्रिल, १९९२) हे कानडी साहित्यकार होते. त्यांना १९९०चा कानडी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13531.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d15a250ae1357b07b5c2c2a987867dc94236f01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13531.txt @@ -0,0 +1,6 @@ +साफ्फो (ग्रीकःΣαπφώ)(ख्रिस्तपूर्व ७०० वर्षे) ही ग्रीक कवयित्री होती. ती ग्रीस मध्ये लेसवोस (ग्रीक उच्चार) (इंग्रजी Lesbos) नावाच्या बेटावर राहत असे. ग्रीक इतिहासकार स्ट्राबो ने ही साफोचा उल्लेख केला आहे. +ती समलैंगिक होती असे म्हणतात. साफोचे स्वातंत्र्य ग्रीक समाजाने मान्य केले नाही. तिची लैंगिकता किंवा त्यावरची काव्य मांडणी ही तिच्यावर झालेल्या अन्यायातून आली असावी. तिचे प्रेम हे स्त्री व पुरुष दोघांवरही होते असे काव्यात दिसते. पण या काव्यात शारीर वर्णने नाहीत. किंवा तसे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे काही इतिहासकार तिला लेस्बियन मानत नाहीत. +साफो चांगल्या घराण्यात जन्माला आली होती. साफोच्या आईचे नाव व तिच्या मुलीचे नाव एकच क्लेई होते. साफो उच्च घराण्यातली असल्याने तिला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य होते. साफोला तीन भाऊ होते. तिचे फॉन नावाच्या व्यक्तीवर प्रेम होते. 'तो' मिळाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असाही एक प्रवाद आहे. पण प्राचीन ग्रीस मध्ये फॉन हा प्रेमाचा देवही मानला जातो. त्यामुळे ती शक्यताही पूर्णपणे मान्य होत नाही. +तिला काहीकाळ लेस्बोसवरून सिसिलीला हद्दपार करण्यात आले होते. +शेवटी तिने या सर्वाला कंटाळून आत्महत्या केली असाही प्रवाद आहे. +काळाच्या ओघात साफोचे काव्य नष्ट झाले आहे. परंतु तिचे काही काव्य खंडीत स्वरूपात सापडते आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13533.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f53b496a5af607f57d6fcac4753a1536853041 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13533.txt @@ -0,0 +1 @@ +साफयान मोहम्मद शरीफ (२४ मे, १९९१:इंग्लंड - हयात) ही  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13536.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd611c0cec824eea8935b3da42c05ca0489b6715 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13536.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान +साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13543.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beeaca1885d9f2082125d28213d6a27859060f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13543.txt @@ -0,0 +1,4 @@ +साबरमती नदी भारताच्या गुजरात राज्यातून मुख्यत्वे वाहणारी नदी आहे. +एकूण ३७१ किमी लांबीच्या नदीचा उगम राजस्थान मधील अरवली पर्वतरांगेत आहे. अरवली रांगांच्या मेवाड टेकड्यांमध्ये साबर व हाथमती या नद्यांच्या संयुक्त प्रवाहानंतर तीला "साबरमती" +असे म्हटले जाते. +ही नदी राजस्थान व गुजरात या राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी उत्तर - दक्षिण वाहते. शेवटी खंबातच्या आखातास जाऊन मिळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13633.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e64bd692eb8b17293d8e1e877e932198365ddad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13633.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सामानगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13646.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73ce28220f15603bf9b550cc6c569d36ef833cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13646.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सामान्य वितरण (नाॅर्मल डिस्ट्रिब्यूशन) किंवा गॉशियन वितरण हे एक सलग शक्यता वितरण आहे. संख्याशास्त्रातील ते एक महत्त्वाचे वितरण आहे. आकड्यांची सरासरी दर्शवणारा मध्य (μ) आणि सरासरीपासून दोन्ही बाजूंना झालेला आकड्यांचा विस्तार (σ2) या दोन परिमाणांनी 'सामान्य वितरणा'चा' आकार निश्चित होतो.. +निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इत्यादी. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13648.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73ce28220f15603bf9b550cc6c569d36ef833cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13648.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सामान्य वितरण (नाॅर्मल डिस्ट्रिब्यूशन) किंवा गॉशियन वितरण हे एक सलग शक्यता वितरण आहे. संख्याशास्त्रातील ते एक महत्त्वाचे वितरण आहे. आकड्यांची सरासरी दर्शवणारा मध्य (μ) आणि सरासरीपासून दोन्ही बाजूंना झालेला आकड्यांचा विस्तार (σ2) या दोन परिमाणांनी 'सामान्य वितरणा'चा' आकार निश्चित होतो.. +निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इत्यादी. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1365.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed58079714c42ac5dbb8c1ea6c690c659da27ad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1365.txt @@ -0,0 +1,3 @@ +विष्णूदास भावे पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला पुरस्कार आहे. इ.स. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला. +गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. +हा पुरस्कार अमोल पालेकर (२०१२), केशवराव दाते, ग.दि.माडगूळकर, छोटा गंधर्व, जयंत सावरकर (२०१६), डॉ. जब्बार पटेल (२०१४), ज्योस्ना भोळे, दिलीप प्रभावळकर (२००७), दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री. काळे, बापूराव माने, बालगंधर्व (१९५९), फैय्याज (२०१०), भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार (२०१३), माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, मोहन जोशी (२०१७), रत्‍नाकर मतकरी (२०११), रामदास कामत (२००८), वसंत कानेटकर, विक्रम गोखले (२०१५), विश्राम बेडेकर, शं.ना. नवरे (२००९), शरद तळवलकर, हिराबाई बडोदेकर, आदींना मिळाला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13662.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1332da4b3fe4d7831d6d379f1ce1265a9c9fa688 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13662.txt @@ -0,0 +1,5 @@ +सामुराई तलवार तथा कताना ही जपानी तलवार आहे. ही तलवार पूर्वी सामुराई योद्धे वापरत असत. + +कटानाची व्याख्या साधारणपणे प्रमाणित आकाराची, मध्यम वक्र (ज्यापेक्षा जास्त वक्रता असलेल्या जुन्या टाचीच्या विरुद्ध ) ६०.६ सेमी (२३.८६ इंच) पेक्षा जास्त ब्लेडची लांबी असलेली जपानी तलवार (जपानी २ शकू) अशी केली जाते .हे त्याच्या विशिष्ट स्वरूपाद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे: एक वक्र, सडपातळ, एकल-धारी ब्लेड गोलाकार किंवा चौरस गार्ड (त्सुबा) आणि दोन हात सामावून घेण्यासाठी लांब पकड. +काही अपवादांसह, टँग (नाकागो) वरील स्वाक्षरी (mei) च्या स्थानावरून, स्वाक्षरी केल्यास, कटाना आणि ताची एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकतात . सर्वसाधारणपणे, नाकागोच्या बाजूला मेई कोरलेली असावी जी तलवार घातल्यावर बाहेरच्या दिशेने असेल. टाचीला कटिंग एज खाली घातल्यामुळे आणि कटाना वरच्या बाजूने घातला जात असल्याने , मेई टांगवर विरुद्ध ठिकाणी असेल. +पाश्चात्य इतिहासकारांनी असे म्हटले आहे की कटाना हे जगातील लष्करी इतिहासातील सर्वोत्तम कटिंग शस्त्रे होते. तथापि, १५व्या शतकातील सेनगोकू कालखंडातील युद्धभूमीवरील मुख्य शस्त्रे म्हणजे युमी (धनुष्य) , यारी (भाला) आणि तानेगाशिमा (तोफा) , आणि कटाना आणि ताची ही फक्त जवळच्या लढाईसाठी वापरली जात होती. या कालावधीत, रणनीती बदलून अशिगारू (पाय सैनिक) मोठ्या संख्येने एकत्र जमले, त्यामुळे नागीणता आणि ताचीरणांगणावर शस्त्रे म्हणून कालबाह्य झाली आणि त्यांची जागा यारी आणि कटानाने घेतली . तुलनेने शांततापूर्ण इडो कालखंडात , कटानाचे महत्त्व शस्त्र म्हणून वाढले आणि इडो कालावधीच्या शेवटी, शिशी (राजकीय कार्यकर्ते) कटाना हे त्यांचे मुख्य शस्त्र म्हणून वापरून अनेक लढाया लढले . कटाना आणि ताची बहुतेकदा डेम्यो (जमीन अधिपती) आणि सामुराई यांच्यात भेटवस्तू म्हणून किंवा शिंटो मंदिरांमध्ये असलेल्या कामीला अर्पण म्हणून आणि समुराईच्या अधिकार आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक म्हणून वापरले जात होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13666.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8f8e183adb54dbb8bb3d3a364fb0058d2a2f728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13666.txt @@ -0,0 +1 @@ +भारतावर कब्जा करण्यापूर्वी अनेक शतके आधी इंग्लंडातले सगळे अरण्य आणि बहुतांश वन्यप्राणी नष्ट झाले होते. १०६६ मध्ये विल्यम द कॉंन्कररच्या राजवटीपासून ह्याची सुरुवात झाली होती. शिकारीचा शोकीन असलेल्या विल्यमने एक नवा जंगल विषयक कायदा लागू केला. इतर कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या या कायद्याने वन्य पशु आणि त्यांच्या अरण्यातील अधिवासात सामान्य लोकांना शिकार करण्यास बंदी घातली. यापुढे राजाच्या राखीव अरण्यातील वन्य पशूंची सामान्य लोकांनी शिकार केली तर त्यांना पोचर अथवा चोरटे शिकारी ठरवून फाशीची शिक्षा फर्मावली जाऊ लागली. १०८६ मध्ये त्याने देशातील सर्व जमीन निरनिराळ्या सरदारांना वाटून दिली. या सरदारांनी राजाच्या पावलावर पाऊल टाकून ग्रामसजांच्या सर्व सामूहिक भूमीवर कब्जा केला आणि सामान्य लोकांना या भूमीवर शेती करण्यास, गुरे चरण्यास किंवा शिकार करण्यास बंदी घातली. अशा रीतीने इंग्लंडात सर्व जमिनीवर केवळ खाजगी मालकी कायद्याने मान्य करण्यात आली आणि सर्व सामूहिक मालकी अवैध ठरवण्यात आली. पुढची दोन शतके या अन्यायाविरुद्धचा सामान्य लोकांचा निषेध निष्ठुरपणे चिरडण्यात आला. याच्या दुष्परिणामातून १४ व्या शतकापर्यंत इंग्लंडातील सगळेच्या सगळे अरण्य आणि बहुतेक वन्यपशू नष्ट झाले.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13680.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad79a536f77a60b9234dbbb17fb3ecd8337174f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13680.txt @@ -0,0 +1 @@ +सामोआचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1372.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..357d5f0072db4b1ea9873691ce757381e554392f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1372.txt @@ -0,0 +1,4 @@ +विष्णूपंत गोविंद दामले (ऑक्टोबर १४, इ.स. १८९२ - जुलै ५ इ.स. १९४५) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी निर्मिलेल्या "संत तुकाराम" हा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणारा पहिला भारतीय चित्रपट होता.[१] +विष्णूपंत दामले हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या प्रभात फिल्म कंपनीचे एक संस्थापक होते, आणि पाच मालकांपैकी एक होते. दामलेमामा म्हणून ते लोकांमध्ये प्रसिद्ध होते.संत तुकाराम' आणि संत ज्ञानेश्वर' या प्रसिद्ध चित्रपटांच्या दामले-फत्तेलाल या दिग्दर्शकद्वयीतले एक एवढीच त्यांची ओळख नसून, ते चित्रपट-यंत्रतंत्र विकसित करणारे तंत्रज्ञ, वास्तुरचनाकार, आणि शिस्तशीर व सत्शील व्यावसायिक होते. +चित्रपटाशी संबंध येण्यापूर्वी दामलेमामा मुंबईच्या नाट्यसृष्टीत चित्रकार होते. इ.स. १९११साली आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर या दोघांनी त्यांना कोल्हापूरला डेक्कन टॉकीजच्या कामासाठी बोलावून घेतले, आणि त्यानंतर विष्णूपंत दामले यांचे आयुष्य चित्रपटसृष्टीशी जखडून गेले. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13742.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..016ee0a2f52062a2f5055486762652e72aff96bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13742.txt @@ -0,0 +1 @@ +शीव तथा सायन हा मुंबई महानगराचा एक भाग आहे. आताच्या मध्य मुंबईत असलेला हा भाग १७व्या शतकात मुंबई बेटाच्या उत्तर टोकाकडील छोटी वस्ती होती. या वस्ती पल्याड साळशेतचे बेट होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13757.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5f9ed0789dc694b2aa8ae1985855497dea1098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13757.txt @@ -0,0 +1 @@ +सायन्स डिरेक्ट हे शास्त्रीय नियतकालिकांचे जगातील सर्वांत मोठे कोष आहे. याची मालकी एल्सफियर या संस्थेकडे असून. साधारणपणे २५०० शास्त्रीय नियतकालिकांचे ८५ लाख शास्त्रीय निबंध यांच्या कोषात आहेत. १९९० नंतरचे बहुतांशी नियतकालिके यांनी आंतरजालावर उपलब्ध केली असून आता शास्त्रीय शोधनिबंधांना शोधणे अतिशय सुकर झाले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1377.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa052e9b9bc7b972b02098162b90021e9fa5357 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1377.txt @@ -0,0 +1,2 @@ +विष्णूपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13772.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10023122ace9c808c2de1e0a7273cd41e961998a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13772.txt @@ -0,0 +1,9 @@ +सायबर गुन्हा भाग १ : - सायबर गुन्हेगारीही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे' जागतिक समस्या आहे. अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात. त्यांच्या पूर्ण संरक्षितेलाचाे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी ॲक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लील गोष्टी व मजकुराचे प्रकाशन या गोष्टी गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकूणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल. लहान मुलांना यापासून वाचविण्यासाठी सेफ्टीवेब (सुरक्षित इंटरनेट जाळे) हे पालकांना सहाय्यकारी ठरत असते. सायबर गुन्ह्याविषयी माहिती : +एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. ते पुढीलप्रमाणे : +पत्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या त्रासाची ही पुढची पायरी म्हणावी लागेल. ब्लॅकमेल करणे, धमकावणे, दंडेली करणे किंवा फसवणूक करणे इत्यादी प्रकारांचा या पद्धतीच्या छळवणुकीत समावेश होतो. पत्रांद्वारे एखाद्याचा छळ करण्याप्रमाणेच हे आहे. मात्र बहुतेकवेळा बनावट खात्यांवरूनच असे ईमेल पाठविले जात असल्याने ते अधिक त्रासदायक असते. +आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठविणे, ईमेल्स पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. महिलांना पुरुषांकडून तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरे जावे लागते. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो. +बहुतेक प्रकरणात महिला, मुले किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर गुन्हेगारांचे बळी ठरतात. पण त्यातही 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच बळी ठरत असल्याचे मानले जाते. हे गुन्हे करण्यामागे चार प्रकारची कारणे किंवा मानसिकता असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये लैंगिक छळ करण्याचा उद्देश, प्रेमात पछाडलेले असणे, बदल्याची किंवा द्वेषाची भावना आणि इगो यांचा समावेश आहे.वेबसाईटस, चॅट रुम्स, इंटरनेटवर असलेली चर्चा घडविणारी व्यासपीठे, ब्लॉग इत्यादी प्रकार आणि ईमेल या माध्यमांद्वारे गुन्हेगार आपल्या बळींना लक्ष्य करतात. मोफत उपलब्ध असलेले ई मेल्स तसेच चॅट रुम्स किंवा इतर व्यासपीठांवर उपलब्ध असलेले अनामिकत्व (जेथे तुम्ही तुमची खरी ओळख लपवून ठेवू शकता) यामुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसते. +सायबर गुन्हे - भाग 2 +सायबरगुन्हा' किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1378.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e963a3afa6c6a6045b0e43189d362f6e9e8fb7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1378.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण एक धरण आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जल सिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो.या धरणाला शंकरसागर या नावाने ओळखले जाते. +गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प असर्जन गावाजवळ. कि.मी. अंतरावर आहे. नांदेड शहरातील प्रकल्प 1988 मध्ये पूर्ण झाला. मागील पाण्याचे क्षेत्र 40 कि.मी. अंतरावर आहे. गोदावरी नदीची लांबी. प्रकल्पाचे सांस्कृतिक कमांड क्षेत्र 23222 हेक्टर आहे. आणि इरिग्रेबल कमांड एरिया 19514 हेक्टर आहे. आतापर्यंत 15856 हेक्टर सिंचन क्षमता आहे. तयार केले आहे. या प्रकल्पाचे कमांड क्षेत्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार व लोहा तालुक्यात वितरित केले गेले आहे. Of०.79 M दशलक्ष घनमीटर प्रकल्पाचे थेट संचयन यापैकी 43.95 दशलक्ष घनमीटर पाणी नांदेड शहरासाठी पिण्याच्या उद्देशाने राखीव असून १०.२८ दशलक्ष घनमीटर जलसाठा औद्योगिक हेतूसाठी राखीव आहे. बॅरेजला 18 उभ्या वेशी आहेत. या प्रकल्पाची कल्पना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. शंकरराव चव्हाण. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ सरकार महाराष्ट्रातील जलाशयाचे नाव शंकर सागर जलशाया असे आहे. विशाल पाण्याचा साठा असल्याने आजूबाजूच्या परिसरातील कालेश्वर मंदिर, लँडस्केपिंग, घाट आणि रत्नेश्वरी डोंगरांची उपस्थिती यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करीत आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेसाठी गर्दी असते. गोदावरी नदीवर स्थित आशिया उपखंडातील हा सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव आहे. +विष्णुपुरी धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13811.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d95c41174fcb2c3d3de0bdf39257cb5dfd33adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13811.txt @@ -0,0 +1,2 @@ +सायमन जेम्स पीटरसन (१७ नोव्हेंबर, १९६८:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे. +पीटरसन ऑकलंडकडून एकूण २६ प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13848.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a1aea72b48cb43b493fa52a85756ea4d227025 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13848.txt @@ -0,0 +1 @@ +द सायलेन्स ऑफ द लॅंब्स हा १९९१मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13852.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88de484f760fab687f106cfd14a42ddc6f22e7e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13852.txt @@ -0,0 +1 @@ +सायलोम स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील शहर आहे. आर्कान्सा-ओक्लाहोमा सीमेवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १५,०३९ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13882.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..937576030f71bd77dcddf544cb86293a9564df89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13882.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13887.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..920ca7414f5d094df73e55b1b8ea5372a28eb133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13887.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारंगपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13890.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb749ac6687e48e70fffd8fb20d4d24f2a37d1ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13890.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारंगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13902.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..753b700ebc5cafde60b27da35fd350e6adfaaaf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13902.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1393.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a08a686bd9d5f11d1d0a79c85669b832167cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1393.txt @@ -0,0 +1,4 @@ +विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट (जन्म : इ.स. १८०४; - इ.स. १८६५) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांच्या वडिलांची संस्कृत पाठशाळा होती. +विष्णूशास्त्रींना देखील इ.स. १८३७ साली पुणे संस्कृत पाठशाळेत ’असिस्टंट पंडित’ म्हणून नोकरी मिळाली. पुढे इ.स. १८३८मध्ये ते प्रमुख अध्यापक झाले. शिक्षण मंडळाच्या त्या नोकरीत असताना विष्णूशास्त्र्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली. +मुंबई सरकारचे मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन यांनी मुळात इंग्रजीत लिहिलेल्या आणि पंधरा भागात असलेल्या पुस्तकाचा विष्णूशास्त्र्यांनी ’नीतिदर्पण’ या नावाचा मराठी अनुवाद केला. ’मराठी शाळांवर पढणाऱ्या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून...’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णूशास्त्री बापटांनी म्हटले आहे. मात्र या पुस्तकातली भाषा मुलांना कळायला थोडी अवघडच होती. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट हे ’नीतिदर्पणकार बापट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. +भाषांतरकार, निबंधलेखक व इतिहासलेखक नारायण विष्णूशास्त्री बापट हे विष्णूशास्त्र्यांचे चिरंजीव. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13930.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a78c1fa74029a7206d994a052092c91f1ddceab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13930.txt @@ -0,0 +1,5 @@ +तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता. +श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. +श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. +स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले. +थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर‍अल्लीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली, असे म्हणतात (?). गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13940.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30ecf1c8aac13d29f8b8bb6af595232a047468ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13940.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारस्ते हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13952.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98c203094042db15313af86ff266d86dd6b69a29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13952.txt @@ -0,0 +1,2 @@ +सॅरा फील्डिंग (८ नोव्हेंबर, १७१० - ९ एप्रिल, १७६८) या इंग्लिश लेखिका होत्या यांनी द गव्हर्नेस, द लिटल फीमेल अकॅडेमी आणि द अॅडव्हेंचर्स ऑफ डेव्हिड सिम्पल यांसह अनेक कादंबऱ्या लिहिल्या. +यांचे भाऊ हेन्री फील्डिंग हे सुद्धा इंग्लिश कादंबरीकार होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13959.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb3458213ff3dad24e14060d235688ed20637c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13959.txt @@ -0,0 +1 @@ +सारा यंत्र हे शेतीसाठी उपयुक्त असे यंत्र आहे. या यंत्राद्वारे शेतजमिनीत 'सारे' पाडता येतात. हे यंत्र वखरासारखे काम करते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13966.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baa47b2c1da4d8b43ce3c833caa1c634b4d0fa57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13966.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 43°52′0″N 18°25′0″E / 43.86667°N 18.41667°E / 43.86667; 18.41667 + +सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय युरोप व बाल्कन प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे. +अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान ओस्मानी साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरी, युगोस्लाव्हिया इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची हत्त्या हे पहिले महायुद्ध चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र व १९४३-१९९२ दरम्यान युगोस्लाव्हिया देशांमधील एक प्रमुख शहर होते. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या. +युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे. +बी ॲन्ड एच एरलाइन्सचा हब असलेला येथील सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13973.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c504329c17b556794ef7681ed405f3b0deee10c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13973.txt @@ -0,0 +1,2 @@ +सारापखेड सावड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13983.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59ba786d800c0bab4687694ceda7980075c97ac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_13983.txt @@ -0,0 +1 @@ +सॅराह लुईझ इलिंगवर्थ (९ सप्टेंबर, १९६३:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९६ दरम्यान ६ कसोटी आणि ३७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14015.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca6222b530ba30f9fcc7ce2e0460f25d26047313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14015.txt @@ -0,0 +1,2 @@ + सारेभाग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14043.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..293d196dbe373f470794ae82a6791f0268095a03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14043.txt @@ -0,0 +1,104 @@ +सार्त (फ्रेंच: Sarthe) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. ले मां हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14046.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6c7fcf6757691f68720d818d1007e27f0708f45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14046.txt @@ -0,0 +1,2 @@ +सार्दिनियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा इटली देशाच्या सार्दिनिया ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १९९७ सालापासून सार्दिनियन ही इटालियन सोबत सार्दिनियाची प्रशासकीय भाषा आहे. +सार्दिनिया बेटाच्या उत्तर भागात कॉर्सिकन भाषा वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14061.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd407d8f6616b928401bc42177f38b76d01b7528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14061.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सार्वजनिक गुंतवणूक ही सरकारद्वारा जनतेसाठी करण्यात आलेली गुंतवणूक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14080.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada5a177a8438bf475ea18d805077fc000257ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14080.txt @@ -0,0 +1 @@ +सार्वजनिक व्यवहार (Public affairs) एक व्यापक क्षेत्र आहे ज्यात सार्वजनिक प्रशासन, राजकीय सहभाग, कॉर्पोरेट समुदायाचा सहभाग, वकिली आणि जनसंपर्क यांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14082.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb94160acab192dd38b2aa7e3dd390696f90a82a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14082.txt @@ -0,0 +1,2 @@ +सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचे सार मानले जाते. +आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये फुल्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केले[१]. याची रचना संवादात्मक असून धर्म, पाप, पुण्य इत्यादी विषयांवर विविध व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यात उत्तरे दिली आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14102.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd72fbbd4036dba37fb7ae34eefef07bd90a1e70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14102.txt @@ -0,0 +1,2 @@ +सालफळहेती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14118.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d24741a6991457da5509f28d2514fa23d358122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14118.txt @@ -0,0 +1,3 @@ +सालशेत बेट भारताच्या मुंबई शहराचा भाग असलेले बेट आहे. खुद्द मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला मीरा-भाईंदर हा भाग सालशेत बेटावर आहे. अत्यंत गर्दीची वस्ती असलेल्या या बेटाच्या ६१९ वर्ग किमी प्रदेशात १५ लाख व्यक्ती राहतात. हे बेट तसेच आसपासच्या छोट्या बेटांचा समूह साष्टी बेटे या नावांनीही ओळखला जातो +या बेटांच्या नावाची व्युत्पत्ती 'सा + अष्ट (८)' अशा अंकसूचक नावाने झाली असल्याचे मानले जाते. +सालशेतच्या उत्तरेस वसईची खाडी, ईशान्येस उल्हास नदी, पूर्वेस ठाण्याची खाडी तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. सालशेत बेटाच्या दक्षिणेस माहीमच्या खाडीपलीकडे माहीम बेट आहे. माहीमची खाडी व मिठी नदी आता जवळपास पूर्णपणे बुजलेली असल्यामुळे आता सालशेत, तुर्भे (ट्रॉम्बे) आणि माहीम बेटे एकमेकास व मुंबईच्या सात बेटांशी जोडले गेलेली आहेत.[१] बोरिवली राष्ट्रीय उद्यान तथा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सालशेत बेटाच्या साधारण मध्यावर आहे तर बेटाच्या ईशान्य भागात ठाणे शहर आहे. सालशेत बेटाचा दक्षिण भाग मुंबई नागरी जिल्ह्यात तर उरलेला भाग मुंबई उपनगरी जिल्ह्यात मोडतो. बेटाचा उत्तर भाग ठाणे जिल्ह्यात आहे.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14141.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..295e2a9a98897fe80e02a4de367055afce57ff7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14141.txt @@ -0,0 +1,2 @@ +सालेगांव हे सेनगांव तालुक्यातील एक गांव आहे ज्याची लोकसंख्या ९२२ इतकी आहे. +19.804909,76.604866 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14146.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba5cac7ab7996e059d3dcdc524b2d808be8144b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14146.txt @@ -0,0 +1,35 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८६९ असलेले सालेभट्टी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २९६.४९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३१२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - +पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही. +५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. . +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र- १ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- निरंक +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14155.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e724c6fa320c6078f26e4aeffc1780ceef29c1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14155.txt @@ -0,0 +1,2 @@ +सालोथ सार उर्फ पोल पोट (ख्मेर: ប៉ុល ពត; १९ मे १९२५ - १५ एप्रिल १९९८) हा कंबोडियामधील एक कम्युनिस्ट व ख्मेर रूज ह्या संघटनेचा म्होरक्या होता. एप्रिल १९७५ ते जानेवारी १९७९ दरम्यान तो कंबोडियाचा राष्ट्रप्रमुख होता. पोल पोट हा एक क्रुर हुकूमशहा होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यवाद अंगिकार करण्याचा घाट घातला होता. त्याच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत कंबोडियामधील २५ टक्के जनता मृत्यूमुखी पडली व सर्वच बाबतीत देशाची अतोनात हानी झाली.त्याने कंबोडियामध्ये त्याला विरोध करणाऱ्या विद्वानांची सामूहिक हत्याकांडे घडवून आणली. +१९७९ साली व्हियेतनामने केलेल्या लष्करी हल्ल्यामध्ये ख्मेर रूजची कंबोडियावरील सत्ता संपुष्टात आली व पोल पोटने जंगलाकडे पलायन केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14162.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e6eb7c7d01dc2b655863f1c8570784f013413c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14162.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 31°23′S 57°57′W / 31.383°S 57.950°W / -31.383; -57.950 + +साल्तो (स्पॅनिश: Salto) he उरुग्वे देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मोन्तेविदेओ खालोखाल) आहे. हे शहर उरुग्वेच्या वायव्य भागात आर्जेन्टिनाच्या सीमेजवळ उरुग्वे नदीच्या पूर्व काठावर वसले आहे. २०११ साली साल्तो शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14168.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be168515114907b991ce2f52e9f1361ae6e72cd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14168.txt @@ -0,0 +1,61 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de El Salvador) हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. +१६व्या शतकाच्या सुरुवातीपासून स्पेनच्या अधिपत्याखाली असलेल्या साल्व्हाडोरला इ.स. १८२१ साली स्वातंत्र्य मिळाले. विसाव्या शतकाचा बराच काळ येथे लष्करी राजवट होती. सध्या येथे लोकशाही असून साल्व्हादोर सांचेझ सेरेन हा येथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. साल्व्हाडोरची अर्थव्यवस्था कमकूवत असून कॉफीची लागवड हा येथील प्रमुख उद्योग राहिला आहे. +एल साल्व्हाडोर हा देश मध्य अमेरिकेत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०४० चौ.किमी.(८,१२३चौ.मैल) आहे. हा अमेरिका खंडातील सर्वात लहान देश आहे. या देशाचा ३२० चौ.किमी. भाग पाण्याने व्यापला आहे. या देशात अनेक लहान नद्या वाहतात. यांत गोआसकोरान, जिबोआ, तोरोला, पाझ, रिओ ग्रांडे दे सान मिगुएल या नद्यांचा समावेश होतो. लेंपा ही एकमेव मोठी नदी आहे. नद्यांसोबतच या देशात अनेक सरोवर आहेत. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1417.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ab1470f800976766d4ce2f41a1788d84e7355e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1417.txt @@ -0,0 +1,2 @@ +विष्णू माधव घाटगे (२४ ऑक्टोबर १९०८ - ६ डिसेंबर १९९१) जर्मनीतील कैसर विल्यम संस्थेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विमानशास्त्र यंत्रविद्या या विषयाचे प्राध्यापक म्हणून भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे नौकरी केली (१९४२-४७) नंतर बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेडचे उपप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी HAL HT-2 ह्या विमानाचा आराखडा व निर्मिती करणाऱ्या संघाचे नेतृत्व केले, पहिले भारतीय डिझाईन केलेले आणि तयार केलेले विमान. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल १९६५ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. +विष्णू माधव घाटगे यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०८ रोजी कोल्हापूर संस्थानातील हसूरचंपू या छोट्याशा गावात झाला.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14187.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1baa52dbe71c4a94f2103f74692cfe38d4a1516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14187.txt @@ -0,0 +1 @@ +साल्सियो फियोरेंतिनो किंवा साल्सियो स्टोरिको हा १६व्या शतकात इटलीमध्ये खेळला जाणारा फुटबॉलसारखा खेळ होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14193.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64686716539bac8851053d851c6657a630e1986c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14193.txt @@ -0,0 +1,8 @@ +साल्हेरची लढाई १६७२मध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्हेर गावाजवळ झालेली ही लढाई होती. मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यांमध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांचा निर्णायक विजय झाला,पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दुःख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दुःख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता. +सरनौबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांविरुद्ध खुल्या मैदानावर मिळवलेला हा पहिला विजय होता.[१] + +पुरंदरच्या तहानंतर सन (१६६५) छत्रपती  महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे सिंहगड , पुरंदर , लोहगड, कर्नाळा, माहुली मुघलांकडे गेले. पुरंदरच्या तहानुसार शिवाजी राज्यांना  आग्राला दरबारात जावे लागले परंतु औरंगजेब ने त्यांना कैदी करून घेतले त्यातून शिवाजी राजांनी चातुर्याने आपली सुटका संप्टेंबर  १६६६ मध्ये  करून घेतली ही आजतागायत सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर  औरंगजेबने हिंदुविरोधी   मोहीम हाती घेतली विश्वनाथ आणि बेणारे मंदिर पाडले . आणि ह्याचा परिणाम आणि प्रतीउत्तर शिवाजी महाराजांनी देयाला सुरुवात केली आणि मुघला विरुद्ध युद्धमोहीम हाती घेतली.१६७० नंतर युद्ध अश्या आणेल मोहिमा यशस्वी पार पडल्या. त्यामधील हे साल्हेर युद्ध.या यद्धात सरदार सुर्याजी काकडे यांना वीरमरण प्राप्त झाले. + + +मराठीत भाषांतरित-प्रवीण पवार 2. https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Salher + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14208.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1599a9534fb42f4e0b760a750d75c585fbc9bb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14208.txt @@ -0,0 +1,2 @@ +साळतर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14209.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0edb8fb9d5138b3078aad83b308d5d6955e0f359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14209.txt @@ -0,0 +1,2 @@ +साळदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14243.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a56291ec5a7dfee48b04bea5a93cd6cb6ebbdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14243.txt @@ -0,0 +1,2 @@ +साळेकरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14259.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a185dc10835a0bea8d748be9497ba150a95bcb99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14259.txt @@ -0,0 +1 @@ +सावंगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14264.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4122e043f80d8458ff7680ae70c0ae6319829ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14264.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०३३ असलेले सावंगा बु हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५५१.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ७७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३९२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ८३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा सावंगा(बु) येथे आहे. माध्यमिक शाळा सावंगा(बु) येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा पेंढरी येथे आहे. पदवी महाविद्यालय पेंढरी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14278.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf7aa22977a9c26959a2076040401d9d529179a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14278.txt @@ -0,0 +1,2 @@ + सावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14288.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7897ff8d7fe47fe61e37e4c0732255661d826420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14288.txt @@ -0,0 +1 @@ +सावंगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14325.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..565442d0f4b23a1bbab376a6c28d146a7a404e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14325.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावटखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14330.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd7b039c8bdf7fe7081a9759fce0638d3c1437fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14330.txt @@ -0,0 +1,8 @@ + सावडव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14379.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..decf0326e5cc9bfb315802b052c753087c64c5e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14379.txt @@ -0,0 +1,2 @@ + सावरगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14383.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..495849de8f24ee1497d20a9ea63d2b4854bb89ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14383.txt @@ -0,0 +1,2 @@ + सावरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14386.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9329b86e0021b5b81cf317ca87c00dea58a2ee38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14386.txt @@ -0,0 +1,2 @@ + सावरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14398.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caff64b9182ee4c904917140189664b392130876 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14398.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14414.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39256037360dd9ef5c4cb134c2e9518f8a6f43b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14414.txt @@ -0,0 +1,12 @@ +सावरगाव बर्डे +सावरगाव बर्डे हे गाव दिल्ली ते चन्नई या रोड वर महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील अकोल्या पासून ७० कि. मि. अंतरावर वाशीम पासून १० कि. मि. अलीकडे आहे. +सावरगाव बर्डेचा तालुका जिल्हा वाशीम असून पोस्टल पिन कोड नंबर ४४४५०५ आहे तसेच फोन कोड ०७२५२ हा आहे. +यागावत खडकेश्वर महादेवाचे मंदिर ,हनुमानाचे मंदिर ,शेनल्याच्या आईचे मंदिर ,तसेच इतरही हिंदूची तीर्थ स्थळे आहेत.बुद्धांची अतिशय सुंदर मूर्ती आहे . +सावरगाव याठिकाणी आलेल्या खड्केश्वराच्या दर्शनास्थ प्रभू रामचंद्र सीतामाता तसेच बंधू लक्ष्मण तपोवन दर्शना नंतर आले होते अशी आख्यायिका आहे . +यागावा मध्ये हिंदू , बौद्ध , मुस्लिम, अश्या विविध धर्माची लोक एकत्र सुखाने नांदतात . +यागावा मध्ये पाटील, कड, बर्डे , शेळके,गोटे,कुटे ,सरकटे,जाधव,शेख,लबडे,हिवाळे, इत्यादी आडनावाचे लोक राहतात. +सावरगाव बर्डेची लोकसंख्या २००१ जनगणना नुसार १५३५ एवढी होती परंतु आज(२०१५) साधारण पने २००० एवढी असेल मतदार संख्या १४५० इतकी आहे. +सावरगाव बर्डे इथून तामसी ,धारकाटा ,खडकी,जाभरून परांडे,काटा,पांगरी नवघरे ,जाभरून वाडी ,चीवरा,इत्यादी गावांना जोडणाऱ्या पायवाटा तसेच गाडवाटा आहेत. +या ठिकाणी विजय सुभाष पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयी साठी. " मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई सुभाषराव जी पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था सावरगाव बर्डे ता. जि. वाशीम ." ही संस्था स्थापन केली याद्वारे२००९ साली" माऊली ज्ञान मंदिर पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळा " सुरू केली .य़ा परंतु ती शाळा दोन वर्ष सुरळीत चालल्या नंतर तिसऱ्या वर्षी काही अपरिहार्य कारणाने बंद केली. मात्र शिक्षणाचा वसा पुढे सुरू ठेवीत २०१२ साली यागावा मध्ये "माऊली कॉम्पुटर्स सावरगाव बर्डे " सुरू करून कॉम्पुटरचे असे नव नवीन अभ्यासक्रम आणले . +ठिकाणी इयत्ता पहिली पासून तर आठवी पर्यंत शिकण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा असून पुढील शिक्षणा साठी गावापासून अर्धाकिमी अंतरावर संमती इंजिनीअर कॉलेज असून तेथे अभियांत्रिकी पदवी (BE) 1 स्थापत्य अभियांत्रिकी 2 संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी 3 विद्युत अभियांत्रिकी 4 इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनियरिंग 5 मेकॅनिकल इंजिनिअरिंग . वकिली , वाणिज्य , इत्यादी क्षेत्रे आहेत . +सावरगाव बर्डे हे गाव आजही पांडुरंग पाटील यांचे म्हणून ओळखले जाते . पांडुरंग पाटील हे सावरगाव बर्डे यथे १९१३ साली सर्वसाधारण कुटुंबात जन्माला येऊन, जास्त शिक्षण नसूनही त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यात सहभाग घेतला. महाराष्ट्र स्थापणे नंतर सावरगाव बर्डेचे ते पाच वर्ष सरपंच राहिले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14419.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dfd231fb65623b353ab8351df64ae49e2dbec72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14419.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावरगावनिपाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1449.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e33d84d6314e371dc21d2ea877977df258f1c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1449.txt @@ -0,0 +1,2 @@ +विसापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14497.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d7a32513ed966fae9fafe87929531d53f3531a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14497.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14501.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a61aa12ee388ad906b64768503fe55f893db87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14501.txt @@ -0,0 +1 @@ +सावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14515.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb900a823865953edd65f7fb725315e34f0e2fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14515.txt @@ -0,0 +1 @@ +सावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14547.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264248e1751856c16e8dbb7a98769804a89e2b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14547.txt @@ -0,0 +1,2 @@ +सावित्री आणि सत्यवान हे हिंदू धर्मातील एक पौराणिक जोडपे आहे. हे जोडपे सावित्रीचे तिच्या पती सत्यवानावरील प्रेम आणि भक्तीसाठी ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, राजकुमारी सावित्रीने सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजकुमाराशी लग्न केले, ज्याचा लवकर मृत्यू होईल अशी भविष्यवाणी झालेली असते. आख्यायिकेचा नंतरचा भाग सावित्रीच्या बुद्धी आणि प्रेमावर केंद्रित आहे, ज्याने तिच्या पतीला यमापासून वाचवले.[१] +सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेची सर्वात जुनी आवृत्ती महाभारताच्या वनपर्वात आढळते. मार्कंडेय ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ही कथा महाभारतातील बहुगुणित कथनाच्या रूपात घडते. जेव्हा युधिष्ठिराने मार्कंडेयाला विचारले की, द्रौपदीच्या भक्तीशी जुळणारी अशी स्त्री आहे का, तेव्हा मार्कंडेयाने ही कथा सांगून उत्तर दिले.[२][३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14585.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b02de4941ae128833b5f9de9b070276284f7c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14585.txt @@ -0,0 +1 @@ +सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेर आहे. सासचा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेर विकसित केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14591.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8c96866f012ba2b6ca41884a098362b0cd592c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14591.txt @@ -0,0 +1,2 @@ +सासपडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14605.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b206687a4af9efe44dfadb437aa8f86f3becb510 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14605.txt @@ -0,0 +1 @@ +साष्टी हे गोव्यातील एका गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14609.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a851554d49d021f7c264ae8115e65783602869f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14609.txt @@ -0,0 +1 @@ +सासाराम लोकसभा मतदारसंघ हा भारतीय प्रजासत्ताकातील बिहार राज्यातल्या ४० लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14611.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797b503036eae1197bf699c1452206a01f2bb00c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14611.txt @@ -0,0 +1,2 @@ +सासुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14612.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cb7f31e9ea1818d700c4f41f3eb2d4e72048b18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14612.txt @@ -0,0 +1,2 @@ +सासुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14620.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..334e591db8f1dad04be95510b09e9b4bf4f15a7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14620.txt @@ -0,0 +1,2 @@ +सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस मॅनिटोबा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस आल्बर्टा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटा व मोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात. +इ.स. १६९० मध्ये येथे युरोपीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. सध्या येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14645.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8928dc362c7b8699732a97aa8d29e3f73a7109c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14645.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन होत आहे. +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14650.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc37477d9aebd1ecb5cc4d9c49f29b0bdedbae1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14650.txt @@ -0,0 +1,6 @@ +साहित्याची व्याख्या देण्याचे पाश्चात्य साहित्यपरंपरेत प्रयत्न झाले. त्यांचा विचार १) अनुृकृतिवादी २) आविष्कारवादी ३) रूपवादी ह्या तीन सिद्धांताच्या आधाराने करता येते. +साहित्याचे प्रयोजन +आधुनिक भाषावैज्ञानिकांनी भाषेविषयीचे आदेशात्मक दृष्टिकोण नाकारले. त्याऐवजी त्यांनी भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याचे वस्तुनिष्ठ व काटेकोर वर्णन करणे हे भाषाविज्ञानाचे कार्य मानले. +[१] +[२] +[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14697.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..803a3c88cf5c00aff6914fa174f4bc45155427ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14697.txt @@ -0,0 +1,2 @@ + +विद्युत प्रभारित कणांना त्यांच्या मार्गाच्या लंबवर्ती दिशेला त्वरित केले असता जे प्रारण उत्पन्न होते त्याला सिंक्रोट्रॉन प्रारण म्हणतात. हे एक ते विद्युतचुंबकीय प्रारण आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14698.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69fcc7f71c5b85ec79eb74d9881b753a52918b9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14698.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +सिंग इज किंग (२००८ चित्रपट) हा एक हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14723.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64d85759dd90c5362db52b98d1c170b4edd3f57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14723.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिंगसपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14739.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a39cd3d3129be79982c4542ed6ad0104f2ac57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14739.txt @@ -0,0 +1,5 @@ +सिंगापूर एरलाइन्स (Singapore Airlines) ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. +एअरबसचे एअरबस ए३८० हे सुपरजंबोजेट विमान वापरात आणणारी सिंगापूर एरलाइन्स ही जगातील पहिली कंपनी होती. प्रवासी वाहतूकीमध्ये सध्या दहाव्या क्रमांकावर असलेली सिंगापूर एरलाइन्स जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक मानली जाते. १४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके बाजार मूल्य असलेली सिंगापूर एरलाइन्स २०१० साली जगातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी होती. +भारत सरकारने नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी दिल्यानंतर २०१३ सिंगापूर एरलाइन्सचा ४९% व टाटा उद्योगसमूहाचा ५१% वाटा असलेली व्हिस्टारा नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रमुख हब असलेल्या व्हिस्टाराच्या विमानसेवेस ३ जानेवारी २०१५ रोजी प्रारंभ झाला. +३१ डिसेंबर २०१४ अखेरीस सिंगापूर एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये खालील विमाने आहेत:[१] +सिंगापूर एरलाइन्स सध्या जगातील ३५ देशांमधील ६२ विमानतळांवर विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14763.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7b007350a24d5c8a0be50f11a1219ad3ada1224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14763.txt @@ -0,0 +1,6 @@ +सिंगापूर महिला क्रिकेट संघाने ८ ते १२ फेब्रुवारी २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी कंबोडियाचा दौरा केला. सिंगापूर महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1477.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622ccda898d6ba0898167a7ca6e8da825485fedb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1477.txt @@ -0,0 +1,5 @@ + +विस्मबर्गचा टाऊन हॉल हा एक बरॉक वस्तुकलेवर आधारित सिटी हॉल आहे. हा जर्मन राज्य, राईनलँड-पॅलाटिनेटच्या जवळ आहे. फ्रान्सच्या बास-ऱ्हिन विभागाच्या उत्तरेकडील सीमेवरील हे एक लहान शहर आहे. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाने १९३२ पासून हे स्मारक ऐतिहासिक म्हणून वर्गीकृत केलेले आहे. [१] +नवीन शहराची हॉल आर्किटेक्ट जोसेफ मासोल यांनी मध्ययुगीन टाऊन हॉल (१३९६ मध्ये बांधलेला) पुनर्स्थित करण्यासाठी डिझाईन केला होता. जुना हॉल फ्रेंच सैन्याने २५ जानेवारी १६७७ रोजी जाळून टाकला होता. याची नोंद अल्सासच्या इतिहासात सापडते . [२] [३] हा जबरदस्त सोहळा २६ जून १७४१ रोजी संपन्न झाला आणि त्याचे उद्घाटन अकरा वर्षांनंतर २७ जून १७५२ रोजी झाले. [४] +स्रोतांच्या आधारे, टाऊन हॉलचे संपूर्ण नूतनीकरण २००९ पासून २०११ पर्यंत, [५] किंवा २०१० पासून २०१२ पर्यंत केले गेले आहे. [२] या पूर्वी १८२६, १९३७ आणि १९५९ मध्ये देखील याचे नूतनीकरण झाले होते. [४] +विस्मबर्गचा लुई क्विन्झ टाऊन हॉल गुलाबी वाळूच्या खडकात बांधलेला आहे. यात तीन मजले आहेत. तळ मजला पहिल्या मजल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट उंचीचा आहे. आणि पहिला मजला दुसऱ्या मजल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट उंच आहे (खालील इन्फोबॉक्स चित्रे पहा). त्याची दर्शनी भिंत एका विशिष्ट आघाडीच्या लष्करी तुकडीचे मुख्य पोर्टल आहे. यात एक बाल्कनी, आणि एक असलेली इमारतीच्या दर्शनी भागाचा वरचा त्रिकोणी भाग, आणि एक घड्याळ टॉवर आहे ज्याला रिज बुर्ज असे नाव आहे. घड्याळाचे मूळ काटे आता पालिका संग्रहालयात संग्रहित आहेत. कल्पित शिलालेखात एएनएनओ एमडीसीएक्सएक्सएलआय ("वर्ष १७४१") आणि आर ईजीएन एल यूडीएक्सव्हीएक्सएन्टीक्वाइसीनेरसेरक्सी (" लुई चौदाव्या वर्षाच्या कारकिर्दीत, मी प्राचीन राखेतून पुनरुत्थानित झाले") असे लिहिलेले आहे. [२] [४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14778.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a74e453d5e6ab14775468a94d86dbab7db9298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14778.txt @@ -0,0 +1,7 @@ +सिंगापूर मधील धर्म (जनगणना २०१५)[१] +सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. सिंगापूरमधील धर्म वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या विविध धर्मांच्या मिश्रणामुळे विविध धार्मिक विश्वास आणि प्रथांची विविधता दर्शविते. सिंगापूरमध्ये बहुतेक प्रमुख धार्मिक गट-संप्रदाय उपलब्ध आहेत. आंतर-धार्मिक संघटनासह, सिंगापूर शहरात १० प्रमुख धर्म ओळखले जातात. प्यू रिसर्च सेंटरच्या २०१४ च्या विश्लेषणात सिंगापूर हे जगातील सर्वात धार्मिकदृष्ट्या विविधता असलेले राष्ट्र आढळून आले. येथे सर्वाधिक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, अलीकडील जनगणना (२०१५) मध्ये देशातील ३३.१२% लोकसंख्या बौद्ध अनुयायी म्हणून घोषित करण्यात आली आहे. +सिंगापूर सरकार अधिकृतपणे वेगवेगळ्या धर्मांबाबत सहिष्णू आहे आणि धार्मिक सौहार्द प्रोत्साहित करते, तथापि, यहोवाच्या साक्षीदारांवर आणि युनिफिकेशन चर्चवर बंदी घातली. काही धर्म, विशेषतः चिनी वंशातील गटांनी, हिंदू आणि इस्लामसारख्या इतर धर्मांबरोबर त्यांच्या उपासनेचे स्थान विलीन केले आहे. लोयांग तुआ पेक काँग मंदिर (पूर्वी किनारपट्टीच्या रांगेत स्थित) याचे एक प्रमुख उदाहरण आहे ज्यात तीन धर्म, ताओवाद, हिंदू आणि बौद्ध धर्म सह-स्थित आहेत. +सिंगापूरच्या जनगणनेत धर्म आणि जातीबद्दल तपशीलवार माहिती समाविष्ट आहे आणि ती दहा किंवा पाच वर्षांच्या आधारावर घेतली जाते. गेल्या तीन दशकांपासून धर्माचे आकडे खालील प्रमाणे आहेत:[२][३][१][मृत दुवा][४] +उपरोक्त आकडेवारी केवळ निवासी लोकसंख्येचा संदर्भ देतात आणि अनिवासी लोकसंख्येचा समावेश नाही (सिंगापूर अधिकारी २००५ मध्ये सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येच्या १८.३३% अनिवासी लोकांच्या आकडे जाहीर केले नाही). +सिंगापूरमधील हिंदू धर्म आणि संस्कृती ७व्या शतकात पुन्हा पाहिली जाऊ शकते, जेव्हा टेमासेक हिंदू-बौद्ध श्रीविजय साम्राज्याचे व्यापार-स्थळ होते. एक हजार वर्षानंतर दक्षिण भारतातील अनेक प्रवासी सिंगापूर येथे आणण्यात आले, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि औपनिवेशिक ब्रिटिश साम्राज्याने त्यांना कुळी आणि बंधुवर्धक कामगार म्हणून काम करण्यास आणले होते. सिंगापूरमध्ये सध्या सुमारे तीस प्रमुख हिंदू मंदिर आहेत, जी विविध देव आणि देवतांना समर्पित आहेत. २०१० मध्ये सिंगापूरमध्ये अंदाजे २,६०,००० हिंदू होते. हिंदू अल्पसंख्याक आहेत जे सिंगापूरचे ५.१% प्रौढ नागरिक आहेत आणि २०१० मध्ये कायम रहिवासी आहेत. सिंगापूरमधील जवळजवळ सर्व हिंदू भारतीय आहेत (९९%), व इतर ज्यांनी हिंदू कुटुंबात लग्न केले आहे. १९३१ मध्ये हिंदू एकूण लोकसंख्येच्या ५.५% वर पोहोचले होते, ते आतापर्यंत सर्वात जास्त प्रमाण होते. सिंगापूरमध्ये दीपावलीचा हिंदू सण राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखला जातो. काही गैर-भारतीय, सामान्यतः बौद्ध चीनी, विविध हिंदू कार्यात सहभागी होतात. मलेशिया आणि इंडोनेशियाच्या वेगवेगळ्या राज्यांव्यतिरिक्त, सिंगापूर हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यांवर कोणतेही बंधन ठेवत नाही. +हिंदू म्हणून नोंदणीकृत निवासी वंशीय गटांची लोकसंख्या २०१५[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14793.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5a711da19de3037a8d59d8f1f7c014c6f8144a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14793.txt @@ -0,0 +1 @@ +सिंगोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14824.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2704e928ffaaf8978d1496cb9ad06ca09e2ef75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14824.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ - ८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिंदखेडा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुका पूर्ण आणि साक्री तालुक्यातील फक्त दुसाने महसूल मंडळ यांचा समावेश होतो. सिंदखेडा हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +जयकुमार जितेंद्रसिंह रावल पक्षाचे भारतीय जनता पक्ष हे सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14830.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f0249609fc9ff2eebe6d98ed8d53ccc39cfdc89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14830.txt @@ -0,0 +1,4 @@ +सिंदगी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१६ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ११७५ लोकसंख्येपैकी ६२० पुरुष तर ५५५ महिला आहेत.गावात ६९६ शिक्षित तर ४७९ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ४३१ पुरुष व २६५ स्त्रिया शिक्षित तर १८९ पुरुष व २९० स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५९.२३ टक्के आहे. +सेनकुड, शेण्णी, मर्शीवणी तांडा, थोडगा, ब्रह्मवाडी, मांगदरी, सिंदगी बुद्रुक, मोघा, टेंबुर्णी, काळेगाव, आनंदवाडी ही जवळपासची गावे आहेत.सिंदगी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14844.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2c6430c50d9696097fdd2beef7f76dec86e20bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14844.txt @@ -0,0 +1 @@ +सिंदीविहिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14849.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8250f8fb74c204f69451a4c6742b6b21c3a42664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14849.txt @@ -0,0 +1,4 @@ +सिंदूर हे कुंकू पासून तयार होते. ते महिलांच्या भांगामध्ये वापरले जाते. +महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल ॲ्क्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.त्यामुळे पूर्वी पासून स्त्रिया वापरत[१] +ते कुंकू व पाणी या पासून तयार करतात. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1486.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ea83114556b0bea43b19bff3d0b0d9a7a978528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1486.txt @@ -0,0 +1,13 @@ +विश्व हिंदू परिषद (विहिंप) सेवाकार्य करणारी देशातील एक स्वयंसेवी संस्था आहे. दादासाहेब आपटे हे या संघटनेचे एक संस्थापक होत. विश्व हिंदू परिषद हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य करते. या परिषदेची स्थापना १७ ऑगस्ट १९७४ मध्ये केली गेली आहे. समाज कल्याणासाठी अनेक सेवाप्रकल्प ही संस्था चालवते. संघटीत व समरस समाज आणि समर्थ भारत हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद वाटचाल करत आहे.[१] हिंदूंचे धर्मातर रोखणे, अस्पृश्यता संपविणे, विदेशातील हिंदूंची धार्मिक कर्मभ्रष्टता संपवून त्यांना हिंदूमार्गावर आणणे, गोरक्षा करणे आदी विहिंपच्या स्थापनेमागील हेतू होते.[२] +विश्व हिंदू परिषदेने आपल्या समोर चार लक्ष्ये ठेवली. +विहिंपने जातीजातीतील वैमनस्य संपवणे व परस्पर समन्वय वाढवण्यावर भर दिला. ज्ञातीसंस्था संपर्क विभाग, समन्वय मंच, सदभाव बैठका अशा उपक्रमांद्वारे सर्व जाती-जमातींचे प्रतिनिधी एकत्र येऊ लागले. विहिंपच्या प्रयत्नातून एका जातीच्या धार्मिक, सामाजिक उत्सावाला इतर जातींच्या पंचांनाही सन्मानाने बोलावून त्यांचा सत्कार करण्याची पद्धत सुरू झाली.[३] +हिंदू समाजाला संघटित करणे, त्याचा स्वाभिमान जागवणे, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे असे परिषद मानते. भारतातील मठ, मंदिर आणि आखाडे यांना एकत्र आणण्याचे कार्य या संस्थेने पार पाडले आहे. या धार्मिक संस्थांना विश्वासात घेऊन हा विश्वास दिला की धार्मिक संस्थांचे प्रश्न सोडवणे, हिंदू समाजाची जागृती अशा विषयांसाठीच एकत्र येणे आवश्यक आहे. संतांचे मंडळ हेच विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शन करते. धर्मसंसद, संतसमिती, मार्गदर्शक मंडळ अशा विविध मार्गाने विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला दिशा दिली जाते. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यांचा सहभाग असतो. जातिसंस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे कार्यही या संस्थेने केले आहे. मंदिरांना सर्व जातीतून प्रशिक्षित पुजारी मिळवून देणे, पुजाऱ्यांच्या धार्मिक शिक्षणाची चांगली व्यवस्था करणे, वेदपाठशालांना आर्थिक मदत देणे, सर्व जाती-जमातींतील पुजाऱ्यांना वेदशिक्षण देण्याची व्यवस्था केली गेली आहे. तामिळनाडू येथे मंदिर पुजाऱ्यांची एक राज्यव्यापी संघटना उभी झाली आहे. भजन, कीर्तन, संस्कारवर्ग यासारखे कार्यक्रम घेतले जातात.[४] विहिंपच्या विविध सेवाप्रकल्पांत सर्व जातींच्या लोकांना समान सेवा मिळते हा अनुभव सार्वत्रिक आहे.[३] +समाजासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प संस्था चालवते आहे.[५] +आज भारतात ५१ हजार एकल विद्यालये, १२५ वसतिगृहे, ४५ अनाथाश्रम, ११०० ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्रे अशी वेगळ्या प्रकारची ५८ हजार सेवाकार्ये भारतात चालू झाली आहेत.[६] +‘हिंदू धर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही‘, असे १९६९ साली विहिंपच्या उडुपी अधिवेशनात १३५ धर्माचार्यांनी जाहीर केले आहे. विश्व हिंदू परिषदेने जातीजातीतील वैमनस्य संपवणे व परस्पर समन्वय वाढवणे यावर भर दिला. ज्ञातिसंस्था संपर्क विभाग, समन्वय मंच, सद्भाव बैठका अशा उपक्रमांद्वारे सर्व जातीजमातींचे प्रतिनिधी एकत्र येऊ लागले. या सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. +एका जातीच्या धार्मिक, सामाजिक उत्सवाला इतर जातीच्या पंचांनाही सन्मानाने बोलावून त्यांचा सत्कार करण्याची पद्धत आहे. +गोरक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद या हिंदू धर्म विरोधी गोष्टींना संघटित विरोध करण्याचे कार्य संस्था करते. +सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमताही दूर करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व संस्कार या किमान मानवी गरजांची सोय झालीच पाहिजे अशी संस्थेची धारणा आहे. +विश्वभरातील अनेक देशांत वेदमंदिरांची स्थापना केली आहे. जगातील शंभरहून अधिक देशांत सक्रिय कार्यसमिती आहे. निरनिराळ्या देशातील हिंदूंना एकत्र करून सण, उत्सव साजरे केले जातात. चिन्मय मिशन सारख्या संस्थासोबत यासाठी कार्य केले जाते. परदेशात आपले कुणी आहे आणि अडचणीत आधार आहे या मुळे हिंदू बांधव एकत्र येत आहेत. प्रशिक्षित पुजारी मंदिरांसाठी पाठवण्याचे काम केले जाते. त्यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक विधी सुरू झाले आहेत. सांस्कृतिक मूल्यांची माहिती व्हावी, म्हणून विविध स्पर्धापरीक्षा विदेशातही घेतल्या जाऊ लागल्या आहेत. विश्‍व हिंदू परिषदेचे आचार्य गिरीराज किशोर हे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष होते. +हिंदू देव देवतांची निंदानालस्ती करणे, जाहिरातीमध्ये त्यांचा विकृत प्रकारे उपयोग करणे अशा घटना रोखण्यासाठी संस्था आंदोलने करते. याविरोधात सरकारवर दबाव निर्माण केला जातो. खटले दाखल केले जातात. जगात कुठेही हिंदूंवर अन्याय होत असेल, तर सर्व देशांतील हिंदू समाजातर्फे त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवला जातो. मानवाधिकार समितीकडे, प्रसंगी जागतिक न्यायालयाकडेही परिषदेतर्फे दाद मागितली जाते. +मीनाक्षीपुरम येथे हिंदूंचे झालेले सामूहिक मुस्लिम धर्मांतर ही हिंदू समाजावर मोठा आघात होता. या निमित्ताने परिषदेने देशभर ‘जनजागरण अभियान’ केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14877.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c585ddf9032271c6c36bd45e0fcf6987101bc57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14877.txt @@ -0,0 +1,9 @@ +हिंदुस्थान देशाची फाळणी होण्यापूर्वी देशाच्या वायव्येला सिंध नावाचा प्रदेश होता. तो मुंबई इलाख्याचा भाग होता. साहजिकच सिंधमध्ये आणि विशेषतः त्यातल्या कराची शहरात अनेक मराठीभाषक होते. त्यावेळी अनेक सरकारी नोकरांच्या बदल्या सिंधमध्ये होत असत. फाळणीआधी कराचीत २५ हजार मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी, गुजराथी, मराठी लोकसंस्कृतीचा प्रभाव कराचीवर होता. फाळणीआघी कराची मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्ट्या जोडलेले होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्येही कराचीतील वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे. +कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली मराठी शाळाही सुरू झाली. इ.स. २०१३ सालीही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. इ.स. १९६१ सालापर्यंत गोव्याहून सुटलेली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची आगबोट कोंकणातली व सौराष्ट्र-कच्छमधील बंदरे घेत कराचीला जात असे. फाळणीनंतर फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ म्हणून समजलेल्या गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सव मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून धार्मिक विधी करणारे, भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जन केले जाते. आज २०१३ साली, कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे. +कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात. +फाळणीनंतर सिंध हा प्रदेश पाकिस्तानात गेला. तेव्हा मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. सिंधमधील सिंधी भाषा बोलणारे लोक मात्र महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या पिंपरी आणि कल्याणजवळच्या अंबरनाथ या गांवी आले. पिंपरीजवळ सिंधी कॉलनी उभी राहिली आणि अंबरनाथजवळ उल्हासनगर. +सिंधी ही आधुनिक आर्यभाषांपैकी एक भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेपासून झाला आहे. ती मुळात देवनागरी लिपीत लिहिली जात असे. इ.स. १८५३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपी निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. त्या समितीने काही अरबी आणि काही फारसी वर्ण एकत्र करून तिसरीच एक लिपी तयार केली. तीच सध्याची अरबी-सिंधी लिपी होय. या लिपीत ५२ वर्ण आहेत. आधुनिक सिंधी वाङ्‌मय प्रामुख्याने याच लिपीत लिहिले गेले आहे. या लिपीबरोबर आज सिंधीचे देवनागरी रूपही प्रचलित आहे. +भारतात आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सिंधी कार्यक्रम होत असतात. जुनी सिंधी माणसे रोजच्या व्यवहारात सिंधी भाषेचा आवर्जून वापर करतात. आधुनिक तरुण-तरुणी यांना सिंधी समजते, पण अनेकांना ती बोलता आणि लिहिता येत नाही. +सिंधी माणसे मराठी माणसांत पूर्णपणे विरघळून गेली आहेत. त्या लोकांपैकी प्राध्यापक लछमन हर्दवाणी नावाच्या गृहस्थाने सिंधी लोकांना मराठी संस्कृती आणि मराठी माणसांना सिंधी संस्कृती समजावून सांगण्याचा वसा घेतला होता. हिंदीपेक्षा मराठीला सिंधी भाषा जवळची आहे असे त्यांचे मत आहे. हर्दवाणी वयाच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्रात आले आणि अहमदनगरच्या महाविद्यालयातून हिंदीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. +१९९२मध्येआणि नंतर फक्त प्रा. लछमन हर्दवाणी यांचीच भाषाविषयक पुस्तके प्रकाशित झालेली दिसतात. +ही सर्व वर्तमानपत्रे महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून प्रसिद्ध होतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14889.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8475a88368044e35aaf1454af48af3176c73c34b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14889.txt @@ -0,0 +1,5 @@ +सिंधुघोष वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांपैकी एक प्रकारच्या पाणबुड्या आहेत. यांची रचना किलो वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे. या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या १९८६पासून आरमारी सेवेत आहेत. +या पाणबुड्या रोसोवूरुझेनी या रशियन कंपनीने भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बनविल्या. झ्वेझदोच्का गोदीमध्ये बांधण्यात आलेल्या या पाणबुड्या प्रॉजेक्ट ८७७ या संकेतनावाखाली बनविण्यात आल्या. यांची साधारण क्षमता ३,००० टन असून या ३०० मीटर खोलपर्यंत बुडी मारू शकतात. पाण्याखाली १८ नॉटच्या वेगाने सरकू शकणाऱ्या या पाणबुड्या ५३ खलाशी व अधिकारी घेउन सतत ४५ दिवस पाण्याखाली एकांड्या मोहिमेवर राहू शकतात. +यांची नावे संस्कृतमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. +जानेवारी १०, इ.स. २००८ रोजी सिंधुघोष आणि मालवाहू नौका एमव्ही लीड्स कॅसलची टक्कर झाली. सिंधुघोषच्या कॉनिंग टॉवरचे किरकोळ नुकसान झाले व त्यानंतर एक महिना दुरुस्तीत होती.[१] +फेब्रुवारी २६, इ.स. २०१० रोजी सिंधुरक्षकमधील सदोष बॅटरीमुळे आग लागली व त्यात एक खलाशी मृत्यू पावला व इतर दोन जखमी झाले.[२] ऑगस्ट १४, इ.स. २०१३ रोजी सिंधुघोषमध्ये स्फोट झाला व त्यानंतर मोठी आग लागली. यात अनेक खलाशी व अधिकारी मृत्यू पावल्याची भीती आहे. यानंतर सिंधुरक्षक बुडाली. ही पुन्हा वापरात येण्याची शक्यता नहिवत आहे.[३] जवळच उभी असलेल्या सिंधुरत्नचेही त्यावेळी किरकोळ नुकसान झाले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14932.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3ab228fdbda3f34cc28a53d44f933ea8360a2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14932.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पूर्वीचे सिंबायोसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी) हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14935.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3ab228fdbda3f34cc28a53d44f933ea8360a2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14935.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पूर्वीचे सिंबायोसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी) हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14940.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..804e6f31bea2183790ea881369b2fafc6aa6ea3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14940.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सिंबियन (इंग्लिश: Symbian) ही मुक्त स्रोत संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) आणि सॉफ्टवेर प्लॅटफॉर्म असून ती खासकरून स्मार्टफोन साठी विकसित करण्यात आली आहे. सिंबियनचा विकासात नोकिया ह्या मोबाईल उत्पादक कंपनीचा मोलाचा वाटा आहे.अलिकडेच सिंबियनची "सिंबियन ३" ही नवीन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आणि या आवृत्तीचा प्रथम उपयोग नोकियाच्या "नोकिया एन-८" या मोबाईलवर करण्यात आला. ११ फेब्रुवारी, २०११ रोजी नोकियाने सिंबियनला सोडून "विंडोज फोन ७" सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14968.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..124856d8ab47bc0bb824fcaafc2df0ae14e71ff9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14968.txt @@ -0,0 +1 @@ +सिंहला (सिंहल/Sinhala) ही दक्षिण आशियातील श्रीलंका ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14975.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbb591c3a7347c03d5f669d9149ad6923670e9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14975.txt @@ -0,0 +1 @@ +सिंहलीज क्रिकेट ग्राउंड श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14982.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a536f5afd91eabbb315db3a633445883e218e92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_14982.txt @@ -0,0 +1,15 @@ +सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे.[१] जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात. +समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो. +कुंभमेळ्याच्या ठिकाणी विविध संप्रदायाचे आणि आखाड्याचे साधू एकत्र येतात आणि उपासना करतात. असे साधू होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. कुंभमेळ्यात या सर्व साधूंचे विशेष महत्त्व असते.[२] +हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि व सूर्य आहे. +हा आखाडा संवत १८४४, सन १७१० मध्ये स्थापन झाला. या संप्रदायाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत. +हा आखाडा संवत १९०२, सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधूंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते. +हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या-गोदावरी संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. याच आखाड्यात आदिनाथ मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ असे योगी झाले. यांचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी, ब्रह्मगिरी, कौलगिरी, येथे साधना केली. +हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी कर्णप्रयाग येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार दत्तात्रय आहेत. +हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी मांडवी (कच्छ) येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव कार्तिक स्वामी आहेत. +हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये हरिद्वार कुंभाचे वेळी एका मोठ्या सभेत विचारविनियम होऊन दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव गुरुनानक ग्रंथसाहेब आहेत. +हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता गायत्री आहे. यांच्यात चार शंकराचार्य पीठांचे ब्रम्हचारी साधू आहेत व महामंडलेश्वर आहेत. +हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी झारवंड वैजनाथ – प्रांत बिहार येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत. +हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये दारागंज येथे मध्वमुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोही, निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभक्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधूंचे शाही स्नान झाल्यावर होत असते. +संत साहित्यातील अभ्यासक प.पु स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सिद्धीविनाय मानव कल्याण मिशन या धर्मादाय संस्थेमार्फत वारकरी आखाड्याचे नियोजन करण्यात येते. संपूर्ण भारतभरातून सिंहस्थ कुंभपर्वासाठी आलेल्या भाविक व साधू संतांसाठी भोजन, वारकरी कीर्तन,भजन, हरिपाठ, भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण कथा इ. चे आयोजन करण्यात येते. +नाशिक येथील कुंभमेळ्याबरोबरच उज्जैन, हरिद्वार येथीलही कुंभमेळ्यात वारकरी आखाड्याचे कार्य असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15004.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99265bb05031d29af82c297b8376f8e1336b16fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15004.txt @@ -0,0 +1,11 @@ +सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SEA, आप्रविको: KSEA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SEA) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात असलेला विमानतळ आहे. वायव्य अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या या विमानतळावरून उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरे तसेच आशिया आणि युरोपमधील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. याला सीटॅक या नावानेही ओळखतात. +येथून उत्तर अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप, मध्यपूर्व आणि आशियामधील बव्हंश मोठ्या शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ अलास्का एरलाइन्स आणि तिची उपकंपनी होरायझन एर यांचे मुख्य ठाणे असून डेल्टा एरलाइन्सचा मोठा तळ आहे. डेल्टा एरलाइन्स येथून अमेरिकेशिवाय युरोप आणि आशियाला थेट विमानसेवा पुरविते. +, डीट्रॉइट, एडमंटन, युजीन, फेरबँक्स, फोर्ट लॉडरडेल, फ्रेस्नो, ग्रेट फॉल्स, हेलेना, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जुनू, काहुलुइ, कैलुआ-कोनाकॅलिस्पेल, कॅलिस्पेल, केलोव्ना, कॅन्सस सिटी, केचिकान, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मेडफोर्ड, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिसूला, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग[५] पोर्टलँड (ओ), पुलमन, रॅली-ड्युरॅम, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी +, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता रोसा (कॅ), सिट्का, सन व्हॅली, स्पोकेन, टॅम्पा, ट्राय-सिटीझ (वॉ), तुसॉन, व्हँकूवर, व्हिक्टोरिया, वाला वाला, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेनाच्ची, विचिटा, याकिमामोसमी: कान्कुन, हेटन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो || align="center" | [६] +, डीट्रॉइट, फेरबँक्स, हाँग काँग (२ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत),[१४][१५] होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, ओसाका–कन्साई (१ एप्रिल, २०१९ पासून),[१६] पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ), रॅले–ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी +, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, स्पोकेन, सोल-इंचॉन, शांघाय-पुडाँग, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेसमोसमी: कान्कुन, सिनसिनाटी, फोर्ट लॉडरडेल, जुनू, मिलवॉकी, न्यू ऑर्लिअन्स, पाम स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो, तुसॉन, व्हँकूवर || align="center" | [१७] +, सान होजे, स्पोकेन, ट्राय-सिटीझ (वॉ), व्हँकूवर, व्हिक्टोरियामोसमी: बोझमन, फेरबँक्स, जॅक्सन होल, केचिकेन, मिलवॉकी, पाम स्प्रिंग्ज, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सिट्का, सन व्हॅली|| align="center" | [१७] +मोसमी: ऑस्टिन, क्लीव्हलँड, कॉलोराडो स्प्रिंग्ज || align="center" | [२२] +, कॅन्सस सिटी, लास व्हेगास, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, साक्रामेंटो, सेंट लुइस, सान डियेगो, सान होजेमोसमी: बाल्टिमोर, ह्युस्टन-हॉबी, मिलवॉकी, नॅशव्हिल|| align="center" | [३०] +, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेसमोसमी: लॉस एंजेलस || align="center" | [३४] +सिॲटल–टॅकोमा विमानतळापासून सिॲटल शहरापर्यंत लिंक लाइट रेल ही रेल्वेसेवा उपलब्ध आहे. येथून वेस्टलेक सेंटर आणि पुढे वॉशिंग्टन विद्यापीठापर्यंत दर १० मिनिटांनी गाड्या धावतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15019.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25e0b7ab56a2fe31ae951d3c6d8edf1a8b5103f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15019.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +सिउनाराइन चॅटरगून (३ एप्रिल, इ.स. १९८१:फायरिश, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15053.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52116eee9e9518abc0742158f2e1378eae0c6d75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15053.txt @@ -0,0 +1,16 @@ +सिकल सेल हा आजार 'सिकल पेशी रक्तक्षय' किंवा 'ड्रेपॅनोसायटोसिस' (ग्रीकःdrepane- विळा, kytos-पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात. 1994च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे. +सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे. +सहाराच्या दक्षिणेस असणा-या मूल निवासी समुदायामध्ये मलेरिया आजारास प्रतिबंध होण्यास सिकल पेशी आजाराचे जनुक एका गुणसूत्रावर असल्यास अधिक प्रभावी ठरते. अकराव्या गुणसूत्राच्या असणा-या दोन्ही गुणसूत्रापैकी एका गुणसूत्रावर सिकल पेशी जनुक असल्यास मलेरियाची तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत. दोन्ह्री गुणसूत्रावर असलेल्या जनुकास युग्मविकल्पी (अलील) म्हणतात. जनुके नेहमी जोड्यांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ युग्मविकल्पी म्हणजे जनुक जोडी. युग्मविकल्पी समयुग्मकी-एकसारखे किंवा विषमयुग्मकी असू शकते. तसेच जनुक प्रभावी किंवा अप्रभावी असू शकते. अप्रभावी सिकल पेशी जनुक दोन्ही गुणसूत्रावर असल्यास सिकल पेशी आजाराची तीव्रता अधिक असते. पण अप्रभावी सिकल पेशी जनुक एका गुणसूत्रावर असून दुस-या गुणसूत्रावर सामान्य हीमोग्लोबिन जनुक असलेली व्यक्ती सिकल पेशी जनुकाच्या अपेक्षेने विषमयुग्मकी असते. अशा व्यक्तीचा आजार कमी तीव्रतेचा असतो. +सिकल सेल आजार अशी संज्ञा द्यावयाचे कारण म्हणजे या आजारामुळे रुग्णास अनेक व्याधीना सामोरे जावे लागते. याचा शेवट मृत्यूने होतो. हीमोग्लोबिन जनुकामधील सर्वच उपप्रकार कमी अधिक तीव्रतेचे आहेत. +सिकल पेशी आजारामुळे होणारी नेहमीची गुंतागुंत म्हणजे रक्तक्षय (ॲनिमिया) होय. +याचा परिणाम रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येणे, प्लीहा या अवयवामध्ये रक्तपेशींचे विघटन होते. सिकल पेशी आजारात प्लीहेवर अति ताण पडल्याने प्लीहा मोठी होते. रक्तविघटनामध्ये अडथळे निर्माण होतात. +केशवाहिन्यामधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नसल्याने रक्त अवरोध निर्माण होतो. याच्या परिणामाने वेदना, आणि रक्तप्रवाह अवरोधामुळे उतीनाश होतो. वेदनाशामके घेतल्यानंतर किरकोळ तक्रारी दूर होतात. तीव्र वेदना थांबवण्यासाठी ओपियम (अफू) वर्गीय औषधांचा वापर करावा लागतो. फुफ्फुसे आणि शिस्नामधील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यास तातडीचे उपचार करावे लागतात. +अरुंद रक्तवाहिन्या आणि प्लीहेमधून रक्त वाहून नेण्यामधील अडथळ्यामुळे सिकलपेशी आजार झालेल्या व्यक्तीची प्लीहा नेहमीपेक्षा मोठी होते. कुमार वयामध्ये प्लीहा मोठी झाल्याचे लक्षात येते. अशा वेळी प्लीहा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. ज्यारुग्णांची प्लीहा काढून टाकली आहे अशा रुग्णाना लसीकरण आणि प्रतिजैविके यांचा उपचार जन्मभर घ्यावा लागतो. प्लीहा मोठी होणे वेदनाजन्य असते. प्लीहेमध्ये साठलेले रक्त एकएकी बाहेर आल्याने रक्तरसाचे (प्लाझमा) प्रमाण कमी होते. रक्तपेशी आणि रक्तरस यांचे गुणोत्तर 15 टक्क्यानी कमी होणे हे धोकादायक ठरते. पोट हाताने चाचपल्यास कडक लागते. एक दोन तासात यावर उपचार न केल्यास रुग्ण दगावतो. कधी कधी बाहेरून रुग्णास रक्त द्यावे लागते. +रुग्णामधील रक्तक्षय, शक्तिपात आणि नाडी प्रति मिनिटास शंभरहून अधिक होणे. हे लक्षण हृदयाची गति वाढल्याचे आहे. अशा वेळी पॅरव्हायरस बी19 या विषाणू संसर्गामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. दोन ते तीन दिवसात तांबड्या पेशी तयार होणे पूर्णपणे थांबते. सामान्य व्यक्तीमध्ये या विषाणूमुळे फारसा परिणाम होत नाही. पण सिकल पेशी आजार झालेल्या रुग्णामध्ये गंभीर स्थिति उद्भवते. सामान्य व्यक्तीच्या अस्थिमज्जेमध्ये नव्या तांबड्या पेशी तयार होतात. त्या पूर्णपणे तयार झाल्या शिवाय रक्तप्रवाहामध्ये येत नाहीत. सिकल पेशी आजारामध्ये अपरिपक्व रक्तपेशी रक्तप्रवाहामध्ये आढळणे ही गंभीर स्थिति आहे. अपरिपक्व रक्तपेशीस ‘रेटिक्युलोसाइट’ म्हणतात. सिकलपेशी रुग्णामधील हीमोग्लोबिन कमी झाल्याचे आढळल्यास रेटिक्युलोसाइटसची संख्या मोजून उपचार ठरवावे लागतात. हे सामान्य पेशींचा झपाट्याने –हास होत असल्याचे लक्षण आहे. यामुळे रक्तामधील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. रुग्ण पूर्ववत होण्यास चार दिवस ते एक आठवडा लागतो. काहीं रुग्णाना रक्त द्यावे लागते. +सिकल पेशी आजाराचे वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये दिसणारे सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे हाता पायाच्या बोटांची आग होणे. छातीत दुखणे, ताप,श्वसनास अडथळा, न्यूमोनियासारखी लक्षणे, अस्थिमज्जेमध्ये गुठळ्या, अशा व्याधीना तोंड द्यावे लागते. +सिकलपेशी आजार जनुकामधील उत्परिवर्तनामुळे होतो. हीमोग्लोबिन रेणू दोन बहुपेप्टाइडनी बनलेला असतो. अल्फा आणि बीटा. बीटा हीमोग्लोबिन बहुपेप्टाइड मधील सहाव्या क्रमांकाच्या जलस्नेही (हायड्रोफिलिक) ग्लुटामिक अमिनो आम्लाची जागा व्हॅलिन या जलद्वेषी (हायड्रोफोबिक) अमिनो आम्लाने घेतली जाते. बीटा ग्लोबिन बनविणारे जनुक 11व्या गुणसूत्रावर असते. सामान्य हीमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी दोन अल्फा आणि दोन बीटा हीमोग्लोबिन बहुपेप्टाइडची आवश्यकता असते. केवळ सहाव्या अमिनो आम्लाच्या बदलामुळे परिसरात ऑक्सिजनचे प्रमाणकमी असल्यास हीमोग्लोबिन रेणूचा आकार बदलून तो दात्र (सिकल) आकाराचा –विळ्यासारखा होतो. यामुळे पेशीचा आकार विळ्यासारखा होऊन पेशीची स्थितिस्थापकता कमी होते. सिकलसेल आजारातील प्रमुख विकार रक्तपेशीमधील स्थितिस्थापकता बदलण्याशी संबंधित आहे. सामान्य रक्तपेशी लवचिक असल्याने सूक्ष्मरक्तवाहिन्यामधून सहज आकार बदलून वाहून नेली जाते. सिकलसेल आजारामध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होतो. समुद्रसपाटीपासून अधिक उंचावर असा परिणाम त्वरित होतो. ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य झाल्यानंतर या पेशींचा विळ्यासारखा आकार पूर्ववत होत नाही. परिणामी सूक्ष्म रक्तवाहिन्या अधिक अरुंद होऊन सिकल पेशींच्या अडथळ्यामुळे उतीना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. या प्रकारास वैद्यकीय परिभाषेत ‘इश्चेमिया’ म्हणतात. +रक्तपेशींच्या कमतरतेस ‘पंडुरोग’ ॲमनिमिया म्हणतात. रक्तपेशींचे मोठ्याप्रमाणात विघटन झाले म्हणजे पंडुरोग होतो. आकार बदललेल्या पेशी प्लीहेमध्ये नष्ट केल्या जातात. अस्थिमज्जेमध्ये नव्या रक्तपेशी सतत तयार होत असतात. सामान्य रक्तपेशीचे आयुष्य120 दिवसांचे असते. पण सिकल पेशी फक्त 10-20 दिवसच रक्तप्रवाहामध्ये राहू शकत असल्याने अस्थिमज्जेमधील नव्या पेशी त्यांची जागा घेऊ न शकल्याने रक्तपेशींची कमतरता होऊन पंडुरोग होतो. मानवी रक्तपेशीमध्ये हीमोग्लोबिन ‘ए’ असते. हीमोग्लोबिन ए मध्ये दोन अल्फा आणि दोन बीटा बहुपेप्टाइड असतात. हीमोग्लोबिनचा आणखी एक प्रकार ए2 मध्ये दोन अल्फा आणि दोन डेल्टा बहुपेप्टाइड असतात. हीमोग्लोबिन एफ दोन अल्फा आणि दोन गॅमा बहुपेप्टाइडनी बनलेले असते. 96-97 % रक्तपेशीमध्ये हीमोग्लोबिन ए असते. +मध्य भारतातील महाराष्ट्रात काही विशिष्ट जातींमध्ये आढळणारा एक आनुवंशिक रोग[१].यात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण बिघडुन गोल स्वरूपात असणाऱ्या लाल रक्तपेशी ह्या विळ्याच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी सुमारे १२० दिवस जिवंत राहतात पण या रोगग्रस्ताच्या फक्त ३० ते ४० दिवस.महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे या रोगाने प्रभावित आहेत.विदर्भातील एकही जिल्हा सिकलसेलमुक्त नाही. लगतच्या मध्यप्रदेश आंध्र प्रदेश छत्तिसगढ आदि राज्यातपण असलेला हा रोग भारतातील एकूण १२ राज्यात आढळला आहे.विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.[२]सुमारे ४६ जाती या रोगाने ग्रस्त आहेत. हा जन्मापासुनच होणारा रोग आहे. यात रुग्णाचे आयुष्य फार तर १७-१८ वर्षाचेच असते. हा रोग प्रजोत्पादनाद्वारे पसरतो. याच्या रोगनिवारणासाठी औषधोपचाराचा अद्याप शोध लागला नाही. +या रोगाचे अस्तित्व सर्वप्रथम सन १९१० मध्ये अमेरीकेत सिद्ध झाले, भारतात सन १९५२ तर विदर्भात सन १९५८ मध्ये. +सिकलसेल' समूळ नष्ट होण्यासाठी औषध अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.[३]परंंतु हा अनूंवांशिंक विकार असल्यामुळे दोन वाहक किंवा पिडीतांनी लग्न टाळल्यास या विकाराचा प्रसार रोकता येउ शकतो. +महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे रुग्णास ओळखपत्र देण्यात येते आणि शासकीय दवाखान्यात मोफत रक्त व औषधोपचार. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15057.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c78face985a11596b75acbe059398a0e0b234a34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15057.txt @@ -0,0 +1 @@ +सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (नेपाळी: सिक्किम प्रजातान्त्रिक मोर्चा) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या व प्रामुख्याने सिक्कीम राज्यात कार्यरत असलेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गंगटोक येथे आहे. १९९४ ते २०१९ दरम्यान सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट सिक्कीममध्ये सत्तेवर होता व पक्षाध्यक्ष पवनकुमार चामलिंग मुख्यमंत्री‎पदावर होते. २०१९ सालापासून सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15063.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5cd35beeafdc26ce300ad84be235148d911b20d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15063.txt @@ -0,0 +1 @@ +सिक्कीमी (Dzongkha) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या सिक्कीम राज्यामधील भुटिया जमातीचे लोक वापरतात. ही भाषा तिबेटीसोबत मिळतीजुळती असून तिची भूतानमधील जोंगखासोबत देखील समानता आढळते. सिक्कीममधील अनेक रहिवासी सिक्कीमीसोबत नेपाळीदेखील वापरतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15078.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9128b3d2d2517217293b657d8d4eb23310311fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15078.txt @@ -0,0 +1,4 @@ +सिक्किम स्काउट्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. 2013च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या सिक्किम स्काउट्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +सिक्किम स्काउट्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15093.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fd3184c1075943091cdf68f7717025930709f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15093.txt @@ -0,0 +1,53 @@ +सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. +सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैर-वैधानिक संस्था म्हणून केली गेली. १२ एप्रिल  1992  रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा १९९२ संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या व्यवसाय जिल्ह्यात सेबीचे मुख्यालय असून अनुक्रमे नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रीय कार्यालये आहेत. जयपूर आणि बेंगळुरू येथे स्थानिक कार्यालये उघडली गेली आहेत आणि वित्तीय वर्ष २०१३-२०१४ मध्ये गुवाहाटी, भुवनेश्वर, पटना, कोची आणि चंदीगड येथे कार्यालये देखील उघडली आहेत. +भांडवली मुद्द्यांचे नियंत्रक हा नियामक प्राधिकारी होता; भांडवल मुद्दे (नियंत्रण) अधिनियम, १९४७. पासून त्याचा अधिकार आला. +सेबीचे सदस्य त्याद्वारे व्यवस्थापित केले जातात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: +१. अध्यक्ष हे भारत सरकारकडून नामित केले जातात. +२. दोन सदस्य, म्हणजेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी +३. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक सदस्य. +४. उर्वरित पाच सदस्य भारत सरकारकडून नामित केले जातात, त्यातील किमान तीन सदस्य पूर्णवेळ सदस्य असतील. +१९९९ च्या दुरुस्तीनंतर सामूहिक गुंतवणूक योजना निधी, चिट फंड आणि सहकारी वगळता सेबीच्या अंतर्गत आणल्या गेल्या.भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते. +तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष/उणीवा होत्या. १९८० नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता परंतु शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. +जी.एस. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून १२ एप्रिल १९८८ रोजी सेबीची स्थापना करण्यात आली. ३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे .सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत. +सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते. +निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रेय शंकर सोमण हे सेबीचे काही काळ सल्लागार होते. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी 'सेबी'ला त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. यामुळे 'सेबी' बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली.अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेरमन आहेत. श्री जी महालिंगम , श्रीमती माधबी पुरी बूच ,श्री एसके मोहंती ,श्री अनंत बरुआ हे सध्या पूर्णवेळ सदस्य आहेत. +कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट रेगुलेशन विभाग +महानगरपालिका वित्त विभाग +विभाग आर्थिक आणि धोरण विश्लेषण +कर्ज आणि संकरित विभाग +अंमलबजावणी विभाग - 1 +अंमलबजावणी विभाग - 2 +चौकशी आणि निवारण विभाग +सामान्य सेवा विभाग +पुनर्प्राप्ती आणि परतावा विभाग +मानव संसाधन विभाग +परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि संरक्षकांचे विभाग +माहिती तंत्रज्ञान विभाग +एकात्मिक पाळत ठेव विभाग +अन्वेषण विभाग +गुंतवणूक व्यवस्थापन विभाग +कायदेशीर व्यवहार विभाग +मार्केट इंटरमीडियरीज नियमन व पर्यवेक्षण विभाग +बाजार नियमन विभाग +आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यालय +गुंतवणूकदार सहाय्य आणि शिक्षण कार्यालय +अध्यक्ष कार्यालय +प्रादेशिक कार्यालये +दक्षता विभाग +सेबीची कार्यपद्धती - +१) सेबी तीन घटकांसाठी काम करीत असते +अ) प्रतिभूती निर्गमक +ब) गुंतवणूकदार +क) बाजारातील मध्यस्थ आणि बाजार +सेबीची महत्त्वाची कार्ये +कार्ये +कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सेबीला खालील अधिकार सोपविण्यात आले आहेत: +१. सिक्युरिटीज एक्सचेंजच्या कायद्यांद्वारे मंजूर करणे. +२. सिक्युरिटीज एक्सचेंजला त्यांच्या  कायद्यांद्वारे दुरुस्ती करणे आवश्यक आहे. +३. खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करा आणि मान्यताप्राप्त सिक्युरिटीज एक्सचेंजमधून नियमित परतावा मागवणे . +४. आर्थिक मध्यस्थांच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करा. +५. विशिष्ट कंपन्यांना एक किंवा अधिक सिक्युरिटीज एक्सचेंजमध्ये त्यांचे समभाग सूचीबद्ध करण्यास भाग पाडणे. +६. ब्रोकर आणि सब-ब्रोकरची नोंदणी +७. कार्यकारी प्रमुख म्हणून सेबी गैरव्यवहारांची तपासणी आणि त्यावर कारवाई करते.   +८. कायदेपालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा सेबीला अधिकार देण्यात आला आहे.   +९. न्यायालयीन प्रमुख म्हणुन घोषणा ,नियम,आदेश काढण्याचा सेबीला अधिकार आहे . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1510.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1f67680075d491c4beada557f3a21e79e909faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1510.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ ऑगस्ट, इ.स. २०१० +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15119.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afba39b37825600d23bc00ec65df03abd8001cdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15119.txt @@ -0,0 +1 @@ +सिटी ओव्हल (पूर्वी अलेक्झांड्रा पार्क[१] आणि काहीवेळा पीटरमॅरिट्झबर्ग ओव्हल म्हणले जात होते),[२] पीटरमॅरिट्झबर्ग, दक्षिण आफ्रिकेतील एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे. १२,००० क्षमतेच्या स्टेडियमचा वापर सध्या प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांसाठी केला जातो, या मैदानाचा वापर क्वाझुलु-नॅटल इनलँड पुरुष आणि महिला संघ, क्वाझुलु-नताल आणि डॉल्फिन (जे किंग्समीड, डर्बन येथे देखील खेळतात) करतात,[३][४] आणि २००३ क्रिकेट विश्वचषक दरम्यान दोन सामने आयोजित केले. हे जगातील फक्त तीन प्रथम-श्रेणी क्रिकेट मैदानांपैकी एक आहे ज्यांच्या सीमेमध्ये झाड आहे[५][६] (इतर आहेत कँटरबरी, युनायटेड किंग्डममधील सेंट लॉरेन्स ग्राउंड आणि ॲमस्टेल्वीन, नेदरलँड्समधील व्हीआरए क्रिकेट ग्राउंड)[७] आणि सिटी ओव्हलवरील सामन्यात शतक झळकावणाऱ्या किंवा पाच बळी घेणाऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूला मैदानावर एक झाड लावावे लागते.[८] सिटी ओव्हल पॅव्हेलियन चेस्टरफील्ड, युनायटेड किंग्डम येथील क्वीन्स पार्क क्रिकेट मैदानाच्या डिझाइनवर आधारित आहे.[९] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15126.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..704834dac64e804740bef7acd12162d9279d43a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15126.txt @@ -0,0 +1,3 @@ +सांगली शिक्षण संस्थेची ४ डिसेंबर १९९४ रोजी सुरू झालेली ही शाळा - ज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले एक निश्चयी पाऊल. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाने सजलेली ही शाळा. +९० वर्षापूर्वी सुरू झालेल्या बीजाचे रूपांतर एका वटवृक्षात झाले आहे. या शाळेला मोठे करणारे कीर्तिवान विद्यार्थी, मुख्याध्यापक, माजी व कार्यरत शिक्षक, सर्व कर्मचारी आणि या शाळेच्या आयुष्यात आलेले सुवर्णक्षण हे एकत्रित गुंफले आहेत. +सिटी हायस्कूल हा एक चालताबोलता इतिहास आहे. याच्या जोरावर वर्तमानकाळ उज्वल आणि लखलखीत आहे. भविष्यकाळ गरुडाच्या भाराराने नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी खुणावतो आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15151.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05df51cae4fffcc97d08e668518176d3fcd03afd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15151.txt @@ -0,0 +1,4 @@ +सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स भारताच्या मुंबई शहरातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. हे आशिया खंडातील सर्वात प्राचीन वाणिज्य महाविद्यालय आहे. +हे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाशी संलग्न आहे. महाविद्यालय वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्रदान करते.[१] +आशिया खंडातील वाणिज्य महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडनहॅम महाविद्यालयाची स्थापना ऑक्टोबर १९१३ मध्ये स्थापन झाले. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर, कॉम्बेचे लॉर्ड सिडनहॅम यांच्या नावाने हे नाव देण्यात आले होते. यामुळे सिडनहॅम कॉलेज वाणिज्यातील सर्वात जुनी पदवी देणारी संस्था आहे. के.एस. अय्यर यांनी महाविद्यालयाचे प्रथम मानद प्राचार्य म्हणून काम केले. अर्थशास्त्रज्ञ पर्सी टेन्स्टे यांची १९२० मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. १९२० मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते या पदावर राहिले. सिडनहॅम महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर केवळ १९४१ मध्येच इतर कोणत्याही संस्थेने या विषयाचे अभ्यासक्रम सुरू केले. भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे लेक्चरर होते. सन २०१९ मध्ये सिडनहॅम कॉलेज मुंबई विद्यापीठातून संलग्न झाले आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाशी संबंधित होते.[२] +संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15157.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a99b19ba5769a504d6d4324140ce736e36c45709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15157.txt @@ -0,0 +1,4 @@ +सिडनी ऑपेरा हाउस (इंग्लिश: Sydney Opera House) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. योर्न उट्झन ह्या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स. १९७३ साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. वर्षामध्ये सरासरी १,५०० कार्यक्रम भरवणारे हे ऑपेरा हाउस जगातील सर्वात वर्दळीच्या नाट्यगृहांपैकी एक आहे. +सिडनीच्या पोर्ट जॅक्सन ह्या प्रशांत महासागरावरील नैसर्गिक बंदराजवळ स्थित असलेले ऑपेरा हाउस हे सिडनीमधील सर्वात मोठे पर्यटक आकर्षण असून जवळील सिडनी हार्बर ब्रिजसोबत ते सिडनी व ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या खुणांपैकी एक मानले जाते. ह्या वास्तूसाठी उट्झनला २००३ साली प्रिट्झ्कर स्थापत्य पारितोषिक हा स्थापत्यशास्त्रामधील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. +युनेस्कोने २००७ साली सिडनी ऑपेरा हाउसला जागतिक वारसा स्थान बनवले. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1522.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ff6d251ff9bd9f1c4c070fd5973ab399245fa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1522.txt @@ -0,0 +1 @@ +विआ स्कॉग (१९३८ - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15228.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d60bfe9ab84c0fd52bdb043ed4827abfff24118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15228.txt @@ -0,0 +1 @@ +सिद्दी जौहर हा अदिलशहाचा सरदार होता. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा किल्ल्यापर्यंत सर्व मुलुख जिंकुन घेतला. त्यावेळी त्यांना तोंड देण्यासाठी आदिलशहाने याची नेमणुक केली. त्याच्यासोबत अफजलखानाचा मुलगा फाजलखान हा सरदार दिला. सिद्दी जौहर चाळीस हजारांची फौज घेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला. त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा किल्यावर होते. सिद्दीने किल्याला वेढा घातला. सलग चार महिने उन्हापावसाची तमा न करता वेढा चालु होता. सिद्दीने सोबत आणलेल्या तोफांचा मारा किल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता म्हणून त्याने राजापुरच्या इंग्रजांकडून लांब पल्याच्या तोफा मागवून त्यांचा मारा किल्यावर केला. षशेवटी गडावरची शिबंदी संपत आली. राजांनी लिद्दी जौहरच्या हातावर तुरी देऊन गडावरून निसटुन जायचा बेत केला. त्याकरिता शिवा काशिद या शिवाजी राजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने महाराजांचा वेश परिधान करून सिद्दीच्या गोटात जाऊन त्याची दिशाभुल केली. तेवढ्या काळात मनहाराज पन्हाळ्यावरून सुखरूप निसटले. पावनखिंड येथे बाजीप्रभु देशपांडे यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन राजाची विशाळगडाकडे सुखरूप रवानगी केली. नंतर महाराजंनी आपल्आया दुतामार्फत पन्हाळ्यावरील किल्लेदार त्र्यंबकपंत यांना निरोप पाठवून किल्ला सिद्दीच्या स्वाधीन केला. आदिलशाहास सिद्दी जौहर चा संशय येऊन त्याने सिद्दीला विषप्रयोग करून ठार मारले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15230.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..652c8bf0647d11dca9b6ac5d71c946986ffac0fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15230.txt @@ -0,0 +1 @@ +सिद्दिपेट हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सिद्दिपेट जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ११५ किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १,११,३५८ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15247.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dd62b888fa0a80eb740d28d52cdf39091876488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15247.txt @@ -0,0 +1 @@ +सिद्धरामय्या किंवा सिद्दरामय्य हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मे २०१३ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पदग्रहण करणारे सिद्धरामय्या राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी ते १९९६-१९९९ व २००४-२००५ दरम्यान कर्नाटकचे उप-मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15250.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..133ba0d6a246abf4dce2ba7a8d26d982fe3c9da6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15250.txt @@ -0,0 +1,9 @@ +पुरुसेरे कत्तुना किंवा पुरुषमक्कल कुनीता हा कर्नाटक राज्यातील लोकसंस्कृती मधील नृत्य नाट्य कलाप्रकार आहे. यालाच असेही स्थानिक भाषेत सिद्धवेश/सिद्धवेस असेही म्हटले जाते.[१] सुल्लिया, बेलथनगड्डी, पुत्तुर येथील तुळू गौडा समाजाचे सदस्य तुळु दिनदर्शिकेनुसार सुग्गी महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे स्वरूप सामाजिक आणि धार्मिक आहे. हा उत्सव संध्याकाळी सुरू होतो आणि पहाटेपर्यंत सुरू राहतो. यामध्ये समाजातील विविध स्तरातील लोकांच्या घरी भेट देणे आणि लोकनृत्य-नाट्य सादर करणे हे याचे स्वरूप आहे.[२] +दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मंगलोर जवळच्या लहान-मोठ्या गावांमधे लोकदेवतांची उपासना आढळून येते. पंजुर्ली, सत्यदेवता, गुलिका अशा देवता इथे पूजनीय आहेत. या सर्व देवतांची उपासना करणारा एक उत्सव तुळुनाडू परिसरात चैत्र पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते.[३] +धार्मिक परंपरेतील नाथ पंथ याच्याशी या कलाप्रकाराचा संबंध मानला जातो. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत याचे सादरीकरण सुरू असते. संन्यासी, भातृ आणि दास्य ही यातील प्रमुख पात्रे असतात. मंगलोरपासून ४५ किमी अंतरावर धर्मस्थल नावाचे मंजुनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. अनेक भक्तगण येथे श्रद्धापूर्वक भेट देतात. याच मंजुनाथाचे मुख्य ठाणे हे मंगलोरजवळच कद्री मंजुनाथ मंदिर येथे आहे. कद्री मंजुनाथ मंदिर परिसरातच नाथपंथाचा एक मठही आहे. येथे नवनाथांची उपासना केली जाते. +सिद्धवेस हा नाथ संप्रदायातील गौड जमातीच्या सदस्यांनी सादर केलेला नृत्य नात्य प्रकार आहे. महाराष्ट्राच्या कोकण भागातील दशावतारी खेळे, संकासूर, गोमू, राधा शिमगोत्सवाच्या काळात घरोघरी जाऊन खेळे सादर करतात त्याच्याशी प्राथमिक स्तरावरचे सिद्धवेसाचे साम्य दिसून येते. मंजुनाथ देवतेची प्रतिकृती किंवा अन्य कोणत्याही समकक्ष स्थानिक लोकदेवतेची प्रतिकृती सिद्धवेस या कलाप्रकारात मुख्य देवता म्हणून पूजिली जाते. +पुरोहित, गावातील एखादा वृद्ध, तीन-चार इस्लाम पंथाचे अनुयायी, विविध मुखवटे घातलेली सोंगे, स्थानिक फुले खोवून तयार केलेले कागदी मुकुट घातलेली लहान लहान मुले, नारळ सुपारीच्या झाडांची वेशभूषा केलेले कलाकार अशी विविध पात्रे या खेळात असतात. या खेळात केवळ पुरूष आणि मुलेच सादरीकरण करू शकतात. महिला आणि मुली केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत असतात. काही वेळेला याच खेळात लोकदैवतांची वेशभूषा आणि रंगभूषा केलेले कलाकारही सहभागी होतात.[३] +ज्या घरासमोर हा खेळ सादर होणार आहे त्या घरच्या शेणाने सारवलेल्या अंगणातील तुळशी वृंदावनासमोर रांगोळी वा फुलांची सजावट केली जाते. तुळशीपुढे पितळी समई प्रज्वलित केली जाते. आणखी एक समई घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करून ठेवली जाते. +खेळाच्या सुरुवातीला कलाकारांची रंगभूषा, वेशभूषा तीन ते चार तास आधी सुरू होते. यासाठी कोणतीही कृत्रिम रंगभूषा साधने वापरली जात नाहीत. हळद, कुंकू, काजळ यांचा वापर करून चेहरा रंगवला जातो आणि नारळी पोफळीच्या सोपटांचे बारीक धागे वापरून पोशाख तयार केले जातात. कापडी पोशाखही वापरले जातात.[३] +तीनसांजेला वांद्यांच्या तालावर लोकदेवतेची मूर्ती डोक्यावर घेऊन छोटीशी मिरवणूक काढली जाते ज्यामधे खेळातील सर्व कलाकार घराच्या अंगणालाच तीन प्रदक्षिणा घालतात. विशिष्ट तालावर पायांच्या विशिष्ट हालचाली करीत सर्व कलाकार प्रदक्षिणा पूर्ण करतात. नंतर केवळ उत्स्फूर्ततेने सादर केला जाणारा, कोणतीही बांधेसूद संहिता नसलेला, संवादाचा पूर्वसराव नसलेला नाट्य नृत्यप्रकार सुरू होतो. या सर्व सादरीकरणामधे समाजातील निम्न स्तरातील लोकांचा सहभाग असल्याने अर्वाच्य भाषेतील विनोदी संवाद, ज्ञानी पंडितांवर केलेली टीका आणि या सर्वातून होणारी विनोदनिर्मिती उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन करते. ठराविक काळानंतर सर्वजण मिळून लोकदैवताची आरती करतात, प्रसाद वाटतात आणि सादरीकरणाची समाप्ती होते.[३] +खेळ संपल्यावर गावजेवण दिले जाते. यजमान कुटूंब सांबार, भात, इडली, एखादी मांसाहारी भाजी आणि दुधात शिजविलेली घट्ट खीर म्हणजेच पायसम् याचे भोजन देते. खेळ सादर केल्याबद्दल कलाकारांना रोख स्वरूपात मानधन दिले जाते, सुपारी, तांदूळ, नारळ असेही दिले जाते. कुटुंबातील स्रिया जाड पोहे, ताजा खोवलेला नारळ आणि गूळ यांचे मिश्रण कालवून त्याचाही प्रसाद तयार करतात.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15263.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60b7802fd9caf5898e1af3c3104d27fd3c1f487d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15263.txt @@ -0,0 +1 @@ +सिद्धार्थ हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15284.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15284.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15290.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0942d1212f5456ec650352d594e96805e1b51b38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15290.txt @@ -0,0 +1,8 @@ + + + +सिद्धार्थ विधी महाविद्यालय (सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ) हे मुंबईतील एक कायद्याचे महाविद्यालय असून याची स्थापना १९५६ मध्ये झाली.[१] हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे चालते, जी ८ जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.[२] समाजातील सर्व घटकांमध्ये कायदेशीर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालय तयार करण्यात आले. हे महाविद्यालय एमएनएमआरडीएच्या वारसा सोसायटीद्वारे वारसा रचना म्हणून घोषित केले आहे.[३] +सध्या महाविद्यालयात तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परंतु, पाच वर्षे बीएसएल, एलएलबी अभ्यासक्रम देखील प्रस्तावित आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन कोर्स देखील महाविद्यालयाद्वारे आयोजित आहेत. +महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये कायद्याच्या पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. महाविद्यालय हे डॉ. आंबेडकरांच्या वैयक्तिक संकलनातील काही दुर्मीळ पुस्तकांचे देखील एक घर आहे, जे भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या संदर्भात वापरण्यात आले होते.[४] +पूर्वी महाविद्यालयाला श्रीमती सिरिमावो भंडारनायके सारख्या अनेक व्यक्तिमत्त्यांनी भेट दिली होती. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. मजूमदार, न्यायमूर्ती रोशन दळवी आणि अनेक अन्य कायदेतज्ज्ञांनी भेटी दिल्या.[५] महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अजमल कसाबच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुकदम्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली होती, जी सामान्यपणे सामान्य जनतेसाठी प्रतिबंधित होती.[६] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15309.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2809c6dbc87fd6b8d82ee0d92ff34d311eea55a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15309.txt @@ -0,0 +1,14 @@ +शुभदीप सिंग सिद्धू (११ जून १९९३ – २९ मे २०२२), जो त्याच्या स्टेज नावाने सिद्धू मूस वाला या नावाने ओळखला जातो, तो एक भारतीय गायक, रॅपर, अभिनेता आणि पंजाबी संगीत आणि पंजाबी सिनेमाशी संबंधित राजकारणी होता. [१] निन्जाच्या "लायसन्स" या गाण्यासाठी गीतकार म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि "जी वॅगन" या युगल गाण्यावर गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या पदार्पणानंतर, त्याने हंबल म्युझिकने प्रसिद्ध केलेल्या विविध ट्रॅकसाठी ब्राउन बॉयझसोबत सहयोग केला. +मूस वाला त्याच्या वादग्रस्त गीतात्मक शैलीसाठी ओळखला जात असे, तो अनेकदा बंदूक संस्कृतीचा प्रचार करत होता, तसेच धार्मिक भावनांनाही आव्हान देत होता [२] शीख धर्मातील माई भागोशी संबंधित होता. [३] [४] बंदूक संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि त्याच्या गाण्यांमध्ये प्रक्षोभक आणि प्रक्षोभक गीते वापरण्यासाठी त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता. [४] [३] २०२२ पर्यंत, त्याच्यावर चार चालू गुन्हेगारी खटले होते. मूस वाला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि २०२२ ची पंजाब विधानसभेची निवडणूक त्यांनी मानसा येथून अयशस्वीपणे लढवली होती. २९ मे २०२२ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. [५] [६] [७] [८] +शुभदीप सिंग सिद्धू हे भारतातील पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गावचे होते. त्यांचा जन्म शीख कुटुंबात वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांच्या पोटी झाला. त्यांनी गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालय, लुधियाना येथे शिक्षण घेतले आणि २०१६ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. मूस वाला यांनी रॅपर तुपाक शकूर यांचे कौतुक केले आणि त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला. सहाव्या इयत्तेत असताना त्यांनी हिप-हॉप संगीत ऐकण्यास सुरुवात केली आणि लुधियाना येथील हरविंदर बिट्टू यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या विधानांनुसार, मूसा या त्यांच्या मूळ गावाला श्रद्धांजली म्हणून त्यांनी मंचाच्या नावासाठी "मूस वाला" निवडले. +पदवीनंतर, मूस वाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून ब्रॅम्प्टन, ओंटारियो, कॅनडा येथे गेले. तेथे राहत असताना त्यांनी शेरिडन कॉलेज आणि हंबर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. +मूस वाला यांनी त्यांच्या स्वतःच्या निर्मिती कंपनी जट लाइफ स्टुडिओज अंतर्गत येस आय अॅम स्टुडंट या चित्रपटातून पंजाबी सिनेमात पदार्पण केले. चित्रपटाचे दिग्दर्शन तरनवीर सिंग जगपाल यांनी केले होते आणि गिल रौंटा यांनी लिहिले होते. २०१९ मध्ये, मूस वाला तेरी मेरी जोडीमध्ये दिसला. जून २०२० मध्ये, त्याने गुनाह नावाच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली. २२ ऑगस्ट रोजी, त्यांनी स्वितज ब्रार अभिनीत आणि ट्रू मेकर्स दिग्दर्शित मूसा जट या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज केला. २४ ऑगस्ट रोजी, त्यांनी अंबरदीप सिंग दिग्दर्शित जट्टन दा मुंडा गांव लगाया या नवीन चित्रपटाची घोषणा केली जी १८ मार्च २०२२ रोजी रिलीज होणार होती. +मूस वाला यांनी डिसेंबर २०१८ मध्ये मूसा गावातून सरपंचपदाची निवडणूक जिंकलेल्या त्यांच्या आई चरण कौरसाठी सक्रियपणे प्रचार केला. +मूस वाला मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि PPCC अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. +३ डिसेंबर २०२१ रोजी, मूस वाला यांनी २०२२ पंजाब विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मानसाचे काँग्रेस आमदार नजरसिंग मनशाहिया यांनी बंड केले आणि मूसेवाला यांच्या उमेदवारीला विरोध केला. मानसा मतदारसंघातून केवळ २०.५२% मते मिळवून, मूस वाला आम आदमी पार्टीच्या विजय सिंगला यांच्याकडून ६३,३२३ मतांच्या फरकाने पराभूत झाले. +२०२२ च्या निवडणुकीदरम्यान, मूस वाला यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणूक प्रचाराचा अनुमत कालावधी संपल्यानंतर त्यांनी मानसा मतदारसंघात घरोघरी प्रचार केला होता. +११ एप्रिल २०२२ रोजी, मूस वाला यांनी "बळीचा बकरा" नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्यांनी २०२२ पंजाब राज्य विधानसभा निवडणुकीतील अपयशाबद्दल शोक व्यक्त केला. आम आदमी पार्टी ने दावा केला आहे की मूस वाला यांनी आपल्या गाण्याद्वारे पंजाबचे मतदार 'आप'ला निवडून देण्यासाठी "गद्दर" (अनुवाद-देशद्रोही) असल्याचे सूचित केले. त्यांनी असाही दावा केला की मूस वालाचे गाणे काँग्रेसची "पंजाबविरोधी" मानसिकता कायम ठेवते आणि त्यांनी मूस वालाच्या मतांचे समर्थन केले की नाही यावर पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्याकडून उत्तर मागितले. +मूस वाला यांची २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांच्या मते, ही हत्या टोळीतील शत्रुत्वामुळे झाली होती. +पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास तो त्याचा चुलत भाऊ गुरप्रीत सिंग आणि शेजारी गुरविंदर सिंग यांच्यासोबत घरातून बाहेर पडला. मूस वाला त्याची काळी महिंद्रा थार एसयूव्ही चालवत होता आणि त्याचे वडील वेगळ्या कारमधून त्याच्या मागे जात होते. तो बर्नाळा येथे त्याच्या मावशीच्या घरी जात होता. ०५:३० वाजता SUV जवाहरके गावात पोहोचली तेव्हा इतर दोन गाड्या अडवून अडवल्या. या घटनेदरम्यान ३० राऊंड गोळीबार करण्यात आला, ज्यात इतर दोन पुरुष जखमी झाले. मूस वालानेही आपल्या पिस्तुलाचा वापर करून हल्लेखोरांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून निघून गेले. त्याचे वडील मूस वाला यांना मानसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. +ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीत ज्या ४२४ लोकांची पोलिस सुरक्षा कमी करण्यात आली होती किंवा पूर्णपणे काढून टाकण्यात आली होती अशा ४२४ लोकांपैकी मूस वाला यांचा समावेश होता, त्याच्याकडे आधीच्या चार कमांडोंच्या तुलनेत फक्त दोन कमांडो होते. घटनेच्या वेळी, मूस वाला त्याच्या बुलेट-प्रूफ वाहनाऐवजी त्याच्या खाजगी कारमधून पोलीस कमांडोसोबत प्रवास करत होते. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, मूस वालाने त्याची सुरक्षा सोबत घेतली नाही कारण त्याची थार एसयूव्ही जी त्याने चालवायची निवडली त्यात पाच लोक बसू शकत नव्हते. +हत्येनंतर काही तासांनी, गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हटले होते. या गोळीबारात बिष्णोईच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी देखील वर्तवली. यावेळी लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगात होता.[९][१०] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15330.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe85459dd385d2ed8a3f0dc25ffb08984220425f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15330.txt @@ -0,0 +1,67 @@ + +१७° ४०′ १७.४७″ N, ७५° ५४′ ३७.५८″ E +सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापुरी चादरी' प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात. +केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते. +इ.स.पू. २००] या वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ]सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. +तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. +सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते. +पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते. +मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे. +मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. +सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला. +स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. +स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धंनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले. +"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ] पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. +सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. +सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. +जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा ज्वारी या धान्याचे कोठार आहे.[ संदर्भ हवा ] +भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे. +सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली. +सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे. +सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. +मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. +लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. +विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, . +सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 5 प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे,५) सोलापूर - सांगली. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते. +सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो. +सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे. +सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. +सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात. +सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते. +सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.[ संदर्भ हवा ] +सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे. +१५) श्री मल्लिकार्जुन मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१६) श्री वीरभद्रेश्वर मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१७) श्री मल्लिकार्जुन मंदिर - चपळगाव अक्कलकोट 18 पुरातन काळापासून श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी काशीवरून पाणी वर्षाला श्रावण महिन्यामध्ये येते. हे स्थान अक्कलकोट पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. +१८) आनंदी गणेश मंदिर —अकलुज +सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.[ संदर्भ हवा ] +१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय  या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती . +सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रूपांतर दैनिकात झाले. +मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.[ संदर्भ हवा ] +बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली . +करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते . +सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली  सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय  ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली  याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे . +लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले . +१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते  साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले . +काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले . +सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले  . +कर्मयोगी वृत्तपत्र +१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली. +' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.[ संदर्भ हवा ] +रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली. +कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली +राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे. +पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले. +कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.[ संदर्भ हवा ]पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे +येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. +आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.[ संदर्भ हवा ] +दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत. +छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते. +दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. +नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15333.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc17a7c3ee992e77023bb70bdf6982487a8ffb1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15333.txt @@ -0,0 +1 @@ +महामहोपाध्याय विद्यानिधि सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव (१ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - ६ जानेवारी, इ.स. १९८४) हे वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार होते. यांनी सुमारे १४ वर्षे (इ.स. १९३२-इ.स. १९४६) झटून भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश नामक मराठी कोशग्रंथाची रचना केली [१]. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15343.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb498746bd13a7e68d88d162983b25dbc07b069a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15343.txt @@ -0,0 +1,2 @@ + सिधकपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15363.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4a1c99f8023cfdcde7534f9f02ad46a45e62060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15363.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिद्धार्थनगर हे भारतातल्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15375.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af1343e7206c27508e6d246ed98cb71bc23ba3b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15375.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे. +इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15376.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af1343e7206c27508e6d246ed98cb71bc23ba3b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15376.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे. +इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15382.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af1343e7206c27508e6d246ed98cb71bc23ba3b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15382.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे. +इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15393.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..155e4524fe28fb6bd0599f92baba468e4af4796d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15393.txt @@ -0,0 +1,33 @@ +साइनसॉइडल मॉडेल +सांख्यिकी, सिग्नल प्रक्रिया आणि वेळ मालिका विश्लेषणामध्ये, सायन फंक्शनच्या Y i क्रमाचा अंदाज घेण्यासाठी साइनसॉइडल मॉडेलचा वापर केला जातो: +जेथे C हा सरासरी पातळी निश्चित करत आहे, α हे साइनसाठी मोठेपणा आहे, ω कोनीय वारंवारता आहे, T i एक वेळ चल आहे, φ फेज-शिफ्ट आहे, आणि E i हा त्रुटी क्रम आहे. +हे सायनसॉइडल मॉडेल नॉनलाइनर किमान चौरस वापरून फिट होऊ शकते; चांगली तंदुरुस्त होण्यासाठी, दिनचर्याना अज्ञात पॅरामीटर्ससाठी चांगल्या प्रारंभिक मूल्यांची आवश्यकता असू शकते.सिंगल सायनसॉइडसह मॉडेल बसवणे हे वर्णक्रमीय घनता अंदाज आणि किमान-चौरस वर्णक्रमीय विश्लेषणाचे एक विशेष प्रकरण आहे. +डेटाच्या सरासरीची गणना करून C साठी चांगले प्रारंभिक मूल्य मिळवता येते. जर डेटा ट्रेंड दर्शवेल, म्हणजे, स्थिर स्थानाच्या गृहीतकाचे उल्लंघन केले असेल, तर कोणीही C ला रेखीय किंवा चतुर्भुज किमान चौरस फिटने बदलू शकतो. म्हणजेच मॉडेल बनते +किंवा +पिरियडोग्राममधील प्रबळ फ्रिक्वेंसीवरून वारंवारतेचे प्रारंभिक मूल्य मिळू शकते. एक जटिल demodulation फेज प्लॉट वारंवारता साठी या प्रारंभिक अंदाज परिष्कृत करण्यासाठी वापरले जाऊ शकते. +सायनसॉइड ऍम्प्लिट्यूडचा अंदाज मिळविण्यासाठी विचलित डेटाचा मूळ मीन वर्ग दोनच्या वर्गमूळाने मोजला जाऊ शकतो. एक जटिल डीमोड्युलेशन अॅम्प्लिट्यूड प्लॉटचा उपयोग मोठेपणासाठी चांगले प्रारंभिक मूल्य शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, हे प्लॉट डेटाच्या संपूर्ण श्रेणीवर मोठेपणा स्थिर आहे किंवा नाही किंवा ते बदलत आहे की नाही हे सूचित करू शकते. जर प्लॉट मूलत: सपाट असेल, म्हणजे शून्य उतार असेल, तर नॉन-लिनियर मॉडेलमध्ये स्थिर मोठेपणा गृहीत धरणे वाजवी आहे. तथापि, जर उतार हा प्लॉटच्या श्रेणीनुसार बदलत असेल तर, एखाद्याला खालीलप्रमाणे मॉडेल समायोजित करावे लागेल: +म्हणजेच, एखाद्या वेळेच्या कार्यासह α बदलू शकते. वरील मॉडेलमध्ये एक रेखीय फिट निर्दिष्ट केले आहे, परंतु आवश्यक असल्यास हे अधिक विस्तृत कार्याने बदलले जाऊ शकते. +कोणत्याही सांख्यिकीय मॉडेलप्रमाणे, फिट मॉडेल प्रमाणीकरणाच्या ग्राफिकल आणि परिमाणात्मक तंत्रांच्या अधीन असले पाहिजे. उदाहरणार्थ, स्थान, स्केल, स्टार्ट-अप इफेक्ट्स आणि आउटलियर्समधील महत्त्वपूर्ण बदल तपासण्यासाठी रन सीक्वेन्स प्लॉट . अवशेष स्वतंत्र आहेत याची पडताळणी करण्यासाठी लॅग प्लॉट वापरला जाऊ शकतो. आउटलियर्स लॅग प्लॉटमध्ये देखील दिसतात आणि अवशेषांमधील स्क्युनेस किंवा इतर गैर- सामान्यता तपासण्यासाठी हिस्टोग्राम आणि सामान्य संभाव्यता प्लॉट . +सोयीस्कर अविभाज्य समीकरणामुळे नॉन-लीनियर रिग्रेशनला रेखीय प्रतिगमनामध्ये रूपांतरित करणे ही वेगळी पद्धत आहे. मग, प्रारंभिक अंदाजाची आवश्यकता नाही आणि पुनरावृत्ती प्रक्रियेची आवश्यकता नाही : फिटिंग थेट मिळते. +डेटाच्या सरासरीची गणना करून C साठी चांगले प्रारंभिक मूल्य मिळवता येते. जर डेटा ट्रेंड दर्शवेल, म्हणजे, स्थिर स्थानाच्या गृहीतकाचे उल्लंघन केले असेल, तर कोणीही C ला रेखीय किंवा चतुर्भुज किमान चौरस फिटने बदलू शकतो. म्हणजेच मॉडेल बनते +किंवा +पिरियडोग्राममधील प्रबळ फ्रिक्वेंसीवरून वारंवारतेचे प्रारंभिक मूल्य मिळू शकते. एक जटिल demodulation फेज प्लॉट वारंवारता साठी या प्रारंभिक अंदाज परिष्कृत करण्यासाठी वापरले जाऊ शकते. +सायनसॉइड ऍम्प्लिट्यूडचा अंदाज मिळविण्यासाठी विचलित डेटाचा मूळ मीन वर्ग दोनच्या वर्गमूळाने मोजला जाऊ शकतो. एक जटिल डीमोड्युलेशन अॅम्प्लिट्यूड प्लॉटचा उपयोग मोठेपणासाठी चांगले प्रारंभिक मूल्य शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, हे प्लॉट डेटाच्या संपूर्ण श्रेणीवर मोठेपणा स्थिर आहे किंवा नाही किंवा ते बदलत आहे की नाही हे सूचित करू शकते. जर प्लॉट मूलत: सपाट असेल, म्हणजे शून्य उतार असेल, तर नॉन-लिनियर मॉडेलमध्ये स्थिर मोठेपणा गृहीत धरणे वाजवी आहे. तथापि, जर उतार हा प्लॉटच्या श्रेणीनुसार बदलत असेल तर, एखाद्याला खालीलप्रमाणे मॉडेल समायोजित करावे लागेल: +म्हणजेच, एखाद्या वेळेच्या कार्यासह α बदलू शकते. वरील मॉडेलमध्ये एक रेखीय फिट निर्दिष्ट केले आहे, परंतु आवश्यक असल्यास हे अधिक विस्तृत कार्याने बदलले जाऊ शकते. + +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. +डेटाच्या सरासरीची गणना करून C साठी चांगले प्रारंभिक मूल्य मिळू शकते. जर डेटा ट्रेंड दर्शवेल, म्हणजे, स्थिर स्थानाच्या गृहीतकाचे उल्लंघन केले असेल, तर कोणीही C ला रेखीय किंवा चतुर्भुज किमान वर्ग फिटने बदलू शकतो. म्हणजेच मॉडेल बनते +किंवा +पिरियडोग्राममधील प्रबळ फ्रिक्वेंसीवरून वारंवारतेचे प्रारंभिक मूल्य मिळू शकते. एक जटिल demodulation फेज प्लॉट वारंवारता साठी या प्रारंभिक अंदाज परिष्कृत करण्यासाठी वापरले जाऊ शकते. +सायनसॉइड ऍम्प्लिट्यूडचा अंदाज मिळविण्यासाठी विचलित डेटाचा मूळ मीन वर्ग दोनच्या वर्गमूळाने मोजला जाऊ शकतो. एक जटिल डीमोड्युलेशन अॅम्प्लिट्यूड प्लॉटचा उपयोग मोठेपणासाठी चांगले प्रारंभिक मूल्य शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, हे प्लॉट डेटाच्या संपूर्ण श्रेणीवर मोठेपणा स्थिर आहे किंवा नाही किंवा ते बदलत आहे की नाही हे सूचित करू शकते. जर प्लॉट मूलत: सपाट असेल, म्हणजे शून्य उतार असेल, तर नॉन-लिनियर मॉडेलमध्ये स्थिर मोठेपणा गृहीत धरणे वाजवी आहे. तथापि, जर उतार हा प्लॉटच्या श्रेणीनुसार बदलत असेल तर, एखाद्याला खालीलप्रमाणे मॉडेल समायोजित करावे लागेल: +म्हणजेच, एखाद्या वेळेच्या कार्यासह α बदलू शकते. वरील मॉडेलमध्ये एक रेखीय फिट निर्दिष्ट केले आहे, परंतु आवश्यक असल्यास हे अधिक विस्तृत कार्याने बदलले जाऊ शकते. + +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. +सोयीस्कर अविभाज्य समीकरणामुळे नॉन-लीनियर रिग्रेशनला रेखीय प्रतिगमनामध्ये रूपांतरित करणे ही वेगळी पद्धत आहे. मग, प्रारंभिक अंदाजाची आवश्यकता नाही आणि पुनरावृत्ती प्रक्रियेची आवश्यकता नाही : फिटिंग थेट मिळते. [१] +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. +सोयीस्कर अविभाज्य समीकरणामुळे नॉन-लीनियर रिग्रेशनला रेखीय प्रतिगमनामध्ये रूपांतरित करणे ही वेगळी पद्धत आहे. मग, प्रारंभिक अंदाजाची आवश्यकता नाही आणि पुनरावृत्ती प्रक्रियेची आवश्यकता नाही : फिटिंग थेट मिळते. [२] +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. +सोयीस्कर अविभाज्य समीकरणामुळे नॉन-लीनियर रिग्रेशनला रेखीय प्रतिगमनामध्ये रूपांतरित करणे ही वेगळी पद्धत आहे. मग, प्रारंभिक अंदाजाची आवश्यकता नाही आणि पुनरावृत्ती प्रक्रियेची आवश्यकता नाही : फिटिंग थेट मिळते. [३] +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. +सोयीस्कर अविभाज्य समीकरणामुळे नॉन-लीनियर रिग्रेशनला रेखीय प्रतिगमनामध्ये रूपांतरित करणे ही वेगळी पद्धत आहे. मग, प्रारंभिक अंदाजाची आवश्यकता नाही आणि पुनरावृत्ती प्रक्रियेची आवश्यकता नाही : फिटिंग थेट मिळते. [४] +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15394.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67adbc572e58cd854fc30e61f5ad1af4f4771592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_15394.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिनेगॉग (इंग्लिश: Synagogue; हिब्रू: בית כנסת) हे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थनाघर आहे. सिनेगॉगमध्ये प्रार्थनेसाठी एक मोठी खोली व अभ्यास व चर्चांसाठी अनेक लहान खोल्या असतात. सिनेगॉग ही एक पवित्र वास्तू असून तिचा वापर केवळ धार्मिक कामांकरिताच करणे बंधनकारक आहे. आधुनिक सिनेगॉगमध्ये धार्मिक शाळा, ग्रंथालय, स्वयंपाकघर इत्यादी सोयी असू शकतात. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1568.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81a9ec0d7a1ac596d8469355e731dd63eec712ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1568.txt @@ -0,0 +1,2 @@ + +'वीर-झारा हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, प्रीती झिंटा व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_16.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_16.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b621a65839f64189d4efd1baf06c68e0aeb96f96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_16.txt @@ -0,0 +1,4 @@ +दोन प्रकारचे विद्युत भार आहेत. ते धनभार आणि ऋणभार हे आहेत. +सामान्यपणे, ते असे लिहले जाते +Q = ne +जिथे Q एक विद्युत प्रभार आहे, n ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि e हा 1 इलेक्ट्रॉन (1.6 X 10^19 C) वरचा शुल्क आहे.विदयुत भाराचे एसआय युनिट हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स-ऑगस्टिन डी कॉलॉम्ब यांच्या नावावर असलेले कोलॉम्ब (C) आहे. विद्युत प्रभाराची दोन मूलभूत स्वरूपे आहेत :- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1620.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..badf37252c947b743771c830c59a3a4356a495f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1620.txt @@ -0,0 +1,106 @@ +लिंगायत हा एक स्वतंत्र परिपूर्ण धर्म आहे. लिंगायात धर्मातील जन्मपासून ते मृत्यू पर्यंत सर्व संस्कार हे हिंदू धर्मातील संस्कारापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे लिंगायतांचे थोर पुढारी होते. त्यांनी लिंगायत परंपरा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली.. +(असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. +सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत. +स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून +निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून +कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण +संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२) +महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८) +"प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७) +म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.) +विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले. +लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे. +न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे. +धर्मगुरू : विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६) +धर्म संहिता (धर्मग्रंथ) : वचन साहित्य +धर्म भाषा : कन्नड +धर्माचे देव नाव : शिव ( देवांचे देव महादेव ) +धर्म चिन्ह : जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्) +धर्म संस्कार : लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा +धर्म सिद्धान्त : शून्य सिद्धान्त +साधना : त्राटक योग (लिंगांगयोग) +दर्शन : षट्‌स्थल दर्शन +समाजशास्त् र: शिवाचार- (सामाजिक समानता) +नीति शास्त्र : गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक) +अर्थ शास्त्र : सदाचार (कायक- दासोह-प्रसाद) +संस्कृति : अवैदिक शरण संस्कृति +परंपरा : धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage). +धर्म क्षेत्र : गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण +धर्म ध्वज : षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज +धर्माचे ध्येय : जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण) +लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. +१. भक्तिस्थल : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते. +२. महेश्वरस्थल : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे. +३. प्रसादीस्थल : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा. +४. प्राणलिंगीस्थल : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे. +५.. शरणस्थल : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे. +६. ऐक्यस्थल : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत. +१) लिंगाचार : अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे. +२) सदाचार : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार. +३) शिवाचार : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे. +४) गणाचार : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे. +५) भृत्याचार : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार. +सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे. +बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे. +१. लिंगायत हा कायकावर उदरनिर्वाह करणारा कायकनिष्ठ धर्म आहे. +२. लिंगायत हे श्रमालाच ईश्वर मानतात, घाम येऊ पर्यत कष्ट करत राहणे हीच ईश्वराची पूजा आहे , असे लिंगायत मानतात. +३. स्वेदस्नान हेच लिंगायतांचे तिर्थस्नान आहे. त्यांना तीर्थयात्रा, तीर्थाटन, तिर्थस्नान करण्यासाठी भटकण्याची गरज नाही. +४. लिंगायत घर, संसार, पत्नी,गाव, नातेवाईक सोडून दूर जंगलात जाऊन राहण्याचा, वैराग्य स्वीकारण्याचा, संन्यास ग्रहण करण्याचा निषेध करतात. लिंगायत एकांतवादी नाही, लोकांतवादी आहेत. +५. सतीपतीने एकत्र राहून एकमेकांच्या शारीरिक लैंगिक गरजा भागवून, दोघांनी एकत्र राहून कायक करायला शिकविणारा लिंगायत धर्म आहे. +इष्टलिंग दीक्षा संस्कार +कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक) + +लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे. +१) लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. +२) लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे. +३) लिंगायत जैन, बौद्ध, हिंदू, शीख, ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. +४) लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. +५) लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. +६) लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्त्वविज्ञान आहे. +७) लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. +८) लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. +९) लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. +१०) लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. +११) लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. +१२) लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. +१३) लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. +१४) लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. +१५) लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. +१६) लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. +१७) लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. +१८) लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. +१९) लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्त्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. +२०) लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. +२१) लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. +२२) लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. +२३) लिंगायत हस्तरेषेला महत्त्व न देता मनगटाच्या शक्तीला महत्त्व देणारा धर्म आहे. +२४) लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. +२५) लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे. +https://vachaanjivani1.wordpress.com +https://vachsanjivani.simdif.com[permanent dead link] +http://www.lingyatyuva.com[permanent dead link] +http://www.lingayrelion.com[permanent dead link] +१. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे. +२. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे. +३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे. +४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे. +५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे. +६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार). +७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर. +८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे. +९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर. +१०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. +११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी. +१२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) +१३. महात्मा बसवेश्वर  : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत) +१४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर +१५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर +१६. बसवामृत - बालाजी कामजोळगे + +हिंदी पुस्तके : +१. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी) +२. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) + +English reference book : +१. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar. +२. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1628.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d763c61d99e167de474acfb2dfc89c8e5a04baf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1628.txt @@ -0,0 +1 @@ +वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक (VGLJ), (पूर्वीचे नाव:झांसी जंक्शन रेल्वे स्थानक (JHS)) हे उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात. १ जानेवारी २०२२ रोजी उत्तर‌ प्रदेश सरकारने स्थानकाला झाशीच्या पराक्रमी साम्राज्ञी भारतीय स्वातंत्र्यदेवता वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे नाव‌ देऊन स्थानकाला सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1630.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33023321e649f2a7ea939f9ca40215bf630e0b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1630.txt @@ -0,0 +1,2 @@ +वीरू दादा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1659.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61c04cc7ee9642ff022f0b652f911f9ceb4a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1659.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅडिलॅक अरीना, बीजिंग ऑलिंपिक बेसबॉल अरीना तथा बीजिंग वुकेसॉंग सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्र हे चीनची राजधानी बीजिंगमधील खेळाचे मैदान आहे. हे इन्डोर[मराठी शब्द सुचवा] मैदान २००८ ऑलिंपिक स्पर्धांसाठी बांधले गेले होते. +६३,००० मी२ विस्तार असलेल्या या मैदानात १८,००० प्रेक्षक बसू शकतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_167.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cd13d282b5bb3d65a94392254b2b519c3632644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_167.txt @@ -0,0 +1,4 @@ +विनायक सदाशिव वाळिंबे[१] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[२]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते. +विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती. +विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते [३]. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले [३]. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३ च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[३]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते. +वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन), व युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1678.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6445c46c3e23b0edaed2b06ec0f60be8cf50aa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1678.txt @@ -0,0 +1,11 @@ + +(२५ जानेवारी १८८२ – २८ मार्च १९४१). एक अग्रगण्य इंग्रजी कादंबरीकर्त्री. जन्म लंडनमध्ये. थोर विचारवंत, चरित्रकार आणि सांस्कृतिक समीक्षक ⇨सर लेस्ली स्टीव्हन हे तिचे वडील. घरातील वातावरण सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न होते. तथापि आई, वडील, बहीण व भाऊ ह्यांच्या निधनाचे आघात सोसावे लागल्याने तिच्या अतिसंवेदनशील मनावर खोल परिणाम झाला. अनेकदा तिला नैराश्याचे झटके येत. वडिलांच्या मृत्यूनंतर लंडनच्या ब्लूम्झबरी विभागातील गॉर्डन स्क्वेअर येथे ती राहत असताना तिचे घर नामवंत साहित्यिक, तत्त्वज्ञ, कलावंत ह्यांच्या विख्यात ‘ब्लूम्झबरी ग्रुप’चे केंद्र झाले होते. ह्याच गटाचे एक साहित्यिक सदस्य लेनर्ड वुल्फ ह्यांच्याशी तिचा विवाह झाला (१९१२). +व्हर्जिनियाने आपला लेखनारंभ टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहून केल्यानंतर ती कादंबरीलेखनाकडे वळली. द व्हॉयिज आउट (१९१५) व नाइट अँड डे (१९१९) ह्या पारंपारिक वास्तववादी वळणाच्या पहिल्या दोन कादंबऱ्या लिहिल्यानंतर कादंबरीलेखनात नवनवे प्रयोग करण्याची गरज तिला तीव्रतेने जाणव +कादंबरीच्या स्वरूपाबद्दलची तिची  भूमिका ‘मॉडर्न फिक्‌शन’ (१९१९) आणि ‘मिस्टर बेनेट अँड मिसेस ब्राउन’ ह्या दोन सुप्रसिद्ध निबंधांतून तिने मांडली आहे. तिच्या मते पात्रांच्या अंतरंगाचा वेध घेणे, त्यांच्या जिवंत जाणिवेचा आलेख काढणे हे कादंबरीकाराचे उद्दिष्ट होय. दिव्याभोवती असलेल्या आभावलयाला (हेलो) निश्चित आकार नसतो. + +आपल्याला फक्त एका प्रकाशकेंद्रापासून निघालेल्या सहस्रावधी तरल प्रकाशशलाका जाणवतात. त्याचप्रमाणे पात्राच्या जाणीव केंद्रापासून निघालेल्या आंतरिक भावविश्वाच्या अगणित शलाकांतूनच जीवनाचा खरा अर्थ जाणवू शकतो, अशी तिची भूमिका पात्रांना येणारा केवळ व्यक्तिविशिष्ट असा अनुभव साकार करणे, ही कादंबरीकाराची कलात्मक आणि नैतिक जबाबदारी असून तो भाषेसारख्या सामाजिक-सार्वजनिक माध्यमातून मांडण्यासाठी भाषेच्या स्वभावाविरूद्ध जाऊन भाषा वाकवणे तिला अपरिहार्य वाटत होते. कादंबरीचा बंध आणि निवेदनपद्धती यांत तिने केलेल्या प्रयोगांमुळे कादंबरीबाबतच्या पारंपरिक धारणांमध्ये मूलभूत परिवर्तन घडून आले. चित्रकलेतील उत्तर-दृक्‌प्रत्ययवादाचा (पोस्ट-इंप्रेशनिझम) तिच्यावर विशेष प्रभाव होता. त्याच्या खुणा तिच्या कादंबऱ्यांत सर्वत्र दिसतात. जेकब्ज रूममध्ये (१९२२) तिने वापरलेले अप्रत्यक्ष निवेदनतंत्र आणि काव्यात्म दृक्‌प्रत्यय ह्यातून तिची प्रयोगशीलता स्पष्टपणे दिसून आली. +घड्याळ, दिनदर्शिका, कालानुक्रमे उलगडत जाणारा इतिहास इत्यादींनी दाखविली जाणारी काळाची एकरेषीय संकल्पना कादंबरी-लेखकांना अनेकदा अपुरी, असमाधानकारक वाटते; कारण व्यक्तिजीवनातील अनुभवात काळाचे एकरेषीय स्वरूप, अनुक्रम, कार्यकारणभाव ह्या गोष्टी मोडून पडतात. परस्परांशी असंबद्ध अशा कित्येक संवेदनांचा व्यक्तीला अनुभव येत असतो आणि ह्या संवेदना आता वर्तमानात, तर आता (स्मृतींच्याद्वारे) भूतकाळात, तर आता भविष्यात, अशा असतात. संज्ञेचा असा अप्रतिहत चालणारा संचार, तदानुषंगिक विचार, स्मृती, आशा-निराशा, संताप, प्रेम इ. भावना अशा अनेक घटकांची दर क्षणी होणारी नित्यनूतन जुळणी व ती दर्शविताना होणारी व्यक्तीच्या अंतरंगाची ओळख हे व्हर्जिनियाच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तींचे समृद्ध आंतरिक भावविश्व आणि त्याला बाह्य, व्यवहारी जगाकडून मिळणारा विरोधी प्रतिसाद हे तिच्या कादंबऱ्यांचे आशयसूत्र आहे. तिच्या प्रयोगशील कादंबऱ्यांमध्ये उपर्युक्त जेकब्ज रूमखेरीज मिसेस डॅलोवे (१९२५), टू द लाइट हाउस (१९२७), द वेव्ह्‌ज्‌ (१९३१), बिट्‌वीन द ॲक्ट्‌स (१९४१) अशा काही कादंबऱ्यांचा समावेश होतो. +तिचे समीक्षालेखनही विपुल आहे. आपले विशेष महत्त्वाचे टीकालेखन तिने आधुनिक कादंबरीची तत्त्वे विशद करण्यासाठी लिहिले असले, तरी आपल्या पूर्वकालीन व समकालीन लेखकांच्या कृतींवरील समीक्षणाचा भागही त्यात लक्षणीय प्रमाणात आहे. +स्त्रीमुक्तीच्या संदर्भात तिचे दोन निबंध - ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ (१९२९) आणि ‘थ्री गिनीज’ (१९३८)–विशेष चर्चिले जातात. ‘ए रूम...’ ह्या निबंधात साहित्यिक स्त्रिया आणि कादंबरी ह्यांच्यातील ऐतिहासिक संबंधाचा आढावा घेतलेला आहे. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांना दीर्घकाळ उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे काही क्षेत्रे–उदा.व्यावसायिक लेखन–स्त्रियांना बंद झाली वा प्रवेशास अवघड ठरली. आर्थिक पारतंत्र्य, दडपणूक, समाजातला निकृष्ट दर्जा हेही त्यांच्या वाट्याला आले. तथापि असली बंधने दूर होताच, त्याही सर्जनशीलतेची अत्युच्च शिखरे गाठू शकतील, अशी व्हर्जिनियाची धारणा होती. विविध क्षेत्रांतून स्त्रियांना वगळण्याचा पुरूषी कावा असला, तरी त्यामुळे आपली स्वतंत्र राजकीय-सांस्कृतिक अस्मिता सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना प्राप्त होईल, असे विचार ‘थ्री गिनीज’ मध्ये मांडलेले आहेत. +तिचे ग्रंथ युनिफॉर्म एडिशन ऑफ द वर्कस ओफ व्हर्जिनिया वुल्फ (१४ खंड, १९२९-५२) ह्या नावाने संकलित करण्यात आले आहेत, तर व्हर्जिनिया वुल्फ : कलेक्टेड एसेज (४ खंड, १९६६-६७) ह्या नावाने तिचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. +मूळची अतिसंवेदनशीलता, वाङ्‌मयनिर्मितीतून येणारा प्रचंड ताण आणि दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर अनुभवाने आलेली व्याकुळता ह्यांचा एकत्रित परिणाम होऊन रॉडमेल येथे तिने आत्महत्या केली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1683.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4caf966355efa4f17e889a86c785fc05b34f49d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1683.txt @@ -0,0 +1,4 @@ +वूल्व्हरीन हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारे पात्र आहे. लोगन आणि वेपन एक्स या नावांनी तो ओळखला जातो. हे पात्र एक उत्परिवर्ती असून त्याच्याकडे उत्साही संवेदना, वर्धित शारीरिक क्षमता, बरे करण्याचे घटक म्हणून ओळखली जाणारी एक शक्तिशाली पुनरुत्पादक क्षमता आणि प्रत्येक हातात तीन मागे घेता येण्याजोगे नखे आहेत. वूल्व्हरिनला एक्स-मेन, एक्स-फोर्स, अल्फा फ्लाइट, द फॅन्टॅस्टिक फोर आणि ॲव्हेंजर्सचा सदस्य म्हणून चित्रित करण्यात आले आहे. +हे पात्र प्रथम द इनक्रेडिबल हल्क #१८० च्या शेवटच्या पॅनेलमध्ये दिसले. मार्वलचे मुख्य संपादक रॉय थॉमस, [१] लेखक लेन वेन, [२] आणि मार्वल कला दिग्दर्शक जॉन रोमिता सीनियर यांनी ते तयार केले होते. रोमिता यांनी पात्राचा पोशाख डिझाइन केला होता, परंतु हे पात्र प्रथम हर्ब ट्रिम्पे यांनी प्रकाशनासाठी रेखाटले होते. त्यानंतर वॉल्व्हरिन सुपरहिरो टीम एक्स-मेनच्या सुधारित आवृत्तीमध्ये सामील झाला, जिथे शेवटी लेखक ख्रिस क्लेरेमॉन्ट, कलाकार डेव्ह कॉकरम आणि कलाकार-लेखक जॉन बायर्न यांनी या पात्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कलाकार फ्रँक मिलरने क्लेरेमॉन्टसोबत सहयोग करत सप्टेंबर ते डिसेंबर १९८२ या चार भागांच्या मर्यादित मालिकेसह पात्र सुधारण्यास मदत केली, ज्याने वॉल्व्हरिनच्या कॅचफ्रेजची सुरुवात केली, "मी जे करतो त्यात मी सर्वोत्कृष्ट आहे, परंतु मी जे करतो ते सर्वोत्तम आहे" खूप छान नाही." +व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकन लोकप्रिय संस्कृतीत उदयास आलेल्या अनेक कठीण अँटीहिरोपैकी व्हॉल्व्हरिन हे एक आहे; [३] प्राणघातक शक्ती वापरण्याची त्याची इच्छा आणि त्याचा एकटेपणाचा स्वभाव १९८० च्या अखेरीस कॉमिक बुक अँटीहिरोसाठी महत्त्वाचा बनला. [३] परिणामी, हे पात्र लोकप्रिय होत चाललेल्या एक्स-मेन फ्रँचायझीच्या चाहत्यांचे आवडते बनले, [३] आणि १९८८ पासून त्याची स्वतःची वॉल्व्हरिन कॉमिक बुक मालिका तयार करण्यात आली. +हे पात्र अ‍ॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिका, व्हिडिओ गेम्स आणि चित्रपटासह बहुतेक एक्स-मेन रुपांतरांमध्ये दिसला आहे. लाइव्ह अॅक्शनमध्ये, ह्यू जॅकमनने ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्सद्वारे २००० ते २०१८ दरम्यान निर्मित एक्स-मेन चित्रपट मालिकेच्या दहा हप्त्यांमध्ये व्यक्तिरेखा साकारली आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट डेडपूल ३ (२०२४) मधील भूमिकेची पुनरावृत्ती होईल. ट्रॉय सिवनने २००९ च्या X-Men Origins: Wolverine या चित्रपटात लोगनची तरुण आवृत्ती साकारली होती. या पात्राला अनेकदा एक्स-मेनच्या सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक, तसेच मार्वलच्या सर्वात लोकप्रिय सुपरहिरोपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. वूल्व्हरिन LGBT चाहत्यांमध्ये देखील लोकप्रिय ठरला आहे, त्याचे वर्णन समलिंगी चिन्ह म्हणून केले जात आहे; सायक्लॉप्स आणि नाईटक्रॉलर सारख्या पुरुष पात्रांशी त्याचे संबंध हायलाइट केले जात आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1708.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6a58375ebdff705cac9859b60a4931c4040836e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1708.txt @@ -0,0 +1 @@ +वूडलँड पार्क अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. हे गाव टेलर काउंटीमध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ६,५१५ लोकसंख्या असलेल्या या गावाच्या सभोवती पाइक नॅशनल फॉरेस्ट हे राष्ट्रीय वन आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1732.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3556ac37fca0ddf587f90c6b735ecdacdef096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1732.txt @@ -0,0 +1,2 @@ +वूस्टरशायर हा पश्चिम इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1746.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bedb8a15ca6a435bff9c9fcc875dadc0ce27a255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1746.txt @@ -0,0 +1,4 @@ +वूस्टर काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे वूस्टर आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८६२,१११ इतकी होती. +वूस्टर काउंटी वूस्टर महानगरक्षेत्राचा भाग आहे. +या काउंटीची रचना २ एप्रिल, १७३१ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1754.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d789e7ef44dd7aa57ed0d38244e63e7e2dd2eee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1754.txt @@ -0,0 +1,2 @@ +वृंदा गजेंद्र अर्थात वृंदा गजेंद्र अहिरे (१५ सप्टेंबर, इ.स. १९७५[१] - हयात), पूर्वाश्रमीची वृंदा पेडणेकर, ही मराठी अभिनेत्री आहे. हिने मराठी चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी चित्रपटदिग्दर्शक गजेंद्र अहिरे हिचा पती आहे. +वृंदा गजेंद्र हिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयात झाले. रुईया महाविद्यालयात असताना गजेंद्र अहिरे लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात तिने अभिनय केला होता. त्या वेळेस ती इयत्ता अकरावीत शिकत होती. नाटकाच्या वेळी तिची गजेंद्राशी ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले [१]. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1770.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fbd69a7f0b4f696a4a5ea322de0671a10430e79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1770.txt @@ -0,0 +1,4 @@ +वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:European Tree Pipit; हिंदी:चचडी, मुसारिची ) हा एक पक्षी आहे. +वरील भागाचा वर्ण तपकिरी असून छातीवरील रेषा सुस्पष्ट दिसतात. भुवया, पंखांवरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पांढुरका. ना-मादी दिसायला सारखे असतात. +हिमालयाच्या पायथ्यापासून, भारतीय द्वीपकल्प, पूर्वेकडे बांगलादेशातील ब्रह्मपुत्रा नदी, पश्चिमेकडे सिंध व दक्षिणेकडे नीलगिरी पर्वत, तसेच मालदीव बेटे या भागांत हिवाळी पाहुणे. +शेतीचा प्रदेश, पिकांच्या कापणीनंतरची रिकामी राने, आणि विरळ झाडे असलेली माळराने. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1775.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a6e6f7e528110eba965a82dc87121d0b35b7c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1775.txt @@ -0,0 +1 @@ +वृक्षमित्र ही भारताच्या बंगळुरु शहरातील पर्यावरणवादी संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1785.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c2e519f6174582c855577ce153095eba09c2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1785.txt @@ -0,0 +1 @@ +व्रुत्तपत्र हे जनजागृतीचे एक प्रभावी साधन असल्याचे सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेवरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी व राजकीय असंतोष प्रकट करण्यासाठी हे माध्यम निवडले. प्रारंभी भारतातील वृत्तपत्रे इंग्र्जी लोकांनी सुरू केली होती. ही वृत्तपत्रे प्रमुखाने शासनाच्या धोरणाची तरफदारी करीत असत . इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा व घेतलेले निर्णय याविषयीच ही वृत्तपत्रे माहिती देत. ब्रिटिश प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी करणे हेच जणू या वृत्तपत्राचे कार्य होते . त्यामुळे राष्ट्रवाद, उदारमतवाद यासारख्या तत्त्वाचा भारतात प्रसार करण्यासाठी आपणच वृत्तपत्रे सुरू केली पाहिजेत , हे येथील उच्चविद्याविभूषित सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आले. हिंदी विचारवंतानी सुरू केलेल्या वृत्तपत्रामधून शासनाच्या अयोग्य धोरणावर कोरडे ओढणे व आपल्या बांधवाना जागृत करणे , समाजात राष्ट्रवादाचा प्रसार करणे शक्य होऊ लागले . प्रारंभीच्या काळात इंग्रजी भाषेतून भारतीयांनी सुरू केलेल्या ' दि इंडियन मिरर ',' बॉम्बे समाचार' ,' दि हिदू' , व 'ट्रिब्युन ' यासारख्या वृत्तपत्रांनी लोकजाग्र्तीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पुढील काळात राजा राममोहन राॅय यांनी ' संवाद - कौमुदी ', देवेन्द्र्नाथानी ' तत्त्वबोधिनी - पत्रिका ', अरविंदबाबू यांनी ' वंदेमातरम् ', सुरेंद्रनाथानी ' बंगाली ' , व लोकमान्य टिळकांनी ' केसरी' ही वृत्तपत्रे सुरू करून मातृभाषेच्या माध्यमातून नवविचारांचा व राष्ट्रवादी विचारसरणीचा समाजात प्रचार-प्रसार सुरू केला. ब्रिटिश शासनाच्या दोषावर प्रखर टीका करन्याबरोबरच समाजात आत्मविश्वास वाढविण्याचे व सामाजिक समता , उदारमतवाद , मानवता , स्वातंत्र्य यासारख्या विचारांचे बीजारोपण करण्याचे कार्य या वृत्तपत्रांनी केले . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1787.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e78efca719d36fb63a5c467e0fd511d69a97e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1787.txt @@ -0,0 +1,24 @@ + + +एखाद्या सर्वसाधारण दिवशी वृत्तपत्राच्या वितरीत होणाऱ्या प्रतींच्या संख्येस वृत्तपत्राचा खप (सर्क्यूलेशन) असे म्हणतात.. वर्तमानपत्राचा खप हा सध्या घसरला आहे. खप हा जाहीरातीचे दर ठरविणारा एक प्रमुख घटक आहे. खप हा सदैव विकल्या गेलेल्या प्रतींएवढा नसतो,ज्यास विक्रीखप असेही म्हणतात,कारण काही वृत्तपत्रे वाचकांस विनामुल्य देण्यात येतात. वाचकसंख्येचा आकडा हा वितरणाच्या आकड्यापेक्षा मोठाच असतो कारण असे समजले जाते कि,वृत्तपत्राची विशिष्ट प्रत एकापेक्षा अधिक लोकं वाचतात. +जगात वृत्तपत्र वितरणात वाढ झाली असून, २००८ सालात दररोज ५४० दशलक्ष प्रती विकल्या गेल्याचे जागतिक वृत्तपत्र संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.जगात सर्वत्र मंदीचा प्रभाव असतानाही वृत्तपत्रांच्या विक्रीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष गाविन ओ रिली यांनी सांगितले. दररोज १.९ अब्ज लोक वृत्तपत्र विकत घेऊन वाचतात. गेल्या पाच वर्षांत वृत्तपत्रांचा खप ८.८ टक्क्याने वाढला आहे.[१] +अनेक देशात,वेगवेगळ्या संस्थांतर्फे वितरणाचे अंकेक्षण होते, जसे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. त्याने जाहिरातदारास ही खात्री होते कि, अमुक एक वर्तमानपत्र हे खरोखरीच प्रकाशकाने दर्शविलेल्या आकड्यांपर्यंत पोचते. +'जाहिरात' या एकाच शब्दाभोवती ही दुनिया फिरताना दिसते. जाहिराती आल्या तर पैसे गोळा होतात, त्यातून वृत्तपत्र चालतात, शिवाय नवनव्या सुधारणा होऊन नवनवीन आवृत्त्याही काढता येणार. मग खप, लोकप्रियता वाढून जाहिराती आणखी वाढणार- असे हे चक्र. विशिष्ट गावचे विशिष्ट वृत्तपत्र ही कल्पना हळूहळू लोप पावते आहे. एखादे राज्य, काही जिल्हे हे एखाद्या ठरावीक वृत्तपत्राचेच- ही कल्पना जुनी होत जाऊन आघाडीची नियतकालिके नवनवीन ठिकाणी, राज्यांत जाऊन तिथे तोट्यात का होईना पण आवृत्त्या सुरू करताना दिसत आहेत.[२] +The World Association of Newspapers (WAN) publishes a list of newspapers with the largest circulation. In 2005, China topped the list in term of total newspaper circulation with 93.5 million a day, India came second with 78.8 million, followed by Japan, with 70.4 million; the United States, with 48.3 million; and जर्मनी, with 22.1 million. Around 75 of the 100 best selling newspapers are in Asia and seven out of top ten are Japanese newspapers. [१] +The Japanese Yomiuri Shimbun, Asahi Shimbun, Mainichi Shimbun and Seikyo Shimbun are still the best-selling newspapers in the world. जर्मनी's Bild became the only entry in the top ten from outside of Asia. Reference News (參考消息) is the most popular paper in China. The highest selling from the United States is USA Today, which is 13th in the world. +According to the Guinness Book of Records, the daily circulation of the Soviet newspaper Trud exceeded 21,500,000 in 1990, while the Soviet weekly Argumenty i Fakty boasted the circulation of 33,500,000 in 1991. +१८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. बहुतेक मराठी साप्ताहिकांचा खप तीस चाळीस हजारांच्या घरात आहे. लोकप्रभा साप्ताहिकाचा ऑक्‍टोबर १९८६ प्पर्यंतचा बत्तीस तेहतीस हजार होता. सप्टेंबर १९८७ मध्ये पंच्याऐंशी हजार प्रती छापलेल्या होत्या.[३] +गोवा +बेळगाव +The Belgian institution CIM (Centre for Information about Media) publishes national circulation figures for all written, audiovisual and web-based media in Belgium. The top ten best selling papers according to their website [२] Archived 2007-06-08 at the Wayback Machine. are Het Laatste Nieuws, 317,715; Het Nieuwsblad, 245,209; SUD Presse (group of papers focused on community specific content), 147,749; Het Belang van Limburg, 121,428; Le Soir, 113,780; Vers l’avenir, 109,287 (group of papers focused on community specific content); La Dernière Heure, 107,583; De Standaard, 104,758; Het Volk, 77,025 and De Morgen, 73,784. + + +सन २००८चा भारतीय वाचक सर्वेक्षणाचा अहवालः दाखवा Archived 2008-01-16 at the Wayback Machine. सर्वांत जास्त वाचल्या जाणारे स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र म्हणुन दैनिक जागरण (५५.७ लाख वाचकसंख्या) आणि राजस्थान पत्रिका (१४ लाख वाचकसंख्या) दोन्ही हिंदी भाषा भाषेतील आहेत. टाइम्स ऑफ इंडिया (१३.३ लाख वाचकसंख्या) हे सर्वदूर वाचल्या जाणारे आंग्लभाषिक वृत्तपत्र आहे,त्यानंतर, हिंदुस्थान टाईम्सचा (६.३ लाख वाचकसंख्या) क्रम लागतो. तदनंतर,हिंदू धर्म (५.२ लाख वाचकसंख्या) हे वर्तमानपत्र येते. नंतर, न्यु इंडियन एक्सप्रेस हेपण सर्वदूर वाचल्या जाणारे (१.८ लाख वाचकसंख्या) आंग्लभाषिक वृत्तपत्र तर मल्याळा मनोरमा हे (९.७ लाख वाचकसंख्या), मल्याळम या प्रांतिय भाषेतील सर्वांत जास्त वितरण असणारे वृत्तपत्र आहे. +The 2004 circulation figures for the morning and evening editions of Japan's largest newspapers: Yomiuri Shimbun, 14,067,000; The Asahi Shimbun, 12,121,000; Mainichi Shimbun, 5,587,000; Seikyou Shimbun, 5,500,000; Nihon Keizai Shimbun, 4,635,000; Chunichi Shimbun/Tokyo Shimbun,4,512,000; Tokyo Sports, 2,425,000; Sankei Shimbun, 2,757,000; Nikkan Sports, 1,965,000; Hokkaido Shimbun, 1,896,594; Sports Nippon, 1,711,000; The Nikkan Gendai, 1,686,000; Akahata, 1,683,000; Yukan Fuji, 1,559,000; Shizuoka Shimbun, 1,479,000; Sankei Sports, 1,368,000; Hochi Shimbun, 1,354,000; Daily Sports, 999,000; [३] +Best-selling paper in English as of April 18, 2008, according to the BPA World Wide, Today's Zaman Archived 2006-12-30 at the Wayback Machine. +Best-selling papers as of July 2, 2006, according to the Audit Bureau of Circulations, [४] Archived 2002-08-19 at the Wayback Machine. are the News of the World (Sunday only), 3,471,415; The Sun, 3,148,700 and The Daily Mail, 2,340,255. +The heyday of the newspaper industry was the 1940s, but the percentage of Americans reading newspapers began to decline with the increased competition from radio, television and, more recently, the Internet. A growing population helped the absolute circulation numbers continue to increase until the 1970s, where it remained stable until the 1990s, when absolute circulation numbers began declining. +Newspaper circulation numbers are reported to the Audit Bureau of Circulations. Best-selling papers as of March 31, 2007 in the U.S.A., according to the Audit Bureau of Circulations, are USA Today, 2,524,965; The Wall Street Journal, 2,068,439 and न्यू यॉर्क टाइम्स, 1,627,062. + +The most widely read paper in the country is the Toronto Star, which, as of the six-month period ending on March 31, 2007, averaged 634,886 copies sold on Saturday, 436,694 Monday to Friday, and 442,265 on Sunday. [५] Archived 2007-09-27 at the Wayback Machine. The second most widely read paper is Toronto-based national newspaper The Globe and Mail, which averaged 410,285 copies on Saturdays, and 322,807 Monday to Friday. The most widely read French-language newspaper is Le Journal de Montréal, which averaged 319,899 copies on Saturday, 267,404 Monday to Friday, and 264,733 on Sunday. It should be noted that unlike in the United States, newspapers in Canada published their biggest and mostly widely read editions on Saturdays, and that most papers don't publish on Sundays. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1791.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9236dbed3f94093d7d643d40967776b1423651d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1791.txt @@ -0,0 +1 @@ +वृत्तसंस्था म्हणजे बातमी कार्यालय होय. बातमी गोळा किंवा वितरीत करण्यासाठी असलेले कार्यालय म्हणजे वृत्तसंस्था होय. एक बातमी कार्यालय प्रामुख्याने पारंपारिक अशा रेडिओ, दूरदर्शन किंवा वृत्तपत्र बातम्या कार्यक्रम म्हणून एकच वृत्त कार्यालयाशी संचलित असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1801.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6802d2e0f434c9d5ce425767c4e4b9b78e8be365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1801.txt @@ -0,0 +1,27 @@ +२८ जानेवारी, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_181.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcad5f0aab57a0e3b9b6aa5243a60de8cd23334d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_181.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 49°53′58″N 97°08′21″W / 49.89944°N 97.13917°W / 49.89944; -97.13917 + +विनिपेग ही कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मॅनिटोबाच्या दक्षिण भागात लाल व असिनिबॉईन नद्यांच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ६.६४ लाख लोकसंख्या असलेले विनिपेग कॅनडामधील सातवे मोठे शहर व आठवे मोठे महानगर आहे. +आईस हॉकी हा विनिपेगमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा विनिपेग जेट्स हा येथील प्रमुख संघ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1811.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66e31b32fade6564be7d19ac41dbb3da9b6bda64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1811.txt @@ -0,0 +1,2 @@ +वृषपर्वा हा भारतीय पुराणकथांमधील दैत्यांचा एक राजा होता. +त्याने दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या संजीवनीविद्येच्या साहाय्याने देवांचा पराभव केला अशी पुराणकथा आहे. या कथेनुसार वृषपर्व्यास शर्मिष्ठा नावाची कन्या होती. शर्मिष्ठेचा पुढे ययाती नावाच्या राजाशी विवाह झाला. त्यांचा पुत्र पुरू हा पुढे राजा झाला व त्याच्यापासून पौरव राजवंश सुरू झाला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_186.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7576a6c7ba19f5174752d8c36d6e0d6d5c986310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_186.txt @@ -0,0 +1 @@ +विनिफ्रेड कॉन्स्टान्स लीच (५ ऑगस्ट, १९२०:सरे, इंग्लंड - १० मे, २०००:लंडन, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५१ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1866.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9703310153707c6a024cecc779b5fba242675d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1866.txt @@ -0,0 +1,9 @@ +वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.[२] +अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.[३] +१८५६ (?) पासून नगरपालिका आणि १८७१पासून नगर वचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल. आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य पाडतात. +प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांचे हे गाव. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना असते.[४] कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.[५] +एकेकाळचे प्रमु़ख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यात देवस्थानांना नेहमीच संपंन्नता लाभली आहे त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. +श्रीदेव वेतोबा मंदिर +शिरोडा वेळागर समुद्रकिनारा +मोचेमाड समुद्रकिनारा +सागरेश्वर समुद्रकिनारा diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1872.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b177b982483760319a2e62d12cac1e37a8946f15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1872.txt @@ -0,0 +1 @@ +वेंडी जॉय को (१९४३:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९६९ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1887.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b310a518c46bbe79f96ee04724f7e2266a27030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1887.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेंब्ली स्टेडियम हे लंडनच्या ब्रेंट बोरोमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९२३ साली बांधलेले जुने वेंब्ली स्टेडियम पाडून त्याच जागेवर २००७ साली हे नवे स्टेडियम बांधण्यत आले. ९०,००० आसनक्षमता असलेले वेंब्ली हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (कँप नोउ खालोखाल) फुटबॉल स्टेडियम आहे. +इंग्लंड फुटबॉल संघ ह्याच स्टेडियममधून आपले राष्ट्रीय सामने खेळतो. तसेच नॅशनल फुटबॉल लीगचा एक सामना दरवर्षी वेंब्लीमध्ये खेळवला जातो. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1917.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ff570e63f98ee8c7d9d3d92a6d6ad28c4149ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1917.txt @@ -0,0 +1,20 @@ +वेटिंग फॉर अ व्हिझा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मचरित्र आहे.[१] यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे.[२] कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस्तक ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.[३][४] +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे. +एका परिच्छेद परिचयामध्ये डॉ. आंबेडकर, विशेषतः परदेशी आणि जे लोक अस्पृश्यतेच्या संकल्पनेशी परिचित नसतील त्यांना, आपल्या पुस्तकाच्या विषयाचा थोडक्यात परिचय करून देतात. +पहिल्या विभागात इ.स. १९०१ मध्ये १० वर्षीय भीमराव आंबेडकरांनी आणि त्यांच्या भावंडांनी त्यांच्या निवासस्थानापासून सातारा ते कोरेगाव येथील त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आणि मसूरला प्रवास करताना अनुभवलेल्या प्रवासाचे त्रासदायक आणि धोकादायक वर्णन केले आहे. +या विभागात बडोद्यामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या न केवळ जातींमधील परंतु धर्मांमधील सखोल विभाजनांचे वर्णन केले आहे. इ.स. १९१८ मध्ये, भारतात परतल्यावर (अमेरिकेमध्ये ३ वर्षे आणि लंडनमध्ये एक वर्ष राहिल्यानंतर) डॉ. आंबेडकर अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये परिवीक्षाचे कार्य करण्यासाठी बडोदा राज्यात गेले. तथापि, बडोदाला पोहोचल्यावर, त्याला कळले की उच्च जातींच्या हिंदू हॉटेलांमध्ये त्यांना खालच्या अस्पृश्य जातीचे असल्यामुळे राहू दिले नाही. त्यांना पारशी सराई सापडली, पण इथे अपारशीला पारशी समाजात राहण्याची परवानगी नव्हती. ते आणि पारशीचे त्राणकर्ते एक तडजोडीपर्यंत पोहोचले, जिथे डॉ. आंबेडकरांनी दुप्पट भाडे देऊन त्यांचे नाव पारशी लिहिले आणि त्यांना राहण्याची परवानगी मिळाली. तथापि, ही फसवणूक (त्यांच्या मते) इतर पारशी लोकांनी शोधून काढली आणि आपल्या निवासस्थानाच्या अकराव्या दिवशी, चिडलेल्या पारशी लोकांनी, शस्त्रांच्या मदतीने त्यांना तेथून काढून टाकले. त्या दिवशी त्यांना ते हॉटेल सोडून जायचे होते, आणि राहण्यासाठी दुसरीकडे जागा नसल्यामुळे डॉ. आंबेडकरांना बडोदा सोडणे भाग पडले आणि दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी मुंबईला परत यावे लागले. +या विभागात इ.स. १९२८ मध्ये चाळीसगाव (महाराष्ट्र) या खेड्यात घडलेली घटना बाबासाहेबांनी कथन केली आहे.अस्पृश्यता आणि दडपशाहीच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी बॉम्बे सरकारने स्थापन केलेल्या समितीचा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. +खानदेश जिल्ह्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे मार्गस्थ होताना चाळीसगाव येथे हिंदूनी अस्पृश्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते तेथे गेले. +चाळीसगाव येथील अस्पृश्यांनी बाबासाहेबांना तेथे एक रात्र मुक्काम करण्याची विनंती केली, परंतु टांगेवाल्याने अस्पृश्य असलेल्या डॉ. आंबेडकरांना टांग्यात घेऊन जाणे नाकारले कारण ते त्याच्या प्रतिष्ठेविरोधी होते. मग त्या गावातील अस्पृश्यांनी तो टांगा भाड्याने घेतला. आणि स्वतः टांगा घेऊन जाऊ लागले. त्यांना टांगा चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे नदीजवळ नाल्यावर अपघात झाला. नाल्याच्या दगडात टांग्याचे चाक अडकल्यामुळे बाबासाहेब टांग्यातून बाहेर फेकले गेले. आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना मोठी दुखापत आणि फ्रॅक्चर झाले. घोडागाडी नदीत पडली आणि बाबासाहेब थोडक्यात बचावले. +डॉ.आंबेडकरांना या घटनेमुळे अस्पृश्य बांधवांबद्दल अधिकच अभिमान वाटू लागला आणि त्यांची प्रतिष्ठा बाबासाहेबांच्या मनात आणखीच उंचावली. कारण गावात आलेल्या बाबासाहेबांना त्यांना पायी चालू द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी स्वतःला धोका पत्करला होता. त्यांना याचीदेखील जाणीव झाली की, साध्या टांगेवाल्यापेक्षा बॅरिस्टर असलेल्या व्यक्तीचीही या समाजात कमी किंमत आहे. +हा विभाग इ.स. १९३४ मध्ये घडलेल्या घटनेशी निगडित आहे. यात मुस्लिम अस्पृश्यांना कशी वागणूक देतात याचा उल्लेख आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे मित्र दौलताबाद किल्ला बघण्यासाठी गेले होते. औरंगाबाद (हैदराबाद निजाम राज्यातील)च्या भेटीदरम्यान. किल्यावर आगमन झाल्यानंतर, +किल्ल्यावर आल्यावर डॉ. आंबेडकरांसह सर्वांनी किल्ल्यावरील प्रवेशद्वाराच्या टाकीत ठेवलेल्या पाणी वापरून हातपाय धुतले व पाणी प्यायले. तथापि, काही मिनिटांनंतर एक वृद्ध मुसलमान व्यक्ती त्यांच्या मागे धावू लागला, "धेड (अस्पृश्य) यांनी आपले पाणी दूषित केले आहे" अशी त्याने ओरड केली आणि लवकरच एक गोंधळ उडाला, त्यात आंबेडकरांचे गट आणि स्थानिक मोठा मुस्लिम गट तेथे ओरड करू लागला. +परंतु आंबेडकरांनी त्या समुदायाला सुनावले की, जर एखाद्या अस्पृश्याने इस्लाम धर्म स्वीकारला असता आणि त्याने हे पाणी वापरले असते तर त्याच्याशी तुम्ही असेच वागले असता काय? +१२ डिसेंबर इ.स. १९२९ रोजी एम.के. गांधी यांनी प्रकाशित केलेल्या यंग इंडिया जर्नलमध्ये प्रकाशित केलेले एक पत्र आहे. त्यात काठेवाडमधील हरिजनच्या दुःखद अनुभवाचे वर्णन केले आहे,  ज्याची पत्नी मुलास जन्म दिल्यानंतर लवकरच आजारी पडली. हिंदू (ब्राह्मण) डॉक्टरांनी तिला थेट उपचार करण्यास नकार दिला, किंवा घरात त्यांना पाहण्यास नकार दिला. रुग्ण स्त्रीला हरिजन कॉलनीच्या बाहेर आणल्यावर तिला तपासण्यास डॉक्टर तयार झाले. मुस्लिम व्यक्तीद्वारा थर्मोमीटर तपासले असता डॉक्टरांना ती आजारी असल्याचे दिसून आले. काही औषधे तिला देण्यात आली, आणि जेव्हा तिची स्थिती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी त्या स्त्रीवर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर ती मरण पावली. + + +This section recounts the narrated experience of a Bhangi boy, recounted on 6 March 1938 at a Bhangi meeting in Dadar, Bombay. The educated boy got employment as a Talati in the government district offices of Borsad, Kheda, in what is now Gujarat. However, he was refused accommodation there, being an untouchable. Neither did the untouchables of the village accommodate him, fearing the wrath of Hindus who felt that the bhangi boy was aiming for a job which was beyond him. +At the government office, his colleagues discriminated against him, treated him badly and did not allow him to drink water when thirsty for fear of the water getting polluted by his touch. Ultimately, matters only got worse, with a large crown of locals threatening to kill him. +He left this job and returned home. +इ.स. १९९० साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीने बाबासाहेबांचे हे लेखन पुस्तिका म्हणून प्रकाशित केले. त्यानंतर इ.स. १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने यातील काही भाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे, खंड १२, भाग १ मध्ये प्रकाशित केला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1922.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc5303be3a73c24cc3a2bcbd6e38fa4d66fc93db --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1922.txt @@ -0,0 +1,3 @@ + +वेड हा २०२२ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे जो रितेश देशमुख दिग्दर्शित आहे, त्याच्या दिग्दर्शनात पदार्पण आहे आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा निर्मित आहे. मुख्य भूमिकेत या जोडप्याला अशोक सराफ आणि जिया शंकर यांनी सोबत केली.[१] +हा २०१९ च्या तेलुगू भाषेतील मजिली चित्रपटाचा रिमेक आहे.[२] वेड ३० डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला,[३] समीक्षकांनी सामान्यतः सिनेमॅटोग्राफी आणि संगीताचे कौतुक केले. बॉक्स ऑफिसवर हा २०२२ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.[४] २३ जानेवारी २०२३ पर्यंत, या चित्रपटाने ₹५५.४० कोटी एवढी कमाई केली आहे.[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1933.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83b7b68aa95dcda2f34c1126a147a6023bbe97bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1933.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेढणी हा अंगठीचा एक प्रकार आहे. तो सोने या धातू मध्ये असतो. ते हातामधील बोटांमध्ये वापरतात. +तो गोल वेढे असतात म्हणून त्याला वेढणी म्हणतात diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1958.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15c9db84c08ab9c4a841d6e337bd6b643dde154b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1958.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1961.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a369469a8e8964e72d51b5e25e0fb530a3fb649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1961.txt @@ -0,0 +1,4 @@ +वेण्णा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे.महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे. जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने सह्याद्रीत उगम पावून पूर्व व दक्षिणेकडे वाहणाऱ्या आहेत. वेण्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरली आहे. +नागपूर जिल्ह्यात वेगळी वेण्णा नदी आहे. +ी नदी आहे. +पहा :जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1963.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1963.txt @@ -0,0 +1,29 @@ + +सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता. +सातारा जिल्ह्यातील नद्या +कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते. +सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. +सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते. +● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. +● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. +● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. +● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. +● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. +● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. +१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो. +२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे. +३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे. +४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे. +५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. +साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. +छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती +  +सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत +सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत +'वेण्णानगर +संगमनगर- +गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले. +सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. +यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. +सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे. +सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1976.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9923d47c9980953dc056618a7a65c9d5ce927c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1976.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध लेण्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमिटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात. [१] + +वेताळवाडी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असले तरी तिथे आवश्यक अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पर्यटकांना आपापल्या जवाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जूनी तोफही इथे आढळते. आता तिल्या नव्याने किल्ल्यावर आणून ठेवलेले आहे. [२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1977.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31d2bc231a3966d05e7371124d11db0bb38110ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1977.txt @@ -0,0 +1 @@ +बेतालबातीम (वेताळभाटी) हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांना प्रिय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1989.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64098058a8a2b5f7f0df1e5c430d1f1a355da1bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1989.txt @@ -0,0 +1,5 @@ +वेद राही (जन्म १९३३) हे एक हिंदी, उर्दू आणि डोग्री लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. +त्यांनी स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर चित्रपटाची निर्मिती केली. राही यांनी दूरदर्शन मालिका गुल गुलशन गुलफामचे दिग्दर्शनही केले होते. +राहींचा जन्म २२ मे १९३३ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला मुल्कराज सराफ होते. ते जम्मूहून "रणबीर" नावाचे वृत्तपत्र प्रकाशीत करत असे. राही यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांनी प्रथम उर्दूमध्ये लेखन सुरू केले आणि नंतर हिंदी आणि डोग्री भाषेतही लेखन सुरू केले. त्यांच्या आतापर्यंतच्या काही प्रसिद्ध कथा आहे: काले हत्थे (१९५८), आले (१९८२), व क्रॉस फायरिंग. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये हाड़ बेडी पत्तन (१९६०), त्रुट्टी दी डोर (१९८०) , परेड (१९८२), गर्भजून इत्यादीचा समावेश आहे. +रामानंद सागर यांच्यामुळे राही यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले, ज्यांच्यासोबत त्यांनी सुमारे २५ हिंदी चित्रपटांसाठी कथा, संवाद आणि पटकथा लेखन केले. त्यांनी बेजुबान (1976), चरस (१९७३), सन्यासी (१९७२), बे-इमान (१९७२), मोम की गुडिया (१९७१), आप आये बहार आयी (1971), पराया धन (१९७०) . (1970), पवित्र पापी (१९६६), ये रात फिर ना आएगी यांसारखे अनेक चित्रपट केले. याशिवाय त्यांनी एहसास (१९९४), रिश्ते (१९८७), जिंदगी (१९८७), गुल गुलशन गुलफाम (१९८४), नादानियां (१९८४), काली घटा (१९७३), प्रेम पर्वत (१९७२), दरार सरख्या टीव्ही मालिकां व चित्रपट दिग्दर्शीत केले आहे. याशिवाय तेकाली घटा चित्रपटचे निर्माते देखील होते. +मार्च २०१९ मध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा "कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार" प्राप्त झाला.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2028.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c16e19d3a68b21adbc8d6886c4232b219dfb1c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2028.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर १३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2038.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a5f30bce53530db921d4d65ac20faf2911f1c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2038.txt @@ -0,0 +1,4 @@ +वेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लायन्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२८३ इतकी होती.[२] +वेन काउंटीची रचना ११ एप्रिल, १८२३ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन सरदार आणि मुत्सद्दी जनरल अँथनी वेन यांचे नाव दिलेले आहे. +वेन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2063.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..543b46be1f53c7b63eec6198efd31f1f91326ec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2063.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +वेन फिलिप्स नावाचे दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2070.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2070.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2080.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e6eb016699fa23e1b6dbe28bf20bca807a2760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2080.txt @@ -0,0 +1,3 @@ +११ जुलै, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2087.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b017c0bf9028cd2d38db7946e5a66191d602c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2087.txt @@ -0,0 +1,3 @@ +विंग कमांडर वेनटप्पा मुसंद्रा मुदियाह. +जुलै १०, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2104.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a138debc81bd92661d7149d89c820663310ea022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2104.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेब्स्टर काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_214.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da59e29cbbd4bc5ea9fc1961c3d5bb20b0e3016 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_214.txt @@ -0,0 +1,2 @@ +विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी) हे चेक प्रजासत्ताकच्या प्राग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. या मैदानावर दोन खेळपट्ट्या आहेत. एक म्हणजे स्कॉट पेज खेळपट्टी तर दुसरी बँक्स खेळपट्टी आहे. +२१ मे २०२१ रोजी स्कॉट पेज खेळपट्टी वर चेक प्रजासत्ताक आणि लक्झेंबर्ग या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2146.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868c2d4beed548a91f8923a679f4389fd9e8e006 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2146.txt @@ -0,0 +1,85 @@ +वेर्ले हे दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या सांगे तालुक्यातील ५४१३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +वेर्ले हे दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या सांगे तालुक्यातील ५४१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४५ कुटुंबे व एकूण ५६८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सांगे (Sanguem) ४० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २६८ पुरुष आणि ३०० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ६ असून अनुसूचित जमातीचे ४६० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ६२७०२० [१] आहे. +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा नेत्रावळी येथे १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा नेत्रावळी येथे १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा कुडचडे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय केपे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था कुडचडे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक कुडचडे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा केपे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र मडगाव येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा मडगाव येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश नाही. +गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४०३७०२ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील शासकीय बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्हॅन उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्हॅन १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही. +गावात बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी उपलब्ध नाही. +गावात समुद्र व नदीवरील बोट सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील वाहतुकीयोग्य जलमार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध नाही.सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २४ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी व १० तासांचा वीजपुरवठा व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +वेर्ले येथे गोवा मिनरल फाऊंडेशनच्या सहकार्याने वेर्ले इको टुरिझम को ऑपरेटिव्ह सोसायटीने पर्यटकांना राहण्यासाठी 'अंगण होम स्टे Archived 2016-04-19 at the Wayback Machine.’ या प्रकल्पाची उभारणी केली आहे.येथील तळ्याचे सौंदर्यीकरण होणार आहे.[२] या गावातील बागा, भाजीपाल्याची शेती, तसेच हल्लीच सुरू झालेली स्ट्रोबेरीची लागवडही मोठ्या प्रमाणात सुरू झलेली आहे. त्यामुळे वेर्ले गावाला मिनी महाबळेश्वर अशेही संबोधले जावू लागले आहे. धबधबे व जंगल पाहण्यासारखे आहे. येथून वाहणारी नदी पुढे तेरेखोल नदीला जाऊन मिळते.[३] +वेर्ले ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +वेर्ले या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): काजू,देशी दारू,नारळ, तेल, सुपारी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2168.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b82d96ee929ccecc03978f4fe71f39aa2268ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2168.txt @@ -0,0 +1,14 @@ +वेलची शब्द खालील प्रकारे वापरला जातो. +वेलचीचा वापर  स्वयंपाकघरामध्ये पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. +1.वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्त्व ब गटातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं. +2.हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. +3.वेलची पित्तावर रामबाण उपाय आहे. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात असं असलं तरीही वेलचीमुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते. अन्न पचण्यासाठी वेलची मदत करते. +4.ॲसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. +5.वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं जातं. वेलचिमध्ये ॲन्टी बॅक्टिरियल गुण असतो. त्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. +6.वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो. +7.बिर्याणी, पुलाव, किंवा घरातील गोड पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केल्यानं सुगंध आणि स्वाद वाढतो. +8.वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो. +9.वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो. +10.चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही बहुगुणी वेलची रोज नक्की खायला हवी. त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहाल. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2176.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a29bcc184de604f32d1490def30355594add8e9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2176.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेलवंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2177.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd66c4b2d7738d10c9652e99ff4a4f0e975c2ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2177.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेलवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2212.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e817d51ecdcb14eb3151a036f5f9d41b9319f22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2212.txt @@ -0,0 +1 @@ +या मतदारसंघातील विजयी खासदार diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2214.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33b674e447d8b9a9fadd9d5f5825c54483f44a3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2214.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेल्लास्वामी रामू वनिता (१९ जुलै, इ.स. १९९०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) ही  भारतकडून सहा एकदिवसीय आणि १६ आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2218.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d7885ee829b060c1cecca26bde276eb12765ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2218.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेल्लोर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६३५०९२ पुरुष मतदार, ६४५३०९ स्त्री मतदार व १४ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०४१५ मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2248.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526d08c95f0d4458fa36eb4ad91eef81a2c3ae4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2248.txt @@ -0,0 +1,22 @@ +भालवडी भट्टी वाघदरा +भोरडी बोपळघर बोरावळे ब्राह्मणघर (वेल्हे) चांदार चापेट चऱ्हाटवाडी चिखलीखुर्द (वेल्हे) चिंचाळेबुद्रुक चिंचाळेखुर्द +चितमोडी +दादवाडी दापोडे दापसरे धानेप धिंडाळी एकलगाव गेव्हांडे घावर घिसर घोडखळ घोडशेत +घोळ (वेल्हे) घोलपघर गिवशी गोंदेखळ गुगुळशी गुंजावणे (वेल्हे) हारपूड हिरपोडी +कुरावती कुरटावाडी लाशिरगाव लाव्हीबुद्रुक लव्ही खुर्द माजगाव माळवली माणगाव (वेल्हे) +मांगदरी मार्गासणी मेरवणे मेटपिळावरे मोहरी (वेल्हे) मोसे बुद्रुक निगडेमोसे निगडे बुद्रुक निगडे खुर्द निवी ओसडे पाबे पाळबुद्रुक पाळखुर्द +वेल्हे बु. हे पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील १२१.६३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३२२ कुटुंबे व एकूण १४८० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७४६ पुरुष आणि ७३४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २११ असून अनुसूचित जमातीचे १४२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६५९९[१] आहे. +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत.गावात १ खाजगी प्राथमिक शाळा आहे.गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (वेल्हे बु ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात १ शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्व प्रकारच्या शासकीय वैद्यकीय सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत. +गावात खाजगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे.तसेच सरकारी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच गावात विहिरीच्या पाण्याची सोय आहे.हे पाणी गावकरी लोक पिण्यास वापरतात. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही.सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात बँक व एटीएम उपलब्ध आहे .गावात शेतकी कर्ज संस्था,स्वयंसहाय्य गट, रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वेल्हे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +वेल्हे बु. या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): +गहू,तांदुळ,ज्वारी,बाजारी,उस,हरभरा,यांचे उत्पादन हेते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_225.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4ce6a9a5be5e4c3c7fc4ccae3d1ac1676b9fc1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_225.txt @@ -0,0 +1 @@ +विनोद कुमार बोइनापल्ली ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2255.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a7fa1e892c19967b4c9e7fa547b38a6aab66268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2255.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेळंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2257.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e14e704430a552dc8736959fbb5a53f0a9cba25d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2257.txt @@ -0,0 +1 @@ +देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून वेळगंगा नदी वाहते व पुढे शिवना नदीस जाऊन मिळते. शिवना नदी पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते. वेळेवर प्रकट झालेली गंगा म्हणजे नदी म्हणून वेळ गंगा हे नाव या नदीला पडले. वेळ गंगा नदीवर काही धरणं झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2285.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d797aca8a4a9f97e1f2ee6695c2212e4c791374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2285.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेळुंजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2288.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..491d59da0c29c2f2218c8c674f4e0fd43aa53a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2288.txt @@ -0,0 +1,13 @@ +९२ वंश आणि ५००० जाती +बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. +वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.[१] +पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळ जवळ १४०० बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. +चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात. +जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. [१]बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो. +बांबूचे आशियामधले उत्पादन गेल्या वीस वर्षांत झपाट्याने वाढले आहे. २००८ मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन २००० मधल्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे. +बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते. +बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते. +बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात. +बांबूची अशी उत्पादने किती कठीण असतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्‍ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते. +बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत. उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेले, रेस्टॉरंट, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. ज्यावेळी बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल असा दिवस फारसा दूर नसावा.बांबू बासरी बनवण्या साठी उपयोगी पडतो +बांबूची कोवळी पाने, फांद्या, कोंब हे चीनमधील जायंट पांडा व नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे. काही वेळेस उंदीर याची फळे खातात. आफ्रिकेतील जंगलातील गोरिलासुद्धा बांबूचे सेवन करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2316.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dce67856f9bd0dfe5aa0743eb78bc922b1302fc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2316.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेसेक्सचा एथेलरेड पहिला (इ.स. ८३७ - एप्रिल २३, इ.स. ८७१) हा वेसेक्सच्या एथेलवुल्फचा मुलगा होता. तो आपल्या भाऊ, वेसेक्सचा एथेलबर्टच्या, मृत्यूनंतर वेसेक्सच्या राजेपदी आला. त्याच्या राज्यकालात डेन्मार्कच्या सैन्याने वेसेक्स व ईंग्लंडवर आक्रमण करून धुमाकूळ घातला. जानेवारी ४, इ.स. ८७१ला रीडिंगच्या लढाईत हार पत्करल्यावर एप्रिल २३ला मर्टोनच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. +त्याच्यानंतर त्याचा लहान भाऊ आल्फ्रेडने राज्य सांभाळले. एथेलरेडला दोन मुले, एथेलवाल्ड व एथेलहेम, होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2357.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..529387e80d0622766b8a87575bb55dcae125ab46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2357.txt @@ -0,0 +1,19 @@ +२००७ इंग्लिश क्रिकेट हंगामाचा भाग म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १२ मे ते ७ जुलै २००७ या कालावधीत इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी, दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या विक्रमी विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-० ने वर्चस्व राखले, तर नंतरच्या वनडे मालिकेत २:१ ने विजय मिळवला. +नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. +नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. + +नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. + +त्यांचा इंग्लंड दौरा पूर्ण झाल्यानंतर, वेस्ट इंडीज आयर्लंडमध्ये चार-राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत खेळेल, जिथे ते यजमान, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2363.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71926a9698f513f3cd5cc57890536c476efb5994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2363.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९३० - मार्च १९३१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2390.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..903f5fffc97a6e74fba221fa9b9664ef09a35b9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2390.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २००३-०४ हंगामात दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आणि पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका तसेच पाच दौरे सामने खेळले. हा दौरा लगेचच झिम्बाब्वेच्या दौऱ्यानंतर आला. +कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजचे नेतृत्व ब्रायन लाराकडे होते तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व ग्रॅमी स्मिथकडे होते. +दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-० आणि एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने कसोटी मालिकेत १७८.०० च्या सरासरीने ७१२ धावा केल्या, त्यानंतर हर्शेल गिब्सने ११६.६० च्या सरासरीने ५८३ धावा केल्या.[१] मखाया एनटिनीने २९ विकेटसह अव्वल विकेट घेणारा म्हणून मालिका पूर्ण केली, त्यानंतर आंद्रे नेलने २२ आणि शॉन पोलॉकने १६ बळी घेतले.[१] एनटिनीला ‘मॅन ऑफ द टेस्ट सीरिज’ म्हणून गौरविण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2407.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff56995ad7a99bfd70bd38635b6d90eebc38b1cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2407.txt @@ -0,0 +1,10 @@ +टिम साउदी (१ली, २री ट्वेंटी२०)मिचेल सँटनर (३री ट्वेंटी२०) +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२० दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी वेस्ट इंडीज संघाने तीन सराव सामने खेळले. ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. +मार्च २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडले. त्यानंतरची न्यू झीलंडची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. वेस्ट इंडीजने ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. +आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने वेस्ट इंडीजचा २-० असा पराभव केला. मालिकेतील तिसरी ट्वेंटी२० पावसामुळे अवघ्या २.२ षटकांनंतर रद्द केली गेली. दोन्ही कसोट्यांमध्ये वर्चस्व राखत न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. केन विल्यमसन पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथम याने न्यू झीलंडचे नेतृत्व केले. + + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2416.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fb975eb2ae458808f228fe0a0a10e44c06ecacb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2416.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ५ डिसेंबर २००८ आणि १३ जानेवारी २००९ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी यजमानांविरुद्ध दोन कसोटी सामने, दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) तसेच स्टेट चॅम्पियनशिप मधील ऑकलंडविरुद्ध तीन दिवसीय सामना खेळला. २००५-०६ मध्ये वेस्ट इंडीजच्या न्यू झीलंड दौऱ्यानंतर दोन्ही पक्षांमधील ही पहिली मालिका होती; त्यांची मागील बैठक २००७ क्रिकेट विश्वचषकाच्या सुपर ८ टप्प्यात झाली होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_242.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1dccf14450b4d08cb8377d11b2c8f3e9c18bf93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_242.txt @@ -0,0 +1 @@ +विनोदन जॉन (२७ मे, १९६०:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८३ ते १९८७ दरम्यान ६ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2425.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa4cc3fe1976b25264c5ef0611d5e4eb17e124a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2425.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_244.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc602fe20b73692e6741214b30506fb75f07dd54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_244.txt @@ -0,0 +1 @@ +विनोद लखमशी चावडा (६ मार्च, इ.स. १९७९:नखत्राणा, कच्छ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील कच्छ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2443.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d791f2b344bd2b72b8fc17721cec74ef4cb3f97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2443.txt @@ -0,0 +1,5 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्याकरिता पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. झिम्बाब्वेने २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर प्रथमच दुसरा कसोटी संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. याआधी श्रीलंकेने ऑक्टोबर २०१७ला पाकिस्तानविरूद्ध लाहोरमध्ये एक टी२० सामना खेळला होता. +योजनेनुसार सदर मालिका नोव्हेंबर २०१७ मध्ये होणार होती पण वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा करण्यास नकार दिला. पीसीबीचे अध्यक्ष नजाम सेथी यांनी हा दौरा एप्रिल २०१८ मध्ये होणार असल्याचे जाहीर केले. सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होतील. कराचीत शेवटचा सामना २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला होता ज्या दौऱ्यात श्रीलंका क्रिकेट संघावर अतिरेकी हल्ला झाला होता आणि सदर दौरा रद्द करावा लागला. +क्रिकेट वेस्ट इंडीजने पाकिस्तानला जाण्याकरता खेळाडूंना अधिक भत्ता देऊ केला. दौऱ्यापुर्वी वेस्ट इंडीजने कमकुवत संघाची घोषणा केली. मुख्य कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने दौऱ्यास सुरक्षेचे कारण सांगून जाण्याच नकार दिला. उपकर्णधार जेसन मोहम्मदला कर्णधार बनवून पाठविण्यात आले. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2456.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68cd113854618b921347210a50e9febcd8f7398 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2456.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९४८-फेब्रुवारी १९४९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचा हा पहिला भारत दौरा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मायभूमीत भारताने पहिली कसोटी खेळली. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका १-० अशी जिंकली. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_246.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2684bf6c944d767323835fac8ff636d904527a45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_246.txt @@ -0,0 +1,6 @@ +विनोदकार (इंग्रजी: कॉमेडियन किंवा कॉमिक) ही अशी व्यक्ती असते जी प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. यासाठी ते विनोदी किंवा गमतीशीर परिस्थितींद्वारे हसवण्याचा प्रयत्न करतात, किंवा मूर्खपणाचे वागतात (स्लॅपस्टिक प्रमाणे) किंवा प्रॉप कॉमेडी यांचा आधार घेतात. जो विनोदकार प्रेक्षकांना थेट संबोधित करतो त्याला स्टँड-अप कॉमेडियन म्हणतात. + +एड विन यांचे एक लोकप्रिय वाक्य दोन संज्ञांमध्ये फरक सांगते:[१]एक कॉमिक मजेशीर गोष्टी सांगतो; विनोदकार विनोदी गोष्टी सांगतो. विनोदाचे किती श्रेय शाब्दिक आशयाला दिले जाऊ शकते आणि अभिनय आणि व्यक्तिरेखेला किती दिले जाऊ शकते यामधील फरक हे दर्शवते. +१९८० पासून कॉमेडीची एक नवीन लाट, ज्याला पर्यायी कॉमेडी (इंग्रजी: alternative comedy) म्हणतात, अधिक ऑफबीट आणि प्रायोगिक शैलीमुळे या प्रकारच्या विनोदाची लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये सामान्यतः अधिक अनुभवात्मक किंवा निरीक्षणात्मक अहवाल (उदा., अॅलेक्सी सायले, डॅनियल तोश, माल्कम हार्डी) यांचा समावेश होतो. जोपर्यंत सामग्रीचा संबंध आहे, टॉमी टियरनन, डेस बिशप, केव्हिन हार्ट आणि डॉन फ्रेंच यांसारखे विनोदी कलाकार त्यांच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःची मजा करण्यासाठी ओळखले जातात, तर जॉन स्टीवर्ट आणि बेन एल्टन यांसारखे विनोद निर्माण करण्यासाठी राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका घेतात. +प्रसिद्ध कॉमेडी हब जसे की, मॉन्ट्रियलमधील जस्ट फॉर लाफ्स फेस्टिव्हल, एडिनबर्ग फ्रिंज आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कॉमेडी फेस्टिव्हल येथे कार्यक्रम करून अनेक विनोदकार एक पंथ ( इंग्रजी: cult following) साधतात. एडिनबर्ग कॉमेडी अवॉर्ड (पूर्वीचे पेरियर कॉमेडी अवॉर्ड) सारखे उल्लेखनीय विनोदी पुरस्कार जिंकल्यानंतर अनेकदा विनोदकाराची कारकीर्द लक्षणीयरीत्या प्रगती करते. विनोदकार कधीकधी मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश करतात, जसे की चित्रपट आणि टेलिव्हिजन, जिथे ते अधिक व्यापकपणे ओळखले जातात (उदा. एडी इझार्ड, ली इव्हान्स). कॉमिकचे स्टँड-अप यश नेहमीच चित्रपटाच्या समीक्षणात्मक किंवा बॉक्स ऑफिस यशाशी संबंधित नसते. +फोर्ब्स मासिक जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या यशस्वी कॉमेडियन्सची वार्षिक यादी प्रकाशित करते. [२] [३] त्यांच्या माहितीच्या स्रोतांमध्ये निल्सन मीडिया रिसर्च, पोलस्टार, बॉक्स ऑफिस मोजो आणि IMDb या माध्यमांचा समावेश होतो. २००६ ते २०१५ पर्यंत जेरी सेनफेल्डने या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. २०१६ मध्ये केविन हार्टने विजेतेपद पटकावले. त्या वर्षी आठ सर्वाधिक मानधन घेणारे कॉमेडियन अमेरिकेचे होते, ज्यात एमी शूमर हिचा समावेश होता, जी अव्वल दहामध्ये समाविष्ट होणारी पहिली महिला ठरली. २०१६ मधील शीर्ष १० खालीलप्रमाणे आहेत:[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2468.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a13a82145644ac533f7b79992420bbc6e304cd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2468.txt @@ -0,0 +1,15 @@ +ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला. सदर दौऱ्यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते.[१] तिसरा एकदिवसीय सामना हुडहुड चक्रीवादळामुळे रद्द झाल्यानंतर मालिका चार सामन्यांची करण्यात आली.[२] +मालिका सुरू होण्याच्या दिवशी, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून त्यांना देऊ असलेले मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मैदानावर न उतरण्याचे ठरवले. बीसीसीआयने मध्यस्थी केल्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्यांना मानधन देण्याचे वचन दिले आणि मालिका सुरू झाली. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी, नाणेफेकीच्या वेळी, वेस्ट इंडीजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो संपूर्ण संघासहित मैदानावर उतरला आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या वचनानुसार त्यांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे राहिलेला दौरा ते सोडून देत आहेत अशी घोषणा केली. चौथा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुष्टी दिली की मानधनाबाबत वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंदरम्यान सुरू असलेल्या वादामुळे, दौऱ्यावरील पुढचे सामने रद्द करण्यात येत आहेत.[३][४] बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वेस्ट इंडीज संघ व्यवस्थानपनाने त्यांचा निर्णय बोर्डाला त्यादिवशी आधीच कळवला होता. नोव्हेंबर मध्ये श्रीलंकेने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास प्राथमिक संमती दर्शवली आहे. [५] त्यानंतर, बीसीसीआयने घोषणा केली की पुढील सुूनेपर्यंत वेस्ट इंडीजसोबत नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात येत आहेत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.[६] + + + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2493.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..634a464ab58b158fe001d731913b21336ad45ee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2493.txt @@ -0,0 +1,6 @@ +वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे. + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2506.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5bbc6f3c49948f7c65f4aa663537a8a56ffc09a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2506.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०१४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला होता. ते न्यू झीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका ३-० ने गमावली आणि टी२०आ मालिका ४-० ने गमावली.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2508.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90ca202a88485bdfd10375655c6dce6c1daad61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2508.txt @@ -0,0 +1,9 @@ +वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथूनच दोन्ही संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याकरता संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धासाठी खेळविण्यात येणार आहे. +वेस्ट इंडीजचा संघ ३० जानेवारी रोजी पाकिस्तानात दाखल झाला. विमानतळावरून सर्व खेळाडूंना ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत हॉटेलवर सोडण्यात आले. वेस्ट इंडीज कर्णधार मेरिसा ॲग्विलेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानात आणण्यासंबंधी आशा प्रकट केली. +वेस्ट इंडीज महिलांनी ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2514.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98c04ba4bc16e15be1cf0be9562ff2de5c9889e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2514.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते एप्रिल २००४ दरम्यान भारत आणि पाकिस्तानचा दौरा केला. ते भारतासोबत पाच एकदिवसीय सामने खेळले, जे भारताने ५-० ने जिंकले.[१] त्यांनी पाकिस्तानशी एक कसोटी सामना आणि सात एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये कसोटी अनिर्णित राहिली आणि वेस्ट इंडीजने एकदिवसीय मालिका ५-२ ने जिंकली.[२] कसोटी सामना हा पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांनी खेळलेला शेवटचा कसोटी सामना होता.[३] पाकिस्तानचा फलंदाज किरण बलुचने महिला कसोटी क्रिकेटमध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २४२ धावा केल्या.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2517.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c14e96210dab7e4aa85c281746a88b3a7bcb4c91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2517.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २००८ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. ते श्रीलंकेविरुद्ध ५ एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ३-२ ने गमावली.[१][२] हा दौरा सुरुवातीला श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या दौऱ्यासाठी नियोजित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2541.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7767d5b971b0ee74cfded92eacd1c9b3df28133d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2541.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2549.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53d40b88818da12d60bbd522300fc3cec9d279d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2549.txt @@ -0,0 +1,8 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २००० क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले - जूनमध्ये दोन आणि ऑगस्टमध्ये तीन - जुलैमध्ये झिम्बाब्वेचा समावेश असलेली त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका. +जूनमध्ये, वेस्ट इंडीजने एजबॅस्टन येथे पहिली कसोटी जिंकली, त्याआधी इंग्लंडने लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी सहज जिंकली आणि वेस्ट इंडीजला त्यांच्या दुसऱ्या डावात ५४ धावांत गुंडाळले. +नॅटवेस्टने प्रायोजित केलेली एकदिवसीय मालिका जुलैमध्ये झाली, ज्यामध्ये इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे हे सर्व तीन वेळा एकमेकांशी खेळले आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांसह सहापैकी चार सामने गमावले.[१] लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने झिम्बाब्वेचा पराभव केला, अशा प्रकारे दोन वर्षांत प्रथमच एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[२] +ऑगस्टमध्ये कसोटी मालिका संपली. ओल्ड ट्रॅफर्ड येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, इंग्लंडने हेडिंग्ले येथील चौथी कसोटी दोन दिवसांत जिंकली आणि वेस्ट इंडीजला त्यांच्या दुसऱ्या डावात ६१ धावांत गुंडाळले. त्यानंतर त्यांनी ओव्हलवरील ५वी कसोटी जिंकली, अशा प्रकारे ३१ वर्षांनी वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला मालिका विजय मिळवला.[३] +पाचही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजचे नेतृत्व जिमी अॅडम्सकडे होते. एसेक्सकडून खेळताना अंगठा मोडण्यापूर्वी नासेर हुसेनने पहिल्या कसोटीत इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले; हुसेन परत येण्यापूर्वी अॅलेक स्ट्युअर्ट दुसऱ्या कसोटीत आणि बहुतेक एकदिवसीय मालिकेसाठी नियुक्त झाला.[४] +एका गोलंदाजाने सात प्रसंगी एका डावात पाच विकेट्स घेतल्या (वेस्ट इंडीजसाठी दोनदा अँड्र्यू कॅडिक आणि क्रेग व्हाईट प्रत्येकी दोनदा आणि डॅरेन गॉफने इंग्लंडसाठी एकदा) बॉलने बहुतेक कसोटी मालिकेत बॅटवर वर्चस्व गाजवले, पण फक्त तीन वेळा शतके झळकावणारे फलंदाज (तिसऱ्या कसोटीत स्टुअर्ट आणि ब्रायन लारा आणि पाचव्या कसोटीत मायकेल अथर्टन). वेस्ट इंडीजच्या फलंदाजीतील विसंगती हे या मालिकेचे वैशिष्ट्य होते: संघाने केवळ दोनदा ३०० धावा पार केल्या आणि दुसऱ्या डावात ७० पेक्षा कमी धावा करून ते दोनदा बाद झाले. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत केवळ एकदाच ३०० धावा पार केल्या, परंतु सातत्याने १५० ते ३०० च्या दरम्यान धावसंख्या नोंदवली. +एथर्टनने कोणत्याही संघासाठी सर्वाधिक धावा केल्या (३११), तर मार्कस ट्रेस्कोथिक, ज्याने तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले, त्याने फलंदाजी सरासरी ४७.५० ने केली. वेस्ट इंडीजसाठी शेर्विन कॅम्पबेलने सर्वाधिक धावा केल्या (२७०), तर रामनरेश सरवानची संघाची सर्वोत्तम फलंदाजी सरासरी (४०.७५) होती. +वॉल्शने दोन्हीपैकी एका संघासाठी (३४) सर्वाधिक विकेट घेतल्या, त्यामुळे तो माल्कम मार्शल मेमोरियल ट्रॉफीचा पहिला विजेता ठरला; त्याला वेस्ट इंडीजचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. गॉफने इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेतले (२५), आणि तो त्याच्या संघाचा मालिका सर्वोत्तम खेळाडू होता. गफला कॅडिक (२२) आणि डॉमिनिक कॉर्क (२०) यांनी चांगली साथ दिली, तर वॉल्शने ५व्या कसोटीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या त्याच्या दीर्घकालीन साथीदार कर्टली अॅम्ब्रोस (१७) पेक्षा दुप्पट बळी घेतले.[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2589.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff56995ad7a99bfd70bd38635b6d90eebc38b1cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2589.txt @@ -0,0 +1,10 @@ +टिम साउदी (१ली, २री ट्वेंटी२०)मिचेल सँटनर (३री ट्वेंटी२०) +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२० दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी वेस्ट इंडीज संघाने तीन सराव सामने खेळले. ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. +मार्च २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडले. त्यानंतरची न्यू झीलंडची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. वेस्ट इंडीजने ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. +आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने वेस्ट इंडीजचा २-० असा पराभव केला. मालिकेतील तिसरी ट्वेंटी२० पावसामुळे अवघ्या २.२ षटकांनंतर रद्द केली गेली. दोन्ही कसोट्यांमध्ये वर्चस्व राखत न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. केन विल्यमसन पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथम याने न्यू झीलंडचे नेतृत्व केले. + + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2594.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5764338a6fbf1d4e0a46638e3c5ca60a3f2da45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2594.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) खेळ खेळून न्यू झीलंडचा दौरा केला.[१] +कसोटी मालिकेपूर्वी सराव खेळ झाले. वेस्ट इंडीज ३ डिसेंबर रोजी न्यू झीलंड मॅक्स ब्लॅक विरुद्ध खेळला, तो सामना गमावला. त्यानंतर त्यांचा सामना ५ डिसेंबरला न्यू झीलंड 'अ' आणि १० डिसेंबरला ऑकलंडशी झाला आणि दोन्ही सामने अनिर्णित राहिले.[२] पहिल्या कसोटी सामन्याला १६ डिसेंबर रोजी सुरुवात झाली, वेस्ट इंडीजने त्यांच्या पहिल्या डावातील ३६५ धावसंख्या - सलामीवीर एड्रियन ग्रिफिथ आणि शेर्विन कॅम्पबेल यांच्या शतकांसह - ख्रिस केर्न्सने सात विकेट्स घेतल्यामुळे सर्वबाद ९७.[३] वेस्ट इंडीजच्या माजी वेगवान गोलंदाजाने वेस्ट इंडीजची कामगिरी "दुसरा रेट" असल्याची टीका केली.[४] केर्न्सने दोन कसोटी सामन्यांची मालिका ९.९४ च्या गोलंदाजीच्या सरासरीने १७ विकेट्ससह पूर्ण केली.[५] +मॅथ्यू सिंक्लेअरच्या द्विशतकाच्या जोरावर न्यू झीलंडने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५१८ धावांपर्यंत मजल मारली आणि वेस्ट इंडीजने १७९ आणि २४३ अशी दोनदा फलंदाजी करताना एक डाव आणि १०५ धावांनी पराभव पत्करला.[६] घरच्या संघाने वनडे मालिका ५:० ने जिंकली. पहिला सामना पावसाने प्रभावित झाला होता, न्यू झीलंडने डकवर्थ लुईसवर तीन विकेट्सने विजय मिळवला होता. उर्वरित चार सामन्यांमध्ये सात विकेट, चार विकेट, आठ विकेट आणि वीस धावांच्या फरकाने विजय मिळवला.[२] नॅथन अॅस्टलने चार अर्धशतकांसह संपूर्ण मालिकेत ३२० धावा केल्या, तर डॅनियल व्हिटोरीने नऊ विकेट घेतल्या.[७] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2609.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99e38991d5d1ccd9e08cbc8212888b30647d5ea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2609.txt @@ -0,0 +1,16 @@ +सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौऱ्यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली होती.[१] +सुरुवातीला, वेळापत्रकानुसार २-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने आयोजित करण्यात आले होते.[२] मे २०१६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत शक्यता पडताळून पाहत होते.[३] परंतु श्रीलंकेत पावसाचा मोसम असल्याने सदर कल्पना बाद करण्यात आली.[१] मालिकेमध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई येथे होणाऱ्या एका दिवस/रात्र कसोटी सामन्याचा समावेश असल्याच्या वृत्ताला पीसीबी ने ऑगस्ट २०१६ मध्ये पुष्टी दिली.[४][५][६] +दुबई येथील पहिली कसोटी ही पाकिस्तानची ४००वी कसोटी आणि दुसरी दिवस-रात्र कसोटी.[७][८] दिवस/रात्र कसोटी सुरू होण्यापुर्वी दोन्ही कर्णधारांनी ह्या स्वरूपासाठी पाठिंबा दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हक म्हणाला "ह्या क्षणी, कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेता हेच कसोटी क्रिकेटचे भविष्य आहे. ".[९] वेस्ट इंडीजचा कर्णधार जासन होल्डरला ही संकल्पना आवडली, तो म्हणाला की "आपण नवीन गोष्टीला संधी दिली पाहिजे".[१०] परंतू, कसोटीच्या पहिल्या दिवशी, मैदानावर फक्त ६८ चाहते होते आणि खेळ संपेपर्यंत हा आकडा फक्त ६०० पर्यंत वाढला होता.[११] कसोटी संपल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नमूद केले की "गुलाबी चेंडूवरती आणखी काम करणे गरजेचे आहे. अजूनतरी तो आवश्यक मापदंडापर्यंत नाहीये आणि मला वाटतं दिवस/रात्र कसोटीसाठी तो एकच अडथळा आहे."[१२] +पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी२० मालिका ३-० ने जिंकल्या. कसोटी मालिका सुद्धा पाकिस्तानने २-१ ने जिंकली. शेवटच्या कसोटी वेस्ट इंडीजने विजय मिळवला. जासन होल्डरच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय.[१३][१४] विजयानंतर, होल्डर म्हणाला "आम्ही लढाऊपणा दाखवला. विजयाचे श्रेय क्रेग ब्रेथवेटला दिले पाहिजे. तो पहिल्या डावात खूपच चांगला खेळला आणि दुसऱ्या डावात पाठलागाची जबाबदारी घेतली".[१५] + + + + + + + + + + + +मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2612.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dfe43a0d37e66a77e464dc6848b8faa1277a387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2612.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०११ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात एक ट्वेंटी-२० (टी२०आ), दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2623.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fb66a5e2f01e878ab235d7714bb18eb45225504 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2623.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2629.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27ce5d761646523d203cc8dd1f5b166f2fce95c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2629.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २००५ मध्ये दोन कसोटी सामने आणि वनडे तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला. कराराच्या वादामुळे वेस्ट इंडीजचा संघ गंभीरपणे संपुष्टात आला होता, ज्यामुळे ब्रायन लारा, ख्रिस गेल आणि कोरी कोलीमोर सारख्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता. अशाप्रकारे, श्रीलंका मालिकेत आणखी जबरदस्त फेव्हरिट म्हणून गेला, घरच्या मैदानावर त्यांचा मजबूत खेळ आणि वेस्ट इंडीजचा खराब फॉर्म – शेवटच्या दहा प्रयत्नांमध्ये फक्त एक कसोटी विजय. आणि त्यांनी त्यांच्या आवडत्या स्थितीची पुष्टी केली, दोन्ही कसोटी जिंकून जोरदार शैलीत विजय मिळवला, जरी त्यांच्या फलंदाजीमध्ये वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांविरुद्ध चिंताजनक कमकुवतपणा दिसून आला ज्यांनी कधीकधी प्रतिभेपेक्षा अधिक मनाने गोलंदाजी केली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2641.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..634a464ab58b158fe001d731913b21336ad45ee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2641.txt @@ -0,0 +1,6 @@ +वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे. + + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2659.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99e38991d5d1ccd9e08cbc8212888b30647d5ea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2659.txt @@ -0,0 +1,16 @@ +सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौऱ्यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली होती.[१] +सुरुवातीला, वेळापत्रकानुसार २-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने आयोजित करण्यात आले होते.[२] मे २०१६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत शक्यता पडताळून पाहत होते.[३] परंतु श्रीलंकेत पावसाचा मोसम असल्याने सदर कल्पना बाद करण्यात आली.[१] मालिकेमध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई येथे होणाऱ्या एका दिवस/रात्र कसोटी सामन्याचा समावेश असल्याच्या वृत्ताला पीसीबी ने ऑगस्ट २०१६ मध्ये पुष्टी दिली.[४][५][६] +दुबई येथील पहिली कसोटी ही पाकिस्तानची ४००वी कसोटी आणि दुसरी दिवस-रात्र कसोटी.[७][८] दिवस/रात्र कसोटी सुरू होण्यापुर्वी दोन्ही कर्णधारांनी ह्या स्वरूपासाठी पाठिंबा दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हक म्हणाला "ह्या क्षणी, कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेता हेच कसोटी क्रिकेटचे भविष्य आहे. ".[९] वेस्ट इंडीजचा कर्णधार जासन होल्डरला ही संकल्पना आवडली, तो म्हणाला की "आपण नवीन गोष्टीला संधी दिली पाहिजे".[१०] परंतू, कसोटीच्या पहिल्या दिवशी, मैदानावर फक्त ६८ चाहते होते आणि खेळ संपेपर्यंत हा आकडा फक्त ६०० पर्यंत वाढला होता.[११] कसोटी संपल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नमूद केले की "गुलाबी चेंडूवरती आणखी काम करणे गरजेचे आहे. अजूनतरी तो आवश्यक मापदंडापर्यंत नाहीये आणि मला वाटतं दिवस/रात्र कसोटीसाठी तो एकच अडथळा आहे."[१२] +पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी२० मालिका ३-० ने जिंकल्या. कसोटी मालिका सुद्धा पाकिस्तानने २-१ ने जिंकली. शेवटच्या कसोटी वेस्ट इंडीजने विजय मिळवला. जासन होल्डरच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय.[१३][१४] विजयानंतर, होल्डर म्हणाला "आम्ही लढाऊपणा दाखवला. विजयाचे श्रेय क्रेग ब्रेथवेटला दिले पाहिजे. तो पहिल्या डावात खूपच चांगला खेळला आणि दुसऱ्या डावात पाठलागाची जबाबदारी घेतली".[१५] + + + + + + + + + + + +मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_270.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93dd30f12c5de8c81301781ecd233b5faae71326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_270.txt @@ -0,0 +1 @@ +सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2701.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..996408d6437e5e9dcf764712297d7b543bcc1680 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2701.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ट हेवन अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. २००६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५७,७२१ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2713.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2d51c65d109be4a08e16d52115f13620140bdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2713.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेस्टपॅक मैदान हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले. +वेलिंग्टन रेल्वे स्थानकापासून जवळ असलेले मैदान फ्लेचर कन्स्ट्रक्शन या कंपनीने १९९९मध्ये बांधले.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2723.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a8827b0e5c6307214f53c0d462af56d009a1fb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2723.txt @@ -0,0 +1,3 @@ +वेस्टमोरलँड काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +वेस्टमोरलँड काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2732.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c319699fc1ff03226f6fe466819cc26c9abbab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2732.txt @@ -0,0 +1,4 @@ +वेस्टीन चेन्नई हे भारत देशाचे तामिळनाडू राज्याचे चेन्नई राजधानीत चेन्नईच्या दक्षिण उपनगरात 154,वेलाचेरीच्या मुख्य रस्त्यावर दहा मजले असणारे स्टारवूड हॉटेल चेनचे सहावे हॉटेल आहे.[१] या हॉटेलची संकेतस्थळ starwoodhotels.com/westin आहे. +या हॉटेलचे उद्घाटन फेब्रुवारी 2013 मध्ये झाले. नोवेंबर 2013 मध्ये या हॉटेलने (EEST) म्हणजेच शोभिवंत, अतिशय सुंदर, शांत, आणि मनाला समाधान प्राप्त करून देणारे एशियन स्पेशालिटी रेस्टोरंट चालू केले.[२] प. मोहम्मद अली हे या हॉटेलचे मालक आहेत. +हे हॉटेल 7792 sq.m. एरिया असणाऱ्या जागेवर बांधलेले आहे. या हॉटेल मध्ये 215 खोल्या आहेत.[३] या हॉटेल मध्ये चार आहार आणि शीतपेये ठिकाणे आहेत त्यात एक 24 तास भोजन व्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण असे रेस्टोरंट, बार आणि तलावाचे कांठावर रेस्टोरंट यांचा समावेश आहे. फावल्या वेळात वेळ घालविण्यासाठी वेस्टीन वर्कआउट नावाचे जिम, खुल्या वातावरणातील तलाव, स्वर्गीय स्पा नावाचा स्पा, सांघिक धावण्याचे नियोजनासाठी रण वेस्टीन या सुविधा आहेत. आणखी याची विशेषतः म्हणजे येथे 12600sq.ft.(1170sq.m.) पेक्षा जादा आकाराची सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी जागा आहे. त्यात विना खांबांचे दोन गोलाकार खोल्या (बॉल रूम) आणि 12 विश्रांती खोल्या त्यातच भर म्हणून व्यवसाय केंद्र ही आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर वर पोहण्याचा तलाव आहे. या हॉटेल मध्ये तीन रेस्टोरंट आहेत तयार एक 24 तास ऋतुमानाप्रमाणे भोजनात आहार देणारे,पॅन एशिया EEST आणि तलाव काठावरचे ग्रिल व बार बेक, याशिवाय आरामात पडून क्रिकेट पहाण्यासाठी बार विल्लौस आहे. तेथे एकदम वरच्या मजल्यावर वेस्टीन ऑफिसर्स क्लब आहे. हॉटेलच्या मध्यबागातील जागेत 35 फूट उंचीचा पाण्याचा धबधबा आहे. +वेस्टीन चेन्नई वेलचेरी रूम्स : क्लब रूम, प्रीमियम रूम्स, डीलक्स रूम्स.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2738.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02d6fc607c77fd5728c392a8217b2b9b96786d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2738.txt @@ -0,0 +1 @@ +वेस्ली मायकेल वेस ब्राउन (ऑक्टोबर १३, इ.स. १९७९ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा संडरलँडकडून बचावफळीत खेळतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2741.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2741.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2753.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454cc92caf418ba0201a52806f0726226cf5143f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2753.txt @@ -0,0 +1,12 @@ +वेहलोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर माकुणसारनाक्यावर डावीकडे गेल्यावर चटाळे, भादवे, मथाणे, एडवण, दातिवरे गावानंतर वैतरणा नदीच्या काठावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७२ कुटुंबे राहतात. एकूण ३४५ लोकसंख्येपैकी १७३ पुरुष तर १७२ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. +दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गुंदावे, साळिवळी, सावरे, खैरे, जानसई, ढेकाळे, वरई, नगावे तर्फे मनोर ही जवळपासची गावे आहेत.वेहलोळी गावासह जानसई, खैरे, वरई गावे खैरे ग्रामपंचायतीमध्ये येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2772.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2372a66c2ab49dcea60e560e4e19b7dbb5ca747 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2772.txt @@ -0,0 +1,3 @@ +वैगई नदी (तमिळ: வைகை) तमिळनाडूतील एक प्रमुख नदी आहे. +तमिळनाडू आणि केरळ राज्यांच्या सीमेवर वरुसनाडू टेकड्यांमध्ये उगम पावून ही नदी आधी ईशान्येस व नंतर आग्नेयेस वाहत पाल्कच्या सामुद्रधुनीत समुद्राला मिळते. +मदुरै शहर या नदीवर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2775.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5b894cb51d28b9a51094601aca67500f34dca41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2775.txt @@ -0,0 +1,2 @@ + वैजनाथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2778.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5668b59c8b3806bad6729ec238b71f440be2241 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2778.txt @@ -0,0 +1,6 @@ + +वैजनाथ ज्ञानदेव शिंदे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी व २००९-२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २००९ मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूकीत भाग घेतला व भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड व अपक्ष दिलीप नाडे यांचा २३,५८३ मतांनी पराभव केला.[१] +[२] +[३] +[४] +[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_278.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93dd30f12c5de8c81301781ecd233b5faae71326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_278.txt @@ -0,0 +1 @@ +सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2838.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9be1218221a9299054faccb01bddf6d509e8d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2838.txt @@ -0,0 +1,3 @@ +वैद्यकीय शिक्षण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. हसन मुश्रीफ हे सध्या वैद्यकीय शिक्षण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2872.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67a8ac14e0a88c01016211552f1c50508c287a0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2872.txt @@ -0,0 +1 @@ +वैर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2879.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8678b682050f97f0bbd019bb7742a90729ace719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2879.txt @@ -0,0 +1 @@ +वैराज हा 'विरजस्‌' लोकात निवास करणारा दैवी पितरसमूह होता. काही पौराणिक उल्लेखांनुसार त्यांचा वास 'सत्य' तर काही उल्लेखांनुसार सनातन' लोकात होता. महाभारतातील सभापर्वानुसार हे पितृगण ब्रह्मसभेतही उपस्थित असत. त्यांना मेना नामक एक मानसकन्या होती. दैत्य, यक्ष, किन्नर, राक्षस, गंधर्व, अप्सरा, भूत, पिशाच, सर्प, नाग हे त्यांची उपासना करीत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2880.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c99bd007c0053fa2c25969e7fb0d9991e1efeb44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2880.txt @@ -0,0 +1 @@ +वैराट हा चिखलदऱ्यातील रेंजर प्रशिक्षण कॉलेजकडील एक प्रमुख पॉईंट असून तो चिखलदऱ्यापासून ८ कि. मी. अंतरावर आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच पॉईंट आहे. वैराटकडे जाताना दोन्ही बाजूकडे सातपुड्याच्या उंच-उंच पर्वतरांगा नजरेत पडतात. येथे महाभारतकाळात वैराट राजाची नगरी होती म्हणून या जागेला वैराट असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. वैराट या उंच ठिकाणावरून सूर्यास्त पाहताना निसर्गाचं आगळं वेगळं रूप पहायला मिळतं. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2952.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2952.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2965.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc31544382514795c86a50f1e3c49ab4b79f83a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2965.txt @@ -0,0 +1 @@ +वॉन्डरर्स क्रिकेट मैदान हे नामिबियाच्या विन्डहोक शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. २ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2980.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..febffdf47d052a88645c69a476507a2a7dd6f72e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2980.txt @@ -0,0 +1,2 @@ +वॉटरबरी हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१०,३६६ असून हे त्यानुसार हे शहर कनेटिकटमध्ये पाचव्या क्रमांकाचे आहे. +नॉगाटक नदीच्या काठी असलेल्या या शहराला ब्रास सिटी असे टोपणनाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2992.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caf53741b1805a4cba222df2a4dc98244bd5bc34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2992.txt @@ -0,0 +1 @@ +इवॉन ओल्डफील्ड (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2997.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ffef752bf5ea96b25f769af87c6e546a7fd1868 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_2997.txt @@ -0,0 +1 @@ +वॉयचेख वितोल्ड यारुझेल्स्की (पोलिश:ˈvɔjt͡ɕɛx jaruˈzɛlskʲi; ६ जुलै, इ.स. १९२३ - २५ मे, इ.स. २०१४) हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3006.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..410aa7701ff8e74bb3674b605e115968d1ea14fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3006.txt @@ -0,0 +1,4 @@ +वॉरेन जी. हार्डिंग (मराठी लेखनभेद: वॉरन जी. हार्डिंग; इंग्लिश: Warren Gamaliel Harding) (२ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात ओहायोचा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर इ.स. १९१५ ते इ.स. १९२१ या कालखंडात याने अमेरिकेची सेनेट सभागृहात ओहायोचो प्रतिनिधित्व केले. इ.स. १८९९ ते इ.स. १९०३ या काळात हा ओहायो विधिमंडळाच्या संस्थानी सेनेटेचा निर्वाचित सदस्य होता. +पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला हार्डिंग रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला व अमेरिकन सेनेटेचे सदस्यत्व चालू असताना अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला तो पहिला व्यक्ती ठरला. +पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनी व ऑस्ट्रियासोबत अमेरिकेने केलेल्या दोन निरनिराळ्या तहांवर त्याने सही केली. महायुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय तंट्यांची परिस्थिति हाताळण्यासाठी लीग ऑफ नेशन्स स्थापण्यात हार्डिंग प्रशासनाने पुढाकार घेतला. +ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये अलास्क्याहून परतत असताना कॅलिफोर्नियात सान फ्रान्सिस्को येथे हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_301.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95e9fd9c902204a792f9ebd843402a52feb336bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_301.txt @@ -0,0 +1,9 @@ +विप्रो टेक्नॉलॉजीज (बीएसई.: 507685, एनएसई.: WIPRO) ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान झेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत. +विप्रो उद्योगसमूहाचीं सुरुवात अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी १९४७ साली वनस्पतीजन्य, साबण वगैरे तत्सम गॄहोपयोगी उत्पादनापासुन सुरू केली. १९६६ साली वडिलांच्या निधनानंतर २१ व्या वर्षी अझीम प्रेमजी यांना उद्योगसमूहाची सुत्रे हाती घ्यावी लागली. त्यावेळी, प्रेमजी अमेरीकेच्य स्टॅन्फोर्ड विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकीचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. पदवी अभ्यासक्रम सोडुन देउन प्रेमजी यांनी भारताचा मार्ग धरला त्यावेळी विप्रोची वार्षिक उलाढाल २० लाख अमेरिकी डॉलर इतकी होती. प्रेमजी यांनी विप्रोच्या वाढीसाठी विविध क्षेत्रात उडी घेतली. १९७७ साली आय. बी. एम.च्या भारतातून झालेल्या उचलबांगडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रेमजी यांना संगणक व अनुषांगिक सेवांच्या व्यवसायाची नविनच संधी मिळाली. १९८१ साली प्रेमजी यांनी विप्रो-निर्मित संगणक भारतीय बाजारात उतरवला. या व्यवसायात वाढ होत प्रेमजी यांनी २००० साली विप्रोची न्यू यॉर्क रोखे-विनिमय बाजारात अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट साठी नोंदणी केली. +बंगळूर, भोपाळ, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, सिकंदराबाद +जपान, मलेशिया, सिंगापुर, तैवान, चीन, ऑस्ट्रेलिया +ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, इटली, बेनेलक्स, पोर्तुगाल, रुमानिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम +कॅनडा, मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने +ब्राझिल +संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया +दक्षिण आफ्रिका diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3019.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d2eacf54392e302f306a1126aa36c2aa66fc8ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3019.txt @@ -0,0 +1,2 @@ + +वॉरविकशायर (इंग्लिश: Warwickshire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून वॉरविक हे येथील मुख्यालय आहे. ही ऐतिहासिक काउंटी विल्यम शेक्सपियर व जॉर्ज इलियट ह्या दोन जगप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकांचे जन्मस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3020.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..664402f359550f73d8de1102375d9d0ebbbbf177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3020.txt @@ -0,0 +1,2 @@ + +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3026.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a241418f36cec8faa5b4ee00394d4ff33477bb93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3026.txt @@ -0,0 +1,7 @@ + +वॉरेंटन हे अमेरिकेची अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील एक छोटे गाव आहे. गावाची वस्ती ५,२८१ (इ.स. २००२ची गणना) आहे. +गावात ९५.६४% गोरे, १.७२% कृष्णवर्णीय, ०.४२% मूळ अमेरिकन, ०.३८% एशियन व उरलेले ईतर वंशाचे लोक राहतात. +फेब्रुवारी १७, इ.स. १९५७ रोजी या गावातील वृद्धाश्रमास आग लागून ७२ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या होत्या. +वॉरेंटन (मिसूरी) हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3054.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3054.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3072.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23d90e094b0a0bfa605c94b49d6063f9696d27ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3072.txt @@ -0,0 +1,14 @@ +२००७-०८ मोसमापासून ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी मालिका विजेत्याला वॉर्न-मुरलीधरन चषक देऊन गौरविण्यात येते. सदर चषकाचे नामकरण हे कसोटी क्रिकेटमधील दोन अव्वल गोलंदाजांच्या नावावरून देण्यात आले आहे, श्रीलंकेचा मुथिया मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न.[३] ह्या चषकाने ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी क्रिकेटचा २५वा वर्धापनदिन साजरा केला.[४] चषकावर दोन्ही गोलंदाजांच्या उजव्या हाताचे साचे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वापरलेले चेंडू यांचा समावेश आहे.[५] श्रीलंकेमधील क्रिकेटचे नियामक मंडळ श्रीलंका क्रिकेटने, त्यांचे ऑस्ट्रेलियाचे सहकारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिले की, विजेत्याला दोन गोलंदाजावरून नाव दिला गेलेला चषक देण्यात यावा.[६] ज्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शवली. चषकाचे अनावरण करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विधान केले की, +... क्रिकेट जगताच्या इतिहासातील दोन महान गोलंदाजानी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या एका शाश्वत पारितोषिकाला त्यांची नावे दिले आहे.[४] +ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी दिला जाणारा बॉर्डर-गावस्कर चषक, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेसाठी दिला जाणारा चॅपेल-हॅडली चषक यानंतर वॉर्न-मुरलीधरन चषक हे माजी क्रिकेट खेळाडूंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यादीमधील नवीन नाव आहे.[७] +वॉर्न-मुरलीधरन चषकाआधी, (१९८३-२००४), ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका २१ वर्षांत १८ वेळा आमने-सामने आले, ज्यामध्ये प्रत्येक देशात चार मालिका झाल्या. १८ कसोट्यांमधून ११ ऑस्ट्रेलियाने जिंकल्या तर श्रीलंकेला फक्त १९९९ मध्ये एकदाच विजय मिळविता आला, आणि ६ सामने अनिर्णित राहिले.[८] ह्या कसोटी मालिका खालीलप्रमाणे होत्या: +२००७ साली ७०८ बळी मिळवून शेन वॉर्न क्रिकेटमधून विवृत्त झाला आणि मुथिया मुरलीधरन २००७-०८ मालिकेच्या सुरुवातील वॉर्न पासून अवघे आठ बळी दूर होता.[९] रिकी पाँटिंगने नमूद केले की मुरलीधरनला वॉर्नचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळींचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक असलेले ९ बळी ऑस्ट्रेलियामध्ये असताना मिळवून द्यायचे नाहीत असा त्याने निश्चय केला होता.[१०] मालिकेच्या शेवटपर्यंत मुरलीधरनला अवघे चार गडी बाद करता आले. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसह चषक २-० ने जिंकला.[११] दुसऱ्या कसोटीमध्ये, कुमार संगाकाराला पंच रुडी कोर्टत्झन यांनी तो १९२ धावांवर खेळत चेंडू खांद्याला लागलेला असताना झेलबाद दिले.[१२] सामन्यानंतर कोर्टत्झनने संगाकाराची माफी मागितली. मालिकेदरम्यान श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अटापट्टुने निवड समितीचे अध्यक्ष अशांत डिमेल यांना उल्लेखून निवड समितीवर "मपेट्स हेडेड बाय जोकर" असे म्हणून टीका केली. [१०] मालिका संपल्यानंतर अटापट्टु क्रिकेट मधून निवृत्त झाला. +पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसी, नाथन ल्योनने त्याच्या पहिल्याच चेंडूवर कुमार संगाकाराला बाद करून पहिला कसोटी बळी मिळवला; असे करणारा तो १४ आंतरराष्ट्रीय आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू. त्याने ३४ धावांमध्ये ५ गडी बाद केले, आणि कसोटी पदार्पणात पाच बळी घेणारा तो १३१वा खेळाडू ठरला.[१३] त्याशिवाय, ट्रेंट कोपलँडने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला बळी घेतला; त्याने तिलकरत्ने दिलशानला बाद केले. तसेच पहिल्या कसोटीमध्ये आयसीसीने मान्यकेले की हॉक-आय किंवा इगल-आय चूक करु शकते. +तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शमिंदा एरंगाने त्याच्या पहिल्या चेंडूवर पहिला कसोटी बळी घेतला; त्याने शेन वॉटसनला बाद केले. त्याशिवाय पहिल्या दिवशी शॉन मार्श २२२ची सरासरी पार करु शकला, ऑस्ट्रेलियन फलंदाजीमधील हा एक विक्रम आहे. [१४] +तिनही कसोटी सामन्यांचा सामनावीराचा पुरस्कार मायकल हसीला मिळाला त्याशिवाय त्याला मालिकावीर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले. +ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवले. +पहिल्या कसोटीदरम्यान सामना प्रसारण करणाऱ्या फुटेजमध्ये पीटर सिडल चेंडूशी फेरफार करताना दिसल्याने थोडा वाद निर्माण झाला होता, परंतु त्याच्या विरोधात औपचारिक तक्रार न होता सदर वाद मिटला.[१५] पुराव्याअभावी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने नंतर सिडलला निर्दोष घोषित केले.[१६] +मेलबर्न येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने कारकिर्दीतील १०,००० धावा पूर्ण केल्या, आणि हा टप्पा सर्वात जलद पार करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१७] +सिडनी मधील शेवटच्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू मायकल हसीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.[१८] +या मालिकेआधी श्रीलंकेची कामगिरी अगदीच वाईट झाली होती, त्यांना इंग्लंडमध्ये सर्व प्रकारांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. पल्लेकेले मध्ये झालेली पाहिली कसोटी दोन गोष्टींमुळे संस्मरणीय ठरली एक कुशल मेंडीसचे पहिले कसोटी शतक (१७६) आणि रंगना हेराथची गोलंदाजी ज्यामुळे श्रीलंकेने सामना १०६ धावांनी जिंकला. हा त्यांचा पाहुण्या संघावर १७ वर्षांनंतर पहिला कसोटी विजय होता. विजयामुळे यजमानांना एक आत्मविश्वास मिळाला ज्याचा फायदा त्यांना गॅलेमधील दुसऱ्या कसोटीत झाला. हेराथ आणि दिलरुवान परेरा ह्यांच्या कामगिरीमुळे श्रीलंकेने सामना २२९ धावांनी जिंकला. सामन्यामध्ये ह्या फिरकी जोडगोळीने २० पैकी १८ गडी बाद केले. +एसएससी वरील तिसऱ्या कसोटीमधील पहिल्या डावात दिनेश चंदिमल आणि धनंजय डी सिल्वा ह्यांनी पहिल्या डावात शतके झळकावली. उत्तरादाखल, शॉन मार्श आणि स्टीव्ह स्मिथ ह्यांनी शतके झळकावली. तिसऱ्या आणि अतिमहत्त्वाच्या डावामध्ये, कुशल सिल्वाने झळकावलेल्या शतकामुळे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली, फक्त डेव्हिड वॉर्नर अर्धशतकापर्यंत मजल मारु शकला आणि इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावाही करता आल्या नाहीत. हेराथने सामन्यात १३ बळी घेतले आणि श्रीलंकेने १६३ धावांनी विजय मिळवला आणि इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला. हेराथला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. ह्या विजयासहीत कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेचा संघ कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या वर गेला तर ऑस्ट्रेलियाला आपले अव्वल स्थान गमवावे लागले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3076.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b67909ff66fa4d25b272d1d3228f3165957dab2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3076.txt @@ -0,0 +1,2 @@ +वॉर्नर पार्क मैदान हे वेस्ट इंडीजमधील सेंट किट्स अँड नेव्हिस देशाच्या बासेतेरे शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. वॉर्नर पार्क क्रीडा संकुलाचा एक भाग असलेल्या या मैदानावर २००७ क्रिकेट विश्वचषकातील काही सामने खेळले गेले. +याला सर थॉमस वॉर्नर या इंग्लिश शोधकाचे नाव देण्यात आले आहे. थॉमर वॉर्नरने सेंट किट्स द्वीपावर पहिली इंग्लिश वसाहत निर्माण केली होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3082.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96fc147b71e0619bc87cc75e0a52870be610a5e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3082.txt @@ -0,0 +1,3 @@ +वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची ही कंपनी आहे. (हे दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत.) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्सच्या लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि कॅलिफोर्नियाच्या बरबँक येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अ‍ॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. +ही कंपनी सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच लाइव्ह-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्यामध्ये इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप यांचा समावेश आहे. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम चित्रपट हा या स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. +हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी १९२३ मध्ये याची स्थापना केली होती. स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त ही कंपनी इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सच्या कंपन्या असलेल्या वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट यांचे चित्रपट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांची निर्मिती, वितरण, विपणन आणि जाहिरात इत्यादी बाबी हाताळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3089.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b48442f886b08d68077c478c55a945e3a636d23c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3089.txt @@ -0,0 +1,3 @@ +वॉर्नर मीडिया, एलएलसी (व्यापारी नाव: वॉर्नरमीडिया) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह होता. या समूहाचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ३०, हडसन यार्ड्स कॉम्प्लेक्स येथे होते. +ही कंपनी १९७२ मध्ये स्टीव्ह रॉस यांनी वॉर्नर कम्युनिकेशन्स म्हणून स्थापित केली होती आणि १९९० मध्ये टाइम इंक आणि मूळ वॉर्नर कम्युनिकेशन्स यांच्यातील विलीनीकरणानंतर टाइम वॉर्नर या कंपनीची निर्मिती करण्यात आली होती. कंपनीकडे विविध चित्रपट, दूरचित्रवाणी आणि केबल कंपन्या आहेत, ज्यामध्ये पुढील कंपन्या समाविष्ट होत्या: +वॉर्नरमीडिया स्टुडिओ आणि नेटवर्क्स (टर्नर ब्रॉडकास्टिंग, एचबीओ, आणि सिनेमॅक्स तसेच वॉर्नर ब्रदर्स, ज्यामध्ये चित्रपट, ॲनिमेशन, टेलिव्हिजन स्टुडिओ यांचा समावेश आहे), कंपनीचा होम एंटरटेनमेंट विभाग आणि स्टुडिओ वितरण सेवा, युनिव्हर्सल पिक्चर्स होम एंटरटेनमेंट, डीसी कॉमिक्स, न्यू लाइन सिनेमा, आणि सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुप [१] ; वॉर्नर ब्रदर्स ही मनोरंजन उपकंपनी, CW टेलिव्हिजन नेटवर्कमध्ये ५०% हिस्सा); WarnerMedia News & Sports (यामध्ये CNN, Turner Sports, आणि AT&T SportsNet सह टर्नर ब्रॉडकास्टिंगच्या बातम्या आणि क्रीडा मालमत्तांचा समावेश आहे); WarnerMedia विक्री आणि वितरण विभाग (यामध्ये डिजिटल मीडिया कंपनी ऑटर मीडियाचा समावेश आहे); आणि WarnerMedia Direct (HBO Max स्ट्रीमिंग सेवेचा समावेश आहे). diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3093.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724cd506b3cffc4f6f0b393e8c476127ba77e036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3093.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते. +१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_312.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7436178ca0d8ce2bec9cfd195dc23f92e16b325f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_312.txt @@ -0,0 +1,5 @@ +विभाजक - (divisor) , जर x ने yला भाग जात असेल तर xला yचा विभाजक म्हणतात. +उदा, १०/२ =५ बाकी ०,पुर्ण भाग जातो. +म्हणून २ हा १०चा विभाजक आहे. +२४ चे विभाजक, १,२,३,४,६,१२,२४ हे आहेत. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3135.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..455d273cc2e74c78c55cede046ee9889084e8d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3135.txt @@ -0,0 +1,2 @@ +वॉल्ट डिझ्नी स्टुडिओ मोशन पिक्चर्स (पूर्वी बुएना व्हिस्टा पिक्चर्स डिस्ट्रिब्युशन, इंक म्हणून ओळखला जात असे) हा वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या डिझ्नी मनोरंजन विभागातील एक अमेरिकन चित्रपट वितरण स्टुडिओ आहे. [२] ही कंपनी वॉल्ट डिझ्नी पिक्चर्स, वॉल्ट डिझ्नी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ, पिक्सार, मार्वल स्टुडिओ, लुकासफिल्म, आणि ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओसह, वॉल्ट डिझ्नी स्टुडिओद्वारे निर्मीत आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपटगृह आणि अधूनमधून डिजिटल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते; सर्चलाइट पिक्चर्स ही कंपनी स्वतःचे स्वायत्त नाट्य वितरण आणि विपणन चालवते. [३] +ही कंपनी मूळतः वॉल्ट डिझ्नीने १९५३ मध्ये बुएना व्हिस्टा फिल्म डिस्ट्रिब्युशन कंपनी, इंक. (नंतर नाव बदलून बुएना व्हिस्टा डिस्ट्रिब्युशन कंपनी, इंक. आणि बुएना व्हिस्टा पिक्चर्स डिस्ट्रिब्युशन, इंक.) म्हणून स्थापित केली होती. तिचे सध्याचे नाव २००७ मध्ये कंपनीने घेतले. [४] [५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3168.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596c534f81e75e7a98856d1027d20dc85754f834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3168.txt @@ -0,0 +1,2 @@ +वॉल्टर मॉरिस बिल ब्रॅडली (जानेवारी २, इ.स. १८७५:लंडन, इंग्लंड - जून १९, इ.स. १९४४:लंडन) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3196.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60469ce0ae26ff822c2dba5f785ac49109bfbc8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3196.txt @@ -0,0 +1,8 @@ +वॉल्त्झ नृत्य हा एक जर्मन नृत्यप्रकार आहे. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत ऑस्ट्रियन आणि बव्हेरियन शेतकऱ्यांच्या नृत्यांमध्ये वर्तुळाकार जलद गतीतील हे लोकप्रिय नृत्य ‘वेलर’ या नावाने प्रसिद्ध होते. ‘लेण्ड्लर’ या जर्मन लोकनृत्यामध्येही वॉल्ट्सची बीजे आढळतात. + +उच्चभ्रू समाजातील लोकही जेव्हा या नृत्यप्रकाराकडे आकर्षिले गेले, तेव्हा त्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभली. स्त्रीपुरुषांनी एकमेकांना बाहुपाशात घेऊन करण्यात येणारा हा नृत्यप्रकार सुरुवातीला उत्तान मानला जाई परंतु फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सर्व यूरोपीय कलाक्षेत्र स्वच्छदतांवादाच्या प्रभावाखाली आले आणि या नृत्यप्रकाराने पाश्चात्त्य नृत्यक्षेत्रात स्वच्छंतावादी क्रांती घडवून आणली. जर्मनी आणि फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये वॉल्ट्सचा प्रसार झाला. ⇨ मोट्सार्टने (१७५६-९१) व्हिएन्नीज युग्मनृत्यासाठी (बॉल) वॉल्ट्सच्या रचना केल्या आहेत. मार्यूस पेतिपा +(१८१९-१९१०) या फ्रेंच नृत्यविशारदाने वॉल्ट्स संगीताचा नृत्यलेखक म्हणून खूप लोकप्रियता मिळविली. द स्लीपिंग ब्यूटी, द स्वॉन लेक, रेमोण्डा, द वॉल्ट्स ऑफ द फ्लावर्स इत्यादींसाठी पेतिपाने केलेल्या नृत्यरचना प्रसिद्ध आहेत मोठ्या जनसमुदायाच्या संमेलनामध्ये करण्यात येणाऱ्या या बॉलरूम नृत्याचे दोन प्रकार आहेत. +वर्तुळाकार गतीतील या नृत्याचा ताल ३/४ भागात असून, व्हिएन्नीज वॉल्ट्समध्ये स्त्रीपुरुष युगुले जलद गतीत एकाच दिशेत वर्तुळाकार वळतात तर बॉस्टनमधील वॉल्टसमध्ये स्त्रीपुरुष युगुले अनेक वर्तुळांच्या आकृतिबंधातून अनेक दिशांमध्ये फिरून संथ लयीत नृत्य करतात. १८४० च्या सुमारास पुढे आलेल्या ⇨पोल्क या नृत्यप्रकारामुळे वॉल्ट्सची लोकप्रियता जरी ओसरू लागली, तरी पश्चिमी समाजांमध्ये आजही हा कलाप्रकार टिकून आहे. पाश्चात्त्य संगीतामध्येही वॉल्ट्सचा अंतर्भाव झालेला असून तेथील बोलपटांतून ते लोकप्रिय झाले आहे. + +मोट्सार्टप्रमाणे ⇨फ्रेदेरीक शॉर्प, मॉरिस रॅव्हेल हे संगीतरचनाकार वॉल्ट्सच्या रचनांसाठी प्रसद्धि असून, व्हिएन्नीज वॉल्ट्सच्या संगीतरचनांसाठी जोहान स्ट्राऊस (ज्यूनिअर), एदुआर्द स्ट्राऊस, फ्रँझ लेहर आणि ऑस्कर स्ट्राऊस हेही प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटसंगीतामध्ये वॉल्ट्स या नृत्यप्रकाराचे संगीत १९५०-५५ पर्यंत सातत्याने वापरले गेले. व्हिएन्नीज वॉल्ट्स या प्रकारात ‘फर्स्ट लेडी’ या नात्याने कारमेन मिरान्दा ह्या गोमंतकीय युवतीला १९७५ मध्ये एका प्रमुख समारंभाचे नृत्याद्वारा उद्घाटन करण्याचा सन्मान लाभला होता. पश्चिमी नृत्यकलेला एकेकाळी नवे चैतन्य देणाऱ्या या कलाप्रकाराला पौर्वात्य वळण देण्यात पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेल्या गोमंतकीय संगीतकारांनी खूप यश मिळवले आहे. आजही महाराष्ट्रातील पारशी लोकांमध्ये लग्नसमारंभात आणि अन्य आनंदोत्सवप्रसंगी वॉल्ट्स नृत्य करण्याचा प्रघात आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3205.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04d262923405e20386fbe5c13c64b7b11cd6c5cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3205.txt @@ -0,0 +1,2 @@ +वॉल्सेनबर्ग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. हुएर्फानो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०००मध्ये ४,१८२ होती. +या गावाला येथे वस्ती करणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी असलेल्या फ्रेड वॉल्सेनचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3211.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c933a9b1e53f1ca4e0e6f6c78c86302ce154a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3211.txt @@ -0,0 +1,46 @@ +गुणक: 38°53′42.4″N 77°02′12.0″W / 38.895111°N 77.036667°W / 38.895111; -77.036667 + +वॉशिंग्टन, डी.सी. (इंग्लिश: Washington, D.C.; अधिकृत नावः डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, District of Columbia) ही अमेरिका देशाची राजधानी आहे. १६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवले गेले. ह्या शहराला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा कोणत्याही राज्याचा भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे व अनेक वेळा त्याला अमेरिकेचे ५१वे राज्य असे मानले जाते. +२०११ साली ६.१८ लाख लोकसंख्या असलेले वॉशिंग्टन हे अमेरिकेमधील २४व्या क्रमांकाचे मोठे शहर तर ५५.८ लाख लोकवस्ती असलेले महानगर क्षेत्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन सरकारच्या तीनही प्रशासकीय शाखा (संसद, राष्ट्राध्यक्ष व न्यायालय) वॉशिंग्टन शहरात आहेत. तसेच येथे जगातील १७६ देशांचे दूतावास, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये आहेत. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक संग्रहालये व वास्तू आहेत. +१७व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन लोकांनी प्रथम या ठिकाणी भेट दिली तेव्हा अल्गोनक्वीयन-भाषिक पिस्काटावे लोकांच्या अनेक जमाती (ज्यांना कोनोई देखील म्हटले जाते) पोटोमॅक नदीच्या सभोवतालच्या जमिनीवर वसले होते. नाकोटचटँक (ज्याला कॅथोलिक मिशनरीज म्हणतात नाकोस्टिन्स देखील म्हणतात) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गटाने सध्याच्या कोलंबिया जिल्ह्यात नाकोस्टिया नदीच्या आसपासच्या वसाहती सांभाळल्या. युरोपियन वसाहतवादी आणि शेजारच्या आदिवासींमधील संघर्षांमुळे पिस्काटावे लोकांचे स्थानांतरण भाग पाडले, ज्यांपैकी काहींनी मेरीलँडच्या पॉईंट ऑफ रॉक्सजवळ नवीन सेटलमेंट स्थापन केली. २३ जानेवारी १७८८ रोजी प्रकाशित झालेल्या त्याच्या फेडरलिस्ट क्रमांक ४३मध्ये, जेम्स मॅडिसन यांनी असा युक्तिवाद केला की नवीन फेडरल सरकारला स्वतःची देखभाल आणि सुरक्षा पुरवण्यासाठी राष्ट्रीय भांडवलावर अधिकाराची आवश्यकता असेल. पाच वर्षांपूर्वी फिलाडेल्फियामध्ये सदस्यांची बैठक होत असताना वेतन न मिळालेल्या सैन्याच्या तुकडीने काँग्रेसला घेराव घातला होता. १७८३ च्या पेनसिल्व्हेनिया विद्रोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटनेत राष्ट्रीय सरकारने स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणत्याही राज्यावर अवलंबून राहण्याची गरज यावर जोर दिला नाही. +९ जुलै १७९० रोजी काँग्रेसने निवास कायदा मंजूर केला ज्याने पोटमॅक नदीवर राष्ट्रीय राजधानी तयार करण्यास मान्यता दिली. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अचूक स्थान निवडले पाहिजे, त्यांनी १ July जुलै रोजी कायद्यात या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. मेरीलँड आणि व्हर्जिनिया या राज्यांनी दान केलेल्या जमिनीपासून तयार केलेले संघराज्य जिल्ह्याचे आरंभिक आकारमान १० चौरस मैल (१ चौरस किमी) होते. व प्रत्येक बाजूला, एकूण १०० चौरस मैल (२५९ चौ.किमी) जागा सोडली होती.. १ [बी] +या प्रदेशात पूर्वी अस्तित्वात असलेल्या वसाहती समाविष्ट केल्या गेल्या; सम १७५१मध्ये मेरीलँडमध्ये जॉर्जटाउन, आणि व्हर्जिनियामधील अलेक्झांड्रिया शहर स्थापण्यात आले. दरम्यान, अ‍ॅल्रिकॉटचे भाऊ जोसेफ आणि बेंजामिन यांच्यासह अँड्र्यू एलिकॉटच्या नेतृत्वाखालील पथकाने फेडरल जिल्ह्याच्या सीमेचे सर्वेक्षण केले आणि प्रत्येक मैलाच्या ठिकाणी सीमा दगड ठेवले. बरेच दगड अजूनही उभे आहेत. +यानंतर जॉर्जटाउनच्या पूर्वेस पोटोमॅकच्या उत्तर काठावर एक नवीन फेडरल शहर बनविण्यात आले. ९ सप्टेंबर १७८१ रोजी राजधानीच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या तीन आयुक्तांनी शहराचे नाव वॉशिंग्टनच्या सन्मानार्थ ठेवले. फेडरल जिल्हा असे नाव ठेवले गेले कोलंबिया ("कोलंबस"चे एक स्त्रीलिंगी रूप), जे त्या काळी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अमेरिकेसाठी एक काव्यात्मक नाव होते. वॉशिंग्टनमध्ये १७ नोव्हेंबर १८०० रोजी काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. काँग्रेसने कोलंबिया सेंद्रिय कायदा मंजूर केला ज्याने १०१चा जिल्हा अधिकृतपणे घटित केला आणि संपूर्ण प्रदेश फेडरल सरकारच्या विशेष नियंत्रणाखाली ठेवला. पुढे, जिल्ह्यातील अखंड क्षेत्र दोन विभागांमध्ये विभागले. पोटोमॅकच्या पूर्वेस वॉशिंग्टन काउंटी आणि पश्चिमेस अलेक्झांड्रिया काउंटी. २ हा कायदा मंजूर झाल्यानंतर, जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना यापुढे मेरीलँड किंवा व्हर्जिनियामधील रहिवासी मानले गेले नाही, ज्यामुळे त्यांनी काँग्रेसमधील आपले प्रतिनिधित्व संपविले. +वॉशिंग्टन, डी.सी. यू.एस. पूर्व कोस्टच्या मध्य-अटलांटिक प्रदेशात आहे. कोलंबिया जिल्हा मागे घेतल्यामुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ ६८.३४ चौरस मैल (१७७० चौ.किमी) आहे, त्यापैकी ६१ चौरस मैल (१५८ चौ किमी ) जमीन आणि 7.29 चौरस मैल (१९ चौ. किमी) (१०.६७%) पाणी आहे. हा जिल्हा वायव्येकडील मॉन्टगोमेरी काउंटी, मेरीलँडच्या सीमेवर आहे; प्रिन्स जॉर्जची काउंटी, पूर्वेस मेरीलँड; आर्लिंग्टन काउंटी, व्हर्जिनिया पश्चिमेस; आणि दक्षिणेस अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया. पोटोमैक नदीच्या दक्षिण काठावर व्हर्जिनियाच्या जिल्ह्याची सीमा बनते आणि अ‍ॅनाकोस्टिया नदी व रॉक क्रीक या दोन प्रमुख उपनद्या आहेत. []२] टाइबर क्रीक हा एक नैसर्गिक जलमार्ग आहे. तो एकदा नॅशनल मॉलमधून गेला होता, तो १८७० च्या दशकात पूर्णपणे भूमिगत होता. या खाडीने भरलेल्या वॉशिंग्टन सिटी कालव्याचा एक भाग देखील आता तयार केला आहे. त्यायामुळे शहरातून ॲनाकोस्टिया नदीकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. चीजपीक आणि ओहियो कालवा जॉर्जटाऊनमध्ये सुरू होतो. पहिल्या शतकात अटलांटिक सीबार्ड फॉल लाईनवर वॉशिंग्टनच्या वायव्य काठावर असलेल्या पोटोटोक नदीच्या लिटल फॉल्सला मागे टाकण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. +जिल्ह्यातील सर्वोच्च नैसर्गिक उंची वरच्या वायव्य वॉशिंग्टन मधील फोर्ट रेनो पार्क येथे समुद्रसपाटीपासून 409 फूट (125 मीटर) उंच आहे. सर्वात कमी बिंदू म्हणजे पोटमॅक नदीवरील समुद्र पातळी. वॉशिंग्टनचे भौगोलिक केंद्र चौथे आणि एल स्ट्रीट्स एनडब्ल्यूच्या छेदनबिंदूजवळ आहे. शहराच्या एकूण क्षेत्राच्या 19% आणि उच्च-घनता असलेल्या अमेरिकेतील शहरांमधील दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी. या भूमिकेने वॉशिंग्टन डीसीला योगदान दिले आहे, युनायटेड स्टेट्समधील १०० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या पार्क सिस्टीमच्या २०१ rankingच्या पार्कस्कोर रँकिंगमध्ये देशात प्रवेश आणि गुणवत्तेसाठी देशातील तिस third्या क्रमांकाचे स्थान आहे. नॅशनल पार्क सर्व्हिस यू.एस. सरकारच्या मालकीच्या शहराच्या बहुतेक 9,122 एकर जागेचे व्यवस्थापन करते. रॉक क्रीक पार्क हे वायव्य वॉशिंग्टनमधील एक 1,754 एकर (7.10 किमी 2) शहरी जंगल आहे, जे शहराला वेगाने वळणा a्या एका खो valley्यातून 9.3 मैल (15.0 किमी) पर्यंत पसरते. १90 lished ० मध्ये स्थापित, हे देशातील चौथे सर्वात प्राचीन राष्ट्रीय उद्यान आहे आणि येथे विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी प्रजाती आहेत, ज्यात रॅकून, हरण, घुबड आणि कोयोट्स आहेत. [] 64] इतर राष्ट्रीय उद्यान सेवेच्या मालमत्तांमध्ये सी अँड ओ कालवा राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यान, नॅशनल मॉल आणि मेमोरियल पार्क, थियोडोर रुझवेल्ट आयलँड, कोलंबिया बेट, फोर्ट ड्युपॉन्ट पार्क, मेरिडियन हिल पार्क, केनिलवर्थ पार्क आणि एक्वाटिक गार्डन्स आणि अ‍ॅनाकोस्टिया पार्क यांचा समावेश आहे. [] 65] डीसी पार्क आणि मनोरंजन विभाग शहरातील थलेटिक फील्ड आणि क्रीडांगणे, 40 जलतरण तलाव आणि 68 करमणूक केंद्रे शहराची 900 एकर (3..6 कि.मी.) देखभाल करतात. [] 66] यू.एस. कृषी विभाग ईशान्य वॉशिंग्टनमध्ये 446 एकर (1.80 किमी 2) यू.एस. नॅशनल आर्बोरेटम चालविते. +वॉशिंग्टन आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामान क्षेत्राच्या उत्तरेकडील भागात (कोप्पेन: सीएफए) आहे. ट्रेवर्था वर्गीकरण समुद्री हवामान (डू) म्हणून परिभाषित केले आहे. हिवाळा सहसा हलक्या हिवाळ्यासह थंड असतात आणि ग्रीष्म .तू गरम आणि दमट असतात. जिल्हा शहराच्या जवळील रोपांची कडकपणा झोन 8 ए आणि शहरामध्ये इतरत्र झोन 7 बी आहे, एक आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामान दर्शवते. वसंत र्र्र्र्र्तू उबदार असते, तर हिवाळा थंड असते आणि वार्षिक हिमवर्षावास सरासरी १.5..5 इंच (cm cm सेमी) वाढते. डिसेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यभागी हिवाळ्यातील तापमान सरासरी 38 ° फॅ (3 अंश सेल्सियस) पर्यंत असते. तथापि, 60 अंश सेल्सियसपेक्षा जास्त (16 डिग्री सेल्सियस) पर्यंत हिवाळ्यातील तापमान असामान्य नाही. जुलैमध्ये दररोज सरासरी .8 .8.° अंश सेल्सियस (२.6..6 अंश सेल्सियस) उन्हाळे आणि दमट असतात आणि सरासरी दैनंदिन सापेक्ष आर्द्रता% 66% पर्यंत असते, ज्यामुळे मध्यम अस्वस्थता येते. उष्णता निर्देशांक उन्हाळ्याच्या उंचीवर नियमितपणे 100 ° फॅ (38 ° से) पर्यंत जातात. उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेचे मिश्रण बऱ्याच वेळेस वादळी वादळे आणते, त्यातील काही प्रसंगी अधूनमधून क्षेत्रात वादळ तयार होते. +अनुच्छेद एक, अमेरिकेच्या राज्यघटनेच्या कलम आठने शहर युनायटेड स्टेट्स काँग्रेसला "विशेष अधिकार क्षेत्र" मंजूर केले. १९३३चा गृह नियम कायदा संमत होईपर्यंत जिल्ह्यात निवडलेले स्थानिक सरकार नव्हते. या कायद्याने कोलंबिया जिल्ह्यातील निवडलेल्या महापौर आणि तेरा-सदस्यांच्या कौन्सिलकडे काही काँग्रेसच्या अधिकारांचे रूपांतर केले. तथापि, कौन्सिलने तयार केलेल्या कायद्यांचा आढावा घेण्याचा आणि तो पलटवण्याचा आणि स्थानिक कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार काँग्रेसकडे कायम आहे. [२०२] +शहरातील आठ प्रभागांपैकी प्रत्येकी एक सदस्य परिषदेचा सदस्य निवडतो आणि रहिवासी संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चार-मोठ्या-मोठ्या सदस्यांची निवड करतात. कौन्सिलचे अध्यक्ष देखील मोठ्या प्रमाणात निवडले जातात. [२०३] छोट्या छोट्या जिल्ह्यांमधून निवडलेल्या ३७ सल्लागार नेबरहुड कमिशन (एएनसी) आहेत. एएनसी रहिवाशांना प्रभावित करणाऱ्या सर्व मुद्द्यांवरील शिफारसी जारी करू शकतात; सरकारी संस्था त्यांचे सल्ला काळजीपूर्वक विचारात घेतात. [२०४] कोलंबिया जिल्हा ॲटर्नी जनरल चार वर्षांच्या मुदतीसाठी निवडले जातात. [२०५] +वॉशिंग्टन, डीसी, सर्व फेडरल सुट्ट्या पाळतात आणि १६ एप्रिल हा मुक्ति दिन म्हणून साजरा करतात. हा दिवस जिल्ह्यात गुलामगिरीच्या समाप्तीची आठवण करतो. सन १९३८मध्ये वॉशिंग्टन, डी.सी.चा ध्वज स्वीकारला गेला. हा जॉर्ज वॉशिंग्टनच्या कौटुंबिक शस्त्रांच्या आकारात आहे. +यू.एस. जनगणना ब्युरोच्या अंदाजानुसार जुलै २००१ पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या ७०,००,५९९ होती, २०१० च्या अमेरिकेच्या जनगणनेनंतर १०,००,००० पेक्षा जास्त लोकांची वाढ. [११] लोकसंख्येच्या अर्ध्या शतकानंतर, २०००पासून ही वृद्धीचा कल कायम आहे. [109] २०१०पर्यंत हे शहर अमेरिकेत २४व्या स्थानावर आहे. [११०] २०१० च्या आकडेवारीनुसार, उपनगरामधील प्रवासी जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक वाढवतात. [१११] जर जिल्हा एक राज्य असेल तर ते वर्माँट आणि व्यॉमिंगच्या पुढे लोकसंख्येमध्ये ४९व्या क्रमांकावर होते. [११२] +वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन एरिया, ज्यात जिल्हा आणि आसपासची उपनगरे आहेत, २०१ 2014 मध्ये अंदाजे सहा दशलक्ष रहिवासी असलेले हे अमेरिकेतील सहावे क्रमांकाचे महानगर आहे. [११3] जेव्हा बाल्टीमोर आणि त्याच्या उपनगरासह वॉशिंग्टन क्षेत्राचा समावेश केला जातो तेव्हा बाल्टीमोर-वॉशिंग्टन महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०१ 2016 मध्ये .6. In दशलक्षपेक्षा जास्त रहिवासी होती, जे देशातील चौथे क्रमांकाचे एकत्रित सांख्यिकीय क्षेत्र आहे. [११4] +२०१ Cच्या जनगणना ब्यूरोच्या आकडेवारीनुसार वॉशिंग्टन डीसीची लोकसंख्या .1 47.१% काळा किंवा आफ्रिकन अमेरिकन, .1 45.१% पांढरा (.8 36.%% नॉन-हिस्पॅनिक व्हाइट), 3.3% आशियाई, ०.%% अमेरिकन भारतीय किंवा अलास्का नेटिव्ह आणि ०.%% मूळ होता. हवाईयन किंवा इतर पॅसिफिक बेटांचे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वंशांमधील लोकसंख्या लोकसंख्येच्या 2.7% आहे. कोणत्याही वंशातील हिस्पॅनिक्स जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी 11.0% आहे. +वॉशिंग्टनची व्यावसायिक आणि व्यवसाय सेवांच्या वाढत्या टक्केवारीसह वाढणारी, विविध अर्थव्यवस्था आहे. [१66] सन २०१ 2018-क्यू २ मधील जिल्ह्याचे एकूण राज्य उत्पादन १$१ अब्ज डॉलर्स होते. [१77] २०१ 2014 मध्ये वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे एकूण उत्पादन 5$5 अब्ज डॉलर्स होते, जे अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे महानगरीय अर्थव्यवस्था बनले आहे. [१88] २०० and ते २०१weenच्या दरम्यान, वॉशिंग्टन मधील दरडोई जीडीपी अमेरिकन राज्यांमधील सातत्याने सर्वात वरच्या स्थानावर आहे. १9 २०१ In मध्ये $ १,,,72२ डॉलर्सवर, दरडोई तिचा जीडीपी देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅसेच्युसेट्सच्या तुलनेत जवळपास तीन पटीने जास्त आहे. १9 २०११ पर्यंत, वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये बेरोजगारीचा दर .2.२% होता; देशातील 49 सर्वात मोठे मेट्रो क्षेत्रांमधील दुसरा सर्वात कमी दर. [१ ]०] कोलंबिया जिल्ह्यातच याच कालावधीत बेरोजगारीचा दर 9.8% होता. [१1१] +डिसेंबर 2017 मध्ये वॉशिंग्टन, डीसी मधील 25% कर्मचारी फेडरल गव्हर्नमेंट एजन्सीद्वारे नोकरीस होते. [१ 15२] [१ 153] हे वॉशिंग्टन, डी.सी.चे राष्ट्रीय आर्थिक मंदीचे लसीकरण करण्याचा विचार आहे कारण फेडरल सरकार मंदीच्या काळातही कामकाज सुरू ठेवते. [१44] फेडरल सरकारच्या जवळ रहाण्यासाठी लॉ संस्था, संरक्षण ठेकेदार, नागरी कंत्राटदार, ना-नफा संस्था, लॉबींग कंपन्या, कामगार संघटना, उद्योग व्यापारी गट आणि व्यावसायिक संघटना अशा अनेक संघटनांचे मुख्यालय वॉशिंग्टन डीसी मध्ये किंवा जवळ आहे. [ ]]] कोलंबिया जिल्ह्यात इमारतीच्या उंचीवरील निर्बंधामुळे, डीसीपासून पोटॉमॅक नदी ओलांडून, व्हर्जिनियामधील रॉसलिन शहर, अनेक फॉर्च्युन 500 कंपन्यांचे संचालन केंद्र म्हणून काम करते. २०१ In मध्ये, Amazonमेझॉनने घोषणा केली की ते व्हर्जिनियाच्या अर्लिंग्टनच्या क्रिस्टल सिटी शेजारच्या भागात "HQ 2" तयार करतील. +जिल्ह्यात १,5०० मैल (२,4०० किमी) रस्ते, पार्कवे आणि मार्ग आहेत. [२66] १ 60 free० च्या दशकात फ्रीवेच्या बंडखोरीमुळे, वॉशिंग्टनच्या मध्यभागी बहुतेक प्रस्तावित आंतरराज्यीय महामार्ग बांधले गेले नाही. आंतरराज्यीय (((आय-))) हा देशाचा प्रमुख पूर्व किनारपट्टी महामार्ग आहे. म्हणून जिल्ह्याच्या सभोवताल वाकून कॅपिटल बेल्टवेचा पूर्व भाग बनतो. प्रस्तावित महामार्ग निधीचा एक भाग त्याऐवजी प्रदेशाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या पायाभूत सुविधांकडे निर्देशित केला गेला. [२77] वॉशिंग्टनमध्ये जाणारे आंतरराज्य महामार्ग, आय-into and आणि आय-5 5 including सह, दोन्ही शहरात प्रवेश केल्यावर लवकरच समाप्त होतात. [२88] +वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन एरिया ट्रान्झिट अथॉरिटी (डब्ल्यूएमएटी) वॉशिंग्टन मेट्रो, शहरातील जलद संक्रमण प्रणाली तसेच मेट्रोबस चालविते. दोन्ही प्रणाली जिल्हा व उपनगराची सेवा करतात. मेट्रो 27 मार्च 1976 रोजी उघडली आणि 2014 पर्यंत, 91 स्टेशन आणि 117 मैल (188 किमी) ट्रॅकचा समावेश आहे. २9 दर आठवड्यात साधारणत: दहा लाख ट्रिपसह मेट्रो ही देशातील दुसरी सर्वात व्यस्त जलद संक्रमण प्रणाली आहे. मेट्रोबस दर आठवड्यात 400,000 पेक्षा अधिक स्वारांची सेवा करते आणि देशातील पाचव्या क्रमांकाची बस प्रणाली आहे. [२0०] हे शहर स्वतःची डीसी सर्क्युलेटर बस सिस्टम चालविते, जे मध्य वॉशिंग्टनमधील व्यावसायिक क्षेत्रांना जोडते. +वॉशिंग्टन मेट्रो ही भुयरी रेल्वे वॉशिंग्टन, डी.सी. शहर आणि उपनगरांना जोडणारी रेल्वेसेवा आहे. +उपयुक्तता +अमेरिकन कॅपिटल कॉम्प्लेक्ससाठी ऊर्जा पुरवण्यासाठी तयार केलेला कॅपिटल पॉवर प्लांट आर्किटेक्ट ऑफ कॅपिटलच्या अखत्यारीत आहे. +जिल्हा कोलंबिया पाणी व गटार प्राधिकरण (म्हणजेच वासा किंवा डीसी वॉटर) हे डीसी सरकारचा स्वतंत्र अधिकार आहे जो वॉशिंग्टनमध्ये पिण्याचे पाणी आणि सांडपाणी संग्रह पुरवतो. आर्मी कोर्प्स ऑफ इंजिनिअर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वॉशिंग्टन अ‍ॅक्यूडक्टकडून वासा पाणी खरेदी करते. पोटोमैक नदीतून काढले जाणारे पाणी शहराच्या डॅलेक्लारिया, जॉर्जटाउन आणि मॅकमिलन जलाशयांमध्ये उपचार आणि साठवले जाते. जलवाहिनी आर्लिंग्टन, फॉल्स चर्च आणि फेअरफॅक्स काउंटीच्या एका भागासह जिल्हा आणि व्हर्जिनियामधील एकूण 1.1 दशलक्ष लोकांना पिण्याचे पाणी पुरवते. [२33] प्राधिकरण देखील चार मेरीलँड आणि व्हर्जिनिया देशांमधील अतिरिक्त 1.6 दशलक्ष लोकांसाठी सांडपाणी प्रक्रिया सेवा प्रदान करते. +शिक्षण +काँग्रेसची लायब्ररी ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे आणि त्यात 167 दशलक्षाहूनही अधिक कॅटलॉज वस्तू आहेत. [२२5] +जिल्हा कोलंबिया पब्लिक स्कूल (डीसीपीएस) शहरातील १२3 सार्वजनिक शाळा चालवित आहेत. [२२6] २०० until पर्यंत PS in वर्षे डीसीपीएसमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने कमी झाली. २०१०-११ शैक्षणिक वर्षात school 46,१ 1 १ विद्यार्थ्यांनी पब्लिक स्कूल सिस्टममध्ये प्रवेश घेतला. [२२7] पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या दोन्ही कामगिरीच्या दृष्टीने, डीसीपीएस देशातील सर्वात कमी किंमतीची, अद्याप सर्वात कमी कामगिरी करणारी शाळा प्रणाली आहे. [२२8] महापौर अ‍ॅड्रियन फेंटी यांच्या प्रशासनाने शाळा बंद करून, शिक्षकांची बदली करून, मुख्याध्यापकांना काढून टाकले आणि अभ्यासक्रमाच्या विकासास मदत करण्यासाठी खासगी शिक्षण संस्था वापरून या प्रणालीत व्यापक बदल केले. २२ +कोलंबिया जिल्हा सार्वजनिक चार्टर स्कूल बोर्ड शहरातील 52 सार्वजनिक चार्टर शाळांचे परीक्षण करतो. [२0०] पारंपारिक पब्लिक स्कूल सिस्टममध्ये असलेल्या ज्ञात समस्यांमुळे, सार्वजनिक चार्टर शाळांमध्ये पटसंख्या नियमितपणे वाढली आहे. [२1१] २०१० पर्यंत, डी.सी., सनदी शाळांची एकूण नोंद सुमारे ,000२,००० होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत%% वाढली होती. [२२7] २०० मध्ये जवळपास १,000,००० विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या या जिल्ह्यात schools २ खासगी शाळा आहेत. [२2२] कोलंबिया पब्लिक लायब्ररी जिल्हा मार्शलिन ल्यूथर किंग ज्युनियर मेमोरियल लायब्ररीसह 25 आसपासची ठिकाणे चालविते +वॉशिंग्टन, डी.सी. हे कलेचे राष्ट्रीय केंद्र आहे. परफॉर्मिंग आर्ट्ससाठी जॉन एफ. केनेडी सेंटरमध्ये नॅशनल सिम्फनी ऑर्केस्ट्रा, वॉशिंग्टन नॅशनल ऑपेरा आणि वॉशिंग्टन बॅलेट आहेत. कॅनेडी सेंटर ऑनर्स प्रत्येक वर्षी परफॉर्मिंग आर्टमध्ये ज्यांना अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनात मोठे योगदान दिले आहे त्यांना प्रदान केले जाते. [१44] ऐतिहासिक फोर्डचे थिएटर, अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हत्येचे ठिकाण, कार्यरत कार्यप्रदर्शन तसेच संग्रहालय म्हणून कार्यरत आहे. [१55] +कॅपिटल हिल जवळील मरीन बॅरेक्समध्ये युनायटेड स्टेट्स मरीन बँड आहे; १9 8 in मध्ये स्थापन केलेली ही देशातील सर्वात जुनी व्यावसायिक संगीत संस्था आहे. [१66] अमेरिकन मार्चचे संगीतकार आणि वॉशिंग्टन-मूळ जॉन फिलिप सौसा यांनी 1880 ते 1892 पर्यंत मरीन बँडचे नेतृत्व केले. [१77] १ in २ in मध्ये स्थापन झालेल्या, युनायटेड स्टेट्स नेव्ही बँडचे मुख्यालय वॉशिंग्टन नेव्ही यार्ड येथे आहे आणि शहराभोवती अधिकृत कार्यक्रम आणि सार्वजनिक मैफिली सादर करते. [१88] वॉशिंग्टनला स्थानिक रंगभूमीची मजबूत परंपरा आहे. १ 50 in० मध्ये स्थापित, अरेना स्टेजने राष्ट्रीय लक्ष वेधले आणि शहराच्या स्वतंत्र नाट्य चळवळीत वाढीस उत्तेजन दिले ज्यामध्ये आता शेक्सपियर थिएटर कंपनी, वूली मॅमथ थिएटर कंपनी आणि स्टुडिओ थिएटर सारख्या संघटनांचा समावेश आहे. [१9 9] एरेना स्टेजने 2010 मध्ये शहरातील उदयोन्मुख दक्षिण-पश्चिम वॉटरफ्रंट क्षेत्रात आपले नवीन नूतनीकरण केलेले घर उघडले. [१ ]०] आता कोलंबिया हाइट्समधील ऐतिहासिक टिवोली थिएटरमध्ये वसलेल्या गॅला हिस्पॅनिक थिएटरची स्थापना १ 6 in6 मध्ये झाली आणि लॅटिनो परफॉर्मिंग आर्ट्सचे नॅशनल सेंटर आहे. +माध्यम +मुख्य लेख: वॉशिंग्टन मधील मीडिया, डी.सी. हे सुद्धा पहा: +वॉशिंग्टन मधील डी.सी. मधील वृत्तपत्रांची यादी आणि +वॉशिंग्टनमध्ये डी.सी. सेट केलेल्या दूरदर्शन कार्यक्रमांची यादी. +फ्रँकलिन स्क्वेअरवरील वॉशिंग्टन पोस्ट बिल्डिंग वॉशिंग्टन, डी.सी. हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रमुख केंद्र आहे. १7777 founded मध्ये स्थापित वॉशिंग्टन पोस्ट हे वॉशिंग्टनमधील सर्वात जुने आणि सर्वाधिक वाचले जाणारे स्थानिक दैनिक वृत्तपत्र आहे. [१ 192 २] "द पोस्ट", ज्याला लोकप्रिय म्हटले जाते, वॉटरगेट घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध आहे. १ 3 २०११ मध्ये देशातील सर्व वृत्तपत्रांचे हे सहाव्या क्रमांकाचे वाचक होते. १ 194 2003 ते 2019 पर्यंत वॉशिंग्टन पोस्ट कंपनीने द एक्सप्रेस नावाचे दैनंदिन विनामूल्य प्रवासी वृत्तपत्र प्रसिद्ध केले ज्यामध्ये घटना, खेळ व करमणुकीचे सारांश दिले गेले; आणखी एक लोकप्रिय स्थानिक दैनिक म्हणजे वॉशिंग्टन टाईम्स, शहरातील दुसरे सामान्य व्याज ब्रॉडशीट आणि पुराणमतवादी राजकीय वर्तुळांमधील प्रभावी कागद. १ 6 वॉशिंग्टन क्षेत्रामध्ये पर्यायी साप्ताहिक वॉशिंग्टन सिटी पेपरमध्येही वाचकांची संख्या चांगली आहे. +खालील चार प्रमुख व्यावसायिक संघ वॉशिंग्टन महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले वॉशिंग्टन हे १२ पैकी एक शहर आहे. +वॉशिंग्टन हे अमेरिकेतील १३ शहरांपैकी एक आहे जिथे चारही मुख्य व्यावसायिक पुरुषांचे क्रीडा संघ असून यात एक प्रमुख व्यावसायिक महिला संघ आहे. वॉशिंग्टन विझार्ड्स (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) आणि वॉशिंग्टन कॅपिटलस (नॅशनल हॉकी लीग) चेनाटाउनमधील कॅपिटल वन एरिना येथे खेळतील. वॉशिंग्टन मिस्टिक्स (महिलांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन) सेंट एलिझाबेथ्स पूर्व करमणूक व खेळ क्षेत्रातील खेळतात. २०० 2008 मध्ये दक्षिणपूर्व डी.सी. मध्ये उघडलेले नॅशनल पार्क, वॉशिंग्टन नॅशनल (मेजर लीग बेसबॉल)चे घर आहे. डीसी युनायटेड (मेजर लीग सॉकर) ऑडी फील्डमध्ये खेळतो. वॉशिंग्टन फुटबॉल संघ (नॅशनल फुटबॉल लीग) जवळील लँडओव्हर, मेरीलँडमधील फेडएक्सफिल्ड येथे खेळत आहे. +डीसी संघांनी एकत्रित तेरा व्यावसायिक लीग स्पर्धेत विजय मिळविला: वॉशिंग्टन फुटबॉल संघाने (त्यानंतर वॉशिंग्टन रेडस्किन्स असे नाव दिले) पाच जिंकले (1980च्या दशकात तीन सुपर बॉल्ससह); [१66] डीसी युनायटेडने चार जिंकले; [१77] आणि वॉशिंग्टन विझार्ड्स (त्यावेळी वॉशिंग्टन बुलेट्स), वॉशिंग्टन कॅपिटलस, वॉशिंग्टन मिस्टिक्स आणि वॉशिंग्टन नॅशनल या दोघांनी एकेरी जिंकली. [१ 188] १ 18 +वॉशिंग्टनमधील इतर व्यावसायिक आणि अर्ध-व्यावसायिक संघांमध्ये हे समाविष्ट आहे: डीसी डिफेंडर (एक्सएफएल), ओल्ड ग्लोरी डीसी (मेजर लीग रग्बी), वॉशिंग्टन कॅस्टल्स (वर्ल्ड टीम टेनिस); वॉशिंग्टन डीसी स्लेयर्स (यूएसए रग्बी लीग); बाल्टिमोर वॉशिंग्टन ईगल्स (यू.एस. ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग); डीसी दिवा (स्वतंत्र महिला फुटबॉल लीग); आणि पोटोमॅक अ‍ॅथलेटिक क्लब आरएफसी (रग्बी सुपर लीग). रॉक क्रीक पार्कमधील विल्यम एच. जी. फिटझेरल्ड टेनिस सेंटर सिटी ओपनचे आयोजन करते. वॉशिंग्टनमध्ये दोन मोठ्या वार्षिक मॅरेथॉन शर्यतींचे ठिकाण आहे: प्रत्येक शरद umnतूतील मेरीन कॉर्प्स मॅरेथॉन आणि वसंत inतू मध्ये आयोजित रॉक एन एन रोल यूएसए मॅरेथॉन. मरीन कॉर्प्स मॅरेथॉनची सुरुवात 1976 मध्ये झाली आणि कधीकधी त्यांना "द पीपल्स मॅरेथॉन" असे म्हटले जाते कारण हे सर्वात मोठी मॅरेथॉन आहे जी सहभागींना बक्षिसाची रक्कम देत नाही. [१ 190 ०] +जिल्ह्यातील एनसीएए विभागातील चार संघ, अमेरिकन ईगल्स, जॉर्ज वॉशिंग्टन वसाहती, जॉर्जटाउन होयास आणि हॉवर्ड बायसन आणि लेडी बायसन यांच्या विस्तृत यादी आहेत. जॉर्जटाउन होयास पुरुषांची बास्केटबॉल संघ सर्वात उल्लेखनीय आहे आणि कॅपिटल वन एरेना येथेही तो खेळतो. २०० to ते २०१२ पर्यंत, जिल्हा आरएफके स्टेडियमवर वार्षिक महाविद्यालयीन फुटबॉल वाडगा खेळ आयोजित करीत होता, याला सैन्य कटोरा म्हणतात. [१ 1 १] डी.सी. क्षेत्रामध्ये मेरीलँडच्या बेथेस्डा येथे असलेल्या कॉमकास्ट स्पोर्ट्सनेट (सीएसएन) क्षेत्रीय स्पोर्ट्स टेलिव्हिजन नेटवर्कचे निवासस्थान आहे. +इम्हॉफ, गॅरी (ऑक्टोबर 1999) "आमची अधिकृत गाणी". डीसी वॉच. 7 फेब्रुवारी 2012 रोजी पुनर्प्राप्त. +"यू.एस. जनगणना ब्युरो क्विक फॅक्ट्स: जिल्हा कोलंबिया". www.census.gov. +"यूएसए मधील लोकांसाठी प्रात्यक्षिके". www.geography-site.co.uk. 12 एप्रिल, 2017 रोजी पुनर्प्राप्त. + +"निषेध". addis.com. मूळ पासून 13 एप्रिल, 2017 रोजी संग्रहित. 12 एप्रिल, 2017 रोजी पुनर्प्राप्त. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3231.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41c8d823b37b020dd07081c8656fba8fc654ea0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3231.txt @@ -0,0 +1,3 @@ +वॉशिंग्टन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +वॉशिंग्टन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3233.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..258a82b81868a0d9e4826865765a72784eff65bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3233.txt @@ -0,0 +1,3 @@ + +वॉशिंग्टन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3237.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69e00b55b8fd9b18ca3ba767b8ac3a2378fededc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3237.txt @@ -0,0 +1,3 @@ +वॉशिंग्टन काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3256.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..811e8cddafa70c6b0cac483eddfee99e0a5cac65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3256.txt @@ -0,0 +1,2 @@ +डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Dulles International Airport; IATA: IAD) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस स्थित असून ह्या शहरासाठीचा तो प्रमुख विमानतळ आहे. डलेस हा अमेरिकेमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. +* यूएस एरवेझचे प्रवासी धरून diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3309.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4975c3ba93149ae8b7e11de08b8eb9f6bc805cb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3309.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्होल्गा (रशियन: Во́лга) ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे. +रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3319.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a04911ff2f8014e239297c395bf3e26115ccbc8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3319.txt @@ -0,0 +1,28 @@ +वोल्फगांग केटर्ले (२१ ऑक्टोबर, इ.स. १९५७:हायडेलबर्ग, पश्चिम जर्मनी - ) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याच्या भौतिकशास्त्रामधील योगदानासाठी त्याला एरिक अ‍ॅलिन कोर्नेल व कार्ल वीमन ह्यांच्यासह २००१ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. +१९५७ साली हायडेलबर्ग येथे जन्मलेल्या केटर्लेने हायडेलबर्ग विद्यापीठ व म्युनिक येथे पदवीचे शिक्षण घेतले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3328.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..775c8bb061e25eb8777a513009240f451e83943b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3328.txt @@ -0,0 +1,2 @@ + व्यंकटपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3331.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b289892974b3c43d2fa32ea9f7693fe0885bde5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3331.txt @@ -0,0 +1,20 @@ +कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर +जगात सामान्य माणसांतून कधीकधी असामान्य व्यक्तिमत्व तयार होते, ज्यांच्यामागे कोणताच वडिलोपार्जित वारसा नसतो. अश्या व्यक्ति स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या असतात. परिस्थिती त्यांना घडवित असते. जसे आगीत तापून सोन्याला अधिक झळाळी प्राप्त होते तसेच या  कर्तृत्त्ववान व्यक्तींचे जीवन असते. असेच एक महनीय व्यक्तिमत्व म्हणजे खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी, सातपुड्याच्या परिसरातील एक प्रकाशाचे बेट, सातपुड्यातील झुंजार लढवय्या, एक पारदर्शी समाजसेवक, एक बंडपीठ, एक सगुणसाकार जिद्द, एक ध्येयनिष्ठ धावपळ, किसानोद्धारक, एक बुलंद कडा, संयुक्त महाराष्ट्राचा खंदा शिपाई, बोराडीचा अभिमन्यू अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो ते कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर. अनेक नामवंत साहित्यिक, लेखक, राजकारणी, समाजसुधारक लोक कर्मवीर अण्णाबाबांविषयी गौरवोद्गार काढतात. सर्वसामान्य लोक प्रेमाने त्यांना ‘अण्णाबाबा’ म्हणत. +बालपण +कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचा जन्म ५ मे १९२३ रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर मधील शिंगावे या गावात तानाजी आणि बनुमाय रंधे या परीट दांपत्याच्या पोटी झाला. अण्णांचे मूळ गाव रुदावली होते. या गावात ते दीड ते दोन वर्षे राहिले.[१] तानाजी आणि बनुमाय हे आपला पारंपारिक परीट व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी व्यंकटराव पितृ छत्राला पारखे झाले. उदरनिर्वाहासाठी पुढे बनुमाय बोराडी या गावी आल्या, तेव्हा अण्णांचे वय चार वर्षे होते.[२] बोराडीला आल्यावर बनुमाय सुरुवातीला अतिशय साध्या घरात रहात होती. मात्र तरीही तिचा स्वाभिमानी स्वभाव टिकून होता. त्याचा परिणाम अण्णांवर देखील झाला. बनुमाय गरजू स्त्रियांना आधार देत असत, हाच वारसा अण्णांनी देखील चालविला. +अण्णांचे बालपण आजारपणात गेले. बनुमाय त्यांच्यासाठी काहीही उपचार करायला कचरत नसत. परिणामी संधीवाताच्या  आजारातून अण्णा चांगले झाले. बनुमाय जरी निरक्षर असली तरी तिला शिक्षणाचे महत्व कळले होते.[३] त्यातून तिने अण्णांचे व वंजीनाना या आपल्या मुलांचे शिक्षण पार पाडण्यासाठी आटोकाट परिश्रम घेतले. सन १९३५ साली बनुमायने अण्णांचे पुढील शिक्षण धुळे येथे करायचे निश्चित केले. तेथील १४ नंबरच्या शाळेत अण्णांचे नाव टाकण्यात आले. मात्र सुरुवातीला अण्णांचे शाळेत मन रमले नाही. ते लवकरच घरी परत आले. त्यांना परत आलेले पाहून बनुमाय अतिशय दुःखी झाली. अण्णांना बनुमायने गुराखी म्हणून कामाला लावले. काही दिवसातच अण्णांचे मन पालटले आणि त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्धार केला. पुढील शिक्षणासाठी अण्णांना  दादासाहेब घोगरे यांच्या बोर्डिंग मध्ये प्रवेश मिळाला. याच दरम्यान अण्णांनी शिक्षण घेताघेता कष्टाची कामे करून पैसे जमा  करायला सुरुवात केली.[४] +स्वातंत्र्य लढ्यात सहभाग +धुळे हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने तेथे वर्तमानपत्रे, वाचनालये उपलब्ध असत. सभा संमेलने होत. या सर्वांचा अण्णांवर परिणाम झाला. त्यांच्या मनात क्रांतिकार्याचे स्फुलिंग पेटले. येथेच अण्णांची ओळख धुळ्यातील फकिराअप्पा, विष्णू भाऊ, देवमन दादा, ब. ना. कुंभार गुरुजी, पांडुरंग राजाराम घोगरे अशा देशप्रेमाणे प्रेरीत लोकांची अण्णांसोबत ओळख झाली. त्यांच्या सोबत राहून  अण्णा देखील स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले. +त्यावेळी सन १९४२ हे आंदोलन भरास आलेले होते. तुरूंग भरती तेव्हा जोरात होती. अण्णांना देखील पकडण्यात आले. नंतर त्यांना विसापूरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. विसापूरच्या तुंगात त्यांची ओळख ‘खतरनाक व भयंकर कैदी’ अशी झाली होती. त्यांच्या हाता पायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या. चार महीने या बेड्या त्यांच्या हाता पायात होत्या. अखेरीस १४ जानेवारी १९४२ रोजी तुरूंगातून अण्णांना मुक्त करण्यात आले.[५] +सन १९४२ ला महात्मा गांधीनी ‘चले जाव’ चा नारा दिला होता. त्यात सहभागी होण्यासाठी अण्णा काँग्रेस सभासद होण्यास गेले. मात्र कमी वयाचे असल्याने त्यांना सभासद होता आले नाही. पुढे ते काही क्रांतीकारकांना भेटले आणि त्यातून त्यांच्या क्रांतिकार्याला सुरुवात झाली. +धुळ्यात शेळकर नावाचे एक पोस्टमन होते. त्यांना बॉम्ब तयार करता येत होता. अण्णांना त्यांच्याकडून एक बॉम्ब मिळाला. त्यांनी तो बॉम्ब पोस्ट ऑफिसावर फेकला. मोठा आवाज करीत बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब टाकून अण्णा आणि त्यांचे मित्र पळून गेले. शेळकर यांच्या खिशात एकदा बॉम्ब फुटला त्यावरून ते पकडले गेले. शेळकर आता आपले नाव सांगेल म्हणून अण्णा भूमिगत झाले.[६] विष्णू पाटील, यशवंत तोताराम, भैय्या गुरव, देवराम पाटील हे यावेळी भूमिगत चळवळीतील अण्णांचे सहकारी होते. त्यांनी सर्वानी मिळून बोराडी येथील फॉरेस्ट बंगला जाळण्याचा कट आखला.[७] २२ मे १९४४ रोजी आपल्या मित्रांसह अण्णांनी बोराडीचा फॉरेस्ट बंगला जाळला. आगीत बंगल्याची राख झाली. तत्काल अण्णा आणि त्यांचे मित्र भूमिगत झाले. अण्णांच्या विरुद्ध पकड वॉरंट निघाले. त्यांच्यावर सरकारने १००००/- रूपयांचे बक्षीस लावले.[८] केवळ इतकेच न होता अण्णांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले. बोराडीहून निघून अण्णा मुंबईला आले. तेथून त्यांनी जळगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर गाडीत प्रस्थान केले. मध्ये बोरगाव मंजू येथे गाडीला अपघात झाला. अपघातातून अण्णा बचावले. गाडीतून उतरून ते वरणगावला आले. तेथूनच चुकून मद्रास-हैदराबाद-नागपूर असा प्रवास करत चंद्रपूर येथून चाळीस किमी अंतरावर असलेल्या ‘मूळ’ या गावी मुल्लाचा वेष धारण करून सात महीने तेथील गोंड कुटुंबात राहीले.[९] +मूळ येथून निघून अण्णा जळगाव मधील नशिराबाद येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी झुगेरी साहेब यांच्या मळ्यात मुक्काम केला. झुगेरी साहेब जेव्हा नमाज पढायचे तेव्हा अण्णा देखील नमाज पढत. झुगेरी साहेबांनी त्यांना कुराण पठण, सुतकताई देखील शिकविले.[१०] +नशिराबाद येथे काही दिवस राहून अण्णा नाशिकला आले. पुढे काही दिवसांनी ते पंढरपूरला एका मित्राच्या घरी आले. याच काळात त्यांची आणि व्यंकटेश माडगूळकर यांची भेट झाली. तेथून अण्णा परत धुळ्याला आले. +परतल्यावर पुन्हा एकदा क्रांतिकारी चळवळ पुढे चालवण्याचे अण्णांनी आपल्या मित्रांसोबत मिळून ठरविले. त्यासाठी पैसा लागणार होता. तो खाजगी व्यक्तींची लूट करून जमा करण्यात येत असे. मात्र हा मार्ग महात्मा गांधींना रुचत नव्हता. त्यामुळे  अण्णांनी दूसरा मार्ग शोधला. तो मार्ग होता सरकारी पैसा लुटायचा. यावेळी शिरपूर ट्रेझरी लुटण्याचा अण्णांनी शंकरराव माळी आणि गोपीचंद या मित्रांच्या मदतीने बेत आखला. तिघांनी एकत्र येऊन ट्रेझरी लुटण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. +अण्णांनी परत एकदा लुटीचा बेत आखला. यावेळी शंकरराव पोपटराव, धुडकू ठाकरे, उत्तमराव पाटील आणि अण्णा या सर्वांची बैठक झाली. धुडकू ठाकरे यांनी सातारा येथील बँक लुटण्याचा विचार मांडला. मात्र त्यात शेतकऱ्यांचे पैसे असल्याने ते लुटणे अयोग्य म्हणून हा बेत रद्द करण्यात आला. +पुढे साक्री येथील कचेरी लुटण्याचा बेत आखला गेला. त्यासाठी गाडी लागणार होती, त्यावर चालक लागणार होता. अण्णांनी पुणे येथून गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.[११] दोन  महीने यात गेल्यानंतर परत दोन महीने योजना आखण्यात गेले. क्रांतीकारकांना बंदुका लागणार होत्या. त्या बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण बोरकुंड वडजाई डोंगरात घेण्यात आले. सावळदा या ठिकाणी आता क्रांतीकारक गोळा होऊ लागले होते. यात तीन महीने गेले. दरम्यान अण्णांना कळले की तळोदा येथे सरकारी खजिना नेला जात आहे. तळोदेस त्यांचे मित्रजन त्यांना रक्कम, रसद, इत्यादी अशी मोलाची साथ देणारे श्री. भावडू भाऊराव हे सृजन होते. +हि रक्कम लुटण्यासाठी अण्णा, उत्तमराव पाटील व अजून एक व्यक्ति असे तिघे निघाले. वडजाईचा एक पोलीस क्रांतीकारकांचा  मित्र होता, त्याने सल्ला दिला की घाई करू नका. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगीतले की वडजाई येथे धरपकड केली जाणार आहे. त्यामुळे सर्व क्रांतिकारक तेथून निघून गेले. पोलीस येथे धरपकड करण्यासाठी आले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. +मार्च १९४४ च्या मध्यावधीत साताऱ्याहुन नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड, निवृत्ती कळके यांच्यासह १६ क्रांतिकारक बंदुकासह धुळे येथे आले. त्यांनी  बोरकुंड(जि. धुळे)जवळ एका शेतात १५ दिवस मुक्काम केला. त्यांना दयाराम पाटील, श्री. भावडूभाऊ राव पाटील हे क्रांतिकारक गोपनीय माहिती पुरवित असत. नंतर अण्णांना कळले की धुळे येथून नंदुरबार कडे साडेपाच लाखांचा खजिना जाणार आहे.[१२] तात्काळ त्यांनी ही गोष्ट उत्तमराव पाटील यांना सांगितली. नंतर इतर क्रांतीकारकांना ही खबर देण्यात आली. हा खजिना लुटण्याचे सर्वानुमते नक्की करण्यात आले. यासाठी चिमठाणे येथे रस्त्यावर मोटार अडवून खजिना लुटणे अशी योजना तयार करण्यात आली.[१३]   +या कामात व्यंकटरावअण्णा यांच्यासह शिवराम पाटील, दमयंतीबाई गुरव, शंकरराव माळी, राम माळी (शिरपुर), उत्तमराव पाटील, भावडु भाऊराव पाटील (तळोदा), अप्पादाजी पाटील, रावसाहेब शेळके, यशवंतराव पाटील (जुणवणे), सखाराम शिंपी (शहादा),नरोत्तमभाई पटेल, माणिक भील (प्रकाशा जि. नंदूरबार), फकीरा पाटील (शहादा), केशवराव वाणी (वडजाई ता. धुळे), मेनकाबाई नाना देवरे, रामदास पाटील (देऊर ता.साक्री), झुलाल भिलाजीराव पाटील, गोविंदभाई पाटील, वामनराव पाटील यांचा  सहभाग होता. तर अनेक जणांनी भूमिगत राहून मदत केली. दि.१४ एप्रिल १९४४ रोजी खजिना नंदुरबार येथे जाणार होता. यासाठी याच दिवशी लूट करण्याचे नक्की करण्यात आले. दि.१४ एप्रिलच्या सकाळी ब्रिटिश खजिना घेऊन नंदूरबारला निघालेल्या गाडीमध्ये चालकाशेजारी खजिनदार कारकुन, मधल्या खजिन्याच्या पेटया व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस बसलेले होते. अण्णा आपल्या साथीदारांसह  धुळे येथून गाडीचा पाठलाग करत तीन आणि पाच अशा दोन टोळ्यांत क्रांतिकारक चिमठाणे येथे आले. चिमठाणा येथे पोलिस चौकी असल्याने तिथे खजिना न लुटता जरा अलीकडे  खजिना लूटण्याची योजना आखण्यात आली. दोन टोळ्या पिशव्या घेऊन पुढे गेल्या तर दोन टोळ्या चिमठाणा येथेच खजिन्याच्या  गाडीमागे थांबल्या. या टोळीमधील काही क्रांतिकारकांनी लग्नाचे कारण सांगून गाडीत प्रवेश मिळवला. साडेदहा वाजता गाड़ी साळवे फाटयाजवळ आली. गाडीमध्ये असलेल्या क्रांतिकारकांनी खोकला उलटीचे नाटक करत खिडकीतुन डोके बाहेर काढत उभ्या असलेल्या क्रांतिकारकांनी लाल रुमाल दाखवत इशारा केला. सावध असलेल्या क्रांतिकारकांनी गाड़ी अडवत सर्व क्रांतिकारक तूटून पडले. 'महात्मा गांधी की जय! वंदे मातरम!' अशा घोषणा देत तब्बल साडेपाच लाख रुपये खजिना धोतर, रुमाल पिशव्यामध्ये भरून ठरल्याप्रमाणे क्रांतिकारक लामकानी, दोंडाईचा येथे पळून गेले. घोषणा ऐकून गाडीमधील पोलिसाना हे क्रांतिकारक असल्याचे कळले. त्यांनी तत्काळ वरिष्ठाना ही घटना कळवली. पोलीसांनी अनेक दिवस चाललेल्या शोध मोहिमेत काही क्रांतीकारक पकडले गेले. पकडलेल्या क्रांतीकारकावर गुन्हे नोंदवण्यात येऊन शिंदखेडा व धुळे कोर्टात केस चालवण्यात आली. तब्बल १४८ पानाच्या या निकालपत्रात १८.०२.१९४६ रोजी व्यंकटराव रणधीर, शंकर पांडु माळी, धोंड़ीराम तुकाराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तर विष्णू पाटील, शिवाजी सावंत यांना निर्दोष सोडून देण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्रांतीकारकांची सुटका झाली. व्यंकटराव अण्णा यांची सुटका १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली.[१४]   तुरूंगातून बाहेर पडल्यावर त्यांना घ्यायला आर. डी. गांधी हे आले होते. तेथून धुळे शहरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे रूपांतर गरूड हायस्कूलच्या मैदानावर सभेत झाले. सभा आटोपल्यावर अण्णांना हबीब सेठ यांच्या मोटारीतून शिरपूर येथे आणण्यात आले.[१५] येथील सत्कार व सभा आटोपल्यावर अण्णांना रात्री तीन वाजता बोराडी येथे आणले गेले. दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी बोराडीत अण्णांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अण्णांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी या सभेत आपल्या भाषणात 'स्वातंत्र्य म्हणजे काय?' हे समजावून सांगीतले. अशा प्रकारे अण्णा खऱ्या अर्थाने आदरणीय होते.   +वसा आणि वारसा +कर्मवीर अण्णा बाबांनी सुरू केलेल्या कार्यात मा. विश्वासराव रंधे, मा. विजयराव रंधे या त्यांच्या सुपुत्रांनी मोलाची भूमिका बजावली. आज तिसऱ्या पिढीतील अण्णांचे नातू डॉ. तुषार विश्वासराव रंधे, निशांत विश्वासराव रंधे,राहुल विश्वासराव रंधे,शशांक विश्वासराव रंधे, रोहित विजयराव रंधे यांनी अण्णांचे कार्य पुढे नेले आहे. डॉ. तुषार रंधे  हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. निशांत रंधे  किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य  आहेत. राहुल रंधे हे बोराडी गावाचे उपसरपंच आहे. रोहित रंधे शिरपूर पालिकेचे नगरसेवक असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आहेत. या सर्वांच्या कामातून, कर्तृत्वातून कर्मवीर अण्णा बाबांनी सरू केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याचा वसा आणि वारसा जपला जात आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3337.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7730e6906f09a305331b3de253c273398687a47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3337.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट १०, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3368.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0687b060bbea73baf9c38628e70c953e2044332e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3368.txt @@ -0,0 +1,3 @@ +व्यवसाय कर व्यावसायिक कंपन्यांच्या नफ्यावर किंवा भांडवलवृद्धीवर लावण्यात येणारा कर आहे. हा भारतासह अनेक राष्ट्रांत प्रचलित आहे. +भारतात याची अंमलबजावणी विक्रीकर खात्यातर्फे केली ज़ाते. व्यवसाय ज्याचा नावावर असतो त्यालाच़ व्यवसाय कर लागू असतो. भारतातील व्यवसायकर नोंदणीधारकांना इलेक्‍ट्रॉनिक विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य असते. हा कर भरण्यासाठी पीटीआरसी टीन (प्रोफेशनल टॅक्‍स एनरोलमेंट क्रमांक?) क्रमांक आवश्यक असतो. +विक्रीकर विभागात आता इंटरनेटचा माध्यमातून विक्रीकर भरण्याची सोय उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3384.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..484b6fc86a942f95db6483f3d0c9220ccbc8fe15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3384.txt @@ -0,0 +1,7 @@ +दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे.   दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. +१.मानसिक : सतत चिडचिड होणे, आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय, आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे, दैनंदिन व्यवहारांत नकारात्मकता, आपण अपयशी असल्याचा गंड, आपण कुणीतरी विशेष आहोत असे समजणे, स्वतःच्या अति प्रेमात असणे व जगाला तुच्छ समजणे ही व यासारखी अनेक कारणे त्या व्यक्तीला दारूशी बांधून ठेवतात. +२.शारीरिक : सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची कार्यक्षमता कमी होत जाणे, लैंगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार होणे. +३.आर्थिक : व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी/व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किवा कर्जे काढणे, नोकरी/व्यवसाय बंद पडणे, वगैरे. +४.लैंगिक : दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लिंगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते. +व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, येरवडा, पुणे इत्यादी. याच सोबत विविध समाजसेवकांनी आणि लोककलाकारांनी सुद्धा व्यसनमुक्ती अभियान चालवले आहेत, ज्यात बशीर मोमीन (कवठेकर) यांचे देखील योगदान आहे, ज्या कारणास्तव त्यांना राज्य शासनाने २००३ साली ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले.[१] +व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3397.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e2404252a35f4b46d6e3930ac1e2469f49a521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3397.txt @@ -0,0 +1,3 @@ +व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह (रशियन: Вячеслав Молотов; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा एक सोव्हिएत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हिएत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता. +१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत व नाझी जर्मनी ह्यांच्या दरम्यान झालेल्या गुप्त करारामध्ये मोलोतोव्हने सहभाग घेतला होता. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार ह्या नावाने मोलोतोव्ह व नाझी परराष्ट्रमंत्री योआखिम फॉन रिबेनट्रॉप ह्यांच्यामध्ये झालेल्या ह्या करारामध्ये पोलंड देशाचे विभाजन व एकमेकांवर अनाक्रमणाचे वचन दिले गेले होते. +युद्ध संपल्यानंतर मोलोतोव्हचे सोव्हिएतमधील महत्त्व कमी झाले. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मोलोतोव्हने स्टॅलिनच्या धोरणांचा पाठिंबा चालू ठेवला. तो निकिता ख्रुश्चेव्हच्या राजवटीचा मोठा टीकाकार होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3402.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fddd660397aab6a93aab062b2836bf3ed946f2e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3402.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध शिवमंदिर गुहागर शहरात आहे. अनेक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाचा श्री व्याडेश्वर हा कुलस्वामी आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्र आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो. +अधिक माहितीसाठी `श्री व्याडेश्वर शिवहर` हे कविता मेहेंदळे यांचे पुस्तक उपलब्ध आहे. (मधुश्री प्रकाशन, पुणे.) हे पुस्तक मंदिरातही उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3421.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8024949bda5f6d9a6a2b6f3ae0ac379b9f3051a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3421.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्यालअथवा 'यली' हा पुरातन मंदिरांच्या शिल्पकलेत कोरल्या जाणारा एक काल्पनिक प्राणी आहे.भारतात बहुतेक पुरातन मंदिरातील कोरीवकामात हा आढळतो. त्याचे शरीर मानवाचे व डोके वेगळ्याच पशूचे अथवा शरीर घोड्याचे अथवा कोणत्याही पशूचे व डोके वेगळ्याच पशूचे असे कोरलेले असते.[ संदर्भ हवा ]व्यालमूर्ती ही साधारणतः कोरीव कामातच आढळते. व्याघ्रव्याल (डोके वाघाचे), अजव्याल (डोके बोकडाचे), अश्वव्याल (डोके अश्वाचे) असे विविध प्रकार यात असतात.ही कल्पना शिल्पकारास गजमुखावरून सुचली असेल असा अदमास आहे.[ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ] +याचा वापर दक्षिण भारतातील मंदिरांच्या बांधकामात व्यापकपणे केलेला आढळतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3455.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7013d603c677aaab7d66c79a3e07ac2e081791d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3455.txt @@ -0,0 +1 @@ +व्रणरोपक हे अशा प्रकारचे औषध आहे जे व्रणांचे (जखमांचे) रोपण (पुर्ववत करणे) करते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3457.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66f34ed0efeb24160acefb7399e7c587d4c79677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3457.txt @@ -0,0 +1,5 @@ +व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नीतिनियमांनी करावयाचे आचरण.[१] व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात. +ऋग्वेदानुसार या शब्दाचा अर्थ 'आज्ञा', 'धार्मिक आचरण', 'उपासना पद्धती' या अनुषंगाने येतो.'ब्राह्मण' ग्रंथांनुसार 'धार्मिक क्रिया', 'आहार निर्बंध', 'विशिष्ट वर्तन', उपवास आदी होतो. धर्मसिंधू या ग्रंथात 'पूजा आदींचा अंतर्भाव असणारा धार्मिक विधी' असे नमूद केले गेले आहे. +व्रत शब्दात वृ असा संस्कृत धातू असून त्याचा अर्थ निवड करणे, अवरोध करणे असा होतो. व्रत-वैकल्ये असा जोडशब्द असून व्रताच्या आचरणाने विकलता येणे अपेक्षित असते.[२] +हिंदू धर्मात वेगवेगळ्या व्रतांच्या वेगवेगळ्या आराध्य देवता असतात.या देवतांची पूजा व्रतामध्ये केली जाते. त्या व्रताच्या वेळी त्या विशिष्ट देवतेची कथा वाचली जाते.[५] +[१०] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3464.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db2aba191a6bf541a7290b0e5723b7f5be36417a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3464.txt @@ -0,0 +1 @@ +व्राटिस्लाविस नॅड निसाऊ (जर्मन: मेफर्सडॉफ) हा लिबरेक (चेक प्रजासत्ताक) या शहराचा भाग असून येथील लोकसंख्या ६,७०० आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3481.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf190d1784b03481fa06010556704cf29ac0cfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3481.txt @@ -0,0 +1 @@ +व्लादिमिर मेचियार (स्लोव्हाक: Vladimír Mečiar; २६ जुलै १९४२) हा स्वतंत्र स्लोव्हाकिया देशाचा पहिला व तिसरा पंतप्रधान होता. त्याच बरोबर तो दोन वेळा अल्प काळासाठी स्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्षपदावर देखील राहिला आहे. १९९२ सालच्या चेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीमध्ये मेचियारची महत्त्वपूर्ण भूमिका होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3511.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f078bb63a3884f6e4ec159f402389980920348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3511.txt @@ -0,0 +1 @@ +व्हादिस्वाफ स्तनिस्वाफ रेमाँट (पोलिश: Władysław Reymont; ७ मे १८६७ - ५ डिसेंबर १९२५) हा एक पोलिश लेखक होता. रेमाँटला १९२४ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3516.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09416ec0c613187c2b6e8b9c5c93702cd43c7294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3516.txt @@ -0,0 +1 @@ +रशियाच्या स्फुटनिक-१ उपग्रहास उत्तर देण्यासाठी अमेरिकेने सहा डिसेंबर १९७५ला व्हॅनगार्ड हा उपग्रह सोडला. पण तो अयशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3546.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61a58b9b6c5df4a5ef299c7ded5da8487785948f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3546.txt @@ -0,0 +1,3 @@ +व्हर्जिन अटलांटिक ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी आहे. इंग्लंडच्या दक्षिण भागातील क्रॉली शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य तळ लंडन हीथ्रो, लंडन गॅटविक आणि मँचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आहेत. येथून व्हर्जिन अटलांटिक जगातील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवते. +व्हर्जिन अटलांटिकची ५१% मालकी व्हर्जिन अटलांटिक लिमिटेड या वेगळ्या कंपनीकडे तर ४९% मालकी डेल्टा एर लाइन्सकडे आहे. +२०१२ साली व्हर्जिन अटलांटिकने ५४ लाख प्रवाशांची ने-आण केली होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3547.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8a079da6d13197b63cd24c406c0e497a91367bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3547.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हर्जिन अमेरिका ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील बर्लिंगेम शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे तळ सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत. या कंपनीची एक चतुर्थांश मालकी व्हर्जिन ग्रुप या रिचर्ड ब्रॅन्सनच्या कंपनीकडे तर उरलेली तीन चतुर्थांश मालकी व्हीएआय पार्टनर्सकडे आहे. +२०१६मध्ये अलास्का एर ग्रुपने ही कंपनी विकत घेण्याची घोषणा केली. २०१७ च्या सुरुवातीपर्यंत ही कंपनी अलास्का एरलाइन्समध्ये विलिन होईल. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3560.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d63355842b613d831b630ee2983f71af8647f4bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3560.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°50′N 76°5′W / 36.833°N 76.083°W / 36.833; -76.083 + +व्हर्जिनिया बीच (इंग्लिश: Virginia Beach) हे अमेरिका देशाच्या व्हर्जिनिया राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. व्हर्जिनियाच्या आग्नेय टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हर्जिनिया बीच शहराची लोकसंख्या सुमारे ४.३८ लाख लोकसंख्या इतकी तर व्हर्जिनिया बीच-नॉर्फोर्क-न्यूपोर्ट न्यूझ ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.७२ लाख इतकी आहे. लोकसंखेच्या दृष्टीने व्हर्जिनिया बीच हे अमेरिमेमधील ३९व्या क्रमांकाचे शहर आहे. +लांबवर पसरलेले समुद्रकिनारे व सौम्य हवामान ह्यांमुळे पर्यटन हा व्हर्जिनिया बीचमधील सर्वात मोठा व्यवसाय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3563.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3563.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3567.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9772a65f1c43fda1fe1c442ed3a35fde7adc7590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3567.txt @@ -0,0 +1 @@ +व्हर्जिन मोबाइल ही बिनतारी संदेशवहनसेवा पुरविणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचे नाव आठ स्वतंत्र कंपन्या दहा देशांत वापरतात. ह्यांत ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, कॅनडा, चिली, दक्षिण आफ्रिका, पोलंड, फ्रान्स, भारत, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश होतो.[१] सिंगापूर आणि कतार मधील व्हर्जिन मोबाइलची सेवा आता बंद झाली आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3584.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3584.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3587.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189ac03becc3667045a918a38713ce3d38a452cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3587.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हर्मिलियन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3591.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..378b4018a46a3d881ea2ff77dc4167707fcd2447 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3591.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली. +व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3596.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fc456ef5aade2cf56af16575b40df373f47067e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3596.txt @@ -0,0 +1 @@ +व्हल्कन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3601.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dfe1a4f575b24b32894046540af321662e2bf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3601.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हाइट काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3608.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b93fe371d4dc4647c1a2f570ee791930f6976d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3608.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हाइट सिटी स्टेडियम तथा द ग्रेट स्टेडियम इंग्लंडची राजधानी लंडनमधील मैदान होते. १९०८ उन्हाळी ऑलिंपिकसाठी बांधण्यात आलेल्या या मैदानात मैदानी खेळांसह मॅरेथॉन शर्यतीचा शेवट पहिल्यांदाचा योजण्यात आला. १९६६ फिफा विश्वचषकाचा एक सामनाही येथे खेळण्यात आला. +हे मैदान १९८५मध्ये पाडण्यात आले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3623.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da705ad6c2975e54cf59139b056e2edf9eedb119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3623.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्रमाणक हा व्यवसायातील व्यवहाराला पुराव्याचा आधार देणारा दस्तऐवज होय. एखाद्या व्यवहाराची निश्चिती होताच त्याचे प्रमाणक केले जाते. उदा. विक्री होताच विक्री प्रमाणक, रोख रक्कम काढताना रोख प्रमाणक बनवले जाते. प्रमाणकावर व्यवहाराचे स्वरूप, व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा लेखा, तारीख, रक्कम, मालाचे तपशील, व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या सह्या असे तपशील नोंदवण्याची सोय असते. +१) अंतर्गत प्रमाणक ( इंग्लिश : Internal Voucher) - व्यवसायातील अंतर्गत व्यवहारांच्या नोंदीसाठी वापरले जाणारे प्रमाणक म्हणजे अंतर्गत प्रमाणक होय. दोन खात्यांमधील देव घेव, हात खर्चासाठी घेतली जाणारी रोख रक्कम, गोदामातून काढलेल्या मालाची नोंद ज्या कागदपत्रावर केली जाते ते सर्व अंतर्गत प्रमाणक आहेत. मोठ्या व्यवसायातील व्याप, अनेक शाखा, कामाच्या विविध पाळ्या, कर्मचाऱ्यांची संख्या इत्यादी घटकांमुळे अंतर्गत व्यवहारांची नोंद ठेवणे आवश्यक बनले आहे.अंतर्गत प्रमाणकावर सह्या करणारे सर्व जण व्यवसायाचे नोकर असतात. +२) बाह्य प्रमाणक ( इंग्लिश : External Voucher) - व्यवसायाबाहेरील व्यक्ती किंवा इतर व्यवसायाबरोबर झालेल्या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी वापरल्या जाणारया प्रमाणकास बाह्य प्रमाणक असे म्हटले जाते. बाह्य प्रमाणक हा व्यवसायाला इतर संस्थे कडून प्राप्त होतो. थोडक्यात इतर व्यापारी संस्थेने हा प्रमाणक जारी केलेला असतो. मालाची उधारीवर खरेदी केल्याचे प्रमाणक, कर चलान, रोख खरेदी प्रमाणक इत्यादी. +१) कर निर्धारण करताना नफ्याची गणना करण्यासाठी पुरावा म्हणून प्रमाणक उपयोगी असतात . +२) व्यवहारांचा विश्वसनीय पुरावा. - वाद उद्भवल्यास प्रमाणकावरील माहिती पुरावा म्हणून उपयोगी पडते. +३) अन्केक्षकाला त्याची जबाबदारी कुठल्याही व्यक्तिगत ढवळाढवळीशिवाय पार पाडता यावी म्हणून. +४) एखाद्या व्यवहाराची तारीख, रक्कम, व्यक्तीची खात्री पटवून घेता यावी म्हणून. +५) न्यायालयात पुरावा म्हणून व्यवसायातील प्रमाणके सादर करता येतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3639.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20108f2af725cf45ab9853677171d901bd18f3e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3639.txt @@ -0,0 +1,9 @@ +टी२०आ किट +वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानुआतू प्रजासत्ताक देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाचे आयोजन वानुआतू क्रिकेट संघटनेने केले आहे, जे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या संघटनेशी संलग्न सदस्य बनले आणि २००९ हा देश सहसदस्य झाला.[५] वानुआतूने 1979च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्या वेळी या देशाला न्यू हेब्रिड्स या नावाने ओळखले जात असे. [६] संघाचे बहुतेक सामने आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक विभागातील इतर सदस्यांविरूद्ध झाले आहेत, ज्यात आयसीसी प्रादेशिक स्पर्धा तसेच पॅसिफिक गेम्समधील क्रिकेट स्पर्धांचाही समावेश आहे.[७] +२००८ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून वानुआतू वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये दाखल झाला. २०१५ डिव्हिजन सिक्स स्पर्धेद्वारे संघाने डब्ल्यूसीएल सिस्टममध्ये भाग घेतला. त्यात या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.[८] २०१६ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून सुरिनामने माघार घेतल्यानंतर या संघाच्या जागी वानुआतूचा समावेश करण्यात आला.[९] +एप्रिल 2018 मध्ये, आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांना ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय (टी-20 आय) पूर्ण दर्जा देण्याचा निर्णय घेतला. म्हणून, 1 जानेवारी 2019 नंतर वानुआतू आणि आयसीसीच्या इतर सदस्य देशांना ट्वेन्टी -20चा दर्जा मिळाला.[१०] वानुआतूने 22 मार्च 2019 रोजी पापुआ न्यू गिनिआविरुद्ध आपला पहिला टी -20 सामना खेळला.[११] एप्रिल 2019 नंतर, वानुआतू संघ २०१९-२१ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये खेळला.[१२] +पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा वानुआतू संघाने सहभाग घेतला, ज्यात २००१ मध्ये सातवा, तर २००२ मध्ये सहावे स्थान मिळविले. २००५ मध्ये वानुआतू देशाने पूर्व आशिया / पॅसिफिक क्रिकेट चषक स्पर्धा आयोजित केली आणि सहा संघांच्या या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. मात्र, २००७ च्या विश्वचषक स्पर्धेची पात्रता त्यांना मिळवता आली नाही. न्यू झीलंडच्या ऑकलंड येथे डिसेंबर 2007 मध्ये झालेल्या पॅसिफिक ट्रॉफीमध्ये वानुआतू संघाने दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे 2008 मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग पाचसाठी ते पात्र ठरले. 2009 हे वर्ष वानुआतूसाठी सर्वांत यशस्वी ठरले. कारण पोर्ट विला येथे झालेल्या दोन एकदिवसीय मालिकेत त्यांनी फिजीचा पराभव केला त्यामुळे सामोआ येथे झालेल्या २००९ आयसीसी ईएपी क्रिकेट ट्रॉफी (वर्ल्ड क्रिकेट लीग नसलेली) स्पर्धेत यजमानांना अंतिम फेरीत पराभूत केले. ज्युनिअर गटातही वानुआतूने पुढील स्पर्धांमध्ये दुसरे स्थान मिळविले: पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, 2005; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, आपिया, सामोआ, 2007; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 19 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा, पोर्टविला, वानुआतू, 2007. +कुवेतमध्ये २०१० मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन एट स्पर्धेत वानुआतू संघाने तिसरा क्रमांक मिळविला. याचाच अर्थ 2012च्या लीगसाठीही ते पात्र ठरले. +२०१८ मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फोर स्पर्धेत वानुआतूने मातब्बर बर्म्युडा संघाचा पराभव केला. बर्म्युडा संघाला कधी काळी एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला होता. बर्म्युडापाठोपाठ डेन्मार्कविरुद्धही विजय नोंदविला. डेन्मार्कनेही यापूर्वी डिव्हिजन टू स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेली होती. मात्र ते अद्याप निव्वळ धावगतीच्या सरासरीच्या आधारे विभाग पाचमध्ये आपले स्थान टिकवून राहिले. [१३] +ऑगस्ट 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकेला यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 2019 मध्ये मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ स्पर्धेच्या आधी करण्यात आली. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3644.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a9da01e8692bd66eb706956660b69990915243 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3644.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हाय धिस कोलावेरी डी (तमिळ: வொய் திஸ் கொலவெறி டி ; रोमन लिपी: Why This Kolaveri Di ;) हे इ.स. २०१२ साली प्रदर्शित होणाऱ्या ३ नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. तमिळ अभिनेता धनुष याने लिहिलेल्या व गायलेल्या या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिले आहे. १६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी अधिकृतरित्या प्रदर्शित झालेले हे गाणे त्यातील टँग्लिश, अर्थात तमिळ-इंग्लिश संमिश्र, शब्दरचनेमुळे आणि धिम्या ठेक्यातल्या लयदार चालीमुळे अत्यल्प कालावधीत लोकप्रिय झाले. या गाण्याच्या लोकप्रियतेची लाट पसरवण्यात सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मोठा वाटा होता. +अनिरुद्ध रविचंदर याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची निर्माती ऐश्वर्या रजनीकांत धनुष (तमिळ अभिनेता रजनीकांत याची कन्या आणि अभिनेता धनुष याची पत्नी) हिला निष्फळ ठरलेल्या प्रेमाविषयी एखादे हलक्या-फुलक्या ढंगातील गाणे हवे होते. रविचंदराने केवळ ५ मिनिटांत एक चाल बनवून दिली [१]. त्यानंतर धनुष याने चालीवर गीतरचना लिहायला घेतली आणि तीदेखील केवळ वीसेक मिनिटांच्या लिहिण्या-गुणगुणण्यातून तयार झाली [२]. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3646.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85d173e6eacf9c0289039b75eaf78a2600dd8a42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3646.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स कॅनिंग, पहिला अर्ल कॅनिंग तथा लॉर्ड कॅनिंग किंवा व्हायकाउंट कॅनिंग (१४ डिसेंबर, १८१२:ब्रॉम्पटन, लंडन, इंग्लंड - १७ जून, १८६२:ग्रॉसव्हेनर स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल[१] आणि व्हाइसरॉय[२] होता. हा १८५७ च्या स्वातंत्रयुद्धादरम्यान गव्हनर जनरल पदावर होता. +याच्या सद्दीदरम्यान मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिककाळातील पहिल्या तीन विद्यापीठांची स्थापना झाली.[३][४][५] लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात प्रस्तावित हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा याने पारित केला.[६][७] याचबरोबर लॉर्ड कॅनिंगने भारतीय पीनल कोड अमलात आणला.[८] +१८५७ च्या युद्धानंतर त्याने सर्वसाधारण सैनिकांना माफी जाहीर केल्यामुळे याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही टोपणनाव मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3648.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fcc81e9921ea60c142083b6216c6657cac6d017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3648.txt @@ -0,0 +1 @@ +व्हायकिंग हा शब्दप्रयोग मध्य युगातील आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडिनेव्हियन खलाशी, लुटारू, व्यापारी व योद्धे ह्यांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. विशेष बनवलेल्या लाकडी बोटी वापरून आपल्या काळामध्ये व्हायकिंग लोकांनी उत्तर युरोपातील जवळजवळ सर्व प्रदेशावर आक्रमण व सत्ता केली होती. व्हायकिंग युग ह्या नावाने ओळखला जाणारा हा काळ स्कँडिनेव्हियाच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3651.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55aa46e1d9c99f119582fbc8c194124b584dcec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3651.txt @@ -0,0 +1,4 @@ +व्हायरल हा शब्द व्हायरस ज्याचा अर्थ "अतिसूक्ष्म रोगाणु" किंवा लवकर पसरणारा असा होतो. त्वरित पसरणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळणाऱ्या चित्रफितीला व्हायरल विडीओ[१] असे म्हणतात. व्हायरल विडीओ इंटरनेट सहयोगाने प्रचलित झाला आहे, जसे चित्रफीत वाटप संकेतस्थळ किंवा ईमेल द्वारा. व्हायरल विडीओ मध्ये सादारणतः हास्य आणि चित्रित विनोद असतात जसे द लोनली आयलंड्स लेझी सनडे आणि डिक इन द बॉक्स, अपरिपक्व चित्रफिती जश्या स्टार वाँर कीड, द नुमा नुमा चित्रफित युट्युब वरील. द इवोल्युशन ऑफ डान्स, चॉकलेट रेन आणि वेब ओन्ली उत्पादन आय गॉट अ क्रश ...ऑन ओबामा. काही थेट समोरच्यांची चित्रफीत प्रचलित झाली आहेत जसे क्रुगरचे आयोधन. +हास्य हे साधाणतः व्हायरल विडीओचे विशेषण असते. परंतु हे आवश्यक नाही. व्हायरल विडीओ म्हणजे कोणतीही चित्रफित जी इलेक्ट्रोनिकली एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जात असतो. +कॅमेरा फोनच्या प्रचलीत वापराने खुपसाच्या अरिपक्व चित्रफित चित्रीत होतात. अगदी कमी खर्चात उपलब्द असलेल्या चित्रफित संपादकीय उपकरणामुळे मोबाईलने खेचलेल्या चित्रफिती पसरवल्या जातात, ई-मेल किंवा संकेतस्थळ आणि एम एम एस द्वारा वाटल्या जातात. या ग्राहकांनी खेचलेले चित्रफिती साधारणतः अव्यवसायीक असे मित्र किंवा परिवाराने पाहण्यासाठी असतात. +व्हायरल विडीओ मुख्य चित्रफित सहयोग संकेतस्थळ जसे युट्यूब किंवा कॉलेज ह्युमर यांच्या आधी ई-मेल द्वारा पसरण्यास झाली. सुरुवातीच्या काही चित्रफितींमधील एक म्हणजे द स्पिरीट ऑफ क्रिसमस जो १९९५ मध्ये प्रसारित झाला. १९९६ मध्ये डानसिंग बेबी समोर आला. ही चित्रफित ३डी चरित्र ॲ्निमेशन सोफ्तवेअरचा नमुना होता. रोन तुझीअर या ॲनिमेटरने कच्चे ॲ्निमेशन स्वछ करून लुकास आर्ट्स जे त्याचा त्या वेळाचे उद्योगस्थळ होते तेथे वाटण्यास सुरुवात केली. व्हायरल विडीओच्या प्रसारात अचानक वाढही आवाक्यातील चित्रफित कॅमेरा आणि चित्रफित सहयोगासाठी खास अश्या संकेतस्थळ जसे युट्यूब मुले झाली असे म्हणता येईल. या संकेतस्थळामुले खुपसारे परंपरागत चित्रफिती काळाआड झाल्या. तरी काही सुरुवातीची उदाहरणे मुख्यप्रवाहात जोडण्यात आल्या. व्हायरल विडीओझ हे व्हायरल मार्केटिंग, बझ्झ मार्केटिंग आणि स्तेल्थ मार्केटिंग यांपासून प्रेरित आहे. व्हायरल मार्केटींगचा इतिहास आपल्या अनुवादासाठी उपलब्ध आहे. इतिहासकार मुख्यतः व्हायरल मार्केटिंग या संकेतावर लक्ष देतात. व्हायरल मार्केटींग परंपरागत तोंडी अनुरूप आहे म्हणून तो इंटरनेटच्या खूप आधी सुरू झाला असे म्हणता येईल. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3727.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cabe6942e35902dcc5cc3d69f91a1682e029c7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3727.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हिक्टर आंद्रियोव्हिच युश्चेन्को (युक्रेनियन: Віктор Андрійович Ющенко; २३ फेब्रुवारी १९५४) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २००५ ते २०१० दरम्यान ह्या पदावर राहिलेला युश्चेन्को हा स्वतंत्र युक्रेनचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. +२००४ साली अध्यक्षीय निवडणुकीचा उमेदवार असताना युश्चेन्कोवर विषप्रयोग झाला होता ज्यातून तो बचावला परंतु त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणावर विकृत झाला होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3736.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1f8fe0717afa3b8b5a29231ae3d364578c4c102 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3736.txt @@ -0,0 +1 @@ +व्हिक्टर थॉमस ट्रंपर (मराठी लेखनभेद: व्हिक्टर ट्रम्पर (२ नोव्हेंबर, १८७७ - २८ जून, १९१५) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3737.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1f8fe0717afa3b8b5a29231ae3d364578c4c102 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3737.txt @@ -0,0 +1 @@ +व्हिक्टर थॉमस ट्रंपर (मराठी लेखनभेद: व्हिक्टर ट्रम्पर (२ नोव्हेंबर, १८७७ - २८ जून, १९१५) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_378.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c8aceff7dec81732404d6ec0aa2393bde968d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_378.txt @@ -0,0 +1,4 @@ +विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले वैद्यकीय महाविद्यालय होते. +याची स्थापना १८४८मध्ये फीमेल मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया नावाने झाली व १८६७मध्ये त्याचे नाव विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया असे बदलले गेले. १९७०मध्ये येथे पुरुषांनाही प्रवेश मिळाल्यावर याचे नाव द मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया असे ठेवले गेले. +२००३मध्ये हानेमन मेडिकल स्कूल आणि विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया एकत्रित होउन ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनची स्थापना झाली. +भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी येथे शिक्षण घेउन एम.डी. ही पदवी मिळविली होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3780.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea7791f7b684e6617acead3836e05a3ad282f2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3780.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया ॲन्ड आल्बर्ट म्यूझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. र डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते. +या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_38.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_38.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f2e07a85a1c66608304ef7c602a7e7ad5062d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_38.txt @@ -0,0 +1,3 @@ +विद्युत स्थितीज उर्जा, विद्युत विभवी उर्जा किंवा विद्युत सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य कुलोंब बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते. +विद्युत स्थितीज उर्जा खालीलप्रमाणे काढली जाते- +म्हणजेच- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3806.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf82710237865805dbcf7670de56a0d2aba2e7e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3806.txt @@ -0,0 +1,7 @@ +व्हिक्टोरिया विद्यापीठ +हे मेलबर्न या शहरातील जुने विद्यापीठ आहे. या संस्थेची सुरुवात एक तंत्रशिक्षण संस्था म्हणून झाली व पुढे विद्यापीठाचे स्वरूप मिळाले. आज या विद्यापीठाचे फ्लिंडर्स स्ट्रीट, फूटस्क्रे हे स्थानीय कँपस आहेत. या शिवाय सिंगापुर व चीन येथे सहकारी संस्था आहेत. +या विद्यापीठात आर.एम.आय.टी. विद्यापीठ येथे असलेल्या पद्धतीसारखेच द्वीस्तरीय तंत्रशिक्षण व पदवी असे अभ्यासक्रम आहेत. +अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. सॅपच्या युनिव्हर्सिटी अलायंस प्रोग्रामचा भाग आहे. +हे विद्यापीठ ऑस्ट्रेलियामध्ये पदव्युत्तर सॅप (एस.ए.पी.) विषयक कोर्सेस शिकवणारे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. +यात मिळणारी पदवी मास्टर ऑफ बिझिनेस इ.आर.पी सिस्टीम्स अशी आहे. +सॅप युनिव्हर्सिटी अलायंस प्रोग्राम Archived 2007-10-10 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3816.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5315aa43ae8175cae123613f786dbee636f5ef08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3816.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हिक्तोर यानुकोव्हिच (युक्रेनियन: Янукович Віктор Федорович) हा युक्रेन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. यानुकोव्हिच आजवर ३ वेळा युक्रेनचा पंतप्रधान व त्याआधी दोनेत्स्क ओब्लास्तचा राज्यपाल राहिला होता. +फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या सरकारविरोधी बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडावी लागली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3823.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdac1c0e546c1013d15c23e1546d2c4f8ed1f53a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3823.txt @@ -0,0 +1,7 @@ +व्हिज्युअल बेसिक नेट (व्हीबी. नेट) एक ऑब्जेक्ट-ओरिएंटेड[मराठी शब्द सुचवा] संगणक आज्ञावली भाषा असून ती एनएटी फ्रेमवर्कवर लागू आहे. +जरी ते क्लासिक व्हिज्युअल बेसिक लँग्वेजची पुढील पायरी असले तरी ती व्हीबी ६शी सुसंगत नाही, आणि जुन्या आवृत्तीमध्ये लिहिलेल्या आज्ञावली VB.NETच्या अंतर्गत संकलित होत नाहीत. +अन्य सर्व .NET भाषांप्रमाणे, VB.NET ने ऑब्जेक्ट ओरिएंटेड संकल्पनांसाठी पूर्ण समर्थन दिले आहे. +VB.NET मधील प्रत्येक गोष्ट म्हणजे सर्व प्रकारचे (संक्षिप्त, पूर्णांक, लांबी, स्ट्रिंग, बुलियन, इत्यादी) आणि वापरकर्ता-परिभाषित प्रकार, कार्यक्रम आणि संमेलने यासह सर्व गोष्टी. +सर्व ऑब्जेक्ट्स बेस क्लास ऑब्जेक्टवरून मिळतात. +मायक्रोसॉफ्टच्या. नेट फ्रेमवर्कद्वारे व्हीबी. नेटची अंमलबजावणी केली जाते. +म्हणूनच, नेट फ्रेमवर्क मधील सर्व ग्रंथालयांमध्ये त्याचा पूर्ण प्रवेश आहे. मोनोवर व्हीबी. नेट प्रोग्रॅम्स चालवणे देखील शक्य आहे, ओपन सोर्स पर्याय .नेट अंतर्गत, विंडोजमध्येच नव्हे तर लिनक्स किंवा मॅक ओएसएक्स. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3851.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d247b180afe13b451bbf76c0c717e5d38f1ea0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3851.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हिडिओकॉन (बीएसई.: 511389) या मुख्यत्वे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निमिर्तीपासून सुरुवात केलेल्या भारतीय उद्योगसमुहाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. +मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतभर आणि चीन, पोलंड, इटली आणि मेक्सिकोमध्ये उत्पादनकेंद्रे आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3875.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6788b7ce7dfcf94c99f08e55c3fa8e42cf1d8c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3875.txt @@ -0,0 +1,6 @@ +कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTA, आप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे. +याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे. +एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. [३] येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती. +कातानिया-फाँतानारोसा विमानतळावर खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि भाड्याने सेवा देतात: +कातानिया-एरोपोर्तो फाँतानारोसा हे नव्याने बांधलेले रेल्वे रेल्वे स्थान, मेसिना-सिरॅक्यूझ रेल्वे, कातानिया-पालेर्मो रेल्वे तसेच कातानिया-कॅल्ताजिरोन रेल्वेद्वारे सिसिलीभर सेवा पुरवते. येथून कातानियाच्या उपनगरी गाड्याही सुटतात. [१८] येथून १० मिनिटांत कातानिया सेंत्राले रेल्वे स्थानकाला जाता येते तर सिरॅक्यूझ किंवा ताओर्मिना स्थानकाला जाण्यासाठी एक तास लागतो. [१९] +येथून नियमित शटल बस सेवा कॅटानिया शहराच्या मध्यवर्ती भागाला तसेच सेंत्राले रेल्वे स्थानकाला वाहतूक पुरवते. शिवाय तर बेटाच्या इतर भागांसाठी नियोजित बस सेवा देखील [२०] विमानतळावरून उपलब्ध आहेत. मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या समोर आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3913.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99bf4394936a22e8ee795bd571df87eb15176ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3913.txt @@ -0,0 +1 @@ +व्हियेतनामी डाँग व्हियेतनामचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3954.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64716d6f157c2e6db432e06b5157f15a5ded7a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3954.txt @@ -0,0 +1,10 @@ +वैकोम नारायणी जानकी, जानकी रामचंद्रन तथा जानकी एम.जी.आर. (३० नोव्हेंबर, १९२३:वैकोम, त्रावणकोर संस्थान, ब्रिटिश भारत  – १९ मे, १९९६:चेन्नई,तमिळनाडू, भारत )[२] या एकभारतीय अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. यांनी मुख्यत्वे मलयालम आणि तमिळ चित्रपटातून काम केले. आपले पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी २३ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. +जानकी यांचा जन्म त्रावणकोरच्या [३] कोट्टायम जिल्ह्यातील वैकोम गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचे मूळ तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही प्रदेशांत होते. यांचे वडील, राजगोपाल अय्यर, तामिळनाडूतील तंजावर येथील तमिळ ब्राह्मण होते. हे संगीतकार पापनासम शिवन यांचे भाऊ होते. [४] यांची आई नारायणी अम्मा वैकोमची होती. जानकी यांच्या आईवडीलांचे लग्न नव्हते झाले तर त्यांच्यात संबंधम नाते होते. त्यामुळे जानकी (''वैकोम नारायणी जानकी'') आणि त्यांची भावंडे आईच्या नावाने ओळखली जायची. +जानकीनेही वयाच्या १७व्या वर्षी अभिनेते गणपति भट (१९१५-७२) या ब्राह्मण गृहस्थांशी तिच्या आई-वडिलांप्रमाणेच संबंधम लग्न केले. जानकी आणि गणपती भट यांना सुरेंद्रन नावाचा मुलगा होता. [५] +जानकी यांनी मन्मथा विजयम (१९३९) [३] आणि सावित्री (१९४१) हे होते. १९४८मधील चंद्रलेखाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. [४] +जानकीने एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत राजा मुक्ती आणि मोहिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९६० पर्यंत आपली चित्रपट कारकीर्द थांबवली होते. रामचंद्रनच्या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर जानकी त्यांच्यासोबत रहायला लागली. [३] त्यांनी १९६२ मध्ये कायदेशीर विवाह केला. रामचंद्रन आणि जानकी यांनी जानकीच्या पहिल्या लग्नापासूनच्या मुलाला सांभाळले. [६] +जानकी सुरुवातीस राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हत्या. [२] रामचंद्रन यांनी अभिनेत्री जयललिता यांचासह त्यांच्या पक्षातील इतर तरुण नेत्यांना राजकीय जबाबदारीसाठी तयार केले होते. +१९८४मध्ये रामचंद्रन यांना पक्षाघाताचा झटका आल्यावर जानकी रामंचंद्रन आणि पक्षात मध्यस्थ झाल्या. १९८७मध्ये रामचंद्रनच्या निधनानंतर पक्षाच्या सदस्यांनी जानकी यांना त्यांची जागा घेण्यास सांगितले. [२] +मुख्यमंत्रीपद घेतल्यावर जानकी यांनी जानेवारी १९८८ मध्ये तामिळनाडूच्या आठव्या विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावेळी १९४ आमदारांची एआयडीएमके ३ गटात विभागली गेली होती. ३० आमदारांचा एक गट जयललिता यांना पाठिंबा देत होता तर १०१ आमदारांचा दुसरा गट जानकीला पाठिंबा देत होता. काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्देशानुसार तटस्थ मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी विधानसभेत मतदानाच्या दिवशी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र जानकीला पाठिंबा देणाऱ्या सभापतींने ती फेटाळून लावले. त्यांनी आदल्याच दिवशी जयललिता गटाच्या ३० आणि द्रमुकच्या १५ आमदारांना अपात्र ठरवले होते. मतदानाच्या वेळी विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा पाठिंबा पुरेसा असल्याचेही त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे २३४ आमदारांतून बहुमत न घेता जानकी यांच्या सरकारला फक्त १९८ आमदारांकडून बहुमत घ्यायचे होते. त्यांना १०१ मते पडली. सभापतींनी मतदान सुरू केल्यावर द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या सभागृहातच हाणामारी झाली आणि सभापतींसह अनेक जण जखमी झाले. सभापतींच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर सभापतींनी जानकी यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे एकतर्फी जाहीर केले. [७] +राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये त्यांचे सरकार बरखास्त करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३५६ चा वापर केला. त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या पुढील निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. एआयएडीएमकेच्या दोन गटांच्या एकत्रीकरणानंतर तिने राजकारण सोडले. [८] जानकी या काही मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांनी विधानसभेची कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही. [९] +१९ मे १९९६ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . रामापुरम, चेन्नई, तामिळनाडू येथील एमजीआर थोट्टम येथे तिच्या राहत्या घराशेजारी तिला दफन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3956.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca1b2f98b3f7d90ac75b543ff2f73b39b9ab3d66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3956.txt @@ -0,0 +1 @@ +व्यंकटरामा पंडित कृष्णमूर्ती (२६ नोव्हेंबर १९२३ - ७ एप्रिल २०१४) उर्फ व्ही. के. मूर्ती या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपटसृष्टीतील छायाकार होते.[१] एकेकाळी व्हायोलिन वादक आणि तुरूंगात बंदी होणारे स्वातंत्र्यसैनिक मूर्ती हे गुरू दत्तचे नियमित कॅमेरामन होते. त्यांनी भारतीय कृष्ण धवल चित्रपटातील काही उल्लेखनीय प्रतिमा प्रदान केल्या. कागज के फूल हा भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रीकरणही त्यांनी केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २००५ मध्ये आयफा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१० मध्ये त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_396.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0136f2b1186b0c1a06780e6a4b29dbb3ca6f600 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_396.txt @@ -0,0 +1,8 @@ + विर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3968.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95c107f56e617668aa1aeb2e6a5b6d9bddc9ad92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3968.txt @@ -0,0 +1 @@ +व्ही. विजयराघवन अलांपदन ( मार्च २३, इ.स. १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील पालघाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3973.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a77db1954535b3e26347348b00ffc8a6fc6db854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3973.txt @@ -0,0 +1 @@ +वेदांतम "व्ही." सत्यनारायण सर्मा (९ सप्टेंबर १९३५ - १६ नोव्हेंबर २०१२) हे कुचीपुडीच्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचा अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणारे एक भारतीय शास्त्रीय नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक होते. कुचीपुडी नृत्यात अनेक स्त्री भूमिका साकारण्यासाठी त्यांना ओळखले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3993.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4efffda27bf447a4285b418c91fd7a4ff02994d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_3993.txt @@ -0,0 +1,6 @@ +व्हीएम गिरिजा (जन्म २७ जुलै १९६१) एक भारतीय कवी आणि निबंधकार आहेत ज्या मल्याळम भाषेत लिहितात. त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत, ज्यात प्रेम - एक अल्बम हा त्यांच्या मल्याळममधील त्यांच्या काव्यसंग्रह प्राणायाम ओरलबम यांचा हिंदी अनुवाद आहे. केरळ साहित्य अकादमीने त्यांना कवितेसाठी २०१८ चा वार्षिक पुरस्कार प्रदान केला आणि त्या साहित्यासाठी "चांगमपुझा पुरस्कार" आणि "बशीर अम्मा मल्याळम पुरस्कार" प्राप्तकर्ता देखील आहे. विजयालक्ष्मी, अनिथा थाम्पी, बालमणी अम्म, सुगताकुमारी यांसारख्या समवयस्क कवयित्रींसोबतच, गिरिजा मल्याळम कवितेतील स्त्रीवाद सुरू ठेवण्यासाठी देखील ओळखल्या जातात. +वटाक्केप्पट्टू मनक्कल गिरिजा यांचा जन्म २७ जुलै १९६१ रोजी दक्षिण भारतीय केरळच्या राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील षोरणूर जवळील परुथिप्रा या गावी वडाक्केप्पट्टू वासुदेवन भट्टाथिरीप्पड आणि गौरी यांच्या घरी झाला.[१] [२] त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संस्कृत महाविद्यालय, पट्टांबी येथे झाले जिथून त्यांनी मल्याळममध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली व परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी लहान वयातच लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या सुरुवातीच्या कविता मातृभूमी वृत्तपत्राच्या "बालपंक्ति" भागामध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्यांनी १९८३ मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून सामील होऊन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९८९ मध्ये जेव्हा ते सुरू झाले तेव्हा कोची एफएम स्टेशनवर त्या कार्यरत झाल्या.[३] ३८ वर्षांच्या सेवेनंतर त्या २०२१ मध्ये कोची एफएममधून निवृत्त झाल्या.[४][५] रेडिओमध्ये काम करत असताना त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली भाषेतील नाटकांचे मल्याळममध्ये भाषांतरही केले.[६] +गिरिजाने दहा पुस्तके प्रकाशित केली आहेत त्यापैकी प्राणायाम ओरलबम [७] चे हिंदीत भाषांतर ए. अरविंदक्षण यांनी प्रेम-एक अल्बम या शीर्षकाखाली केले आहे.[८] जीवनजलम ( करंट बुक्स, २००४), [९] पावयुनु (साइन बुक्स, २००७), [१०] पेनुगल कानाथा पाथिरा नेरागल ( मातृभूमी बुक्स, २०११), [११] ओरिडाथोरिडाथोरिदाथु (करंट बुक्स, २०१२)[१२]पूचायुरक्कम (२०१४), कडलोरवेदु (लोगोस बुक्स, २०१५), [१३] पावयोनु ( केरळ शस्त्र साहित्य परिषद, २०१५), इरुपक्षम्पेदुमिंदुवल्ला न्जान, मुनू दीरखा कविथाकल[१४] (डीसी बुक्स, २०१५), बुद्धपौर्णीमा, आणि द ब्लॅक स्टोन हे नावाजलेले पुस्तके आहेत. द ब्लॅक स्टोन हे पीपी रवींद्रन यांनी केलेल्या तिच्या कवितांचा इंग्रजीत अनुवाद आहे.[१५] +त्यांनी सावित्री अंतर्जनमच्या कवितांचे संकलन एल्लारुदेयुम भूमी या पुस्तकाचे संपादनही केले आहे.[१६] त्यांनी जपानी भाषेतील () पंचारा ऑरेंज मरमचे भाषांतर इंग्रजीतून मल्याळम मध्ये केले आहे.[१] त्यांचे एक पुस्तक कालिकत विद्यापीठातील मल्याळममधील पदवी अभ्यासक्रमासाठी निर्धारित शैक्षणिक मजकूर आहे.[१७] +गिरिजाचा विवाह सी.आर. नीलकंदन यांच्याशी झाला आहे जे एक पर्यावरण कार्यकर्ते आहे. या जोडप्याला अर्द्रा नीलकंदन गिरिजा आणि अर्चा नीलकंदन गिरिजा या दोन मुली आहेत आणि हे कुटुंब कोचीमधील कक्कनाड येथे राहते.[१] +गिरीजा यांना बुद्ध पौर्णिमा या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी २०१८ चा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. [१८] [१९] त्यांना साहित्यासाठी "चांगमपुझा पुरस्कार" आणि "बशीर अम्मा मल्याळम पुरस्कार" देखील मिळाले आहेत. [२०] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4001.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81c34ead942f2a9cd29e21b076c86c32f0ff8ed1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4001.txt @@ -0,0 +1,3 @@ +वल्लीप्पन ओलागनाथन चिदंबरम पिल्लई तथा कप्पालोटिया तमिळन (५ सप्टेंबर, १८७२ - १८ नोव्हेंबर, १९३६) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते होते. +त्यांनी ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या (BISNC) मक्तेदारीशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी १९०६ मध्ये स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी [१] ची स्थापना केली. [२]त्यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी (SSNC) सोबत तुतीकोरीन (भारत) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान ब्रिटिश जहाजांशी स्पर्धा करत पहिली स्वदेशी भारतीय शिपिंग सेवा सुरू केली. भारतातील तेरा प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या तुतिकोरिन पोर्ट ट्रस्टचे नाव त्यांच्या नावावर आहे. +हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांच्यावर नंतर ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला आणि त्यां नाजन्मठेपेची शिक्षा सुनावून त्यांचा बॅरिस्टर परवाना रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4007.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2995e3c250afed021fd78f4d8aab20111c87cdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4007.txt @@ -0,0 +1 @@ +वेंगालील कृष्णन कृष्णमेनोन (मे ३, इ.स. १८९६- ऑक्टोबर ६, इ.स. १९७४) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९४७ ते इ.स. १९५२ या काळात भारताचे इंग्लंडमधील राजदूत होते. ते इ.स. १९५३ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आणि फेब्रुवारी ३, इ.स. १९५६ रोजी त्यांचा जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रीमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून समावेश झाला. ते इ.स. १९५७ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची काश्मीर प्रश्नावर बाजू मांडायला केलेले जानेवारी २३, इ.स. १९५७ रोजी केलेले आठ तासांचे भाषण संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात जास्त चाललेले भाषण आहे. एप्रिल इ.स. १९५८ मध्ये त्यांची भारताचे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९६२च्या चीनविरूद्धच्या युद्धात भारताच्या झालेल्या पराभवानंतर सर्वत्र होत असलेल्या टिकेमुळे त्यांना संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण ते इ.स. १९६९ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत ते केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून लोक्सभेवर निवडून गेले. त्यांचे ऑक्टोबर ६, इ.स. १९७४ रोजी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4024.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28bf97855e451fc68291a894b514808770a18877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4024.txt @@ -0,0 +1,7 @@ +विश्वनाथ प्रताप सिंग (जून २५, इ.स. १९३१ - नोव्हेंबर २७, इ.स. २००८) हे भारताचे दहावे पंतप्रधान (कार्यकाळ: डिसेंबर २, इ.स. १९८९ - नोव्हेंबर १०,इ.स. १९९०) होते. +सिंगचा जन्म २५ जून १९३१ रोजी, अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांना दोन मोठे भावंड होते.[१][२] लवकरच मांडा येथील राजा गोपाळसिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. १९४१ साली वयाच्या १० व्या वर्षी ते मांडाचे शासक झाले.[३] त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली.[४][५] +सिंग हे १९६९ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. १९७१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९७६-७७ मध्ये त्यांनी वाणिज्यमंत्री म्हणून काम पाहिले. +१९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधी जनता सरकारच्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडून आल्या तेव्हा त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सिंगची नियुक्ती केली. मुख्यमंत्री म्हणून (१९८०-८२) त्यांनी दरोडेखोरीवर जोरदार तडाखा लावला, ही समस्या दक्षिण व पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये तीव्र होती. १९८३ मध्ये त्यांनी या भागातील सर्वात भयावय दरोडेखोरांच्या आत्मसमर्पणांवर वैयक्तिकपणे नजर ठेवली. या समस्येवर योग्य आळोखा न घातल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवीली तेव्हा त्यांना बरीच अनुकूल राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. +१९८३ मध्ये वाणिज्यमंत्री म्हणून त्यांनी पुन्हा काम सुरू केले.[४] सिंग यांनी नंतर रथ यात्रेमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्याविरूद्ध अटक वॉरंट काढुन धैर्याने काम केले. +सिंग यांनी २ डिसेंबर १९८९ रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सिंग यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा सांभाळली. सिंग यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला संपविण्याचा निर्णय घेतला जे राजीव गांधींनी तामिळ फुटीरतावादी चळवळीचा मुकाबला करण्यासाठी पाठविले होते. काश्मिरी अतिरेक्यांनी तेव्हा गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद (जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री) यांच्या मुलीचे अपहरण केले. त्याच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली; त्यानंतर झालेल्या टीकेचे वादळ संपवण्यासाठी त्यांनी लवकरच भारतीय जनता पक्षाच्या आग्रहावरून जगमोहन मल्होत्रा ​​या माजी नोकरशहाची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. +सिंग यांनी स्वतः सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. या मंडल आयोगाने सुचविले की सार्वजनिक क्षेत्रातील सर्व नोकऱ्यांचा निश्चित कोटा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या सदस्यांसाठी राखीव असावा. या निर्णयामुळे उत्तर भारतातील शहरी भागातील उच्चवर्णीय तरुणांमध्ये व्यापक निषेधाचे वातावरण निर्माण झाले. २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4032.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e0c0e91ce9ebc92e90d3899e7526414c81f692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4032.txt @@ -0,0 +1 @@ +व्ही.मणिकंडन (तमिळ:வி.மணிகன்டன்) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4093.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd6095214c5e2432838144f17a4576f3d8356d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4093.txt @@ -0,0 +1,3 @@ +व्हॅन वर्ट काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +व्हॅन वर्ट काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4100.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9283b7f16355264a27f53d81b5e7e3fe53feb126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4100.txt @@ -0,0 +1 @@ +व्हॅलमै स्लॅटर (१६ जानेवारी, १९३३:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] Slater played one test for the Australia national women's cricket team.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4131.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5116b33b9fd7a0f2700d5aafff49d801d9e08d8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4131.txt @@ -0,0 +1 @@ +व्हॅलेन्स (लॅटिन:फ्लाव्हियस जुलियस व्हॅलेन्स ऑगस्टस: इ.स. ३२८ - ९ ऑगस्ट, इ.स. ३७८) हा इ.स. ३६४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4152.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b52f41a9082047348158a3c058f253aab25acba --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4152.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हेंचुरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र व्हेंचुरा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,४३,८४३ इतकी होती.[२][३] व्हेंचुरा काउंटी ऑक्सनार्ड-व्हेंचुरा-थाउजंड ओक्स नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १ जानेवारी, १८७३ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4165.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87ad78f135c15130cf09e3eb85547a31b82f5842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4165.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. याची सुरुवात १९३२ साली करण्यात आली. +व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात संत तुकाराम हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_417.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d13f6a7380588ceda008bc8df5b8123535130df --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_417.txt @@ -0,0 +1,2 @@ +विरमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4172.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b4193a35e0bc48e4c55b8de586371c9f510699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4172.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हेनिसचे प्रजासत्ताक हे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये स्थापन झालेले मध्य युगातील एक राष्ट्र होते. एका सहस्त्रकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेले व्हेनिस प्रजासत्ताक जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांपैकी एक मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4180.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c6a8bc20f37a85cde382461a12ffbb998e88d81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4180.txt @@ -0,0 +1 @@ +व्हेनेझुएलाचा ध्वज. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4197.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aea99d3a5bd0781f1312ade6237cef948db2393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4197.txt @@ -0,0 +1,2 @@ + +व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; ७ सप्टेंबर, इ.स. १९८४ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिस खेळाडू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4226.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74bd4442daa839a09b2821d7278beb6425d4d2ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4226.txt @@ -0,0 +1 @@ +व्हर्दुनची लढाई पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांस आणि जर्मनी मध्ये लढली गेलेली लढाई होती. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर, इ.स. १९१६ दरम्यान झालेली ही लढाई या महायुद्धातील सगळ्यात मोठ्या लढायांपैकी एक होती. सुमारे २४ लाख सैनिकांनी भाग घेतलेल्या या लढाईत ३ लाखांहून अधिक सैनिक मृत्युमुखी पडले तर इतर ६ लाखांपेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. नऊ महिने आणि २७ दिवसांनतर जर्मनीने माघार घेतल्यावर फ्रांसचा यात विजय झाला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4227.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf9f2dacaffc698f269f04f1f0e83cb09224b2a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4227.txt @@ -0,0 +1 @@ +सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात. हा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4228.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce095f0f65e583079a219344c7154c80b781e005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4228.txt @@ -0,0 +1 @@ +सीटॅसिया या वर्गातील सर्व जलचर सस्तन प्राण्यांना देवमासा म्हणतात. सीटॅसिया वर्गातील सर्वांना जरी देवमासा म्हणतात, तरी बऱ्याचदा Odontoceti या उपवर्गातील डॉल्फिन व गाधामासा(डॉल्फिन सारखाच, ज्याला इंग्रजीत पॉर्पॉइज म्हणतात) यांना त्यातून वगळण्यात येते. या उपवर्गामधे स्पर्मव्हेल, किलरव्हेल, व बेलुगा व्हेल हे देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4233.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..499d23d90836fb9c1f15c2dba8d18433352477a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4233.txt @@ -0,0 +1 @@ +वल्मा बॅटी (२५ सप्टेंबर, १९२८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - नोव्हेंबर, १९९५:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५१ ते १९६१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4257.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..861a6757e35a458d8d29e7c790c30c4d67a9179f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4257.txt @@ -0,0 +1,104 @@ +व्हॉझ (फ्रेंच: Vosges) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला येथील व्हॉझ ह्या पर्वतरांगेवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. येथील दॉम्रेमी हे गाव जोन ऑफ आर्कचे निवासस्थान होते. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4258.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4cc368af9e5caccf3d6645517a9b93c43a5ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4258.txt @@ -0,0 +1,3 @@ +व्हॉट इफ...? ही त्याच नावाच्या मार्वल कॉमिक्स मालिकेवर आधारित डिझ्नी+ या स्ट्रीमिंग सेवेसाठी एसी ब्रॅडलीने तयार केलेली अमेरिकन अ‍ॅनिमेटेड अँथॉलॉजी मालिका आहे. मार्व्हल स्टुडिओद्वारे निर्मित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मधील ही चौथी दूरचित्रवाणी मालिका आहे आणि मार्व्हल स्टुडिओ अ‍ॅनिमेशनमधील स्टुडिओची पहिली अ‍ॅनिमेटेड मालिका आहे. ही मालिका मल्टीवर्समध्ये पर्यायी समयरेखा दाखवते, जिथे मार्व्हेल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटांमधील प्रमुख क्षण वेगळ्या प्रकारे घडल्यास काय होईल हे दाखवले आहे. ब्रॅडली पहिल्या दोन सीझनसाठी प्रमुख लेखक म्हणून काम करतो तर ब्रायन अँड्र्यूज दिग्दर्शन करतात. +जेफ्री राईट वॉचरच्या भूमिकेत आहे, जो मालिका कथन करतो. अनेक MCU चित्रपट अभिनेते त्यांच्या भूमिकेची पुनरावृत्ती करतात. मार्व्हेलने २०१८ च्या अखेरीस डिझ्नी+ साठी ब्रॅडली आणि अँड्र्यूजसह मालिकेची निर्मिती सुरू केली. एप्रिल २०१९ मध्ये त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पहिल्या सीझनसाठी अ‍ॅनिमेशन ब्ल्यू स्पिरिट, स्क्वीझ, फ्लाइंग बार्क प्रॉडक्शन आणि स्टेलर क्रिएटिव्ह लॅब द्वारे प्रदान केले आहे. स्टीफन फ्रँक अ‍ॅनिमेशन प्रमुख आहेत. +व्हॉट इफ...चा पहिला सीझन ११ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित झाला आणि MCU च्या चौथ्या टप्प्याचा भाग म्हणून ६ ऑक्टोबरपर्यंत नऊ भाग चालवले. दुसरा नऊ-एपिसोडचा सीझन डिसेंबर २०२३ च्या उत्तरार्धात फेज फाईव्हचा भाग म्हणून प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे आणि तिसरा सीझन विकसित होत आहे. मालिकेला आवाज अभिनय, अ‍ॅनिमेशन, सर्जनशील कथानक आणि परिदृश्यांसाठी प्रशंसासह सामान्यतः सकारात्मक पुनरावलोकने मिळाली आहेत, जरी भागांची लांबी आणि लेखन यावर काही ठिकाणी टीका झाली. मार्वल झोम्बी मालिका जी व्हॉट इफ...? च्या काही भागांवर आधारित आहे, ती विकासाची टप्प्यात आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4280.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4098a73ee14e3a96b6aa3ccbd5aff95d6e4ad60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4280.txt @@ -0,0 +1,4 @@ +व्होटाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १२ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७५ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३८९ लोकसंख्येपैकी २०८ पुरुष तर १८१ महिला आहेत.गावात २७२ शिक्षित तर ११७ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १५८ पुरुष व ११४ स्त्रिया शिक्षित तर ५० पुरुष व ६७ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.९२ टक्के आहे. +खानापूर, कोप्रा, केंद्रेवाडी, सोनखेड, विलेगाव, मानखेड, धानोरा बुद्रुक, सटाळा, हिप्परगा, पाटोदा, पारचंडा ही जवळपासची गावे आहेत.विलेगाव ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4300.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b9e550a49854e9efd598ca65c0c8ee86f34b17e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4300.txt @@ -0,0 +1,3 @@ +वोरोनेझ ओब्लास्त (रशियन: Воронежская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4347.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ca8a2c4109879f213ab3e471ea535417c1a584c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4347.txt @@ -0,0 +1 @@ +शंकर बळवंत चव्हाण (१७ एप्रिल, इ.स. १९०३ - ?) हे एक मराठीतील निसर्गकविता, शृंगारिक प्रेमकविता आणि सामाजिक व ऐतिहासिक नाटके लिहिणारे लेखक होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_437.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f6acd583883d01de04c98f7482dfb9467452f14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_437.txt @@ -0,0 +1 @@ +विराटनगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4399.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d81775e61011fa5e0e4436f97072117683a17a17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4399.txt @@ -0,0 +1 @@ +शंकर बाळकृष्ण दीक्षित (२१ जुलै, १८५३:मुरुड, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - २७ एप्रिल, १८९८:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी ज्योतिर्विद, खगोलशास्त्राचे अभ्यासक व ग्रंथलेखक होते. त्यांनी बारा वर्षे सायनपंचांग चालवले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_441.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ffb80938666487820724448b19dffb9e2cdd752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_441.txt @@ -0,0 +1 @@ +विराफ पटेल (जन्म १२ जून १९८०) एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि पटकथा लेखक आहे. ते १९९९ ते २००४ दरम्यान मर्चंट नेव्हीमध्ये खलाशी होते आणि त्यांना २००५ मध्ये द ग्रासिम मिस्टर इंडिया ही पदवी मिळाली होती. माही वे, किस्मत, तेरी मेरी लव्ह स्टोरीज आणि एक बूंद इश्क या मालिकांमधील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4423.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..738e09cb41252af44915cc997dc8b514dae111b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4423.txt @@ -0,0 +1,7 @@ +शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते. +हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत. + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4440.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd6a3c0b6bba083295cc356b52a7f214ea2ea6e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4440.txt @@ -0,0 +1 @@ +एस.एम. पंडित यांचे बालपणीचे कलाशिक्षक. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4454.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..049fa06d469ea202e4412afc2a8b8a171b3c3f44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4454.txt @@ -0,0 +1,2 @@ +शंकरराव धुमाळ हे एक मराठी शेतकरी होते. शिक्षण आणि सहकार हीही त्यांची कार्यक्षेत्रे होती. +डॉ. अश्विनी घोरपडे यांनी त्यांच्या जीवनावर कर्मवर्धन आबा आणि स्मृतिवर्धन आबा या नावांची दोन पुस्तके लिहिली आहेत. पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनने ती प्रसिद्ध केली आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4523.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dbc64d84133b67f59a29c0c66bd007d77af4c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4523.txt @@ -0,0 +1 @@ +शंभुराज देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागाचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर पाटण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4528.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7641c377f803697c785c71ab5837e0709cc4871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4528.txt @@ -0,0 +1,2 @@ +शाका झुलू (१७८७ - १८२८) हा दक्षिण आफ्रिका परिसरातील झुलू लोकांचा पुढारी व १८१६ ते १८२८ दरम्यान झुलू राजतंत्राचा राजा होता. त्याला आजवरचा सर्वात प्रभावशाली झुलू राजा मानले जाते. शाकाच्या नेतृत्वाखालील झुलू राजतंत्राने मोठ्या भूभागावर सत्ता चालवली. हा भूभाग सध्या दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांताचा भाग आहे. +शाकाला झुलू समाजामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय दिले जाते. तसेच त्याने अनेक नव्या युद्धपद्धतींचा अंगिकार केला ज्यामुळे झुलू लष्कर सामर्थ्यवान बनले. आजही दक्षिण आफ्रिकेमधील संस्कृतीवर शाकाचा पगडा जाणवतो. डर्बनच्या किंग शाका आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचेच नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4536.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca4b7fe4bae4816308f4ad7a5fa2e0abb8350a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4536.txt @@ -0,0 +1,4 @@ +हे शिवकाळातील दस्तऐवज होय. +शिवकाळात काही प्रसिद्ध घराण्यात ऐतिहासिक घटना स्मरणाने लिहून ठेवण्याची पद्धती होती.अशा एकत्रित नोंदी असणाऱ्या कागदांना 'शकावली'असे म्हणतात. जेधे शकावली, घोडेगावकर शकावली,सहा कलमी शकावली इत्यादी काही शकावली आहेत. +https://m.youtube.com › watch +शकावल्या म्हणजे काय? - YouTube diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4541.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4b25a1703b57b8777ee5d333b35b7d4ad35a12e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4541.txt @@ -0,0 +1 @@ +शकिरा एक प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4561.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4f7cf8c00c7cf7f009e960bc554b5da2e7669c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4561.txt @@ -0,0 +1,7 @@ + +शकुंतलाबाई परांजपे यांचा (जन्म : १७ जानेवारी १९०६; - ३ मे २०००) या त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. +शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्‌सी. झाल्या. रँग्लर र.पु. परांजपे या आपल्या वडिलांसारखे त्यांना रँग्लर व्हायचे होते. त्यासाठी १९२६मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या. +केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. पॅरिस आणि कोलोन येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड ट्रायपास पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली. त्यांनी १० वर्षे युरोपमध्ये राहून जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिसमध्ये काम करून अनुभव मिळविला. त्या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते. व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. [१] +त्यांचे वडील रँग्लर परांजपे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक, उच्चशिक्षित व वाचनव्यासंगाने परिपूर्ण होते. +युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.[२] सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पर्स्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. +संततिनियमनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१९९१) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4568.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece38757a2196ceef1a455b367f15a139c027f32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4568.txt @@ -0,0 +1 @@ +शकुंतला गोगटे (१९३० - नोव्हेंबर ५, १९९१) ह्या मराठी लेखिका होत्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4576.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ee01076f951721d12e52773083586691f825fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4576.txt @@ -0,0 +1,2 @@ +शकुनी हा गांधार देशाचा राजपुत्र व धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिचा सख्खा भाऊ होता. गांधारी व धृतराष्ट्राच्या विवाहानंतर शकुनीने गांधारीच्या प्रेमाखातर हस्तिनापूरमधे कायमचे वास्तव्य केले. +शकुनी द्युत या खेळामधे निपुण होता. आपला भाचा दुर्योधन याला हस्तिनापूरचे राज्य मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे शकुनीने पांडवांना द्युतासाठी आमंत्रित केले व हरवले. यामुळे पांडवांना राज्यत्याग करून बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट पाळावी लागली.शकुनी कडील पासे हे त्याच्या वडिलांच्या पाठीच्या हाडांचे होते ,व ते शकुनी च ऐकत diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_458.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..032465ce0f79da60e5d7d4ac00f751443bf670c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_458.txt @@ -0,0 +1 @@ +विरुधुनगर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4583.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6afdc50b71d40953658b88db2b253bf0d9cd407b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4583.txt @@ -0,0 +1 @@ +शालिवाहन शक १६३७ या शकाविषयीचा हा लेख आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4621.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7cb0189a47ba0b6e1b76bd1ab97efbd2ebc8ffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4621.txt @@ -0,0 +1 @@ +शक्र व्रत हे इंद्रलोक/शक्रलोक (स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी इंद्र देवतेच्या पूजनाचे एक हिंदू धार्मिक व्रत आहे. आश्विन शुक्ल पंचमीला शक्रव्रताची सुरुवात करता येते आश्विन पौर्णिमेस उपवास करून इन्द्र, इंद्र पत्‍नी शची, ऐरावत, वज्र, मातुलिंग (मातलि) यांची गंध इत्यादींनी पूजा केली जाते. शक्रव्रत एक वर्ष पर्यंत केले जात असे. यात जेवण खुल्या आकाशाखाली केले जाई.. व्रताच्या शेवटी हरीण आणि गाईच दान करत.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_466.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91055af2327c0fb4ccf8d663626aa55ad760cbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_466.txt @@ -0,0 +1,22 @@ + +हिंदू धर्म +त्रिमूर्ती +इतर हिंदू देवता +संज्ञा +पुरूषार्थ +निर्वाण +वेद +उपवेद +पुराण +इतर +उपासना +संस्कारविधी (सोळा संस्कार) +हिंदू सण (विस्तृत माहिती) +विरुपाक्ष मंदिर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे आहे. हे हंपी येथील स्मारकांच्या समूहाचा एक भाग आहे, युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे. हे मंदिर शिवाचे रूप असलेल्या श्री विरुपाक्षाला समर्पित आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या प्रौढ देवराया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शासक दुसऱ्या देवरायाच्या सरदार (नायक) लक्कन दंडेशाने बांधले होते. [१] +विजयनगर साम्राज्याची राजधानी असेलेले हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या (पम्पा होल/पम्पा नदी) काठावर वसले आहे. विरुपाक्ष मंदिर हे येथील मुख्य तीर्थक्षेत्र आहे. या परिसराला अनेक शतके पवित्र अभयारण्य मानले गेले आहे. हंपीचे अवशेष आजही त्यामुळे अबाधित आहेत. येथील मंदिरांमधून अजूनही उपासना होते. तुंगभद्रा नदीशी संबंधित असलेल्या स्थानिक देवी पंपादेवीची पत्नीचे एक मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. त्याला विरुपाक्ष/पम्पा पाथी म्हणून ओळखले जाते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नालागामापल्ले नावाच्या गावात विरुपाक्षिणी अम्मा मंदिर (माता देवी) आहे. +या मंदिराला सुमारे ७व्या शतकापासून अखंड इतिहास आहे. विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी येथे हलविण्या आधीपासूनच विरुपाक्ष-पम्पा अभयारण्य अस्तित्वात होते. येथे ९व्या आणि १०व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत. [२] विजयनगरच्या साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबर त्याची व्याप्ती वाढली. मंदिराच्या बहुतेक इमारती विजयनगर काळातील असल्या तरी मंदिराच्या चालुक्य आणि होयसाळ कालखंडात मंदिरात काही भर घालण्यात आली होती. विजयनगर साम्राज्याचा शासक दुसरा देवराया याच्या अधिपत्याखाली लक्काना दंडेश या सरदाराने भव्य मंदिराची इमारत बांधली होती. [१] +विरूपाक्ष मंदिराच्या छतावरील चित्रे चौदाव्या आणि सोळाव्या शतकातील आहेत. [३] १५६५मध्ये मुसलमानांच्या आक्रमणात शहराचा विनाश झाला परंतु विरुपाक्ष-पम्पाची ही मंदिरे अबाधित राहिली. १९व्या शतकाच्या सुरुवातीस यांची मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार झाले तसेच काही इमारतीही बांधल्या गेल्या. यांत उत्तर आणि पूर्व गोपुराच्या काही तुटलेल्या बुरुजांचा जीर्णोद्धार करणे समाविष्ट होते. +विरुपाक्षाच्या मुख्य मंदिरात एक गर्भगृह, तीन बाहेरचे कक्ष, एक खांब असलेला सभामंडप आणि एक खांब असलेला खुला सभामंडप आहे. या खांबांवर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. याशिवाय मुख्य मंदिराच्या आसपास अजून एक खांब असलेला मंडप, प्रवेशद्वार, अंगण, लहान देवळे आणि इतर छोट्या इमारती आहेत. [४] +उत्तरेकडील कनकगिरी गोपुर नावाचे गोपुर एका छोट्या देवस्थान असलेल्या एका तटबंदीला लागून आहे. ही तटबंदी तुंगभद्रा नदीपर्यंत जाते. [५] +या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी गणिती संकल्पनांचा केलेला वापर आहे. मंदिरामध्ये फ्रॅक्टल्सची संकल्पना अनेक ठिकाणी वापरलेली आहे. मंदिराचा मुख्य आकार त्रिकोणी असून मंदिराच्या वरच्या बाजूला पाहता नक्षिकाम विभाजित होउन त्यांची पुनरावृत्ती होते. हे निसर्गात स्नोफ्लेक आणि इतरत्रही दिसून येतात. [६] +डिसेंबरमध्ये विरूपाक्ष आणि पंपाच्या लग्नोत्सवासाठी येथे प्रचंड होते. तसेच येथे फेब्रुवारी महिन्यात रथोत्सव साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4669.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc1ce23fe3245ec034fd21fef38d42ffce63a22c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4669.txt @@ -0,0 +1 @@ +माओ दुन या टोपणनावाने ओळखला जाणारा शेन यान्बिंग ऊर्फ शेन दहोंग (देवनागरी लेखनभेद: माओ तुन/ शन दहोंग/शन यान्बिंग; सोपी चिनी लिपी: 茅盾; पिन्यिन: Mao Dun;) (जुलै ४, १८९६ - मार्च २७, १९८१) हा चिनी कादंबरीकार, पत्रकार, समीक्षक होता. १९४९ ते १९६५ सालांदरम्यान त्याने चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4677.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe22ec893d3308ed67c1df4845a836e145e6ef49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4677.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनीदेवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो. +या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात.वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे. +येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते. + +हवाई मार्ग : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे. +रेल्वेमार्ग : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्थानक श्रीरामपूर आहे. +रस्ता मार्ग : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम. +http://www.shanishinganapur.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4693.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f46ebec8f727f22faabba373ec087b41423b482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4693.txt @@ -0,0 +1,9 @@ +शनीचे उपग्रह प्रचंड आहेत, १ किमी व्यासाच्या उल्कांपासून ते प्रचंड टायटनपर्यंत. टायटन आकाराने बुधाहूनही मोठा आहे. शनीला ६२ निश्चित कक्षा असलेले उपग्रह, नावे असलेले ५३ आणि ५० किमीपेक्षा जास्त व्यास असलेले फक्त १३ उपग्रह आहेत. +शनी ग्रहाचे चंद्र असंख्य आणि विविधतापूर्ण आहेत. एक गोलाकार पिवळा-तपकिरी शरीर (शनि) डावीकडे दिसू शकतो. हे त्याच्या विषुववृत्तीय विमानासंबधीच्या संदर्भात तिरकस कोनात पाहिले जाते. शनीच्या सभोवती रिंग्ज आणि लहान रिंग चंद्राचा असतो. उजव्या मोठ्या गोल चंद्राच्या दिशेने त्यांचे अंतर क्रमाने दर्शविले जाते. शनि, त्याचे रिंग्ज आणि मोठे बर्फाळ चंद्रमा-मिमास ते रिया पर्यंत अग्रभागांमध्ये सहा राउंड पूर्णतः प्रकाशित झालेल्या आणि काही लहान अनियमित वस्तू आहेत. मोठे अर्धपुतळ शरीर हे दृश्यमान अंशतः अंधुक झालेला उत्तर धोंड्याभोवती परिपत्रक मेघ बँडच्या पार्श्वभूमीमध्ये दर्शविले आहे. +शनिचे अनेक चंद्रमाचे छायाचित्र. डावीकडून उजवीकडे: मिमास, एन्सेलॅडस, टेथिस, दुऑन, रिया; पार्श्वभूमीत बुद्धिमत्ता; (वरच्या उजव्या) आणि अनियमितपणे आकार असलेले हायपरियन (खालच्या उजव्या). काही लहान चंद्रमा देखील दर्शविल्या जातात. मोजण्यासाठी सर्व शनीचे चंद्रमार्ग असंख्य आणि वैविध्यपूर्ण आहेत,ज्यात 1 किलोमीटर पेक्षा कमी विशाल टाइटनपर्यंतच्या लहान चंद्राच्या चांदण्यांमधील ग्रह आहे, जे बुध बुधपेक्षा मोठे आहे. शनिमध्ये 62 चंद्रमाशांच्या पुष्टी केलेल्या कविते आहेत, 53 पैकी ज्याचे नाव आहे आणि त्यातील 13 केवळ 50 किलोमीटरपेक्षा जास्त व्यास आहेत, तसेच त्यांच्या स्वतःच्या जटिल कक्षीय हालचालींच्या घळीच्या रिंग आहेत. सात शनीयान चंद्राचे आकार मोठे असल्यासारखे मोठे आहेत, परंतु त्यापैकी केवळ दोन, टायटन आणि रिया सध्या हायड्रोस्टॅटिक समतोलतेमध्ये आहेत. सॅटर्नच्या चंद्रामध्ये विशेषतः उल्लेखनीय म्हणजे टायटन, सौर उर्जामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या चंद्रा (बृहस्पतिच्या गॅनिमेड नंतर), नायट्रोजन-समृद्ध पृथ्वी सारखी वातावरण आणि कोरड्या नदीचे नेटवर्क्स आणि हायड्रोकार्बन तलाव असलेले एक भूभाग सौर यंत्रणामध्ये कुठेही आढळत नाही; आणि एन्सेलॅडसची रासायनिक रचना केल्यापासून धूमकेतूसारखीच असते विशेषतः एन्सेलॅडसने दक्षिण ध्रुवाच्या पाण्याखाली द्रव पाण्याची उपस्थिती दर्शविली आहे असे गॅस आणि धूळचे जेनेट्स सोडते आणि संभाव्यतेला त्याच्या पृष्ठभागाखाली जागतिक महासागराकडे जाण्याची शक्यता आहे. +शनिचे चंद्राचे चंद्राचे नियमित उपग्रह असतात; त्यांच्याकडे सर्जनच्या विषुववृत्ताच्या विमानास फारशी कल्पना नसलेल्या प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये सात प्रमुख उपग्रह समाविष्ट आहेत, ज्यामध्ये मोठ्या चंद्रासह ट्रोजन कक्षामध्ये अस्तित्वात असलेले दोन लहान चंद्रमा, दोन परस्पर सह-कक्षीय चंद्र आणि दोन उपग्रह आहेत जे शनीच्या फॅ रिगच्या पाळक म्हणून काम करतात. शनीच्या गोल कड्यामध्ये अंतर असणाऱ्या इतर दोन नियमित उपग्रहांची कक्षा. तुलनेने मोठ्या Hyperion टायटन एक अनुनाद मध्ये लॉक केले आहे उर्वरित नियमित चंद्राच्या कक्षेत अिंगच्या बाह्य आवरणाजवळ, जी रिंगमध्ये आणि मुख्य चंद्रमा मिमास आणि एसेलॅडसच्या दरम्यान. नियमित उपग्रहांना परंपरागततः टायटन्स आणि टाइटनेस किंवा त्यानंतर पौराणिक शनिशी संबंधित इतर आकृत्यांचे नामकरण केले जाते +उर्वरित 38, केवळ एक वगळता सर्व लहान आहेत, अनियमित उपग्रह आहेत, ज्यांचे कर्कश शनिपासून बरेच दूर आहेत, उच्च प्रलोभन आहेत, आणि प्रोग्रॅड् आणि प्रतिगामी लोकांमध्ये मिसळले जातात. हे चंद्रमार्ग कदाचित लहान ग्रह ग्रहण केले जातात, किंवा त्यांना पकडले गेल्यानंतर अशा मृतदेहांच्या ढिगाऱ्यापासून मोडकळीस मिळविले गेले, टक्कर कुटुंब बनवणे अनियमित उपग्रहांना त्यांच्या कक्षीय वैशिष्ट्यांत, इनुइट, नॉर्स आणि गॅलिक गटांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे आणि त्यांची नावे संबंधित पौराणिक कथांमधून निवडली जातात. अनियमित चंद्रातील सर्वात मोठा चांद्र चांदणीचा ​​चांभोहा, फॉइ आहे, 19 व्या शतकाच्या शेवटी साप +शनीच्या आतील रत्ने थोड्या शेकडो मीटरपासून सूक्ष्म ते माशाच्या आकाराच्या वस्तू घेऊन असतात, प्रत्येक शनिवारी स्वतःच्या कक्षेत असतात.अशाप्रकारे शनिनिअन चंद्रमाची एक निश्चित संख्या दिली जाऊ शकत नाही, कारण अनफिनिश्ड लहान अनामिक वस्तूंची ज्यामध्ये शनीचा रिंग सिस्टीम बनली आहे आणि चंद्रासाठी नाव असलेल्या मोठ्या वस्तू दरम्यान कोणतीही उद्दीष्ट सीमा नाही. रिंगमध्ये एम्बेड केलेल्या 150 पेक्षा जास्त चांदणींना आसपासच्या रिंग साहित्यात निर्माण होणा-या गोंधळातून आढळून आले, तरी ही अशा वस्तूंच्या एकूण लोकसंख्येचा केवळ एक लहानसा नमूनाचा मानला जातो. +ज्या काळात दुर्बिणीतून फोटो काढता येत नसत, त्याकाळीही शनीच्या आठ उपग्रहांचा शोध लागला होता. १६५५ साली टायटनचा शोध, टेथिस, डायोन, ऱ्हिआ यांचा १६७१-७२ साली लागलेला शोध, मिमास-एन्सेलाडस यांचा १७८९ साली शोध. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4704.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e6c9408f216f410dacc8fee45324463e7a661c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4704.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 41°44′N 123°53′E / 41.733°N 123.883°E / 41.733; 123.883 + +षन्यांग (मराठी नामभेद: शन्यांग, शेनयांग ; चिनी: 沈阳; फीनयीन: Shěnyáng ;), किंवा मुक्देन (मांचू: ), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग (चिनी: 盛京) किंवा फेंगथ्यॅन विषय (चिनी: 奉天府) या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी येथे राजधानीचे ठाणे मांडून छिंग घराण्याने येथून सत्ता चालवली. +प्रशासकीय दृष्ट्या षन्यांगास उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून हे वायव्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले षन्यांग चीनच्या जपान, रशिया व कोरिया ह्या देशांसोबतच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4720.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb5bd66d0cc32a2396f8224181310e6656fcc266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4720.txt @@ -0,0 +1,2 @@ +शबनम राय (२३ ऑगस्ट, १९९९ - ) ही  नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4759.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b0a6c634a4a746c24e0cfa48940de5861180058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4759.txt @@ -0,0 +1,4 @@ +शेमलेस ही एक अमेरिकन कॉमेडी-ड्रामा दूरचित्रवाणी मालिका आहे जी ९ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली.[१][२] +मालिका आयरिश अमेरिकन कुटुंबातील आहे. मोठी मुलगी फियाना ही तिच्या पाच भाऊ आणि बहिणींकडे पालकांची भूमिका घेते. लिप, इयान, डेबी, कार्ल आणि लियाम शिकागोच्या दक्षिण बाजूने जीवनाचा सामना करतात. प्रत्येक भाग ही आणखी एक वेडसर परिस्थिती आहे ज्यामध्ये गॅलॅगर सहापैकी एक किंवा अधिक प्रवेश करतात.[३] +अधिकृत संकेतस्थळ +शेमलेस आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4776.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025475c684b9379772fce1d81de013ae524f24c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4776.txt @@ -0,0 +1 @@ +शमिलिया शाँटेल कॉनेल (१४ जुलै, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4777.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025475c684b9379772fce1d81de013ae524f24c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4777.txt @@ -0,0 +1 @@ +शमिलिया शाँटेल कॉनेल (१४ जुलै, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4796.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2846fee7639b925a179639d32120a3388d6492d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4796.txt @@ -0,0 +1,31 @@ +शरद गोविंदराव पवार (१२ डिसेंबर १९४०)  हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत. +शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार हे त्यांचे पुतणे, रोहित राजेंद्र पवार आणि चि.युगेंद्र श्रीनिवास पवार हे पुतण्याचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. [१] [२] [३] [४] [५] +राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. [६] ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. [७] +२०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. +पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे साहेबांचे मुळगाव,शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. [८] बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत. +त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.[९] +इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. +इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला. +सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली. +१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते. +इ.स. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. १९८५ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. +इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली. +नोव्हेंबर इ.स. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. +जानेवारी इ.स. १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला. +इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. +नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून इ.स. १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च इ.स. १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली. +पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६००हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात चेंगराचेंगरी होऊन ११४ लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला. [१०] +राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या. +जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. +१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, '१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,'उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे' या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. +त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. +इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली. +इ. स्. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५४ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता. + +2023 अजित पवारांचे बंड : जुलै 2023 मध्ये, अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री [११]म्हणून शपथ घेतली, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला की ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत,[१२] +राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत. +पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे - + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4844.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3257bc28d8492a7efb702b28004b244846aaabce --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4844.txt @@ -0,0 +1 @@ +शरद बनसोडे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असलेल्या शिरोळे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये सोलापूर मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4874.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f13bbb189ad28604b6ba464d2b59cf6d2bd152a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4874.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोविंदराव कुलकर्णी (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२९; मृत्यू : कोल्हापूर, ११ डिसेंबर २०१४) हे एक मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्‍नीचे नाव विजया. डॉ. चारुहास भागवत व इंजिनिअर उमेश भागवत ही त्यांची मुले. +गोविंद कुलकर्णी यांचे मूळ नाव शरदचंद्र लक्ष्मण भागवत. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाविषयी ओढ होती. कुटुंबीयांचा सिनेमात काम करण्यास विरोध असल्याने आणि वडिलांनी सिनेमासाठी मूळ नाव लावायचे नाही, अशी ताकीद दिल्याने त्यांनी गोविंद कुलकर्णी हे नाव घेतले. त्याच नावाने दिग्दर्शक, निर्माता म्हणून नाव कमवले. गोविंदराव कुलकर्णी यांनी व्ही. शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही केली होती. +अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते काही काळ संचालक होते. +कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले दादा कोंडके यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वीस सिनेमांचे दिग्दर्शन व सहा सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. +. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4886.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85261783c3d0914164f4ab24d9b88fd973cb51d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4886.txt @@ -0,0 +1,44 @@ + + + +शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंडमधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे. +१८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या होम्सवर डॉयल यांनी ४ कादंबऱ्या आणि ५६ लघुकथा लिहिल्या. “अ स्टडी इन स्कार्लेट” ही पहिली कादंबरी “बीटन्स ख्रिसमस ॲन्युअल” नावाच्या वार्षिकात १८८७ या वर्षी प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी “द साइन ऑफ फोर”, 'लिपिनकॉट्‌स मंथली मॅगेझीन' या मासिकेत १८९० साली प्रकाशित झाली. या नंतर इ.स.१८९१ ते १९२७ पर्यंत “द स्ट्रँड मॅगझीन” मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथांमधून होम्स या पात्राला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कथानकातील घटना १८८० ते १९१४ या कालावधीत घडतात. +शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही मराठी कथांमधे, उदाहरणार्थ भा.रा. भागवतांची पुस्तके, शेरलॅाकला "शरलॅाक" असे संबोधलेले दिसते. +डॉयल यांनी या कथा, होम्सचे सहकारी, मित्र आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत आहेत, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. एकूण कथांपैकी केवळ चार वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात. राहिलेल्या चार पैकी दोन कथांचे कथन स्वतः होम्स करतात आणि दोन कथा तृतीय-पुरुष दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्या आहेत. +शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे डॉयल यांनी नमूद केले आहे. डॉयलनी जोसेफ बेल यांच्या एडिंबरो रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असत. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्‍री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांंमुळे सर आर्थर यांना गुन्हे अन्वेषणासाठी वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड मिळाली. +डॉयल यांनी लिहिलेल्या कथांमध्ये होम्सच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अथवा नातेवाइकांबद्दल खूप कमी माहिती मिळते. “हिज लास्ट बो” या कथेतील घटना १९१४ मध्ये घडतात. या कथेमध्ये होम्सचे वय ६० वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे. यावरून होम्सचे जन्म १८५४ मध्ये झाल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'द न्यू ॲनोटेटेड शेरलॉक होम्स”चे लेखक लेस्ली क्लीन्जर यांनी होम्सची जन्मतारीख ६ जानेवारी असल्याचे म्हटले आहे. +सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून काढायचे निष्कर्ष यांचा अभ्यास पदवीपूर्व काळातच चालू केल्याचे होम्स सांगतात. त्यांनी केलेली सुरुवातीची अन्वेषणे ही त्यांच्याचबरोबर शिकत असलेल्या सोबती विद्यार्थ्यांसाठी केल्याचे कळते. होम्स सुट्टीसाठी एका मित्राच्या घरी गेलेले असताना, त्या मित्राचे वडील होम्सचे निरीक्षणकौशल्य पाहून त्यांना सत्यान्वेशी होण्याचा सल्ला देतात. शिक्षण पूर्ण केल्यावर ६ वर्षे होम्स गुन्हे अन्वेषणाचे काम करतात. त्यानंतर आर्थिक ताणामुळे घरभाडे एकट्याला परवडत नसल्यामुळे ते डॉ. वॉटसन यांच्याबरोबर २२१ बी. बेकर स्ट्रीट या पत्त्यावर घर भाड्याने घेतात व तेथे राहू लागतात. एकत्र राहू लागल्यानंतर डॉ. वॉटसन होम्सच्या अन्वेषणकार्यामध्ये रुची घेऊ लागतात आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करू लागतात. २२१ बी. बेकर स्ट्रीट येथील त्यांचे वास्तव्य १८८१ पासून झाल्याचे कळते. २२१बी हे घर “बेकर स्ट्रीट” या रस्त्याच्या सुरुवातीलाच असून, घराच्या पहिल्या मजल्यावर होम्सची व दुसऱ्या मजल्यावर डॉ. वॉटसन यांची खोली असते. +डॉ. वॉटसनशी ओळख व्हायच्या आधी होम्स एकटेच काम करत असत. क्वचित प्रसंगी ते काही विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी रस्त्यावरील उनाड मुलांची मदत घेत असत. या उनाड मुलांच्या टोळीला “द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स” असे नाव त्यांनी ठेवले होते. 'द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स'चा उल्लेख ३ कथांमध्ये होतो: 'अ स्टडी इन स्कार्लेट', 'द साइन ऑफ फोर' आणि 'द ॲडव्हेंचर ऑफ द क्रुकेड मॅन' +होम्सच्या पालकांचा उल्लेख कुठल्याही कथेत नाही, मात्र त्यांचे पूर्वज धनिक जमीनदार असल्याचे स्वतः होम्स एका प्रसंगी सांगतात. 'द ॲडव्हेंचर ऑफ द ग्रीक इंटरप्रीटर' या कथेमध्ये ते हॉरेस वेर्ने नावाच्या आपल्या फ्रेंच काकांचा उल्लेख करतात. ७ वर्षांनी मोठे असलेले होम्सचे वडील बंधू मायक्रॉफ्ट होम्स यांची ३ कथानकांमध्ये महत्त्वाची भूमिका असून एका कथेमध्ये त्यांचा नुसता उल्लेख आहे. मायक्रॉफ्ट होम्स हे ब्रिटिश सरकारमध्ये एका महत्त्वाच्या पदावर होते. अनेक सरकारी विभागांसंदर्भातील बरीच महत्त्वाची माहिती लक्षात ठेवून ती योग्य ठिकाणी आणि प्रसंगी वापरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. सूक्ष्म निरीक्षण करण्याची आणि निष्कर्ष काढण्याची कला त्यांच्यापेक्षाही त्यांच्या बंधूंमध्ये कित्येक पटीने अधिक असल्याचे होम्स डॉ. वॉटसन यांना सांगतात. पण स्वभावाने आळशी असल्यामुळे थोरले होम्स आपला बराचसा वेळ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या एका क्लब - “डायोजिनीज क्लब” - मध्ये घालवत असत. +शेरलाॅक माणूसघाणा असल्याने त्याच्या नातेसंबंधात फारच मोजके लोक येतात. डॉ. वॉटसन त्याचा सहकारी आणि सर्वात जवळची व्यक्ती म्हणून दिसते. शेरलाॅकचा सख्खा थोरला भाऊ मायक्राॅफ्ट काही वेळा कथांत अवतरतो, मात्र या भावांतील नाते फारसे उलगडत नाही. +शेरलाॅकच्या आयुष्यातील दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची घरमालकीण हडसन बाई. त्यांच्याशी तो तुटक वागत असला तरी या दोघांत आपुलकीचे नाते दिसते. बऱ्याच चलचित्रांत, उदाहरणार्थ, बीबीसीच्या ''शेरलॉक''(२०१०) या मालिकेत[१], खासकरून दुसऱ्या पर्वामधील पहिल्या भागात, या दोघांचे नाते परस्परांशी तुसडेपणे वागणाऱ्या मात्र एकमेकांवर प्रेम असणाऱ्या मायलेकांसारखे दाखवले आहे. +एरवी स्त्रियांबद्दल काही आकर्षण नसणारा शेरलाॅक 'ए स्कॅन्डल इन बोहेमिया', बोहेमियातील भानगड, या कथेत आलेली आयरीन ॲडलर नावाच्या स्त्रीबद्दल फार आदराने बोलताना दिसतो. आयरीन ॲडलरने त्याला पराभूत केलेले असते. या कथेची सुरुवात आणि शेवट पाहता शेरलाॅक आयरीन ॲडलरकडे आकर्षित झालेला दिसतो. या कथेचा वापर करून शेरलाॅक आणि आयरीन ॲडलर यांच्यातील प्रेमकथा बीबीसीच्या शेरलाॅक (२०१०) मालिकेत बनवलेली दिसते. +शेरलाॅकचा कट्टर शत्रू म्हणून प्रा.जेम्स मोरीआर्टी दिसतो. याच्याशी दोन हात करतानाच शेरलाॅकला मृत्यू आलेले "दि फायनल प्राॅब्लेम"मधे दाखवले आहे. +होम्सनी एकूण २३ वर्षे अन्वेषणाचे कार्य केले. त्यांपैकी १७ वर्षे ते डॉ. वॉटसन त्यांच्या सोबत होते. १८८७ मध्ये डॉ. वॉटसनच्या लग्नाआधी आणि पुढे त्यांचा पत्‍नीच्या निधनानंतर ते एकत्र राहत होते. २२१-बी बेकर स्ट्रीट येथील त्यांच्या घराची मालकीण मिसेस हडसन त्यांची घरगुती कामे व घराची देखरेखही करे. +बऱ्याचशा कथा डॉ. वॉटसन अन्वेषणाचा सारांश करत असल्याच्या पद्धतीने लिहिल्या गेल्या आहेत. होम्स अनेकदा डॉ. वॉटसनच्या सारांशिक लिखाणावर तीव्र टीका करत. त्यांचे म्हणणे असे की डॉ. वॉटसन सारांश लिहितांना मूळ अन्वेषणापेक्षा संबंधित लोकांची मनस्थिती आणि भावनांवर आणि घटनांच्या रंगीत चित्रणावर जास्त भर देत. त्यामुळे त्या सारांशाचे मुख्य बिंदू निष्कर्षणविज्ञान नसून व्यक्तिरेखा आणि घटना वर्णन असे. +लिखाणासंदर्भात दुमत असूनही त्यांच्यातील मैत्री घनिष्ट होती. एका प्रसंगी डॉ. वॉटसन यांना बंदुकाची गोळी लागते. अखेरीस जखम सौम्यच असल्याचे कळते पण आपल्याला गोळी लागल्यामुळे झालेली होम्सची तडफड पाहून डॉ. वॉटसनचे मन भरून येते. होम्सची भावनाशून्य स्वभावाची सवय असलेल्या डॉ. वॉटसनना त्यांची अशी प्रतिक्रिया पाहून सुखद धक्का बसतो[२]. +१० वर्षे होम्सच्या कथा रेखाटल्यानंतर, आपल्या इतिहासविषयक लिखाणावर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने डॉयल यांनी १८९३ मध्ये प्रकाशित कथा “द फायनल प्रॉब्लम” मध्ये होम्सच्या पात्राचा अंत केला. या कथेतील घटना १८९१ च्या वर्षात घडतात. राईशेनबाखच्या धबधब्यात प्रा. मॉरियार्टी बरोबरच्या सामन्यात पाय घसरून दरीत पडल्यामुळे होम्स आणि मॉरियार्टी दोघांचा मृत्यू होतो. होम्सच्या चाहत्यांना त्यांच्या मृत्यूचा स्वीकार नाही झाला आणि ते डॉयलकडे होम्सच्या कथा पुन्हा लिहिण्यास सुरू करण्याचा आग्रह करत राहिले. आठ वर्षे या आग्रहाचा प्रतिकार केल्यानंतर १९०१ मध्ये त्यांनी 'द हाऊंड ऑफ बास्करव्हिल' ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीतील घटना होम्सच्या मृत्युपूर्व काळात घडतात. १९०३ मध्ये प्रकाशित (आणि १८९४ मध्ये घडलेल्या) कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस' मध्ये डॉयल यांनी होम्सला अखेर पुन्हा जीवित केले. मानसिक संघर्षानंतर होम्सच्या मृत्यूचा स्वीकार केलेल्या डॉ. वॉटसनला होम्सला जिवंत बघून धक्का बसतो. आपल्या शत्रूंना चुकवण्यासाठी मरण्याचा ढोंग केल्याचे होम्स डॉ. वॉटसनला सांगतात. होम्सवर आधारित कथांचा दुसरे पर्व या कथेनी सुरू होतो. दुसरे आणि शेवटचे पर्व १९२७ पर्यंत चालले. +पहिल्या आणि दुसऱ्या पर्वांमधील काळ (१८९१ ते १८९४) – म्हणजेच “द फायनल प्रॉब्लेम”मधील त्यांच्या मृत्यूपासून “द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस” मधील त्यांच्या परतीपर्यंतच्या काळाला होम्सच्या चाहत्यांनी “द ग्रेट हायॅटस” – म्हणजेच होम्सच्या अदृश्यतेचा काळ - असे नाव दिले आहे. 'द ग्रेट हाईट्स' या वाक्प्रचाराचा सर्वात पहिला वापर एडगर स्मिथ यांनी जुलै १९४६ मध्ये प्रकाशित त्झालेल्या 'शेरलॉक होम्स ॲडव्हेंचर द ग्रेट हाईट्स या लेखात केला. हा लेख 'बेकर स्ट्रीट जर्नल' या मालिकेत प्रकाशित झाला होता. १९०८ मध्ये प्रकाशित कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ व्हिस्टीरिया लॉज' मधील घटना १८९२ या वर्षी घडल्याचे वर्णन डॉयल यांनी चुकून केल्याचे आढळते. +'हिज लास्ट बो' या कथेमध्ये होम्स आपल्या कामातून निवृत्ती घेऊन “सस्सेक्स डाउनस” भागात राहण्यास गेल्याचे कळते. तिथे त्यांनी मधमाश्या पाळण्याचे काम हाती घेतल्याचेही कळते. या विषयावर ते एक पुस्तकही प्रकाशित करतात. या कथेमध्ये होम्स आणि डॉ. वॉटसन काही काळासाठी आपल्या निवृत्त जीवनाचा त्याग करून, पहिल्या विश्वयुद्धात हातभार देण्यास काही अन्वेषणे करतात. 'हिज लास्ट बो' व्यतिरिक्त 'द ॲडव्हेंचर ऑफ द लायन्स मेन' ही एकच कथा होम्सच्या निवृत्ती पश्चात घडते. होम्सच्या मृत्यूबद्दल कुठलीच माहिती आढळत नाही. +शेरलॅाक उंच आणि सडपातळ आहे. त्याचे मस्तक मोठे असून नाक धारदार आहे. केस काळे आहेत. त्याची नजर भेदक आहे. अफूच्या सेवनामुळे त्याचे डोळे किंचित फिकट वाटतात; ते काळे आहेत. त्याची बोटे सडपातळनी लांब आहेत. शेरलॅाकला दाढी-मिशा आहेत का, हा बराच चर्चिला गेलेला विषय आहे. फारच क्वचित् दाढी वा मिशी असलेला शेरलॅाक चित्रांत वा चलचित्रांत दिसतो. मात्र ' रिटर्न आॅफ शेरलॅाक होम्स्'मधे वॉटसन 'तू दाढीमिशा वाढवल्यात', अशा आशयाचे विधान करताना दिसतो. यावरून शेरलॅाकला दाढी-मिशा नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो. +शेरलॅाक पाईपमधून तंबाखू ओडतो. विचार करताना तो धूम्रपान करतो, बऱ्याचदा अतिविचार करताना वा काहीही काम नसले की तो अफू घेतो. +शेरलॅाक मितभाषी आहे. मात्र वाॅटसनसोबत तो बरेच बोलतो. अनेकदा तो फार लहरीनी विक्षिप्त वागतो. शेरलॅाक भुतांखेतांवर विश्वास ठेवत नाही. तो मुळात खूप आळशी आहे; केवळ घरी बसून विचार करायला त्याला आवडते. त्याला बाहेर पडून शारीरिक श्रम करत काम करणे आवडत नाही. मात्र, वेळ पडल्यास तो हे लीलया करतो. शेरलॅाकला मुष्टियुद्धाची आवड आहे, तो तलवारबाजीतही प्रवीण आहे. त्याला अभिनय आणि वेषांतर उत्तम साधते. वाॅटसनलाही कळणार नाही असे वेषांतर तो करतो. +शेरलॅाक इंग्लंडमधील प्रत्येक भागातील मातीचे गुणधर्म माहिती आहेत. त्याने विविध प्रकारच्या तंबाखूंचानी सिगरेटच्या राखेचा अभ्यास केला आहे; तो केवळ राखेवरून सिगरेटचा प्रकारनी उत्पादक ओळखू शकतो. त्याचा कागद आणि शाईंचा अभ्यासही उत्तम आहे. +होम्सला स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची फारशी काळजी नसे. एखाद्या अन्वेषणात तल्लीन झाल्यावर अन्न ग्रहण करण्याचीही त्याला गरज भासत नसे. खाल्लेल्या अन्नाला पचवण्यामध्ये शारीरिक ऊर्जा वाया जाते असे त्यांचे मत असे. होम्सना सिगारेट, सिगार आणि चिलीम (pipe) ओढण्याची सवय होती. डॉ. वॉटसन त्यांच्या या व्यसनाची विशिष्ट निंदा करत नसला तरी या वस्तूंमुळे खोलीत निर्माण होणाऱ्या विषारी वातावरणाची निंदा मात्र नेहमी करे. +आपल्या संशोधन पद्धतीला शेरलॅाक Science of deduction म्हणतो. ही पद्धत म्हणजे बारीक निरीक्षणांतून माहिती गोळा करायची, तिचे वस्तुनिष्ठ पृथक्करण करायचे आणि तर्क बांधायचे. शेरलॅाकचे तर्क क्वचितच चुकत. +एखाद्या निष्पाप व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी होम्स कित्येकदा पुरावे लपवणे, वस्तुस्थितीत फेरबदल, घरफोडी अशे कृत्य करत. हे कृत्य नैतिक पातळीवर न्याय्य असल्यामुळे डॉ. वॉटसनची त्यांना नुसती संमतीच नसून त्यांत त्यांचा सहभागही असे. पण कधी कधी गुन्हे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत होम्स निरपराधी व्यक्तींची हाताळणी करत. अंतिम ध्येय कितीही नैतिक असले तरी निरपराधी लोकांना त्रास देऊन ते साधणे हे डॉ. वॉटसनना कधीच पटत नसे. ‘द ॲडव्हेंचर ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन’ या कथेमध्ये चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन नामक गुन्हेगाराविरुद्ध पुरावे शोधात असताना, होम्स त्याच्याच घरातील एक मोलकरणीची मदत मिळवण्यासाठी तिला लग्नाचे खोटे वचन देतात. नंतर होम्सने असे केल्याचे कळाल्यावर डॉ. वॉटसन त्यांची निंदा करतात. +अनेक प्रसंगी होम्सवर ब्रिटिश सरकारच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या आणि गुप्त विषयांचे अन्वेषण करण्याची जबाबदारी पडत असे. +निरीक्षणकौशल्याने पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यात होम्सना आनंद मिळत असे. आपल्या निरीक्षणकौशल्यावर त्यांना खूप आत्मविश्वास असे. पण इतके कौशल्य असूनही त्यांनी कधीच प्रसिद्धीची इच्छा दर्शवली नाही. आपल्या कामाचे नावलौकिक ते नेहमीच पोलिसांना घेऊ देत असत. ब्रिटिश सरकारतर्फे बहाल केलेले सरदारपदही (knighthood) ते नाकारतात. लंडन शहराबाहेरील पोलीस देखील, योगायोगाने होम्स जवळपास असल्यास त्यांची मदत घेत. डॉ. वॉटसन यांनी प्रकाशित केलेल्या लेखांमधून होम्सना खरी प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीमुळे कित्येक गरजू लोक आपल्या समस्येच्या समाधानासाठी होम्सकडे येत. लोकांना होम्सवर पोलिसांपेक्षा जास्त विश्वास असल्याचे कळते. हा विश्वास होम्सच्या प्रसिद्धीबरोबर वाढत गेलेला दिसतो. लंडनचे पंतप्रधान आणि बोहेमियाचे राजा देखील २२१-बी येथील होम्सच्या निवासस्थानात, काही राष्ट्रस्तरीय व संवेदनशील समस्यांबाबत त्यांची भेट घेऊन त्यांची मदत मागतात. +प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत. +डॉ. वॉटसनव्यतिरिक्त इतर कोणाच्याही मैत्री अथवा संगतीला ते प्रोत्साहन देत नसत. डॉ. वॉटसनचे एक मित्र एकदा त्यांना व होम्सना सुट्टीसाठी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण देतात. डॉ. वॉटसनचे मित्र अविवाहित असून त्या घरात त्यांना पूर्ण मोकळीक मिळणार, केवळ या कारणाने तिथे जायला होम्स तयार होतात. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द ग्लोरिया स्कॉट’ या कथेमध्ये होम्स डॉ. वॉटसना सांगतात की त्यांच्या २ वर्षांच्या विद्यालयीन काळातही त्यांचा व्हिक्टर ट्रेवर नावाचा एकच मित्र होता. ते करत असलेला अभ्यास हा त्यांच्या सोबती विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यांच्यात मिसळण्याची किंवा त्यांच्या सोबतीत वेळ घालवण्याची त्यांना संधीही मिळत नसे आणि त्याची गरजही त्यांना भासत नसे. +संगीत, विशेषतः व्हायोलीन वादनाची होम्सना आवड होती. ते स्वतः उत्तम व्हायोलीन वादन करत. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड हेडेड लीग’ मध्ये होम्स आपल्या अन्वेषणकार्याला काही काळ विराम देऊन विश्रांती करता पाब्लो डे सारासाटे यांचे व्हायोलीन वादन ऐकायला जातात. गायनात (विशेषतः वाग्नर यांच्या संगीतात) असलेली त्यांची रूची ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड सर्कल’ मध्ये दिसून येते. +जटिल समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे मन सक्रिय आणि क्रियाशील राही, पण अन्वेषणकार्यात गुंतलेले नसले तर होम्सची कंटाळवाणी अवस्था होई. अशावेळी ते कोकेनचे ७% सौम्य मिश्रणाचे इंजेक्शन घेत. क्वचित प्रसंगी होम्स मॉरफीनचाही वापर करत, पण कोकेनइतके त्यांना मॉरफीन आवडत नसे. १९-साव्या शतकातील इंग्लंडमध्ये या दोन्ही पदार्थांचा वापर कायदेशीर होता. एका डॉक्टरच्या नात्याने व त्यांचा एकुलता एक मित्र या नात्याने डॉ. वॉटसन होम्सच्या या व्यसनाचे तीव्र विरोध करत. होम्सच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धिमत्तेवर होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना सतत काळजी लागून असे. +तंबाखू, सिगारेट, सिगार यांचे सेवन होम्स व डॉ. वॉटसन दोघे करत. होम्स केवळ राखेवरून सिगारेट किंवा सिगारची छाप ओळखत. +‘द ॲडव्हेंचर ऑफ द मिसिंग थ्री-क्वॉर्टर’ मध्ये होम्सची ड्रग्सच्या वियोगाची सहनशक्ती वाढलेली दिसते. असे असले तरी होम्सचे व्यसन कायमचे निघून गेले नसून केवळ सुप्तावस्थेत असल्याची चिंता डॉ. वॉटसन याच कथेत प्रकट करतात. +शेरलॅाकचा प्रभाव नंतरच्या सर्वच गुप्तहेरकथांवर जाणवतो. बंगालीतील व्योमकेश बक्षी यांच्यावर व सत्यजित राय यांच्या फेलूदावरही हा प्रभाव दिसून येतो. +शेरलाॅकवरचे चलच्चित्रपट इतके प्रसिद्ध पावले की ऑर्थर काॅनन डाॅयल यांना इंग्लंडच्या राणीने 'सर' हा किताब दिला. दि फायनल प्राॅब्लेम (The Final Problem) कथेमधे डाॅयल यांनी शेरलाॅक आणि जेम्स मोरीआर्टी यांच्या झटापटीत दोघे राईशेनबाख धबधब्यावरून पडून मृत्युमुखी पडतात असे दाखवले. शेरलाॅकला संपवायचे, असा त्यांचा साधा हेतू होता. मात्र यावर जगभरातील वाचक खवळले. परिणामी त्यांना "His Last Bow" मधील शेरलाॅकच्या आठवणी लिहाव्या लागल्या. त्यातही वाचकांचे समाधान न झाल्याने, अखेरीस "The Return of Sherlock Holmes" कथातून त्यांना शेरलाॅकला परत जिवंत करावे लागले. +शेरलॅाकचा कथेतील पत्ता "२२१बी , बेकर रस्ता, लंडन " असा आहे. या रस्त्यावर मुळात लंडनमधे २२१बी क्रमांकाचे घरच नव्हते. जेव्हा रस्ता वाढून ही घरे बनली, तेव्हा २२१बी क्रमांकाचे घर २२१बी शेरलॅाक संग्रहालयाकरिता राखून ठेवले गेले. +मूळ कथा प्रकाशित होताना बऱ्याच लोकांना शेरलॅाक खरा मनुष्य आहे, असे वाटे. +सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. ऑर्थर कॅनाॅन डाॅयल यांच्या मूळ कथा जरी केवळ कुमारांसाठी नसल्या, तरी कुमारांसाठी या कथांचे इंग्रजी सोपे रूप केले गेले आहे. मराठीतील बव्हांशी भाषांतरे कुमारांसाठी केली गेली आहेत. त्यांतली काही अशी : - +शेरलॅाकवर कृष्णधवल चित्रपट काळापासून चलच्चित्रपट अणि मालिका बनल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4902.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..760156c2e1fe19603f310bbf2c83855d1b4ceeed --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4902.txt @@ -0,0 +1,2 @@ +शरावती (कन्नड: ಶರಾವತಿ) ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आहे. ती कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते व १२८ किमी पश्चिमेकडे वाहत येऊन होनावर गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. जोग धबधबा हा आशियामधील सर्वात उंचीचा धबधबा शरावतीवरच आहे. +शरावतीवर लिंगणमक्की धरण व इतर काही धरणे बांधली गेली असून त्यांपासून जलविद्युत निर्मिली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4908.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5592532e92c0ea37525cf9667bcd58e6155723e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4908.txt @@ -0,0 +1 @@ +शारीब हाश्मी (जन्म २५ जानेवारी १९७६) हा एक भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो.[१] ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ मालिका द फॅमिली मॅन (२०१९-२१) मध्ये जे.के. तळपदे यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे ज्यासाठी त्याने फिल्मफेर ओटीटी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4922.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..053ac44a6665d348bfac4026209cf48df7b17c42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4922.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +शरजील खान (१४ ऑगस्ट, इ.स. १९८९:हैदराबाद, सिंध, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4928.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fac77d8cbd918dd7b5ce0b55607802613decee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4928.txt @@ -0,0 +1 @@ +शर्मिन अख्तर सुप्‍त (बांग्ला: শারমিন আক্তার সুপ্ত; ३१ डिसेंबर, इ.स. १९९५:गैबंधा, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4931.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94b3b99da880d8294deb78c8c3a323dd6229fac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_4931.txt @@ -0,0 +1,2 @@ +शर्मिन सुलतानात (१२ जानेवारी, इ.स. १९९३:बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +ही आपला पहिला सामना  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध १६ जानेवारी, २०१७ रोजी खेळली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..888404dc31d8fbe23ad77db1721934c224103995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5.txt @@ -0,0 +1,5 @@ +विद्युतचुंबकत्व किंवा विद्युतचुंबकीय बल हे निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी एक आहे. या बलाचे वर्णन विद्युतचुंबकीय क्षेत्र या संकल्पनेच्या आधारे करण्यात येते. विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो. विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर जे बल प्रयुक्त करते त्याला विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात. विद्युतभारित कणांचे आकर्षण आणि प्रतिकर्षण, चुंबकीय क्षेत्राचा विद्युत सुवाहकावर होणारा परिणाम, अशा अनेक उदहरणांमधून विद्युतचुंबकीय बल दिसून येते. +विद्युतचुंबकीय बल गुरुत्वाकर्षण वगळता दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्व बलांमागील मुलभुत बल आहे. साधारणतः सर्व पदार्थांच्या अंतर्गत अणु-रेणूरचनेला मुख्यत्वे हेच बल जबाबदार असते. जवळपास सर्व पदार्थ हे रेणुंचे बनलेले असतात. (रेणुंपासून न बनलेल्या पदार्थाची दोन उदाहरणे न्यूट्रॉन तारा आणि बोस आइन्स्टाइन संघनन). या रेणुंच्या आपआपसांतील बलांमुळे पदार्थांना विविध गुणधर्म आणि रचना प्राप्त होतात. रेणुंमधील ही बले विद्युतचुंबकीय प्रकारची असतात. +विद्युतचुंबकत्वाला अभिजात विद्युतचुंबकत्व आणि पुंजविद्युतचुंबकत्व अशा दोन भागांमध्ये विभागता येते. अभिजात भौतिकशास्त्र हे पुंजगतिकीचे परिणाम विचारात घेत नसल्यामुळे बऱ्याचदा हे फक्त रेणुंपेक्षा मोठ्या आकाराच्या वस्तुंसाठी लागू करता येते. अभिजात विद्युतचुंबकत्वाचे परिपूर्ण गणितीय वर्णन मॅक्सवेलच्या समीकरणांद्वारे केले जाते. +काही विद्युतचुंबकीय एकके, आणि कंसामधे त्या एककांनी मोजली जाणारी राशी - + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5032.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0546ceff0a98c853a25e5f63ad2616daefc456ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5032.txt @@ -0,0 +1,2 @@ +शहरयार नफीस (बंगाली:শাহিরয়ার নাফীস আহেমদ) (जानेवारी २५, इ.स. १९८६:ढाका - ) हा  बांगलादेशकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5059.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75414989b0a365509fa48dd9949acf828b8e0334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5059.txt @@ -0,0 +1,2 @@ +७६-शहात्तर  ही एक संख्या आहे, ती ७५  नंतरची आणि  ७७  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 76 - seventy-six. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5060.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99d05093a318aaf28a4edf5fc64e600fdac91eca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5060.txt @@ -0,0 +1,2 @@ +काझी शहादत होसेन (बंगाली: কাজী শাহাদাত হোসেন ) (सप्टेंबर ७, इ.स. १९८६ - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणिफलंदाजी करतो. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5063.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d33a7f79064fa1c0c1e2705ff409fa6900f5708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5063.txt @@ -0,0 +1 @@ +शहादत हुसेन दिपू (जन्म ४ फेब्रुवारी २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5068.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec2b6f3cd2bfa276e2cb94e1888c10fc4fe8dc5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5068.txt @@ -0,0 +1,2 @@ +शहादा विधानसभा मतदारसंघ - २ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शहादा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका आणि शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा ही महसूल मंडळे आणि शहादा नगरपालिका यांचा समावेश होतो. शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१] +भारतीय जनता पक्षाचे राजेश पाडवी हे शहादा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5071.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938692bcd509f8dca28018ba4cdb4165c97a388d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5071.txt @@ -0,0 +1,6 @@ +शहानूर नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + +शहानूर नदी ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5084.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..144f927fff7eea423120d9fc1466dcda189f02c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5084.txt @@ -0,0 +1,2 @@ +शहापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5088.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0c756ce01df78d48be96ed9e1dd941c1026f753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5088.txt @@ -0,0 +1,2 @@ +२१° ०९′ १८.७२″ N, ७९° ३४′ १२″ E +शहापुर हे भारतील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याचा भंडारा तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग-६ या मार्गानजीक वसलेले आहे. हे गाव भंडारा जिल्ह्यातील एक बाजारपेठ सुद्धा आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5089.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fce0f4fa836ea49815b68e60a9a9e018d8ab0b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5089.txt @@ -0,0 +1 @@ +शहापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5093.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae52e5354ed25fc7e7fd33b262ddc53fa8d5915c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5093.txt @@ -0,0 +1,18 @@ +शहापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका असून तो १००% पेसा क्षेत्र आहे. +शहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर मध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे शहापूर तालुक्यामध्ये आहेत.हा तालुका धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असला तरी पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.[१] + + +Shahapur is located at [show location on an interactive map] 19°27′N 73°20′E / 19.45°N 73.33°E / 19.45; 73.33[1]. It has an average elevation of 46 metres (150 feet). +The total water supply to mumbai city is 3000 MLD per day. The four damns, namely, Tansa, Bhatsa, Vaitarna and Modak Sagar, alone caters 2900 MLD per day. The 100 MLD are supplied by two lakes located around Borivali, TUlsi and Vihar. Since Shahapur supplies almost the entire drinking water to Mumbai, the government of Maharashtra has declared this town a No Chemical Zone. Consequently, no one can start a chemical industry in this area. +[edit] Demographics +As of 2001[update] India census{{GR|India}m}, Shahapur had a populatmion of 50,489. Males constitute 51% of the population and females 49%. Shahapur has an average literacy rate of 87%, higher than the national average of 59.5%: male literacy is 89%, and female literacy is 84%. In Shahapur, 12% of the population is under 6 yemars of age. +[edit] this is shahapur +Shahapur is town on mumbai agra highway,being taluka place and good connectivity to mumbai. Its growing fast construction boom is clearly seen like mumbai suburbs.Infrastructure is crumbling due to major increase in vehicles due to economic boom. Local transport mainly depend on auto rikshaws, buses and private vehicles. Shahapur is connected to all major cities of maharashtra. +Recently it has a major boom in industrial sector as it has a major advantage of good transport facility easily available labour class and also linked with mumbai suburbs with Railway [ central railway local trains through Asangaon Station [AN] ]. +[edit] How to Reach +To reach Shahapur, you may either take a Maharashtra State Transport bus that leads to Shahapur or take Asangaon or Kasara local train on central route of Mumbai Suburban Railway. To reach Shahapur by road come from the National highway no. 3. One can also reach Shahpur from National Highway No. 4 from Khopoli Haal Phata through Karjat - Murbad State highway or from Chauk - Karjat +1) By BUS )- Mumbai - Shirdi, Mumbai - Dhulia,Mumbai - Nashik By Any Bus we can go SHAHAPUR +2) BY TRAIN )- CST-Kasara CST-Asanagaon By these train we can go SHAHAPUR +[edit] Economy +The dominant economy of Shahapur is agriculture. However, recently there have been some spurts of Residential construction taking place. [VMC Group (Vision e Mall Corporation)link title is a mejor group making affordable Houses/Bunglows. +[edit] Education diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5145.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4899c1ca150ab6c065c254007ae4493da2dd277d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5145.txt @@ -0,0 +1 @@ +शालिवाहन शक १७५८ या शकाविषयीचा हा लेख आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5172.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc935781f77a5677e8613fbbe7baa1228f4000f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5172.txt @@ -0,0 +1 @@ +शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVG, आप्रविको: ZSPD) हा चीन देशाच्या शांघाय शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता. पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत शांघाय मॅग्लेव्ह रेल्वेद्वारे जोडण्यात आला आहे. ४३१ किमी/ता (२६८ मैल/तास) इतक्या वेगाने प्रवास करणारी ही रेल्वे सध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव मॅग्लेव्ह रेल्वेगाडी आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5178.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f23e76fb92e2d5766fe54396639121881e57ef31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5178.txt @@ -0,0 +1 @@ +शांड्रे अलविदा फ्रित्झ (२१ जुलै, १९८५:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून ५९ एकदिवसीय आणि २६ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5187.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c37ab14c22a4cf7989ff0519f5480d9d47d88e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5187.txt @@ -0,0 +1,3 @@ +शांता गोखले या द्विभाषिक लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक आहेत. त्या मराठीत तसेच इंग्रजीतही लिहितात. त्यांचे अत्मकथनात्मक पुस्तक इंग्रजीत आहे, कारण तशी प्रकाशकांची मागणी होती. शांता गोखले यांनी त्याच कारणासाठी त्यांच्या वडिलांबद्दलही इंग्रजीत लिहिले आहे. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5207.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c63b3e0fa0c56b83d9469450084ba00f75279a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5207.txt @@ -0,0 +1,2 @@ +शांताबाई किर्लोस्कर (बारामती -मृत्यू: सप्टेंबर १५, २००७, पुणे) महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पालक-शिक्षक संघाच्या संस्थापक होत्या. शांताबाई ’स्त्री’ मासिकाच्या संपादक होत्या. +मुकुंदराव किर्लोस्कर हे त्यांचे पती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5210.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8e174582c43b10f330ccde7eb5f1cdbbc17d36f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5210.txt @@ -0,0 +1 @@ +शांताराम जाधव हे अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व भारतीय कबड्डी संघास आशियाई सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5248.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c20d7cc8c7b10f3a469ac071ce363d9ea30334f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5248.txt @@ -0,0 +1,7 @@ +शांती स्तूप हा उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील लेह जिल्ह्यातील टेकडीवर एका बौद्ध पांढऱ्या गुंफाचे स्तूप आहे. हे इ.स. १९९१ मध्ये जपानी बौद्ध भिक्खु, ग्योमोयो नाकामुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून बांधण्यात आले. शांती स्तूप चौदावे दलाई लामा यांनी नमूद केलेल्या बुद्धांच्या अवशेषांवर आधारित आहे.[१] हे स्तूप केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वामुळेच नव्हे तर सभोवतालच्या परिसराचे पॅनोरमिक दृश्ये प्रदान करण्याच्या ठिकाणामुळे देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. +शांती स्तूप हा जपानी बौद्ध व लडाख बौद्धांनी बांधलेला आहे. याची मूळ कल्पना १९१४ मध्ये निचीदात्सू फुजी (फुजी गुरुजी) यांनी केली होती. जगभरात शांती पगोडा आणि विहारे बांधणे हे निचीदात्सू फुजी यांचे ध्येय होते आणि भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न करायचा होता. +एप्रिल १९८३ मध्ये शांती स्तूपाची निर्मिती भिक्खू ज्योमोयो नाकामुरा आणि कुशोक बकुला, नवी दिल्लीतील लडाखचे लामा, भारत सरकारच्या अल्पसंख्यक आयोगाचे सदस्य, भारताचे माजी राजदूत आणि भारताचे माजी आंतरराष्ट्रीय राजनयिक, यांच्या देखरेखीखाली झाले. हा स्तूप प्रकल्प लद्दाखी बौद्धांच्या मदतीने बांधला गेला, ज्यांनी स्वैच्छिक श्रम दिले आणि जपानच्या बौद्धांनी, भारताला बौद्धांचे "पवित्र" जन्मस्थान म्हणून मानले. इ.स. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्तूपाला वाहून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम मंजूर केले. शांती स्तूप बांधण्यासाठी राज्य सरकारने देखिल काही आर्थिक मदत केली. चौदावे दलाई लामा यांनी ऑगस्ट १९९१ मध्ये शांती स्तूपाचे उद्घाटन केले.[२] +शांती स्तूपामध्ये सध्याच्या दलाई लामाचे छायाचित्र आहे. स्तूप दोन-स्तरीय रचना म्हणून तयार केले आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रत्येक बाजूला हरीण असलेल्या धर्मचक्राची मध्यवर्ती रीलीज आहे. मध्यवर्ती सोनेरी बुद्ध प्रतिमा "धर्म चालू होण्याचे चक्र" (धर्मचक्र) दर्शविणारी व्यासपीठांवर बसते. दुसऱ्या स्तरावर बुद्धांचा "जन्म", बुद्धांचे निधन (परिनिर्वाण) आणि बुद्ध "देवतेला पराभूत करताना" असे दर्शन आहे. दोन्ही पातळीमध्ये लहान ध्यानधारणा करणाऱ्यांची बुद्धिमत्ता आहे. +शांती स्तूप जागतिक शांती आणि समृद्धीला चालना देण्यासाठी आणि २५०० वर्षांच्या बौद्ध धर्माच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. हे जपान आणि लडाखच्या लोकांमधील संबंधांचे प्रतीक मानले जाते. +उद्घाटनानंतर, शांती स्तूप लोकप्रिय पर्यटन आकर्षण बनले आहे. द हिंदू यांच्या मते, हे लेह शहराभोवती "सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण" आहे, तरीही त्याची वास्तू शैली लडाखी शैलीपेक्षा वेगळी आहे.[३] शांती स्तूप लेह शहराला नजरेने पाहत आहे, शहराचे विस्तीर्ण दृश्य, चंग्स्पा गाव, नमाजील त्सो आणि अंतरावर पर्वत.[४][५] शांती स्तूप पासून सर्वोत्तम दृश्ये प्रदान करण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा विचार केला जातो. रात्रीच्या वेळी स्तूप प्रकाशात प्रकाशित होतो. पर्यटकांसाठी हा स्तूप सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत उघडा असतो. +३,६०९ मीटर (११,८४१ फूट) उंच असलेल्या लेह पॅलेसच्या समोर असलेल्या उंच टेकडीवर, आणि लेहपासून ५ कि.मी. (३.१ मैल) अंतरावर हा स्तूप स्थित आहे.[६] डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्यावर ५०० पायऱ्या चढून स्तूपावर पोहोचले जाते.[७] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5262.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8da2547e6a3e505325973214f34e095f3af716d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5262.txt @@ -0,0 +1,3 @@ +षांतोंग (देवनागरी लेखनभेद: शांतोंग, षांदोंग, शांदोंग, षांतुंग; सोपी चिनी लिपी: 山东; पारंपरिक चिनी लिपी: 山東; पिन्यिन: Shāndōng) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. चीनान येथे षांतोंगाची राजधानी आहे. पीत नदीच्या अंतिम टप्प्यापाशी वसलेला या प्रांताचा चिनी संस्कृतीच्या ऐतिहासिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. चिनी संस्कृतीवर प्रभाव पाडणाऱ्या ताओ, चिनी बौद्ध, कन्फ्युशियन मतांच्या तत्त्वप्रणाली येथे घडल्या, विस्तारल्या. ताओ मतानुयायांसाठी तीर्थक्षेत्रासमान असणारा थाय षान हा पर्वत याच प्रदेशात पसरला आहे. कन्फ्यूशियसाचे जन्मगाव मानले जाणारे छूफू हे शहरदेखील षांतोंगातच आहे. +षांतोंग प्रांत एकूण १६ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5288.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b888354ce1ca04696b5d362893be6774bff205af --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5288.txt @@ -0,0 +1,3 @@ +शाकिब खान (ˈʃaːki:b xaːn listen (सहाय्य·माहिती); २८ मार्च, १९७९ रोजी जन्म)[१] आरंभिकतेद्वारे ओळखले जाणारे एसके, हा बांगलादेशी चित्रपट अभिनेता, निर्माता, गायक, चित्रपट संयोजक आणि माध्यम व्यक्तिमत्त्व आहे. सुमारे दोन दशकांच्या कारकिर्दीत, खान हे समकालीन स्थानिक चित्रपट उद्योगाचे प्रोपेलर होते, मोठ्या प्रमाणावर ढॅलीवुड म्हणून ओळखले जाते.[२] मीडियामध्ये तो "किंग खान", "द किंग ऑफ धलीवुड" आणि "नंबर वन शाकिब खान" (इनिशिएलिझम "नं1 एसके") म्हणून प्रसिद्ध आहे, "धल्ल्यावूडचे भाईजान" (त्यांच्या 2018च्या भजना एलो रे चित्रपटाच्या संदर्भात) म्हणून संबोधले जाते.[३][४] सध्या तो बांगलादेशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. +शाकिब खानचा जन्म २८ मार्च १९७९ रोजी बांगलादेशातील गोपाळगंज, मुग्सदपूर, रगधी येथे मसूद राणा म्हणून झाला.[५] खानचे मूळ निवासस्थान गोपाळगंज जिल्ह्यातील मकसूदपूर उपजिल्हा आहे. त्याचे वडील अब्दूर रब सरकारी अधिकारी आणि आई नूरजहां गृहिणी आहेत. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य एक बहीण आणि एक भाऊ आहेत. वडिलांच्या नोकरीमुळे तो नारायणगंज जिल्ह्यात किशोरवयीन झाला.[६] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5289.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ea31cedf37ded4331652a135f1a5b3378e3b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5289.txt @@ -0,0 +1,34 @@ +१२ डिसेंबर, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Stub-बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस +-शाकिब अल हसन हा एक बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो एका दशकासाठी खेळातील तिन्ही स्वरूपात सातत्याने आयसीसीचा अष्टपैलू खेळाडू होता. +शाकिब अल हसन ( बंगाली : সাকিব আল হাসান ; २ 24 मार्च १ 198 77 ) हा एक बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो दशकासाठी खेळातील तिन्ही स्वरूपात सातत्याने आयसीसीचा अष्टपैलू खेळाडू होता. [१] [२] विस्डेन क्रिकेटरच्या पंचांगानुसार त्याला शतकाचा दुसरा सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले . २०१ 2019 मध्ये ईएसपीएन वर्ल्ड फेम १०० द्वारा त्याला जगातील सर्वात प्रसिद्ध leथलिट्स म्हणूनही स्थान देण्यात आले. मधल्या फळीत डावखुरा फलंदाजी करणाऱ्या त्याच्या आक्रमक शैलीने डाव्या हाताच्या ऑर्थोडॉक्सवर नियंत्रण ठेवले.गोलंदाजी आणि अ‍ॅथलेटिक क्षेत्ररचनामुळे त्याला जगातील अव्वल लीगमध्ये ट्रॉफी जिंकण्यास मदत झाली आहे. +शाकिब-अल-हसन diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_529.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609248759ba3dde4e80f9e87a53849716af4fd3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_529.txt @@ -0,0 +1 @@ +आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. पं जगन्नाथबुवा पुरोहीत हे त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5315.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51826bf81a289ffbce2636e0495f991a71610c54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5315.txt @@ -0,0 +1,3 @@ +शदाब खान (४ ऑक्टोबर, १९९८ - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] +. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5326.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cf5f8367132cdb481af47fd84d7e54afee88082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5326.txt @@ -0,0 +1,3 @@ +शानिदार गुहा ही उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतात समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर असून तिचे क्षेत्रफळ ११७०० चौरस फूट व छत ४५ फूट उंचीवर आहे. या गुहेचा शोध डॉ. राल्फ सोलेकी यांनी इ.स. १९५१ साली लावला. डॉ. सोलेकी यांनी या गुहेमध्ये इ.स. १९५७ ते इ.स. १९६१ या कालावधीत उत्खनन केले. +इ.स.पूर्व एक लक्ष वर्षे ते इ.स.पू. ७००० वर्षे या काळातील मानवी वस्त्यांचा इतिहास या शानिदार गुहेच्या उत्खननात उपलब्ध झाला. येथील उपलब्ध पुराव्यानुसार या गुहेत एक लाख वर्षांपूर्वी निॲन्डरथल मानव राहत होता हे सिद्ध झाले. यानंतरही नवाश्मयुगापर्यंत या गुहेत मानवाने वस्ती केली होती. येथील उत्खननात एकूण नऊ मानवी सांगाडे सापडले. यातील पहिल्या क्रमांकाचा सांगाडा प्रौढ निॲन्डरथल मानवाचा असून तो 'शानिदार १' किंवा नॅन्डी या नावाने ओळखला जातो. या सांगाड्याचे वय मृत्यूसमयी ४० ते ५० वर्षांचे होते व हा सांगाडा ३५००० ते ४५००० वर्षे जुना आहे.[१] दुसऱ्या प्रौढ सांगाड्याची कवटी व हाडे भुगा झालेल्या स्वरूपात मिळाली. 'शानिदार ४' नावाने ओळखला जाणारा चौथा सांगाडा डॉ. राल्फ सोलेकी यांना इ.स. १९६० साली उत्खननात प्राप्त झाला त्याचे वय मृत्यूसमयी ३० ते ४५ वर्षांचे असून या निॲन्डरथल मानचाचा काळ इ.स.पू. ६०००० ते इ.स.पू. ८०००० वर्षे इतका जुना आहे.[२] +सुमारे ४५००० वर्षांपूर्वी भूकंपामुळे या गुहेची पडझड झाली. त्यात जो मानव पुरला गेला त्याची हत्यारे मूस्तेरीयन पद्धतीची होती. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगीन मानव या गुहेत राहायला आल्याचा पुरावाही उत्खननातून मिळाला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5327.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e775ce829ef8059d7056ef2233fbb4488d9e5375 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5327.txt @@ -0,0 +1,4 @@ +षान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे, +षान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5333.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58a285859236ad9f6ae27e6003237183f7a60641 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5333.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +शापित हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड भयपट चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन विक्रम भट्टने केले. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार आदित्य नारायण, श्वेता अगरवाल वे शुभ जोशी आहेत. हा चित्रपट एका कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये त्या कुटुंबाच्या सर्व मुलींवर पिढ्यानपिढ्या पासून एक शाप आहे. मुरली शर्मा व निशिगंधा वाड यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट १९ मार्च २०१० रोजी प्रदर्शित झाला व ए.एस.ए प्रॉडक्शन आणि एंटरप्रायजेस प्रा. लि.ने ह्या चित्रपटाचे वितरण केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5346.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..783e083c442c3d594e713bbd49354bf2b07467e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5346.txt @@ -0,0 +1,69 @@ +शाबरी विद्या किवा मंत्र किंवा विद्या कोणी व कशासाठी  तयार केली ? +क्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेषतः मछिंदरनाथनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात. +शाबरीकवच हंस ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. शाबरीकवच हे मच्छिंद्र आणि गोरखनाथ यांनी लिहिले आहे आणि इतर नवनाथांनी हा ग्रंथ लिहिण्यात हातभार लावला आहे. शाबरी कवच वाचन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. +कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारूपाला आले. +"अरे हा कविनारायण । +च्छोदरी पावला जनन।। +तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम। +जगामाजी मिरवी की ।।33।। +(नवनाथ ग्रंथ अध्याय 1, ओवी 33 वी) +एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत. +शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उमलले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्‍नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातीरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्‍वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्‍वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते. +""तरी आता न लावी उशिर । +हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।। +ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र ।। +बाळ शब्द उदेला ।।75।। +(अध्या 9 वा, ओवी 75) +मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे 100 कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाषाणची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.  +नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्‍चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे. +तेंगे करूनी पंचभूत। +दृश्‍यत्त्व पावले संजीवनी अर्थ।। +करभंजन ते संधीत । +प्रेरक झाला जीवित्त्वा ।।61।। +(अध्याय 10, ओवी 61) +कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्‍यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते. +विप्रो हाते सलील बाळ ते जातें। +रक्षता स्पर्शता लागे हाते।। +दृष्टी पाहता बाळाने । +जुळवत रुदन करी ।।112।। +(अध्याय 11 ओवी 112) +पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते. +त्वरे येऊन कर्णदृसी। +दृष्टी पाहे ब्रह्मचारी । +सहज करूनी उभयकरी ।। +नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। +(अध्यय १२ वा, ओवी ११५) +बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते. +भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । +तेजस्वी मिरविले शकलांत ।। +क्षिकेचे मोहळ व्यक्त । +तेही एकांग जाहले ।।२७।। +(अध्याय २४, ओवी २७)  +भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्‍यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगाव फाट्यावरून जाता येते.   +पातला परी अकस्मात । +येता झाला बाळ जेय ।। +सहज चाली पुढे चालत । +बाळ दृष्टी देखिले ।।२१।। +(अध्याय ३४, ओवी २१ की १२१?) +ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्‍नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (विटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे. +असो वटवृक्ष पोखरांत । +अंड राहिले दिवस बहूत ।। +अवि होत्र नारायण त्यांत । +ईश्‍वर सत्ते संचारला ।।९२।। +दिवसेंदिवस अंडात। +वाडी लागले जीववंत ।। +देह होता सामर्थ्यवंत । +भगन लागे अंड ते ।।९३।। +त्यांत तलवर पोखरांत । +बाळ रुदन करी अत्यंत ।। +निढळवाणी कोण त्यांते । +रक्षणाते नसेची ।।९४।। +(अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४) +ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्‍नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि.मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे. +या परी बहुता दिवशी । +ईश्‍वर आता अवतार ।। +विप्पलायन त्या रेतासी । +नारायण संचारला ।।२१।। +(अध्याय ३८, ओवी २१) +एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्‍नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रेरयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.  +या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे काही शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5356.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efea5731f785460ab7d11d7e8bce91a5b3c2cc6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5356.txt @@ -0,0 +1,2 @@ + शामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5364.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcdae07178529c094040e79f33fc19ea71cfd04d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5364.txt @@ -0,0 +1,7 @@ +शामला माजगांवकर या मराठीतील एक नामवंत शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका होत्या. +त्यांचे संगीत शिक्षण उस्ताद अल्ताफ हुसेन खान यांचे चिरंजीव खादीम हुसेन खान, यांच्याकडे झाले होते. श्यामलाबाई आणि त्यांच्या भगिनी, प्रसिद्ध गायिका हिराबाई जव्हेरी, या दोघींनी मिळून मुंबईत इ.स.१९२९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘स्वामी समर्थ संगीत विद्यालया‘ची स्थापना केली. स्त्रियांनी स्त्रियांसाठी व लहान मुलांसाठी मुंबईत काढण्यात आलेले हे पहिलेच संगीत विद्यालय होते. मुंबईत या विद्यालयाच्या खार, चर्नीरोड, आणि दादर(हिंदू कॉलनी) येथे शाखा होत्या. लीला चिटणीस, नलिनी जयवंत, जयश्री वणकुद्रे (व्ही.शांताराम यांच्या पत्नी), मोहनतारा तळपदे-अजिंक्य, जयश्री गडकर-धुरी अशा कितीतरी मुली या विद्यालयात शिकून पुढे जीवनात मोठ्या झाल्या. समाजवादी नेत्या मृणाल गोरे याही श्यामला माजगांवकरांकडे काही दिवस संगीत शिकत होत्या. +शामला माजगांवकर यांच्या भगिनी हिराबाई जव्हेरी या स्वतः सतार, बाजाची पेटी आणि तबलासुद्धा उत्तम वाजवीत आणि शिकवीतही. प्रसिद्ध गायिका मधुबाला जव्हेरी-चावला ह्या हिराबाई जव्हेरींच्या कन्या. +हिराबाई जव्हेरी आणि श्यामला माजगांवकर यांच्या नावाने ‘संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार‘ दिला जातो. इ.स.२०१०मध्ये हा पुरस्कार भानू चरणकर यांना दिला गेला. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5376.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16f7c040276df247d256a124683f4f51423eee38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5376.txt @@ -0,0 +1,2 @@ +शामोनि तथा शामोनि-माँट-ब्लांक हे फ्रांसच्या ऱ्होन-आल्प्स प्रदेशाच्या हाउत-साव्वा प्रांतात असलेले छोटे गाव आहे. हे गाव पहिल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ९,८०० लोकसंख्या असलेल्या या गावात एकाचवेळी ६०,००० पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते. +हे शहर युरोपमधील सर्वोच्च शिखर माँट ब्लांकच्या पायथ्याशी वसलेले असून ऐग्विल दु मिडी हे दुसरे मोठे पर्वतशिखर येथून जवळ आहे. येथे स्कीईंग व इतर हिवाळी खेळांसाठीची सोय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5381.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d12c21c59fd05d85d760fc338033927c7a15497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5381.txt @@ -0,0 +1,2 @@ + +शाय लव्ह (नोव्हेंबर २७, इ.स. १९७८:वीसबाडेन, जर्मनी - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5399.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cea8ab7e0ff40717725cbbdeb0b8ba22cf385f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5399.txt @@ -0,0 +1,3 @@ +शायान प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: CYS, आप्रविको: KCYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: CYS) तथा जेरी ओल्सन फील्ड हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्याची राजधानी असलेल्या शायान शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त १ मैल अंतरावर आहे. +या विमानतळावर शायान एर नॅशनल गार्डचे ठाणे आहे. येथे वायोमिंग एर नॅशनल गार्ड आणि वायोमिंग आर्मी नॅशनल गार्ड (वॉरंग) यांची मुख्य ठाणी आहेत. +प्रवासी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5404.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15922fde227dcff063b1cb745656167872fef85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5404.txt @@ -0,0 +1 @@ +शारंगदेव किंवा निःशङ्क शार्ङ्‌गदेव हे भारतातील तेराव्या शतकातले एक आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ होते. ते महाराष्ट्रातील देवगिरी येथे राहत असत. त्यांच्या संगीत रत्‍नाकर या ग्रंथासाठी ते ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5427.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..545dd6d3419e6c60ebf25721368e309249fef7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5427.txt @@ -0,0 +1,6 @@ +शारदा पीठ हे एक हिंदू मंदिर आणि शारदा (सरस्वती) या हिंदू देवीला समर्पित शिकण्याचे प्राचीन केंद्र आहे. हे मध्ययुगातील काश्मीरमधील भारतीय उपखंडातील अग्रगण्य मंदिर विद्यापीठांपैकी एक होते. हे ठिकाणपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आद्य शंकराचार्यांसारख्या विद्वानांनी येथे भेट दिली होती. उत्तर भारतातील शारदा लिपीच्या विकासात आणि लोकप्रियतेत या शिक्षणाचे केंद्र असलेल्या पीठाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे काश्मीरला काहीवेळा "शारदा देश" म्हणून संबोधले जाई. +अठरा महाशक्ती पीठांपैकी शारदा पीठ हे एक आहे. येथे देवी सतीचा उजव्या हात खाली पडल्याची आख्यायिका आहे. शारदा पीठ, मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ मंदिर ही काश्मिरी पंडितांची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. +काश्मिरी पंडित संघटनेने आणि जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनी भारत आणि पाकिस्तान सरकारांना सीमावर्ती तीर्थयात्रे सुलभ करण्यासाठी उद्युक्त केले आहे.. ज्येष्ठ भारतीय राजकारण्यांनीही पाकिस्तानला या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये या विषयावर द्विपक्षीय चर्चा होते.[१][२] पाकिस्तान सरकार हे भारतीय यात्रेकरूंसाठी कॉरिडॉरच्या संभाव्यतेचा शोध घेत आहे, आणि ही योजना मंजूर होण्याच्या शक्यता आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी २०१९ सालच्या मार्चमध्ये दिले होते.[३] तथापि, त्यानंतर पाकिस्तान सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही.[४] +शारदा पीठाची उत्पत्ती अनिश्चित आहे. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे कुषाण साम्राज्याखाली (इ.स. ३० - इ.स. २३०) बांधले गेले. इतरांचा असा विश्वास आहे की शारदा पीठ आणि मार्तंड सूर्य मंदिर यांच्यातील समानतेमुळे हे कार्कोट साम्राज्याचा पाचवा राजा ललितादित्य (ख्रिस्तपूर्व इ.स. ७२४ - ख्रिस्तपूर्व इ.स. ७६०) यांने बनवले आहे. दुसऱ्या एका मतानुसार की हे शारदा पीठ एकाच काळात नव्हे तर टप्प्याटप्प्यात तयार केले गेले होते, असे सूचित होते. हे मत असलेले काही अनुयायी असा मानतात की शारदा पीठ पहिल्यांंदा ५,००० वर्षांपूर्वी (ही वर्षे केव्हापासून मोजायची?) बांधले गेले. +शारदा पीठाचे सर्वात प्राचीन संदर्भ इ.स. ६वे ते ८वे शतक या काळात लिहिलेल्या नीलमत पुराणात सापडतात. १०व्या शतकात, स्थानिक लोक आणि यात्रेकरू पूजा करत असलेल्या मंदिराचे वर्णन अल बिरूनी करतो. त्यावेळच्या मुलतान सूर्य मंदिर आणि सोरटी सोमनाथ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरांसमवेत त्यांनी त्याचे वर्णन केले आहे. हे असे सुचवते की त्या काळात शारदा पीठ भारतातील सर्वात पूजनीय स्थळांपैकी एक होते. +शारदा पीठ हे पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपासून अंदाजे १५० किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून हे १३० किलोमीटर अंतरावर आहे. हे युद्ध नियंत्रण रेषेपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. त्या मुळे या ठिकाणाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व कमी झाले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १९८१ मीटर उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_545.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2f6a8943007319447624bc796c3affcc44eb23e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_545.txt @@ -0,0 +1,2 @@ +विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होते. इ.स. १९९२मध्ये त्यांना मृण्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +विलास मनोहर हे गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात हेमलकसा-भामरागड येथे आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांचे सहकारी होते. डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी ते १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झाले होते. दारिद्‌ऱ्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्ले प्रकाश आमट्यांना आणून देत. दोघांनी मिळून अनेक जंगली जनावरांना आश्रय दिला होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5465.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a4ebe19c3e2d67683ffb7704cafff21078b46b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5465.txt @@ -0,0 +1,7 @@ +शार्दूलविक्रीडित हे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे येतात. यति बाराव्या अक्षरावर येतो. ह्या वृत्ताचे गण म-स-ज-स-त-त-ग असे येतात. महाराष्ट्रातील हिंदुधर्मीयांच्या विवाहांत म्हणण्यात येणारी मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात. +शार्दूलविक्रिडिताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे : +देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया। +विश्वी या प्रतिभाबले विचरितो चोहीकडे लीलया। +दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पाहाया शके।। +मा सा जासत ता ग येति गण हे पादास की जोडित।। +कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी॥ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5479.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c80ce086e8016c38f48424293471d8568085a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5479.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 35°13′37″N 80°50′36″W / 35.22694°N 80.84333°W / 35.22694; -80.84333 + +शार्लट हे अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येनुसार शार्लट हे अमेरिकेतील १९ वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5482.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c80ce086e8016c38f48424293471d8568085a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5482.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 35°13′37″N 80°50′36″W / 35.22694°N 80.84333°W / 35.22694; -80.84333 + +शार्लट हे अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येनुसार शार्लट हे अमेरिकेतील १९ वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_549.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f5575328c5427bcc4f39bfa955ba413963f903 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_549.txt @@ -0,0 +1,8 @@ +विलास गोविंद सारंग (जन्म : इ.स. १९४२, कारवार; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल २०१५) हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले. +मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले. +विलास सारंग यांचे समीक्षालेखन हे साहित्यसंस्कृतीवरील भाष्य आहे. देशोदेशींच्या दर्जेदार साहित्याच्या वाचनातून आणि आधुनिक पाश्चात्त्य साहित्य विचारसरणीतून त्यांची साहित्यदृष्टी चिकित्सक बनलेली होती. सारंग हे आधुनिक परंपरेतील कवी आणि कथा -कादंबरीकार होते. त्यांच्या सर्जनशील लेखनातून कलादृष्टी आणि जीवनदृष्टी अभिव्यक्त झाली आहे. मराठी साहित्य आणि साहित्यव्यवहाराची त्यांनी परखडपणे चिकित्सा केली आहे. बाळ सीताराम मर्ढेकर, रा. भा. पाटणकर आणि विलास सारंग यांच्या लेखनात मराठी भाषेविषयी तीव्रतम कळकळ दूसन येते. मराठी लेखकांनी सतत नव्या वाटा शोधत राहिल्या पाहिजेत, प्रेरणा आत्मसात केल्या पाहिजेत, तसेच समकालीन लेखक वाचून मधुकरवृत्ती जोपासली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. +विलास सारंग यांनी आपले कोणतेही लेखन योजनाबद्धरीत्या केलेले नाही. ते तरुण असताना त्यांना सॅम्युअल बेकेटच्या नाटकांवर व्याख्यान देण्यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावले. तेथे त्यांची व्याख्याने झाली. त्यांचे हे भाषण मराठी `सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झाले. त्यानंतर फ्रेन्झ काफ्का, ज्यां पोल सार्त्र, आल्बर्ट काम्यू यांच्यावर सुरुवातीला त्यांनी लेख लिहिले. त्यानंतर त्यांचे `सिसिफस आणि बेलाक्वा’ हे पुस्तक तयार झाले. पुढे `सत्यकथा’ मासिकात त्यांचे लेख समीक्षा प्रसिद्ध होत राहिले. सत्यकथा मासिकांबरोबर `अभिरुचि’, `अनुष्टुभ’, `नवभारत’ या नियतकालिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.यातील अनेक लेखांवर त्या त्या वेळी चर्चाही झालेली आहे. यातील काही लेख सुरुवातीला इंग्रजीत आणि नंतर अनुवाद स्वरूपात प्रकाशित झाले.सत्यकथेतील समीक्षांमुळे त्यांचा लेखनाचा हळूहळू मोठा ऐवज तयार झाला. त्यानंतर `अक्षरांचा श्रम केला’यामधील सर्व लेखांची सारंगांनी `एकूण साहित्य’, `कथा कादंबरी’, अनुवाद’ अशा चार विभागात मांडणी करून हे लेखन केले आहे. +विलास सारंग यांच्या सर्जनशील लेखनात आणि समीक्षालेखनात एक समांतर भाग दिसून येतो. तो म्हणजे त्यांनी ज्या साहित्य प्रकारात लेखन केले आहे त्याच प्रकाराविषयी समीक्षालेखन केले आहे. विल्यम वर्डसवर्थ, एस. टी. कोलरिज, मॅथ्यू अर्नोल्ड, टी. एस. एलियट, डब्ल्यू. एच.ऑडन, हे इंग्रजी लेखक आणि मराठीत बाळ सीताराम मर्ढेकर, पु.शि. रेगे, विंदा करंदीकर यांचे साहित्य वाचून ते झपाटून गेलेले होते. '`सिलेक्टेड रायटिंग्ज’ हे पेंग्विन प्रकाशनाने काढलेले टी. एस. एलियट यांचे पुस्तक वाचून त्यावेळी त्यांच्या अंगावर मूर्तिमंत रोमांच उभे राहत असत. मर्ढेकर, एलियट आणि बरेच इंग्रजी आणि अमेरिकन लेखकांचे साहित्य अभ्यासून त्यांनी सैद्धान्तिक समीक्षा, उपयोजित समीक्षा, सूक्ष्म विश्लेषण, साहित्याची ऐतिहासिक समीक्षा आणि '`लिहित्या लेखकांचं वाचन’ असे पुष्कळसे साहित्य त्यांनी वाचलेले होते. यातूनच साहित्यावर भाष्य करण्याची विचक्षण दृष्टी त्यांना मिळाली. +पुढे बऱ्याच वर्षानी त्यांची `रुद्र’ कादंबरी जेव्हा येशू पाटील यांनी प्रकाशित करण्याचे धाडस केले त्यावेळी डॉ. वसंत. पाटणकर आणि डॉ. हरिश्चंद्र थोरात या समीक्षकांनी तिची प्रगल्भ समीक्षा केली. आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवून सारंगांनी मिथ्यकथा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करीत लोकविलक्षण विश्व निर्माण केले आहे. त्यासाठी त्यांना पुराणकथांचा आधार घ्यावा लागला आहे. विलास सारंग हे स्वायत्ततावादी समीक्षक होते, असे पाटणकर आणि अन्य साहित्यकांनी त्यांचे `कोसला’बद्दलचे विवेचन वाचून जे म्हटले आहे ते खरेच वास्तववादी आहे. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_552.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..552b41cb1ac2e9543b8371f6e18f0803bab932a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_552.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बिलासपूर जिल्ह्याविषयी आहे. बिलासपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +बिलासपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिलासपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5539.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..690674e06efbf53dc4638a34f20bcff86ca780dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5539.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +१९७८ साली प्रदर्शित झालेला "शालीमार" हा एक हिंदी चित्रपट आहे. अमेरिकेत हा चित्रपट "Raiders of Shalimar" या नावाने इंग्रजित प्रद्रशित झाला. या चित्रपटात धर्मेंद्र, जीनत अमान, शम्मी कपूर, प्रेमनाथ, श्रीराम लागू, अरुणा इरानी व अमेरिकन अभिनेते सर रेक्स हँरीसन, जॉन सँक्सन व संल्विया मंल्स यानी काम केले आहे. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5542.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19a948965a3ae80fe543c0aaf5b9f9db4883142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5542.txt @@ -0,0 +1,23 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन (इ.स. 78 - इ.स. 130) हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. सातवाहन हा महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश होता. सातवाहन राजवंशाने इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असे 450 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसपासच्या क्षेत्रावर राज्य केले. या 450 वर्षांच्या शासन काळात एकूण 30 राजांनी राज्य केले त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या वडिलांचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री होते. आपल्या नावा आधी आईचे नाव लावणारे हे पहिलेच राजे झाले. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात यांचा मोठा वाटा होता. +गौतमीपुत्र सातकर्णी यांनी नाशिक वर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. शक राजा नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शक, यवन यांचाही बिमोड केला. तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र, पश्चिमेस कोकण, पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले. +सातवाहन मराठा राजवंशाची राजधानी प्रतिष्ठानपुरी होती जिला आज पैठण म्हटले जाते व जीर्णनगर ही उपराजधानी होती जिला आज जुन्नर म्हटले जाते. +इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले. +याच सातवाहन राजवंशातील गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट अतिशय पराक्रमी होते. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्यांचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाले त्यांनी या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले व या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये एक विजयस्तंभ बांधला ज्याला तीर्थखांब म्हटले जाते. शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जी आज अजूनही आपण वापरतो व याच शालीवाहन शकाच्या सुरुवातीचा सण म्हणजेच गुढीपाडवा ज्याला आजही साजरा करतो. +नाशिक जवळील लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णीचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हे वैदिक हिंदू धर्माचे पोषक होते एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा. +गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८ - इ.स. +१३०) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. [१] +गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली. +अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने पश्चिम महाराष्ट्र सौराष्ट्र वर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. +आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले. +गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो. +स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे -- +क्षत्रपांचा गर्व आणि अभिमान यांचा निःपात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुनःस्थापित करणारा....." +या राजाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे. +शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला. + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5557.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dfe3ae05986c686fc2eb3a0fad05c3193bd64b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5557.txt @@ -0,0 +1,2 @@ +शाळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5562.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5562.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5574.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c473a2aa8c97d38bd483c92991cda595f82e59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5574.txt @@ -0,0 +1 @@ +शाशा किरण तिरुपती (जन्म २१ डिसेंबर १९८९) ही कॅनेडियन पार्श्वगायिका, गीतकार आणि भारतीय वंशाची संगीत निर्माता आहे.[१] २०१८ मध्ये "द हम्मा गर्ल" म्हणून लोकप्रिय,[२] तिने सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच कात्रु वेलीदाई मधील "वान वरुवान" या तमिळ गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. तिरुपतीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी, पंजाबी, मल्याळम, कन्नड, बंगाली, कोकणी, अरबी आणि इंग्रजी यासह २० हून अधिक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि गायिका म्हणून २०० हून अधिक गाणी गायली आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5608.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a178d1dcbba392d8ba96f3f8f10be5239a4bbd66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5608.txt @@ -0,0 +1,3 @@ +शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आहे. +हे महविद्यालय २००३ मध्ये अकोला येथे सुरू झाले. +महाविद्यालयात सध्या खालील शाखांमध्ये एम्.बि.बि.एस्. आणि एम.डी. ह्या पदव्या मिळविता येतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5612.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e328b4873bafdedec68608103367dc59de3921ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5612.txt @@ -0,0 +1,7 @@ +शासन करण्याच्या क्रियेला शासन म्हणतात, किंवा दुसऱ्या शब्दांत, राज्य करणे किंवा राज्य करणे याला शासन म्हणतात. अपेक्षा परिभाषित करणाऱ्या, शक्ती देतात किंवा कामगिरीचे प्रमाण ठरवणाऱ्या निर्णयांशी ते संबंधित आहे. ही एक वेगळी प्रक्रिया देखील असू शकते किंवा व्यवस्थापन किंवा नेतृत्व प्रक्रियेचा विशिष्ट भाग असू शकते. काहीवेळा लोक या प्रक्रिया आणि प्रणाली प्रशासित करण्यासाठी सरकार स्थापन करतात. +व्यवसायाच्या संदर्भात किंवा नफा नसलेल्या संस्थेच्या संदर्भात, प्रशासन म्हणजे दिलेल्या क्षेत्रातील अखंड व्यवस्थापन, एकत्रित धोरणे, मार्गदर्शन, प्रक्रिया आणि निर्णय घेणे. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट स्तरावरील व्यवस्थापनामध्ये गोपनीयता, अंतर्गत गुंतवणूक आणि डेटाचा वापर यासाठी धोरणे तयार करणे समाविष्ट असू शकते. +जर सरकार आणि गव्हर्नन्स या शब्दांमध्ये फरक केला तर काय दिसून येईल की सरकार जे करते ते म्हणजे प्रशासन. हे कोणतेही भू-राजकीय सरकार (राष्ट्र-राज्य), कॉर्पोरेट सरकार (व्यवसाय संस्था), सामाजिक-राजकीय सरकार (जात, कुटुंब, इ.) किंवा इतर कोणतेही सरकार असू शकते. परंतु शासन ही शक्ती आणि धोरण व्यवस्थापित करण्याची गतीशील प्रक्रिया आहे, तर सरकार हे वाहन (सामान्यतः सामूहिक) आहे जे ही प्रक्रिया पार पाडते. "शांतता, सुव्यवस्था आणि चांगले सरकार " या कॅनेडियन घोषणेप्रमाणे सरकार हा शब्द शासनासाठी समानार्थी शब्द म्हणून देखील वापरला जातो. १९४७ मध्ये भारतावरील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. +काही लोक शासन आणि राजकारण या संकल्पनांमध्ये स्पष्ट फरक सुचवतात. देणे राजकारणामध्ये अशा प्रक्रियांचा समावेश होतो ज्याद्वारे लोकांचा एक गट सुरुवातीला भिन्न मते आणि हितसंबंध असलेल्या सामूहिक निर्णयापर्यंत पोहोचतो, जो सामान्यतः संपूर्ण गटासाठी आवश्यक असतो आणि ज्याची सार्वजनिक धोरण म्हणून अंमलबजावणी केली जाते. दुसरीकडे, प्रशासन हे त्याच्या विरोधी घटकांऐवजी प्रशासकीय आणि कृती-केंद्रित घटकांबद्दल आहे. राजकारण आणि प्रशासन यांच्यातील पारंपारिक वेगळेपणाबद्दल असे वाद होण्याची शक्यता नेहमीच असते. ते काहीवेळा शासन आणि धोरण सध्या ज्या पद्धतीने आचरणात आणले जातात त्यामध्ये या फरकावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, जे सूचित करते की शासन आणि राजकारण या दोन्हीमध्ये सत्तेच्या पैलूंचा समावेश आहे. +सर्वसाधारणपणे राज्यकारभार तीन प्रमुख मार्गांनी होतो:- +शासनाच्या या पद्धती अनेकदा वर्गीकरण, बाजार आणि नेटवर्कमध्ये दिसतात. +निष्पक्ष शासन म्हणजे अशा व्यवस्थेचा संदर्भ आहे जिथे काम अशा प्रकारे केले जाते ज्यामध्ये अधिकाऱ्यांना लोकशाहीच्या भावनेने लाभार्थ्यांच्या हक्कांचे आणि हितांचे रक्षण करणे सोपे होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5617.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea64fe7b85b1d0c4f020fa01ec877d5c20e085c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5617.txt @@ -0,0 +1,7 @@ +व्यापक अर्थाने, विशिष्ट विषय किंवा विषयांच्या गटाशी संबंधित सर्व ज्ञान, जे एकत्रित केले गेले आहे आणि योग्य क्रमाने ठेवले आहे, त्याला शास्त्र म्हणतात.  जसे, भौतिकशास्त्र, आर्किटेक्चर, आर्किटेक्चर, प्राणीशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत, वनस्पतिशास्त्र इ.  शास्त्राचा अर्थ शास्त्र आहे.'शास्त्र' हा शब्द 'शासू अनुशिष्ठौ' पासून आला आहे ज्याचा अर्थ 'शिस्त लावणे किंवा उपदेश करणे' आहे. +विज्ञान हे कोणत्याही विषयाच्या, ज्ञानाच्या किंवा कलेच्या सर्व पैलूंचे त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून सुरू होणारे एक सुनियोजित, सूत्रबद्ध प्रतिनिधित्व आहे.  येथे शास्त्राची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे- +शास्ती च त्रयते च.  शिष्य अनेन । +म्हणजेच जे शिक्षण शिस्त देऊन आपले रक्षण करते, मार्गदर्शन करते, कधी बोट धरून मार्गदर्शन करते, त्याला 'शास्त्र' म्हणतात.  अशा रीतीने धर्मग्रंथ आणि शास्त्रे पाहिली तर शास्त्रांना खूप महत्त्व आहे.  असंख्य शास्त्रे आहेत, विद्वान शास्त्रे रचत राहतात. +परंतु धर्माच्या संदर्भात 'शास्त्र' म्हणजे ऋषी-मुनी इत्यादींनी लिहिलेल्या त्या प्राचीन ग्रंथांचा संदर्भ ज्यामध्ये लोककल्याणासाठी विविध प्रकारची कर्तव्ये सांगितली गेली आहेत आणि अनुचित कृत्यांचा निषेध करण्यात आला आहे.  दुसऱ्या शब्दांत, धर्मग्रंथ म्हणजे ते ग्रंथ जे लोकांच्या हितासाठी आणि शिस्तीसाठी तयार केले गेले आहेत.  सामान्यत: शास्त्रात सांगितलेली कामे पूर्वानुभूती मानली जातात आणि ज्या गोष्टी शास्त्रात निषिद्ध आहेत, त्या निषिद्ध आणि वर्ज्य मानल्या जातात.  शास्त्रांमध्ये अध्यापनशास्त्र, नीतिशास्त्र किंवा धर्मशास्त्र, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, आयुर्वेद, व्याकरण, तत्त्वज्ञान, कला, धनुर्वेद (लष्करी विज्ञान) इत्यादींचा समावेश होतो. +काही शास्त्रे अनुभवजन्य ज्ञानाच्या शोधात असतात व ते प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा वापर करतात. या शास्त्रांचा एक स्वतंत्र गट होतो. या गटातील शास्त्रांना विज्ञान हे नाव देता येईल. विज्ञान गटाबाहेर असणारी शास्त्रे उद्दिष्ट व पद्धती या दोन्ही बाबतींत विज्ञानांपेक्षा वेगळी आहेत.[१] गणित हे एक शास्त्र आहे. तसेच इतर विज्ञानातील उपपत्तीन्ची मांडणी करण्यात गणित उपयोगी पडते. त्याची कारणे दोन. +कोण्यताही उपपत्तीमध्ये एक भाग गणनेचा असतो. उदाहरणार्थ कालमापनात अमुक सेकंद, अमुक मिनिटे, अमुक तास, अमुक दिवस, अमुक महिने, अमुक वर्षे या साऱ्या संकल्पना संख्या वापरून व्यक्त करता येतात. संख्या हा गणितातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्याचप्रमाणे कोण्यताही उपपत्तीत विशिष्ट "space"[मराठी शब्द सुचवा]ची संकल्पना असते. "space" हा गणितातील दुसरा महत्त्वाचा विचार आहे. किंबहुना गणित म्हणजे "संख्या व space वापरून व्यक्त झालेला विचार" अशी गणिताची व्याख्या करता येईल. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5620.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5620.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5641.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c8ab905fb2d3f8aba5f72ef107403e4e7f1da42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5641.txt @@ -0,0 +1,6 @@ + +मलेशियन ग्रांप्री (मलाय: Malaysian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत मलेशिया देशाच्या क्वालालंपूर जवळील सेपांग नावाच्या शहरामधील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +१९६२ सालापासून खेळवण्यात आलेली ही शर्यत सेपांग येथे १९९९ सालापासून खेळवली जात आहे. +थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट हे एक फॉर्म्युला टु शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे सिंगापूर देशातील थॉमसन रोड भागात स्थित आहे. इ.स. १९६२ ते इ.स. १९६५ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री मधिल फॉर्म्युला टु शर्यती खेळवल्या गेल्या कारण सिंगापूर हा मलेशिया देशाचा भाग होता. इ.स. १९६५ मध्ये सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवले, तरीसुद्दा इ.स. १९७३ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री आयोजित करण्यात आली. +शाह आलम सर्किट हे एक फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेसींग सर्किट आहे, जे मलेशिया देशातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी, शाह आलम परिसरात आहे. सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवल्यावर, थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट सिंगापूर अधिकारक्षेत्रामध्ये गेले. त्यामुळे नवीन सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट तैयार हो पर्यंत, इ.स. १९६८ पासून इ.स. १९९५ पर्यंत, मलेशियन ग्रांप्री या सर्किटवर आयोजित करण्यात आली. या मध्ये तस्मान सीरीज (१९६८-१९७२)[१], फॉर्म्युला पॅसिफिक (१९७४-१९७४, १९७८,१९८२), फॉर्म्युला अटलांटिक (१९७५) आणि फॉर्म्युला होल्डेन (१९९५) शर्यतींचा समावेश आहे. +सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक सेपांग, मलेशिया मधील फॉर्म्युला वन सर्किट आहे. ते क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ स्थित आहे, जे क्वालालंपूर शहरापसुन ४५ कि.मी दुर आहे. येथे २०१७ पर्यंत फॉर्म्युला वन मलेशियन ग्रांप्री आयोजीत केली जाते व ईतर शर्यती सुद्दा आयोजीत केल्या जातात.. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5642.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b3fce0258694bb1f15eaffc502628cbaf05fd1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5642.txt @@ -0,0 +1 @@ +हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगाली: হযরত শাহ্‌জালাল আন্তর্জাতিক বিমানবন্দর) (आहसंवि: DAC, आप्रविको: VGHS) हा बांगलादेश देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी ढाकाच्या उत्तरेस कुर्मितोला शहरामध्ये बांधला गेला असून तो १९८० पासून कार्यरत आहे. शाहजलाल हा बांगलादेशमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5661.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cb0ebae8d84dff51b404bb315a5f0219e1fc3a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5661.txt @@ -0,0 +1,2 @@ +शाहजहानपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5663.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cb0ebae8d84dff51b404bb315a5f0219e1fc3a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5663.txt @@ -0,0 +1,2 @@ +शाहजहानपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5672.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4a9d6a56e3fc87753e24b5fbb1f4ab1f51a87e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5672.txt @@ -0,0 +1,2 @@ +शाहदरा विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5677.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86b850a677e30650e59ad423520f0ae31008f241 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5677.txt @@ -0,0 +1 @@ +शाहपुरा (जयपूर) विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5711.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfdc19f6075cdbb5ae89d394f1b37c49cfeadcd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5711.txt @@ -0,0 +1,5 @@ +शाहीद कपूर हा एक हिंदी चित्रपट अभिनेता असून त्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला. तो एक शिकलेला नर्तक आहे. तो पंकज कपूरचा मुलगा आहे. त्याने त्याची कारकीर्द एका म्युझिकने सुरुवात केली. कपूरने बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा सुभाष घाईच्या ताल (१९९९) चित्रपटात पार्श्वनर्तक म्हणून नृत्य केला होता. चार वर्षांनंतर त्याने त्याचे पहिले चित्रपट इष्क विष्क (२००३) साली काढली व त्याला त्या चित्रपटासाठी फिल्मफेर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल म्हणून जिंकला होता. +अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेता-नर्तक नीलिमा अजीम यांच्याकडे शाहिद कपूरचा जन्म २५ फेब्रुवारी १९८५ रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. जेव्हा शाहिद तीन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला; त्याचे वडील मुंबईत शिफ्ट झाले (आणि त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केले) आणि कपूर आपल्या आई आणि आजी आजोबांसमवेत दिल्लीतच राहिले. त्याचे आजी-आजोबा स्पुटनिक या रशियन मासिकाचे पत्रकार होते आणि शाहिद हा आजोबांचा विशेष आवडता असे. शाहिद दहा वर्षांचा होता तेव्हा त्याची आई, जो नर्तक म्हणून काम करत होती, ती अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी मुंबईला गेली.[१] मुंबईत नीलिमाने अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केले. २००१ मध्ये शाहिद आपली आई आणि खट्टर यांच्यात दुरावा होईपर्यंत राहिला.[२] +२००४ मध्ये फिदाच्या चित्रीकरणादरम्यान, त्याने करीना कपूरला डेट करण्यास सुरुवात केली आणि दोघांनीही या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितले. जेव्हा मिड-डेने सार्वजनिकपणे चुंबन घेणाऱ्या त्यांच्या चित्रांचा संच प्रकाशित केला तेव्हा ते एका प्रसिद्धी घोटाळ्यामध्ये फसले. चित्रे बनावट असल्याचा दावा दाम्पत्याने केला असला तरी वृत्तपत्राने कोणतीही चूक करण्यास नकार दिला. २००७ मध्ये जब वी मेटच्या चित्रीकरणादरम्यान हे जोडपे विभक्त झाले. त्यांच्या विभाजनानंतर, शाहिदने त्याचे वैयक्तिक आयुष्य मिडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्याचे ठरविले. तथापि, विद्या बालन आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह इतर अनेक अभिनेत्रींशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल चर्चा सुद्धा प्रसिद्ध होत्या.[३][४] +मार्च २०१५ मध्ये, शाहिदने त्याची १३ वर्षे लहान असलेली नवी दिल्ली येथील विद्यार्थी मीरा राजपूतशी त्याच्या लग्नाबद्दल जाहीर केले.[५] द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाहिदने धर्मपत्नी राधा सोमी सत्संग बियास मार्गे राजपूत यांची भेट घेतली. या जोडप्याने ७ जुलै २०१५, रोजी गुडगाव येथे एका खासगी समारंभात लग्न केले आणि मीराने ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांची मुलगी मीशा आणि सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा मुलगा झैन यांना जन्म दिला.[६] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5715.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef59ecace5f19a95336b7f7bd7a3b45c4ed480f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5715.txt @@ -0,0 +1,7 @@ +शाहीद परवेज खान (१४ ॲाक्टोबर, १९५८) हे हिंदुस्थानी शास्त्रीय सतार वादनातील इटावा घराण्याचे सतारवादक आहेत.[१] +शाहीद परवेज हे इटावा घराण्यातील सातव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे काका,उ.विलायत खान यांनी प्रचलित आणि विकसित केलेल्या गायकी अंगाने होणाऱ्या वादनशैलीचा समृद्ध वारसा उ.शाहीद परवेज यांनी पुढे नेला आहे. गायकी अंगाबरोबर तंत्रकारी अंगाचा मिलाफ करून निर्माण केलेल्या त्यांच्या स्वतंत्र वादनशैलीसाठी शाहीद परवेज ओळखले जातात.[२] +उ.शाहीद परवेज यांचे सतारीचे शिक्षण त्यांचे वडील उ.अजीज खान यांच्याकडे झाले. उ.अजीज खान हे सतार आणि सूरबहार वादक उ.वाहीद खान यांचे सुपुत्र. घराण्याच्या परंपरेनुसार उ.अजीज खान यांनी शाहीद परवेज यांना सतारीच्या शिक्षणाआधी गाण्याचे आणि तबल्याचे रीतसर शिक्षण दिले. शाहीद परवेज यांचे काका उ.हाफीज खान (गायक,सतार व सूरबहार वादक) यांनी त्यांना गायनाचे धडे दिले. तसेच +दिल्ली घराण्याचे मुन्नु खान यांच्याकडे १० वर्षे तबल्याचे शिक्षण झाले. त्यांच्या घराण्याने इमदाद खान(त्यांचे पणजोबा), इनायत खान, वाहीद खान(त्यांचे आजोबा),आणि विलायत खान(त्यांचे काका) असे वादक निर्माण केले आहेत.[३] +उ.शाहिद परवेज खान यांनी देश-विदेशातील अनेक संगीत महोत्सवातून आपले वादन सादर केले आहे. भारतातील सर्व प्रमुख महोत्सव, अमेरिका, युरोप, कॅनडा, आफ्रिका, ॲास्ट्रेलिया, रशिया,अशा देशातून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. शाहीद परवेज आपल्या स्वतंत्र वादनशैलीसाठी ओळखले जातात. गायकी अंगाबरोबर तंत्रकारी अंगाचा मिलाफ असलेल्या त्यांच्या वादनशैलीत,गायकी अंगासोबत लयीचे +विविध प्रकार पहायला मिळतात.[ संदर्भ हवा ] +त्यांनी स्थापन केलेल्या एस पी के अकादमी (SPK Academy) येथून तसेच त्यांच्याकडे शिकलेले अनेक शिष्य आज इटावा घराण्याची परंपरा पुढे नेत आहेत. शाकीर खान, समीप कुलकर्णी, सीमा गुलाटी, रवी चारी, अझीम अहमद अल्वी, सुब्रनील सरकार, जवाद नूर, नौमन खान, मनीष पिंगळे, कै.योगीराज नाईक हे त्यांचे शिष्य आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5729.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb62dee340187bbee78e610a786830e1183c5211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5729.txt @@ -0,0 +1 @@ +ह्या मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_573.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3692275f4177b41cde313687b3a851aa0251c2d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_573.txt @@ -0,0 +1,2 @@ +विलिस रॉबर्ट कटेल (सप्टेंबर १३, इ.स. १८६३:शेफिल्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - डिसेंबर ९, इ.स. १९२९:नेल्सन, लँकेशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5731.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb62dee340187bbee78e610a786830e1183c5211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5731.txt @@ -0,0 +1 @@ +ह्या मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5737.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff9f8c5487be7fc335253bf457f8a3f02d5bef25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5737.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. त्यानंतर मुंबईमध्ये उघड बंडाची सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असे पूर्ण ब्रिटिश भारतात पसरले आणि तेथील नाविकांकडून त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधील २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.[१][२] +ब्रिटिश सरकारने हे बंड ब्रिटिश सैनिक आणि शाही नौदलाच्या युद्धनौकांचा बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या संपाचा निषेध केला होता. +१८ फेब्रुवारी, १९४६रोजी शाही भारतीय नौसेनेच्या खलाशी व इतर खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या परिस्थितींबाबत तक्रार करत बंद पुकारला. त्यांना मिळणारे राहाण्याच्या ठिकाणाचा आणि अन्नाचा निकृष्ट दर्जा हे या संपाचे तात्कालिक कारण होते.[३] १९ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत याचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय समिती निवडण्यात आली. या समितीचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ्टटनंट मोहम्मद शरिफ आणि पेटी ऑफिसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली[४] या बंदाला भारतीय जनतेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाठिंबा मिळाला होता, परंतु बहुतांश राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचे टाळले हो.[५] +दुसऱ्या महायुद्धात शाही भारतीय नौदलाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९३९ ते १९४५ दरम्यान या दलाचा आकार दहा पटीने वाढला. युद्धपरिस्थितीमध्ये लष्करातील भरती लढवय्या जमातींमधून न करता मिळेल त्या विविध सामाजिक स्तरातील पुरुषांची केली गेली होती. १९४२ ते १९४५ दरम्यान भारतीय साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी नाझी जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेना आणि शाही भारतीय नौदलातील मोठ्या प्रमाणवरील भरती साठी मदत केली ज्यामध्ये प्रामुख्याने साम्यवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. पण युद्ध संपल्यानंतर, नव्याने भरती झालेले लोक ब्रिटिशांविरुद्ध उठले.[६] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5738.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be706050922dbd1f5885c5238381b224ec5f435f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5738.txt @@ -0,0 +1 @@ +शाही रक्षक (फ्रेंच: Garde Impériale) म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या हुकमतीखाली असलेली, फ्रेंच सैन्यातील निवडक सैनिकांची तुकडी होती. कालौघात या रक्षकतुकडीचे स्वरूप बदलत गेले. ही तुकडी नेपोलियनाचे अंगरक्षक, तसेच रणांगणावरील राखीव तुकडी म्हणून भूमिका बजावत असे. शाही रक्षकांमध्ये स्वीय कर्मचारी, भूदल, घोडदळ, तोफखान्याच्या रेजिमेंटी, तसेच सॅपर व मरीन सैनिकांच्या बटालियनी अशा प्रकारे वर्गवारी होती. याखेरीज काही वेळा प्रदीर्घ अनुभवापासून अल्प अनुभवापर्यंतच्या प्रतवारीनुसार जुने रक्षक, मध्यम ‍रक्षक व तरणे रक्षक अशा गटांमध्ये रक्षकांच्या तुकडीची गटवारी केली जाई. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5745.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b116c906cea5a80a1af3cd5269932eaa7804199e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5745.txt @@ -0,0 +1,3 @@ +शाहीर : कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. ... तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. +पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते.[१] +पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. अनेक शाहीर हे कोणत्या एकप्रकार च्या शाहिरी साठी प्रसिद्ध आहेत[२] परंतु लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी चार ही साहीत्य प्रकारत पोवाडे लिहिले आहेत[३][४]. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम[५] , डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य[६] अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात. बदलत्या कालानुसार शाहिरी कार्यक्रमाचे स्वरूप आणि आशय बदलताना दिसून येतो. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात.[७] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5773.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5773.txt @@ -0,0 +1,29 @@ + +सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता. +सातारा जिल्ह्यातील नद्या +कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते. +सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. +सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते. +● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. +● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. +● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. +● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. +● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. +● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. +१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो. +२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे. +३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे. +४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे. +५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. +साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. +छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती +  +सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत +सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत +'वेण्णानगर +संगमनगर- +गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले. +सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. +यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. +सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे. +सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_581.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_581.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5812.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fd15d16ca60ca4c0e27a68cd8d8d1f21bc33a09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5812.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंगारमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5833.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a1f49314e77c3f67afeedebd45652a5efc8f322 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5833.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंगोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5846.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8628826ce05d5900fa3151e91ec9ca3205ad2771 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5846.txt @@ -0,0 +1,5 @@ +शिंतो किंवा शिंटो (जपानी: 神道) हा जपान मधील सर्वात मोठा धर्म आहे. या धर्मास जपानी लोकांचा स्थानिक व आध्यात्मिक धर्म मानले जाते. अनेक अहवालांनुसार, जपानमधील सुमारे ७०% ते ९६% लोक शिंतो धर्माला मानणारी आहे.[१][२][३] जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्वात आहेत. जपानी लोक शिंतो धर्माचे आणि बौद्ध धर्माचे एकत्रितपणे पालन करतात. +जपानमध्ये चीनमधून आलेले तीन धर्म प्रचलित आहेत : कन्फ्यूशियन,[४][५][६] ताओ [७]आणि बौद्ध धर्म, त्यापैकी बौद्ध धर्म हा सर्वात प्रभावशाली आहे.[८] जपानमधील मूळ स्थानिक लोक आयन आहेत, आणि शिंटो हा प्रामुख्याने येथील स्थानिक धर्म आहे.[९] इतर दोन वंश आशियाई प्रदेशातील आहेत. या वांशिक तंतूंनी जपानची संस्कृती, भाषा आणि पौराणिक कथांवर आपली छाप सोडली आहे. या परदेशी घटकांनी शिंटो धर्माच्या द्वैतवादालाही अंतिम स्वरूप दिले. शिंटोवादच्या संपूर्ण इतिहासात हा द्वैतवाद दिसून येतो. हा द्वैतवाद औपचारिक, अधिकृत आणि राष्ट्रीय संप्रदाय, लोकप्रिय प्रथा आणि सामान्य दैनंदिन जीवनामध्ये आढळतो.[१०] +शिंटोवादची नेमकी उत्पत्ती अज्ञात आहे. जपानच्या पारंपारिक कालगणनेनुसार शिंटोवादचा उगम इ.स ६६० मध्ये झाला आहे. हा पहिला जपानी सम्राट (सिकडी) जिमू टेन्नोचा काळ आहे. शिंटोवाद हा तिसरा जुना धर्म आहे. राजकीय सिद्धांत आणि राष्ट्रीय स्थिर योगदानामुळे जगातील विविध धर्मांमध्ये हे एक विशेष स्थान व्यापलेले आहे. शिंटोवादचे वैशिष्ठ्य म्हणजे ते जपानमध्ये पूर्ण वर्चस्वाचे स्थान व्यापते. जपानमधील शिंटो धर्माचा हा निर्विवाद प्रभाव इ.स ८६८ मध्ये जपानमध्ये बौद्ध धर्माचा पदार्पण होईपर्यंत टिकला.[११] +को-जी-की प्राचीन घडामोडींचे दस्तऐवज (Kojiki or 'Records of Ancient Matters' (712 CE) )[१२] आणि निहोन गी (निहोन शोकी) जपानचे इतिहास ( Nihon-gi or 'Chronicles of Japan' (720 CE). )[१३]या साहित्याच्या दोन प्रमुख समुहाना शिंटोवादचे पवित्र ग्रंथ म्हटले जाते. हा जपानच्या स्थानिक साहित्याचा सर्वात आदरणीय, मौल्यवान आणि प्रभावशाली दस्तऐवज आहे. हे कामीची कथा आणि मानवाच्या अस्तित्वापूर्वीच्या दैवी युगातील संवाद सांगतात. या ग्रंथांची सुरुवात सूर्योदयाच्या बेटांच्या निर्मितीच्या कथेपासून होते. हे ग्रंथ देखील मनोरंजकपणे सांगतात की राजेशाही वंश थेट स्वर्गातून जपानच्या बेटांवर कसा आला.[१४] +शिंटो हा मुळात निसर्गपूजेचा धर्म आहे. या प्रकारची उपासना शिंटो पंथांमध्ये, सणांमध्ये आणि विधींमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते. परिणामी, शिंटो निसर्गाच्या देवत्वावर दृढ विश्वास दाखवतात. हे जपानी भाषेतील सर्वात लोकप्रिय शब्द कामी म्हणून ओळखले जातात. कामी चा शाब्दिक अर्थ उच्च आहे. इतर धर्मांमध्ये या शब्दाचा विविध प्रकारे अर्थ लावला गेला आहे. याचा अर्थ शुद्ध किंवा चमकदार श्रेष्ठ, रहस्यमय, गुप्त आणि अलौकिक असा होतो. त्याचा सामान्यतः वापरला जाणारा अर्थ श्रेष्ठ अस्तित्व आहे. ते दोन्ही देवी-देवता आहेत. हे विशिष्ट आणि वैयक्तिक दोन्ही आहे.[१५] जपानमध्ये प्रकाशित झालेल्या शिंटोवरील नवीनतम सर्वसमावेशक ग्रंथात कामी शब्दाच्या उत्पत्ती आणि महत्त्वासंबंधी सोळा भिन्न सिद्धांत आहेत. हे तीन मुख्य विचारांनुसार वर्गीकृत केले आहे. शुद्ध आणि चमकदार श्रेष्ठ, अनोळखी रहस्यमय, भितीदायक जादू आणि अलौकिक मूळ जपानी भाषेत इतका समृद्ध आणि बहुरूपी थीम असलेला दुसरा शब्द नाही. शिंटोच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात प्रसिद्ध धर्मशास्त्रज्ञ म्हणजे मोतुरी (१७३०-१८०१), ज्याने कामी शब्दाचा खरा अर्थ शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले.[१६] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5865.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cedf1e4678fcfde0d5daaf51cb20a4342b76338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5865.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5868.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9138a6cb3f16d848d7b9df7736722ec34446ec07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5868.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंदी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5878.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8ef1f640dfdb2d6b7697aafa52388b2961cc175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5878.txt @@ -0,0 +1,3 @@ +शिन्दे घराणे अथवा (हिन्दीमध्ये सिन्धीया) हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेडे या गावचे पाटील होते. राणोजी शिंदे हा मूळ कर्ता पुरुष होता. +या शिन्दे घराण्याचे कुलदैवत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्‍नागिरीचा दक्खनचा राजा श्री जोतिबा. या जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शिन्दे सरकार यांच्या शासनकाठीला पहिल्या मानाच्या अठरा शासनकाठ्या मध्ये नऊ क्रमांकचा मान आहे.सध्या शिन्दे ग्वाल्हेर याठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्याची ही मानाची शासनकाठी त्यांच्या वतीने चालवण्याचा मान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावाच्या ग्रामस्थांना शिन्देंनी फार पूर्वीपासून दिला आहे.तशी नोन्द सुद्धा सिन्धिया देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहे. +शिन्दे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5879.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb6475f543f9f38adfc5c8a1db7cf9594aaee9a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5879.txt @@ -0,0 +1,3 @@ +शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे.[१] +पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले.[२] पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी, इ.स. १७९४ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[३] +इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजीने बांधवलेले शिवालय होते. महादजी शिंदे यांच्या मॄत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. समाधीच्या बाजूला मोठे शिवमंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे. स्मारकाच्या पुनर्बांधणीकरिता ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव शिंद्यांनी देणगी दिली आहे.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5880.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4456fbf2d513b93c6c78a14cd6ee96006b4cc2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5880.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंदेटाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5896.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6ff6aba4dff6c1cdb065ad7cdf454894e9897e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5896.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिंदेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5903.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80b6e3d852869660f681e8bfee816a58102cf30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5903.txt @@ -0,0 +1,2 @@ + शिंदोळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5920.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5920.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5925.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5925.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5933.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eef4d5ca317d38b7f76d8441cde51615b72c91a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5933.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिकागो बेअर्स हा अमेरिकेच्या शिकागो ह्या शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या एन.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_597.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_597.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5990.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..720efac1c69e0546dfc328555b1f3e114b618eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5990.txt @@ -0,0 +1,4 @@ +सहा प्रकारच्या वेदांगामधील शिक्षा हे एक स्वतंत्र शास्त्र आहे.हे पहिले वेदांग आहे.व्युत्त्पत्तीच्या दृष्टीने स्वर ,वर्ण आदींचा उच्चार कसा करावा हे शिकविणारी विद्या म्हणजे शिक्षा.स्वर तीन प्रकारचे असतात.उदात्त,अनुदात्त,स्वरित.स्वराचा उच्चार करायला जो वेळ लागतो त्याला मात्रा असे म्हणतात.-हस्व,दीर्घ,प्लुत अशा तीन मात्रा आहेत. +वैदिक काळापासूनच वेदांगाकडे वैदिक ऋषींचे लक्ष वेधले गेले होते.तैत्तिरीय उपनिषदात शिक्षेची वर्ण,स्वर,मात्रा,बल,साम आणि संतान अशी सहाप्रकारची अंगे सांगितली आहेत. +शिक्षाशास्त्राचा महत्त्वाचा पूर्णपणे आधारित ग्रंथ म्हणजे "पाणिनीय शिक्षा" होय. या ग्रंथात साठ श्लोक असून याचा इतिहास खूप जुना आहे पण याचे मूळ ग्रंथ आता मिळू शकत नाहीत.महाभारताच्या शांतिपर्वात आचार्य गालव कृत अहसा एका शिक्षाशास्त्राचा उल्लेख येतो शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या काळामध्ये घडलेल्या आहेत रामायण तसेच महाभारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत या काळातील शिक्षण शिक्षण पद्धती शिक्षकांचे स्थान या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या होत्या याचा निर्देश हा या काळातील रामायण आणि महाभारत या महाकाव्याच्या आधारित देखील येतो.[१] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5998.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dfd028576be09e9fb7022cc3473c8a9d870e8d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_5998.txt @@ -0,0 +1,36 @@ +शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे. +छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणुन पण हे मंदिर प्रसिद्ध आहे, स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबिय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत,तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दान पत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपति घेत असत..... + सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.[१] मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. +मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात. +या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. +शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले. +शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्‍ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे. +शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या शिखराला पागोटे (सुताची जाड दोरी) म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा "हर हर हर महादेव"च्या जयघोषात पार पडतो. एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.[२] +चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडिला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. +. +. +. +श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्या इतकीच जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज कावडे यांचा कावडीची परंपरा आजही कायम आहे, चैत्र शुद्ध रम नवमी ला पवित्र कऱ्हा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांचा समवेत कावडीचे प्रस्तान होते... +. +. +पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावत मानवी साखळीचा साह्याने अवघड आसा मुंगी घाट सर केला जातो या कवडीस पहण्य करता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून आसतात व शिव नामाचा जयघोष करत आसतात +. +. +. +महादेवाला आव्हान (रागात ओरडा) करणारे म्हणुन देखील या कवडीची ओळख आहे माहाद्या धाव sss, माहाद्या धाव (अवघड आसा मुंगी घाट सर करताना भक्तांचा कस पणाला लागतो,आशा वेळी भुतोजीमहाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात) व शंभु कृपेने घाटातील अवघड टप्पे भिंती कावड भक्ती-शक्ती चा संगमात मुंगी घट सर करून वर याते, शिवभक्तांचा आनंद गगनात मावेनासा होतो +. +. +मोठ्यमहादेवाला पवित्र कऱ्हा संगमाचा पण्यने सर्वात शेवटचा यात्रेतला अभिषेक केला जातो व शीखर शिंगणापूर येथिल यात्रेची सांगता होते. +1.अमृतेश्वर बळी मंदिर. +2.हत्तीची सोंड. +3.भागीरथी कुंड. +4.जटा आपटलेले स्थान. +5. गुप्तलिंग मंदिर. +6. शिवतीर्थ तलाव. +7.मुंगी घाट. +8.मोठा महादेव मुख्य मंदिर. +9. तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड, सासवड.यांचा विश्रांतीचा ओटा (चांदणी) +शंभू माझा नवसाचा या चित्रपटातील काही भाग हा शिखर श्शिंगणापूरच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रित झाला आहे. अलका कुबल-आठल्ये, मिलिंद गुणाजी, राजेश शृंगारपूरे , तेजा देवकर , हे त्या चित्रपटातले प्रमुख कलावंत आहेत. +★धज पदयात्रा , +★कावड यात्रा +अनभुलेवाडी, थदाळे, वावरहीरे diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6007.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14500e049be770370f82462194d4b3831b3b5cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6007.txt @@ -0,0 +1,10 @@ +शिखा टंडन (जन्म-२० जानेवारी १९८५)त्या एक बेंगळुरू मधील स्विमिंग चॅम्पियन आहे. टंडन यांनी राष्ट्रीय स्तरावरील १४६ पदके आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३६ पदके मिळविली आहेत. ज्यात पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. सध्या त्या अमेरिकेच्या विज्ञान संघाचे सदस्य आहेत.जे यूएसएडीएच्या वैज्ञानिक पुढायांसाठी महत्त्वाचे असलेले संसाधन, अहवाल आणि प्रकल्पांची दैनंदिन कामकाजाची प्रगती, विकास व देखभाल करीत आहे.[१] +टंडन यांच्या धाकटया भावच नाव शोभित टंडन आहेत.ज्यांना अस्थमाचा त्रास झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आईने त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यासाठी त्यांना पोहायला सांगितले. आणि शिखा टंडन त्यांच्याबरोबर जोडले गेले.त्यांचे रोल मॉडेलमध्ये जेनी थॉम्पसन आणि इंज डी ब्रुझन यांचा समावेश आहे.[२] +टंडन यांनी जैन विद्यापीठाच्या छत्रछायेखाली श्री भगवान महावीर जैन महाविद्यालयाचा समावेश घेतला.आणि नंतर बेंगळुरू विद्यापीठातील जैवतंत्रज्ञानचा अभ्यास केला.[३] +तिने केस वेस्टर्न रिझर्व विद्यापीठ,ओहायो या विद्यापीठातून जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान मध्ये तिची दोन्ही मास्टर डिग्री पूर्ण केल्या.आणि सध्या यूएस अँटीडोपोसिंग एजन्सी, कॉलोराडो स्प्रिंग्स, यूएसए येथे विज्ञान कार्यक्रम आघाडी म्हणून काम करीत आहे.[४] +जेव्हा त्या १२ वर्षांच्या होत्या तेव्हा टंडन एका राज्य सभेत दिसलेले.दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्पर्धा घेण्यात आली व कांस्यपदक पटकावले.[५] टंडन १३ व्या वर्षी आशियाई स्पर्धेत आणि १६ वर्षांखालील त्यांच्या पहिल्या जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी गेल्या होत्या. +२००१ च्या २८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत टंडनने २०० मीटर वैयक्तिक पदक जिंकले,नवीन रेकॉर्ड सेट केले.[६] +२००२ साली टंडन बुसानमध्ये आशियाई स्पर्धेत १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये इव्हेंटमध्ये ८ वा क्रमांक पटकावला. +२००३ च्या ५७ व्या सीनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत टंडनने भारतीय महिलांच्या ५० फ्रीस्टाइल रेकॉर्डसला २६.६१ सेल्सचा ब्रेक केला.या स्पर्धेत त्यांनी पाच वैयक्तिक सुवर्ण पदके जिंकली आणि सलग तिसऱ्या वर्षी त्यांना सर्वोत्तम जलतरणपटू घोषित करण्यात आले.[७] +स्पोर्ट्स +फेसबुक फॅन पेज diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6008.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3481622e0073b3e054e0a784721055298ddf0eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6008.txt @@ -0,0 +1 @@ +शिखा पांडे (१२ मे, १९८९:करीमनगर, गोवा, भारत - ) ही भारताकडून २ कसोटी, ३ एकदिवसीय तसेच ६ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. शर्मा उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6053.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8782d1c355dab6ce226b3af33fc23b104842e7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6053.txt @@ -0,0 +1 @@ +Shin-Ei Animation Co., Ltd. (जपानी: シンエイ動画株式会社) टीव्ही असाही यांच्या मालकीचा एक जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ आहे. १९७६ मध्ये टोकियोमध्ये स्थापित, हे ए प्रॉडक्शनचा उत्तराधिकारी आहे, त्याचे संस्थापक दाकिचि कुसुबे यांनी मागील अ‍ॅनिमेशन उपक्रम केले होते, जो पूर्वी टोई अ‍ॅनिमेशनसाठी अ‍ॅनिमेटर होता. शिन-एई सर्वात लोकप्रिय दोन अ‍ॅनिम टेलिव्हिजन मालिकेमागील अ‍ॅनिमेशन स्टुडिओ म्हणून ओळखले जाते: डोरेमन आणि क्रेयॉन शिन-चान, जे अजूनही अनुक्रमे १९७९ आणि १९९२ पासून जपानी टीव्हीवर चालतात.सध्या जपानी टेलिव्हिजनवर प्रसारित केलेली कामे बोल्ड आहेत . diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6070.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6070.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6089.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6dae9576405703578d7965a31fb1662498f6817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6089.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिबेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6096.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f55e992b5c48e27c3906f3cda99c7ae288bb648c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6096.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +शिमरॉन ओडिलोन हेटमायर (२६ डिसेंबर, इ.स. १९९६:कंबरलँड, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6097.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f55e992b5c48e27c3906f3cda99c7ae288bb648c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6097.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +शिमरॉन ओडिलोन हेटमायर (२६ डिसेंबर, इ.स. १९९६:कंबरलँड, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6115.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4d442ae636f2a18aad2c246dbc565a39bc51458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6115.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिमोगा भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर शिमोगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6128.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1000bd5539573b83139be4385fd0d06ebfe90eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6128.txt @@ -0,0 +1 @@ +शिया या इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील १.५ अब्ज मुसलमानांपैकी १० ते १५ टक्के (१५ कोटी) शिया पंथीय आहेत. सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात. महम्मद पैगंबरांनंतर दूत 13पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक आहेत. पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई हजरत अली यांना शियापंथीय उत्तराधिकारी म्हणून मानतात. शियांच्या म्हणण्यानुसार पैगंबरांनीही अली यांनाच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं. पण, हजरत अबू बकर यांनी फसवून प्रमुखपदी वर्णी लावून घेतली. शियापंथीय मुसलमान पैगंबरांनंतरच्या तीन खलीफांना नेता मानत नाहीत. ते त्यांना गासिब असं म्हणतात. गासिब अरबी शब्द आहे. हडपणे असा त्याचा अर्थ होतो. शियापंथीयांनुसार अल्लाने मोहम्मद यांना पैगंबर म्हणून पाठवलं होतं. त्याच धर्तीवर मोहम्मद यांचे जावई अली यांना अल्लानेच इमाम/नबी म्हणून पाठवलं होतं. त्यांची मुलं पुढचे इमाम होत गेले. पुढे जाऊन शिया पंथातही अनेक गट पडले — इस्ना अशरी, जैदिया, इस्माइली शिया, दाऊदी बोहरा, खोजा, नुसैरी इ. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6140.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc6ae2c9fde7ec0e915d307364e4235fa5b626b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6140.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरांबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6152.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37a74a13d1dfbcb3146852b6e1803213371e2b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6152.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6153.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e0f898e16d6c2bdd2929491aa816a7fa9f4e97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6153.txt @@ -0,0 +1,9 @@ + शिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +शिरगाव हे खेड तालुक्यातील सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6156.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04d9aabf46ece830c9be9cd2c1f54f1ed48c3858 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6156.txt @@ -0,0 +1,8 @@ + शिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6182.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8067d20e9338eecdb1f265f4371be375d63ec3ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6182.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरढोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6188.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f9a1e67cd793b242d14b237a1a2741f0915431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6188.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिरताव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +==प्रेक्षणीय स्थळे== श्री भैरोवनाथ मंदिर, श्री खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, म्हाकुबाई मंदिर, श्री मांगोबा मंदिर, श्री सिद्धनाथ किल्ला, माणदेशी बंधारा +==जवळपासची गावे== देवापुर , बनगरवाडी (वरकुटे मलवडी), बनगरवाडी (म्हसवड), पुळकोटी, विरकरवाडी, पळसावडे, वरकुटे मलवडी diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6197.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a6b5061c5304e0666ab81b96b4f2b3400d96b4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6197.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरपुटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6225.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c6adef718d9ea03240fe2c5317c33036a92788f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6225.txt @@ -0,0 +1,17 @@ +शिरवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३५८ कुटुंबे राहतात. एकूण १५९१ लोकसंख्येपैकी ७९८ पुरुष तर ७९३ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +आडणे,कळंभोण, आंबोडे, टोकारे, पारोळ,उसगाव, शिवणसई, खैरपाडा, तिवरी, भिनार, सायवन ही जवळपासची गावे आहेत.शिरवली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6242.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a217107d0548515fda533bb71fdef257a629630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6242.txt @@ -0,0 +1,16 @@ +शिरवळ हे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील ५४७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३७७३ कुटुंबे व एकूण लोकसंख्या १६०८० लोकसंख्या आहे. पैकी पुरुष ८२८५ पुरुष आणि स्त्रिया ७७९५ आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४१९ असून अनुसूचित जमातीचे २२० लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६३१७३ आहे. शिरवळच्या सर्वात जवळचे शहर भोर हे १७ किलोमीटर अंतरावर आहे.  +शिरवळ हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे. पुणे-सातारा-बंगलोर या महामार्गावर साताऱ्याच्या अलीकडे डाव्या हाताला हे गाव लागते. गाव छोटे असून गावात ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय आहे. +  +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. +शिरवळ ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ) : +श्री अंबाबाई Archived 2019-09-12 at the Wayback Machine. ही शिरवळची ग्रामदेवता आहे. हे गावातले सगळ्यात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. अंबिका माता हे ग्रामदैवत असून वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयेला गावात मोठी यात्रा भरते. मंदिरातील मूर्ती पुरातन काळातील आहे. इथे प्राचीन लेणी पण आहेत हे फारच थोड्या जणांना माहित आहे.दरवर्षी अक्षय तृतियेला देवीचा महोत्सव असतो. +हे गावातील दुसऱ्या क्रमाकांचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असून यात्रा व इतर सर्व महोत्सवांमध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. +या पुरातन शिवायालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरातून शुभानमंगल किल्ल्यावर जायला भुयारी मार्ग होता. संकटाच्या वेळी या मार्गाचा उपयोग होत असे, असा उल्लेख सापडतो. +हे मंदिर नदीकिनारी असून अतिशय पुरातन आहे. गावच्या यात्रेच्या वेळी या देवीलासुद्धा खूप महत्त्व येते. +मुदाई मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं आहे. ते वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असते फक्त काही काळ उन्हाळ्यात ते पाण्याच्या बाहेर असते. त्याच वेळी भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकतात.अधिक माहितीसाठी डिजिटल शिरवळ वेबसाईटला भेट द्या +[१] +हेही मंदिर नदीकिनारी असून बस स्थानक ते मंदिरापर्यंत जाणारा रस्ता गावाच्या मध्यभागातून व मुख्य बाजारपेठेतून जातो. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. येथून शुभानमंगल किल्ल्याचे दर्शन घडते. +शिरवळपासून वायव्य दिशेला जवळपास ५ कि. मी. अंतरावर पांडवदऱ्यामध्ये सुंदर पांडवलेणी पाहायला मिळतात. गावापासून १० किलोमीटर पूर्वेला भोर-पंढरपूर या राज्य महामार्गावर वीर धरण आहे. तसेच नसरापूर, नारायणपूर, प्रतिबालाजी मंदिर, महाबळेश्वर, वाई ही पाहण्यासारखी पर्यटनस्थळे काही तासांच्या अंतरावर आहेत. + +गावाच्या जवळच पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे. पांडवदरा असे नाव आहे. शिरवळच्या शुभानमंगल किल्ल्याची माहिती देणारा एक ग्रंथसुद्धा उपलब्ध आहे. +शिरवळ येथे मराठी शाळेशेजारी गेली ३५ वर्षे झाली आपल्या सेवेत खमंग आणि झंजाणित अशी चव श्रीराम बेस्ट वडापाव सेवेत आहे diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6269.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd91b23f53cfb3316dca0477c46ce159dcd376b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6269.txt @@ -0,0 +1,17 @@ +शिरसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०८ कुटुंबे राहतात. एकूण ९०५ लोकसंख्येपैकी ४६६ पुरुष तर ४३९ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +कोशिमशेत, धामणशेत, डोल्हारे, नाशेरा, आडोशी,पाथर्डी, बोटोशी, कुरलोड, केवनाळे, सूर्यमाळ, शिवाळी ही जवळपासची गावे आहेत.आडोशी ग्रामपंचायतीमध्ये आडोशी, आणि शिरसगाव ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6298.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc8844cbfb2687feea9be84f43e5d65a3f1f2fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6298.txt @@ -0,0 +1,2 @@ + शिरसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_63.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_63.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a586b3f2349eb6f5187e025fc2d3e9142dfef378 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_63.txt @@ -0,0 +1,23 @@ +भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. +महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत. + देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. घटनेच्या कलम 370 जम्मू काश्मीर विशेष तरतुदी काढण्यात आल्यानंतर कलम 3A अंतर्गत जम्मू काश्मीरचे क्षेत्रांत व सीमांत बदल केल्यामुळे केंद्रशासित प्रदेश निर्माण केला आहे.31 ऑगस्ट 2019 पूर्वी विधानपरिषद व विधानसभा अस्तित्वात होत्या. कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत. +महाराष्ट्राचे विधान मंडळ +288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत.तर +78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. +5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. +1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात. +1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. +2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. +३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते. +४) विधान परिषदेत किमान ४० व जास्तीत जास्त राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १/३ सदस्य असू शकतात. +५) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. +६) सभापती व उप्सभापतीची निवड विधान परिषदेचे सदस्य आपल्या मधूनच करतात. + +★ कशी असते मतदान प्रक्रिया? +1 विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही. +2) राष्ट्रपती निवडणूक, विद्यापीठ सिनेट यासारख्या निवडणुकींसाठी पसंतीक्रमाची पद्धती वापरली जाते तीच पद्धत या निवडणुकीतही अवलंबली जाते. +3) विधान परिषदेसाठी देखील पसंतीक्रम पद्धतीचाच अवलंब केला जातो. +4) निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपला (आवडीनुसार) पसंतीक्रम देतो. +5) जास्त पसंतीच्या उमेदवाराला पहिला क्रम, त्यानंतर दुसऱ्या आवडीच्या उमेदवाराला दुसरा अशा पद्धतीने एकूण उमेदवारांएवढे मत देता येते. +मतमोजणी : संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. +सरळ लढतीचा फायदा : दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण न झाल्यास पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6310.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc6ae2c9fde7ec0e915d307364e4235fa5b626b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6310.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरांबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6316.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f691ed933c76426a82d2c46a33dde2c977a5a69c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6316.txt @@ -0,0 +1 @@ +शिराझ सुमर (१९५०:टांगानिका - हयात) हा  पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6330.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfca0a233b07c2e1e065257d3ff2befe3396c935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6330.txt @@ -0,0 +1,3 @@ + +दोडका, अर्थात शिराळे, (लेखनभेद, अन्य नावे: दोडके, शिरांचा दोडका, शिराळे, कोशातकी; शास्त्रीय नाव: Luffa acutangula, लुफ्फा अक्यूटॅंगुला ; इंग्लिश: Ridged luffa, रिज लुफ्फा ;) हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशिया व पूर्व आशियापर्यंत आढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. +याचा एक प्रकार कडू दोडकी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_634.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28629ccfc8fa5c5874f15582c21530a17ec2f5bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_634.txt @@ -0,0 +1 @@ +विल्का मवातिले (जन्म १८ जुलै २०००) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6359.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1202cd69a8f238df4cbe1f8960cb70cbf99da77e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6359.txt @@ -0,0 +1 @@ +शिरीष हिरालाल चौधरी महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6361.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b96f803a18a1bcf082902ea13804071e4cf9275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6361.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरुडदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6369.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb3abe4413aa569b3a3d006898f5a0ca0769c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6369.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिरूर विधानसभा मतदारसंघ - १९८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या १. शिरुर तालुक्यातील न्हावरे, वडगांव रासाई आणि तळेगांव ढमढेरे ही महसूल मंडळे आणि शिरुर महसूल मंडळातील शिरुर सझा आणि करंजवणे सझा आणि शिरुर नगरपालिका, २. हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरळी कांचन ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. शिरूर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6384.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2683985499ee9c164ca625ce23d36cf5b5cec770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6384.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिरूर ताजबंद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १६ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०७४ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १०५७७ लोकसंख्येपैकी ५४५८ पुरुष तर ५११९ महिला आहेत.गावात ७३८८ शिक्षित तर ३१८९ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ४०९३ पुरुष व ३२९५ स्त्रिया शिक्षित तर १३६५ पुरुष व १८२४ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.८५ टक्के आहे. +मुलकी, उमरगा कोर्ट, तेलगाव, साळगरा, अजणी खुर्द, आंबेगाव, बोडखा, सय्यदपूर, वाईगाव, चोपळी, मोरेवाडी ही जवळपासची गावे आहेत.शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_639.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79db132c497584ed597c2fe15972cf62615e4026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_639.txt @@ -0,0 +1,4 @@ +विल्किन्सन काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +विल्किन्सन काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6413.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b79ba38f4c92aae11ac226c182edd52eeb329f5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6413.txt @@ -0,0 +1,2 @@ + शिरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6436.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89372948d96a4862a4842e751bde2ce2f3da4621 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6436.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिलाँग लोकसभा मतदारसंघ हा मेघालय राज्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6449.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0cf0c15a95f480f221f4755bb3f477e18daf075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6449.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी, [॥संस्कृत]], कन्नड +शिलाहार (शेलार) हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील मराठा राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. +शिलाहार वंशची तीन घराणी होती. +ही तिन्ही घराणी स्वतःला विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत. जीमूतवाहनाने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर (शिलेवर) बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून त्याच्या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे. +उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई,रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबरनाथ मंदिर याच राजघराण्यातील राजा छित्तराज याच्या कारकिर्दीत उभारले गेले. ठाणे शहरातील प्रसिद्ध कौपीनेश्वर मंदिरही याच राजघराण्याने उभारले. +दक्षिण कोकणचे शिलाहार हे सध्याच्या रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इ. दक्षिणी कोकण प्रदेशात राज्य करत होते. त्यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच आत्ताचे रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापुर होय. सणफुल्ल हा यांचा मूळपुरुष होता. +कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे /राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक (पन्हाळा) या ठिकाणांवर होती. जतिग हा त्यांचा मूळ पुरुष होता. +देवगिरीचे चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांनी शिलाहारांचा पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6460.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026701be980e0939e85676380c0f8fd61d5e5813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6460.txt @@ -0,0 +1,18 @@ +शिलोंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे उधवा-खाणवेळ रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४२४ कुटुंबे राहतात. एकूण २५१२ लोकसंख्येपैकी १२२४ पुरुष तर १२८८ महिला आहेत. गावाची साक्षरता २७.९४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३८.०१ आहे तर स्त्री साक्षरता १८.५१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५३६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २१.३४ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +अलकापूर, वरखंडे, खुबाळे, तोरणीपाडा, बेंडगाव, कळमदेवी, पाटीलपाडा, गडचिंचाळे, दिवाशी,दाभाडी, किन्हवळी ही जवळपासची गावे आहेत.शिलोंदे समूह ग्रामपंचायतीमध्ये कळमदेवी आणि शिलोंदे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6466.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0d08f8cba2d2a546505458186050a06b6a89cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6466.txt @@ -0,0 +1,2 @@ + +शिलोमांत्सिन हा कोलंबसपूर्व, १४४० ते १४७३ कालीन मेक्सिकोची दरीमेक्सिकोच्या दरीत वसलेल्या कुल्वाकानच्या अल्तेपेत्लचा (नगरराज्य) त्लातोआनी ("राजा") होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6486.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..920f325e06b26904c2da5cda79410a34109b6493 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6486.txt @@ -0,0 +1,17 @@ +शिळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२५ कुटुंबे राहतात. एकूण ६९७ लोकसंख्येपैकी ३४० पुरुष तर ३५७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +झाडापोली,साजण, रामपूर,मालवडे,चिंचघर, भोपोळी, घाणेघर, बोरांडे, बांगरचोळे,हाताणे ही जवळपासची गावे आहेत.बोरांडे ग्रामपंचायतीमध्ये बांगरचोळे, बोरांडे, आणि शिळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6508.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfade4f37a944bb21d6ded07392753c84ca83dd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6508.txt @@ -0,0 +1,8 @@ +शिवकुमार शर्मा (१३ जानेवारी, इ.स. १९३८; जम्मू, - १० मे, २०२२; मुंबई) हे एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक होते. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात. +शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे हरिदास संगीत संमेलनात केले.[१] +सुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९५६ साली शांताराम यांच्या "झनक झनक पायल बाजे" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला. +१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत "कॉल ऑफ द व्हॅली" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली "सिलसिला" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने "शिव-हरी" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), विजय, चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), साहिबान, डर (१९९३).[१] +पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.  त्यांना  १९८५ मध्ये  बाल्टीमोर शहराची मानद नागरिकतासुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, सन  १९९१ साली  पद्मश्री, तसेच  २००१ मध्ये  पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजी यांना सन्मानित करण्यात आले. +शिवकुमार शर्मा यांचे लग्न हे मनोरमा शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना रोहित आणि राहुल हे दोन मुलगे आहेत.[२] त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. १९९९मध्ये शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, राहुलला देवाकडूनच संगीताची भेट मिळाली असल्यानेच त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे. +शिवकुमार शर्मा यांनी 'जर्नी विद अ हंड्रेड स्ट्रिंग्ज: माय लाईफ इन म्युझिक' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचे सहलेखन इना पुरी यांनी केले आहे.[३] +वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_651.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbdeb7a49256bfe6bb65dbfe4c069c35a6750521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_651.txt @@ -0,0 +1,2 @@ + +विल्टशायर (इंग्लिश: Wiltshire) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ट्रोब्रिज हे येथील मुख्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6579.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c416fbaaac607e63a1a761f145e7346b801d70ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6579.txt @@ -0,0 +1,2 @@ + +शिवडीचा किल्ला महाराष्ट्राच्या शहरातील मुंबई शहरातील एक किल्ला आहे. याची रचना ईस्ट इंडिया कंपनीने १६८० साली केली.[१] येथून मुंबईच्या बंदरावर नजर ठेवता येते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6580.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..916d175deff6f87cf547bf4b4fb2d631ced3002c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6580.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6589.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72eb80dddfe7e8c04cc1f4ffeb85bdfee087f0bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6589.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९९ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6593.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9f4c4ca707a70ca9b0960fbf13be3fc8e788dc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6593.txt @@ -0,0 +1,5 @@ +शिलाई यंत्र हे कपडे शिवण्याचे यंत्र आहे. यास शिवणयंत्र असेही म्हणतात. शिलाईयंत्राचा प्रथम शोध ए.वाईसेन्थ्ल यांनी इ.स. १७५५मध्ये लावला. १७९० मध्ये थॉमस सेंट यांनी दुसऱ्या शिलाई यंत्राचा शोध लावला. शिलाईयंत्र हे वस्त्रापासून कापड तयार करणे, घरगुती कापड शिवणे यासाठी वापरले जाते. +या मध्ये सुईच्या तोंडाशी नेढे असते ज्यामध्ये दोरा ओवला जातो व बॉबीन मधून एक दोरा येतो. दोन दोऱ्यांच्या सहाय्याने शिवणयंत्राने शिवले जाते. हे यंत्र हाताने, पायाने किंवा विजेवर चालविता येते. आधुनिक शिलाईयंत्रे विजेवर चालतात. +कापड किंवा कापडाचे तुकडे यांच्यावर दोऱ्याची शिलाई करून कपडे बनवणाऱ्या यंत्राला शिवण यंत्र म्हणतात. पहिल्या शिवण यंत्राची निर्मिती औद्योगिक क्रांतीच्या काळात झाली. १७९० मध्ये थॉमस सेंट या इंग्रजाने शिलाई यंत्राचा शोध लावला असे मानले जाते. शिलाई मशीनने कपडे उद्योगाची कार्यक्षमता आणि उत्पादकता नक्कीच सुधारली. घरगुती मशीनच्या तुलनेत औद्योगिक शिलाई मशीनी, दिसण्यात वेगळ्या असून आकारमानाने मोठ्या आणि अधिक वेगवान व कार्यक्षम असतात. आधुनिक शिवण यंत्रात सुई आणि थंम्ब्ल्सची सोईच्या जागी असतात. ही यंत्रे स्वयंचलितही असतात. +इंग्रजी संशोधक थॉमस सेंटने पहिले शिलाई मशीन बनवले पण त्याचा उपयोग कपडे शिवण्यासाठी न करता तो ते लेदर व कॅनव्हास यांच्यावर शिलाई करण्यासाठी करत होता. +त्याच्या शिवणकामाचे यंत्राने साखळी पद्धतीचा वापर केला, ज्यात मशीन फॅब्रिकमध्ये साधी टाके बनविण्यासाठी एक धागे वापरते. स्टिचिंग एरी भांडी घासेल आणि एक फिकट बिंदू रॉड थ्रेक त्या छिद्रातून घेऊन जाईल आणि त्याला पुढील शिवण ठिकाणी हलविले जाईल, जिथे चक्र पुनरावृत्ती होईल आणि शिवण टाकेल. सेंटस् मशीनची रचना विविध लेदर वस्तूंच्या निर्मितीसाठी केली गेली आहे, ज्यामध्ये सेडल आणि ब्रिड्लसचा समावेश आहे, परंतु ते कॅनव्हाससह काम करण्यास सक्षम आहे, आणि जहाजावरील सील सिलाई करण्यासाठी वापरण्यात आला होता. जरी त्यांचे युग युग सुरू झाले असले तरी, ते एक व्यावहारिक प्रवृत्ती बनण्याआधीच येत्या दशकामध्ये संकल्पनेला स्थिर सुधारणा आवश्यक आहे. १८७४ मध्ये, सिलाई मशीन उत्पादक, विल्यम न्यूटन विल्सन यांनी लंडनच्या पेटंट कार्यालयात सेंटचे रेखाचित्र शोधून काढले, लूपला ऍडजस्ट केले आणि एक मशीन निर्माण केले जे सध्या लंडन सायन्स म्युझ्यूच्या मालकीची आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6597.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb18046a9902183d650b4720cac5fe5f861e216e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6597.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवणाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6599.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8838248be45901d7b0df5ac392468d0e440018a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6599.txt @@ -0,0 +1,2 @@ + शिवणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6628.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de685b8b5b74fa136c8054927baf065cc069e826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6628.txt @@ -0,0 +1,8 @@ + शिवणे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6675.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e493b6aafc483deae9d5c14d54c7e4e94b6159e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6675.txt @@ -0,0 +1,6 @@ + +सार्जंट [१] शिवपाल सिंग ( ६ जुलै, १९९५) हा भारतीय मैदानी खेळाडू आहे. हा भालाफेक स्पर्धांमध्ये भाग घेतो. सिंग हा भारतीय वायुसेनेत सार्जंट या वरिष्ठ नॉन-कमिशन्ड ऑफिसरपदावर (SNCO) आहे. +सिंगने २०१८ आशियाई खेळांमध्ये त्याने आठवे स्थान मिळवले तर २०१९ आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. +सिंगने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. [२] +बंदी घातलेले पदार्थ सेवन केल्याबद्दल सिंगला चार वर्षांसाठी खेळातून निलंबित केले गेले आहे. हे निलंबन १० ऑक्टोबर, २०२५ पर्यंत असेल. [३] +शिवपाल सिंग उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील धनापूर ब्लॉक अंतर्गत हिंगुटरगढ गावात राहतो. त्याचे वडील, काका शिवपूजन सिंग आणि जगमोहन सिंग हे देखील भालाफेक करणारे आहेत. [४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6685.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3761be4f85654009e634415694d7b0232b1d642b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6685.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6695.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d937afbf942e56f1eb7cc88393d20cf510ce99cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6695.txt @@ -0,0 +1 @@ +शिवम दुबे (२६ जून, १९९३:मुंबई, भारत - ) हा  भारतकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरुद्ध खेळला.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6705.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e5b0ce42a732fd46b9bdca79eef9c82bb557bfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6705.txt @@ -0,0 +1 @@ +शिमोगा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6709.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c84989619e45daccb635e125c65aee3e60e6c665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6709.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6729.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4d621bc1ab8e2061154793750306a8668a3885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6729.txt @@ -0,0 +1,5 @@ +शिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र - ??) हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरपूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक व संपादक म्हणून ओळखले जातात. [१] आंबेडकरांच्या अगोदरच्या काळात दलित चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. +शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे पुण्यातील भांबुर्डे गावचे वतनदार महार होते. जानबा कांबळेंनी आपला गावकीचा व्यवसाय सोडून पुण्यात युरोपियन लोकांकडे नोकरी धरली. त्यांनी त्यांचा मुलगा शिवराम यास त्याच्या इच्छेप्रमाणे शिकू दिले. शिवराम यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले. त्यांचे राहते घर पुण्याच्या लष्कर भागातल्या भीमपुरा १३७३/६ येथे होते. तेथूनच ते दलितोद्धाराचे काम करीत. + शिवराम जानबा कांबळे हयांनी सन १९०४मध्ये ´श्री शंकर प्रसादिकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज´ नावाची संस्था स्थापली आणि वाचनालयही उघडले. ही भारतातली पहिली दलित समाज संघटित करणारी संस्था होय. महात्मा फुले बाबा पदमनजी यांच्या लेखांतून प्रेरणा घेऊन शिवराम जानबा कांबळे यांनी आपल्या जीवन कार्याला प्रारंभ केला. वेद हे ईश्वरनिर्मित नाहीत या लोकहितवादींच्या बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनाचा आणि अस्पृश्यतेस हिंदू धर्माचा कोणताही आधार नाही, या गोपाळ बाबा वलंगकर यांच्या मतांचा आधार घेऊन शिवराम जानबा कांबळे यांनी आपल्या लेखांतून त्यांनी विचार मांडले कोल्हापुरच्या मराठा दीनबंधू मध्ये प्रकाशित केलेल्या पहिल्याच पत्रात त्यांनी निर्भयपणे व परखडपणे आपल्या मातांची स्पष्टता सर्वांना जाणून दिली. जो मनुष्य महाराचा स्पर्श योग्य मानत नाही, याची सावली त्याज्य मानतो, तोच मनुष्य ख्रिस्ती झाल्यास स्पर्शास पात्र होतो. अहो आमचे दुःख आमचे हिंदू ब्राह्मण बंधू हो, तुम्हाला कळत कसे नाही? +त्यांनी जहाल गटास ' नवीन दांडगा टवाळ पक्ष ' म्हणून त्यावर टीका केली. +शिवराम कांबळे यांनी सासवड येथे इ.स. १९०३ मध्ये ५१ गावांतील महार लोकांची सभा बोलावली होती. या सभेत महारांना शिक्षण मिळावे आणि महार बटालियनचे पुनर्गठन[ दुजोरा हवा] करून लष्करात तसेच पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात यांसाठी सरकारदरबारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. शिवराम कांबळे यांनी इ.स.१९०८-१९१० या काळात सोमवंशीय मित्र [२]) नावाचे मासिक चालवले. जुन्या अंधश्रद्धा व रुढी यांना कवटाळून राष्ट्र उद्धाराच्या मुळावर घाव घालू नये अशा शब्दांमध्ये त्यांनी तत्कालीन सुशिक्षित पदवीधर व तथाकथित विचारवंत व अस्पृश्य उद्धाराच्या चळवळीकडे उपेक्षेने पाहणाऱ्या लोकांना फटकारले. अहम् केंद्रीय वृत्तीवर देखील त्यांनी टीका केली. हिंदू समाजाची पुनर्बांधणी करायची असेल तर उच्चवर्णीयांनी पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील सासवड गावातील ५१गावंच्या महारांची सभा आयोजित करून १५८८ लोकांच्या स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचा अर्ज त्यांनी सरकारला सादर केला. मात्र शिवराम कांबळे यांच्या प्रयत्नांना या काळात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र यावेळी गोपाळ गणेश आगरकर यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले व अस्पृश्य समाजाच्या मागण्या कशा रास्त आहेत याकडे सवर्णांचे व सरकारचे लक्ष वेधून घेतले. शिवराम कांबळे यांनी सन १९१०मध्ये आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पार्लमेंटला अर्ज सादर केला. त्यांनी घरातील लोकांना न्याय व हक्क व संरक्षण देऊन जपानचे उदाहरण देऊन ब्रिटिश सरकारला आवाहन केले की सरकारने संधी दिली तर महार जमात मागे राहू शकत नाहीत. आम्ही कोणत्याही बाबतीत इतर सैनिकांपेक्षा तिळमात्र कमी नाही या निवेदनाचा परिणाम होऊन सरकारने महारानाही पलटणीत प्रवेश दिला [१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6736.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50c68b447add5b8645602c62b9e712f82fbea077 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6736.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवरामबुवा दिवेकर ( - २६ सप्टेंबर १९८८) हे भारतीय शास्त्रीय गायक होते. त्यांना हिंदगंधर्व या उपाधीने संबोधण्यात येत असे. +यांचा मुलगा हिंदराज दिवेकर हा रुद्रवीणा आणि सतारवादक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6738.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f469079b296c1deb75300018d109720f1a629648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6738.txt @@ -0,0 +1,30 @@ +शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा प्रभाव दिसून येतो. साहित्यात किंवा लिखित स्वरूपात शिव्या उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या भ या शब्दापासून सुरू होतात म्हणून कोणी यास भकार शब्द असेही म्हणतात. +रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते. +प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे. +शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषतः या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते. +भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.[ संदर्भ हवा ] +कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या हा विभाग पहा.' +गाढव, नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चावट, कृतघ्न, बावळट, मूर्ख, बेअक्कल, पागल +"आयला" किंवा "आयचा" या शिव्या अलीकडील काळात सर्रास व्यवहारात वापरल्या जातात. फक्त "आईला" किंवा "आईचा" या शब्दांना गलिच्छ अर्थ नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या आईचा अपमान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या "तुझ्या आईचा ---" किंवा "तुझ्या आईला ---" या शिव्यांचे ते छोटे स्वरूप आहे. +हे दोन्ही शब्द शिंदळीच्या आणि रांडेच्याची लघुरुपे आहेत. शिंदळीचा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर रांडचा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.) +अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार श्री.ना.पेंडसे यांच्या लेखनात हा शब्द सापडतो. + +कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरुद्ध बाजूने (तळहाताची विरुद्ध बाजू) सुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते). +बोंब मारणे आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या "शिमगा" सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या होळी भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे. +समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत "*** करतंय कोण, त्याच्या ***त *** दोन " अशा किंबहुना अधिक अश्लील शिव्यांचा समावेश असे. + +'साला' हा वस्तुतः 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ'; +बहिणीचा नवरा' नव्हे.) या अर्थीचा हिंदी भाषेतील शब्द आहे. 'बायकोचा भाऊ' अशाच अर्थाने याचेच 'साळा' हे रूप मराठी भाषेतही काही भागांत/काही समाजांत प्रचलित आहे. +हा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून का गणला जातो याचे एक सुंदर स्पष्टीकरण श्री. खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या पुस्तकात आढळते. +थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणाऱ्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो. +महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो. +उदा.: चित्रपटातील एक गीत-पप्पू कांट डान्स साला +मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे. +उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।। +अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।। +लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।। +काय केले रांडलेका। तुला राजी नाही तुका।। २४७८ +देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥ +तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥ +जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ +थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७॥ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6744.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f81059579e149ea753f9a573861414576425c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6744.txt @@ -0,0 +1,38 @@ +शिव ही हिंदू धर्मातील एक देवता आहे.[१][२] +भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना "महादेव" असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला, आणि म्हणूनच त्यांना "नीलकंठ" किंवा "नीलग्रिव" म्हटले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्रा व पशूंचे स्वामी असल्याने ते "पशुपती" म्हणून देखील ओळखले जातात. +भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे.[३] शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिव शंकरामुळेच होणार आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे. +हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा-महेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपति, कृतिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हा योगी मानला जातो आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहे .[४] +भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या वैदिक साहित्यात रुद्र या नावाची देवता आढळते.[५] यजुर्वेदातील रुद्रसूक्त प्रसिद्ध आहे.[६] हीच रुद्र देवता पुराणकाळात शंकर किंवा शिव या नावाने उदयाला आलेली दिसते.[७] +शिव या देवतेला लोकप्रिय करण्यासाठी शैव संप्रदायाचे मोठे योगदान आहे. या संप्रदायाचे साहित्य म्हणजे शिव पुराण, लिंग पुराण ही शंकर या देवतेशी संबंधित शैव पुराणे होत.[८] +भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. शिवपुत्र गणपतीला ऋद्धी-सिद्धी या दोन पत्नी, आणि शुभ और लाभ असे दोन मुलगे आहेत. शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा, विष्णू या देवतांच्या जोडीने तिचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या वेळी शिव हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती ह्या त्याच्या पत्नी सह तिथे वास आहे. गणपती आणि कार्तिकेय हे शिवाचे पुत्र तर अशोकसुंदरी त्याची पुत्री मानले जातात.[९] +वैदिक काळात शिव हा रुद्र या स्वरूपात पूजिला जात असे.[१०] रुद्र ही ऋग्वेदात मध्यम स्वरूपाची देवता मानली जाते. धनुष्य बाण हे त्याचे आयुध असून तो जटाधारी आहे. तो एक महान वैद्य असून त्याच्याजवळ वेगवेगळी औषधे असतात असे मानले जाते.[९] +अथर्ववेदात व्रात्यकाण्ड आहे. यामध्ये रुद्र हा व्रात्यांशी संबंधित देव आहे असे नोंदविले आहे. याला महादेव असे संबोधिले आहे. हा देव नंतर पशूंच्याकडे गेला. त्याला नंतर पशुपती असेही नाव पडले आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळात रुद्र ही वैदिक धर्मातील एक महत्त्वाची देवता बनली होती. त्यानंतर उपनिषद साहित्याने देखील महेश्वर, शिव या नावाने या देवतेला सन्मान दिलेला दिसतो.[९] +रामायण हा जरी वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असला तरी त्यामध्ये शिवाच्या पूजनाचे संदर्भ दिसतात. रामायणातील शिवाची उपासना ही केवळ मानव करतात असे नसून देव आणि दानवसुद्धा शिवाची पूजा करतात. रावणाने केलेली शंकराची तपश्चर्या हा यातील विशेष उल्लेख मानला जातो.[९] +महाभारतात शिवाचे एक दार्शनिक रूप दिसते आणि दुसरे रूप हे लोकांमध्ये प्रचलित असे आहे. शिवाचा योगदर्शनाशी असलेला संबंध हा ही महाभारतात दिसून येतो. त्याला महायोगी असे संबोधिले आहे.[९] +शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.[११] शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते. +जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.[१२] +शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे.[१३] चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे. +शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेन्द्र असे संबोधले जाते.[१४] +शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे.[१५] हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते की जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही जळून खाक होऊ शकते, अशी मान्यता आहे. मदनाचा (कामदेवाचा) मृत्यू असाच झाला. महादेवांचा तिसरा डोळा हा खरा सत्यदर्शक प्रतिक आहे. त्यात क्रोध ही आहे आणि ममत्व ही. न्याय अन्याय या ही पलिकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो. +वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे. +शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे.[१६] +भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत.[१७] +देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण मांडले, त्यांनाच " ज्योतिर्लिंगे " म्हणून ओळखले जाते.[१८] संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगासोबत शिवाची एक एक आख्यायिका आहे.[१९] +सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम् ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम्। +सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशंच शिवालये॥ +१. सोमनाथ, सोरठ-सौराष्ट्र ( गुजरात ) +२. मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश ) +३. महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश ) +४. ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश ) +५. वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र ) +६. औंढ्या नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र ) +७. केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल) +८. त्र्यंबकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र ) +९. रामेश्वर, रामेश्वरम / सेतुबंधन ( तामिळनाडू ) +१०. भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र ) +११. विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश ) +१२. घृष्णेश्वर, वेरूळ / औरंगाबाद ( महाराष्ट्र ) +दशरथेश्वर महादेव मंदिर, मुखेड (महाराष्ट्र ) +शिवतांडवस्तोत्रम् या रचनेमध्ये शिवाचे वर्णन आणि स्तुती अतिशय कुशलपणे योग्य ते शब्द वापरून केली गेली आहे. हे स्तोत्र रावणाने रचले असे मानले जाते. तसा उल्लेखही या स्तोत्रात आहे.[२०] + +महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. उपवास, पूजा, रुद्र पठन, विविध शिव मंदिरातील यात्रा आणि जत्रा यांनी महाशिवरात्री उत्सव संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो.[२१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6747.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f81059579e149ea753f9a573861414576425c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6747.txt @@ -0,0 +1,38 @@ +शिव ही हिंदू धर्मातील एक देवता आहे.[१][२] +भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना "महादेव" असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला, आणि म्हणूनच त्यांना "नीलकंठ" किंवा "नीलग्रिव" म्हटले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्रा व पशूंचे स्वामी असल्याने ते "पशुपती" म्हणून देखील ओळखले जातात. +भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे.[३] शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिव शंकरामुळेच होणार आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे. +हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा-महेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपति, कृतिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हा योगी मानला जातो आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहे .[४] +भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या वैदिक साहित्यात रुद्र या नावाची देवता आढळते.[५] यजुर्वेदातील रुद्रसूक्त प्रसिद्ध आहे.[६] हीच रुद्र देवता पुराणकाळात शंकर किंवा शिव या नावाने उदयाला आलेली दिसते.[७] +शिव या देवतेला लोकप्रिय करण्यासाठी शैव संप्रदायाचे मोठे योगदान आहे. या संप्रदायाचे साहित्य म्हणजे शिव पुराण, लिंग पुराण ही शंकर या देवतेशी संबंधित शैव पुराणे होत.[८] +भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. शिवपुत्र गणपतीला ऋद्धी-सिद्धी या दोन पत्नी, आणि शुभ और लाभ असे दोन मुलगे आहेत. शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा, विष्णू या देवतांच्या जोडीने तिचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या वेळी शिव हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती ह्या त्याच्या पत्नी सह तिथे वास आहे. गणपती आणि कार्तिकेय हे शिवाचे पुत्र तर अशोकसुंदरी त्याची पुत्री मानले जातात.[९] +वैदिक काळात शिव हा रुद्र या स्वरूपात पूजिला जात असे.[१०] रुद्र ही ऋग्वेदात मध्यम स्वरूपाची देवता मानली जाते. धनुष्य बाण हे त्याचे आयुध असून तो जटाधारी आहे. तो एक महान वैद्य असून त्याच्याजवळ वेगवेगळी औषधे असतात असे मानले जाते.[९] +अथर्ववेदात व्रात्यकाण्ड आहे. यामध्ये रुद्र हा व्रात्यांशी संबंधित देव आहे असे नोंदविले आहे. याला महादेव असे संबोधिले आहे. हा देव नंतर पशूंच्याकडे गेला. त्याला नंतर पशुपती असेही नाव पडले आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळात रुद्र ही वैदिक धर्मातील एक महत्त्वाची देवता बनली होती. त्यानंतर उपनिषद साहित्याने देखील महेश्वर, शिव या नावाने या देवतेला सन्मान दिलेला दिसतो.[९] +रामायण हा जरी वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असला तरी त्यामध्ये शिवाच्या पूजनाचे संदर्भ दिसतात. रामायणातील शिवाची उपासना ही केवळ मानव करतात असे नसून देव आणि दानवसुद्धा शिवाची पूजा करतात. रावणाने केलेली शंकराची तपश्चर्या हा यातील विशेष उल्लेख मानला जातो.[९] +महाभारतात शिवाचे एक दार्शनिक रूप दिसते आणि दुसरे रूप हे लोकांमध्ये प्रचलित असे आहे. शिवाचा योगदर्शनाशी असलेला संबंध हा ही महाभारतात दिसून येतो. त्याला महायोगी असे संबोधिले आहे.[९] +शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.[११] शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते. +जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.[१२] +शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे.[१३] चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे. +शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेन्द्र असे संबोधले जाते.[१४] +शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे.[१५] हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते की जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही जळून खाक होऊ शकते, अशी मान्यता आहे. मदनाचा (कामदेवाचा) मृत्यू असाच झाला. महादेवांचा तिसरा डोळा हा खरा सत्यदर्शक प्रतिक आहे. त्यात क्रोध ही आहे आणि ममत्व ही. न्याय अन्याय या ही पलिकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो. +वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे. +शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे.[१६] +भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत.[१७] +देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण मांडले, त्यांनाच " ज्योतिर्लिंगे " म्हणून ओळखले जाते.[१८] संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगासोबत शिवाची एक एक आख्यायिका आहे.[१९] +सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम् ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम्। +सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशंच शिवालये॥ +१. सोमनाथ, सोरठ-सौराष्ट्र ( गुजरात ) +२. मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश ) +३. महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश ) +४. ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश ) +५. वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र ) +६. औंढ्या नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र ) +७. केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल) +८. त्र्यंबकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र ) +९. रामेश्वर, रामेश्वरम / सेतुबंधन ( तामिळनाडू ) +१०. भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र ) +११. विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश ) +१२. घृष्णेश्वर, वेरूळ / औरंगाबाद ( महाराष्ट्र ) +दशरथेश्वर महादेव मंदिर, मुखेड (महाराष्ट्र ) +शिवतांडवस्तोत्रम् या रचनेमध्ये शिवाचे वर्णन आणि स्तुती अतिशय कुशलपणे योग्य ते शब्द वापरून केली गेली आहे. हे स्तोत्र रावणाने रचले असे मानले जाते. तसा उल्लेखही या स्तोत्रात आहे.[२०] + +महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. उपवास, पूजा, रुद्र पठन, विविध शिव मंदिरातील यात्रा आणि जत्रा यांनी महाशिवरात्री उत्सव संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो.[२१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6750.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9a763ed70833c009f7e972e95084bee8af452cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6750.txt @@ -0,0 +1,5 @@ +शिव लेणी (जोगाई मंडप; हत्तीखाना) ह्या महाराष्ट्र राज्यातल्या, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील हिंदू गुफा आहेत.[१] या संपूर्ण लेणी, त्या काळी मालवा प्रांत असे नाव असलेल्या आणि परमार वंशातील राजा उदयादित्याच्या (कारकीर्द : इ.स. १०६० ते १०८७) राजवटीत टेकडीच्या आत खोदून त्यातील दगडांवर कोरीवकाम करून बनविण्यात आली. या लेणीमध्ये हिंदू पुराणांतील गोष्टींचे वर्णन करणाऱ्या व शिव, नंदी, गणेश व इतर देवांच्या आणि देवींचा समावेश असलेल्या ह्या हिंदू कलाकृती आहेत. +भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार या लेण्यांतील शिल्पे व शिलालेख "अस्तित्वात असलेली भारतीय कलेचे सर्वोत्तम उदाहरण" आहेत. + +या शिव लेणी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पुरातन वारसा (हेरिटेज) जागांमध्ये सामील आहेत. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अधीन, महाराष्ट्र पुरातन स्मारके आणि पुरातत्त्व जागा आणि अस्तित्व कायदा १९६० अन्वये या जागेची नोंद "महाराष्ट्र राज्यातील संरक्षित स्मारकांची यादी" मध्ये संरक्षित स्मारक म्हणून आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6755.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70cf6a6deba7d8ff297a63a7e76ef3e4d4a07dad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6755.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6770.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..709756fafc1564862ec6e0e556523afcea4440ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6770.txt @@ -0,0 +1,3 @@ +शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.[२] मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. १७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. +शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं. मात्र २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे नेते 'एकनाथ शिंदे' यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांसोबत बंड केले व २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे व उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे. +"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6805.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7140b79eca1a744a39adc5bddb47261625dc7e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6805.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +छत्रपती शिवाजी राजे भोसले (तृतीय) (१७५६ - २४ एप्रिल १८१३) भोसले राजघराण्याचे कोल्हापूरचे राजा होते. २२ सप्टेंबर १७६२ ते २४ एप्रिल १८१३ पर्यंत त्यांनी राज्य केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6813.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed4043f6505a223a392867cf32f6131d94abda8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6813.txt @@ -0,0 +1,8 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +छत्रपती पाचवे शिवाजीराजे हे भोसले राजघराण्यातील कोल्हापूर संस्थानचे राजे होते. त्यांनी १८३८ ते १८६६ पर्यंत राज्य केले. आपल्या कारकिर्दीत, १७ तोफांचा एक आनुवंशिक सलाम असलेल्या १९ गनांचा वैयक्तिक सलाम देण्यात आला. +साचा:S-reg diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6822.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ab2793dbaf13f20523b22cfd795c833b902f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6822.txt @@ -0,0 +1,94 @@ + +शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[१] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.[२] +आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.[३] शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. +प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[४] भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.[५] +शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.[६] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.[७] +पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.[८] इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[९] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.[१०] महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. [a] [१७] [१८] +शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. [१९] [२०] एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.[२१] शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. [२२] त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.[२३] [२४] +शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.[२५] [२६] +छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. [२७] त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला ( c. 1590 ). [२८] [२९] +इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिल शाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. [३०] ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. [३०] [३१] शहाजीराजे त्यावेळीपश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. [३०] +शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. [३२] +१६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली.[३३] शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.[३४] +शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. [३५] +जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.[३६] +इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला[३७] आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. [३८] [३९] पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले.[४०] यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. [३८] +यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाईची करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले. [४१] [४२] +१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. [१९] आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. . [४३] भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. [४४]शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. [४५]त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. +शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. [४६] १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. [४७] [४८] [४९] +विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. [५०] अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. +दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. [५१] [५२] तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.[५३] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. +अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता.[५४] एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती.[५५] याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. [५६] शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.[५७] त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.[५८] +आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला.[५९] खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपतलपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.[६०] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. [१९] विजयानंतर, प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीसे देण्यात आली. [६१] +अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.[६२][६३][६४] +अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.[६५] +विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. [६६] मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० च्या मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. +पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांन समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतला आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६३ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. [६७] +अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला; [६८] १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला. [६९] +मुख्य लेख: पावनखिंडीतील लढाई +रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली. [७०] +पावनखिंडच्या लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. [७१] हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोचल्याचे संकेत होता. [७२] घोड खिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावन खिंड ("पवित्र खिंड") असे नामकरण करण्यात आले. [७२] [७३] +१६५७ पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्ण संबंध ठेवले होते. मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती. याच्या बदल्यात शिवरायांच्या ताब्यातील विजापुरी किल्ले आणि गावांवर त्यांचा हक्क मान्य करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुघलांच्या प्रतिसादाने समाधानी झाले नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळाल्याने, त्यांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला. [१९] मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च १६५७ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेशावर छापा टाकला. [७४] यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांनी 300,000 हून एवढी रोख रक्कम आणि 200 घोडे घेतले. [७५] औरंगजेबाने नासिरी खानला पाठवून या छाप्याला उत्तर दिले. नासिरी खानाने अहमदनगर येथे मराठी सैन्याचा पराभव केला. तथापि पावसाळ्यामुळे आणि सम्राट शाहजहानच्या आजारपणानंतर मुघल सिंहासनासाठी भावांसोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्धच्या प्रतिकारांमध्ये व्यत्यय आला. [७६] +आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाइस्ताखानाने आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. [७७] शाइस्ताखानने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले. [७८] +५ एप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाईस्ताखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. [७९] लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले.[८०] तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. [८१] या हल्ल्यात शाइस्ता खानचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. [८२] खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली. [८३] +शाइस्ताखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लूटले. [८४] +इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.[८५] +लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[८६] +शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यांमुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५,००० सैन्यासह पाठवले. [८७] १६६५ मध्ये, जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला.[८८] १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले. [८७] +११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली. [६०] शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली. [८९] [३९] [९०] +१६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले (काही दस्ताऐवजांनुसार दिल्लीमध्ये बोलावले होते.) मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि, दरबारात १२ मे १६६६ रोजी, शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले.[९१] यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते. [९२] शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. [९३] यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्याची हमी दिली. [९४] +शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. [९५]दरम्यान, शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले. [९६] [९७] तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. [९८] [९९] [१००] [१०१] सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात. पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले. [१०२] [१०३] [१०४] [b] +कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.[१०६] +आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.[१०७] +यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे. +शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. [१०८] १६६६ ते १६६८ दरम्यान, औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा ५,००० घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासमवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम (पहिला बहादूरशहा) याच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. संभाजीला बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी प्रदेश देण्यात आला. [१०९] +औरंगजेबाने शिवाजीराजांना कमजोर होत चाललेल्या आदिलशाहीवर हल्ला करण्याची परवानगी दिली; कमकुवत झालेला सुलतान अली आदिल शाह दुसरा याने शांततेसाठी प्रस्ताव दिला आणि शिवाजी महाराजांना सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकार दिले. [३९] +शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील शांतता १६७० पर्यंत टिकली. त्या वेळी औरंगजेबाला शिवाजीराजे आणि मुअज्जम यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल संशय आला, जो त्याचे सिंहासन बळकावू शकेल असे त्याला वाटले. तो शिवाजीराजांकडून लाचही घेत असावा, असाही औरंगजेबाला संशय होता [११०] [१११] तसेच त्या वेळी, औरंगजेबाने अफगाणांशी लढाई केली. त्यासाठी त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केले; परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरीत रुजू झाले. [१११] मुघलांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेरारची जहागीरही काढून घेतली. [८९] प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना शरण आलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवला. [८९] +१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लूटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा-उन-नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या मुघलांनी मराठ्यांशी पुन्हा शत्रुत्व सुरू केले. मुघलांनी शिवाजीराजांना सुरतहून घरी परतल्यावर अडवण्यासाठी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले; परंतु सध्याच्या नाशिकजवळील वणी-दिंडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. [११२] +ऑक्टोबर १६७० मध्ये, शिवाजीराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्रजांना त्रास देण्यासाठी पाठवले. कारण इंग्रजांनी त्यांना युद्धसामग्री विकण्यास नकार दिला होता. त्यांच्या सैन्याने लाकूड तोडणाऱ्या इंग्रज लोकांना मुंबई सोडण्यापासून रोखले. सप्टेंबर १६७१ मध्ये, शिवाजीराजांनी दांडा-राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य मागवण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले. या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती, परंतु राजापूरचे कारखाने लुटल्याची भरपाई मिळण्याची एकही संधी ते गमावू इच्छित नव्हते. इंग्रजांनी लेफ्टनंट स्टीफन उस्टिकला शिवाजीशी बोलणी करण्यासाठी पाठवले, परंतु राजापूर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्या. १६७४ मध्ये शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवर काही करारांसह पुढील वर्षांमध्ये अनेक राजदूतांची देवाणघेवाण झाली, परंतु शिवाजीराजांच्या मृत्यूपूर्वी राजापूरची नुकसानभरपाई कधीही भरली गेली नाही. १६८२ च्या अखेरीस तेथील कारखाना विसर्जित झाला. [११३] +१६७४ मध्ये, मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्यात आले. प्रतापरावांच्या सैन्याने एका मोक्याच्या तलावाला वेढा घालून विजापुरी सैन्याचा पाणीपुरवठा खंडित केला आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्याला पकडले, ज्यामुळे बहलोल खानला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले. शिवाजीराजांनी आधीच इशारे दिले असतानाही, प्रतापरावांनी बहलोल खानला सोडले. परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली. [११४] +शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी पत्र पाठवले आणि बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला. आपल्या राजांच्या फटकारामुळे अस्वस्थ झालेल्या प्रतापरावांनी बहलोल खानला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य मागे सोडून फक्त सहा इतर घोडेस्वारांबरोबर मोहीम सुरू केली. परंतु प्रतापराव युद्धात मारले गेले; त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीराजांना फार दुःख झाले आणि त्यांनी आपला दुसरा मुलगा राजारामचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला. प्रतापरावांच्या पश्चात हंबीरराव मोहिते हे नवीन सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) म्हणून नियुक्त झाले. रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर यांनी नवजात मराठा राज्याची राजधानी म्हणून नव्याने बांधला. [११५] +शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.[११६] इतर मराठा नेत्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. [c] याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते. [११८] +ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता. +प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. [११९] शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. [१२०] शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. [३९] [१२१] त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता. [३९] +प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.[१२२] शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.[१२२] शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.[१२२] +शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते[१२३] आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते.[१२३] त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती. [१२४] हा दर्जा लागू करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला. [१२५] [१२६] +सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले.[१२७] +२८ मे रोजी, शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षत्रिय संस्कारांचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली. मग त्यांना गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. [१९] इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित केले. [१९] सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हूण ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. दोन विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली होती आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते आणि शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली. [१२८] संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला. [१२९] +६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. [१३०] [१३१] हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी ) होता. [१३२] गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. [१९] [१३३] शिवाजी महाराजांना शककर्ता ("युगाचा संस्थापक") [७०] आणि छत्रपती ("सार्वभौम") असे नाव देण्यात आले. त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली. +राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.[ संदर्भ हवा ] तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.[ संदर्भ हवा ] +१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला; ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. [१३४] [१३५] [१३६] +गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.[१३७] अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.”[१३८] त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.[१३८] कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.[१३९] +१६७४ च्या सुरुवातीस, मराठ्यांनी आक्रमक मोहीम हाती घेतली. ऑक्टोबरमध्ये खान्देशामध्ये छापे टाकले. तसेच विजापुरी फोंडा (एप्रिल १६७५), कारवार (मध्यवर्षी), आणि कोल्हापूर (जुलै) ताब्यात घेतला. [१९] नोव्हेंबरमध्ये, मराठा नौदलाने जंजिरा येथील सिद्दींशी झडप घातली, परंतु त्यांना तिथे अपयश आले. [१४०] आजारातून बरे झाल्यावर आणि दख्खनी आणि अफगाण यांच्यात विजापूर येथे सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी एप्रिल १६७६ मध्ये अथणीवर स्वारी केली. [१४१] +आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजीराजांनी दख्खनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले, की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून संरक्षित केली पाहिजे. [१४२] [१४३] त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीराजांनी एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला. यामध्ये विजापूरशी आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे विरोध करण्यास कुतुबशहाने सहमती दर्शविली. +१६७७ मध्ये, शिवाजीराजांनी ३०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळासह आणि गोवळकोंडा तोफखाना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. [६०] दक्षिणेकडे जाताना शिवरायांनी वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले; [१४४] यापैकी नंतरचा किल्ला त्यांचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांची राजधानी बनला. [६०] +शहाजीनंतर तंजावर येथे राज्य करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई (पूर्वाश्रमीच्या मोहिते) आणि शहाजीराजांचा मुलगा आणि शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी पहिला) याच्याशी समेट करण्याचा शिवरायांचा हेतू होता. सुरुवातीला आश्वासक असणाऱ्या वाटाघाटी नंतर अयशस्वी ठरल्या, म्हणून रायगडावर परतताना, शिवाजीराजांनी २६ नोव्हेंबर १६७७ रोजी आपल्या सावत्र भावाच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पठारावरील बहुतेक संपत्ती ताब्यात घेतली. + +व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, जिचा शिवराय मनापासून आदर करत होते, तिने शिवरायांशी नवीन वाटाघाटी केल्या आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारांपासून दूर राहण्यास पटवून दिले. सरतेशेवटी, शिवाजीराजांनी दीपाबाई आणि त्यांच्या स्त्री वंशजांना त्यांनी ताब्यात घेतलेली अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास संमती दिली. तसेच वेंकोजीनेही प्रांतांचे योग्य प्रशासन आणि शहाजीराजेंच्या समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या. [७०] [१४५]शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते पश्चात्ताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले. [१४६] +हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, [१४७] शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. [d] पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. [१४९] [१५०] तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. [१५१] [१५०] शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. [८४] +शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. [८४] राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले. [१५२] +शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.[१५३][१५४] +शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती. [१५५] +शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता[८६]. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले. [१५६] +राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला.[१५७] या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे +"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता +शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". [१५८] ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो."[१५९] +शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते.[१६०] शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, जिला ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते.[१६१] आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. [१६२] +शिवाजी महाराजांनंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, १६८१ मध्ये, औरंगजेबाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश, विजापूरस्थित आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण सुरू केले. या दोन्ही सल्तनतांचा नायनाट करण्यात तो यशस्वी झाला पण दख्खनमध्ये २७ वर्षे घालवूनदेखील तो मराठ्यांना वश करू शकला नाही. या काळात १६८९ मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांना फाशी दिली. मराठ्यांनी नंतर संभाजीराजांचे उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिकार केला. लढायांमुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले.पुढे १७०७ मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला. [१६३] +शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते, त्यांना औरंगजेबाने २७ वर्षांच्या संघर्षात कैदेत ठेवले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी शाहूराजेंची सुटका केली. आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसाहक्कासाठी अल्पशा सत्ता संघर्षानंतर, शाहूराजांनी १७०७ ते १७४९ पर्यंत मराठा साम्राज्यावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर त्यांच्या वंशजांना मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केले. बाळाजींचा मुलगा, पेशवे बाजीराव पहिले आणि नातू, पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू [१६४] पासून उत्तरेला पेशावर (आजचे खैबर पख्तूनख्वा) आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. १७६१ मध्ये, मराठ्यांच्या सैन्याने पानिपतची तिसरी लढाई अफगाण दुर्राणी साम्राज्याच्या अहमद शाह अब्दालीशी गमावली, ज्यामुळे वायव्य भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार थांबला. पानिपतनंतर दहा वर्षांनी, माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा प्रभाव मिळवला . [१६५] +मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात, शाहूराजे आणि पेशव्यांनी सर्वात बलाढ्य शूरवीरांना अर्ध-स्वायत्तता दिली आणि मराठा संघाची निर्मिती केली. [१६६] ते बडोद्याचे गायकवाड, इंदूर आणि माळव्याचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया आणि नागपूरचे भोंसले म्हणून ओळखले जाऊ लागले. १७७५ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज-मराठा युद्ध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात (१८०५-१८१८) इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव होईपर्यंत मराठे भारतातील प्रख्यात सत्ता राहिले. पण या युद्धांनंतर कंपनीला भारतातील बहुतेक भागांत प्रबळ सत्ता मिळाली. [१६७] [१६८] +भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.[ संदर्भ हवा ] +ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.[ संदर्भ हवा ] +तुकाराम, बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.[ संदर्भ हवा ] +आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.[ संदर्भ हवा ] इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.[ संदर्भ हवा ] (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.).[ संदर्भ हवा ] अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.[ संदर्भ हवा ] +छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे.[ संदर्भ हवा ] जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.[ संदर्भ हवा ] म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.[ संदर्भ हवा ] +[१६९] +[१७०] +[१७१] +शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १०० च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.[ संदर्भ हवा ] +भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत : +छ. शिवाजी महाराजांवरील चित्रपट व इतर कलाकृतींसाठीचा विस्तृत लेख: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6831.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8b736ca6302dd2703c5cf54961830b265687644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6831.txt @@ -0,0 +1,51 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.[ संदर्भ हवा ] +या किल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारित (स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हाही एक उद्देश आहे. +शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातून केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी, डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते[ संदर्भ हवा ]. हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता. शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता. त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले. हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या. तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते. प्रवेश केलाच तर परत जाण्याची हमी नव्हती. +हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते. तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टीही सुरक्षित केली.त्यांनी तेथे प्रत्येक १० ते १२ मैलांवर सागरी किल्ला बांधला.एकट्या रत्‍नागिरी जिल्ह्यात त्यांचे ५२ किल्ले होते. +पुण्यात ३० डोंगरी व २ भुईकोट असे ३२ किल्ले होते. ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले. +स्वराज्य अजिंक्य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.बारा मावळ क्षेत्रात असलेल्या ८ किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते. ह्यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरही साल्हेर, मुल्हेर, रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले. +त्यासोबतच त्यांनी सागरी किल्ले किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले. +एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला " किल्ले बहुत जाहले. त्यांच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे." +महाराजांचे उत्तर होते - +"जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाइल पण तो आम्हाला जिंकु शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुने नवे अशे तीनशे साठ किल्ले आहेत. एक एक किल्ला तो १ वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील." +(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते. +यांत ४ किल्ले होते. +एकूण १३ किल्ले +एकूण ५९ किल्ले आहेत. +1)साल्हेर +2)मुल्हेर +3)सालोटा +4) +मोरा +ड +5)हरगड +6*न्हावीगड +7*हनुमानगड +8*तांम्रगड +9*मांगीतुंगी +10*पिसोळ +11*डेरमाळ +12*कर्हेगड +13*बिष्टागड +14*दुंधागड +15*अजमेरागड +16*चौल्हेरगड +17*भिलाईगड +18*पिंपळा +19*कंचणा +20*इंद्राई +21*धोडप +22*राजधेर +23*कोळधेर +24*चांदवड +25*प्रेमगीरी +26*कंक्राळा +२७*लळिंग +(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग) +या संपूर्ण लेखाचा संदर्भ - +पुस्तक- आयएसबीएन: 978-81-910980-0-6 पुस्तकाचे नाव-गनिमी कावा (जागतिक कीर्तीच्या मराठा युद्धतंत्राचा खरा वेध), राजमाता प्रकाशन,मुंबई. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6838.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11838d22d17600c05af169be008b33e139dad7d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6838.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवाजी साटम (जन्म : २१ एप्रिल, इ.स. १९५०) हे एक मराठी अभिनेते आहेत. ते एकेकाळी बँक अधिकारी होते. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली, ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6847.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..480062e899e9ab162979f3ba99c2b21735b4eebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6847.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवाजीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6849.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ea96f7d06c70909502776f68192c09110a90c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6849.txt @@ -0,0 +1 @@ +शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून शिवाजीनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6889.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77ed0c203c7ad29c5546864762e6f14483dd0cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6889.txt @@ -0,0 +1,2 @@ + शिवाणी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6894.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecdd12e988240f2fa7eebe88dbf9da618f6c15dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6894.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवानी ऊर्फ गौरी पंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३; - २१ मार्च, २००३) या एक हिंदी लेखिका होत्या. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणाऱ्या एक लोकप्रिय लेखिका होत.. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या. +शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनेकेतनात झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत बंगाली वातावरण आढळते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6898.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050b15f0fd617e533f8cbebd149348ac0a202c78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6898.txt @@ -0,0 +1 @@ +शिवानी सुर्वे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शिवानी जानाना दिल से दूर आणि देवयानी सारख्या मालिकेसाठी ओळखली जाते. शिवानीने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6900.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5be664b5d8b0afefffcb0732e1168b01c0dfc21e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6900.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवानी बावकर ही एक मराठी अभिनेत्री आहे.[१] तिने लागिरं झालं जी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा:गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.[२][३] +शिवानी बावकर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6902.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62fb09023672d515ec817990e56878190093e75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6902.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवानी मिश्रा (१४ जानेवारी, १९७३:लखनौ, भारत - हयात) ही जन्माने भारतीय परंतु कतारमध्ये स्थायिक असलेली क्रिकेट पंच आहे. +तिचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१९ साली होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6910.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e85cb421f6a835dd2541c90c8d65af5d0eb70a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6910.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_693.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c96b404289d053d006a145891ce568abd975cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_693.txt @@ -0,0 +1,6 @@ +०८ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: क्रिकेट आर्चिव (इंग्लिश मजकूर) + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6955.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc75cc1a2beecc81b72a3c536eb56690aacd969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6955.txt @@ -0,0 +1,5 @@ + +महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आले आहे. +१०८७ ओव्या. महाभारताच्या सभापर्वात आणि भागवताच्या दशमस्कंधात शिशुपाळवधाची कथा आहे पण भास्करभट्ट केवळ आधारांवरच अवलंबून नाहीत. माघ, जयदेव, कालिदास हे भास्करभटांचे आदर्श होत : +देखौनि महाकवींचा पंथु : मज होतसे मनोरथु : विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचेच संस्कार या ग्रंथात अधिक आढळतात. साहित्याचेनि परिमळे : शृंगाराचेनि मेळे : प्रबंध होति मातावळे : कविजनांचे । असे भास्कराने म्हटलेले आहे. भास्कराने लिहिलेल्या या ओवीतच त्याचा साहित्यविषयक दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला आहे; नव्हे त्याचे प्रात्यक्षिक ‘शिशुपाळवधा’त करून आपला प्रबंध शृंगाराने ‘मातावळा’ बनवला आहे. सभावर्णन, निसर्गवर्णन, युद्धवर्णन, जलक्रीडावर्णन, विरहवर्णन, द्वारकावर्णन या पद्यात आढळतात. +भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि (ग्रंथ तर उत्तम जमून आला आहे पण निवृत्तीमार्गासाठी हा उपयुक्त नाही!) : इति बाइदेवबास. बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते. पाल्हाळ, औचित्यानौचित्याचा विवेक नसणे, अस्थानी शृंगार, कालविपर्यास हे दोष या काव्यात आहेत. शृंगारबहळता हा गंभीर दोष या पद्यात आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6964.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e64118e1c5530013042e75f37cad92d2f1578e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6964.txt @@ -0,0 +1,6 @@ +शिसे (चिन्ह: Pb ; इंग्लिश: Lead, लेड ; अणुक्रमांक: ८२) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगे आहे. याचा रंग निळा-राखाडी असून, या मूलद्रव्याची गणना धातूमधे होते. +हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे. +शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. +दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग होतो. +भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते. +भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6977.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d00aafbfae8375c75865064ed5cdd0fb4a181e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6977.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सिहोर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. याच नावाचे एक गांव गुजरात-सौराष्ट्रात भावनगरजवळ आहे. +हे शहर सिहोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_699.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f7f4957d7b1abcfe8e4217326e745177cffcecd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_699.txt @@ -0,0 +1,11 @@ +विल्यम केरी (English:William Carey)(ऑगस्ट १७,इ.स. १७६१ – जून ९,इ.स. १८३४) हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, भाषांतरकार तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत. विल्यम कॅरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ असून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते.[१] +कॅरी यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर्‌दॅम्प्टन परगण्यात टोस्टर(Towcester)जिल्ह्यात पॉलरस्परी(Paulerspury)या खेड्यात ऑगस्ट १७,इ.स. १७६१ रोजी झाला. त्यांचे वडील शाळामास्तर होते. गरीब परिस्थितीमुळे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एका चांभाराकडे उमेदवारी केली. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत चांभाराचा व्यवसाय केला. जोडे शिवीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून त्यांनी मिशनरी व्हावयाचे ठरवले. धंदा सोडून ते बॅप्टिस्ट पंथात दाखल झाले. +१७८३ साली बॅप्टिस्ट चर्चचे सभासदत्व स्वीकारले.[२] व जॉन थॉमस यांच्याबरोबर पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात ११ नोव्हेंबर १७९३ रोजी आले. जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमस यांच्याकडून त्यांनी बंगाली भाषेची तोंडओळख करून घेतली. +बंगालमध्ये आल्यावर कॅरी यांनी माल्दा येथे शेती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७९५ साली त्यांनी तेथे चर्च स्थापन केले. स्थानिक समाजाशी त्यांच्या भाषेत संवाद साधता यावा म्हणून त्यांनी भारतीय भाषांच्या अभ्यासाला सुरुवात केली. [२] नंतर मदनवती येथे त्यांनी निळीच्या मळ्यात पाच वर्षे नोकरी केली. या काळात राम बसु यांच्या मदतीने विल्यम कॅरी यांनी बंगालीचा सखोल अभ्यास केला. त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे अध्ययन केले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या अभ्यासाने ९ वर्षात त्यांनी वेद वाचण्याइतकी प्रगती केली. त्यानंतर ते १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर(Serampur)या डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली आणि एक छापखाना उभारला. +कलकत्त्याच्या फ़ोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत आणि मराठी भाषा [२]आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे १८०१ ते १८३० पर्यंत प्राध्यापक होते. ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या भाषांत पारंगत होते. त्यांचे देहावसान श्रीरामपूर (बंगाल) येथे जून ९,इ.स. १८३४ रोजी झाले. +मदनावती येथे दुभाषी रामराम बसू यांच्याकडे बंगालीचा अभ्यास केला. तेथेच संस्कृताचाही अभ्यास केला. +नागपूरकर भोसल्यांचे वकील वेणीरामपंत यांचे आश्रित वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने मराठीचा अभ्यास केला.[२] +विल्यम कॅरी यांच्या विनंतीवरून, भ्रूणहत्या प्रथेचा अभ्यास करण्यासाठी गव्हर्नर जनरल वेलस्ली यांनी एक समिती नेमली. कॅरी यांची या समितीमध्ये नेमणूक झाली. मेमोरियल ऑन मर्डर कमिटेड अंडर द प्रिटेंड्स ऑफ रिलिजन या नावाचा अहवाल या समितीने दिला आणि त्यानुसार १८०२ साली भ्रूणहत्येवर बंदी घालण्यात आली. +फ्रेंड्स ऑफ इंडिया या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी सतीप्रथे विरुद्धही आवाज उठविला होता. [२] +खालील सर्व ग्रंथ मायाजालावर उपलब्ध आहेत - +विल्यम केरी चरित्र व साहित्य ह्यांच्या अभ्यासकेंद्राचे संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6993.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dbc3632632451b11ecbc3e78a5496f9ef679223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6993.txt @@ -0,0 +1 @@ +शीत कटिबंध हा पृथ्वीवरील ६६ ते ९०अंश अक्षांशादरम्यानचा प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6996.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff9b13fb0269887228b784a5faa1d3a5db5e482f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_6996.txt @@ -0,0 +1,18 @@ +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस +शीतयुद्ध (१९४५ - १९९१) हा शब्द विसाव्या शतकातील लोकशाहीवादी पश्चिमात्य राष्ट्रांचा गट व सोव्हियत संघाच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट ह्यांदरम्यानच्या राजकीय व आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. ह्या दोन गटांदरम्यान वास्तविक युद्ध कधीही झाले नाही तरी शीतयुद्धामधील मोठ्या काळासाठी जगातील ह्या महासत्तांमध्ये राजकीय व लष्करी तणावाचे वातावरण होते. +आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी,पोलंड,चेकोस्लोव्हाकिया,हंगेरी, रुमानिया,बल्गेरिया आणि आल्बेनिया हे देश होते,तर नेदरलँड्स,डेन्मार्क, बेल्जियम,पश्चिम जर्मनी, फ्रान्स,इटली,स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंग्डम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते.अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलंडवर तटस्थता लादली होती. +सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली.पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व लोकशाही सरकारे स्थापन केली गेली. +साम्यवादी सरकारे असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली.याचाच अर्थ तिथे सरकारी उद्योगधद्यांना महत्त्वाचे स्थान असणार होते,तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली.या राष्ट्रांमध्ये खासगी उद्योगधंद्यांना महत्त्व असणार होते. +राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले.पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांनपासून संरक्षण करण्यासाठी १९४९ मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाची (The North Atlantic Treaty organization - NATO) निर्मिती केली गेली. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हियत संघामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत संघाने पूर्व व मध्य युरोपातील अनेक राष्ट्रांवर कब्जा केला व तेथे कम्युनिस्ट राजवटी स्थापन केल्या तसेच ह्या सर्व राष्ट्रांचा ईस्टर्न ब्लॉक हा समूह तयार केला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंग्डम व फ्रान्स ह्या व्यवस्थापश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले. +१९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7003.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e714fac0e4d70f1171bf094b92c0be4426efbb71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7003.txt @@ -0,0 +1 @@ +शीतोष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध हा साधारणपणे पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय वृत्त(आर्क्टिक वृत्त) तसेच मकरवृत्त आणि दक्षिण धृवीय वृत्तांच्या (अंटार्क्टिका वृत्त) यांमधील प्रदेशांदरम्यान येतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_701.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea701f924b4d4e1b0632c2aae245e38c29f18c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_701.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक, पोर्टलंडचा तिसरा ड्यूक (इंग्लिश: William Cavendish-Bentinck, 3rd Duke of Portland; १४ एप्रिल, इ.स. १७३८ - ३० ऑक्टोबर, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7079.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7079.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7082.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1ab7674621a96b21e32f0517821a5be01990af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7082.txt @@ -0,0 +1,2 @@ +शुजा उद दौला (उर्दू: شجاع الدولہ‎; १९ जानेवारी १७३२ - २६ जानेवारी १७७५) हा अठराव्या शतकातील अवधच्या संस्थानाचा नवाब होता. [१]हा दुराणी सम्राट अहमदशाह अब्दालीचा मांडलिक होता व त्याने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांविरुद्ध अब्दालीला मदत केली. +शिवाय "सफदरजंग" हे मुघल शासनात आधी सुभेदार असलेले व नंतरच्या काळात म्हणजे 'मुघल बादशाह-अली गौहर शाह अली' यांच्या शासनकाळात अवध(अयोध्या) येथे स्वतःचे वेगळे साम्राज्य तयार करणारे या व्यक्तिचे "शुजाउद्दौला" हे एकमेव पुत्र होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7085.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6125f9062b3059f7c36e0e90ac3159952cec396 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7085.txt @@ -0,0 +1,115 @@ +शुटींग बॉल SHOOTING BALL हा खेळ मूळ भारतीय उपखंडात जन्मलेला देशी खेळ आहे.[ संदर्भ हवा ] व्हॉलीबॉल हा खेळ जसा खेळला जातो तसाच परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने , वेगळ्या नियमांनी आणि वेगळ्या चेंडूने हा खेळला जातो. शुटींग बॉल ह्या खेळाला भागानुसार वेगवेगळे नावे पडलेली आहेत. मूळ म्हणजे या खेळाला डायरेक्ट व्हॉलीबॉल, शॉटी व्हॉलीबॉल अशा नावांनी देखिल ओळखले जाते. नावात साम्य आल्याने बऱ्याच वेळा शुटींग बॉल आणि व्हॉलीबॉल हे समजण्यात गैरसमज होत असल्याने ह्या खेळाला शुटींग बॉल हे नाव पडले. नावाप्रमानेच हा खेळ आहे, समोरच्या संघाकडून आलेला चेंडू हा शुट म्हणजे मारावा लागतो म्हणून नाव पडले शुटींग बॉल. व्हॉलीबॉल मध्ये चेंडू प्रतिस्पर्ध्याकडे परतवण्यासाठी तीन वेळा हाताळता येतो तसा शुटींगबॉल मध्ये एकाच प्रयत्नात चेंडू परतवणे आवश्यक असते. शुटींग बॉल मध्ये एका संघात 12 खेळाडू असतात त्यापैकी ७ खेळाडू हे मैदानात असतात व ५ खेळाडू राखीव असतात. चेंडू हा चामड्यापासून बनविलेला असतो. त्यामुळे तो व्हॉलीबॉल पेक्षा खूप कडक असतो. +महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब , उत्तर प्रदेश आदी राज्यात हा खेळ गावागावात खेळला जातो. +भारत तसेच ,पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, U A E , अशा आशियायी राष्ट्रांमध्ये हा खेळ लोकप्रिय आहे. +ऑस्ट्रेलिया, कॅनडा , अमेरिका , न्यू झीलंड ,अमेरिका व आफ्रिकान राष्ट्रांमध्ये शुटींग बॉल खेळ आवडीने खेळला जातो. +महाराष्ट्र शासनाने शुटींग बॉलच्या संघटकांना व खेळाडूंना राज्याच्या सर्वोत्कृष्ट अशा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवान्वित केले आहे. +यात मनोहर साळवी (ठाणे) ,अशोक चैधारी(जळगाव), विष्णू निकम ( नाशिक ) ,सदाशिव माने (कोल्हापूर) , राजेंद्र मोहिते(सातारा), राम कोलते(बुलढाणा), बाळू पाटील( कोल्हापूर) , अमजद जेलर( सांगली), अरुणा देशमुख ( बुलढाणा) आदी खेळाडूंचा समावेश आहे. + + +शुटींग बॉल खेलासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम + +1) ग्राउंड आणि त्याचे परिमाण + +हे मैदान आयताकृती असले पाहिजे आणि 5 सेमीच्या रेषाने बंद केलेले असावे. (रुंदी 2 इंच). + +1.1) कोर्ट   -33 फुट * 66 फुट ' +8 मीटर उंचीपर्यंत कोणतेही अडथळे येणार नाहीत. दोन स्क्वेअर कोर्टामध्ये जमीन विभागणारी रेषा +त्याला मध्यरेषा असे म्हणतात. दोन्ही बाजूंना मध्य रेषेपासून 11फुटच्या अंतरावर एक ओळ असेल. नेटमन या रेषेच्या आतमध्ये फक्त एका हाताचा वापर करू शकतात. + +1.2) सर्विस क्षेत्र: +प्रत्येक कोर्टाच्या उजव्या बाजूला सर्विस क्षेत्र काढले जाईल. या क्षेत्राची लांबी व रुंदी 10 फूट असेल. + +1.3) खांब: +पांढरे रंगविलेले खांब मध्यभागी लावावेत आणि दोन्ही बाजूंनी मैदानापासून एक फूट लांब असावेत +खांबाची उंची जमिनीपासून 8 फूट 2 इंच असेल. +खांबाचा व्यास 3 इंचापेक्षा कमी नसावा. + +2) खेळण्याची साधने: + +2.1) चेंडू– मऊ चामड्यापासून बनविलेला असतो +(अ) आकार: 55 सेमी ते 58 सेमी व्यासाचा. +(ब) वजनः ३१५ ग्रॅम (अधिक वजा १० ग्रम) +महिलांसाठी: 280 ग्रॅम (अधिक वजा १५ ग्रम) +(क) हवेचा दाब: +पुरुषांसाठी= २४ पाउंड-अधिक-वजा १ (पाउंड) +महिलांसाठी = 19 पाउंड -अधिक-वजा 1 (पाउंड) + +2.2) नेट (जाळी) +(अ) जाळीची रुंदी १ मीटर असावी. +(बी) जाळीची लांबी 10 मीटरपेक्षा कमी नसावी आणि 12 मेशची असावी. +(c) नेटची उंची मध्यभागी 8 फूट 1 इंच आणि दोन्ही टोकांवर 8'.2 असावी. +महिलांसाठी निव्वळ उंची असावी7'.6 " + +2.3) पंचांची खुर्ची +सामन्याच्या देखरेखीसाठी रेफरीसाठी 5 फूट 6 इंचाची उंची असलेली खुर्ची असेल. + +3) संघ आणि अधिकाऱ्यांची रचना + +3.1) खेळाडूंची संख्या – 12 (बारा) (7 सात + 5 पाच) + +3.2) कोच -1 (०१) + +3.3) व्यवस्थापक- 1 (०१) +मैदानावर पाच पेक्षा कमीखेळाडू असणाऱ्या संघास अधिकृत सामन्यात खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. उर्वरित खेळाडूरेफ्रीच्या परवानगीने मैदानात येताच खेळाडूंना परवानगी दिली जाऊ शकते.  अतिरिक्त पाचखेळाडूआणि त्यांच्या प्रशिक्षकाला रेफरीच्या समोरील बाजुसबसणे आवश्यक आहे. सामन्यादरम्यान  खेळाडूंचा समावेश रेफरीच्या परवानगीने करता येईल.बदली झालेल्या खेळाडूला पुन्हा त्याच गेममध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. + +3.4) युनिफॉर्म +संघाने एकसमान पोशाख घालावा .अर्थात  बनियान किंवा टी-शर्ट घालावा की ज्याच्यावरत्यांच्या राज्याचे किंवा युनिटचे नाव छातीवर असेल आणि पाठीवर 1 ते 10 दरम्यानचे अंक असणे आवश्यक आहे. पाठीवरील अंक हेसंपूर्ण स्पर्धेत तेच राहिले पाहिजे. योग्य गणवेशात नसलेल्या संघास अधिकृतपणे खेळू दिले जाणार नाहीसामने. विश्रांती घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. + +4) पर्यवेक्षण अधिकारी + +4.1) तांत्रिक प्रतिनिधी -एक +4.2) रेफरी -एक +4.3) दुसरा रेफरी एक +4.4) लाइन-मन -दोन +4.5) गुणलेखक - एक + +5) नाणेफेक: +सामन्यापूर्वी  रेफरी पहिल्या सेटमध्ये प्रथम सर्व्हिस आणि कोर्टाच्या बाजूचा निर्णय घेण्यासाठी टॉस घेईल. नाणेफेक संघातील खेळाडूंनी नव्हे तर दोन संघाच्या कर्णधारांच्या उपस्थितीत घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकणारा सर्विस देण्याचा किंवा घेण्याचा हक्क आणि कोर्टाची बाजू, हरणारा  संघ घेतो . + +6) सर्व्हिस +सर्व्हिस म्हणजे बॉल सर्व्हिस झोनमधूनपलीकडच्या बाजूस एका प्रयत्नात एका हाताने खालून मारणे. टॉसद्वारे निर्धारित केलेल्या संघाद्वारे पहिल्या सेटची तसेच निर्णायक सेटची प्रथम सर्व्हिस मारली जाते. सेटची सुरुवात करताना सर्विस आगोदर TOS करून निर्णय झाल्यानंतर एका संहास देण्यात येते. दुसऱ्या सेट मध्ये प्रतिस्पर्धी संघास सुरुवातीची सर्विस देण्यात येते. गरज पडल्यास तिसरा सेट खेळावा लागल्यास ज्या संघाने पहिल्या सेटला सर्विस केली होती , त्या संघास सर्विस देण्यात येते. + +7)  खेळाचे सामान्य नियम +7.1) हाताच्या बोटांनी आणि खुल्या हातांनि चेंडू खेळता येणार नाही’. +7.2)  पहिल्या प्रयत्नात SMASH मारता येऊ शकतो. +7.3 )एका हाताने अगर दोन्ही हातांनीअंडर HANDणे घेतलेला चेंडू एकच प्रयत्नात नेटच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा फौल न होता जाने गरजेचे आहे. +7.4) डोक्याने घेतलेला चेंडू कुठल्याही परिस्थितीत नेटच्या पलीकडे जाने गरजेचे आहे. +7.5) नेट-मॅन व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूविरूद्ध चेंडू अडकू शकतो. + +7.6) वरील चेंडू पायांची हालचाल करून मारल्यास तो वैध ठरविण्यात येईल परंतु तो एका जागी उभा राहुल म्क़र्ल्यस ते चुकीचे ठरविण्यात येईल. +7.7) खेळाच्या दरम्यान नेटला किंवा खांबांना खेळाडूंच्या शरीराचा कोणत्याही भागाचा संपर्क झाल्यास ते अवैध मानण्यात येईल. + +7.8) समोरील कोर्टात दुमडलेल्या हातांनी (वरून किंवा खालुन) चेंडू कुठल्याही stroke शिवाय मारल्यास त्यास परवानगी दिली जाणार नाही .ते अवैध मानण्यात येईल. + +7.9) दोन्ही बाजूंनी वाजवी शूटिंग बलाद्वारे बॉल खेळला जाऊ शकतो. म्हणजेच दोन्ही बाजूचे खेळाडू चेंडू मारताना त्यास आवश्यक जोर लावून मारू शकतात. + +7.10) उडी घेऊन मारलेला (शूट) चेंडू हा कुठल्याही परिस्थितीतनेटच्या पलीकडे जाने आवश्यक आहे. +7.11) मध्य रेषेपासून11 फुटांच्या अंतरावर असलेल्या अटॅक लाइनमध्ये  फक्तनेटमन हेच वरून एका हाताने चेंडू मारू( पंच) शकतात +7.12) कनिष्ठ (ज्युनियर) आणि उप-कनिष्ठ (सब ज्युनियर) खेळाडूंच्या स्पर्धांच्या बाबतीत, सहभागींना  फेडरेशन लावय प्रमाणपत्र पाठवावे लागेल,की जे शाळेचे मुख्याध्यापक किंवा खेळाडू ज्या संस्थेत शिकत असेल तेथील प्रमुखांच्या सही शिक्क्याने मूळ प्रतीत देण्यात आले असेल. +7.13) मुले / मुलींसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा 14/17/19 वर्षाखालील आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या खेळाडूने निर्दिष्ट वय ओलांडू नये ,ज्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या वर्षीच्या 31 डिसेंबर पर्यंत. + +7.14) वयापेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. एखाद्या संघटनेकडून असा खेळाडू खेळविला गेला आहे असे सिद्ध झाल्यास फेडरेशन कडून अशा संघटने  विरुद्ध कारवाई केली जाईल + +7.15) स्पर्धेच्या ठिकाणी किंवा राष्ट्रीय स्पर्धेच्या ठिकाणी रेफरीची आणि तांत्रिक प्रतिनिधी नियुक्ती एसजीएफआय आणि आयोजन सचिव करेल. +7.16) रेफरीच्या निर्णयावरून खेळामध्ये वाद निर्माण झाल्यास फेडरेशनने नेमलेल्या तांत्रिक समितीनेत्या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण कराव आणिसामना पहाण्यासाठी प्रतिनिधी नेमावा. त्या प्रतिनिधीच्या अहवालावरतांत्रिकसमिती त्या सामन्याबाबतनिर्णय घेतील.. +7.17) अंडर हँडणे काढलेला सलग दुसरा चेंडू हा समोरील बाजूच्या आक्रमण रेषेच्या मागे जाने गरजेचे आहे , असे न झाल्यास अवैध ठरविण्यात येईल. +7.18 ) एका स्पर्धेत एक खेळाडू फक्त एका वयोगटात खेळू शकतो. +7.19) कोणत्याही गेममध्ये प्रतिस्थापन (substitution) कोणत्याही वेळेवर घेतली जाऊ शकते. +7.20) एका संघाने अंडर हँडणे चेंडू खेळला ,दुसऱ्या संघानेही अंडर हँडनेच चेंडू खेळला अशा परिस्थितीत पहिल्या संघास तो चेंडू वरून शूट करणे आवश्यक आहे, म्हणजेच सलग तिसरा अंडर हँडला अवैध ठरविला जाईल. + +7.21) चेंडू खेळताना दोन खेळाडूंची टक्कर किना एकमेकांना स्पर्शझाल्यास चालेल परंतु चेंडू एकाच खेळाडूने खेळला पाहिजे. जर दोन्ही खेळाडूंना चेंडूचा स्पर्श झाला असल्यासते अवैध मानण्यात येईल. +7.22) एखाद्या वेळी खेळ उशीरा सुरू झाला आणि सामना निश्चित वेळेत संपणे गरजेचे आहे असे वाटल्यास (लाईटची सोय नसणे किंवा काही नैसर्गिक कारणे जसे की पाऊस, वारा ई.)तर रेफरीने त्या वेळेस त्याच्या घड्याळानुसार वेळ जाहीर करणे आवश्यक आहे. जर सामना निश्चित वेळेत संपला नाही तर दुसऱ्याच दिवशी नवीन सामना खेळविला जाईलआणि आगोदरच्या दिवशीचे गुण विचारात घेतले जाणार नाही, सामना सुरुवातीपासून चालू होईल. + +7.23) जर स्पर्धेच्या ठिकाणी फ्लड लाइटची व्यवस्था असेल तर प्रकाश पडल्यास अपुऱ्या प्रकाशाचे आवाहन केले जाऊ शकते. त्या प्रकरणात प्रकाश पुरेसा असल्यास किंवा नसल्यास रेफरीचा निर्णय अंतिम असेल. यावर खेळाडूंचे कुठल्याही प्रकारचे अपील असू शकत नाही, +7.24)  खराब हवामानामुळे सोडलेला सामना जेव्हा त्याच दिवशी परत खेळविला जात असेलतेव्हा त्याच स्कोअरपासून पुन्हा प्रारंभ केला जाईल. जर त्याच दिवशी तो पुन्हा सुरू केला नसेल तर, तो दुसऱ्या दिवसापासून सुरुवातीपासूनच पुन्हा खेळविला जाईल.जर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळण्यासाठी हवामान योग्य नसेल तर सामना टॉसने निश्चित केला जाऊ शकतो किंवा जर सहभागी संघ आणि आयोजकांनी यात सहमती दर्शविली तर तो सामना दुसऱ्या दिवशी खेळविला जाईल. +7.25) गैरवर्तन व त्यावरील कार्यवाही- +(1) चेतावणी - किरकोळ गैरवर्तनकेल्यास पंच एखाद्या खेळाडूस किंवा संघास चेतावणी देऊ शकतो.एकाद्या संघास किंवा खेळाडूस अशी चेतावणी (warning) दिल्यास याची नोंद गुणपत्रकावर नोंदली जावी. +(2) दंड: कोणत्याही संघातील सदस्याने सामन्यातील पहिल्यांदा असभ्य आचरण केल्यास  दंड केला जातो (यलो कार्ड) +(3) हकालपट्टी: एखाद्या खेळाडूने गंभीर स्वरूपाचे असभ्य वर्तन अथवा वागणूक केल्यास त्यास त्या वेळेपासून संपूर्ण सामना न खेळण्यावर बंदी लावली जाते.(निळे कार्ड) +(4) अपात्रता: अपात्र ठरविलेल्या खेळाडूस मैदान तसेच स्पर्धेची जागा सोडण्यास सांगण्यात येते. +7.26) टाईम आउट आणि टेक्निकल टाईम आउट – +प्रत्येक संघासाठी केवळ दोनच टाईम आउट  मागितले जाऊ शकतात आणि ही वेळ दोन मिनिटांपर्यंत असेल. +जेव्हा एखद्या संघाचे 8 गुण होतात आणि संघ कोर्ट बदलतात तेव्हा टेक्निकल टाईम आउट लागू केला जातो. तसेच सामना चालू असतांना काही अडचण आल्यास पंच टेक्निकल टाईम आउट घोषित करु शकतात. + +7.27) गुण व सेट जिंकणे - +जो संघ सर्वात आधी 15 गुण मिळवितो तो संघ तो सेट जिंकतो. एकूण 3 सेट खेळविले जातात, अशा परिस्थितीत एखादा संघ सलग 2 सेट जिंकल्यास त्यास विजयी घोषित करण्यात येईल. परंतु पहिले 2 सेट 1-1 अशा बरोबरीत सुटल्यास अंतिम तिसरा सेट खेळविण्यात येतो. तिसरा व निर्णायक सेटमध्ये एखाद्या संघ्गाचे 8 गुण झाल्यास बाजू अडला बदल करण्यात येते. 14-14च्या टायच्या बाबतीत, दोन-गुणांची आघाडी (17-15) साध्य होईपर्यंत खेळणे सुरू ठेवले जाते परंतु 18-18 पर्यंत. 18-18 अशा गुनानातर एखाद्या संघाने  आघाडी घेतल्यानंतर कोणत्याही संघाकडून 1 गुण मिळविला असता सामना संपेल diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7098.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d97f6dbd173bea3b7661bccb7a65fbf727d3dec --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7098.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सारंग रागाचा एक प्रकार. +राग शुद्ध सारंग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7121.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d6c0e53a3783c213afe6d4d8a4cabe7027b0f75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7121.txt @@ -0,0 +1,2 @@ +शुभदा शरद गोगटे (जन्म २ सप्टेंबर १९४३) मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका आहेत. त्यांनी कथासंग्रह, कादंबरी, विज्ञानकथा, ललित लेख असे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकार हाताळले आहेत. +’खंडाळ्याच्या घाटासाठी’ हे त्यांचे एक गाजलेले पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7129.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7129.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7138.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9379924c51e12e8c9a83f9ea0083d70efc69dc69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7138.txt @@ -0,0 +1 @@ +शुभा टोळे ह्या भारतातील जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन करतात.[१] त्यांना २०१४मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला गेला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7207.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..352d8daaa8ce2e7bc32f8eedb3671adc6dbef757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7207.txt @@ -0,0 +1,2 @@ +शृंगार हा शब्दाच्या रसाचा एक प्रकार आहे. +ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणा-या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7222.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025475c684b9379772fce1d81de013ae524f24c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7222.txt @@ -0,0 +1 @@ +शमिलिया शाँटेल कॉनेल (१४ जुलै, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7232.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfeb7009c82842e38afc79d60912d05f7e739fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7232.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉक्टर अर्नेस्टो "चे" गेव्हारा (स्पॅनिश: Ernesto Che Guevara), ऊर्फ चे गेव्हारा किंवा एल चे किंवा चे, (जून १४, इ.स. १९२८ - ऑक्टोबर ९, इ.स. १९६७) हा आर्जेंटिनाचा मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्करतज्ज्ञ होता. तो क्यूबाच्या क्रांतिकाळातला एक प्रमुख नेता होता. +वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरिबी व एलियनेशनचे विदारक दृश्य आढळले. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व त्याच्या निरीक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की "लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-वसाहतवाद व साम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे. ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे." ह्या विचारांनी त्याला ग्वाटेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वाटेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅकोबो आर्बेंझ ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. +चे गेव्हारा याचा जन्म १४ जून १९२८ रोजी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिनामध्ये देशात झाला.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7246.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e27348ef4067254af626c26c62d87777cd082394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7246.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेंडगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7267.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16a58f1ab99fd794db2ed10af8dd2bb4264cf2ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7267.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेंदरुण बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7289.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4eb41b69f0cfb7f0d936462fc24895b8b954162 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7289.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7322.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e471de7458035fe4a3a39c8333ef7ac4d3970702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7322.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेख झायेद क्रिकेट स्टेडियम (अरबी: ملعب الكريكيت الشيخ زايد) हे संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २०,००० ते २५,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात नव्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व शारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम). +२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7325.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e471de7458035fe4a3a39c8333ef7ac4d3970702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7325.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेख झायेद क्रिकेट स्टेडियम (अरबी: ملعب الكريكيت الشيخ زايد) हे संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २०,००० ते २५,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात नव्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व शारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम). +२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7329.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc21cdb2ce705991b90a8f245d005cec2fb1c1f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7329.txt @@ -0,0 +1 @@ +शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान (अरबी: زايد بن سلطان آل نهيان; १ डिसेंबर १९१८ - २ नोव्हेंबर २००४) हा मध्य पूर्वेतील अबु धाबीचा अमीर व संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९७१ साली अमिरातीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत तो अध्यक्षपदावर होता. तो अमिरातीच्या सर्वात लोकप्रिय राज्यकर्त्यांपैकी एक मानला जातो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7333.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..224c63645d0a42f3b5c626cc88ae0d049fd2adc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7333.txt @@ -0,0 +1,49 @@ +- पार्श्वभूमी +तो काळ इस्लामी राजवटीचा. दिल्लीचा मुघलबादशाहा, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज तसेच देशात इतरत्र छोटी मोठी राज्य अस्तित्वात होती. या सर्व शाह्या सत्तेसाठी, स्वार्थापायी एकमेकांशी लढत होत्या, यात गोर-गरीब जनता भरडली जात होती. दुसऱ्या बाजूने समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता. +देशात बहुतांशी मुस्लिमांची सत्ता होती तर बहुसंख्य जनता हिंदू होती. दोन्ही धर्मात देव -देव, पूजाअर्चा,  राहणीमान यात फरक होता. हिंदू मुर्तीपुजक तर मुस्लिम निर्गुण निराकार अल्लास भजणारे, हिंदू धर्मात जातीवर्ण व्यवस्था प्रबळ होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णव्यवस्थेची मुळे घट्ट रोवलेली होती. प्रत्येक जातीचे देव व परंपरा वेगळ्या होत्या. श्रेष्ठ, कनिष्ठ यावर जातीवाद होत होता. समाज बुरसट विचाराने रसातळाला गेला होता. समाज दिशाहीन झाला होता. अशावेळी एका समाधसुधारकाची, समानतेची वागणुक देणाऱ्या महात्म्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली संत शेख महंमद महाराजांच्या रूपाने. +-  जन्म +राजमहंमद पिता व फुलाई मातेच्या पोटी शेख महंमदांचा वाहिरा (ता.आष्टी,जि.बीड) या त्यांच्या मुळ गावी जन्म झाला. त्यावेळी राज महंमद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाचे पदरी नोकरीस होते. स्वामी जयराम आपल्या अभंगात संत शेख हंमदांच्या माता पित्यांवीषयी म्हणतात, “ राजे महंमद पिता, फुलाई माता। त्यांचे पोटी संता अवतार॥” राज महंमद आणि फुलाई मातेच्या पोटी अवतारी संत शेख महंमद जन्माला आल्याचे सुचक त्यांनी या ठिकाणी केले आहे. किंवा शेख महंमद स्वतः योगसंग्राममध्ये लिहीतात याती गोरे राज महंमद पिता। सगुण पतिव्रता फुलाई माता। प्रसवली अविनाश भक्ता। शेख महंमदालागी ॥ +शेख महंमदांवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. घरात गुरुपरंपरा व धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांना चांगले शिक्षण मिळाले. वडील राजमंहमद किल्लेधारुर या ठिकाणी हवालदार असल्याने त्यांना समाजात मान सन्मान होता. शेख महंमदांंनी लहानपणापासून सामाजिक, राजकीय परिस्थिती जवळून पाहिली होती. साहजीकच  शेख महंमदांचा वावर किल्ल्यावर असणे स्वभाविक आहे. त्यांची नजर तीक्ष्ण होती. लहानपणापासूनच ते चिकित्सिक वृत्तीचे होते. अफाट व तिक्ष्ण बुद्धिमत्ता असल्याने समाजातील गोरगरीब जनतेचे निरिक्षण ते करीत. समाजातील विषमता,  जाती धर्मातील द्वैष, चातुवर्ण्य व्यवस्था व  परिस्थितीला बळी पडलेला समाज त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला  व वैचारिक क्रांती करण्याचे बिजारोपण बालवयातच झाले. यानंतर ते श्रीगोंदा (चांभारगोंदे) येथे स्थिरावले. +-  अनुग्रह व गुरुपरंपरा +शेख महंमद महाराज हे जरी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असले तरी त्यांचा सुफी संप्रदायाशी संबंध असावा असे इतिहासकारांनी नोंदवले आहे. त्यांच्यावर सुफी, वारकरी, दत्त, नाथ या चारही संप्रदायाचा संस्कार स्थल काल परिस्थिती नुसार घडला असावा असे म्हणता येईल. व त्यानुसार त्यांचा व्यासंग व योगसाधनाही बलवत्तर असावी असे म्हणता येईल. +कादरी संप्रदाय जगातील सुफी संप्रदायाच्या चार उपपंथापैकी एक पंथ होय. या  शिष्य परंपरेतील भारतात आलेला पहिला कादरी सुफी म्हणून महंमद गौस हा मानला जातो. याचेपासून शेख महंमदाची परंपरा मांडता येते.  महंमद गौस - राज महंमद - कादरी चांदसाहेब (चंद्रभट उर्फ चाँद बोधले) कादरी महंमद साहेब म्हणजेच शेख महंमद अशी गुरू परंपरा आहे. चाँदबोधले यांचे दोन शिष्य ते म्हणजे जनार्धन स्वामी व शेख महंमद म्हणजे हे दोघे गुरू बंधु होय. जनार्धन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरुपरंपरा आहे. सुफी पंथ हा ध्यानधारणा, अनुष्ठाण, भजन, पूजन, योगसाधना, इ.वर भर देणारा व अद्वैत मानणारा आहे. एकंदरीत या चारही संप्रदायातील तत्त्वज्ञान व विचार प्रणाली थोड्याफर प्रमाणात सारखीच आहे. त्यात वारकरी संप्रदायाची समतावादी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, सरळमार्गी असणारी भक्ती शेख महंमदांना भावली व ते त्याच ठिकाणी रमले असे म्हणावे लागेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदा भेद भ्रम अमंगळ ॥ किंवा यारे यार ेलहान थोर। याती भलती नारी नर। करावा विचार । नलगे चिंता कवणाशी ॥ म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्व जाती-धर्म, वंश, लिंग आदींना सोबत घेणारा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय होय. त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत केले. +अख्यायीका:- +अनेक अख्यायिका, मौखिक परंपरेतील चमत्कार आजही ऐकावयास मिळतात. +- खाकेबाची कथा +- मोदोबाची कथा +- व्यापारी भक्ताची जहाज तारली +- देहू येथील मंडप विझवला +- गोधडी थरथर कापायला लागली +- बिगार हवेतच तरंगली +- गाय  जिवंत केली +- योगसंग्राम कोरडा निघाला +- तेलीणबाईंची कथा +- मुधा पांगुळ प्रसंग +साहित्य +सोळाव्या शतकातील संत परंपरेतील साहित्य क्षेत्रातील सर्वांत श्रीमंत संत कोणते असतील तर संत शेख महंमद महाराज. मुस्लिम समाजात जन्म घऊन सुद्धा तमाम बहुजन समाजाच्या उद्धारासाठी साहित्य लिहून ठेवले मात्र ज्यांच्या साठी लिहून ठेवले त्यांना त्याची किंमत कळाली नाही असेच म्हणवे लागले. त्यांनी 10 ग्रंथ लिहीले पैकी काही प्रकाशीत झाले तर अझुनही काही ग्रंथ अप्रकाशीत आहेत. 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10)  ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. यामध्ये योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. यात 18 अध्याय आहेत. वरील ग्रंथापैकी साठी संवत्सर व ज्ञान गंगा हे ग्रंथ अप्रकाशीत आहेत. +- वाहिरा येथील सनद +वाहिरा येथील- (सनदेचा मजकूर) (मूळ मजकूर उर्दू) त्याचा मराठीत मजकूर असा- +            1277 हिजरी रोजी सनद सादर होऊन मौजे वाहिरे व नालकोल रुई 3 चाहुर व 1 चाहुर असे एकूण चार चाहूर जमीन वंशपरंपरेने उपभोग घेऊन आशीर्वादाप्रित्यर्थ बहाल इनाम सनदशीर इस्त्रीईलखान यांनी मशिदीची दिवाबत्ती करून खिदमत करावया करता बहार इनाम दिलेले आहे शेख महंमद यांचे मुलगे ह्यांनी वंशपरंपरेने उपभोग घ्यावा सनदेचा कोणीही हुजूर करू नये असे फर्मावले आहे. +    नखळ अल्लाहू परवाना मुहर मुरोद आलमगीर बादशाह अजफरार साह गरह मूहर 1077 मुहर मुताबिक 10 जुळूस वालद मुस्तादयीन महमातहाळ व इस्तकबाळ परगना  पांडेपेडगाव मानोर. +मोगल सत्तेला वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज यांना इनाम जमीन द्यावीशी वाटली या घटनेतून महाराजांचे सामर्थ्य स्पष्ट होते. स्वतःला जिंदा पीर म्हणविणारा आलमगीर बादशहा संत शेख महंमद महाराजांना शरण आला.शेख महंमदम हाराजांच्या अध्यात्मज्ञानाचा साक्षात्कार हेच महत्त्वाचे कारण ठरते. निजाम, निजामशाहीतील अनेक अधिकारी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असलेले शूर सेनानी सरदार मालोजीराजे यांनी संत शेख महंमद महाराजांचे गुरुत्व स्वीकारले. शस्त्र, शक्ती आणि महत्त्वकांक्षा यांच्या आधीन असलेल्या व्यक्ती केवळ दिव्यज्ञानापुढेच  शरण येत असतात. संत शेख महंमद महाराजांपुढे अवघ्या भरतखंडाला हादरे देणाऱ्या राजकीय व्यक्ती शरण आल्या ही त्यांच्या संतत्त्वाची शक्ती आहे. दिव्यज्ञानच नवसमाज घडवू शकते हे संतांनी जाणले होते. मरगळलेल्या समाजाला तेजस्विता आणि तत्परता या गुणांनी उजळण्याचे कार्य संत शेख महंमद महाराजांनी केले. +मालोजीराजेंचे ‘आशिर्वाद प्रित्यर्थ’ बहाल इनाम... +मालोजीराजे यांचे श्रीगोंदामार्गे जाणे येणे असायचे. वेरूळवरून शिखर शिंगणापूरला जाताना एकदा श्रीगोंदा येथे थांबले. शेख महंमद महाराजांची कीर्ती ते ऐकून होते. शेख महंमद महाराजांच्या भेटीनंतर शेख महंमद हे थोर सिद्धपुरूष आहेत. ते ज्ञानी, योगी, तपस्वी आहेत. साक्षात अवतारी पुरूष आहेत. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद कडून अनुग्रह घेतला. आणि पाच चाहूर जमीन इनाम देऊन आजच्या मठास कोट विहीर बांधून दिली. इनाम पत्र दिले ते असे आहे. +तुम्ही आमचे गुरू आहात व आपण तुमचे शिष्य आहो. म्हणून पाच चाहूर खरेदी जमिनीतून बारा बिघे इमान तुम्हास मुकर्रर दिला असे, यास जर कोणी दावा करील तर त्यास आपण वारू. यामुळे शेख महंमद महाराजांना मालोजीराजे भोसले ह्या वजनदार व मातब्बर मनसबदारांचा  आश्रय लाभला होता. पुढे शहाजी राजे हे सुद्धा शेख महंमद महाराजांना गुरू मानत. +मोगल सत्तेने वाहिरा येथे इनाम जमीन दिली व मालोजीराजे यांनी श्रीगोंदा येथे इनाम जमीन दिली. यावरून संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा व वाहिरा येथे जास्त काळ वास्तव्यात होते. त्यांची कर्मभूमी वाहिरा व श्रीगोंदा होती. +शेख महंमदांचा लौकिक प्रपंच +शेख महंमद महाराजांना वारकरी व सुफी संप्रदायाचा वारसा घरातुनच लाभला होता. वडील राज महंमद यांनी आपल्या तोडीस तोड घराण्यातील फातीमाबाई (फातीमाबी) या मुलीशी शेख महंमदाचा विवाह लावून दिला. पुढील काळात फातीमाबाई या महाराजांच्या सर्व कार्यात सक्रीय होत असतील. फतीमाबी आणि शेख महंमद महाराज यांचे पती-पत्नी संबंध, कुटूंब व सांसारिक स्थिती याचे कुठेही स्पष्ट उल्लेख अढळत नाही. त्यांच्या पत्नी फतीमाबी या धार्मिक वृत्तीच्याच असाव्यात कारण जर त्यांना तसा विरोध झाला असता तर त्यांनी लेखणात ऐनकेनप्रकारे व्यक्त केला असता. त्यांना दावलजी, अजमजी, हकीमजी ही तीन मुले झाली. संत शेख महंमद महाराज व फातीमाबी या दांपत्याचे संस्कार मुलांवर झाले. एकूण संपूर्ण घराणेच वारकरी संप्रदयाचा विचार जाणत होते. संत शेख महंमद महाराजांची योगसाधना व विद्वत्वा याचा विचार करता त्यांच्या तिनही मुलांनी दावलजी, अजमजी, हकीमजी यांनी महाराजांना गुरू मानुन दिक्षा घेतली असावी. शेवटच्या टप्प्यामध्ये फतीमाबी यांनीही शेख महंमद महाराजांना सोब समाधी घेण्यासंबंधी गळ घातली असणार म्हणून श्रीगोंदा येथे व वाहिरा येथे सपत्निक समाधी आहे. +संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधीकाळा संदर्भात अभ्यासकांमध्ये एकमत पहायला मिळत नाही. जसे अनेक संतांच्या बाबतीत घडते तसेच महाराजांच्या बाबतीतही घडत आहे. डॉ. भिमा मोदळे यांनी संत कवी शेख महंमद: एक चिकित्सक अभ्यास या पुणे विद्यापीठात सादर केलेल्या टंकलिखीत प्रबंधात संत शेख महंमद महाराजांच्या जन्मशकांविषयीच्या मतभिन्नतेचा साक्षेपाने आढावा घेतला आहे. त्यानुसार +चरित्रकार बा.ना.शिंदे यांच्या मते शके 1548 (इ.स.1626) +महाराष्ट्र सारस्वत पुरवणी लेखक शं.गो. तुळपुळे यांच्या मते शके 1482 (इ.स.1560) जन्मकाल नोंदवला आहे. +तर श्रीगोंद्यातील मठात, फलकावर नोंदवल्या प्रमाणे शके 1548 असा दिलेला आहे. +मालोजीराजे यांनी मठ उभारणीसाठी दिलेल्या चकनाम्याची घटना इ.स.1595 अशी आहे. +जयरामस्वामींच्या समाधीचा (इ.स.5 सप्टेंबर 1672) उल्लेख व त्यानंतर संत शेख महंमद महाराजांची समाधी सुमारे अडीच वर्षांनंतर झाली असे गृहीत धरून महाराजांचे समग्र साहित्य संपादक वा.सी.बेंद्रे महाराजांचा समाधीकाळ इ.स.1672 असा मानतात. +डॉ.गं.ना. मोरजे यांच्या नोंदीप्रमाणे बेंद्रे यांनी इ.स. 1560 ते 1660 असा शेख महंमदांचा काळ मानला आहे. +ही मतभिन्नता लक्षात घेऊन डॉ. भिमा मोदळे यांनी शेख महंमद महाराजांचा कालखंड तारतम्याने इ.स.1575 ते 1674 असा मानावा असे म्हटले आहे. त्यानुसार संत शेख महंमद महाराजांचा जन्मकाळ पंधराव्या शतकाचा उत्तरार्धात अखेरीस झाला आसावा असे मानता येते. नदीचे मूळ आणि ऋषीचेकुळ शोधू नये असे म्हणतात. +ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे || +काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा || +फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे || +नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन || +शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद || + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7338.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c31601c5a5af89a3bcee27247d6a20044e2ea41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7338.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेख मुजिबुर रहमान (मार्च १७, इ.स. १९२० - ऑगस्ट १५, इ.स. १९७५) हा पूर्व पाकिस्तानचा राजकारणी व बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक होता. +मुजिबुर रहमान बांगलादेशचा प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होता. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही संबोधतात. +मुजिबुर रहमानची मुलगी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7358.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df6e2d1f4c05df09f8ef90e3c109a9db5a0debcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7358.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेखर सी. मांडे (५ एप्रिल १९६२) एक संरचनात्मक आणि कंप्यूटेशनल जीवविज्ञानी आहे.[१] सध्या ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद महाप्रबंधक पदांवर कार्यरत आहेत. +तसेच ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव आहेत.मांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वदेशी विज्ञान अभियान विज्ञान भारती यांचे उपाध्यक्ष आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7367.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa77d78bc4cb114994f55a0ba46c63059cb7df5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7367.txt @@ -0,0 +1 @@ +शेगाव महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका आहे. याचे प्रशासकीय केन्द्र शेगाव येथे आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7409.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25abd800efd7958e1b1dbceb97363c5a20e692fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7409.txt @@ -0,0 +1 @@ +शेडेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7434.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b908f152f68c34c17c51e07097aaf4ca39846485 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7434.txt @@ -0,0 +1,4 @@ +शेण्णी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७८ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२३ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ५०१ लोकसंख्येपैकी २५५ पुरुष तर २४६ महिला आहेत.गावात ३५० शिक्षित तर १५१ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १८५ पुरुष व १६५ स्त्रिया शिक्षित तर ७० पुरुष व ८१ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.८६ टक्के आहे. +गुगडळ, मावळगाव, सोरा, चिलखा, सेनकुड, मर्शीवणी तांडा, थोडगा, ब्रह्मवाडी,सिंदगी खुर्द, मांगदरी, सिंदगी बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.सुनेगाव ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7439.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6e1178366b39b0f53088f7c641bd9db005654e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7439.txt @@ -0,0 +1,11 @@ +शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा एक महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. +आमदार भाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा निवडून गेले आहेत, तर पक्षाचे आमदार भाई बाळाराम पाटील हेही कोकण शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेत गेले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख(सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), सुभाष पाटील(अलिबाग), भाई धैर्यशील पाटील (पेण) हे विधानसभेचे आमदार आहेत. भाई गणपतराव देशमुख हे केव्हापासूनतरी ५० वर्षे पक्षाचे काम करत आहेत, ते १९६२ पासून (केव्हापर्यंत?) विधानसभेवर निवडून येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचेच वर्चस्व गेली (केव्हापासून?) अनेक वर्षे आहे +२०१७ साली, महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह इतर नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत, तसेच खोपोली, पनवेलमध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत. (२०२०ची स्थिती?) +सन १९४६ च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यां सहकाऱ्यांना शंकरराव शांताराम मोरे यांनी आपली खंत बोलून दाखविली. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना आणि निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासलेला आहे. काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम करत आहे. यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल.” उपरोक्त खंत व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात ११-९-१९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतर काही आमदारांच्या मदतीने ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापन केला. या संघाच्या स्थापनेनंतर मोरे यांच्या काँग्रेसमधील विरोधकांनी टीकास्त्र सोडले. त्यावेळेस ‘नवयुग’ सारख्या साप्ताहिकांमधून शंकरराव मोरे यांनी आपल्या लेखणीने त्यांना चोख उत्तर दिले. यानंतर दिनांक ११-१-१९४७ रोजी मुंबईतील फणसवाडी येथील शंकरराव मोरे यांच्या बंगल्यात पुनश्च एकदा काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली. सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष” स्थापनेस प्रखर विरोध केला होता, या विरोधाने खचून न जाता पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला. परिणामे ३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी मुक्कामी शंकरराव मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ऐतिहासिक बैठक घेतली. याच बैठकीत आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला. +या पक्षाला प्रारंभापासूनच शास्त्रीय समाजसत्तावादाची वैचारिक बैठक देऊन शंकरराव मोरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणले. शंकररावांच्या सार्वजनिक जीवनातील तिसऱ्या व सर्वात तेजस्वी कालखंडाला शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाची धोरणे सर्वांना समजावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक भक्कम करण्यासाठी अनेक अभ्यास वर्गांतून व शिबिरांतून शंकररावांनी बौद्धिक वर्ग घेतले. शंकररावांनी महाराष्ट्रात तुफानी दौरे काढून भांडवलदारांच्या व त्यांचे मुनीम बनलेल्या काँग्रेस सरकारच्या विरुद्ध उभ्या महाराष्ट्रात जबरदस्त रान उठवून राज्यकर्त्यांच्या सिंहासनाला धाम फोडला. शंकररावांनी त्यांच्या ‘जनसत्ता’ ह्या साप्ताहिकातून मार्क्सवाद आणि शेतकरी कामगार पक्षाचे एकसूत्री विचार लोकांसमोर मांडले. यावेळी ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. वर्गविग्रहाच्या तत्त्वांवर अतूट निष्ठा असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकांच्या पसंदीस जस-जसा खरा उतरत गेला तस-तसे काँग्रेसवाल्यांचे आरोप धांदात खोटे ठरू लागले. पक्षस्थापनेच्या निवेदनातच स्पष्ट ठरले होते की, “यापुढे स्पष्टपणे समाजवादी तत्त्वानुसार कामगार शेतकऱ्यांच्या वर्ग संघटना उभारणे व त्यांचे दैनंदिन वर्गलढे लढविणे हाच एक मार्ग आहे.” त्यामुळे ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्याची तोंडे आपोआपच बंद होत असत. त्याचप्रमाणे ३ ऑगस्ट १९४७ रोजी ह्या पक्ष स्थापनेच्या बैठकीत झालेल्या ठरावातदेखील असे ठरले होते की, “प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येत नाही. कोणताही पक्ष वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारूढ झाला, तरीही तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करू शकणार नाही.” त्याचवेळेस असेदेखील म्हटले होते की, “या वर्गसंघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत. शेतकरी कामगार पक्षाचे हेच प्रमुख धोरण संस्थापक शंकरराव मोरे यांनी आखले होते. आजही शेतकरी कामगार पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे' +शेकापच्या जन्माची बीजे कशी रुजवली गेली याचे विवेचन शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी उद्बोधकरीत्या केले आहे. शंकरराव मोरे विवेचनात म्हणतात, “मार्क्सवादी तत्त्वज्ञान आणि कामगार वर्गाचे आंतरराष्ट्रीयत्व ही स्वातंत्रलढ्याला पोषक आहेत; परंतु या देशात कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने धोरणविषयक चुका करून मार्क्सवादाचे विकृत स्वरूप भारतीय जनतेपुढे ठेवले, हे श्रमजीवी जनतेचे दुर्दैव म्हटले पाहिजे. सन १९३५मध्ये झालेल्य कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या सातव्या काँग्रेसमध्ये वासाहतिक देशांतील स्वातंत्र्यलढ्यासंबंधी मार्गदर्शन करण्याचे कार्य डिमिट्राव्ह प्रबंधाने केले. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसजनांसह भाग घेतला पाहिजे असे धोरण जाहीर करून देखील येथील कम्युनिस्टांनी १९३० च्या व १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यांत सहभाग घेतला नाही. त्यामुळे कम्युनिस्टांना भारतीय जनतेचा मोठा रोष पत्करावा लागला होता. तसेच या लढ्यांतून कामगार वर्गीय पुढारीपणाही तो प्रस्थापित करू शकला नाही. त्यामुळे कम्युनिस्ट हे स्वातंत्र्यलढ्याचे स्वातंत्र्यलढ्याचे शत्रू आहेत ही भावना हिंदुस्थानात जोपासली गेली. याउलट कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यांत पुढारपण घेतले असते तर १९४७ साली तडजोड करण्याची ताकद काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाच्या हाती राहिली नसती. कम्युनिस्टांच्या चुकांमुळेच देशातील कामगार-किसान हा काँग्रेसच्या मागे गेला. ब्रिटिश साम्राज्याशी हातमिळवणी करणे काँग्रेसला त्याचमुळे सोपे झाले. सदर घटनेस विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रात कामगार–किसान क्रांती जिवंत ठेवण्यासाठीच मला ‘शेतकरी-कामगार पक्षाची’ निर्मिती करावी लागली” असेही शंकरराव मोरे यांनी ठामपणे सांगितले. +सन १९४८ ते १९५६ हा ‘शेतकरी-कामगार पक्षाचा’ सुवर्णकाळ होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण याचकाळात शंकरराव मोरे यांचे झुंजार नेतृत्व या पक्षास लाभले होते. शंकररावांनी श्रमजीवी जनतेला समजेल अश्या सोप्या भाषेत हजारो खेड्यात नेण्याचे व जनतेला काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणा खालून काढून मार्क्सवादी छावणीत आणण्याचे मोलाचे कार्य आपल्या सिद्धहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने पार पाडले. आजही मार्क्सवाद व लालबावटा खेड्या-पाड्यात दिसून येत आहे ते ‘शेकाप’ मुळे होय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही शेकाप अग्रेसर होता. १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे २८ आमदार निवडून गेले होते तर शंकरराव मोरे व इतर काहीजण लोकसभेमध्ये निवडून गेले होते. यामुळेच शेतकरी कामगार पक्षाचा हा सुवर्णकाळ होता. दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस ऐन भर आला असतानाच शेकाप फुटली आणि पक्षाची वाताहत सुरू झाली. शंकररावांचे शिष्य व मानसपुत्र एन. डी. पाटील यांनी शंकररावांनंतर शेकापची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आज केवळ रायगड जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवून असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा महामेरू आमदार विवेक पाटलांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला आहे. (सन २०१७). +१९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेकाप’चे २८ आमदार निवडून येण्याचा विक्रम घडला होता. हे यश जरी शेकापला टिकवता आले नाही, तरी देखील आजतागायत रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार सातत्याने निवडून येत आहे. आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. पुढील २५ वर्षे तरी ‘शेकाप’ शिवाय येथे पर्याय नसणार इतकी ‘शेकाप’ने तेथे घट्ट पाय रोवलेले आहेत. समविचारी पक्षांना एकत्रित करून येणाऱ्या विधानसभेत देखील शेकपच्या आमदारांची संख्या वाढेल अशी सध्या येथे परिस्थिती आहे.(२०१७ साल) +१९४७ ते २००९ पर्यंतच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास शंकरराव मोरे यांच्या समर्थ नेतृत्वाने गाजलेल्या या पक्षाने महाराष्ट्रात ग्रामीण भागातील बहुजन समाजातील कर्तबगार तरुणांची एक नवी पिढी घडविली असे दिसून येते. या समर्थ नेतृत्वामध्ये गणपतराव देशमुख, यशवंतराव मोहिते, एन. डी. पाटील, उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, दाजीबा देसाई, कृष्णराव धुळप, विठ्ठलराव हांडे, सोनू आनंदा पंडित (जळगाव)आणि आजचे धडाडीचे आमदार विवेक पाटील यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. +’शेकाप’चे नेते प्रा. एन.डी. पाटील यांना डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात राष्ट्रीय बंधुता पुरस्कार मिळाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन डी पाटील यांनी सत्यशोधकी विचारांची कास धरून महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला जनसामान्यांपर्यंत या पक्षाचे कार्य पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. सामान्य लोकांच्या प्रश्नासंबंधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी संघर्षात्मक लढा उभारला. रयत शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची द्वारे सर्वांना खुली करून दिली. रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली, आणि त्या माध्यमातून गोरगरीब उपेक्षित पीडित शेतकरी यांच्या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7455.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a562a0c8c6919e08f037d6fae4455e41a3cf715e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7455.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेतफळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_747.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74426675a8f9cbb17d4600966839920cf34dbce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_747.txt @@ -0,0 +1,3 @@ +विल्यम टेकुम्सेह शेरमन (८ फेब्रुवारी, १८२०:लँकेस्टर, ओहायो, अमेरिका - १४ फेब्रुवारी, १८९१:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकेचा सेनापती, उद्योजक आणि लेखक होता. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान हा उत्तरेच्या सेनेतील एक सेनापती होता. ब्रिटिश युद्धाभ्यासक बी.एच. लिडेल हार्टच्या मते हा पहिला आधुनिक सेनापती होता. +यादवी युद्धादरम्यान शेरमनने कठीण युद्ध (हार्ड वॉर) ही रणनीती अवलंबिली होती. त्याच्या मते दक्षिणेचा पूर्णपणे पराभव करण्यासाठी त्यांच्या सैन्याचाच नाश नव्हे तर आर्थिक, मानसिक आणि व्यूहात्मक शक्तीचा नाश करणे आवश्यक होते, ज्याकरणे पुन्हा ते डोके वर काढू शकणार नाहीत. त्याने १५ नोव्हेंबर, १८६४ ते २१ डिसेंबर, १८६४ दरम्यान जॉर्जियाची राजधानी अटलांटा पासून अटलांटिक समुद्रावरील सव्हाना शहरापर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. शत्रूच्या प्रदेशात खोलवर घातलेल्या या धाडी दरम्यान त्याला उत्तरेची कुमक मिळणे शक्य नव्हते. पाठलाग करणाऱ्या दक्षिणेच्या सैन्यालाही स्थानिक मदत मिळू नये व त्यांची युद्धशक्ती कमकुवत व्हावी यासाठी त्याने अटलांटा ते सव्हाना मार्गातील प्रदेशाची त्याने राखरांगोळी केली. या मोहीमेला शेरमनची समुद्रापर्यंतची कूच असे नाव देण्यात आले. युद्धशास्त्रातील सर्वभक्षी लढाई (टोटल वॉर) या व्यूहाचे हे सुरुवातीचे उदाहरण समजले जाते. शेरमनच्या व्यूहरचनेचा प्रभाव नाझी जर्मनीचे सेनापती हाइन्झ गुडेरियानच्या ब्लिट्झक्रीग आणि अर्विन रोमेलच्या रणगाडा युद्धनीतीवर दिसून येतो. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7475.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89f2d79e9eca3f080a0f3e99938750bf3086b80a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7475.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +शेन ओमारी डाउरिच (३० ऑक्टोबर, इ.स. १९९१:बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7497.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e74b30c81cb1770d60fb92e9172b9aacdc80060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7497.txt @@ -0,0 +1,36 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +शेन वॉट्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. +साचा:Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7528.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dd4ca153d7b759d4635b5e522954cd06b3cc173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7528.txt @@ -0,0 +1 @@ +शेफाली शाह उर्फ शेफाली शेट्टी (२२ मे, १९७३ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. शेफालीने १९९५ सालच्या रंगीला ह्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ सालच्या सत्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली प्रदर्शित झालेल्या द लास्ट इयर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी शेफालीला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मोहब्बतें, मॉन्सून वेडिंग इत्यादी गाजलेल्या चित्रपटांमध्ये शेफालीच्या भूमिका होत्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7551.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e47070018b92e90ce8d29d2874bef99f118caf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7551.txt @@ -0,0 +1,8 @@ + शेमडराणेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7562.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bf527eba1834e71ca7c91bd9b58be265113c0a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7562.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेर-ए-काश्मीर मैदान हे भारताच्या श्रीनगर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. +जम्मू आणि काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले आणि राजकीय अस्वस्थता या कारणामुळे भारतीय सैन्याने या स्टेडियमवर तब्बल १८ वर्षे तळ ठोकला होता. सन २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनला पुन्हा हे मैदान देण्यात आले. सन २००२ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याच स्टेडियमवर एका सभेला संबोधित केले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_758.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e2c73bb4295e9cffba132061e4cb08437d415c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_758.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम दुसरा (इ.स. १०५६ - ऑक्टोबर २, इ.स. ११००) हा इ.स. १०८७ पासून मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. +हा विल्यम पहिल्याचा (विल्यम द कॉँकरर)चा दुसरा मुलगा होता. याला रुफस या नावानेही ओळखत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7580.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ef14274557eeb2535e76f1159b9e546e078efa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7580.txt @@ -0,0 +1 @@ +शेअरचॅट (मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड) ही एक भारतीय सोशल मीडिया कंपनी, [१] बंगलोर येथे आहे. याची स्थापना अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंग आणि फरीद अहसान यांनी केली होती, आणि 8 जानेवारी 2015 रोजी समाविष्ट करण्यात आली होती. [२] शेअरचॅट (मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड) ही शेअरचॅट, मोज आणि मोज लाइट+ (टकाटक) सारख्या ऍप्लिकेशन्सची मूळ कंपनी आहे. शेअरचॅट ने फेब्रुवारी 2022 मध्ये MX टकाटक विकत घेतले, जे सर्वात मोठ्या घरगुती शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. [३] शेअरचॅट चे 15 भारतीय भाषांमध्ये 350 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. [४] कंपनीचे सध्याचे मूल्य US $5 अब्ज आहे. [५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7587.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c40d7d28ceca412035f247062ef2a09c5fdea7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7587.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेरपुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_761.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73111523f04a48102dce51c8ff153203052eaa1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_761.txt @@ -0,0 +1,7 @@ +विलेम दुसरा (डिसेंबर ६, इ.स. १७९२ - मार्च १७, इ.स. १८४९) हा जानेवारी २०, इ.स. १८४० ते मृत्युपर्यंत नेदरलँड्सचा राजा होता. +विलेम पहिला व विल्हेमिनाच्या या मुलाचा जन्म द हेग येथे झाला. जन्माच्या वेळी विलेम आपल्या देशात नव्हता. +शिक्षण पूर्ण केल्यावर तो ब्रिटिश सैन्यात रूजु झाला व ड्यूक ऑफ वेलिंग्टन बरोबर त्याने काही लढायांमध्येही भाग घेतला. +इ.स. १८१३मध्ये विलेम पहिला नेदरलँड्सचा राजा म्हणून परतला व विलेम दुसरा युवराज म्हणून त्याच्याबरोबर स्वदेशी आला. यानंतर त्याने क्वात्रे ब्रासची लढाई व वॉटरलुची लढाईत भाग घेतला. तेथे तो जखमी झाला. +इ.स. १८१६मध्ये त्याने रशियाचा झार अलेक्झांडर पहिला याची बहीण ऍना पाव्लोव्नाशी लग्न केले. +इ.स. १८४०मध्ये विलेम पहिल्याने पदत्याग केला व विलेम दुसरा राजा झाला. इ.स. १८४८च्या सुमारास युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये क्रांतिचे वारे वाहत होते. विलेमला भीती वाटली की नेदरलँड्सची प्रजा देखील त्याच्या विरुद्ध उठाव करेल. या कारणास्तव त्याने नेदरलँड्सचे संविधान बदलण्याचा निर्णय घेतला व आपल्याकडील सत्ता कमी करून लोकप्रतिनिधींकडे काही जबाबदाऱ्या दिल्या. +मृत्युपूर्वी त्याने नेदरलँड्सची पहिली संसद खुली केली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_763.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7eefafcaed3d64059e8d552db94dc7dd9ea05e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_763.txt @@ -0,0 +1,3 @@ +२९ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7632.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9ac7ed87a9a52ad33d4cdc7ee2fa39be1ce067 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7632.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेरीदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7678.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8fd26c0a2f870eeae64d3ac3c9d2dd7b58be880 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7678.txt @@ -0,0 +1,4 @@ +शेलारवाडी लेणी किंवा घोरावाडी लेणी ही महाराष्ट्रात पुणे शहराजवळच्या शेलारवाडी आणि घोरावाडी गावांजवळची लेणी आहेत. +ही लेणी समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात आहेत. वर जायला खड्या चढणीच्या पायऱ्या आहेत. +ही ९-१० बौद्ध लेणी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदली गेली होती. या लेण्यांमध्ये एक शिवमंदिरही आहे. याला घोरावडेश्वर असे नाव आहे. येथे एक चैत्यगृह आणि विहार आहेत. यांची रचना साधी असून थोडेसे नक्षीकाम आहे. एका विहारात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_769.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd868d9e6c645ad67e7f2397fe66537d2ff860b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_769.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते. +छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१ व इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7698.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20883a4554a701713a65fae6cf21cb34fd33b709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7698.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेल्बी काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_77.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_77.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3cec867ac8041df6c416b07430d2b292b2c8f32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_77.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7705.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3851deb62eed2fddc32ade54cd33dae7f594de4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7705.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेल्बी काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +शेल्बी काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7706.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d335b4cb0e9c90877403b6f813ce8fa9047e1f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7706.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेल्बी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोलंबियाना येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२३,०२४ इतकी होती.[२] या काउंटीला केंटकीच्या गव्हर्नर आयझॅक शेल्बीचे नाव दिले आहे. +शेल्बी काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7712.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5af16ebddb3dd4f465ec1e085200bed909f379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7712.txt @@ -0,0 +1 @@ +शेल्हाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7740.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c57a30ecae569067191f34928a922c8b870ef07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7740.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेळगावथडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7771.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb6f9ff3b37b5b7563661780c8b024ae13442066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7771.txt @@ -0,0 +1,18 @@ +शेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून तिळसा मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११० कुटुंबे राहतात. एकूण ५१३ लोकसंख्येपैकी २५७ पुरुष तर २५६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.७८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.६७ आहे तर स्त्री साक्षरता ६७.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.२८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +फणसगाव, खोदाडे,तिळमाळ,धाधरे,कोळीमसरोवर, धापड, कळंभोळी, बाळिवळी, कासघर, शिरसाड, तिळसे ही जवळपासची गावे आहेत.शेळे ग्रामपंचायतीमध्ये धाधरे, धापड, कोळीमसरोवर आणि शेळे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7813.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c2b42503efd6ff98997ce9f249bb46eddf521ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7813.txt @@ -0,0 +1,2 @@ +शेवाळवाडी लांडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7840.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..843bc6b6c5de5573c6f110464c14f88b00625a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7840.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; - अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेवून राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजाऊन देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते. +लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईयेथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. +चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला. +शैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३ च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7866.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ed55a1e446c90e8416c444dbe71881a64877fbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7866.txt @@ -0,0 +1,3 @@ +शैवाल किंवा शेवाळ (इंग्रजी: Algae - अल्गि) ही सकेंद्रक सजीवांच्या एका गटाची संज्ञा आहे. हे सजीव एकपेशीय किंवा बहूपेशीय असतात. अनेक शैवाल झाडांप्रमाणे सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. पण त्यांना झाडांप्रमाणे मुळे, पाने इत्यादी रचना नसतात. ते ओलसर जमीन, गोड किंवा खारे पाणी, झाडांची साल किंवा ओलसर भिंतींवर हिरव्या, तपकिरी किंवा काही वेळा काळ्या रंगाच्या स्तरांमध्ये आढळतात. +जगभरात आढळणाऱ्या वनस्पतींचे विभाजन दोन मोठ्या विभागात केले गेले आहे. +शैवालांमध्ये प्रजनन अनेक प्रकारांनी होते. काही शैवाल अलैंगिक पेशी विभाजन पद्धतीने प्रजनन करतात, तर काही क्लिष्ट पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7869.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41d080dfa3b4f25d694798ef4f1357980eec24ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7869.txt @@ -0,0 +1,3 @@ +शाँज-एलिजे (फ्रेंच: Avenue des Champs-Élysées) हा पॅरिस, फ्रान्समधील एक अत्यंत प्रतिष्ठित रस्ता आहे. जगातील सर्वांत प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक असलेला शाँज-एलिजे युरोपातील सर्वांत महागडा भूखंड (real estate) मानला जातो. +२ किमी लांब व सरासरी ७० मीटर रुंद असलेला शाँज-एलिजे पॅरिसमधील सर्वांत लोकप्रिय पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. +गुणक: 48°52′11″N 2°18′27″E / 48.86972°N 2.30750°E / 48.86972; 2.30750 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7884.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5046d137ca40d5fc324a7aea34a4b833b9993b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7884.txt @@ -0,0 +1 @@ +शॉन अँड्रु जेकब क्रेग (२३ जून, १९७३:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7885.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d8e41be5962b57665d82fba4c082a4e431d0ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7885.txt @@ -0,0 +1,12 @@ +शॉन गो (जन्म २० जुलै १९९३ मनिला, फिलीपिन्स) एक फिलीपिनियन व्हिज्युअल आर्टिस्ट, चित्रकार, शिल्पकार आणि पॉप कलाकार आहे.[१] सन २०१९ मधील सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल आर्टिस्टसाठी सॅनफ्रान्सिसोच्या व्हिज्युअल आर्ट गॅलरीमध्ये त्याला हा पुरस्कार मिळाला. मिकी माऊस, विनी द पूह, कॅप्टन अमेरिका आणि स्नो व्हाईटमधील सेव्हन ड्वार्फ्स यांसारख्या वर्तमान आणि भूतकाळातील सांस्कृतिक चिन्हांचा समावेश करण्यासाठी तो ओळखला जातो.[२] +२०११-२०१५ शॉनने यूसी बर्कले येथे व्यवसाय, अर्थशास्त्र आणि भूगोल या विषयातील तिहेरी पदवीचे शिक्षण घेतले. २०१७-२०१९ मध्ये त्याने एमोरी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि डबल एमबीए आणि लॉ मध्ये मास्टर्स केले. २०२१-२०२२ मध्ये तो फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेला आणि आर्ट मार्केट्समध्ये मास्टर ऑफ आर्ट्सचा पाठपुरावा केला. शॉनला लहानपणापासूनच वेदनांची आवड निर्माण झाली.[३] +त्याचे कार्य मॅनहॅटनमधील कला आणि डिझाइन संग्रहालय, जकार्ता, इंडोनेशिया येथील नवीन संग्रहालय आणि आर्ट स्पेस तसेच फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शोकेसमध्ये दिसून आले आहे. २०२२ मध्ये, मनिला येथील पहिल्या-वहिल्या मॉडर्न आणि कंटेम्पररी आर्ट फेस्टिव्हलमध्ये त्यांची चित्रे प्रदर्शित केली जातील. गो ने न्यू यॉर्क सिटीमध्ये सहकारी फिलिपिनो कलाकार, लुईस विल्लणुएव आणि जाणते युलो यांच्या सहकार्याने पॉप व्हिज्युअल्सच्या लग्नात एक शो केला. आकर्षक ठोके.[४] +२०२१ - गो आर्ट गॅलरी, फिएस्टा प्रदर्शन, १९५० ते २००० च्या दशकातील ग्रँड मास्टर्सपासून ते आधुनिक अमूर्त आणि पॉप कलाकारांपर्यंतच्या फिलिपिनो कलाकारांची टाइमलाइन (अँग किउकोक, फेडेरिको अग्युलर अल्कुआझ, मायकेल कॅक्नियो, एंजेल कॅक्नियो, ऑस्कर पॉल लूना, ऑस्कर, ऑस्कर , शॉन गो). मनिला, फिलीपिन्स +२०२२ - रिजन्सी ब्रुकलिन. आधुनिक खेळकर शॉन गो आर्ट क्लासिक्सची निवड. ब्रुकलिन, न्यू यॉर्क +२०२२ - जकार्ता आर्ट मोमेंट्स हायब्रीड आर्ट फेअर. ऑनलाइन आणि कला येथे:१ नवीन संग्रहालय आणि कला जागा, जकार्ता, इंडोनेशिया +२०२२ - मनिला, फिलीपिन्स येथे आधुनिक आणि समकालीन कला मेळा +२०२२ - इंडो सेनी "वेव्ह टू द नॉर्थ" सादर करते, प्रदर्शन कला चित्रे, शिल्पे, ग्राफिक्स आणि डिजिटल कलाकृती सादर करते; एनएफटी  (नॉन-फंजिबल टोकन), र्रगूस एफसी  द्वारे क्युरेट केलेले. मॉल ऑफ इंडोनेशिया (एमउआय) +२०२२- "व्हाट्स नेक्स्ट?" गट प्रदर्शन. कॅट-आय क्रिएटिव्ह. अटलांटा, जॉर्जिया +२०२२ - "कम टुगेदर" स्मॉल वर्क्स ग्रुप प्रदर्शन. कॅट-आय क्रिएटिव्ह. अटलांटा, जॉर्जिया +अधिकृत संकेतस्थळ +सॅन्फ्रान्सिसोच्या व्हिज्युअल आर्ट गॅलरी (२०१९) द्वारे सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल आर्टिस्ट diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7888.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3efa044d027e8226caee4f9a0fcf2d0495c31c6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7888.txt @@ -0,0 +1,35 @@ +४ जुलै, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7899.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7899.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7907.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b6fc7e96e725924e752bf57b8dc48d02f59d4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7907.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +शॉन राइट-फिलिप्स (ऑक्टोबर २५, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून, तर इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेअंतर्गत मँचेस्टर सिटी संघाकडून खेळतो. तो ,मधल्या फळीत उजव्या विंगराच्या भूमिकेतून खेळतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7909.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5210905299e4e0ee827229a6ffd8bd5b3c07e515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7909.txt @@ -0,0 +1 @@ +शॉन रॉबर्ट ॲशमोर (जन्म ७ ऑक्टोबर १९७९) [१] एक कॅनेडियन अभिनेता आहे. एक्स-मेन चित्रपट मालिकेतील बॉबी ड्रेक/आईसमॅन,[२][३] ॲनिमॉर्फ्स या दूरचित्रवाणी मालिकेतील जेक,[४] द फॉलोइंग या दूरचित्रवाणी मालिकेतील एजंट माईक वेस्टन, द रुईन्स या भयपट चित्रपटातील एरिक या भूमिकांसाठी तो ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7914.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43ae874ac071c285d4693131dc589aa263fa963d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7914.txt @@ -0,0 +1 @@ +शॉन सिल्व्हर (२९ मार्च, १९९० - ) हा  नामिबियाकडून लिस्ट अ सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7922.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5a6b86f15e7352d45bba56f5c9d392595a6f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7922.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +शाव्ना लेनी ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7966.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37fc72aff2cee4b7f6b08dd3bbf7a611144cad1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7966.txt @@ -0,0 +1 @@ +शोभना चंद्रकुमार (जन्म: २१ मार्च १९६४, तिरुवअनंतपुरम) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री आणि भरतनाट्यम नर्तिका आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7970.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e040f075e5a007030d8a573cd565a3117812d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7970.txt @@ -0,0 +1 @@ +शोभना मोस्तारी (१३ फेब्रुवारी, २०००:बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7978.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df455393bf7cd1da6381496658539ba55a41b400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7978.txt @@ -0,0 +1 @@ +शोभा करंदालजे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7985.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed88fc5058344deff460447ebb8cbc962dfb9914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7985.txt @@ -0,0 +1,2 @@ +शोभा नानासाहेब फडणवीस या मराठी राजकारणी आहेत. या चंद्रपूर जिल्ह्याच्या निवासी असून महाराष्ट्र विधानपरिषद व महाराष्ट्र विधानसभेच्या माजी सदस्य आहेत तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या भूतपूर्व सदस्य आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. +त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. त्यांनी सावली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे, परंतु पुनर्रचित मतदारसंघात हा भाग ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ यांत विभागल्याने त्यांनी ही जागा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सोडली व विधानपरिषदेत दाखल झाल्या. पूर्वीच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सावली विधानसभा मतदारसंघ येत होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7994.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e040f075e5a007030d8a573cd565a3117812d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_7994.txt @@ -0,0 +1 @@ +शोभना मोस्तारी (१३ फेब्रुवारी, २०००:बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8027.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2518df37c25d0daf761331d42674f85bd8535826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8027.txt @@ -0,0 +1,2 @@ +शोहो (जपानी:祥鳳, मंगल फीनिक्स) ही जपानच्या शाही आरमाराची हलकी विमानवाहू नौका होती. शोहो प्रकाराची ही पहिली विवानौका होती. +कॉरल समुद्राच्या लढाईत बुडालेली ही नौका दुसऱ्या महायुद्धात बुडणारी पहिली जपानी विवानौका होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8037.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abea75d968be8f47afca6587608c9f0aa540e5d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8037.txt @@ -0,0 +1,4 @@ +शौर्य हे क्षेपणास्त्र बंदिस्त आवरणातून सोडण्यात येणारे भारतीय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला ७५० ते १९०० किलोमीटरपर्यंतचा आहे.[१] अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी प्रामुख्याने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. +बंदिस्त आवरणातून सोडण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रात हे आवरण भेदून लक्ष्यावर जाण्याची क्षमता असावी लागते. पाणबुडीच्या आवरणातूनही हे क्षेपणास्त्र सोडता आले की अशा क्षेपणास्त्राची जागा हेरणे शत्रूला अवघड जाते. हे क्षेपणास्त्र आवरणात असल्यामुळे ते शत्रूच्या उपग्रहांच्या नजरेस न पडता कोठेही वाहून नेता येते व हव्या त्या ठिकाणाहून डागता येते. +यापुढच्या टप्प्यात ते पाणबुडीतून सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. +प्राथमिक अवस्थेत असून अजून चाचण्या बाकी आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8075.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5483e532cd0674f0593a1c81f4c1bee3fcfcef35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8075.txt @@ -0,0 +1,4 @@ + +श्यामची शाळा हा एक मराठी चित्रपट आहे. याची निर्मिती साईनाथ चित्र या संस्थेने केली. निमिर्ती व दिग्दर्शन प्रकाश जाधव यांचे असून हा चित्रपट सामाजिक आशयावर आहे. महाराष्ट्र शासनाने याला करमुक्त केले आहे. +अरुण नलावडे, विजय पाटकर, मिलिंद शिंदे, विजय कदम आणि अभिनेत्री निशा परुळेकर आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला श्रीरंग आरस यांचे संगीत दिले आहे. विदर्भातील गीतकार एकनाथ पवार यांचे या चित्रपटात दोन गाणी असून पार्श्वगायीका संजीवनी भिलांडे हिने गायीले आहे. अक्षय शिंदे यांनी लिहिलेले गीत पार्श्वगायक श्रीपाद मल्या यांनी गायीले आहे. फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाने विविध पुरस्कार देखील पटकावले होते. +चित्रपट निर्माते प्रकाश जाधव यांनी सन २०१७ मध्ये श्यामची शाळा या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वी 'आम्ही चमकते तारे', रमाबाई भीमराव आंबेडकर या चित्रपटाची निर्मिती केली. त्यात मकरंद अनासपुरे, भरत जाधव, निर्मिती सावंत , निशा परूळेकर या ज्येष्ठ कलावंतांनी भूमिका साकारल्या होत्या. सन २०२१ मध्ये 'वेल डन बाॅईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व विजय पाटकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8085.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4e836a6dccaa0b899dde1c80dcfd4ecc2fab5f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8085.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. श्यामला दिनकर चितळे -माहेरच्या दीक्षित (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९१८; - ॲशलँड-अमेरिका ३१ मार्च, इ.स. २०१३) या एक मराठी महिला व अश्मयुग वनस्पतिशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ होत्या.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8107.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03990cd8ec4927a51dcad3e07cea9b2c89378871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8107.txt @@ -0,0 +1,4 @@ +श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा,[१] +‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’-डॉ. नरेंद्र दाभोळकर[२] +श्रद्धा हा संस्कृत शब्द असून त्याची फोड श्रत् ++धा अशी आहे.श्र या बाराखडीतील अक्षरे जीवनातील चांगल्या मंगलमय गोष्टी निर्देशित करतात.यावरून असं म्हणता येईल की एक अशी धारणा जिच्या अंगिकारामुळे समस्याहीन जीवन जगतां येईल.जीवन जगण्यासाठी धारणेची आवश्यकता आहे.त्याशिवाय कोणतेही कार्य करता येत नाही. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8114.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e08082bb67eecd61f36ba3969ba09183591e416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8114.txt @@ -0,0 +1 @@ +श्रम आणि रोजगार मंत्रालय हे भारत सरकारच्या सर्वात जुन्या आणि सर्वात महत्त्वाचे मंत्रालयांपैकी एक आहे. हे भारताचे एक सांघिक मंत्रालय आहे जे सर्वसाधारणपणे कामगारांचे हित आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे रक्षण आणि रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. [१] उच्च उत्पादन आणि उत्पादकतेसाठी आरोग्यदायी कामाचे वातावरण निर्माण करणे आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार विकसित करणे आणि समन्वय साधणे हे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. [१] तथापि, ९ नोव्हेंबर २०१४ पासून कौशल्य विकास जबाबदाऱ्या, जसे की औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी जबाबदाऱ्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. [२] मंत्रालयाने २० जुलै २०१५ रोजी राष्ट्रीय कारकीर्द सेवा पोर्टल प्रक्षेपण केले जेणेकरून नोकरी पुरवठादार आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी कमी करण्यात मदत होईल. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8123.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5ab592f00cb9de172055834e9fb9dfda0a07719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8123.txt @@ -0,0 +1,6 @@ +श्रवणबेळगोळ (कन्नड: ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳ  ; इंग्रजी: Śravaṇa Beḷgoḷa) हे कर्नाटकाच्या हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे जैन धर्मीयांचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे प्रसिद्ध आहे [१]. +श्रवणबेळगोळ हाळेबीडूपासून ७८ कि.मी., बेलुरापासून ८९ कि.मी., मैसूर शहरापासून ८३ कि.मी. आणि बंगळूर शहरापासून १५७ कि.मी. अंतरावर आहे. +श्रवणबेळगोळाजवळील विंध्यगिरी पर्वतावर बाहुबली गोम्मटेश्वराची ५७ फूट उंचीची मूर्ती अखंड पाषाणातून कोरली आहे. बाहुबली गोम्मटेश्वर जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, अर्थात आदिनाथ यांचा दुसरा पुत्र होता. गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने इ.स. ९७८ ते इ.स. ९९३ या कालखंडात ही मूर्ती घडवून घेतली. ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेल्या मूर्तींपैकी जगातील सर्वात उंच मूर्ती आहे असे मानले जाते [ संदर्भ हवा ]. हे स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या मूर्तीचे अंदाजे वजन ४०० ते ६०० टन आहे. +बाहुबली गोम्मटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठी, कन्नड भाषांतील शिलालेख आहेत. ज्ञात पुराव्यांनुसार येथील मराठी शिलालेख लिखित मराठीच्या इतिहासातील सर्वांत जुना मजकूर आहे[ संदर्भ हवा ]. मूर्तीच्या चोहो बाजूंनी २४ जैन तीर्थंकरांची छोटी मंदिरे आहेत. मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विंध्यगिरी पर्वतावर ६५० पायऱ्या खोदल्या आहेत [२]. +दर १२ वर्षांनी मूर्तीची महामस्तकाभिषेक पूजा करण्यात येते. लाखो जैन भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. मूर्तीवर दूध, दही, तूप, हळद यांचा अभिषेक केला जातो. [३]. +चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्याची समाधी आहे. समाधीसोबत अनेक मंडप व जैन बसदी आहेत. पर्वतावर कन्नड भाषेतील बरेच शिलालेख आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8125.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee9cac97c264f7dca57a115969cae9237ea982b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8125.txt @@ -0,0 +1 @@ +श्रवणबेळगोळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8152.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8324abbf8830b7ea50e69b30d57dc49b3c5e944e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8152.txt @@ -0,0 +1,30 @@ +श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[१] +भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो आणि सौर वर्षाचा पाचवा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो. श्राबोन (बंगाली: শ্রাবণ; श्रवण देखील म्हणतात) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे. तसेच नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतुचा(पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो. +साधारणतः ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी अधिक श्रावण य[२]ेतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत. +अधिक श्रावण असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१...वगैरे. +श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.[३] श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. +या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.[३] +संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. +मुख्य पान : नागपंचमी +या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.[४] +नारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.[६] +या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.[७] पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात. +याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.[८] ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात. +याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.[९]श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात. +श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. +राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते. दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. २०१९ साली १२० लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली. +या निमित्ताने गावातले स्त्री-पुरुष टिमकी, ढोलक, झांजा, यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर, जलाशयांवर जाऊन भुजारियांचे विसर्जन करतात. +श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला.[११] या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.[१२] +श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात.[१३] याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात.[१४]हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[१५] +व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे.[१६] +सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.[१७] +मंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.[१८] पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात. +बुधवार- बुधाची पूजा +गुरुवार- बृहस्पती पूजा +शुक्रवार - जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.[१९] +शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन[२०] +रविवार- आदित्य राणूबाई पूजन[२१] +सत्यनारायण पूजा - श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.[२२] +दान - श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.[२३] +उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.[२५] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8160.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..108cd205f07f7df370a832155a303a1abf0e0842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8160.txt @@ -0,0 +1,3 @@ +श्रावण शुद्ध त्रयोदशी ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8165.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d49dc5fb1a95fe93ebae5e3043f34bf493b807e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8165.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रावण शुद्ध पंचमी ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8169.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d953f38535647f6dc0fd0b4b367ac773f898a6b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8169.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लग्नानंतर पहिल्या श्रावण मासात नवरा मुला कडून नवरीस दिलेले खेळण्याची करंडी. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8179.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55504a93aa4edab9cb3048bf2242c6b60c8ced06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8179.txt @@ -0,0 +1 @@ +श्रावणी रविवार हा श्रावण महिन्यातील रविवारचा दिवस आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8184.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41fa1bc7620d0579d247f24d8b5540fcd39fb2c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8184.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रावस्ती (पाली:सावत्थी) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर श्रावस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +श्रावस्ती पश्चिम राप्ती नदीवर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8189.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15dcaf11509c121bb4819d1993b3284eba80377a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8189.txt @@ -0,0 +1,2 @@ +ह्यांचे ३ प्रकारात वर्गीकरण होते. +ह्यात डाटा/डेटाला कोणतीही हानी न पोहोचवता तो तसाच साठवून ठेवला जाऊ शकतो,मूळ प्रती नुसार: वाव्ह्(डब्ल्यूएव्ही),ऐफ(एआयएफएफ),औ(एयू),रॉ(आरएडब्ल्यू),पीसीएम,सीडा(सीडीए) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8199.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a06543f8f0464cab0375d74ae8b334bf8f7714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8199.txt @@ -0,0 +1,7 @@ + प्रतापसिंह हायस्कूल (जुने नाव: गव्हर्नमेंट हायस्कूल) हे साताऱ्यातील जुन्या राजवाड्यात भरणारे विद्यालय आहे. सातारा जिल्ह्यातील ही पहिली शाळा इ.स. १८७४मध्ये गव्हर्नमेंट हायस्कूल या नावाने सुरू झाली. त्यावेळी ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती, आता मराठी माध्यमाची आहे. २०१७ मध्ये, येथे ५वी ते १०वीपर्यंतचे वर्ग भरतात. आणि शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या १२० इतकी होती.[१] +बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोलकर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गजेंद्र गडकर इत्यादी मोठ्या व्यक्तींनी या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.[२] +या शाळेचा वाडा इ.स. १८२४ साली शिवाजी महाराज यांचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १८५१ साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला.[३] या जुन्या राजवाड्याची ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद झाली आहे. +पूर्वी ही शाळा चौथ्या इयत्तेपर्यंत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला, व ते चौथी पास झाले. शाळेच्या रजिस्टर क्रमांक १९१४ मध्ये 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. +शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नाव प्रतापसिंह हायस्कूल असे झाले. +इ.स. २००३ सालापासून साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला ७ नोव्हेंबरचा दिवस 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकाने या दिनाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन' म्हणून घोषित करावे, ही मागणी सुद्धा अनेक वर्षांपासून होत होती. नंतर इ.स. २०१७ मध्ये हा दिवस महाराष्ट्र शासनाने २०१७ या वर्षापासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून राज्यातील सर्व शाळांत व कनिष्ठ महाविद्यालयांत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.[४][५][६][७]  +जुन्या राजवाड्यात भरणारे या हायस्कूलची इमारत सध्या (२०१८ साली) जीर्ण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी ही शाळा धोकादायक असल्याचे म्हणत तिला इतर ठिकाणी हलवण्यासाठीचे पत्र दिले आहे. तरीसुद्धा हा विभाग व जिल्हा परिषद या वास्तूची देखभाल व दुरुस्ती करीत आहे.[८] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_820.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a2776ba05edbe3b5f9005f6bdf2e85686374de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_820.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम मॉरिस बिली ह्यूस (२५ सप्टेंबर, १८६२:पिम्लिको, लंडन, इंग्लंड - २८ ऑक्टोबर, १८५२:सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान होता. हा २७ ऑक्टोबर, १९१५ ते ९ फेब्रुवारी, १९२३पर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8204.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c846b7453a8c490980d7fe114e55ab0eae97e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8204.txt @@ -0,0 +1 @@ +शेजारी शेजारी पक्के शेजारी ही २०१३-२०१४ मध्ये झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक विनोदी मालिका होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8221.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c925cf6c557778858a3ba23175b967fe421f7a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8221.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्री.पु.भागवत ( २७ डिसेंबर १९२३ - मृत्यू: २१ ऑगष्ट २००७) +महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष +शिक्षण- एम.ए. मुंबई विद्यापीठ +संपादक आणि प्रकाशक - मौज प्रकाशन गृह 1950-2007. +मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन. +लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्यःअध्यापन आणि प्रकार. +श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री. पु. भागवत स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रु. असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या प्रकाशनसंस्था--- diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8283.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1475a569c7db71394176a85e672fdeb3e768da4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8283.txt @@ -0,0 +1,6 @@ +चौंडेश्वरी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गायमुख नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिरात एक मोठी देवीची मूर्ती आहे, ज्याचे डोळे, कान, नाक आणि मुख स्पष्ट दिसते. बाकीचे पूर्ण शरीर जमिनीच्या आत आहे. चौंडेश्वरी माता मोहाडी गावातील तसेच पूर्व विदर्भातील भाविकांचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला विधीवत घटस्थापना करून धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ होतो. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र व जवळच्या मध्य प्रदेश राज्यातील भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्याच्या हेतूने या मंदिरात मोठ्या श्रद्धेने घट (ज्योती कलश) स्थापन करतात.[१] +मंदिराची स्थापना कशी झाली याबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. एक दंतकथा अशी आहे की, संत नारायणस्वामी यांनी १७ व्या शतकात या ठिकाणी महायज्ञ केला होता. यज्ञाच्या वेळी, देवीने हवनकुंडातून प्रकट होऊन त्यांना सांगितले की तिचे नाव चौंडेश्वरी आहे आणि ती येथे राहील. त्यानंतर मंदिरात एकदा एक भक्त आला होता जो देवीचा भक्त होता. भक्ताने देवीला सांगितले की तो तिला भेटण्यासाठी दूरून आला आहे. देवीने भक्ताच्या मनातील विचार समजून घेतले आणि तिने त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली. भक्ताला देवीची मूर्ती दिसली आणि त्याने तिची पूजा केली. चौंडेश्वरी देवी मंदिराला विदर्भातील एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी नवरात्रीच्या सणात येथे मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान, भाविक मंदिरात देवीची पूजा करतात आणि तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात.[२] +चौंडेश्वरी देवी मंदिर हे एकल गाभाऱ्याचे आहे. गाभाऱ्यात चौंडेश्वरी देवीची मूर्ती आहे. मूर्तीची उंची सुमारे १० फूट आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे आणि तिने कमळाचे फूल धारण केले आहे. मंदिर परिसरात एक भव्य सभामंडप आहे. सभामंडपात देवीची इतर मूर्ती आहेत, ज्यात साईबाबा, गजानन महाराज, शिव आणि नंदीबैल यांचा समावेश आहे. मंदिर परिसरात एक वडाचे झाड आहे. वडाच्या झाडाखाली भाविक राहण्यासाठी एक मोठा तंबू उभारला जातो. +मंदिर कमेटीने मंदिर परिसराची कायापालट केली आहे. मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे आणि एक बगीचा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कूपनलिका बांधण्यात आली आहे आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. +चौंडेश्वरी देवी मंदिर हे विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणाला एक शक्तिपीठ मानले जाते. चौंडेश्वरी देवीच्या आशीर्वादाने अनेक भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. +दरवर्षी चौंडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात नऊ दिवसांची यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. नवरात्री उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व्यवस्था करण्यात येते.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8284.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c06e4536e746d2091a421b294550d15556fbad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8284.txt @@ -0,0 +1,7 @@ + +कोल्हापूरची श्री महालक्ष्मी व तुळजापूरची भवानी माता आणि पुण्याची चतुःशृंगीदेवी या प्रमाणेच कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र बदामी येथील प्रसिद्ध श्री बनशंकरी (शांकभरी) देवी तीन अद्यापीठांपैकी एक मानली जाते. हे मंदिर सुमारे २५० वर्षापूर्वीचे आहे ,या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आटल जगद्गुरू श्री शंकराचार्य यांनी केले आहे. +चौडेश्वरी देवी ने दुष्काळात आपल्या शरीरात शांकभाजी निर्माण करून भक्तांना तारले म्हणून तिला शंकभरी असेही म्हणतात. तसेच तीर्थक्षेत्र बदामी येथे बनाच्या रम्य परिसरात स्थायिक झाल्यामुळे बनशंकरी असेही संबोधतात. या देवीचे अखिल भारतातील देवांग हटवार कोष्टी समाजाची श्री बनशंकरी देवी ही कुदैवत मनाली जाते. देवीचे प्रारूप सोलापूर येथील साखरपेठ येथे आहे. +सदर मंदिर हेमाडपंथी असून या देवाचे सभामंडप प्राचीन असून अत्यंत आकर्षक आहे. सभा मंडपात डाव्या बाजूस दुर्गा मातेचे चित्र रेखाटले आहे. तर उजव्या बाजूस श्री पार्वती माता आणि शंकराचे चित्र रेखाटले आहे. +मूर्ती: या देवीची मूर्ती काळ्या पाषाण दगडाची आहे. मूर्ती रेखीव आणि तेजस्वी आहे. मूर्ती चतर्भुज असून सिंहावर आरूढ झालेली आहे. बनशंकरी देवीने आपल्या हातात त्रिशूल ,डमरू ,तलवार , अमृतकलश इ. आयुधे धारण केली असून एका हातामध्ये ग्रंथ/पुस्तक आहे. हे देवीचे स्वरूप उग्र आहे .या देवीस कुंकूमार्चंन केले असता अखंड सौभाग्यवती प्राप्त होते. या देवीच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेच्या कृपाभिलाषी गणपतीची मूर्ती असून उजव्या बाजूस श्री शंभु महादेवाचे लिंग आहे. +उत्सव: सोलापुरातील भक्तगण बदामी येथे जात असल्यामुळे माघ पौर्णिमेला सोलापूर येथे बनशंकरी देवीची यात्रा भरते या यात्रेला रथाची व नंदिध्वजासह मिरवणूक निघते.यावेळी सर्व समाजातील समाज असंख्य भक्तगण मिरवणुकीला हजर राहतात. नवरात्रीमध्ये अश्विनशुक्ल प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत दररोज रुद्राभिषेक तसेच  महापूजा कुंकूमर्चंन करून सामुदायिक आरती केली जाते.  +विशेष : विलंबाने लग्न होत असलेल्या मुलींना दार शुक्रवारी देवीस गजरा अर्पण केलेस ,त्यांचे विवाह जमतात असा बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे. त्याप्रमाणे संकट निवारणासाठी राहू काळामध्ये दर शुक्रवारी लिंबाची आरती केल्यास संकट निवारण होते ,याची प्रचिती ही बऱ्याच लोकांना आली आहे .[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8313.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2822c4e51255fa4d4f668d330664a83a5236e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8313.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय हे शिरूर तालुक्यातील पाबळ या गावात असलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य असे दोन विभाग आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय तसेच संगणक कक्ष आहेत. महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आहे. महाविद्यालयाच्या समोर खेळाची मैदाने आहेत. तसेच महाविद्यालयात जिमखानाही उपलब्ध आहे. +महाविद्यालयात दरवर्षी वार्षिक पारितोषक वितरण व स्नेहसंमेलन तसेच इतर अनेक प्रकारच्या स्पर्धा भारवल्या जातात. त्यात क्रीडा स्पर्धा, आंतरराष्टीय वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ.चा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8323.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c707b3317b6c6ee4cef18317792baf436c47905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8323.txt @@ -0,0 +1,18 @@ +श्री सद्गुरू दरबार व आश्रमांची स्थापना जवळजवळ 75 वर्षांपूर्वी आपल्या श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांनी मुंबई येथे केली. मूळ कोकणातील कुडाळ तालुक्यातील वालावल क्षेत्री श्री सद्गुरू माऊली भगवान महाराज यांचा जन्म झाला.  श्री सद्गुरू माऊलींचे पूर्ण नाव श्री भगवान नारायण (चौधरी) पोखरे होते. +प्रारंभीचा त्यांचा काळ हा गावीच व्यतीत झाला. ब्रिटिश साम्राज्याचा तो काळ होता. सुरुवातीची अशीच काही वर्षे गावी गेल्यानंतर, माऊलींनी मुंबईस प्रयाण केले. श्रीसद्गुरू माऊलीना कोणीही सख्खी भावंडे नव्हती. शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाल्यानंतर माऊलीने समाजसेवा करण्याचं व्रत अंगिकारले आणि त्याचबरोबर नोकरीही पत्करली. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाहही झाला. +मालाड येथील मिलिटरी ऑर्डनन्स डेपो येथे त्यांनी काही काळ नोकरीच्या निमित्ताने घालविला. नोकरी करता करता समाज सेवाही चालूच होती. माऊलींचा आध्यात्मिकतेकडे ओढा होता. अडलेल्या नडलेल्या गरजवंतांना माऊली नेहमीच आपला मदतीचा हात पुढे करीत असत व त्यांना तेथून बाहेर पडण्यास मदतही करीत होत्या. मग ती मदत आर्थिक असो, मानसिक असो वा शारीरिक असो. +हे जरी खरे असले, तरी माऊलींचे मन काही नोकरीत रमेना. सदानकदा समाज सेवेचा ध्यास घेतलेला ! सोबतच आध्यात्मिकतेचा प्रचार आणि प्रसार आपल्या कर्तुत्वाने करून माऊलीने हे आध्यात्मिकतेचे धडे समाजात, विशेषतः तळागाळांतील समाजात सर्वदूर पोहोचतील याची नेहमीच काळजी घेतली. +अशीच काही वर्षे नोकरीत घालविल्यानंतर, खऱ्या अर्थाने माऊलीने आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रबोधन आणि प्रसारण  सुरू केले तेच मुळी आपल्या कामावरील एका कामगार बंधूंच्या घरचे कर्तव्य करून. साधारण हा काल 1945 ते 1950 दरम्यानचा होता. +पुढे माऊलीना अनुग्रहही झाला. त्याची कथा ही वेगळीच आहे. +अशीच माऊली काही घरकुल स्थितीतील कर्तव्यासाठी घराबाहेर पडली असताना, त्यांना रस्त्यात एक कमंडलु धारी गृहस्थ भेटले. बोलणे झाले. कुठून आले म्हणून माऊलींनी विचारणा केली असता, त्यांनी जे उत्तर दिले ते मार्मिक होते. ते म्हणाले, "नागपूर से आया हु, कानपूर जाना है !" आणि त्यांनी आपल्या माऊलींच्या गालाला स्पर्श केला. हाच तो माऊलींचा रस्त्यातच झालेला अनुग्रह. +असेच कार्य पुढे पुढे जात होते. काही नवीन नवीन मंडळी माऊलींच्या सानिध्यात येत होती. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य माऊली करीत होती. त्याचबरोबर आध्यात्मिकतेचे धडेही संपर्कात येणा-या सर्वस्व भाविकांना माऊली देत होती. अशाप्रकारे काही कालावधी गेल्यानंतर साधारण सन 1950च्या दरम्यान त्यांचा संबंध श्री पांडुरंग वाघ यांच्याशी आला. +हे श्री पांडुरंग वाघ चिंचपोकळी येथील बावलावाडी मधील एका चाळीत राहत होते. मिल मध्ये कामाला होते. त्यांच्या येथे त्यांच्या घरकुल स्थितीत काहीवेळा कर्तव्यामुळे माऊलींचे जाणे येणे होत होते. ते एकटेच घरी असायचे, त्यामुळे त्यांनी माऊलीना येथे बसण्याची व आध्यात्मिक प्रबोधन करण्याची विनंती केली होती व माऊलींनी ती मान्य देखील केली होती. त्याप्रमाणे माऊलींचे समाजसेवा व आध्यात्मिक प्रबोधनाचे हे कर्तव्य हळूहळू पुढे पुढे जात होते. +असाच काही काळ गेल्यानंतर, श्री पांडुरंग वाघाना एके दिवशी, त्यांच्या घरकुल स्थितीत झोपलेले असताना प्रणव ऐकावयास मिळाले, "नीचे की संपत्ती क्या देख रहे हो, उपर की संपत्ती देख !" त्या शब्दांनी प्रेरित होऊन, श्रीयुत वाघानी आपली घरकुल स्थिती, आपल्या माऊलीना आध्यात्मिक कार्यासाठी अर्पित केली आणि आपल्या श्री सद्गुरू दरबारचा रितसर प्रारंभ झाला व येथूनच पुढे दरबारची व आपल्या माऊलींची सर्वस्व कर्तव्यें होऊ लागली. येथेच मग कायमस्वरूपी दरबार भरू लागला व आपल्या माऊलींची इथे तिथे फिरण्याची दग दग संपली. येथेच दरबार स्थिर झाला. हा काळ साधारण 1950 ते 1955च्या आसपासचा होता. +या स्थानाला नंतर मुख्य दरबार म्हणून नाव मिळाले. येथूनच बरीचशी कर्तव्ये पार पडली व आज देखील पडत आहेत. प्रथमत: या दरबारात सर्व कर्तव्यें होत होती. त्यामध्ये आध्यात्मिक प्रवचने तसेच मायावी मानवी व सूक्ष्म तऱ्हेच्या कर्तव्यांचा सुद्धा सहभाग होता. +नंतर काही कालावधी गेल्यानंतर मायावी कर्तव्ये ही फेरबंदरच्या मायावी दरबारात होऊ लागली व चिंचपोकळी येथील मुख्य दरबारात फक्त वेगवेगळ्या तत्त्वांची एकचित्तता, तसेच बाबांची ज्ञानयुक्त प्रवचने व वार्षिक धार्मिक कार्यक्रम होऊ लागलेत. +ख-या अर्थाने लालबागचा मुख्य दरबार हा माऊलींच्या ज्ञानदानाचा दरबार झाला. हा ज्ञानदान यज्ञ जो 1945/50च्या दरम्यान आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी प्रज्वलित केला तो आजतागायत सातत्याने अखंडीतपणे तेवत आहे आणि त्यांच्या या सव्विसाव्या अवतारकार्यानंतर देखील तो ज्ञानदान यज्ञ अखंडीत व अविरतपणे चालू आहे. +(या सगळ्या सव्वीस अवतार कार्यात त्यांच्या सोबत असणारे  पितामह गुरुदेव वशिष्ठ आपल्या मार्गदर्शनाने, माऊलींच्याच आदेशानुसार आपल्या संदेशांद्वारे, आपल्या प्रवचनांद्वारे अजूनही तेवत ठेवीत आहेत.) +दरम्यानच्या काळात माऊलींनी सातारा येथील मुक्काम क्षेत्र इंगळेवाडी येथेही आपल्या श्री सद्गुरू आश्रमाची स्थापना तर केलीच, शिवाय आपल्या जन्मगांवी मुक्काम: वालावल, ता.: कुडाळ, जिल्हा: सिंधुदुर्ग येथील वडीलोपार्जित घराचे त्यांनी आपल्या हयातीत रूपांतर श्री सद्गुरू दरबारात केले होते. +इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या महानिर्वाणानंतर आपली ही गृहस्थितीची वास्तू जन्मगांव : वालावल व कर्तव्य स्थान : मालाड, लालबाग, काॅटनग्रीन तसेच इंगळेवाडी, सातारा येथील स्थावर मिळकत सद्याच्या त्यांच्याच नावांच्या विश्वस्त संस्थेला दान करून समाजामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले. +अशाप्रकारे मानवी स्थितीत खऱ्या अर्थाने माऊलींच्या कार्याचा शुभारंभ झाला आणि त्यांचे हे आध्यात्मिक कार्य मानवी स्थितीत, त्यांचेच सेवेकरी, सेवेकरीणी, योगी-योगीनी अव्याहतपणे त्यांच्या आणि पितामह गुरुदेव वशिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार पुढे पुढे नेत आहेत. +! ॐ तत् सत् ! diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8330.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1abcaab762670a53f1f568847282a7132e89ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8330.txt @@ -0,0 +1,8 @@ +श्रीमन्मध्वाचार्य हे थोर्भ हिंदू भक्तिसंप्रदाय उद्धारक होते. ते पूर्णप्रज्ञ होते असे मानले जाते. त्यांचा जन्म उडुपीपासून जवळ असलेल्या पाजक नावाच्या गावी विजयादशमीच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मध्यगेह व आईचे नाव वेदवती असे होते. त्यांनी अनेक वेळा भारताचा दौरा केला, बंगाल, वाराणसी, द्वारका, गोवा आणि कन्याकुमारी या ठिकाणांना भेटी दिल्या. मुक्ती, भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते, असे मध्वाचार्य यांनी प्रतिपादन केले. माधवाने उपनिषदांचा आणि अद्वैत साहित्याचा अभ्यास केला, परंतु मानवी आत्मा आणि देव यांच्या एकत्वाच्या अद्वैतवादाच्या तत्त्वज्ञानावर ते सहमत नव्हते, त्याचे त्याच्या गुरूशी वारंवार मतभेद होत असत. +इ.स. १२८५ मध्ये द्वारका गुजरात मधून मिळवलेल्या मुर्तीसह उडुपी येथे कृष्ण मठाची स्थापना केली. मन्मध्वाचार्ययांनी द्वैतमताच्या प्रचारासाठी आठ मठांची स्थापना केली. यात उत्तरादी मठ हा मुख्य असून तो स्वतंत्र मठ आहे. हिंदू धर्मप्रसारासाठी व मतप्रचाराठी हा मठ कार्यरत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या द्वैत विद्यालयाचा वैष्णव धर्मावर प्रभाव पडला, मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळ , आणि अद्वैत वेदांत आणि विशिष्टाद्वैत वेदांतासह तीन प्रभावशाली वेदांत तत्त्वज्ञानांपैकी एक आहे. द्वैतवादाच्या आवारावर आधारित स्वतःची द्वैत चळवळ सुरू केली - मानवी आत्मा आणि देव (विष्णू म्हणून) या दोन भिन्न गोष्टी आहेत असे प्रतिपादन केले. +त्यांनी ३७ प्रमुख ग्रंथ लिहिले. ब्रह्मसूत्रभाष्य, अनुव्याख्यान, गीताभाष्य, गीतातात्पर्यनिर्णयं, भागवततात्पर्यनिणर्यं, ऋग्वेदभाष्य, महाभारततात्पर्य निर्णयं, तत्त्वविवेक, उपाधिखंडनं हे त्यापैकी काही आहेत. +निर्दोष भक्ती हाच मोक्षप्राप्तीचा उपाय असून तिच्यामुळे जिवांचा उद्धार होतो. स्वतःच्या वास्तव स्वरूपाची अनुभूती म्हणजे मोक्ष ही त्यांची प्रमुख शिकवण होय. मध्वाचार्य हे आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांत आणि रामानुजांच्या विशेषाद्वैत वेदांत शिकवणीचे समीक्षक होते . +मध्वाचार्यांचे प्रमुख चार शिष्य पुढील प्रमाणे पद्मनाभतीर्थ, नरहरीतीर्थ, अक्ष्योभ्यतीर्थ व माधवतीर्थ. +माधवाने त्याच्या हयातीत अनेक चमत्कार केले, ज्यात चिंचेचे दाणे नाण्यांमध्ये रूपांतरित करणे, दरोडेखोर आणि जंगली प्राण्यांविरुद्ध लढणे आणि जिंकणे, ओले कपडे न घालता गंगा पार करणे , आणि त्याच्या मोठ्या बोटांच्या नखांमधून आपल्या विद्यार्थ्यांना प्रकाश देणे यासह अनेक चमत्कार केले. +इस. १९८६ मध्ये जीव्ही अय्यर दिग्दर्शित मध्वाचार्य नावाच्या चित्रपट तयार झाला, तो पूर्णपणे कन्नड भाषेत बनलेल्या चित्रपटांपैकी एक होता . + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_835.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f317e73f98aaed251aac121668a504a8bd97fe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_835.txt @@ -0,0 +1 @@ +सर विल्यम रोवन हॅमिल्टन (ऑगस्ट ४, १८०५:डब्लिन, आयर्लंड - सप्टेंबर २, १८६५:डब्लिन, आयर्लंड) आयरिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होता. ऑप्टिक्स, गतिकी, बीजगणित या विषयांमध्ये त्याने मोलाची कामगिरी केली. क्वाटर्नियनवरील संशोधनाबद्दल त्याला प्रामुख्याने ओळखले जाते. त्याखेरीज त्याचे हॅमिल्टोनियनवरील संशोधन पुंज यामिकाच्या विकासास चालना देणारे ठरले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8384.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c8f25391ae6ee5cfd7d46bd5ac4fa654eaa7ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8384.txt @@ -0,0 +1 @@ +श्री श्रीनिवासन (जन्म फेब्रुवारी २३, १९६७) हे अमेरिकेचे मुख्य उप-न्यायअभिकर्ता आहेत. सध्या ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाशी संलग्न असणाऱ्या कोलंबिया सर्किट न्यायालयाच्या कायदा सुधारणा आणि अंमलबजावणी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूल मधून कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी हारवर्ड लॉ स्कूल मध्ये प्राध्यापकी केली. हे अमेरिकेच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारे पहिलेच भारतीय तसेच दक्षिण आशियायी नागरिक आहेत. सर्वोच्च न्यायालयापुढे सामाजिक स्वास्थ्य आणि समलिंगी व्यक्तींच्या विवाहासारख्या २० महत्त्वाच्या कायदेबदलांमध्ये त्यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8399.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ca38cb52359a505cb5e215ba673ac8ba623cea --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8399.txt @@ -0,0 +1,16 @@ +ज्ञान, बुद्धीचातुर्य, स्मृति, संगीत, कला, भाषण, ज्ञान आणि शिक्षणाची देवी - इत्यादींची अधिपती देवता +सरस्वती (संस्कृत: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, बुद्धी, वाचा, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे.[१] ही आदिशक्तीकचे सत्वगुणप्रधान रूप आहे. सरस्वती मातेला संखीयरूपिणी असेही म्हटले जाते. गणित, कालमापन व ती ब्रह्मांडा मधील सर्व वाहकतत्वांची देवता आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे.[२] सरस्वती देवी ही हिंदू, बौद्ध व जैन ह्या तीनही धर्मांमध्ये ज्ञानदेवता म्हणून उपासली जाते. बौद्ध धर्मग्रंथांमध्ये देवीचे कित्येक उल्लेख आढळून येतात.[ संदर्भ हवा ] +ऋग्वेदात सरस्वती देवीस सर्वोत्तम मातृशक्ति, सर्वोत्तम देवी व सर्वोत्तम नदी म्हणून म्हटले गेले आहे. वैदिक काळात सरस्वती ही एक प्राचीन नदी होती. सरस्वती देवीला बुद्धी व ज्ञानासोबतच सर्व नद्या, झरे, वायु, ध्वनी व प्रवाहित जलांची अधिष्ठात्री देवी मानतात.[३] ऋग्वेदात सरस्वती मातेस अनेक स्तोत्रे समर्पित केली गेली आहेत. विशेषतः ऋग्वेदाच्या प्रथम, द्वितीय, सहाव्या व दहाव्या मंडलात तिचे वर्णनात्मक श्लोक आढळून येतात. तिला धी, बुद्धी व वैश्विक ज्ञानस्वरूपिणी म्हटले जाते. ती बुद्धी, जी ऋषि, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार ह्यांना उपजत असते, तीच सरस्वती स्वतः आहे. यजुर्वेदामध्ये तिचा वाक्, वाचा ह्याच्याशी थेट संबंध प्रस्थापित केला गेला आहे. वाचेची, भाषेची व भाष्याची देवी म्हणून तिचे वाग्देवी असे संबोधन पडले. +चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर अथवा हंस तिच्या बाजूला असतो. हातात वीणा असते. सरस्वतीचे वाहन हंस आहे; जैन पुराणांमधून आणि लोककथांमधून सरस्वती वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात सरस्वती ही विद्येची व ज्ञानाची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.[४] गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, केरळ व तामिळनाडू मध्ये अश्विन नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सरस्वती देवीच्या पूजन अर्चनेला समर्पित असतात. संपूर्ण दक्षिण भारत व महाराष्ट्रात विजयादशमीला सरस्वती पूजन करून विद्या आरंभ करण्यात येते. विशेषतः तमिळनाडू व कर्नाटकात हा समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. +या कुन्देन्दुतुषारहारधवला +या शुभ्रवस्त्रावृता +या वीणावरदण्डमण्डितकरा +या श्वेतपद्मासना। +या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता +सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याऽपहा ॥[५][६] +शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, +वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌। +हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌, +वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥[७] + +सरस्वती माता की आरती इन हिंदी - Saraswati Mata Ki Aarti in Hindi Archived 2020-07-22 at the Wayback Machine.. BhaktiSansar.in. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8440.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2ebda06793077f722c235a34006f0b90876ca09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8440.txt @@ -0,0 +1,3 @@ +श्रीकांत त्यागी (जन्म १९ जानेवारी १९८० - सिहानी कला, उत्तर प्रदेश) हा भारतीय जनता पक्ष (भाजप) मधील एक भारतीय राजकारणी आणि कार्यकर्ता आहे.[१] तो भाजप किसान मोर्चा अभियानाचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि युवा किसान समिती कार्यक्रमाचा राष्ट्रीय सह-संयोजक आहे.[२][३] +त्यागी यानी २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने युवा ब्रिगेड आणि भृगुवंशी सेना या संघटना स्थापन केल्या ज्यात ३० हजारांहून अधिक लोक काम करतात. २०१७ मधील ५७ मोदीनगर विधानसभेत तो माजी संभाव्य उमेदवार म्हणून निवडून आला. त्याने भाजप किसान मोर्चामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, युवा किसान समितीमध्ये राष्ट्रीय सहसंयोजक, पदवीचे माजी असोसिएशन अध्यक्ष अशा विविध संघटनांमध्ये जबाबदार पदे भूषवली आहेत.  २०१९ च्या निवडणुकीत, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा वाराणसी मतदारसंघात विस्तारक म्हणून अभूतपूर्व कार्य केले आणि सेवापुरी आणि रोहनिया येथे सेवा प्रभारी म्हणून जवळून काम केले.[४] +श्रीकांत त्यागी बॅलेटबॉक्स प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_846.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc1b66d8ce24f42ac326c8f29339efbac7b2e807 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_846.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनडाचा दहावा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8463.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e53b1bb017d114063fe457bd412020a831d6c0f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8463.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख श्रीकाकुलम जिल्ह्याविषयी आहे. श्रीकाकुलम शहराविषयीचा लेख येथे आहे. +श्रीकाकुलम भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र श्रीकाकुलम येथे आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8474.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aefd11e2af88769007b97cfb96b39b7bab1a4e9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8474.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीकृष्ण अग्रवाल ( डिसेंबर ९, इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील (सद्यकालीन छत्तिसगड राज्यात) महासमंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8507.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231be70ee0085d866a249bd36a26ae068f8da12c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8507.txt @@ -0,0 +1,3 @@ + +श्रीगोंदा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. +श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी व पेडगावचा बहा्दुरगड आहेत. श्रीगोंदा शहराचे आधीचे नाव चांभारगोंदे होते. विशेष ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले शहर असूनही याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही असे म्हणावे लागेल. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8508.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a4c05594d9f8ce7607b13ccbc31b146880383b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8508.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावापासून जवळ असलेल्या या स्थानकावर दौंड कडून मनमाडकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8510.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9ccb2bfb1e9ee053503d981653dc23f4dc641c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8510.txt @@ -0,0 +1,13 @@ +ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. रचना इ.स. १२८८. एकूण ३२५ लीळा. +अर्थात हे समग्र चरित्र नव्हे कारण गोविंदप्रभूंसंबंधीच्या सर्वच आठवणींचा यात समावेश नाही. गोविंदप्रभू - हरपाळदेव भेटीचा प्रसंग यात नाही. +एका बाजूने ईश्वरावतारास शोभून दिसणारे सर्वज्ञत्वादी गुण तर दुसऱ्या बाजूने अवलियाची लक्षणे अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या चरित्रात घडते. +अमरावती हीच श्रीप्रभूंची कार्यभूमी असल्यामुळे त्यांच्या वऱ्हाडी भक्तजनांच्या तोंडी खास वऱ्हाडी बोली ऐकायला मिळते. प्राचीन वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासाचे हा ग्रंथ हे एक उपयुक्त साधन ठरते. उदा. गडू = तांब्या, हारा = टोपली, हेल = पाणी भरण्याचे मडके. पोपट / पावटे = उकडलेल्या तुरीच्या शेंगा, गीदरी, उकड = नीट न बसलेला, कोनटा = कोपरा. +लीळाचरित्राच्या तुलनेत हे मर्यादित स्वरूपाचे चरित्र आहे. +लीळांचे साधेपण मोहक आहे. यातून उभी राहणारी गुंडम राउळांची ‘नाभिचुंबित खाड’ (दाढी) व ‘गगनाची वास’ पाहणारी मूर्ती लक्ष वेधून घेते. +कथनशैली +तंव ते आली : घागरी ठेवीली : घराआंतु गेली : +पाळणा पाहिला : तव न देखचि ।। +(प्रत्येक ओळीत सहा अक्षरे आणि अनुप्रासात्मकता) +“एजमान ! देऊळवाडेयासि वाट कोण जाईल?” +गोसावी म्हणितले, “मेला जाए! वाटा वाटा जाएना म्हणे” +“नीघरा जाले गर : घरीचीया गोसावीया जाली वोसरी” diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8533.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fae8075d8260ed4d4708f49fcf311520b0519a4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8533.txt @@ -0,0 +1,12 @@ +श्रीधर पणिकर सोमनाथ (जन्म:जुलै १९६३) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष म्हणून काम करणारे भारतीय एरोस्पेस अभियंता आहेत. [१] त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने चांद्रयान-३ नावाची तिसरी भारतीय चंद्र शोध मोहीम पार पाडली. विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी IST १८:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरला, ज्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला.[२] [३] [४] [५] +सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक म्हणून काम केले आहे. [६] [७] विशेषतः लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्स या क्षेत्रांमध्ये वाहन डिझाइन लाँच करण्यासाठी सोमनाथ त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. [८] [९] +सोमनाथ यांचा जन्म आणि केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील थुरावूर येथे एका मल्याळी कुटुंबात झाला होता.[१०] त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधर पणिकर असुन ते हिंदी शिक्षक होते, तर त्यांच्या आई चे नाव थंकम्माअसे आहे.[११] +सोमनाथ यांचे शालेय शिक्षण सेंट ऑगस्टीन हायस्कूल, अरूर येथे झाले असुन त्यांनी महाराजा कॉलेज, एर्नाकुलम येथून पआपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी थंगल कुंजू मुसलियार अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्लम, केरळ विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि डायनॅमिक्स आणि नियंत्रण या विषयातील स्पेशलायझेशनसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी पीएच.डी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT मद्रास) येथे प्रबंध सादर केला. +सोमनाथचे वलसाला यांच्या सोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.[१२] +२ सप्टेंबर २०२३ रोजी जेव्हा आदित्य एल.१ चे यशस्वी प्रक्षेपण झाले, त्याच दिवशी सोमनाथ यांना पोटाच्या कर्करोगाचे निदान झाले. नंतर त्यांनी चेन्नई येथे जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली तसेच त्यांच्यावर केमोथेरपी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर तशाही परिस्थितीत लगेचच पाचव्या दिवशी सोमनाथ कामावर हजर देखील झाले.[१३] +पदवीनंतर, सोमनाथ १९८५ मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात रुजू झाले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात ते संबंधित होते. २०१० मध्ये ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सहयोगी संचालक आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ लाँच व्हेईकलचे प्रकल्प संचालक होते. नोव्हेंबर २०१४ पर्यंत ते प्रोपल्शन आणि स्पेस ऑर्डिनन्स एंटिटीचे उपसंचालक होते.[८] +जून २०१५ मध्ये, त्यांनी वलियामाला, तिरुवनंतपुरम येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि जानेवारी २०१८ पर्यंत काम केले. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून के. सिवन यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर के. सिवन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष झाले. जानेवारी २०२२ मध्ये, त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, पुन्हा के. सिवन यांच्याच जागेवर. +विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, १८ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने, तमिळनाडूच्या SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने २५ सप्टेंबर रोजी सोमनाथ यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स (ऑनॉरिस कॉसा) ही पदवी प्रदान केली.[१४][१५] २३ ऑगस्ट २०२३ रोजी, इसरो चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे नेतृत्व केले. +उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीने १० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या ७ व्या दीक्षांत समारंभात त्यांना साहित्याची मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान केली गेली.[१६] +२०१४ मध्ये, एस सोमनाथ यांना इसरो कडून GSLV Mk-III प्राप्तीसाठी कामगिरी उत्कृष्टता पुरस्कार दिल्या गेला.[१७] [१८] [१९] २०२३ मध्ये, कर्नाटक सरकारने त्यांना प्रतिष्ठित राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले. [२०] [२१] +नायर diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8544.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..116cfc70bb2b4b973b0a803d7f2e64bfb88270a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8544.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीधर वि. वर्तक (१८८५ (?) / १८९४ (?) - १९५०) हे मराठी नाटककार होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8548.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beb244d6770c84e8baabd4b81569ec29a5b56817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8548.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॅा श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात. +केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी, इ.स. १८८४ रोजी ब्रिटिश भारतात रायपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. +इ.स. १९२० साली त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरुणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर तिला शीलवती हे नाव मिळाले.[१] +इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतिशब्द बनवला [२]. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले [२]. +असे म्हणतात की कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय ठेवली होती. +स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले. +ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते. +ते इ.स. १९३१ सालातल्या हैदराबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. +‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले. +ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. त्यांनी कादंबरी लेखनाच्या माध्यमातून वेश्यासंतती, विवाहबाह्य संबंध, अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विचार मांडले होते. त्यांच्या काळात हे विचार फार बंडखोर समजले गेले. +श्री.व्यं. केतकरांची पत्नी जर्मन होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_856.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..062af5f66eb0a4e2963b886bb114f082eb4f53ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_856.txt @@ -0,0 +1,3 @@ +विल्यम विल्फ्रिड डॉजर व्हायसॉल (ऑक्टोबर ३१, इ.स. १८८७:वूड्सबोरो, नॉटिंगहॅमशायर - नोव्हेंबर ११, इ.स. १९३०:नॉटिंगहॅम) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +व्हायसॉल नॉटिंगहॅमकडून काउंटी क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_857.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a009ebd2bae957a3efa58ff09e9db139511d1da --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_857.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम व्हिक्टर रॉथ (२२ जुलै, १९२१ - १३ डिसेंबर, २००३) हे अमेरिकन राजकारणी होते. हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते आणि डेलावेर राज्यातून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून जाणारे शेवटचे रिपब्लिकन होते. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8604.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6f670369b1634f80558557ccd23a7fb1a3c05a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8604.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8609.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a2769a9b3aaca29af61ed395f1389f5b13b0d2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8609.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीनिवासपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार लोकसभा मतदारसंघात असून कोलार जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8626.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fead8f93f58d5f55f914c1488cee3c933c1c9030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8626.txt @@ -0,0 +1,3 @@ + +श्रीपाद गोविंद नेवरेकर (जुलै ३, १९१२ - जून १६, १९७७) हे मराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते होते. +[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8632.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ef602f07b174bace27e97929ce08cc8a8333dbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8632.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीपाद येस्सो नाईक (४ ऑक्टोबर, १९५२:अडपाई, उत्तर गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून १३व्या, १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेत निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8641.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4ed1c44a02afe882417885215d79f03acaabad0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8641.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीपाद रामकृष्ण काळे (? - जून १८, १९९९) हे मराठी साहित्यिक होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8643.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a094c7860ebeb88d41fb6e20f634adceb982521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8643.txt @@ -0,0 +1,2 @@ +कवी श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकात आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवी होते. त्‍यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह बरीच साहित्य निर्मिती केली. +मधुराष्टकम् ही कवी श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली ही एक सुंदर संस्कृत रचना आहे. मधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत कृष्णप्रेमात सगळेच कसे मधुर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. ही रचना जौनपुरी रागात गायली जाते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8647.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1d11f1ded8a20cb6b8d2b53739bae9fa2757d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8647.txt @@ -0,0 +1 @@ +मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर ( - २१ ऑक्टोबर १९७७) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांनी अनेकख संस्कृत ग्रंथावर भाष्ये लिहिली व त्यांची मराठीत रूपांतरे केली. ते हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी मुक्ताबाईच्या 'ताटीच्या अभंगां'चे संपादन केले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8670.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca3cfbcd3a696eac0bebd082c8b967362be2e763 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8670.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीप्रिया ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९७० च्या आणि १९८० च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटांतून भूमिका केल्या. यांत २०० तमिळ चित्रपट तसेच तेलुगू, कन्नड आणि मल्याळी भाषेतील ३००पेक्षा अधिक चित्रपटांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_868.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b512cdb2f651027356d0620cce865108172d162 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_868.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम आल्फ्रेड शेल्डर्स (फेब्रुवारी १२, इ.स. १८८०:किंबर्ली, नॉर्दर्न केप, दक्षिण आफ्रिका - मार्च १८, इ.स. १९१७:क्रॅडॉक, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९९ ते १९०७ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8697.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5bdda7a375eb05e8dff98f53f8463775530c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8697.txt @@ -0,0 +1 @@ +जयवंतीबेन मेहता (डिसेंबर २०, इ.स. १९३८ - हयात), ह्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8699.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a70d3c318e5de73d6229f04e7efa1effe4e57bca --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8699.txt @@ -0,0 +1,15 @@ +श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ) हे भारतातील एक महिला विद्यापीठ आहे. याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. एसएनडीटीची स्थापना पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये ‘एसएनडीटी कॉलेज’ म्हणून ओळखली जाऊ लागली. +डिसेंबर, इ.स. १९१५ साली धोंडो केशव कर्वे यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. ३ जून, इ.स. १९१६ रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै, इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना भारतवर्षीय महिला विद्यापीठ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले. +विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. इ.स. १९५१ साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली. इ.स. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात. +इ.स. १९५२ ते १९५७ या कालावधीत दिवाणबहाद्दुर झवेरी यांनी कुलगुरुपद सांभाळले व यानंतर मात्र एक तप (१९५७ ते १९६९) लेडी ठाकरसींनी. या शेवटच्या बारा वर्षांत १३ नवीन विभागांची/महाविद्यालयांची स्थापना झाली. यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नर्सिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्त्वाची महाविद्यालये होती. अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशास्त्र, फूड सायन्स अँड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही होता. १९७१ ते १९७५ या काळात आणखी ११ विभागांची भर पडली आणि शिवाय पुण्यात एक शिक्षणशास्त्र महाविद्यालय ही स्थापन झाले. +भारतातील विद्यापीठात अन्यत्र न दिसणारे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील अनेक विभाग आहेत. दोन शिक्षणशास्त्र विभाग, स्पेशल एज्युकेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक व्यवस्थापन, भाषा अध्यापन, तसेच विद्यापीठ संचालित दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुद्धा आहेत. +इ.स. १९७४ साली डॉ. नीराबेन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली Research Centre for Women's Studies स्थापन झाले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. +१९७५ ते १९८५ या दशकात विद्यापीठाने आणखी तेरा नवीन पदव्युत्तर विभाग (त्यामध्ये Communication Media for Children सारखे नावीन्यपूर्ण काम करणारे विभाग आहेत), पॉलिटेक्निक, फार्मसी महाविद्यालय आणि दूरस्थ शिक्षण केंद्र (१९७९) स्थापन झाले. +१९८५ नंतरच्या तीन दशकात बारा नावीन्यपूर्ण विभाग आणि संस्थांची स्थापना झाली. यात व्यवस्थापन संस्था, (मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), तंत्रशास्त्र संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र, समाजकार्य संगणकशास्त्र (कंप्युटर सायन्स) न्यायशास्त्र, ज्वेलरी डिझाइन अशा अनेक संस्था आहेत. त्यांपैकी महर्षि कर्वे मॉडेल कॉलेज फॉर विमेन हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे २०११ साली स्थापन केलेले महाविद्यालय आहे.. या महाविद्यालयात B.C.A. आणि B.Com हे अभ्यासक्रम चालतात. +२०१२-१३ या वर्षापासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (मास्टर्स डिग्री) इंटर्नशिप आणि संशोधन हे दोन प्रत्येकी आठ क्रेडिट कोर्सेस प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आवश्यक ठरवले गेले. Internshipमुळे विद्यापीठ ७५०-८०० संस्थांशी जोडले गेले, विद्यार्थिनींना placementच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. +महर्षी कर्वे यांनी दूरस्थ शिक्षणाचा हा विचार विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच केला होता. सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या मातोश्री दिवंगत कमलाताई काकोडकर आणि अशा अनेक स्त्रियांनी स्वतःचे घर, संसार, नोकरी, उद्योग सांभाळून दूरस्थ शिक्षण पद्धतीने उच्च शिक्षण घेतले. M.Com. हा ८० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन प्रणालीने शिकवला जातो. आता ऑगस्ट २०१५ पासून M.A. in Education हा अभ्यासक्रमही पूर्णतः ऑनलाइन केला जाणार आहे. +विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात कर्वे रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा विस्तार केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित नसून तो गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गोवा आणि आसाम या आणखी सहा राज्यांतही झाला आहे. +महर्षी कर्वे (पहिले प्राचार्य), डॉ. ना.मा. आठवले, प्रा. वामन मल्हार जोशी, डॉ. कमलाबाई देशपांडे, डॉ. गं.बा. सरदार, डॉ. शरयू बाळ, डॉ. का.शं. केळकर, डॉ. हे.वि. इनामदार, डॉ. क.वि. लोखंडे, डॉ. जी.वाय. शितोळे (इ.स. २०१६मधील प्राचार्य) +विद्यापीठाच्या मुंबईतील दोन आणि पुणे येथील एक अशा तीनही शाखा आता नेटवर्किंगद्वारे जोडल्या गेल्या आहेत. 'महर्षि' असे या व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्किंग (VPN) प्रणालीचे नाव आहे. या VPN वर 'सुसंवाद' हे Intranet Portal (इंट्रानेट पोर्टल) आहे. अजूनही अनेक ॲप्स विकसित करण्याचे काम चालू आहे. +२०१५ साली विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सुरू झाले. त्या शतक महोत्सवानिमित्त विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. एकविसाव्या शतकातील ग्रंथालय म्हणजे नॉलेज सेंटर, नवीन सहा भाषाध्यापन विभागांसह बारा भाषांसाठी भाषाभवन, विज्ञानसंस्था, डिझाइन संस्था, नॅनोटेक्नॉलॉजी संस्था, जनसंप्रेषण (Mass Communication) संस्था, सेंट्रल इक्विपमेंट सुविधा, स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वसतीगृह, अतिथीगृह इ. प्रकल्पांसाठी संस्थेची जुळवाजुळ‍व सुरू आहे. +जुन्या काळात, पुण्याबाहेर असलेल्या या विद्यापीठात किंवा कॉलेजात जाण्यायेण्यासाठी खास शहर बससेवा होती. तिचे एका टर्मचे प्रवासी भाडे २० रुपये आणि ५५ विद्यार्थिनींच्या वसतिगृहात प्रत्येकीला टर्मला ३५ रुपये आकारले जात, अशी माहिती एस.एम. कणगली यांनी त्यांच्या ‘पुण्याचा माहीतगार’ या पुस्तकात दिली आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8719.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724e682a6d756d32b699e956fb822b177f2f5241 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8719.txt @@ -0,0 +1,6 @@ +श्रीमाताजी सावित्रीविषयी (पुस्तक) +सावित्री या श्रीअरविंद लिखित महाकाव्यावर श्रीमाताजी यांनी वेळोवेळी जे अर्थविवरण केले, जे कथन केले, सावित्रीवर आधारित प्रश्नोत्तरे झाली, पत्रोत्तरे झाली त्या सर्वाचे संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे. श्रीअरविंद विचारांचे अभ्यासक श्री.आर.वाय.देशपांडे यांनी इंग्लिश भाषेत संकलन केले. त्याचा अनुवाद श्री. प्रभाकर नुलकर यांनी केला आहे.[१] +माताजी सावित्री के विषय में, (हिंदी) सावित्री फाउंडेशन, ISBN: 978-93-82547-45-7 + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8720.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29f396d73e8a8ab5beaa2c578d7c4f28862e1779 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8720.txt @@ -0,0 +1,8 @@ +श्रीमाताजींची उत्तरे - भाग पहिला या पुस्तकातील संवाद मुळात फ्रेंच भाषेतील आहेत.[१] त्याचा मराठी अनुवाद श्रीमती विमल भिडे यांनी केला आहे. +श्रीअरविंद आश्रमाची स्थापना झाल्यानंतर श्रीअरविंद यांनी साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी श्रीमाताजींवर सोपविली होती. त्यामुळे साधक व विद्यार्थी त्यांना वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारत असत. आणि त्याची श्रीमाताजी उत्तरे देत असत. अशा उत्तरांचे इंग्रजीमध्ये १७ खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यातील निवडक उत्तरांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. +या पुस्तकात एकूण ०५ भाग आहेत. +०१) पहिल्या भागात एका साधकाशी झालेला पत्रव्यवहार आहे. १९६६ ते १९६९ या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे. +०२) दुसऱ्या भागात 'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने विचारलेले प्रश्न आहेत. १९६९ ते १९७० या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे. +०३) तिसऱ्या भागात 'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने विचारलेले प्रश्न आहेत. १९६९ ते १९७० या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे. +०४) चौथ्या भागात एका साधकाशी झालेला पत्रव्यवहार आहे. १९७१ ते १९७२ या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे. +०५) एका साधकाने १९३२ साली श्रीअरविंद व श्रीमाताजींना पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हा तो १३ वर्षांचा होता. तो चित्रकला आणि संगीत शिकत असे. यामध्ये श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या दोघांनी दिलेल्या उत्तरांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8733.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cee0420ef8ddb6bf42433615bb8ca4bb96d8df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8733.txt @@ -0,0 +1,2 @@ +युक्तेश्वर गिरी (श्रीयुक्तेश्वर असेही लेखन) (बंगाली : শ্রী যুক্তেশ্বর গিরী)(मे १०, इ.स. १८५५ - मार्च ९, इ.स. १९३६) हे प्रियनाथ कारार (बंगाली : প্রিয়নাথ কাঁড়ার) यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव आहे. ते सत्यानंद गिरी व परमहंस योगानंद यांचे गुरू होते. युक्तेश्वर हे शिक्षक, खगोलविद, ज्योतिषी, योगी आणि भगवद्गीता व बायबलवर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते. वाराणसीचे लाहिरी महाशय हे युक्तेश्वरांचे गुरू होते. स्वामी परंपरेतील गिरी शाखेचे ते सदस्य होते. योगानंद मुक्तेश्वरांना ज्ञानावतार समजत असत.[१] + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8758.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b030efc7b4cb94837728ed6c76665081157ede1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8758.txt @@ -0,0 +1,14 @@ +आदरणीय प.पु. गुरुमाऊली श्री. श्रीराम खंडेराव मोरे यांचा जन्म (शके १८७७) फाल्गुन कृष्ण एकादशी, श्रवण नक्षत्र, शिव योगावर, चंद्र मकर राशीत रविवार, दि.२० मार्च, १९५५ साली दंडकारण्य (सद्यनाव दिंडोरी) ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील मोरे वंश (घराण्यामध्ये) झाला. +दिंडोरी पुण्यभूमिला दिंडोरी वन असे नाव होते.त्याचे कारण म्हणजे दिंडोरवन हे दंडकारण्याचे प्रवेशद्वार होते.नंतर दिंडोरवनाचे दिंडोरी हे नाव प्रचलित झाले.हि भूमी त्रिवेणी संगमातून बनली आहे.धारतीर्थ,देवतीर्थ,संततीर्थ यांचा संगम याच भूमीत झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज युक्ती प्रयुक्तीने मावळ्यांच्या मदतीने हिंदू पदपादशाही निर्माण करीत होते.शिवरायांनी सुरतची संपत्ती काबीज केल्यानंतर परतीच्या वेळी नाशिकला येताना दिंडोरी गावाजवळ मोगलांनी त्यांना अडविले. या ठिकाणी आणीबाणीची वेळ आली होती.तेव्हा शिवरायांनी प्रथमच तलवार उपसून समोरासमोर लढाई केली.मोगलांचा पराभव करून त्यांनी मार्ग बदलला.सरळ नाशिकला न जाता आडमार्गाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला गेले.त्यावेळी शिवरायांनी त्र्यंबकेश्वरला नव रत्नजडीत सोन्याचा मुकुट अर्पण केला.हा मुकुट बहुमोल किंमतीचा असून त्याची नोंद तेथे केली आहे . मोगलांशी झालेल्या लढाईचे रणमैदान दिंडोरीच्या दक्षिण बाजूला जवळच आहे .आज त्या ठिकाणी तळे आहे. रणतळे नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. + +प.पु.गुरुमाऊली (श्री. अण्णासाहेब मोरे) यांनी सामान्य जनतेला भावभक्तीचा उदात्तता, उच्च विचारांचे अधिष्ठान, मानवतेचा प्राण दिला आहे. त्यांनी समाजमनाच्या विवेकाची बांधणी करण्याचे कार्य विविध सेवांच्या माध्यमातून अविरत सुरू ठेवले आहे. + “अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म" समजावून सांगणाऱ्या प.पु.गुरुमाऊलींनी देवी – देवतांची खरी ओळख सामान्य जनमानसाला समजेल अशा सोप्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी संतांच्या जनोद्धाराचा मार्ग सोपा, प्रशस्त व निष्कंटक केला आहे.” सद्गुरू प.पु.मोरे दादा व प.पु.गुरुमाऊलींनी भक्तीचा कार्यकारणभाव विशद केला आहे. तसेच सेवा कार्य राष्ट्र कल्याणाशी जोडले आहे. + “प्रवचनांपेक्षा लोक जागृती करणारे, ज्ञान देणारे ग्राम अभियानासारखे समाज सुधारक उपक्रम राबविणारे प.पु.गुरुमाऊली आज सर्व संप्रदायाचे मार्गदर्शक व वंदनीय आहेत.” + सद्गुरू प.पु.दादासाहेबांचा प.पु.गुरुमाऊलींचा शेती व्यवसाय, कृषी आस्था, कृषी विषयक तळमळ श्री विष्णू रूपाने, विष्णू भावाने चाललेली विश्वसेवा आहे. त्यांनी सुरू केलेला दिंडोरीचा श्री स्वामी समर्थ मार्ग राष्ट्र कल्याणास, राष्ट्रोत्कर्षास अध्यात्माशी एकरूप करणारा मार्ग आजही चालू आहे. कृषी प्रधान भारतातील शेती, शेतकरी उत्तम असतील तरच राष्ट्र संपन्न राहणार आहे. या क्रांतीदर्शी भावनेने सद्गुरू प.पु.मोरे दादांनी व प.पु.गुरुमाऊलींनी शेतीला अध्यात्माशी जोडले आहे. +सद्गुरू प.पु.दादासाहेबांचे वडील म्हणजेच प.पु. गुरुमाऊलीचे आजोबा श्री अप्पाजी मोरे – पाटील हे शेतीनिष्ठ, शूर, धाडसी, मेहनती, बुद्धिमान, सचोटी व प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले परोपकारी व्यक्ती होते, दिंडोरी गावांत त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरीब निराधारांचे ते कनवाळू होते.[१] ज्या घराण्यात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे प.पु. सद्गुरू मोरे दादा व प.पु. गुरुमाऊलींच्या रूपाने अवतरतात, त्या वंशाची गौरवपूर्वक ओळख श्रीमद् भगवद् गीतेत अशा प्रकारे करून दिली आहे: +श्लोक +शुचीना श्रीमतां गेहे योगपुरुषोS भिजायते II +अथवा योगिनामेव कुले भवति धीमाताम् II +एताद्धी दुर्लभतरं लोके जन्म यादिद्रराम II +अर्थ - +मागच्या जन्मी योगसाधना पूर्णत्वास न गेलेला योगी स्वर्गादि पुण्यवान लोकांत राहून नंतर कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीमान पुरुषांच्या घरी जन्म घेतो किंवा विरक्त पुण्यवान पुरुष स्वर्गादि लोकांत न जाता ज्ञानी, योगियांच्या कुलात जन्म घेतो. अशा प्रकारचा जन्म होणे, जगात अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8766.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bb00d6f5e5ac8a0295fcfee75d9ca40c60af1ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8766.txt @@ -0,0 +1,9 @@ +डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९)[१] हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.[२] +श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. +वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[३] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. +त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[४] +श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[५] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. +ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.[६] ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. [७] +श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव) +"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे. +श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8774.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c834210a77266e24a480bff03908e94c87839c4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8774.txt @@ -0,0 +1,25 @@ +seyoey6 - इत्यादींची अधिपती देवता +भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार आहेत. वाल्मिकिींनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे ते नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते.[१] त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला. भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रभु श्री राम सत्यवचनी व एकपत्नीव्रत व परम दयाळू होते. +राम हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि त्याला श्री राम आणि श्री रामचंद्र या नावांनीही ओळखले जाते. रामायणातील वर्णनानुसार, अयोध्येचा सूर्यवंशी राजा, चक्रवर्ती सम्राट दशरथ याने पुत्रेष्टी यज्ञ (पुत्रप्राप्ती यज्ञ) केला ज्यामुळे त्यांना पुत्रांचा जन्म झाला.[२] सूर्यप्रकाशामुळे त्यांचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला. वायूच्या आशीर्वादाने भरताचा जन्म झाला. यमराजापासून लक्ष्मणाचा जन्म झाला आणि इंद्राच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म झाला. श्री रामजी हे चार भावांमध्ये सर्वात मोठे होते. पण तो त्याच्या बहिणीपेक्षा लहान होता. भगवान रामाची खरी बहीण शांता होती जी श्री राम आणि त्यांच्या तीन भावांची मोठी बहीण होती. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी श्री राम जयंती किंवा राम नवमी या उत्सवाचे वर्णन संस्कृत महाकाव्य रामायण म्हणून केले जाते. +गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या जीवनावर केंद्रस्थानी असलेल्या भक्तीचे सुप्रसिद्ध महाकाव्य रामचरितमानस देखील रचले आहे.[३] या दोघांशिवाय, रामायण इतर भारतीय भाषांमध्ये देखील रचले गेले आहे, जे खूप प्रसिद्ध आहेत. श्री राम हे भारतात अत्यंत पूजनीय आणि एक आदर्श पुरुष आहेत आणि जगातील अनेक देशांमध्ये श्री राम यांना थायलंड, इंडोनेशिया इत्यादी आदर्श म्हणून पूजले जाते. त्याला पुरुषोत्तम या शब्दाने सुशोभित केले आहे. मर्यादा-पुरुषोत्तम राम हे अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्ये यांचे ज्येष्ठ पुत्र होते. रामाच्या पत्नीचे नाव सीता होते, त्यांना तीन भाऊ होते- लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. रामाने लंकेचा राजा (ज्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता) रावणाचा वध केला. श्रीरामांची मर्यादा पुरुषोत्तम अशी ख्याती आहे. श्रीरामाने राज्य, मित्र, आई-वडील, अगदी पत्नीलाही सन्मानाचे पालन करण्यासाठी सोडले. त्यांचे कुटुंब आदर्श भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. रामाचा जन्म रघुकुलमध्ये झाला, ज्यांच्या परंपरेने रघुकुल विधी नेहमी चालत आले, पण आयुष्य गेले नाही. रामाचे वडील दशरथ यांनी त्यांची सावत्र आई कैकेयीला त्यांच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते. दासी मंथरा हिच्या वेषात कैकेयीने आपला मुलगा भरतासाठी अयोध्येचे सिंहासन आणि राजा दशरथाकडून रामासाठी चौदा वर्षांचा वनवास या वरदानांच्या रूपात मागितला.[४] वडिलांच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी रामाने चौदा वर्षांचा वनवास आनंदाने स्वीकारला. आदर्श पत्नीचे उदाहरण देताना पत्नी सीतेने पतीसोबत वनवास जाणे योग्य मानले. भाऊ लक्ष्मणानेही चौदा वर्षे रामासोबत वनात घालवली. भरताने न्यायासाठी मातेचा आदेश धुडकावून लावला आणि मोठा भाऊ राम याच्याकडे जंगलात गेला आणि त्याची पादुका आणली. नंतर गादीवर ठेवून राज्य केले. राम जेव्हा वनवासी होते तेव्हा त्यांची पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेले होते. जंगलात रामाला हनुमानासारखा मित्र आणि भक्त सापडला ज्याने रामाची सर्व कामे पूर्ण केली. हनुमान, सुग्रीव इत्यादी वानर जातीतील महापुरुषांच्या मदतीने रामाने सीता शोधली. त्याने समुद्रावर पूल बांधून लंकेत पोहोचले[५] आणि रावणाशी युद्ध केले. त्याचा वध करून त्यांनी सीतेला परत आणले. राम अयोध्येला परतल्यावर भरताने राज्य त्यांच्या हाती दिले. राम फक्त होता. त्यांनी चांगले राज्य केले, त्यामुळे आजही लोक सुशासनाची उपमा रामराज्य म्हणून देतात. त्याचे दोन पुत्र कुश आणि लव यांनी त्यांचे राज्य घेतले. हिंदू धर्मातील अनेक सण, दसरा, रामनवमी आणि दीपावली, रामाच्या वन-कथेशी संबंधित आहेत. +'रम्' या मूळातील 'घञ्' प्रत्यय जोडल्याने 'राम' हा शब्द तयार झाला आहे. तो सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात 'रमन' (वास) आहे, म्हणून तो 'राम' आहे आणि भक्त त्याच्यामध्ये 'रमन' (ध्यान) करतात, म्हणूनच तो 'राम' देखील आहे - "रमते कणे कणे इति रामः". 'विष्णुसहस्रनाम' वरील आपल्या भाष्यात, आदि शंकराने पद्म पुराणाचे उदाहरण देत म्हटले आहे की, योगी नित्यानंदाच्या रूपात परमभगवानामध्ये आनंद मानतात, म्हणून ते 'राम' आहेत. +वैदिक वाङ्मयात 'राम'चा उल्लेख प्रचलित स्वरूपात नाही. 'राम' हा शब्द ऋग्वेदात फक्त दोनच ठिकाणी वापरला आहे (१०-३-३ आणि १०-९३-१४). त्यांपैकी एक स्थान काळा रंग (रात्रीचा अंधार) या अर्थाने वापरला जातो आणि उरलेले एक स्थान व्यक्ती या अर्थाने वापरले जाते; पण तरीही तो अवतारपुरुष किंवा दशरथाचा पुत्र असण्याची चिन्हे नाहीत. नीळकंठ चतुर्धर यांनी ऋग्वेदातील अनेक स्तोत्रे निवडून त्यांचा रामायणाचा अर्थ दिला असला तरी ही त्यांची वैयक्तिक धारणा आहे. त्या मंत्रांचा रामायणाचा अर्थ खुद्द ऋग्वेदाच्या त्या भागांत किंवा इतर कोणत्याही भाष्यकाराने सिद्ध केलेला नाही. ऋग्वेदात 'इक्ष्वाकुह' (१०-६०-४) आणि एका ठिकाणी 'दशरथ' (१-१२६-४) हा शब्दही वापरला गेला आहे. पण रामाशी त्याच्या सहवासाचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. +ऐतरेय ब्राह्मण (७-५-१{=७-२७} आणि ७-५-८{=७-३४}) मध्ये 'राम' हा शब्द ब्राह्मणी साहित्यात दोन ठिकाणी वापरला आहे; परंतु तेथे त्याला 'रामो मार्गवेयह' म्हणतात, म्हणजे आचार्य सायनाप्रमाणे 'मृगवु' नावाच्या स्त्रीचा पुत्र. (४-६-१-७). येथे 'राम' हे यज्ञ आचार्याच्या रूपात असून त्यांना 'राम औपतपस्विनी' म्हटले आहे. +काही हिंदू ग्रंथांमध्ये, रामाचे वास्तव्य त्रेतायुग किंवा द्वापार युगात होते असे म्हटले जाते की त्यांच्या लेखकांचा अंदाज सुमारे ५,००० ईसापूर्व होता. काही इतर संशोधकांनी रामाला १२५० ईसापूर्वच्या आसपास राहण्यासाठी अधिक योग्य स्थान मानले, कुरु आणि वृष्णी नेत्यांच्या पुनर्सूचीवर आधारित, जे अधिक वास्तववादी कारकिर्दीत दिले तर त्या काळातले असेल. रामाचे समकालीन भरत आणि सत्त्वाचे स्थान. भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ हसमुख धीरजलाल संकलिया यांच्या मते, ज्यांनी प्रोटो- आणि प्राचीन भारतीय इतिहासात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, हे सर्व "शुद्ध अनुमान" आहे. +रामाची महाकथा, सध्याचे रामायण, साधारणपणे 7व्या आणि 4व्या शतकाच्या दरम्यानचे आहे. ऑक्सफर्डमधील संस्कृतचे प्राध्यापक जॉन ब्रॉकिंग्टन यांच्या मते, रामायणावरील प्रकाशनांसाठी, मूळ मजकूर कदाचित अधिक प्राचीन काळात रचला गेला होता आणि तोंडी प्रसारित केला गेला होता, आणि आधुनिक विद्वानांनी बीसीई 1 ली सहस्राब्दी विविध शतके सांगितली आहेत. ब्रॉकिंग्टनच्या मते, "कामाची भाषा, शैली आणि सामग्रीवर आधारित, तारीख अंदाजे इ.स.पू. पाचव्या शतकाची आहे". +श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. +श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ +श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.[६] +श्रीरामाचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या नावाच्या नगरीत झाल्याचा पुराणात स्पष्ट पुरावा आहे. अयोध्या, जी रामाच्या पूर्वजांची राजधानी होती. रामचंद्रांचे पूर्वज रघू होते. +भगवान राम लहानपणापासूनच शांत स्वभावाचे शूर पुरुष होते. मर्यादांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च स्थान दिले. म्हणूनच त्यांना मरियदा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखले जाते. त्याचे राज्य न्याय्य आणि सुखी मानले जात असे. म्हणून जेव्हा जेव्हा भारतात सुरजची (चांगल्या राज्याची) चर्चा होते तेव्हा रामराजा किंवा रामराज्याचे उदाहरण दिले जाते. धर्ममार्गावर चालणाऱ्या रामाने आपल्या तीन भावांसह गुरू वशिष्ठांकडून शिक्षण घेतले. किशोरवयातच, गुरू विश्वामित्रांनी जंगलात राक्षसांनी निर्माण केलेली दंगल संपवण्यासाठी त्याला सोबत घेतले. या कार्यात रामासोबत त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मणही सोबत होता. बिहारमधील बक्सर जिल्हा हे ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांचे स्थान आहे, जे ब्रह्म ऋषी होण्यापूर्वी राजा विश्वरथ होते. ब्रह्मा ऋषी विश्वामित्र हे वेदमाता गायत्रीचे पहिले उपासक आहेत, वेदांचा महान गायत्री मंत्र ब्रह्मा ऋषी विश्वामित्र यांच्या मुखातून प्रथम निघाला. नंतर विश्वामित्रांच्या तपोभूमीला राक्षसांचा प्रादुर्भाव झाला. तडका नावाच्या राक्षसी विश्वामित्राची तपोभूमी बक्सर (बिहार) येथे राहू लागली आणि आपल्या राक्षसी सैन्याने बक्सरच्या लोकांना त्रास देत असे. जेव्हा वेळ आली तेव्हा विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीरामांनी त्यांचा वध केला. त्या वेळी रामाने तडक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि मारिचाला पळून जाण्यास भाग पाडले. यावेळी गुरू विश्वामित्र त्यांना मिथिला येथे घेऊन गेले. विदेह राजा जनक याने आपली कन्या सीतेच्या लग्नासाठी स्वयंवर सोहळा आयोजित केला होता. जिथे भगवान शिवाचे धनुष्य होते, ज्यासाठी सीताजींचा विवाह त्या शूर शूरवीराशी होणार होता ज्याने ते देऊ केले होते. त्या सोहळ्याला अनेक राजे-महाराजे आले होते. +जेव्हा अनेक राजे प्रयत्न करूनही धनुष्य उचलू शकले नाहीत, तेव्हा विश्वामित्राची परवानगी मिळाल्यावर श्रीरामांनी धनुष्य हाती घेतले आणि अर्पण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना धनुष्य अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतानाच ते महान धनुष्य मोठ्या आवाजाने तुटले. महर्षि परशुरामांनी जेव्हा हा भयानक आवाज ऐकला तेव्हा ते तिथे आले आणि आपल्या गुरूचे (शिवाचे) धनुष्य तुटल्याने संताप व्यक्त करू लागले. लक्ष्मणजी हे उग्र स्वभावाचे होते. त्यांचा परशुरामजींशी वाद झाला. (असा संदर्भ वाल्मिकी रामायणात सापडत नाही.) तेव्हा श्रीरामांनी मध्यस्थी केली. अशा प्रकारे सीतेचा रामाशी विवाह झाला आणि परशुरामासह सर्वांनी तिला आशीर्वाद दिला.[७] राम सीता अयोध्येत सुखाने राहू लागली. रामावर लोकांचे खूप प्रेम होते. त्यांच्या मवाळ, लोकसेवेची भावना आणि न्याय यामुळे ते विशेष लोकप्रिय होते. राजा दशरथ वानप्रस्थकडे निघाले होते. त्यामुळे त्याने रामाकडे राज्य सोपवण्याचा विचार केला. त्यांचा लाडका राजा आपल्या लाडक्या राजपुत्राची राजापदी नियुक्ती करणार असल्याची सुखद लहरही जनतेत होती. त्यावेळी रामाचे इतर दोन भाऊ भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या आजी कैकेय्याकडे गेले होते. कैकेयीची दासी मंथरा हिने कैकेयीला फसवले की राजा तुझ्यावर अन्याय करत आहे. जर तुम्ही राजाची लाडकी राणी असाल तर तुमचा मुलगा राजा झाला पाहिजे, पण राजा दशरथला रामाला राजा बनवायचे आहे. +स्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस या बालखंडात भगवान रामाच्या बालपणाचे तपशीलवार वर्णन आढळते. +दशरथ राजाला कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तीन राण्या होत्या. भगवान राम कौशल्येचे पुत्र होते, लक्ष्मण हे सुमित्रा चे पुत्र होते आणि भरत व शत्रुघ्न हे कैकयी चे पुत्र होते. नियमांनुसार, राजाचा ज्येष्ठ पुत्रच राजा होण्यास पात्र आहे, त्यामुळे श्रीराम अयोध्येचा राजा होणार हे निश्चित होते. कैकेयी ज्याने राजा दशरथाचे दोनदा प्राण वाचवले होते आणि दशरथाने त्याला असे वरदान दिले होते की ती आयुष्याच्या कोणत्याही क्षणी त्याच्याकडून दोन वर मागू शकते. कैकेयीला रामाने राजा व्हावे आणि भविष्य पाहता, आपला मुलगा भरत हा अयोध्येचा राजा व्हावा, अशी इच्छा होती, म्हणून त्याने राजा दशरथाकडून रामाला १४ वर्षे निर्वासित केले आणि आपला मुलगा भरतासाठी अयोध्येचे राज्य मागितले. शब्दांत बांधलेल्या राजा दशरथाला हे स्वीकारण्यास भाग पाडले. श्रीरामांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. श्रीरामाची पत्नी देवी सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मणजी देखील वनवासात गेले.[८] +सीतेला परत मिळवण्यासाठी रामाने हनुमान, विभीषण आणि वानर सैन्याच्या मदतीने रावणाच्या सर्व भाऊ-बहिणींचा आणि त्याच्या वंशजांचा पराभव केला आणि परत येताना विभीषणाला लंकेचा राजा बनवून चांगला शासक होण्यासाठी मार्गदर्शन केले.[११] +रामाने रावणाचा युद्धात पराभव केला आणि त्याचा धाकटा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवले. राम, सीता, लक्ष्मण आणि काही वानर पुष्पक विमानात अयोध्येला निघाले. तेथे भेटल्यानंतर अयोध्येत राम आणि सीतेचा राज्याभिषेक झाला. संपूर्ण राज्य कार्यक्षमतेने वेळ घालवू लागला. +जेव्हा रामचंद्रजींचे आयुष्य पूर्ण झाले तेव्हा यमराजांच्या संमतीने त्यांनी सरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर देह त्याग केला आणि पुन्हा बैकुंठ धाममध्ये विष्णूच्या रूपात विराजमान झाले. +पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते. + + + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_881.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3678a932e7dc76003ac9147d2707d5556c18c355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_881.txt @@ -0,0 +1 @@ +सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल (१५ नोव्हेंबर, इ.स. १७३८ - २५ ऑगस्ट, इ.स. १८२२) हे खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार होते. युरेनस ग्रहाचा व इतर ग्रहांच्या उपग्रहांचा शोध लावण्याचे श्रेय याच्याकडे जाते. आजही भारतीय ज्योतिषी युरेनससाठी हर्शेल/हर्षेल याच नावाचा उपयोग करतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8818.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8818.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती: diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8831.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58d3331bb4754edb5c543298b6d749ad44175bde --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8831.txt @@ -0,0 +1,4 @@ +श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९१ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. अरविंद डि सिल्व्हाकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते. +लॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या १३७ धावांनी जिंकली. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या इंग्लंडच्या ॲलेक स्टुअर्टला सामनावीर घोषित करण्यात आले. + + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8834.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56f419754a8c20648d7eb7a4fd03ac23e01032c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8834.txt @@ -0,0 +1 @@ +२००६ च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात क्रिकेट सामन्यांसाठी श्रीलंकेने इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंड सप्टेंबरपासून प्रथमच मायदेशी परतले होते आणि त्यांनी त्यांचे कसोटी दर्जा टिकवून ठेवण्याचा विचार केला, ज्यामुळे त्यांनी भारतातील आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये त्यांचे दुसरे स्थान राखले आणि दोन्ही संघ आयसीसी वनडे चॅम्पियनशिपमध्ये सहाव्या स्थानासाठी स्पर्धा करत होते कारण दोन्ही इंग्लंड आणि श्रीलंका आशियाई उपखंडात अनुक्रमे भारत आणि पाकिस्तान विरुद्ध गमावलेल्या दोन वनडे दौऱ्यांच्या मागे येत होते. समस्या वाढवण्यासाठी, दोन्ही संघांना संघातील काही प्रमुख सदस्यांची उणीव भासण्याची शक्यता होती कारण इंग्लंड त्यांच्या मागील दौऱ्यासाठी त्यांच्या काही संघांशिवाय होता आणि श्रीलंका इंग्लंडला रवाना होण्याच्या दोन दिवस आधी, कर्णधार मारवान अटापट्टू राहणार असल्याचे उघड झाले. पाठीच्या समस्यांमुळे दौऱ्यासाठी घरी आहे ज्यामुळे त्याला मागील दौरा वगळणे भाग पडले होते. त्यांच्या जागी जेहान मुबारक यांना आणण्यात आले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8849.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49534b223ea6b8cee7b928589451d8139a328c0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8849.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे २०१९ मध्ये सामन्यांची पुष्टी केली. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8881.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..274711948f3cfa465ecc5b96cc559d6151704b1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8881.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने २०००-०१ हंगामात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि श्रीलंकेचे नेतृत्व सनथ जयसूर्याने केले. +श्रीलंकेने ही मालिका ४-१ ने जिंकली, तर न्यू झीलंडने केवळ अंतिम सामना जिंकण्यात यश मिळवले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8883.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd24331e79334fa49667eecae76fef9194de2dcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8883.txt @@ -0,0 +1,39 @@ +२००५-०६ च्या मोसमात श्रीलंका क्रिकेट संघाने क्रिकेट सामन्यांसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. २००४-०५ मोसमात श्रीलंकेला पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन कसोटी सामने खेळायचे होते, २६ डिसेंबर २००४ पासून त्यांचा दौरा सुरू झाला, परंतु २००४ च्या हिंदी महासागरात झालेल्या भूकंपामुळे श्रीलंकेच्या बेटाला मोठा धक्का बसला. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर लंकेचा संघ मायदेशी परतला. कसोटी सामने एप्रिलमध्ये पुनर्निर्धारित करण्यात आले आणि उर्वरित चार एकदिवसीय सामने ३१ डिसेंबर २००५ ते ८ जानेवारी २००६ दरम्यान खेळले गेले. +तिलकरत्ने दिलशान ४८ (७९) +ख्रिस केर्न्स ४/३३ [८] +ईडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलंड +पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि पीटर पार्कर (ऑस्ट्रेलिया) +सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड) +स्टीफन फ्लेमिंग ७७* (९२) +उपुल चंदना १/२९ [७] +न्यू झीलंडने मालिकेतील पहिला सामना सात गडी राखून आणि १७ षटके बाकी असताना जिंकला. या सामन्यानंतर मात्र, न्यू झीलंड आणि श्रीलंकेच्या टाइम झोनमधील फरकामुळे त्सुनामीचा फटका श्रीलंकेसह दक्षिण पूर्व आशियाई देशांना बसला; फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला सुनामीचा फटका वीस मिनिटांनी चुकला. नातेवाईकांच्या चिंतेमुळे श्रीलंकेचा संघ मायदेशी निघाला. कसोटी मालिका एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. +२००४-०५ हंगामात श्रीलंकेच्या सामन्यांच्या जागी न्यू झीलंडने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील फिका वर्ल्ड इलेव्हन हा संमिश्र संघ खेळला. +श्रीलंका आणि न्यू झीलंड क्रिकेट बोर्डांनी २००५-०६ हंगामासाठी एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक बदलले. +तिलकरत्ने दिलशान ४२ (५४) +शेन बाँड ३/२९ [८.२] +क्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर, क्वीन्सटाउन, न्यू झीलंड +पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि टोनी हिल (न्यू झीलंड) +सामनावीर: पीटर फुल्टन (न्यू झीलंड) +पीटर फुल्टन ७०* (७९) +मुथय्या मुरलीधरन १/२९ [१०] +उपुल थरंगा १०३ (१२५) +काइल मिल्स १/४४ [१०] +जेड स्टेडियम, क्राइस्टचर्च, न्युझीलँड +पंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू झीलंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) +सामनावीर: उपुल थरंगा (श्रीलंका) +नॅथन अॅस्टल ९०* (१२५) +परवीझ महारूफ २/४१ [६] +पीटर फुल्टन ५० (६१) +चमिंडा वास ५/३९ [१०] +वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन, न्यू झीलंड +पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि टोनी हिल (न्यू झीलंड) +सामनावीर: जीतन पटेल (न्यू झीलंड) +जहाँ मुबारक ५३ (८४) +जीतन पटेल २/२३ [१०] +मारवान अटापट्टू ६९ (६८) +ख्रिस मार्टिन ३/६२ [१०] +मॅकलिन पार्क, नेपियर, न्यू झीलंड +पंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू झीलंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) +सामनावीर: चमिंडा वास (श्रीलंका) +पीटर फुल्टन ११२ (१३१) +चमिंडा वास ४/४८ [९] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8912.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60805f18e87b577c753ece283dbb1e40de597e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8912.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात क्रिकेट सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा केला. श्रीलंकेने या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली, जसे की चमिंडा वास, मुथय्या मुरलीधरन (मुथय्याला वनडे संघातून फक्त बाहेर ठेवण्यात आले होते) आणि कर्णधार मारवन अट्टापटू. या मालिकेसाठी कर्णधाराची भूमिका महेला जयवर्धनेने घेतली होती. वनडे मालिकेतील पहिला सामना अनुभवी वेगवान गोलंदाज खालेद महमूदचा शेवटचा सामना होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8929.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..575a5bb7e3eb1179529b4640e936e919bfff6fd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8929.txt @@ -0,0 +1,9 @@ +मानधनाच्या वादावरून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने दौरा अर्धवट सोडल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघ ३० ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१४ दरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला.[१] भारताने मालिका ५-० अशी जिंकली आणि एकदिवसीय इतिहासातील त्याचा चवथा ५-० असा व्हाईटवॉश दिला. ०-५ ने हा श्रीलंकेचा पहिलाच व्हाईटवॉश. +चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २६४ धावा केल्या, आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा नवा विक्रम केला. त्याने डावात ३३ चौकार मारले, हा सुद्धा एक विश्वविक्रम आहे. ॲलिस्टर ब्राउनचा लिस्ट अ सामन्यातील २६८ धावांचा विक्रम त्याच्याकडून फक्त चार धावांनी हुकला.[२] + +१ला एकदिवसीय सामना अगदी एकतर्फी झाला. शांत सुरुवात केल्यानंतर पहिला पॉवरप्ले संपल्यावर आणि दुसरा पॉवरप्ले लवकर घेतल्यावर २१ ते ३० षटकांदरम्यान भारताने १०५ धावा केल्या. अजिंक्य रहाणे (१११) आणि शिखर धवन (११३) या दोन्ही सलामीवीरांनी ३५ षटकांत २३१ धावांची भक्कम सलामी दिल्यानंतर सुरेश रैनाच्या झटपट ५० धावांमुळे भारताने श्रीलंकेसमोर ३६३ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनीसुद्धा सावध सुरुवात केली, परंतु सलामीवीर दिलशान बाद झाल्यानंतर ठराविक अंतरावर श्रीलंकेचे गडी बाद होत गेले आणि त्यांचा डाव १९४ धावांत आटोपला. भारताने सामना १६९ धावांनी जिंकला. इशांत शर्माने त्याची एकदिवसीय गोलंदाजीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली. चवथ्या षटकात स्नायू दुखावला गेल्यामुळे वरुण आरोनला मैदान सोडावे लागले.[८][९] +दुसरा एकदिवसीय सामना सुद्धा आणखी एक एकतर्फी सामना होता. पहिल्याच षटकात श्रीलंकेने कुशल परेराचा विकेट गमावला, त्यानंतर दिलशान आणि संगाकाराच्या आक्रमक फलंदाजीनंतरही भारताने सामना आपल्या अधिपत्याखाली ठेवला होता. परंतू, थिसारा परेराने शेवटी केलेली फटकेबाजी आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने केलेल्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत २७४ धावा केल्या. पाठलाग करताना अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला, परंतु २ऱ्या आणि ३ऱ्या गड्यासाठी झालेल्या १००+ भागीदारीच्या जोरावर भारताने ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज विजय मिळवला. अंबाती रायडूने (१२१) त्याचे पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले. [१०][११] +श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली, पहिल्याच षटकात उमेश यादवने कुशल परेराला बाद केले. महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशानच्या १०५ धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेच्या डावाला आकार मिळाला. परंतु पॉवरप्ले मध्ये अक्षर पटेलच्या तीन षटकांमधील तीन बळींमुळे श्रीलंकेच्या डावाची गती मंदावली. जयवर्धनेचे शानदार शतक आणि दिलशानच्या ५० धावांमुळे श्रीलंकेने २४२ धावा केल्या. भारताने उत्तरादाखल सकारात्मक सुरुवात केली आणि शिखर धवनच्या ७९ चेंडूंतील ९१ धावांमुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. कर्णधार विराट कोहलीच्या ५३ धावांच्या खेळी दरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ६००० धावांचा टप्पा ओलांडला. उमेश यादवने कारकि‍र्दीत प्रथमच ४ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. या विजयासह भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.[१२][१३] +मालिकेतील चवथा सामना हा एकाच व्यक्तिचा होता, ती व्यक्ती म्हणजे रोहित शर्मा. ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना बोटाला झालेल्या फ्रॅक्चर नंतर संघाबाहेर असलेल्या रोहितचा हा त्यानंतरचा पहिलाच सामना, ज्यात त्याने ९ षट्कार आणि ३३ चौकारांसहीत १७३ चेंडूंत २६४ धावांची स्फोटक खेळी केली. आणि भारताने निर्धारित ५० षटकांत ४०४ धावांचा डोंगर उभा केला. त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत ३ऱ्या गड्यासाठी २०२ धावांची तर ५व्या गड्यासाठी रॉबिन उथप्पासोबत १२८ धावांची भागीदारी केल, ज्यात उथप्पाने फक्त १६ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचे पहिले ४ फलंदाज अवघ्या ४८ धावा काढून तंबूत परतले. अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरु थिरीमाने यांच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय काहीसा लांबला. ४३.१ षटकांत २५१ धावांमध्ये श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद झाला आणि भारताने सामना जिंकून मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. [१५] +श्रीलंकेच्या डावाची सुरुवात आधीच्या सामन्यांप्रमाणेच झाली. ४५ धावांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (१३९) आणि लाहिरु थिरीमाने (५२) यांच्या १२८ धावांच्या भागीदारीने श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटच्या १० षटकांत ११४ आणि शेवटच्या ५ षटकात श्रीलंकेने ७३ धावा केल्या, आणि श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले. उत्तरादाखल फलंदाजीस उतरलेल्या भारताच्या डावाची सुरुवातही अडखळतच झाली. आधीच्या सामन्यातील द्विशतकवीर रोहित शर्मा अवघ्या ९ धावांवर बाद झाला, आणि भारताची अवस्था ४.३ षटकांत २ बाद १४ अशी झाली त्यानंतर अंबाती रायडू (५९) आणि विराट कोहलीच्या नाबाद १३९ धावांच्या जोरावर भारताने ४९ व्या षटकात ३ गडी राखून विजयी लक्ष्य पार केले. आणि श्रीलंकेला ५-० असे पराभूत करून व्हाईटवॉश दिला. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8983.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b81a004877a1054fe9b80356477236840fa1b14d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8983.txt @@ -0,0 +1 @@ +ऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय सामने (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने (मटी२०आ) होते. महिला एकदिवसीय खेळ हे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.[२][३][४] वेस्ट इंडीजने महिला एकदिवसीय आणि महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.[५][६] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8992.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e93c075004cf50cf8e22b6d306103ce71757c75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_8992.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीलंकेचे प्रांत (सिंहला: පළාත; तमिळ: மாகாணம்) हे श्रीलंका देशाचे ९ राजकीय विभाग आहेत. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागला गेला असून जिल्हे उपजिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9024.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f60e3646cd3ccadef502685e7b8d9df7e479cdab --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9024.txt @@ -0,0 +1,4 @@ +१,४२,२२,८४४ (इ.स. २०१२) प्रमाणः- ७०.१९% + +थेरवाद बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील ७०.२% लोकसंख्येचा धर्म आहे.[१] हे बौद्ध शिष्याचे एक केंद्र राहिले आहे आणि इ.स.पू. तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर बुद्धघोषसारख्या प्रख्यात विद्वान आणि भव्य पाली त्रिपीटकाच्या संरक्षणानंतर त्यापासून शिकत आले आहेत. आपल्या बऱ्याचशा इतिहास दरम्यान, बेटाच्या बौद्ध संसाधनांची देखभाल व पुनरुज्जीवन करण्यासाठी सिंहली राजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९ व्या शतकादरम्यान, द्वीपावर एक आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवन घडले ज्यात बौद्ध शिक्षण आणि शिकणे वाढीस लागले. सुमारे ६,००० बौद्ध मठ असलेल्या श्रीलंकेत सुमारे १५,००० बौद्ध भिक्खू आहेत.[२] +श्रीलंकेतील बौद्ध धर्म प्रामुख्याने सिंहलीं लोक अनुसरतात, परंतु २०१२ च्या श्रीलंकेच्या जनगणनेने श्रीलंकेतील तमिळ लोकसंख्येत ११ भिक्खूंसह २२,२६४ इतकी लोकसंख्या बौद्धांची असल्याचे म्हटले आहे, जे श्रीलंकेच्या सर्व श्रीलंकन तमिळांपैकी १% आहे.[३] इ.स. १९८८ मध्ये श्रीलंकेतील सिंहली भाषक लोकसंख्येत सुमारे ९३% बौद्ध होते.[४] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9034.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aceee7c957d14b5df5ede752d5472ff9c87a88ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9034.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीलाल शुक्ला हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9048.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24744c01b9c0b7da7c03af3884040ea0beed7a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9048.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रीव्हपोर्ट अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील मोठे शहर आहे. कॅडो पॅरिशमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,९९,३११ इतकी होती. +श्रीव्हपोर्ट प्रादेशिक विमानतळ या शहराला विमानसेवा पुरवतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9057.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..766cca809b218c8b61bd3d4d396595e44287560c --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9057.txt @@ -0,0 +1,5 @@ +श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. +हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. +येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. +श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले. +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9087.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895bb66523beffb2f710dff584101b11dd5cba07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9087.txt @@ -0,0 +1 @@ +श्रुती चौधरी (ऑक्टोबर ३, इ.स. १९७५- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील भिवानी-महेन्द्रगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9088.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e50471f1d75dc2659cdd264fcc9c7125732f5c17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9088.txt @@ -0,0 +1,4 @@ + +डाॅ. श्रुती पानसे ह्या मस्तिष्काधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून मराठी लेखिका आहेत. त्यांचे शिक्षण मराठी भाषेत एम.ए. पर्यंत झाले असून त्यांनी 'मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र' या विषयात पीएच.डी. केली आहे. +पानसे यांनी अक्रोड - Brain & Behaviour courses - या कोर्स मध्ये मुलांच्या वयोगटानुसार मेंदू कार्य समजून घेण्यासाठी, तसेच अभ्यास सोपा करण्यासाठी , multiple intelligences, emotional intelligence या विषयावर कोर्सची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचे लेखन केले आहे. याच सोबत त्यांचे 'डोक्यातला मी' हे आॅडिओबुक storytel वर प्रसिद्ध झाले आहे. +मुलांसाठीच्या 'चिकूपिकू' या मासिकाच्या संपादक मंडळात सहभागी त्या सहभागी होत्या. मेंदू समजून घेताना' या विषयावर त्यांनी व्याख्यानं आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9093.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..425d6ab26a6cb009dcda78d1773d382262efb978 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9093.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रुती हासन (मराठी लेखनभेद: श्रुति हासन ; तमिळ: ஸ்ருதி ஹாசன் ; रोमन लिपी: Shruti Haasan) (२८ जानेवारी, इ.स. १९८६ - हयात) ही एक तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय व गायन केले आहे. तमिळ अभिनेता कमल हासन हा तिचा पिता असून मराठी-तमिळ अभिनेत्री सारिका तिची आई आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9105.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea17f356e81067674d9d058856be18e27ee5ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9105.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रेयस तळपदे (२७ जानेवारी १९७६ - हयात) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत झळकत आहे. +श्रेयसचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकाशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला.त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_911.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d794c598773734cbe17923a0a09b97e100f8350 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_911.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा विल्हेल्म (जर्मन: Wilhelm II), जन्मनाव फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट फॉन प्रॉयसेन (जर्मन: Friedrich Wilhelm Viktor Albrecht von Preußen, प्रशियाचा फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट) (२७ जानेवारी, इ.स. १८५९ ; बर्लिन, प्रशिया - ४ जून, इ.स. १९४१ ; डूर्न, नेदरलँड्स) हा प्रशियाचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9111.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79dcc2f88079875a359f8fa9e7fc29aa70aa63b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9111.txt @@ -0,0 +1 @@ +श्रेयस खानोलकर (१५ ऑक्टोबर, १९७७:वेंगुर्ला, महाराष्ट्र - ) हा भारतात प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9124.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db97c7c616d6c6b3a29c3a8223faad197a62775f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9124.txt @@ -0,0 +1,27 @@ +श्र्यॉडिंगरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्र्यॉडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मांजराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्र्यॉडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली. + +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9135.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d6bbbc66ba1cf7a47b481353c442908cb7efb33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9135.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्लेस्विग-होल्श्टाइन (जर्मन: Schleswig-Holstein) हे जर्मनी देशामधील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. श्लेस्विग-होल्श्टाइनच्या उत्तरेस डेन्मार्क देश, पूर्वेस बाल्टिक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र तर दक्षिणेस जर्मनीची नीडर जाक्सन, हांबुर्ग व मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ही राज्ये आहेत. कील ही श्लेस्विग-होल्श्टाइनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ल्युबेक, फ्लेन्सबुर्ग व नॉयम्युन्स्टर ही इतर मोठी शहरे आहेत. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9141.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8430973417dd25cf932da0a2976e8467cd53bff3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9141.txt @@ -0,0 +1 @@ +श्वसन विश्लेषक (इंग्रजी: breathalyser/breathalyzer/ब्रिथॲनालायझर) हे श्वसनाद्वारे अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र असते. इ.स. १९३८ मध्ये याचा शोध लागला. मद्य पिऊन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यास तुरुंगवास किंवा रोख रकमेचा दंड किंवा वाहन अनुज्ञप्ती पत्र निलंबनाची कारवाई अथवा तिन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9142.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d75847dfcaaba05fbed0910feb6abd61db5d934a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9142.txt @@ -0,0 +1 @@ +श्वसनसंस्थेत नाक, गळा, स्वरयंत्र (Larynx), श्वासनलिका व फुफ्फुस यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9157.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a9901fbd719168edc1a10a98bb0578793499dc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9157.txt @@ -0,0 +1,18 @@ +श्वेंतोकशिस्का प्रांत (पोलिश: Województwo świętokrzyskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9158.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..593fae88ad6986e52a97385d4e47261b5ecfe8dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9158.txt @@ -0,0 +1 @@ +झ्हांग श्वाई (चिनी:张帅; २१ जानेवारी, १९८९:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9178.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3e938fb1dce5f3cdf1231e0c0467a889be3e98b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9178.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +१. साने गुरुजींचे पुस्तक. +२. भारताच्या राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णकमळ-पदक मिळवणारा मराठी चित्रपट. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9193.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869ada60e1514fab65c95a8c8bce31c2b1a40bfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9193.txt @@ -0,0 +1,3 @@ +काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू किंवा षडरिपू (सहा शत्रू) असे म्हणतात. +या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात. +ह्या सहा विकारांमुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांना मानस रोग असेही म्हणतात. मानस रोग अर्थात मनुष्यास होणारे विविध आजार. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9221.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5823151a60e2a883d2703b2cbe8d326cd08cdff8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9221.txt @@ -0,0 +1,2 @@ +स.... सासूचा हा एक म‍राठी एक थरारक रहस्य चित्रपट आहे. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9241.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78230e0ce30f7af9dfe89cd07109c6db040a3578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9241.txt @@ -0,0 +1,78 @@ + +मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती आहे. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा. Wikipedia:अशुद्धलेखन हा अशुद्ध लेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे. +विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा विकिपीडियाचा गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय ह्या लेखात उपलब्ध आहे. +अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिया लेखनशैली ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बऱ्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ह्यांत अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता कृपया विकिपीडिया:लेखनभाषा संकेत हे सदर पहा. +लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल. +आंतरविकि संपर्क करू इच्छिणाऱ्या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे. +विकिपीडियातील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील मासिक सदर ह्या विभागात प्रर्दशित केले जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करून आपण विकिपीडियावर लेख कसे लिहावेत ह्याचा अभ्यास करू शकता. विकिपीडियात संपादन करताना काही शंका आल्यास विकिपीडिया:चावडी येथे संपर्क साधावा. विकिपीडियावरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे आहेत- +संपादन कसे करावे ह्याची अधिक माहिती मिळवण्यापूर्वी अजून वाचन करावयाचे असल्यास कृपया विकिपीडिया:सफर येथे जा + + + + + + + + + + + +हा विभाग विकिभाषेचा उपयोग करून विकिपीडियावर संपादने कशी पार पाडावीत याची माहिती देतो. या माहितीचे छ्पाईयोग्य संक्षीप्त टाचण येथे उपलब्ध आहे (ते प्रींट करून सोबत बाळगता येईल किंवा महाविद्यालयात नोटीस बोर्डावर किंवा महाविद्यालयाच्या वार्षीक अंकात अंतर्भूत करता येईल.) +मुख्य लेख सहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन येथे पूर्ण करून हवा आहे त्यास हात भार लावा. +विकिला स्वतःची विशिष्ट लेखन शैली नसली तरी वाचक,लेखक व संपादकांच्या सोयीनुसार काही संकेत आणि विकिसंज्ञा हळू हळू रूढ होत आहेत; उदाहरणार्थ, शीर्षकलेखनाचे संकेत, शुद्धलेखन इत्यादी. +तसेच विकिमध्ये सर्वसामान्यपणे कुणालाही संपादन करता यावे म्हणून संगणकाच्या कळफलकावर सहज उपलब्ध असलेल्या चिन्हांची एक सोपी चिन्हांकित भाषाप्रणाली बनवलेली आहे तिला विकिभाषा किंवा विकि मार्कअप लँग्वेज असेही म्हणतात. +उदाहरणार्थ +तरंगचिन्ह ~ सामान्यपणे कळफलकावरील १ या आकड्याच्या डावीकडे असते. शिफ्टकळ आणि '~' चिन्हाची कळ दाबली असता उपलब्ध होते. +उपयोग- मुख्यत्वे सही करण्याकरता तरंग चिन्ह चारवेळा ~~~~ असे दाबून वापरले असता सदस्याची डिजिटल(डिजिटल शब्दाचा उपयोग येथे बरोबर आहे का नाही याची खात्री करा!) विकिसही आपोआप बनते. +आठ या अंकाच्या डोक्यावरील * हे तारकाचिन्ह आठ हा अंक आणि शिफ्ट कळ सोबत दाबले असता मिळणारे .त्या प्रमाणेच +==== +| +{{}} + +[[]] + +: +<> + +''' ''' + इत्यादी विकिभाषा चिन्हे विकि संपादताना विकिभाषेत कशी वापरली जातात ते आपण येथे पाहू. +नवीन विभाग +उपविभाग +उप-उपविभाग +केवळ एका नव्या ओळीचा +आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. +त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या +वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. +काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक +शोधण्यात उपयोगाचे आहे +(विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी). +परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे +नवीन परिच्छेद सुरू होतो. +तुम्ही ओळींना तोडू शकता +अगदी परिच्छेद न बदलता. +त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो. +आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते. +When there is a need for separating a block of text +the blockquote command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does. +This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text. +(See formula on right): +आडवी दुभाजक रेषा: +ही रेषेवरची ओळ +आणि ही रेषेखालची +विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात. +आणि +ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात - +सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमन्स या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिपीडियावर) चढवावे. मराठी विकिपीडियाचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावीत (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता). +नवीन लेख शीर्षकलेखन करण्यापूर्वी आपणास आधीपासून मराठी यूनिकोडात टंकन येत असल्यास उत्तमच, नसेल तर येथील लेखन सुविधा समजून घ्यावी.मराठी विकिपीडियावर सर्व लेख शीर्षके (नावे) मराठी (देवनागरी) लिपीतच असावीत, अन्य लिपीतील लेख नामे वगळली जावीत असा लेखनसंकेत असून त्यामुळे इंग्रजी किंवा इतर लिपीतील शीर्षकनामे तातडीने वगळली जातात हे लक्षात घ्यावे. +मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत. +१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. +एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास -- +जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा. +जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील इच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात [[असा]] लिहिल्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा. झाले नवीन पान तयार! +२. शोध करून. +ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील.जर आपण शोध घेत असलेले लेखशीर्षक अद्याप अस्तित्वात नसेल तर त्याबरोबर 'मराठी विकिपीडियावर "........." हा लेख लिहा!.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यावर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल. +या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे. +जर अजून काही प्रश्न असल्यास विकिपीडिया चावडीवर विचारावेत. +एखादा नवीन लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या. + ही नोंद आहे याची खात्री करून घ्यावी. +विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9245.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150ec61856f1c1feac41ead38dd594a708240ec5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9245.txt @@ -0,0 +1,2 @@ +सांता क्लारा काउंटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६,२५९ इतकी होती. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाचा एक भाग आहे. सांता क्लारा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान होजे येथे आहे. सांता क्लारा काउंटीमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. सिलिकॉन व्हॅलीचा भाग गणला जाणाऱ्या या काउंटीमध्ये ह्युलेट-पॅकार्ड, गूगल, ॲपल, व्हीएमवेर, इंटेल, एनव्हिडिया, एएमडी, सिस्को आणि इतर अनेक कंपन्याची मुख्यालये आणि आवारे आहेत. या काउंटीचे दरडोई उत्पन्न झ्युरिक आणि ऑस्लोच्या मागोमाग जगात तिसऱ्या क्रमांकाचे होते.[१] वॉशिंग्टन डी.सी. नंतरचे धनाढ्य लोकांचे हे वस्तीस्थान समजले जाते.[२] and one of the most affluent places in the United States.[३][४] +सांता क्लारा काउंटीला १७७७ मध्ये स्थापन झालेल्या मिशन सांता क्लारा दि असिसवरून नाव दिलेले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9250.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3d1ac852876089de4e5d7295993e382ae7969d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9250.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 34°25′33″N 119°42′51″W / 34.42583°N 119.71417°W / 34.42583; -119.71417 + +सांता बार्बरा हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात लॉस एंजेलस शहराच्या ९० मैल वायव्येस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या ९० हजार होती. +येथील भूमध्यसारख्या हवामानामुळे व निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे सँटा बार्बराला अमेरिकेचे रिव्हिएरा असा खिताब लाभला आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरी येथील रहिवासी आहे. साइक या दूरचित्रवाणी मालिकेचे कथानक या शहरात आहे. +सांता बार्बरा यूएस १०१ महामार्गावर आहे. कॅलिफोर्निया १ तथा पॅसिफिक कोस्ट हायवे हा महामार्ग या भागात १०१वरुनच धावतो. महामा येथील विमानतळावरुन पश्चिम अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. +सांता बार्बरा रेल्वे स्थानक सॅन डियेगो-लॉस एंजेलस-सॅन होजे-पोर्टलँड-सिॲटल रेल्वेमार्गावर आहे. कोस्ट स्टारलाइट ही गाडी येथे थांबते. +युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट सांता बार्बरा[१] हे या शहरातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9252.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05aea777fd5261b67be329ba3878114948acc1d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9252.txt @@ -0,0 +1,4 @@ +सँड क्रीकची कत्तल, चिव्हिंग्टने केलेली कत्तल, शायानांची कत्तल किंवा सँड क्रीकची लढाई ही २९ नोव्हेंबर, इ.स. १८६४ रोजी अमेरिकेच्या कॉलोराडो प्रदेशात (आताचे कॉलोराडो राज्य) घडलेली कत्तल होती. अमेरिकन इंडियन युद्ध या युद्धांतर्गत कॉलोराडो प्रदेशातील ७०० सैनिकांच्या स्थानिक शिबंदीने जनरल जॉन चिव्हिंग्टनच्या नेतृत्वाखाली नैऋत्य कॉलोराडोत असलेल्या शायान आणि अरापाहो लोकांच्या वस्तीवर हल्ला चढवला. पहाटेच्या वेळी निःशस्त्र असलेल्या या वस्तीत मुख्यत्वे लहान मुले, स्त्रीया आणि वृद्ध पुरुष होते. युद्धाच्या संपूर्ण तयारीत आलेल्या कॉलोराडो शिबंदीने अंदाधुंद हल्ला चढवला व अनेक व्यक्तींची कत्तल केली. विविध अंदाजांनुसार यात ७०-१६३ लोक मृत्युमुखी पडले.[१] +या हल्ल्यात शामिल तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी सायलस सोल आणि जोसेफ क्रेमर या नेत्यांनी आपापल्या तुकड्यांना हल्ला न करण्याचे फर्मावले होते. या दोन तुकड्या जेथे होत्या तेथून अनेक शायान व अरापाहोंनी पळ काढला व स्वतःला वाचवले. +अतोनात क्रुरपणे झालेल्या हल्ल्याची चौकशी झाल्यावर त्यावेळच्या कॉलोराडोच्या गव्हर्नर जॉन एव्हान्सला राजीनामा द्यायला लागला. चिव्हिंग्टनने लश्करातून राजीनामा दिलेला असल्याने त्याच्यावर लश्करी न्यायालयात खटला चालवता आला नाही. चिव्हिंग्टनला त्यावेळच्या कॉलोराडो प्रदेशातील काही भागांत आदराची तर इतर भागांत तुच्छतेची वागणूक दिली गेली. खटल्यामध्ये चिव्हिंग्टनविरुद्ध साक्ष दिल्याबद्दल सायलस सोलची काही आठवड्यांनंतर हत्या झाली. +ही कत्तल झालेले ठिकाण आताच्या कायोवा काउंटीमध्ये आहे. या ठिकाणाला राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9264.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd308d00f4f268a2d6821c94e896dc48f692ce4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9264.txt @@ -0,0 +1 @@ +अलेक्झांडर जॉन सँडी बेल (१५ एप्रिल, १९०६:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका - १ ऑगस्ट, १९८५:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२८ ते १९३५ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9270.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d911b423a2fcedf3216990d97ca8b41664712143 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9270.txt @@ -0,0 +1,2 @@ +सँड्रा बुलक (इंग्लिश: Sandra Bullock; २६ जुलै १९६४) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८७ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी बुलक हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. १९९४ सालच्या स्पीड ह्या लोकप्रिय चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बुलक प्रकाशझोतात आली. २००९ सालच्या द ब्लाइंड साईड ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. +२०१५ साली पीपल्स ह्या नियतकालिकाने बुलक हिला जगातील सर्वात सुंदर स्त्री असा किताब दिला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9275.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d911b423a2fcedf3216990d97ca8b41664712143 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9275.txt @@ -0,0 +1,2 @@ +सँड्रा बुलक (इंग्लिश: Sandra Bullock; २६ जुलै १९६४) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८७ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी बुलक हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. १९९४ सालच्या स्पीड ह्या लोकप्रिय चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बुलक प्रकाशझोतात आली. २००९ सालच्या द ब्लाइंड साईड ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. +२०१५ साली पीपल्स ह्या नियतकालिकाने बुलक हिला जगातील सर्वात सुंदर स्त्री असा किताब दिला. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9277.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6abfc74e9165102c8cb13a9ef53736f85a3e992d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9277.txt @@ -0,0 +1,4 @@ +सँड्स पॅरिश (/sændz/ "sands") बर्मुडाच्या नऊ परगण्यांपैकी एक आहे. हे नाव इंग्रजी कुलीन सर एडविन सँडिस (१५६१-१६२९) यांच्यासाठी ठेवण्यात आले आहे, आणि म्हणून नावात कोणताही धर्मबोध नाही. +हे बेट साखळीच बेटाच्या नैऋत्येस स्थित आहे, आयर्लंड बेट, बोअझ बेट आणि मोठे सॉमरसेट बेट तसेच बर्मुडा बेटाच्या मुख्य बेटाचा एक छोटासा भाग व्यापलेले आहे. ही बेटे ग्रेट साउंडचा पश्चिम किनारा बनवतात, पाण्याचा मोठा विस्तार जो पश्चिम बर्म्युडाच्या भूगोलावर वर्चस्व गाजवतो, जिथे ते साउथहॅम्प्टन पॅरिशमध्ये जोडलेले आहे. बर्म्युडातील इतर परगण्यांप्रमाणे, ते २.३ चौरस मैल (सुमारे ६.० किमी2 किंवा १५०० एकर) व्यापते. २०१६ मध्ये त्याची लोकसंख्या ६,९८३ होती.[१] +सँडीजमधील नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये एली हार्बर, कॅथेड्रल रॉक्स, डॅनियल हेड आणि मॅन्ग्रोव्ह बे यांचा समावेश आहे. +सँडीच्या इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये मुख्य भूभागाला सॉमरसेट बेटाशी जोडणारा सॉमरसेट ब्रिज आणि आयर्लंड बेटावरील जुने रॉयल नेव्हल डॉकयार्ड यांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9292.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..716daa0017d5f027734e6adacc2159693770d93f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9292.txt @@ -0,0 +1,7 @@ + +पॉंइंटिंग, म्हणजे बोट दाखवणे हा खरे तर मनुष्याचा स्वभाव आहे. पॉंइंटिंग उपकरणे ही सिस्टीम युनिटमधल्या हव्या त्या बिंदूवर जाऊन निवडलेल्या मेंन्यूच इनपुटमध्ये रूपांतर करतात. माऊस, जॉयस्टीक, तच स्क्रीन, लाइट पेन आणि स्टायलस असे पॉंइंटिंग उपकरणांचे प्रकार आहेत. +मॉनिटरवर दिसणाऱ्या पॉंइंटरवर माऊस नियंत्रण ठेवतो. माऊस पॉंइंटर साधारणपणे बाणाच्या आकाराचा असतो. ज्या प्रकारच्या ॲप्लिकेशन चालू असेल, त्यानुसार माऊसचा आकार बदलतो. माऊसला एक, दोन किंवा त्याहूनही अधिक बटणे असू शकतात. या बटणांचा उपयोग कमांड पर्याय निवडण्यासाठी आणि मॉनिटरवर माऊसचा पॉंइंटर नियंत्रित करण्यासाठी होतो. काही माऊसना व्हील बटण असते. मॉनिटरवर माहिती बघताना, वर-खालच्या पानांवर जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माऊसचे निरनिराळे प्रकार आहेत. तीन मूलभूत प्रकार याप्रमाणे. +ऑप्टिकल माऊसमध्ये फिरणारा भाग नसतो. हा सध्या सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. माऊसबाहेर पडणारा प्रकाश माऊसच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. ऑप्टिकल माऊस कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर वापरता येतो. +या माऊसच्या तळाशी गोलाकार फिरणारा चेंडू असतो. तो वायरने सिस्टीम युनिटला जोडलेला असतो. मऊ, सरळ पृष्ठभाग किंवा माऊस पॅडवरून माऊस फिरवला कि रोलर चेंडू फिरतो आणि मॉनिटरवरचा पॉंइंटर नियंत्रित केला जातो. +या प्रकारचा माऊस बॅटरीवर चालतो. सिस्टीम युनिटशी संपर्क साधण्यासाठी कॉर्डलेस माऊस हा रेडीओ लहरी किंवा इन्फ्रारेड लहरींचा उपयोग करतो. या माऊसला वायरची गरज नसल्यामुळे डेस्कवर मोकळी जागा उरते. +टच सरफेस, आणि पॉंइंटिंग स्टिक ही तीन उपकरणहि माऊससारखीच आहेत. ट्रॅकबॉल्सला रोलरबॉल देखील म्हणतात. बोटांनी कीबोर्डच्या लहान चेंडू फिरवून पॉंइंटर नियंत्रित करता येते. टच सरफेस किंवा टचपॅडच्या पृष्ठभागावर बोट फिरवून किंवा दाबून पॉंइंटर नियंत्रित करता येतो. कीबोर्डमध्ये असलेली पॉंइंटिंग स्टिक बोटांनी हलवून पॉंइंटर नियंत्रण करता येते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9339.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10431b6d41c11fa79cb97536301ca66aa6031ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9339.txt @@ -0,0 +1,11 @@ +संगणक आज सगळयात जास्त वापरले जाणारे उपकरण आहे. एवढे आधुनिक यंत्र असुनसुद्धा याची सुरुवात मात्र अतिशय साध्या पद्धतीने झाली. बेरीज वजाबाकी तसेच सोपी गणिते सोडविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या व यंत्रांचा वापर करता करता संगणकाचा शोध लागला व मागील काही वर्षात या क्षेत्रात प्रचंड संशोधन झाले आहे. संगणक विविध औद्योगिक आणि ग्राहक उपकरणांसाठी नियंत्रण प्रणाली म्हणून वापरले जातात. यात मायक्रोवेव्ह ओव्हन आणि रिमोट कंट्रोल्स, औद्योगिक रोबोट्स आणि संगणक-सहाय्यित डिझाइनसारखी फॅक्टरी उपकरणे आणि वैयक्तिक संगणक आणि स्मार्टफोन सारख्या मोबाइल डिव्हाइससारख्या सामान्य हेतूची साधने यासारख्या खास साधनांचा समावेश आहे. +संगणकांचा इतिहास हा विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, उद्योग व्यवसाय आणि राज्य सरकारे या सगळ्यांचा कसा घनिष्ठ परस्पर संबंध असू शकतो आणि यातून राष्ट्रांना व्यापार आणि युद्धात उपयुक्त अशी साधने कशी निर्माण होतात हे दाखवतो. अणुबॉम्ब प्रमाणेच संगणक या विषयाची सुरुवात जॉर्ज बूलच्या गणित व तर्कशास्त्रातल्या मूलभूत संशोधनातून झाली. नेहमीच्या बीजगणितात बेरीज आणि गुणाकारातून आकडेमोड केली जाते. बुलियन बीजगणितात हे खरे आहे की खोटे हे पडताळले जाते व जोड (अ आणि ब), पर्याय (अ किंवा ब), आणि नकार (अ नाही) अशी विधाने वापरत निष्कर्ष काढले जातात. या तर्ककृतीच्या आधारावर सर्व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि सगळ्या कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या भाषा विकसित झाल्या आहेत. १९३६ मध्ये इंग्रज गणितज्ञ अॅलन टूरिंगने लंडनच्या गणितज्ञांसमोर एखादे विधान तर्कशास्त्रीय गृहीतकांतून नेटकेपणे ठरवलेल्या टप्प्याटप्प्यांच्या कृतीक्रमातून सिद्ध करता येते का हा प्रश्न उपस्थित केला. टूरिंगने सुचवले की कोणताही गणनीय क्रम ठराविक टप्प्याटप्प्यांनी निश्चित करणारे एक यंत्र बनवता येईल. या कल्पना सृष्टीतल्या यंत्राच्या आधारावरच आजचे प्रत्यक्ष संगणक बनवलेले आहेत. या गणिती कामाला चार्ल्स बॅबेजने (१७९१-१८७१) डिफरन्स आणि अॅनॅलिटिकल इंजिन हे उपकरण बनवून जोड दिली. पण जगातला पहिला इलेक्ट्रो मेकॅनिकल कम्प्युटर बनवणाऱ्या जर्मन कॉनराड झूसने टुरिंगची परिपूर्ण रचना वापरून प्रोग्रामच्या द्वारे काम करणारा पहीला कम्प्युटर मे १९४१ मध्ये तयार केला. १९४३ ते ४५ च्या दरम्यान त्याने प्लानकॅल्क्युल ही जगातली पहिली कम्प्युटर प्रोग्रॅमिंग भाषा निर्माण केली. हार्वर्ड विद्यापीठातून १९३९ मध्ये भौतिकशास्त्रात पीएचडी केलेल्या हॉवर्ड ऐकेनने चार्ल्स बॅबेजच्या डिफरन्स इंजिन पासून स्फूर्ती घेऊन त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतल्या झूसहून स्वतंत्रपणे इलेक्ट्रो मेकॅनिकल कम्प्युटरची संकल्पना विकसित केली. त्यासाठी पैशांची तरतूद अभियांत्रिकी काम आणि प्रत्यक्ष बांधणी आयबीएम कंपनीने केली. १९४४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात हा संगणक बसवला गेला आणि हार्वर्डच्या अध्यापकांनी याला मार्क १ असे नाव दिले. या संगणकावर अगदी सुरुवातीला अमेरिकेच्या अणुबॉम्ब प्रकल्पासाठी बॉम्ब फोडायला अंतरस्फोटाचा वापर करता येईल का याची आकडेमोड करणारा प्रोग्रॅम चालवला गेला.[१] +चार्ल्स बॅबेज असे म्हणू शकतो की पहिला संगणक ॲबॅकस किंवा त्याचे वंशज, स्लाइड नियम, याचे शोध १६२२ मध्ये विलियम Oughtred यांनी केले. परंतु आजच्या आधुनिक यंत्रांसारखे सदैव पहिले संगणक होते ॲनालिटिकल इंजिन, हे १८३३ ते १८७१ च्या सुमारास ब्रिटिश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या आणि बनविलेले एक साधन होते. इंग्रजी यांत्रिक अभियंता आणि पॉलीमॅथ चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्रामेबल कॉम्प्यूटरची संकल्पना निर्माण केली. १९व्या शतकात चार्ल्स बॅबोस यांनी पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध लावला अथवा पहिला संगणक तयार केला जो आजच्या संगणकाचा पाया होता, म्हणून चार्ल्स बॉबोस यांनी संगणकाचा शोध लावला असे म्हंटले जाते. क्लिफोर्ड बेरी याने एका वर्षात, म्हणजे १९३८ साली त्यांनी २००० निर्वात नलिकांचा उपयोग करून पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक बनवला.हा कॉम्प्युटर खूप गरम व्हायचा +हावर्ड विद्यापिठाच्या होवार्ड आयकेन यांनी १९४४ मध्ये संगणक तयार केला. यात द्विमान पद्धतीचा वापर केला होता. १९४३ साली प्रेस्पेर एक्केर्ट आणि जॉन माउश्ले, यांनी अमेरिकन सैन्यासाठी अचूक गणित करणाऱ्या संगणकाची निर्मिती १९४६ साली केली. +सुरुवातीला अ‍ॅबॅकस कार्यासाठी वापरला जात असे. रोमन अ‍ॅबॅकस २४०० ईसापूर्व पर्यंत बॅबिलोनियामध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमधून विकसित केला गेला. तेव्हापासून, हिशोब करणारे बोर्ड किंवा सारण्यांचे इतर बरेच प्रकार शोधण्यात आले आहेत. तसेच खगोलशास्त्री गणना आणि मोजमाप करण्यासाठी बरेच यांत्रिक उपकरण तयार केले गेले. आउटपुटसाठी मशीनमध्ये एक प्रिंटर, कर्व्ह प्लॅाटर आणि एक घंटा होती. +इंग्रजी मेकॅनिकल अभियंता चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्राम करण्यायोग्य संगणकाची संकल्पना निर्माण केली. ते "संगणकाचा जनक" मानले जातात. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी पहिला यांत्रिक संगणक शोधला. प्रोग्राम आणि डेटाचे इनपुट मशीनला पंच कार्डद्वारे प्रदान केले जायचे. हे यंत्र त्याच्या वेळेच्या जवळपास एक शतक पुढे होते. त्याचे सर्व भाग हाताने बनवावे लागले. अखेरीस, हा प्रकल्प ब्रिटिश सरकारच्या निधी थांबविण्याच्या निर्णयाने विलीन झाला. +अ‍ॅलन ट्युरिंग यांनी १९३६ च्या पेपरमध्ये आधुनिक संगणकाचे तत्त्व मांडले होते. ट्युरिंगने एक साधे डिव्हाइस प्रस्तावित केले ज्याला त्याने "युनिव्हर्सल कम्प्यूटिंग मशीन" म्हटले आणि ते आता युनिव्हर्सल ट्युरिंग मशीन म्हणून ओळखले जाते. ट्युरिंगच्या डिझाइनची मूलभूत संकल्पना संग्रहित प्रोग्राम आहे, जेथे संगणनासाठी सर्व सूचना मेमरीमध्ये संग्रहित केल्या जातात. व्हॉन न्यूमन यांनी कबूल केले की आधुनिक संगणकाची मध्यवर्ती संकल्पना या पेपरमुळे होती. आधुनिक संगणकांना ट्युरिंग-पूर्ण म्हटले जाते, म्हणजेच त्यांच्याकडे अल्गोरिदम अंमलबजावणी क्षमता युनिव्हर्सल ट्युरिंग मशीनच्या बरोबरीने असते. +संगणकीय क्षेत्रात नवीन दिशा एकात्मिक सर्किटच्या आगमनाने आली. १९४५ पासून संगणक प्रचंड प्रगती करीत आहेत, आधुनिक एसओसी (जसे की स्नॅपड्रॅगन ८६५) एक नाण्याचे आकार आहेत तर आधीपेक्षा शेकडो पटीने अधिक शक्तिशाली आहेत. ते कोट्यवधी ट्रान्झिस्टर एकत्रित करतात आणि काही वॅट्स शक्ती वापरतात. +प्रोग्रामिंग भाषा संगणकास चालविण्यासाठी विविध मार्ग प्रदान करतात. नैसर्गिक भाषा विपरीत, प्रोग्रामिंग भाषा विकसीत केल्या आहेत ज्यामुळे संदिग्धता येऊ नये. त्या पूर्णपणे लिहिलेल्या भाषा आहेत आणि बऱ्याचदा मोठ्याने वाचणे कठीण आहे. ते एकतर कंपाइलर किंवा चालविण्यापूर्वी असेंबलरद्वारे मशीन कोडमध्ये भाषांतरित केले जातात. अशा हजारो भिन्न प्रोग्रामिंग भाषा आहेत - काही सामान्य उद्देशासाठी आहेत, तर काही केवळ अत्यंत विशिष्ट अनुप्रयोगांसाठी उपयुक्त आहेत. +१९५० च्या दशकापासून संगणकाचा वापर एकाधिक स्थानांमधील समन्वय करण्यासाठी केला जात आहे. १९७० च्या दशकात, संपूर्ण अमेरिकेतील संशोधन संस्थांमधील संगणक अभियंत्यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या संगणकांना जोडण्यास सुरुवात केली. कालांतराने हे नेटवर्क शैक्षणिक आणि सैन्य संस्थांच्या पलीकडे पसरले आणि इंटरनेट म्हणून ओळखले जाऊ लागले. नेटवर्किंगच्या उदयामध्ये संगणकाच्या स्वरूपाची आणि त्याच्या सीमांची परिभाषा बदलून जाते. माहिती आणि संवाद साधण्यासाठी पर्सनल कॉम्प्युटरचे बरेच मोठे जाळे इंटरनेटशी नियमितपणे कनेक्ट असते. +शिकणारे आणि परिस्थितीशी जुळणारे संगणक प्रोग्राम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख क्षेत्राचा भाग आहेत. नाझी मशीन एनिग्मा नंतर आणि मित्र राष्ट्र दलांना द्वितीय विश्वयुद्ध जिंकण्यास मदत केल्याच्या दशकाहूनही कमी काळानंतर गणितज्ञ अ‍ॅलन ट्युरिंगने दुसऱ्या वेळी एका साध्या प्रश्नासह इतिहास बदलला: "मशीन्स विचार करू शकतात का?". कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्तृत उद्दीष्टाने बऱ्याच प्रश्न आणि वादविवादांना जन्म दिला आहे. इतके की, क्षेत्राची कोणतीही एकल परिभाषा सार्वत्रिकरित्या स्वीकारली जात नाही. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9360.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9360.txt @@ -0,0 +1,29 @@ + +सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता. +सातारा जिल्ह्यातील नद्या +कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते. +सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. +सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते. +● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. +● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. +● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. +● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. +● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. +● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. +१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो. +२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे. +३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे. +४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे. +५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. +साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. +छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती +  +सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत +सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत +'वेण्णानगर +संगमनगर- +गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले. +सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. +यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. +सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे. +सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9362.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69d1074c7641b0ab4508184f448bdb417dedacf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9362.txt @@ -0,0 +1,2 @@ +संगमनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9394.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30a11ad549bb95e590f5da31d7b8a8e8e7034f06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9394.txt @@ -0,0 +1 @@ +संगारेड्डी हे भारताच्या तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ६५ किमी वायव्येस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ७२,१२६ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9415.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52853ad3d9b1d291248554d18b0b2b45f0b345f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9415.txt @@ -0,0 +1,3 @@ + +या नाटकाचा आरंभ विदूषक आणि नटी यांच्या स्तुती वचनांनी होतो. या स्तवन वचनात द्रौपदीला लक्ष्मी व आदिशक्तीची उपमा दिली आहे.🔥 +या नाटकात राजसूय यज्ञ, दुर्योधनाची फजिती, द्यूत व वस्त्रहरण या प्रसंगांचा समावेश आहे. महाभारताच्या मूळ कथानकाला धक्का न लावता, फक्त त्यात थोडेफार केले आहेत. अग्निशिखा, बुद्धिमान व राजनीतीची उत्तम जाण असणाऱ्या द्रौपदीला वेगळेच रेखाटले आहे.तिला भोळ्याभाबड्या स्त्री रूपात चित्रित केले आहे. -Nikita patil diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9420.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21170196da83cf2d0c1672c50dc4d2d72acca38a --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9420.txt @@ -0,0 +1,18 @@ + + + +संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. सन २००३पासून, या पुरस्काराचे स्वरूप ५०,००० रुपये रोख, एक मानपत्र, एक शाल व एक ताम्रपत्र असे आहे. संगीत,नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय व कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार आहेत. उदयोन्मुख कलावंतांपैकी काहींना शिष्यवृत्ती दिली जाते. +====Creative संगीत====[मराठी शब्द सुचवा] +(अपूर्ण यादी) +मल्याळम +मणिपुरी +ओरीया +संस्कृत +तमिळ +तेलुगू +उर्दु +Mime +Punjabi +Tamil +यक्षगान) 2007 +संगीत नाटक अकादमीचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-04-16 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9437.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7370818018afa6ded031f53fd7730bb3a2f46431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9437.txt @@ -0,0 +1,3 @@ +सं. स्वयंवर हे नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी संगीत नाटक आहे. तसेच या नाटकाचे संगीत दिग्दर्शन श्री भास्करबुवा बखले यांनी केले आहे.भास्करबुवा +बखले यांना 'देवगंधर्व'ही उपाधी बहाल केलेली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १० डिसेंबर, १९१६ रोजी मुंबई येथे झाला. या प्रयोगात रुक्मिणीची भूमिका बालगंधर्वांनी केली होती, तर गणपतराव बोडस कृष्णाच्या व रघुवीर सावरकर हे महाराणीच्या भूमिकेत होते. या नाटकासाठी भरजरी शालू, सोन्याचे दागिने तसेच पॅरिसहून मागवलेले अत्तर वापरण्यात आले होते. या नाटकात २५हून अधिक गीते होती. +संगीत स्वयंवर या नाटकाचे मुख्य कथानक हे देवी रुक्मिणी व श्री कृष्णाच्या लग्नावर(स्वयंवर) आधारित आहे. यामध्ये श्री कृष्णाला कधीही न पहिलेली रुक्मिणी श्री कृष्णाच्या केवळ केलेल्या रूपाच्या वर्णनावर श्री कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडून जाते.आणि श्रीकृष्णा बरोबर च लग्न करण्याचा निश्चिय करते. श्री कृष्णाने केलेल्या कंस वधाने रुक्मिणी चा भाऊ रुक्मी हा श्री कृष्णावर प्रचंड संतापून श्री कृष्णाच्या वधासाठी सुडाने संतापलेला असतो.त्यामुळे रुक्मिणी चा विवाह हा रुक्मी चा परम मित्र शिशुपाल याच्याशी च लावून देण्याच वचन रुक्मि णे शिशुपाला ला दिलेला असत. श्री कृष्णाच्या यादव कुळाने १७ वेळा युद्ध करून शिशुपाला च्या सेनेला युद्धात धूळ चारून पराजय केलेला असतो. रुक्मिणी चा शिशुपाल सोबत होणारा विवाह रोखण्यासाठी श्री कृष्णाने केलेले नाटक व झालेला संघर्ष तसेच रुक्मिणीचा श्री कृष्णाच्या प्रेमासाठी केलेले प्रयत्न या नाटकामध्ये कथानक केले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9449.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84709916c5001cb53a7da0ba814511ce1ad805dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9449.txt @@ -0,0 +1 @@ +संगीता कुमारी सिंग देव हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9487.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24126219b5fda5db2d804ffe993bf0b12488b479 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9487.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर (एम्. टेक.) +भारतीय सांख्यिकी शास्त्र (पीएच्. डी.) +न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ, सिडनी (पोस्टडॉक) +टेक्सास विद्यापीठ, अर्लिंग्टन +इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटीकल फिजिक्स, इटली +संघमित्रा बंडोपाध्याय (जन्म 1968) एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी संगणकीय जीवशास्त्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथे प्राध्यापिका असून, त्या २०१० साठी अभियांत्रिकी विज्ञानातील शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या तसेच अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीतील इन्फोसिस पारितोषिक २०१७ च्या विजेत्या आहेत. [१][२] त्यांचे प्रामुख्याने उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग आणि बायोइन्फॉरमॅटिक्स या क्षेत्रात संशोधन केले आहे. [३] +१ ऑगस्ट २०१५ पासून, त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालिका आहेत, आणि त्या संस्थेच्या कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व पाच केंद्रांच्या कामकाजावर देखरेख करतात, तसेच भारतभर पसरलेल्या इतर अनेक सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन रिसर्च युनिट्सचे काम पाहतात.[४] भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या त्या पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर आहेत. +संघमित्रा बंदोपाध्याय यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून भौतिकशास्त्रात विज्ञानाची पदवी प्राप्त करण्यापूर्वी १९९२मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयातून संगणक विज्ञान विषयात (तंत्रज्ञानाची) दुसरी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था येथे मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यापूर्वी, १९९८ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर येथे पीएच्.डी प्राप्त केली.[५] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9491.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cda02ce4e4052b2921d2ecf4ac93aae57c9719f --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9491.txt @@ -0,0 +1 @@ +फेडरेशन वर्सेस फ्रिडम (इंग्लिश: Federation Versus Freedom; मराठी: संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_951.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d794c598773734cbe17923a0a09b97e100f8350 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_951.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा विल्हेल्म (जर्मन: Wilhelm II), जन्मनाव फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट फॉन प्रॉयसेन (जर्मन: Friedrich Wilhelm Viktor Albrecht von Preußen, प्रशियाचा फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट) (२७ जानेवारी, इ.स. १८५९ ; बर्लिन, प्रशिया - ४ जून, इ.स. १९४१ ; डूर्न, नेदरलँड्स) हा प्रशियाचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9533.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7fc983d29a58f4c4c5591c0d9afd86821ddfff9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9533.txt @@ -0,0 +1 @@ +संजय चंदूकाका जगताप मराठी राजकारणी आहेत. हे पुरंदर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9549.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bf567a60f24a2dc1a58097bcb9c784e972d9d0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9549.txt @@ -0,0 +1 @@ +संजय शिरसाट मराठी राजकारणी आहेत. हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9559.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74a1a1fb686e89a9b29040f61f2649687b776d31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9559.txt @@ -0,0 +1 @@ +संजय भाटिया हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9588.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb12002c42ca1e97c0b6412d91307aae02afb929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9588.txt @@ -0,0 +1 @@ +संजय विठ्ठल शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे करमाळा मतदारसंघातूनअपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_959.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e885a8df2fd4ec5fff71ec5dfaab9531b36d9ca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_959.txt @@ -0,0 +1,26 @@ +विल्हेल्म वियेन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9598.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4822cdbb9e71aa8ab98187a7eab2a5d2213cbf96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9598.txt @@ -0,0 +1,2 @@ +संजयनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_96.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_96.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a16c330e30a1ce65814f4f3eb244497ee61eecda --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_96.txt @@ -0,0 +1,6 @@ +विनअँप (Winamp) ही एक एमपी३ संगीताच्या निरनिराळ्या प्रकारच्या फाईल्स वाजवू शकणारी प्रणाली (प्रोग्राम) आहे. +ही प्रणाली कुणालाही विनामूल्य स्वरूपात उपलब्ध आहे. +याचा विकास नलसॉफ्ट (Nullsoft) नावाच्या कंपनीने बनवली आहे. आता ही कंपनी टाईम वॉर्नरच्या ताब्यात आहे.सगळ्यात पहिल्यांदा जस्टीन फ्रँकेल (Justin Frankel) ने इ.स. १९९७ साली ही प्रणाली वितरीत केली. ही प्रणाली इ.स. २००५ साली ५७ दशलक्ष लोक वापरत होते. +संगणकावरील मनोरंजनाचे प्राथमिक साधन म्हणून जगभरातील संगणकांवर सलग पंधरा वर्षे उपलब्ध असणारे हे साॅफ्टवेअर २० डिसेंबर, इ.स. २०१३नंतर कायमचे बंद करण्याचा निर्णय विनअँपने घेतला आहे. यानंतर याची कोणतीही आवृत्ती डाऊनलोड करता येणार नाही. +या प्रणालीची त्वचा बदलता येते. हा बदल करणे सोपे असते तसेच आंतरजाला वरही अनेक त्वचा उपलब्ध आहेत. +या प्रणालीवर अजून काही सुवीधा देवू शकतील अश्या अनेक जोड प्रणाल्याही विकसित झाल्या आहेत. जसे डायरेक्ट साऊंड (DirectSound), व्हिज्युअलायझेशन Visualization तसेच गजराचे घड्याळ, गाण्याची यादी इत्यादी. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9640.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa59877ef11f65a4f46af71d870c1afe97040e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9640.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +संजीवन हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9650.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4259ba20b310dc62be4560119f269cac8b66f065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9650.txt @@ -0,0 +1 @@ +संजीवनी भेलंडे ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पार्श्वगायिका आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9663.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9328df09eec35099e55b77e458f93c6777b297cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9663.txt @@ -0,0 +1,3 @@ + +नाम व नामाचे प्रकार +एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात.हा [१] एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.नाम असे शब्द आहेत जे लेख आणि गुणविशेषण विशेषणांसह उद्भवू शकतात आणि संज्ञा वाक्यांशाचे प्रमुख म्हणून कार्य करू शकतात. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9665.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eebd19a00549d9a1dbff8132eeebeef8022f4253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9665.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की,त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. वाचकांचा व अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये;म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना " संज्ञा कोश " (Thesaurus) असे म्हणतात. +संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो.त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व मनोरंजनही होते. +[१] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_967.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3dddc4e05916def7db79391aaf72af96986582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_967.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्हेल्म कार्ल जोसेफ किलिंग (१० मे, इ.स. १८४७ - ११ फेब्रुवारी, इ.स. १९२३) हा जर्मन गणितज्ञ होता. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9677.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba98b7355df48ec7d066752b320f6e4ea5b1df67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9677.txt @@ -0,0 +1,18 @@ +कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] संत कबीर यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पूर्णिमा इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.[२] +महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते. +[३] +खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित "कबीर सागर" ग्रंथातील मजकूर :- +ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवरकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली, आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ/सबसे बडा. पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले, आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले +कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले [२] +"सकल जनम शिवपुरी गंवाया। +मरती बार मगहर उठि आया।" +त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. +हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.[४][५] +भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.[६] +·        संत कबीर : आधुनिक संदर्भ +·       संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील समाजप्रबोधनात्मक जाणिवांचा तुलनात्मक अभ्यास +·         संत कबीरांच्या दोह्यामधून प्रतिबिंबित होणाऱ्या मुल्याधिष्ठित अनोचारिक शिक्षणाचा अभ्यास +८.दोहे, हिंदी गीत, कुंडलियाँ ,रचनाएँ, बालगीत, ग़ज़ल, हायकू, मुक्तक-RAJPAL SINGH GULIA Archived 2021-10-26 at the Wayback Machine. +https://www.rajpalsinghgulia.com/?m=1 Archived 2021-10-26 at the Wayback Machine. +७. संत कबीर यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक : ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, विडीओज, माहिती स्रोत + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9699.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed6d58c67f7aee92d33d4d19eaff2c43c55b617e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9699.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ हे येशूचे पालक वडील व मरीयाचे पती होते. त्यांची कॅथोलिक चर्च, ऑर्थोडॉक्स चर्च, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन लिबरेशन चर्च, लुथेरनझिझमध्ये 'सेंट जोसेफ' या नावाने पूजा केली जाते. +कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन संप्रदायामध्ये, योसेफ कामगारांच्या आश्रयदाता संत म्हणून ओळखले जाते आणि विविध मेजवानी दिवस संबंधित आहे. पोप पायस नववाने त्याला कॅथोलिक चर्च ऑफ संरक्षक आणि रक्षक दोन्ही घोषित केले आहे. तो येशू आणि मेरी उपस्थितीत मृत्यू झाला की विश्वास झाल्यामुळे आजारी आणि एक आनंदी मृत्यू त्याच्या संरक्षण व्यतिरिक्त असे घोषित लोकप्रिय धार्मिकता मध्ये केले आहे. योसेफ पूर्वजांसाठी एक मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि विविध धर्मप्रांत आणि ठिकाणे संरक्षक बनले आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9717.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946e4402353dbd4bf2e09597fce89dd23555dfad --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9717.txt @@ -0,0 +1,5 @@ +नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री केदारनाथाचे(ज्योतिबाचे) भक्त होते.देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता. +जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी साळुंखे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे. +श्री ज्योतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर कराडजवळच्या किवळ येथील संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. +नावजीनाथाचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.त्यांनी गावात तळे,विहीर,विठ्ठ्ल ,मारुती मंदिर,ग्रामपंचायत कट्टा,मुस्लिम समाजासाठी मशिद ही कामे केली. + diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9738.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd7bffa24af42bcde6af4142f6e98657b353589 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9738.txt @@ -0,0 +1,79 @@ +संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. +त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[१] [२] [३] +ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते. +वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले. +महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे. +ते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले. +महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय' व `संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत. +संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे. +https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761 +ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक +या ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.[४] +जागतिक ऑनलाइन लायब्ररी कॅटलॉग मध्ये संत महिपती महाराज यांची ग्रंथ संपदा व नोंदी" +ओसीएलसी (ऑनलाइन संगणक ग्रंथालय केंद्र) ऑनलाइन कॅटलॉग, +ऑनलाइन जागतिक ग्रंथालयात संत महिपती महाराज यांच्या भक्ती साहित्यावर उपलब्ध इंग्रजी,मराठी,हिंदी व इतर भाषेतील ग्रंथ सूची नोंद व लिंक देण्यात आली आहे. +महापती 1715-1790 +Mahīpati 1715-1790 +Overview +Works: 70 works in 195 publications in 4 languages and 895 library holdings +Genres: Biographies Legends Poetry +Roles: Author, Editor +Classifications: PK2404, 891.46 +Most widely held works by Mahīpati +The life of Eknāth = Śrī Eknāth charitra by Mahīpati( Book ) +26 editions published between 1846 and 1993 in English and Marathi and held by 160 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints : translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book ) +27 editions published between 1806 and 2014 in 3 languages and held by 112 WorldCat member libraries worldwide +Eknath : a translation from the Bhaktalilamrita by Mahīpati( Book ) +7 editions published in 1927 in English and held by 77 WorldCat member libraries worldwide +Tukaram; translation from Mahipati's Bhaktalilamrita, chapters 25-40 by Mahīpati( Book ) +5 editions published in 1930 in English and held by 74 WorldCat member libraries worldwide +Bhanudas; translated from Mahipati's Bhaktavijaya, chapters 42 & 43, with Marathi text in appendix by Mahīpati( Book ) +8 editions published between 1926 and 1930 in English and held by 73 WorldCat member libraries worldwide +Rāmdās, translation of Mahipati's Santavijaya by Mahīpati( Book ) +5 editions published in 1932 in English and held by 53 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints : an English translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book ) +12 editions published between 1933 and 1982 in English and held by 43 WorldCat member libraries worldwide +Tales of the saints of Pandharpur by Mahīpati( Book ) +5 editions published between 1919 and 1927 in English and held by 39 WorldCat member libraries worldwide +Nectar from Indian Saints; an English translation of Mahīpati's Marāthī Bhaktalīlāmrit, chapters 1-12, 41-51 by Mahīpati( Book ) +7 editions published in 1935 in English and held by 34 WorldCat member libraries worldwide +Indian saints by Mahīpati( Book ) +5 editions published in 1988 in English and held by 27 WorldCat member libraries worldwide +Life of Tukaram by Mahīpati( Book ) +7 editions published between 1980 and 1986 in English and held by 20 WorldCat member libraries worldwide +Śrībhakta vijaya by Mahīpati( Book ) +2 editions published in 1974 in Marathi and Hindi and held by 15 WorldCat member libraries worldwide +Verse hagiographies of Hindu saints +Bhanudas, the poet-saint of Maharashtra : translation from the Bhaktivijaya by Mahīpati( Book ) +1 edition published in 1996 in English and held by 14 WorldCat member libraries worldwide +Rāmdās by Mahīpati( Book ) +3 editions published in 1932 in English and Undetermined and held by 10 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints by Mahīpati( Book ) +7 editions published between 1982 and 1996 in English and held by 10 WorldCat member libraries worldwide +Santāñcyā caritrakathā; prācīna marāṭhīntīla santacaritrapara vāṅmayācẽ darśana by Mahīpati( Book ) +2 editions published in 1967 in Marathi and held by 10 WorldCat member libraries worldwide +Śrī Paktavijayuttuḷ on̲r̲ākiya Śrīmat-Tukkārām Svāmikaḷ carittiram : Śrīharināma Stōttirappā saṅkīrttan̲am by Mahīpati( ) +2 editions published in 1911 in Tamil and held by 10 WorldCat member libraries worldwide +Sri Bhaktivijaya [57 lives of the Marathi poet saints by Mahīpati( ) +2 editions published in 1904 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide +Tukaram : the poet saint of Maharashtra by Mahīpati( Book ) +2 editions published in 1996 in English and held by 9 WorldCat member libraries worldwide +Santāñcyā caritrakathā by Mahīpati( Book ) +3 editions published in 1967 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide +(संकलन- विजय प्रभाकर नगरकर,ताहाराबादकर ) +http://www.worldcat.org/identities/lccn-n83046237/ +संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश +श्रीक्षेत्र पंढरपुर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपुर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करून ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे. +या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत. + +इ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणाऱ्या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे. + +पुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे. +विजय प्रभाकर नगरकर यांनी 'सचित्र संत महिपती ताहराबादकर' पुस्तक पॉन्डिचेरी येथील बुक मीडिया प्रकाशका मार्फत प्रसिद्ध केले आहे. +https://www.amazon.in/dp/8194913705/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_N1A1YYXB5QJ5G5KEKPVG +श्री संत महिपती कृपा ब्लॉग] + + +संत महिपती कृपा ब्लॉग +http://mahipatikrupa.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1 diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9748.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6091964ab9fcd5891d39214e9b55d79391dba9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9748.txt @@ -0,0 +1,16 @@ +महान हिंदू संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १३७७ मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. +रविदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते.[१][२] रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.[३][४] +गुरू ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता.[५] हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंच वाणी मजकुरामध्ये रविदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.[६] +रविदास यांचा जन्म वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला आहे. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम.[७] त्यांचे पालक चामड्याचे काम करीत. त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. +रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला. + +विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनांपैकी एक असलेला अनंतदास परचाईचा हा मजकूर रविदासच्या जन्माची ओळख करून देतो. +बनारस शहरामध्ये, कोणत्याही वाईट गोष्टी कधीही पुरुषांना भेट देत नाहीत.जो कोणी मरण पावला तो नरकात जात नाही, स्वतः शंकर राम या नावाने येतो.जेथे श्रुती आणि स्मृती यांचा अधिकार आहे, तिथे रविदासांचाचा पुनर्जन्म झाला,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्याने परमात्म्याचे सगुण (गुणधर्म, प्रतिमेसह) सोडून दिले आणि निर्गुण (गुणधर्मांशिवाय, अमूर्त) परमात्म्यांच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित केले. +बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रविदास शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या ४१ कवितांचा आदि ग्रंथात समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रमाणित स्रोत आहेत. रविदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध.[८] १६९३ मध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर १५० वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकूरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. रवीदासांच्या जीवनाविषयी इतर बहुतेक लेखी स्रोत, शीख परंपरा आणि हिंदू दाद्रपंथी परंपरेचे ग्रंथ, २० व्या शतकाच्या सुरुवातीस किंवा सुमारे ४०० वर्षांनंतर तयार केले गेले होते. +[९] विन्नंद कॉलवेर्टने नमूद केले आहे की रविदासांवर अनंतदास यांच्या संतचरित्राच्या 30 हस्तलिखिते भारताच्या विविध भागात सापडली आहेत.[१०] +१. वेद धर्म सबसे बडा अनुपम सच्चा ज्ञान। +फिर मै क्यों छोडू इसे, पढलू झूठ कुरान॥ +२. मन चंगा तो कटौती में गंगा॥ +संत रोहिदासांचा मृत्यू चितोडगड येथे इ.स. १५२७ मध्ये झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त कर्मठांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे [११] +शिखांचा आदि ग्रंथ आणि हिंदू योद्धा-तपस्वी गटाचे पंचवानी दादूपंथी हे रविदासांच्या साहित्यकृतींचे दोन प्राचीन साक्षात स्रोत आहेत. आदि ग्रंथात, रविदासांच्या चाळीस कवितांचा समावेश आहे.[१२][१३] रविदासांच्या कवितेत द्वितीय किंवा तृतीय श्रेणी असमान नागरिक, वैराग्याची आवश्यकता आणि खरा योगी अशा विषयांचा समावेश आहे. +पीटर फ्राईडलॅंडर असे म्हणतात की रविदासांच्या मृत्यू नंतरही त्यांचे लिखाण भारतीय समाजात संघर्षाचे आहे, रविदासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9782.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be3863fd56ad14605d9c1757c56859b06d84f204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9782.txt @@ -0,0 +1 @@ +संथाळी ही संथाळ वंशाच्या लोकांची भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते. भारताच्या राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीनुसार संथाळली ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_979.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff0a71ae875dc66f12323256303a2718adad3951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_979.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्हेल्म मार्क्स (जर्मन: Wilhelm Marx; १५ जानेवारी १८६३ (1863-01-15), क्योल्न - +५ ऑगस्ट, १९४६, बॉन) हा जर्मनीचा १७वा व १९वा चान्सेलर होता. तो नोव्हेंबर २३ ते जानेवारी १९२५ दरम्यान व मे १९२६ ते जून १९२८ दरम्यान चान्सेलरपदावर होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_980.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ecb8f4159bfb4704bcc8dda8de8dc475155e11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_980.txt @@ -0,0 +1 @@ +विल्हेल्म रिचर्ड वॅग्नर (मे २२, इ.स. १८१३ - फेब्रुवारी १३, इ.स. १८८३) हा जर्मन संगीतकार होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9805.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011bbe64eaae1e22650a8e99333edf361889f2f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9805.txt @@ -0,0 +1 @@ +संतोष पांडे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9806.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7446d3210ee9fc302063ff76a59142d1ae3a4678 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9806.txt @@ -0,0 +1 @@ +संतोष बांगर हे एक शिवसेनेचे नेते असून ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इ.स. २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत.[१][२] तत्पूर्वी इ.स. २०१७ मध्ये त्यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली होती.[३] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9810.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3555288e7653e3c9e8aedd2a7305d6daa7322a7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9810.txt @@ -0,0 +1,2 @@ +संतोष यादव या एव्हरेस्टवर दोन वेगवेगळ्या आरोहण मार्गाने चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. +कांगशुंग फेस या अवघड चढाई मार्गावरील एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले होते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9820.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55705df5eb63edd1ef278c43f85a9d1f0a5755bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9820.txt @@ -0,0 +1,2 @@ +संतोषनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_986.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..007d8955e28aed453557d5b2e23e3938cd2712f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_986.txt @@ -0,0 +1 @@ +विल्हेल्म हाउफ (नोव्हेंबर २९, १८०२ - नोव्हेंबर १८, १८२७) हा जर्मन कवी, कादंबरीकार होता. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9878.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b73eb3776100079173562e50b310c2575969a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9878.txt @@ -0,0 +1,4 @@ +हे महाराष्ट्रातील एक खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ आहे. +त्रिंबक रस्ता, नाशिक +या विद्यापीठात ९ विद्याशाखा आहेत. +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9880.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8969008e0ed9ab559848594a3ef05acf753dca25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9880.txt @@ -0,0 +1 @@ +संदीप रवींद्र क्षीरसागर हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते बीड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9881.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8969008e0ed9ab559848594a3ef05acf753dca25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9881.txt @@ -0,0 +1 @@ +संदीप रवींद्र क्षीरसागर हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते बीड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9941.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7318638b254017552638a7e3155419b737f208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9941.txt @@ -0,0 +1,11 @@ +संन्यासावस्था म्हणजे हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे मानवी जीवनाच्या चार अवस्थांपैकी शेवटची चौथी अवस्था. हिंदुधर्मशास्त्रानुसार मानवी जीवन हे ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य (गृहस्थाश्रम), वानप्रस्थ आणि संन्यास अशा चार आश्रमांत विभागलेले आहे. वानप्रस्थ म्हणजे संसार सोडून देऊन वनात राहणे. वानप्रस्थी हा आपल्या भार्येसह आणि अग्नीसह वनात राहू शकतो. संन्यासी मात्र भार्या आणि अग्नीचा त्याग करून परिवाजक (सदा भ्रमण करणारा संन्यासी) बनतो. वानप्रस्थ आणि संन्यास यांचे इतर नियम प्रायः सारखे आहेत. मनुष्याने चार आश्रमांचा एकापुढे एक अशा क्रमाने स्वीकार करावा, किंवा तयारी असल्यास पूर्वीच्या कोणत्याही आश्रमातून एकदम संन्यासाश्रमात प्रवेश करण्यासही हरकत नसते. +संन्याशांचे मुख्यतः चार प्रकार आहेत – (१) कुटीचक, म्हणजे झोपडी बनवून तीमध्ये राहणारा, भगवी वस्त्रे परिधान करणारा, स्वतःच्या आप्ताच्या घरी भोजन करणारा. (२) बहूदक, म्हणजे बांधव वर्ज्य करून इतर सात घरी भिक्षा मागून निर्वाह करणारा. (३) हंस, म्हणजे गावात एक रात्र आणि शहरांत पाच रात्री राहणारा व वर्षातील अकरा महिने भिक्षेवर राहणारा. (४) परमहंस, शिखायज्ञोपवीत आणि नित्यकर्म यांचा त्याग करणारा. हे चार प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. यांखेरीज तुरीयातीत आणि अवधूत हे आणखी दोन प्रकार संन्यासोपनिषदात सांगितले आहेत. +अवधूतांचे चार प्रकार आहेत : +(१) "ब्रह्मावधूत" - हा कोणत्याही वर्णाचा ब्रह्मोपासक किंवा कोणत्याही आश्रमाचा सदस्य असू शकतो. +(२) "शैवावधूत" - याने विधिपूर्वक संन्यास घेतलेला असतो. +(३) "वीरावधूत" - याच्या डोक्यावरील केस लांब आणि विस्कटलेले असतात, गळामध्ये हाडांची किंवा रुद्राक्षाची माळ असते, कमरेला लंगोटी असते, शरीरावर भस्माचा किंवा रक्तचंदनाचा लेप असतो, हातात लाकडाचा दंड व परशू असतो आणि खांद्यावर मृगचर्म असते. +(४) "कुलावधूत" - हा कुलाचारामध्ये अभिषिक्त असूनही गृहस्थाश्रमात राहत असतो. +अवधूत मार्ग अत्यंत कठीण असतो. या मार्गाने जाणारा क्वचित दिसतो. जो दिसतो तो नित्य पवित्र असतो आणि वैराग्याची प्रतिमूर्ती असतो. ज्ञानी व वेदांचा जाणकार असतो. हा समस्त प्राण्यांमध्ये आपली प्रतिमा पाहतो आणि त्या प्रतिमेमध्ये परब्रह्माची प्रतिमा पाहतो. तो हंस बनून परमहंस बनण्याचा सतत प्रयास करत असतो. +त्रिदण्डी हादेखील संन्यासाचा एक प्रकार आहे. असा संन्यासी तीन एकत्र बांधलेले दण्ड उजव्या हातात धारण करतो. ते वाणी, मन आणि देह यांच्या निग्रहाचे द्योतक समजले जातात. ‘वाग्दण्डोऽथ मनोदण्डः कायदण्डस्तथैवच । यस्यैते निहिता बुद्घौ त्रिदण्डीतिस उच्यते’ (मनुस्मृति १२.१०) अशी ‘त्रिदण्डी’ची व्याख्या मनुस्मृतीत आढळते. हा संन्यासाचा गौण प्रकार होय. यात शेंडी, जानवे आणि वस्त्राचे कच्छ पद्धतीने नेसणे याचा त्याग करावा लागत नाही व परत गृहस्थाश्रम स्वीकारता येतो. सुभद्राहरणप्रसंगी अर्जुनाने या प्रकारचा संन्यास घेतला होता. +आदि शंकराचार्यांनी संन्याशांचे दहा प्रकार प्रस्थापित केले. अरण्य, आश्रम, गिरी, तीर्थ, पर्वत, पुरी, भारती, वन, सरस्वती आणि सागर. +कोणतीही व्यक्ती कुठल्याही आश्रमात किंवा मठात जाऊन एखाद्या गुरूकडून संन्याशाची दीक्षा घेऊ शकत असली, तरी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एखाद्या मठातून घेतलेली दीक्षा ही भारतभर मानली जाते. ते चार मठ आणि त्या मठातून दीक्षा घेतलेल्या संन्याशाचे जोडनाव : diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9957.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f123ef626f6664b63498b8076840390ced126361 --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9957.txt @@ -0,0 +1,11 @@ ++गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. +[१] +गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. +हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली. +नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली. +गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात. +उदाहरण म्हणून काही गीते : +सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं । +ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते. +गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9968.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac901e93af0f179e8830fccd526e858030a4174d --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9968.txt @@ -0,0 +1 @@ +संप्रेरक म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने होत. शरीरात म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी असे याचे स्वरूप असू शकते. संप्रेरक हे अवयव आणि उती अंतर्गत संपर्क प्रमुख साधन म्हणून कार्य करते. संप्रेरक शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित विविध उपक्रमांचे नियमन करतात. संप्रेरक हे जसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही व इतर ग्रंथी करत असतात. पचन, चयापचय, श्वसन, संवेदनाची जाणीव, झोप, मल विसर्जन, स्तनपान, तणाव, वाढ आणि विकास, हालचाल, पुनरुत्पादन[१], आणि भाव भावना या सर्वांवर संप्रेरकांचा अंमल आहे. अगदी थोडेसे संप्रेरक चयापचय बदलण्यासाठी आवश्यक असते. संप्रेरके मेंदूसाठी संदेश देतात. आहे. मेंदू संप्रेरकांच्या विमोचन नियमन करतो. संप्रेरकांच्या अशा अनेक ग्रंथी आपल्या शरीरात असतात.[२] diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9970.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4535320dce5f7f219086c2503531c16f96dbc67e --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9970.txt @@ -0,0 +1,2 @@ +संबलपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर संबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे. diff --git a/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9980.txt b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41e330da4e1a228e38c8f2fa2bc917ececcc80eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_9980.txt @@ -0,0 +1,2 @@ + +संबा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली जम्मू जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून संबा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.