Aarsh-Wankar commited on
Commit
1e89be6
·
verified ·
1 Parent(s): ba7d534

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10004.txt +1 -0
  2. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10017.txt +4 -0
  3. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10045.txt +1 -0
  4. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10073.txt +8 -0
  5. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10096.txt +23 -0
  6. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10097.txt +3 -0
  7. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1012.txt +5 -0
  8. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1013.txt +44 -0
  9. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10144.txt +15 -0
  10. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10145.txt +5 -0
  11. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10175.txt +1 -0
  12. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10177.txt +7 -0
  13. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10181.txt +2 -0
  14. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10185.txt +13 -0
  15. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10203.txt +2 -0
  16. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10214.txt +1 -0
  17. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10226.txt +2 -0
  18. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10229.txt +2 -0
  19. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10265.txt +2 -0
  20. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10267.txt +2 -0
  21. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10300.txt +2 -0
  22. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10301.txt +2 -0
  23. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10312.txt +2 -0
  24. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10315.txt +9 -0
  25. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10319.txt +5 -0
  26. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1033.txt +4 -0
  27. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10341.txt +2 -0
  28. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10342.txt +2 -0
  29. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1035.txt +14 -0
  30. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10357.txt +5 -0
  31. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10360.txt +4 -0
  32. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10365.txt +6 -0
  33. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10378.txt +3 -0
  34. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10379.txt +3 -0
  35. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10391.txt +2 -0
  36. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10396.txt +3 -0
  37. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10400.txt +3 -0
  38. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10409.txt +1 -0
  39. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10440.txt +6 -0
  40. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10475.txt +3 -0
  41. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10494.txt +4 -0
  42. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10504.txt +1 -0
  43. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10511.txt +16 -0
  44. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10516.txt +5 -0
  45. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10560.txt +2 -0
  46. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10569.txt +1 -0
  47. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10607.txt +1 -0
  48. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10611.txt +6 -0
  49. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10626.txt +13 -0
  50. dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10640.txt +13 -0
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10004.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेजस्वी प्रसाद यादव (जन्म ९ नोव्हेंबर १९८९) हा एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेट खेळाडू आहे जो बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे.[१] विशेष म्हणजे तो देशातील सर्वात तरुण विरोधी पक्षनेता आहे.[२]
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10017.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 26°37′48″N 92°48′00″E / 26.63000°N 92.80000°E / 26.63000; 92.80000
2
+
3
+ तेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
4
+ तेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10045.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10073.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10096.txt ADDED
@@ -0,0 +1,23 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ खातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्या शिल्लक रकमांची यादी म्हणजे तेरीज होय. (इंग्लिश: Trial Balance).
2
+ तेरीज म्हणजे विशिष्ट तारखेस एखाद्या व्यापाऱ्याच्या खातेवहीतील सर्व खात्यांची जमा आणि नावे शिलकांची यादी दाखवणारे विवरणपत्र होय.[१]
3
+ तेरीज म्हणजे खातेवहीतील सर्व खात्यांच्या शिल्लक अथवा जमा रकमेचा सारांश आहे. याचा उपयोग नोंदवण्यात आलेल्या सर्व नावे आणि जमा रकमांची समानता निर्धारित करणे आणि अंतिम लेखे तयार करण्यासाठी एक सारांश तयार ठेवणे हा असतो – एरिक कोहलर.
4
+ तेरीज पत्रक का तयार केले जाते याची करणे खालील प्रमाणे
5
+ १) सर्व व्यावसायिक व्यवहार लेखापुस्तकात बरोबर नोंदवले गेले आहेत याची खात्री करणे.
6
+ २) प्रत्येक खात्याची अंकगणितीय शुद्धता तपासणे. जमा नावे रकमांची बेरीज वजाबाकी योग्य प्रकारे करून शिल्लक रकमेची योग्य प्रकारे गणना केली गेली आहे हे पाहणे.
7
+ ३) खातेवाहीतील खात्यांची अंतिम शिल्लक रक्कम जाणणे.
8
+ ४) सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद लेखा पुस्तकात द्विनोंदी लेखा पद्धतीची तत्त्वे पाळून झाली आहेत याची खात्री करणे.
9
+ ५) अंतिम लेखा विवरणे तयार करण्यासाठी आधार पुरवणे.
10
+ जमा आणि नावे खात्यांच्या शिल्लक रकमांची बेरीज समान येणे म्हणजे ‘तेरीज जुळणे’ होय. तेरीज जुळणे म्हणजे लेखा , नोंदी, खतावण्या योग्य प्रकारे लिहिल्या गेल्या असल्याचे मानले जाते. चुका असूनही तेरीज जुळू शकते उदा. चुकीची रक्कम जमा आणि नावे बाजूस लिहिणे, व्यवहाराचे लेखांकन करताना चुकीच्या खात्यांना परिणाम दर्शवणे. परिणामांची नोंद उलट करणे ( खाते जमा करण्याच्या ऐवजी नावे करणे आणि नावे करण्या ऐवजी जमा करणे).
11
+ लेख पुस्तकांची केवळ गणितीय अचूकता पाहण्यासाठी तेरीज केली जाते.
12
+ तेरीज पत्रक तयार करण्यासाठी खालील प्रारूपे वापरली जातात.[२]
13
+ १) विवरण पत्र प्रारूप - संगणकीकरणाच्या आजच्या दिवसात विवरण पत्र प्रारूप जास्ती प्रमाणत वापरले जाते. यालाच रोजकीर्द प्रारूप असेही म्हटले जाते.
14
+ रक्कम रु.
15
+ रक्कम रु.
16
+ २) खातेवही प्रारूप - यालाच टी प्रारूप असेही म्हटले जाते. इंग्रजी टी या आद्याक्षरा प्रमाणे तेरीज पत्रकाची मांडणी केली जाते.डाव्या बाजूस नावे शिल्लक आणि उजव्या बाजूस जमा शिल्लक दर्शवली जाते.
17
+ तेरीज खालील दोन प्रकारे केली जाते .[३]
18
+ १) ढोबळ तेरीज
19
+ २) शुद्ध तेरीज
20
+ १) वैयक्तिक खाती – या प्रकारची खाती जमा किंवा नावे शिल्लक दाखवू शकतात. जर खात्यामध्ये जमा शिल्लक असेल तर ते खाते धनकोचे आणि नावे शिल्लक असेल तर हे खाते ऋणकोचे असते.
21
+ २) मालमत्ता खाती - या खात्यांमध्ये नेहेमीच नावे रक्कम शिल्लक असते.
22
+ ३) देयता खाती – या प्रकारच्या खात्यांमध्ये नेहेमीच जमा रक्कम शिल्लक असते.
23
+ ४) नामधारी खाती – खर्चाशी संबंधित खाती नावे शिल्लक दाखवतात . उत्पन्न किंवा लाभाशी संबंधित खाती जमा रक्कम दर्शवतात.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10097.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले.
2
+ देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते.
3
+ गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'[२] १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१]
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1012.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ प्रा. ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर (१२ नोव्हेंबर,??[माहितीज्ञान पोकळी] - हयात) [१] हे मराठी कवी आहेत. हे काव्य लेखना शिवाय चित्रपट आणि राजकारणातही सक्रीय आहेत.
2
+ इ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी[ दुजोरा हवा] तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली.
3
+ हे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आणि होते.[माहितीज्ञान पोकळी][ दुजोरा हवा]
4
+ सखे साजणी हा दीर्घ काव्याचा संग्रह 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अंगार आणि शृंगार हा काव्य संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला आहे. फेसबुक व अनुदिनीच्या आंतरजालीय सामाजिक माध्यमांचाही त्यांनी त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी वापर केला आहे.
5
+ यमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1013.txt ADDED
@@ -0,0 +1,44 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म : आपेगाव-पैठण, युव नाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५, शालिवाहन शके ११९७, युगाब्द ४३७६; संंजीवन समाधी : दुर्मुख नाम संवत्सर, कार्तिक वद्य त्रयोदशी, रविवार दि. ०२ डिसेंबर इ.स. १२९६, शालिवाहन शके १२१७, युगाब्द ४३९७.)[१][२] हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते.
2
+ फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली.[३] देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[४] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[५][६] संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
3
+ भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
4
+ ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर
5
+ ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
6
+ आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातिल पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
7
+ विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [७]
8
+ आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
9
+ संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
10
+ भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
11
+ ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये (कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी) यादव राजा रामदेवरावाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी आपेगावच्या मराठी देशस्थ ब्राह्मण [८] कुटुंबात झाला. [९] [१०] देवगिरी राजधानी असलेल्या या राज्याला शांतता आणि स्थिरता लाभलेली होती. तेथील राजा साहित्य आणि कलांचा संरक्षक होता. [९] [११]
12
+ संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे चरित्रात्मक तपशील त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांच्या लिखाणात जतन केलेले आहेत. [१२] विविध परंपरा या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील तपशिलांचे परस्परविरोधी माहिती देतात. त्यांच्या ज्ञानेश्वरी (१२९०) या ग्रंथाच्या रचनेची तारीख मात्र निर्विवाद आहे. [१३] [१४] ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील अधिक स्वीकृत परंपरेनुसार, त्यांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला आणि त्यांनी १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. [१५] इतर स्रोतांनुसार त्यांचा जन्म १२७१ मध्ये झाला होता. [१६] [१७]
13
+ ज्ञानेश्वरांच्या सुमारे २१ वर्षांच्या अल्पायुष्यातील चरित्रात्मक तपशिलांबद्दल वाद आहे आणि त्याची सत्यता संशयास्पद आहे. रेड्याला वेद वदवण्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यांसारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी उपलब्ध साहित्य भरलेले आहे. [१६] [१८]
14
+ उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठावरील आपेगाव गावातील कुलकर्णी होते. (कुलकर्णी हे वंशपरंपरागत लेखापाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते, जे गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत.) [१९] त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून हा वारसा मिळाला होता [१७] आणि त्यांचा विवाह आळंदीच्या कुलकर्णी यांच्या कन्या रखुमाबाईशी झाला. गृहस्थ असतानाही विठ्ठलपंतांना आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती. [९] त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे आणि लग्नापासून त्यांना मूल न झाल्यामुळे त्याचा जीवनाबद्दलचा भ्रम वाढला. अखेरीस आपल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्यासी (त्यागी) होण्यासाठी ते काशीला निघून गेले. [१७] या घटनांच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे नाथ योगी संप्रदायातील शिक्षकांच्या पंक्तीतून होते आणि अत्यंत धार्मिक असल्यामुळे ते वाराणसीच्या यात्रेला गेले होते. तेथे ते एका आध्यात्मिक गुरूला भेटले आणि त्यांनी पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. [११]
15
+ विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरू, रामा शर्मा[९] यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली; ज्यांना विविध स्रोतांमध्ये रामानंद, नृसिंहाश्रम, रामद्वय आणि श्रीपाद असेही म्हणतात. (ते रामानंदी संप्रदायाचे संस्थापक रामानंद नव्हते.) [२०] जेव्हा रामाश्रमाला समजले की, विठ्ठलपंतांनी आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे, तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची सूचना केली. विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाबाईंनी चार मुलांना जन्म दिला - निवृत्तीनाथ (१२७३), ज्ञानेश्वर (१२७५), सोपान (१२७७) आणि मुक्ताबाई (१२७९). [२१]
16
+ तत्कालीन ऑर्थोडॉक्स ब्राह्मणांनुसार, ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परतली होती. [९] ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. [२२] [११] याचा अर्थ ब्राह्मण जातीतून बहिष्कार असा मानला जातो. [२२]
17
+ शेवटी विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह नाशिकला निघून गेले. एके दिवशी नित्य विधी करत असताना विठ्ठलपंतांचा सामना एका वाघाशी झाला. विठ्ठलपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले पळून गेली, परंतु निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपले. गुहेत लपून बसले असताना त्यांना गहनीनाथ भेटले, ज्यांनी निवृत्तीनाथांना नाथ योगींच्या बुद्धीची दीक्षा दिली. [२३] [२४] नंतर विठ्ठलपंत आळंदीला परतले आणि ब्राह्मणांना त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्याचे साधन सुचवण्यास सांगितले. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंतांना केली. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता येईल या आशेने इंद्रायणी नदीत उडी मारून एका वर्षातच आपला जीव दिला. [२३] इतर स्रोत आणि स्थानिक लोक परंपरा असा दावा करतात की, त्या दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. [२५] आख्यायिकेची दुसरी आवृत्ती असे सांगते की, विठ्ठलपंतांनी त्यांच्या पापातून क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला गंगा नदीत फेकून दिले. [११]
18
+ ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले गेले. त्यांचे पालक या परंपरेत आधीपासूनच होते. नंतर तिघे भाऊ आणि बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योगी आणि संत कवी बनले. [११]
19
+ ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भावंडे पंढरपूरला गेली. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली, जे ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली; [२६] ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते. [२७] पंढरपूरला परतल्यावर, ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार, "गोरोबा कुंभार, सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि पारिसा (भागवत ब्राह्मण)" यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते. [२८] काही विद्वान नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन होते असे पारंपारिक मत मान्य करतात; तथापि डब्ल्यू.बी. पटवर्धन, आर.जी. भांडारकर आणि आर. भारद्वाज यांसारखे इतर लोक या मताशी असहमत आहेत आणि त्याऐवजी नामदेव १४ व्या शतकाच्या उत्तरार्धातील होते, असे ते मानतात. [२९]
20
+ मेजवानीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. [२८] ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली, खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. [३०] संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली. [२८] संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे. [३१] हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला. [२६] त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. [३२] त्यांच्या संजीवन समाधीने नामदेव आणि इतर उपस्थितांनी शोक केला.
21
+ परंपरेनुसार, ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी नामदेवांनी नंतर विठोबाकडे परत त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती. डॅलमायर लिहितात की, हे "खऱ्या मैत्रीच्या अमरत्वाची आणि उदात्त आणि प्रेमळ अंतःकरणाच्या सहवासाची" साक्ष देते. [३३] अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत. [३४] [३५]
22
+ ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत, [३६] त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य सच्चिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन. [३७] फ्रेड डॅल्मीर यांनी महिपतीच्या हगिओग्राफीमधून खालीलप्रमाणे यातील एका दंतकथेचा सारांश दिला आहे: [३८] वयाच्या १२ व्या वर्षी, ज्ञानेश्वर आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडांसोबत पैठणच्या पुजाऱ्यांकडे दयेची याचना करण्यासाठी पैठणला गेले. तेथे त्यांचा अपमान व विटंबना करण्यात आली. या मुलांना गुंडगिरीचा त्रास होत असताना जवळच्या रस्त्यावर एक माणूस म्हाताऱ्या म्हशीला हिंसकपणे मारहाण करत होता. यामध्ये ती जखमी म्हैस रडून रडून खाली कोसळली. ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला म्हशीच्या काळजीपोटी थांबायला सांगितले. एका पशूबद्दल अति काळजी असण्यासाठी आणि वेदांच्या शिकवणींबद्दल बेफिकीर असल्यासाठी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांची थट्टा केली. ज्ञानेश्वरांनी प्रतिवाद केला की खुद्दवेदांनीच सर्वच जीवन पवित्र आणि ब्रह्माचे प्रकटीकरण मानले आहे. [a] संतप्त पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले की, ज्ञानेश्वरांचा तर्क असे सूचित करतो की प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहिजेत. निश्चल ज्ञानेश्वरांनी मग म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि ती म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली. [३८] फ्रेड डॅलमायर यांच्या मते, ही कथा ज्ञानेश्वरांच्या चरित्राचे अचूक प्रतिबिंबित करते की नाही, याविषयी चिंता नसावी. मॅथ्यू ३:९ मधील जेरुसलेममधील येशूच्या कथेप्रमाणेच या कथेचे प्रतीकात्मक महत्त्व फार मोठे आहे. [३८]
23
+ आणखी एका चमत्कारात ज्ञानेश्वरांना चांगदेव जे एक कुशल योगीहोते, त्यांनी आव्हान दिले होते. चांगदेवांनी आपल्या जादुई सामर्थ्याने वाघावर स्वार होऊन हा पराक्रम साकारला होता. चालत्या भिंतीवर स्वार होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवल��. [४०] [४१] [b] ज्ञानेश्वरांनी ६५ श्लोकांमध्येचांगदेव पासष्टी या नावाने चांगदेवांना सल्ला दिला. [९] नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले. [४३]
24
+ ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
25
+ माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
26
+ ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
27
+ असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
28
+ त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
29
+ 'चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
30
+ ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
31
+ ‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली.
32
+ मुख्य लेख: संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी
33
+ संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
34
+ इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.
35
+ ज्ञानेश्वरांच्या जीवनातील आणि लेखनातील घटक, जसे की, त्यांनी पुरोहित वर्गाच्या संकोचवादावर केलेली टीका, कौटुंबिक जीवनात अडकून पडणे आणि आध्यात्मिक समतावाद यांनी वारकरी चळवळीच्या संस्कृतीला आकार दिला. [४४] [४५] डल्लमायर यांच्या मते, ज्ञानेश्वरांचे जीवन आणि लेखन हे "वारकरी चळवळीसाठी अस्सल धार्मिकतेचे प्राथमिक उदाहरण आहे; तसेच भक्तीचा महत्त्वपूर्ण स्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित झाले आहे". [४५]
36
+ दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त हे आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारी नावाच्या वार्षिक यात्रेत सामील होतात. या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात.[४६] ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी-संतांना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली.
37
+ ज्ञानेश्वरांचे चिद्विलासाचे तत्त्वज्ञान हे नामदेव आणि एकनाथ यांसारख्या वारकरी लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींमध्ये स्वीकारले. एकनाथांच्या हस्तमलक आणि स्वात्मसुखमध्ये अमृतानुभवाचा प्रभाव दिसून येतो . तुकारामांच्या कृती मायावादाचे खंडन यांसारख्या ज्ञानेश्वरांच्या तात्विक संकल्पना आत्मसात करतात आणि स्पष्ट करतात. [४७]
38
+ पालखी :
39
+
40
+ आषाढ महिन्यात आळंदी वरून दरवर्षी पंढरपूर कडे पालखी च प्रस्थान होत अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे त्यावेळी मंदिराचा कळस हल्ल्याशिवाय माउलींच्या पालखीचं प्रस्थान होतं नाही
41
+
42
+
43
+
44
+ चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10144.txt ADDED
@@ -0,0 +1,15 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ के. चंद्रशेखर राव
3
+ भारत राष्ट्र समिती
4
+ के. चंद्रशेखर राव
5
+ भारत राष्ट्र समिती
6
+ तेलंगणा विधानसभेची निवडणूक 7 डिसेंबर 2018 रोजी तेलंगणामध्ये राज्याच्या स्थापनेपासून 2014.[१] मध्ये दुसरी विधानसभेची स्थापना करण्यासाठी घेण्यात आली. विद्यमान भारत राष्ट्र समिती, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तेलंगणा जन समिती आणि तेलुगु देसम पार्टी निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी होते.[२]
7
+ राज्यातील चार विरोधी पक्ष, आयएनसी, टीजेएस, टीडीपी आणि सीपीआय यांनी निवडणुकीत सत्ताधारी बीआरएसचा पराभव करण्यासाठी 'महा कूटमी' (महाआघाडी) स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, महाकूटमीला बहुमत मिळविता आले नाही बीआरएसने विजय मिळवून पुन्हा एकदा सरकार स्थापन केले [३]
8
+ के. चंद्रशेखर राव 2018 मध्ये लवकर निवडणुकीसाठी गेले, जेव्हा त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या नऊ महिने आधी 6 सप्टेंबर 2018 रोजी राजीनामा दिला होता.
9
+ इतर कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने राज्यपालांनी सभागृह बरखास्त केले आणि सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.
10
+ या निवडणुकीमुळे तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (आयएनसी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) यांची युती झाली, जे एकेकाळी प्रजा किंवा महा कुतमीचा भाग म्हणून एकत्र आले.
11
+ भारताच्या निवडणूक आयोगाने घोषित केले की तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीत सर्व 32,574 मतदान केंद्रांवर व्होटर-व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मशीनचा वापर केला जाईल. [४] 12 ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, तेलंगणामध्ये 2,80,64,680 मतदार आहेत, जे 2014 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील 2,81,65,885 मतदारांपेक्षा कमी आहेत. [५] मतदार यादीत सुमारे 2,600+ ट्रान्सजेंडर होते. [६]
12
+ निवडणुकीची तारीख 7 डिसेंबर 2018 होती आणि निकाल 11 डिसेंबर 2018 रोजी लागणार होता [७]
13
+
14
+
15
+ साचा:Telangana elections
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10145.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ रेवंत रेड्डीकाँग्रेस
2
+ २०२३ तेलंगणा विधानसभा निवडणुका ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आल्या. यात राज्याच्या सगळ्या ११९ जागांवर लढती होत्या. ३ डिसेंबर रोजी मतगणना होउन निकाल जाहीर करण्यात आले.
3
+ या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आसनासीन भारत राष्ट्र समितीच्या विरोधात निर्णायक विजय मिळवून दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत केली. [३]
4
+ पक्षानुसार मतदानाची टक्केवारी
5
+ पक्षानुसार जागांची टक्केवारी
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10175.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेलपूरक नौका (इंग्लिश:fleet tanker - फ्लीट टॅंकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारून येतात.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10177.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ तेलबैला किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
4
+ ==कसे जाल ?== पुणे - ताम्हिणी घाटमार्गे पिंपरी मार्गे भांबुर्डे पासून पुढे लोणावळ्याच्या दिशेने गेलं कि तेलबैला फाट्यावरून 3 किमी आता तेलबैला गावात पोचतो
5
+ सांगाती सह्याद्रीचा
6
+ डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
7
+
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10181.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10185.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपुत राजा नारणाल सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले. पुढे याच नारणाल सिंह स्वामींचे वंशज, रावराणा नारणाल सिंह सोलंकी द्वितीय इथले किल्लेदार झाले.
3
+ अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग आहे.
4
+ अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
5
+ गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
6
+ गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात. त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळ-फुटाणे वाहावे व तडक गड उतरावा तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.[ संदर्भ हवा ]
7
+ तेलियागड आणि जाफराबाद हे नरनाळा किल्ल्याचे उपदुर्ग आहेत.
8
+ गडावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहेत. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तुपाच्या टाक्या लागतात. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे; युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असे.
9
+ गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्���ा अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातूची असून इमादशहाच्या काळात गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानूर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरण आहे.
10
+ किल्ल्याच्या पायथ्याशी धारुळ गावात धरुळेश्वराचे एक सुंदर शिवालय आहे. या शिवालयाचे बांधकाम इसवी सन १५२१ साली झालेले आहे. पण हे शिवालय कोणी बांधले याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. हे शिवालय नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिणेस आहे. या शिवालयाचे बांधकाम हेमाडपंथी असून ते शिवालय दक्षिणमुखी आहे. या शिवालयाच्या पूर्वेस भग्नावस्थेत काही वास्तू आहेत. अश्या बऱ्याचश्या वास्तू तेथे सापडतात. त्यांच्या अवशेषांवरून आपण अंदाज लावू शकतो की यांचं वैभव कसं असेल.
11
+ या शिवालयाचे संपूर्ण बांधकाम दगडी असून चौरसाकार आहे व मंदिरांचे कळस हे गोलाकार आहेत. या कारणाने याला गुम्मद असे म्हणतात.शिवालयाचा परिसर खूप मोठा असून रमणीय असा आहे. शिवालयाला पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. शिवालयाकडे जाण्यासाठी विविध असे मार्ग आहेत. त्यामध्ये सहज मार्ग म्हणजे कोट ते रामापूर (धारुळ) या रस्त्यावर पडते.
12
+ गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला याबाबत नक्की माहिती नाही, पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राजपुत राजा नारणाल सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरूज बांधले. गडावर नागपूरकर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
13
+ या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10203.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेलगू विकिपीडिया ही विकिपीडियाची तेलगू भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती डिसेंबर २००३ मध्ये सुरू केली गेली.[१]
2
+ २००५मध्ये चव्हा किरण, अक्किनेनी प्रदीप, व्यासस सत्य, वीव्हन आणि चारीवरी सामील झाल्यावर हिंदी विकिपीडियाला चालना मिळाले; नंतर चारीवरी यांनी तेलगू मोहिमेचे नेतृत्व केले. सत्याने बॉटच्या सहाय्याने जिल्हा, मंडळे आणि तेलगू चित्रपटांसाठी स्टब जोडण्यासाठी एक प्रकल्प आखला व राबविला. तेलगू ऑनलाइन आणि ब्लॉगिंग समुदायाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने या स्टबचे लेख वाढविण्यात आले. चारीवरी यांनी भाषांतर केले आणि सुरुवातीच्या बऱ्याच धोरणांचा मसुदा तयार केला. प्रदीपने ऐहिक कार्ये स्वयंचलित स्क्रिप्ट्स लिहिली आणि लेखाची संख्या वाढून ६,००० झाली.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10214.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेल्हारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10226.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ २३-तेवीस  ही एक संख्या आहे, ती २२  नंतरची आणि  २४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 23 - twenty-three.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10229.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फारसी: فرودگاه بین‌المللی امام خمینی‎) (आहसंवि: IKA, आप्रविको: OIIE) हा इराण देशाच्या तेहरान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ बांधण्यापूर्वी मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तेहरानमधील प्रमुख विमानतळ होता परंतु तो वर्दळीचा बनल्यामुळे इराण सरकारने २००४ साली इमाम खोमेनी विमानतळ बांधून पूर्ण केला.
2
+ हा विमानतळ तेहरानच्या ३० किमी नैऋत्येस स्थित असून इराणची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी इराण एरचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10265.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.
2
+ मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10267.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.
2
+ मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10300.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोंडल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10301.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोंडल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10312.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोंडळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10315.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तोंडवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
3
+ येथील कातळ खोदशिल्पे मार्च २०२४ मध्ये उजेडात आली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[१]
4
+ १.https://villageinfo.in/
5
+ २.https://www.census2011.co.in/
6
+ ३.http://tourism.gov.in/
7
+ ४.https://www.incredibleindia.org/
8
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
9
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10319.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील तोंडापुरा धरण एक धरण आहे.
2
+ तोंडापुरा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
3
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
4
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
5
+
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1033.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो. या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो.
2
+ शासनाचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर रामदास जोशी यांना प्रदान झाला.
3
+ शासनाचा 2020 सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार
4
+ ह.भ.प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10341.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.
2
+ २०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10342.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.
2
+ २०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1035.txt ADDED
@@ -0,0 +1,14 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गणितानुसार जिवा (अन्य मराठी नाव: ज्या फल ; इंग्लिश: Sine / Sine function, साइन, साइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.
2
+ समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची ज्या, म्हणजेच
3
+
4
+
5
+
6
+ sin
7
+
8
+ A
9
+
10
+
11
+ {\displaystyle \sin A}
12
+
13
+ खालील सूत्राने दर्शवली जाते :
14
+
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10357.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ तोरड्या हा फार प्राचीन भारतीय अलंकार आहे .लहान मुलेतो पायामध्ये वापरत असत. तोरड्या चांदीच्या असतात.[१] छोट्या रामाच्या पायांतही तोरड्या होत्या.खालील रामदास स्वामींच्या रचनेत तोरड्याचा उल्लेख आहे.
2
+ "कीरीट कुंडले माला विराजे।
3
+ झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे।
4
+ घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे।
5
+ अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10360.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ राजकारणात टिकून रहाण्यासाठी बऱ्याचदा तोडा, फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला जातो. हिंदुस्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या नीतीचा उपयोग केला असे मानले जाते. ब्रिटिश लोक हिंदुस्थान सोडून गेल्याच्या नंतरच्या काळात भारतीय राजकारणी या तंत्रात अधिकच वाकबगार झाल्याचे मानले जाते. (क्षितिजसरांच्या सल्ल्यास अनुसरून या वाक्यासही संदर्भ देईन अथवा आवश्यक फेरफार करेन . तसे संदर्भ उपलब्ध होणे अवघड असणार नाही हे वेगळे सांगण्याची आवश्यकता असेल असे वाटत नाही. क्षितिजसर तुमच्या सल्ल्यास अनुसरून माझी मते वगळून खालील एक परिच्छेद बदलला त्याबद्दल तुमचे मत कळवा . गरजेनुसार अजून संदर्भ आणि बदल उपलब्ध करता येतील.)
2
+ Sep 24, 2009, 11.35PM IST महाराष्ट्र टाइम्स मधील "सोयरे सकळ " लेखात पत्रकार प्रकाश आसबे म्हणतात, "महाराष्ट्रातील ...... पुढारी केवळ सत्तेचे वाटेकरी नसून परस्परांशी बेटीव्यवहार करून त्यांनी आपली सत्ताधाऱ्यांची 'जमात'च बनवली आहे. परिणामी सत्ता कोणाकडेही गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सत्तेची सोयरीक पिढ्यान्‌पिढ्या अबाधित राहते. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारही त्यांचे आणि बंडखोरही त्यांचेच असतात. अधिकृत उमेदवार निवडून आला तर तो त्यांचाच असतो आणि बंडखोर निवडून आला तरी तो त्यांचाच सोयरा असल्याने सत्तेच्या समीकरणात आपोआपच सामील होतो......". "सोयरे सकळ " लेखात बरीच उदाहरणे देऊन पत्रकार प्रकाश आसबे पुढे म्हणतात, ".... कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. सत्ताधारी आणि बंडखोर हे दोघेही सत्ताधारी जमातीचेच असतात. त्यामुळे सत्तेचा सूर्य सत्ताधारी जमातीतून कधीच मावळत नाही, असे म्हणतात, तेच खरे! "[१]
3
+ धर्मा शिवाय अनेक मुद्दे सत्ताधारी किंवा राजकारणी वापरतात.[ संदर्भ हवा ]
4
+ बऱ्याच वेळा राजकारणी एका पेक्षा अनेक तोडा फोडा मुद्य्यांचा वापर करतात.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10365.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
2
+ हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हटले जाते.
3
+
4
+
5
+
6
+
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10378.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.
2
+ तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.
3
+ गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10379.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.
2
+ तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.
3
+ गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10391.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पोप निकोलस पाचवा (नोव्हेंबर १५, इ.स. १३९७ - मार्च २४, इ.स. १४५५) हा मार्च ६, इ.स. १४४७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
2
+ याचे मूळ नाव तोमासो पॅरेंतुचेली होते. निकोलस नाव घेणारा हा शेवटचा पोप आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10396.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोम्स्क ओब्लास्त (रशियन: То́мская о́бласть) रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते पश्चिम सैबेरियन मैदानाच्या आग्नेयेस वसले असून तोम्स्क येथे त्याची राजधानी आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10400.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.
2
+ तोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रांताची राजधानी आहे.
3
+ गुणक: 36°43′N 137°9′E / 36.717°N 137.150°E / 36.717; 137.150
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10409.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ राजा तोडरमल (?? - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10440.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 45°4′0″N 7°42′0″E / 45.06667°N 7.70000°E / 45.06667; 7.70000
2
+
3
+ तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg ; प्यिमॉंतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमॉंत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.
4
+ इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोम व मिलानखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.
5
+ सेरी आमध्ये खेळणारा व इटलीमधील सर्वात यशस्वी युव्हेन्तुस एफ.सी. हा फुटबॉल क्लब तोरिनोमध्येच स्थित आहे. तोरिनो एफ.सी. हा सेरी आमधील दुसरा फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहे. तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.
6
+ जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10475.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ [[]], इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ तौराई मुझरबानी (२७ मार्च, इ.स. १९८७:माशोनालॅंड, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10494.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 39°8′N 117°11′E / 39.133°N 117.183°E / 39.133; 117.183
2
+
3
+ त्यांजिन (देवनागरी लेखनभेद: त्यांचिन ; चिनी: 天津 ; फीनयीन: Tiānjīn ) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरी क्षेत्रांपैकी हे एक महानगरी क्षेत्र आहे. हे महानगर हाय नदीच्या तीरावर वसले असून याच्या पूर्वेस पिवळ्या समुद्राचा भाग असलेले बोहाय आखात पसरलेले असून उर्वरीत बाजूंस याच्या सीमा हपै प्रांतास आणि पैचिंग महानगरी क्षेत्रास भिडल्या आहेत.
4
+ लोकसंख्येच्या निकषानुसार षांघाय, पैचिंग, क्वांग्चौ या महानगरांपाठोपाठ त्यांजिन चौथे मोठे महानगर आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10504.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ट्रिप लिन्हास एरियास (पोर्तुगीज: TRIP Linhas Aéreas) ही ब्राझील देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९९८ साली स्थापन झालेली ही कंपनी २१४ साली अझुल ब्राझीलियन एरलाइन्स ह्या कंपनीमध्ये विलिन करण्यात आली. हिचे मुख्यालय साओ पाउलो राज्याच्या कांपिनास शहरामध्ये तर प्रमुख वाहतूकतळ बेलो हॉरिझोन्ते विमानतळावर होता.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10511.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ त्रावणकोर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते.
4
+ त्रावणकोर संस्थानची स्थापना इ.स. १७२९ या वर्षी झाली.
5
+ त्रावणकोर संस्थानची राजधानी इ.स. १७९५ पर्यंत पद्मनाभपुरम होती, त्यानंतर त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम हीच कायमची राजधानी होती.
6
+ त्रावणकोर संस्थानचे संस्थानिक वर्मा घराणे होते.
7
+ प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा हे त्रावणकोरच्या राजघराण्यातीलाच होते.
8
+ त्रावणकोर संस्थानाच्या उत्तरेला आणि पूर्वेला मद्रास प्रांत होता. तर पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर होता.
9
+ त्रावणकोर संस्थानचे क्षेत्रफळ १९,८४४ चौरस किमी इतके होते.
10
+ त्रावणकोर संस्थानाचे चार विभाग पडले होते-
11
+ १. कोट्टायम
12
+ २. कोल्लम
13
+ ३. पद्मनाभपुराम्
14
+ ४. त्रिवेंद्रम्
15
+ त्रावणकोर संस्थानात मल्याळम, तमिळ व इंग्रजी या भाषा प्रचलित होत्या.
16
+ भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा बलराम वर्मा यांनी त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. त्यानंतर त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचे मिळून त्रावणकोर-कोचीन घटक राज्य बनवण्यात आले. त्यानंतर त्रावणकोरचा कन्याकुमारी भाग हा तामिळनाडू राज्यात गेला व उर्वरित भाग हा केरळ राज्यात आहे.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10516.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+ श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१[३] होती.
3
+
4
+ त्रिंकोमली जिल्हयात २ नगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन २३० ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१]
5
+ स्रोत[४]
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10560.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
2
+ हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10569.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ वेस्ट इंडीज मधील प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतो.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10607.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रिपुरा हे ईशान्य भारतामधील राज्य एकूण ८ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. १९७२ साली त्रिपुरा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर ४ जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. २०१२ साली ४ नवे जिल्हे स्थापन करण्यात आले.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10611.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ २३° ५०′ २४″ N, ९१° १६′ ४८″ E
2
+ त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
3
+ त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.  
4
+ यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे
5
+ त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.
6
+ त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10626.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
2
+ त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :
3
+ नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.
4
+ सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी२ पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.
5
+ त्रिभुज प्रदेश हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
6
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
7
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
8
+
9
+
10
+ संपूर्ण माहिती(Moin)
11
+ त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प��रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
12
+
13
+ नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्र��ेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो
dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10640.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.[१]
2
+ त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे.[२] सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो.
3
+ सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो.
4
+
5
+ त्रिरश्मी लेणीसमूहात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे.
6
+ या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. या टेकडीवर प्राचीन पाण्याची टाकी आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते.
7
+ या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
8
+ त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते.
9
+ टेकडीखाली बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
10
+ पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात.
11
+ अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते.
12
+ तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.
13
+