Aarsh-Wankar commited on
Commit
82a4bf1
·
verified ·
1 Parent(s): 4c74c33

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10039.txt +2 -0
  2. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1005.txt +14 -0
  3. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1006.txt +1 -0
  4. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1009.txt +8 -0
  5. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10114.txt +6 -0
  6. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10143.txt +3 -0
  7. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10149.txt +4 -0
  8. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10155.txt +4 -0
  9. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1017.txt +1 -0
  10. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10189.txt +4 -0
  11. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1023.txt +8 -0
  12. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10235.txt +2 -0
  13. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10239.txt +2 -0
  14. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10249.txt +2 -0
  15. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10251.txt +2 -0
  16. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10265.txt +2 -0
  17. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10294.txt +5 -0
  18. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1030.txt +11 -0
  19. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10300.txt +2 -0
  20. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10302.txt +2 -0
  21. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10312.txt +4 -0
  22. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10327.txt +1 -0
  23. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10340.txt +5 -0
  24. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10354.txt +81 -0
  25. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10382.txt +2 -0
  26. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10422.txt +2 -0
  27. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1044.txt +3 -0
  28. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10461.txt +2 -0
  29. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10462.txt +2 -0
  30. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10502.txt +1 -0
  31. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10503.txt +1 -0
  32. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1051.txt +24 -0
  33. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10510.txt +1 -0
  34. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10531.txt +0 -0
  35. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10532.txt +17 -0
  36. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10536.txt +1 -0
  37. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10573.txt +1 -0
  38. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10603.txt +6 -0
  39. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10612.txt +1 -0
  40. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10624.txt +10 -0
  41. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10657.txt +1 -0
  42. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10660.txt +1 -0
  43. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10662.txt +6 -0
  44. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10677.txt +6 -0
  45. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10687.txt +2 -0
  46. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10697.txt +1 -0
  47. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10703.txt +15 -0
  48. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10712.txt +2 -0
  49. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10730.txt +3 -0
  50. dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10733.txt +1 -0
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10039.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पश्मी ही भारतातील कुत्र्याची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. कुत्र्याची ही जात मुख्यतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. आता हा घर राखण्यासाठी पाळला जातो.
2
+ हे श्वान सामान्य कुत्र्यापेक्षा उंच असते, ह्याचे तोंड लांबट असते. शेपटीवर व कानांवर जास्त केस असतात. ही कुत्री आक्रमक असतात. ही श्वाने बहुधा पांढऱ्या,करड्या किंवा काळ्या रंगाची असतात. यांचा आवाज इतर कुत्र्यांपेक्षा मोठा असतो. यांना अनोळखी माणसांनी स्पर्श केलेला फारसा आवडत नाही.ह्या कुत्र्यांना एकटे राहायला आवडते. म्हणजेच कळपात लोकांनं मध्ये राहायला आवडत नाही.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1005.txt ADDED
@@ -0,0 +1,14 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामणसे (भारत- महाराष्ट्र- कोकण- रत्‍नागिरी जिल्हा- रत्‍नागिरी तालुका- धामणसे गांव) अरबी समुद्रापासून ४ कोसांवर पूर्वेकडे हे गाव वसलेले आहे.
2
+ धामणसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
3
+ कसबा धामणसे हे प्राचीन काळापासून आपले महत्त्व जपून आहे. येथे स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. ८४ गावांचा कुलस्वामी म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वयंभू देव इथे वास्तव्य करून आहे. देवरुखे ( देवर्षी) ब्राह्मण समुदायाचा हा कुलस्वामी असल्याने देश विदेशातून ज्ञाती चे लोक दर्शनासाठी इथे गर्दी करत असतात. त्याच प्रमाणे हेच येथील ग्रामदैवत सुद्धा आहे. त्यामूळे गावातील लोक सण उत्सवात येथे भक्तांची रीघ लागलेली असते. या मंदिरास सुमारे १३ व्या शतकापासून चा इतिहास आहे. देवर्षी समुदाय ची आद्य वसाहत धामणसे ही मानली जाते त्यामूळे त्या काळापासून इथे नियमित देवाचे पूजन अर्चन होत आहे. हे मंदिर दुर्मिळ वास्तू रचनेचा नमुना आहे असे म्हणावयास हरकत नाही कारण भारतात केवळ 3 मंदिरे दक्षिणाभिमुख आहेत त्यातील हे एक आहे, येथे नंदी अथवा पार्वती नाही. येथे केवळ दर्शन सेवेने मोक्ष प्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे. मृत्यू दिशेवर विजय मिळवणारे असे हे अत्यंत जागृत स्थान आहे. सोमगंगा नदीच्या काठी असणारे हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. याच देवळात श्री रवळनाथ, श्री महालक्ष्मी, श्री चंडिका, श्री वाघजाई, श्री त्रिमुखी आदी देव विराजमान आहेत
4
+ त्याच प्रमाणे गावात मानाई मंदिर,कालिका मंदिर, जाखमाता मंदिर, श्री दत्तगुरू देवस्थान, साई मंदिर, हनुमान मंदिर, बौद्ध समाज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावातील भक्तजन एकोप्याने सर्व उत्सव व सण साजरे करते.
5
+ कसबा धामणसे हे सुमारे ७०० वर्ष इतिहास असलेले गाव असून प्राचीन काळातील समाज रचना गावाच्या सद्य आखणीवरून करता येऊ शकते. बारा बलुतेदारी पद्धतीत हा गाव रचनाबद्ध केलेला आहे. त्यामूळे सर्व जातींचे वास्तव्य या गावात आहे. छत्रपती श्री शिवाजीराजे यांच्या राज्य कालावधीत काही काळ हा गाव आदिलशाही मुलुखात होता. त्यामूळे शिव दरबारात ह्या गावाची नोंद आहे. सरकारी पटलावरील कुळकर्णी पद या गावात होते. ब्रिटिश काळात खोतीने हा गाव विभागला होता. क��लकर्णी,जोशी,कानडे,देसाई असे चार समाज घटक समाजव्यवस्था चालवण्यासाठी नियुक्त होते. गावात ब्राह्मण समाज, मराठा समाज, सोनार समाज, लिंगायत समाज, सुतार समाज,तेली समाज,कुणबी समाज,चर्मकार समाज, बौद्ध समाज इत्यादी सर्व समाज वास्तव्य करून आहेत. सर्व जाती व्यवस्था सुशिक्षित व कर्तुत्वाने मोठ्या पदावर विराजमान आहे यातूनच गावातील एकता, बंधुता आणि समता याचे दर्शन इतर गावातील लोकांना होत आहे. प्राचीन काळात कसबा म्हणजेच प्रमुख ठिकाण असल्याने आजही धामणसे गाव त्याचं दर्जाने व मानाने अग्रस्थानी उभा आहे.
6
+ गावचा परंपरागत मुख्य व्यवसाय हा शेती आहे. काळानुसार बदल होत असून शेतकरी वर्ग बागायतीकडे वळला आहे. गावात आंबा काजू नारळ सुपारी इत्यादी पिकांचे उत्पन्न घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी व परदेशी आहेत. गावातील लोक गवंडी काम, कंत्राट कामे,चिरे खाण व्यवसाय, घर बांधणी अशा विविध व्यवसायात उतरून काम करत आहेत. फर्निचर बनविणे, वेल्डिंग, प्लुंबिंग इत्यादी कौशल्य आधारित व्यवसायांचे आकर्षण युवा पिढीला असून त्यातून रोजगार प्राप्ती ते करत आहेत.
7
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
8
+ गावचा विस्तार मोठा असून पश्चिमेस नेवेरे,गणपतीपुळे उत्तरेस निवेंडी,चाफे, पूर्वेस ओरि , दक्षिणेस खरवते इत्यादी गावे आहेत
9
+ १.https://villageinfo.in/
10
+ २.https://www.census2011.co.in/
11
+ ३.http://tourism.gov.in/
12
+ ४.https://www.incredibleindia.org/
13
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
14
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1006.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ धामणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1009.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10114.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३ – १४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली.
2
+ तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते.
3
+ तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते.
4
+ इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले.
5
+
6
+ पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10143.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ यशोवर्मन पहिला (ख्मेर: ព្រះបាទយសោវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा चौथा सम्राट होता. यशोवर्मन इ.स. ८८९ ते इ.स. ९१०पर्यंत सत्तेवर होता.
2
+ हा पहिला इंद्रवर्मन आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.[१][२] इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता वडिलांच्या हक्काने नव्हे तर आईकडील पूर्वज, जे चेन्ला आणि फुनानचे राज्यकर्ते होते, त्यांच्या हक्काने असल्याचे दाखवले.[३]
3
+ आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. इ.स. ८९२मध्ये त्याने इंद्रतटक हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.[४] याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी यशोधरापूरजवळ यशोधरातटक नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10149.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पहिला राज वोडेयार पहिला (२ जून, १५५२ - २० जून, १६१७:मेलिकोटे) हा मैसुरुचा नववा राजा महाराजा होता. हा चौथ्या चामराज वोडेयारचा मोठा मुलगा होता. हा आपल्या चुलत भाऊ पाचव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर १५७८ पासून १६१७ पर्यंत सिंहासनावर होता.
2
+ आपल्या काका आणि वडीलांनी सुरू केलेले विजयनगरच्या राजदूतांना मैसुरु राज्यातून हाकलून देण्याचे काम राज वोडेयारने सुरू ठेवले. या दरम्यान त्याला स्वतःच्याच कुटुंबाकडूनही विरोध होता. राज वोडेयारने मैसुरुला विजयनगरपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. असे असताही त्याने विजयनगरच्या सम्राट व साम्राज्याला आदर दिला होता.
3
+ पहिल्या राज वोडेयारने दर दसऱ्याच्या दिवशी आपल्या महालापासून बन्नीमंटप मधील शमीच्या झाडा पर्यंत मिरवणूक काढणे सुरू केले. आता याला जगप्रसिद्ध मैसुरु दसऱ्याचे रूप आहे.
4
+ ही प्रथा १६१०पासून आजतगायत अखंड सुरू आहे. राज वोडेयारचा युवराज नरसराज नवरात्रीच्या आधी एक दिवस मृत्यू पावला असताही विद्वानांच्या सल्ल्यावरून राजाने यात खंड पाडला नाही व भविष्यातही राजघराण्याील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही या प्रथेत व्यत्यय आणू नये असे फर्मान काढले.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10155.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पहिला सातकर्णी (ब्राह्मी लिपी:𑀲𑀸𑀢𑀓𑀡𑀺) हा सातवाहन वंशातील तिसरा सम्राट होता. याचे साम्राज्य दख्खन प्रदेशात पसरलेले होते. याचा राज्यकाल इ.स.पू. ६०-इ.स.पू. ७० दरम्यान मानला जातो.[१] काही विद्वानांच्या मते हा काळ इ.स.पू. १८७-इ.स.पू. १७७ असा होता.[२] अलीकडील संशोधनात पहिल्या सातकर्णीचा राज्यकाल इ.स.पू. ८८-इ.स.पू. ४२ असल्याचा उल्लेख आहे.[३]
2
+
3
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
4
+ चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1017.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ धामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10189.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पहिले चीन–जपान युद्ध प्रामुख्याने कोरियाच्या अधिपत्यावरून चीन व जपान ह्या राष्ट्रांदरम्यान १८९४-९५ साली लढले गेले. सहा महिने चाललेल्या ह्या युद्धात जपानने सातत्याने विजय मिळवले व अखेर फेब्रुवारी १८९५ मध्ये चीनने सपशेल शरणागती पत्कारली. ह्या पराभवामुळे चीनमधील छिंग राजवंशाची जगभर नाचक्की झाली व त्याचवेळी पूर्व आशियामधील प्रादेशिक वरचष्मा प्रथमच चीनकडून जपानकडे आला.
2
+ १८६८ सालच्या जपानमधील मैजी पुनर्स्थापनेनंतर जपानची झपाट्याने प्रगती व आधुनिकीकरण होत होते. अनेक शतकांचे एकाकी राहण्याचे धोरण बदलून जपानने जागतिक घडामोडींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व त्याचसोबत साम्राज्यवादाचा देखील अंगिकार केला. तुलनेत शेजारील कोरिया देश मागासलेलाच राहिला होता. जपानला कोरियावर दुसऱ्या महासत्तेचे नियंत्रण नको होते व कोरियामधील नैसर्गिक संपत्तीवर व कृषी उत्पन्नावर जपानचा डोळा होता. पारंपारिक काळापासून कोरियामधील चोसून राजवंशावर चीनचा अंमल होता. १८८० च्या दशकामधील कोरियात घडलेल्या अनेक घटनांमुळे चीन व जपानमध्ये तणाव कायम राहिला.
3
+ जून १८९४ मध्ये सोलमधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरुवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला.
4
+ ह्या युद्धानंतर १० वर्षांनी मांचुरिया व लायोडॉंग द्वीपकल्पाच्या अधिपत्यावरून रशिया–जपान युद्ध घडले.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1023.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10235.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरखेल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10239.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10249.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10251.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10265.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10294.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ पांगुळ गरुड (इंग्लिश: Short-toed Eagle; हिंदी: सापमार) हा एक पक्षी आहे.
2
+ हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असतो. याचा रंग काळा असून छातीखालचा रंग पांढरा असतो. छातीवर गडद बदामी रंगाच्या कड्या.घुबडसारखे मोठे डोके. उडताना खालचा भाग धूसर चंदेरी दिसतो. डोके काळसर. शेपटीवर काळपट आडवे पट्टे.(नेहमी ३ पट्टे) पायांवर पिसे नसतात. चेहऱ्यावर केसांसारखी दिसणारी पिसे. लहान पक्षी उदी रंगाचा. नर-मादी दिसायला सारखे असले, तरी मादी नरापेक्षा मोठी असते.
3
+ भारतात निवासी. अलीकडे नेपाळात नोव्हेंबरमध्ये दिसल्याची नोंद.
4
+ डिसेंबर ते मार्च महिन्यात वीण.
5
+ विरळ जंगले, माळराने आणि समुद्रकिनारे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1030.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे. कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदिर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री. वरदायिनी मंदिर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदिर हे देवालय जुनं आहे. वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ श्री लक्ष्मीकेशव मंदिर व श्री देवी वाघजाई मंदिर ही ग्रामीण यात्रा स्थळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत.
4
+ लॉज, हॉटेल, पेट्रोलपंप, सीएनजी स्टेशन, मेडिकल स्टोअर
5
+ गोळवली, संगमेश्वर, कसबा
6
+ १.https://villageinfo.in/
7
+ २.https://www.census2011.co.in/
8
+ ३.http://tourism.gov.in/
9
+ ४.https://www.incredibleindia.org/
10
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
11
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10300.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुऊन त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.
2
+ गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10302.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांचआंबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10312.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पांचाळ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
2
+ उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ नावाचे राज्य होते. महाभारत काळात प्रभावी असलेले हे राज्य यमुना नदीच्या खोऱ्यात आणि कुरू राज्याच्या शेजारी होते. अहिच्छत्र व कांपिल्य या उत्तर-दक्षिण या दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या.
3
+ पांडवांची पत्नी द्रौपदी ही पांचाळ नरेश द्रुपद राजाची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.
4
+ कुरू व पांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी मगधाने ही राज्ये जिंकून घेतली.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10327.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पांजरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10340.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ पांडव लीला किंवा पांडव नृत्य हा महाभारतातील कथांचे गायन, नृत्य आणि पठण यांच्याद्वारे पुनरुत्थान करण्याची परंपरा आहे. विशेषतः उत्तराखंड येथील गढवाल प्रदेशात हे नृत्य केले जाते.[१][२]
2
+ पांडव हे या महाकाव्यातील पाच प्रमुख पात्र आहेत आणि गावातील हौशी लोक त्यांच्या भूमिका घेतात आणि ढोल, दामाऊ आणि भानकोरे नावाच्या दोन लांबलचक कर्णांसोबत घराबाहेर लीला करतात. विविध गावांमध्ये तीन दिवसांपासून ते एका महिन्यापर्यंत कुठेही चालणारे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात गर्दी खेचतात आणि ते वर्षाचे महत्त्वाचे सांस्कृतिक आकर्षण आहे.[३][४] धार्मिक नाटकात असे नट दाखवले जातात जे सहसा उत्स्फूर्तपणे त्यांच्या पात्रांच्या आत्म्याने "वश" होतात आणि नाचू लागतात."[५][६]
3
+ पांडव लीलाची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथांशी जुळलेली आहे आणि म्हणून त्याची तारीख सांगता येत नाही. हे नेहमीच गावातील हौशी लोकांद्वारे सादर केले जाते, व्यावसायिक नाही, आणि सामान्यतः उत्तराखंडच्या राजपूतांनी प्रायोजित केले जाते. एखाद्या कामगिरीला अनेकदा श्राद्ध म्हटले जाते, जो पूर्वजांच्या उपासनेचा एक हिंदू विधी आहे आणि लीला पूर्वजांच्या उपासनेचा एक प्रकार म्हणून पाहिली जाते. आज, अनेक गढवाली स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून ओळखतात.[७] प्रदर्शन साधारणपणे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातात, आणि एक विशिष्ट गावात दरवर्षी त्याचे आयोजन करू शकत नाही.[८] लीला पाहण्यासाठी लोक जवळच्या गावात जाऊ शकतात. सॅक्स लिहितात की "गढवालमधील बहुतेक गावकरी कदाचित कोणत्याही वर्षात पांडव लीलेच्या अंतरावर असतील."[९]
4
+ प्रत्येक गावाची स्वतःची भिन्नता असू शकते आणि काही गाणे किंवा नाटकावर जास्त भर देऊ शकतात.[१०] सादरीकरण रात्री सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालतात. महाकाव्यातील भाग एका रेखीय क्रमाने सादर केले जाणे आवश्यक नाही, कारण महाकाव्याची कथा सांगणे हा हेतू नसून कलाकार किंवा गावकरी परिचित असलेल्या विशिष्ट दृश्यांना नृत्य करणे किंवा अभिनय करणे हा आहे. जसजशी कथा पुढे सरकते आणि कृती तीव्र होत जाते, तसतसे ते दिवसाच्या सुरुवातीस सुरुवात करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालू ठेवतात.
5
+ बहुप्रतीक्षित भाग हा बहुतेक वेळा वडील आणि मुलगा, अर्जुन आणि नागार्जुन यांच्यातील लढाई असतो, ज्याला गेंडा या ��ावाने ओळखले जाते, कारण त्यात अर्जुन त्याच्या मुलाच्या गेंड्याची हत्या करतो. नाटकात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्यांना कधीही जमिनीला स्पर्श करू दिला जात नाही, त्यामुळे ते त्यांची शक्ती टिकवून ठेवू शकतात आणि पुढील लीला होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. अस्तित्वात असलेले सर्वात मोठे महाकाव्य, संपूर्ण महाभारत साकारणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याने, अभिनयासाठी कलाकार स्वतःचे भाग निवडू शकतात.[११]
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10354.txt ADDED
@@ -0,0 +1,81 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ विठ्ठल (विठोबा (IAST: Viṭhobā), ज्याला विठ्ठल (IAST: Viṭṭhala), आणि पांडुरंग (IAST: Pāṇḍuraṅga) म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी, गैर-विधीवादी भक्ती-चालित[१][२] महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर, पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहासलेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते १३ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.[३]
2
+
3
+ हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते.[४][३] विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते. विठोबा, ज्याला वि(त) थल(अ) आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार, कृष्णाचे रूप मानले जाते.[५]कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[४][६]
4
+ विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[३]
5
+ विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे.
6
+ गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात.
7
+ त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील
8
+ संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[९] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
9
+ पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.[१०]आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार दि. १३ जून इ.स.पु. -३२२८ श्रावण वद्य अष्टमी, श्रीमुख नाम संवत्सर ला पहाटे झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
10
+ पुराणातील श्लोकाप्रमाणे:-
11
+ वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
12
+ ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
13
+ अर्थ-
14
+ याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.
15
+ दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.[११]
16
+ श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
17
+ द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ���या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
18
+ श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येऊन दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
19
+ पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
20
+ पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात || पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
21
+ महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.[१२]
22
+ दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.[३] प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[१३]
23
+ दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
24
+ ‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
25
+ कालविला दहीभात आले मिरे लवणा,
26
+ साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
27
+ उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
28
+ हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.
29
+ नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.
30
+ विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[१५] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[१५]
31
+ संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे.
32
+ 'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[१५]
33
+ देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[३]. आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची मुक्ताईनगरहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर तर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[३] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१६]
34
+ विठोबा हा देव भक्त भक्तां���्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. श्रीहरी विठ्ठल नामे अवतार घेऊन परमभक्तांना भेटून स्वरूप दाखविले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
35
+ आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[१७]
36
+ मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५ चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.
37
+ अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत.
38
+ पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे.[१८][१९]
39
+ पत्रकार कव�� दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते. त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ]
40
+ याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनाचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ]
41
+ २०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[२०]
42
+ विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
43
+ (अपूर्ण यादी)
44
+ १) युगे अठ्ठावीस
45
+ युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
46
+ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
47
+ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
48
+ चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
49
+ जय देव जय देव जय पांडुरंगा ।
50
+ रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
51
+ तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
52
+ कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
53
+ देव सुरवर नित्य येती भेटी ।
54
+ गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
55
+ जय देव ।। 2।।
56
+ धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
57
+ सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
58
+ राई रखुमाबाई राणीया सकळा ।
59
+ ओवळिती राजा विठोबा सावळा।।
60
+ जय देव ।।3।।
61
+ ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
62
+ चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
63
+ दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
64
+ पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
65
+ जय देव ।।4।।
66
+ आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
67
+ चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
68
+ दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
69
+ केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
70
+ जय देव जय देव ||5||
71
+ २) येई हो विठ्ठले
72
+ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
73
+ निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
74
+ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
75
+ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
76
+ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
77
+ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
78
+ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
79
+ विष्णूदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
80
+
81
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10382.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांडुर्णी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10422.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ श्वेत समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. बारेंट्स समुद्राच्या दक्षिणेस असलेला व ९०,००० चौरस किमी पसरलेला श्वेत समुद्र संपूर्णपणे रशिया देशाच्या सरहद्दीत आहे व रशियाचा अंतर्गत भाग मानला जातो. प्रशासकीय दृष्ट्या हा समुद्र रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त, मुर्मान्स्क ओब्लास्त व कॅरेलिया प्रजासत्ताक ह्या विभागांदरम्यान वाटला गेला आहे. अर्खांगेल्स्क हे रशियाचे मोठे बंदर ह्याच समुद्रावर स्थित आहे.
2
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1044.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ धामवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
3
+ ==लोकजीवन= . म्हातारी माणसे व म्हाताऱ्या बाई राहतात सर्व तरुण वर्ग मुंबईला असतो
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10461.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10462.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10502.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाईज बास्को हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. बिल्बाओ हे स्पेनमधील मोठे शहर ह्याच संघात वसले आहे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10503.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ खेड तालुक्यातील पश्चिमभागात महत्वाचे गाव म्हणून पाईट गावाची ओळख आहे.पाईट हा पश्चिमभागाचा कणा म्हटला जातो पाईट हे गाव विस्तीर्ण स्वरूपाचे असून यामध्ये १२ वाड्या (गवारवाडी,लोढूंगवाडी,चिखलवाडी,पापळवाडी,कोमलवाडी,सावंतवाडी,करंडेवाडी,विठ्ठलवाडी,चोरघेवाडी,रौंधळवाडी,ठाकरवाडी,वैतागवाडी) असुन जागोजागी वस्त्या आहेत त्यात सोपावस्ती,घरकुलवस्ती,करंडेवस्ती,गडदेवस्ती इत्यादींचा सामावेश असून यात २ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे (पाईट,रौंधळवाडी). गावाच्या उत्तरेस कुंडेश्वर डोंगर असून त्यावर कुंडेश्वर हे क क्षेत्रातील पर्यटन तळ आहे. पाईटगावच्या दक्षिणेला भामा नदी वाहते त्यावर भामाआसखेड हे मोठे धरण आहे त्या धरणाच्या पाण्यामुळे येथीलभाग जलमय व समृद्ध झालेला दिसुन येतो. पाईट गाव हे आठवडे बाजारी गाव असुन पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडे बाजार गुरुवारी पाईट येथे भरतो. पाईट गावाला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे, शिवाय गावामध्ये शिक्षणाच्याही सुविधा आहेत इंग्लीश मिडीयम बरोबर जिल्हा परीषदेच्या आदर्श शाळेचाही यात सामावेश आहे, आदिवासी शिक्षण संस्था जुन्नरचे कुंडेश्वर विद्यालय पाईट गावात आहे यात १० वी पर्यंत शिक्षण मिळते.पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्युनियर कॉलेज मध्ये १२वी पर्यंत शिक्षण घेता येते पाईट गावाची यात्रा ही या भागातील सर्वात मोठी यात्रा भरते.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_1051.txt ADDED
@@ -0,0 +1,24 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामारी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ४८०१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.
2
+ धामारी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ४८०१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८१७ कुटुंबे व एकूण ३९०९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९८६ पुरुष आणि १९२३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १०१ असून अनुसूचित जमातीचे १७ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५५९१ [१] आहे.
3
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
4
+ ग्रामपंचायतमध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध आहे तसेच गावकऱ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सामान्य सुविधा ग्रामपंचायततर्फे पुरवल्या जातात. गावकऱ्यांना विविध दाखले देणे, त्याच्याकडून विविध कर गोळा करणे ई. कामे ग्रामपंचायत मध्ये केली जातात.
5
+ गावात ५ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, १ शासकीय प्राथमिक शाळा, १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि १ शासकीय माध्यमिक शाळा आहे.
6
+ सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा पाबळ येथे ७ किलोमीटर अंतरावर, पदवी महाविद्यालय जातेगाव येथे ७ किलोमीटरहून जास्त अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यवस्थापन संस्था वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, पॉलिटेक्निक वाघोली येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा कारेगाव येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आणि अपंगांसाठी खास शाळा पुणे येथे ५२ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
7
+ गावात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे.
8
+ सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
9
+ सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
10
+ सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
11
+ गावात १ खाजगी दवाखाना आणि १ औषध��चे दुकान उपलब्ध आहे.
12
+ गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे.
13
+ गावात खंडोबा मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर आणि मस्जिद आहे. गावातील खंडोबा मंदिर हे गावाचे ग्रामदैवत असून दरवर्षी मार्गशीष महिन्यात येथे यात्रा भरते.
14
+ गावात गटारव्यवस्था उघडी आहे. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. आणि गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे.
15
+ गावात पोस्ट ऑफिस (४१२४०३), मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा, शासकीय बस सेवा, आणि ऑटोरिक्षा व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहे.
16
+ गावात व्यापारी बँक (पुणे मध्यवर्ती सहकारी बँक), विकास कारीकारी संस्था, स्वयंसहाय्य गट आणि रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे.
17
+ गावात एटीएम उपलब्ध नाही. सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
18
+ गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.
19
+ सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती ७ किलोमीटर अंतरावर पाबळ येथे आहे.
20
+ गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
21
+ गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
22
+ गावात घरगुती वापरासाठी २४ तास वीज उपलब्ध असून शेतीसाठी आठ तास वीज उपलब्ध आहे.
23
+ धामारी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
24
+ धामारी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते - कांदे, आलू, मेथी, मका, ज्वारी, बाजरी, मुग, तूर, मटकी इ.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10510.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड(मराठीत रत्तल) या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल(चिन्ह lb) = ४५३.५९२ ग्रॅम.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10531.txt ADDED
File without changes
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10532.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते.सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात.
2
+ पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.
3
+ पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठरावीक प्रदेशांतच पडतो.पाऊस पडतो तिथे समृद्धता असते.पाऊस ह्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत .
4
+ १. अतिशय जास्त पाऊस ३०० ते ७५० सें.मी.
5
+ (किंवा त्याहून अधिक अपवादात्मक पर्जन्यमान)
6
+ २ जास्त पाऊस २०० ते ३०० सें.मी.
7
+ ३ मध्यम पाऊस १०० ते २०० सें.मी.
8
+ ४ कमी पाऊस ५० ते १०० सें.मी. ( किंवा अपवादात्मक कमी पर्जन्यमान.)
9
+ पाऊस (Rain), रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (किंवा सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rain)/(Heavy Downpour)/(Torrential Rain), पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain, Downpour), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस/गारपीट (Hailstorm), अतिवृष्टी (Excessive Rainfall), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scattered Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon Rain), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, Post-Monsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी (किंवा अवकाळ्या) पाऊस (Un-seasonal Rain), रात्रीचा पाऊस (Night Rain), धडकवणी/मृगाचा पाऊस/वळवाचा पाऊस/वळीव (Pre-Monsoon showers), हस्ताचा पाऊस/पर्जन्य ( heavy rainfall ) ,सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainfall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण (Cloud seeding)
10
+ अखंडपणे मुसळधार पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते.परिणामतः झड लागल्यावर ओला दुष्काळ पडतो.
11
+ १. मौसीनराम (सरासरी वार्षिक पाऊस ११,८७३ मिलीमीटर )
12
+ २. चेरापुंजी (सरासरी ११,७७७ मिमी.)
13
+ ३. अगुंबे (सरासरी ७६४० मिमी)
14
+ ४. आंबोली (७५०० मिमी
15
+ ५. ताम्हिणी (सरासरी वार्षिक पाऊस ६४९८ मिलिमीटर )
16
+ इ.स. १९७६, १९७८, १९९०, १९९४, २००५, २००६, २०११, आणि २०१४ या वर्षी ताम्हिणी घाटात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडला होता.
17
+ पावसावर लिहिला गेलेल्या काही मराठी कविता आणि गाणी पुढीलप्रमाणे आहेत.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10536.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाओलो बोइ (१५२८:सिरॅक्यूज, इटली - १५९८:नेपल्स, इटली) हा सोळाव्या शतकातील इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता. याला समकालीन बुद्धिबळ खेळाडूंपैकी श्रेष्ठ समजले जाते.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10573.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५४ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानचा हा पहिला इंग्लंड दौरा होता आणि कोणत्याही देशाने पहिल्या वहिल्या इंग्लंड दौऱ्यातच एखादा कसोटी विजय मिळवणारा पाकिस्तान पहिला देश ठरला. पाकिस्तानचे नेतृत्व अब्दुल कारदार याने केले.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10603.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने १९ डिसेंबर २००९ ते ५ फेब्रुवारी २०१० या कालावधीत ३ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१]
2
+ अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान, स्टँड-इन कर्णधार, शाहिद आफ्रिदी, एका कथित बॉल टॅम्परिंग घटनेत सामील होता, जेव्हा तो क्रिकेटचा चेंडू चावताना दिसला.[२][३][४] सामना संपल्यानंतर त्याला मॅच रेफरीने लगेच बोलावले. तेथे आफ्रिदीने बॉल टॅम्परिंगचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यावर दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली.[५]
3
+ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेटने ऑस्ट्रेलियामध्ये (१६०.७ किमी/ता) रेकॉर्ड केलेली सर्वात वेगवान चेंडू टाकली.[६] पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टेटने हा पराक्रम केला. ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांच्यानंतर रेकॉर्ड केलेली ती तिसरी सर्वात जलद वितरण देखील आहे.[६]
4
+ ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ५-० आणि एकमेव टी-२० जिंकून क्लीन स्वीप नोंदवला.
5
+ या दौऱ्यादरम्यान, कर्णधार मोहम्मद युसूफ माजी कर्णधार युनूस खान आणि शोएब मलिक यांच्यासोबत सत्ता संघर्षात सामील असल्याची अटकळ पसरली होती आणि संघाचे मनोबल कमी होते.
6
+ या दौऱ्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चौकशी केली आणि युसूफ आणि युनिस यांची भविष्यात देशासाठी निवड केली जाणार नाही असे जाहीर केले, आजीवन बहिष्काराचा अर्थ लावला आणि मलिक आणि राणा नावेद-उल-हसन यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातली. आफ्रिदी आणि बंधू उमर आणि कामरान अकमल या सर्वांना दंड ठोठावण्यात आला आणि सहा महिन्यांसाठी प्रोबेशनवर ठेवण्यात आले.[७] दुसऱ्या कसोटीनंतर कामरानला वगळण्यात आले होते कारण त्याने दुसऱ्या कसोटीत झेल सोडले होते, परंतु त्याने निर्णयाच्या विरोधात बोलले आणि त्याला वगळले नाही असा आग्रह धरला, तर उमरवर एकजुटीने संपावर जाण्याच्या प्रयत्नात दुखापतीचे खोटे सांगून व्यत्यय आणल्याचा आरोप होता.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10612.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ २८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०११ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाकिस्तानने झिम्बाब्वे राष्ट्रीय संघाविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि झिम्बाब्वेच्या प्रतिनिधी संघाविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळला.[१][२]
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10624.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.
2
+ आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित होती. परंतु तेव्हा जगात कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्येच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा दौरा एप्रिल २०२१ मध्ये होईल असे संकेत दिले. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याला सहमती दर्शवत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन ऐवजी चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांसह सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ४ मार्च २०२१ रोजी क्विंटन डी कॉकला दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्याजागी टेंबा बवुमाकडे कर्णधारपद सोपविले गेले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.
3
+ दक्षिण आफ्रिकेत खेळून झाल्यावर पाकिस्तानी संघ लगेचच दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेस रवाना झाला.
4
+
5
+
6
+
7
+
8
+
9
+
10
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10657.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी २०१८ मध्ये पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[२][३][४] न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, त्यांचा दुसरा ५-० द्विपक्षीय मालिका विजय, २००० मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला विजय.[५][६] पाकिस्तानने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली. हा पाकिस्तानचा न्यू झीलंडमधील पहिला टी२०आ मालिका विजय होता आणि परिणामी, पाकिस्तान आयसीसी टी२०आ चॅम्पियनशिप क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.[७][८]
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10660.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10662.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४]
2
+ १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
3
+ दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७]
4
+
5
+
6
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10677.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४]
2
+ १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
3
+ दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७]
4
+
5
+
6
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10687.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
2
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10697.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10703.txt ADDED
@@ -0,0 +1,15 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान संघ सध्या मार्च २०१७ ते मे २०१७ दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. सदर दौऱ्यावर ३-कसोटी, ३-एकदिवसीय आणि ४-टी२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात आल्या.[१][२][३] ऑगस्ट २०१६ मध्ये भारताविरुद्ध खेळल्याप्रमाणे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क येथे आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्याची शक्यता पडताळून पाहिली होती. परंतु त्यांनी या दौऱ्यावरील सर्व सामने कॅरेबियनमध्येच खेळले गेले.[३]
2
+ जानेवारी २०१७ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडीज बोर्डासमोर दोन टी२० सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला.[४] हे सामने १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी लाहोर येथे आणि आणखी दोन टी२० सामने फ्लोरिडा येथे खेळवण्याबाबत विचार केला गेला.[४] परंतु १२ जानेवारी २०१७, रोजी सामने जाहीर केले गेले, तेव्हा त्यात कुठेही पाकिस्तानातील सामन्यांचा उल्लेख नव्हता.[३] त्यादिवशीच नंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीजचा संघ सुरक्षिततेच्या कारणामुळे पाकिस्तानात खेळणार नसल्याचे जाहीर केले.[५] आधी कार्यक्रमानुसार दोन टी२० सामने खेळवण्याचे ठरले होते, परंतु मार्च २०१७ च्या सुरुवातीला वेळापत्रकात आणळी दोन टी२० सामन्यांचा समावेश करण्यात आला.[६]
3
+ दौऱ्याआधी, मिसबाह-उल-हकने पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार होण्याचा निर्णय घेतला आणि तो पाकिस्तान बोर्डाने मान्य केला.[७] एप्रिल २०१७ मध्ये, मिसबाहने ह्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.[८] दोन दिवसानंतर, युनिस खाननेसुद्धा मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[९]
4
+ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-१ अशी जिंकली[१०] आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला.[११] त्या नंतर त्यांनी कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला २-१ ने पराभूत करून, वेस्ट इंडीजमधील पहिला मालिका विजय साकारला.[१२]
5
+
6
+
7
+
8
+
9
+
10
+
11
+
12
+
13
+
14
+
15
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10712.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
2
+
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10730.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ महिला कसोटी किट
2
+ महिला वनडे किट
3
+ पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
dataset/scraper_5/batch_6/wiki_s5_10733.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१२ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा केला. आयर्लंडमध्ये, ते बांगलादेश विरुद्ध १ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय, तसेच बांगलादेश आणि आयर्लंड विरुद्ध दोन आयर्लंड महिला तिरंगी मालिकेत खेळले. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि २ टी२०आ मध्ये इंग्लंड आणि १ टी२०आ मध्ये वेस्ट इंडीज खेळले.[१][२]