Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10014.txt +51 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1004.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10041.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10073.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10091.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10097.txt +10 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10113.txt +33 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10145.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10203.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10204.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10210.txt +8 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10218.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10220.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10262.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10267.txt +5 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10281.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10295.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10298.txt +8 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10305.txt +79 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10307.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10314.txt +6 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10326.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10327.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1033.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10361.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10365.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10373.txt +8 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10402.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10407.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10417.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1042.txt +70 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10438.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1047.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10482.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10483.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10545.txt +13 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10562.txt +11 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10590.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10611.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10632.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10637.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10649.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10652.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10664.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10666.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10679.txt +11 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10686.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10701.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10730.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10753.txt +3 -0
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10014.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,51 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
|
| 2 |
+
(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
|
| 3 |
+
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
|
| 4 |
+
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
|
| 5 |
+
त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[१] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[२] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
|
| 6 |
+
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ स���दर्भ हवा ]
|
| 8 |
+
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ]
|
| 11 |
+
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
|
| 12 |
+
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
|
| 13 |
+
अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ]
|
| 14 |
+
संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे :
|
| 15 |
+
|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|
| 16 |
+
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||
|
| 17 |
+
यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ]
|
| 18 |
+
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ]
|
| 19 |
+
संतजनांस राजाश्रयः
|
| 20 |
+
१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्ष��सनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 21 |
+
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 22 |
+
३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 23 |
+
४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 24 |
+
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ]
|
| 25 |
+
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 26 |
+
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 27 |
+
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 28 |
+
सक्तीने धर्मांतरास विरोध:
|
| 29 |
+
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ]
|
| 30 |
+
अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:
|
| 31 |
+
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 32 |
+
'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'
|
| 33 |
+
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
|
| 34 |
+
(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)
|
| 35 |
+
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले
|
| 36 |
+
(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
|
| 37 |
+
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ल�� जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ]
|
| 38 |
+
इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.
|
| 39 |
+
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[३] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
|
| 40 |
+
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ]
|
| 41 |
+
मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ]
|
| 42 |
+
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता.
|
| 43 |
+
संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ]
|
| 44 |
+
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :
|
| 45 |
+
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
|
| 46 |
+
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
|
| 47 |
+
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास
|
| 48 |
+
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
|
| 49 |
+
याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ]
|
| 50 |
+
(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या)
|
| 51 |
+
संभाजी महाराजांवरील नाटके
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1004.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10041.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिराती या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.
|
| 2 |
+
या संघाने आता पर्यंत २०१४, २०२० आणि २०२२ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10073.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्���े पुढीलप्रमाणे-
|
| 4 |
+
२०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले
|
| 5 |
+
खालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत.
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
|
| 9 |
+
खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10091.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयोगभूमी[१][श १] म्हणजे दोन विशाल भूखंडांना जोडणारा व दोन बाजूंना समुद्र किंवा अन्य जलाशय असलेला जमिनीचा चिंचोळा पट्टा होय. आशिया खंडातील अरबी द्वीपकल्प व आफ्रिका यांना जोडणारी सुएझ संयोगभूमी, उत्तर व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी पनामा संयोगभूमी, मलय द्वीपकल्पाला उर्वरित आग्नेय आशियाशी जोडणारी क्रा संयोगभूमी या जगातील महत्त्वाच्या संयोगभूमी आहेत.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10097.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संरक्षण मंत्रालय (रक्षा मंत्रालय) कडे राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय सशस्त्र दलांशी थेट संबंधित सरकारच्या सर्व संस्था आणि कार्यांचे समन्वय आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी आहे. भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या सशस्त्र दलांचे औपचारिक सरसेनापती आहेत. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संरक्षण मंत्रालय सशस्त्र दलांना धोरणात्मक चौकट आणि संसाधने प्रदान करते. भारताच्या प्रादेशिक अखंडतेची खात्री करण्यासाठी भारतीय सशस्त्र दल ( भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, भारतीय नौदलासह ) आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दल प्रामुख्याने जबाबदार आहेत.
|
| 2 |
+
सध्या, लष्करी अधिकारी आणि संबंधित नागरी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची नवीन निर्मिती सुरू आहे, मंत्रालयाद्वारे प्रशासित आणि देखरेख केली जाईल. मंत्रालय दरवर्षी जानेवारीत प्रजासत्ताक दिनाचे समारंभ आणि परेड आयोजित करते आणि चालवते, प्रमुख पाहुणे आयोजन करतात. भारताच्या संघीय विभागांमध्ये मंत्रालयाचे सर्वात मोठे अंदाजपत्रक आहे आणि सध्या जगातील देशांमध्ये लष्करी खर्चात तिसऱ्या क्रमांकावर आहे, [१] [२] [३] . [४]
|
| 3 |
+
१७७६ मध्ये कोलकाता येथे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वोच्च सरकारमध्ये एक लष्करी विभाग तयार करण्यात आला, ज्याचे मुख्य कार्य ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या सैन्याशी संबंधित आदेश चाळणे आणि नोंद करणे हे होते. लष्करी विभाग सुरुवातीला सार्वजनिक विभागाची एक शाखा म्हणून काम करत असे आणि लष्कराच्या कर्मचाऱ्यांची यादी ठेवत असे. [५]
|
| 4 |
+
चार्टर ऍक्ट १८३३ सह, ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या सचिवालयाची चार विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली, प्रत्येक विभागाचे प्रमुख सरकारचे सचिव होते. [५] बंगाल, बॉम्बे आणि मद्रासच्या (इंग्रजांच्या अमदानीत) भागातील् सैन्याने एप्रिल १८९५ पर्यंत प्रेसिडेन्सी आर्मी म्हणून काम केले, जेव्हा प्रेसीडेंसी आर्मी एकल भारतीय सैन्यात प्रशासकीय सोयीसाठी एकत्र झाली, ते चार आज्ञामध्ये विभागले गेले: पंजाब ( उत्तर पश्चिम सरहद्दीसह ), बंगाल ( बर्मासह ), मद्रास आणि बॉम्बे ( सिंध, क्वेटा आणि एडनसह ). [५]
|
| 5 |
+
भारतीय सैन्यावरील सर्वोच्च अधिकार गव्हर्नर-जनरलकडे निहित होत���, जो भारताच्या राज्य सचिवांद्वारे वापरला जाणारा ताजच्या नियंत्रणाच्या अधीन होता. परिषदेतील दोन सदस्य लष्करी घडामोडींसाठी जबाबदार होते. एक लष्करी सदस्य होता, जो सर्व प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर देखरेख करत असे. दुसरा कमांडर-इन-चीफ होता जो सर्व कार्यरत बाबींसाठी जबाबदार होता. [५] मार्च १९०६ मध्ये लष्करी विभाग रद्द करण्यात आला आणि त्याच्या जागी दोन स्वतंत्र विभाग आले; लष्कर विभाग आणि लष्करी पुरवठा विभाग. एप्रिल १९०९ मध्ये लष्करी पुरवठा विभाग रद्द करण्यात आला आणि त्याची कार्ये लष्कर विभागाच्या ताब्यात देण्यात आली. जानेवारी १९३८ मध्ये लष्कर विभागाची संरक्षण विभाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. संरक्षण विभाग ऑगस्ट १९४७ मध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या अधिपत्याखाली संरक्षण मंत्रालय बनले. [५]
|
| 6 |
+
१९४७ मध्ये सशस्त्र दलांना मुख्यत्वे परिवहन मदत देणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यात दूरगामी बदल झाले आहेत. नोव्हेंबर १९६२ मध्ये, १९६२ च्या युद्धानंतर, संरक्षण उपकरणांचे संशोधन, विकास आणि उत्पादन हाताळण्यासाठी संरक्षण उत्पादन विभागाची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर १९६५ मध्ये, संरक्षण उद्देशांसाठी आयात प्रतिस्थापनाच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी संरक्षण पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली. हे दोन विभाग नंतर विलीन करून संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभाग तयार करण्यात आला.
|
| 7 |
+
१९८० मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. जानेवारी २००४ मध्ये संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभागाचे नाव बदलून संरक्षण उत्पादन विभाग असे करण्यात आले. लष्करी उपकरणांच्या वैज्ञानिक बाबी आणि संरक्षण दलाच्या उपकरणांचे संशोधन आणि रचना यावर सल्ला देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये माजी सैनिक कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली.
|
| 8 |
+
संरक्षण मंत्रालयात पाच विभाग असतात; संरक्षण विभाग (DoD), सैन्य व्यवहार विभाग (DMA), संरक्षण उत्पादन विभाग (DDP), संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (DRDO), आणि माजी सैनिक कल्याण विभाग (DESW). भारताचे संरक्षण सचिव हे संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात [६] [७] आणि मंत्रालयातील विभागांच्या क्रियाकलापांच्या समन्वयासाठी देखील जबाबदार असतात. [६] [७]
|
| 9 |
+
सर���व विभागांची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
|
| 10 |
+
संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, मानसशास्त्रीय संशोधन संरक्षण संस्था आणि राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासन आणि अखत्यारीत येतात.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10113.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,33 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
समाजविज्ञानात प्रतिमानचा शोध म्हणजे सामाजिक प्रक्रियेचे स्वरूप कसे असते याचे ते
|
| 2 |
+
अंदाजात्मक वर्णन असते याद्वारे संज्ञापन प्रकिया म्हणजे काय?संज्ञापन पद्धत कशी असते हे
|
| 3 |
+
समजणे शक्य होते. ही संपूर्ण प्रक्रियामधून वर्तविता येते.
|
| 4 |
+
सर्वसाधारणपणे प्रतिमान हे आकृतीद्वारे मांडले जाते. या आकृतीद्वारे संज्ञापनातील विविध
|
| 5 |
+
घटनांमध्ये समाविष्ट घटक असतात. त्या घटकातील परस्पर सहसंबंध अभ्यासला जातो.प्रतिमान
|
| 6 |
+
हे स्पष्टीकरण आणि विश्लेषणाचे साधन असते. प्रतिमान म्हणजे सत्याचे प्रतिपादन नव्हे तर
|
| 7 |
+
केवळ त्या संदर्भात केलेल्या संशोधनातून आणि चाचण्यांमधून आलेल्या शक्यता असतात.
|
| 8 |
+
त्यानंतर या प्रतिमानचा विकास होवून त्याचे सिद्धांतात रूपांतर होवू शकते.
|
| 9 |
+
प्रतिमानांचा उपयोग करण्यापूर्वी तसेच एखाद्या भौतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यापूर्वी
|
| 10 |
+
एखाद्या विशिष्ठ प्रतिमानांचा वापर करण्यामागे निश्चित कारण काय? याचे स्पष्टीकरण द्यावे
|
| 11 |
+
लागते. प्रतिमानात एखाद्या वस्तूमधील वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची आणि ही वैशिष्ट्ये परस्परांशी
|
| 12 |
+
कशी निगडीत आहेत? याचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता असते.
|
| 13 |
+
प्रतिमानच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे महत्त्वाच्या सिद्धांत निर्मितीस मदत करणे.
|
| 14 |
+
१) वर्णनात्मक कार्य -
|
| 15 |
+
एखाद्या विशिष्ठ स्वरूपाच्या वर्तनाच्या स्वरूपात सिद्धांत नसला किंवा अपूर्ण स्वरूपात सिद्धांत असला
|
| 16 |
+
म्हणजे त्या वर्तनाची माहिती देण्यासाठी प्रतिमानची बांधणी केली जाते. प्रतिमानाद्वारे अचूक आणि निश्चित
|
| 17 |
+
स्वरूपात वर्णन करता येते.
|
| 18 |
+
२) स्पष्टीकरणात्मक कार्य -
|
| 19 |
+
अस्तित्वात असलेल्या सिद्धांतातील अविकसीत संकल्पनाबद्दल प्रतिमाने स्पष्टीकरण देण्याचे कार्य करते.
|
| 20 |
+
सापेक्षपणे अविकसीत सिद्धांतातील संकल्पनाबद्दल तंतोतंत व्याख्या तयार करण्याचे कार्य प्रतिमानद्वारे
|
| 21 |
+
शक्य होते.
|
| 22 |
+
३) अनेक वर्णसमीरणाचे कार्य -
|
| 23 |
+
संकल्पनामधील समाविष्ट प्रक्रियेतील अनेक वर्ण समीकरणांची मांडणी करण्याचे कार्य प्रतिमान करत
|
| 24 |
+
असतात.
|
| 25 |
+
४) मापनात्मक कार्य प्रतिमान -
|
| 26 |
+
प्रतिमानची निर्मिती ही प्रामुख्याने एखाद्या प्रक्रियेतील वा भौतिक वस्तूतील प्रतिनिधीत्व करणाऱ्या समान
|
| 27 |
+
गुणवैशिष्ट्यांचे मापन करण्यासाठी आणि सापेक्ष विधानांचे तसेच सुप्त वैशिष्ट्यांची जोपासना करण्यासाठी
|
| 28 |
+
केली जाते.
|
| 29 |
+
५) संकल्पनात्मक कार्य -
|
| 30 |
+
ही माध्यमातील बदल ध्वनीत करतात. गणिती प्रतिमानांची स्वतःची भाषा शब्दसंग्रह आणि वाक्यरचनेचे
|
| 31 |
+
आपापले नियत असतात. प्रतिमानाची भाषा चिन्हात आणि नेहमीच्या भाषा चिन्हात फरक असतो.
|
| 32 |
+
रचनात्मक प्रतिमाने ही त्रिमीतीची साधने असतात.
|
| 33 |
+
शब्दसंग्रह म्हणजे काय?
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10145.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात. लोसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10203.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सैद मोदी (इ.स. १९६२ - २८ जुलै, इ.स. १९८८) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू होता.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10204.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सईद रसेल (३ जुलै, १९८४:जेसोर, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करीत असे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10210.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
|
| 7 |
+
सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.[ संदर्भ हवा ] सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10218.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
‘सकल राष्ट्रीय उत्पादन’(ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10220.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सकलैन अर्शद (कतार - ) हा कतारकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना ९ ऑक्टोबर, २०१९ रोजी जर्सीविरुद्ध खेळला.[१]
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10262.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखी गोखले ( २७ जुलै १९९३) एक मराठी दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे.
|
| 2 |
+
गोखले यांनी आपल्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवात काही हिंदी जाहिरातींमधून केली होती. तिने २०१३ मध्ये रंगरेझ या हिंदी चित्रपटात वेणू नावाची छोटीशी भूमिका केली होती. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये रेश्मा इनामदारची भूमिका साकारण्यापूर्वी ती एका एकांकिकेचाही भाग होती. शो संपल्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाट्य नाटकातही दिसली. २०१७ मध्ये तिला महाराष्ट्र टाइम्सने फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले होते. जुन्या कलाकारांसह ती दिल दोस्ती दुनियादारी, परी म्हणून दिल दोस्ती दोबारा या रिबूट सिक्वेलचा देखील भाग होती. पिंपळ (२०१७) मध्येही तिने सीमाची भूमिका साकारली होती. सकाळ पुणे या वृत्तपत्रासाठी तिने मैत्रीणमध्ये लेखही लिहिले आहेत. लगीनघाई नाटकाच्या पोस्टरसाठी तिने स्टिल फोटोग्राफीही केली आहे. जुलै 2018 पर्यंत, ती यूकेमध्ये आर्ट क्युरेशनमध्ये मास्टर्स करत होती.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10267.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सगनभाऊ जन्म १७७८ मृत्यू १८५० सगनभाऊ मुस्लिम धर्मीय होता. मूळचा जेजुरीचा राहणारा; परंतु पुढे अनेक वर्ष पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहिला. तो शिकलकरीचा तलवारींना धार लावणे, म्यान बनवणे, असा व्यवसाय करीत. सगनभाऊ लावण्या उत्तम लिहीत. त्या काळी गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फडाचा प्रमुख सगनभाऊ होता
|
| 2 |
+
नागेश - अदिनाथ - गोविंदनाथ - सिद्धनाथ - सगनभाऊ अशी त्यांची नाथपंथीय परंपरा आहे.
|
| 3 |
+
सगनभाऊच्या लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठा, पातिव्रत्य, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदुसंस्कार त्यामधे स्पष्ट दिसून येतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरुवात झाली. सगनभाऊच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली. बिभत्स, अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करुत होते. त्याच वेळेस सगनभाऊनेही शृंगारिक लावण्या रचल्या. स्वतंत्र विचार, मनोहर कल्पना, यांची सांगड त्याने आपल्या कवनात घातलेली दिसते. उत्तान शृंगार व डौलदार रचना, बैठकीच्या चाली, यामुळे सगनभाऊच्या लावण्या लोकप्रिय झाल्या. सगनभाऊंनी आपल्या लावण्यांतून मराठी राज्य, मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.
|
| 4 |
+
'नाकी नथ हालति नागिन डुलती शृंगाराचा काय नखरा' किंवा 'लाल भडक वेणी सडक आति चमेली मधि भिजली'
|
| 5 |
+
आणि 'गोरे गाल मजा पहाल जपून चाल फाकडे' असे वर्णने तो करतो.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10281.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
१२७१५/१२७१६ सचखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी महाराष्ट्राच्या नांदेड शहराला पंजाबमधील अमृतसरसोबत जोडते. नांदेड व अमृतसर ही दोन्ही शीख धर्मातील पवित्र धर्मस्थळे आहेत. हुजूर साहिब नांदेड गुरुद्वाराला सचखंड नावाने संबोधित केले जात असल्यामुळे ह्या गाडीला सचखंड एक्सप्रेस असे नाव दिले गेले आहे. ही गाडी नांदेडच्या हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक ते अमृतसरच्या अमृतसर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली व पंजाब राज्यांतून धावणारी सचखंड एक्सप्रेस नांदेड व अमृतसर दरम्यानचे २,०८१ किमी अंतर ३४ तास व ५० मिनिटांत पूर्ण करते.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10295.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन संघवी आणि जिगर सरैया हे भारतीय संगीतकार, गायक, संगीत निर्माता, संगीत दिग्दर्शक आहे जे दोघे सचिन-जिगर म्हणून ओळखले जातात. ते हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांसाठी संगीत देतात.[१]
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10298.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन कुंडलकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी भाषेतील चित्रपटदिग्दर्शक, लेखक, नाटककार आहे. मराठी भाषेतील चित्रपटांशिवाय याने हिंदी भाषेतही चित्रपट-दिग्दर्शन केले आहे.
|
| 2 |
+
सचिन कुंडलकर याचा जन्म महाराष्ट्रातल्या पुणे शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत, तर आई पाळणाघर चालवत असे [१]. शालेय दिवसातिल चित्रपटाच्या आवडीने ते प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांच्याकडे कामास गेले असताना, गोवारीकरांनी त्यांना शिक्षण पूर्ण करून येण्याचे सुचवले. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत (एफ.टी.आय.आय. संस्थेत) त्याने चित्रपटविषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले [२]. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकत असताना त्याने दोघी चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या कामी सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्यासाठी साहाय्यकाचे काम केले [२]. नंतर त्यांनी ज़िन्दगी जिंदाबाद , भैस बराबर आणि दहावी फ चित्रपटात सहायकाचे काम केले. फ्रेंच सरकार कडून मिळालेल्या शिष्यवृत्तितुन,ला फेमिस, पॅरिस, येथे दाखल घेतला.
|
| 3 |
+
व्यावसाईक चित्रपट दिग्दर्शनाकडे वळन्या आधी ह्यांनी लघु चित्रपट व नाटक क्षेत्रात काम केले. एफ.टी.आय.आय. मधे शिकत असताना त्यांनी आउट ऑफ़ द बॉक्स हा लघु चित्रपट बनवला. त्यांचा इ.स. २००५ मधील लघु चित्रपट द बाथ समलैंगिकते वर आधारित होता व त्यात रजत कपूर ह्यानी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ३०वे सॅन फ्रान्सिस्को अंतर्राष्ट्रीय एल जी बी टी चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.
|
| 4 |
+
कुंडलकारांची नाटकं, छोट्याश्या सुट्टीत व पूर्णविराम हे खूप गाजले व त्यांचे हिंदी आणि इंग्रजीत पण प्रयोग झाले. ऑन वेकेशन ह्या नावाने छोट्याश्या सुट्टीतचे इंग्रजीत प्रयोग झालेत.
|
| 5 |
+
कुंडलकर याची पहिली प्रकाशित कादंबरी कोबाल्ट ब्लू त्याने वयाच्या विसाव्या वर्षी लिहिण्यास घेतली व दोन वर्षांत ती कादंबरी लिहून पुरी केली [१].
|
| 6 |
+
इ. स. २००६ मध्ये कुंडलकारांचा पहिला चित्रपट रेस्टॉरंट प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसल्या. ह्या चित्रपटाचा सामावेश ४थे गोवा मराठी चित्रपट मोहोत्सव, १२वे आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट मोहोत्सव, ८वे मुंबई चित्रपट मोहोत्सव मध्ये झाला. चित्रपटास समीक्षका���नी चांगले गुण दिले. २००७ मध्ये त्यांचा पुढील चित्रपट निरोप प्रदर्शित झाला. फ्रांस मध्ये स्थाईक होण्याआधी कोकणातील आपल्या गावी आलेल्या एका संगीतकाराच्या मनातील गुंतागुंतीची ही कहाणी होती. समीर धर्माधिकारी व देविका दफ्तरदार ह्यांनी संगीतकार आणि त्याच्या पत्नीची भूमिका साकारली. ह्या चित्रपटासाठी कुंडलकारांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ५५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ह्या चित्रपटाचा "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" म्हणून सन्मान झाला. हा पुरस्कार त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या अपर्णा धर्माधिकारी ह्याच्या सोबत स्वीकारला.
|
| 7 |
+
२००९ सालात प्रेक्षकांच्या समोर एका वेगळ्या प्रकाराच्या चित्रपटासोबत ते हजर झाले. गंध हा तीन एकमेकास भिन्न कथा जोडणारा चित्रपट होता. त्यातील समान दुवा होता तो फक्त मानवीय जाणीव, गंध. चित्रपटात नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी , मिलिंद सोमण, अमृता सुभाष व इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. ह्या चित्रपटासाठी त्यांना "सर्वोत्कृष्ट चलचित्र कथानक" ह्या विभागात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
|
| 8 |
+
पुढे कुंडलकरांनी आपला मोर्चा बॉलीवूड कडे वळवला. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी व मलयाळम आणि तमिळ चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमार ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला अय्या २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10305.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,79 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
१५ जून, इ.स. २०१३
|
| 3 |
+
दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
|
| 4 |
+
|
| 5 |
+
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यू झीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरुण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया) मालिकावीर राहिला आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेट खेळाडू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही. सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेट खेळाडू्सच्या अॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]
|
| 11 |
+
सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
|
| 12 |
+
२०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या.[३]
|
| 13 |
+
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येत असे. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरत असे. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[४][५]
|
| 14 |
+
अनेक वेळा[६] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये तेंडुलकरची गोलंदाजी प्रभावी ठरली -
|
| 15 |
+
* १८ वर्षाचा असताना वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.
|
| 16 |
+
+वि.च.-विश्वचषक
|
| 17 |
+
**आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक
|
| 18 |
+
तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,
|
| 19 |
+
तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:
|
| 20 |
+
विश्वचषक
|
| 21 |
+
२३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
|
| 22 |
+
तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगI.P.L.च्या मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतो. २००८ च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली.
|
| 23 |
+
भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते.
|
| 24 |
+
तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.
|
| 25 |
+
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे.
|
| 26 |
+
विस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.
|
| 27 |
+
वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली ऑकलंड येथे न्यू झीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले [१५]. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.[१६].
|
| 28 |
+
भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला चेपॉकमधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐ���िहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे क्रिकेट विश्वकपचे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मोहम्मद अझहरुद्दीनकडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला[१७]. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली.
|
| 29 |
+
२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला.
|
| 30 |
+
२००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने सिडनीमध्ये द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये राहुल द्रविडला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
|
| 31 |
+
२००४ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील वेस्ट इंडीझ दौऱ्यापासून सक्तीने दूर राहावे लागले.
|
| 32 |
+
सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी फेरोज शाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्��ा भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली.
|
| 33 |
+
फेब्रुवारी ६ २००६ रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणाऱ्यांपैकी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता.
|
| 34 |
+
मार्च १९ इ.स. २००६ रोजी आपल्या घरच्या वानखेडे खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली[१८]. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जेफरी बॉयकॉटने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या दैदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."[१९]
|
| 35 |
+
मे २३ इ.स. २००६ रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धाव���ंख्या सर्वोच्च होती.
|
| 36 |
+
शेवटी जुलै २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन (BCCI) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे.
|
| 37 |
+
सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करून त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु (डकवर्थ लुईस) नियमानुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा (सनथ जयसूर्या) १८ शतकांनी पुढे आहे. आहे[२०].
|
| 38 |
+
वेस्ट इंडीजमधील २००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७(बांगलादेश), ५७* (बर्म्युडा) आणि ० (श्रीलंका) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या ग्रेगचा भाऊ इयान चॅपेलने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला[२१].
|
| 39 |
+
लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे.
|
| 40 |
+
१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने नोव्हेंबर १४, इ.स. २०१३ रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
|
| 41 |
+
काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्��ा) यांच्याशी झाला. त्यांना सारा (ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन (२३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणाऱ्या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली फेरारी ३६० मॉडेना मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला फियाट कंपनीतर्फे मायकल शूमाकरच्या हस्ते भेट देण्यात आली. कस्टमने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.)
|
| 42 |
+
सचिन यांची राज्यसभा सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.[२२]
|
| 43 |
+
शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.[२३]
|
| 44 |
+
सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट अनेक भारतीय भाषांत डब झाला आहे.
|
| 45 |
+
BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy
|
| 46 |
+
|
| 47 |
+
२ सुमन •
|
| 48 |
+
६ ब्लिझार्ड •
|
| 49 |
+
९ रायडू •
|
| 50 |
+
१० तेंडूलकर •
|
| 51 |
+
१६ यादव •
|
| 52 |
+
४५ शर्मा •
|
| 53 |
+
७४ गिब्स •
|
| 54 |
+
८८ लेवी •
|
| 55 |
+
-- शहा •
|
| 56 |
+
-- वानखेडे •
|
| 57 |
+
१ परेरा •
|
| 58 |
+
७ फ्रँकलिन •
|
| 59 |
+
५५ पोलार्ड •
|
| 60 |
+
८९ सिंग •
|
| 61 |
+
-- नाईक •
|
| 62 |
+
१९ कार्तिक •
|
| 63 |
+
८२ जेकब्स •
|
| 64 |
+
-- तारे •
|
| 65 |
+
-- मराठे •
|
| 66 |
+
३ सिंग •
|
| 67 |
+
१३ पटेल •
|
| 68 |
+
१४ नचिम •
|
| 69 |
+
२३ चाहल •
|
| 70 |
+
२५ जॉन्सन •
|
| 71 |
+
३० ओझा •
|
| 72 |
+
६९ सुयाल •
|
| 73 |
+
९९ मलिंगा •
|
| 74 |
+
-- सिंग •
|
| 75 |
+
-- कुलकर्णी •
|
| 76 |
+
-- मॅके •
|
| 77 |
+
-- पीटरसन •
|
| 78 |
+
-- शुक्ला •
|
| 79 |
+
प्रशिक्षक: रॉबिन सिंग
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10307.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सचिनदेव बर्मन (१ ऑक्टोबर, इ.स. १९०६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10314.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन भौमिक (१७ जुलै १९३०[१] – १२ एप्रिल २०११) हे भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक होते. लेखन हे त्यांचे मुख्य काम होते आणि त्यांनी ९० हून अधिक चित्रपटांच्या कथा किंवा पटकथा लिहिल्या होत्या.[२][३] चित्रपटसृष्टीवरील बंगाली नियतकालिक अल्टोरथ मध्येही ते नियमित लिखाण करत असे.
|
| 2 |
+
१९६० च्या दशकात त्यांनी अनुराधा (१९६०), (ज्याने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला), आइ मिलन की बेला (१९६५), जानवर (१९६५), लव्ह इन टोकियो (१९६६), आये दिन बहार के (१९६६) ), ॲन इव्हनिंग इन पॅरिस (१९६७), ब्रह्मचारी (१९६८), आया सावन झूम के (१९६९) आणि आराधना (१९६९) यासारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी लिखाण केले होते.
|
| 3 |
+
१९७० च्या दशकात त्यांना आन मिलो सजना (१९७०), कारवां (१९७१), बे-इमान (१९७१) दोस्त (१९७४), खेल खेल में (१९७५), हम किसीसे कम नहीं (१९७७), गोल माल (१९७९) यासह यश मिळवले.
|
| 4 |
+
१९८० च्या दशकातील त्यांच्या चित्रपटांमध्ये कर्ज (१९८०), दो और दो पांच (१९८०), बेमिसाल (१९८२), जमाने को दिखना है (१९८१), नास्तिक (१९८३), अंदर बाहर (१९८४), साहेब (१९८५) आणि कर्मा (१९८६) होते. त्यांनी तमिळ कॉमेडी चित्रपट थिल्लू मुल्लू (१९८१) मध्ये सह-लेखन देखील केले, जो त्यांच्याच चित्रपट गोल मालचा रिमेक आहे.
|
| 5 |
+
१९९० च्या दशकात मैं खिलाडी तू अनारी (१९९४), ये दिल्लगी (१९९४), करण अर्जुन (१९९५), कोयला (१९९७), सोल्जर (१९९८), आ अब लौट चले (१९९९) आणि ताल (१९९९) या हिट चित्रपटांसह त्यांचे कार्य चालू राहिले.
|
| 6 |
+
पूढे त्यानी कोई... मिल गया (२००३), किसना (२००५) आणि क्रिश (२००६) हे हिट चित्रपट दिले.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10326.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सच्चाई की ताकत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10327.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सच्चिथा जयथिलाके (जन्म २४ फेब्रुवारी १९९७) ही श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू आहे.[१]
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1033.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
व्हिव्हियन जिलींग किंग्मा (२३ ऑक्टोबर, १९९४:हेग, नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10361.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सटाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६२ कि.मी. अंतरावर आहे.
|
| 3 |
+
सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६६७ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३२५३ लोकसंख्येपैकी १६९७ पुरुष तर १५५६ महिला आहेत.गावात २१५१ शिक्षित तर ११०२ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १२४९ पुरुष व ९०२ स्त्रिया शिक्षित तर ४४८ पुरुष व ६५४ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६६.१२ टक्के आहे.
|
| 4 |
+
सोनखेड, विळेगाव, व्होटाळा मानखेड, धानोरा बुद्रुक,हिप्परगा, पाटोदा, पारचंडा, टाकळगाव, नागठणा, धसवाडी ही जवळपासची गावे आहेत.सटाळा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10365.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सडक/अर्जुनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक तालुका आहे.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10373.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सडवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10402.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतरावा लुई (२७ मार्च, १७८५ - ८ जून, १७९५) हा फ्रांसचा राजा होता. हा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मरी आँत्वानेत यांचा मुलगा होता.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10407.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतलज नदी पंजाबमधून वाहणाऱ्या पाच नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी आहे. सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. येथे तिला लांग्केन झांग्बो (हत्ती नदी) अशा नावाने ओळखले जाते. पश्चिम-उत्तर पश्चिमेस २६० किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्कीला येथे भारतात शिरते. हिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो. यात दिशेत १५ किमी वाहून सतलज पाकिस्तानात शिरते. पुढे ही नदी चिनाब नदीला मिळते. येथे ही नदी पंजनाद नदी या नावाने ओळखली जाते. येथून १०० किमी पश्चिमेस बहावलपूर शहराजवळ ही नदी सिंधु नदीस मिळते.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10417.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतियन ज्ञानशेखरन (८ जानेवारी, १९९३ - ) हा भारतीय टेबलटेनिस खेळाडू आहे. याने भारतीय संघातून २०१८ आणि २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये टेबलटेनिस सांघिक विजेतेपद मिळवले.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1042.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,70 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विवेक एक्सप्रेस (इंग्लिश : Vivek Express, गुजराती: વિવેક એક્ષ્પ્રેસ, बंगाली : বিবেক এক্সপ্রেস, आसामी : বিবেক এক্সপ্রেস, कन्नड :ವಿವೇಕ್ ಎಕ್ಸ್ ಪ್ರೆಸ್, तमिळ : விவேக் விரைவு தொடருந்து) ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ४ गाड्यांची शृंखला असलेल्या विवेक एक्सप्रेसची घोषणा २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी केली होती. २०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मसालामध्ये ह्या गाड्यांची सेवा सुरू झाली.
|
| 2 |
+
सध्या एकूण ४ विवेक एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
| 5 |
+
रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
|
| 6 |
+
|
| 7 |
+
उत्तर •
|
| 8 |
+
उत्तर पश्चिम •
|
| 9 |
+
उत्तर पूर्व •
|
| 10 |
+
उत्तर पूर्व सीमा •
|
| 11 |
+
उत्तर मध्य •
|
| 12 |
+
दक्षिण •
|
| 13 |
+
दक्षिण पश्चिम •
|
| 14 |
+
दक्षिण पूर्व •
|
| 15 |
+
दक्षिण पूर्व मध्य •
|
| 16 |
+
दक्षिण मध्य •
|
| 17 |
+
पश्चिम •
|
| 18 |
+
पश्चिम मध्य •
|
| 19 |
+
पूर्व •
|
| 20 |
+
पूर्व तटीय •
|
| 21 |
+
पूर्व मध्य •
|
| 22 |
+
मध्य •
|
| 23 |
+
कोकण
|
| 24 |
+
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
|
| 25 |
+
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 26 |
+
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
|
| 27 |
+
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
|
| 28 |
+
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
|
| 29 |
+
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
|
| 30 |
+
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
|
| 31 |
+
रेल विकास निगम लिमिटेड •
|
| 32 |
+
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 33 |
+
राइट्स लिमिटेड
|
| 34 |
+
बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
|
| 35 |
+
चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
|
| 36 |
+
डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
|
| 37 |
+
इंटिग्रल कोच कारखाना •
|
| 38 |
+
रेल डबा कारखाना •
|
| 39 |
+
रेल चाक कारखाना •
|
| 40 |
+
रेल स्प्रिंग कारखाना
|
| 41 |
+
दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
|
| 42 |
+
दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
|
| 43 |
+
दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 44 |
+
दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 45 |
+
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 46 |
+
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 47 |
+
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 48 |
+
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
|
| 49 |
+
चेन्नई उपनगरी रेल्वे •
|
| 50 |
+
दिल्ली उपनगरी रेल्वे •
|
| 51 |
+
हैदराबाद एम.एम.टी.एस. •
|
| 52 |
+
कोलकाता उपनगरी रेल्वे •
|
| 53 |
+
कोलकाता मेट्रो •
|
| 54 |
+
मुंबई उपनगरी रेल्वे
|
| 55 |
+
वंदे भारत एक्सप्रेस •
|
| 56 |
+
गतिमान एक्सप्रेस •
|
| 57 |
+
शताब्दी एक्सप्रेस •
|
| 58 |
+
राजधानी एक्सप्रेस •
|
| 59 |
+
हमसफर एक्सप्रेस •
|
| 60 |
+
दुरंतो एक्सप्रेस •
|
| 61 |
+
संपर्क क्रांती एक्सप्रेस •
|
| 62 |
+
जन शताब्दी एक्सप्रेस •
|
| 63 |
+
विवेक एक्सप्रे�� •
|
| 64 |
+
राज्यराणी एक्सप्रेस •
|
| 65 |
+
दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
|
| 66 |
+
निलगिरी पर्वतीय रेल्वे •
|
| 67 |
+
कालका-सिमला रेल्वे •
|
| 68 |
+
पॅलेस ऑन व्हील्स •
|
| 69 |
+
डेक्कन ओडिसी •
|
| 70 |
+
गोल्डन चॅरियट
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10438.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतीश चंद्र कौशिक (१३ एप्रिल, १९५६ - ९ मार्च, २०२३) हे एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक होते.
|
| 2 |
+
कौशिक यांचा जन्म महेंद्रगढ, हरियाणा येथे १३ एप्रिल १९५६ रोजी झाला.[१] त्यांनी किरोडी मल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून १९७२ मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[२] तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था माजी विद्यार्थी देखील होते.[३]
|
| 3 |
+
कौशिक हे मिस्टर इंडिया मधील 'कॅलेंडर', [४] दीवाना मस्ताना मधील 'पप्पू पेजर' आणि सारा गॅवरॉनच्या ब्रिक लेन (२००७) मधील 'चानू अहमद' या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांना १९९० मध्ये राम लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरालसाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला होता.[५]
|
| 4 |
+
हिंदी भाषेतील नाटक "विली लोमन" मधील त्यांची 'सेल्समन रामलाल'ची भूमिका विशेष गाजली होती.[६] कौशिक यांनी कुंदन शाह यांच्या कॉमेडी क्लासिक जाने भी दो यारों (१९८३) चित्रपटासाठी संवाद लिहिले होते.[७] रुस्लान मुमताज आणि शीना शहााबादी अभिनीत २००९ मधील त्यांचा तेरी संग चित्रपट, किशोरवयीन गर्भधारणेच्या समस्येवर आधारित होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.[८] चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट श्रीदेवीचा रूप की रानी चोरों का राजा (१९९३) होता. त्याचा दुसरा चित्रपट प्रेम (१९९५) हा होता, ज्याद्वारे तब्बू ने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते.[९] यानंतर त्यांचा १९९९ मधील हम आपके दिल में रहते हैं हा चित्रपट चांगला चालला.
|
| 5 |
+
|
| 6 |
+
त्यांचे पुढचे काम तानसेनच्या जीवनावर आधारित होते, ज्यामध्ये तानसेनची भूमिका अभिषेक बच्चन साकारणार होते, तर साउंडट्रॅक रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून देखील अपूर्ण आहे.[१०] कौशिक हरियाणाच्या चित्रपट सृष्टीत देखील काम करत होते.[११] कौशिक यांनी आपला हिट चित्रपट तेरे नाम (२००३) चा सिक्वेल 'तेरे नाम-2' बनवण्याचा निर्णय घेतला होता.[१२]
|
| 7 |
+
कौशिक यांनी १९८५ मध्ये शशी नावाच्या युवतीसोबत लग्न केले होते.[१३] त्यांचा मुलगा १९९६ मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षी मरण पावला.[१४] तर २०१२ मध्ये, त्यांच्या मुलीचा जन्म सरोगेट आईच्या माध्यमातून झाला.[१५]
|
| 8 |
+
कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ९ ���ार्च २०२३ रोजी गुरुग्राम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[१६][१७] त्याच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, ते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी होळी २०२३ साजरी करताना दिसले होते.[१८]
|
| 9 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_1047.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विवेक राम चौधरी हे भारतीय वायुसेनेचे २७ ले प्रमुख आहेेत.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10482.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सत्तरी हे गोवा राज्यातील एक उत्तर गोवा जिल्ह्यातील गाव आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे.या तालुक्यात ७० गावांचा समावेश आहे.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10483.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सत्तरी हे गोवा राज्यातील एक उत्तर गोवा जिल्ह्यातील गाव आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे.या तालुक्यात ७० गावांचा समावेश आहे.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10545.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,13 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. सत्यनारायण दास (जन्म:९ जून १९५४) हे भारतीय गौडीय वैष्णव विद्वान आणि अभ्यासक आहेत. दासा हे बहुविध व्यासंगी विद्वान योगी आहेत. त्यांनी आग्रा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पीएच.डी. आणि भारतीय कायद्याची पदवी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत.[१] त्यांनी स्थापन केलेल्या जीवा संस्थेत सध्या, गौडीय वैष्णवांच्या क्षेत्रातील अनेक पुस्तके आणि मूळ कागदपत्रे प्रकाशित केली आहेत ज्यात सत् संदर्भावरील भाषांतरे आणि भाष्ये आहेत. याशिवाय त्यांना २०१२ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देखील पुरस्कार मिळाले आहेत.[२] . दास यांना जीव गोस्वामीनचे प्रमुख जिवंत अभ्यासक-विद्वान म्हटले जाते. [३]
|
| 2 |
+
सत्यनारायण दास यांचा जन्म आणि त्यांचे बालपण हरियाणातील फरीदाबाद जवळील एका गावात गेले. मायामी येथील एका कंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर ते संस्कृत शिकण्यासाठी भारतात परत आले. ते इस्कॉनचे सदस्य असून (ते पूर्वी इस्कॉनचे गुरू भक्तिस्वरूप दामोदर स्वामी यांचे दीक्षा घेतलेले शिष्य होते), त्यांनी भारतातील प्रख्यात विद्वान आणि संतांपैकी एक श्री हरिदास शास्त्री महाराजा यांची भेट घेतली. त्यांच्याकडून त्यांनी गौडीय वैष्णव साहित्याच्या संपूर्ण श्रेणीचा अभ्यास केला. न्याय (भारतीय तर्कशास्त्र) वर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी स्वामी श्यामा शरण महाराज आणि इतर विविध पारंपारिक गुरूंच्या अंतर्गत भारतीय तत्त्वज्ञानाच्या सहा प्रणाली शिकल्या. १९९४ मध्ये, जीवा गोस्वामींच्या सत संदर्भाचे भाषांतर आणि टिप्पणी करताना,[४][५] जीवाच्या वैकुंठातून होणाऱ्या पतनाबद्दल एक तात्विक वाद निर्माण झाला, ज्याची पराकाष्ठा सत्यनारायणाच्या "इन वैकुंठ इव्हन लिव्हज डोन्ट फॉल" या पुस्तकाच्या प्रकाशनात झाला.[६] या पुस्तकाचे सह-लेखक कुंडली दास हे देखील आहेत.[७] आत्म्याच्या उत्पत्ती आणि स्वरूपाबाबत पारंपारिक वैष्णव शिकवणीचे सादरीकरण स्वीकारण्यास इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. तेव्हा दास यांनी अधिकृतपणे त्या संस्थेपासून स्वतःला वेगळे केले आणि त्यांचे गुरू श्री हरिदास ��ास्त्री यांच्याकडून पारंपारिक गौडीया वैष्णव पंथाची औपचारिक दीक्षा आणि वैष्णव संन्यास घेतला.[८].
|
| 3 |
+
वैष्णव धर्माच्या चैतन्य विद्यालयाच्या तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्रामध्ये त्यांनी २० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत, ज्यात जीवा गोस्वामी यांच्या सत्-संदर्भाचे मूळ भाषांतर आणि भाष्ये यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी इतर शिक्षणतज्ञांसह विविध संशोधन जर्नल्समध्ये योगदान दिले आहे. सध्या ते विद्वानांना भारतीय शास्त्र शिकवतात.[९]
|
| 4 |
+
दासाच्या भागवत संदर्भाच्या अनुवादाच्या पुस्तक पुनरावलोकनात, शिकागो विद्यापीठातील अलेक्झांडर उस्कोकोव्ह यांनी "हा इतर कोणत्याही युरोपियन भाषेतील अनुवादा पेक्षा, भागवतचा पहिला गंभीर अनुवाद आहे" असे म्हटले आहे.[१०] उस्कोकोव्ह म्हणतात की, "दास यांना जीवाच्या आत आणि बाहेरील कार्ये स्पष्टपणे माहित आहेत. तसेच सोळाव्या शतकातील संस्कृत शिकण्याच्या या उच्च बिंदूसह आणि ज्या परंपरांमधून जीव ज्ञान आत्मसात करतो, जसे की वैदिक हर्मेन्युटिक्स, संस्कृत व्याकरण, भारतीय ज्ञानशास्त्र आणि काव्यशास्त्र, आणि असेच इतर संकल्पना देखील दास यांना चांगल्याच जाणल्या आहेत." एकंदरीत, उस्कोकोव्ह "हे पुस्तक गौडीय वैष्णववाद समजून घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाची उपलब्धि आहे" असे म्हणतात. तसेच याचे भाषांतर "अचूक आणि विश्वासार्ह आहे, यातील युक्तिवाद अचूकपणे समजले आहेत आणि टिप्पण्या त्यांच्या बौद्धिक पार्श्वभूमीनुसार चांगल्या प्रकारे सूचित केल्या आहेत" असे देखील मान्य करतात.[१०]
|
| 5 |
+
फ्लोरिडा विद्यापीठातील जोनाथन एडेलमन यांनी भाषांतर "वाचनीय आणि सामान्यतः अचूक आणि मूळ मजकुराशी एकनिष्ठ" असे म्हटले आहे. "अनुवादकाचे भाष्य न्याय, मीमांसा, पाणिनी, अद्वैत-वेदांत, तसेच विश्वनाथ चक्रवर्तिन, रुपा गोश्वदेस, इत्यादी गौडीय वैष्णव विचारवंतांकडील ज्ञानाची व्यापकता चर्चेत आणते." धर्मशास्त्रीय सामग्री आणि अंतर्दृष्टीची संपत्ती देते" असे देखील म्हटले आहे.
|
| 6 |
+
रटगर्स विद्यापीठातील एडविन ब्रायंट यांनी टिप्पणी केली की दासाचे भागवत संदर्भ "उत्कृष्ट संस्कृत आणि शिष्यवृत्तीच्या शैक्षणिक मानकांनुसार सादर केलेली हर्मेन्यूटिकल कौशल्ये सादर करते".[११]
|
| 7 |
+
डॉ. दास यांनी हेडलबर्ग युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ ट्युबिंगेन, जर्मनी, झुरिच युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड, मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू जर्सी, रटगर्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, गेनेसविले, यूएसए यांसारख्या विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. सध्या ते रटगर्स येथे व्हिजिटिंग फॅकल्टी आणि हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे सहायक फॅकल्टी सदस्य आहेत.[१२]
|
| 8 |
+
ते नियमितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांतील विद्वानांना वैयक्तिक विनंतीवर शिकवत असतात. ते अनेक देशांमध्ये प्रवास करतात आणि भारतीय शास्त्रांवर व्याख्याने देत असतात.[१३]
|
| 9 |
+
डॉ. दास यांनी त्यांचा अभ्यास आणि भारतीय शास्त्रांच्या अनुभवावर आधारित जीव वैदिक मानसशास्त्र हा नवीन विषय विकसित केला आहे. ते सध्या सॅंडी पाइन्स हॉस्पिटल, फ्लोरिडा आणि फोर्ट लॉडरडेल हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञांना वैदिक मानसशास्त्राद्वारे रूग्णांवर उपचार करण्याच्या नवीन तंत्रांचे प्रशिक्षण देत आहेत. अमेरिका,[१३] पोलंड, लिथुआनिया, फ्रान्स,[१४] जपान अशा विविध देशांतील विविध श्रोत्यांना ते व्याख्यानही देत असतात.
|
| 10 |
+
हरिदास शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे बंधू ऋषी आणि डॉ. प्रताप चौहान यांच्या मदतीने सत्यनारायण दास यांनी १९९२ मध्ये जीवा संस्थेची स्थापना केली. जिवा संस्थेचे शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती असे तीन विभाग आहेत. सत्यनारायण दास हे भारतातील वृंदावन येथील शीतल छाया येथे असलेल्या सांस्कृतिक विभागाचे संचालक आहेत. देश-विदेशातील विद्यार्थी तेथे संस्कृत आणि भारतीय विचारांच्या सहा प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी येतात, ज्याला सद्दर्शन असे म्हणतात.[१५][१६] [१७] गौडीय वैष्णव साहित्याच्या अभ्यासातील विशेषीकरण हे जिवा संस्थेचे वैशिष्ट्य आहे. अनेक विद्वान सत्यनारायण दास यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी आणि ग्रंथालयात पुस्तके मिळवण्यासाठी येतात.[१७] ज्यात मुद्रित तसेच दुर्मिळ हस्तलिखित हस्तलिखितांचा संग्रह आहे. शिक्षण आणि आयुर्वेदाचे इतर दोन विभाग फरीदाबाद येथे आहेत. शिक्षण विभागा तर्फे सुमारे १८०० विद्यार्थी असलेले महाविद्यालय चालवले जाते. आयुर्वेद विभागामध्ये संपूर्ण भारतामध्ये ७० दवाखाने आणि तीन टेली-मेडिसिन सेंटर्स आहेत ज्यांना दररोज सुमारे ६००० कॉल येतात आणि त्या द्वारे रुग्णांना मोफत स��्ला दिला जातो.[१८]
|
| 11 |
+
२०१६ मध्ये, दास यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाळांमध्ये ऑक्टोबर ते एप्रिल अखेरीस पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला, जो डॉ. जॅन ब्रझेझिन्स्की यांनी सह-अध्यापन केला, आणि प्रा. मॅथ्यू दस्ती, प्रा. एडविन ब्रायंट आणि प्रो. जॅक हॉले, कोएनराड एल्स्ट आणि डॉ. मॅन्स ब्रू.[१९][१६]
|
| 12 |
+
जीवा इन्स्टिट्यूट एक संस्कृत शाळा चालवते जी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ बनारसशी संलग्न आहे.[२०] राधाकुंडा येथे शाळेची एक शाखा देखील आहे.
|
| 13 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10562.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
महिंद्रा सत्यम पूर्वीची सत्यम कॉंप्युटर सर्व्हिसेस लिमिटेड (बीएसई.: 500376) ही आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा पुरवणारी भारतीय मूळ असलेली कंपनी आहे.
|
| 2 |
+
बी. रामलिंग राजू यांनी इ.स. १९८७ साली सत्यमची स्थापना केली. त्यावेळी सत्यम ही खाजगी कंपनी होती. इ.स. १९९१ साली सत्यमची नोंदणी मुंबई रोखे-विनिमय बाजारात झाली आणि इ.स. २००१ साली न्यू यॉर्क रोखे-विनिमय बाजारात ए.डी.आर. स्वरूपात झाली. इ.स. १९९१ साली कंपनीला पहिला फॉर्च्यून-५०० ग्राहक जॉन डीयर अँड कंपनीद्वारे मिळाला. नव्वदीच्या दशकात सत्यमने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळवत काही नवीन व्यवसायात उडी घेतली. याच प्रयत्नातून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत सत्यम इन्फोवे ही एक यशस्वी कंपनी बनली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला सत्यमने भारताबाहेर कार्यालये थाटली आणि अतिशय वेगाने व्यवसायवृद्धी केली.
|
| 3 |
+
२००७-०८ आर्थिक वर्षात कंपनीची जगभरात ६६ ठिकाणी कार्यालये असून ५२००० कर्मचारी कंपनीच्या ६७० आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी काम करतात. सत्यम ही भारतातील माहिती तंत्रज्ञानक्षेत्रात महसुलानुसार क्रमांक ४ची कंपनी आहे
|
| 4 |
+
जानेवारी ७, इ.स. २००९ रोजी बी. रामलिंग राजूनी सत्यमने गेली अनेक वर्षे आपल्या ताळेबंदात घोटाळे केल्याचे मान्य केले व आपल्या पदांचा राजीनामा दिला.[१] त्यानंतर राम मायनापतीनी सत्यमचे नेतृत्व हाती घेतले.
|
| 5 |
+
बंगळूर, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे, विशाखापट्टणम
|
| 6 |
+
हाँग काँग , जपान, मलेशिया, सिंगापुर, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड
|
| 7 |
+
बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, आयर्लंड, इटली, नेदरलंड, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम
|
| 8 |
+
कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
|
| 9 |
+
ब्राझिल
|
| 10 |
+
संयुक्त अरब अमिराती
|
| 11 |
+
दक्षिण आफ्रिका, मॉरिशस
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10590.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
साचा:माहिती चौकट संस्था
|
| 2 |
+
सप्टेंबर २४, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
|
| 3 |
+
जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे
|
| 4 |
+
व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
|
| 5 |
+
देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा जोतिबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला. जोतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेचे वाटले. यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद ईश्वर भक्ती, व्यक्तीचे श्रेष्ठत्व, त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्य त्याला विरोध, सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले. ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी, त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षूची आवश्यकता नाही, याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं. त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते, याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं. पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही, तर सत्य हेच परब्रम्ह आहे, अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी, हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.
|
| 6 |
+
कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयाने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाट��प, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली मात्र समाज अधिवेशनांची सुरुवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.[१]
|
| 7 |
+
सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली. मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरुवातीस म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरुवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिकरीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सदयःस्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.
|
| 8 |
+
सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा ���रणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.
|
| 9 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10611.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्येंद्र प्रसान्नो सिन्हा हे (२४ मार्च, १८६३ - ४ मार्च, १९२८) हे भारतातील एक वकील होते. १९२० साली ते बिहार आणि ओरिसा प्रांताचे राज्यपाल झाले, ब्रिटिश भारताच्या प्रशासनामध्ये राज्यपाल सारख्या उच्च पदांवर नेमणूक होणारे ते पहिले भारतीय होते.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10632.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदर बझार विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
|
| 2 |
+
हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10637.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदर्न क्रॉस स्थानक हे मेलबर्न शहरातले महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुर्वी स्पेन्सर्स स्ट्रीट स्टेशन या नावाने ओळखले जात असे. पुनर्बांधणी नंतर त्याचे सदर्न क्रॉस स्टेशन असे नामकरण करण्यात आले. येथून ऑस्ट्रेलियाच्या मुख्य शहरांना जोडण्याऱ्या गाड्या सुटतात. त्याच प्रमाणे हे स्थानक मेलबर्न विमानतळाशी ही जोडलेले आहे. या स्थानकावरून मेलबर्न विमानतळ येथे स्कायबस या सेवेद्वारे पोहोचता येते. रेल्वे व इतर माहीतीसाठी मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन हे पान पहा.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10649.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदागोपान रमेश (रोमन लिपी: Sadagoppan Ramesh ;) (ऑक्टोबर १६, इ.स. १९७५; चेन्नई, तमिळनाडू - हयात) हा भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने खेळणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. फलंदाजीसोबत तो उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजीदेखील करतो. एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात निक्सन मॅक्लीन याचा बळी घेऊन त्याने हा विक्रम नोंदवला.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10652.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदानंद हे एक भारतीय पुरुष नाव आहे.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10664.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदानंद शंकर सरवणकर मराठी राजकारणी आहेत. हे माहिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10666.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]
|
| 5 |
+
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.[ संदर्भ हवा ] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10679.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदाशिव कान्होजी पाटील, तथा स.का. पाटील, (११ ऑगस्ट, इ.स. १८९८ - - १९८१) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. स.का. पाटील हे कधी काळी मुंबईचे महापौर होते आणि जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७) मंत्रिमंडळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.
|
| 2 |
+
आचार्य अत्र्यांनी ठेवलेल्या सदोबा पाटील या नावानेच ते ओळखले जात. मुंबईतील चर्नी रोड स्टेशन नजीकच्या एका छोट्या बगिच्याला स.का.पाटील उद्यान म्हणतात; बगिच्याचे जुने नाव जपानी गार्डन असे होते.
|
| 3 |
+
स.का. पाटील मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले.[२] मुंबईतही ते रात्रशाळेत शिकवत असत. [३]बॉम्बे मिल मजदूर युनियनची स्थापना केली पण नंतर ही युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये विलीन झाली..[४]
|
| 4 |
+
स.का. पाटीलांनी कामगार संघटनेचे नेतृत्वही केले होते परंतु ते उजव्या विचारसरणीचे समजले जात. स.का. पाटलांनी काँग्रेसच्या वतीने राजकारणातील कम्युनिस्ट आणि डाव्या विचारधारांवर मात करण्याचा प्रयत्न केला, असे मानले जाते. आंध्रातील आणि महाराष्ट्रातील राजकारणात इतर पुढाऱ्यांच्या एका गटाच्या माध्यमातून - सिंडिकेटच्या माध्यमातून - इंदिरा गांधींच्या डावीकडे झुकणाऱ्या भूमिकांनाही त्यांनी अडथळे उभे केले.[१][५][६][७][८]
|
| 5 |
+
तत्कालीन नेहरू मंत्रिमंडळातील डाव्या आर्थिक नीतींचे प्रतिनिधित्व करणारे व्ही.के कृष्ण मेनन हे केंद्रीय मंत्री मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत. ते दाक्षिणात्य होते, त्यांना राजकारणात परास्त करण्याकरिता, मुक्त अर्थशास्त्राचे समर्थक स.का. पाटीलांनी दाक्षिणात्यांना विरोधाची भूमिका लावून धरणाऱ्या शिवसेनेस पुढे आणले असे काही राजकीय निरीक्षकांचे मत होते. कृष्ण मेनन यांना दूर करण्याकरिता तत्कालीन औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या साखळी' वृत्तपत्रांतूनही कृष्ण मेनन विरोधी वातावरण जाणीवपूर्वक तापवले जात असल्याचा डाव्या विचारसरणीच्या निरीक्षकांचे मत होते.[९]
|
| 6 |
+
स.का. पाटलांनी मुंबईचे महापौर, मुंबई काँग्रसचे आणि नंतर महाराष्ट्र कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी पदे भूषविली. एकूण तीन वेळा लोकसभेत मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, इ.स. १९६७ च्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी पाटलांचा पराभव केला.[१०] स.का. पाटलांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हटले जाई
|
| 7 |
+
केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का. पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि दहा लाख टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लाननंतर ही अमेरिकेने दुसऱ्या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.[११]. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. [ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या काँग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. [ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
अमेरीका-सोव्हियेट शीतयुद्धाच्या काळात, स.का. पाटलांवर अमेरिकेशी विशेष हितसंबध असल्याचे दर्शवणारी हेतुपुरस्सर खोटी कागदपत्रे, रशियन गुप्तचरांनी बनवून वितरित केल्याचा दावा नंतरच्या काळात एका रशियन गुप्तचराने केला होता.[१२]
|
| 10 |
+
स.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली.[१३] या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशी स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली.[१४][१५] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच जॉर्ज फर्नांडिसांकडून हार पत्करावी लागली.
|
| 11 |
+
प्रकाशन वर्ष इस १९४५ औंध प्रकाशन ट्रस्ट औंध
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10686.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदाशिव नेवरेकर (जन्म : १० मार्च १९०२) हे प्रामुख्याने स्त्री-भूमिका करणारे एक मराठी नाट्यअभिनेते होते.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10701.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जुलै ५, इ.स. २००६
|
| 2 |
+
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10730.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सद्दाम हुसेन हा (२८ एप्रिल १९३७ - ३० डिसेंबर २००६) हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. ३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली. १९७९ मध्ये ते स्वतः राष्ट्रपती बनले. सन १९८२ मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
|
dataset/scraper_9/batch_6/wiki_s9_10753.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 35°18′52″N 46°59′32″E / 35.31444°N 46.99222°E / 35.31444; 46.99222
|
| 2 |
+
|
| 3 |
+
सनंदाज (फारसी: سنندج; कुर्दी: سنە) हे इराण देशाच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी व एक मोठे शहर आहे. सनंदाज शहर तेहरानच्या ४९० किमी पश्चिमेस वसले आहे. येथील बहुसंख्य रहिवासी कुर्द वंशाचे आहेत. २०११ साली येथील लोकसंख्या ३.७३ लाख होती.
|