Aarsh-Wankar commited on
Commit
c3e7e7f
·
verified ·
1 Parent(s): 36b2133

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10.txt +26 -0
  2. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10011.txt +4 -0
  3. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10016.txt +17 -0
  4. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10041.txt +1 -0
  5. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1005.txt +1 -0
  6. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10063.txt +1 -0
  7. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10066.txt +40 -0
  8. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10092.txt +5 -0
  9. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10097.txt +6 -0
  10. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1013.txt +2 -0
  11. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10137.txt +19 -0
  12. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1014.txt +7 -0
  13. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10150.txt +4 -0
  14. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10156.txt +12 -0
  15. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10157.txt +12 -0
  16. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1016.txt +7 -0
  17. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10163.txt +3 -0
  18. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10166.txt +2 -0
  19. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10169.txt +7 -0
  20. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10176.txt +3 -0
  21. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10179.txt +8 -0
  22. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10186.txt +1 -0
  23. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10190.txt +1 -0
  24. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10193.txt +1 -0
  25. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10194.txt +1 -0
  26. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10196.txt +18 -0
  27. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10197.txt +2 -0
  28. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10210.txt +9 -0
  29. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10244.txt +2 -0
  30. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10258.txt +1 -0
  31. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10271.txt +3 -0
  32. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10275.txt +1 -0
  33. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10311.txt +4 -0
  34. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10319.txt +3 -0
  35. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10342.txt +2 -0
  36. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10343.txt +1 -0
  37. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10359.txt +3 -0
  38. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10360.txt +2 -0
  39. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10369.txt +1 -0
  40. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10371.txt +4 -0
  41. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1038.txt +1 -0
  42. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10395.txt +1 -0
  43. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10409.txt +1 -0
  44. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1041.txt +5 -0
  45. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10412.txt +1 -0
  46. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10426.txt +1 -0
  47. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10437.txt +2 -0
  48. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1047.txt +1 -0
  49. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10471.txt +1 -0
  50. dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10488.txt +2 -0
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10.txt ADDED
@@ -0,0 +1,26 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जनगणना स्थल निर्देशांक ५२७४०६ असलेले भिलाली हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४१९.४५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २६२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३०४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ८५ किलोमीटर अंतरावर आहे.
2
+ गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१.
3
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
4
+ ५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा शहापूर येथे आहे.
5
+ ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही
6
+ १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा शहापूर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अमळनेर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे.
7
+ असलेल्या सुविधा- काही नाही
8
+ नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
9
+ असलेल्या सुविधा- काही नाही
10
+ नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
11
+ असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा,
12
+ नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
13
+ असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
14
+ नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले स���र्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
15
+ गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते,
16
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
17
+ तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
18
+ गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
19
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
20
+ गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
21
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
22
+ घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
23
+ शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
24
+ व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
25
+ सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
26
+ या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10011.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मुहम्मद अली बोग्रा (बंगाली: মোহাম্মদ আলী বগুড়া ; उर्दू: محمد علی بوگرہ ; रोमन लिपी: Muhammad Ali Bogra) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा तिसरा पंतप्रधान होता. इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ या कालखंडात तो पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९५५ साली पाकिस्तानाचा तत्कालीन गव्हर्नर जनरल इस्कंदर मिर्झा याने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले.
2
+
3
+
4
+ लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10016.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ इब्न बतूता (२५ फेब्रुवारी, १३०४;टॅंजियर, मोरोक्को - इ.स. १३६९:मोरोक्को; अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.[१][२] तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहला (शब्दशः भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते.
2
+ तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता.
3
+ इब्न बतूताच्या बालपणाबद्दलची माहिती त्याच्या प्रवासवर्णनांतील आत्मचरित्रात्मक भागांतून सापडते. यानुसार हा लवाटा जमातीचा[३] बर्बर वंशीय[४] होता व याचे पूर्वज आणि समकालीन कुटुंब न्यायाधीशांचे होते. इब्न बतूताचा जन्म २४ फेब्रुवारी, १३०४ रोजी मोरोक्कोच्या टॅंजियर शहरात झाला.[५] त्यावेळी तेथे मारीनी वंशाचे राज्य होते. लहानपणी हा सुन्नी मलिकी मदहब शाळेतून शिकला असण्याची शक्यता आहे. टॅंजियरच्या रहिवाशांनी इब्न बतूताला धर्मन्याय देण्याची विनंती केली होती.
4
+ इ.स. १३२५ च्या जून महिन्यात वयाच्या एकविसाव्या वर्षी इब्न बतूता मक्केला हजसाठी जाण्याकरता घरातून बाहेर पडला. तेव्हा हा प्रवास येउनजाउन सोळा महिन्यांचा असे. बतूताने पुढील चोवीस वर्षे मोरोक्कोत पाउल ठेवले नाही.[६] आपल्या पहिल्या सफरीच्या सुरुवातीबद्दल इब्न बतूता लिहितो -
5
+ मी एकटाच निघालो. सोबतीला सहप्रवासी असे कोणी नव्हते ज्यांच्या सोबतीत मला आनंद मिळेल. जोडीने जायला मला कोणता कारवांही नव्हता. माझ्या हृदयातील दूरवरच्या अद्भूत प्रदेशांना भेट देण्याची अनेक वर्षे साठवून ठेवलेली इच्छा आणि त्यावेळी आलेली लहर यांना बळी पडून मी माझे मन कठीण केले आणि माझे सुहृद, पुरुष आणि स्त्रीया, यांना सोडण्याचा निश्चय केला. पक्षी जसे आपले घरटे सोडून निघून जातात तसे मी माझे घर सोडण्याचे ठरवले. माझे आईवडील अद्याप संसारी ���ोते आणि त्यांना सोडून जाण्याचे मला जीवावर आले. त्यांचा विरह सहन करणे मला कठीण झाले.[७]
6
+ टॅंजियरपासून इब्न बतूता उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत मक्केकडे निघाला. झय्यानी सुलतान अब्द अल-वदीद आणि हफसी सुलतानांच्या प्रदेशातील ट्लेमेसेन, बेजाइया शहरांतून प्रवास करीत हा ट्युनिसियाला पोचला. येथे त्याने दोन महिने मुक्काम केला.[८] लुटारू आणि वाटमाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी इब्न बतूता थोड्या थोड्या अंतराकरता एखाद्या तांड्याच्या साथीने प्रवास करीत असे. स्फाक्स शहरात पोचल्यावर त्याने लग्न केले.[९] आपल्या प्रवासातील अनेक लग्नांपैकी हे पहिले होय.[१०]
7
+ इ.स. १३२५च्या वसंतात ३,५०० किमीचा प्रवास करून इब्न बतूता इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात दाखल झाला. तेथे त्याची भेट शेख मुर्शिदी आणि शेख बुरहानुद्दीन या मुस्लिम संतांशी झाली. दोघांनीही इब्न बतूता जगप्रवासी होणार असल्याचे भाकित केले होते. बुरहानुद्दीनने इब्न बतूताला सांगितले - तुला परदेशप्रवासाची आवड आहे असे दिसते. तुझी भेट भारतातील माझे बंधू रुकोनुद्दीन आणि चीनमधील बुरहानुद्दीनशी होईल. त्यांना माझा सलाम सांग.[११][१२] या प्रदेशात इब्न बतूताने काही काळ घालवल्यावर तो बाहरी मामलुक सुलतानांची राजधानी असलेल्या कैरो शहराकडे निघाला. तेथे महिनाभर वास्तव्य केल्यावर इब्न बतूताने मक्केकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी सगळ्यात कमी वर्दळीचा रस्ता चोखाळला.[१३] कैरोतून तो नाईल नदीच्या तीरावरून दक्षिणेकडे गेला व नंतर पूर्वेस वळून लाल समुद्रावरील अयधाब बंदराजवळ पोचला.[a] तेथे चाललेल्या बंडाळीमुळे पुढचा रस्ता रोखला गेला व इब्न बतूता कैरोला परतला.[१५]
8
+ पुन्हा एकदा मक्केकडे जाण्यासाठी इब्न बतूताने दमास्कसचा रस्ता धरला. या रस्त्यावर हेब्रॉन, बेथलेहेम आणि जेरुसलेम सारखी अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन तीर्थस्थाने असल्याने मामलुक सैन्य या रस्त्यावर निगराणी ठेवून असे व यात्राळूंचा प्रवास निर्धोक होत असे.[१६] इब्न बतूता लिहितो की तो कैरोपासून १६ जुलैला निघाला व नागमोडी वळणे घेत वीस शहरांना भेट देऊन ९ ऑगस्टला पॅलेस्टाइनमध्ये पोचला. त्या काळात असा प्रवास अशक्य असल्याचे विद्वानांचे मत आहे.[१७][१८] दमास्कसमध्ये रमझानचा महिना घालवल्यावर इब्न बतूताने मदीनाकडे जाणारा एक तांडा धरला. १,३०० किमीच��� प्रवास करीत मदीनाला पोचल्यावर तो पुढे मक्केस पोचला.
9
+ येथून घरी परतण्याऐवजी इब्न बतूताने पुढे मोंगोल साम्राज्याचे ठाणे असलेल्या इल्खानेत या ठिकाणी जाण्याचे ठरवले.[१९]
10
+ मक्केत एक महिना राहिल्यावर १३ नोव्हेंबर, १३२६ रोजी इब्न बतूता अरबी वाळवंट पार करणाऱ्या एका तांड्याबरोबर मदीनामार्गे इराककडे निघाला.[२०] रात्रीचा प्रवास करीत हा तांडा दोन आठवड्यांनी नजफ येथे पोचला. येथे इब्न बतूताने इस्लामच्या चौथा खलीफा अलीच्या कबरीला भेट दिल्याची नोंद केली आहे.[२१]
11
+ येथून तांड्याबरोबर बगदादला न जाता इब्न बतूता इराण/पर्शियाकडे वळला. नजफपासून वसात शहरास गेल्यावर तैग्रिस नदीचा काठ धरून तो दक्षिणेस थेट बसरा बंदरास गेला. तेथून झाग्रोस पर्वतरांग पार करून हा इस्फहान येथे गेला आणि नंतर दक्षिणेस शिराझ शहरास आला. उत्तरेत मोंगोलांनी बेचिराख केलेल्या शहरांपेक्षा शिराझची स्थिती चांगली असल्याची त्याने नोंद केली आहे. शिराझपासून माघारी फिरत इब्न बतूता पुन्हा पर्वतरांग पार करून १३२७ च्या उन्हाळ्यात बगदादला पोचला.[२२] यावेळी बगदादमध्ये ७० वर्षांपूर्वी हुलागु खानाच्या सैन्याने केलेल्या लुटालूट आणि जाळपोळीतून बगदाद अद्यापही सावरलेले नव्हते.[२३]
12
+ इब्न बतूता बगदादला परतला तेव्हा तेथील शेवटचा मोंगोल सरदार अबू सईद बहादुर खान मोठा काफिला घेउन उत्तरेस निघाला होता..[२४] इब्न बतूता या काफिल्यात शामिल झाला पण नंतर उत्तरेस रेशीममार्ग धरून तबरेझला गेला. हे शहर मोंगोलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्याने त्याची फारशी नासधूस झालेली नव्हती.[२५]
13
+ तबरेझपासून इब्न बतूता बगदादला परत आला. यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरून मोसुलला गेला. तेथे त्याने इल्खानेतच्या सरदाराचा पाहुणचारही घेतला.[२६] तेथून हा सध्याच्या तुर्कस्तानमधील सिझ्रे आणि मार्दिनला गेला. वाटेत सिंजरजवळील डोंगरावर त्याला एक कुर्दी साधू भेटला. त्याने इब्न बतूताला चांदीची काही नाणी दिली.[b][२९] मोसुलला परत येऊन इब्न बतूताने बगदादकडे जाणारा तांडा धरला. तीर्थयात्रींचा हा तांडा बगदादला मुख्य प्रवाहाला मिळाला व त्यांनी अरबी वाळवंट पार करीत मक्का गाठले. या प्रवासात आजारी पडलेला इब्न बतूताने कसेबसे करून आपली दुसरी हज पूर्ण केली.[३०]
14
+ वर्षभर मक्केत राहून इब्न बतूता १३२८ किंवा १३३० मध्ये जेद्दाला ग��ला. तेथून छोट्या होड्यांमधून किनाऱ्यालगत प्रवास करीत तो यमनला पोचला. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास संथगतीचा होता. यमनमध्ये त्याने झाबिद आणि ताइझ शहरांना भेट दिली. तेथे त्याने रसुली साम्राज्याच्या शासकाची भेट घेतली. इब्न बतूता लिहतो की त्याने साना शहरात काही दिवस घालवले परंतु हे नक्की ठरवणे कठीण आहे..[३१] सानातून किंवा ताइझपासून तो एडनला गेला.[३२]
15
+ एडनपासून इब्न बतूताने सोमालियातील झैला शहराकडे जाणारे जहाज धरले. तेथे एक आठवडा राहून तो केप गार्डाफुई या भूशिरास गेला. तेथेही एक आठवडा घालवल्यावर तो पुढे मोगादिशूला पोचला.[३३][३४][३५] १३३१ साली इब्न बतूता मोगादिशूला पोचला तेव्हा हे शहर आपल्या वैभवाच्या कळसावर होते. त्याने मोगादिशू अतिप्रचंड शहर असल्याचे वर्णन केले आहे. येथील श्रीमंत व्यापारी अनेक प्रकारच्या सामानाचा व्यवहार करीत व उच्च प्रतीचे कापड इजिप्तसह अनेक देशांना पाठवित असत.[३६] यासुमारास मोगादिशूवर अबू बक्र इब्न सेयक्स उमर या सुलतानाची सत्ता होती.[३७][३८] हा मूळ उत्तर सोमालियातील होता व मोगादिशान (सोमाली) आणि अरबी या दोन्ही भाषा सफाईने बोलायचा.[३८][३९] याच्या दरबारात अनेक वजीर, कायदेपंडित, सेनापती, तृतीयपंथी सेवक आणि हुजरे होते असे इ्ब्न बतूता लिहितो.[३८]
16
+ इब्न बतूता येथून पुढे जहाजाने दक्षिणेकडे निघाला. झांज लोकांचा प्रदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या[४०] या प्रदेशातील मोम्बासा शहरात तो एक रात्र थांबल्याचे त्याने लिहिले आहे.[४१] आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील या प्रदेशात स्वाहिली बोलणाऱ्या लोकांची वस्ती होती. मोम्बासाहून तो सध्याच्या टांझानिया देशातून किल्वा द्वीपावर गेला.[४२] हे बेट सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते.[४३] जगातील सुंदर शहरांतील एक असलेल्या शहरातील घरे लाकडी होती आणि छतांवर डिसची झावळे होती.[४४]
17
+ चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10041.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मुहम्मद वफीक (जन्म २५ एप्रिल १९९६) हा मलेशियाचा क्रिकेट खेळाडू आहे, जो राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1005.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मंगलवनम हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10063.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ महातिर मोहम्मद (१० जुलै १९२५) हे मलेशिया देशाचा चौथे पंतप्रधान होते. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला महातिर हे मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10066.txt ADDED
@@ -0,0 +1,40 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ [१]
2
+ मुहूर्त विचार
3
+ तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या संयोगाने शुभ व अशुभ योग होतात. त्याचप्रमाणे चंद्रबल, ताराबल षड्वर्गबल, शुभ दिन व शुभ योग यांनी अनेक कुयोगांचे व दुर्मुहूर्तांचे परिमार्जन होते.
4
+ आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घटना शुभ मुहुर्तावर कराव्यात म्हणजे अरिष्ट योगामुळे होणाच्या अनेक पीडा व दोष टळतील, महत्त्वाच्या घटनांत षोडश संस्कार, वास्तु, नवीन व्यवसाय व उद्योगधंदे, महत्त्वाचे प्रवास व तीर्थयात्रा आणि सर्व महत्त्वाची कामे ही प्रामुख्याने येतात. ही कार्ये शुभ मुहुर्तावर केली असता ती सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य यास कारणीभूत होतात. त्यासाठीच शुभ मुहुर्ताजी आवश्यकता असते.
5
+
6
+ अन्नप्राशन मुहूर्त
7
+ रिक्तानन्दाष्टदर्श हरिदिवसमथो सौरिभौमार्कवारान्
8
+ लग्नं जन्मर्क्षलग्नाष्टमगृहलवगं मीनमेषालिकंच ।
9
+ हित्वा षष्ठात्समे मास्यथ ही मृगादृशां पन्चमादोजमासे
10
+ नक्षत्रैः स्यात्स्थिराख्यैः समृदुलघुचरैर्बालकान्नाशनं सत् ।।
11
+
12
+ अन्न प्राशन – जन्मापासून ६ व्या अथवा ८ व्या महिन्यात मुलाचे आणि ५ व्या अथवा ७ व्या महिन्यात मुलीचे ऊष्टावन करावे.
13
+ तिथी - २, ३, ५, ६, १२, १३, १५
14
+ वार - सोमवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
15
+ नक्षत्रे - लघु – अश्विमी, हस्त, पुष्य, अभिजित, ध्रुव-रोहिणी, उत्तरात्रय. मृदु – मृग, रेवती, चित्रा, अनुराधा.
16
+ चर - स्वाती, पुनर्वसु, श्रवण, धनिष्ठा, शततारका.
17
+ लग्ने - मेष, वश्चिक व मीन लग्ने वजर्य करावीत. दिन शुद्धी पहावी. दिवसाचा पूर्वार्धच योग्य आहे. चंद्र बल असावे.
18
+
19
+ चौल मुहूर्त
20
+ चौलसंस्कारास मुहूर्त - चौलाविषयी बालकाला जन्मापासून किंवा गर्भावस्थेपासून तिसरया वर्षी अधिकार प्राप्त होत असल्यामुळे त्या तिसरया वर्षी चौलसंस्कार करावा. काही विव्दान तर असे सांगतात की, चौलसंस्कार पहिल्या, पाचव्या किंवा दुस्या वर्षी करावा. अथवा उपनयनसंस्काराच्या वेळी करावा. तात्पर्य, या प्रशस्त वर्षापैकी जे वर्ष कुलधर्माप्रमाणे योग्य असेल, त्या वर्षी चौलसंस्कार करावा. चौलसंस्कार ७ व्या वर्षी मध्यम आणि ९ व ११ व्या वर्षी अधम समजावा. चौलाकरिता सूर्याचा उदगयनकाल प्रशस्त होय. त्यातही सूर्य जेव्हा उत्तरगोली (सायनमानाने मेष, वृषभ व मिथुन या राशीत) असेल तो काल अतिप्रशस्त समजावा. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने शुभ आहेत. त्यातही जन्मास व अधिक-क्षयमास हे त्याज्य समजावे. ज्येष्ठ अपत्याचा चौलसंस्कार ज्येष्ठ महिन्यात करु नये. शुक्लपक्ष शुभ होय. कृष्णपक्षातील शेवटचे ५ दिवस सोडून बाकीचे दिवसही शुभ मानावे. २।३।५।७।१०।११ व १३ या तिथी शुभ आहेत. चौलविषयी ब्राहम्णालारविवार, क्षत्रियाला मंगळवार, वैश्याला शनिवार व शूद्राला शनिवार असे वर्णविशेषेकरून प्रशस्त वार आहेत. गुरू, शुक्र व बुध हे तीन वार सर्वांना समान शुभ आहेत. शुक्लपक्षात सोमवारही सर्वांना शुभ मानावा. अश्र्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, घनिष्ठा, शततारका व रेवती ही नक्षत्रे प्रशस्त आहेत. अन्य मते असे आहे की, हस्त, अश्र्विनी, श्रवण, रेवती, घनिष्ठा, पुन, पुष्य, मृग व चित्रा ही ९ नक्षत्रे उत्तम, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्र, स्वाती, रोहिणी व शतता ही ६ नक्षत्रे मध्मय व बाकीची १२ नक्षत्रे निंध होत. निधन, जन्म, वैनाश, विपद, वध, प्रत्यरि या तारा वज्यृ कराव्या. अष्टमचंद्र वज्यृ करावा. लग्नकुंडलीत १०।९।१२।६।१।३।२ ही लग्ने असावी. ३।६।११ या स्थानी पापग्रह असावे. अष्टमस्थानी शुक्राखेरीज अन्य कोणतही ग्रह नसावा. केंद्रस्थानी क्षीणचंद्र, मंगळ, शनी व रवी नसावे. बुध, गुरू व शुक्र हे केंद्रस्थानी प्रशस्त होत. या चौलापासून पुढील सर्व संस्कारांना सिंहस्थ गुरू व गुरूशुक्रांचे अस्त-बाल्य-वार्घक्यकाल हे वज्यृ करावे.
21
+ गर्भे मातुः कुमारस्य न कुर्याच्चौलकर्म तु ।
22
+ पन्चमासादधः कुर्यादत ऊघ्वृं न कारयेत् ।।
23
+ पन्चाब्दात्प्रागथोघ्वृं तु गर्भिण्यामपि कारतेत् ।
24
+ सहोपनीत्या कुर्याच्चेत्तदा दोषो न विद्यते ।।
25
+ विवाहव्रतचूडासु माता यदि रजस्वला ।
26
+ तस्याः शुद्धेः परं काय माग्डल्यं मनुरब्रवीत् ।।
27
+ अलाभे सुमुहूर्तस्य रजोदोषे हुपस्थिते ।
28
+ श्रियं संपूज्य विधिवत्ततो मग्डलमाचरेत् ।।
29
+ चौलादी कर्माविषयी विशेष - ज्या पुत्राचे चौल करावयाचे त्याची माता गर्भिणी असेल तर त्या गर्भारपणाच्या काळात चौल करु नये. अन्य मुहूर्ताभावदी अडचर्णीमुळे त्या कालात करणे भागच पडेल, तर गर्भारपणाच्या पहिल्या पाच महिन्यांपर्यंतच करावे, त्यानंतर करु नये. हा कालनिषेध, पुत्राच्या वयाच्या उक्त पाच वर्षापूर्वी चौल करणे असेल, तर त्याविषयी आहे. पाच वर्षानंतर ७।९।११ या गौण वर्षी चौल करावयाचे असल्यास माता गर्भिणी असली तरी त्या गर्भारपणाच्या कालात केव्���ाही विहितकाली चौल करावे किंवा उपनयनसंस्काराबरोबर चौल केले असता हा कालनिषेध मानण्याचे कारण नाही. विवाह, उपनयन व चौल ही कृत्ये त्या संस्कार्य अपत्याची माता रजस्वला असता करु नयेत, पाचव्या दिवशी मातेची शुद्धी झाल्यानंतर करावी. जर योग्य काली चांगला मुहूर्त मिळतच नसेल, तर माता रजस्वला असताही श्रीशांती करून मग ती कृत्ये करावी. पुत्राचे चौलादिसंस्कार करणारा पिता नसता त्याऐवजी मातुल, चुलता इत्यादी अन्य कोणी कर्ता असेल तर त्या कत्याची पत्नी गर्भवती किंवा रजस्वला असताही चौल संस्कार करण्याचा निषेध वरीलप्रमाणे समजावा.
30
+ चूडा वर्षातृतीयात् प्रभवति विषमेष्टार्करित्तक्घषष्ठी
31
+ पर्वोनाहे विचैत्रोदगयनसमये ज्ञेन्दुशुक्रेज्यकानाम् ।
32
+ वारे लग्नांशयोच्श्रास्व भनिधनतनौ नैधने शुद्धियुक्ते
33
+ शाक्रोपेतैर्विमैत्रैर्मृदुचरलघुभैरायषट्त्रिस्खपापैः ।।
34
+ क्षीणचन्द्रकुजसौरिभास्करैर्मृत्युशस्त्रमृतिपड्गुताज्वराः ।
35
+ स्युः क्रममेण बुधजीवभार्गवैः केन्द्रगैच्श्र शुभमिष्टतारया ।।
36
+ जन्मापासून २,४,६ वगैरे सम महिन्यात तसेच उत्तरायणात जावळ काढावे. आपापला कुलाचार पाळवा.
37
+ महिने - माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने प्रशस्त आहेत.
38
+ नक्षत्रे - पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, शततारका.
39
+ तिथी - २,३,५,१०,१३.
40
+ वार - सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10092.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ मूत्रवह संस्थेमध्ये दोन मूत्रपिंड, दोन मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. मूत्र प्रणालीचा उद्देश शरीरातील कचरा काढून टाकणे, रक्ताचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रित करणे, इलेक्ट्रोलाइट्स आणि चयापचयांचे स्तर नियंत्रित करणे आणि रक्त पीएचचे नियमन करणे हा आहे. मूत्रमार्ग ही शरीराची ड्रेनेज सिस्टीम आहे ज्यामुळे लघवी बाहेर पडते. किडनीला मुत्र रक्तवाहिन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो जो मूत्रपिंडाच्या रक्तवाहिनीद्वारे मूत्रपिंड सोडतो. प्रत्येक मूत्रपिंडात नेफ्रॉन नावाची कार्यशील एकके असतात. रक्ताची गाळण आणि पुढील प्रक्रिया केल्यानंतर, कचरा (लघवीच्या स्वरूपात) मूत्राशय, गुळगुळीत स्नायू तंतूंनी बनलेल्या नळ्यांद्वारे मूत्रपिंडातून बाहेर पडतो जे मूत्राशयात मूत्र वाहून नेले जाते, जिथे ते साठवले जाते आणि नंतर शरीरातून काढून टाकले जाते. मादी आणि पुरुषांच्या मूत्रसंस्थेमध्ये खूप समानता असते, फक्त मूत्रमार्गाच्या लांबीमध्ये भिन्नता असते.
2
+ लघवी प्रणाली म्हणजे त्या संरचनांचा संदर्भ आहे ज्या उत्सर्जनाच्या बिंदूपर्यंत मूत्र तयार करतात आणि वाहतूक करतात. मानवी मूत्र प्रणालीमध्ये पृष्ठीय शरीराची भिंत आणि डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना पॅरिएटल पेरीटोनियम दरम्यान स्थित दोन मूत्रपिंड असतात.
3
+ मूत्रपिंडाच्या कार्यात्मक युनिटमध्ये, नेफ्रॉनमध्ये लघवीची निर्मिती सुरू होते. लघवी नंतर नलिकांमधून वाहते, मूत्र संकलित करणाऱ्या नलिका रूपांतरित करण्याच्या प्रणालीद्वारे. या गोळा करणाऱ्या नलिका एकत्र येऊन किरकोळ कॅलिसेस बनतात, त्यानंतर मोठ्या कॅलिसेस तयार होतात जे शेवटी मूत्रपिंडाच्या श्रोणीला जोडतात. येथून, मूत्र मूत्रमार्गातून मूत्रमार्गात त्याचा प्रवाह चालू ठेवतो, मूत्र मूत्राशयापर्यंत पोहोचवतो. मानवी मूत्राशय प्रणालीचे शरीरशास्त्र मूत्राशयाच्या पातळीवर पुरुष आणि मादींमध्ये भिन्न असते. पुरुषांमध्ये, मूत्रमार्ग मूत्राशयाच्या ट्रिगरच्या अंतर्गत मूत्रमार्गाच्या छिद्रापासून सुरू होते, बाह्य मूत्रमार्गाच्या छिद्रातून पुढे चालू राहते आणि नंतर प्रोस्टेटिक, झिल्ली, बल्बर आणि पेनिल मूत्रमार्ग बनते. मूत्र बाहेरील मूत्रमार्गाच्या मांसातून बाहेर पडतो. महिलांची मूत्रमार्ग ��ूपच लहान असते, ती मूत्राशयाच्या मानेपासून सुरू होते आणि योनिमार्गाच्या वेस्टिब्युलवर संपते.
4
+ जोपर्यंत लिखित ऐतिहासिक नोंदी अस्तित्त्वात आहेत, तोपर्यंत मूत्रपिंडातील दगड ओळखले जातात आणि नोंदवले जातात. मूत्रमार्गातून मूत्र काढून टाकण्याचे त्यांचे कार्य, मूत्रवाहिनी, तसेच मूत्रपिंडांसह, गॅलेनने दुसऱ्या शतकात वर्णन केले आहे.
5
+ १९२९ मध्ये हॅम्पटन यंग हे शस्त्रक्रियेऐवजी यूरेटेरोस्कोपी नावाच्या अंतर्गत पद्धतीद्वारे मूत्रवाहिनीचे परीक्षण करणारे पहिले होते. १९६४ मध्ये फायबर ऑप्टिक्सवर आधारित लवचिक एंडोस्कोपचा पहिला प्रकाशित वापर व्ही. एफ. मार्शल यांनी सुधारित केला. नेफ्रोस्टॉमी नावाच्या गर्भाशयाला आणि मूत्रमार्गाला बायपास करून मूत्रपिंडाच्या श्रोणीमध्ये ड्रेनेज ट्यूब टाकण्याचे प्रथम वर्णन केले गेले. 1941. या प्रकारचा दृष्टिकोन ओपन सर्जरीपेक्षा खूप वेगळा होता.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10097.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ मून नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
2
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
3
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
4
+
5
+
6
+ मून नदी ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक नदी आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1013.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मंगला धरण (उर्दू: منگلا بند) हे हे पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूर जिल्ह्यातील झेलम नदीवर स्थित एक बहुउद्देशीय धरण आहे. हे जगातील सातवे सर्वात मोठे धरण आहे. धरणाचे नाव मंगला गावावरून पडले आहे.
2
+ २००३ मध्ये प्रथमच पाकिस्तान लष्कराच्या मेजर नसरुल्ला खानने या प्रकल्पाबद्दल माहिती उघडकीस आणली की हा प्रकल्प लंडनच्या बिनी अँड पार्टनर्स (जोडीदार जोफ्री बिनी यांच्या नेतृत्वाखालील टीम) यांनी या प्रकल्पाची रचना व देखरेख केली होती, [२] आणि ते धरण मंगला डॅम कंत्राटदारांनी बांधले होते. ही कंपनी दक्षिण सॅन फ्रान्सिस्कोच्या गाय एफ. एटकिन्सन कंपनीने प्रायोजित केलेल्या ८ यूएस कन्स्ट्रक्शन फर्मच्या गटातील आहे. [३]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10137.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क हे भारतीय संविधानातील एक कलम (कलम ३२) आहे.
2
+ भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे (कलम ३२) . घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे, ते म्हणतात या कलमशिवाय भारतीय संविधान हे काहीच उपयोगाचे नाही. भारताने ही प्राधिलेखांची पद्धत ब्रिटिश संविधानाकडून घेतली आहे. या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
3
+ भारतीय संविधान कलम २२६ अंतर्गत राज्यातील मुख्य न्यायालयाला देखील या प्रकारचा अधिकार प्रदान करते. म्हणजेच भारतीय नागरिक सर्वोच्च न्यायालयात अथवा राज्याच्या मुख्य न्यायालयात आपल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता दाद मागू शकतो. या दोन्ही कालामांतर्गत सर्वोच्च आणि उच्च न्यायालये काही साधनांचा वापर करतात त्यांना प्राधिलेख असे म्हणतात. देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मँडमस), प्रतिबंध (प्रोहेबिशन), क्वा धिकार (को वॉरंटो), आणि प्राकर्षण (सर्शीओराराय) हे ते प्राधिलेख होत.
4
+ १) देहोपस्थिती
5
+ याचा अर्थ होतो की “एखाद्याचा देह बाळगणे”. यात न्यायालय असा आदेश देते की अवैधरीत्या बंदी केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे. असा आदेश न्यायालय एखाद्या खासगी व्यक्तीला तसेच शासनाच्या संस्थेला देऊ शकते. अवैधरित्या बंदी बनविण्याच्या तसेच डांबून ठेवण्याच्या विरोधात हे प्राधिलेख कार्य करते. पण जर त्या व्यक्तीची अटक अथवा बंदी वैध किंवा योग्य कारणासाठी जसे न्यायालयाच्या अवमानासंदर्भात असेल तर या हक्काचा वापर ती व्यक्ती करू शकत नाही.
6
+
7
+ २) महादेश
8
+ याचा अर्थ होतो “आम्ही आदेश देतो”. या प्राधिलेखाद्वारे न्यायालय शासनाच्या अधिकाऱ्याला त्याचे शासकीय कर्तव्य बाजाविण्याचा (जी पूर्ण करण्यात त्या अधिकाऱ्याने टाळाटाळ केले असेल अथवा त्यात काही उणीव राहिली असेल) आदेश देते. असा आदेश कोणत्याही शासकीय संस्थेला, लवादाला, कानिष्ठ न्यायालयाला देता येतो. पण एखाद्���ा खासगी व्यक्ती, संस्था यांना हा आदेश देता येत नाही तसेच राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना हा आदेश देता येत नाही. जर एखादे कर्तव्य अधिकाऱ्याचा स्वविवेकाधिकाराच्या अंतर्गत येत असेल किंवा ते पार पाडण्यास बंधनकारक नसेल हा प्राधिलेख आमलात आणता येत नाही.
9
+
10
+ ३) प्रतिबंध
11
+ अर्थात मज्जाव करणे किंवा अटकाव करणे. जसे महादेशात एखादे कार्य करण्याचा आदेश देण्यात येतो यात एखादी थांबविण्यास सांगितले जाते. जर एखादे कनिष्ठ न्यायालय अथवा लवाद आपल्या अखत्यारी बाहेरील कृती करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्या न्यायालयाला ती कृती न करण्याचा आदेश देते. हा प्राधिलेख फक्त न्यायिक आणि निम-न्यायिक संस्थांकरिता वापरला जाऊ शकतो नाकी एखादी शासकीय संस्था अथवा खासगी व्यक्ती किंवा संस्था.
12
+
13
+ ४) क्वा धिकार
14
+ याचा अर्थ होतो “ कोणत्या अधिकाराने अथवा कोणत्या अधिकारांतर्गत”. न्यायालये या प्राधिलेखाच्या मदतीने शासकीय कार्यालयाचे अवैधनिक ग्रहण थांबवू शकते. हा प्राधिलेख मंत्रीवर्गीय अथवा खासगी कार्यलयाबाबत बजावला जाऊ शकत नाही. या प्राधिलेखांतर्गत कोणतीही इच्छुक व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते.
15
+
16
+ ५) प्राकर्षण
17
+ याचा अर्थ होतो “माहिती देणे” किंवा “ प्रमाणित करणे” हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालायामार्फत कनिष्ठ न्यायालये तसेच विविध लवाद यांना त्यांच्याकडील एखादा प्रलंबित खटला स्वतः कडे हस्तांतरित करून घेणे किंवा त्या खटल्याचा निकाल रद्द करणे या करिता बजाविला जातो. जर वरिष्ठ न्यायालयाला अशी खात्री असेल की तो विशिष्ट खटला त्या न्यायालयाच्या किंवा लवादाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर आहे किंवा त्याच्या निकालात काही चूक झाली आहे तर ती दुरूस्त करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय असा अधिकार बजावते. हा प्राधिलेख विधिमंडळे तसेच खासगी व्यक्ती अथवा संस्था यांच्याविरोधात बजावता येत नाही.
18
+ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे या कलामांतर्गत अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा भौगोलिक दृष्ट्या जास्त विस्तृत आहे याचे कारण सर्वोच्च न्यायालय संपूर्ण भारतात कोठेही या कलामांतर्गत आपले कर्तव्य बजावू शकते पण उच्च न्यायालय केवळ त्याच्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच प्राधिलेख बजावू शकते. पण सर्वोच्च न्यायालयवर एक बंधन आहे ते म्���णजे ते केवळ आणि केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते पण उच्च न्यायालय मूलभूत तसेच कोणत्याही इतर हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते.
19
+ [१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1014.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२]
2
+ मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२]
3
+ इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४]
4
+ नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१]
5
+ मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे.
6
+ डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ]
7
+ प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10150.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; - मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश] हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत
2
+ महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म सौराष्ट्रातील मोरबी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले.
3
+ वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंतःकरणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
4
+ आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषतः पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.[१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10156.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते.
2
+ मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात.
3
+ मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले.
4
+ मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.
5
+ ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१]
6
+ दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर��ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो.
7
+ पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे.
8
+ सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो.
9
+ सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते.
10
+ 'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारक��� अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे.
11
+ एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो.
12
+ मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10157.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते.
2
+ मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात.
3
+ मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले.
4
+ मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.
5
+ ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१]
6
+ दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर��ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो.
7
+ पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे.
8
+ सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो.
9
+ सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते.
10
+ 'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारक��� अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे.
11
+ एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो.
12
+ मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1016.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२]
2
+ मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२]
3
+ इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४]
4
+ नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१]
5
+ मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे.
6
+ डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ]
7
+ प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10163.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ या चित्रपटात खालील गाणी आहेत.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10166.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मृगजळाचे बांधकाम हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा चौथा ललित लेखसंग्रह आहे. इ.स. २००३ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
2
+ या संग्रहात एकूण २६ ललित लेख आहेत. "निसर्गसत्ता व जीवनसत्ता ह्या दोहोंच्या वर सौंदर्यसत्तेचे अधिष्ठान असते," असा सिद्धान्त या संग्रहात लेखकाने मांडलेला आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10169.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले उत्तम संस्कृत प्रकरण रूपक आहे. संस्कृतभाषेमध्ये नाटकास रूपक असे म्हणतात. तसेच नाटक हा दहा रूपकांपैकी एक प्रकार आहे .उज्जयिनी नगरीतील गणिका वसंतसेना ही या नाटकाची नायिका आणि चारुदत्त हा नायक.हा नायक जातीने ब्राह्मण वणिक् आहे. तसेच शर्विलक-मदनिका यांची प्रणयकथा तसेच राजकीय सत्तांतर  ही दोन दुय्यम कथानके मुख्य कथानकाबरोबर ह्या रूपकामध्ये एकत्रितपणे गुंफलेली आहेत. या रुपकातून तत्कालीन समाजाचे यथार्थ दर्शन घडते. कालिदासाच्या नाटकांमध्ये दिसणारे राजदरबाराचे चित्रण येथे दिसत नाही. तर समाजाच्या विविध स्तरांतील लोकांचे मनोज्ञ दर्शन नाटककाराने येथे घडविले आहे. त्यामुळे हे संस्कृत साहित्यातील पहिले सामाजिक नाटक ठरते. गृहस्थाश्रमी ब्राह्मण नायक आणि गणिका नायिका यांची प्रणयकथा रूपकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा धाडसी प्रयोग नाटककाराने केलेला आहे. तसेच प्रस्थापित सत्ता उलथवून टाकण्याचा नाट्यशास्त्राच्या नियमांविरूद्ध प्रसंग यात दाखविला आहे. अशा आणि इतर अनेक कारणांमुळे हा संस्कृत रंगमंचावरील धाडसी प्रयोग ठरतो. हे प्रकरण रूपक असल्यामुळे याचे दहा अंक आहेत. त्यापैकी प्रथम चार अंक हे संस्कृत कवि भास याच्या 'चारुदत्त' या रूपकामधून घेतलेले आहेत आणि पुढील सहा अंक ही शूद्रकाची स्वनिर्मिती आहे. काही इतिहास संशोधकांनी या रूपकामध्ये दाखविलेली राजकीय उलथापालथ ही वास्तव घटनेतून प्रेरित असल्याचे सूचित करून त्याचे ऐतिहासिक पैलू शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच या नाटकात येणारी पालक आणि गोपाल ही राजांची नावे भास कविच्या प्रतिज्ञायौगन्धरायण आणि स्वप्नवासवदत्तम् या नाटकांतही आढळतात. त्यावरून त्यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यास सबळता मिळते.
2
+ या रुपकांधील पात्रे ही समाजातील सर्वसामान्य जन असल्यामुळे त्यांची भाषा ही प्राकृत आहे. यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत, शकार भाषा असे प्राकृत भाषांचे अनेक प्रकार यांत दृग्गोचर होतात. एका गणिकेचा ब्राह्मण वणिकाशी विवाह आणि त्या गृहामध्ये गृहिणी म्हणून प्रवेश हेआजच्याही काळाला न झेपणारे कथानक इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात शूद्रकाने रंगमंचावर दाखविले आहे. यावरून पूर्वीच्या भारतीय समाजात व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते हा गैरसमज दूर होतो.
3
+ या रूपकाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक चित्रपटकलेतील सर्रास दाखविला जाणारा प्रेमी युगलांचा पडत्या पावसांतील मिलन-प्रसंग प्रथमतः भारतीय रंगमंचावर या रुपकांत मांडलेला आहे. अशा प्रकारे हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो.
4
+ या नाटकाच्या कथानकावर मराठीत मृच्छकटिक हे संगीत नाटक आहे. नाटकाच्या कथानकावर आधारित वसंतसेना नावाचा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी काढला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन जहागीरदार यांनी केले होते.
5
+ याआधी १९२९ साली दादासाहेब फाळके यांनी वसंतसेना नावाचा चित्रपट काढला हो याच नावाचा कानडी चित्रपट १९४१ साली, हिंदी चित्रपट १९४२ साली निघाले. वसंतसेना नावाचा तेलुगू चित्रपट १९६७ साली आणि तमिळ चित्रपट २०१४ साली निघाले.
6
+ मराठीतले नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिले होते. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं 'ललितकलोत्सव मंडळी’ने केला होता.
7
+ यातील वसंतसेनेची भूमिका आजवर शांता मोडक, कीर्ती शिलेदार, वनमाला, कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर, मधुवंती दांडेकर या अभिनेत्रींनी मृच्छकटिक नाटकात नायिकेची भूमिका केली आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10176.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मृणाल दुसानीस (२० जून १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. मृणाल मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.[१][२][३]
2
+ मृणाल दुसानीसचा जन्म २० जून १९८८ रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे झाला.[४] तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी कॉलेज, नाशिक येथून घेतले. तिने पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने सॉफ्टवेर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरेशी तिने इ.स. २०१६ मध्ये लग्न केले.[५][६][७][८]
3
+ तिने आपली अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात एकता कपूरची मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना मधून केली.[९][१०] यानंतर, तिने झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेत 'मंजिरी' नावाच्या पात्राची प्रमुख भूमिका पार पाडली.[११] इ.स. २०१५ मध्ये, ती कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत दिसली.[१२] इ.स. २०१८ मध्ये, ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत 'अनुश्री' म्हणून दिसली होती.[१३][१४]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10179.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत.
2
+ त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयातच मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्‍नी रमाबाईंची भूमिका साकारली. या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले. त्यानंतर त्यांनी श्रीकांत आणि द ग्रेट मराठा या मालिकाही केल्या. नंतर द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी इत्यादी मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला.[१] अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहवा मिळाली.
3
+ मृणाल देव-कुलकर्णी यांनी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) या चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले,या चित्रपटानंतर त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) आणि रमा माधव या दोन्ही चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबातच अभिनय देखील केला आहे.
4
+ मृणाल देव-कुलकर्णी यांनी 'मेकअप उतरवल्यानंतर' नावाचे मराठी पुस्तक लिहिले आहे.
5
+ त्यांनी विविधरंगी, बहुढंगी असे अनेक प्रकारचे मराठी तसेच हिंदी चित्रपट केले. [२] त्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, प्रणयरम्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो.
6
+ [३]
7
+ प्रसिद्ध साहित्यिक गो.नी.दांडेकर हे मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा होत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ. विजय देव पुण्यातील स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य होते. व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी मृणाल यांचा विवाह झाला आहे. मृणाल यांचा मुलगा विराजस हा सुद्धा अभिनेता असून त्यानी नुकतीच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.
8
+ मृणाल कुलकर्णी ह्या वयम्च्या ब्रॅंड ऍम्बॅसॅडर देखील आहेत.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10186.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मृणालिनी वनारसे या पर्यावरणाधारित तत्त्वज्ञानच्या अभ्यासक, संशोधक व लेखक आहेत. त्या गेली दहाहून अधिक वर्षे 'Natural Resource Management and Environmental Education' या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य पुणयात असते. त्यांची राहणी त्याच्या पर्यावरणविषयक धोरणांना धरूनच असते.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10190.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मृणालीनी जोशी (१९६९) एक मराठी लेखिका आहेत.[१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10193.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मृण्मयी देशपांडे ( २९ मे १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10194.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मृणमयी पुरस्कार हा गो.नी. दांडेकर यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला पुरस्कार आहे. तो दरवर्षी एका लेखकाला देण्यात येतो. इ.स. १९९९ पासून हा पुरस्कार दांडेकर कुटुंबीयांकडूनतर्फे दिला जातो.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10196.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.
2
+ मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत.
3
+ एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :-
4
+ वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.
5
+ ’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात.
6
+ मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते.
7
+ हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्य��ची उदाहरणे आहेत.
8
+ मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही.
9
+ माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात. याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक, त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे. अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात.
10
+ या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्‌भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्‌गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते.
11
+ मृत व्यक्तीचा ’जीव’ कायमचा कबरीमध्ये पडून राहतो, कायमचा कैलासावर, वैकुंठात, स्वर्गात, नरकात किंवा थोडाथोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो, भूत होऊन पृथ्वीवरच राहतो, परमेश्वराशी एकजीव होतो जातो, निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत. जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कबरीत हा पडून राहिलेल्या ’जिवा’चा न्यायनिवाडा करतो अशीही धार्मिक कल्पना आहे. याचा अर्थ असा की ’जिवाचे मृत्यूनंतर अस्तित्व’ अनेक धर्मांनी मान्य केले आहे. म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या ’जिवंत’ असतो.
12
+ ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे, भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा नरकवास एवढीच मर्यादित असते. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे, हा या धर्मांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे.
13
+ हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश (म्हणजे पाच आवरणे वा देह) असतात. या आवरणांना कोश म्हणतात. अन्‍नकोश, प्राणकोश, मनकोश (किंवा कार्मिककोश), विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत. तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसॉफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत.
14
+ अन्‍न्कोश आपण डोळ्याने पाहू शकतो, प्राणकोश, वासनाकोश आणि मनकोश यांची फक्त कल्पना करता येते. सामान्य माणसापाशी विज्ञानकोश, आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात. उच्च बुद्धि्मंत, कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशांचा थोडाफार विकास झालेला असतो. या पाच वा सात कोशांव्यतिरिक्त माणसाला एक कारण-देह असतो. मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते.
15
+ माणसाच्या मृत्यूच्या वेळी माणसाचा दृश्यकोश गळून पडतो आणि कालांतराने प्राण कोशही गळून पडतो. वासनाकोश आणि मनकोश यांचे सारस्वरूप कारण-देहाला बीजरूपाने चिकटून राहतात. माणसाच्या मृत्यूच्या वेळी क्त त्‍याचा फक्त स्थूलदेह मरण पावतो, शरीरातील जीवात्मा हा प्राण-वासना-मन या कोशांसकट शरीराबाहेर पडतो. प्राणकोश हा शरीराला एका चंदेरी नाडीने जोडलेला असतो. ही नाडी किंवा आयुष्याची दोरी जोपर्यंत बळकट असतेतोवर मनुष्य जिवंत असतो. मनुष्य मेल्यानंतर ही चंदेरी नाडी तुटली नाही, तर तो पुनर्जीवित होऊ शकतो.
16
+ मृत्यूविषयीचा हा आध्यात्मिक दृष्टिकोन भारतीय धर्मांनी थोड्याफार फरकांनी मान्य केलेला आहे.
17
+
18
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10197.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ ज्या ज्वालामुखीचा अनेक शतके उद्रेक झालेला नाही व भविष्यात तशी शक्यता नाही, त्या ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10210.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला.
2
+ महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित "मृत्युंजय " कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी.
3
+ कुरुक्षेत्रावर सुरू असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे.
4
+                  " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? "
5
+ ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला,
6
+                 " पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण         आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी ���ेऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. "
7
+ आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.
8
+ या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
9
+ (http://umatlemani.blogspot.in/)
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10244.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅंगनीज (Mn) (अणुक्रमांक २५) हा एक धातू असून ते एक मूलद्रव्य आहे.
2
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10258.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅंड्रिवा लिनक्स अत्यंत लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली ( संचालन प्रणाली ) आहे.ही कंपनी पूर्वी मॅंड्रेक म्हणून ओळखली जायची.मॅंड्रिवा लिनक्स केडीई व जीनोम तंत्रज्ञान वापरते.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10271.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ मॅक ओएस एक्स १०.१ (सांकेतिक नाव प्युमा) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स चीताची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स जॅग्वारची पूर्वाधिकारी होती.
3
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10275.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10311.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४]
2
+ हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५]
3
+ मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६]
4
+ ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10319.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅकघी टायसन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TYS, आप्रविको: KTYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: TYS) अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॉक्सव्हिल शहराचा विमानतळ आहे. याला पहिल्या महायुद्धात अमेरिकेकडून लढलेल्या चार्ल्स मॅकघी टायसन या वैमानिकाचे नाव देण्यात आलेले आहे.
2
+ येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही.
3
+ येथे टेनेसी एर नॅशनल गार्डची १३४वी रिफ्युएलिंग विंग[मराठी शब्द सुचवा] तळ ठोकून आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10342.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले.
2
+ या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10343.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10359.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅकनैरी काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ मॅकनैरी काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10360.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅकफर्सन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10369.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकमिलन पब्लिशर्स तथा मॅकमिलन ग्रुप ही एक ब्रिटिश प्रकाशन कंपनी आहे. डॅनियल आणि अलेक्झांडर मॅकमिलन यांनी १८४३ मध्ये लंडनमध्ये याची स्थापना केली. यांची जगातील ४१ देशांमधील कार्यालये आहेत.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10371.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मॅकलारेन एम.पी.४-२२ ही २००७ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.
2
+ मॅकलारेन संघ अपात्र घोषित झाल्यमुळे, त्यांना २००७ हंगेरियन ग्रांप्रीच्या शेवटी गुण नाही दिले गेले.[१]
3
+ * मॅकलारेन संघ अपात्र घोषित झाला, व त्यांचे सर्व गुण रद्द करण्यात आले.
4
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1038.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मंगळ २०२० (इंग्रजी: Mars 2020) हे अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था नासाचे अभियान आहे. या अभियानाची सुरुवात १७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२० रोजी याचे प्रक्षेपण होईल. याची रचना क्युरिऑसिटी अंतराळयानावर आधारीत असेल.[१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10395.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ इंग्रजांनी राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कॅ.अलेक्झांडर व कॅ.मॉकीनटॉस या दोन अनुभवी अधिकाऱ्यांना नेमले होते. त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी विविध संवेदनशील क्षेत्रात नाक्यांचे जाळे उभारले होते व शेवटी राजे उमाजी नाईक मॉकीनटॉस या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10409.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅक्रिनस (लॅटिन:मार्कस ओपेलियस सेव्हेरस मॅक्रिनस ऑगस्टस: अंदाजे १६५ - जून, इ.स. २१८) हा रोमन सम्राट होता.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1041.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.[१][२][३] यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. [४]
2
+ मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.[ संदर्भ हवा ]
3
+ या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क व संपदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.
4
+ या अभियानात १५ किलोचे पाच प्रयोगात्मक पेलोडस् पाठवण्यात आली. [५]
5
+ मंगळयान पीएसएलव्ही सी-२५ हे लॉंचिंग व्हेईकलच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपीत केले गेले.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10412.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लोढा किंवा मॅक्रोटेक डेव्हलपर्स (पूर्वीचे नाव : लोढा डेव्हलपर्स) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय स्थावर मालमत्ता कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. [२] कंपनीची स्थापना १९८० मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. [३] मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत . लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत. [४] [३] [५] मुंबईजवळील पालवा ही एकात्मिक स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते. [६] [७] १९ एप्रिल २०२१ रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून सूचीबद्ध झाली. [८] [९]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10426.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅक्स ओ'दाउद (४ मार्च, १९९४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10437.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले.
2
+
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1047.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मंगळवार पेठ आणि सोलापूरचे पारंपारिक वतनदार शेटे घराणे : सोलापूरच्या प्रत्येक परिसराला एक वेगळी पंरपंरा आणि उज्जवल इतिहास आहे.मंगळवार पेठ ही शहराची आर्थिक बाजू म्हणून ओळखली जाते. सोलापूरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.शहरातील वेगवेगळ्या परिसराला आणि पेठेला वाराचे नाव देण्याची पंरपंरा ही पेशव्यांच्याही पूर्वी पासूनची होती.दिलेली नावे लक्षात ठेवण्यास सोपी जावी म्हणून आणि या पेठांची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीत व्हावी,अशा पद्धतीने केली जात होती.आंध्रप्रदेश,कनॉंटक या दोन राज्याच्या सीमेवर असलेले सोलापूर हे व्यापारी पेठ म्हणून उदयास आले. सुरुवातीस केवळ 150 एकर मध्ये वसलेल्या सोलापूर मध्ये बाजारपेठ वसवण्या साठी जागा अत्यंत अपूरी असल्याने व्यापाऱ्यांच्या द्रष्टीने नवी जागा शोधण्यास सुरुवात केली. मंगळवार पेठ देखील कसबा सोलापूर चाच भाग होता.श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सोलापूरचे किल्लेदार उद्धव वीरेश्वर यांच्यासह सोलापूरचे पारंपारिक वतनदार देशमुख,जगदेवपा शेटे, देशपांडे यांच्याशी याबाबत चर्चा करून नवीन बाजारपेठ वसविण्याबाबत सूचना केली.1768 साली किल्लेदार वीरेश्वर यांनी मधला मारुतीच्या पाठीमागील सुमारे 73 एकर जागा शहरातील वतनदार जगदेवप्पा शेटे यांच्या मालकीची जागा व्यवसाय वाढीसाठी नियुक्त केली.सोलापूरचा विस्तार त्याकाळी सावरगाव डोंगरापर्यंत होता.जगदेवप्पा शेटे यांच्याकडे सावरगाव तसेच नळदुर्ग ठाणे यांची देखील वतनदारी व जहागिरी होती. त्याकाळी अत्यंत धाडसी तसेच व्यवहारचातुर्य असे जगदेवप्पा शेटे यांनी या ठिकाणी नवीन व्यापारीपेठ वसविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. यादरम्यान माधवराव पेशवे यांनी सोलापूरला भेट दिली.येथील वतनदार, किल्लेदार यांच्या समवेत झालेल्या चर्चेअंति या 73 एकरामध्ये वसलेल्या नव्या बाजारपेठेला 'माधवपेठ' असे नाव देण्याचे एकमताने ठरले.मधला मारूतीपासून तुळजापूर वेशीपर्यत शेळगी गावठाण पर्यंत व कुंभार वेशीपासून ते बाळीवेस मारुती तसेच शतकेश्वर लिंगापर्यंत अशी या पेठेची चतुःसीमा ठरविण्यात आली. या बाजारपेठेसंबंधीचे सर्व अधिकार जगदेवप्पा शेटे यांना देण्यात आले.जगदेवप्पा शेटे यांनी मुख्य पेठेत चार दिशेला चार मारुती मंदिराची प्रतिष्ठापना केली. कुंभारवेस मारुत���,बाळीवेस मारुती, तुळजापूर वेस मारुती व मधला मारुतीची स्थापना केली. पेठेच्या मधोमध शेटे यांनी वाडा बांधला.मोठ्या बाजरपेठेची निर्मिती केली.विविध जातीधर्माच्या लोकांना व्यवसाय करिता जागा उपलब्ध करून दिली.फलटण भागातील व्यापाऱ्यानिमित्त आलेल्या मारवाडी गुज्जर लोकांना व्यवसायाकरिता फलटण गल्लीत जागा दिली. केवळ 25-30 वर्षामध्ये माधवपेठेत व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास सुरुवात झाली. शेजारच्या दोन्ही राज्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे ही पेठ पूर्णपणे गजबजली.सोलापुरचा सर्वात मोठा बाजार हा दर मंगळवारी भरत असे.हा बाजार खूप मोठा असतो म्हणून बाहेरील गावातील लोक मंगळवारी सोलापूर मध्ये येत असतात मधला मारूतीच्या पिछाडीस असलेल्या मोकळ्या जागेत हा बाजार भरायचा.याच ठिकाणी ही नवीन पेठ स्थापन झाल्यानंतर मंगळवारी भरण्याऱ्या आठवडी बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली व पुढे या बाजाराचे नाव 'माधवपेठ' ऐवजी 'मंगळवारपेठ'असे बदलले गेले.ते आज पूर्व आणि पश्चिम मंगळवारपेठ असे ओळखले जाते.मंगळवार पेठेतील मधला मारुती मंदिरातील ऐतिहासिक मारुतीच्या मूर्तीच्या मागील बाजूस शिव पार्वती विवाह पुराण कोरण्यात आले आहे. अशी ऐतिहासिक शिल्प मंगळवार पेठेत आहे.मंगळवार पेठेतील वतनदार शेटे यांच्या वाड्यात श्रीमंत माधवराव पेशवे बाजारपेठ तसेच मंदिर बाबतीत चर्चेसाठी येत असत. शेटे घराण्यातील दुसरे जगदेवप्पा यांनी वारद घराण्यातील व्यक्तीला व्यवसाय वाढीसाठी सोलापुरात आणले व त्यांना शेटे वाड्यासमोरील जागा राहण्यास दिली.सोलापूरची पहिली नगरपालिका भाड्याने याच मंगळवार पेठेतील शेटे यांच्या वाड्याबाहेरील आठ खण जागेत होती.आजही वतनदार शेटे घराण्यातील वारसदार बाळासाहेब उर्फ सिद्धेश्वर मल्लिकार्जुनप्पा शेटे यांच्याकडे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शेकडो अंदाजे 300 वर्षांपूर्वीचे शस्त्र पाहवयास मिळतात.वतन दार शेटे घराणे हे अत्यंत जुने घराणे आहे. आद्यपंचपिठाधिशांनी हजारो वर्षांपूर्वी याच शेटे घराण्यास वीरशैव परंपरेतील सर्व धार्मिक अधिकार मान सन्मान दिलेला आहे.लग्नकार्यातील पूजेतील पंच कलशपैकी पहिला कलश घेण्याचे तसेच सर्व धार्मिक विधिना मान्यता देणे बाबत शेटे ��ांना मान आहे.वीरशैव लिंगायत समाजाचा प्रमुख व्यक्ती हा शेटे आहे.त्यामुळे गावातील ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या जत्रेत शेटे घराण्यास मोठा मान आहे.चालुक्य काळापूर्वीपासून म्हणजेच अंदाजे 1200-1300 वर्षांपूर्वीपासून या शेटे घराण्याचा इतिहास दिसून येतो.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10471.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता.
dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10488.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
2
+ क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.