text
stringlengths
0
147
सोप्या शब्दात इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे पहिलेच पुस्तक. तेही जवळपास
चार वर्षांपूर्वी लिहून झालेले. परंतु, नंतरही अनेक साधने हाती येत गेली आणि काही
ठिकाणी मांडलेल्या गोष्टींना भक्कम पुरावे मिळाले. अर्थात, हे संदर्भ तपासून लिहिण्याचे
वेड म्हणा वा व्यसन म्हणा, ते अंगिकारले गेले, दोन व्यक्तींमुळेच. ज्येष्ठ इतिहास संशोधक,
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पेशवाईचे अभ्यासक, संशोधक श्री. निनादराव
बेडेकर यांच्यामुळे. इतिहास हे एकप्रकारे पाहिले तर एक शास्त्रच आहे आणि त्याचा
शास्त्रशुद्ध अथवा प्रमाणभूत चौकटीत राहून अभ्यास करणे हे महत्त्वाचे असते, हे या दोन
संशोधकांमुळे मला समजले. निनादराव आज आपल्यात नाहीत, याचे दुःख फार आहे. पण
भाग्याने म्हणा वा पुण्यकर्माने, मला त्यांचा काही सहवास लाभला. माझे भाग्य एवढे
थोर की, मला महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहून या
पुस्तकाला आशिर्वाद दिले. ही गोष्ट खरे सांगायचे तर जाहली'. त्याबद्दल त्यांचे
आभार मानावे इतकाही मी मोठा नाही. इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे आणि श्री.
सदाशिव शिवदे यांच्याकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ही
गोष्टही मला विसरून चालणार नाही. नानासाहेब पेशव्यांच्या अंतःकाळचे वर्णन करणारे दोन
अस्सल मोडी कागद इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांनी तत्काळ उपलब्ध
दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. काही ऐतिहासिक नोंदींसंबंधी विशेष मदत करणारे
आमचे स्नेही भारत महारुगडे, कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार. कोणत्याही परिस्थितीत
कायमच घरच्या मंडळींनी, माझी आई सौ. स्वामिनी कस्तुरे, वडील श्री. सतीश शंकर कस्तुरे
आणि दादा समीर यांनी इतिहासाच्या अभ्यासाला प्रोत्साहनच दिले, याबद्दल खरेच शब्दच
कमी आहे. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच.
मी 'पेशवाई'वर पुस्तक लिहिले आहे आणि आता दीर्घ प्रतिक्षेनंतर ते प्रकाशित
करण्याचा मानस आहे, असे गप्पांच्या ओघात बोललो असता, तत्क्षणी हे पुस्तक
'राफ्टर'कडूनच प्रकाशित करू असे सांगणारे वास्तविक वयाने मोठे असले तरीही माझे
मित्रवर्य श्री. उमेश जोशी यांच्याबद्दल काय बोलावे? उमेश स्वतः थोरल्या रायांच्या
इतिहासातील अभ्यासक आणि विशेष म्हणजे कै. निनादराव बेडेकर यांचे शिष्य
असल्यामुळे पुस्तक अतिशय बारकाईने तपासून त्यातील त्रुटी दाखवून मगच स्वीकारणार,
याची खात्री होती. पुस्तक कसे सजवावे जेणेकरून, वाचकांना तत्कालीन घटना समजून घेणे
सोपे जाईल. विशेषतः ठिकाणे आणि हालचाली वगैरे माहित असाव्यात म्हणून
नकाशे बनवण्याचा विषय निघाला. पण हे नकाशेही अगदीच कंटाळवाणे नसावेत, याकरिता
स्वतः उमेशरावांनी नकाशात जीव येण्याकरिता त्याच्या भौगोलिक रचना अभ्यासून आपल्या
हातातील कामाचा डोंगर कौशल्याने हाताळत अत्यंत कमी वेळात हे अवघड काम पूर्ण केले.
'येकरिता राजेश्रींचे ऋण कैसे उतरावे?' पुस्तकासाठी अक्षरजुळवणी करणारे श्री. मिलिंद-
मंजिरी सहस्रबुद्धे, मुद्रितशोधन करून अत्यंत बारीक चुका शोधण्याचे काम करणाऱ्या उमेश
जोशींच्या आईसाहेब सौ. मेघना जोशी, लोकसन्मुख चेहरा असणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ
बनवणारे 'अस्मी क्रिएशन्स'चे श्री. आशुतोष केळकर आणि सरतेशेवटी पुस्तकाचे मुद्रण
<<<
उत्तमप्रकारे करणारे 'मौज प्रकाशन' चे श्री. संजय भागवत यांचे मनापासून आभार!
या सर्वांव्यतिरिक्त बाह्य जगातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासप्रेमी वाचक. सदर
पुस्तकातील माझे हे लिखाण कोण्या मोठ्या भाषापंडिताच्या गोडीचे नाही अथवा एखाद्या
इतिहासपंडिताच्या तोडीचेही नाही. त्यामुळे आपला अभिप्राय हाच मार्गदर्शक असल्याने
त्याच्या प्रतिक्षेत आहे.
अखेरीस शाहीर प्रभाकराच्या शब्दातच पेशवाईचे महत्त्व सांगावेसे वाटते-
"मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई।
मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई।।"
बहुत काय लिहिणे लेकराचे कायम ऐसेच अगत्य असो द्यावे ही विज्ञापना.
राजते लेखनावधी।।
आपला
<<<
शिवराज्याभिषेक
२. दक्षिण दिग्विजय
३. छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज
४. श्रीमंत पेशवे बालाजी विश्वनाथ
५. पेशवे बाजीराव बल्लाळ (थोरले बाजीराव)
६. पेशवे बाळाजी बाजीराव (थोरले नानासाहेब)
७. पेशवे माधवराव बल्लाळ (थोरले माधवराव)
८. पेशवे नारायणराव बल्लाळ
९. पेशवे रघुनाथराव बाजीराव (राघोबादादा)
१०. पेशवे माधवराव नारायण (सवाई माधवराव)
११. पेशवे बाजीराव रघुनाथ (दुसरे बाजीराव)
१२. पेशवाई : समज-गैरसमज
१३. मोडी पत्रे
१४. छत्रपती आणि पेशवे यांच्या मुद्रा
<<<
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, श्री नृप शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सर, शनिवारची
पहाट झाली. महाडच्या उत्तरेस असणाऱ्या, आठ कोसांवरच्या किल्ले मोठी
लगबग उडाली होती. पहाटेच मंगलवाद्ये वाजायला लागली होती. गडाच्या टोकाटोकांवर,
बुरुजा-बुरुजांवर अन् इमारतींच्या हरएक कोनाड्यात मशाली, पणत्या उजळल्या जात
होत्या. बालेकिल्ल्याच्या दोनही दरवाज्यांबाहेर- पालखी आणि मेणा दरवाज्याबाहेरचा
परिसर गोमयानी सारवलेला होता. राजवाड्यातल्या स्त्रिया आज नाकात नथ घालून,
डोईवरचा पदर सांभाळत हातातल्या चांदीच्या तबकातून दरवाज्याबाहेर रंगोळी घालीत
होत्या. राजवाड्यातल्या कारकूनांची सदरेच्या पाठीमागचा प्रचंड परिसर सजवायची घाई
लागली होती. फुलांच्या माळा भराभर उलगडल्या जात होत्या. महादरवाजा आज
सूर्य उगवायच्या आधीपासून 'आ' वासून सताड होता. पायथ्याच्या चित
दरवाज्यापासून आणि नाणे दरवाज्यापासून गडावर जाण्याकरता माणसांची रीघ लागली
होती. गडाखालच्या पाचाड, रायगडवाडी, कोंझर या गावांमधून गोरसाचे अन् दह्याचे हंडे
भरून घेऊन गवळणी गडाच्या वाटेला लागल्या होत्या. गडाच्या जगदीश्वर-भवानी
टोकाकडून, बाजारपेठेकडून येणारी माणसे आणि महादरवाज्याकडून गड चढून येणारी
माणसे होळीच्या माळापाशी एकत्र येऊन नगारखान्याच्या दिशेने झपाझप पावले उचलत
होती.
होळीच्या माळाच्या दक्षिणेला असलेल्या एका प्रचंड या नगारखान्याची
भव्य इमारत उभी होती. वास्तविक हा एक प्रचंड मोठा दरवाजाच होता. हत्तीवरच्या
अंबारीवरचा झेंडा जराही न वाकवता हत्तीला दरवाजातून जाता येईल इतका हा दरवाजा उंच
होता. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना मंगलमय अशी कमलपुष्पे कोरली होती. अन् त्यांच्याही
बाजूला दोन अप्रतिम शिल्पं खोदली होती. एका वनराजाने आपल्या चारही पायांखाली चार
हत्ती चिरडले असून शेपटीत एका हत्तीला पकडले आहे. असं वाटतं की जणू हा वनराज
सह्याद्रीच्या एका उत्तुंग कड्यावर उभा आहे आणि पाहता पाहता तो त्या शेपटीतल्या हत्तीला
खालच्या खोल दरीत भिरकावून देईल. महादरवाज्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झुली पांघरलेले,
दातांच्या अग्रभागी मोत्यांच्या घसघशीत माळा लावलेले दोन 'गजराज' उभे होते.
बालेकिल्ल्यातल्या राजवाड्यात गोड धांदल उडाली होती. राजवाड्याच्या द्वारांवरती
तोरणे लागली होती. स्वस्तिकादी शुभचिन्हे उमटवण्यात आली होती. नगारखान्यातला
चौघडा लागला. त्यातच सनईचे सूर मिसळले जाऊ लागले. राजवाड्यातल्या देवघरात
आई भवानीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. राजपुरोहित मंत्र म्हणत होते अन् समोर महाराष्ट्राचे
महाभाग्य, श्री शिवाजी महाराज वीरासन घालून बसले होते. बाळंभट्ट आर्विकरांच्या पाया
पडून महाराज राजवाड्याच्या आतल्या भागात गेले. इकडे राजवाड्यातल्या एका प्रशस्त
महालात गागाभट्ट, महाराजांचे राजोपाध्ये व इतर वैदिक ब्राह्मण वेदमंत्रांचे घोष करू लागले.