text
stringlengths 0
147
|
|---|
होता. तो 'सुन्नी' पंथीय मुसलमान होता. दख्खनी, 'शिया' पंथीय मुसलमानांच्या बदल्यात
|
त्याच्या मनात प्रचंड वैरभाव होताच. महाराजांनी नेमका याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचे
|
ठरवले. या दोन्ही शाह्यांना सोबत घेऊन मोगलांचे बस्तान हिंदुस्थानातून कायमचे उठवण्याचा
|
डाव महाराजांनी मांडला.
|
कुतुबशहाच्या दरबारात महाराजांचे प्रल्हाद निराजी नाशिककर या नावाचे एक वकील
|
होते. त्यांनी महाराजांचे सारे म्हणणे कुतुबशहाला सांगितले. या कुतुबशहाचे नाव होते अबुल
|
हसन कुत्बशाह ऊर्फ 'तानाशाह'. या कुतुबशहाचा सारा कारभार त्याचे वजीर मादण्णापंत
|
पिंगळी हे अत्यंत हुशार ब्राह्मण पाहात होते. एखाद्या सुलतानीत बादशाही वजिरी हिंदू अन्
|
त्यातूनही ब्राह्मणाला देण्याची घटना अपवादात्मक होती. मोंगल बादशहा अकबराचा वजीर
|
पंडित 'महेश दास' ऊर्फ 'बिरबल' याच्यानंतर मादण्णापंतांचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण
|
होते. बादशहाने मादण्णापंतांना 'सूर्यप्रकाशराव' असा किताब दिला होता. मादण्णापंतांनी
|
महाराजांचे हे राजकारण कुतुबशहाला समजावून सांगितले आणि कुतुबशहाने मोठ्या
|
<<<
|
आनंदाने महाराजांना भेटण्याची तयारी दर्शवली.
|
दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी विजयादशमी होती. याच दिवशी महाराजांनी 'दक्षिण
|
दिग्विजयार्थ' सीमोल्लंघन केलं. या दक्षिणी पंथांच्या एकजुटीत एक अडसर मात्र अजूनही
|
कायम होता. विजापूरच्या आदिलशाहीत दख्खनी मुसलमानांच्या तुलनेत हिंदुस्थानी
|
पठाणांचंच प्राबल्य अधिक होतं. यावेळी विजापूरचा वजीरही एक पठाणच होता. त्याचं नाव
|
होतं 'बहलोलखान'. त्यामुळे प्रथम दख्खनेतून या पठाणांना हाकलून देऊन मग
|
औरंगजेबाकडे पहाणे गरजेचे होते. महाराज भागानगर-गोवळकोंड्याकडे जात असतानाच
|
कर्नाटकच्या कोप्पळ प्रांतात विजापूरच्या हुसेनखान मियाना या पठाणाशी मराठ्यांची गाठ
|
पडली. या युद्धात सर्जेराव जेध्यांचा तरुण पुत्र नागोजी मारला गेला, परंतु पठाणांचा मात्र
|
जबरदस्त पराभव झाला. खुद्द हुसेनखान मियाना कैद झाला !!
|
फेब्रुवारी १६७७ च्या पहिल्या आठवड्यातच महाराजांची स्वारी भागानगरात प्रवेशती
|
झाली. या पराक्रमी राजाचे तेलंगणच्या रयतेने आणि खुद्द कुतुबशहांनी जंगी स्वागत केले.
|
महाराजांसोबत या वेळी सुमारे पंचवीस हजार मराठी फौज होती. भागानगरच्या मुक्कामी
|
मराठेशाही आणि कुतुबशाही यांच्यात एक महत्त्वाचा तह झाला. तो तहनामा थोडक्यात
|
असा-
|
१) भागानगरच्या मुक्कामी मराठी सैन्याच्या खर्चासाठी कुतुबशहांनी साडेचार लक्ष रु.
|
रोख द्यावेत.
|
२) मराठ्यांच्या दक्षिणेकडील मोहिमेमध्ये कुतुबशाहीचे चार हजार पायदळ व एक हजार
|
घोडदळ मराठ्यांच्या सोबत असावे.
|
३) कुतुबशाही सैन्यावर कुतुबशाहीच सेनापती मिर्झा मुहम्मद अमिन सरलष्कर असेल.
|
त्याचा खर्च, दारूगोळा इ. बादशहांनी पुरवावा.
|
४) कुतुबशाहीने पूर्वी ठरल्याप्रमाणे दरसाल एक लक्ष रु. खंडणी मराठ्यांना देत जावी.
|
५) पूर्वीप्रमाणेच मराठी वकील (प्रल्हाद निराजी नाशिककर) कायम कुतुबशाही
|
दरबारात रहावा.
|
६) दख्खनच्या मोहिमेत जिंकला जाणारा जो भाग पूर्वी शहाजीराजांकडे नसेल असा
|
मुलुख कुतुबशाहीच्या ताब्यात असावा.
|
७) उभय पक्षांनी कायम एकरूप राहून पठाण आणि मोगलांचा बिमोड करावा.
|
महाराज आणि कुतुबशहा यांच्यात हा अत्यंत महत्त्वाचा करार झाला. यानंतर दि. १०
|
मार्च १६७७ रोजी महाराजांनी पुढील मोहिमेकरिता भागानगर (सध्याचे हैदराबाद) सोडले.
|
या वेळी त्यांच्याबरोबर तहात ठरल्याप्रमाणे कुतुबशाही सैन्यही होते.
|
कुतुबशाहीच्या मुक्कामातच महाराजांनी दक्षिणी पंथाच्या एकजुटीकरिता अनेक
|
संस्थानिक, मांडलिक, सरदार इत्यादींना पत्रे पाठवली. परंतु, दुर्दैवाने महाराजांना त्याचा
|
काहीही परिणाम दिसून आला नाही. यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या आणि
|
सम्राट कृष्णदेवरायाने बांधलेल्या पवित्र श्री शैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन थेट चंदीच्या
|
<<<
|
रोखाने निघाले. चंदीचा (जिंजी) हा प्रचंड किल्ला विजापूरकरांकडे होता. महाराजांनी थेट
|
किल्लेदार नसिर मुहम्मदला वश केले आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता हा प्रचंड किल्ला
|
स्वराज्यात दाखल झाला. चंदीच्या या विजयानंतर वेल्लोरला वेढा पडला. पण किल्ला दाद
|
देईना, तेव्हा फौज वेल्लोरला ठेवून (सुमारे दोन हजार घोडदळ व पाच हजार पायदळ)
|
महाराज तंजावरच्या रोखाने निघाले.
|
तंजावरच्या वाटेवर असतानाच तिरूवाडी प्रांतात विजापूरच्या शेरखान लोदी या
|
पठाणाचा महाराजांनी समाचार घेतला. दि. ६ जुलै १६७७ या दिवशी शेरखानाचा अत्यंत
|
दारुण पराभव झाला.
|
शेरखानाच्या या प्रचंड पराभवाची इतकी धास्त विजापुरी सैन्याने घेतली की, या
|
प्रांतातील वालदूर, तेवेनापट्टणम्, बाणागिरी इ. किल्लेही विनासायास मराठ्यांना मिळाले.
|
शेवटी शेरखानाने अत्यंत बिकट अवस्थेत महाराजांशी तह केला आणि अखेर १६७७ च्या
|
पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराज तंजावरमध्ये दाखल झाले. महाराजांनी एकोजीराजे
|
भोसले (माता तुकाबाई), संताजीराजे (माता नरसाबाई) या आपल्या सावत्र बंधूंची भेट
|
घेतली. यांच्यासोबतच महाराजांनी भिवजीराजे, प्रतापजीराजे, कोयाजीराजे
|
(शहाजीराजांच्या नाटकशाळांचे पुत्र) यांच्याही भेटी घेतल्या आणि महाराजांनी एकोजी
|
राजांपाशी विषय काढलाच !-
|
"आपण आम्हांस सामील व्हावे. ते जमत नसेलच तर शहाजी राजांच्या दौलतीपैकी
|
निम्मी दौलत वाटून ती आम्हांस द्यावी. आजपर्यंत आम्ही काही मागितले नाही. तुम्ही
|
आपल्या मनाप्रमाणे सारी वहिवाट केली. आता तुम्ही स्वतः मिळवलेल्या दौलतीतले आम्हास
|
काही नको, परंतु वडिलांच्या दौलतीतील निम्मा हिस्सा आम्हास द्यावा!"
|
परंतु एकोजीराजांच्या मनास ते काही केल्या पटेना. अन् एके दिवशी ते महाराजांना न
|
सांगताच छावणीतून अक्षरशः पळून गेले. का? तर महाराज त्यांना कैद करतील म्हणून !! हे
|
पाहून महाराजांना फार वाईट वाटले. ते उद्वेगाने उद्गारले ...
|
' ... धाकुटे ते धाकुटेच! बुद्धीही धाकुटेपणायोग्य केली. महाराजांचे एक सावत्र बंधू
|
संताजीराजे महाराजांना येऊन मिळाले. परंतु, एकोजीराजे ऐकेनात हे पाहून महाराजांनी
|
कोलेरन नदीच्या उत्तरेकडचा, एकोजीराजांचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. पुढे होसकोट,
|
कोलार, बाळापूर, कावेरीपट्टणम्, वृद्धाचलम् इ. प्रदेश जिंकून महाराज उत्तरेकडे येत
|
असतानाच, इकडे एकोजीराजांनी कर्नाटकातच असलेल्या संताजीरावांवर प्रचंड हल्ला
|
चढवून संताजीराजांना पराभूत केले. परंतु माघार घेतलेल्या संताजीराजांनी आणि
|
रघुनाथपंत हणमंत्यांनी ऐन मध्यरात्रीच एकोजीराजांवर हल्ला चढवला. दिवसभरच्या
|
थकव्याने विश्रांती घेत असलेल्या तंजावरी फौजेचा पाडाव झाला. यात एक हजार
|
आणि प्रचंड लूट संताजीराजांना मिळाली.
|
एकोजीराजांच्या पराभवामुळे महाराजांनाही दुःख हे झालेच. एकोजी राजांना आता फार
|
उदासीनता आली होती. महाराजांनी मोठ्या उदार मनाने चंदी नजीकचा सात लक्ष रु.
|
<<<
|
उत्पन्नाचा मुलुख एकोजीराजांना देऊन टाकला आणि एक अत्यंत रसाळ पत्र लिहून राजांनी
|
समजूत काढली. महाराज म्हणतात,
|
" ... आम्ही तुम्हांस वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? याउपरी सहसा
|
वैराग्य न धरिता मनातून विषण्णता (काढून) कालक्रमण करीत जाणे ... रिकामे बैसोन
|
लोकाहाती नाचीज खावून काल व्यर्थ न गमावणे. कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती. वैराग्य
|
उतारवयी कराल ते आज उद्योग करून आम्हासही तमासे दाखविणे ... "
|
यानंतर कर्नाटकातील विजापूरकरांचाच गदग प्रांत काबीज करून जून १६७८ मध्ये
|
महाराज परतले.
|
<<<
|
महाराज दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले आणि
|
एक महिन्यातच, दि. १ नोव्हेंबर १६७६ या दिवशी संभाजीराजे पत्नी शृंगारपुरात
|
येऊन राहिले. महाराजांनी युवराज संभाजीराजांना शृंगारपूर-प्रभावळी या प्रांताचे सुभेदार
|
म्हणून नेमले होते. वास्तविक संभाजीराजे हे युवराज होते. राजांच्या माघारी राजधानीत
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.