text large_string |
|---|
विरोधी प्रस्ताव बहुमतानं फेटाळला । टॉप न्यूज\nविरोधी प्रस्ताव बहुमतानं फेटाळला\nनवी दिल्ली - बहुचर्चित थेट परकी गुंतवणुकीचा अर्थात, एफडीआयचा प्रस्ताव लोकसभेनं अखेर मंजूर केलाय. प्रस्तावाच्या विरोधात 218 मतं पडली. तर प्रस्तावाच्या बाजूनं 253 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या सभात्यागानं सरकारचा या मुद्द्यावर विजय झाल्याचं स्पष्ट झालंय. मतदानापूर्वीच दोन्ही पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला होता.\nआता कसोटी राज्यसभेत\nलोकसभेत जरी बहुमत मिळालं असलं तरी राज्यसभेत सरकारकडं पुरेसं बहुमत नाही. त्यामुळं राज्यसभेत सरकारची कसोटी लागणार आहे.\nमंगळवारी चर्चेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी विरोधात मतदान केल्यास सरकारला कोणताही धोका नाही, केवळ "एफडीआय'चा निर्णय रद्द होईल, असा खुलासा करून प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन प्रादेशिक पक्षांना केलं होतं. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळं मतदानात संख्याबळाचं पारडं सरकारच्या बाजूनं झुकलं.\nद्रमुकनं सुरुवातीपासूनच प्रस्तावाच्या बाजूनं कौल दिला होता. त्यामुळं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष कोणती भूमिका घेणार, याला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका कालच स्पष्ट केली होती. अखेर मतदानाच्या वेळी त्यांनी सभात्याग केल्यानं सरकारचं काम सोपं झालं.\nसरकारची खरी परीक्षा आता राज्यसभेत होणार आहे. कारण राज्यसभेत सरकारकडं बहुमत नाही. उद्या राज्यसभेत यावर चर्चा होणार आहे.\nदरम्यान , "वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या देशाची सेवा करण्यासाठी नव्हे तर कमाई करण्यासाठी येत आहेत. यामुळं देशाचं विभाजन होईल. देशाच्या बाजाराला पाच हजार वर्षांची परंपरा आहे. हा बाजारच नष्ट होऊन त्यावर अवलंबून असणारे श्रमिक, कष्टकरी, उघड्यावर येतील. देशाचा जाडीपी वाढला, तो याच वर्गामुळं. एफडीआयमुळं या वर्गाचं अस्तित्वच नष्ट होईल. मग देश काय फक्त 15 टक्के लोकांसाठीचं चालवणार काय? असा सवाल जनता दल यु्नायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी चर्चेत भाग घेताना उपस्थित केला. एफडीआयवर तटस्थ भूमिका ठेवणाऱ्या पक्षांना इतिहास कधी माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.\n"एफडीआय़मुळे शेतकरी आणि छोट्या किराणा दूकानदांराना फायदा होईल," हा सरकारचा दावा माकपचे वासुदेव आचार्य यांनी खोडून काढला. या निर्णयामुळे सर्वात जास्त तोटा शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचा होईल. एफडीआयमुळं रोजगार निर्मितीत वाढ होत असेल, नवं तंत्रज्ञान येत असेल तर डावे पक्ष त्याचं समर्थन करण्यास तयार आहे. मात्र इथं नेमकं उलट होत असल्यानं आम्ही त्याला विरोध करत आहोत, असंही आचार्य यांनी नमूद केलं.\nलालूप्रसाद यादव यांच्या भाषणादरम्यान अपेक्षेप्रमाणं सभागृहात गोंधळ झाला. अखेर 13 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर वक्तव्य मागं घेत असल्याचं लालूप्रसाद यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर चर्चा सुरळीत सुरू झाली.\nमतदानापूर्वीही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून एफडीआयवर जोरदार टीका केली. |
इंदापूर : इंदापूरात वाळू उपसा जोरात सुरू आहे. महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याच्याच पाठबळावर वाळूमाफिया कोणालाच जुमानत नसल्याने हा रात्रीस खेळ चाले प्रकार चांगलाच वाढला आहे. वन विभागाच्या रोपवाटिका मोडून, कुंपन तोडून तेथे वाळूचा उपसा करणाऱ्यांविरोधात आज वनविभागाने कारवाई केली. आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. वाळूमाफिया किती मुजोर बनलेत याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. इंदापूर तालुक्यातील शहा व कांदलगाव या ठिकाणी महसूल खात्याने कारवाई केली तरी सातत्याने वाळू उपसा होत असून आज पहाटे १ वाजल्यापासून वन विभागाने थांबून पाळत ठेवली, मात्र आरोपी फरार झाले. वाळूचा केलेला ढिग मात्र वन विभागाच्या ताब्यात आला. अर्थात याला काहीच किंमत नाही. कारण ज्या गावात हा साठा होतोय, त्याच गावातील स्थानिक किंवा राजकीय वरदहस्त असणारे वाळूमाफियाच यात सहभागी असतील हे सांगण्यास भविष्यवेत्त्याची गरज नाही, मात्र अलिकडच्या दोन वर्षात महसूल खात्यातीलच अधिकारी वाळूचा व्यापार करीत असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे आणि याची काहीच लाज या अधिकाऱ्यांना वाटतही नाही आणि यांच्यावर काही कारवाईही देखील होत नाही. काल रात्री कांदलगाव मध्ये वन विभागाने ही कारवाई केली व वनकायद्यानुसार गुन्हाही दाखल केला असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी महान्यूज ला दिली. काळे म्हणाले, मागील आठवड्यातही कांदलगाव येथे कारवलाई करण्यात आली, तेथे संशयित आढळून आले, मात्र वाळू आढळली नव्हती. आज वाळू आढळलेली आहे, मात्र हा वाळूचा साठा करणारे पळून गेले आहेत. ते फार काळ पळून जाणार नाहीत, ते स्थानिक असल्याचा आम्हाला संशय असून या प्रकारास पाठीशी घातले जाणार नाही. जे यात सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमच्या रोपवाटिकेचेही यामध्ये नुकसान करण्यात आले असून वन खात्याच्या हद्दीतील तारेची कुंपने तोडून ही घटना घडलेली आहे. तीन दिवसांपूर्वी मदनवाडी व कुंभारगाव येथेही कारवाई करण्यात आली आहे. |
आपल्या अवतीभवती अनेक घटना घडत असतात. त्या कधी चांगल्या असतात किंवा कधी वाईट असतात. आपल्या अवतीभवतीच्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा सर्वच समाजावर एक कळत नकळत प्रभाव पडत असतो. आपल्या अवतीभवती अनेक घटना घडत असतात. त्या कधी चांगल्या असतात किंवा कधी वाईट असतात. आपल्या अवतीभवतीच्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा सर्वच समाजावर एक कळत नकळत प्रभाव पडत असतो. हा प्रभाव मग या समाजाच्या अभिव्यक्तीमधून दिसून येतो. तो विविध माध्यमांमधूनही दिसून येतो. असाच एक गंभीर विषय आज आपल्या अवतीभवती दिसून येत आहे, तो म्हणजे दहशतवादाचा धोका. मुंबई शहराने तर या दहशतवादाची अनेक रूपं आतापर्यंत पाहिली आहेत. या दहशतवादाचा परिणाम साहाजिकच चित्रपटांच्या कथानकांवरही पडतोच पडतो. भारतातले हिंदी चित्रपट हे एक स्वप्नरंजन असते. त्यात आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींवर काही ना काही सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. देशात दहशतवादाचा धोका असताना एक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो तो म्हणजे या सगळय़ा पार्श्वभूमीवर आपण काय करत आहोत, या प्रश्नावर संबंधित यंत्रणा काही शांत बसलेली नसणारच. त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न 'बेबी' या चित्रपटातून करण्यात आला आहे. हे कथानक आहे भारताच्या गुप्तहेर संघटनेच्या एका यशस्वी मोहिमेचे. बेबी हे या मोहिमेचे सांकेतिक नाव. चित्रपट सुरू होतो तो या मोहिमेतल्या सदस्याच्या फितुरीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून. अनेक देशांमध्ये पसरलेल्या दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख आपल्या देशात बॉम्बस्फोट मालिका घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या एका बॉम्बस्फोटाची माहिती आपल्या गुप्तहेर संघटनेला मिळते. त्यातून ते हा बॉम्बस्फोटाचा कट यशस्वी होऊ देत नाहीत व या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या सगळय़ांची पाळेमुळे खणून काढण्याचा विडा उचलतात. त्याच वेळी तुरुंगात असलेला एक दहशतवादी पळून जातो. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी भारतीय गुप्तचर संघटना एक मोहीम राबवतात. त्या मोहिमेची कथा म्हणजे बेबी. या चित्रपटाचं सगळय़ात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे हा चित्रपट थेट आहे. यात कुठेही आडपडदा ठेवण्यात आलेला नाही. इतर चित्रपटांप्रमाणे केवळ इथे नायकाचाच शहाणपणा नाही तर त्यात एक टीम आहे. त्यांच्यातल्या प्रत्येकाचं स्वतःचं एक महत्त्व आहे. त्यामुळे या चित्रपटातून दिग्दर्शकाने हे सगळं सांघिक काम योग्य पद्धतीने दाखवलं आहे. यातल्या मोहिमेतून दाखवण्यात आलेलं दहशतवादाचं भेसूर चित्रणही विलक्षण आहे. दहशतवाद्यांची मानसिकता त्यातून दिसून येते. त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची दयामाया किंवा माणुसकी दिसून येत नाही. इथे दहशतवाद या प्रवृत्तीवर थेट भाष्य करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची परिणामकता अधिक वाढते. या विलक्षण सर्जनशील साहसाबद्दल आधी नीरज पांडेचं अभिनंदन केलं पाहिजे. त्याने या कथेची हाताळणी करताना कोणताही अभिनिवेश टाळला आहे. त्याला केवळ एक कथा दाखवायची आहे. ज्यात विलक्षण रहस्य आहे, थ्रिल आहे. ज्यात एका पाठोपाठ एक वेगाने घडणारे प्रसंग आहेत. सत व असत यांची लढाई आहे. या देशाच्या एकंदरीत व्यवस्थेविषयीची आस्था आहे. त्यावषयी बारकाईने केलेला अभ्यास आहे. आपल्या देशातल्या संरक्षण दलावरचा विश्वास आहे. त्यांच्या क्षमतेविषयीचा आदर आहे. या सा-या गोष्टींमुळे हा चित्रपट भावनिकदृष्टय़ा प्रेक्षकांची पकड घेतो. केवळ इतकेच नव्हे तर तंत्राच्या दृष्टीनेही हा चित्रपट अगदी उच्च दर्जाचा आहे. या अशा विषयावरचे अनेक हॉलिवुडपट अनेकांना माहीत असतील. त्यांच्या तोडीचा हा चित्रपट झाला आहे. यातल्या परदेशातल्या दृश्यांचा वापर हा केवळ त्या चित्रपटाच्या कथानकाशी संबंधित व तेवढाच करण्यात आला अहे. या चित्रपटातल्या गाण्यांचाही कथानकाच्या आशयाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट थेटपणे हृदयाला भिडतोच भिडतो. या चित्रपटाची गती सांभाळण्याच्या नादात कधी कधी नायक व इतर पात्रं अनावश्यक साहस करतात की काय असं वाटत राहातं. काही प्रसंगांमध्ये शत्रूची इतकी बेसावधता असेल असं वाटत नाही. म्हणजे एका विस्तीर्ण वाळवंटात या दोघांच्या हालचालींकडे कोणाचचं लक्ष नसेल यावर विश्वास बसत नाही. काही काही प्रसंगांत वेळेची गणितं जुळवतानाही अशाच प्रकारे सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केलाय की काय, असं वाटत राहातं. एक माणूस एका ठिकाणाहून दुसरीकडे अनेक लोकांच्या मध्ये इतक्या वेगाने कसा काय पोहोचत असेल यावरही प्रथमदशर्नी विश्वास बसणे कठीण जातं. मात्र हा एक देशभक्तीपर चित्रपट असल्याने व त्यातली सकारात्मकता पाहता या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं इतकंच. अभिनयाच्या दृष्टीने सांगायचं तर अक्षय कुमारने साकारलेला अजय सिंग राजपूत हा आपल्याला अगदी खराखुरा भेटतो. त्याच्या प्रत्येक हालचालीतून दिसणारा त्याचा सहजसुंदर अभिनय, त्याचा आत्मविश्वास व कोणत्याही प्रकारचे स्टंट करण्यातली त्याची क्षमता यामुळे तो नायकापेक्षाही अधिक अभिनेता वाटतो. ज्याला इंग्रजीत कन्विंसिंग म्हणतात तसे त्याने या चित्रपटात केले आहे. या अशा प्रकारचे चित्रपट आतापर्यंत ज्या ज्या अभिनेत्यांनी केले आहेत त्यांच्याहीपेक्षा अगदी उजवा अभिनय अक्षयने या चित्रपटात केला आहे. त्याने केवळ मारधाडीचे प्रसंग चांगले केले असे नाही. अनेकदा त्याने दाखवलेली संवेदना व माणुसकीही मनाला भिडणारी आहे. त्याच्या कौटुंबिक जीवनाले जे क्षण दाखवण्यात आले आहेत तेही त्याने तितक्याच हळुवारपणे साकारलेले आहेत. या सा-या मोहिमेचा प्रमुख म्हणून डॅनीने केलेली भूमिकाही तशीच विलक्षण आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॅनीच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत, त्यांच्यातली एक उजवी भूमिका या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते. तापसी पन्नू या अभिनेत्रीने साकारलेली प्रियाची भूमिकाही अशीच आशादायी आहे. या चित्रपटात के. के. मेनन याने जो दहशतवादी उभा केला आहे व त्यासाठी त्याने ज्या पद्धतीने अंडरप्लेचा अभिनय केला आहे त्यालाही विशेष दाद द्यायला हवी. या दहशतवाद्याचा सारा विखार त्याने केवळ आपल्या डोळय़ांतून व्यक्त केला आहे. अनुपम खेरने उभा केलेला शुक्लाही असाच विलक्षण आहे. अनुपम खेर यांच्यासारख्या अभिनेत्याला आता कोणत्याही भूमिकेत बसवा ते आपलं काम जबरदस्त पद्धतीने करणारच याची खात्रीच असते. आपल्या या लौकिकाला अनुपम खेर हे जागले आहेत. या चित्रपटातल्या अगदी लहान लहान प्रसंगातून व त्यासाठी आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही एका प्रसंगात आपण गुंततो व नंतर त्यातून बाहेर येतो असे या चित्रपटाच्या बाबतीत होत नाही. एक अगदी विलक्षण असा अनुभव आपल्याला पडद्यावर दिल्याबद्दल आपल्याला नीरज पांडेचे आभारच मानायला हवेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे वेळापत्रकही योग्य जुळून आले आहे. देश जेव्हा आपला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असेल तेव्हा या देशातला चित्रपट उद्योग या देशाच्या समोर असलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे किती सजगतेने व सकारात्मक दृष्टीने पाहत आहे हे हा चित्रपट दाखवून जातो. |
सोमवारी सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. नांदेड : तालुक्यातील बोरगांव (तेलंग) येथील ग्रामपंचायत निवडणूक अखेर बिनविरोध करण्यात तेथील गांव पुढाऱ्यांना यश आले आहे. कोविड - १९ महामारीच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूक घोषित झालेल्या गावात गट तट, रुसवे फूगवे, वाद विवाद असे प्रकार प्रामुख्याने पहावयास मिळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाव भावकी, सगे सोयरे, आप्त मित्र देखील एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून तयारीत असतात. काही ठिकाणी तर निवडणुकीच्या कारणांमुळे वादविवाद टोकापर्यंत पोहोचतात म्हणून वरील प्रकार थांबावेत व गावामध्ये सलोखा कायम राहावा, या उद्देशाने बोरगांव येथील क्षीरसागर, कंधारे, निवडंगे व पुरी अशा निर्णायक मतदार असलेल्या प्रमुख कुटुंबियांनी सर्वच ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सोमवारी सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनेच्या धर्तीवर बोलबाला असलेल्या आमदार, खासदार निधीतून विशेष बक्षीस मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या या गावास आमदार आणि खासदार निधीतून भरीव निधी मिळणार असल्याचे बोलल्या जात असून काही ठिकाणी तर बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी ५० लाखापर्यंत विशेष निधीची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. ई- स्वराज एपच्या माध्यमातून गावामध्ये झालेल्या खर्चाचा तपशील पाहणे सहज शक्य होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना देखील गावातील विकास आराखडा पाहणे सोयीचे झाले आहे. येथील निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तेथील नागरिकांचे कौतुक करण्यात येत असून नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे अभिनंदन होत आहे. निवडून आलेले सदस्य अनिल शिवाजीराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), राजू विश्वनाथ कंधारे (अ. जा. ), केशवराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), वच्छलाबाई जळबाजी निवडंगे (अ. जा. ), गिरजाबाई बालाजी क्षीरसागर (खुला प्रवर्ग महिला), लक्ष्मीबाई नागेंद्रबुवा पूरी (इतर मागास), कलावतीबाई रतनबुवा पूरी (इतर मागास प्रवर्ग) आदींचा समावेश आहे. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आनंदा पाटील क्षीरसागर, कोंडिबा निवडंगे, नारायण कंधारे, माधव कंधारे, शिवाजी पाटील क्षीरसागर, रतनबुवा पूरी, गंगाधर कंधारे, नागोराव निवडंगे आदींनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. |
आमच्या आजच्या गोष्ट या नायिका रशिया अण्णा Taratorkina नाट्य आणि सिनेमा एक लोकप्रिय अभिनेत्री होते. प्रेक्षक अशा "जतन करीत आहे पती" म्हणून चित्रपट त्याच्या भूमिका प्रसिध्द आहे, "तसेच मालिकेत," हक्क "आई, लग्न करते" "07, अर्थातच बदलत", "टेरे डेस Hommes", "आनंदी शेवट मर्त्य द्वंद्व". ऑफर तिची कारकीर्द आणि वैयक्तिक जीवन तपशील बाहेर वर्गीकरण अभिनेत्री जाणून घेणे. भविष्यातील ख्यातनाम ऑक्टोबर 8, 1982 रोजी जन्म झाला सोव्हिएत संघ राजधानी - मॉस्को. तिचे वडील - Georgiy Georgievich Taratorkin - युएसएसआर च्या पीपल्स कलाकार, आणि रशिया आणि त्याचे आई - Ekaterina Markina - लेखक आणि अभिनेत्री. अण्णा फिलिप्प नावाच्या एका मोठा भाऊ आहे. हे Ekaterina Markina वै सूचित जन्म अतिशय धोकादायक होते आणि अशा प्रकारे नकारात्मक तिला आरोग्य आणि बाळाच्या दोन्ही आरोग्य परिणाम होऊ शकतो म्हणून कुटुंब Taratorkin मुले, विशेषतः आपले स्वागत आहे की नोंद करावी. तथापि, एक स्त्री दोन बाळांना बाबतीत जाणीवपूर्वक वाईट वाटले नाही आहे मातृत्व आनंद अनुभव धोका घेतला. जीवनचरित्र अण्णा Taratorkin (तिचे बालपण संदर्भित) प्रसिद्ध कलाकार इतर संतती की ते या विलक्षण भिन्न आहे. त्यामुळे, आई किंवा वडील किंवा थिएटर तिला मुलगी कधीच घेतला नाही. याव्यतिरिक्त, मुले Taratorkin त्याचे काम बद्दल बोललो नाही तेव्हा. हे पालक लवकर वयात downside अभिनेता जीवन उघडले, अॅन व फिलिप्प इच्छित नाही खरं आहे. ते या प्रकरणात मुले थिएटर जादू अनुभव शकणार नाही भयभीत झाले होते. पाच वर्षांच्या अण्णा मध्ये "मधमाशी" सेटिंग भूमिका थोडे मुलगी त्या देखावा ऐकले, तेव्हा ती नट शक्यतेचा त्याचे वडील विचारू लागले. तथापि, Georgy नंतर साफ नकार दिला. मंचावर त्यांच्या लहान मुलगी पाहण्यासाठी पालक नाखुषीने असूनही, ती अजूनही रोपवाटिका भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नऊ अण्णा Taratorkina वयाच्या मध्ये चित्रपट "भूत अवतार" मध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसू लागले. या टेप, तरुण अभिनेत्री राज्यपाल मुलगी प्रतिस्पर्धी दमबाजी करणे सुरू होते कोण भूमिका. शाळा वर्षे Anya भाषा जाणून घेण्यासाठी चांगले क्षमता झाली असल्याने तिला, तिच्या आई अभिनेत्री पेक्षा अधिक भाषाशास्त्रज्ञ म्हणून पाहिले. मात्र, बहुतेक Taratorkin त्यानुसार, ती आपण थिएटरमध्ये शाळा प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करा नाही तर, नंतर जीवन अगदी प्रयत्न घेतले नाही की दुः ख वाटत असेल की वाटले. त्यामुळे पदवी नंतर, ती शाळा Shchepkin मध्ये कागदपत्रे दाखल केली. या संस्थेला निवड योग्य त्या अण्णा वेळी VGIK प्राध्यापक म्हणून काम केले प्रसिद्ध बाबा, लुडबूड करू इच्छित नाही खरं गेला आहे. हायस्कूल मध्ये अभ्यास मध्ये, अण्णा लक्षात मी निवडले व्यवसाय सह चुकीचा नव्हती. ती वर्ग उपस्थित खूश होता आणि सर्व सैन्याने अशा कठीण अभिनय शहाणपण शिकण्यासाठी लागू केले आहेत. Shchepkin शाळा मुलगी 2004 मध्ये पदवी प्राप्त केली. तिचे डिप्लोमा काम, जसे की "तीन बहिणींना" (ओल्गा वर्ण), "अज्ञात स्टार '(मोना वर्ण) म्हणून नाटकांतील विविध भूमिका होती," वादळ "(एक वर्ण अर्धा वेडा महिला) आणि" दोन धन्यांची सेवक "(वर्ण बीट्राइस). अण्णा Taratorkina प्रकाशन नंतर सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते रशिया शैक्षणिक युवक थिएटर. ती अशा "यिन आणि यांग" द्वारे अलेक्झांडर Borodin (Inga) दिग्दर्शित म्हणून नाटके स्टेज वर दिसू लागले कोठे, "Tom Sawyer" डी Krenni (Agnes), "Canterville आणून" Nazarova (व्हर्जिनिया), "गरीब" बद्दल दिग्दर्शित . Zagumennova (अण्णा), "स्वप्नं समुद्रकिनारा," आणि इतर. याव्यतिरिक्त, तरुण हुशार अभिनेत्री आणि थिएटर त्यांना काम केले आहे. मॉस्को सिटी कौन्सिल (नाटक "राजा फ" पी Chomsky करून - Cordelia भूमिका), रंगमंच केंद्र "ना Strastnom" (कामगिरी "Moomin मजेत गाणे म्हणणे आणि धूमकेतू" के Bogomolov - भूमिका Freken Snork) "सर्वात महाग, तसेच" Anteprizoy "(उत्पादन - मुक्त "युवराज Eremin यांनी दिग्दर्शित - भूमिका Kazuko," रोलर किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत "Nazarova - Juliette भूमिका). थिएटरमध्ये यशस्वी काम झाली की अण्णा Taratorkina - अभिनेत्री, प्रतिभावान वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक. त्यामुळे ती सिनेमा मध्ये काम ऑफर सुरुवात केली की आश्चर्य नाही. तथापि, तिच्या पहिल्या भूमिका भूमिका होते. आम्ही अशा कामे, जसे चित्रपट 2006 मध्ये मालिका "विमानतळ" आणि "हेल्पलाईन", स्क्रीन प्रकाशित 2005 आणि 2007 मध्ये अनुक्रमे तसेच वर्ष आणि "कोण हिवाळा संध्याकाळी येतो" म्हणून बोलत आहेत, "infidels. " एक चित्रपट अभिनेत्री मध्ये त्याचे पहिले प्रमुख भूमिका असलेली भूमिका वय 25 वर्षे होते. हे व्लादिमिर Potapov यांनी दिग्दर्शित 2007 मध्ये एक चित्र म्हणतात "07 बदल अर्थात," होता. प्लॉट कादंबरी "नर्तक साठी शोधाशोध" लेखक Yevgeny Mesyatsev आधारित होती. चित्रपट रशियन लष्करी आणि निर्दयी दहशतवादी दरम्यान युद्ध कथा सांगते. हन्ना तो एक शूर सैनिक पायलट-ispytatelnitsy भूमिका आला. 2009 मध्ये अभिनेत्री Jaroslav Chevazhevskaya यांनी दिग्दर्शित क्षुल्लक विनोदी "आनंदी शेवट" मध्ये केंद्रीय भूमिका, एक कामगिरी मोठ्या स्क्रीनवर पुन्हा दर्शन धन्यवाद. एक वर्ष नंतर, अण्णा Taratorkina हक्क "मर्त्य द्वंद्व" मालिकेत मुख्य वर्ण, नाही. त्याच वर्षी अभिनेत्री चित्रपट "पृथ्वी लोक" Sergei Govorukhin मध्ये दिसले. या "मनुष्य जतन करा" (2011) आणि "मामा लग्न" (2012) चित्रपट तिच्या सहभाग करण्यात आला. तिच्या भावी पती अलेक्झांडर Ratnikovym (गेल्या Skotnikov) आमच्या कथा नायिका संच भेट घेतली. अण्णा पती Taratorkin देखील एक अभिनेता आहे. बैठकीनंतर ते त्वरीत एकत्र मध्ये हलविले. काही वेळाने ते लग्न केले. आणि अण्णा आणि अलेक्झांडर, समृद्धीचे आणि प्रेरणादायी घटना आनंद नाहीत म्हणून त्यांचे लग्न अतिशय विनम्र होते, एक म्हणेल घरी. दोन एक मुलगा, निकिता आहे. |
Budget 2023 । नागपूर : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या बजेटवर विरोधकांकडून मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत सवाल केला आहे. "देशातील सामान्य गरीब माणसाला अर्थसंकल्पातून (Budget 2023) हद्दपार केलं आहे. देशात एकिकडे श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेत तर गरीब आणखीच गरीब होत चालले आहेत, याचं बॅलन्स कसं करणार? ", असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय. उपेक्षित माणसाला प्रवाहाबरोबर आणण्याचं काम अर्थसंकल्पाद्वारे होणं अपेक्षित होतं, मात्र केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशाची निराशा झाली असल्याचं ते म्हणाले. ओबीसी हा देशाचा कणा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 23 ओबीसी मंत्री आहेत. मात्र ओबीसींना 23 योजनापण दिल्या नाहीत, असंही वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे. 'केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतंही वक्तव्य केले नाही', अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. "हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी एक घोर निराशा खासकरून मुंबईकरांच्या पदरी आली आहे. मुंबईत सातत्याने पंतप्रधान मोदी यांचं येणं-जाणं वाढलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे", असे विनायक राऊत म्हणाले आहेत. महत्वाच्या बातम्या : |
* आटाकामाचे वाळवंट : चिलीच्या किनाऱ्याला असलेले हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. येथे सोने, नायट्रेट आणि कॉपर हे सापडतात. * ग्रॅन चॅको पेरॉग्वेच्या पश्चिमेला अणि अर्जेटिनाच्या उत्तरेला अणि बोलिव्हियाच्या दक्षिणेला हा गवताळ प्रदेश आहे. ही पर्वतश्रेणी व्हॅनेझुएला, कोलंबिया, इडोर, बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेटिना या सात देशांतून जाते. * सरोवरे - लेक मॅरे कॉबो : हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. ते व्हॅनेझुएलाच्या उत्तरेला आहे. या ठिकाणी तेल सापडते. * गॅलाकोबस ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला स्थित आहे. ती एक्वेडीअरच्या ताब्यात आहेत. ही बेटे प्रामुख्याने पशुपक्षी व कासव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. * या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. * किलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते. * हवामान - या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कॅनरी व बेंग्युला या शीतप्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते. * नाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते. * नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदानमधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे. * आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे. * दक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते. |
इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover) गणेश ही केवळ भारताची देवता राहिलेली नसून, गणपतीचा देवता म्हणून स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. त्याचे वर्णन जगातील काही संस्कृतींत मिळते. गणेश उपासना ही भारतीय संस्कृती जेथे पोचली त्या देशात प्रसारित झालेली दिसून येते. लेखक समीक्षकांच्या वेबसाईट्स थिंक महाराष्ट्रचा नवा उपक्रम (Marathi Writers Critic on Web! ) रा. गो. भांडारकर - क्रियाशील सुधारक (Great Scholar R. G. Bhandarkar) रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना 'भांडारकर' हे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते. शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it's Traditions) सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते. शिवमंदिरातील चौकटची नक्षी (Square Drawing in Shiv Temple) शंकराची मंदिरे ही गावातील वस्तीपासून लांब, वर्दळीपासून दूर, निवांत अशी निसर्गरम्य ठिकाणी असतात. ती दऱ्याखोऱ्यांत, डोंगरमाथ्यांवर, पर्वतांच्या पायथ्यांशी, नद्यांच्या उगमांजवळ, नद्यांच्या संगमांजवळ, समुद्रांनजिक, घनदाट अरण्यांत दिसून येतात. जुन्या शिवमंदिरांत हमखास आढळणारी नक्षी म्हणजे 'चौकटची नक्षी' होय. शिव उपासक - शैव संप्रदाय (Worshipping Shiv) शैव हा शिवदेवतेला उपास्य दैवत मानणारा संप्रदाय आहे. शिवाची उत्पत्ती प्रागवैदिक काळातील आहे. वैदिक युगाच्या प्रारंभी शिव नावाचा देव आढळत नाही. तथापी शिवलिंग उपासनेचे पुरावे हे हडप्पा संस्कृतीमध्येही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीमधील समाज हा शिवाची पूजा करत असावा असे निदर्शनास आले आहे. ऐतिहासिक परंपरेचे - टाऊन हॉल म्युझियम (कोल्हापूर) (Kolhapur Town Hall Museum) नवगॉथिक वास्तुशैलीमध्ये तंतोतंत घडवलेली कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाऊन हॉल होय. निमुळते छप्पर, मनोरे आणि आकर्षक वास्तू ही नवगॉथिक वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. टाऊन हॉलची लक्षवेधी इमारत महालक्ष्मी मंदिरापासून उत्तरेला साधारण दोनेक किलोमीटर अंतरावर भाऊसिंगजी रोडवर उभारलेली आहे. कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21) अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2020 आहे. प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors) पंढरपूरच्याआषाढी वारी निमित्ताने 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत. वारीची परंपरा (Wari Tradition) श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्येष्ठ वद्य अष्टमीला 'माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। । ' असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.