text
stringlengths
0
6.48k
५२००० करोड राशी देशांतर्गत तयार होणाऱ्या साहित्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी संरक्षण साहित्यासाठी येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) टक्केवारी ४९% पासून ७४% वाढवण्याची घोषणा मे २०२०मध्ये केली होती.
ते पाऊलसुद्धा या नव्या प्रकल्पाला पूरक ठरेल.
एप्रिल २०१५पासून ऑगस्ट २०२०पर्यंत संरक्षण साहित्यावर एकूण रु.
३.
५ लाख करोड खर्च करण्यात आले होते.
पुढील ६-७ वर्षात सुमारे रु.
४ लाख करोड भारतात बनणाऱ्या संरक्षण साहित्यावर खर्च होतील अशी सरकारची अपेक्षा आहे.
यावरून या नव्या कार्यक्रमाबाबतीत भारत सरकार गंभीर आहे आणि त्यांनी आपला गृहपाठ चोख केला आहे, याची शहानिशा होते.
भारताला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरतेशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव प्रकर्षाने गेल्या सहा महिन्यात झाली आहे.
संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेकडील हे पाऊल म्हणजे कोव्हिड साथीच्या काळ्या ढगाची एक चंदेरी किनार आहे, असं म्हणायला हरकत नाही!
प्रतिनिधी, मुंबईतोट्यात असलेले व त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा सामना करणारे मुंबई विमानतळ अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विमानतळावरील ५०.
५० टक्के व पुढे उर्वरित हिस्सा खरेदी करण्याच्या हालचाली अदानी समूह व जीव्हीके यांच्यात सुरू झाल्या आहेत.
मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड'मार्फत (मिआल) चालवले जाते.
मिआल ही जीव्हीके होल्डिंगची उपकंपनी आहे.
या कंपनीत ५०.
५० टक्के हिस्सा जीव्हीके समूहाचा आहे.
तर १३.
५० टक्के भागीदारी दक्षिण आफ्रिकन कंपनीची आहे.
तर १० टक्के भागीदारी अबु धाबीच्या पेन्शन प्राधिकरणाने केली आहे.
उर्वरित २६ टक्के भागीदारी केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आहे.
यापैकी जीव्हीकेचा ५०.
५० टक्के पहिल्या टप्प्यात व दक्षिण आफ्रिकन कंपनी आणि अबुधाबीचा १० टक्के हिस्सा पुढील टप्प्यात खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे.
असा प्रयत्न त्यांनी मागीलवर्षीही केला होता, हे विशेष.
याआधी मिआलमध्ये जीव्हीके व दक्षिण आफ्रिकन विमानतळ कंपनीसह बिडवेस्ट या कंपनीची भागीदारी होती.
पण बिडवेस्ट मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये १० टक्क्यांसह बाहेर पडली.
त्यावेळी बिडवेस्टचा हा हिस्सा १२४८ कोटी रुपयांना खरेदी करण्यासह एकूण १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी अदानी समूहाने केली होती.
परंतु त्यावेळी जीव्हीकेने अबुधाबीहून ७६४८ कोटी गुंतवणूक आणत 'अदानी'ला रोखले होते.
आता मात्र मिआल कंपनीच संकटात आहे.
त्यामुळे अदानी समूहाने याबाबत आक्रमकरित्या चर्चा सुरू केली आहे.
संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'अदानी समूहाचा हा व्यवहार येत्या काही आठवड्यांत पूर्ण होऊ शकतो.
या व्यवहारांना अबुधाबी पेन्शन निधी आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीनेही मंजुरी दिली आहे.
हा व्यवहार पूर्ण झाल्यास मुंबईचे विमानतळाची ७६ टक्के हिस्सेदारी अदानी समूहाकडे जाईल.
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे ( एमएमआरडीए ) संचालक (प्रणाली) कुलवेंद्र सिंह कपूर यांचे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून कोसळून निधन झाले असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली.
घटना घडली तेव्हा घरामध्ये त्यांची पत्नी आणि २५ वर्षीय मुलगा होता.
( MMRDA Director Kulvindar Singh Kapur Death )वाचा: महापौरांवर कोसळला दु:खाचा डोंगर; मोठ्या भावाचे करोनाने निधनकुलवेंद्र सिंह कपूर (५५) हे वांद्रे कुर्ला संकुलातील एका इमारतीत कुटुंबीयांसह वास्तव्याला होते.
चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून ते काल रात्री कोसळले आणि एकच खळबळ उडाली.
कुलवेंद्र सिंह हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने तातडीने सर्वांना कल्पना दिली.
त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कपूर हे एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होण्याआधी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते.
२ जुला २०१९ पासून ते एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते.
बीकेसी पोलीस स्टेशनकड़ून या घटनेचा तपास सुरू आहे.
वाचा: सोनू सूदच्या मागे कोण आहे हे भविष्यात कळेलच-राज ठाकरेघात की अपघात, अद्याप स्पष्ट नाहीकुलवेंद्र कपूर हे चौथ्या मजल्यावरून कोसळले आहेत.
त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेवेळी पत्नी आणि मुलगा घरातच होते.
अपघातानंतर त्याना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आनंद मुळये यांनी सांगितले.
वाचा: राज्यात सरकारचे स्टेअरिंग कुणाकडे?
; CM ठाकरेंनी दिले 'हे' उत्तरराजीव यांनी व्यक्त केला तीव्र शोकएमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.
राजीव यांनी कुलवेंद्र सिंह कपूर यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
एमएमआरडीए एक परिवाराप्रमाणे या कठीण प्रसंगी कपूर कुटुंबाच्या सोबत आहे.
ईश्वर कुलवेंद्र यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना, अशा भावना राजीव यांनी व्यक्त केल्या.
वाचा: चंद्रपुरात करोनाचा पहिला बळी; अमरावतीत १५ दिवस वास्तव्याला होता
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीरपणे झापल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला.
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, असं सांगतानाच हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता?
, असा सवाल निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.
अजितदादा शरद पवारांशी काय बोलले?
; जयंत पाटलांनी दिली 'ही' महत्त्वाची माहितीतर, या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली होती.
त्यांनी पार्थ यांना लंबी रेस का घोडा म्हटलं होतं.
आज परत सांगतो.
पार्थ लंबी रेस का घोडा आहे.
थांबू नकोस मित्रा, असं नितेश यांनी म्हटलं होतं.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवार कुटुंबातील प्रश्न आहे, असं सांगत पवारांना टोला लगावला होता.
निशाणा नेमका कुणावर?
काय म्हणाले होते पवार?
पार्थचा अनुभव कमी आहे.
तो प्रगल्भ नाही.
त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले.
तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही.
कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही.
मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं पवार म्हणाले होते.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता.
मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती.
त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत.
खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे.
त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.
Nitesh Rane: पवारांचा नातू झाला भाजपचा मित्र!
; नितेश यांनी केलं 'हे' खास ट्विट
प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'मुळे जवळपास सर्वच व्यवहार थांबले होते.
'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे घर खरेदी करताना ग्राहकांवरील बोजा हलका होणार असून, निवारा स्वस्त होणार आहे.
शिवाय या निर्णयामुळे व्यवहार वाढून सरकारी तिजोरीला फायदाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'लॉकडाऊन'नंतर औरंगााबाद विभागात मुद्रांक शुल्क विभागाला तिन्ही जिल्ह्यांत व्यवहाराला हळूहळू सुरुवात झाली होती.
आता सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य घर खरेदी करणाऱ्यांना मार्च २०२१पर्यंत फायदा होणार आहे.
करोना संसर्गामुळे २५ मार्चपासून सर्व महसूल शासकीय कार्यालयातील बंद पडलेलेल्या व्यवहाराचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला.
जमीन, गृह खरेदीचे सर्व व्यवहार देखील आठ मेपर्यंत बंद होते, मात्र आता दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
औरंगाबादसह बीड आणि जालना जिल्ह्यातील व्यवहारही सुरू झाले असून, शासनाला बऱ्यापैकी महसूल मिळण्यास सुरुवात झाली आहे.
त्यातच राज्य सरकारने करोना आणि 'लॉकडाऊन'मुळे अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला आणि घर खरेदीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या दरात दोन ते तीन टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.