text
stringlengths
0
6.48k
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १३ मार्चपासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बंधन टाकण्यात आली होती.
मात्र आता आर्थिक व्यवहारांना गती यावी यासाठी अनेक व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचनांसह लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले आहे.
त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करताना रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
मनमानी पद्धतीने कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, असे सांगत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले.
लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नकापुन्हा लॉकडाउन करण्यात येणार, आता ई-पासची गरज नाही अशा स्वरूपाच्या अफवा सोशल माध्यमांवर पसरविण्यात येत आहे.
मात्र नागरिकांना यावर विश्वास ठेऊ नये असे आ‌वाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले.
लक्षणे लपवू नकाकरोनाचे वाढते रुग्ण आणि मृतांची संख्य नक्कीच चिंता व्यक्त करणारी आहे.
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
लक्षणे असूनही ती माहिती लपविली जाते, उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे ठाकरे म्हणाले.
वेळेत रुग्णालयात येणारे करोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात आहे.
नागरिकांनी सतर्क राहिले तर करोनावर नक्कीच नियंत्रण आणता येईल, असा विश्वास ठाकरे यंनी व्यक्त केला.
जिनिव्हा: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित केला असल्याचा दावा रशियाने केला होता.
करोनावरील रशियन लस या महिन्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले होते.
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
रशियाने निर्देशांचे पालन केले नसल्याचा ठपका जागतिक आरोग्य संघटनेने ठेवला आहे.
त्यामुळे आता रशियन लशीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
रशियाने पुढील महिन्यांपासून करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरण सुरू करणार असल्याचे म्हटले होते.
त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात लशीकरणाची मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले होते.
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लशीवर शंका उपस्थित केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, कोणत्याही देशाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न घेताच लशीच्या उत्पादनासाठी परवानगी दिली तर त्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाचा: करोना लस: ब्रिटनसोबत आणखी एका भारतीय कंपनीचा करारवाचा: मस्तच!
दुबई विमानतळावर श्वान करतात करोना चाचणीक्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, अनेकदा संशोधकांकडून लस विकसित झाल्याचा दावा करण्यात येतो.
ही खरंतर आनंदाची बातमी असते.
मात्र, लस प्रभावी असल्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांमधून लशीची चाचणी करणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षित लस तयार करण्याचे अनेक नियम आहेत.
त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही आहेत.
त्यांचे पालन करणेही आवश्यक आहे.
लशीच्या चाचणीबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे उपचारासाठी संबंधित लस वापरल्यास त्याचे काही दुष्परिणाम होतात का, हेदेखील पाहिले जाते.
त्यामुळे रुग्णांना त्याची झळ बसत नाही.
करोना लशीबाबत दावा करण्यात आला आहे.
मात्र, आम्हाला त्याची अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकृत माहिती आली असती तर, आमच्या युरोपीय कार्यालयाने लशीबाबत नक्कीच माहिती घेतली असती असेही त्यांनी सांगितले.
२५ ट्रिलियन नोटा जाळल्यावाचा: विम्यासाठी कारला आग लावली पण शेकडो एकरावरील जंगल पेटलं!
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर क्लिनिकल चाचणी सुरू असलेल्या २५ लशीची यादी जाहीर केली आहे.
तर, १३९ लशी अद्यापही प्री-क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत.
तर, दुसरीकडे रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी मिखाइल मुराशको यांनी रशिया ऑक्टोबरपासून करोनाची लस सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले.
ऑगस्टमध्ये या लशीला मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
काठमांडू: सीमावादामुळे भारत आणि नेपाळच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळमध्ये राजनयिक पातळीवर चर्चा होणार आहे.
नेपाळ- भारतमधील ओवरसाईट मॅकन्झिमची ही आठवी बैठक असून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे.
या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सीमावादाचा समावेश नसला तरी मागील काही महिन्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव या बैठकीच्या माध्यमातून कमी होऊ शकतो.
या बैठकीत भारताने नेपाळला विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीवर चर्चा होणार आहे.
या बैठकीत नेपाळच्यावतीने शंकरदास बैरागी प्रतिनिधीत्व करणार आहेत.
तर, भारताकडून नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा सहभागी होणार आहेत.
ओवरसाईट मॅकन्झिमची बैठक सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या भारत दौऱ्यानंतर निश्चित करण्यात आली.
दोन्ही देशांत निश्चित करण्यात आलेले प्रकल्प आणि हे वेळेत प्रकल्प पूर्ण होण्याबाबत पावले उचलण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात येते.
१९४७ चा 'तो' करार नव्यानं करण्याची मागणीवाचा: चीन, पाकिस्तानसोबत नवीन गट?
नेपाळने सांगितली 'मन की बात'!
भारतासोबतच्या चर्चेला नेपाळ उत्सुकभारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळ आता चर्चेसाठी उत्सुक आहे.
यामध्ये भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
भारत आणि नेपाळ यांच्यात घनिष्ट संबंध असून चर्चेद्वारे समस्यांचे निराकरण करू शकतो असे भारतातील नेपाळच्या राजदूतांनी म्हटले.
दोन्ही देश एका योग्य वेळी बैठक घेतील आणि कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतात, असेही त्यांनी म्हटले.
वाचा: पाकची 'नेपाळी' आगळीक; नव्या नकाशात लडाख, जुनागडवर ठोकला दावालिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरीसह भारताच्या ३९२ चौकिमी भूभागावर नेपाळने दावा ठोकला होता.
या नव्या नकाशाला नेपाळच्या संसदेने मान्यता दिली.
भारतासोबत वाद सुरू झाल्यानंतर नेपाळमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.
तर, नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आमचा सीमावाद हा चीनसोबत नसून भारतासोबत असल्याचे सांगत वादात आणखी तेल ओतले होते.
दरम्यान, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार याआधीच धुडकावून लावला आहे.
चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली.
नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश 'सार्क'चे सदस्य आहेत.
तर, चीन निरीक्षक आहे.
त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
अहमदनगर: कोणतीही परवानगी नसताना टोनो १६ या नावाने प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध विक्री सुरू केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील कथित डॉक्टर स्वागत तोडकर (Swagat Todkar) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे.
संगमनेर येथील एका औषधाच्या दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियात केल्याने हा गुन्हा संगमनेर येथे दाखल करण्यात येणार आहे.
कोल्हापूरमध्ये रिक्षाचालक ते बोगस डॉक्टर असा प्रवास केलेल्या तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कारवाई झाली.
संगमनेर येथेही बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल आहे.
त्यानंतरही हे प्रकार सुरू आहेच.
अलीकडेच तोडकर याने एका औषधाची जाहिरात केल्याचे आढळून आले आहे.
यासंबंधी आलेल्या तक्रारीवरून संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घारगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोडकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
वाचा: 'पाकव्याप्त काश्मीर, लडाखमधील वैद्यकीय पदवी भारतात चालणार नाही'जीवन संकेत या यू ट्युब चॅनलवर TONO-16 या औषधाची जाहिरात करण्यात आली आहे.
स्वागत तोडकर याचे हे औषध गुरूदत्त मेडीकल, घारगाव, ता.
संगमनेर येथे उपलब्ध असल्याचे त्यात म्हटले आहे.
प्रतिकार शक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे.
हा प्रकार बेकायदा आहे.
त्यामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा तसेच औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश देण्यात आला आहे.
तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही संगमनेर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे.
याशिवाय कोल्हापूरमध्येही त्यांच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे.
आरोग्य विभागाने अनेकदा नोटीसाही दिल्या आहेत, तरीही हे प्रकार सुरू आहेत.
करोनाच्या काळात लोकांच्या मनातील भीतीचा गैरवापर करण्याचा प्रकार दिसून आल्याने आरोग्य विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.
वाचा: पुण्यात गणपती विसर्जनासाठी यंदा 'लय भारी' व्यवस्थाकोल्हापूरमध्ये तीन वर्षांपूर्वीच तोडकर याचा भांडाफोड झाला आहे.
मूळचा रिक्षाचालक असलेल्या स्वागत तोडकरने कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता स्वत:च्या नावासमोर डॉक्टर लावण्यास सुरुवात केली.
इंटरनेटवरून निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर करून आपली दुकानदारी सुरू केली.
त्याने 'हसत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचार' या विषयावरील आठ हजार व्याख्याने राज्यभर दिली आहेत.
व्याख्यानांचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून आपल्या व्यवसायाचा ग्राफ वाढवला.
तोडकर स्वत:च्या नावापुढे एम.
डी, एनएलपी, एन.
डी, मनोविकार तज्ज्ञ, समाजसेवक अशी बिरुदावली लावतो.
कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही घातक उपचार करणाऱ्या स्वागत तोडकर व कोमल पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च २०१७ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोडवर संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले.
यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापुरात जतात.
पुणे, संगमनेर येथे त्याने केंद्रे सुरू केली.
तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
संगमनेर येथे गुन्हा नोंद होऊनही त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात गर्दी पहायला मिळते.
स्वागत तोडकर हे स्वतःला निसर्गोपचार तज्ञ म्हणवून घेतात त्या नावाखाली रुग्णांना विविध औषधे देतात आणि समाज माध्यमातून जाहिरात करतात.
कोव्हिड बद्दल प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी एक औषध विक्रीसाठी बाजारात आणले आहे.