text large_string |
|---|
जळगाव, दि. ८ : फिनॉल, एच-२ ओ-२ व पाणी यांचे मिश्रण तयार होऊन रिअॅक्टरवर दाब निर्माण झाल्यामुळेच गीतांजली केमिकल्स या कंपनीत स्फोट झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या घटनेमुळे नाशिक विभागाचे सहायक कामगार उपायुक्त, एमआयडीसीचे अधिकारी व पोलिसांनी सकाळी कंपनीची पाहणी करुन पंचनामा केला. पोलिसांनी कंपनीतून ज्वालाग्रही पदार्थांचे नमुने घेतले असून ते मुंबईतील सांताक्रूज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. औद्योगिक वसाहतमधील गीतांजली केमिकल्स या कंपनीत रविवारी रात्री ९. १५ वाजता स्फोट झाला. त्यात ८ कामगार भाजले गेले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कंपनीत दोन महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे. सोमवारी सकाळी नाशिक विभागाचे सहायक कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे, एमआयडीसीचे एरिया मॅनेजर महेंद्र पटेल व त्यांच्या पथकाने कंपनीत भेट देऊन पाहणी केली. कंपनीतील प्रशासकीय अधिकारी परेश झंवर व अन्य तज्ज्ञांनी या अधिकाºयांना माहिती दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी सकाळीच भेट देत घटनास्थळाचा पंचनामा करण्यासह कामगार व परिसरातील कंपनी चालकांचे त्यांनी जबाब नोंदवून घेतले. यावेळी स्फोटाचे कारण शोधण्यासाठी एच. सी. आय, एच-२ ओ-२, आर. के. -१५ व एच. बी. आर आदी ज्वालाग्रही पदार्थांचे नमुने घेऊन ते सीलबंद करुन प्रयोगशाळेत पाठविले. या कंपनीत १२० कामगार कंत्राटी पध्दतीने तर ३० कामगार प्रशासकीय कामासाठी व ४० कामगार कायम असे १९० कामगार आहेत. त्यापैकी रविवारी दुपार सत्रात २७ कामगार ड्युटीला होते. स्फोट होताच सर्वत्र पळापळ झाली. त्यात आठ कामगार जखमी झाले आहेत. शेजारी ई-२२ मध्ये सतीश दशरथ ओसवाल यांच्या मालकीची ए. एस. इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या स्फोटातील काही अवशेष या कंपनीत उडाले होते. त्यामुळे दोन पत्रे तुटली आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने रात्री या ठिकाणी कोणी कामगार नव्हते. पवनकुमार गिरधारीलाल देवरा हे कंपनीचे मालक असून सुरेंद्रकुमार रवीकुमार मोहता व मधू सुरेंद्र कुमार मोहता हे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. मोहता व देवरा यांची या कंपनीत भागीदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कामगारांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक उपाययोजना न करता व काळजी न घेता कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरले म्हणून कंपनी मालक सुरेंद्र कुमार मोहता, मधू सुरेंद्र मोहता, पवनकुमार देवरा, व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील, डी. डी. इंगळे व श्रीकांत काबरा यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादंवि कलम २८५,२८७, ३३७,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे स्वतः फिर्यादी झाले आहेत. कंपनीतील कॅटलवर रसायन गरम व मिश्रण होण्यासाठी मीटर लावलेले असते. या मीटरवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञ राहिला असता तर हा स्फोट झाला नसता, व्यवस्थापनाच्या चुकीमुळेच हा स्फोट झाल्याचा जबाब यातील गंभीर जखमी झालेल्या अनिल उत्तम शिरसाळे (वय ३५, रा. शिवाजी नगर, जळगाव) यांनी पोलिसांकडे दिला आहे. कॅटलमध्ये केमिकलचे कमी जास्त मिश्रण व जास्त चाजींग झाल्याने आर. के. १५ या रिअॅक्टरमध्ये जास्त दाब निर्माण झाला म्हणूनच हा स्फोट झाल्याचेही जबाबात म्हटले आहे. |
बडबड तर अशी की चंबळच्या खोऱ्यात जणू राज्यच करायचा. लक्ष नका देऊ त्याच्याकडे. बिलंदर भारी! कलंदर ही! नाही मला कसे ठाऊक विचारताय? माझाच तर .. काय म्हणू? पुत्र? मानसपुत्र? नव्हे खरंतर पात्र! होय, मानसपात्र! माझ्याच नाटकासाठी जमवलेल्या पात्रांपैकी एक तो. सगळी पात्रं जमवली नि हा बेटा हातावर तुरी देऊन निसटला. डाकूच तो! सवयच त्याची पळण्याची. पण मला सांगा मी नसेन तर तो तरी असेल का? माझ्यावाचून त्याला काय अस्तित्व आहे? मी म्हणेन तसा वागेल तो. बोलेल मी म्हणेन तसा. पण बेट्याला हौस भारी. इकडे येऊन नाटकातल्या स्वगतासारखा बोलला असणार. काय तर म्हणे.. गब्बरचा भाऊ रब्बर. आणि ह्या हाडाच्या सापळ्याला सारे घाबरायचे वगैरे! बोलायला काय जाते? मेलेली कोंबडी आगीला भीत नाही नि निवृत्त डाकू थापा मारायला कचरत नाही. पण असा हडकुळा नि निरूपयोगी डाकू का आणला मी? काय आहे मोठ्या नाटकाच्या प्लॉटचा भाग आहे तो. आणि तेवढाच उपयोग त्याचा! सगळ्या पात्रांची जमवाजमव केली, म्हटले जमवू नाटकाची भट्टी नि पाहिले तर हा गायब! बाकीच्यांना बसवून आलोय त्याच्या मागोमाग. तर इथूनही बेट्या गायब. आता तिकडची पात्रे गोंधळ न घालोत म्हणजे मिळवली! नाहीतर एकेक जण आपले रंग उधळायला लागले तर नाटकच उधळले जायचे. मला वाटतं मी जायला हवं. त्याआधी एकदा डोकावतो रब्बरसिंग सापडतो का. नाहीतर जमलेली पात्रमंडळी, त्यांची तरी खबरबात घेतो. तेवढी तर तेवढी. तेवढ्या पात्रांतही करेन नाटक. पात्र म्हणजे.. नाटकात पात्र म्हणून येण्यास पात्र अशी खास मंडळी सगळी. तुम्हाला सांगतो, सोपे नाही हे. चार सहा पात्रे गोळा करा. त्यांना बोलते करा.. त्यांची गोष्ट ऐकवा नि त्यांची एकमेकांशी सांगड घालून बनवा नवीन गोष्ट. लोकांचा विश्वास बसेल अशी खरी वाटेलशी खोटी गोष्ट! पण खरं सांगू? जगात सत्य म्हणून खरीखुरी गोष्ट आहे का अस्तित्वात? डोळ्यांना दिसेल ते सत्य की मनाला पटेल ते सत्य? की मनाला वाटेल ते सत्य? कोणास ठाऊक! कदाचित या साऱ्या सत्यांची भेळ, नाहीतर मिसळ असेल खरे सत्य! पण मी तर म्हणतो जगात कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिणारे तमाम लेखक म्हणजे मात्र जातिवंत खोटारडे. काहीतरी काल्पनिक लिहितात. सारेच कल्पनाविश्व! आभास नुसता! पण हातोटी अशी की लोकांना खरेच वाटावे. लोकंही काय? खोट्यालाच खरं मानून टाळ्याबिळ्या पिटतात! मग काय? आमच्यासारख्या लेखकांचे वगैरे फावते चांगलेच. भटाला दिली ओसरी नि लेखक हातपाय पसरी. लिहितोय आपला कथा कादंबऱ्या आणि नाटकं लिहिण्याची नाटकं देखील करतो! पण म्हणूनच मी आहे बरं हे ही खरं! (बाहेरून कसला तरी आवाज येतो. अगदी बारीकसा.) तुम्हाला आवाज येतोय का कसला? नाही? मग माझी ती पात्रे माझ्याबरोबर फक्त संवाद साधत असणार. इतरांना कसले ऐकायला जातेय! माझीच मानसपात्रे ती! तर मी चाललोय. जेवढी आहेत तेवढी तरी धरून ठेवायला. आजकाल तुम्हाला सांगतो या पात्रांचाही काही नेम नाही उरला. कुणी मध्येच रुसून काय बसतील. कोणाची वाचाच काय बसेल. कुणी विचित्रासारखे काय वागायला लागतील. कोणाचा भरवसा द्यावा? तरी बरे ह्यांच्या दोऱ्या माझ्या हाती आहेत. तुम्हाला म्हणून सांगतो, एका पात्राने काय म्हणावे? म्हणे, तुम्ही खुशाल लेखक म्हणून मिरवा, पण लेखकाकडून लिहवून घेतो तो आकाशातला कुणी, तो कठपुतळीसारखा लेखकास खेळवतो म्हणे. माझ्याच पात्राने असे म्हणावे? मेरी बिल्ली मुझसे म्यांव? मेरा कौवा मुझपे काव? मेरा कुत्ता मुझपर भो भो? पण हे असे झालेय.. निघतो. जरा सगळ्यांना लायनीत लावायला हवे. संहिता म्हणे.. लवकर हवीय. हवीय तर देतो. जमवली पात्रं. घालून बैठक लिहू म्हटले नाटक तर हा रब्बरसिंग डाकू पळाला. निघतो.. अजून कितीतरी पात्रांची व्यवस्था लावायची बाकी आहे.. |
मुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले । Saamana (सामना) आष्टी येथील आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या मुस्लीम समाजातील कुटुंबातील महिलेच्या प्रसूतीनंतर जन्माला आलेल्या अस्वस्थ बाळाचा जीव शिवसेनेच्या धावलेल्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचला आहे. शिवसेनेची तत्परता पाहून मातेसह नातलगांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. गरीब कुटुंबातील मुस्लीम समाजातील महिलेच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या बचावासाठी शिवसेनेने तत्परता दाखवून धावपळ केल्याने नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात शिवसेनेला यश आले. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील गरोदर मुस्लिीम महिला प्रसूती वेदना होत असल्याने आष्टी येथील शासकीय ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दाखल झाली. सोबत सासू सासरे पती देखील होते. महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला खरा, मात्र नंतर डॉक्टरांच्या तपासणीत असे लक्षात आले की, बाळाला श्वास घेण्यास अडचण येत आहे. तसेच त्याची अपेक्षित हालचाल देखील होत नाही. त्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी काही दिवस काचपेटीत ठेवणे गरजेचे आहे. हा महागडा उपचार करण्यासाठी या कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. या उपचारांसाठी बाळाला तातडीने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवणे आवश्यक होते. मात्र, हे उपचार करण्याएवढी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने अँब्युलन्स देखील करणे शक्य नव्हते. 108 क्रमांकांची गाडी देखील त्यांना उपलब्ध न झाल्याने हे कुटुंब काळजीत सापडले. त्यांनी ही बाब तालुकाप्रमुख कुमार शेळके यांच्या मार्फत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांच्या कानावर घातली. यासंदर्भात त्यांनी तत्परता दाखवून कुटुंबाला घाबरून जाऊ नका असा धीर दिला. तसेच तत्काळ गाडीची व्यवस्था करून या महिलेला तिच्या बाळासह नगर येथील दवाखान्यात रवाना केले. तसेच नगर येथील संबंधित डॉक्टरांना देखील या बाळावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना केल्याने पुढील उपचार सुकर झाले. शिवसेनेच्या तत्परतेमुळे या बाळाला जीवदान मिळाले. कठीण प्रसंगी एखाद्या निराधार गरीब कुटुंबासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता बाळासाठी संजीवनी ठरली. बाळाला जीवनदान मिळाले, तर दुसरीकडे बाळाच्या आई वडीलांसह नालगांच्या चेहऱ्यावरून आसंडणाऱ्या त्या क्षणांचा आनंद काही वेगळाच दिसून आला. त्यामुळे हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. भाऊसाहेब लटपटे यांनी सांगितले. |
महानगरपालिका स्थायी समितीवर असलेल्या रिक्त जागांवर नऊ सदस्यांची सर्वसाधारण सभेत वर्णी लागली. त्यामध्ये शारंगधर देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी ते पुन्हा दावेदार असण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन समितीवर सदस्यपदाच्या रिक्त नऊही जागा भरण्यात आल्या. कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समितीवर असलेल्या रिक्त जागांवर नऊ सदस्यांची सर्वसाधारण सभेत वर्णी लागली. त्यामध्ये शारंगधर देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी ते पुन्हा दावेदार असण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन समितीवर सदस्यपदाच्या रिक्त नऊही जागा भरण्यात आल्या. महापालिकेच्या स्थायी समितीवर रिक्त झालेल्या नऊ जागांवर सदस्यपदासाठी वर्णी लागण्यासाठी सर्वच आघाडीत मोठी स्पर्धाच सुरू होती; त्यामुळे या समितीवर कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता होती. गेल्या वर्षी भाजप-ताराराणी आघाडीने गुपचूपपणे हालचाली करत राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडून भाजपच्या आशिष ढवळे यांची सभापतिपदी वर्णी लागली. गेल्यावर्षी ज्या पद्धतीने हालचाली झाल्या, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा धोका पोहोचू नये, यासाठी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसकडे सभापतिपद आहे. यामुळे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसतर्फे गटनेते शारंगधर देशमुख, माधुरी लाड, छाया पोवार, प्रवीण केसरकर यांची वर्णी लागली. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला संख्याबळानुसार दोनच जागा आल्याने त्या ठिकाणी संदीप कवाळे व माधवी गवंडी यांची नियुक्ती झाली. याशिवाय ताराराणी तर्फे पूजा नाईकनवरे आणि राजाराम गायकवाड, तर भाजपतर्फे सविता भालकर यांची वर्णी लागली. काँग्रेसतर्फे राहुल माने आणि प्रताप जाधव हे दोन्हीही नगरसेवक स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुक होते. त्यापैकी माने यांनी सभापती पदासाठी दावाही केला होता; पण त्यांची वर्णी न लागल्याने ते नाराज झाले. त्यापैकी प्रताप जाधव यांचे नाव न आल्याने ते सभागृहाकडेच फिरकले नाहीत. |
अभिनेत्री अमृता रावने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या अदाकारीने अनेक चाहत्यांना वेड लावले आहे. अमृताने रुपेरी पडद्यावर उत्कृष्ट भूमिका साकारल्या, ज्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. अशातच तिने नुकतेच एका गोष्टीचाही खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सांगितले होते की, दिवंगत चित्रकार एमएफ हुसेन यांनी तिला आणि तिच्या आईला दुबईत थेट चित्रकलेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, ते खऱ्या जीवनातील अमृता आणि 'विवाह' या चित्रपटातील अमृता या दोघींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करत होते. अमृताने असेही उघड केले की, हुसेन यांनी तिला त्यांचे 'सिग्नेचर' पेंटब्रशही भेट म्हणून दिले होते. अमृता रावने साल २००६ मध्ये 'विवाह' या रोमँटिक चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने एमएफ हुसेन यांना खूप प्रभावित केले होते. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. काही वर्षांपूर्वी अमृताने एक व्हिडिओही शेअर केला होता. ज्यात एमएफ हुसेन यांनी तिची चित्रे बनवली होती. एमएफ हुसेन एकदा म्हणाले होते की, माधुरी दीक्षितनंतर अमृता राव हा एकमेव चेहरा होता जो त्यांना उत्साहित करत होता. "हे माझ्या सर्वात चांगल्या कौतुकांपैकी एक आहे", असेही याबाबत बोलताना अमृता म्हणाली होती. अमृताने आतापर्यंत 'मैं हूं ना', 'इश्क विश्क', 'अब के बरस', 'ठाकरे', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'मस्ती' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. |
अनुष्का शर्मा (Anuskha Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. फोटोंमध्ये दोघेही हसत मीडियाला पोज देताना देखील दिसून येत आहेत. (Watch Virat Kohli furious with Anushka Sharma at Mumbai airport) पण या जोडप्याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली, आपली मुलगी वामिकाचे संरक्षण करण्यासाठी, पहिले कॅमेरे बंद करण्यास सांगतो आणि नंतर जेव्हा तो पोझ देण्यासाठी येतो तेव्हा त्याचा मूड थोडासा खराब होताना आपल्याला व्हिडीओ मध्ये दिसून येतो. या दरम्यान तो चपळाईने अनुष्काच्या पाठीवर हात ठेवतो आणि तिला दुसऱ्या बाजूला ढकलतो, तर अनुष्काही क्षणभर अडखळते आणि तिचा चेहरा पडतो. यादरम्यान विराटचा चेहरा देखील पडतो. तो हे सर्व प्रकरण हाताळतो आणि अनुष्काला त्याच्याकडे बोलावतो आणि पोझ देतो. अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाला मनसेने केलेली मागणी प्रशासनाने मान्य करुन मुदत वाढ दिली आहे. ठाणेः ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागरिकांना मुदत वाढ मिळावी यासाठी मनसेने मागणी केली होती. ही मागणी ठाणे महापालिकेकडून मान्य करण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच, महिला व बालकल्याण योजना, किन्नर व्यक्तींसाठी योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेणाºया लाभार्थींना दिवाळी सणामुळे तसेच शासकीय सुट्टयांमुळे आठवडाभर पात्रतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मिळालेली नाहीत. पालिकेच्या योजना जनहितासाठी असून ज्येष्ठ, नागरिक महिला यांना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुर्तता करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी मनविसे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका प्रशासनाला केली होती. ही मागणी लक्षात घेऊन पालिकेने तात्काळ मुदत वाढ केली आहे. या आधी १५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत वाढ होती. परंतू ही वाढ ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे. सायं. ५ वाजेपर्यंत लाभार्थींनी आपले अर्ज प्रभाग समिती कार्यालयात देण्याचे आवाहन पालिकेच्या समाज विकास विभागाने केले आहे. *पालिकेने लोकभावनेचा विचार करुन मनसेची मागणी मान्य केली आहे. मुदतवाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. |
रायगड : जिल्ह्यामध्ये काेराेना लसीकरण जाेमाने सुरू आहे. रक्तदाब, मधुमेह अथवा एलर्जी असली तरी काेराेना लस घेताना घाबरून जाऊ नका, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. फक्त आपल्या आजाराबाबत डाॅक्टरांना अवगत करावे, असेही त्यांनी सुचविले आहे. रायगड जिल्ह्यात काेरोनाचा रुग्ण ८ मार्च २०२० राेजी सापडला हाेता. त्याला आता तब्बल एक वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. एक वर्षाच्या आतच भारतामध्ये कोरोनावरील काेव्हिशिल्ड आणि काेव्हॅक्सिन अशा दाेन लसींची निर्मिती करण्यात यश आले आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंट वर्कर, पाेलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना काेराेनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना दाेन टप्प्यात लस देण्याची सुविधा संबंधित सरकारी रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्याची व्यवस्था सरकार आणि प्रशासनाने करून दिलेली आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तदाब, मधुमेह, एलर्जी यासारखे विकार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रक्तदाब असाे अथवा मधुमेह किंवा अन्य काेणता आजार, लस सुरक्षित असल्याने ती घ्यावी, असा सल्ला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. लस घेताना संबंधित डाॅक्टरांना असणाऱ्या समस्या आणि विकार यांची माहिती आवर्जून द्या, असेही सांगायला तज्ज्ञ डाॅक्टर विसरले नाहीत. तसे केल्याने काही रिएक्शन झालेच तर संबंधित डाॅक्टरांना उपचार करणे साेपे जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. लसीकरण झाल्यावर थंडी, ताप आला तरी अजिबात घाबरून जाऊ नये. लसीकरणात जी औषधे डाॅक्टरांनी दिली आहेत, ती त्यांनी वेळेत घ्यावीत. सर्वांनाच ताप येत नाही. त्यामुळे निश्चिंत राहावे, असे आवाहन आराेग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. काेराेना लस सुरक्षित आहे. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी लस घेतल्यास काेणताही त्रास हाेणार नाही. लस घेण्याआधी संबंधित डाॅक्टरांना आपल्या आजाराबाबत आणि नियमित सुरू असलेल्या औषधांबाबत अवगत करून देणे गरजेचे आहे. - डाॅ. राजीव तांबाळे, काेराेना सलीचा आणि एलर्जीचा काहीच संबंध नाही. काही रुग्णांना आम्ही स्टेराॅइडची औषध देतो. त्यानंतर काही रुग्ण स्वतःच्या मनाने गाेळ्या सुरूच ठेवतात. याची कल्पना त्यांनी लसीकरणाच्या वेळी संबंधित डाॅक्टरांना सांगणे गरजेचे आहे. लस घेताना काेणतीच भीती बाळगू नका. - डाॅ. किरण नाबर, रक्तदाब असणाऱ्यांनी आपली औषधे सुरूच ठेवावीत. लस घेतल्याने त्यांना त्याचा काहीच त्रास हाेणार नाही. मात्र, लस घेतल्यानंतर सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे म्हणजेच मास्क लावणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे याचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे. - डाॅ. प्रशांत जन्नावर, ज्यांना किडनीचा विकार आहे आणि ज्यांचे डायलिसिस सुरू आहे, त्यांनी काळजी घ्यावी. रुग्णांनी डायलिसिसच्या दिवशी लस घेऊ नये. अन्य वेळी लस सुरक्षित आहे. |
१ - दिल्ली लढते भारला गेला. सबंध दिवसभर अिग्रजी छावणीतील प्रत्येक मनुष्य निकराने लढत राहिला व थक्त चालला आणि आता ते तग धरू शकणार नाहीत असे वाटू लागलें. -असे असले तरीही ब्रिटिश रोनापतीने आशा सोडण्याचे कारण नाही. कारण त्याच सकाळी तेथे येशून पोचलेल्या ताज्या दमाच्या स्वामिनिष्ठ पंजाबी तुकडद्या आपणास आघाडीवर जाण्याची संधि केव्हा मिळेल याविषयी अत्यंत उत्सुक किंवा भुतावीळ झालेल्या आहेत! त्याना आघाडीवर चालून जाण्याची आज्ञा त्वरित सोडण्यात माली आणि ह्या ताज्या तगडया शिपायांच्या नव्या हल्ल्यास सर्व दिवसभर अविरत लढत असलेल्या क्रांतिकारकांना असमान लढत देणं प्राप्त झाले. तथापि तज्ञा त्या विषम परिस्थितीतही राम पडेपर्यंत क्रांतिकारक अकसारखे लढतच राहिले. आणि नंतर आपलाच विजय झाला आहे असे म्हणत अभय पक्षांची सैन्ये रणक्षेत्रावरून आपापल्या तळावर परत फिरलीं लगा प्रकारे कोणाचाही म्हणण्यासारखा पराभव न होता तो प्लासीचा शतमांवत्सरिक दिवस संपला आणि अभय पक्षाची संध्य आपापल्या शौर्याची व धैर्याची वाखाणणी करीत आपापल्या तळावर परत लोट जसजसे दिवसासागून दिवस लोटत तमतमे नवीन सैनिकी पथके दोन्ही पक्षांत मिळत होती, पंजाबकडून सतत सैनिक भरती होत राहिल्यामुळे या घटस जिग्लि माचेकडे सात हजारांहून अधिक सैनिकांची संख्या झाली होती; तर दुसऱ्या बाजूस रोहिलखडात चंड करून जुठलेली शिपायांची पलटण वस्तरखानाचे नेतृत्वाखाली दिल्लीत येभून पोचली होती. लॉर्ड रॉबर्टस म्हणतोः "रोहिलखडावें चंडोर संग् भावांचा पूल ओलांडून कलकत्ता वेशीतून शहरात प्रवेश करू लागले. हातात मोठमोठे झेंडे व फलक फडकावीत, उढाभू घोषणा करीत व अत्यंत शिस्तीने व सवलन करीत शहरात प्रवेश करीत असलेले हजारो शिपाओ आम्हाला आमच्या छावणीच्या टेहळणी टेकडीवरून दिगत होते " दिल्लीत अमलेल्या भिन्नभिन्न रौनिक पयकांना अकम आणणारी जी ओक शक्ति होती तो म्हणजे त्याचे तत्त्वभेग ! तें नमते तर भिन्नभिन्न भागातील भिन्नभिन्न जातीच्या व धर्माच्या पूर्वी कमेकाची तोंडेही कधी न पाहिलेल्या आणि केवळ योगायोगाने व क्षोभाच्या वादळामुळे लेके ठिकाणी आलेल्या ह्या सहस्रावधि शिपायाना अंकत्र राहताच आले नमते शहरातील लूटमार च वेबंदशाही थायविण्यास स्वतं. बादशहा व त्याचे सल्लागार मंत्रिगण जरी अंकसारसी सटपट करीत असत व अपदेश करीत होने तरीही प्रत्येक दिवशी काहीतरी शिपायांच्या लूटमारीची, दडपशाहीची व दगल माजल्याची बातमी येतच होती. भातिकारकांत हे घडणे स्वाभाविकच असते अशा परिस्थितीत ह्या असंख्य व भिन्नभिन्न सैनिको पथकांना संघटित करून अकरूपता निर्माण करू शकेल अशा अखाया पुढान्याची गरज आवश्यकता होती. या वेळी कात माहजिकपणेच प्रकट होणान्या लोकाच्या दुष्ट प्रवृत्तींना व वाममार्गी भनोबूतींना जरी भयंकर भूत आलेला होता तथापि अशाही परिस्थितीत दिल्ली दाहराने शिवजी सैन्यावर हल्ल्यावर समय सावरकर बादमम ८- स्वातंत्र्यसमर हल्लेत्यांच्यात त्याविषयी भय निर्माण करून त्यांना आपल्या वास ठेवले होते. परकीय शादेशाबाहेर हाकलून देण्याची जी अत्युकट निच्छा निकाय सामान्य नागरित निर्माण घालेली होती तिच्या बळावर हे हल्डे चालले होते. परंतु अंतिम याचा तर केवळ जवळ विच्छातीने काम भागत नाही. तर त्यासाठी संघटित व पद्धतशीर प्रयत्न आणि कर्तृत्ववान् नेतृपयांची असते. त्यामुळे आपल्या सैन्याग्रह व अपार सह रोहिलसंडाचा सूर बन्नसान दिल्लीम पोचला तेव्हा त्याला देवानेच धाडले आहे असे वाटू लागले. बग्नरगान न पोचला त्यावेळी दिल्लीतील लोकांची मनस्थिति कशी होती ह्याचं वर्णन त्याच वेळी दिल्लीमध्ये वास्तव्य करणान्या का गृहस्थाने आपल्या रोजनिशीन- दैनिकीन लिहून ठेवले आहे. त्या काळचे दिल्लीतील केवळ दर्शन घडविणारा म्हणून नव्हे तर अंमंदर लोगच्या विचारगरणीवर व घटनांवर प्रकाश टाकणारा त्या रोजनितीक अतारा पुढे देत आहोत. "रोहिलसंडातून युठाव केलेल्या तुकडया लवकर येणार आहेत अशा आशेने यमुनानदीवरील पूल दुग्न करण्यात आला. रोहिउद मैन्य दूर होते तेव्हापासूनच चादशहा त्याकडे दुविणीतून पहात होता. ता. २ काळी नवाब अहमद कुलोमान आपल्या सरदारांमह व नागरिकांसह रोहिदसंडच्या सैन्याचें स्वागत करण्यास सामोरा झाला त्या वेळी हक़ौम अमन अल्लासान मेनापति मन्दमान, शिवाहिम अलीखान, गुलाम मुलीलान व शिनर प्रतिष्ठिपुढारीमुद्धा हजर होते- रोहिलसडच्या संन्याचा सेनापति असलेला महमद बस्तरखान याने बादशहाला आपली सेवा मान्य करून घेण्याची विनंती केली. वादशहाला त्याची काय अिच्छा आहे हे सांगण्याचा वस्तरखानाने जेव्हा आग्रह धरला तेव्हा वावगहा म्हणाला, "लोकाना सपूर्ण संरक्षण मिळावे, त्याच्या जीविताची व वित्ताची शाश्वती मिळावी, आणि ब्रिटिश शत्रूचें निर्दालन करण्याचें कार्य यशस्वीपणे पार पाडावें होच माझी तीव्र अिच्छा आहे. त्यावर सेनापति म्हणाला की, वादशहाची अिच्छा असेल तर क्रांतिकारक सैन्याचा सर सेनापति म्हणून काम करण्याम मी तयार आहे त्या वेळी बादशहाने प्रेमभराने सेनापतीना हात दावना तमेन भिन्नभिन्न पलटणींच्या प्रमुखांना ओकत्र बोलावून विचारण्यात आले की तरसान याची सर्व सैन्याचे पर सेनापति म्हणून निवड करण्यास ते तयार आहेत का ? मर्म का आवाजात 'हो हो " म्हणून म्हणाले व सर सेनापतीच्या आज्ञा मानण्याची लष्करी किया सैनिकी शपथही सर्वांनी घेतली. हा शपथविधि आटोपल्यावर बादशहाने पुन्हा वस्तरखानाची साजगी भेट घेतली. सर्व शहरात दवडी पिटण्यात आली की, सरदार वस्तरखान याची सर सेनापति म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तरवार, अंक पदक आणि सेनापति ही पदवी त्याना अर्पण करण्यात येजून त्यांचा सन्मान करण्यात आला. राजपुत्र मिर्झा मोगल यास अप- सरसेनापतिपद देण्यात आले. त्याने बादशहास कळविले की, "शहरात १- दिल्ली लडते छुटालूट किंवा रक्तपात करताना प्रत्यक्ष राजपुनही आढळला तर तत्काळ त्याचे कान व नाक कापण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही." बादशहाने उत्तर दिले "आपणाला सर्व अधिकार दिलेले आहेत. जराही कुचराओं न करता आपणाला योग्य वाटेल तें करा." शहराच्या कोनवालालाही दटावण्यात आले की, त्याच्या हलगर्जीपणामुळे जर गावात लुटालूट किंवा दगाधोपा झाला तर त्यालाही फाशीः दिले जाओल. वख्तरखानाने सांगितले की, त्याने आपल्या समवेत चार पायदळाच्या तुकडया, सातदश घोटेस्वार, महा घोड्यावरील तोफा, तीन भुमी तोफा, अित्यादि लष्करी साहित्य आणलेलं आहे. त्याच्या बरोबर आलेल्या शिपायाचा महा महिन्यांचा पगार आधीच दिलेला असून त्याशिवाय चार लक्ष पयांची रोकड त्यानेपानी असल्याने शिपायांच्या पगाराविषयी किवा पैशाच्या नहीविषयी वादशहाने काळजी करण्याचे कारण नाही असेही बस्तानाने सांगितले. जितकेच काय पण जो काही पैमा लढाऔत त्याच्या हाती पडेल तोही बादशहाच्या खजिन्यात तावडती भरला जाऔल. त्यानंतर बादशहाने चार हजार रुपये किंमतीची सेवामिठाओ सर्व संन्यात वाटली. आप्रयाचे शिपाओं, नमिराबाद व जालंदरच्या पलटणी या सर्वांवर मर मेनापति वस्तरखान यात्रा अधिकार होता. शहरातील प्रत्येक नागरिकाने शस्त्र धारण केलेच पाहिजे अशी पहिली याज्ञा सरसेनापति या नात्याने सोडली गेली. प्रत्येक गृहस्थाने व दुकानदारानेही मस्त्र बाळगले पाहिजे, ज्याच्यापाशी शस्त्र नसेल त्याने वरिष्ठ ठाण्यावर जाऊन विचारणा केल्यास तत्काल त्यास हत्यार पुरविलें जाओल, पण कोणीही निःशस्त्र असता कामा नये. अखादा शिपाओ लुटालूट करताना आढळून येथील तर त्याचा हात तोडला जायल वस्तरतान शस्त्रास्त्रांच्या कोठारात गेला व त्याने पाहणी करून शस्त्राची व दारूगोळा निर्मितीची शिस्त लावली. रात्रीआठ वाजता सरसेनापति राजवाड्यावर गेला, वाक्सहाने वेगम झीनत महल, हकीम अहसनुल्लाखान व अहमद कुलीखान याचे वरोवर राज्यातील घडामोडीबद्दल विचारविनिमय केला. ता. ३ जुलै या दिवशी झालेल्या सर्वसाधारण परेडने सचलनाचे वेळी जवळजवळ वीस हजार शिपाय हजर होते. र बरखानाच्या आगमनामुळे दिल्लीतील क्रांतिकारक पक्षाला काही संघटनास्मक रूप देण्यास त्याने ज्या वेळी सुरवात केली होती त्याच वेळी दुमरोकडे ग्रिजी पक्षालाही पजावच्या बाजूने व अन्यभागातूनही अत्साही व धडाडीची नवीन कुमक मिळत होती. पजाबमधून नुक्ताच येत पोचलेला ब्रिगेडियर जनरल चैत्रलॅन याची शौर्यात उत्साहात व वल्पनाशक्तीत बरोबरी करू शक्तील अशी अगदी थोडींच मा सरकारजवळ होती. प्रख्यात लप्करी अजिनीयर बैअहं स्मिय हाही त्याना येथून मिळाला. शिसाच्या बरोबर मुक्याच झालेल्या लढाओस ज्यानो नांवः २ Native Naratives by Metcaife, page 60. समय सावरकर पाळमय ८ - स्वातंत्र्यसमर कमावले होते असे सर्व शिपाभी जॉन लॉरन्मने दिल्लीच्या अिग्रजांच्या मदतीस घाहून दिले. नंतर मैनापति बनने पूर्वी अनेक वेळा दिल्लीवर चढाजी करण्याचा चेत ठरविला होता पण तो अंमलात आणला गेला नव्हता; आता नवीन कुमक मिळाल्यामुळे त्याने दिल्लीवर मरळ व धाडसी पढाओ पराचा निश्चय केला. पूर्वी 'प्रमाणेच ह्याही हल्ल्याची संपूर्ण योजना आखण्यात आली आणि ता. ३ जुलैला घढाओच्या तयारीने गर्हे असलेले अग्रजी सैन्य पूच यरून निघालेंही. पण काय ? फोणी तरी अशी बातमी आणली की, मरगेनापति रानाने अप्रजांचे दिल्लीवर घालून जाण्याचे श्रम वाचविले आहेत ! कारण तो बुद्द स्वतःच त्याचेवर चालून येत आहे. ता. ४ जुलैला वनरसान पुन्हा चढाओ वरून आला व जिग्रजांना त्याने -अलिपूरपर्यंत मागे रेटले !! दिल्लीला गेलो, दिल्लीशहरावर नुसती नजर गेली-दृष्टि गेली की ती महज आपण जिंकलीच, अशी प्रोकि दिल्लीला वेढा घालण्यापूर्वी ने अिग्रज करीत असत • त्या अिग्रजाना पंजाब भागातून नव्या प्रवल पलटणी येथून मिळाल्यावरसुद्धा का संपूर्ण महिन्यात अंक पासूलही पुढे टाकता आले नाही, हे पाहून तीव्रभावनेच्या सेनापडि बर्नाडंला अति दुःख व लाज वाटू लागली. अिग्रज दिल्ली जिंकावयाला जिनके माही होते त्याहून अधिक्तर असणारा दिल्ली महज जिंकण्याचा त्याचा आत्मविश्वास होता. अितका की मुवत्री, कलकत्ता व मद्रासपर्यंत दिल्ली पडल्याची बातमी पसरली ! आणि ह्या बातम्या निराधार आहेत असे अिग्रजाना जेव्हा वारवार दिसून येथू लागले • तेव्हा सर्व हिदुस्थानातील लोक अकमेकाम विचारू लागले की "दिल्लीला अिग्रज सैन्य करीत तरी काय आहेत?" हीच चिंता व शरम लज्जा बर्नार्डच्या मनात घर • करून राहिली होती आणि पूर्वीच्या ह्या अंधकारमय परिस्थितीपेक्षा पुढील काळ काही वेगळा येत्रील अने त्याला वाटेना. जुलट भावी काळाचा विचार करताना त्याला तो अधिकच अधकारमय वाटू लागे. शिपायाच्या अकसारख्या होत राहिलेल्या हल्ल्यामुळे त्याला क्षणभरही असत मिळेना, ओवडेंच नव्हे तर क्रांतिकारकांच्या त्या राजधानीवर सरळ व धाडसी चढाओ करण्याची त्याची महत्त्वाकाक्षा नवीन जुगवणाऱ्या प्रत्येक दिवशी अकसारखी विरून जाते आहे असे त्याला दिसे. सरते शेवटी शरीराने थकलेला, मानसिक चिंतेने ग्रासून गेलेला व निराशेने खचलेला ब्रिटिश सेनानी बर्नाई ता ५ जुलैला पटकीच्या साथीला बळी पडला! ह्या बातमीने अिग्रजाच्या तळावरील संन्यास दुखाचा प्रचंड धक्काच बसला. दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा हा दुसरा अिग्रज सेनापतिही दिल्लीत नव्हे पण थडग्यात प्रवेश - करण्यात यशस्वी ठरला ! त्यानंतर सेनापति रीडने संन्याचीं अधिकारसूत्रे हाती घेतली. तो जिग्रजी संन्याचा तिरारा रोनापति झाला ब्रिटिशाच्या ठाण्यावर चढाओ करण्याचे असे वेत चाललेले असतानाच दिल्लीसील नागरिक ते प्रत्यक्ष कृतीत श्रुतरवीत होते. स्थलाभावी त्या सर्वाचे वर्णन येथे १- दिल्ली लढते करता येत नाही. असे असले तरी ता. ९ जुलै व पुन्हा ता. १४ जुलै या दिवशी ज्या शने क्रांतिकारक लढले व शांप्रमाणेच क्रांतिकारकानीही शौर्याची कमाल केली ते प्रसग महत्त्वाचे व स्फूर्तिदायक असल्याने वगळता येत नाहीत. पहिल्या दिवशी अिमजी घोडदळाना पाडाव करून त्यांना पिटाळण्यात आले. अिंग्रजी तोफखाना वंद पाडण्यात आला. बेका सूर ने हिल व त्याचा घोडा या दोघांना गारद केले. शिपायाने हिदने मरता मरता स्वतला सावरून आपली तरवार अपसली तोंच त्याच्यावर तीन शिपायानी धाव घेतली. हिलने दोनदा गोळी झाडण्याचा केलेला प्रयत्न फमला. परंतु भेरु शिपाओ आपदी तरवार अपसण्यात यशस्वी झाला. अभयतांची हातपाजीची जजपली, त्याची झटापट झाली आणि दोघे साली कोसळले. हिल जमिनीवर अतापा पडलेला होता व त्याच्या छातीवर अंक पाय देसून व हातो तरवार धरून अक शिपाओं जुभा होता. मेजर टॉम्बस्ने तीस फूट अतरावरून हें दृश्य पाहिले, व त्याने नेम धरून शिपायावर गोळी झाडून त्याला ठार केले. मेजर टॉम्बस्ने हिलला जमिनीवरून अचलले व त्याला हालवू लागला. असताना त्याच वेळी दुसरा शिपाओ हिलये पिस्तुल हाती धरून त्याचेवर चाल करून येत असल्याचे पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो शिपायी दोन किंवा तीन जिग्लिाशी काकी लढत असताना, अकाला त्याने आपल्या तरवारीने जसमी केले, दुसन्याला ठार केले आणि तिसऱ्याच्या तरवारीचा तो स्वतःच बळी ठरला. टॉम्बस् व हिल या दोघानाही त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल व्हिक्टोरियापदके देण्यात आली. आणि सर जॉन के म्हणतो की त्या सूर शिपायालाही 'वदादुरसहा पदक' मिळावयास हवे होते ! त्या स्वातत्र्ययुद्धात शहीद झालेले, हुतात्मा झालेले कितीतरी वीर 'बहादुरशहा पदक' मिळविण्यास पात्र होते ! पण शूर स्वार्थत्यागी शिपायाना वहादुरदाहा पदके मिळत नसली तरी त्याहूनही अधिक गौरवाहं शहीद होण्याचे - हुतात्मा होण्याचे कर्तव्यपदक प्रत्यक्ष मृत्युदेवतेकडून मिळण्याचे भाग्य त्याना लाभते येवढे मात्र खरे ! त्या दिवशी अिग्रज शिपायाचा अपमानास्पद असा पराभव झाला पण याचा सूड क्रांतिकारकावर अगवता न आल्याने ते शूर ( ? ) अिग्रज आपल्या ठाण्यात परतले व तो मूड त्याच्या चाकरीत असलेल्या निरपराध भिस्त्यावर व अन्य हिंदी लोकावर त्याचे रक्ताच्या थारोळयात तुकई अडवून ठार करण्यात अर्गाविला ! ३. "It is related that in the absence of tangible enemies, some. of our soldiery, who turned out on this occasion, butchered a number of unoffending camp-followers, servants and others who were huddling together, in vague alarm near the Christian Church Yard. No loyalty, no fidelity, no patient, good service on the part of these good people could extinguish, for a moment, the(टीप पुढील पानावर चालू ) समग्र सावरकर वाहमय ८- स्वातंत्र्यसमर आणि सरोखर पहाता ह्याच मिस्त्यानी व वितरानी अग्लिश सैन्याला त्यांची चोख सेवाचाकरी करून लढण्याच्या स्थितीत ठेवलेलें होनें ! पण ता. १४ जुलंच्या हल्ल्यात ह्यारेक्षाही बधिक वाओट स्थिति झाली. कारण ह्याच दिवशी शूर चेंवलेंनला अका शिपायाने गोळी घालून ठार केले. त्याच्या ह्या मृत्यूमुळे झालेल्या राष्ट्रीय हानीचें व दुःखाचें वर्णन त्रिग्रजी वितिहासकार पुढील शब्दांत करतात : "आमच्या पक्षातील पहिला योद्धा, कीर्तने पहिला व सन्मानांत पहिला ! चेंबलॅनचें प्रेत ज्या 'दिवशी आमच्या तळावर परत आणले गेलें तो आमच्या अितिहासातील अंक अत्यंत • दुःसदायक दिवस होय । " अशा प्रकारे ता. १५ जुलै अलटून गेली तरी दिल्लीतील प्रासादशिखरें, आपल्या मस्तकांवर सूर्यकिरणांनी चमकणारे ध्वज, पताका, गुढघा युभारून जगाला ओरडून सागत होती की, दिल्ली शहर है बाता स्वातंत्र्याचे निवासस्थान झालेले आहे. आणि शेवटी आपले मरण डोळयांसमोर स्पष्ट दिसत असल्यामुळे स्वतः रोडने राजिनामा दिला, अधिकारत्याग केला व हिमालयाच्या टेकडपांत जावून तेथे निवास केला ! जिग्रजी संन्याचा हा तिमरा सेनापति होता. दोघांना थडग्यांत गाडले गेले व - तिसऱ्याने आपला अधिकार सोडत्यानेच केवळ त्याचे प्राण वाचले! अितकें झाले तरीही दिल्ली अजित्रयच राहिली ! क्वॉर्टर मास्टर जनरल वेचर व अॅड्ज्यूटंट जनरल चेंबलॅन आपल्या तळावरच मृत्यूची घटका मोजीन पडले होते तरी दिल्ली जिंकला येओना ! अितकेच नाही तर ऋतिकारकाकडून होणाऱ्या मतत व त्रासदायक हल्ल्या- पासून स्वमरक्षण तरी कमें करावें हा प्रश्न अिग्रजाना पडला. कारण ऋातिकारकांची सख्या या घटकेला वीप हजारपर्यंत झाली होती ! प्रतिकारकांनी चढविलेल्या प्रत्येक हल्ल्यात त्याचें वरेंच मनुष्यबळ खर्ची पडत असले तरी त्याचा अिग्रजांना काहीच लाभ होत तव्हता. पण त्याचे मूठभर सैनिक प्रत्यही मरत गेल्याने अिप्रजाचें संख्यावळ घटन होनें. म्हणून अिग्लिशांनी आता केवळ सरक्षणात्मक धोरण स्वीकारले. वारण हल्ल्यामध्ये होणाऱ्या मृत्यूने क्रांतिकारकांची शक्ति विशेष दुर्बळ होत नमे वा त्याच्या हल्ल्यानही खंड पडत नसे. अलट ते अधिक निश्चयी व निर्भय होनून अभिमानाने अघड सागू लागले की, "अग्लिशाच्या विजयाचे मूल्य पराभवाचित" केच आहे ! " सर्व हिंदुस्थानात पसरलेले अप्रजही टीका करू लागले, गान्हाणी करू लागले व अघडपणे लिहू लागले की, "वेढा घालणारेच वेढयात अडकले गेले आहेत ! आणि जेव्हा अशा परिस्थितीन तिसरा सेनापति निवृत्त झाला तेव्हा प्रेटहेड, चेवलॅन (टीप मागील पानावरून चालू ) -fierce hatred which possessed our white soldiers against all who wore the dusky livery of the East ". Kaye and Malleson's Indian Mutiny, Vol. II, P. 438. |
वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात. पुलगाव : वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात. प्रत्येक वर्षी हा प्रकार घडत असल्याने पावसाळ्यातच मोकाट गुरांची समस्या का निर्माण होते, हा प्रश्नच आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिसणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा मात्र बोजवारा उडत आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच दुचाकी चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. पूर्वी सायकल घेऊन फिरणारी व्यक्ती मोटर सायकल, कारने फिरू लागली. युवकांची 'रॅश ड्रायव्हींग' वाढली आहे; पण शहरातील रस्ते वेगात वाहने चालविण्यासारखे राहिले नाहीत. खाचखळग्यांनी व्यापलेले रस्ते दुरूस्त करता येतात; पण वर्दळीच्या रस्त्यावर चौकात बसलेली जनावरे सतत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. रस्त्यातील या गतिरोधकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ, अहेरी-धारणी राज्यमार्ग जातात. कमी वेग आणि इंधन वापरून लवकर पल्ला गाठण्याच्या दृष्टीने या सर्व मार्गावर जड वाहने, बसेस, कार, दुचाकी आदी वाहनांची रहदारी वाढली आहे. यातच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे या मार्गांवर वाहने चालविणे म्हणजे जीवावर बेतणारेच ठरत आहे. शहरातून जाणाऱ्या या मार्गावरील नाचणगाव, कुर्ला वस्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिनदयाल चौक तर देवळीकडून येणाऱ्या मार्गावर नगर परिषद हायस्कूल, पोस्ट आॅफिस, कॉटन मील आदी ठिकाणी दिवस-रात्र डेरा टाकून बसणारी मोकाट जनावरे गतिरोधकाचे काम करतात. यामुळे भरधाव वाहन चालकास कधी-कधी वाहने नियंत्रीत करणे त्रासदायक ठरते. ही जनावरे इतकी निगरगट्ट आहेत की, वाहन जवळ येऊनही रस्त्यातून उठत नाही. शेवटी वाहन चालकालाच बाजूने वाहन काढावे लागते. अशावेळी समोरून वाहन आल्यास अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. अशीच स्थिती शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही आहे. दिर्घ काळ टिकावे म्हणून डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले; पण या सिमेंट रस्त्यांनीही लवकरच आपले अंतरंग दाखविले. रस्त्यावर नागरिकांनी आपल्या सोयीप्रमाणे ठिकठिकणी गतिरोधक निर्माण केले. मध्यंतरी पाणी पुरवठ्याच्या नवीन जलवाहिन्यांसाठी सिमेंट रस्ते खोदण्यात आले. यामुळेही या रस्त्यावर नाल्या तयार झाल्या. त्या नगर प्रशासनाने न बुजविल्याने पावसामुळे त्यातील माती दबून लांबलचक नालीरूपी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका तसेच बांधकाम विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) |
Seditious Speech: देशद्रोहाच्या खटल्यात दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाने दिल्ली हिंसाचाराचा आरोपी शरजील इमामचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यापूर्वी, न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात शरजीलच्या अंतरिम जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. शरजीलच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने 30 मे रोजी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. 27 मे रोजी शरजील देशद्रोहाच्या खटल्यात अंतरिम जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात गेला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने शरजीलला जामिनासाठी जिल्हा न्यायालयात जाण्यास सांगितले होते. खरं तर, बुधवारी (20 जुलै) शरजील इमामच्या (Sharjeel Imam) अंतरिम जामीनाबाबत दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु न्यायालयाने अंतरिम जामिनावरील आदेश पुढे ढकलला होता. त्यानंतर 23 जुलै रोजी या प्रकरणाचा निर्णय सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीत न्यायालयाने शरजीलचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर शरजील इमामला देशद्रोहाच्या खटल्यात दिलासा मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी 27 मे रोजी या प्रकरणात शरजीलच्या वकिलानेही देशद्रोहाच्या खटल्यात जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्याच्या वकिलाला आधी जिल्हा न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या नागपुरातच भाजपला धक्का बसलाय, नागपूर जिल्ह्यात भाजपला पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसलाय. १३ तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झालेयत. . . शिंदे गटाचा मात्र एक उपसभापती झालाय. |
लखनऊ : यूपीची राजधानी लखनऊमध्ये एका माजी आमदाराच्या सुनेवर (ex mla daughter in law) तिच्यात घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला. फर्रुखाबादमधून माजी आमदार असलेले विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत, यावेळी ते ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. माजी आमदाराची सून (ex mla daughter in law) एकताने आरोप केला आहे की, घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे. तिने एकताला म्हटले, तुझा पती माझा आहे (your husband is mine), तुला मरावे लागेल...यानंतर तिने एकतावर हल्ला केला. गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. एकताने आपल्या बहिणीच्या मदतीने जीव वाचवला. एकताने आरोप केला की, हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोर महिला थेट घुसली. ही घटना 29 मे रोजी सकाळी घडली. एकताने या प्रकरणी वीरांगना सिंहच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात Hazratganj police station एफआयआर नोंदवला आहे. हजरतगंज पोलीस Hazratganj police तपास करत आहेत. एकताने पोलिसांना सांगितले की, 29 मे रोजी सकाळी वीरांगना आमच्या फ्लॅटमध्ये घुसली. त्यावेळी घरात एकता आणि तिची बहिण होती. पती अविनाश बाहेर गेले होते. एकताने रॉडने सुद्धा हल्ला केल्याचा आरोप एकताने केला. एकताने म्हटले, यानंतर वीरांगानाने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. बहिण मदतीला आल्याने माझा जीव वाचला. |
उन्हाळ पिकांच्या लागवडीत यंदा शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीस पसंती दिली असून त्यातही मुग लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मका, भुईमूग आणि भातपिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. या उन्हाळ्यात एकूण तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात ३. ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात १०. ६९ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आली होती. यंदा हे क्षेत्र ११. ०४ लाख हेक्टरवर गेले आहे. या उन्हाळ्यात मूग लागवड क्षेत्रात २१. २ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी याच कालावधीत शेतकऱ्यांनी १४. ४३ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड केली होती. त्यातुलनेत यंदा शुक्रवारपर्यंत (दिनांक १३ मे) १७. ४८ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या यावर्षीच्या तुलनेत यंदा एकूण उन्हाळ पिकांच्या लागवडीत ५. ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उडीद, मूग, तीळ आणि बाजरा लागवडीखालील क्षेत्र वाढले असून भुईमूग, मका, भातपिकाचे क्षेत्र घटले आहे. यंदा भात लागवडीचे क्षेत्र ३. ८ टक्क्यांनी घटले असून गेल्यावर्षीच्या ३०. ९६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा २९. ८० लाख हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
गोवाः आज पहाटे दोन चोरट्यांनी कुंकळ्ळ्ये, म्हार्दोळ येथे एका दुकानदारावर हल्ला केला. पहाटे 3 च्या सुमारास झालेल्या हल्ल्यात गुरुदास असे किराणा दुकान मालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांनी वापरलेल्या दुचाकी हल्ल्याच्या ठिकाणी फेकून घटनास्थळावरून पळ काढला. (Cuncoliem, Mardol shopkeeper attacked by robbers in the wee hours today) फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल बुधवारी रात्री तीन चोऱ्या झाल्या असून तिन्ही चोर्यामध्ये एकाच टोळक्याचा हात आहे का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. खांडोळा - माशेल येथील गणपती मंदिर तसेच कुंकळ्ये येथे दुकान फोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला मात्र झटापटीत दुकानदार जखमी झाला. तिसरी मोठी चोरी तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाला आज आपण तोंड देत आहोत. भविष्यात अशी अनेक संकटे येऊ शकतील. त्यांच्याशी लढण्यासाठी आम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. मोदी यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना वैज्ञानिकांची प्रशंसा केली. ते म्हणाले, 'आता काळ बदलला आहे. आम्हाला कोणत्याही तंत्रज्ञानासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागत नाही. आधी शोध जगात कोणत्या तरी देशात व्हायचे व त्या तंत्रज्ञानासाठी भारताला अनेक वर्षे वाट पाहावी लागायची. आज आमचे वैज्ञानिक त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी एका वर्षातच स्वदेशी कोरोना लस तयार केली. नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील गरजांनुसार नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगून कोरोनासारखी महामारी आज आमच्या समोर आहे. अशी अनेक आव्हाने भविष्याच्या पोटात असू शकतात, असे म्हटले. |
'कामाला लागा', भाजपाध्यक्षांचा कानमंत्र; महाराष्ट्रातील खासदारांसोबत दोन तास खलबते 'कामाला लागा', भाजपाध्यक्षांचा कानमंत्र; महाराष्ट्रातील खासदारांसोबत दोन तास खलबते\nनवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : नवे वर्ष उजडताच देशाच्या राजकीय वर्तुळात येत्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षही आता 'इलेक्शन मोड'वर गेल्याचे दिसत आहे. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी महाराष्ट्र व गोव्यातील भाजप खासदारांची नवी दिल्लीत बैठक घेतली. तब्बल दोन-सव्वादोन तास चाललेल्या या बैठकीत अमित शाह यांनी भाजप खासदारांना 'कामाला लागा' असा सूचक संदेश दिला असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.\nनवीन महाराष्ट्र सदनात झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींसह भाजपचे महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा व राज्यसभा खासदार उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यसभा खासदार नारायण राणे हेही भाजपच्या या संघटनात्मक बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक अधिवेशनात भाजपच्या प्रत्येक राज्यातील खासदारांची अशी बैठक होतच असते, तसेच या बैठकीत केवळ संघटनात्मक बाबींवरच चर्चा झाली, असे या बैठकीनंतर रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातील निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा दानवे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.\n'विकास की राजनीती करो' असा संदेश अमित शाह यांनी भाजप खासदारांना दिल्याचे या बैठकीनंतर काही खासदारांनी अनौपचारिक वार्तालापात सांगितले. तसेच, येत्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागण्याची सूचनाही शाह यांनी केल्याचे खासदारांनी सांगितले.\nम्हणून राणे भाजपच्या बैठकीत\nकाही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत देणाऱ्या खा. नारायण राणे यांनी भाजपच्या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, नारायण राणे हे भाजपच्या बी फॉर्मवर निवडून आले आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आले होते. म्हणून राणे या बैठकीला उपस्थित होते, असे दानवे यांनी स्पष्ट केले. |
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडला विजयासाठी ६१ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून जो रूट (७७ धावा) आणि बेन फोक्स (०९ धावा) फलंदाजी करत आहेत. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावत लॉर्ड्सवरील ४३ वर्षे जुन्या नकोशा घटनेची पुनरावृत्ती केली आहे. कॉलिन (Colin De Grandhomme) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता धावबाद होणारा जगातील दुसराच फलंदाज (Runout On Golden Duck In Lords) ठरला आहे. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान हा किस्सा घडला. टॉम ब्लंडल आणि डॅरिल मिचेल यांच्या अभेद्य भागीदारीला मोडण्याचे काम केले इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने. ब्रॉडने बेन फोक्सच्या हातून मिचेलला झेलबाद केले. त्यानंतर कॉलिन फलंदाजीसाठी आला होता. मात्र पहिलाच चेंडू खेळल्या एक धाव घेण्याच्या प्रयत्नात ओली पॉपने त्याला धावबाद केले. यासह तब्बल ४३ वर्षांनंतर लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळताना गोल्डन डकवर धावबाद होण्याचा नकोसा विक्रम त्याने नावावर केला आहे. यापूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर गोल्डन डकवर धावबाद होणारे पहिले खेळाडू भारताचे माजी कर्णधार एस वेंकटराघवन हे होते. ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच, १९७९ साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात वेंकटराघवन पहिल्या चेंडूचा सामना केल्यानंतर धावबाद झाले होते. त्यानंतर गेल्या ४३ वर्षात लॉर्ड्सवर असे झाले नव्हते. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात शून्यावर आपली विकेट गमावणाऱ्या कॉलिनने पहिल्या डावात नाबाद ४२ धावांची खेळी केली होती. ५० चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ४२ धावा केल्या होत्या. तो न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. त्याला वगळता इतर फलंदाज ३० धावांपर्यंतही मजल मारू शकले नव्हते. |
मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या रिलायन्स Jio 4G मुळे भारतात नव्या डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे. 50 रुपयांत1 GB डाटा, संंपूर्ण देशात रोमिंंग फ्री, सणांच्या दिवशी मोफत मेसेजिंंग सेवा तसेच विद्यार्थ्यांंसाठी 25 टक्के अतिरिक्त मोफत डाटा अशी धम्माल वेलकम ऑफर रिलायन्सने आपल्या ग्राहकांंना दिली आहे. मोबाइलची कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट स्लो स्पीडने त्रस्त असलेल्या ग्राहकांना रिलायन्स jio ने 'जी भरके' ऑफर दिली आहे, असेच म्हणावे लागेेल. देेशातील 18 हजार शहरांसह 2 लाख गावांमध्ये रिलायन्सने आपली Jio 4G सेवा सुरु केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 42 व्या एजीएममध्ये मुकेश अंंबानींंनी सांगितले की, रिलायन्स Jio सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' व्हिजनला समर्पित केली असून 'Jio'चा अर्थ 'Live' असा आहे. सर्व फ्री सर्व्हिसेस 31 डिसेंबर 2016 पर्यंत लागू राहील. जिओचा डाटा प्लान हा जगातील सर्वात स्वस्त असल्याचा दावा अंबानी यांनी केला आहे. रिलायन्स Jio लॉन्चिंगनंंतर देशाची ग्लोबल रॅंंकिंगमध्ये सुधारणा होऊन टॉप10 इंटरनेट प्रोव्हाइडरमध्ये भारताचा समावेश होईल, असा विश्वास देखील अबांंनी यांनी व्यक्त केला आहे. - गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं. - ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला व्हिजिट द्यावी. ← थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो ! |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक) श्री. पौ। छ ११ रा॥ वल. उपरि. तुह्मी आह्मांबराबर येणें ह्मणून तुह्मांस दोनचार पत्रें लिहिलीं; परंतु तुह्मी अद्यापि आला नाहीं. खानखानाचा कारभार विल्हेस लागणें. त्यास, बापूजी महादेव तेथें आहेतच. कारभार यासी विल्हेस लावतील. त्रिंबकपंतासही याच कारभाराकरितां ठेवावयाचें अगत्य असल्याप्त ठेवावें. परंतु जरूर जरूर आह्मांबराबरी तुह्मी यावें; व रा॥ कुकाजी शिवराम, व त्रिंबक खंडेराव यांजबराबरी ऐवज पाठविणें. ह्मणून आज्ञा केली होती. त्यास, याजबराबरी ऐवज रवाना केला असिला तरी उत्तम. ऐवज रवाना जाला नसल्यास एक लक्ष रुपये अगत्य अगत्य जरूर जरूर तुह्मीच घेऊन येणें. तुह्मी यावें व ऐवजहि जरूर पाहिजे याकरितां उदैक गाजदीनगरावरी मुक्काम करावा लागला. त्यास, दिरंग न लावितां बहुत सत्वर येणें. जाणिजे. छ १० रबिलावल. तीन मुकाम पडले. दोन तुमचे जाहाली. ती मुकामादाखलच जाहाली. यास्तव लौकर येणें. उशीर न करणें. मुलकासी ताकीद आहे. यास्तव लौकर स्थान करून पुढील भलता एखादा विचार केला पाहिजे. फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल. आजपावेतों दिल्लीवर खराबा जाहाले ते भलत्या एखाद्या मनसुब्यावर घालून तोंड मोकळें केलें पाहिजे. यास्तव लौकर येणें. जर तुह्मी रुपये लौकर येत नाहीं, तरी मग ताकीद कशास करावा ? ये प्रांतीस पोटास ऐवज मेळवावा लागेल. मग सला राहणें कळतच आहे. तुह्मी इतकें करून फलकार्य सिद्ध जाहालें तरी लौकर आला. |
कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. अनेक महिला कामात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कंबर आणि पोटावरची चरबी वाढत जाते. यामुळे हवेतसे कपडे घालता येत नाहीत. किंबहूना जे कपडे घालत असतो. त्यात शरीराचा आकार बेढब दिसत असतो. जर तुम्ही सुद्धा वजन वाढण्याच्या समस्येमुळे हैराण झाला असाल किंवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही करायचं असेल तर जीमला न जाता किंवा कोणतेही जास्त कष्ट न घेता तुम्ही शरीरातील वाढलेली चरबी कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला दिवसातून स्वतःसाठी फक्त १५ ते २० मिनिटं द्यावी लागणार आहेत. घरच्या घरी काही योगासनं करून तुम्ही आपली फिगर मेटेंन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही योगासनं केल्याने कशाप्रकारे तुमचं वजन कमी होऊ शकतं. ( हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!) फायदेशीर ठरत असतं. हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा. त्यानंतर कंबरेला गोल आकारात हळू हळू जमीनीच्या दिशेने वाकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातांना मागच्या बाजूला फिरवत जमिनीपर्यंत आणा. पाय तसेच ठेवा. ( हे पण वाचा-जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!) चक्रासन हे योगासनातील कठीण आसन असले तरी, नियमित सरावात सहज करता येते. याचे फायदेही आयुष्यभर होतात. चक्रासनाद्वारे लवचिकता येते. डोळ्यांचे आजार होत नाही. कंबरेचा त्रास होत नाही. स्नायू बळकट होतात. पोटाची चरबी कमी होते, उंची वाढते, शारीरिक-मानसीक आणि बौद्धिक विकासात भर पडते. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात जमा झालेली अतिरीक्त चरबी कमी करण्यासाठी चतुरंग आसन फायदेशीर ठरतं असतं. हे आसन करण्यासाठी पुशअप्सच्या पोजिशनमध्ये यावं लागेल. यामुळे तुमच्या शरीराचे मसल्स मजबूत होतील. दररोज हे आसन ५ ते १० मिनिट करा. त्यामुळे कॅलरिज बर्न होण्यास मदत होईल. त्यामुळे तुमच्या पायांची स्ट्रेन्थ वाढत असते. ज्या लोकांना हातांवरची अतिरीक्त चरबी कमी करायची असते त्याच्यासाठी हे आसन फायदेशीर ठरेल. |
वर्णेतिहास : १२५ ( १ ) एकंदर ४० व्यंजने आहेत. मागील स्वराला द्विमात्रक करण्याचा धर्म त्यांच्या ठाईं असल्यानें, अनुस्वार व विसर्ग यांची गणना व्यंजनांत केली आहे. विसर्ग अपभ्रंशांत नाहीं; ज्ञानेश्वरीत आहे. * ( २ ) दंत्यतालव्य व्यंजनें संस्कृतांत नाहींत; महाराष्ट्रीत व अपभ्रंशांत आहेत. 'यः बद्दल महाराष्ट्रींत व अपभ्रंशांत ' जो ' यतो त्याचा उच्चार तालव्य नसून दंत्यतालव्य आहे. वस्तुतः संस्कृतांतील तालव्य ' च ' चा उच्चार ' च्य' च्या जवळ जवळ असतो. मराठी पोथ्यांतून 'विचार' हा शब्द 'विच्यार' असा लिहिलेला फार आढळतो. ' ज्योतिस् ' हा संस्कृत शब्द ' जोइस ' असा महाराष्ट्रांत होतो. ह्मणजे 'ज' तील 'य' काढून टाकण्याकडे महाराष्ट्रीची प्रवृत्ति दिसते. ह्मणजे तालव्य ज अथवा ज्य यांचा दंत्यतालव्य ज करण्याकडे महाराष्ट्रीची प्रवृत्ति होती, असें ह्मणणें प्राप्त होतें. ही प्रवृत्ति मराठीनें उचललेली आहे. ( ३ ) 'ळ् ' हा वर्ण आर्यभाषेंत आहे; संस्कृतांत नाहीं; प्राकृतांत व अपभ्रंशांत आहे; ज्ञानेश्वरीत नाहीं; तत्पश्चात्क मराठींत व तदितर तत्समकालीन लेखांत आहे. शक ११९५ तील पंढरपूर येथील चौऱ्यायशीच्या शिलालेखांत व शक ४१० तील मंगळवेढच्या शिलालेखांत * आहे. ह्यावरून असें दिसतें कीं, संस्कृत उच्चारांचें अनुकरण करण्याकडे ज्ञानेश्वराचा व्यक्तिशः किंवा जातिशः किंवा प्रांतशः ओढा होता. एथून तेथून मजजवळील सगळ्या सबंद ज्ञानेश्वरीत ळ्' हा वर्ण नाहीं. 1 * ज्ञानेश्वरींत विसर्ग आहे तो तत्सम शब्दांत आहे, तद्भव शब्दांत नाहीं. वरील प्रवृत्ती मराठीत निरपवाद तर नाहीच; उलट या संबंधात काही स्थूल नियमही आहेत. तत्सम शब्दात मूळचा तालव्य उच्चार कायम असला तरी त्यातही 'चोर' किंवा 'राजा' यासारखे अपवाद दिसतातच. तद्भव शब्दांतही मूळचा तालव्य उच्चार निरपवाद रीत्या कायम राहतो असा केवळ ' इ ' या स्वरापूर्वी ( उदा., चि, जिणें, झिजणे इ० ). ' ए ' पूर्वीचा तालव्य उच्चार निरपवाद नाही; कारण 'माझेनि ' किंवा 'तुझेनि' यासारख्या रूपांत दंत्यतालव्य आहे. अ, उ आणि ओ या स्वरांच्या पूर्वी मात्र तालव्य येत नाही. 8 आर्यभाषेत म्हणजे वैदिक संस्कृतात असे राजवाड्यांचे म्हणणे असेल तर वैदिक 'ळ हा 'ड् ' चा पर्याय आहे. ( उदा; अग्निमीडे किंवा अग्निमीळे - पुरोहितम्, ऋग्वेद, १.१.१ त्याचा ल् - शी संबंध नाही. * मंगळवेढयाचा ताम्रपट आहे, शिलालेख नाही; व तोही बनावट, अर्थात अविश्वसनीय + ळू चा अभाव ही ज्ञानेश्वरीच्या राजवाडेप्रतीची एक लकब इतकेच म्हणता येईल. कारण या प्रतीशी समान असणाऱ्या माडगावकर - प्रतीत ळ - कार आहे. तसाच तो यादवकालीन महानुभाव ग्रंथांतूनही नित्य दिसतो. 'लीळाचरित्रा' च्या तर तो नावातच आहे. या 'ळ' चे स्टेन कोनौ यांचे नियमन ( JRAS 1902 ) राजवाड्यांनी सार्वत्रिक नाही असे साधार सांगितले आहे. ( राजवाडे - लेखसंग्रह, भा. ३, पृ. १९४-१९६ ). |
अनाडोलू मेडिकल सेंटर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ प्रा. डॉ. मेलिह ओझेल म्हणाले, "तंबाखू उत्पादने, चरबीयुक्त आणि अति पोषण, वजन नियंत्रित करण्यासाठी काहीही न केल्याने गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग होण्याचा धोका वाढतो." वैज्ञानिक अभ्यासानुसार, सुमारे 7 टक्के लोकांना दररोज त्यांच्या अन्ननलिकेमध्ये जळजळ जाणवते. रात्रीच्या वेळी ही लक्षणे जाणवणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के असल्याचे सांगून अनाडोलू हेल्थ सेंटर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ प्रा. डॉ. मेलिह ओझेल म्हणाले, "तंबाखू उत्पादने, चरबीयुक्त आणि अति पोषण, वजन नियंत्रित करण्यासाठी काहीही न केल्याने गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग होण्याचा धोका वाढतो." ओहोटीमध्ये छातीत जळजळ, तोंडात कडू-आंबट पोट द्रव येणे आणि छातीत दुखणे अशी विशिष्ट लक्षणे असल्याचे सांगून, अनाडोलू आरोग्य केंद्राचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ प्रा. डॉ. मेलिह ओझेल म्हणाले, "जेव्हा अन्ननलिकेतील विविध बदल जसे की कडकपणा, इरोशन आणि अल्सर त्यात जोडले जातात, तेव्हा 'शास्त्रीय गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग' चे निदान केले जाते." हा रोग निर्माण होण्यामागे कोणतेही एकच आणि सामान्य कारण नाही, यावर भर देत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ प्रा. डॉ. मेलिह ओझेल म्हणाले, "रिफ्लक्सवर परिणाम करणारी कारणे व्यक्तीपरत्वे बदलतात. तथापि, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोगाच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी, अन्ननलिका आणि पोट यांच्या जंक्शनवर तुलनेने जटिल शारीरिक संरचनाची कार्ये बिघडणे. ओहोटीची मुख्य कारणे म्हणजे प्रगत वय, जास्त औषधांचा वापर, लठ्ठपणा, गॅस्ट्रिक हर्निया, धूम्रपान, कुपोषण आणि निष्क्रियता आणि पचनसंस्थेशी संबंधित काही समस्या किंवा संधिवात आणि एंडोक्राइनोलॉजिकल मूळ. या रोगावर वैद्यकीय, एंडोस्कोपिक आणि सर्जिकल उपचार पद्धती आहेत यावर जोर देऊन, तथापि, जीवनशैलीतील बदल हा उपचाराचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. डॉ. मेलिह ओझेल म्हणाले, "तुम्ही तंबाखूजन्य पदार्थ वापरत असाल, भरपूर चरबीयुक्त असाल आणि अतिपोषित असाल आणि तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काहीही केले नाही तर तुम्हाला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग होण्याचा धोका वाढतो. तुमच्या सवयी किंवा जीवनशैलीचे निरोगी आणि काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्याने तुमच्या रिफ्लक्स हल्ल्यांची वारंवारता, तीव्रता आणि परिणामांवर लक्षणीय परिणाम होतो. चोळी, घट्ट पट्टा, घट्ट कपडे घालण्याऐवजी घट्ट कपडे टाळावेत आणि अंगाला गुंडाळणार नाहीत असे कपडे निवडावेत, यावर भर देत प्रा. डॉ. मेलिह ओझेल यांनी सुचवले, "म्हणून, जर तुम्हाला रिफ्लक्स रोगाचे निदान झाले असेल किंवा तुम्हाला ओहोटीच्या तक्रारी असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या कपड्यांपासून सुरुवात करू शकता." प्रा. डॉ. मेलिह ओझेलने रिफ्लक्सच्या तक्रारी असलेल्या किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोगाचे निदान झालेल्या रुग्णांसाठी 13 शिफारसी केल्या; - सकस आहाराची काळजी घ्या. कमी खा, जेवण वगळू नका, स्नॅक्सकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, भाज्यांमुळे गॅस होऊ शकतो, परंतु ते सहसा तुमचा ओहोटी वाढवत नाहीत. - तुमच्या आहारातील चरबीचे प्रमाण कमी करा. - साखर आणि मिठाई तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. चॉकलेट, पुदीना आणि दालचिनीकडे लक्ष द्या. - मसाले महत्वाचे आहेत. कडू अन्न चांगले आहे, परंतु ते तुमचे वाईट स्वप्न असू शकते. - तुमच्यावर खाण्यापिण्याच्या परिणामांचे निरीक्षण करा. जर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला स्पर्श झाला असेल तर ते काळजीपूर्वक सेवन करणे उपयुक्त आहे. - टोमॅटोचा रस, द्राक्षाचा रस, सोडा, कार्बोनेटेड पेये आणि कॅफिनयुक्त पेये टाळा. - "हे अन्न किंवा हे पेय ओहोटीसाठी चांगले आहे" असे काहीही नाही. लक्षात ठेवा की असा कोणताही अन्न किंवा पेय पर्याय नाही ज्यामुळे तुम्हाला तुमचे उपचार बदलतील किंवा व्यत्यय येईल. - तुम्हाला ओहोटी आहे म्हणून तुम्ही खाणे किंवा पिणे बंद केल्यास ते चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करेल. - तथाकथित "जीवनशैलीतील बदल" पैकी, आम्ही नमूद केलेल्या घटकांकडे लक्ष द्या; तुमचे वजन चांगले नियंत्रित करा आणि अतिशय कठोर आहार टाळा. - लक्षात ठेवा, रिफ्लक्सच्या लक्षणांवर खाद्यपदार्थांचे परिणाम पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि सामान्यीकरण न करणे उपयुक्त आहे. तुम्हाला कोणत्या पदार्थांचा त्रास होतो हे लक्षात घेणे आणि ते तुमच्या आहारातून वगळणे अतिशय सोयीचे आहे. याउलट, सुरुवातीपासूनच यादी सोडून देण्याऐवजी, ज्या पदार्थांचे परिणाम तुम्हाला माहीत नसतील अशा अल्प प्रमाणात वापरून निर्णय घेणे अधिक अचूक ठरेल. - तुम्ही बनवलेल्या पदार्थांमध्ये तुम्ही वापरत असलेले अन्नघटक जोडून व वजा करून परिणामांचे निरीक्षण करा आणि लक्षात घ्या. काही काळानंतर, तुमच्याकडे एक डेटाबेस असेल जो तुम्हाला समजेल की तुम्ही जेवणात कोणते पदार्थ वापरत नसाल तर तुम्ही अधिक सोयीस्कर आहात. - तुम्ही बाहेर जेवत असाल, सुट्टीत असाल, प्रवास करत असाल किंवा तुम्ही कुठेही असाल, तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा. - जेवल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका, झोपेपर्यंत हलक्या हालचालींनी पचन शिथिल करा. |
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर अर्बन बँकेच्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमधील 15 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार हिरे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राहाता तालुक्यातील बाभळेश्वर-2, गोगलगाव-3, हसनापूर-2, लोहगाव-2, नांदुर्खी बु. - 2, लोणी खु. - 2, वाळकी- 2 अशा एकूण 15 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या दिवशी नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील व उमेदवारी अर्ज ही दाखल करता येईल. 7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 9 डिसेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. 21 डिसेंबर, मंगळवार रोजी सकाळी 7. 30 ते सायंकाळी 5. 30 या वेळेत मतदान होणार आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. |
लंडन - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान चक्क एक एअर ऍम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर) मैदानात उतरल्याने खळबळ उडाली. यामुळे या सामन्यातील 20 मिनिटांचा खेळ वाया गेला. डरहॅम आणि ग्लुस्टरशायर यांच्यातील सामना सुरू असताना ही घटना घडली. डरहॅमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता व सामन्यातील पहिलेच षटक सुरू असताना हे हेलिकॉप्टर मैदानात उतरले. मैदानाजवळ एक गंभीर घटना झाल्याने ग्रेट वेस्टर्न एअर ऍम्ब्युलन्स मैदानात उतरली. मैदानावरच ही ऍम्ब्युलन्स उतरल्यामुळे तातडीने मदतही पुरवली गेली. एअर ऍम्ब्युलन्सने काही वेळानंतर टेकऑफ केल्यावर खेळ पूर्ववत सुरू झाला. त्यावेळी समालोचकांनीही महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टरशॉटचा उल्लेख करत सामन्यात रंगत निर्माण केली. आता आम्हाला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहायला आवडेल, असे व्यक्त करत समालोचकांनी आपल्या विनोदबुद्धीचेही दर्शन घडवले. |
टीम इंडियाची जलदगती गोलंदाज झूलन गोस्वामीचा आज ३६ वा वाढदिवस. पश्चिम बंगालच्या नादिया येथे जन्मलेल्या झूलनने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम झुलनच्या नावावर आहे. भारताची आघाडीची गोलंदाज असलेल्या झुलनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर होण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. आजही महिला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम तिच्या नावावर असून दुसरी महिला गोलंदाज तिच्या रेकॉर्डच्या आसपासही नाही. झुलन जेव्हा क्रिकेटर व्हायचं स्वप्न पाहत होती, तेव्हा तिच्या आई- वडिलांना ती कधीच क्रिकेटर होऊ नये असं वाटत होतं. तेव्हा देशात महिला क्रिकेट खेळाला फारसं महत्त्व नव्हतं. तरीही झुलन हा खेळ शिकायला रोज ८० किमीपर्यंत ट्रेनने प्रवास करायची. ती दररोज पहाटे ४ वाजताची ट्रेन पकडून कोलकता येथे ट्रेनिंग सेंटरमध्ये जायची. या दिवसांत तिच्या आई- वडिलांना इतर मुलींसारखं झुलनंने वागावं आणि अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं नेहमीच वाटायचं. पण, झुलनने मात्र तिच्या मनाचंच ऐकलं आणि आपल्या ताकदीने जगभरात नाव कमावलं. २००२ मध्ये झुलनने भारतीय संघात पदार्पण केले. तिच्या उमेदीच्या कारकिर्दीत झुलन जगातील सर्वाधिक जलदगती गोलंदाज राहिली होती. झुलन त्या काळात १२० km/h च्या गतीने गोलंदाजी करायची. आपल्याच या कौशल्यामुळे यावर्षी फेब्रुवरीमध्ये झुलनने २०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला. आतापर्यंत २०० विकेट घेणारी झुलन एकमेव महिला खेळाडू आहे. १९९२ मध्ये वर्ल्ड कप पाहताना झुलनने क्रिकेटर व्हायचं स्वप्न पाहिलं. तेव्हा ती १२ वर्षांची होती. २०१० मध्ये तिने महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्वही केले होते. भारतीय संघ या टुर्नामेंटमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. |
अक्षय कुमारने 'रुस्तम' चित्रपटात नौदल अधिकाऱयाची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील गणवेशाचा लिलाव अक्षय कुमार करत आहे. लिलावातील रक्कम प्राण्यांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगत अक्षय कुमारने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व्यक्त केली आहे. अक्षय कुमारने एका ट्विटद्वारे गणवेशाच्या लिलावाबाबत माहिती दिली आहे. 'रुस्तम'मध्ये परिधान केलेला नौदल अधिकाऱ्याच्या गणवेशाचा लिलाव करण्यात येत असून ही रक्कम प्राण्यांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती त्याने ट्विटद्वारे दिली आहे. 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याआधीदेखील अक्षय कुमारने शहीद जवानांनासाठी निधी उभारण्यात हातभार लावला होता. त्याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमातही अक्षय सहभागी होत असतो. सध्या अक्षय कुमार 'केसरी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटला आग लागली होती. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत '२. ०', 'गोल्ड' हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. |
जळगाव : पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस पळवून आणणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अपह्रत अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीच्या न्यायपिठाच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंदन कुचील चटोपाध्याय, रा. सहारजोरा बंकुरा मुक्ततोर वेस्ट बंगाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथील कुलताली पोलिस स्टेशनला याप्रकरणी गु. र. नं. 769/2022 भा. द. वि. 363, 365 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला पळवून आणणारा आरोपी चंदन चटोपाध्याय हा जळगाव शहरात असून त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याबाबतचे पत्र पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना एनजीओ दिल्ली यांचेकडून मिळाले होते. त्या पत्राच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजनपाटील यांनी आपल्या सहका-यांना पुढील तपासकामी रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे हे. कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, प्रविण मांडोळे, सचिन महाजन, उमेश गोसावी महिला अंमलदार अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंदन चटोपाध्याय (रा. सहारजोरा बंकुरा मुक्ततोर वेस्ट बंगाल) यास महामार्गावरील गोदावरी महाविद्यालय परिसरातील हॉटेल सुमेरसिंग जवळून ताब्यात घेतले. आरोपी चंदन चटोपाध्याय यास या गुन्ह्याचे तपासी अंमलदार काशिनाथ प्रमाणीक यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समिती, जळगाव बेंच ऑफ मॅजिस्टेट (न्यायपीठ) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. |
नाशिक :- भाजपात अद्यापही समेट घडून आलेला नाही. त्यामुळे नक्की काय होणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात असताना भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीचा तिढा नऊ तारखेला सुटणार असल्याचा दावा केला आहे. मराठवाडा, विदर्भासह नाशिक जिल्ह्यालाही अवकाळा पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, सरकार स्थापनेविषयी नऊ नोव्हेंबरपर्यंत कालावधी आहे. त्यामुळे फारशी काळजी करण्याचे कारण नाही. ९ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कोणताही वाद राहणार नाही. सरकार स्थापनेचा निर्णयही तेव्हाच होईल, असा दावा त्यांनी केला. एका प्रश्नाच्या उत्तरात महाजन म्हणाले की मुख्यमंत्री एकटे नाहीत. आमचे पक्षाचे टिमवर्क आहे. मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेते आहे. आमची समिती कार्यरत आहेत. सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. ते एकटे नाहीत. पक्ष त्यांच्यासोबत आहे. मी स्वतः दिवाळीत आठ दिवस मुंबईतच होतो. सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. सध्या आमची भूमिका वेट अॅण्ड वॉच अशी आहे. चित्र लवकरच स्पष्ट होईल, असेही महाजन म्हणाले. |
बाळा : अन् डेंगळे पाटलांचा आसरा तुटला म्हणून ठरूं देऊं कीं काय ? तुमची सरदारी असेल धन्याच्या मजींवर तशी आमची डफ - तंबोरी नाहीं. उगीच शाहीराच्या दरबाराची उस्तवारी कां करतां ? होनाः अन् शाहीरी काय कुणाच्या मजीवर भरवंसून चालते काय ? आमच्या शाहिरीचे चहादार आमच्या भोंवतीं कडें घालून उभे आहेत तोंवर आम्हांला कुणाची रदबदल करण्याचं कारण नाही. उदाजी : ठीक आहे. तो माणदेशी राघूचा तमाशा चढ ठरून तुमच्या डफतंबोरीला गवसणी घालण्याचा एक दिवस उगवेल. काळजी नका करूं. चालेल तोंवर चढेलपणाचा अमल जरूर चालवून घ्या. पण त्या जोरावर इथें वर्दळ करब्याचं कारण नाहीं. यमुनाबाई. तुम्ही आपल्या मुलीचा भरंवसा दिला तसे यांनाहि निरोपाचे विडे द्या. यमुना : यांना निरोपाचे विडे ? मोर० : उदाजीराव, जोडायला उशीर लागतो, तोडायला नाहीं लागत. यमुना : तेंच म्हणतें. तुम्ही तर तोडायला निघाला. उदाजी : होय. यमुना : श्रीमंतांपुढें गुणवती रुजु होण्यापूर्वीच ? मग तिनं आतांपर्यंत धरलेल्या ईर्षेचा उपयोग काय ? या दोघांनी हाताशी धरून आणलेल्या लौकिकाच फळ काय ? होनाजींनं एवढ्या अपरूपानं रचलेली भूपाळी गुणवती श्रीमंतांपुढं म्हणून दाखविणार आहे तिची वाट काय ? उदाजीराव, कोटाची भिंत एकेका दगडाच्या रचाईनं उभी राहते, पण तोफेच्या एका गोळ्यानं कोसळून पडते. रोज सांजसकाळ हिनं गळा घासून मेहनत केली ती तुमच्या मनाईनं मातीमोल होणार, याचा कांही विचार केलांत ? अन् तिची चहा श्रीमंतांनी केली तर अभिमानाला जागा कुणाला होईल ? तुम्हांलाच ! ती तुमची कळावंतीण म्हणून ! उदाजी : अन् तिची चहा करीत असतां श्रीमंतांची लोभाची नजर तिच्यावर ठरली तर अभिमानाच्या बदल्यांत ती माझ्या हातची सुटेल याची काय वाट ? नाही यमुनाबाई, गुणवतीला मी अशी गंगेत सोडायला तयार नाही. भले माझ्या अभिमानाला श्रीमंतांचे पाय नाहीं लागले तरी चालतील. पण श्रीमंतांकडून मिळणा-या बिदागीवर तुमचा हेतु जडला असेल तर तिच्या दसपट, नव्हे शंभरप्रवेश १ ला पट बिदागी मी इथें मोजायला तयार आहे. गुणवतीला बिदागीसाठीं गाण्याची जरूरी काय ? अन् श्रीमंतांपुढं रुजू होण्याचं कारण काय ? बाळा : ( उपहासानें) मोहरा पुतळ्यांच्या पलटणी उशापायथ्याशीं उभ्या आहेत जशा. मागतेकऱ्याला घातलला तुकडा तशी कलावंतांना बिदागी, इतकाच अर्थ कळतो यांना. चल होना, मोतीचारा हंसांना, कावळ्यांना काय त्याचं ! यांनीं काय करावी गुणाची कदर ! गुण० : थांबा होनाजीराव, बाळा थांब जरा. उदाजीराव, गाणं - नाचणं बिदागीसाठी असत नाहीं अन् बिदागीसाठी श्रीमंतांपुढं रुजू होण्याचं कारण नाहीं. बिदागीच्या रूपानं मोहरा पुतळयांचं शिंपण याच दिवाणखान्यांत मी उभी राहिलें तरी माझ्यावर होतं. पण गाणं-नाचणं हा माझा छंद आहे. माझ्या जिवाचा ध्यास आहे. तो ( होनाकडे बोट दाखवून ) यांच्या शागीदींनं मोहोरला आहे. अन् आतां त्याचं चीज श्रीमंतांची वाहवा मिळवून होणार आहे. कदरदान भेटला म्हणजे गुणाचा चाफा कसा परिमळतो, हे तुम्हाला कसं कळणार । तें सांगा यांना मोरशेटजी, सांगतां आलं तर ! आई ( होनाजीकडे बोट करून ) यांना दूर करून तूं माझ्या जिवाचा कोंडमारा करणार तें काय म्हणून ? माझे पंचप्राण गाण्यानाचण्यांत गुंतले आहेत. ते तूं यांच्या ( उदाजीकडे बोट दाखवून ) इष्कासाठीं बळी देणार आहेस काय ? बिदागीची वैरण माझ्यापुढे टाकून तूं मला यांच्या गोठ्यांतलं जनावर बनविणार आहेस काय? माझ्या गाण्या-नाचण्याला बुरखा घालून तूं मला यांची पडदानशीन बिबी करणार आहेस काय ? यमुना : थांब जरा गुणवती. कळतं मला तूं काय म्हणतेस तें. उदाजीराव, तुमच्या ताबेदारीचा पाहारा इतका कडक असेल असं मला वाटलं नव्हतं. गाणं-नाचणं बंद करून हिला बंदिस्त ठेवायची म्हणतां ? उदाजी : होय, ती भापकरांची कळावंतीण म्हणून नांदायची आहे. गांवची म्हणून नाहीं. गुण० : वा ! म्हणजे मला काय लग्नाची बायको समजतां ? ती देखील तुमची जप्ती चालू देणार नाही इतकी. उदाजी : ( हंसत ) यमुनाबाई, पाहिलीत ही गव्हाळी नागीण कशी धुसफुसते आहे ती ! यमुना : जुलुम झाला बाई ! तिच्या छांदिष्टपणाची एक परी यांची ही दुसरी ! होना : पण त्यामागं त्यांच्या अवध्या दौलतीची प्रभावळ आहे ना ? त्यांची कट्यार देखील तिख्याची नाहीं, सोन्याची आहे. परवडलं तर सोयरीक करून तुम्ही बसा कौतुक करीत. आमच्या मानाला तें पुरवत नाहीं. येतों आम्ही, राम राम. ( जाण्यास निघतो. ) गुण० : होनाजीराव, कुणावर रागावतो अन् कुणाची सोड करतां ? तुमच्या मानाला पुरवत नाहीं, तें माझ्या मनाला तरी कसं पुरवेल ? यमुना : ( होनाजीबरोबर निघालेल्या बाळास ) बाळा, तूं देखील निघालास ? बाळा : मी देखील म्हणजे ? होनाला जागा नाहीं. तिथें बाळालाही नाही. यमुना त्यांचा राग होनावर दिसतोय. तूं कां आपल्या अंगीं लाऊन घेतोस ? बाळा : मानाचं पान मानानंच राहिलं पाहिजे, असं मी सांगितलं होतं तें जमलं नाहीं तुम्हांला. त्याच्या पानावेगळं माझं पान नाहीं. कारण त्याची माझी हयात गळ्यांत गळा घालून चालली आहे. तशीच मौतही जमल्यास एकाच ताटीवरून जायची आहे. आमची मैत्रिकी सूर तिथें गळा अन् होना तिथें बाळा अशी लोक सादवितात, माहीत नाहीं कां तुम्हाला ? गुण० : ( रस्त्यावरील खिडकीशीं जाऊन ) सूर तिथें गळा अन् होना तिथें बाळा ! ( जिन्याकडे वळणाऱ्या बाळास विव्हळतेनें ) बाळा, माझ्या गळ्यांतला मणी तुटला. माझा गळा उघडा पडला. अन् तूं पाठमोरा होऊन चाललास ? बाळा : नाहीं गुणवती. तुझी माझी पुण्याई उभी राहिली तर तुझा भरलेला गळा पाहायला माघारी येईन. [ जावयास निघतो. पण गुणवतीकडे पाहून त्याचा पाय उचलत नाहीं.] गुण० : ( दुःखातिशयानें ) सूर तिथें गळा अन् होना तिथे बाळा ! तिथें गुणवतीला थार नाहीं ? आई मला कळावंतिणीचा जन्म देऊन तूं सटवीच्या रात्रीं ज्योत मालविलीस अन् माझ्या कपाळीं असा अंधेर लिंपलास काय ? ( यमुना तिच्या शांतवनासाठी जवळ जाऊन तिला उराशीं धरते आणि आंत नेऊं लागते.) उदाजी : यमुनाबाई हें दर्द गाण्या-नाचण्या पुरतंच असेल तर आतांच्या आतां दुसरा कोणी उस्ताद बघा. एकटा होनाजीच कांहीं दुनियेची गायकी गिळून बसला नाहीं. त्याच्यासारखे छपन्न शाहीर गुणवतीच्या गळ्यावर न्याहाल होऊन येतील. प्रवेश १ ला गुणवती : येतील. पण एकालाही होनाजीरावांची सर येणार नाहीं. उदाजी : यमुनाबाई, ऐकलांत हा कबुलजिबाब ? गाण्या - नाचण्याच्या कसबा - खालीं तुम्ही दोघींनीं अन् शाहिरीच्या अस्तराखालीं या दोघांनी माझी नाकेबंदी करायचा घाट घातला होता काय ? बस्स, यापुढे माझ्या अवध्या दौलतीची उधळमाधळ झाली तरी बेहत्तर, हिला मी माडीची पायरी उतरू देणार नाहीं. अन् ( होना - बाळाकडे बोट दाखवून ) यांना - [ श्रीमंतांचा चोपदार मदनसिंग येतो. तो दरवाजांतच होना - बाळाला पाहून हंसतो. हें पाहून उदाजी तोंड फिरवितो. मदनसिंग पुढे येतो.] मोरशेट : मदनसिंग ? श्रीमंतांकडून आलास ? मदनसिंग : होय शेटजी, गुणवतीला गाण्याची वर्दी द्यायला. यमुना : गुणवतीला गाण्याची वर्दी ? मदनासंग : श्रीमंतांकडे आल्पिष्टण साहेबाला मेजवानीचा बेत आहे आज. गुणवती० : आज ? मदनसिंग : प्रहर रात्रीला. (जातां जातां होनाजीस) शाहीर येतीलच. (बाळास) अन् बाळाभाऊ तुम्हीही. होनाजी : हो येऊं. बाळा : ( उदाजीला उद्देशून पण त्याच्याकडे न पाहतां ) पण गुणवतीचं कसं काय ? [ उदाजी कोणाकडेहि न पाहतां पाय आपटीत जातो. त्याच्याकडे पाहात ] मदनसिंग : कां ? मोरशेट : ( बाळाला नजरेने दाबीत ) कांहीं नाहीं. वर्दीप्रमाणं येईल गुणवती. [ मदनसिंग जातो. गुणवती अंगांत नवचैतन्य संचारल्यासारखे करीत यमुनेला मिठी मारते आणि तिच्या एका खांद्यावर हनुवट ठेवून गदगदून म्हणते ' आई '. तसेच दुसऱ्या खांद्यावरून म्हणते 'प्रहर रात्रीला.' नंतर मिठी सोडून ती प्रथम आंतून आली होती त्या वेळच्या बेहोशपणाने होनाजीकडे पाहात आणि त्याला हाताने भाळवीत म्हणते - " कधीं येशील, भेटशील, प्रीत तपशील सांगशिक तरी ' ] प्रवेश पहिला [ कांहीं वर्षानंतर मोरशेटजींचा दिवाणखाना. मोरशेट डोक्यावर पागोटे ठेवून आणि खुंटीवरील दुपेटा खांद्यावर टाकून बाहेर जाण्याच्या तया रींत आहेत तोंच भिकाजीपंत खिडकींतून वारा यावा तसा अनाहूतपणें येतो. मोरशेट कांहींशा विमनस्कतेत असल्यामुळे भिकाजीपंतांचें येणें त्यांच्या लक्षांत येत नाही. ते कोपऱ्यांतली काठीं हातीं घेऊन क्षणभर खिडकीतून रस्त्याकडे पाहातात आणि निघण्याचा बेत ठाम करून जिन्याच्या तोंडाशीं जातात. हे पाहून आपली दखल देण्याच्या अद्देशाने भिकाजीपंत बळेंच खांकरतात. ] भिकाजी : मोरशेट ? ( हाक ऐकतांच मोरशेट वळून पहातात ) निवांत भेट होईल म्हणून आलो होतों. ( मोरशेट कांहींच उत्तर न देतां रोखून पाहातात ). बाहेर निघाला वाटतं ? अशा अवेळी ? मोर० : ( भिकाजीपंतावरील दृष्टी फिरवून ) सगळ्या सुवेळा श्रीमंतांबरोबर मावळल्या आहेत, भिकाजीपंत. आतां अवेळ नी अकाळ मसुद्यावर देखील शिल्लक नाहीत. कंपनी सरकारचं राज्य झालं आहे ना ? ऐन बारा वाजतां कोडताचं बोलावणं येतं. भिकाजी : पंचायतीचं बोलावणं तें. टाळतां कसं येईल ? आपला संभावितपणा नव्या अमदानीत इतका राजमान्य व्हावा, ही एक अभिमानाला जागा झाली आम्हांला. मोरशेट : तुमच्या अभिमानाला जागा झाली, पण आमच्या संभावितपणाला ओळंबे लागायची वेळ आली ना ? मिकाजी : ( अंग चोरून ) असं काय झालं एकाएकी ? |
नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रविवारी (ता. तीन) नांदेडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते. मग चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) उत्तम चाललं आहे. तुम्ही थोडं अॅडजस्ट केलं तर आणखीन उत्तम चालेल, असा टोला चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहिल्यास असे वाटते की जणू राजकीय युद्धच सुरु आहे. जर हे थांबल नाही तर गँगवार सुरु होईल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. (Everything Is Good In Mahavikas Aghadi, Ashok Chavan Said To Devendra Fadnavis In Nanded) भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकारणाचा स्तर घसरु देऊ नये असे आवाहन चव्हाण यांनी केले. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील बुलेट ट्रेनची बंद झालेली कामे सुरु करावीत. त्या करिता अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करावी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. रेल्वे प्रकल्पांसाठी लागणारा ५० टक्के निधी राज्याने बंद केला आहे. अशोक चव्हाणांनी पुढाकार घेतल्यास बुलेट ट्रेन यासह इतर महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वार फडणवीसांनी व्यक्त केला. |
डोंगर आणि फेसाळलेले धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. गेल्यावर्षापासून कोरोना Corona सर्वत्र कहर मांडला आहे. म्हणून प्रशासनाने पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. मात्र पर्यटक घरी बसून कंटाळलेले आहेत. त्यामुळे आता पाऊस Rain पाडताच पर्यटकांची गर्दी मलंगगड परिसरात होऊ लागली आहे. काल म्हणजे मंगळवारी सायंकाळी कुशीवली गावच्या नदी पात्रात उतरलेल्या पर्यटकांची व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. डोंगराळ भागात पडणाऱ्या पावसामुळे मलंगगडच्या नदीला मोठा पूर येत असतो. मात्र याची पर्यटकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने ते जीव धोक्यात घालून बिनदास्त नदी पात्रात आणि धबधबा परिसरात उतरत आहेत. हिललाईन पोलिसांनी या परिसरात नाका बंदी देखील सुरू केली आहे .ती फक्त शनिवार आणि रविवारी असते. त्यामुळे इतर दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहेत. आता पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे. |
पुणे (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील महिलेचा विनयभंग करून तिच्या डोळ्यांना मोठी ईजा केली होती. त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. या महिलेवर पुण्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पीडित महिलेची भेट घेतली. त्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात ३ नोव्हेंबर रोजी शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. क्रुर आरोपीने महिलेचे दोन्ही डोळे बाहेर काढल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. या घटनेत पीडित महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. या महिलेवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पीडित महिलेची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ससून रूग्णालयात जावून भेट घेतली. पीडित महिलेला दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून कमीत कमी १० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. नुसता पैशाने हा प्रश्न सुटणार नसून महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याने पुढच्या काळात महिलेला सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांमधून मदत केली, जाईल असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. |
गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये सलामीवीरांना येत असलेले अपयश, काही अपवाद सोडले तर फलंदाजीत नसलेले सातत्य याचा फटका अखेर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बसताना दिसतो आहे. गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये सलामीवीरांना येत असलेले अपयश, काही अपवाद सोडले तर फलंदाजीत नसलेले सातत्य याचा फटका अखेर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बसताना दिसतो आहे. पहिल्या डावात गमावलेली ४३ धावांची आघाडी भारताला आता महाग पडणार असून, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ठेवलेले २८७ धावांचे लक्ष्य गाठताना पाहुण्या भारताची ५ बाद ११२ अशी दमछाक झाल्याने पराभव दिसू लागला आहे. भारताला अजून १७५ धावांची गरज आहे; पण पर्थ स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर आता उरलेल्या पाच फलंदाजांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. दिवसअखेर हनुमा विहारी आणि रिषभ पंत ही जोडी मैदानात होती. त्यांच्यावरच आता भिस्त आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलचा मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळा उडविला. भारतीय सलामी जोडी चांगली सुरुवात मिळवून देण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरली. यानंतर हेझलवूडने चेतेश्वर पुजाराची महत्त्वाची विकेट मिळवली. मुरली विजय आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण नॅथन लायनने २०व्या षटकात कोहलीला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. कोहली बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी एकच जल्लोष केला. यानंतर लायनने आपल्या पुढच्या षटकात मुरली विजयचाही अडसर दूर केला. अवघ्या ५५ धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज माघारी परतले होते. यानंतर अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने ४३ धावा जोडल्या. हेझलवूडने रहाणेला बाद करून भारताला 'बॅकफूट'वर ढकलले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हनुमा विहारी आणि रिषभ पंत मैदानात होते. भारताला विजयासाठी १७५ धावांची गरज आहे. भारताच्या पाच विकेट शिल्लक असल्या तरी त्यातील चार हे गोलंदाज आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि टिम पेन यांनी ४ बाद १३२ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. या जोडीने सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांची कसोटी बघितली. सकाळचे पूर्ण सत्र या जोडीने खेळून काढले. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १९० धावा केल्या होत्या. ख्वाजा-पेनने पाचव्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. हीच भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरली. उपाहारानंतर शमीने गोलंदाजीत चांगलेच वैविध्य राखले होते. उपाहारानंतरच्या ९ षटकांत ऑस्ट्रेलियाने १५ धावांच्या आत पाच विकेट गमावल्या. शमीने ७९व्या षटकात सलगच्या चेंडूंवर पेन आणि अॅरन फिंचला बाद केले. (फिंचने बोटाच्या दुखापतीमुळे रविवारी मैदान सोडले होते. ) यानंतर शमीने ख्वाजालाही माघारी पाठवले. ख्वाजाने २१३ चेंडूंत ५ चौकारांसह ७२ धावा केल्या. यानंतर बुमराहने कमिन्स आणि स्टार्कचा त्रिफळा उडविला, तर शमीने लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाला २४३ धावांत रोखले. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क-हेझलवूड या दहाव्या जोडीने ३६ धावा जोडल्या. शमीने ५६ धावांत ६ विकेट घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव - सर्वबाद ३२६. ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव - (४ बाद १३२ वरून पुढे) फिंच झे. पंत गो. शमी, ख्वाजा झे. पंत गो. शमी ७२, पेन झे. कोहली गो. शमी ३७, कमिन्स त्रि. गो. बुमराह १, स्टार्क त्रि. गो. बुमराह १४, लायन झे. विहारी गो. शमी ५, हेझलवूड नाबाद १७, अवांतर १५, एकूण - ९३. २ षटकांत सर्वबाद २४३. बाद क्रम : ५-१९२, ६-१९२, ७-१९८, ८-१९८, ९-२०७, १०-२४३. भारत : दुसरा डाव - लोकेश राहुल त्रि. गो. स्टार्क ०, मुरली विजय त्रि. गो. लायन २०, पुजारा झे. पेन गो. हेझलवूड ४, विराट कोहली झे. ख्वाजा गो. लायन १७, रहाणे झे. हेड गो. हेझलवूड ३०, हनुमा विहारी खेळत आहे २४, रिषभ पंत खेळत आहे ९, अवांतर ८, एकूण - ४१ षटकांत ५ बाद ११२. |
ताण, चिंताग्रस्त भंग, चिंता, अनिद्रा - या सर्व समस्यांसह आधुनिक व्यक्तीला अनेकदा तोंड द्यावे लागते. जरी फार्मेसमध्ये विशेष औषधांचा एक मोठा संग्रह आहे, तरीही बरेच चांगले जुन्या सुखदायक औषधी वनस्पती पसंत करतात. लोकांच्या उपशामकांचा परिणाम महाग औषधेंपेक्षा कमी नसतो आणि शरीरास होणारी हानी हे गवत आणणार नाही. खरं तर, एक उपशामक (औषध) दागिना किंवा त्यांच्या स्वतः च्या वर herbs एक decoction तयार करणे म्हणून कठीण नाही आहे परंतु आपण स्वयंपाकघरमध्ये भोवताली गोंधळ करू इच्छित नसल्यास, आपण कधीही हिरव्या भाज्या देण्याविषयी विचारू शकता. - लिंबू मलम , व्हॅरीअरी, लॅव्हेंडर, हॉप्स, मिठाई आरामात आणि इतरः औषध Antistress च्या रचना सर्व सर्वात प्रसिद्ध soothing herbs समावेश. उपाय वाढती चिडचिड, निद्रानाश, उच्च थकवा सह मदत करते. - नेव्हिन कडू दव , ज्युनिअर, व्हॅलेरियन आणि फूड बीन्सच्या आधारे तयार केले आहे. ही औषधी द्रुतगतीने आणि परिणामकारकपणे मज्जासंस्थेला शांत करते आणि रक्ताभिसरण सामान्य करण्यासाठी मदत करते. - पर्शनच्या स्वरूपात हॉथोर्न आपल्याला दबाव नियंत्रित करण्यास आणि आवश्यक असल्यास ते कमी करण्यास अनुमती देते. जरी या सर्व औषधे कोणत्याही फार्मसीमध्ये औषधे न घेता खरेदी करता येऊ शकतात, तरी आपण त्यांचा वापर सुरू करण्यापूर्वी एका तज्ञाशी संपर्क साधावा. कसे वनस्पती स्वतः ला वर एक चांगला शामकणे तयार करण्यासाठी? आपल्याला टॅब्लेट आवडत नसल्यास, आपण एक थंड शामक स्वतः तयार करू शकता मज्जासंस्था प्रभावित करणारी औषधी वनस्पतींची अशी यादीः - पुदीनासह मेलिसा - एक अद्वितीय संयोजन, निद्रानाश मदत समस्यामुक्त हे सुखदायक औषधी म्हणजे आपण ज्याला साध्या झोपण्याची गरज आहे. लक्षात ठेवणे मुख्य गोष्टः पुदीना उच्च दबाव येथे contraindicated आहे, आणि बाम गर्भधारणेदरम्यान पिण्यास अवांछित आहे. - वलेरीयाना निद्रानाशाने सतत सुरक्षित ठेवेल आणि अंतःकरणाचे कार्य सुधारेल. - Hops च्या cones वर मद्याकरिता काही पदार्थ विरघळवून तयार केलेले औषध एक वाईट वादविवाद आणि चिंता सर्व चिन्हे दूर नाही. - माधवॉच पासून हर्बल टीला चोखणे हे सर्वात शक्तिशाली उन्मादाचे सांत्वन करण्यासाठी इतर कोणत्याही मार्गापेक्षा चांगले आहे. कोरड्या स्वरूपात हे औषधी वनस्पती कोणत्याही फार्मसी येथे खरेदी केले जाऊ शकतात. आणि आता बरेच प्रभावी आणि सहज पाककृतींबद्दल सांगण्याची वेळ आहेः - एका जातीची बडीशेप, कॅरावे आणि व्हॅरीअरीच्या मुळाचे एक चमचे अर्धा तास आग्रह करतात अर्ध्या कप साठी दिवसातून दोन वेळा पिणे मिश्रण. - पुदीना आणि मेलिसा येथील वनस्पतींवर ट्यूंक्चर तयार करणे सोपा आणि सर्वात प्रभावी उपाय आहे पाककला मद्याकरिता काही पदार्थ विरघळवून तयार केलेले औषध नियमित चहा म्हणून सोपे आहे. आपण टेंब्यूचे मिश्रण वेगळे करून मेलिस्चा वापर करु शकता किंवा सामान्य चहासाठी आळशी जोडू शकता. नंतर पिण्याची चव अधिक मसालेदार होईल. या सर्व औषधे अत्यंत प्रवेशयोग्य आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. |
कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, नागरी बँका, सराफी पेढ्यांसह आलिशान बंगल्यांना सराईत टोळ्यांनी टार्गेट केले आहे. शहर, जिल्ह्यात रोज एखाद्या ना एखाद्या ठिकाणी डल्ला मारून चोरटे किमती ऐवज लंपास करीत आहेत. ग्रामीण भागातील राष्ट्रीय बँकांच्या शाखाही चोरट्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. बुधवारी मध्यरात्री धामोड (ता.राधानगरी) येथील युनियन बँकेच्या शाखेवरील दरोड्याच्या प्रयत्नाने हे उघड झाले आहे. बँका, व्यापारी, सराफी पेढ्यांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी सुचविलेल्या उपायांना कोलदांडा देण्यात येत आहे. सीसीटीव्ही, सायरनच्या सूचना हवेत विरल्या आहेत. सुरक्षारक्षक नियुक्तीचा प्रस्तावही बासनात गुंडाळून ठेवावा लागला आहे. शहर, जिल्ह्यात घरफोड्या, चोर्यांसह दरोड्यांच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतो आहे. ही वस्तुस्थिती असली तरी व्यावसायिक फर्म, स्थावर मालमत्ता अथवा सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक झालेल्या किमती ऐवजांच्या सुरक्षिततेची काही अंशी स्वतःची जबाबदारी असते.सगळ्याच उपाययोजना पोलिस यंत्रणांनीच कराव्यात, अशाच भावना समाजात रूढ झाल्या आहेत. त्याचाच गैरफायदा घेत सराईत टोळ्यांनी किमती ऐवजांवर डल्ला मारण्याची मालिकाच सुरू केल्या आहेत. गतवर्षी फेब्रुवारी 2019 मध्ये यशवंत सहकारी बँकेच्या पन्हाळा तालुक्यातील कळे येथील बँकेच्या शाखेवर सराईतांनी दरोडा टाकून 65 लाखांच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांची रोकड लंपास केली. ऑक्टोबर 2019 मध्ये याच गावात यशवंत सहकारी बँकेपासून अवघ्या 50 फूट अंतरावर असलेली प्रियांका ज्वेलर्स पेढी फोडून 20 तोळे दागिन्यांसह मोठी रोकड लंपास केली. चोरीच्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, नागरी बँकांसह व्यापारी पेढ्यांनाही सावधानतेचा इशारा देत व्यावसायिक फर्मच्या आवारात सीसीटीव्ही, सायनर बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठमोठ्या निवासी संकुलांतही ही यंत्रणा कार्यान्वितचे आवाहन करण्यात आले होते; मात्र बहुतांश पेढ्या, व्यावसायिक फर्म, बँकांनी या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. |
केबीसी, इमू अशा अनेक संस्थांमध्ये आर्थिक आमिषाला बळी पडलेल्या घटना नाशिक जिल्ह्यात ताज्या असताना आता लासलगाव येथे ढोकेश्वर मल्टिस्पेशालिटी या संस्थेचाही फुगा फुटला आहे. केबीसी, इमू अशा अनेक संस्थांमध्ये आर्थिक आमिषाला बळी पडलेल्या घटना नाशिक जिल्ह्यात ताज्या असताना आता लासलगाव येथे ढोकेश्वर मल्टिस्पेशालिटी या संस्थेचाही फुगा फुटला आहे. या संस्थेविरुद्ध पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर लासलगावसह जिल्ह्यातील ९ शाखांसह सोसायटीचे संचालक सतीश काळे यांच्या घरी पोलिसांनी शनिवारी छापे टाकले. त्यामुळे ढोकेश्वरच्या गुंतवणूकदारांसह नोकरीसाठी पैसे भरलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ढोकेश्वर सोसायटीच्या महाराष्ट्रात १७५ शाखा आहेत. या पतसंस्थेच्या शाखांमध्ये नोकरीच्या आशेने हजारो तरुणांनी सोसायटीने सांगितल्याप्रमाणे पैसे भरले आहेत. मात्र या तरुणांची संस्थेने फसवणूक केली. त्यानंतर तरुणांनी लासलगाव पोलिसांत यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा शाखांवर याआधीच छापे घातले आहेत. ढोकेश्वर सोयासटीच्या राज्यभर ठिकठिकाणी विविध आर्थिक लाभ व योजनांची जाहिरात केली. याच सोसायटीच्या शाखांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी ठराविक रक्कम युवकांकडून घेतली जात होती. पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत पैसे उकळण्यात आले. कमी पैशात नोकरी मिळत असल्याने अनेक युवक या आमिषाला बळी पडले. नोकरीसाठी पैसे भरूनही नोकरी व ते पैसेही परत मिळत नाही तसेच नातेवाईकांकडून मुदत ठेवी या पतसंस्थेत ठेवल्याने अनेक युवकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्याकडे मनमाड येथील एका तक्रारदाराने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीनुसार नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे व जनार्दन सोनवणे यांच्यासह पथकाने जिल्ह्यातील सुमारे दहा शाखा व सतीश काळे यांच्या राहत्या घरी छापे टाकले. औरंगाबाद, जालना, अहमदनगर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातून बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या आमिषाने ढोकेशवेर सोसायटीत पैसे भरले आहेत. महिनाभरापूर्वी जालना आणि औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यातून काही तरुण लासलगावला आले होते. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी फसवणूक झाली हे लक्ष्यात येताच कार्यालयाची तोडफोड केली होती. रयत शिक्षण संस्थेच्या विंचुर येथील विद्यालयात नोकरीला असणाऱ्या सतीश काळे यांनी सुरुवातीला हरिओम ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले. यातही मोठ्या प्रमाणात अपहार करून अनेक ग्राहकांची फसवणूक केली. मात्र अनेकांनी त्यावेळी तक्रार देण्याचे टाळले. गेल्या दोन तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यानंतर काळे यांनी नवीन योजना आखली. त्यानुसार ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीची स्थापना केली. सुमारे १७५ शाखांची निर्मिती केली. लासलगाव येथील मुख्य कार्यालय कळवण, नांदगाव, मनमाड, घोटी, नाशिक शहर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या ठिकाणांवरून संगणक, कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या कारवाईची चाहूल लागताच सोसायटीचे संस्थापक सतीश काळे फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. |
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- रातोरात नशीब पलटले... असे आपण आजवर ऐकले असलं मात्र हाच प्रत्यय केरळमधील एका व्यक्तीस आला आहे. केरळमधील सदानंदन ओलीपराम्बिल या व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. हि लॉटरी जिंकण्याचा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल... रविवारच्या सकाळी सदानंदन भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण त्यांच्याकडे 500 रुपयांचे सुट्टे नव्हते. यामुळे सदानंदन यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट (XG 21858) विकत घेतले. ते म्हणाले, मी मांसाच्या दुकानाकडे जाताना पाचशे रुपयांचे सुट्टे करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना सुट्टे मिळाले नाही, म्हणून त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि दुपारी लॉटरीचा निकाल आल्यानंतर ते थक्क झाले. कारण काही तासांत ते 'कोट्यधीश' झालो होते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सदानंद यांना कर आणि लॉटरी एजंटचे कमिशन कापून सुमारे 7. 39 कोटी रुपये मिळतील. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. 300 रुपये किमतीचे हे तिकीट कोट्टायम शहरातील बिजी वर्गीस या लॉटरी एजंटने कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते. |
सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता संदीप देवरे यांची काल शुक्रवारी (ता.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पहिले. पालिकेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पालिका सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी संगीता देवरे यांच्या नावाची सूचना नगरसेवक महेश देवरे यांनी आणली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे यांनी अनुमोदन दिले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सौ. देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुवर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच देवरे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नंदाळे यांनी नूतन उपनगराध्यक्षा सौ. देवरे यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. तर नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवरे यांचा सत्कार करण्यात आला. शहर विकासाकरिता शासनाच्या विविध योजना राबविणार असून शहरवासियांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. देवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. यानंतर देवरे यांची ढोल ताशांच्या गजरात चार फाटा ते मल्हार रोडपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, कॉंग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, दीपक पाकळे, महेश देवरे, आरिफ शेख, बाळासाहेब बागुल, नगरसेविका सुलोचना चव्हाण, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, संगीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, आशा भामरे, भारती सूर्यवंशी आदींसह संदीप देवरे, राजेंद्र देवरे, मुन्ना सोनवणे, बॉबी देवरे, निलेश पाटील, धीरज विश्वंभर, राजकुमार सोनी, शुभम बोरसे, कोमल सोनवणे, मंगेश भावसार, चेतन मोरे, अक्षय सोनवणे, सागर पवार, हर्षवर्धन सोनवणे, देवेंद्र येवला, अक्षय खरे, पार्थ सोनवणे, मयूर निकुंभ आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे सासरे (कै.) कृष्णा नानाजी देवरे यांनी सन १९७१ व सन १९७४ मध्ये सटाण्याचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. तर जेठ (कै.) नितीन देवरे हे माजी नगरसेवक, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष (कै.) अर्जुनराव अहिरे यांचे निकटवर्तीय होते. सासरे (कै.) कृष्णा देवरे यांच्या कारकिर्दीतच पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, व्यापारी संकुल तसेच पहिल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाकडून संधी न मिळाल्याने सौ. देवरे यांनी अपक्ष उमेदवारी करीत भरघोस मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी शहर विकास आघाडीत प्रवेश केला. |
गोव्यात राजभवनकडून माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीवर उद्या मंगळवारी राज्य माहिती आयोगासमोर सुनावणी होणार आहे. पणजी - गोव्यात राजभवनकडून माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीवर उद्या मंगळवारी राज्य माहिती आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राजभवन माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा राजभवनचा दावा आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले होते. समाज कार्यकर्ते तथा वकील आयरिश रॉड्रिग्स यांनी आयोगाकडे तक्रार केली आहे. गेल्यावेळी सुनावणी झाली तेव्हा उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राजभवनने दोन आठवड्यांचा कालावधी मागून घेतला होता. आरटीआय कायद्याच्या कलम २ (एच)अन्वये राजभवन 'सार्वजनिक अधिकारिणी' असूनही अद्याप तेथे सार्वजनिक माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. ही नियुक्ती न करणे कायद्याला धरुन नाही, असा आयरिश यांचा दावा आहे. ते म्हणतात की, सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारी यावी यासाठी आरटीआय कायदा करण्यात आला परंतु राजभवनकडून या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. देशभरातील सर्व राजभवनांमध्ये तसेच राष्ट्रपती भवनातही आरटीआय कायद्याची अंमलबजावणी केली जाते. मग गोव्यातील राजभवनच अपवाद का, असा सवाल त्यांनी केला आहे. व्यवहार पारदर्शक रहावेत यासाठी बळकटी देणारा हा कायदा गोव्याच्या राजभवनकडूनच कमकुवत बनविला जात आहे, असा आरोपही आयरिश यांनी केला आहे. आयोगाने राजभवनला लवकरात लवकर सार्वजनिक माहिती अधिकारी नेमण्याचा आदेश द्यावा आणि कायद्याच्या कलम ४ (१) खाली अर्जदारांना माहिती पुरविली जावी तसेच अधिकारी नेमण्यास विलंब केल्याबद्दल दंड ठोठावावा, अशी मागणी आयरिश यांनी केली आहे. राजभवनचे हे प्रकरण जुने आहे. ३१ मार्च २0११ रोजी तत्कालीन राज्य माहिती मुख्य आयुक्त मोतिलाल केणी यांनी राज्यपाल आणि राजभवन 'सार्वजनिक अधिकारिणी'च आहे आणि माहिती हक्क कायदा राजभवनलाही लागू आहे, असा निवाडा दिला होता. राजभवनने या निवाड्यास हायकोर्टात आव्हान दिले असता १४ नोव्हेंबर २0११ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आव्हान याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ३0 जानेवारी ही आव्हान याचिकाही फेटाळून लावली. |
पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह! Russian Model Gretta Vedler : पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा (Russian Model Gretta Vedler) मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला आहे. 23 वर्षीय ग्रेटा जवळपास एक वर्षापासून बेपत्ता होती, मात्र तिचे सोशल मीडिया अकाउंट सुरू होते. ग्रेटाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना मनोरुग्ण म्हटले होते, तेव्हा ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मॉडेल ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने (Dimitry Korovin) केली. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या डिक्कीमध्ये टाकला होता. या घटनेनंतर आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रेटा वेडलरला 300 मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेले होते, जिथे त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून कारच्या डिक्कीमध्ये मृतदेह फेकला, असे कोरोविनने म्हटले आहे. पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. कोरोविनने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता. ग्रेटाच्या मृत्यूनंतर, कोरोविनने तिचे सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येऊ नये, असेही तपास अधिकारी म्हणाले. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या (Russia Ukraine War) दरम्यान रशियन मॉडेल (Russian Model) ग्रेटाचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंतर, रशियन मॉडेल ग्रेटाने वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यानंतर ती बेपत्ता होती. मात्र, आता तिचा मृतदेह सापडला असून मारेकऱ्यानेही आपला गुन्हा मान्य केला आहे. |
नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई 11 जुलैपर्यंत स्थगित केली आहे. एकनाथ शिंदे गटाला तुर्तास कारवाईपासून अभय मिळाले होते. त्यानंतर भाजपने राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे फ्लोअर टेस्टची मागणी केली. राज्यपाल लगेच अॅक्शन मोडमध्ये आले आणि 30 तारखेला अधिवेशन बोलावून प्लोअर टेस्ट करावी असे निर्देश दिले. या निर्णयाला शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोरांच्या या सुनावणीमध्ये एक नाव सतत पुढे येत आहे ते म्हणजे 'नबाम रेबिया' केस (Nabam Rebia Case). या केसमध्ये नक्की काय घडले होते हे आपण जाणून घेवूया. काय होते नबाम रेबिया प्रकरण? * नोव्हेंबर 2016 मध्ये, अरुणाचल प्रदेश राज्यात 20 काँग्रेस आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या विरोधात बंड करून घटनात्मक संकट निर्माण केले. विधानसभेचे 33 सदस्य म्हणजेच काँग्रेसचे 20, भाजपचे 11 आणि 2 अपक्ष आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन अध्यक्ष आणि सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. * राज्यपालांनी मुख्यमंत्री तुकींशी कोणतीही चर्चा न करता, जानेवारी 2016 च्या विधानसभेत सभापतींना हटवण्याची तयारी केली. सभापती नबाम रेबिया यांनी विधानसभेची बैठक होण्यापूर्वीच पक्षांतराच्या कारणास्तव बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले. * त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आणि सभापतींची याचिका फेटाळली. त्यानंतर सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आले. * सभागृहात बंडखोर आमदारांना हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना सभापती त्यांना अपात्र ठरवू शकतात की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने विचार केला. विशेष म्हणजे, घटनेच्या कलम 179 (C) मध्ये विधानसभेच्या ठरावाद्वारे 'सर्व तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने' अध्यक्षांना पदावरून हटविले जाऊ शकते. * विशेष म्हणजे, संविधान सभेच्या चर्चेतून असे दिसून आले की 'सर्व तत्कालीन सदस्य' म्हणजे ' सभागृहात उपस्थित आणि मतदान करणारे सदस्य होय. * बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा अध्यक्ष रेबियांचा निर्णय हा 'सर्व तत्कालीन सदस्यांच्या' मतदानावर मात करण्याचा प्रयत्न आणि असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने निष्कर्ष काढला. * सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय ठरला कारण त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले. |
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी घराकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना प्रवासी वाहन मिळत नसल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणचे हे कामगार आहेत. यावेळी इगतपुरी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गोरखपुर काशी एक्स्प्रेस मध्ये ही मंडळी जाऊन बसली आणि गाडी सोडण्याची मागणी केली. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने पुढील सुचना मिळेल तो पर्यंत सोडता येणार नाही असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबईकडून येणाऱ्यांची संख्या वाढत असून हे नागरिक सरळ महामार्गाने पायी प्रवास करुन कसारा घाटातून इगतपुरी येथे प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी घाटनदेवी मंदिरा जवळील असलेल्या जिल्हाबंदी चेकपोस्ट वर एकच गर्दी झाली असून तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. आता सर्व वाहनांची कसुन चौकशी केली जात असून अत्यावश्यक वाहनांनाच नाशिकडे सोडले जात आहे. विनाकारण प्रवास करणाऱ्या वाहनांना पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवुन देण्यात येत आहे. मात्र या वाहनातील प्रवासी येथेच उतरुन थेट नाशिकच्या दिशेने भरऊन्हात पायी प्रवास करीत असल्याने प्रशासनाची धांदल ऊडाली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर इगतपुरी येथे रेल्वेने काही नागरिक उतरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीर रित्या शिरलेल्या सुमारे ५०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून त्यांना जिल्हा प्रशासनाने परत पाठवले आहे. हे सर्व उत्तर भारतीय आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रेल्वेने त्यांच्या मेंटेनन्स स्टाफसाठी एक गाडी सोडली होती. ज्यातून जवळपास ४०० ते ५०० अनधिकृत प्रवासी देखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथे जाणार होती या सर्व प्रवाशांना रेल्वेने इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे खाली उत्तर उतरवले. त्यानंतर हे सर्व प्रवासी शहरांमध्ये प्रवेश करणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रवाशांना पुन्हा रेल्वे स्टेशन मध्ये परत पाठवून दिले आहे. सध्या तलाठी पोलीस कर्मचारी ग्रामसेवक इत्यादी शासकीय कर्मचारी स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. |
पुण्यातील झॅजमटॅज वर्ल्ड संस्था गेली ३० वर्षे फॅशन आणि सौंदर्य क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेची जागतिक, अखिल भारतीय आणि राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धांची नोंदणीकृत शीर्षके आहेत. यंदा होणारी मिस आणि मिसेस महाराष्ट्र स्पर्धा २० नोव्हेंबर रोजी पुण्यात रेसिडेन्सी क्लब ला संपन्न होणार असल्याचे झॅजमटॅज वर्ल्ड संस्थेचे संस्थापक साजिद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे : पुण्यातील झॅजमटॅज वर्ल्ड संस्था गेली ३० वर्षे फॅशन आणि सौंदर्य क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेची जागतिक, अखिल भारतीय आणि राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धांची नोंदणीकृत शीर्षके आहेत. यंदा होणारी मिस आणि मिसेस महाराष्ट्र स्पर्धा २० नोव्हेंबर रोजी पुण्यात रेसिडेन्सी क्लब ला संपन्न होणार असल्याचे झॅजमटॅज वर्ल्ड संस्थेचे संस्थापक साजिद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी गतवर्षीच्या विजेत्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉ. मनिषा पाटील, मिसेस महाराष्ट्र हर्षाली कोलते, सारिका चव्हाण मिसेस दिवा ऑफ़ इंडिया उपस्थित होत्या. शहरातील महिलांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये सुद्धा पुढे जाण्याची क्षमता असते परंतू त्यांना व्यासपीठं उपलब्ध होत नाही, त्यासाठी आम्ही शहरा बरोबरचं ग्रामीण भागात जाऊन ऑडिशन्स घेतो. तिथल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आमच्या संस्थेचे उद्दीष्ट आहे. आमच्याकडे कराड आणि इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून आलेली स्पर्धक आज जागतिक स्तरावर विजेती झाली आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयामध्ये काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत, असे शेख म्हणाले. सौंदर्य स्पर्धेतील विजेते पद म्हणजे चित्रपट सृष्टीत प्रदार्पण असा समज चुकीचा असल्याचे मत या वेळी डॉ. मनीषा पाटील यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या गृहिणी किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला एक स्वतंत्र ओळख अशा स्पर्धांमधून मिळते तसेच तीचा आत्मविश्वास वाढल्याने पुढील वाटचाल सुलभ होते. ग्रामीण भागातून आलेल्या सारिका चव्हाण म्हणाल्या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे व्यक्तिमत्व विकसीत झाला. बुजरेपणा गेला. त्यामुळे शहरात आल्यावर इथे जुळवून घेताना सोपे गेले. हर्षाली कोलते म्हणाल्या, आयुष्यात अनेक संधी येतात त्या सोडता कामा नये. स्पर्धेत करून घेतलेली तयारी पुढे आयुष्यभर पुरते. अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वास वाढतो. मिस स्पर्धे साठी वय १६ वर्षे पूर्ण आणि मिसेस स्पर्धेसाठी १८ वर्षे पूर्ण आवश्यक आहॆ. ऑडिशन्स विनामूल्य असून इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी ९८९०६२७३२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शेख यांनी केले आहॆ. |
अंकीसा : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले साेमनूर संगमाचे निसर्ग साैंदर्य डाेळ्याचे पारणे फिटणारे आहे. या ठिकाणचे निसर्ग साैंदर्य पाहण्यासाठी तिन्ही राज्यातील पर्यटक येतात. या ठिकाणी बससह सुविधा पुरविल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. सिरोंचा तालुक्यातील साेमनूर येथे गोदावरी व इंद्रावती या दाेन नद्यांचा संगम आहे. इंद्रावती नदी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. तर गाेदावरी नदी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या ठिकाणी तीनही राज्यातील पर्यटक व शालेय विद्यार्थी येतात. दाेन नद्यांचा विस्तीर्ण संगम, साेबत बाजूला माेठमाेठी पहाडी आहे. या पहाडांवर घनदाट जंगल आहे. पाण्याचा खळखळणारा आवाज कित्येक दूर अंतरावर ऐकायला येतो. निसर्ग साैंदर्याने नटलेला सोमनूर संगम विकासापासून वंचित राहिलेला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनांच्या सहायाने प्रवास करावा लागत आहे. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची यात्रा भरते. यात्रेनिमित्त या ठिकाणी माेठ्या प्रमाणात नागरिक येतात. या ठिकाणी बससह इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. या ठिकाणी काही वेळ थांबण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी इमारतीची आवश्यकता आहे. सोमनूर संगम येथे महाशिवरात्रीच्या दरम्यान यात्रा भरण्यात येते. या एकच दिवशी एसटी परिवहन मंडळाच्या वतीने बस सुरू केली जाते; मात्र इतरवेळी बससुविधा राहत नाही. आसरअल्ली ते सोमनूर संगम पर्यंतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पूर्णपणे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी डांबर उकळून गेले आहे. याचा मोठा त्रास पर्यटकांना होत आहे. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. |
जैविक अन् विघटनशील कचर्याच्या व्यवस्थापनाच्या पर्यायी उपाययोजना आता समाजात मुळ धरु पाहतायेत. पण प्लास्टिकच्या बाबत मात्र आपण बरेचसे परावलंबी आहोत. रोज राज्यात एक कोटी दुधाच्या पिशव्यांची विक्री होते. रोज दुधाच्या पिशव्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर येत असतो. हा कचरा विविध नाले गटारे आणि इतर ठिकाणी साचून राहिल्याने बर्याच परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की या पिशव्या केरातून त्यांच्या पोटात गेल्याने भटक्या प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, केरातून काही महाभाग या पिशव्या गटारी मध्ये टाकतात ,गटारी ,ड्रेनेज तुंबतात,अनारोग्य उद्धभवते. काही ठिकाणी एकीकडून कचरा गोळा करायचा आणि दुसरीकडे ओतायचा हे धोरण आहे. याने समस्या फक्त नजरेआड होते. दुधाची पिशवी फाडतांना त्यांचा कोपरा काढायच्या ऐवजी फक्त कट मारला पाहिजे. छोटे प्लास्टिक चे कोपरे कचर्यात सापडले त्याचा पुनःर्वापर करता येत नाही व सागरी जीवनही धोक्यात येते. मागच्या वर्षापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी "दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची तसेच ग्राहकांनी दुधाची रिकामी पिशवी परत केली तर, प्रत्येक पिशवी मागे त्यांना ५० पैसे देण्यात येतील" अशी घोषणा केली. माझ्याकडे साचलेल्या तब्बल सहा महिने कालावधीतील दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवुन जमा करुन ठेवल्यात. स्थानिक दुकानात चौकशी केली पण नाही परत घेतल्या त्यांनी, प्रत्येक पिशवी ५० पैसे परत करणे ही गोष्ट तर दूरच राहिली, आमच्याकडे अद्यापि तशी काही व्यवस्था नाही म्हणाले. व्यावसायिक पातळीवर राज्यभरातील बहुसंख्य डेअरी चालकांशी संपर्क आहे, पण तेथेही अंधारच आहे. कचरा व्यवस्थापनाच्या *3R* पैकी वापर कमी करणे (Reduce), पुनर्वापर करणे (Reuse) या आपल्यापुरत्या स्वांत्यसुखाय विकल्पांसोबत *Recycle* म्हणजे प्रक्रिया करण्याची यंत्रणा कोणाची, कुठे, कशी कार्यान्वित आहे याबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन अगर खाजगी पातळीवर कुठे काही प्रकल्प सुरु असल्यास सोबत दिलेल्या संपर्कमाध्यमाद्वारे अवगत करावे, ही विनंती. सामाजिक आरोग्य सल्लागार, |
'मिले सूर मेरा. . . ' या १४ भारतीय भाषांतील गीताचे बोल जिज्ञासा जागृत करतात. तशीच ठाण्यातील सौरभ बोंद्रे या बहुभाषाकोविद युवकाची वाटचाल प्रेरणादायी आहे. गात भारत हा असा अद्वितीय बहुभाषिक देश आहे की, ज्याच्या २२ अधिकृत भाषा अन् हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. पण, जाणीवपूर्वक वेगवेगळ्या भाषा शिकून त्या आत्मसात करणे म्हणजे दिव्यच! अन् हे दिव्य १३ भाषा शिकून युवावस्थेतच पार पाडलंय ठाण्यातील सौरभ बोंद्रे या युवकाने. कोल्हापुरात जन्मलेला सौरभ बालपणापासून ठाण्याचा रहिवासी. त्याची मातृभाषा मराठी तरीही इंग्रजी माध्यमातून संपूर्ण शिक्षण घेतले. लहानपणी 'डबलडेकर सिंहगड एक्सप्रेस'ने पुण्याला जाताना अन्यभाषक सहप्रवाशांच्या गप्पा ऐकून सौरभचे कुतूहल जागे झाले. तेथूनच त्याचा बहुभाषिक प्रवास सुरू झाला. हिंदी, संस्कृत अनिवार्य विषय असल्यामुळे अभ्यास करतानाच तो चार भाषा शिकला. त्याच्या इमारतीमधील तामिळ कुटुंबाकडे तामिळ, तर कानडींकडून कन्नड शिकला. भारतीय भाषा शिकण्याला त्याकाळी फारसं 'ग्लॅमर' अथवा मानमरातब नव्हता. त्यामुळे या विचित्र छंदाला शाळेत तसेच घरीदेखील विरोध व्हायचा, ओळखीचे लोक 'हे कसलं खूळ! ' असे शेरे मारायचे. पण, सौरभने जिद्द सोडली नव्हती. कॉलेजमध्ये असताना थोडं स्वातंत्र्य मिळालं. ठाणे-मुंबई पालथी घालत धारावीतील तामिळी, चेंबूर-माटुंग्यातील दाक्षिणात्य, ठाण्यातले बंगाली, मुलुंडमधील गुजराती, या सर्वांशी ओळख आणि मैत्री करत या भाषाविश्वात वावर वाढवला. त्यातूनच त्याला कर्नाटक संगीताची आवड लागली आणि तो मँडलिन श्रीनिवास यांचे शिष्य सुरेशकुमार यांच्याकडे कर्नाटकी गायन शिकला. मालती श्रीराम यांच्याकडे सरस्वती वीणा, मुकुंद मराठे यांच्याकडे हिंदुस्थानी गायन आणि पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडे प्राथमिक रुद्र वीणावादन शिकला. 'बी. कॉम. ' होईपर्यंत सौरभने चार भाषांखेरीज तामिळ, कन्नड, उर्दू, तेलुगू, मल्याळम, बांगला, गुजराती भाषा लिहा-वाचायला आणि व्यावहारिक संभाषण करण्याइतक्या शिकला. ठाण्यातले डॉ. बा. रा. दीक्षित यांच्याकडे संस्कृतचे उच्चारण आणि देवनागरी लिपीशास्त्राचा त्याने सखोल अभ्यास केला. 'नागर लेखन परिषदे'तर्फे देवनागरी लिपीत विशेष संशोधन केलं, वडिलांच्या आग्रहाखातर जपानी भाषेचा अभ्यास करून तीन आंतरराष्ट्रीय परीक्षा दिल्या. आपला बहुभाषिक छंद जोपासण्यासाठी सौरभने सुरुवातीला खासगी कंपन्यांमध्ये अकाऊंट्स, अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये काम केलं आणि त्यानंतर साडेचार वर्षे आंतरराष्ट्रीय कॉलसेंटर्समध्येही नोकरी केली. २००८ साली दीड महिना जपानमध्ये प्रशिक्षणार्थ राहून जपानी भाषेचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव घेतला. त्यानंतर भाषा हेच व्यावसायिक क्षेत्र ठरवून सौरभ वाटचाल करीत आहे. मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये 'एम. ए. ' केलं. दिल्लीच्या 'कौमी कौन्सिल'तर्फे उर्दूच्या परीक्षा दिल्या. मग त्याने जपानी शिकवायला आणि संस्कृत शिकवायला सुरुवात केली. चित्रपटांचे सब-टायटल्स करणे, मराठी, संस्कृत आणि हिंदी पुस्तकांचे मुद्रितशोधन करणे अशीही कामे केली. समाजाला कशा प्रकारे योगदान देतोस? असं विचारल्यावर तो सांगतो की, "मी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता नाही. माझ्या व्यवसायातून जमेल तितका वेळ समाजाकरिता देतो. १९९९-२००० मध्ये एका संस्थेतर्फे गोलमंदिराच्या आसपासच्या वेश्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या एका केंद्रात जाऊन इंग्रजी आणि गणित शिकवलं, महापालिकेच्या एका रात्रशाळेत कामगारांना इंग्रजी शिकवलेलं आहे. अजूनही शाळा-कॉलेजांतील काही गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांची परिस्थिती पाहून माफ करतो. काही पोलिसांनाही दहशतवादी कारवाईतील संदेश व मजकूर कळवा यासाठी उर्दू शिकवले," असे सौरभ सांगतो. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 'एसएससी' परीक्षेकरिता निःशुल्क मार्गदर्शन करतो. २०१० सालापासून मुंबईतील किन्नर व समैषी (यौनिक अल्पसंख्य) समाजासोबत काम करत आहे. या समाजाच्या मानवी हक्कांसाठी विशेष सभा, चर्चासत्रं, बोधसत्रं, पदयात्रांचं आयोजन करण्यात पुढाकार घेतो. यासाठी लागणारं लिखाण किंवा भाषांतर वगैरे विनामानधन करतो. कोरोनाकाळात स्वयंसेवी संस्थांतर्फे गरीब आणि स्थलांतरित मजुरांना शिधा व आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं. सध्या तो प्रामुख्याने संस्कृत, जपानी, तामिळ, उर्दू आणि कन्नड या भाषा क्लासेसमध्ये आणि खासगी स्वरूपात शिकवतो. तसेच महाराष्ट्र शासनाच्या 'बालभारती' या पाठ्यपुस्तक मंडळाच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांच्या समीक्षण समितीतही सौरभचा समावेश आहे. मुंबईतील 'जे. जे. इन्स्टिट्यूट' व 'आयआयटी बॉम्बे' येथून 'टायपोग्राफी' (अक्षरमुद्रणशास्त्र) शिकलेल्यांसाठी सौरभ भारतीय लिपी विषयक सल्लागार म्हणून काम करतो. 'ग्राफिक डिझाईन' व भारतीय लिपीचे 'फॉण्ट' बनवणाऱ्या 'एक टाईप', 'व्हाईट क्रो' या भारतीय कंपन्या, 'अक्षराय' नावाची अशासकीय संस्था, तसेच 'गूगल', 'मायक्रोसॉफ्ट', 'अडोब' इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकरिताही तो बहुभाषातज्ज्ञ आणि लिपीशास्त्रज्ञ म्हणून स्वायत्तपणे काम करतो. तसेच मुंबईतील काही ऑर्केस्ट्रांमध्ये तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि बांगला गाणी गाणारा तो एकमेव मराठी युवक आहे. युट्यूबवरही सौरभचा बऱ्यापैकी संचार आहे. 'बहुभाषिकतेचे विश्व', 'बारशाचा पाळणा' आणि 'नभोगहने' हे संस्कृत भावगीत लोकांच्या पसंतीस उतरलंय. पंजाबी, मैतैलोन (मणिपुरी), अरबी आणि मांदारिन (चिनी) या भाषा शिकणे हे त्याचं पुढील लक्ष्य असल्याचे तो सांगतो. त्याच्या या बहुभाषिक प्रवासाकरिता दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे सौरभला मनःपूर्वक शुभेच्छा! |
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडूंसाठीच्या आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीचा वार्षिक करार जाहीर केला आहे. या करारात त्यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. वार्षिक करारातील एकूण खेळाडूंची संख्या तर त्यांनी कमी केलीच आहे. त्याशिवाय अनेक बड्या खेळाडूंना या करारातून डच्चू देखील दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वार्षिक करारातील खेळाडूंच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला. वार्षिक कराराच्या यापूर्वीच्या यादीत २० खेळाडूंचा समावेश होता. मात्र यावेळी केवळ १७ खेळाडूंना वार्षिक करारात स्थान मिळाले आहे. याशिवाय मागील यादीतील काही बड्या खेळाडूंना देखील यावेळी वगळण्यात आले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड आणि डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेड या खेळाडूंना या यादीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय सलामी फलंदाज जो बर्न्स, अष्टपैलू मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनिस यांना देखील वार्षिक करारातून डच्चू मिळाला आहे. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणार्या युवा कॅमरुन ग्रीनला पहिल्यांदाच करारबद्ध खेळाडूंमध्ये समाविष्ट केले गेले आहे. या कराराबाबत बोलतांना ऑस्ट्रेलियाचे निवड समिती प्रमुख ट्रेवर हॉन्स म्हणाले, "आज ज्या १७ खेळाडूंचा समावेश वार्षिक करारात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, त्या सगळया खेळाडूंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे येत्या सत्रात तीनही प्रकाराच्या क्रिकेटच्या स्वरूपात अतिशय व्यग्र वेळापत्रक आहे. आम्ही त्या दृष्टीने नियोजन करत आहोत. " ऑस्ट्रेलियन संघाला येत्या सत्रात भारतात होणारा टी२० वर्ल्डकप खेळायचा आहे. तसेच त्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका देखील खेळायची आहे. महत्वाच्या बातम्याः |
शेलपिंपळगाव (पुणे) : एकीकडे महिला कुस्तीपटूंनी आपला हक्क मागितला तर त्यांना अगदी रस्त्यावरून फरफटत नेले जाते, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी केलेले काम सांगण्यासाठी आज टिफिन बैठका घेतल्या जात आहेत. भविष्यात देशाची लोकशाही वाचवायची असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. चिंचोशी (ता. खेड) येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व गावातील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे, जयसिंग दरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या दीपाली काळे, माजी उपसभापती वैशाली गव्हाणे, बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, हनुमंत कड, विनोद टोपे, कमल कड, माजी संचालक धैर्यशील पानसरे, रोहिदास होले, विनायक घुमटकर, विलास कातोरे, सरपंच उज्ज्वला गोकुळे, उपसरपंच माया निकम, सरपंच आश्विनी साबळे, दौलत मोरे, अध्यक्ष देवानंद निकम, बजरंग दरगुडे, पांडुरंग निकम, एड. बाबासाहेब दरगुडे, बाबाराजे दौंडकर, युवराज भोसकर, विशाल दौंडकर, शुभम पोतले, संदीप गाडे, ग्रामसेविका सारिका गोरडे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच उज्ज्वला गोकुळे यांनी, तर देवानंद निकम यांनी आभार मानले. |
पुणेकरांनी प्रचंड उचलून धरलेला आणि गर्दीचे नवनवे उच्चांक मोडलेला 'हेरिटेज वॉक' १९ जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू होतो आहे. गेलं वर्षभर सुरू असलेल्या या उपक्रमानं वर्षपूर्तीनंतर स्वल्पविराम घेतला होता. पुणेकरांनी प्रचंड उचलून धरलेला आणि गर्दीचे नवनवे उच्चांक मोडलेला 'हेरिटेज वॉक' १९ जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू होतो आहे. गेलं वर्षभर सुरू असलेल्या या उपक्रमानं वर्षपूर्तीनंतर स्वल्पविराम घेतला होता. त्यानंतर नव्या जोमानं आणि नव्या दमानं पूर्वीप्रमाणेच या उपक्रमाला सुरुवात होते आहे. या वर्षी हेरिटेज आणि नेचर वॉक असं त्याचं स्वरूप असणार आहे. म्हणूनच पहिला वॉक 'एम्प्रेस गार्डन' इथं सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. या वर्षी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एच. व्ही. देसाई महाविद्यालय' यांना 'मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना' व 'क्लब हेरिटेज' यांचं पाठबळ लाभलं आहे. गेल्या वर्षी 'गार्डियन हॉलिडेज' या उपक्रमात सहभागी झाले होते. एक वृत्तपत्र, बांधकाम व्यावसायिकांची संघटना, एक शैक्षणिक संस्था यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा उपक्रम चालवण्याचं हे देशातलं एकमेव उदाहरण असावं. पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये दर शनिवारी किंवा रविवारी निघणारा हेरिटेज वॉक हा अनेकांच्या दैनंदिनीचा भाग झाला होता. एकावेळी एक ठिकाण, या नियमामुळे ते स्थळ पूर्णपणे समजावून घेणं, तिथला इतिहास जाणणं शक्य झालं होतं. पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर, प्रा. प्र. के. घाणेकर, संभाजी भोसले, प्रा. मोहन शेटे अशा तज्ज्ञांच्या उपस्थितीमुळे ही प्रक्रिया अधिक सहजसोपी व प्रगल्भ झाली. या वर्षीही या तज्ज्ञांच्या सोबतीनं पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन, प्रा. शिवांगी जोशी हेही मदत करणार आहेत. आज जगभर हेरिटेज या विषयाबद्दलची जागरुकता वाढत चालली आहे. युरोपात अशी स्थळं प्राणापलीकडे जपली जातात. फ्रान्समधील छोटंसं रेल्वे स्टेशन जपण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुढाकार घेता. त्याला आता जगभरातील शेकडो लोक भेटी देतात. त्यातून फ्रान्सला परकीय चलन मिळतं. आपल्याही देशाला, राज्याला आणि शहरालाही समृद्ध वारसा आहे. या शहराच्या वारशाचं संरक्षण करण्याची आणि त्यात भर घालून तो पुढच्या पिढीच्या सुपूर्द करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. |
Nagpur News गेल्या दोन दिवसात विदर्भ हत्याकांडांच्या घटनांनी हादरून गेला आहे. यवतमाळ/ वर्धा : गेल्या दोन दिवसात विदर्भ हत्याकांडांच्या घटनांनी हादरून गेला आहे. यवतमाळसारखा छोट्या शहरात दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. अहिंसेचा संदेश देणाऱ्या बापूंची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हीच अवस्था आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर रक्तरंजित घटनांचे गालबोट लागले आहे. यवतमाळात वर्चस्वाच्या लढाईतून यवतमाळ शहरातील आर्णी रोडवर दोघांची हत्या झाली. तर पुसद तालुक्यातील अमृतनगर येथे दारूच्या नशेत मुलानेच वडिलांचा खून केला. या दोन्ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्या. यवतमाळ येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. उमेश येरमे आणि वसीम पठाण यांचा मंगळवारी रात्री धारदार शस्त्राचे घाव घालून खून करण्यात आला. भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या सात ते आठ जणांनी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर झालेल्या वादावादीतून दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. तर उधारीचे पैसे परत करायचे आहे, त्यासाठी सोयाबीन विकून आलेल्या रकमेतून पैसे द्या म्हणत दारूड्या मुलाने वडिलांसोबत वाद घातला. या वादातूनच वडिलावरच वखराच्या पासीने वार केल्याने मारोती तुकाराम गादेकर या ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिल गादेकर यास अटक करण्यात आली आहे. राष्ट्रसंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापूंच्या जिल्ह्यात सलग दोन दिवसात झालेल्या खुनाच्या घटनांनी जिल्ह्याला हादरा बसला आहे. वर्धा आणि देवळी येथे झालेल्या वृद्धांच्या हत्येच्या घटनांनी दहशत निर्माण झाली आहे. सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोटा तलाव परिसरात असलेल्या केनलच्या विहिरीत वसंत हाथमोडे या ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या करून मृतदेह सिमेंट खांबाला बांधून फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी तपास करीत या प्रकरणात माजी नगराध्यक्षांचे पती भास्कर इथापे यांच्यासह दोघांना अटक केली आहे. न्यायालयात मृतक फितूर होईल आणि शिक्षा लागेल, या भीतीने ही हत्या घडवून आणल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तर देवळी येथील वसंता ढोणे यांची संपत्तीच्या वादातून सव्वा लाख रुपये देऊन त्याच्याच साडभावाने मुलाला सुपारी देऊन हत्याकांड घडवून आणले. या प्रकरणात देवळी पोलिसांनी ७ आरोपीना अटक केली आहे. या दोन्ही घटनांनी अहिंसेची नगरी हिंसक झाल्याची प्रचिती आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही घटनांचा उलगडा झाला असून, आरोपी पोलीस कोठडीत आहेत. |
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime । कुटुंबियासमवेत कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ११ वर्षाच्या मुलीचा भर दुकानात विनयभंग (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अब्दुल बाबु शेख Abdul Babu Shaikh (वय ३५, रा. प्रथमा बिल्डिंग, रामटेकडी, हडपसर - Hadapsar) याला अटक केली आहे. हा प्रकार फातिमानगर येथील के पी सी टी मॉलमधील कपड्याच्या विभागात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Crime) याप्रकरणी वानवडीतील एका ४४ वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०५/२२) दिली आहे. (Crime Against Woman) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कुटंबियांसमवेत कपडे खरेदी करण्यासाठी के पी सी टी मॉलमध्ये गेले होते. तेथील कपडे विभागात त्यांची ११ वर्षाची मुलगी कपडे पहात असताना अब्दुल शेख हा तेथे आला. तिच्या अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या मुलीच्या आरडाओरडामुळे हा प्रकार इतरांना समजल्यावर त्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक गावंडे तपास करीत आहेत. LPG Cylinder Price । एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त, जाणून घ्या किती रुपये कपात करण्यात आली? |
Mumbai(मुंबई): हरियाणाचे नाव ऐकताच लोकांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे गहू आणि धानाची लागवड. लोकांना वाटते की इथे शेतकरी फक्त धान आणि गहू पिकवतात, पण तसे नाही. इतर राज्यांबरोबरच हरियाणामध्येही शेतकरी बागायती पिकांची लागवड करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे बागायती पिकांवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आधुनिक पद्धतीने गुलाबाची लागवड करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हेही वाचाः Indian Institute Of Science: या वेबसाइटवर विहीर कमाई, 20 मिनिटे मिळतील 500 रुपये! किसन टाकच्या रिपोर्टनुसार, राजेश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो हिस्सार जिल्ह्यातील हिदवान गावचा रहिवासी आहे. पूर्वी तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा, मात्र असे असतानाही त्याच्या घरात पैशांची कमतरता होती. अशा परिस्थितीत एका बागायतदाराने त्यांना गुलाबाची लागवड करण्याचा सल्ला दिला. यानंतर राजेश यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून हिदवन गावात येऊन आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने गुलाबाची लागवड सुरू केली. सध्या ती 6 कनालमध्ये गुलाबाची लागवड करत आहे. यातून ते एका महिन्यात 80 किलो गुलाबाच्या फुलांचे उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे ते स्वतः बाजारात गुलाबाची फुले पुरवतात. यासोबतच ते आपल्या शेतात उगवलेल्या गुलाबाच्या फुलांपासून सरबत, गुलाबपाणी आणि गुलकंद तयार करतात. तो आणि त्याची पत्नी मिळून ही उत्पादने घरोघरी जाऊन विकतात. गुलाबाच्या लागवडीतून वर्षभरात ५ लाख रुपये कमावल्याचे राजेश सांगतात. विशेष म्हणजे आता ते इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय पद्धतीने गुलाब फुलांची लागवड करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांना पाहून आता ४० शेतकऱ्यांनी गुलाबाची लागवड सुरू केली आहे. याचा सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. शेणाचा वापर नेहमी खत म्हणून केला जातो. शेतकरी राजेश कुमार सांगतात की, त्यांच्या शेतात उगवलेल्या गुलाबाच्या फुलांना आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना बाजारात मागणी हळूहळू वाढत आहे. त्यांनी सांगितले की ते नेहमी त्यांच्या शेतात शेणखत म्हणून वापरतात. सिरसा, हिस्सार, फतेहाबाद, चंदीगड, मोहाली, अंबाला, रोहतक, भिवानी, बहादूरगड आणि पंचकुला येथे जाऊन ते स्वतः त्यांची उत्पादने पुरवतात. राजेशवर विश्वास ठेवायचा झाल्यास, तो आणि त्याची पत्नी मिळून रोज सकाळी गुलाबाची फुले तोडतात. मग ते बाजारात नेऊन विकावे. 'दैनिक महाराष्ट्र 'चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा! |
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्या. गारखेडा परिसरातील गजानननगर व इंदिरानगर भागात या घटना घडल्या. मंगळवारी सकाळी हे प्रकार उघडकीस आले असून कृष्णा सोमनाथ भारती (वय ३५, रा. गजानन नगर, गारखेडा ) व किशोर आकाश गिरधारी (वय ३०, रा. इंदिरानगर ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. |
मुंबई महापालिकेच्या जकात विभागाची बोगस वेबसाईट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई - मुंबई महापालिकेच्या जकात विभागाची बोगस वेबसाईट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असलेली बोगस वेबसाईट बनवण्यात आली असून यामध्यमातून नोंदणी करत बोगस पावत्या दिल्या जात आहे. त्यामुळे या प्रकारणाची चौकशी आयआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्तत आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले आहेत. त्यामुळे आजवर बोगस पावत्यांद्वारे महापालिकेची तिजोरी लुटणा-या जकात माफीयांनी संगणकीय प्रणालीमध्येही घुसखोरी करत जकातची ई-चोरी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकेचे एमसीजीएमओऑट्रॉय डॉट कॉम यानावाची वेबसाईट आहे. सप्टेंबर २०११मध्ये याची नोंदणी करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात एमसीजीएमऑट्रॉय डॉट इन यानावाची बनावट वेबसाईट कार्यान्वित असल्याचे उघड झाले आहे. या बोगस वेबसाईटची नोंदणी १५ जानेवारी २०१५ रोजी राकेश बापट यांच्या नावे करण्यात आली असून ते नालासोपारा पूर्व भागात राहणारे असल्याचेही तपासणी आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यामुळे महापालिकेच्या वेबसाईटशी साधर्म्य असणा-या बोगस वेबसाईटची नोंदणी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (एनआयएसआय)यांच्याकडे केली होती, याचा शोध घेण्याची सूचनाही एनआयएसआयकडे केली असल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. जकात कर्त्यांच्या संगणीकरणाचे ३९. १७ कोटींचे कंत्राट विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ऑगस्ट २०११मध्ये पाच वर्षाकरता दिली होती. बनावट जकात पावत्यांद्वारे होणा-या जकातचोरीस आळा घालण्यासाठी आणि आयातदार व मुंबई महापालिका यांची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विदर्भ इन्फोटेकच्या माध्यमातून या जकात पावत्या देण्यासाठी यांना हे काम देण्यात आले होते. परंतु बोगस वेबसाईटवर फक्त जकात पावत्यांबाबतच्या पडताळणीची प्रणाली कार्यान्वित असून बनावट पावत्यावरून आयातदारांना त्या पावत्या अधिकृत वाटाव्यात यासाठी या संकेतस्थळाचा वापर केला जात आहे. बोगस वेबसाईटवर महापालिकेच्या बोधचिन्हाचा वापर आणि महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्धिक संपदा कायदा (इंटरलॅक्चुअल प्रॉपर्टी कायदा) याचे उल्लंघन केल्यामुळे याबाबत सायबर गुन्हे विभागाकडे प्राथमिक गुन्हा दाखल (एफआयआर) करण्यात येत असल्याचेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले. |
घर >> ब्लॉग >> पालक >> आईचे पहिले दूध बाळासाठी सर्वोत्तम का आहे? अभिनंदन, तुम्ही आई झाला आहात की लवकरच होणार आहात. तुमच्या बाळासाठी आईचे दूध किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात, जे बाळाला व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. आईचे दूध हे पोषणाचा उत्तम स्रोत आहे. आईच्या दुधातील अनेक घटक बाळाला संसर्ग आणि आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. आईच्या दुधातील प्रथिने गाईच्या दुधापेक्षा अधिक सहज पचतात. कॅल्शियम आणि लोह देखील आईच्या दुधात अधिक सहजपणे शोषले जातात. स्तनपानामुळे बाळामध्ये दमा किंवा ऍलर्जी होण्याचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, श्वासोच्छवासाचे आणि आतड्यांसंबंधी संक्रमण ज्यांना असते त्या लहान मुलांना रेडी-टू-ईट फूड खाण्यास दिले जाते त्यापेक्षा. स्तनपानाचे फायदे अनंत आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आईचं पहिलं घट्ट, पिवळे दूध अतिउत्तम आहे. त्याचे फायदे सविस्तर जाणून घ्या. नवजात मुलाने पुरेसे दूध प्यायले आहे की नाही कसे जाणून घ्यावे? आईचे दूध तुमच्या बाळासाठी फायदेशीर का आहे? जन्मानंतरच्या पहिल्या दिवसांत, कोलोस्ट्रम नावाचा जड आणि पिवळसर द्रव स्तनांमध्ये तयार होतो. हे उच्च प्रथिने, कमी साखर आणि उपयुक्त संयुगे भरलेले आहे. कोलोस्ट्रम हे आदर्श पहिले दूध आहे आणि नवजात मुलाची अपरिपक्व पचनसंस्था विकसित करण्यास मदत करते. आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात जे तुमच्या बाळाला व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. हे विशेषतः कोलोस्ट्रमसाठी खरे आहे. कोलोस्ट्रम उच्च प्रमाणात इम्युनोग्लोबुलिन तसेच काही इतर प्रतिपिंड (एंटीबॉडी)प्रदान करते. जेव्हा आईला व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा सामना करावा लागतो तेव्हा ती अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते. हे अँटीबॉडी नंतर आईच्या दुधात स्रवले जातात आणि आहार देताना बाळाला जातात. आईजीए हा रोग टाळण्यासाठी बाळाच्या नाक, घसा आणि पचनसंस्थेमध्ये संरक्षणात्मक थर तयार करतो. कोलोस्ट्रम हे तुमच्या बाळाचे पहिले लसीकरण मानले जाते कारण त्यात सेक्रेटरी इम्युनोग्लोबुलिन नावाचे प्रतिपिंड (एंटीबॉडी)मोठ्या प्रमाणात असते. आईचे दूध कोलोस्ट्रमपासून परिपक्व दुधात बदलत असताना, रोगप्रतिकारक घटक आणि प्रतिपिंडांची एकाग्रता कमी होते, परंतु आईच्या दुधाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. फक्त बाळालाच नाही तर आईसुद्धा अनेक वर्षे आपल्या बाळाला स्तनपान करते. १) बाळासाठी स्तनपान किती फायदेशीर आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही नक्कीच ते पूर्ण कराल. थोडक्यात सांगायचे तर आईचे दूध बाळासाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे. पण काय? कदाचित याबद्दल तपशीलवार माहितीचा अभाव आहे. हे जाणून घ्या आणि जन्मापासून किमान सहा महिने बाळाला फक्त स्वतःचे दूध पाजावे. २) तुमच्या बाळाला किमान वर्षभर स्तनपान दिल्यास न्यूमोनिया, सर्दी, फ्लू आणि इतर विषाणू होण्याची शक्यता कमी होते. ते बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी आईचे दूध खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला तुमचे मूल निरोगी हवे असेल तर त्याला आईचे दूध पाजावे. ३) बाळाला स्तनपान केल्याने मधुमेह, सेलिआक रोग आणि क्रोहन रोग यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ४) स्तनपान अचानकपणे अर्भक मृत्यूचा धोका निम्म्याने कमी करतो. ५) स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमचे बाळ लठ्ठपणाचा शिकार होणार नाही. ६) बाळाला स्तनपान दिल्यास त्याच्यातील कर्करोगाचा धोका कमी होईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला प्रीमेनोपॉझल स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग आणि एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका कमी असेल. ७) संशोधनात असे दिसून आले आहे की आईच्या दुधात फायदेशीर गुणधर्म आहेत जे तुमच्या बाळाला विशिष्ट संक्रमण आणि ऍलर्जींपासून वाचवू शकतात. किंवा त्याऐवजी, आईचे दूध काही लसींपेक्षा चांगले आहे. ८) अभ्यासात असेही दिसून आले आहे की ज्या बाळांना जास्त काळ स्तनपान दिले जाते त्यांची बुद्धी फॉर्म्युला पाजलेल्या बाळांपेक्षा जास्त असते. आईच्या दुधामुळेही बाळाची संज्ञानात्मक क्षमता विकसित होण्यास मदत होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ९) स्तनपान अतिरिक्त कॅलरी वापरते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान वजन लवकर कमी होण्यास मदत होते. ते ऑक्सिटोसिन संप्रेरक सोडते, जे तुमच्या गर्भाशयाला त्याच्या पूर्व-गर्भधारणेच्या आकारात परत येण्यास मदत करते आणि जन्मानंतर गर्भाशयाच्या रक्तस्त्राव कमी करू शकते. स्तनपानामुळे तुमचा स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो. हे ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील कमी करू शकते. |
मुंबई : मनसेचे पुणे शहर अध्यक्ष राहिलेले वसंत मोरे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यानंतर वसंत मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत असताना आज त्यांनी राज ठाकरेंशी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चर्चा केल्यानंतर मोरे शिवतिर्थाबाहेर पडले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी बोलताना स्मितहास्य करत मी समाधानी असल्याचे म्हणाले. राज ठाकरेंसोबतची भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे, असे वसंत मोरे म्हणाले. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आज शीवतीर्थावर राज ठाकरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांना बोलावले होते. ही भेट आणि चर्चा संपली असून मी समाधानी असल्याचे दिसत आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचे मोरे म्हणाले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे याच सभेत मिळतील, असे राज ठाकरे म्हटल्याचे मोरेंनी सांगितले. मी मनसेचा कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी मनसेतच राहणार, सगळ्या ऑफर्स संपल्या. मी माझ्या साहेबांसोबत, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, असेही मोरे म्हणाले. |
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत सातत्याने चकमकी घडताना दिसत आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकदुसऱ्यांच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. काही ठिकाणी तर थेट दोन गट समोरासमोर येतात आणि धक्का-बुक्कीपर्यंत घटना घडतात. मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या भूमिकेमुळे तो वाद तिथेच संपतो. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परस्परविरोधी लढा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. मात्र तब्बल नऊ महिन्यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. या सर्व घडामोडींवेळी आज जळगावात एक अनपेक्षित घटना घडली. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात एक अतिशय अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला. त्यामुळे घटनास्थळी नवा संघर्ष होण्याची शक्यता होती. परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सत्तारांचा ताफा पुढे निघाला. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न झाला. धरणगावात ठाकरे गट शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक झाला. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली पाहून पोलीस सतर्क झाले. ठाकरे गटाचे कार्यकर्ते कृषीमंत्र्यांचा ताफा अडवत असल्याचे पाहून पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले. . यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा पाहून रिकामे खोके तसेच कापूस फेकत निषेध व्यक्त केला. 'पन्नास खोके', 'एकदम ओके', 'कृषिमंत्र्यांचा निषेध असो', 'शिंदे सरकारचा निषेध असो', अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी नुकसानीची पाहणी केली. शेत शिवारात मका पिकाचं झालेले नुकसान पाहून सत्तार यांनी कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी शेतकऱ्यांशी कोणताही संवाद साधला नाही. शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. यावेळी कृषिमंत्र्यांनी कापूस प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळले. |
शिमला - भारतीय जनता पार्टीच्या हिमाचल प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा राशिम धर सूद यांनी दिलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा शिमला येथील बंगला पाडला जाउ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या धमकीचे पडसाद उमटले आहेत. मात्र भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी राशिम यांच्या विधानांशी असहमती दर्शवत हा वाद थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राशिम यांनी एक व्हिडिओ जारी करून ही धमकी दिली आहे. त्यात त्यांनी मुंबईत अभिनेत्री कंगना राणावतचे कार्यालय पाडल्याच्या कृतीवरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. गरज पडली तर कॉंग्रेसच्या मुलीने (प्रियांका) शिमल्यात जे घर बनवले आहे, तेही आम्ही पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे. हिमाचालचे मुख्यमंत्री ठाकुर यांनी कंगना हिमाचल प्रदेशची कन्या असल्याचे म्हणत तिचे समर्थन केले होते. त्या अनुशंगाने प्रियांका यांना कॉंग्रेसची कन्या असे संबोधण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत बोलताना ठाकुर म्हणाले की कंगनाला ज्या प्रकारे मुंबईत लक्ष्य करण्यात आले ते आम्हाला मान्य नाही. मात्र आता जे प्रियांका यांच्या संदर्भात वक्तव्य केले गेले आहे, त्याच्याशीही आम्ही सहमत नाही. |
हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल ४ दशकांपासून काम करत असलेले ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना आपल्या निगेटिव्ह रोलसाठी ओळखले जातात. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, आजही बॉलिवूडमध्ये त्यांची खास ओळख बनू शकलेली नाही. दुसरीकडे शरत यांचे समकालीन अभिनेते अमिताभ बच्चन आज बॉलिवूडचे महानायक आहेत. आपली ओळख आणि काम न मिळण्याच्या समस्येवर शरत यांनी एका मुलाखतीत मोकळेपणाने चर्चा केली आहे. "जितक्या वाईट गोष्टी असतात, त्या आमच्यामध्ये वाटल्या जातात. अधिकतर वेळ आम्ही त्यांना नकार देतो. त्यावेळी माझ्यासारख्या लोकांचे काम जवळपास शून्य होते," असेही ते म्हणाले. (Actor Sharat Saxena Says Good Roles For Older People Goes To Amitabh Bachchan) शरत सक्सेना नुकतेच प्रदर्शित झालेल्या शेरनीमध्ये झळकले होते. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत होत्या. शरत यांनी पोचरची भूमिका साकारली होती. चित्रपटाला क्रिटिक्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. |
बजेटच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन आणि पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजकांशी बैठकांचा धडाका सुरु आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेने जोरदार कमबॅक केला होता. अर्थचक्राला मिळालेली बळकटी आणि कर महसुलात झालेली वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे. मात्र अजूनही देशातील करोना संकट दूर झालेलं नाही. त्यामुळे आरोग्य क्षेत्राला बूस्टर डोस देण्यासाठी आणि त्यातील पायाभूत सेवा सुविधा सुधारण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा सढळ हाताने मोठी तरतूद कारवाई लागेल. - मागील काही वर्षात अर्थसंकल्पाबाबत मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. ज्यात सर्वात प्रथम सरकारने बजेट सादर करण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली तारीख बदलली. तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्याची प्रथा सुरु केली. - बजेट संसदेत सादर करण्याची तारीख बदलण्यात आली असली तरी त्याची वेळ मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतात. - वर्ष २०२१ पासून आणखी एक बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ई-अर्थसंकल्प अर्थात टॅबलेट स्वरुपात आणला होता. त्याशिवाय खासदारांना देखील बजेटची ई काॅपी देऊन छपाईच्या खर्चात बचत केली होती. - वर्ष २०२० मध्ये केंद्र सरकारने अर्थसंकल्प दस्ताचे नाव वही-खाते नाव दिले होते. तसेच पूर्वी ज्यापद्धतीने ब्रिफकेसमध्ये बजेट आणले जात होते ती पद्धत बदलून त्याऐवजी लाल कपड्यात लपेटून अर्थसंकल्पाचा दस्त आणण्यात आला होता. अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज. |
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा. आत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मनःशांती ढळलेली राहील. फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला नक्कीच अधिकार मिळेल. परदेशातील तुमचे हितसंबंध उपयोगी पडतील आणि त्या संबंधातूनच तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न आणि तुम्हाला अपेक्षित असलेली सत्ता मिळू शकेल. तुमची गती कायम ठेवा, क्षमतांवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळेच स्थान प्राप्त होणार आहे. कुटुंबातील वातावरण तुम्हाला सहकार्य देणारे ठरेल. दूरचे प्रवास केल्यास त्यातून लाभ होऊ शकेल. तुम्ही धार्मिक कार्यात स्वारस्य घ्याल आणि दानधर्म कराल. नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या नंदना सेन ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दुःख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा. अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील. तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल. |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केंद्र सरकार आणि एनसीबीवर जोरदार शब्दात हल्ला चढवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पळून जाण्यास कोणी मदत केली याचे उत्तर भाजपने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. एनसीबीतल्या वसुली गँगचा पर्दाफाश होत असून समीर वानखेडे यांची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल असेही ते म्हणाले. ईडीची कारवाई राजकीय सुडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी करण्यात आली, असे नवाब मलिक म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले ती व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला सामोरे गेली त्यांना अटक झाली. एक दिवस सत्य बाहेर येईल. मात्र परमबीर सिंह कुठे आहेत याचे उत्तर केंद्राने द्यावे. लुकआऊट नोटीस असताना कोणतीही व्यक्ती देश सोडून कशी बाहेर जाऊ शकते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यांत भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे, का अशी विचारणा त्यांनी केली. अमली पदार्थांच्या व्यवसायात भाजपचे नेते व भाजपशी संबंधित लोकांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मनीष भानुशाली, के. पी. गोसावी, रवींद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्वांना अटक करावी आणि आर्थिक गुन्हे शाखा, व क्राइम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली. जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनर भरून 51 टन अफूचे बीज पंधरा दिवसांपासून पडून आहे. या तीन कंटेनरवर एनडीपीसी कायद्याअंतर्गत कारवाई का होत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. समीर वानखेडे यांचे 50 ते 70 हजार रुपयांचे शर्ट असते. दोन लाख रुपयांचा पट्टा, एक लाख रुपये किंमतीची पँट, अडीच लाख रुपयांचे बूट, घडय़ाळ 20 ते 50 लाख रुपयांचे असते. वानखेडे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी दहा कोटींचे कपडे घालू शकतो का, असा प्रश्न केला. वानखेडे यांनी महागडे कपडे घालण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकल्याचा टोला नवाब मलिक यांनी मारला. |
म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडवर फटाक्याचे स्टॉल उभारण्यास परवानगी न देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला बुधवारी सर्वसाधारण सभेत विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. म. टा. प्रतिनिधी, पुणे म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडवर फटाक्याचे स्टॉल उभारण्यास परवानगी न देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला बुधवारी सर्वसाधारण सभेत विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. या रोडवर असलेल्या हॉटेल तसेच मंगल कार्यालयांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते, त्यावेळी कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही, मग फटाका स्टॉल्सला बंदी कशाला, असा प्रश्न उपस्थित करून स्टॉलसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सभासदांनी केली. डीपीरोडवर गेल्या पंधरा वर्षांपासून फटाका स्टॉल्स उभारण्यासाठी महापालिका प्रशासन परवानगी देत आहे. या भागात फटाका स्टॉल्समुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केल्याने यंदाच्या वर्षीपासून येथे फटाका स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. डीपीरोडवरील स्टॉल्स वडगावशेरी येथील एका खासगी जागेत उभारले जाणार आहेत. डीपीरोडवरील जागा नागरिकांच्या तसेच व्यावसायिकांच्या सोयीची असल्याने येथे स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी घेतली. या रोडवर स्टॉल्स उभारण्यास परवानगी देणार नाही, असा निर्णय प्रशासनाने पक्षनेत्यांना कल्पना न घेता घेण्यात आल्याचा आरोप आबा बागूल यांनी केला. नागरिकांसाठी ही जागा सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले. या रोडच्या दोन्ही बाजूला हॉटेल आणि मंगल कार्यालये आहेत, त्यामुळे गर्दी होते. हॉटेलसमोर बेकायदा पद्धतीने पार्किंग होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, केवळ फटाका विक्रेत्यांवर गर्दीचे खापर का फोडले जाते, असा प्रश्न नगरसेवक दीपक मानकर यांनी उपस्थित केला. डीपी रोडवर फटाके स्टॉलला परवानगी देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवावा. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. |
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । मुंबई येथे नुकताच ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भर दुपारी हा सोहळा पार पडला. मात्र दुर्दैवाने या ठिकणी उपस्थितीत ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? |
जागतिक दर्जाच्या संस्थांची वैशिष्ट्ये पली संस्था जागतिक दर्जाची व्हावी अशी प्रत्येक संस्था चालकाची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी आपापल्या परीनं त्याचे प्रयत्नही सुरू असतात. पण जागतिक दर्जा म्हणजे नेमकं काय, हे नेमकं उमजल्याखेरीज त्यादृष्टीनं वेगवान प्रयत्न करता येणार नाहीत. म्हणून प्रस्तुत लेखात जागतिक दर्जाच्या संस्थेच काही लक्षणं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेच्या उत्तमत्वाचे तीन पैलू असतात. १. नफा २. विकास किंवा वाढ ३. मानव विकास यापैकी नफा आणि वाढ यांच्याबद्दल माहिती संस्थेच्या ताळेबंदावर नजर टाकली असता समजते. मात्र, मानव विकासासंबंधी संस्थेची कामगिरी कशी आहे, याची पडताळणी करणं गुंतागुंतीचं आहे. याकरिता पुढील संकल्पना समजून घ्याव्या लागतात. १. संस्थेची शिक्षण क्षमता. २. स्वतःतच बदल घडवून आणण्याची क्षमता. वरील दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्नच आहेत. विवेक मेहेने जागतिक दर्जाच्या संस्थांची वैशिष्ट्ये / २३१ चांगले निर्णय |
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत हा सामना चांगलाच रंगला आहे. येणाऱ्या काळात हा कलगीतुरा आणखीन रंगण्याची चिन्हे आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचे जाहीर केेले आहे. पाटील यांच्या विरोधात संजय राऊत मानहानीचा दावा दाखल करणार आहेत आणि तो देखील तब्बल सव्वा रूपयाचा! संजय राऊत यांच्या या सव्यापसव्याची (नसत्या उठाठेवीची) आता चर्चा सुरू झाली आहे. काय आहे प्रकरण? मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. 'तोंडास फेस कोणाच्या' या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहीला होता. या टीकेला उत्तर देणारा लेख चंद्रकांत पाटील यांनी आज म्हणजेच बुधवार, २१ सप्टेंबर रोजी लिहीला आहे. सामनाच्या संपादकीय पानावर तो छापून आला आहे. या लेखातून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे. हे ही वाचाः या लेखात राऊत यांच्या पत्नीवर झालेल्या पीएमसी घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ पाटील यांनी दिला आहे. पाटलांचा हा वार शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना चागलाच जिव्हारी लागला आहे. यावरूनच संजय राऊत यांनी येत्या चार दिवसांत चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवून सव्वा रूपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. |
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" मुंबई : मनोरंजन : ऑक्सिजन : तरुणाईच्या कष्टानं उजळल्या बारवा, सोशल मीडियातून होतेय मोहिमेची 'वाह वा' महाराष्ट्र : महाराष्ट्र : राजकारण : "११ लोकांचा मृत्यू झाला तरीही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम" क्राइम : Nanded Attack on Police: होता जिवा म्हणून. . . पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला बॉडीगार्डनं स्वतःच्या पाठीवर घेतला, रक्तबंबाळ झाला! कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र : कल्याण डोंबिवली : CoronaVirus in Kalyan-Dombivali : मोकाट फिरणारे कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेटवर पोलिसांची राहणार नजर! |
- राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चवथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली. - पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे. नवी दिल्ली : राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चवथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. १. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते ,आज ७ ते ८ आठवड्यानी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. आणी कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. २. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. ३. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे. ५. आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारांटाईण करायचे आहे. ६. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. ७. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. " दो गज दूरी" हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूळ काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. ९. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे. १०. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषतः रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ११. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा. १३. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा. १५. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज. १७. कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच. १८. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा. १९. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे. २०. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल. २१. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता. |
केत्तूर (अभय माने) होळी सणानंतर खऱ्या अर्थाने वेध लागते ते गुढीपाडवा सणाचे मराठी नववर्ष दिनाचे अर्थात गुढीपाडव्याचे. गुढीपाडव्याला यावर्षी साखरगाठ्यांचे दर मात्र स्थिर असल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. साखरगाठीचे दर गतवर्षी होते तेवढेच म्हणजे 80 रुपये किलो असे आहेत. साखरेच्या दरात वाढ न झाल्याने साखरगाठ्यांचे दर स्थिर राहिले आहेत. इतर इतर सर्व ठिकाणी महागाई वाढत असताना साखरगाठी मात्र महागल्या नाहीत. परिसरात किराणा दुकानात गुजरातहून साखरगाठी येतात स्थानिक साखरगाठी मात्र 100 रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. |
सनातन धर्मात उपासना आणि मंत्रजपाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीपासून ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक विशेष मंत्र सांगण्यात आला आहे. इतकेच नाही तर व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्राचा जप शुभ मानला जातो. तुम्हालाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवायचे असेल तर या मंत्रांचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप खूप प्रभावी मानला जातो. महामृत्युंजयाच्या मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व भीती दूर होते. या मंत्राचा जप केल्याने मन शक्तिशाली होते. या मंत्राचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी येते. सकाळी उठल्यावर आणि स्नान केल्यानंतर या मंत्राचा नियमित जप करावा. या मंत्राचा जप केल्याने घरात सकारात्मकता येते आणि व्यक्तीच्या मनातील भीती दूर जाते. |
या यात्रेमुळे मागील २ दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे) सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन दिवसात तीन लाखांपेक्षाही जास्त भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे) कालपासूनच खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे) आज (सोमवार) पहाटे सहा वाजता गडावरुन पालखी निघून 'कऱ्हा' नदीतीरी दाखल झाली. या भागात कऱ्हेला गंगेइतकंच पवित्र स्थान आहे. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे) जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रच लोकदैवत आहे. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्येची यात्रा. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे) |
अजित सिंगांचा सरकारी निवासस्थानाचा मोह सुटेना! लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतरही माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचा सरकारी बंगल्याचा मोह सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतरही माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचा सरकारी बंगल्याचा मोह सुटलेला नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने निवासस्थान खाली करण्याची नोटीस वारंवार धाडूनही अजित सिंह या बंगल्यात ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे या निवासस्थानी आपले पिता माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणी अजित सिंह यांनी सरकारकडे केली आहे. अजित सिंह कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना सरकारी बंगला सोडणे आवश्यक आहे, परंतु बंगला सोडण्यास कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे कारण अजित सिंह यांनी पुढे केले आहे. हा बंगला खाली करवून घेण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अजित सिंह यांच्या समर्थकांनी हल्ला चढवला होता. १२ तुघलक रस्त्यावरील बंगला माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे निवासस्थान होते. त्याच निवासस्थानात अजित सिंह खासदार व मंत्री असताना राहात होते. यंदा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे बंगला सोडण्याची नोटीस सरकारने बजावली, पण अजित सिंह यांना येनकेनप्रकारे हे निवासस्थान स्वतःच्या ताब्यात ठेवायचे आहे. साबांविने या बंगल्यातील पाणी व वीजपुरवठा खंडित केल्यानंतर अजित सिंह यांनी समर्थकांमार्फत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. अखेरीस पर्याय नसल्याने पित्याच्या पुण्याईवर अजित सिंह यांनी हा बंगला देण्याची विनंती सरकारला केली आहे. चौधरी चरणसिंह हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांनी शेतकरी चळवळीची मुहूर्तमेढ उत्तर भारतात रोवली. १२ तुघलक रस्त्यावरील निवासस्थानावरून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे हे निवासस्थान त्यांचे स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे, अशी विनंती अजित सिंह यांनी केंद्रीय शहरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी पत्राद्वारे केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवासी बंगल्यांचे स्मारकात रूपांतर करण्यास सन २००० मध्ये बंदी घातली होती. त्याचा दाखला देत नायडू यांनी अजित सिंह यांची विनंती धुडकावून लावली आहे. त्या विरोधात संतप्त झालेल्या अजित सिंह यांच्या समर्थकांनी दिल्लीच्या विविध भागांत प्रदर्शने सुरू केली आहे. गाझियाबादमध्ये अजित सिंह समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व हरयाणाचे मुख्यमंत्री भूपेंदरसिंह हूडा यांनी अजित सिंह यांची मागणी योग्य ठरवली आहे. अजितसिंह यांची सरकारी बंगल्यातून हकालपट्टी करण्याचा निर्णय नियमानुसार घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करून या निर्णयाचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जोरदार समर्थन केले. राष्ट्रीय लोकदल आणि काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी शासकीय बंगल्याचे रूपांतर स्मृतिसदनात का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. अजितसिंह यांना बाहेर काढण्यामागे राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले. दिल्लीला होणारा पाणीपुरवठा तोडण्याचा प्रयत्न केला असता आरएलडीच्या कार्यकर्त्यांची गाझियाबाद येथे पोलिसांशी चकमक उडाली होती. अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले आहे. आपण नियम आणि प्रचलित पद्धतीनुसार काम करतो आणि ते नियम आमचे सरकार येण्यापूर्वीचे आहेत. यामागे सुडाचे राजकारण नाही., असे ते म्हणाले. |
मुंबईः सुशांतसिंग राजपूत सिंग प्रकरणी रिया चक्रवर्ती हिला सुरक्षा पुरविल्याबाबत मुंबई पोलिसांवर तिला 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सीबीआयच्या लेखी विनंती पत्रानुसारच तिला ही सुरक्षा पुरविल्याचे स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सांताक्रूझ पूर्वच्या वाकोला परिसरात डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये रियाची चौकशी केली जात आहे. सांताक्रूझ पोलिसांच्या हद्दीत रिया कुटुंबासह राहते. शुक्रवारी काही प्रसारमाध्यमानी तिला धक्काबुक्की केली. तसेच तिच्यावर सुशांतच्या फॅन्सचाही राग आहेच. त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबियांना यामुळे धोका आहे. शनिवारी रिया डीआरडीओ कार्यालयात जाताना तिला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. त्यावरून पुन्हा मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करत आरोपीला 'रेड कार्पेट' सुरक्षा पुरविली जात असल्याचे म्हटले जात होते. याबाबत 'लोकमत' ने परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांना संपर्क केला. तेव्हा सीबीआयने रियाला सुरक्षा पुरविण्याबाबत लेखी विनंती केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लिंचिंग झाल्यास जबाबदार कोण? 'आमचा तपासाशी संबंध नाही, पण कायदा सुव्यवस्था राखणे ही आमची जबाबदारी आहे. रियाची लिंचिंग झाली आणि त्यात तिच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तरी त्याचा दोष मुंबई पोलिसांवर येणार,मात्र रियाला सुरक्षा पुरविण्याबाबत सीबीआयने आम्हाला लेखी पत्र दिले आहे आणि त्यानुसार आम्ही त्याचे पालन करत आहोत. |
पोलिस उपायुक्त (स्पेशल सेल) आलोक कुमार यांनी सांगितले की, फरार आरोपी नीरज शनिवार आणि रविवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान कुतुबमिनार मेट्रो स्टेशनजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, घटनास्थळाजवळ सापळा रचण्यात आला होता. नवी दिल्ली : लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या एका सदस्याला रविवारी पहाटे दिल्लीतील कुतुबमिनार मेट्रो (Qutub Minar Metro in Delhi) स्टेशनजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अटक करण्यात आली (He was arrested in an encounter with the police). अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी नीरज उर्फ कटिया (Accused Neeraj alias Katia) (३०) हा हरियाणातील झज्जर (Jhajjar in Haryana) जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिस उपायुक्त (स्पेशल सेल) आलोक कुमार यांनी सांगितले की, फरार आरोपी नीरज शनिवार आणि रविवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान कुतुबमिनार मेट्रो स्टेशनजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, घटनास्थळाजवळ सापळा रचण्यात आला होता आणि तीनचाकी वाहनातून बाहेर पडताच ऑटोरिक्षामध्ये आलेल्या आरोपीला घेरण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजचा दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, हल्ला, धमकावणे आणि चोरी यासह २५ हून अधिक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. |
women employment exchange in aurangabad । महिलांसाठी पहिले एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज - Divya Marathi\nWomen Employment Exchange In Aurangabad\nमहिलांसाठी पहिले एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज\nऔरंगाबाद - जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत महिलांसाठी स्वतंत्र रोजगार केंद्राची स्थापना नुकतीच करण्यात आली. याद्वारे महिलांना सहज आणि अत्यंत सोप्या पद्धतीने लवकरात लवकर रोजगार उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीचे, केवळ महिलांसाठी असलेले हे औरंगाबादेतील पहिले केंद्र आहे.\nसंस्थेच्या अध्यक्ष प्रा. भारती भांडेकर यांनी या केंद्र स्थानपेमागील भूमिका तसेच कार्यपद्धती सांगितली. त्या म्हणाल्या की, अनेकदा रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जाते. म्हणून पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरविण्याच्या हेतूने संस्थेने हे केंद्र सुरू केले आहे.\nसंत एकनाथ नाट्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या या केंद्रात 100 रुपये या नाममात्र शुल्कावर कुठल्याही क्षेत्रातील महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी साधारणतः2ते3महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 12 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या या केंद्रामध्ये आतापर्यंत 15 रोजगार इच्छुक महिला आणि मुलींनी अर्ज केले आहेत. नाव नोंदणीसाठी महिलांना शिक्षणविषयक सर्व आवश्यक कागदपत्रे, पत्ता, कुटुंबाची माहिती संस्थेकडे द्यावी लागणार आहे.\nयामार्फत रोजगारातील महिलांना पूर्णपणे वेगळी सेवा पुरवण्याचा संस्थेचा मानस आहे. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी6वाजेदरम्यान येथे नावनोंदणी सुरू राहणार आहे. विशेषतः शहरानजिकच्या औद्योगिक वसाहती, वैद्यकीय सेवा, मॉल, हॉटेल्स, दुकाने तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये महिलांना नोकरी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होईल. महिलांसाठीच्या रोजगार केंद्रांची संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रा. हेमलता लखमल, सविता कुलकर्णी, प्रा. विद्या पाटील, अॅड. अंजली कुलकर्णी, डॉ. अर्चना वैद्य तसेच मंगला पाथ्रीकर कार्यरत आहेत.\nसाड्यांपासून पायपोस - जुन्या साड्यांपासून पायपुसणे व बस्कर बनवून देण्यात येणार आहेत. टाकाऊपासून टिकाऊ तयार करणे हा उद्देश आहे. यासाठी इच्छुकांनी जुन्या साड्या आणून द्याव्यात." - भारती भांडेकर, संस्थेच्या अध्यक्षा\nउत्पादनांना मिळाली बाजारपेठ - बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या कार्यालयातच बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 50 बचत गटांनी यासाठी नोंदणी केली आहे. बचत गटांच्या महिलांनाही यातून रोजगार प्राप्त होईल. |
मुलींना चॉकलेट खुप प्रिय असते. ख्रिसमसला चॉकलेट एक उत्तम गिफ्ट असू शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब नेहमीच उत्तम पर्याय आहे. मुलींना जास्त करुन कानातले आवडतात. म्हणून तुम्ही १०० रु. पर्यंतचे सुंदर गिफ्ट भेट म्हणून देउ शकता. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या गर्लफ्रेडला हे गिफ्ट म्हणून देउ शकता. मार्कोटला जातांना उपयोगी पडणारी बॅग तुम्ही गर्लफ्रेडला गिफ्ट म्हणून देउ शकता. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील मुकेश अंबानी Scare प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणात सचिन वाझे यांचे पूर्ण प्लॅनिंग असल्याचे सांगितले जात आहे. इंग्रजी वर्तमानपत्र HT च्या वृत्तानुसार एनआयएने म्हंटले आहे की पोलीस अधिकारी म्हणून आपली क्षमता दर्शविण्यासाठी आणि त्यांची गमावलेली इज्जत परत मिळवण्यासाठी सचिन वाझे यांनी हा संपूर्ण कट रचला आणि स्वतः गूढतेचे निराकारणही केले. लाईम लाईटसाठी सचिन वाझे यांनी हे सर्व केले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत ही संपूर्ण कहाणी सांगितली असून एजन्सीला त्यांच्या या गोष्टीवर विश्वास नाही. एनआयए या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहे आणि त्यानंतरच हा निष्कर्ष निघेल. सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात असून सोमवारी या एजन्सीने ते तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. सचिन एनआयएला जबाब द्यायला आले होते तेव्हासुद्धा त्यांनी त्यांचा फोन घरीच ठेवला होता. अहवालानुसार, तपास एजन्सीने म्हंटले आहे की सचिन वाझे यांनी आपली हरवलेली विश्वासाहार्यता परत मिळविण्यासाठी या संपूर्ण घटनेची आखणी केली होती. षडयंत्राचा भाग म्हणून त्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी अँटिलीयाच्या बाहेर उभी केली आणि त्यानंतर स्वतः या समस्येला सोडविले. ते मुंबई पोलिसांच्या नजरेत हिरो बनण्याचा प्रयत्न करीत होते. क्राईम ब्रांचचे क्राईम इंटेलिजेंट युनिटचे माजी प्रमुख सचिन वाझे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची चौकशी करत होते. २५ फेब्रुवारीला अँटिलीयाच्या बाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. ८ मार्च रोजी हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणात १३ मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. एनआयए या प्रकरणात सातत्याने चौकशी करत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाकडे परवानगी मागितली. मंजुरी मिळाल्यानंतर एनआयए टीमने मुंबई गाठली आणि या प्रकरणाची चौकशी सुरु केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणेने सचिन वाझेंनी मुंबई पोलिसातील काही मोठ्या अधिकारी या प्रकरणात सामील असल्याची माहिती दिली असे सांगितले होते. आता एनआयएने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, सचिन वाझे यांनी स्वतःची विश्वासाहार्यता वाढविण्यासाठी हा संपूर्ण भाग चालविला. मात्र एनआयए सातत्याने या प्रकरणाची चौकशी करत आहे. संपूर्ण तपासणीनंतरच या प्रकरणातील प्रत्येक रहस्य समोर येईल. सचिन वाझेंना 2004 मध्ये एका कस्टोडियलच्या मृत्यूच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. गेल्या 16 वर्षांपासून त्यांना निलंबित करण्यात आले होते आणि Thackeray सरकारने जून 2020 मध्ये त्यांना पुन्हा कामावर घेतले होते. यापूर्वी सचिन वाजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. |
1 नोव्हेंबरपासून WhatsApp फक्त Android 4.1 किंवा त्यावरील आणि iOS 10 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या शिवाय अन्य ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : फेसबुकचा (Facebook) इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म (Instant Messaging Platform) असलेलं व्हॉट्सअॅप (WhatsApp)आता लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. वापरण्यासाठी सहज, सोपं आणि नवनवीन फीचर्स यामुळे जगभरात व्हॉट्सअॅप पॉप्युलर आहे. व्हॉट्सअॅपवर अनेक नवे फीचर्स येत असतात. मात्र अनेकदा हे नवीन फीचर्स चालण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील (Smartphone) ऑपरेटिंग सिस्टम सक्षम नसते. त्यामुळे अनेकदा ज्या युजर्सकडे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेले मोबाईल फोन असतील त्यांना फीचर्सचे अपडेट उशिरा मिळतात किंवा मिळतच नाहीत. आता 1 नोव्हेंबरपासून, WhatsApp फक्त Android 4.1 किंवा त्यावरील आणि iOS 10 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या शिवाय अन्य ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 नंतर अशा जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमधील व्हॉट्सअॅप बंद होऊ शकतं किंवा त्याला एक दिवस लागू शकतो. तुम्हाला आपल्या फोनमधील व्हॉट्सअॅप बंद पडू नये असं वाटत असेल, तर आपला स्मार्टफोन खाली दिलेल्या यादीत नाही याची खात्री करणं तसंच तुमच्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमचं अपडेट तपासणं आवश्यक आहे. फोनचा बॅकअपही घेऊन ठेवणं आवश्यक आहे. फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमचं Version ((Operating System Version) तपासण्याकरता आधी फोनच्या सेटिंग्जमध्ये (Settings) जा. नंतर About Phone ऑप्शनवर जा. खाली स्क्रोल करा आणि अँड्रॉइड Version (Android Version) तपासा. ती Android 4.1 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नवीन फोन घ्यावा (New Phone) लागेल. ज्यात स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम Version 4.1 किंवा त्यापेक्षा वरची असावी लागेल. तुमच्या फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम अपडेट (Update) करण्याची सोय असेल आणि आतापर्यंत फोन अपडेट केलेला नसेल तर तो अपडेट करा. त्यामुळे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं Version कळेल. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊनही हे करता येईल. हे करताना बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याची खात्री करा आणि अपडेट प्रक्रियेदरम्यान फोनचं बटण दाबू नका. iPhone फोन वापरणाऱ्यांनादेखील सेटिंगमध्ये जाऊन iOS Version शोधता येईल. यासाठी सेटिंग्जमध्ये जनरल ऑप्शनमधून सॉफ्टवेअर अपडेट (Software Update) वर जा. तिथे तुमच्या फोनमधील सध्याचं आयओएस Version कोणतं आहे ते कळेल. अपडेटची सुविधा असल्यास अपडेट करा. मात्र तुमच्या फोनमधील iOS Version iOS 10 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागेल. या स्मार्टफोन्समधील व्हॉट्सअॅप होईल बंद - 1 नोव्हेंबरपासून ज्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्याची यादी बरीच मोठी आहे. या यादीत जवळपास 150 स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये iPhone तसंच Samsung, LG, ZTE, Micromax सह अनेक कंपन्यांच्या Android Smartphone चा समावेश आहे. 2014 मध्ये हे फोन दाखल झाले आहेत. कंपनीने भविष्यकाळाचा विचार करून, पुढील 7 वर्षांसाठीची योजना आखली आहे. ज्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे, त्याच ऑपरेटिंग सिस्टमवर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. जुने स्मार्टफोन आगामी काळातील व्हॉट्सअॅप फीचर्ससाठी अनकूल ठरणार नाहीत. यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीला धोकाही वाढेल. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या सर्वोत्तम अनुभवासाठी सुसंगत आणि नवीन अद्यावत ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोन असणं गरजेचं आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याच्या फोन्सच्या मॉडेलची यादी - Apple मॉडेल्स : iPhone SE, iPhone 6S, iPhone 6S Plus Samsung मॉडेल : Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core आणि Galaxy Ace 2. LG मॉडेल्स : ल्युसिड 2, ऑप्टिमस F7, ऑप्टिमस F5, Optimus L3 II Dual, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6 Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD आणि 4X HD, Optimus F3Q ZTE मॉडेल्स : ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987, Grand Memo Huwai मॉडेल्स : Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, Ascend D2 Sony मॉडेल्स : Xperia Miro, Sony Xperia Neo L, Xperia Arc S याशिवाय Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Lenovo A820 अशा फोन्समधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट; तुम्हाला माहिती आहे का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या यादीत तुमचा फोन नसेल तरीही, तुम्ही व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेणं (Backup)आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअॅप बंद झालं, तर तुम्हाला बॅकअपही घेता येणार नाही. मीडिया फाइल्ससह एक्स्पोर्ट करताना तुम्ही 10,000 नवीन मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकता. तर मीडिया फाइल्सशिवाय 40,000 मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकता. ईमेलचा आकार मोठा असल्याने ही मर्यादा घालण्यात आली आहे. |
इस्माकडून २०२१-२२ या हंगामासाठीचे साखर उत्पादन अनुमान जारी - ChiniMandi\nHome Marathi Indian Sugar News in Marathi इस्माकडून २०२१-२२ या हंगामासाठीचे साखर उत्पादन अनुमान जारी\nइस्माकडून २०२१-२२ या हंगामासाठीचे साखर उत्पादन अनुमान जारी\nनवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जून २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात करण्यात आलेल्या सॅटेलाईट मॅपिंगच्या पहिल्या सर्वेक्षणाच्या आधारावर २०२१-२२ या हंगामासाठी ३१० लाख टन साखर उत्पादनाचे प्रारंभिक अनुमान जारी केले होते. हे अनुमान इथेनॉल उत्पादनासाठी ३४ लाख टन साखर संभाव्य डायव्हर्जन लक्षात ठेवून हे अनुमान जारी करण्यात आले होते. आपल्या नव्या अनुमानात इस्माने २०२१-२२ या हंगामात ३०५ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nइस्माने सांगितले की, देशभरात ऊसाच्या पिकाच्या लागवडीची उपग्रहाद्वारे दुसरी छायाचित्रे ऑक्टोबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात आली आहेत. उपग्रहांच्या छायाचित्रांच्या आधारावर २०२१-२२ या हंगामात ऊसाच्या एकूण लागवड क्षेत्र ५४.३७ लाख हेक्टर असण्याची शक्यता आहे. २०२०-२१ या हंगामातील ५२.८८ लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या तुलनेत ते ३ टक्क्यांनी अधिक आहे. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी इस्माच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उसाची घेतलेली उपग्रह छायाचित्रे, अपेक्षित उत्पादन, संबंधीत विविध पैलूंवर आधारित अहवालावर चर्चा करण्यात आली.\nउत्तर प्रदेशातील ऊसाचे क्षेत्रफळ २३.०८ लाख हेक्टर असेल असा अंदाज आहे. इस्माने उत्तर प्रदेशातील पूर्व क्षेत्रात जोरदार आणि बिगरमौसमी पावसामुळे उत्पादनात किरकोळ घसरणीची शक्तता वर्तविली आहे. उत्पादीत साखर उत्पादन, २०२१-२२ मध्ये इथेनॉल उत्पादनावर आधारित ११३.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र २०२०-२१ च्या ११.४८ लाख हेक्टर टनावरुन वाढून २०२१-२२ मध्ये १२.७८ लाख हेक्टर झाले आहे. राज्यात मान्सूनही चांगला राहिला. परिणामी राज्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. इथेनॉल डायव्हर्जनचा विचार केला नाही तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १२२.५ लाख टन होण्याची शक्यता आहे.\nकर्नाटकात गेल्या हंगामातील ऊस क्षेत्र ५.०१ लाख हेक्टरच्या तुलनेत २०२१-२२ या हंगामात ५.११ लाख हेक्टर आहे. २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन ४९.५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. उर्वरीत राज्यांत २०२१-२२ या हंगामात सामूहिक रुपाने ५३.१० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.\nसाखरेचा रस, सिरप आणि बी मोलॅसीसच्या महत्त्वपूर्ण उत्पादनाला इथेनॉल उत्पादनात बदलण्यात आले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात जवळपास ३४ लाख टनाची घट होईल. त्यामुळे उसाचा रस, बी शिरा याला इथेनॉलमध्ये रुपांतरीत होत असल्याने इस्माने २०२१-२२ मध्ये ३०५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. सुरुवातीच्या ३१० लाख टन साखर उत्पादनाच्या अनुमानापेक्षा हे उत्पादन कमी असेल. |
शिबिरे घेऊन पारधी नागरिकांना अत्यावश्यक असलेली कागदपत्रे द्य\nशिबिरे घेऊन पारधी नागरिकांना अत्यावश्यक असलेली कागदपत्रे द्या\nउस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना अद्यापही जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबाकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे नाहीत ती येत्या तीन महिन्यात शिबिरं घेऊन देण्यात यावीत, असे निर्देश राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी आज येथे दिले .\nयेथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , सोलापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे आदी उपस्थित होते .\nउस्मानाबाद जिल्ह्यात 2500 पारधी कुटुंबं आहेत . त्यापैकी काही कुटुंबाकडे अद्यापही नागरिकांची ओळख बसलेली कागदपत्रे नाहीत .यात आधार कार्ड , रेशन कार्ड , मतदार ओळख पत्र , जातीचा दाखला या अत्यावश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे ही कागदपत्रे त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून त्यात ही कागदपत्र पारधी वस्त्यातील कुटुंबाना देण्यात यावीत, असे सांगून श्री.पंडित म्हणाले,उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येत्या तीन महिन्यात शिबिरं भरून ही कागदपत्र देण्यात येतील असे सांगितले आहे . याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनीही सकारत्मक प्रतिसाद दिला आहे असेही ते म्हणाले .\nआदिवासी पाड्यावर राहत असलेल्या नागरिकांनाअद्याप मूलभूत सुविधा मिळण्यासह आणखी बऱ्याच गोष्टीची सुरुवात झालेली नाही. त्या सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी मी उस्मानाबाद आणि सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काही सुविधा आदिवासींना मिळाव्यात अशी सूचना केली आहे . आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींना काही सुविधा मिळाव्यात यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत . त्यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये २ हजार ५०० पारधी कुटुंबांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रत्यक्ष भेटीत सांगितल्याचेही श्री .पंडित म्हणाले .\nपारधी समाजातील निराधार, परितक्ता आणि विधवांना शासनाचावतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी पावले उचलली गरज आहे. त्याही बाबतीत जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे . पारधी समाजाच्या जिल्ह्यात अंगणवाडीच्या आकडेवारीवरून ६० वास्त्यां आहेत . तर आदिवासी प्रकल्प विभागाकडे ८० वास्त्यांची\nनोंद आहे . सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यात १४० पारधी वस्त्यां आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमक्या किती वस्त्या आणि किती पारधी कुटुंबं आहेत याची नेमकी माहिती नोंदविण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे मिशन आरंभ अंतर्गत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे .\nपारधी बांधव जर शासकीय जागेवर 2001पासून रहात असतील ती जागा व त्यांचे घर त्यांच्या नावे करून द्यावे जर ते रहात असलेली जागा खाजगी असेल आणि ते तेथे 2011 पासून रहात असतील तर शासन निर्णय यानुसार त्या जागेवर इतर मालकी हक्क अंतर्गत पारधी कुटुंबांच्या नावे नोंदवण्यात यावीत . अशा जागेवर पक्के घर नसेल तर शासकीय योजनेत पक्की घरे बांधून द्यावित असेही श्री. पंडित यांनी यावेळी सांगितले.\nविशेष म्हणजे सोलापूर येथील आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या ५२ टक्के जागा रिक्त आहेत. त्यापैकी अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत .त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती सराज्य सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nस्वातंत्र्यापूर्वी पारधी बांधवांना गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला आहे. त्यामुळे कोठेही आणि कोणीही चोरी केल्याबरोबर सर्वप्रथम पोलिस संशयित चोर म्हणून पारधी बांधवांना सरसगट उचलतात. यापुढे पोलिसांनी चौकशी करून चोरी करणाऱ्यास अटक करावी पण गुन्हेगारी समाज म्हणून प्रत्येक वेळी पारधी समाजातील नागरिकांच टार्गेट करू नये . एखाद्याने गुन्ह्य केला असेल तर त्यास अटक करावी पण विनाकारण इतरांना अटक करू नये , अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी दर दोन महिन्याला संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तर हे प्रकार थांबविण्यासाठी मी राज्य सरकारकडे मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिगर अनुसूचित जमाती शेत्र (ओटीएसटी) असलेल्या भागात आदिवासी मुले, महिला व त्यांच्या आरोग्याची माहिती समोर येत नाही. कारण या भागांमध्ये या समाजाची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांची स्वतंत्र नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्न नंतर होऊ शकत. नोकरी नंतर करता येऊ शकते, मी आधी शेतकरी आहे. मला आधी माझ शेत वाचवायचं आहे, असे आबुधाबीहून लग्नासाठी सुट्टी घेऊन आलेल्या आणि नंतर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या सतनाम सिंगने सांगितले. सतनाम हा 29 वर्षीय तरुण लग्नासाठी सुट्टी काढून आला होता. मात्र लग्नाचा प्लान रद्द करून तो आता आंदोलनात सहभागी झाला आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. यूएईहून आलेला सतनाम सिंगने देखील आंदोलनात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे हा तरुण लग्न करण्यासाठी दोन महिन्यांची सुट्टी काढून पंजाबमध्ये दाखल झाला. मात्र मोठा भाऊ आणि गावातील बरेचसे शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जात असल्याचे पाहून त्यानंदेखील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबला जाऊन मुलगी शोधायची आणि लग्न करायच या उद्देशानं 29 वर्षी सतनाम सिंगनं अबुधाबी सोडली. जवळपास दोन वर्षे सलग काम केल्यानंतर सतनामला दोन महिन्याची रजा मिळाली होती. नंतर तो 29 नोव्हेंबरला जालंधरला पोहोचला. त्यावेळी मोठा भाऊ आणि गावातील शेतकरी सिंघू सीमेवर सरकारविरुद्ध आंदोलन करत असल्याचे त्याला समजले. सतनाम दोन दिवस आई बाबांसोबत राहिला. त्यानंतर त्याने दुचाकीवरून एका मित्रासोबत दिल्ली-हरयाणाची सीमा गाठली. लग्न नंतर होऊ शकत. नोकरी नंतर करता येऊ शकते, असे अबुधाबीत प्लंबर म्हणून काम करणाऱ्या सतनामन पीटीआयला सांगितले आहे. सतनामने या सुट्टीत लग्न करावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. मात्र सतनाम सध्या आंदोलनात सहभागी झाला आहे. मी सुट्टीत लग्न करावे माझा संसार सुरू व्हावा, अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. माझी आई आता 70 वर्षांची आहे. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. तिला नीटस दिसत नाही. वडिलांच वयदेखील जास्त असल्याने त्यांना शेतातील सर्व काम जमत नाही' अशा शब्दांत सतनामनं घरातील परिस्थिती सांगितली. |
टेक्सासच्या उल्कापात वाटावा अशा उन्हाळ्यात इथे गार वाटते म्हणून आम्ही नियमितपणे जातो. सिबलो निसर्गकेंद्र हे अजिबात प्रसिद्ध नाही पण इथे तास दोन तास फिरायला प्रसन्न वाटते. शाळेच्या अधूनमधून येणाऱ्या सहली आणि पाच दहा पक्षीमित्र सोडले तर इथे विशेष कुणी येत नाही. कधी कधी फोटो शूट चाललेली दिसतात. त्यामुळे नेहमीच निवांत , शांत असते. घराजवळ असल्याने मलाही सुटसुटीत वाटते. याचा आम्ही खूप दिवस विचित्र उच्चार करायचो. Cibolo आहे तर सिबोलो/ किबोलो/चिबोलो / सायबलो पण प्रत्येक वेळेला मुलाने चूक काढली. आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची accents आहेत. तोच फक्त मराठी मराठी उच्चारात आणि इंग्रजी अमेरिकन उच्चारात बोलू शकतो. मुलीचे तर उलट झाले आहे असे चिडवतो , तर त्याने आम्हाला योग्य उच्चार शिकवला तो म्हणजे सिब्लो , हे 'ब' अर्धही नाही आणि पूर्ण पण नाही. तर ह्या नेटीव अमेरिकन / इंडियन 'सिब्लो' शब्दाचा अर्थ आहे टेक्सासची म्हैस अर्थात बायसन. Though the terms are often used interchangeably, buffalo and bison are distinct animals. Old World "true" buffalo (Capebuffalo and water buffalo) are native to Africa and Asia. Bison are found in North America and Europe. Both bison and buffalo are in the bovidae family, but the two are not closely related. आपल्या म्हशीशी यांचा काही संबंध नाही असे विकिपीडिया सांगते. म्हैस नाव असलेले हे निसर्गकेंद्र रमणीय आहे बरं का. पण खास यावे इतके खास नाही. तर आम्ही रहातो ते एक जर्मन वसाहतीने वसवलेले छोटे टुमदार गाव आहे. बरीच अमेरिकन कुटुंब मूळची जर्मनीतुन इथे आले आहेत. साधारण१८५० च्या आसपास येण्यास सुरुवात झाली होती. उरलेली सगळी लोक मूळची मेक्सिकन/ स्पॅनिश वंशाची आहेत. इथे आल्यानंतर अजिबात नसलेली वांशिक विविधता जाणवून अस्वस्थ झाले होते. अर्धी गोरी अमेरिकन आणि अर्धी हिस्पॅनिक ! ! मुलाच्या शाळेत साडेतीन हजार मुलांमध्ये तो एकटाच देशी /brown / south Asian or even asian आहे आता कल्पना करू शकता . तर या अशा छोट्या गोजिरवाण्या "बर्नी" (स्पेलींग Boerne उच्चार जर्मन असल्याने बर्नी) गावातून एक नदी वहाते तिच्या आसपास हे निसर्गकेंद्र वसवलेले आहे. या नदीचे नाव आहे सॅन अँटोनियो व तिच्या ओढ्याचे ( creek म्हणजेच ओढा) नाव सिब्लो क्रीक. आणि निसर्गकेंद्राचे नाव सिब्लो नेचर सेंटर. पाऊस पडून गेल्यावर हिरवेगार झालेला हा परिसर टिपला होता फोनच्या कॅमेऱ्यात . फोटो कसे वाटले नक्की सांगा. धन्यवाद ! |
वाकचौरेंच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत वाढणार - Dainik Prabhat\nवाकचौरेंच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत वाढणार\nApril 13, 2019 । 10:19 am\nतिरंगी लढत खा. लोखंडेंचे गणित बिघडविणार\nअकोले - शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेनेत अस्वस्थता वाढली असून, माजी खा. वाकचौरे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांकरवी त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा सांगावा आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वाकचौरे बंड करणारच हे उघड झाले आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत खा. लोखंडे यांच्या विजयाचे गणित बिघडवणार, हे नक्कीच.\nशिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात माघारीची शक्यता कमीच आहे. अकोले मतदारसंघात गतवेळी खा. सदाशिव लोखंडे याना 64 हजार 573, तर माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना 59 हजार 982 मते मिळाली होती. खा. तर 2009 साली रामदास आठवले यांना 34 हजार 532, तर वाकचौरे यांना 45 हजार 352 मते मिळाली होती. मात्र वाकचौरे यांनी 2014 साली शिवसेनेला ठेंगा दाखविल्याने एकाएकी 'अलाभ्य लाभ' होऊन खा लोखंडे यांनी उमेदवारी मिळवली होती व तेरा दिवसांत ते खासदार झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात पुन्हा फिरकूनच न पाहिल्याने तोही इतिहास घडवून त्यांनी सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला. उमेदवारांचा सक्षम पर्याय नसल्याने नाईलाजास्तव शिवसेना नेतृत्वाला 'मम' म्हणण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.\nविद्यमान खा. लोखंडे, तर कॉंग्रेस आघाडी कडून आ. भाऊसाहेब कांबळे, तर अपक्ष म्हणून माजी खा. वाकचौरे यांच्यात तिरंगी सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, हे एवढ्यात स्पष्ट होणार नसले, तरी 'शेंबी गोंड्या'साठी कोण पुढे कूच करणार? याबाबत मतदारसंघात मतदार राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. निळवंडे बंदिस्त पाइपलाइन व जायकवाडी आवर्तन प्रसंगी त्यांची अगस्ती पूल रात्रीच्या मुक्कामी जमेची बाजू लोखंडे यांना साथ देणार काय? ही औत्सुक्य निर्माण करणारी बाब आहे.\nगत दोन महिन्यांपासून सेनेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा जो पानउतारा केला, तेवढा खचितच एखाद्या खासदारांचा या पूर्वी झाला असेल. त्यामुळे त्यांना या प्रकरणाची गांभीर्य आता आले असले, तर आता मात्र तेव्हढा वेळ मतदार देतील, ही शक्यता जरा कमीच दिसत असून, मतदार आता या तीनही मतदारांची तुलना हटकूनच करणार, हे ओघाने आलेच. त्यामुळे ही दरी बुजविण्याचे मोठे आव्हान खा. लोखंडे पुढे आहे. मागील वेळी दलित आणि मुस्लिम मतदार युती सोबत होते. यावेळी त्यांनी वंचित आघाडी स्थापन करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ही वजाबाकी खा. लोखंडे यांना बरीच मागे घेऊन जाणारी आहे.त्या तुलनेत आ. भाऊसाहेब कांबळे बरे म्हणण्याचा हा बाका प्रसंग म्हणावा लागेल. खरे तर आ. कांबळे हे उमेदवारी घेतच नव्हते.\nमात्र माजी. खा. वाकचौरे यांनी नकार दिल्याने त्यांना कॉंग्रेस नेत्यांना रडतराव घोड्यावर बसविण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी केवळ आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर येऊन पडली आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या चढाओढीच्या राजकारणाने व त्यांच्या स्वपक्ष उमेदवाराशी हाराकीरी करावी लागण्याने आ. कांबळे यांचीही छातीची धड धड वाढली आहे.\nराष्ट्रवादीने दक्षिणेत त्यांच्या पुत्राला चांगलाच घाम फोडला आहे. त्यामुळे ते उत्तरेत किती आणि केंव्हा लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. यात कामाचा माणूस म्हणून जी छाप माजी खा. वाकचौरे यांनी पाडली आहे. ती या मतदारसंघाच्या कायम लक्षात राहणारी अशी ठरली आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसची उमेदवारी जाणीवपूर्वक टाळली, हे येथे लक्षात घेणे महत्वाचे आहे.त्याला मतदारसंघातील मतदार कसा साथ देतो, हे लवकरच समजणार आहे. असे असले तरी सामान्य मतदारांचा कल हा वाकचौरेंकडे झुकणारा आहे, हे विसरता येणार नाही. तरी त्याला उत्तर नगर जिल्ह्यातील मतदार कसे मतदान करतात, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. |
मुंबई। मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची आजची (१४ मे) ही वांद्रे पूर्वेच्या एमएमआरडीएच्या मैदानात होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री हे राज्यात सध्या जे भोंग्यांच्या मुद्यावरून सुरू असलेल राज कारण, हनुमान चालिसा, हिंदुत्व, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यावर टीका केली होती. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते-जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या पत्राला सभेतून नेमके उत्तर देणार याकडे लक्ष लक्ष लागले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे मुंबईसह राज्यातील इतर महापालिका डोळ्यासमोर ठेवून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. |
या रंगाचे एक कोट निःसंशयपणे त्याच्या मालकाकडे लक्ष वेधेल. फिकट रंगाची पाने खूपच हलक्या किंवा त्यापेक्षा अधिक संतृप्त असतात. हा रंग हलका जांभळा, निळा आणि गुलाबी असतो. त्यांच्यातील प्रामुख्याने, बशाकाची सावली देखील बदलते. लॅव्हेंडर, फिकट फिकट, निळा-फिकट, नीलम - बटाटाचे पुष्कळसे छटा आहेत फॅशन हाऊसेसचा संग्रह हा रंगाच्या मॉडेलशिवाय करू शकत नाही. फिकट कोत एक सभ्य, प्रामाणिक, दैनंदिन जीवन प्रतिमेपासून दूर बनवितो. अशा कपडे मध्ये मुलगी एक गूढ, अगदी गूढ ठसा करते. फिकट कोटमध्ये विविध प्रकारचे असू शकतात. एक नियम म्हणून, ते रोमँटिक शैलीसाठी अधिक उपयुक्त आहेत. गुडघ्यापर्यंत, लांबवर किंवा बेल्ट न घालता, कोकूनचे डबे, गोल कंधेच्या ओळसह मोठ्या आकाराचे फॅशन शैली, किंवा मध्यम लांबीचे शास्त्रीय मॉडेल हे खूप लांब असे मॉडेल असू शकतात. या हंगामाचा कल पिंजरा म्हणून ओळखला जातो आणि अशा पॅटर्नसह एक फिकट कोत एक रोचक आणि फॅशनेबल प्रतिमा तयार करेल. तर, एकत्र कसे करावे आणि एक फिकट कोत घालीत? काय संयोजन सह? पण इतर छटा दाखवा आणि रंगांसह आणखी मनोरंजक जोड्या. कोट फिकट फिकट रंग फिकट्याट टकसाच्या सावलीत, गुलाबी, निळा, हलका पिवळा-पिवळ्या रंगाचा रंगांसह जोडता येतो. निळा-फिकट नमुना मेलाकाइट, जर्दाळू, मेन्थॉल, गलिच्छ वायलेट, नीलशी सुसंगत आहे. प्रयोगास घाबरू नका, आणि आपण निश्चितपणे आपलेच, आपल्यासाठी सर्वात योग्य साहित्य शोधू शकाल. |
आज भारत आणि श्रीलंकेमध्ये टि-20 सिरीजमधला पहिला सामना सुरु होण्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेत 10 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. मुस्लिम आणि बौद्ध समाजात वाढलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर, दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये वर्षभरापासून या दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील हिंसाचार वाढला आहे. मुस्लिम आणि बौद्ध समाजात तणाव वाढल्याने, श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आणीबाणीचा निर्णय घेतला आहे. आणि या आणीबाणीमुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे. रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात मेक्सिकोने जर्मनीला 1 - 0 ने पराभूत केले आहे. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवरच्या या सामन्यात हिरविन्ग लोझानो मेक्सिकोच्या या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. |
हिरे विक्री करुन देण्याच्या नावाखाली हिरे व्यापाऱ्यांचे ७७ लाखांचे हिरे घेवून दलाल पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली. मुंबई : हिरे विक्री करुन देण्याच्या नावाखाली हिरे व्यापाऱ्यांचे ७७ लाखांचे हिरे घेऊन दलाल पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी पंकज शहा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील एसव्ही रोड परिसरातील हिरे व्यापारी दिगेश कोटीया यांचा दागिने घडविण्याचा कारखाना आहे. त्याची पंकज शहासोबत ओळख झाली. ओळखीतून त्याने, सुरुवातीला काही व्यवहारातून कोटीया यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, हिरे विक्री करुन एकत्र पैसे देतो असे सांगून त्याने, कोटीया यांच्याकडून १४ फेब्रुवारीपर्यंत ४२ लाख ७९ हजार रुपयांचे हिरे घेतले. त्यानंतर पैसे देण्यास त्याने, टाळाटाळ सुरु केली. त्याचा फोनही लागत नव्हता. यामुळे कोटीया यांना संशय आला. त्यांनी, अन्य व्यापाºयांकडे विचारणा करताच, शहाने अनेकांना गंडा घातल्याचे कळले. यामध्ये त्यांचे मित्र कांतीभाई पडसाला यांना ३४ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समजताच, त्यांच्यासोबत त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या दोघांना एकूण ७७ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. शहाने मुंबईसह गुजरातमधील व्यापाºयांना गंडविल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे. |
Home / Unlabelled / करंजी विद्यालयाची इ १० च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ! करंजी विद्यालयाची इ १० च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ! कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय ,करंजी बुद्रुक या विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल शेकडा ९५.८३% टक्के इतका लागला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे मार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२० मधील एस एस सी परीक्षेचा निकाल ९५.८३% टक्के इतका लागला असून विद्यालयात तब्बल २९ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर २६ विद्यार्थ्यां प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहे. यात कु रितेश भाऊसाहेब आगवन व कुमारी साक्षी अण्णासाहेब कापसे हे दोन विद्यार्थी ९१.६० % गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी दत्तात्रय भिंगारे ९०.६०% व तृतीय क्रमांक कुमारी अश्विनी अनिल चरमळ .८९.२०% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे . सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.आ. श्री आशुतोषजी काळे साहेब , रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री.कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्या सौ विमलताई आगवन, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ. श्री सुनील देसाई, श्री सांडू भाई पठाण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री संजय आगवण, रयत लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्री मुकुंद आगवन तसेच समस्त करंजी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या यशात खारीचा वाटा असलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनकर माळी, सौ अनाप ए. एम., श्री चौधरी बी बी,श्री सांगळे जी.डी.,श्री जगताप एल.पी. , चव्हाण एस. डी.श्री वसावे व्ही. आर.श्री सरोदे ए. व्ही.व श्री डोखे जी.एस. या सर्वांचे मार्गदर्शन लाभले यांचे ही अभिनंदन मान्यवरांनी केले. |
जलद अन्न कॅफे आता घट्टपणे बाजारातील हिस्सा मिळविण्यापासून आहे. ते कारण त्याच्या अभ्यागतांना ऑफर मधुर आणि uncomplicated dishes च्या लोकप्रिय होत आहेत. पण तो नेहमी अशा ठिकाणी भेट द्या करण्याची संधी नाही. त्यामुळे आम्ही घरी या dishes शिजविणे सक्षम असणे आवश्यक आहे. कॅफे या प्रकारची ऑफर सर्वात मागणी वाढली-नंतर स्वयंपाकासाठी योग्य निर्मितीवर एक, "कैसराचे" रोल आहे. आपण कुठेतरी जाऊ शकत नाही तर तो घरी केले जाऊ शकते. एक, "कैसराचे" (रोल) तयार अतिशय सोपे आहे. चव आणि लिंबू पाचर घालून घट्ट बसवणे 100 चिकन ग्रॅम, 100 चीज "Parmesan", एक तोर्तिया ग्रॅम, तेल 150 milliliters, थोडे टबॅस्को सॉस, लसूण दोन पाकळ्या, तीन अंडी yolks, एक उग्र वासाचा समुद्रातील एक छोटा मासा, मसाले घ्या. कृती रोल एक तुकडा डिझाइन केलेले आहे. सुरू करण्यासाठी या बनविणे सॉस तयार. आम्ही क्लासिक आवृत्ती निवडा. मिक्सरमध्ये उग्र वासाचा समुद्रातील एक छोटा मासा, सोललेली लसूण, मीठ आणि मिरपूड मध्ये ठेवा. हे सर्व दळणे. मग गोड मोहरी सह, अंडी yolks मिक्स आणि अजूनही whisking, मिक्सरमध्ये मध्ये मिश्रण. पुढील, मोहरी घालावे. परिणाम जाड सॉस आहे. आता आम्ही स्वतंत्र कंटेनर मध्ये ते पालट जोडण्यासाठी टबॅस्को सॉस आणि लिंबाचा रस. सर्व चांगले ढवळावे आणि बिंबवणे सोडा. तो 150 milliliters सॉस चालू पाहिजे. "कैसराचे" (रोल) तयार करण्यासाठी, तुम्ही मांस marinate आहे. चिकन एक marinade सर्वात सोपा कृती निवडा. सोया सॉस, चिरलेली लसूण आणि मध आणि द्रव हे मिश्रण एक चिकन स्तन भरा मिक्स करावे. नंतर 30 मिनिटे, मांस promarinuetsya. एका बेकिंग शीट वर मग मांस प्रसार आणि 30 मिनीटे ओव्हन मध्ये भाजलेले. तापमान 200 अंश वर सेट केले आहे. या प्रकरणात, मांस निविदा आणि लज्जतदार करते. आता पर्यंत गरम ओव्हन मध्ये एक तोर्तिया ठेवले, त्यामुळे ते ठिसूळ नाही. कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड बाहेर धुऊन वाळलेल्या. एक खवणी वर तीन चीज. केक सॉस lubricates आणि कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड पाने वर ठेवले. मांस तुकडे आणि भाज्या व फळे यांचे वर त्यांना ठेवले आहे. सर्व आम्ही लोखंडी जाळीची चौकट किंवा पॅन मध्ये ओव्हन मध्ये किसलेले चीज आणि स्थान सह शिंपडा. आम्ही हलके तळणे करणे आवश्यक आहे. ठेवा, "कैसराचे" (रोल) एक प्लेट वर आणि तिरपे कट. तुम्ही बघू शकता, ही डिश घरी खूप सोपे आहे तयार. रोल - हे चवदार आणि सुगंधी, "कैसराचे" बाहेर करते. त्याची किंमत 80 ते 100 रूबल्स पासून सरासरी श्रेणी आहे. या, "कैसराचे" (रोल) हे साहित्य अधिक आवश्यक क्लिष्ट कृती आहे. पत्रक nori गरज आहे, एकपेशीय वनस्पती kombu व्हिनेगर तांदूळ 500 मि. ली. , तांदूळ 150 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, एक चतुर्थांश लिंबू, mirin 40 मिली, भाजलेले कोंबडी मांस 40 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 20 ग्रॅम काकडी, 20 ग्रॅम चांगला खारवून वाळवलेले डुकराचे मांस, चीज 20 ग्रॅम, तिळ , avocado, 20 ग्रॅम, कोशिंबीर पाने 20 ग्रॅम. साखर, लिंबाचा रस, seaweed आणि mirin केली सॉस पाककला. उकडलेले तांदूळ ते जोडा. धन्यवाद सॉस अधिक चिकट होईल. तांदूळ nori थर एक शीट वर पसरली आणि तो तीळ शिंपडा. वरची बाजू खाली चालू आणि चिकन स्तन, चीज, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड आणि खारवून वाळवलेले डुकराचे मांस ठेवा. मग avocado, आणि काकडी एक थर आहे. गुंडाळा आणि तुकडे. अशा विशेष कॅफे, "कैसराचे" (रोल) दिले आहे. कॅलरीजची तो उच्च चरबी सामग्री साहित्य असतात नाही म्हणून, क्षुल्लक आहे. त्याची तयारी साठी उत्पादने विशेष स्टोअर, आपण सुशी आणि Rolls आवश्यक सर्वकाही आहे जे खरेदी केले जाऊ शकते. |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर (Raj Thackeray Pune Visit) आहेत. त्यांचा पुणे दोरा आजपासून सुरु होत आहे. हा दौरा दोन दिवस चालणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजणेच्या सुमारास राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ताफा शिवतीर्थावरुन पुण्याच्या दिशेने निघाला. |
मुंबई - सलग तिसऱ्या दिवशी अभिनेता सोनू सूदच्या घराच्या परिसराची आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. मोठ्याप्रमाणात करचोरीचे पुरावे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या हाती चित्रपटांमधून मिळालेला पैसा आणि खासगी गुंतवणुकीसंदर्भात करचोरी करण्यात आल्याचे पुरावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सूद चॅरिटी फाऊण्डेशनची खाती आणि आर्थिक व्यवहारही तपासेल जाणार आहे. आज सायंकाळी आयकर विभागाकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी मागील तीन दिवसांपासून तपास करत आहेत. सोनू सूदचा अकाऊंटंट हा शहरामध्ये नसल्यामुळे त्याला आयकर विभागाला तातडीने माहिती देता आली नसल्याचे समजते. सोनूच्या घरी आयकर विभागाने बुधवारीच तपास सुरु केला आहे. आयकर विभागाने सोनूशी संबंधित सहा ठिकाणांवर तपास केला असून ही ठिकाणे मुंबई आणि लखनऊमध्ये आहेत. आयकर विभागाकडून तपास केला जात असला तरी ही धाडी टाकण्यासारखी कारवाई नसून कागदोपत्री पडताळणी केली जात आहे. सोनू सूदने करचोरी केल्यासंदर्भात हा तपास केला जात असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोनूने एका संपत्तीसंदर्भात केलेल्या व्यवहाराचीही तपासणी आयकर विभागाकडून केली जात असल्याचे न्यूज १८ ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोनू सूद यापूर्वीही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकला होता. मुंबई महानगरपालिकेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली. सोनूने जुहूमधील आपल्या सहा मजली घरामध्येच परवानग्यांची पूर्तता न करता हॉटेल सुरु केल्याचा आरोप करण्यात आलेला. या प्रकरणामध्ये महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीस विरोधात सोनू सूदने याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावल्यानंतर सोनूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आयकर विभाग सोनू सूद आणि लखनऊ बेस्ट रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेला कराराबाबत तपास करत आहे. या करारात करचुकवेगिरीच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तपासाला 'सर्वे' म्हटले जात आहे. याशिवाय, सोनू सूदबाबत सुरु असलेल्या तपासाला राजकीय रंगही दिला जात आहे. अलिकडे सोनू सूद दिल्ली सरकारच्या एका प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. आयकर विभागाचे अधिकारी सर्वात प्रथम बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले होते. त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे वा अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेले नाही. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कंपन्यांचीही विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने केली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. |
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळायला हवा ही गोवा सरकारची भूमिका अखेर भारतीय ऑलिम्पीक संघटनेने शनिवारी मान्य केली. पणजी : राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळायला हवा ही गोवा सरकारची भूमिका अखेर भारतीय ऑलिम्पीक संघटनेने शनिवारी मान्य केली. यावर्षी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होऊ शकत नाहीत हेही स्पष्ट झाले. येत्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा होतील. त्याबाबतच्या तारखाही क्रिडा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी शनिवारी येथे जाहीर केल्या. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा पुढील वर्षी (2020) दि. 20 ऑक्टोबर ते दि. 4 नोव्हेंबर या कालावधीत आम्ही आयोजित करण्यास संघटनेने मान्यता दिल्याचे आजगावकर यांनी लोकमतला सांगितले. यामुळे आम्हाला स्पर्धेसाठी उर्वरित कामे करण्यास आता वेळ मिळेल. वाहतूक व्यवस्था, जेवण, निवास व्यवस्था, उद्घाटन सोहळा यासंबंधीची कामे करण्यासाठी निविदा जारी करण्यापूर्वी स्पर्धेची तारीख ठरणो गरजेचे असते. ही तारीख शनिवारी निश्चित झाल्याने आमचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही स्पर्धेसाठी अनेक साधनसुविधा अगोदरच उभ्या केल्या आहेत व त्यासाठी काही कोटी रुपयेही खर्च केले आहेत, असे आजगावकर म्हणाले. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला आणखी सहा महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा अशी भूमिका यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी मांडली होती. येत्यावर्षी मार्च महिन्यानंतर आम्ही राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा घेऊ शकतो, फक्त तारीख भारतीय ऑलिम्पीक संघटनेने निश्चित करायला हवी असेही गोवा सरकारचे म्हणणो होते. भारतीय ऑलिम्पीक संघटनेने गोव्याला यापूर्वी जो दहा कोटींचा दंड ठोठावला होता, तो माफ केला जावा, असा मुद्दा मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय क्रिडा मंत्र्यांना भेटून मांडला होता. दरम्यान, गोव्याला दहा कोटींचा दंडही माफ झाला आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. भारतीय ऑलिम्पीक संघटना आमच्याकडून दंड स्वीकारणार नाही हे स्पष्ट झाले आहे. स्पर्धेसाठी आम्ही जो खर्च करायचा तो खर्च करू. ऑलिम्पीक संघटनेसाठी आम्ही स्पॉन्सरशीपही उभी करू, असे आजगावकर यांनी नमूद केले. |
बंगळुरू - आयपीएलचा मोसम शेवटाकडे आला असून अद्याप बाद फेरीतील चौथा संघ ठरलेला नसून या स्थानासाठी सध्या तरी हैदराबाद, कोलकाता आणि पंजाब यांच्यात चुरस असून सनरायजर्स हैदराबादकडे बाद फेरीत आपले स्थान पक्के करण्याची आज शेवटची संधी असून त्यांच्या समोर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरूच्या संघाचे आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबदाचा संघ यंदाच्या मोसमात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही प्रकारात समतोल असूनही त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने ते सध्या क्रमवारीत चौथ्या स्थानी असून सध्या त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत. त्यामुळे त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळाल्यास त्यांचे 14 गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता आधिक बळावेल. मात्र, आजच्या सामन्यात त्यांना बंगळुरूचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. तेंव्हाच त्यांना सरासरीच्या बळावर प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी प्राप्त होईल. सध्या हैदराबादच्या संघाकडे त्यांचे दोन्ही धमाकेदार सलामीवीर उपलब्ध नाहीत. ज्यात यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांचा समावेश आहे. त्यामुळे गत सामन्यात हैदराबादच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी सलामीची जबाबदारी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलकडे असून त्याच्या साथीला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा हा सलामीला येतो आहे. त्याचबरोबर बेअरस्ट्रोच्या जागी संघात मोहम्मद नबीला संधी देण्यात आली आहे. असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद - केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल. |
आजकाल सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन प्लान्स आणि सर्विसेज ऑफर करत असतात. जियो बाजारात आल्यानंतर सर्व कंपन्या एयरटेल, वोडाफोन, आईडिया बीएसएनएल इत्यादी सर्वांनी आपल्या प्लान्सच्या किंमती कमी केल्या आहेत. आज आपण बोलणार आहोत एयरटेलच्या त्या प्रीपेड प्लान्स बद्दल ज्यांच्या बेनिफिट मध्ये कंपनीने वाढ केली आहे.हे प्लान्स Rs 500 च्या श्रेणीत येतात. या प्लान्सची किंमत Rs 399, Rs 448 आणि Rs 499 पासून सुरु होत आहे. या प्लान्स मध्ये युजर्सना 400MB अतिरिक्त डेटा दिला जाईल. सुरवात करूया Rs 399 च्या प्लान पासून, या प्लान मध्ये आधी प्रतिदिन 1GB डेटा ऑफर केला जात होता. आता या प्रीपेड प्लान मध्ये युजर्सना प्रतिदिन 1.4GB डेटा ऑफर केला जाईल. या पॅकचे इतर बेनेफिट्स तसेच आहेत. याव्यतिरिक्त सब्सक्राइबर्स अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 मेसेजचा वापर करू शकतील. प्लान मध्ये युजर्सना एयरटेल प्रीमियम TV चे सब्सक्रिप्शन, एक वर्षासाठी नॉर्टन मोबाईल सिक्योरिटी आणि Wynk चे सब्सक्रिप्शन मिळत आहे आणि या प्लानची वैधता 84 दिवस आहे. दुसरा प्लान या लिस्ट मध्ये Rs 448 मध्ये मिळतो ज्यात आधी युजर्सना प्रतिदिन 1.5GB डेटा ऑफर केला जात होता पण आता या प्लान मध्ये युजर्सना 1.9GB डेटा ऑफर केला जाईल. तिसऱ्या प्लानची किंमत Rs 499 पासून सुरु होत आहे आणि या प्लान अंतर्गत प्रीपेड युजर्सना प्रतिदिन 2GB डेटा ऐवजी 2.4GB डेटा मिळतो. प्लानची वैधता 82 दिवस आहे आणि युजर्स प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 फ्री मेसेज मिळतात. प्लान अंतर्गत युजर्सना एयरटेल प्रीमियम टीवी, नॉर्टन मोबाइल सिक्योरिटी आणि विंकचे सब्सक्रिप्शन मिळत आहे. |
सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे. सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे. कल्कि यात नक्की कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'सेक्रेड गेम्स'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसिरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत होती. नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता तर नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांची लाडकी 'सेक्रेड गेम्स २' वेबसिरिज जून ते ऑगस्टच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे नवाझुद्दीनने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. सेक्रेड गेम्स'मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती तर सरताज सिंग या भूमिकेत सैफ अली खान झळकला होता. या दोघांच्या अभिनयाच्या आणि लूकच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या वेबसिरिजच्या पहिल्याच भागात गायतोंडेची हत्या झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याची हत्या का झाली, कशाप्रकारे करण्यात आली, त्याच्या हत्येमागे काय रहस्य होते. यातील काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पहिल्या सिझनमध्ये मिळाली होती आणि आता या सिझनमध्ये यामागची अनेक रहस्य उलगडली जाणार आहेत. कल्कि बाबत बोलायचे झाले तर ती जोया अख्ततरच्या गल्ली बॉयमध्ये दिसली होती. यात तिच्या वाटेला छोटीशी भूमिका आली होती पण तिने प्रभावीपणे साकारली होती. |
Nagpur News नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे. नागपूर : नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे. १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी नागपूर - बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेन शनिवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. त्यासंबंधीची योजना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून यापूर्वीच तयार केली आहे. या ट्रेनसाठी दुसऱ्या पाच रेल्वेगाड्यांच्या संचालनाच्या वेळेत आवश्यक ते संशोधन आणि बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदी नागपुरात येत आहेत. ते येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. या पूर्वनियोजित कार्यक्रमासोबतच ते नागपूर स्थानकावरून वंदे भारतला हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त दिल्लीतून दोन दिवसांपूर्वी नागपुरात धडकले. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि अवघ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांनी रेल्वे स्थानक तसेच आजूबाजूचा परिसर पिंजणे सुरू केले आहे. तर, तिकडे पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्यासह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मंगळवारी दुपारी रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्यांनी रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन केले. थेट पंतप्रधानच ग्रीन सिग्नल देणार असल्याचा निरोप आल्याने अवघे रेल्वे प्रशासनही तयारीला लागले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी हे आज नागपुरात पोहोचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठकीत या संबंधाने दिशानिर्देश दिले. दरम्यान, या संबंधाने माहिती जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी अधिकृत कार्यक्रम ठरला नसल्याने या संबंधाने काही बोलणे योग्य होणार नसल्याचे म्हटले. |
महामंडळाने एसटी टोलमाफीची वारंवार मागणी केली होती. नाशिक- महामंडळाने एसटी टोलमाफीची वारंवार मागणी केली होती. जूनपासून राज्यातील २१ टोलनाक्यांवरून बस सुसाट धावल्याने नाशिक आगाराच्या उत्पन्नात २८ लाख ४६ हजारांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने टोलनाक्यांबाबत महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. काही टोलनाके बंद करण्यात आले तर २१ ठिकाणी बसला टोलमाफी दिली. जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. एका महिन्यात नाशिक आगाराचे तब्बल २८ लाख ४६ हजार २०२ रुपये वाचले आहेत. यात १६ महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील २७ लाख ६३ हजार ५२३ रुपयांची बचत महामंडळाच्या खात्यात जमा झाली आहे. बंद झालेल्या टोलनाक्यांत सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी २ लाख ८४ हजार रुपये भरले जात होते. तर भाबडबारीला २ लाख ४१ हजार ९२० रुपये महिन्याकाठी द्यावे लागत होते. जिल्ह्याबाहेरील टोलनाक्यांवरदेखील सरासरी ७० टक्के रक्कम भरावी लागली. शिलापूर, ढकांबे, नांदुरी, देहरा, कशेळी, लाडगाव, नागेवाडीसारख्या छोटय़ा रकमेच्या टोलमध्येदेखील एसटीला मोठा भरुदड सोसावा लागत होता. राज्यातील २१ टोलनाक्यांवर नाशिक आगारातील सुमारे ११०० बस प्रतिदिवशी ९४ हजार ८७३ रुपये टोलसाठी देत होत्या. यातून आता महामंडळाची सुटका झाली आहे. |
Nanded Mayer Shaileja Swami Home issue । नांदेडच्या महापौर शैलजा स्वामींच्या घरावर दगडफेक - Divya Marathi\nNanded Mayer Shaileja Swami Home Issue\nनांदेडच्या महापौर शैलजा स्वामींच्या घरावर दगडफेक\nनांदेड- शहरातील कौठा भागात प्रस्तावित महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा वाद चांगलाच पेटला. महापौर शैलजा स्वामी यांच्या शोभानगरातील घरावर दगडफेक करण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला.\nतीन वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर शैलजा स्वामी यांनीच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडून कौठा भागात बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्याला मंजुरी घेतली. आयजी ऑफिसजवळील मोक्याची जागाही निश्चित करण्यात आली; पण काही कारणामुळे पुतळा उभा राहिला नाही. शैलजा स्वामी आता महापौर झाल्या आहेत. त्यांनी पुतळा बसवण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, अशी मागणी लिंगायत समाजाकडून होत आहे. पुतळ्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांच्याकडे आहे. महापौर काँग्रेसच्या आहेत.\nमहापालिकेलाकुलूप ठोकण्याचे आंदोलन\nपुतळ्यासाठीजागेची अडचण सांगितली जाते. प्रस्तावित ठिकाणी ४५० चौरस फूट जागा महापालिकेची आहे. तिथे पुतळा उभा करावा. नंतर सुशोभीकरणासाठी जागा अॅक्वायर करावी. पुतळ्याची घोषणा झाल्यानंतर गेली अनेक वर्षे लोक जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी पूजा करतात. लोकांची श्रद्धा त्या ठिकाणावर आहे. पुतळा त्याच ठिकाणी व्हावा, अशी समाजाची इच्छा आहे. मध्यंतरी जागा बदलण्याच्याही काही हालचाली झाल्या. त्यामुळे साशंकता निर्माण झाली. आता आयुक्तांनीही स्पष्ट केले आहे की, पुतळ्याला शासनाची परवानगी नाही. ही परिस्थिती लक्षात घेता पुतळ्याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. पुतळ्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही, तर २२ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर महापालिकेला कुलूप ठोकण्याचे आंदोलन केले जाईल, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी दिली.\nगाडीच्या काचा फुटल्या\nमंगळवारीरात्री १२ वाजताच्या सुमाराला मोटारसायकलवर आलेल्या जणांनी शोभानगरातील महापौराच्या घरावर दगडफेक केली. त्यात त्यांच्या खासगी गाडीच्या काचा फुटल्या. किशोर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. दगडफेक करून त्यांनी त्वरित पळ काढला.\nपुतळा त्याच ठिकाणी\nमहात्मा बसवेश्वरांचा पुतळा प्रस्तावित ठिकाणीच व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्याच ठिकाणी होईल; परंतु पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय, शासनाचे काही नियम यामुळे थोडे अडथळे निर्माण झाल्याने विलंब होत आहे. त्यावर मात करून पुतळा निश्चित बसवला जाईल. शैलजास्वामी, महापौर, नांदेड. |
केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. काल (19 मार्च ) गृहमंत्री अमित शाह यांनी गीर सोमनाथ येथील 'सोमनाथ' मंदिरात पूजा केली. शाह यांनी कुटुंबासह शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. यावेळी त्यांची पत्नी आणि नात उपस्थित होते. अमित शाह यांनी सोमनाथ ट्रस्टचे मोबाईल अॅपही लॉन्च केले. मोबाईल अॅपचे लोकार्पण केल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापन समितीची भेट घेतली. अमित शाह पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.