text large_string |
|---|
पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. अकोला : विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्काराचे धडे देणारे शिक्षक सार्वजनिक ठिकाणी नशापान करताना आढळल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली; मात्र प्रशासकीय कारवाई अनेक महिने रखडली. अखेर मंगळवारी पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. परभणी जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या शिक्षकावर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. शिक्षणाधिकारी वैशाली ठग रूजू झाल्यानंतर मुख्यालयासह निलंबनाचे आदेश दिले जाणार आहेत. अकोला-नांदेड महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये शिक्षकांनी नशापानासाठी हुक्का प्राशन केल्याची घटना पोलिसांच्या छाप्यात उघड झाली होती. त्यावेळी पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली. तर पुढील प्रशासकीय कारवाईसाठीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला. शिक्षण विभागाने त्यानुसार कारवाईचा प्रस्तावही तयार केला; मात्र त्यावर निर्णयच झाला नाही. त्यामुळे शिक्षण समिती, स्थायी समितीच्या सभेत वारंवार हा मुद्दाही उपस्थित झाला. कारवाईच होत नसल्याने हा मुद्दा मागे पडला होता. दरम्यान, याप्रकरणी पुन्हा एकदा कारवाईची मागणी पुढे आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी कारवाईचा आदेश दिला. पातूर तालुक्यातील कोसगाव जिल्हा परिषद शाळेतील विजय भुतकर, अंधारसावंगी-संतोष राठोड, गावंडगाव- सुनील गवळी, गोंधळवाडी- सुखदेव शिंदे, मलकापूर (फॉ. )-दिनेश केकण, विवरा-संजय इंगळे, नांदखेड- अनिल दाते, कारला- गोपीकृष्ण येनकर, अकोला तालुक्यातील हिंगणा बारलिंगा येथील धीरज यादव यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे, तर परभणी जिल्हा परिषदेत बदली झाल्याने महेश मानकरी या शिक्षकावर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त चार शिक्षक गेल्या काही वर्षांपासून सतत गैरहजर आहेत. त्यांना १० जून रोजी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यादिवशी उपस्थित न राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे. त्यासाठी पातूर तालुक्यातील सावरखेड शाळेतील राजेश विष्णूपंत तळोकार, अकोला तालुक्यातील खडका येथील विजय किसन तायडे, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील संजय महादेव वानखडे, बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील अरविंद हिरामण बुरुकले यांना नोटीस देण्यात आली आहे. |
हत्तीरोग (लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ)) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय, वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होऊन बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा "क्युलेक्स विचकि फॅसिएटस' नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चावल्यामुळं होतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्यक आहे. इ. स. १९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश , असाम, कर्नाटक या राज्यात आढळतो. ५ ऑगस्ट हा हत्तीरोग दिन म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. - थंडी वाजून येणे. - ताप येणे. - वृषण आकराने जाड होणे. माणसांमध्ये लसिकाग्रंथिंच्या हत्तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा,असे दिसून येते. सन १८६६ मध्ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्तीरोगाचा परस्पर संबध असल्याचे स्पष्ट केले. सन १८७६ मध्ये जोसेफ बॅनक्रॉप्टी यांनी हत्तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे. रोगकारक घटकहत्तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणा-या अळींमुळं होतो. भारतामध्ये ९८ टक्के रुग्णांमध्ये हत्तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरुपात लागण झालेल्या हत्तीरोग रुग्णांची नोंद आहे. प्रौढ अवस्थेमध्ये हत्तीरोगाचे जंतू लसीका संस्थेच्या वाहिन्यांमध्ये राहतात. लसीका संस्था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते. मनुष्यांमध्ये फार पुर्वीपासून हत्तीरोगाचे जंतू आढळून येतात. - वय - सर्व वयोगटांमध्ये हत्तीरोगाची लागण होऊ शकते. - लिंग - स्त्री किंवा पुरुष दोघांना हत्तीरोग होऊ शकतो. मात्र हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असणा-या क्षेत्रात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचे प्रमाण जास्त दिसून येते. - स्थलांतरीत लोकसंख्या - काम व इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणा-या लोकांमुळे एका भागातून दुस-या भागात हत्तीरोगाचा प्रसार होतो. - रोगप्रतिकार शक्ती - हत्तीचरोगाच्या रोगप्रतिकार शक्तीबाबत अदयाप निश्चित माहिती उपलब्ध नाही. - वातावरण- २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ७० टक्के आर्द्रता ही क्युलेक्स डासांच्या वाढीसाठी पोषक असते. - क्युलेक्सख डासांची उत्पात्तीत घाण, प्रदुषित पाण्याोत खूप मोठया प्रमाणात होते. अयोग्यण पध्दोतीची गटारे, शहरांचे व गावांचे अयोग्य आणि अपुर्ण नियोजन, सांडपाण्याचा अयोग्यं पध्दरतीने होणारा निचरा या सर्व बाबींमुळे क्यु्लेक्सप डासांची उत्पपत्तीा खूप मोठया प्रमाणात होते आणि त्यागमुळे हत्तीवरोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो. रोगप्रसाराचे माध्यमदुषित डास चावल्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. (क्युलेक्स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्टीया हत्तीरोगाच्या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात. ) दुषित डास मनुष्याला चावतात त्या ठिकाणी हत्तीरोगाचे जंतू सोडतो. हा जंतू त्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्थेमध्ये जातो. अधिशयन काळहत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतूच्या शरीरातील प्रवेश आणि मायक्रोफायलेरिया रक्तात सापडणे. या कालावधी विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि, हत्तीरोगाच्या संसर्गक्षम जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्यांचा असतो. लक्षणे व चिन्हेरोग लक्षणाच्या ४ अवस्था असतात. - जंतू शिरकावाची अवस्था- यामध्ये आजाराबाबत लक्षणे दिसू शकतात. - लक्षणविरहीत अवस्था / वाहक अवस्था - यामध्ये रुग्णांचा रात्रीच्या रक्तनमूना तपासणीत मायक्रो फायलेरिया आढळून येतात मात्र रुग्णांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे आढळून येत नाहीत. - तीव्र लक्षण अवस्था- या अवस्थेमध्ये ताप, लसीकाग्रंथीचा दाह, लसीकाग्रंथीना सूज तसेच पुरुषांमध्ये वृषणदाह इ. लक्षणे दिसून येतात. - दिर्घकालीन संसर्ग अवस्था- या अवस्थेमध्ये हात, पाय व बाहय जननेंद्रियावर सूज, अंडवृध्दी इ. लक्षणे दिसतात. निदानहतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८. ३० ते १२ दरम्यान रक्तनमूना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते. - ज्या रुग्णांमध्ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्ती ३०० मिलीग्रॅम ) या प्रमाणात १२ दिवस देण्यात येतात. - रुग्णांने पायाची स्वच्छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्यायाम करणे हे महत्वाचे असते (विकृती व्यवस्थापन ) - हत्तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक असते. |
धनबाद, 08 जानेवारीः भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला भाग पाडून जमिनीवरील थुंकी चाटायला लावली (forced to lick spit) आहे. तसेच संबंधित व्यक्तीला 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला भाग पाडलं आहे. संबंधित घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील धनबाद (Dhanbad) येथील आहे. या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM hemant Soren) यांनी घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईनंतर धनबादमध्ये भाजपकडून 'सद्बुद्धी मौन आंदोलन'चं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी वाहतूक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. भाजपचे धनबादचे खासदार पीएन सिंह आणि भाजप आमदार राज सिन्हा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान येथील एका व्यक्तीने भाजपच्या प्रदेश अध्यक्षांना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच अपशब्द वापरले. यानंतर, संतापलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. एवढ्यावर मन भरलं नाही म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडलं आहे. तसेच 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र या घटनेचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाल्यानंतर, या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी घेतली आहे. तसेच ट्विट करून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शांततेत जीवन जगणाऱ्या झारखंडवासीयांच्या राज्यात शत्रुत्वाला जागा असू शकत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
जागतिक महिलादिनासाठी व्हिंडोज युजर्ससाठी खास महिलांसाठी अनेक अॅप व्हिडोंज स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ब्यूटी टिप्सपासून ते सुरक्षिततेपर्यंतचे सर्व अॅप उपलब्ध केले आहेत. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. धावपळीच्या जगात महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही किंवा वैद्यकीय उपचार घ्यायला सवड मिळत नाही. त्याचप्रमाणे सतत फिरतीवर असणा-या महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक काळजी घ्यावी लागते. अशा वेळेस जर प्रसंग उद्भवल्यास काय करायचं? आपल्या नातेवाइकांशी कसा संपर्क साधायचा याचे निरसन करणारे अॅप व्हिंडोज स्टोअरने उपलब्ध करून दिले आहे. आपल्या अडचणीच्या काळात जर थेट पोलिसांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला हा आयवॉच पोलीस अॅप उपयोगी ठरेल. कारण जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटेल किंवा तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही थेट एसओएस इर्मजन्सी मॅसेज पोलिसांच्या कंट्रोल रूमपर्यंत पाठवू शकता. या अॅपद्वारे पोलीस तुमचा व्हीडियोही पाहू शकतील. त्यामुळे तुम्हाला शोधायला पोलिसांना मदत होईल. गुन्हेगारांना अटक करायला सोपं जाईल. योगा हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम. दिवासाच्या सुरुवातीला केलेला योगा आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळावी याकरता आरोग्यवर्धक आहे. या अॅपमध्ये २७ प्रकारचे विविध योगा प्रकार आहेत, ज्यामध्ये योगा करताना आपल्या शरीराची आकृती, योगाचे फोटो आणि संपूर्ण माहिती नमूद केली आहे. प्रत्येक स्त्रीला संपूर्ण दिनचक्रात अनेक कामं पार पाडायची असतात. प्रत्येक वेळी ते आपल्या लक्षातच राहील असं नाही. काही वेळा एक काम करताना दुसरं काम आपण विसरतो. अशा वेळेस वननोट हा अॅप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आपल्या दैनंदिन जीवनाच्या दिनक्रमाचं या वननोटमध्ये नमूद करणे, व्हॉईस नोट, फोटो नोट करणे आदी महत्त्वाची कामे वननोट अॅप करतं. यू डू अॅप हे रिमांईडर अॅप्लिकेशन आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी यात नमूद करू शकतो. लाईव्ह टाईमलाईन, युजर डिफाईन, जीपीएस लोकेशन्स, कॅलेन्डर व्ह्यू, टास्क हिस्टरी आणि इतर. यामध्ये नवं असं की कामासोबतच ते काम कोठे करायचे आहे याचे जीपीएस लोकेशन सेट करता येऊ शकता येणार आहे. या अॅपमुळे आपण आपल्या जवळ असणा-या नातेवाइकांच्या संपर्कात राहू शकाल. जर तुम्ही अडचणीत असाल तर या अॅपमध्ये असलेल्या फिचरवर जर क्लिक केल्यास तुमच्या नातेवाइकांना त्याचा अॅलर्ट मॅसेज पोहोचेल. त्यामुळे संकटकाळात तुमच्या आसपास असणारी माणसं तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला मदत करतील. जीपीएस, जीपीआरएस, एसएमएस, ईमेल्स याशिवाय हे अॅप आपल्या फेसबुक प्रोफाईलसोबतही कनेक्टेड आहे. ज्यामुळे तुमचं लोकेशन फेसबुकवरील निदान एका तरी मित्राला कळू शकेल. या अॅपमध्ये एक 'पॅनिक' बटन आहे, जेणेकरून हे बटन दाबल्यास तुमच्या नातेवाइकांपर्यंत एसओएस इमर्जन्सी मॅसेज पोहोचेल. मदतीच्या काळात हॉस्पिटल, पोलीस, आपले नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी गार्डियन अॅप हा सर्वात महत्त्वाचा अॅप आहे. कारण हे अॅप इन्स्टॉल करतानाच आपल्या जवळच्या हॉस्पिटल, पोलीस, आपले नातेवाईक यांचे संपर्क क्रमांक विचारतो, त्यामुळे असुरक्षिततेच्या काळात आपण एक बटन प्रेस केल्यास या तिनही ठिकाणी एकाच वेळी एसओएस इमर्जन्सी मॅसेज पोहोचवला जातो. त्याचबरोबर या अॅपमुळे आपले लोकेशन ट्रॅक करता येऊ शकते. जर तुम्ही नव्या जागेत किंवा नव्या ठिकाणी फिरायला जात असाल तर हा अॅप महत्त्वाचा आहे. या अॅपमुळे त्या जागेची सुरक्षितता आपल्याला कळू शकणार आहे. जागेच्या सुरक्षिततेच्या बाबतीतील माहिती, फोटो या अॅपमुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. सतत फिरतीवर असणा-या आणि नव्या जागेत जाणा-या महिलांना हे अॅप महत्त्वाचं आहे. काम कितीही असलं तरी आपलं व्यक्तिमत्त्व सुंदर दिसावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे व्हिंडोजमध्ये असणा-या ब्यूटी टीप्स या अॅपमुळे अगदी कमी वेळात स्वतःच्या चेह-याची निगा कशी राखावी हे कळू शकेल. त्याशिवाय झटपट मेकओव्हर कसा करावा याविषयी माहिती देण्यात आली आहे. अति खर्च, पैशांची अवाजवी उडवाउडवी अशी काहीशी महिलांची ओळख आहे. परंतु सुपर व्हुमन मात्र पैशांची सेव्हिंग करतात. त्यामुळे स्पेन्डींग ट्रॅकर त्यांना खर्चापासून बचाव करतात. आपल्या ऑनलाईन शॉपिंगवर हे व्हिडोंज अॅप लक्ष ठेवतं आणि आपल्या खर्चावर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करतं. |
ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. 72 वर्षीय खलिदा यांना उच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच जामीन मंजुर केला होता पण त्यांच्या सुटकेला आव्हान देण्यात आल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या जामीनाबाबत हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत त्यांना जामीन मंजुर केला. अनाथालयासाठीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या शिक्षेलाही त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून त्याचा निर्णय येत्या 31 जुलै पर्यंत लागणार आहे. त्यांनी त्यांचे पती व बांगलादेशचे माजी अध्यक्ष झियाउर रहमान यांच्या नावाने एक अनाथालय सुरू केले होते त्याला विदेशातून मिळालेल्या देणग्यांमधून त्यांनी सुमारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. |
अशा नवीन डिझाइन विकासासाठी फॅशनेबल महिलांचा प्रेम म्हणून स्लिम इग्गिन्स दररोज वाढतो. यातील आणि इतर मनोरंजक फॅशनस्टास प्रश्नांची, आपण या लेखात उत्तर देण्याचा प्रयत्न करू. Jeggins लवचिक साहित्य पासून sewn, सामान्य एल्क पासून खूपच वेगळ्या नाहीत तथापि, निळ्या रंगाचे अनुकरण करणारे रंगमंच, सजावटीच्या आणि ओळीच्या उपस्थितीमुळे त्यांना अधिक रुचिपूर्ण आणि अष्टपैलू बनते. थोडक्यात, लहान मुलांच्या अंगावर पिलूंचे आच्छादन लेगिंग आणि सर्व आवडत्या हडकुळा जीन्स यांच्यातील क्रॉस असतात. सामान्य जीन्स प्रमाणे, मादी स्लिम जिग्निन्स विविध आवृत्त्यांमध्ये सादर केले जातातः रंगांचा भरपूर प्रमाणात असणे याशिवाय, सजावटीचे घटक आणि कटांचे वैशिष्ट्ये वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सीझरच्या नॉव्हेल्टीमध्ये बॅनट्स, रिव्हट्स, रिकसेस, स्टिचस आणि तसेच rhinestones किंवा buttons सह सजावटी उत्पादनांसहित डेनिम लेगिंग्ज आहेत. शैलीसाठी, मुख्यतः मॉडेल्स भिन्न असतातः कमी किंवा उच्च कंबर, प्रत्येक स्त्रीला संविधानानुसार आणि वैयक्तिक प्राधान्यांच्या आधारावर योग्य पर्याय निवडण्याचा अधिकार आहे. अक्षरशः सर्व उत्पादनांमध्ये लवचिक लवचिक कमरपट्टा असतो, ज्यामुळे आपण त्या मुलींना ज्याचे आदर्श आदर्शापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पॅंट घालता येतात. याव्यतिरिक्त, पूर्ण स्त्रियांना अतिरंजित कंबर असलेली विशेष गाडी इत्यादी पुरविल्या जातात, ज्यामुळे कट-ऑफ सामग्री आणि गुणधर्मांच्या गुणधर्मांमुळे आपल्याला चित्राची काही कमतरता लपविण्याची परवानगी मिळते. पुश-अप इफेक्ट्स चांगले आहेत कारण ते जास्तीचे जाड तयार करत नाहीत, ते सहजपणे शूजांमध्ये भरतात, हालचालींना अडथळा आणू नका, आंतरिक अवयवांना चिरडून टाकू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कमर आणि नितंबांवर जास्तीचे सेंटीमीटर लपवा. फॅशनेबल इफ्जेिंग कसे वापरावे? |
मुंबई : विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कांदाफेको आणि तूरडाळ फेको आंदोलन केलं. आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. दरम्यान, पोलिसांनी राजू शेट्टींसह आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. "हे आंदोलन माझ्याविरोधात नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. तसंच हे आंदोलन आहे. आमच्यात संवाद आहे. कम्युनिकेशन गॅप नाही," असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. |
Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in) साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आजपासून सुरु झालेल्या बंदात झाले. याच पार्श्वभूमीवर 19 जानेवारी पासून सुरु झालेला बंद उद्या म्हणजेच 20 जानेवारीला देखील सुरुच राहणार आहे, अशी माहिती शिर्डी येथील स्थानिकांनी दिली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद उद्याही कायम राहणार आहे. शिर्डीत आज सुरु झालेल्या बंदात हॉटेल, वाहतूक आणि अन्य सुविधा बंद राहिल्या होत्या. असं असलं तरी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष दिपक मुगलीकर (Deepak Mugulikar) यांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावे केले होते यात भर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत "ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती. यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होऊन पाथरी मध्ये 100 नव्हे तर 200 कोटींची कामे केली तरी चालतील पण त्या ठिकाणाला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून संबोधू नका असा पवित्र स्वीकारला होता. त्याचेच रुपांतर बंदात झाले असून हा बंद उद्याही कायम राहणार आहे. यावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, 'साईसतचरित्र'मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हंटले आहे. याच बाबींच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. |
Joker Spyware Apps: जोकर मालवेयरने बाधित असलेले 8 नवीन अॅप्स 50,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले होते. जोकर मालवेयरने बाधित 8 नवीन अॅप्स गुगल प्ले स्टोरवर सापडले आहेत, अशी माहिती सायबर सिक्युरिटी फार्म क्विक हिलने दिली. हे अॅप्स 50,000 पेक्षा जास्त लोकांनी प्ले स्टोर वरून डाउनलोड केले आहेत. हा मालवेयर जाहिराती वापरत असल्याचे भासवून आणि युजर्सना पेड सर्व्हिस त्यांच्या न काळात विकत घेण्यास लावून त्यांचा डेटा चोरतो, असे क्विक हिलने सांगितले. (8 new apps infected by joker spyware downloaded by 50,000) जोकर मालवेयरने बाधित अॅप्सची यादीः या अॅप्सची माहिती गुगलला देण्यात आली असून प्ले स्टोरवरून हे अॅप्स हटवण्यात आले आहेत. जोकर मालवेयरचा जाहिरातींशी इंटरॅक्ट करत असल्याचे भासवून युजर्सचे एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिवाइसची माहिती, ओटीपी इत्यादी माहिती चोरतो. चोरलेल्या माहितीचा वापर करून हा मालवेयर युजर्सच्या न कळत प्रीमियम सर्व्हिसेसना सबस्क्राईब करतो. अश्या अॅप्सपासून वाचण्यासाठी काही टिप्सः - अॅपला कोणतीही परवानगी देताना विचार करावा. गरज नसल्यास परवानगी नाकारावी. |
नवी दिल्लीः पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मसूद अझरला काळ्या यादीत टाकण्याची भारताची मागणी सुरक्षा परिषदेत अनेक दिवस चीनमुळे रखडली होती. या प्रकरणाचा बदला घेण्याची संधी भारताला WHOमुळे मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २२ मे रोजी होणार असलेल्या बैठकीत भारताची एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या चेअरमनपदावर निवड होण्याची चिन्ह दिसत आहेत. हे पद स्वीकारल्यानंतर चीनची कोरोना प्रकरणात चौकशी करण्याची तयारी करण्याचे संकेत भारताने दिले आहेत. याआधी WHOचे सदस्य असलेल्या ६२ देशांनी कोरोना प्रकरणी चीनची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये पायाभूत विकासाशी संबंधित प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कोविड१९ विषाणू या मुद्यावर प्रसारमाध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती. ही भारताची कोरोना प्रकरणातील वाटचालींचे संकेत देणारी प्रतिक्रिया असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात सुरू आहे. गडकरी यांनी कोविड१९ हा विषाणू नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार झाला असण्याची शक्यता आहे, असे मतप्रदर्शन केले होते. आधीच अमेरिका आणि चीन यांच्यात कोरोना प्रश्नावरुन तणाव वाढला आहे. अशा वातावरणात चीनच्या चौकशीची मागणी पुढे आल्यावर भारताकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. भारत हा आदेश देऊन मसूद अझर प्रकरणात चीनने अनेक दिवस केलेल्या कोंडीचा बदला घेईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सुरक्षा परिषदेत नकाराधिकार वापरुन मसूद अझरचे प्रकरण चर्चेलाच येणार नाही, अशी व्यवस्था चीनने केली होती. चीनच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मसूद अझर विनाअडथळा भारतविरोधी कारवाया करू शकत होता. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवून काळ्या यादीत टाकण्याचा तसेच त्याच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांवर बंदी आणण्याचा, बँक खाती आणि लॉकर सील करण्याचा प्रस्ताव भारताने अमेरिकेच्या माध्यमातून सुरक्षा परिषदेत सादर केला होता. चीनने कोंडी केल्यामुळेच हा प्रस्ताव रखडला होता. भारताने मसूद अझर विरोधात सर्वात आधी २००९ मध्ये एक प्रस्ताव सादर केला. चीनने नकाराधिकार वापरुन चर्चेला येण्याआधीच प्रस्ताव फेटाळला. नंतर २०१६ आणि २०१७ मध्ये भारताच्यावतीने अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे मसूद अझर विरोधात प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव नंतर पुन्हा एकदा सादर करण्यात आला. प्रत्येकवेळी चीनने नकाराधिकार वापरला. अखेर चीनवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आणून भारताला हा प्रस्ताव सुरक्षा परिषदेतून मंजूर करुन घ्यावा लागला. चीनने केलेल्या कोंडीमुळे १० वर्ष मसूद अझरविरोधात कारवाई झाली नव्हती. या प्रकाराचा भारत कशा प्रकारे बदला घेतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण तसेच त्यानंतरचे आणखी काही शे रुग्ण चीनच्या वुहान शहर आणि आसपासच्या परिसरात आढळले आहेत. वुहान जवळच चीनची विषाणूंवर संशोधन करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत दीड हजार विषाणू नियंत्रित वातावरणात सुरक्षित असल्याचे ट्वीट काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या प्रशासनाने हे ट्वीट कोरोना संकट तीव्र झाल्यानंतर डीलीट केले होते. अमेरिकेनेही कोरोना प्रकरणी चीनवर लपवाछपवीचा आरोप केला. कोरोना संकटात WHOची बैठक झाली नाही आणि संघटनेच्या प्रमुखांवर चीनचे दूत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आरोप सुरू झाले. या पार्श्वभूमीवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर WHOने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होताच भारताला 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'चे पद मिळावे यासाठी पडद्याआड हालचाली सुरू झाल्या आहेत. WHOच्या आग्नेय आशिया गटाने (South East Asia Group) 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'च्या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला WHOचे सदस्य असलेल्या बहुसंख्य देशांनी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. WHOच्या 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'ला आरोग्याशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णय घेण्याचा तसेच आरोग्याशी संबंधित हेळसांड होत असल्यास चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार आहे. कोरोना प्रकरणी चीनची चौकशी करण्याच्या मागणीवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'कडे आहे. भारताने चौकशीचे आदेश दिल्यास त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडणार आहेत. कोरोनाप्रश्नी अमेरिकेने चीनवर थेट माहिती लपवल्याचा आरोप केला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला चायना व्हायरस असे नवे नाव दिले. हा थेट हल्ला झोंबल्यानंतर चीनने सावध प्रतिक्रिया दिली. पण अमेरिका-चीन तणाव वाढला. या घटनेनंतर चीनने आक्रमक पवित्रा घेत शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अरेरावी करायला सुरुवात केली. भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला. दक्षिण चीन समुद्रात युद्ध सराव सुरू केला. पण चीनच्या हालचालींना भारत आणि अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर आले. भारताने चीनची घुसखोरी रोखली आणि अमेरिकेने चीनच्या युद्धसरावावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांना दक्षिण चीन समुद्रात पाठवले. एकीकडे खडाखडी सुरू असताना भारत सरकारने अमेरिकेशी चर्चा केली. अमेरिकेला हायड्रोक्लोरोक्विन गोळ्यांचा साठा पाठवला तर अमेरिकेतून व्हेंटिलेटर मागवले. ही आरोग्य शिष्टाई WHOच्या बैठकीआधी झाली आहे. या घडामोडींकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक गंभीरपणे बघत आहेत. हे सांकेतिक राजकारण पुढे कोरोना मुद्यावरुन काय वळण घेते याकडे जगाचे लक्ष लागले आहे. चीनने परिस्थितीचा अंदाज येऊ लागताच कोरोना प्रकरणातील आरोप फेटाळले आहेत. तांत्रिक मुद्दे पुढे करुन स्वतःचा बचाव सुरू केला आहे. WHOच्या बैठकीत कोरोना प्रकरणात अडचणीत आल्यास हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन वेळ मारुन नेण्याची तयारी चीन करत असल्याचे वृत्त आहे. |
सरासरी १०० महिलांना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात दर महिन्याला रेल्वेने प्रवास करणाऱ्या सरासरी १०० महिलांना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे बोर्डाने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून ही माहिती समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने चार वर्षांपूर्वी संपूर्ण देशातील रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी ९८३३३३११११ हेल्पलाइन सुरू केली. गेल्या वर्षात १२०० महिलांनी या हेल्पलाइनवर तक्रारी नोंदविल्या आहेत तर, या वर्षात जानेवारीत ८३ आणि फेब्रुवारीमध्ये ९२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांच्या छेडछाडीबरोबरच मोबाइल व दागिने चोरी, प्रकृती अस्वास्थ्य आदी तक्रारींचाही समावेश आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हेल्पलाइनचे राज्याचे केंद्र मुंबईत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून यावर संपर्क साधल्यानंतर सर्वप्रथम मुंबई कार्यालयाकडे तक्रार स्वीकारली जाते आणि तेथून संबंधित रेल्वेच्या मार्गावरील लोहमार्ग पोलिसांना कळविली जाते. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ती गाडी अडवून संबंधितांवर कारवाई करतात. दररोज शेकडो महिलांबरोबर गैरप्रकार घडतात. मात्र, महिला प्रवाशांकडून त्या प्रमाणात तक्रार नोंदविली जात नसल्याने हेल्पलाइनला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमधून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे प्रवास करताना महिचे प्रकृती बिघडणे, पर्स, मोबाइल चोरीला जाणे किंवा हरवणे, छेडछाड, पुरुषांकडून शिविगाळ, महिलांच्या डब्यात पुरुषांचा शिरकाव अशा प्रकारच्या तक्रारींचे निवारणही या हेल्पलाइनच्या माध्यमातून केले जाते. रेल्वे विभाग व लोहमार्ग पोलिस महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे महिलांना येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी, असे अवाहन हेल्पलाइन विभागाने केले आहे. |
अमेरिकन थ्रिलर "जॉन विक" (2014) प्रथम विशालता चाड Stahelski च्या धाडस एक तल्लख दिग्दर्शन 'बनला होता, मॅट्रिक्स, "दावीद आणि Leitch, कायम बदली नट म्हणून ब्रेडा कफ मध्ये Keanu रीव्स एकदा नक्कल" फाईट क्लब "पासून. चित्रपटात, तारांकित Kianu Rivz अप्रतीम, प्रकल्प कार्यकारी निर्माता, आणि स्वीडिश अभिनेता मायकल Nyqvist भूमिका बोलत. व्यावसायिक चित्रपट समीक्षक कृती मूव्ही "जॉन विक" (चित्रपट परीक्षण अतिशय वादग्रस्त आहे) टेप उत्तम प्रकारे एकात्मिक दिसते की, खरं करण्यासाठी त्यांची वृत्ती व्यक्त करणे अवघड होते. प्रेक्षक-सर्व प्रभावी व्यक्ती क्रिया दृश्यांना ब्रह्मानंद अनुभव सूचित perfectionists: प्रत्येक उत्तम प्रकारे प्रत्येक कृती जाहीर बुलेट डोक्यात हळूवारपणे पडत, प्रत्येक वाक्यांश - सत्यापित आणि समर्पक, बदल फक्त अवास्तव आहे फेकून काहीतरी किंवा. त्यामुळे चित्रपट "जॉन विक" IMDb आवृत्ती मुख्यतः laudatory पुनरावलोकने आणि रेटिंगः 7. 20. हिंसा भरपूर प्रमाणात असणे स्क्रीनवर असूनही, चित्रपट निर्माता, क्रिया चित्रपट "जॉन विक", विश्लेषण, चित्रपट योग्य डाव्या, आता "आण्विक बडीशेप" म्हणून केले नाही पुनरावलोकन करतो. उलट, तज्ञ सर्व वेळ प्रचंड सौंदर्यशास्त्र, फक्त व्हिज्युअल नाही भरल्यावरही आहे पासून, कॉमिक बुक अस्तित्वात नसलेली चित्रपट जूळवून घेण्याची प्रक्रिया किंवा त्याचा परिणाम पासून टेप तुलनेत. आत्मा गुन्हा एक संपूर्ण पौराणिक उभी जे कॉमिक्स आणि कथा, impregnated. संस्था, त्यांचे डॉक्टर, सुमारे सहकारी संघ सुटका समर्पित सेवा, हत्या करण्यासाठी स्थापन करण्यात हॉटेल - चित्रपट आम्ही दोन कुळ किलर ऑपरेट आणि तेथे एक गुन्हेगार पायाभूत सुविधा आहे जे एक समांतर वास्तव सेट केले जाते. रोमांचक फायदा "जॉन विक" समीक्षक चिडका शेतकरी मोकळेपणाने क्रिया शैली छान सवयच आणि कसून आक्रमक नॉयर परिवर्तन शकलो कोण व्यावसायिक लेखक म्हणतात. त्यांच्या स्वतः च्या निर्मितीच्या "गुरुत्व मध्यभागी" निर्धारित करण्याचा अधिकार निर्माते. (एक Sniper रायफल फाडली Uillem Defo लपवत न करता, त्यांना दरम्यान ओळीवर) फक्त पांढरा आणि काळा रंगः प्रकल्प पटकथालेखक टन माहीत आहे. - शूर आणि जिवावर उदार, पण अतिशय विनोद असह्य, विरळ संवाद, पण अर्थपूर्ण, सुंदर स्त्री, पुरुषः लेखक, सहभागी पुनरावलोकन "जॉन विक" द्वारे दर्शविले म्हणून. त्याच्या साधेपणा मध्ये सुंदर हे चित्रपट archetypal साहित्य क्वचितच प्रेक्षकांच्या भावना जिवंत होऊ म्हणून, नवोदित दिग्दर्शक वाट बघत असू शकते. शैली आणि क्रिया लेखकाचे अर्थ, आणि आमंत्रित चित्रपट तारे गौरव सुदैवाने, संचालक, दोन प्रमुख घटक द्वारे काम चित्रपट. Kianu Rivz, एक किलर एकमेव निर्णायक या मुलांना मस्त "चालना दिली की," फक्त खरोखर करिष्माई चित्रपट तारे ठरले. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे प्रकल्प मुख्यतः सकारात्मक आढावा होते. वेबसाइट कुजलेले टोमॅटो चित्रपट मते 36 आढावा आधारित 6. 8 उपचार साइट 10 बाहेर Metacritic चित्रकला 100 67 अंश अमूल्य होते च्या सरासरीने धावसंख्या मिळवला. सोडून 'जॉन विक' पुनरावलोकने, सिनेमा तज्ञ शब्द mince नाही. त्यामुळे, पीटर Travers 'रोलिंग स्टोन', बोलका अभिनेता च्या खेळ आवर्जून दखल घेण्यासारखे, प्रकल्प तीन ते चार तारे केले. अधिक उदार पालक जॉर्डन हॉफमन पाच चार तारे मुल्यमापन सशस्त्र दरोडेखोर. रिचर्ड Corliss म्हणाला, "कठोर कारवाई क्रिया-टेप सार आणि निर्मिती आणि Stahelski पाहिजे Leitch कठोर ड्राइव्ह हे लक्ष्य. " अभिनेता च्या वर्गात "Razzie" साठी नियुक्ती करण्यात आली होती "प्रतिष्ठा पुनर्स्थापनेसाठी पुरस्कार. " अनेक तिचे पुनरावलोकन केले सिनेमा स्क्रीन "क्लीनर" एक परतावा लेखक विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. गेल्या जवळजवळ vestiges - गुन्हे व्यवसाय, Tarantino प्रकाश हाताने 90 च्या व्यापक लोकप्रियता मध्ये चित्रपट आज मिळाले. म्हणून, चाहते की "जॉन विक" regarded जाऊ शकते विचार नाही फक्त काही परिस्थितीत लोक पुनरागमन Kiana रीव्स, पण आवश्यक आहे. या भूमिका Keanu रीव्स निर्माते केवळ वर्ण आमंत्रित करण्यात आले होते महान पाहिले. त्यामुळे त्याच्या ट्रेडमार्क तंत्र पूर्ण वापर कलाकार - एक उत्तम प्रकारे निर्विकार चेहरा शत्रूंचा नाश. त्याच्या शारीरिक तंदुरुस्ती आश्चर्य कारवाई शैली सर्वात अनुभवी प्रियकर. मिकाएल Nyqvist एक सुसंस्कृत रशियन माफिया म्हणून पूर्ण केलं होते, त्याचे चारित्र्य भाषेत अपशब्द दोन शिकलो. येन Maksheyn लेखक, होणारा दुर्गुणांपैकी प्रमाण त्यानुसार, "कॉन्टिनेन्टल" मालक, स्वरूपात दृश्यांना प्रतिनिधीत्व एक जोडी महान होते. अमेरिकन Adrianne Palicki एक थरारक कामगिरी मिस पर्किन्स वारंवार दर्शक लक्ष आकर्षित. कुख्यात खलनायक योसेफ Tarasoffa Alfie ऍलन, मनुष्य reincarnated Theon Greyjoy च्या "Thrones च्या गेम. " मागे 2015 उशिरा हिवाळ्यात चाड Stahelski आणि डेव्हिड Leitch ते चित्रपट या चित्रपटाचा सिक्वल काम करण्यास सुरुवात केली करण्यास तयार असाल की सांगितले. दुसरा भाग प्रीमिअरच्या हिवाळा 2017 गेल्या महिन्यात घडली होती. "जॉन विक 2" (2017) परीक्षणे प्रेक्षक अगदी मूळ चित्र अधिक उत्साही होते. यश बॉक्स ऑफिस रक्कम पुष्टी, $ 165. 013. 205 च्या टप्पा पार केला $ 40 000 000. दोन संचालक-पदार्पणासाठी प्रयत्न निर्माण पहिला चित्रपट उत्पादन अर्थसंकल्पाकडे, फक्त दाबा "लक्ष्य" आणि शैली व्याप्ती जवळजवळ रिक्त भरले. अर्थ सोपे आहे, पण प्रकल्प सत्यापित आहे फुटेज 2014 उत्तम प्रकारे विद्यमान ब्रँड आणि घराची ओढ च्या पाहण्यासाठी भांडवल नाही, आधुनिक कृती मूव्ही संदर्भात गेला. 8. 10: IMDB - "जॉन विक 2" तो होता तरी फक्त एक शॉट Stahelski घाण मध्ये चेहरा दाबा नाही, एक उत्कृष्ट पर्यवसान होते, आणि म्हणून मूळ रोमांचक पेक्षा अगदी जास्त रेट होते. चाड Stahelski प्रेक्षक पहिला चित्रपट तो खूप आवडले की सर्व डोस तिप्पट. पर्यवसान च्या प्रीमिअरच्या नंतर "जॉन विक 2" चित्रपट परीक्षणे फ्रेम Keanu रीव्स बघत सर्व समान नेत्रदीपक तकतकीत व्हिज्युअलायझेशन, डायनॅमिक स्थापना, virtuoso लढणे नृत्य दिग्दर्शनासाठी आणि नैसर्गिकरित्या नोंद आहे. आढावा मते, शाखा मूळ प्लॉट अनेकत्व, गोष्ट रचना गुंतागुंत आधारित खूश स्थापना retsendentov आणि नाटक इ मधील प्रमुख पात्र मिळून बदला. नायक पहिल्या भाग रीव्स शिक्षा तहान हलविले, तर तो माणूस कारवाई करण्यासाठी पर्यवसान मध्ये नेण्यात आहे कारण वर्तमान, उशिर हताश परिस्थिती प्रसारित. अतिशय धोक्यात त्याला अस्पष्ट मर्मभेदी आणि वर्ण अधिक उघड अर्थ. चित्र प्लॉट, अर्थातच, क्लिष्ट, आणि अनियमित dizzying हाइट्स गाठली आहे. जवळजवळ प्रेक्षक पहिल्या मिनिटे पासून खेळणी झाली आहे हे स्पष्ट केलेः अधिक अनेकदा भरपूर आणि चांगले फ्रेम मध्ये shootings आणि मारामारी दर वाढत रक्त सांडले, आणि रीव्स, त्याच्या '52 असूनही अशा युक्त्या फक्त विश्वास करू शकत नाही करते. जवळजवळ सर्व युक्त्या Keanu, बंदुक हाताळणी अनुभवी विशेष सैन्याने एजंट म्हणून तेव्हा स्वतंत्रपणे काम केले. नाही हेही खरे शिक्षक सह अभिनेता सहा महिने प्रशिक्षण. मसुदा भाग Stahelski आणि डेव्हिड Leitch Keanu अमेरिकन अभिनेता लॉरेन्स Fishburne पुन्हा दिसू लागले की उल्लेख नाही. या दोन गायक पहिल्या तीन नाटके, "मॅट्रिक्स" Wachowski भाऊ दिसले आहे. प्रभावी व्यक्ती "जॉन विक" (2017) लिहिलेली पुनरावलोकने प्रेरणा, धन्यवाद कल्पित पुनर्मीलन kinodueta च्या निर्मात्यांना पाहिल्यानंतर प्रेक्षक. इतर वर्ण, चित्रपट समीक्षक त्यानुसार, खास काही बाहेर उभे नाही. कोणीही उभे काप कमजोरी आहे, डॅनियल Dafoe, मूळ टेप मित्र जॉन, मार्कस खेळलेला यांनी केले. मुख्य शत्रू, इटालियन गुन्हेगारी गट Santino डे अँटोनियो डोके (Riccardo Skamarchio), ओंगळ आणि उद्दाम कारस्थानी चालू आहे, पण स्मृती पातळी, स्पष्ट खलनायक गाठली नाही. विशेष त्याचे निः शब्द सहाय्यक, अर्धवेळ अंगरक्षक ऍरीस (Rubi Rouz) काही साथीदारांची Santino संपूर्ण पॅक बाहेर उभे नाही. अभिनेत्री, अर्थातच, दैवी सामर्थ्य बहाल करण्यात आली, पण या वेळी ते दाखवा नाही जवळजवळ गुलाब. एक परिणाम म्हणून, "जॉन विक 2» (2017 चित्रपट) समीक्षक आढावा उंच होता. साइट kinoretsenzy व्यावसायिक समीक्षकांकडून कुजलेले टोमॅटो त्याच्या टक्केवारी रेटिंग पोहोचते 91 सूचित की सकारात्मक आढावा च्या जबरदस्त बहुतांश. ख्रिस Nashavati, लेखक आणि सहयोगी मनोरंजन साप्ताहिक चित्रपट timekeeping पहिल्या मिनिटे दरम्यान मृतदेह नुकसान होते प्रशंसा आहे, असे सांगितले. त्याच्या न्यायाच्या टॉम Huddleston, वेळ retsenzor, दर्शक बसा आणि भरपूर गती, युक्त्या आणि शैली आनंद प्रोत्साहन समर्थन पुरवतो. स्कॉट Mendelson पत्रकार आणि 'फोर्ब्स' आता सर्वात उत्कृष्ट, तरतरीत, व्यावसायिक सेट kinospektakley शैली रोमांचक एक भोगावी लागली. गीक गुहा च्या केजी यांचे छायालेखन करण्यापूर्वी असा दावा चित्रपट 2017 या शैली चित्रे शक्य खरे सिनेमा अगदी जवळ, तितकी आहे, मागील retsenzora विचार आहे. |
कारंजा लाड - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३. ३० वाजताच्या सुमारास कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्या हवाली केले. कारंजा लाड - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३. ३० वाजताच्या सुमारास कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्या हवाली केले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कारंजा शहर पोलीस शहरात २१ मार्च रोजी रात्री दरम्यान गस्त सुरू असताना वीज केंद्राजवळ एक संशयीत सकाळी ३. ३० वाजताच्या दरम्यान कारंजा शहर पोलिसांना आढळून आला. अधिक चौकशी केली असता, त्याचेकडे एक मांडूळ जातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवून चैकशी केली असता, तपासात आणखी दुसºया व्यक्तीकडेही एक साप असल्याचे निष्पण्ण झाले. त्या दोघांनाही कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. दरम्यान, शेख अहेमद अब्दुल जब्बार (३५) रा. दाईपूरा कारंजा व शेख जावेद शेख अहमद (३५) रा. मंगळवारा कारंजा अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर वन्य जीव अधीनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली. यावेळी अडीच किलो वजनाचा एक व एक किलो ७०० ग्रॅम वजनाचा ४२ इंच लांब व साडेपाच इंच जाड असे दोन साप पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर साप लाडखेड जि. यवतमाळ येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही कारंजा वनविभागाच्या हवाली केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता. त्या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सापांची तस्करी करणाºया टोळीचा पदार्फाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. |
मी मलाच समजतोय ! ! ! ! ! शोधतोय , ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतोय, तुकोबांच लहानपण देगा देवा आज खरच हवहवस वाटतय, थांबायलाही नकोय, होणार, अपेक्ष्यांचा बांध फुटतोय, आयुष्यातील प्रश्न चिन्ह मोठ होत, प्रत्येकाचा तोड शोधतोय, माझ आयुष्य संपलय लहानपणात, आता दुसर्यांसाठी जगतोय, नाही शक्ती मागतोय, शोधतोय, |
महाजनी ( ६ ) वामनराव विठ्ठल फडणवीस. ( ७) पुरुषोत्तम नारायण (८) बाळाजी रघुनाथ ( ९ ) रामचंद्र विश्वनाथ ( १० ) विनायक नीळकंठ ( ११) पांडू सकपाल हुजन्या ( १२ ) महादू शिंदा हुजन्या ( १३ ) खंडू शिर्का आणि ( १४ ) संजीना शिक. कंपनी सरकारच्या बहाल मजींतील अप्पासाहेच हा निवर्तल्याबरोबर त्याच्या कुटुंबियांची वासलात कशी लाविली गेली हे सांगितल्यानंतर काशीस प्रतापसिंह महाराजांच्या कुटुंबाची काय अवस्था होती तें सांगणे क्रमप्राप्त आहे. तेथें सुद्धां हाच नमुना चालू होता. त्याची कल्पना खाली दिलेल्या प्रतापसिंहाच्या राणीच्या पत्रावरून येईल. ' प्रतापसिंह महाराज निजधामास गेल्यास आज दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले तरी कंपनी सरकार माझी कांहींच दाद घेत नाहीं. महाराजांनीं मरणापूर्वी एकच दिवस म्हणजे ता. १३ - १० - १८४७ ला कंपनी सरकारला एक पत्र लिहून त्यांत त्यांस देण्यांत येत असलेला मासिक तनखा आपल्या मुलाच्या नांवानें चालवावा आणि माझी व्यवस्थाही पण पूर्वीप्रमाणेंच आमच्या खटल्याचा निकाल लागेतोपर्यंत ठेवावी अशी विनंति केली होती. ' १८४७ च्या नोव्हेंबरमध्ये सरकारास पुन्हां एकदां मीं पत्रद्वारें स्मरण दिले. त्याबरोबर पत्र न मिळाल्याचा बहाणा करण्यांत आला व मला मे मक जॉर्ज यांच्यामार्फत तोंडी अर्से कळविण्यांत आले की, माझा तनखा दरमद्दा ८०० रुपये, तसेंच माझ्या मुलासाठी २,५०० रुपये यापमाणें ३,३०० रुपये तनखा देण्यांत येईल. हे भाषण ऐकून मीं चकीतच झाले. कारण महाराजांचे वेळी दहा हजार रुपये तनखा मिळून सुद्धां आमचें कसेंबर्से भागत होतें. तेव्हां आतां मिळणा-या ३,३०० रुपयांत माझें कसें भागणार याचा सरकारनेंच विचार करावा ! ( प्रतापसिंहाच्या बरोबर सातायाहून १२०० मंडळी गेली होती. - तेव्हां राणीचे म्हणणे अक्षरशः खरें होतें. ) 'माझें हें म्हणणें कंपनी सरकारास कळविण्यांत आले तेव्हां मला उलट असे सांगण्यांत आले की, तुम्हांस हवा असल्यास ८०० रुपये तनखा घ्या. महाराजांनीं पुष्कळ पैसा सांठवून ठेविला आहे. हा निरोप ऐकून भी स्तंभितच झालें व मला चीडही आली. तेव्हां मीं सरकारास तोंडींच असे उत्तर दिले की, महाराजांनीं पुष्कळ पैसा ठेविला आहे हा केवळ भ्रम आहे. माझे शत्रू मला कसे छळीत आहेत याची कहाणी आतां महशूर आहे. ती सांगण्याची जरुरी नाहीं. माझ्या वाइटावर असलेले लोक अशा चमत्कारिक कंडचा उठ. वितात व असल्या भ्रामक बातम्या सरकारांत देनात. माझ्या मुलींत व माझ्यांत सध्यां तेढ उत्पन्न करण्यांत आली असून मुलीच्या बाजूकडील मंडळी असल्या खोटया बातम्या सरकारास देत असतील, तरी त्यांनी त्यावर विश्वास ठेवूं नये. या बाबतींत त्यांस खात्रीच करून घ्यावयाची असेल तर मी एका नेसल्या वस्त्रानिशीं वाड्याबाहेर जाऊन उभी राहतें व सरकारने सर्व वाड्याची झडती घेऊन आपली खात्री करावी. त्याला माझी हरकत नाहीं. उगाच साप साप म्हणून भुई बडवूं नये एवढीच विनंति आहे. ' महाराजांच्या उत्तरया उत्तराचा कांहीं एक परिणाम झाला नाहीं. क्रियेकरितां म्हणून ५० हजार रुपये देण्यांत आले. त्याबरोबरच माझ्या मासिक नेमणुकीचे ८०० रुपये आले होते. मी माझ्या नेमणुकीचे ८०० रुपये नाकारले व ५० हजार रुपये घेऊन महाराजांच्या उत्तरक्रियेकरितां काढलेले महाजनांचे कर्ज देऊन टाकिलें. ' या अर्जातच राणीनें सातान्यास जाऊन राहण्याची परवागी मागितली होती. बकासुराप्रमाणें हिंदी संस्थानिकांचीं संस्थानें घशांत टाकणान्या डलहौसीची कारकीर्द या वेळीं चालू होती. तेव्हां राणीच्या या अर्जाची कोणत्या तऱ्हेनें वासलात लागली असेल हें आतां लक्षांत येईल. प्रतापसिंहाने घेतलेला दत्तकपुत्र शाहु यानेंही गव्हर्नर जनरलला खालीलप्रमाणें अर्ज केला होता. ' प्रतापसिंह महाराजांनी आमच्या हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें मला दत्तक घेतलें आहे. या गोष्टीस आमच्या वंशांत दाखले आहेत. तसेच प्रतापसिंह महाराजांनीं माझ्या दत्तविधानाची सर्व हकीगत गव्हर्नर जनरलचे एजन्ट येथील त्या वेळचे कारपेन्टर यांच्या मार्फत कंपनी सरकारास कळविली आहे. माझ्या दत्तविधानानंतर दोन वर्षांनी छत्रपति प्रतापसिंह महाराज निधन पावले व लगेच सहा महिन्यांनी साताव्यास राज्य करणारे शहाजी राजे हेही निवर्तले. तेव्हां कंपनी सरकारने निर्माण केलेल्या सातारच्या गादीस कोणीही वारस नाहीं म्हणून ती खालसा करण्यांत येत आहे, असा निर्णय दिला. पण मी आतां असे जाहीर करूं इच्छितों कीं, मी 'सातारच्या गादीस वारस आहें.' मला प्रतापसिंह महाराजांनी दत्तक घेतले आहे. याशिवाय महाराजांचा दत्तकपुत्र म्हणून जरी आपणांत माझा इक्क मान्य नसेल तरी चिंता नाही. मी महाराजांचा पुतण्या लागतों. म्हणून सातारच्या गादीवर माझा वारसा हक्क आहे व तो आपण १८१९ च्या तहान्वयें मान्य करावा.. 'माझ्या मातोश्रीनेंही आपणांस खाजगी खर्चवेंचासंबंधी आमचे कसे हाल होत आहेत याची कल्पना देणारें एक पत्र धाडिलें आहे. तरी त्याचा सुद्धां योग्य तो विचार करावा. 'इंग्रज सरकारची न्यायी म्हणून कीर्ति महशूर आहे, तरी त्या बाबतीत मी आणि माझी आई, आम्ही दोघेंच अपवाद ठरूं नये.' काशीस राणीवर देखरेख करणारा एजंट त्या वेळपर्यंतचा स्वभावानें गोड व सभ्य होता व त्यास सातारच्या राजाबद्दल सहानुभूति वाटत असल्यामुळे तो वेळच्या वेळी त्यांची पत्रे गव्हर्नर जनरलकडे धाडीत असे. आतां तो बदलून त्या जागी इरसाल एग्लो-इंडियन वृत्तीचा स्टुअर्ट नांवाचा एक तिरसट एजन्ट आला होता. त्यास या सातारच्या छोटया राजाबद्दल व राणीबद्दल थोडासुद्धां आदर वा अनुकंपा वाटत नव्हती. म्हणून त्याने शाहूचें हे पत्र गव्हर्नर जनरलकडे धाडण्याचें नाकारलं. तेव्हां शाहूनें स्वतःच तें पत्र गव्हर्नर जनरल डलहौसीकडे धार्डिलें; पण त्यास ठरल्याप्रमाणें कचन्याची पेटी दाखविण्यांत आली. यानंतर इंग्लंडला या मायलेकरांनी आपली हकीगत कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना कळविली तरी त्याचा उपयोग झाला नाही. गव्हर्नर जनरल व कोर्ट ऑफ डायरेक्टरर्स यांच्यामध्ये सातान्यासंबंधी परस्पर पत्रव्यवहार चालू होता. सातारच्या राजासंबंधी काय धोरण ठेवावयाचें व काय करावयाचें याबद्दल निश्चित असें कांहींच ठरले नव्हतें. म्हणून कोर्ट ऑफ डायरेक्टर्स व गव्हर्नर जनरल मुखस्तंभासारखे स्तब्ध होते. हिंदुस्थान सरकारनें कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना पत्र लिहिले होते, ते असेंः 'राणीनें, आपला तनखा वाढवावा व साता-यास जाऊन राहण्याची परवानगी द्यावी म्हणून लिहिले आहे. मुलगा स्वतःस राजा म्हणवितो व तसें त्यानें अर्जांतही लिहिले आहे व या दोन्ही अजंस अजून उत्तरें गेलीं नाहींत. ग. ज. ची स्वारी मुंबईस असतांना त्यांच्या कानावर या गोष्टी घालण्यांत आल्या होत्या. 'राजपुत्र व त्याची आई यांपैकी कोणासही साताव्यास जाऊन राहण्याची परवानगी देण्यास मुंबई सरकार तयार नाहीं, हिंदुस्थान सरकारनें सातारच्या दत्तकपुत्रास शोभेसाच तनखा तोडून दिला होता. तसेंच त्याचें राणीच्या संबंधींचेंही धोरण पूर्ण औदार्याचे आहे. राजेसाहेबांची बाकी चुकती करण्याबद्दल आपणांकडून कळविण्यांत आलें त्यावरून आपलें धोरण याबाबतींत उदार आहे; पण तसे करण्याचें आतां कांहींच कारण नाहीं. राज्यावर त्यांचा कांहीं एक हक्क उरत नाहीं. हिंदुस्थान सरकारनें प्रतापसिंह महाराजांच्या मुलास राजा म्हणून तनखा तोडून देणें फारच धोक्याचे आहे. कारण तर्से केल्यास राजपुत्र त्याच्या ताब्यां - तील राज्याची मागणी करील; पण ते सर्व राज्य कंपनी सरकारनें खालसा केलें असून त्याच्यावर राजपुत्राचा कोणत्याही तऱ्हेचा हक्क नाहीं आणि याच मुद्यां - वर राणीसही राणी म्हणून तनखा वाढविण्याचे कारण नाहीं. ' आम्ही राणीस १,२०० रुपये पेन्शन देण्यास तयार आहेत. तसेच राणी जिवंत अर्सेतों मुलांसही पेन्शन देण्यास कांहीं एक हरकत नाहीं. 'राणी व राजपुत्र दोघंही राजचिन्हें व राज्य यावरील सर्व हक्क सोडून देण्यास तयार असतील तरच त्यांस वरील सवलती द्याव्या अशी हिं. सरकारची शिफारस आहे. ' या पत्रास कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडून खालीलप्रमाणे उत्तर १० जुलै १८५० ला आलेंः 'मार्गे देऊ केलेला ८०० रुपयांचा तनखा राणी मान्य करीत नसल्याकारणानें १,२०० रुपये तनखा देण्यांत यावा. यानंतर राणी व राजपुत्र या उभयतांनीं आपली सर्व राजचिन्हें व राज्यावरील हक्क सोडल्यास तुम्ही त्यांना पत्र लिहिलेल्या सवलती देणार असें म्हणतां, पण या बाबतींत आमचें मत असें कीं, त्यांना राजचिन्हें वगैरेंचा त्याग करावयास सांगणे म्हणजे नसत्या गोष्टीस महत्त्व देण्यासारखे आहे. तरी त्यांनीं राज्याचा बदोआ लिहून दिल्यानंतर मग खाजगी त-हेनें ते स्वतःस कांहीही म्हणोत त्याच्याशी आपणांस कांहीं कर्तव्य नाहीं. कंपनी सरकारने मात्र सर्व व्यवहार त्यांस सामान्य गृहस्थ समजून करावा. 'राणीस व राजपुत्रास साता-यास जाऊ देऊ नये असें आपलें मत आहे. पण आम्हांस तसे वाटत नाहीं. त्यांना व त्यांच्या इतर परिवाराला खुशाल सातांन्यास जाण्याची परवानगी द्यावी. यापुढे त्यांस काशीस ठेवण्यांत कांहींच तथ्य नाहीं.' अशा अर्थाचें कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचें उत्तर हिं. सरकारास आले. प्रतापसिंह महाराजांनंतर तीन वर्षे नुसते खलिते जाणें व त्यांची उत्तरें येण यांतच निघून गेली. या अवधींत सातारच्या राणीस खर्चासाठी एक दमडीही देण्यांत आली नाहीं. तेव्हां चिचारी टेंकीस आली. एवढ्या मोठ्या लव्याजम्याचा खर्च चालविण फार मुष्किलीचें झालें. सावकारांचे तगादे एकसारखे सुरू झाल्यामुळे राणीस अन्नान्नदशा आली. नवरा मेलेला, जवळ कळकळीनें काम करणारा मनुष्य नाहीं. एक कायतो रंगो बापूजी. पण तो सुद्धां सातासमुद्रापलीकडे इंग्लंडांत. इंग्रज सरकार तर सत्त्व पाहाण्यास विश्वामित्रासारखे हात धुवून पाठीस लागलेलें. तेव्हां या पेंचांतून कसें बाहेर पडावें हेंच त्या विचारसि समजेना. अशा ऐन आणीबाणीच्या वेळी बाळाजीपंत नातूची स्वारी हजर झाली. त्यानें राणी व राजकन्या यांच्यामध्ये भांडणे लावून देण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यकन्येच्या सांगण्यावरून राणीजवळ पैसा भरपूर आहे असे खोटेंच सरकारांत कळविण्यांत आलें या बातमीनें आधींच उदार हातानें मदत करणारें सरकार जास्तच चेकाळलें ! ८०० रुपयांवर पोटगी म्हणून एक पैही मिळणार नाही असे उत्तर कंपनी सरकारने दिले. सर्व बाजूंनी अशी केविलवाणी स्थती झाली असतांनासुद्धां प्रतापसिंह।च्या मार्गे तीन वर्षे तिनें कशीं तरी रेटलीं. पण शेवटीं अगदी टेंकीस आली व बिचारीस मुठीत नाक धरून इंग्रजांस शरण जाण्याचा प्रसंग आला. बाळाजीपंत नातूची स्वारीं वेळेवर हजर झाली व त्यानें राणीस असें सुचविलें कीं, आपण राज्याचा बदोआ लिहून देण्यास तयार असाल, रंगो बापूजीस इंग्लंडमधील सर्व चळवळ सोडून देऊन माघारीं बोलावण्याचा हुकूम कराल तर मी कंपनी सरकाराकडून तुम्हांस तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें नेमणूक करून देईन, उगाच हट्टास पटून स्वतःचा नाश करून घेऊं नका, हा बाळाजी पंताचा विचार राणीस निरुपायानें स्वीकारावा लागला. व तिनें राज्याचा बदोआ लिहून दिला, व रंगो बापूजीसही माघारी बोलाविलें. यानंतर राणी स्वतःचा तनखा ६० हजार रुपयांचा मागत होती. पण ते सुद्धां कंपनी सरकारनें नाकारलें व सालीना ३० हजार रुपयांची नेमणूक करून देण्यांत आली. यानंतर या सर्व मंडळींस साताव्यास जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हां प्रतापसिंह महाराजांची दुसरी स्त्री माईसाहेब व दत्तकपुत्र शाहू राजे हीं दोघें ता. ३।७।१८५४ रोजी सातान्यास कृष्णातीरीं येऊन दाखल झाली. तेव्हां सातान्याहून कै. अप्पासाहेब ऊर्फ शहाजी राजे यांची स्त्री सगुणाबाई व दत्तकपुत्र व्यंकोजी राजे हे त्यांस सामोरे गेले. नंतर परस्परांच्या भेटी झाल्या व मग सातान्यास येऊन स्वाया जुन्या राजवाड्यांत दाखल झाल्या. अशा तऱ्हेनें या वृक्षहीन वेलींची भेट झाली. त्या वेळी उभयतां राण्यांस मनस्वी दुःख झालें. दत्तकांची वासलात • ३८ ब्रिटिश न्यायमंदिरांतून आपणांस न्याय मिळेल, ब्रिटिश न्यायमंदिरांतून आपणांस न्याय मिळेल म्हणून एकसारखी आशा करीत बसलेला प्रतापसिंह मृगजलामार्गे धांवणान्या हरणाप्रमाणे हताश होऊन मरण पावला. त्याच्यानंतर फक्त सहा महिन्यांनींच राजतृष्णेच्या पायीं सख्ख्या भावाचा घात करणारा अप्पासाहेबही पण दुनियेपार झाला. हे दोघेही बंधू असे दुर्देवी कीं त्यांच्या पोटीं औरस संतान नव्हतें प्रतापसिंहान सेनापति बाळासाहेबाचा मुलगा दत्तक घेतला तर, अप्पासाहेबानेंही पण शेडगांवकर भोसल्यांपैकी एक मुलगा दत्तक घेऊन गादीस वारस निर्माण करून ठेवला. मृत माणसाविषयींचे रागलोभ त्याच्याबरोबरच नाहींसे झाले असे मानून चालणा-या आर्य संस्कृतीचा इंग्रज नव्हता. तो या दोघांही दत्तकांची वासलात लावून सातारचें राज्य घशांत टाकणार होता. राज्यास कायदेशीर वारस नाहीं आणि दत्तक आम्हांस मान्य नाहीं, या सचचीवर संस्थानें घशांत टाकून आपला राज्यविस्तार वाढविण्याचा नवीन बूट लॉर्ड ऑक्लंड गव्हर्नर जनरल असतांना निघाला होता. या नवीन धोरणासंबंधी आपआपली मतें व प्रांताप्रांतांची माहिती मागविण्यांत आली असतां मुंबईचा गव्हर्नर कारनॅक आपले मत व प्रांताची माहिती धाडतांना फारच खुश झाला. त्यानें असें नमूद केलें कीं, सातारच्या गादीवर हक्क सांगणान्या माजी व विद्यमान या दोन्ही राजांस औरस पुत्र नाहीं आणि त्यांचीं उतारवयें लक्षांत घेतां त्यांस पुत्र होण्याचा संभव फारच कमी आहे. तेव्हां त्यांच्या पश्चात सातारची गादी आपणांस खालसा करतां येईल. त्यांनी दोघांनी हिंदु चालीरीतीप्रमाणें दत्तक घेऊन गादीस वारस निर्माण केलाच तर त्यांचा हक्क मानणें अथवा धुडकावून लावणे हे सर्वस्वी कंपनी सरकाराच्या अखत्यारीत राहील. " सातारच्या गादी संबंधीं गव्हर्नरनें मारलेल्या या शेन्यावरून सातारची गादी खालसा करण्याकडेच कंपनी सरकारचा कल होता, हे स्पष्ट होतें. अप्पासाहेबास गादीवर बसवितांना त्याच्याकडून सुद्धां १८१९ चा तह मान्य करून घेण्यांत आला होता; तेव्हां तो तहनामा पाळण्याची जबाबदारी उभयतांवर सारखीच होती. सातारकरानें मात्र तहाच्या अटीप्रमाणे वागावयाचें व कंपनी सरकारने मात्र तिस्मारखानी वृत्तीनें चालावयाचें असा त्याचा अर्थ बिलकूल नव्हता. इ. स. १८१९ च्या तहनाम्याचे पहिलेच कलम असे आहे की, ' इंग्रज सरकार सातारचे वंशज वारस यांच्याशी असा तह करतें कीं- ' तेव्हां फक्त प्रतापसिंह व अप्पासाहेब यांच्याशीच इंग्रज तहनाम्यानें बांधले गेले होते जसें मुळींच नाहीं, तर तो करार त्यांनी त्यांच्या वंशजांशी सुद्धां केला होता. पण या सर्व गोष्टींना धाब्यावर बसवून सातारचें राज्य गट्ट करण्याचा कृतनिश्वय कंपनी सरकारनें केला आणि त्यानें आपली चाल तशीच चालू ठेविली. या दत्तक - प्रकरणी मुख्य तीन मुद्यांवर वाटाघाट चालू होती. ( १ ) शहाजी राजांनीं ( अप्पासाहेबानें ) ब्रिटिश सरकारच्या संमतिर्वाचून केलेलें दत्त विधान कायदेशीर मानावें कीं नाहीं. ( २ ) तें कायदेशीर धरलें तर मुंबई सरकारास न्यायाच्या किंवा जरुरीच्या दृष्टीनें तें मान्य करण्याचा अधिकार आहे किंवा नाहीं. ( ३ ) प्रतापसिंहाच्या दत्तकाचे व शहाजी राजे (अप्पासाहेब ) यांच्या दत्तकाचे हक्क काय आहेत. शहाजी राजे ऊर्फ अप्पासाहेब यांनी केलेलें दत्तविधान त्याच्या खाजगी जिंदगीपुरतें कायदेशीर आहे याबद्दल कोणाही मुत्सद्यांचें दुमत नव्हतें. पण हें दत्तविधान इ. स. १८१९ च्या तहाप्रमाणें राज्याधिकार चालविण्यास योग्य आहे किंवा नाहीं याबद्दल दुमत होते. आणि याबद्दल जो तो आपली अक्कल चालवून त्यांतून पळवाटा काढत होता. त्याने घेतलेला दत्तक हा कंपनी सरकारच्या परवानगीनें घेतला नाहीं सबब त्यास मान्यता देऊं नये व गादीस कायदेशीर वारस समजूं नये, कारण अप्पासाहेबानें दत्तकाबद्दल ह्या म्हणण्यांत कांहींच अर्थ नव्हता. परवानगी विचारली असता त्याचा तांतडीनें विचार हेतुपुरस्सर झाला नाहीं. शेवटीं सुद्धां फियर साहेबानें दत्तकाची परवानगी आणावी म्हणून अप्पासाहेबानें त्यास महाबळेश्वरीं गव्हर्नराकडे धाडिलें; पण तो माघारी येण्याच्या आंतच अप्पासाहेब मरणासन्न झाला व त्यास फियरच्या पश्चात दत्तक घेणे भाग पडलें. ही वस्तुस्थिति लक्षांत घेतां साहेबानें या गोष्टीची टाळाटाळ मुद्दाम हेतुपुरस्सर केली असें स्वच्छ दिसतें. तेव्हां हा मुद्दा अगदीं गैरलागू आहे. सत्याची चाड असणारा कोणीही मनुष्य याबद्दल काय म्हणेल याचा नमुना म्हणून सर जॉर्ज क्लार्क यांचे म्हणणें पाहण्यासारखें आहे. अप्पासाहेबानें केलेलें दत्तविधान कायदेशीर आहे की नाही याबद्दल सर जॉर्ज क्लार्कना शंकाच येत नाहीं. हिंदु कायद्याप्रमाणें व धर्माप्रमाणे ग्राह्य मानून तो दत्तकमुलगा राजाच्या खाजगी जिनगीस पूर्ण वारस आहे असें आपलें मत त्यांनीं ठांसून नमूद केलें आहे. आणि नंतर ते पुढे म्हणतात, ' या घराण्यांत पूर्वी दत्तक घेण्याचा प्रसंग आला तेव्हां परवानगी देण्याघेण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्या वेळीं हें राज्य स्वतंत्र होतें. पण आतां तशी परिस्थिति नाहीं. शिवाजी महाराजांचे राज्य पेशव्यांच्या राज्याबरोबरच नाहीसें झालें. आजचें सातारचें राज्य कंपनी सरकारशीं झालेल्या स. १८१९ च्या तहानें अस्तित्वांत आले आणि त्यावेळी जो तह झाला त्या तहांत असे स्पष्ट म्हटलें आहे कीं, त्या वेळचे महाराज व त्यांच्या मागून गादीवर येणारा प्रत्येक वारस यांशीं कंपनी सरकार आपला संबंध सलोख्याचा ठेवील. या अटीप्रमाणें कंपनी सरकार महाराजांशीं व त्यांच्या वारसांशी सलोख्यानें वागण्यास बांधलें गेलें आहे. तेव्हां महाराजांच्या गादीस जो कोणी लायक वारस असेल त्यास मान्यता देणें हें कंपनी सरकारचें कर्तव्य आहे. त्याप्रमाणे सातारचे शहाजी राजे यांनी दत्तक घेतला असून तो हिंदु चालीरीतीप्रमाणे व कायद्याप्रमाणें वारस आहे. तेव्हां त्यास कंपनी सरकारने मान्यता द्यावी हेच योग्य. ' येथील मांडलिंकांनी दत्तक घेण्यापूर्वी सार्वभौम सरकारची परवानगी घ्यावी असा दंडक निर्माण करण्यांत सार्वभौम सरकारचा हेतु सोज्ज्वल आहे. तक्तनशीन राजा निपुत्रिक असला तर मार्गे वारसाचद्दल तंटा अथवा रक्तपात न व्हावा म्हणून सार्वभौम सरकारच्या परवानगीची प्रथा पाडण्यांत आली आहे. तर्सेच सातारचे छत्रपति शहाजी राजे ऊर्फ अप्पासाहेब यांच्या पश्चात त्यांचे राज्य सरकारजमा होण्याचा संभव आहे की काय याबद्दल कोर्ट ऑफ डायरे क्टर्समध्ये स. १८४० मध्ये चर्चा झाली असतां खुद्द चेअरमननींच असे उद्गार काढले आहेत की, सातारा संस्थान वंशपरंपरागत चालणारें असून महाराजांस दत्तक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. दत्तक-प्रकरण आज नव्यानें निर्माण झाले आहे अर्से नाहीं. स. १८२७ सालीं दौलतराव शिंदे वारले त्या वेळीं त्यांनी दत्तक तर घेतला नाहींच; पण आपल्या मार्गे आपला वारस कोण असावा याबद्दल साधी इच्छा सुद्धां प्रदर्शित केली नाहीं. असे असतांना सुद्धां त्यांच्या कुटुंबास दत्तकाची परवानगी देण्यांत आली. पंतसचिव, फलटणचे निंबाळकर, जतचे डफळे वगैरे जहागिरदारांना दत्तकाची परवानगी स. १८१९ नंतर देण्यांत आली आहे. परवानग्या देतांना ज्या गोष्टींचा व कारणांचा विचार करण्यांत आला त्या सर्व गोष्टींचा साकल्यानें विचार करतां सातारकर छत्रपतींचा मुद्दा जास्तच जोरानें सिद्ध होतो. ' प्रांतांत शांतता आणि सुव्यवस्था राहावी हा हेतु हीं संस्थानें निर्माण करण्यांत एल्फिन्स्टनचा होता. त्या दृष्टीने विचार करतां साता-यासारखी संस्थानें म्हणजे ब्रिटिश सरकारचे मोठाले आधारस्तंभ होत. सातारच्या राज्यासंबंधीं विचार करतां माजी महाराजांच्या वतीनें चळवळ होऊन जो त्रास झाला सोडला तर या प्रांतांत शांतता व सुरक्षितता नांदण्यासाठी सातारकरांचा फारच उपयोग झाला आहे. भोसल्यांच्या घराण्यांत यापूर्वी कोल्हापूर, त्रावणकोर, आणि सातारा या तिन्ही शाखांत दत्तविधान होऊन राज्य चालू राहिलें आहे. सातारच्या अप्पासाहेबांना औरसपुत्र असता तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण दत्तकपुत्र हा सर्व ठिकाणीं औरस पुत्राच्या जागीच मानला जातो तेव्हां त्याच्याकडे औरसपुत्राचे सर्व हक्क चालू राहणें हेच न्यायाचें आहे. आपण ताब्यांत घेतलेले मुलूख जेव्हां पुन्हां जुन्या राजघराण्यांच्या ताब्यांत देण्यांत येतात त्या वेळी त्यांच्याशी जे करार होतात ते तर आपण पाळले पाहिजेतच. याशिवाय हे सर्व करार-मदार होतांना आपण त्यांचे जे समज करून दिलेले असतात त्यांस कोणत्याही तन्हेचा बाध न येईल अशा तऱ्हेनें वागणें हेंच नीतिदृष्टया युक्त आहे. तहांत जर ' निरंतर' शब्द असेल तर त्याच्या वारसाशी त्याजकडून तर्से योग्य कारण घडेपर्यंत तहांतील अटीप्रमाणे वागणे हेच ब्रिटिश सरकारचें कर्तव्य आहे. पण शब्दांची ओढाताण करून त्यांतून आपणांस पाहिजे तसा अर्थ निर्माण करणे किंवा तहांतील संदिग्धतेचा फायदा घेऊन राज्य खालसा करणे योग्य होणार नाहीं. सातारचें राज्य खालसा करणें हें आपल्या एकंदर राजकीय कारभाराच्या दृष्टीने जरी आज फायद्याचे वाटत असले तरी आपण आपली न्यायदृष्टि शाबूत ठेवणेंच योग्य होईल. डेक्कन आणि दक्षिण मराठा प्रांत या प्रांतांना जोडणारा सातारा प्रांत हा एक महत्त्वाचा दुवा आहे; पण हा दुवा अन्यायानें ताब्यांत घेण्यापेक्षां सातारकर छत्रपतींचा दुवा घेणेंच अधिक न्यायाचें आहे. छत्रपतींकडून कोणत्याही प्रकारची आगळीक न झाल्या कारणानें आपण केलेला तइ प्रामाणिकपणे पाळणें हेंच योग्य आहे. ' कंपनी सरकारने या देशांत केलेल्या अनेक तहांचा जर कोणता गुणविशेष असेल तर संदिग्धपणा. पण त्याचा फायदा घेऊन आपण जर राज्ये खालसा करण्याचा तडाका सुरू केला तर त्याचे परिणाम भोगण्याचा प्रसंग आपणांवर झाल्यावांचून राहणार नाहीं. पण सातारकरांच्या तहाच्या अटी पाहतां त्यांत संदिग्धपणा कोठेंच नाहीं. त्यांतील अटी अत्यंत स्पष्ट आहेत. त्यांत कांहीं शंका असलीच तर तो तह करणारे मि. एल्फिन्स्टन व ग्रँट डफ यांस विचारून त्या शंकांचे निरसन करून घ्यावें व हा प्रश्न एकदां कायमचा निकालांत काढावा. हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यासंबंधींचें आपले धोरण अत्यंत थिल्लरपणाचें झालें आहे. त्याला कोणताच धरचंद उरलेला नाहीं. तेव्हां संस्थानिकां संबंधी कोणतें धारेण ठेवावें याचा निकाल जाहीरपणे लावावा म्हणजे उभयपक्षी फार चांगलें होईल; व पुन्हां घोळ निर्माण होणार नाहीं. ' या दत्तक - प्रकरणी सर जॉर्ज क्लार्क यांचे भाष्यच फक्त न्यायास धरून आहे. बाकीच्या सर्वांनी या बाबतीत मोठें तर्ककर्कश असें तर्कट रचलें आहे.. - एकेकांनीं एक हात लांकडाची नऊ हात ढलपी काढिली आहे, तर कांहींकांहींनी आपल्या स्वार्थी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांपैकी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचे प्रमुख सभासद लॉर्ड हॉचहाऊस यांना प्रतापसिंह महाराज निवर्तल्याची बातमी लागली तेव्हां आसुरी आनंद झाला आणि ते म्हणाले की, ' सातारचे माजी पदभ्रष्ट महाराज मृत्यु पावले ही इष्टापत्ति अत्यंत योग्य वेळीं घडून आली. कारण सातारच्या गादीवरील विद्यमान महाराजांची प्रकृति ढांसळल्याचें ऐकतों. तेव्हां त्यांचें बरेवाईट झाल्यास या प्रांताचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रसंग लौकरच येईल. तसें झाल्यास या सातारच्या गादी दत्तकाची परवानगी देऊं नये, व त्यांचा मुलूख व्आपल्या राज्यांत सामील करून टाकावा. हे करण्याचें माझ्या हातीं राहील तर ही गोष्ट मी हरप्रयत्नानें घडवून आणनि. ' लॉर्ड हॉबहाऊसनंतर अनेक वीरांनी आपल्या लेखण्या व अक्कल य काम खर्च केली आहे. मि. रीड व विलोबी यांची पत्रके पाहण्यासारखी आहेत. मि. रीड आपल्या पत्रकांत म्हणतात, ' माजी महाराजांना औरस असा वारस कोणीच नसल्याकारणानें हा दत्तकाचा मोठा भानगडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोर्डाच्या सन्माननीय अध्यक्षांनी असे मत दिले आहे कीं, मृत्यूपूर्वी थोडा वेळ महाराजांनी शेडगांवकर घराण्यांतील जो दत्तक घेतला आहे त्याचा वारसा हक्क मान्य करून त्याकडे गादी चालवावी. पण मला तसें वाटत नाहीं. सार्वभौम सरकारच्या संमतीशिवाय घेतल्या जाणा-या दत्तकास गादीचा वारसा हक्क मिळत नाहीं. या प्रश्नाचा विचार करतांना येथील विशिष्ट परिस्थितीचा विचार प्रामु ख्यानें केल। पाहिजे. प्रस्तुत घराण्याच्या धार्मिक रूढीप्रमाणे पाहिलें तरी विशिष्ट सत्तेची मंजुरी मिळाल्याशिवाय ते दत्तविधान ग्राह्य मानतां येत नाहीं. एकदां, सार्वभौम सत्तेची मंजुरी पाहिजे हें तत्त्व मान्य केल्यानंतर मग त्या मंजुरीची |
आतापर्र्यंत ३३० पैकी २५१ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. ठाणे : पोलीस आयुक्तालयात दोन उपनिरीक्षकांसह १३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्र्यंत ३३० पैकी २५१ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कोरोनामुळे उल्हासनगरचे एक व श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू ओढवला आहे. पोलिसांचे बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने बंदोबस्ताचा ताण कमी झाला असला तरी पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होणे सुरूच आहे. शुक्रवारी विविध पोलीस ठाण्यांतील १३ पोलिसांसह मानपाडा व नारपोली पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी कोरोनाबाधित आढळले आहेत. आयुक्तालयात आतापर्यंत ३१ अधिकारी व २९९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील २६ पोलीस अधिकारी आणि २२५ पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे झाले आहेत. यात ठाणे पोलीस मुख्यालयातील लागण झालेल्या ६७ पैकी ५६ जणांचा समावेश आहे. |
Dr.J.J. Magdum polytechnic was started in the year 1984 and it is a self-financed institute. It is affiliated to MSBTE approved by All India Council of Technical Education (AICTE), New Delhi. The Institute is reputed for its high academic standards,excellent infra-structural facilities, Experienced faculty and well maintained discipline. महाविद्यालयीन शिक्षण दोन प्रकारात मोडतं. 1. व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण - जसे कला, संस्कृती व मानवी व्यवहाराचे शिक्षण. 2. तंत्रशिक्षण - जे माणसाला प्रत्यक्ष कृतीची कौशल्ये शिकवते व उद्योग-व्यवसायांच्या संधी निर्माण करून देते. पदोपदी आपली इच्छा असो-नसो, जीवनाच्या प्रत्येकअंगास तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेलाच आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. यंत्रांची ही संरचना राबती ठेवण्यासाठी व सतत बदलनाऱया आव्हानास पुरून ऊरण्यासाठी त्यांचा विकास करावा लागतो.बदलत्या काळानुसार निर्माण होणाऱया गरजांची पूर्ती करण्यासाठी नव्या डिझाईन व विकासाचे मुल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.साक्षर की निरक्षर या धर्तीवर यापूढे तंत्रशिक्षीत की अशिक्षीत असा प्रश्न निर्माण होऊ घातला आहे. तंत्रशिक्षण हे आधुनीक माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, आवश्यक ऊद्योग व्यवसायाच्या संधी आपल्याशा करून देणारे मुलभूत शिक्षण तर बनले आहेच, शिवाय जगभरात प्रचंड प्रमाणात मागणी असलेल्या भारतीय युवकांची मुलभूत अर्हता ही ठरले आहे.पश्चीमेत पहिली औद्यागिक क्रांती झाली त्यावेळी आपल्याला त्याचा गंधही नव्हता. आज जगभरातल्या मोठमोठ्या औद्यागिक कंपन्या भारतीय ऊद्योजकांच्या मालकीच्या होत आहेत. त्यामुळे व तशीही तंत्रशिक्षण कुशल भारतीयांची गरज केव्हा नव्हे एवढी इथून पुढे निर्माण होणार आहे. त्याची फळे चाखायची तर सुरूवात आत्तापासूनच करावयास हवी. बदलत्या काळाचा कल ओळखून दिशा ठरवली नाही तर भोवती समृद्धता आहे पण ते ऊपभोगण्याचे साधन नाही अश्या जून्याच परिस्थितीचे आपण वाहक होऊ. हे टाळायचे असेल तर तंत्रशिक्षणाला पर्याय नाही. अभियीत्रिकी तंत्रशिक्षण म्हणजे विज्ञानाचा ऊपयोग करून साधनसंपत्ती निर्माण करण्याचे कौशल्य शिकवणारे शिक्षण. हे आत्मसात करणे काळाची गरज बनले आहे.इयत्ता दहावीच्या गुणांवर तंत्रनिकेतनातील विविध शाखांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येऊ शकतो. या प्रकारच्या कौशल्यावर आधारीत नोकरी व व्यवसायावर आधारित काम करत राहिल्यास ऊपलब्ध व प्रचलित तंत्रज्ञानात शिरकाव करून घेता येतोच पण त्याचवेळी भविष्यातील येऊ घातलेल्या व विकसीत होत असलेल्या तंत्रज्ञानाचा अंदाज व दिशा लक्षात येते. त्या दिशेने योग्य पावले ऊचलल्यास भावी काळ हा अधिक सौख्यदायक ठरतो. उदार आर्थिक धोरण व खुलेपणा यामुळे व्यापाराच्या संधी वाढल्या. लोकसंख्या व वाढणाऱया बाजारपेठेमुळे ऊत्पादन, व्यापार व सेवा ऊद्योगात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेउन तंत्रशिक्षणसंस्थाचे पेव फुटले. अचानकपणे नव्याने भरपूर संस्था सुरू झाल्यामुळे प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापकांची उणीव भासते. ही उणीव भरून काढण्यासाठी चकचकीत ईमारती, आकर्षक जाहिराती,मोठाले डीजीटल फलक व अर्थहिन शब्दांच्या भुलभूलैयात विद्यार्थी व पालकांना संस्था गुंगवून टाकतात. सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना आपली फसवणूक झाल्याचे खुप ऊशिरा लक्षात येते. हे टाळायचे असेल तर मुलभूत गोष्टींकडे गांभीर्याने पहायला हवे. प्रवेश घेतेवेळी संस्थेची स्थापना किमान दहा वर्षापूर्वीची असावी. त्या संस्थेत शिक्षण घेउन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याचा सल्ला घ्यावा. जाहिरातींचा मारा करून नसलेली गुणवत्ता असल्याचा भास निर्माण केला जातो आहे.. औषध लावून पिकवलेल्या फळासारख्या, अशा झगमगीतपणाविषयी साशंक राहणे पालक व विद्यार्थी यांच्या हिताचे ठरते. न्यायालयाने व शासनाने मान्यताप्राप्त व नियमित प्राचार्यांची नेमणूक करणे संस्थेस बंधनकारक केले आहे. शिक्षणसंस्थेचा प्रमुख या नात्याने घटनात्मकरित्या प्राचार्यांची जबाबदारी मोठी असते. विकासाची दिशा ठरवणारा, शिस्तशीर कार्यप्रणाली राबवणारा, विद्यार्थीहित जपणारा व शिक्षण या मानवी विकासाच्या मुलभूत कल्पनेशी ठाम राहणारा अशी प्राचार्यांची भुमिका तो जर मान्यताप्राप्त व नियमित असेल तरच पार पाडता येते. कुटूंबप्रमुखाचेच पाय स्थिर नसतील तर कुटूंबाचा डोलारा डळमळायला लागतो, हे लक्षात घ्यावयास हवे. पाल्याच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक ही त्याचे भविष्य घडवणारी असल्याने प्रवेशावेळी वरील गोष्टींचा सखोल विचार होणे आवश्यक वाटते. आर्थिक खर्च, व्यतित होणारा कालावधी,पदरात पडणारे दान व मिळणारा अनुभव यांचा योग्य विचार करून सल्लामसलतीने व पूर्ण चौकशी करून विद्यार्थ्यांच्या पुढील भावी शिक्षणाचा निर्णय घेतल्यास ते जास्त संयुक्तिक होईल याची आम्हाला खात्री आहे. एक मंथन या दृष्टीने हा विचार आपणासमोर ठेवला आहे. सल्लामसलत, विचार-विनिमय व माहितीसाठी आम्ही सर्व कार्यालयीन वेळेत हजर आहोतच, पण इतर वेळीही आम्ही उपलब्ध असू. संपर्क - डॉ. जे. जे. मगदूम पॉलिटेक्निक, शिरोळ-वाडी रोड,जयसिंगपूर.416101. ता.शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. फोन - 02322-229572, 225572,www.jjmpoly.co.in डॉ. जे. जे. मगदूम पॉलिटेक्निक ही संस्था 1984 साली स्थापन झाली. आखील भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) नवी दिल्ली व तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) मुंबई, मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) मुंबईशी संलग्न आहे. तीन वर्षाचे पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम संस्था चालवते. ऊदाहरणे... COMPUTER ENGINEERING 1.अमोल चौगुले, नेटवर्क इंजिनियर, IBM, मलेशिया. 2.मारूती गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनियर, TCS, नेदरलँड.3. संजय देसाई, सपोर्ट इंजिनियर,मायक्रोसॉफ्ट,बेंगलोर.4.अमोल चव्हाण, सॉफ्टवेअर इंजिनियर,NVDIA,पूणे. INDUSTRIAL ELECTRONICS & ELECTRONICS TELECOMMUNICATION ENGG 1.अमित कामत, सिनियर डेव्हलपर, TCS. 2.सतिश भिसुरे, असिस्टंट मॅनेजर, JSW. 3.सचीन भोसले, असिसटंट मॅनेजर, TCS, इंग्लंड. 4.गणपत पाटील, टेक्निकल लिडर, टेक महिंन्द्रा, मलेशिया.5. देविदास खुर्द, टाटा कम्युनिकेशन, पूणे. 6. किरण चौगुले, शिपींग कार्पोरेशन, गोवा. CIVIL ENGINEERING 1. दिलीप खरे, सिव्हील इंजिनियर, ठाणे म्युनिसीपल कार्पोरेशन. 2. चौगुले, लंडन स्ट्रक्चरल कंपनी, इग्लंड. 3. सुनिलकुमार भारद्वाज, स्ट्रक्चरल इंजिनियर, DRDO. 4. प्रेमकुमार राठोड, BMC. MECHANICAL ENGINEERING - 1.तस्लिम अरिफ, क्वालिटी ऍश्युरन्स मॅनेजर, नॅशनल केबल्स, दुबई. 2. चेतन पवले, ऑपरेशन हेड, हनीवेल ऑटोमेशन इंडीया लिमटेड, मुंबई. 3. प्रदिप शिंगारे, RTO ऑफिसर, मुंबई. 4.निलेश कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर, टेक्नोव्हिजन. 5. तुषार कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर, मेकॅसॉफ्ट 6. तौफिक हुदली, मॅनेजिंग डायरेक्टर, हुदली अँड सन्स. वानगीदाखल काही ऊदाहरणे.... 1. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE)मुंबई ने तंत्रशिक्षणातील त्यांचा अनुभव व कर्तुत्व लक्षात घेऊन प्राचार्य श्री. ए.जी. पुराणिक यांची निवड आपल्या ऍकॅडेमिक कौन्सील वर केली आहे. 2.संस्थांच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन त्याचा रिपोर्ट सादर करणाऱया मॉनिटरिंग कमिटीवर या संस्थेतील जास्तितजास्त शिक्षक चेअरमन व सदस्य म्हणून काम पाहतात. 3. शैक्षणिक अवेक्षण समितीस सामोरे जाण्यापूर्वी अनेक संस्था ट्रायल मॉनिटरिंग करून घेण्यासाठी आमच्या तज्ञ शिक्षकांना बोलाऊन सल्लामसलत करतात. 4.करिक्युलम रिव्हीजन प्रोजेक्टमध्ये सक्रिय सहभागी होत विविध विषयांचा सिलॅबस डिझाईन करतात. 5.नव्या तंत्रज्ञानाशी एकरूप होणारी G स्किमची अंलबजावणी कशी करावी याचे मार्गदर्शन करतात. 6. लॅब मॅन्युअल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये डिझाईन केलेली मॅन्युअलस् महाराष्ट्र व इतर राज्यातही वापरली जातात. 7. पूर्ण महाराष्ट्रातील पॉलिटेक्निकसाठी MSBTE तर्फे ऍकॅडेमिक कॅलेंडर तयार करतात.याशिवाय सिव्हील इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये "मटेरियल टेस्टींगचे" काम अव्याहत सुरू आहे. खरे बिल्डर्स, पारेख कनस्ट्रक्शन्स, जाधव कनस्ट्रक्शन्स या कनस्ट्रक्शन्स कंपन्या आपल्या कामाचा दर्जा टिकावा म्हणून, इथूनच मटेरियल टेस्टींग करून नेतात. |
शिवाजी सावंत - गारगोटी --बिद्री कारखान्याच्या वाढीव सभासदांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच सत्तारूढ के. पी. पाटील गटाने गावागावात केलेल्या आतषबाजीबाबत वेगळाच सूर सभासदांमधून निघत आहे. याबाबत ५३ हजार सभासदांबाबत सत्तारूढ गटाला विश्वास नसल्याची चर्चा आहे. बिद्री साखर कारखान्याची वार्षिक गाळप क्षमता नऊ लाख मेट्रिक टन आहे. ५३ हजार सभासदांनी वार्षिक केवळ वीस टन ऊस कारखान्यास पुरविल्यास दहा लाख टन उसाचा पुरवठा होऊ शकतो. असे असताना उत्पादक सभासदांचा दहा लाखांपेक्षा कितीतरी अधिक ऊस उत्पादित होतो. ऊसतोडणी कार्यक्रमानुसार उसाची तोड होत नसल्याने जुन्या सभासदांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका म्हणजे कारखाना हातातून जाऊ शकतो, म्हणून २०१२ मध्ये नव्याने चौदा हजार ५६३ सभासद केले. याबद्दल आमदार प्रकाशराव आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, बाबासाहेब पाटील हे न्यायालयात गेले. सभासदांची तपासणी व्हावी, जर हे पात्र असतील तर त्यांना आमचा कोणताही विरोध नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे; पण सत्ताधारी गटाने या सभासदांचा असा समज करून दिला की, हे तुमच्या सभासदत्वाच्या विरोधात आहेत; पण वस्तुस्थिती वेगळी होती. शेवटी न्यायालयाने हे सभासद तपासणीचे आदेश देताच त्यातील केवळ दहा ते अकरा सभासद पात्र असल्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्याने न्यायालयाने त्यांना वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निकाल दिला. कारखान्यास ६७ हजार सभासदांची गरज आहे का? शिवाय ४० कि. मी. अंतराच्या आत लाखो टन ऊस उपलब्ध असणारा हा एकमेव कारखाना आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र जरी चार तालुके असले, तरी उसाची उपलब्धता सर्वत्र सारखीच आहे. म्हणजे कारखान्याला गाळपास ऊस कमी पडत नाही. मग नवीन सभासदांचा अट्टाहास का? ५३ हजार सभासदांचे ५३ कोटी रुपये भागभांडवल आहे. म्हणजे भाग भांडवलाचा तुटवडा नाही, मग आणखीन चौदा कोटी छप्पन लाख तीस हजार रुपये भागभांडवलाची गरज काय? या ६७ हजार ५६३ सभासदांना दरमहा पाच किलो व वार्षिक ६५ किलो साखर १० रुपये दराने दिली जाते. म्हणजेच प्रति किलो १२ ते १३ रुपये तोटा कारखान्याला सहन करावा लागतो. आज ५३ हजार सभासदांपोटी तो तोटा वार्षिक चार कोटी १३ लाख ४० हजार रुपये होतो. आणखीन सभासद वाढल्यास तो तोटा वाढण्याची शक्यता आहे. आजपर्यंत आमदारकी तिकडे कारखान्याची सत्ता हा शिरस्ता अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीची उत्सुकता आहे. के. पी. पाटील यांच्याकडून सभासदांना खूप अपेक्षा आहेत; पण संचालक मंडळाचा तोडणी कार्यक्रमात हस्तक्षेप, नोकरभरती, सत्तेतील नाराजी, वर्षानुवर्षे तीच संचालक मंडळी, या धोक्याच्या बाजू पाहता या बिद्रीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. |
होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. इंदिरानगर : होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणी समस्येमुळे प्रभाग ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे आणि अॅड. श्याम बडोदे यांनी प्रभागातील महिलांसमवेत हंडा मोर्चाची तयारी केली होती. महापालिकेच्या अधिकाºयांनी लेखी आश्वासन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रविवारी (दि. ४) चढ्ढापार्क येथील पाण्याच्या टाकीची मुख्य जलवाहिनी नादुरु स्त झाल्याने हजारो लिटर पाणी तर वाया गेलेच मात्र त्यामुळे बजरंग सोसायटी, परबनगर, रथचक्र चौक आदी भागात आजचा पाणीपुरवठा झाला नाही. नागरिक संतप्त झाले मात्र सकाळपासून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी आणि कर्मचाºयांनी युद्धपातळीवर ही जलवाहिनी दुरु स्त करण्याचे काम हाती घेतले. सायंकाळी साडेसात वाजता ते काम पूर्ण करून कमी दाबाने का असेना जेथे पिण्याचे पाणी मिळाले नाही त्या भागात रात्री आठ वाजता पाणी देण्यास सुरु वात केली. त्यामुळे दिवसभर तहानलेल्या इंदिरानगरमधील या परिसरातील नागरिकांना तर दिलासा मिळाला. |
भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. नागपूर : कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो व त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के नागरिकांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे. जागतिक न्यूरोलॉजी महासंघाच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्ट्रोक दिवसानिमित्त ही माहिती दिली. गेल्या २५ वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जगात प्रत्येक दोन सेकंदात एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होतो. त्यातील ८० टक्के व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटातील असतात. ब्रेन स्ट्रोक कोणत्याही वयात व कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, पण ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्ट्रोक झाल्यानंतर ३० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो तर, ३० टक्के व्यक्तींना दीर्घकालीन अपंगत्व येते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, उच्च कोलेस्ट्रॉल, चुकीची आहार पद्धती, मद्यप्राशन, हृदयरोग, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कारणे टाळल्यास ब्रेन स्ट्रोकला लांब ठेवता येऊ शकते. रोज एक तास चालल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो अशी माहितीही मेश्राम यांनी दिली. एड्स, टीबी व मलेरिया यापेक्षा जास्त मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे होतात. ग्रामीण भारतात ब्रेन स्ट्रोक हा मृत्यूचे सामान्य कारण झाला आहे. मेंदूला आॅक्सिजन व जीवनसत्वाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या गोठलेल्या रक्तामुळे बुजल्या किंवा फुटल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होतो. ८० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या बुजल्यामुळे तर, २० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या फुटल्यामुळे होतात. चेहरा अचानक गळल्यासारखा होणे, अवयवांत अशक्तपणा जाणवणे, बोलण्यात बदल होणे, चालण्यात अडचण येणे व दृष्टी कमी होणे ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणे आहेत. सध्या ब्रेन स्ट्रोकवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार केल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका टळला जाऊ शकतो. बे्रन स्ट्रोक हा आजार व्यक्तीला अपंगत्व आणणाºया आजारांमध्ये पहिल्या तर, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाºया आजारांमध्ये दुसºया क्रमांकावर आहे. बे्रन स्ट्रोक झाल्यानंतर वाचलेले ८ कोटी व्यक्ती जगात आहेत. त्यापैकी ५ कोटी व्यक्तींना अपंगत्व आले आहे. यावर्षी १ कोटी ४५ लाख व्यक्तींना स्ट्रोक आला. त्यापैकी ५५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला असे जागतिक स्ट्रोक संघाचे अध्यक्ष प्रा. मायकेल ब्रेनिन यांनी जागतिक न्यूरोलॉजी परिषदेत बोलताना सांगितले. ही परिषद दुबई येथे झाली. दरम्यान, ब्रेनिन, डॉ. मेश्राम व जागतिक न्यूरोलॉजी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. ºयुजी काझी यांनी ब्रेन स्ट्रोकवर सविस्तर चर्चा केली. प्रा. काझी यांनी स्ट्रोकचा धोका सतत वाढत असून सध्या ४ पैकी १ व्यक्तीला स्ट्रोक येत आहे अशी माहिती दिली. |
छत्रपती संभाजीनगर - गायक अरिजीत सिंग याच्या गाण्यांनी तरुण वर्गाला वेड लावले आहे. त्याच्या गाण्यासह साध्या स्वभावाने त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळेच अरिजित मोठा चाहता वर्ग आहे. मात्र नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अरिजीत सिंगसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला चाहतीने अरिजीत चा हात खेचल्याने त्याला दुखापत झाली आहे. मात्र हाताला दुखापत होऊन देखील अरिजीतने या महिलेला शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये "तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल. माझे ऐका, बोलू नका. तुम्ही मजा करत होता, ते ठीक आहे, पण जर मी परफॉर्म करू शकत नाही, तर तुम्ही मजा कशी करणार आहात? तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात ना? तुम्ही माझा हात का ओढला माझा हात आता थरथरत आहे. मी कार्यक्रम सोडू का? येथून जाऊ का? " असे अरिजीत या महिलेला म्हणताना दिसत आहे. यावर ती महिला चुकून झालेल्या कृतीबद्दल अरिजीतची माफी मागताना दिसते. अरिजितने ही परिस्थिती शांततेत हाताळत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अरिजीतला हातावर पट्टी बांधताना दिसत आहे. यावेळी अरजित त्या माणसाला पट्टी घट्ट बांधून तो रोल करण्यास सांगत असल्याचे दिसून येते. तर एका चाहत्याने अरिजीत सिंगच्या हाताचा फोटो शेअर करत, 'एक कलाकार तुमच्यासाठी तासनतास न थांबता परफॉर्म करतो. एखादा शो पार पाडण्यामागे अनेक जणांची मेहनत असते. पण चाहत्यांकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. कृपया कलाकारांचा आदर करा. गाण्याचा आनंदचा घ्या आणि कलाकरांसोबत नम्रतेने वागा,' असा सल्ला दिला आहे. |
आपापल्या क्षेत्रातील प्रसिद्धी, पसा, नावलौकिक इ. मिळेल. त्यादृष्टीने स्वतच्या नोकरी-व्यवसायावरच लक्ष केंद्रित करा. बँक प्रकरणात छोटीशी चूकही महागात पडू शकते. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ व वरिष्ठांना दिलेला सन्मान फायद्याचा ठरू शकतो. अनपेक्षितपणे होणारे चांगले व्यवहार, ग्राहक राजाचा मिळणारा चांगला प्रतिसाद, आपल्या व्यावहारिक कल्पनांचा होणारा शुभविस्तार आणि वास्तु वा वाहनविषयक व्यवहारातून होणारी सकारात्मक वाटचाल यातून आपण स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करू लागाल. आपल्या गतकाळातील चुकांचे परिणाम सध्या भोगावे लागणे शक्य. राजकारणी, विरोधक आणि धंद्यातील स्पर्धक यांच्यापासून सुरक्षित अंतरावर रहा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विशेष विचार करा. व्यापाराच्या नव्या क्षितिजावर दमदार प्रवेश करू शकाल. साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कला व्यासपीठांवरून आपला नावलौकिक वाढता राहील. स्वतचे आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्यात झालेली कोणतीही हयगय सप्ताहातले नियोजन पूर्ण बिघडवू शकते. |
मायणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, रुग्ण संख्याही कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य संघटनेकडून बोलले जात आहे. त्यामुळे कलेढोण (ता. खटाव) येथील कुटीर रुग्णालयाची दुरुस्ती करून हे रुग्णालय संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी कार्यरत करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. पडळ (ता. खटाव) येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी, कलेढोण येथील कुटीर रुग्णालय इमारतीची पाहणी व नव्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, नंदकुमार मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कलेढोण येथील दिवंगत माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, ग्रामीण कुटीर रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीची पाहणी केली. आरोग्य संघटनेकडून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या कुटीर रुग्णालयाच्या इमारतीची संपूर्ण पाहणी करून इमारत दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून घेण्याचे आदेश दिले. यावेळी माजी सभापती चंद्रकांत पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने, डॉ. समीर तांबोळी, सुरेश शिंदे, राजू जुगदर, यशवंत माळी, सोमनाथ शेटे, अनिल दबडे, पोलीसपाटील सचिन शेटे, उस्मान तांबोळी, वर्षा लिगाडे व दोन्ही ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाची पाहणी करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सुरेंद्र गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार) |
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारीः आपल्या देशात चित्रपटप्रेमींची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे जुगाडू लोकांची संख्याही बरीच आहे. कोण कोणत्या वस्तूचा वापर कसा करेल, याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडfओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण, त्या व्यक्तीचा जुगाड पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. 'झी न्यूज हिंदी'ने यासंदर्भात वृत्त दिलंय. फिल्म मेकिंग ही एक महागडी प्रक्रिया मानली जाते. त्यासाठी लोकेशन, कॅमेरा, इक्विपमेंट्स यासह अनेक गोष्टींची आवश्यकता असते. चित्रपट बनवण्यासाठी पैसाही खूप खर्च करावा लागतो. लोकांना चित्रपट खूप आवडतात आणि अनेकांना या क्षेत्रात हात आजमावायचा आहे, पण त्यासाठी पुरेशी साधनं नाहीत. सध्याच्या काळात लोक मोबाईल फोनचा वापर करून जुगाड करतात. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपण आठवेल. यात लहान मुलं जुगाडच्या माध्यमातून शूटिंग करताना दिसत आहेत. जर तुम्हाला खरोखरच चित्रपट बनवायचा असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असं या व्हिडिओतून दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा एक गट चित्रपट शूट करण्यासाठी कमी बजेट इक्विपमेंट्सचा वापर करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मुलं त्यांची फिल्म शूट करण्यासाठी फोन वापरत आहेत. व्हिडिओची सुरुवात मुलांनी एक सीन शूट करण्याचा प्रयत्न करताना होते. ज्यामध्ये एक व्यक्ती चालताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फोन धरणाऱ्या मुलाने योग्य शॉट घ्यावा, यासाठी दुसरा मुलगा त्याचे पाय धरून त्याला हळू हळू ओढताना दिसतो. यात सर्वात वर चौथा माणूस आहे, जो शॉट दिग्दर्शित करतो, पण 'अॅक्शन' आणि 'कट' म्हणण्यासाठी फिल्मी क्लॅपऐवजी तो चप्पल वापरतोय. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी द फिगेन नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला होता. "जेव्हा तुमच्या चित्रपटाचे बजेट 20 डॉलर असते," असे कॅप्शन व्हिडिओला दिले होते. हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून ट्विटरवर 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हसण्याच्या इमोजीदेखील कमेंट केल्या आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
सवना : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुुर्द शिवारात शेतामधील गोठ्याला आग लागल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. सवना : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुुर्द शिवारात शेतामधील गोठ्याला आग लागल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये शेतीची औजारे, बी-बियाणे, वैरण जळाल्याने अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यासमोर नवेच संकट निर्माण झाले आहे. सवना येथील शेतकरी प्रल्हादअप्पा किसन रोहडकर यांची चोंढी शिवारातील गट क्र. ७२ मध्ये जवळपास १८ एकर शेतमजीन आहे. शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी भुुईमुगाचे साधारणतः १५ गाड्या काड (वाळलेल्या वेलांचा चारा), गवत व कुटार ठेवलेले होते. तसेच सध्या पेरणीचे दिवस असल्याने मागील महिनाभरापासून कृषी औजारे, बी-बियाणे खरेदी करून गोठ्यामध्ये झाकून ठेवले होते. दरम्यान, बुधवारी रात्री ७. ३० ते ८ वाजेदरम्यान प्रल्हादअप्पा रोहडकर यांच्या शेतातील गोठ्यास आग लागली. या आगीमध्ये २७ हजार रूपये किंमतीच्या सोयाबीन बियाणांच्या १० बॅग, १२ हजार ५०० रूपये किंमतीचे १ पोते गोदावरी डीएपी खत, पेट्रोलवर चालणारा फवारणी पंप व भुईमुगाचे काड असा एकूण ३५ हजाराचा माल, तसेच गवत, कुटार आणि तिफन, डवरे, वखर आदी औजारे व इतर असे ११ हजाराचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ९० हजाराचे नुकसान झाले आहे. सवना येथे पावसासाठी पंगतीचा कार्यक्रम असल्याने रोहडकर कुटुंबिय गावातच होते. त्याचवेळी गोठ्याला आग लागली. याबाबत त्यांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर माधव कोरपडे, संतोष क्षीरसागर, दिनेश वानखेडे, लखन नायक आदी शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सवना तलावातून पाणी आणून अडीच तासानंतर आग विझविण्यात यश आले. रात्रीची वेळ असल्याने वीज भारनियमनामुळे लाईट बंद होती. ग्रामस्थांच्या विनंतीवरून लाईनमनने वीजपुरवठा सुरळीत केल्यामुळे पाणी आणण्यासाठी सुविधा झाली. ३ जुलै रोजी सकाळी गोरेगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजमोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुरलीधर मुंढे, पोना के. डी. राखुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. याबाबत प्रल्हादअप्पा रोडकर यांनी दिलेल्या अर्जावरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात जळितची नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी गोठ्यात दावणीला बांधलेले २ बैल सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे कुणीतरी जनावरे सोडून देत गोठ्याला आग लावली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. परंतू रोडकर यांनी तशी तक्रार दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर) सेनगाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी प्रल्हादअप्पा किसन रोहडकर यांची चोंढी शिवारात शेती आहे. शेतातील गोठ्याला बुधवारी रात्री आग लागल्याने नुकसान झाले. आगीमध्ये सोयाबीन बियाणांच्या १० बॅग, १ पोते डीएपी खत, पेट्रोल फवारणी पंप व भुईमुगाचे काड तसेच गवत, कुटार आणि तिफन, डवरे, वखर आदी औजारे व इतर साहित्य जळाले आहे. |
तो आता १५ व्या मुलीला देखील फसवायला निघाला होता. परंतु त्या पुर्वीच पोलिसांनी सापळा रचून त्याचा प्लान उधळवला. लग्न हे आपल्या देशात अत्यंत पवित्र असं बंधन मानलं जातं. लग्न हे दोन व्यक्तींचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन असं म्हटलं जातं. परंतु एका व्यक्तीनं तब्बल १४ वेळा लग्न करून या बंधनाला गालबोट लावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्यक्ती केवळ पैसे मिळवण्यासाठी लग्न करायचा. अन् पैसे मिळताच त्या तरुणींना सोडून द्यायचा. या व्यक्तीने आतापर्यंत १४ मुलींची फसवूक केली. अन् तो आता १५ व्या मुलीला देखील फसवायला निघाला होता. परंतु त्या पुर्वीच पोलिसांनी सापळा रचून त्याचा प्लान उधळवला. पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवलं आहे. गेल्या १८ वर्षात ७ राज्यातील १४ मुलींसोबत या व्यक्तीने लग्न केलं. त्याला भुवनेश्वर येथे अटक करण्यात आली. हा व्यक्ती ओडिसामधील केंद्रपारा जिल्ह्यातील पाटकुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. हा व्यक्ती तरुणींसोबत लग्न करायचा आणि त्यांच्याकडून पैसे आणि दागिनी घेऊन पळून जायचा. भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितले की, या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार २००२ ते २०२० या १८ वर्षांच्या कालावधीत त्याने १४ मुलींशी लग्न केलं. तो मेट्रोमनी साईट्स आणि विविध प्रकारच्या विवाह संस्थांच्या माध्यमातून मुली शोधायचा. या मुलींना खोटी आश्वासनं द्यायचा. आणि त्यांच्यासोबत लग्न करायचा. लग्नानंतर त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घ्यायचा व मुलींना दुसऱ्या राज्यात सोडून पळून जायचा. या व्यक्तीला एका भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी या आरोपीकडून ११ एटीएम कार्ड, चार आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. हे आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. परंतु पोलीस या प्रकरणी आणखी चौकशी करत आहेत. |
शेतकर्यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्यांना लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. शेतकर्यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्यांना लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. नागपूरच्या सभोवताल मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकतो. परंतु तो दलालांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंंंत पोहोचतो. त्यामुळे शेतकर्यांना योग्य भाव मिळत नाही. शिवाय ग्राहकांचीही लूट होते. अशा स्थितीत शेतकर्यांनी स्वतःचा भाजीपाला स्वतःच ग्राहकांपर्यंंत पोहोचवावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी कृषी व पणन विभाग १३ सुसज्जित व्हॅन तयार करीत असून, त्यापैकी पहिली व्हॅन नागपुरात दाखल झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ती शेतकर्यांच्या ताज्या भाजीपाल्यासह ग्राहकांच्या दारावर उभी दिसणार आहे. विशेष म्हणजे, ही व्हॅन खास पद्घतीने तयार केली असून, ती सर्वांंंच्या आकर्षणाचे कें द्र बनली आहे. सोबतच कृषी विभागाने नागपूर विभागात सुमारे ४६८ शेतकरी गट तयार करून, त्यांच्या चार कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा संपूर्ण व्यवहार चालणार आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाने यापूर्वी ही योजना मुंबई व पुणे येथे राबविली आहे. तेथील ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता ती नागपुरात राबविली जात आहे. यात फिरते विक्री केंद्रे व ठिकठिकाणी २८२ किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात शेतकरी गट, बचत गट व बेरोजगार तरुणांना अनुदानावर फिरते विक्री केंद्र व दुकाने दिले जाणार आहेत. नागपूर : या योजनेंतर्गत शहरात २८२ सुसज्जित भाजीपाला विक्री केंद्रे तयार केली जाणार आहेत. यात ज्यांच्याकडे अगोदरच दुकाने उपलब्ध आहेत, त्यांना ते दुकान अधिक सुसज्ज करण्यासाठी शासनाकडून १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. तसेच व्हॅन खरेदीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा शेतकरी गट, बचत गट व सुशिक्षित बेरोजगार अशा कुणालाही लाभ घेता येणार आहे. केवळ शासकीय अनुदानाचा लाभ घेणार्यांनी शेतकर्यांचाच भाजीपाला खरेदी करून तो विक्री करावा, अशी अट घालण्यात आली आहे. तरी यासाठी इच्छुकांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, पणन विभाग किंवा आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे यांनी आवाहन केले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी या भाजीपाला पुरवठा प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्याला एकूण १ कोटी १६ लाख २५ हजार रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातून भाजीपाला लागवडीवर ७५ लाख ३७ हजार, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनावर ६२ हजार, शेडनेट व हरितगृहांवर १९ लाख ९७ हजार, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांवर एक लाख ६८ हजार, पॅक हाऊस व शितगृह बांधणीवर १७ लाख २२ हजार, प्रतवारी व विक्री केंद्र उभारणीवर २९ हजार आणि प्रकल्प व्यवस्थापन व संनियंत्रणावर २७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) |
पाण्याची आणीबाणी अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा अशा कटकटीतून कळवावासीयांची कायमची सुटका होणार आहे. कळवा, दिवा, मुंब्रा शहरामध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणी येत नाही. मात्र आता ही पाणीबाणी संपणार आहे. या शहरांना पाईपलाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत कळवा भागातील पाणीटंचाई इतिहासजमा होणार आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांना मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाईपलाईन जुनी झाली असल्याने ती अनेक वेळा फुटते. नव्या पाईपलाईनसाठी घेत असलेल्या शटडाऊनमुळे कळव्याला पाणी मिळत नाही. अनेकदा दुरूस्तीसाठी कळव्याचा पाणीपुरवठा बंद ठेवला नाही. ही पाणापुरवठा सुरळीत करण्यासाठी पारसिकनगर येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स ते अमृत आंगण संपपर्यंत 705 मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी 2 कोटी 43 लाख निधी मंजूर झाला आहे. खासदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याला नगरविकास विभागाकडून तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. पाईपलाईन जुनी असल्याने अनेक वेळा फुटते. त्यामुळे पारसिकनगरमध्ये सुरू असलेल्या पाईपलीईनचे काम पूर्ण झाल्यावर कळव्यातील पाणीबाणी संपणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. |
संस्थानांतील कारखान्यांची वाढ १ भोर ट्रेडिंग कंपनी लि. भोर ट्रेडिंग कंपनीनें त्रि. सरकारच्या मिलिटरी खात्यास तंबूचा पुरवठा सुमारें १३,००,००० रुपये किंमतीचा केला; आणि या तंबूच्या कामांत कंपनीस सुमारें रु. ६४,००० आणि कापड, विजेचें सामान, वगैरे कामांत रु. २,३०,००० इतका नफा झाला आहे. या कारखान्यांत सुमारे २५० मजूर काम करीत असतात. ८ वें ] २ भोर इंडस्ट्रीज लि. भोर इंडस्ट्रीज लिमिटेड, या कारखान्यास सुरुवात झाल्यापासून ब्रिटिश सरकारास उपयोगी अशा मालाचा पुरवठा या कारखान्यानें १४,५०००० रु. चौदा लक्ष पन्नास हजार किंमतीचा केला, त्यापासून कंपनीस सुमारें ५०,००० रुपये नफा झाला. या कारखान्यांत काम करणाऱ्या मजुरांची संख्या सुमारें १०० वर असून, ते सर्व भोर येथील आहेत. या कंपनीचा कापड रंगविण्याचा विभाग उघडला असून स्प्रे पेंटिंगचें कापड तयार होऊं लागले आहे. या भागाकडे सुमारे १०० मजूर गुंतले आहेत. ट्विन-टेक्सकापडाचा विभाग उघडण्याचा समारंभ श्रीमंत राजेसाहेब यांच्या हस्तें १४ एप्रिल १९४६ इ. रोजी झाला. ३ श्री लक्ष्मी टेक्स्टाइल मिल्स लि. या कारखान्यास भोर दरबारची परवानगी मिळाल्यानंतर कारखान्याची इमारत तयार होऊन मशिनरी आणून प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या काम बऱ्याचशा अडचणी आल्या कंपनीनें अहमदाबाद येथील मशिनरी खरेदी केली व ती आणण्याचें काम चालू असतां सरकारच्या परवानगीवांचून मशिनरी उलगडून पॅक करणे व दुसरीकडे हालविणें यांस बंदी करणारा हुकूम हिंदुस्थान सरकारने जारी केला. त्या हुकुमाप्रमाणें कंपनीनें परवानगी आणविल्यावर मशिनरी उलगडून पॅक करून भोर येथे आणविण्यांत आली. यांत बरेच दिवस गेले. या दरम्यानच्या कालांत कारखान्याकरितां जरूर असणारी इमारत भोरशेजारीं येत्रलीचे हद्दींत भाडघरनजीक सोयीस्कर ठिकाणी बांधण्यांत आली. ता. २ एप्रिल १९४४ इ. रोज कामास प्रथम सुरुवात झाली. ता. १६ एप्रिल पं.च.(४) ८ श्रीलक्ष्मी टेक्स्टाइल मिल्सचें उद्घाटन [ प्रकरण १९४४ रोजीं या मिलचा उद्घाटनसमारंभ श्रीमंत राजेसाहेब यांच्या हस्तें झाला. या दिवसापासून कारखाना नियमितपणे सुरू झाला असून, उत्तम प्रतीचें सूत यांत तयार होऊं लागले आहे; आणि हल्लींच्या परिस्थितीत जास्तीत जास्त सूत तयार करण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. या समारंभाच्या वेळीं श्री. एम्. जी. देसाई यांचें स्वागतपर भाषण झाले. त्यांतील उतारा खालीं दिला आहे : "I have great pleasure in welcoming you all here this evening on the occasion of the opening ceremony of Shri Laxmi Textile Mills. · I am sure, I am voicing the feelings of every one of you present here, when I say, that the Company has been exceptionally fortunate in obtaining the co-operation and goodwill of His Highness Shrimant Raja Saheb of Bhor, whose presence here today I particularly welcome. Shrimant Rajasaheb's unceasing interest in the industrial advancement of the State are well known. It is hardly necessary for me to say. on this occasion what great advantages would result to the State and His Highness's subjects by the establishment of a Textile Mill in his capital. Besides enabling the local population to obtain supplies of yarn, without the addition of the costs of transport and overhead charges that supplies from outside would entail, the working of the Mill within the State would mean employment to a considerable number of workers, occupation to many of the local tradesmen and distributors, both wholesale and retail and the circulation of the money turned over within the State. I am sure Shrimant Rjasaheb had these valuable considerations in mind, when he kindly. and' generously conceded the various concessions that the Shri Laxmi Textile Mills Ltd. are privileged to enjoy. I hope Shrimant Rajasaheb would continue to bestow the same generous co-operation and concessions for many and varied other industries to be established within the State to its lasting benefit and that of his people." |
नवी दिल्ली : पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर देत आणखी वाईट परिस्थिती ओढवू शकेल, असा सूचक इशारा दिला आहे. जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. मात्र, त्यांनी जे केले, त्याविरोधात मी नाही. त्यांच्याकडे त्यासाठी योग्य कारण असू शकेल. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता 'प्रसादा'च्या राजकारणाकडे वळू लागल्याचे हे प्रतिक आहे. माझ्या जन्मापासून मी भाजपाला विरोध करत आलो आहे. त्यामुळे जिवंतपणी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे सिब्बल यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. The question is will he get " prasada " from BJP or is he just a 'catch' for UP elections ? मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत. काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी पुनर्रचना करणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखाने ऐकलेच नाही किंवा ऐकणे सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचे ऐकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत तुम्ही जर ऐकले नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशाराही सिब्बल यांनी दिला आहे. |
बाळापूर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, ता. १८ डिसेंबरला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांबाबतची नोटीस ता. १८ नोव्हेंबरला बाळापूर तहसीलदार सैय्यद एहेसानोद्दीन जारी करणार आहेत. ता. १८ डिसेंबरला तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असून, या निवडणुकांबाबत तालुक्यातील जनतेला मोठी उत्सूकता आहे. ता. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, ता. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशनपत्र ता. २८ नोव्हेंबर ते ता. २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ता. ५ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ता. ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान ता. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असल्याचे निवडणूक अधिकारी विजय सुरडकर यांनी सांगितले आहे. नकाशी, मनारखेड, सातरगाव, कारंजा (रमजानपूर), टाकळी (निमकर्दा), हसनापूर, भरतपूर, नागद, शेळद, कुपटा, सांगवी जोमदेव, कळंबी (महागाव), मोरगाव (सादीजन), सागद, दधम, वझेगाव, मोरझाडी, कोळासा, मनारखेड, तामशी, जोगलखेड, टाकळी (खोजबोळ), मांडवा, निंबी, मोखा, कळंबा (बु. ) |
अमडापूर हे चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाशी परिसरातील जवळपास ४८ ते ५० खेड्यांचा संपर्क येतो. या ठिकाणी दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व नागरिक जीवनवश्यक वस्तु खरेदीसाठी ये-जा करतात. आल्यानंतर मात्र कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. जणू काही कोरोणा संपला असल्यासारखे बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. शासनाने ठरवून दिलेले कोविड नियम पाळत नसल्याने १० एप्रिल रोजी अमडापूर पोलीस व ग्रामपंचायत कार्यालय यांनी संयुक्तपणे मास्क न लावणाऱ्यांवर व ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून १३०० रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी नियमांचे पालन करून तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा, गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले. या कारवाईत अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. |
नाशिक । जिल्हा बँकेने शेतकर्यांना विविध कार्यकारी विकास सोसायट्यांमार्फत पीककर्ज वितरण करावे, या मागणीचे निवेदन जिल्हा विविध कार्यकारी विकास सोसायटी संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी आधिकार्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक राजू देसले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत गायखे, निमंत्रक उत्तम खांडबहाले, राजाभाऊ ढगे, संपत वक्ते, किरण गायधनी आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे सीईओ राजेंद्र बकाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेने मार्च महिन्यात विविध कार्यकारी विकास सोसायटींना पत्र पाठवून कळवले होते की, मार्च महिन्या अखेर पर्यंत कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना एप्रिलमध्ये कर्जपुरवठा करावा, त्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांचे पत्र सोसायट्यांना पाठवण्यात आलेले होते. त्यामूळे त्यावेळी सुमारे 157 कोटी रुपये कर्ज शेतकर्यांनी बँकेला परतफेड केले. मात्र त्यानंतर जिल्हा बँकेने या शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटी संघटनेने जिल्हा बँक अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांकडे 25 एप्रिलपर्यत पीककर्ज वाटप करण्याची मागणी केली होती. |
पुणे : रुग्णांसाठीची औषध खरेदी या महत्त्वाच्या विषयात स्थायी समितीने घातलेला घोळ असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्व नियम, कायदा पाळून पूर्ण झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याच्या समितीच्या निर्णयामुळे गेले दोन महिने औषधांविना तळमळत असलेल्या किंवा कर्ज काढून त्यावर खर्च कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणखी किमान महिनाभर तरी तसेच राहावे लागणार आहे. माजी नगरसेवक राजन काची यांनी सांगितले, की अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. त्यांच्यावरील उपचारांच्या खर्चात प्रशासनाने अर्धी कपात केली आहे. सर्वसाधारण सभेने त्यांना १०० टक्के सवलत दिलेली असताना प्रशासनाने पदाधिकाऱ्यांबरोबर साधी चर्चाही न करता ही कपात केली. आता पदाधिकाऱ्यांनी थेट औषधांवरच संक्रात आणली आहे. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत प्रशासन व पदाधिकारी नियोजन करत नसतील, त्यांच्यात समन्वय नसेल तर त्यासारखे दुर्दैव नाही, असे मत काची यांनी व्यक्त केले. माजी महापौरांपासून अनेक माजी नगरसेवक महापालिकेच्या या विनामूल्य औषध योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची नावे जाहीर करणे योग्य नाही; पण आपण स्वतः या योजनेतून औषधे घेत असतो, असे ते म्हणाले. याशिवाय शहरी गरीब योजनेतही अनेक गरीब गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ मिळतो. कर्करोग, किडनी व अन्य काही आजारांवर बराच प्रदीर्घ काळ औषध घ्यावे लागतात. नियमितपणे खरेदी करून ही औषधे घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच महापालिकेने ही योजना सुरू केली आहे. त्याचा पुरवठादार, त्यांच्याबद्दल संशय हा सगळा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो वेळेवर सोडवणे गरजेचे आहे, त्यासाठी रुग्णांना वेठीस धरणे योग्य नाही. कराव्यात, असेही सुचवण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे आता पुन्हा किमान महिनाभर तरी ही औषध खरेदी लांबणार आहे. स्थायी समितीचा लेखी ठराव गाडीखाना या आरोग्य विभागाच्या मुख्यालयात अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर त्यांच्याकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. तसे करताना कोणत्या अटी व कोणते नियम शिथिल करायचे यावर खल होईल; कारण, काही विशिष्ट औषधांच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या परवान्याच्या अटीत बदल करता येणे शक्य नाही. कमी मुदतीची निविदा काढावी असे सांगण्यात आले तरीही किमान सात दिवस लागतील. त्यानंतर आलेल्या निविदा खुल्या करण्याची पद्धत आहे. त्यात किमान आठ ते दहा दिवस जातील. त्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आलेल्या निविदा ठेवल्या जातील. तिथे मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष औषध पुरवठ्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत रुग्णांनी करायचे काय, असा प्रश्न स्थायी समितीने या विषयावर घेतलेल्या भूमिकेने निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला औषधे मिळत नाहीत. फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेताना स्थायी समितीने तोपर्यंत जुन्या पुरवठादाराकडून औषधे घ्यावीत असे म्हटले आहे. हा फक्त शाब्दिक ठराव आहे. याची अंमलबजावणी होत नाही. रुग्णांच्या जिवाशी असा खेळ करणे अयोग्य आहे. - दत्ता एकबोटे, माजी महापौर. प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये कसलाही समन्वय नसल्याचे यातून सिद्ध होत आहे. त्यांना शंका आली व त्यांनी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला याला काही अर्थ दिसत नाही. एकाच ठेकेदाराने कायम पुरवठा करू नये, दरवर्षी ठेकेदार बदलला जाईल, जुन्यांना काम दिले जाणार नाही, असा महापालिकेचा नियम नाही. त्यामुळे समितीने उपस्थित केल्या मुद्द्यात काही तथ्य नाही. - जयसिंग भोसले, |
वाशीच्या स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्वेक्षणानुसार, वयाच्या साठीला आलेले भारतातील ८० टक्के जेष्ठ नागरिक हे सांधेदुखीने त्रस्त आहेत. यापैकी ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे सांधे प्रत्यारोपण तसंच वेगवेगळ्या शल्यचिकित्सा करण्यासाठी पुरेसा निधीसुद्धा उपलब्ध नाही. जगभरात १ ऑक्टोबर हा दिवस 'ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. लोकसंख्या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार असून शतकाच्या मध्यावधीस ती २१ टक्के होईल. आर्थिक सुबकता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे लोकांची वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे पर्यायाने ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येसोबतच त्यांच्या अनेक समस्याही पुढे आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा अनेक स्वरूपाच्या समस्या असू शकतात. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर सरतं आयुष्य सुसह्य, शांत आणि समाधानी करायचं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आणि महागाईचा मारा झेलताना वयाची साठी कधी ओलांडते ते कळतच नाही. 'आयुष्याचा हा शेवटचा टप्पा सुंदर करण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे. मुळात ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे मोकळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पाहिल्यास आणि तरुणांनी ज्येष्ठांना समजून घेतल्यास, त्यांच्या आरोग्याच्या समस्यांची तीव्रता कमी होईल', अशी भावनाही डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. |
उत्तर दिशेला डोकं करून झोपण्याची सवय आरोग्यावर करते हा गंभीर परिणाम ! ।\nHome / Marathi / Diseases & Conditions / उत्तर दिशेला डोकं करून झोपण्याची सवय आरोग्यावर करते हा गंभीर परिणाम !\nनेमक्या कोणत्या दिशेला डोकं करून झोपणं आरोग्याला ठरते फायदेशीर ? हे नक्की जाणून घ्या\nEditorial Team । Updated: July 12, 2017 5:48 pm\nTags: Sleeping habits Sleeping position\nआजकाल प्रत्येकजण घराची निवड करताना वास्तूशास्त्र पाहतो. वास्तूशास्त्रानुसार घराचा दरवाजा कुठे आहे ? स्वयंपाकघर कुठे आहे ? जेवायची जागा कशी आहे ? हे तपासून पाहतो. पण तुमची झोपण्याची स्थिती काय आहे? डोके कुठल्या दिशेला हवे ? यावरही तुमचे आरोग्य अवलंबून असते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? घरात सार्या सुखवस्तू आहेत पण आरोग्य पुरेशी साथ देत नाही असा प्रत्यय अनेक घरात येतो. यावेळेस तुम्ही किती महागड्या बेडवर झोपता यावर केवळ तुमचे आरोग्य अवलंबून नसते तर तुमची स्थितीदेखील एक महत्त्वाची भूमिका बजावते.\nमानवी शरीराचे स्वतःचे मॅग्नेटिक फिल्ड असते. जेव्हा तुम्ही उत्तरेला डोके करून झोपता तेव्हा शरीर मॅग्नेटीक फिल्डशी समांतर नसते. याचा परिणाम रक्तदाबावर होतो.आणि तो पुन्हा सुरळीत ठेवण्यासाठी हृद्यावर अधिक ताण येतो. डोके, मान, पोट दुखत असताना नेमके कसे झोपावे ? याबाबतचा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या\nतुम्ही उतार वयात असाल आणि तसेच तुमच्या रक्तवाहिन्या कमजोर असतील तर अशा चूकीच्या स्थितीत झोपण्याच्या सवयीमुळे पॅरॅलिसिस ( पक्षघात) किंवा हॅमरेज होण्याचा धोका अधिक बळावतो. जेव्हा तुम्ही आडवे झोपता तेव्हा आपोआपच हृद्याचे ठोके कमी होतात. उत्तरेला डोके करून झोपल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. ताण वाढतो. म्हणूनच तुम्हांला रात्री 8 तासाची झोप घेऊनही सकाळी फ्रेश वाटत नसेल तर तुमच्या झोपण्याची दिशाही तपासून पहा. या '6' कारणांमुळे तुमच्या दिवसाची सुरवात डोकेदुखीने होते !\nझोपताना नेमके डोके कोणत्या दिशेले असणं फायदेशीर ठरते ?\nझोपताना डोके दक्षिणेला किंवा पूर्वेला ठेवून झोपा. पश्चिमेला डोके करून झोपणेदेखील तितकेसे त्रासदायक ठरत नाही. Pain management specialist, डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या सल्ल्यानुसार, झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळणे( हार्टबर्न) चा त्रास कमी करतो. यासोबतच डाव्या कुशीवर झोपण्याचे इतर कोणते फायदे आहेत हे देखील नक्की जाणून घ्या.\nइंटरेस्टिंग फॅक्ट्स -\nतुम्हांला ठाऊक आहे का ? तुमच्या साथीदारासोबतचे बॉन्डींग वाढवण्यासाठी दक्षिणेकडे डोके करून झोपण्याची सवय फायदेशीर ठरते. लव्ह लाईफबद्दल संकेत देतात या '6′ झोपण्याच्या स्थिती !\nPublished: July 12, 2017 5:08 pm । Updated:July 12, 2017 5:48 pm\nरडताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का येतात? |
nagaradhyaksha resignation news । करारनाम्याची मुदत संपूनही नगराध्यक्षांचा राजीनाम्यास नकार - Divya Marathi\nNagaradhyaksha Resignation News\nकरारनाम्याची मुदत संपूनही नगराध्यक्षांचा राजीनाम्यास नकार\nतुळजापूर - एकछत्री अंमल असणार्या तुळजापूर पालिकेत निवडणुकीपूर्वी सर्व नगरसेवकांमध्ये समझोता झाला होता. त्या समझोत्यानुसार नगराध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपूनही राजीनामा देण्यास नगराध्यक्षांनी नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.27) बोलाविण्यात आलेली सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांवर दबाव वाढविण्यासाठी सभेतील एकही विषय मंजूर होऊ न देण्यावर सर्व नगरसेवक ठाम आहेत.\nपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे महिनाभर उशिराने तुळजापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे. गेल्या महिनाभरापासून सभा न झाल्याने अनेक महत्त्वाचे विषय रेंगाळले आहेत. त्यातच निवडणुकीपूर्वी झालेल्या समझोत्यानुसार एक वर्षाची मुदत संपल्यानंतरही नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या समझोता एक्सप्रेसला यामुळे चांगलाच ब्रेक लागला आहे. या प्रकारामुळे शुक्रवारी होणार्या सर्वसाधारण सभेची पदाधिकार्यांसह नागरिकांनाही प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिनाभरापासून सभा न झाल्याने पालिकेतील अनेक निर्णय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तुळजापूर पालिकेचा कारभार समझोता एक्सप्रेसमुळे जिल्ह्यासह राज्यभर चर्चेला आला. सत्ता राष्ट्रवादीची असली तरी निर्णय स्थानिक पातळीवर सर्वसंमतीने घेतले जातात. यानुसार निवडणुकीपूर्वी ठरलेल्या करारनाम्यानुसार आजपर्यंत सर्वकाही सुरळीत चालले. मात्र, यावेळी विद्यमान नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने पुढे काय निर्णय घ्यायचा याबाबत शुक्रवारच्या सभेनंतरच चर्चा होण्याची शक्यता आहे.\nपालिकेतील सर्व 19 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादीने काही महत्त्वपूर्ण समझोते केले होते. यामध्ये सर्वांना संधी मिळावी म्हणून उपनगराध्यक्ष पदाची मुदत एक वर्षाची केली. त्यानुसार5वर्षांत5उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्यांचा कालावधी 1 वर्ष, त्यानुसार पाच वर्षांत दहा स्वीकृत नगरसेवक. पहिले दीड वर्ष अर्चना गंगणे यांना तर नंतर एक वर्ष विद्याताई गंगणे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. विद्याताई गंगणे यांची एक वर्षाची नगराध्यक्षपदाची मुदत 16 जून रोजी संपली.\n- वार्डनिहाय स्वच्छतेचा ठेका देणे.\n- कॅरीबॅगमुक्ती अभियान राबविणे.\n- हद्दवाढ भागाचा विकास आराखडा तयार करणे.\n- महावितरणच्या 'अभय योजनेत' सहभागी होणे.\n- 13 वा वित्त आयोग, रस्ता फंड, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कामाचे बिल करणे.\nयापूर्वी विनातक्रार राजीनामे\nयापूर्वी अर्चना गंगणे यांनी आपला दीड वर्षाचा कालावधी संपल्यानंतर विनातक्रार राजीनामा दिला होता. तत्पूर्वी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अनिता साळुंके यांनीही वर्षाचा कालावधी संपताच तत्काळ राजीनामा सादर केला होता. तसेच स्वीकृत नगरसेवक विनोद पलंगे, श्रीकृष्ण सूर्यवंशी, अफसर शेख यांनीही समझोत्यानुसार मुदत संपताच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.\nनिवडणूकपूर्व समझोत्यानुसार यापूर्वीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांनी मुदत संपताच आपले राजीनामे दिले आहेत. विद्यमान नगराध्यक्षांनाही पक्षादेश पाळावाच लागेल."\nनारायणराजे गवळी, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस. |
भारतीय चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाची. पुढील महिन्याच्या 19 तारखेपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढत चालली आहे. यंदाचे आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं खेळाडूंची कोरोना चाचणी, जैव सुरक्षितता वातावरण, आदी सर्व विषयांवर चर्चा सुरू आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी पुढील आठवड्यात आणखी कॅरेबियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. पण, ही लीग सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूला माघार घ्यावी लागली आहे. विमान पकडण्यासाठी तो वेळेत पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे त्याला आता स्पर्धेत खेळणार नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबीयन अॅलन यानं सीपीएलमधून माघार घेतली आहे. जमैका येथून बार्बाडोस येथे सुटणारं विमान त्याला पकडता आलं नाही. सीपीएलमध्ये तो सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचा सदस्य आहे. 3 ऑगस्टपूर्वी त्याला बार्बाडोस येथे दाखल व्हायचे होते. तेथून खेळाडूंना चार्टड विमानानं त्रिनिदाद येथे नेण्यात येणार होते, पण तो बार्बाडोस येथेच पोहचू शकला नाही. "विमानाची माहिती देताना काहीतरी कन्फुजन झालं आणि त्यामुळे त्याला विमान पकडता आलं नाही. आम्ही सर्व प्रयत्न केले, परंतु कोरना व्हायरसमुळे असलेल्या प्रवास निर्बंधामुळे आम्हाला त्रिनिदाद येथे पोहोचता येणार नाही. चार्टड विमान हा एकमेव पर्याय होता,"असे अॅलनच्या एजंटनं सांगितले. कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) ला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी खेळाडू, अधिकारी आणि आयोजक आदी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे दाखल झाले आहेत. सर्व 162 सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता सर्वांना हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल. लीग आयोजक संचालक म्हणाले,"सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. सर्व सदस्यांचे आरोग्य, याला आम्ही प्राधान्य दिले आहे. " Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का! पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी! Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला! Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली होती. नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे मोदींची ही मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात, याचीही आठवण मोदींनी करून दिली आहे. मी फार लहान वयात घर सोडलं. कारण तेव्हाचं जीवन वेगळंच होतं. केव्हा केव्हा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा व्हायची, तेव्हा आईला बोलावून घ्यायचो, परंतु नंतर आईच बोलायची की मी इथे काय करणार, मी परत जाते. मोदी म्हणाले, माझ्याकडे जेव्हा आई येते, तेव्हा तिला वेळ देता येत नाही. एखाद दुसऱ्या वेळी फक्त तिच्याबरोबर जेवण होते. जर एखादी घटना मला न आवडल्यास मी ती कागदावर लिहितो. ती घटना का झाली, त्यानंतर तो कागद फेकून देत होतो. परंतु तरीही मनाला काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी ती घटना कागदावर उतरवत राहतो आणि कागद फाडून टाकतो. तेव्हा मीसुद्धा चुकीचा असल्याचं कळत होतं. नाराजी, राग आणि लोभ हे मनुष्याच्या स्वभावाचे गुण आहेत, असंही मोदी म्हणाले आहेत. मी बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री होतो. मी लहानपणी रामकृष्ण मिशन आश्रमातही गेलो होतो. 20 वर्षांच्या वयातच मी फार फिरलो. खूप भटकलो आणि जग बघितलं. फिरत फिरतच मी इथपर्यंत आलो. मी काय होईन हे मलाच ठाऊक नव्हतं, पण मी पंतप्रधान झालो. |
भंडारा : चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजविण्याचा प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव टोली येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखनी वन विभागाने घरातून मांस आणि कुऱ्हाड जप्त केलीये. मात्र, आरोपी पसार झाला आहे. संजय मनोहर पोंगरे असे शिकाऱ्याचे नाव आहे (Bhandara Chital hunting and meat cooked at home Lakhani forest department took action). भंडारा (Bhandara) येथील लाखनी वन विभागाला पिंपळगाव टोली येथील एका घरात चितळाचे मांस शिजत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन वन विभागाने संजय पोंगरे यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील चुलीवर एका भांड्यात मांस शिजत असल्याचे दिसून आले. तसेच, घरात रक्ताने माखलेले प्लास्टिकचे पोते आणि एक कुऱ्हाडही सापडली. वन विभागाने हे सर्व साहित्य जप्त केले आहे. मात्र, यावेळी आरोपी पसार झाला असून लाखनी वन विभाग त्याच्या शोध घेत आहे. लाखनी तालुका परिसर हा वन आच्छादित असल्याने वन्य प्राणी शिकार (Hunting) प्रकरण नेहमी घडत असल्याने वनविभागासमोर लोभी शिकाऱ्यांचे आवाहन नेहमीच राहते. आता याप्रकरणी वन विभाग तपास करत आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
सार्वजनिक रोडवर सोमवारी (दि. 28) केली. करणकुमार भरत राय (वय-22 रा. गुरुदत्त कॉलनी, कर्वेनगर, पुणे मुळ रा. थाना डुमरा, गाव रसदपुर, जि. सितामडी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी व कर्मचारी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी कर्वे पुतळ्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर दुचाकीवर एक तरुण संशयितरित्या उभा असलेला आढळून आला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या दुचाकीच्या मध्यभागी असलेल्या पोत्याची झडती घेतली असता 1 लाख 51 हजार 400 रुपयांचा 7 किलो 570 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी, मोबाईल, एक इलेट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2 लाख 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलस आयुक्त रामनाथ पोकळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदिप शिर्के, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, योगेश मोहिते, रेहना शेख यांच्या पथकाने केली. Indrani Balan Winter T20 League 2022 । दुसरी 'इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग' अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय ! ! Maharashtra Cabinet Decision । 75000 पदांच्या नोकरभरतीला गती देणार, शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय (व्हिडिओ) |
धाडच्या एस. टी. बसस्थानकाच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी ! धाड : धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. धाड : धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. बुलडाणा विभागात असणाºया बसस्थानकापैकी बुलडाणा औरगांबाद मार्गावर धाड े बसस्थानक आहे. एस. टी. महामंडळाने साधारण २० ते २५ वर्षापूर्वी धामणगांव रोडलगत प्रशस्त जागा घेवून, तात्पुरते एस. टी. रोड उभारुन बसस्थानक सुरु केले. ह्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक आणि प्रवासी निवारा असा एकत्रीत बांधकाम वजा शेड म्हणजे बसस्थानक आहे. त्यावेळी बाजुला अपुºया जागेवर महिला आणि पुरुषांकरता स्वच्छता गृह तयार केले. याठिकाणी शौचालय बांधकाम करण्यात आले नाही. तेव्हापासून तर आतापर्यंत एस. टी. महामंडळाने बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. या बसस्थानकावरुन दैनंदिन व प्रासंगीक स्वरुपात प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या भरपूर आहे. प्रामुख्याने नोकरदार महिला शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणी निमित्त असंख्य महिला व मुली धाड बसस्थानकावर येतात परंतु शौचालय, पुरेसा निवारा, पाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, लाईट व्यवस्था ह्या मुलभूत सुविधांची वाणवा आहे. |
राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. अशातच शिवसेनेचे(shivsena0 अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके(ramesh latake) यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत भाजप(bjp) कडून मुरजी पटेल (muraji patel) यांना उमेदवारी दडण्यात आली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके(rutuja latake) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून रंगलं तर ठाकरे गटाकडून मुरजी पाटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. अशातच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत (andheri by-election) मोठी घडामोड घडली आहे. भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत अशी घोषणा केली. दरम्यान भाजपच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (ncp) आमदार रोहित पवार ( MLA rohit pawar) यांनी भाजपच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत चांगलाच टोला लगावला आहे. अंधेरी पोटनिवडणूक (andheri by-election) बिनविरोध होईल, असं चित्र दिसत आहे. पण त्यापूर्वी जे घडलं ते निंदनीय होतं. त्यांनी आधीच ही निवडणूक बिनविरोध होईल असं जाहीर केलं असतं तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती. असं राष्ट्रवादीचे (ncp) आमदार रोहित पवार (MLA rohit pawar) म्हणाले. दरम्यान रोहित पवार यांनी आतापर्यंतच्या आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावरही भाष्य केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळत आहे. हे सध्याच्या चित्रावरून दिसतंय. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहील. जनतेच्या मनात काय आहे, त्यांना पक्षात सुरु असलेल्या घडामोडी पचनी पडल्या नाहीत, हे या निकालातून स्पष्ट दिसत आहे. असंही रोहित पवार म्हणाले. |
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व त्यांच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या आठ रुग्णालयांतर्गत केलेल्या आठ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. फिल्डवर असलेले अधिकारी, कामगार यांना सुरक्षा साधने पुरवली जात असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी अशा 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला पोलीस दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर नर्स व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. या दोन्ही नर्स पुण्यातील रुग्णालयात कार्यरत होत्या. तर पोलीस कर्मचारी पुणे पोलीस दलात कार्यरत असून पिंपरी चिंवडमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या पंधरा दिवसांत वायसीएममधील एका डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर भोसरी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वॉर्डबॉयला संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. मंगळवारी महापालिका सेवेतील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पालिकेत वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. निगडी परिसरात पालिका कर्मचारी निवासस्थान असलेली इमारत कालपासून सील करण्यात आली आहे. हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. |
पुणे : कोरोना काळात सलग २४६ दिवस सातत्याने सामाजिक काम करणाºया वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झोपडपट्टीत राहून कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्या आजीकडून सत्कार केला. 'कोरोना नायकांचा कोरोना नायिकेकडून सत्कार' अशा शब्दात उपस्थितांनी या सत्काराचे वर्णन केले. मार्च ते नोव्हेंबर या काळात संघटनेचे सर्व कार्यकर्ते गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत करत होते. फक्त पुण्यातच नव्हे तर कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर व काहीजणांनी तर थेट दिल्ली, जम्मू, काश्मिर, पंजाब या राज्यांमध्ये जाऊन तिथेही स्थानिक कार्यकर्त्यांच्या साह्याने संघटनेच्या सामाजिक कामाची मुहुर्तमेढ रोवली. जूने कपडे, औषधे, धान्य अशी सर्व प्रकारची मदत दानशूर व्यक्तींकडून घेऊन ती या गरजू कुटुंबांना पोहचवण्यात आली. अॅड. अमोल ढमाले यांनी त्यांना सहकार्य केले. कार्यक्रमाला सचिन जामगे, महेश बाटले, सचिन कर्वे, किरण राऊत , उद्धव काळे, यज्ञेश मोरे उपस्थित होते. |
शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे... बिग बींचा भावनिक ब्लॉग\nगेल्या 50 वर्षांपासून बॉलिवूड आणि सिनेचाहत्यांचा हृदयावर अधिराज्य गाजवणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. 'वाढतं वय शरीराला सहकार्य करत नाही, त्यामुळे निवृत्त होण्याचा विचार करत आहे', अशा भावना बिग बींनी आपल्या ब्लॉगमधून व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची शुटिंग करण्यासाठी गुरुवारी (28 नोव्हेंबर) सकाळीच मनालीमध्ये पोहोचले होते. मनालीमधील शुटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल 12 तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली. शिवाय, इथल्या निसर्गाचं आणि स्थानिकांचंही प्रचंड कौतुक केलं आहे. 'मनालीतील लोक अतिशय साधी आणि प्रामाणिक आहेत, आपण कधीही त्यांची बरोबरी करू शकत नाही',असं बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे.\n'आता मला निवृत्त झाले पाहिजे...'\nबिग बींच्या ब्लॉगमधील पुढील संदेश अतिशय भावनिक आहे. 'पुन्हा एकदा नवीन जागा, नव्या खोलीत स्वतःला सामावून घ्यायचं आहे. आता मला निवृत्त झाले पाहिजे. मेंदू आणि हाताची बोटं परस्परविरोधी काम करत आहेत, हा एक संदेश आहे',असा आशयाचा ब्लॉग बिग बींना लिहिला आहे. दरम्यान, हा एक मेसेज असल्याचं अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. पण बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या या ब्लॉगकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. मीडिया इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या निवृत्तीसंदर्भात निरनिराळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थासंदर्भातही चिंता व्यक्ती केली जात आहे.\nवाचा अमिताभ बच्चन यांचा भावनिक ब्लॉग :\nबिग बींवर सुरू होते औषधोपचार\nकाही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना चार दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 1983साली झळकलेल्या 'कुली' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान झालेली दुखापत आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे अमिताभ बच्चन त्रासल्याची माहिती समोर आली आहे.\nब्रह्मास्त्रच्या शुटिंगमध्ये व्यस्त\nसध्या अमिताभ बच्चन अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर दुसरीकडे आयुष्मान खुरानासोबत असलेल्या 'गुलाबो सिताबो' सिनेमाचंही शुटिंग ते करत आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे 'झुंड' सिनेमादेखील आहे. या सिनेमाच्या शुटिंगचं वेळापत्रकही व्यस्त असल्याचं म्हटलं जात आहे.\nनव्या कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत\nसिनेसृष्टीत 'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडला कित्येक सुपरहिट सिनेम्यांसहीत बरंच काही दिलं आहे. कित्येक नवोदित कलाकार त्यांना आपले गॉडफादर मानतात. त्यांच्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. प्रामाणिकपणे आणि कष्ट करून यश कसं मिळवलं जातं, याचं जिवंत उदाहरण म्हणून अमिताभ बच्चन. या महानायकानं प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयापासून आराम घेण्याचा निर्णय घेतला तर बॉलिवूड आणि चाहत्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी असेल.\n(वाचा :VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल) |
Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणातील वर्ग हा शेती करत आहे. अशा वेळी शेतकरी बंधू शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून त्यांची स्वप्ने पूर्ण करत आहेत. जर तुम्हीही शेतकरी असाल तर आज तुमच्यासाठी एक सुपरहिट व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही काही दिवसातच श्रीमंत होऊ शकता. या शेतीच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध आहे. या व्यवसायाला हिरवे सोने असेही म्हणतात. देशात बांबूची लागवड करणारे लोक फार कमी आहेत. बांबूची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. इतर पिकांच्या तुलनेत बांबूची लागवड अत्यंत सुरक्षित मानली जाते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच यातून खूप चांगले उत्पन्नही मिळू शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही हंगामात खराब होत नाही. बांबू पिकाची एकदा लागवड केल्यास त्यातून अनेक वर्षे नफा मिळवता येतो. बांबू लागवडीत खर्च आणि मेहनत कमी आहे. ओसाड जमिनीतही लागवड करता येते. बांबूची लागवड कशी करावी? तुम्ही कोणत्याही रोपवाटिकेतून बांबूचे रोपटे विकत घेऊन ते लावू शकता. त्याच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा की माती जास्त वालुकामय नसावी. 2 फूट खोल आणि 2 फूट रुंद खड्डा खोदून बांबूची लागवड करता येते. यानंतर शेणखत टाकता येते. रोपे लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्या आणि एक महिना दररोज पाणी द्या. 6 महिन्यांनी आठवड्यातून पाणी द्यावे. एक हेक्टर जमिनीत 625 बांबू रोपे लावता येतात. बांबूचे रोप अवघ्या तीन महिन्यांत वाढू लागते. बांबूच्या झाडांची वेळोवेळी छाटणी करावी लागते. बांबूचे पीक 3-4 वर्षात तयार होते. या पिकासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते. कागद बनवण्यासोबतच बांबूचा वापर ऑरगॅनिक फॅब्रिक बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच अनेक सजावटीच्या वस्तूंसाठीही बांबूचा वापर केला जातो. भारत सरकारने देशात बांबू शेतीला चालना देण्यासाठी 2006-2007 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले होते. बांबूचे पीक 40 वर्षे चालू असते. 2 ते 3 वर्षांच्या मेहनतीनंतर बांबूची शेती अनेक वर्षे बंपर कमवू शकते. बांबूच्या लागवडीतून तुम्ही 4 वर्षात 40 लाख रुपये कमवू शकता. कापणीनंतरही बांबू पुन्हा वाढतात. बांबूच्या काड्या वापरून अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात. यामुळे तुमचा नफा अनेक पटींनी वाढेल. बांबूच्या लागवडीसोबत तीळ, उडीद, मूग-हरभरा, गहू, बार्ली किंवा मोहरी ही पिके घेता येतात. त्यामुळे उत्पन्न वाढेल. |
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी खास ललित संगीत अभ्यासक्रम सुरु झाला आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीसाठी सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच सांस्कृतिक चळवळ वाढीस लागेल असे मत ललित कला केंद्र, विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा थिएटर वर्कशॉप कंपनी संचलीत मराठी ललित संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे माजी सह आयुक्त दिलीप गावडे , शहरातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था - संघटनांचे प्रतिनिधी, गायक, कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रवीण भोळे पुढे म्हणाले की, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असतो. मात्र प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने सर्वांनाच प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशा स्थितीत अंश प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात प्रमाणात अभ्यासक्रम घेण्याची जबाबदारी थिएटर वर्कशॉप कंपनी संस्थेला दिली आहे. शहरातील उदयोन्मुख कलाकारांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दिलीप गावडे म्हणाले की, शहरपातळीवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु झाल्याने शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. शहरात सुरु झालेला हा उपक्रम शहरासाठी अभिमानास्पद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कस्तुरी पायगुडे- राणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर पवार यांनी मानले. |
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1 -1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ऑस्ट्रेलियन संघाला आनंदाची बातमी मिळाली असून, त्यांचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी खेळाडू वसीम जाफर यांनी ट्विटरवर मजेशीर पोस्ट करत डेव्हिड वॉर्नरला बाद करण्याचा प्लॅन भारतीय संघाला दिला आहे. वसीम जाफर हे ट्विटरवर आपल्या विनोदी पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. अशातच त्यांनी 4 फोटो टाकत खाली लिहले आहे, "तुझ्यासाठी हा मेसेज सोपा असेल रिषभ. " जाफर यांनी या फोटोत रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजाला देखील टॅग केलेले आहे. फॅन्सनी देखील जाफर यांच्या फोटोवर मजेशीर कमेंट केलेल्या आहेत. जाफर यांनी या मेसेजमधून पंतला सल्ला दिला आहे की, जेव्हा वॉर्नर फलंदाजीसाठी येईल तेव्हा तू बुटा बुमा हे गाणं गा, जेणेकरून वॉर्नर डान्स करण्यासाठी क्रिजच्या बाहेर येईल व तेव्हा तू त्याला यष्टीचीत करशील. दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, लॉकडाऊनमध्ये वॉर्नरने दक्षिणात्य चित्रपटातील बुटा बुमा या गाण्यावर मजेशीर डान्स केला होता. तसेच त्याचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळेच जाफर यांनी विनोदी शैलीने ही पोस्ट केली आहे. |
कोठडीतून खेळ dungeons एक सिम्युलेटर म्हणून वर्णन केले आहे, जे प्रकाशित सर्व gamers आठवतो. आणि तो आपण रक्षणकर्ता भूमिका घेणे आमंत्रित केले आहे, जे त्या दुर्मिळ प्रकल्प एक सर्व गोष्टी मध्ये चांगले नाही, आणि या भामटा, काळोख प्रभु. आपण आपल्या स्वतः च्या घरातून वाईट प्रचंड तयार करा आणि सर्व पृथ्वीवरील प्रसिद्ध होण्यासाठी राज्य, तुला ठार मारण्याचा होते कोण चांगला सरदार सर्व प्रकारच्या थांबवू त्यांची शक्ती तसेच भयानक सापळे विविध वापर सुसज्ज आहे. खेळ खूपच सोपे होते, पण त्याच वेळी अतिशय रोमांचक, आणि तो शब्दशः आपल्या ज्युनियर जाहीर प्रत्येक टिप्पणी oozed की एक विशेष प्रतिभा काळा विनोद दिली. स्वाभाविकच, या यश लक्ष न दिला गेलेला नाही, आणि तो प्रकाश आपण सध्या वाचण्यास सक्षम असेल हा खेळ कोठडीतून 2 विहंगावलोकन आणि रस्ता वर काही सूचना या चित्रपटाचा निर्णय घेण्यात आला होता. , नाही अर्थ आहे प्रत्येक पातळीवर रस्ता वर्णन कारण प्रत्येकजण त्यांच्या स्वतः च्या घोटाळ्यात करू शकता, पण सामान्य सल्ला आणि आपल्या सैन्याने आयोजित कसे शिफारशी, आपण तो वाचतो आहे हे मला माहीत आहे. आणि मग आपण खेळ प्रक्रिया कोठडीतून 2. जास्त आनंद मिळवू शकता सर्वेक्षण देखील आपण वापरू शकता आणि त्यामुळे आपल्या नियंत्रण spells अंतर्गत होईल की गोष्टी बद्दल सर्व प्रकारच्या सांगते. लगेच तो पर्यवसान एक यशस्वी होता की असे म्हणू नये की - आपण एक जास्त विकसित आणि मनोरंजक पहिला भाग दिसेल त्यावर असे लिहिले कोठडीतून 2 अधोरेखित करतो जे पुनरावलोकन पहिल्या आणि दुसर्या भाग दरम्यान आहेत काय समानता आणि फरक जास्त लक्ष केंद्रित करणार नाही कव्हर वर. आम्ही ते अतिशय भिन्न आहेत की म्हणू शकता, पण एक सामान्य थीम, शैली आणि तेच काळा विनोद सामायिक करा. त्यामुळे, आपण एक शक्तिशाली गडद स्वामी, तुम्ही सर्वकाही पुन्हा इंधन भरणे किंवा भरुन घेणे जेथे त्याच्या स्वतः च्या घरातून, आहे आहे. तथापि, या, आपण अर्थातच, पुरेसा नाही आहे त्रासदायक ध्येयवादी नायक आणि चांगले इतर सैन्याने सतत आपण आणि ऑफ द फेम शोधात आपल्या टाकीत दहशत म्हणून. त्यानुसार, आपल्या कार्य असेलः सैन्यातील जास्तीत जास्त शक्ती गोळा करण्यासाठी पृष्ठभाग येतात आणि खरोखर शक्तिशाली आहेत, त्यांनी हे सर्व वर्ण दर्शविण्यासाठी. त्यामुळे समोर आपण हळूहळू अमलात आणणे आवश्यक आहे की दोन कामे आहेत - प्रथम आपण अजून पालन नाही भूमिगत जगात पूर्णपणे काबीज करणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपण त्यांच्या प्रभाव विस्तृत करण्यासाठी त्याचे सैन्य भांडवल गुंतवणे आणि त्याच्या आकार वाढविण्यासाठी, सक्षम असेल. जे लोक आणि इतर प्रकाश माणूस सतत नाश करू पाहणारे वास्तव्य आहे वरच्या जग जप्त, आपण खरोखर काहीतरी नाही आहोत आणि हस्तक्षेप तरी, फक्त आपल्या स्वतः च्या वाईट जीवन जगू - पण आणि नंतर आधीच आपण दुसर्या टप्प्यात जाऊ शकता. की कथा खेळ कोठडीतून 2. पुनरावलोकन अधिक तपशील आपण मोहीम दर्शवेल बद्ध आहे काय आहे, तो आपण सर्व या प्रकल्पाचे फायदे तसेच सांगेन की, एक यशस्वी वाईट प्रभु अंधारकोठडी जात मूलतत्त्वे आपल्याला परिचय. त्यामुळे, कोठडीतून 2 याप्रमाणे, आपण आधीच समजले, तर ते त्याच्या प्रभाव ग्राउंड अंतर्गत, पृष्ठभाग वर लोक नाश तसेच विस्तृत आहे. हे सर्व केले जाते आपण एक वेगळाच विषय प्रचंड विविध सैन्य मदतीने सक्षम असेल - प्रथम आपण फक्त काही प्रजाती उपलब्ध होणार आहे, पण एक भूमिगत जगात आपल्या शक्ती प्रसार आपण एकतर मागील विषयावर पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत नवीन प्राणी ताबा घेईल, किंवा असेल गंभीरपणे भविष्यात आपल्याला मदत करण्यास क्षमता. तसेच, आपण एक मनोरंजक ऐतिहासिक मोहीम मोड देते, जे आपण प्रत्यक्षात अगदी खेळ पहिल्या भागात प्ले लक्ष द्या, पण पर्यवसान एक नवीन ग्राफिक आणि भौतिक डिझाइन पाहिजे. ही पहिली भाग खेळला नाही आहेत ज्यांना एक उत्तम संधी आहे, पण मी ते आवडेल. देखील लक्षात ठेवा दोन्ही मोहिमा, आपण पुस्तके, फिल्म आणि कला इतर कामे मनोरंजक संदर्भ एक प्रचंड विविधता लक्षात येईल की. अर्थात, आपण आपल्या ज्युनियर गडद विनोद आहे दिसेल की ताब्यात ठेवता न येणारा हशा पासून बाहेर पडू शकतात तर बाबतीत त्यामुळे केवळ करू शकता. आजचा सकाळ खेळ नाही फक्त देखावा रीती आहेत आम्ही विसरू नये - मित्रांशी ऑनलाइन खेळण्यासाठी संधी अगदी आहे. साधारणतया, खेळ कोठडीतून 2 याप्रमाणे आपण किती वेळ लागेल, पण आपल्याला ते आवडेल, तर इतर रीती आपण खूप खेळ खर्च तास संख्या, फक्त वाढू होईल की खेचणे शकता. या भूमिका वठविणे खेळ स्पष्टपणे रेषेचा मोहीम, हा प्रकल्प, पुनरावलोकन जे मानले जाते उपस्थित नाही बांधलेले असल्याने आणि ते शोधण्यासाठी - अनेक लोक अंधारकोठडी वेढा 2 याप्रमाणे खेळ शोधण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्येक कार्य आपण करू इच्छित मार्ग सुरू करू शकता, त्या सैनिक सोबत घेऊन की आपण यापुढे दिसत नाही. आपण गमावू शकत नाही किंवा पुढे काय करावे ते कळत नाही. , सैनिकांची संरेखन बदलण्यासाठी धोरण - आपण फक्त पुढे, हल्ला, कॅप्चर आणि विजय, आणि जर गरज नाही. आणि पुन्हा प्रयत्न करा. प्रकल्प अंधारकोठडी चेंडू जुन्या मालिका चाहत्यांसाठी, तसेच पहिला भाग आवडले जे 2015 मध्ये प्रकाशीत आणि ताज्या हवेचा प्रत्यक्ष लांब-प्रलंबीत श्वास झाले. केवळ दुसरा भाग - आपण यापुढे सतत मानवी वर्ण बंद दूर ठेवणे भाग पाडले आणि कवटीच्या भिंती सजवण्यासाठी निरर्थक आहे टाकीत परत धारण करतील, बरेच चांगले आणि अधिक मनोरंजक आहे. आता आपण पुढे जाऊ आणि झडप घालतात करणे आवश्यक आहे, आणि तो जास्त मजा आहे. शिवाय, तेथे दोन धावा संबंधित जवळजवळ तीस विविध प्रचंड, विविध वैशिष्ट्ये आणि स्पेशलायझेशननुसार काही ध्येयवादी नायक पर्यायांपैकी, खेळ रीती एक ऐवजी मोठ्या प्रमाणात आहे. पण शैली सिम्युलेटर टाकीत एक रणनीतिकखेळ धोरण मार्ग दिला असे मला वाटत नाही - ते आहे. फक्त खेळ नवीन भाग सुसंवाद या दोन शैली, त्याचा अर्थ असा काय आहे ते आपल्याला एक संपूर्ण नवीन दृष्टीकोन देत गडद प्रभु असेल. मनोरंजक नावीन्यपूर्ण लक्षात ठेवा - भयपट हाताचा. आपण आपल्या सैन्याने अधिक अचूकपणे आणि flexibly आपल्या ज्युनियर प्रत्येक नियंत्रित करून एक, आवश्यक असल्यास व्यवस्थापित करण्याची परवानगी देईल हे एक साधन आहे. वरच्या - अर्थात, नव्या जगातील उत्कृष्ट परिचय विसरू नका. खेळ पहिल्या भाग आपण टाकीत लॉक केली जातात, तर आणि फक्त वर अभ्यागतांना प्राप्त, आता परत तडाखा शकतो. आणि केक वर चेरी तितकी चार पुष्कळसे रीती, आपले लक्ष आकर्षित करू शकता, जे प्रत्येक म्हणून खेळ उपस्थिती होते. सर्वसाधारणपणे, या खेळ - नाही अंधारकोठडी वेढा 2, रस्ता ती या RPG तसे नाही, आणि तो पूर्ण वाईट चिंता सर्वकाही मध्ये एक भव्य फरक देते. पण, तो हा खेळ रस्ता लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. प्रक्रियेत आपण अंधारकोठडी चेंडू 2 बऱ्याच अंशी समान आहे की सापडेल - अनेक gamers या प्रकल्प अंधारकोठडी चेंडू 3 अधिक दिसते, आणि नाही कोठडीतून 2, आणि तो पण आनंदी करू शकत नाही सहमत आहे. चांगल्या जुन्या मालिका विशेषतः उत्साही चाहते, कारण, शेवटी, ते आपण खेळ दुसऱ्या भागात त्याच्या वेळ प्रतीक्षा करू नका काय पाहू शकत होता. पण पुरेशी घराची ओढ - खेळायला वेळ आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक मिशन च्या रस्ता तेथे वर्णन केले जाईल, तो खात्यात खेळ परिवर्तनशीलता घेऊन काही अर्थ नाही म्हणून. उलट, आपण उत्तीर्ण मध्ये आपण मदत करेल अशी मूलभूत टिपा सापडेल. आणि त्यांना पहिल्या - शक्य तितकी कारखाना कामगार. ते आहे, आणि आपल्या लष्करी वर पहिल्या अंधार आपल्या राज्य ठेवले शकते. सैन्याने तयार लव्हाळा नका - फक्त थोडे संरक्षण, वर्ण किंवा इतर खेळाडू (पुष्कळसे मोडमध्ये) विरोध केला करू शकता, आणि नंतर पटकन आपल्या खजिने भरा आणि आपण लोकसंख्या मर्यादा वाढ इमारती तयार करण्याची संधी देणे सक्षम असेल की नोकरी तयार आयोजित - नंतर होईल आणि अधिक वॉरियर्स आहे. तुम्ही बघू शकता, खेळ अंधारकोठडी वेढा 2, हा प्रकल्प काहीही आहे, त्यामुळे एकमेकांशी त्यांना गोंधळ करू नका. तसेच आवर्जून दखल घेण्यासारखे एक खेळ अंधारकोठडी बचावफळी 2, जे कधी कधी हा प्रकल्प सह गोंधळून आहे की आहे - पण पुन्हा, या ते शैली मध्ये अगदी भिन्न आहेत कोठडीतून 2 काहीही आहे की एक पूर्णपणे भिन्न खेळ आहे. त्यामुळे नेहमी काय भागभांडवल आहे, आणि खेळ मध्ये गोंधळून जाऊ नये हे लक्षात. हे आहे अंधारकोठडी दुः स्वप्न 2, dungeons संबंधित कोणत्याही प्रकल्प नाही, ते सर्व अतिशय भिन्न आहेत, आणि या सूचना फक्त हा खेळ भागविण्यासाठी होईल. इतका, तो परिषद स्वतः थेट परत करण्याची वेळ आली आहे, आणि या वेळी आपण लोकसंख्या मर्यादा येथे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. हे अत्यंत महत्वाचे घटक आहे. आणि मागील बाबतीत म्हणून, अधिक - अधिक चांगल्या. नेहमी मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करा. कोठडीतून मध्ये 2 रीती मनोरंजक आणि रोमांचक गोष्टी भरपूर खेळ जोडू शकता, पण प्रथम आपण मूलभूत घोटाळ्यात समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण उत्पन्न कायम स्रोत प्राप्त करण्याची परवानगी देईल की एक युक्ती आहे. खरं की अंडरवर्ल्ड मध्ये सोने आणि हिरा खाणी विविध आकार असू शकतात, आणि आपण तेथे एक स्टोअर तयार असेल, तर आपल्या बेस कोठे आहे, तो कुचकामी असेल. श्रीमंत मिळविण्यासाठी सर्वोत्तम मार्ग - पुढील सर्वात मोठी ठेव एक स्टोरेज सुविधा तयार करण्यासाठी, कोरड्या संभव आहे. मग आपण नेहमी आपण फक्त स्वप्न शकता जे पैसे पुरवठा होईल. अर्थात, आहेत मध्ये कोठडीतून 2 फसवणूक, पण आपण फक्त स्वतः ला मिळवू शकता तर का त्यांचा वापर? आपण अधिक करू शकता कारण, कोणीतरी मरण पावला तर घाबरू नका - अनेक गेमर्सना expendable म्हणून त्यांच्या प्राण्यातच घ्या. पण हा चुकीचा दृष्टिकोन आहे - आपण एक विशिष्ट ध्येय विजय जरी, आपण ते दिसेल चांगला नाही सामान्य क्लिष्ट आणि पुष्कळसे पालन करावे लागेल. आपण सहजपणे यशस्वी होईल टाकीत - त्यामुळे बिनबाद मिशन पास स्वतःला सराव. खाली पडलेले एक अक्राळविक्राळ मेलेली नाही, तो आहे - बेशुद्ध, त्यामुळे वैद्यकीय बेड हलवा आणि तो पुनर्प्राप्त करण्यासाठी प्रतीक्षा. पृष्ठभाग वर, सर्वकाही अधिक कठीण आहे, पण आपले कर्मचारी एक घसरण आहे का हे पाहण्यासाठी प्राणी टेलिपोर्ट आपण नेहमी पुस्तके असणे आवश्यक आहे, आपण एक घर पाठवू शकता, पण आधीच वर वर्णन पद्धत पुन्हा आहे. आपण किती अधिक प्रभावी आपला गेम होईल हे लक्षात येईल. पण अजूनही आपण जाणून घेण्यासाठी आहे की संपूर्ण सूक्ष्म व्यवस्थापन आहे. आपण घोटाळ्यात, आपल्या सर्व सैनिक ठळक की हा खेळ सर्वोत्तम काम शत्रू आणि आशा पाठवून असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आपण मोहीम दुसऱ्या सहामाहीत, मजबूत AI विरुद्ध किंवा रिअल खेळाडू विरुद्ध मध्ये प्ले केल्यास, आपल्याला त्वरित चिरडणे. पृष्ठभाग वर असताना, अपरिहार्य आहे आणि त्यांच्या हल्ले अधिक संघटित करून, वैयक्तिकरित्या युनिट प्रत्येक नियंत्रित करणे आणि विचार भयपट हाताचा वापर करा. खेळ पृष्ठभाग अधिक मोक्याचा असेल, तर भूमिगत तीच सिम्युलेटर dungeons, आपण त्या इमारत, एक जेथे दाखल करण्यासाठी आणि या सर्व पटकन कळत कसे कुठे आहात ते समजून आपल्या खोल्या, सापळे आणि प्रचंड सर्व माहिती अभ्यास करणे आवश्यक आहे म्हणून आहे. पृष्ठभाग वर हे विसरू नका तुम्ही आपल्या देशात लोक अपवित्र करीत नाही, ज्यामुळे अधिक गुण प्राप्त वाईट. शिवाय, प्रत्येक पातळीवर, आपण जमीन विटंबना आपण आणि आपल्या सैन्याने एक-वेळचा बोनस देण्याचे ज्या बिंदू शोधू शकता. तुम्हाला माहीत आहे म्हणून, या रस्ता एक गेमर हात घ्या आणि मोहीम संपूर्ण खर्च ज्यांनी एक नाही. हे चांगले कसे गडद प्रभु पडणे की कठीण काम सह झुंजणे फक्त एक इशारा आहे. |
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरातील ९० फूट रोडवरील प्रगतीनगर परिसरात एका नायजेरियनला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नायजेरियन व्यक्तींनी मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करून सुमारे ५० ते ६० वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. तर काही नागरिकांनाही मारहाण केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये राहणाºया जोसेफ या नायजेरियन तरुणाला काही अनोळखी लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला उपचारासाठी जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेले. पण त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर संतापलेल्या ६ ते ७ नायजेरियन लोकांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नगीनदास पाडा, प्रगतीनगर, ९० फुटी रोड या परिसरातील रस्त्याच्या कडेला उभे करून ठेवलेले ट्रक, टेम्पो, रिक्षा, कार अशा ५० ते ६० वाहनांवर दगड मारून त्यांच्या काचा फोडल्या. दोघा तिघांना मारहाणही झाल्याचे सूत्रांकडून कळते. एकूणच या प्रकारामुळे या परिसरात रात्रभर भीतीचे वातावरण होते. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस, एसआरपी असा पोलिसांचा मोठा फौजफाटा रात्रभर उपस्थित होता. जोसेफचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. परदेशी नागरिक असल्याने व्हिडीओग्राफीमध्ये शवविच्छेदन होत असून, तो अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार आहे. वाहनांची तोडफोड मध्यरात्री करण्यात आली आहे. -डी. एस. पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे) |
जवळपास पंधरा टन लाकडांचा साठा केल्यामुळे आगामी काळात अंत्यविधी वेळी लाकडांचा तुटवडा भासणार नाही. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना मशिनरीच्या एका बटनावर प्रेताची विल्हेवाट लावली जाते. येथील स्मशानभूमीत पाच वर्षांपूर्वी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून याठिकाणी वास्तू उभारून डिझेल वर चालणारी शव दाहीनी बसविण्यात आलेली आहे परंतु ही मशिनरी नेहमीच बंद अवस्थेत असल्याने अंत्यविधी वेळेस खूपच अडचणी निर्माण होत होत्या. संबंधीत खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिकांची ही महत्त्वपूर्ण समस्या दूर करण्यासाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रमदानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला त्यास सर्व स्तरातून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला अनेक हात यासाठी पुढे आले. यावेळी भाजपचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ,सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगरसेवक प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, संदीप कदम, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे,संजय भोसले यांसह अन्य नागरिक,हॉटेल कामगार सुध्दा स्वेच्छेने या सेवाभावी उपक्रमात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेल्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. |
लग्नावेळी सात जन्माचे वचन देणाऱ्या नवरदेवासोबत नवरी लग्न न करता नवरदेवाच्या बहिणीशी करत असल्याची आश्चर्य करणारी प्रथा गुजरातच्या एका शहरात घडते. गुजरातच्या उदयपूर शहरात आदिवाश्यांमध्ये नवरी नवरदेवाच्या बहिणीशी लग्न करण्याची प्रथा आहे. यामध्ये लग्नाच्या दिवशी नवरदेव आपल्या आईसोबत घरी राहतो आणि त्याची बहीण किंवा अविवाहित महिला नवरीशी लग्न करून तिला घरी आणते. नेमकी प्रथा काय ? गुजरातच्या उदयपूर शहरातील आदिवाश्यांमध्ये एक आगळी-वेगळी प्रथा आहे. या लग्नामध्ये नवरी नवरदेवाशी लग्न करत नाही. नवरदेवाची बहिण किंवा कुटुंबातील दुसरी अविवाहित महिला नवरीबरोबर सप्तपदी करते. यावेळी लग्न सुरू असताना नवरदेव आपल्या आईसोबत घरी थांबतो. नवरदेवाची बहिण सर्व प्रथा पूर्ण करून नवरीला सासरी घेऊन येते. ही प्रथा मोडण्याच प्रयत्न केल्यावर वाईट घटना घडतं, अडचणींना सामना करावा लागत असल्याचे या गावातील लोकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, नवरदेव शेरवानी घालून घरी थांबतो आणि त्याची बहिण सर्व प्रथा पूर्ण करते. सुरखेडा, सनाडा आणि अंबल या गावात ही प्रथा स्वीकारली आहे. त्यामुळे या गावात नवरी मुलाशी लग्न आणि सप्तपदी न करता त्याच्या बहिणीशी करते लग्न. |
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या वतीने स्व. शरदभाई शहा यांच्या स्मरणार्थ "बादशहा"या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महावीर प्रतिष्ठान सॅलसबरी पार्क,लेक टाऊन स्थानक,व गंगाधाम सोसायटी अशा तीन ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी आयोजक विभागिय समन्वय युवराज शहा, तिमिर संघवी, सुजस शहा, स्मिताबेन शरद शहा, बिरेन शहा, राजीव शहा, रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, नगरसेवक प्रवीण चोरबेले, हरेशभाई शहा, अभय छाजेड आदी उपस्थित होते. यावेळी जैन साध्वी हिमानी महाराज यांनीही रक्तदान केले. याप्रसंगी बोलताना युवराज शहा यांनी उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले. राम बांगड यांनी आजच्या कोरोना महामारीच्या काळातील रक्ताचा तुटवडा चिंताजनक असून अशा रक्तदान शिबिरातून नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाचे सहाय्य होत आहे असे संगितले. या शिबिरात १६० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले. घोलप ब्लड बँक व सहायता ग्रुप यांनी तांत्रिक संचालन केले. |
CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची (COVAXIN ) प्रतीक्षा वाढतच चालली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून व्हायरस पुढे हतबल झाले आहेत. रुग्णसंख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 243,397,606 वर पोहोचली आहे. तर 4,947,807 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान सर्वच देशात वेगाने लसीकरण देखील सुरू करण्यात आलं आहे. मात्र याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची (COVAXIN ) प्रतीक्षा वाढतच चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून अद्याप देखील या कोरोना लसीला मान्यता का मिळत नाही, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेकडूनच याबाबत मोठा खुलासा करण्यात आला असून लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया ही विलंबाचीच असल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही कोरोना लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया ही प्रचंड गुंतागुंतीची असते. लसीचं पूर्ण परिक्षण आणि मूल्यांकन झाल्याशिवाय कुठल्याही लसीला मान्यता दिली जात नाही. एखाद्या लसीला मिळणारी मान्यता हा कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असतो. त्यामुळे सर्व निकष तपासून पाहणं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरील चाचण्यांच्या निष्कर्षाचं पृथक्करण करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असल्याचं रेयान यांनी सांगितलं आहे. लोकांना योग्य सल्ला देणं अत्यंत गरजेचं आहे. भलेही यासाठी एक किंवा दोन आठवडे अधिक लागले तरी चालेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची 26 ऑक्टोबरला लसीला मान्यता देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लसीला मान्यता देण्यात येऊ शकते का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी या प्रश्नाला उत्तर देताना असं कोणतंही आश्वासन देण्यास नकार दिला आहे. 26 तारखेला भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिनला आपात्कालीन वापराच्या यादीत टाकण्याच्या निर्णयाबाबत चर्चा होणार आहे. मात्र इतर अनेक गोष्टींवर याचा निर्णय अवलंबून असेल, असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मागितले जाणारे सर्व तपशील आम्ही पुरवत असून लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा भारत बायोटेककडून व्यक्त करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. |
कोल्हापूर शहरात संचार करुन आता गवा तळंदगे गावाजवळ असलेल्या पंचतारांकित वसाहतीत असणाऱ्या महापारेषणच्या उपकेंद्राजवळ आला आहे. आज (रविवार) पहाटे अनेकांना पाझर तलावाजवळ त्याचे दर्शन झाले. शहरातील मुक्कामानंतर गवा आता फाइव्ह स्टार मुक्कामी आल्याने नागरिकांची भंबेरी उडाली आहे. तळंदगे गावानजीकच फाइव्ह स्टार एमआयडीसी जवळ महापारेषणचे मोठे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राजवळच एक तळे आहे. त्या ठिकाणी आज पहाटे गव्याचे दर्शन झाले. तेथून तो हवालदार मळ्याकडे गेला असे काही नागरिकांनी सांगितले. गव्याच्या दर्शनामुळे नागरिकांत खळबळ माजली असून, लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाझर तलावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या लोकाना हा गवा दिसला. त्यांनी त्या भागातील लोकांना त्याची कल्पना देऊन अॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. तर गवा गावशेती असलेल्या भागातही आढळला आहे. त्यामुळे पंचतारांकित वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांनी सावधपने जावे असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस पाटील समीर मुल्लणी यांनी याबाबत हुपरी पोलिसांना माहिती दिली आहे. तळंदगे गावाजवळ महापारेशनच्या उपकेंद्राजवळ पाझर तलावाजवळ गव्याचे रविवारी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. |
राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या एफआरपीची काय परिस्थिती आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. . the sugarcane crushing season of Maharashtra. In the state sugarcane crushing took 173 days. This season sugar factories turnover crossed one lakh crore mark. |
Home चित्रपट आगामी चित्रपट 'श्री महालक्ष्मी क्रिएशन्स'ने केली 'कॉपी' 'श्री महालक्ष्मी क्रिएशन्स'ने केली 'कॉपी' मुलांच्या भावविश्वासोबतच शालेय जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्यांवर प्रकाश टाकणा-या चित्रपटांच्या पंक्तीत लवकरच आणखी एक मराठी चित्रपट विराजमान होणार आहे. गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरूवात झालेल्या 'कॉपी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाने पहिला टप्पा पार केला आहे. अलीकडच्या काळात किशोरवयीन मुलांचं अंतरंग उलगडणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. प्रेक्षकसुद्धा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत असल्याने मुलांच्या मनातील विचार चित्रपटांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवून समाजात नवीन विचारधारा रूजवण्याचं काम हे चित्रपट करीत आहेत. 'श्री महालक्ष्मी क्रिएशन्स'ची प्रस्तुती असलेल्या निर्माते गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांचा 'कॉपी' हा मराठी चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा असल्याचं शीर्षकावरूनच जाणवतं. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे ही दिग्दर्शकांची जोडी 'कॉपी'चं दिग्दर्शन करीत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड पेण आणि परिसरातील काही लोकेशन्सवर पूर्ण करण्यात आलं. मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे, विपुल साळुंखे अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मुदशिंगकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतीक्षा साबळे , शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. 'कॉपी' चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, 'शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारे फार कमी चित्रपट तयार होतात. 'कॉपी' हा चित्रपट जरी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असला तरी यात विविध विषय हाताळण्यात आले आहेत. केवळ शिक्षण, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणसंस्था यांभोवती या चित्रपटाचं कथानक मर्यादित नसून या अनुषंगाने वास्तव जीवनात घडणाऱ्या सत्य घटनांवर भाष्य करणारं आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेला आरसा दाखवत त्यातील उणिवांवर प्रहार करणारा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाचा मुद्दा समोर येणार आहे. शिक्षण घेणा-या किशोरवयीन मुलांच्या मनातील भावनांना वाव निर्माण करून देण्याचं कामही हा चित्रपट करणार आहे. आजच्या बदलत्या शिक्षणव्यवस्थेचा समाजाला जसा फायदा होत आहे, तसा काही प्रमाणात तोटाही होत आहे. समाजात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या थोर नेत्यांच्या मनातील भारत आजच्या बाजारीकरणात हरवला आहे, त्याचंच प्रतिबिंब 'कॉपी' या चित्रपटात उमटणार आहे. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून लोकेशन्सची निवड करण्यात आली. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञाच्या उत्तम सहकार्यामुळे चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले." दिग्दर्शनासोबतच हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनीच राहुल साळवे यांच्यासोबत 'कॉपी'ची कथा लिहिली आहे. याशिवाय हेमंत आणि दयासागर यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे, तर दयासागर यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाची मूळ संकल्पना गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. संदीप कुचिकोरवे 'कॉपी'च्या कलादिग्दर्शनाची बाजू सांभाळत असून कॅमेरामन सँटिनिओ टेझिओ छायालेखक आहेत. कोरिओग्राफर रॉकी हारळे यांच्या तालावर चित्रपटातील कलावंत ताल धरणार आहेत. रविंद्र तुकाराम हारळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून, जय घोंगे निर्मिती व्यवस्थापक आहेत. राहुल साळवे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून रोहन-रोहन ही सध्याची लोकप्रिय संगीतकार जोडी या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. |
मुंबई : हिंगणघाट जळीत कांडातील पिडितेचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुखद, धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेन खाली गेली आहे. आम्ही पिडितेच्या कुंटूंबियांच्या दुखात सहभागी आहोत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. अश्या घटना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल आहे. जर हे सरकार महिलांच्या विरोधात घडणा-या दुदैर्वी घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर राज्यात अराजकता निर्माण होईल. अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होताना दिसत आहे. पनवेल, मीरारोड, जळगाव, सिल्लोड याठीकाणी झालेल्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. या घटने नंतर जनता रस्त्यावर उतरली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. महिलांवर सातत्यांने होणाऱ्या या घटनांमुळे हे सिध्द झाले आहे कि परिस्थिती या सरकारच्या हाता बाहेर गेली आहे. लोकांनी कायदा हातात घेतला आहे. जर हे सरकार महिलांच्या विरोधात होणाऱ्या घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर अराजकता निर्माण होईल. अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली. |
विश्वास पाटील - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलची रचना करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले. पी. एन. यांनी एकाच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला रोखताना स्वतःची एक जागा वाढविलीच व शिवाय ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनाही रोखण्याचा बंदोबस्त करून ठेवला. सत्तारूढ पॅनलमधून पी. एन. यांचे पुतणे उदय निवासराव पाटील, सुरेश पाटील, पी. डी. धुंदरे व वसंत खाडे या चौघांना संधी मिळाली. मावळत्या आघाडीत त्यांना तीन जागा होत्या. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सवतासुभा मांडल्याने त्यांच्या गटाची एक जागा कमी झाली. त्या जागेवर पी. एन. यांनी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते वसंत खाडे (रा. सांगरूळ) यांना सामावून घेतले. 'गोकुळ'मध्ये पी. एन. व माजी अध्यक्ष अरुण नरके एकत्र असले तरी त्यांच्यात हाडवैर आहे; कारण विधानसभेला हे दोघे एकमेकांच्या विरोधात शड्डू मारतात. त्यामुळे अरुण नरके यांना पॅनलमध्येच घेण्यास पी. एन. यांचा विरोध होता; परंतु संदीप नरके यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्यात त्यांना यश आले नाही. दूध संघाच्या राजकारणाचे नेते महाडिक-पीएन असले तरी तेथील व्यवस्थापनांवर नरके व दिवंगत नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांचा जास्त प्रभाव राहिला. आता चुयेकर यांच्या निधनानंतर नरके यांचे वजन वाढले आहे. मावळत्या संचालक मंडळातील पी. एन. यांना मानणाऱ्या संचालकांपैकी कुणाकडेच नरके यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती; किंबहुना ते सगळे नरके यांच्या हो ला हो म्हणणारेच होते. आता वसंत खाडे तसे नरके यांच्या सगळ्याच गोष्टींना संमती देणारे नाहीत. कुंभी-कासारी कारखान्याच्या राजकारणातही खाडे व आमदार चंद्रदीप नरके यांचे राजकीय हाडवैर आहे; त्यामुळे खाडे दूध संघात जाणे हे नरके यांच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरले आहे. गटाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून वसंत खाडे हे नरके यांच्या प्रत्येक गोष्टीला रोखू शकतात. खासदार धनंजय महाडिक यांचा रामराजे कुपेकर यांच्यासाठीही खूप प्रयत्न होता. त्यासाठी चंदगड तालुक्यातील आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याही ताकदीचा त्यांनी वापर करून पाहिला; परंतु त्यालाही पी. एन. यांनी दाद दिली नाही. गडहिंग्लज तालुक्यात दिवंगत नेते राजकुमार हत्तरकी हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते. त्यामुळे तिथेही राष्ट्रवादीला कट्ट्यावर बसवून सदानंद हत्तरकी यांना संधी देण्यात देण्यात आली. सदानंद यांना उमेदवारी द्यावी यासाठी पी. एन. व आमदार महाडिक यांचाही आग्रह राहिला. खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी एका टप्प्यावर फारच आग्रह धरल्यावर 'तुम्ही त्यांच्यासाठी (रामराजेंसाठी) स्वतंत्र पॅनल करा. . . ' असेही सुनावले. रामराजे यांनी दोन वेळा प्रयत्न करूनही त्यांना 'गोकुळ'च्या पॅनलमध्ये संधी मिळविण्यात अपयश आले. |
मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते. इस्लामपूर (जि. सांगली) : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत कंपनीकडून आठ हजार शेतकऱ्यांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. प्रहार संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते. यावेळी मारुती खाडे (सांगरुळ, जि. कोल्हापूर) म्हणाले की, शेतकऱ्यांनी पै पै साठवून या व्यवसायात गुंतवणूक केली. पैसे घेताना मंत्र्यांचा मुलगा हजर होता, सुधीर मोहिते, संदीप मोहिते हे संचालक हजर होते. मग आता याच्याशी आपला संबंध नाही, असे मंत्री कसे म्हणतात? रेश्मा पवार या पारधी महिलेने सांगितले की, सुधीर मोहितेलाही मोक्क्याखाली घाला. निर्मला पवार म्हणाल्या की, नवरा मेल्यावर पोरांसाठी काहीतरी करूया म्हणून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. त्यातही तोटा झाला. चोरीचा धंदा सोडून चांगले काही तरी करावे म्हणून पैसे गुंतवले. शेतकरी, पारधी समाजाला फसवणाऱ्या या सर्वांना मोक्का लावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी म्हणाला की, ९ लाख रुपये कर्ज काढून या कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवले. ते पैसे मंत्र्यांनी परत करावेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही. |
प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर आणि अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे लवकरच 'सोहळा' चित्रपटाद्वारे प्रथमच एकत्र येत आहेत. विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरील सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे वेगळे दर्शन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना होईल. सचिनसह ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका 'सोहळा' सिनेमामध्ये पाहायला मिळतील. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणा-या सिनेमात एकूण चार गाणी आहेत. त्यात 'पांथस्थ मी', 'तुझ्या माझ्या आभाळाला', 'नो प्रॉब्लेम' या गाण्यांचा समावेश आहे. नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रवीण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर यांनी गाणी गायली आहेत. |
आज प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येते. पैशामुळे माणसाने आपले जगणे अधिक सुसह्य केलेयं. त्यामुळे माणून नेहमी पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो. आज आम्ही तुम्हाला अशा पाच राशींविषयी सांगणार आहोत जे सतत पैसा कमवत असतात. पण त्यांच्याकडून तितक्याच जलद गतीने पैसा खर्चही होतो. हो, म्हणजेच त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. चला तर जाणून घेऊया त्या पाच राशी कोणत्या आहेत. मेष - मेष राशीचे लोक आपल्या कतृत्वाच्या जोरावर आयुष्यात खूप संपत्ती मिळवतात. ते प्रचंड मेहनती असतात पण तितकेच ते जास्त खर्चिकही असतात. त्यांना विनाकारण पैसा नको त्या ठिकाणी खर्च करायची सवय असते. वृषभ - वृषभ राशीचे लोक पैसा कमावण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना सहज आयुष्यात यश, संपत्ती , पैसा मिळतो. मात्र अनेकदा त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. सिंह - ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचे लोक धन कमाईच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. या राशीच्या महिलांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खूप आवड असते. या राशीच्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते. पण त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांना पैसाही अपूरा वाटायला लागतो. वृश्चिक - या राशीच्या लोकांच्या हातात अनेक राजयोग असतात, त्यामुळे हातात घेतलेले प्रत्येक काम ते पूर्णत्वास नेतात. त्यांच्या कडे कधीच पैशाची कमतरता नसते. पण ते खूप खर्चिक असतात. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. कर्क - कर्क राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते. त्यामुळे त्यांच्याकडे सतत पैसा येत असतो. मात्र त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्या कडे पैसा टिकत नाही. |
पिफ २०१८ः व्हिडियो पार्लर (२०१८): मनोरंजक पुर्वार्ध पण उत्तरार्धात हुकला । पाहावे मनाचे\n'व्हिडियो पार्लर' 'पिफ्-२०१८'मध्ये पहिला. तोच त्यांचा 'वर्ल्ड प्रीमियर' असल्याने अख्खी टीम आली होती. 'रंगा पतंगा'च्या दमदार पदार्पणानंतर वाढलेल्या अपेक्षांसह दिग्दर्शक 'प्रसाद नामजोशी' काय घेऊन येताहेत याची उत्सुकता होती. सुरुवातीलाच हा सिनेमा गेले १२ वर्षे घडतोय हे त्यांनी सांगितल्यावर उत्सुकता नि अपेक्षा दोन्ही शीगेला पोचल्या. इतकी वर्षे त्यात गेल्याने की काय माहीत नाही, पण थोडक्यात सांगायचं तर सिनेमा वाट भरकटलेला वाटला.\nहा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित व्हायचाय. त्यामुळे कथेच्या फार तपशिलात शिरणं रसभंग ठरेल नि औचित्याला धरून राहणार नाही पण थोडक्यात सांगायचं तर विक्रम (संदीप पाठक) हा एक प्रथितयश व बऱ्यापैकी 'सुलझा हुवा' दिग्दर्शक एका स्वामींच्या मठात जातोय. त्या स्वामींचं नुकतंच निधन झालंय. त्या प्रवासात फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा आपल्याला ऐंशीच्या दशकातल्या मध्यमवर्गीय घरात एकट्या आईने वाढवलेल्या विक्रमचं बालपण (पौगंडावस्थेपासून) दाखवतो. विशेषतः त्यावर असणारा सिनेमाचा प्रभाव, त्यातही व्हिडियो पार्लरमध्ये उत्तान सिनेमे चोरून बघणं, आणि एकूणच त्याचं त्याच्या नि त्याच्या मित्रांच्या आयुष्याच्या घडणीतील त्या पार्लरचं स्थान अश्या अंगाने हा सिनेमा पुढे सरकतो आणि शेवटी तो स्वामी (ओंकार गोवर्धन) नि विक्रम यांच्या या घटनांतून अनेकदा निर्देशित केलेल्या त्याच तत्त्वज्ञानाबद्दल कंटाळा येईस्तोवर बोलतो. हा स्वामी कोण असतो? त्याचं पुर्वाधाशी नातं काय वगैरे सिनेमा बघुनच समजेल.\nकथा असो, पटकथा असो वा संवाद असोत वा ध्वनी/प्रकाशलेखन असो - सिनेमाचं लेखन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र पटकथा लेखनात हा सिनेमा गडबडला आहे. सुरुवातीला विक्रमच्या एकुणच घडणीतील त्याच्या बालपणाच्या घटनांचे, एका मित्राचे नि व्हिडीयो पार्लरचे स्थान दाखवत सिनेमा चांगला घडत जातो. पुर्वार्धातील लेखन, संवाद, मांडणी सगळेच नेमके आणि नेमक्या तारा छेडणारे झाले आहे. तोवर ही सगळी कथा विक्रमच्या दृष्टिकोनातून नि त्याच्याबद्दलच चाललेली असते. पुढे ही कथा या सगळ्या प्रसंगांचा विक्रमाच्या दिग्दर्शक होण्यात असलेला वाटा अश्या मार्गाने जाणे अपेक्षित होते. पण तसे न होता विक्रम घोषित करून टाकतो की त्याचे दिग्दर्शक होणं हे निव्वळ तो प्रवाहपतित असल्याने झालेय आणि कथा अचानक स्वामी, त्याचे तत्त्वज्ञान वगैरे कडे झुकते ती झुकते. खरंतर सिनेमाने प्रेक्षकांच्या अपेक्षांच्यापेक्षा वेगळं वळण घेणं हे नावीन्यपूर्ण असलं तरी ते वळण धक्कादायक नाही तर किमान नाट्यपूर्ण तरी हवं. सिनेमाचा पूर्वार्ध नि हा तत्त्वज्ञानात्मक उत्तरार्ध याचा सांधा सिनेमात अगदीच घाईत नि नावापुरता जोडला जातो आणि सिनेमा हे वेगळं वळण "आता हे काय आणि किती वेळ सांगणार" म्हणायला लावतं.\nया सिनेमाचं बलस्थानं असेल तर त्याचं संवाद लेखन. अतिशय खुसखुशीत आणि नेमक्या पट्टीत मेसेज पोचवणारे चुरचुरीत संवाद धमाल आणतात. त्याच सोबत संदीप पाठक, ओंकार गोवर्धन आणि कल्याणी मुळे यांचे अभिनयही चांगले आहेत. त्यातही कल्याणी मुळे यांच्या अप्रतिम संवादफेकीमुळे कित्येक संवादांची खुमारी वाढलीच आहे. मात्र या कलाकारांना तोडीस तोड (खरंतर वरचढ ;)) अभिनय सगळे कुमार-कलाकार विशेषतः पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांचा झाला आहे.\nसंगीत, ध्वनी, संकलन आदी तांत्रिक अंगे त्रास होणार नाहीत इतपत चांगली आहेत. या सिनेमाचा काही भाग ८०च्या दशकात घडतो. तो काळही एखाद-दुसरा अपवादात्मक प्रसंग (जसे दुकानांवरच्या लेटरिंगची पद्धत, चोरून सिनेमा बघताना घेतलेल्या प्लास्टिक पिशवीवरील प्रिंटिंग वगैरे) सोडले तर चांगला उभा केला आहे. इतकीही काळजी अनेकदा एतद्देशीय सिनेमांत नसते त्यामानाने हे काम फर्मास आहे. मात्र 'गावाकडे' वगैरे शब्दप्रयोग संवादात असताना प्रत्यक्षात निमशहरी भाग का दाखवला जातो हे काही समजत नाही. चित्रीकरण फारच देखणं असलं तरी सूचक गोष्टी तितक्याशा सटल नाहीत.\nअसो. थोडक्यात सिनेमाचा पूर्वार्ध खूप आवडला आणि उत्तरार्धात खूप काही ऐकून-पाहूनही "दादा, तुला नक्की म्हणायचंय काय?" असं म्हणावंसं वाटलं. एकुणात रंगा पतंगा नंतर त्याच दिग्दर्शकाकडून असलेल्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत हेच खरं. कदाचित फेस्टिव्हली सिनेमांसोबत हा सिनेमा बघितला गेल्याने माझी याबाबतीत फूटपट्टी वेगळी झाली असण्याचीही शक्यता आहेच. पण त्याला इलाज नाही.\nव्हिडियो पार्लर (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nदिग्दर्शकः प्रसाद नामजोशी\nकलाकारः ओंकार गोवर्धन, पार्थ भालेराव, संदीप पाठक\nचित्रपटाचा वेळः १३० मिनिटे\nबापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म\nए दिल है मुश्किल (२०१६) : वाचवा!! (पैसे, वेळ आणि स्वतःलाही) |
अंपायरने पाकिस्तानला लावला5धावांचा दंड; पाकने 120 धावांनी जिंकला सामना । Babar Azam enters fielding with keeping gloves: Umpire fines Pakistan5runs; Pakistan won the match by 120 runs - Divya Marathi\nBabar Azam Enters Fielding With Keeping Gloves: Umpire Fines Pakistan5Runs; Pakistan Won The Match By 120 Runs\nबाबर कीपिंग ग्लोव्ह्ज घालून उतरला क्षेत्ररक्षणातःअंपायरने पाकिस्तानला लावला5धावांचा दंड; पाकने 120 धावांनी जिंकला सामना\nपाकिस्तानी खेळाडू अनेकदा हसण्याचे पात्र बनतात. मग ते त्याचे वाईट इंग्रजी असो किंवा मैदानावरील वागणूक. शुक्रवारी पाकिस्तान-वेस्ट इंडिज वनडे सामन्यातही असेच घडले. जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एका हातात विकेटकीपिंग ग्लोव्हज घालून मैदानात उतरला. त्याच्या चुकीमुळे मैदानावरील पंचांनी पाकिस्तानी संघावर5धावांचा दंड ठोठावला किंवा वेस्ट इंडिजला बोनस म्हणून5धावा दिल्या. हे प्रकरण 29 व्या षटकामधील आहे.\nया पेनल्टीनंतर पाकिस्तानी चाहते त्याला ट्रोल करत आहेत. एकाने क्रिकेटच्या पुस्तकाचे उर्दूमध्ये भाषांतर करण्याची मागणी केली, जेणेकरून पाकिस्तानी खेळाडूंना क्रिकेटचे नियम चांगल्या प्रकारे कळू शकतील.\nक्रिकेटच्या नियम 28.1 अंतर्गत अंपायरने हा दंड दिला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, यष्टिरक्षक वगळता कोणताही खेळाडू हातमोजे आणि बाह्य लेग गार्ड सारख्या गोष्टी घालू शकणार नाही. होय, परंतु फलंदाजाच्या सर्वात जवळचा खेळाडू हेल्मेट वापरू शकतो.\nसामन्याच्या मध्यभागी घुसला फॅन\nया सामन्यात पाकिस्तानी डाव सुरू असताना एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला. अशा स्थितीत सामना मध्येच थांबवावा लागला. मात्र, तो 39व्या षटकात शादाबची गळा भेट घेऊन लगेच परतला.\nइमाम झाला 72 धावांवर धावबाद\nपाकिस्तानी डावाच्या 28व्या षटकात इमाम-उल-हक 72 धावांवर बाद झाला. यामुळे संतापलेला इमाम विकेटवरच बॅट स्विंग करताना दिसला. इमाम अकील हुसेनला मिडविकेटच्या दिशेने खेळवले आणि एक रन घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉन स्ट्राइक एंडला उभ्या असलेल्या कर्णधार बाबर आझमने अजिबात रस दाखवला नाही. तर इमाम दुसऱ्या टोकाला धावला आणि अशा स्थितीत इमामने परतण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र तो धावबाद झाला\nवेस्ट इंडिजला 276 धावांचे लक्ष्य मिळाले\nया पेनल्टीनंतर वेस्ट इंडिज संघाला 276 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, कॅरेबियन संघ 32.2 षटकांत केवळ 155 धावाच करू शकला. त्याच्याकडून एस ब्रूक्सने 42 धावा केल्या. काइल मेयरने 33 धावांचे योगदान दिले. पाक गोलंदाज मोहम्मद नवाजने4आणि मोहम्मद वसीमने3बळी घेतले.\nतत्पूर्वी, पाकिस्तानच्या डावात कर्णधार बाबर आझमने 77 आणि इमाम-उल-हकने 72 धावांचे योगदान दिले. शादाब आणि खुशदिलने 22-22 धावा जोडल्या. अकिल हुसेनने तीन बळी घेतले. अल्जफरी जोसेफ आणि अँडरसन फिलिप्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले.\nपाकिस्तानचा मोठा विजय\nपाकिस्तान संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 120 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयासह संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला होता.\nभारत416-10 226-7 (72.1) |
मुंबई - राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून 6 दिवस अधिवेशन चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते. |
चिखली (बुलढाणा)। अपघात किंवा इतर कारणाने मनुष्याला हात किंवा पाय जाणे निकामी होणे ही घटना दुर्दैवीच, यामुळे कुटूंबाचा संपुर्ण भार ज्याचे खांद्यावर असतो, अशी व्यक्ती पार खचुन जाते. असे संकट कोसळलेल्या व्यक्तींना जगन्याची उभारी देणे, नैराशातुन जिवनाच्या आनंद मार्गाकडे नेणारा आशेचा किरण म्हणुजे अनुराधा परिवार सातत्याने राबवित असलेले अस्थीव्यंग तपासणी व जयपूर फुट जोडणी मिशन होय. या शिबीरात कृत्रिम हात व पाय यासाठी निवडण्यात आलेल्या २१३ व्यक्तींना साधणे देण्यात येत आहे, तर 150 अपंगाना 3 चाकी सायकल, वांकर, कुबड्या व कॅलीपर आदी देण्यात येत आहेत. अनुराधा मिशनच्या उपक्रमात साधुवासवाणी मिशन पुणे यांच्या समर्थ साथही लाभली आहे. अपंगांच्या जिवनात या साहित्यामुळे जिवन सुसहय करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली त्याची मनस्वी आनंद होतो आहे, असे उद्गार आमदार राहुल बोंद्रे यांनी 363 अपंगाना दिल्या जाणाoया साहित्य वितरण प्रसंगी बोलतांना काढले. अनुराधा मिशन व साधुवासवाणी मिशन पुणे यांच्या वतीने आ. राहुल बोंद्रे यांचे वाढदिवसानिमितत अनुराधा नगरातील महाराणा प्रताप इंनडोअर स्टेडियम मध्ये अस्थीव्यंग तपासणी व जयपूर फुट जोडणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात 363 अपंगाची तपासणी करुन कृत्रिम हात व पाय यासाठी 213 अपंगाची निवड करण्यात आली होती. तर 150 अपंगाना 3 चाकी सायकल, वाकर, कुबड्या आणि कॅलीपर यासाठी निवण्यात आले होते.या सर्व निवडण्यात आलेल्या अपंगांना वरील सर्व साहितय महाराणा प्रताप इंनडोअर स्टेडियममध्ये सन्मानपुर्वक आ.राहुल बोंद्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या वितरण समारंभाप्रसंगी ज्यांच्या प्रेरणेने मागिल 21 वर्षापासुन रुग्णसेवा व अपंग सेवा या क्षेत्रात अनुराधा मिशन सातत्याने कार्य करत आहे, असे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनीही उपस्थिती देवुन अपंगांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याचबरोबर या कार्यक्रमाला डॉ.छाजेड बुलडाणा साधुवासवाणी मिशनचे डॉ.मिलींद जाधव व त्यांच्या सहकार्याने पुर्णवेळ हजेरी दिली. कार्यक्रमाचे व्यस्थापन डॉ.कैलास बियाणी व त्यांच्या सहकार्यानी केले. कार्यक्रमाला मौनीबाबा शिक्षण संस्थानचे विश्वस्त आत्माराम देशमाने, डॉ. सिध्देश्वर वानेरे, फारुखसेठ सौदागर, इजाज मंत्री, गजानन परिहार, चंद्रपालसिंह परिहार, मंडळकर यांची उपस्थिती होती. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, आ.राहुल बोंद्रे आणि अनुराधा परिवार मागील २१ वर्षे सातत्याने अपंग सेवा महायज्ञाच्या माध्यमातुन रुग्णसेवा करित अपंगासाठी साधुवासवाणी मिशन पुणे, सत्यसाई सेवा प्रतिष्ठाण, अपंग पुर्नवसन केंद्र, महाविर विकलांग सेवा प्रतिष्ठाण इत्यादी सेवाभावी संस्थानचा या उपक्रमास नेहमी पाठींबा व सहकार्य मिळत आल्याने आजवर जयपुर फुट जोडणी अंतर्गत 1 हजार 800 पेक्षा जास्त रुग्णांना जयपुर फुट कृत्रिम अवयव, कॅलीपर, व्हील चेअर्स, ट्रयसिकल, स्टिक, कुबड्या इत्यादी 45 लाख रुपये पेक्षा अधिक साहित्य मोफत मिशनद्वारे अपंगाना देण्यात आलेले आहे. याशिवाय अनुराधा मिशन नेत्रचिकित्सा, रोगनिदान, रक्तदान यासारखे कार्यक्रम राबविणा बरोबरच दुर्धर रोगासाठी रुग्णांना आर्थीक मदत देण्याचे काम अव्याहतपणे करत आहे. तर अनुराधा मिशनच्या वतीने आदिवासी भागात फिरते रुग्णालय रुग्णवाहिका चालविल्या जात आहे. यामुळे अनेकांसाठी अनुराधा मिशन हे आशास्थान ठरत आहे. |
औंधः गोपूज येथील शेतकरी विकास दत्तात्रय घाडगे यांनी डांबर प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने गोपूज येथे झालेल्या समन्वय बैठकीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसान ठरवून द्यावे, असा आदेश तहसीलदारांनी दिला आहे. गोपूज येथे झालेल्या बैठकीत तहसीलदार किरण जमदाडे, सत्यवान कमाने, तलाठी उत्तम चव्हाण, औंध पोलीस ठाण्याचे पंकज भुजबळ, वडूजचे देवकर कंपनी प्रतिनिधी सोपान खराडे, अनिल पवार, शेतकरी विकास घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कंपनी आणि शेतकरी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये कोणकोणत्या पिकांचे किती नुकसान झाले व किती भरपाई देता येईल, यासाठी कृषी विभागाकडून नुकसान रकमेचा अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्याला द्यावी, अशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर विकास घाडगे यांनी पुढील सोमवारपर्यंत आत्मदहन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती दिली. |
Top 5 Lake Cities in India: भारतामध्ये अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव (Lake) आहेत. अनेक सुंदर शहरे या तलावांकाठी वसलेली आहेत. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे. |
आग्रा : वृत्तसंस्था - आग्रा (उत्तर प्रदेश) येथे घरात घुसून एका महिला डॉक्टरची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच 2 मुलांवर हल्ला करण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण कमलानगर परिसरातील आहे. घटनेच्या वेळी डॉ. निशा आणि मुले घरात होती. डॉक्टर निशा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही जखमी मुलांवर उपचार रुग्णालयात सुरू आहेत. दुसरीकडे, घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभमला चकमकीत अटक केली. त्याला गोळ्या घालून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी शुभमकडून बॅगेत असलेला चोरीचा मालही जप्त केला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही रिचार्ज करणार्या व्यक्तीने ही घटना घडवून आणली आहे. आग्राचे एडीजी जोन अजय आनंद यांनी सांगितले की, आरोपींच्या अटकेसाठी अनेक पथके तयार करण्यात आली होती, जे वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत होते. त्यानंतर या घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने मारेकऱ्याचा शोध घेण्यात काही काळानंतर यश मिळाले. चकमकीत पोलिसांनी शुभम नावाच्या तरुणाला अटक केली. पोलीस ठाण्यातील कमलानगर भागात महिला दंतचिकित्सक निशाचा घरात घुसून चाकूने खून केला. तसेच चाकूच्या हल्ल्यामुळे दोन मुलेही जखमी झाली आहेत. आयजी रेंज ए सतीश गणेश यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली असता, शुभम नावाच्या व्यक्तीने दरोड्यासाठी महिला डॉक्टरची हत्या केल्याचे समजले. पोलिसांनी शुभमचा शोध सुरू केला तेव्हा शुभम दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी शुभमला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शुभमने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांची गोळी शुभमच्या पायाला लागल्याने जखमी झालेल्या शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथे त्याच्याकडून दागिने व रोकड भरलेली बॅग ताब्यात घेण्यात आली. |
भगवान शिवाला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत हे आपल्याला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया व्रताचे महत्व आणि पूजेचा मुहूर्त. जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी संपूर्ण भक्तीभावाने भैरवाची पूजा करतो त्यांची कष्ट आणि संकटं दूर होतात. हिंदू धर्मात गणेश पूजेला आणि व्रताला विशेष महत्व आहे. उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तेव्हा जाणून घ्या व्रताचे महत्व, पद्धत आणि मुहूर्त. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे. |
बर्याच परीकथांसाठी, रशियन आणि युरोपियन दोन्ही, जादूची वस्तू वापरण्याची वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याचा हेतू वांछित यश आणि उत्कृष्ट कार्ये पूर्ण करण्यासाठी नायकोंला मदत करणे हा आहे. उदाहरणार्थ, त्यांना अदृश्य करण्यासाठी, दुष्टतेस अपरिवर्तनीय करणे, सामर्थ्य देणे आणि जीवनाची असंख्य शक्यता अशा गोष्टींबद्दल, आपण सुरक्षितपणे संदर्भ घेऊ शकता आणि बूट्स-स्पीडर्स या परीक्षेत कोणत्या यंत्रास जुळतात, कोणत्या वर्गामध्ये अंतराळात चळवळीचा प्रचंड वेग गाजणारे कपडे देणारे घटक? किंवा अशा अनेक गोष्टी आहेत? या आणि इतर, कोणत्याही कमी मनोरंजक प्रश्न आमच्या लेख उत्तर दिले नाहीत. विशेषताचे सार आणि उद्देश स्पष्ट पेक्षा अधिक आहे. हे स्पष्ट आहे की त्या वेळी अशा शूज अस्तित्वात नाहीत, आणि ते अस्तित्वात नाही, कदाचित आजही (जेम्स बॉन्ड किंवा वेडा शोधकांचा शोध वगळता विशिष्ट विकास वगळता) आजही अस्तित्वात नाही. परंतु त्याचा उल्लेख जागतिक आणि कॉपीराइटच्या काही लोकांच्या विविध परीकथांवर नियमित नियमितपणासह पूर्ण केला जाऊ शकतो, जे विशिष्ट कथा सांगणार्यांनी लिहिलेले होते. हा चमत्कार कुठे आला आणि कोणत्या परीक्षेत बूट, वेगाने बूट केले, कोठे बोलायचे, पाय वाढले? अशा शूजांचे आमच्या ज्ञात संदर्भांपैकी पहिले जुने प्राचीन ग्रीक पुराणांत आहे. अर्थात, बूट नव्हे, परंतु पोर्चेससह विशिष्ट सॅन्डल, जे हर्मीसच्या संयोगात - दैवी पोस्टमन जेव्हा त्यांनी बातम्या चिरडून ठेवणे आणि काही मिनिटांच्या कालावधीत मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक होते तेव्हा त्यांनी त्याला मदत केली. नक्कीच, हे कोणत्या परीक्षेत बूट आहेत, स्पीड स्केटर्स आहेत या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे नाही. कारण मिथक एक परिकथा नाही (आणि काही शास्त्रज्ञांनी असा विश्वास देखील केला आहे की ती एक काल्पनिक कथा नाही). पण तरीही जादूची वस्तुस्थिती स्पष्ट होण्याचे मूळ कारण स्पष्ट होते, जसे की अवकाशात हालचाल गतिमान करणे. "भविष्यसूचक स्वप्न" त्यात, मुख्य पात्र इवान, एका व्यापार्याचा मुलगा आहे. काल्पनिक कथा लोक Afanasyev तोंडी सर्जनशीलता प्रसिद्ध कलेक्टर प्रक्रिया मध्ये प्रतिनिधित्व रशियन आहे. आपल्या वडिलांच्या इच्छेच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या एका रशियन माणसाला सांगितले होते त्यासाठी त्याने एका खांबावर नग्न बांधून रस्त्याच्या मध्यभागी फेकून दिले. त्सारेविच त्याला मदत करतो, परंतु इव्हान लवकरच त्याच्याशी क्रोधित झाला, ज्यासाठी त्याला दगडांच्या ढिगाखाली फेकण्यात आले. मग राजकुमार अजूनही एका महत्वाच्या विषयात स्वतः च्या जागी वापरण्यासाठी त्याला मुक्त करतो आणि इव्हान एक लहानशा सफरीतून बाहेर पडला, 12 जणांची संख्या मोजताना समान कॅफाईन्समध्ये कपडे घातले. जंगलात, तो आपल्या वडिलाकडून वारसदार असलेल्या वडिलांना भेटतोः एक अदृश्य कॅप, कार्पेट-विमान, वेगवान बूट. आणि लबाडी, शक्तिशाली कलाकृतींचा ताबा घेते. नंतर, त्यांच्या मदतीने त्याने चांगले कार्य केले. अशाप्रकारे, काल्पनिक कथा ज्यात बूट आहेत अशा कादंबरीबद्दल विचारले असता, "एक भविष्यसूचक स्वप्न" आहे. त्यामध्ये, एक सेवानिवृत्त सैनिक - नाटककार - राजकुमारीशी लग्न करतो, ज्याने अस्थायीरित्या एक अस्वलाची प्रतिमा काढली होती. येथे देखील, त्याने फसवणूक करून त्याच तीन जादूची साधने ताब्यात घेतली, पण काही कारणास्तव तो लहान बूट वापरत नाही- हे ऑब्जेक्ट कोणत्या गोष्टीमध्ये वस्तूंचा उल्लेख केला आहे? या प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकतेः "जादू राजकुमारी. " या प्रसिद्ध कथाकार (लेखक, लोक सामग्रीवर आधारित) च्या लेखकांच्या परीक्षांच्या एका कहाणीत - "बॉय-ऑन-फिंगर" - सात मैल बूट्सचा थेट उल्लेख आहे. अनुवादांच्या काही रूपांमध्ये ते लहान बूट असले तरी आवाज येतो. मुख्य वर्ण त्यांना Ogre पासून अप abducts. याव्यतिरिक्त, बॉय-बोट-फिंगर, दूताने राजाच्या सेवेला नियुक्त केले आहे आणि या जादुई गुणांच्या मदतीने कौटुंबिक गरजा पुरविल्या जातात. परदेशातूनः हौफच्या काल्पनिक नायकच्या लिटल फ्लोर बद्दल, जादूचे शूज मोठ्या अंतरावरुन हलविले जातात, ज्यायोगे तो आपल्या स्वतः च्या कारणासाठी यशस्वीपणे वापरतो. अँडरसनमध्ये एक काल्पनिक कथा "कालोशी आनंद" आहे, जेथे नायक च्या जादूची शूज देखील चालते - फक्त वेळेत आणि बाऊमच्या "द विझार्ड ऑफ ओज" मध्ये, ज्यूंच्या जादूमुळे मुख्य पात्रांना परदेशात भटकत नाही! येथे ते आहेत - कमीत कमी स्कील सह अनेक बाजू असलेला आणि किरकोळ बूट. कोणत्या काल्पनिक गोष्टीमध्ये एक जादूचा गुणधर्म आहे (आणि एक नाही! ) आम्ही विश्लेषण केले आहे पण काही जादूई चपला कितीही दिसत नसे, त्याचा मुख्य उद्देश सर्व कामेमध्ये बदल होत नाहीः जलद हालचाल तसे, आणि प्रसिद्ध सांता क्लॉज देखील, काही माहिती नुसार, उच्च गतिचे बूट आहेतः कसा तरी तो रात्री सर्व मुलांमधून प्रवास करण्यास व त्यांना पत्रांमध्ये भेट देण्यास मदत करतो! |
गाववाल्यांनो गणपतीला गावी जायची तयारी झाली का? असं विचारत नितेश राणेंची याही वर्षी कोकणवासीयांना गणेशोत्सवाची विशेष भेट देण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मागील दहा वर्षांपासून बस सेवा तर मागील वर्षीपासून मोदी एक्सप्रेसची सुविधा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी ही सेवा असणार आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सुटणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. Have you prepared for Ganapati to go to the village? Asking this, Nitesh Rane is giving a special Ganeshotsav gift to the people of Konkan this year. Bus service has been provided for the last ten years for those going to Konkan for Ganeshotsav and Modi Express has been provided since last year. Similarly, this year too, this service will be held. 29 August at 10 am. Your rightful Modi Express will depart from Platform No. 8. BJP MLA Nitesh Rane shared the video and said. |
Health Tips : आजकाल केस गळण्याच्या समस्येने प्रत्येकजण त्रस्त आहे. याचं कारण बदलती जीवनशैली. महिलांना त्यांचे केस सर्वात प्रिय असतात. केसांची नीट निगा राखण्यासाठी तेल, शाम्पू, यांसारखे विविध उपचार केले जातात. पण तरीही केसगळती कमी होत नाही. पण जर तुमच्या केस गळतीचे योग्य कारण काय हे जर तुम्हाला माहित असेल तर तुुम्ही तुमच्या सवयी बदलून केसगळती थांबवू शकता. केस नेमके कोणत्या कारणामुळे गळतात ते जाणून घ्या. झोप न लागणे - सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे तुमच्या वजनावर विपरित परिणाम होतोच पण केसदेखील गळतात, त्यामुळे सात तासांची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गरम पाणी - गरम पाण्याने केस धुतल्यास केसांत कोंडा होतो त्यामुळे केस गळणे सुरू होते. जंक फूड - आयर्न, व्हिटॅमिन-ए, सी आणि झिंक हे घटक केस गळण्यास कारणीभूत असतात. केस गळत असतील तर, आधी हे घटक तुम्ही घेत आहात का ते शोधा. याशिवाय अनेकदा फास्ट फूड हे देखील केसगळतीचं कारण ठरू शकते. ब्लो ड्रायर - ब्लो ड्रायरमुळे तुमच्या केसांना उष्णतेमुळे नुकसान होते आणि त्यामुळे केस तुटतात. तणाव - तणावामुळे केस खूप गळतात. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर नीट काम करत नाही आणि तुमचे केस नीट काम करत नाहीत. केसांच्या कूपांना कमकुवत करणारे पोषण, ज्यामुळे केस गळतात. अधिक शॅम्पू करणे - रोज केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमचे केस पातळ होण्याचा धोका आहे. खरंतर, शॅम्पूमधील सल्फेटसारखे रसायन केसांना कमकुवत बनवते आणि केसांना आवश्यक असते. केसांवर वेगवेगळे प्रयोग करणे - वारंवार स्टाईल केल्यामुळे केस तुटतात. हेअर स्टाइलिंग टूल्समधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे केस कमकुवत होतात आणि केसांच्या नैसर्गिक संरचनेशी छेडछाड होते, ज्यामुळे केस पातळ होतात आणि गळतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. महत्वाच्या बातम्या : |
जालना : सरकार त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खे मंत्रालय पेटवू शकतो, असा जळजळीत इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे (All India Maratha Federation) जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख (Arvind Deshmukh) यांनी दिला आहे. ते म्हणाले, आधीच्या सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण होतं तर आताच्या सरकारचं धोरण मराठ्यांच्या मुलाचं मरण, असं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नका, अशी मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, 'मराठा ठोक मोर्चा'ने शनिवारी 'पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा' काढला. नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. पंढरपुरातून पायी मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पंढरपूर पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा अडवण्यात आला. पोलीस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्याने वातावरण तापलं आहे. पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे. पायी दिंडीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. १० खासगी वाहनांतून पोलीस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यामध्ये पोहचतील. त्यानंतर पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक होईल, अशी माहिती आहे. ड्रोनने नजर ठेवली जाईल. पंढरपूरकडे निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवलं. १४४ कलम लागू असल्याने त्यांना पंढरपुरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. कळंब पोलिसांनी आंदोलकांना नजरकैदेत ठेवलं आहे. १४९ नुसार १२ कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. |
दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा मागील वर्षभरात अपघातांचा अड्डाच झाला आहे. याआधी 1 मार्च रोजी रात्री भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. 3 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. तर त्यापाठोपाठ लगेचच 3 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला होता. |
केडगाव दुहेरी हत्याकांडात सीआयडीला तपासात भक्कम पुरावे मिळाले आहेत. आरोपी दोघांना गोळ्या घालून मारताना व पळून जाताना पाहणारे तीन साक्षीदार आहेत. त्यात एक महिला, अल्पवयीन मुलगा, एक पुरुष असे तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. या व्यतिरिक्त इतर ७३ साक्षीदारांची यादी असून, त्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी, आरोपी भानुदास कोतकरच्या तीन नोकरांचा समावेश आहे. केडगाव येथे शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या दुहेरी हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने नुकतेच दोषारोपपत्र दाखल केले आहे. काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर, नगरसेवक विशाल कोतकर, प्रत्यक्ष मारेकरी संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे, रवींद्र खोलम, पिस्तूल पुरविणाऱ्या बाबासाहेब केदार, बी. एम. कोतकर यांच्याविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा काही तपास विशेष तपास पथक व काही तपास सीआयडीच्या पथकाने केलेला आहे. या गुन्ह्यात सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले नव्हते. परंतु सीआयडीच्या तपासात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करत असताना व घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या पाहणारे तीन साक्षीदार आहेत. 'एक जण शनिवारी सांयकाळी घरी आला होता. त्याने रवींद्र खोलमबाबत माहिती विचारल्यानंतर बाहेर गेले असल्याचे सांगितले. घरी आलेल्या व्यक्तीने डोळसे (संदीप गुंजाळ) असे नाव सांगितले होते. त्याचवेळी आमच्या घरासमोर आणखी (संजय कोतकर) एक जण स्कूटरवर आला होता. घराबाहेर या दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर डोळसे यानी पिस्तूल काढून एकावर गोळी झाडल्यानंतर तो निघून गेला. मी घाबरली असल्याने दरवाजा लावून घरात बसले होते. खिडकीतून सर्व दिसत होते. त्याचवेळी डोळसे याने पुन्हा येऊन जमिनीवर खाली पडलेल्या व्यक्तीचा चाकूने गळा चिरला' असा जबाब प्रत्यक्षदर्शी महिला साक्षीदाराचा आहे. 'गॅलरीत उभा असताना मोठा आवाज झाला होता. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या व्यक्तीचा अंगातून रक्त येत होते' असा जबाब अल्पवयीन मुलाचा आहे. 'वसंत ठुबे यांना काही जण मारत असल्याची माहिती सुवर्णनगर भागातील एका नागरिकाने फोनवरून सांगितले. ठुबे माझा नातेवाइक असल्याने गाडीवरून सुवर्णनगर येथे गेले असता चार ते पाच जण ठुबे य़ांना मारून पळून जात असल्याचे पाहिले,' असा जबाब घटनास्थळी आलेल्या नातेवाइकाचा आहे. या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराव्यतिरिक्त इतर ७३ साक्षीदार आहेत. त्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, घटनास्थळी गेलेले शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. या गुन्ह्यात कट रचल्याच्या आरोप सिद्ध करण्यासाठी आरोपींचे कॉल डिटेल्सची माहिती दोषारोपपत्रात दिलेली आहे. १ हजार ३६६ पानांच्या दोषारोपपत्रात आरोपींच्या कॉल डिटेल्सबाबत नऊशेहून अधिक पाने आहेत, भानुदास कोतकरचे इतरांबरोबर झालेल्या कॉल्स डिटेल्स आहे. भानुदास कोतकरच्या फोन सुरू असताना त्याच्या वाहनचालक व दोन नोकर त्यांच्य़ाबरोबर होते. त्यांची नावे साक्षीदारांच्या यादीत आहेत. 'ठिक आहे करून घ्या,' असे कोतकरचे संभाषण सुरू असल्याचे या साक्षीदारांचे म्हणणे आहे. |
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरमराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University: ) जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत या विद्यापीठाचे गेट आणि त्या गेटवरील बाबासाहेबांचे नाव हे सदैव प्रेरणादायी राहील. शहरांपासून खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांवरील घराघरांत ज्ञानाचा प्रकाश नेणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ( Dr. Babasaheb Ambedkar) स्मरण करून नामविस्तार दिनी गेटचे मनोभावे पूजन केले जाते. विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी गेटच्या उभारणीची आठवण सांगितली. सन १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला. सुरुवातीला विद्यापीठ ओळखले जाईल, अशी एखाद्यी प्रतिकृती किंवा 'लोगो' नव्हता. तब्बल १२ वर्षांचा काळ तसाच गेला. डॉ. आर. पी. नाथ यांनी ऑक्टोबर १९७१ मध्ये कुलगुरूपदाचा पदभार घेतला. डिसेंबरमध्ये विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. या कार्यक्रमासाठी तत्कालीन राज्यपाल नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यापीठाला प्रवेशद्वार (गेट) असावे, अशी संकल्पना डॉ. नाथ यांनी मांडली. तत्कालीन निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लोडबेअरिंग पद्धतीने गेट उभारणीचे काम सुरू केले आणि १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर वास्तूचे लोकार्पणही झाले. या वास्तूद्वारे विद्यापीठाचा लोगोही साकारण्यात आला. या गेटची उंची २९. ३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट रुंद आहेत. हेच गेट यापुढे अनेक पिढ्यांना नामांतर लढ्यातील अत्याचाराची, त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची सदैव आठवण करून देत राहील. कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे, यासाठी १९७७ ते १९९४ तब्बल १७ वर्षे प्रदीर्घ लढा लढावा लागला. १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्ताराचा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. त्यामुळे मनपा व पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत गेटवरील नाव बदलण्यात आले. १४ जानेवारी १९९४ रोजी सकाळी नऊ वाजता उच्चशिक्षण सचिव लखनपाल यांनी सांगितले की, विद्यापीठ नामविस्तार ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळेल. ही प्रत मिळताच तत्काळ अंमलबजावणी करा. त्यानंतर लगेच सर्व अधिकाऱ्यांना संभाव्य परिस्थितीची कल्पना देत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. नामविस्ताराचे समर्थक खासदार बापूसाहेब काळदाते यांच्या उपस्थितीत सायंकाळी विद्यापीठात नामविस्तार साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी विद्यापीठातील सर्व जुनी स्टेशनरी रद्द केली आणि दोन दिवसांत नवीन स्टेशनरी तयार करण्यात आली. |
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबईतल्या मिल संस्कृतीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये काही दृष्यांवर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या ट्रेलरमधील दृष्यांवर आक्षेप घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं पोस्टर महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात रिलीज केलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर यातील काही भडक दृष्यांची चर्चा होत आहे. या दृष्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एक महिला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहेत. अनेकांनी याविषयी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं होतं. मुंबईच्या जंगलातला हा धूर कोणालाच सुखासुखी जगू द्यायचा नाही, सगळ्यांची वाट लागणार...काँक्रिटच्या जंगलातलं वास्तव या टॅग लाईनने हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलवरुन वाद झाल्यानंतरही मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं. त्यामुळे महिला आयोग आणि केंद्रीय माहिती व प्रसारण खातं याविषयी आता नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. |
'क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाल्याने दोन्ही घटकांना होणार फायदा' ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात यावा, याबाबत गेले अनेक वर्षे चर्चा रंगलेली आहे. पण त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पण आता २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. क्रिकेटचा समावेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामंध्ये करण्यात येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून ICC ने यासाठी पुढाकार घेतला आहे. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी ICC जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी२० क्रिकेटचा समावेश होण्यासाठी ICC ने रितसर अर्ज दाखल केला असल्याचे ICC च्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सांगण्यात आले आहे. ICC ने हा अर्ज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) यजमानपदाअंतर्गत केला आहे. या आधी १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. त्यात दक्षिण आफ्रिका संघ विजेता ठरला होता. ICC चा अर्ज मान्य झाल्यास २४ वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेट हा खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ICC ने हे पाऊल उचलले आहे. "क्रिकेटला जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचा समावेश झाल्याने दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल आणि या पुढाकाराने महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास रिचर्डसन यांनी व्यक्त केला आहे. |
बाजार समितीच्या मोंढ्यावर डाळींबाचे लिलाव घेणा-या व्यापारी व खरेदिदारांना या पेरू व चिकूंची खरेदी करण्याच्या सुचना व्यवस्थापनाने दिल्या. राहाता ः कांदा आणि डाळिंबाची राज्यातील मोठी अर्थिक उलाढाल असलेली बाजारपेठ असा येथील बाजार समितीचा लौकीक आहे. आजपासून येथे अन्य फळांचे लिलाव देखील सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी पेरू व चिकूचे प्रतिकिलो पचंवीस रूपये दराने लिलाव झाले. अवघ्या तासाभरात शेतक-यांच्या तिस लाख रूपये किंमतीच्या फळांची विक्री झाली. नगर जिल्ह्यातील वाढती पेरू व चिकूची लागवड लक्षात घेऊन हा मोंढा सूरू करण्यात आला. पहिल्या दिवशी समाधानकारक भाव मिळाल्याने फळे विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. पेरू व चिकू सोबत अॅपल बोराची देखील मोठी आवक झाली. त्यास प्रतिकिलो दहा रूपये दर मिळाला. गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद सदाफळ, अॅड.रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान (काका) सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांच्या उपस्थीतीत आज या फळबाजारास प्रारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या मोंढ्यावर डाळींबाचे लिलाव घेणा-या व्यापारी व खरेदिदारांना या पेरू व चिकूंची खरेदी करण्याच्या सुचना व्यवस्थापनाने दिल्या. त्यांनी सहमती दर्शवून आज पहिल्यांदाच डाळींबा व्यक्तीरीक्त चिकू व पेरूची खरेदी केली. डाळींबाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तर भारतात आम्ही येथून खरेदि केलेली फळे पाठविणार असल्याचे या व्यापा-यांनी सांगीतले. काही दिवसांपूर्वी राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील पेरू उत्पादकांनी या बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे येथे पेरू व चिकूचा मोंढा सुरू करावा, त्यामुळे डाळींबाच्या मोंढ्या प्रमाणे स्पर्धा निर्माण होऊन चांगला भाव मिळेल. अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार विखे पाटील यांच्या सुचनेनंतर आजपासून विविध फळांचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. |
एमपीसी न्यूज - पतीच्या विवाहबाह्य (Pune Crime)संबंधास पत्नीने विरोध केला. या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून घरातून हाकलून देत तिला नांदविण्यास नकार दिला. ही घटना 14 मे 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत काळेवाडी आणि हडपसर येथे घडली. मनीष गजानन शेलार (वय 27, रा. हडपसर. मूळ रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेलार याने फिर्यादी विवाहितेला किरकोळ कारणावरून त्रास दिला. तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित लावून दिले नाही. लग्नामध्ये (Pune Crime) आमचा मानपान नीट केला नाही, असे म्हणत तुझ्या वडिलांकडून सोन्याची चैन व अंगठी मागवून घेण्याची मागणी आरोपीने केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत प्रेम संबंध असल्याचे फिर्यादीस समजल्याने त्यांनी त्यासाठी विरोध केला. त्यावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून घरातून हाकलून देत नांदविण्यास नकार देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. |
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा समस्तीपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा बचाव केला. लालू यांच्यावर नव्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांच्या अनुशंगाने त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय जनता दलासोबत आलो आहे तेव्हा तेव्हा त्यांनी लालू यांच्या विरोधात प्रकरणे दाखल केली आहे. आताही आम्ही एकत्र आल्यावर पुन्हा नवी प्रकरणे सुरू करण्यात आली असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणाचा उल्लेख करून नितीश म्हणाले की त्यांच्याकडे या प्रकरणात काहीच पुरावे नव्हते. आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी केस दाखल केली. त्यामुळे हे लोक म्हणजे भाजप कसे काम करते ते समजून घ्या. आपण जेवढे समाजवादी लोक आहोत ते सगळे एकत्र राहु, देशाच्या आणि बिहारच्या प्रगतीत हातभार लावू व बिहारला पुढे नेऊ. आपण आयुष्यात आता पुन्हा कधीच भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. |
मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर' मुंबई - मेट्रोच्यादहिसर येथील आनंद नगरच्या परिसरात असलेल्या मेट्रोच्या स्थानकाच्या अप्पर दहिसर स्थानकाचे नामकरण अखेर आनंद नगर असे करण्यात आले आहे. याबाबत विविध पक्षाच्या लोकांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा करत स्थानकाचे नाव बदलण्याबाबत विनंती पत्र दिले होते. त्यानुसार हे नाव बदलण्यात आले आले असून याबाबत दहिसरकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. अंधेरी पश्चिम डी एन नगर दहिसर मेट्रो २ च्या ट्रायल रनचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र दहिसरमध्ये स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये असंतोष व्यक्त होत होता. दहिसर क्षेत्र विस्तृत असले तरी मेट्रो स्थानक हे पूर्णपणे आनंदनगरच्या सीमेत आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर हे नाव देणे स्थानिकांना मान्य नव्हते. त्यानुसार या नावाला त्यांच्याकडून विरोध सुरू होता. याबाबत विविध पक्षाच्या शिष्टमंडळानी एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन देत नाव बद्दलण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार एमएमआरडीए आयुक्तांनी १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स्थानिकांच्या या मागणीबाबत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पत्र दिले होते. ज्याच्या उत्तरात त्यानी ही विनंती मान्य करत २४ नोव्हेंबर,२०२१ रोजी या स्थानकाचे नाव आता अप्पर दहिसर न राहता आनंदनगर मेट्रो स्टेशन करण्यात आले असुन याच नावाचा वापर पुढील सर्व अधिकृत प्रक्रियेसाठी करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. |
इंधनाच्या दरात झालेली भाववाढ सर्वसामान्यांची पिळवणूक करणारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातून शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंधनाच्या दरात झालेली भाववाढ सर्वसामान्यांची पिळवणूक करणारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातून शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंधनदरातील जीवघेणी वाढ जर कमी केली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील पुरुषोत्तम कडलग यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्र हाती घेताच शासनाच्या इंधन दरवाढीवर टिकास्त्र सोडत अंदोलन छेडले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी येथे सरकारची प्रतिकात्मक तरिडी यात्रा काढली. या अंत्ययात्रेला खांदा देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष अरूण मेढे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, पद्मा पवार, सायरा शेख, कोमल निकाळे, खेमराज कौर आदी जिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहीले. दिनकर काळे, देवीदास जोशी, विवेक खैरनार, वाळू बदादे, भास्कर मेढे, उल्हास तुंगार, बाळु बोडके, कैलास मोरे, स्वप्नील बागडे, विजय गांगुर्डे, राजेंद्र जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालवर ही तीरडी यात्रा नेण्यात आली. तेथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. |
(नरसापूर येथील विस्ट्रॉनचा कारखाना, संग्रहित छायाचित्र ) भारतात आयफोनचं उत्पादन करणारी तैवानची कंपनी 'विस्ट्रॉन'च्या कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील कारखान्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. तेव्हापासून कारखान्यातून आयफोनचं उत्पादन बंद होतं, पण आता कंपनी लवकरच उत्पादन घेण्यास सुरूवात करणार आहे. विस्ट्रॉनच्या सीईओंनी ९ फेब्रुवारी रोजीच कारखान्यातील उत्पादन पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरूवारी विस्ट्रॉनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कर्नाटकचे उद्योग मंत्री जगदीश शेट्टार यांची भेट घेतली आणि उत्पादन पुन्हा सुरू करत असल्याची माहिती दिली. यावेळी, राज्य सरकारकडून कंपनीला सहकार्य केलं जाईल असं सांगत शेट्टार यांनी विस्ट्रॉनचं कामकाज लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी शेट्टार यांनी याबाबत माहिती दिली. १२ डिसेंबर रोजी कोलार जिल्ह्यातील नरसापूर येथील विस्ट्रॉन कार्पोरेशनच्या कारखान्यात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन न मिळाल्यामुळे संतापलेल्या जवळपास चार हजार कामगारांनी ही तोडफोड केली होती. त्यानंतर विस्ट्रॉन कंपनीने कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्या बद्दल माफी मागितली असून कंपनीच्या भारतातील उपाध्यक्षांचीही हकालपट्टी केली होती. तर, बंगळुरूतील या घटनेनंतर Apple नं देखील विस्टॉनला झटका देत कंपनीला प्रोबेशनवर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत विस्ट्रॉन ही कंपनी आपल्या चुका पूर्णपणे सुधारत नाही तोवर कंपनीला कोणताही व्यवसाय न देण्याचा निर्णय Apple नं घेतला होता. तसेच, हिंसाचाराच्या घटनेसाठी अॅपलनेही माफी मागितली होती. शिवाय कर्नाटक सरकारनेही हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. |
फॅशन असो, हेअरस्टाईल असो. डायलॉग असो किंवा मग विचार. प्रत्येक गोष्टींमध्ये बॉलिवूडचा सर्वसामान्यांवर प्रभाव पडत असतो. बदलता काळ आणि बदलणारा ट्रेंड यानुसार कलाकार मंडळी स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. प्रत्येक सिनेमात नवा आणि आकर्षक लूक असवा यासाठी कलाकार मेहनत घेतात. लूकमध्ये बदल करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती हेअरस्टाईलची. कलाकार मंडळी हेअरस्टाईलमध्ये काळानुरुप बदल करतात. कलाकार जे काही करतात तेच आजची पीढीही फॉलो करते. सेलिब्रिटींप्रमाणेच आकर्षक आणि लक्षवेधी हेअर स्टाईल असावी यासाठी तरुणाईमध्ये स्पर्धा असते. त्यामुळे सेलिब्रिटींची हेअर स्टाईल लोकप्रिय होत जाते. पाहूया कोणत्या अभिनेत्रींच्या हेअर स्टाइलने तरुणाईला भुरळ घातली आहे. |
हरियाणा विधानसभाः गोपाल कांडा ते चौटाला, भाजपने असा बदलला गेम - BBC News मराठी\nहरियाणा विधानसभाः गोपाल कांडा ते चौटाला, भाजपने असा बदलला गेम\nहरियाणात पुन्हा भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. नवं सरकार भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्या युतीचं असेल.\nगृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा असेल.\nदोन्ही पक्षांचे नेते आज (शनिवारी) राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करतील.\n"जनतेने दोन्ही पक्षांना जनादेश दिला आहे, आणि दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे की हरियाणामध्ये ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतील," अमित शाह म्हणाले.\nअनेक अपक्ष आमदारांनी या युतीला समर्थन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सरकारला येत्या काळासाठी शुभेच्छाही दिल्या.\nअमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव तर नाही सांगितलं पण मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होतील अशी अटकळ आहे.\nजेजेपीने दिले होते पाठिंब्याचे संकेत\nयाआधी हरियाणात आपल्या पहिल्याच निवडणुकीत दहा जागा जिंकणाऱ्या जेजेपीने म्हटलं होतं की ते सरकार बनवण्यासाठी कोणत्याही पक्षाला समर्थन द्यायला तयार आहेत पण त्या पक्षाने जेजेपीच्या किमान सामाईक कार्यक्रमाला मान्यता दिली पाहिजे.\nशुक्रवारी संध्याकाळी जेजेपीचे प्रमुख 31-वर्षीय दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं की जो पक्ष जेष्ठांच्या पेन्शनमध्ये वाढ यासह इतर विषयांवर सहमत असेल त्यांच्यासोबत मिळून जेजेपी सरकार स्थापन करेल.\nत्यांनी म्हटलं होती की आम्ही संबंधित पक्षांशी बोलू आणि येत्या काही तासात आम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल.\nगुरुवारी झालेल्या मतमोजणीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 90 मधल्या भाजपला 40, काँग्रेसला 31, जेजेपीला 10 आणि अपक्ष आमदारांना7जागा मिळाल्या. याशिवाय इंडियन नॅशनल लोक दल आणि हरियाणा लोकहित पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.\nएका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान दुष्यंत यांना विचारलं गेली की गुरुवारपर्यंत हरियाणातल्या सत्तेची चावी त्यांच्याकडे होती पण आता अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. याबदद्ल काय सांगाल?\n"सत्तेची चावी अजूनही आमच्याकडेच आहे आणि भाजप कोणाबरोबर जाऊ इच्छितं हे त्यांनी ठरवावं," दुष्यंत म्हणाले.\nनिवडणुकीचे निकाल आल्यानंतर असं म्हटलं जात होतं की जेजेपी नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरतील पण गुरुवारी रात्रीपर्यंत परिस्थिती बदलली होती.\nगुरुवारी रात्री हरियाणा लोकहित पक्षाचे नेते आणि सिरसाचे आमदार गोपाल कांडांनी भाजपला समर्थन देण्याची घोषणा केली. सगळ्या अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असाही दावा त्यांनी केला.\n"माझे वडील 1926 पासून आरएसएसशी संबंधित होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.\nहरियाणात निवडून आलेल्या7अपक्ष आमदारांपैकी अनेक जण भाजपमधून बाहेर पडलेले बंडखोर आहेत. त्यातल्या अनेकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.\nरानियामधून जिंकलेले रणजीत सिंह यांनी म्हटलं की, "मी तर स्पष्टच सांगितलंय की माझा भाजपला पाठिंबा आहे."\nभाजपचे बंडखोर आमदार नयनपाल रावत यांनीही म्हटलं की ते पुन्हा भाजपला पाठिंबा देतील. "पक्षनेतृत्वाकडे कोणालाही मंत्री बनवण्याचे अधिकार असतात. माझीही महत्त्वाकांक्षा आहेच की मी मंत्री बनावं म्हणजे माझ्या मतदारसंघासाठी मी चांगलं काम करू शकेन."\nआणखी एक अपक्ष उमेदवार रणधीर गोलान यांनी म्हटलं की, "भाजप माझी आई आहे. मी 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता होतो. मी कुठे जाणार?"\nदरम्यान, हरियाणाचे मावळते मुख्यमंत्री मनोहर खट्टर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घ्यायला दिल्लीत पोहचले. त्याआधी ते म्हणाले होती की हरियाणात आमचंच सरकार बनेल याबाबत आम्ही आशावादी आहोत. |
एमपीसी न्यूज : लवासा हिल स्टेशन (Lavasa Hill Station) प्रकल्प विरोधात केलेल्या याचिकेची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सहा आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी ऍड. नानासाहेब जाधव यांनी लवासा प्रकल्प बेकायदा असल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यातच निकाली काढली होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर (Lavasa Hill Station) न्यायालयाने यातील सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्रद्वारे आपली भूमिका मांडण्यास या नोटीसीद्वारे सांगण्यात आले आहे. |
राजाळे (ता. फलटण) गावच्या जानुबाई देवीची वार्षिक यात्रा बुधवार, दि. १२ व गुरुवार, दि. १३ एप्रिल रोजी होणार आहे. बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी गावच्या वतीने दुपारी ४. ०० वाजता देवीला साडीचोळी अर्पण करण्यात येईल. त्यानंतर बकरी, सायंकाळी ७. ०० वाजता सासनकाठ्या गोळा करणे, जोतिबाला हळद लावणे, संध्याकाळी ९. ०० वाजता बारामती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम व पहाटे देवीचा छबिना निघणार आहे. गुरुवारी सकाळी १०. ०० वाजता आनंद जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. सायं. ५. ०० वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होऊन यात्रेची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ राजाळे व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी व नाईक निंबाळकर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. |
मुंबई, दि. ५ (पीसीबी) - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. दरम्यान, ही नोटीस पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक' मधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते. नेहरूंचा आत्माच त्यात गुंतला होता. निर्भीड असणारे नेहरु कोणत्याही टीकेला ते घाबरत नव्हते. 'नॅशनल हेराल्ड'ने त्याच स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार केला. हल्ली राज्यकर्ते व पत्रकार यांचे तसे कमी जमते, परंतु नेहरूंनीच यासंबंधी काय सांगितले आहे ते आज दिले तर ते उचित ठरावे, असं म्हणत त्यांनी मोदी-शाह यांना अप्रत्यक्षपणे राजकारणातील व्यापारी म्हटले आहे. त्यामुळे नेहरूंना EDची नोटीस पाठवल्याशिवाय यांचा आत्मा शांत होणार नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. यावेळी माध्यामांशी बोलतानाही राऊतांनी केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.काश्मिरमध्ये 20 पोलिसांची हत्या होते मात्र देशाच्या गृहमंत्र्यांना त्याची पर्वा नाही, काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना देशातील केंद्र सरकार सत्तेची आठ वर्ष साजरी करण्यात व्यस्त आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या काश्मीर धुमसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. मात्र केंद्राचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले, काश्मीरची सध्याची परिस्थीती गंभीर आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र सत्तेची आठ वर्ष साजरी करत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेना पूर्ण ताकतीने काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभी आहे, असं आश्वासनही राऊतांनी दिलं आहे. काश्मिरी पंडितांना हवी ती मदत महाराष्ट्र सरकार पुरवणार असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, 15 जूनच्या आयोध्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहे. आयोध्या दौऱ्यात राजकारण होणार नाही. काश्मीर जळत आहे आणि दिल्लीतले राज्यकर्ते चित्रपट प्रमोशनमध्ये गुंग आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काश्मिरी नागरिकांच्या अक्रोशाकडे केंद्र सरकारचा दुर्लक्ष करत आहे. येथे होणारा काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकाराच्या कानामध्ये जात नाही का? असा सवालही खासदार राऊत यांनी केला आहे. |
पिंपरी - परदेशात वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत वाहन चालक आणि तेथील पोलीस अतिशय सक्त आहेत. रात्रीच्या तीन वाजता देखील रस्त्यावर कुणीही नसेल तरीही तेथील वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळतात. पण आपल्याकडे याच्या विरोधातील चित्र दिसून येते. दुपारी तीन वाजता वाहतुकीच्या नियमांचा भंग करीत भर गर्दीत सुद्धा वाहने सुसाट जातात, अशी खंत प्रसिद्ध सिनेअभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केले. आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन देखील पाटकर यांनी केले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 32 व्या वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजय पाटकर बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर आदी उपस्थित होते. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा अभिनेते विजय पाटकर आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विजय पाटकर म्हणाले, मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात. पोलिसांना बघताच मुंबईकर ब्रेक मारतात. पण या बाबतीत पुणेकर थोडे धीट आहेत. पोलिसांना पाहून ते थांबत नाहीत. मात्र आता पुणेकर सुद्धा घाबरायला लागले आहेत. पुणेकर घाबरतात हेच खूप आहे, असा मिश्किल टोला मुंबईकर असलेल्या पाटकर यांनी पुणेकरांना लगावला. पाटकर पुढे म्हणाले, आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांमुळेच अपघात होतात. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. |
जिल्ह्याचे सुपुत्र व बेंगळुरूच्या नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांची आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापूर - जिल्ह्याचे सुपुत्र व बेंगळुरूच्या नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांची आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेचे अध्यक्ष बनणारे डॉ. पाटील पहिले आशियाई नागरिक आहेत. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अमेरिकेतील शिकागो शहरात मार्च २०१५अखेर होणा-या जागतिक परिषदेत डॉ. जगन्नाथ अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. आजवर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांचा ताबा असलेल्या संघटनेचे अध्यक्षपद प्रथमच भारतीय आणि आशियाई व्यक्तीला मिळत आहे. संघटनेच्या बार्सिलोना, स्पेन येथील मुख्यालयातून या निवडीची घोषणा करण्यात आली. नॅकमार्फत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या डॉ. पाटील यांना चीन, पाकिस्तान, रशिया, श्रीलंका, मलेशिया व कोरिया इत्यादी आशियाई देशांचे समर्थन लाभले. १९७१च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेले कै. सीताराम पाटील व वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांचे ते पुत्र आहेत. तिटवे येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शहीद पब्लिक स्कूलची स्थापना करून ग्रामीण भागातून जागतिक विद्यार्थी घडवण्याचा उपक्रम डॉ. जगन्नाथ यांनी हाती घेतला आहे. |
पॉर्न पाहाणं, शेअर करणं गुन्हा आहे का? एखादी व्यक्ती पॉर्न पाहू शकते का? सोशल मीडियावर पॉर्न शेअर करता येते का? याबरोबरच फोनमध्ये चाइल्ड पॉर्न कंटेंट स्टोअर केल्यास काय शिक्षा होऊ शकते? असे काही महत्त्वाचे प्रश्न वारंवार समोर येतात. या प्रश्नांची उत्तरं देणारी ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत. पॉर्नवर बंदी असूनही लोक पॉर्न पाहतात का? भारतात अनेक पॉर्न बेवसाईटवर बंदी आहे. काही वेबसाईट 'नैतिकता आणि सभ्यता' याच्या सीमा ओलांडून नियमभंग करत असल्याचं सांगत जुलै 2015 मध्ये भारत सरकारनं 857 वेबसाईटवर बंदी घातली. त्यानंतर 2018 मध्ये ही बंदी पुन्हा वाढवण्यात आली. आजही या वेबसाईटवरील बंदी कायम आहे. याचा अर्थ असा की, इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्यांनी (Internet Service Providers-ISP) त्यांच्या ग्राहकांना या वेबसाईट उपलब्ध होणार नाही, यासाठी पावलं उचलणं अपेक्षित होतं. मात्र पॉर्न पाहण्यावर बंदी असली तरीही, भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या घटलेली नाही, असं पॉर्नहब या वेबसाईटनं त्यांच्या एका अहवालात म्हटलं आहे. गूगल आणि यू ट्यूबप्रमाणेच पॉर्नहबदेखील त्यांचा यूझर डेटा जाहीर करत असतं. 2020 मध्ये पॉर्नहबनं 2018 मधील आकडेवारी जाहीर केली होती. पॉर्नहबवर सर्वाधिक भेट देणारे प्रेक्षक किंवा यूझर्स हे अमेरिकेचे आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी ब्रिटन आणि भारत आहेत. या दोन देशांमध्ये असलेला फरक हा अत्यंत थोडा आहे. साधारणपणे भारतीय हे एका व्हीडिओवर 8 मिनिटं आणि 23 सेकंद एवढा वेळ खर्च करतात असं पॉर्नहबच्या अहवालात म्हटलं आहे. तर, पॉर्न पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये 44% प्रेक्षक हे 18-44 वयोगटातील असल्याचंही समोर आलं आहे. तर 41% टक्के 25-34 वयोगटातील असल्याचं यात म्हटलं आहे. साधारणपणे भारतातील पॉर्न पाहणाऱ्यांचं सरासरी वय हे 29 आहे. भारतातील पॉर्नहबच्या प्रेक्षकांमध्ये 30% महिलांचा समावेश असल्याचं पॉर्नहबनं म्हटलं आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या तीन आठवड्यांच्या काळात, भारतात वेबसाईटवर भेट देणाऱ्यांची संख्या 95% नी वाढल्याचं पॉर्नहबनं एप्रिल 2020 मध्ये जाहीर केलं. भारतात बंदी असल्यानं प्रेक्षक व्हीपीएन (VPN), किंवा प्रॉक्सीचा वापर करून पॉर्न पाहतात, असं आयटी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. "उदाहरण द्यायचं झाल्यास पॉर्नहब, एक्स व्हीडिओ याबाबत माहिती घेऊन. Jio, Airtel सारख्या इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या वेबसाईटवर बंदी घातली आहे. मात्र VPN, DNS सर्व्हर चेंज आणि प्रॉक्सी यांच्या मदतीनं अनेकजण या बेवसाईटवर जाऊ शकतात. त्याशिवाय अशा वेबसाईट पाहण्यासाठी मोझिला फायरफॉक्स आणि गूगल क्रोमसारखे ब्राऊझर न वापरता तुलनेत कमी लोकप्रिय असलेले ब्राऊझर यूझर वापरतात," असं हैदराबादेतील आयटी तज्ज्ञ प्रवीण कुमार रेजेट म्हणाले. पॉर्न पाहाणं कायदेशीर की बेकायदेशीर? माहिती तंत्रज्ञान कायदा, 2020 (IT Act); लैंगिक अपराधांपासून लहान मुलांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO Act) यात काही नियम आहेत. तसंच भारतीय दंड संहिता 1860 नुसार पॉर्न पाहणाऱ्यांवर काही निर्बंध घालण्यात आली आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, भारतात पॉर्न पाहणं हे बेकायदेशीर नाही. सुप्रीम कोर्टानं 2015 मध्ये याबाबत स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. "एखाद्या व्यक्तीनं त्याच्या खासगी क्षेत्रामध्ये पॉर्न पाहणं हे, त्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. "वैयक्तिक स्वातंत्र्य हा भारतीय संविधानातील कलम 21 चा भाग आहे. जर सरकारला या स्वातंत्र्याशी संबंधित काही निर्बंध घालायची असतील, तर त्यासाठी वेगळा कायदा करावा लागेल, असं संविधानात म्हटलं आहे, "नैतिकता आणि सभ्यता" याच्या आधारे सरकार निर्बंध घालणारा कायदा आणू शकतं," असं IT Act आणि POCSO Act चा अभ्यास करणारे हर्षवर्धन पवार म्हणाले. दूरसंचार विभागानं 2015 मध्ये 'नैतिकता आणि सभ्यता' याच मुद्द्यांच्या आधारे पॉर्न वेबसाईटवर बंदी आणली. चाइल्ड पॉर्नोग्राफीवर आळा घालण्यासाठी या वेबसाईटवर निर्बंध लादण्यात आल्याचं दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आलं. तसंच हे निर्बंध तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचंही सांगण्यात आलं. "पॉर्न वेबसाईटची संख्या हजारोंमध्ये आहे. तर केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या वेबसाईटची संख्या एक हजार पेक्षाही कमी आहे. आणखी एक अडचण म्हणजे पॉर्न वेबसाईट सातत्यानं त्यांचे आयपी अॅड्रेस (IP)बदलत असतात. अशाप्रकारे किती आयपी अॅड्रेसवर बंदी घालणार? शिवाय नेटिझन्स इतर कोणत्याही मार्गाने या बेवसाईट पाहतातच. "अशाप्रकारे पॉर्न पाहून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत आहोत, हे तरुणांच्या स्वतःच्याच लक्षात यायला हवं. महत्त्वाचं म्हणजे पॉर्नचा मुलांवर होणारा परिणाम, याबाबत जनजागृती व्हायला हवी. हाच त्यावरचा उपाय ठरू शकतो," असं हर्षवर्धन म्हणाले. किती शिक्षा होऊ शकते? IT ACT 2000 मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पॉर्न पाहण्यासंदर्भात काही नियम आहेत. या नियमांनुसार सेक्सशी संबंधित माहिती प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणं हा गुन्हा ठरतो. IT Act अॅक्ट 2000 च्या सेक्शन 67 नुसार, लैंगिक घटनेचं चित्रण करणं आणि ती प्रकाशित करणं किंवा इतर ठिकाणी वितरीत करणं हा दंडणीय गुन्हा आहे. त्यासाठी 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. गुन्हेगार दुसऱ्यांदा असंच कृत्य करताना पकडला गेला असेल तर, 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अधिक दंडाची रक्कम भरावी लागू शकते. त्याचसोबत सेक्शन 66 (e) नुसार, एखद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय 'हेतूपुरस्सर किंवा नकळत' त्या व्यक्तीच्या खासगी अवयवांचे फोटो किंवा व्हीडिओ प्रसिद्ध करणं किंवा ते पसरवणं हादेखील गुन्हा असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातील Indecent Representation of Women (Prohibition) Act नुसार पुस्तकं, पेंटिंग फोटो, लेख यामध्ये महिलांचं निषेधार्ह सादरीकरण करणं हाही गुन्हा आहे. हर्षवर्धन यांच्या मते, IT Act हा प्रामुख्यानं इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून लागू करण्यात आला आहे. "इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी पॉर्न साइट्स बॅन करायला हव्यात. पण सर्वांत मोठी समस्या ही यूझरची आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी बॅन केल्यानंतरही असा कंटेंट यूझरला उपलब्ध होतो. " "त्याचवेळी सरकारचे पॉर्नसंबंधी नियम आणि निर्बंधही काळजीपूर्वक जाणून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं चाइल्ड पॉर्नोग्राफीचा विचार करून निर्बंध घातले असल्याचं सरकार सांगत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये या मुद्द्याबाबत जागरुकता असायला हवी. पॉर्न पाहणं हा काही गुन्हा नाही, मात्र चाइल्ड पॉर्न पाहणं हा गंभीर गुन्हा आहे. चाइल्ड पॉर्न पाहिल्यानं, मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता असते," असं हर्षवर्धन म्हणाले. चाइल्ड पॉर्नोग्राफी बेकायदेशीर आहे का? चाइल्ड पॉर्नोग्राफी हा गुन्हा असल्याचं, भारत सरकारनं आतापर्यंत अनेकवेळा स्पष्टपणे सांगितलं आहे. भारतीय कायद्यानुसार तो गंभीर गुन्हा आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रसिद्ध, प्रकाशित करणं, तिचं वितरणं किंवा इतर ठिकाणी पाठवणं याबरोबर असा कंटेंट तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही तो शेअर केला असेल तरी, तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. चाइल्ड पॉर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी POCSO Act मध्ये विशेष तरतुदी आहेत. लहान मुलांचे फोटो व्हीडिओ लैंगिक दृष्टीकोनातून सादर करणं, कम्प्युटरवर फोटो, व्हीडिओ एडिट करणं याचाही समावेश चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये होतो. POCSO Act च्या सेक्शन 14 नुसार जर कोणी लहान मुलाना पॉर्नसाठी वापर करत असेल, तर त्या व्यक्तीला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. गुन्हेगार जर दुसऱ्यांदा अशा प्रकारचं कृत्य करताना आढळला तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. एखाद्याला पाठवण्यासाठी, शेअर करण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी अशा कोणत्याही कारणाने चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित कंटेट बाळगणं हा गुन्हा असल्याचं POCSO Act मध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हेगाराला तुरुंगवास आणि दंड अशी दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. दंडाची किमान रक्कम 5000 आहे तर जास्तीत जास्त किती असेल याची मर्यादा निश्चित नाही. म्हणजे गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार दंडाची रक्कम ठरवली जाईल. महत्त्वाचं म्हणजे, फोटो व्हीडिओ गोळा करणे आणि वेबसाईटवर अपलोड करणे यासाठी तीन ते पाच वर्षांदरम्यान तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफीचा विचार करता याबाबत कंटेट गोळा करणे, शोधणे किंवा ब्राऊजिंग करणे, डाऊनलोड करणे, त्याचं प्रमोशन करणं किंवा त्याचं वितरण करणं यावरही निर्बंध आहेत. मात्र, पुरावा सादर करण्यासाठी म्हणून असे फोटो, व्हीडिओ जवळ बाळगता येऊ शकतात. POCSO Act मध्ये अशा कठोर तरतुदी असूनही चाइल्ट पॉर्नोग्राफीची प्रकरणं समोर येतच आहेत. एकट्या नागपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये पॉक्सोअंतर्गत 38 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 30 जणांना अटक करण्यात आली असल्याचं, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. म्हणजेच भारतात पॉर्न पाहण्यावर बंदी नाही, मात्र त्याबाबतचा कंटेट प्रकाशित, प्रसिद्ध करणं, तयार करणं किंवा वितरीत करणं यावर बंदी आहे. तर चाइल्ड पॉर्नोग्राफीवर पूर्णपणे बंदी आहे. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. ) |
संत रविदासांशी संबंधित एक किस्सा आहे. एके दिवशी त्यांचा एक शिष्य त्यांच्याकडे तक्रार करत होता, 'रामजतन नावाचा माणूस अनेकदा चपला शिवायला येतो आणि तुम्ही त्याचे काम करा. तू बाहेर गेलास तेव्हा मी रामजतन काम करत होतो. कामाच्या बदल्यात त्याने मला जी नाणी दिली होती ती सर्व खोटी होती. नाणी परत करताना मी नाणी ओळखली आणि त्याला खडसावले. मी त्याला सांगितले की मी तुझे बूट शिवणार नाही आणि त्याचे जोडे त्याला परत केले. ' संत रविदास म्हणाले, 'माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही त्याचे जोडे शिवले पाहिजेत. मी तेच करतो. मला माहीत आहे की तो प्रत्येक वेळी मला खोटी नाणी देऊन जातो. हे ऐकून शिष्याला धक्काच बसला. तो म्हणाला, 'असं का करतास? ' संत रविदास म्हणतात, 'तो आपल्या दारात येतो. . . तो असे का करतो ते मला ही माहित नाही. . . तो खोटी नाणी देतो आणि मी ठेवतो. मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. शिष्याने विचारले, 'त्या खोट्या नाण्यांचे तुम्ही काय करता? ' संत रविदास म्हणाले, 'मी ती नाणी जमिनीत गाडतो, जेणेकरून ती नाणी इतर कोणाची फसवणूक करू शकत नाहीत. निदान ही पण एक सेवा आहे. धडा - आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की आपल्या आजूबाजूला अनेक लोक चुकीचे काम करतात. वाईट लोक वाईट गोष्टी करतात. आपल्या चांगल्यापासून वाईट कर्म कसे थांबवायचे हे आपण ठरवायचे आहे. |
मुंबई : अभिनेत्री जिया खानने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाच्या आईने तिचा बॉयफ्रेंड-अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणी सर्वात मोठी बातमी आहे. जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सुरज पांचोली याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्याच्या अभावी कोर्टाने सूरजची मुक्तता केली आहे. सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे सुरज पांचोली याला मोठा दिलासा मिळाला आहे. 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे. जिया खान 3 जून रोजी 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूप्रकरणात सूरज पांचोलीचं नाव आलं होतं. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. जियाच्या आईनेही सूरजवर आरोप करून त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. मात्र, सीबीआयने पुराव्या अभावी सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त केलं. आज सकाळीच सूरज पांचोली कोर्टात पोहोचला. यावेळी त्याला मीडियाने घेरलं. पण त्याने कुणाशीही बातचीत केली नाही. जरीना वहाब सुद्धा सूरज सोबत होत्या. कोर्टाचा निकाल लवकर येणार होता. पण जियाची आई राबिया यांनी काही लिखित गोष्टी जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे कोर्टाने दुपारी साडेबारा नंतर निकाल देणार असल्याचं म्हटलं होतं. सूरज विरोधात कोणताच खटला होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सूरजने कोर्टाचे आभारही मानले. सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त केलं या निकालावर सूरजची आई अभिनेत्री जरीना वहाब यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मायक्रोसॉप्टने Microsoft एका नवीन इव्हेंटची घोषणा केली आहे. याचे आयोजन 24 जूनला करण्यात येईल. या इव्हेंटमध्ये विन्डोजची Windows नेक्स्ट जनरेशन सादर केली जाईल. हा एक व्हर्च्युअल इव्हेंट असेल. या अपकमिंग इव्हेंटसाठी कंपनीने काही मीडियांना आमंत्रित केले आहे. द वर्जच्या रिपोर्टनुसार, इव्हेंटची सुरुवात 24 जूनला 11एएम ईटी (8:30 पीएम आयएसटी) ला होईल. या इव्हेंटमध्ये मायक्रोसॉफ्टचे Microsoft सीईओ सत्य नडेला आणि चीफ प्रॉडक्ट ऑफिसर पॅनोस पानाय दोघे उपस्थित असतील. आशा आहे की, कंपनी नवीन विन्डोजसाठी Windows नवीन यूजर इन्टरफेस आणि फिचर्स सादर करूशकते. विन्डोजच्या या नवीन व्हर्जनला विन्डोज 11 साठी प्लेस केले जाऊ शकते. कंपनी काही काळापासून विन्डोज डेस्कटॉप यूजर इन्टरफेस (कोडनेम सन व्हॅली) मध्ये खुप बदल करण्यासाठी काम करत आहे आणि या इव्हेंटमध्ये कंपनी याच्या फायनल बिल्डला शोकेस करेल. मागील 6 वर्षापासून विन्डोज 10 विन्डोजचे लेटेस्ट व्हर्जन आहे. आशा व्यक्त केली जात आहे की, सन व्हॅलीमध्ये नवीन स्टार्ट मेन्यू, टास्कबार लेआऊट, आयकॉन्स, साऊंड, अॅप डिझाईन आणि प्लूईड अॅनिमेशन पहायला मिळू शकते. मायक्रोसॉफ्टने अलिकडेच विन्डोजच्या नवीन व्हर्जन विन्डोज 10एक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यास ओएसचे मॉर्डन व्हर्जन विन्डोज कोअर ओएस बनवले गेले होते. |
मुंबई : दर वर्षाला राज्यात तब्बल 18 हजार (महिन्याला 1 हजार 500) मोटरसायकल चोरीला जातात. मोटारसायकल चोरीचे सर्वाधिक प्रमाण हे पुणे आणि औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी 3 वाहने चोरीला जातात. मध्यमवर्गीय आणि गरिबांना या वाढत्या वाहन चोऱ्यांचा फटका बसत आहे. औरंगाबाद शहराची मोटारसायकलचे शहर म्हणून नवी ओळख तयार होत आहे. या शहरात दररोज 8 लाख लोक मोटारसायकलवरुन प्रवास करतात. शहरात दर महिन्याला एक हजार मोटारसायकल खेरेदी केल्या जातात. शहरात मोटारसायकलची संख्या वाढली, त्यासोबतच मोटारसायकल चोरीचे प्रमाणदेखील वाढले. या औद्योगिक शहरात प्रत्येक दिवसाला मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे दाखल होतात. 2018 या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल 745 वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यापैकी केवळ 169 वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल 450 वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत. राज्यात वर्षाकाठी 18 हजार मोटारसायकलची चोरी होते. म्हणजेच महिन्याला दिड हजार मोटार सायकलची चोरी होते. मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात पुण्याचा पहिला तर औरंगाबादचा दुसरा नंबर लागतो. मोटारसायकल तयार करणाऱ्या कंपन्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण रोखता येईल, अशी यंत्रणा तयार करु शकले नाहीत, त्यामुळेच मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे. अपुरी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे परवडते. वेळप्रसंगी कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा काढून जमवलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. त्यामुळे मोटारसायकल चोरीला गेली तर त्याचा सर्वसामान्य व्यक्तीला मोठा फटका बसतो. त्यामुळे राज्यातील मोटारसायकल चोरीचे प्रमाण चिंता व्यक्त करणारे आहे. हे असेच होत राहीले, मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत गेले तर त्यासाठी पोलिसांचा स्वतंत्र सेल निर्माण करण्याची वेळ येईल. |
प्रत्येकच कर्णधाराचा एक आवडता खेळाडू असतो आणि महेंद्रसिंग धोनीबाबत बोलायचे, तर त्याने नेहमीच सुरेश रैनाला खूप पाठिंबा दिला, असे भारताचा माजी डावखुरा अष्टपैलू युवराज सिंग म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात भारताने घरच्या मैदानावर २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. या विश्वचषकात युवराजने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. मात्र, विश्वचषकात युवराज, सुरेश रैना आणि युसूफ पठाण या तिघांपैकी कोणत्या दोन खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान द्यायचे हा कठीण प्रश्न धोनीसमोर होता. सुरेश रैनाला तेव्हा खूप पाठिंबा मिळाला, कारण धोनीचा त्याच्यावर खूप विश्वास होता. प्रत्येकच कर्णधाराचा एक आवडता खेळाडू असतो आणि माझ्या मते धोनीने रैनाला त्यावेळी खूप पाठिंबा दर्शवला, असे युवराज एका मुलाखतीत म्हणाला. अखेर विश्वचषकात युवराज, रैना आणि युसूफ या तिघांनाही संघात स्थान मिळाले. मात्र, अखेरच्या काही सामन्यांत युसूफला संघातून वगळण्यात आले होते. याबाबत युवराजने सांगितले, युसूफ त्यावेळी चांगली कामगिरी करत होता. मीसुद्धा उत्तम फलंदाजी करत होतो आणि विकेट्सही मिळवत होतो. रैनाला मात्र धावांसाठी झुंजावे लागत होते. त्यावेळी संघात एकही डावखुरा फिरकीपटू नव्हता आणि मला विकेट मिळत होत्या. त्यामुळे मला संघात ठेवण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. युवराजने २००७ टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार मारले होते. त्यावेळी त्याने वापरलेल्या बॅटवर प्रश्न उपस्थित केले गेले, असे युवराजने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी त्यावेळी मला विचारले होते की, तुझ्या बॅटच्या मागच्या बाजूला फायबर आहे का आणि तू हे सामनाधिकार्यांना दाखवले आहेस का? मग, मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला काही चुकीचे वाटत असल्यास तुम्हीच माझी बॅट तपासून घ्या. अॅडम गिलक्रिस्टनेही मला बॅटविषयी विचारले होते, असे युवराज म्हणाला. गांगुली आवडता कर्णधार! युवराजने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वाधिक सामने हे सौरव गांगुली आणि धोनी यांच्या नेतृत्वात खेळले. परंतु, या दोघांमध्ये त्याने आवडता कर्णधार म्हणून गांगुलीला पसंती दिली. दादा (गांगुली) माझा सर्वात आवडता कर्णधार आहे. त्याने मला सर्वाधिक पाठिंबा दिला. आमचे वय खूप कमी होते. मात्र, त्याने आमच्या प्रतिभेला वाव दिला. आम्हाला घडवले, असे युवराजने नमूद केले. युवराजने गांगुलीच्या नेतृत्वात ११०, तर धोनीच्या नेतृत्वात १०४ एकदिवसीय सामने खेळले. |
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून तालुक्यातील ब्रम्हपुरी व नंदेश्वर या गावातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 29 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 273 वर गेली आहे. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 28 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे. आज दि. 7 ऑक्टोबर रोजी नागरिकांचे स्वॅब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 164 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत. वरील 164 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 13 आणि निगेटिव्ह 151 जणांचे अहवाल आलेले आहेत . सदरचे नागरिक हे मंगळवेढा 11 , कचरेवाडी 1 आणि शेलेवाडी 1 येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा 1 , नंदेश्वर 2 येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत. मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 273 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 129 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.