text
large_string
Money From Shares । पैसा वाढवावा तरी कसा? तर तो अशा शेकडो टक्के परतावा देणाऱ्या शेअर्समधून, पैसा वेगाने का वाढतोय हा स्टॉक? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
ढोल लेझीम,पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे, लहान मुलींचे लेझीम पथक, स्ट्रॉबेरी, पुस्तकांच्या गावाची माहिती सांगणारा चित्ररथ, फुलांनी सजवलेल्या पालखीत स्ट्रॉबेरी फळांची केलेली मांडणी अशा उत्साही वातावरणात भिलार येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, जि.प. सदस्या सौ. नीता आखाडे, सभापती रूपाली राजपूरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, राजेंद्र भिलारे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सपोनि तृप्ती सोनावणे, सरपंच वंदना भिलारे, प्रवीण भिलारे, लागीरंच्या कलाकार नीलिमा कमाने, सुनीता कुदळे, गटविकास अधिकारी दिलीप शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. महोत्सवाचा आहे. महोत्सवाचे उदघाटन झाल्यानंतर पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सवाच्या दिंडीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत डॉल्बी बरोबरच विद्यार्थ्यांचे आकर्षक लेझीम पथक, पुस्तकांच्या गावाची महती सांगणारा चित्ररथ सहभागी झाले होते. तजेलदार व लाल चुटूक स्ट्रॉबेरीची पालखी हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. ही दिंडी शिवाजी चौकात आल्यावरपुढे ती बसस्थानक मार्गे महाबळेश्वरकडे रवाना झाली. महाबळेश्वरच्या बाजारपेठेतूनही ही मिरवणूक जल्लोषात निघाली. यामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुम्ही संपूर्ण ताकदीने उभं करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निवडणूक येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचं नाव घेतील, यासंबंधीची तयारी तुम्ही सुरू करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून पाटील यांच्या उमदेवारीचे स्पष्ट संकेत दिले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. पवार म्हणाले की, तुम्ही आज अभिजीत पाटील यांना साथ दिली. तुम्ही लोकांनी अभिजित पाटील यांच्यासारखं नेतृत्व तयार केले आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे. नुसतं पाठीशी उभा राहायचं नाही, तर औदुंबरअण्णा पाटील, भारत भालके यांच्यानंतर पंढरपूर तालुका पोरका वाटतो. त्याचे हे पोरकेपण घालवण्याची ताकद आज अभिजित पाटील यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांना तुम्ही पूर्ण ताकदीने उभं करा. एकेकाळी हा सोलापूर जिल्हा दुष्काळी होता. पण, (स्व. ) यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाचा पाया घातला आणि त्यातील पाण्याच्या जोरावर आज जिल्ह्यातील उसाची शेती फुलेली आहे. पहिल्या पिढीने मोठे काम केले आहे. त्यानंतर बबनदादा, राजन पाटील यांच्यासारखी दुसरी पिढीही जिल्ह्यात कार्यरत आहे. आता तिसऱ्या पिढीनेही पुढे येऊन शेती क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन काम केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. आपल्याकडे आज साखर मोठ्या प्रमाणात पडून आहे. दुसरीकडे, जगात साखरेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आपण साखरेची निर्यात केली, तर आपल्या शेतकऱ्याला चार पैसे मिळतील. पण, केंद्र सरकारने साखर निर्यात करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. तोच न्याय कांद्याच्या बाबतीतही लागू आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारबाबतही आपल्याला निकाल घ्यावा लागणार आहे. जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, त्यांना तुम्हीही ताकद द्या, असे आवाहन शरद पवार यांनी केले. महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले. चव्हाण यांच्या धर्मपत्नी विणूताई यांचे नाव या भागाला देण्याचा निर्णय औदुंबरअण्णा पाटील यांनी घेतला. त्यामुळे या भागाला वेणूनगर असे नाव देण्यात आले, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात कामासाठी स्थलांतर करणारे मजूर व कामगारांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने गावाकडे परतण्याची तयारी चालवली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कामासाठी मुंबई, पुणे येथे स्थलांतर करणारे तालुक्यातील चार हजार १६ नागरिक शुक्रवारपर्यंत (ता. २७) आपल्या गावी परत आले आहेत. त्यांना गावपातळीवर आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शहरी भागात जमावबंदी अमलात आणली आहे. नागरिकांनी घरामध्ये राहूनच सुरक्षितता बाळगावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात कामासाठी स्थलांतर करणारे मजूर व कामगारांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने गावाकडे परतण्याची तयारी चालवली आहे. जनता कर्फ्यूपासून या स्थलांतरित नागरिकांनी आपापल्या गावी परतणे सुरू केले आहे. मुंबई-पुणे भागातून गावाकडे परतलेल्या ग्रामीण भागातील प्रत्येक मजूर व कामगारापासून या आजाराचा फैलाव होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात परतलेल्या प्रत्येक महिला व ग्रामस्थांची नोंद संकलित करून त्यांना सर्दी, खोकला, पडसे हा आजार आहे किंवा नाही याची खातरजमा करीत उपचार हाती घेण्यात आले आहेत. तालुक्यात शुक्रवारपर्यंत आखाडा बाळापूर प्राथमिक केंद्रांतर्गत ६९२, डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्र ५३५, मसोड ८३९, पोतरा ७५५, रामेश्वर तांडा ५६५, वाकोडी ६३० असे एकूण चार हजार सोळा मजूर व कामगार आपापल्या गावी परत आले आहेत. मुंबई, पुणे येथून परतलेल्या मजूर व कामगारांची सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले असून शहरामध्येही १३८ जण परत आले असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या नागरिकांना कुठल्याही आजारा संदर्भात शंका वाटल्यास त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्याकरिता आरोग्य विभागाने रॅपिड ऍक्शन पथक तैनात केले आहे. या पथकाच्या माध्यमातून आजारी रुग्णाला गावपातळीवरच उपचाराची सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोरेगाव (ता. सेनगाव) : ग्रामीण भागातील खासगी दवाखाने बंद केल्याने रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. परंतु, गोरेगाव येथील खासगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ. दीपक पाटील गोरेगावकर यांनी विविध आजाराच्या दीडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. कोरोना आजार आटोक्यात येईपर्यंत मोफत आरोग्य सेवा सुरू राहील असे डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. या कार्याबद्दल डॉ. दिपक यांचे गावातुन कौतुक होत आहे. तसेच येथील डॉ. रवि पाटील गोरेगावकर व गजानन गिरे यांनी स्वखर्चातुन गावात जंतनाशक धुर फवारणी केली आहे. कै. निवृत्ती पाटील शिक्षण व वैद्यकीय सेवा प्रसारक सस्था गोरेगाव व शिव हॉस्पिटल यांच्या वतीने गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून कोरोना विषाणूबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. या वेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. श्रीमनवार, श्री. तुराफभाई, दिलीप कावरखे, जगन कावरखे, गजानन गिरे, गजानन कावरखे, मोईन पठाण, दौलत भाई, शिकंदर, रामा कांबळे, सीताराम कावरखे, शिवाजी पाटील, नंदू रवणे, राजू गायकवाड, सोपान रणबावले आदींची उपस्थिती होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविण्याचे प्रकार सुरूच आहेत. या मार्गावर हलक्या वाहनांसाठी प्रतितास १०० किमी वेग मर्यादा निश्चित असतानाही १८० किमी वेगाने वाहने चालवली जातात. अपघात कमी करण्याच्या उद्दिष्टाबरोबरच वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी परिवहन विभागानं नवे पाऊल उचललं आहे. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करूनही वाहन चालक सुधारताना दिसत नाहीत. त्यामुळे RTO नं आक्रमक भूमिका घेतलीय. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे वेगाने वाहन चालवणाऱ्यांचा थेट परवाना रद्द होईल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हलक्या वाहनांना घाटात प्रतितास ५० किमी आणि अन्य ठिकाणी १०० किमी वेगमर्यादा निश्चित आहे. या वेगमर्यादेत पाच टक्के सवलत दिली जाते. मात्र वाहन चालकांना वेगाचा मोह आवरत नाही. सर्वाधिक घटना या वेग मर्यादा उल्लंघनाच्या घडतात. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.
उन्हाळी शिबिरांमधून पालकांना नेमके काय हवे? उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. पुढच्या आठवड्यात बहुसंख्य शाळांची घंटा वाजेल. पालकांच्यादृष्टीने पाल्यांना सांभाळण्याच्या काही तासांचा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या अडीच महिन्यांच्या सुटीत पाल्यांना सांभाळताना उडालेल्या त्रेधा तिरपीटीने पालक आणि विशेषतः आई चांगलीच वैतागते. बहुदा त्यातून उन्हाळी शिबिरांमध्ये पाल्यांना पाठविण्याचा आग्रह सुरू होतो. कडक ऊन असल्याने दिवसा बाहेर खेळणे त्रासदायक, घरात बैठे खेळ कुणाबरोबर खेळायचे हा प्रश्न असल्याने मुले टीव्ही किंवा मोबाइलला चिकटतात, त्यावर उपाय म्हणून उन्हाळी शिबिरांचा मार्ग शोधून काढला जातो. अर्थात हा नकारात्मक सूर नाही, त्याचे फायदेदेखील आहेत. परंतु, पालकांच्या दृष्टीने वर्षभर शाळेच्या धावपळीत छंद, कला प्रकार शिकता येत नाही, त्याला सुटीच्या काळात वेळ देता येतो हा पहिला फायदा तर दुसरा फायदा मुले दिवसभर काय करू हा प्रश्न विचारुन भंडावून सोडत असतात. त्यामुळे दिवसातील किमान दोन-चार तास शिबिरात गेली तर व्यस्त राहतील. उद्देश चांगला आहे. योगायोगाने जिल्हा पातळीवर वेगवेगळी शिबिरे होऊ लागली आहेत. कला, क्रीडा, साहसी खेळ अशी भिन्न स्वरुपाची ही शिबिरे आणि त्यात शिकविणारी तज्ज्ञ, जाणकार मंडळी असल्याने ही शिबिरे चांगली होतात. या शिबिरांमधून पाल्यांना त्यांचा कल, आवड असलेल्या क्षेत्राची तोंडओळख होणे, प्रशिक्षणाची सुरुवात होणे, ज्याला त्या कलाप्रकारात गती आहे, त्याला पुढील वाट दाखविणे, किमान तयार असलेल्या विद्यार्थ्यांकडून सफाईदारपणे ते करवून घेणे अशी खरे तर अपेक्षा असते. संयोजक आणि पालक या दोघांना किमान अशी अपेक्षा असायला हवी. शिबिराचा कालावधी लक्षात घेऊन त्यातील गुणवत्ता, सराव आणि विषयात पारंगत होण्याची शक्यता अवलंबून असते. मुळात समस्या याठिकाणी निर्माण होते. मागणी तसा पुरवठा या बाजारपेठेच्या नियमानुसार शिबिर संयोजक पालकांच्या अपेक्षा, मागणी लक्षात घेऊन एका शिबिरात अनेक गोष्टींचा समावेश करतात. मुलांची संख्या अधिक असते. नवोदित, नवशिका, पारंगत असे सगळे एका शिबिरात सहभागी झालेले असतात. प्रशिक्षक एक किंवा दोन असल्याने ते 'सब घोडे बारा टके' या न्यायाने प्रशिक्षण देतात. बाल, कुमार अशा वयोगटातील मुले असल्याने प्रत्येकाची ग्रहणक्षमता, आकलन क्षमता भिन्न असते. शारीरिक क्षमतेत फरक असतो. पण एवढ्या मोठ्या संख्येत या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि शिबिराच्या शेवटी पालक म्हणतात, शिबिराचा फायदा काय झाला? आमच्या मुलाला तर अमूक-तमूक येतच नाही. तमक्याच्या पिंट्याला तर हेही येते आणि तेही येते. ही तुलना आणि अपेक्षा मुळात चुकीची आहे. शिबिरातील दैनंदिन घडामोडींशी पालक पाल्यांशी संवाद साधतात काय? शिबिरापूर्वी, शिबिरादरम्यान आणि शिबिराच्या सांगतेनंतर त्यांच्यात काय बदल होतोय, याचे काळजीपूर्वक निरीक्षण पालकांनी केले आहे काय? याचा विचार प्रत्येक पालकाने करायला हवा. असा विचार केला असेल तर त्यांना काही गोष्टी लक्षात येतील. पहिली गोष्ट म्हणजे चार-आठ दिवसांच्या शिबिरातून पाल्य पारंगत होणार नाही. आवडीच्या क्षेत्राची किमान तोंडओळख त्याला होईल. या क्षेत्राची आपल्याला खरोखर आवड आहे का, अमूक करतो म्हणून मी करावे, असे अनुकरण आहे काय? त्यासाठी लागणारी कौशल्ये आपल्यात आहे काय? आपण सरावासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार आहोत काय यासंबंधी खरे तर पालकांनी मुलांशी चर्चा करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे, शिबिरांमधून स्वयंशिस्त, साहचर्य, सर्वसमावेशकता, संघबांधणी या आणि इतर अनेक गुणांचा त्याला परिचय होतो. स्वाभाविकपणे संस्कार होतात. शाळा आणि शिबिरामधील फरक त्याला लक्षात येतो. या गुणांसंबंधी पालकांनी त्याला अवगत करावे, त्याच्या वर्तनात झालेला बदल त्याला लक्षात आणून द्यावा, त्याला प्रोत्साहित करावे. पालकांच्या अशा कृतीमुळे पाल्याचा शिबिराकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक वास्तववादी होईल. शिबिर संयोजकांनीदेखील केवळ आर्थिक लाभाकडे न बघता मुलांच्या सर्वांिगण विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. अशा शिबिरांच्या आयोजनाचा खर्च मोठा असतो, केवळ शुल्कातून तो निघू शकत नाही. अशावेळी उद्योजक, व्यापारी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक योगदान दिले तर ही मोठी समाजसेवा घडेल.
श्रीमन्महाभारतार्थ - ३ वनपर्व. अ. ३१३. यक्ष - सर्व भूतांचा अतिथि कोण ? सनातन धर्म कोणता ? आणि हे राजेंद्रा, अमृत व हें सर्व जगत् किंस्वरूप आहे ? वैशंपायन-जनमेजया, यज्ञादिकांतील दानाला चित्तशुद्धीच्या द्वारा आणि यज्ञादिकाला चित्तैकाम्यद्वारा समष्टि-उपासनेच्या प्रवृत्तीचें हेतुत्व असल्यामुळे दान व यज्ञादि या दोहोंनाहि मोक्षोपकारकत्व आहे, अशा आशयानें युधिष्ठिर म्हणाला - " आह्वनीयादिरूप अग्नि हाच सर्व भूतांचा अतिथि आहे. गाईचें दूध हेंच सोमाख्य अमृत आहे. त्या गोक्षीररूप सोमाचें हवन करणे हाच नित्य धर्म आहे व तो मोक्षाचें साधन असल्यामुळे अमृत आहे. ( आतां मोक्षाचें द्वार सांगतों- ) वायूच हें सर्व जगत् आहे. ( वायूच व्यष्टि व समष्टि अशी श्रुति असल्यामुळे पिंड-ब्रह्मांडात्मक वायुरूपत्वाची प्राप्ति हेंच मोक्षद्वार आहे, असा याचा भावार्थ ) यक्ष - एकटाच कोण संचार करितो ? एकदा उत्पन्न झालेलाच पुनः कोण जन्म पावतो ? हिमाचें औषध काय ? व महत् आवपन कोणतें ? पूर्वोक्त वायूचाहि संहार झाल्यावर काय अवशिष्ट राहते, तें सांगण्याच्या इच्छेनें युधिष्ठिर म्हणाला - एकटा सूर्यच संचार करितो. म्ह० सूर्याप्रमाणें चित्प्रकाशरूप असलेला आत्माच प्रकाश पावतो. चंद्रमा हीच ज्याची देवता आहे, तें मनच अविद्यावशात् पुनः पुनः उत्पन्न होते व तें दुःखप्रद जगाची कल्पना करितें. ( अविद्येच्या निवृत्तीचा उपाय सांगतों-) तत्त्वमस्यादि अग्निरूप वाकूच अविद्याजाड्याचें औषध - निवारक आहे. शरीराख्य भूमि हेंच मोठें आचपन - विद्या व अविद्या यांचे निधानस्थान आहे. कारण या शरीरांतच संसारित्वाप्रमाणे असंसारी ब्रह्मभावहि साक्षात् अनुभविला जातो. यक्ष - एकच धर्म्य स्थान कोणतें ! म्ह० सर्वधर्म कोणत्या एका साधनांत अंतर्भूत होतो ! यश, स्वर्ग्यसाधन व सुख यांतील प्रत्येकाचें एकेक पर्यवस्थान कोणतें ! १ या प्रश्नोत्तर मालिकेतील पहिल्या दोन प्रश्नांनीं साधनांसह ब्रह्मविद्येचा उपन्यास केला. पुढील सात प्रश्नांनीं ' त्वं ' पदार्थाचं शोधन केले. त्या पुढील तीन प्रश्नांनीं साधनासह तत्पदार्थाचें शोधन केलें. तत्पदार्थ व त्वंपदार्थशोधन म्ह० ईश्वर व जीव यांना उपाधिशून्य शुद्ध चैतन्यरूपानें प्रदर्शित करणे. आतां पुनः भिन्नप्रकारानें साधनांचाच उपदेश करून तत्त्वंपदार्थाचा अभेद या पुढील नऊ प्रश्नांनी दाखविला आहे. युधिष्ठिर - दक्षता है एक धर्म्यपद आहे म्ह० एका दक्षतेमध्यें सर्व धर्मांचें पर्यवसान होतें. दानामध्ये सर्व यश पर्यवस्थित होतें. एका सत्यामध्ये सर्व स्वर्गसाधनें अंतर्भूत होतात आणि एका शीलामध्ये सर्व सुख परिसमाप्त होतें. यक्ष - मनुष्याचा आत्मा कोण ? दैवकृत सखा कोण? त्याचें उपजीवन व परायण काय ? युधिष्ठिर - हे यक्षा, मनुष्यानें उद्योग, दान, सत्य व शील यांचें सेवन तर करावेंच; पण त्यांतल्या त्यांत दान हाच पुत्रतुल्य आत्मा आहे. भार्या हाच देवकृत सखा व पर्जन्यवत् उपजीवन आहे. तथापि दान सर्वाचें परायण आहे. कारण तें आत्मप्रद आहे, रमणीय फल देणारें आहे व 'दिल्यावांचून प्राप्त होत नाहीं,' असे शास्त्रवचन असल्यामुळे उपजीवनाचे कारणहि आहे. यक्ष - धनाला हितावह असलेल्या धन्य वस्तूंतील उत्तम धन्य वस्तु कोणती ? धनांतील उत्तम धन, लाभांतील उत्तम लाभ व सुखांतील उत्तम सुख कोणतें ! युधिष्ठिर - दक्षता च धन्यांतील उत्तम धन्य म्ह० धनाला हितावह साधन आहे. वेदशास्त्राध्ययन हेंच उत्तम धन आहे, स्वर्ण रौप्यादि हें नव्हे. आरोग्य हैं धर्माचं उत्तम साधन असल्यामुळे तोच श्रेष्ठ लाभ होय व संतोष हेंच सर्वोत्तम सुख आहे. उद्योग, अध्ययन, आरोग्य व संतोष हीं चार साधनें दृष्टफलाच्या द्वारा ज्ञानावर उपकार करितात. यक्ष - लोकांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता ? सदा फल देणारा धर्म कोणता ? कशाचें नियमन केले असतां शोक करण्याचा प्रसंग येत नाहीं ! कोणाशीं केलेला समागम जीर्ण होत नाहीं ! युधिष्ठिर - सर्व भूतांना अभय देणें, एतद्रूप संन्यास, हाच श्रेष्ठ धर्म आहे. प्रणव हा मोक्षमंत्र असून ' त्रयी' शब्दानें येथें त्रिमात्र प्रणव विवक्षित आहे. त्याचा आश्रय केलेला जो धर्म तो अकार, उकार व मकार, यांचे अर्थ, एतद्रूप स्थूल, सूक्ष्म व कारण, या उपाधींचा क्रमानें उत्तरोत्तर प्रविलाप करून अर्धमात्रार्थभूत तुरीय ब्रह्मामध्यें अवस्थित होणें, हाच अविनाशी फलरूप धर्म आहे. कारण तुरीय ब्रह्मावस्थानरूप ब्रह्म हैं साक्षात् मोक्षसाधन आहे. त्या धर्माच्या प्राप्तीचा मनोनिग्रह हाच उपाय असून त्याच्या योगानें आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो व पुरुष सुखाचेंहि उल्लंघन करितो. यास्तव मनोनिग्रह केल्यानें जीव शोक करीत नाहीं व मनोनिग्रहाच्या मार्गाचा उपदेश करणारे जे कृपाळु संत, त्यांचा सहवास केला असतां तो केव्हांहि जीर्ण होत नाहीं, श्रीमन्महाभारतार्थ - ३ वनपर्व. अ. ३१३. यक्ष - कशाचा त्याग केल्याने मनुष्य प्रिय होतो ? कोणत्या वस्तूचा अहेर केल्यानें तो शोक करीत नाहीं ? कशाचा परित्याग केला असतां मनुष्य अर्थवान् व सुखी होतो ? मानादि चतुष्टयाचा त्याग हेच मनोनिग्रहाचें दृष्ट द्वार आहे. या आशयानें युधिष्ठिर म्हणतो - मान सोडल्यानें मनुष्य प्रिय होतो. क्रोध सोडून शोक करीत नाहीं. कामाचा त्याग करून अर्थवान् होतो व लोभाचा परिहार करून सुखी होतो. यक्ष - ब्राह्मण, नटनर्तक, भृत्य आणि राजे यांतील प्रत्येकाला कशासाठीं दान दिले जातें ? युधिष्ठिर - ब्राह्मणाला दिलेलें दान धर्मवृद्धीला कारण होतें, नट-नर्तकांना दिलेलें दान यश वाढवितें. भृत्यांना दिलेले दान त्यांचें पोषण करतें. पण राजाला केवल भीतीनें दान दिले जातें. या चारी प्रकारच्या दानांतील ब्राह्मणाला दिलेलें दान धर्मोपयोगी असल्यामुळे परंपरेनें मोक्षसाधनहि होतें. इतरांना दिलेलें दान तसें मोक्षोपकारक होत नाहीं. यक्ष - हा लोक कशानें औवृत आहे व तो कशानें प्रकाशित होत नाहीं ? पुरुष मित्रत्याग कां करितो ? त्याला स्वर्गप्राप्ति कां होत नाहीं ? युधिष्ठिर - जरा, मरण, शोक, मोह, इत्यादिकांचा आश्रय, असें जें स्थूलसूक्ष्म शरीरद्वयरूप अज्ञानकार्य, त्यानें हा चिद्रूप आत्मा आवृत झाला आहे. कल्पित सर्पानें जशी रज्जु अदृश्य होते, त्याप्रमाणे हा अनुभवरूप आत्माहि शरीररूप कल्पित उपाधीनें अदृश्य झाला आहे. यास्तव अज्ञानाच्या नाशासाठीं त्रयी धर्माची अत्यंत आवश्यकता आहे. यावर तूं कदाचित् म्हणशील कीं, सुपुतींत दोन्ही देहांचा अभाव झालेला असल्यामुळे त्याबरोबर अज्ञानाचा नाशहि झालाच आहे. मग आतां त्रयी धर्माचा काय उपयोग ! तर त्याचें उत्तर ऐक. १ दानबलानें मानादिकांना जिकून मनोनिग्रह करणाऱ्या पुरुषांचा आत्यंतिक नाश होईल. अकारादि-मात्रार्थरूप स्थूलादि उपाधींचा उत्तरोत्तर उपाधींत लय करणें एतद्रूप त्रयीधर्माची काय आवश्यकता आहे ? अशा आशयानें यक्षानें हा प्रश्न केला आहे. सुपुतींतहि मूल अज्ञानाने त्याला झांकून टाकिलें आहे, म्हणून तो अनुभवाला येत नाहीं. यास्तव त्रयी धर्मानें पूर्वोक्त प्रकारें तिन्ही देहांचा उत्त रोत्तर कारणांत अवश्य प्रविलाप करावा म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीररूप आहे, सूक्ष्म शरीर कारण शरीररूप आहे व कारण शरीर चिदात्मरूप आहे, असें उत्तरोत्तर चिंतन करावें. ज्ञान व विज्ञान यांचाच परस्पर विरोध आहे आणि संसार हैं अज्ञानाचें कार्य आहे, त्यामुळे नुस्त्या चित्तनिरोधानें त्याचा नाश होणार नाहीं. तर सर्पाचा बाध करून रजूला जाणल्यानेंच जसा समूल भयाचा नाश होतो, स्याप्रमाणें देहत्रयाचा बाध करून स्वरूपाचें ज्ञान झाल्यानेंच समूल संसाराचा नाश होतो. हे यक्षा, लोभामुळे पुरुष मित्रांचा त्याग करितो व ऐहिक विषयासक्तीमुळे स्वर्गाला जात नाहीं. यास्तव लोभ व संग यांचा त्याग करून ज्ञानच संपादन करावें. यक्ष - पुरुष, राष्ट्र, श्राद्ध, व यज्ञ हीं कशानें मृत होतात ? लोभ व संग यांचा त्याग न केल्यास कोणता दोप उद्भवतो, हे सांगण्याच्या आशयानें युधिष्ठिर म्हणाला- यक्षा, दरिद्र - लुब्धचित्त पुरुष मृत होय. कारण तो दानादि करण्यास असमर्थ असतो. ज्याप्रमाणें राजरहित राष्ट्र मृत असते, त्याप्रमाणे प्राणरूपी राजाचें संचारस्थान असलेले हें दरिद्राचें शरीर जिवंत असूनहि मृतच आहे. श्रोत्रियरहित श्राद्ध मृत असून दक्षिणारहित यज्ञहि मृत आहे. यक्ष - दिशा कोणती ? उदक कशाला म्हणतात ? अन्न कोणतें व विष काय आहे ? राजा युधिष्टिरा, आतां श्राद्धाचा काल कोणता तें सांग आणि तूं हें जल प्राशन कर व घेऊनहि जा. युधिष्ठिर - वेदप्रमाणनिष्ठ संत हेच उपदेष्टे आहेत. म्ह० आचार्यवचनानेंच ब्रह्म जाणावें. जल म्ह० पिंड ब्रह्माण्डात्मक कार्य व त्यावर अभिमान ठेवणारा चेतन व्यष्टि समष्टि जीव या जलशब्दावरून लक्षित होतो व आकाशअव्याकृत कारण, यावरून त्याचा अभिमानी ईश्वर लक्षित होतो. येथें जल व आकाश यांचा 'जलं आकाशं, ' असा एक विभक्त्यन्त प्रयोग केलेला १ याप्रमाणे लोभादिकांचा त्याग, दानादिकांचें अनुष्ठान, शमादिसंपत्ति व श्रवणादिक यांनी युक्त असलेल्या पुरुषाला ज्ञातव्य असलेले जें ब्रह्मात्मैक्य तेंच सांगण्यासाठीं यक्ष हा प्रश्न करीत आहे,
दबंग खान नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याचे चाहते त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृत्यांवर लक्ष ठेवून असतात, ज्याचे उदाहरण नुकतेच एका पार्टीदरम्यान पाहायला मिळाले, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, भाई जानच्या हातात अर्धा भरलेला ग्लास पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. असे घडले की अभिनेत्याने हातात अर्धा भरलेला ग्लास धरला होता, जो तो त्याच्या कारमधून बाहेर पडताना त्याच्या जीन्सच्या खिशात बसलेला दिसत होता. त्याचवेळी कोणीतरी त्याला हे करताना पकडले. मग काय सोशल मीडियावर रातोरात अभिनेता ट्रोल झाला. 3 सप्टेंबरला सलमान मुराद खेतानीच्या बर्थडे पार्टीला गेला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर आला आहे. त्याचवेळी एक चाहता म्हणाला, 'पँटच्या खिशात ग्लास. तसेच आणखी एका सोशल मीडिया यूजरने सांगितले की, ते जीन्सच्या खिशात पाण्याचा ग्लास कसा ठेवतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या कलाकारांच्या या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्क फ्रंटवर सलमान खान लवकरच 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू आणि राघव जुयाल यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय त्याचा (सलमान खान) 'टायगर 3' हा चित्रपटही लवकरच पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.
तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या टिएमटी एम्पॉलाईज युनियवर कोणचा कब्जा होणार याचे चित्र आता शनिवारी मध्यरात्रीच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजपाने आपली शक्ती पणाला लावली आहे. तर विद्यमान प्रगती पॅनलने देखील आपली सत्ता अबादीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ठाणे - तब्बल १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टिएमटी एम्पलॉईज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्यात आरोप प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. मागील २५ वर्षात परिवहनला चांगले दिवस दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. तर शिवसेनेने परिवहनचा बट्टाबोळ केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. परंतु तिसरीकडे राष्टÑवादीच्या पॅनलने मात्र आपला छुपा प्रचार कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता परिवहनवर कोणाचा झेंडा फडकणार हे आता शनिवारी रात्रीच निश्चित होणार आहे. या निवडणुकीत सात पदाधिकारी आणि ३० सदस्य पदासाठी तब्बल ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरु झाली. त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टिएमटी एम्पलॉईज युनियनची स्थापना करण्यात आली. ही एक मान्यता प्राप्त युनियन असून या युनियनवर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवील पॅनलने कब्जा केला होता. मधला काळ वगळता थेट १२ वर्षांनतर आता युनियनची निवडणुक लागली आहे. या निवडणुकीत सुरवातीला शिवसेनेच्या धर्मवीर पॅनल विरुध्द राष्टÑवादीच्या शरद राव प्रणीत प्रगती पॅनल असा सामना रंगणार अशी चिन्हे होती. परंतु अचानकपणे भाजपाच्या विकास पॅनलने या निवडणुकीत उडी घेतली आणि मतांचे विभाजन होण्यास सुरवात झाली. विकास पॅनलने विकासाचा मुद्दा घेऊन शिवसेनेकडून झालेल्या चुकांचा पाडाच कामगारांना पुढे वाचण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे, ज्या ६१३ कामगारांना कायम करण्याचे आश्वासन शिवसेना मागील कित्येक वर्षापासून देत होती. त्याबाबतचा निर्णय भाजपाने एका फटक्यात शेवटच्या टप्यात आणून ठेवला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून देखील भाजपाचे आता केंद्राचे दाखले दिले जाऊ लागले असून त्यांच्याकडून केवळ दिशाभुलच केली जात असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून स्वतः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारात घौडदोड घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या वतीने आमदार संजय केळकर, शिवाजी पाटील, नारायण पवार, भरत चव्हाण, कृष्णा पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. दरम्यान आता निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सांयकाळी आरोप प्रत्यारोपांच्या झडी उडवित संपला आहे. शनिवारी सकाळी सात वाजता खºया अर्थाने मतदानाला सुरवात होणार असून येथील एनकेटी महाविद्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात ते सांयकाळी पाचवाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असून यात १८८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच वाजता निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर सांयकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरवात होऊन रात्री १२ वाजेपर्यंत निकाल हाती येणार आहे.
तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच! काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अजय देवगण आणि काजोल बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ते दोघे त्यांच्या कामात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते दोघे त्यांच्या कुटुंबियांसाठी नेहमीच वेळ काढतात. काही दिवसांपूर्वी ते दोघे आपल्या मुलांना घेऊन फिरायला गेले आहेत. तानाजीमध्ये दोघे एकत्र दिसणार असल्याची आधी चर्चा होती. मात्र आजतकच्या रिपोर्टनुसार दोघे कॉमेडी सिनेमात एकत्र झळकणार आहेत. अजय आणि काजोल स्क्रिप्ट फायनल होण्याची वाट बघत आहेत. याबाबत दोघांकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. सिनेमाची शूटिंग 2020 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती आहे. अजय देवगणचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी दोघे भुजला गेले होते. तिथले काही फोटो काजोलने सोशल मीडियावर शेअर केले होते. अजय देवगणचा दे दे प्यार दे हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या अजय आणि काजोल त्यांच्या तानाजीः द अन्संग हिरो या चित्रपटावर काम करत असून त्यांच्यासोबतच सैफ अली खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर काजोल आणि अजय या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे. या निवडणुकीसाठीच्या मतदानाचा हक्क संताेष परब यांनी बजावला. यावेळी माध्यमांशी बाेलताना संताेष परब म्हणाले ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचे नाव आत्ता येथे सांगू शकत नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान आज दुपारी आमदार नितेश राणे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर निर्णय हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रातील नजरा काेकणाकडे लागल्या आहेत. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- एम. आय. एम. पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्याकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा होऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात पदाधिकार्यांनी प्रयत्न करण्याच्या ठरविण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सरफराज जहागिरदार यांनी अहमदनगर शहराची नूतन पदाधिकार्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये शहर कार्याध्यक्षपदी मतीन नाजमोहंमद शेख, शहर महासचिव शहेबाज इकबाल शेख (बॉक्सर), शहर युवा अध्यक्षपदी आमीर नासीर खान, भिंगार शहराध्यक्षपदी वसीम सुलेमान खान, अहमदनगर शहर सचिवपदी शेख मुस्ताफा समद, मोहम्मद उफेर राजू शेख, नाफेउद्दीन हाफिजोद्दीन सय्यद, सहसचिवपदी सनाउल्लाह इक्राम खान (तांबटकर), शेख रईस नुरमोहम्मद, असद आदम शेख, हाफिज उमेर आदम शेख, शेख शाहिद मुनीर आदिंची निवड करुन पत्र देण्यात आले. याप्रसंगी सरफराज जहागिरदार म्हणाले, एमआयएम पक्षाचे प्रमुख बॅ. असुद्ुद्दीन ओवेसी यांच्या विचारांचा वारसा तसेच पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील व महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु आहे. पक्षाच्यावतीने सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. नूतन पदाधिकार्यांनीही समाजातील प्रश्नांना प्राधान्य देऊन पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.
पुणे - स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत फायदेशीर असलेल्या सीएनजी गॅसचे दर वाढले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसमध्ये प्रती किलो 1 रुपये 55 पैशांची वाढ करण्यात आली. नव्या दरानूसार 55 रुपये 50 पैसे प्रति किलो दराने सीएनजी खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) गॅसच्या किंमतीमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले. देशात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनदरवाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. यातच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून रविवारपासून शहरातील सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरातवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजवर शहर हद्दीत सीएनजी गॅस 53 रुपये 95 पैसे प्रति किलो उपलब्ध करून देण्यात येत होता. यात किलोमागे 1 रुपया 55 पैशांची वाढ करण्यात आहे. सद्यस्थितीत शहरात सीएनजीवर चालणारी एकूण एक लाख 80 हजारांपेक्षा अधिक वाहने आहेत. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे.
'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना' परंडा, भूम आणि वाशी तालुक्यांतील ७८ गावांमध्ये ८५ किलोमीटर लांब जलसंधारणाची कामे करण्यात आली. शासकीय अनुदानाचा आधार न घेता बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती नावाने तयार केलेल्या नवीन पॅटर्नचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी परंडा तालुक्यातील भांडगाव येथे पार पडले. या शिवारात पाणी साचेल तेव्हा दुष्काळाने होरपळत असलेल्या जनतेच्या डोळय़ांत आनंदाश्रू तरळतील, असा आशावाद ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. सावंत प्रतिष्ठानच्या वतीने नदी खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची ७८ कामे पूर्ण करण्यात आली. या कामाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे व रवींद्र गायकवाड, लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की भांडगाव परिसरातील शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या कामामुळे मोठा फायदा होणार आहे. शहरातील लोकांना दुष्काळ काय असतो, हे माहिती नसते. या भागात फिरल्यानंतर दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती आम्ही घरी बसून टीव्हीवर पाहतो. दुष्काळात या भागातील लोकांना, जनावरांना पिण्यास पाणी नाही. पाण्यासाठी कोसोदूर भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. लोकांना मदत करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक तानाजी सावंत यांनी, भूम, परंडा व वाशी तालुक्यांत केलेल्या कामांमुळे या भागात ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. सीना-कोळेगाव प्रकल्पातील गाळउपसा केला जाणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी सरकारने डिझेल द्यावे, अशी मागणी सावंत यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केली. या मागणीच्या पूर्ततेसाठी डॉ. सावंत यांनी लगेच अनुमती दिली.
पालघर, 24 मार्चः मागील तीन आठवड्यापासून पालघर येथून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा (missing engineering student) अखेर मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुण जिवंत असेल, या आशेनं गेल्या जवळपास 21 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांसोबत नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते. अखेर तो जिवंत असण्याची शेवटची आशाही मालवली आहे. एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याने (Dead body found into well) परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चहुबाजूंनी तपास केला जात आहे. चेतन खंदारे असं मृत आढळलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत चेतन हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून तो पालघरमधील सेंट जॉन्स कॉलेजमधील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. 3 मार्च रोजी चेतन अचानक बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस चेतनचा शोध घेत होते. मित्र परिवार, नातेवाईक, ओळखीचे इतर यांच्याकडे चौकशी करूनही चेतनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तीन आठवड्यानंतर पालघर -बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ त्याचा मृतदेह आढळला. येथील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी मृतदेह पाण्यातून काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हेही वाचा- शाळेत घुसून नराधमाचा 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं! मृत चेतनच्या नातेवाईकांनी मात्र त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पण मृत चेतनसोबत नेमकं काय घडलं? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्यानं आत्महत्या केली, की त्याच्यासोबत घातपात घडला की हा एक अपघात आहे. अशा चहुबाजूंनी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, त्यानुसार चौकशीची दिशा ठरेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली. मुंबई - हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागलीय. मंत्रिपद न मिळाल्यामुळे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट ते बच्चू कडूपर्यंत अनेक जण नाराज आहेत. या विस्तारात त्यांना संधी मिळते का, हे पाहावे लागेल. आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली. राज्यातल्या महामंडळाचे वाटपही रखडले आहे. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांची महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटासोबत येणारे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अनेक जण नाराजी दाखवत आहेत. संजय शिरसाटांनी या नाराजीतून ट्विट करून ते नंतर डिलिट केले. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
शुक्रवार 07 डिसेंबर 2018\nठिक्कर आणि ठकीचा संसार\nलहानपणी माझी एक बालमैत्रीण होती . पुण्याला माझी मावशी सदाशिवपेठेत ज्या वाडयात राहायची तिथे ती शेजारी होती. नाव विसरलो म्हणून आपण तिला ठकी म्हणूया. ठकी होती चिमुरडी चुणचुणीत पुणेरी . दोन चप्प वेण्या , परकर पोलका, ७ वर्षांची , हुजूरपागा किंवा नु म वि अशा हुशार मुलींच्या शाळेत जाणारी. ७ व्या वर्षी महर्षी कर्व्यांचं ज्ञान दान व समाज प्रबोधन हे मह्तकार्य हाती घेतलेली .( थोडक्यात सर्वाना अक्कल शिकवणारी ). पुण्याहून सुट्टीतून परत येताना माझा IQ दहा वीस टक्क्यांनी वाढवणारी , वेळ पडली तर कचाकचा भांडण करणारी. ठकी .\nवाड्यात बाकीची मुलं मोठी असल्यामुळे मला बऱ्याचदा ठकीशीच खेळावं लागे . ठकीचा आवडता खेळ होता ठिक्कर. अमेरिकेत त्याला हॉपस्कॉच म्हणतात म्हणे.वाड्यातल्या रिकाम्या लाद्यांवर खडूने ठकी चौकोन काढत असे . सगळे चौकोन, त्यांना ती घरं म्हणत असे , काढून झाले कि हातात एक चपट ठिक्कर घेऊन मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात ठकी मला खेळ शिकवत असे .\nआज या गोष्टीला ४७ वर्ष झाली . पुढच्या आयुष्यात अनेक बायकांचे संसार बघितले तेव्हा ठकीच्या या ठिक्कर खेळाची आठवण येत असे .ठकीने प्रथम मला खेळ शिकवला , माझ्याकडून सगळं करून घेतलं तो दिवस आठवतो . तिने चौकोन काढून त्यात आकडे भरले मी त्या घराना नाव देतो म्हणजे स्त्री आणि तिचा संसार म्हणजे काय ते कळेल .\nठकीने पहिला चौकोन काढला. आपण त्याला माहेर म्हणू. ती म्हणाली हे पहिलं घर . इथे काय तो श्वास घे , इथून पुढे श्वास घ्यायला मिळणार नाही . या घरात दोन पावलांवर उभं राहता येतं. याच्या पुढे लंगडी किंवा एका पायाची कसरत . आता हातात ही ठिक्कर घे. ठिक्कर म्हणजे मुलीचं वय . जस जस वय वाढेल तशी ही ठिक्कर पुढच्या घरात टाकायची आणि ती जबाब दारी घ्यायची . आता पुढे दोन घरं , शिक्षण आणि तारुण्य , दोन्ही घरात मज्जा . सुरवातीला तुझ्यासाठी सोप्पी घरं ठेवलीयेत . बरं का ? याच्यापुढचं घर लग्न . इथे लक्ष देऊन पाऊल टाक. चुकलं तर बाद होशील . ( ठकी मला मध्येच घाबरवायची )\nआता याच्या पुढे पुन्हा दोन घरं , नवरा आणि सासर , दोन्ही घरात बरोब्बर पाऊल पडलं पाहिजे . थोडी ओढाताण होईल . तोल सांभाळ . ( होय ग बाई !)\nआता एकदम उडी मारून एकाच घरात यायचं , ते घर म्हणजे बाळंतपण. थोडा श्वास घे पण थोडा वेळच बरं का ? पुढच्या तयारीला लागायचं.\nआता पुन्हा दोन घरं मुलं आणि नवरा . हे बघ प्रत्येक घराला चौकट असते त्याबाहेर पाऊल जाता कामा नये .( ठकी , काही चौकोन नुसतेच फुल्या मारून ठेवलेत , काय आहे ते ? ) ठकी म्हणाली, तिथे कधीच जायचं नाही, त्या दिशेला पाऊलही पडणार नाही हे बघ, मोठेपणी तुला काय ते कळेलच.\nबराच प्रवास झालाय तुझा , पण अजून संपलेलं नाहीये . पुढे बघ दोन घरं . एकात मुलांचं करियर ,लग्न , संसार दुसरीत नवरा , सासर .\nठकी त्या खेळाची डिफिकल्टी लेव्हल वाढवत न्यायची . कधी माझे डोळे बंद करून , तळहातावर दगड ठेवून तर कधी चक्क कपाळावर दुसरी ठिक्कर ठेवून .\nसंसारात पण असच . कधी नवर्याची अचानक परगावी बदली झाली , कधी सासऱयांचा बायपास , कधी फ्लॅटचे पैसे बिल्डरने बुडवले, कधी माहेरी दादा वहिनीची पराकोटीला गेलेली भांडणं. मी म्हणायचो , ठकी, किती दमवतेस . जरा पहिल्या घरात जाऊन पुन्हा सुरुवात करू का ? ठकी म्हणायची, एकदा पाऊल बाहेर टाकलस ना.? आता पुन्हा माहेरी नाही जायचं . जिथे असशील तिथूनच खेळ सुरु ठेवायचा . इतक्यात , ठकी SSS अशी हाक ऐकू यायची. आईची . ठकी\nमदत करायला आत गेली कि मी धावत पहिल्या घरी माहेरी जायचो , मैत्रिणींना भेटून यायचो . फुफ्फुसात फ्रेश हवा भरून पुन्हा आहे त्याच घरात . ठकी यायच्या आत .मी म्हणायचो , ठकी खेळ इतका कठीण का करून ठेवतेस ? ती गूढ हसत म्हणायची , हाच तर खेळ आहे , हीच तर गम्मत आहे , हे स्त्रीचं आयुष्य आहे तुला समजायचं नाही .\nआज वाटतं , एका हातात परकर धरून , लंगडी घालत , टणाटण उड्या मारत , सगळी घरं काबीज करणारी ठकी आयुष्यात बरंच काही शिकवून गेली . सुदैवाने माझ्यावर ही वेळ आली नाही . मी आपला नवर्यांचा आवडता खेळ आयुष्यभर खेळत राहिलो. कुठला माहितेय ? तळ्यात मळ्यात !!
ओप्पो आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेज चे न्यू इयर एडिशन्स शांघाई मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च करण्यासाठी तयार आहे. Oppo ने घोषणा केली आहे की 17 डिसेंबरला कंपनी आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेजचे न्यू इयर एडिशन्स लॉन्च करेल. ओप्पोची R-सीरीज आपल्या रेड कलर साठी ओळखली जाते आणि लॉन्चच्या पोस्टर वरून संकेत मिळाले आहेत की OPPO R17 आणि OPPO R17 Pro च्या बाबतीती पण असेच काहीसे होणार आहे. पण, डिवाइसेजचे स्पेक्स रेगुलर वेरीएंट सारखेच असतील. डिवाइस शांघाई मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये लॉन्च केले जातील. OPPO R17 बद्दल बोलायचे तर हा डिवाइस 6.4-इंचाच्या एका गोरिला ग्लास 6 ने सुरक्षित डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. तसेच यात तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे. चांगली बाब अशी की स्मार्टफोन मध्ये AI क्षमता आहे. तसेच यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह स्ट्रीमर ब्लू तसेच नीयन पर्पल रंगांत उपलब्ध केला गेला आहे. यासाठी प्री-आर्डर ची प्रक्रिया सुरु केली गेली होती, आणि याचा सेल 18 ऑगस्ट पासून करण्यात आला होता. फोन के कुछ इतर स्पेक्स फाटा यात तुम्हाला ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 प्रोसेसर मिळणार आहे, तसेच यात तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा एक कॅमेरा कॉम्बो असेल. जो LED फ्लश सह फोन मध्ये दिसत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळणार आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3,500mAh क्षमता असेलली बॅटरी पण मिळत आहे. R17 Pro च्या इतर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा 6.4 इंचाच्या फुल HD+ AMOLED डिस्प्ले सह येतो ज्यात वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.5% आहे आणि याला कोर्निंगच्या लेटेस्ट गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ड्यूल सिम सह Oppo R17 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित कलरओएस 5.2 वर चालतो. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्सना या डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज मिळत आहे. कॅमेरा सेट-अप पाहता, याच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. एक सेंसर 12 मेगापिक्सलचा असेल, ज्याचा अर्पचर/1.5-2.4 आहे. दुसरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे जो अर्पचर एफ/2.6 सह येतो तर तिसरा सेंसर TOF 3D स्टीरियो कॅमेरा आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर का 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेट-अप ऑप्टिकल इमेज स्टेबलाइज़ेशन, ड्यूल पिक्सल पीडीएएफ आणि अल्ट्रा नाइट मोड सह येतो. Oppo R17 Pro 3700 एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे जी सुपर VOOC टेक्नोलॉजी सह येईल. Oppo R17 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिविटी फीचर मध्ये युजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस/ ए-जीपीएस आणि एनएफसी सपोर्ट मिळतील. स्मार्टफोनचे डाइमेंशन 157.6×74.6×7.9 मिलीमीटर आणि वजन 183 ग्राम आहे.
'KPMG' सल्लागार कंपनीला महापालिका अजून किती दिवस पोसणार? कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपले; आमदार महेश लांडगे यांनी माणुसकीचे नाते जपले! सुरक्षा साधणे मिळेनात : स्वस्त धान्य दुकानदार १ सप्टेंबरपासून संपावर! 'महाईन्यूज'चा गणपतीः उपमहापाैर तुषार हिंगे यांचा संकल्प; म्हणाले भविष्यात 'हीच' संकल्पना शहरात राबविणार! सणासुदीच्या तोंडावर कडधान्य, डाळींचे भाव कडाडले ! तळेगाव नगरपरिषदेतील ठेकेदारांची बीले ८ महिन्यांपासून रखडली!
BBC News, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का होतोय? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पक्षपातीपणा करतात का? भरत गोगावले की सुनील प्रभू, कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार? पुढे काय होणार? शरद पवारांचं बंड 1999 च्या निवडणुकांनंतर लगेच का थंड झालं होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत? विधानसभेत बहुमत चाचणी नेमकी कशी घेतली जाते?
तिवरे-वरगांव, माशेल, भोम-अडकोण, बेतकी-खांडोळा परिसरातील गणपती चित्रशाळा बंद पडण्याचा सपाटा सुरू असतानाही तिवरे येथील एकमेव चित्रशाळा या परिसरात तग धरून आजपर्यंत कार्यरत आहे. 92 वर्षीच्या उतारवयातही त्याच उमेदीने रामराय गावकर आपल्या चित्रशाळेत गणपती मुर्ती साकारीत आहे. त्यांनी सद्यपरिस्थितीत सुमारे 300 मुर्ती बनविल्या आहे. सुरवातीला 20 मुर्तीपासून सुरू केलेली चित्रशाळा गावकर कुटूंबियांनी कोरोना काळातही अखंडीतपणे सुरू ठेवलेली आहे. गेल्या नव्वद वर्षाच्या काळात आपली कला जोपासताना आपल्या मुर्ती बनविण्याच्या माध्यमातून अनेक गणेशभक्तांनाही त्यांनी जोडलेले आहे. ज्येष्ठ मुर्तीकारांशी आमच्या वार्ताहरानी भेट घेतली असता ते गणपतीच्या मुर्तीवर ब्रशने अखेरचा हात फिरवण्यात मग्न होते. सदर चित्रशाळेची 125 वर्षाची परंपरा आहे. त्यावेळी इतर अनेक चित्रशाळा कार्यरत असल्याने सर्व चित्रशाळामध्ये मुर्ती बनविल्या जात होत्या. कालांतराने आसापासच्या चित्रशाळा बंद पडू लागल्या, त्याही परिस्थितीत गावकर यांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आपल्या पुर्वजाकडून मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात. गेल्या 60 वर्षापासून स्वतः चित्रशाळा चालवित असून सुरवातीच्या काळात बनविण्यात येत असलेल्या 20 मुर्तीही आपल्याकडूनच बनवित असल्याचे ते सांगतात. गणेशमुर्ती चिकणमातीची केल्या जात असून पुर्वी ही चिकणमाती खांडोळय़ाहून आणली जायची, परंतू सदर मातीत दगड जास्त मिळू लागल्याने दगड व माती वेगळे करण्यात वेळ जायचा. त्याकाळी वाहनांची सोय नव्हती, बैलगाडीवरून माती आणली जायची. सद्या माती मांद्रेहून आणली जात आहे. माती बिजवण्यापासून ते गोळया बनविणे, त्यानंतर गणपतीची मुर्ती बनविण्यापासून रंगरंगोटी कामे सुरू होत असतात. काही मुर्ती साच्यातून केल्या जातात. तर काही मुर्ती पुर्णरित्या हातकामाने केल्या जातात. गणपतीची 'रेखणी' म्हणजे डोळे व इतर बारीक काम मुळ स्वतः करावी लागतात, त्यात इतर बंधुचे सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणतात. आपला मोठा भाऊ विष्णू गावकर (बाप्पा) यांनी माझी गणपती बनविण्याची विद्या पदरात पाडून घेतली असून सध्या तो गणपतीच्या मुर्ती साकारण्यापासून ते रेखणीपर्यंत सर्व कामे स्वतः करीत आहे. माझ्या मुलांनीही या कामात पुर्णपणे झोकून घेतले आहे. उतरत्या वयातही आपल्याकडून जी सेवा शक्य आहे ती आपण देतो. शाळेत जवळजवळ 300 गणेशमुर्ती तयार करीत आहे. वर्षोनुवर्ष मागणी असते, परंतू माणसांचा तुटवडा भासतो व सद्या कोरोनाच्या काळात अनेक अडचणी डोके वर काढीत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण जागरूकता वाढत असल्याने हल्ली बाजारात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपती मुर्ती विक्रीस उपलब्ध असूनही परंतू लोकांचा आग्रह शाडू चिकणमातीच्या गणेशमुर्तीना पसंती दिली जात आहेत. चित्रशाळेत तिसऱया पिढीतील विष्णू गावकर यांनी गणपती साकारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना आता घरातील अन्य लोक सहकार्य करीत आहे. चौथ्या पिढीतील नातू या कलेत निपूण असून वडिलांबरोबर तोही मुर्ती बनविण्याचा हातभार लावत आहे. त्याच्या वडीलाप्रमाणे तो रेखणी व रंग भरण्याचे काम अत्यंत सुरेखरित्या करतो.मुर्ती करण्याची आवड असल्याने त्यांना बारावीनंतर फाईन आर्टस शाखेत प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. वडीलोपार्जित मिळालेली कलेची देणगी हळूहळू आपल्या इतर कुटूंबातील सदस्यांनाही ओढ निर्माण होत आहे. कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता चित्रशाळेत भेट देणाऱयासाठी मुर्ती सामाजिक अंतर सोडून ठेवल्या असून लोकांसाठी तीन दिवस अगोदर गणपती नेण्याच्या व्यवस्थेनुसार तसा निरोपही देण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या अभियंत्यावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश अशोकराव महाजन (वय २६) असे या अभियंत्याचे नाव असून, तो शासकीय सेवेत कार्यरत आहे. या प्रकरणातील २६वर्षीय तरुणी वर्धा जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी आहे. त्यांची एकमेकांशी ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी हितेश नागपुरात आला. काही दिवसांतच तो शासकीय सेवेत रुजू झाला. याच काळात ही तरुणीसुद्धा नागपुरात आली. ती परिचारिका आहे. या दोघांची पूर्वीची ओळख होतीच. त्याचे रूपांतर पुढे मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या आणाभाका झाल्या. शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून तरुणी गर्भवती राहिली. तेव्हा, 'माझ्या बहिणीचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू', असे आश्वासन हितेशने दिले. या आश्वासनाच्या भरवशावर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप या तरुणीने केला आहे. पुढे त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. तरुणीने पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीच्या आधारावर हितेशवर भादंविच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडाधिकारी आयोजित भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कांदिवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत एम/पूर्व १ व २ विभागाने चमकदार कामगिरी केली. मानखुर्द विभागाने १० सुवर्णासह ७ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण २२ पदके मिळवली. १४ वर्षाखालील प्राथमिक विभागातून मानखुर्द मनपा मराठी शाळा क्र. १ च्या अक्षय नायकवडी (२२ किलो), प्रियांका साठे (२८ किलो), निशा धनगर (३७ किलो) यांनी सुवर्णपदक, कार्तिक सत्रे (२८ किलो), वैष्णवी पाटील (३७ किलो) यांनी रौप्य तसेच संस्कार जाधव (२४ किलो), समीर शिर्के (३४ किलो), विलास लांडगे (३२ किलो) व संजना सोडुलकर (२८ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले. शिवाजी नगर मनपा हिंदी क्र. १ शाळेच्या फरहान खान (५७ किलो) व अरबाज अन्सारी (४७ किलो) यांनी सुवर्ण तर जैद अहमद खान (४१ कि. ) व १७ वर्षाखालील गटात समीर शमशाद खान (३७ किलो) यांनी रौप्यपदके पटकावली. तुर्भे एमपीएस शाळेच्या मयांक चौधरी (२४ किलो) व १७ वर्षाखालील मुथ्थु कोनार (७५ किलो) यांनी रौप्यपदके मिळवली. गोवंडी स्टेशन मराठी क्र. २ च्या सुयश काळेने कांस्यपदक मिळविले. १७ वर्षाखालील तुर्भे माध्यमिक मराठी शाळेच्या प्रसाद कदम (४५ किलो), विघ्नेश कदम (४० किलो), सोनू सावळे (३२ किलो), मारुती वीरकर (४१ किलो) व जीवा सेल्वाकुमार (३७ किलो) यांनी सुवर्ण तर प्रियांका खंडेराव (४० किलो) यांनी रौप्यपदक पटकावले. कनिष्ठ पर्यवेक्षक धैर्यधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेखा सागावकर, मानसी पांडे, अनुजा ठाकूर, नारायण जाधव तसेच मार्गदर्शक नितीन भगत, सागर कोकरे, योगेश सावंत, मो. अशरफ शॉन यांचे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष, यंदाची दिवाळी तरी गोड होणार का ? चाफळ - राज्यात या वर्षीही अतिवृष्टीने थैमान घातले होते. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच बळी ठरणार बळीराजा याही वेळी बरबाद झाला आहे. शासनाने अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतीचे, घरांचे पंचनामे करून अर्जही भरून घेतले आहेत. आता शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणजे बळीराजाला थोडासातरी दिलासा मिळेल आणि यावर्षीची दिवाळी तरी गोड होइल अशी शेतकऱ्यांच्या आशा आहे. त्यामुळे शासनाच्या भूमीकेकडे लक्ष लागून राहीले आहे. गत साली प्रत्येक गावातील चार-दोन शेतकरी वगळता भरपाईची एक दमडीही कोणा नूकसानग्रस्ताच्या नावावर जमा झालेली नाही. दिवाळीच्या तोंडावर तरी भरपाई मिळेल आणि आपल्या मूलाबाळांना गोडधोड करता येईल, कपडालत्ता घेता येईल या आशेने बसलेल्या बळीराजाची पूरती निराशाच झाली होती. यावर्षी पंचनामे होऊन तीन महीन्याचा अवधी झालेला आहे. अजूनही शासनाकडून मदती संदर्भात कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामूळे आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर तरी शासनाने मदत द्यावी व बळीराजांसह त्याची मुलबाळ यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी बळीराजांकडून होत आहे. फक्त यावर्षी शासनाने पंचनामा केलेल्या व खरोखरच नूकसान झालेल्या प्रत्येक नूकसानग्रस्त बळीराजाला मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करून बसला आहे. आधिच करोनाने डबघाईला आलेला शेतकरी यंदा पावसाळ्यात ही पुरता हतबल झाला. अनेक पावसाळे पहीलेल्या बळीराजासाठी यावर्षीचा पावसाळा माञ आगळावेगळाच ठरला. ज्या शेती व जनावरांवर आपल्या कूटूबांचा उदरनिर्वाह चालतो त्या शेती व जनावरांनाच पावसाने हिरावून नेले. तीन ते चार दिवसच झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड प्रमाणात नूकसान झाले. आपल्या शेताची हद्द नेमकी कूठपर्यंत आहे हेही ओळखण्यापलीकडे शेती वाहून गेली. काही ठिकाणी जनावरे वाहून गेली तर काही ठिकाणी राहते घरही पावसाने भूईसपाट केले. एक ना अनेक संकटे बळीराजावर कोसळत असताना काही दात्यांनी तात्पूरती जगण्यासाठी मदतीच्या रूपाने ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण तोही तोकडाच होता. खरी मदत तर शासनांकडून अपेक्षीत असताना शासनाने माञ तीन महीने उलटूनही अजून पर्यंत दमडीचीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. त्यामूळे शासनाने यावेळी तातडीने निर्णय घेऊन दिवाळीपूर्वीच मदत करावी. मागीव वर्षाचा अनुभव पाहता आपला पंचनामा तर केला आहे. गत वर्षी सारखं आपलं नाव मदतीच्या यादीतून गायब तर होणार नाही ना. या विवेचंनेत शेतकरी आप आपसात चर्चा करताना दिसत आहे. त्यामूळे शासनाने यावर्षी पंचनामा केलेल्या नूकसानग्रस्त प्रत्येक बळीराजाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आपण घाबरत आहात? देवाच्या अभिवचनांपासून धैर्य धरा. भिती तुटते आणि तुटू शकते, विशेषतः शोकांतिका, अनिश्चितता आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर. जेव्हा आपण भयभीत होतो तेव्हा एखाद्याच्या मनात एक "काय असेल तर? काळजी घेतो, आणि आपली कल्पनाशक्ती अधिक चांगले आहे, आपल्याला पॅनीककडे पाठविण्याबद्दल परंतु, देवाने मुलाचे जीवन जगणे ही काहीच योग्य नाही. जेव्हा भीती येईल तेव्हा ख्रिश्चनांनी लक्षात ठेवण्यासाठी तीन गोष्टी आहेत. लक्षात ठेवणे ही दुसरी गोष्ट आहे. येशू ठाऊक आहे की देव नियंत्रणात आहे . त्याला कशाचीही भीती वाटत नाही त्यापेक्षा विश्वाचा क्रमाक्रम अधिक सामर्थ्यवान आहे हे त्याला ठाऊक आहे. त्याला माहीत आहे की देव विविध प्रकारे मदत करतो, ज्यामध्ये सर्वात वाईट घडामोडी घडल्यास आपल्याला मदत करणे जरी तुमची भीती जागृत झाली असली तरी देव तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. तिसरा, लक्षात ठेवा देव फार दूर नाही. तो आपल्या आत पवित्र आत्म्याच्या द्वारे राहतो. तो आपल्या भीतीमुळे त्याच्यावर विश्वास ठेवून , त्याच्या शांततेत आणि संरक्षणार्थ विश्र्वास इच्छिते. आतापर्यंत तो तुमचा पाठलाग करत आहे. आणि तो तुमच्याबरोबर राहील. दाविदाबद्दल विचार करा, त्याने गल्याथ या राक्षसला तोंड द्यावे लागले म्हणून पलिश्ती लोकांशी लढले आणि शौल राजाचा खून झाला नाही. डेव्हिड प्रथम कशाबद्दल भय आहे हे आधीच माहित होते. जरी त्याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आले असले, तरी त्याला सिंहासनापूर्वीच्या कित्येक वर्षांपासून आपल्या जीवनासाठी पळून जावे लागले. दावीदाने त्या वेळेस काय लिहिले ते ऐका. "मी जरी थडग्यासारख्या भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. " ( स्तोत्र 23: 4 , एनएलटी ) प्रेषित पौलाने आपल्या धैर्यवान मिशनरी प्रवासावर भीती ओढवून घेणे आवश्यक होते. त्याला केवळ सतत छळाला तोंड द्यावे लागले नाही , तर त्याला आजारपण, लुटारु आणि जहाजे डळमळीत सहन करावे लागले. चिंता करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचे त्याने कशाप्रकारे पालन केले? त्याला कळले की देव आपल्याला सोडून देण्याकरिता फक्त आपले रक्षण करीत नाही. त्याने जन्म-पुन्हा विश्वासू देव देत असलेल्या भेटींवर केंद्रित. पौलाने त्या तरुण मिशनर्या, तीमथ्यला जे म्हटले त्याकडे लक्ष द्याः "कारण देव आम्हाला भीती आणि थरकाप उडविणारा नाही, तर शक्ती, प्रेम आणि स्वतः ची शिस्त. " (2 तीमथ्य 1: 7, एनएलटी) सरतेशेवटी, स्वतः येशूचे हे शब्द ध्यानात घ्या. कारण तो पुत्र देवाचा पुत्र आहे . तो जे सांगतो ते खरे आहे आणि आपण त्यावर आपले जीवन जगू शकताः "शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो, कारण जगाचा धिक्कार असो, मी तुम्हांला सांगत आहे की, तुमची अंतः करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. (योहान 14:27, एनएलटी) या बायबलमधील वचनांपासून धैर्य धरा आणि भयाने वागण्याकरता प्रार्थना करा. प्रिय भगवान, माझ्या भीतीमुळे माझे पाय भस्म झाले आहेत. त्यांनी मला तुरुंगात टाकले आहे. मी तुझ्याकडे मदतीची याचना करतो तू मला साहाय्य केलेस. माझ्या भीतीमुळे मी जगलो नाही. हे बायबलमधील वचने मला तुमची उपस्थिती दाखवतात तू माझ्या सोबत आहे. तू माझे संकट माझ्यापासून दूर ठेवतोस. कृपया, प्रिय लोक, या भितींना विश्वासासह बदलण्यासाठी आपले प्रेम आणि शक्ती द्या. तुमचे परिपूर्ण प्रेम माझे भय नष्ट करते. मी तुम्हाला फक्त आपण देऊ शकता की शांती देणे सर्वांत आश्वासने साठी धन्यवाद आता मी ज्या क्षणी तुला त्रास देत आहे त्याबद्दल तुमची समजूत घेणारी तुमची शांती आता प्राप्त झाली आहे. कारण तू माझ्याबरोबर आहेस, मला भयभीत राहण्याची गरज नाही. परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा मार्ग सांगशील. मला माझे शत्रु आहेत. माझ्या भीतीपोटी गुलाम म्हणून मी जगण्याची गरज नाही. धन्यवाद, प्रिय येशू, मला भीतीपासून मुक्त करण्यासाठी. माझ्या जीवनाची ताकद असणं, आभार, पित्या देवा! परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मी कोणाला घाबरू? परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. मला कोणाची भीती वाटते? (एनकेजेव्ही) जेव्हा मी घाबरतो तेव्हा तुझ्यावर मी विश्वास ठेवतो. माझा देवावर विश्वास आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवणे शक्य आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार? (एनआयव्ही) घाबरू नकोस. तुझी निराशा होणार नाही. लोक तुझी निंदा करणार नाहीत. तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही. तुम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. का? कारण तुम्ही दुर्बल आहात. पण तरीही तू तुझे कुटुंब तुला परत दे. (एनकेजेव्ही) पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. परंतु आत्मा स्वतः पवित्र आत्म्याने प्राप्त झाला आहे. (केजेव्ही)
मुंबई : राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ'चं प्रात्यक्षित दाखवलं. यावेळी त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आपल्या भूमिकेचे तीन व्हिडिओ दाखवले. यावरुन त्यांनी राज्य सरकारला सवाल विचारले. मनसेच्या पाडवा मेळाव्यातील भूमिकेवरुन राज ठाकरेंवर टीका झाल्यानंतर त्यांनी या टिकेला ठाण्यातील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Uttar Sabha in Thane Raj Thackeray showed that three videos) सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी लावले. यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018 आणि 23 जानेवारी 2020 मध्ये त्यांनी केलेल्या भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली. भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळं भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता भुजबळ होते, असंही ते म्हणाले.
विशाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर ही लढत शेवटच्या चेंडूआधीच जिंकायला हवी होती, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले. व� ��शाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर ही लढत शेवटच्या चेंडूआधीच जिंकायला हवी होती, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले. सनरायजर्सने दिलेल्या १२८ धावांचा पाठलाग करताना रॉयल्सने अजिंक्य रहाणे (६२) याच्या धीरोदात्त खेळीच्या बळावर २0 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर १३१ धावा करीत विजयी लक्ष्य ४ गडी गमावून पूर्ण केले. सामन्यानंतर स्मिथ म्हणाला, हा सामना अपेक्षेपेक्षा जास्त चुरशीचा ठरला; परंतु आम्ही महत्त्वाचे गुण मिळवण्यात यशस्वी ठरलो. हा सामना अखेरपर्यंत न जाता आधीच जिंकायला हवा होता. आमच्याकडे काही चांगले भारतीय खेळाडू असून ते चांगले खेळत आहेत. खेळपट्टी पूर्ण सामन्यादरम्यान सारखीच ठरली. सामना जिंकणे सुखद ठरले. . दुसरीकडे सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसल्याचे म्हटले आहे. वॉर्नर म्हणाला, 'हा सामना अटीतटीचा झाला; परंतु ते चांगले खेळले. आम्ही अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नाही. 'सामनावीर आणि पर्पल कॅप प्राप्त करणार्या रहाणेने स्वतःच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, 'मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याने मी खुश आहे. संघ म्हणूनही आम्ही चांगली कामगिरी केली. खेळपट्टी थोडी संथ होती आणि आपण नेहमीप्रमाणेच फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. ' (वृत्तसंस्था)
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. लहान मुलांना कुत्रा किंवा मांजरींचा लडा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर कुणी सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' अजगर आहे तर खरंच विश्वास बसणार नाही. इस्त्राइलमधील एका मुलीचा स्वीमिंग बडी अजगर आहे. जेव्हा तिच्या घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते तेव्हा तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत असतो. या अजगराचा आकार पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यपणे लहान मुले साध्या पालीला बघूनही घाबरतात, पण ही मुलगी ११ फूट लांब अजगरासोबत खेळते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. ती बालपणापासूनच प्राण्यांसोबत राहते, त्यांच्यासोबतच ती वाढली आहे. बेले(अजगराचं नाव) त्याच पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा इनबरने बेलेसोबतच सर्वात जास्त वेळ घालवला. दोघांची पक्की मैत्री झाली. ( भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ) इनबरला सापांसोबत फिरणं आणि खेळणं आवडतं. कधी-कधी ती सापाची कात काढण्यात आणि कोरोना दरम्यान आनंदी राहण्यात त्यांची मदत करते. इनबरची आई Sarit Regev ने सांगितले की, 'इनबर अनेक साप आणि इतरही प्राण्यांमध्ये मोठी झाली आहे. जेव्हा ती लहान होती तेव्हा आंघोळ करताना बेले तिच्यासोबतच राहत होता. आता दोघेही मोठे झाले आहेत. दोघेही सोबत राहतात. हे आमच्यासाठी नॉर्मल आहे.
जगभरातला सभ्य समाज अशा व्यवस्थेचा पुरस्कर्ता नाही. वर्णभेद केंदस्थानी ठेवून जर्मनीतली लोकशाही हिटलरने संपवली. वर्ण तर केवळ दोनच होते, भारतात जाती मात्र हजारो आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांत भारतातल्या जातीव्यवस्थेचा आजही उपहासाने उल्लेख होतो. जातीपातींच्या संघर्षात भारत तुटला, तर तो एखाद्या काचेसारखा तुटेल.
नाशिक : बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरट्यांनी कापून नेल्याची घटना शास्त्रीनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चंदन तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील जगदिश कुलकर्णी (रा. कुलप्रभा बंगला,शास्त्रीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी कुलकर्णी कुटूंबिय घरात नसल्याची संधी साधून वॉल कंपाऊडची तार कापून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. यानंतर भामट्यांनी चंदनाच्या झाडाचा सहा फुट उंचीचा बुंधा कापून नेला. ही बाब परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून दोन तस्करांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत. .... नाशिक : हातातील पैसे हिसकावून घेत टोळक्याने एकाच बापलेकांसह एकास बेदम मारहाण केल्याची घटना देवळाली गावातील वडारवाडी चौकात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीघांना अटक करण्यात आली आहे. अर्जुन उर्फ गंड्या रूंजा पवार,राहूल चंदू पवार,शाम रूंजा पवार,कैलास रूंजा पवार,काशिनाथ रूंजा पवार व चंदू पवार (रा. सर्व वडारवाडी,दे. गाव) अशी संशयीतांची नावे असून त्यातील कैलास पवार,काशिनाथ पवार व चंदू पवार आदींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मनोज सतिश सकट (२५ रा. सोमवार बाजार,देवळाली गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मनोज सकट गुरूवारी (दि. २७) रात्री कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना वडारवाडी चौकात अर्जुन उर्फ गुंड्या पवार व राहूल पवार यांनी त्याची वाट अडवित हातातील पैसे हिसकावून घेतले. यावेळी मनोज सकट याने विरोध केला असता दोघांनी त्यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यानंतर मनोज याने घरी जावून आपबिती कथन केल्याने त्याचा भाऊ, वडिल,आते बहिण आणि गल्लीतील दिपक फासके आदी चार जण संशयीतांना जाब विचारणा करण्यासाठी गेले असतांना सहा जणांच्या टोळक्याने सर्वांना बेदम मारहाण केली. या घटनेत सकट बापलेकांसह फासगे आणि आतेबहिण जखमी झाली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत. ....
खाणारा वगैरे वगैरे गुणांमध्ये कमी पडतो अशास शिल्पाच्या कामावर मुख्य नेमावे असे कौटिल्य म्हणतो. यावरून शिल्पशास्त्राबद्दल व ते जाणणाऱ्याबद्दल कौटिल्यकाळी किती आदर होता याची कल्पना येते. कारागिरांविषयी तो उघड उघड तुच्छताबुद्धी व्यक्त करतो. कदाचित कारागीर हे शूद्र वर्णाचे असल्याने असे होत असावे. शूद्र पुरुष व क्षत्रिय स्त्री यांना होणारी प्रतिलोम संतती म्हणजे क्षत्ता, सुतार (३.७.२६). रथकार हा मूळचा वैश्य पण व्यवसायामुळे तो रथकार म्हणून ओळखला जातो (३-७-३५). निक्षेपासंबंधी, वस्तू बनविण्यासाठी कारागिराला दिलेल्या कच्च्या मालासंबंधी, नियम देताना कौटिल्य कारागीर लबाड (अशुचि) असतात असे एक सर्वसाधारण विधान करतो. कारागिरांत साक्षिपूर्वक निक्षेप स्वीकारण्याची पद्धत नाही (३.१२.३६,३७) हे कारणही तो पुढे देतो. शिल्पवन्त म्हणजे शिल्पज्ञ यांची गणना तो जासूद, हिशोबनीस, लिपिक इत्यादी लोकांत करतो. या वर्गातील नोकरांना राजाने मासिक पाचशे पण ['पण' हे त्यावेळचे पैसे आहेत.] वेतन द्यावे (५·३.१४) असे कौटिल्याने म्हटले आहे. तेव्हा राजाच्या पदरी शिल्पज्ञ (शिल्पशास्त्री नव्हे) असावेत पण त्यांची गणना सामान्य लिपिकाबरोबर केली जात असे. हे शिल्पज्ञ कारागीर नव्हेत, त्याहून वरच्या दर्जाचे आहेत कारण पुढेच म्हटले आहे की 'कारूशिल्पिनो विंशति शतिकाः । (५·३.१६) म्हणजे कुशल कारागीरास १२० पण वेतन असावे. सुतार, लोहार, सोनार हे कुशल कारागीर असावेत. केवळ कुशल मजूर म्हणजे दगड घडविणारे, विटा भाजणारे वगैरे जे कारागीर त्यांची संभावना 'क्षुद्रकारुकः' म्हणून केलेली आहे. (५.२.२१).
लेख - छत्रपती शिवरायांचे थोरपण । Saamana (सामना) हिंदुस्थानच्या आणि तमाम हिंदूंच्या सुदैवाने सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक सोनेरी पान लिहिले गेले. चीनपासून इराणपर्यंत पसरलेल्या आशिया आणि आप्रिâकन खंडात सर्वत्र मुस्लिम राजवटींचे नगारे वाजत असताना महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीतील रायगडावर राजे शिवाजी शहाजी भोसले हे छत्रपती झाले. सार्वभौम सम्राट म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. म्हणून दरवर्षी आपण आजच्या या ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीला शिवराज्याभिषेक दिनाचा उत्सव साजरा करतो. शिवाजी महाराजांचे दर्शन पहिल्यांदा घडले ते तिसरीत असताना. पुस्तकात त्यांचे चित्र छापलेले होते. गणपती, राम, कृष्ण तसे शिवाजी महाराज देवांपैकीच एक वाटत. त्या पुढच्या वर्गांमध्ये इतिहासाच्या धड्यांमधून महाराज भेटत गेले. सावळ्या नावाच्या पोरसवदा मावळ्याची कविता तर वेड लावून गेली. `खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या!' अशी कडक धमकी देणारा सावळ्या पुढे म्हणतो- हे हाडही माझे लेचेपेचे नसे, या नसानसातून हिम्मतबाजी वसे' आणि त्यानंतर हिणवतो- आपण मोठे दाढीवाले असे शूर बायकी, किती ते आम्हाला ठाऊकी! मग वेशांतर करून सरहद्द ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेले खरे तर सावळ्याची परीक्षा घ्यायला आलेले स्वतः शिवाजी महाराज वेश बाजूला करून प्रकट होत सावळ्याला शाबासकी देतात. हे सगळे दृश्य डोळ्यासमोर घडत आहे असे वाटे. त्यानंतर रायगडावर अडकून पडलेली हिरकणी गवळण बुरजावरून आपल्या बाळाच्या ओढीने गडाखाली उतरते, तो प्रसंग आणि महाराजांनी तिच्या पराक्रमाचे साडी-चोळी देऊन केलेले कौतुक व बुरुज पक्का बांधून घ्या म्हणून दिलेला हुकूम हे प्रसंग समोर घडल्यासारखे वाटत. पुढे इतिहासाच्या पानापानांवर महाराज भेटत गेले. अफजलखान भेट, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, आग्र्याहून सुटका या अद्भुत कहाण्या उलगडू लागल्या. पण महाराजांचे सुसंगत चरित्र समजले ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रमालेमुळे. `राजा शिवछत्रपती' पुस्तकाची पारायणे आम्ही मित्र करू लागलो. गडकिल्ल्यांच्या सहलींमधून महाराजांना शोधू लागलो. यातून महाराजांची मुत्सद्देगिरी, धोरणीपणा समजू लागला. डोंगरी किल्ले जिंकून ते अभेद्य करण्याची त्यांची प्रथा हे खोलवर विचार करून राबविलेले धोरणच होते. समोरच्या शत्रूंकडे म्हणजे मोगलांकडे किंवा आदिलशहाकडे अफाट फौजा होत्या. त्या तुलनेत शिवरायांकडे घोडदळ, शस्त्रास्त्रे, मातब्बर सेनापती संख्येने कमी होते. तेव्हा अशा बलाढ्य शत्रूंसमोर मैदानांच्या सपाटीवर निभाव लागणे शक्य नव्हते हे हेरून महाराजांनी दुर्गम किल्ल्यांच्या मदतीने आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून बलाढ्य शत्रूला जेरीस आणले. तंजावरपर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे त्यांना त्यामुळेच शक्य झाले. अशा विस्तारापूर्वी शाहिस्तेखान, बहलोलखान, दिलेरखान, सिद्धी जौहर आणि अफजलखान यापैकी कोणी कोणी शिवरायांचे तडाखे खाल्ल्यावाचून सुटले नाहीत. महाराजांच्या भक्तांनी, चाहत्यांनी त्यांची महती गाणे आपण समजू शकतो. परंतु जगाच्या इतिहासातील पानांवर ज्यांना महत्त्वाच्या जागी नोंदविले गेले त्यांनी शिवरायांच्या गुणांचे जे वर्णन केले त्यातून महाराजांचे जगावेगळेपण सिद्ध होते. यांतील अनेक जण आपआपल्या काळातील नायक किंवा महानायक होते. उण्यापुर्या तीस वर्षांच्या पराक्रमात शिवाजी महाराज फक्त दोन एतद्देशीय योध्द्यांशी लढले. त्यांचे इतर सर्व बलाढ्य शत्रू हे परदेशातून आलेले आक्रमक होते! कोण होते हे यवन? - जो स्वप्नातही शिवाजी दिसला तर घाबरत असे तो शाहिस्तेखान हा तुर्कीचा होता. - बहलोल खान पठाण, सिकंदर पठाण, चिदनखान पठाण हे सर्व सरदार अफगाणचे होते. - दिलेरखान पठाण हा मंगोलियातून आलेला होता. या सर्वांना शिवाजीराजांनी धूळ चारली होती. - सिद्धी जौहर आणि सलबखान हे दोघे इराणी सरदार महाराजांच्या हातून पराभूत झाले. पैकी सिद्धी जौहरने स्वराज्यावर समुद्रमार्गे हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी आरमार उभारले. पहिले भारतीय आरमार! (नमाज पढत असताना औरंगजेबाला महाराजांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली तेव्हा त्याने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल हे उद्गार काढले.) उझबेकिस्तानातून आलेल्या लढवय्याकार तलबखानाच्या 30 हजार ताकदवान फौजेची शिवाजीच्या फक्त एक हजार मावळ्यांनी दाणादाण उडवली. एकही उझबेकी सैनिक सुखासुखी परत गेला नाही. हे सर्व वाचल्यावर प्रत्येक देशप्रेमी भारतीयाला आपण त्या महान राजाबद्दल किती अल्पसे जाणतो याची खंत वाटल्याशिवाय राहत नाही. निदान नव्या पिढीला शिवाजी महाराजांची पूर्ण ओळख करून देऊन ही खंत मागे सारूया! आजच्या शिवराज्याभिषेक उत्सवदिनी महाराष्ट्राच्या नव्हे, हिंदुस्थानच्या दैवताला मनोभावे वंदन करुया!
बंडींगच्या भरावावर हरळीचे वा इतर गवत (हेमाटा, मारवेल इ.) शेतक-यांनी स्वतः लावण्याबाबत त्यांना प्रवृत्त करुन मार्गदर्शन करण्यात येते. बंडींगच्या भरावास पाणी शिंपडण्याची/दबाईची गरज नाही. खोदलेली सर्व माती बांधासाठीच वापरण्यात येते. वरील प्रकारची कामे ही प्रामुख्याने अकुशल स्वरुपाची आहेत, व रोहयोच्या माध्यमातून राबविण्यास अनुकूल असल्यामुळे कुशल / अकुशल निकष पडताळण्याची गरज नसते.
हिंगोली येथे ४६० पोती गहू काळ्या बाजारात नेणार्या दोघांना अटक ! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला. गेली दीड वर्षे 'एपेक्स कोव्हिड हॉस्पिटल'मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत नेहमी धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या ! विषाणूला वेशीवरच रोखणार्या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे ! जयपूर (राजस्थान) येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्काराला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात धन्यता मानली. कांग्रेस के राज में जनता कोरोना के संकट में ! शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा ! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.
नवी दिल्ली - भारताचा अव्वल थाळीफेकपटू विकास गौडा याने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या "ट्विटर पेज'वर त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा विकास भारताचा पहिला आणि एकमेव थाळीफेकपटू आहे. चार ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या गौडा हा गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेनंतर कुठल्याही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला नाही. त्या स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवले होते. ३४ वर्षीय विकास याने २०१२मध्ये ६६. २८ मीटर थाळीफेक करून नवा राष्ट्रीय विक्रम रचला. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले. मात्र २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकासह विकास याने नवा विक्रम रचला. या स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी करणारा तो भारताचा पहिला थाळीफेकपटू आहे. आशियाई (एशियाड) स्पर्धाचा विचार करता गौडा याने २०१०मध्ये कांस्य आणि २०१४मध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. विकास याला ऑलिंपिक पदकाने हुलकावणी दिली. २००४, २००८, २०१२ आणि २०१६ अशा सलग चार ऑलिंपिकमध्ये तो सहभागी झाला. मात्र, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्येच त्याला अंतिम फेरी गाठता आली.
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. दरम्यान शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा कोण घेणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून मुंबई पालिकेकडे काही दिवसांपुर्वीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी आज मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळावा घेतला जातो. यासाठी यंदाही २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होत. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले होते की, "तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो मेळावा आम्ही शिवतीर्थीवरच घेणार ," "दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नाही,दसरा मेळावा होणारच," असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र आता शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याने यावरून शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करतांना दिसत आहे. आता दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त कुणाला परवानगी देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सदा सरवणकर हे दरवर्षी दसरा मेळाव्याच्या परवाणगीसाठी अर्ज करत होते. मात्र त्यांनी यंदा शिंंदे गटात गेल्याने त्यांच्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आता याप्रकरणी काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई - आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 नुसार प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षांनी पूर, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी विषयी भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री पाच ते सात वेळा दिल्लीवारी करतात पण शेतकऱ्याच्या मदतीची मागणी करत नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचे कृषि दिनी मुख्यमंत्री म्हणाले होते पण 45 दिवसात 137 आत्महत्या झाल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रात प्रंचड अतिवृष्टी झाली. यानंतर सराकरने फक्त दोन ओळीची घोषणा केली. यात शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमा नुसार हेक्टरी 13600 मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, एनडीआरएफचे नियम 2015 ते 2020 या कालावधीसाठी झाले आहेत. या नियमांबाबत विचार होणे गरजेचे आहे. एडीआरफच्या नियमातील हे निकष हास्यास्पद असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादा दानवे यांनी सांगीतले. यावेळी यावेळी पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेख कोठेही नसल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांनी देण्याची मागणी केली. यावेळी राज्यात पूर स्थितीअसताना मुख्यमंत्री पाच ते सहावेळा दिल्ली दौरा करतात पण केंद्राचे पथक यावे यासाठी प्रयत्न केल्याचे आयकीवात नाही. अतीवृष्टीसाठी मदतीची मागणी केल्याचे आयकीवात नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. तर यावेळी कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याचे म्हणाले होते. पण मागच्या 45 दिवसात 137 शेतकरी आत्महत्या झाल्या, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना हे सरकार सीलोड मधील एका सुतगीरणीला मदत देत आहे. याबाबत अब्दुल सत्तरा यांनी सुत गिरणीला 15 कोटींची मदत दिली आहे. ही सुतगीरणी शासनाच्या नियमात बसत नसताना तीला मदत करण्यात आली आहे, अशी टीका अंबादस दानवे यांनी केली.
पुणे : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तसेच १५ व्या दिवसापासून ही रक्कम जमा होईपर्यंत विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजाची रक्कम खात्यात जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक असेल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. कारखान्यांकडील उत्पादित साखर वित्तीय संस्था, लिड बँकेस तारण देऊन बँक खात्यावर कर्ज रक्कम एफआरपी देण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. सध्या राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखाने ऊस बिलाची रक्कम पंधरवडानिहाय देतात. म्हणजे दि. १ ते १५ या पहिल्या पंधरवड्याची रक्कम दि. २८ ते ३० तारखेपर्यंत दिली जाते. दि. १६ ते ३१ या कालावधीतील रक्कम पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देण्यात येते. या प्रचलित प्रध्दतीमुळे अनेक ऊस पुरवठादारांना त्यांच्या उसाची रक्कम जवळपास २० ते ३० दिवस उशिराने मिळते. त्यामुळे ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३ व (३-अ) मधील तरतुदीचा भंग होतो व पर्यायाने ऊस पुरवठादारांकडून व्याजाची मागणी होते. राज्यातील काही साखर कारखाने दर १५ दिवसांनंतरर ऊस पुरवठादार शेतकºयांना ऊस बिलाची रक्कम न देता प्रत्येक ७ दिवसांनी किंवा १० दिवसांनी बँकेकडून कर्ज प्राप्त करून घेतात. त्याआधारे ऊस पुरवठादार शेतºयांना वेळेवर रक्कम देणे शक्य होते. साखर कारखान्यांनी गाळप हंगामातील उस बिलाची रक्कम वेळेत देण्यासाठी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १४ दिवसाच्या आतील कालावधी निश्चित करावा व त्याप्रमो मालतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेकडे कर्ज उचलीची मागणी करावी, असे गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेत एक चांगली बातमी आली आहे. लस आयातीवरील 10 टक्के सीमाशुल्क सरकार माफ करू शकते. खासगी कंपन्यांनाही ही लस आयात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर देशात लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करुन देणे फार सोपे होईल. रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीची आयात करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ही लस लवकरच भारतात येऊ शकते. याव्यतिरिक्त, फायझर, मॉडर्ना आणि जॉनसन आणि जॉन्सन यांना देखील त्यांच्या लस पाठविण्यास सांगितले आहे. (Central government to waive 10 percent customs duty on vaccine imports? ) एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका माध्यमाला सांगितले सरकार खासगी कंपन्यांनाही लस आयात करण्यास मान्यता देण्याच्या विचारात आहे. या कंपन्या या लसी खुल्या बाजारात विकू शकतील आणि सरकार त्यात कसलाही हस्तक्षेप करणार नाही. परदेशी कंपन्यांना लसींची किंमत निश्चित करण्याची परवानगी सरकार देऊ शकते. देशातील कोरोना लसीची खरेदी व विक्रीवर सध्या सरकारच्या निगराणी खाली आहे. सध्या अनेक आशियाई देश लसीच्या आयातीवर 10-20 टक्के पर्यंत आयात शुल्क आकारत आहेत. यात नेपाळ आणि पाकिस्तान सारख्या देशांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना आणि ब्राझील देखील कोविड लसीच्या आयातीवर 20 टक्के पर्यंत आयात शुल्क आकारत आहेत. भारतात कोविड लसीच्या आयातीवर मूलभूत कस्टम ड्युटी 10 टक्के आहे. यासाठी 10 टक्के समाज कल्याण अधिभार आणि 5 टक्के आयजीएसटी शुल्क आकारले जाते. केंद्राने लस खरेदी करण्यासाठी 4500 कोटी रुपये दिले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 3000 कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दोन-तीन महिन्यांपासून लसीचा पुरवठा करण्यासाठी हे पैसे आगाऊ म्हणून देण्यात आले आहेत. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की सरकारने लसी उत्पादक कंपन्यांना अनुदान दिले आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. पंढरपूर, दि. 4 - सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी दिली. उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यास मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्याशी चर्चा करून शुक्रवारी रात्री भीमा नदीपात्रात १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे. हा विसर्ग शनिवारी सकाळी २६०० वाढवून तो ४२०० क्युसेक्स करण्यात येणार आहे. उजनी धरणाच्या पाणी सोडण्याच्या प्रत्येक गेटचा विचार करून व एक ठोकताळा बांधून पाणी सोडण्यात येते. सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, शिरभावी पाणीपुरवठा योजना, कासेगाव पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी एकूण ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसाठी बंधारे आहेत, अशा ठिकाणी हे पाणी साठवण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर औज बंधारा, पंढरपूर बंधारा, मंगळवेढ्यातील बंधा-याचा समावेश आहे. हे बंधारे या पाण्यातून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. भीमा नदीवरील इतर १७ बंधारेही शेतीच्या पाण्यासाठी भरून घेण्याची मागणी होत आहे.
नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या 3 कृषी विधेयकांवरून देशभरात विरोध होत असतनाही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा होईल. मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना ऐतिहासिक निर्णय होत असल्याचे सांगितले होते. या 3 विधेयकांमुळे राजकीय गदारोळ सुरू असतानाच विधेयकांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, देशातील काही राज्यात याविरोधात तीव्र आंदोलने झाली. देशभरातील शेतकरी पक्ष, संघटनांमधून रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली होती. मोदी सरकारने संसदेत मंजूरी दिलेल्या तीन कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींनी अंतिम स्वाक्षरी न करण्याची मागणी देशभरातून करण्यात येत आहे. तरी देखील तीन कृषी विधेयकास राष्ट्रपतींची मंजूरी दिली आहे. त्यामुळे हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा होईल. जमीन अधिग्रहण कायद्यावेळी सरकार मागे हटलं होतं, पण यावेळी ती शक्यता नाही, असे बोलले जात आहे. विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरही राज्य शासनाचा विरोध सुरु आहे. उद्या (दि. 27) यासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही विधेयक राज्यात लागू होऊ देणार नाही असे सांगितले होते.
राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष सुरु आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. व्यापारी आणि नोकदार वर्गाला दिलासा मिळाल्याच चित्र आहे. यामुळं देशात आनंदाच वातावरण निर्माण झालंय. कारण कोरोनाचं नव रुप (New strain of corona virus) आता जगा समोर आलंय. संशोधकांनी याला 'डेल्टा प्लस' किंवा 'एवाई १' असं नाव दिलंय. कोरोनाच्या या नव्या विषाणूच्या प्रकारामुळं नुकसान होईल का? असा प्रश्न आता चोहो बाजूनं विचारला जातोय. संशोधकांनी मात्र यावर यावर काही उत्तर दिलेलं नाही. त्यांच म्हणनं आहे की चिंतेची गोष्ट नाही करण देशात यामुळं संक्रमित होणाऱ्यांची संख्या खुप कमी आहे. डेल्टा प्लस (Delta Plus) हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आहे. डेल्ट किंवा 'बी १.६१७.२' या प्रकारात बदल घडून आल्यामुळं हा नवा कोरोनाचा विषाणू बनला आहे. डेल्टा या विषाणू प्रकारातला पहिला विषाणू भारतात सापडला होता. यामुळंच भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या विषाणू मुळं किती घातक परिस्थीती निर्माण होऊ शकते याबद्दल ठोस विधान अजून पर्यंत कुणीही केलेलं नाहीये. आजाराची गंभीरता या विषाणूमुळं किती असेल हे देखील सांगण्यात आलेलं नाहीये. रोग प्रतिकारक क्षमतेबद्दल विशेष अभ्यास असेलेल्या विनीत बल यांनी सांगिलंय की या विषाणूच्या नव्या प्रकारामुळं अँटी बॉडीजना कॉकटेल प्रयोगाचा झटका बसला आहे. युरोपात याचे रुग्ण जास्त आहेत. शिवाय अमेरिकेतही याचा प्रसार होतोय. यामुळं आजार अधिकच गंभीर होऊ शकतो. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संसशोधन संस्थेकडून सांगण्यात आलंय की, "हा नवा कोरोना विषाणूचा प्रकार किती संक्रमन वेग किती आहे हे तपासण जास्ती महत्त्वाच आहे." कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळं संक्रमीत झालेल्या व्यक्तीच्या अँटीबॉडीजची गुणवत्ता आणि संख्या ही लस घेतलेल्या व्यक्तींच्या परिक्षणातून कळेत त्यातून बऱ्याच नव्या गोष्टी समोर येऊ शकतात. भीतीच काही कारण नाही? भारतात ७ जुनपर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या विषाणूनुने बाधित रुग्णांची संख्या फक्त ६ इतकी होती. तज्ञांच्या मते या नव्या विषाणूच्या प्रसाराचा वेग किती हे समजल्यानंतरच पुढची पावलं उचलली जातील. दरम्यान इंग्लंडमध्ये आणखी चार आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. इंग्लंडच्या पंतप्रधांनी सांगितलं की, "डेल्टा या कोरोनाच्या नव्या विषाणू प्रकारामुळं इंग्लंडमध्ये आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. यासाठी १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवत आहे." भारतात याचा प्रचार आणि प्रसार कसा होतो? यावर पुढची गणितं अवलंबून आहेत. Disclaimer : सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे. यात आम्ही सत्यतेचा दावा करत नाहीत.
हैदराबाद, 21 डिसेंबर : लहनांपासून तरुणांपर्यंत फुगे पाहिले की फोडायचा मोह आजही अनेकांना आवरत नाही. फुगे दिसले किंवा कुणालातरी घाबरवण्यासाठी देखील फुगे फोडण्याची मजा काही वेगळीच असते. फुगे फोडण्याचा आनंद आणि त्यातली गंमत मंत्र्यांनी देखील घेतल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्घाटन समारंभासाठी तमिळनाडूचे मंत्री राजेंद्र भालाजी उपस्थित होते. त्यावेळी फुगे पाहून त्यांना देखील बालपणीची आठवण झाली असावी आणि मोह आवरला नाही. त्यांनी कात्री घेऊन फुगे फोडले आणि मग उद्घाटन केले. या सोहळ्यादरम्यान त्यांनी फुगे फोडण्याचा आनंद घेतला आहे. त्यांचा फुगे फोडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तामिळनाडूचे मंत्री राजेंद्र भालाजी शिवकालीतील अम्मा मिनी क्लिनिकचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले. उद्घाटनाच्या वेळी आजूबाजूला लावलेले फुगे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी हे फुगे फोडून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. आधी फुगे फोडले आणि मग उद्घाटन केलं. त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. Tags: Tamil nadu, Viral video.
अकोला : देशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अकोल्यातील क्रिकेटपटू त्यांच्या खेळाने प्रभावित करीत असतानाच आणखी एका खेळाडूने स्थानिक पातळीवर द्विशतकी खेळी करीत अकोल्यात गुणवत्तेला कमी नसल्याचे दाखवून दिले. विजय तेलंग आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अकोल्याच्या आर्यन मेश्रामच्या 200 धावांच्या बळावर भंडारा संघावर 199 धावांनी विजय नोंदविला. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या केलेल्या 50 षटकांच्या या सामन्यात अकोला संघाने प्रथम फलंदाजी करताना 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यात समालीवीर आर्यनच्या एकटयाच्याच 200 धावांचा समावेश आहे. त्याने 141 चेंडूंचा सामना करीत 27 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने त्याने ही द्विशतकी खेळी उभारली. त्याच्या एकूण 200 धावांमध्ये चौकार आणि षटकारांचा वाटा 162 धावांचा होता. यावरून त्याच्या एकूणच बहारदार खेळाचा प्रत्यय येतो. त्याला या खेळीदरम्यान अहान जोशीने 29 तर सिद्धांत मुळेने नाबाद 54 धावा काढून सुरेख साथ दिली. भंडारा संघातर्फे शुभम रोडेने 3 तर गोविंद मेहता आणि उपदेश राजपुत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भंडारा संघ 47.7 षटकात 217 धावा काढून बाद झाला. त्यामुळे त्यांना 119 धावांनी पराभव पत्करावा लागला. अकोला संघातर्फे सिद्धांत मुळे अर्ध शतकी खेळीनंतर 21 धावांमध्ये 3 गडी बाद करून अष्टपैलू खेळ केला. कोण आहे आर्यन? स्थानिक क्रिकेट स्पर्धेत मर्यादित षटकाच्या सामन्यात 200 धावा काढणारा आर्यन मेश्राम आहे तरी कोण, असा प्रश्न सर्व क्रिकेट रसिकांना पडला असेल. हा अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, अतिशय होतकरू क्रिकेटपटू आहे. त्याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. आजच्या खेळीने त्याने विदर्भ संघाचे द्वार ठोठावले आहे. विदर्भ संघाकडून रणजी करंडक स्पर्धा खेळत असलेला वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे, २३ वर्षांखालील युवा विदर्भ संघाकडून खेळणार अथर्व तायडेसह विदर्भाच्या सर्वच स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता आर्यननेही विदर्भ संघाच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
१० जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण 'हलाल म्हणजे काय ? 'हलाल' पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम, 'हलाल' चळवळीचा उद्देश, 'हलाल अर्थव्यवस्था' : स्वरूप, विस्तार आणि प्रचार अन् 'हलाल प्रमाणपत्र' मिळवण्यासाठी मुस्लिम निरीक्षक नेमणे आवश्यक आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. 'हलाल प्रमाणपत्र' देण्यासाठी 'जमियत-उलेमा-ए-हिंद-हलाल ट्रस्ट'कडून केली जाणारी शुल्क आकारणी पुढे नमुन्यादाखल दिलेली आहे. यातून 'हलाल प्रमाणपत्रासाठी किती भरमसाठ शुल्क आकारले जाते ? ', याची कल्पना येईल. भारतात 'हलाल प्रमाणपत्र' देणार्या अनेक खासगी संस्था आहेत. त्यांत प्रामुख्याने पुढील संस्थांचा समावेश आहे. यांतील धर्मादाय संस्थांना अशा प्रकारचे व्यापारी कार्य करण्याची अनुमती नसते; परंतु तरीही त्या उघडपणे 'हलाल प्रमाणपत्रा'द्वारे पैसे गोळा करत आहेत ! १०. 'हलाल प्रमाणपत्रा'ची निरर्थकता ! १० अ. भारत शासनाचे 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)' असतांना 'हलाल प्रमाणपत्र' देणार्या इस्लामी संस्था कशासाठी ? : भारत शासनाकडून 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण' (FSSAI), तसेच विविध राज्यांत 'अन्न व औषध प्रशासन' (FDA) हे विभाग खाद्यपदार्थ, तसेच औषधे यांच्याशी संबंधित सर्व अनुमती देतात. 'एखादा पदार्थ शाकाहारी आहे कि मांसाहारी ? ', हे ठरवण्यासाठी या विभागांकडून चाचण्या करून त्या पदार्थातील सर्व घटक आणि त्यांचे प्रमाण यांची एक सारणी त्या उत्पादनावर लावली जाते. तसेच शाकाहारी पदार्थावर एका चौकोनात हिरव्या रंगाचा ठिपका, तर त्यात मांसाहारी घटक असल्यास चौकोनात 'ब्राऊन' (चॉकलेटी) रंगाचा ठिपका छापला जातो. १६ डिसेंबर २०२१ या दिवशी देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देतांना उत्पादनावर त्यातील घटकांचे मूळ स्रोतही छापण्याचे आदेश दिले आहेत, म्हणजे 'च्युईंग गम'मध्ये वापरलेले 'जिलेटिन' डुक्कर किंवा गोवंश यांपासून मिळवले असल्यास तसा उल्लेख करणे बंधनकारक आहे. 'FSSAI'ने सर्व चाचण्या करून एखादा पदार्थ शाकाहारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर, त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा एकदा त्या पदार्थात 'हराम' घटक नाही, हे सांगणारे 'हलाल प्रमाणपत्र' देण्याचा अधिकार एखाद्या त्रयस्थ खासगी इस्लामी संस्थेला कसा काय प्राप्त होतो ? १० आ. वैश्विक स्तरावर प्रमाणीकरण नसलेली सदोष 'हलाल प्रमाणपत्र' प्रक्रिया ! : 'हलाल प्रमाणपत्र' देणारी प्रत्येक इस्लामी संस्था तिचे स्वतःचे नियम बनवते. या नियमांचे कुठेही मानक प्रमाणीकरण (स्टँडर्डायजेशन) ठरलेले नाही. त्यामुळे ती संस्था ज्या मुसलमान पंथाशी (शिया, सुन्नी, देवबंदी आदी) संबंधित असते, त्या पंथाशी संबंधित मुसलमान देश त्यांच्या 'हलाल प्रमाणपत्रा'ला वैध मानतात; मात्र तेच प्रमाणपत्र दुसर्या इस्लामी देशातील 'शरीयत बोर्ड' अवैध ठरवते, उदा. भारतातील 'हलाल प्रमाणपत्र' संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अवैध मानले जाते. १० इ. 'हलाल प्रमाणपत्र' देणार्यांचा भ्रष्टाचार : 'हलाल अर्थव्यवस्थे'ची मूळ संकल्पना मांडल्या गेलेल्या मलेशियातच वर्ष २०२० मध्ये बनावट 'हलाल' मांस विकून मुसलमानांना भ्रष्ट करण्याचा प्रकार तब्बल ४० वर्षे चालू असल्याचे उघड झाले ! तेथील व्यापारी चीन, ब्राझिल, कॅनडा, मेक्सिको, स्पेन आदी देशांतून कांगारूचे, तसेच घोड्याचे मांस आणून ते 'हलाल' मांसात मिसळून 'हलाल बीफ' या नावे विकत होते. या घोटाळ्यासाठी त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकार्यांना लाच दिल्याचे उघडकीस आले. अमेरिकेतील 'इस्लामिक सर्व्हिसेस ऑफ अमेरिका (ISA)' नावाची 'हलाल प्रमाणपत्र' देणारी संस्था चालवणारे जलील आवोसी आणि याह्या आवोसी यांनीही 'हलाल' मांसात घोटाळा केला. स्थानिक पशूवधगृहातून मांसाची पाकिटे मागवून त्यावरील शिक्का काढून पुन्हा त्यावर 'हलाल प्रमाणित बीफ' असल्याचा शिक्का लावला जात असे. या प्रकरणात त्यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. ११ अ. हिंदु खाटिकांचा परंपरागत व्यवसाय बंद पडणे : हिंदु धर्मातील खाटिक समाज मांसाचा परंपरागत व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. सध्या 'हलाल'च्या आग्रहामुळे बहुतांश व्यावसायिक केवळ इस्लामी पद्धतीच्या 'हलाल' मांसाची मागणी करतात. हिंदु खाटिक समाजाच्या विक्रेत्याकडील मांस 'हराम' मानले जात असल्याने साहजिकच ते नाकारले जाते. त्यामुळे हिंदु खाटिक समाजाचा वंशपरंपरागत व्यवसाय बंद पडून तो आपोआपच मुसलमानांच्या कह्यात जाऊ लागला आहे. ११ आ. 'हलाल' मांसाद्वारे बहुसंख्य हिंदूंवर अल्पसंख्यांकांची हुकूमशाही ! : नसीम निकोलस तालेब या इंग्लंडमधील लेखकाने लिहिले आहे, 'हेकेखोर लोकांचा अल्पसंख्यांक गट त्याला अनुकूल गोष्टींची मागणी करून तेथील बहुसंख्यांकांना आपल्या इच्छेने वागण्यास भाग पाडतो. ' आज भारतात ८० टक्के लोक हिंदू आहेत. त्यांतील ५८ टक्के हिंदू मांसाहारी आहेत; मात्र त्यांना 'हलाल' मांस भक्षण करणे निषिद्ध आहे', हे ठाऊकच नसल्याने ते 'हलाल' मांसच खातात. दुसरीकडे अल्पसंख्य मुसलमान मात्र 'मला इस्लामनुसार 'हलाल' मांसच हवे', असा दबाव निर्माण करतो. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना काय हवे, हे दुर्लक्षित करून प्रत्येक ठिकाणी 'हलाल' मांसच वापरले जाते. हे 'मानसिक इस्लामीकरण'च आहे. १२. 'हलाल अर्थव्यवस्था' अन् 'जिहादी आतंकवाद' यांचा संबंध ! अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर 'हलाल अर्थव्यवस्था' आणि 'जिहादी आतंकवाद' यांचाही संबंध जोडला जात आहे. या संदर्भातील काही वार्ता आणि अहवाल पुढे दिले आहेत. १२ अ. अमेरिकेतील 'हलाल प्रमाणपत्र' देणार्या संस्थेकडून आतंकवादी संस्थांना साहाय्य ! : अमेरिकेतील 'मिडल ईस्ट फोरम'च्या पडताळणीत उघड झाले आहे की, 'इस्लामिक फूड अँड न्यूट्रिशन कौन्सिल ऑफ अमेरिका (IFANCA)' ही 'हलाल प्रमाणपत्र' देणारी संस्था वर्ष २०१२ पासून 'जमात-ए-इस्लामिया', 'हमास', 'अल्-कायदा' आदी इस्लामिक कट्टरपंथी गटांना निधी पुरवत आहे. १२ आ. ऑस्ट्रेलियात 'हलाल प्रमाणपत्रा'च्या निधीतून आतंकवाद्यांना साहाय्य : 'हलाल प्रमाणपत्र' देणार्या 'इस्लामिक कौन्सिल ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ICWA)'च्या वर्ष २०१३च्या अहवालात म्हटले आहे की, 'ICWA'ने सीरियातील नागरी परिस्थिती पाहून 'अल् इमदाद चॅरिटी'च्या माध्यमातून तेथे देणग्या दिल्या आहेत. प्रत्यक्षात 'अल् इमदाद' ही संस्था सीरिया देशातील 'इसिस', 'हमास', प्रतिबंधित 'मुस्लिम ब्रदरहूड' आणि इतर अनेक जिहादी गटांना निधी वितरित करते. १२ इ. भारतात 'जमियत उलेमा-ए-हिंद'चे आतंकवादी कारवायांमधील आरोपींना साहाय्य! : भारतात 'हलाल प्रमाणपत्र' देणारी 'जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट' ही एक मुख्य संघटना आहे. डिसेंबर २०१९ मध्ये 'जमियत उलेमा-ए-हिंद'चा बंगालचा प्रदेशाध्यक्ष सिद्दीकुल्ला चौधरी याने 'नागरिकत्व सुधारणा' कायद्याला विरोध करतांना 'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोलकाता विमानतळाच्या बाहेर पडू देणार नाही', अशी धमकीच दिली होती. हीच संघटना उत्तरप्रदेशचे हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणार्या आरोपींचा खटला लढण्यासाठी कायदेविषयक साहाय्य करत आहे. हीच संघटना '७/११' चा मुंबई रेल्वे बाँबस्फोट, २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, '२६/११'चे मुंबईवरील आक्रमण इत्यादी अनेक आतंकवादी प्रकरणांमधील आरोपींना कायदेविषयक साहाय्य करत आहे. विविध आतंकवादी संघटनांच्या अनुमाने ७०० आरोपींना ते अशा प्रकारे साहाय्य करत आहेत. (क्रमशः) हलाल प्रमाणपत्राद्वारे निधी गोळा करून त्याचा जिहादी संघटनांसाठी वापर होत असल्याने त्यावर बंदीच हवी !
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कुडाळ-मालवण हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील मालवण किनारपट्टीवर जगभरातील पर्यटक येतात. पण पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची वानवा येथे आढळते. या मतदार संघात मिश्र स्वरूपातील मतदार असले तरी मच्छीमार समाजाचा प्रभाव या मतदारसंघावर दिसून येतो. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी काँग्रेसच्या नारायण राणे या मातब्बर नेत्याचा दारूण पराभव केला. वैभव नाईक हे उच्चशिक्षित असून त्यांना वाचन आणि सामाजिक कार्याची आवड आहे.
पुणे : भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या (आयएसए) वतीने आयोजिलेल्या 'ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप'चे विजेतेपद महाराष्ट्राने मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५९ सुवर्ण, ६३ रौप्य आणि १४ कांस्य अशा एकूण १३६ पदकांची कमाई केली. तामिळनाडूच्या खेळाडूंनी ११९ पदके जिंकत दुसरे स्थान पटकावले. त्यामध्ये ५६ सुवर्ण, ५३ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. १४, १७, १९, २२, २५ वर्षाखालील अशा विविध वयोगटात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये अॅथलेटिक्स, कबड्डी, रोलर, स्केटिंग, कुस्ती, तायक्वांदो, कराटे, खो-खो, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, वूशु आदी १२ क्रीडा प्रकारात देशभरातून सुमारे २५० खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा, बिहार, दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आसाम आदी राज्यांतील खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्यमंत्री डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी 'आयएसए'चे उपाध्यक्ष कमल मलकानी, खजिनदार व मुख्य संयोजक सुरेश हेमनानी, जनसंपर्क अधिकारी जयदेव डेम्बरा, विनोद मेघांनी, राजीव धलवानी, जयहिंद हायस्कुलच्या प्राचार्या ज्योती मलकानी आदी उपस्थित होत्या. सर्व स्तरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही नॅशनल ओपन चॅम्पियनशिप आयोजिली होती. असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे संयोजक सुरेश हेमनानी यांनी सांगितले.
नमस्कार मायबोलीकरांनो. . मला योगा संबधित काही पुस्तके ऑनलाईन मागवयची आहे. मी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला चेक केले पण तिथे या यादीमधील 1 2 च पुस्तक मिळत आहेत. मला ही सगळीच पुस्तके हवी आहेत. कुठून ऑर्डर करता येईल? पुस्तके हिंदी आणि काही मराठी मधे आहेत. कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर कृपया कळवा. परीक्षा असल्यामुळे पुस्तके वेळेत अर्जंट हवी आहेत. धन्यवाद. Groups audience: Group content visibility:
- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला. - ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते. - २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही विराटनं नावावर केला. जॉनी बेअरस्टो, कुसल मेंडिस आणि अॅनरिच नॉर्टझे हेही तीन वेळा भोपळ्यावर बाद झाले आहेत. - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची विराटची पहिलीच वेळ ठरली. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
शहरातील समतानगर येथे फोन लावण्याच्या कारणावरुन महिलेने वाद घालत तरुणाला त्याच्या घरासमोरच डोक्यात लाकडी दांडक्याने मारहा करत दुखापत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी माहराण करणार्या महिलेविरोधात रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील समतानगरातील भैय्या गल्ली येथे मुकेश रविंद्र माळी वय ३२ हार तरुण वास्तव्यास आहे. तो हमाली काम करुन उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी सायंकाळी मुकेश माळी हा घरासमोर उभा असतांना फोन लावण्याच्या कारणावरुन गल्लीतील महिला ललीता दिपक शिरसाळे हिने मुकेश सोबत वाद घातला. तसेच लाकडी दांडा मुकेशच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. यात मुकेश हा जखमी झाला. याप्रकरणी मुकेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरुन ललीता शिरसाळे रा. भैय्या गल्ली, समतानगर हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहेत.
ATM Withdraw : आज मोबाईलच्या मदतीने घरी बसून तुम्ही एकाच वेळी अनेक काम करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो आज मोबाईलच्या मदतीने काही जण हजारो रुपयांचे घरी बसून व्यवहार करत आहे तर काही जण ऑनलाईन शिक्षण घेत आहे तर कोणी आपला व्यवसाय मोबाईलद्वारे करत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता फोनमध्ये असणाऱ्या UPI द्वारे कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकता. इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) ही एक सुविधा आहे जी लोकांना कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू देते. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. UPI मधून पैसे काढण्यासाठी तुम्ही GooglePay, PhonePe, Paytm आणि इतर UPI अॅप्स वापरू शकता. स्टेप 1: कोणत्याही एटीएम मशीनवर जा आणि स्क्रीनवर रोख पैसे काढण्यावर टॅप करा. स्टेप 2: नंतर UPI पर्याय निवडा. स्टेप 3: तुमच्या ATM स्क्रीनवर QR कोड दिसेल. स्टेप 4: आता तुमच्या फोनवर UPI अॅप उघडा आणि ATM मशीनवर प्रदर्शित होणारा QR कोड स्कॅन करा. स्टेप 5: नंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका. तुम्ही 5 हजारांपर्यंत रोख काढू शकता. स्टेप 6: UPI पिन एंटर करा आणि पुढे जा वर टॅप करा.
गेल्या काही दिवसांत 'कोरोना'चे संक्रमण कमी होताना दिसत असल्यामुळे 'अनलॉक'च्या प्रक्रियेअंतर्गत देशभरात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटगृह मालक, निर्माते, कलाकारांबरोबरच प्रेक्षकांमध्येही उत्साह दिसत असतनाच पुन्हा चित्रपटगृहांबाबत काही निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'कोरोना'चे रुग्ण वाढत असून लॉकडाऊनची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी दुसरीकडे बॉलीवूडमधील निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहेत. 'चंडीगड करे आशिकी' या चित्रपटानंतर आता आयुष्मान खुरानाच्या आणखी एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. आयुष्मान खुरानाची 'चंडीगड करे आशिकी' ही फिल्म या वर्षी 9 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत असून अभिषेक कपूर यांनी 'टी-सिरीज'सोबत मिळून ही फिल्म बनविली आहे. आता अनुभव सिन्हा दिग्दर्शित फिल्म 'अनेक' या वर्षी 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. सध्या या चित्रपटाचे शुटिंग भारताच्या उत्तर पूर्व भागात सुरू आहे. 'अनेक' ही एक जासूसी थ्रिलर फिल्म असल्याचे सांगितले जात असून या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभव सिन्हा पुन्हा 'टी-सिरीज'मध्ये परतत असल्याचे बोलले जात आहे. या वर्षी जुलै आणि सप्टेंबर या महिन्यांत आयुष्मान खुरानाचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असून जुलैमध्ये आणखीही काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये 2 जुलैला दक्षिण भारतीय फिल्म 'मेजर' आणि सिद्धार्थ मल्होत्राची फिल्म 'शेरशाह' प्रदर्शित होणार आहे. तर बहुचर्चित 'केजीएफ चॅप्टर 2' आणि अभिनेता प्रभास याचा 'राधे श्याम' हे चित्रपटही जुलैमध्येच प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ऑगस्टमध्ये 6 रोजी अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा 'अतरंगी रे' चित्रपट तर 13 रोजी दक्षिण भारतीय चित्रपट 'पुष्पा' आणि जॉन अब्राहमचा 'अटॅक' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. सप्टेंबरमध्ये 'शर्माजी नमकीन' आणि 'लायगर' यांसारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
सिद्धूंनी माफी मागितल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही : अमरिंदर सिंग\nचंदीगडः २१ जुलै- काँग्रेस हाय कमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि दीर्घकाळ चाललेला वाद संपल्याचे मान्य केले आहे, पण तसे होताना मात्र, दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वाद अद्याप कायम आहे. सिद्धूंनी माफी मागितल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही , असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्यासमोर नवज्योतसिंग सिद्धू यांनी माफी मागण्यासाठी अट घातली होती. सिद्धू यांनी त्यांच्यावर केलेल्या अपमानकारक वक्तव्यांबद्दल जाहीरपणे माफी मागावी, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीण ठुकराल यांनी पंजाबमधील सध्या सुरू असलेल्या वादाबाबत सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही वेळ मागितलेली नाही. सिद्धू यांच्या वृत्तीत कोणताही बदल नाही. सिद्धू हे सोशल मीडियावर केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तो पर्यंत कोणतीही भेट होणार नाही. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा विरोध डावलून पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली आहे, हे विशेष.
पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा राष्ट्रवादीबद्दलचं सर्वाधिक अविश्वास; लढावे स्वबळावर की आघाडीबरोबर? स्वबळावर लढायचे तर तेवढी राजकीय ताकद नाही व महाविकास आघाडीत जायचे तर बहुतेकांना सर्वाधिक अविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असल्याचे दिसते आहे. पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वबळाचा आग्रह होत असला तरी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मात्र महाविकास आघाडी की स्वबळावर याबाबत संभ्रमात आहेत. स्वबळावर लढायचे तर तेवढी राजकीय ताकद नाही व महाविकास आघाडीत जायचे तर बहुतेकांना सर्वाधिक अविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असल्याचे दिसते आहे. एकेकाळी पुणे शहरात व महापालिकेतही वर्चस्व असलेल्या काँग्रेसची आजची राजकीय अवस्था तशी नाही. १६४ नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेसचे फक्त १० नगरसेवक आहेत. आता तर नव्या प्रभागरचनेत सर्व मिळून १७३ नगरसेवक असणार आहेत. २३ गावे महापालिकेला जोडली गेली आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद आहेत. हक्काचा मतदारही दुरावला गेलेला मागील काही निवडणुकांमधील मतदानावरून दिसून येते. सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देता आले नाहीतर तर तिथेच पक्षाची अर्धी हार होईल असे काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अतिआत्मविश्वासाचा वाटतो. महाविकास आघाडी करून निवडणूक लढवली तर तिघांची ताकद एकत्र होईल. त्याचा फायदा काँग्रेसला होईलही, भारतीय जनता पार्टीला पायबंद घालता येईल हे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य आहे, मात्र अशी आघाडी करताना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बहुसंख्य काँग्रेसजनांना अविश्वास आहे. सध्याचे १० उमेदवार व महापालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार अशा मिळून साधारण ३० जागा काँग्रेसला आघाडीच्या जागा वाटपात मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल. राष्ट्रीय पक्ष असताना इतक्या कमी जागा घेऊन लढायचे का? प्रभागांमधील इच्छुक कार्यकर्त्यांचे बंड झाले तर ते थोपवायचे कसे असे प्रश्न यातून काँग्रेसमध्ये विचारले जात आहेत. सध्याच्या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ९ नगरसेवक आहे. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आघाडीत वर्चस्व राहील. ते मान्य करायचे तर मग काँग्रेसच्या शहरातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल असे काही स्थानिक नेत्यांना वाटते. "प्रदेशाध्यक्षांचा आदेश असेल त्याप्रमाणे यासंबधीचा निर्णय होईल. आम्ही शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, जुने नवे नेते यांच्याबरोबर चर्चा करून त्याचा एकत्रित अहवाल प्रदेशकडे पाठवला आहे. त्याचा विचार करूनच काय तो निर्णय घेतला जाईल असे रमेश बागवे (शहराध्यक्ष, काँग्रेस) यांनी सांगितले. "
मुंबई : भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. भाजपशासित गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी पावलं उचलली आहेत. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर हा समान नागरी कायदा नेमका आहे तरी काय? हे पाहणं गरजेचं आहे. Uniform Civil Code/समान नागरी कायदा : आपल्या देशात कोणी हत्या केली, चोरी केली किंवा काही गुन्हा केला तर ती व्यक्ती कुठल्याही धर्म, जात, पंथाची असो, तिला शिक्षा एकच असते. हिंदू व्यक्तीने हत्या केली म्हणून वेगळी शिक्षा, किंवा मुस्लिम व्यक्तीने हत्या केली म्हणून दुसरी शिक्षा असं नाही. पण हीच परिस्थिती नागरी कायद्यांमध्ये अर्थात लग्न, घटस्फोट किंवा संपत्ती प्रकरणामध्ये नाही. इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, अशा विविध धर्मांसाठी त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत, नियम आहेत. लग्न, घटस्फोट, संपत्ती आणि वारसदार असे कौटुंबिक विषय नागरी कायद्याअंतर्गत येतात. यात हिंदू धर्मीयांचा विवाह कायदा वेगळा आहे, शीख, जैन, बौद्ध धर्मालाही तो लागू होतो. तर मुस्लिम समाजातील लग्न, घटस्फोटाची प्रकरणं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड'नुसार चालतात. अशाच प्रकारे पारशी आणि ख्रिश्चन धर्माचेही पर्सनल लॉ बोर्ड आहेत. त्यामुळे या विविध धर्मातील लग्न, घटस्फोट, वारसदाराची प्रकरणं ही त्या-त्या पर्सनल लॉ बोर्डनुसार निकाली निघतात. पण 'यूनिफॉर्म सिव्हिल कोड' अर्थात समान नागरी कायदा लागू झाला, तर हे सगळे पर्सनल लॉ बोर्ड बरखास्त होतील. प्रत्येक धर्मातील नागरी प्रकरणांसाठी म्हणजे विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी याबाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असतील. ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल, तिथं लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांचा ताबा, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी अडचणी काय आहेत? समान नागरी कायद्याला विरोधही केला जातो. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यासह काही पक्षांनी, संघटनांनी हा कायदा अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचं म्हणतं विरोध दर्शविला आहे. भारत विविध जाती, समुदायांचा देश आहे. वेगवेगळ्या धर्मांनुसार त्यांचे कायदेही वेगवेगळे आहेत. समान नागरी कायदा लागू झाल्यास त्याचा धर्मिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप होईल असा दावा करण्यात येतो. समान नागरी कायदा हे कोणतही न्यायालय आणू शकत नाही, किंवा त्याबाबत आदेशही देऊ शकत नाही. कारण हा मुद्दा Directive Principles of State Policy मध्ये म्हणजे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिला आहे. मार्गदर्शक तत्वांमधील एखाद्या विषयांवर कायदा लागू करणं हे केवळ राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या हातात आहे. कारण असे मुद्दे लागू करण्यासाठी त्या-त्या वेळची समाजिक-आर्थिक परिस्थिती पाहून त्याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे समान नागरी कायदा न्यायालयाच्या हातात नसून पूर्णपणे केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या हातात आहे. संसदेत किंवा विधिमंडळात हे कायदे मंजूर करून घ्यावे लागतील. समान नागरी कायद्याचे समर्थक : अर्थात समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्यांप्रमाणेच समर्थन करणारेही आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या कायद्याच्या समर्थनात राहिला आहे. भाजपच्या जाहिरनाम्यात वर्षोनुवर्षे असणारा मुद्दा आहे. शिवसेनेसारखे काही हिंदुत्ववादी पक्षही या कायद्याचे समर्थन करतात. याशिवाय समान नागरी कायदा गोवामध्ये लागू आहे. अलिकडेच दिल्ली उच्च न्यायलायाने एका प्रकरणामध्ये समान नागरी कायद्याची आवश्यकता बोलून दाखविली होती. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी हा कायदा लागू करण्याबाबत सुचवलेलं आहे. देशात Uniform Civil Code ची गरज आहे, आणि तो सरकारने आणावा, असं म्हणतं सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांनी वारंवार याबाबत उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का? 'गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. उत्तराखंडमध्ये येत आहे. प्रत्येक राज्य समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्न करेल, असं संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलंय. समान नागरी कायदा आपण आणू शकलो नाही, पण तो आला पाहिजे आणि येईल', असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतचं एका कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर आणि माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा तो आज (गुरुवारी) करणार आहे. आज करणार अधिकृत घोषणा वृत्तसंस्था, कोलंबो श्रीलंकेचा सलामीवीर आणि माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा तो आज (गुरुवारी) करणार आहे. श्रीलंका क्रिकेटने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की दिलशान कसोटीतून निवृत्ती घेत असून, त्याची औपचारिक घोषणा तो गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. ३६ वर्षीय दिलशानने या पत्रकात म्हटले आहे, की युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. खरे तर निवृत्तीची घोषणा झिम्बाब्वे दौऱ्यानंतर करणार होतो. मात्र, दुर्दैवाने ही मालिका पुढे ढकलण्यात आली. अर्थात, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये मी खेळणार आहे. क्रिकेटमधील भविष्याबाबत राष्ट्रीय निवड समितीशी चर्चा केली आहे. त्यांना वन-डे क्रिकेटमध्ये माझी गरज असल्यास मी २०१५च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार आहे. दिलशानने १९९९मध्ये बुलावयो येथे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात १६३ धावांची शानदार खेळी केली होती. चौदा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने ८७ कसोटी सामन्यांत ४०. ९८च्या सरासरीने ५४९२ धावा केल्या आहेत. कर्णधार असताना त्याने २०११मध्ये लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध १९३ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. 'दिलस्कूप' शॉटचा जनक असलेला दिलशान आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो निवृत्ती जाहीर करणार होता. मात्र, होबार्टमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४७ धावांची खेळी केली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध गॅलेवर १२६ धावांची खेळी केली होती. संघाची गरज म्हणून त्याने झिम्बाब्वे दौऱ्यानंतर निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. भारताविरुद्ध दिलशान नेहमीच चिवट खेळी करायचा. भारताविरुद्ध त्याने ४८. १७च्या सरासरीने ८१९ धावा केल्या आहेत.
मुंबई, 22 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad yatra) दरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहेत आणि ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे. नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या या ऑफरवर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मला वाटतं त्यांनी हा शोध कुठून लावला मला माहिती नाही. माझ्या विभागात मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्या विभागात मातोश्रीचा हस्तक्षेप आहे असं म्हणणं चुकीचं आहे. राणेसाहेब हे युती काळात मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की, धोरणात्मक किंवा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सामूहिकपणे घ्यावा लागतो. राणे केंद्रीय मंत्री आहेत, उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा पॉलिसी डिसिजन घ्यायचा असेल तर पंतप्रधानांच्या संमतीने घ्यावा लागेल. " CM Eknath Shinde : विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, मोठी बातमी मिळणार? "नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य एकप्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अशाप्रकारे संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाहीये" असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पहिला दिवस कुणी नेला? ' असा प्रश्न पडला आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धनाची गरज कवीने दोन वेगवेगळ्या कवितांमधून सांगितली आहे. आमराईह्या कवितेत कवीने बेसुमार वृक्षतोडीकडे बालवाचकांचे लक्ष वेधले आहे. गावे सारी सुनी! ' महानगरातील मुलांसाठी बैलगाडीत बसण्याचा अनुभव तसा दुर्मीळच! म्हणूनच तर अलीकडे 'शेतीपर्यटन'ही संकल्पना भरभराटीस आली आहे. बैलगाडीच्या स्वारीचा अनुभव एका बालकाच्या शब्दांतच वाचा : पोटात दुखेल, हसून हसून! ' पर्यावरणाइतकाच स्वच्छतेचा संस्कार बालमनावर बिंबविणे अतिशय गरजेचे आहे. 'स्वच्छतादूत' ह्या कवितेत कवीने बाळगोपाळांना हेच आवाहन केले आहे : आपण सारे स्वच्छतादूत होऊ या! ' जगातला प्रत्येक माणूस असा स्वच्छतादूत बनला, तर पृथ्वीचे रूपांतर स्वच्छ आणि सुंदर स्वर्गात व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी हा ख-या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. तो उन्हापावसात राबतो, कष्टतो. हिरवं स्वप्न पाहतो. त्याच्या कष्टांची जाणीव करून देताना कवीने 'औत' ह्या कवितेत लिहिले आहे : कधीच नाही सुटला, त्याच्या हातातील कासरा' 'पोपटाची पार्टी 'ही ह्या संग्रहाच्या शीर्षकाची कविता. ह्या कवितेत पोपटाच्या पार्टीचे मोठे रंगतदार वर्णन आले आहे. त्यातील खाणेपिणे, नाचगाणे यातील धमाल कोणालाही आवडेल. पोपटाची पार्टी वाsरे वाs रे! ' ही कविता वाचून प्रत्येक बालकाला आपल्या वाढदिवसाची पार्टी अशीच बहारदार व्हायला हवी, असे वाटायला लागले, तर नवल वाटायला नको! चोराला पकडायचे असो, की वाहतुकीची कोंडी फोडायची असो, पोलीसदादा हजर! म्हणूनच तर ह्या कवितेतील बालक अभिमानाने सांगते : सांगू तुम्हाला किती! ' सदर संग्रहातील 'बस', 'कूकरची शिट्टी', 'डाळींची सभा', 'झाडावरची मजा', 'जत्रा', 'शाळेतून आला एक बेडूक', 'कावळा आणि कोकाकोला', ' जग जिंकण्यासाठी', 'खारूताई आणि माकड', ह्या कविताही मुळातून वाचण्यासारख्या आहेत. कविता एका रंगात आणि चित्रं एका रंगात छापून पुस्तकाची झकास निर्मिती केली आहे. बालकांचे भावविश्व समृद्ध करतील, अशाच ह्या सर्व बालकविता आहेत. निखळ वाचनानंद देणारी ही 'पोपटाची पार्टी' विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी एकदा अनुभवलीच पाहिजे. पोपटाची पार्टी (बालकवितासंग्रह) प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड. किंमत रु. ६०.
नवी मुंबई : ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सूट? नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi mumbai) ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत (Property tax relief) देणाची तयारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दर्शवली आहे. नवी मुंबई मनपाने (BMC) नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकास आराखड्यात टाकलेल्या सिडकोच्या भूखंडांवरील (cidco land reservation) आरक्षणाचा पुन्हा अभ्यास करून आरक्षण हटवण्याबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. (Property tax relaxation possibilities on five hundred square foot homes as eknath shinde clarification) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका हद्दीतील ५०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबईत नाराजीची लाट उसळली आहे. याबाबत सकाळने मालमत्ता करसवलतीत दुजाभाव या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून नागरीकांचा संतापाला वाचा फोडली. नवी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी मालमत्ता कर सवलत आणि भूखंड आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकारांसमोर स्पष्टीकरण दिले. यावेळी शिंदे यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस. एस. पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरूळ -बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपूल, पालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला. नवी मुंबईतील सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तोपर्यंत याआधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या विकास आराखड्यात सिडकोच्या भूखंडांवर महापालिकेने टाकलेले आरक्षम काढण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमिवर शिंदे यांनी घुमजाव केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
बंगळुरू : चांद्रयान २ मोहिमेला अपेक्षित यश न मिळाल्याने इस्रोमधील साऱ्या शास्त्रज्ञांचे काहीसे चेहरे पडले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक केले. विज्ञानात अपयश नसते, असतात ते प्रयोग आणि प्रयत्न. कधीही पराभव मानणाºया संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे, त्यामुळे केवळ मीच नव्हे, तर सारा भारत आणि सर्व भारतीय तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ , अशा शब्दांत पंतप्रधानांनी पुढील मोहिमांसाठी या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. चांद्रयान-२ चा अंतिम निकाल आपणा सर्वांच्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा प्रवास अतिशय उत्तम होता, असे सांगतानाच, या मोहिमेमुळे चंद्राला आपल्या कवेमध्ये घेण्याची इच्छा अधिक प्रबळ झाली असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. इस्रोच्या सेंटरमधून मोदी यांनी केलेले भाषण शास्त्रज्ञांना उद्देशून असले तरी त्यातून भारतीयांच्या मनातील अपयशाची भावनाही त्यांनी पुसून टाकली. त्यामुळे मोदी यांच्या भाषणानंतर देशभरातून इस्रो व त्यातील शास्त्रज्ञांना शाबासकी देणाºया व त्यांचे कौतुक करणाºया प्रतिक्रिया येऊ लागल्या. तुम्ही अजिबात निराश होऊ नका, अवघा भारत तुमच्या पाठिशी आहे, तुम्ही केवळ चांद्रयान-२ मोहिमेसाठीच नव्हे, तर जगात भारताची मान ताठपणे उंचावण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-२ मोहिमेसाठी तुम्ही घेतलेले परिश्रम सर्वांनी पाहिले आहेत. तुम्ही अगदी झपाटल्याप्रमाणे रात्रन्दिवस काम करीत होता. त्यामुळे कदाचित आपला वेग काही काळासाठी कमी झाला असला तरी तो थांबलेला नाही आणि तुम्ही तो थांबू देणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. या भाषणानंतर सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात आले आणि प्रत्येकाचा हात हातात घेत त्यांना शुभच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुकही केले. त्यावेळी सारेच शास्त्रज्ञ काहीसे भावनाविवश झाले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना तर त्या क्षणी आपल्या भावना आवरताच आल्या नाहीत. मोदी यांनी त्यांना मिठी मारून त्यांच्या पाठीवरून अनेकदा हात फिरवला. त्याप्रसंगी सिवन यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. ते पाहून सारे शास्त्रज्ञही सद्गदित झाले होते. चांद्रयान-२ मोहिमेचा अंतिम टप्पा पाहण्यासाठी देशभरातून अनेक शाळकरी विद्यार्थी इस्रोमध्ये आले होते. त्या सर्वांना तो क्षण पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्षात तसे न घडल्याने तेही काहीसे हिरमुसले झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी या मुलांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी काही मिनिटे गप्पा मारल्या. त्यावेळी एका मुलाने मला अंतराळवीर होण्याची इच्छा असल्याचे सांगताच, मोदी यांनी त्याला शाबासकी दिली. एका विद्यार्थ्याने आपणास राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचे सांगितले, तेव्हा मोदी यांनी 'पंतप्रधान व्हायचे नाही का? 'असा प्रश्न गमतीने केला. त्यावर सर्वांनाच हसू फुटले. यात काही विद्यार्थी भूतानचेही होते. पंतप्रधानांनी त्यांना इतर मुलांशी मैत्री झाली की नाही, असा प्रश्नही केला.
भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या विश्वस्त व संस्थापक अध्यक्ष केळकर यांच्या सौभाग्यवती मनीषा केळकर यांचे भोर हे माहेरघर आहे. त्यांच्या वडीलांचे स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट आहे. भोर ते अक्कलकोट पायी दिंडी दरवर्षी असते. त्यात मनीषाताईंचा नेहमी सहभाग असतो. मनीषा केळकर यांच्या माहेरातील अध्यात्मिक आणि सामाजिक वारसा त्यांच्याकडे जन्मजातच आला आहे. वडिलांप्रमाणेच अन्नछत्र, गरिबांना मदत, दिंडीच्या माध्यमातून कार्यक्रम आदी समाजकार्याचा वारसा त्या पतींबरोबर पुढे चालवत आहेत. मनीषाताईंचे शिक्षण बीएपर्यंत झाले. सोळा वर्षांपूर्वी वडिलांप्रमाणेच समाजकार्याची आवड असणाऱ्या राजीव केळकर यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यापासून त्या आपल्या पतीच्या समाजकार्यात अविरतपणे खंबीरपणे साथ देत आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलांचे पालनपोषण आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत, आपण समाजाशी देणं लागतो, ही जाणीव ठेवून केळकर दाम्पत्यांनी झोकून देऊन काम सुरू केले. सध्या त्या टिटेघर येथे भोर येथील बाजारभाव असलेल्या किमतीतच किराणा दुकान चालवत आहेत. सुईपासून सर्व वस्तू दुकानात भोर बाजारपेठेतील भावात मिळतात, पीठ गिरणी, गावात 16 बचत गट निर्माण करण्यासाठी मोठी मदत, महिला नवरात्र उत्सवामधून गावातील महिलांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. विविध समाजपयोगी कामे, "ध्रुव'च्या माध्यमातून महिलांना गोधडी, शिवण, फॅशन डिझाईन, कागदी पिशव्या, पार्लर प्रशिक्षण देऊन अनेक मुली व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहेत. पोटच्या मुलांप्रमाणे इतर गरीब कुटुंबातील मुलांचा सांभाळ करीत त्यांना सुसंस्कृत करीत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे त्या प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गरिबांच्या मुला-मुलींना खऱ्या अर्थाने एका मायेची ऊब त्यांनी दिली आहे. हल्लीच्या काळात दुसऱ्यांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या मनीषाताईंसारख्या महिला क्वचित पाहायला मिळतात. सर्व मुलांच्या काकू असलेल्या मनीषाताई संस्थेत असणाऱ्या मुलांचा बालहट्ट पुरवण्यात कधीच कमी पडत नाहीत. घरातील सर्व स्वयंपाक वगैरे कामे करून, मुलांचे संगोपन, दिवाळीत मुलांकडून आकाश कंदील कार्यशाळा आयोजित करून गरीब कुटुंब व मुलांना मोफत दिवाळी फराळ वाटप, शिवण प्रशिक्षणासह विधायक कामेही मोठ्या हिरारीने पार पडतात. पुण्यातील दानशूर व्यक्तीबरोबरच अमेरिकेत स्थायिक असलेल्या आरती अनावकर या नेहमी त्यांना मदत करतात. पुण्या-मुंबईहून सुट्टीला फिरायला आलेले काहीजण मनीषा केळकरांची भेट घ्यायलाही विसरत नाहीत. हीच त्यांच्या माणुसकी आणि सेवाभावातील जनसंचयाची पोचपावती आहे. मनीषा केळकर यांच्या कार्यात घनःश्याम केळकर, डॉ. योगेंद्र आगटे, प्रा. विनय कुलकर्णी, प्रविण ढोले-पाटील, रामचंद्र कितूर, किशोर केळकर आदींचा नेहमीच पाठिंबा मिळत असतो. भविष्यात ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे रोजगार निर्माण करणार आहेत. गुणवत्ताधारक गरीब, गरजू विद्यार्थांनीना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्या सक्रिय आहेत. समाजसेवेचा वारसा घेतलेले पती राजीव केळकर यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच मदत करणाऱ्या पडद्यामागच्या नारी शक्तीला म्हणजेच मनीषाताईंना जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा सलाम. करोना महामारीत लॉकडाऊनमध्ये "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर त्यांनी चार पाच गावांना किराणा वाटप केला. करोनाच्या काळात पती राजीव केळकर यांना मदत करण्याकरिता त्या ठाम उभ्या होत्या. वाचकांसाठी मोफत असणाऱ्या साडेसात हजार पुस्तकांचे स्मृतिग्रंध ग्रंथालय चालवतात. संस्थेतील काही मुलींना शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले. त्यांचे कन्यादान केले आहे. म्हसर येथील आरती आनंदा शिंदे हिचे संस्थेच्या वतीने शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. त्या मुलीने खो- खो, ऍथलेटिक्समधून जिल्हा व राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. गरजू, अनाथांची माय म्हणून त्यांची सेवाव्रती वृत्ती थक्क करणारी आहे.
BLOG : बाई भानावर या! कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वतःच एका अागळ्या वेगळ्या प्रकारे गाजावाजा केला आणि प्रकाशझोतात आल्या. बाईचे चित्रपट मोजके तेही तेलगू भाषेत असल्यामुळे ती आपल्याला फारशी परिचित असण्याचा फारसा संबंध नाही. पण कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वतःच एका अगळ्या वेगळ्या प्रकारे गाजावाजा केला आणि प्रकाशझोतात आल्या. चित्रपट सृष्टीत कास्टिंग काऊच हा मुद्दा तिच्यामुळे समोर आलाय असं नाही. चंदेरी दुनियेच्या पडद्यामागची शापित बाजू अनेकदा चर्चेत येत असते. पण तिने टॉपलेस होऊन अनोखे आंदोलन छेडल्यामुळे या मुद्दापेक्षा तिच्या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बाईनं तो स्टंट केला होता असा आरोप मला मुळीच करायचा नाही. पण तिने आज केलेल्या आरोपावर तिला भानावर आणावस नक्की वाटत. क्रिकेटच्या मैदानातील देवावर या श्रीची छाया का पडावी? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मैदानात ज्या माणसाने खेळातच नव्हे तर खेळाडूवृत्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले, त्याच्यावर आरोप करुन हिला काय मिळणार? एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यावर निशाणा साधण्याचा प्रकार करुन ती प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करतेय का? सचिन आणि चार्मी कौर अर्थात सुरदीप कौर यांच्यात रोमान्स झाल्याचा अर्थ श्री रेड्डीने फेसबुकवरुन शेअर केलेल्या पोस्टवरुन लावण्यात येत आहे. प्रसिद्धीसाठीच ती असे विपरित कांड करत असल्याचे बाऊन्सर तिच्यावर पडण्यास सुरुवातही झाली आहे. तिला असे समालोचन करुन याशिवाय दुसरे काय मिळणार म्हणा. क्रिकेटर आणि अभिनेत्री यांची नावे जोडणे ही गोष्ट आपल्याकडे नवी नाही. नव्वदीच्या दशकात भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा रोमान्सचा बादशहा म्हणून मिरवायचा. रवी शास्त्री आणि अमृता सिंग हे प्रकरणही चांगलेच गाजले. अजय जडेजा, युवराज सिंग, विराट कोहली, हार्दिक पांड्या ही मंडळीही प्रेमाच्या मोहजाळ्याला स्पर्शून आलेली मंडळी म्हणता येतील. पण मास्टर ब्लास्टरचे नाव आतापर्यंत अशा प्रकरणात कधीच आले नाही. त्यामुळेच श्री रेड्डीच्या बरळण्यावरुन देव भ्रष्ट होणार नाही तेही तितकेच खरे आहे. तेंडुलकरच्या बाबतीत अनेक किस्से क्रिकेट चाहत्यांना माहित आहेत. त्यातीलच एक ऐकीवातील किस्सा. लॉर्डसच्या मैदानावर इंग्रजांना नमवून शर्ट काढायचा प्लॅन सौरव दादाने आखला होता. यावेळी सचिन तेंडुलकरने रुमालही काढणार नाही, अशीच काहीशी भूमिका घेतली होती. त्यामुळे गांगुलीने वनमॅन आर्मीची भूमिका बजावत बेत तडीस नेला. सांगण्याच तात्पर्य आमच्या क्रिकेटच्या देवात संयम, लाजाळूपणा आणि आदर याचा भांडार आहे. त्याला बदनाम करुन कुणीही आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर त्याला फारसा फरक पडणार नाही. पण असे करणाऱ्याला मात्र चटका निश्चितच बसेल. सरशेवटी एवढच म्हणेन बाई तुमचा अभिनय कच्चा असल्याचे वेगवेगळ्या स्टंटबाज चर्चेतून सहज दिसून येतय. बाई आता भानावर या नाही तर बाद ठराल!
श्री. वेंकटरामन् यांचा जन्म तामिळनाडूमधील राजमदम या खेड्यात ४ डिसेंबर १९१० रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी घेतली. त्यांचा विवाह श्रीमती जानकी यांच्याशी १९३८ मध्ये झाला. त्यांना तीन कन्या आहेत. मद्रास हायकोर्टात वेंकटरामन् यांनी १९३५ पासून पॅक्टिस सुरु केली. परंतु याच काळात ते भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीकडे ओढले गेले आणि 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली. पुढे १९४७ ते १९५० वेंकटरामन् मद्रास बार फेडरेशनचे सेक्रेटरी होते. आपल्या कायद्याच्या करीयरमध्ये ते कामगारांसाठी विशेष कार्य करीत होते. १९४९ मध्ये त्यांनी एक कायद्याचे मासिक काढले, त्यांत कामगारांसंबंधीचे कायदे, त्यांची माहिती दिली जात असे. कामगार चळवळीत काम करीत असतानाच ते हळूहळू राजकारणाकडे ओढले गेले. १९५० मध्ये ते विधानसभेमध्ये निवडून गेले. १९५३-५४ ला ते काँग्रेसपार्टीचे सेक्रेटरी होते. १९५७ मध्ये लोकसभेत निवडून आले असूनसुद्धा त्यांनी तेथे राजीनामा दिला व मद्रास सरकारमध्ये ते मंत्री म्हणून काम पाहू लागले. १९६७ पर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात मंत्री म्हणून कार्य केले. याच काळात मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पुढारी होते. सरकारमध्ये निरनिराळी अनेक पदे भूषविल्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. १९५३ ते १९६१ या काळात अनेकवेळा त्यांनी परदेशांना भेटी दिल्या. अनेक विद्यापीठांकडून त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' च्या पदव्या मिळाल्या आहेत. कांचीपरम येथील शंकराचार्यांनी त्यांना 'सत सेवा रत्न ' असा किताब दिला आहे. ऑगस्ट १९८४ मध्ये श्री वेंकटरामन भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्याचवेळी ते राज्यसभेचे अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू अॅवॉर्ड समितीचे सदस्य, इंदिरा गांधी एवॉर्ड समितीचेही सदस्य अशी अनेक पदे ते भूषवीत होते. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडचे ते उपाध्यक्ष होते, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांचे कुलगुरुपदावरही ते कार्य करीत होते. १९८७ मध्ये त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि २५ जुलै १९८७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ ग्रहण केली. ते भारताचे आठवे राष्ट्रपती होत. देशाची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ घटनात्मक प्रमुख नव्हेत, तर भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांचे व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असतात. अशा या प्रमुखपदी प्रतिभाताई पाटील यांची निवड ही केंद्रीय राजकारणाचा अनुभव; निष्कलंक चारित्र्य, निष्ठा व परिपक्वता या निकषांवर झाली आहे. आणि या नव्या जबाबदारीला त्या योग्य न्याय देतील, यात शंका नाही. १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव जिल्ह्यातील नाङगाव येथे प्रतिभाताईंचा जन्म झाला. त्यांचे एम. ए. पर्यंतचे कॉलेजशिक्षण जळगावातच झाले. कॉलेजमध्ये खेळातही आघाडीवर असणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यानंतर मुंबईत लॉ कॉलेजमध्ये एल्. एल्. एम्. ची पदवी घेऊन जळगावात वकिली चालू केली. पण त्यानंतर मात्र त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९८५ या काळात महाराष्ट्रात त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली. नगरविकास, शिक्षण, पर्यटन, संसदीय कामकाज, सार्वजनिक आरोग्य, सांस्कृतिक अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची चिंता केली, त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी दर करण्याचा प्रयत्न केला. १९८५ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर वर्षभरात त्या उपसभापती झाल्या. १९८८ ते १९९० त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष होत्या. १९९१ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर मात्र त्या जणू राजकीय विजनवासात गेल्या. तब्बल आठ वर्षानंतर २००४ मध्ये त्या राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झाल्या आणि पुनः राजकीय पटलावर दिसू लागल्या. प्रतिभाताईंचे पती देवीसिंह शेखावत अमरावतीचे महापौर होते. प्रतिभाताईंच्या राजकारणाला देवीसिंह यांची नेहमी साथ असते व ताईंच्या यशात देवीसिंह यांचा मोठा वाटा आहे. प्रतिभाताईंना ज्योती राठोड ही मुलगी व राजेंद्रसिंग हा मुलगा आहे. आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषविताना त्यांची सामान्य जनतेबद्दलची तळमळ सतत दिसून येते. कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात त्या कुशल आहेत. विरोधी पक्षनेत्या असताना सरकारवर जबरदस्त प्रहार करण्याची कुवत त्यांच्या ठिकाणी होती. अशा या करारी व्यक्तिमत्त्वाने आता राष्ट्रपतीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. दि. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली. सह्याद्री व सातपुड्याचे कडे ओलांडून राजस्थानातील अरवली पर्वत पार करून पाटील आडनांवाची ही धीरगंभीर महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या सिंहासनावर सन्मानाने विराजमान झाली आहे. पहिली मॅडम प्रेसिडेंट ' महाराष्ट्राने देशाला दिली आहे. साधी रहाणी व उच्च विचारसरणीचा वस्तुपाठ त्या आपल्याला देतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी वर्किंग वुमेन्स होस्टेलची स्थापना केली आहे. जळगावात इंजिनिअरिंग कॉलेज, साखर कारखाना, अंधांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भटक्या विमुक्तांसाठी शाळेची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे त्यांच्या स्वभावातच आहे, त्यानुसार त्या या पदावरून भरीव कामगिरी करून दाखवतील, अशी खात्री वाटते. परंपरा व " प्रोफेशनॅलिझम' याचा अनोखा संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. त्यांच्या नव्या कारकीर्दीला अनेकानेक शुभेच्छा !! . P. V. Narasimha Rao यांचे संपूर्ण नांव पामुलपति वेंकट नरसिंहराव. हे भारताचे नववे पंतप्रधान होत. १९९१ ते १९९६ ते पंतप्रधान होते. देशाचे पंतप्रधान होणारे ते दक्षिण भारतातील पहिले नेते आहेत. नरसिंहराव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी करीमनगर येथेच झाले. वरंगळ येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेस, आर्यसमाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्याग्रह चळवळीत भाग घ्यायला सुरूवात केली. हैद्राबादच्या निजाम सरकारच्या विरुद्ध बंड करून सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना निजाम सरकारच्या उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. तेव्हा त्यांनी आपले पुढील शिक्षण नागपूर विद्यापीठातून आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. ते बी. एस्. सी. एल्. एल्. बी. झाले आहेत. शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वतःला वंदे मातरम् चळवळीत झोकून दिले होते. त्रिपूर येथे भरलेल्या काँग्रेस महासभेत त्यांनी भाग घेतला होता. हैद्राबाद काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सतत २० वर्षे ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. इ. स. १९५१ पासून ते अखिल भारत काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाह लागले. आंध्र प्रदेशच्या शासनात त्यांनी अनेकविध पदे व मंत्रिपदे सांभाळली. १९७१ ते ७३ आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. इ. स. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. चंदीगडला भरलेल्या अधिवेशनात त्यांनी राजनीति व विदेशी धोरण यावर अभ्यासपूर्ण भाषण दिले. १९७७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीत . जिंकले. १९७४ मध्ये ते पार्लमेंटच्या पब्लिक अकौंटस् कमिटीचे चेअरमन झाले. १९८० मध्ये ते विदेशमंत्री बनले. १९८० ते १९८४ ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात होते. १९८५ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातही ते होते. १९८९ साली ते चौथ्यावेळेला लोकसभेसाठी निवडून आले. त्यांनी विदेश मंत्रालय, गृहरक्षा, मानवविकास अशा विविध खात्यांवर मंत्री म्हणून कार्य केले आहे. २९ मे १९९१ या दिवशी ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. २१ जून १९९१ रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सीटीबीटी करार स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. १९९६ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते. परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा सोने गहाण टाकून देशाचा कारभार चालू होता. इतकी हलाखीची परिस्थिती होती. या परिस्थितीतून जनतेला कुठेही चटका बसू न देता नरसिंहराव यांनी गहाण टाकलेले सोने परत आणले आणि देशाचा रथही विकासाच्या मार्गावर आणून ठेवला. आर्थिक उदारीकरण हे अपत्य नरसिंहराव यांचेच आहे आणि याच्या पायावरच भारताची विकासाची गती सतत वाढत आहे. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष अल्पमतात आला आणि आघाडी शासन सत्तेवर आले. नरसिंहराव विरोधी पक्षाचे नेतत्त्व करू लागले. ते जसे धुरंधर राजकारणी आहेत, तसेच ते साहित्य तपस्वीही आहेत. ते उत्तम तेलगू कथालेखक आहेत. तेलगू, मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भारतीय भाषांबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. तेलगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांची 'वेईपडिगळु' ही कादंबरी त्यांनी हिंदीत 'सहस्त्रकणा' या नावाने अनुवादीत केली आहे. मराठीतील पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचा त्यांनी तेलगमध्ये अनुवाद केला आहे. 'बहुभाषामेधावी ' अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी इनसायडर' हे कादंबरीवजा आत्मवृत्त लिहिले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. पाश्चात्य साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे अनेक भाषांवरचे प्रभुत्व व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टी अनेक नेत्यांना व जनतेला आकर्षित करणाऱ्या ठरल्या. सुसंस्कृत, विद्वान व ज्ञानयोगी अशा नरसिंहराव यांनी देशाचा गौरव सतत वाढता खला या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराचे २३ डिसेंबर २००४ ला निधन झाले. श्री. रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होत. ते एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात. सर्व थरातील लोकांशी संवाद साधणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. श्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म १९ मे १९१३ रोजी आंध्रप्रदेशातील रायलसीमा या अविकसित भागातील अनंतपूर येथे झाला. अडयार ( मद्रास ) येथील थिऑसॉफिकल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु त्या काळात स्वातंत्र्यचळवळीचे वारे जोरात वाहत होते. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि अनेकदा कारावास भोगला. या काळात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून आले. तरुण वयात त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली. दहा वर्षे ते या पदावर होते. मद्रास विधान सभेची १९४६ मधील निवडणूक त्यांनी सहज जिंकली आणि त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द सुरु झाली. १९४९ ते ५१ ते मद्रास राज्यात दारुबंदी मंत्री होते. १९५२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान स्वतंत्र आंध्रचा लढा यशस्वी होऊन टी प्रकाशम हे नव्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांना साथ देण्यासाठी श्री. रेड्डी हैद्राबादला परतले. मधे काहीकाळ ते पुनः १९५६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आले. १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र अवघ्या चारच महिन्यांनी लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्यावर केंद्रीय पोलाद खात्याची जबाबदारी टाकली. पंतप्रधान शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्री. रेड्डी यांना पर्यटन खाते दिले. १९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत श्री. रेड्डी हिंदूपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आणि लोकसभेचे सभापती बनले. १९६९ ची निवडणुक हा श्री. रेड्डी यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय ठरला. जगजीवनराम आणि श्री. रेड्डी या दोघांमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. रेड्डी यांचीच निवड झाली. पण त्यांना व्ही. व्ही. गिरी या अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसही फुटली आणि इंदिराजींचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रपतीपदाचा हा हुकलेला योग श्री. रेड्डी यांच्यासमोर १९७७ मध्ये आला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून ते निवडून आले आणि लोकसभेचे सभापतीपद त्यांच्याकडे आले. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दिन अलि अहमद यांच्या निधनानंतर १९७७ मध्ये श्री. रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. परस्परांशी कमालीचा राजकीय संघर्ष असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी व श्री. रेड्डी यांना १९८० ते ८२ या काळात एकत्र काम करावे लागले. . वेंकटेश्वर युनिव्हर्सिटीने श्री. रेड्डी यांना डॉक्टर ऑफ लॉज' ही डिग्री दिली. k r narayanan यांचे संपूर्ण नांव नारायणन् कोचेरी रामन. २७ ऑक्टोबर १९२० ला केरळमधील उजावर या गावी एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होत. विद्यार्थीदशेपासूनच ते तल्लख बुद्धीचे हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी शिकवण्या करून व शिष्यवृत्त्या मिळवून केले. तिरुअनंतपुरमच्या महाविद्यालय व विश्वविद्यालयातून उत्तम गुण मिळवून ते पदवीधर झाले. १९५१ मध्ये त्यांचा विवाह माटिन्ट टिन्ट ( आताच्या उषा ) या ब्रह्मदेशीय महिलेशी झाला. सरुवातीच्या काळात त्यांनी व्याख्याते म्हणून कार्य केले. नंतर 'टाइम्स ऑफ इंडिया ' 'हिंदू' ( मद्रास ) अशा दैनिकांमधून पत्रकारीता केली. याचवेळी त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुढील शिक्षणासाठी ते खाना झाले. लंडनला असताना ते ' सोशल वेल्फेअर वीकली ( मुंबई ) ' या साप्ताहिकाचे लंडन येथील वार्ताहर म्हणून काम पहात असत. के. एम्. मुन्शी या साप्ताहिकाचे संपादन करीत असत. लंडनच्या वास्तव्यात नारायणन् यांचा परिचय जागतिक कीर्तीचे विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की यांच्याशी झाला. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नारायणन यांना मिळाले. १९४८ साली राज्यशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. प्रा. लास्की यांनी पंडित नेहरूंकडे नारायणन यांची शिफारस केली. १९४९ साली पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय विदेशी सेवेत घेतले. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आपली तल्लख बुद्धिमत्ता व व्यावसायिक राजनीति यांचा त्यांनी कुशलतेने योग्य असा वापर केला. कित्येक विदेशी राजनैतिक समस्या त्यांनी हुशारीने हाताळल्या. भारताचे राजदत म्हणून त्यांनी थायलंड व तुर्कस्तान येथे काम पाहिले. भारताचे शिष्टमंडळ घेऊन ते रंगून, टोकियो, लंडन, ऑस्ट्रेलिया, हॅनोई या ठिकाणी गेले. १९६८ मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत-चीन संबंध बिघडले होते. भारताचे राजदूत या नात्याने के आर. नारायणन १९७६ मध्ये चीनला भेट देण्यास गेले. चीन-भारत संबंध पुनः प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. विदेशी सेवेतून मुक्त झाल्यावर विद्यापीठाचे उपकुलगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याआधी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्रीय प्रशासनाचे व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले. वॉशिंग्टन येथे भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या पदावर ते चार वर्षे राहिले. १९७० मध्ये त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. वॉशिंग्टनमधील जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला. लोकसभेत त्यांची नियोजन आणि पाणीखाते, परराष्ट्र व्यवहार, आणि विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून निवड झाली. पुढे भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर त्यांची एकमताने निवड झाली. २५ जुलै १९९७ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. ' मेमोरियल फंड ', ' इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च' अशा अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. 'एसेज् इन अंडरस्टैंडिंग ', 'नॉन अलायनमेंट इन कंटेंपरी इंटरनॅशनल रिलेशन्स इन इंडिया अँड अमेरिका ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यात भारतीय राजनैतिक धोरणावर भाष्य केले आहे. इ. स. २००२ पर्यंत नारायणन राष्ट्रपती पदावर होते.
पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) - दैनंदिन काम करताना प्रत्येकालाच वाटते की आपल्यामध्ये उत्साह असावा. परंतु काही वेळा आळस आल्यास जांभळी येते. त्यानंतर वारंवार जांभई येण्याची सुरुवात होते. आपल्या सोबत इतरांना देखील जांभई येऊ लागते. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, नेमके असे का होते. जास्त जांभई येण्याची कारणे म्हणजे झोप न लागणे, थकवा आणि कंटाळा ही जांभई येण्याची मुख्य कारणे आहेत, परंतु जांभई येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. हायपोथायरॉईड : हायपोथायरॉईडीझमची समस्या असते तेव्हा शरीर आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन तयार करू शकत नाही. ही एंडोक्राइन सिस्टमशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही. त्यामुळे जांभईही सतत येत राहते. झोप कमी होणे : सर्वात प्रमुख आणि सामान्य कारण म्हणजे रात्रीची झोप कमी होणे. त्यामुळे लोक दिवसभर जांभई देतात. संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला ७ते ८ तासांची झोप लागते. पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे स्लीप अॅपनिया नावाच्या विकाराची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे जांभई सतत येत राहते. साइड इफेक्ट्स : काही औषधांचे दुष्परिणाम देखील सतत मळमळ होण्याचे कारण असू शकतात. जास्त जांभई दिल्याने बद्धकोष्ठता, सूज येणे, जुलाब, चक्कर येणे आणि तोंड कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासून दूर राहायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका. ताणतणाव : हृदयाच्या समस्या : सतत जांभई येणे देखील हृदयाच्या समस्या दर्शवते. खरं तर, जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते, तेव्हा रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याकरिता काळजी घ्यावी.
मराठे, सिद्दी आणि इंग्रज : १३७ ठेवून घेतले. तो दि. ५ - १० - १६८२ रोजी मरण पावला.' ही बातमी सुरतचा मुत्सद्दी कारतलबखान यास कळविण्यात आली होती. बरा झाल्यावर सिद्दी मिस्त्रीला त्याच्याकडे पाठविण्यात येणार होते. त्याच्या बरोबरच्या माणसांत जे लोक मुसलमान असतील त्यांना जीवे मारू नये. जे हिंदू मुसलमान होत असतील त्यांना कैदेत ठेवावे. जे मुसलमान होण्यास नकार देतील त्यांना ठार करावे. २ सिद्दीला सर्व प्रकारची मदत देण्यास सुरतकर मुंबईकरांना सांगत होते. रु. १०००० सर्व प्रकारचा माल आणि सिद्दीची कुटुंबे मुंबईत राहू द्यावी असेही सुरतकरांनी बजाविले. सुरतकरांचे हे धोरण पसंत नसल्याने मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल, दुष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे कठीण असल्याचे मुंबईकरांनी कळविले. ४ सुरतकरांच्या या धोरणामुळे मुंबईकरांच्या पोटात भीती वाटत होती. ते दि. ५-१०-१६८२ रोजी लिहितात, " सिद्दी संभाजी राजांची सारखी आगळीक करीत आहे. तो येथून गेल्यावर मात्र आमची धडगत राहणार नाही, तरी सैनिक आणि आरमारी मदत ताबडतोब पाठवावी. संभाजी राजांनी अन्नधान्य आणण्याची सक्त मनाई केलेली असून पोर्तुगेजांनी ही मुंबईला धान्य देऊ नये म्हणून जाहीरनामा काढला आहे. सुरतकरांनी मुंबईकरांच्या अडचणीकडे लक्षच दिले नाही. सिद्दीच्या संबंधात बोलणी करण्यासाठी आणि इंग्रजांची मैत्री संपादण्यासाठी संभाजी राजांनी आपल्या वतीने न्यायाधीश प्रल्हाद निराजीला पाठविण्याचे ठरविले. मुघल सैन्य कल्याण-भिवंडीला वेढा देऊन बसलेले होते. मुघलांनी सर्वत्र आक्रमक पवित्रा घेतलेला होता. अशा वेळी सिद्दी, इंग्रज आणि मुघल एक झाले तर मराठी राज्याला भयंकर धोका उत्पन्न होण्याची भीती होती. अशा परिस्थितीत इंग्रजांची मैत्री संपादून मुघलांना मदत करण्यापासून त्यांना परावृत्त करणे आवश्यक झाले होते. या दृष्टीने आपण होऊन संभाजी महाराजांनी प्रल्हादपंतांना इंग्रजांकडे पाठविण्याचे ठरविले असावे असे दिसते. दि. २४-१०-१६८२ पूर्वी ते महाराजांचे अनेक निरोप घेऊन इंग्रजांना भेटण्यासाठी निघाले. त्यांनी महाराजांचे अनेक हुकूम इंग्रजांना कळविले. मराठे इंग्रजांना पैशाची व सैन्याची ( मुंबईच्या संरक्षणासाठी असावी ) मदत करावयास
पुणे । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात लढा दिला, अन्नधान्य, ऊस, कापूस, दुधाला योग्य खरेदीदर मिळावा. तसेच त्यांनी पीकविम्यासाठी आंदोलनही केली आहेत. त्यामुळे त्यांना कृषिमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाने म्हटलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान, समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषिमंत्री पद स्वीकारू, अशी इच्छा राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. 'जिओ प्राईम'नुसार दर महिन्याला 303 रुपयांचा रिचार्ज केल्यास, अनलिमिटेड कॉल, एसएमएस आणि दररोज 1 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने 346 रुपयांचा जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे. जिओचा प्लॅन हा त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठीच असेल, तर व्होडाफोनने अशी कोणतीही अट ठेवली नाही. व्होडाफोनच्या सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. व्होडाफोन नवा प्लॅन काय आहे? व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 346 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये दररोज 1 जीबी 3G आणि 4G डेटा या प्रमाणे 28 GB 4G डेटा मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड फ्री कॉल करता येणार आहेत. रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबरशिप आणि एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या ऑफर्समुळे इतर प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांमध्ये नव-नव्या ऑफर्सवरुन स्पर्धा सुरु झाली आहे. खरंतर इतर कंपन्यांना जिओचा चांगलाच धसका घेतला आहे. एअरटेलपाठोपाठ आता व्होडाफोननेही इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉल्सचा प्लॅन लॉन्च करत जिओलाच टक्कर दिली आहे. व्होडाफोनच्या नव्या प्रीपेड ग्राहकांसाठीच्या प्लॅनला कसा प्रतिसाद मिळतो आणि जिओला टक्कर देण्यात व्होडाफोनला यश मिळतंय का, हे येत्या काळात दिसून येईल.
पुणे : भाजपच्या एका खासदाराच्या हट्टापायी पुणे मेट्रो अडीच वर्षे रखडली. परिणामी प्रकल्पाचा खर्च हजार कोटींनी वाढला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी केला. येत्या शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो भाजपाने आणली असा दावा त्यांच्या नेत्यांकडून केला जात असताना पवार यांनी मेट्रो रखडवल्यावरून भाजपावर शरसंधान साधले. पुण्याचा मेट्रो प्रकल्प केंद्राकडे मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असताना मेट्रो एलिव्हेटेड असावी की भुयारी यावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादात मेट्रो बरेच दिवस रखडली. यावरून अजित पवार यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे. कर्वेनगरमध्ये तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक टेनिस कोर्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने उपस्थित होते. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचा निगडीपर्यंत विस्तार व्हावा यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. एका चहावाल्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्ती सापडत असल्याकडे निर्देश करीत चूक झाली आणि राजकारणात आलो, चहा विकला असता तर बरे झाले असते, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली. आगामी २०१७ या वर्षात कोणत्याही नागरिकाला रांगेत थांबावे लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बारामती - येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करीत ग्रामीण पोलिसांनी 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. बारामतीतील आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. संतोष लक्ष्मण गायकवाड (रा वसंतनगर, बारामती,) व हरी दगडू नवले, (रा शिक्षक सोसायटी, कसबा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवलेला अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना माहिती मिळाली की, संतोष गायकवाड व हरी नवले हे बारामती शहरामध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून बारामती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या गोडाऊनची माहिती घेऊन पोलिसांनी सापळा रचला. बारामती क्राईम ब्रॅंचचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह कसबा आणि वसंत नगर येथील गोडाऊनवर छापा टाकत नवलेला ताब्यात घेतले. तर हा गुटखा गायकवाडचा असल्याचे नवलेने सांगितले. कसबा येथील गोडाऊनमधून 18 लाख 99 हजार 700 रुपयांचा तर वसंतनगर येथील गोडाऊनमधून अंदाजे 11 लाख रुपयांचा असा 29 लाख 99 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, भाऊसाहेब मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, गणेश नांदे, सिद्धू पाटील, राजेश गायकवाड, रामदास जाधव यांनी कारवाई केली.
'बिग बॉस मराठी २' च्या घरातील पहिला दिवस सदस्यांचं एका बाबीवर एकमत झालं ते म्हणजे अभिजीत बिचुकलेना नॉमिनेट करायचं. अभिजीतने कालपासून या ना त्या कारणाने घरात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या मनात महिलांविषयी असलेला अनादर वेळोवेळी दिसून आला आहे. याशिवाय किचनमध्येही बिचुकले, नेहा शितोळे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले यांच्यात लादी पुसण्यावरून खडाजंगी झाली. त्यामुळे काल गोड गोड वाटत असलेले अनेकांचे शब्द आज काहीसे बोचरे वाटत आहे. बिचुकलेनंतर नॉमिनेशनसाठी सगळ्यांच्या रडारवर आहे शिव ठाकरे. घरात एंट्री घेतल्यानंतर रुपाली आणि शिवमधील झालेला वादही याला काहीसा कारणीभूत असावा. पण बिचुकलेंच्या नावावर नॉमिनेशन करण्यबाबत मात्र एकमत आहे. त्यामुळे बिचुकलेंचं भवितव्य काय असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या एलएलएम व एलएलबी वर्गातून दोन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील एलएलबी या अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. अंतिम सत्राच्या निकालानंतर झालेल्या ऑनलाइन पदवीप्रदान समारंभात डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील पदव्युत्तर परीक्षेत यशवंत कोंडू चित्ते व एलएलबी तृतीय वर्ष अभ्यासक्रमातून चंद्रकांत रमेशचंद्र अग्रवाल यांना सिव्हिल प्रोसिजर कोड या विषयासाठी सुवर्णपदक बहाल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस. जी. गाडगे यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई : जागतिक दुस-या क्रमांकाचा एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड टीसीएलने गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर कोहिनूर येथे प्रिमिअम व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही सी७२५ आणि ४के एचडीआर टीव्ही पी७२५ लाँच करत उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर घातली आहे. टीसीएल सी७२५ क्यूएलईडी ४के टीव्हीमध्ये उच्च दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीसह क्यूएलईडी तंत्रज्ञान व डॉल्बी व्हिजन आहे. तसेच या टीव्हीमध्ये अनेक कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्यांसह व्हिडिओ कॉल आहे. क्यूएलईडी टीव्ही अपवादात्मक पिक्चर क्वॉलिटीसाठी आकर्षक कलर्स, सुधारित कॉन्ट्रास्ट आणि अद्वितीय सुस्पष्टतेची खात्री देतो, तसेच गुगल ड्युओ अॅपच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा देतो. सी७२५ मध्ये स्मार्ट यूआय, गतीशील रिफ्रेश रेट, एमईएमसी व एआयपीक्यू इंजिन आहे, जे वास्तविक रूपात पिक्चर दिसण्याची खात्री देतात. गुगल असिस्टण्टच्या माध्यमातून युजर्स चॅनेल्स बदलू शकतात, आवाज समायोजित करू शकतात, प्लेबॅक नियंत्रित करू शकतात आणि त्यांच्या वॉईस कमांडसह अनेक गोष्टी नियंत्रित करू शकतात. टीसीएल नवोन्मेष्कारांना सादर करते, जेथे तंत्रज्ञानाला आधुनिक डिझाइन्सची जोड आहे. टीसीएल स्मार्ट एआय व अँड्रॉइड आर(११) ची शक्ती असलेल्या पी७२५ मध्ये अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स व अनेक मनोरंजन अनुभव देण्यासाठी मॅजिकल वेब कॅमेरा आहे. प्रेक्षकांना एमईएमसीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व्हिज्युअल्सचा देखील आनंद मिळतो. हा टीव्ही अधिक इंटरअॅक्टिव्ह कार्यक्षमता व सर्वोत्तम मनोरंजनासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा टीव्ही प्रत्येक कोप-यामधून आकर्षक दिसतो आणि या टीव्हीमध्ये मेटलिक स्लिम बेझेल-लेस डिझाइन व इन्वर्टेड व्ही-शेप स्टॅण्डसह फॅब्रिक स्टॅक आहे, जे टीव्हीच्या मध्यभागी असून त्यामध्ये पॉवर एलईडी आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही सी७२५ कोहिनूर येथे फक्त ५३९९० रूपये या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. ब्रॅण्ड पहिल्यांदाच अर्ली बर्ड ऑफर्ससाठी नियोजन करत आहे, जेथे ब्रॅण्ड १७,००० रूपयांचा ब्ल्यूटूथ स्पीकर मोफतपणे देईल. यासोबत ग्राहकांना २,९९९ रूपयांचा व्हिडिओ कॉल कॅमेरा देखील मोफत मिळेल (१० एप्रिल २०२२ पर्यंत वैध). ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के कॅशबॅक आणि अधिक आकर्षक ऑफर्सचा देखील आनंद घेता येईल. या लाँचबाबत बोलताना टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक शेन म्हणाले, "युजर्सना सर्जनशील जीवन देण्याच्या मनसुब्यासह आम्ही विचारशील डिझाइन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थपूर्ण अनुभव देतो. आमचे व्यापक उत्पादन कौशल्य, सर्वोत्तमरित्या एकीकृत पुरवठा साखळी आणि अत्याधुनिक पॅनेल फॅक्टरी सर्वांना नवोन्मेष्कार देण्यामध्ये मदत करतात. जीवनाला सर्वोत्तम बनवण्याच्या दृष्टीकोनासह आमचा विश्वसनीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्पर्धात्मक ब्रॅण्ड बनवण्याचा विश्वास आहे. ब्रॅण्डचे मुख्य ध्येय उत्पादने व सेवांच्या संदर्भात अचूक परिपूर्णता संपादित करण्याचे आहे."
आज हजारो संस्था व व्यक्ती वृक्षारोपण करीत असतात, मात्र केवळ संवर्धन होत नसल्याने वेळोवेळी रोपण करण्यात आलेली झाडे जगत नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाने एक झाड संवर्धन करण्यावर भर देण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे यांनी केले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी गोडसे बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, भगीरथ हांडोरे, कृष्णा चव्हाण, विशाल साळुंके, आबा शेवाळे, मनोहर बागूल, चंद्रभान पाटील, संतोष मुळे, मनोहर साळुंके, अनुपशा शाहू, स्वाती कांडेकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनात पोलिसांचाही हातभार लागावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वांजळे यांनी सांगितले.
सोलापूर येथे पुन्हा संताप करवणारी घटना घडली आहे. अनेक कारणावरुन वादात सापडणारे बार्शी पोलीस परत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये आता हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. हा सर्व प्रकार खासगी वृत्त वाहिनीच्या हाती लागला आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितासोबत सार्वजनिक ठिकाणी जेवण करणाऱ्या या बार्शी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बद्दल टीव्ही नाईन ने वृत्त दिले आहे. यातील प्रकरण असे की मागच्या वर्षी 29 ऑक्टोबर 2018 वेळी बार्शी येथे रहिवासी असलेला अंकुल उर्फ गोल्या चव्हाण हा त्याच्या घरी मुलीला खेळवत होता. त्याचवेळी त्याच्यावर अज्ञात तरुणाने तलवारीने हल्ला केला आणि त्याची हत्या केली होती. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सुरज चव्हाण, दीपक माने, सुरज मानेसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणातील चार आरोपींना अटक देखील केली. मात्र इतर आरोपी फरार आहेत. मृत अंकुल चव्हाणच्या नातेवाईकांनी उर्वरित फरार आरोपीच्या अटकेसाठी उपोषण केले, त्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला आणि किरण गुळवे या संशयिताला अटक केली. या अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी बार्शी न्यायालयात हजर केल होते, न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यानंतर या आरोपीची न्यायालयातून थेट पोलीस कोठडीत रवानगी होणे गरजेचे किंबहुना तसेच होणे अपेक्षित होते. मात्र, बार्शी पोलिसांनी संशयित आरोपी किरण गुळवे याला बार्शीतील एका हॉटेलमध्ये जेवण करायला नेले व त्याच्यासोबत एकाच टेबलावर बसून जेवणही देखील केले. बार्शी पोलिसांचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. आरोपीसोबत जेवण हे तर कायद्याचा अपमान असून या पोलिसांनवर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनासाठी प्रशासन तयार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनासाठी प्रशासन तयार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. विशेषतः मिहानमध्ये प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून डांबरी ठिगळ लावण्यात आले आहेत. याबाबत 'मटा' सातत्याने पाठपुरावा करत असून, एमएडीची कामाला लागल्याचे चित्र आहे. मिहानच्या उड्डाणपुलावर गेल्या वर्षभरापासून खड्डे दिसून येत आहेत. मात्र, त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. दरम्यान, मिहान परिसरातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या (आयआयएम) शैक्षणिक परिसराचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद येत असून खड्डेयुक्त मार्गावरून त्यांना न्यायचे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यानंतर एमएडीसीने मिहानमधील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी एकूण ६९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. एमएडीसीने केलेल्या दाव्यानुसार, परिसरातील सर्व रस्त्यांची डागडुजी समाधानकारक झाली आहे. मात्र, 'मटा'ने केलेल्या पाहणीत उड्डाणपुलावरील खड्ड्यांची संख्या पाहता हा संपूर्ण मार्गावर डांबरीकरण आवश्यक होते. असे असतानाही एमएडीसीने केवळ खड्डे असलेल्या जागांवर डांबरी पॅचेस तयार करून रस्त्याची दुरुस्ती झाली म्हणत हात वर केले आहेत. वास्तविक पाहता, हे पॅचेस पुढील काही दिवसांत उखडून पुन्हा रस्त्यांची स्थिती जैसे थे होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्गाचे योग्य डांबरीकरण अधिककाळ टिकणारे राहिले असते, अशी भावना तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मिहानमधील रस्त्यांच्या कामाबाबत एमएडीसीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यानुसार, मिहान उड्डाणपूल तसेच आतील रस्त्यांची दुरुस्ती झाली असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवणगाव येथील रस्त्याचेदेखील डांबरीकरण झाले आहे.
नवी दिल्ली 01 मार्च : खरी मैत्री ही सर्वोत्तम मानली जाते, जी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असते. आपल्यापैकी बहुतेकांचे अनेक मित्र असतात. अनेकदा आपण माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या कथाही ऐकतो. मात्र यात कुत्रा, मांजर आणि पोपट यांच्यासोबतच्याच मैत्रिणीच्या जास्त कथा असतात. पण मैत्रीची एक नवी आणि अनोखी बातमी आता समोर आली आहे. यात एका व्यक्तीची अशा एका जिवासोबत मैत्री झाली, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटरवर बसून रस्त्याने चाललेला दिसत आहे. तर, त्याच्या बरोबर डोक्याच्या वरती एक पक्षी उडताना दिसत आहे, या पक्षाची व्यक्तीसोबत अतिशय खास मैत्री आहे. ही मैत्री जरा विचित्र वाटली तरी सारस आणि माणसामधलं हे बंध अतूट आहे हे मात्र खरं. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती मोहम्मद आरिफ आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक वर्षापूर्वी आरिफला हा पक्षी शेतात जखमी अवस्थेत सापडला होता. यानंतर त्याने या सुंदर पक्षाला आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्याने पक्ष्याच्या जखमांवर उपचार करून त्याला पुन्हा उड्डाणासाठी योग्य केलं. मात्र एकदा आपले घाव भरल्यानंतर पक्षाने असं काही केलं जे पाहून गावातील सगळे लोक थक्क झाले. हा पक्षी परत आकाशात उडलाच मात्र तो आरिफच्या घरीच येऊन थांबला. तेव्हापासून हा पक्षी आरिफचा सर्वात खास मित्र बनला आणि त्याच्यासोबतच राहातो. आरिफ जेव्हा कामासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा हा पक्षीही त्याच्यासोबत 30-40 किलोमीटरपर्यंत उडत प्रवास करतो. या दोघांच्या अनोख्या मैत्रिणी देशभरातील लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
मुंबईः इंडियन प्रीमीयर लीग(indian premier league) २०२१च्या नव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत खेळवणाऱ्या सर्व फ्रेंचायजी टीममधील एक टीम अशी आहे जिच्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. हा संघ म्हणजे विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखाली खेळणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore). आतापर्यंत या संघाने एकदाही आयपीएलचा खिताब जिंकलेला नाही. यावेळी आरसीबीचा संघ विजयासाठी दावेदार मानला जात आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरूवात दोन धुरंधर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघादरम्यानच्या सामन्याने होणार आहे. ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होत आहे. विराटचा संघ या सामन्यात विजय मिळवत विजयी सुरूवात करू पाहणार आहे तर गतविजेता चॅम्पियन असलेल्या मुंबईलाही विजयाची आस आहे. आरसीबीने बुधवारी या दिग्गज खेळाडूचा फोटो शेअर करत एक विचार पोस्ट केला. यात कर्णधार विराट कोहलीच्या फोटोसह लिहिले आहे की तो टीम सोडण्याबाबत विचार करू शकत अथवा दुसऱ्या कोणत्याही टीमचा भाग होण्याचा विचार त्याच्या मनात येईल. यात मिस्टर ३६० डिग्री नावाने प्रसिद्ध दिग्गज क्रिकेटर एबी डे विलियर्सच्या नावाचाही समावेश आहे. यानंतर संघात सामीलकेलेल्या रजत पाटीदार या युवा खेळाडूचेही नाव आहे. या खेळाडूसोबत लिहिले की मिळणाऱ्या संधीला दोन्ही हातांनी मिळवण्यासाठी तयार आहे.
Farmers Protest in Mumbai: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे मान्य केले असले, तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्यास, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळावी यासाठी संसदेत कायदा करावा. तोवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकरी नेते Rakesh Tikait यांनी दिला. मुंबई : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे मान्य केले असले, तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्यास, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळावी यासाठी संसदेत कायदा करावा. तोवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला. महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन आणि किसान आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चातर्फे रविवारी आझाद मैदानात 'शेतकरी-कामगार महापंचायती'चे आयोजन करण्यात आले. मुंबईसह गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली-सातारा, रायगड, पालघरमधून कष्टकरी आणि आदिवासी मोठ्या संख्येने महापंचायतीत सहभागी झाले. या कार्यक्रमाला संबोधित करताना टिकैत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. टिकैत म्हणाले की, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एमएसपीचे समर्थक होते. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची हमी मिळावी यासाठी राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची मागणी त्यांनी केली होती. तत्कालीन केंद्र सरकारने एमएसपीचा अभ्यास करण्याची जबाबदारी मोदींवरच सोपविली होती. इतकेच काय सत्तेत आल्यास एमएसपीचा कायदा आणण्याचे आश्वासन त्यांनी प्रत्येक प्रचारसभेत दिले होते. आता पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ते एमएसपी देण्याच्या विरोधात आहेत. शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांप्रति सरकारचा उद्देश साफ नाही. त्यामुळे यांच्या या राजकारणाला बळी न पडता अधिक सतर्क राहून पावले टाकण्याची गरज आहे. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देशभर प्रवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुलेट ट्रेनच्या नावाखाली पालघरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जंगले कापली जात आहेत. पण जल-जंगल-जमिनीवर त्यांचाच अधिकार आहे, जे तेथे राहतात. त्यामुळे आदिवासींवर दडपशाहीचा अवलंब केल्यास लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर दिले जाईल, असे टिकैत म्हणाले. शेतकरी आंदोलनाला वेगवेगळी नावे देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आधी पंजाबींना खलिस्तानी, हरियाणातील शेतकऱ्यांना माओवादी, पश्चिमेकडील कष्टकऱ्यांना दहशतवादी म्हणाले. त्यांची कपटनीती हाणून पाडायची असल्यास एकजुटीशिवाय पर्याय नाही. आंदोलनासाठी प्रत्येकाने दिल्लीला यावे, अशी अपेक्षा नाही. पण मनापासून समर्थन दिल्यास असाध्य ते साध्य करता येईल, असेही टिकैत म्हणाले. - शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना संबंधित राज्य सरकारांनी मदत करावी. हे आंदोलन यशस्वी होण्याचे सर्व श्रेय त्यांचे आहे, असेही टिकैत यांनी सांगितले. - राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनावरही टिकैत यांनी भाष्य केले. एसटीचे खासगीकरण न करता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकारने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांचा हा लढा अद्याप संपलेला नाही. ७५० जणांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. समाजातील प्रत्येक कष्टकऱ्याला जोवर न्याय मिळत नाही, तोवर लढा सुरू राहील. सरकारने जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना रोखू, असा इशाराही टिकैत यांनी दिला.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनची मुंबईसह राज्यात कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. कालपर्यंत गर्दी गजबजलेले मुंबईचे रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे, तर ठाणे, कल्याण डोंबिवलीसह सातरा, नांदेड, कोल्हापूर, नागपूर जिल्हातही नागरिक विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहेत. राज्यात दोन दिवसांचा कडकी लॉकडाऊन असतानाही मुंबईतील दादर फूल मार्केट, भाजीमार्केट परिसरात खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडवा सण जवळ अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपल्याने दादरच्या मीनाताई ठाकरे मार्केटफूलमध्ये विक्रेत्यांची फुलांची पार्सल विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यासाठी घाई सुरु आहे. यात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दीही मोठ्याप्रमाणात दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यात दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे . पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू सारख्या मोठ्या शहरात सध्या बाजारपेठा कडकडीत बंद असून या ठिकाणी तपासणी नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दोन दिवशीय लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो आणि रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मुंबई मेट्रो आणि लोकलमध्ये आज हातावर मोजण्याइतकी प्रवासी दिसत आहेत. सामान्य नागरिकांना मेट्रो आणि रेल्वेने प्रवासाची मुभा असतानाही नागरिक कडक लॉकडाऊनचे पालन करताना दिसत आहे. विकेंड लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासाची मुभा आहे की नाही अशा संभ्रमात सापडलेल्या मुंबईकरांनी आज बेस्टचा आधार घेतला. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेल नाहीत. परंतु तरीही अनेक नागरिक लोकलपेक्षा बेस्ट बसने प्रवास करण्या प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आज अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरुन नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. ठाण्यात विकेंड लॉकडाऊन नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. तलावपाली, चिंतामणी चौकसारखा परिसर आज शांत आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊनचे पालन करत आहेत. तलावपाली, चिंतामणी चौकसारखा परिसर आज शांत आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या जांभळी नाका येथील मार्केटसह सर्व मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद आहेत. मुख्य भाजी मंडई बंद आहे. तर धान्य मार्केट देखील बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत. आहेत. कापूरबावडीसारख्या जंक्शनवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. भिवंडी आणि घोडबंदर रोडवरुन येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी पोलीस करत आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना पुढे ठाण्यात पाठवले जात आहे. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पुन्हा घरी पाठवले जात आहे. कल्याण-डोंबिवली शहरात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासूनच लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेसह महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर तूरळक नागरिक दिसून येत आहे. मात्र काही नागरिकांना मॉर्निंग वॉकला बगल दिला आहे. कल्याणचा काळा तलाव बंद करुनही या परिसरात नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती दिवसागणिक वाढत आहे. मिरा, भाईंदर आणि वसई विरार शहारातही विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या ठिकाणच्या शहारातील नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडण्यास नागरिकांना रोखले जात आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. नांदेड जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनचा पुरेपुर फज्जा उडाला आहे. जिल्ह्यात बाजारपेठा आणि व रस्त्यांवर नागरिकांची व वाहनांची मोठ्या गर्दी पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचा नांदेडकरांनी फज्जा उडवल्याचं चित्र आहे. साताऱ्यात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील रस्ते ओस पडले असून पोलिसांकडून नाक्यानाक्यावर तपासणी सुरु आहे. घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. तर सर्व दुकाने बंद आहेत. कोल्हापूरात विकेंड लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होताना दिसतेय. कोल्हापूर शहराच्या चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या चौकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 15 जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर 27 लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी दिल्या आहेत. राज्यातील पात्र लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या माध्यमातून 'सरकारी योजना मेळावा' उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांचा मेळा' आयोजित करण्यात येणार आहे. एबीपी माझामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सरकारी योजनांचे न्याय्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 'जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची', असे हे अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या कामांचा अहवाल दररोज जिल्हा लोककल्याण कक्षाकडे सादर करावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना 36 विभागांमार्फत 76 शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यात येणार आहेत. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ जलद, कमी कागदोपत्री आणि शासनाने निश्चित केलेल्या शुल्कात दिला जाईल. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तीन दिवस याच ठिकाणी राहणार आहेत. योजनांची माहिती देणे, योजनांचा लाभ देणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, हा या मेळाव्याचा मूळ उद्देश आहे. त्याद्वारे अधिकाऱ्यांना मेळाव्याच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधता येणार आहे, जेणेकरून ते जनतेच्या समस्या जवळून पाहतील आणि त्या समस्यांवर उपाय शोधता येतील. (हेही वाचाः लवकरच दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांना मिळणार हक्काचे घर; घरकूल योजना तयार करण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश) पात्र व विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना योजना मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हानिहाय करण्यात येणार आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी, यासाठी सर्व अधिकारी व जनतेला एका छताखाली एकत्र करून विविध योजनांचा लाभ जनतेला मेळाव्याच्या स्वरुपात दिला जाणार आहे. या मेळाव्यानुसार सर्व विभाग त्यांच्या योजना आणि शासनाच्या निर्णयांची माहिती तयार करतील.
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानी कार्यकर्त्या मलाला यूसुफझाई यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून 2018 वर्षासाठीच्या ग्लीट्समन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी एका समारंभात युसूफझाई यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. जगभरातले जीवनमान सुधारण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी व्यक्तीला हार्वर्ड विद्यापीठाकडून ग्लीट्समन पुरस्कार दिला जातो. पुरस्कार स्वरुपात विजेत्याला 125,000 डॉलर इतकी रोख रक्कम दिली जाते. मलाला यूसुफझाई यांना 2014 साली नोबेल शांती पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. याचबरोबर नोबेल शांती पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा मानदेखील त्यांना मिळालेला आहे. मलाला यूसुफझाई या सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनी आहेत व "I AM MALALA" या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे.
मुंबई : हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही. देशातील सद्यःस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी एका कार्यक्रमात म्हणालेत. ठाकरे म्हणालेत, "मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे 'पेटंट' भाजपाने (BJP) घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो," असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले. शिवसेना (Shiv Sena) आता महाराष्ट्राच्याबाहेर इतर राज्यात विस्तार करणार आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, बाबरी मशीद पडल्यावर इतरांनी हात झटकले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे विधान केले. त्या एका वाक्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल देशात लोकांना-नेत्यांना आकर्षण वाटू लागले; पण आम्ही त्या वेळी देशात मित्रपक्ष भाजपा हिंदुत्वाचा झेंडा घेत असल्याने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर ठिकाणी अनेक चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. आता इतर राज्यांत शिवसेनेचे हिंदुत्व आवडत असेल तर जरूर काम करा, अशी भूमिका आम्ही घेतली आहे.
गेल्या वर्षी मंगलोर येथील विमान दुर्घटनेतील पिडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे. मंगलोरगेल्या वर्षी मंगलोर येथील विमान दुर्घटनेतील पिडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे. गेल्या वर्षी २२ मे २०१० रोजी एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात १५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातात मरण पावलेल्या बी. मोहम्मद या २४ वषीर्य तरुणाचे नातेवाईक अब्दुल सलाम आणि रामला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूतीर् पी. आर. रामचंदन मेनन यांनी पिडितांच्या नातेवाईकांना एक लाख एसडीआर (स्पेशल ड्राविंग राइट्स (एसडीआर ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीची विशेष करन्सी आहे)) किंवा ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असा निर्णय दिला. दुबईवरून मंगलोरला येणारे ७३७-८०० हे बोइंग विमान उतरताना हा अपघात झाला होता. या विमानाचा पायलट मूळचा सर्बियाचा नागरिक होता.
भोर -तालुक्यातील करोना तपासणीत अहवालात आज तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात भोर शहर, सारोळा, आणि निदान सांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असून तालुक्यातील बाधितांचा आकडा 226 वर पोहचला आहे. यातील 153 जणांनी करोनावर मात केली असून, 63 करोना बाधितांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. आज पर्यंत 808 संशयितांचे स्वॅब तपासले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. भोर तालुक्यातील करोना बाधितांचे संख्येत वाढ होत असताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. प्रशासनाने सुचवलेल्या मार्गदर्शक नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास तालुका करोनावर विजय मिळवू शकेल. करोनाला तालुक्यातून हद्धपार करण्यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांच्या आदेशानुसार भोरचे प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहे; मात्र नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याची खरी गरज असल्याचे भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉं, विजयकुमार थोरात यांनी सांगीतले.
नवी दिल्ली, 4 मे : पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. देशभरात हजारो युजर्स एलपीजी सिलेंडर ऑनलाइन बुक करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात. Paytm App वर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्याआधी केवळ कूपन कोडचा वापर करावा लागेल. त्याशिवाय पेटीएमचे नवे युजर्स लेटेस्ट डीलसह पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा कॅशबॅकही मिळवू शकतात. त्यासाठी पेटीएमवर पेमेंट करताना केवळ प्रोमो कोड "FIRTSGAS किंवा GAS100" चा वापर करावा लागेल. ही रिफंड ऑफर सर्व तीन प्रमुख एलपीजी सिलेंडर कंपन्या इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसवर मान्य आहे. इतकंच नाही, तर पेटीएम पोस्टपेड नावाने पॉप्युलर पेटीएम नाऊ पे लेटर सर्विसमध्ये रजिस्टर्ड करुन पुढील महिन्यात सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट करता येईल. कंपनीने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा अनुभव अधिक सोपा केला आहे. यात युजरला आपल्या गॅस सिलेंडर डिटेल्सला ट्रॅक करण्यासाठी आणि रिफिल करण्यासाठी ऑटोमेटिक इंटेलिजेंट रिमाइंडर मिळवण्याची परवानगी देतं. पेटीएमच्या मोफत आणि क्विक बुकिंग प्रक्रियेमुळे एलपीजी सिलेंडर बुकिंग सहज झालं आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता. - सर्वात आधी Paytm ओपन करुन Recharge and Payment मध्ये Book Gas Cylinder वर क्लिक करा. - आता तुमचा गॅस प्रोव्हाइडर निवडा. - त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एलपीजी आयडी किंवा कंज्यूमर नंबर टाका. - आता पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग पैकी कोणत्याही एकाची निवड करुन पेमेंट करा. त्यात कूपन कोड सेक्शनमध्ये प्रोमो कोड 'FIRTSGAS किंवा GAS100' जोडा. - पेमेंट पूर्ण करा आणि तुमची प्रोसेस पूर्ण होईल. सिलेंडर जवळच्या गॅस एजेन्सीकडून रजिस्टर्ड पत्त्यावर पोहोचवला जाईल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Meet ratan tatas brother jimmy tata who lives ina2 bedroom flat mhjb gh - कोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू?2बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य - News18 लोकमत\nकोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू?2बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य\nएखाद्या उद्योगपतीच्या नातेवाईकाची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा (Jimmy Tata) हे अवघ्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात.\nनवी दिल्ली, 20 जानेवारीः प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) हे नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतात. टाटा उद्योग समूहाचे (Tata Group of Companies) ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा (Jimmy Tata) हे अवघ्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात. देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांचा कोणता परिचय देण्याची गरज नाही. सध्या त्यांच्यासोबतचा शंतनू नायडू (Shantanu Naidu) या तरुण मुलाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 28 वर्षांच्या नायडूने बिझनेस इंडस्ट्रीत स्वतःच वेगळेपण निर्माण केलंय. अनेकांना ही उंची गाठायची असते, पण नायडूने कमी वयात हे यश संपादन केलंय. शंतनू-रतन टाटा यांच्या फोटोबरोबरच आता रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा यांचीही चर्चा सुरू झालीय. हे वाचा-500 रुपयाच्या नोटेच्या सुट्ट्यांसाठी लॉटरीचं तिकीट घेतलं आणि आयुष्याचं सोनं झालं ग्लॅमर आणि चर्चांपासून दूर मुंबईच्या कुलाबा परिसरात राहणारे जिमी टाटा कायमच ग्लॅमर आणि चर्चांपासून दूर असतात. ते इतकं सामान्य आयुष्य जगत आहेत की, ते दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात. मीडियापासून लांब असल्यामुळे त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. जिमी टाटा हे रतन टाटा यांचे धाकटे भाऊ आहेत, तर नोएल टाटा (Noel Tata) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत. 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले. ते टाटा समूहातील कंपन्यांचे भागधारक आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ते मोबाईलचा देखील वापर करत नाहीत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशाच्या आणि जगाच्या बातम्यांशी ते जोडलेले राहतात.' हे वाचा-Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम स्क्वॉशचे उत्तम खेळाडू रतन टाटा यांच्याप्रमाणे जिमी टाटादेखील अविवाहित आहेत. उद्योगपती हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी बुधवारी रतन टाटा यांच्या भावाबद्दल ट्विटवरून माहिती दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'तुम्ही रतन टाटा यांचे लहान भाऊ जिमी टाटा यांना ओळखता का. कुलाबा परिसरात दोन बेडरूम असणाऱ्या फ्लॅटमध्ये ते राहतात. त्यांना व्यवसायात रस नाही. ते स्क्वॉशचे उत्तम खेळाडू होते, आणि प्रत्येक वेळी मला हरवत होते.'\nDid you know of Ratan Tata's younger brother Jimmy Tata who livesaquiet reticent life inahumble2bhk flat in Colaba, Mumbai! Never interested in business, he wasavery good squash player and would beat me every time. Low profile like the Tata group! pic.twitter.com/hkp2sHQVKq\nएखादा उद्योजकाची व त्याच्या जवळच्या नातेवाईकांची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मोठमोठ्या उद्योगपतींच्या घरातील व्यक्ती सततच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. पण रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा हे मात्र याला अपवाद आहेत.
नुकतेच अभिनेत्री आलिया भट हिने अंडरवॉटर फोटोशूट केले. तिने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. नेटकरी आलियाचा अंडरवॉटर हॉट अंदाज पाहून घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आलियाने एका मासिकासाठी अंडरवॉटर फोटोशूट केले. तिने यामध्ये ब्लू, पर्पल, पिंक, मैटेलिक, नियॉन या रंगाची मोनोकनी घातली आहे. तिने हे फोटोशूट वॉग या मासिकासाठी केले आहे. आलियाने तीन फोटो शेअर केले आहेत. पैकी एका फोटोत पाण्यात उडी घेताना तर दोन फोटोंमध्ये तिने एक्सप्रेशन दिले आहेत. लाखो नेटकऱ्यांनी या तिनही फोटोंना लाइक केले आहे. तर या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिला कमेंट सुद्धा केले आहे. त्यानुसार तिचे अंडरवॉटर फोटोशूट पाहून अनेकांनी तिला वॉटर बेबी म्हणून स्तुती केली आहे.
एक आनंदी व्यक्ती बनण्यासाठी टिपा आणि अधिक यशस्वी व्यवसाय मालकलहान व्यवसाय मालक व्यस्त कार्यक्रम, विविध जबाबदार्या आणि महत्त्वपूर्ण निर्णयांचा स्थिर प्रवाह म्हणून ओळखले जातात. आपण हे सर्व पूर्ण केले तरीदेखील, सर्व वेळ, साध्या सत्य म्हणजे एका दिवसात केवळ अनेक तास असतात आणि एकाचवेळी आपण अनेक गोष्टी करु शकता. बर्याचदा, आमचे वैयक्तिक जीवन ग्रस्त असते आणि आम्ही स्वतः व्यवसायाचे गुलाम बनतो, जे सहसा बर्नआउटस करते . शिल्लक तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाऊल ग्राहक, कर्मचारी आणि विक्रेते यांच्याशी सीमा आखत आहे. आपल्या सीमांना पूर्णपणे कडक असण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला आपल्या व्यवसाय संबंधांची रचना कशी करायची आहे याविषयी एक स्पष्ट कल्पना आवश्यक आहे जेणेकरून आपण ती दृष्टी अंमलबजावणी करणार्या सवयी निर्माण करू शकता. त्या भागात विचार करा जिथे आपल्याला वाटते की आपल्याला अधिक रचना तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपण आपल्या व्यवसाय संपर्कांशी कसा संवाद साधू आणि त्यावर संवाद साधू इच्छिता यावर स्पष्ट रहा. नंतर आपण त्या धोरणांना सामायिक करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या वेळेचा आदर करणार्या सीमा बनवू शकता. जशी आपल्याला इतरांबरोबरचे आपले संपर्क व्यवस्थापित करणारे नियम सेट करण्याची आवश्यकता आहे तशीच आपल्याला स्वतःसाठी निश्चित नियम सेट करणे आवश्यक आहे. त्या रात्रीच्या रात्रीच्या कॉलला "हे फक्त एकदाच" घेणे खूप सोपे आहे किंवा आपला वैयक्तिक सेलफोन नंबर एका विश्वासार्ह क्लायंटला द्या. पण अंदाधुंदीच्या उष्णतेमध्ये, तात्काळ म्हणून काय पात्र ठरते याबाबत उद्दिष्ट ठेवणे कठीण होऊ शकते. एखादी आणीबाणी म्हणून वर्गीकृत केले जाण्याआधी कोणते घटक अस्तित्वात असावेत याची एक चेकलिस्ट तयार करा. मर्यादा पूर्वस्थितीत आणण्यासाठी परिस्थितीचा निराकरण झाल्यानंतर आणि आपल्या सीमांना कशा प्रकारे घुटमळले जावे हे तसेच हे स्पष्ट करा. सीमा निश्चित करणे सवयी तयार करण्याबद्दल आहे आणि सकारात्मक सवय निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काहीतरी करणे म्हणजे सातत्याने करणे. आपण एकदा मध्ये देऊ केले किंवा काहीतरी स्लाइड करू तर पुढच्या वेळी आपल्या स्वतःच्या जमिनीच्या नियमांचा आदर करण्याकरिता आपण दुप्पट कठीण काम करावे लागणार आहात. वर्क-लाइफ शिल्लकसाठी आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ समर्पित करणे आवश्यक आहे; आपण त्यात गुंतवणूकीची वेळ न घालता आपले वैयक्तिक जीवन केंद्रबिंदू देऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सहसा कामाच्या ठिकाणी दिशानिर्देशीत केले गेले तर आपला वेळ खंडित न करता आणि जास्त तणाव निर्माण न करता तुम्ही विश्रांती घेण्यास किंवा गैर-कायदेशीर बाबींमध्ये सहभागी होण्यास फारशी संधी उपलब्ध होणार नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ काढणे हे एक मार्ग आहे याची खात्री करणे हे त्या वेळेत शेड्यूल करणे म्हणजे ते एखाद्या अन्य कामाची जबाबदारी होते. कालांतराने, हे आपल्यासाठी दुसरे स्वरूप बनले जाईल आणि आपल्या दिवसादरम्यान सर्वात मौल्यवान स्लॉट्स असेल. कार्य-जीवन शिल्लक विकसित होणारी योजना तयार करणे आपल्याला ताण कमी करण्यास मदत करेल, शेवटी अधिक आनंदी आणि अधिक यशस्वी व्यवसाय मालक बनणे.
कायम संगीतामध्ये मेलोडी शोधणाऱ्या आणि तितक्याच आत्मीयतेनं ती रसिकांसमोर सादर करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी आजवर अनेक मालिकांची शीर्षकगीतं अजरामर केली आहेत. आता 'मोलकरीण बाई' या मालिकेच्या शीर्षकगीताला पत्कींच्या मेलोडीयस संगीताचा स्पर्श लाभला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेच्या शीर्षक गीतापाठोपाठ अशोक पत्की यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'मोलकरीण बाई' या मालिकेचं शीर्षक गीतही संगीतबद्ध केलं आहे. २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेचं शीर्षक गीत रोहिणी निनावे यांनी लिहिलं आहे. मालिकेच्या कथानकाला साजेसे शब्द रोहिणी यांनी गीतामध्ये गुंफले आहेत. उर्मिला धनगरच्या ठसकेबाज आवाजात पत्कींनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. 'मोलकरीण बाई'च्या शीर्षक गीताविषयी पत्की म्हणाले की, कोणत्याही गीतामध्ये मेलोडी असणं गरजेचं असतं. मेलोडी नसेल तर त्या गाण्यात गोडवा वाटत नाही. मालिकेचं शीर्षकगीत करताना त्यातील कथानकाचा भावही लक्षात घ्यावा लागतो. या मालिकेचं गीतही प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं आहे. 'दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण... दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण...' हे शब्दच खूप बोलके आणि उत्साहवर्धक आहेत. ममता आणि गावरान ठसका यांचा उत्तम मिलाफ या शीर्षक गीताचं वेगळेपण म्हणता येईल. रोहिणी निनावेंनी हे शीर्षकगीत लिहिलं आहे. मालिकेची कथा आणि पात्रांचं मनोगत शीर्षक गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयीची ही मालिका आहे. दुःखातही सुख शोधण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती 'मोलकरीण बाई' या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हे शीर्षकगीत आणि मालिका नक्की आवडेल अशी भावना रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली आहे. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्यानं आयुष्य जितकं सुखकर होतं, तितकंच तिच्या नसण्यानं अस्ताव्यस्त बनतं. कुटुंबातली सदस्य नसली तरी ती कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग असते. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट 'मोलकरीण बाई' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यासोबतच घरकाम करणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व मालिकेच्या शीर्षकगीतातून पत्की यांनी रेखाटलं आहे.
निंगबो सैक्सिन मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी कं, लि.2008 मध्ये स्थापन झालेल्या Ningbo Solution Magnet Co., Ltd. कडून घेतलेले आहे. आमची कंपनी चीनमधील उत्पादन भांडवल असलेले दक्षिणपूर्व किनारपट्टीवरील शहर निंगबो येथे आहे.हे निंगबो लिशे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे.चीनमधील प्रीकास्ट कॉंक्रिट मॅग्नेटिक फिक्सिंग उत्पादनांची पहिली व्यावसायिक उत्पादक म्हणून, आमच्या कंपनीकडे एक परिपक्व R & D टीम आणि प्रगत पूर्ण-स्केल उत्पादन उपकरणे आहेत.आम्ही प्रीकास्ट कॉंक्रिट उद्योगासाठी मॅग्नेटिक फिक्सिंगमध्ये उत्पादन कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि जगभरातील प्रीकास्ट काँक्रीट कारखान्यांसाठी मॅन्युअल ऑपरेशन कमी करण्यासाठी संपूर्ण उपाय प्रदान करण्यात गुंतलो आहोत. आमच्या SAIXIN शटरिंग मॅग्नेटसह वापरलेले, उच्च सामर्थ्य, चांगली कडकपणा, स्पेशल एज टूथ डिझाइन चुंबकीय चक, स्ट्रो... सह प्रतिबद्धता बंद करू शकते. काँक्रीट फवारणी मशिन हे फवारणी तंत्रज्ञानातील एक प्रगत उत्पादन आहे जे कमीत कमी रिबाउंडसह सतत प्रवाह सक्षम करते आणि श... मधील कमाल क्षेत्राचे कव्हरेज सुनिश्चित करते. Ningbo Saixin Magnetic Technology Co., Ltd. अनेक विकसनशील देशांमध्ये बांधकामाच्या औद्योगिकीकरणाच्या विकासाबरोबरच, पीसी उद्योगातील चुंबकीय फिक्स्चर मोठ्या प्रमाणावर ओळखले गेले आहेत आणि उत्पादनात लागू केले गेले आहेत, चुंबकीय घटकांमधील आमचे कौशल्य आणि प्रीफेब्रिकेटेड बिल्डिंग उद्योगाला समर्थन देण्याचा अनुभव वापरून, आम्ही आधीच सेवा देण्यास सुरुवात केली आहे. असंख्य सुप्रसिद्ध काँक्रीट घटकांचे उत्पादन करणारे संयंत्र.
मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शनिवारी सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पीडितेला रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक होती. बलात्कारानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घातल्याने तिच्या शरीरातून बरेच रक्त वाहू लागले होते. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी खून प्रयत्न करुनही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. (Mumbai Rape Case: Death of Nirbhaya who fought life and death on a ventilator) या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका टेम्पोच्या आत 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. साकीनाकाची ही घटना देशाची राजधानी दिल्लीत 2012 च्या 'निर्भया' घटनेची आठवण करून देते. साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिले आहेत. ते म्हणाले की मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि पोलिसांकडून प्रत्येक क्षणाचा अपडेट घेत आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की साकीनाकाची घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील एक महत्त्वाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये आरोपी पीडितेला रस्त्यात बेदम मारहाण करत असल्याचे दिसून येते. मारहाण केल्यानंतर तो पीडितेला एका टेम्पोमध्ये टाकून पळून जातो. हा सीसीटीव्ही रात्रीचा आहे, यामुळे चित्र फारसे स्पष्ट नाही. महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईत महिला आता सर्वात असुरक्षित बनत आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेत आणखी आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे. सध्या या दिशेने तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन आला की साकीनाका येथील खैराणी रोडवर एक महिला बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. माहिती मिळताच साकीनाका पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्या महिलेवर उपचार सुरू होते.
( ७ ) तत्सम - भिन्न क्रियाविशेषणाचे अन्ती पूज्य देणे - उभयसंमत ( ८ ) लुप्तान्त क्रियाविशेषणाचे अन्ती पूज्य न देणें ( शब्दयोगीचा अतक्रियाविशेषणातच होतो ) उभयसमत. ९ ) ला - भिन्न- - प्रत्ययान्त विभक्तिरूपान्तावर पूज्य देणे - उभयसमत ( १० ) अनेकवचनी सामान्यरूपाचे अंती पूज्य देणें - मोरोपताची धग्सोड व आधुनिकाचा नियम ( ११ ) प्रथमपुरुषी क्रियापदाचे अती पूज्य देणेपूज्य देणे - उभयसमत ( १२ ) मी, आम्ही ह्या शब्दाचे अती पूज्य देणे- मोरोपतास सर्वथा मान्य; आधुनिक दृष्ट्या हे शब्द तृतीयान्त असतील तरच ( 93 ) द्वितीय पुरुषी आज्ञार्थी एकवचनी क्रियापद ईकारान्त असल्यास व अन्यार्थी अनेकवचनी क्रियापद आकारान्त असल्यास, त्याचे अन्ती पूज्य देणें - उभयसमत. ( १४ ) हास, धाव, झाक, फेक, वेंच इत्यादि काही शब्दात, व्युत्पत्तीचा आधार नसताही पूज्य देणे - उभयसंमत ( १५ ) ण, न, म याच्या बाराखडीतील अक्षरावर नियमप्राप्त असेल तेथेंही पूज्य न देणें-दोघाची धरमोड ( १६ ) या अनुवाकातील पूज्यासबधीची सर्व विधानें केवळ अनुनासिकविषयक समजावी ६ वरील तुलनेचा ( तपशीलवार = ) सांग विचार( १ ) मला, तुला, तिला, हिला, जिचा इत्यादि थोडे अपवाद काही सर्वनामाच्या एकवचनात मोरोपतात सापडतात ( २ ) हे पितृगज्यश्री तपती ( व १३ - ३२ ), मूर्ति श्रमत्ये ( व ४-४९ ), स्त्री मज आठवते ( ४-१८१ ) असे त्रिविध प्रयोग मोरोपतात सापडतात. 'तपती ' हा देशस्थी, तर ' श्रमत्ये ' हा कोकणस्थी प्रयोग होय. तिसरा 'ते कारान्त प्रयोग मध्यम असल्याने हल्ली सार्वत्रिक झाल्यासारखा आहे. यू - विशिष्ट प्रयोग दादोबाचे व्याकरणात व लो. टिळकाचे लेखात सांपडतो. अलीकडे इंग्रजी भाषेचे सवईनें आपल्या बोलण्यात दाक्षिण्याचा योग्याधिक देखावा शिरत चालला आहे. इंग्रजी भाषा, तोंडावर कोणास उद्देशून बोलताना अनेकवचन ( you ) वापरिते, पण त्याची पाठ फिरताच त्याचा निर्देश करण्यात he वापरिते, ही रीत आपणही सामत उचलति आहों अशाच खऱ्या वा खोट्या दाक्षिण्याभिरुचमुळे य् - विशिष्ट रूप ग्राम्य वाटून आपण तें टाकितों यामुळे 'जात्ये ' या प्रयोगास 'जाते' याने खो दिला आहे. ही प्रवृत्ति मोरोपंतात काचित्क असणारी वर्तमान मराठीत सार्वत्रिक होत आहे 'दिल्ये' याचें स्थानी मोरोपतात कधी कधी ' दिलें' (वि० १-७३ ) असें रूप आढळते. साराश, नागरिकत्वामुळे स्त्रीलिंगक्रियापदरूपात यू प्रविष्ट करू नये, ही वर्तमान प्रवृत्ति होय ही लक्ष्यात घेतल्यास 'पराजप्ये' असे लिहावे की ' पराजपे ' लिहावें, हा वाद सहजच निकालात निघतो दाक्षिण्यानुगुण असल्याने पराजपे, आठले, हेच प्रयोग हल्ली शिष्टसमत होत नामदार पराजपे, जे आपणास पराजप्ये म्हणवितात, यानी लिहिलेल्या व नटेसन कपनीने छापिलेल्या नामदार गोखले याचे चरित्रातही गोखले यानी पराजण्यास लिहिलेल्या पत्राच्या हस्तलेखात पराजण्याचा उल्लेख (प्रथर्मेत) 'पराजपे' अशा य-काररहित नावानेंच केला आहे, ही गोष्ट या सबधात लक्षणीय आहे य-प्रमाणे सयोगाभासातील ह गाळण्याचीही प्रवृत्ति साप्रत बहुशः दिसून येते. कोण्ही तरी ( व ३ - १० ) असे प्रयोग - मोरोपतात वारवार सापडतात, पण हेच प्रयोग वर्तमानकाळी 'कोणी तरी असे हकाररहित आढळतात. ( 3 ) या सबधात असे दिसतें की, मराठीत जे -हस्वान्त संस्कृत शब्द फार विरळा आढळतात ते प्रथमेमध्ये -हस्वान्त लिहावे त्याचा परिचय वाढून ते तत्सम कोटीत दाखल झाले म्हणजे अर्थातच दीर्घान्त लिहावे साराश विधु, नति इत्यादि शब्द केवळ संस्कृत असल्याने त्याची प्रथमा हस्वान्त लिहावी, तर गुरू, बुद्धी हे तत्सम चनल्यानें त्याची प्रथमा दीर्घान्त लिहावी ( ४ ) हा नियम सार्वत्रिक समजावा इतर कोणत्याहि नियमाशी विरोध आला तरी याचेंच अनुसरण करावें. फूल, मूल इ नामें नपुसकलिंगी असताहि तदन्ती पूज्य देऊ नये ( ५ ) अशी नामें म्हणजे फळ, फळे इत्यादि बहुत अकारान्त, पाणी, मोती दही इ. थोडी ईकारान्त, वासरू, वासरें इत्यादि काही ऊकारान्त, भार्डे, भाडी इत्यादि अनेक एकारान्त होत. पैकी पाणी, लोणी इ. शब्द नियम १५ प्रमाणें शून्यरहित ठरतात. याच नियमानुसार देवानी, मुलाना, जाताना इ. ठिकाणी अन्ताक्षरावर शून्य न देण्याकडे प्रवृत्ति होते, व तें योग्यच आहे कारण 'मनानें' यात अती पूज्य दिलें तरी ते उच्चारात पृथक् भासमान होत नाही अशा स्थितीत तें द्याच कशाला' येथे उच्चारानुरूप अनुनासिक-लेखन हें तत्त्व पाळलें जाते, ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ( ६ ) मोरोपती ग्रथ, मोरोपती कविता, मोरोपंती लेखन इत्यादि ठिकाणी विषेशणाचा अन्त्यस्वर लिगानुसार बदलत नसल्यानें तो स-पूज्य लिहू नये. पण काळे फूल, काळा ढग इत्यादि ठिकाणी लिगानुसार बदलणारा स्वर नपुसकलिगात स-पूज्य लिहिणे प्राप्त आहे. हे मुलगे, हीं मुले, - यातील सर्वनामावरील पूज्यही अर्सेच सकारण आहे. 'न बुडविति न वा तारिति चित्रें बरवीहि आड नावाची' या आर्यार्धात 'ति' - वर पूज्य प्राप्त होत नाही, कारण त्यातील स्वर नपुसकलिगविशिष्ट नाही, वारे, नद्या, वादळे बुडविति- इत्यादि प्रयोगावरून ईकारान्त रूप सर्व लिगास साधारण ठरते करिता प्रस्तुत नियमार्ने ' बुडविति' हैं रूप पूज्यान्त नको, व मोरोपती प्रयोगही हीच गोष्ट दर्शवितात. ( ७ ) सदा, बहुधा, सर्वथा इत्यादि क्रियाविशेषणें तत्सम असल्यानें ती पूम्यान्त होत नाहीत उलट- - परवा, मघा, उद्या, खाली, पुढें, मार्गे, कोठें ही सर्व पूज्यान्त होतात या बाबतीत एक मोरोपती विशेष नजरेंत येतो जेविंतेवि, केवि ही तीन क्रियाविशेषणे आपण सर्वसाधारण रीतीस अनुसरून अन्ताक्षरावर पूज्य देऊन लिहितों. तर मोरोपत नियमानें ती जेंवि, केंवि, तेंवि, अशी लिहितात सामान्यतत्त्वाशी विरुद्ध दिसल्यास व्यक्तीचे मत उपेक्षणीय असल्याने येथे आधुनिक प्रघातच योग्य ठरतो ( ८ ) क्रियाविशेषण पूज्यान्त लिहिणें हें तत्त्व त्याच्या मूळ म्हणजे अविकल रूपासच लाविले पाहिजे, त्याच्या छाटलेल्या रूपास लावू नये. 'त्याच्या कडेला' यातील 'कडेला' याचें रूप छाटून 'कडे' अर्से आपण योजितो यातील 'डे' - वर पूज्य लिहू नये. जिकडे, तिकडे यातही हाच नियम पाळावा. 'आणोनिया' यातील 'या' गाळून होणारे सक्षेप आणोनि, आणून इ० हेही पूज्यरहित ठरतात. मात्र मोरोपतात 'आणोनी' अशा दीर्घान्त रूपावर वारवार, नियमानें नव्हे, पूज्य आढळतें हें पूज्य न देण्यास आपणास अनेक कारणें आहेत. ( क ) स्वता मोरोपताची धरसोड, ( ख ) हें रूप खंडित असल्यामुळे प्रस्तुत नियमाची अप्राप्ती, ( ग ) कलम ५हीं या पूज्यास विरुद्धच मानितां येईल. ( ९ ) या संबधात षष्ठीच्या प्रत्ययाची गणना विशेषणप्रत्ययात करावी, म्हणजे चा, ची - इत्यादीवर सर्वत्रच अनुस्वार प्राप्त होणार नाही. ( १० ) या बाबतीत दुहेरी विचार करणें प्राप्त आहे - प्रत्ययपूर्व सामान्यरूप व अप्रत्यय सामान्यरूप, - प्रत्यक्ष विभक्तीचे रूपात अवयवरूपाने असणारें, व स्वतंत्रपदरूपाने असणारें, जसें - 'शाहण्या लोकानी' येथें लोका हें पदागभूत सामान्यरूप व " शाहण्या' है पदभूत सामान्यरूप मोरोपत उभयत्र कधी पूज्य देतात, कधी देत नाहीत सिहानी ( वि० २ - १ ), या डोळ्याचें रक्षण (व० ६-१६ ), ज्या मानवा (वि० २-७३), सुभटाही (वि २-४२), इत्यादि ठिकाणी दिसणारी धरसोड अनुकरणार्ह नाही प्रस्तुत मराठीत पदावयव असलेल्या अनेकवचनी सामान्यरूपावर नियमानें पूज्य देतात, पण पदभूत सामान्यरूपावर देतात तें तें स्पष्टपणे स्वतः होऊन अनेकवचनाचा बोध करीत असेल तरच, जर्से-'तुम्हां भाबड्या मुलांना ही वर्तमानकालीन व्यवस्था कोणासही योग्यच वाटेल. ( ११ ) मि, मः इत्यादि-प्रत्यय अन्ती असल्यानें, सस्कृत प्रथमपुरुषी कियापदाचें अताक्षर मकारगर्भ असते, व तन्मूलक पूज्य मराठी रूपातही आढळतें. अर्थात् व्युत्पत्तिदृष्ट्या हें योग्यच आहे ही दोन्ही वचनातील पूज्ये केवळ व्युत्पत्तिसकेतमूलक आहेत पण ही देण्यात कोठेंच धरसोड दिसत नसल्यानें ती ठेवणें योग्य दिसतें ( १२ ) मी हा शब्द अती पूज्य देऊन लिहिण्याचें मोरोपताचें कारण अर्से असावें की अहम्, यातील मकाराचा प्रस्तुत शब्दात अनुनासिक होतो. पण साप्रत हा व आम्ही शब्द प्रथमान्त असताना त्यावर पूज्य देत नाहीत, तर तृतीयात असताना देतात, व हें योग्यच आहे कारण तृतीयाताशी पूज्याची कल्पना निगडित आहे येथें अर्से तत्त्व दिसते की, भेददर्शनास उपकारक होईल अशा रीतीनें पूज्याचा उपयोग करावा. ( १३ ) या संबधाचा विचार जरा सविस्तर करणे भाग आहे ( क ) मूळ संस्कृत शब्दात म्हणजे प्रभवात - असलेला अनुस्वार किवा पंचमवर्ण तद्भवात पूज्याचे रूपानें व्यक्त केलाच पाहिजे. ( ख ) प्रभवात आधार नसलेलेंही पूज्य रूढीस अनुसरून कायम ठेवावें. ( ग ) काही शब्दात रूढ असलेलें अशा प्रकारचें पूज्य तत्सरूप शब्दापासून त्याचा भेद दाखविण्याकरिता अवश्य, अतएव रक्षणीय आहे या मुद्द्याचा यथाक्रम विचार - ( क ) प्रभवातील नासिक्य तद्द्वात भासविणे अवश्य मानिल्यास, (विशति ) वीस, (त्रिशन्) तीस, ( दामन ) दावें, ( नमन ) लवणे, ( दशम ) दहावा ( जेमन ) जेवणे, ( यमल ) जावळा, ( कामला ) कावळ इ अनेक शब्दात पूज्य द्यावें लागेल, पण कालाचा ओघ असलेलीच पूज्यें कमी करण्याकडे असल्यानें, नसल्या ठिकाणी पूज्य देण्याचा आग्रह कोणी धरील असें वाटत नाही. करिता प्रस्तुत मत म्हणजे प्रभवानुरूप तद्द्वात अवश्य पूज्य देणें ग्राह्य ठरत नाही ( ख ) केवळ रूढि प्राप्त पूज्याविषयी मोरोपताचें मत ' धावणे' ह्या शब्दाचे लेखनावरून अनुमित होतच आहे हे पूज्य देण्यात त्याची धरसोड आहे अर्थात् ते काढून टाकण्यास त्याची हरकत दिसत नाही करिता दुमरें मतही त्याज्यच ठरते. ( ग ) शब्दभेद दाखविण्याकरिता पूज्य देणें, तर ते कोणकोणत्या शब्दात देणार ' पाट ( पाण्याचा, बसण्याचा ), पाव ( पोचणे, चतुर्थाश, खाद्य ), माठ ( भाजी, मडकें ), घोट ( पाण्याचा, घोटणे ), वात ( वारा, दिव्याची ), वाणी ( व्यापारी, वाचा ), ताव ( कागदाचा, ताशेरा ) इ० अनेक शब्द मूलतः भिन्न असलेले, भिन्नार्थ पण सरूप आहेत. याच्या अर्थाचे नियमन वाक्यावरूनच होणार हा अर्थनिर्णय करण्याचा भार घेणें लेखनास योग्य व शक्यही नाही. 'वाट' शब्दाचे मार्ग, मनास वाटणे, पाठ्यावर वाटणे, भावात वाटणें, पोटातील अवयवविशेष, इ० अनेक अर्थ आहेत यातील भेद नुसत्या शब्दरूपावरून व्यक्त करणे शक्य आहे काय ? असला भार इतर भाषातही लेखन पतकरीत नाही. सस्कृतात 'हरि ' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत तरी पण तो शब्द निरंतर एकरूप लिहितात, मग त्याचा अर्थ कोणताही असो पूर्वापर संबंधावरून अशा शब्दाचा अर्थ कोणता घेणें हे वाक्यात ठरतें. इग्रजीतही अनेक (Paronyms ) सरूप शब्द आहेत, जसें Bear, Bat, Hind, Ring. अर्थभेदास अनुसरून याचें निरनिराळें स्पेलिग कोणीही सुचविलें नाही साराश, अर्थभेदाकरितां कृत्रिम (निर्मूल) लेखनभेद इष्ट नाहीं, ह्या सत्यता येथें सिद्ध होते. एवच अर्थभेदास उपयुक्त, पण निर्मूल
ऐतिहासिक संकीर्ण साहित्याच्या या अकराव्या खंडांत माझ्या संग्रहांतील कांहीं ऐतिहासिक पत्रे छापलीं आहेत. हीं पर्ने मला १ देवगडजवळील ओटव (रत्नागिरी ) चे प्रभुदेसाई, २ कान्हूर पठार (अहमदनगर) येथील नगरकर, 3 चात ( पुणे ) चे चासकर जोशी, ४ पुणे येथील नेने घाटावरील श्रीयुत जोगळेकर व ५ सातारा येथील फडणीस यांच्या दप्तरांतून मिळाली आहेत. इतर साधनग्रंथांप्रमाणें यांतील पत्राही विस्कळीत, तुटक प्रसंगांची किंवा घडामोडींची माहिती देणारी, अशीं आहेत. तथापि त्या प्रत्येकांत इतिहासोपयोगी माहितीचे सुवर्णकण सांपडत असल्यामुळे साधन म्हणून त्या प्रत्येक पत्राला कांहीं महत्त्व आहेच आहे. सातारकर फडणीस दप्तरांतील पर्ने मात्र एकाच विषयासंबंधी असून त्यांतील माहिती आजपर्यंत बहुधा सर्व अप्रसिद्ध अशीच आहे. सातारकर छत्रपतींनी पेशव्यांच्या कैदेतून मुक्त होण्याकरतां उठाव केला, पुढे पेशव्यांनीं रास्ते-पटवर्धनांकडून तो जबरदस्तीनें मोडला, त्यानंतर चतुरसिंग भोसल्याला बाहेर पाठवून त्याच्या करवी आपले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी छत्रपतींनीं खटपट केली व पुनः उठाव केला, त्याची हकीगत या पत्रांत सांपडेल. बापू कान्हो फडणीस हे छत्रपतीने मुत्सदी म्हणून चतुरसिंगाबरोबर दिले होते. यशवंतराव होळकरानें पुण्यावर स्वारी करून दुस-या बाजीरावाचा व दौलतराव शिंद्याचा पराभव केला, त्या वेळी सातारकर छत्रपतींना मुलूख तोडून देऊन स्वतंत्र करण्याचा मनसुबा होळकरांच्या छावणींत बापू कान्हो फडणीस कसे शिजवीत होते त्यासंबंधी विश्वसनीय अशी हकीगत येथेंच प्रथम वाचावयास मिळेल. दुर्दैवानें तें कांहींच साधलें नाहीं व चतुरसिंग आणि बापू कान्हो फडणीस यांना देशोधडी होऊन उत्तर हिंदुस्थानाकडे पळावें लागले. त्यांतही अखेर त्रिंबकजी डेंगळ्यानें मालेगांव मुक्कामीं दग्यानें चतुरसिंग, बापू कान्हो आणि त्याचे सर्व लोक पकडून कैद केले. चतुरसिंगाला कांगोरी किल्ल्याची हवा पहावी लागली तर बापू कान्होला जिवधन किल्ल्यावर कैद करून ठेवण्यांत आलें. बिचाथा चतुरसिंगार्चा सुटका इंग्रजांनीं खडकीच्या लढाईनंतर थोडेच दिवसांनी केली. परंतु किल्ल्यावरून चतुरसिंगाचें प्रेतच खालीं आलें ! तो आजारी होऊन त्याच सुमारास मृत्यु पावला होता. बापू कान्हो मात्र सुदैवी. त्याची सुटका इंग्रजांनीं करून पुनः पूर्वीप्रमाणे त्याला, सातान्यास स्थापलेल्या प्रतापसिंह छत्रपतीच्या दरबारीं जुन्या दरकावर कामास पाठविलें. या बापू कान्होनें पुढें आपलें तपशीलवार आत्मचरित्र, वाक्याच्या रूपानें ग्रँट डफला लिहून दिलें तें प्रसिद्ध आहे. पण त्यांतहि नसलेली चतुरसिंगाच्या खटपटीची किती तरी नवी माहिती पुढे दिलेल्या बापू कान्होच्या पत्रव्यवहारांत आढळेल.
नागपूर, 27 एप्रिल : नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने मगर आणि कासव यांच्या अधिवासांचा शोध घेण्यासह त्यांचे निरीक्षण केले जावे या उद्देशाने सर्वेक्षण केले जाणार आहे. अश्या प्रकारचे हे मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण असणार आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात सर्व सामान्यांना देखील मोफत सहभागी होता येणार आहे. Rain Update : महिना उलटला, विदर्भात कधी बरसणार जोरदार पाऊस? हवामान खातं काय म्हणतंय? Paper Bag Day 2023: या वस्तू पाहून पडाल प्रेमात, ओळखा कशापासून बनली असेल? Nagpur News: समाजाने ज्यांना झिडकारलं, त्यांचं नृत्य पाहून सगळ्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट! महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीपात्रात 2 जून रोजी कोलितमारा पर्यटन परिसरापासून या सर्वेक्षणाला प्रारंभ होईल आणि 4 जूनपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. मगरी आणि कासव यांचा अधिवास पेंच येथील नदीपात्रात आढळून आला आहे. या सर्वेक्षणात मगर आणि कासव या दोन्ही प्राण्यांची नदीतील घनता आणि त्यांच्या अधिवासाच्या वापराचा अभ्यास केला जाणार आहे. स्वयंसेवक,संशोधक आणि नागरिकांच्या सहभागाने होणारे हे अशा प्रकारचे मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण आहे. पेंच नदी, लोअर पेंच धरण आणि तोतलाडोह जलाशयाच्या उतारांचे सर्वेक्षण यात करण्यात येणार आहे. तीनसा इकॉलॉजिकल फाऊंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या सर्वेक्षणात मगरींसंदर्भात काम करणारे 30 पेक्षा अधिक तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी होणार आहे. अशाप्रकारच्या कामाचा पूर्वीचा अनुभव असलेले स्वयंसेवक या सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात. या उपक्रमामुळे व्यवस्थापनाला संपूर्ण व्याघ्रप्रकल्पाचा एकाच वेळी अभ्यास करता येणार आहे. संशोधक, बचावकर्ते आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मगरी आणि कासवांच्या अधिवासाच्या वापराचे वैज्ञानिक दस्तावेजीकरण केले जाणार आहे. त्यातून व्याघ्रप्रकल्पातील पेंच नदीच्या अधिवासातील विविध भागांत मगरी आणि विविध कासवांच्या प्रजातींची विपुलता आणि वितरणाचा अंदाज येणार आहे. या सर्वेक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी 15 मे रोजी सायंकाळी पाच वाजतापर्यंत https://forms. gle/CgVSVf2YZugyNBZ27 या लिंकद्वारे गुगल अर्ज भरावयाचे आहेत. सहभागींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. निवडलेल्या सहभागींना मेलद्वारे कळवले जाईल. सहभागींना निवडलेल्या सर्वेक्षण क्षेत्राजवळ निवडलेल्या संरक्षण कुटींपैकी एकाचे वाटप केले जाईल. प्रत्येक संरक्षण कुटीवर किमान एका तज्ज्ञाच्या एक वा दोन व्यक्ती राहतील. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाकडून केली जाईल. सर्वेक्षणामध्ये किनाऱ्याच्या बाजूने पायी चालून आणि नावेद्वारे नदीत प्रवास करून नोंदी घेणे अपेक्षित राहणार आहे. या संदर्भातील माहितीसाठी www. penchtigerreserve. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केले आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक आणि भाजपच्या कथित हितसंबंधांवरून झालेल्या वादग्रस्त आरोपांची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल दोन महिन्यांमध्ये प्रसिद्ध करावा, अहवाल येईपर्यंत फेसबुकच्या भारतातील चमूला बाजूला केले जावे, तसेच २०१४ पासून फेसबुकवरील प्रत्येक द्वेषपूर्ण लिखाणाचे प्रसंगही जाहीर केले जावेत, अशा मागण्या करणारे पत्र काँग्रेसने फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पाठवले आहे. हे पत्र ट्विट करून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले. पक्षपातीपणा, द्वेषपूर्ण भाषणे, बनावट वृत्ते यांच्या आधारे लोकशाहीची मोडतोड कोणालाही करू दिली जाणार नाही. या प्रकरणातील फेसबुकचे हितसंबंध 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने चव्हाट्यावर आणले असून सर्व भारतीयांनी फेसबुकच्या हेतूंसंदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत, असे ट्विट राहुल यांनी केले. झुकरबर्ग यांना पाठवलेल्या पत्रावर काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची स्वाक्षरी असून त्यात फेसबुक-इंडियाच्या सार्वजनिक धोरण संचालक अधिकारी आँखी दास यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषणांचा मजकूर फेसबुकवरून काढून टाकून भाजपच्या नेत्यांच्या हितसंबंधांना बाधा आणल्यास भारतात फेसबुकला व्यावसायिक हानी पोहोचू शकते, असे दास यांनी फेसबुकच्या भारतातील कर्मचा-यांसमोर स्पष्ट भूमिका मांडली होती, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात केला आहे. भाजप नेत्यांच्या द्वेष पसरवणा-या भाषणांकडे फेसबुक-इंडियाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वृत्तातील दावे व आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली. भारतात फेसबुक भाजपचे हितसंबंध जपत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही फेसबुकने केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानंतर फेसबुकने द्वेषपूर्ण भाषणे काढून टाकली असतील तर गुन्ह्याची कबुलीच ठरते, असे पत्रात म्हटले आहे. या प्रकरणावरून गेले दोन दिवस काँग्रेसने भाजपला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे खासदार व संसदेच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काबूल - अमेरिका (America) आणि नाटो देशांनी अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दोन दशकांची मोहीम (Campaign) अखेर आटोपती घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) देशावरील पकड भक्कम करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. अमेरिकी सैन्याला (Army) मदत केलेल्या नागरिकांच्या (Citizens) दारांवर, शरण या किंवा मरा, अशा धमक्या देणारी पत्रे चिकटवली जात आहेत. अनेक शहरांत हा प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांनी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम राबविली. आपल्या देशाशिवाय मदत केलेल्या आणि गरज असलेल्या अधिकाधिक अफगाण नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतरही ज्यांना अफगाणिस्तानात थांबणे भाग पडले त्यांच्यावर भयंकर स्थिती ओढवेल हे स्पष्ट झाले. यातील अनेक स्थानिक नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात होते. असंख्य नागरिक विमानतळावर गेले सुद्धा होते, पण त्यांना विमानात जागा मिळू शकली नाही. आता आपण अडकलो असून जिवाची भीती वाटत असल्याचे अनेकांनी सांगितले. तालिबान्यांनी घरोघरी झडती घेण्याचे सत्र याआधीच सुरु केले होते. आता घराच्या दारावर पत्र चिकटविली जात आहेत. तालिबानने आमंत्रित केलेल्या न्यायालयासमोर हजर व्हावे, तेथे तुमच्या शिक्षेचे स्वरूप जाहीर केले जाईल. तेथे हजर राहिला नाहीत तर त्याची परिणती मृत्युदंडात होईल, अशी धमकी देणारा संदेश या पत्रांत आहे. याआधी सत्ता बळकावली तेव्हा तालिबानने असे दडपशाहीचे धोरण अवलंबिले होते. तेव्हा ते मर्यादेत झाले होते, पण आता शहरा-शहरांत ते राबविले जात आहे.
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचा (Suriya) 'इथरकुम थुनिंधवन'(Etharkkum Thunindhavan) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याधी सुर्याचा 'जय भीम' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षक 'इथरकुम थुनिंधवन' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'इथरकुम थुनिंधवन' सिनेमात सुर्या मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात अॅक्शचा तडका असणार आहे. पंडिराज यांनी या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 10 मार्च 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
कुठे चाललोय आपण ? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? आठ दिवसांपूर्वी नागपुरात पवनकर कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या कशासाठी करण्यात आली? मारणारा संशयित आरोपी विवेक पालटकर हा सायको होता? त्याने कौटुंबिक वादातून हे हत्यांकाड घडवून आणले, असा कयास परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी बांधला आहे. नराधम पालटकर हत्याकांडानंतर फरार झाला आहे. मात्र या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर आणि नागपूरकरांवर प्रेम न करणाऱ्यांनी पुन्हा एकदा नागपूरला 'क्राईम कॅपिटल'ची बिरुदावली लावली आहे. गत सहा वर्षांत नागपुरात दुहेरी हत्याकांडाची सहा आणि तिहेरी हत्याकांडाची पाच प्रकरणं घडली. काही व्यक्तिगत कारणांमुळे तर काही आपसी वैमनस्यातून ही हत्याकांड घडली आहेत. मुळात या हत्याकांडाचा खोलवर अभ्यास केला तर क्रोध आणि अहंकार या दोन गोष्टी यात दडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी नरसाळ्यात कोंबडी अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एका माथेफिरूने तिघांना ठार मारले होते. अतिक्रोधाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. २६ जून २०१२ रोजी कळमन्यातील आभा कॉलनीत नाथजोगी समुदायातील सुपडा मगन नागनाथ, हसन दादाराव सोलंकी आणि पंजाब भिकाराम शिंदे या तिघांची जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. हे बिचारे पोट भरण्यासाठी महिलांचे सोंग (वेशांतर) करून भीक मागत होते. जमावाच्या नावाखाली अविवेकी वृत्तीने या तिघांना दगडाने ठेचून ठार मारले होते. या हत्याकांडात तर मारणारे आणि मरणारे दोन्ही पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. मग यालाही क्राईम कॅपिटलची फोडणी आपण लावायची का? १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नंदनवन परिसरात राशी कांबळे आणि उषा सेवकदास कांबळे या आजीनातीची गणेश शाहू आणि साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. यात मरणाºया राशीचा काय दोष होता ? मात्र येथेही क्रोधाने निरागस मुलीचा बळी घेतला. स्वतःच्या चार वर्षीय मुलासह बहीण, जावई, भाची आणि बहिणीची सासू या सर्वांना एकाच वेळी एवढ्या क्रूरपणे मारून विवेक पालटकर याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र हे हत्याकांड त्यानेच घडवून आणले, हे अद्यापही कायदेशीररीत्या कुठेच सिद्ध झालेले नाही. पालटकरला तातडीने अटक झालीच पाहीजे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून पवनकर कुटुंबातील हत्याकांडावर पर्दाफाश करण्याची मागणी समाजातून प्रखरतेने होताना दिसत नाही. मात्र एखादे हत्याकांड घडल्यानंतर केवळ पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही, नागपूरची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे उपदेश सोशल मीडियावर पहायला आणि शहरातील कट्ट्यावर ऐकायला मिळतात. मात्र हे असे का होतेय ? नागपुरात अशा घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर कुणी तसा मॅसेज किंवा व्हिडीओ टाकल्याचे क्वचितच पाहावयास मिळते. मात्र एखाद्या पोलीस वाल्याने कुणाशी वाद घातला किंवा कुणाला मारले तर तो व्हिडीओ आम्ही क्षणाचाही विलंब न करता विविध गु्रपवर व्हायरल करतो. मात्र नागपुरात एखादी चांगली घटना घडली तर ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी किती लोक पुढाकार घेतात? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असतील तर हे माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? सजग नागपूरकर म्हणून ही आमची जबाबदारी नाही का ?
अल्पभूधारक शेतक-यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'जवाहर विहीर योजने'चा वसई तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ठाणे- अल्पभूधारक शेतक-यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'जवाहर विहीर योजने'चा वसई तालुक्यात बोजवारा उडाला आहे. जुन्याच विहिरींची डागडुजी करून त्या नवीन दाखवत कोटयवधी रुपये हडप करण्यात आले आहेत. शेतक-यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने १९९२ रोजी 'जवाहर विहीर योजना' अमलात आणली. या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतक-यास विहिरीच्या बांधकामासाठी ७० हजार रुपये अनुदान देण्यात येते. वसई तालुक्यातील सुमारे ४८२ शेतक-यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. १९९२ ते २००९ या कालावधीत या विहिरींवर ३ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये इतका खर्च वसई पंचायत समितीमार्फत करण्यात आलेला आहे. कोटयवधींचा खर्च करूनही एकूण २८८ विहिरीच पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पैकी ८० विहिरी रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. १९९२ ते २००७ पर्यंत ३८४ विहिरींना मंजुरी देण्यात आलेली होती. तर २००७-०८ मध्ये ५८ व २००८-०९ मध्ये ४० अशा एकू ण ४८२ विहिरी मंजूर असताना २८८ विहिरीच पूर्ण करण्यात आल्याने लेखापरीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. तर पूर्ण झालेल्या विहिरींची शेतक-यांच्या सातबारावर नोंदी घेण्यात न आल्याने नक्की विहिरी बांधण्यात आलेल्या आहेत की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. २६ विहिरी अद्याप अपूर्ण असून शेतकऱ्यांना देण्यात आलेला विहिरीच्या अनुदानाचा पहिला व दुसरा हफ्ता वसूल करण्यात पंचायत समिती प्रशासनाला अपयश आलेले आहे. या योजनेंतर्गत विहिरींची कामे ३ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची असल्याने शेतक-यांना विहीर मंजूर झाल्याचे प्रशासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता अधिनियम १९६८ नुसार सक्षम अधिका-याकडून विहीर बांधकामासाठी तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच विहिरींची कामे सुरू करणे आवश्यक असताना हे नियम धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत. काही शेतक-यांनी अभियंत्यांना हाताशी धरून जुन्या विहिरींनाच डागडुजी करून नवीन विहिरी दाखवण्याचा प्रताप केला आहे. अभियंत्यांनी या विहिरींची मोजमाप पुस्तीकेत नोंदणी घेऊन अंतिम मूल्यांकन देण्याचा पराक्रम केला आहे.
दंतेवाडा- छत्तीसगढमध्येस आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू आहे. त्याव गडबडीचा फायदा घेत दंतेवाडा भागात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न पोलीसांनी गुरुवारी उधळून लावला. पोलीसांनी दंतेवाडा जिल्ह्यातील रस्त्यावर पेरण्यात आलेले ५० किलोच्या आयईडीचा वापर करण्यात आलेले दोन भूसुरूंग निकामी केले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगढमधील स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गेल्या् काही दिवसांपासून छत्तीसगढमध्येक आगामी काळात होत असलेल्याल विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू आहे. याचा फायदा घेत नक्षलवद़यानी दोरनापाल ते जागरगुंडा या रस्त्यावर प्रत्येकी २५ किलो वजनाचे दोन आयईडी स्टीलच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस या भागाची पाहणी करीत असताना त्यांना हे दोन आयईडी आढळले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगढमधील स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई करीत तातडीने ते दोन्ही निकामी केले. २०१० साली नक्षलवाद्यांनी याच ठिकाणी पोलीसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ७६ पोलीस मृत्युमुखी पडले होते. त्याामुळे यावेळी पोलिसांनी काळजी घेत हे दोन शस्त्रसाठे पोलिसांनी जप्त केले आहेत.