text
large_string
'ही' मॉडेल ग्लॅमरच्याबाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींना 'टक्कर' ! मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बिग बॉस 11 ची सर्वात ग्लॅमरस स्पर्धक असलेली बंदगी कालराचे काही लेटेस्ट फोटो सोशलवर सध्या धुमाकूळ घालत आहेत. बंदगी आधीपासूनच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. बिग बॉससारखा मोठा फ्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मात्र बंदगी स्टार झाली. यानंतर तिच्या पर्सनॅलिटीतही खूप बदल झाल्याचे दिसून आले. बंदगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. ज्यांनी सोशलवर धुमाकूळ घातला आहे. बंदगीच्या फोटोमध्ये तुम्ही तिचा ग्लॅमरस अंदाज पाहू शकता. बंदगीचा आउटफिट असो किंवा अॅटीट्यूड तिचा हरएक अंदाज हा हटके असतो आणि चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असतो. ब्लॅक आउटफिटमधील बंदगीचा अलग टशन तुम्ही पाहू शकता. तिचे हे कूल फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. बंदगीच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला गॉर्जियस म्हटलं आहे तर काहींनी तिला स्टनिंग म्हटलं आहे. बंदगी नेहमीच आपल्या लुकसोबत एक्सपेरिमेंट्स करत असते. तिला कधीच कसली भीती वाटत नाही. तिचा हा बिंधास्त अंदाज तुम्ही बिग बॉस 11 मध्येही पाहिला असेल. बंदगी मेकअपच्या वेगवेगळ्या टेक्निकही आत्मसात करत असते. बंदगी लवकरच एका रिजनल सिनेमातून डेब्यू करणार आहे. बंदगीने दोन तेलगू सिनेमे साईन केले आहेत. ग्लॅमर फिल्डमध्ये येण्याआधी बंदगीने सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉबही केला आहे. तिने मॉडेलिंगही केलं आहे. खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, बंदगी बिग बॉस फेम पुनीश शर्माला डेट करत आहे. शोमध्येच दोघांचं अफेअर सुरु झालं होतं. सलमानच्या रिअॅलिटी शोमध्ये पुनीश आणि बंदगीला रोमँटीक होताना अनेकदा पाहिले आहे. - योग करा आणि घ्या प्रणयाचा आनंद, शरीर आणि मन होईल तरुण !
माणसांच्या गोष्टींना जोडून जेव्हा स्थलकालाचे संदर्भ येतात, शहरांची धडधडणारी हृदयं येतात, नद्या येतात, गल्लीबोळ येतात, तेव्हा त्या गोष्टींना नवी झळाळी मिळते. शहरं आपली मूळ रूपं पालटून कात टाकू लागतात, तेव्हा त्यातल्या माणसांचं काय होत असतं, हे जरा उचकटून पाहिलं की एक गोष्ट सहज लक्षात येते. ती म्हणजे माणसांच्या मनातला केऑस सगळीकडे सारखाच. प्रेमही सारखंच. रुसवेफुगवेही सारखेच. हे सगळं व्यक्त करण्याची भाषा, आठवणी, मनाच्या कोपऱ्यात रेंगाळणाऱ्या हळव्या जागा फक्त बदलतात. बाकी सगळं तेच. तरीही प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळी. 'वेक अप सिद'मधली मुंबई जशी मनात ठाण मांडून राहते, 'जून' मधलं औरंगाबाद जसं आतल्या कोलाहलाला साद देत जातं, तसंच 'गोदावरी' मधलं नाशिकही. गोदावरीच्या पाण्याचं साचलेपण हे निशिकांतच्याच मनातल्या कोलाहलाचं प्रतीक आहे. तो हळूहळू निवळत जातो, आजूबाजूच्या माणसांबद्दलचा त्याच्या मनात धुमसत असलेला राग हळूहळू कमी होत जातो, तेव्हा पाणी वाहतं होतं. आपल्या आजोबांच्या 'मारुतीच्या पायाला पाणी लागलं का? ' या पालुपदाला कंटाळलेल्या आणि वडिलांच्या मौनाला विटलेल्या निशिकांतची घुसमट पहिल्या फ्रेमपासून दिसत राहते. कासवच्या सांगण्यावरून तो गोदावरीत स्नान करायला तयार होतो, तेव्हा पार्श्वभूमीला रावणाचं दहन होत असतं. आपल्या मनातला रावण असाच प्रेमाने जाळून टाकायला हवा, याची प्रेक्षकांत बसलेल्या आपल्याला नकळत जाणीव होत असते. फुगेवाला निशिकांतला मिठी मारतो, तेव्हा आपल्याच काळजात काहीतरी डुचमळत असतं. एकीकडे पिंडदान आणि दुसरीकडे डोहाळजेवण, असे जन्ममृत्यूचे सोहळे एकाच वेळी साजरे होत असताना आपला फुकाचा माज किंचितसा का होईना, हळूहळू उतरत असतो. तोंडातून अवाक्षरही न काढणारा नीलकंठ निशिकांतशी संवाद साधतो, तेव्हा प्रेक्षक म्हणून हा प्रसंग पाहताना आपल्या मनावरून सुखाची थंड झुळूक गेल्याचा भास होत असतो. निखिल महाजन यांचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही अप्रतिम. प्राजक्त देशमुख यांनी 'देवबाभळी'तून एक सुंदर अनुभव दिला होताच. इथेही त्यांचं लेखन तीच जादू करून जातं. हे सगळं वाचूनही खरं तर ज्यांनी चित्रपट पाहिला नाहीये, त्यांना काही संदर्भ लागणार नाही चित्रपटाच्या कथेच्या बाबतीत. त्यामुळे जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहाच. कारण इथे कथा सांगण्यात मजा नाही. पडद्यावरच्या कविता चित्रपटगृहांत जाऊनच अनुभवायला हव्यात. आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. अलिकडेच, या चित्रपटाची 2021 च्या भारतातील सर्वोत्तम 10 चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे IFFI 2021 मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये, निखिल महाजनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला. याचबरोबर गोदावरीचा जागतिक प्रीमियर व्हँकुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 आणि एशिया पॅसिफिक प्रीमियर न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये झाला होता.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला जाहीर विरोध करणारा दिमित्री स्कुरैखिन रशियातच आहे. आपल्या प्रयत्नांमुळे एखाद्याच्या मनात जरी प्रश्न निर्माण झाला, काही अंतर्मुख झाले, तरी पुरेसे आहे, असे त्याला वाटते. सत्तेला असा एकट्याचा प्रश्नही अवघड वाटत असतो. जगातील सर्वच देशांचे व्यवहार स्वहिताभोवती एवढे केंद्रीत झाले आहेत, की आक्रमण करणारा देश आणि त्या आक्रमणाचा सामना करणारा देश अशी सरळ सरळ विभागणी करणे शक्यच होत नाही. रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, नागरी वस्त्यांवर बॉम्बफेक केली, शहरे उद्ध्वस्त केली; तरीही तटस्थ भूमिका घेत अनेक देश 'नरो वा कुंजरो वा' पद्धतीची भूमिका घेत आहेत. खुद्द रशियात तर सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणे, म्हणजे मोठे संकट ओढवून घेणेच आहे; तरीही एक व्यक्ती आपल्या परीने रशियाच्या आक्रमणाचा निषेध करीत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे दिमित्री स्कुरैखिन. मास्कोपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुस्कोव्हस्तोस्कोव्ह या छोट्याशा गावात, दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेले एक छोटेसे चर्च आहे. त्या चर्चच्या बाजूलाच असलेल्या एका छोट्या शॉपिंग सेंटरकडे सध्या सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. हे शॉपिंग सेंटर दिमित्रीच्या मालकीचे असून, त्याच्या दर्शनी भागात, मोठ्या अक्षरांत, जाडजूड ब्रशने गडद लाल रंगात एक वाक्य लिहिले आहे, 'युक्रेनला शांतता लाभो आणि रशियनांना स्वातंत्र्य मिळो.' त्या पुढे त्याने रशियाच्या हल्ल्याला बळी पडलेल्या युक्रेनियन शहरांची नावे लिहिली आहेत, मॉरिपोल, बूच, खेरसॉन, चेर्निहिव्ह. जसजशी नावे कळतात, तशी दिमित्री ही यादी वाढवत राहतो. शॉपिंग सेंटरच्या विस्तीर्ण अशा छपराला त्याने युक्रेनच्या राष्ट्रीय ध्वजासारखा पिवळा आणि निळा रंग दिला आहे. दिमित्री म्हणतो, 'माझा आणि अनेक रशियनांचा सुरुवातीला असा समज झाला होता, की युक्रेन सरकारमधील ड्रग माफियांचा बिमोड करण्यासाठी रशियाने ही खास लष्करी मोहीम सुरू केली आहे; परंतु हळूहळू युक्रेनमधील एक एक गाव नेस्तनाबूत होत असल्याचे लक्षात येऊ लागले. प्रसारमाध्यमे सरकारच्या ताब्यात असल्याने, लोकांना वस्तुस्थिती सांगण्याचा हाच एकमेव मार्ग होता.' हे सर्व करण्यातला धोका दिमित्राला माहिती आहे. आपल्याला तुरुंगवास किंवा मोठा दंड होऊ शकतो, याचीही त्याला कल्पना आहे. रशियन लष्कराचा अपमान केल्याबद्दल त्याला एकदा दंड ठोठावण्यातही आला आहे; शिवाय त्याच्या दुकानाच्या फळीवर कोणी तरी 'देशद्रोही' असे लिहून ठेवले आहे. दिमित्री म्हणतो, 'काही न करता सगळे पाहत शांत बसणे मला मंजूर नाही. जे काही चालले आहे, ते पाहून मी आतून दुभंगलो आहे. मनाला शांतता लाभावी, म्हणून मी हे करीत आहे. या सगळ्या क्रौर्याची सावली आम्हा सगळ्यांच्याच मनावर दीर्घ काळ राहील, याची मला खात्री आहे.' पुतीन जे काही करीत आहेत, त्याला रशियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे सरकार भासवत असले, तरी तो एक भ्रम आहे, असे दिमित्री म्हणतो. 'युक्रेनवरील हल्ला आणि त्याचा परिणाम म्हणून वाढलेली महागाई, गरिबी, उपासमार याला तुमचा पाठिंबा आहे का, असे कुठल्याही सामान्य माणसाला विचारून बघा, तो उलट प्रश्न करेल, 'तुला वेड लागले आहे का?' लोकांना खरी माहिती मिळत नाही. त्यांची दिशाभूल केली जात आहे,' असे दिमित्री ठासून सांगतो. अर्थात, सगळेच काही दिमित्री नसतात. रस्त्यावरून जाणारे काही नागरिक त्याला मूर्खात काढतात. काही नागरिक मात्र हळू आवाजात का होईना, दिमित्रीच्या स्वरात स्वर मिळवून, रशियन लोकांना सत्य काय ते जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे म्हणतात. दिमित्रीचे ९२ वर्षाचे एक शिक्षक म्हणतात, 'युद्ध कुणालाच नको आहे; कदाचित सरकारलाच त्याची गरज भासत असावी.' आपण हे जे करतो आहोत त्याने युद्ध थांबणार नाही, शांतता प्रस्थापित होणार नाही किंवा जग एकत्र येऊन युक्रेनच्या बाजूने उभे राहणार नाही, याची दिमित्रीला जाणीव आहेत. तो म्हणतो, 'माझ्या या प्रयत्नांमुळे काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या, काही लोकांना प्रश्न पडले, काही अंतर्मुख झाले आणि काहींनी सत्याचा शोध सुरू केला, याची मला खात्री आहे. मला तेवढे पुरेसे आहे. आपण आपल्या ताकदीचा वापर केला, याचे समाधान मला मिळते.' 'जगी या खास वेड्यांचा पसारा मांडला सारा' असे म्हणताना, जगाच्या कल्याणासाठी एकाकी लढणाऱ्या अशा दिमित्रींचीही कल्पना नक्कीच केली असणार.
पुणे - लोकसभा निवडणुकीत हातकंणगले मतदारसंघाचा अनपेक्षित निकाल लागला. राजू शेट्टींचा पराभव होवून शिवसेनेचे धैर्यशील माने एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शेट्टींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून नवा एल्गार पुकारला आहे. 'आजपासून. . ' या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकरी चळवळीचे व्रत पुढे चालण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ' मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे , अशा भावना त्यांनी कवितेच्या आरंभी व्यक्त केल्या आहेत. मी खचलो नाही, थोडासा टिचलो आहे . . ते कोण मला बेदखल करणार ? मी बळीराजाच्या काळजातच, घर करून बसलो आहे . . असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांशी आपला ऋणानुबंध दर्शवला आहे. म्हणून चला . . भूमीपुत्रांनो उठा, नवा एल्गार करू. . ! गोरगरिबांच्या हक्कासाठी आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू...! ! असा आशावाद व्यक्त करून त्यांनी आपली लढाई सुरूच असल्याचे अधोरेखित केले आहे. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्य़ आणि देश पातळीवर आंदोलन करताना त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला याचाच फटका त्यांना बसला. याशिवाय जैन विरुद्ध मराठा असा संघर्षही परिणाम करणारा ठरला आहे.
नाटक हे समाजाचेच एक अंग आहे. नाटकातील पात्रे जिवंत असतात. आपल्या समर्थ अभिनयाने ती पात्रे नाटक उभे करतात. एकच नाटक अनेक वेळा पाहिले तर प्रत्येक वेळी वेगळा अनुभव येतो, वेगळी अनुभूती येते. नाटकात काही तरी अलौकिक आणि अद्भुत असे असते. कल्पित आणि सत्य यांचे बेमालूम मिश्रण त्यात आढळून येते. नाटकात जीवनाचे दर्शन घडते आणि जीवनाला उजाळा मिळतो. म्हणून नाटकाला पाचवा वेद म्हणतात. जे नाटक एकाच वेळी सर्वांचे संतर्पण करते ते उत्कृष्ट नाटक होय. संसारात तडतोड अत्यंत आवश्यक असते. दुसऱ्याचे मन समजावून न घेता प्रत्येकजण जर संसारात स्वतःच्याच मनाला वाटेल तसा वागू लागला, तर संसार करणे अशक्य होते. अशा एका मन मानेल तशा वागणाऱ्या, दुसऱ्याला समजावून न घेता केवळ संशयाने माथे भडकावून घेणाऱ्या तापट माणसाच्या संसाराची कशी अधोगती होते, हे "हे रंग मानवाचे' या नाटकात दाखविले होते. मुंबईतील एका चाळीत शंकरचे मध्यमवर्गीय कुटुंब राहत असते. शंकर अत्यंत तापट व सनातनी विचारांचा असतो. राधा या त्याच्या पत्नीला स्वतःच्या मनातील व्यथा मनमोकळेपणाने सांगण्यासाठी तिच्या सुदैवाने भास्कर नावाचा एक मित्र लाभतो. त्याच्याशी तिची निर्मळ मैत्री असते. परंतु चाळीतील शेजाऱ्यांनी पिकविलेल्या खोट्यानाट्या अफवांवर विश्वास ठेवून शंकर राधाकडे संशयाने बघतो. त्याची तरुण मुलगी लता हिचाही त्याला संशय येतो. एकदा राधा व भास्कर हास्यविनोद करीत असताना शंकर अचानक येतो व दोघांचाही खून करतो. अखेर त्याला पकडल्यावर स्वतःच्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतो आणि नाटक संपते. हे तीन अंकी नाटक होते. या शोकांतिकेला चाळीतील डॉक्युमेंटरीसारखे स्वरूप दाखविले आहे, ते वास्तववादी आहे. साधारणतः पाच-सहा दशकांपूर्वीचे हे रंगमंचावरचे नाटक असले तरी आजच्या वास्तववादी समाजाचे चित्र दाखविते. आजही केवळ चारित्र्याच्या संशयावरून कितीतरी "राधा' सत्य न जाणता तापट "शंकरा'च्या हातून बळी पडतात.
कामठी तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथे निवडणूक झालेल्या नऊपैकी सहा ग्रा. पं. वर भाजपा समर्थित गटाचे सरपंच आणि उपसरपंच विजयी झाले. काँग्रेस समर्थित गटाचा केवळ तीन गावात विजय झाला. भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमटाऊन असलेल्या कोराडी ग्रा. पं. च्या सरपंचपदी भाजपाचे नरेंद्र धानोले विजयी झाले. कळमेश्वर तालुक्यात पाचही ग्रा. पं. च्या सरपंचपदी काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले. तालुक्यात बिनविरोध निवडणूक झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रा. पं. च्या सरपंचपदी काँग्रेसच्या नीतू सहारे बिनविरोध विजयी झाल्या. मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीत येथे काँग्रेसचे दोन गट पडले. यात नीलेश कडू यांनी चेतन निंबाळकर यांचा एक मताने पराभव केला. कडू यांना पाच तर निंबाळकर यांना चार मते पडली. शिवसेनाचा गड असलेल्या रामटेक मतदार संघातील नऊपैकी सात ग्रा. पं. मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. यासोबतच तालुक्यात पथरई ग्रा. पं. च्या सरपंचपदी मनसे समर्थित संदीप मनिलाल वासनिक विजयी झाले आहेत. मानापूर ग्रा. पं. मध्ये शिवसेना समर्थित संदीप मधुकर सावरकर यांची सरपंचपदी वर्णी लागली. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवलापार ग्रा. पं. वर काँग्रेसने झेंडा फडकविला. येथे काँग्रेसच्या शाहिस्ता इलियाज खान पठाण यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली. येथे १३ पैकी ११ जागांवर काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य विजयी झाले आहेत. तालुक्यात दाहोदा ग्रा. पं. मध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंचपदाच्या निवडणूक झाली नाही. येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे स्वप्निल सखाराम सर्याम उपसरपंचपदी विजयी झाले. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ८३ ग्रा. पं. मध्ये काँग्रेसचे तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ ग्रा. पं. मध्ये भाजपाचे उमेदवार सरपंच झाल्याचा दावा केला आहे. या दोघांच्या दाव्यांची बेरीज १५६ इतकी होते. मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात १२९ ग्रा. पं. साठी निवडणुका झाल्या आहेत.
'महसूल'मधील वरील गैरप्रकारांबाबत कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून त्याविरोधात आवाज उठविला होता. या भ्रष्ट कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचेही निदर्शनास आणून दिल्या होत्या. या अनुशंगाने सोमवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी आजही असे बनावट दस्ताची आदेश शासकीय व्यवहारात निदर्शनास येत आहेत. या आदेशांना पायबंद घालण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असा आग्रह धरला. यावेळी रमेश मोरे, अशोक पवार, अजित सासने, भाऊ घोडके. चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. ओळ : कोल्हापुरातील करवीर प्रांत कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला महसूलमधील घोटाळेबाजांवर कारवाईचे आश्वासन दिले.
'कपडे बदलता तसे तुम्ही पक्ष बदलता', नितेश राणेंना प्रश्न विचारल्यानंतर काय झालं? आमदार नितेश राणे हे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पक्ष बदलण्यावर तसेच संजय राऊतांसंदर्भात प्रश्न विचारल्यावर काय घडलं? आमदार नितेश राणे हे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पक्ष बदलण्यावर तसेच संजय राऊतांसंदर्भात प्रश्न विचारल्यावर काय घडलं? नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीण एक राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य करत संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. बारसू दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंवर निलेश आणि नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. तसंच त्यांनी बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी आग्रह देखील धरला आहे. Nitesh Rane: महाविकास आघाडीने आम्हाला प्रचंड त्रास दिला. भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. आम्हाला झालेला त्रास कमी करण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागलं. असं नितेश राणे म्हणाले.
जर तुम्ही कामाने थकले असाल किंवा नोकरी मिळण्यापूर्वी तुमच्या व्यवसायात तुमचे नशीब आजमावायचे असेल, तर दुग्ध व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असू शकतो. अधिकृत आकडेवारीनुसार, या क्षेत्रात भरपूर क्षमता आहे आणि 2026 पर्यंत हा उद्योग $314 अब्ज किंवा 2. 6 लाख कोटी रुपयांचा असेल. यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने निधीही जारी केला आहे. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. येथे तुम्हाला या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली जात आहे. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या दुग्धव्यवसायाच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या भागातील लोक सैल दुधाऐवजी पॅकेज्ड दूध खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्यास, तुम्ही अमूल किंवा मदर डेअरी सारख्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता, जे तुमच्याकडून संपूर्ण दूध खरेदी करतील आणि तुम्हाला चांगली किंमत देतील. यासोबतच कोणत्या प्राण्याचे दूध तुमच्यासाठी जास्त महाग आहे हे देखील पाहावे लागेल. उदाहरणार्थ, गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध जास्त महागात विकले जाते, त्यामुळे नफा जास्त अपेक्षित आहे. वरील गोष्टींना अंतिम स्वरूप दिल्यानंतर, तुम्हाला जनावरे ठेवण्यासाठी जमिनीचा तुकडा आणि त्यावर शेड लागेल. जितके जास्त प्राणी असतील तितकी जागा जास्त लागेल. यासोबतच त्यांच्या खाद्य-पाण्याचीही व्यवस्था करावी लागणार आहे. कचरा व्यवस्थापनाचीही व्यवस्था करावी लागेल. म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या शेणाच्या पोळ्या बाजारात विकल्या जाऊ शकतात. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नाबार्डकडून डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत कर्जाचे अनुदान मिळेल. Khatabook नावाच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सुमारे 33. 33 टक्के सबसिडी मिळू शकते. सरकारच्या इन्व्हेस्ट इंडिया वेबसाइटनुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (DAHD) अंतर्गत पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नवीन डेअरी युनिट्सना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्यात आला आहे. याअंतर्गत नवीन डेअरी चालकांना कर्जावर ३ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. भारतात डेअरी फार्म उभारण्यासाठी सुमारे 10-20 लाख रुपये खर्च येऊ शकतो. तथापि, खर्च करावयाची रक्कम पूर्णपणे तुमच्या दुग्धशाळेच्या आकारावर अवलंबून असेल. सुरुवातीच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त, तुम्हाला मजूर मजुरी, पशु विमा आणि वैद्यकीय सुविधा इत्यादींसाठी पैसे खर्च करावे लागतील. इन्व्हेस्ट इंडियाच्या मते, पुढील 5-6 वर्षांमध्ये दूध आणि संबंधित उत्पादनांचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 18% असण्याचा अंदाज आहे. हे तुम्हाला कोणत्याही सुरक्षित म्युच्युअल फंड आणि बँक एफडीमधून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. दुग्धव्यवसाय हे सध्या देशातील सर्वात मोठे कृषी उत्पादन आहे, जे अर्थव्यवस्थेत सुमारे 5 टक्के योगदान देते. नफ्याबद्दल बोलायचे तर ते तुमच्या व्यवसायाच्या चालण्यावर अवलंबून असेल. तथापि, येथे आम्ही तुम्हाला नफ्याचे उदाहरण देत आहोत. जयपूरच्या लोहारवाडा येथे राहणाऱ्या रतन लाल यांच्याकडे जवळपास 80 प्राणी आहेत. ज्यातून सुमारे 416 लिटर दूध बाहेर येते. दोन वर्षांपूर्वी ते ६० रुपये प्रतिलिटर दराने विकायचे. त्यांची रोजची कमाई 24,960 रुपये होती. रोजचा खर्च सुमारे 14,900 रुपये होता. महिन्यासाठी त्याचा एकूण निव्वळ नफा अंदाजे रु. 3,01,800 होता. महत्वाच्या बातम्या; हरभरा खरेदी न झाल्याने राज्यातील शेतकरी नाराज, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी. . 26 किलोच्या माशाने मच्छिमार बनवला लखपती, या कारणाने माशाला लागली मोठी बोली. .
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन- पुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच शहरात मागील काही दिवसांपासून शून्य मृत्यूची नोंद होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 116 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 78 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 245 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 116 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 439 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 326 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने एक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 765 एक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 09 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 01 रुग्ण आहे. एकूण एक्टिव्ह रुग्णांपैकी 4. 12 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
छोट्या पडद्यावरील ठाकूर सज्जन सिंग या नावाने प्रसिद्ध असलेले अनुपम श्याम (Anupam shyam) यांनी आपल्या भारदस्त आवाज आणि डॅशिंग लूकने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते आज या जगात नसतील पण त्यांच्या दमदार अभिनयासाठी ते कायम स्मरणात राहतील. अनुपम श्याम यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 रोजी प्रतापगड, उत्तर प्रदेश येथे झाला. अनुपम श्याम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली होती. जाणून घ्या अभिनय विश्वातील या दिग्गज अभिनेत्याच्या काही खास गोष्टी. अभिनेते अनुपम श्याम यांचे शालेय शिक्षण प्रतापगड येथून झाले. यानंतर त्यांनी अवध विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि लखनऊ येथील भरतेंदू नाट्य अकादमीमध्ये नाट्यशास्त्र शिकण्यासाठी आले. यानंतर अनुपम श्याम यांनी दिल्लीच्या श्री राम सेंटर थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेले. A post shared by Anupam Shyam (sajjan Singh) (@anupamshyamojha) अनुपम श्याम यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. त्यांनी आधी 'लिटिल बुद्धा' आणि नंतर शेखर कपूरच्या 'बँडिट क्वीन' चित्रपटात काम केले. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आणि अनेक छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. अनुपम श्यामला त्याच्या लाऊड लूकमुळे बहुतेक नकारात्मक पात्र मिळत असत. तो एक अभिनेता होता ज्याने वर्षानुवर्षे बॉलीवूडमध्ये काम केले होते, जरी त्याला खरी ओळख केवळ टेलिव्हिजनवरून मिळाली. अनुपम श्याम यांनी 2009 मध्ये आलेल्या 'मन की आवाज प्रतिज्ञा' या मालिकेत ठाकूर सज्जन सिंग यांची भूमिका साकारली होती आणि येथूनच त्यांना खरी ओळख मिळाली. हे पात्र इतके प्रसिद्ध झाले की, अनुपम श्यामचे दुसरे नाव ठाकूर सज्जन सिग होते आणि आजही बहुतेक लोक त्यांना याच नावाने ओळखतात. या मालिकेतही अनुपम श्याम एका ग्रे शेडच्या पात्रात दिसले होते, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो पण त्याची नकारात्मक बाजूही आहे. A post shared by Anupam Shyam (sajjan Singh) (@anupamshyamojha) अनुपम श्याम यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 'बॅन्डिट क्वीन', 'स्लमडॉग मिलेनियर', 'द वॉरियर', 'थ्रेड', 'शक्ती', 'हल्ला बोल', 'रक्तचरित' आणि 'जय गंगा' इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले. छोट्या पडद्यावर तो 'मन की आवाज प्रतिज्ञा' ते 'कृष्णा चली लंडन' आणि 'डोली अरमान की' सारख्या मालिकांचा भाग होता. अनुपम श्याम यांना दीर्घकाळ मूत्रपिंडाच्या संसर्गाचा सामना करावा लागला. ते डायलिसिसवर होते. अनुपम श्याम यांचे उत्तर मुंबई उपनगरातील एपेक्स किडनी केअर येथे डायलिसिस सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना गोरेगाव येथील लाईफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या भावाने सांगितले होते की, पैशांअभावी त्यांचे उपचार व्यवस्थित होत नाहीत. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत निधीतून मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने उपस्थित होते. पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ३४ गावांतून ही लसीकरण मोहीम पार पडणार असून, या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्रवीण माने यांच्या हस्ते झाला. ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींनी व ४५ ते ५९ ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर, दमा सारखे दुर्धर आजार असतील अशा सर्व व्यक्तींनी पळसदेव, बिजवडी ,भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे जाऊन लस घ्यावी तसेच लसीकरणासाठी सोबत येताना पॅनकार्ड किंवा आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे,सरपंच इंद्रायणी मोरे उपसरपंच पुष्पलता काळे , हनुमंत नाना बनसोडे ,भालचंद्र बापू बांडे,मेघराज कुचेकर,अंकुश जाधव, अजिनाथ पवार ,महेंद्र काळे ,स्वप्निल काळे , सुजित मोरे ,अनिल कुचेकर ,डॉ. रणजित जाधवर, सतीश मोरे ,उमेश काळे, डोंगरे गुरुजी,निलेश रंदवे , डॉ. मदने उपस्थित होते.
संशोधक डॉ. एस. नांबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' नावाचा सिनेमा 1 जुलै रोजी प्रदर्शित झाला. प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन यानं या सिनेमात डॉ. एस. नांबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. तसंच, आर. माधवननं दिग्दर्शनाची धुराही सांभाळलीय. ही घटना 1994ची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)मध्ये हेरगिरी केल्याचा आरोप डॉ. एस. नांबी नारायणन आणि अन्य काही जणांवर झाला. इस्रोतील रॉकेटचे डिझाईन आणि इतर काही माहिती शेजारी राष्ट्रांना विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. पण हे सगळे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं. उलट सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारला नारायण यांना नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये देण्याचे आदेश तर दिलेच, शिवाय चौकशी समितीही स्थापन केली. पण या सगळ्या प्रकारात एका गुणवंत संशोधकाला काय त्रासातून समोर जावं लागलं? आणि ते काम करत असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या संशोधनाचं पुढं काय झालं? माझ्याबरोबर असं का झालं? खरंतर 1998मध्येच सुप्रीम कोर्टाने डॉ. नारायणन यांना हेरगिरीच्या प्रकरणात निर्दोष ठरवलं होतं. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी नारायणन यांच्यासह सहा जणांना अटक केली होती त्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही अधिकाऱ्यारांवर कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे डॉ. नारायणन यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. बीबीसी हिंदी बरोबर चर्चा करताना नारायणन म्हणाले, "या प्रकरणी मला कसं फसवलं हे मला पूर्ण माहिती आहे. मात्र का फसवलं हे मात्र माहिती नाही. त्यांनी माझ्याविरुद्ध अनेक प्रकारचे पुरावे सादर केले. मात्र त्यांनी असं का केलं आणि माझ्याविरुद्धच का केलं यावर माझ्याकडे काहीही उत्तर नाही. " जेव्हा डॉ. नारायणन यांना अटक झाली तेव्हा प्रकरणाची माहिती त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या वैज्ञानिकांना होती. त्यांच्या अटकेमुळे भारतात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीच काम कितीतरी मागे गेलं. इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी बीबीसीला सांगितलं, "डॉ. नारायणन यांनी त्यावेळी या इंजिनचं काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करत आणलं होतं. हेच त्यांची योग्यता आणि काम क्षमता दाखवून देतं. " प्रकरण काय होतं? 1994मध्ये नारायणन यांच्याबरोबर एक वैज्ञानिक आणि अन्य काही लोकांना अटक केली होती. त्यात मालदीवच्या दोन महिला आणि बंगळुरूच्या दोन व्यापाऱ्यांचा समावेश होता. दोन वैज्ञानिकांवर इस्रोच्या रॉकेट इंजिनाचे चित्र आणि त्याचं तंत्रज्ञान दुसऱ्या देशांवर विकण्याचा आरोप होता. ज्या इंजिनाचं रेखाचित्र विकण्याची बाब समोर आली ते क्रायोजेनिक इंजिन होते. तेव्हा या इंजिनाचा कोणी विचारही केला नव्हता. जेव्हा सीबीआयने हे प्रकरण हाती घेतलं तेव्हा नारायणन यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. नारायणन सांगतात की त्यांच्यावर तुरुंगात अनन्वित अत्याचार झाले. पोलिसांनी त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर केला. ते सांगतात, "मी त्याविषयी जास्त बोलू इच्छित नाही. मला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. " जेव्हा निर्दोष मुक्तता झाली. . 1998मध्ये सुप्रीम कोर्टाने नारायणन यांची या प्रकरणातून मुक्तता केली. त्यानंतर जेव्हा ते कामावर परतले तेव्हा त्यांना या प्रकल्पावर काम करण्याची परवानगी मिळाली नाही. ते सांगतात, "मी उच्चपदावर काम करू शकत नव्हतो. प्रोजेक्ट डायरेक्टर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह अशा पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमांडिंग पोझिशनवर राहणं आवश्यक आहे. मात्र इतका छळ आणि अपमान सहन केल्यावर माझा स्वतःवरचाच विश्वास उडाला. तो प्रकल्प बिघडवण्याचीही माझी इच्छा नव्हतीच. " "याच कारणामुळे मी डेस्क जॉब मागून घेतला. तिथे तुम्हाला लोकांबरोबर जास्त संपर्क साधण्याची गरज पडत नाही. " "मी डिप्रेशनमध्ये नव्हतो. मात्र हे सगळं करण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. एक तर माझं काम पुढे नेणं किंवा राजीनामा देणं इतकेच पर्याय माझ्याकडे होते. मला माझा गमावलेला सन्मान परत मिळवायचा होता. " मग तो मान परत मिळाला का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे असं मला वाटतं. मला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असं देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका चौकशी समिती स्थापन केली आहे. याचा अर्थ काय आहे? " फार आधीच तयार झालं असतं क्रायोजेनिक इंजिन? या सगळ्या धबडग्यात एक प्रश्न असा उरतो की नारायणन यांना अशा प्रकारे फसवलं नसतं तर भारतात क्रायोजेनिक इंजिनाची निर्मिती खूप आधीच झाली असती का? नारायणन या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतात, "अर्थातच. हे इंजिन खूप आधीच तयार झालं असतं. जी वस्तू तयारच झाली नाही त्याला कोण कसं सिद्ध करणार होतं? ठीक आहे, मी स्वतःला सिद्ध केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेकाचं मनोबल खचलं. त्यामुळे त्या प्रकल्पाची गती मंदावली. " इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. नायर देखील नारायणन यांना दुजोरा देतात. हे सगळं झालं नसतं तर भारतात क्रायोजेनिक इंजिन तेव्हाच तयार झालं असतं असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, "त्यांना खूप मनःस्ताप सहन करावा लागला. त्यांनी आपलं करिअर गमावलं. कोर्टाने आता त्यांना चांगला दिलासा दिला आहे. " हे सगळं असलं तरी नारायणन यांच्या भावनांचं काय? त्यावर माधवन नायर म्हणतात, "त्याचं दुःख तर कायमच राहील. "
खासगी शाळेत प्रवेश करणे एक महाग गुंतवणूक असू शकते, खासकरून जेव्हा आपण विचार करतो की दिवसाचे विद्यालय शिक्षण वर्षातून 30,000 डॉलरच्या वर पोहोचू शकते. त्या अनेक बोर्डिंग शाळा यांचा उल्लेख नाही ज्यात शिक्षण वर्ष 50,000 डॉलर्सपेक्षा जास्त चांगले आहे. परंतु, वित्तीय मदत आणि शिष्यवृत्तीमुळे, पूर्ण-शिक्षण शिष्यवृत्ती समवेत, एक खाजगी शाळा शिक्षण हे आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक परवडणारे असू शकते. पूर्ण शिष्यवृत्ती हे सर्वसामान्य प्रमाण नसून ते अस्तित्वात आहेत. ज्या कुटुंबांना खाजगी शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च घेण्यात स्वारस्य असेल त्यांना केवळ या प्रतिष्ठित शिष्यवृत्त्यांचाच विचार न करता केवळ उदार आर्थिक मदत पॅकेजेस देतात अशा शाळांना पहा. नाही, प्रत्येक शाळेमध्ये पूर्ण-ट्युटिंग वित्तीय मदत पॅकेज देण्यात येणार नाही; हे खरे आहे की काही शाळांना आवश्यक आहे की सर्व कुटुंबांना खाजगी शालेय शिक्षणाच्या खर्चास काहीतरी योगदान द्या. पण, अशी अनेक शाळा आहेत जी पात्रता असलेल्या कुटुंबांची पूर्ण गरज भागविण्यासाठी बांधील आहेत. येथे चार ईस्ट कोस्ट स्कूल आहेत जे संपूर्ण शिकवणी शिष्यवृत्ती आणि / किंवा संपूर्ण आर्थिक मदत देतात. चेशीयर अकादमी टायर ऑफ चेशायरमधील पात्र दिवस विद्यार्थ्यांना एक पूर्ण ट्यूशन शिष्यवृत्ती आणि पात्र विद्यार्थ्यांना वित्तीय मदत पुरवते. येथे दोन्ही बद्दल अधिक जाणून घ्या. 1 9 37 मध्ये स्थापित, चेॅशियर अकादमी येथे टाउन शिष्यवृत्ती नववी ग्रेड प्रवेश विद्यार्थ्यांना खुले आहे, आणि टाउन ऑफ केशरीर मध्ये राहतात कोण. प्रतिष्ठित पुरस्कारासाठी चेशायर अकादमीच्या आपल्या चार वर्षाचा विद्यार्थी कारकीर्दीसाठी पूर्ण शिकवणार्या शिष्यवृत्तीसह सर्वोच्च उमेदवार प्रदान केला आहे. हा पुरस्कार निवडणे नागरिकत्व, शिष्यवृत्ती, नेतृत्व प्रदर्शन आणि क्षमता आणि चेशायर अकादमी आणि मोठ्या समुदायास दोघांनाही सकारात्मक योगदान देण्यावर आधारित आहे. टाउन शिष्यवृत्ती विचारासाठी, उमेदवारासः वेस्टचेस्टर कंट्री डे स्कूल अनेक शिष्यवृत्त्या प्रदान करते, काही पूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती आणि काही पूर्ण शिकवणीच्या टक्केवारी आहेत. येथे अधिक जाणून घ्या. संपूर्ण ट्यूशन शिष्यवृत्ती त्यांच्या योग्यता शिष्यवृत्ती कार्यक्रम माध्यमातून केले जाते, जे 2013 मध्ये सुरू करण्यात आली. सहाव्या सहाव्यातील एका विद्यार्थ्यासाठी एक पूर्ण नवशिक्षणाची शिष्यवृत्ती आणि नवव्या दर्जाची विद्यार्थी उदय होण्याची ऑफर आहे. नवीन आणि परत येणारे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत, जे विद्यार्थी हे दर्शवितेः
खंड पहिला ( १८९२-१९५६ इ. स. ) अस्पृश्यांचे एक थोर पुढारी, प्रसिद्ध कायदेपंडित व घटनातज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांचा लौकिक आहे. आंबेडकरांच्या जन्म १४ फेब्रुवारी १८९२ रोजीं रत्नागिरी जिल्ह्यांत दापोली गांवीं झाला. त्यांची आई लहान पणींच वारली. त्यामुळे वडिलांनीच त्यांचें पालनपोषण केलें. आंबेडकरांचें मूळ नांव आंबावडेकर असें होतें; पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या एका शिक्षकाने तें बदलून आंबेडकर असे केलें. यांचें शिक्षण सातारा व मुंबई येथे झालें. बी. ए. झाल्यावर ते श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेला गेले व कोलंबिया विद्यापीठाचे एम. ए., पीच्. डी. झाले ( १९१६ - १७). अमेरिकेहून परत आल्यावर त्यांनी बडोदें संस्थानांत नोकरी धरली. या नोकरीत असतांना अस्पृश्य म्हणून त्यांना फार वाईट अनुभव आले. त्यानंतर कोल्हापूरच्या महाराजांचें साहाय्य घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये अभ्यास करून व 'दि प्रॉब्लेम ऑफ दि रुपी' हा प्रबंध लिहून लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. ही दुर्मिळ पदवी त्यांनी संपादन केली. नंतर बॅरिस्टरीचीहि परीक्षा देऊन ते मायदेशीं परत आले. उच्चविद्याविभूषित असूनहि अस्पृश्य जातींत जन्माला आल्यामुळे त्यांना आयुष्यांत फार अपमान सोसावे लागले. शेवटीं त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धाराची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांचें निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा केली. आपल्या प्रतिज्ञेला अनुसरून त्यांनी स्वतःला अस्पृश्योद्धाराच्या कामीं सर्वस्वी वाहून घेतलें. आंबेडकर डॉ. भीमराव वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलीं. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने दोन प्रखर सत्याग्रह केले. पहिला महाडला चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा (मार्च १९२७) व दुसरा नाशिकच्या राममंदिरप्रवेशाचा ( मार्च १९३०). या सत्याग्रहांमुळे अस्पृश्यांमध्ये जागृति होऊन त्यांची संघटना झाली. १९३० ते ३२ पर्यंत ते गोलमेज परिषदेचे सभासद होते. या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळावा, अशी मागणी केली व गोलमेज परिषदेत ती मंजूरहि झाली. परंतु त्यावरूनच म. गांधी व आंबेडकर यांच्यांत मतभेद निर्माण झाला. गांधीजींना अस्पृश्यांचा हा सवता सुभा मान्य नव्हता. म्हणून तो निर्णय बदलून घेण्यासाठी गांधीजींनी पुणे येथे प्राणांतिक उपोषण आरंभिलें. त्या वेळी आंबेडकर व गांधीजी या दोघांत या प्रश्नावर चर्चा होऊन सुप्रसिद्ध 'पुणे करार जन्माला आला. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे ते मुंबई कौन्सिलवर निवडून आले. १९४२ ते ४६ या काळांत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे मजूरमंत्री होते. त्या अवधींत त्यांनी अस्पृश्य वर्गाची शैक्षणिक व आर्थिक उन्नति करण्याच्या कामी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी मुंबईंत सिद्धार्थ कॉलेज स्थापन केलें. 'शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ' ही अस्पृश्यांची संस्था त्यांच्याच खंबीर नेतृत्वाखाली वाढली. भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंड ळांत कायदामंत्री म्हणून त्यांची नेमणक झाली. पुढे स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याच्या कामीं त्यांची योजना झाली. तीन वर्षे सतत परिश्रम करून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताची नवी राज्यघटना तयार केली. आंबेडकरांच्या दृष्टीने या घटनेंतील महत्त्वाचा भाग म्हणजे अस्पृश्यता नामशेष करणारे कलम हा होय. या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच १९४८ च्या ऑक्टोबर मध्ये हिंदुकोड बिल लोकसभेला सादर करण्याचा मानहि त्यांनाच मिळाला. त्यांच्या पहिल्या पत्नीचें नांव रमाबाई असें होतें. त्या १९३७ सालों निवर्तल्या. त्यानंतर अकरा वर्षांनी म्हणजे १९४८ साली डॉ. लक्ष्मीबाई कबीर या सारस्वत महिलेशीं त्यांनी द्वितीय विवाह केला. स्पृश्यांकडून अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय त्यांच्या धर्मांतरावांचून दूर होणार नाही, अशा धारणेने सन १९३६ साली आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती; पण ती त्यांनी अंमलांत आणली, ती मात्र पुढे वीस वर्षांनंतर. १४ ऑक्टोबर १९५६ रोजीं दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर येथे आपल्या एक लाख अनुयायांसह त्यांनी हिंदु धर्माचा त्याग डॉ. आंबेडकर 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत' व 'जनता' अशीं तीन करून बौद्ध धर्म स्वीकारला. जन्मभर आलेल्या कटु अनु
WPL 2023 MI vs DC Final: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7. 30 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान, या सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ऑरेंज कॅपही प्रदान केली जाईल. आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाणार आहे. यंदाच्या हंगामात ही ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये चांगलीच चूरस पाहायला मिळणार आहे. या तीन खेळाडू म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग आणि मुंबई इंडियन्सची नतालिया स्किव्हर-ब्रंट व हेली मॅथ्यूज. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत लेनिंग आघाडीवर आहे. तिने आत्तापर्यंत या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने 8 सामन्यात 51. 66 च्या सरारीने 310 धावा केल्या आहेत. या यादीत तिच्या पाठोपाठ युपी वॉरियर्सकडून खेळणारी ताहलिया मॅकग्रा आहे. तिने 9 सामन्यात 302 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नतालिया असून तिने 9 सामन्यांत 54. 40 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत. तसेच हेली मॅथ्यूज या यादीत पाचव्या क्रमांकावर असून तिने 9 सामन्यांत 32. 25 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सोफी डिवाईनने 266 धावा केल्या आहेत. पण या यादीतील ताहलिया मॅकग्रा आणि सोफी डिवाईन यांच्या संघांचे आव्हान संपूष्टात आल्याने त्यांची ऑरेंज कॅप पटकावण्याची संधीही संपली आहे. पण आता नतालिया आणि मॅथ्यूजला लेनिंगला मागे टाकत ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी असेल, तर लेंनिंगही अंतिम सामन्यात आपला अफलातून फॉर्म कायम ठेवत ऑरेंज कॅपही स्वतःकडेच कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे अंतिम सामन्यानंतर ही ऑरेंज कॅप अखेर कोणाकडे जाणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 310 - मेग लेनिंग (8 सामने) (दिल्ली कॅपिटल्स) 302 - ताहलिया मॅकग्रा (9 सामने) (युपी वॉरियर्स) 272 - नतालिया स्किव्हर-ब्रंट (9 सामने) (मुंबई इंडियन्स) 266 - सोफी डिवाईन (8 सामने) (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) 258 - हेली मॅथ्यूज (9 सामने) (मुंबई इंडियन्स) Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी आणखी 32 उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. मनसेनं आज आपली तिसरी यादी जाहीर केली. पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये २७ उमेदवारांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये 45 उमेदवारांचा समावेश होता. आतापर्यंत मनसेनं 104 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मनसे राज्यात १५० जागा लढवण्याची शक्यता आहे.
विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अमृतसर येथे झाला होता. १९५५ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी 'शारदा', 'रागिनी', 'बेवकूफ' यांसारख्या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर १९७१ मध्ये आलेल्या 'रिटा'मधून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते 'एलान', 'लाल पत्थर', 'अमर प्रेम', 'अनुराग', '20 साल पहले', 'बंदगी', 'हवस', 'वरदान', 'रफ्तार', 'अर्जुन पंडित', 'नागिन', 'सफेद झूठ', 'अनुरोध', 'घर', 'जानी दुश्मन', 'स्वर्ग नरक', 'दादा', 'अमरदीप' आणि 'द बर्निंग ट्रेन' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. विनोद मेहरा त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सुद्धा खूप चर्चेत राहिले. त्यांचं वैवाहिक जीवन खूपच गुंतागुतीचं होतं. १९७४ मध्ये त्यांनी मीना ब्रोका यांच्याशी लग्न केलं मात्र त्यांचा हे लग्न फक्त ४ वर्षंच टिकलं. १९७८ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. त्यानंतर १९८० मध्ये विनोद यांनी बिंदिया गोस्वामी यांच्याशी लग्न केलं मात्र हे लग्नही ४ वर्षांनी मोडलं. घटस्फोट घेत दोघंही १९८४ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा किरणसोबत लग्न केलं. पण या लग्नाच्या २-३ वर्षांनी विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ३० ऑक्टोबर १९९० रोजी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी विनोद मेहरा यांचं निधन झालं. बिंदिया गोस्वामी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काही काळ विनोद मेहरा अभिनेत्री रेखा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा जोरदार चालल्या. रेखा यांचं अमिताभ यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या अशात विनोद मेहरा यांची सोबत त्यांना आवडू लागली. या दोघांनी लग्न सुद्धा केलं होतं असं म्हटलं जातं. पण या गोष्टीची पुष्टी दोघांपैकी कोणीच केली नाही. रेखा आणि विनोद मेहरा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. विनोद यांच्या आईला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पुणतांबा चांगदेवनगर येथील कावेरी रविंद्र सांबारे (वय ३२) ही महिला स्वतःच्या शेतात काम करीत असताना विषारी साप चावून मृत झाल्याने तिचा संसारच उघड्यावर आला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कावेरी आपल्या शेतात गवत काढण्याचे काम करीत होती. कामाच्या नादात तिचे खाली लक्ष नव्हते. विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला. तिच्या सोबत असलेल्या एका महिलेच्या ही बाब लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. नातेवाईकांनी तिला तत्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारसाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. तिला चावलेला साप अतिशय विषारी असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कावेरी सांबारे यांच्या पश्चात पती रविंद्र, एक मुलगा, मुलगी, सासू सासरे, दीर, भावजयी असा परिवार आहे.
विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नवी दिल्ली- विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारचे याबाबत मत मागवले आहे. मुळचे केरळचे आणि सध्या इटलीत ट्रेंटो येथे कामानिमित्त राहणारे जोसफ शाइन यांनी ही याचिका दाखल केली आहे. संमतीने ठेवलेल्या संबंधांमध्ये केवळ पुरुषालाच दोषी का धरले जाते आणि संबंधित विवाहित स्त्रीला यामध्ये का दोषी ठरवले जात नाही असा प्रश्न जोसेफ यांनी या याचिकेद्वारे विचारला आहे. विधिज्ञ कालीस्वकम राज यांनी भारतीय दंडविधान संहितेतील कलम 497 मधील तरतुदीवर न्यायालयात बोट ठेवले. अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला, अविवाहित पुरुष आणि विवाहित महिला किंवा विवाहित पुरुष आणि विवाहित महिला यांच्यामधील संमतीने झालेल्या संबंधांमध्ये महिलेची त्यातील भूमिका कोणतीही असो त्याचा विचार न करता तिला क्लीन चिट दिली जाते, याकडे राज यांनी लक्ष वेधले. त्यामुळेच भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीची वैधता तपासण्यावर सर्वोच्च न्यायालयाने विचार सुरु केला. कलम 497 काय सांगते- दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीशी संबंध ठेवल्यास आणि तिच्या पतीच्या संमतीशिवाय किंवा मौनानुकूलतेशिवाय ते संबंध असतील तर ते बलात्कार नसून व्यभिचाराचा गुन्हा म्हणून न्यायालयासमोर येईल. या गुन्ह्याखाली त्या पुरुषास पाच वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड किवं दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच त्या पत्नीला यासंदर्भात कोणतीही शिक्षा होणार नाही.
वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते. वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ माजली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याने त्या वेळेस काहीही हालचाल झाली नव्हती. धक्कादायक म्हणजे कुणाच्या तरी तक्रारीवरून आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता, अशी मधल्या काळात महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या मुद्यावरून टीका करताना महापालिका व बविआ नेत्यांना घरचा आहेर दिला होता. मुळातच या २२ कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून काढताना कुठलीही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नव्हती. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात या अभियंत्यांनी बविआचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली होती. या प्रकरणात न्याय कृती करण्याचे आश्वासन आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्या वेळी दिले होते. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाला जाब विचारला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याची तयारीही त्यांनी केली होती. प्रशासनाने सेवा खंडित केलेल्या त्या २२ कनिष्ठ अभियंत्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचा शब्द दिल्याने या प्रकरणाची महासभेत चर्चा झाली नाही. मागील चार महिने बेरोजगार असलेले हे अभियंते महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून २० जानेवारीपासून या सर्वांना त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दिशा पाटनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या "मलंग' चित्रपटामुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता दिशा पाटनी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल टाकण्याची इच्छा आहे. तिला प्रियंका चोप्राकडून खूप प्रेरणा मिळाली असून, त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते, असे दिशा पाटणी म्हणाली. नुकत्याच एका मुलाखतीत दिशा पाटनी म्हणाली, बॉलिवूडची 'देशी गर्ल' अर्थात प्रियांका चोप्राला मी खुपच फॉलो करते. प्रियांका माझयासाठी प्रेरणास्थान आहे. छोट्या गावातून येवून बॉलीवूडच नव्हे तर आज हॉलीवूडमध्येही छाप पाडणे तितकेसे सोपे नाही. प्रियांकाने जे केले त्यामुळे अभिनय क्षेत्रात भारताने नाव जगभरात घेतले जात आहे. दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दिशा पाटनी सध्या "मलंग' चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉप कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. यानंतर ती सलमान खानच्या आगामी "राधे' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे.
भारताच्या १६ वर्षीय एस. एल. नारायणनने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीत ग्रँडमास्टर विदीत गुजराथीला बरोबरीत रोखले. यासह नारायणनने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही मिळविला. पुणे : भारताच्या १६ वर्षीय एस. एल. नारायणनने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीत ग्रँडमास्टर विदीत गुजराथीला बरोबरीत रोखले. यासह नारायणनने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही मिळविला. विमाननगर येथील हयात हॉटेलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. खुल्या गटातील नवव्या फेरीत केरळच्या एस. एल. नारायणनने नाशिकच्या विदीत गुजराथीला ५२व्या चालीअखेर बरोबरीत रोखले. नारायणनचे २४२०, तर विदीतचे २६३५ एलो रेटिंग आहे. या बरोबरीसह नारायणनने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही मिळविला. भारताचा इंटरनॅशनल मास्टर दीप्तायन घोषने ग्रँडमास्टर जॉर्ज कोरीला बरोबरीत रोखले. घोषचे २५०८, तर कोरीचे २६१२ एलो रेटिंग आहे. मुलींत रशियाची वुमन ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा गोरियाच्किना साडेसात गुणांसह आघाडीवर आहे. मुलींच्या नवव्या फेरीत ऋचा पुजारीने भारताच्याच श्वेता गोळेवर मात केली. ऋचाचे आता साडेपाच झाले गुण आहेत. पुण्याच्या आकांक्षा हगवणेला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या आयमिवाने आकांक्षावर मात केली. याशिवाय पी. व्ही. नंदीताने भारताच्याच प्रत्युषा बोडावर मात केली.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक आत्महत्यांचे (Kolhapur Crime) सत्र सुरुच आहे. आता या यादीमध्ये लग्न ठरत नसल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलताना गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. ही धक्कादायक घटना शिंगणापूरमध्ये (ता. करवीर) घडली. चेतन भिवाजी चौगले (वय 33) असे मृताचे नाव आहे. वय होऊनही लग्न न झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. चेतनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न ठरवण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, योग जुळून न आल्याने चेतन नैराश्यात होता. या नैराश्यातून चौगुले मळ्यातील जनावरांच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. चेतन दहावीपर्यंत शिकला होता. तो वडिलांसह शेत करत होता. दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असतानाही लग्न होत नसल्याने त्याला नैराश्याने ग्रासले होते. गेल्या काही वर्षांपासून शेती करणाऱ्या मुलांच्या विवाहाचा गंभीर प्रश्न झाला आहे. यामधून विवाह जुळवण्याच्या नावाखाली फसवणुकीचेही प्रकार झाले आहेत. दुसरीकडे, कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खूनाचा कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 24 तासात छडा लावण्यात आला आहे. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरसिंह दत्ताजीराव थोरात अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर एलसीबीनं मयत अमरसिंहचे वडिल दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात या दोघांना जेरबंद केलं आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत. दरम्यान, अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात सातत्याने भांडणे होत होती. अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याला पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला होता. यामुळे घरात वाद झाला होता. याच वादातून वडिलांनी घरामध्ये अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. या मारहाणीत प्रचंड रक्तस्रावाने अमरसिंहचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी घाबरून रस्त्या शेजारी मृतदेह टाकला होता.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये प्राणी, पक्षी, पाळीव प्राणी आणि सोशल मीडियावरील क्रिएटर्सने तयार केलेल्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या चिंपाझीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका मुलाचे जॅकेट काढून घेताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडओमध्ये एक चिंपाझी एका तरूणाचे जॅकेट काढताना दिसत आहे. तो त्याच्या अंगातून जॅकेट काढून घेत आपल्या अंगात घालताना या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी शेअर केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवर आलेल्या मजेशीर प्रतिक्रिया पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
नवी दिल्ली :- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) या दोघांची अप्रतिम जोडी देवाने बनवली आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना राबवणे सोपी गोष्ट नाही, असे म्हणत दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राजनाथ सिंग आणि योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनऊमध्ये १ हजार ७१० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय आणि आरोग्य, स्मार्ट सिटी मिशन, सेतू निगम आणि सिंचनाच्या १८० योजनांचा समावेश आहे. "योगी गुन्हेगारांविरोधात कडक शिक्षा देतात, त्यामुळे त्यांचा नाव ऐकून गुन्हेगार घाबरतात. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नसते तर मी माझ्या लखनऊ मतदारसंघाचा इतका विकास करू शकलो नसतो." असे कौतुक सिंग यांनी यावेळी केले.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) च्या संघाने आज, 23 डिसेंबर 2022 रोजी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट (CLAT) 2023 चा निकाल जाहीर केला आहे. CLAT 2023 ची परीक्षा 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. CLAT 2023 ची परीक्षा देणारे उमेदवार निकाल पाहू शकतात. उमेदवारांना नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे. ✅खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरती जाहिरात आली! ✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! ⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा! ✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा ! ✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी ! ! CLAT 2023 UG मध्ये मिळवलेले सर्वोच्च गुण 116. 75 आहे. CLAT 2023 साठी, एकूण उपस्थिती सुमारे 94. 87% होती. CLAT 2023 साठी अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी 56% महिला आहेत, 44% पुरुष आहेत आणि 2 ट्रान्सजेंडर अर्जदार आहेत. अधिकृत घोषणेनुसार, दोन उमेदवारांनी UG CLAT 2023 मध्ये परिपूर्ण गुण मिळवले. पाच विद्यार्थ्यांनी 99. 97 पर्सेंटाइल, तीन विद्यार्थ्यांनी 99. 98 पर्सेंटाइल, तीन उमेदवारांनी 99. 99 पर्सेंटाइल आणि चार उमेदवारांनी 99. 96 पर्सेंटाइल मिळवले. CLAT 2023 च्या UG आवृत्तीमध्ये सर्वोच्च स्कोअर 116. 75 आहे. CLAT PG 2023 मध्ये फक्त एका विद्यार्थ्याने 99. 99 टक्केवारी मिळवली, तर कमाल 95. 25 गुण मिळवले. - सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट consortiumofnlus. ac. in वर जा. - एक नवीन लॉगिन पेज उघडेल. - तुमचा CLAT अर्ज क्रमांक/अॅडमिट कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख भरा आणि सबमिट करा. - CLAT 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. - निकाल तपासा आणि डाउनलोड करा. परीक्षा आणि निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus. ac. in ला भेट देऊ शकतात. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२२ च्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार १९ जून २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवाराना अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासाठी ९ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने (National Law University Consortium) परीक्षेच्या तारखेत सुधारणा केली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १९ जूनपासून सुरु होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ मे रोजी होणार होती. आता यूजी आणि पीजी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CLAT २०२२ परीक्षा १९ जून २०२२ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत घेतली जाणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच, CNLU ने CLAT परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती. ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी मिळणार असून ते ९ मे २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट consortiumofnlus. ac. in वर जाऊन लॉग इन करू शकतात. - CLAT परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवारांना कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus. ac. in वर जा. - होमपेजवर 'CLAT 2022' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. - अर्ज भरण्यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. - सर्व तपशील देऊन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून CLAT 2022 अर्ज भरणे सुरू करा. - अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा. - तुमची CLAT नोंदणी पूर्ण होईल. - भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. The reason for postponing the CLAT has not been officially announced. Candidates, meanwhile, are advised to prepare for the exam in view of these new dates. The exam will be held from 3 pm to 5 pm. This is a national level law course entrance exam. The examination is conducted for admission to five year LLB and one year LLM courses in 22 National Law Universities. This exam will be offline. Examination centers will be set up for the examination. - उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४० टक्के गुण) बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. - मार्च / एप्रिल २०२२ मधील परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. - उमेदवारांकडे किमान ५० टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) एलएलबीची पदवी आवश्यक आहे. - पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात. - CLAT 2022 साठी अर्ज भरताना उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट गेटवेचा उपयोग करायचा आहे. - याद्वारे अर्ज शुल्क जमा करता येईल. - सर्वसाधारण गटातील उमेदवारांसीठी CLAT अर्जाचे शुल्क चार हजार रुपये आहे. - एससी, एसटी आणि बीपीएल उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,५०० रुपये आहे. क्लॅट परीक्षा २०२२ देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची अपडेट आहे. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीएनएलयूच्या कार्यकारी समिती आणि जनरल बॉडीच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा उमेदवारांना फायदा होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर अपडेट पाहता येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हैदराबाद येथील नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथील प्राध्यापक फैजान मुस्तफा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, २०२२ मध्ये पहिल्यांदाच क्लॅट परीक्षा दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लॅट २०२२ चा पहिला टप्पा ८ मे रोजी आणि दुसरा टप्पा १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. क्लॅट समुपदेशन शुल्कः बैठकीत क्लॅट २०२२ साठी समुपदेशन शुल्क कमी करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या सीएलएटी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांपैकी सर्वसाधारण श्रेणीसाठी समुपदेशन शुल्क ५० हजारांऐवजी ३० हजार असणार आहे. तसेच एससी, एसटी, ओबीसी, बीसी, इड्ब्ल्यूएस, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी समुपदेशन शुल्क केवळ २० हजार रुपये असणार आहे. विद्यार्थ्यांची गोपनीयताः उमेदवारांचे तपशील कोणत्याही विद्यापीठ किंवा कोणत्याही तिसऱ्या संस्थेला शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डिटेल्स शेअर करण्यासाठी उमेदवाराची संमती असेल तरच, त्याचे/तिचे तपशील परीक्षा मंडळाद्वारे संस्थेला दिले जातील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. क्लॅट कन्वेअरः या बैठकीमध्ये हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूरचे कुलगुरु वी. सी. विवेकानंद यांची क्लॅट २०२२ परीक्षेसाठी संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.
स� ��ंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठीजळगाव : धावत्या रिक्षामधून अचानक धूर निघू लागल्याने घाबरलेल्याअश्विनी राजू पाटील (२१, रा. मंगरुळपीर, जि. वाशिम) या विद्यार्थिनीने उडी घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील ट्रक खाली येऊन ती जागीच ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते जळगाव दरम्यान हातेड नाल्याजवळ झाला. अपघातानंतर ट्रक व रिक्षा दोन्हीही पसार झाले. इतर प्रवाशांनीही रिक्षातून उडी घेतली मात्र ते सुदैवाने बचावले. फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी १. अश्विनी पाटील ही डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती या महाविद्यालयाच्याच वस्तीगृहात राहत होती. गुरुवारी गावाकडे जाण्यासाठी ती एका रिक्षाने जळगावला यायला निघाली. २. रिक्षा पुढे आल्यानंतर त्यामधून अचानक धूर निघू लागला. रिक्षाला आग लागली की काय? या भीतीने प्रवाशांनी खाली उड्या घेतल्या. यामध्ये अश्विनीनेदेखील उडी घेतली. ३. चालकाच्या बाजूने उडी घेतल्याने मागून येणार्या ट्रक खाली ती आली. यात तिच्या चेहर्यावरुन ट्रकचे चाक गेले व ती जागीच गतप्राण झाली. शरीराला कोठेही इजा झालेली नसून चेहराच पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ट्रक, रिक्षा पसारअपघातानंतर रिक्षाचालक, ट्रकचालक पसार झाले. इतकेच नव्हे ज्या प्रवाशांनी रिक्षातून उडी घेतली तेही प्रवासी तेथून निघून गेले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडल्या गेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबीय पतपुरवठा करणाऱ्या संस्था तसेच खासगी सावकारांचे कर्जबाजारी झाले आहेत. सततचा दुष्काळ, पीक उत्पादन घेणे मुश्किल झाले आहे, अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख तणावात जीवन जगत आहेत. अशा कुटुंबीयांचा प्रेरणा प्रकल्पांतर्गत सर्वे करण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील 223 कुटुंबप्रमुख तणावपूर्ण आयुष्य जगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील 157 शेतकरी सौम्य, 48 मध्यम तर 18 शेतकरी तीव्र तणावग्रस्त आहेत. धामणगाव 26 हजार 849 कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये 14 हजार 55 शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर व निंबोली या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून 26 हजार 849 कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वे करण्यात आला. 14 हजार 55 शेतकरी कुटुंबाचा यात समावेश आहे. यापैकी 18 कुटुंबप्रमुख तणावात आयुष्य जगत आहेत. 157 सौम्य आणि 48 मध्यम स्वरूपातील तणावात आहेत. शासनाने आशा प्रेरणा प्रकल्प शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमाअंतर्गत आशा वर्कर्सच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला. तळेगाव दशासर, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर व निंबोली या चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील 27 हजार 292 घरांमधील 26 हजार 849 कुटुंबांपैकी शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमांतर्गत संशयित शेतकरी कुटुंबीयांची संख्या 2850 आहे. यामध्ये मानसिक आजाराचे वर्गीकरण केल्यानंतर सौम्य स्वरुपातील 158, मध्यम 48, तीव्र 18 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तीव्र असलेल्या काही शेतकऱ्यांवर मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत व समुपदेशन करत आहेत. 104 या हेल्पलाईनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. त्याचप्रमाणे तळेगाव दशासर केंद्रात सौम्य 23, मध्यम 12, तीव्र 6 असे शेतकरी आहेत. अंजनसिंगी सौम्य 73, मध्यम 27, तीव्र 8 आहेत. मंगरुळ दस्तगीर केंद्रात तीव्र निरंक तर मध्यम 1, सौम्य 29 आहेत. निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सौम्य 32, मध्यम 8, तीव्र 4 शेतकरी आहेत. तणावाचे रूपांतर आत्महत्येमध्ये होऊ नये यासाठी शासन मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करीत आहेत.
विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी असलेल्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमद यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील अलीपूर कोर्टाने हे अटक वॉरंट जारी केले आहे. हसीन जहाँने २०१८ मध्ये मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी तिने शमी विरोधात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील घटस्फोटाचा खटला देखील कोलकात्ता कोर्टात आहे. अलीपूर कोर्टाने शमीला हजर होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. जर १५ दिवसांत शमी हजर झाला नाही तर त्याला अटक करा, असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल केला होता.
औरंगाबादमधले कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांना अहवाल सादर करण्यासाठी आयजींनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ मागून घेतली आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोठडीत असताना उपचार घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली. औरंगाबाद विभागाचे आय.जी. प्रभात रंजन यांना हे आदेश देण्यात आले. तसेच पोलिस महासंचालक शिवानंदन यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यांना ही शिक्षा मिळाली ती मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसल्याबद्दल. बुधवारी मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आले असतांना हर्षवर्धन जाधव त्यांच्या ताफ्यात घुसले.आणि शिक्षा म्हणून पोलिसांनी जाधव यांचे असे हाल केले. या जबर मारहाणीनंतर जाधव यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तर हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांनाचं मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी केला. तर झाल्या प्रकाराचा मनसेनं निषेध केला.अशी अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला असा सवाल मनसे नेते विचारत आहे. या प्रकरणाविरोधात वातावरण तापायला लागलं. आणि गृहमंत्र्यांनी प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या मारहाणीवर आता तीव्र पडसाद उमटत आहे. आरोपीला एवढ्या अमानुषपणे मारण्याचा अधिकार पोलिसांना आहे का असा सवाल आता केला जात आहे. त्यामुळं एका आमदाराला पोलिस अशी मारहाण करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा असा प्रश्न आता विचारला जातो. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी ज्या पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप होतो त्यांना रूग्णालयात नेल्यानंतर दाखल करण्यात आलं नसताना तसा खोटं रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं पोलिसांच्या या एकूणच गोलमाल प्रकारावर मनसेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज व्हीआर वनिता (VR Vanitha) हिने सोमवारी (२१ फेब्रुवारी) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (VR Vanitha Announced Retirement) जाहीर केली आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी तिने क्रिकेटला अलविदा केला आहे. ट्वीटरच्या माध्यमांतून तिने ही घोषणा केली असून आपल्या संघ सहकारी कर्णधार मिताली राज आणि गोलंदाज झूलन गोस्वामी यांचे आभारही व्यक्त केले आहेत. तसेच तिने आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासात तिला सहकार्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मंडळी, संरक्षक आणि संघातील इतर साथीदारांचेही आभार मानले आहेत. तसेच तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्त्व करणाऱ्या २ राज्य संघ, कर्नाटक आणि बंगाललाही धन्यवाद म्हटले आहे. "मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. हा संघर्ष, आनंद, हृदय तुटणे, शिखणे आणि वैयक्तिक यश साध्य करण्याचा प्रवास राहिला आहे. पण मला काही गोष्टींचा मात्र खेद आहे. मला मिळालेल्या संधींचे, विशेषत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळाल्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. हा माझ्यासाठी शेवट नसून नव्या आव्हानांची नवी सुरुवात आहे," असे तिने पुढे लिहिले आहे. जानेवारी २०१४ मध्ये वनिताने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ती भारतीय संघात सलामीवीर फलंदाजाची भूमिका निभावत आली आहे. तिने आतापर्यंत भारताकडून ६ वनडे सामने खेळले आहे. यादरम्यान तिने ८५ धावा केल्या आहेत. संपूर्ण वनडे कारकिर्दीत तिला एकही अर्धशतक करता आले नाही. टी२० क्रिकेटमध्येही तिला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. तिने टी२० क्रिकेटमध्ये १६ सामने खेळताना २१६ धावा केल्या आहेत. ओदिशाला नमवून माजी विजेत्या बंगलोरने उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही राखले कायम!
मार्च १६६५, मोघलांचे हिरवे वादळ मिर्झा राजा जियसिंग च्या नेतृत्वात पुरंदर वर आदळले होते. परंतु पुरंदर च्या दक्षिण दरवाजातून मराठ्यांनी मोघलांच्या नाकावर टिकचून रसद वर गडावर पोहचवली होती ह्याची बातमी दिलेरखानास कळताच तो पाहऱ्यावरील सरदार दाऊदखनावर चांगलाच उसळला. व त्यास वेढ्यातून परत मोघल छावणीत हकलवून दिले. दाऊदखान आता स्वतःवर आलेली नामुष्की दूर करण्यासाठी मिर्झाराजांकडे मुघल तक्ता शी इमान प्रकट करण्यासाठी मुलूखगिरी ची संधी मागू लागला. मिर्झा ही स्वराज्याच्या विरोधात दुसरी आघाडी उघडन्याच्या तयारीतच होते. त्यांनी दाऊदखनास मुघल राजपूत सरदारांचा भरणा असलेली ७ हजारांची फौज व देऊन राजगड च्या दिशेने रवाना केले. राजगड कडे कूच म्हणजे दररया खोऱ्यातील मावळ प्रदेश, भूतकाळात बहमनी व आदिलशाही फौजेचीही हिकडे तोंड वळवण्यास छाती झाली न्हवती, पण मग आताच विलासाची सवय असलेल्या मोघली फौजेस ह्या स्वारीचे स्फुरण कसे काय चढले? त्याचे उत्तर म्हणजे मावळातील प्रदेशाची जण असलेले व वतनाची हव्यास असलेले बाळाजी नाईक शिळीमबकर व विठोजी हैबतराव शिळिंबकर हे मिर्झा राजा ने टाकलेल्या जाळ्यात स्वतःहून गुरफटले होते. दाउद खानाचा रोख रोहिडा ते राजगड असा होता, (२७ एप्रिल ला दाऊद खान रोहिड्याच्या पायथ्याशी आला.) ह्या मुलखात स्वराज्यातील ५० गावे व अनेक मातबर सरदारांचा कुटुंब कबिला होता. नेमकं हेच सावज मोघलांच्या निशाण्यावर होते. शिकारी कुत्री जशी सशांच्या कळपावर तुटून पडावी तसाच पराक्रम मुगलांनी रोहिडा ते राजगड च्या आसमंतातील ५० गावात केला. तिथून वाचलेले लोक डोंगर रांगेतील दुर्गम आशा खेड्यात जमले. परंतु शिळीमकरांनी शत्रूस तेथे ही पोहचवले. आता जमलेले लोकांपैकी लढाऊ बाण्याचे लोक पुढे येऊन खिंडीच्या सहाय्याने मोघली टोळधाडेस प्रत्युत्तर देऊ लागले. परंतु मोगलांची जास्तीची कुमक येताच मात्र त्यांनी डोंगर दर्यात लुप्त होण्याचा निर्णय घेतला. येथील फौजेची नासाडी भरून काढण्यासाठी मुघलांनी मग गावातील उरलेली रिकामी घरे व इतर जनगम मालमत्ता (नेहमीच्या सवयी प्रमाणे) साफ करून तेथेच भक्षास गिळलेल्या अजगरा सारखे सुस्थावले व दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल १६६५ रोजी हा मोगलांचा मस्तवाल कळप कळयुगातील नररूपी शिवाचे स्थान असलेल्या मराठ्यांची राजधानी राजगड जवळ करू लागला. . रोहिडा राजगड आसमंतातील गोर गरीब जनते विरुद्ध रुस्तमी पराक्रम केल्याच्या अविर्भावात हा झुंडरूपी कळप दुसऱ्या दिवशी राजगड च्या सणजीवन माची च्या ध्रुव दिशेस म्हणजेच उत्तरेस स्थिरावला. छावणीतून दाऊदखान ह्या बारा कोसांचा घेर असलेल्या ह्या मराठ्यांच्या राजधानीच्या डोंगरावर चाल करून महादरवाजा कब्जात घेण्याचा मनसुबा आखत असतानाच बाहेर त्यास अचानक बाहेरील गोंधळ ऐकू आला. व बाहेर येताच त्यास आकाशातून उल्कापात होत असल्याचे भास झाले. कारण मोगल छावणी स्थिरावते ना स्थिरावते तोच संजीवन माची वरील जगदंबेच्या भुत्यांनी गोंधळातील पोत जाळवा तसा तोफांना बत्ती दिल्या होत्या. तोफांतील पडणाऱ्या गोळ्यामुळे छावणीतील राजपुतांस मात्र मा काली च जणू नभांतून आग ओकत असल्याचा भास होत होता. वरून कोसळणाऱ्या गोळ्यात भाजून करपण्यापेक्षा छावणी मागील गुंजवणी नदीकडे मोगलांनी धाव घेतली. पण विस्कळीत झालेल्या मोगलांस सह्याद्रीत आज कोणी वाली न्हवता. बाजारबुनगे तर ह्या पळपुत्या हशमांच्या गर्दीत अक्षरश कुस्करले जात होते. गोफनातील धोंड्यांनी तर झाडावरील पिकलेल्या फळ प्रमाणे मोघली डोकी टिपली होती. जसे मोघल पांगु लागले तसे तडबंदीतील जनग्यांमधून बरकनदाज चाप ओढू लागले व चऱ्यांमधून धनुर्धर प्रत्युनशा खेचू लागले. सह्याद्रीचा सोबती वारा ही त्यास साद देत होता. मोगलांची पुरती दैना झाली होती. आता आजच कदाचित जन्नत मधील हूर आपल्याला न्हयायला येतात की काय अशी धास्ती मोंगलास वाटू लागली. जवळपास ३ प्रहर मार खाऊन वाचलेल्या मोंगलास आता रणात धीर धरवत न्हवता. त्यांनी आता उरलं सुरला सर्व अवसान एकत्र करून राजगडास पाठ व बुडाला पाय लावण्याचा (पळून जाण्याचा) युद्धकलेतला एक वेगळाच पवित्रा घेतला होता. ह्यात मोघल वा राजपूत हे वेगळे न राहता खांद्याला खांदा लावून सुसाट सुटले होते. इस्लामी वीरांच्या ह्या पवित्र्यात मात्र मावळात शिरताना जी खुमखुमी होती तिचा लवलेश ही उरला न्हवता. राजगड च्या माऱ्याच्या टप्प्यातून जे दैवी कृपेने वाचले ते आता सह्याद्रीच्या निसर्गरूपी भौगोलिक कचाट्यात सापडले होते. पण हिठे शिलिंबकरांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. जाताना मागे राजगडाकडे फक्त अश्वांवर स्वार असलेली मनुष्यरूपी धडावरील भुंडी डोकी फक्त नजर फेकत होती, त्यावरील मोगली पगड्या केव्हाच राजगडाच्या आसमंतातील मातीत मिळाली होती त्या बरोबर मोगली अब्रू ही.
ठाणे : अल्पावधीतच जास्त पैसे तसेच सोने देण्याच्या योजनांचे प्रलोभन दाखवून तब्बल १४ हजार ३४० गुंतवणूकदारांकडून २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीजीएन ज्वेलर्स प्रकरणातील वॉन्टेड आरोपी व्यवस्थापिका लीना पिटर हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी मंगळवारी दिली. लोकांना सोने आणि इतर योजनांचे आमिष दाखवून विरीथगोपालन नायर आणि वत्सला नायर यांनी व्हीजीएन ज्वेलर्स नावाने वित्तीय संस्था सुरू केली होती. डोंबिवली पूर्व, उल्हासनगर आणि मुंबईतील मुलुंडमध्ये ही दुकाने होती. यातील मुख्य सूत्रधार तथा आरोपी विरीथगोपालन नायर याने २००६ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना दरमहा पाचशे रुपयाप्रमाणे २४ महिने गुंतविल्यास १२ हजारांच्या बदल्यात १४ हजार रुपये मिळतील किंवा तितक्याच रकमेचे सोने देण्यात येईल. तसेच एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १५५ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरुपात परत दिले जायचे. मात्र, गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील परतावा परत न देता ६६ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झाला होता. सोन्याची दुकाने, सोन्यामधील गुंतवणुकीची योजना तसेच इतर योजनांद्वारे अवाजवी परतावा आणि गुंतवणुकीच्या फसव्या आमिषाला गुंतवणूकदारांना फसवू शकतात. अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. तसेच व्हीजीएन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. यापूर्वी व्हीजीएन ज्वेलर्सचा मालक विरीथगोपालन याला ५ ऑक्टोबर २०२१ मध्ये आणि त्याचा मुलगा गोविंदगोपालन याला २ डिसेंबर २०२१ रोजी अटक झाली. आता ७ मार्च २०२२ रोजी यातील वॉन्टेड व्हीजीएन ज्वेलर्सची व्यवस्थापिका लीना पीटर हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तिला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत आणि सहायक पोलीस निरीक्षक विक्रम कोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. आतापर्यंत १४ हजार ३४० गुंतवणूकदारांची २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपये इतकी फसवणूक झाली. आरोपींच्या आठ बँकांमधील २८ बँक खाती गोठवून त्यातील २४ लाख १८ हजार ५०३ इतकी रक्कम गोठविली आहे. तसेच ४६ कोटींची पाच स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. विरीथगोपालन याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ४२ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतमाल नाशवंत असून जर वेळेवर पार्सल वॅगन नाही मिळाली तर तो खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, त्यामुळे तातडीने वॅगन उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकर्यांसह व्यापार्यांनी केली आहे. दरम्यान कार्टिंग एजंट दिलीप नरवडे (Dilip Narwade) यांनी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणाचा फटका शेतकरी आणि व्यापारी यांना तर बसत आहेच शिवाय रेल्वेचे (Railway) मोठ्या प्रमाणात महसूलदेखील बुडत असल्याचे सांगितले. याबाबत आपण लक्ष घालून रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकार्याशी चर्चा करून ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. पवार यांनी नरवडे यांना दिले आहे. मध्य रेल्वेत मनमाड रेल्वे स्थानक महत्वपूर्ण जंक्शन असून देशाच्या कानाकोपर्यातील सुमारे 125 पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे येथून पार्सलच्या माध्यमातून पंजाब, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश यासह इतर राज्यात रोज शेकडो टन कांदा, कोबी, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला यासह इतर शेतमाल पाठविला जातो. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या भुसावळ विभागाकडून शेतकरी, व्यापारी आणि कार्टिंग एजंट यांना पार्सल वॅगन उपलब्ध करून दिले जातात त्यातून रेल्वेला रोज सुमारे 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र सध्या भुसावळ विभागातील काही अधिकारी मनमानी करून मागणीनुसार पार्सल वॅगन उपलब्ध करून देत नसल्यामुळे शेकडो टन शेतमाल रेल्वे स्थानकावर पडून आहे. वेळेवर पार्सल वॅगन नाही मिळाले तर सर्व शेतमाल खराब होऊन आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असे शेतकरी व व्यापार्यांनी सांगून तातडीने वॅगन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासन नेहमीच मनमाड शहर परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि कार्टिंग एजंट (carting agent) यांच्याशी दुजाभाव करून त्यांना वेळेवर आणि मागणीनुसार पार्सल वॅगन उपलब्ध करून देत नसल्याने शेतकर्यांसह व्यापार्यांचे शेतमाल खराब होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मागणी नुसार पार्सल वॅगन उपलब्ध करून देण्यात यावे शिवाय या भागासाठी किसान रेल सुरु करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वाळूच्या वादातून दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व रमेश सोनवणे यांचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला. या हल्ल्यात उमेश सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. वाळूच्या वादातून घडली घटना; हल्लेखोर अटकम. टा. प्रतिनिधी । दौंड वाळूच्या वादातून दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व रमेश सोनवणे यांचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला. या हल्ल्यात उमेश सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दौंड तालुक्यातील राहू गावात दुपारी एक वाजता ही घटना घडली. याप्रकरणी संतोष जगताप व त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन जीप व एक दुचाकी जाळली. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. हल्लेखोर संतोष जगताप व सोनवणे यांच्यामध्ये वाळूच्या ठेक्यावरून वाद होता. शनिवारी सकाळीही त्यांच्यात वादविवाद झाले होते. त्यानंतर जगताप हा आपल्या काही साथीदारांना घेऊन राहू गावात आला. गणेश सोनवणे, रमेश व उमेश यांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तिघेही गंभीर झाले. त्यांना तातडीने पुण्यात रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु गणेश व रमेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उमेशची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर संतोष व त्यांच्या साथीदारांनी पलायन केले. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाची चक्रे फिरवून काही तासांतच संतोष व त्याच्या पाच साथीदारांना अटक केली. राहूच्या बाजारपेठेत भरदिवसा हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली. वाळूच्या ठेक्यांवरून गुंडगिरी आणि दहशतीचे प्रकार होत आहेत. हाच वाद सोनवणे कुटुंबातील दोघांच्या जिवावर बेतला. गणेश हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे यांचा मुलगा होता, तर संतोष हा बाजार समितीच्या संचालिका प्रतिभा जगताप यांचा मुलगा आहे.
या गणपतीच्या दर्शानासाठी दुरवरुन भक्तगण येतात. मनोकामाना पुर्ण करणाऱ्या गणपतींध्ये या गणपतीचे नाव अग्रकमाने घेतले जाते. नावाप्रमाणेच हा हा गणपती श्रीमंत आहे. यंदा या मंडळाने जयपूरच्या हवामहल ची प्रतिकृती साकारली आहे. हवामहल आणि त्यावरची विदयूत रोषणाई डोळे दिपवणारी आहे.
सरपंच निवडीवरून शेणोलीत धुमश्चक्री! कऱ्हाड/शेणोली : शेणोली (ता. कऱ्हाड) येथे सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादावादीचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मारामारीत पर्यवसान झाले. दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचासह तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती. काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच काहीजण पसार झाले आहेत. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेणोली ग्रामपंचायतीची निवडणूक ४ आॅगस्टला पार पडली आहे. बुधवारी तेथील सरपंच, उपसरपंच निवडीही पार पडल्या. यावेळी माजी सरपंच नारायण शिंगाडे यांच्या गटातील सरपंच व्हावा, अशी शिंगाडे गटाची अपेक्षा होती. मात्र, विरोधी गटातील महिलेला सरपंचपद मिळाले. त्यामुळे बुधवारपासून गावात तणावपूर्ण वातावरण होते. अशातच गुरुवारी सकाळी सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून नारायण शिंगाडे यांचा विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांशी वाद झाला. त्यावेळी शिंगाडे गटातील काहीजणांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली. त्याला ग्रामस्थांनी उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीनंतर विरोधी गटातील काहीजण आक्रमक झाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नारायण शिंगाडे हे गावातील मुख्य बाजारपेठेत आले असताना विरोधी गटातील काहीजणांनी त्यांना घेरले. सकाळी केलेल्या माराहाणीचा जाब विचारत त्यांनी शिंगाडे यांना धक्काबुक्की केली. यावेळी शिंगाडे गटातील काहीजण त्याठिकाणी पोहोचले. त्यामुळे हा वाद वाढत गेला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. विरोधी गटातील काहींनी नारायण शिंगाडे यांच्यासह त्यांचा पुतण्या सतीश शिंगाडे व अन्य एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत ते तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (वार्ताहर) शेणोलीमध्ये ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली. त्यामध्ये अतुल भोसले समर्थक नारायण शिंगाडे व उंडाळकर समर्थकांनी एकत्रितपणे आठ जागा मिळवून विजय संपादन केला. मात्र, बुधवारी प्रत्यक्षात सरपंच निवडीवेळी उंडाळकर समर्थक तीन सदस्य पृथ्वीराज चव्हाण, मदनराव मोहिते यांच्या गटाच्या बरोबर राहिले. त्यांनी सरपंच, उपसरपंच निवडीत बाजी मारली. याच कारणावरून हा वाद पेटल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. गुरुवारी दुपारी मदनराव मोहिते समर्थक कार्यकर्त्याला शिंगाडे गटातील काहीनी मारहाण केली. त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मोहिते समर्थकांनी शिंगाडे यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.
ऱ्होडस गवत - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nऱ्होडस गवत : (लॅ. क्लोरिस गयाना कुल-ग्रॅमिनी). या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) चाऱ्याच्या गवताची द. आफ्रिकेतून १९१५ मध्ये भारतात आयात करण्यात आली. द. आफ्रिकेतील मुत्सद्दी सेसिल जॉन ऱ्होड्स यांनी केपटाऊन शहरानजीक आपल्या शेतीवाडीत हे गवत मोठ्या प्रमाणावर लावले म्हणून त्यांच्याच नावाने हे ओळखण्यात येऊ लागले. भारतातही ते पुष्कळ लोकप्रिय झाले आहे. ऱ्होडस गवताचे संधिक्षोड [⟶ खोड] तारेसारखे असून ९० ते १२० सेंमी. उंच वाढते. तिरश्चर (खोडाचे जमिनीत आडवे वाढणारे प्ररोह) लांब, मजबूत, पर्णयुक्त असतात. पाने ३-५ मिमी. रुंद व टोकाकडे निमुळती असतात. फुलोऱ्यातील कणिशांची [⟶ पुष्पबंध] संख्या १०-१५ असून ती ५ -१० सेंमी. लांब व बोटाच्या आकाराची पसरणारी असतात. कणिशके एकमेकांशी भिडलेली व पक्व अवस्थेत गवताच्या रंगाची असतात. कणिशांत बीज मोठ्या संख्येने धरते.\nभारतात उष्ण आणि उपोष्ण भागांत बागायती अथवा जिरायती अशा दोन्ही स्वरूपांत याची लागवड करता येते. हे अवर्षण विरोधक असून थंडीही सहन करू शकते. उबदार व दमट हवामानात व खोलगट भागात याची वाढ चांगली होते. भारी चिकण माती आणि दलदल या गवताला मानवत नाहीत. हलक्या प्रकारच्या दुमट जमिनीत याची उत्तम वाढ होते. जमिनीतील पुष्कळ लवणता सहन करू शकणाऱ्या गवतांच्या जातींमध्ये याचा समावेश होतो.\nऱ्होड्स गवताची लागवड बियांपासून अथवा मुळे फुटलेल्या कांड्यांपासून करतात. जिरायती पिकासाठी हेक्टरी ४.५ ते ८ किग्रॅ. व बागायती पिकासाठी ११ ते १३ किग्रॅ. बी लागते. मुळे फुटलेली कांडी एका हेक्टरला सु. २५,००० लागतात. पेरणीपूर्वी हेक्टरी १२ ते २० टन शेणखत व पहिल्या कापणीनंतर हेक्टरी २२० किग्रॅ. अमोनियम सल्फेट दिल्याने चांगले उत्पादन मिळते.\nबी पेरून तयार केलेल्या पिकाची तीन महिन्यांनंतर व कांडी लावून केलेल्या पिकाची दोन महिन्यांनंतर पहिली कापणी करतात. पुढील कापण्या एक महिन्याच्या अंतराने करतात. उत्तर भारतात दरवर्षी ७-८ कापण्या व दक्षिण भारताच्या उबदार हवामानात १२ कापण्या मिळतात.\nपेरणीनंतर अथवा लागणीनंतर कोळपणी करणे आवश्यक असते. आवश्यकतेप्रमाणे विरळणी करून दोन झाडांतील अंतर ४५ ते ६० सेंमी. ठेवतात. हंगामाप्रमाणे पिकाला २-३ आठवड्यांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देतात.\nबागायती पिकाचे ओल्या चाऱ्याचे वार्षिक हेक्टरी उत्पादन सु. ३७ टन आणि जिरायती पिकाचे सु. १७.५ टन असते. मैला पाण्यावर वाढलेल्या पिकाचे हेक्टरी १७५.६ टन उत्पादन मिळाल्याची नोंद आहे. हे पीक फार झपाट्याने वाढत असल्याने ते शेतात फार दाट होते. यासाठी वर्षातून एकदा नांगरणी करून झाडांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक असते. योग्य रीतीने पिकाची निगा ठेवल्यास ते पुष्कळ वर्षे चांगले उत्पादन देते. सर्वसाधारणपणे हे पीक एका जागी तीन वर्षे चांगले उत्पन्न देते. जनावरे चरण्यासाठी ओला चारा म्हणून व वाळलेले गवत करण्यासाठी हे गवत उपयुक्त आहे परंतु भारतात हे गवत मुख्यतः ओल्या चाऱ्यासाठी वापरतात.\nलसूण घासाबरोबर हे पीक घेतल्यास चाऱ्याची उपयुक्तता वाढते आणि चाऱ्याचा वर्षभर पुरवठा होतो. उन्हाळ्यात ऱ्होड्स गवतापासून व हिवाळ्यात लसूण घासापासून चारा मिळतो. ऱ्होड्स गवत पालेदार असल्याने जनावरे आवडीने खातात. ते पुरेशा प्रमाणात पौष्टिक असते. हिरव्या चाऱ्यात सु. ३% व फुलावर येण्यापूर्वी कापणी करून वाळविलेल्या गवतात ६.४% प्रथिने असतात. तसेच या पिकात कॅल्शियम (०.५%) व फॉस्फरस (०.४%) समतोल प्रमाणात असतात. घोड्यासाठी हे गवत योग्य समजत नाहीत.\nकुरणात पावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत या गवतात गुरे चारून व त्यानंतर गुरे चारण्याचे बंद करून त्याची फुलावर येण्यापूर्वी कापणी केल्यास त्यापासून वाळलेले गवत तयार करता येते. गुरे चरताना ते त्यांच्या पायाखाली तुडविले गेले तरी त्यापासून अपाय होत नाही.\nपहा : वैरण.\nसंदर्भ : 1. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.\n2. Narayanan. T. R. Dabadghac, P. M. Forage Crops of India, New Delhi. 1972.\nचव्हाण. ई. गो. गोखले, वा. पु.
'अतरंगी रे' (Atrangi Re) साठी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या प्रमोशन करण्यात मुलाखती देण्यात सारा खान (Sara Ali Khan) सध्या बिझी आहे. सध्या एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. हा किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आहे. नवाब घराण्याची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khna) हिने फार कमी कालावधीत चित्रपट जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खानने 2018 साली 'केदारनाथ' (Kedarnath Movie) या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, पण साराने रसिकांची पसंती मिळवत अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली. छोटे नवाब सैफ अली खान (Sai Ali Khan) आणि अभिनेत्री अमृता सिंह (Amrita Singh) यांची लेक सारा अली खान नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. 'अतरंगी रे' सिनेमामुळेही ती सध्या प्रचंड चर्चेत आहे. धनुष आणि अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट 'अतरंगी रे' ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर 24 डिसेंबर 2021 रोजी होईल. या चित्रपटात सारा अली खान रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, धनुष (Dhanush) विष्णूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) रिंग मास्टर आहे, ज्याचं नाव अनिल आहे. 'अतरंगी रे' साठी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या प्रमोशन करण्यात मुलाखती देण्यात सारा सध्या बिझी आहे. सध्या एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. हा किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आहे. किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साराच्या लहानपणीचा हा किस्सा आहे. साराचा खेळकर स्वभाव सगळ्यांनाचा चांगलाच माहिती झाला आहे. लहानपणापासूनच सारा अगदी तशीच आहे. एकदा सैफ अली खान आणि आई अमृता सिंहसोबत सारा एका घड्याळाच्या दुकानात गेले होते. तेव्हा सारा दुकानाच्या बाहेर राहून डान्स करत होती. एका माणसाने साराला डान्स करताना पाहिले आणि तिला पैसे दिले. साराला या सगळ्या गोष्टी अगदी मजेशीर वाटल्या. त्या माणसाने दिलेले पैसेही तिने अगदी सांभाळून ठेवले. डान्स करत असल्याचे पाहून त्या माणसाने तिला पैसे दिले यामुळे साराही खुप खुश होती. साराच्या तोंडून हा किस्सा ऐकताच उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते.
दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. घरो-घरी तर उत्साह पाहायला मिळतच आहे. पण यंदा सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधनाचे संदेश देणारे देखावे सादर करतात. अशापैकीच एक आहे दादर इथला राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. गणपती हे बृद्धीचे दैवत मानले जाते. त्यामुळे यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरण स्नेही आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट नजरे समोर ठेऊन ग्रंथालय या संकल्पनेवर सजावट साकारण्यात आली आहे. विद्या ददाति विनयम् असा संदेशही याद्वारे देण्यात आला आहे. विद्या ददाति विनयम्, म्हणजेच ज्ञान आणि विद्यामुळे माणसामध्ये नम्रता येते. विद्या किंवा ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे पुस्तके. ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांचं हेच महत्त्व मंडळाने देखाव्यातून सादर केला आहे. विशेष म्हणजे सजावटीसाठी वापरण्यात आलेली पुस्तके ही मंडळाला वर्गणीदार आणि वाचकांकडून भेट म्हणून देण्यात आली आहेत. जवळपास 300 हून अधिक वेगवेगळ्या विषयांवर आधारीत पुस्तकांचा खजिना मंडळाला वाचकांकडून भेट म्हणून दिला आहे. लायब्ररी ही संकल्पना ऋषीकेश बाणावलकर यांची आहे. तर ही संपूर्ण सजावट सुश्मिता चंद्रमौली यांनी केली आहे. कॅलिग्राफी सोनाली माने आणि लायटिंग उमेश काटे आणि अक्षय मोरे यांनी केली आहे. वाचकांकडून भेट म्हणून मिळालेली ही 300 पुस्तके गणेशोत्सवानंतर NGO Book Share Of India या सेवाभावी संस्थेला सुपूर्द करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवा हे धोरण राबवून ही पुस्तकं संस्थेला दिली जाणार आहेत, अशी माहिती राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभय चव्हाण यांनी दिली.
सांगली : मापात माप करणाऱ्या संशयित पेट्रोल पंपांवर छापे टाकण्याची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची सांगली जिल्ह्यातील कारवाई अद्याप सुरूच आहे. पथकाने रविवारी दुपारी माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याचा पेट्रोलपंप व माधवनगर जकात नाक्याजवळील सदाशिव पेट्रोलियम या दोन पंपांवर छापे टाकून तीन तास तपासणी केली. पण तिथे आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही. जिल्ह्यातील आणखी तीन संशयित पंपांची नावे निष्पन्न झाली आहेत. पेट्रोल पंपावर मापात माप करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील २२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या टोळीच्या चौकशीत सांगली जिल्ह्यातील काही पंपांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून ठाण्याचे पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. आतापर्यंत पथकाने भिलवडी (ता. पलूस), अंकली (ता. मिरज), बागणी, आष्टा (ता. वाळवा), तसेच तासगाव येथे छापे टाकले आहेत. टोळीतील संशयितांनी, सांगली साखर कारखान्याजवळील दोन पंपात मापात माप करण्यासाठी 'चीप' दिली आहे, अशी कबुली दिली होती. त्यामुळे दुपारी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत भुरके तसेच सांगलीच्या वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक किशोर चोरडिया, क्षेत्र सहाय्यक उदय कोळी, तसेच इंडियन आॅईलचे अभियंते यांनी संयुक्तपणे रविवारी दुपारी वसंतदादा कारखान्याच्या पंपावर छापा टाकला. या पंपावर पेट्रोल व डिझेल विक्रीची दोन यंत्रे आहेत. या दोन्ही यंत्रांची तासभर तपासणी करण्यात आली. पण त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही. कारखान्याच्या पंपाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पथकाने माधवनगर जकात नाक्याजवळ असलेल्या सदाशिव पेट्रोलियम या पंपावर तीन वाजता छापा टाकला. याठिकाणी पेट्रोल व डिझेलची तीन यंत्रे आहेत. ही सर्व यंत्रे उघडून त्यामधील पल्सर कार्ड व पॅनल कार्डची तपासणी केली. एक लिटर, दोन, तीन, चार व पाच लिटर असे पेट्रोल बाहेर काढून त्याचे माप तपासले. मात्र मापात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत. पाच लिटरमागे दहा मि. लि. पेट्रोल जास्त जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. पंपाचे मालक सुधीर पाटील यांच्यावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. पेट्रोल-डिझेल खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. पल्सर कार्ड बदलले आहे का? , याचीही तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी मापात पाप करण्यासाठी भारतासह परदेशातही 'चीप' दिली आहे. राज्यातील १०९ पंपांची नावे निष्पन्न झाली होती. सांगली, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक पुणे, औरंगाबाद, नागपूर, राजगड आदी जिल्ह्यांतील पंपांवर छापे टाकले आहेत. यातील ७० पंपांत दोष आढळून आले आहेत. लिटरमागे ४० ते १८० मि. लि. चा फरक आढळून आला आहे. पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी सांगितलेल्या माहितीवरुन सांगली जिल्ह्यातील पंपांवर छापे टाकून तपासणी सुरु ठेवली आहे. अजूनही जिल्ह्यातील तीन पेट्रोलपंप 'रडार'वर आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही कारवाई पूर्ण केली जाईल. ज्या पंपांवर दोष आढळून आले आहेत, त्यांच्यावर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल.
परतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची हिरवीगार शेते पिकांनी डोलू लागली होती. आदिवासी बांधव शेतीच्या कामात गुंतली होती. दर्याखोर्याच्या मेळघाटातील पर्वतराजीने क्षितीजापर्यंत हिरवी शाल पांघरली होती. त्यावर पांढर्याशुभ्र पुजक्यांचे ढग लडिवाळपणे खेळताना दिसत होते. नभात कृष्ण मेघांची दाटी झाली होती. रानवार्याने त्यांच्याशी हातमिळवणी केली. आणि आषाढधारा बरसू लागल्या. वृक्ष-लता चिंब भिजू लागल्या. त्यांच्या पानापानावरुन पाणी जमिनीवर पडू लागले. त्याचे ओहळ तयार होऊन ते नदी नाल्यात जाऊ लागले होते. त्यामुळे नदी नाले भरभरून वाहू लागली होती. मेळघाटच्या डोंगरवनातील धबधबे काळ्या शिळांवरुन कोसळू लागले होते. कुठेकुठे त्यावर धुकंही पांघरल्या जात होतं. क्षणातच वार्याच्या झुळकीमुळं धुक्यात धबधबा झाकला जायचा आणि क्षणातच पडदा बाजूला व्हायचा तसंच निसर्गाचं खळाळतं हास्य नजरेत पडायचं. निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवने म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाल्यासारखे वाटत होते. २०२७ चौ. किलोमिटरच्या मेळघाटात हे निसर्गदृष्य वर्षाऋतुमध्ये जागोजागी पहायला मिळते. आणि पाहणार्याच्या मनाला नवीन उभारी मिळते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्याला अशा निसर्गरुपामुळे उर्जा मिळत असते. वर्षाऋतू हा सृजनपर्व सुरु करणारा ऋतू आहे. आकाश आणि धरतीच्या मीलनात ढग हे प्रेमदूत बनून येतात. मेघाचा अर्थ वर्षाव करणे असा होतो. जलधर, पयोधर आणि वारीवाह ही ढगांची तीन रुप आहेत. कालिदासाने वर्षाऋतूचं वर्णन जलदसमय असे केले आहे. दरवर्षी चातक पक्षी मृगसरीसोबत येतात आणि पावसाळा संपला की भारतात किंवा पृथ्वीच्या ज्या भागात पाऊस पडतो त्या भागांकडे जातात. जाताना ती आपली पिलं येथेच सोडून जातात. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर तीही आपल्या मायबापांबरोबर निघून जातात. मेघाच्या जलबिंदूवर जीवननिर्वाह करण्याचा चातकाचा संकल्प एवढा प्रसिध्द आहे की, कालिदासाने त्यास चातकव्रत हे नाव दिले आहे. सांज प्रहरी मेळघाटचं हृदयस्थान असलेल्या कोलकास वनविश्रामगृहावर पाहोचलो. पावसाचा जोर वाढला होताच. येथील संपूर्ण वनसृष्टीवर संधीछाया पसरली होती. गर्द हिरव्या वनराईतून वाहणार्या सिपना नदीच्या पात्रातून एक गूढरम्य आवाज येऊ लागला. तो होता नदीच्या खळाळण्याचा. जणू काही पुढे चला, पुढे चला सागराकडे असा तो आवाज होता. तशीही प्रत्येक नदी नाल्याची ओढ सागरास मिळण्यासाठीच असते. मायेची ओढ तशीचं ही सागरओढ आहे. या अंधारबनावर राज्य होते ते टिमटिमणार्या अद्भुत काजव्यांचे. तर दिगंतरात तारका पुंज्यांचे. वनश्रीवरील हे दृश्य मनमोहित करीत होते. मेळघाटातील सेमाडोह, कोलकास, हरिसाल, तारुबांदा, चिखलदरा परिसरातील अरण्यात पावसाळी भटकंती झाली. सारी निसर्गसृष्टी कशी हिरव्या रंगात न्हालेली दिसत होती. चिंब भिजलेली होती. सिपना, गडगा, खापरा, खंडू आणि डोलार ह्या नद्या ओसंडून वाहत आहेत. पक्षी जिवन संपन्न दिसत आहे. एकंदरीत सारी सजीवसृष्टी आल्हाददायी दिसत होती. सृष्टीचक्रात निसर्ग आपली विविध रुपं तिनही ऋतूत दाखवित असतो. मात्र पावसाळी वनवैभव अनुभवने म्हणजे नवचैतन्य मिळविणे असेच असते. निसर्ग देव आहे. दयाधन आहे. तसाच तो रुद्रभीषणही आहे. आणि तो करुणानिधीही आहे. त्याकडे श्रध्देने पाहिले पाहिजे. निसर्गावर प्रेम करा. निसर्गाचे रक्षण करा. यावर संबंध सजीवसृष्टीचे भवितव्य अवलंबून आहे.
धुळे प्रतिनिधी ::>काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या वेळी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिली. तहसील कार्यालय किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्याची सूचना व्हीसीत देण्यात आली. केंद्र शासनाचे कृषी धोरण त्वरित रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे. तसेच १० ऑक्टोबरला व्हर्च्युअल सभा होणार आहे. या सभेचे प्रसारण प्रत्येक गावात करण्यात येणार आहे. व्हीसीत मंत्री नितीन राऊत, अॅड. के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या सचिव वामशी चांदणी, आशिष दुवा आदी सहभागी झाले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दिली आहे.
वायू वादळाच्या तडाख्याने आज पश्चिम रेल्वेचं लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. घोलवड आणि उंबरगाव रेल्वेस्थानकांदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुलाचा गर्डर झुकल्याने दुपारी १२. ३० वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. युद्धपातळीवर काम करून ही वाहतूक रात्री ७. ४५ वाजता पूर्ववत करण्यात यश आलं आहे. घोलवड-उंबरगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या पुलाचे गर्डर बसवण्याचे करण्याचे काम आज हाती घेण्यात आले होते. दुपारी १२. ३० ते २ या वेळेत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काम सुरू असतानाच वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आणि त्यात एक गर्डर झुकल्याने हे काम लांबले. परिणामी पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. हे काम शर्थीचे प्रयत्न करून पूर्ण करण्यात आले असून मुंबई-वलसाड दरम्यान दोन्ही मार्गांवर रात्री ७. ४५ वाजल्यापासून वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईतून गुजरातकडे जाणारे आणि गुजरातमधून मुंबईकडे येणारे अनेक प्रवासी अडकून पडले. पश्चिम रेल्वने दिलेल्या माहितीनुसार १० एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह इतर प्रकरणात पक्षपातीपणा केल्याच्या आरोपाखाली रशिद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयातील दोन महिला वकिलांविरोधात सर्वोच्च न्यायालया अवमान याचिका दाखल केली आहे. रशिद खान पठाण यांनी न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्याविरोधात ही याचिका केली आहे. या अवमान याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. नियम ३च्या अंतर्गत ही याचिका करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याच्या आरोप करत ही याचिका केली आहे. पठाण यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, रेवती मोहिते डेरे यांनी त्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या विविध प्रकरणात असतानाही त्या खटल्यांपासून स्वतःला दूर ठेवले नाही. त्यांच्या भगिनी वंदना चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार असतानाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित विविध प्रकरणात निर्णय दिले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात प्रथमदर्शनी सर्वप्रकारचे पुरावे तपास अधिकाऱ्यांकडे असतानाही रेवकी मोहिते डेरे व शर्मिला देशमुख यांनी हसन मुश्रीफ यांना जामीन मंजूर केला. भाजपाचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांच्याविरोधात बनावट आरोप असतानाही सोमय्या यांच्या अनुपस्थितीतही ते आरोप डेरे-देशमुख खंडपीठाने ऐकले. हे ही वाचाः राम सेतूला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित करा! पठाण यांनी याचिकेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्यातील तत्त्वांची पायमल्ली न्यायाधीश डेरे यांनी केली आहे. शिवाय, कोणत्याही निश्चित कारणाशिवाय आर्थिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला चंदा कोचर विरुद्ध सीबीआय या प्रकरणात जामीन दिला. कोणतीही निश्चित कारणमीमांसा न करता या न्यायाधीशांनी ३०७अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आमदाराला जामीन देण्यात आला. अशा प्रकारचे आदेश देण्याची एक कार्यपद्धती या न्यायाधीशांनी अवलंबिली आहे. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, न्यायाधीश डेरे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याची एक सवय आहे. माननीय न्यायालयाने नेहमीच हे म्हटलेले आहे की, न्यायाधीश, नागरिक आणि विविध संस्थांनी न्यायालयाचे आदेश गांभीर्याने घ्यायला हवेत. त्यांचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी कारण कुणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. यासाठी याचिकाकर्ता पठाण यांनी विविध खटल्यांची यादी सोबत जोडली आहे. त्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान कसा होतो हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जळगाव, दि. 5 (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सीडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्यातीतील स्वस्त धान्य दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी आधार व मोबाईल क्रमांक जोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी,2021 पर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रास्त दर धान्य दुकानातील ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सीडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदारांनी करावयाची आहे. त्यानुसार तालुका कार्यालयांकडून सर्व रास्त भाव दुकानदार यांना eD1 उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य शासन परिपत्रकानुसार रास्त भाव दुकाने सकाळी 4 तास आणि दुपारी 4 तास निश्चितपणे उघडी ठेवावीत, असे निर्देश आहेत. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने वेळ निश्चित करावी, असे देखील निर्देश आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींग करणे शक्य व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने यांच्या वेळा निश्चित करणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने यांच्या वेळा आणि कार्यपध्दती निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने सकाळी 8. 00 ते दुपारी 12. 00 तसेच दुपारी 4. 00 ते रात्री 8. 00 या कालावधीत उघडी ठेवणेत यावीत. या वेळेत धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड करणेची कार्यवाही करून घ्यावी. ज्या गावात आठवडी बाजार भरत, असेल अशा ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवणेत यावीत. विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत. 15 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान संपन्न होणार असल्याने लाभार्थी मतदानासाठी येणार आहेत. यास्तव या दिवशी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल सिडींग करून घ्यावे. लाभार्थी आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींगसाठी आल्यावर त्वरीत आधार सिडींग करून घ्यावे. 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांना पुढील कालावधीचे धान्य देय होणार नसल्याने सदर कार्यवाही काळजीपूर्वक आणि विहीत वेळेत प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.
एमपीसी न्यूज- भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. (Rahatani News) त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 17) दुपारी शिवराजनगर अंडरपास, रहाटणी येथे घडला. हर्षल सुनील पाटील (वय 30, रा. ताथवडे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/जीएन 7919 या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून शिवराजनगर अंडरपास येथून जात असताना त्यांच्या पाठीमागून कार चालक भरधाव वेगात आला. कारने पाटील यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. (Rahatani News) त्यात पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कार चालक अपघाताच्या ठिकाणावरून निघून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, आज राजधानीतील कामांचा शुभारंभ होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने ज्या गतीने सहा महिन्यांत कामे केली आहेत, त्यामुळे आता उरलेल्या दोन वर्षांत काय होईल, याचा त्रास काही जणांना होत आहे. त्यांना पोटदुखी, मळमळ होत आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना टीका करू द्या, त्यांच्या टीकेला आपण कामाने उत्तर देऊ. टीकेपेक्षा दहापट काम आपण करू. केंद्र व राज्यात आपले सरकार आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता मिळवून मुंबईसह राज्याच्या विकासाचे सध्याचे डबल इंजिन 'ट्रिपल इंजिन'मध्ये रुपांतरित करणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम आशीर्वादाने मुंबईसह राज्याचा चेहरामोहरा बदलणार, असा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. जी २० परिषदेच्या निमित्ताने मुंबईभर वातावरण तयार करणे तसचे मुंबई शहर त्यांनी चमकविले, या शब्दांत त्यांनी कौतुक केले. मुंबईत मेट्रोचे तीनशे किलोमीटरचे जाळे तयार झाल्यानंतर तीस ते चाळीस लाख वाहनांची वाहतूक कमी होईल. ४०० किमीच्या सिमेंट रस्ते पहिल्या टप्प्यात तर ५०० किमीचे रस्ते दुसऱ्या टप्प्यात होतील व मुंबई खड्डेमुक्त होईल. पण या योजनेतही काही लोक खोडा घालत आहेत. डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीत वारंवार होणारा कोट्यवधींचा खर्च वाचेल, खड्डयांमुळे निष्पाप जीव जाणेही वाचेल, डांबरीकरणाच्या नावाखाली आपले काळेपांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले. मुंबईत पुनर्विकासाचे प्रकल्प राबवून मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचाच निर्धार व्यक्त करून शिंदे म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात येत्या तीन वर्षांत मुंबई, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. विकासाला विरोध करणाऱ्यांना मुंबईकर ओळखतात. त्यांचा मोदी आणि आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करताना गेल्या सहा महिन्यात आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. जल्लोष झाला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील ८ वर्षांपासून एनडीएचं सरकार अधिक काळाहून टिकलं आहे. २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आता पुढील सार्वत्रिक निवडणुकीला जवळपास २ वर्षे शिल्लक आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक झाली तर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा इतिहास रचतील का? , असा प्रश्न येथे उपस्थित होतोय. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करेल का? राहुल गांधींचे काय होणार? त्यांचा पक्ष ५० जागांचा आकडा पार करू शकेल का? , पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि औवेसींचं काय होणार? , असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील जनता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या पाठीशी उभी असल्याचे इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. लोक त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्रात कोणाला किती जागा? आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर ४८ जागांपैकी नरेंद्र मोदी (भाजप) २६ जागा जिंकू शकतात. त्याचवेळी, सर्वेक्षणानुसार, उद्धव ठाकरे (शिवसेना) यांना ३, एकनाथ शिंदे (शिंदे समर्थक शिवसेना) ११, शरद पवार (राष्ट्रवादी) ६ आणि राहुल गांधी (काँग्रेस) यांना २ जागा मिळू शकतात. महाराष्ट्रात शिवसेना फुटल्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात भाजपच्या मतांची टक्केवारी ७ टक्क्यांनी वाढली असून आज निवडणूक झाल्यास भाजपला ३५ टक्के मतं मिळतील. तर महाविकास आघाडीसोबत गेल्यास शिवसेनेला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण शिवसेनेच्या मतांमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. गोव्यातील स्थिती काय? गोव्यात लोकसभेच्या २ जागा आहेत. त्यामुळे सर्व्हेनुसार, या दोन्ही जागा भाजपला मिळू शकतात. तर मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला २०१९ मध्ये ५२ टक्के मते मिळाली होती. आता निवडणुका झाल्यास भाजपला ५३ टक्के मतं मिळतील. काँग्रेसला एका जागेचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, सध्या लोकसभेत मोदींच्या समर्थनार्थ ३४८ खासदार आहेत, तर लोकसभेत राहुल गांधींच्या समर्थनार्थ ९१ खासदार आहेत. दरम्यान, पुढील लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. निवडणुकीला दोन वर्षे उरली आहेत, पण आतापासून २०२४ चा निकाल काय लागणार याचीही उत्सुकता आहे.
चिखली,(प्रतिनिधी): वर्णवाद घेवून, मनुवादी वृत्तीने भाजपा सरकार काम करीत असून त्याविरूध्द सर्व सामान्यांच्या मौलीक अधिकारासाठी काँग्रेस लढा देत आहे. काँगे्रस सरकारच्या काळात मनरेगा सारख्या योजनांमुळे गरीब रोजगारांच्या जीवनात चांगले दिवस आले. काँगे्रसने देशात हरीतक्रांती आणली, त्यामुळे मोठ मोठी धरणे निर्माण होवुन देश सुजलाम-सुफलाम होवु शकला. त्याउलट भाजपा सरकारच्या कार्यकाळात रोजगार व कुटीरोद्योग कमी झाले, या सरकारच्या कारभारामुळे लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात सापडले, त्यामुळे या मनमानी कारभाराविरूध्द लढा द्यावा लागेल, त्यासाठीच देशातील युवकांचे प्रबोधन करून आणि त्यांना या लढयात सामील करण्यासाठी ही यात्रा संपूर्ण देशात गावोगाव फिरून युवकांना जागृत करीत आहे, असे उद्गार अखिल भारतीय युवक काँगे्रस अध्यक्ष केशवचंद यादव यांनी चिखली येथे बोलतांना काढले. अखिल भारतीय युवक काँगे्रसच्या वतीने संपुर्ण देशभर युवक काँगे्रसच्या वतीने कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर युवा क्रांती यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचे चिखली येथे 9 जानेवारी रोजी आगमन झाले. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता चिखली मतदार संघातील युवक कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधीत केले. सकाळी कडाक्याच्या थंडीतही या यात्रेच्या स्वागतासाठी मतदारसंघातुन हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. यात्रेचे स्वागतासाठी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा युवक काँग्रेस मनोज कायंदे, चिखली विधानसभा अध्यक्ष रमेश सुरडकर, उपाध्यक्ष राहुल सवडतकर, प्रदिप ढोण, किशोर सोळंकी, शुभम पडघान, प्रसाद ठेंग, चिखली तालुका काँग्रेस अध्यक्ष विष्णु पाटील, शहर अध्यक्ष अतरोद्यीन काझी, डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरूशे, सोशल मेडीयाचे अॅड.प्रशांत देशमुख, डॉक्टर सेलचे डॉ.संजय घुगे, सचिन बोंद्रे, सेवादलाचे गजानन परीहार, मागासर्वीय सेलचे अर्जुन गवई यांच्यासह मतदार संघातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देश पातळीवर निघालेल्या युवा क्रांती यात्रेत अखिल भारतीय युवक काँगे्रसचे अध्यक्ष केशवचंद यादव यांचे बरोबर उपाध्यक्ष श्रीनिवासजी, महासचिव प्रतिभा रघुवंशी, भैयाजी पवार, महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रभारी मनिष चौधरी, प्रवक्ते आनंद दुबे, उपाध्यक्ष कुणाल राउत, आयटीसेलचे मध्यप्रदेशचे अध्यक्षा विभा बिंंदु डागोरे, प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत, यांचा समावेश असुन भारतातील विविध राज्यातील प्रातिनिधीक स्वरूपात सहभागी झालेले अनेक युवक कार्यकर्त्यांचा सहभाग या यात्रेत दिसुन आला. यावेळी महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रात नक्कीच काँगे्रसचे सरकार येणार असुन नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राज्यस्थान व छत्तीसगडमध्ये काँगे्रसने युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना तिकीट देवून अत्यंत गरीब कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. महाराष्ट्रातील युवक काँगे्रसचे संघठन त्या मानाने अगदीच जबरदस्त आहे. त्यामुळे युवक काँगे्रस राज्यात काँगे्रसला विजयी करून सत्तेवर बसविणार हे नक्की असे उद्गार काढले. यावेळी युवक काँगे्रसचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी देशाचे पंतप्रधान मनकी बाते करते है, लेकीन जनकी बाते नही कर्ते है, त्यातही सर्रास खोटे बालायचे आणि खोटी आश्वासने दयायची असे करत आहेत. कारण खोटी आश्वासने दयायला काहीच लागत नाही. परंतु त्यांचे हे खोटं आता जनतेसमोर उघड पडत असुन त्याचाच परीणाम तिन राज्यात भाजपाचा पराभव होण्यात झाला आहे. आता त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीत पुन्हा पराभावाचा सामना करावा लागणार आहे, असा टोला लगावला. या युवा क्रांती यात्रेचे चिखलीत स्वागत करतांना चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत सरकारच्या खोटेपणाचा परदा, टराटर फाडुन काढीत ही यात्रा अनेक राज्यात फिरून आपल्या गावात पोहचली आहे. व येथुन पुढेही तिचा प्रवास देशभर होणार आहे, या दरम्यान भापजा सरकारचे सर्व कटकारस्थान आणि जनविरोधी निती लोकांसमोर उघडी पाडीत काँगे्रस पक्ष देशाला कसा विकासाच्या यशोशिखरावर घेवुन जाणार आहे, याचे मार्गदर्शक यात्रेतील सहभागी नेते मंडळी करणार आहे. त्याचे परीणामी आगामी निवडणुकीत युवक काँग्रेस हा उत्साह आणि उर्जा आता वादळ म्हणून भाजपाचा पानापाचोळा उडवील आणि भाजपाचा पराभव होवुन काँगे्रस पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यात येणार आहे, अशी खात्री उपस्थितांना दिली. कार्यक्रमासाठी चिखली नगर परिषद सदस्य रउफभाई, आसिफभाई, गोकुळ शिंगणे, विजय गाडेकर, युवक काँगे्रस,एन.एस.यु.आय, डॉक्टर सेल, सेवादल, विधी सेल, मागासवर्गीय सेल, ओबीसी सेल, यांचेसह तालुका काँगे्रस व शहर काँगे्रसचे सर्व पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या मुलीचा विवाह पार पडला. याप्रसंगी भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. संजय कुटे यांनी नवरदेवासोबत डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला. काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी सैराट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हायरल होतोय.
'हटाओ इसे,क्या बनाया है'; लाल सिंग चड्ढा एडिट करण्याचा आईचा आमिरला सल्ला? बॉलीवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) सिने इंडस्ट्रीत परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. एक उत्तम कलाकार म्हणून त्यानं स्वतःची ओळख खूप भक्कम बनवली आहे. आमिरचा तब्बल तीन-चार वर्षांनी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीस येत आहे. त्यानं सिनेमातलं 'कहानी' हे गाणं सोशल मीडियावर नाही तर रेडिओवर हटके अंदाजात लॉंच केलं. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपली आई झीनत हुसैनला जर सिनेमा आवडला नाही तर ती काय प्रतिक्रिया देते याविषयीनं अभिनेत्यानं मोठा खुलासा केला आहे. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातलं 'कहानी' गाणं रेडिओवर लॉंच झाल्यावर आता त्याला पसंतीची दाद चाहत्यांकडून मिळताना दिसत आहे. या गाण्याला अमिताभ भट्टाचार्यने लिहिलं आहे. तर मोहन कनननं ते गाणं गायलं आहे. त्याच गाण्याच्या लॉंचला रेडिओ स्टेशनवर गेलेल्या आमिरनं आपल्या आईच्या सिनेमा पाहून प्रतिक्रिया देण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला आहे, "जेव्हा आईला माझा सिनेमा आवडत नाही तेव्हा ती लगेच म्हणते,'हटाओ इसको,क्या बनाया है? ' अगदी क्यूट अंदाजात ती हे म्हणते", असंही आमिर पुढे म्हणाला. आमिर म्हणाला,"लाल सिंग चड्ढा आईला दाखवताना मनात धाकधूक होती. ती काय म्हणेल याची. नशिबानं ती म्हणाली नाही,'हटाओ इसे,क्या बनाया है'. ती म्हणाली,"आमिर तू कोणाचंच ऐकू नकोस. फिल्म मस्त बनली आहे,आहे तशी रिलीज कर. यात काहीच एडिट करू नकोस". आमिरनं आवर्जुन नमूद केलं की सिनेमासाठी मला माझ्या आईची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरते. आमिर खान आणि करिना कपूर खान अभिनित 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. लाल सिंग चड्ढा सिनेमात नागा चैतन्य,मोना सिंग यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अंद्वैत चंदननं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
Mumbai News: कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना रुग्णांचा (Corona Patient) वाढता आकडा रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून शुक्रवारपासून नाकावाटे कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेला (Vaccination) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये सोमवारी म्हणजे 1 मे रोजी हे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील सर्व महानगरपालिका केंद्रांवर सोमवारी, 1 मे 2023 रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने कोविड सोमवारी मुंबईत कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मंगळवार, 2 मे 2023 पासून कोविड लसीकरण पूर्ववत सुरू राहील. ' मुंबईकर नागरिकांनी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे. 28 एप्रिल 2023 पासून इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही लस 60 वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून दिली जात आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत महानगर पालिकेच्या 24 केंद्रामध्ये ही लस दिली जात आहे. पण मुंबईत इन्कोव्हॅक लसीकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी फक्त 23 जण पहिल्या दिवसाचे लाभार्थी होते. 16 लसीकरण केंद्रावर एकाही नागरिकाने लस घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. तर काही लसीकरण केंद्रावर लस साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना घरी परत जावे लागले. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
येथील गजानन महाराज सेवा ग्रुप संचलित गजानन ग्रुपच्यावतीने भुसावळ ते शेगाव पायी दिंडी 1 डिसेंबर रोजी भुसावळ येथून रवाना झाली. कर्नल सुनील व्ही. कदम, सुजाता कदम, सेवानिवृत्त मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर, संगिता सावळे, अलका झोपे, मोनाली इसावे, ललिता शेलोडे यांच्याहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. सकाळी सात वाजता गजानन बावनी पोथीचे वाचन व आरती करुन अष्टभुजा देवी मंदिरापासून पालखीस प्रारंभ झाला. पालखीत टाळकरी, विणेकरी व कलशधारी वारकरी महिला सहभागी झाल्या. शहरातील मुख्य चौकात भाविकांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी वारकछयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मुक्ताईनगर, वाघळूद, चिखली व शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने पालखीची सांगता होणार आहे. यशस्वीतेसाठी गजानन महाराज सेवा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, नुतन अध्यक्ष सुनीता पाटील, दिनेश गवळी, संतोष शेलोडे, शरद देवरे, कौस्तुभ देवधर, दुर्गादास महाराज, अनिता ढाके, सरला देवरे, रचना देवधर, नरेंद्र सपकाळ, पद्माकर घोडके, बीपीन पटेल, प्यारेलाल विश्वकर्मा यांनी परिश्रम घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी केले आहे. पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. सरकारने लालू यांची सुरक्षा झेड प्लस (Z+) वरून झेड (Z) केली असून त्यांना देण्यात आलेले एनएसजी कमांडोंचे सुरक्षा कवच काढून घेण्यात आले आहे. यावर रागाच्या भरात लालू यांचे पुत्र तसेच बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या मुलाच्या लग्नात तोडफोड करण्याची धमकी दिल्यानंतर आता तेज प्रताप यादव यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान तेज प्रताप यादव यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वी तेज प्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेज प्रताप यादव म्हणाले होते की, 'मला सुशील मोदी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. जर मी तिथे गेलो तर तिथेच त्यांची पोलखोल करणार'. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 23 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत देशभरातील व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय झाला. यात लालूंच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. लालूंची झेड प्लस सुरक्षा काढून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली. तसंच संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या झेड सुरक्षेत कपात करून ती वाय (Y) केली आहे. या बैठकीत लालू प्रसाद यादवांसोबत शरद यादव, जितन राम मांझी यांच्यासोबतच गुजरातचे राज्यमंत्री हरिभाई पार्थी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश टी. एस ठाकूर, जामा मशिदीचे शाही इमाम एम. एस. ए बुखारी, दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. मुंबईः प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनेमुंबई-पुण्याहून गोरखपूर, दानापूर, दरभंगा, छपरा, मंडुवाडीह दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या, अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. मध्य रेल्वेच्या घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबईहून मुंबई-गोरखपूर-मुंबई विशेष (१० फेऱ्या), मुंबई-दानापूर-दानापूर विशेष अतिजलद, मुंबई-दरभंगा-मुंबई विशेष (४ फेऱ्या), मुंबई- छपरा-मुंबई विशेष (२ फेऱ्या), दादर-मंडुवाडीह - दादर विशेष अतिजलद (६ फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येतील, तर पुण्याहून पुणे-गोरखपूर-पुणे विशेष (१० फेऱ्या), पुणे-दानापूर-पुणे विशेष अतिजलद (६ फेऱ्या), पुणे-दरभंगा-पुणे विशेष (४ फेऱ्या), पुणे-भागलपूर - पुणे विशेष (२ फेऱ्या) या गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहूणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar ED action) यांच्या संपत्तीवर आज ईडीने छापेमारी केली. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) प्रतिक्रिया देत "श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती घेऊन बोलू" असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. "ईडीच्या कारवायांचा सरकारवर काही फरक पडत नाही हे आपणा सर्वांना माहितीच आहे परंतु श्रीधर पाटणक यांच्यावर आज झालेल्या कारवाईची माहिती घेऊन मी बोलेन. माहिती न घेतल्याशिवाय मी बोलणार नाही " असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर आज झालेल्या ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. "अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही", असा इशारा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला दिला आहे. गैरकामांची चौकशी नक्की करावी, परंतु सुड बुद्धीने, आकसापोटी, राजकीय सुडाच्या भावनेने अशा प्रकारची कारवाई लोकशाहीत करणे योग्य नाही. अशा कारवायांना सेना कधीही घाबरली नाही आणि कधीही घाबरणार नाही. महाविकास आघाडी सरकार कधीही अस्थिर होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपला चांगलाच टोला लगावलाय. तुम्ही आम्हाला जेवढे डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ. तुम्ही डिवचताय म्हणून आम्ही कधीही कोसळून पडणार नाही. महाराष्ट्राची जनचा आंधळी नाहीये. तुम्ही घरात घुसून सरकार पाडू अशा मानसिकतेत असाल तर महाराष्ट्रातील जनतेला राज्यात काय सुरू आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. हे सुडाच राजकारण आहे. हे पाहुणे महाविकास आघाडीतील सर्वांच्या घरी जाणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोहे आणि चिवड्याची सोय नाश्त्यासाठी करुन ठेवली पाहिजे, असा टोला आव्हाडांनी लगावला.
12 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमधल्या दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावलीय. हिंसाचार थांबवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुरेशी पावलं उचलली नसल्याचं कोर्टाने म्हटलंय. तसंच तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची केंद्राचीही होती, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. याप्रकरणी दोन्ही सरकारांना 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. तसंच दंगलग्रस्त लोकांना सरकारनं ताबडतोब मदत पुरवावी, असे आदेशही कोर्टाने दिलेत. छेडछाडीच्या कारणावरून मुझफ्फरनगरमध्ये दंगल उसळली. या दंगलीत 48 जणांना आपला जीव गमवावा लागला. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
चालू रब्बी हंगामातील खरेदीतील घसरणीचे कारण गव्हाच्या साठ्यात 56 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यावेळी उत्पादनात घट झाली आहे. त्याच वेळी, मे 2020 पासून केंद्र सरकार रेशन योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना गहू वितरित करत आहे. याचा परिणाम साठ्यावरही झाला आहे. देशातील गव्हाचा साठा 15 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. 1 ऑगस्ट 2008 नंतरचा हा नीचांक आहे. भारतीय फूड कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारी संस्थांकडे सध्या सेंट्रल ब्रिजवर असलेला गव्हाचा साठा या महिन्याच्या सुरुवातीला 26. 6 दशलक्ष टनांपर्यंत घसरला, जो 1 ऑगस्ट 2008 नंतरचा नीचांक आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत ते 22. 5 दशलक्ष टन होईल, असा अंदाज आहे. चालू रब्बी हंगामातील खरेदीतील घसरणीचे कारण गव्हाच्या साठ्यात 56 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यावेळी उत्पादनात घट झाली आहे. त्याच वेळी, मे 2020 पासून केंद्र सरकार रेशन योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना गहू वितरित करत आहे. याचा परिणाम साठ्यावरही झाला आहे. कृषी मंत्रालयाने सांगितले की, यावेळी मार्च महिन्यात कमालीच्या तापमानामुळे देशातील गव्हाच्या उत्पादनात ३ टक्के घट झाली आहे. सरकारने 2021-22 हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) आतापर्यंत 58 दशलक्ष टनांहून अधिक तांदूळ खरेदी केले आहेत आणि एकूण खरेदी 60 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. गतवर्षी तांदूळ खरेदी विक्रमी 60 दशलक्ष टन होती. पुढील खरेदी हंगाम (2022-23) 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पूर्वेकडील राज्यांमध्ये आतापर्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताच्या पेरणी क्षेत्रात एक वर्षापूर्वीच्या तुलनेत भात उत्पादनात १३ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. कमी उत्पादनाचा परिणाम धान्य खरेदीवर होऊ शकतो. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख राज्यांमध्ये तांदूळ उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण या राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला आहे. तथापि, या राज्यांमधील किंमत किमान आधारभूत किंमत (MSP) पेक्षा जास्त राहू शकते. इतर क्षेत्रातील कमी उत्पादन पाहता व्यापारी शेतकऱ्यांकडून एमएसपीपेक्षा जास्त दराने खरेदी करू शकतात. त्यामुळे सरकारी खरेदीवर परिणाम होऊ शकतो. आगामी हंगामासाठी अन्न मंत्रालय लवकरच तांदूळ खरेदीचे लक्ष्य निश्चित करू शकते. अन्न मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या महिन्यात जागतिक मागणी लक्षात घेऊन राज्यांना अधिक तांदूळ पिकवण्याचे आवाहन केले होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढवल्यास केंद्रीय पूलमधील तांदळाचा बफर स्टॉक 16 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
Amol kolhe: डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असल्याचं सांगितलं. सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा जितका सकारात्मक वापर होतो, तितक्याच काही नकारात्मक गोष्टीही घडतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया हॅण्डल हॅक झाल्याच्या वा त्यांच्या नावे फेक अकाऊंट सुरु केल्याच्या घटना कानावर पडल्या आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या बाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असल्याचं सांगितलं. तसंच या अकाऊंटच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे सावध राहा, असंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसंच त्यांनी कायदेशीर तक्रारही दाखल केली आहे. काय आहे डॉ. अमोल कोल्हे यांची पोस्ट? @kdr. amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr. amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या. दरम्यान, अमोल कोल्हे उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक राजकीय व्यक्तीदेखील आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ते सक्रीय असून कायम त्यांच्या दौऱ्यांविषयी वा विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती जनतेला देत असतात. त्यामुळे त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असून त्यातून जनतेची फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याविषयीची माहिती जनतेला दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा महत्वपूर्ण निर्णय आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर मोदी सरकारने हा निर्णय घेतला. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरेल. अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक बँकांचे विलीनीकरणाचे करण्याचे धोरण जाहीर केले होते. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नसल्याची ग्वाही अरुण जेटली यांनी दिली होती. सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी असलेला रेटा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकिंग क्षेत्राच्या अमूल्य योगदानाची अपेक्षा या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
शेतमाल बाजार सुधार विधेयके पारित करण्यात भाजपा सरकार तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले असले तरी त्यांचा ग्रामीण भागातील प्रभाव लक्षात घेता ते शेतकऱ्यांना यातून काही लाभ मिळवून देऊ शकतील असे संभवत नाही. त्या तुलनेत आजची प्रस्थापित शेतमाल बाजार व्यवस्था राजकीय वा आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम दिसते. शेवटी हो, ना करता शेतमाल बाजार सुधार राज्यसभेत कसे का होईना पण पारित झालेत. लोकसभेत बहुमत असल्याने तशी धास्ती नव्हती पण ही बिले राज्यसभेत येईपर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या त्यावरून अगोदर काहीशी सोपी वाटणारी अमलबजावणी वाटते तेवढी सोपी नाही हे लक्षात आले. खुद्द एनडीएच्या एका घटकाचा विरोध व त्यातील कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा हे या सुधारांच्या विरोधाला अचानकपणे बळ देत समोर आले. या विरोधाला पंजाब व हरियाणातील प्रादेशिक शेतमाल बाजाराची वैशिष्ठे कारणीभूत असल्याचे दिसते. तेथील या व्यवस्थेतील आर्थिक लाभार्थ्यांची राजकीय ताकद उफाळून आल्याचे दिसते. असाच प्रकार भारतातील अनेक भौगोलिक प्रदेशात दिसून येतो. या बिलावरच्या राज्यसभेतील चर्चेत बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या की परंपरांगत पीकपद्धती व त्यातून विकसित झालेल्या बाजार व्यवस्था या मध्ये संकल्पनात्मक व कार्यपद्धतीत प्रचंड तफावती व विरोधाभास दिसून येतो. बिहार व केरळमध्ये तर ज्या बाजार कायद्याचा सातत्याने उल्लेख होतो तो एपीएमसी एक्टच अस्तित्वात नाही. साधारणतः गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांतील बाजारांच्या समस्यांमध्ये पीकवाण, पीकपद्धती साधारणतः एक असल्याने साधर्म्य दिसून येते. आंध्र व ओरिसा भात उत्पादक तर बंगाल व पूर्वेकडील राज्यांत वेगळी परिस्थिती दिसते. दक्षिणेकडील राज्येही त्यांचा एक वेगळा बाज राखून आहेत. या शेतमालात परत साठवणक्षम व नाशवंत अशा विविध मात्रातील गुणधर्मामुळे त्याच्या विक्री व्यवस्थाही भिन्न असल्याचे दिसते. शिवाय बागायत वा जिरायत याबरोबर नगदी वा प्रक्रियाक्षम शेतमाल यांचेही बाजार तसे विकसित झालेले दिसतात. ऊस, कापूस व कांद्यासारख्या शेतमालाचे स्वतंत्र गुणधर्म असलेले शेतमाल बाजार अस्तित्वात आले आहेत. काही शेतमाल निर्यातक्षम असल्याने त्यांच्या बाजारातील निकष वेगळे असू शकतात. असा विविध गुणधर्म व वैशिष्ठ्यांनी नटलेला हा शेतमाल बाजार एका समान समीकरणात किती कठीण आहे हे यावरून लक्षात यावे. या साऱ्यांमधील एक समान धागा म्हणजे शेतमालाला मिळणारा भाव व शेतमालाच्या बाजारात विकसित झालेल्या शोषण व्यवस्था व शोषण पद्धती यात स्थिरावलेली काही समीकरणे. यातील कायद्यातील तरतुदींबरोबर स्थिरावलेल्या प्रथा परंपरा जोडीला असल्याने शेतमाल विरोधात एक विशिष्ठ कार्यपद्धती स्थिरावलेली दिसते. परत हा कायदा राबवतांना त्याला लाभलेले सहकार क्षेत्र व सहकार कायद्याचे कोंदण व सहजसुलभ भ्रष्टाचाराच्या संधी, त्यामुळे ही बाजार व्यवस्था एक राजकीय व्यवस्था म्हणूनही स्थिरावलेली दिसते. या साऱ्या परिप्रेक्ष्यात एक मोठी लाभार्थ्यांची फळी, ज्यात सहकार व पणन खाते, बाजार समित्यांचे व्यवस्थापन, परवानाधारक व्यापारी, अडते, दलाल, हमाल, मापारी, माथाडी यांचा समावेश असलेली एक मोठी संघटनात्मक ताकद एकवटत प्रस्थापित झालेली दिसते. त्यामुळे या व्यवस्थेला कुठल्याही सुधाराच्या वा बदलाच्या शक्यता निर्माण झाल्या की आपला प्रभाव दाखवत ते प्रयत्न हाणून पाडले जात. हे लक्षात यायच्या आत शेतकऱ्यांच्या शोषणाचे मुद्दे संशयास्पद वाटत राहिले तरी जागतिकीकरणात आपण जागतिक व्यापार संस्थेचे सभासद झाल्यावर शेतीतील अनुदाने व बाजार पद्धती या त्या करारात पहिल्यांदा अधोरेखित झाले व शेतकऱ्यांच्या शोषणाला ही सारी बंदिस्त बाजार व्यवस्था कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. या करारात सदरचा बंदिस्त शेतमाल बाजार खुला करत शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यातील अडथळा दूर करावा अशी तरतूद असली तरी या कायद्यात खुलेपणाचा प्रवेश व्हायला १९९५ ते २००३ सालापर्यंतचा प्रदीर्घ काळ लागला. २००३ साली या कराराच्या रेट्यामुळे मॉडेल एक्ट त्या वेळच्या संसदेने पारित केला तरी अमलबजावणी राज्यांची असल्याने त्या त्या राज्यांनी तो स्विकारायला २००८ साल उजाडावे लागले. या कायद्यात करार शेतीचे एक स्वतंत्र परिशिष्ठ असून सरकारी एपीएमसी व्यतिरिक्त खाजगी बाजाराच्या उभारणीचा प्रस्तावही होता. मात्र कायदा व राजकारणाचे अभय मिळालेल्या प्रस्थापित व्यवस्थेने सदरचा बदल अमलात आणू दिला नाही. काही राज्यात नियमनमुक्तीसारखे निर्णय घेण्यात आले असले तरी त्यांची अमलबजावणी याच शक्तींनी रोखलेली दिसते. शेतकऱ्यांच्या रास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने या बाजार व्यवस्थेतील दोष निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे होणे स्वाभाविक असले तरी सरकारे बदलली तरी असे बाजार सुधार प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत. भाजप सरकारने कोरोना काळात हे सुधार आणण्यात त्यांच्या काही अपरिहार्यता असल्या तरी सैद्धांतिक पातळीवर या सुधारांची भाषा आश्वासक वाटत असली तरी ती प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा घोकून घोकून पाठ केलेली वाटते. शिवाय राज्यसभेत ही विधेयकं पारित करतांना ज्या तऱ्हेने लोकशाहीची मोडतोड व सभागृह चालवण्याच्या पद्धती व संकेत पायदळी तुडवण्यात आले त्यातून शेतकऱ्यांच्या हिताचे म्हणून समजल्या जाणाऱ्या विधेयकात भाजपा सरकारचाच आत्मविश्वास ढेपाळल्याचे दिसते. शेतकरी हितापेक्षा भाजपाला आपले राज व सत्ताकारण सांभाळणे महत्त्वाचे दिसते. या साऱ्या विधेयकांतील मूळ अर्थाचा गाभाच हरवल्याने केवळ ती शेतकऱ्यांना खूष करु शकतील अशी शक्यता असल्याने त्यांच्या अमलबजावणीतील शक्यता व धोके लक्षात न घेता घाईघाईने पारित करण्यात आले. मात्र हा विषय ऐरणीवर येताच तो किती क्लिष्ट, गहन व खोलवरचा आहे हे लक्षात येऊ लागल्याने शेतकऱ्यांची काही लाभ मिळण्याच्या दुसऱ्या अर्थाने निराशाच व्हायची शक्यता आहे. पहिला मुद्दा एक देश, एक बाजार म्हणताना पूर्वापार चालत आलेली बाजार समित्यांची भरभक्कम व्यवस्था तशीच ठेवत तिच्या सावली व उपस्थितीत नवी खुली व्यवस्था वाढण्याची अपेक्षा केली जात आहे. म्हणजे दोन बाजार व्यवस्था दोन वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या मार्गानी अमलात येऊ शकतील. यात एक साधा सरळ तर्क असा की बाजार समित्यांतील खरेदीदारांना इतर मार्गांनी बाजार समितीतील कर न भरता आपल्या सोईने बाहेर माल मिळणार असेल तर ते बाहेरच माल घेत आपला व्यापार सुरू ठेवतील. या बाजारातील दरात हाताळणी व वाहतूकीचा एक मोठा हिस्सा व्यापाऱ्यांचा नफा वाढवू शकेल. आज संसाधने व भांडवली गुंतवणुकीच्या अभावाने शेतकरी तो मिळवू शकत नाहीत. यात स्पर्धेची अपेक्षा केली तरी भाव वाढण्यापेक्षा शोषणातून वाचलेला नफा एवढेच शेतकऱ्यांना मिळू शकेल. मूल्यवृद्धीचे मार्ग वेगळे आहेत व त्यांचा या बदलाशी काही एक संबंध नाही. ही सारी प्रक्रिया बाजार समित्यांची मूलभूत व्यवस्था व संसाधने वापरत सध्याच्या बाजार समितीतच खुला बाजार म्हणजे साऱ्यांना खरेदीची परवानगी देत एक मुक्तद्वार विभाग ठेवला असता तर शेतकऱ्यांना दोन्ही बाजारातील फायदेतोटे जोखत आपला माल कुठे विकायचा याचा निर्णय घेता आला असता. शेतकऱ्यांचे पैसे बुडतील ही एक काल्पनिक भीती दाखवली जाते व ती मूलतः खुल्या बाजाराच्या विरोधात वापरण्याची एक सबब आहे. शिवाय आजच्या बाजार समित्याची व्यवस्था ही शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली व सार्वजनिक निधी वापरून उभारलेली शेतकऱ्यांच्या मालकीची व्यवस्था आहे, तिच्यात तात्पुरते सेवेकरी म्हणून शिरलेल्या भाडेकरुंना संरक्षण देत खऱ्या मालकाला रस्त्यावर आणण्यासारखेच आहे. म्हणून या बाजारात जो काही खुलेपणा आणायचा तो एकाच आवारात आणला पाहिजे. दुसरा मुद्दा आवश्यक वस्तुंच्या कायद्यातील सुधारांचा. यात काही शेतमाल या कायद्याच्या नियंत्रणांतून बाहेर काढले असले तरी अपवादात्मक व युद्धसदृश परिस्थितीत सरकार ही नियंत्रणे परत लादू शकेल अशी पळवाट ठेवली होती. हा सुधार कसा व किती भूसभूशीत व ठिसूळ आहे याचा प्रत्यय नुकताच अपवादात्मक व युद्धसदृश परिस्थिती नसतांना केवळ राजकीय कारणांसाठी गरज नसतांना कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली त्यातून दिसून येतो. कांद्याचे भाव ३० रु. वरून ४० रु. वर गेले म्हणजे अपवादात्मक परिस्थिती अशी सरकारची समज दिसते. म्हणजे सरकारच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे हित हे कायदा असला तरी ते नेहमीच दुय्यम असेल हे सिद्ध झाले आहे. तिसरा मुद्दा करार शेतीचा. अशा करार करून ते राबवण्यायोग्य परिस्थिती अजून आपल्याकडे नाही. शिवाय यात न्याय मिळवतांना खरेदीदार व शेतकरी यांच्यात जो काही दुजाभाव केला आहे त्यावरून सरकारची नियत दिसून येते. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांचे वाईन उत्पादकांशी झालेले सारे करार अयशस्वी झाल्यावर न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने काहीही नव्हते हे सरकारी कराराच्या मसुद्यातच दिसून आले आहे. त्यामुळे अशी व्यवस्था सक्षमतेने उभी रहात शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल असे वाटत नाही. शिवाय आपल्याकडे कायदा व सुव्यवस्था, पोलिस व न्यायालयांची व्यवस्था इतकी पराकोटीची अन्यायकारक आहे की तिचाही शेतकऱ्यांना फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. शेवटी आपला प्रभाव व परिणाम निश्चित काय आहे हे न ठरताच ही विधेयके पारित करण्यात भाजपा सरकार तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले असले तरी त्यांचा ग्रामीण भागातील प्रभाव लक्षात घेता ते शेतकऱ्यांना यातून काही लाभ मिळवून देऊ शकतील असे संभवत नाही. त्या तुलनेत आजची प्रस्थापित शेतमाल बाजार व्यवस्था राजकीय वा आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम दिसते. शिवाय भाजपाच्या आजवरच्या कारभारात त्यानी शेतीक्षेत्राला दिलेल्या आश्वासनांची विश्वासार्हता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली पत वा विश्वासार्हता गमावलेल्या माणसाची खरी नोटही बाजारात कुणी स्वीकारू नये अशी भाजपची आज अवस्था आहे. या साऱ्यातून शेतकऱ्यांना खरोखर या एकाधिकारी शोषणातून सोडवत त्यांना आपल्या घामाचा दाम मिळवून द्यायचा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न एक राजकीय हत्यार म्हणून आपले सत्ताकारण सशक्त करायचे आहे हे येणारा काळच ठरवेल ! ! डॉ . गिरधर पाटील, हे कृषीतज्ज्ञ आहेत.
मुंबई : मुंबईतील एका महिलेने भारतीय जनता पक्षाच्या (BJP Leader) नेत्याच्या विरोधात हनिट्रॅप (Honeytrap) लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नेता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील असून तो मोठ्या पदावर कार्यरत आहे. या प्रकरणी संबंधित नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित महिला राजकीय नेत्याची नातेवाईकचे असल्याचे सांगण्यात येत आहे. (Attempt to trap big BJP leader in Solapur in 'Honeytrap') भारतीय जनता पक्षाचा हा नेता सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे. तो नेता सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्या नेत्याने दिलेल्या तक्रारीत संशयित आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत मुंबईत घर आणि दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या नेत्याकडून संबंधित संशयित आरोपी महिलेने या पूर्वी टप्याटप्प्याने १ लाख ७८ हजार 'फोन पे'च्या माध्यमातून आणि दोन लाख रुपये रोखीने स्वीकारल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ती महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर संबंधित महिलेने त्या नेत्याला बोलावून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याची धमकीही दिली आहे, असे संबंधित नेत्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित संशयित आरोपी महिला ही राजकीय नेत्याची नातेवाईकचं असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या राजकीय नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कम ३८४, ३४१, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंददुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत परस्पर विरोधी गुन्हे दंगलीचा तसेच शासन आदेशाचे उल्लंघन केलल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील चार जणांना अटक केली आहे. मारहाणीत दोन्ही गटातर्फे चाकू, लाठ्या, काठ्यांचा वापर करण्यात आला. याबाबत नायबान जाहीरखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शेख इस्तीयास अब्दुल रज्जाक, शेख रोनक मुस्ताक, शेख अखलाक शेख मुस्ताक, शेख रशिद अब्दुल रजाक, शेख शफी शेख इसाद, शेख खलिल शेख इसाक, शेख मोहम्मद शेख रफा व इतर असे एकुण १४ जणांवर गुन्हा दाखल झाला. दुसरी फिर्याद कसाई अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक यांच्या फिर्यादीवरून फारूखखान जहीर खान कुरेशी उर्फ पप्पू कुरेशी, नायबखान जहीरखान कुरेशी, फिरोजखान कुरेशी यांच्यासह एकुण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याच घटनेतील काहीजण पोलीस ठाण्याच्या आवारात देखील हाणामारी करतांना दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध देखील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकुण ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली.
कोलार पिंपरी खाणीत कार्यरत रमेश गणपत भगत हे परिवारातसोबत वर्धा जिल्ह्यातील खापरी येथे गेले असता, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने, कानातील डोरले, मंगळसूत्र, अंगठी व नगदी १२ हजार रुपये, असा ६७ हजारांचा मुदेमाल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोदविला. तपासाची दिशा समजून घेण्यासाठी तपासणी तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनखाली जमादार बुरेवार करीत आहेत. वणी : गणेशपूर वळणावर घोन्साकडून येत असलेल्या विना नंबरच्या भरधाव प्रवासी ऑटोवरचे नियंत्रण सुटले व ऑटो पलटी झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. यात रुखमा मनोहर आत्राम, मनोहर धर्माजी आत्राम, दोघेही रा. सोनेगाव व लक्ष्मी देवीदास शंकरराव, रा. गडचांदूर हे तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्यात उत्पादित होणारा कांदा स्थानिक पातळीवर अनेक व्यापारी खरेदी करून तोच कांदा इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विकतात. या दरम्यान अनेकदा कांदा विकल्यानंतर त्याचे पैसे दिले जातात. मात्र कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील स्थानिक कांदा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे १६ लाख ६१ हजार ६५० रूपये न दिल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी तामीळनाडू राज्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, ब्राम्हणगाव येथील कांदा व्यापारी कैलास भिमराज माकुणे यांच्याकडून कोकमठाण येथील पुणतांबा फाटा येथून सारवनन चेट्टीयार (रा. गोपालपुरम, ता. पोलाची जि. कोईमतूर, राज्य तामीळनाडू) याने १३ मे २०२१ पासून ते आजपर्यंत १६ लाख ६१ हजार ६५० रुपये कांदा घेऊन कांद्याचे पेसे न देता विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. म्हणून माकोणे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सारवनन चेट्टीयार याच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेषा बदलावणारा मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग असाच काहीसा प्रचार-प्रसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना वेळी करण्यात आला. २२ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्ग हा लोकांसाठी खुला झाला त्यानंतर आजवर या मार्गावर शेकडो अपघात घडले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या हसत्या खेळत्या संपूर्ण कुटुंबाचीचं राखरांगोळी झाली आहे. अगदी उद्घाटनाच्या दिवशीपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली. अपघात होण्यामागे नेमके कारणे काय : अजूनही दररोज अपघात घडत आहेत. इतक्या उत्तम रस्त्याची निर्मिती केल्यानंतर देखील अपघात होण्यामागे नेमके कारणे काय आहे. हे जाणून घेण्यासाठी (VNIT) विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी अनेक दिवस अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. ज्यामध्ये हायवे- संमोहन नावाचा प्रकार पुढे आला आहे. प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूधबावरे अशी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. हायवे संमोहन हा विषय नवीन आहे. रोजच्या रोज घडणाऱ्या अपघातांसोबत हायवे संमोहनचे काय नाते आहे याबद्दल तथ्य जाऊन घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा काही महत्वाचे मुद्दे पुढे आले आहेत. अपघातांमुळे चिंता वाढली : डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहिल्या टप्याचे लोकार्पण झाले होते. नागपूर ते शिर्डी पर्यंतचे अंतर अवघे पाच ते सहा तासांवर आले. परंतु रोजच्या रोज होत असलेल्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळेचं नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने अभ्यास केला. हायवे संमोहन म्हणजे काय : ज्यावेळी एखादा महामार्ग अगदीचं सरळ एका रेषेत तयार केला जातो, त्याचंवेळी चालकांच्या नजरेत एकसारखे दृश्य अनेकदा वारंवार येतात. स्पीड ब्रेकर, इतर अडथळ्यांशिवाय महामार्गावर गाडी तीव्र गतीने तासंतास धावते अशा वेळी हायवे संमोहित होते. शरीराच्या हालचाल स्थिर झाल्यासारख्या जाणवतात. त्यामुळे मेंदू क्रियाशील नसतो. त्यालाचं महामार्ग संमोहन असे म्हंटले जाते. 'हे' उपाय केल्यास अपघात कमी होतील : अगदी सरळ रेषेत निर्माण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर 'लेन कटिंग' ओव्हर स्पीड हे अपघाताचे प्रमुख कारण आहेत. समृद्धी महामार्ग हा तीन पदरी असून दोन स्वतंत्र ट्रॅक आहे.
पणजी : गोव्यात मान्सून लांबणीवर पडल्याने तसेच हवेत प्रचंड उष्मा वाढल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उद्या शनिवारी १० रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, हायर सेकंडरी बंद ठेवल्या जाणार आहेत. शिक्षण खात्याने दुपारी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व सरकारी अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, मिडल स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच विशेष मुलांसाठीच्या शाळा उद्या शनिवारी बंद राहतील. मान्सून लांबणीवर पडल्याने आम आदमी पक्ष तसेच अन्य विरोधी पक्षांनी पाऊस सुरू होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी केली होती. शिक्षण संचालकांना या संदर्भात निवेदनेही सादर करण्यात आली होती. अनेक शाळांमध्ये पंखे तसेच अन्य सुविधा नाहीत. त्यामुळे उष्म्याने विद्यार्थी व शिक्षक हैराण झाले होते. पाऊस सुरू होईपर्यंत शाळा बंद ठेवा, अशी मागणी पालकांकडून केली जात होती. दरम्यान, मान्सून काल गुरुवारी केरळात दाखल झाला असून येत्या १३ पर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. आणखी पाच दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने उद्या शनिवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शाळांना सलग सुट्टी असेल.
हळूच फुटून उठली. ती म्हणाली, " तें काय तें केव्हांतरी एकदां सांगेन. आज नुसता आशीर्वाद द्या मला - मरतांना या दोन पायांची धूळ मला पवित्र करील, या मांडीवर डोकं टेंकून तुमच्या तोंडाकडे पहात आनंदाने प्राण सोडीन, एवढाच आशिर्वाद या - " तिच्याने पुढे बोलवेना - यावेळी तिचा गळा दाटून आला. द्यानीलांबर घाबरला बळेंबळेंच तिला आपल्या हृदयाशी कवटाळून धरून म्हणाला, काय झालंय ग आज ? कुणी कांहीं बोललं का तुला ? नव-याच्या हृदयावर डोकं टेकून ती मुकाट्यानं रडत होती. त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं नाहीं. नीलांबर पुनः म्हणाला, " कधींच तूं असं कांहीं केलं नव्हतंस विराज काय झालंय ? सांग ना ! " तोंड वळवून विराजने डोळे पुसले, पण नजर वर करून पाहिले नाहीं. ती हळूच म्हणाली, " सांगेन पुढं केव्हां तरी. " नीलांबरने जास्त आग्रह धरला नाहीं. तो तसाच वसून राहिला होता. तिच्या केसांत आपली बोटें हळूहळू फिरवित तिचें सांत्वन करीत होता. शक्तीच्या बाहेर खर्च करून बहिणीचे लग्न लावून दिल्यामुळे तो मोठ्या अडचणींत आला होता. त्यापूर्वी त्याचा संसार मोठासा सुबत्तेचा होता अमे नव्हे. त्यांतून दोन वर्षे या दुष्काळाचीं गेलीं. कुणग्यांत धान्य नाहीं. तळ्यांत पाणी नाहीं - मासे नाहींत - केळीच्या बागा सुकत चालल्या होत्या, लिंबाच्या - बागांतले कोवळे धोंडे गळून पडत होते आणि वर ऋणकन्यांची रहदारी आतां सुरू झाली होती. त्यांतच मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे पाठवण्याबद्दल छोटीच्या सासयाचीं गोड-कडक पत्रे येत होतीं. ही सारी हकीकत विराजला माहीत नव्हती. या पुष्कळशा अप्रिय गोष्टी नीलांबर नें तिच्यापासून चोरून ठेवल्या होत्या. त्याला वाटलें, कुणीतरी या हकीकती विराजला ऐकवल्या असाव्या. त्या कल्पनेनें तो उद्विग्न झाला. तितक्यांत वर तोंड करून विराज थोडीशी हंसली आणि म्हणाली, प्रश्न विचारतें, खरं खरं सांगाल ? " मनांतल्या मनांत नीलांबर अधिकच साशंक होऊन म्हणाला, " कोणता प्रश्न ? " विराजच्या साया सौंदर्यात मोठ्यांतले मोठें सौंदर्य होतें तें तिचें गोड
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 65 व्या अमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड 2020 चं नॉमिनेशन जाहीर करण्यात आलं आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी गुहावटीला हे अवॉर्ड फंक्शन होणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही या यादीत अनेक बॉलिवूड सिनेमे आहेत. यात फक्त क्वालिटीच नाही तर चांगली स्टोरी आणि चांगली कंसेप्ट असणारे सिनेमेही समाविष्ट आहेत. नेहा धुपिया हा शो होस्ट करणार आहे. पाहूयात कोण कोण ब्लॅक लेडीला आपल्या घरी घेऊन जातं. सर्वोत्कृष्ट सिनेमा (क्रिटीक्स)- आर्टीकल 15 (अनुभव सिन्हा), मर्द को दर्द नहीं होता(वासन बाला), फोटो(रिेतेश बत्रा) सोनचिरिया (अभिषेक चौबे), द स्काय इज पिंक (शोनाली बोस) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी द सर्जिकल स्ट्राईक), जगन शक्ती (मिशन मंगल), नितेश तिवारी (छिछोरे), सिद्धार्थ आनंद (वॉर), जोया अख्तर (गली बॉय) सर्वोत्कृष्ट अभिनेता लिड रोल- अक्षय कुमार (केसरी), आयुष्मान खुराना (बाला), हृतिक रोशन (सुपर 30), रणवीर सिंग (गली बॉय), शाहिद कपूर (कबीर सिंग), विकी कौशल (उरी द सर्जिकल स्ट्राईक). सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स)- अक्षय खन्ना (सेक्शन 375), आयुष्मान खुराना (आर्टीकल 15), नवाजुद्दीन सिद्दीकी (फोटो), राजकुमार राव (जजमेंटल है क्या) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लिड रोल- आलिया भट (गली बॉय), कंगना रणौत (मणिकर्णिक द क्वीन ऑफ झाँसी), करीना कपूर खान (गुड न्यूज), प्रियंका चोपडा (द स्काय इज पिंक), रानी मुखर्जी (मर्दानी 2), विद्या बालन ( मिशन मंगल). सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स)- भूमी पेडणेकर (सोनचिरीया), भूमी पेडणेकर (सांड की आँख), कंगना रणौत (जजमेंटल हाय है क्या), राधिका मदान (मर्द को दर्द नहीं होता) सान्या मल्होत्रा (फोटो), तापसी पन्नू (सांड की आँख) सर्वोत्कृष्ट अभिनेता सपोर्टींग रोल- दिलजीत दोसांझ (गड न्यूज), गुलशन देवैया (मर्द को दर्द नहीं होता), मनोज पाहवा (आर्टीकल 15), रणवीर शौरी (सोनचिरीया), सिद्धांत चतुर्वेदी (गली बॉय), विजय वर्मा (गली बॉय). सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सपोर्टींग रोल- अमृता सिंह (बदला), अमृता सुभाष (गली बॉय), कामिनी कौशल (कबीर सिंह), माधुरी दीक्षित (कलंक), सीमा पाहवा (बाला), जायरा वसीम (द स्काय इज पिंक) सर्वोत्कृष्ट गाणं- अमिताभ भट्टाचार्य- कलंक नही (कलंक), दिव्य आणि अंकुर तिवारी- अपना टाइम आयेगा (गली बॉय), इरशाद कमाल- बेखयाली (कबीर सिंह), मनोज मुंतशिर- तेरी मिट्टी (केसरी), मिथून- तुझे कितना चाहने लगे (कबीर सिंग), तनिष्क बागची- वे माही(केसरी) सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर मेल- अरिजीत सिंग- कलंक नहीं (कलंक), अरिजीत सिंग- वे माही (केसरी), नक्श अजीज- स्लो मोशन (भारत), बी प्रक- तेरी मिट्टी (केसरी), तप टंड- बेखयाली (कबीर सिंग) सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फीमेल- नेहा भसीन- चशनी (भारत), परंपरा ठाकुर- मेरे सोहनेया (कबीर सिंग), शिल्पा राव- घुंघरू (वाॅर), श्रेया घोषाल- ये ऐना (कबीर सिंग), श्रेया घोषाल, वैशाली म्हडे- घर मोर परदेसिया (कलंक), सोना महापात्रा, ज्योतिका तंग्री- बेबी गोल्ड (सांड की आँख) सर्वोत्कृष्ट डायलॉग- आर्टीकल 15- अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकी, बाला- नरेन भट्ट, छिछोरे- नितेश तिवारी, पियुष गुप्ता, निखिल मेहरोत्रा, गली बॉय- विजय मौर्य, सोनचिरीया- सुदीप शर्मा, सुपर 30- संजीव दत्ता. सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट- आर्टीकल 15- अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकी, गली बॉय- रीमा कागती आणि जोया अख्तर, मिशन मंगल- आर बाल्की, जगन शक्ती, निधी सिंह धर्म, साकेत कोंडीपार्थी, सांड की आँख- बलविंदर सिंह जंजुआ, सेक्शन 375- मनीष गुप्ता आण अजय बहल, सोनचिरीया- सुदीप शर्मा. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्टोरी- आर्टीकल 15- अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, छिछोरे- नितेश तिवारी, पीयुष गुप्ता, निखिल मेहरोत्रा, गली बॉय- जोखा अख्तर, रीमा कागती, मर्द को दर्द नहीं होता- वासन बाला, मिशन मंगल- जगन शक्ती, सोनचिरीया- अभिषेक चौबे, सुदीप शर्मा. सर्वोत्कृष्ट डेब्यू डायरेक्टर- आदित्य धर (उरी द सर्जिकल स्ट्राईक), जगन शक्ती (मिशन मंगल), राज शांडिल्य (ड्रीमगर्ल), तुषार हिरानंदनी (सांड की आँख), राज मेहता (गुड न्यूज), गोपी पुथरान (मर्दानी 2) सर्वोत्कृष्ट डेब्यू मेल- अभिमन्यू दासानी (मर्द को दर्द नहीं होता), मिजान जाफरी (मलाल), सिद्धनाथ चतुर्वेदी (गली बॉय), वर्धन पुरी (ये साली आशिकी), विशाल जेठवा (मर्दानी 2), जहीर इकबाल (नोटबुक) सर्वोत्कृष्ट डेब्यू फीमेल- अनन्या पांडे (स्टुडेंट ऑफ द इयर 2), प्रनूतन बहल (नोटबुक), तारा सुतारिया (स्टुडेंट ऑफ द इयर 2), सई मांजरेकर (दबंग 3), शर्मिन सहगल (मलाल), शिवालेका ओबेरॉय (ये साली आशिकी)
डोंबिवली : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसचा ठाणे रेल्वे स्थानकातील 'आॅपरेशनल' थांबा ३१ मार्चपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती कर्जत येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी दिली. या थांब्यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. सिंहगड एक्स्प्रेस मुंबईहून पुण्याला जाताना ठाण्यात थांबते. मात्र, पुण्याहून मुंबईला येताना ती ठाण्यात थांबत नाही. त्यामुळे हा थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तात्पुरता थांबा मिळाला. तो आधी जून तर नंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीनंतर पुढे काय होणार, असा प्रश्न असंख्य प्रवाशांना होता. पण आता मार्चअखेरीपर्यंत थांब्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
वाडा : कडाक्याची थंडी, मनात घर करून राहिलेली भूकंपाच्या धक्क्याची भीती, आणि त्या भीतीमुळेच घराबाहेर अंगणात शेकोटी पेटवून उघड्यावर जागवाव्या लागणा-या रात्री... पालघर जिल्ह्य़ातील तलासरी आणि डहाणू भागात हे चित्र सध्या सर्रास दिसून येत आहे. परिसरात भूकंपसञ चालूच असल्याने येथील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. धरणक्षेञ भागात भूकंपाचे धक्के सुरूच राहिल्याने धरण भागात भुकंपाचा केंद्रबिंदू असल्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. परिसरातील धरणे, काही मैल दूर असलेला तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, आणि विविध प्रकल्प अशा साधनसंपत्तीला ही जणू धोक्याची सूचना आहे. शहरांची तहान भागविण्यासाठी या परिसरात धरणे बांधली गेली खरी, मात्र पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती आणि शेती सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून संघर्ष नित्याचाच आहे. त्यातच भूकंप भयाने चार भिंतीतला संसार आज उघड्यावर येऊ पाहतोय. भयग्रस्त झालेला महिलावर्ग "बाई धरण बांधते अन् माझे हाती मरण कांडते"असेच जणू म्हणत आहे. परिसरात कुर्झे, धामणी आणि कवडसा आणि सुर्या अशी धरणे आहेत. याच भागात अगदी ४० ते ५० कि. मी अंतरावर सागरी किनारा व तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. याच भागाच्या पूर्वेस- दक्षिण जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यात काही धरणे आहेत. तर काही जुन्या - नव्या धरणांची कामे सुरू आहेत. परिसरातील बहुतांश भुभाग बेसाल्टने तयार झालेला असून, जांभा मृदा व वाळूकामय आहे. अशा भौगोलिक रचनेतील या परिसरात महामुंबईच्याही कक्षा रूंदावत आहेत. मुंबई ते डहाणू अशी रेल्वे लोकलसेवा कार्यरत आहे. त्यामुळे या क्षेत्रात औद्योगिक वसाहतीबरोबर विकासकांनीही इमारती बांधणीला जोड दिली आहे. त्यामुळे येथे मोठे गृहप्रकल्प येथे आकार घेताना दिसतात. केंद्र सरकारचे व राज्यसरकारचे इंड्रस्टीज काॅरिडाॅर प्रकल्प, बंदर विकास आणि रस्ते विकास अशा विविध प्रकल्पांची कामे होणार आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. असे महत्वाचे प्रकल्प असताना आज हा परीसरात भुकंपाच्या धक्क्याने हादरतोय. पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळेल यासाठी इथल्या जनतेने संघर्ष केला. माञ धरण उशाशी आणि कोरड घशाशी, असा प्रकार सुरु आहे. धरण परीसरातील जनता ११ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत भुकंपाचे धक्के सोसतेय. ३. २ रिश्टर स्केलच्या दरम्यानचे धक्के कुंर्झे, गावित पाडा, आंबेसरी, धुंदलवाडी, हळद पाडा, दापचरी, शिसने, आंबोली, नागझरी, वंकास, वसा, करंजवीरा, तलोटे, पूजवे या गावांमध्ये नोंदले गेले आहेत. घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. धरणाच्या जवळ दिवसभरात तीन -चार धक्के बसतात. त्यामुळे भयग्रस्त जनतेचा चार भिंतीतला संसार आजघडीला भयापोटी बाहेर पडला आहे. कुणी नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे, तर कुणी बाहेरच थंडीत झोपत आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बंडखोरी झाल्याने महाराष्ट्रात शिवसेनेची (Maharashtra Shivsena) मोठी वाताहात झाली आहे. शिंदे गटात (Shinde Group) शिवसेनेचे आमदार गेल्यानंतर खासदारांचा (MP) एक गट शिंदे गटात सामील झाला. अशातच जालन्याचे (Jalna) शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. मागील आठवड्यापासून ते दिल्ली मुक्कामी आहेत. या आठवड्यात त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. भाजपच्या नेत्यांच्याही खोतकरांनी भेटी घेतल्या आहेत. आज दुपारी खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे खोतकर यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. खोतकर यांनी शिंदे गटात सामील झालेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हटले, मी शिवसेना सोडली असं सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आहेत. पण असं कुठेही काही घडलं नाही. मी आजही शिवसेनेत आहे, मी शिवसैनिक आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. दरम्यान, या भेटीच्या वेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hingoli MP Hemant Patil) यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. डॉ. शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल सरचिटणीस डॉ. सुनील बनशेळकीकर, शहराध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, सचिव डॉ. विक्रम माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बिरादार, धन्वन्तरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, शफीभाई हाशमी, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, अजय शेटकार, बंटी आलमकेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोव्हीड लस ही पूर्णपणे सुरक्षीत आहे. प्रत्येकाने लस घ्यावी आणि लस घेतल्याने कोव्हीड होत नाही असे नसून, लस घेतल्यानंतरही प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाने सांगितलेले सर्व नियम आणि बचावात्मक उपाय याेजनांचे काटेकोरपणे पालन करून आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर्स सेलच्या शहराध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले आहे. यावेळी लसीकरण केंद्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई, 10 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स यांच्यात सामना होत आहे. या मन्यात लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीला लंकेनं लवकर बाद केलं. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चामिंडा वासच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कलुविथरानाकडे झेल देऊन बाद झाला. सचिनने पुन्हा एकदा खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. सचिन बाद झाला तेव्हा पंचांनीही आऊट देण्यासाठी बोट लवकर वर केलं नव्हतं. जणू त्यांना अजुनही सचिनला खेळताना बघायचं होतं. मात्र, तोपर्यंत सचिनने मैदान सोडलवं होतं आणि पंचांनीही इकडे बोट वरती करून तो बाद असल्याचा निर्णय दिला. सचिन बाद झाल्यानंतर सेहवागही धावबाद झाला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सेहवागने 5 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 4. 2 षटकांत भारताची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. लकेंकडून दिलशान, कलुविथराना, कपुदगेरा आणि सेनानायके यांनाच 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताच्या मुनाफ पटेलनं 4 गडी बाद केले तर झहीर खान, इरफान पठान, गोनी आणि संजय बांगर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
कल्याण - भाईगिरीच्या वर्चस्वाच्या वादातून कल्याण पूर्वेत पूर्ववैमनस्यातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची चाकूचे वार करून हत्त्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेतील आरोपीचा कोळसेवाडी पोलिसांनी तत्परनेने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे . (Kalyan Crime) पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ईश्वरी क्लासेस जवळ, नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर, समता नगर काटेमानिवली या ठिकणी न्यू सुदर्शन कॉलनी काटेमानिवली कल्याण पूर्व येथे रहाणाऱ्या अमोल लोखंडे या ३९ वर्ष युवकाची कंचन कॉलनी, समता नगर, काटेमानिवली येथे रहाणाऱ्या ३२ वर्षीय टक्या उर्फ जयेश डोईफोडे या युवकाने पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून जखमी करून हत्त्या केली . या घटनेची खबर लागताच कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी जयेश डोईफोडे याचा तत्परतेने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे . या खूनाच्या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे . माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मयत अमोल लोखंडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे. तर जयेश डोईफोडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. भाईगिरीच्या वर्चस्वातून झालेल्या हत्येनंतर कल्याण पूर्व परिसरात दहशत पसरली आहे.
आपल्या शरीरात अनेकविध पेशी नाश पावत असतात आणि त्याजागी नव्या तयार होत असतात . अशा जीर्ण पेशींची विल्हेवाट लावताना त्यापासून युरिक ऍसिड बनते . युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले म्हणजे त्यांचे सांध्यांमध्ये स्फटिक बनतात. अशा स्फटिकांमुळे सांध्याला अचानक सूज येते व विंचू चावल्यासारख्या वेदना होतात . स्फटिकांमुळे सांधा सुजणे म्हणजे गाऊट. फक्त युरिक ऍसिड वाढणे म्हणजे गाऊट नव्हे. अएन्कस्पॉन म्हणजे कंबरेचा आमवात . हा एक प्रतिकारशक्तीचाच आजार . त्याचे नेमके कारण माहित नाही . तो माकड हाडाच्या सांध्यापासून (सॅक्रोइलियाक सांधा प्रकरण २) सुरु होतो . प्रदीर्घकाळ हळूहळू वाढत जातो. ऍन्किलोसिंग म्हणजे मानके एकमेकांना चिकटणे आणि स्पॉन्डीलाटिस (दोन्ही ग्रीक शब्द ) म्हणजे मणक्यांना सूज येणे. मणक्यांचे टेंडॉन्स (कंदरा) आणि लिगामेंटस जिथे मणक्यांना जोडलेले असतात तिथे सूज येणे हे याचे वैशिष्ट्य. विषाणूंमुळे सांध्याच्या आतल्या आवरणाला ( सायनोव्हियम ) सूज येऊन चिकनगुनिया होतो. नाकात व्हायरसमुळे सर्दी-पडसे होते . तसे १९५३ मध्ये टांझानिया आणि मोझाम्बिक देशांच्या सीमेवरील माकोडे पठारावर हा आजार प्रथम सापडला. माकोडे भाषेतल्या कनगुन्याला या क्रियापदावरून हा शब्द तयार झाला . चिकनगुनिया म्हणजे रुग्णाला वाकवून टाकणारा आजार. आपले चांगले आरोग्य आमचे सर्वात मोठे यश आहे. पुणे शहरातील संधिवात उपचारांसाठी प्रचलित नाव म्हणजे डॉ. निलेश पाटील. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित संस्थांमध्ये अभ्यास केला आहे. रूग्णांना उत्तम सेवा देण्याचा, डॉक्टर प्रत्येक टप्प्यावर एक जागरुक प्रयत्न करतात. डॉ.निलेश पाटील यांनी एफसीपीएस (अंतर्गत औषध),मुंबई आणि पीजी संधिवातशास्त्र मध्ये,झोन हॉपकिन्स विद्यापीठ, न्यूयॉर्क मधून प्राप्त केली आहे. आमच्या लोकांच्या ऱ्हुमॅटिक स्थितीविषयी जागरुकता पसरवणे आणि रुग्णांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आधुनिक उपचार उपलब्ध करणे हा त्याचा हेतू आहे. सर्वोत्कृष्ट संधिवात तज्ञ मी भेटलो आहे .. उपचारांच्या सोबत त्यांनी रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढविला आहे आणि रुग्णाला आधीपेक्षा बरे वाटत आहे .. निदान आणि उपचारांमध्ये डॉक्टर खूप चांगले आहे ....
। पुणे । वृत्तसंस्था । गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसर्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्रावर चाकुने सपासप वार करत त्याचा निर्घृण अंत केला. यानंतर त्या आरोपी मित्राने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे. अमन अशोक यादव (वय 26) असं खून झालेल्या मित्राचं नाव आहे. तर, चेतन पाटील असं खून करणार्या मित्राचं नाव आहे. पुण्यातील आसरीएम गुजराती शाळेसमोरील फुटपाथवर ही घटना घडली आहे.
शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब सुरक्षा विभागाला कळवली. सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षक सुनील माळी हे साप व नाग पकडण्यात तरबेज असल्याने ही बाब त्यांना कळवण्यात आली. त्यांनी पुढील वीस ते पंचवीस मिनिटांत त्या कोब्राला सुरक्षित स्थळी सोडले. माळी म्हणाले, कोब्रा सहा फुटी असून, त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते. सुनील माळी यांनी आतापर्यंत २०० हून अधिक साप व नाग पकडले आहेत. दरम्यान माळी यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात नेमके काय घडले याची पूर्ण कल्पना येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या घडामोडींची चौकशी करण्यास सांगितले आहे. नुकसानभरपाई देताना भेदभाव कसा झाला, कोणी केला, याला जबाबदार कोण, महापोर्टलवर नेमके काय झाले, या साऱ्याच घटनाक्रमाची चौकशी आता राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक करणार आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यावर येणाऱ्या निष्कर्षांनुसार जबाबदार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली - वर्षअखेर होणा-या ऑस्ट्रेलिया दौ-यावेळी भारताचा संघ दिवस-रात्र (डे-नाईट) कसोटी खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया बोर्डाला कळवले आहे. मागील दोन वर्षापासून ऑस्ट्रेलिया दौ-यावर आलेला प्रत्येक संघ दिवस-रात्र कसोटी खेळत आहे. त्यामुळे भारतानेही सलामीची कसोटी 'डे-नाईट' म्हणून खेळवावी, अशी ऑस्ट्रेलिया बोर्डाची इच्छा होती. मात्र बीसीसीआयने त्याला नकार दर्शवला आहे. पारंपरिक लाल चेंडूंपासून क्रिकेटपटूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून दिवस-रात्र कसोटी खेळण्यास उत्सुक नसल्याचे बीसीसीआयने कळवले आहे.
मुख्य लग्नाच्या बातम्या 'व्यवस्था' एपिसोड 4 रिकॅपः मनेका तिच्या संगीतामध्ये दिसली, लग्नाचा अनुभव 'रिअॅलिटी चेक' 'व्यवस्था' एपिसोड 4 रिकॅपः मनेका तिच्या संगीतामध्ये दिसली, लग्नाचा अनुभव 'रिअॅलिटी चेक' FYI च्या तिन्ही वधू व्यवस्था केली त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त गोष्टी समान आहेतः ते त्यांची लढाई निवडत आहेत आणि निवडत आहेत. मंगळवार, 31 मे, एपिसोडमध्ये, मेनका आणि विकी त्यांच्या जीभ चावत राहतात - परंतु टेलर आता मागे हटत नाही. येथे, गाठ हंगाम सुरू असताना प्रत्येक जोडप्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकतो. Mayur and Maneka: मयूरची वाट पाहत राहिल्यानंतर - चिंता खरी होती - मनेका त्यांच्या संगीताला दाखवते, त्यांच्या लग्नाच्या काही दिवस आधी आयोजित एक मोठी पार्टी. ती भव्य, पारंपारिक भारतीय पोशाखात सजलेली आहे, ज्यामुळे मयूर तिच्या नृत्यदिग्दर्शित भारतीय नृत्यासह आनंदी होतो. मग, कौटुंबिक मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुम्ही फक्त मुलीशी लग्न करत नाही. तुम्ही कुटुंबाशी लग्न करा, मयूर शेअर करतो व्यवस्था केली दर्शक. वधूला त्याच्या भावी वधूच्या कुटुंबाशी जुळवून घेण्यात काही अडचण आली आहे कारण ते अधिक पारंपारिक आहेत. तो स्वतः चे वर्णन पाश्चात्यीकृत करतो. नंतर, जेव्हा मनेका त्याला त्याच्या घराच्या गोपनीयतेत त्यांच्या पहिल्या नृत्याचा सराव करण्यास सांगते तेव्हा मयूर नकार देतो. जरी मनेकाने नेहमीच वधू म्हणून तिच्या पहिल्या नृत्याची कल्पना केली असली तरी मयूरने ते पूर्णपणे वगळणे पसंत केले. मी त्याऐवजी ते फक्त प्रवासामधून काढून टाकतो, तो दर्शकांना सांगतो. तिला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात, तो मेनकाला सांगतो की ते त्यांच्या मोठ्या दिवसाजवळ सराव करू शकतात. लग्नाच्या दिवशी सकाळी मनेकाने तिचे केस आणि मेकअप केला आणि तिने काही भारतीय परंपरा समाविष्ट केल्या. तिने तिच्या प्रत्येक हातावर बांगड्यांचे थर लावले आणि नवीन वधू म्हणून तिच्या स्थितीचे प्रतीक आहे. भारतात, नवविवाहित स्त्रिया संपूर्ण वर्षभर बांगड्या घालतात, परंतु मनेका एका महिन्यासाठी लक्ष्य ठेवतात. शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला आणि मनेका तिच्या वराला वेदीवर भेटली. वधूचे पालक मयूरच्या हातात हात ठेवून तिला देतात, जे नंतर दर्शकांना सांगतात की ते पारंपारिक मार्गाने गेले याचा त्यांना आनंद आहे. (त्याला सुरुवातीला लास वेगासमध्ये लग्न करायचे होते!) मयूर त्याच्याभोवती एक हार, मंगळसूत्र ठेवतो व्यवस्था केली वधूची मान. हिंदू संस्कृतीत लग्नाच्या अंगठीऐवजी मंगळसूत्र सादर केले जाते. समारंभानंतर, मेनका तिच्या रिसेप्शन पोशाखात बदलते. ती मयूरला त्यांच्या पहिल्या नृत्याचा सराव एकत्र करण्यास सांगते, परंतु तो स्पष्टपणे कमी उत्साही आहे. च्या नंतर व्यवस्था केली पती -पत्नी म्हणून जोडप्याने प्रवेश केला, मेनकाला नृत्य करायचे आहे - पण तिचा नवरा डान्स फ्लोअरवर खुर्चीवर बसला आहे, तिला एकटे नाचण्यास सोडून. माझे हृदय बुडले, मेनका दर्शकांना कबूल करते. नंतर, मयूर समजावून सांगतो की त्याला त्यात जबरदस्ती वाटली, परंतु मनेका निराशा एक वास्तव तपासणी म्हणून पाहते. तो एक अमेरिकनकृत माणूस आहे, नवीन वधू शेअर करते. तो माझ्यापेक्षा वेगळा माणूस आहे. [मी] फक्त ते सोडले पाहिजे. ही आमच्या लग्नाची सुरुवात आहे, म्हणून नेहमीच चढ -उतार असतात ... आपल्याला आपल्या लढाया निवडाव्या लागतील. मयूर दर्शकांना सांगतो की त्याला हवे ते मिळालेः एक सुंदर, हुशार, यशस्वी पत्नी. बेन आणि विकीः ही एक ज्यू प्रथा आहे की वधू आणि वधू त्यांच्या लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी एकमेकांना पाहू शकत नाहीत किंवा बोलत नाहीत. विकी तिच्या आईबरोबर सिएटलमध्ये राहण्यासाठी न्यूयॉर्क सोडत आहे, आणि तिला बेन आधीच गहाळ आहे. विकीची आई, सुझान सांगते व्यवस्था केली विकी हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर एका वर्षासाठी इस्रायलला गेले होते. जेव्हा ती परत आली, तेव्हा विकी ज्यूंच्या चालीरीतींचे अधिक पालन करते, ज्यात आहारविषयक कायदे, शब्बाथ ठेवणे, उच्च सुट्ट्या इत्यादींचा समावेश होता. सुसान ज्यू समुदायाचा भाग असूनही तिच्या विचारांमध्ये अधिक आरामशीर आहे. मला वाटते की बेन आणि व्हिक्टोरिया खूप लहान आहेत, सुसानने आगामी लग्नाबद्दल कबूल केले. दोघांनाही खूप मोठे व्हायचे आहे आणि त्यांना लग्न कसे करावे हे माहित नाही. तिला तिची मुलगी गमवायची नाही, पण तुम्हाला फक्त ते बाजूला ठेवावे लागेल आणि तुमचे तोंड बंद ठेवावे लागेल, ती त्यांच्यासोबत शेअर करते व्यवस्था केली उत्पादक. बेन कोषेर फूडसह अल्ट्रा-टेम बॅचलर पार्टी करत आहे. अमेरिकन समाजाने ठरवलेल्या मानकाच्या तुलनेत हे खूपच लंगडे मानले जाईल, तो हसतो. लग्नापूर्वी त्याला स्ट्रिप क्लबमध्ये जाणे समजत नाही. आपण नेमकी उलट मनाची चौकट असावी की नाही? तो विचार करतो. त्याचा मित्र झॅच बेनला लैंगिक चर्चा देण्याची ऑफर देतो, परंतु तो नाकारण्यास मागेपुढे पाहत नाही. विकी शेवटच्या मिनिटांच्या तपशीलांमुळे तणावग्रस्त आहे आणि सुसान चिंतित आहे. विक्की सहा वर्षांची असताना तिने विकीच्या वडिलांना घटस्फोट दिला, परंतु दोघेही आपल्या मुलीला गल्लीतून चालत आहेत. बेन आणि विकीचे कुटुंब रिहर्सलला उपस्थित असले तरी विकीला जाण्याची परवानगी नाही. बेनला त्याच्या भावी पत्नीच्या कुटुंबावर चांगला प्रभाव पाडण्याची चिंता आहे. पण जेव्हा विकीचे कुटुंब असे प्रश्न विचारते की त्याला उत्तर कसे द्यायचे हे माहित नसते तेव्हा तो अवाक असतो. ते बाळांना आणि भविष्यासाठी इतर योजनांबद्दल विचारतात आणि बेनला अस्वस्थ करतात. सुसानच्या चिंतांबद्दल बोलण्यासाठी सुसान विकीच्या मावशीला भेटते. तिला तिच्या मुलीने आयुष्यभर आपले केस सार्वजनिकपणे झाकल्याबद्दल काळजी वाटते. तिला असे वाटते की ती आपले मूल गमावत आहे. नंतर, सुसान आणि विकी यांच्यात एक मधुर आई-मुलीचा क्षण आहे. सुसान विक्कीच्या एका विगवर प्रयत्न करते आणि तिने स्पष्ट केले की तिला आशा आहे की तिच्या मुलीचे लग्न कार्य करेल आणि ते आयुष्यभर एकत्र असतील. डेव्हिड आणि टेलरः त्यांच्या ताज्या वादविवादानंतर, डेव्हिडने टेलरला तिच्या पालकांच्या घरातून उचलले. आता ती टेलरची माझी पत्नी आहे, तिला माझे समर्थन करण्याची गरज आहे, तो दर्शकांना सांगतो, परंतु टेलर अजूनही त्याच्यावर रागावला आहे. त्याला हे समजणे आवश्यक आहे की मी निश्चितपणे अल्फा आहे. मी पत्नी आहे, आणि मी जिंकणार आहे, टेलर स्पष्ट करतात. डेव्हिडने माफी मागितली की तिला तिच्याशी लग्न करायचे नाही, परंतु टेलरने त्याच्या आईशी बोलावे अशी त्याची इच्छा आहे. टेलर तिच्या मैत्रिणी कर्टनीसोबत मेकॅनिकल बैल चालवायला आणि स्वार होण्यासाठी बाहेर गेला. टेलर म्हणते की ते त्यांच्या मुलींच्या रात्रीचा आनंद घेत असताना ते खरोखरच खूप छान आहेत. टेलर कोर्टनीला सांगते की तिने फ्लाइट अटेंडंट म्हणून अर्ज केला होता, परंतु तिने अद्याप डेव्हिडला सांगितले नाही. तिला वाटत नाही की तिचा नवरा संधीबद्दल आनंदी असेल, परंतु टेलर नोकरीबद्दल उत्साहित आहे. कोर्टनी टेलरला तिच्या सासू मेल्बाशी गोष्टी बोलण्यास प्रोत्साहित करते, पण टेलरला ते पटत नाही. टेलर आणि कोर्टनी मद्यपान करत असताना, डेव्हिड त्याच्या आईला भेटतो. तो तिला सांगतो की त्याला आवडणाऱ्या दोन स्त्रियांमधील वैर त्याला आतून खात आहे. मेलबाला वाटते की तिचा मुलगा खूप छान आहे, पण ती टेलरशी संपर्क साधण्यास सहमत आहे. तिला तिच्या सूनकडून माफीची अपेक्षा आहे, पण टेलरला माझ्या मनात क्षमस्व नाही. डेव्हिडशी आणखी एका वादानंतर, टेलर मेल्बाच्या भोजनासाठी गेला. मेल्बा आपल्या मुलाच्या बायकोला पाहून आतुरतेने वागते, तिला दारात जाताना मिठी मारते. हे माझ्या प्राधान्य यादीच्या वर नव्हते, टेलर म्हणते की ती तिच्या सॅलडमध्ये बसली आहे. तिने मेलबाची माफी मागण्यास नकार दिला, जो टेलरला सांगतो की ती पूर्णपणे प्रामाणिक नाही. सासूच्या बोलण्याने टेलरला धक्का बसला. महिलांपैकी कोणीही मागे हटत नाही. डोकावून पाहूः च्या पुढील भागावर व्यवस्था केली , बेन आणि विकीचा लग्नाचा दिवस आहे. मयूर बाळांसाठी तयार नाही, परंतु मेनकाचा कालावधी उशिरा आहे. टेलरला नोकरीची ऑफर मिळाली, पण डेव्हिड त्याच्या पत्नीसाठी आनंदी नाही. ही जोडपी डोळ्यांसमोर दिसू लागतील का, किंवा त्यांचे पहिले वर्ष असेल व्यवस्था केली विवाह हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात अशांत वर्ष ठरतात?
जनावरांना घेऊन कत्तलीसाठी तेलंगणाकडे निघालेला भरधाव ट्रक वणी शहरालगतच्या घोन्सा चौफुलीवर उलटला. वणी : जनावरांना घेऊन कत्तलीसाठी तेलंगणाकडे निघालेला भरधाव ट्रक वणी शहरालगतच्या घोन्सा चौफुलीवर उलटला. शनिवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत चार जनावरे ठार झाली. अपघातानंतर ट्रकचालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाले. अपघातानंतर ट्रकमधील काही जनावरे लगतच्या ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात शिरली. काहींनी या जनावरांना बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम राबवून ही जनावरे ताब्यात घेतली. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांच्या भितीने भरधाव जात होता. मात्र घोन्सा मार्गावरील वळणावर हा ट्रक उलटला. सदर ट्रक कुठून आला, याचा उलगडा मात्र झाला नाही. वाचलेल्या जनावरांना गोरक्षणात ठेवण्यात आले आहे.
येवला : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा येथील भागवत सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्या सोबत राष्ट्रवादीच्या प्राथमिक तसेच सक्रि य सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्याकडे सुपूर्द केला असून याची प्रत आमदार छगन भुजबळ यांना पाठवली आहे. येवला : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा येथील भागवत सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्या सोबत राष्ट्रवादीच्या प्राथमिक तसेच सक्रि य सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्याकडे सुपूर्द केला असून याची प्रत आमदार छगन भुजबळ यांना पाठवली आहे. येवला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सन २०१४ पासून ते सक्र ीय होते. तालुक्यातील सर्व प्रलंबित सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी मदत करु अशी भुमिका तत्कालीन पालकमंत्री भुजबळ यांनी घेतल्याने ममदापूर येथील साठवण बंधाऱ्याच्या भुमिपूजन प्रसंगी सोनवणे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भुमिपूजनानंतर ५ वर्ष लोटली तरी ममदापूर येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागला नाही. सोनवणे यांनी पाठपुरावा करु न तालुक्यातील अनेक सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण, अन्वेन्शन, सविस्तर प्रकल्प अहवाल, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदींचा पाठपुरावा करु न प्रकल्प मार्गी लावले होते. राष्ट्रवादीची राज्यात पुन्हा सत्ता येईल आणि भुजबळांच्या मदतीने तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न सोडवता येईल अशी सोनवणे यांना आशा होती. मात्र २०१४ ला राष्ट्रवादीची सत्ता गेली. हेवीवेट नेते असूनही त्यानंतर सिंचन प्रश्न जैसे थे राहिले. सध्याच्या भाजपा-शिवसेना युती सरकारनेही भुजबळांच्या मतदार संघात असहकाराची भुमिका ठेवली. यामुळे देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्प रखडला. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला अपेक्षा असलेल्या पुणेगाव-डोंगरगाव कालव्यालाही पाणी आले नाही. जनतेला विविध निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता आली नाही. याची खंत म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचे सोनवणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
हिंगणघाट (जि. वर्धा) : राज्यात गाजलेल्या प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणी (Ankita burning scandal) बुधवारी (ता. एक) शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी (hearing start) घेण्यात आली. गुरुवारी (ता. दोन) सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून एड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) शहरात दाखल झाले असून, न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता. एड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद सादर केला. गुरवारी पुन्हा प्रक्रिया सुरू राहणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर बचाव पक्षाचे वकील एड. भूपेंद्र सोने आपला युक्तिवाद सादर करतील. खटल्याचे कामकाज आता जवळजवळ संपुष्टात आले असून, लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. आज कामकाजाच्यावेळी न्यायालयीन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावातील रहिवासी असलेली अंकिता पिसुड्डे कॉलेजला जात होती. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे (२७) याने पेट्रोल टाकून जाळले. काही वेळांनी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, आठ दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. या कामासाठी ७ कोटी ७ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून यातून बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे. या निधीतून संपूर्ण परिसराचे मजबूतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण, आधुनिक पीव्हीसी फॉल सिलिंग, शुद्ध वातावरणासाठी बगिच्याची सुविधा, वेटींग हॉलच्या आधुनिकीकरण, ग्रामीण विभागासाठी नऊ फलाट फार्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भरपूर क्षमता असलेले दोन सेफ्टीक टँक, दर्शनी भागात आकर्षक वॉल कंपाऊंड, डिजीटल एल. ई. डी. डिस्प्ले, मजबूत व आकर्षक फ्लोरींग, टूव्हिलर पार्किंगसाठी विशेष व्यवस्था, बगीचामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा, प्रवाशाच्या सुविधेकरिता विविध दुकानांची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थाकरिता स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था, स्टाफकरिता आरामदायी गेस्ट रूम, महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह, कँटींगचे आधुनिक पद्धतीने नुतनीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. उल्लेखनिय म्हणजे जुनी विभाग नियंत्रक कार्यालयाची इमारत पाडून तेथे ग्रामीण करीता बस स्थानक तयार करण्यात येणार आहे. एकूणच वर्धा बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे.
वॉशिंग्टनः मनी हाईस्ट सीरीजसारखी धाडसी चोरी अॅपल स्टोअरमध्ये घडली आहे. चोरांनी अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करून 4 कोटी 10 लाख रुपये किमतीचे 436 आयफोन चोरुन नेले आहेत. सिएटलच्या स्थानिक वृत्तवाहिनी, किंग 5 न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी सिएटल कॉफी गियरमध्ये प्रवेश केला आणि अॅपल स्टोअरच्या बॅकरूममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडले. चोरट्यांनी शेजारच्या कॉफी शॉपचा वापर करून अॅपल स्टोअरच्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देत सुमारे 5,00,000 डॉलर्स किमतीचे 4 कोटी 10 लाख रुपये किमतीचे 436 आयफोन चोरले. कॉफी शॉपचे सीईओ- माईक ऍटकिन्सन यांनीही ट्विटरवर अॅपल स्टोअरच्या बाथरूममध्ये चोरट्यांनी तयार केलेल्या भगदाडाच्या फोटोसह याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांनी पुष्टी केली की अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या कॉफी शॉपचा वापर केला गेला होता त्यांनीच फोन करून याबाबत माहिती दिली होती. दरम्यान यानंतर, सिएटल कॉफी गियरला त्यांचे कुलूप बदलण्यासाठी जवळपास 900 डॉलर खर्च करावे लागले तर बाथरूमच्या दुरुस्तीवर 600 ते 800 डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि दुकाने असलेल्या अल्डरवुड मॉल त्यांना मदत करत आहे. सिएटलच्या किंग 5 न्यूजच्या मते, गुन्ह्याचा वेग आणि अचूकतेमुळे अॅटकिन्सनसह काही लोकांचा संशय आहे की, हे ओळखीच्याच माणसाचे हे काम आहे. स्टोअरमध्ये डिस्प्लेसाठी लावण्यात आलेले मोबाईल चोरण्यात फारशी मेहनत लागत नाही आणि या आयफोनची किंमतही सोन्या-हिर्यां इतकीच महाग आहे, त्यामुळे चोर अॅपल स्टोअरला अनेकदा टार्गेट करतात. दुसरीकडे, अॅपलने चोरीबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. दुसरीकडे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारतात दोन अॅपल रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले आहे. पहिले स्टोअर 18 एप्रिल रोजी मुंबई बीकेसीमध्ये उघडण्यात आले, तर दुसर्या स्टोअरचे अनावरण 20 एप्रिल रोजी दिल्लीतील साकेत येथील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये करण्यात आले. भारताच्या दौर्यावर असलेल्या टिम कुक यांनी नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 'मोदी तेरा अच्छा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बंद दुचाकी वाहने ढकलत आणत ती परवडत नसल्याचे दाखवत, सरकारने केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्टÑवादीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रुड आॅइलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुखाचे दिवस येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी यावेळी केले. राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय आणि ज्या शेतकºयांच्या नावाखाली ही लूट सरकारने चालवली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्राने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी करत आंदोलनाचा इशाराही दिला.
'ठोकून काढा! मोदीजी विरोधकांवरचे हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे बघा' मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला ठोकून काढा म्हणत या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिवसेनेने सामनामधून केली आहे. पुलवामा हल्ल्यात 37 जवानांना वीरमरण आले. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहण्याची वेळ असल्याचे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. मोदींनी पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवून पाकिस्तानवरील हल्ल्यांकडे पहावे असेही अग्रलेखात म्हटले आहे.
ब्रेड अँड बटर - भाग ५ 'पिझ्झा' वाळवणी, ़कॅनिंग, लोणची, मुरांबे वगैरे. ब्रेड अँड बटर - भाग ४ 'संपूर्ण गव्हाचा पाव' हॅरी पॉटरबद्दल. माझे घर नक्की कोणते? सध्या काय वाचताय? विश्राम बेडेकरः "रणांगण" शांता गोखलेः "त्या वर्षी" उद्धव शेळके, "धग" अँड्रॉइड साठी मराठी टंकलेखन "अॅप"
पणजी, २७ मे (वार्ता. ) - केंद्रशासनाने म्हादई प्रवाह प्राधिकरण (कल्याण आणि सौजन्यशील प्रगतीशील नदी प्राधिकरण) स्थापन केल्याच्या घोषणेनंतर ३ मासांनी म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाला म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयांची कार्यवाही करण्याविषयी अधिसूचना जारी केली आहे. १४ ऑगस्ट २०१८ मध्ये म्हादई जल विवाद लवादाने या विषयीचा पाणी वाटपाच्या संदर्भातील निर्णय दिला होता. त्यानंतर केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या सुधारित सविस्तर विकास आराखड्याला मान्यता दिल्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचप्रमाणे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि जलविवाद आयोग यांच्याकडे जल व्यवस्थापन प्राधिकरणाची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रशासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने म्हादई प्रवाह या नावाने प्राधिकरण घोषित केले होते. या प्राधिकरणाच्या घोषणेनंतर ३ मासांनी हे प्राधिकरण अधिसूचित करण्यात आले आहे. A great news for people of Goa ! या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय पणजी येथे असेल. म्हादई प्रवाह प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन योजना २०२३ सिद्ध करण्यात आली आहे. ही योजना २२ मे २०२३ या दिवशी अधिसूचित करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष पूर्णवेळ आणि स्वतंत्र असतील. उच्च प्रशासकीय श्रेणी किंवा सदस्य असलेले, केंद्रीय जल आयोगाच्या स्तरावरील केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवा संदर्भातील अभियंता असलेले सेवारत अधिकारी ३ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी नियुक्त केले जातील. म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्याविरुद्धच्या लढ्यामध्ये प्राधिकरणाचे साहाय्य मिळेल, अशी आशा गोव्याला आहे.
अमळनेर (प्रतिनिधी) शिवजन्मोत्सवा निमित्त चित्रकलेच्या माध्यमातून बालकांना शिवरायांचे व्यक्तित्व कळावे हा उद्देश ठेवून येथील राजमुद्रा फाउंडेशन आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा शुभारंभ छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्बन बँकेचे चेअरमन अभिषेक पाटिल,सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांनी पुष्पहार अर्पण करून केला.तर कृ उ बा संचालक विजय पाटिल, अनिल बोरसे, शालिक पाटिल आदिंनी प्रतिमा पूजन केले.प्रास्तविक राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष नगरसेवक श्याम पाटिल यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी संदेश पाटिल,बाळासाहेब शिसोदे, जयवंत शिसोदे,अशोक पाटील, नानासाहेब पाटील, जयवंतराव पाटील, विजय चव्हाण बापू पाटिल आदिंसह मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने तीन गटात झालेल्या या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.सोशल डिस्टनसिंग व मास्क चा वापर करीत स्पर्धक व पालक यावेळी उपस्थित होते. शिवजन्मोत्सव चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अक्षय चव्हाण, किरण पाटील, विशाल पाटील, सारंग लोहार,निनाद शिसोदे, उज्ज्वल मोरे, राहुल पाटील, तेजस पवार, दर्पण वाघ, उमेश पाटील, विपुल पाटील, कुणाल पाटील, गौरव पाटील, निलेश पाटील, सागर ठाकरे,मयूर पाटील, तुषार वायकर,अधिकार पाटील, निखिल सूर्यवंशी, आदि राजमुद्रा फाउंडेशन चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची 'भरती' सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाले असून प्रत्येक जण आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार पर्यटन करू लागला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाले असून प्रत्येक जण आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार पर्यटन करू लागला आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून आपल्या कुटुंबासह एक दिवसाच्या सहलीसाठी येथील पिरवाडी किनाऱ्याला पसंती मिळू लागली आहे. या ठिकाणी मिळणारे ताजे मासे, घरगुती जेवण तसेच नारळपाण्याच्या ओढीने पर्यटकांच्या संख्येत काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. विशेषतः दर रविवारी पिरवाडी किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. याचा फायदा येथील स्थानिक व्यावसायिकांनाही होऊ लागला आहे. उन्हाळी, पावसाळी व हिवाळी अशा तिन्ही ऋतूंचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटन केले जाते. मात्र अनेकांना दूरवर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने एक-दोन तासांत पोहोचता येऊन पर्यटनाची मजा लुटता येईल अशा स्थळांच्या शोधात अनेक जण असतात. उरणला समुद्रकिनारा लाभला असूनही या किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या तशी कमीच असते. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटनाचा ओघ वाढल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. काही वर्षांपूर्वी येथे एखाद्दुसरे हॉटेल होते. यात वाढ होऊन सध्या उरणच्या किनाऱ्यावर तसेच आजूबाजूलाही पर्यटकांची खवय्येगिरी भागविणारी शाकाहारी तसेच मांसाहारी हॉटेल्स उभारली गेली आहेत. त्यामुळे काही दिवस राहण्याचीही उत्तम सोय असणारी हॉटेल्स या परिसरात तयार होऊ लागली आहेत. उरणचा समुद्रकिनारा स्वच्छ असून येथील वाळूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कोकण आणि रायगड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध नसला तरी उरणमधील स्थानिक रहिवासी तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ांतील काही तालुक्यांतून या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या वाढू लागल्याची माहिती पिरवाडी येथील रहिवासी नाना पाटील यांनी दिली आहे. किनारा म्हटला की मासे आले. मांसाहारी आणि त्यातही आगरी पद्धतीचे घरगुती जेवण सध्या या परिसरात उपलब्ध होत असल्याने या घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सध्या गर्दी करू लागले आहेत. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तासह जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी सावधानतेचे फलकही लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, रविवारी क्षमतेपेक्षा अधिक दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेऊन पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर येत असल्याने सध्या दर रविवारी उरण एस.टी. स्टॅण्ड चारफाटा येथे नागरिकांना सायंकाळी किमान दोन ते तीन तासांच्या वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१) आह्मी राणोजीसिंग, मल्हारजी होळकर, यशवंतराव पवार आणि पिलाजी जाधव स्वदस्तूर लिहून देतों की :- बाळाजीराव मुख्य प्रधान यांनी बादशाहाची नोकरी करणे कबूल केली आहे. त्यास जर तो यापुढें चाकरी करण्यास मागें पुढें पाहील तर आह्मी त्यास दोन गोष्टी सांगून तसें करूं देणार नाही आणि आह्मी सांगितले असतां जर बाळाजीराव चाकरी न करण्याचा हट्ट करील तर आह्मी सारे पंडितप्रधान याची चाकरी सोडूं. दाखल्याभावी हा दस्ताऐवज लिहून दिला असे. हा दस्ताऐवज सन १७४३ त छ ७ बिलावल (२१ एप्रिल १७४३) बादशाही कारकीर्दीच्या विसावे वर्षी ह्मणजे सन २४ जुलूस साली लिहून दिला. याप्रमाणें पेशव्यांची कबुलात झाल्यावर दिल्लीबादशाहा महमदशाहा यांनी आपले पुत्र अहमदशाहा याचे नावाच्या सनदा व परवाने शिरस्तेप्रमाणे छ २२ जमादिलावलचा (४ जुलै १७४३) व दुसरी सनद छ १८ रजबची (२८ आगस्ट १७४३) याप्रमाणें दोन पेशवे यास दिल्या, अर्बा अर्बैनात. बादशाहाकडून सनदा पदरी पडेतोपर्यंत या सालांत पेशवे यांनी हिंदुस्थानांत असतां व पुण्यास दादासाहेब वगैरे यांनी काय काय कामें केली ती खाली दाखविली आहेत. छ ८ रमजान (२६ अक्टोबर १७४२) महिन्यांत गढे मंडळावर लढाई झाली, व छ १ सवालरोजी (१८ नोव्हेंबर १७४२) गढे मंडळ फत्ते झालें. छ ९ सवाल उंडे-याचे (२६ नोव्हेंबर १७४३) अहीर यासी लढाई होऊन मोर्चे लाविले. छ २२ सवाल (९ डिसेंबर १७४२) झाशी घेतल्याची खबर आली. छ ३ जिलकाद (२० डिसेंबर १७४२) भाऊसाहेब व दादासाहेब जनार्दनपंतसुध्दां नाशिकास गंगास्नानास गेले. नानासाहेब हिंदुस्थानांत असतां छ ११ जिल्हेज रोजी (२७ जानेवारी १७४३) प्रयागास यात्रेकरितां आले. छ २४ जिल्हेज (९ फेब्रुवारी १७४३) रामपुरा काशी दक्षिणतीरास मुक्काम केला. तेव्हां श्रीमंतांच्या मनांत काशीक्षेत्र हस्तगत करावें ह्मणून आल्यावर स्वारीच्या ढाला काशीकडे फिरविल्या. त्यासमयीं काशींत सफदरजंग अधिकारी होता, त्यास ही गोष्ट कळली. तेव्हां त्यांनी घाबरून सर्व काशी क्षेत्रांतील नारायण दीक्षित पाटणकर आदि शिष्ट ब्राह्मण जमा करून आणून त्यांस सांगितलें की, तुमचे ब्राह्मण राजे यांनी काशी घ्यावयाचा बेत केला, याप्रमाणें ढाल उभी करून हिकडे येतात, त्यांस माघारे फिरवावें, नाहीतर तुह्मां सर्वांस मुसलमान करीन. अशी जरब देतांच सर्व ब्राह्मणांनी भिऊन त्यास सांगितलें की, आह्मी माघारें फिरवितों. असे बोलून दीक्षित आदिकरून चारशें ब्राह्मण उघडे बोडके काशीबाहेर श्रीमंत ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणीं रात्रीस चार घटिका रात्र झाली त्यावेळेस पोहोंचले. ब्राह्मण समुदाय पाहून श्रीमंत डे-याबाहेर येऊन उभे राहून दीक्षित पाटणकर यांस पाहून बोलले कीं उघडे बोडके कां आला ? तेव्हां झालेला मजकूर श्रीमंतांस कळवून ब्राह्मण राखावयाचे असल्याचे आपण माघारें फिरावें हें चांगले आहे. हा मजकूर श्रीमंतांनी ऐकून इतक्या ब्राह्मणांस आह्मांकरिता दुःख होतें तर आह्मांस या गोष्टीची जरूर नाही. तेव्हा ब्राह्मणांनी आपण माघारे फिरावें असे सांगितले. नंतर श्रीमंत बोलले की आह्मांस गंगास्नान करावयाचें आहे ते कसें घडेल ? हे ऐकून दीक्षित बोलले, आमचे मेळ्यांत आपण चलावें, आपल्यास स्नान घालून परत पाठवितों. त्यावरून श्रीमंत एकटेच त्या ब्राह्मणांबरोबर काशीत जाऊन स्नान करून माघारे उलटले. हा मजकूर सफदरजंग यानें ऐकिल्यावर त्याचा सन्मान झाला नाहीं ही आमची चूक झाली असें बोलले. श्रीमंत काशीहून गयेस चालते झाले. छ १० मोहरमी (२४ फेब्रुवारी १७४३) गयेस जाऊन गयावर्जन केले. त्यावेळेस बरोबर पिलाजी जाधवराव, महादजी अंबाजी पुरंदरे, बाजी भिवराव चावेरीकर व रघोजी भोसले होते. छ १४ सफर रोजीं (३० मार्च १७४३) मुस्ताफाखान याची भेट झाली व छ १५ सफरी (३१ मार्च १७४३) सौराज्य प्रांतांत मक्षुकाबादेस मुक्काम झाला तेथें अलाबकस याची भेट झाली. छ २३ सफर (८ एप्रिल १७४३) मौजे पलटी यापैकी मनोर येथें अलीवर्द्दीखान भेटीस आले होते. छ २९ रबिलावल (१३ मे १७४३) अखेरसाल साता-यास जाऊन छ १८ जमादिलावल (३० जून १७४३) अर्बा अर्बैन सालीं परत आले. महाराजांची प्रकृति बिघडली होती, सबब खुद्द पेशवे यावेळेस पुण्यास नव्हते. भाऊसाहेब गेले असावे. संभाजी आंग्रे मयत झाले.
"...आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो"\nBy Bhagyashri Konarde On April 25, 2022 8:19 am\nमुंबई । 'मातोश्री' बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) राणा दांपत्यासह भाजप (BJP) विरोधात टीकेची झोड उठवण्यात आली आहे.\nराणा दांपत्याला पुढे करून मुंबईतील वातावरण बिघडवायचं हेच ठरवलं होतं आणि त्याबरहुकूम सगळं घडलं. यामागे भाजपचंच कुचकं डोकं आहे, असा आरोप सामानातून करण्यात आला आहे. तर मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा अट्टहास कशासाठी?, असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.\nसंसदेत श्रीरामांच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो हे आश्चर्यच आहे, असा खोचक टोला शिवसेनेने (Shivsena) लगावला आहे.\nदरम्यान, राम सत्यवचनी होते. हनुमान त्या रामाचा भक्त होता. खोटेपणाच्या पायावर उभ्या असलेल्या नवनीत राणा हनुमान चालिसेचं राजकारण करतात आणि समस्त भाजप या भंपकपणाच्या नौटंकीत टाळ्या वाजवत नाचतोय, असा घणाघात देखील शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे.
"श्याम, तू इतकी पुस्तकं कशाला आणतोस?" रामने विचारले.\n"माझ्याने राहवत नाही. उपाशी राहवं, पण पुस्तकं घ्यावं, असं मला वाटतं," मी म्हणालो.\nखरोखरच माझ्या खिशात पैसे असले, म्हणजे ते पुस्तके, नाही तर सुंदर चित्रे घेण्यातच जायचे. देशभक्तांचे कार्डाच्या आकाराचे कितीतरी फोटो बाजारात असत. ते सारे विकत घ्यायचे मी ठरवले. देशभक्तांची अनेक नावे त्या बाजारात असणा-या चित्रांवरून मी प्रथम शिकलो. मागून त्यांची मी माहिती मिळवू लागलो. त्या थोरांची आपल्याला काहीही माहिती नाही, ह्याची मला लाज वाटे. अशा रीतीने मी माझ्या मनोबुध्दीला खाद्य पुरवीत होतो. माझ्या भावना प्रगल्भ होत होत्या. मला नवीन विचार मिळत होते.\nएके दिवशी मी ग्रंथ-संग्रहालयातून बाहेर पडत होतो, तो एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझ्या हातात पुस्तक होते.\n"कसलं आहे पुस्तक?" त्यांनी विचारले.\n" 'आमच्या आयुष्यातील आठवणी,' रमाबाई रानडयांनी लिहिलेलं पुस्तक," मी म्हटले.\n"इथे मोफत मिळतात वाटतं पुस्तकं?" त्यांनी प्रश्र केला.\n"मोफत कशी मिळतील?" मी म्हटले.\n"मग तुमची ओळख आहे वाटतं चिटणिसाशी?" त्यांनी पुन्हा प्रश्र केला.\n"नाही बुवा," मी उत्तर दिले.\n"मग कुणी पुस्तकं दिलं? शिक्का तर संग्रहालयाचा आहे. वर्गणीदारांशिवाय पुस्तक मिळत नसेल?" ते म्हणाले.\n"मी वर्गणीदार आहे," मी सांगितले.\n"अहो, तुम्ही वारकरी आहांत ना?" त्यांनी आश्चर्याने विचारले.\n"हो," मी शांतपणे उत्तर दिले.\n"वारकरी असून वर्गणीदार होता? वर्गणी भरायला तुमच्याजवळ पैसे आहेत वाटतं, जेवणासाठी मात्र नाहीत? ही दुस-याची तुम्ही फसवणूक करीत आहांत," ते म्हणाले.\n"उपाशी राहूनच मी वर्गणीदार झालो आहे. माझे सारे वार नाहीत. तरीही महिन्याचे चार आणे पोटाला उपाशी राखून, मी ह्या ग्रंथ-संग्रहालयाला देत असतो व विचारांचं खाद्य मिळवीत असतो. मी कुणाची फसवणूक नाही करीत, फक्त माझ्या पोटाची फसवणूक आहे," मी म्हटले.\n"पोटाला भरपूर खायचं नाही आणि म्हणे पुस्तकं वाचा! तुम्ही एक विचित्रच वारकरी आहांत. स्पष्टच सांगायचं झालं, तर तुम्ही वेडे आहात. मूर्ख आहांत. आधी खा पोटभर," ते सद्गृहस्थ म्हणाले व निघून गेले.\nवारकरी असून वर्गणीदार होणे, हे त्या गृहस्थांस पाप वाटले. माझे सारे अत्रदाते असेच म्हणतील का? रामच्या घरची मंडळीही मला नावे ठेवीत असतील का? श्याम गरीब आहे. मग ही पुस्तकांची ऐट त्याला कशाला, असे का ते मला म्हणतील? मला काही कळेना. 'लोक काही म्हणोत. तू विचारांचा उपासक हो' असेच माझ्या मनाने मला सांगितले व तेच मी ऐकले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं आहे. अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं आहे. अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. कृषिमूल्य आयोगाला आणखी अधिकार देणार आहोत, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. अण्णा हजारेंना पुन्हा आंदोलन करावं लागणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर यश मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना लिंबू पाणी पाजलं आहे. कृषी अवजारांचा जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणणार असल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. तसेच तीन महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे. लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्य केली आहे. अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केलाय.
बार्शी : तावरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचीत्य साधून प्रमुख अतिथी संतोष गुंड यांनी या शाळेसाठी प्रोजेक्टर भेट दिले. प्रथम प्रमुख संतोष गुंड, मनीष चौहान यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक लोखडे, तलाठी सुतार, सोमनाथ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील सोमनाथ इंगळे यांनी मातोश्री ग्रुप तावरवाडीच्यावतीने शाळेतील गुणवंत मुलांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी शिक्षक ताकभाते ,आतार, उमेश पवार, अनिल इंगोले, बलभीम बरंगुळे, प्रभू तोडरमल, भारत गवळी, वैभव बारंगुळे उपस्थित होते.
प्रशासनाच्या कारभाराची ऐशीतैशी ! कोल्हापूर - 'ए. टी. एम्. ' सारख्या दिसणार्या एका यंत्रात काही नाणी टाकल्यावर सामान्य नागरिकांना तात्काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्हाधिकारी कार्यालयांत बसवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात असणारे हे यंत्र मात्र गेली ३ वर्षे धूळखात पडून आहे. 'डिजिटल इंडिया'च्या गोष्टी करतांना उत्साहाने चालू केलेल्या अनेक योजना नंतर कशा प्रकारे वार्यावर सोडल्या जातात, याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.