text
large_string
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान बदलविषयक परिषदेतील चर्चेची 'नुसत्या हवेतल्या गप्पा' अशी हेटाळणी होणे टळले, ते केवळ एका मुद्द्यामुळे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान बदलविषयक परिषदेतील चर्चेची 'नुसत्या हवेतल्या गप्पा' अशी हेटाळणी होणे टळले, ते केवळ एका मुद्द्यामुळे. तो मुद्दा आहे नुकसान भरपाईचा. श्रीमंत देशांनी निदान तत्त्वतः तरी गरीब देशांना भरपाई देण्याचे मान्य केले, ही परिषदेची कमाई म्हणावी लागेल. त्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आधी लक्षात घ्यावी लागेल ती एकूणच जागतिक व्यवस्थेतील सध्याची विषमता. जगापुढे हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळणे हे आव्हान आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखणे हे त्यातील सर्वांत प्रमुख. जीवाश्म इंधनांचा वापर करून निर्माण केलेली ऊर्जा वापरून अमेरिका, युरोपातील देशांनी समृद्धीचे सोपान पार केले. दरडोई उत्पन्न वाढवले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक व्यापारातही वर्चस्व मिळवले. त्याची फळे त्यांना मिळाली; पण या प्रक्रियेत पर्यावरणाची जी काही हानी झाली, त्याच्या झळा मात्र सगळ्याच मानवजातीला बसल्या आणि बसत आहेत. जे देश आता कुठे डोके वर काढू पाहात आहेत, आपल्या लोकसंख्येला थोडे बरे जीवनमान मिळवू देऊ पाहात आहेत, त्यांना जेव्हा जागतिक परिषदेत श्रीमंत देश कार्बन उत्सर्जन रोखण्याचे ब्रह्मज्ञान सांगू लागतात, तेव्हा प्रतिक्रिया येणे साहजिकच म्हटले पाहिजे. दरडोई कर्ब उत्सर्जनाचे आकडे पाहिले तर ही तफावत स्पष्ट होते. युरोपीय देशांचे दरडोई कर्ब उत्सर्जन १०. ५ टन, अमेरिकेचे २३ टन तर भारताचे फक्त दोन टन. खच्चून भरलेल्या रेल्वेगाडीत जागा मिळविण्यासाठी धडपडणारा बाहेर राहिलेल्यांविषयी तोपर्यंतच सहानुभूती बाळगतो, जोपर्यंत त्याला आता प्रवेश मिळत नाही. पण एकदा का प्रवेश मिळाला, की नव्याने आता कुणी येऊ नये, असे त्याला वाटू लागते. पाश्चात्त्य जगतातील अनेक देशांचा अशा प्रकारचा दृष्टिकोन असल्याने पर्यावरणाच्या बाबतीतील जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यात मतभेदांचा अडथळा येऊ लागला. याविषयीच्या मंथनातून गरीब देशांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी तीन दशकांपूर्वी पहिल्यांदा मांडली गेली. आजवर तरी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या होत्या. अलीकडच्या काळात पूर, दुष्काळ, चक्रीवादळे यासारखे हवामान बदलाचे जे दुष्परिणाम तीव्रतेने समोर येत आहेत, ते पाहता या मागणीने उचल खाल्ली. इजिप्तमधील ताज्या परिषदेत श्रीमंत राष्ट्रांनी त्यामागची भूमिका निदान तत्त्वतः मान्य केली, ही गोष्टदेखील थोर झाली म्हणायची! आता मुद्दा आहे तो तपशीलाचा. भरपाईसाठी निधी उभा करण्यविषयी अद्याप काही रचना ठरलेली नाही. ती ठरवणे, त्याप्रमाणे निधी उभा करणे आणि योग्य ती भरपाई गरीब राष्ट्रांना मिळणे ही पुढची उद्दिष्टे आहेत आणि त्यात कसोटी लागेल. हवामान बदलांच्या दुष्परिणामांचे निराकरण (मिटिगेशन) आणि जुळवण (एडाप्टेशन) यासाठी फार मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, बदलाशी जुळवून घेण्यासाठी पीक पद्धती, शेतीचे वेळापत्रक आदी अनेक गोष्टींत बदल करावे लागतील. उद्योगांच्याही नव्या पद्धती आणाव्या लागतील. यासाठी नवतंत्रज्ञान लागेल. संपूर्ण जगाची 'अल्प कार्बन उत्सर्जनाधारित अर्थव्यवस्था' निर्माण करण्यासाठी जो निधी लागेल, तो चार चे सहा ट्रिलियन डॉलर इतका प्रचंड आहे. तो कसा उभा करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यापूर्वी विकसित देशांनी निधी देण्याबाबत शब्द पाळल्याचे आढळलेले नाही. भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी जुळवणीसाठीचा ताण देशातील छोट्या शेतकऱ्यांवर पडता कामा नये, असा मुद्दा परिषदेत मांडला आणि तो महत्त्वाचा होता. पण या संपूर्ण परिषदेत कार्बन उत्सर्जन घटवण्याविषयी नव्याने काही बांधिलकी स्वीकारण्याबाबत काहीच घडलेले नाही. हे अपयशही नोंदवायला हवे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा विचारात घ्यावा लागेल. पर्यावरणाचा गंभीर प्रश्न जागतिक पातळीवर हाताळताना फक्त तंत्रज्ञान आणि त्यासाठीचा निधी एवढ्यावरच चर्चा घोटाळत राहता कामा नये. भलेही गरीब देशांना भरपाई दिली जाईल. पण ज्या निसर्गाची नासाडी होत आहे, त्याची भरपाई कोण आणि कशी देणार? हवामान बदलाचे दुष्परिणाम हे मूळ दुखण्याचे केवळ लक्षण आहे. घाव घालायला हवा तो मूळ दुखण्यावर. जंगलांचा विनाश टाळणे, जंगलाप्रमाणेच कार्बन शोषणाऱ्या सागरी पर्यावरणाचे जतन करणे ही आव्हाने बिकट होत चालली आहेत. सदतीस टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन घटविण्यात जंगलेच कारणीभूत ठरत असतात. परंतु जगभरच त्यांचा विनाश होत आहे. भारताचा विचार केला तर २०१९ आणि २०२० या वर्षांत येथील ३८. ५ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील जंगल तोडले गेले. हे प्रमाण एकूण वनाच्छादनाच्या १४ टक्के आहे. पाश्चात्त्यांच्या प्रदूषणकारी विकासनीतीकडे बोट दाखवून विकसनशील देशांची बाजू मांडणे योग्यच असले तरी प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर इतर उदयोन्मुख देशांसाठी धडा घालून देणे आवश्यक आहे. आपले 'मोठेपण' अधोरेखित होईल, ते अशा प्रयत्नांतून. पर्यावरणाच्या बाबतीतही मुद्दा केवळ अर्थ लावण्याचा नसून जग बदलण्याचा आहे!
तारकपूर आगारात प्रवाशांचे गुलाबपुष्पाने स्वागत - DNA Live24\nHome / Ahmednagar / City / तारकपूर आगारात प्रवाशांचे गुलाबपुष्पाने स्वागत\nतारकपूर आगारात प्रवाशांचे गुलाबपुष्पाने स्वागत\nअहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात अाले. परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवाशांनीही या उपक्रमाचे चांगले स्वागत केले.\nयावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ साहित्यिका लिला गोविलकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अशोक जाधव, यंत्र अभियंता उदयसिंग पाटील, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, माऊली वितरणचे संचालक सुभाष भांड, प्रा. संजय नगरकर, दक्षता अधिकारी विक्रम भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी जालिंदर शिरसाट, आगार व्यवस्थापक सुनील गायकवाड, आदी उपस्थित होते.\nगोविलकर म्हणाल्या, मराठी भाषा ही गृहस्वामिनी आहे. हिंदी, इंग्रजी आदी भाषा तिच्या मैत्रिणी आहेत. महाराष्ट्रातील संतांनी मराठी टिकविली. इंग्रजी शब्द वापरा पण इंग्रजीचे वर्चस्व टाळा. दररोज मराठी पुस्तकांतील किमान एक पान वाचावे व मराठीतून स्वाक्षरी करा. विभाग नियंत्रक जाधव यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाच्या कामांची माहिती दिली. राम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर सुनील गायकवाड यांनी आभार मानले.
Aai Mazi Kalubai : सध्या अभिनेता संग्राम साळवी हा सोनी मराठी या वाहिनीवर "आई माझी काळुबाई" या मालिकेमध्ये 'मिलिंद' नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये तो आपल्याला अभिनेत्री जानवी किल्लेकर (मालती) यांच्यासोबत अभिनय करताना दिसत आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापनाने जारी केलेल्या एका वक्तव्यामध्ये जन्मदर वाढण्यासाठी सध्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन धोरणानुसार सर्वात आधी देशाच्या पूर्वेकडील औद्योगिक क्षेत्रातील भागांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे असे चीन सरकारने स्पष्ट केले आहे. ईशान्य चीनमधील अनेक प्रांत हे औद्योगिक पट्ट्यात येतात. या ठिकाणी जन्मदर कमालीचा घटला आहे. २०१९ मध्ये तर जन्मदर हा १९४९ च्या जन्मदराइतका पडला होता. २०२० मध्येही चीनमधील जन्मदरात घसरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. २०२० मध्ये जन्मदर १५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २०२० मधील सविस्तर अहवाल एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित केला जणार आहे. लॉकडाऊन नंतर काही नवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करायला दाखल होत आहेत. या निमित्ताने अनेक कलाकार विविध भूमिकांमधून आपल्या भेटीस पुन्हा मालिकांतून येत आहेत. यातलं एक बहुचर्चित नाव म्हणजे स्मिता तांबे. स्मिता तांबे हे नाव मालिका आणि एकंदर मनोरंजनविश्वाला काही नवं नाही. त्यांनी करीयरच्या सुरुवातीपासूनच अनेक विविध भूमिका केल्या आहेत आणि त्यासाठी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आज त्यांच्या नवीन मालिकेनिमित्त त्यांच्याविषयी थोडसं. स्मिता ह्या मुळच्या साताऱ्याच्या. पण त्यांचे वडिल कामानिमित्त पुण्याला आले आणि त्याचं पूर्ण कुटुंब इथे स्थायिक झालं. तिथेच त्याचं सगळं शिक्षण झालं. शाळेत अभ्यासासोबतच इतर स्पर्धांमध्ये स्मिता या पुढे होत्या. एका मुलाखतीत नमूद केल्याप्रमाणे त्यांनी या काळात अनेक वादविवाद स्पर्धा जिंकल्या होत्या. तसेच कबड्डी च्या टीम मधूनही त्या खेळत. पण पुढे करियर म्हणून त्यांनी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला. तसा अभ्यास सुरु केला. एम.ए. एम. फिल. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो पर्यंत त्यांनी अभिनय हेच आपलं करियर असेल असं ठरवलं नव्हतं. पुढे जोगवा सारखा सिनेमा, तसेच नाटकांतून त्यांनी कामे सुरु केली. "हर हायनेस अनिता" हे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं नाटक ठरलं. या नाटकाच्या तालमींसाठी त्या पुण्याहून मुंबईला येत व त्याच दिवशी पुण्याला पुन्हा जात. असं करता करता, आपण हेच क्षेत्र निवडावं आणि मुंबईला कामानिमित्त राहावं असं त्यांना वाटलं. पुढे नाटकांसोबतच त्यांनी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम करायला सुरुवात केली. त्यांची गाजलेली नाटके म्हणजे, बापाचा बाप, श्रीमान योगी, हमिदाबाईची कोठी आणि अनेक.
भीषण अपघात. . . ट्रकचा टायर फुटल्याने बसला धडक बसून झालेल्या अपघातात २० प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वरोरा शहराजवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधील सिमेंटचे पाईप रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
Ahmednagar Army Public School Recruitment : अहमदनगरमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये एक भरती काढण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये कोणत्या आणि किती पदांसाठी भरती होणार आहे तसेच यासाठी कसा अर्ज करावा लागेल याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! 'हा' शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा.... कोणत्या पदासाठी होणार भरती? आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे मुख्याध्यापिका आणि विशेष शिक्षक या पदासाठी भरती होणार आहे. ही 2 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. मुख्याध्यापक : या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयातून पदवीधर असावा. सोबतच, सदर उमेदवाराने B. Ed/M. Ed आणि B. El. Ed/डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन घेतलेले असावे. यासह, किमान 08 वर्षांचा अध्यापनाचा अनुभवासह CBSE मान्यताप्राप्त शाळेत PRT म्हणून किमान 05 वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी एकदा अधिसूचना वाचावी. विशेष शिक्षक : यासाठी विशेष शिक्षणात बीएड पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे. हे पण वाचा :- शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात.... . अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये करायचा आहे. अर्जाचा नमुना www. apsahmednagar. com या संकेतस्थळावर जाऊन आपण डाउनलोड करू शकता. नमुन्यामध्ये अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C/O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर - 414002 या पत्त्यावर पाठवायचा आहे. या पदासाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज 25 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवता येणार आहे. या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण https://www. apsahmednagar. com/Home/Index या अहमदनगर आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
शहादा : धडगाव तालुक्यातील वनअधिकार कायद्यातील जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, 73 वनगावे तात्काळ महसूली करण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मागण्या मान्य होईर्पयत या कार्यालयावर पाच तास ठिय्या आदोलन करण्यात आले. अखेर सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे लेखी पत्र प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या सहीनिशी आदोलकांना देण्यात आले. शहादा प्रांताधकारी कार्यालयावर प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदोलकांचा वनअधिकार कायद्याची जनपक्षीय अमंलबजावणी होण्यासाठी मोर्चा नेण्यात आला. शहरातील मार्केट यार्डपासून मोर्चाला सुरुवात होऊन बसस्थानक, डोंगरगाव रोड, पटेल रेसीडेन्सी चौकमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. त्याठिकाणी घेराव घालत विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी प्रतिभा शिंदे यांनी मोर्चेकःयांना मार्गदर्शन केले. धडगाव तालुक्यातील 73 वनगावे महसुली करण्यात यावीत, वनजमीनधारकांचे अंशतः मंजूर केलेले पट्टे सर्व दावेदारांना पूर्णतः मंजूर करून तसा सातबारा उतारा तात्काळ देण्यात यावा, पाच हजार वनदावे प्रक्रियेमध्ये घ्यावेत, देवघरे समितीची यादी वनअधिकार समितींना उपलब्ध करून द्यावी. दावे मंजूर झालेल्या वनजमीन धारकांचे सपाटीकरण व बागायती करणे या योजना लागू कराव्यात, त्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, लेगापाणी ते गोरांबा व बिजरी-सिरसानी ते बोदला या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील निकृष्ट रस्ता कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी आदी मागण्या मंजूर झाल्याशिवाय न उठण्याचा निर्धार आदोलंकानी केला. त्यांनी सुमारे पाच तास या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. या वेळी झालेल्या बैठकीस शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, धडगावचे तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गावीत, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, धडगाव व शहाद्याचे कृषी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक संजय शुक्ल व सहकाःयांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की गूळ आणि मधामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे ते नुकसान करत नाहीत. मात्र, तसे नाही. तुम्हाला माहित आहे का की साखरेची कँडी या दोघांपेक्षा चांगली आहे आणि आयुर्वेदातही त्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वास्तविक, साखर परिष्कृत न करता, आपण साखर कँडी म्हणून वापरू शकता. साखर शुद्ध झाल्यावर त्यात अनेक रसायनेही मिसळली जातात. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की आपण साखर आणि मीठ कमी सेवन केले पाहिजे. पण त्याशिवाय आयुष्य सोपे नव्हते. आपण त्याऐवजी साखर कँडी वापरू शकता. चला तुम्हाला साखर कँडीचे फायदे सांगतो. आयुर्वेदात असे सांगितले आहे की साखर मिठाई खाल्ल्याने वजन वाढत नाही. त्यापेक्षा ज्यांना लठ्ठपणाची तक्रार आहे त्यांनी साखरेऐवजी साखरेचे सेवन करावे. एका बडीशेपसोबत साखरेची कँडी खाल्ल्याने चव तर येतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते. जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तर तुमच्या दिनचर्येत साखर कँडी खाणे सुरू करा. दुधासोबत साखर खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि शरीरात ऊर्जाही राहते. आजपासूनच त्याचा आहारात समावेश करा पण प्रमाणही लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का की साखरेची कँडी खाल्ल्याने आपली पचनक्रिया निरोगी राहते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी खाल्ल्यानंतर साखरेची कँडी खावी. पोटात गॅस किंवा पोटदुखीच्या तक्रारी साखर मिठाईने दूर केल्या जाऊ शकतात. तोंडात फोड येण्याची तक्रार असेल तर साखरेची मिठाई खाणे सुरू करा. साखर कँडीमध्ये अल्सर थंड करणारे घटक असतात आणि तोंडाच्या आतील त्वचेला बरे करण्यास मदत करतात. शरीरातील लोह किंवा रक्ताची कमतरता साखर कँडीने दूर केली जाऊ शकते. याची चव गोड असल्यामुळे मुलांना ते सेवन करायला आवडेल. Latest:
आज 'व्हॅलेंनटाईन डे', नागपूर : रविवार, १४ फेब्रुवारी प्रेमवीरांचा हक्काचा दिवस. या दिवसी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाबाचे फूल एकमेकांना देण्याची प्रथा आहे. 'व्हॅलेंनटाईन डे' निमित्ताने फूल बाजारात गेल्या तीन दिवसांत लाल डच गुलाबाची आवक वाढली असून जवळपास ५ लाख फुलांची आवक झाली. किरकोळमध्ये एका डच गुलाब फुलाचे भाव ४० रुपये होते. रविवारी दरवाढीची शक्यता आहे. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, व्हॅलेंनटाईन डे निमित्ताने पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातून डच गुलाबाची आवक वाढली आहे. बाजारात सहा जण या फुलांची विक्री करतात. त्याकडे जवळपास ५ लाख फुलांची आवक झाली आहे. शनिवारी ३५० ते ४०० रुपये बंडल (एक बंडल २० फुले) असे भाव होते. किरकोळ विक्रेत्यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि जास्त दराने विक्री केली. रविवारी आवक कमी राहणार आहे. यंदा लोकल गुलाबाची आवक कमी आहे. कोरोनामुळे अनेकांनी लागवड केली नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारीला सण साजरा करणाऱ्यांना डच गुलाब जास्त भावात खरेदी करावे लागतील.
Naad Khula: बाळासाहेबांचा झंझावात (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांचा झंझावात (Balasaheb Thackeray) बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. 'गर्व से कहो हम हिंदू है' या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.
नोटाबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा अमित शाह संचालक मंडळावर असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये या बँकेत ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. यानंतर हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीनंतर १० नोव्हेंबरपासून बँका व पोस्ट कार्यालयातून जुन्या नोटा बदलून नवीन देण्यात येत होत्या, मात्र पाच दिवसांनी देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. या पाच दिवसांच्या काळात जमा झालेल्या नोटा सरकारकडून बदलून देण्यात आल्या. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंदर्भातील माहिती मागवली. यात अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे समोर आले आहे. बँकेत नोटाबंदीच्या काळात ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. बँकेच्या वेबसाईटवर अमित शाह बँकेच्या संचालक मंडळावर असल्याचे दिसते. २००० साली अमित शाह बँकेच्या अध्यक्षपदी होते. यानंतर राजकोट जिल्हा सहकारी बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेने सुमारे ६९३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. या मुद्द्यावरुन विरोधक भाजपावर टीका करण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकार जम्मू- काश्मीरमधील राज्यपालपदावर राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला संधी देण्याचा विचार करत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राजकारणाशी संबंधित व्यक्तीला राज्यपालपदावर संधी देण्याची ही पहिलीच वेळ ठरु शकते. यापूर्वी जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदावर सैन्यदल, गुप्तर विभाग किंवा प्रशासकीय सेवेशी संबंधित व्यक्तीलाच संधी देण्यात आली होती. ही परंपरा आता मोदी सरकार मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू- काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीची साथ सोडत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे जम्मू- काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरचे विद्यमान राज्यपाल एन. एन. व्होरा यांचा कार्यकाळ २८ जून रोजी संपणार आहे. अमरनाथ यात्रा संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. अमरनाथ यात्रा २८ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यानंतरच राज्यपालपदावर नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. राज्यपालपदावर सैन्यदलाशी संबंधित व्यक्तीला संधी दिली तर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचा संदेश जाईल, अशी भीती भाजपाला वाटते. त्यामुळे या पदावर कोणाला संधी द्यायची असा पेच आहे. विद्यमान राज्यपाल व्होरा हे पंजाब कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी १९९० ते २००८ या कालावधीत जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदावर सैन्यदल किंवा गुप्तचर विभागाशी संबंधित व्यक्तीलाच संधी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशासकीय सेवेची पार्श्वभूमी असलेले व्होरा हे पहिलेच राज्यपाल ठरले. सॅन फ्रान्सिस्को : टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनींपैकी एक मानल्या जाणाऱ्या 'इंटेल'मध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे 'इंटेल'चे सीईओ ब्रायन क्रेझनिक यांना राजीनामा द्यावा लागला आहे. 58 वर्षीय क्रेझनिक हे काही काळापूर्वी एका ज्युनिओरसोबत परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये होते. मात्र या नातेसंबंधांमुळे कंपनीच्या मॅनेजर्ससाठी लागू असलेल्या धोरणांचं उल्लंघन झालं आहे, असं अंतर्गत आणि बाह्य समितीच्या चौकशीत उघड झालं. क्रेझनिक यांचे कुठल्या कर्मचाऱ्याशी नातेसंबंध होते, या रिलेशनशीपचा कालावधी किंवी अन्य कोणताही तपशील उघड करण्यास कंपनीने नकार दिला आहे. चौकशी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती इंटेल'तर्फे देण्यात आली आहे. क्रेझनिक यांनी 1982 मध्ये इंटेल' कंपनी जॉईन केली होती. मे 2013 पासून पाच वर्ष त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची धुरा सांभाळली आहे. क्रेझनिक पायउतार झाल्यानंतर रॉबर्ट स्वॉन यांना अंतरिम सीईओपद देण्यात आलं आहे. वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी नुकतंच गोंडस बाळाला जन्म दिला. पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत. ऑकलंडमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात आर्डर्न यांनी मुलीला जन्म दिला. यावेळी त्यांचे पती आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्डही सोबत होते. गेल्या वर्षी पदाची सूत्रं हाती घेताना 37 वर्षीय आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या देशाच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं. आता, पदावर असताना प्रसुत होणाऱ्याही त्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत. आर्डर्न मातृत्व रजेवर असेपर्यंत उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स पुढील सहा महिन्यांसाठी देशाचा कारभार सांभाळतील. न्यूझीलंडमध्ये 1893 साली महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आर्डर्न या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला आपण कार्यालयात परत येऊ. त्यानंतर पती बाळाची काळजी घेतील. देशाबाहेर कामानिमित्त जावं लागलं, तरी पती बाळाचा सांभाळ करतील, असं आर्डर्न यांनी सांगितलं. यापूर्वी 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला होता. मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'पनामा' प्रकरणात पुन्हा एकदा नवी कागदपत्रे समोर आली आहेत. या कागदपत्रांमध्ये बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱ्या अनेक मोठ्या भारतीय उद्योगपतींचीही नावे उघड झाली आहेत. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील शोधपत्रकारांनी यासंदर्भातील 12 लाख नव्या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे, ज्यातील 12 हजार पाने करचुकव्या भारतीय व्यवसायिकांशी संबंधित आहेत. तसेच नव्या कागदपत्रांमुळे या प्रकरणात अगोदर उघड झालेल्या व्यक्तींच्या करचुकवेगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. नव्या कागदपत्रांत कोणाकोणाचे नाव - उघड झालेल्या नव्या कागदपत्रांत भारतातील दिग्गज उद्योगपतींची नावे समोर आली आहेत. यामध्ये पीव्हीआरचे मालक अजय बिजली आणि त्यांचे कुटुंबीय, हाईक मेसेंजरचा सीईओ आणि सुनील मित्तल यांचा मुलगा कवीन मित्तल, एशियन पेंट्सचे सीईओ अश्विन दानींचा मुलगा जलज दानी यांचा समावेश आहे. कोटाः आंतरराष्ट्रीय योग दिनी योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या प्रसंगी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंदरा राजेही उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं हे चौथं वर्ष असून २०१५मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला होता. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमासाठी रामदेव बाबांना निमंत्रण दिलं होतं. यावेळी कार्यक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमदेखील उपस्थित होती. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगासनासाठी २ लाखांहून अधिक लोक कोटा येथे जमले होते. हजारो विद्यार्थी योग शिबिरात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त करण्यासाठी योग सर्वात योग्य पद्धत आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं. बाबा रामदेव यांनी मागील वर्षी २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं होतं. त्यावेळी त्यांनी ५४,५२२ लोकांसोबत योगा केला होता. त्याआधी त्यांनी ३५,९८४ लोकांसोबत एकत्र योग अभ्यास केला होता. या योग शिबिरात पंतप्रधानही सहभागी झाले होते. बोस्टन : अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे. अतुल गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या तिन्ही कंपन्यांनी बुधवारी गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीरच केले. या नव्या कंपनीचे मुख्यालय बोस्टनमध्ये असेल. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे एंडोक्राइन सर्जन आहेत. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत. कमी खर्चात चांगल्या आरोग्य व वैद्यकीय सेवा देणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ना नफा तत्त्वावर आम्ही ही कंपनी सुरू करीत आहोत, असे बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांनी स्पष्ट केले. डॉ. गावंडे या कामात आम्हाला यश मिळवून देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. डॉ. अतुल गावंडे अनेक वर्षे अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी काम करीत असून, अमेरिकेतील वैद्यकीय उपचार, आरोग्य व त्यावरील खर्च यावर त्यांनी अनेकदा सडकून टीकाही केली आहे. अतुल गावंडे जसे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहेत, तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यामुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल. वॉशिंग्टन- पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातल्या 400हून अधिक प्रकाशनांनी चार्ल्स क्रॉथम्मर यांचे लेख छापले होते. अनेक वर्षांपासून क्रॉथम्मर यांना कर्करोगानं पछाडलं होतं. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पोटातून कर्करोगाची गाठ काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी रक्त तपासणी केली असता कर्करोगानं पुन्हा डोकं वर काढल्याचं त्यांना समजलं. तसेच कर्करोग शरीरात वेगानं पसरत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. 8 जून रोजी क्रॉथम्मर डॉक्टरांकडे नियमित तपासणीकरिता गेले असता डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून तुमच्याकडे फक्त आठवड्याभराचा वेळ असल्याचं त्यांना सांगितलं. मृत्यूपूर्वी त्यांनी एक विधानही केलं होतं. हा अंतिम निर्णय आहे. माझा लढा आता संपला आहे, असं म्हणत त्यांनी प्राण सोडले आहेत. १६३३ः गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले. १८९७ः पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले. १९४०ः दुसरे महायुद्ध - फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. १९४०ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. १९४१ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली. १९७८ः जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला. १९८४ः व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली. १९८६ः अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला. १९९४ः महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण. २००७ः अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले. १८०५ः इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यूः १० मार्च १८७२) १८८७ः ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यूः १४ फेब्रुवारी १९७५) १८९६ः नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म. १८९९ः मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यूः १४ डिसेंबर १९८०) १९०८ः महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यूः ९ एप्रिल १९९८) १९२७ः भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म. (मृत्यूः १२ फेब्रुवारी २०१५) १९३२ः आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यूः १२ जानेवारी २००५ - मुंबई, महाराष्ट्र) १९५५ः लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्मः १८ ऑगस्ट १९२३) १९९३ः चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन. १९९४ः चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्मः १७ जानेवारी १९०८) २०१४ः भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्मः ३ एप्रिल १९४९) © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
गोवा, 18 जून : गोव्यातल्या सिकेरी समुद्रकिनारी अगदी जवळ लाटांचा आनंद घेत खडकावर बसलेल्या तामिळनाडूच्या तीन पर्यटकांपैकी एकाचा लाटांच्या तडाख्यात बुडून मृत्यू झालाय. तामिळनाडूच्या चार पर्यटकांचा एक गृप सिकेरीच्या बीचवर फिरण्यासाठी गेला होता. त्यातले तिघे अगदी लाटांच्या जवळ गेले होते. मात्र जोराच्या लाटेने त्यातल्या एकाचा बळी घेतलाय. तर दुसऱ्या एका गोव्यातल्याच बागा बीच जवळ झालेल्या दुर्घटनेत अशाच प्रकारे लाटांचा आनंद घेणाऱ्या मंगळूरहून आलेल्या चार पर्यटकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झालाय. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
संगमनेर तालुक्यातील कसारे गावच्या सरपंचांना चक्क चपलेचा हार घालून त्यांचा पाणउतारा करन्यात आला आहे. या घटनेने अहमदनगर जिल्हात ऐकच खळबळ उडालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कसारे गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावच्या दलित सरपंचाला गावातील समाजकंटकांनी चपलेचा हार घातल्याचा गावच्या सरपंचाने केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद अनुसूचित जातीजमातीसाठी राखीव ठेवले गेले होते. यात महेश अण्णासाहेब बोराडे हे या समाजातून येत असल्याने त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. याच राग मनात धरुन या नवनिर्वाचित सरपंचाला चपलेचा हार घातल्याचा आरोप या सरपंचाने केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात ३(१)(D) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या गळ्यात पादत्रानांची माळ घालणे आणि ३(१)(w)(१) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या स्त्रीला ती अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे. याची माहिती असताना तिला जाणूनबुजून तिची संमती नसताना स्पर्श करणे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींनी देखील सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
लक्षावधी नेटिझन्सच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी फेसबुक कंपनीची 'द यूएस फेडरल ट्रेड कमिशन'द्वारे चौकशी करण्यात येणार आहे. केंब्रिज अॅनालिटिका संस्थेने फेसबुककडून लाखो युजर्सचा डेटा मिळवला कसा यासंदर्भातली ही चौकशी आहे. 5 कोटी युझर्सचा डेटा लीक केल्याप्रकरणी फेसबुकवर जगभरातून टीका होते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक मोहीमेत हा डेटा वापरण्यात आल्याची चर्चा आहे. युझर्सची प्रायव्हसी अर्थात खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रेड कमिशनद्वारे फेसबुकची चौकशी होणार आहे. फेसबुकद्वारे डेटा लीक प्रकरण आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे असं फेडरल ट्रेड कमिशनचे कन्झ्युमर प्रोटेक्शन प्रमुख टॉम पॅहल यांनी सांगितलं. वापरकर्त्यांची गोपनीय माहिती लीक करणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजावर आमचं बारिक लक्ष असून, त्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाते. आपली गोपनीय माहिती कुठल्याही व्यापारी, व्यावसायिक कामासाठी दिली जात असेल तर फेसबुकने नियमानुसार त्याची कल्पना युझर्सना देणं अनिवार्य आहे. दरम्यान फेडरल ट्रेड कमिशनद्वारे मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर भूमिका मांडायला आवडेल असं फेसबुकचे डेप्युटी चीफ प्रायव्हसी ऑफिसर रॉब शेरमन यांनी 'सीएनबीसी'ला सांगितलं. पर्सनॅलिटी क्विझ विचारून एका अॅपच्या माध्यमातून गोपनीय माहिती जमा करण्यात आली. केवळ 2,70,000 नेटिझन्सनी क्विझ पूर्ण सोडवली. मात्र त्याहून अधिक कोट्यवधी नेटिझन्सची माहिती फेसबुककडे जमा झाली. गोपनीय माहिती लीक होऊ नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग्ज बदलल्याचं फेसबुकने सांगितलं. डेटा लीकप्रकरणी अमेरिकेच्या बाजारतलं फेसबुकचं मूल्यांकन 55 बिलिअन डॉलर्सनी घसरलं आहे. फेडरल ट्रेड कमिशनकडून फेसबुकची चौकशी होणार असल्याचं कळल्यानंतर मूल्यांकनानंतर आणखी 5 टक्क्यांची घसरण झाली होती. युके डेटा प्रोटेक्शन रेग्युलेटर आणि युरोपियन कमिशनद्वारेही फेसबुकची चौकशी होणार आहे. डेटा लीकप्रकरणी फेसबुकने अमेरिका आणि युकेमध्ये दिलगिरी व्यक्त करणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चौकशीची घोषणा करण्यात आली. डेटा लीकप्रकरणी आम्ही आणखी कठोर उपाययोजना करू शकलो असतो अशा शब्दांत फेसबुकचा संस्थापक मार्क झुगरबर्ग यांनी माफी मागितली होती. 'हा विश्वासघात आहे. त्याबद्दल मी माफी मागतो', असं त्यांनी पुढे सांगितलं. यापुढे असं डेटा लीक होऊ नये यासाठी पावलं उचलली आहेत असं फेसबुकने स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. )
- संत ज्ञानेश्वरांची पालखी आज बरड मुक्कामी असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटण मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. - संत तुकारामांची पालखी आज इंदापूर मुक्कामी असणार आहे. इंदापूर येथे गोल रिंगण होणार आहे. - संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन होणार आहे. आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापुरातील उळेगावात पालखीचे मुक्काम असेल. त्यानंतर सोलापूर शहरात सकाळी पालखीचे आगमन होईल. - मोदी आज अमेकिन काँग्रेस (संसद) च्या संयुक्त सत्राला संबोधित करणार आहेत. - जो बायडन यांच्या बरोबर मोदी रात्रीचं भोजन करतील. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढचे तीन दिवस दरेगावात असणार आहेत. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम, पक्षाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. - यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव यशस्विनी सन्मान सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी शबाना आझमी, जावेद अख्तर उपस्थित रहाणार आहेत, - रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दुग्ध विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूध दर प्रश्नासंदर्भात बैठक होणार आहे. - गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन होणार आहे. आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापुरातील उळेगावात पालखीचे मुक्काम असेल. त्यानंतर सोलापूर शहरात सकाळी पालखीचे आगमन होईल. दरवर्षी शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पालखीचे स्वागत करत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत केले जात आहे. - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आहेत. - जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघासाठीच्या संयुक्त विचारविनिमय समितीची मंत्रालयात महत्वाची बैठक होणार आहे. - समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. - साल 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्यात. शेवटच्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली जाणार. - येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि एसीबीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.
तीन साक्षीदार आहेतः आत्मा, पाणी आणि रक्त, आणि तिघेही एकच साक्ष देतात. 'जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एका पुत्राविषयीची आहे. 1 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. "ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही. तर आम्हांस माहीत आहे की जे काही आम्ही मागितले आहे ते आम्हांला मिळालेच आहे. 16 जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठी त्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्ये पडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्या पापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. "सर्व अनीति हे पाप आहे, असे पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. 18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही. 9 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे. 24 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तिपूजेपासून दूर राखा. आता आपल्याला अनंतकाळचे जीवन आहे 13जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्चिंत असावे, 14आणि आम्हांला देवामध्ये खात्री आहे की, जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, तेव्हा तो आमचे ऐकतो. 15 आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो, तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली,
नाशिक महानगर पालिकेची (Nashik Municipal Corporation) नाशिक (nashik) - सिन्नर (sinnar) सिटीलिंक (Citylink) बससेवा (Bus service) सुरु असून या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, सायंकाळी 6 नंतर नाशिकहून सिन्नरसाठी बसेस फारच कमी असल्याने प्रवाशांंचे हाल होत आहेत. सायंकाळी 6 नंतर नाशिकहून बसेस (bus) वाढवण्याची मागणी प्रवाशांनी सिटीलिंकचे व्यवस्थापक राजेश वाघ (Rajesh Wagh, Manager, Citylink) यांना निवेदन (memorandum) देत केली आहे. सिटीलिंक बससेवेचा (Citylink bus service) पहिल्या दिवसापासून सिन्नकर (sinnar) लाभ घेत आहेत. दररोज शिक्षण (education) अथवा नोकरीसाठी नाशिकला जाणार्या सिन्नरकरांना या बससेवेचा फायदाही होत आहे. नाशिकला जाण्यासाठी सकाळी साडे सात वाजेपासून दर 15 मिनिटाला बसेस आहेत. त्यामुळे नाशिकला जाणार्यांची चांगली सोय झाली आहे. मात्र, सायंकाळी नाशिकहुन परततांना सहा वाजेनंतर बसेसची संख्या फारच कमी आहे. ज्या बसेस आहेत, त्याही छोट्या आहेत. त्यात पुरेसे प्रवासी बसू शकत नाहीत. सहा वाजेनंतर दर अर्धा तासाने बसेस असल्याने सिन्नरला जाणार्या प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. नोकरी व्यवसायानिमित्त नाशिकला (nashik) दररोज येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सायंकाळी सिन्नरला परतण्यासाठी पुरेशा प्रमाणात बसेस नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. बसेसमध्ये उभे राहायलाही जागा नसते, एवढी प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामूळे अनेक प्रवासी इतर पर्यायांचा विचार करु लागले आहेत. हे प्रवासी परिवहन महामंडळाच्या बसेसकडे वळण्यापूर्वीच सायंकाळी 6 नंतर किमान तासभर सिन्नरसाठी दर 15 मिनिटांनी बसेस सोडाव्यात व प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर करण आसावा, दिलीप बाकळे, सुनिल दिघे, प्रशांत पाटील, राहूल जाधव, प्रतिक बढे, मिलिंद जाधव, निखिल उगले यांच्यासह प्रवाशांच्या सह्या आहेत.
बुलेट ट्रेनच्या वेगानं मराठा आरक्षणावर न्याय द्या अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारकडे केली. मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असून मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याचं संजय राऊत म्हणाले. मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे लोक रस्त्यावर उतरले मात्र त्यांच्यासाठी सरकारला वेळ का नाही असा सवालही त्यांनी या वेळी केला. तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ आहे. मग त्यापद्धतीनं मंत्र्यांची मालमत्ताही जाहीर केली पाहिजे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
मेमरीमध्ये संग्रहित केले पाहिजे. तर, त्याऐवजी एका वेळी एक ब्लॉक वाचण्याऐवजी, काय केले जाऊ शकते ते म्हणजे प्रत्येक वेळी बीबी ब्लॉक्स वाचले जाऊ शकतात. तर, त्यासाठी आवश्यक असलेल्या पासची संख्या आर आणि एससाठी आहे आणि अर्थातच हे कमाल मर्यादा कार्य आहे. म्हणून, बीबी ब्लॉक्स मेमरीमध्ये संग्रहित केले जाऊ शकतात तर या पुष्कळ सीक्स आणि ट्रान्सफरची आवश्यकता आहे. तर, हे ठीक आहे आणि जर संबंधांची क्रमवारी लावलेली नसेल तर दुय्यम निर्देशांक वापरला जाऊ शकतो किंवा संबंधांची क्रमवारी लावावी लागेल. मग तेथे आणखी एक अल्गोरिदम आहे ज्याला संकरित विलीन जॉइन म्हणतात, जेथे हे होते की तेथे संबंधांचे एक क्रमवारी लावली जाते, परंतु दुसऱ्या रिलेशनमध्ये एक इंडेक्स तयार केलेला असतो जो त्यास अनुक्रमणिका बनवितो; म्हणजेच ते तयार केलेले बी + ट्री इंडेक्स आहे. तर हे केले जात आहे की, या ब्लॉकमधील नोंदी आणि त्यातील नोंदी एक-एक करून वाचल्या जातात आणि मग दुसऱ्या नात्यातील जुळणारे ट्युप्ल्स मिळविण्यासाठी इंडेक्समध्ये क्वेरी केली जाते. तर हे केले जाऊ शकते आणि हे अल्गोरिदम आहे, त्यानंतर हायब्रीड मर्ज असे म्हणतात याला एक संकर म्हणतात, कारण त्या सर्वांना क्रमवारी लावलेली नसते तर दुसरी अनुक्रमित होते. म्हणूनच याला हायब्रिड मर्ज जॉइन असे म्हणतात.
पुणे - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडप्रकरणी पुणे पोलिसांनी शूटर संतोष जाधवला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जाधव हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव यांच्या साथीदारालाही अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंतकुमार सरंगल आज सकाळी या घडामोडींची माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य जाधव याला 2021 मध्ये, पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते. वर्षभरापासून तो फरार होता. अधिकाऱ्याने सांगितले की, मूसवाला खून प्रकरणात त्याची आणि नागनाथ सूर्यवंशी यांची नावे समोर आली आहेत. त्याचा शोध करत पुणे ग्रामीण पोलिसांनी 2021 च्या खून प्रकरणानंतर जाधवला आश्रय देणारा आरोपी सिद्धेश कांबळे उर्फ महाकाळ याला आधीच अटक केली आहे. मंचर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मकोकाच्या गुन्ह्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी बिष्णोई टोळीचा सदस्य महाकाल याला अटक केली होती. मुसेवाला हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलनेही त्याची चौकशी केली होती. चित्रपट पटकथा लेखक सलीम खान आणि त्याचा अभिनेता-मुलगा सलमान खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी महाकालचीही चौकशी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी जाधवचा शोध घेण्यासाठी गेल्या आठवड्यात अनेक पथके गुजरात आणि राजस्थानला पाठवली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आता जाहिरातीसाठी करण्यात येणार आहे. आर्थिक कारणासाठी नाही तर या स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित व व्यवस्थित व्हावी, यासाठी हा विचार करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. पुणे : शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आता जाहिरातीसाठी करण्यात येणार आहे. आर्थिक कारणासाठी नाही तर या स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित व व्यवस्थित व्हावी, यासाठी हा विचार करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. शहरातील ४९३ पैकी २५० मोठ्या व वर्दळीच्या ठिकाणावरच्या स्वच्छतागृहांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या वरच्या भागावर डिजिटल जाहिरात करता येईल. दर्शनी भागाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना अॅक्रेलिकच्या फ्रेम लावता येणार आहेत. त्याचा आकार स्वच्छतागृहाच्या भिंतींच्या आकारावर ठरवण्यात येईल. अत्यंत कमी दरात (साधारण २२० रुपये चौरस फूट) कंपन्यांना ही जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबदल्यात जाहिरातदार कंपनीने त्या स्वच्छतागृहाची साफसफाईची जबाबदारी घ्यायची आहे. कर्वेरस्ता येथील नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या परिसरातील महापालिकेची दोन स्वच्छतागृहे या पद्धतीने खासगी कंपन्यांनाच चालवायला दिली आहेत. जाहिरातीसाठी म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून ते हे काम करतात. त्यासाठी वर्षाला १ ते सव्वा लाख रुपये खर्च त्यांना येतो. नळस्टॉप येथे पुरुषांचे तर एसएनडीटी चौकात महिलांसाठीचे स्वच्छतागृह या पद्धतीने गेले तब्बल तीन वर्षे चालवले जात आहे. परिसरातील सर्वच नागरिकांची या स्वच्छतागृहांबाबत, तिथे दुर्गंधी येते, पाणी बाहेर वाहते अशी या तीन वर्षांत एकदाही तक्रार आलेली नाही. त्याच धर्तीवर पण महापालिकेला अल्प उत्पन्न मिळवून देणारा हा प्रस्ताव आकाशचिन्ह विभागाने तयार केला आहे. सध्या महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची वरची जागा व भिंतीही मोकळ्या असतात. त्यावर शिकवणी वर्गाच्या, राजकीय पक्षांच्या, जाहीर कार्यक्रमांच्या, सांस्कृतिक उपक्रमांच्या जाहिराती चिकटवल्या जातात. वरच्या बाजूलाही फलक लावून त्या जागेचा वापर केला जातो. याचे कसलेही पैसे महापालिकेला मिळत नाहीत व शहराचे विद्रूपीकरणही होत असते. त्यामुळेच अल्प पैसे आकारून जाहिरातींना परवानगी द्यायची व त्या बदल्यात त्यांच्यावर त्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईची जबाबदारी टाकायची, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांकडून महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांना विरोध होता. त्यातूनच स्थानिक नगरसेवकांकडे ती स्वच्छतागृहे पाडून टाकण्याचा आग्रह धरला जातो. अनेक प्रभागांमधील स्वच्छतागृहे यामुळे पाडून टाकण्यात आली असून त्यामुळे परिसरात येणाºया नागरिकांची अडचण होते. प्रामुख्याने वर्दळीच्या भागात, बाजारपेठेत ही अडचण जास्त होते. विशेषतः महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रस्तावामुळे ही अडचण दूर होईल, कंपन्यांना स्वस्त दरात जाहिरात करायला मिळेल व स्वच्छतागृहांची स्वच्छताही राहील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. १शहरातील महापालिकेच्या अन्य स्वच्छतागृहांच्या साफसफाईची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांवर आहे. त्यांच्याकडून ती व्यवस्थित पार पाडली जात नाही. त्यामुळेच शहरातील बहुसंख्य स्वच्छतागृहांची अवस्था दुर्गंधीयुक्त, आत पाऊलही ठेवता येणार नाही अशी असते. २कर्मचारी वेळेवर येत नाहीत, आले तर व्यवस्थित काम करत नाहीत, काही ठिकाणी वापर जास्त असल्यामुळे स्वच्छता ठेवली तरीही ती कायम राहत नाही, कर्मचारी दिवसभर उपस्थित नसतात, त्यामुळे ते आहेत तोपर्यंत स्वच्छ व ते गेले की अस्वच्छता असेही प्रकार काही ठिकाणी आहेत. अन्य जाहिरातींकरिता महापालिका आकारते त्यापेक्षा अत्यंत कमी दर यासाठी आकारण्यात येणार आहे. साधारण वर्षभराच्या मुदतीकरिता ते स्वच्छतागृह कंपनीला देण्यात येईल. त्यांच्याकडून चांगला अनुभव आला तर तो करार पुढेही सुरू ठेवण्यात येईल किंवा त्यांना नको असल्यास दुसºया कंपनीला ती जागा जाहिरातीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. स्थायी समितीसमोर लवकरच हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. तुषार दौंडकर, खासगी कंपन्यांना स्वच्छतागृह चालवण्यास देण्याआधी या भागातील नागरिकांकडून स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र आता त्या कंपन्यांनी फारच चांगल्या प्रकारे दोन्ही स्वच्छतागृहांची व्यवस्था ठेवली आहे. शहरातील अन्य स्वच्छतागृहांसाठी, त्यातही महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांसाठी असे केले जात असेल तर ते चांगलेच आहे. माधुरी सहस्रबुद्धे,
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. परंतु चौकशी दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लाईफलाईन केअर रुग्णालयात अडसूळ यांना दाखल करण्यात आले आहे. अडसूळ यांची ईडी चौकशी करण्यासाठी ईडीचा एक अधिकारी सध्या रुग्णालयातच उपस्थित आहे. ज्या क्षणी अडसूळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल तेव्हा ईडी त्यांना ताब्यात घेईल असे सांगण्यात येत आहे. सोमवारी ईडीचे पथक अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते. चौकशीसाठी अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतलं होते अशा चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांची ईडी चौकशी सुरु आहे. अडसूळ यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे एक पथक मुंबईतील घरी दाखल झाले होते. यावेळी ईडीने चौकशीदरम्यान त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली होती. परंतु चौकशीदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे रुग्णावाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अडसूळ सध्या रुग्णालयातच असून त्यांना सोडल्यावर ताक्काळ ईडी चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी ईडीचा एक अधिकारीही रुग्णालयात हजर आहे.
अटकळी(दीपक दारोकार)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अटकळी ता. तेल्हारा येथे सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त बालिका दिन साजरा करण्यात आला व प्रभात फेरी काढण्यात आली लेक वाचवा लेक शिकवा, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असा संदेश प्रभात फेरीतून देण्यात आला मुला, मुलींनी भाषणातुन व कविता सादर करुण सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला शाळेचे मुख्याद्यापक,शिक्षीका, ग्राम पंचायत अटकळी चे सरपंच, ग्रा. शि. स. अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्त उपस्थित होते. अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. ३१ जुलैपर्यंत ही पडताळणी पूर्ण करावयाची असून, सध्या सर्व कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत. मे महिन्यात जिल्ह्यांतर्गत १४०२ तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत ५८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मराठी माध्यमाच्या एकूण १३३१ जणांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या असून, ऊर्दू माध्यमाच्या ७१ बदल्या झाल्या. मराठी माध्यमातील ३३ मुख्याध्यापक, २६२ पदवीधर शिक्षक, १०३६ सहायक शिक्षकांचा या बदलीमध्ये समावेश आहे तर ऊर्दू माध्यमातील एक मुख्याध्यापक, १७ पदवीधर शिक्षक व ५३ सहायक शिक्षकांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील एकूण २५४, मालेगाव तालुक्यातील एकूण २५१, मानोरा तालुक्यातील एकूण १९५, मंगरूळपीर तालुक्यातील एकूण २०२, रिसोड तालुक्यातील एकूण १९० आणि वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ३१० अशा एकूण १४०२ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या. यामध्ये एक ते चार संवर्गातील काही शिक्षकांनी बदलीसाठी विशिष्ट संवर्गाचे पुरावे सादर करून सवलतीचा लाभ घेतला. बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या एक ते चार संवर्गातील शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची १०० टक्के पडताळणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी केली जात असून, काही शिक्षकांनीदेखील गटशिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केल्या आहेत. विशेषतः अपंग प्रमाणपत्रावर अनेकांचा संशय असून, त्या दृष्टिकोनातून या पथकातील आरोग्य अधिकाºयांमार्फत अपंग प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी 'गॉड फादर'मार्फत फिल्डिंग लावली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
पती-पत्नीचे नाते घट्ट करायचे असेल तर बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चांगले चित्र लावा. राधा-कृष्णाचे चित्र पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढवते. जर पती-पत्नीचे नाते चांगले नसेल, प्रेमाची कमतरता असेल तर बेडरूममध्ये दोघांचे फोटो लावणे फायदेशीर ठरेल. बेडरूममध्ये फक्त राधा-कृष्णाचेच चित्र लावावे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांकडे आनंदाने आणि प्रेमाने पाहत आहेत. यामुळे पती-पत्नीमधील कटुता संपते. दोघांमध्ये प्रेम वाढतं. बेडरुमच्या भिंतीवर राधा-कृष्ण या जोडप्याचे चित्र अशा प्रकारे लावा की, सकाळ संध्याकाळ त्यांची नजर त्या चित्रावर पडेल. यामुळे त्यांच्यातील रागरूसवा कमी होतो आणि प्रेम वाढते. तुम्ही राधाकृष्णाचे चित्र विकत घेता तेव्हा ते लाल फ्रेममध्ये असेल याची खात्री करा. लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे घरामध्ये असे चित्र लावल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि शांती वाढते. असे मानले जाते की घरात राधाकृष्णाचे चित्र लावल्याने अनेक समस्या दूर होतात. राधा कृष्ण हे अखंड प्रेमासाठी ओळखले जाते. त्यामुळे बेडरूममध्ये त्यांच्या चित्रासमोर तुमचा फोटो लावा. त्यामुळे दोघांमधील प्रेम वाढते.
रंगांचा उत्सव म्हणजे होळी. या दिवशी एकमेकांना रंग लावून या सणाचा आनंद घेतला जातो. पण रंग (Color) खेळताना केसांची (Hair) आणि त्वचेची (Skin) काळजी घेणे आवश्यक आहे. करना रंगांमध्ये भेसळ असल्याने केस आणि त्वचा खराब होऊ शकते. जाणून घेऊया होळी (Holi) खेळण्यापूर्वी आणि नंतर केसांची काळजी कशी घ्यावी. (Holi Hair Care Tips) * केसांना फाटे फुटले असेल तर ते काढून टाकावे. कारण रंग खेळताना केस अधिक खराब होऊ शकतात. * रंग खेळण्यापूर्वी केस चांगले धुवावे. तसेच तेल लावायला विसरु नका. कारण केसांमधील रंग लवकर निघून जणीस मदत मिळते. * आजच्या दिवशी तुम्ही या टिप्स फॉलो केल्यास केसचे आरोग्य चांगले राहील. * होळी (Holi) खेळणे झाल्यानंतर रंग केसांमध्ये अधिककाळ राहू देवू नका. केस लगेच स्वच्छ पाण्याने धुवावे. केस धुण्यापूर्वी एकदा विचारावे, यामुळे केसामधील बरच रंग निघून जाण्यास मदत मिळते. * होळी खेळल्यानंतर केवळ शॅम्पू करणे पुरेसे नाही. केसांमधील (Hair)रंग निघून जाण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हेअर मास्क लावावे. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. घरात असलेल्या अंडी, दही, लिंबू आणि इतर वस्तूपासून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
जामखेड : जामखेड तालुक्यातील चोभेवाडी शिवारातून भरधाव वेगाने जाणा-या इंग्लिश स्कुल व्हॅनच्या चालकाचे अवघड वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. यातील एका गंभीर जखमी विद्यार्थ्यावर जामखेडमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीचालक फरार झाल्याने जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी १०८ रूग्णवाहिकेच्या मदतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामखेड तालुक्यातील जवळा येथील क्रांती ज्योती इंग्लिश मेडीयम स्कुलची स्कुल व्हॅन (एमएच १६ सीसी ३२९१) नेहमीप्रमाणे जवळके, चोभेवाडी, खुटेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जवळ्याकडे नान्नजमार्गे निघाली असताना चोभेवाडी शिवारातील एका वळणावर ही गाडी आली असता भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दहा फुट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. दरम्यान गाडी पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्याऐवजी चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. गाडीचालकही जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शेतात काम करणारे शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत गाडीतील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. अपघातामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरलेले होते. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी तातडीने नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ अॅब्युलन्सच्या मदतीने दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने जखमींवर इतर कर्मचा-यांनी उपचार केले. काही वेळाने दुसरे वैद्यकीय अधिकारी प्रदिप खर्डे हे नान्नजला दाखल झाले त्यांनी किरकोळ जखमी असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली. या अपघातात अक्षय बंडू वाळूंजकर (वय ४ वर्षे), प्रशांत बालाजी देशमुख (वय ६ वर्षे), सार्थक शिवाजी बळे (वय ८ वर्षे), कुणाल विनोद बोराटे (वय ६ वर्षे) सार्थक परशुराम इंगळे (वय ६ वर्षे), भरतरीनाथ शिवाजी बळे (वय ६ वर्षे) सर्व राहणार जवळके सटवाई ता. जामखेड हे सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी घरी सोडून देण्यात आले. दरम्यान या अपघातात चोभेवाडी येथील अर्थव आप्पासाहेब खोटे (वय ५ वर्षे) या विद्यार्थ्याच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जामखेड येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे पद २०१७ पासून रिक्त आहे. या ठिकाणी तात्पुरत्या नेमणूका असलेले अधिकारी दोन वर्षांपासुन कार्यरत आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी नेमणूकीस नसल्यामुळे या भागातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. येथील आरोग्य सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. कर्मचारी मनमानी कारभार करताना दिसत आहेत. या ठिकाणी तातडीने निवासी वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक करावी अशी मागणी या भागातून जोर धरत आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजल्यानंतर घाबरलेले पालक तसेच नागरिकांनी नान्नजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे चिमुकले विद्यार्थी जास्तच घाबरून गेले होते.
मुंबईः मराठी मालिका सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. मालिकांमध्ये येणारे भन्नाट ट्विस्ट , नवीन पात्रांची एन्ट्रीमुळं प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण होतेय. लोकप्रियतेवरून मालिकेचा टीआरपी ठरतो आणि कोणती मालिका वरचढ ठरली, हे दर आठवड्याला टीआरपीवरून कळतं. काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूस मालिकेला मागे टाकत ' आई कुठे काय करते' या मालिकेनं अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत संवेदनशील विषय मांडला गेला. 'आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का' या विषयावर भाष्य करणारे तीन भाग नुकतेच होऊन गेले. मालिकेत गौरी आणि यशच्या साखरपुड्याचा हा प्रसंग १७ कलाकारांच्या उपस्थितीत तीन दिवस चित्रित केला गेला. आई होणं, न होणं आणि स्त्रीत्व यावर आजही ठामपणे मत मांडलं जात नाही. हा प्रश्न मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर देखील मालिकेची प्रचंड चर्चा सुरू होती. देवमाणूस मालिकेत देवीसिंगला पुराव्यांच्या अभावी निर्दोश घोषित करण्यात आलं. त्याची सुटका झाल्यानंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चंदाची एन्ट्री झाली असली मालिकेत आता काही राहिलं नसल्याचं नेटकरी सोशल मीडियावर म्हणताता दिसून येत आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत देवमाणूस मालिता दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका असून चौथा क्रमांक 'सुख म्हणजे नक्की काय असतं? ' या मालिकेला मिळाला आहे. तर पाचव्या क्रमांकावर 'मुलगी झाली हो' ही मालिका आहे.
मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. 2011नंतर प्रथमच वर्ल्ड कप उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे. 1992नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धा राऊंड रॉबीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा यापूर्वीच्या स्पर्धांपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे कोहलीला वाटते. तो म्हणाला,"या फॉरमॅटमुळे वर्ल्ड कपमधील चुरस अधिक वाढवली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली आहे. 2015नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीनं आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्ट्या कशा आहेत यापेक्षा तणाव कसा हाताळतो, हे महत्त्वाचे आहे. " 5 जूनला भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
Coronavirus In India : बुधवारी रोजी एकूण ३ लाख १४ हजार ८३५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचलीय. हायलाइट्सः नवी दिल्ली : देशात, बुधवारी (२१ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख १४ हजार ८३५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत देशात तब्बल २ हजार १०४ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात मंगळवारी एकूण १ लाख ७८ हजार ८४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८४ हजार ६५७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २२ लाख ९१ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २७ कोटी २७ लाख ०५ हजार १०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १६ लाख ५१ हजार ७११ नमुन्यांची करोना चाचणी बुधवारी करण्यात आली. राजधानी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार वालिया यांचं करोना संसर्गामुळे निधन झालंय. ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री १. ३० वाजल्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करीत होते, असा पोलिसांना संशय आहे. नवी दिल्ली : सीएएविरोधी आंदोलनाचा आयसिसशी कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासंबंधी दोघांना अटक झाली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. कारण, या संघटनेशी संबंधित एका दाम्पत्याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. दिल्लीचे पोलीस उपाध्यक्ष प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले, ओखलाच्या जामियानगरमधून एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जहानजेब सामी आणि हिना बशीर बेग अशी या नवरा-बायकोची नावं आहेत. या दोघांचा संबंध आयसिसच्या खुरासान मॉड्यूलशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करीत होते, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत सध्या अनेक ठिकाणी सीएए, एनआरसीविरोधात आंदोलनं सुरु आहेत. जामिया येथील शाहीन बाग भाग यांपैकी एक आहे. शाहीन बागेत आंदोलकांनी एक मुख्य रस्ता बंद केला आहे. नोएडा आणि दिल्लीला हा रस्ता जोडतो.
Husband-Wife killed in horrific accident near Karodi Fata : पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. औरंगाबाद : दुचाकीवरून औरंगाबादकडे येत असलेल्या पती-पत्नीला समोरून आलेल्या भरधाव ट्रॅकने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दांपत्याचा चेंदामेंदा झाला. मृतदेहाचे अवशेष उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. ही घटना आज सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय पूनमचंद छानवाल (वय-51), मीनाबाई संजय छानवाल (वय-46 दोघे रा. शांतीनगर, परसोडा, लासूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, संजय हे पत्नीसह मोटारसायकलवरून (एम. एच. 20 डी. एक्स. 3179) औरंगाबाद शहरात येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. अपघातात दोघे ठार झाल्याचे पाहुन ट्रक चालक घटनस्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती स्थनिकांनी पोलिसांना देताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. अपघात एवढा भीषण होता की, पती व पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते. त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते. पोलिसांना अक्षरशः मृतदेहाचा खच खोऱ्याने उचलावा लागला. तर संजय यांचे शीर पोलिसांना आढळून आले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविले असून या प्रकरणी दुपार पर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक आडे यांनी दिली आहे.
सिगरेटची सवय मोडण्यासाठी केलेला अभूतपूर्व 'प्रयोग' पाहिलात का? आज काल बहुतांश लोकांना सिगरेटचं व्यसन असतं. कोणी मित्रांबरोबर पहिला प्रयत्न करतं, मित्रांच्या आग्रहाला बळी पडतं, "घे रे! त्यात काय होतं एका सिगरेटने? " किंवा असेच काही बाही बोलून एखाद्याला सवय लावली जाते. तर कोणी सगळेच सिगरेटस् ओढतात, अपण ओढून बघायला काय हरकत आहे असं म्हणून स्वतःच व्यसनाला बळी पडतात. तर कोणाला ही स्टाइल वाटते, हा ट्रेंड आपण 'फॉलो' केला नाही तर सगळे आपल्याला हसतील असा विचार करतात. टेंशन घालवावं, बेफिकिर राहावं किंवा आपण किती बेफिकिर आहोत हे दुनियेला दाखवण्यासाठी सिगरेट ओढतात. सिगरेट ओढायचं व्यसन लागण्यामागे काही अंशी जाहिरातीही कारणीभूत असतात असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे. आज काल बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी आकर्षक जाहिराती तयार केल्या जातात. ह्या जाहिराती मार्केटिंग करण्याचं खूप मोठं तंत्रज्ञान आहे, आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी ह्या जाहिराती तयार केल्या जातात आणि त्या आकर्षणाला बरेच जणं बळी पडतात. हे सगळ्याच उत्पादनांच्या बाबतीत आहे. सिगरेट त्याला कशी अपवाद? तर एकूणच काय तर काही ना काही कारणांनी सिगरेट ओढायचं व्यसन लागतं एखाद्याला. आधी आधी घरचे ओरडतील म्हणून त्यांच्या पासून लपवून सिगरेट ओढली जाते, मग तर उघड उघड सगळ्यांसमोर ओढली जाते, घरच्यांची बोलणी खावी लागतात. त्यावरून घरात भांडणं होतात, चिडचिड होते, घरातलं वातावरण बिघडतं, एक विचित्र तणाव निर्माण होतो. अशा अनेक सावधान राहण्याच्या सूचना टि. व्ही. , रेडिओ किंवा जाहिरातीत देतात. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की सिगरेट ओढणे तब्येतीसाठी हानीकारक असते. त्यामुळेच घरचे आपल्या पाल्यासाठी किंवा घरातील जो कोणी सिगरेट ओढत असेल त्याला विरोध करतात, सिगरेट ओढू नको असं सांगतात. बरं नुसतं सिगरेट ओढणाऱ्याला त्रास होतो असं नाही तर त्या सिगरेटच्या धुराने आजुबाजूच्या माणसांनाही त्याचा त्रास होतो. परत नुसती तब्येत बिघडते असं नाही. सिगरेटसचा खर्च तर जास्त होतोच आणि आजारी पडल्यावर डॉक्टरचा देखील खर्च वाढतो. कारण, कर्करोग तर फार नंतरची स्टेज आहे. सुरुवातीला सिगरेटच्या धुराचा त्रास सुरू होतो. घसा खवखवतो, खोकला होतो, कफ होतो. एकंतरीतच सिगरेटचे दुष्परिणामच जास्त असतात. मग काय, हे नको असलेलं व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. पण व्यसनच ते! फ़ार चिवट असतं, काही केल्या सुटत नाही. उलट बहुत करून जास्तीत जास्त वाढत जातं असाच बऱ्याच जणांचा अनुभव आहे. ह्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर तर पडायचं असतं पण कसं ते कळत नाही. व्यसनमुक्ती केंद्रात जाणं म्हणजे कमीपणाचं, अपमानास्पद वाटतं. म्हणजे तो मार्ग तर बंदच होतो. अशा वेळी मग काय करायचं? व्यसन तर सोडवायचंय पण कसं सोडायचं ह्याचा मार्ग सापडत नाहीये. आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याला सिगरेटचं व्यसन होतं आणि ते सोडवण्यासाठी त्याने काय अनोखी शक्कल लढवली ते पाहूया ह्या लेखातून! इब्राहिम येसेल असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो तुर्कस्थानात राहणारा आहे. ह्या इब्राहिमला वयाच्या १६ व्या वर्षी हे व्यसन लागलं. मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार असं म्हंटलं आहे की त्याला दिवसाला कमीत कमी दोन पाकिटं लागयची सिगरेटची. आज त्याचं वय ४२ वर्षे आहे आणि तो सिगरेटच्या व्यसनाच्या पूर्णपणे अधीन झाला! इब्राहिमच्या वडिलांचं निधन फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झालं, त्यानंतर इब्राहिमला आपलं हे व्यसन सोडविण्याची इच्छा झाली. वडिलांच्या निधनाने कुटुंबाचं झालेलं नुकसान भरून तर निघणार नाही, पण आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये असं वाटून त्याने सिगरेट सोडण्याचे ठरविले. काहीही करून त्याला सिगरेट सोडायचीच होती. सिगरेटचे व्यसन सोडविण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पण हे व्यसन त्याच्याकडून काही केल्या सुटले नाही. जवळपास २६ वर्षांपासून असणारं हे व्यसन सहजासहजी कसं सुटेल? त्याने सिगरेटचे व्यसन सोडण्याचे अनेक प्रयत्न केले पण, ते सगळे व्यर्थ गेल्यानंतर तो खूप निराश झाला. मग हे व्यसन दूर करण्यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली. काहीही करून हे सिगरेटचं व्यसन सोडवायचंच ह्या विचाराने बाकीचे मार्ग अयशस्वी झाल्यावर त्याने परिस्थिती आपल्या हातात घेतली. त्याने असा एक पिंजरा तयार केला की ज्याच्यातून ह्या कर्करोगाला आमंत्रण देणार्या भयंकर सिगरेट जाऊच शकत नाही. आता हा पिंजरा म्हणा किंवा हेल्मेट! त्याने अशा पद्धतीने ते तयार केलं आहे की त्यातून सिगरेट तोंडापर्यंत जाऊच शकत नाही. एव्हढेच नाही तर ह्या पिंजऱ्याला किंवा हेल्मेटला कुलुप देखील आहे. ज्याची किल्ली फक्त इब्राहिमच्या बायकोकडेच आहे. इतर कोणाकडेही ह्याची किल्ली नाहिये. अगदी इब्राहिमकडेही त्याची किल्ली नाहीये. सुरुवातीला त्याच्या ह्या विचित्रपणाची सगळ्यांनी खिल्ली उडवली, त्याचं हे वागणं सगळ्यांना मूर्खपणाचं वाटलं. अशी युक्ती कोणीच कधीही केली नसेल. पण, हळूहळू सगळ्यांना हे पटलं की, त्याची युक्ती कामी येणार आहे. एव्हढेच नाही तर त्याची अतिरिक्त खाण्याची सवयही कमी झाली. त्यामुळे त्याचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत झाली. ह्याशिवाय त्याचं अजून एका गोष्टीसाठी देखील कौतुक करायला हवं की एव्हढं वजन असलेलं हेल्मेट किंवा पिंजरा घालून बसायचं सोप्पी गोष्ट नाहिये. दिवसभर त्या हेल्मेटचं वजन पेलणं खूप कठिण गोष्ट आहे. खरंच जर एखाद्याने व्यसन सोडायचं मनापासून ठरवलं तर तो काहीही करू शकतो हे ह्या इब्राहिमच्या उदाहरणावरून दिसून येते. खरंच, अशा माणसांमुळे जगात अशक्य काहीच नसते हे लक्षात येते. आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक कराः InMarathi. com । आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । शेअरचॅट । Copyright © InMarathi. com । All rights reserved.
पिंपरी - ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप असल्याने महापालिका (Municipal) स्थायी समिती अध्यक्ष बुधवारच्या (ता. १) साप्ताहिक सभेसाठी (Weekly Meeting) येणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, ते उपस्थित राहिले आणि अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचनाही केल्या. तब्बल ५२ कोटी रुपये खर्चाचे ५८ विषय मंजूर झाले. मात्र, राष्ट्रवादीच्या (NCP) चार सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. स्थायी समितीची १८ ऑगस्टची सभा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला होता. लांडगे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर आहेत. त्यामुळे बुधवारची (ता. १) सभा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, लांडगे यांनी पंधरा दिवसांनंतर महापालिकेत प्रवेश करत २५ ऑगस्टची तहकूब व एक सप्टेंबरची नियमित सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली. भाजपचे दहापैकी नऊ सदस्य उपस्थित होते. रवी लांडगे यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेचे एक असे पाच सदस्य अनुपस्थित राहिले. पिंपरीतील सुखवानी कॉलनीतील दोन हजार चौरस फूट गाळ्यांसह मंडईतील गाळ्यांना मागणी आहे. ही सर्व गाळे भाडेतत्वावर दिल्यास पालिकेला उत्पन्न मिळेल. टपाल कार्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. त्या अहवालानुसार इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयाला गाळा देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असा आदेश लांडगे यांनी दिला. ठाणे येथील फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांनी अधिकचे पोलिस संरक्षण घ्यावे. जोखीम उचलून कारवाई करू नये. स्वतःच्या सुरक्षेचा विचार करावा, असे आवाहन लांडगे यांनी केले. आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या. गणेशोत्सव आठ दिवसांवर आला आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधाचे पालन करून उत्सव साजरा करावयाचा आहे. मात्र, गणरायांना निरोप देताना विसर्जन घाटांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागनिहाय फिरते विसर्जन जलकुंभ रथाची व्यवस्था करावी. लोकवस्तीनुसार आवश्यकता भासल्यास त्यांची संख्या वाढवावी. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, अशी सूचनाही अध्यक्षांनी केली.
लाईव्ह न्यूज : बेळगाव - गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. G20 शिखर परिषदेसाठी ITPO कॉम्प्लेक्स सज्ज; २६ जुलैला नरेंद्र मोदी करणार उद्घाटन! टी ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. जेर्मेन ब्लॅकवूडला ( २०) अजिंक्य रहाणेने अविश्वसनीय झेल घेतला. अश्विनने टाकलेला चेंडू बॅट अन् पॅडमधून यष्टिंवर आदळला. ब्रेथवेड २३५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ७५ धावांवर माघारी परतला. अकोला : अकोला : आता गावातील घरावर मिळू शकेल कर्ज! अकोला : अकोला : अकोला : सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच! अकोला : अकोला : अकोला : अकोला : Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य! अकोला :
कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लिन चीट दिल्यानंतर गोगोईंविरोधात आज सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी ५५ निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या निदर्शनात महिला वकीलही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. गोगोईंना क्लीन चिट देऊन अंतर्गत चौकशी समितीने पीडित महिलेवर अन्याय केल्याचं या निदर्शकांचं म्हणणं आहे.
जिवंत खेकडे देणारे व्हेंडिंग मशीन आणि मॉल मध्ये मगर खरेदीसाठी चला या देशात - Majha Paper\nजिवंत खेकडे देणारे व्हेंडिंग मशीन आणि मॉल मध्ये मगर खरेदीसाठी चला या देशात\nजरा हटके, पर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / खेकडे. व्हेंडिंग मशीन, चीन, बदके, मगर मास / June 5, 2021 June 5, 2021\nआज जगभरच्या अनेक देशात मोठमोठे शॉपिंग मॉल्स आहेत आणि जागोजागी विविध वस्तू देणारी व्हेंडिंग मशीन लागलेली पाहायला मिळतात. व्हेंडिंग मशीन सुविधेबद्द्दल जपान सर्वात आघाडीवर असलेला देश आहे. मात्र येथे अजून तरी जिवंत खेकडे देणारे मशीन नाही. त्यासाठी चीनला भेट द्यायला हवी.\nकरोना मुळे जगभर चीनविषयी राग आणि टीका व्यक्त होत आहे पण चीन मध्ये अशाही अनेक गोष्टी आहेत की त्या ऐकूनच एखाद्याचे डोके चक्रावून जाईल. चीन मध्ये सेन्सरशिप कडक आहे त्यामुळे चीन मधल्या अनेक घटना कधी जगासमोर येत नाहीत.\nअश्या विचित्र कथा नक्कीच नवलाच्या म्हणता येतील. चीनच्या नानजिंग मेट्रो स्टेशनवर जिवंत खेकडे पुरविणारे व्हेंडिंग मशीन बसविले गेले आहे. प्लास्टिक बॉक्स मध्ये मिळणारे हे खेकडे त्यांचे आकार आणि क्वालिटीनुसार महाग स्वस्त मिळतात. सोबत क्रॅब व्हिनेगर सुद्धा मिळते. त्यामुळे नागरिक घरी जाताना हे रेडी टू कुक खेकडे नेऊन रात्रीच्या जेवणाची सोय करू शकतात.\nअमेरिकेच्या वॉलमार्ट प्रमाणेच चीन मध्ये त्यांचे वॉलमार्ट आहे. खाल्ले जाणारे सगळे प्राणी येथे विकले जातात. अगदी मगरी आणि पाली सुद्धा. मगरी, पाली आईसबेडवर ठेवलेल्या असतात. शिवाय जिवंत मासे. पोर्क इतकेच नव्हे तर कुत्री मांजरांचे मांस सुद्धा येथे विकले जाते. चीन मध्ये आपण धान्य पिकवतो तशी झुरळांची शेती केली जाते. झुरळांचा वापर अनेक औषधे आणि सिरप मध्ये केला जातो.\nअनेक देशात पोलीस विभागाकडे श्वान पथके आहेत. काही ठिकाणी घोड्यांची पथके आहेत. चीन मध्ये मात्र बदकांची पथके पोलीस ताफ्यात आहेत. हे पक्षी धोका जवळ असला तर एकत्र येतात आणि आक्रमक होतात. त्यांचा कर्कश्य आवाज आणि आक्रमक वर्तणूक यांची पोलिसाना मदत होते असे सांगितले जाते.
Automobile sector update : नवी दिल्ली : कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या वाहनांची मागणी जोरात आहे. यावेळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, त्यामुळे कंपन्यांना दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही वाहनांची माहिती देत आहोत, ज्यांची ग्राहकांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. (These are the most popular vehicles in market, having long waiting period) महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV700) सध्या एसयूव्ही श्रेणीतील वाहने खूप लोकप्रिय होत आहेत. महिंद्राचे हे एसयूव्ही श्रेणीतील अत्यंत लोकप्रिय मॉडेल आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV700) ला भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त प्रतीक्षा कालावधी आहे. डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहकांना 21 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. या एसयूव्हीचे दमदार इंजिन आणि उत्तम वैशिष्ट्ये ग्राहकांना आकर्षित करत आहेत. किया केरन्स (Kia Carens) किया मोटर्सने अलीकडेच लॉंच केलेली किया केरन्स ही गाडीही अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. किया केरन्स लोकप्रिय झाली आहे. या यादीत किया केरेन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासाठी १८ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च केले होते. तेव्हापासून ते खूप लोकप्रिय झाले आहे. 1. 5L चे 1. 5L पेट्रोल प्रकार या MPV वर सर्वात प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. याशिवाय, या वाहनाच्या 1. 4L टर्बो-पेट्रोल आणि 1. 5L टर्बो डिझेल प्रकारांसाठी तुम्हाला आठ महिने प्रतीक्षा करावी लागेल. मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) मारुतिची वाहने भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यात एर्टिगाचे स्थान वरती आहे. या यादीत मारुती अर्टिगा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय बाजारपेठेतील ही मारुतीची सर्वात लोकप्रिय MPV आहे. मारुति एर्टिगामध्ये कामगिरी आणि आराम यांचा जबरदस्त समतोल दिसून येतो. समोर आलेल्या माहितीनुसार त्याच्या मानक पेट्रोल प्रकारासाठी, प्रतीक्षा कालावधी चार महिन्यांपर्यंत असू शकतो. परंतु मारुती एर्टिगाच्या सीएनजी प्रकारावर, जास्तीत जास्त प्रतीक्षा कालावधी नऊ महिने चालू आहे. सध्या विविध ऑटोमोबाईल कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देत आहेत. अनेक वाहनांवर डिस्काउंट मिळते आहे. टाटा मोटर्स आणि मारुति सारख्या कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या काही मॉडेल्सवर मोठी सूट जाहीर केली आहे.
डेहराडून - भारतीय जनता पक्षाने उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि नोकऱ्यांपासून मोफत सिलिंडरपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली. उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचे सरकार आल्यास ५० हजार सरकारी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. एवढेच नाही तर गरीब महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ऋषिकेश ते बद्रीनाथ धामपर्यंत रस्ता तयार करण्यात आला आहे. मी तुम्हाला वचन देतो की या वर्षी आम्ही चार धामचे काम पूर्ण करण्यासाठी काम करू. गंगोत्री धाममध्ये १६०० कोटींचे काम असून त्यापैकी ९किलोमीटरचे काम बाकी आहे असे सांगताना, मला उत्तराखंडच्या खासदार आणि नेत्यांची साथ मिळाली नसती, तर हे सर्व काम मी पूर्ण करू शकलो नसतो असेही त्यांनी सांगितले. हे सर्व काम करताना अनेक अडथळे आले पण तरीही आम्ही काम पूर्ण केले आहे. आता कितीही ढग फुटी झाली तरी पुरामुळे या रस्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. भाजपच्या या जाहीरनाम्यातून ५० हजार सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत सत्तेत येताच २४ हजार नोकऱ्या दिल्या जातील. बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्यात येणार असून,याअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार. यावेळी रस्त्यांबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, असंघटित मजूर आणि गरिबांना ६,००० रुपयांपर्यंतचे पेन्शन आणि ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. अंमली पदार्थांबाबतचे धोरण राबविण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली जाईल. लव्ह जिहादच्या कायद्यात बदल करून तो कडक करण्यात येणार आहे.राज्यातील सर्व गावे ४जी/५जी मोबाईल नेटवर्क आणि हायस्पीड ब्रॉडबँड आणि फायबर इंटरनेटने जोडली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील एका रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना सुलभ कर्ज देण्यासाठी ₹ ५ लाखांपर्यंतच्या कर्जावर ५०% पर्यंत गॅरंटी कव्हर दिले जाईल. जमिनीच्या अवैध धंद्यामुळे जमीन आणि लोकसंख्येतील बदलांशी संबंधित समस्यांची चौकशी आणि निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक अधिकारप्राप्त समिती स्थापन केली जाईल. फिरते रुग्णालय होणार, गरीब महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत तर किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशांव्यतिरिक्त राज्य सरकार सहा हजार रुपये देणार आहे, म्हणजे एकूण १२ हजार रुपये. फलोत्पादन, दुग्धव्यवसायासाठी कोटी रुपयांचा निधी स्थापन केला जाईल.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी हरकतीत नमूद संचालक हे निवडणुकीस पात्र सभासद असल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या महिन्यात १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या प्रारूप मतदार यादीवर २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात दाखल करून घेण्यात आल्या होत्या. यात पिंपळगाव खांब येथील बाळू संतू बोराडे, रामभाऊ भागूजी जाधव, विल्होळी सारुळ येथील गणपत शंकर नवले, संजय संतू घेळ यांनी माजी खासदार तथा बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह चंद्रकला पिंगळे, गोकुळ पिंगळे, माजी संचालक दिलीप थेटे व अलका थेटे, सचिन थेटे अशा जवळपास २७६ सहकारी संस्थांच्या संचालक सभासदांच्या दुबार नावांसंदर्भात हरकती घेतल्या होत्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी नुकताच निर्णय जाहीर केला आहे. सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३५ अन्वये कारवाई करण्यात आलेली नसल्याने हरकतीत नमूद संचालक सभासद निवडणुकीस पात्र असल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात यावी, असा अभिप्राय त्यांनी आदेशात दिला आहे. माजी सभापतींसह संचालक य त्यांचे कुटुंबीय यांची नावे हरकतीत असल्यामुळे सहकार क्षेत्राचे याकडे लक्ष लागून होते. संबंधित हरकतीवरून बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पिंगळे आणि चुंभळे गटातील वाद नवा नाही. जसजशी निवडणूक जवळ येईल तसा या दोहोंमधील संघर्ष आणखी वाढत जातो, हा आजवरचा इतिहास आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जातात. जोडीला 'कागदीबाण'ही सोडले जातात. बाजार समितीची निवडणूक होईपर्यंत दोन्ही गटांकडून आणखी किती 'कागदीबाण' सोडले जातात आणि यात कोण घायाळ होते, हे येणाऱ्या काळात दिसेलच. परंतु, ह्यावेळी समर्थकांमार्फत चुंभळे गटाने सोडलेल्या बाणांचा नेम मात्र चुकला आहे.
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे. दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली, सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये सात आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बोगस विद्यापीठं असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं या विद्यापीठाचं नाव आहे.
बारामती : बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने पूर्व प्राथमिक प्रवेशप्रक्रियेमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाबाबतची खोटी कागदपत्रे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला सादर केली आहेत. त्यामुळे या शाळेची खोट्या कागदपत्रांबाबत सोमवारपासून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, चौकशीमध्ये शाळा व्यवस्थापन दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी दिली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे : २०१२-१३च्या शासनाच्या निर्णयानुसार दुर्बल आणि वंचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शाळा प्रवेशामध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, असा अध्यादेश असताना मएसोच्या निर्मला हरिभाऊ देशपांडे आपल्या शाळेतील १०० टक्के प्रवेशशुल्क आकारून प्रवेश दिल्याचे आढळून आले आहे. शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, असा नियम लागू केला आहे. मात्र, देशपांडे शाळेने हा कोटा पूर्ण न करता पहिली ते चौथीच्या ६०० विद्यार्थ्यांचे नियम डावलून प्रवेशशुल्क घेतले आहे. तसेच, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला १०० टक्के प्रवेश मोफत दिल्याची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत सोमवारपासून निर्मला हरिभाऊ देशपांडे शाळेची शिक्षण विभागाकडून चौकशी होणार आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन दोषी अढळल्यास शाळेला विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत करावे लागेल. तसेच, शाळेची मान्यता काढून घेण्यापर्यंत कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील २२ शाळांची २५ टक्के मोफत प्रवेशाबाबतच्या कोट्याची चौकशी सुरू आहे. काही शाळांनी अद्याप २५ टक्के मोफत प्रवेशाचा कोटा पूर्ण केलेला नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. हा कोटा पूर्ण करण्यासंबंधी शिक्षण विभागाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच, पुढील काही दिवसांत हा कोटा पूर्ण केला की नाही, याची शहानिशा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे, असे दोडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उपप्रकरण ९ वें.\nआर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.\nव्याजापेक्षी सावकारी.- सावकारीमध्यें आणखी एक भेद केला पाहिजे तो हा कीं गहाणवस्तूच्या उत्पन्नांतून व्याजाची अपेक्षा करणारी सावकारी आणि मुद्दलादाखल आणि व्याजादाखल किंमतीच्या तथापि अनुत्पादक वस्तू जमानत म्हणून घेऊन केली जाणारी सावकारी. जमिनीवरील सावकारी बर्याच अंशीं उत्पन्नावर रचलेली सावकारी असतें; म्हणजे केवळ भूमिभक्षणाचा हेतू न धरतां आपल्या मुद्दलावर आपल्यास व्याज मिळावें या हेतूनें जेव्हां सावकार रकमा देतो तेव्हां तो अर्थात् त्या जागेपासून उत्पन्न होण्याची शक्यता पाहतो. चाळीवर दिलेल्या रकमा ही सावकारी देखील याच वर्गांत मोडेल. परंतु मोठ्या श्रीमंत लोकांनीं किंवा श्रीमंतीचा आव घालूं इच्छिणार्यांनीं आपल्यास राहण्यासाठीं जे टोलेजंग वाडे बांधले असतील पण ज्या वाड्यांतून उत्पन्न निघण्याची सोय बेताचीच असेल म्हणजे उत्पन्न निघालें तरी तें शेंकडा तीन टक्के देखील निघण्याचा संभव नसेल, त्या वाड्यांवर जो सावकार व्याज मिळविण्याची अपेक्षा धरतो अशाकडून रकमा मिळण्याचा संभव नाहीं. केवळ एखादा भूमिभक्षक सावकारच असला वाडा वगैरे मालमत्ता आपल्या तावडींत घेण्याच्या इच्छेनें त्यावर रकमा देईल; आणि दरसाल व्याज मिळण्याचा संभव नसल्यानें आणि पुढें कबजा घेण्यासाठीं खटले करावे लागण्याचा संभव असल्यामुळें तो व्याजहि बरेंच आकारील. प्रत्येक व्यहारामध्यें हा एक नियम लक्षांत ठेवावा कीं जेव्हां मालमत्तेपासून वार्षिक उत्पन्न बेताचेंच असेल तेव्हां तिची किंमत कितीहि मोठी असली तरी तिची पत रोकड बाजारांत थोडीच असणार.\nकबजेगहाणाची सावकारी याच म्हणजे 'भक्षक' वर्गांत मोडते. ज्या वस्तूंपासून वार्षिक उत्पन्न होत नाहीं परंतु ज्यांची किंमत मोठी आहे अशा गोष्टी म्हणजे दागिने, सोनें, घड्याळें, पिआनो वगैरे प्रकारच्या मौल्यवान् जिनसा सावकारास बहुतेक प्रसंगीं कबजांतच घ्याव्या लागतात. कां कीं, मालकास त्या वस्तूंच्या अस्तित्वापासून उत्पन्न होत नसतें; आणि शिवाय मुद्दल आणि व्याज मिळून जर रास वाढत गेली आणि ऋणकोस पैसा देणें अशक्य झालें तर ऋणको ती वस्तु लांबवील असाहि संभव महाराष्ट्रांत असतो. आणखी एक थोडीबहुत साहसाची सावकारी सांपडते. ती म्हटली म्हणजे बड्या बापाच्या बेट्यास त्याच्या भावी इस्टेटीच्या कबजावरच पैसा देणें ही होय. या सावकारींत कायद्याच्या भानगडी पुष्कळ असतात. पुष्कळदां हें कर्ज कोर्टामार्फत वसूल होणेंहि शक्य नसतें आणि यामुळें सावकारस बरेंच मोठें जोखीम अंगावर घ्यावें लागतें. उधळपट्टी करणार्या तरुण मुलांस गांठून त्यांस जे रकमा देतात ते दिलेल्या रकमेच्या चौपट किंवा पांचपट रकमेचें खत लिहून घेतात; आणि कुळाची बेअब्रु करण्याचा धाक घालून यांस आपली रक्कम वसूल करून घ्यावीं लागते. अशा प्रकारचे सावकार सर्व देशांत आहेत आणि इंग्लंडांत जाणारे हिंदुस्थानी राजपुत्र बरेच वेळां असल्या सावकारांच्या तावडींत सांपडण्याचा संभव असतो.\nकांहींच जमानत नसतांना देखील लहान सहान रकमा कर्जाऊ देणें म्हणजे बिनजमानतीची सावकारी देशांत थोडक्या प्रमाणानें चालू आहे. असल्या प्रकारच्या सावकारीमध्यें देण्याची रक्कम पांच दहा रुपये फार तर असते. गरीब मजूर वर्गास केवळ आपल्या वेतनाच्या जोरावर पैसा काढावा लागतो आणि त्यांस महिन्याचें कधीं कधीं रुपयास एक आणा व्याज द्यावें लागतें. डोक्यावर माल घेऊन विकणार्या लोकांस देखील सुमारें याच दरानें पैसे काढावे लागतात आणि कधीं कधीं तर रुपयास एक आणा रोज याप्रमाणें व्याज भरावें लागतें.\nसावकारी आणि दुकान हे दोन धंदे पुष्कळदां एकत्र सांपडतात. ज्यापाशीं कांहीं एक नाहीं अशा पण कामवाल्या मनुष्यास रोजचा २५।३० रुपयांचा माल देऊन रोजच्या उत्पन्नांतून ते पैसे वसूल करण्याची रीत आहे. मुंबई, पुणें येथील चहाच्या दुकानांत असल्या प्रकारची सावकारी चालते. महिन्याचें भाडें ठरलें असेल त्याप्रमाणें घरवाला रोजचे दोन तीन रुपये वसूल करतो आणि वाणी आपल्या सामानाचे पैसे रोज घेऊन जातो.
अकोला - जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड एन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तथापि, ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे, तसेच ज्या गावांत रॅपिड टेस्टसाठी काही कारणाने लोकांचा प्रतिसाद मिळालेला नाही अशा गावांमध्ये पुन्हा रॅपिड टेस्ट घेण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले. कोविड १९ संदर्भात आज जिल्ह्यास्तरीय आढावा घेण्यात आला. सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्यांच्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिक्षक डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच ओझोन व आयकॉन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते. तसेच दुपारच्या सत्रात झुम प्रणालीद्वारे सर्व सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांचीही आढावा बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते. कोवीड रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री व औषधी साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्या. रुग्णालयात कोवीड वार्डात होत असलेल्या उपचार व व्यवस्थेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस युनिट कार्यान्वित करावे, तसेच खाजगी रुग्णालयांनीही डायलिसीस सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णास उपचारासाठी दाखल करतांना रुग्णासोबत आधार कार्ड व त्याची शिधापत्रिका सोबत अवश्य द्यावी. त्यामुळे रुग्णांना महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे शक्य होते. रुग्णाच्या निकटवर्तीयांनी ही काळजी अवश्य घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विशेषतः पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड एन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तथापि, काही गावांमध्ये नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा रॅपिड टेस्ट करण्यासाठी गावात असलेली बाधितांची संख्या,मृत्यूची संख्या व प्रतिसाद कमी असलेल्या ठिकाणी टेस्ट घेण्यात याव्या. यासाठी सरपंच,पोलीस पाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविका, शिक्षक व तलाठी यांच्या ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घ्यावा. ज्या दिवशी चाचण्या करावयाच्या असतील त्याआधी त्या गावास गटविकास अधिकारी, तहसिलदार इ. अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना आवाहन करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
लेखन उत्पादन आहे, "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो": हे नाटक समकालीन समाज संबंधित आहे का? अ एस Griboedov शास्त्रीय रशियन साहित्य मध्ये समाविष्ट केले गेले होते नाटक, लिहिले. त्यात त्यांनी अचूकपणे एक आधुनिक समाजातील मध्ये मूळचा असलेल्या सामाजिक वाईट वर्णन केले आहे. त्यामुळे उत्पादन रचना, "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" शालेय अभ्यासक्रमात आवश्यक आहे. लेखक म्हणून चोखपणे ते घरगुती नाव (FAMUSOV, MOLCHALIN) झाले आहेत की त्यांच्या वाईट विलक्षण वैशिष्ट्ये वर्णन त्यामुळे अचूक आणि स्पष्टपणे, ध्येयवादी नायक वर्ण पोहचविणे व्यवस्थापित. उत्पादन रचना, "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" वर्ण थोडक्यात वर्णन द्या, आणि त्यांना राहण्याकरिता काय नावडती गुण बद्दल लिहायला महत्वाचे असेल. प्रिय मित्रांनो वडील Chatsky, सोफिया, FAMUSOV - उच्च सार्वजनिक ठेवा ज्यांना वाहवा नमुना आहे. त्या मुलीशी लग्न केले Skalozub मुलगी का हवा आहे आहे. पॉल Afanasievich काका उदाहरण त्यांना ठेवून, तरुण पिढी शिक्षण आवडतात. तो आवेशाने परंपरा संरक्षण आणि इतर मते दरावर अवलंबून असते. FAMUSOV देखील हे तिला लज्जास्पद अधिक प्रभावी लोक फेडणे विचार नाही. Afanasievich पॉल लोभ आणि अंड रक्षणकर्ता आहे. MOLCHALIN देखील एक जाहिरात मिळविण्यासाठी काहीही करण्याची इच्छा आहे जो उपहास व्यक्ती प्रतिमा प्रतिनिधित्व करतो. तो प्रभावी लोक आपण टीका करताना गप्प असावा असा विश्वास आहे. Toby त्याच अज्ञान, उद्धट माणूस तीव्रपणे सर्व नवीन नाकारतो तो आहे. आणि हे आकडे समाज फक्त समस्या आहेत. कारण अशा व्यक्तीची समाजात अशा भ्रष्टाचार म्हणून घटना आहेत, नोकरशाही, प्रगती विरोध, अधिक यशस्वी लोक उपासना (ते पैसे घेणे काही मदत योग्य कारण आमचा विश्वास आहे). या सर्व उणीवा आधुनिक समाजातील आहे. Chatsky - उत्पादन रचना, "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" मुख्य वर्ण बद्दल लिहायला नाही अशक्य आहे. तो त्याची मते समर्थन शोधण्यासाठी आशेने, परदेशात खर्च काही वर्षे आगमन. पण तो famusovskogo समाज उभे आहे. वाचक, कथा परिचित आहे दृश्ये Chatsky Decembrist एक विशिष्ट साम्य आहे की आवर्जून दखल घेण्यासारखे. तो सर्व त्या आलेले तिरस्कार, आणि FAMUSOV MOLCHALIN, वेठबिगारी दिशेने नकारात्मक वृत्ती उपासना केली. Chatsky मानवतावाद, शिक्षण, विचार स्वातंत्र्य, जुने दृश्ये पुनर्स्थित होईल जे कल्पना दिला. इतर वर्ण विपरीत, तो उघडपणे, त्यांची मते, Famusovs येथे एकत्र जमले समाज शॉक जे व्यक्त करण्यासाठी घाबरत नाही आहे. आणि आजकाल सार्वजनिक मत आव्हान घाबरत नाही कोण आहेत विलक्षण व्यक्तिमत्व आहेत. ते फक्त Chatsky म्हणून, इतर समजत नाही आणि त्यांच्या दृश्ये स्वीकारत नाही आहेत. "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" अलेक्झांडर Griboyedov कामे वर निबंध लिहिताना तो मुख्य वर्ण नाही केवळ सत्य आहे की, समाज तो स्वतः आढळले ज्या, अज्ञान बंद मनाचा, पण कारण मध्ये निराशा होती, जात आहे की नोंद करावी त्याच्या असतात. रशिया मध्ये अलेक्झांडर Andreyevich परत मुख्य उद्देश सोफिया लग्न त्याच्या उद्देश होता. पण ती Molchalin निवडले. सोफिया एक मूर्ख तरुण महिला नाही, परंतु तो तिच्या उच्च आदर्श प्रेरणा आहे, असे श्रीमंत आतील जगाशी व्यक्तिमत्व वेढलेले होते नाही. त्यामुळे ती प्रभाव Famusov आले आणि Molchalin त्याच्या लक्ष वळले. ती त्याच्या shortcomings लक्षात नाही तिच्या साठी तो परिपूर्ण मनुष्य होता. उपहास व्यक्ती - तसेच, त्याच्या idealized Chatsky, सोफिया की MOLCHALIN समजत नाही की कोण विश्वास ठेवला नाही. पण सर्वाधिक ती खरे नाही त्याच्या वेडेपणा, सुमारे एक अफवा सुरु मन दुखावले जाते. हे सोफीया मध्ये पूर्णपणे निराश नंतर Chatsky होते. उत्पादन कामे काही थीम, "दुः ख होवो व्यवहारज्ञान पासून" Griboedova अ एस नाटक प्रेम व्याज बद्दल लिहायला सांगितले. तो नायक वर्ण उघड मध्ये एक महत्वाची भूमिका बजावते आहे. उत्पादन रचना, "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" नाटक नाव समजून घेण्याचा प्रयत्न महत्वाचे आहे. सर्व केल्यानंतर, अद्याप हुशार चांगला असल्याचे, नाही का? होय, पण त्याच बौद्धिक पातळी आणि आपल्या समजुती समजून लोक आहेत तर. नाटक देखील Chatsky स्वतः साठी विचार करू नका जे लोकांमध्ये आहे, त्यांच्या सर्व समजुती, ते इतर उसने. ते एक व्यक्ती म्हणून विकास नाही आणि अगदी लक्षात नाही. Chatsky, त्यांच्या सर्व अज्ञान, हट्टीपणा पाहतो त्यांना पोहचविणे प्रयत्न की जगणे चुकीचे आहे, पण कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून, तो पाहतो आणि माहीत आहे कारण मुख्य वर्ण, त्याच्या भोवती लोक तसे कठीण आहे. त्यांच्या स्वतः च्या दृश्ये चिंतन आणि चांगले प्रिय जीवन करण्यासाठी प्रयत्न करणे बाहेरून वातावरण पाहा एक संधी आहे - लेखन "व्यवहारज्ञान पासून दुः ख होवो" उत्पादन आहे.
प्रसिद्ध अभिनेता विजयच्या 'मेर्सल' या तामीळ सिनेमात जीएसटीवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र यातील संवाद चुकीचे असल्याचे सांगत ते चित्रपटातून वगळावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
क्रिकेट फॅनला देश सोडण्याचा सल्ला दिल्यावरून उदभवलेल्या वादामुळे आता विराटवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कसून टीका होते आहे. 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ नारायण याने विरोध केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याने विराटला उत्तर दिले आहे. अशा प्रकारचे वागणे भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला शोभत नसल्याचे त्याने सांगितले. क्रिकेट टीम कर्णधार विराट कोहलीने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या फॅन्सला भारतातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर टीकांचा पाऊस पाडला. याची दखल घेत बीसीसीआयने त्याला झापले होते.
आमदार महोदयांनी तरुणीवर प्रेम केलं, लग्नाचं आश्वासन दिलं, लग्न रजिस्टर करण्याची तारीखही ठरवली. मात्र त्या तारखेला ते हजरच राहिले नाहीत. त्यानंतर संतप्त तरुणीने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. Case against MLA । तरुणीला लग्नाचं वचन देऊन लग्नाच्या दिवशी मात्र गैरहजर राहिलेल्या आमदार महोदयांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रेमाच्या आणाभाका घेऊन शेवटच्या क्षणी आमदार प्रियकरानं पाठ फिरवल्यामुळे तरुणीला जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिनं थेट पोलिसांत धाव घेत आमदाराविरुद्ध तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला. ओरिसातील बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांच्याविरोधात सध्या गुन्हा दाखल झाला असून आपला यात काहीही दोष नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांनी एक महिन्यापूर्वी स्वतःच रजिस्टर लग्न करण्यासाठी अर्ज दिला होता. शुक्रवारी जगतसिंहपूर येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात ते रजिस्टर पद्धतीनं लग्न करणार होते. त्यांची प्रेयसी सोमालिका ठरलेल्या वेळेत कार्यालयात पोहोचल्या. मात्र तिथं पोहोचल्यावर त्यांना धक्का बसला. आमदार महोदय लग्नाला हजर नव्हतेच, पण येतील याच्या कुठल्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या. आमदारांच्या वतीने एकही नातेवाईक किंवा मित्र त्या ठिकाणी हजर नव्हता. ठरलेल्या ठिकाणी त्यांनी तब्बल तीन तास वाट पाहिली. तरीही आमदार प्रियकराचा पत्ता नव्हता. वाट पाहून त्यांनी रजिस्ट्रार ऑफिसमधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. वचन देऊनही आमदार स्वतःच्या लग्नाला हजर न राहिल्यामुळे तरुणीच्या रागाचा पारा चांगलाच चढला. थेट पोलीस स्टेशन गाठून आमदाराविरोधात त्यांनी तक्रार नोंदवली. गेल्या तीन वर्षांपासून आपले आणि दास यांचे संबंध असल्याचा उल्लेख तरुणीने तक्रारीत केला आहे. दास यांनी आपला विश्वासघात घेतला असून लैंगिक शोषण केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. विजय दास यांनी आपला शब्द पाळला नसून गेल्या कित्येक दिवसांपासून ते आपला फोन उचलत नसल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही आमदारांकडून धमक्या येत असल्याचा आरोप तिने केला आहे. सोमालिकाने म्हटलं आहे की आम्ही 17 मे रोजी सब रजिस्ट्रार कार्यालयात लग्न रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला होता. विजयने मला शब्द दिला होता. आपण रजिस्टर लग्न करून नव्या संसाराला सुरुवात करू, असं स्वप्न त्यानं दाखवलं होतं. रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करतानाही तो माझ्यासोबतच होता. मात्र त्यानंतर काय घडलं आपल्याला माहित नाही. लग्नाच्या ठरलेल्या दिवशी तो आलाच नाही. त्यामुळे आपल्याला जबर धक्का बसला. आमदार दास यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांत लग्नाचं रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याची मुभा असते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अजून 60 दिवस बाकी आहेत. शुक्रवारी लग्न रजिस्टर करायचं असल्याबाबत आपल्याला कुठलीही सूचना मिळालेली नव्हती. अन्यथा आपण वेळेवर हजर राहिलो असतो, असा खुलासा त्यांनी केला आहे.
अक्षय कुमारचा स्पोर्ट ड्रामा 'गोल्ड' आता चीनमध्ये दिसणार आहे. 'गोल्ड' सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रिलीज झाला होता. देशाला पहिलं गोल्ड मेडल हॉकी टीमने स्वंतत्र भारताच्या स्वरुपात दिलं होतं. हीच कथा पडद्यावर दिग्दर्शक रिमा कागतीने उत्तम प्रकारे पडद्यावर साकारली आहे. टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने 'गोल्ड' सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. अक्षय कुमारने या सिनेमात बंगाली कोचची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमा आता चीनमध्ये 13 डिसेंबरला रिलीज होत आहे. अक्षय कुमारने सोशल मिडियावर ही बाब जाहीर केली आहे. अक्षयने यात तपन दास नावाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा मागील वर्षी सौदी अरेबियामध्ये रिलीज झाला होता. सौदीमध्ये रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे.
मुंबई ,२५ एप्रिल /प्रतिनिधी :- हिंगोलीचे माजी खासदार अॅड. शिवाजी माने, सावंतवाडी येथील श्रीमंत युवराज लखम खेम सावंत भोसले, मीरा भाईंदर येथील चंद्रकांत मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.तान्हाजी मुटकुळे,माजी आमदार रामराव वडकुते आदी यावेळी उपस्थित होते.
मुलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था मुंबई पोलिसांच्या मदतीने बालमजुरीविरोधात घेत असलेल्या मोहिमा, तसेच छापेसत्रांमुळे मुंबईतील बालमजुरीला मोठ्या प्रमाणात रोख लागल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था मुंबई पोलिसांच्या मदतीने बालमजुरीविरोधात घेत असलेल्या मोहिमा, तसेच छापेसत्रांमुळे मुंबईतील बालमजुरीला मोठ्या प्रमाणात रोख लागल्याचे दिसून येत आहे. प्रथम या सामाजिक संस्थेने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईतील बालमजुरीचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खाली आल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये तीन लाख तर ठाण्यात २५ हजार दुकानांमधून बालमजूर काम करतात का, यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईमध्ये १४ वर्षांखाली १५२ मुले बालमजूर म्हणून काम करताना आढळली. हॉटेलमध्ये काम करत असलेल्या या मुलांचे प्रमाण इतर ठिकाणच्या बालमजुरीपेक्षा अधिक होते. मालकांना कायद्याचा धाक दाखवून मुलांकडून काम करून घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. ज्यांनी मुले काम करत नाहीत असे सांगूनही मुलांना कामाला ठेवले होते, अशा २५ ठिकाणी संस्थेने पोलिसांच्या मदतीने रेड टाकल्या, त्यातून ६३ मुलांची बालमजुरीमधून सुटका केली. मुंबईतील १५ पोलिस स्टेशन्सच्या सहकार्याने प्रथमने वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये ही कारवाई केली. पाच वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, अनेक दुकानांमध्ये आमच्याकडे बालमजूर नाहीत, अशा पाट्या लावूनही मुलांना राबवून घेतले जायचे. दुकानांच्या, हॉटेलच्या आतमध्ये मात्र मुलांना छुप्या पद्धतीने राबवून घेतले जात होते. हे प्रमाण आता कमी झाले आहे. गेल्या काही वर्षात बालमजुरी प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे कायद्याची जरब आता बसू लागली आहे. तरीही ही लढाई आता अधिक टोकदार करावी लागणार असल्याचे मुलांच्या हक्क व अधिकाराच्या प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. मुलग्यांच्या तुलनेत बालमजुरीमध्ये मुलींना लोटण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
"हे" उपाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी नक्कीच ठरतील फायदेशीर ! लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. यामुळेच डायबिटीज, हायब्लडप्रेशर यासारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष बाब म्हणजे आदिवासींमध्ये ही समस्या खुप कमी प्रमाणात आढळते. त्यांची जिवनपद्धती आणि वनऔषधी आजारांना त्यांच्या आसपासही फिरकू देत नाही. आज असेच काही निवडक हर्बल उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे आत्मसात करुन तुम्ही शरिराची चरबी कमी करु शकता. हे उपाय आत्मसात करून तुम्ही तुमची जिवनशैली नियंत्रित करु शकता. कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते. उत्तर मध्यप्रदेशातील आदिवासी लोक शेवग्याची भाजी वजन कमी कराण्यासाठी प्रभावी असल्याचे मानतात. गुळ डिंक पाण्यातून दिवसातून दोनदा घेतल्याने वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते. गाजराचे भरपूर सेवन करावे कारण आधुनिक विज्ञानानेही गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मान्य केले आहे. मध एक काम्पलेक्स साखर आहे, जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खुप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने फायदा होतो. काहीजण याच मिश्रणात एक चमच लिंबू रस टाकून पितात. दोन्ही उपाय फायदेशीर आहेत. काहीजण केवळ लिंबू पाणी आणि मध पिऊन दिवसभर उपवास करतात. हा प्रभावी देशी उपाय आहे. सुंठ, दालचिनी, आणि काळी मिरी (3ग्रॅम प्रत्येकी) एकत्र करुन त्याची बारीक पूड करा. या पुडीचे दोन भाग करा. पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा असे प्या. ताजी पत्ता कोबी ही वजन कमी करायला मदत करते. ताजी पत्ता कोबी बारिक करुन तिचा रस बनवुन रोज सकाळी घेतल्याने चरबी कमी होत असल्याचे आदिवासी सांगतात. आधुनिक विज्ञानही या बाबीला पुष्टी देते. पत्ता कोबी साखर आणि इतर कार्बोहाइड्रेटसची चरबी होण्यापासून रोखते आणि वजन कमी करते. अर्धा चमचा सोप एक कप उकळत्या पाण्यात टाकून 10 मिनिटे उकळून थंड झाल्यावर सलग तिन महीने प्यायल्यास वजन कमी होईल. पुदीन्याची हिरवी चटणी पोळीसोबत खाल्ल्याने फायदा होतो. आदिवासी पुदिना टाकून चहा पिण्याचा सल्ला देतात. हिरडा किंवा बेहडा यांच्या फळांचे चुर्ण एक एक चमचा 50 ग्रॅम पडवळाच्या रसासोबत (1 ग्लास) मिसळून घेतल्याने वजन खुप लवकर कमी होते आणि थकवाही निघून जातो.
ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा बोलबाला दिसतोय. . . दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आज त्यांनी अमेरिकेविरुद्ध ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ गोंधळला अन् त्यांनी पटापट विकेट टाकल्या. झिम्बाब्वेने वन डे क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला. जॉयलॉर्ड गुम्बी आणि इनोसेंट काइया ( ३२) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. जॉयलॉर्ड व कर्णधार सीन विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना अमेरिकेच्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. जॉयलॉर्ड ७८ धावांवर माघारी परतल्यानंतर विलियम्स आणि फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाची बॅट तळपली. रझाने २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा कुटल्या. रायन बर्लने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची आतषबाजी केली. सीन द्विशतक झळकावेल असे वाटत होते, परंतु तो १०१ चेंडूंत २१ चौकार व ५ षटकारांसह १७४ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेने ६ बाद ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यांनी भारताचा २०१४ सालचा ( ५/४०४ वि. श्रीलंका) विक्रम मोडला. स्टीव्हन टेलर आणि सुशांत मोदानी या दोन्ही सलामीवीरांना रिचर्ड एनगारावाने माघारी पाठवले. त्यानंतर ब्रड इव्हान्स व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी १ धक्के दिले. त्यात दोन फलंदाज रन आऊट झाल्याने अमेरिकेची अवस्था ६ बाद ४५ अशी झाली होती. अभिषेक पराडकर ( २४) आणि जेस्सी सिंग ( २१) यांनी काही काळ संघर्ष केला. अमेरिकेचा संघ १०४ धावांत तंबूत पाठवून झिम्बाब्वेने ३०४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने २०२३ च्या सुरुवातीला श्रीलंकेवर ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि वन डे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला होता. न्यूझीलंडने २००८मध्ये आयर्लंडवर २०९ धावांनी विजय मिळवला होता आणि आज तो विक्रम झिम्बाब्वेने तोडला . Web Title: ICC World Cup Qualifier: Zimbabwe won by 304 runs against USA, this is a second Largest margin of victory (by runs) Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
ठाणे : दुकानातील सोन्याचे दागिने चुपचाप द्या, अन्यथा तुम्हाला मारून टाकीन, अशी धमकी देत पाच लाख ६२ हजारांचे १८ तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल असा ऐवज लुबाडणाऱ्या लोकेश ठाकरे (३०), गणेश पाटील (३५), सुकीर म्हात्रे (३२) आणि विनायक म्हात्रे (२९) या चौघांना कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पूर्वी सोने गहाण ठेवण्याच्या व्यवहाराचा राग मनात धरून भगवानराम देवासी यांच्या कळवा शिवाजीनगर येथील कृष्णा ज्वेलर्स या दुकानात लोकेश आणि गणेश यांनी त्यांच्या साथीदारांसह १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रवेश केला. नंतर त्यांनी काचेचा दरवाजा जबरदस्तीने बंद करून दुकानातील बद्रीराम आणि शामलाल या दोन्ही भावांचे मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावले. त्यानंतर त्यांना मारून टाकण्याची धमकी देत दुकानातील शोकेसमधील ९५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, ३२ हजारांचा सोन्याचा हार, ४४ हजारांची सोनसाखळी असा पाच लाख ६२ हजारांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही आरोपींना १८ सप्टेंबर रोजी पहाटे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले. आर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणात आधी निलंबन कारवाई व बुधवारी उशिरा रात्री फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने आता अपहार करणाऱ्या आरोपींच्या अटकेची तेवढी प्रतीक्षा आहे. आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या आरोपींच्या मुसक्या केव्हा आवळतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले. आता त्यांच्या अटकेची फसवणूक झालेल्या खातेदारांना प्रतीक्षा आहे. यातील तिघांना आधीच निलंबित केले गेले होते, तर अंकितची सेवा कंत्राटी असल्याने संपुष्टात आणण्यात आली. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानेरक्कम सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी खातेदारांची गर्दी होत आहे. गुरुवारीही बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. बँकेबाहेर खातेदारांना रांग लावावी लागली. फिर्याद ८९ लाखांच्या अपहाराची दिली गेली असली तरी प्रत्यक्षात गुरुवारीसुद्धा आणखी डझनभर खातेदारांनी तक्रारी केल्या. त्यांच्या तक्रारीनुसार ११ लाख १० हजारांच्या रकमेचा अपहार झाल्याचा आकडा जुळतो आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ७० तक्रारी बॅंकेला प्राप्त झाल्या असून त्यात सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम गहाळ असल्याचे आढळून आले, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. आणखीही तक्रारी बँकेला प्राप्त होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. कारण बँकेत पोत्यामधून रोकड घेऊन येताना काही चेहरे दिसतात. सीसीटीव्हीमध्येही संचालक मंडळाने त्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आरोपी बनविले जावू शकते. आर्णी शाखेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. संचालक मंडळ बैठकीतही एका-दोघांचा विरोध झुगारून संबंधित तिघांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. केवळ निलंबनावरच कारवाई थांबणार नसून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा कोंगरे यांनी केली होती. अखेर बुधवारी गुन्हे दाखल झाले आणि कोंगरे यांनी आपला शब्द खरा केला. गुन्हे दाखल व्हावे म्हणून त्यांनी काही अनुभवी संचालकांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना तीव्रता पटवून दिली. आर्णी शाखेतील गैरव्यवहाराचे प्रकरण केवळ निलंबन व फौजदारीवर थांबणार नाही, तर खातेदारांचा एक-एक रुपया त्यांना परत केला जाईल, त्यासाठी आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यातून ही वसुली केली जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी 'लोकमत'ला सांगितले. गहाळ रक्कम चौघांकडूनही वसूल करायची असल्याने त्यांची सर्व बँक खाती सील करण्यात आली आहेत. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना त्याबाबत पत्र देण्यात आले. या चौघांनाही आर्णी शाखेत येण्यास मनाई असून, ते आल्यास त्यांच्यावर कायम वॉच राहणार असल्याचेही कोंगरे यांनी सांगितले. हा गैरव्यवहार आर्णी शाखेपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे इतर शाखेच्या खातेदारांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या रकमा सुरक्षित असल्याचे प्रा. टिकाराम कोंगरे यांनी स्पष्ट केले. आर्णी शाखेतील लाखो रुपयांचा गैरव्यवहार 'लोकमत'ने उघडकीस आणला. या वृत्तमालिकेमुळे नागरिकांना आपल्या खात्यातील रकमा गहाळ झाल्याचे कळले. 'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळेच या गैरव्यवहारातील दोषींचे निलंबन व त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकली. आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्तेची जप्ती, त्यातून वसुली व खातेदारांचे गेलेेले पैसे परत मिळेपर्यंत 'लोकमत'चा हा पाठपुरावा कायम राहणार आहे. आर्णीचे ठाणेदार पितांबरराव जाधव यांनी 'लोकमत'ला सांगितले की, आर्णी शाखेतील ८९ लाखांच्या अपहाराचा तपास सध्या माझ्याकडे आहे. परंतु आर्थिक गुन्हा असल्याने व त्याची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल. आरोपी अद्याप अटक नसून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी फिर्याद दाखल करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम काेंगरे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांची भेट घेतली. अशा प्रकरणात पोलीस सहसा ऑडिट रिपोर्टची मागणी करतात व नंतरच गुन्हा दाखल करतात. परंतु, आर्णी प्रकरणात प्राथमिक अंकेक्षण अहवालावरून गुन्हा नोंदविण्याची विनंती करताना एसपींना या प्रकरणाची व्याप्ती पटवून देण्यात आली. त्यानुसार, फिर्याद येताच तत्काळ गुन्हा नोंदविला गेला. या शिष्टमंडळात बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी अध्यक्ष मनीष पाटील, संचालक राजुदास जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांचा समावेश होता.
सोलापूर येथील लक्ष्मी-विष्णू मिलच्या सर्व कामगारांना मुंबईच्या धर्तीवर घरे देणार आहे. घरांपासून एकही कामगार वंचित राहणार नाही, अशी हमी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टमंडळास दिली. सोमवारी शिष्टमंडळाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लक्ष्मी-विष्णू मिलच्या गैरव्यवहाराची चौकशी तातडीने करावी, अशी मागणी केली. यावेळी देशमुख यांनी चर्चा करून हक्काच्या घरापासून एकही कामगार वंचित राहणार नाही तसेच त्यांना मुंबईच्या धर्तीवर घरे देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे, असे संगितले.
Four special trains between Jaipur and Hyderabad : या गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे. अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण - मध्य रेल्वेने जयपूर ते हैदराबाद दरम्यान २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे. नांदेड विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ०९७३७ जयपूर - हैदराबाद ही विशेष गाडी २६ डिसेंबर व २ जानेवारी रोजी जयपूर स्थानकावरून १५. २० वाजता रवाना होईल. ही गाडी २८ डिसेंबर व ४ जानेवारी रोजी हैदराबाद स्थानकावर पाेहोचणार आहे. ०९७३८ हैदराबाद - जयपूर ही विशेष गाडी २८ डिसेंबर व ४ जानेवारी रोजी हैदराबाद स्थानकावरून रवाना होऊन ३० डिसेंबर व ६ जानेवारी रोजी जयपूर स्थानकावर पोहोचणार आहे. या गाड्यांना अकोला, वाशिम, मलकापूर या स्थानकांवर थांबा असणार आहे. या गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी शयनयान, द्वितीय श्रेणी खुर्ची यान असे डब्बे राहतील.
आयपीएलचा (IPL) 13 वा सत्र सुरू होण्यापूर्वी खेळलेला ऑल स्टार गेम (All Star Game) आता पुढे ढकलला गेला आहे. स्पर्धा संपल्यानंतर आता हा सामना खेळला जाईल. आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होईल. मात्र, आयपीएलपूर्वी होणार सामना आता या स्पर्धेनंतर होणार असं म्हटलं जात आहे. याची पुष्टी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी केली. मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्व फ्रॅन्चायझींनी त्यांच्या खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी असा कोणताही सामना न खेळावा अशी इच्छा आहे. सामन्यादरम्यान त्यांचे मुख्य खेळाडू जखमी होऊ नये आणि त्यांच्या स्टार खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेलाही मुकावे लागू नये अशी त्यांना भीती आहे. ऑल स्टार गेम घेण्याचा निर्णय 28 जानेवारी रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता, परंतु याबाबत आठही फ्रँचायझींशी सल्ला केला गेला नव्हता. (IPL 2020: टीम इंडियानंतर 'या' संघाकडून एकत्र खेळणार एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा; BCCI के केलायं प्लॅन) पटेल यांनी वेबसाइटला सांगितले की, "हा सामना स्पर्धेनंतर खेळला जाईल. " ते म्हणाले, "आम्ही खेळाडूंची कामगिरी पाहू आणि त्या आधारे दोन्ही संघांची निवड केली जाईल. " गेल्या महिन्यात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी ऑल स्टार मॅचची घोषणा केली होती. ऑल-स्टार्स सामन्यात आयपीएलच्या आठही फ्रँचायझीतील खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता आहे. आधीच्या मीडिया रिपोर्टनुसार दक्षिण आणि पश्चिम भारत संघ (मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद) एक संघ बनवतील आणि उत्तर आणि पूर्व भारत संघ (दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब) दुसरा संघ तयार करतील. आयपीएलच्या 13 व्या सत्राचा पहिला सामना 29 मार्च रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.
लाईव्ह न्यूज : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? पोलादपूर - ग्रामपंचायत बोरज हद्दीतील साखर पेडेवाडीतील दरडग्रस्त वाडीमधील सर्व 8 कुटुंबातील एकूण 22 लोकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले. अमरावती : अमरावती : अमरावती : अमरावती : केंद्रांवर जाण्यास असमर्थ असाल तर, घरपोच मिळणार लस! अमरावती : अमरावती : अमरावती : अमरावती : महावितरणचा शॉक, मीटर रिडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, शेकडोंचा बसतोचा फटका! अमरावती : आरोग्य विभागाची पदभरती केव्हा? अमरावती :
पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या 'राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र' उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून सहकार चळवळ टिकविण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशपातळीवर होत असलेल्या सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी पोकळी भरण्याची क्षमता नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. या संधीचा फायदा घेतांना बँकेच्या कामकाजासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. सहकारी सोसायट्यांचे नाबार्ड आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले. सहकारमंत्री पाटील म्हणाले, सहकाराला ११० वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य नागरी सहकारी बँकांनी केले. नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे चांगले काम होत आहे. संगणकीय प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर प्रशिक्षण महत्वाचे झाले आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयीदेखील प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्र. दि. तथा आबासाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सहकारी बँकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदा लोणकर आणि पुष्पलता जाधव यांना कै. मीराताई देशपांडे उत्कृष्ट महिला संचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या प्रशिक्षणात सर्वाधिक सहभाग घेणाऱ्या आणि उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठीच्या पुरस्कारांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी, दि.०१(पीसीबी) - कष्टकरी कामगार पंचायतचे नेते प्रल्हाद कांबळे व त्यांची पत्नी रुक्मिणी कांबळे यांना मारहाण करून प्रल्हाद कांबळे यांच्या विरोधात ३५३ व ३५४ कलमा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे,या प्रकरणी पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्यामुळे आणि 353 चा दुरउपयोग होत असले बाबत पिंपरी-चिंचवड शहरातील फुले-शाहू-आंबेडकर वादी पक्ष संघटना, कष्टकरी संघटना , व सर्व पक्षीय घटनेचा वतीने या घटनेचा निषेध १ मे २०२१ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय वर सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली या वेळी त्यांनी वरिल प्रमाणे आश्वासन दिल्यामुळे तसेच ज्वाईन कमिशनर श्री.रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्री.सुधीर हिरेमठ यांनी या प्रकरणाची चौकशी करू असे आश्वासन दिल्यामुळे १ मे रोजी निघणारा सर्वपक्षीय मोर्चा रद्द करण्यात आला आल्याचे कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी सांगितले, यावेळी रिपब्लिक युवा मोर्चा अध्यक्ष राहूलजी डंबाळे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर सुरेश निकाळजे, बहुजन सम्राट सेना अध्यक्ष संतोष निसर्गंध,-भीमाकोरेगाव संघर्ष सामाजिक समिती अध्यक्षा अनिता सावळे , आदी उपस्थित होते , ३५३ या कलमाचा सरकारी बाबु कडून दुरउपयोग होत असून हे कलम रद्द करावे यासाठी पुढील काळात महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरवठा करणार असल्याचे यावेळी राहुल डंबाळे यांनी सांगितले, कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत असे संतोष निसर्गंध म्हणाले, यापुढील काळात सरकारी अधिकारी यांनी ३५३ कायद्याचा दुरउपयोग केल्यास शहरातील सर्व संघटना यापुढेही एकत्र येतील या आंदोलनासाठी एकत्र आलेल्या सर्व संघटनांचे आभार व्यक्त करतो असे सुरेश निकाळजे म्हणाले. माजी नगरसेवक मारुती भापकर, मानव कांबळे, काशिनाथ नखाते , क्रांतीकुमार कडूलकर , गणेश दराडे यांनी देखिल आंदोलनास पाठींबा दिला होता , सदर मोर्चामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चा नेते मा.राहुल डंबाळे ,रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया शहर अध्यक्ष मा.सुरेश निकाळजे , रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष मा.अजिज शेख , कष्टकरी कामगार पंचायत बळीराम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष मा.संदिपान झोंबाडे , राष्ट्रीय चर्मकार महासंघ महासचिव मा.ज्ञनेश्वर कांबळे ,बहुजन सम्राट सेना अध्यक्ष मा.संतोष निसर्गंध , भिमाकोरेगांव संघर्ष समिती अध्यक्ष मा.अनिताताई साळवे , सामाजिक कार्येकर्त्या मा.अंजनाताई गायकवाड , राष्ट्रवादी कॉग्रेस सफाई कामगार विभाग प्रदेश सचिव मा.युनूस पठाण , डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रुप अध्यक्ष मा,सतीश कदम , भारतीय लहुजी पँथर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.अक्षय दुनघव ,सह पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्ष संघटनांनी आंदोलनास पाठींबा दिला होता ,
सोलापूर : महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाºया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. समाजात महिलांवर होणाºया अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले होते. त्यांच्या या चळवळीत सोलापूरकरांनीही साथ दिली होती. विद्याताई यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्याताई या १९९७ मध्ये सोलापुरात आल्या होत्या . त्यावेळी त्यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयात ३० टक्के बायकांचा राजकारणात सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. १९९८ मध्ये दिशा अभ्यास मंडळ या स्त्रिया आणि मुलांसाठी काम करणाºया संस्थेची स्थापना त्यांच्या हस्ते झाली. १९९९ मध्ये 'जोडीदार जीवनाचा' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या. दिशा अभ्यास मंडळाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांनी चाकोरी नावाच्या चित्रपटाद्वारे स्त्रियांनी आपल्या पायातल्या रितीरिवाजांचे साखळदंड कसे काढून टाकले पाहिजेत, हे सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिराचंद नेमचंद आणि परिवर्तन अॅकॅडमी यांच्या दोन दिवसांच्या शिबिरासाठी त्या आल्या होत्या. इच्छामरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावरील त्यांचे पुस्तक खूप लोकांना भावले. त्यांनी महाराष्ट्रभर या विषयावर व्याख्याने दिली. १९९८ मध्ये सोलापुरात त्या इच्छामरण या विषयावर बोलण्यासाठी आल्या होत्या. विद्याताई यांनी कायम स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरला. मिळून साºया जणी या मासिकातून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडले. त्या अनेकदा सोलापुरात व्याख्यानासाठी आल्या होत्या. त्या फक्त अभ्यासू वक्त्या नव्हे तर क्रियाशील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. स्त्री चळवळीमध्ये स्त्रीला पुरुषाची साथ असायला हवी म्हणून त्यांनी या चळवळीत पुरुषांना सामील करुन घेतले. स्त्रियांना स्वतंत्र विचार व अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यांच्यामुळेच आज लाखो स्त्रिया स्वतंत्रपणाने विचार करत आहेत, मनासारखं आयुष्य जगत आहेत. स्त्रियांवर होणाºया अत्याचाराविरोधात जागृती करण्यासाठी विद्याताई यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केडर उभे केले होते. पुरोगामी चळवळीतील त्या अग्रणी होत्या. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्या व्याख्याने देत होत्या. देशात महिलांसाठी काम करणाºयांमध्ये त्यांचे नाव हे सदैव पुढे राहील. ज्या काळात आम्ही सामाजिक कार्यात भाग घेत होतो, त्या काळात विविध विषयांवर प्रबोधन करण्याची गरज होती. हे काम विद्यातार्इंनी केले. राज्यातील स्त्रियांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावरही खूप प्रभाव पडला होता.
सातारा : लोकशाहीतील सर्व संस्था हस्तगत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, व अर्थमंत्री जेटली सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंकही अलिप्त राहिलेली नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय लोकांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमणे, हा या सरकारचा उद्देश आहे त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे आतापर्यंत चार वित्त सल्लागार सोडून गेले आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नाहीत हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी काल राजीनामा दिला. यासंदर्भात आपली भुमिका मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जीत पटेल यांनी काल राजीनामा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यांनी यामागे वैयक्तिक कारण सांगितले असले तरी काय काय चालले आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. 19 नोव्हेंबरला रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ती अत्यंत वादग्रस्त झाली होती. त्याच दिवशी उर्जित पटेल राजीनामा देणार असे वृत्त बाहेर आले होते. सर्व लोकशाहीच्या संस्था हस्तगत करण्याचा मोदी, जेटली सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंक ही अलिप्त राहिलेली नाही. सरकारी विभाग असल्यासारखे तिचे रूपांतर करून तिची स्वायतत्ता संपवून टाकायचा हा त्याच प्लॅन आहे. बॅंकेतील तीन चार लाख कोटी रूपयांची गंगाजळी त्यांना वित्तीय कारणासाठी वापरायची आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकिय लोकांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमणे हा त्यामागचा उद्देश आहे. आज हा चौथा वित्तीय सल्लागार सोडून गेला आहे. पहिल्यांदा अरविंद सुब्रमन्यम गेले. त्याआधी रघुराम राजन यांना काम करून दिले नाही. स्वतः अरविंद बानगरीया ज्यांना मोदींनीच आणले होते, त्यांनाही काम करून दिले नाही. आता चौथा वित्त सल्लागार सोडून गेले आहे. एकुणच आंतरराष्ट्रीय तज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नाहीत हे अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
काहीवेळा तुम्ही Instagram वर काहीतरी पोस्ट करता आणि काही मिनिटांनंतर (दिवस, आठवडे किंवा अगदी वर्षे!) ठरवता की तुम्हाला ते आता नको आहे. सुदैवाने, Instagram वर ते सोपे आहे. तुमच्या स्मार्टफोनवर Instagram वर जा. स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपर्यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. फोटो काढण्यासाठी, तो उघडा आणि सेटिंग्ज > गोपनीयता वर जा. तुम्हाला हटवायची असलेली प्रतिमा निवडा, नंतर कचरापेटी बटण दाबा. संदेश प्रकार बदलण्यासाठी, स्टोअर अॅप उघडा आणि पर्याय चिन्हावर टॅप करा (स्क्रीनच्या उजव्या कोपर्यात तीन ठिपके). फक्त "हटवा" पर्यायावर टॅप करा. एकदा आपण ते केले की, हटविण्याची पुष्टी करा. तुम्ही तुम्हाला आवडतील तितके फोटो हटवू शकता, पण तरीही एका वेळी एकापेक्षा जास्त पोस्ट काढणे शक्य नाही. तुमच्या फोटोवरून टॅग काढणे देखील शक्य आहे. आपण हे खालील प्रकारे साध्य करू शकताः तुमच्या फोनवरील Instagram वर जा. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी स्क्रोल करा आणि तुमच्या प्रोफाइल बटणावर क्लिक करा. तुम्हाला ज्या फोटोतून टॅग काढायचा आहे त्या फोटोवर जाऊन, ते पाहून आणि टॅग काढा टॅप करून तुमच्या फोटोंपैकी एक टॅग काढून टाका. त्यावर तुमचे नाव टॅप करा. त्यानंतर, बॉक्स दिसेल तेव्हा "फोटोमधून मला काढा" वर टॅप करा. नंतर "समाप्त" निवडा. त्यात एवढेच आहे. "टॅग" मेनूच्या वरच्या-उजव्या कोपर्यात तीन ठिपके टॅप करा, नंतर "फोटो लपवा" निवडा. लक्षात ठेवा की लॅपटॉप किंवा पीसीवरील आपल्या प्रोफाइलमधून Instagram फोटो काढण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्हाला एखादा फोटो काढायचा असेल तर तुमच्या फोनवरील अॅपवर जा आणि तेथून हटवा. तुम्हाला एखादी पोस्ट काढावी लागली तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. तो खरोखर वाचतो का? तुमच्या वैयक्तिक भावनांशिवाय संदेश हटवणे फायदेशीर आहे की नाही याचा विचार करा. कदाचित ते मनोरंजक वाचन होते? Sotrender द्वारे Sotrender तुम्हाला तुमच्या पोस्टिंगच्या यशाचे अत्याधुनिक पद्धतीने विश्लेषण करण्याची परवानगी देतो. हे शक्य आहे की कोणत्याही कारणास्तव आपण यापुढे आपल्या प्रोफाइलमध्ये काही नोंदी पाहू इच्छित नाही. कदाचित तुमची पोस्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल? किंवा पोस्टमध्ये सादर केलेली ऑफर कालबाह्य झाली आहे? किंवा कदाचित तुमचे हृदय बदलले आहे आणि ते तसे राहू इच्छित नाही? हे सर्व समजण्यासारखे आहे. तथापि, आम्ही संदेश हटवण्याऐवजी संग्रहित करण्याच्या शक्यतेकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. पहिले कारण म्हणजे तुम्ही तुमचा विचार पुन्हा सहज बदलू शकता! आणि एकदा ट्विट डिलीट केल्यावर मागे फिरणे नाही. आपण या सर्व पोस्ट संग्रहित केल्यास आपण संग्रहण विभागात शोधू शकता, परंतु आपण ते आपल्या प्रोफाइलवर द्रुतपणे पाहू शकता. दुसरे कारण, तथापि, अधिक लक्षणीय आहे. Instagram चालवणाऱ्या अल्गोरिदमला सामग्री हटवणे आवडत नाही, विशेषतः जर ती वारंवार होत असेल. अशा अॅक्टिव्हिटी त्याच्या व्याप्तीच्या बाहेर आहेत आणि एकदा तुम्ही तुमची सामग्री हटवली की, तुमच्या सवयी पुन्हा शिकून घ्याव्या लागतील. तुम्ही एखादे पोस्ट संग्रहित केले किंवा हटवले तर इतर वापरकर्त्यांना काही फरक पडत नाही - त्यांना ते पुन्हा दिसणार नाही. तथापि, आपल्या प्रोफाइलच्या यशासाठी हा एक महत्त्वाचा फरक आहे.
पडदा, पोस्टर फोटो आजच्या कोल्हापूर टुडे पान १ वरून घेणे. . कऱ्हाड, ता. ३१ : दर्जेदार नाटकांसाठी आसुसलेल्या कऱ्हाडकरांसाठी सहा ते आठ जूनदरम्यान सकाळ नाट्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद घेण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी तिकिटांवर भरघोस सवलत दिली असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यशवंतराव स्मृती सदन येथे दररोज रात्री साडेनऊ वाजता महोत्सव होणार आहे. नाट्यगृहावर गुरुवार (ता. १) पासून तिकिटे उपलब्ध होणार आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवरील तीन दर्जेदार नाटके या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक चितळे डेअरी आणि सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत. दरम्यान, प्रशांत दामले, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील सेलिब्रिटींचा नाट्याविष्कार यानिमित्ताने सजणार आहे. त्याशिवाय त्यांच्याशी संवादही साधता येणार आहे. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. साहजिकच, ही एक वेगळी पर्वणी कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे. तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती रुपये) तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकिटे 'बुक माय शो'च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९४२२४०५००७ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय यशवंतराव स्मृती सदन (सकाळी नऊ ते बारा, सायंकाळी चार ते नऊ), चितळे एक्स्प्रेस (त्रिगुण एम्पायर, मंगळवार पेठ) (सकाळी अकरा ते सायंकाळी सात) येथेही तिकिटे उपलब्ध होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील रसिक दर्दी असून नाट्यप्रेमी आणि 'सकाळ'प्रेमीही आहेत. पुण्यातील सकाळच्या नाट्यमहोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रातही तिन्ही नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल होतील, यात शंका नाही. तिन्हीही नाटके सुंदर आणि दर्जेदार आहेत. या नाटकांचा नक्कीच आस्वाद घ्या. 05946 (आजच्या कोल्हापूर टुडे पान १ वरून घेणे) 'तू तू मी मी' हे नाटक पुन्हा रंगमंचावर आल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 'सकाळ'च्या पुण्यातील नाट्य महोत्सवातही या नाटकाला प्रेक्षकांनी उदंड गर्दी केली. आता हाच महोत्सव कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड येथे होत असून, प्रेक्षक नक्कीच या प्रयोगालाच नव्हे तर संपूर्ण महोत्सवाला मोठी गर्दी करतील, असा विश्वास नक्कीच आहे.
कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. रत्नागिरी : कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेनंतर सुरू होणारी विमानसेवा कोकणच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे. सुरेश प्रभू हे १ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनतर्फे अंबर हॉल, रत्नागिरी येथे आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील व कुडाळ येथे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गेली २० वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाची ते पाहणी करणार आहेत. यावेळी ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत. हवाईमंत्री असल्याने विमानतळ सुरू करण्याचा मार्ग ते सोपा करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रत्नागिरी विमानतळ हे तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या विमानतळाच्या विस्ताराचे काम वेगात सुरू होते. येथील धावपट्टीची लांबीही वाढवण्यात आली असून, येथून प्रथम तटरक्षक दलाची विमान वाहतूक सुरू होईल व मे २०१८मध्ये प्रवासी विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. सिंधुदुगार्तील चिपी विमानतळाकरिता आतापर्यंत अनेक मुहूर्त जाहीर झाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येत्या जूनमध्ये विमान टेक आॅफ करेल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, अधिवेशन काळात आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना या विमानतळाचे उदघाटन नेमके कधी होईल, याबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही. मात्र, या दौऱ्यामुळे ही विमानतळे लवकरच सुरू होतील, अशी आशा आहे. कोकण विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याकरिता केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केंद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाईस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुखांची राऊंड टेबल कॉन्फरन्स मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत होत आहे. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी येथील तरुणांना कोकणातच नोकरी, व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी ही कॉन्फरन्स महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे, 23 मार्च : महाराष्ट्र सरकारने राज्यभरात कलम 144 लागू करण्याची घोषणा करत जमावबंदी केली आहे. मात्र तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. अनेकजण शहरातून गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात (Pune) परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. त्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. Tomato farming : टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी अन् करोडपती झाला पुणेकर शेतकरी! Mumbai News : 1000 रुपयांचं फेस मसाजर फक्त 200 रुपयांना, मेकअपचं इतकं स्वस्त साहित्य कुठे पाहिलंय का? Pune News : Pune News : पुणेकरांनो, सहलीचं प्लॅनिंग करताय? तुम्हाला ही ठिकाणं माहितेय का? यावेळी पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांना क्वारंटाइनचा शिक्का असलेला व्यक्ती दिसल्यास पुणे पोलिसांना 1800 233 4130 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. पुणे पोलिसांची 136 टीम क्वारंटाइनमध्ये राहायला सांगितलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता झालेले कदाचित त्यांच्या गावी वा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
भैरवनाथ गोविंदा पथकाची स्थापना २००८ साली झाली. या पथकाच्या स्थापनेमागचा उद्देश इतर गोविंदा पथकापेक्षा वेगळा होता. मुंबई- गोकुळी आनंद झाला । । रामकृष्ण घरा आला. . या गवळणीच्या पदाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळात साजरी केली गेली होती. पण या खेळाने आज मुंबईसह संपूर्ण राज्यावर एक वेगळी मोहिनी टाकली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर एकावर एक थर रचून आकाशाला हात लावणारे गोविंदा उभे राहतात. अशीच काही मंडळे मुंबईत देखील आहेत. भैरवनाथ गोविंदा पथकाची स्थापना २००८ साली झाली. या पथकाच्या स्थापनेमागचा उद्देश इतर गोविंदा पथकापेक्षा वेगळा होता. या मंडळाकडे दहीहंडी फोडून येणारा पैसा लोकहिताच्या कार्यासाठी वापरला जायचा आणि आजही वापरला जातो. असे पथकाचे अध्यक्ष दीपक पार्टे (तात्या)यांनी सांगितले. आजवर उंचच उंच थर लावून कितीतरी गोविंदांचा प्राण गेला असेल; पण भैरवनाथ गोविंदा पथक हे एकमेव मंडळ असे आहे की, आतापर्यंत दहीहंडी फोडताना कोणीही गोविंदा जखमी झालेला नाही. २००८ साली फक्त १०० जणांच्या ताफ्यासह मंडळाने ६ थर लावण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीदेखील झाला. २००८ मध्ये मंडळाला म्हणावा तितका नफा झाला नाही. पण अध्यक्ष पार्टे यांनी आपल्या खिशातले पैसे टाकून समाजकार्यासाठी निधी दिला आणि समाजकार्यासाठी अधिकाअधिक पैसा मिळावा म्हणून गोविंदांनीही आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे जमा केले आणि एका आदिवासी पाडय़ात २००८ साली एक शाळा उभी राहिली. खेळाचा पैसा समाजकार्यासाठी वापरला जातो हे कळल्यानंतर कोपरखैरणेतील तरुणांनीही पुढाकार घेतला आणि आजवर या पथकात २५० जण थर लावण्यासाठी तर इतर १०० जण बचावासाठी सज्ज असतात. २०१० साली चौथ्या थरावरून पडून आकेश पार्टे गंभीर जखमी झाला होता. याच्या उपचारासाठी मंडळाने भरपूर मदतनिधी दिला. यानंतर अशी घटना घडू नये यासाठी मंडळाने कमी थर लावले, कारण बचावपक्षात फार कमी लोक होते; पण २०१२मध्ये पथकात ३०० तरुण सामील झाले. यानंतर या पथकाने २०१३ साली तीन एक्के लावण्याचा मान घाटकोपरमध्ये पटकावला होता. आतापर्यंत मंडळ सहीसलामतपणे ९ थर लावण्याचे प्रयत्न करत आहे. २०१४ साली या मंडळाने मानाच्या ७ दहीहंडय़ा फोडल्या आणि ९ थरामध्ये ३ एक्के लावण्याचा यशस्वी प्रयत्न पथकाने केला. या पथकात सर्वात लहान गोविंदा हा १३ वर्षाचा असून या छोटय़ा गोविंदालाही खूप नामांकने भेटली आहेत. मंडळाचे काम वाखणण्याजोगे आहे असं म्हणावं लागेल, कारण फक्त दीड ते दोन महिन्यांच्या सरावाच्या जोरावर ९ थर लावणं म्हणजे अशक्य असतं; पण या मंडळाने हेही काम अतिशय उत्कृष्टरित्या केले आहे. या मंडळातील गोविंदांना या मंडळात सहभागी होण्याचे कारण विचारले असता त्यांनी याचे श्रेय मंडळाचे अध्यक्ष दीपक पार्टे यांना दिले. त्यांच्याबरोबर आम्हालाही समाजकार्याचा एक भाग होता येते हे आमचं परमभाग्य असल्याचे सांगून, आजच्या धकाधकीचा विसर व्हावा यासाठी आम्ही दोन महिने खूप सराव करतो आणि अधिकाधिक बक्षिसे मिळवून ती समाजकार्याला कशी उपयोगी पडतील यासाठी आम्ही या पथकात सामील झालो असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकांच्या माध्यमातून सातारा भागातील काही गावांचे विकासकाम पूर्ण झाले असून यापुढेही ही विकासकामे अतिशय जोमात करणार असल्याचे पार्टे यांनी सांगितले. पथकातून येणा-या पैशांमधून मुंबईतही अनेक शिबिरे राबवली जातात आणि ही सर्व शिबिरे मोफत असल्यामुळे याचा फायदा सामान्यांपासून श्रीमंतालाही घेता येतो. गेल्यावर्षी मुंबईमध्ये या पथकाने २५० व्हीलचेअर वाटल्या होत्या. त्यासोबत यावर्षीही हे पथक दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी जास्तीत जास्त दहीहंडय़ा फोडण्याच्या तयारीत आहे. हे पथक केवळ दहीहंडय़ा फोडत नाही तर एक अनोखा संदेश आपल्या घोषणांतून देत असते. मंडळाने मानाच्या सात दहीहंडय़ा फोडल्या आणि 'विशेष पथक' नावाचा किताबही पटकावला. शिवाय, यावर्षी 'बेटी बचाओ'चा संदेश देत हे मंडळ मुंबईतील एक विशेष मंडळ बनण्याच्या मार्गावर आहे.
श्रावस्ती : सिरसियामधील रामपूर देवमन गावातील प्रगतशील शेतकरी अनंतराम वर्मा यांच्या शेतात तुलसीपूर साखर कारखाना, बलरामपूरचे उप महाव्यवस्थापक डॉ. राजेश प्रताप शाही यांनी फीत कापून मान्सून काळातील ऊस लागवडीचा प्रारंभ केला. मान्सून काळातील ऊस लागवडीमुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नशीब उजाडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. उप महाव्यवस्थापक म्हणाले की, सिरसियामधील जमीन चांगली आहे. शेतकऱ्यांनी नव्या प्रजातीच्या ऊसाची शास्त्रीय पद्धतीने लागवड करावी. रोपांतील किमान अंतर तीन फुटांचे असावे. शेतकऱ्यांनी बटाटा-ऊस, ऊस-मिरची, टोमॅटो-ऊस, फ्लॉवर-ऊस, लसूण - ऊस, कांदा-ऊस तसेच डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घ्यावे. जागरणमधील वृत्तानुसार, सहाय्यक व्यवस्थापक शशांक राय म्हणाले की, ऊसासाठी दीर्घ कालावधी लागतो. त्यासाठी २७-३३ डिग्री सेंटीग्रेड हे तापमान उपयुक्त आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी उसाच्या वाढीसाठी अतिशय चांगला आहे. या वेळेत ऊस कठिण परिस्थितीतही तग धरतो. शेतकऱ्यांना अनुदानावर औषध पंप, डिझेल इंजिन, जंगली जनावरांपासून पिकांच्या बचावासाठी सोलर पॅनल दिले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा. यावेळी सीडीओ अभय श्रीवास्तव, शेतकरी रणवीर बहादुर यादव, संतोष वर्मा, अरविंद वर्मा, अशर्फीलाल वर्मा, शिव कुमार, नंदूराम, सुनील आदी उपस्थित होते.
लेकरू हे आईसाठी काळजाचा तुकडा जणू--------आई ही सदा लेकरांची काळजी करणारी, त्याच्या चूका पोटात घालणारी, पदराखाली लपवणारी, मायेच्या पावसात चिंब भिजवणारी, डोळ्यांमधूनी लेकरांच्या संपूर्ण चित्रपट सृष्टी बघणारी, नुसत्या स्पर्शाने बाळाच्या वेदना जाणून घेणारी, बदलणाऱ्या ऋतूपासून हिवाळा-उन्हाळ्याचे चटके सोसणारी, उपाशीतापाशी राहून मुलांना भरपेट जेवू घालणारी, मुलांच्या सुखसोयी साठी हेलपाटे खाणारी, काही नडल्यास देवाला ही न सोडणारी ती माऊली मायचं असते. जगाच्या पाठीवर देव ही जिच्या क्रोधाला घाबरत असेल ती माय असते. प्रेमाची व्याख्या शिकावी माय कडून.. वात्सल्य काय असतं शिकावं मायकडून...मायेची ममता दगडाला पाझर फोडते एव्हढे सामर्थ तिच्या ममतेत असते... दयासागर , करुणेची घागर ----तिच्या सानिध्यात जीवन हे आपले नंदनवन आहे. मायबाप आहे ज्याच्यापाशी त्याने न पहावी काबा काशी!!! माय किंवा आई दोन शब्दांची जोडी, ती मग पशु पक्ष्यांची असो किंवा मानव जातीची भावना ,वेदना ,संवेदना ,सहनशीलता, लेकरांना जगविण्याची जिजीविषा तिच्या अंगात असते. एरवी नाजूक साजूक दिसणारी माय संकट आले की वाघीणी सारखी डरकाळी फोडते. कुठल्याही आणि कसलेही जीवघेणे प्रसंग असो ती काडीचाही विचार न करता सामोरी जाते. आणि लेकरं घडतात, ती करून दाखवते जसे माता जिजाई ने स्वराज्याला छत्रपती दिले. याउलट माय गेली तर बापाला लेकरं सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. आई ही आईचं असते आणखी दुसरे काहींचं नसते. आई जशी धरणीमाय, सगळं सोसून पोटात घालते. काम करून कितीही दमली असली तरी तिच्या चेहऱ्यावर जराही थकल्याचे भाव येत नाही, विसावा न घेता अहोरात्र कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत असते . माऊलीचा चेहरा नेहमी हसरा, निरागस, निर्मळ, स्थितप्रज्ञ असतो, अगदी देवालाही लाजविल अशी करुणामयी जागती जिवंत मूर्ती . निरपेक्ष भावनेनं , निस्वार्थी मनानं कोणत्याही गोष्टीचा फायदा तोटा न बघता प्रामाणिकपणे घरच्यांची अविरत सेवा करते.पोटच्या पोरासाठी माय ही कडेकोट किल्ला उतरते, जीवाची तमा न बाळगता, उरी एकचं ध्यास , बाळं एकटं घरी आणि मला जायलाच पाहिजे मग कितिही संकटांना सामोरे जावे लागले तरी बेहत्तर-----अशी असते माय----न भूतो न भविष्यती -------ज्या मातेचा सत्कार शिवाजी महाराजांनी हिरकणी नांव संबोधून केला---- केवढं मोठं साहस, केवढी मोठी हिम्मत----त्या माऊलीची----आणि हे फक्त आणि फक्त मायचं करू शकते !!! उगाचंच नाही म्हंटल---तिच्या बोलण्यात प्रेम, वागण्यात प्रेम, रागात प्रेम, तिचं प्रेम हे प्रत्येक गोष्टींमधून व्यक्त होतं. आपल्याजवळ पाहिजे असते फक्त नजर ओळखायसाठी. एक माय ती आपली आणि दुसरी माय धरणीमाय, तीही तशीच , काळ्या मातीचं लेणं लेवून आमच्या साठी धान्य पिकविते--- आपली अन्नपूर्णा---पाणी पाऊस, उन्हाळे, हिवाळे, भूकंप, महापूर, दुष्काळ सहन करून आमचे जीवनयापन करते. एक नैसर्गिक वसुंधरा आणि दुसरी आई नावाची वसुंधरा दोघींची प्रकुर्ती एकचं.
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे व औषध विक्रेत्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी होती. सकाळी ७ ते ११ ही दुकाने उघडण्याची वेळी होती. परंतु कापड, सलून, रेस्टॉरन्ट, हार्डवेअर, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, भांडी, सराफ, शालेय वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, पादत्राणे, भाजी मंडई, मार्केट यार्ड आदी व्यापार क्षेत्रातील व्यवहार ५१ दिवसांपासून बंद आहेत. दुकानांची घरपट्टी, घर खर्च, कर्जावरील व्याज, लाईट बिल, नोकरांचे पगार आदी व्यवहार बंद ठेवून करणे कठीण झाले आहे. दुकानातील मालही खराब होऊ लागला आहे. शासनाने लॉकडाऊन संदर्भात १ तारखेपासून बदल करताना शासनाने नियमनात बदल करून सकाळी ८ ते ४ या वेळेत सर्व दुकानाचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीरामपूर मर्चन्टस् असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोळळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सेक्रेटरी नीलेश ओझा, सहसेक्रेटरी अमोल कोलते, संचालक विलास बोरावके, संजय शाह, वैभव लोढा, राहुल मुथ्था, मुकेश कोठारी, सुनील गुप्ता, प्रवीण गुलाटी, प्रेमचंद कुंकूलोळ, दत्तात्रय धालपे, नितीन ललवाणी, राजेश कासलीवाल आदींच्या स्वाक्षरी आहेत. श्रीरामपूर : श्रीरामपूर मर्चन्टस् असोसिएशन मंगल कार्यालय कार्यालयात सुरू करण्यात आलेले स्व. जयंतराव ससाणे कोविड सेंटर हे दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या घटल्यामुळे बंद करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारातून शहर कॉंग्रेस कमिटी, श्री शक्ती ग्रुप, तुळजा फाउंडेशन व मर्चन्टस् असोसिएशन यांच्या संयुक्तिक विद्यमानेे कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावावर मात करण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होेते. सेंटरमध्ये दाखल रुग्णांची जेवण, राहण्याची सोय करून उत्तम सेवा देण्यात आली. सेंटरचा समारोप समारंभ झाला. सेंटरमध्ये ९६ कोविड बाधा झालेले रुग्ण दाखल होते. त्यातील ६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अन्य रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले.
आशिया चषक 2022 मधील सुपर-फोर सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने 174 धावांचे लक्ष्य पाचव्या चेंडूवर पूर्ण केले. या पराभवामुळे भारतीय संघाला अंतिम फेरी गाठणे जवळपास कठीण झाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 सुपर-4 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावत 173 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते. 13 च्या स्कोअरवर त्याचे दोन गडी गमावले. केएल राहुल सहा धावा करून बाद झाला तर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहितसह सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी58 चेंडूत 97 धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहित 72 धावा करून बाद झाला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही 34 धावा करून बाद झाला. 19व्या षटकात भारताने दोन चेंडूंत सलग दोन विकेट गमावल्या. दीपक हुड्डापाठोपाठ पंतही 17 धावा करून बाद झाला. गेला. शेवटी रविचंद्रन अश्विनने सात चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 15 धावांची मौल्यवान खेळी केली. श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने 174 धावांचे लक्ष्य शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 57 आणि पाथुम निसांकाने 52 धावा केल्या. दासुन शनाका 33 आणि भानुका राजपक्षे 25 धावांवर नाबाद राहिले.
2019 - 20 च्या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर (जीडीपी)मध्ये 7 टक्क्यांनी वृद्धी होऊ शकते असा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. या सर्वेक्षणामध्ये गुंतवणूक आणि विक्रीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. नवी दिल्ली : संसदेमध्ये उद्या 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थसंकल्प प्रस्तुत करणार आहेत. त्याआधी आज अर्थमंत्री संसदेत आर्थिक सर्वेक्षण (आर्थिक पाहणी अहवाल) सादर केला. 2019 - 20 च्या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर (जीडीपी)मध्ये 7 टक्क्यांनी वृद्धी होऊ शकते असा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. या सर्वेक्षणामध्ये गुंतवणूक आणि विक्रीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2018 - 19 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सभागृहात मांडला. सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा दुसरे आर्थिक सर्वेक्षण होते. या आर्थिक वर्षात (2019 - 20) आर्थिक विकास दर सात टक्के राहण्याची शक्यता आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात ( 2018 - 19 ) आर्थिक विकास दर 6. 8 टक्के तर त्याआधी 2017 - 18 मध्ये 7. 2 टक्के विकास दर होता. या सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात गुंतवणूक आणि विक्रीमध्ये वाढ होणार असल्याने विकास दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच बांधकाम क्षेत्रात देखील गती येण्याचा अंदाज आहे. या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे की, सरकार वित्तीय तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 6. 8 टक्के राहिली. त्यातही जानेवारी ते मार्च या तिमाहीत पाच वर्षातील सर्वात कमी म्हणजे 5. 8 टक्क्यांवर आली. आर्थिक घडी नीट बसावी यासाठीचे प्रयत्न आणि शेती संकट यामुळे तूट वाढल्याचं अर्थ तज्ञांचं मत आहे. येत्या पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था दुपटीने वाढवून 5 लाख कोटी डॉलर्स करायचं उद्दीष्ट पंतप्रधान मोदींना याआधीच जाहीर केलं आहे, तसं करायचं असेल तर विकास दर 8 टक्के असणं गरजेचं आहे. हा दर अपेक्षेप्रमाणे राहिला तर आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था ठरु. यामुळे आपण चीनलाही मागं टाकू शकतो. गेल्या वर्षभरात रोजगार, शेती, उद्योग, सेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्राची स्थिती काय आहे हे या अहवालात मांडलं जातं. देशाच्या अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण संसदेच्या पटलावर मांडलं जातं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज तो राज्यसभेत सादर केला. हा अहवाल देशाचे मुख्य अर्थ सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम यांनी तयार केला आहे. हा त्यांचा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचा पहिलाच आर्थिक पाहणी अहवाल आहे. जगातील पाचवी सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनायचं असेल तर काय करायला हवं याचा लेखाजोखा या आर्थिक अहवालात मांडला जातो. • विकास दर सात टक्के राहण्याची आशा आहे. • वर्ष 2019-20 मध्ये कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये घट होऊ शकते. • सर्वेक्षणात निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची देखील शकता वर्तवली आहे. • सर्वेक्षणामध्ये वित्तीय तूट 5. 8 टक्के सांगितली आहे, जो सरकारसाठी चिंतेचा विषय आहे.
पुणे (नितीन पाटील) : Pune Police Inspector Transfer । शहर पोलिस दलातील हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र धैर्यशील शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहे. (Pune Police Inspector Transfer) पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आस्थपना मंडळाची बैठक दि. 1 जुलै 2023 रोजी पार पडली. त्यामध्ये रविंद्र शेळके यांना हडपसर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यास मान्य्ता देण्यात आली आहे. दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांपेक्षा रविंद्र शेळके हे सिनिअर असल्याने त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संगमनेर । Sangamner: संगमनेर तालुक्यातील घारगाव हद्दीत मुळा नदीपात्रात एका ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला. बुधवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. शांताराम तात्याराव शिंदे वय ४० रा. खंदरमाळ असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी शांताराम शिंदे हे खंदरमाळ येथील राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर पडले होते. मात्र ते घरी न आल्याने त्यांची पत्नी कल्पना व मुलगा दिलीप वय १५ हे त्यांचा शोध घेत होते. नाशिक पुणे महामार्गावर घारगाव येथील पुलावरून काही नागरिकांना बुधवारी सकाळी नदीत मृतदेह नदीत तरंगताना आढळला. हा प्रकार घारगाव पोलिसांना सांगण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह शावविचेदन करण्यासाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. या व्यक्तीचे मृत्यू मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - 'केसरी' आणि 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने राहत्या घरी आत्महत्या केली. या संबंधी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. मात्र, आता या सर्व प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नहारच्या गळ्यावर संशयास्पद निशाण आढळले आहेत. गोरेगाव पोलिस याचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी कांचन शर्मा हिने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर संदीपला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यास नकार दिला. जेव्हा ती दुसऱ्या रुग्णालयात संदीपला घेऊन गेली त्यावेळी तेथील डॉक्टरांनी संदीपला तपासून मृत घोषित केले. संदीपच्या गळ्यावर जखमा आढळून आल्याने या प्रकरणात पोलिसांना संशय येत आहे. पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पहात आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा सायबर सेल संदीप नहारच्या सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यानं कौटुंबिक आणि बॉलिबूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचे म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वतः जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येआधी पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय म्हटले ? संदीपने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असे सांगितले. 10 मिनिटाच्या व्हिडीओत संदीपने म्हटले की, मी तुम्हाला बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडीओ बनवण्याचा एकच हेतू आहे की माझ्या आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कांचन शर्मा आहे. मी दीड-दोन वर्षापासून एका मानसिक तणावात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितले. आमचं 365 दिवस भांडण होतं. संदीप व्हिडीओत पुढे म्हणतो की, ती म्हणते की ती आत्महत्या करेल आणि त्यात मला अडकवेल. मी पूरता वैतागून गेलो आहे. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करते. माझ्या आईला शिव्या देते. तिच्यासमोर मी घरच्यांचे फोनही उचलू शकत नाही. माझे नाव कोणाशीही जोडते. ती नेहमीच माझ्यावर संशय घेते. संशयाला कोणतेही औषध नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी तिला शोधले. तिची आई तिला साथ देते. एवढेच नाही तर केस करण्याची धमकी देते. संदीपने पुढे म्हटले की, कांचनचा 2015-16 मध्ये एक एक्स होता. त्याच्यासोबत सहा वर्षे ती राहिली होती. तिने आपल्या एक्सला एका खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. मला तिची दया आली म्हणून तिच्यासोबत लग्न केले. मात्र, आमच्यात कोणतीच गोष्ट सारखी नव्हती. व्हिडीओत संदीपने सांगितले की, मित्रांनो, मी काही केले तर कांचनने माझ्या घरातील सदस्यांना त्रास देऊ नये. ती माझ्या कुटुंबाचा खूप द्वेष करते. त्यांच्या विरोधात तिने केस करु नये. माझी बुलेट मला बाबांना द्यायची आहे. सोनसाखळी आईला द्यायची आहे. पैसे कांचनने घ्यावेत. ती स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाही. तिला तिच्या चुका लक्षात येतील अशी अपेक्षा आहे. जर भविष्यात तिने लग्न केले तर त्या माणसाने सर्वात आधी तिच्या मेंदूवर काहीतरी उपचार करुन घ्यावेत, असे संदीपने म्हटले आहे.
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने तक्रार दिल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश केशव प्रधान (३० रा. बापू बंगला,वासननगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी अनिता पाटील (रा. छोटी उमरी,जि. अकोला) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रधान दांम्पत्य बापू बंगल्याच्या सुरक्षारक्षक रूममध्ये वास्तव्यास आहे. सोमवारी (दि. ७) शिल्पा प्रधान या विवाहीतेने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात झोळीच्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. मृत विवाहीतेच्या बहिण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिल्पा यांना पती रूपेश हा चारित्र्याचा संशय घेवून शारिरीक व मानसिक छळ करीत होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून इंदिरानगर पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या लागोपाठच्या दुसऱ्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी सकाळी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा संभाव्य प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या लागोपाठच्या दुसऱ्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी सकाळी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा संभाव्य प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील आणखी एका लाजिरवाण्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी करावयाच्या उपायांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. दीड वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पक्षात जान फुंकतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला तुल्यबळ लढत देतील अशी अपेक्षा असताना, काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपशेल निराशा केली आहे. देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता न आलेल्या काँग्रेसला पाच वर्षांपूर्वी जिंकलेल्या ४४ जागांवरून केवळ ५२ जागांवरच पोहोचता आले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवतील, अशी चर्चा असून त्यांचा राजीनामा फेटाळला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय कोणीही पक्ष चालवू शकत नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी आपल्या कार्यशैलीत लक्षणीय बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही अनेक काँग्रेस नेत्यांना वाटते. शनिवारच्या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सर्व बडे काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. सलग दुसऱ्या दारुण पराभवातून सावरून भविष्यातील वाटचालीसाठी काँग्रेस पक्षाने मजबूत होण्यासाठी काय केले पाहिजे, याचेही चिंतन बैठकीत अपेक्षित आहे. काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेताना राहुल गांधी यांच्या मदतीला ए. के. अँटनी, अशोक गहलोत, कमलनाथ, अहमद पटेल, अमरिंदर सिंह असे बडे आणि अनुभवी नेते देण्याचाही प्रस्ताव आहे.
गत कित्येक दिवसांपासून अवैध वाळूचे ट्रॅक्टर बिनधास्त भरधाव वेगाने पळवून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाचा डोळा होता. परंतु, ते हाती लागत नव्हते. ६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरडशहापूर येथे वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. पूर्णा नदीच्या नालेगाव परिसरातून शिरडशहापूर व परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू होते. याबाबत 'लोकमत' मध्ये वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरडशहापूर येथे दोन ट्रॅक्टर पकडले. याबाबतची माहिती तहसीलदार कृष्ण कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरडशहापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. दोन्ही ट्रॅक्टरला क्रमांक नाही. ट्रॅक्टर मालक विश्वनाथ संभाजी कदम (रा. वाई) गोविंद शिवजी राखोंडे (रा. नालेगाव) या दोघांविरुद्ध कारवाई करुन दोन्ही ट्रॅक्टर औंढा येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार कृष्ण कानगुले, सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राऊत, घुगे ,तलाठी मूकिर काकडे ,हरण आदींनी केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस शिक्षण क्षेत्र पूर्णपणे ठप्प होतं. शाळा-कॉलेजं आणि एकूणच शिक्षण क्षेत्र पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. पण, लॉकडाउनच्या काळातही देशभरातील लॉ शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'स्टडी फ्रॉम होम'चा प्रभावी मार्ग अवलंबला आहे. करोनामुळे परीक्षा रद्द होऊनही शिक्षणाच्या जिज्ञासेपोटी विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करतायत, हे वैशिष्ट्य आहे. लॉचं शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शिकता-शिकता अनुभव मिळावा यासाठी सीनिअर वकिलांकडे आर्टिकलशिप करतात. त्यामुळे रोजच्या शिक्षणाबरोबरच या विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळवणंही सुरूच असतं. पण, सध्याच्या परिस्थितीमुळे देशातील न्यायव्यवस्थाही ठप्प आहे. न्यायालयात अत्यावश्यक खटले वगळता बाकी सर्व न्यायालयीन कामकाज पुढे ढकलण्यात आलंय. त्यामुळे न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असलेल्या वकील मंडळींना आणि त्यांच्याकडे ज्युनिअरशिपसाठी जाणाऱ्या लॉच्या विद्यार्थ्यांनाही मागच्या दोन महिन्यांपासून मोठा ब्रेक मिळाला आहे. पण, लॉचे विद्यार्थी आणि नवोदित वकील या सक्तीच्या सुट्टीचा 'स्टडी फ्रॉम होम'साठी उपयोग करत आहेत. या काळात लॉच्या विद्यार्थ्यांना अनेक कोर्टातील नामांकित वकील, वकील संघटना, लॉ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठाच्या लॉ विभागाकडून व्हिडीओ कॉन्फरन्स, वेबिनार आणि ऑनलाइन व्याख्यानमाला आदी उपक्रमातून ई-प्रशिक्षण दिलं जातंय. लॉ विद्यार्थ्यांच्या गृहपाठात मुंबई विद्यापीठाच्या लॉ विभागानेही भरीव योगदान दिलं आहे. मागील दोन महिन्यात विद्यापीठाच्या विधी विभागानेही एलएलबी आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून नामांकित वकील व प्राध्यापक यांची ऑनलाइन लेक्चर्स आयोजित केली होती. विद्यापीठाच्या लॉ विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन लेक्चर सीरिजमध्ये रिसर्च मेथडोलॉजी, ज्युडिशियल प्रोसेस, क्रिमिनोलॉजी, सायबर क्राइम आणि आयपीआर अशा अनेक विषयांचा समावेश होता. करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकूणच शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. पण, या वेळेचा सदुपयोग करण्याचं ठरवून आमच्या विभागानं मागील दोन महिन्यात अनेक महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या आणि नामांकित वकिलांच्या सहकार्यानं निरनिराळ्या विषयांवर वेबिनार आणि ऑनलाईन लेक्चर्सचं आयोजन केलं. अजूनही हे उपक्रम सुरू आहेत आणि विद्यार्थी या ऑनलाइन उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. करोनामुळे बार कौन्सिलने ठरवलेले सर्व उपक्रम रद्द करावे लागले. पण, उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीनं आम्ही मागील दोन महिन्यांच्या कालावधीत नवोदित वकीलांसाठी अनेक प्रतिथयश आणि अनुभवी विधीज्ञांच्या व्याख्यानांचं केलं आहे. नवोदित वकिलांचा आणि लॉच्या विद्यार्थ्यांचाही या ऑनलाइन उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरुन दाम्पत्याला गज व चाकूसारख्या हत्याराने मारहाण करुन चोरी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ यादव क्षीरसागर, (वय 40), धंदा- शेती यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 26 एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोधेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी तिघे अज्ञात चोरटे आले. त्यातील एकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन घरामधील सामानाची उचकापाचक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी फिर्यादी व त्याची पत्नी अशांनी त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीस त्याचेकडील असलेल्या लोखंडी गजाने व चाकुसारख्या काहीतरी धारदार हत्याराने हाता पायावर डोक्यावर मारहाण करून जखमी करून फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये घेऊन पळून गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Bjp Leader Chandrakant Patil : भाजप नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर पाटील यांना तीव्र रोषाला सामोरे जावे लागते. तसेच पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात त्यांच्यानंतर शाईफेक देखील करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. जळगाव येथे एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, मी बोलल्यानंतर कुणीतरी त्याची स्कीम तयार करत याने काही बोलल्यानंतर त्याचा अर्थ लावायचा असा मस्त प्रोग्रॅम तयार होतो, आणि त्याला इको क्रिएट करणं म्हणतात,आणि हा बोलला ,तो बोलला. पण मी असं बोललो की काय? असं म्हणत संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्यूज होतो. पण माझीही मोठी यंत्रणा आहे. माझं प्रत्येक भाषण कॅसेट होतं. त्याच्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकतात बिचारे ,मला त्यांची कीव येते. दर दोन महिन्यांनी काहीतरी काढत असतात अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला होता. या विधानाचा विरोध म्हणून पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला गेला. कलम 307 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच 11 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
2014 साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - काँग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे. असे मत व्यक्त करतानाच पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न गत काही वर्षांपासून होत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निरीक्षण नोंदवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजा मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे.
मुंबई : पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा हा मूलभूत हक्क आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी लोकांना पाणी मिळावण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागते, हे दुर्दैव आहे, अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली. भिवंडीच्या कांबे गावातील रहिवाशांनी केलेल्या याचिकेवर न्या. एस. जे. काथावाल व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे होती, त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले. ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी निजामपूर महापालिकेचा संयुक्त उपक्रम असलेली स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन एॅण्ड इन्फ्रा या कंपनीला आपल्याला नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी रहिवाशांनी न्यायालयात याचिका दाखल केली. सध्या आपल्याला महिन्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येतो, तोही केवळ दोन तास करण्यात येतो, असा दावा गावकऱ्यांनी न्यायालयात केला आहे. स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांनी न्यायालयाला सांगितले की, या गावाला एका ठरावीक ठिकाणापर्यंत पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात येतो. मात्र त्या ठिकाणापासून गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. गेल्या पाच वर्षांत या गावाची लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यासाठी आम्हाला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अद्ययावत करावी लागेल, असे दांगडे यांनी न्यायालयाला सांगितले. दररोज काही तासांसाठी पाणीपुरवठा केला पाहिजे. हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. लोकांना असा त्रास सहन करायला लागू नये. महाराष्ट्र सरकार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले, असे आम्हाला म्हणायला लावू नका. राज्य सरकार इतके असहाय्य आहे, हे आम्ही मान्य करणार नाही. यासंदर्भात राज्याच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्याला बोलविण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले. बेकायदेशीर जोडण्यांवर काय तोडगा काढणार? स्टेम कंपनी बेकायदेशीररीत्या स्थानिक नेत्यांना आणि टँकर लॉबीला पाणी पुरवत असून, मुख्य जलवाहिनीला ३०० बेकायदेशीर जोडण्या असल्याचा आरोप याचिकेद्वारे केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काय पावले उचलणार, याचे उत्तर दांगडे यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवत दांगडे यांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आधी बेकायदेशीर जोडण्या बंद करा. तुम्ही (स्टेम) काहीही कारवाई करत नसल्याने साधी पोलीस तक्रारही दाखल केली नाही. अधिकार असतानाही याचिकाकर्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत नाही. दांगडे या समस्येवर तोडगा काढण्यास इच्छुक नाही, असे वाटते, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर दांगडे यांनी न्यायालयाला सांगितले की, जेव्हा ते बेकायदेशीर जोडण्या बंद करण्यास गेले होते, तेव्हा १५०च्या जमावाने त्यांना घेरले होते.
गेल्या भागामध्ये आपण छत्तीसगड येथील हवामान बदलासंदर्भात झालेले अभ्यास आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला जातो. या भागामध्ये या राज्यातील शेती, सुराज्य गाव योजना याविषयी माहिती घेऊ. छत्तीसगड राज्यामध्ये तीन प्रकारच्या जमिनी आढळतात. बागड बागड ही पठारावरची सपाट जमीन असून, तेथे सोयाबीन, भात यांसारखी नगदी पिके घेतली जातात. बारहा हा जमिनीचा प्रकार उत्तम समजला जातो. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक आहे. या जमिनीत कायम ओलावा असतो. या जमिनीवर स्थानिक भाताचे वाणांचे (जे ११० ते १४० दिवसांत परिपक्व होतात) उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र महानदी आणि तिच्या उपनद्यांना येणारे पूर, उशिरा येणारा पाऊस याचा या पिकावर परिणाम होत आहे. या स्थानिक वाणांची जागा आता संकरित वाणांनी घेतली आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांची उपलब्धता केली जाते. यांत्रिकीकरणाला चालना दिली जाते. अर्थात, यात शेतकऱ्यांपेक्षा विक्रेत्यांचाच अधिक फायदा होत आहे. या भागात बोअरवेलची संख्याही वेगाने वाढत आहे. डिपरा ही डोंगर टेकड्यांच्या पायथ्याची जमीन. येथे पाण्याचा निचरा वेगाने होतो. छत्तीसगडच्या कृषी विभागाने या तिन्ही प्रकारच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कृषी क्षेत्राचा वातावरण बदलाच्या दृष्टिकोनामधून सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार बागड पद्धतीमध्ये पाणी साठवून भूगर्भात जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच भागात अधिक हमीभावाची खात्री देत सेंद्रिय सोयबीन आणि भात पिकास प्रोत्साहन दिले जात आहे. बारहा पद्धतीमध्ये भाताच्या स्थानिक वाणास प्रोत्साहन दिले जात आहे. स्थानिक भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शाश्वत पाणीपुरवठा करून साडेचार महिन्याचे हे भात वाण वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डिपरा या जमिनीवर डोंगर उतारावर सध्या सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणावर लागवड दिसून येते. कमी पाण्यावर भरपूर उत्पादन देणाऱ्या या पिकाच्या परागसिंचनासाठी जंगलामधील मधमाश्यांचा फायदा होतो. वातावरण बदलास सामोरे जाताना सूर्यफुलाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. या राज्यात राष्ट्रीय फल उत्पादन कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी फळे, मसाला पिके, औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेऊ लागले आहेत. राज्य शासनाने कृषी उत्पादन साठवणुकीसाठी सुमारे ११० गोदामे आणि ५० शीतगृहे बांधली आहेत. ही सेवा अल्प भाड्यात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. भारतीय हवामान खात्याशी संबंधित ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रत्येक गावामध्ये उपलब्ध केली आहे. ध्वनिक्षेपकाच्या साह्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाचा अंदाज (नेहमीसारखा की मुसळधार), वारा, वादळे, गारपीट, दुष्काळाची पूर्व सूचना, नद्यांना येणारे पूर यांची माहिती दिली जाते. छत्तीसगडमध्ये बहुतेक शेतकरी पशुपालन करतात. जंगलात मुबलक चारा असून, शासनाद्वारे काही राखीव कुरणेही विकसित केली आहेत. पशुधनापासून प्राप्त होणाऱ्या कंपोस्ट खताला शासनाचे अनुदान आहे. सुराज्य योजना पाणी संवर्धन आणि संरक्षणाच्या विविध योजना असून, त्यात शेतकऱ्यांचा मुक्त सहभाग दिसतो. यामुळे आज या राज्यातील शेतकरी रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये फळे आणि पालेभाज्या घेताना दिसतो. 'सुराज्य गाव योजना' ही छत्तीसगडमधील राज्य शासनाची एक सुंदर योजना. ग्रामसभेद्वारे नियंत्रित होणाऱ्या या योजनेत 'नारवा', 'गारुवा', 'गुवा' आणि 'बाड' या चार तत्त्वावर काम चालते. त्याच्या आद्याक्षरावरून या योजनेस NGGB असेही म्हणतात. वातावरण बदलाच्या सर्वांत जास्त झळा ग्रामीण भागास विशेषतः तेथील कृषी जीवनास बसणार आहेत. जागतिक असलेल्या या समस्येस सामोरे जाण्यासाठी प्रत्येक लहान गाव हे छत्तीसगडमधील गावांप्रमाणेच सुराज्य होणे गरजेचे आहे. निसर्गाचा सन्मान करणारे गाव. . . चार वर्षांपूर्वी बस्तरमधील एका लहान आदिवासी गावाला भेट देण्याचा योग आला. गावाचा परिसर, घरे ही आदिवासी खेड्याप्रमाणे निसर्गाचा सन्मान करणारी पारंपरिकच. गावामधील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये गावात सुरू असलेल्या विविध योजनांची आणि लाभार्थीची नावे होती. प्रत्येक घराची स्वतःची शेणखत साठवण जागा होती. प्रति दिन त्यातील अर्धा हिस्सा ग्रामपंचायतीला दिला जात होता. गाव परिसरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे लहान मोठे मळे होते. अनेकांच्या परसदारीही भाजीपाला लावलेला दिसत होता. किमान एक दोन फळ झाडे तरी दिसत होती. वाहणारा लहान ओढा निर्मळ पाण्याने भरून वाहत होतात. सुराज्य गाव योजनेअंतर्गत गावाला शासकीय अनुदान मिळत होते. त्याचा सर्व तपशील बोर्डावर लिहिलेला होता. अंगणवाडीमधील मुलांना प्रति दिन एक कप ताजे दूध देण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाने वाटून घेतलेली होती. या मुलांच्या आहारात स्थानिक पिकवलेली फळे आणि ताज्या भाज्यांचा समावेश होत होता. तेथील अंगणवाडीला भेट दिली, तेव्हा मला जाणवले की प्रत्येक मूल गुटगुटीत आहे. मला खरेतर प्रश्न पडला की आपल्याकडे असे का होऊ शकत नाही? अशी सुराज्ये आपल्याकडे का निर्माण होत नाहीत, याचा विचार करताना जाणवले की आपली मानसिकता हेच कारण आहे. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
ईडीकडून (ED) उके प्रकरणात दाखल चार्जशीटमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके (Satish Ukey) याचे वकील एड. रवी जाधव यांनी केला आहे. नागपूर : फसवणूक केल्या प्रकरणी आणि आरोपपत्रात फेरबदल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सतीश उकेंच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे, जमीन गैरव्यवहारात मनी लॉंड्रींगप्रकरणी सतीश उके प्रकरणात हा मोठा गौप्यस्फोट आहे. ईडीकडून (ED) उके प्रकरणात दाखल चार्जशीटमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके (Satish Ukey) याचे वकील एड. रवी जाधव यांनी केला आहे. या संदर्भात उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात २ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जानंतर न्यायालयाने संबंधित चार्जशीट सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवण्याचा निर्देश दिला आहे.. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवत राहिले आहे आणि असे ते नागपुरातील पहिले वकील आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ३१ मार्च रोजी ईडीच्या पथकाने धाड घातली होती. जवळपास ६ ते ७ तासांच्या चौकशीनंतर सतीश उके व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात ईडीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुंबईद्वारे ईसीआयआरसह केल्या जात असलेल्या चौकशीतून मुक्तता मिळावी आणि हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्यात यावे, अशी विनंती उके बंधूंनी ईडीच्या विशेष न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. तसेच, योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची त्यांना मुभा मात्र त्यांना दिली. या प्रकरणी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपात अॅड. सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ३१ मार्च २०२२ रोजी ईडी मुंबईने नागपुरातून अटक केली होती. सतीश उकेंचे वकील रवी जाधव यांच्या आरोपानंतर हे प्रकरण काय वळण घेते. हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तुमचा स्ट्रॉलर हरवला की तुमच्याकडे नाही? काळजी करू नका, तुमच्या लहान मुलाला बाहेर जेवायला घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे उत्तम उपाय आहे. आमचे हॉटेल हाय चेअर हे मुलांसाठी रेस्टॉरंट, कॅफे, हॉटेल्स आणि बरेच काही येथे आरामदायी आणि सुरक्षित ठिकाण आहे. बॅगमध्ये फोल्ड करणे आणि साठवणे सोपे आहे जेणेकरून तुम्ही जिथे जाल तिथे ती तुमच्यासोबत जाऊ शकते. हे मुलांना हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये असल्यासारखे वाटण्यास मदत करते आणि पालकांसाठी हा एक मोठा विक्री बिंदू आहे. युमेया चेअरशॉटेल उच्च खुर्ची विविध डिझाइनसह येते जे कार्य आणि सौंदर्यशास्त्र एकत्रित करते. कठोर गुणवत्ता चाचणी विश्वसनीय उत्पादन गुणवत्ता सुनिश्चित करते. उद्योगातील अनेक वर्षांच्या अनुभवाने समर्थित आणि समर्थित, या उत्पादनाने असंख्य प्रशंसा मिळविली आहेत. • आमच्या कंपनीचे स्पष्ट भौगोलिक स्थान फायदे आहेत, त्यामुळे वाहतूक अतिशय सोयीस्कर आहे. • युमेया चेअर्स सक्रियपणे ग्राहकांच्या सूचना स्वीकारतात आणि सेवा प्रणालीमध्ये सतत सुधारणा करतात. • युमेया चेअर्समध्ये वरिष्ठ संशोधन आणि विकास कार्यसंघ आणि प्रगत आधुनिक उत्पादन उपकरणे आहेत, जे जलद विकासासाठी मजबूत हमी देतात. युमेया खुर्च्या केवळ दर्जेदार इलेक्ट्रिक उपकरणेच पुरवत नाहीत, तर ऑन-साइट इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरची सेवाही पुरवतात. आम्ही ग्राहकांना चिंतामुक्त खरेदी अनुभव देतो. गरज असल्यास लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा! हॉटेल हाय चेअर स्थापित करणे किती सोपे आहे?
भुवनेश्वर (ओडिशा) - ओडिशातील संबलपूरमध्ये १४ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. पोलिसांनी हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते, असा दावाही पोलिसांनी केला आहे. यात आक्रमणात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे. #ओडिशा प्रदेश भाजपा अध्यक्ष #मनमोहन_सामल ने कहा कि संबलपुर में की हनुमान जयंती बाइक रैली पर हिंसा पूर्व नियोजित साजिश । घटना पर मुख्यमंत्री मुँह न खोलना दुर्भाग्यपूर्ण है । पोलिसांचे म्हणणे आहे की, काही लोकांनी त्यांच्या घरात लाठ्या-काठ्या आणि दगड आधीच जमा करून ठेवले होते. काहींनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. घरांची झडती घेतल्यावर हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी १०० दंगेखोरांची ओळख पटवली असून अद्याप २६ जणांना अटक करण्यात आली आहे.
गणेशोत्सव आणि गौरी गणपतीमुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढण्यासह बाजारपेठेत गर्दी वाढल्यामुळे गेल्या ११ दिवसांत शहरात करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. गणेश विसर्जनावेळी भक्तांना गणपती बाप्पाकडे करोनामुक्तीचे आशीर्वाद मागितले असले तरी गणेशोत्सवाच्या काळात गेल्या अकरा दिवसांत शहरात ६,९९३ करोनाबाधित आढळले, तर ७२ जणांनी जीव गमावल्याने करोनाचे संकट अधिक गडद झाल्याचे चित्र आहे. गेल्या अकरा दिवसांतील ही वाढ नाशिककरांसाठी धोक्याची घंटाच आहे. नाशिक शहर अनलॉक झाल्यापासून करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असला तरी उत्सवादरम्यान त्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सव आणि गौरी गणपतीमुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांची, तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्यांचीही संख्या वाढल्यामुळे गेल्या अकरा दिवसांत करोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. गेल्या अकरा दिवसांमध्ये म्हणजे २२ ऑगस्टपासून करोनाबाधित रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यास केवळ २३, २४ व २५ ऑगस्टला हा आकडा पाचशेच्या खाली असल्याचे दिसून येते. त्यानंतर मात्र करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्याचे चित्र आहे. अन्य दिवशी मात्र ही संख्या सहाशेच्या पुढे असल्याचे निदर्शनास आले आहे. २९ ऑगस्टला सर्वाधिक म्हणजेच हा आकडा ९५८ होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न केल्यामुळे, तसेच उत्सवाच्या उत्साहात सुरक्षित वावरला हरताळ फासल्यामुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुण्याहून शहरात सणासाठी आलेल्या नाशिककरांची संख्याही मोठी होती. या शहरांमध्ये ही करोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. या काळात घरातील सदस्यांची संख्याही जास्त असल्यामुळे घरातही सुरक्षित वावर पाळला जात नव्हता. त्यामुळेही करोनाबधित होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. गणेशोत्सवादरम्यान नियमांचे पालक करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत सातत्याने करण्यात येत होते. त्यानुसार गणपती आवाहन आणि विसर्जनादरम्यान नाकरिकांनी या नियमांचे पालन केले होते. मात्र, संपूर्ण उत्सवकाळात मात्र हे नियम फारसे पाळले गेलेले नसल्याचे निदर्शनास आले. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मेनरोड, दहिपूल या परिसरात रोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती. खरेदी करताना विक्रेते आणि ग्राहक या दोघांमार्फतही नियमांचे पालन केले जात नव्हते. केवळ चेहऱ्यावर मास्क आणि बॅगमध्ये सॅनिटायझर इतकेच चित्र होते. सुरक्षित वावरच्या नियमाचा मात्र या कालावधीत पूर्ण फज्जा उडाला होता. उत्सवकाळात नातेवाइकांच्या घरी जाण्याचे प्रमाणही अधिक होते. शहरात अकरा दिवसांत सात हजार करोनाबाधित वाढण्यासह गेल्या अकरा दिवसांत ७२ करोनाबळी गेल्याची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबळींची संख्या २१ ऑगस्ट रोजी ४२४ होती. एक सप्टेंबरपर्यंत करोनाबळींचा आकडा ४९६ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. या काळात रोज सरासरी सात जणांचा करोनामुळे बळी गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्सव नाशिककरांना चांगलाच भोवल्याचे चित्र आहे.
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - गुप्तांगांना हात लावून गरोदर महिलेसोबत अश्लीलचाळे केल्याने पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयातील एका डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२३) दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णालयातील लेबर रुम वॉर्ड ५८ मध्ये घडली. याप्रकरणी गरोदर २० वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. हर्षल बसवराज निबान्नवर (वय २८, रा.फ्लॅट क्र. ३०१, तुलीप हाईट्स वाघेरे टॉवर, नेहरुनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २० वर्षीय तरुणी या गरोदर आहेत. त्या घरात काम करत असताना पडल्या होत्या यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे त्या रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचार घेण्यासाठी संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल झाल्या. यावेळी तेथे उपस्थित डॉ. हर्षल याने महिलेच्या अंगाला वारंवार हात लावला, तसेच तुम्हाला बरे वाटून अगर न वाटून ४ दिवस अॅडमीट व्हावेच लागेल, असे म्हणाला. काही वेळाने हर्षलने महिलेच्या तपासणी दरम्यान तिच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला, असा महिलेचा आरोप आहे. मात्र डॉ हर्षल यांनी चौकशी दरम्यान सांगितले की हा तपासणीचा भाग असून महिलेच्या तपासणी दरम्यान त्या ठिकाणी काही महिला डॉक्टर देखील उपस्थित होत्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हरीदास बोचरे करत आहेत.
परभणी : जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार ९१४ वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात नवीन वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीज वितरणकडून ग्राहकांची गैरसोय दूर करून दिलासा दिला आहे. कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासह वीज बिल वसुली, नवीन वीज जोडण्या देण्याचे काम सुरूच आहे. परभणी जिल्ह्यात उच्च, लघु दाब वर्गवारीमधील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषी या गटातील वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे नवीन वीज जोडण्या देण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सातत्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर होत असलयाने या वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढून ग्राहकांना वीज जोडण्या देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील नवीन वीज जोडण्यांचे प्रस्ताव दाखल केलेल्या ९ हजार ९१४ वीज ग्राहकांना कोरेानाच्या काळात नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे या ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या वतीने दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.
अध्यात्म हेच देशाचे तत्त्वज्ञान आहे, असे विचार त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी आगरतळा येथे सुरू झालेल्या अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात मांडले. त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन आणि इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाच्या पहिल्या दिवशी शांती काली आश्रमाचे महंत चित्त महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांना अष्टलक्ष्मी म्हणून संबोधले आहे. अष्टलक्ष्मी संमेलनाद्वारे आठही राज्यांना एकमेकांची संत संस्कृती समजून घेण्याची संधी मिळेल. येथील संस्कृतीची एकात्मता त्यातून साधली जाईल. आपण एकमेकांना समजून घेतल्याशिवाय आपण दुसऱ्यांना त्याचे महत्त्व काय सांगणार," असा सवाल साहा यांनी उपस्थित केला. "मी कोण आहे. माझा जन्म कशासाठी झाला आहे, हे जोवर जाणत नाही, तोवर आपण दुसऱ्यासाठी काहीही करू शकणार नाही. मंदिर असो किंवा मशीद त्याचे घुमट हे निमुळते असते. देवाकडे केलेली मागणी ध्वनीद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचावी, हाच त्यामागील उद्देश असतो," अशा शब्दांत साहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वबंधूत्वाचा संदेश देशाबाहेर नेण्याचे कार्य हे संमेलन करील, असा विश्वास कार्याउपाध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंतनू हिर्लेकर यांनी अष्टलक्ष्मी स्तुती सादर केले. याचप्रमाणे संस्कार भारतीतर्फे स्वागतगीत सादर करण्यात आले. समारोपप्रसंगी महाराष्ट्राच्या वारक-यांनी कृष्णगीतावर आधारित दिंडीनृत्याने वातावरणात भक्तीरसाची निर्मिती केली. त्यानंतर आसामच्या कलाकारांनीही संगीत सादर केले.
संस्कृतीहीन बाबरच्या चरित्राचे वास्तव स्वरूप ! हिंसाचारामुळे धुलागड (बंगाल) अजूनही धुमसतेच ! हिंदूंच्या विरोधानंतर कॅलिफोर्नियातील आस्थापनाने हिंदु देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांची विक्री थांबवली ! भिवंडीत १०० किलो गोमांस नेणार्या २ धर्मांधांना अटक ! हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्या 'बिलिव्हर्स'च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा ! चेरत्तला (केरळ) : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात धर्माचरण या विषयावर प्रवचन !
चिनी लोक सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खूप चवीनं खातात. जेवणाबरोबर ते सतत गरम पाणी किंवा 'हर्बल टी' पिताना दिसतात. जेवणाच्या वेळा मात्र अगदी काटेकोर. सहसा कुणी त्या चुकवीत नाहीत. चिनी लोक सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खूप चवीनं खातात. जेवणाबरोबर ते सतत गरम पाणी किंवा 'हर्बल टी' पिताना दिसतात. जेवणाच्या वेळा मात्र अगदी काटेकोर. सहसा कुणी त्या चुकवीत नाहीत. दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा. ९५ टक्के चिनी लोक याच वेळी जेवताना दिसतील. डबे उघडून बसलेले दिसतात. त्यावेळी तुम्हाला टॅक्सी मिळणंही कठीण! . . चीनच्या दक्षिणेकडचे डोंगराळ प्रदेशातले लोक बहुतेक करून गरीब शेतकरी आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धतींतही येथे थोडा फरक दिसतो. या भागात जे पदार्थ मिळतात ते सुकवून टिकवून ठेवण्याची पद्धत जास्त आहे. हे लोक भाताबरोबर खारवलेले किंवा आंबवलेले मासे, भाज्यांची त्यांच्या पद्धतीने बनवलेली लोणची, वाळवलेल्या वेगवेगळ्या शेंगा हे प्रकार खातात. 'शियान' रेस्टॉरंटमध्ये एक 'हँड पूल्ड नूडल्स' हा प्रकार मिळतो. याला 'ला मियान' म्हणतात. हे नूडल्स हाताने पिठाच्या गोळ्याला ओढून आपल्यासमोर बनवून, उकडून देतात. त्यावर थोडे सोया सॉस, थोडे व्हिनेगार घालून, लांब मोड आलेले मूग घालून आपल्याला खायला देतात. यावर आपल्याला हवा तेवढा लाल तिखट सॉस म्हणजे 'ला जाओ' घेऊन खायचं. हा ला जाओ म्हणजे चिली सॉस लाल मिरच्या, तीळाचे कूट, मीठ आणि भरपूर तेलाने बनलेला असतो. या ला मियान बरोबर चवीला उकडलेले शेंगदाणे, लसूण लावलेले काकडीचे काप, कोवळ्या बांबूची किसून केलेली कोशिंबीर, किसलेल्या ड्राय टोफूची कोशिंबीर, लसूण घातलेली उकडलेली पालकाची पानं, तिखट राइस जेली क्यूब्ज हे कितीतरी शाकाहारी प्रकार आपण खाऊ शकतो. पोट भरतं पण मन भरत नाही, असा आमचा दरवेळेचा अनुभव आहे. हे सगळं शाकाहारी असल्यामुळे बऱ्याच पाहुण्यांना आम्ही तिथे नेतो. 'चायनीज हॉट पॉट' हासुद्धा एक खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे. याचे वेगळे रेस्टॉरंट्स असतात. आपण शाकाहारी किंवा मांसाहारी आणि हिरवी किंवा लाल असा करीचा प्रकार सांगायचा. त्याबरोबर तिखटाची लेव्हल ठरवायची/सांगायची. तसं पाणी किंवा करी ते बनवतात. त्यानंतर भाज्यांचे प्रकार म्हणजे बटाट्याचे, रताळ्याचे, गाजराचे आणि कमळ काकडीचे पातळ काप, पालक आणि इतर हिरव्या भाज्या, कोबीचे तुकडे, मशरूम्सचे हवे ते प्रकार आणि मासे, कोळंबीचे रोल्स, चिकनचे पातळ काप, टोफूचे २-३ प्रकार, मांसाचे ३-४ प्रकार यातलं हवं ते सिलेक्ट करायचं. थोड्या वेळाने आपल्या टेबलवर एक शेगडी आणली जाते. यावर एका मोठ्या भांड्यात आपण सांगितलेली पाणीदार करी असते. मोठ्या ताटांमध्ये आपण सांगितलेल्या भाज्या आणि इतर गोष्टी आणून देतात. ही करी उकळायला लागली की त्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी घालून ५-७ मिनिटे शिजल्यावर चिमट्याने आपल्या ताटात काढून त्या खायच्या. चवीला अनेक प्रकारचे सॉस असतात. ही करीसुद्धा बाऊलमध्ये घेऊन सूपसारखी पिता येते. मात्र हा हॉट पॉट खायला अतिशय पेशन्स असावा लागतो. भरपूर वेळ आणि मोठ्ठा ग्रुप असेल तर मजा येते. इथलं स्ट्रीट फूड पण बरंच प्रसिद्ध आहे. बहुतेक करून यात बार्बेक्यू फूड असतं. वेगवेगळे कबाबचे प्रकार, तळलेले किंवा भाजलेले टोफूचे काप, पोर्क किंवा बीफचे सातये, काड्यांवर लावलेले खेकडे, बेबी आॅक्टोपस, स्क्वीड किंवा जंबो प्रॉन्स. हे सगळं खायला संध्याकाळी भरपूर गर्दी असते. भाज्यांमध्ये बटाटे, कमळ काकडीचे काप, भाजलेली रताळी, मक्याची कणसं हे प्रकारसुद्धा या गाड्यांवर दिसतात. याबरोबर हवी असल्यास नान, मटन बिर्याणी आणि काही मिठाया पण मिळतात. मात्र आपल्याकडचा शाकाहारी माणूस या भाज्या खाणं शक्य नाही. कारण ज्या शेगडीवर मांस भाजतात त्यावर भाज्यादेखील भाजतात. बिजिंगमध्ये असे प्रकार मिळणारी एक मोठ्ठी फूड स्ट्रीट आहे. खूप सारे टुरिस्ट मुद्दाम तिथे हे सगळं खायला जातात. या सगळ्या साध्या, शाकाहारी किंवा तिखट, तेलकट मांसाहारी जेवणाबरोबर हे लोक सतत गरम पाणी किंवा वेगवेगळ्या वनस्पती घातलेला चहा पिताना दिसतात. कदाचित म्हणूनच यांचं जेवण आपोआप जिरून जात असेल. यांचे बहुतेक पदार्थ शेंगदाण्याचं, मक्याचं, मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरून बनवलेले असतात. हे लोक जेवणाच्या वेळा शक्यतो चुकवत नाहीत. दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ९५ टक्के चिनी लोक जेवताना दिसतील. अगदी शॉपिंग मार्केटमध्येसुद्धा यावेळी हे लोक डबे उघडून बसलेले दिसतात. यावेळी टॅक्सी मिळणंही कठीण असतं. हर्बल चहा किंवा ग्रीन टी मात्र हे लोक सतत पीत असतात. प्रत्येकाजवळ एक छोटा थर्मास असतो. त्यात वेगवेगळे हर्ब्ज. शेवंती, गुलाबाची वाळलेली फुलं, खडीसाखरेचे तुकडे इत्यादि प्रकार ग्रीन टीच्या पानांबरोबर घातलेले असतात. यातलं पाणी संपत आलं की पुन्हा पुन्हा भरत ते दिवसभर पीत राहायचं. यामुळेच हे लोक खूप फिट असतात. इथे इतकी वर्षं राहून यांच्या जेवणाच्या वेळा आम्हीदेखील पाळायला लागलोय. अगदी ६ वाजता जरी नाही तरी ७. ३० वाजता आमचं जेवण झालेलं असतं. दिवसातून १-२ वेळा ग्रीन टीसुद्धा प्यायला जातो. भारतीय चायनिज पदार्थांपेक्षा इथल्या खऱ्या चायनिज पदार्थांची चव आणि प्रकार खूपच वेगळे आहेत. या चवींची सवय व्हायला वेळ लागतो. परंतु दोन्हींची तुलना मात्र होऊ शकत नाही. दोन्ही चांगलेच आहेत. या चिनी लोकांच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रस्त्यांच्या मध्ये आणि दुतर्फा इतकी सुंदर झाडं लावलेली असतात की काय सांगावं! प्रत्येक ३-४ रंगांच्या फुलझाडांची क्रमवारी ठरलेली असते. त्यांच्याभोवती कधी हिरवी झाडं तर कधी नुसतीच गवताची हिरवळ. चौकाचौकांतून फुलझाडांच्या वेगवेगळ्या रचना केलेल्या असतात. कधी उडणारे पक्षी, तर कधी मोठ्ठी सांडलेली फुलांची परडी. अतिशय सुंदर अशी रंगसंगती या सगळ्यांतून दिसत असते. आणि हे रंग अर्थातच ही फुलझाडं ऋतूप्रमाणे बदलत असतात. हे सगळं अखंडपणे करणाऱ्या त्या माळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दर काही दिवसांनी चौकातल्या रंगसंगती आणि रचना बदललेल्या असतात. शांघायच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला हांगपू नदी पार करावी लागते. यासाठी नदीवर ४-५ पूल्स आणि काही टनेल्स किंवा भुयारं या नदीखाली बनवली आहेत. यामधून सतत वाहतूक सुरू असते. या पुलांच्या कठड्यांना सौरऊर्जेवर चालणारे लाइट्स लावलेले आहेत. रात्री हे सगळे पूल अतिशय सुंदर दिसतात. हांगपू नदीच्या काठाला 'बंड' असं म्हणतात. या बंडला खूप सुंदर फुलझाडांच्या रचनांनी सजवलेलं असतं. याठिकाणी नेहमीच भरपूर पर्यटक असतात. या नदीच्या पूर्वेला शांघायचा २००० सालानंतर बनलेला नवा भाग बघायला मिळतो. यांचा बांधकामाचा वेग थक्क करून टाकणारा आहे. अगदी अलीकडे म्हणजे २०१५ मध्ये लोकांसाठी सुरू झालेल्या शांघाय टॉवरचं काम २००८ मध्ये चालू झालं होतं. ही १२८ मजली इमारत यांनी अवघ्या सहा वर्षांत उभी केली आणि २०१५ मध्ये त्याचं उद्घाटनही झालं. असं म्हणतात की, या इमारतीचा नवा स्लॅब दर तीन ते पाच दिवसांत पूर्ण होत होता. हे चित्र केवळ शांघायसारख्या मोठ्या शहरातूनच नव्हे, तर अगदी लहान गावांतूनही दिसतं. इथली माणसं पाऊस पडत असतानासुद्धा छत्री घेऊन झाडांचं किंवा कचरा उचलण्याचं काम करताना दिसतात. पूर्वीच्या काळी ही गावं आणि शहरं एवढी स्वच्छ नव्हती. पण आता मात्र यांच्या देशातले लोक स्वच्छतेबाबत फार जागरूक आहेत. चीनमध्ये खूप पर्यटक येतात. आपल्या देशाविषयी चुकीच्या कल्पना मनात घेऊन त्यांनी परत जाऊ नये यासाठी हे नागरिक खूपच जागरूक असतात. जगभरातल्या पाहुण्यांना आपला देश स्वच्छ आणि आकर्षक वाटावा यासाठीही हे लोक खूप मेहनत घेतात. चिनी नागरिकांचं स्वच्छतेविषयीचं प्रेम आणि तिथल्या कायद्यांविषयी पुढच्या भागात. . (लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत. ) भारतीय रामाला चिनी वस्त्रं! भारतीय नववर्ष गुढीपाडव्याचा सण भारतात नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आम्ही इथे चीनमध्येही गुढीपाडवा त्याच उत्साहात साजरा करतो. आमच्याकडे चैत्रात रामाचं नवरात्र असतं. चीनमध्ये आल्यापासून दरवर्षी आमच्या पिढीजात मूर्तींना आम्ही नवी वस्त्रं शिवतो. ही वस्त्रं शिवण्याचं काम कोण करत असेल? - आमची चिनी आया! दर गुढीपाडव्याला तिने स्वहस्ते शिवलेली चायना सिल्कची अत्यंत सुबक वस्त्रं आमच्या रामरायाला आम्ही घालतो! यंदाही आमच्या चिनी आयानं तयार केलेल्या सुंदर वस्त्रांनीच आमचा रामराया नटला!
टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची अमेरिकन थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणार्या कार्नेज एन्डेाव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस संस्थेच्या बोर्डवर ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष हार्वे फिममन यांनी रतन टाटा बोर्डवर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून टाटा यांच्या निवडीचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले आहे. हार्वे या संदर्भात बोलताना म्हणाले की रतन टाटा यांना जागतिक अर्थव्यवस्थेचे उत्तम ज्ञान आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्र ही जगातील अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग असून त्याचाही अनुभव टाटा यांच्याकडे आहे. रतन टाटा हे कार्नेज साठी अॅसेट ठरतील व त्यांच्यामुळे ग्लोबल थिक टँक विकसित होण्यास मदत होणार आहे. दिल्लीत संस्थेचे नवीन दक्षिण आशिया केंद्र स्थापन करण्यासही टाटा यांचे सहाय्य मोलाचे ठरणार आहे. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून १९९१ ते २०१२ पर्यंत जबाबदारी सांभाळली आहे. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ते पंतप्रधानांच्या व्यापार उद्योग कौन्सिलचेही सदस्य आहेत. कार्नेज एन्डोव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुना थिक टँक असून त्याची स्थापना १९१० साली झाली आहे. या संशोधन केंद्राच्या मास्को, बिजिग, बैरूट आणि ब्रुसेल्स येथेही शाखा आहेत. संस्थेचे मुख्यालय वॉशिग्टन डीसी येथे आहे.
लॅम्पसमोर अभ्यास करताना झोप येऊ शकते. त्यामुळे तुमच्या खोलीत पुरेसा प्रकाश ठेवा. टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास केल्यास मेंदू जागृत राहातो. जास्त जेवल्यास सुस्ती येते. त्यामुळे हलका आहार घ्या. पाणी पित राहिल्याने झोप येणार नाही. दुपारी पुरेशी झोप घ्या. घरातल्या घरातच थोडा वेळ चाला. मोठ्याने वाचा. चणे-शेंगदाण्यासारख्या गोष्टी अधूनमधून तोंडात टाकत राहा जेणेकरून हालचाल होईल व झोप येणार नाही.
अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हायलाइट्सः अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अत्याचारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजकीय दबावामुळे अद्याप अत्याचारी युवकाला अटक करण्यात आलेली नाही,अशी चर्चा आहे. नागपूरः अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अत्याचारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजकीय दबावामुळे अद्याप अत्याचारी युवकाला अटक करण्यात आलेली नाही,अशी चर्चा आहे. (the son of a former zilla parishad member abused the girl) वैभव राऊत (वय २३ रा. नवेगाव चिजदा),असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास राऊत यांचा मुलगा आहे. वैभव याने देवलापार परिसरात राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने तिला अश्विन कुंभरे याच्या रिसॉर्टवर नेले. तेथे चहातून तिला गुंगीचे औषध दिले. तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने मोबाइलद्वारे तरुणीची अश्लील चित्रफित तयार केली. ही अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन वैभव हा तिच्यावर सतत अत्याचार करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तरुणीने देवलापार पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वैभव याला अटक न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा आहे.
गणित हे संख्यांच्या विज्ञान आहे. तंतोतंत होण्यासाठी, मेरियम-वेबस्टर शब्दकोश गणित व्याख्या करतोः संख्यांचे विज्ञान आणि त्यांची कार्यप्रणाली, आंतरसंबंध, जोड्या, सामान्यीकरण, अमूर्त आणि जागा कॉन्फिगरेशन आणि त्यांची रचना, माप, परिवर्तन आणि सामान्यीकरण. गणिती विज्ञानाची अनेक शाखा आहेत, ज्यात बीजगणित, भूमिती आणि गणिताचा समावेश आहे. गणित हा एक शोध नाही शोध आणि भौतिक गोष्टी आणि कार्यपद्धती हे कायद्यांचे संशोधन आहे. तथापि, गणिताचा इतिहास आहे, गणित आणि शोध आणि गणिती साधनांमधील संबंध हे स्वतःच शोध मानले जातात. "गणिती विचारांपासून ते प्राचीन ते आधुनिक काळातील" पुस्तकानुसार, एक संघटीत विज्ञान म्हणून गणित 600-100 इ. स. पूर्व काळातील ग्रीक काळापर्यंत अस्तित्वात नव्हते. तथापि, अगोदरची संस्कृती ज्यामध्ये गणिताची सुरवात किंवा मूलतत्त्वे निर्माण झाली होती. उदाहरणार्थ, जेव्हा सभ्यता व्यापारास सुरुवात झाली, तेव्हा गणना करण्याची गरज निर्माण झाली. जेंव्हा मानवाने सामानांची खरेदी केली, त्यांना वस्तूंची मोजणी करण्यासाठी आणि त्या वस्तूंची किंमत मोजण्यासाठी एक मार्ग लागतो. मोजणीच्या संख्येसाठी पहिला उपकरण अर्थातच होता, मानवी हात आणि बोटांनी त्या प्रमाणात मोजले. आणि दहा बोटांपर्यंत गणना करणे, मानवाने नैसर्गिक मार्कर, खडक किंवा गोळे वापरले. त्या टप्प्यापासून, मोजणे बोर्ड आणि abacus सारख्या साधनांचा शोध लावला होता. येथे युग सुरू झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींची ही एक तात्काळ आहे, ए पासून ते सुरूवात. मोजणीसाठी मोजमाप करणारे पहिले साधन म्हणजे एबॅकसचा शोध चीनमधील सुमारे 1200 बीसीच्या आसपास होता आणि त्याचा वापर फारस आणि इजिप्त समृद्ध अनेक प्राचीन संस्कृतीत केला गेला. नवनिर्मितीचा इटालियन (14 व्या शतकातील 16 व्या शतकातील) इटालियनांना आधुनिक अकाउंटिंगचे वडील म्हणून ओळखले जाते. बीजगणितवरील प्रथम ग्रंथ अलेग्ज़ॅंड्रियाच्या दियोफॅन्थस यांनी इ. स. पू. च्या तिसर्या शतकात लिहिलेले होते. बीजगणित अरबी शब्द अल-जबर, एक प्राचीन वैद्यकीय संज्ञा आहे ज्याचा अर्थ "तुटलेल्या भागांची पुनर्मिलन" असा होतो. अल-खवरीझी हा एक प्रारंभिक बीजगणित विद्वान आहे आणि सर्वप्रथम औपचारिक शिक्षणाची शिकवण दिली. आर्किमिडीज हे ग्रीसचे गणितज्ञ आणि संशोधक होते. त्यांनी आर्किमिडीजच्या स्क्रू (यंत्रास शोधून काढणे) आणि हायड्रोस्टॅटिक तत्त्व (आर्किमिडीजच्या तत्त्वानुसार) च्या निर्मितीसाठी आणि गोल आणि त्याचे परिमाणबद्ध सिलेंडर यांच्यातील संबंधांबद्दलच्या त्याच्या शोधाबद्दल ओळखले जाते. पाणी वाढवण्यासाठी). गॉटफ्रेड विल्हेल्म लेबनिझ (1646-1716) एक जर्मन तत्वज्ञानी, गणितज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ होते आणि बहुधा तो विभेद आणि अभिन्न गणकयंत्राचा शोध लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने हे सर आयझॅक न्यूटन यांच्या स्वतंत्रतेने केले. एक आलेख सांख्यिकीय माहितीचा एक चित्रमय प्रतिनिधित्व किंवा परिवर्तनांदरम्यान कार्यशील संबंध आहे विल्यम प्लेफेयर (17 9 6 9 -23) हे सहसा रेखांकित प्लॉट्स, बार चार्ट, आणि पाय चार्ट यासह डेटा प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाणारे बहुतेक ग्राफिक फॉर्मचे आविष्कारी म्हणून पाहिले जाते. पायथागोरिसनवाद हा तत्त्वज्ञान विद्या आहे आणि धार्मिक बंधुत्वाचा पाया सापाच्या पाइथागोरस ने बांधला असा विश्वास आहे जो 525 साली इ. स. 5 9 5 च्या सुमारास दक्षिण इटलीमध्ये क्रॉटन येथे स्थायिक झाला. या गटाच्या गणित विकासावर गहिरा प्रभाव होता. साधी प्रक्षेपक म्हणजे एक प्राचीन यंत्र. प्लेन एंगलचे बांधकाम आणि त्याचे मोजमाप करण्यासाठी वापरला जाणारा एक साधन म्हणून, साधी प्रक्षेपक दिशांच्याशी चिन्हांकित अर्धवर्तुळ डिस्कसारखा दिसतो, ज्याचा प्रारंभ 0º ते 180º ने होतो. नेव्हीगेशन चार्टवरील बोटांच्या स्थानाची योजना आखताना पहिला जटिल प्रक्षेपक तयार केला होता. एका तीन हाताने प्रक्षेपक किंवा स्टेशन पॉइंटर म्हणवला, 1801 मध्ये अमेरिकेच्या नौदल कप्तान जोसेफ Huddart यांनी त्याचा शोध लावला. केंद्र आखेचे निर्धारण केले जाते, तर बाह्य दुहेरी रोटेट करण्यायोग्य आणि मध्यभागी असलेल्या कोनाशी संबंधित कोणत्याही कोनावर सेट करण्यास सक्षम असतात. परिपत्रक आणि आयताकार स्लाइड नियम, गणिती गणितेसाठी वापरले जाणारे एक साधन, हे गणितज्ञ विल्यम ऑग्ट्रेड यांनी शोधलेले होते. हिंदू गणितज्ञ आर्यभट्ट आणि वरुमहारा यांनी 5 5 9 ए. डी.
मुंबईः Multibagger stock: शेअर बाजारात संयमामुळे संपत्ती निर्माण होत असते. शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूक यादृष्टीने २०२१ हे वर्ष एक जबरदस्त वर्ष ठरले आहे. अनेक शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अनेक शेअर्सनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. काही शेअर असे आहेत की ज्यांनी काही महिन्यातच गुंतवणुकदारांचा पैसा काही पटींनी वाढवला आहे. तर अनेक शेअर असे आहेत की त्यांनी गुंतवणुकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा भरपूर परतावा दिला आहे. वैभव ग्लोबलचा (Vaibhav Global Ltd)शेअरदेखील असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे. सध्या हा शेअर ७१८ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. मागील दहा वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. (Share market: Multibagger stock, Investment of Rs 1 lakh in Vaibhav Global Ltd become Rs 1 crore in 10 year) हा मल्टीबॅगर शेअर जरी मागील सहा महिन्यांपासून काहीसा दबावात असला तरी दीर्घकालावधीत त्याने दणदणीत परतावा दिला आहे. मे २०२१ हा शेअर आपल्या आतापर्यतच्या उच्चांकीवर म्हणजे १०५० रुपयांच्या पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर नफावसूलीमुळे त्यात काहीशी घसरण झाली आहे. अर्थात मागील दहा वर्षांचा कालावधी पाहता या शेअरमुळे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत. दहा वर्षापूर्वी म्हणजे १६ सप्टेंबर २०११ हा शेअर ७. १३ रुपये प्रति शेअर या किंमतीवर होता. तर आज हा शेअर ७१८ रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. म्हणजेच दहा वर्षात या शेअरने जवळपास ९९७० टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच वैभव ग्लोबलच्या शेअरमधील गुंतवणूक १० वर्षांच्या कालावधीत १०० पटींनी वाढली आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यत वैभव ग्लोबलच्या शेअरने जवळपास ४० टक्के परतावा दिला आहे. वर्षाच्या सुरूवातीला ५१०. ४२ रुपयांवर असणारा हा शेअर ७१८ रुपयांपर्यत पोचला आहे. जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १. ४० लाख रुपये झाले आहे. दहा वर्षात या शेअरने जवळपास ९,९७० टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच दहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. पाच वर्षांच्या कालावधीचा विचार करता या शेअरने १,०५० टक्के परतावा दिला आहे. म्हणजे ५ वर्षात या शेअरमधील १ लाख रुपयांचे आज जवळपास ११. ५ लाख रुपये झाले आहेत. वैभव ग्लोबल लि. ची स्थापना १९८० मध्ये झाली आहे. कंपनी एक मल्टीनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असून फॅशन ज्वेलरी म्हणजे दागिने आणि लाईफस्टाईलशी निगडीत वस्तूंचे उत्पादन करते. कंपनीचा व्यवसाय अमेरिका आणि इंग्लंडमध्ये देखील आहे. शेअर बाजाराने नुकताच नवा विक्रम नोंदवत सेन्सेक्सने ५९,००० अशांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीने १७,६०० अंशाचा टप्पा ओलांडला. दोन्ही निर्देशांकांची ही आतापर्यतची उच्चांकी पातळी आहे. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर पोचले असून या तेजीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. बाजारातील दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. सेन्सेक्स आगामी काळात ६०,००० अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसत असल्याने शेअर बाजाराच्या तेजीला वातावरण अनुकूल झालेले दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजार सध्या मोठ्या तेजीत आहे. मात्र या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. कारण चढ उतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे. (डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा. )
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. अनलॉक प्रक्रियेनंतर काही अटींच्या अधिन राहून लग्न सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाची नागरिकांच्या मनात धास्ती कायम होती. त्यामुळे नियोजित विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला असेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते; परंतु प्रत्यक्षात हा समज खोटा ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार लग्न विवाह सोहळे पार पडले आहे. लग्न केल्यानंतर शासन नियमानुसार त्याची संबंधित शासकीय कार्यालयात नोंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यात आलेल्या नोंदणीनुसार २०२० या वर्षी परभणी तालुक्यात ५२ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद असतानाही गेल्या दोन महिन्यात ११ दाम्पत्यांनी परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विवाहाची नोंद केली आहे. अनेकांनी मात्र नोंदणी केलेली नाही. गत वर्षी १० मार्चपासून विवाह मुहूर्त सुरू झाले होते; परंतु कोरोनामुळे राज्यात १८ मार्चपासून प्रतिबंध लागू करण्यात आले. २२ मार्चपासून तर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या वर्षात मार्चनंतर अनेक विवाह मुहूर्त होते. त्यात १६, १७, २५, २६ एप्रिल, १, २, ४, ५, ६, १५, १७, १८, २३ मे, ११, १५, १७, २७, २९, ३० जून, २७, २९, ३० नोव्हेंबर, १,७,९, १०, ११ डिसेंबर या कालावधीत विवाह मुहूर्त होते; परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यावर परिणाम झाला. परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे तालुक्यातील ५२ विवाह सोहळ्याची २०२० या वर्षात नोंद झाली आहे. ही आकडेवारी परभणीपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार विवाह सोहळे झाले आहेत. त्याच्या नोंदी मात्र स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर पालिका कार्यालयात नाहीत. चालू वर्षात आतापर्यंत ११ विवाह सोहळ्याची परभणीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंद झाली आहे. चालू एप्रिल महिन्यात २२, २४, २६, २७, २८, २९, ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत; परंतु ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने प्रशासनाच्या नियमामुळे विवाह होणे कठीण आहे. दोन वर्षात सर्व लग्न रद्द झाल्याने नुकसान झाले आहे. मंगल कार्यालयात दुरुस्ती, नवीन कामे मागील वर्षी केली, त्याचा खर्च अद्याप निघाला नाही. वरून विजेचे बिल घरातून भरण्याची वेळ आली आहे. - प्रमोद वाकोडकर, अध्यक्ष, जिल्हा मंगल कार्यालय संघटना.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) ५ वरिष्ठ नेत्यांचं ट्विटर (Twitter) अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने काल, बुधवारी केला आहे. So! After Shri @RahulGandhi, the Lord @narendramodi Ji and Vassal @Jack & @twitter have locked @rssurjewala, @ajaymaken & @sushmitadevinc. @INCIndia registers its protest and promises to continue the fight for each and all being wronged! We shall hold on @AshwiniVaishnaw Ji ! ! दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी सस्पेंड करण्यात आलं होत. सरकारच्या दबावामुळे ट्विटरने राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर विरोध कारवाई केली, असा काँग्रेसने आरोप केला आहे. दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत. याच ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली होती.