text
large_string
म्हणुनि प्रमाद येथें जो जो घडला असेल मजकडुनी, तत् तत् क्षमस्व विद्वन् ! निज लेखें नित्य भेट कडकडुनी ! २३ प्रकाशन करमणूक, वर्ष १२, अंक ३० नोव्हेंबर १९०१० कवीची दिवाळी. चिंता दुर्दिन लयास जाउनि विमल मनोनभ झार्ले, उल्हासाचा विशुद्ध वायू स्वैर तयांतुनि चाले; मतिवसुमतितें शारदवैभव देई प्रसन्नतेतें, विविध विषय हीं नव धान्यांचीं विलसति तीवरि शेर्ते; २ विचाररूपी धवल जलांचे प्रवाह वाहति वेगें, मनोगगन हे बिंबुनि त्यामधिं धांवे त्यांच्या संगे. स्फूर्ति - दिवाळी आली दयिते कविते ! तयार होई, सुकाव्य-पक्कान्नांतें करुनी दाखवि तूं चतुराई; लावुनि माझ्या जातिस्नेहा करि तूं अभ्यंगातें, तेणें येवो सुखकर ऐसें मार्दव तव अंगांतें. तरंगरूपी उंचा शालू देतों तुज नेसाया, परोपरीचे अलंकारही रूप तुझें खुलवाया; सौभाग्यालंकार ' तुझ्यास्तव केला मी प्रेमाचा, हृदयकरंड्यामधिल रसें तो आहे ओला साचा. त्याचा नमुना दावी रसिकां लावुनियां तो भाळीं, इष्ट न व्हाया ' तीट' करी तूं मम दोषांची काळी. स्वदेशभवनीं यशोदीप ते चोहिकडे उजळावे, सहज तयानें जनदुःखांचें दाट तिमिर निरसावें. मानधनाचा धनलोभी मी घेऊनि त्या धनातें, पूजायातें बसतां कविते ! दे मज साहित्यातें; सहृदय ऐसे स्वदेशबंधू सादर बोलावोनी, नानाकृतिच्या पक्कान्नांची दे त्यास मेजवानी. तयांवरोनी सुगुणसुंदरी ! सुवर्ण तव ओंवाळीं, ओवाळणि तत्संतोषाची घ्यावी, न तूं निराळी. ह्या रीतीनें करीं साजरी ' कविची दिपवाळी ' तूं तव दयिताचा दयिते कविते ! याविण न दुआ हेतू. १३ प्रकाशन - मनोरंजन, करमणूक. नोव्हेंबर-डिसेंबर १९०१. गुणसीमा भीमा. गुणसीमा भीमा Sleep, little baby, sleep ! Not in thy cradle bed, Not on thy mother's breast Hence forth shall be thy rest, But with the quiet dead! उठुनि लहरी उदकास ती तयांत लीन होते विलसोनि निमेषांत; झुळुक वायूची सुखवुनी तनूतें स्वैरगतिनें केव्हांच निघुनि जाते; मेघमाळेवरि दिव्य चंचला ही क्षणामध्यें चमकोनि दिसत नाहीं; तशिच माझी नंदिनी सुगुणसीमा निमाली ती मधुमधुरगिरा भीमा ! विषादानें घेरिलें मन्मनाला, कंठ दाटोनी करुणभरें आला; तीव्र लागे निश्वास वहायाला, अश्रुधारा होटल्या लोचनांला. Mrs. Southey.
स्नान आणि स्नानगृहे : पाणी, जलयुक्त अन्य पदार्थ, दूध, माती, वाफ यांनी शरीर भिजविण्याची एक प्रक्रिया व त्यासाठी निर्मिलेल्या-बांधलेल्या वास्तू. स्नानाचा उद्देश शरीरस्वच्छता किंवा रोगनिवारण असतो. स्नानविधी हे धार्मिक वा गूढवादी किंवा अन्य अन्वयार्थानेही असतात. जसे ख्रिस्ती धर्मातील अभ्यंजन स्नान किंवा गंगादी नद्यांतील हिंदूंचे पवित्र धार्मिक स्नान होय. प्राचीन सार्वजनिक स्नानगृहे ईजिप्त, सिंधू संस्कृती, इंका, माया इ. अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात तथापि त्यांचे फार थोडे अवशेष पुरातत्त्वीय उत्खननांत उपलब्ध झाले आहेत. प्राचीन ग्रीक संस्कृतीत स्नानविधीला महत्त्व असल्याचे काही पुरावे मिळतात. नॉससच्या प्रासादातील (इ. स. पू. १७००) स्नानदालनांच्या अवशेषांवरून त्याची कल्पना येते. रोमन साम्राज्यात रोम व पाँपेई या शहरांत विशाल स्नानगृहे होती. ती केवळ स्नानगृहे नसून मनोरंजनाची सांस्कृतिक केंद्रे होती. त्यांना थर्मो म्हणत. त्यांची बांधणी उंच चौथर्यावर केली जाई व सभोवती तटभिंत असे. त्यात कोमट व उष्ण पाण्या-बरोबरच कपडे बदलण्याची स्वतंत्र खोली असे. तसेच तेल, उटणी, अत्तरे लावून मालीश करून घ्यावयाची खोली (अँक्च्युरिया) असे स्वतंत्र दालन असे. ही सर्व दालने काच, संगमरवर व आरसे यांनी सुशोभित केलेली असत. रोममध्ये ' थर्मी ऑफ कॅराकॅला ' नामक भव्य स्नानगृह होते, त्याचे भग्न अवशेष अवशिष्ट आहेत. एके काळी त्यात १,६०० व्यक्तींच्या स्नानाची सोय होत असे. क्लीओपात्रा या रोमन साम्राज्या-तील राणीच्या शाही स्नानाच्या काही कथा, दंतकथा, वदंता प्रसिद्ध आहेत.बायझंटियममध्ये सुरुवातीच्या काळात स्नानगृहे असल्याचे दाखले मिळतात. पुढे तुर्कांनी तीच कल्पना आचरणात आणली. त्यांनी काही काळानंतर ती ' टर्किश बाथ ' या बदललेल्या स्वरूपात पश्चिम यूरोपात पसरविली. सॉमरसेटच्या स्नानगृहावरून रोमन लोकांची स्नानगृहे कशी होती, याची कल्पना येते. ट्रोजन, टायट्स,डायोक्लेशियन या राजांची मोठी व शाही थाटाची स्नानगृहे होती. त्यांत ग्रंथालये, व्याख्यानकक्षा, बागा, व्यायामगृहे इ. असत. `रोमन साम्राज्याच्या र्हासानंतर भव्य स्नानगृहांचे प्रमाण कमी झाले. प्रबोधन कालातील आणि सतराव्या व अठराव्या शतकांतील सार्वजनिक स्नानगृहांतून अनीती पसरते, अशी हाकाटी नीतिवादी मंडळींनी त्या वेळी केल्याने, तसेच साथीचे रोग पसरतात, असा समज वाढल्याने स्नानगृहे ही संकल्पना कमीच होत गेली. परिणामतः राजे-रजवाड्यांतही स्नानाची प्रथा कमी झाली होती. एलिझाबेथ राणी तर दर तीन महिन्यांनी स्नान करीत असे. फ्रान्सचा चौथा हेन्री स्नान धोकादायक आहे, असे मानीत असे. चौदावा लूई कधीकाळी सर्वांग धूत असे, तेव्हा वातावरण चांगले राहावे म्हणून सुगंधी द्रव्ये जाळीत असे. एकोणिसाव्या शतकात स्नान करण्याचे प्रमाण वाढले, तरी सार्वजनिक स्नानगृहे कमीच होती. औद्योगिक क्रांतीनंतर एकेका गावात हजारो माणसे एकत्र राहू लागली. तेथील वातावरण धुराने दूषित होई. हवा व उजेड कमी असलेल्या जागेत माणसांना दाटीवाटीने राहावे लागे. सांडपाण्याची व्यवस्था नसे आणि पाणी अपुरे असे. १८४२ मध्ये लिव्हरपूल येथे व्यक्तिशः स्नान करावयाची सोय असलेले स्नानगृह सुरू झाले, तेच पहिले आधुनिक स्नानगृह होय. त्याच वर्षी पोहण्याची सोय असलेले सार्वजनिक स्नानगृह उभारण्यात आले तथापि पौर्वात्य आणि उष्ण प्रदेशांत स्नानाची पद्धत फार पूर्वीपासून चालू असलेली आढळते. स्नानाचा धार्मिक रूढींशी संबंध लावलेला असल्याने प्रतिदिनी स्नानाचा प्रघात पडलेला दिसतो. प्रत्येक देशांत स्नानाच्या विविध पद्धती रूढ होत्या. मुसलमानी अंमलाखालील देशांत रोमन पद्धतीची सार्वजनिक स्नानगृहे होती. रशिया-तील स्नानांचे विविध प्रकार रूढ असून ते अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने प्रचलित आहेत. स्नानाचे प्रकार : अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने स्नान करणे याला अभ्यंगस्नान म्हणतात. याला मांगली स्नान असेही म्हणतात. ही पद्धत फार प्राचीन काळापासून भारतात (विशेषतः हिंदूं-मध्ये) व इतर देशांत प्रचलित आहे. सणासुदीला विशेषतः दिवाळीच्या सणानिमित्त अभ्यंगस्नान केले जाते. शरीराचे स्नायू बलवान व्हावे व बल, पुष्टी आणि कांती वाढावी, हा त्यामागे उद्देश असतो. आरोग्यवृद्धी हा त्या स्नानाचा पहिला उद्देश असून पुढे त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. या कामी तीळ किंवा खोबर्याचे तेल आणि क्वचित तूपही वापरतात. त्यांत चंदन, गुलाब, मोगरा वगैरे फुलांची अत्तरे मिसळतात. तेलात हळदही टाकतात. तोही अभ्यंगाचाच प्रकार होय. मंगल कार्यापूर्वीड्ढविशेषतः विवाहविधीपूर्वीड्ढयजमान दंपतीने अभ्यंगस्नान करावे, असा संकेत आहे. हळदी समारंभ हाही अभ्यंगस्नानाचा एक प्रकार होय. राज्याभिषेक, राजसूय, अश्वमेध इ. प्रसंगी अभ्यंगस्नानाला विशेष प्राधान्य असून त्याला अठरा द्रव्यांची आवश्यकता असते. ज्यू लोकांत राजे आणि धर्माधिकारी यांना अधिकारासंबंधी अभिषेक करण्याच्या प्रसंगी तेल लावीत. ख्रिस्तांचे मसीहा असे जे नाव आहे, त्याचा अर्थ प्रलाभिषिक्त असाच आहे. रोमन कॅथलिकांच्या मंदिरांतून विशेष प्रसंगी अभ्यंगविधी होत असतो. ज्वर, जड अंग, सांधेदुखी, अपचन, मलावरोध या व्याधींवर पाण्याच्या वाफेचे स्नान गुणकारी व चैतन्यमय ठरते. या पाण्यात निर्गुडी, आघाडा, तरवड ही वातनाशक पाने घालतात. रशियातील वाफेच्या स्नानाचा प्रकार टर्किश स्नानासारखाच असतो. फिनलंडमध्ये सावता नावाचा वाफेच्या स्नानाचा प्रकार आहे. लाल होईपर्यंत तापवलेल्या दगडावर पाणी ओतल्याने उत्पन्न होणारी वाफ अंगावर घेतात. त्या वेळी रुधिराभिसरण चांगले व्हावयासाठी सावनाच्या फांद्या अंगावर मारतात. बर्चच्या पाल्याने अंग चोळल्यानंतर गार पाण्याने स्नान करतात. या स्नानानंतर विश्रांती घेतल्यास अंगात नवचैतन्य निर्माण होते. स्कँडिनेव्हियन लोक स्नान पूर्ण करताना गार पाण्यात बुड्या मारतात किंवा बर्फात लोळत असतात. सुगंधाच्या घमघमाटात अंगावर गरम पाण्याचे तुषार आले, तर श्रमपरिहार होऊन उल्हसित वाटते. अंग दुखण्यावर किंवा अंगाचा दाह होत असल्यास गरम पाण्याच्या तुषारस्नानाचा लाभ होतो. गार पाण्याच्या फवार्याचे स्नानही श्रमपरिहारक असते. पाश्चिमात्य लोकांत सूर्यस्नान लोकप्रिय आहे. सर्वांग ओल्या फडक्याने पुसून, प्रथम पालथे पडून, सूर्यकिरणे अंगावर घेतल्यानंतर उताणे पडून आणि त्यानंतर दोन्ही बाजूंवर किरणे घेतात. सूर्यस्नान वीस मिनिटांपासून एक तासापर्यंत करतात. दर दहा मिनिटांनी ओल्या फडक्याने अंग पुसतात.गोर्या कातड्यावर थोडा राप चढतो म्हणून पाश्चिमात्य लोकांत सूर्यस्नान लोकप्रिय आहे. शिवाय ' ड ' जीवनसत्त्व मिळून त्याने शरीराचे चापल्य व तजेला वाढतो. सूर्यप्रकाश घेताना प्रारंभी सर्वांग थोडावेळ उघडे ठेवतात. सवय झाल्यावर आणि अंग पुरेसे रापल्यावर जास्तवेळ सूर्य-प्रकाशात रहावयास हरकत नसते. प्रारंभीच जास्तवेळ सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास दाह उत्पन्न होऊन मन कमकुवत होण्याचे भय असते. अंगकांती तेजस्वी बनविण्यासाठी चंद्रस्नानाचे महत्त्व प्रतिपादिले आहे. गरम किंवा कोमट पाण्याने अंग पुसून चांदण्यात बसावे किंवा झोपावे. त्याने त्वचा उजळते आणि अस्वस्थता कमी होऊन मनःशांती लाभते तसेच निद्रानाशाचा विकार होत नाही. शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी हे स्नान जास्त आल्हादकारक असते. समुद्राच्या आणि नदीच्या स्नानाला हिंदू लोक धार्मिक महत्त्व देतात. कुंभपर्व हा एक पुण्ययोग असून या दिवशी प्रयागतीर्थात स्नान केल्याने एक हजार अश्वमेध, शंभर वाजपेय व पृथ्वीभोवती एक लाख प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते, अशी समजूत आहे. कृष्णा, गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांतील स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पाश्चात्त्य देशांत तिसरा जॉर्ज या इंग्लंडच्या राजामुळे समुद्रस्नान लोकप्रिय झाले. समुद्राच्या थंड पाण्याने हृदयावर ताण पडण्याची भीती असल्याने असे स्नान सरसकट सर्वांनाच मानवत नाही. टबबाथ हा मुख्यतः पाश्चात्त्य स्नानप्रकार आहे परंतु तो इंग्रजांच्या वसाहतीकरणानंतर पौर्वात्य देशांतही प्रसृत झाला असून श्रीमंतांच्या प्रशस्त हवेल्यांत तो हमखास आढळतो. यामध्ये पाय पसरून बसता येईल, रेलून बसता येईल किंवा व्यवस्थित बसता येईल अशा प्रशस्त भांड्यात स्नान करण्याची पद्धत असून त्यात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व डोके धुतले म्हणजे भांड्यातले पाणी खराब होत नाही. शरीराला सोसेल असे गरम पाणी त्यात सोडतात. पोटापर्यंत पाणी येऊ शकेल इतके पाणी या घंगाळेसदृश भांड्यात घेतात. फ्रेंच बाथसाठी टबात थंड पाणी घेऊन त्यात अर्धा तास बसल्यानंतर कोमट पाणी घेतात. त्यानंतर अंगाला साबण लावून अंग स्वच्छ करतात. बाळंतपणानंतर टबातील स्नान लाभदायक ठरते. आधुनिक काळात स्नानाच्या वेळी वापरावयाचे साबणांचे अनेक सुगंधी प्रकार उपलब्ध आहेत. स्नानाच्या पाण्यात दोन चमचे अमोनिया घालून अमोनिया स्नान करतात. ह्यासारखाच असलेला ग्लिसरीन स्नानाचा प्रकार त्वचेसाठी उपयुक्त असून तो खर्चिक आहे. लव्हेंडर स्नान, सुगंधी क्षारांचे स्नान असे अनेक सुगंधी प्रकार स्नानाच्या संदर्भात लोकप्रिय आहेत. यांशिवाय वाळू , कुजलेला झाडपाला, किरणोत्सर्गी मातीही स्नानासाठी वापरतात. विशेषतः बालकांना कडुनिंबाचे डहाळे टाकून उन्हात तापविलेल्या पाण्याने स्नान घालतात. तसेच हळद आणि डाळीचे पीठ दुधात कालवून ते त्यांच्या अंगाला स्नान घालण्यापूर्वी चोळतात. भारतात ऋतुप्राप्तीनंतरच्या चौथ्या दिवशीच्या स्नानास विशेष महत्त्व आहे. तद्वतच बाळंतिणीचे स्नान शरीर बांधेसूद राहण्यासाठी आवश्यक मानले जाते. जपानी पद्धतीच्या स्नानात मालीश अंतर्भूत असते. जपानमधील मात्सुयामा, जर्मनीतील बेडन-बेडन,चेकोस्लोव्हाकियातील कॉर्लव्ही व्हारी, फ्रान्समधील विशी एक्स-ले-बान, इंग्लंडमधील बाथ व हेरोगेट तसेच बेल्जियममधील स्पा हे झरे औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारतात अनेक ठिकाणी औषधी गरम पाण्याचे झरे (उन्हाळे) असून युमनथांग (सिक्कीम), तप्तपाणी (ओडिशा), नग्गर, मनाली, मणिकरण (हिमाचल प्रदेश), बक्रेश्वर (प. बंगाल), वज्रेश्वरी, पाली, गणेशपुरी, धुळे जिल्ह्यात शहादे व शिरपूर, जळगाव जिल्ह्यात चोपडे (महाराष्ट्र) इत्यादी ठिकाणी खास स्नानासाठी लोक जातात. गंधकयुक्त गरम पाणी काही त्वचारोगांवर औषधी असते. या पाण्यात गंधक, फॉस्फरस, कॅल्शियम कॉर्बोनेट, मॅग्नेशियम, सिलिका व इतर लवणे असतात.
नाशिक, दि. १६ (पीसीबी) - राष्ट्रवादी -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिलेल्या वागणुकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवार) येथे केले. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यात निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा काढली आहे. त्यानिमित्त नाशिक येथे आयोजित केलेल्या सभेत आव्हाड यांनी आपल्या भाषणात शिवसेना- भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राफेल ते नथुराम गोडसे आणि भगवा ते भाजपच्या धोरणांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. नाशिक शहराच्या समस्या, बंद करण्यात आलेले कारखाने, स्थानिक तरुणांची बेरोजगारी यावर त्यांनी भाजपवर घणाघात केला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदी उपस्थित होते.
वर्षानुवर्षे चोर, दरोडेखोर असा कलंक लागलेला पारधी समाज ही ओळख पुसून काढण्यासाठी झगडतो आहे. या समाजाच्या पालावर शिक्षणाची, परिवर्तनाची गंगा नेऊन पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भरीव काम 'कोरो'च्या नवनेतृत्व कार्यक्रमाने केले. मुंबई ः वर्षानुवर्षे चोर, दरोडेखोर असा कलंक लागलेला पारधी समाज ही ओळख पुसून काढण्यासाठी झगडतो आहे. या समाजाच्या पालावर शिक्षणाची, परिवर्तनाची गंगा नेऊन पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भरीव काम 'कोरो'च्या नवनेतृत्व कार्यक्रमाने केले. याच पारधी समाजाला सोबत घेऊन नगर जिल्ह्यामध्ये पारधी विकास आराखडा तयार करण्यात आला. राज्यात पारधी वस्ती असलेल्या प्रत्येक ठिकाणी लवकरच 'मॉडेल' म्हणून हा विकास आराखडा राबवण्यात येणार आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील १,२५८ पारधी पालांचे अभ्यासपूर्ण संशोधन केले. या समाजाच्या आशाआकांशा, अपेक्षा समजून घेऊन समाजकारण, राजकारणामध्ये त्यांचा सहभाग वाढवत जातपंचायतीच्या जोखडामधून सुटका करण्यासाठी या विकास आराखड्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ग्रामीण विकास अध्ययन केंद्र, कोरो, सीएसआरडी संस्था, लोकाधिकार आंदोलन या स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन पारधी समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पालांवर केलेल्या सर्वेक्षणामधून या समाजाच्या विदारक स्थितीचे वास्तव पुढे आले. जातपंचायतीचे जोखड, अंधश्रद्धा आणि गुलामगिरीमध्ये जखडलेल्या पारध्यांपैकी अवघ्या ३७ टक्क्यांना गावामध्ये स्थान मिळाले होते, तर ५७ टक्के पारध्यांकडे मालकीची घरे नव्हती. ८५ टक्के समाजाला सरकारी योजनांचा कोणताही लाभ मिळालेला नव्हता. वनहक्क कायद्याची ८० टक्के समाजाला कोणतीही माहिती नव्हती. स्वर्णजयंती स्वावलंबन योजनेअंतर्गत हक्काची जमीन मिळू शकते, याबाबत ७६ टक्के पारधी अनभिज्ञ होते. ६५ टक्क्यांकडे जातीचा दाखला नव्हता, तर ८२. ४३ टक्क्यांना ग्रामपंचायतीत राखीव जागा असतात, याची जाणीवच नव्हती. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, शेती, वनविकास क्षेत्रात पारधी समाजासाठी योजना, त्याचे लाभ यांचा विस्तृत विचार आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. हा आराखडा प्रशासन, पोलिस, स्थानिक यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या सहभागाने मॉडेल म्हणून राज्यात राबवण्यात येणार आहे. नवनेतृत्व उदयाला आले! पारंपरिक जोखडामध्ये बांधलेल्या या समाजाला स्वतःच्या अपेक्षांविषयीही कधी सांगता आले नव्हते, मात्र आज याच समाजातून विकास आराखड्याच्या प्रक्रियेतून पन्नास युवांचे नवनेतृत्व उभे राहत आहे. पालावरच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या २५० पारधी मुलांनी आता सर्वसामान्य शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. पारधी स्त्रियांच्या हातीही आता पाटीपेन्सिल आली आहे. सातशे कुटुंबांना जातीचे दाखलेही मिळाले आहे. (क्रमशः)
पिंपरी - ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी आज मावळ लोकसभेसाठी दुपारी 2. 15 च्या सुमारास काळभोरनगर येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांतील सदस्य देखील होते. दरम्यान, मावळ येथील मतदार संघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग आप्पा बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सध्या आपण सर्वच डिजिटलयुगात जगत आहोत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब बघितल्याशिवाय दिवस सरत नाही. त्यामुळे अनेकदा याच्यावरून टीकाही केली जाते. परंतु या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर केला तर त्यातून काही विधायक गोष्टींची निर्मिती होऊ शकते. असाच प्रयत्न 'स्मृतिगंध'तर्फे केला जात आहे. आपल्याकडे संगीताचा अनमोल ठेवा आहे. काही दिग्गज गायक, संगीतकारांनी संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हा अभिजात संगीताचा ठेवा आणि त्याबरोबर त्या व्यक्तिमत्त्वांंचे चरित्र, त्यांचा जीवनपट रसिकांसमोर आणण्याचा एक स्तुत्य उपक्रम 'स्मृतिगंध'ने हाती घेतला आहे. डिजिटल माध्यमातून संगीताचा हा झळाळता इतिहास नवीन पिढीपर्यंत आणि सातासमुद्रापार राहणाऱ्या संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे. याअंतर्गंत येत्या १५ जुलैला 'स्मृतिगंध' प्रकाशित 'गंधर्वगान' ही वेब सीरिज सुरू होत आहे. 'आनंदगंधर्व' म्हणून प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आनंद भाटे हे 'गंधर्वगान'चे सादरकर्ते आहेत. यामध्ये संवादक आदित्य ओक असून, संगीतकार कौशल इनामदार आणि अभिनेता सुबोध भावे यांचा विशेष सहभाग आहे. यासंदर्भात 'जाई काजळ'चे संचालक आणि 'गंधर्वगान'चे निर्माते राजेश गाडगीळ म्हणाले, " या वेब सीरिजची मूळ संकल्पना आनंद भाटे यांची आहे. पूर्वी आनंद भाटे आणि आदित्य ओक हे बालगंधर्वांच्या गायकीवर आधारित रंगमंचीय कार्यक्रम करायचे. परंतु कार्यक्रम करण्याला काही मर्यादा आहेत. आता लोकांकडे अडीच-तीन तासांचा कार्यक्रम जाऊन बघायला वेळ नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. आजच्या पिढीचे विश्व, विशेषतः तरुण पिढीचे विश्व म्हणजे मोबाइल, फेसबुक आणि यू ट्यूब! एकदा आनंद भाटे यांच्याशी बोलताना गंधर्व गायकीची वैशिष्ट्यं वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवता येतील का, अशी चर्चा झाली. त्यातूनच मग 'गंधर्वगान'ची संकल्पना आकाराला आली. गंधर्वगायकी हा खूप मोठा विषय आहे,पण तो एक एक पैलू घेऊन वेब सिरीजच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचू शकतो. येत्या १५ जुलैपासून या सीरिजला सुरुवात होईल. यामध्ये पंडित भास्करबुवा बखले यांच्यापासून असणारी गंधर्वगायकीची, गंधर्वघराण्याची परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. 'बालगंधर्व' हे या गंधर्वगायकीतले एक अत्यंत महत्त्वाचे नाव. त्यांच्यावर आठ-नऊ भाग असतील,तसंच इतर भागांत पंडित भास्करबुवा बखले, छोटागंधर्व, सवाईगंधर्व यांच्या गायकीवर आधारित भाग असतील. आदित्य ओक हे आनंद भाटे यांच्याशी संवाद साधतील आणि ती गायकी अर्थातच शब्दसुरांच्या माध्यमातून आनंद भाटे उलगडून दाखवतील." साहजिकच 'गंधर्वगान' पाहिल्यानंतर जेव्हा आपण बालगंधर्वांनी गायलेले गीत ऐकू, तेव्हा त्यातले सौंदर्य आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल. या सीरिजचा एका भागाचा कालावधी पंचवीस ते तीस मिनिटांचा असेल. 'गंधर्वगान' प्रोजेक्टमध्ये संगीतकार कौशल इनामदार यांचाही सहभाग आहे. याबाबत कौशल म्हणाले, "या वेब सीरिजचे दोन भाग हे 'बालगंधर्व' चित्रपटाच्या संगीतावर आधारित आहेत. मुळात बालगंधर्व हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यात 'बालगंधर्व' चित्रपटाचं संगीत हे माझ्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक होतं. या चित्रपटाच्या संगीतनिर्मितीत अर्थातच माझ्याबरोबर आनंद भाटे, आदित्य ओक आणि प्रसाद पाध्ये यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 'बालगंधर्व' चित्रपटाचं संगीत लोकांना इतकं भावलं होतं की दोन दिवसांत या चित्रपटाच्या अकरा हजार सीडीज विकल्या गेल्या होत्या. या सर्व आठवणींना आम्ही 'गंधर्वगान'मधून उजाळा देणार आहोत. आज मोबाइलचा जमाना आहे, बालगंधर्वांची गीतं आयपॉडच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून लोकांसमोर आणणं हे एक आव्हान होतं. आणि तरुण पिढीला नाट्यसंगीत नक्की आवडतं, हे अशा उपक्रमातून सिद्ध होतं. डिजिटल माध्यमाविषयी असं सांगेन की आपल्या मागच्या काळात जे चांगलं घडलं, जे संगीत अभिजात आहे, उत्तम आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी या पुढच्या काळातील माध्यमांचा उपयोग व्हायलाच हवा. आज विविध उपक्रम हे डिजिटल माध्यमातून येत आहेत, हे माध्यमांचं लोकतांत्रिकीकरण आहे, असं मी म्हणेन. कारण इथे टीआरपीची गणितं नाहीत. आपला जो सांगीतिक विचार आहे, तो आपल्याला हव्या त्या प्रकारे प्रामाणिकपणे लोकांसमोर आणण्याचं डिजिटल मीडिया हे माध्यम आहे. त्याचा अधिकाधिक वापर होतोय,हे स्वागतार्ह आहे." अशा प्रकारचे उपक्रम लोकांपर्यंत पोचवण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो 'स्मृतिगंध' या ऑनलाइन व्यासपीठाचा. 'स्मृतिगंध' या ऑनलाइन व्यासपीठाला सुरुवात झाली मे २०१७ साली! याचे संस्थापक अमित टिल्लू म्हणाले, "अभिजात संगीत लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा मूळ हेतू आहे. अभिजात संगीताचा ठेवा लोकांना आजच्या डिजिटल माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'स्मृतिगंध'चे आमचे व्हॉट्सअॅपचे पाच कन्टेन्ट ग्रुप्स आहेत तर नऊ व्हॉट्सअॅप ग्रुप हे विविध शहरांत राहणाऱ्या लोकांचे आहेत. यात अमेरिकेतील लोकांचाही समूह आहे . 'गंधर्वगान'ची लिंक ही त्या ग्रुप्सनासुद्धा पाठवली जाईल." सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हा उपक्रम विनामूल्य आहे. 'अनादि मी अनंत मी' 'स्मृतिगंध'प्रमाणेच आणखी एका उपक्रमाचा इथे उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे 'अनादि मी अनंत मी' या नाट्यकलाकृतीचा. 'अनादि मी अनंत मी' हे माधव खाडिलकर लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट उलगडणारे नाट्य. या नाटकाचा पहिला प्रयोग २६ फेब्रुवारी १९८४ साली रंगभूमीवर सादर झाला होता. १९८५ साली या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये इंडिया हाऊसच्या वास्तूत झाले. २०१६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण स्मृतिवर्षानिमित्ताने या नाटकाचे नाट्यअभिवाचन स्वरूपात पुनर्निर्माण करण्याची इच्छा ओंकार खाडिलकर याच्या मनात निर्माण झाली. पुणे-मुंबई येथील पंचवीस-तीस जणांना घेऊन, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तालमी सुरू झाल्या. त्यानंतर पहिला प्रयोग भरत नाट्यमंदिर येथे हाऊसफुल्ल झाला. सुमारे तीनशे प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेरून परतावे लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने ओंकार खाडिलकर याने 'अनादि मी अनंत मी' ही नाट्यकृती ध्वनिनाट्य पद्धतीने डिजिटल मीडियाचा वापर करून प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचे ठरवले . ओंकार म्हणाला , "आम्ही 'अनादि मी अनंत मी' हे नाटक पुन्हा नव्यानं रेकॉर्ड केलं. हे नाटक माझ्या वडिलांनी म्हणजे माधव खाडिलकर यांनी लिहिलं असून त्याचं संगीत माझ्या आईनं अर्थात आशा खाडिलकर यांनी केलं आहे. यात सोळा गाणी आहेत. सध्याचा काळ डिजिटल माध्यमाचा आहे आणि ही माध्यमं अनिवार्य आहेत. या माध्यमातून लोकांना आपण आपलंसं करायला हवं. सावरकरांचं व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा उद्देश आहे. नाट्यप्रयोग रंगमंचावर विनामूल्य सादर केला तरी त्याला मर्यादा आहेत. डिजिटल माध्यमातून एकाच वेळी तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोचू शकता. सध्या लोकांकडे नाटक बघण्यासाठी दोन तास असतीलच असे नाही. त्यामुळे गाडी चालवता चालवता, प्रवास करता करतासुद्धा तुम्ही ज्याचा आनंद घेऊ शकता असं हे डिजिटल माध्यम! आम्ही या नाटकाचे पंधरा मिनिटं प्रत्येकी असे काही भाग तयार केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून २८ मे २०१९ पासून 'अनादि मी अनंत मी' हे ध्वनिनाट्य आपल्याला उपलब्ध झालं आहे. हे ध्वनिनाट्य उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि रिव्हर्ब कट्टा या डिजिटल मनोरंजन मीडियाच्या सहकार्यानं विनामूल्य स्वरूपात www.reverbkatta.in या संकेतस्थळावर, तसंच बुकगंगा, स्नॉवेल या ऑडिओ अॅप्सवर उपलब्ध आहे. हे ध्वनिनाट्य www.eprasaran.com इथंही उपलब्ध आहे. 'अनादि मी अनंत मी ' या यू ट्यूब चॅनेलवर बारा भागांत उपलबल्ध आहेत."
हृदयाच्या ओसाडींत वसे संप्रती करपल्या त्या प्रीतीचें पिशाच्च मात्र ! का न मग वासना ही व्हावी मजशीं एकांतांत भेटायची आपणालागी ? बुद्ध नगरीं आले ' - हें निवेदावया यौगंधरायणें दूत वर्नी धाडिला. उषःकाल उदयन उद्या येईल : - चला, घेऊं पुरवून त्या आधी हौस ! न यावा तो आला योग हा अवचित, किती पाहतां सखया ! अंत दासीचा ! गौतम : (स्वगत) अहा ! काय संकट है ओढवे तरी ! कोणत्या उपायीं त्याची फेडावी गोवी ? शंकाही या अरिष्टाची येती मजला, तरी मी या पापपंकों येतों कासया ? हिजसाठी मीं लंघिला निज निश्चय, आणि, हीच लोटू पाहे मज रौरवीं ( पुन्हा त्या जाळीदार भिंतीकडून दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला हास्यध्वनि होतो ! पण गौतमाचें तिकडे लक्ष्य नसतें. ) ( तो ध्यानस्थ बसतो. त्याने डोळे मिटलेले पाहून ती रमणी त्या जाळीदार भिंतीकडे पाहत हाताने स्तब्ध राहण्याची खूण करिते. तोंच मार हा तृष्णा, रति व अरति यांच्यासह लगबगीने प्रवेश करून गौतमाला घेरतो. माराच्या हातांत धनुष्य व पाठीशीं बाणांचा भाता आहे. हीं चौघेंहि त्या रमणीला अदृश्य आहेत. ) मार : जाति- वरमंगला वाजवा दुंदुभी ! पुष्पवृष्टी करा ! बुद्ध अपुल्या करीं आज आला पुरा ! ध्रु०
कर्क राशिः जून महिना तुमच्यासाठी सामान्य राहील. या महिन्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. कामाची गती मंद राहील. कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, तरीही मेहनतीनुसार फळ मिळण्यात शंका असेल. उच्च अधिकार्यांशी मतभेदामुळे प्रगतीवर परिणाम होईल. व्यवसायात चढ-उतार होतील. भागीदारीच्या कामकाजात पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन काम सुरू करणार असाल तर ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करा. महिन्याच्या सुरुवातीला मोठा कौटुंबिक खर्च होऊ शकतो किंवा तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यावे लागू शकतात. हा महिना आरोग्याच्या बाबतीत बिघाडाचा आहे, त्यामुळे काळजी घ्या. हंगामी आणि अन्नाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देतील. हे देखील खर्च होतील. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक समन्वयाचा अभाव असू शकतो. या महिन्यात अनिश्चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. आर्थिक योग उत्तम असतील. खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या.
बिग बॉस 14 ची ट्रॉफी अखेर रूबीना दिलैकने जिंकली. बिग बॉसच्या घरात 143 दिवस राहणारी रूबीना बिग बॉसची ट्रॉफी आणि 36 लाख प्राईज मनी घेऊनच बाहेर पडली. बिग बॉसची विजेती ठरल्यानंतर रूबीनाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानलेत. 'खूप खूप आभार. मी माझ्या सुंदर तिस-या डोळ्यासोबत (बिग बॉसची ट्रॉफी) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतेय. माझ्या फॅन्स आणि फॉलोअर्ससाठी हे इन्स्टंट इन्स्टा लाईव्ह करतेय. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी बिग बॉस 14 ची विजेती बनू शकली. तुम्ही माझे स्वप्न सत्यात बदलले. यानंतर मी खास तुमच्यासाठी लाईव्ह येईल. बिग बॉस, कलर्स टीव्ही आणि सलमान खान यांचेही खूप खूप आभार. . . ,' असे रूबीना म्हणाली. बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेलेत, तेव्हा या कपलच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हते. अगदी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहोचले होते. पण बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना दोघांमधील मतभेद दूर झालेत. दोघांनाही नव्याने एकमेकांची, एकमेकांवरच्या ्रप्रेमाची जाणीव झाली. रूबीना व अभिनवने घटस्फोटाचा विचार कधीच मनातून काढून टाकला आहे. आता तर दोघेही दुसºयांदा लग्न करण्याच्या विचारात आहेत. यासाठी रूबीना डेस्टिनेशन वेडिंग प्लान करतेय. आमचे हे दुसरे लग्न आयुष्यभरासाठी असेन, असे रूबीना बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाली. या शोने आमचे नाते मजबूत केले. आम्ही बिग बॉसच्या घरात नव्याने प्रेमात पडलो, असेही ती म्हणाली. बिग बॉस जिंकणे माझे स्वप्न होते. मला हा शो जिंकायचाच होता. म्हणतात ना, सगळा नशीबाचा खेळ असतो. कदाचित हे माझ्या नशीबात होते. बिग बॉसच्या घरातील प्रवास माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. या प्रवासात मी स्वतःचाच शोध घेतला आणि मला याचा अभिमान आहे, असेही शो जिंकल्यानंतर रूबीना म्हणाली.
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन इमारतीत देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. नवीन संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेसोबतच एक संविधान सभागृहही बांधण्यात आले आहे. त्यात देशाच्या संविधानिक वारशाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. नवीन इमारतीतील लोकसभेत ८८८ खासदारांची बसण्याची क्षमता असेल. तर राज्यसभेचा आकार लोकसभेपेक्षा लहान असेल. राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतील. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. यामध्ये १२८० खासदार एकत्र बसू शकतील. नवीन इमारतीत खासदारांच्या सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. यात सर्व संसद सदस्यांसाठी एक विशेष विश्रामगृह, एक लायब्ररी, जेवणाचे हॉल आणि पार्किंगची जागा आहे. हायटेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन संसद भवनात महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. कॅफे, डायनिंग एरिया, कमिटी मीटिंग रूममध्येही हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत. कॉमन रूम व्यतिरिक्त महिलांसाठी लाउंज, व्हीआयपी लाउंजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष विश्रामगृहांमध्ये खासदारांना त्यांचे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि संसदेत भेटायला येणाऱ्या लोकांना बोलावण्याचे स्वातंत्र्य असेल. जुन्या इमारतीच्या तुलनेत नव्या इमारतीतील लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था सुधारण्यात आली आहे. जुन्या सभागृहांमध्ये खासदारांना बसण्यात सर्वाधिक त्रास होत असे. पण नवीन संसद भवनाच्या दोन्ही सभागृहात जागा वाढवण्यात आली आहे. आता लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात प्रत्येक बेंचवर फक्त दोन सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. जुन्या इमारतीत खासदारांना ये-जा करताना त्रास व्हायचा. मात्र नव्या सभागृहात खासदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ये-जा करता येणार आहे. या दरम्यान कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. नवीन संसद भवन हायटेक बनवण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. खासदारांच्या सुविधा लक्षात घेऊन प्रत्येक आसनावर डिजिटल यंत्रणा आणि टच स्क्रीन बसवण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या मोबाईल किंवा टॅबलेटवरून ही डिजिटल प्रणाली थेट जोडता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही यंत्रणा त्याच सीटशी जोडली जाणार आहे, जी त्यांना लोकसभा सचिवालयाने अधिकृतपणे दिली आहे. या डिजिटल प्रणालींवर संसदेच्या कामकाजाच्या तपशिलासोबतच खासदारांना त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही पाहता येणार आहेत. संसदेला कागदावर सुसज्ज करण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे खासदारांना आता या यंत्रणांद्वारेच महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे. नवीन संसद भवन संकुलात अद्ययावत दृकश्राव्य यंत्रणाही बसवण्यात आली आहे. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आणि अधिवेशन तहकूब झाल्यानंतर खासदार आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यामार्फत माहिती दिली जाईल. जुन्या इमारतीप्रमाणेच इमारतीत खासदारांसाठी आरामदायी डायनिंग हॉल तयार करण्यात आला आहे. याशिवाय वयोवृद्ध खासदारांसाठी अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उर्मिला मातोंडकर ही 1990 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट केले. आता उर्मिलाने एका मुलाखतीत स्फोटक विधान केले आहे. उर्मिलाने 'रंगीला' चित्रपटातील तिच्या अभिनयाला अभिनयाचे श्रेय दिले नसल्याचे म्हटले आहे. उर्मिलाने तिचा अभिनय 'सेक्स अपील' म्हणून फेटाळून लावला. रंगीलामध्ये उर्मिलाने महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. उर्मिला मातोंडकरने 'कर्मा' आणि 'मासूम' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. नंतर तिने 'जुदाई', 'सत्या', 'प्यार तूने क्या किया', 'भूत', 'कौन', आणि 'एक हसीना थी' असे अनेक चित्रपट केले ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (actress urmila matondkar says her acting was dismissed credit not given for rangeela)
बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वैभववाडी : बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजन कदम हा एडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. त्याने प्रशिक्षण संस्थेत अस्तित्वात नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र बनवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का व खोटी स्वाक्षरी करून ते ओझरम (ता. कणकवली) येथील युवकाला दिले. तसेच रजा कालावधीतील बनावट वेतनचिठ्ठी बनवून वैभववाडी शहरातील तीन लोकांना तो कर्जासाठी जामीन राहिल्याचे आरोप कदमवर ठेवण्यात आले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौगुले यांच्या तक्रारीनुसार येथील प्रशिक्षण संस्थेत ह्यप्लंबरह्ण (नळ कारागीर) हा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिल्लीतील एन. सी. व्ही. टी संस्थेमार्फत दिले जाते. मात्र, ओझरम येथील विराज रवींद्र राणे या युवकाने आॅगस्ट २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला असे बोगस प्रमाणपत्र संशयित आरोपी राजन कदम याने बनविले. त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून त्यांची खोटी स्वाक्षरी केली व ते प्रमाणपत्र कदम याने विराज राणेला दिले. परंतु, विराज राणे नोकरीसाठी परदेशी जाणार असल्याने १ एप्रिलला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आला. त्याने मराठीतील प्लंबर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र इंग्रजीत रुपांतरीत करून देण्याची मागणी केली. त्यावेळी बोगस प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे प्रशिक्षण संस्थेत विराज राणेचा प्रवेशच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ५ एप्रिलला युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेचे कर्मचारी राजन कदम याला शोधत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळे बनावट वेतनचिठ्ठीचा प्रकार उघड झाला. संशयित आरोपी राजन कदम हा २३ जानेवारी २०१७ ते १५ जुलै २०१७ या कालावधीत असाधारण रजेवर होता. त्या दरम्यान जून २०१७ ची बनावट वेतनचिठ्ठी बनवून तो युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेत वैभववाडी शहरातील तिघांना कर्जासाठी जामीन राहिला आहे. त्या कर्जदारांचे हप्ते थकित राहिल्यामुळे बँकेचे कर्मचारी जामीनदार राजन कदमच्या शोधात प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळेच कदम याने दोन प्रकरणात शासन, बँक आणि आपली फसवणूक केल्याची तक्रार प्राचार्य डी. बी. चौगुले यांनी दिली आहे. चौगुले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिपाई राजन कदम याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कदम याला अटक झाली नव्हती. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे उपलब्ध नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे उघड झाल्याने प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे यापूर्वी आणखीही अशाच प्रकारची विविध अभ्यासक्रमांची बोगस प्रमाणपत्रे बनवून दिली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने शक्यतांचा तपास होणे आवश्यक आहे.
एखादा मेसेज किंवा पोस्ट कुठून आली हे व्हॉट्सअॅप सांगू शकत नाही. व्हॉट्सअॅपच्या मते, असं करणं म्हणजे एखाद्याच्या गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्यासारखे आहे. यामुळेच सरकारच्या या संबंधित प्रस्तावाला व्हॉट्सअॅपने विरोध केला आहे. एखादा मेसेज किंवा पोस्ट कुठून आली हे व्हॉट्सअॅप सांगू शकत नाही. व्हॉट्सअॅपच्या मते, असं करणं म्हणजे एखाद्याच्या गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्यासारखे आहे. यामुळेच सरकारच्या या संबंधित प्रस्तावाला व्हॉट्सअॅपने विरोध केला आहे. सोशल मीडिया कंपनीच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. खोट्या आणि प्रक्षोभक पोस्टला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, ज्यामुळे देशभरात काही जणांची मारहाण करुन हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि काही ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सरकार लोकसभा निवडणुकांनंतर या बाबत तशा सूचना प्रसिद्ध करणार आहे. यानुसार जर सोशल मीडिया कंपन्या आणि मेसंजिंग अॅपचे कर्मचारी हे सांगत नाही की, अशा पोस्ट कुठून आल्या तर त्या कंपनीवर दंड आकरण्याची आणि कर्मचाऱ्यांना गजाआड पाठविण्याची तरतूद असणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या प्रस्तावित नियमांची व्याप्ती प्रचंड आहे. हे गोपनीयता अधिकाराच्या विरोधात आहे, जे जगातील सर्व लोकांसाठी फार महत्त्वाचे आहे. सरकार ज्याची मागणी करत आहे, ते पूर्ण करणे खूप अवघड आहे. कारण कंपनी ग्राहकांना एंड टू एंड एनक्रिप्शनची ऑफर देते. एखादी पोस्ट कुठून आली, याची माहिती देण्यासाठी कंपनीला नवीन कार्यक्रम (programme) तयार करावा लागेल अशी माहितीही एका सूत्राने दिली. गोपनीयता हा व्हॉट्सअॅपच्या सेवेचा महत्त्वाचा भाग आहे. आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या प्रकरणी सरकारला विरोध करणे सुरूच ठेवणार आहे कारण या नियमामुळे एनक्रिप्शन फीचर कमकुवत होईल असं कंपनीचं मत आहे. या बातमीला अनुसरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची व्हॉट्सअॅपने उत्तरेही दिलेली नाहीत. तथापि, ग्राहकांचा व्यक्तिगत डेटा स्टोर करणं प्लॅटफॉर्मच्या मूळ स्वभावाला धरून नाही असं व्हॉट्सअॅपच म्हणणं आहे. ग्राहकांचा दोघांमधील संवाद हा गोपनीय राहायला हवा, यासाठी व्हॉट्सअॅप तयार करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप अशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे कारण प्लॅटफॉर्मवर मेसेज करणाऱ्या ग्राहकांची माहिती संग्राहित करता येणार नाही. यात कोणत्याही प्रकारच्या बदलाचा प्रभाव जगात त्याच्या कामकाजावर पडेल, अशी माहितीही एका सूत्राने दिली. मात्र, सरकारी अधिकारी व्हॉट्सअॅपच्या या मताशी सहमत नाही. सरकारच्या मते, ज्याप्रमाणे कंपन्या तपास यंत्रणांना कॉल रेकॉर्डची माहिती देतात, त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही ती द्यायला हवी असं सरकारी अधिकाऱ्यांचं मत आहे. व्हॉट्सअॅपला आमचं म्हणणं कळत नाही किंवा कंपनीला ही बाब समजून घ्यायची नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने पूर्वीच इकोनॉमिक टाइम्सला दिली आहे. आम्ही व्हॉट्सअॅपकडे व्हिडिओ, ऑडियो किंवा मजकूराबाबत माहिती मागत नाही तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की, ती पोस्ट कुठून आली आहे. तथापि, यासाठी आम्हाला कोणताही अपराध केला नसला तरीही त्यांचा डेटा नेहमीच स्टोर करून ठेवावा लागेल , अशी माहिती वर नमूद केलेल्या एका सूत्रानेच दिली आहे.
गेल्या तीन महिन्याच्या कारकीर्दीत मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला असून नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचा आरोप रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विटा येथे झालेल्या जाहीर सभेत केला. राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी पवार सांगली जिल्ह्यातील विटा आणि जत येथे आले होते. तासगाव येथे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग आणि प्रकल्प गुजरातला पळविले जात असून ते केवळ त्याच राज्याचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे नेतृत्व उद्ध्वस्त करण्यासाठी तासगावसारख्या लहान शहरात पंतप्रधान येतात हे आबांचेच महत्त्व वाढविण्याचा प्रकार आहे. भाजपाने प्रचार यंत्रणा खालच्या पातळीवर नेली असून या प्रचारामुळे महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव रचला गेला असून हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्यांमुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. मोदी सरकारकडून सामान्य जनतेच्या अपेक्षा होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांत या अपेक्षा फोल ठरल्या असल्याचेही ते म्हणाले. या सभेसाठी जयंत पाटील, आर. आर. पाटील, अमरसिंह देशमुख, बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
पुणे/आकुर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - लोहमार्ग ओलांडत असताना एका मालगाडीची धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकावर घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून यामध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा मृत्यू झाला आहे. गौतमी महेंद्र जाधव (वय-29) आणि रवि चंदर पिलाव (वय- 35) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी आणि रवि यांची मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आकुर्डी रेल्वे स्थानकावरून मालगाडी जात होती. गौतमी आणि रवी यांना मालगाडीची धडक बसली यामध्ये दोघांचा जगीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रवी आणि गौतमी हे दोघे आकुर्डी रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग ओलांडत होते. त्यावेळी येणारी मालगाडी त्या दोघांना दिसली. मात्र, मालगाडी येत असतानाही या दोघांनी लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना लोहमार्ग ओलांडता आला नाही. त्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या मालगाडीची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
True rumors । गोव्यात आयआयटी होणार तरी कुठे?\nकेंद्राने गोव्यासाठी आयआयटी मंजूर करून झाली अनेक वर्षे\nखरी कुजबुज.....Dainik Gomantak\n13 May, 2022, 3:10 am\nगोवाः केंद्राने गोव्यासाठी आयआयटी मंजूर करून अनेक वर्षे झाली. सध्या तिचे काम फर्मागुढी येथून सुरू असले तरी तिचे कायमस्वरुपी संकुल कुठे साकारणार याबाबत गोवा सरकारची ठाम भूमिका नाही असा संशय आता व्यक्त केला जाऊ लागलेला आहे. प्रथम काणकोणमधील लोलये भगवती पठार, नंतर सांगे, त्यानंतर मेळावली सत्तरी अशा अनेक जागा निवडल्या, पण लोकांच्या विरोधानंतर सरकारने माघार घेतली. ताज्या निवडणुकीनंतर सभापती तवडकर यांनी काणकोणात ही संस्था नेण्यासाठी पुढाकार घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला, पण त्यानंतर केपे व आता सांगेचे नाव सरकारच या प्रतिष्ठेच्या संस्थेसाठी घेऊ लागल्याने सरकारच्या मनात नेमके काय आहे असा सवाल लोकांकडून केला जाऊ लागला आहे.\nकरमळी तळे सुशोभिकरणासाठी पुढाकार!\nहॉटमिक्सिंग झाले पण...\nगोव्याची एक खासियत म्हणजे मुक्तीनंतरच्या गेल्या साठ वर्षांत येथील खेडी - पाडी रस्त्यांनी जोडली गेली आहेत. त्यातील अधिकतम रस्ते केवळ डांबरीच नव्हे, तर हॉटमिक्सव्दारे गुळगुळीत झालेले आहेत. अशा प्रमुख रस्त्यापैकी पोळे ते मडगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मध्ये मोडतो. या महामार्गाचा गुळे ते बाळ्ळी दरम्यानचा भाग संपूर्णतः उखडल्याचा दावा करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले व त्यानंतर संबंधित सुत्रे हलून हॉटमिक्सींगचे काम सुरू झाले व आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, पण मुद्दा तो नाहीच. या रस्त्याच्या करमल घाटातील साधारण सात कि.मी. भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे माती, दगड व कचऱ्याने भरून गेलेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी संबंधित खाते ती साफ करेल की पुन्हा काँग्रेसवाल्यांना रस्त्यावर यावे लागेल अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙\n'कौन बनेगा आमदार' या दै. 'गोमन्तक'ने जाहीर केलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. चाळीसपैकी 38 मतदारसंघाचा निकाल बरोबर सांगणाऱ्याला पहिला क्रमांक प्राप्त झाला. विशेष म्हणजे त्यांनी ज्या दोन चुका केल्या आहेत. त्यात फोंडा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यांनी फोंड्यात डॉ. केतन भाटीकरच्या नावावर खूण केली होती आणि बहुतेक स्पर्धकांच्या प्रवेशिका पाहिल्यास फोंड्यात एकतर केतन भाटीकर व राजेश वेरेकर यांचे नाव दिसून येते. 'पात्रांवा'चे जिंकणे हे बऱ्याच लोकांच्या दृष्टीने अनपेक्षित होते.\nफोंड्यात तर त्यावेळी भाटीकर की वेरेकर यावर पैजाही लागल्या होत्या, पण अनपेक्षितपणे पात्रांवाने मुंसडी मारलीच. म्हणजे आपल्या हातात किती पत्ते आहेत त्याच्यापेक्षा जास्त पत्ते शर्टाच्या बाहीखाली ठेवणे ही पात्रांवाची खासियत यावेळीही प्रत्ययास आली. अजूनही फोंड्याच्या निकालाबद्दल खमंग चर्चा सुरू आहे. 'ये कैसा हो गया' असा प्रश्न दोन महिने झाले तरी फोंड्यात एकामेकांना विचारला जात आहे. मात्र, या प्रश्नाला पात्रांवाचे एकनिष्ठ कार्यकर्ते 'येही तो पात्रांव का कमाल है' असे उत्तर देताना दिसत आहेत. आहे की नाही मजा.\nऑफर दोन लाखांची\nविजय सरदेसाई यांच्या गटातील नगराध्यक्ष लिंडन परेरा यांची टर्म आता संपत आलेली असताना दिगंबर कामत गटातील नगरसेवक या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असताना एका वजनदार नगरसेवकाने स्वतः नगराध्यक्ष बनण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे असे समजते. या नगरसेवकाने अन्य नगरसेवक आपल्या बाजूला वळविण्यास सुरवात करताना आपल्या बरोबर आल्यास त्या नगरसेवकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. आत्ता बोला! ∙∙∙\n'त्या' डोंगरावर उभे राहिले कुटीर!\n'तुम्ही एखाद्याला एकदाच मूर्ख बनवू शकतात, सगळ्यांनाच प्रत्येक वेळी मूर्ख बनविणे शक्य नाही.' अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पांझोरकोणी कुंकळ्ळी येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून डोंगर कापणीचे प्रकरण बरेच गाजले होते. तृणमूल काँग्रेसचे डॉ. जोर्सन फर्नांडिस व काँग्रेसचे युरी आलेमाव यांनी या डोंगर कापणीचे राजकीय भांडवल केले होते.\nपोलिस अधीक्षक सेमी तावारीस यांनी यावर गीतही गायले होते. भाजप विरोधी पक्ष तत्कालीन आमदार क्लाफास डायस व बाबू कवळेकर यांच्यावर आरोप करीत होते. निवडणुकीत बाबू व क्लाफास हरले. मात्र, ज्या डोंगर कापणीचे राजकीय भांडवल केले होते त्याच डोंगराच्या शिखरावर आणखी एका व्यक्तीने डोंगर कापून कुटीर उभारले आहे. आता युरी आलेमाव आमदार आहेत. मात्र, जे डोंगराचा खालचा भाग कापला म्हणून शिगमा घालीत होते ते राजकीय पक्ष, आमदार, पराभूत उमेदवार व समाजकार्यकर्ते आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. म्हणजे डोंगर कापणी करणार कोणत्या धर्माचा, जातीचा व पक्षाचा यावरून ते कायदेशीर की बेकायदेशीर ठरते का? असा प्रश्न पडायला लागला आहे. ∙∙∙\nअखेर रस्त्यावरील खड्डे हटविणे अशक्य आहे अशी कबुली संबंधित मंत्र्यांनी दिली हे बरे झाले. कारण यापूर्वी सरकारने पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त केले जातील असे जाहीर केले होते. त्यापूर्वी गत नोव्हेंबरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या महिना अखेरपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील असे घोषीत केले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही व त्यामुळे तो थट्टेचा विषय ठरला होता, पण मुद्दा तो नाही. रस्ते असो वा अन्य कामे, त्यांच्या दर्जाची हमी संबंधित ठेकेदारावर असते व हमी काळात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचे बंधन संबंधितावर असते . सरकार त्याची अंमलबजावणी का करत नाही किंबहुना असे खड्डे का पडतात त्याचा शोध घेतला तरी बरेच काही साध्य होईल असे काही ठेकेदारच म्हणू लागले आहेत. ∙∙∙\nनिदान बाबूशनी तरी समस्या संपवाव्यात\nमहसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हे धडाकेबाज व्यक्तीमत्त्व. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे सोपलेल्या खात्यांचा ताबा घेताच त्यांनी खात्यांची माहिती घेण्यास सुरवात केली. तसेच प्रलंबित प्रश्न, समस्या आणि मागण्या सोडविण्याची ग्वाही दिली. म्हापसा मामलेदार कार्यालयात झेरॉक्स काढण्याची सुविधा नसल्याची बाब मंत्री मोन्सेरात यांच्या आता लक्षात आली. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी महसूलमंत्री असताना या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी उपस्थित लोकांनी अनेक समस्या खंवटे यांच्यासमोर मांडल्या होत्या. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.\nम्हापसा मामलेदार कार्यालयात साधे झेरॉक्स मशीनही नसावे, याची खंत मंत्री मोन्सेरात यांनी बोलून दाखवली. कुठल्याही सरकारी कामासाठी झेरॉक्सच्या प्रती लागतात. त्या मिळविण्यासाठी लोकांना दाहीदिशा जावे लागते, याची जाणीव ठेऊन मोन्सेरात यांच्या खासगी कार्यालयात बऱ्याच वर्षांपासून झेरॉक्स मशीनची सोय करून ठेवली आहे. पण सरकारी कार्यालयातच अशी व्यवस्था नसल्याचे पाहून मोन्सेरात अस्वस्थ झाले. खंवटे यांनी नाही किमान मोन्सेरात तरी आपल्या मागण्या पूर्ण करतील का अशी चर्चा सध्या म्हापसावसीयांत सुरू आहे. ∙∙∙\nनीलेश काब्राल यांचा प्रामाणिकपणा...\nसार्वजनिक बांधकाम खाते सर्वात मलईदार खाते. खासकरून रस्ता विभागाबाबत तरी विचारायलाच नको. नवा रस्ता करायला जेवढा पैसा खर्च होतो, त्यापेक्षा अधिक निधी दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी होतो.\nरस्त्यावरील खड्ड्यांचा आणि वाहनचालकांचा जवळचा संबंध. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग सोडले, तर राज्य महामार्ग आणि शहरांसह ग्रामीण भागांतील रस्त्याची झालेली वाताहत हा विषय गेली दीड एक वर्षे गाजत आहे. माजी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी डिसेंबर 2021अखेर खड्डे बुजवू असे सांगितले होते, तर मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर 2021 पूर्वी राज्यातील सर्व रस्ते होतील, अशी ग्वाही दिली होती. नोव्हेंबर-डिसेंबर संपून सहा महिने होत आले. निवडणुकाही झाल्,या पण खड्ड्यांची मालिका काही संपत नाही. आता नूतन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल मात्र भलतेच प्रामाणिक म्हणायचे. त्यांनी राज्यातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त होऊ शकणार नाहीत, याची स्पष्ट कबुली दिली. एका दृष्टीने हेही बरेच झाले म्हणायचे. कारण वाहनचालक आगामी पावसाळा कसा काढायचा याची मानसिक तयारी करूनच घरातून बाहेर पडतील. ∙∙∙\nसोने गेले कुठे?\nगोव्यातील फुटबॉलसाठी भूषणावह असलेली 'बांदोडकर गोल्ड ट्रॉफी' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या ट्रॉफीचे कथित सोने गेले कुठे, असा प्रश्न विचारून गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी रान उठवले. आता या सोन्याचा पाठपुरावा करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 1970 मध्ये स्पर्धेला सुरवात झाली. नंतर ही स्पर्धाच बंद झाली आणि ट्रॉफी बँकेच्या लॉकरमध्ये अडकली. 2016 मध्ये पुन्हा स्पर्धेनिमित्त ती ट्रॉफी लॉकरमधून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर पुन्हा ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी काही काळ जीएफडीसीच्या कार्यालयात होती. आता ती 'जीएफए'च्या कोठारात पडून आहे. मग या ट्रॉफीचे सोने गेले कुठे? खरे तर आलेमाव यांनी याप्रकरणी कोणावरही आरोप वा अंगुलीनिर्देश केलेले नाहीत. यदाकदाचित जर हे प्रकरण तपास यंत्रणांकडे गेले, तर या यंत्रणाही बुचकळ्यात पडणार आहेत. एक प्रकारे तपास यंत्रणांपुढे चर्चिल यांनी आव्हान उभे केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.\nनोकऱ्यांसाठी आमदारांची सतावणूक\nमागच्या सरकारने मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या. या नोकऱ्या देतानाही आपल्या चेल्यापेल्यांना आधी प्राधान्य दिले आणि मुलाखतींचा केवळ फार्स केला. तत्कालीन सरकारमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत. मात्र, या सरकारी नोकऱ्या खरेच गरजवंतांना मिळाल्या काय, हा सवाल उपस्थित होत आहे. मागच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाली असली तरी काही खात्यात अजून भरती झालेली नाही, त्यामुळेच तर आता नवीन निवडून आलेल्या आमदारांकडे आणि मंत्र्यांकडे युवक आणि त्यांच्या पालकांकडून या सरकारी नोकऱ्यांसाठी सध्या तगादा लावला जात आहे, त्यामुळे नवीन मंत्री आमदारांची गोची झाली आहे.\nरोमीचे म्हालगडे झाले सक्रिय?\n'शिगमा सरला तरी कवित्व उरते' अशी एक म्हण आहे. गोव्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतल्या कोकणीला मान्यता मिळाली. कोकणी आठव्या परिशिष्ठात गेली, कोकणी गुगलवर आली. कोकणीच्या लेखकांना सरस्वती व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले, तरी आजही मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी होते. एवढेच नव्हे, तर रोमी लिपीतल्या कोकणीलाही राजमान्यता देण्याची मागणी होतेय.\nशनिवारी व रविवारी मालवणला कोकणी साहित्य परिषद भरत आहे, त्याच्या पूर्वी आज शुक्रवारी मडगावला कुवेट कोकणी मोगी संस्थेने काढलेल्या रोमी कोकणीतून प्रमाण कोकणी शिकूया व गोयचे दायज या पुस्तकाचे लोकार्पण होत आहे. हा जरी योगायोग असला तरी रोमी कोकणी मोगी सक्रिय होत आहेत याचेच हे प्रमाण. काही का असोना कोकणी आता केवळ कोकणापूर्तीच मर्यादित राहिली नसून कुवेटसारख्या देशातही पोचली. यालाच म्हणतात म्हालगडेपण! ∙∙∙\nखाण भागातील उच्च शिक्षित बेरोजगारच...\nखाणी बंद होऊन दहा वर्षे उलटली तरी अजून सुरू झालेल्या नाहीत. फक्त लिलावाचा खनिज माल तेवढा वाहतूक केला जात आहे, त्यातही हा माल किती आहे आणि किती वाहतूक केला याबद्दल सगळे गौडबंगालच आहे. हे सगळे खाणींबद्दल झाले तरी खाणव्याप्त भागातील पालकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले, पण दुर्दैवाची बाब म्हणजे या उच्च शिक्षित युवकांकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. अभियंता तसेच अन्य उच्च शिक्षित झालेले युवक बेरोजगार असून सरकारी नोकऱ्यांच्याबाबतीतही खाण भागातील युवकांना प्राधान्य देण्यात आलेले नाही. खाण भागातील महसूल फक्त गिळंकृत करायचा आणि सुविधा मात्र इतरांना द्यायच्या, असा हा प्रकार असून भाजप सरकारला कधी जाग येणार आणि खाण भागातील युवकांच्या हातांना कधी काम मिळणार, असे खाण अवलंबितच आता हताशपणे विचारत आहेत.\nझोळी झाली फाटकी\nसरकार सवंग लोकप्रियतेच्या मागे लागले आहे. आज राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही सवंग लोकप्रियता परवडणारी नाही. देणाऱ्याचे हात हजार; पण फाटकी माझी झोळी ही परिस्थिती उलटी झाली आहे ती अशी - 'घेणाऱ्यांचे हात हजार, पण सरकारची झोळी झाली फाटकी'. संबंध जनता मेटाकुटीला आली असताना अठरा मिनिटांच्या शपथविधीसाठी पावणेसहा कोटी रुपये खर्च केले जातात. आता तर प्रशासन जनतेच्या दारात घेऊन राज्यभरात किमान एका कार्यक्रमाला 35 ते 40 लाख खर्च केले जाणार आहे. मात्र, सरकार खाली हात घेऊन जनतेच्या दारात फिरत आहे. जनतेला रिकाम्या पोटी आश्वासने शिवाय काहीच मिळत नाही. सरकारने जनतेच्या दारात जाताना शिदोरी घेऊन जायला हवे. एका बाजूने लोकप्रियतेचा सपाटा लावला असताना जनता आर्थिक योजनाची प्रतीक्षा करीत आहे, हे चित्र बदलणे गरजेचे आहे.\nमडगाव ही अ वर्गात मोडणारी नगरपालिका. तेथील मुख्याधिकारी हा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीचा अधीकारी असतो. त्यावरून या संस्थेचे महत्त्व कळून येईल, पण मुद्दा तो नाही तेथील मुख्याधिकारी गेला आठवडाभर रजेवर आहे व आणखी आठवडाभर रजेवर असतील. पण सरकारने त्यांच्या अनुपस्थितीत कारभार पाहण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यावरून पालिका प्रशासनात काय चाललेय असा सवाल लोक करत आहेत. पावसाळा तोंडावर आलेला आहे, पावसाळापूर्व कामे अजून व्हावयाची आहेत, सोनसोडोवरील समस्या कायम आहे व या परिस्थितीत मुख्याधिकारी रजेवर गेल्याने व्यापारी राजधानीतील एकंदर व्यवहार कोलमडण्याची भीती आहे.
माझ्या घरात आजारपणाला पैसे नाहीत, मी घरपट्टी कशी भरणार? पुणे - माझी पूर्वी कधीही घरपट्टी प्रलंबित राहिली नाही. मात्र कोरोनामुळे मी ती भरू शकले नाही. एक लाख २१ हजार रुपये घरपट्टी भरण्याची नोटीस मला शनिवारी सकाळी मिळाली. माझ्या घरात आजारपणासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता एवढी घरपट्टी मी कशी भरणार. लोकअदालतीत तडजोड होऊन घरपट्टी कमी होर्इल, असे वाटले होते. मात्र ते देखील झाले नाही, अशी व्यथा शैला रामचंद्र मोरे यांनी मांडली. शैला या उरुळीकांचन येथे राहता. त्यांची एक लाख २१ हजार ३९८ रुपयांची घरपट्टी थकीत आहे. ही रक्कम न भरल्याने त्यांचे प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. त्याबाबतची नोटीस त्यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यामुळे त्या घार्इने न्यायालयात दाखल झाल्या. लोकअदालतीत तडजोड करून संबंधित रक्कम कमी करण्याबाबत त्यांनी विनंती केली. मात्र त्याला कोणतीच दाद न मिळाल्याने त्या निराश होऊन परत घरी आल्या. असाच अनुभव घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या अनेकांना आला. लोकअदालतीचा मुख्य उद्देश हा तडजोडीने दावे मिटावा हा आहे. न्यायालयाने विनंती करून देखील ग्रामपंचायतीमधील अधिकारी-पदाधिकारी यांनी थकबाकीदारांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तडजोड करण्याचे आम्हाला शासनाकडून आदेश नाही, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. थकबाकी पूर्ण माफ करा, अशी कोणाची मागणी नाही. मात्र रक्कमेत तडजोड व्हायला हवी, अशी पक्षकारांची इच्छा आहे.
पुण्यात रिपाइंचा आमदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा करत महायुतीत पुणे कँटोन्मेंट व पिंपरीसह दहा जागांची मागणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षालाही भाजप-सेनेने ठेंगाच दाखविला आहे. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा करत महायुतीत पुणे कँटोन्मेंट व पिंपरीसह दहा जागांची मागणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षालाही भाजप-सेनेने ठेंगाच दाखविला आहे. पुण्यातील कँटोन्मेंट आणि पिंपरीची आग्रही मागणी करणाऱ्या रिपाइंला भाजप-सेनेने वाटाण्याच्या अक्षता दाखवित आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुणे कँटोन्मेंटमधून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांचे नाव जाहीर केले आहे, तर पिंपरीतून शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबूकस्वार यांचे नाव जाहीर केले आहे. या दोन्ही जागांची मागणी रिपाइंकडून केली जात होती. गेल्या बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे युतीधर्म पाळत शहरात भाजपचे खासदार, आमदार आणि महापालिकेत सत्ता आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला, तरी सत्तेत वाटा मिळाला नसल्याची नाराजीही रिपाइंच्या शहर पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही भाजप-सेनेने सत्तेचा वाटा न देता रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १. ८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
मुंबई - संजय राऊत राष्ट्रपती होणार असतील तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही,' असं खळबळजनक ट्विट कुणाल कामरा ने केलं आहे. या ट्विटमधून त्याने अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्यांना 'टोला' हाणाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पडेल अशा चर्चा होत असून राष्ट्रपती राजवट लागू करा अशा मागण्या होत असल्याने कुणाल कामरा यांनी असे ट्विट करून राष्ट्रपती राजवटची मागणी करणाऱ्यांना उत्तर दिलं असावं. गेल्या काही दिवसांपासून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना शटअप या कुणाल या शोच्या दुसरे सिझनचे पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यापासून कुणाल कामरा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला असून कुणाल कामरा यांनी आता ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक मागणी करून चर्चेत आले आहे.
दिवा-पनवेल लोकल तातडीने सुरू करा ! सुरुवातीला मालवाहतुकीसाठी सुरू झालेला दिवा-पनवेल मार्ग पुढे प्रवासी वाहतुकीसाठीही खुला झाला. सुरुवातीला मालवाहतुकीसाठी सुरू झालेला दिवा-पनवेल मार्ग पुढे प्रवासी वाहतुकीसाठीही खुला झाला. पण पाच दशके उलटल्यानंतरही त्या प्रवासी वाहतुकीला गती मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याबद्दल 'लोकमत'च्या वाचकांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाला उपनगरी दर्जा दिल्याने लवकरात लवकर त्यावरून लोकल सुरू केल्यास या मार्गावरील औद्योगिक वसाहती, गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दिवा - पनवेलदरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण झाले. त्यावरून शटल सेवा सुरू झाली. पुढे या मार्गाला उपनगरी मार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे या मार्गावरून लवकरच लोकल वाहतूक सुरू होईल, अशी येथील प्रवाशांची अपेक्षा होती. हा मार्ग रोह्यापर्यंत विस्तारित झाला. त्यातील पेणपर्यंतच्या मार्गावर ईएमयू सेवा सुरू झाली. याच मार्गावरील थळपर्यंतचा आरसीएफ खत कारखान्याचा मार्ग वापरून अलिबागपर्यंत लोकल सुरू करण्याचे स्वप्न दाखवले गेले. मात्र, दीर्घकाळ ही स्वप्नेच राहिली. हार्बर रेल्वेमार्गाचा मुंबई ते पनवेल असा विस्तार झाला. ठाणे ते पनवेल असा नवा मार्ग सुरू झाला. त्यातील उरणच्या मार्गाचे काम सुरू झाले. पनवेल-उरण हा स्वतंत्र मालवाहतुकीचा मार्ग पुनरुज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिव्याहून वसईला जाणारा मार्ग डहाणूपर्यंत विस्तारित करून डहाणू-पनवेल वाहतूक सुरू झाली. ती पेणपर्यंत वाढवण्याची मागणी सुरू आहे. पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या, त्यावरून मेल-एक्स्प्रेससह लोकल सुरू करण्याच्या मागणीला वेग आला. मात्र, या साऱ्या वाढत्या पसाºयात दातिवली, आगासन, निळजे, तळोजा, नावडे, कळंबोलीमार्गे पनवेलला जाणारा मूळचा मार्ग मध्य रेल्वेकडून दुर्लक्षितच राहिला. या मार्गावरून कोकण रेल्वेच्या गाड्या धावतात. शिवाय दिवसाकाठी प्रवासी वाहतुकीच्या साधारण सात फेºया होतात. पण त्यातील काही शटल सेवा, काही मेमू गाड्या असल्याने त्यांच्या फेºया, गतीवर मर्यादा येतात. त्यामुळे या मार्गावरून लोकल सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. आगासन, निळजे, तळोजा येथील गृहनिर्माण प्रकल्प असोत की तळोजा, नावडे, कळंबोलीतील औद्योगिक वसाहती असोत, त्यांच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. मध्यंतरी या मार्गावरील उसरघर येथे नवे स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या, पण त्याला विरोध झाला. दिव्याजवळ म्हातार्डी येथे थांबणाºया बुलेट ट्रेनचे स्टेशन या मार्गाजवळ असल्याने त्यानिमित्ताने तरी या मार्गावरून लोकल सुरू करण्याची मागणी नव्याने सुरू झाली आहे. सुरुवातीला अपुºया रेकचे (गाड्या) कारण पुढे करणाºया मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत या मार्गाबद्दल मौन बाळगले आहे. या भागातील खासदारांनी पाठपुरावा केला, तर त्यासाठी रेल्वेवर दबाव येईल. त्यातून मेमू, शटलऐवजी या मार्गावरून लोकल धावू शकतील, अशी भावना 'लोकमत'च्या वाचकांनी व्यक्त केली आहे. दिवा-पनवेलदरम्यानचा लोहमार्ग तयार असूनही आगासन, निळजे, तळोजा, नावडे, कळंबोलीच्या प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे दिवा- पनवेल या मार्गावर लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाºया आमच्यासारख्या महिला प्रवाशांचे हाल कमी होतील. फार पूर्वीपासून दिवा आणि पनवेलदरम्यान मध्य रेल्वेवर शटल सेवा प्रवाशांच्या सेवेत आहे. कोकण रेल्वेमुळे तर कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया पनवेलचा मागील पंचवीस-तीस वर्षांत संपूर्ण कायापालट झाला आहे. पनवेल आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. तसेच तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, कौसा अशा आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झालेले आहेत. मध्य रेल्वेची कर्जत/खोपोली, कसारा या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा आहे. नुकताच हार्बर मार्गावरील नेरुळ ते उरण या मार्गावरील नेरुळ-खारकोपरपर्यंतच्या लोकल सेवेचा शुभारंभ झाला. पण दिवा-पनवेल मार्ग मात्र उपेक्षित राहिला. आता तर पेणपर्यंत रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले आहे आणि पनवेल-पेण मेमू सेवा सुरू आहे. पण नागरी वस्ती वाढल्याने मध्य रेल्वेने दिवा-पनवेल-पेण अशी उपनगरीय सेवा चालू केली तर या मार्गावर रेल्वेला चांगले उत्पन्न नक्कीच मिळेल. तसेच कर्जत, कसारा, आसनगाव या भागातून देखील थेट पनवेलपर्यंत उपनगरीय सेवा सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल. - अनंत बोरसे, शहापूर, जिल्हा ठाणे. मुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गासाठी आणि आता नेरूळ-उरण या चौथ्या कॉरिडोरसाठी गाड्या सहज उपलब्ध झाल्या. पश्चिम रेल्वेलाही पार डहाणूपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी लोकल मिळाल्या. मग मध्य रेल्वे लोकल मिळवण्यात कमी का पडते? सुरुवातीला जुन्या गाड्या बदलण्यासाठी सीमेन्सच्या लोकल आल्या. आता बम्बार्डियर लोकल आल्या. त्यात या मार्गाचा समावेश केला असता, तर तेथेही सहज लोकल उपलब्ध झाल्या असत्या.
लवकरच आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 ला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आयसीसीने आज टी-20 विश्वचषक 2021 च्या गटाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या टी20 विश्वचषक 2021 साठी 12 संघ खेळणार असून, ज्यांची विभागणी ए आणि बी अशी करण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच 8 संघात क्वालीफायर सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला आणखी रंगतदार करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचा (India Vs Pakistan) एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. यामुळे या स्पर्धेच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक लढती होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, कोरोना संकटामुळे हे सर्व सामने ओमन आणि यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे आयपीएल 2020 ची स्पर्धादेखील यूएईमध्ये पार पडली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2020 चा खिताब जिंकला होता.
भारत आणि इंग्लंड संघांमधले 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, दि. 23 - भारत आणि इंग्लंड संघांमधले 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड कऱण्यात आलेल्या संघात आर. अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी सहा महिन्यात भारताचे वेळापत्रक व्यस्त आहे. आधीच संघातील मुख्य खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत आणि 9 तारखेपासून बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे निवड समितीनं जडेजा आणि अश्विन या दोन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. अश्विन आणि जाडेजा यांच्याऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांचा भारताच्या टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. 26 जानेवारी, 29 जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी भारत इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्याची मालिका खेळणार आहे.
बाईचा नवरा : (पंचमुख्या मारूतीकडे पाहून मोठ्या रागाने पावून म्हणाला) साहेब तुम्हाला नाव साजें, माझी खात्री होऊन मला तर असे कळून आलें कीं हा धोंडा पुजण्यास तर पात्र नाहींच; पण याला आता फोडून, याच्या चिंधड्या चिंधड्या करून, मातीस मिळवून याची राख रांगोळी केली, म्हणजे दुसरें कोणी मजसारखे भोळे गृहस्थ ब्राह्मणाचे ऐकून याच्या नावांवर फसून, कर्जबाजारी होणार नाहीत; व दुसरें असें कीं ह्या सोंगाला फोडल्याशिवाय खरा जो भगवान आहे, त्याला आम्हातील सर्व लोक तोपर्यंत ओळखूं शकणारच नाहींत. विदूषक : आतां पाद्री आणि ब्राह्मण दोघांच्या उपदेशांत किती अंतर आहे या विषयी विचार करणें तुम्हा सर्व लोकांकडे सोपतो. पाद्री : (मोठा भयभीत होऊन म्हणाला) पाटीलबुवा याला आतां या वेळेंस फोडूं नका, कारण तुम्हासारख्या समजुतीचे लोक फारच थोडे आहेत. म्हणून बाकीचे सर्व अज्ञानी तुम्हांवर फिर्याद करून, तुम्हास सरकारांत पडकून नेतील; व सरकारही तुम्हाला आरोपी ठरवून शिक्षा करतील. विदूषकः पाद्री साहेब तुम्ही इतके का भिता ? हे कुणबी माळी कसचे मारुतीला फोडतात ? अहो हा घरी गेला म्हणजे याला भलता कोणी एकदा ब्राह्मण येऊन नेहमी प्रमाणे असे सांगेल की, अरे पाद्रींचा धर्म खोटा आहे म्हणजे झाले. हाही ब्राह्मणाचा उपदेश ऐकून त्या सारखा तुमची व तुमच्या धर्माची निंदा करू लागेल; याला ते धर्माविषयी विचार करण्यास उमास तरी खाऊं देतात; एकतर हे विचारशून्य, दुसरे शूद्रांनी ब्राह्मणांची आज्ञा कधीच उल्लंघू नये, म्हणून बहुत दिवसांपासून, ब्राह्मणांनी आपल्या लेखणीच्या व सत्तेच्या दिमाखाने कुणब्या माळ्यांच्या मनांत ठसविले आहे, हे सर्व खोटे वाट असल्यास, मनुकडे व परशूरामाकडे पहा म्हणजे तुमची खात्री होईल. बाईचा नवरा : साहेब तुम्हाला काय सांगू ! या बेट्या मारुतीच्या नावावर ह्या ओरडणाऱ्या ब्राह्मणांनी मला इतके फसवून बुडविले आहे, की जर मी तुम्हास सर्व मुळापासून सांगेन तर तुम्हीपण माझी नातवानी पाहून, या ब्राह्मणास सुद्धा काही शिक्षा असावी म्हणून म्हणाल, तर मारुतीला फोडणें तर कोणीकडेसच राहील. (इतक्यात एक मुसलमान हे सर्व बोलणे ऐकत उभा होता त्याने पुढे हात करून म्हणाला-क्यऊं पाद्री साहेब पिच्छले दिनोमे हमारे बादशहावोने हिंदूके बड मुर्तोकू फोड डालेसो अच्छा किया; ये सब लोग उन्होंके नामसें तानें मार-मापकर रोते है; ये बडा आबसोस [अफसोस] है.) पाद्री : टुंमकु माआलुम नही मेरे साहाब टुमारे बादशहावोंने इन्होंके बुंतोंकू फोड डाले, सो अच्छा किया यह सच है, लेकीन उन्होंने हमारे मूजब तकरीर करकरके उन्होंके हातोंसें फोडा नहीं. बाईचा नवरा : साहेब, ते भाई काय म्हणतात ? पाद्री : ते असे म्हणतात कीं तुमची सोरटी सोमनाथाची मूर्ती त्यांच्या एका बादशहाने फोडली, हे त्या बादशहाने फार चांगले काम केलें, म्हणून मी त्यास असे उत्तर दिले की तुम्ही आम्हासारखी केवल हिंदुची समजूत करून, ती मूर्ती फोडविली नाही; याकरिता, सर्व हिंदू तुमच्या बादशहाच्या नावाने अद्याप कुरकुर करीत आहे. बाईचा नवरा : भाई साहेब तुम्हीं कांही आमच्या मधी बोलू नका; साहेबाला माझ्याबरोबर थोडे बोलू द्या कारण तुम्हीं म्हणता ते व साहेबांचे बोलणे सर्व खरे असावें असे आता मला वाटू लागले. मुसलमान : पाद्री साहेब पटेल की तुम्हारेसे बात करनेंकी बहीत खुशी है. चलने देव मै भी खडेखडे सुनता हूँ. पाद्री : त्यांनी कशाचे तुम्हांला मारुतीच्या नावांवर फसविले. कारण तेही तुमच्या बाकीच्या लोकांसारखे अद्याप अडाणीच आहेत व त्यांचे पूर्वज जसजसे तुमच्या पूर्वजांशी वर्तत होते तसतसें तेही तुम्हाशी वर्ततात, म्हणून त्याजकडे (हल्लीच्या ब्राह्मणाच्या बोलण्यावरून,) यांचा कांही बोल नाही. बाईचा नवरा : असें बोलू लागल्यास त्यांच्या तोंडाला साहेब कोण हात लावील ? कारण त्याचे मत असें आहे की, बापाने मिळवलेला इनाम मुलाने स्वस्थ खावा; पण याची सरकारपट्टी मात्र मुलांनी देऊं नयें; म्हणजे त्यांनी आपल्या पूर्वजाप्रमाणे आमच्या श्रमाच्या पोळ्या खुशाल खाव्यात, परंतु त्या पोळ्याचा दाम खर्च आम्हा माळ्या कुणब्यास भरून घेणे आवडल्यास मात्र, आम्ही त्याच्या पूर्वजाचा शोध करीत फिरावें काय ? काय मौज आहे !!! विदूषक : हाताचे सोडून पळत्याच्या पाठी कोणी लागावे वा ! पाद्री : पाटील इतके रागावूं नका थोडे शांत व्हा; आणि मजशीं किंचित बोला तुम्हाला वाचतां येते काय? (तिकडे सर्व ब्राह्मण आशीर्वाद देताना एकमेकांकडे डोळ्यांने चमकाऊ लागले,) बाईचा नवरा : साहेब मला राग येऊन फळ काय ? माझ्यानें काय त्या भटांचे होणार ? परंतु मला वाचतां येत नाही. पाद्री : कां ! तुम्हाला वाचता कां येत नाही ? बाईचा नवरा : साहेब मी जेव्हां लहान होतो, तेव्हां माझा बाप एका खेड्यांत रहात असें, त्यावेळी त्यानें मला शाळेंत शिकण्याकरितां घातले होते खरें, परंतु शाळेंत पंतोजी मला फार मारूं लागला म्हणून माझ्या आईने मजला शाळेंतून काढून गुरामागें लावले. विदूषकः (सरकारकडे तोंड फिरऊन म्हणाला) कुणबी काय जे आतां बोलला ते सर्व सत्य आहे. तसें होत असते बरें ! पाद्री : तुम्हालाच पंतोजी इतके कां मारी ? इतर सर्व मुलास मारीत नसे ? तुम्ही कांही खोडकर असाल. बाईचा नवरा : कदाचित, मी एक खोडकर असेन, पण सर्व कुणब्या माळ्यांची मुले मजसारखींच होती काय ? तेथे तर सर्व कुणब्यांनी आपली मुलें घरी ठेवून घेतली होती. आतां तुम्हीं असें म्हणाल कीं कुणबी माळी सर्व अडाणी आहेत; त्यांला कशाची लिहिण्याची गोडी; म्हणून त्यांनी आपली मुले घरी ठेऊन घेतली असतील. पाद्री : होय. (ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून) माझे मत तसेंच आहे. बाईचा नवरा : साहेब ! जेव्हां मामलेदार वगैरे ब्राह्मण कामगाराचा तुम्हा इंग्रज लोकासारखा विद्या शिकल्यामुळें डामडौल वाढून, मोठ्या इतमामास पावलेल्या गृहस्थास दृष्टीने आम्हीं पाहतो. तेव्हां कां आमच्या मनांत लिहिणें शिकू नयें म्हणून येत असेल काय ? नाहीं नाहीं ! नेहमी आमच्या मनांत असें येत असतें की, आपणही विद्वान होऊन महालकरी तरी व्हावे, परंतु आपल्या या ब्राह्मण पंतोजींची कारस्थाने तुम्हांला काय ठायी ? विदूषक : साहेब, कुणबी आता काय बोलला, त्यावर तुम्ही पाद्रींनीं पण विचार करावा बरे. पाद्री : तुम्ही म्हणता ते सर्व खरें आहे, पण आतां तसें कांही नाही; कारण आताशी कृपाळू क्यांडी साहेबांनी बरेच दुसरे नवें पंतोजी तयार करून गावोगांव पाठविण्याचा झपाटा चालविला आहे. बाईचा नवरा : साहेब तुम्ही आपलीच टर शेवटास नेता असे मला वाटतें, अहो आपल्या क्यांडी साहेबांनी हत्ती एव्हढालें पंतोजी तयार करून, गांवोगांव शिकण्याकरितां पाठविले, हे मलाही ऐकून (माहिती) आहे. पण फळ काय ? त्या गावांतील सर्व ब्राह्मण लोक कुणब्या माळ्यांनी आपली मुलें शाळेत पाठवू नयेत, म्हणून आतल्या आंत त्यांना उपदेश करून, अथवा कुलकर्णीपणाचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या शिकण्याच्या आड येत नसतील काय ! पाद्री : छ : छ : पाटीलबुवा, हें केवळ तुम्ही द्वेष बुद्धीनें बोलतां. कारण आतांशी सर्व ब्राह्मण लोक आमच्या तोंडावर, तुम्हीं बाकीच्या सर्व लोकांनी विद्या शिकावी म्हणून बोलत असतात. विदूषक : पाद्री साहेब, तुम्ही थोडे दिवस कळ काढा; म्हणजे सर्व कुणब्या माळ्यांची एकदम अशीच त्यांच्या गाऱ्हाणाची आरोळी सरकारच्या कदमापाशी येईल; कारण आतांशी त्याला थोडेशें कळू लागले आहे, तथापी ब्राह्मणास अद्याप आतल्या आंत भीतच आहेत. बाईचा नवरा : बरे, जर सर्व ब्राह्मण आमच्या शिकण्याविषयी "तोंड देखली" काळजी वाहतात आणि त्या बोलण्याप्रमाणे साहेब लोकांच्या मागें गांवोंगाव जाऊन, तशीं वर्तणूक करितात अशी तुमची पक्की खात्री आहे काय ? विदूषक : का ! पाद्री साहेब तुम्ही इंग्रजांनी आपली विद्या शिकवली तरी बहुतेक इंग्रजी तुमच्या हाताखाली शिकलेले ब्राह्मण "काहीतरी भेद असलाच पाहिजे," म्हणून बोलत नसतात काय ? पाद्री : आता ते आम्हांशी बोलून दाखवितात एक; आणि तुम्हाशीं वहिवाट करतात दुसरी, याला आम्ही काय करावें ? विदूषकः असे असे, मार्गावर या साहेब; केवळ सुधारल्या ब्राह्मणांच्या मसलतीवर भरवसा ठेवून त्यांच्या धोरणानेच चालू नका. बाईचा नवरा : आतां मीच तुम्हाला कसे म्हणून सांगू ? पाद्री : सांगा तुम्हीच कां सांगा ना ? कारण कोणी कोणाची अक्कल वाटली नाही. बाईचा नवरा : मला असे वाटते की सरकारी बोर्ड ऑफ इज्युकेशनच्या द्वारें, असा एक नेम करून टाकावा की दर खेडेगावांनी माळ्या कुणब्यांच्या वस्तीचा अनुमान करून, त्यांची मुले शाळेंत अमूक असावीत जर, कदाचित तितकी मुलें गावकरी भरती करून देणार नाहीत तर, एकदम तेथील शाळा मोडली जाईल. मग पाहू बरें ! हे हेच ब्राह्मण लोक, आम्हा कुणब्या माळ्यास, मुले शाळेत पाठवावीत म्हणून उपदेश करू लागतील; शेवटी असे सुद्धा म्हणूं लागतील कीं, अहो माळ्या कुणब्या हो, मागे जे शास्त्रांत लिहिले आहे की, शूद्रांनी लिहिणें शिकू नयें ते सर्व खोटे आहे. विदूषक : साहेब असे न म्हणून काय करतील. कारण कुणबी माळी जर, आपल्या मुलांस विद्या शिकण्यास पाठवणार नाहीत तर त्यांच्या मुलाला (त्यांच्या मुलाकरिता) विद्या न मिळतां काही दिवसांनी माळ्या कुणब्यांच्या मुलांच्या पंक्तीत जाऊन बसावे लागेल; यालाच "बाप दाखीव नाहीतर पिंड पाड" असे म्हणतात. परंतु साहेब ह्या सर्व कुणब्यांच्या बोलण्यावर सरकार लक्ष पुरवील? पुरविल्यास पुढे फारच कुणब्यांचे बरे होईल असें मला पण वाटते. पाद्री : पाटील बुवा जर सर्व कुणब्या माळ्यांनी आपली मुलं घरी ठेवून घेतलीत. यावरून ती शाळा मोडली असेल नाही बरें ? बाईचा नवरा : मोडतील कशानें ? तेथें काही ब्राह्मणांची मुलें होती ती येत असत. विदूषक : असें कसें होईल ! जातींच्या मुलाला गोडी गुलाबीने न शिकविता कोणी मारीत असतों काय ? (तिकडे ब्राह्मणांनी आशीर्वाद म्हटल्यानंतर, त्यातून जोशानें हातात पळीसुद्धा पंचपात्री घेऊन, जोगाईच्या नवऱ्याच्या पाठीमागे उभा राहून, त्यास असे म्हणाला कां रे बाबा घरी चालतोस ना ? ) पाद्री : अहो भटजी याला माझ्याबरोबर बोलू द्या. विदूषकः पण जोशाला हे काय ठावें की पाद्रीनें एव्हढा वेळ श्रम करून कुणब्याला, राघूसारखा पढवून, उलटा जोशाचा पंतोजी होण्याजोगा तयार केला आहे. पाद्री : अरे बाबा आम्ही अज्ञानानेच बरोबर बोलावयास आलो आहोत व आमच्या तारणाऱ्याची आज्ञा ही अशीच आहे. विदूषक : धन्य !! धन्य तुमचा तारणारा की ज्यानें या सर्व माळ्या कुणब्यास इंग्रजी सरकारच्या हातून तारण्याविषयी (ब्राह्मणाची नजर चुकारून) सतत उपाय चालवलाच आहे. जोशी : बोला, येऊं द्या तुमचा येशू ख्रिस्त; (कुणब्याकडे तोंड करून म्हणला) जा, बाबा बाट ! याचा उपदेश ऐक, कमी करू नको, म्हणजे पुष्कळ गांव खायाला मिळतील. (असे म्हणून तेथेंच एके बाजूला तरफडत उभा राहिला). विदूषक : हे काय या जोशास ठावें कीं येशू ख्रिस्त याच्या चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा कांही दिवसांनी बाटावावयास (शुद्ध करण्यास) कधी कमी करणार नाही. पाद्री : पाटील बुवा, ब्राह्मणाची मुले शिकत राहिली, आणि तुमच्या लोकांचीच मुलें का निघाली ? बाईचा नवरा : (जोशाच्या तोंडाकडे पाहून कांही भ्याल्यासारखा करून) साहेब आता मी काय सांगू ? तुम्हाला कां कळत नाही ? विदूषकः कुणब्या माळ्यांचा हाच तर मोठा वेडेपणा की सरकारास अथवा साहेब लोकास यांनी आपली सर्व दुःखे आपल्या स्वमुखांनें सांगितल्याशिवाय त्यांना यांची दुःखे कशी कळतील, व इंग्रज सरकारने तरी कोठवर दुःखें मनी जान होऊन, निवारण करावीत ? दिवसा अंध खरें. पाद्री : पाटील बुवा ब्राह्मण बुवास भिवू नका, सांगा काय जे खरे असेल ते म्हणजे मी ज्ञानोदयांत कोणाचें भय न धरिता छापून प्रकट करीन. विदूषकः हे एक माझे भविष्य ध्यानांत असूं द्या, बरे ? पुढें कांही दिवसांनी ज्ञानोदयाची किम्मत कुणब्याच्याने करवणार नाही. जोशी : (हळूच कोणास ऐकूं न जावे म्हणून, जोगाईकडे तोंड करून) जोगाई तुझ्या नवऱ्याला वेड तर लागले नाहीं ? आतां तुझा नवरा साहेब लोकांची बरोबरी करायास लागला, पण घरीं भांडी कोणी घासावीत बरें ? विदूषक : वाहवारे इंग्रज लोक कीं ज्यांची बला ईश्वर दूर करो !!! कारण जे नेहमी कुणब्या माळ्यांस आपल्या बरोबर करूं पाहतात आणि ब्राह्मण त्यास भांडी घासणारें करूं इच्छितात. बाई : (बायको कुणब्याची) महाराज, तुमची सर्व कामाची मेली घाईच ! थांबा, साहेब पण कसा तुम्हा ब्राह्मणापेक्षाही (देवाविषयी बोलतो) चांगले बोलणे बोलतो, ते जरा मला पण ऐकू द्याविदूषक : सत्य बोल सर्वांस आवडू लागतात हे उघड सिद्ध आहे ना. जोशी : कुणब्याची जात वेडी खरी ! (असें म्हणून तसाच दात ओठ खात उभा राहिला). विदूषकः कुणब्याची जात वेडी खरी. म्हणूनच त्यांनी ब्राह्मणांचे इतके दिवस अंधासारखे ऐकले बाबा ! (जोशी कांही पुढे बोलतो इतक्यात). पाद्री : चुप चुप. ब्राह्मणाच्या बुवा गडबड करूं नको, पाटील बुवाला ब्राह्मणाच्या मुलाचे कारण सांगू द्या, (म्हणून कुणब्याच्या डोक्यावर मोठ्या विनोदाने हातातल्या काठीचा शेंडा ठेऊन) बोला बाबा बोला !! भिऊं नका ! बाईचा नवरा : (मोठा अटकळत अटकळत) साहेब ती मुले त्याच्या जातवाल्याची होती यावरून आम्हां इतकें त्यांना मारीत नव्हते व दुसरे असे की त्यातील एकादा मुलगा शाळा सोडून घरी राहिल्यास त्या गावांतील सर्व ब्राह्मण बायकासुद्धा त्या शाळेत जाण्याविषयी इतका घेघाट करीत की त्याला अन्नपाणीसुद्धा गोड लागू देत नसत. पाद्री : बरे तर तुम्हा कुणब्या माळ्यातील एकादा मुलगा घरीं शाळा सोडून राहिल्यास तुमचे आईबाप कोठे जात असत ? त्यांनी तुम्हाला उपदेश करूं नये का ? जोशी : वाहवा साहेब वाहवा ! आतां फारच उत्तम विचारलें. म्हणून कुणब्याकडे तोंड करून म्हणतो आतां हो पाद्री, नाही तर तुमच्या वडिलांनी तुम्हांला शाळेत पुन्हा जा म्हणून कां सांगत गेले नाहीं याचे कारण सांगा. बाईचा नवरा : जोशी बुवा तुम्हाला राग तर येणार नाही ? जोशी : बोल बोल. आमचा राग चुलीत गेला, आता का आमची पेशवाई आहे म्हणून तुला शिक्षा करविण्याविषयीं आमच्यांनें खटपट होणार ? व आतां तुम्ही आपल्या मनुच्या कायद्याला मानताल कां ? पहा पाहिजे असल्यास "मनुसंहिता ॥ अ. (कायदा)" ॥ श्लोक (कलम) २०५ ॥ विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून म्हणाला) मनुनें कायदे कुणब्या माळ्यांच्या अनुमताने केले असतील काय ? बाईचा नवरा : तुम्हीं ब्राह्मण लोक आमच्या आई-बापांना असें नेहमी सांगत नसतां की, अरें तुम्हाला लिहिणे शिकण्याचा तो कोण तुमचा मनु का फनूच्याच कायद्यावरून अधिकार नाही, मग त्यांनी करावे काय ? त्यांनी का तुमच्या मनुच्या कायद्याला हरताळ लावून आपापली मुले शाळेत घालतील की काय ? कारण तुम्ही त्याला लिहिण्याचे तोंडच दाखविले नाही म्हणून, ते तुमचें आंधळ्यासारखे ऐकत होते. परंतु आता या हिंदुस्थानांत इंग्रज सरकारच्या कृपेने असे असे आमचे कांहीं एक माळी कुणबी (व ईश्वर करील तर महार मांगही होतील) आहेत की ते तुमच्या मनुका फनुच्या कायद्याला हरताळ कोण लावीत बसतो म्हणून जे असे एकदम सिद्ध करून दाखवतील कीं मनुचें म्हणून जे कांही कायदे आहेत ते सर्व तपकिरीच्या पुड्या बांधण्यात विकून त्यांच्या कवड्या करून आंधळ्या पांगळ्यांच्या धर्मशाळेत पाठवून द्याव्यात. विदूषक : (आपल्याच मनाशी) मला तर असे वाटते की, तपकिरीच्या पुड्याच्या उपयोगी पडल्यास पुढे त्या पुड्या सोडल्यावर त्यातील एखादा श्लोक कोणाचें दृष्टी पडून, सहज त्या तुकड्यावरील श्लोक कोणी वाचील कीं नाहीं ? म्हणून दुसरी एखादी योजना करावी, म्हणजे कुणब्या माळ्यांचे कल्याण होऊन ब्राह्मणही चांगल्या मार्गास लागतील. जोशी : बरें बरें जर तुम्हाला शाळेत घालून विद्या आल्याने आमचा अधिकार जातो तर मग पंतोजीने तुजला मारीतो पर्यंत तरी तुझ्या बापाने तुला शाळेंत कसा पाठविला ? नवरा : हे काय तुम्हाला ठाऊक नाही ? जेव्हा शाळेवरील सुपरिटेण्डेंट अथवा कोणी मोठा साहेब येऊन सर्व जातीतील मुले शाळेत घेतलीच पाहिजे म्हणून ताकीद देत असल्यामुळे भट कुलकर्णी सरकारास दाखवायासाठी मात्र कुणब्यांची मुलांची भरती मेंढरासारखी करून साहेबाची स्वारी येईतोपर्यंत शाळेत कोंडून ठेवीत असतात काय व दुसरे असे की तुमच्याबरोबर आमच्यातला एक तरी ह्या वेळेस लिहिणे शिकून हुशार झाला काय ? झाला असल्यास चला माझ्या लहानपणीच्या गावात आणि दाखवा ! जोशी : मग हे साहेबास कसें ठाऊक नाही ? बाईचा नवरा : त्यांना कसे ठाऊक होईल आणि त्यांना कोण सांगले ? असा कोणाला मगदूर होता ? जोशी : तुमचे वडील नव्हते का ? बाईचा नवरा : आमचे वडील होते खरे, पण जेथे पाटलास करी कुळकरण्याच्या व ब्राह्मणाच्या चुक्या सांगाव्या म्हणून धैर्य होत असते काय (नंतर खालचा ओठ दातात धरून मनातल्या मनात म्हणून असे कधी भगवान करील की आमचे सर्व लोक तुम्हा ब्राह्मणांच्या चुक्या बेधडक तुमचे भय न धरता सरकार जवळ सांगू लागतील ?) विदूषक : (कुणब्याकडे तोंड करून) बाबा घाबरा होऊ नको, तुम्ही सर्व माळ्या कुणब्यांनी पण महार मांगांनी सुद्धा ब्राह्मणाचे किमपी भय धरू नये म्हणून ईश्वराने तुमच्या देशात इंग्रजास आणले आहे. व तोच तुमच्यावरील सर्व संकटे दूर करवतील. जोशी : तुजकडे काहीं बोल नाहीं हे कलीचेच महात्म म्हणून तुम्ही आम्हा ब्राह्मणाच्या लबाड्या बाहेर पाडू विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) या राज्यात विद्येचे द्वार सर्व जातींना खुल्ले असतानाही यांच्या लबाड्या बाहेर कलियुगांत सुद्धां पडूं नयेंत असें यांना वाटते. बाईचा नवरा : साहेब तुम्ही ऐकले ना ? हे मी जे बोललो ते लबाड आहे काय ? पाहिजे असल्यास चला सर्व आपण गावोगाव जाऊन त्या त्या गावच्या ब्राह्मणांस नकळत विचारून पाहूं. मग कळेल की जोशी बुवा लबाड कां मी ? व दुसरे अशें की, येव्हडा वेळ यांचा मनु नाचत होता, आणि आतां तर बोलण्यांत कली का फली घेऊन आलेत ! आतां जर मी विचार करून, बोलू लागल्यास यांच्या मनु सारखीं ही कलीची खोड माझ्याने काढवणार नाहीं ? परंतु पुन्हा कधी फावल्यास पुढें याविषयी बोलून यांची खात्री मीच करीन. कारण आतां मला यांचे सर्व विचारांती खोटें दिसून येऊ लागले. जोशी : अरे तुला लबाड कोण म्हणाला ? मी आमचें ब्राह्मण लोक लबाड आहेत म्हणून म्हणालों; परंतु बाबा असं तुम्ही बोलूं नयें, साहेब किती दिवस येथें राहणार ! शेवटी तुम्हां आम्हांशीच गाठ आहे. कारण मुसलमानाप्रमाणे हे इंग्रजी राज्य आज नाहीतर पुढे कांहीं वर्षांनी जाऊन पुन्हा पेशवाई येईल. अरे ब्राह्मण हे पूर्वीपासून १८ वर्णाचे गुरू असल्यामुळे तुम्ही शूद्रांनी आम्हांस वंदावे यातच तुम्हास ईश्वर प्राप्ती आहे. विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) ब्राह्मणाने इतर शुद्र अति शुद्र जातींवर केलेली विद्या बंदी उठवून त्यांना शिकवून शहाणें करण्याकरिता ईश्वरानें या देशावर इंग्रजांना पाठविले आहे. शूद्रादी अति शूद्र शिकून शहाणें झाल्यावर तें इंग्रजांचें उपकार विसरणार नाहींत व मग पेशवाईपेक्षा शंभर पटीने इंग्रजी राज्य पसंत करतील. पण पुढे जर मोगलांप्रमाणे इंग्रज लोक या देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून शहाणे झालेले शूद्र अति शूद्र लोक पूर्वी शूद्रात झालेल्या जहाँमर्द शिवाजीप्रमाणे आपले शुद्रादी अति शूद्रांचे राज्य स्थापन अमेरीकेतील लोकांप्रमाणे आपला राज्यकारभार आपण पाहतील, पण भटांची ती दृष्टी व नष्ट पेशवाई आता पुढे या देशावर कधींच येणार नाही. हे या जोशीबुवांनी पक्के ध्यानात ठेवावे. आणि तसेंच जी ईश्वरप्राप्ती भटांना झाली नाहीं ती ते तुम्हा शूद्रास कोठून करून देतील ? बाईचा नवरा : अहो भटजी, या इंग्रजी राज्यापुढें आतां तुमची ती जुलमी पेशवाई कधीच टिकाव धरून पुन्हा येणार नाही. त्या पेशवाईत शुद्रावर व त्यातूनही अतिशूद्र जे मांग-महार यांचेवर जो जुलूम झाला त्याची आता आठवण होणे देखील नको, या इंग्रजी राज्यांत आमच्या लोकांनी विद्या शिकल्यावर त्यांना चांगले कळू लागेल व मग पुढें ते तुमच्या भटाब्राह्मणांचे कांही एक चालू देणार नाहींत. पाद्रीः पाटलांनी कांही खोटे सांगितले नाही. त्यांना आता देवाच्या दयेने जे सत्य ते कळलें व त्यांनी कोणास न दबता ते मात्र तोंडाने बोलून दाखविले. सहजगत्या त्यांच्या तोंडातून निघालेले सत्य बोल ऐकल्यावरून असें अनुमान करवंतें कीं ईश्वर कांही दिवसानें प्रथम शूद्रातिशूद्रांनां विद्यावंत करून तुम्हा ब्राह्मणांनी बनवलेली शास्त्रे लबाड ठरवविल व तुमच्या सांगण्यांवरून दगडी मूर्तीला फसून आज जसें भजतात, ते सर्व मूर्तीला भजणें सोडवविल आणि खरा व जिवंत तोच देव मी आहे, हे त्यास ओळखावयास लावून, तो आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारें करील, परंतु तुम्ही असें म्हणतां कीं आम्हां ब्राह्मणास मात्र वंदावे. तर मग त्यांनी ईश्वरास काय वंदावे किंवा कसें ? जोशी : ब्राह्मणांस वंदिले म्हणजे त्यांत सर्व आले. विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) ज्ञानोदयाचे करते (कर्ते) नेहमी ब्राह्मणाचें वंदन करीत. त्यांनी आतां या अज्ञान कुणब्या माळ्यांच्या व मांगामहाराच्या वंदनाची आशा करू नये अशी माझी सर्व जोशांस सुचना आहे. व पुढे जोशी कुणब्या माळ्यांच्या लग्नांत कसकसा घोटाळा घालीत असतात त्यावेळी लग्नाची सुपारी मला आल्यास मीही तेथे येऊन मला काही असे सुचल्यास ब्राह्मणाच्या तोंडावर बोलण्यास कधी कमी करणार नाही. (असे म्हणून सर्व लोकांस सलाम आलकी (आलेकुम) करून विदूषक चालता झाला.) पाद्री : (कुणब्याकडे तोंड करून) बाबा जेथे देवाची ब्राह्मण बरोबरी करूं लागले तेथे त्यांची समज समाधानी करावी अशीं माझी मोठी इच्छा होती. परंतु आतां संध्याकाळ झाली म्हणून मी जातो, परंतु तुम्हाला जर कधी आणखी वेळ सापडेल तर माझ्या बंगल्यात या. म्हणजे मीच यांनी तुम्हास आपण तुमचे ईश्वर होऊन कसेकसे फसावित आले त्याविषयी सर्व समजूत काढीन. ते कृत्रिमी आणि लबाड आहेत असें मला त्यांच्याच बोलण्यावरून आताच दिसून आले. (असे म्हणून पाद्री टोपी डोचक्यावर ठेवून चालता झाला). (इतक्यात कुणब्याने आपल्या स्त्रीस मोठ्या घाईने) : मी दुकानी आपल्या जोशाचा हिशोब करण्यासाठी आपल्या दुकानापर्यंत जातो व तूं घरी जाऊन लौकर भाजी भाकरी तयार कर. मघाशी तिसरे प्रहरी माझे पोट कांही भरले नाही. (इतके बोलणे झाल्यावर सर्व निघून जातात. थोड्या वेळाने कुणबी आपल्या घरी जातो.) बाईचा नवरा : अगे भटजीचा हिशोब आटोपून आलो. तुझी भाकरी तयार झाली कां ? बाई : होय, (वाढलेले ताट नवऱ्यासमोर ठेवून) हे घ्या आणि करा जेवण ! बाईचा नवरा : अगे तुझेही ताट घे. आज आपण बरोबरच जेवण करूं ! बाई : अगोदर तुम्ही आपले आटोपा. बाईचा नवरा : अगे आज तू देखील लवकर जेवण आटोप कशी ! मघाशी त्या परोपकारी पाद्री साहेबाच्या उपदेशावरून व आज घडलेल्या सर्व गोष्टीवरून देवाच्या आणि धर्माच्या नावांवर आपणासारख्या इतर अज्ञान माळी कुणबी इत्यादी शूद्र जातींनी लबाड्या व हूल थापा देऊन लुबाडून खाण्याचा भटाब्राह्मणांचा कावा चांगला उघड झाला असून शिवाय विद्या शिकण्याचें महत्त्वही आज आपणास चांगले कळून आले आहे. म्हणून आपण लौकर जेवण आटपून आपल्या घरापलीकडील त्या रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले यांच्या वाड्यात त्यांती स्त्री सौ. सावित्रीबाई फुले यांनी उपवर स्त्रियांसाठी रात्रीची जी शाळा घातलेली आहे त्या शाळेत तू आजपासून जावें व तेथें रा. रा. जोतीराव फुले यांनी वयस्कर पुरुषांकरिता रात्रीची जी दुसरी शाळा घातलेली आहे तीत आजपासून मी जाणें सुरू करितों. या दोन्ही शाळांतून ते दोघे उभयता सर्वांना मोफत शिक्षण देतात. यापूर्वी यांच्या या शाळांत येण्याबद्दल त्या दोघांनी आपणास पुष्कळ वेळा आग्रह केला असता आपण गेलो नाही ही आपण मोठीच चूक केली आहे. बाई : (जेवावयास बसून) ठीक आहे. चला तर आपण दोघे आजपासून रोज रात्री फुल्यांच्या शाळेत जाऊन लिहिणें, वाचणें शिकू. म्हणजेंच पुढे जगातील सर्व गोष्टी आपणांस कळू लागतील. ( नंतर बाई व तिचा नवरा असे दोघेंही जेवण आटोपून आणि आपापल्या हातात पाटी लेखणी घेऊन फुलें यांच्या प्रौढ स्त्री पुरुषांत साक्षरता प्रसारासाठी काढलेल्या रात्रीच्या शाळांत शिक्षण घेण्यास तिकडे निघून जातात)
'आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. आता त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, 'काँग्रेस पक्षावर अनेकवेळा अशी स्थिती आली. त्यातून हा पक्ष बाहेर पडला आणि पुन्हा उभा राहिला. आताही पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पवारांनी काँग्रेसची चिंता करू नये. दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वतःच्या पक्षाचा विचार करावा, असा टोला नितीन राऊत यांनी थेट पवारांना लगावला होता. पवार हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. ते महाराष्ट्रात सत्तेत आमचे सहकारी आहेत. मात्र एका मित्र पक्षाबद्दल, ते अशी टीका करणार असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका सहन केली जाणार नाही. पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला, तरी त्यांना राज्यात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांनी त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाची स्वबळावर सत्ता आणली. त्या मुख्यमंत्री बनल्या. पण पवार तसे करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये, असे नितीन राऊत म्हणाले आहेत.
आजच्या काळात महिलांसाठी मोठी समस्या असते ते म्हणजे चेहऱ्यावरील मुरूम. योग केल्याने शरीर तर सदृढ राहते तसेच चेहरा ही मुलायम आणि चमकदार बनण्यास मदत होते. सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी धनुरासन , हलासन रोज करा. यामुळे शरीरात रक्त प्रवाह सुरळीत चालतो व शरीरातील सगळ्या अंगात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे सहज पोहचतात. ही योगासने त्वचेसाठी उपयुक्त आहेत. जर चेहऱ्यावर जास्त फॅट जमा झाली असेल तर हास्ययोग उपयुक्त ठरतो. हास्ययोग केल्याने गालाचे फॅट कमी होण्यात मदत होते. यामध्ये जोर- जोरात हसल्याने चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि फॅट कमी होते. केसांची समस्या दूर करण्यासाठी वज्रासन, बालम योग, अधोमुख शवासन आणि सर्वांगासन हे आसन करू शकता. यामुळे केसांना खूप फायदा होतो आणि केस गळती, केस पांढरे होणे यासारखे त्रासही कमी होतात.
"रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा" "रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा" मुंबई । गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुडबुद्धीने करत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे, असा आरोप केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं आहे ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे की, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही कोणाला टार्गेट करत नाहीत. लोकं आमच्या हातात पुरावे आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधन झाली आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे क्रिमिनल सिंधिटेक आहे. कोणाला अंगावर यायचं असेल तर या. तुम्हाला त्याचं भाषेत उत्तर दिलं जाईलं, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप युती तूटल्यापासून दोन्ही पक्षातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. किरीट सोमय्या गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण देतो. पालघर येथील येऊर गावात सोमय्या यांचा मोठा प्रकल्प सुरू आहे. 260 कोटींचा हा प्रकल्प नील सोमय्याने सुरू केला असून मेधा किरीट सोमय्या या डायरेक्ट्रर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
वडगाव मावळ - मावळात (Maval) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Vaccination) तीन टप्प्यात आतापर्यंत ९४ हजार २२८ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे 9Dr Chandrakant Lohare) यांनी दिली. त्यात ७४ हजार ३६५ जणांचा पहिला डोस तर १९ हजार ८६३ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. कालावधी वाढल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. (duration increased number of people taking second dose Maval increased 25 percent) मावळ तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरु आहे. लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
शासनाने गुटखाबंदी केली असली तरी राज्यात सर्वत्र बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. नामदेव मोरे, नवी मुंबई- शासनाने गुटखाबंदी केली असली तरी राज्यात सर्वत्र बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. गुजरातवरून भाजीच्या ट्रकमधून गुटखा मुंबई व नवी मुंबई बाजार समिती परिसरात आणला जात असून येथून तो शहरातील इतर दुकानदारांना पुरविला जात आहे. गांजामाफिया टारझन व त्याचा मुलगा तुरुंगात गेल्यानंतरही एपीएमसीमधील त्यांचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाला असून पूर्वीपेक्षा दुप्पट दराने विक्री केली जात आहे. 'लोकमत'ने अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केल्यानंतर नवी मुंबईमधील गांजा, एमडी पावडर व इतर अमली पदार्थ विक्रेत्यांची धरपकड सुरू झाली आहे. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त माफियांना अटक झाली आहे. पण अद्याप मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नाही. एपीएमसीमध्ये अड्डा चालविणारा टारझन व त्याचा मुलगा दत्ता विधातेला अटक केल्यानंतरही काही दिवस बंद असलेला त्यांचा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. भाजी मार्केटच्या बाहेरील शौचालयाजवळ खुलेआम गांजा विक्री सुरू झाली आहे. पूर्वी ६० ते ८० रुपयांना विकली जाणारी पुडी आता १६० रुपयांना विकली जात आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी छोटे विक्रेते आहेत. मुख्य वितरक अद्याप फरार आहेत. अटक झालेल्या आरोपींच्या जागेवर नवीन व्यक्तींची नेमणूक करून गांजा विक्री करून घेतली जात आहे. या व्यवसायामध्ये अंडरवर्ल्डचा सहभाग असून मोठ्या गुन्हेगारांचा व माफियांचा सहभाग आहे. जोपर्यंत मोक्कासारखी कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत पूर्णपणे अमली पदार्थांची विक्री थांबणार नसल्याचे बोलले जात आहे. गांजाबरोबर गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाने गुटखाबंदी केली असल्यामुळे गुजरातवरून रोज लाखो रुपयांचा गुटखा मुंबई व नवी मुुंबईत आणला जात आहे. मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा गोणी लपवून आणल्या जात आहेत. मुंबईमध्ये एपीएमसी परिसर व इतर ठिकाणी या गोणी उतरवून त्या स्थानिक दलालांच्या मार्फत पानटपऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीप्रमाणे रोज १० ते १५ लाख रुपयांचा गुटखा मुंबईत वितरित केला जात आहे. गुटख्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. नवी मुंबईमध्ये या विभागाचे कार्यालयच नसल्याने येथे गुटखा आणला जातो. कारवाईचे अधिकार नसल्याचे कारण देवून पोलीस जबाबदारी झटकत आहेत. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे बिनधास्तपणे गुजरातचा गुटखा महाराष्ट्रातील तरुणाईचा व कष्टकरी कामगारांचे आरोग्य बिघडवत असून याविषयी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. मुंबई व नवी मुंबईमध्ये गुजरातमधून विमल पान मसाला व गुटखा विक्रीसाठी येत आहे. चार रुपये किमतीचा हा पानमसाला व एक रुपयाची गुटखा पावडर दुप्पट दराने विक्री केली जात आहे. उत्तरप्रदेशच्या गाझीयाबादमधून राजश्री गुटखा विक्रीसाठी येत आहे. याशिवाय आरएमडी व इतर गुटख्याचीही खुलेआम विक्री होत आहे. पोलीस स्टेशन, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही अभय मिळत असल्याने हे अवैध व्यवसाय तेजीत आहेत. गुजरात व उत्तरप्रदेशचा गुटखा महाराष्ट्रातील तरुण व कामगारांचे आरोग्य बिघडवत असल्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बंदी असल्यामुळे चार व पाच रुपयांचा गुटखा दहा रुपयांना विकला जात आहे. आरएमडी गुटखा चक्क ५० रुपयांना विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक टपरीवर गुटखा विकला जात आहे. भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये अनधिकृत टपरीवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. या पानटपऱ्यांचे हप्ते सुरू असल्याचे बोलले जात आहे. हे हप्ते नक्की कोण घेत आहे याचाही शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवून गांजा विक्री सुरूच आहे. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले आरोपी हे फक्त विक्रेते आहेत. खरे माफिया व पुरवठादार फरार आहेत. अटक झालेल्या आरोपींच्या जागेवर नवीन दलालांची नेमणूक करून गांजा विक्री करून घेतली जात आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध घेवून त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली तर या व्यवसायाला आळा बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
नवी दिल्ली, 6 डिसेंबर : Maruti ची Wagon R कार पॉप्युलर आहे. चांगल्या मायलेजसह लहान कुटुंबासाठी ही कार चांगला पर्याय आहे. सध्या या कारची किंमत 5. 25 लाख रुपये आहे. परंतु एका खास डीलमध्ये ही कार 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येईल. खास डीलमध्ये मिळणारं हे Maruti Wagon R VXI मॉडेल आहे. हे BS 4 इंजिनवर काम करतं. ही कार सिल्व्हर कलर वेरिएंटमध्ये येते. या कारला 998 cc इंजिन देण्यात आलं आहे, जे 67. 1 बीएचपी पॉवर जनरेट करतं. यात एयरबॅगची सुविधाही देण्यात आली आहे. डीलमध्ये मिळणारी ही कार 2011 सालातील पेट्रोल मॉडेल आहे. ही कार मॅन्युअली ट्रान्समिशनसह येते. हरियाणातील HR26 आरटीओमध्ये ही कार रजिस्टर्ड आहे. Maruti WagonR सेकंड हँड सेंगमेंट कार असून ही 1. 11 लाख किलोमीटरपर्यंत चालली आहे. CarDekho वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटोनुसार, ही कार चांगल्या कंडिशनमध्ये असून फर्स्ट ओनर कार आहे. Maruti WagonR कार 1,99,000 रुपयात लिस्टेड आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही कार केवळ 5100 रुपये देऊन बुक करता येऊ शकते. वेबसाइटवर होम डिलीव्हरीचाही पर्याय आहे, जो अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या सेकंड हँड कार खरेदीवर वॉरंटी आणि कॅशबॅकचा पर्यायही दिला जात आहे. त्यामुळे ही डील फायद्याची ठरू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, त्यानंतर पुढील डील करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नागपूर : राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घाेषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र चार महिने उलटूनही त्याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयाेजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपमुख्यमंत्री, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना चौथे स्मरणपत्र पाठविले आहे. रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र घोषणेला चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील अद्यापपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन न केल्याबद्दल श्रीपाद जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना चौथे स्मरणपत्र पाठविले. मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, यासाठी आम्ही सातत्याने गेली अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. संबंधित अशासकीय तज्ज्ञ समितीची पंधरा दिवसांच्या आत स्थापनेची घोषणादेखील आपण केली होती. तज्ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची शासनाने तिसरी घोषणा करूनही सुमारे ४ महिने होत झाले असले, तरी संबंधित शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही. याकडे आपले पुन्हा लक्ष वेधीत आहोत. ही समिती आम्ही विनंती केलेल्या संस्थात्मक सहभागासह नेमली जावी, याचे पुन्हा स्मरणही करून देत आहोत, असे श्रीपाद जोशी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' पुरस्कार यावर्षी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. रासेयोच्या सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठीही याच महाविद्यालयाच्या डॉ. कल्याण सावंत यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे महाविद्यालय आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजसेवा केल्यामुळे राजर्षी शाहू महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयातील रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्याण सावंत यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, त्यांचीही 'सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी' म्हणून निवड करण्यात आली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. राजू, उपप्राचार्य सदाशिव शिंदे, उपप्राचार्य सुचेता वाघमारे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्याण सावंत यांचे संस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, एड. सुनील सोनवणे यांनी कौतुक केले.
Sand boa Snake : अकोल्यात मांडूळ सापाची तस्करी; एकाला अटक\nसदर आरोपीकडून3किलो 300 ग्राम वजनाचा मांडूळ जप्त करण्यात आला आहे. या मांडुळाची लांबी 43 इंच असून रूंदी व गोलाई 8 इंच आहे. तसेच या मांडुळाची अंदाजे किंमत5लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nSand boa Snake : अकोल्यात मांडूळ सापाची तस्करी; एकाला अटकजयेश गावंडे\n09 Sep, 2021, 12:57 pm\nअकोला : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बाळापुर जवळ काही इसम मांडूळ सापाची बेकायदेशीर पणे तस्करी करून खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते.\nयासंदर्भात पोलिसांना सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता काही जण घटनास्थळावरून पळून गेले. तर एकाला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अनिल बंडू देशमुख (वय 44) राहणार माटरगाव जिल्हा बुलढाणा यास अटक करण्यात आली आहे.\nसदर आरोपीकडून3किलो 300 ग्राम वजनाचा मांडूळ जप्त करण्यात आला आहे. या मांडुळाची लांबी 43 इंच असून रूंदी व गोलाई 8 इंच आहे. तसेच या मांडुळाची अंदाजे किंमत5लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी विरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जोराने श्वास रोधत, सुसानला वाटले, 'हे पोलीस असणार. तिच्या शेजारील मुलगा एकदम ताठ झाला व उघड्या असणाऱ्या दाराकडे निरखून बघू लागला. त्यांच्या मागे गालीचा घातलेल्या जिन्यावर काही सळसळले. जेसिका कडकपणे बोलली, "हे पोलीस आहेत. त्यांना आत येऊ दे." सुसानला वाटले नव्हते, की ते एवढेजण येतील किंवा ते एवढे काही करतील. किंवा चौकशी एवढी लांबेल. त्यांचे फोटो घेणे, बोटांचे ठसे घेणे, भरभर, कुशलतेने चाललेले तपासकाम, बघून तिला फार नवल वाटले. तिला थोडा धक्का बसला व खून झाल्यामुळे, त्यांनी साक्षी पुराव्यापासून नेमके कायकाय केले, हे स्वतःच्या डोळ्यांनी बघून, ती आश्चर्यचकित झाली. तरी तिची स्वतःची लेफ्टनंट मोहर्व याने घेतलेली मुलाखत तितकी अवघड नव्हती. तो झटपट बोलणारा, तरुण दयाळू होता आणि तिथे ती का होती याचे स्पष्टीकरण देण्यासाठी जिम बायरन होता. पोलीस तिथे यायच्या वेळेस तिथे आलेल्या जिम बायरनचे तिला आभार मानावेसे वाटले. तो म्हणाला होता, "तुला जे जे माहिती आहे, ते सगळे सांग. " "पण मला काहीच माहिती नाही." लेफ्टनंट मोहर्वने कसे का होईना, पण सुसानला या सगळ्या प्रकरणाच्या मध्यभागी आणले. पण ते नंतर झाले खूपच नंतर. अथक चौकशीनंतर, असीम संशोधनानंतर, असीम वेळा परत तेच तेच करून व असीम सभा घेऊन. मृत माणसांची चित्रे असलेल्या व ते सर्व वरेज पोलिसांना निरखून बघत असलेल्या अंधाऱ्या जेवायच्या खोलीत खूप वेळ थांबून, सुसानवर व साक्ष देणाऱ्या नोकरांवर नजर ठेऊन, ते झाले. जिमने तिला लगेच कळवले होते व पूर्णपणे स्थिरस्थावर केले होते. दुपारी एक वाजता जिम पुन्हा तिच्याकडे आला. तो बोलला, "असे बघ, तू भुतासारखी दिसते आहेस. तू काही खाल्लेस का?" व सुसान म्हणाली, "नाही." पुढच्याच क्षणी ती स्वयंपाकघरात होती व जिमने बर्फाच्या पेटीतून आणलेले कोरडे पदार्थ खात होती. ती म्हणाली, "तू सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष देतोस. मला वाटले वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना इथे प्रवेश नसेल." "ओहो, पोलीस चालतात. ते जबानी देण्यासाठी, ते आपल्या सर्वांना नीट वागवतात, हे तुला माहिती आहे. अजून केक? आणि विसरू नकोस, मी पण या केसमध्ये आहे. कॅरोलीन कशाला घाबरत होती, ते तुला सापडले, की नाही?" "नाही. मला तिच्याशी बोलायची संधी मिळाली नाही." तो आनंद न दाखवणारे हसू हसला. "तू मला हे विचारतो आहेस. त्यांनी मुख्यतः तीन गोष्टी सांगितल्या. नोकर निर्दोष आहेत. घरात जेसिका, डेव्हिड व कॅरोलीनशिवाय कोणी नव्हते. " थोडी शहारून सुसान बोलली, "आणि मेरी? जिमने शांतपणे कबूल केले, "आणि तू. तिसरे म्हणजे, त्यांना पिस्तुल मिळाले नाही. जेसिका आणि तू एकमेकींना पुरावा ठरलात. मग डेव्हिड आणि कॅरोलीन राहिले. ठीक आहे त्यांच्यापैकी कुणी हे केले? आणि का?" ती म्हणाली, "मला माहिती नाही, पण जिम, मी घाबरले आहे." "घाबरलीस? पोलीस घरात असतांना? का?" सुसान म्हणाली, "माहिती नाही का. मी काही स्पष्ट करू शकत नाही. एक प्रकारचा धोका. घरात कुठेतरी कसला तरी धोका आहे. तो समुद्राच्या ताऱ्यासारखा आहे. फक्त समुद्राचा तारा मेला आहे आणि हा जिवंत आहे. भयंकर रीत्या जिवंत आहे." सुसानला माहिती होते, की ती तर्काधिष्टीत बोलत नाही आहे आणि जिम तिच्याकडे काळजीने बघतो आहे. अचानक तिच्यामागील अर्धवट उघडे दार उघडले व पोलीस काही बोलण्यापूर्वी, तिच्या घशात आवंढा आला व हृदय धडधडू लागले. तो म्हणाला, "लेफ्टनंटने तुम्हाला दोघांना बोलावले आहे." जसे ते हॉलमधून पार झाले, तसा घड्याळात एक टोला पडला. तो खूप वेळ वाजत राहिला. मग ती त्या रुंद दारातून आत गेल्याला व जेसिकाला भेटल्याला आठ तास आणि जास्त झाले. आता सगळीकडचे दिवे लागले होते. आणि तिथे पोलीस होते. जुन्या पद्धतीची हॉल आणि ड्रॉइंगरूम यांच्यामधील सरकणारी दारे बंद होती. ती बंद होतांना मोठा आवाज येत असे. एक पोलीस "तिथे" असे म्हणाला व त्यापैकी एक दार उघडले. वरील झुंबर विचित्र व भीतीदायक पद्धतीने चमकले. खिडक्यांवरील फिकट तपकिरी मखमली पडद्यांवर रेषा दिसत होत्या. आणि शेकोटीवरील आरशात, नागमोडी रेषा दिसत होत्या. जुन्या टर्किश रंगावर विरलेल्या जागा दिसत होत्या. जेसिकाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक करडी सावली अंधारी होती आणि कॅरोलीनचे तोंड व झपाटलेले डोळे खूप स्पष्ट दिसत होते. डेव्हिडच्या गालांवर चकचकीत शेंदरी डाग होते. लेफ्टनंट मोहर्व यांचे तरुण व ताजेतवाने दिसणे संपले होते. तो दमलेला व करड्या चाळीशीचा दिसत होता. साध्या कपड्यातील गुप्तहेर मागे ढकलल्या जाणाऱ्या घसरड्या खुर्चीत पाठ टेकून बसला होता. त्यांच्यामागे दार परत लागले. जेसिका त्यांच्याकडे वळून बघत होती, तरी अजून कोणी बोलत नव्हते. सुसानला वेगळे असे काही वाटले, की त्या घरातील प्रत्येकजण बदलला आहे. तरीही जेसिका खरे तर बदलली नव्हती. तिची व सुसानची नजरानजर झाली. सुसानचे डोळे तसेच थंड व लांबून दिलेल्या आज्ञेसारखे होते. मग वेगळे काय होते? कॅरोलीन व सुसान यांचे डोळे एका बारीक, वाकलेल्या व करूण रीत्या खुर्चीत पोक आल्यासारखे बसलेल्या आकृतीकडे वळले. तिच्या छान केसांच्या लहान बटा तिच्या चेहऱ्याभोवती पसरल्या होत्या व तोंड जरासे थरथरत होते का, अर्थात हा काही बदल नव्हता. तर सुसान व कॅरोलीन दोघीनाही कशाने तरी ताण आला होता. त्या दोघी जास्त ठळकपणे उठून दिसत होत्या. त्यांच्या सावल्या जाड व त्याच्या रेषा जास्त काळ्या झाल्या होत्या. लेफ्टनंट मोहर्व कॅरोलीनकडे वळला. "मिस कॅरोलीन, तुम्ही म्हणत होतात, ती तरुण स्त्री ही का?" कॅरोलीनचे डोळे जेसिकाला टाळून, सुसानकडे भिरभिरले आणि पुन्हा भारावून, लेफ्टनंट मोहर्वकडे वळले. "हो. हो. डेव्हिड खिडकीपासून चालत येऊन, कॅरोलीनसमोर उभा राहिला. "कॅरोलीनमावशी, इकडे बघ. तुझ्या हे लक्षात आले आहे का, की तू जे मिस
Bhosari Crime News : .... तरीही पोलिसांनी त्याला शिताफीने ठोकल्या बेड्या! एमपीसी न्यूज - प्रेयसीचा खून करून सुरुवातीला नालासोपारा आणि तिथून पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी अटक केली. आरोपीने युक्ती करून स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवला आणि दुसऱ्याच्या मोबाईलवरून भोसरीतील मित्राला फोन केला. दरम्यान, त्याने केवळ फोनच नाही तर फोनवर खुनाची कबुली देखील दिली. ही बाब पोलिसांना कळताच आरोपीचा माग काढत नालासोपारा येथील ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली. कलावती उर्फ कल्पना घोडीबा सुरावार (वय 38, रा. धावडेवस्ती, भोसरी. मूळ रा. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बाजीराव विश्वनाथ साबळे (रा. जामखेड, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता कलावती हिचा खून झाल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. मयत कलावती ही घरी एकटी असताना तिच्यावर धारदार हत्याराने शरीरावर सर्व ठिकाणी वार करुन जीवे ठार मारण्यात आले होते. मयताचा मुलगा नामदेव सुरावार याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. कलावती हिचे यापूर्वी बाजीराव विश्वनाथ साबळे (रा. जामखेड जि. अहमदनगर) याच्या बरोबर प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यास येत असे. पोलिसांनी मयताचा मोबाईल व संशयीत इसमाच्या मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले. या माहितीच्या आधारे तपास केला असता, संशयीत आरोपी घटनेच्या वेळी मयत महिलेस भेटण्यासाठी तिच्या घरी आल्याचे पोलिसांना कळाले. परंतु, घटना घडल्यापासून संशयीत इसमाचा मोबाईल बंद होता व तो घटनास्थळावरून पळून गेला होता, त्यामुळेच त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला . भोसरी पोलिसांनी दोन पथके आरोपीच्या मागावर पाठवली. आरोपीच्या मूळ गावी जाऊन देखील पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान आरोपीने घटनेची खबरबात घेण्यासाठी दुसऱ्याच्या फोनवरून त्याच्या भोसरीतील मित्राला फोन केला आणि त्याने कलावतीचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला आणि थेट पालघर जिल्ह्यातील नालासोपारा गाठले. तिथे दोन दिवस वेषांतर करून आरोपी बाजीराव रेल्वेने पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीतच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे व मयत महिला हे पाटोदा येथे राहण्यास असताना त्या दोघात अनेक दिवस अनैतिक संबंध होते. मयत महिलेचा नवरा घोंडीबा सुरावार त्यांच्यासाठी अडसर होत होता. त्यामुळे आरोपी बाजीराव व मयत महिला यांनी मिळून मयत महिलेचा पती घोंडीबा सुरावार याचा सन 2016 मध्ये पाटोदा जि. बीड येथे निघृण खून केला. त्याचा मृतदेह सौताडा ता. पाटोदा येथील खोल दरीत फेकून दिला होता. या गुन्हयात बाजीराव विश्वनाथ साबळे व कलावती उर्फ कल्पना धोंडीबा सुरावार दोघांना अटक झाली होती. सध्या दोघेही जामीनावर मुक्त होते. सन 2019 मध्ये मयत महिला कलावती ही भोसरी येथे राहण्यास आली होती. आरोपी बाजीराव हा अधून मधून तिला भेटण्यासाठी येत असे व तेथे तिच्या बरोबर राहत असे. आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे यास मयत महिला ही सतत फोनवर व्यस्त असल्याचे दिसून आल्याने तसेच तिचे इतर कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरु झाले असावेत याचा संशय आरोपीला आला व त्यावरुन त्याने फोनवरुन तिच्याशी भांडणही केले. त्यावेळी मयत महिलेने 'तु सतत माझ्याशी भांडण करणार असशील तर माझ्या सोबत संबंध तोडून टाक. तसेच तु मला 15 लाख रुपये दे. नाहीतर मी माझ्या मुलास तुझ्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला सांगेल. ' कलावतीमुळे आपण तिचा नवरा घोंडीबा सुरावार याचा खून केला व आता ती सोडून जाणार तसेच आपल्या विरुध्द कोर्टात मुलाला साक्ष द्यायला सांगणार याचा राग मनात धरुन कलावती हिचा बाजीरावने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहा पोलीस निरिक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भवारी, पोलीस अंमलदार जी. एन. हिंगे, एस. डी. देवकर, जी. पी. सावंत, एस. ए. जाधव, ए. एस. जाधव, एस. व्ही. सातपुते, तसेच दरोडा विरोधी पथकाचे एस. एल. रासकर, व्ही. ए. वीर, पो. शि. कदम यांनी केली आहे.
ची टर्म तशीच अर्धी सोडून तो घरीं आला. नानांना बरें वाटण्याबद्दल तो शिकस्त करी. नानांना आपले इहलोकचे दिवस संपुष्टांत आल्याचें दिसत होतें. नानांनी एक दिवस अरविंदाला अंथरुणाजवळ बोलावले. माझी मुदत सरत आली आहे. मला आता फार थोडे दिवस इथे काढायचे आहेत. तूं मात्र विचाराने आपल्या आयुष्याचें तारूं हाकार. तूं नोकरी मिळविशील, याबद्दल मला संदेह नाही; तथापि सांगायचें एकच को, गरीब कुळांतील पण दक्ष व कर्तबगार मुलगी पाहून लग्न कर.' अरविंदाने 'हो' म्हटले. माझें काळीज चरं झालें माझ्याशीं अरविंदाने लग्न करूं नये, असा नाही कां याचा ध्वनी झाला ? खरंच श्रीमंती हा खऱ्या प्रेमांत केवढा अडसर आहे ! मला नानांचा राग आला. पण मरणाच्या दारीं पडलेल्या माणसावर रागावून उपयोग काय? नानांचा तरी त्यांत दोष काय होता? माझ्या आईची तरी मनापासून कुठे इच्छा होती? मला स्वतःला सुद्धा प्रेम असूनही अरविंदाशी लग्न करावें असें अजून कधी वाटत होतें? आता मी अरविंदाच्या नानांवर रागावूं, माझ्या आईदादावर रुसू की स्वतःवर जळफळू? मला कांहीच उमगेन।. थोडयाच दिवसांनी अरविंदाचा एकमेव आधार तुटला, नानांनी इहलोकची यात्रा संपविली, अरविंद पोरका झाला! आता मला त्याच्याबद्दल अनुकपा वाटू लागली. पण अजूनही त्याच्याशी लग्न करावयास माझे मन घेईना. अरविंदाला नोकरी पाहणेंच भाग होतें. बऱ्याचशा खटमनाची घडण पटीने त्याला मुंबईस एका वर्तमानपत्राच्या कचेरीत सहसंपादकाची नोकरी मिळाली. आर्थिक दृष्ट्या ठीक झालें; पण प्रापंचिक दृष्ट्या त्याचा उन्हाळा सुरूच होता. एक दिवस मी खोलींत एकटीच विचार करीत बसलें होतें. पोस्टमनने माझे नावचें एक पाकीट आणून दिलें तें अरविंदाचें पत्र होतें. कित्येक दिवसांत त्याचें कांहीच वर्तमान कळले नव्हतें. मी उत्सुकतेने पत्र वाचू लागले. पत्रांतला सारांश पुढोलप्रमाणें होता - ' कमल ! मरणसमयींच्या नानांच्या इच्छेविरुद्ध मी तुला माझ्याशी लग्न करणेबद्दल पृच्छा करणें हें माझ्या प्रेमळ पित्याचे इच्छेशीं प्रतारणा करण्यासारखे आहे. तथापि माझ्या स्वभावाची तुझ्याइतकी कुणालाच पारख नसल्याने प्रपंचांत तुझी जोड मिळाल्यास माझ्या आयुष्यातील यशाच्या वाटयाचें सर्व श्रेय तुला देतां यईल. मनाची श्रीमंत पण हाडाची गरीब, जन्मजात खानदानी पण अलौकिक स्वार्थत्याग करून येईल त्या स्थितींत समरस होण्याची विचारांची व आचारांची निकोप घडण तुझ्या वाचुन इतरत्र सापडणें दुर्मिळ. तुझ्या सहानुभव व प्रेमळ सोबतोवाचून जगाच्या बेफाट वावटळींत एकट्याने शिरायला मला धीरच होत नाही. तुझ्या आधारावर धकाधकीच्या मामल्यांत बेछूट स्वैरायला नड नाही. आजच्या घडीला तरी माझे सर्व विचार तुझ्याकडे केंद्रित झाले आहेत. माझी जोडीदार होण्यास तूं कबूल असल्यास तुझ्या अमोल स्वार्थत्यागाबद्दल कृतज्ञ राहून आपला जीवनौष सुखप्रवाही होण्याकरिता मी प्रयत्नांची शिकस्त करीन. तुझ्या स्वार्थत्यागामुळे माझ्या ध्येयप्रवणतेकडे निश्चित लक्ष राहून मला चैतन्ययुक्त उल्हासाची सदैव स्फूर्ति मिळेल. विचार करून काय ते ठरीव. 'दुसन्याची ताबेदारी पत्करूं नये, हा तुझा मानस मी फार पूर्वीपासून ओळखून आहे. पण पतिपत्नींनी एकमेकांची प्रेमळ ताबेदारी पत्करल्यावाचून आयुष्यांत कांही आनंद असेल, असे मला वाटत नाही. लग्न न करतां तू राहिलीस तर हा अनुभव तुला येणार नाही असें नाही. आमच्या नानांप्रमाणे अवास्तव करारी राहून आयुष्य नीरस करावें असें मला वाटत नाही. म्हणूनच थोडे पडतें घेऊनही तूं माझ्याशी संबंध जोडू इच्छीत असल्यास जरूर तसा प्रयत्न करून पहावा, या भावनेने मुद्दाम तुला लिहिले आहे. 'भलत्याच कल्पना मनांत बाळगून आयुष्याचे निष्कारण धिंडवडे उडवावेत व शेवटीं अपयशाचान आढावा काढावा हैं मला बिलकूल रुचत नाही. आयुष्य हें स्वकष्टार्जित आनंदाचा मनमोक्त उपयोग घेण्याकरिता आहे, असें माझ्याप्रमाणे तुला नाही का वाटत? 'एवढया आग्रहानेही तुला आपली मतें बदलणें शक्य नसेल तर ध्येयवादी असलो तरीही संसाराचे तीन तेरा करून संन्यस्त आयुष्य पत्करून जीवनांतील आनंद नाहीसा करावा, असें माझें मत नाही. तूं नच तयार झाल्यास दुसन्या एखाद्या अनुरूप तरुणीशीं विवाहबद्ध होऊन मी आयुष्यक्रमणास लागेन. पूर्वपरिचयावरून व ह्या पत्रावरून माझ्याविषयी ज्या भावना ठेवणें तुला परवडत असेल, त्या ठेऊन आपला निर्णय शक्य तो लवकर कळीव. 'मनुष्यस्वभाव सहवासप्रिय आहे. यापुढे एकलकोंडे निष्प्रेम आयुष्य माझ्याने निभणार नाही. तुझ्या उत्तराची वाट पहात आहे. तुझ्या सहवासाची अपेक्षा करणार अरविंद बरेच दिवसांत अरविंदांचें कुशल कळले नव्हते, तें ह्या पत्रांतून कळल्याबद्दल आनंद वाटला. त्यांनी तडकाफडकी एकदम लग्नाची मागणी घातल्याबद्दल आश्यर्याचा धक्का बसला. अगदी निकरावर व एकेरीवर येऊन त्यांनी लिहिलें होतें- 'मनुष्यस्वभाव सहवासप्रिय आहे. यापुढे एकलकोंडे निष्प्रेम आयुष्य माझ्याने निभणार नाही.' मी लग्नाला तयार न झाल्यास ते दुसरीकडे मागणी घालणार होते. मला किंचित् विषादपूर्ण उद्विग्नता वाटली. कितीतरी दिवस माझे विचारांतच गेले. अरविंदाला मी उत्तर लिहू शकले नाही. अरविंदाशीं लग्न करण्याबद्दल माझा निश्चयही होईना. एकंदर पुरुष जातीबद्दल मला तिटकारा वाटत होता का ? छे, तसेंहि नाही. पण हें मात्र निविवाद की लग्न करून मग तें कुणाशींही असो- आपलें स्वातंत्र्य गमावूं नये. मला अरविंदाबद्दल प्रेम वाटत होतें; पण ते केवळ पत्नीला पतीबद्दल वाटावें अगर प्रियकरणीला प्रियकराबद्दल वाटावें असें होतें असें मला वाटेना. माझा कांहीच निर्णय होऊं शकला नाही; पण त्यामुळे अलीकडे अरविंदाने निष्कारण माझ्या मनःसरांत आवर्त निर्माण केलें, अशी मात्र माझी खात्री झाली. मी अगदी बेचैन झालें. आईने मला विचालें- 'कमळे! का गऽ अलीकडे सुकल्यासारखी दिसतेस ? कुठे? तुझें आपलें उगीच कांही तरी ' असें उडवाउडवीचें उत्तर मी दिलें. आईच ती ! एवढ्या उत्तराने गप्प बसली; पण तिचें समाधान झाल्यासारखें दिसलें नाही. कसल्या तरी काळजीने मला पोखरले आहे, असे तिला वाटू लागलें. पुष्कळ दिवसांच्या विचाराने मी आपली मतें दृढ करूं लागलें. माझ्या मत्सरी हट्टी मनाला पिछेहाट पटणें शक्य नव्हतें. नानांनी मरतांना सुद्धा माझ्याशी लग्न करण्याबद्दल अरविदाला सुचवूं नये? माझा अभिमान इरेस पेटला. मी कायम ठरवलें व एक दिवस 'मला तुझ्याशी लग्न करतां येत नाही. तूं बेलाशक दुसऱ्या मुलीशी लग्न करून सुखी हो ' असें मी अरविंदाला कळविलें. माझ्या उत्तराने अरविंदाला वाईट वाटले असावें. तोही नानांचा मुलगा होता. ध्येयवादी असला तरीही हळवा भावनोद्रेक त्याच्यामध्ये नव्हता. त्याच्याही करारीपणाला मी धक्का दिला होता. कांही दिवसांनी अरविंदाने लग्न केल्याचें मला समजलें. धनुरूप वधूशों त्याचें लग्न झालें. पुढे कांही दिवसांनी आपला संसार पाहण्याकरिता त्याने मला बोलाविलें. न जाण्याचा माझा निश्चय टिकला नाही. मी त्याचे लग्नानंतर दीड वर्षाने त्याचेकडे गेलें. अरविंदाला व शरद्ला मला पाहून अपरिमित आनंद झाला. शरद्च्या मांडीवर अरुण खेळत होता. अरुणाच्या आग मनाने अरविंद - शरद्ची जोडी किती सुखांत दिसत होती! पण काय तरी मेला स्वभाव ! मलाही कांही त्यांच्या सुखांत खरें समाधान वाटले नाही. माझी जागा शरदने पटकावली, असा खोटा अभिमान मला आता जाळूं लागला. दोनच दिवस त्यांचेकडे राहिल्यावर मी जायला निघालें. एकपरी मी आलेच नसतें तर बरें होतें, असें मला झालें. अरविंद म्हणाला, 'कमल! दोनच दिवसांकरिता आलीस अन् लगेच चाललीस, हें गड काय ? रहा ना चार दिवस ' 'खरंच, कमळावन्सं! राह्यलात चार दिवस म्हणून काय बिघडलं ?" शरदने पुस्ती जोडली. 'कमळावन्सं !' या संबोधनाने मला शरदचा संताप बाला. किती वेडी मी? मला असें कां वाटावें? याचा उलगडाच होईना. स्वतःचें सान्त्वन करण्याचा शक्य तो प्रयत्न केला ; पण छेः! मला तिथे राहणें शक्यच नव्हते. मला त्यांचें सुख पाहवत नव्हतें हेंच खरें. पण मी होऊनच त्यांच्या लग्नाला संमती दिली होती ना? हो, तें खरं सारं, पण माझ्या अंतर्मनाची गळचेपी करूनच ना? माझ्या हृदयांत वणवा पेटला; पण त्या खाईंत या सुखी जोडप्याचा मी कां म्हणून बळी घ्यावा? मी जायला निघालेंअरविंद म्हणाला, 'कमळ ! दोन दिवस राहिलीस; पण मोकळेपणाने नाही राहिलीस. कां गऽ असं ? किती साधा निर्विकार प्रश्न ! पण ब्रह्मांड उभें केलें माझ्यापुढे. एखाद्याने खरें सांगितलें तर माणसाला केवढा राग येतो, हें या वेळीं मला पटलें. मी उद्गारलें, छेः कांहीतरीच. मला फार कामं आहेत. गेलंच पाहिजे. ' मी जायला निघालें. अरविंद शरद् मला पोचवायला आले. मी शरदचा निरोप घेऊं लागलें, तोंच धाकटा अरुण मजकडे येण्यासाठी झाप टाकू लागला. माझें सारें अवसान गळून गेलें. किती निष्पाप बालक! शरद्ने तरी माझा काय अपराध केला होता ? वा ! नव्हता कसा ? पण मग मी लग्न केले नाही तर अरविंदाने तसेंच राह्यचें होतें का ? लहानपणापासून कष्टांत दिवस काढले, आताही त्याला सुख मिळू नये का ? माझ्या हृदयांत कालवाकालव झाली. माझा मलाच संताप आता मात्र मो थांबले नाही. मी तडक डोळे पुसले व त्यांच्या घराबाहेर पडलें.
आहे. चार आश्रमांत गृहस्थाश्रमाची योग्यता एका दृष्टीने मोठी आहे, कारण इतर सर्व आश्रमांतील लोकांची उपजीविका गृहस्थाश्रमी लोकांवर अवलंबून असते; त्याचप्रमाणे समाजाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने सर्व वर्णांपेक्षा क्षत्रियवर्णाची योग्यता जास्त आहे, अशी आपली पूर्वापार समजूत आहे. म्हणूनच या राजनीतिशास्त्राला 'सर्वोपजीवकं' आणि ' लोकस्थितिकृत् ' हीं विशेषणे शुक्राचार्यांनीं शिरोभागीं घेतलेल्या अवतरणांत योजिलेलीं आहेत. तसेच हे शास्त्र ' धर्मार्थकाममूलक ' असून शिवाय मोक्षप्रद ' ही आहे, असें शुक्राचार्य म्हणतात. तसेंच महाभारतांत या राजधर्मात धर्म, अर्थ, काम हा त्रिवर्ग 'समासक्त' असून शिवाय मोक्षधर्मही यांत 'समाहित' झालेला आहे, असे म्हटलेलें आहे. यावरून 'राजा व राज्य' या संस्थांचे किती महत्व आपल्या पूर्वजांना वाटत होतें याची कल्पना येते, राज्य ही संस्था नष्ट झाल्यास समाज ही संस्था टिकणार नाहीं, वर्णाश्रमधर्म टिकणार नाहीं, आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थही कोणाला प्राप्त होणार नाहीत, अशी त्यांची पूर्ण खात्री असल्याचे दिसून येतें. अलीकडील विद्वानांतही समाजांतील राजकीय संस्थांच्या महत्वाबद्दल पूर्ण मतैक्य दृष्टीस पडतें. सुप्रसिद्ध इंग्लिश राजनीतिज्ञ व्हायकाउंट मोर्ले यांनी एके ठिकाणीं ' आमच्या राष्ट्राचें वैभव, सामर्थ्य व भवितव्य या सर्वांच्या मुळाशीं राजकीय तत्वेंच आहेत' असे म्हटले आहे. याच वचनाच्या आधारावर अर्वाचीन हिंदी राष्ट्राचे पितामह दादाभाई नवरोजी यांनी कलकत्याच्या १९०६ सालच्या राष्ट्रीय सभेत स्वराज्यप्राप्तीचें महत्व लोकांना पटवून दिलं. तात्पर्य, महाभारत काळापासून आजपर्यंत जे जे विचारी पुरुष होऊन गेले, त्यांनी एका विशिष्ट दृष्टीनें समाजाच्या राजकीय स्थितीला महत्व दिलेलें आहे.
नवी दिल्लीः उत्तर भारतामध्ये दि. २९ पासून थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हमानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मद्यपान करणे टाळावे आणि शक्यतो घरात अथवा बंदिस्त जागेतच रहावे, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या उत्तरेकडील भागात दि. २९ पासून थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागाने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांना मद्यपान न करण्याची सूचना देण्यात आली आहे. मद्यपानामुळे शरीराचे तापमान कमी होत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे विभागाने नमूद केले आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांनवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पश्चिमेकडे अडथळा निर्माण झाल्याने रविवार आणि सोमवारी पारा काहीसा वर येऊ शकतो. मात्र, हा अडथळा अल्पकालीन आहे. त्यामुळे त्यानंतर हिमालयाकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तरेत थंडीची लाट येऊ शकते, असे विभागीय केंद्राचे प्रमुख किलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.
खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. नागपूर : खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. राजू ऊर्फ राजेंद्र नारायण देशमुख (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो खरबी चौकात आॅटो चालवित होता. नंदनवनमधील या भागात आॅटो चालविणाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या व्यावसायिक स्पर्धेने वादाचे रूप घेतले आहे. त्यामुळे एकमेकांना टोमणे मारणे, शिव्या घालणे, बाचाबाची करणे, असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी दुपारी ३. ४५ च्या सुमारास याच वादातून राजू देशमुख आणि त्याचा साथीदार चंदू या दोघांनी नीरज चटोले (वय ३८, रा. गंगा लेआऊट, नंदनवन) याला माँ गंगा सेलिब्रेशन हॉलसमोर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. डोक्याला दुखापत झाल्याने चटोलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी राजू आणि चंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेने आॅटोचालकांमधील वादाचे स्वरूप तीव्र झाले. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी आॅटोचालक पक्या आणि पांग्या या दोघांनी त्यांच्या आॅटोतून राजू देशमुखला खरबी चौकात फेकले आणि पळून गेले. राजूच्या शरीरावर चाकूचे घाव होते. तो शेवटचे आचके देत होता. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत जमलेल्या बघ्यांपैकी एकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच नंदनवनचे गस्तीवरील पथक तेथे पोहचले. त्यांनी जखमी राजूला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिवसाढवळ्या वर्दळीच्या चौकात आॅटोचालकांनी विरोधी गटातील आॅटोचालकाची हत्या केल्याचे कळल्याने पोलीसही हादरले. नंदनवनचा पोलीस ताफा, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह अनेकांनी तेथे धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागले नव्हते. आरोपींनी राजूला कुठे पकडले, त्याच्यावर कोणत्या ठिकाणी घाव घातले, ते आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त भरणे यांनी लोकतमशी बोलताना दिली.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि वाद होताना दिसत आहेत. आर्यन खान प्रकरण, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर अशा अनेक मुद्द्यांवरून हे आरोप होत असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यांवरून विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, विरोधकांच्या सरकार पाडू या दाव्यांची देखील त्यांनी खिल्ली उडवली. भाजपाकडून सातत्याने राज्यातील सरकार पाडण्याविषयी केलेल्या दाव्यांवरून संजय राऊतांनी टीका केली आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "भाजपाला राज्यातलं सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचंय. पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले 'आठेक दिवसांत सरकार पाडू असं नागपुरातले भाजपावाले बोलतायत'. सरकार पाडू आणि सरकार पडेल या कैचीतच राज्यातला विरोधी पक्ष अडकून पडला आहे", अनिल देशमुख यांच्या अटकेवरून देखील संजय राऊतांनी भाजपाला सुनावले आहे. "हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या २४ तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे", असं या लेखात संजय राऊतांनी नमूद केलं आहे. तुरुंगांचेच खासगीकरण झाले काय? दरम्यान, राज्यात तुरुंगांचेच खासगीकरण झाले आहे का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. "आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. ईडी, सीबीआय, एनसीबी ज्या पद्धतीने काम करतंय, ते पाहाता त्यांचंच खासगीकरण झाल्याचं चित्र आहे. राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते", असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
पुणे : राज्यात एक बाजूला कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना दोन दिवसापूर्वी पुण्यातील चाकणमध्ये 12 ऑक्सिजन सिलेंडर चोरल्याची घटना घडली आहे. यामुळे ऑक्सिजन टंचाईची दाहकता लक्षात येत असून अशा पद्धतीने ऑक्सिजन सिलेंडरची बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजारात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. याप्रकरणी पिंपरी येथील चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोनटक्के यांनी एबीपी डिजिटल शी बोलताना सांगतिले कि, "अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी तक्रादार वाहनचालक महिंद्रा पीक अप चे मालक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांच्या घराबाहेर पार्किंग करून ठेवलेल्या या टेम्पोत 12 ऑक्सिजनने भरलेलं सिलेंडर आणि 7 रिकामे सिलेंडर ठेवले होते. मात्र तीन दिवसापूर्वी भल्या पहाटे हा टेम्पो चोरीला गेल्याचे सांगितले आहे. चोरटयांनी हा टेम्पो चोरण्यामागे ऑक्सिजनचे सिलेंडर चोरण्याचा उद्देश असावा असे सध्या वाटत आहे. सगळ्या गोष्टी तपासाअंती लक्षात येतीलच. " काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% आणि उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50% या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.
पुणे : पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असताना त्यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णयापेक्षा सूचनाच जास्त आल्या. विशेष म्हणजे जलसंपदा विभाग मुंढवा जॅकवेलमधून दिल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशोबच मानायला तयार नाही. त्याबाबत जलसंपदामंत्र्यांकडे आग्रही राहण्याऐवजी दुरुस्तीच्याच मुद्यावर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, बेबी कॅनॉलबाबत त्वरित दुरुस्ती करावी. धरणक्षेत्रातील गाळ काढावा. धरणक्षेत्रात आलेले गवत काढण्यात यावे. खडकवासला धरणातून होणारी पाण्याची गळती कमी करावी. पंप लावणाºयांवर कडक कारवाई करावी. महानगरपालिकेने वेळेत कामे पूर्ण करावीत. पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा. बांधकासाठी लागणाºया पाण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा. बेकायदेशीर नळजोडणीबाबत कडक कारवाई करावी. खासदार अनिल शिरोळे यांनी, मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्तीबरोबर टेमघर धरणाचीदेखील दुरुस्ती करावी, त्यातून जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही असे सुचविले. अनिल शिरोळे म्हणाले की, पुणे शहराला वर्षाला १६ टीएमसी पिण्याचे पाणी लागते तर धरणातून १२ टीएमसी पाणी हे शेतीकरिता सोडण्यात येते. २०११ साली राज्याचे जलसंपदा खाते, पुणे शहर महानगरपालिका यांमध्ये करार झाला व मुंढवा जॅकवेल बांधण्यात आले. या जॅकवेलकरिता महापालिकेने रुपये १०० कोटी खर्च केले आणि पुण्याचे सांडपाणी प्रक्रिया करून शेतीयोग्य बनवून बेबी कॅनालच्या माध्यमातून शेतीकरिता जवळजवळ इंदापूरपर्यंत सोडण्यात येणार असे ठरले. या कराराप्रमाणे दिवसाला ५५० एमएलडी म्हणजे वर्षाला ६. ५ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र, या कालव्याची नादुरुस्ती आणि पुढे पाणी जाताना उभे राहिलेले अडथळे यामुळे आज केवळ ३. ५ टीएमसी पाणीच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी उपलब्ध होत आहे. या कालव्याचे अडथळे जेसीबीच्या माध्यमातून काढले व लिकेज दुरुस्ती केली तर कराराप्रमाणे ६. ५ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याला हात न लावता या कालव्याची दुरुस्ती करावी. याशिवाय टेमघर धरणातून वर्षाला नादुरुस्तीमुळे १. ५ टीएमसी पाणी वाया जाते. याही धरणाची दुरुस्ती करीत त्या पाण्याची बचत करावी, हा मुद्दा आपण मांडल्याचे शिरोळे यांनी सांगितले. मागील वर्षापेक्षा या वर्षी १५ टक्के पाऊस कमी झाला असून, या वर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात २१. ३९ टीएमसी (७३. ३९ टक्के) पाणीसाठा असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत ४. २६ टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवू शकतो. यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम ठेवली आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे, वाढती लोकसंख्या, शहराच्या पाच किमीवरील दिलेले पाणी आणि 'फ्लोटिंग पॉप्युलेशन' लक्षात घेता ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना दररोज पाणी द्यावे लागते. म्हणून १३५० एमएलडीने पाणीपुरवठा व्हावा. बेकायदा पाणी घेणाºयांवर जलसंपदाकडून कारवाई होत नाही. कालव्याची डागडुजी केली जात नाही. त्यामुळे गळती वाढते. पाणी नीट मोजलेही जात नाही. जलसंपदाकडून पुणेकरांवर नाहक जास्त पाणी वापरले जातात असा आरोप केला जातो. वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून पाण्याचा कोटा वाढवून द्यावा.
घर महामुंबई गाव सुकलाय, मुंबईत पाणीच पाणी! गाव सुकलाय, मुंबईत पाणीच पाणी! पाण्याच्या टाकीत नळ्या टाकून तोंडाने पाणी ओढायचे आणि दिवसाआड मिळणारे प्यायचे पाणी भरायचे. दिवसदिवस पाण्यासाठी काढायचा हा आता गावातील महिलांचा नित्यक्रम बनला आहे. शेतातील मका जळून गेला, घरबंद करून अनेक लोक गावाबाहेर पडले आहेत, असा अनुभव सांगत होत्या जालना जिल्ह्यातील भोकरदण तालुक्यातून आलेल्या पंचफुला मगरे. गेल्या सहा वर्षांपासून त्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबईत चैत्यभूमीवर अभिवादनाला येतात. गेल्या तीन वर्षांपासूनच आमच्या भागाला दुष्काळाने पीडले आहे. गाव सगळा सुकलाय, मुंबईत मात्र पाणीच पाणी दिसते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठीची लढाई एकीकडे मोठी आहे, पण पाण्याअभावी शेती जळणारी पाहवत नाही. घरोघरी नळयोजनेतून पाण्याच्या जोडणीचे पाईप पोहचले आहेत, पण पिण्यासाठी त्यातून एकदाही पाणी आलेले नाही. दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते, तेदेखील खूप अस्वच्छ असते. गाळून पिण्याशिवाय पर्याय नसतो. माझे वय झाले आहे, आता कामासाठी कुठेही जाता येत नाही. पण कुटुंबात छोटी मुले असणार्यांचा काम केल्याशिवाय खर्च कसा भागणार? म्हणूनच दरवर्षी अनेक जण घर बंद करून गाव सोडून पुणे, औरंगाबाद याठिकाणी जातात, असेही त्यांनी सांगितले. भीमा कोरेगावच्या हिंसेमध्ये मीदेखील माझ्या कुटुंबासह अडकले होते. रस्त्यात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या प्रसंगांना सामना करावा लागला. तरीही जवळपास सात ते आठ तास सलग चालत मी कुटुंबासह तिथून बाहेर पडले. आज मुंबईत येण्याआधीही अनेकांनी भीमा कोरेगावसारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली. पण या घटनेला न घाबरता घडेल त्या प्रसंगाला सामोरे जायचे यासाठी मी तयार झाले, असेही त्या म्हणाल्या. यंदा पहिल्याच वर्षी त्यांच्यासोबत लिलाबाई मगरेदेखील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्या होत्या. त्यांनीदेखील मुंबईतील गर्दी आणि वाहनांचे ट्रॅफिक हे सगळ आश्चर्याच वाटते, अशी भावना व्यक्त केली. आम्ही खेड्यात राहतो, ज्या तालुक्याच्या ठिकाणी कामाला जातो त्याठिकाणी रंगारी काम करून पोट भरतो. पण ग्रामीण भागात राहूनही आम्ही पाण्यासाठी महिन्याला 300 रूपये भरतो. यंदा पाण्याच्या भीषण टंचाईला डिसेंबर महिन्यातच सुरूवात झाली आहे. यंदा उन्हाळ्यात पाण्याचे संकट आणखी भीषण होणार आहे, असे हिंगोली जिल्ह्यातील वस्मत तालुक्यातील देविदास मोरे खूपच गंभीरपणे सांगत होते. गावातली नळयोजना बिल न भरल्यामुळे बंद झाली आहे. दोन बोर गावकर्यांनी मिळून घेतल्या. 500 फूट अंतरावरून पाईपलाईनने पाणी गावात येते. हे पाणीही दोन दिवसाआड येते. पण या पाण्यासाठी 300 रूपये मोजावे लागतात. शहरातील लोकांपेक्षाही हा पाण्याचा खर्च अधिक आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत पाणी संकटाने सातत्याने हिंगोली जिल्ह्यात तोंड वर काढले आहे. त्यामुळे यंदाही डिसेंबर अखेरीस पुरेल इतकेच पाणी आहे. यंदा जानेवारीतच टँकर सुरू करावा लागेल अशी स्थिती आहे. जळगावातील रावेरमध्ये दर दोन दिवसाआड पाणी येते. प्रत्येकाला साधारणपणे एका तासात हे पाणी भरावे लागते. एका तासात मोजून 5 हंडे इतके पाणी मिळते. कपडे आणि भांड्यासाठी इतर पाण्याची व्यवस्थाही करावी लागते. या पाण्यासाठी महिन्याला 1200 रूपये ते 1300 रूपये मोजावे लागतात. शेतीला तर काहीच पाणी उरत नाही, अशी खंत यशोदाबाई लघासे यांनी व्यक्त केली. यंदा मुंबईत पहिल्यांदाच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले आहे. मुंबई शहरातील लगबग सगळी भारावणारी आहे. मुंबईचा समुद्र पाहिला आता आणखी मुंबई फिरायची आहे, असेही त्या म्हणाल्या.
आणि आभा ही मुलगीपण होती. त्यांचा मित्रमंडळींच्या बाबतीत माझ्या आणि शोभाच्या दृष्टिकोनात थोडा फरक होता हे मान्यच करायला हवं. शोनीलच्या मैत्रिणींच्या तुलनेत आभाच्या मित्रांकडे आमचं जास्त बारकाईनी लक्ष असायचं. हा विषय मगाशी निघाला होता. 8 ) घरातला पसारा (उदा. गाद्या, चादरी, जेवणाचं टेबल, ओटा) मुली किंवा स्त्रिया आवरतात. पुरुष आवरत नाहीत. माझ्या वडलांनी एकाही गोष्टीला कधीही हात लावला नाही. मी या गोष्टी मध्यमपेक्षा जरा कमी इतक्या प्रमाणात केल्या. माझा तत्त्वतः विरोध कधीच नव्हता, पण व्यवसायातल्या वेळेचं गणित मला कधी सुधरलं नाही. शोनील मात्र इंग्लंडमधे त्याच्या संसारात साधारण निम्म्या गोष्टींची जबाबदारी घेतो. श्रेयसपण घेतो. 9 ) मुलींना भरतकाम, शिवणकाम, या कला लहानपणापासून शिकवल्या जातात. मुलांना नाही. ही असमानताच आहे यात शंका नाही. त्यातल्या भरतकामाबद्दल माझं काही म्हणणं नाही. कारण भरतकामाचा, विणकामाचा संबंध फक्त सुशोभित करण्याशी आहे, पण शिवणकाम पुरुषांना न शिकवल्यामुळे त्यांचा खूप तोटा होतो. याचा उल्लेख झाल्यासरशी मला हिंदी सिनेमामधे अनेक वेळेला बघितलेलं दृश्य आठवतं. नवरा कामावर जायला निघतो आणि सगळे कपडे घातल्यावर गुंडी तुटल्याचं लक्षात येऊन बायको ती अंगात घातलेल्या शर्टवर शिवून देते. माझ्या वडलांनी काहीच शिवणकाम केलं नाही. मी अगदी थोडं, माझ्या कपड्यांच्या दुरुस्त्या स्वतः करण्याइतपत केलं. जरा कठीण काम शोभा करते. त्याहून कठीण किंवा वेळखाऊ असलं तर मी ते शिंप्याकडे टाकतो. शोनील इंग्लंडमधे असल्यामुळे कपड्यांची दुरुस्ती हा शब्दच त्यांना माहिती नाही. काय ते विकत घ्यायचं. या विषयातली गंमत अशी की, घरगुती शिवण बायका करतात पण कपडे शिवून मिळणाऱ्या दुकानात मात्र पुरुष कामाला असतात. अगदी लेडीज टेलर्स देखील पुरुष असतात. पुरुषांसाठी जसे पँट - शर्ट तयार कपड्यांच्या दुकानात मिळतात तसे स्त्रियांसाठी देखील पँट-शर्ट मिळतात. फरक असा की स्त्रियांच्या पँटवर आणि शर्टवरदेखील डिझाइन, नक्षीकाम वगैरे असतं. झालरी, लेसवर्क, चिकनक्लॉथ अशा गोष्टी असतात. 'होम सायन्स' नावाचा शिक्षणातला एक व्यवस्थित ग्रॅज्युएट कोर्स असतो. स्वावलंबन, आत्मसन्मान
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने १ जून १९४८ रोजी पहिली बस सेवा सुरू केली होती. आज या बसला ७१ वर्षे पूर्ण झाली असून संपूर्ण राज्यात हा वर्धापन दिवस प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटप करून साजरा करण्यात आला. आधी जी बस सुरु करण्यात आली होती, ती बस लाकडाची होती. चारही बाजूनी लाकडाची व वरील बाजू कापडाची अशी होती. या बसला प्रवाशांकडून चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बसमध्ये काळानुरूप बदल करण्यात आले. शासनाकडून अनेक सुविधा प्रवाशांना मिळत गेल्या त्यामुळे प्रवाशांचा बसकडे ओढा वाढला. दि 1 जून शनिवार रोजी भुसावळ आगारात ११०० बसेस असून प्रवाशांना चांगल्या प्रकारे सुविधा पुरवीत आहेत. शहरात, गावात, खेड्या पाड्यात, दुर्गम भागात ज्या ठिकाणी कुठलेही वाहन पोहचत नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आज रोजी पोहचत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी बसचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करण्याचे आवाहन आगर प्रमुख यांनी प्रवाशांना केले आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, आगार प्रमुख भोई, आगार व्यवस्थापक उपस्थित होते.
ABP Ideas of India : देशात एखाद्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी अनेक वर्ष लागतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेत गंभीर स्वरुपाच्या सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी व्यक्त केली. एबीपीच्या आयडीया ऑफ इंडिया समिट 2022 मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी साळवे बोलत होते. या वेळी त्यांनी कॉन्स्टिट्यूशन, द रोल ऑफ ज्यूडिशनरी या विषयावर चर्चा केली. भारतात न्याय मिळण्यासाठी उशीर लागतो या प्रश्नाला उत्तर देताना हरीश साळवे म्हणाले, न्यायव्यवस्थेत गंभीर स्वरुपाच्या सुधारणा करण्याची गरज आहे. जर एखाद्या व्यक्तीने न्यायालयात कोणती याचिका दाखल केली तर त्याचा निकाल येण्यासाठी 10 वर्षे लागतात. जेव्हा एखाद्याला लवकरात लवकर न्याय मिळेल, तेव्हा न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक वाढेल. हरिश साळवे पुढे म्हणाले, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अनेक वर्षे जातात. जस्टिस डिलिव्हरी सिस्टम म्हणजे याचिका दाखल केल्यानंतर लवकरात लवकर निकाल दिला जातो. मुंबई ही अशी राजधानी आहे की, जिथे अंतरिम याचिका दाखल केल्यानंतर निकाल येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आपल्याला अधिक न्यायाधिशांची गरज आहे. जर तुम्ही एखादी पीआयएल दाखल केल्यानंतर कोर्ट एसआयटीची समिती गठित करते. त्यानंतर अनेक एजन्सी त्यावर काम करतात. दरम्यान अशा इको सिस्टमवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे लवकरात लवकर न्याय मिळेल. केंद्र आणि राज्यामध्ये सुरू असलेल्या वादावर हरिश साळवे म्हणाले, प्रत्येक ठिकाणी न्यायव्यवस्थेची गरज का आहे? ही सगळी प्रकरणे गर्व्हरर्नेंस लेव्हलवर सोडवण्याची गरज आहे. आपल्याला डिसीजन मेकिंगवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमुळे न्यायालयाचा वेळ खर्च होतो. सुप्रिम कोर्टाने कधी विचार देखील केला नसेल त्यांना अशी प्रकरणे सोडवावी लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत न्यायव्यवस्थेला लक्ष घालावे लागते कारण, राज्य सरकार केंद्राचे ऐकत नाही. आपल्याला एक अशी व्यवस्था बनावावी लागेल ज्यामध्ये कोर्टाच्या बाहेर अशी प्रकरणे सोडवण्यात येतील. यूनिफॉर्म सिव्हिल कोडवर हरिश साळवे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था हा गंभीर विषय आहे. देशाची प्रगती करण्यासाठी योग्या पावले उचलण्याची गरज आहे. देशासमोर इतके गंभीर प्रश्न असताना मला नाही वाटत की, यूनिफॉर्म सिव्हिल कोड हा गंभीर विषय आहे. आपल्याला न्यायाधिशांच्या नियुक्तीवर चर्चा करण्याची गरज आहे. संबंधित बातम्या :
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे. मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्रायल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते. भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू) भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात व दमण आणि दीव, दादरा व नगर हवेली या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०[संदर्भ द्या] पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला. श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, प्रताधिकार-कामत.कॉमसर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत. कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ. स. १०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२ होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.
Annanya Pande in NCB Office : एनसीबी अनन्या पांडेची चौकशी करत आहेः एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आणि तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. क्रूज ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची कारवाई सुरू आहे. एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आणि तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. Annanya Pande in NCB Office । मुंबईः मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ची कारवाई सुरू आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey ) हिची आज सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशी केली जाईल. यापूर्वी गुरुवारी एनसीबीने सुमारे दोन तास चौकशी केली होती. आर्यन खानच्या (Aryan Khan) व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्याचे नाव समोर आले आहे. (Aryan Drugs Case: Actress Ananya Pandey today drug case in NCB office) अनन्यासोबत वडील चंकी पांडे (chanky Pandey) यानेही NCB कार्यालय गाठले. एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकून तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. NCB ने दोन दिवसात वांद्रे, CST, नालासोपारासह 5 ठिकाणी छापे टाकले. व्हॉट्सअॅप चॅट संदर्भात गुरुवारी अनन्या पांडेची चौकशी होणार होती. तथापि, सूत्रांचे म्हणणे आहे की, अनन्याची गुरुवारी फारशी चौकशी केली गेली नाही. याच कारणामुळे एजन्सीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता अभिनेत्रीला पुन्हा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अभिनेता शाहरुख खानच्या घरी गुरुवारी एनसीबी 'मन्नत' पोहोचला. क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख खान आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. तो तेथे सुमारे 15 मिनिटे राहिला. आर्यनच्या अटकेनंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा शाहरुख खान आपल्या मुलाला भेटायला आला होता.यापूर्वी बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. Aryan Khan Drugs Case : जामीनसाठी आर्यन खानला मिळतेय 'तारीख पे तारीख'; सुनावणीसाठी High Court ने दिली पुढची तारीख!
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत. श्रीमती जयश्री पाटील चुयेकर या 2015 ते 2020 या कालावधीत गोकुळच्या संचालिका होत्या. विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजता चुये येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, गोकुळचे विद्यमान संचालक शशिकांत पाटील, सहा मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जयश्री पाटील माई या नावाने परिचित होत्या. गोकुळचे संस्थापक चेअरमन आनंदराव पाटील चुयेकर यांनी सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात जे भरीव काम केले त्यामध्ये जयश्री पाटील यांची खंबीर साथ होती. गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून त्या साक्षीदार होत्या. जयश्री पाटील यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळात आनंदराव पाटील चुयेकर यांना भक्कम साथ दिली. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पश्चात त्यांनी 2015 मध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवली होती. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, नावीद मुश्रीफ, अजित नरके, प्रकाश पाटील, सुजित मिंणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके यांनी अंत्यदर्शन घेतले. माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव फराकटे, उमेश भोईटे आदींनी चुयेकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामने येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तसेच भारतीय संघाची पहिलीच लढत पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असतो. त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोवर्स आहेत, ज्यांचे मनोरंजन करण्यासाठी रोहित शर्मा आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. असाच एक व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भारतीय संघाच्या नवीन जर्सीमध्ये दिसून येत आहे. त्याने या व्हिडिओमध्ये हटक्या स्टाईलमध्ये जर्सी घातल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने व्हिडिओच्या सुरुवातीला ही जर्सी हातात धरली होती. त्यानंतर त्याने ती जर्सी बेडवर ठेवली. इतक्यात तो बेडवर उडी मारतो अणि जर्सी त्याच्या अंगावर असते. या व्हिडिओवर त्याने हटके कॅप्शनदेखील दिले आहे. रोहितला या नव्या जर्सीमध्ये पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर दिग्गज खेळाडूंनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याने प्रतिक्रीया देत, "वेरी क्यूट..." असे लिहून पुढे हसायच्या ईमोजी टाकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज डेविड वॉर्नर याने मजेशीर प्रतिक्रिया देत, "तू माझ्या टिकटॉक व्हिडिओची कॉपी केली आहेस," असे लिहिले आहे. तर युझवेंद्र चहलने आपली प्रतिक्रिया देत "पुअर बेड,"असे लिहिले आहे.
रॉयल एनफील्डच्या नव्या Classic 500 Pegasus Edition बाईकचे बुकींग आजपासून सुरू करण्यात आले आहे. दिल्लीतील एका शोरूमने दिलेल्या माहितीनुसार या नव्या कोऱ्या मॉडेलची किंमत २.४० लाख रूपये इतकी सांगितली जात आहे. अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या या मॉडेलचे बुकींग तुम्ही ऑनलाईनही करू शकता. प्राप्त माहितीनुसार भारतात या मॉडेलची केवळ २५० युनिट्सच विकली जाणार आहेत. तर, जगभरात या मॉडेल्सची केवळ १,००० युनिट्स विकली जातील. Royal Enfield Classic 500 Pegasus Edition बाईक रॉयल एनफील्ड RE/WD 125 वर आधारलेली आहे. या बाईकला फ्लाईंग फ्ली (Flying Flea) नावानेही ओळखले जाते. Flying Flea ला ब्रिटीश पॅराट्रूपर्स वर्ल्ड वॉर २च्या दरम्यान वापरले जात असे. या बाईकच्या ऑनलाईन बुकींग नंतर एक यूनीक कोड जनरेट होईल आणि त्याच्या माध्यमातूनच लॉगइन करून आपण ही बाईक खरेदी करू शकाल.
No Drugs Found In Aryan Khan No Conspiracy Hatched Related Offence Says Bombay Hc\nHome विशेष आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कोणताही कट रचलेला नाही - हायकोर्ट\nआर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कोणताही कट रचलेला नाही - हायकोर्ट\nNovember 20, 2021 6:27 PM Mumbai\nआर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत गुन्हा करण्याचा कट रचला होता, असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर करताना दिलेल्या तपशीलवार आदेशात म्हटले आहे. क्रूझ शिप ड्रग न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी या तिघांना जामीन मंजूर केला होता. आदेशाची तपशीलवार प्रत आज उपलब्ध करण्यात आली. त्यांच्यावर NDPS कायद्याच्या कलम 20(b), कलम 27, 28, 29 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n(हेही वाचा - प्रकाश आंबेडकरांकडून वानखेडेंची पाठराखण, म्हणाले...)\nअसे म्हटले आदेशात\nक्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला ३० ऑक्टोबर रोजी जामीन देण्यात आला होता. आर्यनच्या जामीन ऑर्डरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, असे या आदेशात म्हटले गेले आहे.\nड्रग्ज विक्रीचं षडयंत्र\nआर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज खान आणि मूनमून धमेचा हिच्याकडे ड्रग्ज सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज आणि मूनमून यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं जामीन आदेशात केली आहे. तसंच, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.\nपूर्वीचा लेखवरळी कोळीवाड्यात पोलीस तैनात, कोळीबांधव संतापले\nपुढील लेखईडीकडून खासदार भावना गवळींना तिसरं समन्स!
सातारा : 'साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटातील जनतेची मते निर्णायक असतात. माझ्या विजयातही या गटाचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, निवडणूक आली की काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बहुरुप्यासारखे सैरावैरा धावतात. सातारा : 'साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटातील जनतेची मते निर्णायक असतात. माझ्या विजयातही या गटाचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, निवडणूक आली की काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बहुरुप्यासारखे सैरावैरा धावतात. काही बहुरुपी मात्र आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून फिरू लागले आहेत. अशा बहुरुप्यांना जनता कधीही भुलणार नाही,' अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता टीका केली. लिंब येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन, गावाअंतर्गत डांबरीकरण, भैरवनाथ आळी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, बौद्धवस्ती येथे अंतर्गत गटार, काँक्रिटीकरण, पाणी टाकी व पाईपलाईन करणे आदी विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, प्रतीक कदम, कमल जाधव, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, दयानंद उघडे, छाया कुंभार, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, गणपतराव शिंदे, धनंजय शेडगे, राजेंद्र शेडगे, सरपंच विद्या सावंत उपस्थित होत्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'भाजपचे सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून, केवळ राजकारणापोटी सहकारी बँका अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. या सरकराने साताऱ्यासह पुणे, नगर यासह अन्य जिल्हा बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेवर अटकाव आणला आहे. तसेच साखरेचे दर तीन हजारांपेक्षा कमी केल्याने साखर उद्योगही अडचणीत आणला आहे. साखर कारखान्याबाबत हे सरकार योग्य निर्णय घेत नाही. वास्तविक डिसेंबरमध्ये निर्णय घेणे आवश्यक असताना आजअखेर सरकारने निर्णय घेतला नसल्याने साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. "दातृत्वापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे आहे. हीच भूमिका माझी नेहमी राहिली आहे आणि पुढेही राहणार आहे. मी तुमच्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहे. भविष्यात आगामी निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, निवडणुकीनंतर हे बाशिंगबहाद्दर पुन्हा पाच वर्षांनंतरच दिसतील. माझ्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर जशास तसे उत्तर मिळेल,' असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. जितेंद्र सावंत म्हणाले, 'आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब गटाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. कृष्णा नदीवरील बंधारा लिंबसाठी वरदान ठरणार आहे. लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे. लिंबमधील जनतेवर कोणी अन्याय केल्यास या अन्यायाच्याविरोधात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्जेराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. अनिल सोनमळे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले. साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिबंचे वर्चस्व नेहमीच कायम आहे. याची प्रचिती सर्वांना आलीच आहे. लिंब गटातील कोट्यवधींची कामे मार्गी लावली आहेत. आजही अनेककामांचे भूमिपूजन झाले. या सर्व कामांचे श्रेय खºया अर्थाने जितेंद्र सावंत यांना आहे. कॅप्टन अण्णांमुळेच अजिंक्यतारा कारखाना अडचणीतूनबाहेर आला आहे,' असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले. लिंब, ता. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वनिता गोरे, जितेंद्र सावंत, सर्जेराव सावंत व मान्यवर उपस्थित होते.
अमरावती : राज्य शासनाच्या २९ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सोमवार ते शुक्रवारी शासकीय कामकाज सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी राहणार आहे. कामकाजच्या दिवशी सर्व कार्यालयांची वेळ ४५ मिनिट वाढविण्यात आली आहे. यानुसार सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९. ४५ वाजता कार्यालय उघडतील आणि सांयकाळी ६. १५ वाजता बंद होतील. याशिवाय शासकीय कार्यालयाचे कामकाज सकाळी ९. ४५ ते सांयकाळी ६. १५ पर्यत होईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे कामकाज सकाळी ९. ३० ते सांयकाळी ६. ३० वाजेपर्यंत राहणार आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना जारी केलेल्या आदेशानुसार कामकाजाच्या सूचना दिल्या आहेत. कामकाजाच्या दिवशी वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही या आदेशाव्दारे दिले आहेत.
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. नागपूर : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हापरिषद निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपाशी य़ुती तोडून सत्तेत गेलेल्या शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. यावेळी शिवसेनेने भाजपावर शब्द पाळला नाही, खोटे बोलल्याचा आरोप केला होता. हे सत्तानाट्य दोन महिने रंगले असताना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते प्रचारसभा घेत होते. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असल्याचा घणाघाती आरोप गडकरी यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी बोचरी टीका केली.
भंडारा : महाराष्ट्र शासनाकडून घोषित विवाह व उत्तराधिकार कायदा करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली. त्या उपसमितीला तत्काळ रद्द करण्याची मागणी द रजिस्टर्ड े प्रांतिय अध्यक्ष किशोर बौध्द व भंडारा जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी डांगे यांच्यामार्फत महामहिम राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बौध्द विवाह व उत्तराधिकार कायदा तयार करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत केली. या समितीतील सर्व सदस्यगण हे गैर बुध्दीस्ट असुन हिंदु धर्मिय आहेत. भारतात सर्व राज्यामध्ये पंजीकृत बौध्द लोक राहतात. त्या प्रत्येक राज्याच्या अनुसार त्यांची विविध बोलीभाषा आहेत. पंरतु हे सर्व लोक आपल्या सामाजिक तथा धार्मिक व्यवहार बौध्द पध्दतीने करतात. या लोकांनी स्वतःला विधीवत बौध्द घोषित केलेले आहेत. त्याच्या शासकीय व अर्थशासकीय रेकार्डमध्ये बौध्द म्हणून नोदं केलेली आहे. जे अल्पसंख्याक वर्गात मोडतात. त्यांना पंजीकृत बौध्द असे संबोधिली जाते. त्यामुळे बौध्दांचे कायदे फक्त बौध्दांकरिताच प्रास्तावित व्हावेत अशी मागणी द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियानी केलेली आहे. तसेच ज्या लोकांना बौध्द धर्माची जाणीव नाही फक्त वरकरनी बौध्द दाखवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेच्या संवैधानिक देशात लेखी रेकार्डमध्ये बौध्द म्हणून कोणाचीही नोंद शासन दरबारात नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनानी घोषित बौध्द विवाह व उत्तराधिकार कायदा करण्यासाठी गठीत उपसमिती तत्काळ रद्द करावे. ज्यामुळे भारतातील बौध्दांचे मन दुखणार नाही, याची नोंद घ्यावी, अन्यथा द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने तीव्र अांदोलन करण्यात येईल. सोबतच शासनावर कायदेशीर कार्यवाही सुध्दा करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी प्रामुख्याने द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे प्रांतीय अध्यक्ष किशोर बौध्द, जिल्हयाचे अध्यक्ष विवेक बौध्द, सचिव रवि बौध्द, प्रांतीय सचिव बाबुलाल बौध्द, चेतन बौध्द गडचिरोली, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष उध्दवराव बौध्द, पटीसेन बौध्द, इंदल बौध्द, डॉ. अशोकांत बौध्द, मित्रसेन बौध्द जाम, हरिदास बौध्द, प्रदीप बौध्द, मुनेश्वर बौध्द यांच्यासह बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
(असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही) प्रथम श्री चौधरी डॉ. भारती लव्हेकर... योजना आहे, म्हाडा पुनर्विकास करणार आहे की, खाजगी विकासक नेमणार आहात की आणखी काही करणार आहात, कारण तेथील प्रश्न अत्यंत त्रासदायक झाले आहेत. एका पिढी संपली आणि दुसरी पिढी ५० शी पर्यंत आली आहे. शेवटी लोक कुठपर्यंत वाट पाहतील हा महत्त्वाचा विषय आहे. एसव्हीपी नगरला मोठा ले-आऊट आहे. त्या ठिकाणी एका एका इमारतीचा पुनर्विकास होत होता. परंतु तो रोखण्यात आला आहे. तो कधी सुरू करणार आहात की पूर्ण इमारतींचा पुनर्विकास करणार आहात या संदर्भात मला आपल्या उत्तरातून समजेल अशी अपेक्षा आहे. यानंतर श्रीमती कोळगिरे.. (असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही) प्रथम श्री. धुमाळे उपाध्यक्ष : सन्माननीय सदस्या डॉ. भारती लव्हेकर यांचे भाषण संपेपर्यंत सभागृहाच्या वेळ वाढविण्यात येईल. डॉ. भारती लव्हेकर : अध्यक्ष महोदय, आराम नगर किंवा ५६ वसाहतीच्या संदर्भात सांगायचे झाले त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन अतिशय जीर्ण झालेली आहे. तिथून पाणी गळून ते मातीमिश्रीत येत आहे. त्यामुळे त्या पाण्याच्या पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील आयोजित केल्या होत्या. त्यांनी मला सांगितले की, आता आम्ही हे काम आणि पैसे ही महानगरपालिकेकडे वर्ग केले आहे. पण हे काम कुणीही करत नाही. त्यामुळे तेथील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. आराम नगरमधील माझ्या मतदासंघातील उदाहरण मी देईल परंतु तसेच उदाहरण ५६ वसाहतीमध्ये देखील असू शकेल. त्या ठिकाणचे लाईटचे पोल बंद आहेत आणि त्यामुळे लाईट नाही म्हणून तिथे गर्दुल्ले येतात. यामुळे तिथे मुलींची छेडछाड, ड्रग्सचा व्यवसाय होत आहे. या सर्व बाबींसाठी कारणीभूत कारण मी महानगरपालिकेला विचारले की, आपल्याकडे हे काम वर्ग केल्याचे म्हाडने सांगितले तर त्यांनी माझ्याकडे म्हाडाने न भरलेले १९ लाख रुपयांचे लाईट बिल माझ्याकडे दिले आहे. आपण म्हाडाकडून हे पैसे लवकर भरावे म्हणजे मग महानगरपालिका तिथे काम करेल अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आराम नगरमधील आणखी एक विषय असा आहे की, मधल्या ठिकाणी रस्ते नाहीत त्यामुळे तिथे काम करण्याची गरज आहे. त्यासाठी मी पत्र दिले होते की, तेथील पुनर्विकास होईपर्यंत मी माझ्या आमदार निधीतून तिथे रस्तेबांधून देईल किंवा इतर काही व्यवस्था करायची असेल तर ती करेल. तिथे कंपाऊंड वॉलची देखील गरज आहे. कारण तिथे खूप ड्रग्सचे प्रकार आणि गुंडगिरी चालते. ते सर्व रोखण्याची गरज आहे. मला कळत नाही की, आराम नगरच्या बाबतीत नक्की काय सुरु आहे ? कारण तेथील पुनर्विकासही होत नाही आणि लोकांचे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे लोक त्रासलेली आहेत. तेथील पुनर्विकास होईल तेव्हा तिथे रुग्णालयाची देखील मागणी आहे. अशा अनेक बाबी आहेत. यामुळे मला वाटते की, आपण तेथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम करावे. यावर
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून एकाच वेळी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी सकाळी अत्यावश्यक सेवा व दुपारनंतर इतर दुकानांना उघडण्यास परवानगी देऊन बाजारपेठेतील गर्दीचे विभाजन करावे, अशी मागणी महाबळेश्वर येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली आल्याने कोरोनासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली असून, बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील स्थानिकांपेक्षा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार, रविवारी ही संख्या खूप पटीने वाढते. येथील स्थानिक नागरिक जीवनावश्यक बाबींच्या खरेदीसाठी सकाळी बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास बाजारपेठेत ही स्थानिक नागरिकांची गर्दी होते. पर्यटक पावसाळी वातावरणामुळे सकाळी उशिरा उठतात. त्यानंतर ते परिसरातील विविध स्थळांना भेटी देतात. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. त्यामुळे महाबळेश्वरची बाजारपेठ ही सायंकाळनंतर पर्यटकांनी नेहमी गजबजून जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा विचार करून दुकानांच्या वेळा ठरविल्या आहेत. या वेळेनुसार स्थानिक व पर्यटकांची एकाच वेळी गर्दी होणार आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही अधिक आहे म्हणून या गर्दीचे विभाजन करणे आवश्यक आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या सोईसाठी सर्व अत्यावश्यक बाबींची दुकाने नेहमीप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत उघडली जातील. दुपारी दोननंतर ही सर्व दुकाने बंद होतील. त्यानंतर स्थानिक विक्रेत्यांची इतर दुकाने सुरू होतील ही दुकाने रात्री आठ अथवा नऊ वाजता बंद होतील. बाजारपेठे अशा प्रकारे दोन वेळांमध्ये उघडण्यात आल्यास गर्दीचे विभाजन होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही टाळता येणार आहे. उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यापारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे जिल्हातील 4 विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचं मार्गदर्शन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी निवडणूका पाहता राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात सभा आणि बैठकांचं आयोजन केलंयं. भाजपला निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे मिळालेलं यश पाहता मनसे देखील येणाऱ्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करणार आहे. आता मनसे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यात यशस्वी होते का? , हे येणाऱ्या काळात समजेल. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास टाळले.
सेवाग्राम : श्रीमद् राजचंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नई तालीम परिसरात 'युगपुरूष- महात्मा के महात्मा' हा अनोखा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मोहनदास गांधी यांना गहण अध्यात्मिक ज्ञान देणारे श्रीमद् राजचंद्र यांच्यातील संबंधाची यशोगाथा या नाट्यप्रयोगातून मांडण्यात आली. यातून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर आदिवासी भागात अत्याधुनिक रुग्णालय सुरू करण्याकरिता करण्यात येणार आहे. श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर, दक्षिण गुजरात या संस्थेच्या माध्यमातून हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सामाजिक स्तरावर ही संस्था कार्यरत आहे. श्रीमद् राजचंद्र हे महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक गुरू मानले जातात. जगाला सत्य व अहिंसाची देण देणाऱ्या गांधीजींना खऱ्या अर्थाने याचा बोध व प्रेरणा देण्याचे कार्य श्रीमद् राजचंद्र यांनी केले आहे. महात्मा गांधी यांच्याकरिता राजचंद्र हे महात्मा होते. म्हणून या नाटकाचे नामकरण याप्रमाणे करण्यात आले आहे. बॅरिस्टर असलेल्या गांधीजींची जडणघडण राजचंद्र यांच्या सहवासात आणि पत्र लिखानाद्वारे होत राहिली. 'युगपुरूष- महात्मा के महात्मा' हे नाटक श्रीमद् रामचंद्र व महात्मा गांधी या दोन महात्मावर आधारित आहे. कलाकार, संवाद, अभिनय, संगीत, पटकथा, सजावट, प्रकाश रचना याचा प्रभावी वापर करण्यात आल्याने नाटकातील संदेश अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. श्रीमद् राजचंद्र या अध्यात्मिक युगपुरूषाचा गुजरात मधील बबानिया गावात १८६७ मध्ये जन्म झाला. २३ व्या वर्षी विशुद्ध ज्ञान व निष्काम भक्तीचा त्यांनी समन्वय प्राप्त केला. 'आत्मसिद्धी शास्त्र'ची रचना करून तत्वज्ञान व सिद्धांत सोप्या भाषेत त्यांनी सामान्यांपर्यंत पोहचविले. त्यांचे अमृतमय बोधवचन 'श्रीमद् राजचंद्र' या गं्रथात संग्रहित करण्यात आले. त्यांनीच गांधीजींना अध्यात्मिक ज्ञान दिले. गांधीजींनी १९३० मध्ये मॉडर्न रिव्यूमध्ये याविषयी लिहिले आहे. या व्यक्तीने धर्माच्या गोष्टीतून माझे हृदय जिंकले. आजपर्यंत असा प्रभाव माझ्यावर कुणी टाकू शकले नाही. या नाटकातून श्रीमद् राजचंद्र यांच्यापासून गांधीजींनी सत्य, अहिंसा ही मूल्य स्वीकारून स्वातंत्र्य चळवळीत त्याचा योग्यप्रकारे उपयोग केल्याचे दाखविण्यात आले आहे. वर्तमान युगात जगताना भौतिक सुखाच्या मागे धावणे निरर्थक असल्याची प्रेरणा यातून मिळते. जीवनाचे ध्येय काय असावे? मानवतावादी निर्भय समाज निर्माण व्हावा, असा सकारात्मक प्रभाव नाटक प्रेक्षकांवर टाकते. श्रीमद् राजचंद्र यांचे १५० वे जयंती वर्ष असून त्यांचे शिष्य व भक्त पु. राकेशभाई यांच्या प्रेरणेने श्रीमद् राजचंद्र मिशनची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. उल्हास जाजू, भरत दोशी, गिरीश मांडविया यांची प्रमुख उपस्थिती होती. नई तालीम समितीचे कार्यकर्ता व नागरिक या नाट्यप्रयोगाला उपस्थित होते. (वार्ताहर)
देशातील एटीएममध्ये नोटांचा ठणठणाट असल्याने पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळातील अनुभव लोकांना येत आहेत. बँकेत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दिसत आहे. उत्तराखंडमध्ये एका बँकेने लग्नपत्रिका दाखवल्यानंतर पैसे दिल्याने लोकांची नोटाबंदीची आठवण पुन्हा ताजी झाली. उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात रमेश राम नावाचा तरुण बँकेत पैसे काढण्यासाठी पोहचला. पण त्याच्या पदरी पैसे नाही तर निराशा पडली. त्याने १० हजार रुपये काढायचे आहेत असे सांगितल्यानंतर बँकेने तेवढे पैसे देण्यास नकार दिला. बँक एकावेळी २ हजार रुपये देण्यास तयार होती. नातेवाईकाच्या लग्नासाठी पैसे हवे असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा बँकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला. जेव्हा ३५ किलोमीटर प्रवास करुन तो बँकेच्या जिल्हा कार्यालयात पोहचला. लग्नपत्रिका दाखवल्यानंतर त्याला पूर्ण रक्कम देण्यात आली. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेकांच्या लग्नात या चलन तुटवड्याने लग्न समारंभावर परिणाम होत आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरु झाल्या तेव्हा पैसे काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. एटीएममध्ये पैसे संपल्याने बँकेतून जितके मिळतील तितके पैसे काढण्यास खातेदारांनी सुरुवात केली आहे. मात्र बँकेत भरणा करणाऱ्यांपेक्षा पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने चलन तुटवडा निर्माण झाला आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील रिक्त असलेल्या न्यायमूर्ती पदासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सुचवलेल्या उमेदवाराने लैंगिक छळ केल्याचे आरोप होत आहेत. या पदासाठी ब्रेट कॅव्हेनॉ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ब्रेट यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. तर सिनेटनं कॅव्हेनॉ यांच्या बाजूनं मतदान करावं, असे आदेश ट्रंप यांनी दिले आहेत. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. 9 सदस्य असलेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला तिथल्या राजकीय आणि समाजिक जीवनात मोठं महत्त्व आहे. तर अमेरिकेन बार असोसिएशनने या नियुक्तीसाठीचं मतदान पुढं ढकलून FBIकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ब्रेट यांनी Senate Judiciary Committeeला या प्रकरणास साक्ष दिली असून हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. "डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य माझ्या कुटुंबाला उध्वस्थ करत आहेत. माझं नाव राजकीय हेतूसाठी वापरण्यात येत आहे," असा आरोप त्यांनी केला आहे. "ब्रेट यांनी 36 वर्षांपूर्वी माझ्यासोबत केलेल्या लैंगिक छळामुळे माझ्यावर मोठा परिणाम झाला," असा आरोप ख्रिश्चिन फोर्ड या महिलेने केला आहे. या महिलेचीही या समिती समोर साक्ष झाली. "त्या घटनेनंतर अनेक वर्षं भीतीत जगत होते आणि मला लाजिरवाणं वाटत होतं. 1982ला घडलेल्या या घटनेवेळी माझं वय 15 तर ब्रेट यांचं वय 17 होतं. एका पार्टीत ही घटना घडली," असं त्यांनी सांगितलं. माझ्याशी गैरवर्तन करताना ब्रेट आणि त्यांचा मित्र एकमेकांकडे पाहून हसत होते. माझ्याशी गैरवर्तन करणारे ब्रेट होते, असं त्यांनी म्हटलं आहे. इतर ही काही महिलांनी ब्रेट यांच्यावर आरोप केले आहेत. 1980मध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी माझ्यासमोर स्वतःचे कपडे उतरवले होते, असं डेबोरा रामिरेझ यांनी म्हटलं आहे. 1980मध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी काही मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप वॉशिंग्टन डीसी इथल्या रहिवासी ज्यूली स्वेटनिक यांनी केला आहे. कोलॅरेडो इथल्या सिनेटरला एका महिलेनं निनावी पत्र पाठवून ब्रेट एका महिलेसोबत बळजबरी करत असताना माझ्या मुलीनं पाहिलं होतं, असा आरोप केला आहे. ब्रेट यांनी काय म्हटलं? Senate Judiciary Committee सुरू असलेली प्रक्रिया म्हणजे राष्ट्रासाठी कलंक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या समितीसमोर त्यांची साक्ष सुरू आहे. "जुलै महिन्यात उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतत काहीतर अडचणी येत आहेत. काहींना माझी उमेदवारी खटकत आहे. या प्रक्रियेतून मी माघार घ्यावी, असं काहींना वाटतं. पण मी घाबरणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. फोर्ड ज्या पार्टीविषयी बोलत आहेत, तिथं मी नव्हतो, असं ते म्हणाले. ट्रंप यांची भूमिका काय? "ब्रेट यांनी दिलेली साक्ष अधिक प्रामाणिक आणि प्रभावी आहे असं माझ्या लक्षात आलं आहे," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. या घटना राजकीय स्वरूपाच्या असून डेमोक्रॅटिक पक्ष ब्रेट यांची उमेदवारी रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. तर ट्रंप यांनी या न्यायाधीशाच्या चारित्र्याचं सातत्याने समर्थन केलं आहे. मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वांत चारित्र्यवान तेच आहेत, असं त्यांनी ट्रंप यांनी म्हटलं आहे. ब्रेट यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले तर त्यांचं नामनिर्देशन मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढं काय होणार? सिनेटसमोर जाण्यापूर्वी ब्रेट यांना सिनेटच्या न्यायिक समितीने त्यांची निवड करावी लागेल. ही समितीत शुक्रवारी मतदान होणं अपेक्षित आहे. पण मतदानात विलंब होऊ शकतो, असं समितीचे सभापती रिपब्लिकन पक्षाचे नेते चक ग्रासली यांनी म्हटलं आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या 10 सिनेट सदस्यांनी ब्रेट यांचं नामनिर्देशन मागं घ्यावं असं म्हटलं आहे. रिपब्लिकन पक्षाला त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीची निवड नोव्हेंबरपूर्वी व्हावी असं वाटतं कारण अमेरिकेत होणाऱ्या मिडटर्म निवडणुकीत सिनेटमधील त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. याचा परिणाम महिलांच्या मतांवरही होणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. )
शहर परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेताना कोणतेही नियोजन केले नसल्याने सध्या शहर ठिकठिकाणी खणून ठेवल्याचे दिसत आहे. शहर परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेताना कोणतेही नियोजन केले नसल्याने सध्या शहर ठिकठिकाणी खणून ठेवल्याचे दिसत आहे. अर्धवट कामांमुळे कुठे गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहते तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच बंद असल्याने व्यावसायिकांना आपली दुकानेही बंद ठेवणे भाग पडले आहे. काही ठिकाणी जीव धोक्यात घालून नागरिकांना आपले घर गाठावे लागते. काही कामे पूर्णत्वास गेली तरी रस्ता खुला न केल्यामुळे रस्त्याच्या एका बाजुवर दोन्ही बाजुंच्या वाहनांचा बोजा पडला आहे. परिणामी, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उपरोक्त ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर तसेच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरात सध्या मुंबई नाका, सारडा सर्कल ते दूध बाजार, गणेशवाडी, मखमलाबाद नाका आणि धुमाळ पॉईंटसह अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. साधारणतः दीड महिन्यापूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत मुंबई नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता रस्ता रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारून तातडीने रस्त्याचे खोदकाम, खडीकरण हाती घेण्यात आले. रुंदीकरणाच्या नावाखाली जुना आग्रारोडवर दुतर्फा खोदकाम करण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे मुळात अरूंद असलेला रस्ता अधिकच चिंचोळा झाला. शिवाय, भूमिगत वायरचे जाळे ठिकठिकाणी उघडे पडले. जलवाहिन्या तुटल्याने मध्यंतरी पाण्याची गळती येथे झाली होती. परिसरात सकाळी तसेच सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. त्यात खडी व तत्सम साहित्य रस्त्यालगत पडून आहे. यामुळे वाहतुकीत अवरोध निर्माण झाला आहे. दूध बाजार ते सारडा सर्कल परिसराची परिस्थिती याहून वेगळी नाही. सारडा सर्कलकडून दूध बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावर भंगार, लोखंडी साहित्य, टायर, विद्युत उपकरणे दुरूस्ती, कुशन्स अशी १२५ हुन अधिक दुकाने आहेत. या रस्त्याचे काम चार महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीत एका बाजुचे काम अंतीम टप्प्यात आहे. दुसऱ्या बाजूला बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामुळे हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद असून स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वाहने येण्यासाठी जागा नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली असून हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. गणेशवाडी परिसरात दुतर्फा खोदकाम केल्यामुळे ठिकठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे. या ठिकाणी 'ड्रेनेज' उघडे पडले आहेत. गटारीचे पाणी व ढापे नसल्याने स्थानिकांना दरुगधीचा सामना करावा लागतो. रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यासाठी कोणताही फलक नाही. खडीमुळे अनेकदा वाहने 'पंक्चर' होतात तर काही ठिकाणी खडीवर सांडपाणी आल्याने वाहने घसरून अपघातही होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे. या भागात जवळच टपाल कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका तसेच आयुर्वेद महाविद्यालय असल्याने विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. परंतु, विस्तारीकरणाच्या कामामुळे सर्वाना बेजार केले आहे. काम सुरू झाल्यापासून आजतागायत नगरसेवक वा पालिका अधिकारी कामाची पाहणी करण्यास आले नसल्याची तक्रारही केली जाते. मखमलाबाद नाक्यावर वेगळीच समस्या आहे. रामवाडी ते पेठ फाटा या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे एका बाजुचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, तो रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. यामुळे एका बाजुने दोन्हीकडील वाहतूक होते. या ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकाच बाजुने दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने पादचारी व शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे अवघड बनते. वाहनधारकांना कोंडीत अडकून पडावे लागते.
Is the PM's new home corona virus-proof? मुंबईः 'ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. दिल्लीत करोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. ही नवी घरे करोना विषाणुप्रूफ आहेत काय? याबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा,' असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, मेहुल चोक्सी प्रकरणामुळं करोनाचा विसर पडेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. 'नव्या योजनेनुसार पंतप्रधान १५ एकरांच्या घरात जातील. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, अशी टीका सुरु झाली आहे. जॉन्सन यांनी लग्न केलं. आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? करोनामुळं देशातील ९७ टक्के जनता गरिबीच्या उंबरठ्यावर आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 'मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना 'भारतरत्न' ही दिले जाईल,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
(पूर्वसूत्रः आम्ही दोघंही १९४७ नंतर जन्म झालेले! त्यामुळे तो त्याच्या देशाचा नागरीक आणि मी भारताचा! आम्ही दोघंही परस्परांबद्दल बरंच काही नवीन शिकत होतो. आमचे दोघांचेही काही पूर्वग्रह होते, आपापल्या समाजाने करून दिलेल्या समजुती होत्या. माझ्या दृष्टीने त्याचा देश पाकिस्तान आणि माझा हिंदुस्तान! पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! सुट्टीच्या दिवशी क्वचित कुराणेशरीफही वाचायचा!! मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!! तरीसुद्धा गोंधळ हे व्हायचेच!! एकदा अशीच गंमत झाली....) एकदा अशीच गंमत झाली! हिवाळ्यात थंडीचा कडाका पडला होता. बाहेर बर्फाचे डोंगर साठले होते. हिमवृष्टीमुळे हायवेज बंद होऊन ट्राफिक जाम होणार असे वाटत होते. तशात मला भयानक सर्दी झाली होती. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून ऑफिसातून लवकर घरी आलो. पहातो तर अब्दुलखान आपला घरी बसलेला! हिमवृष्टीचे लक्षण बघूनच त्याने सिक लीव्ह टाकली असावी. मी अंगावरचा बर्फ झटकत, खोकत-शिंकत, बाथरूम मध्ये गेलो. गरम शॉवर घेऊन बाहेर येईपर्यंत खानने कपाटातून बाटली काढून दोन ग्लासात दोन पेग तयार करून ठेवले होते. काही न बोलता त्याने एक ग्लास माझ्या हातात दिला. मी ही काही न बोलता तो तोंडाला लावला. त्याच्या चेहर्यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!! आम्ही दोघेही न बोलता खिडकीतून बाहेर चाललेलं हिमवादळाचं तांडव बघत आपापले ग्लास रिकामे करत राहिलो. तीनएक पेग संपवल्यानंतर तो म्हणाला, "घरमें डबलरोटी है. मैने मेरे लिये गोश्त बनाया है. तुम क्या खाओगे?" त्याचा प्रश्न. "अगर इनफ है तो मैं भी वही खाऊंगा" तो गडगडाटी हसला, "गुड जोक!! लगता शराब तुम्हे घुमा रही है. लेकिन सच्ची बोलोना, कुछ बनायें तुम्हारे लिये?" "नही, मैं सचमुच डबलरोटी-गोश्त खाऊंगा" "अच्छा! तो ये बात है? अबे तू तो खाकर ही दिखा!! मेरी तर्फसे तुम्हे सौ डॉलर इनाम!!" "ठीक है!" मी उठलो. दोन प्लेटस घेतल्या. दोन्हीतही गोश्त आणि पाव वाढून घेतला. एक प्लेट त्याच्या हातात दिली. मी पावाचा तुकडा काढून गोश्तच्या रश्श्यात बुडवला. आता मी तो तोंडात घालणार इतक्यात अब्दुलखान कडाडला, "अबे तेरा दिमाग फिर गया है क्या रे, काफीर?" त्याच्या ओरडण्यानेच मी दचकलो. "क्यों? क्या हुवा?" "अबे वो गोश्त है, बीफ!!" "पता है!" "अबे लेकिन तू तो हिन्दू है ना!" "फिर गोश्त कैसे खाता है? बीफ खानेसे तेरा मजहब मिट नही जायेगा? ये ले तेरा सौ डॉलर, मगर ये गुस्ताखी मुझे नही करनी बाबा!!" "खानसाहब, आपको सचमुच लगता है की बीफ खानेसे मेरा हिन्दू मजहब खत्म हो जायेगा?" "हमने तो ऐसाही सुना है, की हिन्दुओंको बीफ मना है, जैसे हम मुसलमानोंको पोर्क!! इसलिये हम पोर्क नही खाते!!" "तो आप पाक मुसलमान है?" "बिल्कुल! इसमें कोई शक है?" "तो आप अभी शराब कैसे पीते थे मेरे साथ? क्या इस्लामको शराब मंजूर है?" आता त्याच्या चेहर्यावर स्माईल उमटलं, नजर निवळली!! "वो बात अलग है!!" "खानसाब, बुरा मत मानिये! मेरा मतलब ये रहा की उस उपरवाले को पाने के लिये खाने-पीने जैसी चीजोंपर पाबंदी लगानेकी जरूरत नही. और ना ही ऐसी चीजोंपर पाबंदी लगाकर उसको पाया जा सकता है" पण त्याचं आश्चर्य विरलेलं नव्हतं. त्याने धडाधडा त्याच्या पाकिस्तानी मित्रांना फोन फिरवले. फोन स्पीकरवर लावून सगळ्यांना हेच सांगत होता, "अरे भाई, हमे बचपनसे सिखाते आये है ना कि हिन्दू गोश्त नही खाते? वो मेरा रूममेट सुलेश है ना, वो तो गोश्त खाता है और उपरसे बोलता है कि मै फिरभी हिन्दू हूं" त्यानंतर त्याचे मित्रही कधी मी फोन उचलला तर मोकळेपणे माझ्याशी बोलायचे, घरी यायचे. येतांना माझ्यासाठी पाकिस्तानी खासियत खाऊ घेऊन यायचे. त्या प्रसंगानंतर अब्दुल खानवरचंही दडपण दूर झालं असावं. निरनिराळ्या विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या पण मुख्य विषय म्हणजे निरनिराळ्या देशांतले लोक इथे येऊन अमेरिकेला कसे 'चुत्या' बनवतात हा असायचा. तो शब्दही त्याला माहिती होता. एकदा आम्ही असेच गप्पा मारत बसलो होतो. विषय होता बिर्याणी! अर्थातच तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. नुकतेच आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवून आलो होतो. अब्दुल खान त्यांच्या बिर्याणीला शिव्यांची लाखोली वहात होता. त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. बोलता बोलता नकळत म्हणाला, अनुभवाअंती माझंही तेच मत झालं आहे. भारताचा देशाभिमान वगैरे ठीक आहे पण पाकी सिंधूच्या खोर्यात होणार्या बासमतीला पर्याय नाही!! महाग असतो पण पैसा वसूल!!! जसा त्यांचा कोणताही आंबा आपल्या हापुसची बरोबरी करू शकत नाही तसा आपला बासमती त्यांच्या इंडस बासमती तांदळाशी मुकाबला करू शकत नाही!!! "घडी नयी ली है क्या सुलेश!" "नही तो! पुरानीही है!!" "दिखा, दिखा!!" मी मनगटावरचं घड्याळ काढून त्याच्या हातात दिलं. "हेच्...हेम्...टी...! ये क्या है?" "हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स! घडी बनानेवाली कंपनीका नाम है!!" त्याने तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहिले. "तुम्हारा क्या मतलब, ये इंडियामें बनी है?" "हां!! हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स, बंगलोरमें फॅक्टरी है" अब्दुल खान एकदम गप्प झाला. बराच वेळ हातातल्या घड्याळाकडे बघत राहिला. नंतर घड्याळ माझ्या हातात देत गंभीरपणे स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, "पाकिस्तान और इंडिया! दोनो एकसाथ इन्किलाब हुवे!! लेकिन तुम लोगोने कितनी तरक्की कर ली!! हम वहीं के वहीं रहें!! ऐसी खूबसूरत घडियां पाकिस्तानमें नही बनती!!!" "तुम्हें पता है सुलेश, उस टाईमपर हमारे पठान लीडर गफ्फारखानने मांग की थी की जैसे ईस्ट और वेस्ट पाकिस्तान बनाया है वैसे नॉर्थ्-वेस्ट फ्रंटियरको अलग रखके उसे वेस्ट इंडिया बनाओ! लेकिन किसीने उनकी नही सुनी!! अभी शायद कभी कभी लगता है कहीं वे सही और हम गलत तो नही थे?" मला काय बोलावे ते कळेना!! मग त्यानेच विषय बदलला, त्याला हिंदी सिनेमे खूप आवडायचे! त्यातही प्रत्यक्ष सिनेमापेक्षा गाणी छायागीत सारखी बघायला आवडायची. या बाबतीत त्याची आणि माझी आवड सारखी होती.
बिटकॉइनवरून व्यवहार करण्याच्या नावाखाली शहरातील व्यापाऱ्याचा लॅपटॉप आणि संगणक हॅक करून १७ बिटकॉइनसह दहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बिटकॉइनवरून व्यवहार करण्याच्या नावाखाली शहरातील व्यापाऱ्याचा लॅपटॉप आणि संगणक हॅक करून १७ बिटकॉइनसह दहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टेलिग्राम यूझर दीपेंद्र शर्मा यासह ब्राझीलमधील एक व्यक्तीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक हंसराज पटेल (३७, रा. केशर मनी, झांबड इस्टेट, श्रेयनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार, पटेल यांनी २०१८ मध्ये २० बिटकॉइन (अंदाजे किंमत ९ लाख ५० हजार रुपये) खरेदी केले होते. त्यावेळी त्यांची टेलिग्रामवरून दीपेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. दीपेंद्र शर्मा यांनी संपर्क साधून ट्रेड नाइट क्रिप्टो सिग्नलसाठी मार्केटिंग करण्याचा प्रस्ताव पटेल यांच्यासमोर ठेवला. या मार्केटिंगसाठी टेलिग्रामवर करारही करण्यात आला. त्यांनी १७ बिटकॉइनची मागितले. १७ कॉइनचे ३४ करून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी हे कॉइन घेतले होते. मात्र, दीपेंद्रने हे बिटकॉइन परत केले नाहीत. वारंवार विनंती केल्यानंतर, बिटकॉइनविषयीचा व्हिडिओ देण्याच्या अटीवर त्या कॉइन परत करण्याची तयारी दीपेंद्रने दाखवली होती. पटेल यांनी बिटकॉइन लाभाबाबत व्हिडीओ तयार करूनही दिला. त्यावर व्हिडीओ व्हायरल करून, दीपक पटेल हाच दीपेंद्र शर्मा आहे, असा सोशल मीडियावर प्रचार करण्याची धमकी दिली. तसेच, पटेल यांना ब्लॉकही केले. या प्रकरणात दीपक पटेल हे आधी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे बिटकॉइनची तक्रार देता येत नाही. असे सांगून पटेल यांना सायबर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले होते. सायबर पोलिस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागून एक राजकीय संकटं येत आहे. आधी ४० आमदार सोडून गेले,त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेली, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणही गेलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून दूर जात कॉंग्रेस आणि एनसीपीच्या पाठिंब्याने सरकारची स्थापना केलं, तेव्हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी हा एक धक्कादायक निर्णय होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु हा निर्णय त्याच्यासाठी नंतर किती कठीण जाईल याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. (Latest Marathi News) उद्धव ठाकरे यांचा हाच निर्णय मान्य नाही असं म्हणत अडीच वर्षांनी शिवसेनेतील ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केली. या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही गेलं. उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरेंसाठी अडचणी इथेच थांबत नाहीत. उद्धव ठाकरे यांची कमी झालेली राजकीय ताकद त्यांच्या आणखी अडचणी निर्माण करु शकते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सारखे मित्रपक्ष या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने हळूहळू उद्धव ठाकरे यांना टाळू देखील शकतात. मुख्यमंत्रीपदासाठी तर राष्ट्रवादीकडून नावं देखील समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळी शिवसेनेची ताकद सर्वाधिक होती. मात्र सध्याची स्थिती अगदी उलट आहे. आगामी निवडणुकांमध्ये वाटाघाटींदरम्यान ठाकरे गटाची बार्गेंनिग पॉवरही कमी होऊ शकते. याशिवाय बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी पहिलं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबई महापालिकेवर मागील 25 वर्षांपासून राज्य केले आहे, परंतु ती शिवसेना ठाकरे कुटुंबातील होती. आता शिवसेना एकनाथ शिंदेची बनली आहे. पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होईल. तिथे उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे. या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात. बीएमसीमध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय युती ही राज्यासाठी एक नवीन राजकीय प्रयोग आहे. मात्र ठाकरे गट आणि वंचितची युती काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य आहे की नाही अद्याप स्पष्ट नाही. कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची वंचित सोबतची युती त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीपासून दूर नेऊ शकते. प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरेंची युती अद्याप मुंबई महापालिकेसाठी आहे. मात्र लोकसभेसाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आहे. बुधवारी सामनात लिहिलेल्या लेखातूनही हे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांना दिलासा म्हणजे सत्ता व पक्ष गमावल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. पक्षात बिघाड झाल्यानंतर झालेल्या दोन सर्वेक्षणांमध्ये, त्यांच्या यूपीएच्या जागा सतत वाढल्या आहेत. ऑगस्ट २०२२ च्या सी वोटर सर्वेक्षणात यूपीएला ३० जागा मिळाल्याचे दाखवले होते, तर जानेवारी २०२३ च्या सर्वेक्षणात 34 जागांवर आहे. त्याच वेळी सत्ता आणि पार्टी मिळवल्यानंतरही शिंदे गट अद्याप यश मिळवू शकला नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिंद गटाला ५ पैकी ४ जागा गमावल्या होत्या. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
मार्स लॉजिस्टिक्स, तुर्कीच्या आघाडीच्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक, लॉजिस्टिक असोसिएशनच्या सहकार्याने या वर्षी 20 व्यांदा इंटर-युनिव्हर्सिटी लॉजिस्टिक केस स्पर्धा आयोजित करत आहे. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या पुरस्कार विजेत्या केस स्पर्धेची अंतिम मुदत 30 एप्रिल आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी पात्र मानव संसाधनांना प्रशिक्षित करण्यासाठी या वर्षी 20 व्यांदा आयोजित केलेल्या, आंतर-विद्यापीठ लॉजिस्टिक प्रकरण स्पर्धेला 20 वर्षांपासून विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून खूप उत्सुकता आहे. मार्स लॉजिस्टिक्स आणि लॉडर यांच्या सहकार्याने झालेल्या स्पर्धेत टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन आणि सर्जनशीलता समोर येते. आंतर-विद्यापीठ लॉजिस्टिक प्रकरण स्पर्धा, जी दरवर्षी आयोजित केली जाते, दिलेल्या प्रकरणावर 3 लोकांच्या संघांनी सादर केलेल्या उपायांचे मूल्यांकन LODER द्वारे निर्धारित ज्युरी सदस्यांद्वारे केले जाते. मूल्यमापनाच्या परिणामी, विजेते संघ प्रथम पारितोषिक जिंकतात. सहभागाच्या अटी जाणून घेण्यासाठी आणि सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी, तुमची टीम तयार करणे, marslogistics.com वेबसाइटला भेट देणे आणि कामाचा दिवस संपेपर्यंत अर्ज भरणे पुरेसे आहे. रविवार, एप्रिल 30, 2023.
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (94th All India Marathi Literary Convention ) यशस्वीतेसाठी योगदान देणार्या स्वयंसेवकांचा रविवारी दि. 27 मार्च रोजी, सायंकाळी 5 वा. , विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट हॉल, सावरकर नगर येथे प्रमाणपत्र वाटप व सत्कार समारंभाचे (felicitation ceremony of volunteers )आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांतर्फे योगदान देणार्या सर्व स्वयंसेवकांचा उचित सन्मान करण्याचा मनोदय होता, परंतु संमेलनानंतर आलेल्या करोनाच्या तिसर्या लाटेच्या सावटाखाली ते शक्य झाले नाही, शासनाच्या निर्बंधामुळे स्वयंसेवकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बंधने येत होती. सध्या करोनाचा प्रभाव कमी झालेला असता साहित्य संमेलनातर्फेे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कार्यक्रमास सर्वसमिती प्रमुख विश्वास ठाकूर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कार्यवाहक संजय करंजकर, विनायक रानडे, रमेश अय्यर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्वयंसेवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समिती पालक रमेश देशमुख, समिती प्रमुख डॉ. संतोष मोरे, भूषण काळे, वेदांशू पाटील, यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जोहान्सबर्गः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना, चेतेश्वर पुजारा टिच्चून उभा राहिला आणि अर्धशतकी खेळी करून त्यानं संघाला सावरलं. त्याच्या या चिवट, झुंजार फलंदाजीचं क्रिकेटवर्तुळात कौतुक होतंय. पण, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पुजाराच्या अर्धशतकानंतर एक घोळ घातला आणि त्यांना क्रिकेटप्रेमींचे चांगलेच फटके खावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीला जिद्दीनं सामोरा जात, चेतेश्वर पुजारानं 173 चेंडूत 50 धावा केल्या. त्याचं अर्धशतक झाल्या-झाल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं त्याबद्दलचं ट्विट केलं, पण त्यात पुजाराऐवजी आर. अश्विनचा फोटो वापरला. ही चूक ट्विपल्सच्या लगेच लक्षात आली आणि भारतीय क्रिकेटप्रेमींनी द. आफ्रिका बोर्डाला धारेवर धरलं. पण बोर्डानं ही चूक सुधारण्याचं सौजन्य दाखवलं नाही. डोळे मिटून काम करता का? , कुठल्याही क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आलेलं आजवरचं सगळ्यात वाईट ट्विट, तुम्ही घाईघाईत मेल पाठवला, पण चुकीचा फोटो अटॅच केलात, अशा प्रतिक्रिया देत ट्विपल्सनी द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाची शाळा घेतली. दरम्यान, पहिल्या कसोटीत हाराकिरी करणाऱ्या आणि दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेपुढे लोटांगण घालणाऱ्या टीम इंडियासाठी ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. 'व्हाइट वॉश' टाळण्यासाठी त्यांना ही कसोटी जिंकावीच लागणार आहे. परंतु, पहिल्या डावात भारताचे रथी-महारथी ढेपाळल्यानं आता पुन्हा सगळा भार गोलंदाजांवर येऊन पडलाय. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळाने मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि प. महाराष्ट्राच्या काही भागात ठाण मांडले आहे. राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळाने मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि प. महाराष्ट्राच्या काही भागात ठाण मांडले आहे. दुष्काळ जाहीर करण्याचे निकष जुने असल्याचे सांगत, महसूलमंत्री एकनाथ खडसे समितीने नवीन निकषांआधारे १४ हजार ८०७ गावांत दुष्काळ जाहीर केला. पीक कापणीअहवालानंतर गावांची संख्या वाढेल. दुष्काळनिवारण आणि 'कृषी व मदत तथा पुनर्वसन विभागा'ने विविध योजना लागू केल्या, मात्र, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तीनवरून पाच वर्षांचा केला. व्यापारी बँकाप्रमाणेच जिल्हा बँकांच्याही पीककर्जाचे व्याजासह रूपांतरण, जिल्हा बँकेच्या ७७१ कोटींच्या कर्जाचे रूपांतरण पूर्ण, बँकाकडून ३५०० कोटींच्या पीक कर्जाचे रूपांतरण. शेतकरी नाराज का? सर्व पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आश्वासने दिली होती. मात्र, नवे सरकार आल्यानंतर कर्जमाफी शक्य नसून कर्जमुक्तीचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले. विविध नैसर्गिक संकटांनी बेजार झालेला शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.
शहराच्या मध्य वस्तीतील मंडई, तुळशीबाग या भागांपासून कोथरूड, विश्रांतवाडी, आळंदी रोड यांसारख्या उपनगरांतील भागांतील अतिक्रमणांवर पालिकेने बुधवारी धडक कारवाई केली. म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराच्या मध्य वस्तीतील मंडई, तुळशीबाग या भागांपासून कोथरूड, विश्रांतवाडी, आळंदी रोड यांसारख्या उपनगरांतील भागांतील अतिक्रमणांवर पालिकेने बुधवारी धडक कारवाई केली. रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांपासून ते हातगाडी स्टॉलपर्यंत सर्व प्रकारची अतिक्रमणे या कारवाईत हटविण्यात आली. पालिकेतील मंगळवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये अतिक्रमण कारवाईवरून काही सदस्यांनी प्रशासनावर कोरडे ओढले होते. वारंवार सांगूनही अधिकारी कारवाई करत नसल्याबद्दल टीकाही झाली होती. त्यामुळे, प्रशासनाला दोषी धरणाऱ्या या सदस्यांच्या प्रभागांमध्येच पालिकेने बुधवारी जोरदार कारवाई केली. मध्य वस्तीतील तुळशीबागेसह शनिपार, विश्रामबागवाडा, शनिवारवाडा आणि लक्ष्मी रोड परिसर; तसेच विश्रांतवाडी, आळंदी रोड, बिबवेवाडी रोड, कोथरूड येथील सुतार हॉस्पिटल परिसर या भागांतही पालिकेने कारवाईचा जोर लावला. या कारवाईत पथारी व्यावसायिकांसह हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये विविध स्वरूपाचा मालही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला आहे. 'वारंवार अतिक्रमणे होणाऱ्या, शहराच्या वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी ही कारवाई सुरू केली. सकाळी १०पासून सायंकाळपर्यंत प्रमुख रस्ते आणि चौकांमधील बहुसंख्य अतिक्रमणे हटविण्यात आली. शहराच्या इतर भागांमध्येही यापुढे कारवाईत सातत्ये राखले जाईल,' अशी माहिती अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
'प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, तो शोधून काढण्याचे आव्हान शिक्षकांमध्ये असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे केले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, तो शोधून काढण्याचे आव्हान शिक्षकांमध्ये असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे केले. प्रभा चंपालाल देसरडा एज्युकेशन फाऊंडेशन संचलित डॉ. देसरडा पब्लिक स्कूलचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी घनश्याम मुनी, कौशलमुनी यांचे आर्शीवचनपर भाषणे झाली. याप्रसंगी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, 'कठीण गोष्ट सोपी करणारा तो शिक्षक असतो, तर सोपी गोष्ट कठीण करून सांगणारा हा प्राध्यापक असतो. विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देण्याची गरज आहे. ' शेखर देसरडा यांनी प्रास्ताविक केले. किशोर देसरडा यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ओमप्रकाश पोकर्णा, प्रशांत देसरडा यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता देसरडा यांनी आभार मानले. कार्यक्रमास एल. एन. शर्मा, कांतीलाल धाडिवाल, साधना शहा, लक्ष्मीकांत धोंड, अक्षय देसरडा, राजेश राका, सुनील जोगदेव, मुख्याध्यापक गजानंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका दर्शना कुर्लेकर यांची उपस्थिती होती.
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुपला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारातील अदानी समूहाचे शेअर कोसळल्यापासून ते श्रीमंतांच्या यादीतील घसरलेल्या क्रमांकापर्यंत गौतम आदानी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. असं असतानाच आता मुंबईतील धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. (adani group dharavi redevelopment project will be stopped in mumbai) अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाचे (Dharavi redevelopment project) कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी आर्थिक संकटात असल्यामुळे धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला (Adani Group) पतपुरवठा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये (Share Market) अदानी समूहाचे शेअर कोसळले आहेत. त्यामुळे अदानी ग्रुपने मार्केटमधून एक्झिट घेतली आहे. त्यातच अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता काटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल. हिंडनबर्गने अदानी समूहाच्या व्यवहारांविषयी एकूण 88 प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या परतफेड क्षमतेपेक्षा जास्त कर्ज देण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्गच्या रिपोटमध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी पैसे उभे करताना अदानींच्या मार्गात आणि पर्यायाने धारावी पुनर्विकासात पुन्हा एकदा अडथळे निर्माण होऊ शकतात. "सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा Adani Realtyच्या सध्याच्या प्रकल्पांवर आणि धोरणात्मक वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही ते हाती घेण्यास आणि ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. Adani Realtyचे मजबूत व्यवसाय मूलतत्त्वे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्रित आहे", असे अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
सातपूर गावात राहणाऱ्या नीलेश याने संशयित सावकार निखिल भावले यांच्याकडून चार महिन्यापूर्वी दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात तो त्यांना दरमहा व्याजरुपी रक्कम देत होता. पैसे परत करावेत म्हणून संशयित भावले वारंवार त्रास देत होता. सोमवारी (दि. १७) संशयित निखिल हा नीलेशच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. भावले याने नीलेशची मोपेड दुचाकी बळजबरीने उचलून नेली. नीलेश हा नैराश्याच्या गर्तेत बुडाला आणि अखेर कर्जाच्या परतफेडीपोटी होणाऱ्या सावकारी छळाला कंटाळून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मयत नीलेशचा भाऊ आकाश सोनवणे याने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संशयित निखिल भावले या खाजगी सावकाराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खाजगी सावकारीतून बेकायदा कर्ज देऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचे समोर आले आहे. यातूनच सातपूर येथील अशोकनगर भागात राहणाऱ्या नीलेशने आपलं जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत नीलेश सोनवणे याने संशयित सावकार निखिल भावले यांच्याकडून दहा हजार रुपयांचे कर्ज २५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्यामुळे तो भावले यांना अडीच हजार रुपयांचे व्याज भरत होता, असे पोलिासंनी सांगितले. त्याच्याकडे एका महिन्याचे व्याज थकले होते म्हणून भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे नीलेशने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. या धक्कादायक घटनेने सातपूर परिसरात हळहळ व खासगी बेकायदेशीर सावकारीविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या खासगी सावकारी पेढ्या पोलीस प्रशासन कधी उद्ध्वस्त करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. भूमाफियांची पाळेमुळे उखडून फेकणारे दीपक पाण्डेय खासगी सावकाराविरुद्ध काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
दुसरीकडे काय चाललें होतें ? "कसली कसलीरे ?" उतावळेपणाच्या आवाजांत मनोरमेनें विचारलें. " ते झणाले कीं, एक बाई होती. तिचा नवरा मेला तेव्हां तिनं दुसरं लग्न केलं. त्या दुसन्या बोवानें त्या बाईच्या मुलाला छळलं, मारलें. त्या बोवाचा होता एक मुलगा त्याचे मात्र लांड करायचे त्या दोघां बाईनं न बोवानं. एके दिवशी त्या बोवानं बाईच्या मुलाला धाडलं रानांत. जरी आई त्या नवन्याकरतां आपल्या मुलाचा दुष्टावा करी तरी पण तिची प्रीति स्यावर होती. स्या बोवानं त्याला जर उपाशी ठेवलं तर तिनें त्याला चोरून खायला घालावे. एके दिवशीं त्या बाईंचें नू बोवाचें झालं भांडण. बोबा झणे "या मुलाला तूं घरांतून घालवून दे." बाई ह्मणे, "मी नाहीं घालवणार!" बाई पुढे ह्मणाली, "तू नाही तर मी दुसरा नवरा करीनं जा तुला जिकडे नायचं असेल तिकडे. " तो बोवा मग मात्र अगदी खजिल झाला. पुढे मग बोवानं धाडलं त्या मुलाला रानांत. तो जाईना ह्मणून त्याला मारलन सुद्धां. मग काय करतो बिचारा, रडत रडत गेला रानांत. तिथे त्याच्या मागोमाग तो बोवा गेला न् त्यानं त्या मुलाची कायशीशी कुरापत काढून त्याचं डोकं ठेंचून त्या मुलाला विहीरींत दिलं टाकून इकडे त्या बाईला बोवाचा तो मुलगा नकोसा झाला होता. बोवा घरांत नाहीं असं पाहून बाईनं पण मुलाची मान विळीन कापली अन् त्याचें प्रेत कपड्यांत झांकून तिथेंच परसांत पुरून टाकलंन पुढे त्या दोघांची गांठ पडली अन् त्या बोवांनी त्या बाईला खूप खूप मारली. मग ती गेली पळून. अशी जमतीची गोष्ट होती बघ." ५ वें. ] हैं कथानक पुत्रमुखांतून कानीं पडत असतां मनोरमेच्या चर्येवर निर निराळे विकार उद्भवत होते. अखेरीस ती रागानें लाल झाली. मुलाला तिच्या रागाचें कारण न कळून भय वाटलें व गांगरून जाऊन तो बिचारा चूप बसला. दुसरे दिवशी सकाळी मास्तरसाहेबांना दाराशींच भय्यानें मज्जाव केला. कारण विचारतां याउपर तुमची शिकवणी बाईसाहेबांना पसंत नसल्याचें सुधारणेचा मनु. [ प्रकरण सांगण्यांत आले. या एकाएकी झालेल्या बडतर्फीचे निमित्त त्यांचें त्यांनाच चांगले उमजले असेल. प्रकरण सहावें. निश्चय ठरला. प्रोफेसर घमेंड्यांइतका मनोरमाबाईचा पाठपुरावा करणारा दुसरा कोणी चिकट गृहस्थ नव्हता. धिमेपणा हा त्यांच्यांतला मोठा गुण असल्याबद्दल यांचा छात्रवर्ग नेहमीं वाखाणीत असे. कालेजांतील गुरूंच्या गुणदोषांची चर्चा निघाली की, त्यांत घमेंड्यांचें नांव हटकून निघायचंच. व त्या विद्यार्थीवर्गात कोणी नकल्या व विनोदी मिळाला की, त्यांच्या आख्यानानें विद्यार्थ्यास पोट धरून हंसावेंच लागे. यांचा विषय संस्कृत असे तथापि अडीअडचणीच्या वेळीं कोणताहि विषय शिकविण्याची यांची एका पायावर तयारी असे. विद्यार्थ्यांना कांहीं तरी प्रश्न विचारून खिजविण्यांत यांचा हातखंडा असल्याचें विद्यार्थी नेहमीं सांगत असत. काव्य अगर नाटक पढ वीत असतां पात्रांची भाषणें नाटककाराच्या, 'सविमर्शम्' 'साकूतम्' 'साभिप्रायम्' इत्यादि सूचनेप्रमाणें अंगविक्षेपासह सांगण्याची यांना मोठी हौस. साधारणतः न समजेसा अवघड भाग विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत खुबीनें धूळ फेकून सोडून देण्याचे कसब यांना अगदर्दी रें साधलेलें. स्यांतून यांचें मर्म जाणणारा दक्ष विद्यार्थी आढळलाच तर त्यात कसें तरी हिणावून खाली बसावयास लावलें नाहीं असे कधींच व्हावयाचें नाहीं. एका वर्गीतून दुसऱ्या वर्गोत जातांना मध्ये कालेजचे शिपाई भेटल्यास त्यांस "अरे हजीरीबुक नीट वागव, फाटेल, " "अरे ! आमच्या घरचे नारळ आणलेस का ?" असे प्रश्न विचारण्यांत त्यांस मोठेपणा वाटत असावा असे त्यांच्या नेहमीच्या वर्तनावरून विद्यार्थ्यास वाटे. उदराच्या स्थूलत्वामुळे गतीला मंदपणा आल्याने एका अंगावर झुकत झुकत स्वारी चालत असे. मुले चेष्टेखोरच !
बीजिंग : भारताने चिनी 'अॅप्स'वर घातलेल्या बंदीचा भारतातील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे. 'भारताने त्यांची चूक सुधारावी', असा फुकाचा सल्लाही दूतावासाच्या एका अधिकार्याने दिला आहे. (स्वतः 'अॅप्स'च्या माध्यमातून हेरगिरी करायची आणि त्यावर बंदी घालणार्यांना चूक सुधारण्याचा सल्ला द्यायचा, हा चीनचा धूर्तपणा आहे. अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तूंवर देशात बंदी घातली पाहिजे ! - संपादक, दैनिक सनातन प्रभात)
चाकण : शेतकऱ्यांना वातावरणातील बदल, पीक लागवड, कीड रोगाचे व्यवस्थापन, औषधफवारणी, वादळी वारे आणि पाऊस यांसह शेतीविषयक सगळीच माहिती मिळावी, यासाठी 'किसान एप'ची निर्मिती केली. त्या एपच्या आधारे शेतकऱ्यांना मेसेजद्वारे माहिती देण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपासून नेटवर्कअभावी ही माहिती शेतकऱ्यांना मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पिकांवर येणाऱ्या संकटावेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक माहिती मिळावी, यासाठी शासनाने किसान पोर्टल सुरू केले आहे. खेड तालुक्यात शेतीला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी सधन झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी शेतात विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्य पिके, भात शेती आणि फळबागांमधून चांगले उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी नवनवीन शेती पिकांचे उत्पादन घेऊन सेंद्रिय खतांचा वापर करून पिके घेत आहे. निर्सगाच्या अनियमितपणामुळे अचूक माहिती मिळावी यासाठी किसान पोर्टलला जोडले गेले आहे. परंतु मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने शेतीविषयक माहितीचे एसएमएस मिळत नाही. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. किसान एपमुळे शेतकऱ्यांना शेतीबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे. बी-बियाणे, खत, औषध आणि हंगामातील पिकांची लागवड, वाढीव उत्पादन याचे व्यवस्थित नियोजन करता येत आहे. परंतु मेसेज वेळेवर मिळत नसल्याने हवामानाचा अंदाज चुकत आहे, असे गोनवडी येथील प्रगतिशील शेतकरी दिनेश मोहिते-पाटील यांनी सांगितले. आमच्याकडे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पावसाची माहिती मिळत नाही. भामनेर खोऱ्यात भाताचे आगर असल्याने सर्व पावसावर अवलंबून असते. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे त्यांना मेसेजवर अवलंबून राहवे लागते. तेही नेटवर्क अभावी मिळत नाही. यावर सरकारने काहीतरी नियोजन करावे, असे भात उत्पादक शेतकरी किसन नवले यांनी म्हटले आहे.
मुंबई :- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. कायद्यात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून, शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारला (Central Government) केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कृषी कायद्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, आज कृषी कायद्याबाबत प्राथमिक चर्चा होत आहे. एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका असून, महाविकास आघाडीची नाही. असेही ते म्हणाले. कृषी कायद्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही केंद्राला सांगितलं चर्चा करा. ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा. काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. बिल रद्द करा असं शेतकरी संघटनांचं मत आहे. महाविकास आघाडी सरकारने या बिलाविरोधातील आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे. आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा. सगळ्यांशी चर्च करु. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं. दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे. ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी नमूद केलं. साखरप्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, 310 लाख टन साखर तयार होईल असा अंदाज आहे. तेवढी साखर परदेशात निर्यात केली. अनुदान जाहीर केलं. जो साखरेचा दर 31 रुपये ठरवला तो वाढवावा , यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 31 रुपये दर वाढवावा, अशी मागणीही त्यांनी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येत आहे. आमचा अंदाज आहे त्यात काही मदत होईल, किती होईल सांगणे उचित होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. हायकोर्टाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या (Kanjurmarg Metro Shed) कामाला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आज पाच वाजता एमएमआरडीएची (MMRDA) बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावेळी याबाबत चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले.
नवी दिल्ली : 'प्लेबॉय'साठी पोझ देणे स्त्रीवादी असल्याचा पुरावा असू शकतो...? असा विश्वास एका महिला फ्रेंच मंत्र्याने व्यक्त केला आहे. याशिवाय तिने कपड्यांसह प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसण्याच्या तिच्या निर्णयाचा बचाव केला आहे. 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राजकारणात आणलेल्या 40 वर्षीय स्त्रीवादी लेखिका मार्लेन शियाप्पा यांच्याकडे वादांचा मोठा इतिहास आहे. त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचे लोक सहसा रागावतात. प्लेबॉयच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीत दिसलेल्या फोटोचा बचाव करताना, मासिकाचे संपादक जीन-क्रिस्टोफ फ्लोरेंटाईन यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, फ्रेंच सरकारमधील मंत्र्यांपैकी शियाप्पा मार्लीन या फोटोसाठी सर्वात योग्य होत्या, कारण त्या महिलांच्या अधिकारांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांना माहित आहे की, हे मासिक स्त्रीवाद प्रचाराचे साधन बनू शकते. फ्लोरेंटाइन यांनी असेही सांगितले की, 'प्लेबॉय' हे मासिक सॉफ्ट पॉर्न मासिक नाही, तर 300 पृष्ठांचे त्रैमासिक 'मूक' (मासिक आणि पुस्तकाची मिश्र आवृत्ती) आहे, जी बौद्धिक आहे आणि ट्रेंडिंगसुद्धा करत आहे. या मासिकात आजही स्त्रियांची नग्न छायाचित्रे छापली जात असली तरी ती जास्त पानांवर छापली जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
वसंत ऋतू म्हणजे जेव्हा जगाला त्याच्या हिवाळी झोप्यातून झोपावे लागते. झाडं आणि झाडे फुले सुरवात होतात, आणि पक्षी आणि मधमाश्या ते करतात. या हंगामात कलाकार, कवी आणि संगीतकार यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. काही गायक एक वसंत ऋतु सकाळी तपशील शांत आत्मा शोधू. इतर नवीन प्रेमाची आणि नवीन आयुष्याची अभिवचन मनावतात जी हंगाम प्रेरणा देतात. आपल्याकडे आवडते वसंत ऋतुचरण आहे? वसंत ऋतू बद्दल या 10 उत्कृष्ट गीतांची सूची आहे का ते शोधा. लव्हिन 'चमचाः' डेड्रीम '(1 9 66) लव्हिन 'स्पूनुंगच्या एका सुंदर दिवसाची ऑडेस् हे मूळचे' बेबी लव्ह 'या सुपरस्ट्रीम क्लासिकच्या पुनर्रचनासाठी गट सदस्या जॉन सेबास्टियन यांच्या प्रयत्नांशी संबंधित होते. 1 9 60 च्या दशकाच्या पूर्वार्धात लव्हिन 'स्पूनझुनने लोक-पॉप संगीत आणले. गट सदस्यांनी त्यांच्या गीते "चांगले वेळ संगीत" म्हणून संबोधले. 1 9 65 साली त्यांनी "ड्यू द ब्रेट इन इन मॅजिक? " सह प्रथम पॉप 10 वर त्यानंतर 1 9 66 पासून "डेसम्री" आणि "स्यूदर इन द सिटी" या क्रमांकाचा "सिंगल इन द सिटी" यातील सर्वात मोठा हिट असलेल्या "डेड्रीम" या सहा सलग टॉप टॉप 10 स्मॅशसह पदार्पण केले. "डेड्रीम" पॉल मेकार्टनी बीटल्सचे गाणे "शुभ दिवस सुर्यप्रकाश" लिहणे. "डेड्रीम" हे गटाचे दुसरे अल्बमचे शीर्षक कट देखील होते. अल्बम चार्टवरील शीर्ष 10 पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे एकमेव अल्बम होते. सायमन आणि गारफंकेलः 'द 59 वी स्ट्रीट ब्रिज सॉंग' (1 9 66) एड कोच क्वीन्सबोरो ब्रिज या नावाने ओळखले जाणारे 59 वी स्ट्रीट ब्रिज, न्यूयॉर्क शहरातील मॅनहट्टन आणि क्वीन्सच्या बोंसला जोडते. हे गाणे आपल्या सभोवतालच्या जगाला विश्रांती आणि आनंदाने प्रोत्साहित करते, "धीमा, आपण खूप वेगाने पुढे जा. " गाणे प्रथम सायमन अँड गारफंकेलच्या 1 9 66 च्या अल्बम "अजमोदा (पर्सले), सेज, रोझमेरी आणि थायमई" वर दिसले. त्याची लोकप्रियता असूनही, दोघांनीही एकाच म्हणून सोडले नाही. पॉप ग्रुप हार्पेस बिझरे यांनी 1 9 67 मध्ये आपल्या कव्हरेज आवृत्तीचे प्रकाशन केले व "द 59 व्या स्ट्रीट ब्रिज सॉंग" (फेलिन 'ग्रूव्ही) "हा त्यांचा पहिला पॉप हिट नंबर 13 वर घेतला. जाझ समूहचे दोन सदस्य डेव्ह ब्रबेक क्वार्टेट सायमन आणि गारफंकेल आवृत्तीवर दिसतातः ड्रमर ज्यो मोरेलो आणि बास प्लेयर इउजीन राइट. "59 व्या स्ट्रीट ब्रिज सॉंग (Feelin 'Groovy)" नावाच्या वाङ्मयीन भाषणासाठी निर्मात्यांना दावा केल्याबद्दल सायमनच्या शनिवारी-सकाळच्या टीव्ही शो "एचआर पफस्टनस्ट" या थीम गाण्याचे गीत गीत पॉल सायमनला मिळाले. ह्यू मसाकेलाः 'ग्रझिंग इन द गॉस' (1 9 68) लोक संगीतकार ब्रुस लांगहॉर्न यांनी रेकॉर्डवर गिटार वाजविले. त्यांनी बॉब डायलानच्या कल्पित गीता "मिस्टर डफ ओरिन मॅन" ची प्रेरणा दिली. 1 9 6 9 मध्ये आरएंडबी गायन गट फ्रेंड ऑफ डिस्टिनक्शन्सने ग्रॅजिंग इन द ग्रेस या ग्रुप सदस्याच्या हॅरी एलस्टन यांनी लिहिलेल्या गीतांचे कव्हर रिलीज केले. पॉप सिंगल्सच्या चार्टवर क्रमांक 3 वर आणि आर अँड बीमध्ये नं. यू 2: 'सुंदर डे' (2000) U2 च्या मते, त्यांच्या उत्साही गाण्याचे "सुंदर दिवस" एक गाणे म्हणून आले "नेहमी. " जेव्हा प्रमुख गायक बोनो गीतांमध्ये "सुंदर दिवस" आले तेव्हा, गाणे त्याचे वर्तमान स्वरुप घेण्यास सुरुवात केली. "सुंदर डे" बँडच्या मागे आपल्या मूळ रॉक ध्वनिच्या मागे एक अल्बम "ऑल व्हॅट तुम्ही यू टू रिच विथ विथ आइड" वर होता. अमेरिकेतील बिलबोर्ड हॉट 100 वर गाणे 21 व्या स्थानी पोचले, तर पर्यायी आणि प्रौढ पॉप रेडिओ चार्टमध्ये वरच्या 10 पर्यंत पोहोचले. लंडनमधील लाइव्ह 8 मैफिलीत आणि न्यू ऑरेलन्स सुपरडोम येथे झालेल्या चक्रीवादळ कॅटरिना शोमध्ये सुरेख लाइव्ह परफॉर्मन्ससह त्याचे वारसा बंद करण्यात आला. "सुंदर डे" ने तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले, ज्यामध्ये "रेकॉर्ड ऑफ दी इयर" आणि "सॉन्ड ऑफ दी इयर" यांचा समावेश आहे. रोलिंग स्टोनने 2000 ते 200 9 या दशकातील दहा सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणे सूचीबद्ध केले. "सुंदर दिन" "अमेरिकन आइडल" विजेता ली डीयवेझ साठी 2010 मध्ये पहिल्यांदा निवडला गेला. अँडी ग्रामरः 'आपले दि डोक ठेवा' (2011) गायक-गीतकार एंडी ग्रामर त्यांच्या गाण्यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध आहे. "आपले जागृत ठेवा" जीवनातील आव्हानांच्या तोंडाने सकारात्मक राहण्यासाठी स्पष्ट प्रोत्साहनातून स्पष्ट केले आहे. अँडी ग्रामरने हॉलीवूड रिपोर्टरला सांगितले, "माझा अंतिम ध्येय प्रत्यक्ष असल्याचे सिद्ध करणे आहे. मी लिहित असताना मी दुःखीपेक्षा अधिक आनंदी असतो. " प्रौढ पॉप रेडओ चार्टवर क्रमांक 5 वर उडी मारणारा "आपल्या डोक्यावर ठेवा" आपल्या स्वतः च्या नामांकीत पदार्पण अल्बमवर दिसून येतो आणि तो राष्ट्रीय चार्टमध्ये तोडला. मांजर स्टीव्हन्सः 'मॉर्निंग हैज ब्रोकन' (1 9 72) "मॉर्निंग हैज़ ब्रोकन" हे पहिले 1 9 31 साली एका नवीन दिवशी भेटवस्तू म्हणून ख्रिश्चन भजन म्हणून प्रकाशित झाले. हे शब्द "बॉनसेन" असे नामांकित गल्लीतील संगीतबद्ध केले आहेत आणि हे शब्द एलेनोर फारजीवन यांनी लिहिलेले आहेत, जो सुप्रसिद्ध मुलांच्या लेखक होत्या. गाडीचा कॅट स्टीव्हन्सचा रेकॉर्डिंग काढण्यासाठी पियानोची व्यवस्था रिक वकामन यांच्याद्वारे केली जाते, जी प्रगतीशील रॉक बँड ह्यांचे त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. 1 9 72 साली "मॉर्निंग हैज ब्रोकन 'या सिनेमाद्वारे रिमेझ केल्या. कॅट स्टीव्हन्सने अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे टॉप 10 आणि आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठे पॉप हिटचे सहावे स्थान पटकावले. तो प्रौढ समकालीन चार्ट वर क्रमांक 1 वर गेला. गाणे "टीझर अँड द फायरकॅट" या अल्बमवर समाविष्ट आहे, ज्यामध्ये "पिस ट्रेन" नावाचा टॉप 10 हिट आहे. पट्टी लाबेलेः 'न्यू एटिट्यूड' (1 9 85) 1 9 76 मध्ये यशस्वी महिला आरएंडबी त्रिकले लेबलेच्या फेरबदलानंतर, पट्टी लेबलेला एकट्या एकट्या करिअरला उडी मारण्यास कठीण झाले. बर्याच गाणी आर अँडबीच्या चार्ट्सवर पोहचली, परंतु कोणीही 26 तारखेपेक्षा 1 9 82 पर्यंत चढला नाही. त्या वर्षी, "बेस्ट इज अब आऊट आऊट" ही एक वर्षाची पुस्तके असलेली आर अँड बी टॉप 20 मध्ये उभी होती. त्यानंतर 11 व्या आर एंड बी स्मॅश "केवळ जर तुम्हाला माहीत असेल तर. " एडी मर्फी चित्रपटाच्या उत्पादकांनी "बेव्हरली हिल्स कॉप" साउंडट्रॅक एकत्रित करत असताना, त्यांनी दोन गाणी रेकॉर्ड करण्यासाठी पट्टी लाबेलेला विचारले. एक "नवीन वृत्ती" जीवनासाठी नवीन दृष्टिकोनाने धडपडणारी गाढव होती. तो एक स्मॅश होता आणि एक एकल कलाकार म्हणून प्रथमच साठी पॉप टॉप 20 मध्ये Patti LaBelle आणले बेस्ट फिमेल आर अँड बी वोकलसाठी तिने ग्रॅमी ऍवॉर्डसाठी नामांकन मिळवले. स्मॅश मुथः 'ऑल स्टार' (1 999) सन 1 99 7 साली रॉक बँड स्स्मास मुथ पॉप चार्ट्समध्ये मोडला. त्यांच्या दुसर्या अल्बम "एस्ट्रो लाउंज" वरून पाठपुरावा करून "ऑल स्टार" हा चित्रपट 1 999 मध्ये पॉप चार्टवर क्रमांक 4 वर गेला. हा जीवनाचा एक उत्साही दृष्टिकोन आहे. असंख्य संगीत व्हिडीओमध्ये विलियम एच. मॅसी, बेन स्टिलर, आणि जेनाए गोरोफालो यांनी अभिनय केला "मिस्टरी मेन" या चित्रपटातील कलाकारांच्या श्रेणीतून आले आहे. स्मॅश मुथचे आणखी एक मोठे पॉप हिट "मग द मॉर्निंग कॉमेस" होते, जे बिलबोर्ड हॉट 100 वर क्रमांक 11 वर उमटत होता आणि प्रौढ पॉप रेडिओवर क्रमांक 2 वर सर्व मार्गाने जात होता. अमेरिकन लेखकः 'बेस्ट डे ऑफ माय लाइफ' (2014) पॉप-रॉक ग्रुप अमेरिकन लेखकांचे सदस्य बोस्टनच्या प्रतिष्ठित बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक येथे विद्यार्थी म्हणून भेटले. पॉप मायक्रोसॉफ्टच्या "बेस्ट डे ऑफ माई लाईफ" या पॉप अपहृताने आपल्या उत्साहवर्धक गीते आणि बेंझो परिचय साठी उल्लेखनीय आहे. 2014 मध्ये मुख्य प्रवाहात पॉप ओलांडण्याआधी प्रथम 2013 मध्ये रॉक आणि प्रौढ पॉप रेडिओवर त्याचा पाठिंबा मिळाला होता. अखेरीस "बेस्ट डे ऑफ माई लाइफ" प्रौढ पॉप रेडओ चार्टमध्ये सर्वात वर आला आणि मुख्य प्रवाहात पॉप रेडओ चार्टवर क्रमांक 4 वर गेला. "सर्वोत्कृष्ट दिवस ऑफ माय लाइफ" दूरदर्शन क्रीडा कव्हरेज आणि जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला गेला. डायरियो जीः 'सांच्यूमे' (1 99 8) "स्यूच्यम" 1 99 7 मध्ये डारियो जी द्वारा प्रथम एकल म्हणून प्रसिद्ध करण्यात आले, ब्रिटिश संगीतकार पॉल स्पेन्सरचे स्टेज नाव. ड्रीम अॅकेडमीच्या हिट सिंगल "लाइफ इन अ नॉर्दर्न टाउन" मधील नमुना वापरणे हे लक्षणीय आहे. गाणे हळूहळू एक सकाळी सूर्योदय च्या अनुकरण मध्ये बिल्ड. तो यूएस मधील नृत्य चार्ट क्रमांक 1 वर आला, यूके मधील नंबर 2 पॉप, आणि जगभरातील एक टॉप 10 पॉप स्मॅश होता. Dario जी मूलतः एक त्रिकूट होते गट प्रथम Dario म्हणतात, परंतु त्यांनी समान नावाने दुसर्या कलाकार द्वारे खटला सह धमकी केल्यानंतर त्यांच्या नाव बदलले 1 99 8 मध्ये रिलीझ झालेल्या "डेमोक्रॅटिक" अल्बमची "सूनमॅमे" हा "सनमाचिन" वर समाविष्ट करण्यात आली.
पुणे : 'देशभरातील युवक आज रस्त्यावर उतरून फॅसिझमवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. हा विरोधकांचा ड्रामा नसून युवकच स्वतःहून पुढे आले आहेत. यामाध्यमातून युवकांनी देशातील भितीच्या वातावरणाला प्रत्युत्तर दिले आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्या अरूणा रॉय यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला तरूणाईकडून होत असलेल्या विरोधाचे समर्थन केले. तसेच केंद्र शासनाने हा कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती अधिकारात मागविलेली माहिती दिली नाही, असेही त्यांनी सांगितले. अरूणा रॉय यांच्या 'द आरटीआय स्टोरी' या पुस्तकाच्या 'कहाणी माहिती अधिकाराची' या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. याप्रसंगी रॉय व त्यांचे सहकारी निखील डे यांच्याशी अभिनेत्री वीणा जामकर हिने संवाद साधला. तत्पुर्वी, 'दलपतसिंग येती गावा' या माहिती अधिकारावर आधारीत नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे, मकरंद साठे यांच्यासह राजकुमार तांगडे, वीणा जामकर, अश्विनी भालेकर व सभाजी तांगडे यांनी या नाटकाविषयीचे अनुभव सांगितले. नाटकाची निर्मिती प्रक्रिया व नाट्य संहितेवरील पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. साधना प्रकाशनचे संपादक विनोद शिरसाट यावेळी उपस्थित होते. अवधूत डोंगरे यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. रॉय म्हणाल्या, सध्या अर्बन, बुध्दीवादी, न्याय, नागरिक, समानता हे शब्द उच्चारण्यास नको वाटते. कारण त्यापुढे लगेच नक्षली, डावे, पाकिस्तानी, दहशतवादी असे शब्द जोडले जात आहेत. देशातील अव्यवस्थेला असे विचार समोर आणतात. गोरक्षकांकडून झुंडशाही करून लोकांना मारले जात आहे. सर्व नीतीमुल्ये पायदळी तुडविली जात आहेत. त्यामुळे आज पुन्हा अहिंसा या विचारांकडे जाण्याची गरज वाटते. युवकांनी आशावाद निर्माण केला असून तो सोडता कामा नये. लोकांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करायला हवे. सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदानासारखे प्रयोग करायला हवेत. 'आरटीआय' हा कायदा लोकशाही, संविधानाचा उत्सव आहे. मानवी हक्क अबाधित ठेवण्यासाठी या कायद्याचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. आरटीआय हे एक जनआंदोलन असून सरकार जाब विचारण्यासाठी लोकांच्या हातातील हत्यार आहे. न्यायव्यवस्थाही सरकारच्या पुढे झुकते. कलम ३७०, काश्मीर स्थिती, जेएनयु, सीएए याबाबत न्यायालयाने ऐकूनही घेतले नाही. त्यामुळे आपण न्यायव्यवस्थेवरही अवलंबून राहू शकत नाही, असे डे यांनी नमुद केले. कायदे हे कोणत्याही गुन्हांवर आळा घालण्यासाठी असतात. पण मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यावर हे गुन्हे थांबत नाहीत. सूड आणि न्यायात फरक असून, मृत्यूदंड हे गुन्ह्यांना आळा घालण्याचे उत्तर नाही, असे स्पष्ट करत अरुणा रॉय यांनी फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शविला. देशात हिंसेची विकृती वाढत असल्याने पुन्हा असिंहा देशाच्या केंद्रस्थानी असायला हवी. नथुराम गोडसेचे आज मंदिर उभारले जात आहे. मग कोण जिंकले आणि कोण हरले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये अनेक वेगळ्या जॉब्स आहेत. हरकत नाही आपण मालक काय, मालक पासून डिशवॉशर करण्यासाठी शिजविणे , ते एक रेस्टॉरंट धावा smoothly करणे सर्व महत्वाचे आहेत. रेस्टॉरन्ट मालकास स्वतःच सर्व काही करू इच्छितात, ते स्वयंपाक पासून विपणन व बुकखोपिंगमध्ये दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी. तथापि, सर्व काही करण्याचा प्रयत्न करणे, वित्तीय चिंतेचा विषय असो किंवा फक्त असेच वाटत नाही की कोणीही "योग्य" करू शकेल आणि आपल्याला आणि कदाचित आपला व्यवसाय जमिनीवर पटकन धावेल. हे प्रमुख शेफ आहे तो माणूस (किंवा मुलगी) आहे जो विशेष तयार करतो, पदार्थांचे आदेश देतो आणि स्वयंपाकघरच्या महाव्यवस्थापक म्हणून काम करतो. तो कदाचित शेड्युलिंग, भर्ती आणि स्वयंपाकघर कर्मचाऱ्यांच्या गोळीबांधणीही करतो. कार्यकारी मुख्य आचारी स्थितीसाठी एक चांगले उमेदवार साधारणपणे कित्येक वर्ष स्वयंपाक अनुभव आणि रेस्टॉरंट व्यवस्थापन अनुभव असलेल्या कोणीतरी भरले आहे. रेस्टॉरंट व्यवस्थापकांना रेस्टॉरंट चालवण्याच्या दैनंदिन व्यवसायात अनेक जबाबदाऱ्या असतात. एक रेस्टॉरंट मॅनेजर असण्याची पात्रता मूलभूत माहिती जसे की लोक कौशल्ये आणि संस्था. तथापि, एका रेस्टॉरंटच्या आकारानुसार आणि संकल्पनेवर आधारित, उमेदवारांना व्यवसाय किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये पदवी आवश्यक असू शकते. रेस्टॉरंट सर्व्हर आपल्या रेस्टॉरन्टसाठी ग्राहक सेवा प्रतिनिधी आहे एक चांगला रेस्टॉरन्ट सर्व्हर कोणत्याही ग्राहकाला नियमितमध्ये रुपांतरीत करू शकते, परंतु खराब सर्व्हर अगदी सहजपणे ग्राहकांना सहजपणे बंद करू शकते. रेस्टॉरंट सर्व्हर जॉबच्या वर्णनात फक्त अन्न पुरविण्यापुर्वी विविध कर्तव्ये समाविष्ट होऊ शकतात. बारटेंडर हा घराच्या कर्मचार्यांच्या समोरचा सर्वात वरचा भाग आहे. रेस्टॉरन्टच्या प्रकारावर अवलंबून, बारटेन्डर आपल्या टेबल्स (सेवा बार) साठी तसेच इतर सर्व ग्राहकांना पट्टीवर खाण्यास निवडण्यासाठी सेवा देण्यास जबाबदार असू शकतात. एक रेस्टॉरंट होस्ट सामान्य नोकरी पूर्ण, स्वागत आहे, आणि सीट ग्राहकांना आहे. म्हणून बर्याच रेस्टॉरंट अनुभवाशिवाय कोणीतरी उत्कृष्ट प्रवेश-पातळीची नोकरी आहे (किंवा कोणतेही). व्यस्त मंडळाचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी मेजवानी मैत्रीपूर्ण आणि विनम्र असावी तसेच एकत्रित आणि आरामदायक मल्टी-टास्किंग असावी. सामान्यतः एंट्री लेव्हलची स्थिती, सर्व रेस्टॉरन्टमध्ये डिशवॉशर सर्वात कमी दर्जाचे स्थान असते. वॉशिंग वॉशर्सच्या स्पष्ट पलीकडे, इतर कर्तव्यात वॉशिंग मार्श, बाथरूमचे साफसफाई आणि इतर लहान देखभाल कामे यांचा समावेश आहे. डिशवॉशिंग हे बहुतेक लोकांच्या स्वप्नातील नोकरी नसले तरी ते सर्वात महत्वाचे आहे- सर्वसाधारणपणे, डिशवॉशर त्यांच्या शिफ्टसाठी दर्शवत नसल्यास, व्यस्त रात्री आपल्या रेस्टॉरंटमध्ये पीस करण्याचे थांबविले जाऊ शकते. रेस्टॉरंट चालवण्याच्या बर्याच भागांप्रमाणे, मालक बुककीपर किंवा अकाउंटंट म्हणून काम करू शकतो. या प्रत्येक नोकर्यामधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे एक बुककीपर वित्तीय व्यवहारांची नोंद करतो, जसे की दैनिक बँक ठेवी आणि पे रोल चेक जारी करणे. एका अकाऊंटंटने त्या व्यवहाराचे विश्लेषण केले आहे, जसे की नफा व तोटा विवरण तयार करणे आणि वार्षिक कर तयार करणे. बहीणपात्र भाड्याने घेण्याचा निर्णय घेताना किंवा ते स्वतः ला करण्याचा प्रयत्न करताना वेळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. मालक म्हणून, आपल्याकडे आधीपासून कधीही नसणारे कार्यरत सूची आहे आपल्या दैनंदिन अर्थ व्यवस्थापनाच्या वेळेस आपण समर्पित नसल्यास, आपल्याला कामावर घेण्यावर विचार करा, कारण पैशाचा हा भाग आपण दुर्लक्ष करू इच्छित नाही. बहीखाणेसह आपल्या सोईचे स्तर महत्त्वाचे आहेत. आपल्याजवळ वित्तपुरवयात अगोदर अनुभव नसल्यास, रेस्टॉरंट ऑपरेशनची जटिलता ट्रॅक करणे कठीण असू शकते. दररोज साफसफाईसह फ्रीजर पासून श्रेणीपर्यंत चालत असलेल्या सर्व कूलरपर्यंत, रेस्टॉरंटमध्ये तोडण्यासाठी बरेच उपकरणे उपलब्ध आहेत. बहीखाणे प्रमाणे, दैनंदिन देखरेखी एक नोकरी असू शकते जे आपण स्वतः ला करू इच्छित आहात. हे आपण किती सुलभ, आपल्या रेस्टॉरंटचे आकार आणि आपण इतर कोणत्या कर्तव्यांची पूर्तता करतो यावर अवलंबून आहे. जेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी विघटन होत असते तेव्हा सुधारकाने फोन करण्यापेक्षा आपल्या कर्मचार्यांना पूर्ण वेळची देखरेख / स्वच्छता ठेवण्यासाठी स्वस्त ठेवा.
सोलापूर 18 मार्च : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांची एकजीव संस्कृती असलेलं शहर अशी सोलापूरची ओळख आहे. मराठी, कानडी आणि तेलुगु भाषिक नागरिकांप्रमाणेच विविध जाती धर्माचे नागरिक सोलापूरमध्ये सामावले आहेत. त्यांच्या विविध खाद्यपदार्थामुळे सोलापूरची खाद्यसंस्कृती श्रीमंत झालीय. येथील काळे मसाले चांगलेच फेमस आहेत. अगदी व्हेज भाजीत मसाले टाकले तर त्याला नॉनव्हेजच्या भाजीप्रमाणे चव येते. सोलापूरमध्ये सध्या भावसार कुटुंबीयांची आई हिंगोलीआंबिका भावसार खानवळ चांगलीच गाजत आहेत. किसन गर्जे हे या खानावळीचे मालक आहेत. त्यांनी सुरूवातीला कन्ना चौकात छोट्याशा गाडीवर नॉनव्हेजमधील विविध पदार्थांचा स्टॉल टाकला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद लक्षात घेऊनच त्यांनी खानावळ सुरू केली. Pandharpur: विठूरायाचा थकवटा दूर करणार, आज पंढरीत प्रक्षाळ पूजा; देवाचा पलंग पुन्हा बसवणार! Breaking news : सोलापुरात भाजपला खिंडार; केसीआर यांचा दौरा सुफळ संपूर्ण! Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट! भावसार खानववळीमधील मटन जिगरी, मटन कलेजी, मटन मसाला, सुके मटन, खिमा उंडे आणि मेथी खिमा हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. स्वच्छ आणि ताजे मटन तसंच विशिष्ट प्रकारचे घरगुती काळे तिखट वापरुन इथं हे सर्व पदार्थ केले जातात. त्याचबरोबर ग्राहकांना सोलापूरची ओळख असलेली कडक भाकरीही देण्यात येते. गर्जे यांनी लॉकडाऊननंतर हा व्यवसाय सुरू केला. घरातील सर्वच व्यक्ती या खानावळीत काम करतात. गर्जे यांच्या पत्नी येथील विशेष डिश बनवतात. सोलापूरचे स्पेशल काळ्या तिखटातील मटन खाण्याची तुमची इच्छा असेल तर भावसार खानावळ नक्की ट्राय करा. इथं तुम्हाला मटन थाळी आणि स्पेशल मटन थाळीचा मनमुराद आनंद घेता येईल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पळसदेव - पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते भिगवणदरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय करणारे हॉटेल मालक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिक दारू पिऊन रस्त्यावर गाडी चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण यादरम्यान मोठ्या संख्येने वाढले आहेत. भिगवण ते इंदापूरदरम्यान उजनी धरणातील प्रसिद्ध मासे मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला विना परवाना हॉटेल व्यवसाय थाटले आहेत. या माशाबरोबरच हे हॉटेल मालक नागरिकांना अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. परिणामी यादरम्यानच्या गावातील नागरिक दारू पिऊन तर्रर्र होत आहेत. अनेकदा मुख्य रस्त्यावरच अथवा सेवा रस्त्यावरच पडलेले दिसत आहेत. लोणी देवकर, काळेवाडी, बिजवडी, डाळज, पळसदेव गावाच्या हद्दीत अनेकदा सेवा रस्त्यावर दारू पिऊन नागरिक झोपलेले दिसत आहेत. दारू पिऊन अनेकांनी या रस्त्यावर जीव गमावला आहे. मात्र तरीही हा प्रकार सुरूच आहे. हॉटेल मालक आर्थिक लाभापोटी अवैधरित्या दारू विकून समाजातील सर्वसामान्य नागरिकांची कुटुंब उद्ध्वस्त करीत आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्वच गावांत स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस पाटील नियुक्त आहेत. तरी देखील अवैध दारू विक्री सुरूच आहे. अवैध कामाची माहिती पोलीस पाटील संबधित पोलीस स्टेशनला देत नाहीत का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. तरी तातडीने महामार्गालगत असलेल्या हॉटेलवरील दारू विक्री बंद करावी, महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शेतकरी कर्जमाफी बाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं 'मोठं' विधान ! मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 20 दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. कर्जमाफीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीला घेऊन मोठं विधान केलं आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "शेतकऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आधीच्या सरकारनं 60 पेक्षा जास्त कॉलम असणारा अर्ज भरून घेतला होता. मात्र अशा काही अटी व शर्ती नाहीत त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसेल" असं चव्हाणांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या हेतून सरकारानं पूर्ण तयारी केल्याचंही बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. यानंतर आता राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आलं आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्ण राज्याचं लक्ष शेतकरी कर्जमाफीकडे लागलं आहे. - कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी 'या' ७ घरगुती टिप्स !
वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी 'लेटलतीफ' ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९. ३० वाजताच कार्यालयात 'दस्तक' दिली. सोमवारी 'लोकमत'ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९. ३५ वाजता 'लोकमत' च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. वणी : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचा आठवडा संपल्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतर सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळी म्हणजे ९. ४५ वाजता कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. परंतु वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी 'लेटलतीफ' ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९. ३० वाजताच कार्यालयात 'दस्तक' दिली. सोमवारी 'लोकमत'ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९. ३५ वाजता 'लोकमत' च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. तहसीलच्या प्रत्येकच विभागात एक, दोन कर्मचारी फाईली हुसकत तर काही कर्मचारी मोबाईलमध्ये गुंतून असल्याचे दिसून आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एसडीओ डॉ. शरद जावळे यांच्यासह त्यांचे काही कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. १० वाजतानंतर वणी तहसील कार्यालयात एकेकाने कर्मचाऱ्यांचे आगमन होत होते. मस्टरवर स्वाक्षरी करून काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयाबाहेर पडताना दिसले. वणीतील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती आमने-सामने आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांची दररोजच मोठी गर्दी पहायला मिळते. वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर हे स्वतः ९. ३० वाजता कार्यालयात येऊन बसले. परंतु ठरवून दिलेल्या वेळेत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होते. येथील दोन कनिष्ठ अभियंते १० वाजतानंतरही कार्यालयात पोहचले नव्हते. तसेच लेखा विभागातील दोन कर्मचारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, दोन लिपीकांना पहिल्याच दिवशी लेटमार्क मिळाला. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी सांगितले. दोन दिवसांच्या सलग सुट्या उपभोगल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी वणी तहसील कार्यालयात उशिरा पोहचणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना तहसीलदार श्याम धनमने यांनी नोटीस बजावली. यात चार अव्वल कारकून व आठ कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे. येथील तहसील कार्यालया १० अव्वल कारकून व १६ कनिष्ठ लिपीक आहेत.
रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदाफाटा : रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात कापणीसाठी आलेला गहू पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत नसले तरी फळधारणा होत असलेला गहू पाण्याने जमीनीवर झोपला आहे. तर हरभरा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे रबी हंगामाची आशा धरुन असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसाने निराश केले. कोरपना तालुक्यात अनेकांनी गहू पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी करुन शेतातच ढिग करून ठेवले मात्र तेही भिजले आहे. आवारपूर, नांदा, बिबी, पिंपळगाव, हिरापूर आदी गाव शिवारातील उभे गहू पीक जमीनीवर पडल्याने पीक भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे गेल्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई, खरीपात बसलेला फटका आणि आता रबीतही पिकाची अवस्था बेकार असल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. गहू पिकाचा उत्पादन खर्च १ एकरसाठी साधारणतः सात ते आठ हजार रुपये आहे. यातच १५०० ते १८०० रुपयापेक्षा अधिक भाव या पिकाला मिळत नाही. त्यामुळे शेतात कष्ट करुन हाती मात्र काहीच येत नसल्याचे शेतकरी सांगतात. यालाच पर्याय म्हणून शेतकरी हरभरा पिकाची लागवड केली आहे. मात्र पावसाने येणारे फुलोर गळला तर कुठे घाटे जमिनीवर पडल्याचेही चित्र दिसून येत आहे. कापूस पीक हातून गेल्यानंतर रबी पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर कुणी उसणवारी पैसे मागून शेती साहित्याची खरेदी केली. परंतु निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतातून उत्पादन निघाल्यानंतर बाजारात पिकाचे भाव कमालीचे घसरतात. हीच परिस्थिी 'अच्छे दिन' म्हणणाऱ्या शासनाच्या काळातही कायम असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहे. अनेक गावात शेती नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश संबंधीत अधिकारी व कार्यालयांना दिले आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच पाहणी करीत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मद्दतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. (वार्ताहर) पावसाने पडलेला गहू पुन्हा फळधारणेस सक्षम राहत नाही. तो भुईसपाट होतो. त्यामुळे पुन्हा उत्पादन घेता येण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करीत गहू पिकाची पेरणी केली. परंतु, उत्पादन घरी येण्याआधीच पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील पिकांचे फार मोठे नुकसान झालेले नाही. पिकांची पाहणी करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील कृषी सेवकाला पाहणीसाठी पाढवून नुकसान आढळून आल्यास मदतीसाठी पाठपुरावा करणार.
दारुसाठी जीव धोक्यात घालून 'त्या ' युवकांनी घेतल्या पाण्यात उडया ! - Parner Darshan\nपोलिस येताच त्यांनी तलावातून काढला पळ.\nउस्मानाबाद : तुळजापूर-लातूर मार्गावरून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन काेल्हापूरकडे निघालेल्या एका ट्रकला सोमवारी पहाटे अपघात झाला.तुळजापूरजवळील पाचुंदा तलावानजीक येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तलावात उलटला.यानंतर, काही तरुणांनी जीव धोक्यात घालत पाण्यात उतरून मद्याचे बॉक्स पळविले. लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील लुटालूट टळली.\nपोलीस निरीक्षक, तुळजापूर.\nआम्ही प्रत्येकजण शेतकरीच आहोत !
Crime News : जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या व्यक्तीने त्याला लुटलं. शेवटी तरूणाला ऑटो आणि नंतर मेट्रोने प्रवास करत दिल्लीतील घरी पोहोचावं लागलं. Crime News : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एक अजब घटना समोर आली आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-टू मध्ये राहणाऱ्या एका तरूणाला अनोळखी व्यक्तीसोबत दारू पिणं चांगलंच महागात पडलं. शुक्रवारी काम केल्यानंतर सायंकाळी कामाहून परत येत असताना तो गुरुग्राममध्ये दारू पिण्यासाठी गेला. पण जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या व्यक्तीने त्याला लुटलं. शेवटी तरूणाला ऑटो आणि नंतर मेट्रोने प्रवास करत दिल्लीतील घरी पोहोचावं लागलं. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-टू मध्ये राहणारा अमित प्रकाश याने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितलं की, तो गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोड येथील एका कंपनीत काम करतो. तिथे त्याने ऑफिस संपल्यावर एका अनोळखी व्यक्तीसोबत दारू प्यायली होती. त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून तो सुभाष चौकात आपल्या कारमधून उतरला होता. नशेत असल्याने त्याला हे लक्षात राहिलं नाही की, ही त्याची स्वतःची कार आहे. अमित प्रकाशनुसार तिथे उतरल्यानंर ऑटोने तो मेट्रो स्टेशनला गेला आणि मेट्रोने घरी पोहोचला. कारसोबत त्याचा लॅपटॉप, मोबाइल आणि 18 हजार रूपये कॅश गायब आहे. पोलिसांनी अमित प्रकाशच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. प्रकाशने पोलिसांना सांगितलं की, तो दारू पिण्यासाठी अहातामध्ये गेला होता. अहाता गोल्फ कोर्स रोडवर लेकफॉरेस्ट वाइन शॉपजवळ आहे. नशेच्या स्थितीत एका वाइनसाठी मी 20 हजार रूपये दिले होते. पण ती बॉटल केवळ 2 हजार रूपयांची आहे. नंतर मालकाने मल 18 हजार रूपये परत केले. त्यानंतर कारमध्ये बसून मी दारू पित होतो. तेव्हाच एक अनोळखी व्यक्ती आली आणि सोबत बसून पिण्याचं बोलला. मी त्याला ऑफर केलं तर कारमध्ये बसला. मी त्याला काही ड्रिंक्स दिले. प्रकाशने तक्रारीत सांगितलं की, त्यानंतर तो कार चालवत सुभाष चौकमध्ये पोहोचला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कारमधून उतरला. मला आठवत नव्हतं की, ही माझीच कार आहे. त्यानंतर मी ऑटोने हुडा सिटी सेंटर पोहोचला. घरी पोहोचल्यावर मला माझ्यासोबत काय झालं हे समजलं. पोलीस म्हणाले की, पीडित तरूणाला त्या अनोळखी व्यक्तीबाबत फार जास्त काही आठवत नाहीये. आम्ही गुन्हा नोंदवून घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जात आहे.
(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला मध्ये, मुले लक्ष्यित आणखी एक पीडित आहे. आम्ही बालविवाहाची उत्पत्ती आणि मुद्द्यांचा अन्वेषण करतो. कित्येक शतकांपासून बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. अल्पवयीन मुलांना वैवाहिक युनियनमध्ये आणण्याचा समाजात एक आदर्श झाला होता. तरीही, बहुतेक बालविवाह हे नववधू आणि वृद्ध पुरुष यांच्यात होते. बालविवाहाची परंपरा भारतात अस्तित्त्वात असलेल्या अनेक प्रकारची भेदभाव प्रकट करते. पुरुषप्रधान लैंगिक असमानता, स्त्रियांवरील लैंगिक आक्षेप आणि मानवी हक्क नाकारण्यापासून. आम्ही आधुनिक काळातील समाजातील भारतातील बालविवाहाचे मूळ आणि त्यावरील निषिद्ध, समस्याप्रधान स्थितीचा अन्वेषण करतो. शतकांपासून बालविवाहाची प्रथा भारतीय समाजातील एक भाग आहे. ही प्रथा मध्ययुगीन काळात परत जाऊ शकते. त्यानंतर भारतभर विकास व प्रगती असूनही बालविवाह कायम आहेत. बर्याच लोकांसाठी बाल विवाह हा सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये ही भारतीय समाजाची महत्त्वपूर्ण परंपरा आहे. बर्याच विधींमध्ये अनेक गट आणि जमातींच्या जीवनशैलीत महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशाप्रकारे, बालविवाह हे सर्वसाधारणपणे बर्याच व्यक्तींसाठी सर्वसामान्य प्रमाण आहे. अल्पवयीन मुली. विसाव्या शतकाच्या पूर्व व विशेषतः अठरा वर्षाखालील विवाह करणे नेहमीचेच होते. अल्पवयीन असताना विवाह केलेल्या प्रसिद्ध जोडप्यांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा यांचा समावेश आहे. गांधी 30 वर्षांचे होते, तर त्यांची पत्नी केवळ 14 वर्षांची होती. वधू आणि वर यांच्यात वयातील अंतर असणे सामान्य गोष्ट होती. बहुतेक वेळेस ती एक बाल वधू असते, अनेक वर्षांपासून तिचे वरिष्ठ असलेल्या पुरुषाशी लग्न केले जाते. वयाचे अंतर तथापि सुरुवातीला एक प्रकरण म्हणून पाहिले गेले नव्हते आणि संपूर्ण इतिहासात ते मान्य केले गेले. ही प्रथा अजूनही बर्याच ठिकाणी पसरली आहे. उदाहरणार्थ, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल ही अशी काही भारतीय राज्ये आहेत ज्यात मोठ्या वयातही बालविवाह होत असतात. निःसंशयपणे, एक तरुण पत्नी 'शुद्ध', कुमारी स्त्रीची इच्छा बाळगून आपल्या कल्पनेवर आधारित आहे. अविवाहित, तरूण स्त्री 'शुद्ध' असल्याची श्रद्धा अद्यापही बर्याच लोकांची अपमानजनक मागणी आहे. वर कितीही म्हातारा असला तरी त्यांना लहान मूल असला तरीही त्यांना त्यांची लहान वधू पाहिजे आहे. यामुळे तारुण्याच्या बायकोचे दीर्घायुष्य वाढते आणि त्यामुळे मुलांचे लैंगिक संबंध वाढतात. बालविवाहामागील स्त्रियांचे लैंगिक अत्याचार हे मुख्य कारण आहे. हे कुटुंबातील पुरुषांद्वारे मुलींवर लैंगिक नियंत्रणामुळे होते. 'कुटुंबाचा सन्मान असणारी महिला' या सांस्कृतिक श्रद्धेमुळे, पुरुष नातेवाईकांनी 'सन्मान' टिकवून ठेवण्यासाठी मुलींच्या लग्नात घाई केली. हे लैंगिक स्वातंत्र्य नाकारत असल्याने हे महिलांशी अन्यायकारक आणि भेदभाव करणारा आहे. हे त्यांच्या निवडी आणि त्यांच्या शरीरावर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जीवन यावर मर्यादित करते. हे दुहेरी मानके आणि लिंग असमानतेचे देखील एक उदाहरण आहे. पुरुषांना समान लैंगिक नियंत्रणाखाली आणले जात नाही किंवा ते 'शुद्ध' राहतील अशी अपेक्षा केली जात नाही. तरीही स्त्री, वयाची पर्वा न करता, कौटुंबिक सन्मान तिच्यावर अवलंबून असल्याने मुक्त होऊ शकत नाही. याचा अर्थ तिच्या आयुष्याच्या विविध पैलूंमध्ये तिला स्वतःचे कोणतेही स्वातंत्र्य नाही. भारतातील बर्याच तरूणींसाठी विवाह हा पुरुषप्रधान अत्याचाराचा एक भाग आहे. लग्नाआधी एक स्त्री तिच्या पतीच्या मालकीची असते. अशा प्रकारे, ती तिच्या वडिलांच्या सन्मानापासून पतीच्या सन्मानासाठी जबाबदार आहे. हे मत 'पाराय्य धन'च्या माध्यमातून समर्थित आहे, अशी अनेक कुटुंबियांची धारणा आहे. 'पराया धन' म्हणजे 'दुसर्याची संपत्ती', म्हणून अशी समजली जाते की ती एक मुलगी, एक स्त्री ही दुसर्याची आहे. पुन्हा, हा एक स्त्री आहे त्याचे स्वतःचे अस्तित्व नाकारण्याचा हा एक प्रकार आहे. ती फक्त इतरांची मालमत्ता मानली जाते. महिलांविषयीच्या या विपरित विचारांमुळे बालविवाहाचे अस्तित्व टिकवून राहिले आहे. वयस्क पुरुषांसह अल्पवयीन मुलींना सतत मान्यता दिल्यामुळे पेडोफिलियाला परवानगी मिळाली आणि प्रोत्साहित केले गेले. हे असुरक्षित मुलांसाठी धोकादायक आहे, केवळ त्यांच्यावरच लैंगिक अत्याचार केले जात नाही तर त्यांच्या निरागसतेचा देखील बळी पडला आहे. म्हणूनच, बालविवाहाची प्रथा केवळ महिलांच्या अत्याचारालाच जोडते. मुले आणि महिलांच्या संरक्षणासाठी सर्वसाधारणपणे बालविवाह रोखण्यासाठी कायदे लागू केले गेले. १ 1929 .२ पासून भारतात बालविवाहांवर बंदी आली. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, ज्याला 'शारदा कायदा' म्हणून देखील ओळखले जाते, ते बदलण्याचे प्रतीक बनले. स्त्रीसाठी लग्नाचे कायदेशीर वय पुरुषांसाठी 18 आणि 21 झाले. याची पर्वा न करता, भारतात अद्याप १ 15 दशलक्षाहूनही अल्पवयीन बालवधू आहेत आणि आकडेवारीत अजूनही वाढ होत आहे. कायद्याची अंमलबजावणी अनेकदा दुर्लक्ष करते किंवा जागरूक असूनही बालविवाह होण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बालविवाह बंधन कायदा ही महिलांनी आयोजित केली होती. यामुळे महिलांनी होणारा सामाजिक सुधारणांचा पहिला बदल ठरला. त्यास बालविवाहाविरूद्ध युक्तिवाद करणारे गांधींचे पाठबळ देखील होते. अल्पवयीन मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हा कायदा होता. तरीही, हे अनेक अल्पवयीन मुलांचे भविष्य बदलू शकले नाही जे बालविवाहाचे निरंतर बळी पडतच राहिले आणि पुढेही. बालविवाह बंधन कायदा संमत झाल्यानंतर काही वर्षानंतर, अल्पवयीन मुलांच्या नववधूंचा दर वाढतच गेला. जनगणनेत 8.5 दशलक्ष ते 12 दशलक्ष अल्पवयीन मुलांची वधारली आहे. यावरून असे दिसून येते की मुलांच्या संरक्षणासाठी कायदे करूनही ते वैवाहिक जीवनात कसे टाकले गेले. अनेक भारतीय राज्यात बेकायदेशीर असूनही बालविवाह हे अगदी आधुनिक काळातही भारतात स्पष्टपणे दिसून येत आहे. बर्याचदा, हे आर्थिक अडचणींमुळे होते ज्यामुळे कुटुंबे त्यांच्या तरुण मुलींना देतात. गरिबीमुळे आणि नोकरीच्या संधीअभावी ते आपल्या मुलांना खायला देऊ शकत नाहीत. इतर वेळी, समाज मुलींना ओझे समजते; कुटुंबावर एक आर्थिक नाली. यामुळे मुलींचे वय काहीही नसले तरी लग्न केले जाते. याचा परिणाम म्हणजे दारिद्र्य असलेल्या कुटुंबांमध्ये बालविवाहाचे प्रमाण सामान्य आहे. मुली आर्थिक अडचणी असल्याच्या दृश्यामुळे ते मुलांच्या आधी लग्न केले जातात. वधू जितकी लहान असेल तिचा हुंडा कमी असेल. यामुळे, गरीब कुटुंबांकरिता बाल विवाह हा एक परवडणारा पर्याय बनला आहे. गरीब प्रदेशातील आणि कुटूंबातील स्त्रियांसाठी शिक्षणाची पातळी कमी आहे. हे लिंग-स्टिरियोटाइप वर सतत विश्वास ठेवण्यामुळे आहे. उदाहरणार्थ, भारतातील बर्याच ग्रामीण भागात त्यांचा असा विश्वास आहे की मुलगा वृद्धावस्थेतच त्यांची काळजी घेईल तर मुलगी दुसर्या कुटूंबाची मालमत्ता आहे. यामुळे ते आपल्या मुलींपेक्षा आपल्या मुलास शिक्षित करण्यासाठी जास्त पैसे आणि वेळ घालवतात. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींपेक्षा जास्त फायदा होत आहे ज्यांना आर्थिक ओझे किंवा पोट भरण्यासाठी फक्त अतिरिक्त तोंड समजले जाते. यामुळे 'मोल्की' विवाह होतात. 'मोल्की' ची प्रथा परंपरागत एक गरीब कुटुंब आपल्या मुलीशी श्रीमंत पतीशी लग्न करीत होते. हे आर्थिक सुरक्षेसाठी होते. नवरा तिच्या बदल्यात वधूच्या कुटूंबियांना बरीच रक्कम देत असे. 'मोल्की'ने याची खात्री करुन दिली की मुलगी तिच्या मातृ घराच्या सदस्यांप्रमाणेच स्थिरतेसह जगेल. ही एक अशी व्यवस्था होती ज्यात सहभागी सर्व पक्षांचे कल्याण सुनिश्चित होते. हे वधू हक्क नाकारत नाही. तरीही, आधुनिक काळात 'मोल्की' विवाहसोहळ्यांना वधू खरेदीचे एक प्रकार मानले जाते. 'मोल्की' विवाहसोहळ्यांमागील खरा अर्थ काय असायचा, तो बदलला आहे. गरीब कुटुंबांना मदत करणे आणि तरुण मुलींना स्थिर जीवन जगण्याची खात्री करणे ही प्राथमिक प्रथा आहे. 'मोल्की' विवाहसोहळ्यांमध्ये आता महिला किरकोळ विक्री करतात आणि स्त्रियांना शोषणाचे जीवन देतात. यामधून, त्यांचे मूल्य आणि सन्मान कमी करा. कारण 'मोल्की' नववधू सामान्यतः लैंगिक आणि शारीरिक छळ करतात. त्यांना बद्ध गुलाम म्हणून वागवले जाते आणि त्यांच्या पतीशिवाय इतर कुटूंबातील सदस्यांसाठी त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले जाते. त्यांना पत्नीचा दर्जा दिला जात नाही किंवा 'आणले' गेले म्हणून त्यांचा सन्मानही केला जात नाही. हा आधुनिक काळातील गुलामीचा एक प्रकार आहे. म्हणून, 'मोल्की' नववधू, कोणत्याही स्वातंत्र्य नसलेल्या, मालमत्ता म्हणून मानल्या जातात आणि श्रीमंत व्यक्तींच्या मालकीच्या असतात. इतर 'मोल्की' नववधूंसाठी त्यांना सामान्यतः समाजातील सदस्यांचा रोष सहन करावा लागतो. 'मोल्की' हे नावच गोंधळ होते कारण ते 'मोल्कीस' सारख्या संदर्भांद्वारे कमी केले जातात. याचा अर्थ त्यांना निकृष्ट दर्जाची वाटण्यासाठी 'पैश्यासह आणले' याचा अर्थ. जातीपाती आणि दारिद्रय़ांमुळे त्यांच्यात पुढे भेदभाव केला जातो. नंतरचे लोक त्यांच्या कुटुंबियांना विक्रेते आणि चोर म्हणून ठेवतात. म्हणूनच 'मोल्की' ही परंपरा केवळ मानवी तस्करीपेक्षा कमी नाही. तथापि, ती व्यक्ती विवाहित असल्याने हिंसाचार आणि अत्याचार विचारात घेतले जात नाहीत. जणू काय लग्नामुळे अत्याचार होऊ देतात. बाल वधूचे आयुष्यः बाल वधू असणे खरोखर काय आहे? बालविवाहांमुळे बालपण लहान होते. एकदा लग्नाची विधी पूर्ण झाली की त्यांचे बालपण देखील. 'पत्नी' झाल्यानंतर अल्पवयीन वधूने फक्त घरगुती कर्तव्ये पार पाडणे अपेक्षित आहे. बाल वधूंचे वय आणि असुरक्षितता याकडे दुर्लक्ष केलेले विषय आहेत. गृहिणीची विशिष्ट भूमिका गृहित धरली जाते. तथापि, फरक म्हणजे त्यांना कुक, स्वच्छ आणि कुटुंबाची सेवा करण्याशिवाय काहीही करण्याचा अधिकार नाकारला जात आहे. अधिकारांचा अभाव आणि स्वातंत्र्याचा अभाव; गुलाम गुलाम होण्यापेक्षा हे जीवन वेगळे आहे का? बाल वधूला त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास किंवा प्रारंभ करण्यास नकार दिला जातो. यामुळे त्यांच्या संभाव्य प्रगती थांबविल्यामुळे त्यांच्या भविष्यातील शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. उदाहरणार्थ, कौटुंबिक शेतात सक्ती केल्याशिवाय त्यांना काम करण्यास देखील थांबविले आहे. शिक्षणाऐवजी, त्यांना तरुणपणामुळे सर्वात उत्पादक समजले जात असल्याने त्यांना सक्तीने भाग पाडले जाते. नोकरीच्या संधी नाहीत, शिक्षण नाही आणि कोणतीही पाठबळ नसल्यामुळे, अल्पवयीन पत्नीला बहुतेक वेळेस नशिब मिळालेले असते. काही लोकांसाठी, घरगुती अत्याचार त्वरित त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक भाग बनतात, जे निर्विवाद आणि दर्शकांकडून निर्बंधित नाहीत. शारीरिक आणि लैंगिक अत्याचार बालविवाहाचा भाग आणि पार्सल म्हणून कार्य करतात. २०१ from मधील अभ्यासानुसार बालविवाहामधील अल्पवयीन नववधूंना शारीरिक आणि लैंगिक हिंसा होण्याचा धोका संभवतो. हा धोका गेल्या काही वर्षांत वाढला आहे. एखाद्या पत्नीच्या रूढ लैंगिक अपेक्षेमुळे तिला मूल होण्याची अपेक्षा असते. यामुळे अल्पवयीन पत्नी आणि जन्मलेले बाळ मृत्यूचे प्रमाण कमी होत असताना बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे गरोदरपण आणि बाळंतपण. एखाद्या मुलीचा कालावधी पूर्ण होताच, तिचे शरीर केवळ विकसित होत असूनही, तिला विवाह आणि मातृत्व मिळविण्यासाठी योग्य मानले जाते. ती अद्याप मूल आहे ही वस्तुस्थिती डिसमिस केली जाते आणि या बदल्यात, गर्भवती मुलासाठी बाळंतपणाचा धोका देखील असतो. यामुळे स्त्रियांना घालवलेल्या 'सन्मान' आणि मालकीचा प्रश्न आहे. हिंसा, अत्याचार, शोषण हे 'सन्मान' टिकवण्याचा एक प्रकार कसा आहे? एनपीआर.ऑर्ग.च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी अंदाजे दीड दशलक्ष अल्पवयीन मुलींचे लग्न केले जाते. ते फक्त एकट्या भारतात वर्षातून १ mar लाख बालविवाहाचा बळी पडतात. युनिसेफच्या आकडेवारीनुसार 40% पेक्षा जास्त बालविवाह दक्षिण आशियातून आले आहेत. या गुन्हेगारीचे जवळजवळ निम्मे बळी हे जगातील एका भागातील आहेत. जगातील mar 47% बालविवाहासाठी भारत स्वतः जबाबदार आहे. तरीही भारतीय कायदा अंमलबजावणीकडे डोळेझाक सुरू आहे. तथापि, भारतातील काही राज्यांनी बाल विवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन पाठपुरावा केला आहे. उदाहरणार्थ, हरियाणामध्ये, जेथे बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी 'आपनी बेटी, अपना धन' ही योजना सुरू केली आहे. बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी 'माझी मुलगी, माझी संपत्ती' अशी योजना सुरू केली गेली. हे कुटुंबांना 'धन धरण' प्रमाणे वागण्यापेक्षा त्यांच्या मुलींची सकारात्मक काळजी घेण्यास प्रोत्साहित करते. एकदा ही मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर आणि तिचा विवाह झाला नाही तेव्हा ही योजना कुटुंबांना मोठ्या प्रमाणात पैसे देते. यामुळे तिला बालविवाहाचा बळी पडण्यास मदत होते. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला साथीच्या आजाराने ओलांडून बालविवाहाची गर्दी केली आहे भारत. यामुळे अधिक अल्पवयीन मुलांना धोका निर्माण झाला आहे. साथीच्या रोगाने गरीब कुटुंबांवर आर्थिक समस्या वाढल्या. मुलींना अजूनही उत्तरदायित्व म्हणून पाहिले जाते या वस्तुस्थितीने हे स्पष्ट केले. तथापि, काही कुटुंबांना, त्यांच्या अल्पवयीन मुलींशी लग्न करण्याची इच्छा नसतानाही, त्यांना कोणताही पर्याय नसल्याचा विश्वास आहे. हे ग्रामीण भारतीय समाजात विकास करण्यात मदत करण्यासाठी उपलब्ध संसाधनांच्या अभावामुळे आहे. स्थिर रूढीवादी विश्वास आणि लिंगभेद यामुळे बालविवाहाचा अभ्यास करण्यास अनुमती मिळते. जुन्या जुन्या परंपरा आणि भेदभावांना आव्हान न देता बालविवाहांचे अस्तित्व कायम आहे. ते बर्याच जणांसाठी शक्यता बनतात. कायद्याचे पालन न करता आणि श्रद्धा बदलल्या तरी बाल विवाह भारतात अजूनही होतात. पारंपारिक आणि सांस्कृतिक मूल्ये अभिमानाचा विषय बनणे थांबवतात जेव्हा समान परंपरा आणि संस्कृतीतील असुरक्षित सदस्यांना कमी लेखले जाते, उत्पीडित केले जाते आणि शोषण केले जाते.
सध्या वायूदलात 1300 महिला अधिकारी असून, त्यातील 94 महिला या वैमानिक आहेत. मात्र, त्या केवळ ट्रान्सपोर्ट विमान, हेलिकॅप्टर आदींवरच काम करत आल्या आहेत. युद्ध क्षेत्रावर आजपर्यंत कोणीही प्रतिनिधित्व केले नाही. आवनी या मध्यप्रदेशमधील साटण्याच्या रहिवासी असून त्यांचा एक भाऊदेखील सैन्य दलात कार्यरत आहे. तर गुजरातमधील बडोदाच्या मोहना सिंह यांचे वडील वायू दलात सार्जंट होते. तर मथूरेच्या भावना कंठ यांच्या कुटुंबातील कोणीही भारतीय सैन्यदलात कार्यरत नव्हते. पासिंग आउट परेडनंतर त्यांना कर्नाटकमधील बिदर येथे असलेल्या एअरबेसवर अधिकचे ट्रेनिंग पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर त्या सुखोई, मिरास, जुगवारसारख्या अत्याधुनिक विमानाचे प्रतिनिधित्व करू शकणार आहेत. या तिघींनीही पिलेटस या विमानावरील सुरुवातीचे आपले सहा महिन्यांचे प्रशिक्षण हैदराबादच्या एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरवर पूर्ण केले. त्यानंतर उर्वरित सहा महिन्याचे प्रशिक्षण हकिमनेट एअरबेसवरील किरण एअरक्राफ्टवर केले. या तिघीही आधीपासूनच वायूदलात आधिकारी आहेत. पण आता त्या फायटर पायलट झाल्याने त्यांना युद्धादरम्यान वापरण्यात येणाऱ्या सुखोई, मिराजसारख्या विमानांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या वायूसेनेच्या इतिहासात तीन तरुणींनी आपले नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवून वायूदलात फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या. अवनी चर्तुवेदी, भावना कंठ आणि मोहनी सिंह यांनी हैदरबादच्या पासिंग आउट परेडमध्ये आपले कसब दाखवले.
`वेदांतने दुकानातून मद्य विकत आणले. ते शुद्ध आहे की अशुद्ध हे कसे ओळखायचे? ` हा प्रश्न एखाद्या परीक्षेचा असेल असे वाटण्याचे काहीही कारण नाही; पण तसा पराक्रम शिक्षण विभागाने केला. सांगली- `वेदांतने दुकानातून मद्य विकत आणले. ते शुद्ध आहे की अशुद्ध हे कसे ओळखायचे? ` हा प्रश्न एखाद्या परीक्षेचा असेल असे वाटण्याचे काहीही कारण नाही; पण तसा पराक्रम शिक्षण विभागाने केला. नास परीक्षेत सातवीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. अर्थात, त्यात घाईगडबडीने दुरुस्तीही करण्यात आली. सोमवारी जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नास परीक्षा (नॅशनल एचिव्हमेंट सर्व्हे) झाली. त्यावेळी सातवीच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या व शालेय गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या 'जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था' (डाएट) मार्फत प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. गुणवत्ता वाढ आणि मूल्यमापन या हेतूने परीक्षा झाली. त्यामध्ये मराठी भाषेचे अक्षरशः धिंडवडे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शुद्धलेखनाच्या नावाने चांगभलं होतं. वेदान्त हा शब्द 'वेदांत' असा लिहिला होता. प्रश्न क्रमांक ३५ हा `मद्य शुद्ध कि अशुद्ध कसे ओळखले जाईल? ` असा होता. `मधा`ऐवजी `मद्य` असा उल्लेख होता. मद्याची शुद्धता ओळखण्यासाठी चव घेणे, वास घेणे, रंगावरून ओळखणे, आदी चार पर्यायही दिले होते. प्रश्नपत्रिका शाळाशाळांत पोहोचली आणि त्यानंतर हा गोंधळ उजेडात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने फर्मान जारी केले. `संबंधित प्रश्नामध्ये मद्याऐवजी `मध` असा शब्द अपेक्षित आहे, त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या स्तरावर प्रश्नपत्रिकेत काळ्या बाॅलपेनने दुरुस्ती करूनच ती विद्यार्थ्यांना द्यावी` असे फर्मावले. शिक्षकांनी आदेशाचे तंतोतंत पालन केले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा बचाव झाला. नाहीतर त्यांना मद्याची शुद्धता कशी ओळखावी याचे धडे शालेय वयापासूनच घ्यावे लागले असते. सातवीची सामान्य विज्ञानाची ही प्रश्नपत्रिका म्हणजे अशुद्ध मराठी लेखनाची परिसीमाच ठरली. त्यात छापलेले काही अशुद्ध शब्द आणि कंसात अपेक्षित शुद्ध शब्द असे : दिघू (दिगू), कश्याचा (कशाचा), तीचे (तिचे), लान (लहान). याशिवाय वाक्यांमध्ये पूर्णविराम, प्रश्नचिन्हे, जोडाक्षरे यांचीही अनागोंदी ठासून भरली होती. मुद्रितशोधनाचा पत्ता नव्हता. कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार केल्याचे गृहित धरले, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळे झाकून ती मंजूर केली असावी अशी शंका येण्यासारखी स्थिती होती. अशा अधिकाऱ्यांच्या हाती मुलांचे भविष्य असेल, तर गुणवत्ता कशी वाढणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.
आरोपीचे बँक खाते गोठवले! पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडा दलित हत्याकांडातील फिर्यादीच आरोपी निघाल्याने शासकीय आर्थिक मदत, विविध राजकीय व्यक्ती आणि हितचिंतकांकडून सहानुभूतिपोटी मिळालेल्या जवळपास एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ दरम्यान, आरोपी दिलीप जाधव याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली. आहेत. (प्रतिनिधी) च्न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत खडसावल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीचे कलम वगळावे, असा अर्ज न्यायालयाकडे दिला आहे. च्हत्याकांड हे कौटुंबिक वादातून घडले असून, मारेकरी हे मृतांचे जवळचे नातेवाईक आहेत. चौघांनीच संगनमताने हे हत्याकांड घडवून आणल्याने या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचे कलम लावण्याची गरज नाही, असे निष्पन्न झाल्यानेच सदरचा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे दिल्याची माहिती आहे. फक्त चारच आरोपी! जवखेडे हत्या प्रकरणात केवळ चारच आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अटक करणे बाकी आहे. चौथा आरोपी ही महिला असल्याचे समजले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले करवत, कुऱ्हाड ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. एक-दोन दिवसांत चौथा आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जालिंदर नानासाहेब बडाख (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बडाख यांनी श्रीराम फायनान्समधून कर्जरुपात ट्रॅक्टर घेतले होते. शेतीसाठी सोसायटी काढली होती. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जालिंदर बडाख याने रविवारी पहाटे स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालिंदर बडाख यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलग, एक मुलगी, भावजई, पुतणी, चुलते, चुलती असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम ।
२०१५ मध्ये अशाचा एका प्रयोगात सोयाबीन तेलामुळे लठ्ठपणा, मधुमेह, इन्शुलिन प्रतिकार व यकृताला सूज हे विकार निर्माण होत असल्याचे दिसून आले होते. खाण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर केल्याने मेंदूत घातक जनुकीय बदल होतात, असा दावा एका संशोधनात करण्यात आला असून या तेलामुळे लठ्ठपणा व मधुमेहासही उत्तेजन मिळते असाही इशारा देण्यात आला आहे. या तेलामुळे मेंदूत जे बदल होतात त्यामुळे स्वमग्नता, स्मृतिभ्रंश (अल्झायमर) यासारखे आजार निर्माण होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे,की चटपटीत अन्नपदार्थ बनवण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर नेहमीच केला जातो. पाकिटबंद पदार्थातही त्याचा वापर केला जातो. सोयाबीन हे जनावारांनाही काही भागात खाऊ घातले जाते. 'एंडोक्रायनोलॉजी' या नियतकालिकात म्हटले आहे,की सोयाबीन तेल, कमी लिनोलिक आम्ल असलेले सोयाबीन तेल व खोबरेल तेल अशी तीन प्रकारची तेले उंदरांना देण्यात आली असता त्यांच्यात वेगळे परिणाम दिसून आले. २०१५ मध्ये अशाचा एका प्रयोगात सोयाबीन तेलामुळे लठ्ठपणा, मधुमेह, इन्शुलिन प्रतिकार व यकृताला सूज हे विकार निर्माण होत असल्याचे दिसून आले होते. २०१७ मधील अभ्यासात असे दिसून आले,की जर कमी लिनोलिक आम्ल असलेले तेल सेवन केले तर त्यामुळे लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या निर्माण होण्याचा धोका कमी असतो, पण आताच्या अभ्यासात पूनमजोत देवल यांनी म्हटले आहे,की कमी लिनोलिक आम्ल असलेले तेल व साधे सोयाबीन तेल दोन्ही मेंदूला सारखेच घातक असते. या तेलामुळे मेंदूतील हायपोथॅलमस भागावर परिणाम होतो. हा भाग माणसाचे वजन, तापमान व इतर बाबी नियंत्रित करीत असतो. त्यामुळे हायपोथॅलमसमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण कमी होते. एकूण १०० जनुकांवर या तेलाने विपरीत परिणाम होतो. याशिवाय स्वमग्नता, कंपवात (पार्किन्सन) यासारख्या आजारांचा धोका वाढतो. मात्र, सोयाबीनच्या टोफू, सोयामिल्क, एडमीम, सॉय सॉस या उत्पादनांनी हे धोके निर्माण होतात असे सिद्ध झालेले नाही. शिवाय वर उल्लेख केलेले रोग सोयाबीन तेलाने होतात असेही अजून ठामपणे सिद्ध झालेले नाही, पण या तेलामुळे या रोगांची जोखीम वाढू शकते इतकाच या संशोधनाचा मर्यादित अर्थ आहे.
शांताबाईंचा ८०वा वाढदिवस होता. शांताबाईंच्या घरी त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यात मीही होते. गप्पांच्या दरम्यान शांताबाईंनी कविवर्य मर्ढेकरांच्या शब्दांचा मार्मिक वापर केला नि म्हटलं, "मी ऐंशी गोड हिवाळे अनुभवले आहेत!".. आता मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी अनेक आठवणींची ऊबच मागे उरली आहे..\nशांताबाई स. प. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. स. प. महाविद्यालय आणि माटेमास्तर (श्री. म. माटे) यांच्याविषयी त्यांना जिव्हाळा होता. स. प. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आणण्याच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली. ती ओळख खरं तर औपचारिक स्वरूपाची होती, पण शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व इतकं अनौपचारिक होतं की, ती ओळख पुढेही टिकून राहिली. त्यानंतर उत्कर्ष प्रकाशनच्या 'कविता विसाव्या शतकाची' (२०००) या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या आणि\nओळखीचे रूपांतर आपुलकीच्या नात्यामध्ये झाले. त्यांना संपादकीय बैठकीसाठी आणण्या-नेण्याची जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे त्यांचा सहवास मला जास्त प्रमाणात मिळाला. माझ्यासाठी तो कामाचा आनंददायी 'बोनस' होता.\nआमच्या संपादकीय बैठकीमध्ये शांताबाईंच्या अद्भुत अशा पाठांतरशक्तीचं दर्शन सर्वाना होत असे. जुन्या कवीच्या एखाद्या महत्त्वाच्या कवितेचा उल्लेख झाला की, त्या कवितेतल्या दोन-चार ओळी म्हणून दाखवल्याशिवाय शांताबाईंना चैनच पडत नसे. केवळ जुन्या पिढीतील कवींच्याच नव्हे, तर आजच्या पिढीतील कवींच्या कविताही त्यांना मुखोद्गत होत्या. कविता महाजन यांची 'ओंजळ' ही कविता मी शांताबाईंच्या तोंडूनच पहिल्यांदा ऐकली. आपल्याकडील मौखिक परंपरेचं सत्त्व शांताबाईंनी खऱ्या अर्थाने आत्मसात केलं होते.\nकविवर्य माधव ज्युलियन आणि रविकिरण मंडळ यांच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाईंवर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. 'या मंडळीभोवती एक सोनेरी गुलाबी धुसर वलय असल्यासारखं वाटे', असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. काव्य लोकाभिमुख करण्याची मंडळाची धडपड त्यांना पटली होती. शांताबाईंनी मंडळाची काव्यगायनाची पद्धती स्वीकारली नाही, पण मूळची काव्यपठण पंरपरा आणि त्या माध्यमातून कवितेचा लोकांशी जुळणारा संवाद त्यांना महत्त्वाचा वाटत राहिला. रविकिरण मंडळाची एक ठळक खूण म्हणजे मंडळाने लेखनात अनुस्वाराऐवजी केलेला परसवर्णाचा वापर! शांताबाई आपले नाव कधीही 'शांता' असे लिहीत नसत. त्या आपले नाव 'शान्ता' असेच लिहीत. रविकिरण मंडळाच्या प्रभावाची ही खूण त्यांच्या नावात जणू एकरूप झाली होती.\nशांताबाईंची अनेक रूपं जशीच्या तशी आजही डोळ्यांसमोर येतात. पुस्तकांना कव्हरं घालण्यात शाळकरी मुलीच्या उत्साहाने रमलेल्या शांताबाई, चालताना वाटेत एखादं सुंदर फूल दिसल्यावर जवळ जाऊन त्याचं मन भरून कौतुक करणाऱ्या शांताबाई, वि. ल. बरवे (कवी आनंद) यांची 'मुचकुंद दरी' ही कादंबरी वाचायचीच राहिली, म्हणून खंत व्यक्त करणाऱ्या शांताबाई, एखाद्या भाबडय़ा रसिकाची गंमत सांगताना मिस्कीलपणे हसणाऱ्या शांताबाई, स्त्रीसुलभ चौकसपणानं साडीचा पोत पारखणाऱ्या शांताबाई, पं. हृदयनाथ मंगेशकरांची एखादी कठीण चाल पुन्हा ऐकण्यासाठी आपण 'चाल कळली नाही' असा अडाणीपणाचा आव कसा आणत असू, हे खटय़ाळपणे सांगणाऱ्या शांताबाई आणि मुख्य म्हणजे सदैव कवितेसह जगणाऱ्या शांताबाई!\nशांताबाईंना चालायला त्रास व्हायचा. तेव्हा स्वतःच स्वतःला हसत त्या पटकन म्हणायच्या, "अगं, रामदासांनी नाही का म्हटलं-\n'त्रिखंड हिंडलो आता, घराचा उंबरा मोठा'\nतसं माझं झालं आहे!"\nस्वतःच्या सगळ्या भावभावनांना अनुरूप अशा ओळी त्यांच्यासाठी हात जोडून तयार असत. त्या सुमारास शांताबाई 'स्मरणातल्या कविता' हे सदर 'अंतर्नाद' मासिकासाठी लिहित होत्या. समुद्राची जशी अखंड गाज चालू असते, तशी त्यांच्या मनात कवितेची अखंड गाज चालू असे.'\nखरं तर कवितेबाबत जुने-नवे असे कप्पेच त्यांच्या मनात नव्हते. जुन्यातलं जे अर्थपूर्ण होतं, ते त्यांनी आपलंसं केलं होतं आणि आपल्याला झेपेल तितकं नवीनही स्वीकारलं होतं. रविकिरण मंडळ, नवकाव्य, साठोत्तरी काव्य असे काव्याचे टप्पे त्यांनी पाहिले, अनुभवले आणि प्राध्यापक या नात्याने अभ्यासलेही. त्यांची वाङ्मयीन भूमिका लवचिक, सर्वसमावेशक अशीच राहिली. आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणातही त्यांनी 'रसिकतेची साधना' या विषयावर बोलताना हीच भूमिका मांडली.\nशांताबाईंनी वरवर विरोधी वाटणाऱ्या अनेक गोष्टी एकत्र आणून दाखवल्या होत्या. त्यांनी जुन्या ढंगाची वृत्तबद्ध कविता लिहिली. गझल, सुनीत या प्रकारची कविता लिहिली आणि नव्या मुक्तशैलीतली कविताही लिहिली. सर्वाना सहज समजेल असं लिहिणं, हे फार अवघड असतं. ते काम तर त्यांनी आयुष्यभर केलं. कविता आणि गीत यांच्यात विरोधाची भिंत उभी करता येणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही त्यांनी स्वतःला 'सर्वसामान्यांची लेखिका' मानणं पसंत केलं. व्यावसायिक लेखक आणि कलावंत यातली दरी कमी केली. खूप नावलौकिक मिळूनही त्यांच्यातला साधेपणा गळून गेला नाही. त्यांची कविता अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही टोकाचे अनुभव व्यक्त करत राहिली. वास्तविक त्या अनेकांशी स्नेहाचे नाते मनाने टिकवून होत्या, तरीही एकाकीपणाचा अनुभव त्यांच्या कवितेतून वजा झाला नाही. त्यांची गाणी लोकांना मोठय़ा प्रमाणावर एकीकडे रिझवत राहिली आणि तरीही "त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?" असा जिव्हारी झोंबणारा प्रश्न त्या कवितेतून विचारत राहिल्या.\nशांताबाईंना हे सारं साधलं, कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं. त्यांचा व्यासंग दांडगा होता. प्रसंगी ढोरमेहनत घेण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. त्यांचं निरीक्षण मार्मिक होतं. मनाची रसिक वृत्ती टवटवीत होती. स्मरणशक्ती लख्ख होती. त्यांच्याकडे अशी आंतरिक समृद्धी होती. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे. अखेपर्यंत त्या लेखनात व्यग्र होत्या. भासाच्या 'अविमारक' या संस्कृत नाटकाचा त्या अनुवाद करीत होत्या. ते काम अपूर्ण राहिलं. त्या आधी त्यांनी 'सुवर्णमुद्रा' हे अवतरणं- विनोद इत्यादींच्या संकलनाचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. तेव्हा असं आणखीही एक पुस्तक होईल. त्याचं नाव मी 'नक्षत्रचित्र' ठेवणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तेही काम अपुरं राहिलं. 'आपण एक मोठय़ा लेखिका आहोत', हे दडपण त्यांच्यावर नसे. त्यामुळेच स्वतंत्र लेखन, संपादन, अनुवाद याबरोबरच काहीसं दुय्यम स्वरूपाचं संकलनाचं कामही त्या हौसेने अगदी रमतगमत करीत राहिल्या.\nशांताबाईंजवळ माहितीचा खजिनाच असे. कसलीही पांडित्याची ऐट न बाळगता त्या तो खजिना खुला करीत असत. अनेक शब्दांच्या मूळ कथा ऐकवत. ('ससेमिरा' या शब्दामागे एक कथा आहे हे त्यांनीच गप्पांमध्ये सांगितलं.) त्यांचं साधं बोलणंही भाषेच्या नाना कळा उलगडून दाखवणारं असे. एकदा फोनवर बोलताना त्यांनी मला सांगितलं होतं.. "आपण 'तळ्यात-मळ्यात' म्हणतो ना, तसं गावाकडच्या बायका म्हणतात- 'दही खाऊ की मही खाऊ?' अगं मही म्हणजे लोणी- 'मथित'वरून 'मही' हा शब्द तयार झाला आहे!"\nमी शांताबाईंना गमतीनं म्हणत असे, "शांताबाई, तुमच्याकडून जाताना खरंच बहुश्रुत व्हायला होतं!" खरं तर शांताबाईंवरही 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'सारखा एखादा ग्रंथ व्हायला हवा होता. त्यांच्याकडे माहितीचा भरपूर साठा होता. कारण कुतूहल हा त्यांचा स्थायिभाव होता. त्यांच्यातल्या कुतूहलामुळेच त्यांचं ललितलेखनही सहजसुंदर होत असे.\nशांताबाईंनी विविध वाङ्मयप्रकार हाताळले. पण त्यांची मुख्य ओळख एक 'कवयित्री' अशीच राहील. सुरुवातीला वर्णनात रमणारी त्यांची कविता पुढे पुढे अंतर्मुख होत गेली. 'गोंदण', 'जन्मजान्हवी' हे त्यांचे संग्रह फार महत्त्वाचे आहेत. त्या म्हणत की, कविता ही 'बहुरूपिणी' आहे. शांताबाईंनी कवितेची अनेक रूपे आपलीशी केली. भावगीते, बालगीते, कोळीगीते, लावण्या, चित्रपटगीते- अशी तऱ्हेतऱ्हेची गीते लिहिली. त्यांची गाणी आबालवृद्धांच्या ओठी राहतील, अशी आहेत. त्याशिवाय चिनी कविता, जपानी हायकू, संस्कृत सुभाषिते यांचा अनुवादही त्यांनी केला. त्यांनी अनेक पिढय़ांवर सौंदर्यवादी जाणिवांचे संस्कार केले. आयुष्याच्या प्रवासात त्यांना कविता ही आपली 'सखी' वाटली. 'किनारे मनाचे' या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत त्यांनी म्हटलं आहे.\n'कविता या सुंदर आणि चैतन्यपूर्ण सखीला- तिनं मला सहवास, आनंद आणि सांत्वन दिलं."\nशांताबाईंनी एका कवितेत म्हटलं आहे-\n"अशी ती सदाची, भरतीची, परतीची\nकाही आभाळाची, बरीचशी धरतीची"\nशांताबाईंना आभाळाची- स्वप्नांची- ओढ होती, हे खरं! पण त्याहीपेक्षा सहज साधेपणा आणि रसरशीत जीवनप्रेम ही मातीची वैशिष्टय़ं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटली होती. त्यामुळे 'बरीचशी धरतीची' हे त्याचं वर्णन त्यांना शब्दशः लागू पडतं!
दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. ९/११ घडूनही अमेरिकेत जमातीय हिंसाचार उसळला नाही. फक्त एक हत्या, तीही 'चुकीच्या लक्ष्या'ची झाली व ती करणाऱ्यावर कारवाईही झाली. आपल्याकडे मात्र जमावाने केलेल्या हिंसक, विध्वंसक व विघ्न आणणाऱ्या (डिसरप्टिव्ह) कृत्यांना केवळ प्रोत्साहनच नव्हे, तर एक प्रकारची अधिमान्यता व प्रतिष्ठाही लाभली आहे. दैवदुर्विलास असा की, 'भावना दुखावणे' हा गुन्हा ठरविल्यामुळेच, झुंडशाहीला अधिमान्यता दिली जात आहे. माझा एक मित्र अमेरिकेत एका ग्रुपबरोबर टूरला गेला होता. एका छान दृश्याच्या पाश्र्वभूमीवर ग्रुप फोटो काढू या असे ठरले. कॅमेऱ्यात ग्रुप मावेना, म्हणून हा म्हणाला, 'बुटके असतील त्यांनी पुढे व्हा आणि उंच असतील त्यांनी मागे जा, म्हणजे ग्रुप मावेल.' दोन अमेरिकन महिला त्याच्यावर चांगल्याच उखडल्या. 'यू शुड नॉट हॅव युज्ड वर्ड्स सच अॅज टॉल ऑर शॉर्ट! इट्स इन्सिल्टग!' बुटके, उंच असे शब्द वापरणे म्हणजे भेदभाव व अवहेलना करणे. हे दुसरे टोक गाठले जात आहे. कोणीच कोणाला हिणवू नये यात शंकाच नाही, पण गांधीजींचा 'हरिजन' शब्द दलितांना जास्त डाचला होता. मेंटली-रिटार्डेडला 'मेंटली-चॅलेंज्ड' म्हणायचे, अशी सुशब्दीकरणे (युफेमिझम) करून, स्वीकार न करणाऱ्या पालकांचा दुखरेपणा जात नाही. मुख्य मुद्दा असा की, शब्दाने 'हिणविले न जाणे' आपण कधी शिकणार की नाही? आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? झुंडशाहीच्या कृत्याविरुद्ध जेव्हा फिर्याद दाखल केली जाते तेव्हा अगोदरच एक प्रतिफिर्याद (भावना दुखावल्याची) दाखल झालेली असते. झुंडशाहीचा जो बळी असतो त्याने, आरोपिततः (अलेजेडली) अमुक समूहाची भावना दुखावलेली असते. मग दोघांनीही फिर्याद मागे घ्यावी अशी 'मांडवली' केली जाते. हा झुंडशाहीचा विजय असतो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पराभव! भावना दुखावता कामा नये अशा स्वरूपाचा जो कायदा आहे, त्यामागचा हेतू शक्यतो शांतता नांदावी असाच आहे, पण या कायद्याचा गरफायदा नेमक्या उलटय़ा दिशेने घेतला जात आहे. सत्याग्रह या स्वरूपात या कायद्याचा 'सविनय-भंग' करण्याची सोय आहे काय? म्हणजेच पोलिसांसमवेत न्यायालयापुढे जाऊन हा कायदा मी मोडतो आहे, मी दोषी असल्याचे मान्य करतो आहे व मला कायदेशीर शिक्षा मिळावी, असे म्हणून, मी 'संभवतः भावनादुखाऊ विधान' करू शकतो काय? असे केले की मग मला, माझ्या प्रियजनांना व माझ्याशी सहमत असलेल्यांना, तथाकथित दुःखित समूहापासून संपूर्ण संरक्षण मिळेल, अशी हमी राज्यसंस्था घेणार आहे काय? जर हे शक्य नसेल, तर मग हा 'भावना दुखावणे बंदी' कायदा एकतर्फी व अन्यायकारक नाही काय? झुंडशहांना फिर्यादही करायला संधी आणि िहसाही करायला संधी, तर उलट अभिव्यक्तीकाराने मारही खायचा आणि फिर्यादही मागे घ्यायची, हा अजब न्याय आहे. याहून महत्त्वाचे असे, की जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? पाकीटमाराला मारहाण करणारे, उगीच न्यायदात्याचा आव आणून, स्वतःमधील साठलेल्या कटुतेचे विरेचन करून घेतात. कशावरही राग काढणे हा हक्क त्यांना नसतो. झुंडशाही ज्या कोणाच्या विरोधात किंवा निषेधार्थ चालविली जाते, त्याची (किंवा त्याच्या 'कलाकृती'ची) काय लायकी होती? हा प्रश्नच झुंडशाहीपासून विषयांतर करणारा आहे. व्यक्तीची सभ्य प्रतिमा तिच्या नावाशी निगडित असते. जमावात व्यक्तीची ओळख पुसली जाऊन ती निनावी बनते. अनेक माणसांचा राक्षस बनतो आणि बळी-माणूस अगतिक बनतो. व्यक्तीच्या जमावापुढे असणाऱ्या दौर्बल्यामुळेच, नागरिकांच्या जीवित-वित्ताचे रक्षण करणे, हे शासनसंस्थेचे आद्यकर्तव्य ठरते. खाप किंवा अन्य जातपंचायती त्यांच्या रूढींनुसार चक्क शिक्षाही ठोठावतात आणि अमलात आणतात. जातिनिर्मूलनाच्या नावाखाली जातिदृढमूलन चालूच आहे, पण निदान, जात-पंचायतींना तरी बेकायदेशीर ठरवून, त्या चालविणाऱ्यांना दखलपात्र गुन्हेगार म्हणून दंडित करणे यासाठीचा कायदा का असू शकत नाही? घटनाबाह्य़ 'शासन' चालविणे म्हणजे चक्क देशद्रोह नाही काय? नक्षलवाद्यांनी पीपल्स कोर्ट भरविणे किंवा झुंडशहांनी स्वतःचे न्यायदानाचे दरबार भरविणे, धर्मगुरूंनी फतवे काढणे किंवा अगदी ग्रामसभेने व्यसनमुक्तीच्या सद्हेतूने, पण बांधून फटके देणे हे सारेच विशेष कायदा करून बेकायदा ठरविले गेले पाहिजे. अॅबॉलिशन ऑफ अनकॉन्स्टिटय़ूशनल सेन्टर्स ऑफ जस्टिस! ग्रस्त कोण? व्यक्ती की समूह? नागरिकांत भेदभाव न करण्याचे घटनेत जे कलम आहे त्याला अपवाद म्हणून, दुर्बल घटकांबाबत झुकते माप देण्याचे कलम आहे. या कलमाचा वापर करताना वर्षांनुवष्रे, एक घोडचूक केली जात आहे. विविध कारणांनी येणारी दुर्बलता ही व्यक्तीच्या वाटय़ाला येत असते. व्यक्तीची दुर्बलता मोजण्यात, जात-धर्म-िलग हे घटक (फॅक्टर्स) म्हणून घेण्याऐवजी, एखाद्या जातिसमूहातील, धर्मसमूहातील किंवा लिंगसमूहातील समस्त व्यक्तींना सरसकटपणे दुर्बल ठरवून टाकणे, हीच ती घोडचूक होय. मंडल आयोग वा सच्चर आयोग यांना, व्यक्तीच्या मागासलेपणाचे घटक कसे मोजावे असे काम देणे उचित झाले असते. प्रत्यक्षात, अन्य मागास जातिसमूह तसेच अल्पसंख्य धर्मसमूह या समस्त समूहांनाच दुर्बल मानावे काय? असे शोध-उद्दिष्ट (टम्र्स ऑफ रेफरन्स) दिले गेले. या व अशा कोणत्याही टम्र्स ऑफ रेफरन्स देणे, हेच घटनेच्या गाभ्यातील भावनेच्या (स्पिरिटच्या) विरोधात जाणारे होते. या घोडचुकीमुळे राजकारण हे कलुषित व द्वेषमूलक होऊन बसले आहे. त्यात राजीव गांधींनी शहाबानोप्रकरणी इहवादाची पायमल्ली करून हिंदुत्ववादाला मोठेच प्रोत्साहन दिले आहे. 'मूळच्या भेदभावावर उपाय म्हणून उफराटा भेदभाव' हा सिद्धान्त फसला आहे, हे एकदाचे मान्य केले पाहिजे. मूळ भेदभावावरच प्रतिबंध करणारा, तसे निर्णय मागे घ्यायला लावणारा (प्रिव्हेन्शन अॅण्ड र्रिडेसल ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट कास्ट, रिलिजन, जेंडर) व व्यक्तीला लागू असणारा कायदा करण्याची वेळ आली आहे. एका जाहीर चच्रेत जयंती नटराजन यांनी प्रश्न विचारला, 'मिशनऱ्यांच्या सेवेमुळे जर धर्मातर झाले असेल तर ग्रस्त-पक्ष कोणता? (हू इज द अॅग्रीव्हड पार्टी?)' यावर सिंघल (हे विहिंपच्या सिंघलांचे बंधू व भाजपच्या वतीने बोलत होते) उत्तरले, 'येथे ग्रस्त-पक्ष म्हणजे बहुसंख्याक जमात! (द मेजॉरिटी कम्युनिटी!)'. गोतगटीय समूहाला कायदेशीर व्यक्ती गणणे, हेच प्रतिगामी आणि झुंडशाहीला अधिमान्यता देणारे आहे. एक हिंदू व्यक्ती समजा ख्रिश्चन झाली तर ते तिला धर्मविचार पटून? की कृतज्ञतेपोटी? हे इतर हिंदूंनी का ठरवायचे? सर्व हिंदूंचा प्रतिनिधी असे पद अस्तित्वात नाही, नव्हते व नसेल. ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा!
घालाल हुज्जत, तर पोलिसांची बरकत! शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड. . . त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना 'बरकत' प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे. नाशिक : शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड. . . त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना 'बरकत' प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे. नियमभंग केला आणि त्यामुळेच पोलिसांनी अडवून कारवाई केली तर साधारणतः त्याला कोणी हरकत घेत नाही. मुळातच पोलिसांनी अडवले की, आता खैर नाही अशी सामान्यतः मानसिकता असते. त्यामुळे सहसा कोणी प्रतिप्रश्न करीत नाही. मात्र नियमांचा भंग केला नसेल किंवा नियमभंग करणारे अनेक आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला एक जण तर अशा व्यक्तींनी आपली बाजू मांडून उपयोग नसतो. बºयाचदा रहदारीला अडथळा होईल अशा रितीने मोटार उभी नसेल, परंतु केवळ त्यावर दंड भरायचे म्हटल्यास नागरिक विरोध करतात. आपण नियमभंग केलेला नाही. रहदारीला कोणताही अडथळा झालेला नाही असे बिंबवून उपयोग नाही. अशावेळी सरळ वाद घालणाºया नागरिकाने मात्र गंभीर गुन्हा केला असल्यागत पोलीस कर्मचाºयांची भाषा सुरू होते आणि प्रसंगी जास्त बोलले किंवा पोलिसांशी हुज्जत घातली तर वाहतूक नियमभंगाची कलमे वाढत जातात. मग, कागद नव्हते, इन्शुरन्स नाही, असे अनेक नियम तपासून सर्व कलमांचे चलनही फाडले जाते. बºयाचदा अनेक नागरिक दंड भरण्यापेक्षा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु अशावेळी येथेच पावती फाडण्याचा आग्रह नाही, तर कोर्टात जायचे असेल तर लायसन जप्त, असा प्रकार केला जातो. या प्रकारामुळे पोलिसांशी वाद घालणे महागात पडत असल्याने गुमान दंड भरणे हेच शहाणपणाचे ठरते असे अनुभवही काहींनी कथन केले. नियमभंगाचे कोणीच समर्थन करीत नाही, मात्र एखाद्याकडून कागदपत्रे अनवधानाने राहिली असावीत किंवा नाही हे ओळखण्याची नजर निश्चितच पोलिसांकडे असते. त्याचा वापर न करता सर्वांनाच कारवाईत भरडणे कितपत योग्य, असाही प्रश्न केला जात आहे. ४पोलिसांशी वाद घातला तर सहज होणारा दंडही वाढत जातो. परंतु एखादा नागरिक जास्तच आक्रमक झाल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हाही दाखल होतो. दोनेक वर्षांपूर्वी शरणपूररोडवर एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी रोजच ठेवलेल्या बॅरिकेड्समुळे अडचण होत असल्याने वाद घालणाºया स्थानिक रहिवासी व्यक्तीला सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. म्हणजेच वाहतूक नियमाचा भंग म्हणूनच कारवाई होते, असे काही नाही. वाहतूक पोलिसांच्या वारंवार होणाºया कारवाईला कंटाळून अनेकदा रिक्षाचालकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. मध्यंतरी तर एका मोटारचालकाने रस्त्यातच बैठक घातली. यासंदर्भातही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सोलापूर : फक्त हौस पूर्ण करण्याकरिता दोन मित्रांनी चक्क १० दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघड झाली आहे. चोरलेल्या सर्व दुचाकींची किंमत जवळपास १० लाख रु. इतकी आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. दुचाकी चोरण्यासाठी या मुलांनी बनावट चाव्यांचा वापर केला आहे. दरम्यान,पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दोन्ही मुले मोटारसायकल चोरण्यामध्ये तरबेज आहेत. दोघांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते गाड्या चालवण्याचा आनंद घेण्याकरीता गाड्यांची चोरी करीत असत. त्यासाठी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राकडून त्यांनी ही चावी तयार करुन घेतली होती. महत्वाचे म्हणजे चोरी केलेल्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ते गाडी तिथेच सोडून द्यायचे आणि काही दिवसांच्या अंतराने दुसऱ्या गाडीची चोरी करायचे.
बोकलवाडीच्या सेंट परषु महाविद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापक दाबे साहेबांचा दराराच तसा होता. अक्कड मिशा, फेंदारलेले नाक, चेहऱ्यावर विक्राळ भाव आणि अंगात हुप्या माकडासारखी मस्ती. शाळेला भेट देणाऱ्या कुठल्याही बेसावध पालकाला दाबे साहेब एक मुख्याध्यापक न वाटता पॅरोलवर सुटलेला अट्टल दरोडेखोर वाटून ते दचकत असत. त्यांच्या या कल्ट पर्सनॅलिटी मुळे शाळेतले सगळेच बापडे मास्तर लोक दाबे सरांना दबून असत. अजिबात ज्ञान नसलेला उच्चपदस्थ मनुष्य जसा सतत काहीही बिनडोक चुका काढून हाता खालच्या हुशार माणसाला नामोहरम करतो नेमके तेच दाबे साहेबांचे दबाव तंत्र होते. नालायक आणि अभ्यासू दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या पाठीत अकारण बुक्की घालण्यात त्यांना एक अवर्णीय आनंद मिळत असे. स्टाफ मिटिंग मध्ये तर अखंड मिशा पिळीत वाद घालत बसण्यात त्यांचा हातखंडा होता . कुणी स्टाफने कधी चुकून माकून दिलेली चांगली सूचना कशी अत्यंत बिनडोक आहे हे आरडाओरडा करत सांगितले तर ते समोरच्याला लगेच पटते हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. अनेक निष्पाप मास्तर आणि मास्तरणी स्टाफ रूम मध्ये दाबेच्या झापण्यामुळे ढसढसा रडल्याच्या करूण कथा साने गुरुजींच्या फोटो मागच्या मूक भिंती आनंदाने सांगतील. अशा या खविस दाबे साहेबांच्या हाताखाली कुणी म्हणजे कुणीच टिकत नसल्याने अर्थातच त्यांचा शिपाई म्हणून निवड झाली तेव्हा मला विशेष अभिमान वाटला हे वेगळे सांगायला नको. लहानपणा पासूनच मला राकट, बिनडोक, धसमुसळा, कोडगा वगैरे विशेषणे ऐकण्याची सवय होतीच त्या मुळे दाबे साहेबांच्या आरड्याओरड्याला घाबरणारा मी गडी नव्हतोच. माझा फक्त एकाच प्रॉब्लेम होता ते म्हणजे मी दिवसातून तीनचार वेळा तरी कशाला ना कशाला अडखळून पडत असे. लहानपणा पासूनच माझ्या धांदरट स्वभावामुळे ही अशी धडपडण्याची सवय मला होती. तसा बाकी मी भक्कम गडी असल्याने मला मामुली खरचटण्या पलीकडे फारसे काही होत नसे. आजच सकाळी साहेबानी चार पाच वेळा टाळलेली वार्षिक पगार वाढीची स्टाफ मिटिंग भरायला एकदाचा मुहूर्त लागला. चहा देण्याच्या निमित्ताने मी पण खोलीतच घुटमळत होतो. या वर्षी तरी बरा पगार वाढेल या आशेवर अंगचोरून बसलेल्या सर्व मास्तरांना आपल्या अक्कडबाज मिशा पिळत साहेब म्हणाले. "तर मला असे कळले आहे की तुम्हाला सर्वांना पगार वाढ पाहिजे आहे, बरोबर? " सर्वांनी पटापट मुंड्या हलवल्या. "छान अगदी छान कुठल्याही लायक शिक्षकाला किंवा शिक्षिकेला पगार वाढ मिळायलाच हवी. " सर्वांनी हसरे चेहरे करत पुन्हा पटापट मुंड्या हलवल्या. "छान छान, प्रथम मला काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही सर्वांनी खडू पहिलाच असेल? " काही लोक साहेब विनोद करताहेत म्हंणून सगळेच खो खो हसले. दाबेचा विनोद म्हंटल्यावर तर पाटील मास्तर जरा जास्तच वेळ हसले. मग एकदाचे ते खोकत दमून थांबल्यावर. मराठीच्या भक्कम कवियत्री कुसुमवल्ली बाई म्हणाल्या. "इश्श, म्हणजे काय सर एका शिक्षकाला खडू कसा माहीत नसेल? . . . खडू म्हणजे काही जणू काही शिक्षकाचे अकरावे बोटंच. " सर्वांनी पुन्हा लगेच अनुमोदनपर पटापट मुंड्या हलवल्या एक दोघांनी तर उदाहरण म्हणून करंगळी पण वर केली मग लगेच चूक लक्षात येऊन बदलून मधले बोट वर केले. साहेब त्या कडे दुर्लक्ष करत पुढे म्हणाले. "अरे वा छान छान अकरावे बोट म्हणजे खडू काय . . वा वा छान उपमा दिली आहे वसकवल्ली बाई " "हो हो तेच म्हणायचे होते मला कुसुमवल्ली. . . तर मग मला आपल्या पैकी कुणीही माझ्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या ? " असे म्हणत साहेबानी बेसावध कुत्र्यावर थंड पाणी टाकावे तशी खालील प्रश्नांची सरबत्ती केलीः -"प्रश्न एक, एका महिन्यात एक शिक्षक किती खडू वापरतो? " -"प्रश्न दोन, एका खडूची लांबी किती मिलीमीटर असते? " -"प्रश्न तीन, एका खडूने कुठली अक्षरे जास्त लिहिता येतात? इंग्रजी,हिंदी की मराठी? " -"प्रश्न चार, एका खडूचे सरासरी वजन किती ग्राम असते? " एवढे बोलून साहेबानी सर्वांकडे रोखून पहिले. आता स्टाफरूम मध्ये भीषण शांतता पसरली. एकाही मास्तरला उत्तर देता येईना. मघाशी जोरात हसणाऱ्या पाटील मास्तरनी तर असा मोठ्ठा आ वासला की त्यांच्याच चहाच्या कपा वरच्या दोन माशा त्याच्याच मुखात जाऊन सहीसलामत परत आल्या. चित्रकलेच्या नयन बाई आणि इतिहासाच्या कोमल बाई तर स्फुन्दू स्फुन्दू रडू लागल्या. गणिताचे मास्तर अवघड गणित घातल्यावर आपलेच विद्यार्थी करतात तसेच पुटपुटत उगाच बोटावर काही तरी आकडेमोड करू लागले. बाकीचे शिक्षक सिनेमाच्या मॉब सिन मध्ये नेमके काय करावे हे न कळल्यामुळे म्हंटले तर हसतोय अन्यथा रडतोय असे चेहरे करून बसले. "आत्ता काय झाले सगळ्यांना थोबाड पाडून बसायला? मी काय अवघड फार प्रश्न विचारला का? सध्या खडू बद्दल प्रश्न विचारला ना? रोज वापरताना तुम्ही? बरोबर का चूक? " सगळयांनी नंदी बैला सारख्या माना हलवल्या. "मग तुम्हाला एकाला तरी यातले एखादे तरी उत्तर यायला नको? बोला? अरे बोला ना? ? ? " (भीषण शांतता) मग आवाज आणखी चढवत दाबे साहेब म्हणाले, "आता समजली तुम्हाला तुमची सर्वांची अक्कल? अरे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाली तुम्ही शिक्षक आहेत आणि तुम्हाला तुम्ही जी गोष्ट रोज वापरता तिच्या बद्दल माहिती नाही? " "म्हणे अकरावे बोट, काय हो वसकवल्ली बाई किमान तुम्हाला तरी उत्तर यायला हवे ना? " कुसूमवल्ली बाईंनी डोळ्याला पदर लावला. "देव जाणे तुम्ही शिक्षक लोक इतकी वर्षे विद्यार्थ्यांना काय शिकवत असाल ते! आता तुम्हीच सांगा कुठल्या कारणाने तुम्हाला पगारवाढ द्यायची? हसे होईल हसे जर बाहेर ही गोष्ट कळली तर की बोकलवाडीच्या शिक्षकांना खडूचे वजन किती असते ते पण माहीत नाहीये, बरोबर ना? " "कीव वाटते मला तुमच्या अज्ञानाची. चला निघा आता. पुन्हा माझ्या समोर याल तेव्हा अभ्यास करून येत चला. लाज वाटत नाही पगार वाढ मागायला? " सगळा स्टाफ क्षणात खोलीतून नाहीसा झाला. सगळे बाहेर पळाल्या बरोबर साहेबानी माझ्या कडे विजयी मुद्रेने पहिले मी लगेच लोचटपणे म्हणालो. "वा साहेब चांगली जिरवली तुम्ही याची, साहेब तुम्हाला तुमचा आवडता डबल उकळलेला चहा आणू? "सर लायब्ररीत नव्या पुस्तकाचा स्टॉक आलाय दोन चार पुस्तके घरी देतो पाठवून. " मला माहिती होते की साहेब साधारण पणे लग्ना मुंजीत पुस्तकेच भेट देतात. मी कुठल्याही जातिवन्त शिपाया प्रमाणे साहेबांना बातम्या पुरवीत असे त्या मुळे आपली नौकरी शाबूत राहते एव्हढे व्यवहार ज्ञान मला नक्कीच होते. "जा आता चहा घेऊन ये फक्कड आणि जाताना लायब्ररीयन डिसूझा मॅडमला पाठव ताबडतोब" असे जेव्हा साहेब ओरडले तेव्हा मी तात्काळ बाहेर पळालो. साहेबांचा आवडता डबल उकळता चहा घेऊन येताना पायऱ्यांवर मी दोनदा धडपडलोच पण नशिबाने चहा सांडला नाही. मध्ये एक शिक्षकांचा घोळका दिसला म्हणून थांबून बघतो तर लायब्ररीयन डिसूझा मॅडम रडून रडून इतरांना सांगत होत्या की दाबे साहेब त्यांनाच म्हणतात की लायब्ररीची गहाळ झालेली पुस्तके त्यांनी चोरली. मी लगेच तिथून सटकलो. साहेबांच्या खोलीत धापा टाकत कधी एकदा ही डिसुझा बाई ढसा ढसा रडतीये ही बातमी साहेबाना सांगेन या आनंदात पायपुसण्याला अडखळून डायरेकट खुर्चीवर बसलेल्या दाबेच्या सरच्या मांडी वरच डबल उकळता चहा ओतला. टिरीवर मधमाशा चावलेल्या कुठल्याही माकडा प्रमाणे अप्रतिम बोंब ठोकत दाबे साहेबानी अख्ख्या खोलीभर ता ता थैय्या नाच केला. मला इतके हसू आले की ज्याचे नाव ते पण मी मोठया मुश्किलीने हसू आवरून त्वरित नम्र सेवकापणे मान खाली घालून शिव्या खाल्ल्या. माणसाने चूक झाल्यावर ती कबुल करायलाच हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. आता झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून मी साहेबांना म्हणालो "साहेब आपण आपली पॅन्ट आणि शर्ट मला काढून द्या मी शाळेच्या हौदावर धुवून आणि इस्त्री करून आणतो. " "वारे वा शहाणाच आहेस की आणि मी काय इथे असा उघडाच बंब बसू? कुणी स्टाफ मधले आले तर काय प्रतिमा होईल माझी? " "आपण असं करू साहेब माझ्या मित्राचे मेन्स पार्लर आहे त्याला घेतो बोलावून जरा फेशिअल बिशिअल करून घ्या तोवर टाइम पण जाईन आणि काम पण होईल कसं? " "आयडिया चांगलीये पण त्याचे पैसे कोण देईल बे? " "पैसे मी देतो की साहेब. " मग मात्र साहेबाना माझी आयडिया चांगलीच पटली. मी लगेच माझा मित्र साधूनाथला बोलावून घेतले तो साहित्य घेऊन पाच मिनिटात हजर झाला. त्याला मी बजावले आपल्या साहेबांची मस्त दाढी, फेशिअल, हेड मसाज करायचा एकदम स्पेशल! मला मनातल्या मनात शिव्या घालीत साहेबानी आपला पॅन्ट-शर्ट काढून मला दिली आणि फॅन फुल्ल करून पंख्याखाली दोन्ही मांडीवरच्या ताज्या गुटगुटीत टम्म फोडांना हवा देत बसले. खरे म्हणजे त्यांची बमबाट ढेरी,चट्टेरी पट्टेरी अंडरवेअर त्यातून लटकणारा गोंडस नाडा आणि भोके असलेली मळकट बनियन या मुळे साहेब मजेदार दिसत होते पण ही वेळ हसायची नव्हती आणीबाणीची होती . "आलोच साहेब" असे म्हणून मी धावत शाळेच्या हौदापाशी गेलो तर हौदात नेहमी प्रमाणे पाणीच नाही. मग मी तसाच धावत नदी वर गेलो. नदीपासच्या एका झाडाखाली तीर्रटचा डाव रंगात आला होता. मला बघितला की भिडू लोकांनी मोठया प्रेमाने मला बोलावून घेतले. "अरे आव आव बद्रीसेठ" असे म्हंटल्यावर मलाही त्यांचे मन मोडवेना. चहा चिलीम करत उगा आपले पाच दहा मिनिट खेळूत म्हणता म्हणता सगळेच पैसे हरलो. मग मी पण जिद्दीला पेटलो आपली कष्टाची कमाई मी थोडीच अशी जाऊ देणार भिडूलोक पण दिलदार पैसेच उरले नाहीत म्हंटल्यावर द्रौपदी सारखी साहेबांची पॅन्ट-शर्ट डावाला लावू द्यायला तयार झाले. पंधराच मिनिटांनी आता शाळेकडे हात हलवीत निघालो तर डोक्यात एकच विचार होता साहेबाला पँटशर्ट कुठे गेले म्हणून काय सांगायचे? शेवटी खूप विचार करून ठरवले की धुवून वाळत टाकल्या वर गाईने चुकून खाल्ले असे खोटेच सांगायचे. आता साहेब गो मातेचे नाव घेतल्यावर काही म्हणणार नाहीत असे मला वाटले. आजचा दिवसच वाईट या पुढे उठल्यावर आरशात जन्मभर पाहायचेच नाहीच असे मी मनाशी ठरवूनच टाकले . पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. शाळेत आलो तर साहेबाच्या खोली बाहेर ही तोबा गर्दी. त्याचे काय झाले मी बाहेर पडल्यावर साहेबाची दाढी करून गप्प बसावे ना, जरा मिशा अड्जस्ट करतो म्हणत मिशा बारीक करताना मूर्ख साधुनाथने वस्तऱ्याने साहेबाच्या पिळदार मिशा एकी कडे लांब झाली म्हणून दुसरी कडे कमी करत करत पार हिटलर सारख्या करून टाकल्या. तरी नशीब समोर आरसा नसल्याने साहेबाना लगेच कळले नाही. साधूनाथ महाराज आपल्या चुकी मुळे घाबरून घाईघाईत साहेबाच्या तोंडाला हिरवे फेशियल फासून लघवी करून येतो म्हणून जो बाहेर पडला तो परत आलाच नाही. तरी बर जाताना दाराला बाहेरून कडी लाव असे साहेब म्हणाले होते. एक पंधराच मिनिटांनी कुसूमवल्ली बाई आज अर्धा दिवस सुट्टी पाहिजे म्हणून दाबेच्या खोलीत गेल्या आणि तिथे बसलेल्या हिरव्या तोंडाच्या राक्षसाला पाहून ओरडत पळतच बाहेर आल्या. त्यांच्या ओरडण्याने लोकं जमा झाले. कुसूमवल्ली बाईंनी शक्य तितक्या रंगतदार पध्धतीने जे काही वर्णन केले त्या वरून सगळ्यांना कळाले की चड्डी बनियन गॅंग मधला चोरटा साहेबांच्या खोलीत आहे. मग ताबडतोब लोकांनी साहेबांच्या खोली कडे धाव घेतली तर काय आस्चर्य नालायक चोरट्याने आतून कडी लावलेली. मग शिक्षकांनी धक्के मारून दरवाजा उघडला तर तो हिरव्या तोंडाचा चोर खिडकीतून उडी मारून लायब्ररीच्या दिशेने पळाला होता म्हणे. आता लोकांना कळले कि पुस्तकचोर कोण आहे तो बिचाऱ्या डिसुझा बाई वर आळ. आता मग मी पण दोन चार दांडग्या शिक्षका बरोबर लायब्ररीची रॅक धुंडाळू लागलो. दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यातल्या रॅकपाशी शोधताना मी एकटा आहे हे पाहून मला साहेबानी हळूच शुक शुक केले आणि लाचार आवाजात म्हणाले "अरे बद्री मी आहे मी दाबे सर . . . . कसेही कर आणि या लोकांना बाहेर काढ फार इज्जतीचा पंचनामा झालाय. हे मला चोर समजतात आता जर मला धरलं तर फार हाणतील रे. " मी पण आश्चर्याचा धक्का बसल्याची ओव्हर ऍक्टिंग करत म्हणालो "अरेच्या सर तुम्ही? " काळजी करू नका साहेब मी करतो काही तरी, लोक फार खवळलेत. तुम्ही आता इथेच गुमाने लपा इथंच मध्यरात्री येऊन बाहेर काढतो तुम्हाला. " त्यावर साहेब म्हणाले, "बर बर पण माझे कपडे तर दे की लेका" मग मात्र मी प्रामाणिकपणे मनाशी ठरवल्या प्रमाणे सांगितले की साहेब कपडे वाळत घातले तेव्हा तुमचे कपडे गाईनी खाल्ले. हे सांगताच साहेब जे भडकले ते आपली परिस्थिती काय आपण बोलतो काय हे विसरून मलाच शिव्या शाप देऊ लागले. म्हणतात ना ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे. या जगात खऱ्याचा वाली नाही! मग मात्र मी सरळ खाली आलो आणि प्रामाणिक पणे गर्दीला सांगितलं की चोट्ट नेमके कुठे लपले आहे. मग काय विचारता महाराजा लोकांनी हिरव्या तोंडाच्या चोरट्याला रानटी सावज धरावं तसं सिमेंटच्या पोत्यात घालून लाथा बुक्क्यानी कुटले की ज्याचे नाव ते. साहेबाना भरपूर वेळ मारल्या वर मग मीच ओरडलो "अरे हे तर आपले दाबे सर! " चार दिवसांनी मी साहेबाना भेटायला फुले घेऊन दवाखान्यात पाचव्या मजल्यावर प्रायव्हेट खोलीत गेलो तेव्हा अंगभर प्लास्टर घातलेले हिटलर छाप मिशीचे साहेब मोठे गमतीदार दिसत होते. कुणास ठाऊक पण मला बघून साहेब रागाने एकदम लालीलाल झाले. वेड्या सारखे अद्वातद्वा शिव्या देऊ लागले. नालायक माणसा तुझ्यामुळेच माझे हे असे भजे झाले असे म्हणू लागले. मला वाटते औषधाचा परिणाम असणार नाहीतर एव्हढे राग येण्या सारखे मी काय बरे यांचे घोडे मारले? तेव्हढ्यात खोलीत एक सुंदर नर्स आली म्हणून मग मी आणि दाबेसर दोघेही परिस्थिती विसरून तिच्याकडे एकटक बघू लागलो तर ती नर्स माझ्यावरच वसकली "अहो त्यांच्या ऑक्सिजनच्या नळी वरून बाजूला सरका" अरे बापरे! मग मात्र मी घाबरून घाई घाई ने बाजूला सरकायला गेलो आणि नेहमी प्रमाणे अडखळून साहेबांच्या पलंगाच्या पायाकडच्या बाजूवर धप्पकन पडलो आणि काय आस्चर्य महाराजा माझ्या वजनाने साहेब नळ्या सिलिंडर सकट जे काही उडाले ते सरळ खिडकीतून बोंबलत सूर्राट रॉकेट सारखे बाहेर गेले. मग जेव्हा मी आणि नर्स बाईने खिडकीतून वाकून पहिले तर प्लास्टर मध्ये गुंडाळलेले आदरणीय दाबे साहेब एका कचऱ्याच्या ट्रकवर निपचित आडवे पडून कचऱ्याच्या ढिगा सोबत लांब लांब जाताना दिसले!