text large_string |
|---|
Chhatrapati Sambhaji Nagar News: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी याच नुकसानग्रस्त भागातील शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. सत्तार यांनी आज कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी आज (19 मार्च) रोजी कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी बुद्रुक , साखरवेल शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. तर झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे तसेच पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार राजपूत, मंडळ कृषी अधिकारी सरकलवार, कृषी सहाय्यक जगदीश पवार, एकनाथ वाघ आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, सरकारकडून याबाबत ठोस पाऊले उचलले जात नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान याचवेळी संभाजीराजे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल," असे संभाजीराजे म्हणाले आहेत. इतर महत्वाच्या बातम्या : |
मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मनमाड ( नाशिक ) : मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या माहितीसाठी मदत केंद्र विविध स्थानकांवर उघडण्यात आल्याचे माहिती भुसावळ विभागाने दिली आहे. ऐन दिवाळीत या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने मनस्ताप सहन करावे लागत आहे. # खालील गाड्या रद्द / वळवल्या / शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. गाड्या चांदूरबाजार-नारखेडी मार्गे वळवण्यात आल्या. 12140 नागपूर-CSMT JCO 23. 10. 2022 (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द) गाड्या गोंदिया-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-सोलापूर-पुणे मार्गे वळवण्यात आल्या. गाड्या नागपूर-इटारसी-संत हिरडाराम नगर-नागदा मार्गे वळवण्यात आल्या. पुणे-सोलापूर-सिकंदराबाद-बल्हारशाह-नागपूर मार्गे गाड्या वळवण्यात आल्या. 20804 गांधीधाम-विशाखापट्टणम JCO 23. 10. 2022 सुरत-वसई रोड-पनवेल-पुणे-सोलापूर-वाडी-सिकंदराबाद मार्गे. |
मनु (४, २५० शय्यां गृहान्कुशान्... धाना मत्स्यान्पयो मांसं शाकं चैव न निनुदेत् ।), अत्रि ( २५०-२५१ आंद्रे मांसं घृतं तैलम्... स्नेहपक्वं च तक्रं च शूद्रस्यापि न दुष्यति ।) यांत असले पदार्थ सांगितले असून त्यांत मतभेद दिसतातच एकपंगत आणि सहभोजन हेहि विषय भक्ष्यामध्यबिचारांत येतात. सहभोजन झणजे एका ताटांत जेवणे किंवा एकमेकाजवळ बसून जेवणे असाहि अर्थ होतो. ऐतरेय आरण्यकांत ( ५, ३, ३. १८ ) • नेदंविद् अनेदंविदा समुद्दिशेन्न सह भुंजीत न सधमादी स्यात् ' - हे जाणणारानें न जागणाऱ्या बरोबर जेऊ नये, असें सांगून विशिष्ट सहभोजनाचा निषेध केला आहे. ज्यांच्यांशी सहभोजन करूं नये असे सांगितले त्यांच्याशीं जेवावगस वसलें असतां उदक, भस्म, द्वार, वाट, इत्यादि मध्ये आल्यास दोष लागत नाहीं अर्से लघुहारीतांत ( ७४ ) व बृहस्पतिस्मृतींत (अपराकार्ने उद्धृत केलेल्या वचनांत ) सांगितले आहे [उदकं च तृणं भस्म द्वारः पंथास्तथैव च । एभिरन्तरितं कृत्वा पंक्तिदोषो न विद्यते । लघुहारीत; 'अभिना भस्मना चैव सलिलेन विशेषतः । द्वारेण स्तंभमार्गण षभिः पंक्तिर्विभिद्यते ] या सर्व गोष्टींचा विचार करतां प्रस्तुत स्थितींत आपण काय करावे याचा निर्णय करणे कठीण नाहीं. स्वतःच्या घरांत वाटेल ते ज्यानें त्याने करावें, पण सभा संमेलनें इत्यादि सार्वजनिक ठिकाण पंक्तीचे वाद माजविणें अयुक्त होय. सार्वजनिक ठिकाण शाकाहार असल्यास पंक्तिभेद मानूं नये. शाकाहारी कुटुंबांकडे कोणालाहि जेवावयास अडचण नसावी, अशा प्रकारचा आचार प्रचलित झाला पाहिजे. शाका. हारी व मांसाहारी ह्यांच्या भावनांतच थोडा फरक असल्यामुळे शाकाहान्यांना मांसाहारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्गाकडे भोजन करण्यास सांगणे आज तरी व्यवहार्य नाही, परंतु शाकाहाराचा पाक असतांना दोन्ही प्रकारच्या लोकांना एका पंक्तींत बसण्याचा आचार लोकमान्य व्हावा इतकेंच आज म्हणणे आहे. शास्त्रांत अभक्ष्य पदार्थाचे जे विवेचन आहे, त्यांतील टोमाटो, लसूण, कांदा, गांजर, कोहळा, डीक, हिंग, शेवग्याच्या शेंगा, यांचा निषिद्धपणा आतां बहुतेक गेला आहे, तेव्हा त्या दृष्टीने कांही अडचण येणार नाहीं. या वर्ज्य पदार्थात जीवनतत्वांचा (Vitamine ) बराच भाग असतो, म्हणून ते सर्वत्र खाण्यांत येतात. परिस्थिती प्रमाणे खाळावळींत जेवल्याशिवाय पुष्कळांना गत्यंतर नसतें. तेव्हां पूर्णपणे शाकाहार असलेल्या सार्वजनिक ठिकाणी पंक्ति मेद न मानतां खोट्या श्रेष्ठकनिष्ठ भावाची कल्पना विसरून सर्वांनीं एकंपक्तींत बसून जेवण्यास हरकत नाही. शेपन्नास वर्षांनी बहुतेक सर्वच मांसनिवृत्त होतील किंवा बहुतेकांस व्हावे लागेल अस माझे मत मी पूर्वी सांगितलेच आहे. स्त्रिया, त्यांची कर्तव्यें आणि हक्क हा विषय पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाहि महत्वाचा आहे. स्त्रियांची कर्तव्यें आणि हक्क ह्मणजे केवळ आजची कर्तव्यें व हक्क असा अर्थ नाहीं. ऐतिहासिक दृष्टयाच या विषयाचा विचार प्रस्तुत करावयाचा आहे. या विषया संबंधाच्या कित्येक गोष्टी पूर्वी संस्कार, विवाह इत्यादिकांच्या विवेचनांत येऊन गेल्याच आहेत. या व्याख्यानांत त्यांचा साभाजिक दर्जा व हक्क कसे काय होते हैं पहावयाचें आहे. समाजांत स्त्री अनेक नात्यांनी वावरते. आई, मुलगी, बायको, बहीण इत्यादि नाती तिची असतात. ही निरनिराळी नातीं घेऊन या विषयाचा विचार करूं. स्मृतींत अनेक विषय येतात. उदाहरणार्थ याज्ञवल्क्यस्मृति घेतली तर तिचे तीन भाग आहेत, आचाराध्याय, व्यवहाराध्याय व प्रायश्चित्ताध्याय. यांतील व्यवहाराध्यामांत माणसाचे खासगी अधिकार, वाक्पारुष्य, दंडपारुष्य, दायभाग, दान इत्यादि विषय येतात. या व्याख्यानांत स्त्रियांसंबंधाने हे व्यवहारकांड काय ह्मणते याचाच थोडक्यांत विचार करावयाचा आहे. सामान्यतः सर्व सुधारलेल्या समांजांत पुरुष व स्त्रिया यांची संख्या थोड्या बहुत फरकानें समान असते. निसर्गाचीच ही योजना आहे. ह्मणजे असें ह्मणतां येईल कीं, समाजरूपी रथाची दोन चाकेंच पुरुष व स्त्रिया ही होत ' यथा ह्येकेंन चक्रेण न रथस्य गतिर्भवेत् ' जसा एकाच चाकानें रथ चालू शकत नाहीं, त्याप्रमाणे स्त्रीपुरुषांच्या सहकार्याशिवाय समाजहि चालणार नाहीं. समाजाचा उत्कर्ष या सहकार्यावर अवलंबून आहे. कित्येक लोक स्त्रियांचाच कैवार घेऊन बोलतात तर दुसरे त्यांची सर्वथैव निंदा करून त्यांना मूर्ख साहसी अशीं दूषणें देतात. ' अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभिता ' इत्यादि दुर्गुण स्त्रियांत स्वाभाविकपणेच असतात असें या दुसऱ्या पक्षाचें म्हणणें असतें. धर्म शास्त्रांचे ग्रंथ पुरुषांनी केले त्यावेळी स्त्रिया विद्वान् नव्हत्या निदान लेखक नव्हत्या. यास्तव त्यांच्याविषयीं एकपक्ष लिहिण्यांत आले असे म्हणतात. पण धर्मशास्त्रांत स्त्रियांची स्तुति जशी येते तशी निंदाहि येते. पुरुष हे सारे अरेराव व जुलमी, स्त्रियांनी आप ल्याला देव मानावें अर्से समजणारे आहेत असें स्त्रियांनीं समजणें व उलट स्त्रिया म्हणजे सान्या मूर्ख लबाड असे पुरुषांनी प्रतिपादर्णे ह्रीं दोन्हीं अयुक्तच. स्त्रिया म्हणजे येथून तेथून साऱ्या देवी व पुरुष तेवढे सगळे जुलमी असे म्हणणेही चुकीचें आहे. सगळ्याच स्त्रिया तारा मंदोदरीच्या वर्गातील आहेत किंवा त्या पुढे मागें साऱ्या देवता ( Angels ] होतील असेंद्दि नाहीं. पूर्वीच्या ग्रंथांत पुरुषग्रंथकारांनी स्त्रियांची बाजू मांडली नाहीं हे थोडेसे खरें असले तरी स्त्रियांचा कैवार घेणारे कांहीं ग्रंथकार झाले आहेत. उदाहरणार्थ याज्ञवल्क्यस्मृतीवरील विज्ञानेश्वराच्या मिताक्षरानामक टीकेवर बालंभट्टी म्हणून जी टीका आहे तिच्याविषयी पूर्वी सांगितलेच आहे. ही टीका लक्ष्मीदेवी नामक स्त्रीच्या नांवावर कांही जण घालतात; पण खरा प्रकार तसा दिसत नाहीं. या टीकेंत स्त्रियांचा फार कैवार घेतलेला आढळतो म्हणून ती स्त्रीकृत आहे असे समजतात व त्या कारणास्तव ' पत्नी दुहितरश्चैव पितरौ भ्रातरस्तथा ' ( या. २, १३५ - १३६ ) इत्यादि श्लोकांवरील बाळंभट्टी टर्कित ' भ्रातरः ' शब्दांत बहिणीचाहि अंतर्भाव होतो असे जें सुचविले आहे, त्याला मुंबई हायकोर्ट मान्यता देत नाहीं. पुत्रहीन स्थितींत पुरुषाला मरण आल्यास त्याची संपत्ति कोणाकडे कोणत्या क्रमानें जावी हैं या श्लोकांत सांगतांना प्रथम पत्नी, मग कन्या, त्यानंतर आईबाप, नंतर भाऊ, त्यांच्या नंतर भावांचे मुलगे, मग इतर गोत्रज व बंधु इत्यादि क्रम दिला असून बहिणीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बहिणीला भावाच्या द्रव्यांत वारसा केव्हांहि नाहीं असे सर्वजण म्हणतात. पण बाळंभट्टींत ' पुमान् स्त्रिया ' या पाणिनिसूत्रानुसार ' भ्रातरः एकशेष समजून बहिणींचाहि त्यांत अंतर्भाव केलेला आहे. अशा रीतीनें ही बालंभट्टी स्त्रियांची कैवारी आहे. तिचे कर्तृत्व स्त्रीकडे नसले तरी इतर कांहीं शीला, विज्जा इत्यादि स्त्रिया प्राचीन काळी काव्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. लीलावती नामक सुप्रसिद्ध स्त्री ज्योतिषी भास्कराचार्य यांची कन्या असून तिनेंच लीलावती नामक गणितशास्त्रावरील ग्रंथ रचिला असे म्हणतात; निदान तो तिच्यासाठी रचिलेला होता असे दिसतें. धर्मशास्त्रावर सुद्धां यापुढें स्त्रिया ग्रंथ लिहूं लागतील यांत शंका नाहीं. हिंदु कायद्यासंबंधानें कु. बाळुताई खरे व रा. केळकर यानीं 'हिंदुव्यवहारशास्त्र नावाचा ग्रंथ अलीकडे लिहिलेला आहेच. चाळीस वर्षांपूर्वीची आमच्या स्त्रियांची स्थिति त्यांच्या आजच्या स्थितीशीं ताडून पाहिल्यास यापुढें स्त्रिया धर्मशास्त्र, समाजशास्त्र, इत्यादि अनेक विषयांवर ग्रंथ लिहिण्यास समर्थ होतील अर्से सहज दिसून येईल. स्त्रियांना शिकून काय करायचे ? त्यांना काय नोकऱ्या करावयाच्या आहेत ? असे प्रश्न बहुधा त्यावेळी विचारण्यांत येत. पण आतां तसले प्रश्न कोणी विचारीत नाहीत. उलट नवीन तरुण लग्न करतांना वधू किती शिकलेली आहे हेंच पाहातात; कोणी बी. ए. बायको पाहिजे म्हणतो तर कोणी मॅट्रिक तरी पाहिजे म्हणतो. मुलींना शिकवावें कीं नाहीं असाच जेथें वाद होता तेथें स्त्रियांच्या स्वतंत्र विद्यापीठाचा प्रश्नच नव्हता. पण आतां त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ प्रो. कर्वे यांनी काढले आहे. इतकी प्रगति आज चाळीस वर्षात झाली. अर्थात स्त्रिया यापुढे आपली कर्तव्यें व हक्क यांना जागूं लागतीलच. पण यो चावतींत एवढे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हां पूर्वीचे धर्मशास्त्रकार स्त्रियांच्या हक्कावर गदा आणतात असे दिसतें, तेव्हां ते त्या स्त्रिया म्हणून तसे करतात असें मात्र नाहीं. सामाजिक जबाबदारीची जी कल्पना त्यावेळी रूढ होती, तिला अनुसरून त्यांनी निर्बंध घातले होते. पण त्यावरून स्त्रियांची निंदाच करण्याचा त्यांचा हेतु होता असें म्हणता येत नाही. मनूनें स्त्रियांना जशी दूपणें दिली आहेत, तशी त्यांची स्तुतिह त्यानें पुष्कळच केलेली आहे. ' न हि निंदा निन्द्यं निन्दितं प्रवृत्ता' म्हणजे निंदा ही केवळ निंदेसाठी नसते, तर कर्तव्य गोष्टीवर विशेष भर देण्यासाठी असते. उदाहरण, दूध विकणारा ब्राह्मण तीन दिवसांनी शूद्र होतो अमें जेव्हा स्मृति सांगतात, तेव्हा त्याचा अर्थ तो खरोखर तिसऱ्या दिवशी शूद्र होतो असा नसून त्यानें दूध विक्रं नये एवढेच सागण्याचा हेतु असतो. तमें नसतें, तर त्याच्या मुलामुलीना ब्राह्मण घराण्यांत स्थळे मिळण्याची पंचाईत पडली असती. पण तसा त्या निंदेचा अर्थ नाही. प्रस्तुतच्या स्त्रीविषयक विशिष्ट कल्पना आपण पाश्चात्यांकडून घेतल्या आहेत. पण जरा इतिहासाकडे वळून पाहिल्यास काही काळापूर्वी यूरोपांत तरी स्त्रियांची स्थिति काय दृष्टीस पडते ? पंधरा सोळाशे वर्षापूर्वीच्या होऊन गेलेल्या याज्ञवल्क्य स्मृतीने स्त्रियाना जी पदवी समाजांत दिली तिच्या दशाशहि इंग्लिश स्त्रियाची स्थिति अवव्या साठ वर्षापूर्वी नव्हती. सन १८७३ या वर्षी इंग्लडात 'विवाहित स्त्रीविषयक कायदा ( Married Women's Property Act ) झाला. त्या पूर्वीच्या कायद्याने एखाद्या स्त्रीला तिचा बाप, भाऊ अशा नातेवाईकाकडून स्थावर जंगम संपत्ति मिळाली तरी विवाहानंतर ती तिच्या नवऱ्याकडे जाई. जंगम संपत्तीचा नवन्यानें वाटेल तसा व्यय करावा, त्यांत बोलण्याचा त्या स्त्रीला अधिकार नसे. स्थावर संपत्तीवर हि नवऱ्याचाच अधिकार त्याच्या हयातीपर्यंत असे. आजहि जर १८७३ पूर्वी लग्न झालेले एखादें जोडपें हयात असेल तर त्याला जुना कायदाच लागू होईल. त्यानंतरच्या लग्नांना मात्र नवा कायदा लागू आहे. एखाद्या मनुष्याची स्थावर संपत्ति असून मृत्युपत्र केल्याशिवाय जर तो निपुत्रिक मृत झाला तर ज्येष्ठाधिकाराच्या ( Primogeniture ) नियमानुसार ती त्याच्या बायकोला न मिळतां हयात अस लेल्या त्यांतल्या त्यात जवळच्या पुरुष नातेवाईकाला मिळे. पण याज्ञवल्क्यस्मृतीप्रमाणें मनुष्याची संपत्ति प्रथम त्याच्या स्त्रीला मिळणार; स्त्री नसेल तर मुलींना व त्या नसतील तर मुलीच्या मुलाला, नंतर आईबापांना, या क्रमानें ती मिळावयाची असते ( पत्नी दुहितरश्चैव इ० या. स्मृ. २, १३५ ) . आमच्या स्मृतिकारांनी स्त्रीधन स्वतंत्रपणें सांगितले असून नवरा जर त्याला विशिष्ट चिकट प्रसंगाशिवाय हात लावील, तर त्याला चोर समजून राजाने त्याला दंड करावा असे म्हटलें आहे. व्याधिग्रस्त झाल्यामुळे औषधपाण्यासाठी किंवा धनकोनें घर धरल्यास त्याप्रसंगी मात्र स्त्रीधनाचा उपयोग नवऱ्याला करता येई. हिंदु व इंग्लिश या दोन्ही कायद्यात असा फरक आहे. मुसलमानी कायद्यात मुलाबरोबर मुलींनाहि बापाच्या संपत्तीचा काही भाग मिळतो. आई, बायको, मुली, मुलगे या सर्वांमध्यें पष्ठाश, अष्टमांश अशा प्रमाणांत संपत्तीची विभागणी झाल्यामुळे एखाद दुसऱ्या पिढीतच मोठी संपत्ति देखील त्या कायद्यामुळे तुकडे तुकडे होऊन नष्ट होते. पण आमच्या कायद्याप्रमाणें एक एकटाच वारस होतो व त्यामुळे संपत्ति बराच काळ एकत्र राहू शकते. संपत्तीच्या वारसदारांमधील वाटणीसंबंधाच्या या विविध कायद्यांतील कोणता उत्तम आहे हें सागणें कठीण आहे. वस्तुतः त्याची तुलना करणेंच योग्य नव्हे. इ. स. पूर्वी किंवा त्यानंतर थोड्याच काळांत झालेले स्मृतिकार आणि आजच्या काळातील कायदे यांची तुलना कशी होऊं शकेल ? स्त्री पुरुष या दोहोंना आत्मा, मन, शरीर ही असल्यामुळे दोहोंच्याहि बाबतींत त्या सर्वाचा विकास झाला पाहिजे ही गोष्ट योग्य आहे; पण त्याबरोबर हेंही लक्षात ठेविलें पाहिजे कीं, स्त्रिया व पुरुष यांच्यांत कांहीं बाबतींत निसर्गानेंच फरक केलेला आहे. प्रजोत्पत्ति व बालसंगोपन या गोष्टी निसर्गानें स्त्रियांकडेच सोंपविल्या आहेत व त्या दृष्टीनें स्त्रिया आणि पुरुप याच्या कर्तव्यांत स्वाभाविकपणेंच थोडा बहुत भेद होणे अपरिहार्य आहे. आमच्या धर्मशास्त्रांत विवाहाचें ध्येय धर्म व प्रजा हैं सांगितले असून त्याविषयी पूर्वीच्या व्याख्यानांत विवेचन येऊन गेलेंच आहे. पण आज तसें ध्येय मानण्याची प्रवृत्ति कमी कमी होऊं लागलं असून भोग भोगण्याची प्रवृत्ति वाढत आहे. मुळांत हेतूच बदलल्यामुळे त्यावर उभारलेले विधिनिषेध आतां कसेसेच वाटूं लागले आहेत. पूर्वी पुत्र पाहिजे ही कल्पना जोरांत होती. पुत्राच्या योगानें पितृऋण फेडण्याची कल्पना तेव्हां होती. तिला अनुसरून पुत्राला जें महत्व मिळाले, त्यामुळे स्त्रियांविषयींच्या कित्येक कल्पना उत्पन्न झाल्या. पण पाश्चात्य देशांतर ज्येष्ठापत्याच्या अधिकाराचा (Primogeniture ) कायदा पुरुषानाच लागू होता, मुलगी वडील असेल तर तिला कांही बापाची संपत्ति मिळत नसे. आपल्याकडेहि वतनाचे हक्क स्त्रियांना मिळत नाहीत. असले कायदे राष्ट्राचें धोरण पाहून केलेले असतात. असो. समाजांत स्त्रियाचें नातें अनेक प्रकारचें असतें हें पूर्वी सांगितलेंच, त्या विविध नात्यांनी स्त्रियांची स्थिति कशी दिसून येते तें आतां क्रमशः पाहूं. सामान्य दृष्टीने विचार स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रथम विचार करूं. प्राचीनकाळी स्त्रियांना शिक्षण अवश्य होतें असेंच दिसून येतें. परमेश्वराचे निश्वासभूत जे वेद X त्यांतील कित्येक सूक्तांच्या X यस्य निश्वसितं वेदा यो वेढेभ्योऽखिलं जगत् । निर्ममे तमहं वन्दे विद्यातीर्थमहेश्वरम् ।। सायणभाष्य; ' अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद्यभ्चदो यजुर्वेदः सामवदेः ' (बृह. उ. २.४.१०) |
सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. सातार्याला जाणार्या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी. पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात आहे. पाटेश्वरचे मंदिर अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधले. Pateshwar Mandir ,Degaon ,Satara. (Pateshwar Temple, Dist. Satara) पाटेश्वरचा डोंगर चढतांना रस्त्यात दगडात कोरलेली गणपतीची प्राचीन मुर्ती पहायला मिळते. डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली " विश्वेश्वर पुष्करणी" आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीवर शिवाची दुर्मिळ "अजएकपाद"मूर्ती कोरलेली आहे, या शिल्पातील मुर्तीला एकच पाय कोरलेला आहे. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. सातारा ते सातारा एम.आय.डी.सी ७ किमी व सातारा एम.आय.डी.सी ते देगाव ७ किमी अंतर आहे. देगावला जाण्यासाठी सातार्याहून सिटी बस व रिक्षाची सोय आहे. देगाव बस स्थानकाच्या मागील डोंगरावर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पावसाळा सोडून इतर ऋतुत जीप सारखे वहान जाऊ शकते. या रस्त्याने आपण पाऊण तासात पाटेश्वरला पोहोचतो. |
धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन धान खरेदी करीत आहेत. बाजार समितीतील सुध्दा धानाला कमी भाव मिळत असून २५० ते ३०० रूपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केल्याची घोषणा केली. परंंतू, प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात हलके धान निघाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी धान विक्री करणे सुरू केले. धानाला व्यापाऱ्यांनी सुरूवातीपासून भाव दिला नाही. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील २० दिवसापासून धानाची आवक वाढली. येथेही प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना किमान २०० ते ३०० रूपये तोटा सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डावर अडतीया मार्फत धानाची बोली बोलली जाते. निश्चितच बोलीची सुरूवात येथे कमीच राहते. धानाची आवक वाढल्याने दलालांची तथा व्यापाऱ्यांची सध्या बल्ले-बल्ले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जावून धान खरेदी करणे सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. परंतु, नगदी रक्कम मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकरी या व्यापाऱ्यांकडे आकर्षित होत आहे. आधारभूत धान खरेदी आज होईल, उद्या होईल याकडे बळीराजा नजरा लावून होते. मात्र, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. दिवाळी आली असतानाही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, बाजारात गर्दी नाही त्यामुळे व्यापारीसुध्दा हातावार हात देऊन ग्राहकांची प्रतिक्षा करीत आहेत. मागील शासनाच काळात सप्टेंबर महिन्यात नियोजन करून १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. सध्या तसे आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यावरही किमान १५ दिवस नियोजनाकरिता लागणार आहेत. नियोजनाचा येथे अभाव दिसून येतो. मागील एक महिन्यापासून शेतकरी धान विक्री करीत आहेत. हे धान व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर ही व्यापारी मंडळी धान खरेदी केंद्रावर हे धान विक्री करून मोठा नफा कमावण्याची शक्यता अधिक आहे. उशिरा धान खरेदी केंद्र सुरू करण्यामागची ठोस कारणे शासन सांगण्यास असमर्थ ठरले आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासन लहान शेतकऱ्यांचा बळी घेत आहेत. मागील शासनाच्या काळात सप्टेंबरमध्येच नियोजन होऊन १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले होते. - अनिल बावनकर, माजी आमदार, तुमसर. |
कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. । TodaysLive\nकोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून उद्या दुपारपर्यंत अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.\nअरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीच परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचना केल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वतः फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.\nमाजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. |
महाराष्ट्रामध्ये यंदा 2 ऑगस्ट पासून श्रावण मासारंभ होणार आहे. आषाढ अमावस्येनंतर श्रावणाला सुरूवात होते. त्यामुळे आज (1 ऑगस्ट) पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात सुरू होणार्या या श्रावण महिन्यासोबत तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, मांगल्य नांदो यासाठी प्रार्थना करून या नव्या पर्वाच्या शुभेच्छा नक्की शेअर करा. |
Last Modified सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (16:01 IST) प्रश्न असा आहे की जर एखादा व्हिडिओ लीक होऊन पॉर्न वेबसाइटवर अपलोड झाला असेल तर तो काढण्याचा काही मार्ग आहे का? होय, अशा काही स्टेप्स आहेत ज्याचे अनुसरण करून तुम्ही पॉर्न साइट किंवा सोशल मीडिया वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडिओ किंवा फोटो हटवू शकता. यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे हाच उत्तम पर्याय मानला जातो. तथापि, यास बराच वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधून व्हिडिओ हटवण्यास सांगू शकता. वास्तविक, बहुतेक वेबसाइट कॉपीराइट धोरणाचे पालन करतात. यामुळे ती अशा पोस्ट लगेच काढून टाकते. तुम्ही वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसल्यास काय करावे? आता तुम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल. तुम्हाला तिसऱ्या पक्षाकडे जावे लागेल. यासाठी तुम्हाला www.whois.com या वेबसाइटची मदत मिळेल. यामध्ये कोणत्याही वेबसाईटचे डोमेन नेम टाकल्यास त्याच्याशी संबंधित संपूर्ण तपशील उपलब्ध होतो. येथून आपण साइट मालकाशी संपर्क साधू शकता आणि त्याच्याकडून व्हिडिओ काढला जाऊ शकतो. पॉर्न साइट्सवरून व्हिडिओ काढून टाकणे खूप सोपे आहे हे माहित आहे. यासाठी व्हिडिओच्या तळाशी तक्रार करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही व्हिडिओ डिलीट करण्याचे कारण देऊन तुमचे काम करून घेऊ शकता. गुगल सर्च रिझल्टमधून कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकणे सोपे आहे. तुम्ही Google ला संपर्क करा. यासाठी तुम्हाला https://support.google.com/websearch/troubleshooter/3111061#ts=2889054%2C2889099%2C288910This या साइटवर जावे लागेल. याद्वारे सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये महिलांना अधिक मदत केली जाते. वेबदुनिया वर वाचा : निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. Two Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय? महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे. खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. नाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले. नवी दिल्ली. देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी या दहशतीमुळे अनेक लोक घराबाहेर पडले. या भूकंपाची माहिती देताना नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, नवी दिल्लीच्या पश्चिमेला 8 किमी अंतरावर आज रात्री 9.30 च्या सुमारास 2.5 तीव्रतेचा भूकंप झाला. नवी दिल्ली इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp ने युजर्सची सोय आणि यूजर इंटरफेस सुधारण्यासाठी मेसेज युवरसेल्फ नवीन फीचर जारी केले आहेत. हे वैशिष्ट्य प्रथम चाचणीसाठी जारी करण्यात आले. आता कंपनीने ते जागतिक स्तरावर आणण्याची घोषणा केली आहे. मुळात, ही 1:1 चॅट आहे जी तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या नोट्स, रिमाइंडर आणि दस्तऐवज जतन करू देते आणि स्वतःला संदेश पाठवू शकता. निवांत व्हा.. दिवसभरातल्या सर्व चिंता बाजूला सारा, आणि शांत झोपी जा... पण, तुम्हाला जर रात्री झोप लागत नसेल किंवा त्यात काही समस्या येत असतील, तर अशी समस्या असलेले तुम्ही एकटे नाहीत. आपल्यापैकी जवळपास एकतृतीयांश लोकांना झोप लागण्यासंबंधी किंवा लागलेली झोप टिकण्याबाबत समस्या असतात. अगदी बीबीसीचे पत्रकार आणि डॉक्टर असलेल्या मायकल मॉस्ले यांनाही ती समस्या होती. |
एक squinting सुधारक एक संदिग्ध सुधारक आहे (सामान्यतः फक्त एक कृती म्हणून), जे आधी आणि नंतर दोन्ही शब्द पात्र असल्याचे दिसत आहे. यास दोन मार्गांचे फेरफिल्ड किंवा squinting बांधकाम देखील म्हणतात. वाक्यामध्ये त्याचे स्थान बदलून सामान्यतः एक squinting modifier सुधारीत केले जाऊ शकते. स्क्विंटिंग मॉडिफायरची काही उदाहरणे येथे आहेतः - जे ऐकतात ते सहसा तुम्ही विश्वास ठेवता. - क्वचितच श्रेणी रद्द करणा-या प्रशिक्षकांना फटके मारतात. - नवीन प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आमच्या प्रथम सभेस सहमती दर्शविली. - खेळ संपल्यावर मी मर्दिनला सांगितले , मी त्याला बिंगो हॉलमध्ये नेले. - येथे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित माहित नाहीत की आम्ही सामायिक करू इच्छितो. - " आम्ही पूर्णपणे गोषवारा तर्क मान्य करू शकत नाही संवादात्मक क्रियाविशेषण पूर्णपणे क्रिया करण्यापूर्वी किंवा त्यास खालील विशेषण मध्ये फेरबदल करू शकते. एका अशा सुधारकांना काहीवेळा squinting modifier असे म्हणतात --it एकाच वेळी दोन दिशानिर्देश दिसतो असे दिसते. संशोधक जेव्हा आम्ही जे लिहिले आहे ते शोधताना शोधणे कठिण असू शकते कारण आपण स्वतःच काय करतो आणि काय शिकतो हे समजणे चुकीचे आहे, हे केवळ अस्पष्ट आहे. आम्ही पूर्णपणे अमूर्त तर्क स्वीकारू शकत नाही किंवा आपण पूर्णपणे अमूर्त तर्कशास्त्र स्वीकारू शकत नाही . दुसऱ्या अर्थाने, आपल्याला वाक्य अधिक गुंतागुंतीत करावे लागेल आणि एक सापेक्ष खंड वापरणे आवश्यक आहे कारण मूळ वाक्यात तेथे पूर्णपणे स्थिती नाही त्यामुळे ते अमूर्तपणे अमूर्तपणे बदलू शकतील. " (एडवर्ड डी. जॉन्सन, द हँडबुक ऑफ गुड इंग्लिश , सायमन अँड शुस्टर, 1 99 1) - "सैद्धांतिकदृष्ट्या केवळ नियतकालिकाला वाक्याच्या अर्थाचा परिणाम होतो . . . परंतु सरावांत मला फक्त एक हवे आहे, मला फक्त एक हवे आहे आणि मला फक्त एकच एकच अर्थ असावा अशी अपेक्षा आहे, ताल आणि जोर यातील फरक असूनही. जरी आपण असे शिकले असेल की केवळ त्या शब्दाची अंमलबजावणी होण्याआधीच नेहमी थेट असावा, तर शैलीतील बहुतेक समकालीन लेखकांनी त्या नियमाचे पात्र केले पाहिजे आणि असे आवाहन केले की या वाक्यात ध्वनी आणि अनैसर्गिक अशी वाक्ये आहेतः क्रियापदावर येण्याआधी क्रियापदावर येण्याआधी, आणि अनैसर्गिक प्लेसमेंट वाचन मध्ये बाधा आणत असेल तरच प्रत्येक उदाहरणामध्ये आपण फक्त अशी अपेक्षा करतो. . . . [प. कोंब केवळ अस्पष्टतेशिवाय त्याच्या मुर्तिगत ठिकाणी येते, ते उभे रहावे. "परंतु 'अस्पष्टता न घेता' एक महत्वाची पात्रता आहे. आपण शब्द बदलून त्याऐवजी क्रियापदापूर्वीच टाकून आपण कधी कधी वाक्यात गोंधळ करू शकता. जर आपण जर असे लिहित असाल की समिती केवळ त्यांच्या प्रस्ताव , वाचकांमध्ये रस दाखवत होती हे समजणे आवश्यक नाही 'केवळ त्यांच्या प्रस्तावातच रस होता. ' कदाचित समिती केवळ व्याज ढळणारी होती . . . म्हणूनच फक्त आपल्या सोबत काळजी घ्या. " (क्लेअर केहरवाल्ड कुक, लाइन बाय लाइनः तुमची स्वतःची लिखित रचना कशी करावें. ह्यूटन मिफ्लिन, 1 9 85) फक्त एक हँडबुक समस्या? " टी तो मोडक मोडणे मुख्यतः महाविद्यालयीन स्तरावरील हँडबुकमध्ये असतो. या संज्ञा दोन वाक्यरचना घटकांमधील एक अभिव्यक्ती किंवा वाक्यासाठी वापरली जाते आणि यापलीकडे काय किंवा काय पुढे काय होते हे सुधारण्यासाठी घेतले जाऊ शकते. "आम्हाला कोरियामधील एका बातमीदाराकडून पाठवलेल्या उदाहरणाकडे पाहाः ज्या स्टोअरमध्ये मोठी विक्री होती ती अलीकडेच दिवाळखोर बनली. "कॉलेज हँडबुकमध्ये दाखविलेल्या स्क्वंटिंग मॉडिफायरची उदाहरणे आपण वापरलेल्या एकाच्या तुलनेत आहेत आणि प्रत्यक्ष लेखनमध्ये ते असंभवनीय दिसत आहेत. " ( मेरियम-वेबस्टरची संक्षिप्त शब्दकोश इंग्रजी वापर , 2002) |
मुंबई : केंद्र शासनाचा औदयोगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उदयोजकता विभाग व महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या स्टार्ट अप महाराष्ट्र यात्रेचे उदघाटन उदया दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राजभवन येथून होणार आहे. राज्यपाल चे.विदयासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य उदयोग मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास आणि उदयोजकता राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही बातमी पण वाचा : मंत्रिमंडळ विस्तार दसऱ्यानंतरच ! महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना स्टार्ट अप विषयात योग्य मार्गदर्शनमिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा महाराष्ट्रातीलउद्योजकांना लाभ मिळण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या 'महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजभवन येथून या यात्रेचे उदघाटन झाल्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणार असून स्टार्ट अप यात्रा निमित्त्ताने विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्ट अप व्हॅन राज्यभरात फिरणार आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेची ग्रॅड फिनाले नागपूर येथे होणार आहे. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींना तथा उदयोजकांना स्टार्ट अप इंडिया अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी www.startupindia.gov.in किंवा www.msins.in वर याबाबत नोंदणी करता येईल. |
दोन वर्षा पासून कोरोना महामारणे सर्वसामान्यांचे जंनजीवन ते विध्यार्थी शिक्षण वीसकळीत केले आहे. शिक्षण स्वस्था द्वारे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधून काढला परंतु . सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार कुटूंबायातील विध्यार्थानां हा पर्याय परवडणारा नोव्हता. कोरोना काळात जगणे मुश्किल झाले होते. त्या नंतर कशे बशे जीवन मान रुळावर येत अस्थाना. शिक्षण स्वस्थानानी शाळा ऑनलाईन घेवायचे ठरविले. निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी प. स. शिक्षण अधिकाऱ्यांन निवेदन सादर केले सादर प्रकारणात जातीने लक्ष घालून विध्यार्थी पालकांना न्याय मिळून द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना, व स्वाभिमानी विध्यार्थी संघटना, विध्यार्थी, व त्याच्या पालकांना घेऊन आंदोलन असा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला. |
त्यांच्या मागे मुलगा , दोन मुली , बहिण , पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा परिवार आहे . नारायणगाव येथील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकलचे आशिष कोठारी यांचे वडील तर पुणे येथील प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ . सुधीर कोठारी यांचे ते चुलते होत . चंद्रभान मूळचंद कोठारी यांचे जुन्या काळातील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकल आहे . अनेक गरजूंना आर्थिक मदत करीत असत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही प्रसिद्धी न करता गुप्तरीत्या त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला १ लाख ११ हजार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख रुपयांची आर्थिक मदत पाठविली होती . नारायणगावच्या जडणघडण मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे . |
तुम्हाला सुद्धा तुमच्या वाहनातून प्रवास करायचा असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving License) ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तुम्ही तुमच्या घरातून आरामत फक्त 350 रुपयांमध्ये लायसन्ससाठी अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. जर तुम्हाला पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्स मिळत असेल तर तुम्हाला शिकाऊ परवाना (Driving Learning license) मिळवण्यासाठी एक चाचणी द्यावी लागेल. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, आपण शिकाऊ परवान्यासाठी पात्र व्हाल. एकदा लर्निंग लायसन्स तयार झाले की ते काही महिन्यांसाठी वैध असते. या काळात तुम्हाला गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल किंवा वाहन चालवायला शिकावे लागेल. वाहन शिक्षण परवान्याची मुदत संपण्यापूर्वी तुम्हाला परवान्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. License साठी अर्ज कसा करावा? कायम परवान्यासाठी (Driving License) तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घ्या. र्वप्रथम, तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट Https://Parivahan. Gov. In/ वर जा. तुमच्या स्क्रीनवर होम पेज (मुखपृष्ठ) उघडेल. मुख्य पृष्ठावर, आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल. त्यानंतर तुम्ही पुढील पानावर पोहोचाल. सर्व प्रथम, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्सच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पुढील पानावर ड्रायव्हिंग लायसन्सचे टप्पे दिले जातील. तुम्हाला खाली सुरू असलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा शिकाऊ परवाना क्रमांक (Driving Learning license) आणि जन्मतारीख भरावी लागेल आणि OK च्या पर्यायावर क्लिक करा. |
BGO/ MMP/D/ प्रा.सुरेश नवले... गडकोटांना जतन करण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी गरज पडली तर केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी किंवा माननीय पंतप्रधांनाना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी. या ऐतिहासिक वास्तू विशद करून त्या जतन करणे कसे आवश्यक आहे हे जर त्यांना सांगितले आणि त्या वास्तू जतन केल्या तर महाराष्ट्रातील जनता आपल्याला दुवा दिल्या शिवाय राहणार नाही. ती दूरदृष्टी निश्चितपणे शासनाकडे आहे असा अभिप्राय या क्षणी मी व्यक्त केला तर तो अप्रस्तुत ठरू नये. महाराष्ट्राने 54 विशाल प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. 43 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. 30 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असणारा हा विभाग आहे. विदर्भामध्ये रूपये 18500 कोटींचे आश्वासित करार झालेले आहेत. उद्योग विभागाला चालना देण्याचा प्रयत्न उद्योग विभागाचे प्रमुख माननीय उद्योग मंत्री श्री.नारायण राणे यांनी केलेला आहे. श्री. राणे साहेब दूरदृष्टी असणारा नेता आहे. महराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यक्षमतेने काम करणारा नेता आहे. भविष्याच्या गर्भामध्ये काय दडले आहे हे शोध घेणारा हा नेता आहे. त्यामुळेच त्यांनी उद्योग खात्याला चालना दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. असुधारित प्रत यानंतर श्री. अजित.... |
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि. १५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. सिडको : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि. १५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. नवोदित कवींचे अहिराणी कवी संमेलन होणार असल्याची माहितीही खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्ष सौ. सुनिता पाटील यांनी दिली. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (जळगांव), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा. किसन पाटील, वा. ना. आंधळे (जळगांव), प्रा. तानसेन जगताप (चाळीसगांव), रामदास वाघ (धुळे), डॉ. रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. |
खाण्याबाबत आधी बेफिकिर राहून नंतर कडक डाएट करणं काही बरं नव्हे. त्यापेक्षा योग्य आहारालाच जीवनशैली बनवणं केव्हाही चांगलं. त्यासाठी काही टिप्स. खाण्याबाबत आधी बेफिकिर राहून नंतर कडक डाएट करणं काही बरं नव्हे. त्यापेक्षा योग्य आहारालाच जीवनशैली बनवणं केव्हाही चांगलं. त्यासाठी काही टिप्स. जसे खाल तसे दिसाल, या उक्तीप्रमाणे तुम्ही काय खाता, किती खाता, कसं खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. अन्न हे पूर्णब्रह्म असलं, तरी त्याचं सेवन योग्य प्रमाणात होणं हेही तितकंच गरजेचं आहे. तसं झालं तरच त्या अन्नातून योग्य ऊर्जा, आवश्यक पोषण मिळून हवा असलेला परिणामही साधता येतो. म्हणूनच फक्त वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे यासाठी शिक्षा वाटण्याइतपत चुकीचं 'डाएट' करण्यापेक्षा योग्य आहारालाच तुमची जीवनशैली बनवा. पुढे सांगितलेल्या काही टिप्स कटाक्षानं पाळल्यात, तर तुम्हाला योग्य आहाराचे नियम पाळणं नक्कीच सोपं जाईल. रोज किमान ६-७ तासांची शांत झोप घ्या. यामुळे सर्व इंद्रियांना आराम मिळून दिवसभरातील झीज भरून काढण्यास मदत मिळेल. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी चहा, कॉफी तत्सम पेय घेऊ नका. चहा- कॉफीमुळे जाग तर येईल; पण त्यातल्या कॅफिनमुळे शरीराला काहीही पोषण मिळणार नाही. त्याऐवजी एखादं फळ किंवा रात्रभर पाण्यात भिजवलेलं सुकं फळ खा. यामुळे रात्रभर न खाल्ल्यानं खालावलेली रक्तातील साखरेची पातळी सुधारेल. नाश्ता कधीही टाळू नका. ब्रेकफास्टचा अर्थच रात्रभर पेशींना झालेला उपवास सोडणं असा आहे. नाश्त्यामध्ये पोटभरीचे पदार्थ उदा. पोहे, उपमा, पराठा, थालीपीठ खा. सकाळी चयापचय क्रिया वाढलेली असते, त्यामुळे पोषकतत्त्वांनी युक्त असाच नाश्ता घ्या. दुपारचं जेवण योग्य प्रमाणात, तर रात्रीचं जेवण हलकं घ्या; कारण दिवस मावळेल तशी चयापचय क्रिया मंदावत जाते. तीन मुख्य खाण्याच्या वेळांमधे ताक आणि सलाड, फळ, शहाळं, सुकामेवा, फुटाणे अशा छोट्या खाण्याचा समावेश करा. यामुळे दोन खाण्यातील अंतर कमी होईल. म्हणजेच दर दोन-तीन तासांनी खाल्लं जाईल. त्यामुळे शरीरास नियमित कॅलरीज, पोषक तत्त्वं मिळतीलच; शिवाय शरीरात चरबी साठण्याचं प्रमाण कमी होईल. ६-७ भागात खाणं विभागल्यामुळे भूक आणि खाण्याचं प्रमाण याचा ताळमेळ साधला जाईल. रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी दोन- अडीच तास आधी करा म्हणजे ते व्यवस्थित पचेल. प्रत्येक घास हळू व व्यवस्थित चावून खा. यामुळे अन्नाचं विघटन होऊन ते पचतं आणि योग्य प्रमाणातही घेतलं जातं; कारण पोट भरल्याचा संदेश मेंदूला मिळण्यास १५-२० मिनिटं लागतात. खाण्याबरोबरच पाण्याच्या प्रमाणाकडेही लक्ष द्या. किमान ८-१० ग्लास पाणी प्या. शक्य तितकं घरचं, ताजं अन्न घ्या. बाहेरच्या खाणं सतत शिजवल्यामुळे त्यातली पोषणमूल्यं कमी झालेली असतात. शिळं अन्न शक्यतो खाऊ नका. त्यातली पोषणमूल्यं नष्ट झालेली असतात. या सर्वांबरोबरच महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून किमान ४-५ दिवस योग्य तो व्यायाम करा. लक्षात घ्या प्रत्येकाची आहाराची गरज वय, उंची, लिंग, शारीरिक आजार अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. तरीही या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून योग्य जीवनशैलीकडे पाऊल टाकण्यास नक्कीच मदत होईल. |
बाबा पदमनजी : ( मे १८३१ - २९ ऑगस्ट १९०६ ). मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. पदमनजी माणिकजी मुळे ह्यांचे कुटुंब कासार जातीचे, धार्मिक वळणाचे, कट्टर मूर्तिपूजक आणि तत्कालीन मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृतीला जवळचे असे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रथम सरकारी आणि नंतर मिशन शाळेत झाले. १८४९ साली मुंबईस येऊन बाबांनी चौपाटीजवळील फ्री चर्च (विल्सन) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे शिक्षक नारायण शेषाद्री ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे सुरुवातीला बाबांचे त्यांच्याविषयीचे मत फार प्रतिकूल होते. डॉ. विल्सन, रेव्ह. मिचेल, रेव्ह. नेसबिट असे विद्वान शिक्षक त्यांना लाभले. हा काळ नव्या विचारांच्या उदयाचा होता. शालेय वयातच त्यांना वाचनाचा नाद लागला. फिरत्या ग्रंथ विक्रेत्यांकडून घेतलेले ग्रंथ, ज्ञानोदय, प्रभाकर, ज्ञानप्रकाश, शतपत्रे, काही धर्मविषयक पत्रिका, इंग्रजी-मराठी व्याख्याने ह्या सर्वांचा एकसंध परिणाम तत्कालीन युवकांच्या मनांवर होत होता. मूर्तिपूजा बंद करावी, जातिभेद मोडावा, विधवाविवाह रूढ करावेत, अशी त्यांची विचारधारा तयार होत होती. काही काळ ते 'परमहंस मंडळी' ह्या प्रागतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परंतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वरदत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आशयाचे विचार त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी ह्या संघटनेशी संबंध तोडला. हे तरुण ख्रिस्ती होणार असे बोलले जाऊ लागले होते. त्यात एक नाव होते ते बाबा पदमनजी ह्यांचे. बाबा पदमनजींनी ३ सप्टेंबर १८५४ रोजी, म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी, बेळगाव येथे रेव्हरंड टेलर यांच्याकडून बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. धर्मांतरानंतर जवळजवळ १६ वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. ७ एप्रिल १८६७ रोजी बाबा पदमनजींनी फ्री चर्च मिशनचे पाळक म्हणून दीक्षाविधी स्वीकारला. ते रेव्हरेंड बाबा पदमनजी बनले. पाच-सहा वर्षे पाळकाचे काम केल्यानंतर बाबांनी स्वतः संपूर्ण वेळ लेखनास वाहून घेतले. त्यानंतर ख्रिश्चन लिटरेचर सोसायटीसाठी त्यांनी लिखाण केले, अनेक नियतकालिके चालविली. १८७८ साली बाबांनी बायबल सोसायटीच्या व ट्रॅक्ट सोसायटीच्या संपादकाचे काम मुंबईत स्वीकारले. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी १८५७ साली यमुनापर्यटन ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. यमुनापर्यटन म्हणजे ह्या कादंबरीची नायिका यमुना हिच्या प्रवासाची कथा होय. मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलेली आणि ख्रिस्ती धर्माबद्दल प्रेम असलेली यमुना आपला पती विनायक ह्याच्यासह प्रवासास निघते. ह्या प्रवासात काही हिंदू विधवा त्यांना भेटतात; त्यांची दुःखे त्यांना दिसतात. दुःखी विधवांना यमुना येशूचा उपदेश ऐकवते. ह्या प्रवासातच विनायकाला अपघाती मरण येते. मरतेसमयी यमुना त्याला बाप्तिस्मा देते. यमुना विधवा झाल्यामुळे तिचे केशवपन घडवून आणण्याचे प्रयत्न होतात; पण यमुना ते होऊ देत नाही. तिचा सासराही तिला पाठिंबा देतो. पुढे यमुना एका ख्रिस्ती गृहस्थाशी विवाह करते; स्वतःही ख्रिस्ती धर्म स्वीकारते. यमुनेचा प्रवास जसा भौगोलिक, तसाच वैचारिकही आहे. ह्या प्रवासातील विविध अनुभवांतून यमुना ही ख्रिस्ताच्या अधिकाधिक जवळ जाते आणि अखेरीस ख्रिस्ती होते. या कादंबरीद्वारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा त्यांचा हेतू होता. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक 'हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण' असे ठेवले, त्यावरूनही हेच स्पष्ट होते. मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे साहित्यप्रकारांत जवळजवळ सव्वाशे पुस्तके बाबांनी लिहिली आहेत. बाबा पदमनजींनी शब्दरत्नावली या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस १८६० साली प्रसिद्ध केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. पदमनजीलिखित ग्रंथसंख्या सुमारे एकशेतीन भरते. जगातील महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतर झालेल्या त्यांच्या अरुणोदय ह्या आत्मचरित्राने मराठी साहित्याला एका नव्या क्षेत्रातील अनुभवाचा आणि अभिव्यक्तीचा परिचय घडवून दिला. तसेच तत्कालीन समाजाच्या ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक जीवनाचे यथोचित दर्शनही घडवले (१८८८). बाप्तिस्मा घेतल्यानंतरच्या चाळीस वर्षांतील अनुभवांवरचे त्यांचे अनुभवसंग्रह हे दोन भागांतील पुस्तक प्रभावी आणि परिणामकारक ठरले (१८९५). हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची माहिती करून देणारे वेदधर्मी लोकांचा वृत्तांत, हिंदू सणांविषयीचे वेद, मुहूर्त ज्योतिष, हिंदी-ख्रिस्ती धर्माविषयी संवाद, हिंदू धर्माचे स्वरूप, जातिभेद विवेचन, उद्धारमार्ग आणि विज्ञान, मानवशास्त्र असे वेगवेगळे विषय घेऊन बाबांनी निबंधलेखन केले असून ते पुस्तक रूपाने प्रसिद्धही झाले आहे. कॅंडीच्या कोशाव्यतिरिक्त (१८६०), शब्दरत्नावली (१८६०), मोलस्वर्थकृत मराठी-इंग्रजी कोशाचा संक्षेप (१८६३), संस्कृत-मराठी शब्दकोश (१८९१), लूथरचा इतिहास (दु. आ. १८९१), पहिल्या तीन शतकांतील ख्रिस्ती मंडळीच्या अंतर्गत इतिहासाची कित्येक अंगे (१८९२), शाळांकरिता महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (१८६६), स्त्रीविद्याभ्यास निबंध (१८५२), स्त्रीकंठभूषण (१८६८), वाचनपाठावली (१८८४), शिक्षापद्धती (१८८४), अर्वाचीन ग्रंथकर्त्यांच्या अडचणी, कथा, चरित्रे अशा अनेक विषयांवर बाबांनी लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. त्यांना 'ख्रिस्ती वाङ्मय महर्षि' म्हणावे इतके ख्रिस्ती धर्मविषयक लेखन व भाषांतरे त्यांच्या नावावर आहेत. निबंधमाला ह्या त्यांच्या ग्रंथास पंचवीस रुपयांचे 'निसबिट प्राईज' मिळाले होते (१८६०). रेव्ह. नारायण वामन टिळक यांनी त्यांना 'ख्रिस्ती मराठी वाङ्मयाचे जनक' तर भास्करराव उजगरे यांनी त्यांना 'ख्रिस्ती वाङ्मयाचे भीष्माचार्य' म्हटले आहे. मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुनापर्यटनाचा उल्लेख करण्यात येत असला, तरी यमुनापर्यटनात कादंबरीचे व्यवच्छेदक असे विशेष घटक सापडत नसून ती कांदबरी नव्हे, असेही विचार व्यक्तविले गेले आहेत. मात्र ह्या कादंबरीतील काही कलात्मक न्यूने दाखविल्यानंतरही वास्तववादी मराठी कादंबरीच्या प्रवासातील अगदी आरंभीचा व महत्त्वाचा टप्पा म्हणून तिचा गौरव करणारे अभ्यासकही आहेत. अत्यंत तत्त्वनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या रेव्ह. बाबा पदमनजी ह्यांचे मुंबई येथे निधन झाले. ह्या 'मराठी ख्रिस्ती वाङ्मयाच्या जनका'ची स्मृती ज्ञानोदय मासिकातर्फे त्यांच्या निधनशताब्दीला त्यांच्या कबरीवर कोनशिला बसवून मुंबईच्या शिवडीच्या कबरस्थानात जपण्यात आली आहे. संदर्भ : - कऱ्हाडकर, के. सी. बाबा पदमनजी : काल व कर्तृत्व, म. रा. साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई, १९७९. |
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु, आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. - तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्या सोबत वेळ घालूं तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहे. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमचा संगी तुमच्या बद्दल चांगला विचार करतो म्हणून, बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की, तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल. मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अश्यात कुठला ही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्या सोबत वेळ घालूं तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल परंतु, तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे. स्वतःच स्वतःवर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका - तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरुन टोकणे टाळावे. काळजी करण्याचा दिवस - तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. प्रेम आशेचा किरण दाखवेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज लोक तुमचे अभिनंदन करतील - याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. |
Bharat Chin Sambandh Essay in Marathi language - भारत आणि चीन या दोन्ही देशात प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. चीनच्या भूमीवर भारतातून बौद्ध धर्माचा प्रसार झाला. प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी चीनच्या लोकांनी भारतातील विद्यापीठे म्हणजे नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठाची निवड केली होती, कारण त्या काळात जगातील ही दोन विद्यापीठे शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे होती. त्यावेळी युरोपातील लोकांची रानटी स्थिती होती.\n1946 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीची स्थापना झाली असली तरी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध समान राहिले. चीनच्या संघर्षाप्रती भारताने विकसनशील देशाचे धोरण आखले आणि पंचशीलवरही विश्वास व्यक्त केला. 1949 मध्ये नवीन चीनच्या स्थापनेनंतर पुढील वर्षी भारताने चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. अशाप्रकारे भारत हा चीनच्या पीपल्स रिपब्लिकला मान्यता देणारा पहिला गैर-समाजवादी देश ठरला.\nजून 1954 मध्ये चीन, भारत आणि म्यानमार यांनी शांततापूर्ण सहअस्तित्वाची पाच तत्त्वे म्हणजे पंचशील सादर केले. भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे संभवत असली, तरी सीमाप्रश्न हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. चीनला मान्य असलेली सीमा व सीमाप्रदेश, भारत स्वीकारीत नाही, हे पाहून चीनने भारताच्या सीमाप्रदेशावर अकस्मात आक्रमण केले. चीनने सुरू केलेले हे अघोषित युद्ध 20 ऑक्टोबर पासून 21 नोव्हेंबर 1962 पर्यंत चालले.\nया युद्धात भारतीय सैन्याचा टिकाव लागला नाही. 22 नोव्हेंबरच्या सकाळपासून चीनने एकतर्फी गोळीबार स्थगित केला व युद्ध बंद पडले तथापि या आकस्मित सैनिकी कारवाईनंतरही चीनला स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे सीमाप्रश्न सोडविण्यात यश मिळाले नाही. भारत-चीन संघर्ष काळात महत्त्वाच्या लढाया अक्साई चीन आणि अरूणाचलाच्या कामेंग व लेहित या जिल्ह्यांत झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला जी संरक्षणात्मक युद्धे लढावी लागली, त्यांच्या तुलनेत हे युद्ध क्षुद्रच म्हणावे लागते तथापि आंतरराष्ट्रीय कायदा, आशियातील सत्तासमतोल, भारताचे परराष्ट्रीय संबंध आणि राजकीय मतप्रणाली यांच्या दृष्टीने हे युद्ध महत्त्वाचे ठरते.\nया युद्धात भारताचे 1,383 सैनिक ठार झाले 1,696 हरवले व 3,968 सैनिक युद्धबंदी झाले. चीनच्या सैनिकी हानीची माहिती उपलब्ध नाही. भारताला एकही चिनी सैनिक युद्धबंदीकरता आला नाही. तुरळक वस्तीच्या डोंगरी प्रदेशात युद्ध झाल्याने नागरी प्राणहानी व वित्तहानी नगण्य होती. वायुसेनेचा उपयोग कोणीही केला नाही. मात्र जखमी सैनिकांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. रणगाड्यांचा वापर अगदी किरकोळ प्रमाणात झाला. चालू राहिला, बिनशर्तपणे खुल्या मनाने चीनने कोलंबो प्रस्ताव मान्य करावा व भारत-चीन सीमाप्रश्न आंतरराष्ट्रीय विधिज्ञ न्यायालयाकडे सोपवावा, असे नेहरूंनी सुचविले.\nभारत-चीन सीमाप्रश्न हा सार्वभौमत्वाचे अंग असल्याने भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष विचारविनिमयानेच सोडविला पाहिजे लवाद वगैरे चीनला मंजूर नाही भारताला असाच घोळ घालावयाचा असेल, तर चीन या संदर्भात काहीही उत्तर देणार नाही, असे चौ एन-लायने त्यांवर कळविले होते. श्रीमती बंदरनायके व ईजिप्तचे अली साब्री यांच्या प्रयत्नाने भारत व चीनमध्ये समझोता होण्याची आशा वाटत असतानाच 27 मे 1964 रोजी नेहरू दिवंगत झाले.\nजनता पक्षाच्या राजवटीत 1978 मध्ये चीनशी परत बोलणी सुरू करण्यास त्या वेळेचे परराष्ट्रमंत्री वाजपेयी चीनमध्ये गेले असतानाच व्हिएटनाम व चीनमध्ये अघोषित युद्ध सुरू झाल्याने वाजपेयींना परतावे लागले. भारत-चीन संबंधाबाबत 1978 नंतर पुढील घटना घडल्या. 1975 साली भारतात सिक्कीमचे विलीनीकरण झाले. त्याचा चीनने निषेध केला. कदाचित या घटनेबाबत 1978 मधील भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी व चिनी परराष्ट्रमंत्री हुयांग हुआ यांच्या भेटीत चर्चा झाली असती. व्हिएटनामच्या साहाय्याने कांपूचियात नवे सरकार स्थापन झाले. भारताने त्यास मान्यता दिली. कांपूचियात नव्या सरकारला भारता अगोदर रशियाने मान्यता दिली होती. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटात भारताने परत प्रमुख स्थान प्राप्त करून घेतले.\nBharat Chin sambandh essay in Marathi language.\nभारत-चीन संबंध विषयी निबंध तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा. |
नंदुरबारः मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला व दोन पुरुष अशा सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बस चालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. परंतु गोष्ट इथे संपत नाही. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाला आहे. दसऱ्याच्या तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर बाया माणसे. . मुले ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात. चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे. दसरा, दिवाळी, मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढीपाडव्याला गावाला परतायचे. पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट. या भीषण अपघातात कर्ते पुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेडा या गावावर शोककळा पसरली. नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी. आर. पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गावात येतात. अपघातात कुणी आई तर कुणी बाप गमावलेला असतो. डझनभर लोक कायमचे जायबंदी झालेले. त्यांच्या मजुरीवर अवलंबून असलेली अनाथ झालेली उघडी वाघडी लहान मुले तर गांगरून गेलेली. झोपडीतले दारिद्र्य, दुःख, दैना पाहून सारेच हेलावून जातात. या आदिवासी लोकांची भाषा कोणाला समजत नाही. समजते ते फक्त त्यांच्या डोळ्यातले दुःख. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर पोलीस अधिक्षकांचे फर्मान सुटते. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भापकर हे अपघात मृत्युमुखी पडलेल्या कुंटुबाच्या घरात दोन महिन्याचा किराणा पाठवतात. पुन्हा फर्मान सुटते या साऱ्या मयत व जखमी लोकांच्या घरी FIR ची प्रत, PM रिपोर्ट, मृत्यू दाखला,पंचनामा आदी कागदपत्रांची फाईल घरपोच होते. सरकारी मदत आणि विमा रक्कम मिळण्यासाठी जलद हालचाल सुरु होते. उचल म्हणून घेतलेले पैसे ठेकेदारांने परत घेऊ नये यासाठी त्याला सूचना दिली. बसमालकाने देखील या लोकांना आर्थिक मदत केली. अपघातग्रस्तांचे दुःख हलके केल्यांने एरव्ही कडक वाटणारे पोलिस आदिवासी पाड्यावरचे देवदूत अशी ओळख निर्माण झाली. नंदुरबार पोलीसांनी मात्र अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन 'माणुसकीचा दसरा' साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. आदिवासींनीही पोलीसांचे आभार मानले आहेत. दोघांनाही एकमेकांची भाषा समजली नसली तरी परस्परांच्या भावना मात्र नक्कीच कळाल्या असतील. |
मालेगाव (जि. नाशिक) : बिटकॉईनच्या (Bitcoin) नावावर ठेवी घेतल्याचे भासवून चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील मंगेश मांडवडे (३२, हल्ली रा. आदर्श नगर, नाशिक) या तरुणाची पाऊणेतीन लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच पध्दतीने सुरत, सापुतारा व नाशिक यासह वेगवेगळ्या ठिकाणी सेमीनार घेऊन तिघा संशयितांनी अनेकांना प्लॅटिमा अल्टीमा हा क्रिप्टो कॉईन व फॉर्म घेऊन फसविल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक व राज्य ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात एका परदेशी नागरीकाचा समावेश आहे. (Fraud of 2 lakh 75 thousand by pretending to take deposits in Bitcoin nashik latest crime marathi news) श्री. मांडवडे याच्याशी राजेंद्र उपाध्याय, योगेश भालेराव व एलेक्स (रा. जर्मनी) यांनी प्रत्यक्ष व झुम मिटींगद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन चिंचगव्हाण व नाशिक येथुन दोन वेळा दोन लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम घेतली. डिसेंबर २०२१ ते ८ जुलै २०२२ दरम्यान चिंचगव्हाण येथे हा प्रकार घडला. रक्कमेपोटी महिन्याला कमीत कमी दहा टक्के परतावा मिळेल असे खोटे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मांडवडेच्या मोबाईलमध्ये रजिस्टर केल्याचे दाखवून प्लॅटिमा, अल्टीमा, बिटकाईन फिर्यादीच्या नावावर घेतल्याचे भासवून ठेवी स्विकारुन फसवणूक केली. प्रत्यक्षात मांडवडे यांना कुठलीही रक्कम परत केली नाही. या संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेमीनार घेत भारतीय रुपयाऐवजी डॉलर, युरो या विदेशी चलनात बेकायदेशीर गुंतवणूक करुन फसवणूक केल्याचे म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत. |
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे. . , विद्यार्थी-१ (पुणे) विद्यार्थी-२ (नाशिक) ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...! विद्यार्थी ३ (मुंबई) दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस...! विद्यार्थी-४ (अकोला) विद्यार्थी-५ (अमरावती) कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं ! विद्यार्थी-६ (यवतमाळ) निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली. . आं ! ! विद्यार्थी-७ (वाशिम) विद्यार्थी-८ (बुलढाना) लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं. . आन चाल्लि लगे. . विद्यार्थी ९ (वर्धा) विद्यार्थी १० (नागपूर) विद्यार्थी ११ (धुळे) काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड ! विद्यार्थी १२(लातूर) : आरं बाबो, अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला...! विद्यार्थी १३ (मालवण) : मेली अवदीसा नायथयली..., तेचा त्वांडार शिरापडली ती..., तेच्या आवशिक खाली कोल्यान..., माझा काळीज नांगरुन. . , खिदळत - खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार...! ! ! विद्यार्थी १४ ( चिपळूण ) : |
राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे २३ लाख ८१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे वाढीव व दुप्पट दराने ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
थॅनॉसने का मागितली माफी ? - Majha Paper\nथॅनॉसने का मागितली माफी ?\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / कोरोना व्हायरस, जोश ब्रोलिन, थॅनॉस, लॉकडाऊन / April 20, 2020 April 20, 2020\nलॉकडाऊनमुळे सर्वचजण आपआपल्या घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटणे अवघड झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच मित्रांशी संवाद साधवा लागत आहे. मात्र सेल्फ क्वारंटाईनचे पालन न करत आपल्या पालकांना भेटायला गेल्याने अभिनेता जोश ब्रोलिनला टीकेचा सामना करावा लागत आहे.\n50 वर्षीय जोश ब्रोलिनने एव्हेंजर्स चित्रपटात थॅनॉसची भूमिका साकारली आहे. ब्रोलिने सेल्फ क्वांरटाईन मोड आपली पत्नी कॅथेरियन आणि 1 वर्षांची मुलगी वेस्टलियनला घेऊन आपल्या पालकांचे घरी गेला होता. सर्वांचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र क्वांरटाईन मोडल्याने नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर डिलीट करण्यात आला आहे.\nImage Credited - storypick\nमात्र या प्रकरणार ब्रोलिनने माफी मागितली आहे. तो म्हणाला की, वडील हे आमच्या घरा शेजारीच राहतात. आमची त्यांना बघायला जाण्याची योजना होती, ना की त्यांच्या जवळ जाण्याची. मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. ही नक्कीच आमची जबाबदारी आहे. आम्ही दुसरेच काहीतरी करण्यासाठी गेलो होतो. मात्र आमच्याकडे पूल नसल्याने मुलीला पूल दाखवला. माझे वागणे नक्कीच बेजबाबदारपणाचे होते.\nब्रोलिन पुढे म्हणाला की, कधीकधी प्रामाणिकपणे वागणे अवघड होते. प्रामाणिपणे मी चुकला आहे हे मान्य करणे देखील अवघड असते. आलेल्या प्रतिक्रियांनी मला पुन्हा वास्तविक परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. मला आठवण करून दिल्याबद्दल खरचं आभार. हे खरचं माझ्यासाठी गरजेचे होते आणि मी नक्कीच माझ्या माणसांची काळजी करतो. धन्यवाद. |
भोपाळ : जातिव्यवस्थेच्या आधारे भेदभाव करत असल्याचे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील दिव्यांग आरोपीला जामीन नाकारला. आजच्या युगात ही बाब धक्कादायक असल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपी आणि पीडित यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर असल्याचे कारण देत आरोपीच्या वडिलांनी लग्नास परवानागी दिली नाही. मात्र, पीडित ही अन्य जातीची असल्याने लग्नाला नकार देण्यात आला होता, अशी माहिती न्यायमूर्ती विवेक अगरवाल यांना देण्यात आली. वास्तव काहीही असले तरी, काय पाहायला मिळत आहे तर, 21व्या शतकातही जात आणि पंथाच्या नावावर सामाजिक भेदाभेद केली जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. आरोपीने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता. सहमतीने आम्ही शरीरसंबंध ठेवले होते आणि अनेकदा आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये राहिलो सुद्धा होतो, असे आरोपीचे म्हणणे होते. जेव्हा सहसंमतीने शरीर संबंध असल्याचे प्रकरण असते, तेव्हा केवळ लग्नाला नकार देणे हे खटला चालवण्याचे कारण असू शकत नाही, अशी अनेक उदाहरणे असल्याचे सांगण्यात आले. या उलट, केवळ विवाहाआधी सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे हे प्रकरण नाही. पण आरोपीने लग्नाची फूस देऊन त्यांनी शरीर संबंध ठेवला होता, यावर प्रतिवादींनी भर दिला. तथापि, त्याला संरक्षण मंत्रालयात नोकरी मिळाल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आरोपीला दोघांच्या वयातील अंतर तसेच दोघांची जात वेगळी असल्याची कल्पना होती, याची नोंद न्यायालयाने घेतली. न्यायाच्या दृष्टीने तसेच साक्षीदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता आरोपीला लाभ देणे योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने त्याचा जामीनअर्ज फेटाळला. |
सार्वजनिक वाचनालयातील कलहाची परिणीती अखेर प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या राजीनाम्याने झाली आहे. अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी राजीनामा स्वीकारला असून बेणी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रमुख सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कार्यक्षम आमदार पुरस्कार समारंभ सोहळ्यात बेणी यांनी त्यांच्या भाषणात काही आरोप केले. पुरस्कारासाठी धनंजय मुंढे यांची निवड केल्याने दबावासाठी फोन आल्याचे त्यांनी समारंभात सांगितले. याप्रकरणी सावाना अध्यक्षांनी खुलासा करून तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने सावानामध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले. पुढेही ही धुसफूस कायमच होती. नवीन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उघड दोन गट पडले होते. प्रमुख सचिव या पदासाठी काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. गेल्या आठवड्यातील बैठकीत स्वाभाविकपणेच त्याचा स्फोट झाला. या बैठकीत बेणी व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकाच्या गळ्याला हात लावण्यापर्यंत वेळ गेली. एका महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही झाली. या बैठकीचा बभ्रा माध्यमांमध्ये झाल्यानंतर या कलहाची परिणीती कोणाच्या तरी बळीत होणार हे अपेक्षित होतेच. यापार्श्वभूमीवर बेणी यांनी मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर व विनया केळकर यांच्या चौकशीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठविले. त्याची पत्रपरिषदेत माहिती दिली. ही माहिती बेणी देत असताना उर्वरित सर्व पदाधिकारी त्यांच्यापासून फटकून तर होतेच; शिवाय या पत्राबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत होते. त्यामुळे 'सावाना'तील कलह आता टिपेला पोहचल्याचे दिसून आले. कार्यकारिणीतील बदलते वारे लक्षात घेऊन बेणी यांनी रातोरात अध्यक्षांकडे राजीनामा दिला. अध्यक्ष औरंगाबादकर यांनीही तात्काळ तो स्वीकारुन बेणी यांना कार्यमुक्त करण्याची तत्परता दाखविली. यातून हा संघर्ष किती तीव्र झाला होता, याची प्रचिती आली आहे. बेणी यांनी राजीनामा दिल्यानंतर घटनेची सर्व चौकशी करून आणि 'सावाना'च्या हितास्तव बेणी यांना पदमुक्त केले आहे. - विलास औरंगाबादकर, भ्रष्टाच्या विविध आरोपांमध्ये अटक होऊन जामिनावर सुटका झालेली व्यक्ती वाचनालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत पदाधिकारी म्हणून मिरविते हेच मुळात सावानचे दुर्दैव आहे. जेथे तात्यासाहेब, म्हात्रे, बाळासाहेब दातार यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी काम केले तेथे बेणीसारख्या व्यक्तीचे असणे धोकादायक आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तीचे सामान्य सभासदत्वही रद्द केले गेले पाहिजे. - रमेश जुन्नरे, |
Bharti Singh Gifts Neetu Kapoor: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत पार पडला. यानंतर रणबीर-आलियाने शनिवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टी आयोजित केली होती. नीतू कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आदित्य सील, अनुष्का रंजन, शाहरुख खान, गौरी खान, तारा सुतारिया, आधार जैन, शाहीन भट्ट, सोनी राजदान, लव रंजन, रोहित धवन, अयान मुखर्जी, करण असे अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य कार्यक्रमात उपस्थित होते. नीतू कपूर (Neetu Kapoor) ने लग्नानंतर लगेचचं कामाला सुरुवात केली आहे. 'हुनरबाज'च्या ग्रँड फिनालेमध्ये त्या स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे. यादरम्यान कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) ही फिनालेचा भाग होती. मुलाला जन्म दिल्यानंतर 12 दिवसांनी भारती कामावर परतली आहे. 'हुनरबाज'च्या सेटवर लग्नासारखे वातावरण तयार करण्यात आले. कारण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नुकताचं लग्नसोहळा पार पडला. यानंतर भारतीने गमतीने आलियाला प्रेशर कुकर भेट म्हणून दिला. कॉमेडियन भारती यावेळी म्हणाली, तिने करण जोहरकडे रणबीर आणि आलियाला गिफ्ट दिले होते. परंतु, करण जोहर कदाचित ते गिफ्ट देण्याचं विसरला. (हेही वाचा - Ranbir Alia Mehendi: रणबीर-आलियाच्या मेहंदीचे फोटो व्हायरल) भारतीने रणबीर आणि आलियाला त्यांच्या लग्नात प्रेशर कुकर भेट म्हणून दिला आहे. हे गिफ्ट पाहून नीतू कपूर खूप खुश झाली. यावेळी नितू कपूर म्हणाली, आता मी हे गिफ्ट माझी सून आलियाला देणार आहे. भारतीने असा युक्तिवाद केला की, तिने लग्नाचे फोटो पाहिले. यात रणबीर खूप हडकूळा दिसत होता. त्यामुळे तिने प्रेशर कुकर सारख्या उपयुक्त भेटवस्तूची योजना आखली. जेणेकरून आलिया त्यात रणबीरसाठी स्वादिष्ट अन्न शिजवू शकेल. Neetu ji ko mila Haarsh aur Bharti se ek anokha gift. Comments mein bataiye humein, aap kya dena chaahenge #RanLia ko as wedding gift? हुनरबाज ग्रँड फिनालेमध्ये डान्स दिवाने ज्युनियर्सला प्रोत्साहन देण्यासाठी नोरा फतेही, मर्जी पेस्टनजी, नीतू कपूर सहभागी झाले. दरम्यान, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला तिच्या लग्नात व्हर्साची हँडबॅग भेट दिली होती. दीपिका पदुकोणने नवविवाहित जोडप्याला चोपर्ड येथील घड्याळे भेट दिली. कतरिना कैफने आलियाला प्लॅटिनम ब्रेसलेट गिफ्ट केल्याचे बोलले जात आहे. |
शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला रोषणाईवर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी टीका केली होती. आता या टीकेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असं म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांना टोला लगावला होता. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही खासदार आता आमने-सामने उभे राहिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर सध्यांकाळी उशिरा भेट दिली. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फंडातून करण्यात आलेल्या रोषणाईची पाहणी केली. यावेळी खासदार संभाजीराजेंनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले होते. |
मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा. समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा. संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१. काही शंका, मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे? मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का? इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का? भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का? सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे. विद्वानांचे एकमत शक्य आहे काय? या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का? |
mns in problem । शिवसेनेच्या भूमिकेने मनसे अडचणीत - Divya Marathi\nMns In Problem\nशिवसेनेच्या भूमिकेने मनसे अडचणीत\nनाशिक - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राहुल ढिकले यांच्यासाठी मनसेने निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, भाजपनेही कराराप्रमाणे सभापतिपदासाठी दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने सभापतिपदावरील दावा कायम ठेवल्यामुळे मनसेसमोर दुहेरी पेच निर्माण झाला आहे. तूर्तास भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र असून, मनसेला थोपवण्यासाठी शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा देण्याची खेळीही खेळली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनसे व भाजप नेत्यांत खलबते सुरू होती.\nगतवेळी किंगमेकर ठरलेल्या शिवसेनेचा यंदा कराराप्रमाणे किंग बनण्याचाच प्रयत्न असेल, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मनसे व भाजपवर दबाव आला असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने नवे समीकरण जुळवण्याची तयारीही सुरू आहे. मनसेकडे महापौरपद, भाजपकडे उपमहापौरपद असून, दुसर्या क्रमांकाचे संख्याबळ असल्याने यंदा स्थायी सभापतिपदासाठी सेनेने दावा केला होता. मात्र, मनसे व भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे सेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले. अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेशी चर्चा न झाल्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नवीन समीकरणे जुळवण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यात मनसेच टार्गेट असेल, असेही दिसते.\nशिवसेना : सभापतिपद मिळवायचे असेल तर भाजपला राजी करणे अपरिहार्य आहे. राज्यस्तरीय युतीचा हवाला देऊन भाजपची मनधरणी केली तर दोघांचे संख्याबळ पाच होते. भाजप सोबत न राहिल्यास बहुमतासाठी लागणार्या आणखी सहा मतांसाठी महाआघाडी तयार करून राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षांची मदत घ्यावी लागेल.\nभाजप : मनसेचे पाच सदस्य असून, भाजपकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करून तीन मते मिळाल्यास बहुमत मिळेल. भाजपकडे काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षांची मदत घेण्याचा पर्याय नाही. विधानसभेच्या तोंडावर तशी खेळी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भाजपला सेनेची मनधरणी करावी लागेल.\nमनसे : सभापतिपदावर भाजपचा दावा असल्याची बाळा नांदगावकरांनी कबुली दिली आहे. अशा स्थितीत मनसेला सभापतिपद मिळवायचे असेल तर दोन मतांची गरज भासेल. मनसेचे पाच व भाजपचे दोन सदस्य मिळून संख्या सात होते. बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज असून, अपक्षांची मदत घेतली तर सदस्यसंख्या समान होईल.\nकाँग्रेस आघाडी : राष्ट्रवादी व काँग्रेस या दोघांनाही एकमेव संधी आहे. एक तर नाराज शिवसेनेला मदत करायची किंवा त्यांच्या मदतीवर सभापतिपद मिळवायचे. दोन्ही पक्ष मिळून पाच सदस्य असून, सेनेच्या तिघांनी पाठिंबा दिला तर सदस्यसंख्या आठ होईल. त्याबरोबरच अपक्षांच्या एका मताच्या जोरावर सभापती करण्याचे गणित जुळवता येईल. |
करुणच्या त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ७५९ धावांवर घोषित करताना इंग्लंडवर २८२ धावांची आघाडी घेतली. चेन्नई- इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने (३०३*) विक्रमी केली. कसोटीत त्रिशतक ठोकणारा तो भारताचा केवळ दुसरा फलंदाज आहे. करुणच्या नाबाद त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ७५९ धावांवर घोषित करताना प्रतिस्पर्ध्यावर २८२ धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसअखेर सोमवारी इंग्लंडने बिनबाद १२ धावा केल्यात. तिस-या दिवसअखेर ७१ धावांवर खेळणारा करुण शतक ठोकेल, याची खात्री होती. मात्र त्याने पहिल्या शतकाचे रूपांतर त्रिशतकामध्ये केले. इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण करणा-या करुणला पहिल्या दोन कसोटीतील दोन डावांत केवळ १७ धावा करता आल्या होत्या. मात्र चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर त्याने संधीचा पुरेपूर फायदा उठवताना नाबाद त्रिशतक ठोकले. सलामीवीर लोकेश राहुलचे द्विशतक केवळ एका धावेने हुकल्याने करुणकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या. त्याने संघ सहका-यांसह चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले. नायरने ३८१ चेंडूंत ३२ चौकार आणि चार उत्तुंग षटकारांसह नाबाद ३०३ धावांची अविस्मरणीय खेळी केली. त्याने उपाहारापूर्वी शतक पूर्ण केले. त्यासाठी १८५ चेंडूंत घेतले. त्यानंतर शंभर ते दोनशे धावांचा पल्ला १२१ चेंडूंमध्ये गाठला. चहापानानंतर द्विशतक साकारणा-या करुणने दोनशे ते तीनशे धावांचा टप्पा अवघ्या ७५ चेंडूंत पूर्ण केला. उपाहारानंतर भारताने इंग्लंडवर आघाडी घेतली तरी मोठी आघाडी अपेक्षित होती. सांघिक हित लक्षात घेत करुणने 'गियर' बदलला आणि द्विशतक आणि त्रिशतक साजरे झाले. पहिल्या सत्रात संयमी वाटणा-या या राजस्थानच्या फलंदाजाने दुस-या आणि तिस-या सत्रात वनडे स्टाईल फलंदाजी करताना आपले कौशल्य दाखवून दिले. केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर योग्य वेळी फटकेबाजी करून तसेच तीन शतकी आणि एक अर्धशतकी भागीदारी करताना नायरने भारताला इंग्लंडविरुद्धची सर्वाधिक धावसंख्या नोंदवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिस-या दिवशी करुणने लोकेश राहुलसह चौथ्या विकेटसाठी १६१ धावा जोडल्या. चौथ्या दिवशी त्याने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजासह सहाव्या आणि सातव्या विकेटसाठी अनुक्रमे १८१ आणि १३८ धावांची भागीदारी केली. नायर आणि जडेजाने ११५ चेंडूंत शतकी भागीदारी रचली. या जोडीने प्रति षटकामागे सातहून अधिक धावा फटकावताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. करुणला सोमवारी अश्विन आणि जडेजाची सुरेख साथ लाभली. अश्विनने सातत्य राखताना १४९ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावा केल्या. जडेजाने ५५ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. त्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या दोघांपूर्वी म्हणजे सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या मुरली विजयला (२९) मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने करुणला साथ दिली. तसेच अर्धशतकी भागीदारी रचली. तो मैदानावर असतानाच नायरने शतक पूर्ण केले. मुंबई कसोटीप्रमाणेच चेन्नईतही पहिल्या डावात चारशेहून अधिक धावा करून इंग्लंडचे काहीच चालले नाही. दोन दिवसांत पाहुण्या गोलंदाजांना केवळ सात विकेट मिळवता आल्या. मात्र साडेसातशेहून अधिक धावा निघाल्या. याचा अर्थ प्रत्येक विकेटसाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना शंभरहून अधिक विकेट मोजाव्या लागल्या. इंग्लंडतर्फे वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि पहिली कसोटी खेळणा-या लियाम डावसनने सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र त्यासाठी दोघांनी अनुक्रमे 8० आणि 12० धावा मोजल्या. ऑफस्पिनर मोईन अली (१८९-१) तसेच अब्दुल रशिदही (१५३-१) महागडे ठरले. चौथ्या दिवसाचा खेळ संपायला १६ मिनिटे शिल्लक असताना भारताने पहिला डाव घोषित केला. त्यामुळे पाहुण्यांना फलंदाजीसाठी उतरावे लागले. दिवसअखेर त्यांनी ५ षटकांत बिनबाद १२ धावा केल्यात. डावाचा मारा टाळण्यासाठी त्यांना अद्याप २७० धावांची आवश्यकता आहे. सर्वच्या सर्व दहा विकेट शिल्लक असल्याने पाहुण्यांना भारताचा विजयरथ रोखताना कसोटी अनिर्णीत राखण्याची संधी आहे. मात्र त्यांनी हाराकिरी केल्यास भारताचा विजयाचा 'चौकार' दृष्टिपथात असेल. भारत - ७ बाद ७५९ डाव घोषित (करुण नायर नाबाद ३०३, लोकेश राहुल १९९) चेन्नई कसोटीत शानदार नाबाद त्रिशतक ठोकताना करुण नायरने माजी सलामीवीर वीरेंदर सेहवागशी बरोबरी केली. 'मुलतान का सुलतान' म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरूने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये ऐतिहासिक ३०९ धावांची खेळी केली होती. तब्बल एका तपानंतर करुण त्याच्याजवळ पोहोचला. सेहवागचा सर्वाधिक धावांचा विक्रम पार करता आला नसला तरी करुण हा त्रिशतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज आहे. सोमवारी त्याचे वय २५ वर्षे आणि १३ दिवस इतके होते. त्रिशतक ठोकले तेव्हा वीरू २५ वर्षे आणि १६० दिवसांचा होता. मधल्या फळीतील फलंदाजाने तीनशेची मजल मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. फटकेबाज फलंदाज सेहवागने आपल्या शैलीत करुणचे कौतुक केले आहे. त्रिशतकी क्लबमध्ये करुणचे स्वागत आहे. गेली १२ वर्षे आणि आठ महिने मी एकटाच त्रिशतकपटू होतो. मला साथ मिळाली. करुणची खेळी पाहताना खूप मजा आली, असे सेहवागने 'ट्विटर'द्वारे सांगितले. - कारकीर्दीतील पहिल्या शतकाचे रूपांतर त्रिशतकात करणारा करुण नायर भारताचा पहिला फलंदाज आहे. - त्रिशतकाने शतकांची सुरुवात करणारा करुण आशियातील पहिला फलंदाज ठरला. - २५ वर्षे आणि १३ दिवसांचा नायर भारताचा सर्वात युवा त्रिशतकवीर आहे. - करुणची चेन्नईतील खेळी भारतातर्फे तिसरी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. - पाचव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करणारा करुण पहिलाच भारतीय बॅट्समन आहे. - पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावातील भारताची धावसंख्या (७ बाद ७५९ डाव घोषित) इंग्लंडविरुद्धची सर्वाधिक आहे. - भारताची पहिल्या डावातील २८२ धावांची आघाडी आजवरची पहिल्या डावातील सर्वाधिक आघाडी आहे. |
सोनाक्षी सिन्हाने कंगना राणौतला दिले 'हे' सणसणीत उत्तर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क! ! आता ती इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे. तुम्हाला माहित आहेच की, सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वीच ट्विटरला 'बाय-बाय' केले आहे. नेपोटिझमच्या मुद्यांवरून वाढती ट्रोलिंग तिची डोकेदुखी बनत चालली होती, या एकाच कारणावरून तिने टिवटर सोडले होते. आता ती इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे. तिने या पोस्टद्वारे बॉलिवूड पदार्पणासाठी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असल्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे सांगितले आहे. बॉलिवूड म्हटल्यावर हे सगळं तर होणारच. पण, सोनाक्षीने कंगना राणौतचे नाव न घेता तिच्यावर हे सर्व आरोप केले आहेत. आता यावर कंगना काय उत्तर देते, हे पाहूच. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती 'दबंग ३' मध्ये दिसली होती. तर आता संजय दत्त आणि अजय देवगण यांच्यासोबत ती दिसण्याची शक्यता आहे. |
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील मंदिर परिसरातील एका गुहेत ध्यानधारणा केली होती. त्यानंतर ध्यानधारणेसाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेल्या या गुहेचा तपशील समोर आला होता. आता या गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी लोकांनी जागा आरक्षित केल्याचे समजते. या माध्यमातून आतापर्यंत गढवाल मंडल विकास निगमला ९५ हजारांचे उत्त्पन्न मिळाले आहे. गढवाल मंडल विकास निगमतर्फे (जीएमव्हीएन) गेल्यावर्षीपासून केदारनाथ येथे या गुहेची सोय करून देण्यात आली होती. केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अशाप्रकारे गुहा तयार करण्याची कल्पना सुचविली होती. सुरूवातीला या गुहेत राहण्याचे एका दिवसाचे भाडे ३००० रूपये इतके होते. तसेच ही गुहा किमान तीन दिवसांसाठी भाड्याने घेण्याची अट होती. मात्र, पर्यटकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे भाडे ९९० रूपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. सध्या या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी प्रतिरात्र १५०० आणि प्रतिदिन ९९० रूपये मोजावे लागतात. |
नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते सरकार म्हणजे हम दो, हमारे दो अशी स्थिती आहे. सध्या देश फक्त चार लोक चालवतात, असा आरोप त्यांनी केला होता. यावर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले. निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, हम दो, हमारे दो म्हणजे दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे....मुलगी आणि जावई, असा त्याचा अर्थ होतो. परंतु आम्ही असे करत नाही. सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला केला. स्वनिधीचा पैसे क्रोनीजल जात नाही. जावयांना अशा राज्यांमध्ये जमिनी भेटत होत्या. जेथे त्यांचे आधी शासन होते. राजस्थान, हरियाणा मध्ये आधी असे होत होते. अर्थसंकल्प गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार आहे. यासाठी आम्ही काम करतो. कोणत्याही जावयासाठी नाही, अशी टीका सीतारामन यांनी केली आहे. काँग्रेसवर हल्ला चढवत निर्मला सीतारामन म्हंटल्या कि, शशी थरूर येथे उपस्थित आहेत. केरळमध्ये ज्यावेळी त्यांच्या पक्षाचे सरकार होते. या लोकांनी कोणतेही टेंडर नसताना क्रोनीला तेथे बोलविले होते. आणि हे लोक आम्हाला कॅपिटालिस्ट म्हणतात? आमच्यासाठी जनताच क्रोनी आहे. |
मुंबई : राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे. त्यातच सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आधिकारी दाखल झाले होते. तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अश्वासन दिले होते. मात्र अद्याप मदत मिळलेली नाही याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अजून एक पोकळ आश्वासन...पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे. प्रकरण असे की, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. |
अयोध्याकाण्डम् । WAYNALAMAN AND NAVNGAAAA आगतश्चापि भरतः स्थाप्यो नृपमते पदे भरतं च परिष्वज्य यौवराज्येऽभिषिच्य च । अस्मत्सन्तापजं दुःखं न त्वामभिभविष्यति भरतश्चापि वक्तव्यो यथा राजनि वर्तसे । तथा मातृषु वर्तेथाः सर्वास्वेवाविशेषतः यथा च तव कैकेयी सुमित्रा चाविशेषतः । तथैव देवी कौसल्या मम माता विशेषतः तातस्य प्रियकामेन यौवराज्यमवेक्षता । लोकयोरुभयोः शक्यं नित्यदा सुखमेधतुम् निवर्त्यमानो रामेण सुमन्त्रः प्रतिबोधितः । तत्सर्व वचनं श्रुत्वा स्नेहात्काकुत्स्थमब्रवीत् यदहं नोपचारेण ब्रूयाः स्नेहादविक्लवम् । भक्तिमानिति तत्तावद्वाक्यं त्वं क्षन्तुमर्हसि कथं हि त्वद्विहीनोऽहं प्रतियास्यामि तां पुरीम् । सांग आणि भरत आला, म्हणजे दशरथाच्या अनुमतीने त्याला राज्यावर बसविण्याची व्यवस्था होऊं द्या. तूं भरताला भेटून त्याला याँवराज्याचा अभिषेक करविलास, म्हणजे आम्हांकरिता संताप उत्पन्न होऊन, तुला दुःख होणार नाही. भरताला माझा असा निरोप सांग की, " जसा तूं राजाशी वागत असतोस, तसाच कांहीएक भेद मनांत न आणतां सर्वही मातांशी वागत जा. (३०० - ३४ ) " ज्याप्रमाणे तुला कैकेयी व सुमित्रा यांमध्ये भेद नाही, त्याचप्रमाणे माझी माता कौसल्या हिलाही तूं त्यांच्यासारखीच समजत जा. पित्याचें प्रिय करण्याचा उद्देश धरून तूं यौवराज्याचा अंगिकार केलास, म्हणजे उभयलोकीं सर्वदा तुझें सुख वृद्धिंगत होणें शक्य आहे. " याप्रमाणे सुमंत्राला परत पाठवितांना रामाने -बोध केला असता, त्याचें तें सर्व भाषण श्रवण करून तो सुमंत्र प्रेमामुळे त्या ककुत्स्थकुलोत्पन्न रामाला म्हणाला, मी तुझ्याशीं सत्कारपूर्वक भीत भीत भाषण न करितां प्रेमामुळे निर्भयपणाने भाषण करीत आहे; परंतु मी भक्तिमान, आहें, अर्से समजून तूं त्या भाषणाबद्दल मात्र मला क्षमा कर. बा रामा, तुझ्या |
इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात ! इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्. आय. डी. सी. मधील वाय अॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला. |
इस्लामाबाद :- भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाईहल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यात जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार केलं. पाकिस्तानने सुरुवातीला हल्ला झाल्याचं नाकारलं होतं. मात्र आता जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, या ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरने भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. टाइम्स नाऊने ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने मसूद अझहरचे अनेक नातेवाईक बेपत्ता असल्याची माहिती दिली असल्याचंही वृत्तात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा मारला गेला आहे. हे सर्व जण त्यावेळी दहशतवादी तळावर उपस्थित होते. |
पुणे - "फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांना व्यवसायासाठी सकाळी 9 ते रात्री 9 अशी वेळ कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठरवून दिली होती. बरेच दिवस या नियमाची अंमलबजावणी झालेली नव्हती. मात्र, सध्या या नियमाचा दुजोरा देत, बोर्डाने व्यापाऱ्यांना भाडेपावती देणे बंद केले आहे. मोठ्या प्रमाणात असलेला माल दररोज ने-आण करायचा कसा? असा व्यापाऱ्यांना पडला असून, अधिकृत परवाना असतानाही या नियमाचा अट्टहास का? ' असा प्रश्न येथील व्यावसायिक उपस्थित करत आहेत. लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट येथे व्यावसायिकांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिली होती. सुरूवातीला व्यावसायिकांना सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेतच व्यवसायाची मुभा देण्यात आली होती. मात्र, कालांतराने बोर्ड अधिकाऱ्यांना या नियमाचा विसर पडला. तसेच अनेक व्यावसायिकांनी याठिकाणी आपली दुकाने थाटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मालाची आवक होऊ लागली. साहजिकपणे हा माल दुकानातच ठेवला जाऊ लागला. मात्र, गेल्या काही काळापासून येथील अनधिकृत दुकानदारांचा प्रश्न भेडसावू लागल्याने बोर्डाने पुन्हा एकदा जुन्या नियमावलीचा आधार घेत, फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच व्यवसाय तसेच रात्री जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक व्यावसायिकांनी यासाठी विरोध दर्शविला असता, बोर्डाकडून दुकानदारांना भाडेकराराची पावती दिली जात नसल्याची तक्रार फॅशन स्ट्रीट पथारी असोसिएशनचे सचिव मजहर कुरेशी यांनी केली आहे. तसेच हा नियम जाचक असून, त्यामुळे व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकाराने व्यावसायिक कात्र अडचणीत आले आहेत. |
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेत्यांविषयी मला प्रचंड आदर आहे. पण माझा सवाल आहे की, अंदमानच्या कोठडीत ११ वर्षे वीर सावरकर यांच्याप्रमाणे अनन्वित अत्याचार सहन करणारा, एकतरी नेता मला दाखवा. अशाप्रकारचे अत्याचार सहन करूनही सावरकरांनी नेहमी स्वातंत्र्यलक्ष्मीचं गीत गायले, असे फडणवीस यांनी म्हटले. स्वातंत्र्यीवर सावकर हे अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती. कारागृहातील शेकडो लोक कदाचित वेडे झाले असते. अंदमानच्या काळकोठडीत तोपर्यंत अनेक कैदी ठार वेडे झाले होते. पण या कारागृहातील कैद्यांना बंड करण्याचा धीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. राहुल गांधी यांना कोणीतरी काहीतरी लिहून देते आणि ते सावरकरांविषयी काहीही बोलतात. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावातील 'स' तरी माहिती आहे का? राहुल गांधी फक्त लिहलेलं वाचतात. सावरकर फक्त तीन ते चार वर्षे अंदमानच्या कारागृहात होते, असं बोलतात. अशा लोकांना आपण उत्तर दिलं पाहिजे आणि आपण ते देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. स्वातंत्र्यीवर सावरकर यांना एक माहिती होतं की, हिंदू समाज जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था संपवून एक होत नाही तोपर्यंत हा देश दुर्बल राहील. हिंदू समाज एकत्र होता तोपर्यंत भारतीय लोकांमध्ये विजीगीषू वृत्ती जिवंत होती, त्यांनी अनेक आक्रमणं परतवून लावली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. |
नाशिक : देवळा तालुक्यातील मेशी येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली आहे. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरु ण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (३१) गेला असता मोटारच्या लोखंडी पेटीला विजेचे करंट उतरलेले असल्याने संदीप लोखंडी पेटीला लटकला. तो मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे बघून थोड्याच अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण उर्फमनोज रमेश शिरसाठ (२३)हा त्याच्या मदतीला धावून गेला असता तोही पेटीला लटकला. दोघांची मदतीसाठी धडपड पाहून जवळच असलेला कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तो सुद्धा त्यांना लटकला पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला . त्यामुळे तो बचावला. या घडलेल्या प्रकारात संदीप शिरसाठ व भूषण शिरसाठ यांना गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रु ग्णवाहिका बोलवून देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले . मात्र, संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. रु ग्णालयातील डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना मृत घोषित केले तर जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, पोलीस हवालदार धोक्र ट, गायकवाड हे करीत आहेत. संदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील,भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे तर भूषण शिरसाठ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक होता. देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 'ा दुर्घटनेमुळे मेशी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. |
LMOTY 2022: शाश्वत विकासाची दृष्टी! आमदार डॉ. राहुल पाटील ठरले 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकारणी' Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: आमदार डॉ. राहुल पाटील यांना 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती' या श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राजकारणी म्हटले की, ते केवळ रस्ते, वीज, पाण्यासह विकासात्मक कामांच्या मागे धावणारे अशी सर्वसामान्यांची भावना; परंतु शाश्वत विकासाची दृष्टी असणारे राजकारणी हे बोटावर मोजण्याइतकेच असतात. त्यातील एक नाव असणारे आमदार डॉ. राहुल पाटील यांना 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती' या श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईत आज दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी या पुरस्कारासाठी मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं होतं. या पुरस्काराचे मानकरी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील ठरले आहेत. सामान्यांचे जगणे कसे सुकर होईल? मतदारसंघातील निराधार, विधवांसह सर्वसामान्य कुटुंबास हक्काचा रोजगार कसा मिळेल, यासाठी पदरमोड करणारे राजकारणी समाजसेवक म्हणून डॉ. राहुल पाटील यांची परभणीत ओळख आहे. बहुतांश नेत्यांना नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यातून वेळ मिळत नाही. अनेक जण स्वतःला यातच गुरफटून घेतात. पण राहुल पाटलांनी हजारो नागरिकांचे खासगी प्रश्न वैयक्तिक पातळीवर पदरमोड करून सोडवल्याने अनेक कुटुंबं सक्षमपणे उभे राहिलेत. पक्षीय बंधने बाजूला सारून सर्व जातीधर्माच्या नागरिकांना रोजगार दिला. हजारो गरजू व्यक्तींना प्रशिक्षण कालावधीत घरून केंद्रापर्यंत तसेच केंद्रापासून ते घरापर्यंत मोफत प्रवास सुविधा उभारली. आरोग्याच्या दृष्टीने आतापर्यंत जवळपास दोन लाख नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांसह सातत्याने आरोग्य शिबीर, मोतीबिंदू मुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी घेतलेल्या दिव्यांगांच्या विवाह सोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. मराठवाडा कृषी विद्यापीठात बाल वैज्ञानिकांसाठी विज्ञान संकुल उभारणीचे काम त्यांनी हाती घेतले आहे. याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी उभारण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. आमदार डॉ. राहुल पाटील हे उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील माजी कुलगुरू, पत्नी आणि ते स्वतः एम. बी. बी. एस. आहेत. |
नवी देहली - देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या 'डिजिटल नेटवर्क'(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षांत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याचा हा पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केले. ३१ जानेवारी या दिवशी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आरंभ झाला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची राष्ट्र्रपती मुर्मू यांची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, भगवान बसवेश्वर म्हणाले होते की, कर्म ही पूजा आणि कर्मातच शिव आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार सरकार राष्ट्रउभारणीत सक्रीय आहे. भारतात एक स्थिर, निर्भय आणि निर्णायक सरकार आहे. सर्वांचे दायित्व पार पाडण्यास सक्षम असणारा, तसेच गरिबी नसणारा अन् मध्यमवर्ग श्रीमंत असणारा, असा आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. काळाच्या पुढे दोन पावले रहाणारे तरुण इसतील, असा भारत असावा, असे मला वाटते. |
अमरावती : तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना भ्रष्टाचाराची कबुली देण्याचे बळ व सद्बुद्धी संत गाडगेबाबांनी द्यावी, यासाठी बुधवारी जिल्हा कचेरीपुढे होमहवन करण्यात आले. चांदेकर यांच्यामुळे लागलेल्या ग्रहणातून मुक्त झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. त्याचबरोबर गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने हे अभिनव आंदोलन केले. गेल्या पाच वर्षांपासून तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून सामान्य विद्यार्थ्यांची फसवणूक केली. विद्यापीठात जमा होणारा सामान्य विद्यार्थ्यांचा पैसा अपात्र कंपन्याच्या घशात ओतून आर्थिक नुकसान केले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, ट्रेनिंग प्लेसमेंट, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या, विकास आदी बाबींना नख लावण्याचे काम चांदेकर यांनी केले, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या सर्व बाबींची चीड विद्यार्थी वर्गामध्ये आहे. विद्यार्थी विरोधी व भ्रष्ट मुरलीधर चांदेकर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असलेला संताप अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रतिकात्मकरीत्या होमहवनाद्वारे व विद्यापीठाच्या विविध विभागांत गोमूत्र शिंपडून व्यक्त केला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, प्रथमेश पिंपळे, अजिंक्य मेटकर, अखिल ठाकरे, तुषार कोंबे, भूषण कोलपकर, गोविंद यादव, अमन सोनी आदी विद्यार्थी उपस्थित होते. (स्वतंत्र बातमी घेणे) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गाेमूत्र शिंपडल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी केली. पोलीस सूत्रानुसार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बुधवारी तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कारभाराचा विरोध करण्यासाठी सामूहिक हाेमहवन केले. यादरम्यान काही गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आंदोलकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास परीक्षा विभागात आंदोलकांनी सोबत आणलेले गोमूत्र शिंपडले. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना गर्दी केल्याने व महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिनेश सूर्यवंशी तसेच १० जणांविरुद्ध भांदविच्या १४३, २६९, ५१(ब), १८८, १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस विद्यापीठात पोहोचताच आंदोलकांनी पळ काढला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने पोलिसांत फिर्याद दिली. विद्यापीठात गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत १० ते १५ जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आंदोलकांनी केले. त्यांची ओळख पटविली जात आहे. - पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा. |
MUMBAI LIVE IN: कोरोनाचा कहर! अभिनंदन, इन्स्पेक्टर विजय! मुंबई पोलिसांकडून 'बिग बीं'ना शुभेच्छा! गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज! 'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा. NEW UPDATE (S) |
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात? जास्त वेळ काम केल्याने कदाचित तुमची उत्पादकता वाढेल आणि थोडेफार यश मिळेल पण त्याचे समांतर परीणाम आपण जाणतोच, तसेच ईतर जबाबदार्या झेलून फार वर्षे हे करता येत नाही. मग काय करावे? कुणीतरी म्हंटलय की "Successful people don't do different things, they do things differently." म्हणजे नक्की काय? सर्वात प्रथम थोडीशी सर्वसाधारण मानसिकता समजून घेऊ. कळतय पण वळत नाही अशी काहीशी आपली गत असते. ऑफिसातलं असो किंवा घरातलं, कोणतही उद्दीष्ट किंवा कामाकडे आग लागेपर्यंत ढुंकुनही न पाहण्याची आपली वृत्ती असते. परीक्षा असो, प्रेझेंटेशन बनवायचं असो, बिल भरायचं असो किंवा प्रवासाला निघायचं असो सगळीकडे हाच प्रकार. काही सायकॉलॉजीस्ट्स च्या म्हणण्यानुसार आपल्याला थ्रिल अनुभवून त्यातून मिळणार्या समाधानाची चटक असते. म्हणजे उशीर झालेला असताना शेवटच्या क्षणी बस/ट्रेन पकडल्यावर जो अभिमान आणि आनंद वाटतो त्याला तोड नाही. किंवा शेवटच्या क्षणी तहान भूक विसरून एखादा प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण केला की वरीष्ठांकडुन शाबसकी मिळणे वगैरे वगैरे.. दुसरा मुद्दा असा की आपला कंफर्ट झोन (आळशीपणा एक्स्प्लेन्ड) - कायम त्यातच राहण्यासाठी आपण कितीही किंमत चुकवायला तयार असतो. उदा. मद्य प्यायल्यावर येणारी झिंग तशीच रहावी ही उत्कट ईच्छा. किंवा कोण पुन्हा रेझ्युमे बनवून ईंटरव्यु देईल, दुसर्या शहरात मुक्काम हलवणे वगैरे.. त्यापेक्षा जे चाल्ल्लय ते बरंय. खरं तर कोणतही काम करायचं म्हंटलं की त्यामुळे होणारा त्रास किंवा रोजच्यापेक्षा वेगळं करावं लागेल हा विचार डोळ्यासमोर येतो आणि आपण ते काम टाळायचा प्रयत्न करू लागतो. जेव्हा त्याला आग लागते तेव्हा ते का करतो हे वर सांगितलं आहेच. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आयुष्यातल्या उद्दीष्टांना डेडलाईन नसते, त्यामुळे त्यांना आग लागत नाही. उदा. मला बिझीनेस करायचाय, किंवा बाग फुलवायची आहे, आणखी किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे वगैरे सर्व महत्वकांक्षा मनातच राहतात आणि तशाच स्मशानात जातात. बास झाली फिलॉसोफी...उपाय काय मग? थोडी मानसिकता बदलली आणि जोडीला एखादी परीणामकारी पद्धत वापरली तर फार मोठा फरक पडतो. कॉर्पोरेट जगतातही हे प्रॉब्लेम असतात आणि त्यात वापरल्या जाणार्या काही पद्धती व्यक्तीगत आयुष्यात वापरल्यास बराच फायदा होतो. Agile, Kanban, Scrum हे शब्द काही जणांना परिचीत असतील आणि त्याबद्दल मतमतांतरही असतील, ती चर्चा नंतर कधीतरी करू. सद्ध्या Kanban पद्धत थोडक्यात समजून घेऊ आणि कशी वापरयाची ते पाहू. ही पद्धत असंख्य प्रकारे आणि असंख्य गोष्टींसाठी वापरता येते. Kanban चा ईतिहास Kanban विकी वर वाचता येईल. थोडासा टु डू लिस्टसारखा प्रकार पण बराच वेगळा. कानबानचे ( किंवा कॅनबॅन) कोअर प्रिन्सिपल म्हणजे ही लिस्ट डोळ्यासमोर (वर्चुअली नाही तर फिजीकली) ठेवणे. ऐकायला किरकोळ वाटेल पण वापरल्यावर उपयुक्तता कळेल. घरातल्या भिंतीवर, बोर्डवर, किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअर (हे मी रेकमेंड करणार नाही) वापरून कानबान बोर्ड बनवता येतो. सर्वात पहिले तुम्हाला रकाने बनवावे लागतील, सर्व साधारण पणे Backlog, To Do, Doing, Done असे. अनुभवा नंतर यात बदल करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे येऊ. तुमचे एक मोठे (मोठे असलेच पाहिजे असे नाही) उद्दीष्ट, ईच्छा, किंवा स्वप्न याला एक नाव द्या, तेच हेडींग या बोर्डाला द्या. मग ते साध्य करण्यासाठी काय काय छोट्या स्टेप्स लागतील (आपण त्यांना टास्क म्हणू) अशा प्रकारे विभाजन करा. हे विभाजन शक्यतो असे करा की ती छोटी टास्क स्वतंत्र रित्या पुर्ण करता आली पाहिजे आणि एक आठवडा/दिवस्/महिन्यात (तुम्ही ठरवा) पुर्ण होईल. आता या सर्व टास्क स्टीकी नोट्स वर लिहा किंवा आयताकृती तुकडे केलेल्या कागदावर लिहा, त्याला नंबर द्या आणि हवं तर डेडलाईन द्या. आता या टास्क करण्याचा क्रम ठरवा. क्रम कसा ठरवायचा हे अनुभवातून शिकालच. पण सुरुवातीला सोप्या आणि पटकन करता येणार्या टास्क्सना प्राधान्य द्या आणि वरचा क्रम द्या. आता ह्या सर्व टास्क बॅकलॉग रकान्यात क्रमानुसार लावा. टास्कचे तुकडे चिकटवायला फेवीकॉल वगैरे वापरू नका. काढून पुन्हा लावता येइल असे हवे ;). आता मस्तपैकी स्वतःला शाबासकी द्या, कारण इथे पोहोचणे ही एक अचीवमेंट आहे. :) आता हा बोर्ड भिंतीवर असा लावा की येताजाता डोळ्यांना दिसेल. बॅकलॉग रकान्यातून एक किंवा जास्त टास्क ज्या तुम्हाला आता करण्यायोग्य वाटताहेत त्या टु डु मधे घ्या. एकच व्यक्ती यावर काम करत असेल तर एकच टास्क डुइंग मधे घ्या. ती पुर्ण झाली की डन मधे टाका आणि सेलीब्रेट करा. मग दुसरी पुर्ण करायला घ्या. ज्या दिवशी सगळ्या टास्क बॅकलॉग मधून डन मधे येतील त्या दिवशी तुमचे स्वप्न पुर्ण झालेले असेल. :) हे सर्व वाचायला किचकट वाटत असले तरी तितके नाही. तुमचा बोर्ड साधारणपणे असा दिसेल. (चित्र आंतरजालावरून साभार) यावरचा एक तुनळी व्हिडीओ. तुमच्या स्वप्न/ध्येयपूर्तीसाठी आगाऊ शुभेच्छा. |
बजेटः आयकरात आणि शेतकऱ्यांना सवलती, विरोधक म्हणतात हा तर 'जुमला' प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मध्यमवर्ग, शेतकरी आणि मजुरांसाठी सवलतींच्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकीआधी होणाऱ्या या बजेटमध्ये केलेल्या या घोषणा ही जुमलेबाजी (भूल-थापा) असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या या अंतरिम अर्थसंकल्पनांमधल्या "पोकळ घोषणांनी अपेक्षाभंग केला", अशी प्रतिक्रिया काँग्रसने दिली आहे. हंगामी अर्थसंकल्पाद्वारे आर्थिक वर्षाच्या चार महिन्यांच्या खर्चाची संसदेची मंजुरी मिळवली जाते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवे सरकार सामान्य अर्थसंकल्प सादर करते. पाहा संपूर्ण भाषणः दुपारी 1. 30 वाजता - योगी म्हणतात. . या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्ग, गरीब, महिला अशा सर्व घटकांचा विचार करण्यात आला. नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पाचा उपयोग होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. "करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवल्याने मध्यमवर्गाचे उत्पन्न आणखी वाढेल. देशातील प्रमुख नद्या येत्या दहा वर्षांमध्ये पुनरुज्जीवित करण्याचं उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी ठेवलं आहे. या निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा आम्हाला विश्वास आहे," असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते, जहाजबांधणी आणि जलसंसाधन, नदीविकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले. "शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय यांचा तसेच डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, संरक्षण या सर्वांचा समावेश करून राष्ट्राला एक संपूर्ण अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे अभिनंदन करते," असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. दुपारी 1. 20 वाजता - 'हा तर अपेक्षाभंग' पण काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "या अर्थसंकल्पाने अपेक्षाभंग केला. मध्यमवर्गीयांना करामध्ये मोठी सूट दिली. मात्र शेतकऱ्यांना दरमहा केवळ 500 रुपयांची मदत केली जाणार आहे. यामुळे सन्मान आणि प्रतिष्ठेसह त्यांना जगता येईल का? " दुपारी 12. 45 वाजता - "नीयत साफ है, नीति स्पष्ट और निष्ठा अटल. " - आमच्या सरकारच्या काळात विकास एक जनआंदोलन झाले, हेच या सरकारचं यश आहे. - आम्ही एक पाऊल टाकतोय तर शेकडो नवे मार्ग खुले होत आहेत. आम्ही एका सशक्त भारतासाठी पाऊल टाकतोय. या देशाच्या नागरिकांना एकत्र घेऊनच आम्ही भारताला पुढे नेऊ. - "नीयत साफ है, नीति स्पष्ट और निष्ठा अटल. " म्हणत पीयूष गोयल यांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण संपवलं. बजेटमधल्या घोषणांमुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. - पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरमध्ये सूट. एकूण उत्पन्न 6. 5 लाखांपर्यंत असलेल्यांनी प्रॉव्हिडंट फंड तसंच प्रिस्क्राइब्ड इक्विटींमध्ये दीड लाखापर्यंतची गुंतवणूक केल्यास आयकर भरावा लागणार नाही. - कुठल्याही बचत ठेवींवर मिळणाऱ्या 40 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजांवर आता कोणताही कर नाही. सध्या ही करमुक्त मर्यादा 10,000 रुपये आहे. दुपारी 12. 15 वाजता - महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल? - गेल्या चार वर्षात 30 लाख 38 हजार खोट्या कंपन्यांवर सरकारनं कारवाई केली. - टॅक्स भरण्यामध्ये पारदर्शकता आणणार, 24 तासात रिटर्न्सवर प्रक्रिया होईल, यासाठी तंत्रज्ञान विकसीत केलं जाईल. ईशान्य भारताला पायाभूत विकासात मोठा फायदा झाला आणि तो मिळत राहणार. पुढच्या आर्थिक वर्षात ईशान्य भारतासाठी निधी 21 टक्क्यांनी वाढवणार, म्हणजेच एकूण गुंतवणूक Rs 58,166 रुपयांची. - सौरऊर्जा वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे, हे क्षेत्र नवे रोजगार तयार करत आहे. - पाच वर्षात मोबाइल डेटा वापरण्यात 50 पटीने वाढ झाली आहे. - देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवांशांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. - ब्रॉडगेजवरील सर्व मनुष्यविरहित क्रॉसिंग्ज बंद करण्यात आली आहेत. - प्रधानमंत्री श्रमयोगी अनुदान या नवीन योजनेची घोषणा. त्यानुसार EPF जाणाऱ्या कामगारांना 6 लाखांचा विमा. - गोमातेचा सन्मान करण्यासाठी हे सरकार मागे पडणार नाही. त्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करणार. - राष्ट्रीय कामधेनू योजनेअंतर्गत गोवंश सुधारणा, विकासासाठी काम करण्यात येईल. - शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये आमच्या सरकारने वाढ केली. - दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये जमा करणार. यासाठी लागणारे 75 हजार कोटी सरकार देणार. - याचा 12 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार. - जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आमच्या सरकारने आणली. - या योजनेमुळ गरीब आणि मध्यमवग्रियांचे 3000 कोटी रूपये वाचले आहेत. लाखो-कोट्यवधी लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे. - हरियाणामध्ये 22वे AIIMS सुरू होणार आहे. बँकांची कर्ज बुडण्याची खरी स्थिती समोर आणा, हे रिझर्व्ह बँकेला सांगण्याची आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. - बँकांची कर्ज प्रकरणांची आणि कर्ज बुडण्याची खरी स्थिती समोर आणा, हे रिझर्व्ह बँकेला सांगण्याची आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. - तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वसूल केले आहे. - कोळसा आणि स्पेक्ट्रम अशा नैसर्गिक साधनसंपत्ती वाटपात पारदर्शकता आणली. अरुण जेटली लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत पीयूष गोयल यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. "2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6. 1 टक्क्यांवर होता आणि हा आकडा गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक आहे," हे सांगणारा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा (NSSO) एक अहवाल बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यामुळे ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशी या बातमीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तुम्हीही त्या बातमीविषयी इथे वाचू शकता. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये गोयल काय घोषणा करतात, यावर सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान, आम्हीही वाचकांना आज हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही यावर आपली मतं आम्हाला फेसबुक किंवा ट्विटरवर सांगू शकता. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारच्या गेल्या 4. 5 वर्षांच्या कामकाजाचा उल्लेख करत या सरकारने नव्या भारतासाठी काम केले असून 2014 पूर्वी देश अस्थिर पर्वात होता, असं अभिभाषणात सांगितलं आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स 36,311. 74 वर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक 10,851. 35 वर उघडला. बजेटच्या दिवशी काय नवीन घोषणा होतात, यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असतेच. पण याचे तत्काळ परिणाम शेअर मार्केट्सवर पाहायला मिळतात. त्यामुळे या आकड्यांवर दिवसभर सर्वांची नजर राहील. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री पीयूष गोयल संसदेत पोहोचले. पूर्णवेळ अर्थमंत्री अरुण जेटली हे उपचारासाठी परदेशी गेल्यामुळे अर्थ मंत्रालयाचा पदभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. जेव्हा वार्षिक कमाईपेक्षा सरकारचा खर्च जास्त होतो, तेव्हा त्याला वित्तीय तूट असे म्हणतात. यामध्ये कर्जाचा समावेश नसतो. 2017 साली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 या वर्षासाठी वित्तीय तूट GDPच्या 3. 2 टक्के असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तज्ज्ञांनी येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकानुनयी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात अधिक खर्चाची घोषणा करेल आणि कररचनेत बदल करेल अशी शक्यता आहे. सध्या वार्षिक अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. ही मर्यादा 5 लाख होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आयकरामध्ये 80 C अधिनियमांतर्गत मिळणारी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 1. 5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जो कर नागरिक सरकारला थेट स्वरूपात देतात त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. हा कर उत्पन्नावर लागतो, तो कोणत्याही इतर व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. प्रत्यक्ष करामध्ये आयकर, संपत्ती कर आणि कार्पोरेट कर यांचा समावेश होतो. जो कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येतो त्यास अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. यामध्ये सेवा उपलब्ध करून देणारे, उत्पादनांवर लागणारे कर यांचा समावेश होतो. वॅट, सेल्स टॅक्स, लक्झरी टॅक्ससारख्या करांऐवजी आता GST आकारला जातो. GST अप्रत्यक्ष कर आहे. भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होते. हे वर्ष पुढील कँलेंडर वर्षाच्या 31 मार्चपर्यंत सुरू राहाते. आर्थिक वर्षामध्ये बदल करण्याची चर्चा या सरकारने केली आहे. आर्थिक वर्ष कॅलेंडर वर्षाप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे. मात्र त्यामध्ये अजून कोणताही बदल झालेला नाही. सध्या एखाद्या व्यक्तीला शेअरबाजारामध्ये एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळामध्ये पैसे गुंतवून लाभ मिळाला तर त्याला अल्पकालीन भांडवली लाभ किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. त्यावर सध्या 15 ट्कके कर लावण्यात आला आहे. शेअर्समधून एका वर्षाहून अधिक काळामध्ये मिळवल्या जाणाऱ्या लाभाला दीर्घकालीन भांडवली नफा (लाँग टर्म कॅपिटल गेन) असं म्हटलं जातं. या नफ्यावर कोणताही कर लागायचा नाही. मात्र 2018-19 या अर्थसंकल्पामध्ये 10 ट्कके कराची तरतूद करण्यात आली. अर्थात हा कर एक लाखांहून अधिकच्या नफ्यावरच लागू झाला आहे. एक लाखांपेक्षा कमी लाभावर कोणताही कर लावला जात नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. ) |
मुंबई । गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे, तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई क्राईम ब्रांच लकडावला यांची पाठलाग करत होती. लकडावाला मुंबई पोलिसांनी पाटणामधून अटक केले आहे. लकडावालाला न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याने दाऊद इब्राहिम नाराज होता. त्यामुळेच दाऊद इब्राहिमने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. यानंतर अनेक वर्ष लकडावाला येथेच राहिला. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांची कामगिरी अभिनंदास्पद ! कुख्यात गॅंगस्टर एजाज युसुफ लकडावालाला पाटणामधून काल (८ जानेवारी) मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. एजाज दाऊद, छोटा शकील, राजन सोबतही काम करत होते. लकडावालावर ८० गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांची कामगिरी अभिनंदास्पद, असल्याचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी आज (९ जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले. ज्या पोलीस अधिकाऱ्यानी ही महत्त्वाची कामगिरी केली. यापूर्वी लकडावालाची मुलगी शिफा शेख हिने मनीष अडवाणी या फेक नावाने पासपोर्ट तयार केला होता. शिफा हिला पोलिसांनी मुंबई विमानतळावर अंतर्गत ताब्यात घेतला आहे. मुंबई पोलिसांनी याचा आधार घेत लकडावालाचा पाठलाग करत पाटणातून अटक केली. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
साबरमती - गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला आता न्यायालयीन कोठडीत साबरमती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. आज 14 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर लॉरेन्स बिश्नोईला गुजरात पोलिसांनी नलिया कोर्टात हजर केले. तेथून त्याला साबरमती कारागृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साबरमती जेल हे अतिक अहमदचे लपण्याचे ठिकाण होते, जिथून अतिक हा मोबाईल फोनचा बिनदिक्कत वापर करून आपली गुन्हेगारी सिंडिकेट चालवत होता. त्याचवेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच साबरमती कारागृहात हलवण्यात येणार आहे. लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आपले जाळे उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील याबाबत सुरक्षा यंत्रणांना पूर्ण शंका आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगात मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मुंबईपर्यंत ज्या प्रकारे नेटवर्क पसरले आहे. कारागृह प्रशासन आणि सर्व सुरक्षा यंत्रणा याबाबत पूर्णपणे सतर्क आहेत. खरेतर, गेल्या वर्षी 14 सप्टेंबर रोजी गुजरात एटीएसने भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळील समुद्रात पाकिस्तानी मासेमारी करणारी नौका अडवली आणि त्यातून 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 40 किलो हेरॉईन जप्त केले होते. त्यावेळी 'अल तय्यासा' नावाच्या बोटीतून प्रवास करणाऱ्या पाकिस्तानच्या सहा नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीतील सरताज मलिक आणि जग्गी सिंग उर्फ वीरपाल सिंग या दोन रहिवाशांच्या मदतीने हेरॉईन दिल्ली आणि पंजाबसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये रस्त्याने आणले जाणार होते, असे तपासात उघड झाले. नंतर दोघांनाही अटक करण्यात आली. एका नायजेरियन नागरिकासह दोन तस्करांच्या टोळीद्वारे या अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. हे दोन्ही तस्कर पंजाबमधील तुरुंगात बंद आहेत. आठ आरोपींकडे चौकशी केली असता, कारागृहात बसून अमली पदार्थांचे तस्कर मीरज रहमानी आणि अनी चीफ ओबिन्ना उर्फ चीफ (नायजेरियन नागरिक) हे टोळी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. रहमानी कपूरथळा तुरुंगात आणि ओबिन्ना अमृतसर तुरुंगात बंद आहेत. दोघेही बिश्नोईसाठी काम करत होते, असे समजते. |
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या पतीपत्नीस गडबडीत गाडी लॉक न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण उघड्या असलेल्या गाडीतून चोरट्यांनी १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. त्यामुळे गाडी लॉक न करणे या दाम्पत्याच्या चांगलेच महागात पडले आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील पानमंद दाम्पत्य मुलीच्या सारखपुड्याचे आमंत्रण देण्यासाठी रांधे येथील नातेवाईक दत्तात्रय टावरे यांच्याकडे आले. त्यांनी आपली स्वीफ्ट ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून नातेवाईकांच्या घरी गेले. मात्र या गडबडीत त्यांच्याकडून गाडीचे दरवाजे लॉक करण्याचे विसरून गेले. नेमक्या याच संधीचा फायदा घेवून अज्ञात भामट्याने गाडी उघडून आतमध्ये असलेली दागिन्यांची पर्स लंपास केली. गाडीत आपली दागिन्यांसह पर्स राहील्याचे लक्षात येताच पानमंद यांची लगेच गाडीत येवून पाहीले, मात्र तोपर्यंत चोरट्याने आपला डाव साधला होता. याबाबत शितल दादासाहेब पानमंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोहेकॉ कदम हे करत आहेत. - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी शपथविधी घेणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. होय तुम्ही वाचता आहात ते अगदी खरे आहे. आता म्हणाल की शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा कसा दिला असा प्रश्न तुमच्या मनात येईल. ते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हे खरे आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे तो सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. सामना या वृत्तपत्राचे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे संपादक होते. गेली ७ वर्षे ते सामना चे संपादक होते. संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. सामना वृत्तपत्रावर कालपर्यंत संपादक म्हणून नाव होते. महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेत आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री आता संपूर्ण राज्याचा नेता असतो. त्यामुळे त्यांनी आता संपादकपदी राहणे योग्य नसल्याने त्यांनी सामना ची संपूर्ण जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपविली आहे. आजच्या सामना वृत्तपत्रातून संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. |
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) येथे घडली आहे. येथे आपल्या पोटाच्या 8 वर्षांच्या पोरीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलीच्या आईनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 2 मार्च रोजी या विकृत बापाला ताब्यात घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे जीवे मारण्याची धमकी देत गेले दोन वर्षे हा बाप आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. सोलापुरातील माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित चिमुरडी इयत्ता दुसरीत शिकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे की, आपल्या नवऱ्याने म्हणजेच, या मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार करून, ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आईच्या म्हणण्यानुसार तब्बल दोन वर्षे हा प्रकार सुरु होता. 19 फेब्रुवारीच्या रात्रीदेखील घरात कोणी नसताना बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. मुलगी झोपल्यानंतर पतीने तिला उठवून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे. (हेही वाचाः 12 वर्षाच्या मुलीवर 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सामुहिक बलात्कार व खून; 7 अल्पवयीन मुलांना अटक) हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्यात येईल अशी धमकी हा बाप आपल्या मुलीला देत असे. अखेर आईच्या हा प्रकार लक्षात आल्यावर तिने माढा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या मुलीची वैद्यकीय तपासणी सुरु आहे. पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याआधी पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाला दिल्ली हायकोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणामध्ये मुलगी गर्भावती राहिली होती. |
मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असून शेकडो पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. यंदा अकरावी प्रवेशाच्या तीनच फेऱ्या होणार असून यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याने आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात तिसऱ्या गुणवत्ता यादीत तरी आपला नंबर लागणार का? अशी धाकधूक विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. दुसऱ्या यादीनंतर आज जाहीर होणाऱ्या तिसऱ्या यादीसाठी मुंबई विभागात एकूण १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध आहेत. दुसऱ्या यादीत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून केवळ २८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी मिळून आतापर्यंत मुंबई विभागातून १ लाख १६ हजार १२८ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामध्ये कोट्यातील ३५ हजार १३२ जागांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत ७६ हजार जागांवर अलॉटमेंट होऊनही केवळ २८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केल्याने तिसऱ्या यादीत प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागील वर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८ हजार ७१ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामधील सर्वाधिक जागा या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला बसलाच, मात्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे ही प्रक्रिया रेंगाळल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांत यंदा घट झाल्याचे मत तज्ज्ञ नोंदवित आहेत. अनेक पालक, विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेशच घ्यायचा रद्द केल्याने यंदाही अकरावीच्या लाखाहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. |
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातील तोडफोड व जाळपोळीने हिंसक वळण घेतले होते. पोलिस प्रशासाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारच्या महाराष्ट्र बंदला सायंकाळी दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये शिवाजी चौक परिसरात जोरदार दगडफेक, वाहनांची तोडफोड व टपर्यांची जाळपोळ झाली. दगडफेकीत सोळा पोलिस कर्मचारी व शेकडो लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही समाजातील 44 युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेेत. 150 युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. संचारबंदी शिथिल करावी, विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत, याकरिता माजी खासदार निवेदिता माने, धैर्यशील माने यांचे शिष्टमंडळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेणार आहेत. सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, याबाबतचे निवेदन प्रांत समीर शिंगटे व जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांना दिले आहे. |
मुंबई, 11 फेब्रुवारी : माणसाच्या शरीराला पौष्टिक अन्नाबरोबरच पुरेशा झोपेचीही गरज असते. दिवसभर थकलेल्या शरीराला विश्रांतीसाठी काही काळ झोप घेणं आवश्यक असतं. त्यामुळे शरीर व मनाला आलेला थकवा कमी होतो, कार्यक्षमता वाढते. अपुऱ्या झोपेचे अनेक दुष्परिणाम असतात. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे काही आजारही पाठी लागू शकतात. हे टाळण्यासाठी पुरेशी व चांगली झोप घेणं गरजेचं असतं. काही जणांना अंथरूणावर पडल्यापडल्या झोप लागत नाही. काहींची झोप सतत चाळवते. अशा वेळी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास झोप लागण्यास मदत मिळू शकते. पुरेशी व शांत झोप झाली तर सकाळी उठून ताजंतवानं वाटतं. मात्र तसं न झाल्यास दिवसभर डोकं दुखणं, थकवा येणं, कामात लक्ष न लागणं, झोप येणं अशा समस्या येतात. दिवसभर खूप काम झालं असेल, तर अंथरूणावर पडल्यापडल्या झोप लागते. मात्र काही जणांच्या बाबतीत तसं होत नाही. पडल्यापडल्या झोप लागली, तरी थोड्या वेळानं जाग येते व पुन्हा झोप लागत नाही. अशा झोपेच्या तक्रारींमुळे व्याधी मागे लागतात. पुरेशा झोपेमुळे शरीरातल्या अवयवांचं कार्य सुरळीत राहतं. मेंदूचं काम सुधारतं. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीनं पुरेशी व शांत झोप घेतली पाहिजे. काही पदार्थांच्या सेवनामुळे रात्रीची चांगली झोप मिळण्यास मदत होते. भात : रात्रीच्या जेवणात भात न खाणारे अनेक आहेत. डायबेटिस झालेल्या व्यक्ती तर भात वर्ज्यच करतात. तसंच वजन वाढतं म्हणूनही काही जण भात खात नाहीत. मात्र तांदळात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. त्यात कर्बोदकं भरपूर असतात. त्याचा जीआय इंडेक्सही जास्त असतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक तास भात खाल्ला तर झोप चांगली लागते. दूध : झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध पिणं झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. दुधात असलेल्या Typtophan आणि Serotoninमुळे चांगली झोप लागते. नट्स : सुकामेवा आरोग्यासाठी खूप उत्तम असतो. शांत झोप येण्यासाठीही त्याची मदत होते. त्यात अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. त्यामुळे डायबेटिस आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. मेलॅटोनिन भरपूर असल्यामुळे त्यांच्या सेवनानं झोप चांगली लागते. चेरी : झोपण्याआधी एक मूठ चेरी खाल्ल्यास छान झोप लागते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चेरीचा ज्युसही पिता येऊ शकतं. ताज्या चेरी उपलब्ध नसतील, तर फ्रोझन चेरीही फायदेशीर ठरू शकतात. चेरीमध्ये असलेलं मेलॅटोनिन शरीराचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतं. कॅमोमाईल टी : यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते तसंच ताण व भीतीही कमी होते. त्वचेचं आरोग्य सुधारतं. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदूतल्या रिसेप्टर्सना चालना मिळते. यामुळे झोप चांगली लागते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रात्री 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. वारंवार अपुरी झोप होत असेल तर वजन वाढणं, डिमेन्शिया अशा समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी व शांत झोप गरजेची असते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भोंग्याचं राजकारण केलं जात आहे, हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातील वातावरण बिघडवलं जात आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. या वेळी राऊत म्हणाले, यापूर्वी कधीच हनुमान जयंती आणि राम नवमीला हिंसा झाली नाही. या घटनांवर पंतप्रधान गप्प का? असा सवाल करत पंतप्रधानांनी देशातील एकतेवर बोलण्याची गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण कोल्हापूरातील निकालाने याला सडेतोड उत्तर दिले आहे. दंगे भडकवणे हे नव हिंदुत्व ओवेसीचं लक्ष्य आहे. अशा प्रकारचं षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही. हे षडयंत्र उधळून लावलं जाईल, असेही संजय राऊत म्हणाले. |
मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात नवोदय विद्यालयाच्या तोडीच्या सेवा सुविधा असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवनही विद्यार्थ्यांसाठी आसुसलेले होते. विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक शाळेची ओढ आणि आस्था निर्माण व्हावी या हेतूने शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांचे पुस्तके देत स्वागत झाले. ही शाळा पुन्हा येथे सुरु व्हावी, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज हा प्रयत्न सफल झाल्याचे समाधान असून अनुसूचित आणि नवबौद्ध समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधायुक्त शिक्षण मिळणार असल्याने त्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित आयएसओ मानांकित शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना पालकासोबत पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते. पहिल्या दिवशी या प्रवेशोत्सवाकरिता सुंदर रंगरांगोळी, भव्य आकर्षक मंडपाची उभारणी करुन सुशोभिकरण करण्यात आले होते. या प्रसंगी समाज कल्याण विभागाच्या लेखा अधिकारी मनिषा पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे, उपक्रमशील शिक्षक ध्रुवास राठोड व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह पालकांचाही खासदार पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. भविष्याची दिशा कशी असावी, याविषयी विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षा राजपत्रित लेखा अधिकारी मनिषा पाटील यांनी, त्यांचा यशस्वी जीवनप्रवास उलगडत स्फूर्तिदायी मनोगत व्यक्त केले. आपल्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वाने राज्यभर नावलौकिक झालेले उपक्रमशील शिक्षक ध्रुवास राठोड यांनी शाळेत राबवले जाणारे विविध नावीन्यपूर्ण गुणवत्तादायी उपक्रम व विद्यार्थ्यांना शाळेमार्फत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती देत शाखेकरिता खासदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास सांगितला. आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले. अमरावती येथे स्थलांतरित झालेली शाळा पुन्हा येथे मिळवून जागा उपलब्ध करुन आज ही दिमाखदार शाळा प्रत्यक्षात साकारली.पाल्यांना सुविधायुक्त शाळा उपलब्ध केल्याबद्दल पालकांनी खासदार पाटील यांचे आभार व्यक्त केले. |
वजन घटवण्यासाठी नारळाचं तेलच का वापरावे? संशोधनानुसार नारळाच्या तेलामध्ये स्वयंपाक केल्यास पोट रिक्त असल्याची जाणीव होत नाही. महत्त्वाचे म्हणजे भूक कमी प्रमाणात लागते. एका अभ्यासाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पटकन भूक लागत नाही. याच उलट कमी चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे सतत भूक लागते. यामुळेच नारळ तेलाचा आहारात समावेश केल्यास काही प्रमाणात वजन कमी होण्यास मदत मिळते. (वाचा : Weight Loss : वजन कमी करायचंय? फॉलो करा आयुर्वेदिक लाइफ स्टाइल) थायरॉइड ग्रंथींची सक्रियता कमी झाल्यास वजन वाढीच्या समस्या उद्भवतात. पण नारळाच्या तेलाचं सेवन केल्यास या ग्रंथींच्या कार्य प्रणालीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. शिवाय चयापचयाची क्षमता देखील वाढते. चयापचायी प्रक्रिया (Metabolism System) सुधारल्यानं पचनाच्या समस्या कमी होतात. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी (Weight loss tips in marathi) जमा होत नाही. कारण अन्नपदार्थांचं योग्य पद्धतीनं पचन न झाल्यास शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर फेकली जात नाही. परिणामी वजन वाढण्यास सुरुवात होते. (वाचा : सावधान! करोनाला तुमच्या घरात प्रवेश देऊ नका, जाणून घ्या भाजीपाला स्वच्छ धुण्याच्या पद्धती) नारळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड आहे. हा घटक रोगजंतू आणि कोणत्याही संसर्गाविरोधात लढण्याचं कार्य करतो. मुख्य म्हणजे लॉरिक अॅसिडमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. कारण शरीर बळकट असल्यास आपण कोणतेही ध्येय गाठू शकता. शारीरिक क्षमता वाढल्यास वजन घटवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला अधिक वेळ व्यायाम करणं शक्य होतं. (वाचा : मधुमेहींसाठी आयुष मंत्रालयाकडून विशेष सूचना, अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती) चरबीयुक्त पदार्थांचं अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास शरीर सूजणं ही बाब सामान्य आहे. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळवून देण्यात पेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. नारळ तेलामध्ये (Weight Loss Ayurvedic Tips in Marathi) शरीराच्या एखाद्या अवयवाला आलेली सूज कमी करण्याचे गुणधर्म आहेत. नारळाच्या तेलातील या घटकांमुळे सूज देखील कमी होते आणि अतिरिक चरबीही कमी होण्यास मदत होते. (वाचा : केवळ १५ मिनिटांत स्वतःला कसं ठेवावं फिट, शिल्पा शेट्टीनं सांगितला आरोग्यमंत्र) सॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश असल्यानं नारळाच्या तेलामध्ये नैसर्गिक स्वरुपात भूक कमी करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणजेच जी लोक नियमित स्वरुपात नारळाच्या तेलाचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये खाण्याची इच्छा कमी होते. खाण्याची इच्छाच कमी झाल्यानं शरीर सडपातळ राहण्यास मदत होते. नारळाच्या तेलाच्या सेवनामुळे भूक कमी लागते, यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज् जात नाहीत. (वाचा : शिल्पा शेट्टीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य, नियमित करते 'हे' आसन) आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नारळाच्या तेलामध्ये हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे स्वयंपाकासाठी नारळ तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासोबत नारळ तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हृदय देखील निरोगी ठेवण्याचे कार्य करते. कसा करावा नारळ तेलाचा वापर ? स्वयंपाकाव्यतिरिक्त नारळ तेलाच्या सेवनाचे आरोग्यदायी लाभ घेण्याचे कित्येक पद्धती आहेत. एक कप गरम पाण्यामध्ये एक छोटा चमचा नारळ तेल मिक्स करा. सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि भूक देखील कमी लागते. अतिरिक्त प्रमाणात नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास याचे शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभरात तीन छोट्या चमच्यांहून अधिक नारळ तेलाचे सेवन करू नये, अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम होतील. (वाचा : Weight Loss Story :लठ्ठपणामुळे वजन झालं होतं ११७ किलो, ६ महिन्यांत घटवलं २२ किलो वजन) |
भागवत कराड यांनी विमानात सहप्रवाशाचे प्राण कसे वाचवले? व्हॅसोव्हेजन सिनकोप म्हणजे काय? केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या एका फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. हा फोटो एका विमानातला असून यामध्ये डॉ. कराड हे एका व्यक्तीवर उपचार करत असल्याचं दिसून येतं. केंद्रात मंत्री असलेल्या भागवत कराड यांनी प्रसंगावधान राखत विमानात आपल्या मूळच्या डॉक्टरच्या भूमिकेत तातडीने प्रवेश केला. त्यांनी दिलेल्या आपत्कालीन उपचारांमुळे त्या प्राणही वाचले. डॉ. कराड यांच्या या कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊ. नेमकं काय घडलं? डॉ. भागवत कराड हे सोमवारी (15 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री 1 वाजता इंडिगो फ्लाइट क्रमांक 171ने दिल्ली ते मुंबई प्रवास करत होते. ते विमानात पहिल्याच रांगेत बसले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात ते झोपी गेले. काही वेळाने त्यांना विमानातील क्रू सदस्यांच्या आवाजाने जाग आली. घोषणा सुरू होती, "विमानात कुणी डॉक्टर असेल तर तत्काळ संपर्क साधा. एका प्रवाशाला मदतीची गरज आहे. " हा प्रसंग डॉ. भागवत कराड यांनी फेसबुकवर पोस्ट करत हा प्रसंग शेअर केला. ते म्हणतात, "प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट इंडिगोमध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरू झाली आणि मला कळाले. एका क्षणाचाही देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड शुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली, असं डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या, असं आवाहनदेखील डॉ. कराड यांनी केलं. यासंदर्भात डॉ. कराड यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, "मी ज्यावेळी त्या व्यक्तीकडे गेलो, तेव्हा तो विमानातील खुर्च्यांच्या मध्ये आडवा बेशुद्धावस्थेत पडला होता. मी त्याची नाडी तपासली. तेव्हा ती अतिशय मंद झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. हा हायपोटेन्शनचा प्रकार असल्याचं माझ्या लक्षात आलं. " "तातडीने मी त्या व्यक्तीला खुर्चीवर उताणं करून प्रथमोपचारास सुरुवात केली. त्याचे पाय वर केले. कपडे सैल करून त्याच्या छातीवर थोडं चोळलं. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांना ग्लुकोज अथवा ORS आणण्यास सांगितलं. विमानात ORS उपलब्ध होतं. ते द्रावण संबंधित व्यक्तीला पाजण्यात आलं. त्यानंतर त्याला थोडं बरं वाटू लागलं. " या घटनेचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला. हाच फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून डॉ. कराड यांचं कौतुक होताना दिसत आहे. डॉ. कराड सांगतात, "संबंधित व्यक्ती हा अनोळखी होता. त्यामुळे त्याची मेडिकल हिस्टरी काय आहे, हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं. त्याची नाडी तपासताच त्याचा रक्तदाब कमी झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यादृष्टीने उपचार सुरू केले. शिवाय शरीरातील ग्लुकोज पातळी खालावल्यास अशा प्रकारे चक्कर येण्याचे प्रकार उद्भवतात. त्यामुळे हायपोटेन्शन आणि हायपोग्लायसेमिया या दोन्ही स्थितींच्या अनुषंगाने उपचार देण्यास मी सुरू केलं. अशा व्यक्तींना तत्काळ ग्लुकोजमिश्रीत पाणी पाजणं गरजेचं असतं. त्यासाठी ORS ही मागवून ठेवलं. " संबंधित व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर डॉ. कराड यांनी त्याच्याकडून आरोग्याबाबत माहिती जाणून घेतली. संबंधित व्यक्तीला कोणत्याही व्याधी नाहीत, असं त्या व्यक्तीने सांगितलं. म्हणजे केवळ झोपेतून अचानक उठून उभं राहिल्यामुळे त्याला अशा प्रकारे चक्कर आली. याला शास्त्रीय भाषेत 'व्हॅसोव्हेजन सिनकोप' असं संबोधलं जातं, असं डॉ. कराड यांनी सांगितलं. यादरम्यान संबंधित प्रवाशासोबत चर्चा करताना डॉ. कराड यांनी त्याला ECG आणि इतर काही आवश्यक चाचण्याही करून घेण्याचा सल्ला दिला. व्हॅसोव्हेजन सिनकोप काय आहे? डॉ. कराड सांगतात, "झोपेतून अचानक उठून उभे झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कधी-कधी अंधारी आल्यासारखं होतं. यालाच 'व्हॅसोव्हेजन सिनकोप' म्हटलं जातं. हे कुणालाही होऊ शकतं. अगदी निरोगी व्यक्तीलाही. " सोलापूर येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अग्रजा चिटणीस यांनी सिनकोप व्हॅसोव्हेजनसंदर्भात सविस्तर समजावून सांगितलं. त्या म्हणतात, "व्यक्ती झोपलेला असताना आपला रक्तप्रवाह संथपणे हृदयाच्या दिशेने जात असतो. पण झोपेतून अचानक उठून थेट उभं राहून चालू लागल्यानंतर या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला थोडं गरगरल्यासारखं होतं. हे अगदी कुणालाही होऊ शकतं. त्याचप्रमाणे, आपण दिवसभर आपण काही ना काही खात असतो. परंतु, रात्रभर झोपेत असल्यामुळे बराच वेळ जेवण केलेलं नसतं. अशा स्थितीत सकाळच्या वेळी हायपोग्लायसेमियाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह असणाऱ्या किंवा नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना ही समस्या येऊ शकते. शिवाय विमान प्रवासात बराच काळ काही खाल्लेलं नसतं, त्यामुळे अशा ठिकाणी या अडचणी येऊ शकतात. काय काळजी घ्यावी? व्हॅसोव्हिजन सिनकोप टाळण्यासाठी झोपेतून अचानक आडव्याचं उभं होण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया करावी, असा सल्ला डॉ. चिटणीस यांनी दिला. त्या म्हणतात, झोपेतून उठल्यानंतर थोडं थांबून उभं राहावं. यामुळे रक्तप्रवाह विचलित न होता समांतर पद्धतीने सगळ्या दिशेने होऊ लागतो. याशिवाय, प्रवासाला जाताना आपण भरपूर पाणी प्यायलेलं असणं गरजेचं असतं. विशेषतः विमानप्रवासात अनेकांना विविध प्रकारचे त्रास होतात, ते टाळण्यासाठी आपलं शरीर हायड्रेटेड असणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. निरोगी व्यक्तींनी नियमितपणे आपल्या शरीराची चाचणी करत राहावी. रक्तदाब, मधुमेह यांच्यासारख्या व्याधी असलेल्या रुग्णांनी आपली औषधं, ग्लुकोज वगैरे गोष्टी सोबत बाळगाव्यात. डॉ. कराड म्हणतात,की प्रवासाला जाण्यापूर्वी रुग्णांनी एकदा आपल्या डॉक्टरांशी चर्चा नक्कीच केली पाहिजे. त्यांनी आपली औषधं नियमित वेळेवर घेऊनच प्रवासाला निघावं. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. ) |
स्मार्टफोन कंपनी POCO आपला नवीन स्मार्टफोन POCO M3 Pro 5G ला उद्या भारतात लाँच करणार आहे. मात्र, लाँचिंगच्या आधीच फोनची किंमत लीक झाली असून, जवळपास १५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोनमध्ये दमदार फीचर्स मिळतील. हायलाइट्सः लाँचिंगनंतर भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता. फोन १५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध होईल. नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी POCO लवकरच भारतात POCO M3 Pro 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या फोनला उद्या (८ जून) लाँच करेल. मात्र, अधिकृत लाँचिंगच्या अधिकच फोनच्या किंमत आणि फीचर्सबाबत अनेक माहिती समोर आली आहे. फोन शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरीसोबत येईल. यासोबतच यात हँडसेट मीडियाटेक डाइमेंशन ७०० चिप मिळेल. एका टिपस्टरनुसार ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या POCO M3 Pro 5G ची किंमत जवळपास १७,९९९ रुपये (($२४६) असू शकते. हा भारतातील सर्वात स्वस्त ५जी फोन असेल. कंपनी स्मार्टफोनला यापेक्षा कमी किंमतीत देखील लाँच करू शकते. जे ४ जीबी रॅम आमि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट असू शकते. भारतीय बाजारातील लाँचिंगच्या आधी POCO M3 Pro ला युरोपमध्ये १७९ युरो (१५,८४८ रुपये) सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या किंमतीवरून अंदाज लावला जात आहे की, भारतात या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास १५ हजार रुपये असू शकते. स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर पोको एम३ प्रो ५जी चे भारतीय व्हेरिएंट देखील ग्लोबल व्हेरिएंट सारखेच असेल. Poco M3 Pro 5G अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ चालतो. यात ६. ५ इंचचा फूल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Poco M3 Pro 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि एआय फेस अनलॉक सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. |
हैदराबाद/विशाखापट्टणम : गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा असून आता हे लोण उत्तराखंडातही पोहोचले आहे. रोजचे मुख्य अन्न असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील जनता मात्र धास्तावली आहे. दोन दिवसांपूर्वी हैदराबादेतील सरूरनगरच्या एका ग्राहकाने बिर्याणीत प्लास्टिकचा तांदूळ वापरला जात असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी मीरपेठच्या एका ग्राहकाने असा दावा केला की, किराणा दुकानातून खरेदी केलेला तांदूळ प्लास्टिकचा निघाला. हा प्रकार सोशल मीडियावरूनही झळकल्याने या प्लास्टिकच्या तांदळाच्या चर्चेला चांगलाच ऊत आला. याची गंभीर दखल घेत राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने मीरपेठमधील किराणा दुकानावर धाड टाकून या तांदळाचे नमुने जप्त करून परीक्षणासाठी पाठविले आहेत. मीरपेठ भागातील नंदनवन कॉलनीतून अशोकची अशी तक्रार आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मी आणि माझे कुटुंबिय पोटदुखीने त्रस्त आहोत. घरातील सर्वांचे हात-पायही ठणकत आहेत. सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर बायकोने ताटात वाढलेला भात मोकळा आणि खाण्यालायक नव्हता. राज्याचे नागरी पुरवठा आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी अधिकाऱ्यांनी युसूफगुडा, सरूरनगर, मीरपेठ आणि तक्रारी आलेल्या ठिकाणी तांदळाचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. हे नमुने परीक्षणासाठी राज्याच्या अन्न-पदार्थ प्रयोगशाळेत पाठविले जातील. शास्त्रीय परीक्षणानंतर नक्की काय भानगड आहे, याचा उलगडा होईल. परीक्षण अहवाल गुरुवारपर्यंत हाती घेईल, असेही त्यांनी सांगितले. |
नवी दिल्ली - युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने रोहित शर्माचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना पंत याने 32 चेंडूत शतक फटकावत भारतीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. गेल्या महिन्यात इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात रोहित शर्माने 35 चेंडूत शतकी खेळी केली होती. या खेळीदरम्यान ऋषभ पंतने 38 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 116 धावा फटकावल्या. फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात झालेल्या लढतीत हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 145 धावांचे आव्हान ठेवले. पण ऋषभ पंतने केलेल्या वादळी खेळीसमोर हे आव्हान अगदी किरकोळ ठरले. ऋषभने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांना फोडून काढले. ऋषभच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना दहा गडी राखून जिंकला. याआधी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-20 क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने 35 चेंडूत शतकी खेळी करत भारतातर्फे सर्वात वेगवान टी-20 शतकाचा विक्रम नोंदवला होता. त्याआधी युसूफ पठाणने 2010 साली आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक फटकावले होते. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. रुपीनगर परिसरातील सरस्वती शाळेजवळ ही वाहनांची तोडफोड झाली. तीन अज्ञातांनी पहाटे 4:15 च्या सुमारास या वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं. परिसरात कोयता गँगनंतर आता गाड्या फोडणारी टोळी सक्रिय होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रात्री गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. अशा भुरट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे. |
हेच सांगितले होते ना\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 10:03 वा.]\nएखाद्याचा गणपती दूध पित असल्यास त्याला पिऊ द्यावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का.\nप्यायलाच बसला असेल एखाद्याचा गणपती (दूध हं!) तर त्याला थांबवायला माझ्याकडे उत्साह नाही. माझ्या घरातला पिऊ लागला तर पंचाईत आहे. ती मी होऊ देणार नाही पण माझ्या घरातला पितच (गणपती हं!) नसेल तर मी पिईल कधीतरी ही भीती "रोज" बाळगायचीही गरज नाही. प्यायला लागला तर त्याला यना-रिहॅबमध्ये पाठवता येईलच. ;-)\nजोरात हसणार! हाहाहा!\nका बरे? असे होत नसावे असे वाटते का? या जोरात हसणारलाच आक्षेप आहे कारण आपल्या अंगाशी आले की काहीजण ते टाळून दुसरेच काहीतरी पाल्हाळ लावू लागतात.\nमान तुकवावी लागते असे मी कुठेही म्हटलेले नाही. लहान मुलांना बरे वाटावे म्हणून आपण त्यांच्या काही गोष्टी ऐकतो. तसेच हे. आता लहान मुलांसाठी गणपती दूध पितो असे मान्य करावे लागेल तर.\nहो ना म्हणजेच आपल्याला न पटणारी प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा आहे असे म्हणून झोडपण्यात काही हशील नाही. हेच सांगायचे आहे.\nप्रतिष्ठित असे वागतात म्हणजे कसे वागतात हे अजून निश्चित झालेले. कल्चरल हिंदू म्हणून वागल्याने, वावरल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळत नाही.\nठीक म्हणजे घरातली क्ष ही व्यक्ती प्रसाद खायला देवळात जाते त्यावर प्रतिष्ठितांच्या अशा वागण्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळते या उपप्रतिसादाला काहीच अर्थ उरत नाही खरे ना!\nकंटाळा येणे किंवा उत्साह वाटणे हे अत्यंत वैयक्तिक आहे. इथे विज्ञानवाद्यांनीच नमते घ्यायला पाहिजे अशी एक भूमिका दिसते.\nहो ना! तर मग याचप्रमाणे दत्तनामाचा जप करणे*, चमत्कार झाला असे वाटणे*, देवाची पूजा करणे* याही वैयक्तिक गोष्टी आणि अनुभव आहेत. नमते घेणे वि. आपल्याखेरीज इतर अंधश्रद्ध आहेत असे समजून झोडपणे आणि धांगडधिंगा घालणे यातला फरक समजून घ्यावा.\n* या गोष्टींची भलावण चालली आहे असा कृपा करून प्रचार करू नये. :-)\nतुम्हाला हे सांगायचे आहे काय?\nधम्मकलाडू [04 Jun 2010 रोजी 10:05 वा.]\nन पटणारी प्रत्येक गोष्ट गणपती-दूध-पितो (किंवा होमीपदीत-नॅनो-टेक्नॉलजी) छाप नसते. उदा. मोगल साम्राज्याचा ऱ्हासासाठी मनसबदारी पद्धतच कारणीभूत ठरली, असे कुणी म्हटले आणि ती मला पटली नाही ह्याचा गोष्ट ती अंधश्रद्धा होत नाही. थेअरी ऑफ पॉप्युलेशन मला पटली नाही म्हणजे ती अंधश्रद्धा होत नाही. मात्र होमीपदीत-नॅनो-टेक्नॉलजी किंवा दीपक चोप्राचे आध्यात्मिक-क्वांटम-फिजिक्स ह्या गणपती-दूध-पितो छाप गोष्टी आहेत. अशा न पटणाऱ्या, फालतू, भंकस गोष्टी कोणी करू लागले तर त्यांना झोडपण्यात काही हशील नाही असे तुम्हाला सांगायचे आहे काय? उदा. कोणाला होमीपदीच्या गोळ्या लाभी ठरत असतील तर विज्ञानवाद्यांनी होमीपदीत विज्ञान नाही असे म्हणू नये, असे म्हणायचे आहे का?\nमला जे म्हणायचे आहे\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 10:27 वा.]\nमला जे म्हणायचे आहे ते मी व्यवस्थित सांगितले आहे असे वाटते. तेव्हा उगीच होमिओपॅथीमधील नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे कथा मध्ये आणू नयेत. मला जे सांगायचे आहे ते "मऊ लागले म्हणून" आणि त्यानंतरच्या सहस्त्रबुद्ध्यांना दिलेल्या प्रतिसादात व्यवस्थित आलेले आहे. जर आपल्याला वेड पांघरून पेडगावला जाण्यात धन्यता वाटत असेल तर मला वेळ घालवायचा नाही.\nधम्मकलाडू [04 Jun 2010 रोजी 12:33 वा.]\nमला जे म्हणायचे आहे ते मी व्यवस्थित सांगितले आहे असे वाटते.\nतुमच्यापरीने तुम्ही ते व्यवस्थितच सांगितले ह्याबद्दल शंकाच नाही. मीही माझ्यापरीने प्रयत्न केला आहे, करतो आहे.\nतेव्हा उगीच होमिओपॅथीमधील नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे कथा मध्ये आणू नयेत.\nपटू न शकणाऱ्या भंपकबाजीचे (अंधश्रद्धांचे) हे दाखले आहेत. न पटणारी प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा नसते. मात्र काही गोष्टी नक्कीच असतात.\nजर आपल्याला वेड पांघरून पेडगावला जाण्यात धन्यता वाटत असेल तर मला वेळ घालवायचा नाही.\nआम्ही कुठेही जाणार नाही इथेच आहोत. वेळ दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 12:44 वा.]\nकुठे जाणार आपण? तेवढी ठिकाणे नसावीत उपलब्ध. ह. घ्या. आपले पेडगावही येथेच आहे याची खात्री आहे. आपल्या न पटणार्या काही गोष्टी अंधश्रद्धा असतात हे जितके खरे आहे तितकेच प्रत्येकाची श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्या वेगवेगळी असते हे देखील या चर्चेतून दिसते किंवा दुसरा जर तुमच्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणत असेल तर त्याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो तेव्हा एकमेकांना हिणवायचे, दुसर्याचे समजून न घेता धांगडधिंगा घालायचा, धादांत खोटे बोलायचे, वाक्ये आपल्याला हवी तशी ट्विस्ट करायची हे अयोग्य आहे आणि याचा विरोध नक्कीच होईल.\nमऊ लागले म्हणून - २\nप्रियाली [02 Jun 2010 रोजी 12:12 वा.]\nउपक्रमावर अंधश्रद्धा विरोधातले लेख येणे बंद झाले, तर फोडलेल्या नारळाची खिरापत मी खाईन आणि स्वतः अंधश्रद्धाविरोधी लेख लिहायचा श्रीगणेशा करेन!\nअवश्य करा. किंबहुना, करालच याची खात्री आहे. मऊ लागले म्हणून हा प्रतिसाद वाचला असेलच आपण. :-)\nसर्वच जण सफाई कामगार झाले, तर चालणार नाही, हे खरे आहे.\nनाही हं! सर्वच सफाई कामगार कसे होतील उपक्रमावर. झाले तर कंपनीचे दुकान चालायचे कसे? आम्ही आहोत ना अंधश्रद्धाळू, प्रबोधन करून घ्यायला.\nवाचला आहे :-)\nधनंजय [02 Jun 2010 रोजी 13:42 वा.]\nनिर्दिष्ट प्रतिसाद वाचलेला आहे.\nपुढील मुद्दे :\n१. मऊ जमीन - एक वेगळा दृष्टिकोन\n२. कंटाळा - असा मुद्दा असण्याबाबत सहमत; याबाबत "उपक्रमा"चे धोरण काय असावे\n१. मऊ जमीन :\nउपक्रमावर अंधश्रद्धाविरोधाचा तात्त्विक विरोध होतो, तो अन्य ठिकाणी झालेल्या विरोधापेक्षा वेगळा असतो.\nजमीन वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक मऊ असणार -हे अपेक्षित आहे? मऊ आहे तिथे अधिक खोलपर्यंत खणले जाऊ शकते. खोलपर्यंत खणण्याचा काही फायदा असेल, तर मऊ जमिनीपासून सुरू केलेले बरे. अधिक खोलावरती जर काही वेगळ्या प्रकारचे खडक असतील, तर त्यांच्यापर्यंत वर-वरून मऊ जमिनीच्या ठिकाणी पोचता येते.\nखेड्यांमध्ये आणि सरहद्दीवर लोक तळमळत असताना आमचे काही आळशी शिक्षक शहरातल्या कॉलेजांत आतुर विद्यार्थ्यांना वैद्यक शिकवत होते! या मऊ जमीन बघून खणायाला घेणार्यांना भारत शासन पगार देते - इजेवर अपमानाचे लोण.\nवैद्यकीय महाविद्यालयात ज्या खोलीपर्यंत मुद्दे चर्चिले जातात, त्यापेक्षा समाजामध्ये अन्य ठिकाणी वेगळ्या खोलीपर्यंत चर्चिले जातात. हे योग्यच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संवादकांकडे विषयांची प्राथमिकता वेगवेगळी असते आणि त्यामुळेच संवादाची गुंतागुंत वेगळी असते. हे असे आणखी एका क्षेत्रातले उदाहरण.\n(वाटल्यास "प्रीचिंग टु द क्वायर"या गुळगुळीत शब्दप्रयोगाचा [क्लिशेचा] विचार करावा. चर्चमधील गानवृंदामध्ये जी चर्चा होते, ती खरोखर निरर्थक असते का? बिगर-चर्च वाद्यवृंदाचा मला तरी अनुभव आहे, आणि यातली चर्चा होयबा-होयबा नसते असा माझा अनुभव आहे. आता हे खरे आहे - अमुक प्रकारचे संगीत आस्वाद्य/सुंदर आहे, याबाबत सर्वच सहमत असतात. "हे संगीत म्हणजे शुद्ध गोंगाट" असे समाजातले काहींचे मत असते, त्या मताचा वकील कोणी तिथे नसतोच! मात्र त्यापुढच्या सांगितिक बाबतीत गायक-वादकांमध्ये अनेक मतभेद उद्भवतात. जर "आस्वाद्य की गोंगाट" या मतभेदाशी चर्चा आडली तर "स्वरमेळ की सुरावट आस्वाद्य" हा विचार व्हायची वेळच येणार नाही. आणखी एका क्षेत्रातले उदाहरण.)\n२. त्याच त्या विषयांबाबत कंटाळा\nआणखी एक सुयोग्य मुद्दा वरील संवादात आला आहे - तो आहे "कंटाळ्या"चा.\nउपक्रम संकेतस्थळावर जे वैविध्य दिसेल त्या अपेक्षेने काही वाचक येतात, ते वैविध्य दिसले नाही म्हणून कंटाळा येतो. यामुळे उपक्रम स्थळाची लोकप्रियता कमी होईल ही शक्यता आहेच.\nवर्तमानपत्रांमध्ये सुद्धा "बातम्या", "संपादकीये", वेगवेगळ्या प्रकारच्या "पुरवण्या" यांचे काही विवक्षित प्रमाण राहील म्हणून प्रयत्न करतात. असे करताना ज्या सदरांचे लेख फार असतील, त्या सदरामधील काही लेख प्रसिद्ध करत नाहीत. जिथे लेख कमी असतील, तिथे मुद्दामून लेखकांना आमंत्रण देतात. त्या माध्यमात असा निर्णय करण्याची जबाबदारी असलेले संपादन मंडळ असते. हे सर्व योग्यच आहे.\nसध्या तरी उपक्रमावरती तशी सोय नाही. येथील संपादन मंडळ सेवाभावी (बिनपगारी) आहे, असेच ऐकलेले आहे. माझ्या अनुभवात तरी (ललित साहित्य सोडले तर) लेख नकारायचा प्रघात नाही. अशा परिस्थितीत वैविध्याचा समतोल साधण्यासाठी काय करावे - अमुक विषयावरचे लेख बंद करता येत नसतीलच तर अन्य प्रकारचे लेख लिहिण्यास लेखकांनी एकमेकांना उद्युक्त करावे.\nआहे त्या धोरणात जर एकरंगीपणा होत राहिला, आणि तो असह्य झाला आणि संकेतस्थळाचे नुकसान झाले, तर काय? तर संकेतस्थळ मालकाने संकेतस्थळाचे धोरण बदलावे. (उपक्रम दिवाळी अंकात वैविध्य असावे, म्हणून संकेतस्थळ मालक विशेष प्रयत्न करतात. म्हणजे अशा धोरणास संकेतस्थळ मालकांचा तत्त्विक विरोध नसावा. तरी हे धोरण कष्टसाध्य असावे. वर्षभर असे धोरण राबवावे का? याच्या फायद्या-तोट्याचे विश्लेषण मालकांनी विश्वासू सल्लागारांसोबत करावे.)\nया चर्चेतील अनेक प्रतिसाद (माझा हा उपप्रतिसाद सुद्धा) मूळ चर्चाविषयापासून दूर जातो आहे. या प्रतिसादांचा वेगळा धागा करावा अशी विनंती.\nप्रियाली [02 Jun 2010 रोजी 14:33 वा.]\nअंधश्रद्धा विरोधाला विरोध होतो आहे असे म्हणणे चुकीचे वाटते. विकास यांनी गंमतीत तसे म्हटले असावे कारण इथे होणार्या अतिरेकाला ते कंटाळले असावेत. (हा अंदाज माझा.) परंतु, उपक्रमावर अंधश्रद्धा विरोधाला विरोध होतो हे मांडणे अयोग्य आहे. विरोध आहे तो बाळबोध लेख लिहून तिच तिच रेकॉर्ड पुन्हा वाजवत राहायला, नवे काही न सांगता इथला प्रत्येकजण (बहुधा आपले सोजीर सोडून) अंधश्रद्धा पिडीत आहे अशी मनोधारणा करून घ्यायला. याचा त्रास इतरांना होतो याची जाणीव नसल्याला.\nआणि कठिण ठिकाणी प्रयत्नच करायचे नाहीच. मऊ जमीन खणून खणून काहीही हाती लागत नाही हे लक्षात आले तरी खणत राहायचे याचाच कंटाळा आला आहे. तेव्हा वेगळी जमीन बघा किंवा खणण्याचे तंत्र बदला हेच तर सांगते आहे. :-)\nनव्हे नव्हे आपला गैरसमज दिसतो. वर गाडगेबाबांचे उदाहरण आहे ना तेच चपखल आहे. आळशी शिक्षक पोटासाठी व्यवसाय करतात. समाजसुधारणा हा त्यांचा हेतू नसतोच. तेव्हा आपले उदाहरण चालणार नाही. ही उगीच दिशाभूल वाटते.\nयेथील संपादन मंडळ सेवाभावी (बिनपगारी) आहे, असेच ऐकलेले आहे. माझ्या अनुभवात तरी (ललित साहित्य सोडले तर) लेख नकारायचा प्रघात नाही. अशा परिस्थितीत वैविध्याचा समतोल साधण्यासाठी काय करावे - अमुक विषयावरचे लेख बंद करता येत नसतीलच तर अन्य प्रकारचे लेख लिहिण्यास लेखकांनी एकमेकांना उद्युक्त करावे.\nढोबळमानाने या मुद्द्याशी सहमत आहे. माझ्यामते आक्षेपार्ह विषय सोडून कोणत्याही विषयांवरील लेख बंद करण्याची गरज नाही परंतु उपक्रमाला साजेसे लेख आपण मांडतो का हे पाहणे गरजेचे आहे. व्यक्तिगत अनुभवाची उदाहरणे देऊन लेख टाकले तर दिवसाला २ लेख मलाही पाडता येतील आणि इतरांनाही. (तेवढा वेळ आणि उत्साह नाही ही गोष्ट वेगळी.) आपण कोणाला काय सांगतो आहोत, आपला टारगेट ऑडियन्स कोण आहे याची जाणीव लेखकाला हवी. शेवटी, तुम्ही जर इतरांना मूर्खातच काढत असाल तर त्या व्यक्तींना एक दिवस कंटाळा येणे साहजिक आहे.\nमला वाटते हे प्रतिसाद अवांतर नसावेत. ज्या उद्देशाने लेख टाकला आहे त्याला धरून असावेत. अर्थातच, लेखकाला अवांतर वाटले तर हलवणे इष्ट. त्यांच्या खरडवहीत दुवा टाकते आहे.\nआरागॉर्न [02 Jun 2010 रोजी 17:11 वा.]\nमला प्रतिसाद अवांतर वाटले नाहीत. कंटाळ्याशी निगडीत आहेत.\nविकास [02 Jun 2010 रोजी 22:32 वा.]\nविकास यांनी गंमतीत तसे म्हटले असावे कारण इथे होणार्या अतिरेकाला ते कंटाळले असावेत.\nअर्थातच गंमतीत म्हणले होते. म्हणूनच मी नुसते "नारळ फोडीन" म्हणले, कुणासमोर अथवा कुणाच्या डोक्यावर हे काहीच लिहीले नव्हते ;)\nअंधश्रद्धा निर्मूलनाला माझा देखील विरोध नाही. कसे करावे ह्या संदर्भात मतभेद असू शकतात. तसेच दुसरा मुद्दा जरी कोणी अंधश्रद्धाळू असले तरी त्याला अडाणी म्हणणे अथवा तुच्छ समजणे मला पटत नाही. तशा (तुच्छतेच्या) सुराच्या बाबतीत मात्र माझा मतभेद नसून विरोध आहे. केवळ तुच्छ लेखले म्हणूनच नाही, तर त्यातून होणार्या अडमुठ्या विरोधाने, मूळ कार्याची हानी होण्याचीच जास्त शक्यता असते म्हणून.\nआरागॉर्न [03 Jun 2010 रोजी 04:38 वा.]\nसर्व मुद्यांवर सहमत आहे. नारळ फोडण्याशी सुद्धा. :)\nआरागॉर्न [02 Jun 2010 रोजी 06:54 वा.]\nउपक्रमावर तेच तेच लेख येण्यापेक्षा थोडे वेगळे लेख यावेत किंवा अशा लेखांसाठी वेगळी जमीन शोधावी असे मला वाटते.\nसहमत आहे. दर दोन दिवसांनी एक नवीन चमत्काराचे वर्णन आणि त्याचे स्पष्टीकरण यातून प्रबोधन होते आहे असे वाटत नाही. त्याऐवजी धनंजय यांनी टाकलेली रसेल यांच्या विचारांची लेखमालिका वाचायला नक्कीच आवडेल.\nनिखिल जोशी [02 Jun 2010 रोजी 07:53 वा.]\nमाझ्या घरातील क्ष ही व्यक्ती घरात किंवा बाहेर पूजा-अर्चा करत नाही. कधीतरी सणावाराच्या दिवशी मंदिरात जाते. तिथे प्रसाद खाऊन दोन-चार डॉलर दक्षिणा देऊन परत येते. या व्यक्तीला मी रोज सांगितले "पूजा करू नकोस. वेळ वाया जातो. पूजेने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा सकाळी बाहेर फेरफटका मारून ये." माझ्या मते दोन-चार वेळेस ही व्यक्ती ते ऐकून घेईल आणि मग मला सांगेल "गप्प बैस. मी पूजा करत नाही हे माहित असताना उगीच लेक्चर का मारतेस? कधीकाळी गेलोच प्रसाद खायला तर तुझी भूणभूण कशाला?"\nबाकी, झेंड्याला वंदन करणे वगैरे सवयींचा भाग असू शकतो किंवा श्रद्धेचाही हे खरेच आहे. त्याचबरोबर या कृतीने कोणाचे कसलेही नुकसान होत नाही तेव्हा रीत-पद्धत म्हणून केले तर काय बिघडते असा विचारही त्यामागे असू शकतो. माणूस आपल्याला न पटणार्या प्रत्येक गोष्टीशी फटकून राहू शकत नाही.\nया व्यक्तीस प्रतिष्ठा असेल तर "ही व्यक्ती करते मग आपणही करू" असे अनेकांना वाटते. झुंड जेव्हढी मोठी तेव्हढे त्यांना सुरक्षित वाटते. अशा लोकांपैकीच कोणी मालेगावला बाँब फोडायला गेला तर?\nप्रतिष्ठित लोकांच्या कृतीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात म्हणून उपक्रमसारख्या जागी प्रबोधन करण्यास अधिक महत्व आहे. अंगारा काढणे, निखार्यांवर चालणे, असले जादूचे प्रयोग आणि निर्माल्यदान, बोकडबचाव अशी कामे अनेकजण करतातच.\nबाकी, झेंड्याला वंदन करणे वगैरे सवयींचा भाग असू शकतो किंवा श्रद्धेचाही हे खरेच आहे.\nसवयीचा भाग आणि अंधश्रद्धा यांत फारसा फरक नाही. 'रीत-पद्धत' फायदेशीर आहे की नाही ते तपासलेच पाहिजे.\nसीमेवर जाऊन कोणीतरी मरावे अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार म्हणून मी चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभा राहतो. माझे पॉपकॉर्न सांडले तरी परवडते. खासगीत तसे केले नाही की त्यास हिशोबी विवेक म्हणता येईल.\nप्रियाली [02 Jun 2010 रोजी 11:26 वा.]\nअमेरिकेहून डायरेक्ट मालेगाव! हाहाहाहा!!!!!! मारुती लाजला असेल हं आमचा. त्याला वाटायचं की प्रचंड उडीचा मक्ता केवळ त्याचाच. ;-)\nअबब! साप साप असं बोंबलत दोर्या धोपटायची सवय झाली आहे असं म्हणा ना.\nमान्य आहे. काय करावे बरे या रिकामटेकड्या अंधश्रद्धाळू लोकांचे?\nनिखिल जोशी [03 Jun 2010 रोजी 03:26 वा.]\nप्रतिष्ठितांच्या वागण्यामुळे देवधर्माला प्रतिष्ठा मिळण्यात मदत होते. धर्माची रचना दुरुपयोग करणे सोपे व्हावे अशीच आहे.\nउपक्रमवर प्रतिष्ठितांच्या प्रबोधनास्तव लेखन केले जाते. जादूच्या प्रयोगांपेक्षा ते अधिक आवश्यक आहे.\nमाझा रास्त संशय असा की तुम्हा लोकांना कंटाळा आला नसून चंचुप्रवेशच हाणून पाडायचा आहे. आवडत्या रुढींवर टीका टाळण्यासाठी Aragorn यांनी "विवेकवादी नाही का रुढी पाळत? मग तेही आमच्याच पातळीवर!" असा युक्तिवाद केला आहे.\nचित्रा [03 Jun 2010 रोजी 21:12 वा.]\nआपण प्रतिष्ठित आहोत तर आपण आपले वागणे बदलावे (नव्हे ते बदलले असावेच, अशी खात्री आहे), दुसर्यांना एवढा जालीम डोस होईल एवढा आग्रह का?\nअसो. खालील काही प्रश्नांची उत्तरे ऐकणे रसपूर्ण होईल.\nसमजा, आपल्याला सत्यनारायण आवडत नाही, पण कोणी प्रसादाला बोलावले तर जाऊच नये का? किंवा गेले तर प्रसाद खाऊ नये का? का खाल्ला, तर मी प्रसाद खातो, पण या तुमच्या भाकड पूजेवर माझा विश्वास नाही, असे स्पष्ट म्हणावे? तशात हा माणूस आपला बॉस असला, तर काय कराल? का न जाण्यासाठी दुसरे काही काम आहे म्हणून खोटे बोलावे? किंवा काही न बोलता गप्प बसावे, ही आत्मवंचना नाही का? का आपल्या घरी सत्यनारायण न करणे, त्याऐवजी दुसरे काही पर्याय तयार करणे हा उपाय अधिक प्रतिष्ठित आणि दुसर्याला न दुखावता काही शिकवणारा आहे? असो.\nआवडत्या रुढींवर टीका टाळण्यासाठी Aragorn यांनी "विवेकवादी नाही का रुढी पाळत? मग तेही आमच्याच पातळीवर!" असा युक्तिवाद केला आहे.\nया युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले जात नाही आहे.\nमुळात रूढी हा समाजाचा भाग म्हणून येतात, जर पटत नसल्या तर वेगळ्या समाजाची कास धरावी. अशा समाजाची निर्मिती ही समाजात असलेल्या माणसांमधून करायची असल्यास त्यांना मूर्ख समजू नये, असे म्हटले तर काय चुकले?\nनिखिल जोशी [04 Jun 2010 रोजी 02:04 वा.]\nदुसर्यांना एवढा जालीम डोस होईल एवढा आग्रह का?\nएकाच सूर्यमालेत आहोत ना! विहिंपला अमेरिकेतून पैसे येत.\nगेले तर प्रसाद खाऊ नये का? का खाल्ला, तर मी प्रसाद खातो, पण या तुमच्या भाकड पूजेवर माझा विश्वास नाही, असे स्पष्ट म्हणावे?\nमाझे वडील जातच नाहीत. मी जातो आणि स्पष्ट बोलतो.\nतशात हा माणूस आपला बॉस असला, तर काय कराल?\nमैत्री नसेल तर मी स्पष्ट सांगतो की या विषयावर मी सहकार्यांशी चर्चा, व्यवहार, भेटीगाठी करीत नाही कारण माझे मत सांगितले तर भावना दुखावल्या या सबबीखाली नोकरीत अडचण होऊ शकते. मैत्री असेल तर माझे मत सांगतो.\nगॉडः मी अमेरिकन नाही.\nगीता, नाताळ, झेंडा, राष्ट्रपती, शपथः उत्तर दिले आहे.\nमुळात रूढी हा समाजाचा भाग म्हणून येतात, जर पटत नसल्या तर वेगळ्या समाजाची कास धरावी.\nराममोहननी बेंटिंकला असे सांगितले नाही ही देवाची कृपा!\nसमाजाची निर्मिती ही समाजात असलेल्या माणसांमधून करायची असल्यास त्यांना मूर्ख समजू नये, असे म्हटले तर काय चुकले?\nनिमूटपणे यनाख्यान ऐकले तर उत्तम. शहाजोग समन्वयवाद चालणार नाही. झोपलेल्याला जागे करता येते पण ...\nचित्रा [04 Jun 2010 रोजी 02:37 वा.]\nविहिंपचा इथे काय संबंध? तुम्ही मासे खाता पण तुमचा शेजारी खात नाही, तुम्ही त्याच्या बिल्डिंगमध्ये राहता, म्हणून तुमच्या घरात शिजवलेल्या माशांचा वास माझ्या घरात आला नाही पाहिजे असे त्याने म्हटले तर? दुराग्रह तो दुराग्रहच. माझे माझ्या घरात मासे खाणे पटत नाही, तर बिल्डिंगमध्ये राहू नका असे म्हणणे सयुक्तिक होईल.\nमी जातो आणि स्पष्ट बोलतो.\nतुम्ही जाऊन दुसर्याचा अपमान करता असे कोणी म्हटले तर? स्पष्ट बोलल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय होते हे समजून घ्यायला आवडेल.\nवेगळ्या समाजाची म्हणजे जे वेगळे विचार करतात अशांची. जर समाजात राहून काम करायचे असले तर ते उदाहरणाने, कायदेशीरपणे करावे. आधी सुरूवात मी आधी एका ठिकाणी म्हटले आहे तशी हे व्यवसाय म्हणून नोंदणी करून करावी, म्हणजे ते कायद्याच्या कक्षेत येतील.\nनिमूटपणे यनाख्यान ऐकले तर उत्तम.\nसॉरी, जमणार नाही.\nशहाजोग समन्वयवाद चालणार नाही. झोपलेल्याला जागे करता येते पण ...\nशहाजोगपणा काहीही नाही. झोपेचे सोंग मी घेतलेले नाही. माझे लग्न होऊन दशकाहून अधिक वेळ झाला आहे, पण माझ्या घरात मी एकदाही सत्यनारायण घातलेला नाही. गणपतीत चांदीचा गणपती ठेवून गणपती "बसवते", आरत्या म्हणते, मोदक करते, कारण तो माझ्या पोरीला आवडतो. गणपती झाले की उचलून ठेवते, परत पुढच्या वर्षी तोच "बसवते". उद्या म्हणाल गणपती बसवणे ही बंद केले पाहिजे, तर चालणार नाही. माझ्या घरात मी काय करावे, आणि काय नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला (म्हणजे माझ्या जवळचे प्रेमाचे लोक सोडून कोणाही इतर क्ष व्यक्तीला नाही).\nयाच न्यायाने -\n१. लग्नात दारू देणे बंद करावे.\n२. लग्नात नाचणे बंद करावे.\n३. घरात किंवा दारात मासे/कोंबडी शिजवणे बंद करावे.\n४. पोवळी/मोती यांचे दागिन्यातले वापर बंद करावे.\nअसले कुठचेही फतवे काढण्यास माझा विरोध राहील. कुठच्याही पद्धतीच्या एकांगी, हेकेखोर आग्रहास नक्की विरोध आहे/राहील.\nनिखिल जोशी [04 Jun 2010 रोजी 03:12 वा.]\nतुम्ही त्याच्या बिल्डिंगमध्ये राहता, म्हणून तुमच्या घरात शिजवलेल्या माशांचा वास माझ्या घरात आला नाही पाहिजे असे त्याने म्हटले तर?\nबिल्डरशी करार करताना अट घालावी की बिल्डर मांसाहार्यांना इतर फ्लॅट विकणार नाही. त्याला वास आवडत नाही हा त्याचा दोष आहे. माशांचा वास घातक (उदा. ध्वनिप्रदूषण) नाही.\nपण भाड्याची घरे शोधताना मी खोटे न बोलून अनेक घरमालकांचा नकार ऐकला आहे. स्वयंपाकघरासाठी ऍक्टिवेटेड चारकोलच्या चिमण्या मिळत असतील तर सोय होईल.\nमाझ्या अनेक 'मित्रांचे' मत आहे की मी मुळात अपमान करण्यासाठीच वेगळा वागतो!\nहे खरे आहे की लोक दुखावतात. आम्हाला आंबट द्राक्षे नकोतच.\nवेगळ्या समाजाची म्हणजे जे वेगळे विचार करतात अशांची. जर समाजात राहून काम करायचे असले तर ते उदाहरणाने, कायदेशीरपणे करावे.\nबंगालमध्ये सतीची प्रथा होती. तिला उपर्या बेंटिंकने विरोध केला. त्याऐवजी राममोहननी परदेशी जायला हवे होते का?\nआम्ही बर्यापैकी आदर्श उदाहरण असे वागतो आणि "धावा धावा मूर्ती फोडा" असे काही बेकायदेशीरही म्हणत नाही.\nमाझे लग्न होऊन दशकाहून अधिक वेळ झाला आहे, पण माझ्या घरात मी एकदाही सत्यनारायण घातलेला नाही. गणपतीत चांदीचा गणपती ठेवून गणपती "बसवते", आरत्या म्हणते, मोदक करते, कारण तो माझ्या पोरीला आवडतो. गणपती झाले की उचलून ठेवते, परत पुढच्या वर्षी तोच "बसवते". उद्या म्हणाल गणपती बसवणे ही बंद केले पाहिजे, तर चालणार नाही. माझ्या घरात मी काय करावे, आणि काय नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला (म्हणजे माझ्या जवळचे प्रेमाचे लोक सोडून कोणाही इतर क्ष व्यक्तीला नाही).\n१ कृती अंधश्रद्ध नसू शकते - त्यामागचा उद्देश पहावा, असे प्रमोद सहस्रबुद्धे यांनी नमूद केले आहे.\n२ कृतींवर बंदी नाही, हेटाळणी/टीका झाली तर काय अडचण आहे? संभाषणस्वातंत्र्य नाही का?\nपोवळे, मोती यांना सँडल घालणार्यांचा ('गाया'वाले) विरोध असतो.\nचित्रा [04 Jun 2010 रोजी 03:57 वा.]\nहे खरे आहे की लोक दुखावतात.\nम्हणजे फायदा काय होतो? स्वतः आपण लोकांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याखेरीज काय हाती येते? (यात तुम्हाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण हेच मी होताना पाहिले आहे).\nजर तुमच्या वागण्याने एका व्यक्तीला तरी असे वाटले की "अरे, खरेच, आपणही असे करून पाहू तर खरे, काय वेगळे होते", तर तुम्ही काही साध्य करू शकलात. नाहीतर तेलही (लोकांना बदलण्याची संधी) गेले आणि तूपही (मैत्री) गेले आणि हाती धुपाटणे (निरूपयोगी हेकेखोरपणा) राहिले असे होते.\nहेच प्रियाली, विकास आणि आरागॉर्न सांगत आहेत असे वाटते.\nकृतींवर बंदी नाही, हेटाळणी/टीका झाली तर काय अडचण आहे? संभाषणस्वातंत्र्य नाही का?\nअसे नाही. टीका करूच नये असे मी म्हणत नाही, पण जेव्हा ही टीका अस्थानी आणि सातत्याने होते, तेव्हा ती हेकटपणाची होते. हेटाळणी करू नये असे मात्र वाटते, कारण वर दिल्याप्रमाणे. तेलही गेले, तूपही गेले..\nतिला उपर्या बेंटिंकने विरोध केला. त्याऐवजी राममोहननी परदेशी जायला हवे होते का?\nनाही. त्यांनी सतीची प्रथा बदलावी यासाठी प्रयत्न केले. तशीच प्रथा बदलायची असली, तर लोकांत राहून प्रयत्न करावेत. हिणवून/लोकांना कमी बुद्धीचे, हिणकस लेखून हे कधीही साध्य होणार नाही.\nकृती अंधश्रद्ध नसू शकते - त्यामागचा उद्देश पहावा, असे प्रमोद सहस्रबुद्धे यांनी नमूद केले आहे.\nहेच कोणी ठरवायचे?\nएक उदाहरण देते - वेगळे वाटेल पण तसेच आहे.\nमाझे आईकडचे आजोबा अतिशय बुद्धिमान, आणि जुन्या काळात उच्च इंग्रजी शिक्षण घेतलेले असे होते. जुन्या काळी इंग्लंडला जाऊन आले होते, तेथील वातावरणाची आणि कडक शिस्तीची सवय होती. स्वभावाने फटकळ आणि स्पष्टवक्ते, त्यामुळे खरेतर प्रेमळ असूनही आम्हा नातवंडांपासून काहीसे दूरच राहिले, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, व्यासंगाचा फायदा समाजाला जसा झाला, तसा घरातल्यांना झाला नाही. घरातले आणि दारातलेही तसे काहीसे वचकून लांबच राहिले.\nनिखिल जोशी [04 Jun 2010 रोजी 06:38 वा.]\nम्हणजे फायदा काय होतो? स्वतः आपण लोकांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याखेरीज काय हाती येते?\n'त्यां'चे मठ्ठ वागणे मूकपणे बघून आणि त्यात सहभागी होऊन माझ्या भावना दुखावतात, वाटते "हे माझ्यासारखे मानव आहेत?". किंबहुना मी बोलतो तसा 'चालतो' की नाही यावर भाष्य करायला ते टपून असतात. निमूटपणे त्यांच्या समारंभात जातो पण नंतर कधीतरी चर्चेत त्याचा संदर्भ देऊन "तेव्हा कुठे गेला होता (नि)धर्म" असे विचारतात.\nशिवाय कधी ना कधी परिवर्तन होईल अशी आशाही (स्पष्ट बोलण्यात) असते.\n"या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले जात नाही आहे." हे आपले मत बदलले असेल असे वाटते. प्रियाली, गुंडोपंत आणि आरागॉर्न यांचे मतपरिवर्तन झाल्याची चिन्हे नाहीत.\nते "पडलो तरी नाक वर" असे सांगून विज्ञानाचे श्रेष्ठत्व नाकारीत आहेत. समन्वयाचा प्रयत्न हा आमचा अपमान आहे.\nटीका करूच नये असे मी म्हणत नाही, पण जेव्हा ही टीका अस्थानी आणि सातत्याने होते, तेव्हा ती हेकटपणाची होते. हेटाळणी करू नये असे मात्र वाटते\nहिणवून/लोकांना कमी बुद्धीचे, हिणकस लेखून हे कधीही साध्य होणार नाही.\nसमन्वयाचा दावा हा प्रबोधनास केलेला शहाजोग विरोध आहे. संवाद (!=प्रवचन) नको म्हणणार्यांना टीकेने बेजार करणे हा एकच उपाय आहे.\nबेंटिंकने "तुरुंगात घालू" सांगून सतिबंदी केली.\nम्हणूनच अंधश्रद्धाजन्य रूढींची कृतीसुद्धा सामाजिक जीवनात करू नये असे सांगतो.\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 09:02 वा.]\nप्रियाली, गुंडोपंत आणि आरागॉर्न यांचे मतपरिवर्तन झाल्याची चिन्हे नाहीत.\nअसे कोठे बरे विज्ञानाचे श्रेष्ठत्व नाकारले? जरा दाखवून द्यावे.\nआरागॉर्न [04 Jun 2010 रोजी 14:04 वा.]\nहे काय भलतेच. असे पुरावे नसतात काही विचारायचे.. :)\nनिखिल जोशी [04 Jun 2010 रोजी 17:59 वा.]\nउपक्रमाने या सर्वांपासून स्वतंत्र राहावे आणि तटस्थपणे विचार करावेत असे वाटते.\nहा मॅनरलेस संदर्भ संपादित करण्यासाठीः\nमलाही अनेकदा वाचत असताना हे थोतांड आहे, ते खरे नाही असे विचार मनात येतातच परंतु पुढला विचार मनात हा असतो की -"मग इतरांना खरे वाटण्यासारखे त्यात काय आहे? त्यांची बाजूही कळावी."\nत्याचबरोबर या कृतीने कोणाचे कसलेही नुकसान होत नाही तेव्हा रीत-पद्धत म्हणून केले तर काय बिघडते असा विचारही त्यामागे असू शकतो.\nरीत-पद्धत म्हणून कृती करणे चूकच आहे. प्रसादाची चव आवडली, गायत्री मंत्राची चाल/शब्द/अर्थ आवडले, कन्यादानाच्या कृतीतून प्रेम व्यक्त होते असे वाटले, तर मान्य आहे. पण मूर्तीसमोर रुपया/डॉलर ठेवण्यात आनंद मिळू शकतो हे अविश्वसनीय आहे.\nनाक वर करणेः\nदुसरा जर तुमच्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणत असेल तर त्याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो\nएरवी प्रत्येक मुद्दा विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघणार्यांना चर्चेतील मुद्यांचे रॅशनलायझेशन करताना पाहून अंमळ करमणूक जाहली. :)\nचित्रा [04 Jun 2010 रोजी 12:25 वा.]\n'त्यां'चे मठ्ठ वागणे मूकपणे बघून आणि त्यात सहभागी होऊन माझ्या भावना दुखावतात, वाटते "हे माझ्यासारखे मानव आहेत?"\nयाच प्रकारे शाळा/कॉलेजातील शिक्षकांनीही शिकवताना समोर मूढमती, मठ्ठ मुले बसली आहेत असेच समजून शिकवण्यास आपला विरोध नसावा. एखाद्या मुलाला काही कल्पना समजायला अवघड जात असल्या तर त्याची बुद्धीच नाही, ते खरेच मानव आहेत का? असाच विचार करून शिकवावे.\nअशी आशा जरूर ठेवावी. पण परिवर्तन हे वेगळे पर्याय दिल्याने होते, ते पर्याय कन्स्ट्रक्टिव्ह असावे लागतात.\nमी गुंडोपंतांचे नाव घेतले नव्हते.\nअसो. आणि कसले मत परिवर्तन करायचे? विज्ञानवादाची कास धरणे म्हणजे लोकांपासून फटकून सातत्याने त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या प्रत्येक कृतीवर संशय घेत राहणे करू नये असे आम्ही सगळे सुचवत आहोत तेव्हा मतपरिवर्तन करावे असे तुम्हाला तरी वाटते आहे का? मग काय गणपती साजरे करतो, त्याने अंधश्रद्धा वाढते, म्हणून ते करू नयेत; उद्या थँक्सगिव्हिंगला फक्त थँक्स द्यावे, टर्की आणू नये; मद्य पिऊ नये; हॅलोवीनला मुलांना ड्रॅक्युला/भुते/पर्या यांचे ड्रेस घालू नये, असले फतवे निघाले तर ऐकून घ्यायचे का? आणि हा सगळा वेळ वाचला तर तो कुठे घालवायचा ह्याचेही फतवे काढले जातील याची खात्री वाटते.\nसमन्वयाचा प्रयत्न हा आमचा अपमान आहे.\nजे तुमच्यासारखे नाहीत अशा लोकांच्या बुद्धीला कमी दर्जाचे, हीन लेखणे हा त्यांचा अपमान आहे. फिट्टम फाट.\nअच्छा?! मग आता घालाच तुरूंगात जे तुमच्याविरोधी बोलतात त्यांना. किंवा टिकेने बेजार करा. (ज्यांना पेशन्स नाही अशा सर्वांना फुलटाईम अपत्यसंगोपन करायला लावले पाहिजे असे माझे आता मत झाले आहे).\nह्यासंबंधीच्या फतव्यांचीच वाट पाहत आहे.\nनिखिल जोशी [04 Jun 2010 रोजी 18:32 वा.]\nसमजाऊन सांगायला मी नेहमीच तयार असतो.\nझोपलेल्याला जागे करता येते. "मी झोपलो आहे, झोपणेच चांगले, तुम्हीपण झोपलेले आहात" असे कोणी आडमुठे बनले तर नाईलाज आहे.\nलोकांपासून फटकून सातत्याने त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या प्रत्येक कृतीवर संशय घेत राहणे करू नये असे आम्ही सगळे सुचवत आहोत तेव्हा मतपरिवर्तन करावे असे तुम्हाला तरी वाटते आहे का?\nसगळे? 'तुमचा कंपू' असे म्हणायचे आहे का?\nमग काय गणपती साजरे करतो, त्याने अंधश्रद्धा वाढते, म्हणून ते करू नयेत; उद्या थँक्सगिव्हिंगला फक्त थँक्स द्यावे, टर्की आणू नये; मद्य पिऊ नये; हॅलोवीनला मुलांना ड्रॅक्युला/भुते/पर्या यांचे ड्रेस घालू नये, असले फतवे निघाले तर ऐकून घ्यायचे का?\nकृती आनंददायक असल्याचा दावा केल्यास कृतीला विरोध नाही. हातात निरांजन धरून गोलगोल फिरविण्याची मौज (फुलबाजीप्रमाणे) वाटत असेल असे मानले तरी ते मूर्तीसमोर करून काय साधते? आणि मूर्तीला नमस्कार करण्यात कोणत्या ज्ञानेंद्रियाला गंमत वाटते?\nनुसतेच आमच्यासारखे नाहीत हा आरोप नाही. ते आमच्यापेक्षा कमी आहेत हा दावा आहे. दाव्याच्या सत्यासत्यतेची चर्चा जरूर करा. दावा सिद्ध झाल्यावर/चर्चा करणे टाळल्यास कमी लेखणे हा अपमान कसा? ती त्यांची रास्त लायकी आहे!\nतुरुंग/फतवे यांची गरज नाही. टीका झोंबते.\nचित्रा [05 Jun 2010 रोजी 02:48 वा.]\nनेहमीप्रमाणे तुम्ही विषय भलतीकडे फिरवला आहे. कंपूचा काही संबंध नाही. इथे जे लोक सांगत आहेत असे वाटते ते लिहीले. यापैकी प्रत्येकाशी माझी किंवा माझ्याशी त्यांची मते जुळतात असे नाही, वादही झाले आहेत/होतात/होतील.\nते आमच्यापेक्षा कमी आहेत हा दावा आहे. दाव्याच्या सत्यासत्यतेची चर्चा जरूर करा. दावा सिद्ध झाल्यावर/चर्चा करणे टाळल्यास कमी लेखणे हा अपमान कसा? ती त्यांची रास्त लायकी आहे!\nतुमच्या श्रेष्ठत्त्वाच्या दाव्याची चर्चा करण्याइतका मला यापुढे खरेच रिकामा वेळ मिळेल असे वाटत नाही तेव्हा धन्यवाद.\nवसंत सुधाकर लिमये [05 Jun 2010 रोजी 00:51 वा.]\nप्रतिष्ठित लोकांच्या कृतीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात म्हणून उपक्रमसारख्या जागी प्रबोधन करण्यास अधिक महत्व आहे. अंगारा काढणे, निखार्यांवर चालणे, असले जादूचे प्रयोग आणि निर्माल्यदान, बोकडबचाव अशी कामे अनेकजण करतातच\nपूर्ण सहमत! पांढरपेशा लोकांचे प्रबोधन करणे हे सर्वात कठीण. इतर स्थळांवरच्या 'मेंढरपेशा' लोकांना हाकायला काय लागते हो? थोडी पुंगी वाजवली की अनेक साप डोलायला लागतात (अगदी खिशातले पैसेही काढून देतात हे आपण पाहिलेच आहे.)\nखरी टणक जमीन इथेच आहे. गुंडोपंत, आरागॉर्न, प्रियाली ह्यांचे प्रतिसाद वाचले की लक्षात येईल वरुन माती मऊ वाटत असली तरी त्यात किती धोंडे आहेत.\nप्रियाली [05 Jun 2010 रोजी 11:08 वा.]\nपांढरपेशा लोकांचे प्रबोधन करणे हे सर्वात कठीण.\nआपण सोडून इतर सर्व अंधश्रद्ध अशी झापडे डोळ्यांवर बसवणार्या अंधश्रद्धांनी आमचे प्रबोधन करूनच पाहावे. :-) माझा पाठिंबाच आहे आपल्याला.\nप्रकाश घाटपांडे [02 Jun 2010 रोजी 03:48 वा.]\nहा काय ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणायचे का? पहा अमेरिका सुद्धा देवावर विश्वास ठेवते असे म्हणायचे का?\nकुराण बायबल सदसद विवेक बुद्धीला स्मरुन देखील शपथ घेता येते.\nनिष्ठा ठेवण्याचे प्रतिक आहे. समूह जीवनात प्रतिकांची गरज भासते. मानवी मेंदुला ही प्रतिमेची गरज लागते. झेंड्याला वंदन करुन राष्ट्रद्रोही कृत्य करणारे निष्ठावंत(?) आहेतच की\nसर्व माणसे समान नसतात. बुद्धीमत्ता कार्यक्षमता उपयुक्तता यात फरक असतो. फरक आहे म्हणुन जग आहे सगळेच चोर असतील तर साव कुणाला म्हणणार? (अथवा उलट)\nशपथ म्हणजे वादा! जो वादा किया वो निभाना पडेगा याची किमान जाणीव तरी यातुन होते\nआरागॉर्न [02 Jun 2010 रोजी 04:23 वा.]\n>हा काय ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणायचे का? पहा अमेरिका सुद्धा देवावर विश्वास ठेवते असे म्हणायचे का?\nईश्वरावरील श्रद्धेचा पुरावा आहे. लेखाचा उद्देश ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा नाही.\n>कुराण बायबल सदसद विवेक बुद्धीला स्मरुन देखील शपथ घेता येते.\nपण तर्कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये एका पुस्तकाला स्मरण्याची गरज काय? त्याऐवजी अगाथा ख्रिस्थीच्या पुस्तकाला स्मरून शपथ घेतली तर चालेल का?\nश्रद्धेच्या विरोधात असणार्या वैज्ञानिकांनी ही प्रथा बंद करण्याविषयी काही केले असते तर त्यांच्या आर्गुमेंटला आणखी बळकटपणा आला असता असे वाटते. मागे नेचर मासिकाने खास नाताळ सवलत म्हणून काही अंक उपलब्ध केले होते तेव्हा नेचरच्याच एका एडीटरने मेरीच्या कन्सेप्शनविषयी नेचरचे काय मत आहे असा प्रश्न विचारला होता.\n>निष्ठा ठेवण्याचे प्रतिक आहे. समूह जीवनात प्रतिकांची गरज भासते. मानवी मेंदुला ही प्रतिमेची गरज लागते.\nसहमत. तसेच डॉ अभय बंग यांच्या मते कृष्णाची मूर्ती हे पावित्र्याचे प्रतीक आहे. काही प्रतीके चालतात आणि काही नाही असे का?\n>सर्व माणसे समान नसतात. बुद्धीमत्ता कार्यक्षमता उपयुक्तता यात फरक असतो. फरक आहे म्हणुन जग आहे सगळेच चोर असतील तर साव कुणाला म्हणणार? (अथवा उलट)\nयुटोपियन जगात सर्व माणसे समान असतील कारण सर्व विवेकनिष्ठ पद्धतीने अचरण करतील.\n>शपथ म्हणजे वादा! जो वादा किया वो निभाना पडेगा याची किमान जाणीव तरी यातुन होते\nसहमत. या व्यवहारात तर्कनिष्ठतेपेक्षा भावना येत आहेत असे वाटून जाते.\nनिखिल जोशी [02 Jun 2010 रोजी 22:23 वा.]\nडॉ अभय बंग यांच्या मते कृष्णाची मूर्ती हे पावित्र्याचे प्रतीक आहे. काही प्रतीके चालतात आणि काही नाही असे का?\nविवेकवाद्यांना गांधीवाद चालतो असे कोण म्हणाले?\nस्मरणार्याच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणे नैतिक नसले तरी त्यात न्यायालयाची अंधश्रद्ध वागणूक नाही.\nतोवर उच्च-नीच वागणूक बरोबर आहे ना?\nआरागॉर्न [03 Jun 2010 रोजी 04:36 वा.]\nनिखिल जोशी [03 Jun 2010 रोजी 10:04 वा.]\nआम्ही दिलेली रॅशनलायझेशन्स् तोकडी आहेत असा आपला आरोप आहे काय? तसे असल्यास त्यांतील त्रुटी दाखविण्याची कृपा करावी.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [04 Jun 2010 रोजी 15:03 वा.]\nप्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद...!\nकंपनी, मऊ लागेल तिथे खणणे, इत्यादि.\nयनावाला [04 Jun 2010 रोजी 16:34 वा.]\n*इथे आपणा सर्व उपक्रमींचा एक समुदाय आहे. विषयवार काही उपसमूह आहेत.या व्यतिरिक्त कांही कंपू/कंपन्या आहेत असे लिहिणे म्हणजे"संगणकोsस्तीति टंकितव्यम् ।"त्याला कोणताही आधार नाही.इथले सदस्य अशा संकुचित मनोवृत्तीचे नाहीत असा माझा दृढविश्वास आहे.\n* लेख/प्रस्ताव यावर प्रतिसाद देताना त्या लेखात काय आहे याचाच विचार होतो असे आजपर्यंतचे प्रतिसाद वाचून वाटते. काही उपक्रमी प्रस्तावकाचे नाव पाहून प्रतिसाद लिहितील हे कल्पनेत तरी संभवते काय? असा आरोप म्हणजे सदस्यांचा अपमानच होय.\n* प्रत्येकाला विद्वत्ताप्रचुर आणि माहितीपरिपूर्ण लेख लिहिणे जमेल असे नाही.जो तो आपल्या क्षमतेला अनुसरून लिहिणार.तो लेख कांही जणांना कंटाळवाणा, सपक वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी तसे व्यक्त करणे योग्यच आहे. त्यामुळे प्रस्तावकाला आपला स्तर ,आपले स्थान याचे भान येते. पुढचा लेख टाकताना तो अधिक सजग होतो.\n*"नवे लेखन" मधील पहिल्या तीन पानांवरील सर्व लेख पाहिले.विषयांचे वैविध्य खूप आहे.\n*सद्ध्या उपक्रमावर येणार्या पाहुण्यांची संख्या मोठी दिसते. त्यांना रंजक वाटेल , आणि उपक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांत बसेल या हेतूने मी तीन लेख लिहिले. केवळ तात्त्विक चर्चेपेक्षा अनुभवकथन, संवादरूप लेखन लक्षवेधून घेते असे वाटते. हेतू साध्य झाला नाही. मर्यादेचे आत्मभान आले.\n* "मऊ लागते तेथे खणणे " हे प्रियाली यांचे लेखन दूषित पूर्वग्रह आणि अपुरी माहिती यांवर आधारित आहे. मुसलमान बुवांची, तसेच बायांची सुद्धा, अनेक प्रकरणे अंनिसने उजेडात आणली आहेत.ख्रिश्चन धर्मगुरूंचा फ़ेथ हीलिंग हा फ़सवणुकीचा प्रकार अंनिसने बंद पाडला.सविस्तर माहिती डॉ. नरेन्द्र दाभोळकर लिखित "तिमिरातुनी तेजाकडे"(राजहंस प्रकाशन, पृष्ठे ४७०, मूल्य ४००रु.) या पुस्तकात आहे.\n*अंनिसचे कार्य हिंदूंसाठी इष्ट आहे की अनिष्ट? हितकारक की अहितकारक? हिंदूंच्या हिताचे असेल तर "आधी त्यांना सांगा! आधी त्यांना सांगा! मग आम्हाला" असे तर्कविसंगत का बोलले जाते? विचार करता वाटते की अंनिस आणि डॉ.दाभोळकर यांच्याविषयी वाटणारा आकस."आम्ही आमच्या श्रद्धांचे काय ते पाहून घेऊ. हे अंनिसवाले आम्हांला सांगणारे कोण?"असा एकूण पवित्रा दिसतो."अंधश्रद्धा निर्मूलन व्हायला पाहिजे" असे वरवर म्हणायचे.मग "त्यांच्या आधी,त्यांच्या आधी करा.मग आमच्या. तुम्ही मऊ लगेल तिथे खणता" असा ओरडा करणे हा कांगावखोरपणा आहे.\n....शांतचित्ताने आणि पूर्वग्रहविरहित दृष्टीने विचार केल्यास हे पटू शकेल.\nशांतचित्त आणि कांगावेखोरपणा\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 17:20 वा.]\n"मऊ लागते तेथे खणणे " हे प्रियाली यांचे लेखन दूषित पूर्वग्रह आणि अपुरी माहिती यांवर आधारित आहे. मुसलमान बुवांची, तसेच बायांची सुद्धा, अनेक प्रकरणे अंनिसने उजेडात आणली आहेत.ख्रिश्चन धर्मगुरूंचा फ़ेथ हीलिंग हा फ़सवणुकीचा प्रकार अंनिसने बंद पाडला.सविस्तर माहिती डॉ. नरेन्द्र दाभोळकर लिखित "तिमिरातुनी तेजाकडे"(राजहंस प्रकाशन, पृष्ठे ४७०, मूल्य ४००रु.) या पुस्तकात आहे.\n"मऊ लागले म्हणून" या प्रतिसादातून केलेला कांगावेखोरपणा मला मान्य आहे. त्यानिमित्ताने, आपण बाहेर पडून हा प्रतिसाद लिहिलात हे उत्तम झाले. "अंनिस फक्त हिंदु धर्मावर टिका करते" हे माझे वाक्य नाही ते वाक्य म्हटले जाते/दिसते असे मी लिहिले आहे. त्याचा प्रतिवाद माझ्याकडून होतो असेही लिहिले आहे परंतु मऊ असते तेथे खणले जाते या मुद्द्यावर मी कायम आहे. तीही एक बारकीशी का होईना पण बाजू आहे विसरणे मला योग्य वाटत नाही.\nपूर्वग्रहविरहित दृष्टी हे सर्वांचेच असायला हवेत ना. "अवतार आणि पुनर्जन्म" असे शब्द उच्चारता जर फेफरे येत असेल आणि इतरांच्या चर्चांची हानी केली जात असेल तर कोणी कोणाला पूर्वग्रहविरहित दृष्टीचे डोस पाजायचे? जर समोरच्याला तुम्ही उपदेश करता परंतु स्वतःचे आचरण त्या विरुद्ध असेल तर इतरांनी किती दिवस सहन करावे अशी अपेक्षा आहे? आपल्याला मानवत नाही त्या विषयाला निरर्थक वगैरे म्हणणे हे सूज्ञपणाचे लक्षण नाही. त्या चर्चेत सांगूनही कळले नाही, सुधारले नाही आणि हे पुन्हा पुन्हा होईल असे वाटले तेव्हा मीही हा डोस पाजून पाहिला. तो लागू पडला तर उत्तम म्हणेन.\nलेख/प्रस्ताव यावर प्रतिसाद देताना त्या लेखात काय आहे याचाच विचार होतो असे आजपर्यंतचे प्रतिसाद वाचून वाटते. काही उपक्रमी प्रस्तावकाचे नाव पाहून प्रतिसाद लिहितील हे कल्पनेत तरी संभवते काय?\nव्यक्तीपेक्षा लेख महत्त्वाचा हे तत्त्व म्हणून उत्तम असले तरी व्यक्तीकडे पाहून प्रतिसाद येणे हे मानवी स्वभावाला धरून आहे तेव्हा ते तसे होते असे मला वाटते. आवडत्या लेखकांचे, आपल्या मित्रमंडळाचे, कंपूतील सदस्याचे लेख प्रथम वाचले जातात आणि त्यांना पूरक प्रतिसाद दिला जातो असेही होते हे नाकारून चालणार नाही.\nकेवळ तात्त्विक चर्चेपेक्षा अनुभवकथन, संवादरूप लेखन लक्षवेधून घेते असे वाटते.\nसंवादरूप लेखन लक्ष वेधून घेते हे खरे आहे. आपण लिहिताही रोचक आणि त्यात थोडे बदल करून वेगळ्या धाटणीचे लेखही लिहिता येतील. हा सल्ला आहे सक्ती नव्हे.\nशांतचित्त, समजूतदारपणा वगैरेंची जेवढी गरज मला आहे तेवढीच ती आपल्याला, इतरांना तुच्छ लेखणार्या सर्वांना आहे हे समजून घ्यावे. तसे झाले की उपक्रमावर येणारे लेख भरकटवले जाणार नाहीत.\nबाकी काय म्हणू? आपण जशी माझ्या चर्चेत ७५+ प्रतिसाद होऊन गेल्यावर क्षमा मागितलीत तशी मीही मागून मोकळी होते. :-)\nमूर्तीसमोर रुपया/डॉलर ठेवण्यात आनंद मिळू शकतो हे अविश्वसनीय का?\nआजानुकर्ण [04 Jun 2010 रोजी 18:03 वा.]\nपण मूर्तीसमोर रुपया/डॉलर ठेवण्यात आनंद मिळू शकतो हे अविश्वसनीय आहे.\nहे अविश्वसनीय का वाटावे हे कळत नाही. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात. एखाद्याला मूर्तीसमोर पैसे ठेवण्यात आनंद मिळू शकतो तर एखाद्याला तो मिळत नाही. 'श्यामची आई' या पुस्तकात समुद्राला अर्पण केलेल्या पैशांबाबत एक सुंदर किस्सा आहे. तुमच्या प्रतिसादांवरुन तुमचे वाचन चांगले असावे व तो किस्सा तुमच्या वाचनात आला असावा असे वाटते.\nनिखिल जोशी [05 Jun 2010 रोजी 12:52 वा.]\nसापडले एकदाचे ते पुस्तक! तो किस्सा नीट आठवत नव्हता. त्या प्रसंगात ते कुटुंब नवसासाठी प्रवास करीत असते. म्हणजे नुसती रूढीग्रस्त कृती नाही तर डायरेक्ट अंधश्रद्धाच! साने गुरुजी विवेकवाद्यांच्या काय कामाचे?\nगंमत म्हणजे आता साधना मासिक दाभोळकर चालवितात.\nसाधना व साने गुरुजी\nआजानुकर्ण [06 Jun 2010 रोजी 04:02 वा.]\nत्या प्रसंगात ते कुटुंब नवसासाठी प्रवास करीत असते. म्हणजे नुसती रूढीग्रस्त कृती नाही तर डायरेक्ट अंधश्रद्धाच!\nतो नवस श्यामने केला होता का? त्या नवसाच्या संदर्भात त्याचे वय लक्षात घेता श्यामने कोणत्या स्वरुपाचा निषेध करणे आवश्यक होते? आपल्या मते हा प्रसंग ही फार डेंजरस गोष्ट असावी, मात्र तरीही पूर्ण प्रसंगात श्यामची काय चूक होती हे कळले नाही.\nसाने गुरुजी विवेकवाद्यांच्या काय कामाचे?\nहे वाक्य बोलून आपण विवेकवाद्यांचा अपमान करत आहात. याउलट आपल्यासारखे रॅडिकल रॅशनलिस्ट हेच मध्यममार्गी विवेकवाद्यांचे व विवेकवादाचे नुकसान करत आहेत असे वाटते.\nनिखिल जोशी [07 Jun 2010 रोजी 01:46 वा.]\nमध्यममार्गी विवेकवादी म्हणजे काय? वाईट ते चांगले या पटावर (स्पेक्ट्रम) मध्येच का थांबावे?\nनवसही श्यामने केला नव्हता आणि नाणेही त्याने टाकले नाही. त्याने फक्त नाणे टाकण्याच्या कृतीचे कौतुक केले. यावर माझी टिप्पणी अशी की 'नवस बोलल्यामुळे फायदा होतो' असे मानणारी व्यक्ती अंधश्रद्ध असते. त्या व्यक्तीची दुसरी कृती निव्वळ आनंदासाठी होती असे बाय डिफॉल्ट का मानावे? हजारो वर्षे समुद्राला सजीव मानतात. मग 'नाणे टाकणे' ही कृतीसुद्धा अंधश्रद्धाजन्य ठरावी ना?\nआजानुकर्ण [07 Jun 2010 रोजी 04:06 वा.]\nवाईट ते चांगले या पटावर मध्येच थांबणे म्हणजे मध्यममार्ग नव्हे. ज्या समाजात आपण राहतो त्याची मानसिकता समजावून घेवून त्यानुसार विवेकवादाचे डोस पाजणे म्हणजे मध्यममार्ग अशी माझी व्याख्या आहे. या व्याख्येत विवेकवादी मार्गावर मध्येच थांबणे कोठेही अपेक्षित नाही. मात्र डोस किती जालीम हवा हे ठरवणे अपेक्षित आहे. अन्यथा अशा डोसची रिऍक्शन येऊन (ज्याला आपण रोगी समजत आहोत तो) रोगी अडेलतट्टू बनू शकतो.\nश्यामची आई हे पुस्तक माझ्या संग्रहात सध्या नाही. हा प्रसंग मला आठवल्यामुळे मी लिहिला होता. मात्र या प्रसंगासंदर्भात श्यामचा पर्स्पेक्टिव कौतुक करण्याचा नसून केवळ (सदर प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने) एक स्टेटमेंट करण्याचा होता असे आठवते. नाणे टाकणे ही कृती अंधश्रद्धाजन्य आहे, यात काही वाद नाही. पण हे नाणे टाकल्यामुळे असे काय मोठे नुकसान झाले हे मला समजत नाही. कदाचित समुद्राने आपल्याला एवढे भरभरुन दिले, त्याची परतफेड हे नाणे समुद्रात टाकून आपण करुयात असा संस्कार श्यामवर करणे त्याच्या आईला अपेक्षित असेल. (वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टिकोण बाळगणाऱ्या बीपी सारख्या कंपन्या जे प्रदूषण करतात त्यामानाने हे एक नाणे समुद्रात टाकणे फारच क्षुल्लक प्रदूषण आहे असे मी मानतो.) मात्र या प्रसंगातून निसर्गाच्या प्रती आपले काहीएक कर्तव्य आहे हा संस्कार श्यामवर झाला हे महत्त्वाचे.\nकाही वर्षांपूर्वी मुकुंद टांकसाळे लोकसत्तेत एक दैनिक स्तंभ लिहित असत (गमतीगमतीत की सक्काळी सक्काळी असे काहीतरी नाव असावे.. नक्की आठवत नाही.) त्यात त्यांनी त्यांचा स्वानुभव लिहिला होता. टांकसाळे स्वतः साधना परिवारातील असावेत. (त्यावेळी) ते रॅडिकल रॅशनलिस्ट होते. कोणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा असली की बोलावणे आले तरी तिथे जायचे नाही. प्रसाद खायचा नाही. जमेल तशी टिंगलटवाळी करायची असा विवेकवादी दृष्टिकोण त्यांनी जपला होता. एकदा त्यांच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये सत्यनारायणाची पूजा होती. शेजारधर्माला अनुसरुन त्यांच्या शेजाऱ्याने पूजेसाठी व प्रसादासाठी बोलावले. थोडासा शेजारधर्म पाळावा म्हणून माफक वेळेसाठी हजेरी लावण्यासाठी टाकसाळे गेले, मात्र त्यांनी अनेकदा आग्रह केल्यानंतरही प्रसाद वगैरे खाल्ला नाही. शेजाऱ्यांना फार वाईट वाटले. काही दिवसांनी टांकसाळे फार आजारी पडले. घरी काळजी घेणारे कोणी नव्हते तेव्हा या शेजाऱ्यांनी त्यांची मुलासारखी काळजी घेतली.\nया प्रसंगानंतर टांकसाळ्यांनी विचार केला की त्या पूजेच्या वेळी मी जे काही केले तो विवेकवादी दृष्टिकोण होता की फक्त माझा अहंकार जपणे? जर मी तो पदार्थ प्रसाद समजून खाण्याऐवजी स्वीट डिश म्हणून खाल्ला असता तर शेजाऱ्यांचे मन दुखावणे मला टाळता आले असते. त्यांच्या त्या पदार्थाप्रती काही भावना होत्या, मी त्या समजावून घेऊ शकलो असतो.\nनिखिल जोशी [07 Jun 2010 रोजी 04:25 वा.]\nजर मी तो पदार्थ प्रसाद समजून खाण्याऐवजी स्वीट डिश म्हणून खाल्ला असता तर शेजाऱ्यांचे मन दुखावणे मला टाळता आले असते.\nमीही असेच विधान केले आहे.\nया प्रसंगासंदर्भात श्यामचा पर्स्पेक्टिव कौतुक करण्याचा नसून केवळ (सदर प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने) एक स्टेटमेंट करण्याचा होता असे आठवते. नाणे टाकणे ही कृती अंधश्रद्धाजन्य आहे, यात काही वाद नाही. पण हे नाणे टाकल्यामुळे असे काय मोठे नुकसान झाले हे मला समजत नाही. कदाचित समुद्राने आपल्याला एवढे भरभरुन दिले, त्याची परतफेड हे नाणे समुद्रात टाकून आपण करुयात असा संस्कार श्यामवर करणे त्याच्या आईला अपेक्षित असेल. (वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टिकोण बाळगणाऱ्या बीपी सारख्या कंपन्या जे प्रदूषण करतात त्यामानाने हे एक नाणे समुद्रात टाकणे फारच क्षुल्लक प्रदूषण आहे असे मी मानतो.) मात्र या प्रसंगातून निसर्गाच्या प्रती आपले काहीएक कर्तव्य आहे हा संस्कार श्यामवर झाला हे महत्त्वाचे.\n'नाणे टाकणे' या कृतीत स्वतोमूल्य (इंट्रिंन्सिक व्हॅल्यू) आनंद नाही असेच सिद्ध होते.\nआजानुकर्ण [07 Jun 2010 रोजी 04:34 वा.]\nमी याआधीही एका प्रतिसादात असे लिहिले होते की कोणत्या कृतीत आनंद मानायचा याचे संपूर्ण स्वातंत्र्य ती कृती करणाऱ्याला असते. केवळ पंचज्ञानेंद्रियांना काहीतरी जाणवले (स्पर्श-चव-दृष्टी-श्रवण-गंध) म्हणजेच आनंदाची अनुभूती यावी ही मला फार basal व्याख्या वाटते.\nनिखिल जोशी [07 Jun 2010 रोजी 04:48 वा.]\nती कृती आनंदासाठी होती असे साने गुरुजींचेही मत नव्हते. ती कृती भीतीजन्य होती असे गृहीत धरायला वाव आहे.\nआजानुकर्ण [07 Jun 2010 रोजी 05:11 वा.]\nगुरुजींनी कृतीमागचा कार्यकारणभाव विशद केला नसल्याने,\nआपण ती कृती भीतीजन्य होती असे गृहीत धरु शकता. मी ती कृती आईने मुलावर निसर्गप्रेमाचे विशिष्ट संस्कार करण्यासाठी केलेली होती असे गृहीत धरु शकतो.\nअसले कसले प्रेम?\nनिखिल जोशी [07 Jun 2010 रोजी 05:23 वा.]\nराजाचे नाक कापणारे माकड ही गोष्ट आठविली.\nसंस्कार म्हणून असो किंवा भीती, शेवटी आनंददायक स्वतोमूल्य नाहीच!\nआजानुकर्ण [07 Jun 2010 रोजी 05:32 वा.]\nआपल्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीज् योग्य प्रकारे ट्यून होत नाहीत (किंवा तुमचे आणि आणचे रुलिंग प्लॅनेट्स जुळत नसावेत :-) ) असे दिसत आहे.\nत्यामुळे या विषयावरील संवाद इथे थांबवणे इष्ट वाटते.\nमात्र तरीही राजाचे नाक कापणारे माकड ही गोष्ट आठवल्याचे वाचून गंमत वाटली. माझ्या मते गुरुजींच्या आईच्या कृतीचे ते परिणाम तेवढे गंभीर नव्हते. या प्रसंगापश्चात नाक कापले जाण्यासारखी काही गैरकृत्ये गुरुजींनी केल्याचेही आढळले नाही. त्याचे श्रेय या संस्कारांना देता यावे.\n(त्यांची व माझी-इतरांची राजकीय-किंवा सामाजिक प्रश्नांवरील मते वेगवेगळी असली तरीही). एकंदर माणूस भला होता.\nनिखिल जोशी [07 Jun 2010 रोजी 06:05 वा.]\nसाने गुरुजी भले होते यात वादच नाही. पण अंधश्रद्ध लोक भले असू शकतात.\nअर्थात मूळ मुद्याशी हे फाटे आहेत. मूळ मुद्दा आहे की नाणे टाकणे ही आनंद मिळविणारी कृती नव्हती, भले अंधश्रद्धेतून असो अथवा निसर्गप्रेमातून.\nस्टीवन वाईनबर्ग यांचे एक वचन काहीसे असे आहेः वाईट माणसे वाईट वागतात आणि चांगली माणसे चांगली वागतात. धर्म चांगल्या माणसांकडून दुष्कृत्ये करवून घेतो.\nराजाचे नाक कापणारे माकड ही गोष्ट आठवल्याचे वाचून गंमत वाटली. माझ्या मते गुरुजींच्या आईच्या कृतीचे ते परिणाम तेवढे गंभीर नव्हते. या प्रसंगापश्चात नाक कापले जाण्यासारखी काही गैरकृत्ये गुरुजींनी केल्याचेही आढळले नाही. त्याचे श्रेय या संस्कारांना देता यावे.\nनक्कीच. (अर्थात या अतिशयोक्त रूपकात समुद्राचे नाक कापले जाणे अपेक्षित होते, उदा. नाण्यामुळे प्रदूषण, इ.)\nआरागॉर्न [07 Jun 2010 रोजी 05:11 वा.]\nजर मी तो पदार्थ प्रसाद समजून खाण्याऐवजी स्वीट डिश म्हणून खाल्ला असता तर शेजाऱ्यांचे मन दुखावणे मला टाळता आले असते. त्यांच्या त्या पदार्थाप्रती काही भावना होत्या, मी त्या समजावून घेऊ शकलो असतो.\nइथे दीवारमधील शशी कपूरचा डायलॉक आठवला.\n"मां तुम्हे प्रशाद दे रही है, तुम मिठाई समझ के खा लेना." |
आपण रिव्हर्स पंच एका पेक्षा अधिक प्रकारचे स्टॉन्स टाकून अभ्यास करू शकता. आमच्या मार्शल आर्ट्स प्रशिक्षण उद्देशासाठी, लढाऊ वृत्ती मध्ये सुरू. जर आपण डाव्या हाताने असाल, तर आपले उजवे हात फॉरवर्ड पोजीशनमध्ये असेल आणि सर्वकाही त्यातून उलटले जाईल. त्या म्हणाल्या, जवळजवळ सर्व मार्शल आर्ट्स शैली दोन्ही हाताने उलट मागे फेकतात. आपले पुढचे पाऊल- या प्रकरणात, डावा पाय- समोर स्थितीत किंवा पुढे पाऊल मध्ये पुढे जाईल. मग पुढे आपले हात हलवू (या प्रकरणात उजवीकडे) पुढे जाण्यास सुरुवात करा. आपण असे केल्याने, आपले डावे हात चेंबरमध्ये परत जातील, विशेषतः आपण काटा किंवा हुंग करत असल्यास दोन्ही हाताने असे केल्याने, हात बारीक होणे सुरू करा. धक्कादायक हात पामच्या दिशेने चालू होण्यास प्रारंभ होईल - अंतिम पंचिंग स्थिती- दुसरीकडे ते हलवेल जेणेकरून जेव्हा ते चेंबरमध्ये परत येतील तेव्हा पाम उगवेल. हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कल्पित सामर्थ्य भरपूर आहे. त्यामुळे व्यवसायींचे नितंब पंचाने पिळुन सुरू होतील. भांडणे तेव्हा, नॉन पंचिंग हात परत चेंबर मध्ये आणण्यासाठी मूर्ख होईल ऐवजी, तो आपल्या विरोधकांकडून ब्लॉक स्ट्राइक मदतीसाठी थांबेल. |
माथेरानची मिनीट्रेन सात महिन्यांत येणार रुळावर ! माथेरान : सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या किरकोळ अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंदची घोषणा केली आणि सात महिन्यांनंतर मिनीट्रेन सुरू होणार यामुळे माथेरानच्या नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माथेरान मिनीट्रेन सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय मंडळींनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे कैफियत मांडली व त्याला प्रभूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर एअर ब्रेक प्रणालीची मिनीट्रेन माथेरानमध्ये धावेल, असे सूतोवाच के ले. या अनुषंगाने २२ डिसेंबरला गुरु वारी खास माथेरानसाठी एअर ब्रेक प्रणालीची दोन इंजिने ४०१ आणि ४०२ ही नेरळमधील लोको शेड येथे दाखल झाली. यावर माथेरानच्या लोकांना विश्वास बसत नव्हता म्हणून माथेरानकर स्वतः नेरळ येथे ही दोन इंजिने पाहण्यासाठी गेले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शुक्र वारी रेल्वे प्रशासनाचे डी. आर. एम. जी. एस. गोयल यांनी माथेरानमध्ये येऊन अपघात घडलेल्या स्थळाची पाहणी केली. त्यामुळे सध्या येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे १७ जानेवारीपर्यंत ही माथेरानची राणी डौलात धावेल, असा विश्वास रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर) |
भाषा । माय सह्याद्री\nPosted on फेब्रुवारी 10, 2010 by Atul Sabnis\nकाही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो होतो. दोन-चार कविता वाचून झाल्या, मग तो मला म्हणाला, "तू एक काम कर, इंग्रजीतच लिही, मराठीत लिहायच्या भानगडीत पडू नकोस." त्या वेळी मला वाईट वाटलं, पण मी गप्प राहिलो.\nPosted in अस्तित्व, कविता, भाषा, मराठी\nPosted on फेब्रुवारी 19, 2008 by Atul Sabnis\nकाही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?\nती कशी मोजाल?\nPosted in भाषा, मराठी, विचार, शब्द\nकुणी ऐकलं नाही तर\nPosted on डिसेंबर 30, 2006 by Atul Sabnis\nशेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर\nते भरलेले लाल डोळे पुसत\nमनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून\nरंगमंचावर परत येशील का?\nशब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर\nशब्दांचा तिरस्कार न करत\nविचार फक्त व्यक्त करायचे म्हणून\nस्वतःसाठी परत लिहिशील का?\nदारा बाहेर असल्याचा भास झाला तर\nथरथरणारे हात घट करत\nमनातली भिती घालवून\nमाझ्यासाठी दार उघडशील का?\nPosted in कविता, भाषा, मराठी, विचार, शब्द\nPosted on ऑक्टोबर 12, 2006 by Atul Sabnis\nमराठी ब्लॉग विश्व, त्यांच्या प्रमाणे, समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे हे त्यांचे मूळ प्रयोजन आहे. कधी बघा, जर गेला नसाल तर. उत्तम प्रयोजन आहे.\nएक गोष्ट लक्ष्यात आली का तुमच्या? डावी कडे, सर्व मराठी ब्लॉगची लिस्ट आहे. जास्त करून, ब्लॉग "मी", "माझी", "माझे", "मराठी", आणी "मन" ह्या शब्दांवर आधारीत आहे. माझा ब्लॉग सुद्धा माय सह्याद्री आहे.\nमराठी माणसाचं "म" ह्या अक्षरावर इतकं प्रेम, इतकी ओढ? का बरं?\nPosted on ऑक्टोबर 8, 2006 by Atul Sabnis\nरायटर्स ब्लॉक जसा असतो, तसा म्हणे ब्लॉगर्स ब्लोक सुद्धा आहे. बाकी सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहीत आहे पण माय सह्याद्री वर आणी "ठेले पे हिमालय" (हिंदी ब्लॉग) वर मात्र ब्लॉगर्स ब्लॉक लागलाय. मग हा ब्लॉगर्स ब्लॉक नसून 'देवनागरी ब्लॉगिंग ब्लॉक' असावा.\nविचार अपुरे पडत नाहीत, शब्द अपुरे पडतात. ते शब्दांची वाट पाहत असतात. मी ही वाट पाहत आहे. येतील, खात्री आहे. |
शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ-Shambhar Pakvanne + Dudh Dahi Panirche Padarth by Nirmala Rahalkar, Vidula Sathe - Sathe Prakashan - BookGanga.com\nHome > Books > पाकशास्त्र > शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ\nAuthor: निर्मला रहाळकर , विदुला साठे\nजेवण झाल्यावर गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. त्यातही नाना प्रकार हवेतच. त्यासाठी विदुला साठे यांनी गोडाच्या विविध प्रकारांच्या कृती दिल्या आहेत. पाकातील पक्वान्ने, दुधाची पक्वान्ने, पोळ्या, हलवा, लाडू, मोदक, वड्या, करंज्या, भात आणि अन्य प्रकारचे गोडाचे पदर्थ असे विभाग पुस्तकात आहेत. रोजच्या जेवणात गोड बदल करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त.\nदुसऱ्या पुस्तकात विजया रहाळकर यांनी दुधाचे चविष्ट पदार्थ शिकवले आहेत. नेहमीच्या खिरींपासून ते भाज्यांच्या, बाळंतिणीसाठी खिरी, ज्येष्ठांसाठी खिरी असे विशेष विभाग आहेत. बंगाली पदार्थ, पनीरचे पदार्थ, चीजचे पदार्थ, खव्याचे पदार्थ, दह्याचे - ताकाचे पदार्थ पुस्तकात आहेत.एवढेच नव्हे, तर आईस्क्रीम, कस्टर्ड किंवा खरवस, थंड पेये, पंचामृत यांच्याही कृती दिल्या आहेत. |
गेल्या काही दिवसांपासून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत लक्ष घातल्यापासून या भागातही फळबागा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. 'उजनी'च्या ऊस पट्ट्यात आता पिकताहेत एक्स्पोर्ट क्वालिटीची फळे ! केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्याचा (Karmala) उजनी (Ujani Dam) लाभक्षेत्र परिसर उसाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात उसाचे पीकच मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत लक्ष घातल्यापासून या भागातही फळबागा (Orchards) लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. परिसरात दरवर्षी फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे तालुक्यात वाशिंबे, कंदर, चिखलठाण, पारेवाडी परिसरात हा बदल दिसून येत आहे. उसापेक्षा फळबागांपासून उत्पन्नही चांगले मिळत असल्याने फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. (Instead of sugarcane in Ujani benefit area, farmers are now turning to orchards-ssd73) तालुक्याच्या पश्चिम भागातील तरुण शेतकरी वर्ग या बदलांना प्रथम सुरवात करीत आहे. परिसरात सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू ही पिके घेतली जात असून, आगामी काळात सीताफळ, चिकू, संत्रा ही पिकेही घेतली जाणार आहेत. फळबागांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेऊ लागले असून, यातून बळिराजाही समृद्ध होत आहे. कृषी खात्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे असून, पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी फळबाग लागवडीकडे वळत आहेत व शेतीकडे उद्योग म्हणून पाहात आहेत. फळबाग शेतीला उसाप्रमाणे जास्त पाणीही लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे संकटही टळत आहे. शेतकरी फळबागा लागवडीकडे वळत आहेत. उजनी लाभक्षेत्रात ऊस पिकानंतर केळी लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात शासनाने राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे. शेतकऱ्यांना माती, पाणी, रासायनिक खते यांचे परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा सुरू करावी. जळगाव जिल्ह्यानंतर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण क्षेत्रात सर्वांत जास्त निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत आहे. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना स्वतःचा माल निर्यात करण्यासाठी व उजनी धरण परिसरात शीतगृह उभारणीसाठी बॅंकांमार्फत कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे. शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे विभागाकडून दिल्ली ते सांगोला किसान रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. किसान रेल शेतमालाच्या वेगवान वाहतुकीमध्ये खरंच गेमचेंजर ठरत आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर स्टेशनवरून उजनी परिसरातील शेतमाल दील्ली बाजारपेठेत जात होता; परंतु रेल्वे विभागाने जेऊर रेल्वे स्टेशनवरचा थांबा रद्द केला आहे, तो पूर्ववत करावा. |
वाराणसी : भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज कांशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे मंदिराच्या विश्वस्तानी स्वागत केले. तेथून त्यांनी सारनाथ येथील बौद्ध तीर्थ स्थळाला भेट दिली तसेच गौतम बुद्धांनी जिथे पहिले प्रवचन दिले त्या धामेक स्तुपालाही त्यांनी भेट दिली. राजपक्षे हे शुक्रवारपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. |
शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी रायगडावर फलटण येथील शिवरुद्रा ढोलताशा पथकाला वाद्य वाजविण्याचा बहुमान मिळाला आहे. फलटण : शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी रायगडावर फलटण येथील शिवरुद्रा ढोलताशा पथकाला वाद्य वाजविण्याचा बहुमान मिळाला आहे. दुर्गराज किल्ले रायगडावर दि. ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि लाखोंच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक साजरा होत असतो. या ऐतिहासिक कार्यक्रमास महाराष्ट्रातील निवडक ढोलताशा पथकास आमंत्रित केले जाते. या वर्षीचा हा बहुमान सातारा जिल्'ातील फलटण येथील 'शिवरुद्रा' या ढोलताशा पथकास मिळाला असून, रायगडावर यंदा होणार फलटणच्या 'शिवरुद्राचा गजर. ' दुर्गराज किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. देशभरातून लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी येथे उपस्थितीत राहतात. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला जातो. यावर्षी महाराष्ट्रातून तीन विशेष पथकांना महोत्सव समितीने आमंत्रित केले आहे, त्यामध्ये सातारा जिल्'ातील फलटण येथील 'शिवरुद्रा वाद्य पथक, पुणे येथील 'रणवाद्य' पथक आणि नाशिक येथील 'स'ाद्री गर्जना' वाद्य पथक या तीन पथकांना रायगडी वादन करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा कार्यक्रम खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. निंबुत, ता. बारामती येथील राज्यस्तरीय ढोलताशा पथक स्पर्धांत प्रथम क्रमांक विजेत्या शिवरुद्रा पथकातील युवक-युवतींमध्ये या निमंत्रणाने एक वेगळा उत्साह संचारला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या पथकात युवतींचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला व स्वराज्याला छत्रपती मिळाले. ही घटना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदणारी ठरली. हा दिवस म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. हा दिवस 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्त ढोल पथकांना आमंत्रित केले जाते. यंदा ही संधी फलटणच्या 'शिवरुद्रा' ढोल पथकास मिळाल्याने फलटणकरांनी शिवरुद्रा पथकातील युवक-युवतींचे कौतुक केले. हे पथक रायगडावर फलटण येथील गजानन चौक येथून रवाना झाले. या पथकात ३० युवक व २५ युवतींचा सहभाग आहे. |
SSR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fhadanvis) व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना Twitter वर Tag करत ही मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी मध्ये म्हंटले आहे की, 'महाराष्ट्रचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस कमिश्नर यांनी 2 महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंग परिवारला न्याय मिळेल.' |
मुंबई - शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरून वातावरण तापलेलं असतानाच शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही अनिल परब यांना कंगनाच्या मुद्द्यावरून छेडलं आहे. "अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाची कारवाई...काय ती तोडफोड...काय ती तडफड...काय तो सुका दम...आणि काळवंडलेला मुकादम. परब साहेब कंगना रानावतच्या ऑफिसची केलेली तोडफोड आठवते का? " असं ट्वीट शीतल म्हात्रे यांनी केलं आहे. परब साहेब कंगना रानावतच्या ऑफिसची केलेली तोडफोड आठवते का? अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या काळात कारवाई झाली होती. बंगल्याच्या बांधकामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत तिच्या बंगल्यावर बुलडोझर लावण्यात आला होता. त्यावेळी कंगनानेही महाविकास आघाडीवर आगपाखड केली होती. त्यानंतर, आता अनिल परबांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याने शीतल म्हात्रेने कंगनाचा मुद्दा छेडला आहे. 'किरीट सोमय्या यांनी हे कार्यलय नियमित न करण्यासाठी म्हाडावर सतत दबाव टाकला. त्यामुळे म्हाडाने आम्हाला पत्र लिहिले आणि सांगितले की हे कार्यलय नियमित करता येणार नाही', असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी स्पष्ट केले. "1960 सालापासून म्हाडाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या आपण ज्या इमारतीच्या परिसरात बसलेले आहात, त्याच इमारतीचा मी रहिवाशी असून, माझा जन्म या इमारतीत झाला. मी आज आमदार किंवा माजी मंत्री म्हणून बोलत नाही, तर म्हाडाचा आणि या इमारतीमधील रहिवाशी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझे लहानपण गेले, इथेच मी मोठा झालो. ज्यावेळी मी आमदार झालो, त्यावेळी या इमारती स्वतःच्या मालकीच्या असून, म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाहीत. त्यावेळी इमारतीमधील रहिवाशांनी मला सांगितले की, आपण आमदार झाला तर, आपले जनसंपर्क कार्यालय आपल्या इमारतीमध्येच राहुद्या. त्यामुळे सोसायटीची जागा तुम्ही वापर ती वापरण्यास आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी आमच्या या सोसायटीची जागा वापरत होतो. परंतु, या जागेवर काही लोकांनी तक्रारी केल्या", असे अनिल परब म्हणाले. |
सौरभ नववीत होता तेव्हा अचानक 'बाप' हा घराचा आधारवड कोसळला. ब्रेन हॅमरेजने सौरभच्या वडिलांचे, कैलाश मडावी यांचे निधन झाले. सगळ्या घरासाठी हा मोठाच धक्का होता. आता जगायला लागणारे पैसे कुठून येणार आणि संसाराचे रहाटगाडे कसे चालणार, हा प्रश्न आ वासून उभा होता. सौरभचे आजी-आजोबादेखील कामाला जायचे. पण कर्ता-सावरता मुलगा गेल्यावर त्यांच्याही अंगातील बळ गेल्यासारखे झाले. आता, हे दोघेही म्हातारे जीव झोपडीवजा घरात आणि त्यापुढच्या टीचभर अंगणात बसून असतात. |
एमपीसी न्यूज : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी- चिंचवडमधील वृक्षदायी प्रतिष्ठान (Tree Plantation) यांच्या संयुक्तपणे तुळजापूर बायपास रस्ता ते मोर्डा दरम्यान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. तुळजापूर बायपास रोड ते मोर्डा, धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. महंत मावजीनाथ बाबा महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, नगरसेवक विजय कंदले, एड. महेश गुंड, प्रगतिशील शेतकरी खंडूनाना नावडे, ह. भ. प. माऊली माहाराज विकास नीचळ, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कोरे यांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून वृक्षारोपण केले. तसेच वाडी बामणी येथील तुळजाई विद्यालयास 'हर घर तिरंगा उत्सव देशाचा' यानिमित 75 विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले आणि देशाविषयी अभिमान जागृत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. (Tree Plantation) तुळजाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती तेवढे वृक्ष लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करून 700 रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्ष लागवड, संगोपन करण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळी तुळजाई विद्यालय वाडी-बामणी यांच्यावतीने अरुण पवार यांचा वृक्षमित्र म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसेवा फाउंडेशन तुळजापूरचे पंकज शहाणे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग पाटील, जीवन अमृतराव, जगदीश पाटील, रत्नाकर खांडेकर, जाधव सर, भंडारे साहेब, बापू ननवरे, रमेश कामटे, विजय पवार, विशाल पवार, नरवडे सर, महादेव गिराम, आण्णा राव, युवराज पांथरे, कल्याण नरवडे, संजय पारवे, काकासाहेब थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योजक बालाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी बोलताना महंत मावजीनाथ बाबा महाराज म्हणाले, की अरुण पवार यांचे सामाजिक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. सचिन रोचकरी म्हणाले, की अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पवार बंधूनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला असून,(Tree Plantation)आपल्या गावकडेही त्यांचे पूर्णपणे लक्ष आहे. जयसिंग पाटील यांनी पवार बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. |
नवी दिल्ली, 29 जानेवारी : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मुंबई-दिल्ली सारख्या शहरांमध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संकट ओसरतंय, अशी चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. पण असा विचार करणं योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संकटाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. WHOच्या वरिष्ठ अधिकारी पूनम खेत्रपाल सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात काही शहरं आणि राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा स्थिर झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे या संसर्गाला जितकं जास्त गतीने रोखता येईल आणि वाढत्या संसर्गाला योग्य उपाययोजना करुन रोखता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पूनम खेत्रपाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत देशातील काही भागांमध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ कमी झाल्याची किंवा स्थिर असल्याचं सांगितलं होतं. पण या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षा डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी 'पीटीआय-भाषाला' मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतातील कोरोना संकटावर भाष्य केलं. देशातील धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. उलट हा संसर्ग पूर्णपणे संपावा यासाठी उपाययोजान कराव्या लागतील. लसीकरणावर प्रचंड भर द्यावा लागले. या संकट काळात प्रत्येक देशाने हेच करणं जास्त अपेक्षित आहे, असंदेखील त्या यावेळी म्हणाल्या. (IND vs WI : 19 वर्ष आणि 6 सीरिज, रोहित शर्माला इतिहास वाचवण्याचं आव्हान! ) देशातल्या कोरोना परिस्थिती बद्दल बोलायचं झालं तर देशात 21 जानेवारीला 3,47,254 रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाबाधितांची आकडेवारी घटताना दिसत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओदिशा, हरियाणा, पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग काहीसा कमी झाला आहे. पण कोरोना मृतकांची आकेवारी ही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा थेट 800 च्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. "आपण अद्यापही जागतिक महामारीशी झुंज देत आहोत. आपल्याला या संसर्गाला थांबवणं आणि सर्वाधिक नागरिकांचा जीव वाचवायचा आहे. तोच आपला उद्देश असायला हवा. विशेष म्हणजे फक्त देशात कोरोना मृतकांची आकडेवारी वाढली याचा अर्थ असा होत नाही की हा विषाणू जगासाठी चिंता वाढवणारा नाहीय. खरंतर कोरोनाचा डेल्टा विषाणू हा माणसाच्या फुफ्फुसांमध्ये वाढवायचा. पण ओमायक्रोन विषाणू हा श्वासनलिकेवर आघात करतो. त्यामुळे तो प्रचंड संसर्गजन्य आहे. आपण त्याचा संसर्ग थांबवायला हवा", असं सिंह म्हणाल्या. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
कारच्या डिकीतून तब्बल दहा गोण्या गुटखा जप्त. . . शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. कराड : शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. सादिक सिकंदर मुल्ला (वय ३९, रा. शनिवार पेठ, सातारा), अजीम महंमद तांबोळी (वय ३७, रा. जकातवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अजिम कुरेशी (रा. मंगळवार पेठ, सातारा) हा फरार झाला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सातारा येथील शाहूपुरी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना कराडहून साताऱ्याच्या दिशेने एक कार निघाली होती. पोलिसांनी बोगदा परिसरात ही कार अडविली. कार थांबल्यानंतर पोलिसांनी कारमधील युवकांची चौकशी केली. त्यानंतर कारची डिकी उघडण्यास सांगितले. यावेळी कारमध्ये अजिम कुरेशी हा लघुशंका करून येतो, असे सांगितले. तो तेथून पळून गेला. पोलिसांनी कारची डिकी उघडताच डिकीमध्ये गुटख्याच्या दहा गोण्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी कारमधील सादिक मुल्ला व अजीम तांबोळी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी जकातवाडी येथे तांबोळीच्या घरातूनही गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला, फौजदार शरद भोसले, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, स्वप्नील पवार यांनी केली आहे. |
घनदाट अरण्य, अभयारण्याचा फेरफटका आणि सुंदर शिवमंदिर असा मेनू हवा असेल आणि हाताशी एखाद्या दिवसाचाच वेळ असेल तर भीमाशंकर या ठिकाणाला पर्याय नाही. पुण्यापासून जवळ असलेले १२ ज्योतिर्लिंगातील एक शिवलिंग असलेले भीमाशंकर हे छोट्या सहलीसाठीचे एक आकर्षक स्थळ आहे. डोळ्याना तृप्त करणारा निसर्ग आणि तनमनाला ताजे करणारी हवा अनुभवण्यासाठी तरी येथे जायलाच हवे. सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण खास म्हणावे लागेल. भारतात विशेष समजल्या जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवमंदिर प्रथम पाहून घ्यावे. हे हेमाडपंथी मंदिर दगडातून बांधले गेले असून त्यावरचे कोरीवकामही भुरळ घालणारे आहे. या गावाला नांव मिळाले ते भीमा नदीवरून. कथा अशी सांगतात की शंभू महादेवाने येथे राक्षस त्रिपुरासुराशी युद्ध करून त्याला ठार मारले. या दोघांच्या युद्धामुळे इतकी उर्जा उत्पन्न झाली की भीमा नदीचे पाणीही उकळू लागले. म्हणून हे भीमाशंकर. शंकराची येथील पिंड दोन भागात विभागलेली आहे. छोटा भाग पार्वती आणि मोठा भाग शंकर समजला जातो. हे मंदिर नाना फडणीस यांनी १८ व्या शतकात बांधले असे इतिहास सांगतो. भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींच्या सुंदर पक्ष्यांचे तसेच अनेक प्रकारच्या वन्य जीवांचे निवासस्थान आहे. मात्र त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती देवखार. यालाच शेकरू असेही म्हटले जाते आणि हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. हे जंगल हे सदाहरित वृक्षाचे जंगल असून येथे अनेक औषधी वनस्पतीही आढळतात. आदिवासीही येथे राहतात. आता आपल्यालाही अभयारण्यात एखादा मुक्काम करता येतो. त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. १२० चौरस किमीचे हे अभयारण्य फोटोग्राफर्स, पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमींसाठी फार मोठी देणगी आहे. याच जंगलातून फार पूर्वी पांडवांनीही आपली वाट शोधली होती असेही सांगितले जाते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. ट्रेकर्स तसेच रॉक क्लायबिंग सारख्या साहसी क्रिडाप्रेमींसाठी हा काळ सर्वात उत्तम. पिण्याचे पुरेसे पाणी बरोबर ठेवणे मात्र गरजेचे. हिरवागार निसर्ग, सह्याद्रीच्या पश्चिम घाटाची शान, भलेमोठाले कातळ, विविध प्रकारची झाडेझुडपे, ६० फूटांपेक्षाही अधिक वाढलेले महाकाय वृक्ष यांची मोहिनी कांही वेगळीच. पुण्याहून तसेच कर्जतहूनही भीमाशंकर येथे जाणे सुलभ पडते. चार तासांचा हा प्रवास लाल मातीचे डोंगर, अवघड घाट, अरूंद रस्ते, डोंगरातून अवखळपणे वाहणारे ओघळ यांनी परिपूर्ण आहे. विकएंड साठी किवा अगदी एक दिवसाच्या सहलीसाठी सुद्धा हे स्थान अगदी मस्त आहे. |
एखाद्या चांगल्या लेखकानं मीराची ही प्रेमकहाणी लिहिली तर ती कादंबरीसारखी सरस वाटेल. या कहाणीतील दोन्ही मनस्वी व्यक्तीची स्वभावचित्रं रेखाटण्यासारखी आहेत. एकानं बापू आणि देश सेवा यांनाच आपल्या जीवनाचे उद्देश मानले होते. दुसरी व्यक्ती अशी होती जी देशप्रेमाखातर फाशीच्या तख्तावर जाऊन आली होती. अनेक वेळा जिला मृत्यूच्या जबड्यात शिरावं लागलं आणि जिला जगातली कुठलीही स्त्री आपल्या मोहजालात अडकवू शकली नव्हती. मीरानं मला प्रेम-बन्धनात बांधून ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यांनी एक महान व पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून त्यासाठी खडतर तपश्चर्या केली होती, हे मात्र खरं! तपश्चर्या नेहमी सफल होते अशीच सर्वसाधारण समजूत आहे. परंतु आमच्या प्रकरणात एकाचं तप सफल होण्यासाठी दुसऱ्याचं तप निष्फळ बनत होतं, भंग पावत होतं. चाळीस वर्षाच्या तपश्चर्येपुढं दोन वर्षाचं तप मग किती टिकू शकणार? किती प्रभाव पाडू शकणार? दोन तपस्यांच्या तपातला हा संघर्ष होता. माझी प्राप्ती व्हावी म्हणून अनेक मुलींनी माझ्याकडे प्रेमपूर्ण कटाक्ष टाकले होते, मात्र त्यांच्यापैकी कुणी मीरासारखं तपाचरण किंवा आराधना केलेली नव्हती. असं कुणी केलं असतं तर माझं जीवन अगदीच वेगळं बनलं असतं. माझं जीवन हे एक शिस्तबद्ध जीवन आहे. योगायोगानंच ते तसं बनलं. कुणाच्या तरी मागे लागून, किंवा परिस्थितीनं भांबावून जाऊन मी कधीही माझ्या जीवनाची दिशा बदलली नाही. मला जीवनात अनेक वळणं आणि अडथळे ओलांडावे लागले. प्रत्येक वळणावर देशहित डोळ्यापुढे ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे, हे उद्दिष्ट मी कधीही नजरेआड होऊ दिलं नाही. मीराला मी माझ्या जीवनाशी एकरुप करू शकलो नाही. माझा तो निर्णय चूक होता का बरोबर, ह्याचा निर्णय करण्यासाठी आजही मी थांबू इच्छित नाही. माझ्या विद्वान वाचकांवर मी हा निर्णय सोपवतो. राजकीय परिस्थिती आणि माझी विचारसरणी ज्या वातावरणात मी त्या काळी रहात होतो त्याचं वर्णन करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. मी तेव्हा जे केलं ते योग्य की अयोग्य, ह्याचा निर्णय वाचकच करू शकतील. बापू म्हणत असत की, 'भारत-छोडो-आंदोलन' रूपी हा संघर्ष, हा त्यांच्या जीवनातील अंतिम संघर्ष आहे. त्यावेळी सबंध जगात ज्या घटना घडल्या, त्या सर्वांचा भारतातील वातावरणावर परिणाम झाला होता - आणि हा परिणाम अभूतपूर्व होता. आपल्या देशावर प्रेम करणारा प्रत्येक देशभक्त यावेळी मातृभूमीसाठी स्वतःची आत्माहुती द्यायला तयार होता. या अन्तिम युद्धाच्या वेळी बापू मला आपल्या समवेत ठेवू इच्छित होते. १९४२ सालचा जानेवारी महिना असावा. बारडोली येथं गुजरात काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीत राष्ट्रीय सरकार स्थापन करत असताना, इंग्रजांचं प्रभुत्व मान्य करून, जपानचा सशस्त्र सामना करायचा किंवा नाही, या विषयावर चर्चा व्हायची होती. बापूंचा शस्त्रास्त्रांचा वापर करण्याला विरोध होता. गुजराथमधील बहुसंख्य नेते बापूंच्या विरोधात होते. या बैठकीतून बापू अत्यंत निराश होऊन बाहेर पडले. यानंतर बापूंशी या विषयावर माझी चर्चा झाली. बापूंनी स्पष्ट शब्दात विचारलं होतं की, भारताला स्वतंत्र करायचं असेल तर, जापान्यांच्या विरुद्ध आपण शस्त्र हातात घेऊन लढायचं का? तुम्ही याला तयार आहात का? हिंसेचा अवलंब करणं योग्य ठरेल का? मी त्यांना उत्तर दिलं-बापू, शस्त्र हातात घ्यायचं का नाही, हे मला समजत नाही. मला एवढंच कळतं की, तुमची बुद्धी माझ्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे- जोपर्यंत ही श्रद्धा माझ्या मनात कायम आहे, तोपर्यंत मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालेन. मी अन्य विचार करणार नाही. भारताच्या इतिहासात १९४२ हे वर्ष एक झंझावाती वर्ष होतं. केव्हा कुठं काय होईल, याचा कुणालाच पत्ता नव्हता. माझं मन देखील एका विचित्र धुंदीनं भारावून गेलेलं होतं. या सुमारास बापू एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत व्यग्र होते. मे महिन्याचे दिवस होते. बापू बिर्ला-भवन मध्ये थांबले होते. आंदोलन कशा तऱ्हेनं करावं, कसं चालवावं, यासंबंधी बापू माझ्याशी सल्लामसलत करू इच्छित होते. त्यांनी मला आपल्या पूर्ण विश्वासू सहकाऱ्यांत समाविष्ट केलं होतं. मला ते म्हणाले ही माझ्या जीवनातली शेवटची लढाई आहे. यामुळं मी तुम्हाला प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत आपल्या बरोबर ठेवू इच्छितो. बापूंचा माझ्यावर एवढा विश्वास जडलेला होता. खरोखरच, मी मोठा भाग्यशाली होतो. दोन दिवसांत गांधीजींची दोन रुपं गांधीजी माझ्याशी मुंबई, मालाड येथे चालविल्या जाणाऱ्या संघासंबंधी बोलले. तो बंद कसा करायचा, सर्व तरुणांना वर्ध्याला कसं न्यायचं याविषयी सरदार वल्लभभाई पटेलांशीही चर्चा केली होती. बापूंच्या निकटच्या सहकाऱ्यांत, बापू माझ्यावर किती जास्त विश्वास ठेवत चालले आहेत, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. अनेकांना ही गोष्ट खटकली व त्यांनी आपल्या पद्धतीनं बापूंना समजावण्याचा प्रयत्न केला. बापूंनी जो काही निर्णय घेतला होता, त्यासंबंधी पुनर्विचार करण्यास या मंडळींनी त्यांना भाग, पाडण्यात आलं. बापूंनी मला बोलावून घेतलं व अहिंसक व्यायाम संघाच्या अंदाजपत्रकासंबंधी मला काही प्रश्न विचारले. गोष्टी तशा मामुली स्वरूपाच्या होत्या. त्यांच्या संमतीनंच मी अंदाजपत्रक तयार केलं होतं. त्यांच्या मान्यतेचं पत्रही माझ्यापाशी होतं. माझ्या उत्तरानं त्यांचं समाधान झालं. त्यांचा दुसरा प्रश्न होता की मी काम करतेवेळी इतरांशी जरा कडकपणे वागतो, असं लोक सांगतात, हे खरं आहे काय? मी उत्तर दिलंअनुक्रमणिका बापू, मी सैनिकवृत्तीचा मनुष्य आहे. सैनिक तयार करतांना काही वेळा मला अवश्य कडक व्हावं लागतं. माझं उत्तर ऐकून बापूंना हसू आलं. गोष्ट एवढ्यावरच संपली. बापूंना दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या रूपांत बघितलं. पहिल्या दिवशी त्यांनी जे प्रेम व विश्वास दाखवला होता, त्यानं मी खरोखरच भारावून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी गोष्टी तशा सर्वसाधारणच होत्या. तथापि त्यांनी मला ज्या तऱ्हेनं प्रश्न विचारले, ते ऐकून माझ्या मनात खळबळ निर्माण झाली. मी अत्यंत बारकाईनं यावर विचार करू लागलो. १८ मे १९४२ रोजी बापू मालाड येथील माझ्या संस्थेची पाहणी करण्यासाठी येणार होते. ठरल्यावेळी ते आले. चाळीस तरुणांनी दिमाखात व्यायामाच्या कसरतीचं प्रदर्शन केलं. मुंबईचे हजारो प्रेक्षक तिथं आले होते. श्री. जी. डी. बिर्ला, सरदार वल्लभभाई पटेल, महादेवभाई देसाई आणि मुंबईचे प्रमुख नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. कवायतींचं प्रदर्शन सर्वांच्याच पसंतीला उतरलं सरदार वल्लभभाईनी योग्य ते आदेश देऊन वर्ध्याला जाण्याची कसकशी तयारी करायची हे सांगितले. दोन दिवसांच्या अल्प काळात बापूंची दोन रूपं मला बघायला मिळाल्यामुळे माझा दृष्टिकोण बदलला. पहिले दिवशी बापूंनी जेव्हा मला सांगितलं की ही त्यांच्या जीवनातली शेवटची लढाई आहे, तेव्हा मला वारंवार असच वाटत होतं की, बापू आपली ही इच्छा पूर्ण करत आहेत. दुसरे दिवशी मी जेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा बापूंनी ज्याला ते शेवटची लढाई म्हणत होते, त्यासंबंधीची रूपरेखा माझ्यासमोर मांडली. आजपासून अठ्ठावीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. भारतीयांच्या जीवनातला तो एक नाजुक क्षण होता. काय करायचं आणि कसं करायचं यासंबंधी निश्चयपूर्वक निर्णय घेणं अवघड होतं. आम्ही इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याबाबत प्रयत्नशील होतो आणि इंग्रज घट्ट पाय रोवून उभे होते. जपान भारतातून इंग्रजांना हाकलून आपलं प्रभुत्व प्रस्थापित करू इच्छित होता. भारतीयांच्या दृष्टीनं हा प्रकार म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात पडण्यासारखा होता. कोणाची बाजू घ्यावी, हा बिकट प्रश्न होता. बापूंनी नेमक्या कोणत्या शब्दात हा निर्णय मांडला होता, हे मी सांगू शकणार नाही. एक गोष्ट स्पष्ट होती की, आम्ही इंग्रजांना साहाय्य करणार नव्हतो आणि जपान्यांशीही सामना करणार नव्हतो. इंग्रज आमच्या पाठीवर स्वार झालेले होते. त्यांना खाली उतरून जपानी आमच्या पाठीवर स्वार होऊ इच्छित होते. आपली ही असहाय परिस्थिती लक्षात घेऊन बापूंनी जो निर्णय घेतला होता, त्याहून अधिक उत्तम गोष्ट दुसरी कुठलीच नव्हती. भारताच्या राजकीय वातावरणात पुष्कळशा सोयी होत्या. भारताच्या स्वातंत्रसंग्रामात सामील झालेले लोक दोन गटात विभागले गेले होते. एका पक्षाची अशी इच्छा होती की, कोणत्याही रीतीनं इंग्रजांच्या तावडीतून देशाची मुक्तता झाली पाहिजे. ज्यांनी जळवांप्रमाणं आमच्या रक्ताचं शोषण केलं आहे, आम्हाला गुलाम बनवलेलं आहे, अशा लोकांशी आमच बंधुभाव राहूच शकणार नाही. स्वतःला अत्यंत जागृत समजणारा दुसरा पक्ष, असं मानत होता की, आम्ही जर इंग्रजांना मदत केली नाही तर, जपान अगदी सहजतेनं भारतावर आपला अधिकार प्रस्थापित करील. लाखोच्या संख्येनं जपानी भारतात घुसतील. असं जर घडलं तर त्यांच्या तावडीतून भारताला मुक्त करणं, हे स्वप्नवत् ठरेल. तेव्हा या पक्षानं घोषणा दिली की, युद्धात आपण इंग्रजांच्या बाजूनं उतरलं पाहिजे, त्यांची साथ केली पाहिजे. |
रामचंद्र गुहा यांनी पोस्ट केलेल्या फोटोत ते काही खात असल्याचे दिसून येते. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, जुन्या गोव्यातील सुंदर सकाळ नंतर पणजीत लंच केले. गोव्यात भाजपचे शासन आहे़ तेव्हा मी निर्णय घेतला की, आज जेवणामध्ये बीफ खाऊ. फोटोबरोबरच त्यांनी गोव्यातील सुंदर फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोवर भाजपचे माजी खासदार बलवीर पुंज यांनी टिका करताना म्हटले आहे की, आपण बीफ खाऊन आणि सोशल मिडियावर फोटो पोस्ट करुन जेवणाचा आनंद घेत नाही तर जाणून बुजून लाखो लोकांच्या विश्वासाची खिल्ली उडवत आहात. आपल्या सेक्युलर मानसिकतेमुळे आपल्याला कसे संवेदनहीन माणूसमध्ये परिवर्तित केले आहे. गुहा यांच्या या फोटावर अनेकांनी टिका केली. काहींनी तर त्यांना मारहाण करु अशी धमकीही दिली. तर काहींनी त्यांची संभावना राक्षस अशी केली. भाजप वैचारिक पातळीवर बीफला विरोध करत असून अनेक भाजप शासित राज्यात बीफला बंदी आहे. मात्र, गोव्यात भाजप शासन असूनही येथे बीफला बंदी नाही. कारण गोव्यात संपूर्ण जगभरातून पर्यटक येतात आणि त्यांना खाण्या पिण्यावर बंधने आणली तर त्यातून पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल यासाठी गोवा शासनाने ही बंदी आणलेली नाही. रामचंद्र गुहा यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टिका केली आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीही भाजप समर्थकांचा विरोध सहन करावा लागला होता. |
पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्याचे भांडवल संपले असल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतात पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाला आधीच दोन महिने उशीर झाला असून अजून उशीर नको म्हणून शेतकरी वर्गाने नुकसान भरपाई अनुदानाची वाट न पहाता आपल्या कारभारणीचे मंगळसूत्र व इतर दागिने बँकांकडे गहाण ठेवून तसेच उधार उसनवार करून रब्बी हंगामाची तयारी केली असून सर्वत्र रब्बी हंगामाची लगबग सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या बैल मशागतीला वेळ लागत असल्याने शेतकरी वर्गाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले असून ट्रक्टरच्या मदतीने नांगरणी , फणने रोटरी मारणे अशी कामे केली जात असल्याने हा व्यवसाय करणार्या ट्रक्टर मालकांना चांगले दिवस आले आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिके सडून गेल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. असे असले तरी शेतकरी वर्गाने हार न मानता रब्बी हंगामाच्या कामाला लागला आहे. या भागात मका पिकाचे क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांची मका सोंगणी व चारा साठवण्याची धावपळ सुरु आहे. आजही काही शेतात पाणी साचल्याने दलदलीचे साम्राज्य असल्याने मका सोंगणीसाठी अडथळा येत आहे. पाणी उपलब्ध राहाणार असल्याने या भागात गहू हरभरा,या पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकरी वर्गाने या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. तर नगदी पिक म्हणून कांदा पिकाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. पाटोदा परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकर्यांची धावपळ सुरु आहे. पावसाने कांदा रोपे सडून गेली आहे मात्र ज्या जमिनी उंच सखल तसेच मुरूमट होत्या अशा जमिनीमधील कांदा रोपांनी काही प्रमाणात तग धरल्याने शेतकरी वर्गाने कांदा लागवड सुरु ठेवली आहे. सध्या कांद्यास मिळत असलेला बाजारभाव पुढील काळातही मिळणार असल्याच्या कयास शेतकर्यांनी बांधला असल्याने कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. ज्या शेतकर्यांकडे कांदा रोपे शिल्लक नाही असे शेतकरी कांदा रोप विकत घेऊन कांदा लागवड करतांना दिसत आहे. सध्या कांदा रोपाला सोन्याचे दिवस आले असून एक पायलीचे कांदा रोप सुमारे पन्नास ते साठ हजार रु पयांना विकले जात आहे. ही महागडे रोपे घेण्यातही शेतकरी वर्गात चढाओढ लागली आहे. त्यामुळे ज्याच्याकडे कांदा रोप आहे आशा शेतकºयांना सुगीचे दिवस आले आहे. |
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. नेमके काय म्हणाले आहे मोदी? जाणून घ्या देशात लहान शेतकऱ्यांना ताकद मिळावी यासाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे शेतकरी ही मागणी करत होते. याआधीच्या सरकारने यावर चर्चा केली होती. यावेळी चर्चा करून हे कायदे लागू केले गेले. अनेक शेतकरी संघटनांनी या कायद्याचे स्वागत केले. ज्यांनी स्वागत केले त्यांचे मी आभार मानतो. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी क्षेत्राच्या हिताने काम करत आहे. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने, शेतकऱ्यांसाठी समर्पणाने हे कायदे आणले. पण तरीही काही शेतकऱ्यांना हे कायदे समजले नाही. कृषी तज्ज्ञांनी त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यांचे तर्क समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ज्यावर आक्षेप होता ते बदलण्याची तयारी दाखवली. कायदे निलंबित करण्याचा प्रस्तावही मांडला असे मोदी म्हणाले. देशवासियांची माफी मागून मला हे म्हणावं वाटतं की, आमच्या तपस्येत काही उणीव राहिली असावी. दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व आम्ही समजून सांगू शकलो नाही. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेणार आहे. याची संवैधानिक प्रक्रिया सुरु करणार असल्याचे मोदींनी सांगितले. |
प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिक : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे वणी घाटात बस कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या बस अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. बस घाटात कोसळल्यानंतर स्थानिकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. अपघातग्रस्त झालेली बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती मिळाली आहे. सप्तश्रृंगी घाटात एसटी महामंडळाची बस घाटात कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाले आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आली नाही. |
Seema Haider Case: सीमा हैदर प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्याने उर्दू भाषेत सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा नाहीतर २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशा शब्दात धमकी दिली आहे. हायलाइट्सः सीमा हैदर प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकीचा फोन. फोन द्वारे म्हटले, 'सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवल्यास भारताचा होईल' १२ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला फोन. मुंबई : मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली आहे. या कक्षाला धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्याने उर्दू भाषेत सांगितले की सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवले नाही तर भारत उद्ध्वस्त होईल. या कॉलरने पुढे धमकी दिली की भारताला २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहावे लागेल आणि असे झाल्यास उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल. सध्या पोलीस या कॉलची चौकशी करत आहेत. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात असे अनेक कॉल आले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, १२ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवण्याचा कॉल आला होता. सीमाला परत न पाठवल्यास भारताने दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार राहावे, अशी धमकी या कॉलरने दिली. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीमा हैदर ही पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहे. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा नावाच्या व्यक्तीशी २०१४ मध्ये झाला होता. त्याला चार मुलेही आहेत. २०१९ मध्ये गुलाम रझा कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला आणि तेथून सीमाला पैसे पाठवत असे. सीमाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर तो कधीच परत आला नाही. दरम्यान, २०२० मध्ये सीमाने PUBG गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या जेवर येथील रहिवासी असलेल्या सचिनशी मैत्री केली. दोघेही प्रेमात पडले आणि या वर्षी मार्चमध्ये दोघांनी नेपाळमध्ये लग्न केले. यानंतर दोघेही मायदेशी परतले होते. सीमा १२ मे रोजी नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि सचिनच्या घरी पोहोचली. सीमा हैदरला बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सचिनलाही नोएडा पोलिसांनी अटक केली होती. नंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीमाने पाकिस्तानला परत पाठवल्यास जीवाला धोका आहे. त्यांना भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी योगी सरकारकडे केली आहे. सीमाचा दावा आहे की तिने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारून सचिनशी लग्न केले आहे. |
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. नाशिक : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. पावसाने हजेरी लावल्याने पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. येवला : गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली. पोळा या सणाच्या पूर्वसंध्येलाच तालुक्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उभ्या पिकांना असलेली गरज पुर्ण झाली असली तरी विहिरींना पाणी येण्यासाठी मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकºयांना आहे. येवला शहरामध्ये सोशल मीडियावर शहरातील रस्त्यातील खड्डे ओव्हरफ्लो अशा पोस्ट फिरवून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले जात होते. रविवारी पहाटेपासून कमीजास्त प्रमाणात येणारा पाऊस सकाळी ७ नंतर हळूहळू जोर पकडू लागला तर दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. येवला तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या १९ दिवसात केवळ २० मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी आली नसली तरी निश्चितच आॅगस्टची सरासरी ओलांडली जाईल असे चित्र दिसत आहे. डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे आनंदित झाला आहे. परिसरात रिमझिम पावसाने शनिवारी रात्री व रविवारी हजेरी लावली आहे. मुसळधार जरी नसला तरी या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपू लागली होती. त्यामुळे बळीराजाच्या चेहºयावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसू लागले होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. जेमतेम पावसावर पेरणी झालेली पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली होती. पावसामुळे जनावरांच्या चाºयाची चिंता थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होणार आहे. बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील बहुतांशी आदिवासी बांधवांचे मुख्य पीक हे भात व नागली असून, लागवडीनंतर दमदार पावसाच्या हजेरीशिवाय ही पिकेही आता कोमेजू लागल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहºयावर चिंता दिसू लागली होती. पावसाने सगळीकडेच हजेरी लावल्याने या भागातील भात, नागली, बाजरी, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे. आठ ते दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल व विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे. पेठ : राज्यभर पावसाचे पुनरागमन झाले असताना पेठ तालुक्यात मात्र गत १२ तासांपासून रिमझिम सुरू आहे. सर्वत्र ढगांनी आकाश झाकोळले असून गोळशी फाट्यापासून सावळघाटपर्यंत रस्ते धुक्यात हरवले आहेत. |
सातारा : बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारावरून उठलेल्या वादात आता शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंच्या लेखनाबाबत घेतलेल्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पुरस्कार स्थगित ठेवावा, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 'महाराष्ट्र शासनाने ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर केला आणि तो प्रदान करण्याची तयारी केली आहे. तथापि, पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. जरूर त्या अभ्यासाअंती, या आक्षेपात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे आणि त्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत वेदनादायी झाली आहे. सबब या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्थगित ठेवावा,' असे परखड मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. 'छत्रपती शिवरायांमुळे भारत देश झाला. महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळाली. जगातील प्रगत देशांत शिवरायांविषयी संशोधन व अभ्यास केला जातो. किंबहुना राज्यकर्ता कसा असावा, तर रयतप्रेमी शिवरायांसारखा, असे दाखले जागतिक स्तरावरून केल्या जाणाऱ्या अभ्यासात नमूद केले जातात. जिजाऊ आईसाहेब तर राष्ट्रमाता आहेत. शासनाने अरबी समुद्रामध्ये १०८ फूट उंचीचे शिवस्मारक उभे करण्याचे जाहीर केले आहे. शिवराय व जिजाऊ आईसाहेब यांच्याविषयी शासनाच्या कृतिशील भावनेचे विकृतीकरण होऊ नये म्हणून तज्ज्ञांकडून लेखनाची तपासणी करून आक्षेपांचे निरसन होईपर्यंत हा पुरस्कार वितरणाचा निर्णय स्थगित करावा,' असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी) 'बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या असंविधानिक लेखनामुळे सामान्य जनतेमध्ये पुरंदरे यांना जाहीर झालेल्या 'महाराष्ट्र भूषण'बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार घोषित करून त्यांचे आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरत आहे,' असे खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे. |
या अगोदर मनसेकडूनही सामी यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचा विरोध करण्यात आला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, मोदी सरकारने अदनान सामी यांना दिलेला पुरस्कार परत घ्यावा. तसेच, आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. |
विनोद शेलकर यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nHomeकल्याणविनोद शेलकर यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nकल्याण , प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विनोद शेलकर यांनी बनवलेले त्यांचे सुंदर कॅनव्हास पेंटिग भेट म्हणून देण्यात आले. पेंटिंग त्यांना खूप आवडली. आपल्या सारखे आदर्श शिक्षक असतात म्हणून गुणवंत विद्यार्थी घडतात. शिक्षकांनीही असेच कालसुसंगत, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत शिक्षण द्यावे असे कपिल पाटील यांनी सांगितले.\nसत्कारसमारंभाचं औचित्य साधून आहिराणी भाषा संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणारे मंडळाचे खजिनदार ए. जी. पाटील, क्रीडा शिक्षक ईश्वर पाटील व ज्येष्ठ पत्रकार आणि श्रेष्ठ छायाचित्रकार दिपक जोशी यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. यावेळी प्रज्ञावंत, गुणवंत, किर्तीवंत खान्देशी गुरुवर्यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्शशिक्षक पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आल.\nविनोद शेलकर यांच्या कर्याचीही दखल घेण्यात आली. विनोद शेलकर हे गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण पश्चिम येथे कलाशिक्षक असून, आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन, एनजीओ च्या माध्यमातून गरजू, वंचित व्यक्तींसाठी त्यांचे काम सुरू असते.\nभाजपा शिक्षक आघाडीचे ते कोकण विभाग कार्यवाह असून शिक्षकांचे विविध प्रश्न सातत्याने मांडण्यासाठी, सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. श्री संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल विविध समाज मंडळे, सामाजिक संस्था नेहमी घेत असतात.\nत्यामुळे आतापर्यंत ७५ च्या वर नॅशनल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य बलजित कौर मारवाह, पर्यवेक्षक अर्चना तिवारी, समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे. |
Electricity Bill : महिन्याच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे. नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक नागरिकांना भरमसाठ विजेचं बिल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. हजार, बाराशे नव्हे तर तब्बल 3114154015 रुपये बिल आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिन्याच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचीवीज कंपनी 'जयपुर विद्युत वितरण निगम लिमिटेड' (jvvnl) ने अलवरमधील एका कंपनीला हजारो, लाखो नाही तर तब्बल अब्जावधीचं विजेचं बिल पाठवलं आहे. नेहमी येणाऱ्या 10 ते 20 हजार रुपये बिलाच्या जागी 3114154015 हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकाला मोठा धक्काच बसला. एवढंच नाही तर 25 जानेवारीपर्यंत हे वीज बिल भरलं नाही तर पावणे सहा कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचंही सांगितलं आहे. भिवाडी येथील खुशखेडा इंडस्ट्रीअल एरियातील डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीचं बिल 3 अब्ज 11 कोटी 41 लाख 54 हजार 15 रुपये आलं आहे. बिलाचा आकडा पाहून मालक अनिता शर्मांना धक्काच बसला. अनिता यांनी त्वरीत वीज वितरण कंपनीशी संपर्क केला. संगणकामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं शर्मा यांना सांगण्यात आलं. जेव्हीव्हीएनएलच्या वेबसाईटवरून पुन्हा एकदा नवीन बिल मागवण्यात आलं. नव्या बिलात ही रक्कम 226134 रुपये झाली. अनिता शर्मा यांनी हे बिल देखील चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्याचं बिल हे साधारण 22 हजारच्या जवळपास असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीत वीज कंपनीच्या प्रणालीत असलेल्या त्रुटी, त्यात तब्बल दहापट जास्त बिल आकारण्यात आलेलं पाहून वीज कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. सात लाख किंमत असलेल्या फ्लॅटचं बिल तब्बल 77 लाख आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेच्या मीटरचं रीडिंग दाखल केलेल्या दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमकडून (डीएचबीवीएन) ग्राहकांना विजेचं बिल पाठवलं जात आहे. त्याचवेळी हा अजब प्रकार समोर आला आहे. सेक्टर 57 मधील हाऊसिंग बोर्डाच्या तब्बल 200 चौरस फूट असलेल्या ईडब्ल्यूएक फ्लॅटचं दोन महिन्याचं विजेचं बिल तब्बल 77,31 लाख रुपये आलं आहे. हाऊसिंग बोर्डाच्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील घर क्रमांक 373 च्या तळ मजल्यावर गोपाळ राम राहतात. त्यांना तब्बल 77.31 लाख रुपये विजेचं बिल आलं आहे. 4 जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे 2.24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. याआधीही चुकीचं वीज बिल आलं असल्याची माहिती समोर आली आहे. गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं होतं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही असं रामू राठोड यांनी म्हटलं होतं. |
11 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. विधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला. विरोधी आमदार आज वेलमध्ये उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स्थगन प्रस्ताव घेऊ शकत नाही असं सांगत अध्यक्षांनी फेटाळला. तर मुख्यमंत्र्यांनीही आज विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही 2008 ला संपूर्ण विदर्भाला जितके पैसे दिले तेवढे आम्ही फक्त बुलढाण्याला दिले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाल पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तुमचं पाप आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आणि बोंड अळीच्या प्रश्नावर योग्य वेळी उत्तर देऊ असंही ते म्हणाले. त्यामुळे एकंदरच विधानसभेतील वातावरण चांगलच तापलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे, असं मत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत, अशी टीका देखील त्यांनी केली. पुढे मंत्री ठाकूर म्हणाल्या की, नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार विरोधी पक्षाला नाही. जर नैतिकता शिल्लक असेल तर शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्या मुलाला वाचवणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागा. मध्यप्रदेश मध्ये आयएसआय (ISI) ला मदत करणाऱ्या संघ कार्यकर्त्याचं पुढे काय झालं, इक्बाल मिर्ची शी संबंधित कंपन्यांकडून भाजपने 20 कोटी देणगी घेतल्याच्या बातम्या आल्या त्याबद्दल काय भूमिका आहे? या वर ही विरोधी पक्षाने बोललं पाहिजे. दहशतवाद्यांशी संबंध कुणाचा आहे हे सर्वांना माहितीय. मालेगाव-नांदेड अजून लोकं विसरली नाहीत, असं देखील मंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. |
तिची जर्मनी सोडण्याची कथा फारच त्रासदायक आहे. अॅडॉल्फ हिटलर सत्तेवर आला तेव्हा लिझ रसायनशास्त्र संस्थेची कार्यवाहक संचालक होती. तिचे ऑस्ट्रियाचे नागरिकत्व असूनही, तिचे पुतणे ऑट्टो फ्रेश, फ्रिट्ज हॅबर, लेझ सिझलार्ड आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींसह इतर सर्व ज्यू शास्त्रज्ञांना बरखास्त करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यापैकी बहुतेकजण जर्मनीमधून स्थलांतरित झाले. तिला काम सोडुन जाता येईना. वेळ तर अशी होती कि जीव कधीही जाऊ शकत होता. शेवटी लिझ हॉलंडमध्ये पळून गेली आणि शेवटी स्वीडनला आली. १ जुलै १९३८ रोजी, ऑट्टो हॅन यांच्या मदतीने आणि डच भौतिकशास्त्रज्ञ डर्क कोस्टर आणि फॉकर यांच्या मदतीने लीझने नेदरलँड्समध्ये पलायन केले. डच सीमेवर आश्रयाने तिला प्रवास करण्यास भाग पाडले गेले, जेथे कोस्टरने जर्मन इमिग्रेशन अधिकाऱ्यांना राजी केले की तिला नेदरलँड्सला जाण्याची परवानगी द्यावी. आपल्या मालमत्तेविना ती सुरक्षितस्थळी पोचली. तेव्हा तिच्या पर्समध्ये १० शिल्लिंग होते जेव्हा तिने जर्मनी कायमचे सोडले. ती निघण्यापूर्वी ऑट्टो हॅनने तिला आपल्या आईकडून वारसा मिळालेली हिराची अंगठी दिली होतीः आवश्यक असल्यास सीमा रक्षकांना लाच देण्यासाठी हे वापरले जायचे. त्याची गरजच नाही पडली. जर्मनी सोडुन स्टॉकहोमध्ये आल्यावरची गोष्ट तुम्हाला माहितच आहे. हॅन्न सोबत काम करताना तिने निल्स बोरबरोबर काम केलं होतं. न्युक्लिअर फिशनमध्ये अल्बुचं म्हणजे आईनस्टाईनच E=MC2 सुत्र फार उपयोगी पढल्याचं ती खुल्या मनानं कबुल करते. फ्रिसच आणि रुडॉल्फ पियर्स यांनी फ्रिसच-पियर्स संकल्पना मांडली. ज्यामध्ये प्रथम अणूचा स्फोट कसा होतो हे स्पष्ट केले गेले आणि यामुळेच मॅनहॅटन प्रकल्पाची १९४२ मध्ये स्थापना झाली. लॉटर अॅलामोस येथील प्रकल्पात काम करण्याची ऑफर मीटनर यांनी नाकारली आणि "मला बॉम्बबरोबर काही देणेघेणे नाही!" असे घोषित केले. हा खरा मानवतावादी स्टैंड म्हणता येईल. हा स्टैंड घेणारी ती एकटी नव्हतीच. आईनस्टाईनही सोबत होता. हिरोशिमा तिच्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. बॉम्बचा शोध लागल्याबद्दल तिला वाईट वाटले. अर्थातच ती घटनाच जग हादरवणारी होती. स्वीडनमध्ये लिझ प्रथम सिगबहॅनच्या नोबेल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्समध्ये सक्रिय झाली आणि स्वीडिश डिफेन्स रिसर्च आस्थापना (एफओए) आणि स्टॉकहोममधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे, जिथे तिची प्रयोगशाळा होती आणि स्विडनच्या पहिल्या अणुभट्ट्यावर संशोधन करण्यात भाग घेतला. १९४७ मध्ये, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ स्टॉकहोम येथे प्रोफेसर म्हणुन काम केलं. १९६८ मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी तिचा आणि हॅनचा मृत्यू काही महिन्यांतच झाला. दोघांची मैत्री (?) शेवटपर्यंत टिकली. पण एक गोष्ट इतिहासात कायमची ठळक झाली. ती म्हणजे जगात धार्मिक अल्पसंख्यांक आणि स्त्री असणं खुप महागड्या गोष्टी आहेत. त्यातला धर्म जीव घेऊन मारुन टाकतो, पण त्यातुन पळता तरी आलं तिला. पण बाई असणं खुप महागात पडलं लिझला. सख्या (?) मित्राकडुनच दगा मिळाला. असंच तर होत आलंय, सतत श्रेय लाटुन घेण्यात आलं बाईचं. फार कमी लोकांना ते देणं जमतं. अल्बर्ट आईनस्टाईन ने प्रयत्न केला मिलिव्हाला न्याय देण्याचा. नोबल समितिला मात्र ते जमलं नाही लिझला न्याय देणं. अडगळीतली नायिका अडगळीत फेकण्यात नोबल समितीनं फार मोठ्ठ योगदान दिलंय. आजच्या काळात लिझ असती तरी लाखो हॅशटॅग चालवुनही लिझला न्याय मिळाला असता की नाही, माहित नाही. |
पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. दोषी असणार्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी इंगळे यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर केवळ विकासावर भर देण्यात आला. विकासाबरोबर समाजाला नीतीमत्तेचे शिक्षण दिले गेले नाही. हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 'कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून मिळालेले शासकीय अनुदान खर्च करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र महापालिकेने नियमबाह्य पद्धतीने प्रशासनाकडून औषध खरेदी करून त्यात मोठा अपव्यवहार केला आहे', हप्तेवसुलीसाठी धर्मांधांच्या टोळीने हवेत तलवारी फिरवून कोंढवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलग २ दिवस चालू असलेल्या या प्रकाराचा स्थानिक नागरिकांनीच प्रतिकार करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन मासांपासून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला एक जण बनावट वैद्य बनून रुग्णालयात उघडपणे वावरत असतांना आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी यांच्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात येत नाही ? यातून रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो ! |
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत लॉकडाऊन कालावधीत शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी कर भरल्याची पावती आणि लसीकरणाचे पत्र जोडणे बंधनकारक आहे. याबाबतच्या उपसूचनेला महासभेने मान्यता दिली. शहरातील 18 हजार फेरीवाल्यांनाही मदत देण्याची उपसूचना महासभेने दिली आहे. या योजनेसाठी 15 मे पासून अर्ज भरता येणार असून महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज स्वीकृत केले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत लॉकडाऊन कालावधीत शहरातील परवानाधारक रिक्षाचालक, पथविक्रेते, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन चालक, जिम ट्रेनर, लोक कलावंत आणि बँड पथक यांना तीन हजार रुपयांची एकदाच दिली जाणारी मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शहरातील 18 हजार फेरीवाल्यांनाही मदत देण्याची उपसूचना महासभेने दिली आहे. तसेच नाभिक दुकानातील पाच कामगारांऐवजी दोनच कामगारांना अर्थसहाय्य करण्याचा बदल करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 मे नंतर नागरी सुविधा केंद्रामध्ये अर्ज करता येणार आहेत. यासाठी 20 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध लेखाशीर्षावरील तरतूद वळविण्यास शुक्रवारी (दि. 30 एप्रिल) झालेल्या सभेत उपसुचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. सर्वांना मदत मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील नोंदणीची माहिती द्यावी लागणार आहे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 'डीबीटी' मार्फत थेट देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 37 घोषित आणि 34 अघोषित अशा 71 झोपडपट्या आहेत. त्यात 49 हजार 83 झोपड्या असून सुमारे दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. झोपडीधारकांनाही महापालिका एकावेळी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. लॉकडाऊनचा वाढीव कालावधी विचारात घेता पिंपरी- चिंचवड शहरातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना तातडीने लाभ होण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेतील महापालिकेने शिफारस केलेल्या ( महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले एलओआर (लेटर ऑफ रिकमंडशन') व नोंदणीकृत अशा सर्व फेरीवाल्यांना मदत करण्यात येणार आहे. अंदाजे 18 हजार फेरीवाल्यांच्या व्यवसायाची यापूर्वीच तपासणी करण्यात आलेली असल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र अर्ज मागविण्याऐवजी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडील सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट मदत करण्याची उपसूचना केली. या योजनेमध्ये महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले एलओआर व नोंदणीकृत लाभार्थ्यांव्यतिरिक्त शहरातील इतर लाभार्थ्यांना भाग घेण्यासाठी महापालिकेच्या इतर योजनेप्रमाणेच नागरी सुविधा केंद्रामध्ये अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या शिफारशीने हे अर्ज नागरवस्ती विभागाकडे सादर केले जाणार आहेत. या योजनेचे अर्ज 15 मे 2021 नंतर किंवा शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन संपल्यानंतरच्या लगतच्या दिवसांपासून महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात स्वीकृत केले जाणार आहेत. यासाठी दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन हजार, आठवी ते दहावी तीन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याच्या लेखाशीर्षावरील, बेरोजगारांसाठी मेळावा, एड्स बाधित व्यक्तींना मोफत पास, जेष्ठ नागरिक धोरण व उपक्रम, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, दारिद्र्य रेषेखालील गुणवंत विद्यार्थी, इतर योजना कार्यक्रम, शहीद जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, लाईट हाऊस उपक्रम, झोपडपट्टीतील महिलांना चादर, कंबल, पंजा, बेडशीट, संसारोपयोगी साहित्य देणे या लेखाशीर्षावरील तरतुदीत घट करण्यात आली आहे. कोविड दिलासा अर्थसहाय्य योजना या लेखाशीर्षावर 14 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद वर्ग केली असून, यासाठी एकूण 20 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर म्हणाले, "या योजनेसाठी सर्वांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. शहरातील फेरीवाल्यांनाही मदत केली जाणार आहे. फेरीवाल्यांची महापालिकेकडे सर्व माहिती आहे. शहरातील रहिवाशी आहे की नाही यासाठी अर्ज भरून द्यावा लागतो. यादी तयार आहे. पण, शहरातील रहिवाशी असल्याचे खात्रीने सांगू शकत नाही. महासभेने दोन ते तीन उपसूचना दिल्या आहेत. कचरावेचक, घोषित, अघोषित झोपदीडीधारकांनाही मदत देण्याची उपसूचना दिली आहे. अंतिम ठराव आल्यानंतर त्याचे नियोजन करता येईल. 15 मे नंतर अर्ज भरून घेतले जाणार आहेत". एलओआर म्हणजे काय ? मागच्या लॉकडाऊनवेळी केंद्र सरकारकडून फेरीवाल्यांना आर्थिक मदत देण्याची योजना आली होती. महापालिकेकडे नोंदणीकृत, परवाना धारक असलेल्या फेरीवाल्यांना लाभ देण्याचे सांगितले होते. व्यवसाय करतोय पण परवाना, नोंदणी नाही अशांच्या बाबतीत महापालिकेने शिफारस करायची होती. त्याला एलओआर ('लेटर ऑफ रिकमंडशन') म्हटले जाते. |
ताज्या भाजलेले वॅट्ससह मजबूत सुगंधी चहाच्या तुलनेत दिवसाची चांगली सुरुवात नाही. आणि ताजा खोडरहित वेफर्स सहजपणे वायफळ बडबड केल्याशिवाय लोखंडी असतात. पण या स्वयंपाक सहाय्यकाचा फायदा जास्तीतजास्त असल्याने, 5-इंचा -1 मधील बदलण्यायोग्य पॅनेल्ससह बहुउद्देशीय वफ़ेल लोह खरेदी करण्याबद्दल विचार करणे शहाणपणाचे ठरते. प्रथम, काढता येण्याजोग्या पॅनेलसह वॅफर काय आहे यावर जवळून पहा. या सुबक कॉम्पॅक्ट साधनास एक मिनी बेकरी असे नाव दिले जाऊ शकते, कारण त्याच्या मदतीने आपण केवळ वाफल्स तयार करू शकत नाही परंतु कुकीज "मूर्ख" , सँडविच, डोनट आणि पॅनकेक्स संरचनात्मकपणे, हे वायफळ लोहा दोन गरम पृष्ठभाग दर्शवितो, एकमेकांच्या विरोधात असलेल्या लूपच्या साहाय्याने, त्यातील प्रत्येक बदलण्यायोग्य फॉर्म निश्चित करण्यासाठी एक यंत्रणा आहे. सहसा विक्रीवर आपण तीन किंवा चार काढता येणार्या पटल ("सुप्रा", "टेफल") सह वायफळ बडबड किंवा पाय पूठ करणारे लाकूड लोखंडी कडे शोधू शकता परंतु पाच मॉडेल आहेत. निवडताना, आपण खालील तपशीलांवर लक्ष देणे आवश्यक आहेः ऑपरेटिंग मोडची प्रकाश ओळख, गैर स्टिक कोटिंगची गुणवत्ता, अवरुद्ध करण्याची यंत्रणा अस्तित्वात असणे आणि ओव्हरहाटिंगसाठी संरक्षण तसेच हाताळणीतील सामग्री. आपल्याकडे एखादे पर्याय असल्यास, आपण स्टेनलेस स्टीलच्या प्रकरणात डिव्हाइसला प्राधान्य दिले पाहिजे, कारण त्यात जास्त ताकद आहे आणि उच्च तापमानांमुळे होणा-या संसर्गापासून घाबरत नाही. तीन काढता येण्याजोग्या पॅनल्ससह वायफळ बडबड करणाऱ्या निर्मात्यांपेक्षा वेगळे, जे कोणत्याही घरगुती उपकरण स्टोअरमध्ये खरेदी करता येऊ शकते, केवळ 5-मध्ये -1 उपकरणे ऑनलाइन स्टोअर्समध्येच उपलब्ध आहेत. म्हणून जेव्हा ते विकत घेतले जातात, काही निराशाजनक आणि अगदी अप्रिय आश्चर्यांसाठी तयार रहा. त्यामुळे, तयार होणारी पहिली गोष्ट बर्यापैकी उच्च किंमत आहे. 5-इंच -1 यंत्राला 40-150 डॉलर्सपेक्षा कमी खर्च येईल, जो अज्ञात निर्मात्याच्या उपकरणासाठी लक्षणीय आहे. दुसरे म्हणजे, अशा साधनांची लहान शक्ती बेकिंग वेफर्स आणि शेंगदाणे वैश्विक विस्तारास परवानगी देणार नाही, कारण जाहिरातदारांनी वचन दिले आहे. तिसर्यांदा, अशा वायफळ बडबड इस्त्री त्वरीत पुरेसे अपयशी सुरू. उदाहरणार्थ, वायफळ मेकर टर्बो टीव्ही 1150-डब्ल्यू मध्ये, सर्वात सामान्य अपयश संकेत दिवा अयशस्वी आहे. काय लक्षात घेण्याजोगा आहे, सेवा केंद्राच्या मदतीने घरमालकांच्या मदतीने हे विघटन काढून टाकणे सोपे आहे. |
एका महिलेला बेकायदा डांबल्याबद्दल, हायकोर्टाने, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या तिघा अधिका-यांना अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम तक्रारदार महिलेला द्यावी असेही न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश ए. व्ही. पोतदार ह्यांनी आदेशात म्हटले आहे. मटा ऑनलाइन वृत्त। मुंबईएका महिलेला बेकायदा डांबल्याबद्दल, हायकोर्टाने, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या तिघा अधिका-यांना अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम तक्रारदार महिलेला द्यावी असेही न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश ए. व्ही. पोतदार ह्यांनी आदेशात म्हटले आहे. तक्रादार महिला, वीणा सिप्पी आणि त्यांच्या शेजारी रहाणा-या आरती छाब्रीया ह्यांच्यात वाद झाला. दोघींनी एकमेकाविरूद्ध तक्रारी नोंदवल्या. दुस-या दिवशी, सिप्पी, गावदेवी पोलीस स्टेशनला, आपल्या तक्रारीचे काय झाले हे विचारण्यासाठी गेल्या असता, पोलिसांनी, त्यांना अटक करून आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिलांच्या कोठडीत टाकले. दुस-या दिवशी दंडाधिका-यांनी, त्यांना सातशे रूपयांच्या जामीनावर सोडले. सिप्पी ह्यांनी, आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप पोलिसांनी ठेवला. या कृतीविरुद्ध सिप्पी ह्यांनी हायकोर्टात दाद मागितली. त्यांना युक्तीवाद केला की, आपल्याला अटक केली आहे हे आपल्या, ८० वर्षांच्या आईलाही कळवू दिले नाही. शिवाय आपल्याविरुद्ध अटकेचे आदेशही नव्हते. अरुंद कोठडीत, चाळीस महिला आरोपींबरोबर आपल्याला ठेवले. हायकोर्टाने निर्णय दिला की, पोलिसांच्या ह्या कृतीमुळे सिप्पी ह्यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल, अडीच लाख रूपये नुकसानभरपाई आणि पंचवीस हजर रूपये वकीलाची फी त्यांना द्यावी. सिप्पी ह्यांनी, स्वतःची बाजू स्वतःच मांडली. सिप्पी ह्यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांबाबत, पोलीस स्वतः त्यांना जामीन देऊ शकत असताना, पोलिसांनी तसे केले नाही ह्याचीही कोर्टाने दखल घेतली. शिवाय तिच्या अटक वॉरंटमध्ये, तिला कोठडीत का धाडत आहोत हेही पोलिसांनी नमुद केले नाही. सहाय्यक आयुक्त श्याम चव्हाण, सिनियर इन्स्पेक्टर नारायण डुंबरे आणि सबइन्स्पेक्टर एम. बी. वाघमारे ह्यांच्याकडून राज्य सरकारने ही रक्कम वसूल करावी आणि आदेशाची प्रत, पोलीस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ह्यांना पुढील कारवाईसाठी धाडावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. |
जनाबाई दाभाडे ही जुन्नरमधल्या पुताची वाडी गावातली बारावीत शिकणारी मुलगी. जुन्नरमधल्या अतिदुर्गम भागात हे गाव आहे. या गावात प्रामुख्यानं महादेव कोळी राहतात. मोटारसायकल-एसटीने वर घाटातून एक-दीड तासाचा प्रवास केल्यानंतर हे गाव लागतं. आजूबाजूला उजाड-उघडे बोडके डोंगर. आता जानेवारीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिलाय. गावात पोहोचून जनाबाईच्या घरी गेलं तर जनाबाई गावातल्या विहीरीवर पाणी आणायला गेली होती. तिची वाट पाहत थांबलो, तोवर तिच्या आईनं बिनदुधाचा काळा चहा करुन दिला. जनाबाई तोवर विहीरीवरुन आली. दररोज विहीरीवरुन पाणी आणणं हा तिच्या दिनक्रमातला महत्वाचा भाग. मग ती सांगू लागली, "आज रविवार म्हणून घरी आले, नायतर मी शासकीय हॉस्टेलमध्ये राहते, कधी तरी सुट्टीला घरी येते. एसटी आसली तरी रोज जाऊन-येऊन कॉलेज करणं शक्य नाय. कारण एस.टी. साठी सकाळी सहाला घराबाहेर पडायला लागतं. थांब्यावर जाऊन उभं रहाय लागतं. एवढ्या सकाळी अंधार आसतो, तं बिबट्यांची भीती पण वाटती." जनाबाईनं सांगितलेली ही परिस्थिती जुन्नर भागातल्या फोफसंडी, मांडवे, मुथाळणे, पिपंळगाव-जोगा, चिल्हेवाडी, उदापूर, मांजारणे अशा अनेक गावांमधल्या मुलींची आहे. इथल्या भागातल्या लोकांमध्ये बिबट्यांची भीती मोठ्या प्रमाणात आहे. दिवसाढवळ्याही घरांमध्ये - शेतांमध्ये बिबट्या येण्याच्या घटना इथं जवळपास दररोज घडतात. "बिबट्यांमुळं रात्री लघवी- संडासला घराबाहेर जाण्याचीच भीती वाटते. मोठ्या माणसांना बरोबर घेऊन जावं लागतं." जयश्री भगत या विद्यार्थिनीनं सांगितलं. मांडवे - पिंपळगाव जोगा अशी गावं लांब दऱ्या खोऱ्यांमध्ये वसलेली आहेत, आजूबाजूला मोठं जंगल. त्यानंतर डोंगर आणि घाट. त्यामुळे या गावांमधून निघून दररोज पाच - सात किलोमीटर येणं आणि परत तेवढंच अंतर चालणं, अशी बारा-चौदा किलोमीटरची पायी रपेट अनेक मुला-मुलींना करावी लागते. आजूबाजूचा रस्ता डोंगरदऱ्या आणि जंगलांचा असल्यामुळे एस.टी. मोटारसायकल असा काहीही पर्याय तिथं वापरला जाऊ शकत नाही. इथल्या विद्यार्थिंनींसाठी म्हणूनच शाळा शिकणं सोपं नाही. जुन्नरमधल्या ओतूर इथल्या शासकीय वसतिगृहात आजूबाजूच्या अतिदुर्गम गावांमधून आलेल्या मुली राहतात. इथं राहून त्या शिक्षण घेतात. या मुलीसांठी शिक्षण घेणंं फार आव्हानात्मक आहे. इथल्या मुथाळणे शासकीय आश्रमशाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मागील अकरा वर्षांपासून काम करणाऱ्या अनिल साबळेंनी सांगितलं, "आमच्या शाळेतली जयश्री भगत ही विद्यार्थिनी प्रतिकूल परिस्थितीतून शिकून ७४ टक्के मार्क्स मिळवून बारावीला पहिली आली. त्यामुळे तिचा सत्कार करण्यासाठी मी व काही शिक्षक तिच्या गावाी घरी गेलो होतो पण निकालाच्या दिवशीही ती घरी नव्हती. शेतात मजुरीसाठी गेली होती. तिला निकालाबद्दल माहितीसुद्धा नव्हती." जयश्री भगत आता एफ.वाय.बी.कॉमला आहे. तिच्या घरी आणखी दोन बहिणी आणि एक भाऊ, आई-वडील व आजी-आजोबा, असे एकूण ८ जण आहेत. थोड्याफार शेतजमिनीत फक्त धान म्हणजे तांदूळ पिकतो. तोही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून. दुर्गम डोंगरातल्या तिच्या फोफसंडी गावात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट आहे. जयश्रीला दहावीपर्यंतचं शिक्षण ओतूरला जाऊन येऊन केलं. तेव्हा सकाळी ८ वाजता शाळेत पोहोचण्यासाठी तिला ६ वाजता बस पकडावी लागायची. ६ वाजता एस.टी. त बसायचं म्हणजे पहाटे चार-पाचला उठून स्वयंपाकपाणी करणं. संध्याकाळी पुन्हा ६ ची एस.टी पकडून आठ वाजता घरी यायचं. त्यानंतर घरातलं काम. पावसाळा-हिवाळ्यात धुकं, पावसामुळे बरेचदा एस.टी. रात्री साडे नऊ-दहालाही पोहोचते. अडचणी इथंच संपत नाहीत, तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उन्हाळी सुट्टी-हिवाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत जयश्री मजुरीने काम करायला जाते. बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतातले कांदे खुरपणं, टोमॅटो, मिरच्या, काकडी तोडणं, अशी कामं ती करते. तिनं सांगितलं, "आम्ही सकाळी ६ वाजता एस.टी. नाय तर पिकअपनं बनकर फाट्याला जातो. आठच्या आसपास तिथं जाऊन उभं राहतो. सगळी मजुरीला जाणारी माणसं तिथंच गोळा होतात. मग बागायतीवालं ज्याचं जे काम आहे ते सांगून पैशै ठरवून आम्हाला गाडीतून घेऊन जातात शेतात कामाला," म्हणत ती पुढं सांगते, "सीझन आसंल तशी मजुरी मिळती. कधी दिवसाला ३००-३५० तर कधी २५० पण मिळत्यात. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करायला लागतं." थोड्याफार फरकाने जयश्रीची कहाणी इथल्या प्रत्येक आदिवासी मुलीची कहाणी आहे. इथल्या सगळ्या मुली अगदी सहाव्या-सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीही उन्हाळी-हिवाळी सुट्टीतह साखरझोपेतून उठून बनकर फाट्यावर (तिथला मजूर अड्डा) जाऊन उभ्या राहतात. कारण कुणी तरी आपल्याला मजुरीनं शेतात काम करायला घेऊन जाईल आणि त्या चार पैशातून वर्षभराचा शिक्षणाचा प्रवासाचा खर्च भागवता येईल, घरात चार पैसे कमवून दिले, तर घरातले लोकही शिक्षणाला विरोध करणार नाहीत, हा विचारही त्यामागे असतो. ज्या बरी परिस्थिती असलेल्या मुली (अपवादानं) मजुरीला जात नाहीत, त्यांनाही वेगळा काही तरी कामधंदा करावाच लागतो. आशा नारायण ठोंगे ही मुथाळणे गावातली मुलगी. तिचे वडील नारायण ठोंगे यांनी त्यांच्याकडे असलेल्या जमिनीतली पाच एकर जमीन आश्रमशाळेसाठी दिली. त्याचा मोबदला अनेक वर्षांनी मिळाला. तोही बाजारभावापेक्षा कमी दर. सरकारकडून एकूण जमिनीचा भाव मिळाला १४ लाख ९० हजार. त्यातून दोन मुलींची लग्न केली. एका मुलीला ते नर्सिंगची शिक्षण देत आहेत. सगळ्यात धाकटी आशा बारावीला आहे. मुलगा अहमदनगरच्या अकोले तालुक्यात शिकतो. त्याच्या संस्थेला वर्षाकाठी एक पोतं तांदूळ, एक पोतं गहू आणि वर्षाला पाच हजार रुपये पाठवावे लागतात. नारायण ठोंगे सांगतात, "काय करणार, आश्रमशाळेसाठी या गावातलं कुणीच जमीन द्यायला तयार नव्हतं, आमच्या नशिबांन आमच्याकडं थोडी फार जमीन. शाळेसाठी न द्यावी तर गावात पोरं शिकतीन कशी? म्हणून दिली जमीन. आता उरलेल्या थोड्या जमिनीत तांदूळ, नाचणी न जरा भुईमूग होतो. यंदा पाऊस ना, त्यामुळं तीन पोती बी तांदूळ नाय झाला. म्हस याली म्हणून दुधावं भागतंय." नारायण ठोेंगेंची मुलगी सकाळी शाळेसाठी ६ वाजता घरातून निघते. जाताना पाच लिटर म्हशीचं दूध सोबत घेऊन जाते. ओतूर स्टॅंडला उतरलं की आधी स्टॅंडजवळच्या हॉटेलवर दूध घालायचं नि मग शाळेला असा तिचा दिनक्रम. म्हशीच्या रोजचं दूध विकून जे पैसे येतात त्यात पाच माणसांच्या कुटूंबांचा-तीन जणांच्या खर्च कसाबसा भागवला जातो. दुसरा रोजगार किंवा उद्योगधंद्याच्या संधी या भागात नाहीत. डोंगराळ भागातल्या महादेव कोळींच्या शेतात फक्त धान पिकतं. त्यावर गुजराण करणं इथल्या आदिवासींना अशक्य आहे. तुंटपुंज्या धानाच्या शेतीव्यतिरिक्त या भागात काहीही रोजगार-उद्योगधंदा नसल्यानं सातवी-आठवीतल्या बऱ्याच मुलींना मधून शाळा सोडून द्यावी लागते. शाळा सोडून मग या मुलींना मजुरी करणं, कातकरी-ठाकर मुलींना ३००० रुपये सालाने (वर्षभराच्या श्रमाचा मोबदला) मेंढपाळ म्हणून काम करणं एवढंच हाती उरतं. अनिल साबळे, जे या शासकीय आश्रमशाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करतात, यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये सोनम वाघ या १० वर्षीय कातकरी मुलीची मेंढपाळ कामातून सुटका करुन तिला शासकीय आश्रमशाळेत दाखल केलं. साबळे सांगतात, "या भागातल्या महादेव कोळींकडे थोडीशी तरी धानाची शेती आहे, पण ठाकर आणि कातकरी पूर्णपणे स्थलांतरित आयुष्य जगतात. शेती व बाकी कामांसाठी लागणारी कौशल्यं त्यांच्यामध्ये विकसित न केल्याने वीटभट्टीवर मजुरी, भातशेती मजुरीनं करणं, चिंचा-आंबे पाडून देणं, हेच जगण्याचं साधन." "त्यातही मजुरी पुरेशी दिली जात नाही. अनेक आदिवासींना कधी थोडे तांदूळ, शंभर एक रुपये देऊन भरपूर काम करुन घेतलं जातं," म्हणत ते पुढं सांगतात, "कातकरी-ठाकर आदिवासींमध्ये एकूणच दारिद्र्य-सर्वच प्रकारची अभावग्रस्तता यामुळं त्यांचं राहणीमानही वाईट दर्जाचं असतं. अस्वच्छता, लोंकाकडून वाट्याला येणारी उपेक्षा, गरिबी या सगळ्यामुळे कातकरी-ठाकर समाजात व्यसनाधीनतेचं, दारुचं प्रमाण जास्त आहे. सतत दारुच्या अंमलाखाली असणारे पालक आपल्या मुलांचं पालनपोषण नीट करु शकत नाहीत, म्हणूनही ते आपल्या मुला-मुलींना मेंढपाळांकडे वर्षभर काम करण्यासाठी दोन-तीन हजार रुपये मोबदल्यात पाठवून देतात आणि त्यांचं शिक्षण सुटतं." एकंदर या परिस्थितीबद्दल घोडेगाव एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं, "या भागातील आश्रमशाळांमध्ये जवळपास ६ हजार विद्यार्थी शिकतात. शालाबाह्य मुलांचं प्रमाण शून्यावर आलेलं आहे. राज्यभरात ५०२ तर पुणे जिल्ह्यात घोडेगाव प्रकल्पांअतर्गत एकूण २३ आश्रमशाळा आहेत. चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पटसंख्या वाढवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. मुलींची गैरहजेरी कमी करण्यासाठी येत्या काळात मासिक पाळीदरम्यान मुलींच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आश्रमशाळांमध्ये मेनस्ट्रुअल हेल्थ रुम्स, हॉट वॉटर बॅग्ज अशा काही सुविधा करणार आहोत, त्यासाठी काही निधीही मंजूर झाला आहे." सातवी-आठवीनंतरच्या अनेक मुली घरच्या गरिबीमुळे शाळा सोडतात, यावर धोरणात्मकदृष्ट्या उपाययोजनांबाबत काय करता येऊ शकतं? असं विचारलं असता, प्रसाद म्हणाले, "आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या काही लोकांना सोबत घेऊन एक मोहीम राबवली होती. मुलींच्या दीर्घकाळ अनुपस्थितीबाबत एक अभ्यासही करण्यात आला होता, तसंच पालकांचं समुपदेशनही केलं होतं. पण या मागचं मुख्य कारण आदिवासींची सामाजिक-आर्थिक परिस्थिती आहे, ती सातत्याने प्रयत्न करुन सुधारता येईल." 'प्रथम' या संस्थेनं २०१८ मध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाच्या अवस्थेबाबत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातल्या १५ ते १६ वयोगटातल्या शालाबाह्य मुलींचं प्रमाण ५.१ टक्के आहे, ही चिंतित करणारी बाब आहे. गरीबी, मासिक पाळीदरम्यान शौचालयं - पाण्याचा - सोयी - सुविधांचा अभाव अशा अनेक कारणांनी सातवी - आठवीनंतरच्या मुलींचं शिक्षण सुटतं. प्रथमच्याच अहवालानुसार ग्रामीण भागांतील शासकीय शाळांमध्ये वापरण्यायोग्य शौैचालयांचं प्रमाण ६६ टक्के आहे. या सर्व समस्या धोरणात्मक पातळीवर बदल, नवीन शैक्षणिक मॉडेल्सबाबत संशोधन, प्रयोग करुनच सोडवता येतील. जुन्नरमधल्या अनेक गावांमधल्या या आदिवासी मुली या बिबट्यांचं भय, गरीबी, दुर्गम भागातला प्रवास, घरातली कामं, मजुरीला जाऊन पैसै कमावणं अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत शिकत आहेत. आदिवासी मुलींमध्ये शिकण्याची जिद्द, विजीगीषू वृत्ती, अपार कष्टाची तयारी दिसते. राजकीय इच्छाशक्ती, धोरणात्मक पातळीवरचे बदलच त्यांचं शिकून आत्मर्निभर होण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात. |
इनकम टॅक्सची नवी वेबसाईट आणि फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड । कसा अर्ज कराल? मुंबई, १२ जून । जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे. विशेष म्हणजे येथे पॅन कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची किंवा कागदपत्र देण्याची गरज नाही. Instant Pan Card सुविधेमुळे विना वाट पाहता तुम्ही तात्काळ तुमची अडचण सोडवू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करत पॅन नंबर तयार होतो. हे पॅन कार्ड इतर सामान्य पॅन कार्डप्रमाणेच वैध असतं. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. ऑनलाईननंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रत घरीही मागवता येते. पॅन कार्डसाठी कसा अर्ज कराल? 1. Incometax. gov. in वर जा. 2. होम पेजवर Our Services या पर्यायात जाऊन See More वर क्लिक करा. 3. Instant E-Pan पर्यायावर Instant Pan Card साठी अर्ज करा. 4. नवं पॅन कार्ड बनवण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा. 5. त्यानंतर आधार नंबर टाकून Continue वर क्लिक करा. 6. यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि आधारशी संलग्न फोनवर ओटीपी येईल. 7. यानंतर हा ओटीपी टाकून कन्फर्म करा. 8. कन्फर्म केल्यानंतर वेबसाइटवर आधार कार्डशी संबंधित माहिती दिसेल. 9. यानंतर आयडी तपासून ओके करा. पॅन कार्ड डाऊनलोड कसा करणार? 1. यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन पुन्हा Our Services पर्यायावर See More येथे क्लिक करा. 2. Instant E-Pan वर क्लिक करा आणि चेक स्टेट्स लिंकवर क्लिक करा. 3. यानंतर आधार नंबर टाका. 4. ओटीपी टाका. 4. तुम्हाला तुमचं पॅन कार्ड दिसेल, ते डाऊनलोड करा. 5. हे ईपॅन डाऊनलोड करुन प्रत्येक ठिकाणी वापरता येतं. News Title: Know steps how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax department website news updates. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे सर्वात मोठे नेते असल्याचं सांगितलं, पण त्याचवेळी भाजपवर त्यांनी आरोप केला आहे की त्यांना देशाचे पंतप्रधान राहू न देता त्यांना पक्षाचे नेते बनवले आहे. याशिवाय संजय राऊत विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात भाजप विरुद्ध शिवसेना (BJP vs Shivsena) यांच्यातील वाढत्या तणावावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आज सत्तेच्या महाभारतात हे दोघे कौरवांप्रमाणे एकमेकांशी लढत आहेत. आणि पांडव समोरासमोर उभे आहेत. त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढचे लक्ष्य शरद पवार आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'लोकशाहीत राज्य, देश आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मात्र दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षांपासून तसे होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक जन्मोजन्माचे शत्रू असल्यासारखे वागत आहेत. महाभारताप्रमाणे कौरव आणि पांडव समोरासमोर उभे आहेत. हे संसदीय लोकशाहीसाठी चांगले नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर साधक-बाधक एकमत होऊन सभागृहाचे कामकाज पुढे न्यावे. शिवसेना खासदार म्हणाले, निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे उपस्थित केले जातात. हिजाबचा मुद्दा होता. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत असे अनेक मुद्दे अचानक येऊन निवडणुकीला वेगळा रंग देतात. विकासाच्या मुद्दय़ांऐवजी धार्मिक मुद्दय़ांवर भर, याच मुद्दय़ावर निवडणुका लढवल्या जातात. ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात मृतदेह गंगेत वाहून जाताना दिसत होता, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या वेळीही लोक भावनेच्या भरात वाहतांना दिसतात. चार राज्यांत भाजपने बाजी मारली आहे. ही चांगली गोष्ट आहे. आनंद करा पण अहंकारात बुडू नका. लोकशाहीत विरोधी पक्ष टिकणे गरजेचे आहे. (हे ही वाचा संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावात- जितेंद्र आव्हाड) गोव्यातील भाजपच्या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असलेल्या टाळ्यांबाबत संजय राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांना गोव्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणत त्यांचे कौतुक केले जात आहे. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. गोवा जिंकून महाराष्ट्राचा नेता आला, त्याचा आनंद आहे. पण गोवा कोणीही जिंकू शकत नाही हे ध्यानात ठेवा. तेथील राजकारण विचित्र आहे. तिथे कधीही कोणताही पक्ष जिंकत नाही, वैयक्तिक व्यक्ती जिंकते आणि मग विजयी लोकांचा एक गट तिथे सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतो. |
भागीदार संबंध विविध त्रास नकारात्मक व्यवसाय परिणाम करू शकतो म्हणून गंभीर उद्योजक मध्ये, clockwork काम केले पाहिजे. टाळण्यासाठी अकल्पित परिस्थिती, एक हात वर, आणि दुसरीकडे, कंपनी करार विषय सेवा यावर आधारित भिन्न फॉर्म, करार दरम्यान गेला. अलीकडे, अधिक आणि अधिक उद्योजक स्वतः ला आणि मुलभूत आणि व्यवहार नियमांशी आपल्या भागीदार संरक्षण करण्यासाठी एक बँक हमी शोधत आहेत. हमीदार बँक, लाभार्थी आणि मुख्यः हे दस्तऐवज तीन पक्ष यांचा समावेश आहे की एक विशेष करार आहे. पक्ष प्रत्येक कर्तव्ये नियमित अंमलबजावणी आणि शक्ती majeure टाळण्यासाठी. मुख्य - अर्जदार किंवा करार निष्कर्ष इनिशिएटर आहे व्यक्ती आहे. बँक गॅरंटी एक हात आणि मृत्यूपत्राचा बँक स्वाक्षरी, आणि इतर - ग्राहक दुसर्या लाभार्थी म्हणतात. हा दस्तऐवज इतर विरुद्ध एक पक्ष काही जबाबदाऱ्या पूर्ण हमी. एक करार करण्यासाठी वित्तीय संस्थांची असे आवाहन जे संघटना - एक बँक गॅरंटी प्रमुख. हा दस्तऐवज अन्यथा लाभार्थी प्राचार्य करार अ-कामगिरी द्यावी, अशी रक्कम प्राप्त होईल, ग्राहक सर्व जबाबदा कामगिरी विश्वास होण्यासाठी अनुमती देते. तर कराराच्या अटी कामगिरी दोष भागवली नाही, नुकसान भरपाई त्याच्या खात्यात किंवा चालते क्रेडिट ओळ, त्याचे नाव दिले. पण गाठता परिस्थितीत, विमा प्रदान झाल्यास आहेत. मुख्य - त्यांचे काम आणि प्रतिष्ठित भागीदार कारण स्वतः बँक गॅरंटी दोन्ही बाजूंच्या जोखीम सर्व प्रकारच्या संरक्षण की विमा एक शक्तिशाली साधन आहे गंभीर एक व्यक्ती. हा मुद्दा आजच्या व्यवसाय वातावरणात फार महत्वाचे आहे. त्याच्या करार संबंध खूप वेळा हा दस्तऐवज मुख्य वापरते. (कर्ज प्राप्त करण्यासाठी एक विनंती व्यावसायिक बँकांना लागू करताना) या दस्तऐवज अधिक जोरदारपणे खर्च कारण तर नाही गेले आहेत हे त्याला उत्तम प्रकारे जतन करण्यास अनुमती देते. अंमलबजावणी करणारी यंत्रणा भरले बँक हमी रचना सर्व खर्च. अर्जदार कोण खात्री बँक संदर्भ देखील पाळलीच पाहिजे सर्व बाबींची पूर्तता केली पाहिजे, किंवा दस्तऐवज जारी करण्यास नकार दिला जाऊ शकतो. क्रेडिट संघटना त्याच्या मध्यस्थ प्राचार्य देते जे एक फी प्राप्त होतो. ही परिस्थिती नागरी बाहेर स्पेलिंग आहे. कायदा भरपाई आणि त्याचा आकार भरणा प्रक्रिया, त्यामुळे अर्जदार आणि हमीदार विहित नाही आहे एकमेव गोष्ट त्यांच्या स्वतः च्या समस्येचे निराकरण, आणि बँक गॅरंटी परिस्थिती लिहून करणे आवश्यक आहे. करार दलाली देयके मूल्य वर्णन असलेले कोणतेही आयटम नाहीत तेथे आहे जरी, दस्तऐवज अद्याप वैध मानले जाते आणि न्यायालयात अर्जदाराने आव्हान जाऊ शकत नाही. बँक गॅरंटी - लाभार्थी व प्राचार्य यांच्यात मध्यस्थ आहे. तो पक्ष संबंध स्पष्ट गुंतलेली नाही, पण फक्त बँक गॅरंटी अटी नेमका पूर्ण नियंत्रण. आणि त्याच्या निर्णय - भागीदार संघर्ष सादर दस्तऐवज झाल्यास लक्षात घेता. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.