text large_string |
|---|
'प्रभात'चे 'स्मरत बलिदानम्' अव्वल ठरल्याची गोष्ट! उघडलं; की, सगळीकडे लख्ख प्रकाश! आपणही असेच. . . आपलं स्वातंत्र्य वाटणारं. , स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी नव्या पिढीतही राहावी यासाठी 'प्रभात'मधील संस्कृत शिक्षक मधुकर आटोळे यांनी संस्कृत बालनाट्य 'स्मरत बलिदानम्'चं नाट्यलेखन केलं. नाटकाची थीम होती. . . जालियनवाला बाग हत्याकांड! भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा बिंदू असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेला १०३ वर्षे झालीत. इंग्रजांच्या राजवटीचा हा निर्घृणतेचा कळसच होता. हा स्वातंत्र्याच्या ट्रिगर पॉईंट ठरला. भारतातील ब्रिटिश राजच्या अखेरीची ही सुरुवात ठरली. दिनांक १ व २ ऑगस्टला बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अकोला येथील प्रभात किड्स स्कूलच्या 'स्मरत बलिदानम्' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. तसं पाहिलं तर, संस्कृत नाटकं भारतीय नाट्यपरंपरेचा आधार आहे. महाकवी कालिदासाचे 'शाकुन्तलम्' हे केवळ नाटक नाही, तर विश्व आणि भारतीय संस्कृतीचा समुद्र आहे. ज्ञान-विज्ञानाचे भांडार, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या संस्कृत भाषेची शाळांमधील आणि एकंदरीतच स्थिती आशादायक असेलच असे नाही. सध्या शालेय स्तरावर 'स्कोअरिंग' विषय म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. मात्र, त्या पलीकडे जाऊन संस्कृतही भाषा म्हणून शिकण्याची गरज व महत्त्व पटविणारी व 'भाषा-भगिनींची संकल्पना' प्राधान्याने राबविणारी अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलने अग्रक्रमावर असलेले स्थान शाबूत ठेवून 'स्मरत बलिदानम्'च्या माध्यमातून संस्कृत विषय आणि संस्कृत नाट्यक्षेत्रात शिरपेचातील मानाचा तुरा खोवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल, टि्वटर इन्स्टाग्राम, व्हॉट्सएपच्या आहारी जाणाऱ्या नव्या पिढीतल्या शाळकरी विद्यार्थ्यांना 'स्मरत बलिदानम्' मधील अनुभव स्फूर्तिदायक होता. संस्कृत विषय असलेल्या, त्यामध्ये अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांकडून संस्कृत भाषेतील नेमके उच्चार, भावाभिव्यक्ती, सादरीकरण हे सगळं मोठे आव्हानच होतं. ते संस्कृत विभागातील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक पेललं. सांस्कृतिक विभागाने त्यांच्या कसदार प्रयत्नातील वैभवात परंपरेप्रमाणे भर टाकली. दिमतीला ज्येष्ठांचं मार्गदर्शन व प्रेरणा तसेच नाटकातील सुयोग्य प्रॉपर्टी, भावनात्मकतेचे सूक्ष्म दर्शन घडविण्यासाठी पैलू पाडण्याचं खडतर आव्हान तर होतंच, ते इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी निष्ठेनं पेललं. याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुप्त क्षमतांचा शोध लागला; स्वतःचा विकास घडवून आणता आला. 'स्मरत बलिदानम्' मधील संस्कृत शब्द, त्यांची अचूक संवादफेक करणं, ऐतिहासिक प्रसंगाशी तादात्म्यता, जो अनुभव व थरार, त्याचे सादरीकरण स्टेजवर करणे, स्वातंत्र्यमूल्याचा भाव जपणं हे नव्या पिढीत येतेय हे पाहाणं, तेवढी लहान वयात स्वातंत्र्याच्या किमतीची मेंदूत होणारी बांधणी पक्की होत जाणं, हे सर्व दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सर्वांचा कस लागणं ही फार मोठी कसरत कुशलतेने हाताळण्यासाठी प्रभातचे संचालक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारे यांनी अस्सल प्रेरणातंत्राचा वापर केला. मेंदूमधील पेशींची परस्पर जुळणी आणि बालकाचा शारीरिक नि मानसिक विकास, या दोन्ही प्रक्रिया परस्परावलंबी असतात. 'प्रभात'ने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमशीलता जपल्यामुळे असे यश प्राप्त केल्या जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असताना संस्कृत नाट्यपरंपरेतील मजबूत पाया घालण्याचं काम 'प्रभात'ने केलं आहे; ही घटनाच अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवाला सुखावणारी म्हणायला बराचसा वाव आहे! |
सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-आर. आर. आबांचे स्मारक 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. येथील मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर राजकीय नेते मंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून स्मारक होणार आहे. आमदार सुमन पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आर. आर. यांच्यासोबतच्या विधीमंडळातील अनेक आठवणी श्रोत्यांसमोर उघड करताना मुनगंटीवार यांनी त्यांच्यासोबतचे आपली मैत्रीही उलगडली. ते म्हणाले, मी नवखा आमदार म्हणून विधानसभेच्या ग्रंथालयात गेल्यानंतर गेल्या पाच वर्षातील कुणाची भाषणे मी वाचू असा प्रश्न मी ग्रंथपाल बाबा वाघमारे यांना केला. त्यांनी मला आर. आर. यांचे नाव सांगितले. त्याअर्थाने आर. आर. माझ्यासाठी प्रेरणा होते. युतीचा आमदार म्हणून 1995 च्या विधानसभेत पहिले भाषण केले. त्यानंतर "तुम्ही चांगले भाषण केलेत. तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे. ' असे पत्र त्यांनी मला आवर्जून पाठवले. एक संवेदनशील राजकारणी म्हणून मी त्यांना अनुभवत होतो. 9 डिसेंबर 2009 रोजी विधानसभेत मी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या व्यथांवर बोलताना केवळ भाषणे करून नक्षलवाद संपणार नाही. असे मी आर. आर. यांच्यावर टिका केली. या भाषणात मी त्यांना गडचिरोलीचे पालकमंत्री व्हा असे आव्हान दिले. एका विरोधी आमदाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी विधीमंडळात आपण पालकमंत्री होत आहोत अशी घोषणा केली. गडचिरोलीच्या विकासासाठी ते मंत्रीमंडळ बैठकीत कायम आग्रही राहिले. त्यासाठी त्यांनी अंगावर वाद ओढवून घेतले. डान्सबार बंदीचा निर्णय असो वा स्वच्छता अभियानाचा. आर. आर. यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही आमच्या पक्षात हवे होता. मीही त्यांनी माझ्या पक्षात येण्याचे आवाहन करायचो. हे खरे होते की, त्यांनी कधीही पक्ष बदलला नसता आणि मी देखील दिल्लीने कितीही अन्याय केला तरी पक्ष बदलणार नाही. कोणताच पक्ष वाईट नाही, मात्र प्रत्येक पक्षात चांगल्या माणसांसाठी जागा मात्र असली पाहिजे. राजकारणाबद्दलचा समाजाचा झालेला दृष्टीकोन बदलण्यासाठी ते झाले पाहिजे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी प्रास्ताविक केले. मी स्वता जातीने लक्ष घालून अठरा महिन्यात स्मारकाचे काम पुर्ण करणारच अशी ग्वाही दिली. खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर यांची भाषणे झाली. आमदार सुमन पाटील यांनी शासनाने स्मारक उभारणीसाठी राजकारणनिरपेक्षपणे दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, नीता केळकर शैलजा पाटील विविध पक्षीय नेते उपस्थित होते. |
सीएसआर फंडातून आदर्श ग्राम; मराठी पाऊल देशासाठी दिशादर्शक । Popatrao pawar Interview by Dipti Raut - Divya Marathi\nPopatrao Pawar Interview By Dipti Raut\nसीएसआर फंडातून आदर्श ग्राम; मराठी पाऊल देशासाठी दिशादर्शक\n'पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये हिवरे बाजारची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आदर्श गाव अभियान जाहीर करताना अमिताभ बच्चन, रतन टाटा, आनंद महिंद्रा यांच्यासोबत ग्रामसभांचा प्रतिनिधी म्हणून निमंत्रित केले. या दोन्ही घटना माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत', असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. २०१८ पर्यंत राज्यातील हजार गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने उद्योजकांच्या सहभागातून आदर्श ग्राम अभियान सुरू केले अाहे. त्याच्या सल्लागार समितीवर निवड झालेल्या पवारांशी 'दिव्य मराठी'ने साधलेला संवाद.\nप्रश्न : अभियानाकडे कसे बघता?\nपवारः महाराष्ट्राने देशाला रोजगार हमी कायदा, निर्मल ग्राम अभियान अन् पाणलोट विकासाची चळवळ दिली. त्याच धर्तीवर सीएसआर फंडातून आदर्श ग्राम विकासाचे अभियान हे महाराष्ट्राचे पाऊल संपूर्ण देशासाठी दखलपात्र ठरेल, असा विश्वास अाहे.\nप्रश्नः ग्रामीण विकास आणि आदर्श ग्राम यात फरक काय?\nपवारः ग्रामविकास, जलसंधारण, कृषी, वने, शिक्षण, आरोग्य ही खाती स्वतंत्रपणे काम करत असतात. त्यांचा समन्वय नसतो. दुसरीकडे उद्योग क्षेत्रांकडून केली जाणारी कामेही काही ठरावीक भागातच झाली. संपूर्ण गाव हे युनिट धरून हे अभियान अाहे.\nप्रश्नः ग्रामविकासासाठी पुरेसा निधी शासनाकडे नाही का?\nपवारः निधीची कमतरता नाही, तर पैशांचा विनियोग योग्य प्रकारे होत नाही. या अभियानाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल. उद्योग क्षेत्र त्यांचा निधी थेट मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करतील. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समित्या काम करतील.\nप्रश्नः एक हजार गावांची निवड कशी होणार ?\nपवारः मानवी विकास निर्देशांकामध्ये मागे असणाऱ्या तसेच २५ टक्के आदिवासी गावांचा अभियानात समावेश केला जाईल. आज राज्यातील ५२ टक्के गावे दुष्काळी, ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. अशी विकासापासून वंचित गावे निवडली जातील. ५० टक्के गावे उद्योग संस्था, तर ५० टक्के गावे शासन निवडेल.\nप्रश्नः मग ग्रामविकास खाते काय करेल?\nपवारः ग्रामविकास खातेच नव्हे, तर यात सर्वच खात्यांच्या कामांचा समावेश आहे. यात जलयुक्त शिवार, संयुक्त वन व्यवस्थापन, नद्या संवर्धन, सांडपाणी नियोजन, प्राथमिक शिक्षण सुधारणा, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण पाणीपुरवठा आदी सर्व अभियानांची यात सांगड घालण्यात आली.\nप्रश्नः प्रत्यक्ष काम कसे होईल?\nपवारः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यकारिणीची स्थापना करण्यात येईल. त्यात १० कोटींपेक्षा जास्त निधी देणाऱ्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, शासन, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असतील. सीएसआरमधून जेवढा निधी संकलित होईल, तेवढाच निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यात घातला जाईल.\nप्रश्नः मग ग्रामसभांनी काय करायचे?\nपवारः ग्रामसभांनी सुचवलेले जिल्हाधिकारी पुढे सुचवणार. त्याशिवाय या हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो नियुक्त केले जातील. त्यांची निवड, प्रशिक्षण याबाबत मुंबईच्या आयआयटीतर्फे आखणी केली जात आहे.\nप्रश्नः गावांच्या संसाधनांवर उद्योग क्षेत्राचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका नाही का?\nपवारः वर्षाखेरीस स्वतंत्र यंत्रणांद्वारे आर्थिक, सामाजिक ऑडिट होणार आहे. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हिवरे बाजारसारखी आदर्श गावे उभी राहिली; पण आता ती संधी राज्यातील एक हजार गावांना मिळेल. हिवरेबाजारचे यशस्वी नियोजन हा याचा आधार असणार आहे.\nबच्चन, आमिर, सचिनचा सहभाग :\nज्येष्ठअभिनेते अमिताभ बच्चन यांचाही अभियानात सहभाग असणार आहे. सिनेअभिनेते आमिर खान आणि सचिन तेंडुलकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी या अभियानात निमंत्रित केले आहे. सहभागी होण्याबाबत त्यांनी त्यांची संमती कळविली आहे.\nग्रामीण विकासासाठी शासन, उद्योजक एकत्र येण्याची देशात पहिलीच वेळ आहे. उद्योजक म्हणून सीएसआरमधून लोकोपयोगी कामे करत असतो. आता आदर्श ग्राम विकास अभियानाच्या माध्यमातूनही आम्हाला महत्त्वाचा सहभाग देता येणार आहे. उद्योग क्षेत्राने याचे स्वागत केले आहे. हे स्वतंत्र आणि संयुक्त अभियान असणार आहे. सरकार फक्त पूरक भूमिका निभावणार आहे. राजकुमारधूत, उद्योजक.\nग्रामीण विकासासाठी शासन, उद्योजक, समाज या सर्व घटकांना एकत्र आणणे अभिनंदनीय आहे. ग्रामीण विकास ही संकल्पना निधी ओतून, सरकारी आदेश काढून एखादी योजना राबवावी तशी नाही. यात गाव हे केंद्रभूत हवे. गाव सक्षम करावे, गावाचा सहभाग घ्यावा लागेल, गावातून तसे नेतृत्व उभे करावे लागेल. हे या अभियानापुढचे आव्हान आहे. डॉ.अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते. |
'पती, पत्नी और वो' या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट आलेत. त्यांनी बॉक्स आॅफीसवर चांगली कमाईही केली. अनेक कलावंतांना तर अशा चित्रपटांमुळेच मोठी ओळखही मिळाली. अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची प्रेमकथा 'दो अनजाने'च्या सेटवर सुरू झाली. त्यावेळी अमिताभने जया भादुरीशी विवाह केला होता. या दोंघाबद्दलचे गॉसिप प्रसिद्ध होत होते. मोठ्या वृत्तपत्रात अशा बातम्या झळकत होत्याच. एक दिवस जया भादुरीने रेखाला जेवनाचे आमंत्रण दिले. याच वेळी काहीही झाले तरी मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही, हे तिने रेखाला ठणकावून सांगितले. आधी रेखानेही आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली पण नंतर या सर्व गोष्टींना तिने नकार दिला. आपल्या प्रेमाचे कोणतेही भविष्य नाही हे तिला कळले असावे कदाचित. धमेंद्र - हेमा मालिनी : 'तूम हसीन मैं जवान'च्या शूटिंगदरम्यान वीरू (धमेंद्र) बसंतीच्या (हेमा मालिनी) प्रेमात पडला. त्यावेळी त्याचे लग्न प्रकाश कौरशी झाले होते. सनी व बॉबी ही दोन मुलेही त्याला होती. दोघांत जरी १३ वर्षांचे मोठे अंतर असले तरी ही प्रेमकथा फुलली अन् बहरलीही. हेमाने विवाहित पुरुषांशी लग्न करण्याचा प्रस्ताव मान्य केला. मात्र प्रकाश हिने घटस्फोट देण्यास नकार दिला. अखेर धमेंद्र व हेमा मालिनीने इस्लाम कबूल करून कायदेशीर विवाह केला. मिथुन चक्रवर्ती - श्रीदेवी : श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात पडली त्यावेळी मिथुनचा योगिता बालीशी विवाह झाला होता. त्यांनी लपून विवाह केला असल्याचेही सांगण्यात येत होते. ही गोष्ट योगिता बालीपासून लपवून ठेवली गेली. याच तणावातून योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशीही अफवा उडली. यानंतर त्यांनी विवाह न करण्याचे ठरविले. अखेर श्रीदेवीने बोनी कपूरशी विवाह केला. बोनीदेखील विवाहित होता. त्याने या सुंदरीसाठी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला, मुलालाही सोडले! राज बब्बर - स्मिता पाटील : नादिराने दोघांचे संबध उदार मनाने स्वीकारले. दोघांच्या विवाहाबाबत नादिरा हिचा विचार काही वेगळा दिसतो. ती म्हणते की स्मिताला माझ्या नवऱ्यासोबत राहायला आवडत होते. तिला त्याचा सहवास हवा होता. दोघांच्या अफेअरची चर्चा माझ्या कानावर आली होती, पण मी तिचा स्वीकार केला. तिला आपल्या घरी जागा दिली. आम्ही सर्वांनी एकमेकांचा कायम आदर केला. मात्र ही प्रेमकथा फार काळ चालली नाही. प्रसूतीच्या दरम्यान स्मिताचा मृत्यू झाला. राज परत नादिराकडे आला तर प्रतीकची देखरेख त्याच्या आजोबांनी केली. आदित्य पांचोली - कंगना राणावत : कंगना राणावत स्ट्रगल करीत असताना ती आदित्य पांचोलीला भेटली. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यावेळी या दोघांत सुमारे २० वर्षांचे अंतर होते. आदित्य विवाहित होता व त्याला मुलेही होतीच. दरम्यान, दोघांत वितुष्ट आले. याच काळात आदित्य पांचोलीने कंगनाला घर विकत घेण्यासाठी मोठी रक्कम दिल्याची वार्ता पसरली. या दरम्यान कंगनाच्या बहिणीवर अॅसिडहल्ला झाला. यावेळी हॉस्पिटलचे बिल आदित्यने दिल्याची बातमी आली होती. यात कंगनाला आरोपी करण्यात आले होते. संजय खान - झीनत अमान : संजय खान याने आधीच अभिनेत्री झरीन खान हिच्याशी निकाह केला होता. मात्र तो स्वतःला झीनत अमानसारख्या बोल्ड व ब्युटीफुल अभिनेत्रीसोबत विवाह करण्याच्या मोहापासून आवरू शकला नाही. पण दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. संजयची पत्नी झरीनच नव्हे तर झीनतचे अपंगत्व यासाठी कारणीभूत ठरले. झीनतने आपला एक डोळा गमविला, सोबतच तिची प्रकृती ढासळू लागली आणि ही कथाही तेथेच संपली. |
बबिता मुलगी करीना कपूरसोबत (फाइल) मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बबिता शिवदासानी 68 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1948ला मुंबईत झाला. सिनेसृष्टीच्या करिअरमध्ये त्यांनी 19 सिनेमांत काम केले. बबिता यांनी 1966मध्ये आलेल्या 'दस लाख' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र, त्यांना मोठ्या ब्रेक निर्माते जीपी सिप्पी यांच्या 'राज' सिनेमातून मिळाला. सिनेमात त्यांच्या अपोझिट राजेश खन्ना होते. मात्र, हा सिनेमा चालू शकला नाही. परंतु बबिता यांचे करिअर या सिनेमाने सावरले. 'फर्ज', 'किस्मत', 'तुमसे अच्छा कौन है', 'हसीना मान जाएगी', 'अनजाना', 'कब क्यो और कहां', 'पहचान', 'कल आज और कल'सारख्य सिनेमांत काम केलेल्या बबिता यांना 1971मध्ये रणधीर कपूरसोबत लग्न केले. लग्नासाठी त्यांनी सिनेसृष्टीशी नाते तोडले आणि मुलगी करिश्मा आणि करीनाला जन्म दिला. मात्र, रणधीर आणि बबिता यांचे नाते जास्तकाळ टिकू शकले नाही. दोघे विभक्त झाले. तरीदेखील बबिता यांनी दोन मुलांचे संगोपन व्यवस्थित केले. त्यामुळेच करिश्मा आणि करीना बॉलिवूडच्या ए-लिस्ट अॅक्ट्रेस बनू शकल्या. प्रेम आणि कुटुंबासाठी बबिता यांनी सिनेमे सोडले होते. आज त्यांच्या मुली त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. धाकटी मुलगी करीनाविषयी बोलायचे झाले तर तिने 2000मध्ये आलेल्या 'रिफ्यूज' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र, 'चमेली', 'देव', 'ओमकारा', 'जब वी मेट'सारख्या सिनेमांनी ती प्रसिध्दी झोतात आली. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्यानंतर ती बॉलिवूडच्या हाईएस्ट पेड अॅक्ट्रेसमध्ये सामील झाली. करीनाची आई बबिताने केवळ 19 सिनेमांत काम केले. सिनेमांपेक्षा जास्त त्यांनी फॅमिलीवर जास्त फोकस केले. म्हणून त्या खास ओळख निर्माण करण्यात मागे पडल्या. |
पनवेल : पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नवीन पॅटर्न तयार केला असून, गावाची डिजिटलाईज वाटचाल सुरू आहे. शिवकर ग्रामपंचायतीने डिजिटलायझेशनच्या दृष्टीने लोकसहभागातून अनेक गोष्टी उभारण्यात आलेल्या आहेत. गावात सुरक्षेच्या दृष्टीने १६ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, रस्त्याच्या दुतर्फा पामची झाडे आदी लावण्यात आली आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च करण्यात आले असून मुख्य रस्ते, शाळा, वर्दळीच्या ठिकाणी ते लावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी दिली. घरपट्टी तसेच पाणीपट्टी वेळेवर भरणाºया ग्रामस्थांना मोफत धान्य दळून देण्याची योजना ग्रामपंचायतीने अमलात आणली आहे, याकरिता गावातील तीन राईस मील सोबत ग्रामपंचायतीने बोलणी केली आहे. ग्रामस्थांनी कर वेळेवर भरल्यास ग्रामपंचायतीला विविध देयके देण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत नाहीत, अथवा व्याजापोटी इतर खर्च वाढू नये, हा या मागचा उद्देश आहे. सध्याच्या घडीला गावची लोकसंख्या २४३४ असून, एकूण क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केली जाते. याकरिता निम्मा खर्च ग्रामपंचायत उचलते. संपूर्ण नैसर्गिकरीत्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून ग्रामपंचात शासनाच्या जादा दराने भात खरेदी करते. सध्याच्या घडीला प्रतिक्विंटल १७५० रुपये शासन शेतकऱ्याला भाव देते. ग्रामपंचायत प्रतिक्विंटल २००० रुपयाचा भाव देते. सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेले धान्य ग्रामपंचायत प्रदर्शन भरवून २००० अधिक ५०० रुपये आकारून विक्री करेल, अशी योजना ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी आखली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात कोणतीही सूचना द्यावयाची दवंडी पिटली जाते. याचा अर्थ ग्रामपंचायतीने नेमलेला कर्मचारी गावात जाऊन प्रत्येक चौकात ओरडून सर्वांना माहिती देतात. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या चौकात कायमस्वरूपी स्पीकर लावले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातून दिलेल्या सूचना थेट ग्रामस्थांना ऐकायला येतात. विशेष म्हणजे, ग्रामसभादेखील अशाचप्रकारे लाइव्ह ग्रामस्थांना ऐकायला मिळतात. शहरामध्ये देखील सांडपाण्याचे नियोजनाचे तीन-तेरा उडाले असताना, शिवकर गावात सुमारे २०० शोषखडे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यामध्ये गावातील सांडपाणी जिरविले जाते. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असून डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काम करणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. मात्र, राज्यातही आदर्श ग्रामपंचायत बनण्याचा मान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच अनिल ढवळे यांनी सांगितले. |
औरंगाबाद : शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संतापात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आपण भावनेच्या भरात केल्याचे नमूद करीत खैरे यांनी सोमवारी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषदेत जाहीरपणे माफी मागितली. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर खैरे यांनी पिता-पुत्रांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. ३२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असतांना २९ वर्षीय आदित्य यांची माफी मागण्याची वेळ आल्याने शिवसेना बदलत असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, माझे पक्षप्रमुखांशी बोलणे झाले आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली आहे. जे काही होईल ते चांगलेच होईल. मी तीन दिवस नॉट रिचेबल नव्हतो, शहरातच होतो. मी मनपा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळाबाबत शोध घेत होतो. कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून नॉटरिचेबल राहण्याचा फायदा होतो. आपल्याकडून काही चुका होत नाहीत. राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु चतुर्वेदी 'तार्इं'चे (१२ मार्च रोजी चतुर्वेदी 'बाई'असे बोलले होते. ) नाव अचानक आल्याने माझा त्रागा झाला. भावनेच्या भरात मी बोललो. त्यामुळे वरिष्ठही नाराज झाले. मी कुठेही जाणार नाही. ३२ वर्ष सतत निवडून आलो आहे. स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेचेच काम करील. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करील. आदित्य यांना वाईट वाटले असेल तर मी त्यांची माफी मागतो. मी शिवसेनेत तिसऱ्या पिढीसोबत काम करणारा शिवसैनिक आहे. मला पक्षाने खुप काही दिले आहे. ३ दिवस वातावरण शांत व्हावे, यासाठी नॉटरिचेबल होतो. यावेळी आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती. पहा व्हिडीओ : |
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाआधी घराची साफ-सफाई करावी. पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करावा. घराच्या दारावर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा. पुजा स्थळी एक चौरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी- गणपतीची मूर्ती ठेवावी. चौरंगाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावून, दिवा लावून पाणी, मोळी, तांदूळ, फळ, गुळ, हळदी, गुलाल इत्यादी अर्पित करावा. देवी महालक्ष्मीची स्तुती करावी. या सोबतच देवी सरस्वती, काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवाची ही पुजा विधान पूर्वक करावी. लक्ष्मी पूजनासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावं. लक्ष्मी पूजा झाल्यावर तिजोरी, मशिनरी आणि व्यवासायिक उपकरणाची पूजा करावी. पुजा झाल्यानंतर गरजू लोकांना मिठाई आणि दक्षिणा द्यावी. कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्रातःकाळी शरीरावर तेलाची मालिश करुन नंतर अंघोळ करावी. असे मानले जाते की असे केल्याने धन हानी होत नाही. दिवाळीच्या दिवशी व्यस्कर व लहान मुले सोडून इतर व्यक्तींनी भोजन करू नये. संध्याकाळी लक्ष्मी पुजनाच्या नंतर भोजन ग्रहण करावं. दिवाळीच्या दिवशी पूर्वजांचे पूजन करावे आणि त्यांना धूप व भोग अर्पित करावं. प्रदोष काळाच्या वेळी हातामध्ये उल्का धारण करुन पित्रांना मार्ग दाखवावा. उल्का म्हणजे दिवा लावून किंवा इतर माध्यमाने अग्नीचा प्रकाश दाखवून पित्रांना मार्ग दाखवा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्ती होते. दिवाळीच्या निमित्ताने भजन, स्तुती, मंत्र म्हणत घरात उत्सव साजरा केला पाहिजे. असे सांगितले जाते की असे केल्याने घरात व्याप्त दरिद्रता दूर होते. |
व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास! बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांच्याविषयी प्रत्येकालाच आदर आहे. बड्या स्टार्सपैकी अमिताभ बच्चन सोडले तर अगदी हातावर मोजण्याएवढेच कलाकार आहेत ज्यांना आपण परिपूर्ण अभिनेता म्हणून संबोधू शकतो. त्यापैकीच एक नाव म्हणजे आशुतोष राणा. नाव ऐकून तुम्हीसुद्धा चाट पडला असाल, मोठ्या पडद्यावर कायमच नकारात्मक भूमिका साकारणारे आशुतोष राणा हे खऱ्या आयुष्यात खूपच मितभाषी, ज्ञानी आणि संयमी आहेत. आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : कोणत्याही गॉडफादरचा हात डोक्यावर नसतानाही आशुतोष यांनी काळविश्वात त्यांचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे आणि यामुळेच ढीगभर खलनायकाच्या भूमिका करूनसुद्धा त्यांनी त्याचा परिणाम स्वतःच्या खासगी आयुष्यावर कधीच होऊ दिला नाही. आज आशुतोष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाविषयी आणि त्यांच्या लव्हस्टोरीविषयी या लेखातून जाणून घेऊया! आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या आशुतोष राणा यांचा जन्म मध्यप्रदेशमधील गाडरवाडा येथे झाला, खरंतर त्यांना पुढे शिक्षण घेऊन वकील व्हायचं होतं पण आपल्या आजोबांच्या सांगण्यावरुन त्यांनी काळविश्वात यायचं ठरवलं. गावात होणाऱ्या रामलीलांमध्ये आशुतोष नेहमीच रावणाची भूमिका करायचे आणि ते बघूनच त्यांच्या आजी आजोबांना याने अभिनय क्षेत्रात नाव कमवावं असं वाटायचं. नंतर आशुतोष यांनी 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' मधून रीतसर अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि नशीब आजमावण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. स्वाभिमान मालिकेपासून आशुतोष यांच्या करियरला सुरुवात झाली खरी, पण १९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'दुश्मन' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटासाठी आशुतोष यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. फक्त हिंदीच नव्हे तर तामीळ तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषेतल्या सिनेमातूनसुद्धा आशुतोषनी त्यांचा ठसा उमटवला आहे. स्वाभिमान या मालिकेचं दिग्दर्शन महेश भट करत होते आणि यामध्ये काम मिळवण्यासाठी आशुतोष बरेच प्रयत्न करत होते. जेव्हा आशुतोष प्रथम महेश भट यांना भेटले तेव्हा त्यांनी महेश भट यांना वाकून पायाला स्पर्श करून नमस्कार केला. - रणजीत मुलींचे कपडे ओढायचा म्हणून त्याला घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं होतं! - बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे? महेश भट यांना कुणीच त्यांच्या पाया पडलेलं आवडत नसल्याने त्यांनी त्यांच्या गार्डसना बोलवून आशुतोष यांना सेटवरुन हाकलवून दिलं. नंतर महेश भटनी आशुतोष यांना याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की "हे माझे संस्कार आहेत आणि मी ते विसरू शकत नाही! " नंतर याच मालिकेत महेश भट यांनी आशुतोष यांना खलनायकाची भूमिका दिली. आशुतोष यांच्या म्हणण्यावर महेश भट हसले आणि म्हणाले की "खरंतर मी बरेच दिवसांनी तुला भेटलो नव्हतो आणि तुला तातडीने भेटणं गरजेचं होतं म्हणून मी फोनवर तुझ्याशी असं बोललो, खरंतर या भूमिकेसाठी महेश यांनी आशुतोषलाच घ्यायचं ठरवलं होतं कारण ही भूमिका त्यांच्याशिवाय आणखीन कुणीच उत्तम साकारू शकणार नाही अशी त्यांना खात्री होती. झालंही तसंच संघर्ष सिनेमा हा बॉलिवूडमधला एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा ठरला आणि लज्जाशंकर पांडे बघताना लोकांच्या काळजाचा अगदी थरकाप उडाला. बॉलिवूडचा हा व्हिलन एका फोन कॉलमुळे मराठमोळ्या रेणुका शहाणेच्या प्रेमात पडला, ज्याबद्दल आशुतोष यांनी बऱ्याच मुलाखतीत खुलासा केला आहे. हंसल मेहता यांच्या सिनेमाच्या सेटवर आशुतोष आणि रणूका यांची ओळख झाली. अर्धा तास गप्पा मारल्यावर आशुतोष यांच्या व्यक्तिमत्वामुळे रेणुका चांगलीच इम्प्रेस झाली. खरंतर आशुतोष यांनासुद्धा रेणुका आवडायला लागली होती पण त्यांना बोलावं कधी हे सुचत नव्हतं. अखेर दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आशुतोष यांनी रेणुकाला फोन केला, आणि तिथूनच हळू हळू त्यांची लव्ह स्टोरी पुढे सरकली, तब्बल ३ महीने त्यांची ही लव्हस्टोरी सुरू होती आणि एके दिवशी एक छानशी कविता लिहून ती सादर करून आशुतोषनी रेणुकाला प्रपोज केलं. ही कविता वाचून रेणुकासुद्धा इम्प्रेस झाली आणि नंतर ते लग्नबंधनात अडकले. आशुतोष यांनी सादर केलेली सुंदर कविता नेमकी काय होती : आशुतोष राणा यांनी पडद्यावर कितीही भयावह खलनायक साकारले असले तरी खऱ्या आयुष्यात ते तितकेच संवेदनशील आहेत, वाचनाची त्यांना प्रचंड आवड आहे, त्यांचा व्यासंग वाखणण्याजोगाच आहे, आणि यामुळेच ते बॉलिवूडमध्ये टिकून आहेत. अशा या हरहुन्नरी आणि स्वतःच्या मेहनतीने नशीब घडवणाऱ्या कलाकाराला टीम इनमराठीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक कराः InMarathi. com । आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । शेअरचॅट । Copyright © InMarathi. com । All rights reserved. |
साहीत्य : दही : साखर मीठ घालुन फेटुन घ्या. वरुन हीरवी मिर्ची व कडीपत्त्याची फोडणी द्या. पॅटीस साठी : कॄतीः कणसं मिक्सर वर बारीक करुन घ्या. वरील सर्व साहीत्य एकत्र करुन पॅटीस मसाला तयार करुन घ्या . १ ब्रेड स्लायीस घ्या, त्यावर तयार पॅटीस मसाला लावा. तसे सगळे ब्रेड तयार करुन घ्या . तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजा. लागेल तसे तेल सोडा. चाटः कुरकुरीत केलेला ब्रेड पॅटीस घ्या. त्यावर २ चमचे दही घाला. १-१ चमचा चटणी टाका. सर्वात वरती बारीक शेव घालुन खायला द्या . |
नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) त्यांच्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी (ता. ३) गडकरी यांच्या हस्ते पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाशिक शहराची स्तुती केली आणि म्हणाले. . नाशिकमधील 'या' दोन गोष्टी मला खूप आवडल्या. गडकरींना महाराष्ट्रातील शहरांच्या भौगोलिक परिस्थितीचं उत्तम ज्ञान असून त्यांनी नाशिकच्या वैशिष्यांबद्दल सांगितलं. तसेच त्यावेळी ते म्हणाले, नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत. इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही. येथील कार्यालये, त्यांना असलेली पार्किंग अतिशय उत्तम आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच नाशिक शहराबद्दल बोलताना आपल्या पत्तीसोबत झालेला संवाददेखील गडकरी यांनी यावेळी सांगितला. माझी पत्नी विमानात माझ्यासोबत होती. नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे, असं ती मला सांगत होती, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच नाशिक शहराचा विकास आणि हवामान याबद्दल बोलताना त्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहराचा अभ्यास करावा. शहराला सुंदर ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करावा, असा सल्लादेखील दिला. |
या महिलेचं नाव कायली गनर असं आहे. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार ही अभिनेत्री अमेरिकन सैन्यात कार्यरत होती. जवळपास १ वर्ष तिने सैन्यात काम केलं. मात्र त्यानंतर पॉर्नस्टार होण्यासाठी तिने नोकरी सोडली. सैन्यात राहून अॅडल्ड कंटेंड तयार करणं तिला शक्य झालं नसतं. त्यामुळे अखेर तिने नोकरी सोडण्याचाच निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर तिने स्वतःची एक अॅडल्ट वेब साईट सुरु केली. अन् त्यावर टॉपलेस फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता तिचं फॅनफॉलोइंग वाढलं. अन् आता ती अॅडल्ट इंडस्ट्रीमधील एक नामांकित पॉर्नस्टार म्हणून ओळखली जाते. प्रत्येक पोस्टसाठी तिला २ ते ५ लाख रुपये मिळतात. यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. कायलीच्या मते पॉर्नस्टार झाल्यामुळे तिच्या आत्मविश्वासात कमालिची वाढ झाली आहे. |
... तर, टोल तर द्यावाच लागेल! - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ... तर, टोल तर द्यावाच लागेल! ... तर, टोल तर द्यावाच लागेल! व्यवस्थांच्या उत्कृष्टतेसंदर्भात भारताच्या वेशीबाहेरील देशांचे भारी कौतुक आपल्या सर्वांच्यात मनात असते. ते शब्दांतून व्यक्तही होते कित्येकदा. आकारमान, लोकसंख्या, आर्थिक ताकद अशा विविध निकषांवर तुलनेने कितीतरी कमी असलेले अनेक देश भारतापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले असल्याचे चित्र, म्हटलं तर नामुष्की सिद्ध करणारेही आहे. पण, इच्छाशक्तीचा अभाव, प्रचंड भ्रष्टाचार आणि जागोजागी राजकारण, यामुळे 'त्यांच्या' पुढे निघून जाण्याची दुर्दम्य इच्छा कालपर्यंत कधी जागलीच नव्हती आपल्या मनात. यंदाच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळातील मंत्री, विशेषतः नितीन गडकरींसारखे दूरदृष्टी असलेले नेते जेव्हा कल्पनाशक्तीच्या अद्भुत आविष्काराच्या जोरावर हे नकारात्मक चित्र बदलण्याचा विडा उचलतात, तेव्हा कुणीतरी कौतुकाची थाप पाठीवर ठेवणे गरजेचे असते. परवा, लोकसभेत विरोधी पक्षातील भलेभले नेतेही नितीन गडकरींचे कौतुक करताना, त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना दिसले, तेव्हा विकासाच्या मुद्यावर भारतीय राजकारण सकारात्मक दिशेने प्रवाहित होत असल्याची ग्वाही मिळाली. संसदेत परिवहन मंत्रालयाशी संबंधित पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना, स्वतःच्या विभागासाठी आवश्यक खर्चाला लोकसभेने मंजुरी द्यावी, अशी मागणी करताना नितीन गडकरी यांनी भारतातील रस्तेविकासाचे त्यांच्या कल्पनेतील मॉडेलच सर्वांच्या साक्षीने सादर केले. दळणवळणाच्या सोयी-सुविधांचा भलामोठा आलेख सादर करताना, वाहतुकीची लंडन शहराच्या धर्तीवरची व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करीत असतानाच, टोलटॅक्स भरावाच लागेल, हे स्पष्टपणे सांगण्यास त्यांनी कमी केले नाही. चांगल्या सुविधा हव्यात, तर कर तर भरावाचा लागेल, हेही त्यांनी बिनदिक्कतपणे जाहीर करून टाकले. इकडे लोक विदेशातील व्यवस्थांची उदाहरणे तर देतात. आपल्याकडेही तशीच सुविधा हवी अशी अपेक्षाही व्यक्त करतात, पण कर भरायचा म्हटलं की तेच लोक लागलीच हात वर करतात. पण प्रगती हवी असेल, तर असे जबाबदारी टाळून वागता येणार नाही. त्यात प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. रस्त्यांचा विकास हा तर कुठल्याही देशाच्या चढत्या आलेखाचा आधार असतो. मुळात अर्थकारणाची पाळेमुळेच त्यात दडलेली असतात. शेतीपासून तर उद्योगांसाठीच्या सुविधांची वाटचालही दळणवळणाच्या सोयींमधूनच साकारत असते. ज्या देशांनी हे गणित जाणले, ते रस्त्यांची बांधणी करून कुठल्या कुठे निघून गेलेत. आमची सरकारे मात्र आजवर केवळ जातिपातीच्या राजकारणात अन् खाबुगिरीत रमलेली राहिली म्हणून भारत इतरांच्या तुलनेत मागे राहिला. एकदा या चौकटी पार करून विकासाचा ध्यास मनाशी बांधला गेला तर काय चमत्कार घडू शकतो, हे सारा देश बघतो आहे आज. गेल्या एका वर्षात 16,420 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे निर्माणकार्य झाले. पाच वर्षांत 17 लक्ष कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची उभारणी या एका मंत्रालयाच्या माध्यमातून झाली आहे. त्यातील 11 लक्ष कोटी रुपयांचा उपयोग एकट्या मार्ग निर्माणकार्यासाठी झाला आहे. 40 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची, जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती हा त्यातला एक भाग आहे. भारतमाला परियोजनेतून होत असलेला सुमारे 65 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निर्माणातूनही विकासाची तीच धडपड प्रतििंबबित होते. या निर्माणकार्यासोबतच आता हळूहळू इतर आयामांवर लक्ष केंद्रित करणेही सुरू झाले आहे. प्रचंड खर्चाच्या या प्रक्रियेत लोकसहभाग असावा म्हणून टोलटॅक्सची व्यवस्था उभारली जातेय्. त्यातही जे देऊ शकतील अशांकडूनच हा कर वसूल होईल, अशी व्यवस्था साकारण्याचा प्रयत्न केला जातोय्. रस्त्यांचे जाळे विणतानाही प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरावर भर दिला जातोय्. कुठल्याही नैसर्गिक आपदेपेक्षा किंवा दहशतवादी घटनांपेक्षाही भारतात रस्ते अपघातात मृत पावणार्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक आहे, हे एक दुर्दैवी वास्तव आहे. या अपघातांवरील नियंत्रणासाठी कडक कायदे तयार करण्यासोबतच त्याच्या तितक्याच कठोर अंमलबजावणीचाही मानस परवा संसदेत व्यक्त झाला. कोट्यवधींची कामे होत असतानाही भ्रष्टाचाराला थारा नसणे, लोकांच्या अडचणी लक्षात घेत पुढे जाणे, अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये साध्य करत करत देशाच्या जीडीपी वाढीत साह्यभूत ठरण्याचा या विभागाचा निर्धार म्हणूनच कौतुकास्पद ठरतो. अपघात नियंत्रणासाठी वाहनांवर फास्टॅग लावण्याचा निर्णय असो, की मग नॅशनल हायवेचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प, सार्याच बाबी देशाला प्रगतिपथावर नेणार्या आहेत. त्यासाठी पैशाची सहज, सुलभ उपलब्धता आहे, असेही नाही. चणचण तर तिथेही आहेच. पण, समोर उभ्या ठाकलेल्या संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती असली की मार्ग निघतातच. या देशाच्या रस्तेबांधणीप्रक्रियेत प्रथमच लोकसहभागातून अर्थव्यवस्था उभारण्याची अभिनव कल्पना साकारते आहे. प्रयोग बॉण्ड विक्रीचा असो वा मग दर 50 किलोमीटरवर तयार केल्या जाणार्या सुविधाकेंद्रांचा, पैसे उपलब्ध नाहीत म्हणून रडत बसायचे नाही. उलट, संभाव्य पर्यायांचा सतत विचार करायचा आणि पुढे जायचे. याच आगळ्या योजनेतून स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर रस्त्यांचे जाळे विणण्याचा उपक्रम मार्गक्रमण करतो आहे. करणार आहे. बहुधा याच सकारात्मक पावलांच्या प्रतिक्रियांस्वरूप लोकसभेत विरोधी बाकांवरील सदस्यांसह सारेच समर्थनार्थ उभे ठाकलेले दिसले. आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन यांच्यापासून तर फारुख अब्दुल्लांंपर्यंत कुणालाही मग या विभागाच्या खर्चाला मान्यता देण्यात आडकाठी आणण्याची गरज उरली नाही. सर्वांनी एकमताने विधेयक मंजूर केले. |
नवी दिल्ली, 22 मेः नवनवीन खाद्यपदार्थांच्या पाककृती (cuisine) अनेकदा सोशल मीडिया (Social Media) किंवा युट्युबवरुन शेअर केल्या जातात. महिला वर्गाकडून अशा व्हिडीओंना (Video) विशेष पसंती मिळत असते. अनेकजण या पाककृती स्वतःदेखील करुन बघत असतात. सोशल मिडीयामुळे अगदी देशोदेशीच्या वैशिष्ठयपूर्ण डिशेस अगदी घरबसल्या तयार करता येणं शक्य झालं आहे. तसेच स्वयंपाक करताना आवश्यक असलेल्या काही बारीकसारीक गोष्टी देखील सोशल मीडियावर उपलब्ध असल्यानं त्याही महिलांना उपयुक्त ठरत आहेत. असाच एक चपाती तयार करण्याच्या नव्या पध्दतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. चपाती (Chapati) ही बहुतेक भारतीय घरांमध्ये बनवली जाणारी एक सामान्य पाककृती आहे. चपाती बनवण्यासाठी एक पोळपाट, लाटणं आणि लोखंडी तव्याची गरज असते. परंतु,जर एखाद्याकडे तवा उपलब्ध नसला तरी परिपूर्ण चपाती कशी भाजली जाऊ शकते,याचे प्रात्यक्षिक नुकतेच एका महिलेने दाखवलं आहे. याबाबत सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून,एक महिला प्रेशर कुकरच्या मदतीने चपात्या भाजण्याचे एक अनोखं प्रात्यक्षिक दाखवत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये एका महिलेने तिच्या स्वयंपाक घरातील गॅसपेटवला असून त्यावर रिकामा कुकर ठेवला आहे. आता तिने गॅसच्या ज्वाळा मोठ्या केल्या आहेत. त्यानंतर त्या महिलेने पोळपाट आणि लाटण्याच्या सहाय्याने 3 चपाती लाटल्या आहेत. त्यानंतर या लाटलेल्या 3 चपाती या महिलेने त्या रिकाम्या प्रेशर कुकरमध्ये ठेवल्याचं दिसतं. त्यानंतर त्या महिलेनं कुकरचं झाकण बंद केलं. हे झाकण घट्ट बंद केल्यानंतर ही महिला व्हिडीओ पाहणाऱ्या दर्शकांना 3 मिनिटं थांबण्याची विनंती करते. काही वेळेनंतर ही महिला प्रेशर कुकरचं(Pressure Cooker)झाकण उघडते. त्यानंतर कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या ही महिला झाऱ्याच्या साहाय्याने स्वच्छ प्लेटमध्ये काढताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर ही महिला या प्लेटमधील चपात्या कशा उत्तमरितीनं तयार झाल्या आहेत, हे व्हिडीओ पाहणाऱ्या दर्शकांना दाखवते. खरंच, तव्यावर भाजलेल्या चपात्या आणि कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या यामध्ये काहीही फरक नसल्याचं या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतं. बॅचलर व्यक्तींना काही ना काही कारणामुळे सतत घरं बदलावी लागतात,त्यामुळे अशा व्यक्तींचा कमी भांडी खरेदी करण्यावर भर असतो. त्यांच्यासाठी चपात्या भाजण्याची ही नवी पध्दत नक्कीच उपयुक्त ठरु शकते. कारण या प्रक्रियेत प्रेशर कुकरच्या माध्यमातून भात,वरण आणि चपातीसुध्दा तयार करता येऊ शकते. ही पाककृती सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे आणि त्यातील बहुतेक जण चपाती बनवण्यासाठी ही नवी पध्दत वापरतील अशी अपेक्षा आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. Tags: Food, Viral video. |
अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिला कोण ओळखत नाही? गोंडस चेह-याची ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माऊलीच्या आयुष्यात आली आणि सगळ्यांचीच वहिनी झाली. जेनिलियाने आजवर तेलगु, हिंदी, तमिळ, कन्नड़ व मल्याळम या सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रितेश देशमुखशी लग्नानंतर त्यानंतर संसारात रमलेल्या जेनिलियाने 'लय भारी' आणि माऊली या सिनेमांमध्ये डान्स नंबरही केला. अलीकडेच जेनिलियाने स्पेशल फोटोशूट केलं आहे. एरवी फॅमिली आणि मुलांचे फोटो पोस्ट करणा-या जेनिलियाने अलीकडे तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याशिवाय जेनिलिया पुर्वीपेक्षा अधिक फिट स्लीम दिसत आहे. याशिवाय तिचा सोशल अपिअरन्सही वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेनिलिया स्क्रीनवर दिसू शकते अशी आशा तिच्या फॅन्सनी बाळगायला हरकत नाही. |
- वास्तुदोष आपल्याकडील पैशाच्या पॉकेटमुळेही लागू शकतो. - पर्समध्ये कोणतीही धारदार किंवा धातूची वस्तू कधीही ठेवू नका. Vastu Tips for Wallet: वास्तुशास्त्र (Vaastu Shaastra) हे सकारात्मक (Positive) आणि नकारात्मक (Negative) उर्जेवर आधारित आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे घरात सुख-समृद्धी येते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येत असते. जर तुमच्याकडे पैसा (Money) नसेल किंवा घरात वारंवार आर्थिक संकट येत असेल तर तुमच्यावर काही वास्तुदोष असू शकतो. वास्तुदोष म्हणजे घरात असतो असं नाही. वास्तुदोष आपल्याकडील पैशाच्या पॉकेटमुळेही लागू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टींचा व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळे तो गरीबांच्या दिशेने जात असतो. वास्तूनुसार काही गोष्टी पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत. (These 4 things should not be kept in the purse even after forgetting, you will become poor ) नोटा कधीही आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटात फिरवून किंवा दुमटून ठेवू नयेत. पैसा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते व्यस्थित ठेवले नसल्याने लक्ष्मी माता कोप करत असते. त्यामुळे पर्समध्ये नेहमी पद्धतशीरपणे पैसे ठेवा. पर्समध्ये कोणतीही धारदार किंवा धातूची वस्तू कधीही ठेवू नका. पर्समध्ये चाकू, पिन, चावी यांसारख्या वस्तू ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो, असे मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीकडे वाटचाल करू लागते. तुमच्या पर्स किंवा वॉलेटमध्ये बिल किंवा जुन्या पावत्या यासारख्या गोष्टी कधीही ठेवू नका. जेव्हा पर्समध्ये कागदांचा ढीग ठेवला जातो तेव्हा राहू दोष होत असतो, ज्यामुळे पैशाची हानी होते आणि अनावश्यक खर्च होतो. त्यामुळे तुमच्या पर्समधून जुन्या वस्तू काढून टाका. त्याचबरोबर आपल्यातील अनेकांच्या पर्समध्ये त्यांच्या स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांचे किंवा आजी-बाबांचे फोटो ठेवत असतात. परंतु तसं करू नये. पूर्वजांचा आदर केला पाहिजे, परंतु त्यांचे चित्र पर्समध्ये ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला पूर्वजांचे चित्र लावावे. तसेच पर्समध्ये देवाचे चित्र कधीही ठेवू नये. पूजेच्या घरी देवाचा फोटो पूर्ण आदराने लावावा. |
माझा नेल्सन मंडेलांशी थेट संबंध कधीच आला नाही, येण्याचे काहीही कारणच नव्हते. एकतर मी दक्षिण आफ्रिकेत १९९४ सालच्या मार्चमधील निवडणुका संपल्यावर गेलो होतो. नुकताच मंडेलांचा राज्यरोहण समारंभ पार पडला होता. दुसरे कारण म्हणजे मंडेला राहायचे, एकतर जोहान्सबर्ग/प्रिटोरिया किंवा केप टाऊन मध्ये तर मी त्यावेळी पीटरमेरिट्झबर्ग मध्ये! ! देशात मी संपूर्णपणे नव्याने प्रवेश केलेला. अर्थात नव्या राजवटीचे पडसाद हळूहळू समाजात पसरायला लागले होते. लोकांच्यात नवी स्वप्ने, नवा आनंद दिसून येत होता. एक मात्र नक्की, जरी वंशभेद कायद्यान्वये संपला असला तरी लोकांच्या मनातून गेलेला नव्हता. खरेतर पुढील जुळपास ४,५ वर्षांत तो तसाच राहिला होता. एके रात्री मी काही मित्रांसमवेत एका हॉटेलात (पूर्वी काळातील गोऱ्या वंशाचे) गेलो असताना, मिळालेली नकारात्मक वागणूक, ही मला चपराकच होती. माझ्या पूर्वीच्या लेखांत त्याबद्दल सविस्तर वर्णन केले असल्याने, इथे पुनरुक्ती नको. असो, तेंव्हा सांगायचं मुद्दा असा, वातावरणात नव्या स्वातंत्र्याचे वारे भरले होते. १०४७ साली, भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेंव्हाची परिस्थिती जेंव्हा मी वाचली तेंव्हा जे मनावर चित्र उमटले होते, त्याचेच तंतोतंत चित्र मला १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत बघायला मिळाले. सुदैवाने, नेल्सन मंडेला अतिशय व्यवहारी असल्याने, त्यांनी मंत्रिमंडळ तयार करतानाच, पूर्वकालीन गोऱ्या राजवटीतील अनुभवसिद्ध गोऱ्या लोकांना नव्याने सामावून घेतले. ते अर्थातच जरुरीचे होते. कारण काळ्या लोकांना राज्य चालवण्याचा कसलाच अनुभव नव्हता. विशेषतःः उपाध्यक्ष म्हणून "डी क्लर्क" यांची नेमणूक केली - ही व्यक्ती पूर्वाश्रमीच्या मंत्रिमंडळात अध्यक्ष होते. इतर अनेक महत्वाच्या खात्यांचा अधिभार त्यांनी गोऱ्या लोकांकडेच सोपवला होता. उदारमतवादी धोरणाचे सुरेख उदाहरण म्हणून म्हणायला हवे. पहिली ३,४ वर्षे तरी देशात कसलाच गोंधळ उडाला नव्हता. वास्तविक पहाता, इतर आफ्रिकन देशातील अनुभव बघता, दक्षिण आफ्रिकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळणे अशक्य नव्हते. नवीन राजवट आली तरीही अतिशय शांततेने सगळं बदल झाला आणि हळूहळू स्थिरावला गेला आणि याचे सगळे श्रेय नेल्सन मंडेला यांच्याच कडे जाते. जुन्या राजवटीतील मंत्र्यांना देखील तशीच सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली. त्यांच्या खात्यात कधीही फारसा हस्तक्षेप केला नाही. अर्थात सगळेच सुंदर होते, असे नक्कीच म्हणता येणार नाही. गोऱ्या लोकांचे काही गैरव्यवहार नंतर उघडकीस आले. त्याचीच परिणीती काळ्या लोकांवर झाली आणि हळूहळू भ्रष्टाचार पसरायला लागला. दुर्दैवाने, नेल्सन मंडेलांच्याच काळात, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उभे राहायला लागले होते, इतके की संध्याकाळी ऑफिस वेळ संपल्यावर जोहान्सबर्गमध्ये रस्त्यावरून पायी हिंडणे अवघड होऊ लागले. हे मंडेलांचे ठळक अपयश म्हणायला हवे. आर्थिक व्यवस्था खालावायला लागली होती. मंडेलांनीच, पुढे "Black Empowerment" कायदा पास झाला, त्याचा पाया घातला होता पण त्याचीच कडू फळे तुरळक का होईना दिसायला लागली होती. गोरा समाज आणि काळा समाज, यामधील आर्थिक दरी वाढायला लागली होती आणि समाजात असंतोष वाढायला लागला होता. वास्तविक पहाता, आता कुणीही स्थानिक रहिवासी, मनात येईल तिथे घर, कॉलेजमध्ये प्रवेश, हवी तिथे नोकरी इत्यादी सुखसोयी उपभोगायला मुक्त होता पण मुळात आर्थिक चणचण कमालीची असल्याने काळ्या लोकांच्या मनातील उद्रेक अधूनमधून उफाळत होता. स्वातंत्र्य मिळून केवळ ४,५ वर्षेच झाली होती आणि तितक्या काळातच,विशेषतःः स्थानिक भारतीय लोकांच्यात "पूर्वीची राजवट बरी होती" असे मतपरिवर्तन व्हायला लागले होते - जरी उघडपणे व्यक्त होत नसले तरी अनेक घरगुती समारंभात व्यक्त होत असे आणि याचा मी साक्षीदार होतो. हे देखील मंडेलांच्या नावावर अपयश मांडायला हवे. मुळात काळा समाज हा नेहमीच उग्र स्वभावाचा - कुठे, कधी उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. जे इतर आफ्रिकन देशांत घडत असते त्याचीच छोटी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत क्षीणपणे का होईना व्यक्त होत होती. मंडेलांना देशाच्या आर्थिक परिस्थितीची वाजवी जाण होती आणि आपली करन्सी मजबूत व्हावी म्हणून त्यांनी अनेक पावले उचलली होती परंतु हळूहळू ठिगळ पडत होते. एक कारण असे देखील देता येईल, मंत्रिमंडळातील गोऱ्या लोकांनी जितके सहाय्य्य देणे अपेक्षित होते तितके मंडेलांना मिळाले नाही आणि काळ्या लोकांना अनुभव कमीच असल्याने, ती बाजू देखील लंगडीच होती. असे असून देखील त्यांनी तक्रारीचा कुठेही पाढा वाचला नाही किंवा मागील राजवटीला दोष दिला नाही. आज जी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेत आहे, त्याची सुरवात मंडेलांच्या काळातच सुरु झाली होती. याचे परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षाचा घटत चाललेला पाठिंबा - पण हे घडणारच होते, केवळ लोकांना सुविधा दिल्या म्हणजे परिस्थितीत बदल होतो, हा भाबडा समज फार बोकाळला. माणूस सुधारण्याचे प्रयत्नच झाले नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम फार दूरगामी होतो. आताचे चित्र यालाच पुष्टी देते. आजच्या परिस्थितीला काही प्रमाणात मंडेला जबाबदार नक्कीच आहेत. सत्ता आल्यावर तिचा वापर करताना काही प्रमाणात तुम्हाला कठोर वागणे क्रमप्राप्तच असते. काळ्या लोकांना तळागाळातून वर आणणे आवश्यकच होते, त्यासाठी त्यांना सुविधा देणे योग्य होते परंतु त्या सुविधा कितपत परिणामकारक ठरत आहेत, हे तपासण्याची कसलीच यंत्रणा उभी केली नाही- हा भाबडेपणा झाला. केवळ कायदे केले म्हणजे सर्व काही सुव्यवस्थित होईल, हे मानले गेले! ! याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय कसे राहील? वास्तविक काळा समाज म्हणजे आपला समाज. तेंव्हा आपल्या समाजाबाबत मंडेलांना व्यावहारिक दृष्टी दाखवायला हवी होती. आपला समाज कसा आहे? याची समज त्यांना नसणार तर कुणाला असणार. असे असताना देखील, कायदे तयार करणे आणि त्याच कायद्यांची परिणामकारकता तपासणे, याबाबत मंडेला कमी पडले आणि पुढील काळ्या अध्यक्षांनी त्यांचीच "री" ओढली! ! असे असले तरी, दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे. |
मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट सातने एक आंतराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी शैक्षणिक फंड मिळवून देण्याचा नावाखाली लाखोंची फसवणूक करत होते. प्रसाद भोलापती आणि विनेश विश्वनाथ अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीने आता पर्यंत नऊ जणांना साडे चार कोटींचा गंडा घातला असून हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी एक महिलेला या दोन्ही आरोपींनी एक पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे त्यांनी आपण अधिकारी असलेल्या कंपनीला आयपीएमआय कंपनीकडून 80 हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक फंड मिळाला असल्याचे सांगितले. हा फंड रिझर्व्ह बँकेत आहे आणि तेथील अधिकाऱ्यांना पन्नास लाख रुपये दिल्यास त्यांना सात कोटी रुपये मिळतील असे त्यांना अमिश दाखविले. या बाबत त्याने भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालय, भारतीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारतीय कॉर्पोरेट मंत्रालय, परदेशी बँक आणि तेथील कंपन्यांची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला भुलून फिर्यादी महिलेने त्यांना तात्काळ 50 हजार रुपये अॅडव्हान्स देखील त्यांना दिले. पुढील रक्कम घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी घाटकोपरला त्या महिलेला बोलावले. मात्र या दरम्यान फिर्यादी महिलेच्या एक मित्राने सदर टोळी लोकांची अशी फसवणूक करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर या महिलेने गुन्हे कक्ष सातशी संपर्क साधला आणि झालेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी हे दोन्ही आरोपी जिथे महिलेला भेटणार होते. त्या घाटकोपरमधील हॉटेलवर छापा टाकला आणि या दोघांना अटक केली आहे. त्यांचाकडून अनेक शासकीय कागदपत्रे, बँकेची कागदपत्रे , सरकारी, मंत्रालयाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली असून ती सर्व बनावट आहेत. या टोळीने, दिल्ली, महाराष्ट्रसह विविध राज्यात असेच लोकांना फसविल्याचे समोर आले आहे. या टोळीत काही परदेशी सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असून पुढील चौकशी गुन्हे कक्ष सात करत आहे. |
मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. ठाणे - मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. लिव्हरपूल, लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलमध्ये देशातील सर्वात मोठा स्टार्टअप प्रकल्प सादर करण्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ऐनवेळी मंजुरी न दिल्याने संधी हुकली असल्याचा आरोप थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रक काढून केला आहे. यापूर्वी होणारे वाद हे चार भिंतीआड होत होते. परंतु, आता असे काय घडले की, आयुक्तांना थेट हे पत्रकच काढावे लागले, याचे कुतूहल मात्र वाढले आहे. ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्टार्टअप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन रुस्तमजी येथे स्टार्टअप संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येथे सुमारे लाखभर रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ब्रिटिश सरकारने येत्या १८ ते २२ तारखांच्या कालावधीत लिव्हरपूल, लंडन येथे आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महापालिका देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप प्रकल्पाचे प्रदर्शन मांडणार होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना या प्रकल्पाविषयी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. यासाठी एकूण ८. ५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. आयत्या वेळेचा विषय म्हणून तो महासभेसमोर पाठवला होता. त्यास मान्यता मिळाली नाही. यासंदर्भात महापालिका सचिव अशोक बुरपल्ले व उपायुक्त संदीप माळवी यांनी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांना विनंती केली होती. परंतु, त्यांनी त्यास नकार दिल्याने आता या फेस्टिव्हलमधून बाहेर पडावे लागल्याचे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकात नमूद करून महापौरांनाच जबाबदार ठरवले आहे. याबाबत, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी मला दोन अधिकारी भेटण्यास आले होते. मागील महिन्यात झालेल्या महासभेतील विषयात आयत्या वेळेचा विषय म्हणून या विषयाला तुम्ही मान्यता द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, २२ दिवस उलटल्यानंतर मी अशा प्रकारे या विषयाला कशी काय मंजुरी देणार, तसेच त्याला नुसती माझी मंजुरीच गरजेची नसून महासभेचीही मंजुरी हवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षभरात आयत्यावेळच्या कोणत्याच विषयांना मंजुरी दिलेली नाही. त्यातही आयुक्तांना स्वतःला २५ लाखांच्या खर्चाबाबत अधिकार आहेत, त्या अधिकारात ते मंजूर करून घेऊ शकले असते. यापूर्वीही मागील वर्षभरात आयुक्तांनी विदेश दौरे केले आहेत, त्यावेळी त्यांना कधी महासभेच्या मंजुरीची गरज भासली नव्हती का, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे. रस्टार्ट अप प्रकल्पाविषयी आंतरराष्टÑीय तज्ज्ञांसमोर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल सादरीकरण करणार होते. या सादरीकरणासाठी ८. ५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. त्या खर्चाला महासभेने मान्यता नाकारली. |
Coronavirus : कोरोनातून सावरलेल्या इटलीतील वृद्धाचा जयपूरमध्ये मृत्यू; निधनाचं कारण कोरोना नाही! Coronavirus : कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी (20 मार्च) जयपूरमध्ये कोरोनातून सावरलेल्या इटलीतील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या व्यक्तीच्या निधनाचं कारण कोरोना नसून कार्डिएक अरेस्टने त्याचा मृत्यू झाला आहे. ऐन्द्री कार्ली असं या 69 वर्षीय व्यक्तीचं नाव असून फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शुक्रवारी (20 मार्च) 2,45,670 वर पोहोचली होती. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 88, 441 लोक बरेही झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. 163 भारतीयांना आणि 32 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पद्दूच्चेरीमध्ये 1, दिल्लीमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, केरळमध्ये 28, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 2, तेलंगणामध्ये 16, गुजरात 2, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 19, लडाख 10, तमिळनाडू 3, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी शुक्रवारी (20 मार्च) पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यातील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात. राज्यातील 1035 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 971 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे' असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. |
प्रबळ मूच्छी आळी ! अशा प्रकारें इंद्र संकटांत इंद्र आपल्या रथासह बाणांचे आच्छादन दूर पडला आहे असे पाहतांच, मातळीने सहस्र सारून बाहेर पडला, व त्यानें देवसैनिकांच्या अश्व जोडलेला त्याचा रथ तत्काल तेथे आणून मनाला प्रफुल्लित केलें. आपल्या परोक्ष शत्रूनी त्याच्याजवळ उभा केला; तेव्हां इंद्र ऐरावता- आपल्या सैन्याची दुर्दशा उडविली असे पाहून, वरून उतरून रथांत बसला. राजा, त्या वेळ. इंद्राने शत्रूचा उच्छेद करण्याकरिता आपले वज्र च्या मातळीच्या चळाखीबद्दल जंभानेही त्याची उचविले, आणि त्या त्वेषांत बळ व पाक यांची प्रशंसा केळी, आणि हसत हसत एक देदीप्यमान मस्तकें उडविलीं. ही स्थिति पाहून इतर दैत्यांना शूळ त्याच्या अंगावर फेंकिळा. मातळीला तो मोठें भय वाटलें. बल आणि पाक मेळे असे शुक मर्मस्थानी लागला, तरी त्याची दुःसह पीडा पाहून नमुचीला अत्यंत शोक झाला; आणि त्यानें तशीच सहन केली; पण सारथ्य सोडिलें नाहीं. इंद्राचे हे कृत्य त्याला सहन न होऊन तो इंद्रात्या प्रसंगी इंद्रासही पराकाष्ठेचा त्वेप चढळा, आणि च्या अंगावर धावून आला. राजा, ते स्याने क्रुद्ध होऊन आपल्या वज्राने जमाचे मस्तक इंद्राचें व नमुचीच युद्ध घडापासून वेगळे केलें. जंभ मेल्याचे वर्तमान फारच भयंकर झाले. नमुचीनें आपला शूल नारदांनी त्याच्या बांधवांना सांगितले, तेव्हां उचलून मोठी गर्जना केळी, आणि ' दुष्टा, नमुचि, बल, पाक हे दैत्य तत्काल तेथे येऊन मेळास !' असे म्हणून तो शूल त्यावर फेपोहोचले. त्यांनी वाक्प्रहारांनी इंद्राचे अंतःकरण कळा. पण इंद्रानें आपल्या बाणाच्या योगानें आणि शरप्रहारांनी त्याचे शरीर अगदी विद्वत्या झुळाचे आकाशांतच सहस्रशः तुकडे केले ! करून सोडिके. बळ दैत्याने मोठ्या चपलतेने राजा, इंद्रालाही राग आला होता; म्हणून इंद्राच्या रथाच्या घोड्यांना हजार बाण मारून त्यानें नमुचीचा शिरच्छेद करण्याकरितां त्याच्या एकदम घायाळ केले. पाक दैत्यानें एकदम मानेवर वज्रप्रहार केला. पण त्यापासून त्याच्या दोनशें बाण सोडन सारथि आणि चक्रादिकांसह त्वचेला सुद्धां धक्का लागला नाहीं ! तेव्हां इंद्राला स्थ हे दोन्ही निरुपयोगी केळे. इतक्यांत नमुचीनें मोठे आश्चर्य वाटलें. ज्या वज्राच्या जोरावर आपण भयंकर गर्जना केली, आणि पंधरा बाण इंद्रावर वृत्रासुराचा वध केला, त्या बज्रानें नमुचीच्या सोडिले. राजा, पर्जन्यकाळी मेत्र ज्याप्रमाणे त्वचेला नुसता धक्का सुद्धां लागला नाही, है सूर्याला आच्छादितात, त्याप्रमाणे त्या दैत्यांनी पाहून इंद्र दचकला. तो मनांत म्हणूं लागला घोडे, सारथि व रथ यांसह इंद्राळा आच्छादून की, " जेव्हा पर्वतांना पंख होते, तेव्हां से टाफिके. इंद्र कोठे दिसेना असे पाहून देवगण आकाशांत उडत आणि भूमीवर पडत; त्यामुळें घाबरले; आणि देवसैन्यांत जिकडे तिकडे हाहा- प्रजचा फार नाश होई, म्हणून त्या पर्वतांचे कार उडाला ! दैत्यांनीही देवसैन्य निर्नायक पख मी या वज्रानें तोडिळे; त्वष्टयाच्या तपाची झाले आहे अर्से पाहून त्याजवर निकराचा हल्ला केवळ मूर्तिच असा जो महाप्रबळ दैत्य वृत्रासुर, केला आणि त्याचा पराभव केला. समुद्रांत नौका त्याचीही मान भीं या वज्रानें चिरली; आणि फुटून गेली असता व्यापाऱ्यांची जशी स्थिति कोणत्याही आयुधांनीं ज्यांच्या त्वचेचा भंग होत होते, तशी देवाची स्थिति झाली. इतक्यांत, नव्हता, असे अनेक दैत्यही भी या वज्रानें ज्याप्रमाणें रात्र संपल्यावर सूर्यनारायण आपल्या मारिके; पण असे असतां आज तें वज्र या क्षुद्र किरणांनी जगाळा प्रफलित करितो, त्याप्रमाणे दैत्यापुढे तुच्छ ठरले काय ! हें वज्र म्हणजे |
पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे. पद क्र. 1- (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) पद क्र. 2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि. पद क्र. 3- पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य. पद क्र. 4- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव. पद क्र. 5- (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट किंवा समतुल्य. पद क्र. 6- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर- E &G ) किंवा समतुल्य. पद क्र. 7- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य. नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत. #GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का ? |
कोरोना लसीकरणासाठी आज 'ड्राय रन' ! देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी 'ड्राय रन' घेण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर 'कोविन अॅप' किती सोयीस्कर व उपयोगी आहे, हे तपासणे. कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरांवरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे, यासाठी यापूर्वी नागपूरसह अन्य काही जिल्ह्यात 'ड्राय रन' घेण्यात आला. आता वाशिम जिल्ह्यातही ८ जानेवारी रोजी 'ड्राय रन' घेण्यात येणार आहे. या ड्राय रनमध्ये सत्रस्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर, कोविन अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोविन अॅपमध्ये करण्यात येईल. 'ड्राय रन' मोहिमेत लाभार्थ्यांना लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे. |
भाजपचे अमित शहा यांनीच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून पलटी मारली आहे त्यामुळे स्वतंत्र विदर्भासाठी ठाम असणारे मुख्यमंत्री फडणवीस यांची गोची होणार आहे . मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयात शहा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी राम मंदिर, ३७० कलमांसह वेगळ्या विदर्भ राज्याबद्दलच्या आश्वासनांची आठवण शहा यांना करून दिली. यापैकी राम मंदिर व कलम ३७०च्या मुद्द्यावर शहा यांनी थेट नकार दिला नाही. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपला 'छप्परफाड' यश मिळवून देणारा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा त्यांनी अक्षरशः झटकून टाकला. सत्ता आल्यानंतर वेगळा विदर्भ देऊ, असे कुठलेही वचन आम्ही दिले नव्हते, असे शहा यांनी बिनदिक्कतपणे सांगून टाकले. शहा यांच्या या वक्तव्यामुळं विदर्भातील जनतेला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न आता राज्य भाजपपुढं उभा राहिला आहे. |
जाणून घ्या काय आहे हे नवीन फिचर ? WhatsApp युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वॉट्स ऍप आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. सध्या कंपनी या फिचरची बिटा वर्जनमध्ये टेस्टींग करत आहे. या फिचर्समध्ये तुमचा व्हॉईस कॉल तुम्हाला व्हिडिओ Add Newकॉल मध्ये स्विच करता येणार आहे. तसंच या फिचरची विशेषता म्हणजे व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करतेवेळी कॉल डिस्कनेक्ट करण्याची गरज पडणार नाही. WhatsApp सध्या व्हिडिओ कॉलची सुविधा देत आहे. जर तुम्ही कुणाला व्हॉईस कॉल करत असाल आणि अचानक तुमचं मन व्हिडिओ कॉल करण्याचं झालं, तर आधी तुम्हाला व्हॉईस कॉल डिस्कनेक्ट करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला व्हिडीओ कॉल करावा लागतो. मात्र आता या नव्या फिचरमुळे असे करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये जाऊ शकता. (रिलायन्स जिओ मोबाईल घेत आहात, एकदा नक्की विचार करा...!) सध्या बिटा व्हर्जनवर या फिचरचं टेस्टींग सुरू आहे. wabetainfo च्या रिपोर्टनुसार, अॅन्ड्रॉईड बिटा व्हर्जन 2.17.263 वर गेल्या आठवड्यात या नव्या फिचरला टाकण्यात आलं आहे. सोबतच WhatsApp एका नव्या अॅपचंही टेस्टींग करत आहे. हे अॅप व्यावसायिकांसाठी तयार केलं जात आहे. या अॅपच्या माध्यमातून व्यावसायिक लोक आणि ग्राहक एकमेकांसोबत सोप्या पद्धतीनं संवाद साधू शकतील. मात्र या अॅपबद्दल अजून काही अधिकॄत स्पष्टीकरण आलेलं नाहीये. |
Budh Rashi Parivartan । ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ठराविक कालावधीत प्रवेश करतो. सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी बुध ग्रहाने कर्करोग सोडून सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह राशीत बुधदेवाचे आगमन काही राशींच्या जीवनात अनिष्ट परिणाम करू शकते. बुधदेव २१ ऑगस्टपर्यंत सिंह राशीत राहतील. जाणून घ्या कोणत्या राशींवर असेल बुध भगवान देवाचा अशुभ प्रभाव. कर्क राशी : आपल्या राशीतून दुसऱ्या घरात बुधाचे संक्रमण झाले आहे. बुधाच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन सुखकारक राहील. मात्र, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांसाठी बुध आर्थिक अडचणी आणू शकतो. बुध आपल्या राशीच्या 12 व्या घरात संक्रमण करतो. यामुळे आपल्या खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. मकर राशी : मकर राशीच्या लोकांसाठी बुध संक्रमण जीवनात आव्हाने आणू शकते. आपल्या राशीच्या आठव्या घरात बुधाचे संक्रमण झाले आहे. या काळात गुंतवणूक टाळावी. कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगावी. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. कुंभ राशी : कुंभ राशीच्या सप्तमात बुधाचा प्रवेश झाला आहे. बुध संक्रमण आपल्या वैवाहिक जीवनावर आणि व्यवसायावर परिणाम करू शकते. या काळात जोडीदारासोबत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. मीन राशी : मीन राशीच्या सहाव्या घरात बुधाचे संक्रमण शुभ मानले जात नाही. या काळात कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्चाला लगाम . कोणताही निर्णय घेताना थोरामोठ्यांचा सल्ला घ्या. आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. News Title: Budh Rashi Parivartan effect on these zodiac signs check details 04 August 2022. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. बलरामपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं विजेचं बिल आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाने शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं बिल पाठवलं आहे. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार असं शेतकऱ्याचं नाव असून हे भलं मोठं बिल पाहून त्यांना धक्का बसला आहे. तसेच नोटीस मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय देखील चिंतेत आहे. डिसेंबर 2018 मध्ये या गावाचे विद्युतीकरण केले होते. गावातील शेतकरी शिवकुमार यांनी सौभाग्य योजने अंतर्गत पत्नी सुनीता देवीच्या नावावर विजेचं कनेक्शन घेतलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये सुनीता देवीच्या नावावर 1700 रुपयांचा विजेचं बिल आलं होतं. मात्र काही कारणास्तव शिवकुमार हे विजेचं बिल भरू शकले नाही. 29 जुलै 2020 मध्ये शिवकुमार यांच्या पत्नी सुनीता देवीच्या नावावर तब्बल 64,02,507 रकमेची नोटीस आली आहे. 8 ऑगस्टपर्यंत हे बिल जमा करण्याचे निर्देश त्यामध्ये देण्यात आले आहेत. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत आहे. आपली सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. घरात केवळ दोनच बल्ब सुरू असताना एवढं बिल कसं आलं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात? ; आता कायमस्वरूपी Mute करून टाका! |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपने हा विषय जोरदार लावून धरला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका होत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. "सागरा प्राण तळमळला" या देशात तरुणांना काय हवंय. . 1947पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं,आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच. . प्रचंड संताप ही होतो. . सर्वांना होतो. . त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते. . आपल्या ट्विट मध्ये पंकजा मुंडे म्हणतात, सागरा प्राण तळमळला या देशात तरुणांना काय हवंय... 1947 पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं, आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होचोच. . प्रचंड संतापही होतो. . त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते... कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ? ? ? ... जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरु ठेवण्यात आले होते. आज भाजपने सावरकरांचा मुद्दा जोरदार लावून धरला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली. - रोज ओले खोबरे खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे ! |
आजपासून राज्यात मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व दुकानं सुरू कऱण्यात आली आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकानं खुली असतील. यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूची दुकानं तर विषम तारखेला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायलरुम बंद राहणार आहेत. दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदारांनी घ्यायची आहे. खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते असेही नवीन नियमात नमूद केले आहे. |
पणजी : ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सोमवारी सायंकाळी शानदार समारोप झाला. 'एब्रेस आॅफ द सर्पंट' या कोलंबियन सिनेमाला प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला, तर रशियन सिनेनिर्माते निकिता मिखालकोव्ह यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन केले होते. दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यावेळी विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्यपाल मृदुला सिन्हा, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी या वेळी उपस्थित होते. उत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड झालेल्या 'एब्रेस आॅफ द सर्पंट' या सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माते या वेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे कला दिग्दर्शकांनी मुख्यमंत्री पार्सेकर व केंद्रीय राज्यमंत्री राठोड यांच्या हस्ते 'सुवर्ण मयूर' स्वीकारला. युनेस्कोचे फेलिनी पदक 'सिनेमावाला' या बंगाली चित्रपटाला देण्यात आले. या सिनेमाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राज्यपाल मृदुला सिन्हा व ए. आर. रेहमान यांच्या हस्ते निकिता मिखालकोव्ह यांना 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 'गेली ४० वर्षे मी या क्षेत्रात असून आपण आयुष्यात प्रथम दिल्लीतील इफ्फीमध्ये माझा पहिला चित्रपट घेऊन सहभागी झालो होतो,' असे मिखालकोव्ह म्हणाले. राज कपूर रशियातही प्रसिद्ध होते. त्यांना वाटले असते, तर त्या वेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्षही झाले असते, असे ते म्हणाले. ज्युरी समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार 'आईनस्टाईन इन गुवानाजुवातो' या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर ग्रीनअवे यांना देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार फ्रेंच अभिनेते विन्सेंट लिंडन याला 'द मेजर आॅफ अ मॅन' या चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तुर्कस्तानच्या 'मुस्तांग' चित्रपटातील पाच महिला कलाकारांना विभागून देण्यात आला. विशेष ज्युरी पुरस्कार जुलिया वार्गास यांना देण्यात आला. सिनेमांमधून जगातील संस्कृती आपल्याला कळते. जगातील माणसांमध्ये असलेले साधर्म्य कळते. यापुढील काळातही अधिकाधिक चांगले सिनेमे देशात तयार होतील, असा विश्वास प्रमुख पाहुणे ए. आर. रेहमान यांनी व्यक्त केला. इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील दोन वर्षांत सगळ्या साधनसुविधा उभ्या होतील, असा विश्वास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केला. सचिव सुनील अरोरा यांनीही विचार मांडले. राठोड, पार्सेकर, अरोरा, आर. के. श्रीवास्तव यांच्यासह राज्यपाल मृदुला सिन्हा, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, सीईओ अमेय अभ्यंकर यांच्याही हस्ते विविध पुरस्कारांचे कलाकारांना वितरण करण्यात आले. शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीच्या सर्व सदस्यांनाही गौरविण्यात आले. २०१४ सालच्या इफ्फीचे डिझायनर गोव्याचे सुपुत्र सुशांत तारी यांनाही या वेळी गौरविण्यात आले. कबीर बेदी यांनी सूत्रनिवेदन केले. राहुल आर्या याने वाळूवर शिल्पकृती काढून भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास चितारला. (खास प्रतिनिधी) |
मावळ, दि. १५ (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघातील मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघ रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात येतो. मुंबई विभागात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, डोंगरगाव, खंडाळा हा मावळ मतदारसंघातील भाग येतो. मुंबई विभागातील मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामासंदर्भात खासदार बारणे यांनी मुंबई रेल्वे विभागाचे डीआरएम रजनीश के. गोयल यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्प आणि नवीन कामे हाती घेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मुंबई मध्य रेल्वे अतंर्गत येणाऱ्या लोणावळा ते मुंबई या मार्गातील गेट क्रमांक २२ अंबिवली, २३ भिवपुरी, २५ अषाने कोषाने, २६ सावरगाव, तसेच गेट क्रमांक ३४ डोंगरगाव, २९ खंडाळा गावठाण आणि गेट क्रमांक ३१ जुना खंडाळा (लोणावळा ) येथे रेल्वे ओव्हर ब्रिजचे कामे केली जाणार आहेत. ही कामे लवकरात लवकर सुरू करावीत. पनवेल ते खारकोपर लोकल सेवा सुरू आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाला गती देवून पूर्णत्वाकडे नेण्याबाबत सूचना केल्या. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजच्या कामाला गती द्यावी. अनेक नवीन कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्यावी. याशिवाय नेरळ ते माथेरान दरम्यान चालू असलेल्या ट्राय ट्रेनचा आढावा घेतला. त्यातील काही त्रुटीमध्ये सुधारणा करावी. पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. पनवेल रेल्वे सेवेचाही आढावा घेतल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. |
नागपूरः खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. वृत्त वाहिन्यांवर मनता येते तशी बातमी दाखविली जाते आणि त्याचा ज्याला जो अर्थ काढायचा आहे तसे अर्थ काढले जातात, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation election 2022) निवडणूकीवर केलेल्या विधानावर फडणवीस म्हणाले, मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे, असं समजून जेव्हा तुम्ही झोकुन देता, तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. माझे वाक्य फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी नव्हते, तर प्रत्येक निवडणुकीच्या एकंदरीत रणनीती संदर्भात होते, असे स्पष्टीकरणही यावेळी फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र आणि देशामध्ये ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जो मान आहे तो खूप मोठा आहे. सगळ्यांच्या मनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहे. त्यामुळे फोटो लावण्याची अनिवार्यता करण्याची गरज नाही. मात्र सरकारी कार्यालय नियमाने, आदेशाने चालतात. त्यामुळे आदेश काढले असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मिशन इंडिया (BJP Mission India) आहे. तसेच महाराष्ट्र भाजपचा मिशन महाराष्ट्र आहे. तसेच बारामती हे महाराष्ट्रात आहे. म्हणून बारामती मिशन (Mission Baramati) महाराष्ट्र मध्ये आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे. आम्ही प्रत्येक जागेचे नियोजन करतो. मात्र अनेकांकडून वेगळे तर्क लावण्यात येतात असेही यावेळी ते म्हणाले. बारामतीमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष गावा-गावात बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. |
नवी दिल्लीः जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतत्रं कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करण्यात येईल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडलं जाईल. करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणमधून आलेल्या नागरिकांची आधी तपासणी करण्यात येणार आहे. इराणमध्ये १३ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. पश्चिम आशियात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव इराणमध्ये झाला आहे. इराणमधून मंगळवारी ५८ प्रवाशांना आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ४४ प्रवाशांना आणले गेलं होतं. इराणमध्ये शनिवारी करोना व्हायरसने जवळपास १०० जणांचा मृत्यू झालाय. यानुसार इराणमधील करोनामुळे मृतांची संख्या ७००पर्यंत पोहोचलीय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाने दोन आठवड्यांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे. आखाती देशांमध्येही करोनाचा फैलाव होतोय. इराणचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. इरानचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सल्लागारालाही करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपा्ट्याने वाढत आहे. यातच देशातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांदरम्यान लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो स्कूटर (praise pro electric scooter) चे 3215 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंंपनी ग्राहकांना स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास ताबडतोब दुरुस्त करुन देईव, असे ओकिनावाने म्हटले आहे. ओकिनावा कंपनी गाड्यांसाठी आयोजित करत असलेल्या हेल्थ चेकअप शिबिरांचा हा एक भाग आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, बॅटरी लूज कनेक्टर किंवा कोणत्याही डॅमेज झाला आहे का हे तपासले जाईल आणि ओकिनावा अधिकृत डीलरशिपवर फ्री दुरुस्ती केली जाईल, दुरूस्तीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री घेण्यासाठी कपनी डिलरशीप्ससोबत मिळून यावर काम करत आहे, तसेच यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे, असे सांगण्यात आले आहे. या कंपनीचे देशभरात सुमारे 500 डीलर्सचे नेटवर्क आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रिकच्या सुमारे 40 इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) आग लागली होती. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई-स्कूटर नेत असताना हा अपघात झाला. यापूर्वीही ओला आणि प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. 28 मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये, मिडनाईट ब्लू कलर Ola S1 Pro आगीत जळताना दिसून आली होती. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्युअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. |
खेड-आळंदी, 16 ऑक्टोबर : खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांची मोठी संख्या आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही बैलगाडा शर्यतीचा मुद्दा जोरात सुरू आहे. आणि प्रचारात प्रतिस्पर्ध्यांनाही शेलक्या उपमा दिल्या जात आहेत. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भाषणाच्या आधी बैलगाडा शर्यतीत जसा आवाज दिला जातो अशी आरोळी ठोकण्यात आली. त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साह संचारला. बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याकडे इथल्या नागरिकांचं लक्ष लागलंय. त्यामुळे अमोल कोल्हे यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांचं हे सांगण्याची शैली जरा हटके होती. विधानसभा निवडणुकीत खेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत लढत होत आहे. या लढतीवर अमोल कोल्हेंनी मतदारांना विनोदी शैलीत आवाहन केलं. खेड मतदारसंघातली निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आता कोणत्या उमेदवाराचा बाजार उठणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
रोलर रिले स्केटिंग संघटना व जिल्हा सायकलिंग संघटना यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी विभागीय पातळीवरील स्केटिंग व सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. १५ ऑगस्टला सायकलिंग स्पर्धा दुपारी एक वाजता आणि स्केटिंग स्पर्धा दुपारी चार वाजता होणार आहे. सायकलिंगमध्ये बायसिकल, ट्रायसिकल, एमटीबी, रेसिंग सायकल स्पर्धांचा समावेश आहे. स्केटिंगमध्ये कॉड स्केट, बिगनर स्केट, प्रोफेशनल इनलाइन, फॅन्सी इनलाइन स्केट या प्रकारांचा समावेश आहे. ही स्पर्धा दोन, चार, सहा, आठ, दहा, बारा व चौदा वर्षांखालील गटात तसेच खुल्या गटातही घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. खेळाडूंनी स्पर्धेत सुरक्षेसाठी हेल्मेट व इनसुट घालणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राधिका अंबे व सचिव भिकन अंबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. |
मुंबई - अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्याची हत्या करणे अत्यंत चुकीचे आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील एका इमारतीत बकरी ईदनिमित्त बकर्या आणल्या होत्या. त्यावरून हिंदु आणि जैन कुटुंबियांना विरोध केला होता. या प्रकरणी जैन समुदायाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर २८ जून या दिवशी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने अनुमतीविना इमारतीत बकर्यांची हत्या करणार्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांना दिले आहेत. 'मुंबई पोलिसांनी इमारतीच्या आवारात पडताळणी करावी. आवश्यकता भासल्यास इमारतीत पुरेसा बंदोबस्तही ठेवावा', अशी सूचना न्यायालयाने दिली आहे. प्रत्यक्षात या इमारतीत ६० बकर्या आणल्याचा आरोप जैन धर्मियांकडून केला गेला. बकर्या आणल्यावर मुसलमानाला विरोध करणारे हिंदू आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी लाठीमारही केला. (अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक) पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ? |
स्वारीतील कार्यक्रम. आपणच दोन्ही बाजूंने कांही तरी बोलून उगीच मला लाजवावयाचें, एवढाच काय तो रोख असे. दुसरें कांहीं नाहीं. असा विनोदांत कांहीं वेळ गेल्यावर निजण्याच्या पूर्वी एक तास कारकुनांपैकी कोणीतरी एकजण येऊन दैनिक इंग्रजी वर्तमानपत्रे वाचीत असे. त्या वेळी मी स्वतःच्या पायांस तूर चोळीत बर्से. कारण, डोळे दुखरे असल्यामुळे दररोज पायाला तूप लावून घेतल्याशिवाय झोप येत नसे. एखादे वेळेस वाचन नसेल, त्या दिवर्शी आम्ही उभयतां बुद्धिव खेळत अमूं. अशा वेळी गडी पायांस तूप लावीत असे. सुमारे दहा अकरा वाजता आम्ही झोपी जावयाचे. स्वतःला झोप जातीची कमी असल्यामुळे चार साडेचार तास झप लागली, की, पुष्कळ झाली असे वाटे. यासंबंधाने माझं अगदी उलट असे. मला झपि फार असल्यामुळे स्वतःची झाँप तीन साडेतीन वाजता झाल्याबरोबर मला उठविण्यास आरंभ होई. तेव्हां उठण्याचा कंटाळा म्हणून मनांतल्या मनात राग यई व कहा केव्हां त्रास वाटून मी रडकुंडीला येई; पण यापैकी काहीं बाहर दाखवीत नसे व बोलत नसे. तरी स्वतःच्या लक्षात येई. पण हे आपल्याला समजले नाही असे दाखवून मी उठन नित्यक्रमाला लांगपर्यंत मला जागी करण्याचा क्रम चालावयाचा. मी एकदा उठून दिवा जवळ घेऊन वाचण्याचं पुस्तक हातांत घेतले ह्मणजे मग अमुक वाच ह्मणून सांगावयाचं. याप्रमाणं मी वाचू लागले ह्मणजे त्यातील लोक, केका, अभंग आपण अणूं लागावयाचे, किंवा ऐकत असतां अर्थाकडे मन गढले ह्मणजे तल्लीनतेनें चुटक्या अगर टाळ्यासुद्धां वाजवावयाच्या. एखाड़ा नामदेवाचा प्रेमळ अभंग स्वतःच्या आवडीसारखा आला तर तो मला पुनः पुनः ह्मणावयास सांगावयाचें व अभंगाच्या विचा रांत मन गढून गेल्यामुळे डोळे मिटून स्वतः डोलंसुद्धां लगावयाचें, अशी कधीं कवी स्थिति होई. अशा वेळी सकाळच्या संधिप्रकाशाच्या १२२ आमच्या आयुष्यांतील कांही आठवणी. शांत उजेडांत हें भक्तिपूर्ण मुख फारच प्रेमळ दिसून माझें मन सद्गदित होई आणि स्वतःबद्दल प्रेम व पूज्यबुद्धि आपोआप वाढे. मी एकटी असलें ह्मणजे माझ्या मनांत अर्से येई, कीं, नुसत्या नात्याच्या किंवा संसाराच्या दृष्टीनें मी इकडे पहातें, पण येथे सामर्थ्य व दैवीभाग जास्त आहे; पण हे वाटणे फार वेळ टिकत नसे. याबद्दल आपण जवळ कांहीं विचारावें व आपल्याला काय वाटते. ते सांगावें, अर्से मनांत आणून त्या बुद्धीनें मीं वर पाहिलें, व त्याच वेळीं माझ्याकडे पाहण्याची वेळ आली तर दृष्टादृष्ट होतांच माझे हे सर्व विचार वाळूच्या इमारतीप्रमाणे ढासळून जावयाचे. मी कांहीं बोलणार होतें हैं लक्षांत येऊन स्वतः ह्मणावयाचें " कांहीं टीका करावयाचा विचार मनांत घोळत आहे वाटतें ? असेल तर चालू दे. मग विचार कशाला ? आह्मी भोळींभाबडी माणसें ! कांहीं तरी भजन करतों. तुह्मी इंग्रजी शिकलेल्या बायका, तुझांला हे थोडेंच रुचणार आहे!" असें ऐकलें ह्मणजे मी लाजून उठून जाई. झालें. राहिला बेत. गेले उद्यांवर. याप्रमाणे नेहमीं चालावयाचेंच. प्रत्येक तालुक्याच्या गांवीं आमचा मुक्काम दोन किंवा तीन दिवस होत असे. तेव्हां मुलींच्या शाळेचे मास्तर शाळा पहावयास येण्याबद्दल आमंत्रण करण्यास येत. त्यांनी आमंत्रण केल्यावर ह्मणावयाचें "हें काम बायकांचे आहे. त्यांस आमंत्रण करा ह्मणजे त्या येतील." असे ऐकल्यावर ते मजकडे येत व शाळा पाहण्याची वेळ ठरवीत. रात्री जेवतेवेळीं विचारावयाचें "आज भेटावयास कोण कोण आले होते ?" मी ह्मणे " कोणी नाहीं. मामलेदारीणबाई व मुन्सफीणबाईच आल्या होत्या. संध्याकाळी मात्र मुलींच्या शाळेचे मास्तर येऊन आमंत्रण करून गेले. " सुखाचा प्रवास. हें ऐकलं झणजे ह्मणावयाचें "मग केव्हांचा बेत ठरला ? कांहीं व्याख्यानाची तयारी असेलच ! मलाही मघार्शी कामाच्या धांदलीत कांहीं ऐकल्यासारखे वाटतें खरें; पण तेव्हां लक्षात आले नव्हते. कांहीं रस्त्याने जाणारे लोक बोलत होते, कीं, येथे भल्या जाड्या विद्वान बाई आल्या आहेत, त्यांचें उद्या मुलींच्या शाळेत व्याख्यान आहे, वगैरे वगैरे कांहीं बोलत होते खरे. आह्मी आपल्या कामांत. आमचें कोठें लक्ष असतें? पण ओझरते कानावर आलेले शब्द तुझ्याचबद्दल असतील, असें आतां वाटते. " हे बोलणे नवीन ऐकणाराला खरंच वाटेल, असे गंभीरपणे बोलावयाचें. फुरसतीची वेळ असली झणजे गट्टेनें व विनोदानें बोलावयाची संवय असे. मी ह्मणे " इतक्या शब्दांपैकी 'भल्या जाड्या ' एवढा शब्द मात्र मला लागू पडतो खरा. बाकी सर्व कल्पनाच आहे. दुसरे दिवशी मी शाळा पाहून आल्यावरमुद्धां ही थट्टा चालावयाचीच. बरं, एखादे गांवीं काही अडचणीमुळे किंवा आळसाने शाळा पाहण्यास गेले नाही, तर लागलाच राग येई व ह्मणणं होई मनुष्य अगत्याने बोलवायास येतो, तेथे नुमते जाऊन पाहण्यास काय होते : काय ओझं ध्यावयाचे असते तुमच्या जाण्याने बोलावणाराम मांझ थोडाच मिळतो आहे ! आपल्याला अनायास माहिती मिळते ह्मणून जावं. आमी बोलनी ह्मणजे काय ! नुसतं करमणुकीसाठी विनोदाने बोलतों. पट्टेच्या बोलण्याचा अर्थ भलता घेऊं नये. अशा नव्हने सुखासमाधानांत होणारा प्रवास अधिक प्रिय कां होणार नाहीं ! याप्रमाणे आझांला तर वरच्याहून प्रवासांत जास्त सुख होई. फिरता फिरतां आमचा मुक्काम एकदा तासगांवी पडला. तालुक्याचा गांव असला म्हणजे आमचे राहणे दोन तीन दिवसतरी व्हावयाचें. या वेळी आह्मी श्रीगणपतीचे धर्मशाळेत उतरलो होतो. माझी उतरून |
अहमदनगर : राज्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अहमदनगर महापालिकेत मात्र हे दोन्ही पक्ष मंगळवारी जाहीरपणे एकत्र आले. स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीव संजय ढाेणे, नगरसेविका वंदना ताठे यांचे पती विलास ताठे, नगरसेवक रामदास आंधळे ही भाजपची मंडळीही उपस्थित होती. महापौर वाकळे यांच्यासह पदाधिकारी नगरसेवकांनी हजेरी लावत घुले यांच्या उमेदवारीला एकप्रकारे पाठिंबा दिला आहे. महापालिकेत स्थायी समिती सभापतीसाठी अविनाश घुले यांनी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर दाखल केला. स्थायी समितीचे सदस्य घुले हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचा अर्ज दाखल करताना महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनीही हजेरी लावली. बसपाच्या कोट्यातून आलेले मुद्दसर शेख हे तर सुरुवातीपासून घुले यांच्यासोबत होते. नगरसचिव कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेऊन विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या दालनात सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विरोधी पक्षनेते बारस्कर हे राष्ट्रवादीचे आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी घुले यांनी फोनवरून सर्वांशी संपर्क साधला. महापौर वाकळे हे आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला गेला. घुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महापौर वाकळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक हजर असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना सध्या अधिवशेनाच्या निमित्ताने रंगला आहे. अधिवेशनात भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असून, अहमदनगर महापालिकेत मात्र भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे मनोज कोतकर यांना राष्ट्रवादी प्रवेश देऊन त्यांना सभापती करण्यात आले. कोतकर हे राष्ट्रवादीतून सभापती झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच आदळाआपट केली. कोतकर यांना तुम्ही नेमके कुणाचे आहात याचा लेखी खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस त्यांना बजावली गेली. यावेळी तर उघडपणे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या घुले यांचा अर्ज दाखल करताना हजेरी लावली. यावर मात्र भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने एकप्रकारे राष्ट्रवादीच्या घुले यांना पाठिंबा दिल्याचेच यावरून उघड होते. स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे घुले यांचा अर्ज दाखल करताना महापौरांसह भाजपाच्या नगरसेवकांनी हजेरी लावली. बसपाचे मुद्दसर शेख हेही उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवकही उपस्थित होते. सेनेकडून मात्र कुणीही उपस्थित नव्हते. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीतून सेनेने माघार घेतली. त्यावेळीही सेना एकाकी पडली. यावेळीही सेनेला सभापती पदापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा, भाजप हे चारही पक्ष एकत्र आल्याने सेना पुन्हा एकाकी पडली आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी घुले यांनी दोन अर्ज दाखल केले. यापैकी एका अर्जासाठी बसपाचे मुद्दसर शेख हे सूचक असून, प्रकाश भागानगरे हे अनुमोदक आहेत. दुसऱ्या अर्जासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सागर बोरुडे सूचक असून, अनुमोदक म्हणून सुप्रिया धनंजय जाधव यांची स्वाक्षरी आहे. |
Kesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम\nHomeLatest Bollywood NewsKesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम\nअक्षय कुमारचा नवा सिनेमा केसरी रसिकांच्या भेटीला सिद्ध झाला आहे. या सिनेमातील काही क्षण अक्षयने तीन पार्टमध्ये फॅन्ससोबत शेअर केले आहेत. यातील पहिल्या पार्ट्मध्ये अक्षय तळपत्या तलवारीसहित अफगाणी शत्रुचा समाचार घेताना दिसत आहे.\nतर या सिनेमाच्या दुस-या व्हिडिओमध्ये अफगाणी सैनिकासमोर हवालदार ईशरसिंह अर्थात अक्षयकुमार अंगाभोवती ज्वाळा लपटेलेल्या असतानाही निडरपणे उभा असल्याचं दिसून येत आहे. अक्षयचा धगधगता अवतार पाहून अफगाणी सैनिकांच्या चेह-यावरील भय स्पष्टपणे दिसून येत आहे. २ सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला ईशरसिंगच्या धाडसी स्वभावाचा प्रत्यय देईल यात शंका नाही. या व्हिडिओला Glimpses of Kesari - Part2असं नाव दिलं गेलं आहे.\nहा सिनेमा अनुराग सिंह दिग्दर्शित करत आहे. हा सिनेमा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. करण जोहर, अपूर्व मेहता, अरूणा भाटिया आणि हीरू जोहर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १८९७च्या सारागढीच्या लढाईवर बेतलेला आहे. यामध्ये २१ शीख सैनिकांनी १०,००० अफगाणी सैनिकांना पाणी पाजलं होतं.\nGlimpses of Kesari - Part ३ मध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच २१ शिख १०,००० सैनिकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. संख्येने शत्रुसैन्यापेक्षा कमी असूनही ईशर सिंगच्या चेह-यावर भितीचा लवलेशही दिसून येत नाही. मुंग्यांसारखे दिसणारं अफगाण सैन्य पुढे सरकताच ईशर सहका-यांना गोळी चालवण्याची आज्ञा देतो हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा १ मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे. |
Mumbai Rain Live Updates : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. फक्त मुंबईतच नाही तर कोकण किनारपट्टीवरील जिल्हे आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. अशात आता हवामान खात्याकडून सहा जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई : मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्या थांबलेला हा पाऊस पुन्हा जोरदार कोसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून पुढच्या २४ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे १०० सेंटीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर कुलाब्याचा पाऊसही ९५ सेंटीमीटरपर्यंत पोहोचला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जुलैमध्ये पडलेल्या पावसाने सिद्ध केला आहे. सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली. शुक्रवारी पालघर, ठाण्यासह मुंबईलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. |
सोलापुर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये वारकऱ्यांना भजन किर्तन कऱण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावर वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे नेते तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. आळंदी येथील विनोद जाधव महाराज यांना मंदिरातील विठ्ठल सभा मंडपामध्ये नामजप करण्यास मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर वारकरी आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांमधील वाद निर्माण झाला होता. त्यानंतर माध्यमांंनी आवाज उठवल्यानंतर आज मंदिर समितीने आपल्या निर्णयाचा फेर विचार करत मंदिरातील सभा मंडपामध्ये वारकऱ्यांना नाम जप भजन कीर्तन करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती या पदाचा अतिरिक्त कारभार गुरव यांच्याकडून संजीव जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर तुषार भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे हिंदुत्वाचे सरकार आहे. इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल आणि देव-धर्मावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई होईल. पांडूरंगाच्या मंदिरातून मुजोर अधिकाऱ्याला हटविण्याची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार असं त्यांनी म्हटलं आहे. - वसंत मोरेंचा दिलदारपणा. . ! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्...; |
शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. धीरज शुक्ला। नागपूर : शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. तुम्ही जेवढे वाहन अधिक चालवाल तेवढेच तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य कमी होत जाईल. डांबरी रस्त्याच्या तुलनेत २०-३० टक्के टायर्स कमी चालतील. तज्ज्ञांच्या मते सिमेंट रोड, डांबर रोडच्या तुलनेत अधिक कडक असतो. तापमानातही सात ते आठ अंशाचा फरक असतो. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते थंड होण्यास तीन ते चार तास अधिक लागतात. गरमी आणि दाब सहन केल्याने घर्षण आणि गरमीमुळे टायर अधिक घासल्या जातात. अधिक दाब आणि गरमीमुळे टायर अचानक फुटू शकतात. वेगवेगळे वाहन आणि आकाराच्या टायर तसेच गुणवत्तेच्या आधारावर तापमान सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. कमाल ५५ ते ६५ डिग्री तापमानच हे टायर सहन करू शकतात. 'लोकमत'ने शहरात किती किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येत आहेत, याची माहिती घेतली. याबाबत महापालिकेच्या बांधकाम कार्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तळेवार यांनी सांगितले की, शहरात सिमेंट रस्त्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३० किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे तयार करण्यात येतील. यात १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून १८ किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दुसऱ्या टप्प्यात ५९ म्हणजे एकूण ८९ किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते होतील. अधीक्षक अभियंता तळेवार यानी सांगितले की, डांबराच्या रस्त्यावर देखभालीचा खर्च अधिक येतो. सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा खर्चही अधिक येतो. परंतु सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी लागणारी किंमत सात वर्षात भरून निघते. त्याचे वयोमान ३५ वर्षे राहते. यामुळे सिमेंटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. गरमीच्या दिवसात डांबर पिघळल्याने वाहन असंतुलित होत नाहीत. परंतु टायरची पकड संपू लागते. रेती, पाणी रस्त्यावर पडलेली असल्यामुळे वाहन रस्त्यावरून घसरते. अशा स्थितीत अपघाताचा धोका डांबर रोडच्या अपेक्षेनुसार सिमेंट रस्त्यावर अधिक वाढतो. तज्ज्ञांच्या मते डांबरात 'फ्लेक्सिबिलीटी' आणि 'इलास्टिसिटी' अधिक राहते. सिमेंट रस्त्यावर मजबुती अधिक असते. अशात डांबर कोणत्याची ऋतूत टायरच्या ग्रीपला पकडून ठेवते. परंतु सिमेंट रोडवर संतुलन राखणे कठीण होते. वाहतुकीमुळे सिमेंटचे रस्ते गुळगुळीत होऊन अपघात होतात. टायर डिलर्सच्या मते नागपुरात सध्या असे टायर उपलब्ध नाहीत ज्यात सिमेंट रोडसाठी विशेष पद्धतीची डिझाईन किंवा विशेष तंत्रज्ञान वापरले आहे. सामान्यपणे कंपन्या ग्रीपमध्ये थोडा बदल करतात. परंतु एकाच पद्धतीने त्यांना तयार करण्यात येते. डांबर हे बिटुमॅन या पदार्थामुळे बनत असल्यामुळे त्यात लवचिकता असते. दाब पडल्यास डांबरी रस्ता दबल्या जातो. त्यामुळे टायरवर कमी दाब पडतो. दुसरीकडे सिमेंटचे रस्ते कडक असतात. अशात दाब केवळ टायरवरच पडतो. सिमेंट रोडचे तापमानही सात ते आठ अंश अधिक राहते. सिमेंट रोड उशिराने थंड होतात. घर्षण आणि गरमीमुळे दाबाने टायर गरम होतात. अचानक ब्रेक लावल्यास तापमान वाढते आणि दाबामुळे ते फुटूही शकतात. - डॉ. श्रीकृष्ण ढाले, उप-प्राचार्य व विभाग प्रमुख, |
प्रतिमा ( स्वभावपारपोष ) म्हणतो 'बाहेरच्या सोंगानें परमेश्वर कांहीं फसणार नाहीं, तेव्हां आम्ही पूजाअर्चेच्या वेळीं येत नाहीं. थाटामाटानें नाना, तुमचें राजकाज साधेल. आम्ही दीपोत्सवाचे वेळीं अंबारीत बसून मिरवत पर्वतीला येऊं.' येथपर्यंत नानाबद्दलचें कलुषित मत त्याच्या तोंडावर बोलून दाखविण्याइतकी माधवरावाची मनःस्थिति पोंचविल्यानंतर पर्वतीच्या देवालयांत आईसाहेब आणि नाना एकमेकांशी बाजीरावासंबंधी हळूहळू गुप्तपणे बोलत असतांना तेथें माधवरावाला आणून आणि तें दृश्य प्रत्यक्ष दाखवून त्याच्या मनांतील संशयाला प्रत्यक्ष प्रमाणाचें खतपाणी दिले आहे व केशवशास्त्रयानें त्याच मुद्याबाबत बाबासाहेबांचें म्हणून बनावट केलेलें पत्र त्याच्या हातीं देऊन संश्याच्या बीजाला स्पष्ट अंकूर फोडून ठेवला आहे आणि 'व्यभिचारप्रेमांत उत्पन्न झालेली घाणीची घोरपड नानांनी माझ्या गळ्यांत बांधली.' अशा जळफळणाऱ्या वृत्तींत माधवरावाला आणून ठेवून दुसरा अंक समाप्त केला आहे. तिसऱ्या अंकामध्यें खुद्द नाना आणि आईसाहेब यांच्या परवानगीशिवाय माधवरावाला कोणीही भेटू नये असा बंदोबस्त झाल्यामुळे त्या उभयतांच्याबद्दल वाटणाऱ्या तिटकाऱ्याची मजल इतकी गेली कीं नानांची किंवा कोणाचीही भीडमर्यादा न ठेवतां किंवा कसलीही भयभीति न बाळगतां किंवा पहिल्याप्रमाणे राजकारणाचीही पर्वा न करतां माधवरावाला तो कोंडमारा सहन न झाल्यामुळें भर दरबारांत सर्व सरदार - दरकदारांसमोर उघडउघड तो सांगून टाकतो की 'शनवार वाड्यांत मी नानांचा कैदी आहे माझ्यावर पहारेकरी कोण म्हणाल तर आमच्या सासुबाई!' त्यानंतर माधवरावाला आनंद व्हावा म्हणून आईसाहेब त्यांना तसाबरा दाखवीत असतानां ह्या तसबिरा तुमच्या नानाला अर्पण करा म्हणजे ते खूष होऊन पर्वतीवर आणखी एखादा दीपोत्सव करून तुमची हौस पुरवतील.XXXXXजा, त्यांच्या वाड्यांतच रहावयाला जा. असें मर्मभेदो तीव्र उत्तर देऊन स्त्रीदाक्षिण्याची नव्हे तर वडिलकीच्या मानाची मर्यादाही त्याने ठेवली नाही. ही परिस्थितीही स्वभावपरिपोषाच्या दृष्टीने अभ्यासनीय आहे. नाट्याचार्य खाडिलकर माधवरावाच्या मनामध्यें संशयाच्या वेडानें इतका धुमाकूळ 'घातल्यावर त्याची जास्त वाढ करण्याचें काम केशवशास्त्रयाला फारसें अवघड नव्हते. त्यावेळी नाना, माधवराव आणि यशोदाबाई यांच्या तसबिरांचे वर्णन माधवरावाजवळ करतांना तिघांच्याही चेहऱ्यांत साम्य आहे असा त्यानें ध्वनि काढला आहे आणि माधवरावाच्या मनांत "नानांच्या आणि हिच्या चेहऱ्यांत सारखेपणा असणे जुळतें एक वेळ - पण माझ्या चेहऱ्यांत - कसें म्हणतां ? काय कारण बरें?" अशा तऱ्हेची बायकोच्या कमअस्सल बीजाबद्दल पूर्ण खात्री आणि स्वतःच्या बीजासंबंधी संशय उत्पन्न करून ठेवला आहे आणि अंतःकरणाच्या जास्त नाजूक स्थितींत पोवाडेवाल्याकडून माधवरावाच्या कानांवर - ' श्रीमंत सवाई रावसाहेब वशिल्याचा मोतीदाणा x x x वशिल्याचा भानु आणला आशा तऱ्हेचा खोडसाळ पोवाडा ऐकवून आणि नागनाथाला शिक्षा सांगितली त्यावेळीं त्यानें उच्चारलेल्या नानाच्या वशिल्याचा, भानूच्या बीजाचा - " या शब्दांची आठवण करवून स्वतःच्या बीजासंबंधाचा संशय जास्त दृढ करून दिला आहे आणि सासूप्रमाणें माझी आईही भ्रष्टच असली पाहिजे अशा विचारांच्या अत्यंत कष्टप्रद मनस्थितींत माधवरावाला आणून ठेवून संशयाच्या चढत्या कमानींत तिसऱ्या अंकाचा शेवट केला आहे. 'माझी आई भ्रष्टच असली पाहिजे' ही कल्पनाच इतकी दुस्तर आहे कीं तिला भ्रष्ट करणाराचा सूड घेतल्याशिवाय मनाला समाधान मिळणे शक्य नाही आणि तें समाधानसुद्धां तात्पुरतें समाधानच होय! शिवाय तात्पुरते समाधानही तो सूड खुनाच्या स्वरूपांत उगवल्याशिवाय मिळणे नाहीं. हीच अगदी हीच स्थिति सवाई माधवरावाची चवथ्या अंकांत झाली आहे आणि तिसऱ्या अंकाप्रमाणे राजदरबारामध्ये सर्व सरदारांसमोर नानांच्याबद्दल वाटणारा संताप व्यक्त करण्याइतकाच नव्हे तर गारपिरावर दसऱ्याचे दिवशीं शमीपूजनाचे समारंभाचे वेळीं भर चवाट्यावर सर्व समाजासमोर नानांच्या पापाची आंतडी चवाट्यावर आणण्यासाठी त्याच्या पोटांत खंजीर खुपसून त्याचा सूड उगविण्याच्या भरात अंबारीतून उडी टाकण्यास |
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! भक्ती : भक्ती : धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा! भक्ती : भक्ती : भक्ती : भक्ती : Pitru Paksha 2021 : पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'हे' साधे सोपे मराठीतले स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच! भक्ती : भक्ती : Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्राने पितृपक्षासाठी गणपती आणि नवरात्रीच्या मधला काळच का निवडला असावा? जाणून घ्या! भक्ती : भक्ती : मुंज्याच्या भीतीने रात्री अपरात्री पिंपळाच्या पारावर जायला घाबरताय? मग हे वाचाच! |
यापूर्वी Bigg Boss Marathi 3 च्या स्पर्धक तृप्ती देसाई यांनाही झाली होती करोनाची लागण. जवळपास दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या असाध्य विषाणूसोबत (Coronavirus) लढा देत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत (Celebrities) अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. पुन्हा एकदा आता कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामध्येच आता 'बिग बॉस मराठी 3' (Bigg Boss Marathi 3 ) मधील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सदस्यानं सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धक आदिश वैद्य (Adish Vaidya) याला कोरोनाची लागण झाली आहे. आदिशनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून (Social Media Instagram) यासंदर्भात माहिती दिली आहे. "मला सकाळपासून थोडा कफ आणि सर्दीचा त्रास होत होता. सोमवारी मी कोरोनाची चाचणी केली होती. आज सकाळी चाचणीचा रिपोर्ट मिळाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांना जर लक्षणं दिसली तर कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. लवकरच बरा होईन," असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अखेर "कोरोनाने" मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी. परंतु, नियमांचे पालन मी करीत होते. . . . जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असं तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. |
राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मुंबई : राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शासनाने हा निर्णय घेऊन शिक्षकांचा यथोचित सन्मान केल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण परसले आहे. शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळालेल्या प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, अपंग शिक्षक आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना दोन जादा वेतनवाढीऐवजी 1 लाख रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेश जारी केल्यापासून याचा लाभ शिक्षकांना देण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार नसल्याने त्यांना तो द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केली आहे. तर या निर्णयाबद्दल शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी) च्महापालिकेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाःया 2क्13-14 सालच्या 5क् महापौर पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. प्रत्येकी 1क् हजार रुपये रकमेचा धनादेश, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवाय दोन राष्ट्रीय, चार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणाही करण्यात आली आहे. च्मंगला राजाराम रसाळ आणि मंगल व्हटकर यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आहेत. तर माताचरण आर. मिश्र, धर्मराज खदेरु यादव, मुश्ताक अहमद जुबेर आणि रश्मी आर. लुकतुके यांना राज्य पुरस्कार घोषित झाले आहेत. या पुरस्कार विजेत्यांना 5 सप्टेंबर रोजी दिल्ली व पुणो येथे गौरविण्यात येणार आहे. च्सेवाकाळात उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेल्या महापालिका शाळांतील गुणवंत शिक्षकांना, मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळांतील एकूण 5क् शिक्षकांना महापौर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजिलिस शाळेत 125 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण 5क् शिक्षकांची पुरस्कारांकरिता निवड करण्यात आली आहे. च्ठाणो : ठाणो व पालघर जिल्हा परिषदेद्वारे 5 सप्टेंबर शिक्षक दिन संयुक्तरीत्या साजरा केला जात आहे. पालकमंत्नी गणोश नाईक व राज्यमंत्नी राजेंद्र गावित यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या 13 शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. च्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक शहापूर येथील एकनाथ पवार, मुरबाडमधील शरद तुकाराम सूर्यराव, भिवंडीतील रमेश गांधले, अंबरनाथमधील बळवंत शेवाळे, कल्याणमधील निर्मला भिरु ड, तलासरीतील सोननाथ भोये, वसईतील विद्या पाठारे, वाडय़ातील रवींद्र हरड, मोखाडय़ातील सुनील वाणी, जव्हारमधील युवराज वाघ, डहाणूतील विमल चुरी, पालघरमधील विश्वनाथ संखे, पुरस्कार द्यायचा की नाही या द्विधा मनःस्थितीत माध्यमिक शिक्षण विभाग आहे. च्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी जिल्हा परिषदेची किंवा शासनाची तशी खास तरतूद नसल्यामुळे या पुरस्कार देण्यासंदर्भात उशिरार्पयत एकमत झालेले नाही. पण या पुरस्कारासाठी 11 शिक्षकांनी प्रस्ताव दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या वर्तक सभागृहात सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. |
मुंबईः बुधवारी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. हा सण फक्त सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटींनी देखील साजरा केला. यावेळी केवळ पत्नीच नव्हे तर अनेक पतींनीही बायकोला पाठिंबा देत हा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा केला. बर्याच सेलेब्सचे फोटो देखील सोशल मीडियावर सातत्याने येत असल्याचे काल आपल्याला पाहायला मिळालं. येथे आम्ही आपल्याला एका सेलिब्रिटीने कशा प्रकारे हा सण साजरा केला ते दाखविणार आहोत. टीव्ही कॉमेडियन भारती सिंगने हा दिवस कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथसोबत साजरा केला. चंद्र बाहेर आल्यानंतर भारतीने तिचा पती हर्षाच्या हातून पाणी घेतलं आणि आपला उपवास सोडला. टीव्ही स्टार धीरज धूपर यांच्या पत्नीनेही करवा चौथचा उपवास पाळला आणि पूजेनंतर तिने आपला उपवास सोडला. या व्हिडिओमध्ये बाकीच्या सेलेब्रिटींनी करवाचौथचा उपवास कसा ठेवला ते आपण येथे पाहू शकता आणि अहवालासह करवाचौथच्या दिवसाच्या सेलिब्रिटींचे फोटो पाहू शकता. विशेष म्हणजे बुधवारी सकाळपासूनच करवा चौथ सोशल मीडियावर ट्रेंड होत होता. यावेळी अनेक सेलेब्सच्या नव्या लूकचे फोटो समोर येत होते. संध्याकाळी चंद्र बाहेर आल्यानंतर त्याचे देखील फोटो समोर आले होते. |
कनकु कनक तैं सौगुनी सादकता अधिकाई उहि खाएँ बौराइ जगु इहि पातैं ही बौराइ (शतपट कनकाहून ते मादक सुवर्णप्रेम माजवि गिळतां धत्तुरा, केवळ मिळता हेम रसलिना १९२) (सतसईतील मूळ दोह्यांच्या अवतरणासोबतच, श्री.बढे यांनी केलेला यथार्थ रसानुवादही उद्धृत करीत आहोत. त्यावरून 'रसलीना' तील रसग्रहणाची कल्पना वाचकांना येऊ शकेल.) असे कितीतरी दोहे सतसईत मिळू शकतात. बिहारी सतसईत ७१० दोहे संकलित केलेले आहेत. या श्रृंगारप्रधान ग्रंथांत अनेक सामान्य प्रवृत्तीही ग्रथित केल्या आहेत. या ग्रंथातील भावप्रतिमा जितक्या सुगठित व मनोरम आहेत, तेवढेच काव्यकला शिल्पही अप्रतीम आहे. आता आपण सतसईच्या परंपरेचाही थोडक्यात विचार करू या. अपभ्रंश साहित्यात 'दूहा' छंद महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पण हिंदी साहित्यात दोहा छंदाला खास असे महत्त्व नाही. संस्कृत साहित्यात शतक सप्तशती अथवा सप्त शतिका असल्या रचनांची प्राचीन परंपरा आहे. सातशे दोह्यांची एकसंध रचनापद्धती हिंदी कवींनी संस्कृत साहित्यातून उचलली आहे. ['बिहारी की सत्सई' पद्यसिंह शर्मा-पृष्ठ ७१.] संस्कृत आणि प्राकृतात संख्येच्या आधारावर जे ग्रंथ निर्माण केले गेले आहेत त्यांची संख्या अल्प नाही. जार्ज ग्रियर्सनने पंचशिका, शतक आणि सप्तशती ग्रंथाची मोजदाद करताना ती संख्या ३१ इतकी आहे असे सांगितले आहे. [सतसई सपाक-शामसुंदर गुप्त, पृष्ठ ४.] प्रस्तुत प्रसंगी या सूचनाफलकाच्या चर्चेची आवश्यकता नाही. पण या सूचीमुळे संख्यावाचक ग्रंथांची परंपरा प्राचीन आहे एवढे निश्चित कळते. प्राकृत भाषेत लिहिलेली 'गाथा सप्तशती' या परंपरेचा आद्य ग्रंथ होय. या ग्रंथापासूनच या परंपरेचा प्रारंभ मानला जातो. 'गाथा सप्तशतींचा संग्रह सातवाहनाने केला आहे. ज्याला 'हाल' कवी म्हणूनही निर्देशिले जाते. या संबंधीही पुष्कळच मतभेद निर्माण झाले आहेत. मराठीचे प्रसिद्ध साहित्य इतिहास संशोधक श्री. स. आ. जोगळेकर यांनी गाथा सप्तशतीची विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी प्रत्येक गाथेचे प्रामाणिक विवरणही केले आहे. त्यांनी सातवाहन अर्थात कवि हाल यानेच हा ग्रंथ संकलित केला आहे हे मान्य केले आहे. डॉ. त्रिभुवनसिंह आपल्या 'दरबारी संस्कृत हिंदी मुक्तक' या ग्रंथात हाल यानेच गाथा सप्तशती संकलित केली हे अविछिन्नपणे सांगितले आहे. या वादविवादात न पडता सतसईची परंपरा विकसित करणाऱ्या या आदिग्रंथाची चर्चा आपणाला या ठिकाणी जास्त उपयुक्त होईल व अधिक औचित्यपूर्ण वाटेल. प्राकृत गाथा सप्तशती गाथा सप्तशतीचा संग्रह सातवाहनाने केला आहे. सातवाहनाचेच दुसरे नाव "हाल"होते. गाथा सप्तशतीची पार्श्वभूमी तत्कालीन लोकजीवनावर आधारलेली आहे. या ग्रंथात त्या काळच्या समाजजीवनाचे चित्र रेखाटले आहे. याची भाषा महाराष्ट्रीय प्राकृत आहे. विप्रलंभ श्रृंगार, दैनंदिन जीवनातील सजीवता, नैसर्गिक प्रवृत्तीची दृश्य चलत्चित्रे, ग्रामीण जीवनातील माया, मोह, मत्सरादि व्याभिचारी भाव भावनांचे मनोहारी लीला विलास, इत्यादींचे सजीव तसेच मौलिक वर्णन, यात या गाथांचे विशेषत्व दिसून येते. यातील श्रृंगार जनजीवनाशी संबंधित आहे. हा ग्रंथ केवळ सतसईच्या परंपरेला प्रमाणभूत नसून श्रृंगारात लौकिक सतसईकाराने अनेक प्रकारे प्रेरणा धारण केली आहे. महाकवी कालिदासावरही गाथा जीवनाची यथार्थ प्रतिष्ठापना करण्यासही कारणीभूत झाला आहे. या ग्रंथापासून सप्तशतीचा प्रभाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. या ग्रंथाला आदर्श मानून दोन प्रकारच्या सतसई लिहिल्या गेल्या आहेत. पहिली भक्ती आणि सूक्तिप्रधान रचना व दुसरी श्रृंगारप्रधान रचना. कीथने या ग्रंथाचा रचनाकाल इ.स. पूर्व २०० हा मानला आहे. ग्रियर्सनने इ.स.चे ५ वे शतक सांगितले आहे. पण या कालाला पंडित संशोधकांनी अप्रमाणित ठरविले आहे. संशोधनाच्या आधारे गाथा सप्तशती पहिल्या शतकातच रचली गेली असे निश्चितपणे मान्य करण्यात आले. आर्या सप्तशती सतसईच्या परंपरेत गोवर्धनाचार्यांच्या 'आर्या सप्तशती' या ग्रंथाच्या रचनेमुळे एक नवीन दिशा दृग्गोचर झाली. या आर्या सप्तशतीचा रचना काल १२ वे शतक मानले गेले आहे. गोवर्धनाचार्य, बंगालचा राजा लक्ष्मणसेन यांच्या दरबारी राजकवी नियुक्त होते. या रचनेवरही गाथा सप्तशतीचा अधिक प्रभा देसून येतो. हे त्यांनी स्वतःच मान्य केले आहे. आर्या छंदात लिहिलेल्या सप्तशतीतील वर्ण्य वस्तू संख्या आणि श्रृंगारप्रधान अभिव्यंजनाची निवड 'गाथा सप्तशतीनुसारच केलेली आढळते. या दोन सप्तशतींच्या मध्यकालात इ.स.८५० च्या जवळपास प्रसिद्ध अमरू शतकांची रचना झाली. अमरू कवीच्या श्रृंगारात अद्भुत रसप्रवाह संमीलित झालेले दिसून येतात. परंतु गाथा व आर्या सप्तशतीमध्ये एक पारंपारिक क्रम आढळतो म्हणून सतसईच्या परंपरेत या ग्रंथांना विशेष महत्त्व आहे. [लालचंद्रिका - संपादक जार्ज अब्राहम ग्रियर्सन (भूमिका).] तुलसी सतसई हिंदी साहित्यात 'सतसई' या प्रकाराचा प्रारंभ 'तुलसी सतसई' व 'रहीम सतसई' या ग्रंथांपासून झाला आहे. वि.सं. १६४२ हा तुलसी सतसईचा रचनाकाल मानला गेला आहे. ही सतसई सात भागांत विभागलेली आहे. पहिल्या भागात भक्तीचे निरूपण केले असून दुसऱ्यात उपासना व पराभक्तीचे विवरण आहे. तिसऱ्यात रामभजन व चवथ्या विभागात आत्मबोधाची व्याख्या केली आहे. पाचव्यात कर्म सिद्धांत व सहाव्यात ज्ञानसिद्धांताचे निरूपण आहे व सातव्यात राजनीतीचे वर्णन केले आहे. एकूण तुलसीचा अंतर्हेतू नीति व उपदेशप्रधान आहे. याला 'सूक्तिप्रधान सतसई' म्हटले तरीही चालण्यासारखे आहे. रहीम सतसई रहीम सतसई ही तुलसी सतसईच्या समकालीन आहे. पण ही सतसई अपूर्णावस्थेत आढळते. तुलसी सतसईप्रमाणेच यातही नीतिबोध व उपदेश यांना प्राधान्य दिलेले आहे. रहिमने स्वानुभवाच्या आधारावर याची रचना केलेली आहे. तुलसी ज्ञानाचा महिमा गातात. ते मर्यादावादी आहेत आणि रहिमने सदाचाराला महत्त्व दिले आहे. नीति आणि अनुभव सूक्तिस्वरूपात व्यक्त करण्यात रहीम फार कुशल होते. दोन्हीचा सुंदर मेळ घालून रहिमने हा सूक्तिसंग्रह रचला आहे. मतिराम सतसई 'मतिराम सतसई' व 'बिहारी सतसई' हे ग्रंथही समकालीन आहेत. 'मतिराम सतसई' ही रचना प्रासंगिक किंवा परिस्थिती विशेष घटनांवर आधारलेली नाही आणि मोहरांच्या लोभानेही लिहिलेली नाही. "मतिरामने" समयानुकूल आपल्या उन्मत क्षणांचा मुक्त भावनिर्देश त्यात कुशलतेने, गोवला आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या दोह्यात सहृदयता, सरसता आणि मनोहारी भाष्याचा हृदयंगम संगम झाला आहे. याचा रचनाकाल वि.सं. १६९० च्या आसपास मानला जातो. 'मतिराम सतसई' त त्यांच्याच 'रसराज' व 'ललितललाम' या ग्रंथांतील अधिकांश दोहे संकलित केले असा लोकापवाद आहे. बिहारी आणि मतिराम यांच्या सतसईंची तुलना केली तर बिहारींचे दोहे काव्याच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहेत हे सिद्ध होईल. मतिरामने आपल्या विभिन्न ग्रंथांच्या रचनेतच आपल्या साऱ्या प्रतिभाशक्तीचा व्यय केला पण बिहारीने आपली सारी शक्ती सतसईतच केंद्रित केली. 'बिहारी सतसई'च्या प्रसिद्धी नंतर इतर हिंदी कवींमध्ये जणु चढाओढ सुरू झाली आणि तिचा आदर्श ठेऊन अनेक रचना प्रसृत केल्या. (१) रसनिधि सतसई (रचना काल सं. १६६० ते सं. १७१७ च्या दरम्यान), 'वृन्द सतसई' ( रचना सं. १८६१), 'राम सतसई' (रचना काल सं. १८६० ते १८८० पर्यंत), 'विक्रम सतसई' (रचना सं. १८३९ ते सं. १८८६ पर्यंत) या सर्व ग्रंथांवर बिहारीचा प्रभाव पडलेला आहे. बिहारींनी आपल्या पूर्ववर्ती संस्कृत, प्राकृत आणि हिंदीपासून प्रेरणा घेतली आहे. पण फक्त श्रृंगारप्रधान काव्याचाच प्रभाव त्यांच्या मनोवृत्तीत अधिक दिसून आला. जरी बिहारींनी गाथा सप्तशती, अमरू शतक आणि आर्या सप्तशतीचे अनुकरण केले तरीही त्यांच्या मौलिक अभिव्यक्तीचे तेज काही आगळेच आहे. सतसईच्या परंपरेचे अध्ययन केल्यानंतर ही परंपरा अखंड, सुदीर्घ आणि सुदृढ असल्याची साक्ष पटते. 'मुक्तक' काव्यात दोहा व आर्या छंद हाच विशेषत्वाने वापरला आहे. आणि तोच अतिशय युक्त वाटतो. सतसईच्या परंपरेत विशषतः तीनच ग्रंथांना बहुमान्यता मिळाली. प्राकृतांतील गाथा सप्तशती, संस्कृतमधले 'अमरू शतक' व 'आर्या सप्तशती' आणि हिंदीतील 'बिहारी सतसई'. हे ग्रंथ काव्यातील निकषावर उजळून निघालेले आहेत. या ग्रंथांमध्ये श्रृंगार भावनेला जेवढा वाव मिळाला तेवढा भक्तीभावनेलाही मिळू शकला नाही. 'रसाळता' हे एकमेव त्यांच्या लोकप्रियतेचे कारण म्हणता येईल. बिहारी सतसईवरील टीका बिहारी सतसईच्या संबंधित टीकांचा क्रम जवळजवळ पंधरा सोळा वर्षांनंतर सुरू झाला. सतसई इतकी लोकप्रिय झाली की, वाचक वर्ग विभिन्न दृष्टिकोनातून तिचा रसास्वाद घेण्यावरच थांबला नाही तर तिच्यावर विविध प्रकारे टीकाग्रंथांची रचनाही करू लागला. हिंदी अथवा हिंदीच्या अन्य उपभाषांच्या व्यतिरिक्त संस्कृत, फारसी, उर्दू आणि गुजराथी इत्यादी भाषांमध्ये गद्य व पद्य दोन्ही रूपांत सतसईवरील टीकांचा प्रसार होऊ लागला. या टीकाग्रंथातील काहींचा नामनिर्देशच केवळ सांपडतो पण काही मात्र प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा सामान्य परिचय देणे आवश्यक वाटते. [हा परिचय "कविवर बिहारी", "बिहारी की वाग्विभूति", "मिश्रबंधु विनोद" आणि "बिहारी विहार" यामधून उद्धृत केला आहे.] |
लातूर - सामान्य माणसांना अच्छे दिनचे स्वप्ने दाखवून देश व राज्यात जनतेला फसवून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही फसवी आश्वासने देऊन सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या फसव्या भाजपला महापालिकेत निवडून पश्चात्तापात पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. पालिकेत 13 जागांवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सोमवारी (ता. 27) रात्री डॉ. आंबेडकर चौकातील सभेत ते बोलत होते. पक्षाचे निरीक्षक जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर, प्रदेश सरचिटणीस पप्पू कुलकर्णी, मुर्तुजा खान, संजय बनसोडे, नगरसेवक राजा मनियार, विनोद रणसुभे, नवनाथ आल्टे, राजेंद्र इंद्राळे, बबन भोसले, इब्राहीम सय्यद, रेहाना बासले, राहुल माकणीकर, इर्शाद तांबोळी, संजय शेटे, प्रशांत पाटील, शारदा बनसोडे, कौसरबी सय्यद, लाला सुरवसे, किरण बडे, संजय सोनकांबळे, अनिल गायकवाड, रेखा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कार्य केले. पाणीटंचाईमुळे लातूर बदनाम होताना राष्ट्रवादीमुळेच सरकारला पाणीप्रश्नाची दखल घ्यावी लागली. टंचाईत आमच्या नगरसेवकांनी चांगले काम करून लोकांपर्यंत पाणी पोहोचविले. प्रत्येक कार्यकर्ता पाण्यासाठी झटला. आता राष्ट्रवादीच्या हाती सत्ता देऊन शहराचा विकास घडवून आणावा. येत्या काळात भाजपचे फसवे नेते येऊन भाषणे देतील. लातूरला दत्तक घेतल्याचे मुख्यमंत्री सांगतील. त्यांनी यापूर्वी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यांचे काय झाले, ते विचारा. पालिकेत राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसने सन्मानपूर्वक प्रस्ताव दिल्यास आघाडीचा विचार होईल. अन्यथा 18 प्रभागांतील 70 जागांवर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल तेव्हा ना हात ना कमळ फक्त घड्याळ निवडून येईल, असा विश्वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण राखण्याकरिता स्थायी समिती अस्तित्वात असूनही पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र 'रेव्हेन्यू कमिटी' स्थापन करण्यासाठी पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण राखण्याकरिता स्थायी समिती अस्तित्वात असूनही पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र 'रेव्हेन्यू कमिटी' स्थापन करण्यासाठी पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. एका बाजूला या कमिटीला खर्चाचे अधिकार नसतील, असा दावा केला जात असला; तरी प्रत्यक्षात कमिटीला स्थायी समितीसारखा दर्जा आणि अधिकार देण्यात यावे, असा ठरावच सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. त्यामुळे, या कमिटीतून खरोखरी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न होणार, की काही ठराविक माननीयांचे हित साधले जाणार, अशी विचारणा केली जात आहे. 'रेव्हेन्यू कमिटी'साठी प्रत्येकी दोन सदस्यांची नावे सुचविण्याचे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी नुकतेच पालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे. तसेच, या कमिटीला मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती उपमहापौर आबा बागूल यांनी दिली. मात्र, स्थायी समिती अस्तित्वात असताना, त्यासारखीच पर्यायी कमिटी निर्माण करणे, कितपत व्यवहार्य ठरणार, याबद्दल मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. टेंडर मान्य करण्याचे किंवा खर्चाबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार या कमिटीला नसतील; तर ती केवळ पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी कोणते नवे स्रोत वापरता येतील, त्याचा परामर्श घेईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु, अशी कमिटी स्थापन करण्यासाठी झालेल्या ठरावामध्येच स्थायी समितीसारखा दर्जा व अधिकार कमिटीला मिळावेत, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, स्थायी समितीचे अधिकार कमी करून 'रेव्हेन्यू कमिटी'च्या हातात पालिकेच्या आर्थिक नाड्या सोपविण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात आहे. पालिकेचे उत्पन्न स्रोत मर्यादित असल्याने त्यात वाढ करून विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी रेव्हेन्यू कमिटी असावी, असा आग्रह उपमहापौर आबा बागूल यांनी सातत्याने धरला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता दिल्यानंतर ही कमिटी स्थापन करावी, यासाठी बागूल यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार, पालिकेतील प्रत्येक पक्षाने प्रत्येकी दोन सभासदांची नावे कळवावीत, असे पत्र महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी नुकतेच सर्व गटनेत्यांना दिले आहे. महापौर आणि आयुक्तदेखील या कमिटीचे सदस्य असतील. तसेच, दर १५ दिवसांनी या कमिटीची बैठक होईल, असेही निश्चित करण्यात आले आहे. |
2 नोव्हेंबरः शीना बोरा हत्याप्रकरणी वाद टाळण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची मुदतीच्या पूर्वी उचलबांगडी केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्याची चर्चा मारियांबद्दल होतीच. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, त्यावेळी दोन-तीन वाद निर्माण झाले होते. ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्ही मान्य केलं. शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस घेतल्यामुळे पोलिस आयुक्त या केसमध्ये इतका रस का घेत आहेत, असे सवाल उपस्थित झाले. Ajit Pawar : अजितदादांचा 'मास्टरस्ट्रोक', मंत्रालयात आता शिंदे आणि फडणवीस झाले शेजारी! Mumbai News : रिक्षाचालकाच्या लेकीने सातासमुद्रापार केली सुवर्णपदकाची कमाई, असं गाठलं मुंबई ते बर्लिन! मारियांना तपासकार्यात कुतूहल असतं, त्यामुळे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचा विचार करत आम्ही इतर शक्यता फेटाळून लावल्या, असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पुढे ते असंही म्हणाले की, मारियांना आम्ही बढती दिली, त्यांची ट्रान्सफर केली नाही. शीना बोरा हत्या प्रकरण सोडलं तर मारिया यांचं काम नेहमीच उत्तम राहिलंय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. सिंधुदुर्गनगरी , दि. २४ : आॅक्टोबर महिन्याचा पगार देण्याची वेळ आली असतानाही प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या ३९० मुख्याध्यापकांचे वेतन देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापकांना उर्वरित शिक्षकांची पगार बिले सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्याध्यापकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी स्वतःहून बाजूला होऊन उर्वरित शिक्षकांची वेतन देयके सादर करण्यास नकार दिला आहे. तर प्रशासनाने मुख्याध्यापकांसहीत सादर झालेली पगार बिले नाकारली आहेत. अतिरिक्त मुख्याध्यापक आणि प्रशासनाच्या या खो-खोच्या खेळात उपशिक्षकांच्या वेतनाचा प्रश्नही रेंगाळला आहे. यासाठी प्रशासनाकडून अतिरिक्त मुख्याध्यापकांच्या वेतनाची आणि भूमिकेची ढाल केली जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हे अतिरिक्त मुख्याध्यापक चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई का होत नाही? असा सवालही उपस्थित केला आहे. अतिरिक्त मुख्याध्यापकांची भूमिका व त्यांनी सादर केलेली बिले नियमबाह्य असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. मात्र अन्य उपशिक्षकांचे नाहक थांबविण्यात आलेले वेतन तत्काळ अदा करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका याबाबत सकारात्मक आहे. मात्र शिक्षण विभागाकडून योग्य प्रकारची टिप्पणी योग्यवेळी ठेवली जात नसल्याने हा घोळ निर्माण झाला असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. शिक्षकांचे वेतन २३ आॅक्टोबर पर्यंत न झाल्यास २४ आॅक्टोबर रोजी सर्व शिक्षक संघटना जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष नंदू राणे, राजन कोरगावकर, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष के. टी. चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ही. म. मसके, केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष धोंडू रेडकर उपस्थित होते. |
नुकत्याच बिग बॉसच्या अकराव्या विकेंड वॉरमध्ये उषाताई नाडकर्णी घराबाहेर पडल्या. या आठवड्यात त्यांना त्यांचे चाहते वाचवू शकले नाहीत. त्यांना सगळ्यात कमी वोट मिळाल्याकारणाने त्या घराबाहेर पडल्या. त्या या घरातल्या सर्वात वयस्कर आणि अभिनयाच्या बाबतीत अनुभवी अभिनेत्री होत्या. तरीपण त्यांनी आपल्या पुर्ण एनर्जीने सगळे टास्क केले. अनिल थत्तेंना शिवीगाळपासून ते शर्मिष्ठाला कानाखाली मारण्यापर्यंत सगळीच्या कॉन्ट्रोव्हर्सी त्यांनी नीट गाजवल्या. तर अशा उषाताई बिग बॉसमधून बाहेर पडल्या आहेत. पाहा त्यांचे त्या घरातील काही अनमोल क्षण. उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद सगळेच खूप भाऊक झाले. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार ? मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीचा हा आठवडा पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा आणि आऊ यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. ज्यामध्ये सई आणि पुष्कर मेघा वर बरेच नाराज दिसले. सई आणि पुष्कर यांनी मेघाला बरेच बोलून दाखवले. परंतु आता सईने मेघाला आपण सगळे विसरून जाउया असे सांगितले असून मेघाने सईला असे सांगितले आहे पुष्कर जे काही माझायाबद्दल बोलला ते मी नाही विसरू शकत. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा यांच्यातील वाद मिटतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. आता येणारे सगळेच आठवडे महत्वपूर्ण असून बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याला स्वतःसाठी खेळण्याची वेळ आली आहे. उषा नाडकर्णी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्या. तेव्हा महेश मांजरेकर यांनी बोलताना सांगितले कि, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आऊ यांची खूप आठवण येईल. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. |
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते. मुंबई- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते. त्यावेळी अधिवेशन काळातच मागण्यांवर निर्णय घेण्याचे लिखित आश्वासन शासनातर्फे संघटनेस देण्यात आले होते व तसे निवेदन मा. शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात व प्रसिद्धी माध्यमांकडेही केले होते. परंतु तरीही २१ मार्च २०१८ रोजी मा. अर्थमंत्री, मा. शिक्षणमंत्री व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत मागण्यांवर शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलानाही म्हणून संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला असून, २६ मार्चला मंत्रालयासमोर,आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तपासलेल्या उत्तर पत्रिका व मार्कशीट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे १२ वीच्या निकालावर परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच असेल असे संघटनेतर्फे शासनास कळविण्यात आले आहे. पुढील प्रमुख मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते. - २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतानासाठी आर्थिक तरतूद करणे. तसेच २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना मान्यता देणे. - माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करणे. - २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवडश्रेणी देणे. - दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ व अंशतः अनुदान तत्त्वावरील शिक्षकांना तसेच दि. ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. - २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून आता पर्यन्तची थकबाकी देणे. - उप प्राचार्य/पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करणे,तसेच घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन वाढविणे. - विना अनुदानितची सेवा वरिष्ठ व निवड श्रेणी साठी ग्राह्य धरणे साठीच्या ६ मे २०१४ च्या शासनादेशात सुधारणा करणे. - कायम विना अनुदानित मूल्यांकनास पात्र उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या तातडीने जाहीर करणे. |
इस्लामाबाद : पाकिस्तानाचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने पैशांची उधळपट्टी रोखण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली आठवड्याभरात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत अधिकारी, नेते आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तिंना फर्स्ट क्लासमधून हवाई प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानुसार यापुढे पाकिस्तानात, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, मुख्य न्यायमूर्ती, पंतप्रधान आणि सिनेट चेअरमन यांना फर्स्ट क्लास दर्जाचा हवाई प्रवास करता येणार नाही. यावेळी मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली की, या बैठकीत कार्यालयांच्या कामाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी होती आता ती नऊ ते पाच अशी करण्यात आली आहेत. इम्रान यांच्या कॅबिनेटने सर्व कार्यालयांमध्ये केवळ एकच म्हणजे फक्त रविवारी सुटी असेल असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारची सुटी रद्द करण्यात आली आहे. परदेश दौरे तसेच देशांतर्गत प्रवासासाठी विशेष विमान न वापरण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना ते फक्त दोन गाडया आणि दोन नोकर सेवेसाठी ठेवणार आहेत. आधीच्या सरकारने पंजाब आणि खैबर पख्तूनखवा प्रांतात सुरु केलेल्या सर्व मोठया प्रकल्पांचे ऑडीट करण्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याचदरम्यान, कॅपिटल अॅडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट डिविजन हे मंत्रालय रद्द करण्यात आले असून, त्याच्या कामाची विभागणी इतर मंत्रालयांमध्ये करण्यात येणार आहे. |
ठाणे । कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर आज (१९ जुलै) अचानक दरड कोसळली. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. यावेळी टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. तर या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
म्हटल्याप्रमाणें या शक्ति राक्षासांसारख्या असून त्यांचें आपण योग्य रीतीनें नियंत्रण केले तर त्यांपासून उत्तमोत्तम कार्याची निष्पत्ति करून घेतां येईल. इतर शक्तींची जी गोष्ट तीच तर्कातीत मनाच्या सूचनानुवर्तित्वाची गोष्ट असल्यास त्यांत नवल तें काय ? चांगल्या सुपीक जमिनींत उत्तम प्रकारचें बी पेरलें तर त्यांत सुंदर पीक येईल, व निवडुंग वाढूं दिला तर तोहि जोरानें फोंफावेल. त्याचप्रमाणें रोगोत्पादक सूचनांचा परिणाम तर्कातीत मनावर होऊं दिल्यास त्यापासून शरीरास अपाय होईल, व क्वचित् प्रसंगीं अनर्थही ओढवेल; उलट, रोगनिवारणाच्या किंवा रोगप्रतिबंधाच्या सूचनांचा अभियोग तर्कातीत मनावर योग्य रीतीनें केल्यास त्यांचाहि परिणाम त्या मनावर होईल, व त्यामुळे रोगविनाश व रोगप्रतिबंध होऊन शरीराच्या आरोग्याचें संरक्षण व संवर्धन झाल्यावांचून राहणार नाहीं. मानवी शरीर हें अनंत सूक्ष्मपेशींचें साम्राज्य असून त्यांपैकी प्रत्येक सूक्ष्मपेशाला मन आहे, एका किंवा अनेक सूक्ष्मपेशींच्या क्रमप्राप्त कार्यात विकृति उत्पन्न झाली म्हणजे रोग उद्भवतो, ही विकृति दूर करण्याचें सामर्थ्य मनुष्याच्या दोन मनांपैकी तर्कातीत मनाच्या अंगीं पूर्णपणें आहे, आणि तर्कातीत मन सर्वस्वी सुचनानुवर्ति असल्यामुळे सूक्ष्मपेशींतील विकृति नाहींशी करून येतें - इतक्या सर्व शास्रशुद्ध गोष्टी लक्षांत घेतल्या म्हणजे रोगरोगपरिहार करण्याचे कार्य त्याच्याकडून सूचनांच्या योगाने घडवून आणतां रिहारासाठीं मनुष्यानें काय केले पाहिजे या प्रश्नाचे उत्तर उघड होतें. मानसोपचारशास्त्र कळले म्हणजे मानसोपचारपद्धतीची घटना करणे फार अवघड नाहीं, कारण, तकांतीत मनाला जागृत करून त्याला रोगपरिहारक सूचना दिल्या असतां त्यांचा त्या मनाकडून स्वीकार होतो, व त्या सूचनांप्रमाणे कार्य घडून येतें, येवढें तत्त्व एकदां पूर्ण प्रस्थापित झालें। की, प्रत्यक्ष उपचारपद्धति ठरविणे सोपें आहे. ज्या पद्धतीमुळें तर्कातति मनाला जागृत करतां येऊन रोगपरिहारक सूचनांचा अभियोग त्याच्यावर उत्तम प्रकारें करतां येईल त्या पद्धतीचा विचारपूर्वक निर्णय करून मानसोपचारवाद्यांनी तिला ' मानसोपचारपद्धति ' असें नांव दिले आहे. मा न |
काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपा तिरंगा एकता यात्रा काढणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी विरोधक आणि सत्तारुढ भाजपा आमनेसामने असतील. मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपा तिरंगा एकता यात्रा काढणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी विरोधक आणि सत्तारुढ भाजपा आमनेसामने असतील. मुंबईतील संविधान बचाव रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जदयूचे शरद यादव, तुषार गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारूक अब्दुला, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आदी सहभागी होतील, अशी माहिती खा. राजू शेट्टी यांनी दिली. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे आॅफ इंडिया अशी सर्वपक्षीय रॅली निघेल. घटनेने दिलेल्या व्यक्तिगत, सामाजिक स्वातंत्र्यावर भाजपा सरकारच्या काळात गदा आली असून, घटना बदलण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. ते जनतेसमोर आणण्यासाठी रॅली असेल, असे खा. शेट्टी म्हणाले. या रॅलीला मुंबई काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्यात सहभागी होतील, असे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. दरम्यान मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होतील. चैत्यभूमीपासून यात्रा सुरू होईल. भाजपाचे खासदार, आमदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यात सहभागी होतील, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपाच्या वतीने राज्यभर तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राज्यभरात तीनशे ठिकाणी या यात्रा काढण्यात येतील. भाजपाच्या वतीने राज्यात सुमारे ३ हजार ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येईल व घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले जाईल. समाजात दुफळी माजविण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून होत असतानाच, तिरंग्याखाली सर्वांना एकत्र आणून, सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश तिरंगा यात्रेद्वारे दिला जाईल, असे दानवे यांनी सांगितले. |
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोंडी येथे झालेल्या अपघातात कोल्हा ठार झाला. वन्यजीव प्रेमींनी ही माहिती वन विभागाला दिली. कोल्ह्याचा मृतदेह विच्छेदनासाठी वन विभागाने ताब्यात घेतला. सोमवार, २० जून रोजी दुपारी १२ वाजता कोंडी येथे एका कोल्ह्याचा अपघात झाला. कोंडी येथील रहिवासी महेश मोरे यांनी याची माहिती वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सर्कलचे सुरेश क्षीरसागर यांना दिली. त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधला. वनरक्षक यशोदा आदलिंगे यांनी योगेश, बसवराज मडवळकर, दशरथ कांबळे यांना पाठविले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतला. दळणवळण लवकर व्हावे यासाठी प्रशस्त असे महामार्ग तयार केले आहेत. त्याचा फायदा फक्त माणसांना होत असून, मुके वन्यजीव, पशू-पक्ष्यांना मात्र नाहक आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. भविष्यात रस्ता ओलांडताना वन्यजीवांचा नाहक बळी जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. ज्या महामार्गांवर वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रालगतच्या महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली. |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी (farmer) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे (dhule) जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज (Crop loan) वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना (Bank) सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे (Minister Dadaji Bhuse) यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक प्रल्हाद खाडे, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे (Collector Trupti Dhodmise), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंत्री श्री. भुसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यावर जिल्हा प्रशासन व फ्लाइंग क्लबच्या सहकार्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. मंत्री श्री. भुसे म्हणाले, आजपासून बरोबर 75 वर्षांपूर्वी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यासाठी भारतीयांना दीडशे वर्षे ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला. या काळात विविध आंदोलने झाली. स्वातंत्र्याच्या या यज्ञात अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. शेवटी 1942 मध्ये ब्रिटिशांना 'चले जाव' करावे लागले. त्यानंतर 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला मिळालेले स्वातंत्र्य केवळ भारतासाठी नव्हते, तर तिसऱ्या जगातील पारतंत्र्यातील सर्व देशांसाठी प्रेरणा देणारे होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात- अज्ञात वीरांनी योगदान दिले आहे. धुळे जिल्हाही स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यात मागे नव्हता. जिल्ह्यातील चिमठाणे गावाजवळ क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. जंगल सत्याग्रह, विविध आंदोलनाच्या माध्यमातून या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले होते. धुळे जिल्हा कारागृहात आचार्य विनोबा भावे, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, पूज्य सानेगुरुजी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना बंदिवान करण्यात आले होते. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही आपल्या जिल्ह्याने योगदान दिले आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'घरोघरी तिरंगा' अर्थात 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमास आपल्या जिल्हावासीयांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्वच असा म्हणावा लागेल. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण होण्याबरोबरच आपला देशाभिमानही वाढला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 20 सरोवरांचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित सरोवरांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थ्यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य माहे सप्टेंबर 2022 अखेर मंजूर केले आहे. त्यानुसार दरमहा नियमित व मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. दरमहा एकूण 14 हजार 500 टन अन्नधान्याचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे. तसेच शिवभोजन योजनेचे 31 केंद्र सुरू आहेत. त्या माध्यमातून रोज सरासरी 2 हजार 800 थाळ्यांचे वितरण होत आहे. आतापर्यंत 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गेली दोन वर्षे कोरोना विषाणूने आपल्याला बंदिस्त करून ठेवले होते. मात्र, कोविड लसीकरणाने त्याची तीव्रता कमी केली. त्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेवू शकत आहोत. मात्र, आजही अनेकांनी पहिला, दुसरा किंवा बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यांनी कोविड लसीकरण करून घेत सुरक्षित व्हावे. केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. त्याचाही लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लहान- मोठे प्रकल्प भरत आले आहेत. आतापर्यंत सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला असून पावसाचा आणखी दीड महिना कालावधी शिल्लक आहे. समाधानकारक पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खते आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात जमा केले जातात. आपल्या जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण दोन लाख 8 हजार 360 लाभार्थी आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे. यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू केला आहे. ई-पीक पाहणीच्या सुलभीकरणासाठी शासनामार्फत नवीन एप व्हर्जन-2 विकसित केले आहे. या नवीन प्रणालीत सहभागी होवून शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी व्हावे. लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनीदेखील या प्रक्रियेत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 या आर्थिक वर्षांत 16 हजार 15 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यात धुळे जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2016- 17 ते 2021- 22 अखेर 40 हजार 939 घरकूल पूर्ण करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 मध्ये 1490 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. रमाई ग्रामीण आवास योजनेंतर्ग तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 हजार 918 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, दळण- वळण, औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मध्ये सर्वसाधारणसाठी 236 कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 118 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 30 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधा बळकटीकरणार भर देण्यात येत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील विद्यमान मतदारांच्या प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकासह माहिती संग्रहित करण्याची मोहीम एक ऑगस्ट 2022 पासून सुरू केली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आधार क्रमांक हे बीएलओंमार्फत ऑनलाईन एपद्वारे आधार लिंक करण्याची मोहीम सुरु केलेली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभाग नोंदवावा. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मात्र, त्यासाठी आपल्या सहकार्याचीही गरज आहे. आपण, सर्वजण वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत. यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार झाला. त्यात जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित मैदानी, मॅरेथान, सायक्लोथॉन व वॉकेथान स्पर्धेतील विजेत्यांचा समावेश होता. त्यांची नावे अशी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने) : मॅरेथान खुला गट (पुरुष) : शरद विजय अहिरे, नीलेश हिंमत माळी, सागर रवींद्र माळी. मॅरेथॉन खुला गट (महिला) : निकिती उत्तम थोरात, कल्याणी भारमल चव्हाण, पूनम खंडू माळी. सायक्लोथॉन 20 वर्षांआतील मुले : नयनकुमार रवींद्र पाटील, प्रणय राजेश चौरसिया, समर्थ संजय पाटील. सायक्लोथॉन 20 वर्षांवरील पुरुष : ऋषिकेश जगदीश सोनवणे, नकुल सुरेश अहिरराव, योगेश्वर राजेंद्र भदाणे. सायक्लोथॉन 20 वर्षांआतील मुली- रोशनी विठ्ठल पाटील, प्राजक्ता प्रशांत मराठे, बबिता प्रदीप येलपले. सायक्लोथॉन 20 वर्षांवरील महिला- मनीषा कमलेश पाटील. वॉकेथॉन (पुरुष) : करण भुरा धारवे, मनोज संजय माळी, सागर निंबा कन्नोर. वॉकेथॉन (महिला) :बालमना अशोक चव्हाण, कल्याणी भारमल चव्हाण, कल्याणी शालिकराव पवार. एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे व श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल, धुळे, महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका, क्लस्टर, ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले. त्यांची नावे अशी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- सवोत्कृष्ट तालुका- शिरपूर, धुळे, शिंदखेडे. क्लस्टर - नगाव, ता. धुळे, जैताणे, ता. साक्री, भाटपुरा, ता. शिरपूर. ग्रामपंचायत- आर्वी, ता. धुळे, हट्टी खुर्द, ता. साक्री, सुराय, ता. शिंदखेडे. राज्यस्तरीय योजना- ग्रामीण (रमाई, शबरी व पारधी) : सवोत्कृष्ट तालुका शिरपूर, साक्री, धुळे. सर्वोत्कृष्ट क्लस्टर- देऊर बुद्रुक, ता. धुळे, शेवाळे, ता. शिंदखेडे, चरणमाळ, ता. साक्री. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- भामेर, ता. साक्री, डांगुर्णे, ता. शिंदखेडे, भटाणे, ता. शिरपूर. स्व्च्छ विद्यालय पुरस्कार- एसईएस प्राथमिक आश्रमशाळा. जगदीश देवपूर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. |
संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन सात गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकर्यांसह नागरीकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतुक संस्थेचे संचालक शिवाजीराव इलग यांनी केली आहे. प्रतापपूर गावात रेबीजची लागण झाल्याने सलिम शेख, अनिल गोसावी, आबा सांगळे, ज्ञानेश्वर माळी, हरिभाऊ दराडी यांच्या सहा गायींचा मृत्यु झाला असून हौसाबाई बिडवे यांच्या गायीला लागन झाल्याने वेगळे ठेवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापपूर दाढ रस्त्यावरील कुरण परिसरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रे आणुन सोडण्यात आले. यापैकी रेबिज बाधित असलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील गायी रेबीज बाधित झाल्यामुळे सोमवारपासून गायी दगावण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकर्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ऊस तोडणी मजुर त्यांची मुले व जनावरांना रेबीज बाधित कुत्र्याने चावा घेतल्यास मोठा अनर्थ निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे, शिवाजीराव इलग यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर शिंदे यांच्याशी संपर्क साधला आसता त्यांनी तातडीने प्रतापपूर गावातील नुकसान ग्रस्त शेतकर्याच्या पशुधनाची तपासणी करत लसीकरण करण्यास सुरवात केली आहे. निमगावजाळी आरोग्य केद्राचे प्रमुख डॉ. तांबोळी यांनी संपर्कात आलेल्या सुमारे चाळीस शेतकर्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले आहे. प्रतापपूर व आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीसह उंबरी व मांचीकडे जाणार्या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या मोठ्या टोळ्या रस्त्यावर बसून येणार्या जाणार्या नागरीकांना त्रास देत असतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान दुधाळ गायी दगावल्याने शेतकर्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून या शेतकर्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच दत्तात्रय आंधळे, आ. राधाकृष्ण विखे ट्रक वाहतुक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, डॉ. बाळासाहेब आंधळे, पांडुरंग आंधळे, किरण आंधळे, गोरक्षनाथ घुगे, गणेश इलग, विकास आंधळे, महेंद्र सांगळे आदींनी केली आहे. |
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : देशातील कोरोना विषाणूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाने आपला जीव गमावला. ४६ वर्षीय रुग्णावर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर गुजरातमधील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत पावलेल्यांचा आकडा हा चारवर पोहचला आहे. २६ मार्च रोजी उच्च रक्तदाबाच्या त्रासानंतर संबंधित रुग्णाला सरदार वल्लभभाई सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला मधुमेहाचा देखील त्रास होता. या रुग्णासह गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये आतापर्यंत दोघांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे, तर सुरतमधील एक आणि भावनगरमधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. |
एखाद्या बोर्ड किंवा कागदावरील मजकुराचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचे भाषांतर करणे गुगल ट्रान्सलेट अॅपमुळे अतिशय सोपे झाले आहे. ज्या मजकुराचे भाषांतर हवे आहे त्याचा फोटो काढला तरी अॅपच्या मदतीने लगेच भाषांतर करुन मिळणार आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणा-यांसाठी खूषखबर आहे. एखाद्या बोर्ड किंवा कागदावरील मजकुराचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचे भाषांतर करणे गुगल ट्रान्सलेट (Google Translate) अॅपमुळे अतिशय सोपे झाले आहे. ज्या मजकुराचे भाषांतर हवे आहे त्याचा फोटो काढला तरी अॅपच्या मदतीने लगेच भाषांतर करुन मिळणार आहे. गुगलने आपले भाषांतराचे अॅप अपग्रेड केले आहे. या अपग्रेडेशनमुळे 'गुगल ट्रान्सलेट' अॅपद्वारे मजकूर टाइप करुन उपलब्ध ९० भाषांमध्ये भाषांतरित करता येईल. कॅमे-याद्वारे मजकुराचा फोटो काढून २६ भाषांमध्ये भाषांतरित करता येणार आहे. तसेच इंग्रजीतून फ्रेंचमध्ये आणि फ्रेंचमधून इंग्रजीत अशा पद्धतीने दोन्ही मार्गांनी अवघ्या काही सेकंदात जास्तीत जास्त ४० भाषांमध्ये मजकूर भाषांतरित करणे शक्य आहे. या व्यतिरिक्त अॅपमधील बोर्डवर हाताने लिहिल्यास ते समजून घेऊन त्याचे थेट डिजिटल स्वरुपात शब्दात रुपांतर करणारे एक फिचर देखील अॅपमध्ये उपलब्ध आहे. 'गुगल ट्रान्सलेट' अॅपमधील 'फोटो काढा आणि मजकुराचे भाषांतर करुन घ्या' ही पद्धत अतिशय सोपी आहे. या पद्धतीवर आणखी संशोधन सुरु आहे. सध्या कॅमे-याची मदत घेऊन इंग्रजी मजकुराचा फोटो काढून मजकुराचे हिंदी भाषांतर मिळवता येते. पण हिंदी मजकुराचे कॅमे-याने फोटो काढून नंतर इंग्रजीत रुपांतर करणे सध्या शक्य नाही. संशोधन सुरु असल्यामुळे या अडचणींवर लवकरच मात केली जाईल, असा विश्वास अॅप निर्मात्या गुगल कंपनीने व्यक्त केला आहे. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट कनेक्शन सुरु नसतानाही 'गुगल ट्रान्सलेट' द्वारे मजकुराचे भाषांतर करता येईल. |
भाग तीन । अतुल कुलकर्णी\n१२४६ प्रकल्प ४१ हजार कोटींच्या प्रतीक्षेत\nनागपूर अधिवेशात राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष\nउद्याच्या अंकात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी बातचित व विविध पक्षांची भूमिका\nमुंबई दि. १६ - जलसिंचन विभागाला धोरणच नसल्याने राज्यातील १२४६ प्रकल्प रेंगाळत पडले आहेत. हे पूर्ण करण्यासाठी तब्बल ४१ हजार कोटी रुपये लागतील पण तेवढे पैसे कोठून आणि किती कालावधीत उभे करणार हा मोठा प्रश्न असताना दिवसेनदिवस प्रकल्पांच्या कालावधीत वाढ होऊ लागल्याने किंमत देखील वाढू लागली आहे. या सर्व दुष्टचक्रात कितीही पैसे दिले तरी ते कमीच पडतील ही विदारक वस्तुस्थिती आज जलसिंचन व अर्थ खात्यापुढे आहे.\nअशावेळी जे प्रकल्प ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहेत ते आधी करावेत, त्यानंतर ६० ते ७० टक्के पूर्ण झालेले प्रकल्प करावेत असेही कोणी ठरविताना दिसत नाहीत. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातील प्रकल्प आधी पूर्ण झाला पाहिजे असा अट्टाहास असल्याने कोणालाही पूर्ण समाधान नाही आणि कोणते काम बंदही करता येत नाही असा सारा मामला आहे.\nहे सर्व प्रकरण छापून येताच राज्यभर मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून देखील अनेक दूरध्वनी लोकमतला आले. लोकांनी या सर्व प्रकराबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली. नागपूर अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकरण समोर आल्याने त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी आता अधिवेशन काळात कोणती भूमिका घेणार याकडे त्या त्या भागातील लोकांचे लक्ष लागले आहे.\nप्रलंबित प्रकल्प हाती घेताना देखील कृष्णा खोऱ्यातील मोठ्या प्रकल्पांची संख्या आणि इतर विभागातील प्रकल्पांची संख्या पाहिली तरी विरोधाभास लक्षात येतो. राज्यात आजमितीला ७४ मोठे प्रकल्प, १८० मध्यम प्रकल्प आणि ९९२ लघू प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत. राज्यातील १२४६ अपूर्ण प्रकल्पांसाठी सध्या ६९,४६६.२५ कोटी रुपयांची गरज होती त्यापैकी २८,१५१.५६ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत व ४१,३१४.६९ कोटी रुपयांची सध्या गरज आहे. पण ही रक्कम जर वेळेवर मिळाली नाही तर या प्रकल्पांची किंमत आणखी वाढतच जाणार आहे. काम-काळ -तंत्र म्हणजे कामाचे स्वरुप, त्यासाठीचा वेळ आणि लागणारी यंत्रसामुग्री यांची सांगड न बसल्यास हा खर्च ८० हजार कोटीच्या घरात जाईल असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्या त्या विभागातील महामंडळात झालेल्या कामांची राज्याशी तुलना केली तर धक्कादायक निष्कर्ष समोर येतो. (सोबतचा चार्ट पहावा)\nजलसिंचन विभागाची ही सगळी दारुण अवस्था असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.\nराज्याच्या सिंचनासाठीचा सध्याचा कार्यक्रम कोणत्या गतीने चालू आहे, त्याचे स्वरुप काय आहे?\nरखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणता आराखडा समोर आहे?\nत्यासाठीच्या निधी उभारणीचे प्लॅनिंग नेमके कोणते आहे?\nजलसिंचनाच्या एकत्रित विकासासाठी राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर कोणते नियोजन आहे?\n५० टक्के टंचाईग्रस्त भागासाठी कायमस्वरुपी सिंचनासाठी कोणता समन्वय आहे?\nमराठवाडा, विदर्भातील सर्व प्रकल्प सिंचनाअभावी रखडलेले असताना त्यांना आधी निधी दिला तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प रखडतील, ही दरी कशी दूर करणार?\nसिंचन प्रकल्प राबविताना किती जमीन लागवडीखाली यायला हवी होती आणि प्रत्यक्षात किती जमीन लागवडीखाली आली?\nजलसिंचन योजनांच्या अंमलबजावणीसाठीचा कार्यक्रम आणि भविष्यकालीन विभागनिहाय समतोल आराखडा आहे का?\nपेरिनियल एरिगेशन आणि सिझनल एरिगेशन यासाठी निधीची उभारणी आणि त्याचे नियोजन आहे का?\nबारमाही एरिगेशन क्षेत्रात (कडा) जो समन्वय आहे तसा राज्यात इतर ठिकाणी आहे का?\nजलसिंचन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायमस्वरुपी आढाव्याकरिता जिल्हा-विभाग स्तरावर मॉनेटरिंग यंत्रणा आहे का?\nअसे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. ज्याची उत्तरे जलसंपदा विभागाने द्यायची आहेत. |
भारताचा आशियाई दोरीवरचा खेळ (३/३ः पूर्व व आग्नेय आशिया) पश्चिम आशिया, भारतीय उपखंडानंतर तितक्याच रोचक अशा पूर्व आशियाकडे वळूया. आधुनिक सिल्क रूट म्हणा किंवा आधुनिक जागतिक सत्तास्पर्धेचे केंद्र म्हणा, पूर्व व आग्नेय आशियाकडे सगळ्या शक्तींनी आपले लक्ष वळवले आहे. भारताचे इतर अनेक प्रदेशातील परराष्ट्रधोरण नरसिंहराव सरकारच्या काळात कसे बदलले हे आपण पाहिले. जगाचा हा भागही त्याला अपवाद नव्हता. १९९१ मध्ये सत्तेवर येताच राव सरकारने "लुक ईस्ट" नावाचे धोरण घोषित केले. आतापर्यंत 'स्ट्रॅटेजिक' दृष्टिकोनातून दुर्लक्षित किंवा कमी पाहिल्या गेलेल्या या भागावरील चीनच्या वाढत्या प्रभावावर उतारा ठरू शकेल या उद्देशाने भारताने आपले हे धोरण घोषित केले. आग्नेय आशियातील अनेक लहान देश झपाट्याने प्रगतिपथावर असणार्या चीनच्या प्रभावाखाली येत होते किंवा नाईलाजाने चीनला शरण जात होते. भारत केवळ धोरण घोषित करून थांबला नाही तर याचा पहिला प्रत्यय १९९३ मध्ये आला. ब्रह्मदेश अर्थात म्यानमारमध्ये तोपर्यंत लष्करशाही असल्याने संबंध न ठेवणार्या भारताने आपले धोरण पूर्ण फिरवत लष्करी "जन्ता"ला अधिकृत सरकारची मान्यता देत औपचारिक संबंधांना सुरवात केली. अर्थातच म्यानमारमधील लोकशाही व मानवाधिकारासंबंधी आपली भूमिका स्पष्ट होती. मात्र ती भूमिका आपल्या आर्थिक, व्यापारी व सामरिक संबंधांच्या आड येऊ न देण्याचे धोरण अवलंबण्यास राव सरकारने सुरवात केली. १९९४मध्ये अंदमानच्या केवळ २० किमी उत्तरेला असलेल्या 'कोको आयलंड' चीनला भाडेकरारावर दिल्याची बातमी आली आणि भारत सरकार अधिकच जागे झाले. त्यानंतर भारताने म्यानमारशी व्यापारी करार केले, शिवाय पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक केली. आता आपण म्यानमारमधील तेलासाठी चीनशी स्पर्धा करू लागलो आहोत. शिवाय आपण आता बर्मिज आर्मीला ट्रेनिंग देण्याचेही कंत्राट मिळवण्याची खटपट करत आहोत. भारतातील ईशान्येकडील फुटिरवाद्यांना अटकाव करण्यास म्यानमारच्या सैन्याने आपल्याला मदत करायला सुरवात केली आहे. शिवाय अंमली पदार्थांची तस्करीदेखील कमी झाली आहे. म्यानमारमध्ये लोकशाही वारे वाहू लागल्यानंतर सिंग सरकारतर्फे अधिक जोमाने आपले संबंध सुधारायला सुरवात झाली आहे. भारतीय लष्कराने बांधलेला "भारत-म्यानमार मैत्री मार्ग" ईशान्य भारताला रंगूनपर्यंत जोडतोच, शिवाय पुढे हाच मार्ग लाओस, कंबोडीया, व्हिएतनामपर्यंत न्यायचा भारताचा मानस आहे. राव सरकारच्या आधीच्या सरकारांसाठी वेळीच अशी काही पावले उचलता येणे शक्य असते (दुर्दैवाने शक्य नसावे कारण म्यानमारचे लष्कर भारतीय वंशाच्या बर्मिज लोकांनाही देशाबाहेर हाकलत होते, आपल्याशी संबंध ठेवायला तयार होणे दूरच राहिले. ) तर कदाचित चीनकडे गेलेल्या सामरिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या "कोको आयलंड"ची जखम अशी भळभळत राहिली नसती असे मात्र राहून राहून वाटते. मेकॉन्ग-गंगा कोऑपरेशन डील असो की भारत-आसियान फ्री ट्रेड अॅग्रीमेंट असो व्हिएतनामने भारताला अश्या करारांत सहभागी करण्यासाठी भारताची बाजू उचलून धरली आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या कायमस्वरूपी जागेला जाहीर पाठिंबा देणार्या मोजक्या सुरवातीच्या देशांत व्हिएतनाम होता. गेल्या दोन वर्षांत पाहिलं तर, २०११ ते २०१२ या वर्षात आपला व्यापार ५६%हून अधिक वाढला आहे. हल्लीच्या काळात व्हिएतनाम जवळच्या समुद्रात तेलाच्या खाणींमुळे या मैत्रीला नवा आयाम प्राप्त झाला आहे. अर्थात आपल्या मैत्रीला अजून एक समानतेची किनार आहे चीन बरोबरच्या सीमावादाची. आपल्याप्रमाणेच विविध बेटांसंबंधी व्हिएतनामचे चीनबरोबर वाद आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावावर उत्तर म्हणून व्हिएतनाम भारताकडे पाहत आहे. इतकेच काय तर चीन व व्हिएतनाम प्रश्नात मध्यस्थ व्हायची एकतर्फी ऑफरही व्हिएतनामने दिली आहे. भारताने अर्थातच ही ऑफर स्वीकारली नाही (कारण ती एकतर्फी होती. चीनने अशी कोणतीही मागणी किंवा विनंती केली नव्हती की या प्रस्तावाला सहमती दर्शवली नव्हती). आता या भागातील सर्वात मोठ्या देशाकडे आणि आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी राष्ट्राकडे वळूया, अर्थात चीन! भारत आणि चीन या जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी महत्त्वाच्या दोन संस्कृती. गेले कित्येक वर्षे हिमालयाच्या नैसर्गिक सीमेने दुभागलेले हे शेजार्यांचे सहजीवन अबाधित होते. तिबेट गिळल्यावर झालेली शीख-चीन लढाई सोडल्यास भारतीय जनतेने चीन विरुद्ध युद्ध म्हणावे असे वर्तन फारसे नव्हते. १९६२ मध्ये चीनसोबत युद्ध झाले आणि परिस्थिती पालटली आणि भारताच्या आणि भारतीयांच्या मनात चीनबद्दल अढी निर्माण झाली ती आजतागायत कायम आहे. खरंतर त्यानंतर १९६७ मधील "चोला इन्सिडन्स" नंतर आपल्या सैन्याने चीनला सिक्कीममधून मागे फिरणे भाग पाडले आहे, शिवाय १८८७मध्ये अरुणाचलमध्ये घुसण्यापासून यशस्वीपणे रोखले होते. इतकेच नाही तर एका अभ्यासात असे दिसून आले आहे की आतापर्यंत (२००५ पर्यंत) २३ घटनांपैकी १७ घटना चीनने पड खाऊन सोडवायला तयारी दाखवली. मात्र तरी भारतीयांचा न्यूनगंड पुसला गेला नाहीच, उलट विविध घटनांमुळे चीनविरुद्धचा अविश्वास वाढीस लागला. चीन बरोबरच्या संबंधातील बदलांच्या सुरुवातीचे श्रेय मात्र राव सरकारच्याही आधी राजीव गांधींच्या सरकारला जाते. १९८७ मध्ये अरुणाचलामध्ये भारत व चीनच्या शक्तिप्रदर्शनानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री एन्. डी. तिवारी यांना चीनला पाठवून शांतीप्रस्ताव तर मांडला गेलाच शिवाय जगभरच्या पंडितांना खोटे ठरवून १९९३/९४ मध्ये भारताने चीनबरोबर परिस्थिती "जैसे-थे" ठेवायचा करारच केला. अर्थात त्यानंतर काही लहान-मोठ्या कुरबुरी सोडल्या अन् फार मोठ्या चकमकी झाल्या नसल्या तरी संबंध सलोख्याचे आहेत असे मात्र म्हणता येत नाही. त्यानंतर भारताचे चीनसोबत व्यापारी, सामरिक संबंध वाढले. २००८ साली चीन हा भारतासाठी सर्वात मोठा व्यापारी संबंध असणारा देश झाला. अर्थात हा व्यवहार अजून तरी भारतासाठी फारसा फायद्याचा नसला तरी त्याचे महत्त्व आहेच. चीन म्हटले की त्याचे अनेकांना चिंतेत टाकणार्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पद्धतीच्या वाटचालीकडे काणाडोळा करता येणार नाही. आशियाई समुदाय आणि भारत यांना वेढणार्या या 'माळे'मुळे चीनची वाढती सामरिक शक्ती आणि आपल्याकडील उत्तराचा अभाव याकडे अनेक तज्ज्ञ लक्ष वेधत असतात. ही चिंता आततायी आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. चीनचा वाढता प्रभाव आणि त्याची एकूणच परिसरात वाढती दादागिरी हा चिंतेचा विषय आहेच. किंबहुना चीनचा याबाबतीत प्रगतीचा वेग इतका अफाट आहे की त्याला उत्तर देण्यासाठी कोणत्याही एका देशाने तयारी करणे अशक्य असल्याचेही काहींचे मत आहे. मात्र या बाबतीत भारत हातावर हात धरून बसला आहे असा आक्षेप जो अनेकदा ऐकू येतो तो देखील सत्याशी फार जवळ जाणारा नाही. पूर्व आशियातील बदलती परराष्ट्रधोरणे बघितली तर चीनने पूर्वी भारताच्या बाजूने असणार्या श्रीलंका व नेपाळमध्ये यशस्वी आणि प्रभावी शिरकाव केल्याचे दिसून येते. तर भारताने चीनचा प्रभाव असणार्या म्यानमार, इंडोनेशिया या देशांत आपला प्रभाव निश्चितपणे वाढवल्याचे दिसून येते आहे. (एकेकाळी बांगलादेश युद्धात इंडोनेशियाने पाकिस्तानच्या बाजुने, भारताच्या विरोधात युद्धनौकांची मदत देऊ केली होती, तेथून आजचा प्रवास रंजक आहे). शिवाय बांगलादेश, ताजिकिस्तान, थायलंड, लाओस या देशांमध्ये भारत आणि चीनमध्ये प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी तुल्यबळ टक्कर आहे. उत्तर कोरिया व पाकिस्तान हे पूर्णतः चीनच्या तर व्हिएतनाम व भूतान हे देश ठामपणे भारताच्या बाजूने आहेत. भारताने सध्या मालदिवशी संबंध शिथील केले असले तरी परिस्थिती लवकरच पूर्ववत होऊ शकेल व भारताचा तिथेही एक एअर-बेस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय जपान व दक्षिण कोरिया अजून भारताच्या बाजूने नसले तरी चीनच्या राजकीय दृष्ट्या विरोधात आहेत. याव्यतिरिक्त माझ्यामते भारताभोवतीच्या या मौक्तिकमालेच्या संकल्पनेत दोन मोठे अडसर आहेत. एक म्हणजे आपली निकोबार व लक्षद्वीप बेटे. या दोन बेटांचे अस्तित्व हिंदी महासागरातील कोणतीही वाहतूक आपल्या नजरेखालून गेल्याशिवाय होणे अशक्य करतात. दुसरा अडसर म्हणजे अनेक देशांमध्ये चीनबद्दल वाढत जाणारी नाराजी. आफ्रिकेतील चीनने तुलनेने नुकताच रस घेतलेले देश असोत नाहीतर इंडोनेशियासारखे चीनचे जुने मित्र. चिनी कंपन्यांना कंत्राट देणे म्हणजे स्थानिक रोजगार गमावणे असे समीकरण रूढ होऊ पाहते आहे जे चीनच्या वाढत्या प्रभावाला आपोआप मारक ठरते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांच्या नुकत्याच झालेल्या जपान भेटीकडे बघायची गरज आहे. भारताने जेव्हा दुसर्यांदा अणुचाचण्या केल्या तेव्हा बहुतांश देशांनी निर्बंध घातले (जे त्यांना पुढील ३ ते ७ वर्षांत हटवावे लागले). या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या भेटीचे सर्वात मोठे फलित जर काही असेल तर जपानसारख्या आण्विक अस्त्रांच्या कट्टर विरोधी राष्ट्राने भारतासोबत अणुकरार करण्याचे सूतोवाच करणे. वाढत्या चिनी प्रभावामुळे भारत जितका बेचैन आहे त्यापेक्षा अधिक जपान, अमेरिका व दक्षिण कोरिया बेचैन आहेत. या तथाकथित स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला उतारा म्हणून अमेरिका-जपान-भारत-ऑस्ट्रेलिया असा "डायमंड" तयार करण्याची योजना जपानने प्रस्तावित केली आहे. २००६ मध्ये भारताने जपानबरोबर महत्त्वाचे करार केल्यानंतर आपल्याला अनेक पातळ्यांवर फायदे झाले आहेत. जपानसारख्या पिडीत राष्ट्राने आपली आण्विक अस्पृश्यता हटवण्याचे सूतोवाच करणे निश्चितच आनंददायी आहे. दुसरे असे की, या भेटीनंतर जपानने काही क्षेत्रांतील उच्च व अत्याधुनिक तंत्रज्ञानही भारताला द्यायची तयारी दाखवली आहे. या अश्या घोषणांमुळेच चीन अधिकच वैतागला व त्या भरात सरकारी मुखपत्र समजल्याजाणार्या वृत्तपत्रात जपानवर डोळे वटारणारा अग्रलेख आला होता हे आठवत असेलच. तर सारांश सांगायचा तर भारताची बदलती आर्थिक परिस्थिती, भारताचे भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व यांची सांगड घालत भारताने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये निश्चित प्रगती केल्याचे दिसते. अर्थात बरेच करायचे बाकी आहे पण परिस्थिती अजिबातच हाताबाहेर गेलेली नाही किंबहुना आता कुठे हातात येते आहे असे माझे मत आहे. (समाप्त) अनेकांनी प्रतिसाद, व्यनी, प्रत्यक्ष भेटींत विचारल्या प्रमाणे तीनच भाग का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण कुठेतरी मर्यादा हवी म्हणून आशियाचे तीन भाग करून येथील आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत ढोबळ ओळख करून देण्याचा मानस हे लेख लिहिताना होता. आपण पाकिस्तान किंवा चीन पुढे कसा नांगी टाकून बसले आहोत, आपली परराष्ट्र नीती कशी कणाहीन आहे किंवा आपल्याकडे कशी रणनीतीच नाही वगैरे मते मांडणारे लेख/चर्चा विविध माध्यमांतून आपल्यापुढे येत असतातच. त्यात सगळेच गैर असते किंवा चुकीचे असेलच असे नाही पण त्या लेखांच्या निष्कर्षांशी सहमती नोंदवण्याआधी, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्लिष्टतेकडे आणि भारतीय धोरणासंबंधी काहिशा सकारात्मक बाजूकडे लक्ष वेधले जाणे इतकेच या लेखांचे मर्यादित उद्दिष्ट ठेवले होते. |
अध्याय ४ था. ] न घडेल, द्याल तरि निजपतिशोधावधि करीन मीं कष्ट. १५१. बोलेन प्राणप्रियशोधार्थ ब्राह्मणासवें मात्र, मदधीन असावें हें व्रत माझें, देवि ! आणि हें गात्र. १५२ राजप्रेसू म्हणे, 'मज मान्य असे सर्व हे असे चि, रहा, हो मत्सुता प्रियसखी, विरहानळ उपरैमो, नसो चिर हा. सुख नृपसुतासुनंदाज्योत्स्नासख्यें सतीव्रता पाहे, पावे भवार्तमतिसी सत्संगतिनें न तीव्रतापा हे. स्त्रोपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ? सिंहासनीं मिरवले, ते चिरले हो ! वनांत पाय तेणें. १५५ जातां वनांत ऐके ऐसी दूरूनि हाक, 'वणव्याला भ्यालों, पुण्यश्लोका ! रक्ष; दुजा अभयदा कवण व्याला ? १५६ धावोनि जाय नळ, कीं, न विपत्पूरी पदप्रवण वाहो, पाहे तो अहि आहे, आलासे त्यासमीप वणवा हो ! पुसतां नळासि सांगे, "घडलें मज गुर्वतिक्रमें पाप; 'स्थावरसा हो, जो नळ नुचली तो' हा सुरर्षि दे शाप. १५८ त्वद्धित करुनि यशार्ते हा नागसखा नवा नळा ! लाहो. यातें रक्षुनि तुजला, तोष न भक्षुनि दवानळाला हो." अंगुष्टमात्र झाला तो कर्कोटक असें वदोनि हित, दावविवर्जितदेशीं त्यातें नळ भूप ने, करी विहित. सोडावा भूवरि तो राहे अवलंब करुनि तो खातें, मग बोले क्षण द्याया रोखातें, मग अनंत तोखातें. 'करितों हित कांहीं बा ! स्वपढ़ें मोजीत सजना ! चाल, १. पंतांच्या दप्तरांतील अन्यलिखित प्रतींत 'घ्याल' असा सरस पाठ आहे. २. राजमाता. ३. शांत होवो. ४. नृपसुता सुनंदारूपी चंद्रकांतीच्या सख्यानें. ५. गवतानें. ६. सर्पाला. ७. संकटाच्या पुरांत ८. पदीं नम्र झालेला. ९. गुरूच्या ( नारदाच्या ) अमर्यादेनं. १०. न हलणारा असा. ११. दावाभिरहित अशा स्थानीं. १२. आकाशातें. १३. रोषातें. १४. संतोषातें. |
अमरावती : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना कृषीपंपाची बारा तास वीज देण्यात येत आहे. मात्र पश्चिम विदर्भाला यात वगळण्यात आले. शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे (Shiv Sena) वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्य अभियंत्याच्या कक्षातच पंख्याला दोरी बांधून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. (Live Marathi News) अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 40 कृषीपंपाच्या (डीपी) रोहित्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच सिंचन करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. शेतात सिंचन होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे आज उद्धव ठाकरे गटाच्या ठाकरे गटातर्फे अमरावतीच्या मुख्य वीज वितरण (MSEDCL) अभियंताच्या कक्षात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना विभागीय संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. युवासेना पदाधिकारी प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत चक्क अभियंत्याच्या समोरच पंख्यावर दोर गळ्यात टाकून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक आत्महत्येचा प्रयत्न प्रकाश मारोटकर यांनी केल्याने या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान बंद असलेल्या सर्व डीपी तातडीने दुरुस्त करण्यात येईल; असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
नांदेड : राज्यात काहींही झालेले तरी महिला आणि लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण काह्ही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूल बस चालकाने एका नवनीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला आहे. सदर अत्याचाराची घटना नांदेड शहरात घडली आहे. १५ वर्षीय नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या स्कूलबस चालकाचे नाव गजानन वडजे असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत शिकणाऱ्या मुलीला स्कूलबस चाकालाने अनेक दिवसांपासून फूस लावली होती. सदर पिडीत मुलीला फूस लावून स्कूलबस चालकाने तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेनंतर आरोपी गजानन वडजे हा पिडीत मुलीला ब्लॅकमेल करू आणि लागला. आणि ब्लॅकमेल करून त्याने पुन्हा अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. तुझे आता लग्न होऊ देणार नाही अशी धमकी आरोपी गजानन वडजे याने अनेकवेळा पिडीत मुलीला दिली. त्यामुळे पिडीत मुलगी चांगलीच घाबरली होती. दरम्यान, वाहनचालक सतत देत असलेल्या तणावातू पीडित मुलीने फिनेल प्राषण करुन आत्महत्येचा देखील करण्याचा प्रयत्न केला होता. अशी माहिती समोर आली आहे. सदर पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचाचार सुरू आहेत. उपचारादरम्यान पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. यावेळी आपल्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला असल्याचं माहित झाल्यावर मुलीच्या वडिलाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या वडिलांनी मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन वडजे याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली असून, पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत. |
अंदर की बात ! भाजप आणि जेडीयू यांच्यातील मैत्रीत 'दूरावा' ? - पोलीसनामा (Policenama) नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कधी भांडण तर कधी मैत्री अशी युती असलेल्या भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोघांमध्ये मोठा पक्ष कोणता यावरून सध्या वाद सुरु असून यामध्ये कोण जिंकतो आणि कोण मोठा पक्ष म्हणून समोर येतो यासाठी दोघांमध्ये लढाई सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याआधी या दोन्ही पक्षांच्या मैत्रीला कधी सुरुवात झाली आणि त्यांच्यात कशाप्रकारे नंतर वाद झाले याची आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी संयुक्त जनता दल हे समता पार्टी म्हणून ओळखली जात असे. जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे सर्वात आधी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांना जोरदार दणका दिल्यानंतर त्यांच्याकडे एक होण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यावेळी दोघांनी वेगवेगळ्या निवडणूक लढल्या होत्या. त्यामध्ये भाजपला 53 जेडीयूला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले होते होते. मात्र त्यानंतर दोघांनी एकत्र येत आपल्या मैत्रीच्या पर्वाला सुरुवात केली. 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 18 जागांवर यश मिळाले तर समता पार्टीला सहा जागांवर यश मिळाले. त्यानंतर 2000 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 67 जागा जिंकता आल्या तर समता पार्टीला कमी जागांवर यश मिळाले. मात्र त्यानंतर 2003 मध्ये समता पार्टी हि संयुक्त जनता दल झाल्यावर झालेल्या 2005 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र सात दिवसांत त्यांनी बहुमत गमावले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. 2005मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने निवडणूक एकत्रित लढली आणि लालू प्रसाद यांना सत्तेतून खाली खेचले. त्यावेळी जास्त जागा जिंकून देखील भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. 2010 मध्ये देखील दोघांनी शानदार विजय मिळवत पुन्हा सत्ता मिळवली. मात्र यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कमी जागांवर उमेदवार देऊन देखील भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यानंतर 2010 मध्ये नरेंद्र मोदी यांचा कालखंड सुरु झाल्यानंतर नितीश कुमार हे मोदी यांच्याविरुद्ध उभे राहिले. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात मतभेद होण्यास सुरुवात झाली. आणि शेवटी 2013 मध्ये दोघांमधील जुनी मैत्री तुटली. मात्र त्याचा परिणाम जेडीयूला लोकसभा निवडणुकीत दिसून आला. त्यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांनी एकत्र निवडणूक लढवत भाजपचा दारुण पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर लालू प्रसाद आणि नितीश यांची युती तुटली . त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू पुन्हा एकत्र लढले आणि बिहारमध्ये 40 पैकी 39 जागांवर या आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले. मात्र आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. |
मुंबई - मुंबईत रविवारी ४७९ रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार २४० वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ८४ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ६६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १८ हजार २ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०. ०६% टक्के आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २०८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. रुग्ण आढळून आल्याने ५१ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३९ हजार १९८, तर आतापर्यंत एकूण १ कोटी २ लाख १६ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. |
हलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात । ऐसीअक्षरे\nहलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात\nSubmitted by योगेश्वर on गुरुवार, 17/09/2015 - 17:17\nपर्वणी काळात साधु आणि जनतेची पापं, अंग, हात आणि पाय, काहींचे फक्त डोळे आणि बोटांनी डोक्यावर पाणी शिंपडण्यासाठी धरणात साठवलेले पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी नाशिककरांना ४० दिवस पुरेल एवढे होते. सध्याच्या अवर्षण स्थितीत पाणी येत नाही म्हणुन ओरड करणारे नाशिककर आणि सर्व भोळेभामटे आणि भाबडे पुण्यसंकलन सोहळ्याचा आनंद डुबकी मारून, नदीवर नुसताच फेरफटका मारून, आंघोळ करणार्यांना बघुन नेत्रसुख घेत, गर्दी मधे कोपराने धक्काबुक्की करत, हाथ कि सफाई दाखवत घेत आहेत. यात पोलिस, काॅर्पोरेट स्वयंसेवक, मेळ्यासाठी आलेल्या निधीचं तुप आपल्या पोळीवर ओढणारे कार्यसम्राट आणि त्यांचे पंटर, बगलबच्चे, हे पण आपली स्वार्थी अन् निःस्वार्थी या दोन्ही प्रकारची सेवा बहाल करत आहेत. यांसोबत काही खरेखुरे कार्यकर्ते देखिल आहेत. जे फारच हाय ब्रो, नास्तिक, (माझ्यासारखे) दांभिक किंवा गेलाबाजार विज्ञाननिष्ठ वगैरे असतील ते फक्त बातम्या आणि फोटो पाहुन बोटं मोडतायत. या सर्वांत एक गोष्ट समान आहे कि त्यातले बरेच सेल्फीवीर आहेत.\nआता सगळ्या शाही स्नानांचे विधी ऊरकल्यावर पाणीटंचाई म्हणुन बोटं मोडायला परत सगळे तयार होतील. परत दुष्काळाच्या नावाने रड..\nगेल्या काही दिवसातल्या गोंधळातुन एक गोष्ट नक्की जाणवतेय कि स्वतःची ओळख धर्म, जात, पक्ष, भाषा अशा वेगवेगळ्या लेबलांखाली बनवता बनवता "माणुस" ही ओळख पुसत चालली आहे.\nच्यायला यांना पाहीजे म्हणुन पाणी टंचाई सोसा, भोंगे ऐका, डी.जे. भोगा, ट्राफिक जाम सोसा, मटण खाणं सोडा.. किती ते रंगित धार्मिक बलात्कार? रंगित यासाठी की कोणी भगवा, कोणी हिरवा, कोणी निळा तर कोणी शांततेचा रंग पांघरूण. सध्या या बलात्कार्यांचं प्रमाण वाढलंय आणि त्यांना राजकिय अभय पण मिळतंय.\nया धार्मिक बलात्कार्यांना ३५४अ, ३७५, ३७६अ आणि जे काही आणखी कलमं असतील ते लावायला पाहीजे. पण लावणार कोण?\nकाहींना हे वाचुन फार गुदगुल्या होत असतील. मी किती हतबल आहे असं वाटत असेल. पण त्यांचा हा भ्रमाचा भोपळा येत्या काही दशकांत नक्कीच फुटणार आहे. कारण या सगळ्या चुझ्पाला कंटाळलेला वर्ग वाढतोय.. वेगाने.. आणि लवकरच या धार्मिक बहुसंख्यांना तो मागे टाकणार आहे.\nतेव्हा प्यायला मुबलक पाणी असेलच पण डुबकी मारायला सुद्धा शुद्ध पाणी मिळेल\nत्यावेळी हलाल पावभाजी आणि कांदा, आले, लसुण नसलेलं चिकन कोशर वरणभातासोबत सुखाने एकत्र नांदतील.\nरंगित धार्मिक बलात्कार?\nPermalink Submitted by घनु on गुरुवार, 17/09/2015 - 19:04.\nरंगित धार्मिक बलात्कार? आवडला हा शब्द पण शेवटी बलात्कारच तो, त्याला आवडलं तरी कसं म्हणावं... असो.\nमागच्याच शनिवारी नाशिकला जाणं झालं, ज्या दिवशी शहरात होतो त्याच्या दुसर्या दिवशी शाही-स्नान पर्वणी होती. शहरात पर्वणी ला लोक येणार म्हणून चोख व्यवस्था होती आदल्या दिवसापासून.\nपोलिसांची कीव नेहमीच येते असं नाही, पण ह्या वेळेला फार फार प्रकर्षाने आली.\nमध्यंतरी उन्हाळ्यात अवकाळी पाउस झाला, तो ही वादळी स्वरूपाचा त्यामुळे द्राक्षाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं. नाशिकमधे एका मित्राचा वाईनरी प्लांट आहे, स्वतःचं द्राक्षाचं शेत आहे, त्याला अक्षरशः द्राक्ष दुसरी कडून मागवावी लागली. हे असं चित्र अनेक शेतकर्यांकडे होतं. दुसरीकडे पावसाळ्यात द्राक्षाशिवाय इतर पिकं घेणारे शेतकरी पावसाच्या भरवश्यावर, आणि अता नेमका पाऊस नाही. आणि ह्यापुढे आला तरी की पुन्हा तीच गत, पिकांचा नुकसानच. पण पावसा तू पड बाबा\nशाही स्नानाच्या वेळी नदीतल्या पाण्याने रोग-राई पसरू नये, पाणी स्वच्छ असावं म्हणून ते पाणी वाहातं-खळाळतं ठेवावं लागतं, पण ते वाहातं ठेवण्यासाठी किती पाणी वाया जातंय ह्याचा हिशोब नाही. मराठवाडा तर जाऊच द्या पण नाशिकच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले धुळे आणि पुढचा इतर खानदेश जिथे पाण्याची अशक्य टंचाई ऐनीवेज असतेच त्यांच्या समोर पाण्याचा हा 'नंगा' नाच करायचा हे किती अघोरी आणि क्रुर\nशहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साधू महाराजांचे होर्डींगज लागले होते. आमच्या स्टॉल ला (आखाड्याला) आवर्जून भेट द्या छाप झैरातीच होत्या त्या. फार गमतीशीर प्रकरण वाटलं ते एक. पण काय करणार हो, आज-काल कॉम्पीटीशन कशात नाही सांगा तर, इथेही चालायचंच\nलहान मुलांची व्यवस्था आणि सुरक्षा हे तर आपण अश्या उत्सवात(?) ग्राह्य धरतच नाही, त्यात विशेष काय ते. "कुंभ के मेले मे बिछडे हूये भाई" हे म्हणतोच की आपण अगदी सहज. बडे बडे मेले में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है\nअजून चेंगराचेंगरीत काही मनुष्यहानीची बातमी आली नाही हे एक चांगलंच आणि असं काही न होवो ही प्रार्थना. पण मागच्या वेळी झालं होतं त्यामुळे ह्यावेळी अशी काही बातमी आली कानावर तर धक्का तरी नाही बसणार.\nपण असो....हे असले विचार मनातच केलेलेच बरे. असे अधार्मिक 'तोकडे' विचार खुलेआम केले तर आपल्यावर ही धार्मिक बलात्कार व्हायचा, 'तोकडे' कपडे घातल्यावर होतो तसा.\nअसे अधार्मिक 'तोकडे' विचार\nPermalink Submitted by .शुचि. on गुरुवार, 17/09/2015 - 19:06.\nअसे अधार्मिक 'तोकडे' विचार खुलेआम केले तर आपल्यावर ही धार्मिक बलात्कार व्हायचा, 'तोकडे' कपडे घातल्यावर होतो तसा.\nPermalink Submitted by योगेश्वर on रविवार, 20/09/2015 - 22:46.\nआडदंड लोकांनी जगाचे जेवढं नुकसान केलंय त्यापेक्षा कैक पटींनी जास्त नुकसान सज्जन लोकांनी गप्प राहुन केलंय, असं काहीतरी माझ्या वाचनात आलंय.\nआवडले. देव घरापुरता मर्यादित\nPermalink Submitted by .शुचि. on गुरुवार, 17/09/2015 - 19:29.\nआवडले. देव घरापुरता मर्यादित असावा. समाजाला त्रासही नको, देखावे नको आणि ते सार्वजनिक उदोउदो नको.\nसुखदुःखाचा असमतोल हे वर्तमान\nPermalink Submitted by शरद गाडगीळ on शुक्रवार, 18/09/2015 - 20:30.\nसुखदुःखाचा असमतोल हे वर्तमान ,त्याचे उत्तर कोणालाच माहीत नाही.भूतकाळाचा काहीतरी अगम्य संबंध दाखवून भविष्याची गॅरंटी बय्राच लोकांस देऊ शकतो त्याला प्रेषित ,गुरू वगैरे म्हणायचं.तो सांगेल त्याला धर्म म्हणायचं.माया.\nPermalink Submitted by योगेश्वर on रविवार, 20/09/2015 - 22:40.\nहे सर्व अब्राहमिक धर्म म्हणजे निव्वळ बिनडोकपणा आहे. या प्रेषितांच्या धर्तिवरच आपल्याकडे गुरुंच आणि बाबांचं पेव फुट्लं आहे.\nकाहींना हे वाचुन फार\nPermalink Submitted by पिवळा डांबिस on शुक्रवार, 18/09/2015 - 22:24.\nतुमच्या तोंडी साखर पडो.\nपण नाही, असं काहीही होणार नाही. उलट गेल्या काही दशकांत हे प्रकार वाढलेलेच दिसताहेत!\nहतबलता आणि धार्मिकता यांच माझ्या मते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे!!\nराजेश घासकडवी यांचे विश्लेषण\nPermalink Submitted by योगेश्वर on रविवार, 20/09/2015 - 22:37.\nधार्मिक कट्टरता आणि कट्टरतेबरोबरचा हिंसाचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जुन्या काळी भाबडेपणाने धर्माचं पालन केल जात होतं. धर्मबुड्व्यांना बहिष्क्रुत केलं जाई. आता गोळ्या घालतात. हतबलता आणि धार्मिकता यांचा संबध आहेच.\nबाकी राजेश घासकडवी यांचे धार्मिकतेबद्दलचे विश्लेषण (जरी अतिमर्यादीत पातळीवरील असले तरी) या प्रमेयाला दुजारा देणारे आहे.\nतुमच्या आशावादाचं कौतुक आणि\nPermalink Submitted by अंतराआनंद on सोमवार, 21/09/2015 - 21:18.\nतुमच्या आशावादाचं कौतुक आणि सदिच्छा.\nऊम्मिद पे दुनिया कायम है।\nPermalink Submitted by योगेश्वर on मंगळवार, 22/09/2015 - 01:34.\nहोय ना !\nPermalink Submitted by धर्मराजमुटके on मंगळवार, 22/09/2015 - 22:34.\nगोसावडे फारच माजलेत ! शिवाय चाळीस दिवस पुरेल एवढे पाणी त्यांच्या अंगाने शोषून घेतले म्हणजे काय ?\nआम्ही शहरी लोक एकवेळ सु-शी केली तरी फ्लश करुन एकावेळी ३ ते ६ लीटर पाण्याचा सदुपयोग करतो, धावत्या पाण्याखाली दाढी करतो तेव्हा २-४ लीटर पाणी सहज वापरतो. शेतकरी दादा तर खुपच हुशार ! उस नको लाऊ, ठिबक सिंचन वापर तर म्हणतो, शेरातली येड्यांनो तुम्हाला काय कळतं ? शेतात पाट सोडून दिला की १-२ तास झोप काढायला मोकळा.\nसोसायटीत दुपारी २-६ या वेळेत वॉचमेनला पाणी बंद ठेवायला सांगीतले तर बायका वचावचा बोलतात. काल भरुन ठेवलेले पाणी शिळे झाले म्हणून ओतून देतात.\nशहरी माणसाला पाऊस म्हणजे एक आपत्ती वाटते. त्याला पाऊस पडायला हवा असतो पण तो तलाव क्षेत्रात नाहीतर रात्री पडला पाहिजे आणि कामावर जाताना बंद झाला पाहिजे.\nआणि हो, मला पाण्याचे महत्त्व फक्त पावसाने ओढ दिली की तेवढयापुरते कळते. पण मग मी मुंबईत राहतो याची आठवण येऊन मी निर्धास्त होतो. कारण मला माहित आहे, जर मला पाणी कमी पडले तर माझे सरकार, वाट्टेल त्या धरणातून पाणी ओढून आणेल, वेळच पडली तर आम्ही शेतकर्याचे तोंडचे पाणी पळवू पण मला पाणी मिळेलच.\nकाय करु मला कायमच दुसर्याच कुसळ दिसतं पण माझं स्वतःचं कुसळ दिसत नाही ? मी काय करु ??\nबाकी काही म्हणा, अरुणजोशींनी\nPermalink Submitted by बॅटमॅन on बुधवार, 23/09/2015 - 16:57.\nबाकी काही म्हणा, अरुणजोशींनी यावर खूष होऊन एक मेगाबायटी प्रतिसाद तर नक्कीच लिहिला असता.\nकोणी अजों ना कोणी शोधुन काढुन\nPermalink Submitted by अनु राव on बुधवार, 23/09/2015 - 16:59.\nकोणी अजों ना कोणी शोधुन काढुन जबरदस्तीने ऐसी वर यायला लावू शकत नाही का? |
मनमाड : येथील प्रोफेसर कॉलनी भागात १३ वर्षीय बालकाचा कंपाउंडच्या फाटकावरून पडल्याने लोखंडी गज शरीरात घुसून मृत्यू झाला. शिवाजीनगरमधील रहिवासी आदित्य भीमराव जाधव (१३) हा प्रोफेसर कॉलनीजवळील मैदानावर खेळण्यासाठी गेला होता. कंपाउंडच्या फाटकावर चढून पतंग उडवण्याच्या नादात हात निसटून तो खाली पडला. पडताना फाटकाचा लोखंडी गज त्याच्या शरीरात घुसल्याने तो जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर) |
प्रकरण दहावे जनुक अभियांत्रिकी आणि आनुवंशिकीय समुपदेशन (Genetic Engineering and Genetic Councelling) जनुक अभियांत्रिकी माणसामध्ये होणाऱ्या आनुवंशिक व्याधींची थोडीफार कल्पना आता वाचकांना आली असेल. या व्याधीसंबंधी प्रथम विचार असा येतो की त्या बऱ्या करताच येणार नाहीत कारण या व्याधी औषधांनी बऱ्या होत नाहीत. मग यावर उपायच नाही का ? इतके निराश होण्याचे कारण नाही. गेल्या दोन तीन दशकात वैज्ञानिकांनी गुणसूत्रे आणि जनुके यांच्यासंबंधी इतके विविध प्रकारचे आणि सखोल संशोधन आणि प्रयोग केले आहेत की अत्याधुनिक तंत्रांच्या सहाय्याने आज जनुकांची जडण घडण बदलण्याची क्षमता विज्ञानाला मिळाली आहे. डॉ. हरगोविंद खुराना यांच्या सारख्या प्रज्ञावंत भारतीय वैज्ञानिकाने कृत्रिम जनुक तयार करून जगाला फार मोठा दिलासा दिला आहे. वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे जनुक अभियांत्रिकी. जनुक अभियांत्रिकी किंवा पुनः संयोजी डीएनए (रिकॉम्बीनन्ट डीएनए) तंत्र म्हणजे गुणसूत्रांवरील जनुकांची मांडणी बदलणे. या तंत्राच्या सहाय्याने डीएनए अलग करता येतो. पुनर्रचित करता येतो आणि एका पेशीतून दुसऱ्या पेशीत स्थानांतरित जीव अभियांत्रिक (इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिके मार्फत काढलेले छायाचित्र) एका विषाणूमधील डावीकडे दिसणारी डी एन ए ची साखळी उजवीकडे परकीय डी एन एचा एक तुकडा जोडला जात आहे. १०.१ अ जनुक अभियांत्रिकी.. |
ठळक मुद्देया प्रकारामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडणार नाहीत, असंही शकिबला वाटतं. श्रीलंका : निदाहास ट्रॉफीतील प्रकरणानंतरआपल्यावर आयसीसी कडक कारवाई करेल, या भितीने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने पलटी मारली आहे. जेव्हा मैदानात गोंधळ सुरु होता तेव्हा शकिब मैदानावरील फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये बोलवत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. पण आता मात्र " तो मी नव्हेच. . . " असं म्हणत शकिबने पलटी मारली आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकात जे नाट्य घडलं ते काही चाह्त्यांच्या पचनी पडलेले नाही. अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला. " मैदानात जेव्हा सारा गोंधळ सुरु होता तेव्हा मी खेळाडूंनी पेव्हेलियनमध्ये बोलावले नाही. त्यांना मी सामना पूर्ण करा, अशी सुचना करत होतो. काही लोकांनी माझ्या या गोष्टीचा फारच चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे माझ्यावर टीकाही झाली. पण मी हे सांगू इच्छितो की, मी खेळाडूंना माघारी बोलवत नव्हतो. ते खेळभावनेला शोभलं नसतं, " असं शकिबनं सांगितलं. बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरा केला, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडणार नाहीत, असंही शकिबला वाटतं. याबद्दल तो म्हणाला की, " बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. जे काही घडले त्याचे मी समर्थन करत नाही. काही वेळा चुका होतात. पण या चुकांमुळे दोन्ही देशांतील संबंध मात्र नक्कीच बिघडणार नाहीत. आम्ही नेहमीच श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज असू " Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
यंदा 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल्समध्ये हॉलिवूड कलाकारांसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींचाही जलवा पहायला मिळाला. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut),दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)यांनी कान्स फिल्म फेस्टिवल 2019 (Cannes Film Festival 2019) च्या रेड कार्पेटवर यंदा पाऊल ठेवलं. त्यांच्या खास डिझायनर ड्रेसची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. तिन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सचे ड्रेस रिप्रेझेंट केले होते. प्रियंका चोप्रा आता बॉलिवूड सिनेमांसोबतच हॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करत आहे. यंदा कान्स फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर तिने पहिल्यांदा आपली झलक दाखवली आहे. दीपिका 2010 साली पहिल्यांदा कान्स फेस्टिवल्समध्ये रेड कार्पेटवर आली होती. यंदा गिफ्ट रॅप बो स्टाईलमध्ये दीपिकाचा ड्रेस डिझाईन करण्यात आला होता. कंगना यंदा कांजीवरम साडीला वेस्टर्न टचमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. तर जमसूटचा लूक हा तिचा आफ्टर पार्टी लूक आहे. बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतच यंदा हीना खानदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. कंगना लवकरच 'मेंटल है क्या' चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रियंका 'द स्काई इज पिंक' या बॉलिवूड सिनेमात तर दीपिका 'छपाक' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. |
BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!! जी गोष्ट राहुल द्रविड U-19 भारतीय संघासाठी करु शकला ती रवी शास्त्रींना का जमली नसेल. पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आणि संपूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण तयार झालंय. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला. मुंबईकर पृथ्वी शॉचं नेतृत्व आणि त्याला राहुल द्रविड सारख्या कणखर प्रशिक्षकाची मिळालेली साथ या जोरावर भारताने या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. ही स्पर्धा अनेक दृष्टीकोनातून भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरलेली आहे. ज्या क्रीडा रसिकांनी १९ वर्षाखालील विश्वचषकाचे सामने पाहिले असतील त्यांना एक गोष्ट नक्की जाणवली असेल ती म्हणजे सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ उजवा ठरला. एकाही सामन्यात भारताला कडवा प्रतिकार सहन करावा लागला नाही. पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमन गिल सारखे फलंदाज; इशान पोरेल, शिवम मवी, कमलेश नागरकोटीसारखे गोलंदाज हे आगामी काळात भारतीय क्रिकेटचा चेहरा ठरु शकतात. भारतीय संघाने स्पर्धेत राखलेलं निर्विवाद वर्चस्व आणि त्यांना राहुल द्रविडची मिळालेली खंबीर साथ या सर्व गोष्टी आता तुम्हाला माहिती झालेल्या असतील. या विजयानंतर जवळपास सर्व क्षेत्रातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांनी भारतीय संघाचं कोडकौतुक केलंय. बीसीसीआयने तर सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी भरघोस रकमेचं इनामही जाहीर केलंय. मात्र या विजयासह भारतीय क्रिकेटमधलं आशा-निराशेचे चार चौकोन समोर आलेले आहेत. या आशा निराशेच्या खेळात राहुल द्रविडचं U-19 संघाच्या पाठीमागे एका व्रतस्थ योग्यासारखं उभं राहणं, आशादायी चित्र तयार करुन जातंय. भारतीय प्रेक्षकांना राहुल द्रविड का भावतो? खरंतरं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जणं आपापल्यापरीने देऊ शकतो. मात्र माझ्यामते मैदानात कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांत आणि संयमी डोक्याने जो भारतीय संघाचा पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढतो, त्यावर भारतीय प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. मग अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यासारखे खेळाडूही भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनले ते याच शांत आणि संयमी स्वभावामुळे. यापैकी एकाही खेळाडूला मैदानात तुम्ही विनाकारण आक्रमक होताना पाहिलेलं नसेल. राहुल द्रविड ने आयुष्यभर 'द वॉल' हे बिरुद मिरवलं. जगात आक्रमक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे जलदगती गोलंदाज द्रविडच्या बचावात्मक फलंदाजीपुढे अक्षरशः गुडघे टेकायचे. त्यामुळे राहुल द्रविड हा खेळाडू कधीच वाईट वागू शकत नाही किंवा चुकीचे निर्णय घेऊ शकत नाही असा भारतीयांना आत्मविश्वास आहे. अशा निष्कलंक राहुल द्रविडवर पहिल्यांदा आक्षेप घेतला गेला तो रामचंद्र गुहा या व्यक्तिकडून. रामचंद्र गुहा हे पेशाने इतिहासकार म्हणून ओळखले जात असले तरीही काही दिवसांपूर्वी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीत स्थान देण्यात आलं होतं. अवघ्या काही कालावधीत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या गुहांनी एका पत्राद्वारे बीसीसीआयमधल्या व्हीआयपी कल्चरवर आक्षेप घेतला होता. यात काही खेळाडूंवर टीका करताना गुहांनी राहुल द्रविडवरही आक्षेप घेतला होता. भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाशी संबंधित असलेल्या कोणत्याही माजी खेळाडूला आयपीएलमध्ये सहभाग दिला जाऊ नये असं म्हणत गुहांनी, राहुल द्रविडच्या U-19 संघाचा प्रशिक्षक आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघाचा मार्गदर्शक होण्यावर बोट ठेवलं होतं. साहजिकच गुहांच्या या लेटरबॉम्बनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठं वादळ उठलं होतं. द्रविडसारख्या खेळाडूच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण झाल्याने चाहत्यांनी गुहांना चांगलंच टीकेचं धनी बनवलं. या घटनेवर द्रविडने स्पष्टीकरण देताना तितक्याच संयमीपणाने आपली बाजू मांडली. "आयपीएल संबंधी करार करताना मी बीसीसीआयला याची पूर्वकल्पना दिलेली होती. U-19 संघाचा प्रशिक्षक म्हणून १० महिने मी काम पाहणं अपेक्षित होतं. त्यानूसार मी काम केलेलं आहे, त्यामुळे माझा करार झाल्यानंतर नियमांमध्ये बदल झाले असल्यास या गोष्टीसाठी मला दोषी ठरवलं जाणं योग्य ठरणार नाही." या प्रकरणावर द्रविडने बीसीसीआयलाही आपली बाजू स्पष्ट करायला सांगितली होती. ज्यावर बीसीसीआयने द्रविडच्या बाजूने आपला कौल देत, द्रविडकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचा निर्वाळा दिला होता. Conflict of interest चा मुद्दा करुन गुहांनी राहुल द्रविडवर टीका केली असल्याने यावरुन मोठा वाद निर्माण होऊ शकला असता. मात्र द्रविडने हा मुद्दा अतिशय शांतपणे हाताळत प्रकरण चिघळलं जाणार नाही याची काळजी घेतली. U-19 विश्वचषकासाठी द्रविडने एक प्रशिक्षक म्हणून घेतलेली मेहनतही तितकीच वाखणण्याजोगी आहे. गेल्या १४ महिन्यांपासून राहुल द्रविड U-19 भारतीय संघातील खेळाडूंवर आपली मेहनत घेतो आहे. कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचं आहे, त्यासाठी त्याच्याकडून तयारी करुन घ्यायचं. तरुण खेळाडूंना फलंदाजीच्या टिप्स देणं, संघाची एकत्र मोट बांधून ठेवणं या सर्व गोष्टींमध्ये राहुल द्रविड एखाद्या निष्णात प्रशिक्षकासारखा वागला आहे. कदाचीत ही गोष्ट कोणात्या लक्षात येणार नाही, पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या U-19 आशिया चषकातही भारताचा संघ विजयी ठरला होता. मात्र या संघात पृथ्वी शॉला जागा देण्यात आलेली नव्हती. राहुल द्रविडने पृथ्वी शॉला आशिया चषकाऐवजी रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. रणजीतला अनुभव तुझी फलंदाजी आणखी समृद्ध करेल असं विधान राहुल द्रविडने केलं होतं. त्यानंतर पृथ्वी शॉने रणजीत मुंबईकडून खेळताना केलेली कामगिरी आणि त्यानंतर विश्वचषकात भारतीय संघाचं केलेलं खंबीर नेतृत्व हे आपण सर्वांनी पाहिलं होतं. कित्येकदा तरुण वयात खेळाडूना आपण आक्रमक फलंदाज व्हावं अशी इच्छा असते. U-19 विश्वचषकात मालिकावीराचा किताब पटकावणारा शुभमन गिल हा देखील असाच एक खेळाडू...मात्र काही महिन्यांपूर्वी इंग्लंडचा U-19 संघ भारत दौऱ्यावर आलेला असताना शुभमन पहिल्या दोन वन-डे सामन्यांत चांगली कामगिरी करु शकला नव्हता. यावेळी राहुल द्रविडने त्याच्या फलंदाजीतले गुण हेरुन त्याला एक मोलाचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्याच्या फलंदाजीत झालेला बदल हा खरचं थक्क करण्यासारखा आहे. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी आणि शुभमन गिलने राहुल सरांचं कौतुक करताना काय म्हणलं होतं जरुर वाचा. एखाद्या खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला योग्य सल्ला देत त्याच्याकडून हवीतशी कामगिरी करुन घेणं हे काम द्रविडसारखाच प्रशिक्षक करु शकतो. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी उतरायचं म्हणजे केवळ १५ - २० जणांचा संघ घेऊन क्रिकेट खेळणं आणि परत येणं इतकचं नसतं. आपण ज्या देशात खेळायला जाणार आहोत, तिकडचं वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं ही देखील महत्वाची गोष्ट मानली जाते. हीच बाब हेरुन राहुल द्रविड विश्वचषक सुरु होण्यासाठी U-19 संघाला घेऊन न्यूझीलंडमध्ये स्पर्धेच्या आधी २० दिवस आधी तळ ठोकून बसला होता. या सर्व गोष्टींचं आपल्या देशाला मिळालेलं फलित आपण पाहतच आहोत. भारतीय सिनीअर संघाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर असतानाही राहुल द्रविडने आग्रहाने U-19 संघाचं प्रशिक्षकपद मागून घेतलं होतं. प्रशिक्षीत खेळाडूंना प्रशिक्षण देण्याऐवजी देशाची नवीन पिढी क्रिकेट परिपक्व करावी यासाठी एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे राहुल द्रविडने उचलेलं हे पाऊल खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तरुण वयात खेळाडूंचं आपल्या ध्येयावरचं लक्ष्य कमी होण्याची शक्यता असते. आयपीएलचा लिलाव ही सध्या भारतात क्रिकेटर बनू पाहणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल. साहजिकच न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंच्या मनात आयपीएल लिलावाच्या अकराव्या हंगामाबद्दल उत्सुकता होती. मात्र अशावेळी राहुल द्रविडने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आपली समजूत काढत खेळाडूंना आपुलकीचा सल्ला दिला, आयपीएलचा लिलाव दरवर्षी होणार आहे पण विश्वचषक खेळण्याची संधी ४ वर्षांतून एकदाच येईल असं म्हणत राहुलने आपल्या खेळाडूंचे कान बरोबर टोचले. ऑस्ट्रेलियाला पहिल्याच साखळी सामन्यात भारताने पराभवाचं पाणी पाजलं होतं. मात्र अंतिम फेरीत पुन्हा ऑस्ट्रेलियाशी भारताचा सामना होणार होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी लेखून चालणार नव्हतं. यासाठी सामन्याच्या एक दिवस आधी राहुल द्रविडने नामी शक्कल लढवली. अवश्य वाचा - ICC U19 World Cup: अंतिम सामना होईपर्यंत खेळाडूंवर द्रविडने घातली 'मोबाईल बंदी' तर अशीच बरीच उदाहरणं देता येतील ज्यावरुन राहुल द्रविड हा एक परिपक्व क्रिकेट प्रशिक्षक असल्याचं आपल्याला म्हणता येईल. हे झालं भारतीय क्रिकेटचं आशादायी चित्र. मात्र जेव्हा एक क्रिकेट रसिक म्हणून आपण भारताच्या सिनीअर संघाच्या कामगिरीकडे पाहतो तिकडे सांघिक कामगिरी कमी आणि वाद-विवादांची मालिका जास्त दिसून येते. एकीकडे राहुल द्रविड भारताची क्रिकेटमधली पुढची पिढी घडवत असताना, सध्याच्या पिढीने क्रीडा रसिकांसमोर आपला आदर्श घ्यावा असं एकही उदाहरण घालून दिलेलं नाही. यासाठी भारतीयांचं अतिक्रिकेट प्रेम, किंवा एखाद्या खेळाडूला संघाबाहेर बसवलेलं सहन न होणं, पराभव पचवण्याची वृत्ती नसणं अशा अनेक गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. मात्र ही बाब इथे दुय्यम ठरते. २०१७ या वर्षात अजिंक्य बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात आणि श्रीलंकेमध्ये खेळला. यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण वर्षात अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १ शतक झळकावता आलेलं आहे. सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात अजिंक्यने १३२ धावांची खेळी केली. याव्यतिरीक्त श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटीतलं पहिल्या डावातलं अर्धशतकं, ऑस्ट्रेलियावरिुद्ध बंगळुरुत दुसऱ्या डावातलं अर्धशतकं आणि बांगलादेशविरुद्ध एकमेव हैदराबाद कसोटीती पहिल्या डावात झळकावलेलं अर्धशतक अशी इनमिन ३ अर्धशतकांचा समावेश आहे. बाकीच्या सर्व सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीत अपयशी ठरला आहे. अंदाजे ३० च्या सरासरीने अजिंक्यने कसोटीत धावा काढल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने त्यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर मात्र आपली छाप सोडली. ५ वन-डे सामन्यांमध्ये अजिंक्यने धावांचा रतिब घालत मालिकेत सर्वाधीक धावा पटकावत मालिकावीराचा किताब मिळवला. यानंतर श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यांमध्ये अजिंक्य पुन्हा अपयशी ठरला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना अजिंक्यने सलग ४ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करुन आपली छाप पाडली. महत्वाने नमूद करायची गोष्ट म्हणजे २०१७ साली वन-डे क्रिकेटमध्ये अजिंक्यने चांगली फलंदाजी केली असली तरीही त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता, एकाही सामन्यात त्याला आपल्या खेळीचं शतकात रुपांतर करता आलं नव्हतं. मात्र अजिंक्यचा मुंबईकर साथीदार रोहित शर्मा यामध्ये भाव खाऊन गेला. श्रीलंकेविरुद्ध वन-डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने केलेली कामगिरी आणि विराटच्या अनुपस्थितीत सांभाळलेलं कर्णधारपद या जोरावर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली. मात्र अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांना आणि काही माजी खेळाडूंना ही बाब रुचली नाही. या घटनेनंतर अनेक माजी खेळाडूंनी आपापलं मतप्रदर्शन करत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना टिकेचं धनी बनवलं. आपल्यावर होत असलेली टीका पाहून मग विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनीही अजिंक्यला संघात न घेण्याचा आपला निर्णय कसा योग्य होता याचं स्पष्टीकरण देत, आगीत तेल ओतलं. वास्तविक पाहता कोणत्या खेळाडूला संघात जागा द्यायची हा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षक-संघव्यवस्थापनाचा असतो. त्यामुळे निराशाजनक कामगिरीच्या जोरावर जर विराट कोहलीला पहिल्या दोन कसोटीत अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवासं वाटलं तर त्यात गहजब होण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र दुर्दैवाने भारतीय क्रिकेटमधल्या एकाही धुरंधर माणसाला ही बाब निट हाताळता आली नाही. त्यामुळे संघनिवडीच्या मुद्द्यावरुन गरज नसताना क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले. डोकं शांत ठेऊन विचार करायला गेलं तर एक बाब नक्की आपल्या लक्षात येईल की अजिंक्य रहाणेच्या २०१७ च्या कामगिरीत सातत्य नव्हतं. अजिंक्यच्या गुणवत्तेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, पुढचे काही वर्ष अजिंक्यचं संघातलं स्थान अबाधित आहे. मात्र कोणत्याही चांगल्या खेळाडूच्या आयुष्यात बॅडपॅच हा येतोच. सचिनही या बॅडपॅचमधून सुटला नाही. अशावेळी अजिंक्यला त्याच्या प्रशिक्षकांनी जवळ घेऊन, त्याची शैली कुठे चुकते आहे का किंवा गरज पडल्यास त्याला काहीकाळासाठी रणजी क्रिकेट खेळून आपलं तंत्र पुन्हा एकदा घोटवून घेण्याचा सल्ला का बरं दिला नसेल?? एक गोष्ट इथे लक्षात आणून द्यावीशी वाटेल की २०१७ च्या हंगामात अजिंक्य मुंबईकडून ठराविक सामन्यांचा अपवाद वगळता रणजी सामने खेळला नव्हता. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अजिंक्यने आपण रणजी खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचं कळवत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेकांचा रोष पत्करुन घेतला होता. जसं मी याआधी म्हणालो की अजिंक्यचं भारतीय क्रिकेट संघातलं स्थान हे अबाधित आहे. पुढची काही वर्ष तरी त्याच्या स्थानाला धक्का नाही. एक तंत्रशुद्ध फलंदाज, स्लिपमध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अजिंक्यने नावारुपाला आलेला आहे. कित्येकांना अजिंक्यमध्ये राहुल द्रविडच्या शैलीचा भास होतो. त्यामुळे अजिंक्यसाठी भारतीय संघाची दारं बंद झालेली नाहीत ही बाब त्याच्या चाहत्यांनी समजावून घ्यायला हवी. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यला स्थान मिळालं नसलं तरीही तिसऱ्या कसोटीत विराटने जनमताच्या रेट्यापुढे म्हणाल किंवा मालिकेत आपली इज्जत वाचवायची आहे म्हणून म्हणा, अजिंक्यला संघात परत घेतलं. यानंतर वन-डे मालिकेसाठी अजिंक्यला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल असं म्हणतं, त्याचं संघातलं स्थान अजुनही अबाधित आहे याची खात्री दिली. आणि अजिंक्यनेही पहिल्या वन-डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी रचत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र या सर्व कालावधीत भारतीय क्रिकेटमधला एक निराशाजनक चेहरा समोर आला. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या अपमानास्पद राजीनाम्यानंतर अजुनही भारतीय चाहते विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडगोळीवर नाराज आहेत. त्यांचा कोणताही निर्णय ते खुल्यादिलाने स्विकारत नाहीत. एखादा सामना हरल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर होणारी टीका, अर्वाच्य शब्दांत होणारी शिवीगाळ या सर्व गोष्टी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक वर्ग क्रिकेटपासून दुरावत जात असल्याचं पहायला मिळतंय. ज्या देशात क्रिकेटला धर्माचं रुप दिलं जातं, त्यासाठी हे चित्र नक्कीचं चांगलं नाही. प्रत्येकाला आपला आवडता खेळाडू संघात खेळावा असं वाटतं असतं, यात काहीच चूक नाही. मात्र असं झालं नाही म्हणून इतरांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणं कितपत योग्य आहे. क्रिकेटसाठी भारतीय क्रीडारसिक अजुनही आपलं देहभान विसरतात. मात्र अशा पराकोटीच्या प्रेमातून एक वर्ग या खेळापासून दूर झाला तर ती गोष्ट नक्कीच चांगली वाटणार नाही. |
नागपूर : नायलॉन मांजाने गळा कापून तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरात घडली आहे. प्रणय ठाकरे (वय २०) असं या तरूणाचं नाव आहे. गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांनी नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. प्रणय आपल्या दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी दोघे जण अडकलेला मांजा ओढत होते. यावेळी मांजाने प्रणयचा गळा कापला गेला. लोकांनी त्याला हॉस्पीटलमध्ये भरती करेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. हॉस्पीटलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. |
मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेले ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते बाईक रॅली काढणार होते. मात्र त्यापूर्वीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वर्सोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय निरुपम यांच्या समर्थनार्थ आलेल्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता संजय निरुपम आपल्या बाईक रॅलीला सुरुवात करणार होते. मात्र त्यापूर्वीच दुपारी एक वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून ३ तासांपासून त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. तसंच जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत त्यांना ठाण्यातच ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संजय निरुपम गजानन किर्तीकरांविरोधात आक्रमक : खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी नुकतीच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निरुपम यांनी केली आहे. तसंच जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. निरुपम म्हणाले होते की, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार म्हणून किर्तीकर यांनी निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर ते निवडून आले होते. आता तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणलं त्यांच्याशी केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी निरुपम यांनी केली. सोबतच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. जर किर्तीकर यांच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी राजीनामा द्यावा आणि पुण्यामध्ये आरामात उर्वरित आयुष्य घालवावं, अशी आक्रमक भूमिका निरुपम यांनी मांडली होती. |
ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका.... प्रवासी विमानातूनही 'एचएएचल'ची हेरगिरी? ओझर येथील विमानतळ हे एचएएलच्या मालकीचे आहे. त्यामुळे ते संरक्षण विमानतळ आहे. याठिकाणाहून सध्या प्रवासी विमानसेवा सुरू आहे. मात्र, याच सेवेद्वारेही एचएएलची हेरगिरी करणे शक्य असल्याची बाब पुढे आली आहे. कारण, विमानातून काढल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडिओवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एचएएलच्या आवाराची गोपनियता भंग होत आहे. ओझर विमानतळावरुन सध्या अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. एचएएलच्या आवारात केंद्रीय दलाकडून सुरक्षा ठेवली जाते. मात्र, ओझर विमानतळ हे उडान योजनेअंतर्गत निवडलेले असल्याने महाराष्ट्र सरकारकडून त्यास सुरक्षा पुरविली जाते. म्हणजेच, नाशिक ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे. विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलपर्यंत स्मार्ट फोन व अन्य उपकणांना मुभा आहे. त्यानंतर विमानसेवा कंपनीच्या वाहनाद्वारे प्रवाशांना थेट धावपट्टीवर नेले जाते. तेथेही अनेक उत्साही प्रवासी फोटो काढतात. हेच फोटो सोशल मिडियावर शेअर केले जातात. म्हणजेच, संरक्षण दलासाठी असलेल्या धावपट्टीच्या ठिकाणी सर्रास स्मार्ट फोनचा वापर होतो. केवळ इतकेच नाही तर जेव्हा प्रवासी विमानात बसतात तेव्हाही ते विमानाच्या खिडकीतून फोटो आणि व्हिडिओ काढत असतात. विमानाच्या उड्डाण होते वेळी आणि आकाशात गेल्यानंतरही हे प्रकार सुरूच असतात. म्हणजेच, ज्या धावपट्टी लगत एचएएलचा लढाऊ विमान निर्मितीचा कारखाना आहे आणि प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जो ओळखला जातो तेथे गोपनियतेचा सर्रास भंग होत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भातील अटकाव करण्यास चक्क एचएएल हतबल असल्याचेही समोर येत आहे. कारण, एचएएलची स्वतःची सुरक्षा व्यवस्था कुठेच नाही. टर्मिनल आणि धावपट्टीच्या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलिसांची सुरक्षा आहे. तर, विमानात प्रवासी बसल्यानंतर ती बाब त्या त्या कंपनीच्या अखत्यारित येते. त्यामुळे एचएएलच्या आवाराचे फोटो किंवा व्हिडिओ याचे चित्रीकरण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच, एचएएलची गोपनियता राखायची असेल तर अशा प्रकारच्या बाबींनाही प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची बाब संरक्षण क्षेत्रातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. दीपक शिरसाठ या एचएएलच्या कर्मचाऱ्याने हेरगिरी केल्याचा संशय असताना एचएएलच्या सुरक्षेसाठी व्यापक स्वरुपातच विचार करण्याची गरज असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुखोई, मिग यासारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची सुरक्षा राखायची असेल तर त्यासाठी सर्वंकष असा आराखडा असणे आवश्यक आहे. आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी, असे स्पष्टपणे सुरक्षा यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'इंडिया दर्पण'शी बोलताना सांगितले आहे. (क्रमशः) |
सातारा : सातारच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार बुधवार, दि. १४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ नंतर या निवडी केल्या जाणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी सातारा विकास आघाडीकडून विजय बडेकर यांचे नाव अंतिम असले तरी उपनगराध्यक्षपदासाठी नगरविकास आघाडीकडून जयवंत भोसले व दीपलक्ष्मी नाईक यांचे नाव चर्चेत आहेत. माजी नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते २ यावेळेत नगराध्यक्षपदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा आहे. त्यादिवशी दुपारी २ ते ४ यावेळेत पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने हे अर्जांची छाननी करून उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या अर्जदारांची यादी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालिकेतील नोटीस बोर्डावर लावतील. फेटाळलेल्या अर्जदारांना दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपील करता येईल. सायंकाळी ५ नंतर वैध अर्जदारांची नावे जाहीर केली जातील. दि. १३ रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी सूचनेद्वारे अर्ज मागे घेता येतील. दि. १४ रोजी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष निवडणूक होईल. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी दि. १४ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा आहे. पीठासन अधिकारी या नामनिर्देशनपत्राची छाननी करतील. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) नगरविकास आघाडीमधून उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक जयवंत भोसले यांच्यासोबत नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक यांचेही नाव चर्चेत आहे. नाईक यांना पालिकेतील कोणतेही सभापतिपद मिळाले नसल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. |
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig) कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्पृहा नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (photo:spruhavarad/ig) साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:spruhavarad/ig) अभिनेत्री स्पृहा जोशीकडेही साड्यांचं उत्तमोत्तम कलेक्शन आहे, चला तर पाहूया! (photo:spruhavarad/ig) स्पृहाने या फोटोमध्ये जांभळ्या रंगाची साडी नेसलीये, सिम्पल ज्वेलरीसोबत तिने हा लूक पूर्ण केलाय. (photo:spruhavarad/ig) हिरव्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज स्पृहाला अगदी शोभून दिसतोय. (photo:spruhavarad/ig) 'साडी संडे' म्हणत स्पृहाने हा फोटो नुकताच शेअर केलाय, रॉयल ब्लु साडीमध्ये स्पृहाचं सौंदर्य खुलून दिसतंय. (photo:spruhavarad/ig) हा फोटो स्पृहाने संक्रांतीनिमित्त शेअर केला होता, ब्लॅक अँड व्हाईट साडी आणि रेट्रो लूकमध्ये स्पृहा फारच सुंदर दिसतेय. (photo:spruhavarad/ig) या स्काय ब्लु रंगाच्या साडीवर स्पृहाने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान करून सुंदर लूक तयार केलाय. (photo:spruhavarad/ig) कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि नऊवारी साडी स्पृहाच्या या लूकवर चाहते घायाळ झालेत. (photo:spruhavarad/ig) |
आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघाचा कर्णधार एडन मार्करम याने लग्नगाठ बांधली आहे. मार्करमने त्याची लॉन्गटाईम गर्लफ्रेंड निकोल डेनिले ओ'कॉनरसोबत दक्षिण आफ्रिकेत प्रोटोरिया येथे विवाह केला. मार्करमच्या लग्नाला त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता. मार्करम आणि निकोल २०१२ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत होते. हे दोघेही हायस्कुलमध्ये एकत्र शिकत होते. तेव्हाच दोघांचीही भेट झाली. मार्करम आणि निकोल हे १० वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी २५ जून २०२२ मध्ये साखरपुडा केला. निकोल डेनिले ओ'कॉनर दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. निकोल एक उद्योजिका असून नडोरा ज्वेलरी शॉपची मालकीण आहे. Thanks For Reading! |
शक्तिदेवतेची आराधना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. जेव्हा समाजाला गरज भासली तेव्हा तेव्हा अवतार घेऊन कोणत्या ना कोणत्या असुराला संपवण्याचे काम करणाऱ्या या शक्तिदेवतेचा उत्सव आजपासून महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरा केला जाईल. सध्या भारताला सतावून सोडणाऱ्या करोना महामारीच्या काळात गेल्यावर्षीचा उत्सव लॉकडाऊनच्या स्थितीत संपन्न करण्यात आला होता. या वर्षी मात्र नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली केली जाणार असल्याने भाविकांमध्ये वेगळा उत्साह संचारला असल्यास नवल नाही. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत देशातील आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. याच आठवड्यात राज्यातील शैक्षणिक केंद्रे सुरू झाल्यानंतर आता धार्मिक स्थळेही सुरू होणार आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे जरी आतापर्यंत शक्तिदेवतेने विविध असुरांचा नाश केला असला, तरी करोनाच्या परिस्थितीत जो असूर निर्माण झाला आहे त्याचा नाश करणे मात्र संपूर्णपणे आपल्याच हातात आहे. शक्तिदेवतेच्या उत्सवामुळे सर्वांना ऊर्जा आणि उत्साह मिळणार आहे, त्याचा वापर करून सर्वांनी समजूतदारपणे वागून जर नियमांचे पालन केले तर आगामी कालावधीत या करोनासुराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय पुराणे आणि प्राचीन कथांचा जरी विचार केला तरी जेव्हा जेव्हा शक्तिदेवतेने एखाद्या असुराचा नाश केला तेव्हा तेव्हा तिने लोकांना एकत्र करून या माध्यमातूनच अशा असुरांना संपवले होते. करोनासुराचा अस्त करायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनीच पुढाकार घ्यावा लागणार आहे, असा संदेश आजच्या शक्तिदेवतेच्या उत्सवा निमित्ताने मिळणार आहे. दीड वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याकारणाने भाविकांना थेट आपल्या उपास्य देवतेचे दर्शन होत नव्हते. पण आता सर्व धार्मिक स्थळे खुली होणार असल्याने भाविकांना तो लाभ होणार असला, तरी याची दुसरी बाजूही लक्षात घ्यावी लागणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी जी गर्दी होणार आहेत ती महामारीचा प्रभाव वाढवण्यास कारणीभूत ठरू नये, याची दक्षता आता घ्यावीच लागणार आहे. मंदिरे आणि शैक्षणिक केंद्रे या ठिकाणी करोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याच्या शक्यतेने गेल्या काही दिवसांपासून ही केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. पण आता महामारी आटोक्यात आल्याने ही केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत पण त्यामुळेच परत महामारीचा प्रभाव वाढू नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याबाबत जी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचा संपूर्णपणे विचार करूनच मंदिर व्यवस्थापकांना आगामी कालावधीमध्ये भाविकांना मंदिरात प्रवेश द्यावा लागणार आहे. अर्थात, एरव्ही ही सर्वसाधारणपणे अशाच नियमांचे पालन करून मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जातो. स्वच्छता आणि शिस्त याचे पालन नेहमीच धार्मिक ठिकाणी केले जाते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंदिर व्यवस्थापनाने गर्दीवर नियंत्रण कसे ठेवायचे. मंदिर असो किंवा इतर धर्मीयांचे प्रार्थनास्थळे असोत त्या भोवती नेहमीच एक प्रकारची अर्थव्यवस्था तयार झालेली असते. फुले, पूजा साहित्य, धार्मिक वस्तू, मिठाईची दुकाने धार्मिक स्थळांभोवती एकवटलेली असतात. या ठिकाणच्याही गर्दीवर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवता येणार आहे काय, याचाही विचार करावा लागेल. शिवाय हे सर्व व्यावसायिक मूलभूत नियमांचे पालन करत आहेत काय, याचीही दक्षता आगामी कालावधीत घ्यावी लागणार आहे. काही प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश देताना कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणण्यास प्रतिबंध केला आहे. म्हणजेच भाविक आता नारळ किंवा इतर तत्सम पूजेच्या वस्तू मंदिरात आणू शकणार नाहीत. या निर्णयामुळे बऱ्यापैकी परिणाम होणार असला तरी राज्यातील छोट्या-छोट्या मंदिरांमध्ये असा निर्णय अमलात आणणे शक्य आहे काय, याचाही विचार करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धार्मिक स्थळे खुली झाल्यामुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळणार आहे. साहजिकच सार्वजनिक एसटी वाहतूक असो किंवा खासगी बस वाहतूक त्या ठिकाणी ही गर्दी वाढणार आहे. सरकारी बससेवेमध्ये बऱ्यापैकी काळजी घेतली जात असली तरी खासगी बस सुविधा देणारे व्यवस्थापक योग्य काळजी घेऊनच प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये प्रवेश देतील का, याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव असताना तिसरी लाट लवकरच येईल अशी चर्चा सुरू झाली होती. सुदैवाने ही लाट अद्याप आलेली नाही, पण आता शैक्षणिक केंद्रे आणि धार्मिक केंद्रे सुरू झाल्यानंतर ही लाट जर आली तर त्याचा दोष शिक्षण केंद्रे आणि धार्मिक केंद्रांना दिला जाणार आहे, हे लक्षात घेऊनच संबंधितांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. परंपरेत सांगण्यात येणाऱ्या कथांप्रमाणे असुरांचा नाश करण्याची जबाबदारी जरी देवांवर देण्यात आली असली तरी आधुनिक काळात मात्र ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागणार आहे. एखाद्या असुराचा नाश करण्यासाठी जरी विविध शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर करण्यात आला असला तरी करोनाअसुराचा वध करण्यासाठी लसीकरणाचे कवच आणि मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर या सर्वमान्य त्रिसूत्रीचा वापर लागणार आहे. ही शस्त्रे सामान्य नागरिकांनाच वापरावी लागणार आहेत. शिक्षण केंद्रे आणि धार्मिक केंद्रे आता खुली झाल्याने नागरिकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. समाजातील सर्व व्यवहार नियमित पद्धतीने सुरू झाले आहेत. ही नियमित व्यवस्था आगामी कालावधीमध्येही व्यवस्थित चालू राहावी, असे वाटत असेल तर करोनाअसुराचा कायमचा नायनाट करणे गरजेचे आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शक्तिदेवतेच्या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या असुराचा नाश करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे. |
इस्लामपूर - पैशांची हमी अन् धोका नाही म्हणून आम्ही भारतीय स्टेट बँकेत व्यवहार करतो. पण येथे आम्हाला म्हातारपणी मरण यातना भोगाव्या लागतायेत अशी तीव्र नाराजीची भावना जेष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. कोणाची पेन्शन इथं मिळते. . कोणाचे ठेवींवरील व्याज काढायचे असते. म्हणून वयोवृद्ध नागरिक भारतीय स्टेट बँकेत येतात. पण इथला कारभार पाहून ते वैतागतात. इथल्या अनुभवाचा पाढा शनिवारी या वयोवृद्धांनी वाचला. . इस्लामपूर येथे सावकार कॉलनीत भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) शाखा आहे. येथे जेष्ठ नागरिक खातेदार दुर्लक्षित आहेत. शहरात एकच शाखा असल्याने एसबीआयमध्ये खातेदारांची संख्या माेठी आहे. या शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय, बँक कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नाहीत असे रोजचे चित्र आहे. एसबीआयच्या शाखेत स्थानिक व परिसरातील गावांमधील व्यापारी, शासकीय व खासगी कर्मचारी, शेतकरी, कामगार, पेन्शनधारक, शासकीय याेजनांचे लाभार्थी कर्जदार यांच्यासह इतर नागरिकांची खाती असल्याने या शाखेच्या खातेदारांची संख्या माेठी आहे. त्यामुळे बँकेत राेज खातेदारांची गर्दी असते. प्रशस्त इमारतीत बँके असल्याने काऊंटरसमाेर जागा आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅश काऊंटर इमारतीच्या बाहेर खिडकीत आहे. ते ही एकच असल्याने तिथे गर्दी असते. संबंधित काऊंटरसाठी जलद गतीने काम करणारी व्यक्ती असायला हवी. पण कर्मचाऱ्यांच्या निवांत कामामुळे तासंतास खातेदारांना रांगेत उभे राहावे लागते. यात महिलांची व जेष्ठ नागरिकांची कुचंबणा हाेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत बराच वेळ उभे राहणे शक्य हाेत नसल्याने ते नंबर जाऊ नये म्हणून मध्येच बसतात. त्यामुळे त्यांना नंबरला असणाऱ्या इतर खातेदारांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. कर्मचारी लहानसहान चुकांसाठी उद्धट उत्तर देत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी दिली. अडाणी व्यक्तीला समजत नाही तेव्हा उडवा उडवाची उत्तरे दिली जातात. यामुळे जेष्ठ नागरिक भांबावून जातात. अनेक वयोवृद्ध लोक रिक्षातून येतात. त्यावेळी आजारी नागरिक असल्याने ते रिक्षात ताटकळत बसून असतात. अनेकदा रिक्षा चालक रांगेत उभे राहून त्यांना मदत करतात. यामुळे जेष्ठ नागरिकांना वेगळे कॅश काऊंटर द्या अशी मागणी अनेक वर्षे दुर्लक्षित आहे. जेष्ठ नागरिकांकडे बँक व्यवस्थापन लक्ष देत नसल्याचा आराेपही त्यांनी केला. बाहेरगावाहून आलेल्या वयाेवृद्ध व्यक्तीला या शाखेत हजारभर रुपये काढण्यासाठी दाेन तास रांगेत उभे राहावे लागते. अनेकदा लिंक,सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगतात. दुसरीकडे, हेच कर्मचारी कामाच्या वेळी आपसात अथवा फाेनवर गप्पा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकाराबाबत बँक अधिकाऱ्यांची 'तेरी भी चूप. . मेरी भी चूप" अशी भूमिका असते. इस्लामपूर येथील शाखेत खातेदारांची संख्या अधिक आहे. यामुळेच शहरात अजून एखादी भारतीय स्टेट बँकेची शाखा हवी अशी मागणी होत आहे. सध्या कोरोनाच्या मुळे सर्वत्र दक्षता घेतली जाते. पण बँकेच्या प्रवेशदारातच वॉचमन अंगावर धावून आल्यासारखे वर्तन करतात. जेष्ठचं काय सर्वांनाच एसबीआयचा अनुभव " भीक नको पण कुत्रा आवर" असा आहे. याकडे बँक प्रशासन लक्ष देणार का ? प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही तर लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष घालावे अशी मागणी आहे. |
औरंगाबाद : महावितरण शहर भारनियमनमुक्तच्या नावाखाली वीज ग्राहकांकडून अधिक दराने वीज बिल वसूल करीत आहे. शहरातील अनेक भागांत देखभाल दुरुस्ती, आहे. कंपनी भारनियमनमुक्त शहराप्रमाणे २४ तास वीजपुरवठा करीत नसल्यामुळे दररोज वीज ग्राहकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाच्या पाहऱ्यात नागरिकांना गर्मीचा सामना करावा लागत आहे. शहरात २ लाख ४५ हजार वीज ग्राहक आहेत. महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेऊन तीन महिने झाले तरी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. शहरातील अनेक भागांतील विद्युत खांब आणि वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खांबांचे पडण्याचे आणि तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, विविध भागांतील वीजपुरवठा खंडित होत आहे. |
निषेधाऐवजी गायकवाडांना समर्थन मिळत असल्याने महाराज मंडळी गार!; आज धमकी देणारे महाराज शिव्यांत न्हाले! - Buldana Live\nHome/बुलडाणा (घाटावर)/निषेधाऐवजी गायकवाडांना समर्थन मिळत असल्याने महाराज मंडळी गार!; आज धमकी देणारे महाराज शिव्यांत न्हाले!\nबुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उपासतापास बंद करा. रोज4अंडी खा, दिवसाआड मांसाहार करा... जान है तो जहांन है... प्रोटिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे... असे आवाहन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्यामुळे 'खवळलेल्या' वारकरी सांप्रदायातील काहींनी आमदार संजय गायकवाड यांना कॉल करून त्यांच्या वक्तव्यामुळे धर्माची बदनामी झाल्याचा आव आणला. तेवढ्यावरच न थांबता माफी मागण्याचा आग्रह धरला. आमदारांनी ते आवाहन कुणासाठी, कशासाठी केले हे वारंवार सांगूनही सतत सुरू असलेल्या कॉल्समुळे आणि त्यावरून वारंवार डिवचले जात असल्याने संतापून त्यांनी महाराज मंडळींचा उद्धारही केला. एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. आज, 13 मे रोजी एका महाराजाने चक्क धमकीची भाषा वापरल्यानंतर, गायकवाडांनी मग त्याला शिव्यांनी न्हावू घातले!\nआमदार गायकवाडांनी कार्यकर्ते, समर्थकांना केलेले आवाहन एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर, बुलडाण्यातील एका 'कट्टर' विरोधक नेत्याने आयती 'संधी' लाभल्याचे ओळखून त्याचा 'इश्यू' केला. वारकरी सांप्रदायातील काही मंडळींना 'पेटवून' दिले. वारंवार डिवचले की गायकवाडांनी खवळणे या नेत्याला अपेक्षित होते. तसे ते घडलेही. मात्र वारकऱ्यांच्या भूमिकेला जनसमर्थन लाभले नाही. बुलडाणा लाइव्हनेही काल तटस्थ भूमिका घेऊन या विषयावर बातमी दिली. सध्याच्या वातावरणात हा वाद जाणूनबुजून पेटविला जात असल्याचे कालच बुलडाणा लाइव्हने ठामपणे मांडले होते. कॉल करायचा, डिवचायचे आणि तो कॉल व्हायरल होईल याची व्यवस्था करायची, असे सारे गणित काही मंडळींनी मांडल्याचे काल दिसून आले. मात्र घडले उलटच. महाराजांना बोलल्याबद्दल सामान्य जनतेतून निषेध व्यक्त होण्याऐवजी गायकवाडांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर समर्थन प्राप्त झाले. गायकवाडांनी मांडलेली भूमिका योग्य आहे आणि त्याचा हिंदूत्वाचा काहीएक संबंध नाही, हेही जनतेनेच महाराज मंडळींना ठणकावून सांगितल्यानंतर महाराज मंडळी अक्षरशः गार झाल्याचे दिसून येत आहे.\nप्रशांत महाराजांनी गाठले गायकवाडांचे कार्यालय...\nकाल संजय गायकवाडांना फोन करून 'व्यक्त' होणाऱ्या प्रशांत महाराजांनी आज आपल्या 'भावना' गुंडाळल्याचे दिसून आले. त्यांनी गायकवाड यांच्या कार्यालयात येऊन हे प्रकरण कशापद्धतीने चुकीचे रंगवले गेले आणि त्याचा फायदा कुणी उचलला, हे सांगितले. आपण हे प्रकरण इथेच संपवत असून, वारकरी मंडळींनीही गायकवाडांना यापुढे या विषयावर कॉल करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nते महाराज शिव्यांत न्हाले...\nतुम्ही माफी मागायला पाहिजेत, असे बोलायला नाही पाहिजेत...असे अकोल्याच्या एक महाराजांनी गायकवाडांना कॉल करून सुनावले. त्यावर गायकवाडांनी 31 मे रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर सर्व महाराज मंडळी या मी चर्चा करतो, असे सांगितले. महाराज त्यावर म्हणाले, की सिंदखेड राजाला 31 मे ला कशाला, उद्या परवा सांगा कुठे यायचे... (विशेष म्हणजे सध्या जिल्हाबंदी आहे आणि बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे.) या धमकीयुक्त भाषेमुळे खवळलेल्या गायकवाडांनी मग या महाराजांना अक्षरशः शिव्यांच्या पावसात बसवले व फोन कट केला.\nवाद रंगविण्याऐवजी जनजागृती करा...\nगायकवाडांना कॉल करणे, माफी मागण्याची मागणी करणे यासाठी जणू काही लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे. अशी स्पर्धा करून वाद वाढविण्यापेक्षा या मंडळींनी कोरोनाबद्दल जनजागृती करण्याची खरेतर गरज आहे. राजकीय नेत्याचा उपदेश (मग तो आरोग्यादृष्टीने कसा का असेना) एकवेळ कुणी ऐकणार नाही. पण महाराज मंडळींच्या उपदेशाला समाजात गांभीर्याने घेतले जाते. त्यामुळे जी मंडळी आजघडीला नको त्या विषयावर हवा देण्याचा प्रयत्न करतेय, त्यांनी हे करण्यापेक्षा कोरोना जनजागृतीत वेळ घालवायला हवा, अशी संतप्त भावना आज अनेकांनी बुलडाणा लाइव्हकडे व्यक्त केली.\n"ऑनलाइन' अडचण येत असेल तर पीक नुकसानीची माहिती लेखी द्या; पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शेतकऱ्यांना दिलासा!\nजिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार दुकानदारांना ठोठावला 10 हजारांचा दंड! |
न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) हा त्याच्या खेळाबरोबरच शांत स्वभावामुळेही ओळखला जातो. आपलं वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात न आणताच राहणं केन विलियमसनला पसंत आहे. थोडासा लाजाळू स्वभावाचा असलेल्या केन विलियमसनची पार्टनर सारा रहीमही (Sarah Raheem) त्याच्यासारखीच आहे. सारादेखील केनप्रमाणेच प्रकाशझोतापासून लांब राहते. ब्रिस्टलमध्ये जन्मलेली सारा पेशाने नर्स आहे. केन आणि सारा यांनी अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही, मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघं एका चिमुकलीचे आई-वडील झाले. विलियमसन आणि सारा यांची पहिली भेट न्यूझीलंडच्या एका रुग्णालयात झाली, जिकडे विलियमसन उपचार करण्यासाठी आला होता. केन विलियमसनवर उपचार सुरू असताना दोघांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर दिले. फोनवर काही काळ संभाषण झाल्यानंतर दोघं एकमेकांना डेटही करायला लागले. बराच कालावधी चाहत्यांना विलियमसनच्या लव्ह स्टोरीबाबत काहीच माहिती नव्हतं. सारा कायमच लोकप्रियतेपासून लांब राहते. केनसोबत डेट केल्यामुळे ती चर्चेत आली होती, पण वैयक्तिक आयुष्य कसं जगायचं, हे तिला चांगलं माहिती आहे. साराचं सोशल मीडिया अकाऊंटही प्रायव्हेट आहे आणि फक्त तिचे 200 फॉलोअर्स आहेत. |
मुंबई :मराठवाडयातील पाटोदा, बदनापूर आणि धारूर येथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीच्या तीन घटना घडल्या.. पाचोदाः आमदाराच्या दौरयात शेकडो कार्यकर्ते हजर असतात.. बातमी देताना सर्वांचीच नावे देणे शक्य नसते.. मात्र आपले नाव आले नाही कार्यकर्ते पिसाळतात आणि थेट पत्रकारावर हल्ले करतात.. पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे पत्रकार डॉ. हरिदास शेलार यांच्यावर घरात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच कारणावरून हल्ला केला.. आमदार बाळासाहेब आजबे यांचा मतदार संघात दौरा होता.. मात्र बातमीत एका कार्यकर्त्यांचे नाव नसल्याने त्याने चिडून पत्रकारावर हल्ला केला.. पोलिसात तक़ार दिली आहे.. बदनापूर : जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे.. वाळू माफियांना अधिकरयाचे पाठबळ असल्याने वाळू माफियाची बातमी आली की अधिकारीही चवताळतात.. बीडचा लोकप्रश्न दैनिकात बातमी आल्याबद्दल एका वरिष्ठ महसूल अधिकारयाने कायदा हातात घेत पत्रकार संदीप पवार यांना मारहाण केली.. पोलिसात तक़ार दिली गेली आहे.. धारूर : 2006 मध्ये सामना वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचा राग मनात धरून एका सोन्याच्या वयापारयाने आज धारूर येथील वरिष्ठ पत्रकार चद़कांत देशपांडे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पत्रकार संरक्षण कायद्याखाली नोंदविल्या जात असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्याचा आरोप पत्रकार हल्ला समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे.. |
व्यवहार आहे हा १ 'बोडक्याचा तुझ्या व्यवहार " एवढेंच मी सतापानें म्हणालों. गजाभाऊनें रात्री मला जेवायला रहाण्याचा आग्रह केला व मीही विशेष आढेवेढे न घेता जेवायचे कबूल केले कारण रात्री साडेदहा वाजेपर्येत करणार तरी काय ? कावेरीच्या पाठोपाठ मी घरात शिरलो सुरुवात कशी करू १ का मारू एक तोंडात पहिल्या प्रथम पण गिरीशच्या देखत नको आमने चिरजीन तर झोपींच गेले होते कावेरीनें चूल पेटवलेली पाहिले, तेव्हा मी रागानेंच म्हटलें, 'आता चूल पेटवून बाराला जेवायला वाढणार आहेस वाटते " ती काहींच बोलली नाहीं तिनें चुलीवर पाणी मात्र ठेवलें मींच सुरुवात केली, 'नाटक कसे काय झाले ?" 'भावजींना भूक लागली आहे भात चुलीवर टाकते' हे उत्तर आलें. 'कावेरी, लाज वाटत नाहीं तुला ? माझी कल्पना नव्हती तू इतकी बेमुर्वतखोर बायको असशीलशी । कुणाबरोबर नाटकाला गेली होतीस? तुला माझी जरूर नव्हती १ मला जेवण वगैरे काहीं नव्हते ? तुला जर माझ्याशीं ससार करण्याची इच्छा नव्हती तर घरात का नाहीं कुजून मेलीस? वाटेल त्या लोकाबरोबर नाटकाला जाताना काहीं शरम तरी जिवाला ?' बधारा मोडून तोडून बेफाट वाहणाऱ्या महापुरातील लोंढ्यासारखा तिचा वाक्प्रवाह एकाएकी सुरू झाला' हैं - हेंच तें सदा 'मी' 'मी'. माझ्याकरता - माझ्याकरता दुसऱ्याने मरावें । माझ्याकरता दुसन्यानें मरावें । माझ्याकरता बायकोनें गर्भारपण, बाळतपण यात मरावें. माइयाकरता बायकोनें पोराचें लेढार पाळावें. माझ्या अब्रूकरता बायकोनें सदोदित घरात कुजून सडून मरावें. माझ्याकरतामाझ्याकरता / तुम्हाला जर माझा कटाळा आला असेल तर ही मी तुमच्यापुढे उभी आहे - घाला तें लाकूड माझ्या डोक्यात नी घ्या आपल्या नवरेपणाचा हक्क गाजवून.' ती एवढे बोलून मटकन् खाली बसली काय करावें हेच मला समजेना माझी कल्पना होती की मी बोललो तर ही मुकाट्यानें ऐकून घेईल इथें तर चोरावर मोराचा प्रकार. 'व्यवहार आहे हा ' म्हणून कार्नीकाळी कठघोष करणाया गजाभाऊची मन् आठवण झाली. 'कावेरी - मला ह्रीं सोंगे कळतात बरें का ? रडून ओरडून कागावा केलास तरी अपराध लपणे शक्य नाहीं. नाटकाला नेणारा जो हरीचा लाल तुला भेटला होता - जा, त्याच्याच घरीं राहीनास ' 'हा' म्हणून कावेरी रागानें उसळून म्हणाली. मी दचकून जरा मागें सरलों. 'बोललात ते बोललात - पुन्हा बोलू नका तसें नाहीं तर मी काय करीन नी काय नाहीं याचा नेम नाहीं.' आमच्या भांडणाचा प्रकार पाहून गिरीश मनात चरकला. तोही पण जरा वेळाने रडू लागला कावेरीने रागारागानें चुलींत पाणी ओतलें. गिरीशला थोडेंसें दूध पाजून निजवलें - आणि माझ्या खाण्यापिण्याची चौकशीही न करता - उपाशींच अथरुणावर जाऊन पडली. मीही पण काहींच न बोलता बाहेर जाऊन पडलों खरोखरच व्यवहार - ससार - इतका चमत्कारिक आहे का ? सुमारें चार महिने 'मागील पानावरून पुढे चालू'चाच प्रकार कायम होता. कावेरी ससारात मुळींच लक्ष घालीनाशी झाली. ह्यामुळे मनोहर नेहमीं काहीं ना काहीं तरी कारणानें आजारी असे त्या दिवशींच्या नाटकाच्या प्रकारामुळे मलाही एक प्रकारची दहशतच बसली. म्हणून मीही पण तिला लागेल बोलेनासा झालों. तरी पण मुलाच्या रडण्यामुळे मला काहीं वेळा मध्यें बोलणे भाग पडे. मुकाट्यानें ऐकून घेण्याचा तिचा जणु काय कृतसकल्पच होता फारच झालें म्हणजे दोन चार दुपट्यात गुडाळलेलें मनोहरचें बोचकें माझ्यापुढे येऊन पडे. अशा प्रसगातून सुटण्याचा माझा सोपा मार्ग म्हटला म्हणजे कोट टोपी चढवून गजाभाऊच्या घराचा रस्ता धरणें. नवीन लुगडीं घ्यायला झाली होती पण तिनें होऊन काहीं मला सागितले नाहीं. मला वाटतें गजाभाऊच त्या दिवशी सकाळीं Times चा अक हातात घेऊन आला होता गजाभाऊचें राजकारण म्हणजे Times मधील सिनेमाच्या जाहिराती वाचण्यापलीकडे फारसे जात नव्हतें. 'या गजाभाऊ. केव्हाचा आहे हा Times ?' मीं विचारलें. कारण जुना का होईना पण हातात Times दिसलाच पाहिजे ह्या मताचा गजाभाऊ होता. 'आहे, आजचाच आहे. हे पाहिलें का १ ' व्यवहार आहे हा ' इतक्यात कावेरी बाहेर आली. सागायलासुद्धा लाज वाटते, पण कावेरीचै लुगडें बोहारणीलासुद्धा देण्याइतकें धड नव्हते. आणि हे कशाकरता ? तर माझ्या मित्रादेखत माझी अब्रू काढण्याकरता. गजाभाऊच्या लक्षात ही गोष्ट आली असावी. कारण, माझ्याकडे पाहून त्यानें जरा खिन्नपणानें मान हलवलेली माझ्या दृष्टींतून सुटली नाहीं दुसऱ्या दिवश मुकाटयानें दोन लुगडीं आणून टाकलीं तरी तिचें एक नाहीं की दोन नाहीं. कावेरीच्या धाकट्या बहिणीचें लग्न ठरल्याचे दादासाहेबाचें पत्र आले होतें. आम्हा दोघानाही बोलावणे होते पण झाल्या प्रकारानतर तिच्या माहेरीं जाण्यास माझें मनच घेईना मी तर जाणार नव्हतोच, पण कावेरी लाही मी जाऊ देणार नव्हतों. मनुष्याच्या सहनशीलतेलाही एक ठराविक मर्यादा असतेच कीं नाहीं ? एक वेळ वाटलें - जाईना ही पीडा । चार ? दिवस एकटी राहिली म्हणजे येईल आपोआप ताळ्यावर जाते कुठे? पण पुन्हा विचार केला कीं छेः । हिला तरी का अशी मोकळी सोडू तुझा हट्ट तर हा घे माझा हट्ट. काय वाटेल तें होऊ दे - प्रत्यक्ष तुझा जन्मदाता आला तरी - 'कावेरी येत नाहीं, जा, फिर्याद लावा, जा' पत्र आल्याबरोबर मीं तें कावेरीच्या अगावर फेकले व मुद्दामच सिगारेट शिलगावून धुराचे लोटच्या लोट सोडू लागलों घर माझें आहे - जोपर्यंत गोडींत होतीस तोपर्यंत घेतलें तुझें ऐकून । आता घे तुझ्यादेखत ही अशी सिगारेट फुकतों. कावेरीनें पत्र वाचून टेबलावर ठेवले व काहींच न बोलता सैपाकघरचा रस्ता सुधारला. मी थक्कच झालों. काय बाई आहे कीं भूत आहे ! काहीं 'हो' नाहीं, 'नाहीं' नाहीं. मी जर हिच्या जाग असतो तर नवन्याच्या पाया पडून माहेरीं घाडण्याविषय त्याच्यापाशीं तासभर रडत बसलों असत. येथें रडणे तर दूरच राहिलें पण फुकाचें पहार्णेसुद्धा नाहीं माझ्याकडे ! आश्चर्य आहे. दादासाहेब आले. कामाची सबब सागून माझी सुटका तर मी करून घेतली. 'पहा बुवा, आईची इच्छा फार होती की तुम्हीहि पण लग्नाला यावें म्हणून. पण आता कामाचेंच म्हणता म्हणून नाइलाज आहे. बरें, सगळ्याच गोष्टी थोडयाच मनुष्याच्या मनाप्रमाणें घडून येतात ? आहे आपला गिरीश, - जावई नाहीं, जावयाचें पोरहि आहेच' म्हणून दादासाहेब आपल्याच कोटीबाजपणावर खूष होऊन मोठ्यानें हसले 'कावेरीहि येणार नाहीं न्हणते ' मी हळूच म्हणालो 'एः ' वेडी आहे ती अहो, ती पुष्कळ लाख म्हणेल - ती कोण अन् तिला विचारतो कोण ? बापुराव, इतकें बायकाच्या आवडीनावडीकडे पाहून चालेल में आपले ?' 'अन् मीं कवी येणार नाही म्हणून म्हटले आहे " कावेरीच पुढें येऊन म्हणाली दादासाहेब जर तेथे नसते तर तिला हातातलें पुस्तक फेकून मारलेच असते 'अग वेडे, तुला विचारतो आहे कोण ? माझे नी बापुरावाचें भाषण आहे ते तू आपली आत जाऊन वेणीफणी कर जा आली लगेच डोंबारणीसारख्या झिपन्या घेऊन नमत्या भानगडींत चाभारचौकशी करण्याची सवय सोडून दे आता ' दादासाहेब म्हणाले. मी तडक घरात गेलो 'कावेरा - ' मी ट्रकेला लाथ मारून म्हणालों. 'कावेरी, या घगत माझ्या शब्दाला काहींच किमत नाहीं का? मी सागतो तू जाऊ नकोस 'ते दादा बाहेर आहेत - त्याना गागा ' ती किंचित् हसून म्हणाली. - 'काय माजवले आहेस तू हे " मी रागानें म्हणालों 'मी माहेरी जाणार ' ती शान्तपणाने म्हणाली. मला भान राहिलें नाहीं मी मागे पुढे न पहाता तिच्या तोंडात एक भडकावली. गाल लाल झाला तिचा झोंक गेला खाबाला टेकल्यामुळे खालीं मात्र पडली नाहीं मीं हे काय केलें ? माझ्याकरता आपल्या नावा घर पाणी सोडलेल्या कावेरीला मीं गुरासारखें निर्दयतेनें मारले 'मारा - आणखी मारा - तुमचें तरी समाधान होऊ द्या. या जन्मीं तरी तुमच्या हातात सापडले आहे. घ्या मारून" म्हणून रडत रडत कावेरी माझ्यापुढे उभी राहिली. 'तू नाहीं माझें ऐकणार " मी म्हणालों 'भी माहेरीं जाणार' असे म्हणून तिने ट्रक भरण्यास सुरुवात केली. |
राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देणे हा राज्य सरकारचा बहुमानच आहे, राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देणे हा राज्य सरकारचा बहुमानच आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले. तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, अशा शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारचा २०२०चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. त्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित 'सुवर्णरंग' हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेला लोकराज्य अंक यावेळी भेट म्हणून दिला. भारतरत्न लता मंगेशकर आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती आहेत. त्यामुळेच भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य सरकार महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मदत घेतली जाणार आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले. आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार वेगळा आहे. माझ्या मातीने केलेला गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे, असे मी मानते. या पुरस्कारासाठी मी राज्य सरकारची आभारी आहे. |
आमच्याकडे सामाजिक नेटवर्कचा एक चांगला सेट आहे जिथे आम्ही आमच्या कलात्मक कौशल्ये प्रदर्शित करू शकतो चित्रकला, शिल्पकला, डिजिटल चित्रण, कुंभारकामविषयक किंवा कोणत्याही शाखेत. ते मार्ग दाखवितात आणि जगभरातील आम्हाला आमच्या अनुयायी आणि त्यांच्या कामाचे चाहते शोधण्याची परवानगी देतात. त्या नेटवर्कपैकी एक Google+ आहे, जे हे आमचे काम उघडकीस आणण्याचे काम करते आणि संभाव्य ग्राहक आमच्या सेवांची विनंती करण्यासाठी संपर्कात असतात. फोटोग्राफर, लेखक, शेफ आणि इतर सर्जनशील लोक त्यांच्या आवडी सामायिक करण्यासाठी या नेटवर्कवर दररोज भेटतात. दोन दिवसांपूर्वी, गुगलने Google+ तयार नावाचा एक नवीन प्रोग्राम जाहीर केला जो माउंटन व्ह्यू मधील लोकांकडून आलेल्या या नवीन प्रस्तावातून त्यांच्या गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी उच्च-गुणवत्तेच्या सामग्री निर्मात्यांना शोधत आहे. आपण सामग्री निर्माता असल्यास आपल्यास संधी मिळण्याची शक्यता आहे साइटवर ठळकपणे दिसतात आणि विपणन माध्यमातून. Google त्या निर्मात्यांकडे देखील पहात आहे जे Google+ चे पुनर्निर्देशित करणे सुरू ठेवण्यासाठी अभिप्राय देण्यास स्वीकार करते आणि हे भविष्यात वाढू आणि सुधारू शकते. परत, गूगल काही अतिशय मनोरंजक फायदे देते जसे कीः सत्यापित प्रोफाइल, नवीन वैशिष्ट्यांकडे लवकर प्रवेश आणि नवीन कलाकार आणि निर्मात्यांशी संपर्क साधण्याची इतर संधी. आपल्याला असे वाटते की आपण आपल्या वेबसाइटवरून तयार केलेली सामग्री जसे की Google+ किंवा इतरांकडे, ही एक उत्तम संधी असू शकते. पण मला ते म्हणायचे आहे गूगल अशा निर्मात्यांचा शोध घेत आहे ज्यांचे थीमेटिक संग्रह आहेत उच्च गुणवत्ता आणि मनोरंजक सामग्रीसह. आपणास प्रविष्ट्या किमान आठवड्यात तयार केल्या पाहिजेत. अनुयायांची आणि विशिष्ट सामग्रीची मर्यादा नाही, म्हणून प्रयत्न करण्यासारखे काहीही होत नाही. म्हणून आपल्याला असे वाटत असल्यास आपल्याला दुसर्या साइटची आवश्यकता आहे आपल्या कला किंवा निर्मितीला प्रोत्साहन द्या पास होण्यास उशीर करू नका या दुव्याद्वारे डेटा प्रविष्ट करण्यासाठी आणि «लागू करा on वर क्लिक करा. सर्व प्रकारच्या कलाकार आणि उच्च गुणवत्तेची सामग्री असलेले निर्माता असलेल्या बेहेन्स, डेव्हिएंट आर्ट किंवा फेसबुक सारख्या सर्व नेटवर्कमध्ये Google मागे राहू इच्छित नाही. आपल्याकडेही आहे ड्रिब्बल आणि बेहेंसे सह इतर पर्याय. |
सांगली : राज्यपाल नियुक्त आमदारकीवर फुली मारून राजू शेट्टी आता २०२४ मधील खासदारकीच्या मैदानात शड्डू ठोकणार आहेत. विरोधकाला धोबीपछाड देण्यासाठी कोणत्याही आखाड्याची लांग बांधण्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीशी अंतर राखत वाळवा-शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांशी साधलेली जवळीक त्यांचे इरादे स्पष्ट करत आहे. लोकसभेच्या २०१९ मधील मैदानात मातीला पाठ लागल्यानंतर शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हालचाली मंदावल्या होत्या. कोरोनामुळे चळवळीलाही खीळ बसली होती. यादरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र दीड वर्षापासून राज्यपालांनी त्या यादीवर सही केलेली नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट संपत आली आहे. 'स्वाभिमानी'ने जिल्हाभरात आंदोलने, मोर्चे याद्वारे कार्यकर्ते क्रियाशील ठेवले आहेत. मात्र प्रत्यक्ष पद नसल्याने शेट्टींसह संघटनेची पिछेहाट होण्याची भीती दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा विषय झटकून टाकत लोकसभेच्या २०२४ मधील मैदानासाठी जोरबैठका सुरू केल्या आहेत. लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेचे चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघ (इस्लामपूर, शिराळा) येतात. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून शेट्टी लढले होते. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेने बाजी मारली होती. शेट्टी यांच्या पाडावासाठी भाजपनेच जास्त जोर लावला होता. आता मैदानातील समीकरणे बदलली आहेत. भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला वेळ असला तरी आखाड्यात सरावाला जोर आला आहे. महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवल्या तर शेट्टी यांना आघाडीतून उमेदवारीचा दावा करता येणार नाही. कारण सध्या खासदार असलेल्या पक्षालाच तिकीट मिळण्याची शक्यता अधिक. त्यातच महाविकास आघाडीकडून शेट्टींच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यांनी कोणत्याही पक्षाची लांग बांधण्याची तयारी केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी इस्लामपुरात मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात शिराळ्यातील भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील सहभागी झाले आहेत. सध्या तरी भाजपच्या एका गटाशी शेट्टी यांची जवळीक दिसत आहे. कदाचित उद्या पुन्हा अख्ख्या भाजपशीच त्यांचा दोस्ताना होईल. शेट्टी यांचे 'साध्य' खासदारकीच असल्याने अशा साधनांची फिकीर ते कशाला करतील? तिकडे मोर्चा कोल्हापुरात, इकडे इस्लामपुरात! राजू शेट्टी यांचे लक्ष्य सध्या हातकणंगले मतदारसंघच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सोमवारी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी इस्लामपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. इस्लामपूर, शिराळा मतदारसंघ समाविष्ट असलेल्या 'हातकणंगले'वरच लक्ष केंद्रित केल्याचे हे द्योतक आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. जे येतील त्यांना सोबत घेण्याच्या भूमिकेतून शेट्टी यांनी शिवाजीराव नाईक आणि निशिकांत पाटील यांना साथीला घेतले असले तरी त्याला भाजपमधील शीतयुद्धाची झालर आहे. भाजपमध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि महाडिक गट एकत्र आहे. खोत-महाडिक गटाचा शिराळ्यात नाईक गटाशी, तर इस्लामपुरात निशिकांत पाटील यांच्याशी सवतासुभा आहे. खोत हे शेट्टी यांचे कट्टर विरोधक. त्यामुळे 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या चाणक्य नीतीने शेट्टींनी नाईक-पाटील यांना सोबत घेतले आहे. |
चीनने गुरुवारी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सांगितले की ते आपल्या शेजाऱ्यांसोबतच्या राजनैतिक संबंधांमध्ये चीन नेहमीच आपल्या सर्वोत्तम मित्र (पाकिस्तान) ला प्राधान्य देतो. यासोबतच, चीनने 60 अब्ज डॉलरच्या CPEC प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा देखील यावेळी पुनरुच्चार केला. मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयात चीनी दूतावासाचे प्रभारी पांग चुन्सू यांची भेट घेतली. यावेळी शरीफ म्हणाले की, त्यांचे सरकार चीनसोबतचे संबंध सुधारण्यास खूप महत्त्व देते आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि गरिबी निर्मूलन या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यास उत्सुक आहे. तसेच शाहबाज यांनी सांगितले की, त्यांचे सरकार चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या उभारणीचा परिश्रमपूर्वक पाठपुरावा करेल आणि दोन्ही देशांच्या फायद्यासाठी त्याचा वेगवान विकास करेल. चीनच्या नेत्यांशी शाहबाज यांच्या भेटीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान शाहबाज यांच्या सकारात्मक प्रतिसादाचा आम्ही आदर करतो. "चीन आणि पाकिस्तान हे महत्त्वाचे सामरिक भागीदार आणि चांगले मित्र आहेत. आमच्या शेजाऱ्यांसोबतच्या राजनैतिक संबंधांच्या बाबतीत आम्ही पाकिस्तानला नेहमीच प्राधान्य देऊ आणि त्यांच्या सुधारणेच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ. "आम्ही पाकिस्तानी प्रशासनासोबत काम करणे सुरू ठेवू आणि विविध पातळ्यांवर जवळच्या संपर्कात राहू, द्विपक्षीय संबंधांना नवीन आयाम जोडून आणि CPEC ची उभारणी करू," असे चीनच्या प्रवक्त्याने सांगितले. |
उल्हासनगर राष्ट्रवादीत पुन्हा कलानीराज? शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी कलानी महालमध्ये बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. उल्हासनगर : शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी कलानी महालमध्ये बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पक्षात दोन गट असून गटनेता भरत गंगोत्री आणि शहर जिल्हाध्यक्ष हरचरण कौर यांना शह देण्यासाठी बैठकीसाठी हे ठिकाण निवडल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कलानीराज येण्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्योती कलानी पक्षाच्या शहराध्यक्ष आणि आमदार असताना मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून राष्ट्रवादीमधील बहुतांश पदाधिकारी आणि नगरसेवकांना ओमी टीममध्ये सामावून घेतले होते. पक्षात नावालाच असलेल्या ज्योती कलानी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाने त्याच दिवशी शहर जिल्हाध्यक्षपदी हरचरणसिंग कौर यांची नियुक्ती केली. तत्कालीन महापौर पंचम कलानी यांना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे ज्योती कलानी यांना एका रात्रीत राष्ट्रवादीने संधी दिली. त्यापूर्वी गटनेते गंगोत्री यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीत ओमी कलानी यांनी ओमी टीमचे अस्तित्व कायम ठेवत कलानी यांचा प्रचार केला. मात्र, ज्योती कलानी यांचा पराभव झाला. उमेदवारी न दिल्याचा वचपा ओमी टीमने महापौर निवडणुकीत काढला. भाजपमधील ओमी समर्थक नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी सेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान केल्यामुळे त्या महापौरपदी निवडून आल्या. माजी आमदार ज्योती कलानी नावालाच राष्ट्रवादी पक्षात आहेत. मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमचे अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे कलानी कुटुंबासोबतचे सलोख्याचे संबंध लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे कलानी कुटुंबाला पुन्हा राष्ट्रवादीत आश्रय मिळू शकतो. यातून कलानी कुटुंबाने युवक विंगची बैठक कलानी महालात घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीची सूत्रे कलानी महालातून हलण्याचे संकेत मिळत असल्याने कलानी कुटुंबामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकारण आणखी काय कलाटणी घेते याकडे लक्ष लागले आहे. युवक विंगचे प्रवक्तेसुरज चव्हाण यांनी युवकांना मार्गदर्शन करून पक्षाला एकसंध आणि मजबूत करण्याचे आवाहन या बैठकीत केले. युवक विंगचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी युवक विंग मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यासाठी युवक विंगची बैठक घेतल्याचे यावेळी सांगितले. |
बीजिंग - जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून गणना होत असलेल्या चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लोकसंख्या नियंत्रणाचे विविध उपाय योजले जात आहेत. तरीही एक हैराण करणारी गोष्ट समोर आली असून चीनमधील एका जोडप्याने वीस वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे पंधरा मुलांना जन्म दिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर या परिसरातील अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी चीनच्या सरकारने कित्येक वर्षापासून एक मूल हे धोरण राबवले आहे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये हे धोरण बदलून दोन मुलांच्या जन्माला परवानगी देण्यात आली आहे पण ही जी घटना उघडकीस आली आहे ती 1995 ते 2016 सालची आहे तेव्हा चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे कायदे अतिशय कडक होते आणि प्रत्येक जोडप्याला फक्त एकाच मुलाला जन्म देण्याची परवानगी होती असे असतानाही या जोडप्याने वीस वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल पंधरा मुलांना जन्म दिला त्यामध्ये अकरा मुली आणि चार मुले यांचा समावेश आहे. 1995 ते 2016 या कालावधीत या जोडप्याने या मुलांना जन्म दिला चीनमधील रोंग कौंटीतील लिगुन शहरात हि घटना घडली असून या मुलांना जन्म दिल्यानंतर ही या जोडप्याने सर्व सरकारी कल्याणकारी योजनांचा फायदा घेतला होता गरीब कुटुंबांना मिळणाऱ्या सर्व आर्थिक सवलतीही या कुटुंबाने मिळवल्या होत्या चीन सरकारने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातील मानवी तस्करीचा शोध घेण्यासाठी एका विशेष मोहिमेचा प्रारंभ केला होता. या मोहिमेमध्येच माहिती घेत असतानाच ही विचित्र घटना समोर आली चीन प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या परिसरातील सर्व अकरा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे लोकसंख्या नियंत्रणाच्या राष्ट्रीय मोहिमेमध्ये निष्काळजीपणा दाखवण्याचा ठपका या सर्व अधिकार्यांवर ठेवण्यात आला आहे. |
कोरबा, 23 सप्टेंबर : आई आणि बाळाच्या नात्याला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू (Child death on the spot) झाला. स्वतःच्या मुलाच्या हत्येप्रकरणी (crime news) पोलिसांनी आईला अटक केली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत मुलाचे वय फक्त 3 वर्षे होते. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. सात्विक हा आई प्रमिलाकडून वारंवार दूध पिण्याचा आग्रह करत होता. या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात प्रमिलानं केलेल्या कृत्यामुळे निरागस मुलाला प्राणाला मुकावे लागले, आई इतकी निष्ठूर कशी झाली, अशी चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आई प्रमिला काही वेळ मुलाला खाऊ घालत राहिली, समजावत राहिली. तरीही मूल रडत होते, मग रागाच्या भरात प्रमिलाने सात्विकला उचलून जमिनीवर आपटलं. घटनेनंतर कुटुंबातील इतरांनी पाहिले की, सात्विक जमिनीवर पडलेला आहे. त्यानंतर कुटुंबातील काहींनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे पोहचताच डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. प्रमिलाने मुलाला फेकून दिले तेव्हा तिचा पती घरी नव्हता. त्या काळात घरी फक्त प्रमिलाचे सासरे उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की 2014 पासून प्रमिलाची मानसिक स्थिती चांगली नाही. या कारणास्तव, प्रमिलाचे कुटुंबीय तिच्यावर उपचार करत आहेत. तरीही तिची प्रकृती आजपर्यंत सुधारलेली नाही. कोरबा पोलिसांनी असेही सांगितले की, जमिनीवर आदळल्यामुळे सात्विकच्या कानात खूप जखम झाली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस प्रमिलाला अटक करत असून पुढील तपास सुरू आहे. आईच्या मानसिक स्थितीबाबत आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. आरोपीची डॉक्टरांकडून तपासणी करण्याची पोलिसांची तयारी आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणुकीस उभ्या असलेल्या उर्मिलाला गोपाळ शेट्टींविरोधात पराभवास सामोरं जावं लागलं. पण आता उर्मिलाने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं उर्मिलाचं म्हणणं आहे. मी अनेकदा मुंबई काँग्रेस अध्यक्षांकडे काही बाबींसंदर्भात पत्रव्यवहार केला होता. पण त्याला कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. याशिवाय पत्रातील काही गोपनीय बाबीही समोर येऊ लागल्या. त्यामुळे व्यथित होऊन उर्मिलाने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. सामाजिक काम करण्यात अनेकदा पक्षाचं राजकारण आडवं येत असल्याचंही उर्मिलाचं मत आहे. पण पक्षातून बाहेर पडले तरी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहीन ही बाबदेखील तिने बोलून दाखवली आहे. |
मटा. प्रतिनिधी, पिंपरीः सातारासह चार जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या कुख्यात वाळू तस्कर याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चार पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आली आहेत. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतूस जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने या कारवाईमध्ये एकूण ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतूस जप्त केली आहेत. सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने जुलै २०२० मध्ये अवैध पिस्तूल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी ४२ पिस्तूल, गावठी कट्टे आणि ६४ काडतूस जप्त केली होती. या तपासात १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली होती. याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय ३०, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) याचेही नाव निष्पन्न झाले होते. उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली होती. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला १७ ऑगस्ट ला कारागृहातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. तसेच या प्रकरणातील तपासातून संतोष चंदू राठोड (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) याचे नाव तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी संतोष याच्यावर २०१८ मध्ये लोणावळा पोलिस ठाण्यात खुनाच्या त्याला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांनी संतोषला १० ऑगस्ट ला अटक करून, एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. त्याची सातारा परिसरात 'शूट ग्रुप' नावाची गुन्हेगारी टोळी आणि "आई साहेब प्रतिष्ठान' नावाची संघटना आहे. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. २०१६ मध्ये निगडीतील कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी होता. तसेच २०१८ मध्ये भाजपाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथच हा मुख्य सूत्रधार होता. वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. Share this: Like this: Next articleमंदिर बंद असूनही बाप्पाचं 'विशाल' दर्शन; ऑनलाइन नव्हे तर थेट! These are actually great ideas in concerning blogging. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday. Thanks so much for the blog post. Like!! Great article post.Really thank you! Really Cool. Please enter your comment! You have entered an incorrect email address! Save my name, email, and website in this browser for the next time I comment. भारताचा माजी कर्णधार दगड फोडण्याचे काम करतोय; सोनू सूदने केली मदत! |
बुटीबाेरी : बुटीबाेरी व परिसरात शनिवारी (दि. १३) दारूविक्री बंद असतसाना पाेलिसांनी गस्तीदरम्यान दाेन ठिकाणी धाडी टाकल्या. यात एकास अटक करण्यात आली असून, एकूण १ लाख ११ हजार ३६९ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. चंदू ऊर्फ चंद्रप्रकाश वासे (४०, रा. सातगाव-रिधोरा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी अवैध दारूविक्रेत्याचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आले हाेते. त्यातच बुटीबाेरी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बुटीबाेरी येथील रेल्वेस्थानक परिसरात राहणारा रामचंद्र गद्दामवार हा दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी लगेच धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. यात त्याच्या घरातून ४६,०८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५७६ बाटल्या जप्त केल्या. ताे घरी आढळून न आल्याने पाेलिसांनी त्याला अटक केली नाही. दरम्यान, चंदू वासे हादेखील दारू विकत असल्याची माहिती याच पथकाला मिळाली. त्यामुळे त्यांनी सातगाव-रिधाेरा गाठून चंदूच्या घराची झडती घेतली. ताे घरी आढळून येताच त्याला अटक केली. त्याच्या घरातून ६५,२८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ८१६ बाटल्या जप्त केल्या. या दाेन्ही घटनांमध्ये बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, हवालदार मिलिंद नांदुरकर, सत्येंद्र रंगारी, प्रवीण देव्हारे, पंकज ढोके, राकेश तालेवार, विवेक गेडाम, सातव यांच्या पथकाने बजावली. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.