Dataset Viewer
Auto-converted to Parquet Duplicate
text
large_string
शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि. प. ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी दिली. हिंगोली : शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि. प. ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी दिली. जिल्हा परिषदेत आज पाणीपुरवठा योजनांचा आढावा तुम्मोड यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रादेशिक योजनांतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने या गावांतून वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे या योजनेतील गावांचा सर्व्हे करून विद्युत व तांत्रिक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दिला असला तरीही जेथे या योजनेचे पाणीच आतापर्यंत कधी गेले नाही, अशा गावांचा वेगळा प्रस्ताव पाठविण्यासाठी वस्तुनिष्ठ सर्व्हे करण्यास सांगितले आहे. अशा गावांसाठी शासन स्तरावरून वेगळे उपाय करण्यासाठी तरी प्रयत्न करता येतील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल योजनेत एकूण ८७ गावांचा पाणीपुरवठा योजनांचा आराखडा मंजूर झाला आहे. यापैकी १३ गावांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. मात्र शासनाने पुढील १५ वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून योजना तयार करण्यास सांगून ते परत पाठविले. त्यामुळे ते नव्याने तयार करण्यात येत आहेत. या कामाची व्याप्ती पाहता खाजगी यंत्रणेमार्फत सर्व्हे करून या योजनेचे प्रस्ताव तयार करण्यास आज सीईओ तुम्मोड यांनी सांगितले. या कामाला गती देऊन लवकर प्रस्ताव तयार होतील, याची काळजी घेण्यासही बजावले. टंचाईचा जानेवारी ते मार्च महिन्याचा आराखडा आधीच सादर केलेला आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ज्या तालुक्यांचा पुरवणी आराखडा देण्याची गरज आहे, तो तातडीने तयार करण्यास सांगितले. तर मंजूर आराखड्याची अंमलबजावणी करावी, असेही सांगितले. भौतिकदृष्ट्या पूर्ण मात्र आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या १0७ पैकी १0 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर आणखी ३0 प्रकरणे जि. प. त दाखल झाली आहेत. उर्वरित ६७ योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करून संबंधितांची देयके अदा करण्यास सांगितले. अपूर्ण असलेल्या २५ योजनांमुळे ही गावे टंचाईतही येत आहेत अन् या योजनांवर झालेला खर्चही वाया जात आहे. त्यामुळे या योजनांवर आधी लक्ष केंद्रित करून त्या पूर्ण कशा होतील, याचे अभियंतानिहाय नियोजन करण्यास सांगितले. तर यापैकी ३ योजना पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. अधिग्रहणाचे प्रस्ताव आता ज्या दिवशी पाणीपुरवठा सुरू झाला त्या दिवसापासूनच मंजूर होणार असल्याने तसे शेतकऱ्यांना सांगून अधिग्रहणास विलंब लागणार नाही, याची काळजी घेण्यासही तुम्मोड सांगितले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये 473 दहशतवादी घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाचे 104 जवान जखमी झाले असून 223 जवान शहीद झाले आहेत. त्याच वेळी, या हल्ल्यांमध्ये 78 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 187 नागरिक जखमी झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, 2020 मध्ये 244 दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये सुरक्षा दलाचे 62 जवान शहीद झाले, तर 106 जवान जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 112 जण जखमी झाले. त्याच वेळी, 2021 मध्ये 229 दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये सुरक्षा दलाचे 42 जवान शहीद झाले, असून 117 जवान जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये 41 नागरिकांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
मुंबई साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आरोपी सिद्ध झाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन काथवारू चौहानला बलात्कार आणि हत्येसह सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. ही घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडून दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवला होता. न्यायालयाने शिक्षेवरील चर्चेसाठी १ जून २०२२ ही तारीख निश्चित केली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री एका ३० वर्षीय महिलेवर ४५ वर्षीय मोहन काथवारू चौहान याने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यांनतर १० सप्टेंबर रोजी सकाळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडले. खैराणी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा फोन कंट्रोल रूमला आला. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे रक्ताने माखलेली महिला आढळून आली. तिला रुग्णालयात नेण्यात आल मात्र पीडित महिलेचा उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत ही घटना घडली. वाहनात रक्ताचे डागही आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हे ही वाचाः सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध! याप्रकरणी पोलिसांनी ७७ साक्षिदारांचे जबाब नोंद करून ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सर्व आरोपींमधून आरोप चौहान याला दोषी ठरवण्यात आले आहे. या दोषीवर १ जून रोजी न्यायालयात शिक्षेसाठी युक्तिवाद होणार आहे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात सूरु होता.
ग्राहक आणि कर्मचा-यांची चोरी टाळण्यासाठी बर्याच व्यवसायांसाठी उच्च-दर्जाच्या अधिका-यांना एक गैर-विनंतीकरण करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. गैर-सूचनाप्रणाली काय आहे? गैर-विनवणी करारामुळे (अ) कर्मचारी किंवा (ब) व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांना विनंती करण्यापासून एखाद्या व्यक्तीस (सामान्यतः माजी कर्मचारी) मर्यादा असते. गैर-आग्रहाची भाषा एका संपूर्ण दस्तऐवजाच्या रूपात किंवा दुसर्या दस्तऐवजामध्ये एक कलम, जसे रोजगार करार किंवा स्वतंत्र कंत्राटदार करार म्हणून येऊ शकते. गैर-विनंती तीन प्रकारच्या प्रतिबंधात्मक करारांपैकी एक आहे , तर इतर दोन गैर-स्पर्धात्मक करार आणि न उघडता (गोपनीयता) करार आहेत. एखादी व्यक्ती नोकरी न करण्याच्या वेळी किंवा नंतर काही करू नये यासाठी त्यांना प्रतिबंधित किंवा सक्तीने करण्याचे सर्व तीन प्रयत्न. अंमलबजावणी करण्यायोग्य असल्यास, वेळ, क्षेत्र आणि कार्यांच्या प्रकारानुसार वाजवी मर्यादा असणे आवश्यक आहे. चांगले कर्मचारी शोधणे अवघड आहेत आणि एका कंपनीने एक बहुमूल्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्षे घालवली असतील. नियोक्ता दुसर्या कर्मचाऱ्याला कंपनी सोडण्यास रोखू इच्छितो आणि त्या मौल्यवान कमिशनरला सोडून जाण्यास आणि नवीन कंपनीला सामील करण्यास सांगितले. जो XYZ कंपनीमध्ये नोकरी सोडत आहे त्याच्याकडे एक चांगला प्रशासकीय सहाय्यक आहे, आणि तो तिला त्याच्यासोबत येण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करतो. त्याने अ-विचारणा-या करारावर स्वाक्षरी केली असेल तर करार कराराचा भंग केल्याविना तो ते करू शकणार नाही. तशाच प्रकारे, एखादा कर्मचारी एखाद्या व्यवसायापासून दूर राहण्यास ग्राहकांना विनंती करण्यापासून एका माजी कर्मचार्यास रोखू शकतो. ही परिस्थिती विक्री आणि व्यावसायिक पद्धतींमध्ये ग्राहक किंवा रुग्णांसह होते. जर जॉय एक्सवायझ इंक. साठी एक विक्रता म्हणून कार्यरत असेल, तर त्याने त्याच्या संपर्कांची यादी घेतली असावी. जर त्याने त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला आग्रहाची विनंती करण्यास सांगितले जाऊ शकते. आणि जर शेरॉन आपल्या पूर्वीच्या व्यवसायाच्या ग्राहकांना विनंती करण्याचा प्रयत्न करत असेल तर तेच सौदा. गैर-विनवणी करारांमध्ये सर्वात सामान्य समस्या अशी आहे की जर ते "वाजवी" (केस-बाय-केस आधारावर परिभाषित नसलेले) नसतील तर त्यांना व्यापाराचे संयम मानले जाऊ शकते . याचा अर्थ, हा करार गैरव्यवहाराने एखाद्याला व्यवसाय करण्यापासून प्रतिबंधित करतो. खटला दाखल केला जातो आणि न्यायालयाने निर्णय दिलेला असतो, किंवा काही प्रकरणांमध्ये राज्यामध्ये कायदे नसलेले करार जसे मर्यादित करार असतात. राज्य कायदे बदलू शकतात. प्रतिबंधात्मक करारांमध्ये या प्रकारच्या कॅलिफोर्नियाचे कायदे सर्वात जास्त, तसेच, प्रतिबंधात्मक आहेत. राज्याच्या एक विशिष्ट कायद्यात असे म्हटले आहे की अशा प्रकारच्या करारनामा सामान्यतः अप्रवर्तनीय आहेत, त्याशिवाय जेथे ते व्यापार रहदारीचे संरक्षण करण्यासाठी वापरले जातात. लक्षात ठेवा काही समस्याः - स्वेच्छेने एखाद्या कंपनीस दुसर्या कंपनीत सामील होण्यापासून एखाद्याला रोखणे कठीण आहे. - तो आक्षेप सिद्ध करणे देखील कठीण आहे. काय एक माजी कर्मचारी सक्रियपणे माजी ग्राहकांना शोधत नाही, पण ते त्याला किंवा तिला संपर्क? काय माजी कर्मचारी किराणा दुकान येथे माजी ग्राहक धावा आणि एक व्यवसाय कार्ड बाहेर हात? - ग्राहकांच्या बाबतीत, काही कंपन्या "अप्रत्यक्ष" आग्रहामुळे प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा अर्थ जाहिराती किंवा प्रसिद्धी असा होऊ शकतो. या निर्बंधामुळे नॉन-सॉलिफिकेशन ऍण्टमेंटच्या उल्लंघनाच्या जोखमीस न हाताळता नवीन व्यवसायाचे जाहिरात देणे जवळजवळ अशक्य होते.
किमुक्तम् । तत्र व्यपदेशिवद्वचनमेकाचो त्वाचार्य आदेशो यः सकारस्तस्य षत्वमिति द्वे प्रथमार्थ षत्वे चादेशसंप्रत्ययार्थम् । ततो घसिग्रहणं करोति ।। अवचनाल्लोकविज्ञानात्सिद्धमिति ॥ यदपि नानाविभक्तीनां च समासानुपपत्तिरित्याचार्यप्रवृत्तिर्ज्ञापयति नानाविभत्तयोरेष समास इति यदयं शासिवसिघसीनां च [८.३.६०] इति घसिग्रहणं करोति । कथं कृत्वा ज्ञापकम् । यदि ह्यादेशस्य यः सकार इत्येषं स्याद् घसिग्रहणमनर्थकं स्यात् । पश्यति ते काय सांगितलें आहे ? ते असे सांगितले आहे की- धातूच्या एकाच् प्रथम भागाला सांगितलेले द्वित्व फक्त इ या घातूला म्हणजे नुसत्या एक अचालाच द्वित्व झाले पाहिजे. तसेच आदेशरूप सकाराला आदेशाचा अवयव समजून षत्व झाले पाहिजे. याकरितां व्यपदेशिवद्भाव सांगितला पाहिजे. परंतु तसा सागितला नाहीं तरी काम भागेल. कारण लोक तसे आपोआपच समजतात. आतां भिन्न भिन्न अर्थाची दोन ठिकाण षष्ठी विभक्ति निरनिराळी होत असल्यामुळे द्वंद्व समास होणार नाहीं असा जो पूर्वी दोष दिला आहे तोही येत नाहीं. कारण हा आचार्य पाणिनि ' शासिवसिघसीनां च ' ( ८।३।६० ) या सूत्रामध्ये अद् घातूला आदेश झालेल्या घस् यांतील सकाराला षत्व करावे म्हणून मुद्दाम सांगतो त्यावरून तो अर्से सुचवितो कीं- येथे हा द्वंद्व समास निरनिराळ्या अर्थाची षष्ठी असतो. नाही केला आहे. १४. तीन मुलगे असतां क्रमानें ज्येष्ठ मध्यम व कनिष्ठ असा सरळ होणारा व्यवहार एकच मुलगा असनाही हाच थोरला हाच मधला व हाच धाकटा अशा रीतीने केल्याबद्दलचा प्रघात लोकांमध्ये दृष्टीस पडतो. १. ( सू. ६० ) इण् किंवा कवर्ग यांच्या पुढील जो शास्, वस् आणि घस् यांचा सकार त्याला षकार आदेश होतो. हे शापक कसें जमतें १ असे जमवावें कीं-आदेशाचा अवयव जो सकार त्याला षत्व होतें असा जर येथें पाणिनीच्या मनात अर्थ असता तर घस् या आदेशांच्या सकाराला प्रकृत सूत्रार्ने षत्व सिद्ध होत असल्यामुळे 'शासिवसिघसीनां च ' ( ८ । ३ । ६० ) या सूत्रामध्ये घस् हा शब्द फुकट उच्चारला अर्से होते. तेव्हा आदेशरूप जो सकार त्याला षत्व होते असा येथें अर्थ आहे अशा नजरेनेच आचार्य पाणिजीनें घस् असा शब्द घातला आहे. ( सू. ६१ ) या सूत्रामध्ये स्तौतिण्योः असें कशाकरितां म्हटले आहे १ स्तु धातु आणि ण्यन्त धातु यांशिवाय इतर धातूच्या सकाराला सन् प्रत्यय पुढे असतांना षत्व होऊं नये म्हणून तसे म्हटले आहे. उदा०सिसिक्षति. आतां या सूत्रामध्यें एव हा शब्द कथाकरितां घातला आहे ? नियम होण्याकरितां एब १. ( सू. ६१ ) अभ्यासांतील इणाच्या पुढील सकाराला मूर्धन्य आदेश होतो सकाराचे स्थानी षकार झालेला सन् प्रत्यय पुढे असतांना मात्र तो सकार स्तु किवा ण्यन्त या धातूचाच भतला पाहिजे. • पिच क्षरणे.' धात्वादे षः सः सन्. 'सन्यडोः ' याने दित्व. चोः कुः यानें कुल, आदेश प्रत्यययोः याने षत्व, सिसिक्षति, नान्येषामिति । नैततुस्ति प्रयोजनम् । सिद्धे बिधिरारभ्यमाणोऽन्त रेणैवकारकरणं नियमार्थो भविष्यति । इष्टतोऽबधारणार्थस्तर्हि । यथैवं विज्ञायेत स्तौतिण्योरेव षणीति । मैवं विज्ञायि स्तौतिण्योः षण्येवेति । इह न शब्द घातला आहे. तो नियम असा कीं- धातूहून सन् प्रत्यय केला असतांना त्या धातूच्या सकाराला जर षत्व होईल तर फक्त स्तु धातु आणि ण्यन्त धातु यांच्याच सकाराला षैत्व होतें, इतर धातूच्या सकाराला षत्व होत नाहीं. एव शब्दाचा असा उपयोग सांगणे बरोबर नाहीं. कारण एकादी गोष्ट सिद्ध असतांना जर मुद्दाम पुनः त्या गोष्टीचा विधि केला असेल तर त्या ठिकाण अर्थातच तो विधि नियम दाख विण्याकरतां केला असें एव शब्दावांचूनच गृहीत धरतां येतें. तर मग येथे एव शब्दाचा उपयोग असा कीं- जो नियम होईल तो इष्ट नियम झाला पाहिजे; विपरीत नियम होऊं नये. म्हणजे या सूत्रामध्ये षण् म्हणजे षत्व केलेला सन् प्रत्यय पुढें असतांना स्तु धातु आणि ण्यन्त धातु यांच्याच फक्त सकाराला षत्व होते असा नियम झाला पाहिजे. विपरीत नियम म्हणजे- स्तु धातु आणि ण्यन्त घातु यांच्या सकाराला जर षत्व कर्तव्य असेल तर षण् पुढे असतांनाच करावें तुष्टाव वगैरे ठिकाणीं करूं नये असा स्यात् तुष्टाष ॥ अथ षणीति किमर्थम् । सेषीव्यते ॥ को विनतेऽनुरोधः । अविनते नियमो मा भूत् । सुषुप्सतीति ॥ कः सानुबन्धेऽनुरोधः । षशब्दमात्रे नियमो मा भूत् । सुषुपिष इन्द्रम् । सुषुपिष इहेति ॥ ३. जसे 'टुम् स्तुतौ ' सन्. द्वित्व. ' अज्झन०' (६।५।१६) यानें दीर्घ. सन् प्रत्ययाच्या सकाराला षत्व. प्रकृत सूत्राने अभ्यासोन्तरखंडांतील सकाराला षत्व ष्टुत्व तुष्टपति 'मिष्वप् शये . धारवादेः षः सः यानें स णिच् णिजन्ताहून सन्. त्याला इडागम द्वित्व 'युतिस्वाप्योः०' ( ७॥४॥६७ ) यानें अभ्यासाला संप्रसारण. सन् प्रत्ययाच्या सकाराला षत्व. प्रकृत सूत्रानें अभ्या सोत्तरखंडांतील सकाराका षत्व. सुष्यापयिषति. ४. 'टुञ् स्तुतौ' लिट्, तिप्. णल्. द्वित्व. बृद्धि, आव् नियम येथें न झाला पाहिजे. कारण तसा त्रिपरीत नियम केला असतां तुष्टाव वगैरे उदाहरणांमध्ये षत्व होणार नाहीं. आतां या सूत्रामध्यें षणि असें कशाकरितां म्हटले आहे १ सन् प्रत्ययाशिवाय यङ् बगैरे इतर प्रत्यय केले असतां तेथें या नियमानें षत्वाचा प्रति. षेष होऊं नये म्हणून षणि असे म्हटले आहे. उदा० - सषीव्येते. पण येथें सूत्रकारांनीं षणि असे उच्चारून षत्व केलेल्या षणापर्यंत जी घाव मारली आहे ती कशाकरितां ? षत्व न झालेला सन् प्रत्यय पुढे असतांना हा नियम लागू होऊं नये म्हणून षणि असें म्हटले आहे. उदा० - सुषुप्सति. तरी पण पुनः येथें सूत्रकारांनीं षण् असे णकारासकट उच्चारण करून त्या इत्संशक वर्णापर्यंत जी घाव मारली आहे ती कशाकरितां ? नुसता षशब्द पुढें असताना हा नियम लागू होऊं नये म्हणून सूत्रकारांनी येथे इत्संशक नकार उच्चारला आहे. उदा०- सुषुपिष इन्द्रम् आदेश. 'आदेशप्रत्यययोः ' यानें षत्व. तुष्टधव. ५. ' पिवु तन्तुसंताने. ' धात्वादेः षः सः ' धातोरेकाचो०' यङ्. द्विध्व. 'गुणो यङ्लुकोः' (७।४।८२ ) यानें अभ्यासाला गुण. सेषीव्यते. ६. ' ञिष्वप् शये.' धात्वादेः षः सः . सन्. ' रुदविदमुष ० ' ( ११२१८ ) यानें सन् प्रत्ययाला कित्त्व. वचिस्वपि०' ( ६।१।१५ ) यानें संप्रसारण. दिल, षत्व सुषुप्सति
प्रिया राजवंश यांचे खरे नाव वीरा सिंह. शालेय शिक्षण सिमल्यातलंच. शाळेत असताना त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांत अभिनय केला होता. वनविभागात कंजरवेटर म्हणून काम करत असताना प्रिया राजवंश यांच्या वडिलांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते. प्रिया राजवंश सुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला गेल्या होती. त्यांचा जन्म १९३७ रोजी सिमला येथे झाला. तेथे गेल्यानंतर त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्स या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. चेतन आनंद हे त्यांच्या'हकीकत' या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता. हिंदी चित्रपटसृष्टीत युद्धपट निर्माण करण्यात चेतनला स्वारस्य होते. त्यामुळे या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून तो विभक्त झाला होता. जीवनातील एकाकीपणामुळे तो बेचैन होता. 'हकीकत' हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. 'हकीकत' रिलीज झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला. प्रिया राजवंश रातोरात बिग स्टार झाल्या. १९५० मध्ये चेतन आणि देवआनंदने मिळून 'नवकेतन' सुरु केली होती. पण ते यश देव आणि नवकेतनच्या नावावर नोंदवले गेले. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने 'हिमालया फिल्म्स' सुरु केली. चेतनची एक खास टीम होती, जाल मिस्त्री, कैफी आझमी आणि मदनमोहन ! या टीममध्ये आता प्रिया राजवंश यांचे नाव सामील झाले. चेतनने हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. 'हकीकत'नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. 'हकीकत'नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. मात्र त्यांनी केवळ चेतन आनंद यांच्यासोबतच काम करणे पसंत केले. तिने इतर मोठ मोठे बॅनरचे चित्रपटही नाकारले. यामुळे तिच्या सिनेमांची संख्या मोजकीच राहिली. 'हकीकत'नंतर १९७० मध्ये 'हीर रांझा', १९७३ मध्ये 'हिंदुस्थान की कसम' आणि 'हंसते जख्म', १९७७ मध्ये 'साहेब बहादुर', १९८१मध्ये 'कुदरत' आणि १९८५मध्ये 'हाथों की लकीरें' या सिनेमात प्रिया राजवंश होत्या. 'हिंदुस्तान की कसम'मध्ये तर प्रिया राजवंश यांची ताहिरा आणि मोहिनी अशी दुहेरी भूमिका होती. प्रिया राजवंश यांचे निधन २७ मार्च २००० रोजी झाले. संजीव वेलणकर पुणे.
तळोदा, जि. नंदुरबार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक (Agriculture Produce Market Committee Election) कार्यक्रम नुकताच नव्याने जाहीर करण्यात आला असून, २८ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानानंतर (Voting) पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते, व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ट होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने पाठविली होती. त्यानंतर प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
बेड शिल्लक नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉस्पिटलची माहिती घेऊन बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची नावे सामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावीत, आदी मुद्दे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रात मांडले आहेत. कोरेगाव (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे, तसेच मदत स्वरूपात रेमेडेसिव्हर औषधे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याचे लेखी पत्र आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हास्तरावर झालेल्या कोरोनासंदर्भातील बैठकीदरम्यान पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भात बैठक झाली; परंतु आमदार शिंदे सध्या मुंबईमध्ये असल्याने ते या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात पाठवले आहेत. त्यात म्हटले आहे, की प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतानाही कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून, रुग्णाला वेळेत ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा मिळत नसल्यामुळे मृत्युदर वाढत आहे. वेळीच ऑक्सिजन व आयसीयू बेड मिळाल्यास रुग्ण बरे होण्यास मदत होणार आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात तेवढे ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना व्हेंटिलेटर अणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. या संस्थांकडून होणाऱ्या पुरवठ्यातून प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्राच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था केल्यास आणि संबंधित ठिकाणी डॉक्टर व नर्सेस उपलब्ध करून दिल्यास वेळेत उपाययोजना होईल आणि सातारा येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल. ढेबेवाडीचे 36 खाटांचे कोविड हॉस्पिटल पहिल्याच दिवशी गॅसवर! याशिवाय तत्काळ खासगी रुग्णालये अधिगृहीत करून 70 टक्के बेड कोविडसाठी व 30 टक्के बेड अन्य रुग्णांसाठी राखीव ठेवावीत. होम क्वारंटाइन करणे शक्य नसेल, अशा ठिकाणी संबंधित तालुक्यातील हॉटेल, मंगल कार्यालये अधिगृहीत करून ताब्यात घ्यावीत, तसेच सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना रेमेडेसिव्हर औषधे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करावे. गरजू रुग्णांना या औषधांचे मोफत वाटप करावे आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. खासगी हॉस्पिटलचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे खासगी हॉस्पिटलवरील नियंत्रणासाठी शासनाच्या आदेशानुसार समिती गठित करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का? त्याचा फायदा रुग्णांना होत आहे का? याबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे. तसे आज होत नसल्याचे दिसून येत आहे. बेड शिल्लक नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉस्पिटलची माहिती घेऊन बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची नावे सामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावीत, असे मुद्दे आमदार शिंदे यांनी मांडले आहेत. सावधान... तुमच्या फेसबुकवरून अश्लील चित्रे पोस्ट होण्याचा धोका! कशी घ्याल काळजी? सातारा जिल्ह्यात बेडसाठी होणारी ससेहोलपट थांबणार ?
अमळनेर : फरशी रोडवरील रामभाऊ दशरथ मोरे (८७) यांचे दि. २ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते एड. अशोक मोरे व नगरपरिषद कर्मचारी रघुनाथ मोरे यांचे वडिल होत. Recover your password. A password will be e-mailed to you.
जेव्हा Appleपलने अधिकृतपणे नवीन मॅजिक कीबोर्ड ट्रॅकपॅडवर लाँच केले तेव्हा लॉगीटेक कंपनीने घोषणा केली की ती ए वर कार्यरत आहे या मॅजिक कीबोर्डची स्वस्त आवृत्ती Appleपल ही एक आवृत्ती आहे जी 2018 मध्ये लॉन्च केलेल्या मॉडेल्सशी सुसंगत असेल. हे नवीन कीबोर्ड आधीपासूनच अधिकृत आहे आणि त्याला फोलिओ टच असे कीबोर्ड आहे ट्रॅकपॅडचा समावेश करते आणि डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी केस देखील समाविष्ट करते आमच्या सहली दरम्यान. यापूर्वी, लॉजिटेकने 10,5 व्या पिढीच्या आयपॅड, आयपॅड एअर आणि XNUMX-इंचाचा आयपॅड प्रो सुसंगत कॉम्बो टच हा ट्रॅकपॅड कीबोर्ड रिलीझ केला होता. या नवीन कीबोर्डची रचना खूपच आहे कॉम्बो टच मॉडेलमध्ये सापडलेल्या प्रमाणेच, डिव्हाइसच्या कडांचे संरक्षण करणारे कवच असलेले, त्यात लेखन, वाचन, रेखांकन किंवा सामग्री पाहणे असो की आपल्याला अधिक आरामात कार्य करण्यास सक्षम असण्याची प्रवृत्ती सेट करण्यासाठी मागे कीबोर्ड आणि मागे एक स्टँड समाविष्ट आहे. यात Appleपल पेन्सिल स्टोअर स्टँडचा समावेश आहे. आयपॅडला जोडत आहे स्मार्ट कनेक्टर कनेक्शनद्वारे केले जाते, केवळ आयपॅड प्रो श्रेणीत कनेक्शन उपलब्ध आहे, म्हणून कोणत्याही वेळी शुल्क आकारणे आवश्यक नाही, कारण कार्य करण्याची आवश्यक ऊर्जा थेट आयपॅडकडून प्राप्त केली गेली आहे, म्हणून ते आयपॅडसह ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत नाहीत, जसे त्यांच्याकडे आहे हे कनेक्शन पोर्ट नसलेले सर्व बाह्य कीबोर्ड करण्यासाठी. जेव्हा आम्ही कीबोर्ड वापरत नाही, तेव्हा आम्ही आयपॅडच्या मागील बाजूस कीबोर्ड संचयित करू शकतो, ही शक्यता मॅजिक कीबोर्डवर उपलब्ध नाही. हा नवीन कीबोर्ड स्पॅनिश Appleपल स्टोअरमध्ये हे 159,95 युरोमध्ये उपलब्ध आहे आणि वितरण, आज ते खरेदी 27 जुलैला होणार आहे.
१६२ : आचार्य भागवत संकलित वाकाय / खंड २ अशा वेळी बियोग, दुःख, अपमान इत्यादिकांचे आघात ती बघिरता नाहीशी करून. नवजागृती निर्माण करतात. या दृष्टीने दुख-वेदना आत्म्याला जागे करणान्या इतिकाच होतात. 'चिरजनमेर वेदना' (पृ. ८२), 'निंदा दुःख अपमान (पृ. १३९), 'आरो आघात सइले आमार' (पृ. ९५) 'एक मांलो (पृ. ९६ ) इत्यादी गीतांतून दुःखाच्या आवश्यकतेचे आणि उपकारित्याचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. भीती छेड़ी एक दुःखाचेच स्वरूप आहे. सुख विनाशाची शंका, दुःख प्राप्तीची अशंका यातून भीती निर्माण होते. क्षणिकाला चिरकालिक बनविण्याची दुराशा हे भीतीचे मूळ आहे. आपल्या जीवनाचा आलंब जोपर्यंत अक्षणिक आणि सान्तस्वरूपाचा असेल तोपर्यंत भीतीची कैदाशीण आपली पाठ पुरवणारच. अध्यात्मामध्ये आपल्या जीवनाचा आलंब महान् चिरकालिक आणि अनंत बनविण्याची साधना करावयाची असते. 'दाओ हे मय मेडे. दाओ (पृ. ३५) या गीतात या साधनेचा उल्लेख आहे. मृत्यू हे मानवी जीवनातील सर्वांत मोठे दुःख होय. खरोखर मृत्यूपेक्षा मृत्यूची कल्पना अधिक दुःखदायक भासते. इतर दुःखे कितीही भयपद असली तरी माणसाच्या अहंभावाच्या विनाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते. ती 'अईया विकासालाच प्रतिबंध करू शकतात. पण मृत्यूमुळे शरीर, इन्द्रिये, मन आणि बुद्धी या सान्या सुख-साधनांसह बाह्य विश्वाला कायम आंचवावे लागते, म्हणून 'अहं'ला मृत्यूची कल्पना देखील सहन होत नाही. देहाला अमर करण्याचे कायाकल्प, अमृतसंजीवनी, रसदर्शन १ 'पारा सिद्ध केल्यामुळे मनुष्य अमर होतो, असे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञान इत्यादी प्रयत्न आणि जीवात्म्याने अमरत्व, स्वर्गादि सुखलोक इत्यादी कल्पनांची निर्मिती यासाठीच मनुष्याने केलेली आहे. रूढ धर्मामध्ये परलोकाचे जे विलक्षण प्रस्थ माजलेले दिसते त्याचेही कारण 'अहं'ची आसक्ती हेच होय. खन्या आध्यामिक जीवनात 'अहं'चा संपूर्ण विलय उद्दिष्ट असल्यामुळे ही आसक्ती तेथे उरतच नाही. उलट व्यक्ती आणि विश्व यांच्या मधला देहाचा आणि द्वैताचा पडदा दूर करून जिवाला विश्वमय म्हणजेच विश्वात्ममय करण्याचे महान कार्य मृत्यूने साधत असल्यामुळे त्याला परमात्म्याच्या संदेशवाहकाचे स्वरूप लाभते. 'यम' ही मूल्यूची देवता असली तरी त्याला 'धर्म' हे नाव देण्यात आले आहे ते यामुळेच मृत्यूचे हे रहस्य यमाला माहीत असल्यामुळे कठोपनिषदात समाला आत्मविधेचा उपदेष्टा बनविले आहे. मृत्यूचे रहस्य हेच आत्म्याचे रहस्य आहे. 'प्राणो मृ यूए, प्राणो विराट् ' या उपनिषदातील घोषणांप्रमाणेच रवीन्द्रनाथांच्या साहित्यात जीवन आणि मरण यांचे एकत्वच प्रतिपादिलेले आढळते. देहाच्या मरणाने आध्यात्मिक जीवनात खंड पडत नाही. ही श्रद्धा 'गीतांजली च्या गीतात उकळत्वाने व्यक्त झाली आहे. रवीन्द्रनाथांच्या ' नैवेद्य' नामक कवितासंग्रहात 'जन्म' आणि 'मृत्यू अशी दोन सुनीते आहेत. त्यात म्हटले आहेरूपहीन ज्ञानातीत भीषण शकति घरेछे आमार काळे जननी मूरति ("जन्म ) वीन्द्रचोगी जी १६३ ज्या शक्तीने मला या अशात विश्वात जन्म दिला तिनेच जननीची मूर्ती धारण करून माझा सांभाळ केला, नंतर जीवन मला प्रेममय भासले. ज्या अर्थी जीवनावर माझे प्रेम अडल्याचा अनुभव आहे, त्या अर्थी मृत्यूवरही मला तसेच प्रेम करता येईल दे खास, स्तन छ ते तुले निले कोंदे शिशु हरे मुहुर्ते श्वास पाय गिये रतनान्तरे बालकाला स्तन्य पाजताना माता त्याला एका बाजूकडून काढून दुसऱ्या बाजूकडे घेते. स्पा वेळी बालकाला प्रथम आक्रोश करावासा वाटतो, पण अनुभवाने ते लागलेच शांत होते. रवीन्द्रांच्या या वर्णनावरून अन्न आणि मृत्यू या दोन्ही एकाच मंगल शकीच्या दोन बाजू आहेत, असे सूचित होते. 'प्रेमेर दूतके पाठाचे नाथ क ( १६७) या गीतात मूल्यूला प्रेमाचा दूत म्हणून आळविले आहे. जीवनाची साधना मृत्यू नंतर देखील चालू राहील असे 'तोमाय खाँजा शेष हवे ना मोर' (पृ. १४६) या गीतात ध्वनित झाले आहे. या विचारधारेप्रमाणे पाहता मृल्यूमध्ये जीवनाची सफलता होते असेच म्हणावे लागेल. "जेनो शेष गाने मोर सब रागिणी पुरे' (पृ. १४७) या गीतात हा भाव वर्णिला आहे. मृत्यूचा दिवस हा दुःखाचा अथवा विकलतेचा न होता आनंदाचा आणि उत्सवाचा झाला पाहिजे. 'जावार दिने एइ कथाटि' (पृ. १५५) या गीतात प्रयाणदिनीची धन्यता अनुभविष्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. प्रेमवृत्तीच्या विकासाच्या साधनेतील दुःख, भय आणि मृत्यू यांचे रवीन्द्रनाथांनी वर्णिलेले स्थान आध्यात्मिक विकासाला अत्यंत उपकारक आहे, असे आतापर्यंतच्या विवेचनावरून उघड होईल असे वाटते, विश्वाच्या आनंदरूपात समरस व्हावयाचे म्हणजे विश्वाशिव आणि रौद्र, कर आणि दुःखकर अशा दोनही अवस्थांचे आनंदस्वरूप अनुभविणे होय. अहंकाराचा विलय यावरसुन्दापलीकडील आनंदतरवाशी एकरूप होण्याची शक्यता असते. विश्वाच्या उभारणीच्या आणि सहारणीच्या लीलेत स्वेच्छेने सामील होऊन विश्वाशी एकरूप होण्याची साधना 'पारबि नाकि जोग दिते एइ छन्दे रे' (पृ. ३९) या गीतातृ भग्योदात शब्दांत रवीन्द्रनाथांनी व्यक्त केली आहे. चित्ताच्या समाधीवर आरूढ झालेल्या सिद्धाची व्यवहारावस्था बाल, उन्मत्त, पिशाच यांच्यासारखी वर्णिलेली आढळते. त्या स्थितीशी या गीतांतील वर्णन सहज तुलीता येईल. 'आनंदेरि सागर येके एसेछे आज बान' (पृ. १०) या गाण्यातही भावोन्मत्तता प्रकट झाली आहे. अध्यात्ममार्गातील साधकाची, भगवधेमाची भूक लागलेल्या मताची चित्तवृत्ती नेहमीच अस्यंत आर्त झालेली आढळते. 'आर्ति अनुभविल्याशिवाय आध्यात्मिक जीवनाची परिपूर्ती होत नाही. प्राप्त परिस्थितीचा, भौतिक सुख, लौकिक यश इत्यादि १६४ः आचार्य भागवत संकलित बाड्मय / खंड २ कांचा उबग आल्याशिवाय भक्तहृदय निर्माण होत नाही. 'गीतांजली या अनेक गीतांत ही आर्ति उत्कटवाने प्रकट झाली आहे. 'जदि तोमार देखा ना पाइ, प्रभू' (पृ. २७), प्रभू, तोमा लागी आँखी जागे' (पृ. २१), 'घने जने आछि जडाये हाय (पृ. ३२), 'आसन तलेर माटिर परे' (पृ. ४९), 'कबे आमि बाहिर होलेम' ( पू. ७० ), 'जो चार आलो आलाते चाइ' (पृ. ७७), 'घाय जेने मोर सफल भालोबासा' (पृ. ८४), 'छिन्न करे लाओ हे मोरे (४. ९२), 'चाइ गो आमि तोमारे चाइ' (पृ. ९५), 'एकडी नमस्कारे प्रभू पृ. १३१), 'प्रेमेर हाते धरा देवो ( १. १६५) या गीतातील आर्तता मध्ययुगीन मतांच्या कवितातील आर्ततेशी तुलिता येईल. हृदयाची ही आर्ति एका निराळ्या प्रकारे व्यक्त झालेली वैष्णव भक्तांच्या कवितेत आढळते. मक्त असे मानतो की, परमेश्वर आपल्या भेटीसाठी आणि उद्धारासाठी अत्यंत विन्हल झालेला आहे. मक्ताला मुक्ती दिल्याशिवाय त्याला समाधान लाभत नाही. खीन्द्रांच्या 'गीतांजली 'तडी या प्रकारची गीते आलेली आहेत. आमार मिलन लागि तुमि आपछो कबे घेके' (पु. ३७), 'तोरा घुनिस नि की शुनिस नि तार पायेर ध्वनि ' (पृ. ६७) या गीतात प्रभु भक्ताच्थ मीडनासाठी आतुर झालेला असतो, सहस्ररूपांनी सहलमार्गावरून भक्ताला हृदयाशी वरण्याला घावत असतो, अशी भक्ताची समजूल व्यक्त झाली आहे. प्रभू भेटण्यासाठी, भेट देण्यासाठी उत्सुक आहे, पण भक्कालाच ओळख पटत नाही, असेही वर्णन काही गीतांतून आले आहे. भक्तहृदय प्रभूच्या भेटीसाठी आतुर असले, त्यासाठी सर्वस्वाच्या त्यागाची त्याची तयारी असली, कोणत्याही कठोर साधनेला स्वीकारण्याची त्याची शक्ती असली तरी प्रभूच्या प्राप्तीसाठी आपली तपस्या आणि आपले सामध्ये पुरे पडणार नाही अशी त्यांची खात्री असते. आपला उद्धार अखेरीस प्रभूच्या कृपेनेच होणार आहे ही त्याची दृढ श्रद्धा असते. कारण प्रभूच्या परमकारुणिकतेविषयी त्याच्या मनात मुळीच संदेह नसतो. रवीन्द्रांच्या 'गीतांजली 'तही प्रभूच्या या कृयाशक्तीवरील विश्वास 'दया दिये हवे गो मोर जीवन धुते (पु. ८० ), दया करे इच्छा करे आननि छोटो हये (१.१२५) या गीतात दिसून येतो. परमेश्वराला भक्त नाना स्वरूपांनी आळवितो. कधी गजा म्हणून, कधी मालक म्हणून, कधी सखा म्हणून वर्णिले जाते. माता, पिता, या नात्यांनी त्याला बाहणे हे तर नित्याचेच आहे. भक्तीचे हे सारे ढंग 'गीतांजळीत आलेले आहेत. जिवाला वधू मानून परमात्म्याला प्रियकर समजगे ही मधुरा सक्तीही 'गीतांजली'त आली आहे. क्वचित भक्ताच्या मेटीसाठी प्रभूचा अभिसार होत असल्याचेही वर्णन आहे. घिटाईने परमेश्वराशी सलगीचे भाषाही 'गीतांजळी 'त सापडेल. तात्पर्य, भारतीय परंपरेतील भक्तीच्या साज्या साधना रवीन्द्रनाथात अवतीर्ण झालेल्या आढळतात. रवीन्द्रांच्या भक्तिगीतांमध्ये एक खास वैशिष्टय आढळते. ते या ठिकाणी निराळे नमूद केले पाहिजे. विश्वाच्या हृदयस्थानी असलेले चैतन्य स्फूर्तिशाली असल्याचा स्वीन्द्रांचा रवीन्द्रांची गीतांजलीः १६५ अनुभव आहे. रवीन्द्रनाथ हे स्वतः महान् कधी आणि कलावंत असल्यामुळे या चैतन्य तत्वाचा साक्षात्कारही त्यांना त्याच स्वरूपात उद्दावा यात काहीच अस्वाभाविक नाही. विश्वाच्या अंतर्यामी अथवा मनुष्याच्या अंतर्यामी असणारे तत्व हे कवी अथवा कलावंत याप्रमाणे नवनवोन्मेवशाली, सर्जनशील आत्मप्रकाशनासाठी अधीर झालेले आहे असे रवीन्द्रांनी आपल्या साहित्यात आणि साहित्यमीमांसतही प्रतिपादले आहे. वैदिक बाध्यात क्वचित असे उद्गार आढळतात. तेथे परमेश्वराला कवी म्हणून संबोधिलेले सापडते. विश्व हे देवाचे काव्य आहे, असे 'पश्य देवस्य काव्येन ममारन जीयेति! अशासारख्या वचनातून दिसून येते. रवीन्द्रांच्या साहित्यातही अन्तर्यामी पुरुषाला कबी, चित्रकार, शिल्पी आणि गायक म्हणून वर्णिले आहे. रवीन्द्रांच्या प्रतिमेचा विश्व विस्तार असला तरी त्या प्रतिमेचे प्रमुख स्वरूप गानमयच आहे. त्यांनी काव्य, नाट्य, नृत्य, चित्र, शिस्य इत्यादी बहुतेक सर्व ललित कलांमध्ये अभिशता दाखविली असली तरी त्यांची प्रमुख भूमिका जीवनाचे गायक हीच आहे. सामान्यतः गायन म्हणजे सुरांची सजावट समजली जाते. पण रवीन्द्रांची गायनासंबंधीची कल्पना याहून फार व्यापक आणि विशाल होती. प्राचीन हिंदी शास्त्रीय संगीताहून त्यांनी एक वेगळे संगीत निर्माण केले. भाव, शब्द, अर्थ आणि स्वर या सर्वांचे मनोहर मीलन रवीन्द्रांच्या बहुतेक गीतांतून आढळून येते. बंगालमध्ये शास्त्रीय संगीताच्या पेक्षा निराळे असे रवीन्द्र संगीत निर्माण झाले आहे. या संगीतात जीवनाच्या सान्या प्रेरणा सामंजस्याने आळविण्याची पद्धती आहे. विश्वातील नाना घटना; नाना कृती आणि नाना आविष्कार या सर्वामध्ये ताल आहे, लय आहे आणि या विविध सुरांनी या विश्वाचे मनोहर संगीत चालले आहे, अशी रवीन्द्रांची अनुभूती आहे. अन्तर्यामी पुरुष हा गायक असून त्याचे गायन परिणत होत असते, असे रवीन्द्रनाथांनी 'गीतांजली 'ती अनेक गीतांत गाइले आहे. गायनकला ही सबै कलांची सम्राशी आहे, असा त्यांचा गायनकलेविषयीचा अभिप्राय होता. आपल्या जीवनातही सान्या वृत्तींचे आणि गायन निर्माण व्हावे ही त्यांची प्रमुख आकांक्षा होतो. प्रभूच्या विश्वसंगीताशी आपल्या स्वतःच्या हृदयवीगने अखंड साथ करावी ही त्यांची जीवनसाधना होती. या दृष्टीने पाहता त्यांच्या गायनाचे स्वरूप संपूर्णपणे आध्यात्मिक होते हे उपड होईल. 'तुमि केमन करे गान करो' (पृ. २५), 'देवा जे गान गाइते आसा आमार, हानि से गान गावा' (१.४२), एवार नीरब करे दाओ (पु. ६४), 'बजे तोमार बाजे बॉशि (पु. ७९), तुमि जखन गान गाहीते बोलो' (पृ. ८३) या गीतांतून हीच विचारसरणी व्यक्त झालेली आढळून येईल. रवीन्द्रांची प्रतिभा गायनस्वरूपाची असल्यामुळे आपल्या हृदयात गानपुष्पे कोणीतरी अकस्मात् फुलवीत आहे, असा त्यांचा नेहमीचा अनुभव असे. या गानांनी आपले जीवन चिरकाल कृतार्थ करून टाकले आहे, असाही त्यांचा अनुभव असे (पु. १०२). गान दिये १६६ : आचार्य भागवत संकलित वाडाय / खंड २ जे तोमाय खुँजि बाहिरमने' (पृ. १४५) या गाण्यात गायनाच्या साधनेने आपण जीवनाच्या नाना रहस्यांचा साक्षात्कार घेऊ शकलो, असे रवन्द्रांनी वर्णिले आहे. रवीन्द्रांच्या आध्यात्मिक साधनेचा बौद्धिक उलगडा होण्यासाठी ही गानमीमांसा अत्यंत आवश्यक आहे, असे मा बाटत असल्यामुळे या ठिकाणी तिचा मुद्दाम थोडा प्रपंच केला आहे. आध्यात्मिक साधना म्हटली म्हणजे देहाचा तिरस्कार, कर्माचा द्वेष, सामाजिक कर्तव्याविषयीची बेफिकिरी, विश्वाला मायिक अथवा आभासिक समजून स्वतःमध्येच रंगून जाण्याची स्वार्थमयता इत्यादी गोष्टींचे चित्र पुष्कळांच्या डोळ्यासमोर उभे राहते. आध्यामि कतेच्या इतिहासात या सान्या विकृती भरपूर आढळून येत असल्यामुळे हा केवळ आधुनिक मनाचा गैरसमज आहे. असे म्हणता येणार नाही. ज्ञानाने कठोर रुक्षता आणि भक्तीने दुर्बल विव्हलता निर्माण झालेली समाजाने पाहिलेली आहे. भारतीय मध्ययुगीन संतांच्या जीवनातही सामाजिक जीवनाच्या नानाविध विकासाकडे पुष्कळसे दुर्लक्षच झालेले आहे. सुदैवाने आधुनिक काळात भारतीय आध्यात्मिकतेला कर्मयोगाचे सामाजिक स्वरूप विशेषत्वाने लाभले आहे. रवीन्द्रनाथांच्या जीवनदर्शनात भक्तीला विश्वप्रेमाचे विश्वसेवेचे, आणि विश्वउद्धाराचे स्वरूप लाभले आहे. 'आमार ए प्रेम नय तो भीरू' ( . ९४ ) या गीतात न्याकुळ होऊन डोळयांतून टिपे गाळीत बसणारे असे आपले प्रेम भीरू आणि बलहीन नाही, भीष मनोहराला वरण्याची त्याची तयारी आहे, असे घोषित झाले आहे. 'नैवेद्य नामक संग्रहात रवीन्द्रनाथांनी एका सुनीतात आपल्या भक्तीचा आदर्श वर्णिला आहे. जे भक्ती तोमारे लये धैर्य नाही माने, मुहुर्ते विव्हल हय नृत्य गीतगाने भावोन्मादमत्तनाय, सेइ ज्ञानहारा उदभ्रान्त उच्छल-फेन भक्तीमद्धारा नांहि चाहि नाथ ।। दाओ भक्ती शान्तीरस, स्निग्ध सुधा पूर्ण करि मंगल कलस संसार भवन द्वारे । जे भक्ति अमृत समस्त जीवने मोर हइणे विस्तृत निगूढ गंभीर, सर्व कर्मे दिवे बल, व्यर्थ शुभ चेष्ट रेओ करिबे सफल आनंदे कल्याणे । सर्व-प्रेमे दिवे तृप्ति, सर्व दुःखे दिवे क्षेम, सर्व सुखे दीप्ति दाहहीन ।। संवरिया भाव-अथुनीर चित्त रखे परिपूर्ण अमत्त गंभीर ॥ रवीन्द्रांची गीतांजलीः १६७ यात भावोन्मादाच्या मत्ततेमध्ये नृत्यगीतात बुडून जाणारी, बाह्य विश्वाचे मान नष्ट करणारी प्रमत्त भक्ती आपणाला नको आहे असे प्रथम म्हटले आहे. नंतर शांत, अप्रमत्त अशा भक्तीची याचना केली आहे. अशी भक्ती सर्व कर्मोंना बल देणारी, केवळ भौतिक उपयुक्ततेच्या दृष्टीने निरर्थक असणान्या शुभ व्यापारांनाही आनंद आणि कल्याण रूपात परिणत करणारी, प्रेमात तृप्ती, दुःखात क्षेम आणि सुखात दाइहीन दीप्ती प्रकट करणारी असेल असा रवीन्द्रनाथांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे. आणखी एके ठिकाणी रवीन्द्रनाथ म्हणतातः भावेर ललितमा राखि निलीम कर्मक्षेत्रे करि दाओ सक्षम स्वाधीन भावाच्या मृदू अंकावर मला झोपवून टाकू नको, कर्म क्षेत्रात मला समर्थ आणि स्वतंत्र कर, अशीच बीर्याची मागणी त्यांच्या साहित्यात ठिकठिकाणी आढळते. रवीन्द्रांचे जीवनदी सामाजिक उद्धाराच्या नानाविध प्रयोगांनी भरून गेलेले दिसून येते. राजकारणाच्या धकाघकीतही त्यांनी आपला वाटा उचललाच होता. तथापि आपल्या स्वभावधर्माला अनुसरून शिक्षणक्षेत्र हेच आपले कर्मक्षेत्रे त्यांनी बनविले होते. त्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला विश्वभारतीचा आदर्श हा सान्या विश्वातील विद्वानांना मान्य झालेला आहे. शिक्षणक्षेत्रातील रवीन्द्रांची कामगिरी नवभारताला विशेष उपयोगी पडणार आहे, अशी माझी खात्री आहे. विश्वेश्वराची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर विश्वाच्या सुखदुःखाशी समरूप झाल्याशिवाय ती होणार नाही हा विश्वास 'विश्वसाथे योगे जेथाय विहारो? (१.९९), 'भजन पूजन साधन आराधना' ( १. १३१) या गीतात उत्तम तन्ऱ्हेने व्यक्त झाला आहे. आपल्याच मनाच्या कोपऱ्यात दडून न बसता प्राणाच्या स्थामध्ये आरूढ होऊन मी विशाल विश्वामध्ये केन्हा वावरेन, सुखदुःखाच्या सागरात झेप टाकून त्या सागराचे तरंग छातीवर कधी झेलीन अशी तळमळ आमार एकला घरेर आडाल मेडे (पु. ८९), 'एका आमि फिरचो ना आर' (१.९०), 'जेथाय तोमार लुट इतेछे भुवने (पृ. १०१) इत्यादी गाण्यांत आढळते. या तळमळीप्रमाणे रवीन्द्रनाथांनी समाजसेवेसाठी आणि ग्रामीण जनतेच्या उद्धारासाठी पुष्कळ प्रयोग केले. आपल्या संपत्तीचा फार मोठ्या प्रमाणात त्यागही केला, तथापि भारतीय जनतेचे, विशेषतः ग्रामीण जनतेचे दारिय इतके मयानक आहे, तिचे अज्ञान इतके अगाध आहे की, कोणाही एका माणसाचा त्यागमग तो कितीही उत्कटत्वाला पोचलेला असला तरी पुरा पडणार नाही. भारतातील दरिद्रनारायणाशी त्याच्या दारिद्र्यात एकरूप होणे हे अत्यंत वैराग्यशील सेवकालाही सर्वोशाने साधण्यासारखे नाही. रवीन्द्रनाथांना ही जाणीव झालेली होती. हे जेथाय थाके सवार अधम दीनेर हते दीन ( पू. ११६) या प्रसिद्ध गीतात स्पष्टपणे दिसून येते. तत्त्वज्ञानदृष्टीने सुखदुःखात्मक सारा दृश्य प्रपंच एकाच तत्वाचा विस्तार असला आणि भावावेशात सान्या द्वंद्वांचा काही काळ विसर पडत असला तरी जीवनाच्या व्याव
डोंबिवली - उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या डोंबिवलीतील दौऱ्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. दिवसभरात 133 अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई केली आहे. तसेच ह प्रभागातील ट्युलिप या इमारतीवर अनधिकृत नळ जोडणी केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून या बांधकामांना पाणी पुरवठा देखील अनधिकृत रित्या केला जात आहे. यामुळे पाण्याचा कोठा वाढवूनही अनेक भागात पाण्याची समस्या ही बारा ही महिने कायम असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री सामंत यांनी डोंबिवलीत धाड टाकत पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली. परंतू त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी त्या भागाची पाहणी करत पाणी चोरी झाले नसल्याचे स्पष्ट केले. या घडलेल्या प्रकारामुळे उद्योगमंत्र्यांचा दौरा तसेच पालिका अधिकाऱ्यांची तपासणी या दोन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे जाग आलेल्या पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. गुरुवारी दिवसभरात विविध प्रभागातील सुमारे 133 अनधिकृत नळजोडण्या पालिका प्रशासनाकडून खंडीत करण्यात आल्या. अ प्रभागातील बल्याणी परिसरातील 17 नळजोडण्या, ब प्रभागातील उंबर्डे परिसरातील 5, क प्रभागातील देवानंद भोईर चाळ, चंदनशिवेनगर परिसरातील 21, जे प्रभागातील अशोकनगर, वालधुनी परिसरातील 13, ड प्रभागातील काटेमानिवली येथील 10, फ प्रभागातील खंबाळपाडा, कांचनगाव परिसरातील 12, ग प्रभागातील नेरुरकर रोड, म्हात्रे नगर, आयरेगाव येथील 12, आय प्रभागातील गोळवली, पिसवली या परिसरातील 22, ह प्रभागातील 15, ई प्रभागातील नांदिवली, भोपर व देसलेपाडा परिसरातील 6 अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ह प्रभागातील ट्युलिप इमारतीवर अनधिकृत नळजोडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आय प्रभागातील 14 वाणिज्य आस्थापने यांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली.
अहमदनगर । राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या. आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राज्यात बहुतांशी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी (Karjat Nagar Panchayat Election) काल पार पडलेल्या मतदान (Voting) प्रक्रियेत एकूण 80. 21 टक्के मतदान (Voting) झाले होते. काल सायंकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Workers) फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला होता. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.
नवी दिल्लीः केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या कॅन्टीनमध्ये आता यापुढे केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री करण्यात येईल, असे आज गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे 50 लाख कुटुंबीयांना 1 जूनपासून या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तूच मिळू शकणार आहेत, असे शहा यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये सांगितले. स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करावा आणि आत्मनिर्भर होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे शहा यांनी सांगितले. देशात बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहनही शहा यांनी केले. सीएपीएफ, सीआरपीएफ. बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्सच्या कॅन्टीनमध्ये दरवर्षी अंदाजे 2,800 कोटींची उत्पादनांची विक्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना उद्देशून केलेल्या आवाहनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन केले होते. तसेच देशात बनवलेल्याच वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा बदल स्वीकारण्यात आला आहे. या बदलामुळेच देशाला जगाचे नेतृत्व करण्याची वाट उपलब्ध होईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. "जर प्रत्येक भारतीयाने "मेड इन इंडिया' म्हणजेच स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची प्रतिज्ञा केली, तर देश निश्चितच आगामी पाच वर्षात आत्मनिर्भर बनेल. ' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कॅगचे माजी प्रमुख विनोद राय यांची नियुक्ती केली आहे. सुप्रीम कोर्टाने एकूण चार सदस्यांचं प्रशासकीय मंडळ नेमलं आहे. यात विनोद राय यांच्यासह रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि डायना एदुल्जी यांची नेमणूक केली आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कॅगचे माजी प्रमुख विनोद राय यांची नियुक्ती केली आहे. सुप्रीम कोर्टाने एकूण चार सदस्यांचं प्रशासकीय मंडळ नेमलं आहे. यात विनोद राय यांच्यासह रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि डायना एदुल्जी यांची नेमणूक केली आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय मंडळावर क्रीडा सचिवांची नियुक्ती करावी अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. पण सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची ही मागणी फेटाळून लावली आणि चार सदस्यांचं प्रशासकीय मंडळ नेमलं. Historian @Ram_Guha, IDFC official #VikramLimaye, ex-women cricket captain #DianaEdulji also in the panel. #SupremeCourt #BCCI - Press Trust of India (@PTI_News) January 30, 2017 विनोद राय हे कॅगचे माजी प्रमुख आहेत. रामचंद्र गुहा हे इतिहास संशोधक आहेत. तर विक्रम लिमये आयडीएफसीचे प्रमुख आहेत आणि डायना एदुल्जी या महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहेत. या सर्वांची बीसीसीआयच्या प्रशासकीय मंडळावर सुप्रीम कोर्टाने नियुक्ती केली आहे.
राज्याला ऐन उकाड्यात भारनियमनाच्या चटक्यांपासून वाचवणार्या कोयना जलविद्युत प्रकल्पाने यंदा कमालीचे पाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना यंदा दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबरपासूनचा थंडीचा प्रभावही विजेची मागणी कमी होण्यासाठी पथ्यावर पडला आहे. त्यामुळेच कोयनेच्या पाण्याचे यंदा विक्रमी नियोजन करण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे. सध्या कोयनेचा ४१ टीएमसी इतका पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा जादा वीज मागणीच्या काळात वीजनिर्मितीसाठी उपलब्ध होणार आहे. आगामी चार महिन्यांत महिन्यापोटी १० टीएमसी इतका पाणीसाठा वापरणे शक्य होणार आहे. गेल्यावर्षी जानेवारी अखेरीस ३७ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदाच्या ४१ टीएमसी पाण्यातून १५०० दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती करणे शक्य आहे. इतक्या पाण्यात उकाड्यात वाढलेली विजेची गरज पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास महानिर्मितीच्या अधिकार्यांना वाटतो. यंदा पाण्याच्या व्यवस्थापनात गेल्या वर्षीच्या पाण्याच्या नियोजनाचा अनुभव उपयोगी पडला आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक आहे. महानिर्मिती राज्यात सकाळी आणि संध्याकाळी जादा वीज मागणीच्या काळात कोयना जलविद्युत प्रकल्पाचा वापर वीजनिर्मितीसाठी करते. त्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तुटवडा भरून काढण्यासाठी मदत होते. गेल्या उन्हाळ्यात विजेची मागणी २२ हजार मेगावॉटपेक्षा अधिक होती. यंदाच्या उकाड्यातील विजेची सरासरी मागणी २० हजार मेगावॉटचा आकडा पार करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १११ रुग्ण आढळले आहेत. - गेल्या २४ तासांत १ हजार ४७४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५७ हजार ३१४ वर गेली आहे. - गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ४७४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५७ हजार ३१४ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार २६ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १५ हजार १६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ५ चे २६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बी ए. २. ७५ व्हेरीयंटचे देखील १३ रुग्ण आढळले आहेत. यातील २३ रुग्ण मुंबई तर १३ रुग्ण पुणे येथील आहेत . याशिवाय प्रत्येकी १ रुग्ण बुलढाणा, ठाणे आणि लातूर येथील आहे. हे सर्व नमुने दिनांक २९ जून ते ४ जुलै २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बी ए. ४ आणि बी ए. ५ रुग्णांची संख्या १५८ तर बी ए. २. ७५ रुग्णांची संख्या ७० झाली आहे. जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ : अ. क्र. (टीप - बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
नटून थटून रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी राहिलेली, गाड्यांच्या आत डोकावणारी अलिशा एक सेक्स वर्कर आहे. रस्त्यावर उभी असताना मागून कोणीतरी आवाज देईल, तिला बघून कोणीतरी गाडी थांबवेल याची ती वाट पाहत असते. प्रत्येक रात्री ती याच रस्त्यांवर उभी असलेली दिसते. त्याच रस्त्यावर मी अलिशापासून थोड्या दूर अंतरावर उभी राहिले होते. पत्रकार असून देखील माझ्या मनात थोडी भीती होतीच. आणि रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी उभं राहण्याची भीती कोणत्याही मुलीला वाटली असती. पण मग अलिशा आमच्यापेक्षा वेगळी आहे का? भीतीचा लवलेश चेहऱ्यावर येऊ न देणाऱ्या अलिशाच्या मनात भीती नसेलच का? सेक्स वर्कर असलेल्या अलिशाच्या गुंता झालेल्या आयुष्याचा हा एक पैलू आहे. तिला या कामाची लाज वाटत नाही पण तिला हे काम करणं आवडतही नाही. मागील बऱ्याच वर्षांपासून हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणारी अलिशा एक ट्रांसजेंडर आहे. आशूची ती अलिशा झाली जेणेकरून तिला मोकळेपणाने जगता यावं. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिला सेक्स-वर्कर होऊन किंमत मोजावी लागली. पाटण्यात असलेल्या अलिशाला अगदी लहान वयातच घर सोडावे लागलं. एकट राहून तिला तिच्या उदरनिर्वाहाचं साधन शोधावं लागलं. BBCShe या प्रकल्पातील या गोष्टीसाठी बीबीसीने द ब्रिज संस्थेसोबत काम केलं आहेत. वाचकांची आवडनिवड, प्राधान्य अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणं या प्रकल्पाचा उद्देश आहे. संबंधित वृत्त : - बातम्यांच्या जगात महिलांचा टक्का कसा वाढवावा? घर सोडताना मनाला खूप वेदना झाल्या. मम्मीची साडी नेसणं, लिपस्टिक लावणं, नेलपॉलिश लावणं, बांगड्या घालणं, मुलींसोबत खेळणं अलिशाला आवडायचं. पण तिच्या मम्मीला हे सर्व आवडत नव्हतं. मम्मीच्या नजरेत तर तिला मुलगा झाला होता आणि त्याचं नाव तिने आशु ठेवलं होतं. आणि त्याने नॉर्मल मुलांसारखं वागावं अशी तिची अपेक्षा होती. पण अलिशा सांगते की, तिच्या मनात सुरुवातीपासूनच मुलींसारख्या भावना होत्या. तिच्या आईला कदाचित हे सर्व कळलं देखील असेल पण इतर कोणाला ही गोष्ट कळू नये असं तिला वाटायचं म्हणून ती मला नेहमी सांगायची की आशू, मुलांसारखं वाग. पण माझ्या मन मला खात होतं पण मग आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे गेलं होतं. ती 13 वर्षांची असताना तिच्या ट्यूशन टीचरने तिच्यावर जबरदस्ती केली. सोबतच तिच्या वागण्याबोलण्याचीही खिल्ली उडवली. अलिशाच्या सांगते, त्या टीचरने तिच्यासाठी अपशब्द वापरले आणि जर तिने याबद्दल कोणाला काही सांगितलं तर तिच्या घरचेच तिला हाकलून लावतील अशी धमकी दिली. एकीकडे लैंगिक शोषण झाल्याची वेदना, दुसरीकडे टीचरने वापरलेले अपशब्द आणि कुटुंबियांकडून सुरू असलेला द्वेष यामुळे ती पुरती हादरून गेली होती. अलिशाला खूप दुःखात होती. तिने तिच्या आईला आणि बहिणीला एक-दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला पण उघडपणे काहीच सांगता आलं नाही. अखेर घर सोडण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. मुलाच्या शरीरात बंदिस्त असलेल्या आशूला तिची नवी ओळख तयार करायची होती. तिला स्त्री व्हायचं होतं, पण यासाठी खूप पैसा मोजावा लागणार होता. मित्राच्या भरवशावर तिने दिल्ली गाठलं. इथंच तिची भेट तिच्या गुरुशी झाली. ट्रान्सजेंडर लोक जेव्हा आपलं घरदार सोडून एकटे राहतात तेव्हा ते गुरुला शरण जातात. अलिशाला जेव्हा पहिल्यांदा सेक्सवर्कसाठी पाठवण्यात आलं तेव्हा तिने 4 हजार रुपयांची कमाई केली. हळूहळू मी इतके पैसे साठवले की सर्जरी करून आता मी स्त्री होऊ शकत होते. 3 वर्षांपूर्वी सर्जरी करून आशू अलिशा बनली. आता आयुष्याला अर्थ देण्याचं काम शिल्लक होतं. ट्रान्सजेंडर आणि सेक्सवर्कर ओळखीच्या पलीकडेही नाव करायचं होतं. अलिशाने दुसरं काही काम शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता असंही काही नव्हतं. याच दरम्यानच्या काळा भारतात ट्रान्सजेंडर समुदायाला मान्यता मिळाली, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले. 2014 मध्ये एक ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली होती. ट्रान्सजेंडर्स मागासवर्गीय असल्याने त्यांना आरक्षण द्यावं, त्यांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले होते. राज्यघटनेतील कलम 14, 16 आणि 21 नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, रोजगार आणि सामाजिक मान्यता मिळण्याचा समान अधिकार मिळतो. त्यानंतर 2019 मध्ये संसदेने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऑफ राइट्स कायदा लागू केला. पण वास्तवात आजही काही बदललेलं नाही. अलिशाला नोकरी मिळवणं अगदीच अशक्यप्राय झालं. अलिशाने लहान वयातच घर सोडलं, त्यानंतरही तिच्या मागचा संघर्ष संपला नाही. तिने तिचं शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. पण एके ठिकाणी तिला संधी मिळाली. तिच्या गुरूने तिला ट्रान्सजेंडर्सच्या आरोग्य आणि लैंगिक समस्यांवर काम करणाऱ्या एनजीओची ओळख करून दिली होती. अलिशाचं वागणं बोलणं बघून, तिचा आत्मविश्वास बघून त्यांनी तिला नोकरी दिली. त्यामुळे आज ती हेल्थ वर्कर म्हणून काम करते. आणि हे काम एखाद्या लीडरपेक्षा कमी नाहीये. आज ती ट्रान्सजेंडर्स समुदायामध्ये, सेक्स वर्कर्सना "एड्स" आणि अनेक आजारांबद्दल माहिती देते, औषधे मिळवून देते. शिवाय त्यांना हॉस्पिटलमधील उपचार मिळवून देण्यात मदत करते. सोसायटी फॉर सर्व्हिस टू व्हॉलंटरी एजन्सीज या गुरूग्राम स्थित एनजीओमध्ये काम करणाऱ्या अलिशाला हे एनजीओ तिच्या कुटुंबासारखच वाटतं. ट्रान्सजेंडर्स दररोज इथं येतात, त्यांचं सुख दुःख शेअर करतात. जगण्यासाठी धैर्य लागतं आणि ते मिळवण्यासाठी ती कृष्णाला आपला सखा मानते. ती ताठ मानेने चालते पण देवासमोर नतमस्तकही होते. समाजाने तिला अपूर्ण असल्याची जी जाणीव करून दिली आहे ती देवाने पूर्ण केल्याचं अलिशा सांगते.
farming business ideas : एका एकरात 120 झाडे लावा, व्हाल करोडपती ! लाखात नाही कोटीत पैसे कमवाल ! जाणून घ्या लाल चंदनाची शेती कशी करावी ? तुळशीची लागवड करून कमवा मोठा नफा, औषधापासून सौंदर्य उत्पादनांपर्यंत तुळशीचा वापर....... .
लाईव्ह न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री मदन दास देवी यांचे आज पहाटे बंगलोरमध्ये निधन. रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. मुंबई : बॉलीवुड : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव' मुंबई : खासदारांनी आंदोलन करताच मिळाली शौचालयाच्या पुनर्बांधणीला परवानगी! महाराष्ट्र : मुंबई : मुंबई : तंत्रज्ञान : जरा हटके : छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय :
हा धागा आमच्या एका व्हॉटसअॅप समुहात झालेल्या चर्चेवर आधारीत आहे. मी काही व्यवसायांची यादी आणि ते येत्या १५ वर्षात भारतात त्यांची मागणी का मंदावेल याची कारणंही देतो आहे. ती बरोबरंच आहेत असा अजिबात दावा नाहीये.किंबहूना ती बरोबर आहेत का हे तपासण्यासाठीच इथे देतोय. तुम्हालाही अशी येत्या १५ वर्षात मागणी मंदावू शकणारी अजून काही क्षेत्रे आणि त्यामागची अंदाजे कारणं माहित असतील तर जरुर लिहा. प्रतिसाद देण्यापूर्वी कृपया खालील गोष्टी ध्यानात घ्या. १.आपण येत्या १५ वर्षातला अंदाज घेतोय.२०१८ पर्यंत जी क्षेत्रे चांगली फायद्यात होती त्यांचा आढावा किंवा इतिहास जाणून घेत नाही आहोत. यात प्रामुख्याने १ ली ते १२ पर्यंतच्या ट्यूशन्स/क्लासेसचा विचार केला आहे.शिक्षणावर होणारा खर्च,जाणारा वेळ आणि त्याचा अर्थप्राप्तीसाठी उपयोग याचा हिशोब लोक मांडू लागतील.एकूणच भारतीय शिक्षणव्यवस्था ही फारशी भरवशाची नसल्याने नावापुरती पदवी घेऊन 'एवढा पैसा क्लासेसवर अोतण्यापेक्षा या पैशात काही बिझनेस सुरु करु.त्यातल्या टक्क्याटोणप्यामुळे मिळणारं ज्ञान हे जास्त शिकवून जाईल.'असा विचार बळावणे.शिवाय हल्ली अॉनलाईन क्लासेस,युट्युब हे पर्याय तुलनेने स्वस्त आहेत.बायजुसारख्या शैक्षणिक सॉफ्टवेअरची जाहिरात शाहरुख खान सारखा सुपरस्टार करतो यावरुन यातली आर्थिक गुंतवणूक लक्षात यावी.होमस्कूलिंगही वाढू शकतं. सोबतच UPSC,MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च आणि त्यात यशस्वी होणार्या उमेदवारांची संख्या पाहिली तर अजून थोडे वास्तव समोर येईल.लोक यापुढे या क्षेत्रात पुरेसा विचार उतरतील असे वाटते. यात पुस्तके,रस्त्यावर लावले जाणारे फ्लेक्सबोर्ड यांचा खप रोडावेल;कारण पुस्तकंच काय पण काहीही वाचायला मुळातच लोकांकडे पुरेसा वेळ नाहीये.हा वेळ दिवसेंदिवस कमीच होत जाणारेय.शिवाय 'पुस्तकी ज्ञान नको प्रत्यक्षात काही काम केलं असेल तर ते सांगा' असा प्रचार वाढीस लागू शकतो. प्लॅस्टीकबंदी कधीही कडक होऊन फ्लेक्सवर, अन्नपदार्थ पॅकबंद करायच्या पिशव्यांवर बंदी येऊ शकते. दुसरं स्वस्त,सर्व हवामानात टिकणारं,विघटनशील आणि ज्यावर चांगली छपाई होईल असं माध्यम अजूनतरी उपलब्ध नसणं ही कारणे असतील. पण हा व्यवसाय अगदीच रसातळाला जाईल असंही नाही.अॉफिस,शाळा,कॉलेज यांना लागणारी पुस्तकं,वह्या,बिलबुकं यांना थोडीफार मागणी असेल.ती सुद्धा 'पेपरलेस' चा प्रचार फार झाला नाही तरच. अॅमेझॉन,स्नॅपडील,गुगल यांसारखे अॉनलाईन वस्तू विक्रेते प्रत्यक्ष मोठालं दुकान थाटून थेट विक्रीत उतरणे.महिन्याचा,वर्षाचा किराणा माल मॉलमधून एकदमच डिस्काऊंटवर खरेदी करणे.नुकताच संगमनेर मधील व्यापार्यांनी अॉनलाईन वस्तू विक्री कंपन्यामुळे व्यवसाय मंदावल्यामुळे आलेल्या वैफल्यातून केलेला प्रकार वाचनात आलाच असेल. भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फार बनतंच नसल्याने शिवाय त्या दुरुस्त करण्याइतपत सहज नसल्याने स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी बळावून अशा वस्तू दुरुस्त करण्यासाठी खुप कुशल अशा तंत्रज्ञांची गरजच न भासणे किंवा त्यांच्यासाठी पुरेसं कामच उपलब्ध न होणे. यात उत्पादनांसाठी टॅगलाईन सुचवणार्या कंपन्या,कलाकारांना घेऊन प्रत्यक्षात जाहिराती बनवणार्या कंपन्या विचारात घेतल्या आहेत.गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या 'डिजिटल मार्केंटींग'वाल्या कंपन्यांचं भांडवल मुळातंच कमी असतं त्यामुळे त्यांच्या संख्येवरुन जाहिरात क्षेत्र फायद्यात आहे आणि राहीलंच असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. उत्पादनाची/सेवेची जाहिरात आणि उत्पादनाची विक्री यांचे आंतरसंबंध तपासून देणार्या अत्याधुनिक यंत्रणा,प्रणाली यांचा वापर वाढणे जेणेकरुन जाहिरात कुठे करावी,कशी करावी याचे निर्णय उत्पादक कंपनी स्वतःच घेणे आणि ते बरोबर निघणे.पर्यायाने जाहिरात कंपनीला कंत्राट देणे कमी होणे.जाहिरातींवरचा खर्च कमी होणे.एखाद्या उत्पादनाची टॅगलाईन आवडली किंवा ती विविध माध्यमांतून वारंवार दिसते एवढे दोनंच निकष लावून आपण ते उत्पादन घेतो हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.बर्याच अॅपमधे जाहिरातींचा भडीमार असतो.ती जाहिरातीतली प्रत्येक वस्तू आपण लगेच विकत घेत नाही. बांधकाम करणारा इंजिनिअरच या बाबत पुरेसा सक्षम असणे;शिवाय इंटरनेटवर आयत्या तयार प्लॅन्सची संख्या भरपूर असणे,आर्कीटेक्ट नावापुरता,प्लॅन अप्रुव्ह करण्यापुरता कंस्ट्रक्शन कंपनीत असणे किंवा त्याला पुरेसं श्रेय मिळत नसल्याने पैसे चांगले मिळत असले तरी कामाचं समाधान न मिळणे; कारण आर्किटेक्ट हा जरा कमी कलाकारच असतो.कलाकार हे बर्यापैकी संवेदनशील असतातंच. त्याशिवाय मुंबई,दिल्ली,पुण्यासारख्या भल्या मोठ्या शहरातल्या आर्किटेक्टकडून काम करुन घेण्याचा ट्रेंड वाढणे आणि त्यामुळे छोट्या शहरातल्या आर्किटेक्टना पुरेशी मागणी नसणे,आधीच्या आर्किटेक्टचे पैसे देणं बाकी असणे,राजकीय सेटींग नसणे ही सुद्धा कारणे असतीलच. या शाखेत भरतीच कमी आहे.पदवीला अंदाजे 120 आणि पदविकेला 100 उत्तीर्ण होतात महाराष्ट्रातून. यावरून प्रमाण बघा.विशेषतः 2008 पासून प्रकर्षाने.आऊटसोर्सिंगही बरंच वाढलंय.१९९० नंतर पॉलिस्टरचं प्रमाण वाढल्याने कपड्यांचं आयुर्मानही वाढलंय. फोटो स्टुडीओ बिजनेस तालुका आणि साधारण जिल्हापातळीवर ठप्प झालेला आहे.स्मार्टफोनमधेच २०-२२ मेगापिक्सेलचे कॅमेरे येताहेत.अर्थात हे स्टील फोटोग्राफीबद्दल. मात्र व्हिडिओ शुटींग करणार्यांना थीम वेडींग,टिव्ही मालिका,सिनेमे,राजकीय सभा इथून मागणी राहीलंच.अर्थात दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या त्या म्हणजे अशा मालिका,सिनेमे,राजकीय सभा आयोजकांकडे 'जॅक लावता येणे आणि त्यांच्याकडून कामाचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत तग धरणे हे जमलं तरंच! सध्या साखर तसेच इतर मोठ्या कारखान्यांमधे अॉटोमेशन वाढतं आहे.गव्हाणीपासुन ते बग्याज आऊटलेट फुल auto, प्रोडक्शन मधे जुस ते पार शुगर्स सायलो पर्यंत आणि को जेन boiler पासुन gas outlet सगळीकडे अॉटोमेशन येतं आहे.अर्थातंच छोटे कारखाने परवडेबल नसल्याने अॉटोमेशनकडे वळण्याची शक्यता कमी आहे;पण मोठ्या कंपन्यांत हे प्रमाण अजून वाढेल. या क्षेत्राबद्दल बर्यापैकी संदिग्धता आहे.काही जण म्हणत आहेत की आयटीला मरण नाही.वाईंडप करायलाच १० वर्षे जातील तर दुसरीकडे क्लाऊड कॉम्प्युटिंग, AI,अॉटोमेशन यांचही प्रमाण या क्षेत्रात वाढतंय त्यामुळे यात सध्या जितके लोक काम करतायत त्यात बर्यापैकी घट होईल.जोडीला या क्षेत्रातला मानसिक ताण आहेच. मिपावर आयटीतले लोक बरेच आहेत त्यामुळे याबद्दल इथल्याच आयटी तज्ञांनी वास्तव सांगावं.
पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना ! नागपूर : विविध बाजारपेठा, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, बस कंडक्टर, फूटपाथ विक्रेते आणि बँकांमध्ये पूर्वी सुट्या पैशांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत होती. सुटी नाणी नसल्यास अनेकदा ग्राहक आणि प्रवाशांचे वाद व्हायचे. मात्र काही वर्षांमध्ये चलनात असलेल्या सुट्या नाण्यांची समस्या पूर्णपणे संपली आहे. एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी आता बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत. बँकांसह विविध दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सुटी नाणी जमा होत आहेत. त्यामुळे आता नाणी नकोच, असे बोलले जात आहे. सुट्या नाण्यांची मागणी घटल्यामुळे बँकांकडेदेखील नाण्यांचा ढीग पडला आहे. त्यामुळे सुट्या नाण्यांचे नेमके काय करायचे, असा प्रश्न बँकांना पडला आहे. नेहमी बाजारात नाणे स्वीकारण्यावरून अफवा पसरत असल्याने ही नाणी चलनात आहे वा नाही, यावर अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्याचप्रमाणे १० रुपयांचे नाणे कुणी स्वीकारण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांचे नाणे सन २००९ मध्ये चलनात आणले. अजूनही ते चलनात असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून, सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. बँकांमध्ये कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही; पण डिजिटल पेमेंटमुळे लोक स्वीकारत नाहीत. याशिवाय सर्वच बाजारपेठांमध्ये नाणे स्वीकारण्यास कुणीही तयार होत नाही. सरकारने एक रुपया, दोन, पाच, दहा रुपयांवर बंदी घातलेली नाही. अनेकदा अफवा पसरत असल्यामुळे नाणी स्वीकारली जात नाहीत. डिजिटल पेमेंटमुळे सर्वच बाजारपेठांमध्ये नाणे स्वीकारणे जवळपास बंदच झाले आहे. वजनात जड आणि आकाराला मोठी असणारी नाणी लोकांकडून नाकारण्यात येतात. यात मुख्यत्त्वे दहा रुपयांच्या नाण्याचा समावेश आहे. सुटी नाणी पर्समध्ये अथवा खिशात बाळगणे आता कठीण जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बँकांनी दहा रुपयांचे नाणे चलनात आणले आहे. हे नाणे आकाराला मोठे आणि वजनदार असल्यामुळे ते अनेकांना भार वाटत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सुट्या पैशांची विशेषतः एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांची चलनात कमतरता भासायची. मात्र आता ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्याने बँकांमधून सुट्या पैशांची मागणी घटली आहे. मात्र बँकांमध्ये चलनातील सर्वच नाणी स्वीकारली जातात. त्यामुळे बँकांमध्ये नोटांसहित दहा रुपयांच्या नाण्यांचाही मोठा साठा शिल्लक आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नाण्यांचे वाटप करावे लागते; पण कुणीही स्वीकारत नाहीत.
साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला. यावल, जि. जळगाव : तालुक्यातील साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला. साकळी येथील उर्दू शाळेसमोर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सभात्याग करत सभा संपेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन दिले. ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हाल्वची पूजा-अर्चा केली. गावातील सार्वजनिक समस्येसाठी अशा प्रकारे प्रथमच आणि अनोखे आंदोलन झाल्याने या आंदोलनाची गावात चर्चा होती. सात-आठ महिन्यांपासून निवेदन देऊनही समस्या न सुटल्याने ३० रोजी झालेल्या मासिक सभेत जगदीश मराठे, सैय्यद अशफाक, बेबाबाई चौधरी, नीलिमा नेवे यांनी सभात्याग केला. या वेळी जि. प. चे माजी सदस्य वसंतराव महाजन यांनी आपली संतप्त भूमिका मांडताना सांगितले की, अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे काही महिन्यांपूर्वी अतिसाराची लागण होऊन एक नऊ वर्षीय बालिका दगावली होती, असा दुर्लक्षित कारभार करून अजून किती लोकांचा जीव घेणार? दरम्यान, ग्रामविकास अधिकारी डी. आर. निकुंभ यांनी आंदोलन ठिकाणी येऊन समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर सोडविणार असल्याचे उपस्थितांसमोर सांगितले. याप्रसंगी जीवन बडगुजर, सचिन चौधरी, संतोष महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. व्हॉल्व्हची दुरूस्ती वेळोवेळी केलेली आहे. विरोधकांजवळ कोणताही मुद्दा नसल्याने विरोधक स्टंटबाजी करीत आहेत. प्रस्तावित राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावातील सर्व जीर्ण व्हॉल्व्ह बदलून नवीन व्हॉव्हल बसविण्यात येतील.
उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जालना/मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणइ सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद महिला आयोगापर्यंत गेला. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून उर्फीला नोटीस पाठवण्यात आली होती. यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावण्यात आली. चित्रा वाघ यांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा राहिला नसल्याचीही चर्चा रंगली. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचे समर्थन नसल्याने त्या कमी पडल्या का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर, भाजपात समर्थक किंवा बेसमर्थक असं काही नाही. चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली त्यांवर बोलायला त्या सक्षम असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची वीज कपात करण्यात आली असल्याचे विचारले असता, लवकरच याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. "भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता," असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलं.
अवघ्या 17 दिवसांत राजकारणात एन्ट्री, थेट बसले आमदराच्या खुर्चीवर! नांदेड, 25 ऑक्टोबर : राजकारणात कधी कोणाचं नशीब उजळेल हे सांगता येत नाही. नांदेडमध्येही मोहन हंबर्डे हे राजकारणात सक्रिय नसतांनादेखील आमदार झाले. तेही 17 दिवसांत. मोहन हंबर्डे यांना काँग्रेसने दक्षिण नांदेडमधून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. 4 सप्टेंबरला त्यांनी अर्ज दाखल केला आणि 24 सप्टेंबरला ते आमदार झाले. मोहन हंबर्डे यांचे सख्खे भाऊ संतुक हंबर्डे हे भाजपाचे महानगराध्यक्ष होते. मागील 5 वर्षांपासून त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. पण ही जागा शिवसेनेला सुटली आणि संतुक हंबर्डे यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. मात्र ध्यानीमनी नसतांना मोहन हंबर्डे हे 17 दिवसांत आमदार झाले. दक्षिणमधून काँग्रेसकडे अनेकांनी उमेदवारी मागीतली होती. पण काँग्रेसला नवा चेहरा हवा होता. हंबर्डे कुटूंबाचा नांदेड ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. तेव्हा याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचं काँग्रेसने ठरवलं. मोहन हंबर्डे यांनी निवडणूक लढवन्याचा आग्रह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यामुळे मोहन हंबर्डे तयार झाले. काँग्रेससाठी मोहन हंबर्डे नवखे असल्याने ते पराभूत होतील असं वाटत होतं. शिवाय या मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील, एमआयएम, वंचित आणि अपक्ष त्यांचे तगडे आव्हान हंबर्डें पुढे होते. पण त्यांना नांदेडकरांनी साथ दिली. अत्यंत अटीतटीच्या लढाईत मोहन हंबर्डे तीन हजार पाचशे मतांनी विजयी झाले. हंबर्डे यांच्या यशाप्रमाणे अशाच एका उमेदवाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशात चर्चा आहे ती चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांची. बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या मातेच्या लेकराने आमदारकी जिंकल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अगदी हालाकीचे दिवस काढत आता विधानसभेत जागा मिळवल्यामुळे जोरगेवार यांनी सगळ्यांचे आभार मानले. यावेळी आपल्या लेकराला मिळालेला बहुमान पाहून आईचा उर भरून आला आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबले नाहीत. जेव्हा जोरगेवार हे विजयी झाल्यानंतर लोकांनी ढोल-ताश्यामध्ये त्यांच्या विजयाची मिरवणूक काढली. त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेचा आपल्या लेकराप्रती बहुमान पाहिल्यानंतर जोरगेवार यांच्या आईला अश्रू अनावर झाले. यानंतर जोरगेवार यांनी आपल्या गळ्यातले सगळे हार काढत आईच्या गळ्यात घातले आणि विजयाचं सगळं श्रेय आईला दिलं. हा प्रसंग पाहिल्यानंतर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. जोरगेवार यांच्या विजयाचं सर्व स्थरातून कौतूक होत आहे. चंद्रपूर मतदारसंघातमध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार भाजप उमेदवाराचा पराभव करत 73 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. आपल्या मुलाचा हा विजय पाहून आईचा उर भरून आला. आईच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू पाहिल्यानंतर जोरगेवारदेखील भाऊक झाले. त्यांच्या यशाचं सर्व श्रेय त्यांनी आईला दिलं आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी आईचा आशीर्वाद घेतला. खरंतर जोरगेवार हे दलित समाजातील आहेत. आपल्या अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी हा विजय मिळवला. जोरगेवार यांच्या आई चंद्रपूर शहरातील गांधी चौकात बांबूच्या टोपल्या विकतात. अगदी हालाकित्या काळात त्यांनी त्यांच्या लेकराला मोठं केलं. त्यामुळेच कदाचित लेकाराचा बहुमान पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. इतर लोकही जोरगेवार यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतूक करत आहेत. दरम्यान, तब्बल 73 हजार मतांच्या फरकाने विजय जोरगेवार यांनी विजय मिळवला आहे. 2014च्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. नंतर त्यांनी शिवसेनेच्या मदतीने निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना काही मतांनी पराभव पत्कारावा लागला. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट देण्यासाठी नकार देण्यात आला. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष उभं राहून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला.
गुलशनाबाद ही नाशिकची ओळख असून देशातच नव्हे तर विदेशातही येथील फुलांचा सुगंध दरवळतो. येथील गुलाब, मोगरा,शेवंतीला मंदिरामधुन मोठी मागणी असते. पण करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मंदिरे बंद असून धार्मिक सोहळ्यावर देखील गंडांतर आले आहे. त्यामुळे श्रावणातही फुलांचा बाजार कोमजल्याचे पहायला मिळत आहे. फुल उत्पादक शेतकर्यांसोबतच विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. फुलांना मागणी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फुलांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधीची उलाढाल थंडावली आहे. करोना संकटाचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रावर पहायला मिळत असून फुल शेती देखील त्यास अपवाद नाही. भाव मिळत नसल्यामुळे अनेकांनी फुलांची बागावर कुऱ्हाड चालवली आहे. झेंडू, गुलाब, मोगरासह सर्वच फुलांची मागणी कमी झाली आहे. श्रावण महिन्यातील देशभरात नाशिकचे फुले पाठवली जातात. त्यातून लाखोंची उलाढाल होते. पण यंदा करोनामुळे ही उलाढाल ठप्प झाली आहे. देशभरात मागील 22 मार्चला लाॅकडाउन जारि करुन तो पाच टप्प्यांमधे वाढविण्यात आला. त्यानंतर सरकारने मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे उद्योग -व्यवसायांना प्रारंभ करण्यात आला. परंतु अद्यापही मंदिर, मश्जिद, गुरूद्वारा, चर्चसह सर्वच प्रार्थनास्ळे बंद असून सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. विवाह सोहळ्याला 50 तर अत्यंविधीला 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे फुलांनी मागणी केवळ 10 ते 15 टक्क्यांवर आली आहेत. तर गतवर्षीपेक्षा बाजार भाव निम्म्यांपेक्षा देखील कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फुल उत्पादकांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. तर विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता प्रार्थनास्थळे केव्हा उघडतात, याकडे सर्वाचेच लक्ष लागुन राहीले आहे. नाशिकचा फुल बाजार हा प्रसिध्द आहे. येथे फुल विक्रिसाठी मोठया संख्येने विक्रेते येतात. पहाटे पाच ते दुपारी १२ या वेळेत हा परिसर नानाविविध फुलांच्या सुंगधाने दरवळतो. रोज लाखोंची उलाढाल होते. पण मागील काही दिवसांपासून करोनामुळे येथील चैतन्य हरवल्याचे पहायला मिळते. येथील फुल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लातूरः जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून मंगळवारी नवे ५१ बाधित रुग्ण आढळले तर १६० कोरोनामुक्त झाले आहेत. आता बाधितांच्या आलेख ८९ हजार ६१७ वर पोहोचला आहे. तर यातील ८६ हजार ३८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर तसेच गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २ हजार २९७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी २९७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. तर १८३५ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून ५१ रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान मंगळवारी पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत घट होत आहे. दररोज हजारावर रुग्णसंख्या गेली होती. मात्र आता दोन अंकी रुग्ण संख्या आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. मृत्यूच्या संख्येतही घट आहे. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ९६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर १३ रुग्ण गंभीर मेकानिकल व्हेंटिलेटरवर आहेत. ५६ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १८३ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु ऑक्सिजनवर आहेत. तर १०६ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु विनाऑक्सिजनवर असून ५७५ रुग्ण सैम्य लक्षणाची उपचार घेत आहेत. ९३४ रुग्णांपैकी ५५८ दवाखान्यात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहेत. तर ३७५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात तसेच कोविड सेंटर आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या १६० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली. सदर रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गांधी चौक,एक हजार मुला मुलींचे वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
गया (बिहार): बिहारच्या गयामध्ये सैन्य अभ्यासादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. होळीच्या रंगात तल्लीन झालेल्या गुलरबेड गावातील एका घरावर लष्करी सराव सुरू असताना अचानक तोफगोळा पडला. तोफेचा गोळा घरात पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच सैन्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अनेकदा पडताहेत तोफेचे गोळेः होळीच्या दिवशी बुधवारी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गयाच्या डोभी ब्लॉकच्या त्रिलोकीपूरमध्ये लष्कराची सराव फायरिंग रेंज चालते. शेजारील गावांना या फायरिंग रेंजचा फटका बसतो आणि अनेकदा तोफांचे गोळे फायरिंग रेंजच्या बाहेर पडतात. गयाच्या बाराछत्ती पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गुलरवेद गावात बुधवारी फायरिंग रेंजचा शेल पडला आणि दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यूः मिळालेल्या माहितीनुसार, मांझी यांच्या घरावर लष्करी सराव गोळीबाराचा शेल पडला होता. या घटनेत त्यांची मुलगी आणि जावयासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कांचन कुमारी, गोविंदा मांझी, सूरज कुमार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्ये गीता कुमारी, पिंटू मांझी, रासो देवी यांचा समावेश आहे. या सर्वांना उत्तम उपचारासाठी मगध मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. होळी खेळत असताना ही घटना घडलीः मिळालेल्या माहितीनुसार, गोला मांझी यांचे कुटुंबीय होळी खेळत होते. दरम्यान, अचानक लष्करी सरावाचा एक तोफगोळा घरात पडला आणि होळीच्या आनंदाचे रूपांतर दुःखद वातावरणात झाले अन् तीन जणांचा मृत्यू झाला. तीन गंभीर जखमी असून, जीवन-मरणाची लढाई लढत आहेत.
केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरु असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. केंद्र सरकारकडून वारंवार सूचना देऊनही ट्विटरने केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे पालन केले नाही. ट्विटरचे हेच वागणे आता अंगाशी आले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९च्या अंतर्गत ट्विटरला मिळालेला सुरक्षेचा अधिकार आता ट्विटरकडून काढून घेण्यात आला आहे. अशाप्रकारे ट्विटरला केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुढील काळात कोणत्याही ट्विटर युझरने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह, चिथावणीखोर ट्विट केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ट्विटरची असणार आहे.
मुंबई-सनी लियोन चा पती आता हिंदी भाषा आणि नृत्याचे धडे गिरवत आहे तर अभिनयाचे मार्गदशन हि तो खुद्द सनी लियोन कडूनच घेतो आहे . सनी आणि तिचा पती डेनीअल आता या निमित्ताने बॉलीवूड मध्ये चर्चेचा विषय बनत आहेत अर्थात चांगल्या चर्चेचा . ... अजून तरी .... .
मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी रविवारी दिल्लीसह काही राज्ये संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीचं काही क्षेत्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यापूर्वी ४८ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत महाराष्ट्रातून येणार्या प्रवाशांच्या आरटी-पीसीआर रिपोर्टचा तपास करण्यात अपयशी ठरल्याबद्दल चार विमान कंपन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, विस्तारा, इंडिगो, स्पाइस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहेत. या प्रकरणी अद्याप या चार एअरलाइन्सकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे.
'शहरातील करोनाबाधितांचे प्रमाण आणि मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील निर्बंधांमध्ये काही अंशी सूट देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. 'शहरातील करोनाबाधितांचे प्रमाण आणि मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील निर्बंधांमध्ये काही अंशी सूट देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यानुसार सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,' अशी ग्वाही राज्याचे पालकमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. कौन्सिल हॉल येथे झालेल्या जिल्हा करोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, एड. अशोक पवार, शरद रणपिसे, राहुल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'पुण्यातील बाधितांचा दर व मृत्यूदर कमी झाला आहे. गेले काही आठवडे त्यातील सातत्य टिकून आहे. त्यामुळे दुकानांची वेळ दुपारी चारऐवजी सातपर्यंत वाढवावी, तसेच शनिवार-रविवारच्या लॉकडाउनबाबतही वेगळा विचार करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सद्यस्थितीची माहिती दिली. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन निर्बंधांमध्ये काही सवलती देण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,' असे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यात ५५ लाख नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले. 'पुणे शहरात सर्व दुकाने व सेवा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सातपर्यंत व शनिवार, रविवारी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे,' असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. 'जम्बो रुग्णालय बंद करू नका' 'करोनाची साथ नियंत्रणात येत असली, तरी ग्रामीण भागांत अजूनही करोना रुग्णांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागांतील अनेक रुग्ण शहरात उपचारासाठी येत असून, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे जम्बो रुग्णालय बंद केले जाऊ नये,' अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. 'विकासपुरुष जनता ठरवेल' उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नुकताच (२२ जुलै) साजरा झाला. या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांचा विकासपुरुष असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावले होते. अजित पवारांच्या समर्थकांनीही फ्लेक्सबाजी करून, त्याला उत्तर दिले होते. त्याबाबत विचारले असता, 'पुण्याचा विकासपुरुष जनताच ठरवेल,' असा टोला अजित पवार यांनी लगावला.
विज्ञान परिषदेतर्फे प्रीती दामले यांचे अवयदानावर शुक्रवारी व्याख्यान - My Marathi\nHome Local Pune विज्ञान परिषदेतर्फे प्रीती दामले यांचे अवयदानावर शुक्रवारी व्याख्यान\nपुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे प्रीती दामले यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. 'अवयवदानाचे महत्व' या विषयावर शुक्रवार, दि. १७ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.\nअवयवदान म्हणजे नेमके काय? कोणकोणते अवयवदान करता येतात? त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे? कायदा काय सांगतो? समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अवयवदानाबाबतच्या संदेशांमध्ये कितपत तथ्य असते? आपल्याला अवयवदान करायचे असल्यास कसे करावे? अवयवदान करणे आज गरजेचे का बनले आहे? अशा विविध प्रश्नांची उकल प्रीती दामले आपल्या व्याख्यानातून करणार आहेत. तेव्हा अधिकाधीक विज्ञानप्रेमी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा व अवयवदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान परिषदेच्या वतीने केले आहे.
End of preview. Expand in Data Studio
README.md exists but content is empty.
Downloads last month
3