text
stringlengths
0
6.48k
.......अविस्मरणीय आठवणी आहेत .
@marathisanmaan @marathiiworld @marathicineyug @marathiasmitaofficial #cinema #marathifilmsfanclub #marathifilm #internationalcinema A post shared by Sandeep Kulkarni (@sandeepkulkarniofficial) on Dec 11, 2019 at 12:18am PST २००५ मध्ये त्यांनी पहिला सिनेमा दिग्दर्शित केला.
तो म्हणजे सुपरहिट डोंबिवली फास्ट.
या सिनेमामुळे निशिकांत कामत हे नाव घराघरात पोहोचलं.
पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आणि त्याला मिळालेलं घवघवीत यश यामुळे दिग्दर्शन वर्तुळात निशिकांत यांचं नाव ठळकपणे घेतलं जाऊ लागलं.
या सिनेमानंतर निशिकांत यांच्यातला दिग्दर्शक पुर्णपणे स्वतंत्र झाला आणि त्यांनी इतर भाषिक सिनेमांचंही दिग्दर्शन करायला सुरुवात केली.
२००७ मध्ये त्यांनी एक तमिळ सिनेमाही दिग्दर्शित केला.
२००८ मध्ये ते पुन्हा एकदा हिंदी सिनेमांकडे वळले आणि 'मुंबई मेरी जान' हा सिनेमा दिग्दर्शित केला.
या सिनेमामुळेही निशिकांत यांच्या नावाची चर्चा झाली.
एकीकडे दिग्दर्शनात घवघवीत यश मिळत असताना त्यांच्यातला अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
२०११ मध्ये आलेल्या ४०४ या हिंदी सिनेमात त्यांनी अभिनय केला.
यानंतर २०११ मध्ये त्यांनी जॉन अब्राहम स्टारर फोर्स सिनेमाचं दिग्दर्शन केलं.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला होता.
या सिनेमाने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली.
यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
दृश्यममुळे निशिकांत कामत आले लाइमलाइटमध्ये२०१५ मध्ये आलेल्या दृश्यम सिनेमामुळे निशिकांत कामत लाइमलाइटमध्ये आले.
निशिकांत यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं.
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
यानंतर २०१६ मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
याशिवाय इरफान खान स्टारर मदारी आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनच्या भावेश जोशी सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता.
निशिकांत कामत यांचे आगामी सिनेमेनिशिकांत सध्या दरबदर या त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते.
२०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.
पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजून पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
सिनेमांशिवाय रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही प्रोग्रामचेही निशिकांत निर्माते होते.
जन्म- १७ जून १९७० मध्ये मुंबईतील दादर येथे निशिकांत यांचा जन्म झाला.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांत यांचं स्वप्न यशाच्या शिखरावर पोहोचण्याचं होतं.
रूईया कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
पुरस्कार- निशिकांत यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे.
२००६ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
तसेच या सिनेमासाठी फिल्मफेअरचा बेस्ट क्रिटिक अवॉर्डही मिळाला होता.
मुंबई: राजस्थानात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतल्यानं तेथील सत्तांतराची चर्चा फोल ठरली आहे.
तेथील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
तसंच, महाराष्ट्रातील सरकार कोसळण्याची भाकिते करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरही सडकून टीका करण्यात आली आहे.
वाचा: ४८ तासांत माफी मागा नाहीतर.
.. राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीसनारायण राणे यांनी अलीकडेच बोलताना राज्यातील सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळेल, असं भाकीत केलं होतं.
'राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाही.
आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असं राणे म्हणाले होते.
वाचा: 'उद्धव ठाकरे, तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल'राजस्थानातील कथित 'ऑपरेशन कमळ'वर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपचे खासदार नारायण राणे यांचाही समाचार घेतला आहे.
शिवसेनेनं त्यांना 'भोंदू डॉक्टर' म्हणून हिणवलं आहे.
'काही ऑपरेशन टेबलावरच फसतात.
महाराष्ट्रातील पहाटेचे ऑपरेशन फसले.
आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे,' असा टोला शिवसेनेनं राणे यांचं नाव न घेता हाणला आहे.
Live: राज्यातील सर्व ठळक घडामोडी एकाच क्लिकवर'राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'ऑपरेशन कमळ'चेच ऑपरेशन करून भाजपला धडा शिकवला.
तिथे ऑपरेशन महिनाभर चालूनही फसले.
भाजपनं आता तरी धडा घ्यावा.
थोडे थांबावे आणि पुढे जावे, कारण वळणावर धोका आहे,' असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
दावा सोशल मीडियावर एका पत्राचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
कथित पणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमिपूजनावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिले आहे.
या पत्रात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तूती केली आहे.
या पत्रात लिहिले आहे की, प्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्वात आधी मी तुम्हाला व तुमच्या टीमला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठीच्या योगदानाबद्दल शुभेच्छा देतो.
राम मंदिर एक मैलाचा दगड बनवण्यासाठी हिंदू नेहमी तुमचे व तुमच्या टीमचे आभारी राहतील.
जो एक हिंदू राष्ट्रसाठी नवीन इतिहास बनणार आहे.
२०२२ निवडणुकीसाठी तुम्हाला आम्ही आताच शुभेच्छा देतो.
मी राम मंदिराच्या निर्माणासाठी लवकरात लवकर ५० कोटी रुपये पाठवत आहे.
या पत्रावर मोदी यांची कथित स्वाक्षरी सुद्धा आहे.
यावर ७ ऑगस्ट २०२० ची तारीख आहे.
शेयर करण्यात येत असलेले पत्र फेक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असे कोणतेही पत्र लिहिले नाही.
प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या फॅक्ट चेकच्या टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या पत्राला फेक असल्याचे म्हटले आहे.
हायलाइट्स:देशभरात मुहर्रम जुलूस काढण्यासाठी याचिकाविशिष्ट ठिकाणी असतं तर धोका लक्षात घेऊन परवानगी देणं शक्य - सर्वोच्च न्यायालयपुढील सुनावणी येत्या सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी होणार नवी दिल्ली : करोनाकाळात पाच जणांसहीत मुहर्रम जुलूसला सर्वोच्च न्यायालयानं सध्या तरी परवानगी देण्यास नकार दर्शवला आहे.
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाब यांनी संपूर्ण देशभरात मुहर्रम जुलूस काढण्याची परवानगी मागितली होती.
याचिकाकर्त्यांनी सरकारी गाईडलाईन्सची काळजी घेतली जाईल.
तसंच यात्रेत केवळ पाच लोक सहभागी होतील, असं म्हटलं होतं.
या प्रकरणाची पुढली सुनावणी सोमवारी होणार आहे.
जुलूस काढण्यास परवानगी दिली तर पुन्हा एका समुदायाला करोना फैलावण्याच्या नावावर निशाण्यावर घेतलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला हे नकोय.
लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालय देणार नाही असंही न्यायालयानं म्हटलंय.
मुहर्रम जुलूस संपूर्ण देशात ठिकठिकाणी निघेल यासाठी प्रत्येक राज्य सरकारची परवानगी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलंय.
यावर, याचिकाकर्त्यांनी मुहर्रम जुलूस प्रत्येक वर्षी निघतो, असं म्हटलं.
यावर, करोना मात्र प्रत्येक वर्षी नसतो, असं प्रत्यूत्तर न्यायालयानं दिलं.
वाचा :नवा रेकॉर्ड!
देशात २४ तासांत ७५ हजारांहून अधिक नवीन रुग्ण दाखलवाचा :परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची सूचना'.
.. म्हणून जगन्नाथ पुरी यात्रेला मिळाली परवानगी'न्यायालयात मुहर्रमला परवानगी देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी जगन्नाथपुरी यात्रेचं उदाहरण दिलं.
यावर सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 'तुम्ही संपूर्ण देशभरात जुलूस काढण्याची परवानगी मागत आहात.
जगन्नाथ पुरी यात्रा एका विशिष्ट जागेवरच होते.
इथे एक रथ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो.
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो' असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.
जगन्नाथ पुरी यात्रेसाठीही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी नाकारली होती.
'यात्रेची परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत.
महामारीच्या काळात असं आयोजन केलं जाऊ शकत नाही' असं म्हणत परवानगी नाकारण्यात आली होती.
परंतु, पुनर्विचार याचिका दाखल झाल्यानंतर काही अटींसहीत न्यायालयानं यात्रेची परवानगी दिली होती.
देशभरात मुहर्रम जुलूसला परवानगी देण्यास न्यायालयाचा नकारवाचा :'बाहुबली' आमदार मुख्तार अन्सारीच्या अवैध बांधकामांवर बुलडोझरवाचा :लज्जास्पद!
विधवा महिला, दिव्यांग व्यक्तीच्या तोंडाला काळं फासून गावभर धिंड
प्रतिनिधी, पुणेपुणे शहर आणि जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, १२ ऑगस्टपर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
पूर्ण जिल्ह्यात सध्या एक लाख १५ हजार १२८ करोनाबाधित असून, त्यापैकी ८६ हजार ८१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
मात्र, गेल्या चाळीस दिवसांत करोनामुळे १८१३ मृत्यूही झाले आहेत.
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने करोनाबाबतची मार्च महिन्यापासूनची आकडेवारी जाहीर केली आहे.
पुण्यात मार्चअखेर ४३ रुग्णांची नोंद झाली होती.
त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर १६ जण करोनामुक्त झाले होते.
करोनाची लागण झालेल्या पहिल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ ३७ टक्के इतके होते.
प्रशासनाने गेल्या चार महिन्यांत करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगाने वाढले असून, १२ ऑगस्टपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील ७५.
४० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
शहर आणि जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १९ जूनला १३ हजार ७५९ इतकी रुग्णसंख्या होती.
त्यामध्ये वेगाने वाढ होऊन २८ जुलैला हीच संख्या ८१ हजारांच्या घरात पोहोचली.
मात्र, त्याच वेगाने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून, ७५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात २६ जुलैनंतर करोनाबाधितांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वाटत होती.
मात्र, लागण होण्याचे प्रमाण तितकेसे कमी न झाल्याने प्रशासनापुढील चिंता कायम आहे.
त्यातच लॉकडाउन शिथिल झाले असल्याने व्यवहार पूर्ववत होत आहेत.
त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा रुग्णवाढीचा आलेख उंचावला, तर त्याला तोंड देण्यासाठी जंबो रुग्णालये लवकर साकारणे आवश्यक आहे.
तारीख रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण टक्केवारी ३० मार्च ४३ १६ ३७.