text
stringlengths
0
6.48k
२१ १५ एप्रिल ४३७ ४३ ९.
८४ ३ मे २९५१ ४९९ २४.
३३ १७ मे ४०१८ २०१४ ५०.
१२ १९ जून १३७५० ८५२४ ६१.
९९२८ जुलै ८१०५६ ५१६२९ ६३.
६९१२ ऑगस्ट ११५१२८ ८६८१७ ७५.
४०गेल्या महिन्यात सर्वाधिक मृत्यूपुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जुलैपर्यंत ८०६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
एकूण रुग्णांची संख्या २९ हजार ९४४ इतकी होती, तर मृत्यूदर ३.
२३ टक्के होता.
दोन जुलै ते १२ ऑगस्ट यादरम्यान रुग्णसंख्येने एक लाख १५ हजारांचा टप्पा ओलांडला.
या ४० दिवसांत १८१३ मृत्यू नोंदवले गेले.
प्रतिनिधी, पुणेकरोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा मिळाल्यास उपचार करणे शक्य होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तपेढ्यांकडे धाव घेतली.
मात्र, शनिवारी दिवसभरात ओ आणि बी पॉझिटिव्हसह अन्य रक्तगटाचे प्लाझ्मा मिळू शकले नाहीत.
प्लाझ्मासाठी मागणी वाढली असली, तरी त्या तुलनेत दाते तसेच प्लाझ्मा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून 'प्लाझ्मा देता का प्लाझ्मा' अशी विनवणी सुरू झाली आहे.
शहरातील रुग्णालयांमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर जाणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.
आजमितीला शहरातील रुग्णांची संख्या पाहता दोन हजारपेक्षा रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्याही चारशेच्या घरात आहे.
अशा गंभीर रुग्णांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडासह अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी नाही.
अशा रुग्णांना जीवदान देण्यासाठी ससून, नवले रुग्णालय आणि पूना हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीचे उपचार सुरू आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यासाठी देशातील मोजक्याच रुग्णालयांना परवानगी दिली आहे.
काही प्रमाणात प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असून रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
त्यामुळे उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांकडून प्लाझ्मा आणण्याची सूचना नातेवाइकांना केली जात आहे.
त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाइक रक्तपेढ्यांकडे धाव घेत असून प्लाझ्माची मागणी करीत आहेत.
परंतु, रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नसल्याने त्यांच्याकडून नकार दिला जात आहे.
जनकल्याण रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ.
अतुल कुलकर्णी म्हणाले, 'सध्या प्लाझ्मास मोठी मागणी आहे.
गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णांचे नातेवाइक; तसेच रुग्णालयांकडून प्लाझ्मासाठी चौकशी सुरू आहे.
प्लाझ्मा देण्यास रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नाही.
त्याबाबतची नियमावलीदेखील स्पष्ट नाही.
राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे आम्ही याबाबत पाठपुरावा करीत आहोत.
प्लाझ्माची गरज पाहता करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांनी दान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
'रुग्णाचे नातेवाइक पंकज भावसार म्हणाले, 'माझ्या सासऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला.
डॉक्टरांनी प्लाझ्मा आणण्यास सांगितले.
अनेक ठिकाणी चौकशी केली.
मित्रांकडे विचारणा केली.
पण प्लाझ्मा कोठेच मिळाला नाही.
अखेर रक्तपेढ्यांशी संपर्क केला.
परंतु, त्यांच्याकडे उपलब्धता नाही.
'सध्या डेंगीच्या आजाराच्या रुग्णांना प्लेटलेटची मागणी होत आहे.
त्याकरिता प्लाझ्मासाठी मागणी वाढली आहे.
परंतु, दाते मिळत नाहीत.
त्याशिवाय रक्तपेढ्यांमध्ये अद्याप ते मिळत नसल्याने आम्हीच दाते पुरवित आहोत.
शनिवारी दिवसभरत ओ आणि बी पॉझिटिव्ह या रक्तगटाचा प्लाझ्मा कोठेच उपलब्ध झाला नाही.
दात्यांनी पुढे यायला हवे तरच तुटवडा दूर होईल.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्टसद्यस्थितीत करोनाची भीती, सामाजिक दडपण, कुटुंबातून प्रोत्साहन नसल्याने दाते पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
काही जणांनी रक्तदान केले नाही.
प्लाझ्मा दान हा रक्तदानाचा पुढचा टप्पा आहे.
रक्त काढून प्लाझ्मा तयार करण्याबबात रक्तपेढ्यांमध्ये जागृती नाही.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी जून महिन्यापर्यंत बरे झालेल े रुग्ण पात्र ठरणार आहेत.
- डॉ.
अतुल कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, जनकल्याण रक्तपेढी
नवी दिल्लीः गलवान खोऱ्याच्या उत्तरेस असलेल्या डेपसांगच्या मैदानावरून सैनिकांना मागे हटवण्याच्या मुद्द्यावर भारत आणि चीन सैन्यात मेजर जनरल स्तरावर सुरू आहे.
ही बैठक दौलत बेग ओल्डी येथे सुरू आहे.
भारताकडून ३ माउंटन डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अभिजित बापट हे भारताच्या वतीने चर्चेचे नेतृत्व करत आहेत.
तर चीनच्या वतीने पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) वरिष्ठ कर्नल हान रुई थेआ हे बैठकीचे नेतृत्व करत आहेत.
ही बैठक आज सकाळी सुरू झाली आहे.
गलवान खोऱ्यात उत्तर भागात असलेल्या डेपसांगच्या मैदानावरून सैनिक मागे हटवण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे.
डेपसांगच्या विरोधी दिशेला सुमारे १५ हजार चिनी सैनिकांना तैनात आहेत.
या बैठकीत १६००० फूट उंचीवरील ९०० चौरस किलोमीटर मैदानी भागातून सैनिक मागे घेण्याबाबत आणि तिथून हटवण्याच्या यंत्रणेवर काम करण्यासंदर्भात चर्चा होईल.
एलएसीवर (प्रत्यक्ष ताबा रेषा) यथास्थिती निर्माण करण्यासाठी कमांडर स्तरावर चर्चा झाली होती.
पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.
यानंतर आज मेजर जनरल स्तरीय चर्चा होत आहे.
भारतीय लष्कराचा डेपसांगच्या मैदानावर वचक आहे.
तर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी त्याच्या पूर्वेकडे आहे.
दौलत बेग ओल्डीच्या मोक्याच्या हवाई तळापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'बॉटलनेक' नावाच्या भागावर चिनी सैन्याने लक्ष केंद्रीत केलं आहे.
दोन्ही बाजूचे सैनिक गस्त घालण्यापासून एकमेकांना विरोध करत आहेत.
तिथे प्रत्यक्ष ताबा रेषेची धारणा कित्येक किलोमीटरने बदलते.
६ जूनपासून ते आतापर्यंत भारत आणि चिनी सैन्यात पाच बैठका झाल्या आहेत.
आता ही सहावी बैठक आहे.
बोगस करोना रिपोर्ट फक्त १ हजार रुपयांत, असा झाला भांडाफोडकुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेशचीनची घुसखोरी चीन भारतीय सीमेत सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये यावरूनच रक्तरंजित संघर्ष झाला होता.
ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते.
त्याचबरोबर उत्तर लद्दाखच्या डेपसांग-डीबीओ भागांमध्ये नवीन मोर्चा उघडण्याचा चीनचा कुटील डाव आहे.
डेपसांगमध्ये भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनने सैनिकांची तैनाती पूर्वीपेक्षा जास्त वाढवली आहे.
चिनी वाहनांची हालचाल वाढली आहे.
भारतीय सैनिकांनी त्यांना सहसा तिथून पिटाळून लावतात.
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे.
प्रतिनिधी, पुणे करोनाचे वाढते आकडे सातत्याने धडकी भरवत असताना पुणेकरांसाठी येत्या दोन-तीन आठवड्यांनंतर दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत यापूर्वी प्रादुर्भावाचा उच्चांक असलेली असलेली परिस्थिती सध्या पुण्यात निर्माण झालेली आहे.
मुंबईचा अनुभव पाहता पुण्यातील ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे.
त्यानंतर पुण्यातील करोनाचा जोर ओसरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले, 'जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि पुण्यातील प्रादुर्भावाची तुलना केली असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र दिसते आहे.
मुंबईमध्ये १४ जूनच्या सुमारास करोना संसर्गाचा उच्चांक गाठला होता.
पुण्यात उच्चांक गाठण्यासाठी २६ जुलै उजाडला.
त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवड्यांनंतर पुण्यातील प्रादुर्भाव ओसरण्यास सुरुवात होईल.
' मुंबई आणि पुण्यातील आकडेवारीचे तौलनिक विश्लेषण करताना राव म्हणाले, 'पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा या सर्व ठिकाणची परिस्थिती पुणे म्हणून गृहीत धरण्यात आली आहे.
पुण्यातील करोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर पोहोचला आहे.
पुण्यात दहा लाख लोकसंख्येमागे दर दिवशी ९३० चाचण्या करण्यात येत आहेत.
ही संख्या राज्यात सर्वाधिक असून, राज्यात सरासरी ३१५ तर मुंबईत ६१० चाचण्या केल्या जातात.
' 'मुंबईतील हिट रेट (एकूण चाचण्या आणि त्यातुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या) १४ टक्के आहे; तर, पुण्याचा २१ टक्के आहे.
मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दर दिवशी एक टक्का आहे.
पुण्यात सध्या ते तीन टक्के आहे.
पुण्याचा दर एक टक्क्यांपर्यंत कमी आल्यानंतर येथील बाधितांची संख्याही घटेल,' अशी माहिती राव यांनी दिली.
पुण्यातील परिस्थितीत आटोक्यात येण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यानेची शक्यता गृहीत धरूनच जंबो रुग्णालयांची उभारणी सुरू करण्यात आली आहे.
पुणेकरांसाठी पुढील दोन ते तीन आठवडे महत्त्वाचे असून, या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजचे आहे.
हिट रेट २५ टक्के मुंबईचा सरासरी 'हिट रेट' हा २२ टक्के इतका आहे.
मात्र, गेल्या एका आठवड्यातील परिस्थिती पाहता हा दर १४ टक्क्यांपर्यंत खाली आहे.
पुण्याचा सरासरी 'हिट रेट' हा २१ टक्के इतका आहे.
मात्र, गेल्या आठवड्यातील परिस्थिती पाहता हा दर २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
पुण्यातील 'हिट रेट' कमी होण्यास सुरूवात झाली की, करोनाचा जोर ओसरण्यास सुरुवात झाल्याचे ते निदर्शक असणार आहे.