text
stringlengths
0
6.48k
राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास, अशी खंत व्यक्त करतानाच भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे.
पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे.
पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील.
त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील.
बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला.
राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे.
श्रीरामाचीही तीच इच्छा असेल!
सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेनेने ही सल बोलून दाखवली आहे.
राम मंदिर भूमिपूजनः दिव्यांच्या तेजात अशी उजळली अयोध्या, सर्वत्र राम नामाचा जयघोषशिवसेनेने काय म्हटलं?
>> डॉ.
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी.
व्ही.
नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल.
तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते.
राममंदिर निर्माणासाठी अनेकांनी वेगवेगळय़ा प्रकारे किंमत मोजली आणि योगदान दिले ते असे.
>> बाबरीचा ढाचा संपूर्ण जमीनदोस्त होताच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला.
राममंदिरासाठी कल्याणसिंग यांनी आपल्या सरकारचाच त्याग केला.
ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा.
>> राममंदिराच्या लढ्याने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे.
लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली.
देशातील बहुसंख्य हिंदूंच्या छातीवर पाय देऊन कुणाला राजकारण करता येणार नाही.
निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही.
हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही.
राम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्हणाले.
..अकलेचे तारे तोडले, पाकच्या नव्या नकाशावर भारताचे सणसणीत उत्तर
दावा सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे.
ज्यात न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेयरवर लावलेल्या बिलबोर्ड्समध्ये भगवान रामचा फोटो दिसत आहे.
दावा करण्यात येत आहे की, अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनाच्या आनंदाने बिलबोर्डावर भगवान राम यांचा फोटो लावला आहे.
हा फोटो फेक आहे आणि अन्य एका फोटोसोबत छेडछाड करून हा फोटो बनवला आहे.
काही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने आम्ही फोटोला सर्च केले.
त्यानंतर आम्हाला खरा फोटो मिळाला.
पाहा खरा फोटो खऱ्या फोटोला एडिट करुन त्यात भगवान रामचा फोटो जोडला गेला आहे.
पाहा खरा आणि फेक फोटो एकत्र आम्हाला एक अशीच वेबसाईट मिळाली.
या वरून कोणीही युजर टाइम्स स्क्वेयरच्या याच फोटोवर आपल्या मनपसंतीचा फोटो लावू शकतो.
निष्कर्ष टाइम्स स्क्वेयर बिलबोर्ड वर भगवान रामचा फोटो फेक आहे, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी, मुंबईसरासरी वीज बिलाचा भरणा केलेल्या ग्राहकांच्या बिलातून महावितरणने युनिटऐवजी रकमेची वजावट केल्याने ग्राहकांना जबर फटका बसला आहे.
हा फटका काही हजार रुपयांत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने काही वीजबिलांचा अभ्यास केला.
त्यानुसार एका ग्राहकाचा लॉकडाउन काळात (१९ मार्च ते १८ जून) या काळात एकूण २४७४ युनिट वीज वापर झाला.
त्यापोटी त्याचे वीज आकार शुल्क २२ हजार ९१२ रुपये अर्थात, सरासरी ९.
२६ रुपये प्रति युनिट होते.
या ग्राहकाने लॉकडाउन काळात एकूण ५३४ युनिट वीज देयकाचा भरणा केलेला आहे.
२४७४ मधून ५३४ युनिट थेट वजा केल्यास व उर्वरित १९४० युनिट्सचा ९.
२६ रुपये प्रति युनिट या दराने गुणाकार केला तरी वीज आकार फक्त १७ हजार ९६४ रुपये होतो.
परंतु महावितरणने तब्बल २२ हजार ९१२ रुपयांचे बिल पाठवत लूट केलेली आहे.
अन्य एका देयकात, ग्राहकाचा लॉकडाऊन काळातील वीज वापर १५७५ युनिट होता.
त्यानुसार या ग्राहकाला १२ हजार ४११ रुपये वीज आकारानुसार (सरासरी ७.
८८ रुपये प्रति युनिट) देयक पाठविण्यात आले.
या ग्राहकाने ७६४ युनिट्स वीज वापराच्या देयकाचा लॉकडाऊन काळात भरणा केला.
यामध्ये महावितरणने १५७५ मधून ७६४ वजा करून या ग्राहकाला वीज बिल पाठवणे अत्यावश्यक होते.
तसे केले असते तर ८११ युनिट्ससाठी ७.
८८ रुपये प्रति युनिट दराने या ग्राहकाला १२ हजार ४११ रुपयांऐवजी फक्त ६ हजार ९३० रुपयांच्या वीज आकाराचे बिल आले असते.
पण महावितरणकडून मोठी वसुली झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आणखी एका देयकात ग्राहकाचा लॉकडाउन काळातील वीज वापर १४८९ युनिट्स होता.
या ग्राहकाने लॉकडाऊन काळात ६२७ युनिट्सचा भरणा केला.
या ग्राहकाला ९,१९० रुपयांचे (प्रति युनिट सरासरी ६.
१७ रुपये) बिल पाठविण्यात आले.
त्याऐवजी १४८९ मधून ६२७ युनिट्स वजा करून ८६२ युनिट्सचे देयक पाठवले असते तर या ग्राहकाचा वीज आकार जेमतेम ५ हजार ३२० रुपये असता.
प्रत्यक्षात तो खूप अधिक आला आहे.
वजावटीत सुसूत्रताच नाहीलॉकडाउन काळात सरासरी भरणा केलेल्या ग्राहकांना अदानी इलेक्ट्रिसिटी व बेस्टने युनिटची वजावट दिली आहे.
महावितरणने मात्र रकमेची वजावट दिली.
यामध्ये कुठल्याही नियमाचे उल्लंघन नसले तरी वजावट किंवा समायोजनात सुसूत्रता नाही व त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
खास प्रतिनिधी, नाशिकशहरात संततधार पावसाने दमदार हजेरी लावली असून, त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली आहे.
गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायाच्या पोटरीपर्यंत पाणी आले आहे.
पुढील दोन दिवस ग्रामीण भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने धरणातील विसर्ग वाढल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नदीकाठालगतच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शहरात आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढू लागला आहे.
विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अधिक असल्याने धरणांमधील पाणीपातळीत गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे.
त्यामुळे गंगापूर धरणातून शनिवारी सायंकाळी विसर्गही वाढविण्यात आला.
धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि शहरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतदेखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असून, या हंगामात पहिल्यांदाच गोदाघाटावरील मारुतीच्या मूर्तीला नदीपात्रातील पाण्याचा स्पर्श झाला आहे.
हे पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे संकेत मानले जाते.
येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळपासून वाढत चाललेल्या पावसाच्या जोरामुळे हा अंदाज खरा ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर अधिक वेगाने विसर्ग केला जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.
त्यामुळे गोदावरीत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या रविवारी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला.
५०० क्यूसेक वेगाने हा विसर्ग सुरू होता.
पावसाचा जोर वाढल्याने सध्या गंगापूर धरणातून १५०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
परंतु, शहरातील होळकर पुलाखालून मात्र २८०० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
त्यामुळे गोदाघाटावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे चित्र आहे.
वृत्तसेवा, ठाणेपावसाळी पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी, त्यातून होणारे अपघात आणि इतर आपत्ती टाळण्यासाठी गेली काही वर्षे ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना अशा ठिकाणी मज्जाव केला जातो.
यंदा तर करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील जंगल आणि जलाशयांच्या काठी हे नियम खुंटीला टांगले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे.
गेल्या शनिवार, रविवारी मुंबई, ठाण्यातील अनेक पर्यटक चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी येऊन या भागात संचार करीत होते.
या पर्यटकांनी तोंडावर मास्क बांधण्याचे सौजन्यही दाखविलेले नव्हते.
बारवी धरण परिसरात दिवसभर पर्यटकांची वर्दळ होती.
धरणाच्या पात्राचा सेल्फी पॉइंटसारखा वापर करून समूह छायाचित्रण सुरू होते.
त्यापुढे असलेल्या जंगलात तर चक्क रस्त्याशेजारी बैठक मारून काही पर्यटक दारू पिताना दिसत होते.
अनेक गाड्या रस्त्यावर होत्या.
त्यावरून जंगलाच्या आतही काही पर्यटक गेल्याचे समोर आले.
त्यांना हटकण्यासाठी त्या संपूर्ण आठ-दहा किलोमीटरच्या रस्त्यावर वन विभाग अथवा पोलिसांपैकी कुणाचाही पहारा नव्हता.
जणू काही बारवीचे जंगल पर्यटकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती शनिवार-रविवारी दिसली.
महामार्गावरून जोरात वाहने हाकत वाट फुटेल तिकडे पर्यटकांचा संचार सुरू होता.
गेले महिनाभर हा धुडगूस कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे.
२४ जुलैच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने या वास्तवाकडे लक्ष वेधले होते.
मात्र पर्यटनस्थळी चौक्या, पहारे नसल्याने पर्यटकांचे फावत आहे.
धाबे, हॉटेलकडून नियमभंगपार्सलसेवेचे बंध मोडून महामार्गावरील अनेक धाबे मालकांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ बसून खाण्यास परवानगी दिल्याचे दिसून आले.