text stringlengths 0 6.48k |
|---|
हॉटेल आणि धाबे मालकांनी अनधिकृत सुरू केलेले हे 'बिगिन अगेन' पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडले. |
माळशेजमध्ये मात्र मज्जावमाळशेज घाट परिसरात मात्र पर्यटकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. |
घाटाच्या पायथ्याशीच महामार्गावर पोलिस पहारा होता. |
माळशेजकडे जाणाऱ्या आडवाटांवरही पोलिस प्रवाशांना हटकताना दिसत होते. |
त्यामुळे माळशेज घाट परिसरात पर्यटकांचा उच्छाद नव्हता. |
मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. |
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे. |
सुशांत प्रकरणात सरकारमधील मंत्र्यावर आरोप करणारे आमदार नीतेश राणे यांनीही या निकालानंतर ट्वीट केलं आहे. |
त्यांच्या ट्वीटमुळं वेगळीच चर्चा रंगली आहे. |
वाचा: गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत; राजीनाम्याची मागणीसुरुवातीला बॉलिवूडमधील व्यावसायिक स्पर्धेपर्यंत मर्यादित असलेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. |
भाजपच्या कुठल्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता. |
शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी राजकीय हाडवैर असलेले भाजपचे खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी या संदर्भात अनेकदा थेट ट्वीट केले होते. |
सातत्यानं आरोप होऊनही राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयला देण्यास नकार दिला होता. |
मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत असून इतर कुठल्याही यंत्रणेमार्फत तपासाची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. |
त्यानंतरही सीबीआय चौकशीची मागणी थांबत नव्हती. |
सर्वोच्च न्यायालयानं मात्र सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचे निर्देश दिले आहेत. |
त्यामुळं भाजप आता आणखी आक्रमक झाला आहे. |
भाजपच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. |
नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे. |
'अब बेबी पेंग्विन तो गियो. |
.. इट्स शो टाइम' असं त्यांनी म्हटलं आहे. |
#JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. |
त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. |
वाचा: आता न्याय होणार! |
भाजपने ठाकरे सरकारला घेरले! |
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी हवेत आरोप करू नका. |
हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन आरोप करा, असं खुलं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. |
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज थेट भाजपचं नाव घेऊन हे आव्हान दिलं. |
कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये. |
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा. |
पुरावे घेऊन पुढे या, असं राऊत म्हणाले. |
आदित्य ठाकरे हे राजकारणातील उभरतं नेतृत्व आहे. |
त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. |
पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते चांगलं काम करत आहेत. |
त्यांचं हे काम अनेकांना खूपत आहे. |
कोविड सेंटर उभारण्यात त्यांची मोठी कामगिरी आहे. |
एका चांगल्या नेतृत्वाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खपवून घेतलं जाणार नाही, असं राऊत म्हणाले. |
संजय राऊत गोत्यात; सुशांतचा भाऊ ठोकणार अब्रुनुकसानीचा दावामुंबई पोलीस सुशांत प्रकरणाचा तपास करत आहेत. |
मात्र पहिल्या दिवसांपासून तपासात अडथळे आणले जात आहेत. |
खोटी माहिती जोडली जात आहे. |
खोटेपणाची सुरुवात ज्यांनी केली. |
त्यांनी आता माघार घ्यावी, असं सांगतानाच जे लोक मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहेत. |
ते लोक आपल्याच राज्याची बदनामी करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. |
सुशांतसिंह हा महाराष्ट्राचा मुलगा आहे. |
त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाची आम्हाला काळजी आहे. |
संवेदना आहे. |
या महाराष्ट्राच्या मुलाला आम्ही संपूर्ण न्याय देऊ, असं सांगतानाच सीबीआयपेक्षा आधी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येऊ द्या, असंही ते म्हणाले. |
बिहार पोलीस या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. |
ईडीच्या चौकशीत रियाने लपवला स्वतःचा अजून एक फोन नंबरफडणवीसांवर टीकाकर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला असून त्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले आहेत. |
त्यावरून राऊत यांनी राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. |
मध्यप्रदेशमध्ये पुतळा हटविला गेला होता. |
तेव्हा फडणवीसांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दम दिला होता. |
आता कर्नाटकातील पुतळा हटवला गेला आहे. |
त्यामुळे फडणवीस यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांना दम द्यावा, असा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे. |
व्हिडिओ व्हायरल, सुशांतसिंह एवढा आनंदी कधीच नव्हता |
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. |
सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. |
राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. |
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे. |
राहुल हा कुविख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत. |
ऑगस्ट २०१९मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची हत्या केली होती. |
लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती. |
तसेच २० जून २०२०मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती. |
त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही २४ जून २०२०मध्ये एकाची हत्या केली होती. |
दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. |
त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
राहुलने मुंबईत वांद्रे येथे जानेवारीत सलमानची रेकी केली होती. |
त्यासाठी तो दोन दिवस मुंबईत थांबला होता. |
यावेळी सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवून असायचा. |
पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी त्याला उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथून अटक केली. |
त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. |
मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. |
त्याची निमका तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. |
सलमान पैसे वाटायला येणार; भिवंडीत अफवापोलीस अधिकारी राजेश दुग्गल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. |
राहुलने जानेवारी २०२०मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराच्या इशाऱ्यावरून सलमानच्या घराची रेकी केली होती. |
त्यानंतर त्याने राजस्थानच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला रेकीची माहिती दिली होती, असं दुग्गल यांनी सांगितलं. |
रेकी केल्यानंतर राहुल पुन्हा राजस्थानात आला. |
त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला. |
दरम्यान, राहुलला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
बर्थ डे स्पेशल: सलमानचे 'दबंग' डायलॉग्सरुग्णालयात जाण्यापूर्वी भावूक झाला संजय; म्हणाला'माझ्यासाठी प्रार्थना करा' |
ठाणे: गणेशोत्सावाच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नवीन योजना आखली आहे. |
विसर्जनस्थळी गर्दी होऊन करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आता गणेश विसर्जनासाठी प्रत्येकाला वेळ देण्यात येणार आहे. |
ऑनलाइनच्या माध्यामातून हे टाइम स्लॉट देण्यात येणार आहेत. |
महापालिका प्रशासनाने ही योजना आखली आहे. |
यंदा गणेशोत्सवात डीजी प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. |
करोनाचं संकट पाहता प्रशासनाने बनविलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. |
विपिन शर्मा यांनी केलं आहे. |
पोलीस आणि पालिका प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. |
सोशल डिस्टन्सिंगचं पालन पालन व्हावं आणि विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने १३ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. |
तर २० ठिकाणी मूर्ती स्वीकारण्याचं केंद्र तयार करण्यात आली आहेत. |
गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने डीजी ठाणे कोविड१९ डॅशबोर्डावर जाऊन ऑनलाइन टाइम स्लॉट घ्यावा लागणार आहे. |
या डॅशबोर्डवर जाऊन गणेश भक्तांना विसर्जनाची वेळ बुक करावी लागणार आहे. |
आजपासूनच ठाणेकर या योजनेचा लाभ उठवू शकणार आहेत. |
त्यासाठी www. |
covidthane. |
org या संकेतस्थळावर जाऊन टाइम स्लॉट बुक करता येणार आहे. |
दरम्याना, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहत असलेल्या गणेश भक्तांना झोनच्या बाहेर जाऊन गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. |
त्यांना आपल्या सोसायटी किंवा घरांच्या परिसरातच गणेश विसर्जन करावं लागणार आहे. |
राष्ट्रवादीमध्ये काहीतरी घडतंय? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.