text
stringlengths
0
6.48k
‌वृत्तसंस्था, नवी दिल्लीदिल्ली विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन बसण्यास (ओबीई) दिल्ली उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनांसह परवानगी दिली आहे.
या परीक्षा येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणारआहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत, विद्यार्थ्यांना ईमेल आणि विद्यापीठाच्या पोर्टलवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
तसेच उत्तर पत्रिका अपलोड करण्यास त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात यावा, असे निर्देश न्यायमूर्ती प्रतिभा एम.
सिंह यांनी दिले.
तसेच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना 'ऑटो जनरेटेड' ईमेल पाठवण्याचे निर्देश देतानाच, विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर, याची माहिती देणारा मेलही विद्यार्थ्यांना गेला पाहिजे, असे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे नोडल अधिकारी आणि सेंट्रल इमेल आयडीच्या संदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली विद्यापीठाने ठरवलेल्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये पुस्तक घेऊन बसण्याच्या निर्णयाला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते.
यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.
यावेळी न्या.
सिंह यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छाही दिल्या.
येत्या १० ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाइन ओपन बुक परीक्षा (ओबीई) होणार असून, जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार नाहीत, त्यांना वर्गामध्ये बसून परीक्षा देण्याचीही संधी मिळणार आहे.
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील.
न्यायालयाचे निर्देश- या परीक्षांचे निकाल हे तातडीने लावण्यात यावे आणि उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पाठवण्यात यावी.
- प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आणि उत्तरपत्रिका अपलोड करण्यात येणाऱ्या समस्यांसह विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
- तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्या तक्रार समितीकडे पाठवण्यात याव्यात.
- निवृत्त न्या.
प्रतिभा रानी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार समिती स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या तक्रारी पाच दिवसांच्या आत सोडवाव्यात.
- परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठ आणि समितीने आपापला अहवाल सादर करावा.
अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे.
नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांना आधीच करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही अस्वस्थ वाटू लागले असून ते आज करोनाची चाचणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नवीन राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा दहा जणांना करोनाची लागण झाली आहे.
आई-वडिलांना करोनाची लागण झाल्याने रवि राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले आहेत.
तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत.
मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला.
करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी करोनाची टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.
त्यामुळे त्यांनाही आता रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तर दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने ते आज करोनाची चाचणी करणार आहेत.
राणा यांच्या कुटुंबात दहा जणांना लागण झाल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कातील लोकांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आणि क्वॉरंटाइन होण्याचे आवाहन केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते.
करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या.
शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती.
सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या.
त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
अभिनेता समीर शर्माची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफासदरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे.
दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते.
यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या.
रवी राणा यांच्या वडिलांना करोनाचा संसर्ग कसा झाला, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये.
ब्रायन लाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह?
जाणून घ्या सत्यखासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी भन्नाट आयडिया
लखनऊ: श्राराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे.
नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता.
त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली.
त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत.
त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत.
८ दिवसांपूर्वीच, ५ ऑगस्ट या दिवशी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच महंत नृत्यगोपाल दास हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या समर्थकांशी तसेच, मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली.
या बरोबरच मुख्यमंत्री योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्यगोपाल दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत सूचना केल्या.
मथुरेत आहेत नृत्यगोपाल दासकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नृत्यगोपाल दास हे मथुरेत येत असतात.
आज त्यांची तब्येत अचानक बिघडली.
त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.
या नंतर त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली.
त्यानंतर त्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी अयोध्येतील रामलल्लाचे पुजाऱ्याला देखील करोनाची लागण झाली होती.
या व्यतिरिक्त तेथील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.
त्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता.
त्यावेळी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.
वाचा- देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २३,९६,६३८ वरदेशात सुमारे २४ लाख कोरोना रुग्णयावेळी, देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या २४ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.
गेल्या २४ तासांत जवळजवळ ६७ हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
तर २४ तासात ९४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३७ एवढी आहे.
वाचा- प्रणव मुखर्जींची प्रकृती नाजूक; प्रणवदांचे पुत्र प्रसारमाध्यमांवर भडकले, म्हणाले.
..कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ४७ हजार ३३ लोक मरण पावले आहेत.
तसेच आतापर्यंत करोनावर मात करत १६ लाख ९५ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत, तर देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ५३ हजार ६२२ इतकी आहे.
आकडेवारीनुसार, देशातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ७० टक्क्यांहून अधिक आहे.
यासह देशभरात एकाच दिवसात सर्वाधिक ७ लाख ३३ हजार ४४९ चाचण्या घेण्यात आल्या.
ही बातमी देखील वाचा:संजय राऊत यांच्या विरोधात पाटण्यात तक्रार, अटकेची मागणी
मुंबई:गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला पीपीपी मॉडलनुसार देशातील सहा विमानतळाचे अधिकार मिळाले आहेत.
आता अदानी समूहातील अदानी एटरप्रायझेस लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील ७४ टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.
हा सौदा पूर्ण झाल्यानंतर अदानी कंपनी खासगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा एअरपोर्ट ऑपरेटर ठरेल.
वाचा- सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मोदी सरकारने या गोष्टी केल्या स्वस्तअदानी समूहाला याआधीच देशातील सहा विमानतळाच्या व्यवस्थापनाचे अधिकार मिळाले आहेत.
त्याचत मुंबई एअरपोर्टमधील जीव्हीके समूहाकडील ५०.
५ टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला.
आता अन्य हिस्सेरादांपैकी दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ACSA आणि बिडवेस्ट ग्रुप यांच्याकडील अनुक्रमे १० आणि १३.
५ टक्के हिस्सा अदानी समूह विकत घेणार, असे वृत्त बिझनेस स्टॅडर्डने दिले आहे.
वाचा- 'या' वस्तू होणार स्वस्त ; केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केलाहा हिस्सा खरेदी केल्यानंतर अदानी ग्रुप सर्वात मोठा शेअरधारक होईल.
जीएमआर हा समूह देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर आहे.
वाचा- गेल्या वर्षी भारतीयांनी केली ही चूक; झाला ५६१ कोटींचा दंड!
एका वृत्तानुसार अदानी समूह हिस्सा विकत घेण्यासाठी १५ हजार कोटी रुपये मोजू शकते.
इतक नव्हे तर मुंबईत तयार होणाऱ्या नवी मुंबईतील विमानतळाचा मालकी हक्क अदानी समूहाला मिळू शकतो.
कारण MIAL मध्ये त्यांचा ७४ टक्के वाटा आहे.
वाचा- मोदी सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना दिली आनंदाची बातमीजयपूर, गुवाहटी, तिरुवनंतपूरम एअरपोर्ट अदानी समूहाला ५० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत.
पीपीपी मॉडेलनुसार अदानी समूहाला देशातील सहा विमानतळाचे संचालन, देखरेख आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे.
यात अहमदाबाद, लखनऊ, मंगलोर, जयपूर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहटी यांचा समावेश आहे.
वाचा- या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक; लवकरच येतोय IPOयांनी केला विरोधदरम्यान केरळचे मुख्यमंत्री पी.
विजयन यांनी तिरुवनंतपूरम विमानतळ खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला आहे.
या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले आहे.
प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल-डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विद्युत वाहनांसह सीएनजी, एलपीजी गाड्यांवर भर देत आहेत.
वैध पीयूसी नसल्यास वाहननोंदणी रद्द करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे.
वैध पीयूसी नसलेल्या वाहनांबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
यानुसार महाराष्ट्रातदेखील अंमलबजावणी होणार असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
लॉकडाउनमध्ये मुंबईसह अनेक शहरांतील हवेची योग्यतापातळी सुधारली होती.
अनलॉक काळात सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही.
यामुळे खासगी वाहतुकीचा वापर वाढत आहे.
त्यातच अनेकजण करोनासंसर्ग होण्याच्या भीतीने खासगी वाहनांला पसंती देत आहेत.
याकाळात पीयूसीसह अन्य कागपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन आयुक्तालयातील अधिकारी सांगतात.