text
stringlengths
0
6.48k
नेमका हाच धोका लक्षात घेता, प्रादेशिक मनोरुग्णालयाने मनोरुग्णांच्या हृदयाचे इव्हॅल्युशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या माध्यमातून त्यांना भविष्यातील हृदयरोगाचे अचूक निदान करता येऊ शकणार आहे.
अतिउच्च रक्तदाब, ताण तणाव, मधुमेहात हृदयरोगाची पाळेमुळे दडलेली असतात, असे वैद्यकशास्त्र म्हणते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाची स्पंदन क्षमता अशक्त होते.
निरोगी माणसात अशुद्ध रक्त हृदयात जाणे आणि ते शुद्ध होऊन परत शरीराकडे जाण्यासाठी हृदयाच्या झडपाची वा रक्ताभिसरणाची क्षमता ६० असावी, असा निकष वैद्यकशास्त्रात आहे.
वैद्यकीय परिभाषेत याला 'इजेक्शन फॅक्शन' म्हणतात.
मात्र अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे हृदयाची ही रक्ताभिसरणाची क्षमता कमी होते.
मुख्य धमन्यांमध्ये अवरोध निर्माण होऊन, हृदयविकाराचा धोका त्यामुळेच बळावतो.
अद्ययावत झालेल्या वैद्यकीयशास्त्रामुळे हा धोका वेळीच ओळखता येणे, आता शक्य झाले आहे.
त्यासाठी सर्वांत आधी एखाद्याचा इको काढून हृदयात डोकावता येते.
नुसते इको काढून हे ओळखणे शक्य नाही.
त्यासाठी इसीजी आणि इकोत दिसलेल्या सूक्ष्म बदलांना टिपणेही महत्त्वाचे असते.
आधिच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या अशा वैफल्यग्रस्तांच्या संभाव्या हृदयरोगाचे निदान करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.
माधुरी थोरात आणि नव्यानेच फिजिशिअन म्हणून सेवा देत असलेले डॉ.
श्रीकांत करोडे यांनी उपचारांसाठी भरती सर्व रुग्णाचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला.
यात सर्व रुग्णांचे इसीजी, इको, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन निदान, कोलेस्ट्रॉल आदी चाचण्या केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे, आतापर्यंत केलेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रशासनाला आढळले.
याचे पुढचे पाऊल म्हणून आता सर्वच रुग्णांच्या रक्तापासून ते त्यांच्या शरीरातील अवयवांचेही पूर्णत: मॉनिटरींग केले जात आहे.
मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भविष्यातील हृदयरोगाचा धोका आहे का, याचेही या माध्यमातून निदान करणे शक्य होणार असून, राज्यातला हा बहुधा पहिलाच प्रयोग राहणार आहे.
याला दुजोरा देताना डॉ.
करोडे म्हणाले, मनोरुग्ण आधीच दुर्लक्षित असतात, हा आजवरचा आमचा अनुभव आहे.
पण इथे आल्यानंतर रुग्णांची जबाबदारी प्रशासनाची असते.
त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संभाव्य आजाराचे निदान करता आले, तर पुढील गुंतागुंतही टाळणे शक्य होणार आहे.
शिवाय यातून मधुमेह, उच्चरक्तदाबाचेही निदान करून तशी उपचार दिशाही ठरविता येणार आहे.
प्रतिनिधी ,औरंगाबाद: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याच्या खिशातील रोख एक हजार १६० रुपये चोरून नेणाऱ्या दोघा आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
दोघा आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.
वाडकर यांनी शुक्रवारी दिले.
बबन उर्फ गबऱ्या भागाजी मकळे (३५, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) व अनिल अंबादास माळवे (४५, रा.
प्रकाश नगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात शुभम भिकुलाल जाट (२६, रा.
जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याने तक्रार दिली.
२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी शुभम हा मुकुंदवाडी येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसलेला होता.
त्यावेळी तेथे दोघे आरोपी आले.
त्यांनी शुभमकडे दारू पिण्यासाठी २० रुपयांची मागणी केली.
त्यावर शुभमने नकार दिला.
त्यामुळे आरोपींनी त्याला शिवीगाळ करून,'तू पोलिसांचा खबऱ्या आहेस,' असे म्हणत अनिल माळवेने शुभमच्या खिशातून बळजबरी एक हजार १६० रुपये काढून घेतले.
बबन उर्फ गबऱ्या याने शुभमनचे दोन्ही हात पकडले.
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले.
शुभमने आरडा ओरडा करताच दोन्ही आरोपींनी तेथून धूम ठोकली.
या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगली: पोलीस निरीक्षकाने तरुणीवर केला बलात्कारधक्कादायक!
नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कारझुंडबळी: महिलेला सायकलची धडक, बेदम मारहाणीत ६० वर्षीय वृद्ध ठारघात!
संशयाचं भूत मानगुटीवर; मित्राची गळा आवळून केली हत्यापोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले.
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत आहेत.
आरोपींनी चोरलेली रक्कम जप्त करणे आहे; तसेच आरोपींचे कोणी साथीदार आहेत काय, याबाबत देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील गौतम कदम यांनी केली.
ही विनंती मान्य करून आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर तलवारीने मुंडके छाटेल; डॉक्टरला धमकीमावशीच्या घरी आलेल्या मुलीवर शेजाऱ्यांनी केला सामूहिक बलात्कार'त्याचं' बहिणीवर प्रेम होतं; प्रियकराचा जीव जाईपर्यंत केले चाकूने वार
अमरावती: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवरच टीकास्त्र सोडलं आहे.
आधी सोयाबीनची बियाणे बोगस निघाली.
आता सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग आला आहे.
राज्यातील कृषी खाते झोपले आहे का?
, अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
विदर्भात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
मात्र, आधी बोगस बियाणांमुळे परेशान असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग आल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे.
सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी शेतात पेरले, पण बोगस बियाणांमुळे पीक आलं नाही.
आता पीक आलं तर अज्ञात रोगाने ते मारून टाकलं आहे.
शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना राज्यातील कृषी खाते काय झोपले आहे का?
असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
जेव्हा बियाणे बाहेर येतात तेव्हा ते प्रामाणिकीकरण करूनच बाजारात आणली जातात.
मात्र, हे बियाणे बाजारात आणतानाच बदमाशी केली जाते की काय?
अशी शंका घेण्यास वाव आहे.
महाबीजवाल्यांनी बाजारातून २ ते ३ हजार क्विंटलचं सर्वात बेकार बियाणं घेऊन शेतकऱ्यांना ७ हजाराच्या भावाने विकलं असावं, असा माझा आरोप आहे, असंही ते म्हणाले.
जळगावात शिवसेनेचं भाजपविरोधात अनोखं आंदोलन; लोक बघतच बसले!
शरद पवार नाशिकला पोहोचण्याआधीच 'या' अधिकाऱ्याची उचलबांगडीदरम्यान, बोगस बियाण्यांमुळे झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बियाणांमुळे रोग पडला की वातावरणामुळे रोग पडला याचीही तपासणी केली जाणार आहे.
ज्यांनी विमा काढलाय त्यांना विम्याचे पैसे मिळतील आणि इतरांना शासनाकडून मदत केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना बियाणं चांगलं मिळालं असं एकही वर्ष जात नाही.
दरवर्षी बियाणांची समस्या असतेच.
या प्रकरणात जो आरोपी आहे.
कंपनीचा मालक आहे, त्यांना धरून चोप दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.
कांदा निघाला बांगलादेशला
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या डायरीच्या छेडछाड प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत.
मीडियाला मिळालेल्या त्याच्या पर्सनल डायरीची काही पानं गायब आहेत.
सुशांतच्या चुलत भावानेही सांगितले की पोलिसांनी त्याची पर्सनल डायरी घेतली होती पण ते यासोबत छेडछाड करतील असं कधी वाटलं नव्हतं.
यासोबतच सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याच्या दोन वेगवेगळ्या जबाबांनी या प्रकरणाची गुंतागुंत अजून वाढली आहे.
सुशांतच्या डायरीची सहा पानं गायब आहेत.
सिद्धार्थ म्हणाला कोणतंही पान फाटलेलं नव्हतंसुशांतच्या मृत्यूची गुंतागुंत सतत वाढत आहे.
बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी नव्याने सुरू केली होती.
पण आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.
टाइम्स नाउला सुशांतची पर्सनल डायरी मिळाली.
असं म्हटलं जातं की, या डायरीतील काही पानं फाडलेली होती.
यावर सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू म्हणाला की, त्याला डायरी लिहायची सवय होती.
माझ्यासमोरच पोलिसांनी त्याच्या ४- ५ डायरी घरून नेल्या होत्या.
सुरुवातीला मला वाटलं चौकशीसाठी ही चांगली गोष्ट आहे.
पण मला वाटलं नव्हतं की, पुराव्यांची छेडछाड करण्यात येईल आणि मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा देशासमोर येईल.
सुशांत केसमध्ये रियासहीत ६ लोकांमध्ये ही आहे मोठी लिंकसिद्धार्थ पिठानीचे दोन वेगवेगळे जबाबसुशांतच्या डायरीची पानं फाटल्याचे कळल्यानंतर सिद्धार्थने दोन वेगवेगळे जबाब दिले.
ज्यामुळे नक्की खरं काय ते कळू शकले नाही.
सिद्धार्थने सुरुवातीला सांगितलं की सुशांतच्या डायरीची पानं फाटली नव्हती.
यानंतरच्या जबाबात त्याने म्हटलं की, सुशांत अनेकदा स्वतःचं पानं फाडायचा.
विजय माल्ल्या आणि सुशांत राजपूतच्या केसचं सीबीआय 'कनेक्शन'सुशांतच्या मित्राने व्यक्त केला संदेहसुशांतचा मित्र नीलोत्पल मृणालच्या मते, फाडलेल्या पानांची चौकशी होणं गरजेचं आहे.
रिया नक्कीच काहीतरी लपवत आहे.
तो म्हणाला की, कोणी काहीही लिहू शकतं आणि काहीही लपवू शकतं.
डायरीवरचे बोटांचे ठसे मिटवले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ठश्यांचीही तपासणी केली गेली पाहिजे.
पिठानीने पोलिसांना दिले मेसेजसिद्धार्थने त्या पुराव्यांबद्दलही सांगितले जे मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
यात चावीवाल्याला केलेल्या मेसेजपासून अनेक गोष्टींचा समावेश आहे.
वृत्तसेवा , ठाणे डिजिटल स्वाक्षरी विकल्याप्रकरणी डॉ.
संकेत दोशी यांचा परवाना नुकताच रद्द करण्यात आला आहे.