text
stringlengths
0
6.48k
प्रत्यक्ष उपस्थित नसून स्वत:ची स्वाक्षरी देऊन अनेक ठिकाणी वैद्यकीय अहवाल दिल्याप्रकरणी ठाणे पॅथोलॉजिस्ट असोसिएशनतर्फे सचिव डॉ.
राजेश बुताला यांनी डॉ.
दोशी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एम.
एम.
सी.
) यांच्याकडून डॉ.
संकेत दोशी यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला आहे.
दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निबंधक संजय देशमुख यांनी डॉ.
संकेत दोशी यांची आर्थिक चणचण आणि हतबल स्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीची शिक्षा जाहीर केल्याचे पत्र जारी केले आहे.
करोनाच्या काळात वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक शस्त्रक्रिया, तपासण्या, महागडी औषधे, कमीशनबाजी यातून रुग्णांची व त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे.
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे.
सदर प्रतिवादी डॉ.
दोशी यांची रोगनिदानतज्ज्ञ म्हणून नोंदणी घाटकोपर, कुर्ला या भागातील असूनही त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर ठाणे, बदलापूर, पनवेल, उल्हासनगर, डोंबिवली, नालासोपारा, भिवंडी, वाशी, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या लॅबमध्ये आढळून आला.
तपासणीदरम्यान डॉ.
दोशी आंध्र प्रदेशातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याचे उघड झालेच, शिवाय डॉ.
दोशी यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या पत्नीने पात्रता नसूनही अनेक अहवालांवर सह्या केल्याचेही समोर आले.
डिजिटल सहीचा वापर केला गेल्याने अनेक रुग्णांचे निदान आणि त्यामुळे उपचारही चुकीचे झाल्याचे आढळले.
संकेत दोशी यांनी पत्नीच्या कर्करोगाच्या उपचार खर्चासाठी आणि अपत्याच्या वाढत्या शिक्षण खर्चामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि मानसिक ताणामुळे हे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
विमा कंपनीने डिजिटल स्वाक्षरीचे अहवाल ग्राह्य धरू नका असे सूचित केले आहे.
जोशी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
माझी सगळ्या डॉक्टरांना हीच विनंती आहे की सह्याजीराव रोगनिदानतज्ज्ञांना प्रोत्साहित करू नका.
डिजिटल स्वाक्षरी योग्य नाही.
प्रत्यक्ष तपासणी होऊनच योग्य अहवाल रुग्णांपर्यंत पोचला पाहिजे.
अल्प लाभासाठी असे उद्योग करू नका.
माझ्या इतर सहकारी डॉक्टरांनी या प्रकरणातून योग्य तो बोध घ्यावा.
दिनकर देसाई, अध्यक्ष, द पॅथोलॉजीस्ट असोसिएशन, ठाणे
नवी दिल्लीः HMD Global या महिन्यात अनेक नवीन फोन लाँच करण्याच्या तयारी आहे.
कंपनी अँड्रॉयड ओएसचे नोकिया फीचर फोनवर काम करीत आहे.
आता एका नवीन स्केचवरून ही माहिती समोर येत आहे की, अँड्रॉयड बेस्ड नोकिया फीचर फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.
वाचाः रेडमी नोट ८ प्रोला मिळतोय लेटेस्ट MIUI 12 अपडेटNokia 3310, Nokia 8110 आणि Nokia 5310 यासारख्या क्लासिक फोन्सला नवीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.
कंपनी नवीन नोकिया फीचर फोनला लाँच करणार आहे.
जो गुगलच्या अँड्रॉयड ओएसवर चालेल.
आता या नोकिया फीचर फोनचे स्केच समोर आले आहे.
ज्यात गुगल असिस्टंटसाठी एक वेगले बटन दिले जावू शकते.
स्केचला Nokiamob ने शेयर केले आहे.
तसेच हे चर्चित अँड्रॉयड ओएसचा नोकिया फीचर फोन आहे.
वाचाः जगातील सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड, एका सेकंदात पूर्ण Netflix डाउनलोडगुगल असिस्टंट शिवाय फोनची ओव्हरऑल डिझाईन पाहिल्यास हा कोणत्याही नोकिया फीचर फोन सारखा दिसतो.
फोनच्या वरच्या भागात एक सेल्फी कॅमेरा दिला आहे.
या फोनला स्केच पाहिल्यास एक अँड्रॉयडवर चालणारा नोकिया फीचर फोन सारखा वाटतो.
गुगलच्या जवळ फीचर फोनसाठी अँड्रॉयड ओएसचे कोणतेही व्हर्जन नाही.
वाचाः Nokia C3 भारतात लवकरच होतोय लाँच, जाणून घ्या डिटेल्सवाचाः रियलमी ७ आणि ७ प्रो भारतात होतायेत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्सएका व्हिडिओत नोकिया फीचर फोनला अँड्रॉयड व्हर्जन सोबत पाहिले गेले आहे.
या फोनमध्ये गुगल अॅप्स यासारखे यूट्यूब व क्रोम प्री इन्स्टॉल येते.
फोन गुगल असिस्टेंट व्हाइस सर्च सपोर्ट करतो.
ज्या बटनला प्रेस करून अॅक्टिवेट केले जावू शकते.
आता अँड्रॉयड बेस्ड फीचर फोनसंबंधी गुगल आणि नोकियाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आली नाही.
वाचाः रोज २ जीबी डेटा-कॉलिंगचे प्लान, किंमत १४९ रुपयांपासून सुरूवाचाः ओप्पोचा नवा स्मार्टफोन भारतात येतोय, २०२० मधील सर्वात स्लीम फोननोकियाचा एका फोनला बेसिक वैशिष्ट्यांसह FCC सर्टिफिकेशन मिळाले होते.
परंतु, आता नोकिया फीचर फोनमध्ये अँड्रॉयडची कोणतीही माहिती नाही.
नवीन नोकिया फीचर फोन सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
वाचाः मायक्रोमॅक्स पुढच्या महिन्यात लाँच करणार मेड इन इंडिया स्मार्टफोनवाचाः स्मार्टफोनची स्क्रीन फुटलेल्या ग्राहकांसाठी सॅमसंगची भन्नाट ऑफर
पुणे: लॉकडाऊनला विरोध करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करोना महामारीवरून केंद्र सरकारची पोलखोल केली आहे.
देशात महामारी आहे तर मग देशातील मृत्यूदर अर्ध्यापेक्षा कमी कसा?
, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून हा सवाल केला आहे.
त्यांनी गेल्या वर्षीच्या मृत्यूची आणि यंदा करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देऊन सरकारला धारेवर धरले आहे.
मार्च ते मे २०१९ दरम्यान अंदाजे १,२३,५१२ मृत्यू झाले.
तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले.
मग महामारी आली असेल तर हा मृत्युदर अर्धा कसा काय झाला?
, असा सवाल करतानाच महामारी नसतानाही सामान्य माणसाला रस्त्यावर आणणारं लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचं हे जनतेने ठरवावं, असं आवाहन आंबेडकरांनी केलं आहे.
सरकारच्याच अहवालानुसार ८० टक्के भारतीयांमध्ये करोनाच्या विरोधातील अँटिबॉडी तयार झाल्या आहेत.
तर १५ टक्के लोकांमध्ये त्या तयार होत आहेत.
उरलेल्या ५ टक्के लोकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडी तयार झालेल्या नाहीत.
या लोकांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत.
पण सरकार त्यांना शोधण्याऐवजी ९५ टक्के लोकांना लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठिस धरण्याचं काम करत आहे.
सरकारच्या या मनमानी धोरणामुळे छोट्याछोट्या व्यावसायिकांचं आणि समाज घटकांचं मोठं नुकसान होत असून सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
इतर देशांत सुरू असलेल्या लॉकडाऊनचं अंधानुकरण थांबवण्याचं आवाहन ही त्यांनी केलं.
... तर आधी केंद्रातील सरकार पडेल; सुशांतसिंह प्रकरणावरून राऊतांचा इशारादरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून आंबेडकरांनी लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली आहे.
त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची मतं, निरीक्षणं आणि आकडेवारीचा हवालाही दिला आहे.
करोना संसर्ग हा इतर आजारासारखाच आजार आहे.
त्यासोबतच आपल्याला रहावे लागणार आहे.
त्यामुळे या आजाराबाबतची काळजी घेऊन जनजीवन सुरळीत केलं पाहिजे.
करोना हटवण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही, असं सांगतानाच आम्ही लॉकडाऊनला विरोध करत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे.
करोनाने चिंता वाढवली; जगभरात भारतात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूगडाख शिवसेनेत येताच चित्र बदलले; भोळ्या शंकराचा 'वाघ' झाला!
कुणाल लोंढे, पनवेल: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
सीबीआयच्या पथकाकडून या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी केली जात आहे.
मात्र, केवळ नामसाधर्म्यामुळे पनवेलच्या डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.
सुशांतचे अनेक चाहते या डॉक्टरांना फोन करून सुशांतचा शवविच्छेदन अहवाल खोटा दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करत आहेत.
या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पनवेल शहरातील नेत्रचिकित्सक म्हणून परिचित असलेले डॉ.
संदीप इंगळे अनेक वर्षांपासून येथे रुग्णांना सेवा देत आहेत.
इंगळे यांना गेल्या आठवड्यापासून काही अनोळखी व्यक्तींकडून मोबाइलवर फोन येत आहेत.
सशांतसिंहचा शवविच्छेदन अहवाल तुम्ही खोटा बनविला आहे, माझ्याकडे पुरावे आहेत.
हे तुम्ही चुकीचे केले आहे, असा आरोप फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती करत आहेत.
तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर पनवेलचे डॉ.
संदीप इंगळे हे नेत्ररोगतज्ज्ञ असताना त्यांनी सुशांतसिंहचे शवविच्छेदन केले कसे, असे प्रश्न विचारणारे चाहत्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत.
'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं सत्य बाहेर यावं ही जनतेची इच्छा'सुशांतचे कपडे, ५६ स्टेटमेन्ट; वांद्रे पोलिसांनी सीबीआयला दिले महत्त्वपूर्ण पुरावे'ते' चॅट उघड झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर चार ते पाच फोन आल्यानंतर डॉ.
इंगळे यांनी या प्रकाराची माहिती घेतली.
शवविच्छेदन अहवालात डॉ.
संदीप इंगळे नावाच्या डॉक्टरांचा उल्लेख असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मात्र, नेमके ते डॉक्टर कोण हे माहीत नसणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांकडून मला नाहक त्रास होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
इंगळे यांच्या घराचा पत्ता, क्लिनिकचा पत्ता सांगून समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी केली जात असताना, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही.
त्यामुळे डॉ.
इंगळे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रार अर्जाद्वारे दिली आहे.
अद्यापही पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही.
सुशांतसिंह प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना केवळ नामसाधर्म्यामुळे मला सुशांतच्या समर्थकांचे फोन येत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जात आहेत.
पण माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.
सुशांतच्या मृतदेहाचे विच्छेदन करणारा डॉक्टर मी नाही.