text
large_string
करोनाच्या (Corona) संसर्गाच्या काळात माणसाला जीवनाचे महत्त्व समजते आहे. अमेरिकेत एका माणसाने करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडचे पैसे भर चौकात जाऊन उधळायची इच्छा आपल्या मित्राकडे व्यक्त केली आणि त्यानेही भर चौकात नोटांची पुडकी सोडून उधळत जनतेला संदेश दिला की पैसे संपत्ती व्यर्थ आहे आणि आपला जीवच सर्वात मौल्यवान आहे. पैसे फुकट मिळताहेत म्हटल्यावर ते गोळा करायला अगदी अमेरिकेतली माणसंही गर्दी करायला लागली. या पैसे उधळणाऱ्या माणसाचा आणि ते गोळा करणाऱ्यांचा व्हिडियो सोशल मिडियावरून व्हायरल झालाय. एकीकडे महाराष्ट्राचे मामु माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडियो कॉन्फरन्स बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना करोनावरून राजकारण करू नका, हे सांगा अशी विनंती करतात आणि दुसरीकडे त्यांच्या सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) केंद्र सरकारवर रेमडिसिव्हरवरून राजकारण केल्याचा आरोप करतात, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्या ट्विट्सना उत्तर दिले आहे आणि आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. राज्याच्या काही भागात आणि पुण्याच्याही काही भागात रेमडिसिव्हरचा (Remdesivir) काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलेय. पुण्याच्या ग्रामीण भागात तर चक्क रेमडिसिव्हरच्या इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्या घेऊन त्यात शिरेतून घ्यावयाचे द्रवरूप पँरासिटामॉल तयार करून तेच रेमडिसिव्हर म्हणून विकणारी टोळी पोलिसांनी पकडलीय. करोनानं माणसाच्या आयुष्याचा क्षणभंगुरपणा खरे तर सर्वांच्याच लक्षात आलाय पण तरीही करोनानं जगणं इतकं अवघड केलंय की माणसांचं वागणंच या रोगानं बदलून टाकलंय आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या गाण्याप्रमाणे मानसापरास मेंढरं बरी, असं वाटावं अशा या तीनही घटना आहेत. माणसं सगळीकडे सारखीच भले ते प्रगतीहीन, प्रगतीशील किंवा प्रगत देश असोत. करोनानं खऱ्या अर्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड तयार केलेय आणि करोनासारख्या रोगासाठी सगळे सारखेच आहेत, हेही पुन्हा पुन्हा सिद्ध झालेय. अनेकदा प्रगत देशांमधे बर्फवृष्टी, एखादे फयान वादळ, भूकंप अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या वेळी माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत. तरीही माणूस काही शहाणा व्हायला तयार नाही आणि म्हणूनच मग तथाकथित भौतिक प्रगतीत किंवा ऐहिक सुखांमधे सारं काही मिळत नाही, हेच मृत्यूनंतर आपले पैसे लोकांमधे उधळून टाकणाऱ्या ऐश्वर्यवंताला वाटत असावं. सत्तेची साठमारी आणि त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप भारतीय राजकारणाला नवे नाहीत. पण करोनासारख्या प्राणघातक साथीच्या काळातही राजकीय आरोपांचे फड रंगत असतील तर जनतेने त्यात हस्तक्षेप करायला हवा, असे प्रकर्षाने वाटते. एकदा निवडणुका झाल्या की नेते पाठ फिरवतात आणि पाच वर्षांनीच उगवतात, ही पूर्वीची तक्रार आता करण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्रावर केलेले आरोप असोत की त्याला केंद्राने दिलेले प्रत्युत्तर, हे सारं आम्हाला योग्य वाटत नाही, हे तरी किमान जबाबदार जनता म्हणून प्रत्येकाने व्यक्त करायला हवे. आता मोबाइल नावाचे यंत्र आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्या अवाक्यात आलेले आहे. त्याचा प्रभावीपणे वापर करायला हवा आणि केवळ सोशल मिडियावरून वा व्हाट्स अप ग्रुपमधून नव्हे तर थेट सरकारी वेबसाईट्सवरून सर्वच पातळ्यांवरच्या राज्यकर्त्यांना नागरिकांनी आपले निषेध किंवा अनुकूलताही प्रभावीपणे व्यक्त करायला हवी. म्हणजे मग दर पाच वर्षांनी मतांचा जोगवा मागणारे आणि तो देणारे, हे दोघेही किमान उत्तरदायी होतील. रेमडिसिव्हरचा काळा बाजार किंवा नकली औषध बनवणारे हेही आपल्याच समाजात तयार झालेले आहेत, याचे भान ठेवून लोकशाही मार्गाने त्यांना शिक्षा करायलाच हवी. पण त्याबरोबरच मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खायची प्रवृत्ती अगदी करोना संकटाच्या काळातही संधी शोधत असते, याचेच दर्शन या घटना घडवतात. करोनाच्या कृष्ममेघाला एक रुपेरी किनारही आहे. पुण्यातले मनसेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी शंभर खाटांचे रुग्णालय केवळ करोनाच्या रुग्णांसाठी एका रुग्णालयाच्या मदतीने सिद्ध केलेय. कॉँग्रेसचे पालिकेतले गटनेते आबा बागूल यांच्या पुढाकारातून गणेश कला क्रीडामंच या पालिकेच्या करमणूक सभागृहात शंभर खाटांचे केवळ प्राणवायूसज्ज खाटांची सुविधा तयार होतेय. त्याला पालिका आणि खासगी सहभागाचंही पाठबळ आहे. वास्तविक, सगळीकडे अंधार पसरत असताना मोरे किंवा बागूल यांच्यासारख्यांचे प्रयत्न म्हणजे एक छोटीशी पणती लावण्याचे स्तुत्य उपक्रम आहेत. अशा पणत्या वाढल्या तरच अंधार आपसूक दूर होईल. करोना हरेल माणुसकी जिंकेल.
प्रकरण ९ वें. भडोच येथील गुर्जर. [ हा वृतान्त गुर्जर राजांचा ताम्रलेखांच्या आधारानें बांबे गॅझीटीअ मधील गुजराथच्या वर्णनांत चांगला जुळविलेला आहे. दुसन्या कोरींव लेखांवरूनहि त्यांविषयीं कांहीं माहिती मिळते. तसे कांही पुराणांतून व विशेषतः स्कन्दपुराणांतून आलेल्या एतद्विषयक उल्लेखांचाहि आपल्याला उपयोग होणार आहे. ]. वलभीच्या राज्यांत सौराष्ट्राचा म्हणजे हल्लींच्या काठेवाडाचा बहुतांशीं अन्तर्भाव होतो हें पूर्वी सांगितलेंच आहे; त्याप्रमाणें भरुकच्छ म्हणजे भडोचच्या राज्यांत हल्लींच्या गुजराथ प्रान्ताचा बहुतेक समावेश होतो असें म्हणावयास हरकत नाहीं. भरुकच्छच्या गुर्जर राजांच्या ताम्रपटांवरून असे दिसून आले आहे कीं त्या घराण्यांत सहा राजे झाले. त्यांची नांवें व त्यांच्या दानलेखांवरून कळलेली त्याच्या कारकीर्दीपैकीं कांहीं नक्कीं वर्षे खालीं लिहिल्याप्रमाणे आहेतः१ दद्द ( स. ५८० ); २ जयभट ( स. ६०५), ३ दुसरा दद्द स. ६३३ ) ; ४ दुसरा जयभट ( स. ६५५ ) ; ५ तिसरा दद्द ( स. ६८० ) ६ तिसरा जयभट ( स. ७०६-७३४). या राजांनी भडोच व नंदिपुर ( राजपिपला संस्थानांतील नांदोरी ) येथें सहाव्या शतकाच्या मध्यापासून ८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे सुमारे २०० वर्षे राज्य केलें. ते आपल्याला गूर्जर म्हणवीत, व त्यांपैकीं शेवटच्या दोघांच्या दानलेखांत त्यांचा मूळपुरुष महाराज कर्ण म्हणून कोणी होता असे म्हटले आहे. हा कर्ण कोण याचा निर्णय करता येत नाहीं. बरेच विद्वान लोक पहिली हिंदु राज्ये त्याला महाभारतांतील कर्णच समजतात. पण तें बरोबर नाहीं. कारण भारतीय कर्ण सूत म्हणजे मिश्रजातीय होता, व म्हणून त्याला महाराज म्हणणें शक्य दिसत नाहीं. कांहीं तरी वंशवृक्ष जुळवावयाचा तर अशा मिश्रजातीय कर्णालाच मूळपुरुष काय म्हणून कोणी मानील? म्हणून आमच्या मतें हा कर्ण भारतीय नसून गुर्जर वंशांतीलच कोणी मोठा राजा असावा, पण त्याचा वृत्तान्त आज कांहीं उपलब्ध नाहीं. हे गुर्जर लोक इतक्या दक्षिणेकडे कसे आले हे सांगता येत नाहीं, पण ह्युएनत्संगाचे वेळीं गूर्जर राज्य म्हणून प्रख्यात असलेलें जें भिनमालचें राज्य तेथून ते खालीं आले यांत शंका नाहीं. भडोचचे हे गुर्जर राजे आपल्या दानलेखांत स्वतःला स्वतंत्र राजे म्हणवीत नसून सामन्त ह्मणवीत असत. यावरून ते बहुधा भिनमालच्या गूर्जर सजांचे मांडलिंक असावे असे दिसतें. गुजरात देश उत्तर व दक्षिण हिंदुस्थानाच्या मध्ये स्थित असल्यामुळे तेथें दोन्ही ठिकाणच्या लोकांची गांठ पडते. तेथील गुर्जर राजे उघड उत्तरेकडील आहेत. पण त्यांच्या दानलेखांत इ. स. २४९ त सुरू झालेला त्रेकूटक उर्फ कलचूरी शकाचा उपयोग केलेला आहे. हे लेख गुजराथी वळणाच्या पण दक्षिणी अक्षरांनीं लिहिलेले असून त्याच्या खालीं राजांचा स्वहस्त मात्र उत्तरेकडील चळण्याचा असतो. या वरून हे राजे उत्तरेकडील, पण त्यांची जात सामान्यतः दक्षिणेकडील होती असे उघड होते. या प्रान्तावर गुर्जरापूर्वी हैहयवंशीय त्रकूटकांचें राज्य होतें. या त्रैकूटिकांची राजधानी त्रिकूट हें हल्लीं कोठें आहे हें जरी अद्यापि समजलेलें नाहीं, तरी वाल्मिकि रामायण आणि कालिदासाचा रघुवंश यति त्याचा निर्देश आलेला आहे. • गुजराथ प्रान्तांतून तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्या वाहत जाऊन समुद्राला मिळतात व त्यांच्या योगानें त्या प्रान्ताचे स्वाभाविकपणें तीन भाग होतात, असे म्हणावयास हरकत नाहीं. त्यांत नर्मदेपर्यंतच्या मुलखाला दक्षिण गुजराथ, तेथून महीपर्यत मध्य गुजराथ आणि महीच्या पळीकडे उत्तर गुजराथ असे म्हणता येईल. प्राचीनकाळी यापैकी दक्षिण भागाळा परान्त व नंतर लाट अशीं नांवें मिळाली होतीं. परांत नांव महाभारतांत आले असून लाटाचा उल्लेख अनेक दानबेख व वराहमिराचे ग्रंथ यांत आलेला आहे. मध्य गुजराथेला पूर्वी आनर्त म्हणत. पण त्या नांवाचा मागमूस लवकरच नाहींसा होऊन त्याच्या जागीं भरुकच्छ हें नांव आलें. उत्तर गुजराथेला युएनत्संगानें आनंदपूर म्हटले आहे. दक्षिणेतून येथें आलेला त्रैकूटक राजांचा अंमल या तीन भागांपैकी दक्षिण व मध्य भाग यांवर होता. त्या मुळेच भडोचच्या गुर्जर राजांच्या ताम्रलेखांत दक्षिणी अक्षरमाला व त्रैकूटक शक यांचा उपयोग केलेला आढळतो. पुढे गूर्जर राजांनी दक्षिण गुजराथेवर देखील आपला अंमल बसविला. पण पुनः लवकरच दक्षिणेतील चालुक्यांनीं तो भाग जिंकून नवसारी येथें आपल्यापैकी एका घराण्याची स्थापना केली. हें गुजराथेतील चालुक्य घराणे होय. या चालुक्यांचा एक ताम्रपट फार महत्वाचा आहे. त्यांत त्रैकूटक शकाचा उपयोग केलेला असून शिवाय सिन्धप्रान्त काबीज केल्यावर आरबांनी इतर जवळचे प्रान्त जिंकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांत सांगितलें आहे. या प्रयत्नापैकी एका प्रयत्नांत त्यांची नवसारी येथें चालुक्यांशीं गांठ पडून त्यांना हार खावी लागला. हा उपरनिर्दिष्ट ताम्रपट इ. स. ७३९ त ( कूटक शक ३९० ) कोरलेला असून पुलकेशीच्या नांवाचा आहे, व हिंदुस्थानच्या सामान्य इतिहासावरहि त्याने किंचित् प्रकाश पडण्यासारखा आहे. त्यांत म्हटले आहेः-' दारितोदित सैन्धव कच्छेल्ल सौराष्ट्र चावोटक मोर्य गुर्जरादि राज्ये निःशेष दाक्षिणात्य क्षितिपति जिगीबया दक्षिणापथ प्रवेश प्रथममेव नवसारिका विषय प्रसाधनायागते समरशिरसि विजिते ताजिक़ानीके' इ० ( बां. गॅ. गुजराथ ). आर्य लोक आरबांना तांजीक म्हणत. या ताजिकांनी सिंध, कच्छेल, सौराष्ट्र ( वलभी ); पहिलीं हिंदु राज्ये. चावोटक, मौर्य ( याचें वर्णन पुढे येईल ). आणि गुर्जर या राज्यांवर स्वान्या करून नंतर नवसारी मार्गानें सगळा दक्षिण भाग जिंकण्याच्या उद्देशानें चालुक्यांवर हल्ला केला असें वरील वर्णनांत म्हटले आहे. या यादीवरून इ. स. ७३९ त सिंधप्रांत आणि नवसारी यांच्या दरम्यान कोणतीं राज्यें होतीं हैं समजतें. त्यांत आलेले गुर्जर राज्य म्हणजे नर्मदेपलीकडील सर्व गुजराथ प्रान्त होय असे आम्हाला वाटतें. मध्य गुजराथचे कांहीं भाग जरी क्वचित् वलभीच्या राज्यांत मोडत तरी सामान्यपणे तो भाग दद्दांच्या भडोच येथील घराण्याच्याच ताब्यांत होता. पण आनन्द पुर आणि कच्छ हे भाग ह्युएनत्संगाचे वेळीं मालव राज्यांत समाविष्ट झालेले होते. असो, पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुर्जरवंशाचें राज्य एकंदर २०० वर्षे चालल्यावर भडोचचें घराणें नामशेष झाले ८ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास हा प्रकार झाला असावा, पण तो कसा घडून आला याविषयीं कांहीं ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. त्याचा नाश अरब लोकांकडून झालेला नाहीं एवढें खास. मग तो चालुक्यांनी केलेला असो वा चावोटकांनीं केलेला असो, त्याविषयीं निश्चित कांही सांगता येत नाहीं. भडोचचें गुर्जर घराणें जरी नष्ट झालें, तरी त्याचे नांव सर्व प्रान्ताला मिळाल्यामुळे ते मात्र चिरंजीव झाले आहे याचें आश्चर्य वाटते. देशाला नांवें पडण्याची कारणे भिन्न भिन्न असतात. इंग्लड देशाला ते नांव मिळण्याचे कारण अॅगल लोक पण ते तर एकंदर जनसमूहाचा अगदींच क्षुल्लक भाग होते. त्यांच्या बरोबरचे ब्रिटन, सॅक्सन, नॉर्मन, डेन इत्यादि लोक सर्व मागे पडून एकटे अॅगलच नांवामुळे पुढे आले. भरतखंडाला सांप्रत आपण सर्व लोक हिंदुस्थान म्हणतों, तथापि हें नांव त्याला कांहीं आपण स्वतः दिलेले नव्हे. ते परकीयांनी दिलेले आहे. पण तेच आतां पुढे होऊन मूळचें आपण दिलेले भरतखंड हें नांव लुप्तप्राय झालें आहे. पंजाबच्या नांवाची तीच स्थिति. त्याचे मूळचें नांव पंचनद. पण तें आतां केवळ वेद व महाभारत यांत मात्र राहिले आहे; परकीयांनी दिलेलें पंजाब हें प्रचारांत आले आहे. गुजरायच्या नांवांतहि असाच कांहीं प्रकार झाला असावा असे आम्हाला वाटतें. म्हणजे गुजरात हे नांव मूळ परकीयांनी दिलेले असून मग तेथील लोकांनी त्याला गुर्जर राष्ट्र या रूपानें आपलेसे केलें. वस्तुतः गुर्जरांची सामक्षा आतां तेथें कांहींच राहिलेली नाहीं. तेथील लोक गुर्जरांचे वंशज नसून त्यांपासून स्वरूप व स्वभाव या बाबतींत सर्वस्वी भिन्न आहेत. तेथील ब्राह्मणही गुर्जरवंशीय नाहींत. नागर ब्राह्मणांना जरी कित्येक पुराणेतिहासविशारद पंडित गुर्जर अतएव पर कीय समजतात तथापि वस्तुतः ते तसे नाहींत. त्याप्रमाणेंच भार्गव आणि औदीच्य ब्राह्मण हेही गुर्जरांनंतर पुष्कळ काळाने तेथें आलेले असून ते स्वतःला द्रविडेत म्हणूनच समजतात ब्राह्मणांप्रमाणे गुजरातेतील क्षत्रिय वर्णहि गुर्जरवंशीय नाहीं. त्यांच्यांतील वल, चावडे, गोहिल, सोळुखी इत्यादि क्षत्रिय आपल्याला गुर्जर म्हणवीत नाहींत. त्यांच्या या स्वतःच्या समजा विरुद्ध, व त्यांच्यांतील परंपरागत हकीगती विरुद्ध कांही पंडित त्यांना परदेशस्थ गुर्जर म्हणतात. पण या पंडितांच्या मतापेक्षां त्या लोकांची परंपराच अधिक ऐतिहासिक अतएव अधिक विश्वसनीय होय. या संबंधानें आणखी विवेचन प्रसंगानुसार पुढे येईल. तात्पर्य गुजरातेंतील ब्राह्मण व क्षत्रिय वर्गोतील लोक तसेंच इतरहि जातीचे लोक स्वरूपदृष्टया व इतिहासदृष्टया गुर्जर नाहींत. पण असे असूनहि त्या प्रांताला गुजरात असे नांव मिळाले याचे कारण, तेथे आपणाला गुर्जर म्हणविणारे घराणे २०० वर्षे म्हणजे इ. स. ५५० पासून इ. स. ७५० पर्यंत राज्य करीत होते हेच होय असे आम्हाला वाटते. या गुर्जरवंशाने आनर्त व लाट हीं प्रान्ताची जुनी नांवें मागे सारून स्वतःचे नांव पुढे केले; व तसेंच तें न्याच्या मागेहि राहिले आहे त्यांचा या प्रान्तावरील अंमल यशस्वी व वळभी राजांच्या सारखाच सुखदायक झालेला दिसतो. त्यांच्या राज्यांत नमूद करण्यासारख्या मोठमोठ्या घडामोडी घडून आल्या नाहीत याच गोष्टीवरून खरें म्हटले तर त्यांचें राज्य एकमार्गी सुखाचें होते दिसतें व त्यामुळेच कदाचित त्यांचे नांव प्रांताच्या नांवांत चिरस्थायि झाले असावें. गुर्जर राजांनी आपल्या भाषेचा पगडा त्या लोकांवर बसविल्यामुळेहि कदाचित त्या प्रान्ताळा त्यांचें नांव मिळालेले असेल. गुजराती भाषेचें स्वरूप उत्तरेकडील असून ती भाषा महाराष्ट्रीपेक्षां शौरसेनीशींच निकट पहिली हिंदु राज्ये, तथापि पूर्वी एकदां महाराष्ट्री देखील गुजरायेंत प्रबळ होती. त्रैकूटकांच्या राज्याचे वेळीं तेथील लोकांवर महाराष्ट्री भाषेची छाप न पडणे अशक्य होते. त्रैकूटकांची लिपि व त्यांचा शक तर गुर्जरराजांच्याहि दानलेखांत आढळत असल्याबद्दल पूर्वी सांगितलेच आहे. शिवाय काठेवाड आणि गुजराथेंतील जैन लोकांचें धार्मिक वाङ्मय महाराष्ट्रीत आहे, आणि अजूनहि धर्मग्रंथांचें लिहिण्यांत तेथील जैन महाराष्ट्रीचाच उपयोग करतात. या गोष्टीवरूनहि वरील विधानाची साक्ष पटते. म्हणजे एका काळीं गुजराथेंतील सामान्य लोकांची भाषा महाराष्ट्री किंवा तत्सदश होती असेच अनुमान करावें लागतें. कदाचित् दक्षिणी जैन सहाव्या शतकाच्या पूर्वी सर्व हिंदुस्थानांतील जैनांत अग्रगण्य असल्यामुळे गुजराथी जैनांनी त्यांच्यापासून आपला धर्म व त्याबरोबर धर्म ग्रंथांची भाषा म्हणून महाराष्ट्री यांचा स्वीकार केला असेल. कारण कांहीं असो, बौद्ध धार्मिक ग्रंथ जसे पाळीत आहेत तसे जैन महाराष्ट्रीय आहेत. भाषेचा हा प्रश्न येथे इतकांच सोडून एवढे सांगणें पुरे आहे कीं, ती भाषा उत्तरेकडील गुर्जरांच्या भाषेवरून बनलेली असल्यामुळे ती शौरसेनीशीं निकट संबद्ध आहे. म्हणजे गुजराती भाषा व प्रान्ताचें गुजरात हें नांव इ. सनाच्या आठव्या शतकापासून प्रचलित आहेत असें ठरतें. गुर्जरांच्या ताम्रपटांवरून पहातां ते सूर्योपासक असावेत असे दिसतें, व त्यांत कांही आश्चर्यहि नाही. त्यांच्या मूळ ठिकाणीं म्हणजे भिनमाल येथे सूर्याचें मंदिर होतेच. ते सूर्ये/पासक होते एवढ्यावरून त्यांना परकीय देशस्थ मानण्याचे कांहीं कारण नाहीं. खरोखर पहातां सूर्योपासना भरतखंडांत वेदकालापासून प्रचलित असून ब्राह्मणांचा अति पवित्र जो गायत्री मंत्र त्याची देवता सूर्यच आहे. अलीकडील काळांत शिव व विष्णु यांच्या उपासनेने अग्रस्थान पटकाविल्यामुळे जरी सूर्योपासना मागे पडली आहे, तरी ती केव्हांहि समूळ नष्ट झालेली नाहीं. इस पू ४०० च्या सुमारास टोसियस नामक ग्रीक लेखकानें असे लिहिले आहे की अबूपासून पंधरा दिवसांचे वाटेवर एका ठिकाणी सूर्यचंद्राच्या उपासनेचें एक मोठे क्षेत्र आहे. हे स्थान मारवाडांत कोठें तरी असावें (बांचे गॅझिटीभडोच येथील गुर्जर. जर, गुजरात, पा. ५३२). या लिहिण्यावरून पारशी लोकांचा हिंदुस्था माला संपर्क होण्यापूर्वीपासूनच येथें सूर्योपासना चालू होती हैं उघड होते. मारवाडांतील भिनमाळचें सूर्य मंदिर हे अर्थात् फार जुनें असले पाहिजे. त्याप्रमाणे प्रभास येथील चंद्रोपासनाहि बरीच प्राचीन आहे. प्राचीन राजांना अनेकवार मोठे सूर्योपासक म्हटलेले आढळते, व ठाणेश्वराच्या वर्धन घराण्यांत आणि काठेवाडांतील वलभी घराण्यांतहि असे सूर्योपासक राजे दिसून येतात. कित्येक राजांनी पूर्वीची सूर्योपासना सोडून दुसरीचा स्वीकार केलेला असल्यामुळे त्यांना त्याप्रमाणे माहेश्वर व भागवत अशीं विशेषणे लाविलेली दिसतात. अद्यापिहि आमच्या पंचायतन पूजेंत सूर्योपासना शिल्लक आहेच. एका विशिष्ट प्रकारचे सूर्योपासक म्हणून परदेशस्थ मग नामक लोकांचा हिंदुसमाजांत प्रवेश होऊन त्यांत ते समाविष्ट झाले म्हणून हरत-हेच्या येथील सूर्योपासकांना परदेशीय मग समजणे गैर आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणें आर्योच्या दुसऱ्या स्वारींत आलेल्या सोमवंशीय टोळ्यांपैकीं गुर्जर हे असून त्यांची वृत्ति गीतेत सांगितलेल्या वैश्यांची होती; म्हणजे ते कृषि व गोरक्ष्य हे धंदे प्राधान्यें करून करीत. पंजाबांतील आपल्या मूळ स्थानांतून ते प्रथम मारवाडांत भिनमाल येथे कां व कसे आले तो इतिहास पुढे योग्य स्थळीं सांगतां येईल. स्कंदपुराणांत ( आमच्या मतें या पुराणाचा काळ ८ वें शतक होय ) गुजराथ व काठेवाड यांपैकीं तीन चार सुप्रसिद्ध तीर्थ-स्थानांचा उल्लेख असून त्यांच्या उत्पत्तीविषयीं त्यांत कांही काल्पनिक पण गमतीच्या कथा दिलेल्या आहेत. त्यांचा विचार पुढे यथा प्रसंग होईल, येथें एवढेच सांगावयास पाहिजे कीं नर्मदातीरावरील भरुकच्छ ( भृगु आश्रम ), स्तंभपुर उर्फ खंबायत जवळील महीसागर संगम व कुमारी तीर्थ, नागर ब्राह्मणांचे आनन्दपुर आणि प्रभास म्हणजे सरस्वतीनामक एका काल्पनिक नदीच्या समुद्राशीं झालेल्या संगमाजवळील तीर्थ, तसेंच सोमनाथाचें सुप्रसिद्ध देवालय इत्यादि पवित्र स्थानें ७ व्या शतकांत फार प्रसिद्ध व सर्वांना पूज्य अशीं होतीं. हे प्रकरण पुरे करण्यापूर्वी भडोच, खंबायत आणि प्रभास या गुजराथेंतील बंदरांचा प्राचीन काळापासून इतर ठिकाणांशीं दर्यावर्दी व्यापार कसा चालत असे, याचे दिग्दर्शन करणें अवश्य आहे. पृथ्वीपर्यटनवर्णनात्मक पेरिप्लस नांवाच्या ग्रंथांत भडोच बंदरीत बाहेरून येणाऱ्या मालांत मध, पितळ, कथील, शिसें, पोवळी, अशुद्ध सोने, विविध कापड, चिटे, डीक, सोन्यारुप्याचीं नाणी, मलमे, सुगंधि द्रव्यें, व राजे लोकांच्या उपयोगाची निरनिराळी वाद्ये आणि त्यांच्या जनानखान्यासाठी तरुण यवनी कन्या व उंची वस्त्रे यांचा निर्देश केलेला असून, बाहेर जाणान्या मालांत हस्तिदंत, मातीचीं भांडीं, कापूस, रेशीम, मिरची इत्यादि पदार्थ सांगितले आहेत. हे वर्णन इ.स. २०० च्या सुमाराचे आहे. आठव्या शतकांतील आरब लोकांनी केलेल्या वर्णनाशी हैं ताडून पहातां असे दिसते की, त्यावेळी काठेवाडांत व गुजराथेंत सोन्याराग्याच्या खाणीचं काम चालत असे. तथापि उत्तम सोन्याची नाणी कशी पाडावीं हे तेथील लोकांस चांगलेंसे माहीत नव्हनें. म्हणूनच मुबलक सोनं व रुपे देशांत पैदा होत असूनहि त्यावेळीं सोन्यारुप्याची नाणी त्या लोकांना बाहेरून आणणे युक्त वाटे. गुजराथेत दीनार नाणे चालत असे व ते परदेशी होते. दीनार हा शब्दच परकीय आहे. वरील बंदरांशिवाय मिंदन ( आजचे संजाण ) बंदरांतून सागाचे लांकूडबांबूच्या काठ्या हा मालहि बाहेर रवाना होई. भडोच येथील भाल्यांची दांडे बाहेर ठिकाणीं फार खात. तसेच खंबायतचे जोडे प्रसिद्ध असत ( अजूनही तसे आहेत. ) पाचूचे खडेहि गुजराथेतून बाहेर देशी जात पूर्वी गुजराथेतील राजांच्या जनानखान्यासाठी यवनी तरुणी इकडे येत, पण तो प्रकर पालटून आठव्या शतकांत अरब सरदारांसाठी गुजराथेतून तरुणी तिकडे नेऊ लागले ! या सुमारास मुसलमानी देशांतून म्हणजे विशेषतः अरबस्तान व इराण यातन घोडेहि इकडे आणीत असत. महाभारतकालापासून प्रसिद्ध असलेलों मडोचची कापसांचीं वस्त्रे व कापूस हीं अद्यापि तशींच असून त्यांचीहि बाहेरदेशी रवानगी होत असे. प्रकरण १० वें. बादामी वें चालुक्य घराणे. [ या घराण्याच्या इतिहासाची त म्रलेख, शिलालेख इत्यादि साधन 'विपुल असून त्यांवरून कळून येणारा त्याचा इतिहास डॉ. सर रामकृष्ण भांडारकर यांनी आपल्या दक्षिणच्या इतिहासांत दिलाच आहे. त्यावरून मुख्यत्वे हे प्रकरण लिहिले असून रामायण, महाभारत व ताम्रपटादि लेख यांच्या परिशीलनाने झालेलीं तद्वेिषयक आमची मतेहि यथाप्रसंग आम्हीं नमूद केलीं आहेत. ] दक्षिण हिंदुस्थानांतील ह्युएनत्संगाने पाहिलेली व वर्णिलेली मुख्य राज्यें म्हटलीं म्हणजे महाराष्ट्र, कांची आणि कोंकणपुर हीं होत. त्यांतहि महाराष्ट्रानें इतर सर्वांना आपले अंकित करून सर्व दक्षिण भागावर साम्राज्य स्थापिलें होते. या राज्यांचा जो कांहीं इतिहास प्राचीन कोरींव लेखांवरून दिसून येण्यासारखा आहे तो येथें देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहो. या तीन्ही राज्यांतील राजवराणीं ज्यांना आज आम्ही मराठे म्हणतों, त्या जातीचीं होतीं अमें आमवें मत आहे. कित्येकांस हैं मत चमत्कारिक वाटेल. पण वस्तुस्थितीच तशी असल्यामुळे ही गोष्ट नाकबूल करून चालणार नाही. त्या राजघराण्यांचे सांप्रतचे प्रतिनिधि मराठेच आहेत. त्यावेळचे चालुक्य म्हणजे आजचे चाळके किंवा सोळुंखी होत. कांचीचे पल्लव आज पालवे म्हणून आणि कोंकणपुर अथवा बनवासी येथील कदम्ब हे कदम या नांवानें आज प्रसिद्ध आहेत. म्हणजे ७व्या शतकाच्या आरंभी दक्षिणेत असलेल्या मुख्य तोन्हीं राज्यांतील राजे महारट्टी ऊर्फ मराठेच होते. वंशदृष्टीनें ते मिश्र आर्य असून प्रथमतः ते गोदावरीच्या आसपास रहात आणि महाराष्ट्री नांवाची प्राकृत भाषा बोलत. अशी ही वस्तुस्थिति आजवर कोणाच्या लक्षांत आलेली दिसत नाहीं; म्हणून कित्येकांनीं बादामीच्या चालुक्यांना कानही म्हणजे द्रवीड ठरविले आहे. पट्टवांचें तर बहुतेकांना कोडेंच पडलें असून कदम्ब म्हणजे कोणी मूळचे द्रवीड-वंशीय ब्राह्मण असावे असें आजवर समजत आलेले आहेत. पण हा सर्व भ्रम आहे. ह्रीं सर्व घराणीं मूळ आर्यवंशीयच होत. कालान्तराने दक्षिणेतील मूळच्या द्रवीड राजवंशाशीं त्यांचा शरीरसंबंध घडून त्यांच्यांत पुढे मिश्रण झाले असावें. तथापि त्यांनी आपला मूळचा आर्यस्वभाव आणि आर्यधर्म व आर्यभाषा न सोडतां तशींच कायम ठेविलीं होतीं. त्या सर्वांचा इतिहास नीट लक्षांत येण्यासाठीं आर्यलोकांचा दक्षिणेंत प्रथम प्रवेश झाला, तेव्हांपासून दक्षिणच्या इतिहासाचें विहंगमदृष्टया निरीक्षण करणें अवश्य आहे. आर्य लोकांनी दक्षिणेत उतरून तेथें वसाहती केल्या, याबद्दल आतां कोणता वादच राहिलेला नाहीं. डॉ. भांडारकरांचे मतें हा वसाहतकाल पाणिनि व कात्यायन या दोन प्रसिद्ध वैयाकरणांच्या मध्ये केव्हां तरी म्हणजे इ. स. च्या पूर्वी ९ व्या आणि ४ थ्या शतकांच्या दरम्यान असावा. ( आमच्या मतें तो याहूनहि प्राचीन असूं शकेल. पाणिनीनें एका सूत्रांत अश्मकी हें राजनाम तसेंच राजपुत्रनामहि हेंच आहे असे सांगितले असून, अश्मक म्हणजे आमच्या मतें हल्लींच्या पैठणच्या आसपासचा प्रान्त असावा. पाणिनीडून प्राचीन कालच्या ग्रंथांत अश्मक हें उत्तरेकडील बादामीचें चालुक्य घराणे. आन्तांचें व लोकांचें नांव म्हणून सांगितलेले आढळतें. ) आर्य 'लोकांची दक्षिणेतील पहिली वसाहत विदर्भ देशांत म्हणजे आजच्या चहाडांत झाली, व तेथून पुढे ते गोदावरीतीरावरील प्रतिष्ठान ऊर्फ पैठणपर्यंत पसरले. गोदावरीच्या कांठचा मुलूख या विजयशाली आर्यांना फारच आवडला, व सर्व जगांत उत्तम प्रांत असें त्यांचें त्यांनीं पुराणांत वर्णन करून या श्रेष्ठपणाला कारणीभूत झालेल्या गोदावरीला उत्तरेकडील गंगेच्या जोडीस बसविलें. नवीन वसाहतीच्या राजधानीला देखील त्यांनी प्रतिष्ठान असे जुनेंच नांव दिलें. आज ज्याला प्रयाग म्हणतात. त्याचेंहि प्रथम प्रतिष्ठान असेंच नामकरण पूर्वीच्या आर्यांनीं केलें होतें, व त्याच नांवाची दक्षिणेत पुनरावृत्ति झाली. प्रतिष्ठानाच्या स्थापनेनंतर हे वसाहतवाले पुढे आणखी निरनिराळ्या प्रान्तांत राहूं लागले; आणि त्या प्रान्तांना त्यांनीं राष्ट्र असें नांव दिलें. या राष्ट्रांचीं नांवें पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, आणि मल्लराष्ट्र अशीं महाभारतांतहि लिहिलेली असून हीं तीन व अश्मक मिळून आजचा महाराष्ट्र झालेला आहे. प्रान्त किंवा देश या अर्थी राष्ट्र हा शब्द महाराष्ट्रीयांचा फार आवडता होता असें पुढे आम्हीं दाखविणार आहों. या राष्ट्राशिवाय आणखी दक्षिणेंत कृष्णेच्या उगमाजवळ कुंतल देश म्हणून होता. महाभारतांत कुंतल हें नांव उत्तरेकडील व दक्षिणेकडील अशा दोन्ही देशांच्या यादींत आलेले आहे. म्हणजे आर्यांच्या अमलाखाली असलेल्या प्रान्ताच्या यादींत तें असून शिवाय दक्षिणेकडील अनार्य देशांतहि तें होतें. कदाचित दोघांच्या सरहद्दीवर असल्यामुळे असा प्रकार झालेला असेल * असो. कुंतल देशापर्यंत म्हणजे कृष्णानदीपर्यंत आर्यांचा दक्षिणेत प्रवेश झाल्यावर तेथें पुढे त्यांना अटकाव झाला. तुंगभद्रेच्या महाभारतांतील देशाची यादी एका ठिकाणी दिली आहे ती पहा.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित ग्रामस्थांनी केलपाणीत तळ ठोकला! अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जुन्या गावात गत २0 दिवसांपासून पुनर्वसित गावकरी जुन्या केलपाणीत तळ ठोकून आहेत. शेत जमिनी द्या, नंतर परत येऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाचे नुसते मेळघाट दौरे सुरू आहेत. दरम्यान, १२ जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा फौजफाटा शेत जमिनीचा शासन निर्णय घेऊन मेळघाटात पोहोचला आहे. या पुनर्वसित ग्रामस्थांना शेत जमिनीच्या प्रक्रियेची कागदपत्रे दाखवित जंगलातून बाहेर चलण्याबाबत मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे. विजय शिंदे । अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जुन्या गावात गत २0 दिवसांपासून पुनर्वसित गावकरी जुन्या केलपाणीत तळ ठोकून आहेत. शेत जमिनी द्या, नंतर परत येऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाचे नुसते मेळघाट दौरे सुरू आहेत. दरम्यान, १२ जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा फौजफाटा शेत जमिनीचा शासन निर्णय घेऊन मेळघाटात पोहोचला आहे. या पुनर्वसित ग्रामस्थांना शेत जमिनीच्या प्रक्रियेची कागदपत्रे दाखवित जंगलातून बाहेर चलण्याबाबत मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले. परंतु, मूलभूत सुविधा तसेच उदरनिर्वाहाचे साधन, शेत जमीन मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या पुनर्वसित ग्रामस्थांनी दुसर्यांदा मेळघाट गाठून जुन्या गावी तळ ठोकला आहे. त्यांना बाहेर आणण्याकरिता मुख्यमंत्र्यांपासून तर आमदारांपर्यंत तसेच मुख्य सचिवांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वांनी प्रयत्न चालविले आहेत. परंतु, पुनर्वसित ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने अखेर शासनाने शेत जमिनीबाबत जी. आर. काढला आहे. सदर जी. आर. घेऊन अमरावती पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, आमदार प्रभुदास भिलावेकर, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, धारणी उपविभागीय अधिकारी विजय राठोड, अकोट तहसीलदार विश्वनाथ घुगे तसेच धारणी, चिखलदरा येथील तहसीलदारांसह अधिकारी, कर्मचार्यांचा फौजफाटा मेळघाटात पोहोचला आहे. या ठिकाणी पुनर्वसित ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात येत असून, शासनाने शेत जमिनीबाबतचा जी. आर. काढला, तसेच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जंगलाच्या बाहेर निघून पुनर्वसित गावातील सुरक्षित स्थळी चला, यावर लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची बोलणी उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेवरून गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे गत काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांच्या वाहनांचा ताफा या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात धुराळा उडवित आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत ऐन रात्रीच्याच वेळी अधिकार्यांच्या वाहनांचा ताफा मेळघाटात शिरत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांना प्रवेश बंदी असताना दिवसभर पुनर्वसित ग्रामस्थांवर समुपदेशन करण्याऐवजी रात्रीच्याच वेळी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची उठाठेव वन्य प्राण्यांच्या जीवावर उठत असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमीत व्यक्त होत आहे. उघड्यावर, जंगलात राहुट्या बांधून कुडकुडत्या थंडीत पुनर्वसित ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे. या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी महात्मा गांधींचा फोटो एका खांबावर लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. गत १५ - २0 दिवसांपासून मेळघाटात असलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांनी वन्य प्राणी किंवा वनसंपत्तीला कुठलीही बाधा पोहोचविल्याचे वृत्त नाही. केवळ जमीन हमारी मॉ है, इसे मत छीनो. असे फलक घेऊन न्यायाच्या प्रतीक्षेत एक-एक दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने जमिनीचा सातबारा कधी होतो आणि या मेळघाट आंदोलनाची समाप्ती कधी होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न काल (8 डिसेंबर) माढ्यात पार पडलं. या लग्नात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेजारी गप्पा मारल्या होत्या. या वरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालंय, असं समजण्याचं कारण नाही. आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्या असं अजित पवार म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं मिळून सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालं असतानाच अचानक नाट्यमय घडामोडी घडून अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा द्यावा लागला होता . - 'थंड दूध' पिण्याने वाढते सौंदर्य ! 'हे' ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती. . छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती. सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसतेय. हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील आवडले आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. झी २४ तासने दिलेल्या माहितीनुसार सायली संजीव अभिनेते अशोक सराफ यांची मानलेली मुलगी आहे, अनेकांना ही गोष्टी माहिती नाही तसेच काहींना ही एख अफवा असल्याचे वाटते. मात्र खुद्द सायलीने याविषयीचा खुलासा केला होता. तिने गोष्ट खरी असल्याचं सांगितले होते. 'अशोक सराफ मला त्यांची मुलगी मानतात तर मी त्यांची मानलेली मुलगी आहे हे बऱ्याचं लोकांना माहीत नाही. ' असं तिने म्हटले होते. फिटनेसबाबतही सायली बरीच सजग असते. आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
देशभरातील मंदिरे व गुरुद्वारा यांमधून देण्यात येणारे मोफत भोजन म्हणजेच लंगर आणि भंडारा यांना लवकरच वस्तू व सेवा करातून सूट मिळणार आहे. केंद्र सरकारने या बाबतीतील आपली भूमिका थोडी मवाळ केली आहे. याबाबतीत एका महिन्याच्या आत निर्णय होऊ शकतो, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. सरकार जीएसटी विधेयकाच्या काही अटींमध्ये बदल करेल आणि लंगर व भंडार्यासाठी सूट मागणाऱ्या धार्मिक संस्थांकडे त्यांचे वार्षिक हिशेब मागेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर आणि शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मागणी केली होती. सरकारने आपले म्हणणे ऐकले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी कौर यांनी दिली होती. शिखांचे पवित्र स्थळ असलेले अमृतसर येथील सुवर्ण मंदिर गुरुद्वाऱ्यात जगातील सर्वात मोठा लंगर चालतो. तेथे लाखो लोकांना वर्षभर मोफत जेवण देण्यात येते. यात केवळ तूप-साखर व डाळ यासाठी 75 कोटी रुपये खर्च होतात. सध्या या लंगरमध्ये वापरण्यात येणाऱ्या तूप, दूध, भुकटी, तेल, साखर, गॅस सिलिंडर आणि अन्य वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे या लंगरवर 20 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दिल्ली डायनेमोस विरुद्ध जमशेदपूर असा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली डायनेमोस संघाचा मागील सामना नॉर्थ ईस्ट युटीडी संघाबरोबर होता. या सामन्यामध्ये नॉर्थ ईस्ट युटीडी संघाने पहिल्या हाफमध्येच २ गोल केले. दिल्ली संघ हा सामना ०-२ अश्या फरकाने हरला. दिल्ली संघाने एकूण ३ सामने खेळले असून १ सामना जिंकला आहे तर २ सामनेसंघ पराभूत झाला आहे. संघाचे एकूण गुण ३ आहेत. जमशेदपुर संघाचा मागील सामना एटीके संघाबरोबर होता. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी जोरदार टक्कर दिली. दोन्ही संघाना शेवटपर्यंत एकमेकांविरुद्ध गोल करता आला नाही व या सामन्याचा शेवट ०-० असा झाला. जमशेदपूर संघाने एकून ३ सामने खेळले असून तिन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत. दिल्ली डायनेमोस संघाला विजयासाठी जमशेदपुर संघाला जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे तर जमशेदपूर आजच्या सामन्यात तरी गोल करणार कि नाही याची उत्सुकता लागली आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असून जमेशदपूर ९व्या तर दिल्ली ८व्या स्थानी आहे.
Karnataka High Court On Facebook Ban: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने मेटाला इशारा दिला आहे. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर कर्नाटक पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. तपासात सहकार्य न केल्यामुळे न्यायालयाने फेसबुकवर बंदी घालण्याचे म्हटले आहे. हे प्रकरण सौदीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाशी संबंधित आहे, ज्याचे नाव शैलेश कुमार आहे. शैलेश कुमार 25 वर्षांपासून सौदी अरेबियात काम करत आहेत. शैलेश कुमार यांची पत्नी कविता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यातर्गंत ही सुनावणी सुरु आहे. कविता यांनी न्यायालयाला सांगितले की, 'शैलेश यांनी एकदा फेसबुकवर (Facebook) CAA आणि NRC च्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली होती, पण काही लोकांना ती आवडली नाही. शैलेश यांच्या नावाने बनावट खाते तयार आले, ज्यामध्ये सौदी किंग आणि इस्लामच्या विरुद्ध लिहिण्यात आले. यानंतर, सौदी पोलिसांनी शैलेश यांना अटक केली. ' कविता यांनी या प्रकरणाची तक्रार मंगळुरु पोलिसांकडे केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान, मंगळुरु पोलिसांनी फेसबुककडून काही माहिती मागितली, पण कंपनीने प्रतिसाद दिला नाही. शैलेश कुमार प्रकरणाचा तपास 2021 पासून लांबणीवर पडत आहे. कविता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, केंद्रालाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. सोशल मीडिया कंपनीने पोलिसांना सहकार्य न केल्यास देशभरातील त्यांच्या सेवांवर बंदी घालण्याचा विचार करु, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) म्हटले आहे. कविता या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिकरनकट्टे येथील रहिवासी आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडः दिवाळीचा सण सुरू आहे. बळीराजाची दिवाळी अंधारात घालवू नका. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले तर शेतकरी विजबिले भरू शकतो. घरातल्या विजबिलाची रक्कम मिटरचे युनिट तपासून दिले जाते. मात्र, शेतीचे वीजबिल हे अंदाजे दिले जाते. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून त्यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा, असे निर्देश डॉ. भारती पवार यांनी तक्रार निवारण बैठकीत दिले. बळीराजा हा खूप सहनशील आणि संवेदनशील आहे. तुम्ही आता त्यांचा अंत बघू नका, अशी तंबीही डॉ. भारती पवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिली. अनेक ग्रामपंचायतींच्या पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने गावे अंधारात आहेत. त्यांचे डीपी कनेक्शन खंडित करू नका. नादुरुस्त असलेल्या डी. पी. लवकर दुरुस्त करा. जिथे जिथे वीजपुरवठाविषयी समस्या असतील त्याठिकाणी जाऊन त्या सोडवा.
अकोला- मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर आता मुस्लिम समुदायही या मागणीवर आक्रमक झाला आहे. या आक्रमकतेचा पहिला बांध आज, गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर फुटला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) आणि भारिप-बमसंने काढलेल्या मोर्चातून ही आक्रमकता दिसून आली. राजकीय युतीसाठी एमआयएमला सोबत घेणारे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या मोर्चाला संबोधित केले. दुपारी तीनच्या सुमारास अकोला क्रिकेट क्लबच्या (एसीसी) मैदानातून मोर्चा निघाला. ऑल इंडिया एमआयएम आणि भारिप-बमसंचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पुढे महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाकचेरीवर पोहोचला. खबरदारीचा उपाय म्हणून या मोर्चाला जिल्हा परिषदेच्या डाव्या बाजूने एक फर्लांग अंतरावरच अडवण्यात आले होते. मोर्चाच्या शेवटी एका प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन सादर केले. यामध्ये आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाची जनगणना, मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद, मुस्लिम समाजाच्या 'शरीयत'मध्ये राजकीय हस्तक्षेपावर बंदी, अल्पसंख्याकबहुल वस्त्यांचा जलदगतीने विकास आदी मुद्द्यांचाही समावेश आहे. भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महासचिव युसुफभाई पिंजानी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, एमआयएमचे अकोट तालुकाध्यक्ष अब्दुल सादीक इनामदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमीरउल्लाखान पठाण, सिरसोलीचे माजी सरपंच इरफानअली मीरसाहेब, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रहेमान खान, मो. मुस्तफा मो. युसूफ, सय्यद मोहसीन सय्यद अख्तर, अन्सार खान अताउल्ला खान, शेख साबीर शेख मुसा, भारिप-बमसंचे राजेंद्र पातोंड, अॅड. संतोष रहाटे, विकास सदांशिव या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. देशभरातील मुसलमानांचा आतापर्यंत केवळ वापर झाला, असे निरीक्षण नोंदवत अॅड. आंबेडकरांनी मुसलमानांच्या आजच्या संघटितपणाचे कौतुक केले. ते म्हणाले, तुमचा वापर करणाऱ्या काँग्रेस पक्षाला तुमची मते हवी आहेत, परंतु तुम्ही नको. म्हणूनच माझ्यासोबत युती करताना ते एमआयएमला बाजूला ठेवा, अशी गळ घालतात. परंतु मी ते कदापिही मान्य करणार नाही. मी हवा असेल तर एमआयएमही सोबत असेलच, असे मी त्यांना खडसावून सांगितले आहे. मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आतापर्यंत जेवढी आंदोलने झालीत, ती धार्मिक बॅनरखाली झाली होती. आज पहिल्यांदा हा लढा एका राजकीय पक्षाच्या नावाने पुढे रेटला जात आहे. त्यामुळे आजपासून खरी राजकीय लढाई सुरु झाली आहे. ही लढाई भविष्यातही अशीच सुरु राहील, या अपेक्षेसह अॅड. आंबेडकर यांनी आपल्या संबोधनाला विराम दिला. तसेच या आंदोलनात भारिप-बमसंचे ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सैफुल्ला खान, प्रभाताई शिरसाट, संध्याताई वाघोडे, शोभाताई शेळके, डॉ. प्रसन्नजित गवई, सिमांत तायडे, वंदनाताई वासनिक, मुकद्दर भाई, शरीफ राणा, शेख साबिर, नितेश किर्दक, रेखाताई अंभोरे, मो. रिझवान,शेख नाझिम, महादेव शिरसाट, विलास जगताप, शेख शमसु, जाकिर खान, गजानन गवई, दीपक बोडखे, अब्दुल सईद, पराग गवई, अब्दुल कय्युम, इम्रान शाह, शेख आमिन, सद्दाम अली, खुदेजाबी सै.मेहमुद, अकबर खान पठाण, युसूफ खान, सैय्यद जानी, बरकत अली, शेख एजाज, शेख जमिल, अन्सार भाई, मतलब भाई, वासिफ पटेल, प्रदीप पळसपगार आदी सहभागी झाले होते. तर आम्हाला का नाही आरक्षण? : राज्य शासनाने अलीकडेच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. तो धागा पकडून ते जर आंदोलनाच्या बळावर आरक्षण मिळवत असतील तर आम्हाला का नाही ? महाराष्ट्रात आमची संख्याही १९ टक्क्यांच्या आसपास आहे, असे म्हणत सर्वांनी यावेळी आरक्षणाचा मुद्दा रेटून धरला.
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अनागोंदीमुळे अखेर तालिबानने सत्ता स्थापन केली. तर आता तालिबानने मुलींच्या शिक्षणाबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातून अत्यंत दुःखद आणि मानवताविरोधी बातमी समोर आली आहे. तालिबान सरकारने सहाव्या इयत्तेवरील मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याविरुद्ध फर्मान जारी केले आहे. म्हणजेच अफगाणिस्तानातील मुली सहाव्या इयत्तेपुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तान सध्या मोठ्या संकटातून जात आहे. त्यात अफगाणिस्तान घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. तालिबानच्या या निर्णयामुळे सर्व देशांकडून मान्यता आणि मदत मिळविण्याचे प्रयत्न थांबतील. आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबान नेत्यांना शाळा उघडण्याचे आणि महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे हक्क देण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ एक नवीन फर्मान जारी केले. त्यानंतर शाळांनी मुलींना घरी जाण्यास सांगितले. दरम्यान, तालिबानचे प्रतिनिधी वहिदुल्लाह हाश्मी यांनी असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. मंगळवारी उशिरा हा निर्णय घेण्यात आला. आम्ही असे म्हणत नाही की मुलींच्या शाळा कायमच्या बंद केल्या जातील. मंगळवारी मंत्रालयाचे प्रवक्ते मौलवी अझीझ अहमद यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले की सर्व मुलींना शाळेत परत जाण्याची परवानगी दिली जाईल, तथापि तालिबान प्रशासन ज्या भागात पालकांचा विरोध करत आहे किंवा जेथे मुल मुली वेगळे आहेत. तेथे तालिबान शाळा बंद करणार नाही. परंतु शाळांना या अटींची पूर्तता करता आली तर सहाव्या इयत्तेपासून मुलींचे वर्ग सुरू करण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिलं आहे. मंत्रालयाच्या बाजूने कोणताही मुद्दा नाही, परंतू हा एक संवेदनशील आणि हा सांस्कृतिक मुद्दा आहे, असं मत व्यक्त केलं आहे. कट्टरतावादी तालिबान चळवळीचा कणा ग्रामीण भाग आहे, जिथे अनेक भागांमध्ये लोक आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यास इच्छूक आहेत. काही भागात, शिक्षकांनी सांगितले की तालिबानकडून अधिकृत आदेश जारी होईपर्यंत ते मुलींसाठी वर्ग चालवतील. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाचे विशेष प्रतिनिधी डेबोरा ल्योन गुरुवारी तालिबानची भेट घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना त्यांचा निर्णय मागे घेण्यास सांगतील.
भूम : बौद्ध समाजासाठी हक्काची अधिकृत स्मशानभूमी मिळावी या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष धीरज शांतलिंग शिंदे यांनी १ फेब्रुवारीपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भूम शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या नागरिकांना समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अधिकृत स्मशानभूमी उपलब्ध नाही. सध्या सर्व्हे नंबर २२१ मध्ये अनेक वर्षापासून अंत्यविधी करण्यात येत आहेत. परंतु, सदरील जागा ही बौद्ध समाजातील नागरिकांना अंत्यविधीसाठी अधिकृत नाही. त्यासाठी या जागेची स्मशानभूमीसाठी नगरपालिकेला नोंद करावी, अशी मागणी केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी व नगरपरिषद यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. परंतु, अद्याप नगरपालिकेच्या दप्तरी नोंद झालेली नाही. ती नोंद लवकरात लवकर करावी, या मागणीसाठी धीरज शिंदे यांनी हे उपाेषण सुरू केले आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या भारतातील पहिल्या सलग भूमिगत मेट्रोने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. असंख्य अडचणी पार करत या प्रकल्पातील १७ बोगदे तयार झाले आहेत. अजून १५ बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. साधारणपणे सन २०२१ पर्यंत हा मार्ग मुंबईकरांना सेवा देईल, अशी अपेक्षा आहे. १७ बोगदे तयार झाले असले, तरी आतापर्यंत या प्रकल्पाचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक आणि जिकीरीचा असाच आहे. यापुढे तर आणखी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारचे जॉईंट व्हेंचर असणारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही कंपनी अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली आहे. विदेशातून टनेल बोरिंग मशिन अर्थात टीबीएम मशीन बंदरात आणणे, त्यांच्या सुट्या भागांची वाहतूक करून ते प्रकल्पस्थळी आणणे येथपासूनच प्रकल्पाच्या खडतर प्रवासाला सुरूवात झाली होती. तब्बल सात मीटरचा एक भाग असे या अजस्त्र यंत्राचे स्वरूप आहे. त्यामुळे भाग सुटे करूनच ही यंत्रे प्रकल्पस्थळी नेण्यात आली. हे भाग वाहून नेणाऱ्या वाहनांना फक्त रात्रीच्या वेळेसच वाहतुकीला परवानगी होती. सुटे भाग प्रकल्पस्थळी आणल्यानंतर ज्या ठिकाणी स्थानकाची उभारणी होणार आहे, अशा ठिकाणी भूगर्भात सुमारे पाच मजले खाली मोठ्या विहीरी खोदण्यात आल्या आहेत. हे सगळे भाग त्या विहरीत सोडण्यात आले. सगळ्या भागांची जुळणी करण्यास साधारण दोन दिवस लागतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने या यंत्राद्वारे बोगदा खोदण्याचे काम सुरू झाले. यंत्राची देखभाल करणे हे सर्वात कठीण काम आहे. यंत्राच्या समोरच्या भागाला असणारी चकती ज्याला कटर म्हणतात, ते बिघडले की प्रत्यक्ष मनुष्यबळ वापरून बिघाड दूर करावा लागतो. ही दुरूस्ती झाल्याशिवाय बोगदा खोदणे शक्यच नसते. भूगर्भात काही ठिकाणी अत्यंत कठीण खडक, तर काही ठिकाणी दलदल, असे भिन्न स्वरूप होते. भरतीच्या वेळी आता येणाऱ्या पाण्याचेही आव्हान होते. भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर आत शिरलेच, तर अवघ्या दोन तासांत ते बोगद्यातून बाहेर फेकणारी यंत्रणा आहे. सध्या स्टेशन बॉक्सचा भाग उघडा असल्याने पाणी आत येऊ शकते. परंतु कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी आत येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे भूमिगत मार्गात पाणी साचले तर काय, या शंकाना काही अर्थ नाही. आग्रीपाडा परिसरात काम करताना मोठे आव्हान आले होते. भुसभुशीत मातीत खोदकाम करणे अवघड होते. एके ठिकाणी जुनी कोरडी विहीर आड आली. त्या ठिकाणाहून यंत्र शिताफीने न्यायचे होते. तसे करताना आसपासचा भाग ढासळण्याची शक्यता होती. मात्र अत्यंत कुशलतेने हे काम पार पाडले होते. काही ठिकाणी इंग्रजी 'एक्स' आद्याक्षराप्रमाणे भूगर्भातील रचना असल्यास तेथे यंत्राद्वारे काम करता येत नाही, अशा ठिकाणी मुनष्यबळ वापरूनच काम करावे लागले होते. या कामासाठी खास ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांना नेमण्यात आले आहे. प्रकल्पाच्या काही भागात यंत्रानेही फोडता येत नाही असा अत्यंत कठीण खडक मार्गात आल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यावेळी नियंत्रित स्फोट करून खडक फोडण्यात आले होते. अत्यंत संवेदनशील अशा एअरपोर्ट भागातही असेच आव्हान होते. एअरपोर्टच्या फायबर लाइनचे जाळे येथे आहे. या ठिकाणी काम करताना समजा कॉर्पोरेशनची वायर तुटली तर दुरूस्तीच्या कामासाठी जाण्यासाठी किंवा अन्य खोदकामासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागल्या होत्या. ही झाली यांत्रिक कामे. परंतु भूगर्भात काम करताना सुरक्षेची आव्हाने आणखी मोठी आहेत आणि ती थेट तेथे काम करणाऱ्यांच्याशी संबंधित आहेत. दलदलीची जमीन असल्याने मिथेन, सल्फर डाय ऑक्साइड या घातक वायुंचा धोका कायम असतो . त्यामुळे या वायुंचे प्रमाण नियंत्रित रहावे म्हणून चोवीस तास देखरेख ठेवली जाते. बाहेरून ऑक्सिजन घेणे, घातक वायुंवर नियंत्रण ठेवणे हे खुपच जिकीरीचे काम आहे. काम करणाऱ्यांना भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. प्रत्यक्ष यंत्र ऑपरेट होते, त्या ठिकाणचे वातावरण थंड राखले जाते. गरम हवा सातत्याने बाहेर काढली जाते. खोदकाम करताना पृष्ठभागावरील इमारतींना हानी पोहोचेल, अशी भीती होती. परंतु १७ बोगदे खोदताना एकाही इमारतीला धोका पोहोचल्याचे एकिवात नाही. असेच चित्र कायम राहो, हीच अपेक्षा! बांधकाम क्षेत्रातील आवाजाची पातळी हा या प्रकल्पासाठी मोठी डोकेदुखी होती. आवाजाचे हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. त्यानंतर कॉर्पोरेशनने स्वतःहून निरीची नियुक्ती केली. सध्या निरीच्या निकषानुसार काम सुरू आहे. अजून १५ बोगदे खोदण्याचे काम शिल्लक आहे. सात कंपन्यांना वाटून हे काम देण्यात आले आहे. बोगदे खोदून झाल्यानंतर खरे आव्हान पुढेच आहे. स्टेशन बॉक्स उभारणी, मेट्रोचे ट्रॅक टाकणे, वायरिंग, विद्युत प्रवाह, सिग्नल यंत्रणा, अशी अनेक किचकट कामे शिल्लक आहेत. मेट्रो कारडेपोसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून निर्माण झालेला वाद, गिरगाव काळबादेवीतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे दोन किचकट मुद्दे आहेत. त्यापैकी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता फक्त आरे कॉलनीतील कारडेपोचा प्रश्न शिल्लक आहे. हाही प्रश्न निकालात निघाल्यानंतर मेट्रो ३ आणखी वेग घेईल. सध्या तरी अर्धी मोहीम फत्ते झाली आहे, असे म्हणूया!
Sonalee Kulkarni : मॅक्सिकोच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे 'अप्सरे'चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितीये? Sonalee Kulkarni Photos: मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता सोनालीनं नवे फोटो शेअर केले आहेत.
Sushma Andhare । कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभांमधून त्यांनी शिंदे सरकारवर प्रहार केला. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या काळात भेट देत नव्हते असा आरोप शिंदे गटातील आमदारांचा आहे, याचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. "मात्र आमचे एकनाथ भाऊ घरात नसतात ते घाराच्या बाहेचरं असतात. ते इतके घराच्या बाहेर असतात की केसरकर भाऊ म्हणातात त्यांना सलाईन लावावे लागते. ते घराच्या बाहेर असतात पण ते मंत्रालयाच नसतात. ते गणपतीची आरती करतात. ते दांडीया खेळायला जातात. ते श्राध्दाचं जेवायला जातात. ते दिल्लीला हुजरे-मुजरे करायला जातात. त्यातून वेळ मिळाला तर ते गुवाहाटीला कामाख्याला जातात. ते घरात नसतात," असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. महत्वाच्या बातम्या : - Ambadas Danve । "भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर..."; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला! - Ashish Shelar । शेलारांच्या सुरक्षा रक्षकाला महिलेची मारहाण, गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?
येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असले, तरी त्याचा प्रभाव फारसा नसल्याने थंडी कमी झाली आहे असं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागांत काहीशी थंडी कमी झाली असल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीहून अधिक वाढला आहे. विदर्भात १७ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही थंडी नसल्याने किमान तापमानात १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा असला, तरी ढगाळ हवामानामुळे दिवसभर उन्हाचा चटका व रात्री काहीसा गारवा आहे. कोकणातील किमान तापमानात झपाट्याने बदल होत असले, तरी किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग या ठिकाणी हलका पाऊस पडेल.
गुजरातमधल्या न्याय प्राधिकरणाने 'फ्रोझन रोटी' प्रकारात मोडणाऱ्या पराठ्यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय योग्य ठरवल्याने अलीकडेच वादाचे तरंग उमटले. याच सुमारास देशात पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच अन्नधान्याचा साठा नीचांकी स्तरावर आल्याची माहिती पुढे आली. डिजिटायझेशन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर असल्याचे सिद्ध झाल्याचे वृत्तही अलीकडे भुवया उंचावणारं ठरलं. अर्थव्यवस्था किंवा आर्थिक आघाडीवरील घडामोडी म्हणजे सामान्यांच्या आकलनाबाहेरच्या किंवा त्यांच्याशी थेट संबंधित नसलेल्याच बाबी नसतात, तर त्यांच्यावर दुरून परिणाम करणारे घटक असतात. आर्थिक आघाडीवरचे निर्णय, घडामोडी सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यालाही स्पर्श करत असतात, फक्त हा संबंध समजून घ्यावा लागतो. तो बारकाईने लक्षात घेतला की, रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन दरवाढीचा फटका कसा बसला ते कळतं. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत दरवाढीवर कसं नियंत्रण राहतं, ते उमगतं आणि पुढे जाऊन रोजच्या किरकोळ आर्थिक घडामोडीही जगण्यावर कसा परिणाम करतात, ते उमगतं. अशाच काही घडामोडींनी आर्थिक आघाडीवरील ताजं चित्र अलीकडेच उलगडून दाखवलं. देशात वस्तू आणि सेवा कर लागू होऊन आता पाच वर्षं झाली आहेत; पण आजही कोणत्या वस्तूवर जीएसटी असावा किंवा नसावा या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. आता रोटी आणि पराठ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. 'फ्रोझन' रोटी-पराठ्यावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय वादात अडकला आहे. 'रेडी टू कूक' पराठ्यावर जास्त कर मोजावा लागू शकतो. गुजरातमधल्या 'ऑथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंग'या प्राधिकरणाने रेडी टू कूक म्हणजे 'फ्रोझन रोटी' पराठ्यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय योग्य ठरवला. अहमदाबाद इथल्या वाडीलाल इंडस्ट्रीजने कर आकारण्याच्या निर्णयाला प्राधिकरणाकडे आव्हान दिलं होतं. त्यावर प्राधिकरणाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे फ्रोझन पराठा खाताना अतिरिक्त कर मोजावा लागणार आहे. पराठा तयार करणाऱ्या कंपन्यांनी १८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा केला होता. हे पदार्थ गव्हापासून तयार होतात. गव्हाच्या पीठावरही जीएसटी मोजावा लागतो. या दोन्हींवर एकसारखा जीएसटी लागू व्हावा अशी मागणी त्यांनी केली. याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार, त्यांची कंपनी आठ प्रकारचे पराठे तयार करते. यामध्ये मलबार पराठा, मिक्स पराठा, व्हेज पराठा, ओनियन पराठा, प्लेन पराठा, लच्छा पराठा यांचा समावेश आहे. गव्हाच्या पिठापासून पराठा तयार करण्यात येतो. त्यामध्ये तेल, भाज्या आणि इतर पदार्थांचा वापर होतो. हा 'रेडी-टू-कूक' प्रकारातील पराठा आहे. तो ग्राहक घरी घेऊन गरम करून खाऊ शकतो. त्यामुळे त्यावर जीएसटी वा इतर कर लावण्यात येऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला होता. गुजरातच्या जीएसटी प्राधिकरणाने रोटी ही 'रेडी टू ईट' प्रकारात मोडते, तर हा पराठा 'रेडी टू कूक' प्रकारात मोडत असल्याने या दोन्ही गोष्टी एकदम वेगवेगळ्या असल्याचा दावा केला. प्राधिकरणानेही तूप अथवा बटर लावल्याशिवाय लज्जत येत नसल्याने फ्रोझन पराठा लक्झरी श्रेणीत मोडत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे पराठ्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय योग्य ठरवण्यात आला. याच सुमारास देशात पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच अन्नधान्याचा साठा नीचांकी स्तरावर आल्याची माहिती पुढे आली. हा साठा ऐंशी कोटी लोकांना अनुदानाच्या रूपात वापरता येणार होता. हा बंपर अन्नधान्य साठा अचानक कमी झाला. अलीकडेच देशातल्या अनेक भागात पावसाने रौद्र रूप धारण केलं. उशिरा अवतरलेला पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरीच काय, सरकारही हवालदिल झालं आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बेमोसमी पावसाने हाहाकार उडवला. शेतातली पिकं हातची गेली आहेत. एकूणच शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. गहू आणि तांदळाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यानंतर कडधान्य आणि डाळींचं नुकसान झालं आहे. या सर्वांचा परिणाम किरकोळ खाद्यान्न किमती वाढण्यावर झाला आहे. या किमती २२ महिन्यांच्या उच्चत्तम पातळीवर आहेत. भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या म्हणण्यानुसार या १ ऑक्टोबर रोजी एकूण अन्नधान्य साठा ५१. १४ दशलक्ष टन होता. त्यात अनिवार्य बफर स्टॉक ३०. ७७ दशलक्ष टन या आरक्षित भंडारापेक्षा ६६ टक्के अधिक आहे. सरकार हा साठा या वर्षासाठी राखीव ठेवणार आहे. सध्याचं तांदळाचं उत्पादन देशाची गरज भागवण्यासाठी पुरेसं आहे; पण खरी चिंता गव्हाच्या साठ्याची आहे. कारण हा साठा गेल्या १४ वर्षांमध्ये सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा सरकार अर्ध्याच गव्हाची खरेदी करू शकले आहे. मागणी वाढल्याने शेतकरी सरकारऐवजी खासगी व्यापाऱ्यांना गव्हाची विक्री करत आहेत. यंदा कडक उन्हाळ्याच्या झळा जाणवल्याने गव्हाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमालीचे घसरले. तांदळाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावलं आहे. त्यातून बासमती तांदळाला सवलत देण्यात आली आहे. तरीही खासगी व्यापारी अन्नधान्याचा काळाबाजार करून अथवा साठेबाजी करून जनतेला वेठीस धरण्याची भीती व्यक्त होत आहे. डिजिटाझेशनच्या मोहिमेची खबरबात - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हर गोरिंचेस यांनी डिजिटायझेशनसाठी भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. ते म्हणतात, भारत सरकारचं हे पाऊल हा एक मोठा बदल आहे. डिजिटायझेशन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर असल्याचं सिद्ध झालं आहे. भारताने डिजिटायझेशनच्या क्षेत्रात वेग घेतला आहे. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना गोरिंचेस म्हणाले, 'फायनान्शियल इन्क्लुजन'प्रमाणेच डिजिटायझेशन अनेक पैलूंमध्ये उपयुक्त ठरलं आहे. कारण भारतासारख्या देशात बँकिंग व्यवस्थेशी जोडलेले नसलेले लोक मोठ्या संख्येने आहेत. 'डिजिटल वॉलेट'मध्ये प्रवेश मिळाल्याने ते सहज व्यवहार करण्यास सक्षम झाले आहेत. डिजिटायझेशनमुळे लोकांच्या अनेक समस्या सोप्या झाल्या आहेत. 'डिजिटल वॉलेट'मुळे लोकांचं जीवन सोपं झालं आहे. कारण 'डिजिटल वॉलेट'मुळेच लोक सहज व्यवहार करू शकले आहेत. 'डिजिटायझेशन'मुळे लोकांच्या बँकांशी संबंधित अनेक समस्या सुटल्या आहेत. आता लोकांना बँकेत न जाता घरी बसून माहिती मिळते. सोबतच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. डिजिटलायझेशनमुळेच हे शक्य झालं आहे. भारताची वितरण व्यवस्था मजबूत झाली आहे. लोकांना आधुनिक अर्थव्यवस्थेत आणण्यातही ही मोठी मदत आहे. हा वाढीचा घटक आहे आणि 'डिजिटल प्रणाली'त प्रवेश केल्याने बाजारपेठांमध्येही बदल होतो. भारतासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल उपक्रमामुळे सरकारला लोकांपर्यंत पोहोचणं आणि वितरण प्रणाली लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं आहे. हे पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत खूप कठीण होतं.
तीन गेबलांसह असलेले एक-मजली घर. चित्रामध्ये फक्त दोनच गेबल दिसत आहेत (पिवळ्या रंगात रंगवलेले) गेबल ही एक प्रकारची भिंत असते जी छपराच्या दोन कडांच्या मध्ये असते. सहसा ही त्रिकोणी असते. गेबलचा आकार आणि ते तपशीलवार कसे वापरले जाते यावर त्या इमारतीमध्ये वापरलेल्या स्ट्रक्चरल सिस्टमवर अवलंबून असते. यातून त्या ठिकाणचे हवामान, सामग्रीची उपलब्धता आणि सौंदर्याच्या कक्षा प्रतिबिंबित होतात. एक गेबल भिंत किंवा गेबल एंड सामान्यपणे संपूर्ण भिंतीस संदर्भित करते. त्यामध्ये गेबल आणि त्याच्या खाली असलेल्या भिंतीचा समावेश असतो. काही प्रकारच्या छतांमध्ये गेबल नसते (उदाहरणार्थ हिप छप्पर). गेबल्स असलेल्या छताचा एक सामान्य प्रकार, गॅबल छप्पर. पॅरापेट मध्ये खूप वक्र (डच गॅबल) किंवा आडव्या पायऱ्या (क्रो-स्टेप्ड गेबल) पासून बनलेले असते. यात छताच्या कर्णरेषा लपू शकतात. अलीकडील इमारतींच्या बांधकामात गेबल बऱ्याचदा क्लासिक पेडीमेंट फॉर्म प्रमाणेच बनवले जाते. परंतु क्लासिकल स्ट्रक्चर्सच्या विपरीत, जे ट्रेबेशनद्वारे कार्य करतात, बऱ्याच इमारतींचे गेबल टोक प्रत्यक्षात बेअर-वॉल स्ट्रक्चरसारखे असतात. गेबल शैली फॅब्रिक स्ट्रक्चर्सच्या डिझाइनमध्ये देखील वापरली जाते. वेगवेगळ्या पद्धतीची ढील देउन वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे बनवले जातात. गॅबल छप्परचे उलटे रूप म्हणजे व्ही-छप्पर किंवा फुलपाखरू छप्पर . हाऊस ऑफ सेव्हन गेबल्स (डिस्मिग्ग्युएशन) बेल-गेबल ( एस्पाडेआ ) टायम्पॅनम (आर्किटेक्चर) Chisholm, Hugh, ed. (1911). "गेबल" . ज्ञानकोश ब्रिटानिका . 11 (11 वी). केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. पी. 380.
Jubilee Megastar Dada. दादा कोंडके पुन्हा होणे नाही. त्यांनी चित्रपटसृष्टीत जे काय करून दाखविले ते पुन्हा आता होणे नाही. अगदी हिंदीतदेखील होणे नाही. सलग नऊ चित्रपट ज्युबिली होणे... त्यात मग सबकुछ दादा, असेच! म्हणजे निर्मती दादांची, अभिनय दादांनाचा, स्क्रिप्ट तयार करण्यात दादांचा पुढाकार. संगितकार कोण, त्याने कसे संगीत द्यावे, हे ठरविणार दादा. दादांचा चित्रपटाच्या पडद्यावरचा प्रवेश चक्क भालजी पेंढारकर यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या दिग्दर्शनाखाली आणि आशीर्वादानं झाला. 'तांबडी माती' मध्ये त्यांनी दादांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपट चालला नाही. दादा चित्रपटाच्या पडद्यावर येण्याआधीच स्टार होते. त्यांच्या नावाला वलय आले होते. असे भाग्य त्या आधी कुणाला लाभले असेल असे वाटत नाही. त्यामुळे 'तांबडी माती' हा तमाम महाराष्ट्राच्या औत्सुक्याचा विषय होताच. तो सिनेमा चालला नाही त्याचा ठपका अर्थातच दादांवर ठेवला गेला. 'विच्छा'नं समाजातील उच्चभ्रू, ढोंगी मानसकितेवर कोरडे ओढले होतेच. त्याचा बदला घेण्याची ही संधी चालून आली होती. सार्यांनीच तांबडी माती न चालण्याचे खापर दादांच्या डोक्यावर फोडले. वगनाट्य करणे वेगळे आणि चित्रपट करणे वेगळे. उगाच भलतञयाच ठिकाणी नाक खुपसले की असेच होते... अशी जहरी टिका करण्यात आली. मात्र, भालजींनी दादांना समजावले, टिका कारांच्या या समीक्षेकडे बघू नकोस. तसे केलेस तर तू आयुष्यभर कामच करू शकणार नाहीस. दादांनी ते पथ्य नंतर आयुष्यभर पाळले. आये, उषा, पँट आणि यश! एकूणात भालजींचे म्हणने असे की तुझा जॉनर मला नेमकेपणाने पकडता आला नाही. तूच आता चित्रपट काढ... मग सोंगाड्याचा जन्म झाला. वसंत सबनीस यांनीच विच्छा लिहिले होते. दादांचा जॉनर त्यांना माहिती होता त्यामुळे सबनीसच योग्य होते. त्यात मग दादा आणि भालजींनी तया संहितेला फोडणी दिली. भालजींच्या संचात असलेल्या गोविंद कुलकर्णी यांच्याकडेच दिग्दशनाची जबाबदारी देण्यात आली होती. तसे भालजी पाहणारच होते मात्र कुलकर्णी होते. त्यांनीच संगीत बारी चालविणार्या उषा चव्हाण यांचे नाव सुचविले आणि त्यांनी सोंगाड्या करण्यासाठी होकारही दिला. दादांच्या चित्रपट कारकीर्दीची तीन वैशिष्ट्ये सागायची झाल्यास त्यांच्या चित्रपाटतली 'आये', दादाच म्हणत 'ज्याला आय नाय, त्याला काय नाय' अर्थात या वाक्याचाही दुसरा अर्थ शोधून लोक हसून घेत. तर आये, दुसरा सिग्नेचर सिंबॉल म्हणजे उषा चव्हाण ही नायीका आणि तिसरा म्हणजे दादांची नाडेवाली हाफ पँट... सोंगाड्या पासूनच या तिनही गोष्टींनी दादांची सोबत केली ती अगदी अखेर पर्यंत. दादांच्या या चित्रपटातील भूमिकेला भक्कम आधार देणारी भूमिका म्हणजे त्यांच्या 'आय'ची होती. बावळट वाटणारं पोरं अन् त्याची अत्यंत मायाळू पण पोराच्या भल्यासाठी वरपांगी कडकपणा धारण करणारे आय... भालजींच्या डोळ्यासमोर हे कॅरेक्टर होत. ते रत्न्ामालाबाईंच्या रूपात सापडलं आणि मग jRuekykckbZ दादांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या आयच झाल्या. दादाची भूमिका बावळट होती. गरीब नायक होता तो. त्याला मग फाटके कपडे घालायचे काय, असा सवाल होता. फाटक्या कपड्यातून गरीबी दिसेल पण बावळटपणाचे काय? मग भालजींनी कपडेपटाची पेटी बोलावली. त्यात ही ढगळ, बेंगरुळ वाटणारी पँट दिसली. तिचा नाडा नको तितका लांब होता. भालजींनी तीच पँट दादांना घालायला दिली. दादांना त्या अवतारात बघून एकच हशा पिकला. चित्रपट पूर्ण झाला. दादांच्या चित्रपटांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिरोईनचे नाव उषा आणि नायीकेला सुरेल आवाजही 'उषा' मंगेशकरांचाच. खरेतर ही गाणी राम कदम आशा भोसले यांच्याकडून संगीतबद्ध करणार होते मात्र आशा भोसले ऐनवेळी न आल्याने राम कदम यांनी ती उषा मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. यातली काय सखु आणि माळ्याच्या माळ्यामंदी, ही गाणी दादांनी आधीच चाल लावलेली आणि दादांनीच लिहिलेली होती. सोंगाड्या प्रदर्शित झाला. त्या आधी जेव्हा जेव्हा शो करण्यात आले त बघून या क्षेत्रातील जाणती मंडळी कुचेष्टेनं सांगायची, असलं बावळट ध्यान नायक म्हणून कोण बघणार? एकूणातच हा चित्रपट चालणार नाही, असाच सार्यांचा हो रा होता वितरकही मिळेना. मग दादांनीच तो पुण्याच्या टॉकीजला लावला. तिथे या चित्रपटानं चक्क रौप्य महोत्सव केला. मग मुंबईच्या कोहिनूर चित्रपटगृहात चार आठवड्यांचा करार करून चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र त्या चित्रपटगृहाच्या मालकाने दुसर्याच आठवड्यात देव आनंदचा 'तेरे मेरे सपने' हा चित्रपट लावायचा म्हणून दादांचा सोंगाड्या उतरविला. चार आठवड्याचा करार असूनही असे काल, या दादांच्या प्रश्नावर त्याचे उर्मट उत्तर होते. बरीच धावपळ केल्यावर दादा अखेर बाळासाहेप ठाकरे यांच्याकडे गेले नि मग बाळासाहेबांनी त्यांच्या खास 'ठाकरी' शैलीत हा प्रश्न सोडविला.
जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश - Majha Paper\nजुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश\nक्रिकेट, मनोरंजन / By Majha Paper / June 25, 2012 March 21, 2016\nजुहूतील येथील ओकवूड प्रीमिअर या आलिशान हॉटेलात २० मे रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदर्थांचे सेवन करणार्यांमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.\nचाचणीत दोषी आढळलेल्यांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे अपूर्व अग्निहोत्री, अंगद बेदी, अंशुमन झा यांच्यासह अनेक उच्चभ्रू दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहे.\nओकवूड हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत उपस्थित असलेला अभिनेता अपूर्व अग्निहोत्री याच्या रत्त*ाचा नमुना पॉझिटीव्ह आढळला. ही बातमी पसरल्यानंतर त्याची बोलती बंद झाली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी त्याची बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्याच्याकडून 'नो कॉमेंटस', असे उत्तर मिळत आहे.\nरेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलेल्या १२८ जणांपैकी ४४ जणांच्या राक्तांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या ४४ जणांनी नशा केली होती. पुणे वॉरियर्सचा क्रिकेटपटू राहुल शर्मा आणि व्हेन पार्नेलही या पार्टीत पकडले गेले होते. त्यांचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. परंतु, अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीच्या रक्ताचा नमुना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.\nअपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा (क्योकी सास भी कभी बहू थी फेम) यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी मात्र निर्दोष असल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बाजू मांडली होती. पोलिसांवरही दोघांनी चांगलीच आगपाखड केली होती. त्या तो दोषी आढल्याने त्याची बोलती बंद झाली आहे.
जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यवतमाळ : विस्तार अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीचे दार उघडले आहे. त्यामुळे बीएडधारक शिक्षकांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बढतीची संधी चालून आली आहे. मात्र दुसरीकडे आधीच तुटवडा असलेल्या सहायक शिक्षकांची तूट काही शेकड्यांवरून हजारांवर जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना बढती देणे आणि शिक्षकांची रिक्त पदे भरून काढणे हा दुहेरी समतोल साधण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागेल. जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४७८ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत अनेक नावे दोनदा टाकण्यात आली आहे. तर अनेक पात्र शिक्षकांची नावेच गायब आहेत. केंद्र प्रमुख सभेने पुन्हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी २८ मेपर्यंत पुन्हा आक्षेप मागविले आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊन कालावधीत होणाºया या पदोन्नतीमुळे जिल्ह्यात शिक्षकांचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून दुर्गम गावांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता विस्तार अधिकारी म्हणून शिक्षकांची बढती झाल्यास आणखी अनेक शाळा शिक्षकांना मूकणार आहेत. कोरोनामुळे मजूर खेड्यात परतल्याने पटसंख्या वाढणार असून त्यासाठी जादा शिक्षक कसे मिळतील हा प्रश्न आहे. एकीकडे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बढत्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने नवीन शिक्षक नियुक्ती, बदल्यांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे बढतीमुळे शाळा सोडून तालुका पातळीवर जाणाºया शिक्षकामुळे शाळेतील जागा रिक्त होणार आहे. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे तेथे नवा शिक्षक देणे किंवा बदलीने दुसरा शिक्षक पाठविणे अशक्य होईल.
शहापूर तहसीलदारांच्या सतर्कतेने रोखले दोन बालविवाह; समुपदेशाने गहिवरले उपस्थित वऱ्हाडी. शहापूर व वाडा तालुक्यात दोन बालविवाह होत असून शहापूरातील आश्रम शाळेत इयत्ता 8/9 मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुला मुलींचे वाडा तालुक्यातील चेंदवणीयेथे होणार असल्याची माहिती शहापूर च्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना मिळाली मिळालेल्या माहिती नुसार तहसीलदार सूर्यवंशी यांनी शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलामुलीचे लग्न थांबवले पाहिजे यासाठी थोडा ही विलंब न करता तहसीलदारांनी स्थानिक तलाठी घागस, पोलीस पाटील , समाजसेवक सुभाष मोडक, शहापूर तहसील कार्यालयाचे भूषण जाधव यांना विवाह स्थळी आघई गोरलेपाडा येथे पाठवले तिथे सर्व टीम पोहचल्यावर त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन समज देत विवाह थांबवण्याची विनंती केली गांडूळवाड आश्रम शाळा शहापूर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांनी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक यांच्याशी मोबाईल वर संभाषण करीत चर्चा केली या चर्चे दरम्यान च्या समुपदेशने मात्र मुलीचे वडील, मामा यांच्या सह सर्वच वऱ्हाडी भावुक झालें. . जुळलेला विवाह पुढच्या तारखेला करण्याचे कबूल करीत तहसीलदार व प्रशासनाचे आभार मानले. तर दुसरा विवाह शहापूर गोठेघर येथील 17 वर्षीय मुलाचा विवाह जव्हार तालुक्यातील तिलोंदा येथे होणार होते या प्रकरणी तहसीलदार शहापूर यांनी वाडा, जव्हार येथील वरिष्ठ अधिकारी व शहापूर गोठेघर आश्रम शाळेतील मुख्यध्यपक यांना संपर्क करून सदर बालविवाह रोखण्यात यश मिळवले. वेळीच वाडा, जव्हार तालुक्यातील प्रशासन विवाह स्थळी गेले व विवाह थांबवला आजच्या कारवाईत तहसीलदार शहापूर यांनी शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलां मुलीं चे बालविवाह रोखण्यात यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. . शहापूर, वाडा, जव्हार, मोखाडा, मुरबाड सारख्या बहुतांश अतिदुर्गम भागात बालविवाह केले जात आहेत. मुलगी 12 ते 14 वर्षाची झाली की तिचा विवाह केला जातो त्या वेळी मुलगा ही 15 ते 17 वर्षा आतील असतो परिणामी बालविवाह झाल्या मुळे कुपोषण, माता मृत्यू सारखे प्रकार ह्या तालुक्यात पाहावयास मिळत आहेत. परिणामी यासाठी समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेत समजप्रबोधन करून बालविवाह विरोधात चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
समान नागरी कायद्यासंदर्भात (Uniform Civil Code) ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सर्व नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेऊन आपण यापुढे महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यभरातील दौऱ्याची सुरवात विदर्भातून होणार आहे. येत्या आणि आणि नऊ जुलैला विदर्भापासून नेते संपर्क प्रमुख व आमदार दौरा करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिनांक ८ जूलै रोजी अमरावती दौरा आणि ९ जुलै रोजी यवतमाळ दोरा होणार आहे. विदर्भ दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सभा घेऊन शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. तर देशातील विरोधकांची बैठक पार पडल्यानंतर पुन्हा 20 जुलैपासून पुढे उर्वरित महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा वेळापत्रक ठरेल. आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे हे नेते सुद्धा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन दौरे करणार आहेत. राज्यात ज्या राजकारणात घडामोडी झाल्या त्यानंतर सर्व पक्ष बैठका बोलवत आहेत. यामध्ये आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याचा मतदारसंघांमध्ये नेमका काय इम्पॅक्ट होईल याबद्दल आढावा घेण्यात आला, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, याची तारीख पक्षाचे सचिव ठरवतील मात्र हा दौरा 100% होणार आहे. आम्ही सुद्धा या दौऱ्यामध्ये सर्व ठिकाणी जाणार संघटना मजबूत करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व शिवसेना नेते आणि लोकप्रतिधिंना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीत रहायचे की नाही...? यावर सर्वांची मतं घेतली.... यावेळी उपस्थित सर्व शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधींनी हात वर करून महाविकास आघाडीतच रहायचे असा निर्णय दिला, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. मनसे पक्ष किंवा राज ठाकरे संदर्भात कुठल्याही प्रकारे चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. या आपल्याच माध्यमातून चर्चासमोर येत आहेत, मात्र आजच्या बैठकीत राज ठाकरे आणि मनसे पक्ष संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याला समर्थन दिलं होतं, पाठिंबा दिला होता. आमचा सुद्धा पाठिंबा याला असेल, मात्र जोपर्यंत या संदर्भातील मसुदासमोर येत नाही तोपर्यंत आमचा पक्ष भूमिका समोर ठेवणार नाही. समान नागरी कायदा हा मुद्दा आगामी निवडणुका विचारात घेता आणला आहे, आणि भाजप हा मुद्दा समोर आणून निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत मसुदा येत नाही तोपर्यंत या संदर्भात कुठली भाष्य करणं अथवा मग भूमिका मांडणे योग्य नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.
Mahindra Car Sales : महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कार्सच्या किमतीत कमालीची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना आता कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा कंपनीकडून ग्राहकांना खूप मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण कंपनीच्या काही 3 कार्सची विक्री थांबली आहे. त्यामुळे आता या कार कंपनीने कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या कार्स खूप लोकप्रिय होत्या. मात्र मागील काही महिन्यापासून त्यांची विक्री थांबली आहे. संपूर्ण देशभरात एप्रिलपासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे आता प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व कार कंपन्यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तथापि, महिंद्राने या नवीन नियमांची पूर्तता करण्यासाठी आपले तीन मॉडेल्स अपडेट न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परिणामी, कंपनी ३१ मार्चपर्यंत या गाड्यांचा स्टॉक क्लिअर करत असून अजूनही कंपनीने या निर्णयाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. कंपनीची प्रभावित मॉडेलपैकी एक महिंद्रा मराझो असून तिच्या विक्रीत मागील काही महिन्यांत कमालीची घट झाली आहे. विक्रीबाबत सांगायचे झाले तर कंपनीने जानेवारी 2023 मध्ये, कारच्या फक्त 164 युनिट्सची विक्री केली होती, जी मागच्या वर्षी याच महिन्यात 956 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीचे दुसरे मॉडेल म्हणजे महिंद्रा KUV100. मागच्या काही महिन्यांत, या कारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, डिसेंबर 2022 मध्ये फक्त एक युनिट विकले गेले आणि त्यानंतरच्या महिन्यांत एकही युनिटची विक्री झाली नाही. विक्रीत मोठी घट झाली असल्याने कंपनी डिसेंबर 2022 मध्ये आपले फ्लॅगशिप मॉडेल Mahindra Alturas बंद करणार आहे. कंपनीने वाहनाचे उत्पादन बंद करून नवीन बुकिंग स्वीकारणेही बंद केले होते. कंपनी आता कारचा उर्वरित स्टॉक क्लिअर असल्याची माहिती आहे.
AIBA Ranking: 'सुपरमॉम' मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल\nमेरी कोमने गेल्या वर्षी ४८ वजनी गटात जागतिक अजिंक्यपद पटकावलं होतं. हे तिचं सहावं विजेतेपद होतं.\nNews18 Lokmat ।\tJan 10, 2019 03:25 PM IST\n'मॅग्नीफिशंट मेरी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारताची स्टार महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने गेल्या वर्षी ४८ वजनी गटात जागतिक अजिंक्यपद पटकावलं होतं. हे तिचं सहावं विजेतेपद होतं.\nआता जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) तिने अव्वल स्थान पटकावलं आहे. 'सुपरमॉम मेरी' कोमची ही कामगिरी भारतीयांना अभिमान वाटणारी अशीच आहे.\nएआयबीएच्या अपडेट केलेल्या रॅकिंगनुसार, सुपरमॉमने तिच्या वजनी गटात १७०० अंक मिळवत पहिलं स्थान पटकावलं. मेरी कॉमला २०२० ऑलंपिकचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५१ किलो वजनी गटात खेळावं लागणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ४८ किलो वजनी गट अद्याप समाविष्ट करण्यात आलेला नाही.\nतीन मुलांची आई असलेल्या मेरीने २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. तिने जागतिक अजिंक्यपदासोबत कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिलं स्थान पटकावलं होतं. मेरीने बुल्गरियामध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.\nअन्य भारतीय खेळाडूंमध्ये पिंकी जांगडा ५१ किलो वजनी गटात आठव्या स्थानावर आहे. आशियाई रौप्य पदक विजेती मनिषा माउन ५४ किलो वजनी गटात आठव्या स्थानावर आहे.\nजागतिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेली सोनिया लाठेर ५७ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक विजेती सिमरनजीत कौर ६४ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर आहे.\nमाजी वर्ल्ड चॅम्पियन एल. सरिता देवी १६ व्या स्थानावर आहे. इंडिया ओपनची सुवर्णपदक विजेत आणि जागतिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेली लवलीना बोरगोहेन तिच्या ६९ किलो वजनी गटात पाचव्या स्थानावर आहे. अजूनपर्यंत पुरुषांचं रॅकिंग अपडेट झालेलं नाही.
देवयानी विकास आणि किल्ली. लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर. भय्या विकासचा मोठा भाऊ. कावेरी बाई देवयानीची आई. अंकुश मनीषाचा नवरा. सुरेश देवयानीचा भाऊ. विश्राम देवयानीचा चुलत भाऊ. प्रिया विकासची चुलत बहीण. सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट. पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट. हे अपमानास्पद बोलणं ऐकल्यावर सुप्रियाचे दोन्ही मित्र उठले. त्यांच्या आविर्भावा वरून स्पष्टच दिसत होतं की ते राजूला आता सोडणार नाही म्हणून, पण विकास ने त्यांना थांबवलं. विकास अजूनही शांतच होता. सर्वांनाच त्यांच्या शांत पणाचं आश्चर्य वाटत होतं. पण सुप्रियाला आठवलं, देवयानी काय म्हणाली ते. विकास कधीही पॅनीक होत नाही म्हणून. तिला विकासचं कौतुकच वाटलं. खरं तर विकास केव्हाही राजूचा चोळामोळा करू शकत होता पण त्याने तसं काही केलं नाही. आता मात्र कमाल झाली. राजू आपला हेका सोडायला अजिबात तयार नव्हता. तो विकासच्या संयमाची जणू काही परीक्षाच घेत होता. विकासला सुद्धा क्षणभर वाटलं की एक थप्पड पुरेशी आहे, याला चूप बसवायला. पण तो शांत राहिला. त्यानी विचार केला की देवयानीच्या उत्तरानंतर बघू काय करायचं ते. देवयानीनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यानी मान हलवून संमती दर्शक सिग्नल दिला. मग देवयानीनी बोलायला सुरवात केली. "देवयानी" राजुनी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला. राजूने एकदा सर्वांच्या कडे नजर फिरवली आणि त्याला समजलं की आपण इथून जाण्यातच शहाणपणा आहे. तो चालला गेला. "मला पहायचं होतं की देवयानी कसं हाताळते हे प्रकरण. जर गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं वाटलं असतं तर कंट्रोल आपल्या हातात घ्यायला मी होतोच की इथे. पण तशी वेळच आली नाही. तिने फार धैर्याने आणि संयमाने हाताळलं हे प्रकरण." - विकास. "मग आता काय करायचा विचार आहे?" - सुप्रिया. काही नाही. वेट अँड वॉच. एवढंच करायचं. मी आणि देवयानी जरा बाहेर फिरून येतो फ्रेश वाटेल. देवयानी आणि विकास बाहेर पडले. पुढच्या चौकात सिग्नल वर थांबले असतांना शेजारी पोलिसांची जीप थांबली. विकास ने वळून पाहिलं तर इंस्पेक्टर शीतोळे. देवयानी जेंव्हा अडकली होती तेंव्हा हेच शीतोळे आले होते. नंतर सुद्धा विकास त्यांना भेटला होता आणि त्याच्या आणि देवयानीच्या ओळखीची माहिती त्यांना दिली होती आणि धन्यवाद पण दिले की त्यांनी पॉजिटिव रीपोर्ट दिल्या मुळेच देवयानीशी ओळख वाढली म्हणून. त्या नंतर सुद्धा तो इंस्पेक्टर साहेबांना सहज भेटला होता. आज ते जेंव्हा दिसले तेंव्हा हाय, हेलो झालं आणि शीतोळे म्हणाले "की सिग्नल पार करून जरा थांबा वहिनींची ओळख करून द्या. असे कसे जाता आहात". मग चौक पार करून विकास आणि शीतोळे थांबले. "समोर एक छोटं हॉटेल दिसतं आहे तिथेच बसू. चला." शीतोळे म्हणाले. इंस्पेक्टर शीतोळे, विकास आणि देवयानी तिघंही हॉटेल मधे एका कोपर्यांतल्या टेबल वर बसले. "हं सांगा विकास साहेब, काय प्रॉब्लेम आहे." शीतोळे म्हणाले. "तो मुलगा, तुम्ही म्हणता, सगळं ऐकून घेतल्यावर चालला गेला, पण त्यानी हे अॅक्सेप्ट केलं आहे का? भविष्यात तो देवयानीला त्रास देणार नाही यांची खात्री आहे का?" शीतोळयांनी विचारलं. "आज नाही. पण तुम्हाला सांगितलं की" विकास म्हणाला "काल रात्री देवयानीला सोडवण्यासाठी त्या दोघा मित्रांनी त्याला दोन ठेवून दिल्या म्हणून. "ओके. उद्या किती वाजता येऊ?" - विकास. "दुपारी बारा नंतर फोन करा मग मी सांगेन केंव्हा यायचं ते. पण सगळं व्यवस्थित लिहून आणा म्हणजे झालं." - शीतोळे. "ठीक आहे साहेब." - विकास. "चिंता करू नका. आम्ही आहोत तुमच्या मदतीसाठी. काहीही झालं तरी कायदा हातात घेऊ नका. चलो. चलते हैं." आणि असं म्हणून शीतोळे निघाले.
मेष- आज तुम्ही जे काही काम करता त्याचा नक्कीच फायदा होईल. कामावरून पैसे मिळेल. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येऊ शकतात. आपण कामाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. वृषभ- कार्यालय किंवा व्यवसायात नवीन उपक्रम सुरू करण्याची वेळ आहे. आपण आपल्या कामात प्रयोग करण्यात यशस्वी होऊ शकता. मिथुन- जुन्या कामाचा विचार करण्यास प्रारंभ करा, त्याचा फायदा होऊ शकेल. आज तुम्हाला बरे वाटेल गट आणि सामाजिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. कर्क- अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची आज जास्त शक्यता आहे. पैशाचा प्रश्न सुटू शकतो. मित्र आपल्याला मदत करतील. कार्याशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील. सिंह- आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे, ज्याद्वारे आपण देखील आनंदी व्हाल. तुमची महत्वाकांक्षा वाढेल. कन्या- आज तुम्ही सामर्थ्याने आणि संयमाने काम कराल. दिवसभर पैशाचा विचार करत राहाल. जमीन आणि मालमत्ता कामांनाही संपत्तीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आपण काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासमोर आणखी काही काम मिळू शकेल. तुळ- आपण काही महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करू शकता. जे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही कष्ट करून आनंद घ्याल. नवीन काम सुरू करण्याऐवजी जुन्या कामांना आच्छादित करण्यावर अधिक लक्ष दिले जाईल. वृश्चिक- दिवस तुमच्यासाठी खास असेल. अशा काही गोष्टी किंवा गोष्टी उघड केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा फायदा होईल. आज एखाद्या कठीण प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. धनु- नोकरी, करिअर आणि पैशाच्याबाबतीत चांगला दिवस आहे. आपण नवीन नोकरीसाठी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करीत असाल तर आपले प्रयत्न पूर्ण केले जाऊ शकतात. आपली उत्सुकता देखील शिगेला असू शकते. मकर- आज मकर राशीवर गुरु ग्रहाचे शुभ संकेत आहेत. आज मकर राशीच्या लोकांना संपत्तीचा फायदा होऊ शकतो. अशा कार्याचा फायदा होईल जो बराच काळ टिकेल. आज अनेक मनोरंजक कल्पना आणि योजना तयार केल्या जाऊ शकतात. कुंभ- जुना तणाव संपेल. स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष द्या. आपली सक्रियेची पातळी वाढू शकते. समाज आणि कौटुंबिक दोन्ही क्षेत्रांचे काम पूर्ण केले जाऊ शकते. अनेक प्रकारचे विचार आपल्या मनातही येऊ शकतात. मीन- कामकाजासह आपली जबाबदारी वाढू शकते. दिवसभर व्यस्त देखील असेल. काही व्यवसायाचे व्यवहार विचारपूर्वक करा. तुम्ही बर्याच प्रमाणात यशस्वी व्हाल.
मुंबईः व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपने त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) जाहीर केली आहे. या पॉलिसीमुळे भविष्यात व्हॉट्सअॅप वापरावे की वापरू नये असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या समस्येवर उत्तर म्हणजे सिग्नल हे अॅप आहे. हे अॅप जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क वापरतात. त्यांनी स्वतः ही माहिती जाहीर केली आहे. वापरण्यासाठी व्हॉट्सअॅप सारखेच असलेले पण अधिक सुरक्षित आणि सोपे असे सिग्नल हे मेसेजिंग अॅप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअॅप सारखी युझरची चिंता वाढवणारी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) सिग्नल अॅप वापरत नाही. डेटा सुरक्षित राहील असी ग्वाही सिग्नल अॅपकडून दिली जाते. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून सिग्नल या अॅपची लोकप्रियता वाढली आहे. (signal app is easy and secure option than whatsapp) व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला युझर म्हणून जे ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होकार देतील त्यांनाच पुढे व्हॉट्सअॅप वापरता येईल. जे ओके हे हिरव्या रंगाचे बटण दाबून होकार देणार नाहीत त्यांना मुदत संपल्यानंतर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकच्या डेटाचा एक भाग होणार आहे. व्हॉट्सअॅपकडे असलेल्या युझरच्या डेटाचा व्यावसायिक वापर फेसबुक करणार आहे. फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही फेसबुक कंपनीची डिजिटल उत्पादने आहेत. याच कारणामुळे व्हॉट्सअॅपच्या डेटाचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी फेसबुक करत आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे फेसबुकचे काम सोपे होणार आहे. मात्र ज्यांना स्वतःची खासगी माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ नये असे वाटते त्यांनी अद्याप व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला एक युझर म्हणून संमती दिलेली नाही. हे युझर पर्यायाच्या शोधात आहेत. या युझरसाठी सिग्नल हे मेसेजिंग अॅप एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. सिग्नल हे एक ओपन सोर्स अॅप आहे. या अॅपचा सोर्स कोड सार्वजनिक करण्यात आला आहे. या कोडच्या मदतीने तज्ज्ञ व्यक्ती अॅपच्या सुरक्षेची आणि डेटा प्रायव्हसीची (माहितीच्या सुरक्षेची) तांत्रिक खात्री करुन घेऊ शकतात. सिग्नल अॅपवरील कोणत्याही चॅटचा कोणत्याही अॅपच्या मदतीने स्क्रीनशॉट घेता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे सिग्नल अॅप युझरची खासगी माहिती संकलित करत नाही. याउलट व्हॉट्सअॅप युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर यांना अॅक्सेस करुन ही माहिती स्वतःकडे कायमस्वरुपी तांत्रिक स्वरुपात नोंदवून ठेवते. सिग्नल अॅप युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर यांना अॅक्सेस करते पण ती माहिती स्वतःकडे नोंदवून ठेवत नाही. यामुळे युझरचा खासगी डेटा शेअर होत नाही. व्हॉट्सअॅपच्या तुलनेत सिग्नल अॅपमध्ये खूप आधीपासूनच अदृश्य होणाऱ्या अर्थात डिसअपिअरिंग मेसेजचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाद्वारे ठराविक मुदतीनंतर संदेश आपोआप दिसेनासा होतो. यामुळे आधीच्या संवादाचे पुरावे मागे उरत नाही. स्मार्टफोनवर कोणतेही अॅप वापरले तर संबंधित अॅपच्या सर्व्हरला मोबाइलमधील युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर, महत्त्वाच्या डॉक्युमेंटचे फोल्डर या गोष्टींना आवश्यकतेनुसार अॅक्सेस करावा लागतो. याच कारणामुळे अॅप कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी बदलली अथवा त्यांचे सर्व्हर हॅक झाले तर खासगी डेटा शेअर होण्याचा धोका असतो. याआधी गूगल आणि फेसबुकच्या मर्यादीत डेटाच्या हॅकिंगच्या घटना घडल्या आहेत. यामुळे इंटरनेट विश्वाचा भाग असलेला अमूक एक सर्व्हर सुरक्षित आहे असे म्हणणे कठीण आहे. अद्याप या सर्व्हरचे हॅकिंग झालेले नाही एवढेच म्हणता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युझर अनेक अॅप वापरतात त्यामुळे एखाद्या अॅपवर तुमचा अमूक एखादा डेटा शेअर होत नसला तरी दुसऱ्या अॅपवर हा डेटा शेअर होतच असतो. मोदी सरकारने बंदी घालपर्यंत भारतात अनेक चिनी कंपन्यांची अॅप वापरली जात होती. या अॅपमुळे बहुसंख्य भारतीयांचा डेटा चीनच्या हाती पोहोचला आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप या अमेरिकेतील कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीची चिंता करावी की नाही हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात ज्यांना सध्या प्रायव्हसीची चिंता सतावत आहे त्यांच्यासाठी सिग्नल अॅप हा नवा पर्याय उपलब्ध आहे.
नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. मधुकर ठाकूर, उरण- मध्य रेल्वे आणि सिडको यांच्या भागीदारीत सुरू असलेल्या नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. १७६२ कोटी खर्चाचा प्रस्तावित प्रकल्प दोन टप्प्यात सुरू झाला आहे. पहिल्या टप्पा सीवूड ते खारकोपर डिसेंबर २०१७ तर खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची डेडलाइन २०१९ आहे. मात्र रेल्वेमार्गात खारफुटी आणि वन खात्याच्या जमिनीचा खोडा आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता मुंबईशी जोडणारा हा प्रकल्प मुदतीत पूर्णत्वास जाईल का, याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे. आंतरराष्ट्रीय जेएनपीटी बंदर आणि विविध प्रकल्पांमुळे उरण परिसराचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने पसारा वाढत चालला आहे. आयात-निर्यातीच्या या वाढत्या पसाऱ्यामुळे उरण आता जगाच्या नकाशावर आले आहे. नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित शिवडी-न्हावा शेवा सेतू आदी प्रकल्पांमुळे तर व्यापारी दृष्टिकोनातून मुंबईबरोबरच उरण देशभरातील विविध रेल्वेमार्गाशी जोडले जावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. खरे तर ५० वर्षांपूर्वी पनवेल मार्गावरून थेट उरण नौदलाच्या डेपोतून मालाची वाहतूक थांबल्याने हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराविना धूळ खात पडला आहे. मात्र जेएनपीटी बंदराच्या निर्मितीनंतर या रेल्वेमार्गाचा पुन्हा एकदा वापर होण्यास सुरुवात झाली. व्यापार वृद्धी आणि परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे उभारण्याचा प्रयत्न जेएनपीटी, सिडको, रेल्वेक डून सातत्याने केला जात आहे. त्यासाठी जेएनपीटीकडूनही विविध रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील सीवूड ते खारकोपर या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. सीवूड स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत या उपनगरीय मार्गावर रेल्वे धावणार आहे. सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. पनवेल क्रि क ब्रिजसह छोट्या-मोठ्या पुलांचेही काम झाले आहे. उपनगरीय तरघर स्थानक नवी मुंबई विमानतळाशी जोडले जाणार आहे. स्थानकांसाठी डबल डिसचार्ज सुविधा, कंप्युटर सबवे आदि सुविधा असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाच्या कामाची डेडलाइन जून २०१९ पर्यंतची आहे. पहिला टप्पा सीवूड ते खारकोपर रेल्वेमार्ग २०१७ पर्यंत सुरू करण्यासाठी काम सुरू असले तरी उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गाची खारफुटी आणि वनखात्याच्या जमिनीचा खोड्यामुळे प्रकल्पास विलंब होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुप्रिया साहू यांनी २५ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला. त्यांनी सांगितलं की, ही घटना नीलगिरीची आहे. इथे एका हत्तीने बसला टक्कर दिली. तर सुद्धा बस ड्रायव्हरने स्वतःला शांत ठेवत परिस्थिती हॅंडल केली. तसेच प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यातही मदत केली. या बस ड्रायव्हरचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ११ हजारांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला. हत्तीने तर बसची काचही फोडली. आज सकाळच्या या घटनेत त्याने प्रवाशांना सुरक्षित राहण्यास मदत केली. म्हणूनच म्हणतात की, शांत डोकं कमाल करतं. १ मिनिटांच्या या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, हत्तीला रस्त्यावर पाहून ड्रायव्हर बस लगेच मागे घेतो आणि एका जागी उभी करतो. पण हत्ती त्यांच्या मागे येतो आणि हत्ती रागात बसची विंडशील्डवर जोरदार टक्कर मारतो. याने बसची काच फुटते. अशात बसमधील प्रवाशी घाबरतात. मात्र, बस ड्रायव्हर समजदारीने काम घेतो आणि आपली जागा सोडून मागे जातो. जेणेकरून हत्ती शांत होऊन जाईल.
Ahmednagar । अहमदनगरः रिकामटेकड्या दोन तरुणांनी केलेला उद्योग त्यांच्याच अंगलट आल्याची घटना घडली आहे. या उद्योगामुळे लष्करासह पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. त्यातील एकास ताब्यात घेऊन दोघांविरोधात लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढवळपुरी (ता. पारनेर) येथील अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी या दोघांनी गावाशेजारी असलेल्या के. के. रेंज या लष्कराच्या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या हद्दीत फिरायला गेले होते. यावेळी या प्रशिक्षण केंद्रात रणगाड्यातून मिस फायर झालेला एक जीवंत बॉम्ब (Bomb) पडलेला होता. या दोघांनी हा बॉम्ब उचलून घराकडे घेऊन आले. बॉम्ब कोठे ठेवायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्न पडला असता त्यांनी शेतामध्ये खोल खड्डा खोदून हा बॉम्ब पुरून ठेवला. हा प्रकार गावातील काही ग्रामस्थांनी हे पाहिला. याबाबत काही जागरूक ग्रामस्थांनी ही माहिती पारनेर पोलिसांना दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणाची खात्री करून लष्करी अधिकाऱ्यांना माहिती दिली. लष्करी अधिकारी, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे संयुक्त पथक ढवळपुरी गावात दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने संबंधित शेतात जाऊन अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने बॉम्बचा शोध घेतला. तो जीवंत बोंब जिवंत असल्याचे समोर आले. त्यांनी हा बॉम्ब नष्ट केला. लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गांगर्डे अधिक तपास तपास करीत आहेत.
४ थें ] मूळ जागेवरच आहे. स्तभाचे चार तुकडे झालेले असून खालचा तुकडा जमिनींत स्वस्थानी आहे, बाकीचे तुकडे त्याच्या भोवती उभे करून ठेवले आहेत. स्तंभावरील गुळगुळीत पॉलिश प्रेक्षणीय आहे. अशोकाच्या स्तभावर त्याचा एक शिलालेख आहे. त्यामध्ये बुद्धाच्या प्रथमोपदेशाची माहिती असावी अशी साहजिक अपेक्षा असणार. पण त्या लेखामध्यें भिक्षूना निष्कारण वितंडवाद करून संघभेद न करण्याबद्दल अशोकाने दिलेला आदेश आहे. आहे. लेखाच्या चवथ्या ओळींतील अक्षरे - [ भिखू वा भिखू ] नि वा संघ भाखति से ओदातानि दुसानि संनंधापयिया आनावाससि हीं आहेत. अशोकाच्या लेखाच्या पाठीमागें पहिल्या शतकातील अश्वघोष राजाचा एक छोटा लेख आहे. त्याच्या लिपीचे वळण अशोकलिपीहून निराळें आहे. अशोक स्तंभाच्या पूर्वेस गुप्त कालातील प्रचंड देवालयाचा गाभारा आहे. या देवालयामध्यें धर्मोपदेश करणारी बुद्धमूर्ति होती त्या मूर्तीची जागाच प्रथमोपदेशाची जागा असावी. देवालयाच्या भरभक्कम भिंती पाहिल्या म्हणजे त्याचे शिखर खूप उच असले पाहिजे अर्से वाटू लागतें. देवालयाच्या पुढे मोठे [ प्रकरण आवार असून त्यामध्ये यात्रेकरूंनीं पुण्य लागावे म्हणून परत जाताना बांधलेले बारीक स्तूप, भिक्षूच्या ओवऱ्या, छोटी देवळें वगैरे होतीं. देवालयाच्या आवारांत प्रवेश करण्याचे द्वार सुमारे ४०० फूट पूर्वेस होते दाराच्या उजव्या हातास हात-पाय धुण्याकरिता एक पादोदक कुड होते, ते आता खणून बाहेर काढले आहे या कुडाच्या उत्तरेस पाणी वाहून नेण्याकरिता बाघलेले पक्के गटारही आता दिसते. या मोठ्या देवळाच्या उत्तरेस एक मोठी भिंत होती, व तिच्या पलीकडे एक दुसरे प्रचड देवालय होते ते बाराव्या शतकामध्ये गोविंदचद्र नावाच्या कनोजच्या हिंदु राजाच्या कुमारदेवी नांवाच्या हिंदू स्त्रीनें बाधले होते या देवालयाच्या पूर्वेस व पश्चिमेस अनेक गुप्तकालीन मठाचे अवशेष खणून बाहेर काढलेले आहेत. गुप्तकालीन मठ व मदिरे पुढे अकराव्या शतकामध्ये मोडकळीस आलीं जुन्या इमारतींचे खाब वगैरे बाहेर न काढता त्याचा पडलेला ढिगारा सपाट करून, जरूर तेथे त्यामध्ये भरीला विटाचे तुकडे वगैरे भरून, त्याच्या वर मोठे दगड घालून नवीन काळच्या देवळाची व मठाची जमीन करण्यात आली हे कुमारदेवीच्या देवळाच्या पूर्वेस थोड्या अतरावर जिन्यावरून उतरून खालीं गेल्यावर जे खाब, ढिगारा ४ थे ] व त्यावर टाकलेल्या दगडाच्या लडी दिसतात त्यावरून स्पष्ट दिसून येईल. कुमारदेवीच्या जिनचक्रविहाराच्या खालींहि मठाचे अवशेष उकरले तर सापडतील देवळाच्या पाठीमागे एक भुयारी रस्ता आहे, त्याच्या शेवटीं एक बारके देऊळ लागते ते बहुतकरून एकातात ध्यान करण्याकरितां बाधळें असावे. कुमारदेवीच्या जिनचऋविहार देवळाच्या पूर्वेस गुप्तकालीन मठाचे अवशेष आहेत या मठाच्या खाबाचें खोदकाम सुबक आहे हे मठ ओलाडून पादोदक कुडाच्या पुढे गेले म्हणजे एक प्रचड स्तूप लागतो तो आठव्या शतकात बाधण्यात आला होता त्याच्या वरील खोदकाम पुरे होऊ शकले नाहीं. स्तूपामध्ये अगदीं पाढरे दिसणारे दगड तो दुरुस्त करताना सरकारने घातलेले आहेत जुन्या दगडापैकी काहींवर भूमितींतील समातर रेखा, चौकोन वगैरे आकृति कोरलेल्या आहेत या आकृती खोदकामामध्ये मुसलमानी कालात आल्या असा सामान्य समज आहे, पण या स्तूपावरून त्या हिंदूकालातहि कधीं कधीं कोरीत असत हे दिसून येईल. स्तूपावर निरनिराळ्या बाजूस जे आठ कोनाडे आहेत, त्यामध्यें बुद्धमूर्ती पूर्वी ठेवण्यात आल्या होत्या. स्तूपाच्या अनेक दगडावर बुद्ध यात्रेकरूनी सोनें घासलेले आहे, म्हणून ते पिवळे दिसतात. naan cam
कोणत्या क्षेत्रात मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा? हा प्रश्न असा आहे ज्याने बहुतेक लोकांना आपल्या वरिष्ठांवर अवलंबून राहण्याबद्दल विसरून जाण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरीस, आपला व्यवसाय अधिक कमवा आणि छिपी संभाव्यता लक्षात घेऊन प्रारंभ करण्यासाठी एक उत्तम संधी आहे तथापि, काहीही पैसे पैसे गुंतविण्यापूर्वी, आपण काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे सर्व प्रथम, प्रारंभ करण्याची कल्पना निवडली जावी. मला स्वतःच्या आयुष्याचा अनुभव घ्यायचा असेल जर तुम्ही खरोखर चांगले कार्य केले तर ते मिळवणे उत्कृष्ट होईल. त्यामुळे, जर तुम्हाला कायद्यातील फर्ममध्ये 10 वर्षे काम करायचे असेल तर तुम्ही स्वतःच सल्ला देऊ शकता. केवळ स्पेशलायझेशनसाठी संकराळाचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. आपण मागील कामकाजाचा अनुभव आणि छंद देखील आठवू शकता. जर अशी एखादी मित्र असतील की ज्या सुट्ट्या आणि कार्यक्रमांची व्यवस्था करतात, तर आपण संबंधित क्षेत्रात एक कंपनी उघडू शकता. मनात येणारी पहिली कल्पना मनात आणणे योग्य नाही. आगाऊ स्वरूपात हे आवश्यक आहे की गोलांची यादी तयार करणे ज्यामध्ये वाईट करणे नाही. आपण कोणत्याही स्टार्टअप कल्पना रेकॉर्ड करू शकता, अगदी सर्वात वेडा देखील स्वतंत्रपणे, आपण आनंद आणणार्या त्या क्रियाकलापांची एक सूची तयार करु शकता. कदाचित दोन्ही सूचीतील काही आयटम जुळतील. बहुधा ही अशी क्रिया आहे जी चांगली कमाई करू शकते. शेवटी, काम आनंदाने केले जाते तेव्हा तो लाभदायक होऊ शकतो. खरेतर, संभाव्य खरेदीदार आणि ग्राहकांना नेमके काय ऑफर केले जावे हे महत्वाचे नाही. मुख्य गोष्ट ही आहे ज्यामध्ये हे सर्व दिसते. एक हसणे आणि हितसंबंधाची वृत्ती अर्धा यश असू शकते. आपला स्वतःचा व्यवसाय उघडण्यापूर्वी, एक लहान विपणन संशोधन दुखापत होणार नाही. ज्या उद्योगात आपण काम केले पाहिजे, त्याचा अभ्यास करणे योग्य आहे, शून्यतेकडे लक्ष द्या आणि आपल्या स्वतःच्या कंपनीत ती भरण्याचा प्रयत्न करा. या प्रकरणात, व्यवसायासाठी स्टार्टअप कल्पना खरोखर फलदायी ठरतील. स्टार्टअपची कल्पना आधीच अस्तित्वात असल्यास, त्याच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक संधी उपलब्ध आहेत, आपण एक लहान चाचणी आयोजित करू शकता कल्पना करणे आवश्यक आहे की डिनर पार्टी किंवा पार्टीसाठी आमंत्रण मिळाले. येथे प्रत्येकजण स्वतः आणि त्यांच्या कार्याबद्दल चर्चा करेल. जर तुमच्या रोजगाराची कथा लाजिरवाणी आहे तर आपण या क्षेत्रात व्यवसाय सुरू करू नये का यावर विचार करणे योग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या व्यवसायाबद्दल अनोळखी लोकांपर्यंत जास्तीत जास्त सांगू इच्छित असल्यास. याचा अर्थ एका स्टार्टअपची कल्पना योग्यरित्या निवडली जाते. खरं तर, याला कोणत्या फरक पडत नाही ज्याला गोल करण्याची आवश्यकता आहे. मुख्य गोष्ट काम आनंद आणते आहे. अशी प्रकरणे आहेत जेव्हा लोकांनी स्वच्छतागृहांचे शौचालय आणि शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांनी सफाई कामगारांचे आयोजन केले. त्याच वेळी, एक उत्कृष्ट संघ निवडणे आणि अनेक नियमित ग्राहकांना शोधणे शक्य होते. या प्रकरणात, आपला स्वतः चा व्यवसाय हा अभिमानाची बाब आहे. आणि शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी त्याने हे बांधले की काही फरक पडत नाही. विविध प्रारंभिक कल्पना विचारात घेतल्या, प्रारंभिक भांडवलाच्या रकमेबद्दल आपण विसरू नये. आपण 50-100 हजार rubles असल्यास आपल्याकडे बूट स्टोअर उघडणे शक्य होईल हे संभव नाही. एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे हे एक चांगली कल्पना नाही. आपण खात्रीने करू शकणार नाही की व्यवसाय नक्कीच यश देईल. जर आपण ग्राहकांचा विश्वास जिंकू शकत नसाल तर कर्ज भोक मध्ये येण्याचा धोका आहे. म्हणून, सुरवातीपासून एखाद्या स्टार्टअपच्या कल्पना विचार करणे चांगले. किमान गुंतवणूकीसह पैसे कमविण्याचे बरेच मार्ग आहेत उदाहरणार्थ, आपण आपले ज्ञान आणि अनुभव इंटरनेटवर सामायिक करू शकता इन्फोबनेस आज सुंदर विकसित आहे. या क्षेत्रातील बर्याच जणांना स्वतः ला पूर्णतः लक्षात आले. प्रारंभिक टप्प्यात, गुंतवणूक केवळ एका पृष्ठाच्या साइटच्या निर्मितीमध्ये केली जाते. आणि ज्यांना वेब डिझाइनमध्ये काम करण्याची कौशल्ये आहेत, त्यांना खर्च करण्याची गरज नाही. आज इंटरनेटवर सुरू होणा-या कल्पनांकडे खूप आशावादी आहेत. व्यवसायाने जवळ आणि कौटुंबिक मूल्यांचे नुकसान होऊ नये. काम अशा प्रकारे बांधले गेले पाहिजे की दफ्तरमध्ये नेहमीच राहण्याची काहीच गरज नव्हती. शिवाय, व्यवस्थापक नेहमीच दूरस्थपणे कार्य करू शकतो. त्याला फक्त दिवसातील 24 तास संपर्कात रहावे लागेल. बर्याच लोकांना हे माहित आहे की, "आपल्यावर जे प्रेम आहे ते करा आणि पैसा आपल्याकडे येईल. " हे अर्थ प्राप्त होतो पण सर्वकाही इतके सोपे नसते. त्याचे कार्य खरोखर प्रेम करणे आवश्यक आहे, आणि नंतर तो एक नफा करू शकता तथापि, आपण काहीतरी ऑफर करणे आवश्यक आहे जे उर्वरित मनोरंजक असेल. कोणीतरी समुद्रकिनार्यावर खूप वेळ घालवू इच्छित आहे परंतु लोकांना यात रस नाही, आणि ते काही लाभ देणार नाही. म्हणून, आणि आपल्या आवडत्या व्यवसायावर कमाई यशस्वी होणार नाही. स्टार्टअप काय असावे? आपले विचार ऐकून नवीन कल्पना विचारात घेण्यासारखे आहेत. कामामुळे केवळ व्यवसायाच्या मालकासच नव्हे तर सहकार्यांसह जर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा, तर तुम्ही त्या दिवसाचे लक्ष वेधून घेता, की विद्युत्दिनी वेगाने चालू आहे, नवीन ओळखीची एक मोठी संख्या दिसू लागली, याचाच अर्थ की स्टार्टअपची कल्पना योग्यरित्या निवडण्यात आली. खाली, आम्ही काही मनोरंजक कल्पना सादर करणार आहोत ज्यामुळे एखाद्यासाठी फायदेशीर व्यवसायाचे आधार बनू शकेल. तोपर्यंत फुलांचा व्यवसाय सर्वात फायदेशीर एक आहे की ओळखले जाते. फ्लोरिस्टिक्स एक प्रचंड वेगाने विकसित होत आहे आता लोक फक्त bouquets देऊ नाहीत, परंतु रिअल डिझायनर कला काम. अलीकडे, एक नवीन तंत्रज्ञान उदयास आले आहे जे ग्राहकांना फुलने बोलण्याची परवानगी देते. कळ्या वर कोणत्याही शिलालेख किंवा कंपन्या लोगो सह अल्ट्रा-पातळ स्टिकर superimposed आहेत. असे उत्पादन फुले खराब करत नाही, त्यांना एक विशेष मोहिनी दिला जातो. स्टिकर्स विशेष तंत्रज्ञानाद्वारे केले जातात. ते बोटाने किंवा ओलसर कापडाने माखलेले नाहीत फ्लॉवर पूर्णपणे कोरडे असले तरीही जलरोधक प्रतिमा संरक्षित केली जातील. अशा एका स्टिकरची किंमत 10-15 rubles आहे. अचूक किंमत आकारावर अवलंबून आहे. खरेदीदार स्टिकर्स 30-40 रूबलसाठी देऊ शकतात. आपल्या स्वतःच्या व्यवसायाला फुले विकणे उघडण्यासाठी आपल्याला फ्लॉवर पॅव्हिलियन भाड्याने द्यावे लागेल, ताजे फुले पुरवठादारांबरोबर संपर्क प्रस्थापित करणे आणि बल्कमधील स्टिकर्स विकत घेणे आवश्यक आहे. प्रारंभ करण्यासाठी, आपल्याला अंदाजे 80 हजार rubles ची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या काळात अशा व्यवसायामध्ये गुंतवणूकीची आवश्यकता नसते आणि महासागर किंवा समुद्राच्या किनार्यावर राहणारे लोक अधिक उपयुक्त होतील. दररोजच्या जीवनात प्रत्येकजण उबदार वाळूवर विश्रांती घेतो. अतिरिक्त फीसाठी, आपण आपल्या जवळच्या एखाद्या स्वप्नातील एक स्वप्न देऊ शकता. ग्राहक किनार्यावर राहणाऱ्या कलाकारांच्या खात्यात पैसे हस्तांतरीत करतो. तो, त्याउलट, वाळूवर एक विशिष्ट शिलालेख बनवितो आणि त्याच्या ग्राहकाने फोटो पाठवितो. या प्रकारचे व्यवसाय कसे जायचे? आपल्याला फक्त आपल्या स्वतः च्या सेवेसाठी जाहिरात तयार करणे आवश्यक आहे. एक खोली भाड्याने आवश्यक नाही म्हणून, प्रारंभिक खर्च खूप लहान असतील उच्च दर्जाचे फोटोग्राफिक उपकरणे खरेदी करण्यासाठी हे अनावश्यक देखील असेल. खरेतर ग्राहकांना कार्ड पाठविणे आवश्यक आहे. फोटोशॉपच्या कौशल्यांवर मात करण्यासाठी हे देखील अपेक्षित आहे. आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गोल कसे निवडावे? सर्वप्रथम, एक यादी तयार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये प्रारंभीच्या चांगल्या कल्पनांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. आत्मा ज्या खरोखरच्या मनात आहे त्या कल्पनांना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. शेवटी, काम सुखाने केले पाहिजे. आर्थिक संधी आणि जीवनशैली घेणे देखील चांगले आहे. कोणताही क्रियाकलाप एक छोट्याश्यासह सुरू होऊ शकतो. आपल्या सर्व बचत ताबडतोब खर्च करू नका. उदाहरणार्थ, आपण विक्री क्षेत्रात स्वतः चा प्रयत्न करू इच्छित असल्यास, आपल्याला ताबडतोब स्टोअर उघडणे आवश्यक नाही आपण इंटरनेटवरील वस्तू विकू शकता. कालांतराने, आपला व्यवसाय विस्तारीत केला जाऊ शकतो.
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. केंद्रीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीच्या इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आठ जुलैपर्यंत रेड अलर्ड जारी करण्यात आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नऊ जुलैपर्यंत परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस मार्गे सुरू असून परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५४. ८९ मिमी पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरस्थिती नाही. मात्र, खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. कुठेही पूरस्थिती नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः, तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रायगडमध्ये एक एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय पालघर येथे एक, रायगड-महाड येथे दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दोन, कोल्हापूरमध्ये दोन, साताऱ्यात एक, सिंधुदुर्ग येथे एक अशी १३ पथके राज्यभरात तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबईत तीन, पुण्यात एक, नागपुरात एक अशा एकूण पाच एनडीआरएफच्या, तर धुळे येथे दोन, नागपुरात दोन अशा चार एसडीआरएफच्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत.
लाल मासेपासून बनविलेले पदार्थ नाजूक समजले जातात परंतु त्याच वेळी ते देखील मधुर आहेत, आपल्याला त्यांची तयारी रहस्य जाणून घेणे आवश्यक आहे. आता आम्ही सॅल्मनमधून स्टेक्स स्वयंपाक करण्याकरिता आपल्याला रुचिपूर्ण पाककृती म्हणेन. साहित्यः - साल्मनचे स्टेक्स - 500 ग्रॅम; - मीठ; - काळा ग्राउंड मिरपूड; प्रथम एका बेकिंग शीटवर फॉइल लगावा आणि भाजीपाला सह ते ग्रीस लावा. सॅल्मनचे स्टीक्स एका बाजूला मिठ आणि मिरपूड सह शिडकाव केले जातात आणि दुसरा. त्यानंतर 20 मिनिटे मासे लावा. नंतर तयार फॉइलवर स्टेक्स ठेवा आणि लपेटून ठेवा. सुमारे अर्धा तास एक मध्यम हिरव्या ओव्हन मध्ये बेक करावे. आम्ही तत्परतेची तपासणी करतोः आम्ही पेंढा उलगडतो आणि मांस मध्य भागांतून वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. जर मासे तयार असेल तर मांस अगदी सहज निघून जाईल. अन्यथा, ओव्हनमध्ये 10 मिनिटांसाठी मासे परत आणावे. साहित्यः - तांबूस पिवळसर - 1 तुकडा; - लिंबाचा रस; - मीठ; - काळा ग्राउंड मिरपूड; स्टेक माझा सल्मोन, सुका मेवा, आणि नंतर खारट, प्रिटीरशुविमाचा काळी मिरी व लिंबाचा रस घालून शिंपडा. आम्ही ऑलिव्ह ऑईलच्या दोन्ही बाजूस स्टेक झाकतो. यानंतर फ्राइंग पॅनमध्ये त्याच तेलाचे थोडे ओव्हन करा, ते चांगले गरम करा आणि तयार स्टेक ठेवा. आम्ही एका बाजूला एका जागी मोठी आग लावण्याकरिता तळणे केले. आणि मग आम्ही ते पुन्हा चालू करतो, अतिवृष्टीवर सुमारे दोन मिनिटे भरू शकतो, आणि मग आम्ही आग लावून झाकण ठेवून तळण्याचे झाकण लावा आणि ताकदीने स्टेक आणा. अशा सोप्या कृती केल्यामुळे, मासे खूप चवदार वाटतील, परिणामी कवच यामुळे रस बाहेर जाणार नाही आणि परिणामी सॅल्मन स्टेक मऊ, चवदार आणि अतिशय रसदार राहिल. साहित्यः - 3 लहान सदोष स्टेक्स; - कमी चरबीयुक्त दूध - 300 एमएल; - लसूण - 4 लवंगा; - मीठ; - काळा ग्राउंड मिरपूड; स्टीक्स सॅल्मन चांगले धुऊन, कागदी towels सह वाळवा एका वाडग्यात आम्ही दूध ओततो, त्यात स्टेक्स घालून अर्धा तास सोडा. एक लहान खवणी वर Chives लसूण आणि तीन. अर्धा लिंबू पासून आम्ही रस पिळून काढणे. सॅल्मनचा संचय केल्यानंतर, दूध निचरा झाले आहे, आणि मासे मिठ, मिरपूड आणि लसूण सह चोळण्यात आहेत. नंतर लिंबाचा रस सह शिंपडा. अशाप्रकारे स्टेक्स मल्टीइव्हरच्या एका पॅनमध्ये ठेवले आहेत आणि "बेकिंग" पद्धतीने आम्ही 30 मिनिटे तयार करतो. परंतु या प्रकरणात, प्रक्रिया सुरू झाल्यापासून 20 मिनिटांनंतर, मल्टीइव्हर कव्हर उघडून मासे दुसर्या बाजुला वळवा. तयार स्टेक्स काळजीपूर्वक मल्टीवार्कमधून काढला आणि लगेचच टेबलवर चालला. आणि हा पदार्थ खरोखरच चवदार बनविण्यासाठी, आपण काही गुणांचा विचार करावाः - मासे तयार करताना भरपूर द्रव सोडलं जातं, तर प्रथम झाकण ओपन मल्टीवार्का सह शिजवावे लागते; - जर स्टेक्स पुरेसा जाड असेल तर तो 3 सेमी पेक्षा जास्त असेल तर एकूण 15 मिनिटांची वाढ करावी. साहित्यः - सॅल्मनमधून स्टेक्स - 4 पीसी . ; - पीठ - 1 टेस्पून. चमचा; - एक वनस्पती (हिस्टॅम) - 0,5 टीस्पून; - ऑलिव्ह तेल - 3 टेस्पून. चमच्याने; - व्हिनेगर वाइन - 1 टेस्पून. चमचा; - सोया सॉस- 50 मिलि; - आयोडीनयुक्त मीठ - 1 चमचे; - मिरपूड काळा ग्राउंड - चिमूटभर; - कोरड्या वाईन - 0,5 चष्मा; - पाणी - 0. 5 कप. ऑलिव्ह ऑइल आणि वाइन व्हिनेगरसह सोया सॉस मिक्स करावे. परिणामी मिश्रण स्टेक्स पुदीत केलेले आहे आणि खारटपणासाठी अर्धा तास सोडा. वेळोवेळी त्यांना समान वळण लागण्याची गरज आहे जेणेकरून ते समान प्रकारे भिजत असतात. आता आम्ही तळण्याचे पॅन गरम करत आहोत त्यात वनस्पती तेल सुमारे 1 चमचे स्टीक हे अळंबीतून बाहेर काढले जातात, सुका मेतात, मीठ आणि मिरचीचा चोळण्यात येतो आणि त्यांना एका उकडलेले तळण्याचे पॅनमध्ये ठेवले जाते. आग लगेच सुमारे सरासरी कमी आहे एकीकडे सुमारे 3 मिनिटे भोपळी चोळावे. नंतर हळुवारपणे आणि 3 मिनीटे ते तळून काढा. मग आम्ही मासे एका डिशवर हलवतो, आणि त्याच तळव्यापड्यात ओठ घाला. सुमारे 1 मिनिट ते ढवळत, ढवळत. आता पॅन मध्ये वाइन, उर्वरित marinade, पाणी घालावे आणि ढवळत, जाड होईपर्यंत सॉस उकळणे थायम घालावे आणि कमी गॅसवर शिजवावे. 4. खूप शेवटी, सॉस मीठ आणि मिरपूड आहे. आम्ही सॅल्मनमधून स्टेक्स ओततो आणि तातडीने टेबलवर सर्व्ह करतो. प्रत्येकजण एक आनंददायी भूक आहे!
मुंबईः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांना सोबत घेऊन सर्वात मोठे बंड केले. या सर्व बंडाचे जायंट किलर एकनाथ शिंदे ठरले. या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीतीत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पॉईंट कोणता होता, ठिणगी नेमकी कुठे पडली, याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. 'ट्रिगर पॉईंट विचारत असाल तर ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटायची आणि कोणीतरी शहीद व्हायचं. ही 50 लोकंच माझ्या मागे लागली होती,' असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, '2019 ला महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला कौल दिला होता. बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही निवडणूक लढलो. पण निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. महाविकास आघाडीचा प्रयोग आमच्यातल्या अनेक आमदारांना मान्य नव्हता, पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही नेतृत्वाचा निर्णय मान्य केला,' असं शिंदे म्हणाले. 'महाविकासआघाडीमध्ये शिवसैनिकाला त्रास दिला जात होता. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं. आमच्याच मतदारसंघामध्ये जाऊन आमचे घटकपक्ष भूमिपूजन करत होते. बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व याची गळचेपी होत होती, हे आम्हाला जाणवत होतं,' असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर आमच्यावर 50 खोके वगैरे टीका करतात, पण आम्ही जी 50 लोक आहोत ती किती वर्ष शिवसेनेत आहोत. आम्ही 25-30, 40 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांचा अनुभव किती आहे? 50 खोके बोलतात त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
पारनेर : राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या (बीएएमएस, बीएचएमएस, नर्सिंग) परीक्षा येत्या १४ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याच वेळी दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल नेमणुका एक डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे विविध वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात आमदार लंके यांनी म्हटले आहे, की राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या परीक्षा १४ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल नेमणुका एक डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. यात विरोधाभास निर्माण झाला आहे. बहुतांश विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठीच्या रजादेखील रद्द केल्या असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. मुलांच्या नेमणुका व त्यानंतर लगेचच काही दिवसांतच परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे नुकसान टाळण्यासाठी १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात. दोन पेपरमध्ये किमान तीन ते चार दिवसांचे अंतर ठेवावे, अशी मागणी लंके यांनी या पत्रात केली आहे.
विराट कोहली ते आदित्य ठाकरे यांच्यात काय कॉमन आहे? सध्या तरुण मुलांच्या जगात दाढी वाढवणं, रुबाबदार मिशा ठेवणं याची भलती क्रेझ आहे. दाढी-मिशी ठेवणं किंवा दाढी वाढवणं हे एकेकाळी तरुणांच्या जगात गबाळेपणा किंवा असभ्यपणाचं मानलं जात होतं. क्लीन शेवची मोठी क्रेझ होती. चॉकलेट हिरो लूक तरुणांमध्ये फार लोकप्रिय होता. त्यातही आमीर खान, शाहरूख खान, सलमान आणि सैफ यांचे लूक हे तरुणांमध्ये भयंकर आवडते होते. आपण तसं चॉकलेटी, रोमॅण्टिक दिसावं असा एक अट्टाहासही होता. रु बाबदार तरुण व्यक्तिमत्त्वाचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. आणि जो पहावा तो तरुण दाढी वाढवून फिरताना दिसतो आहे. त्यातच सध्या अनेक सेलिब्रिटी कलाकार, खेळाडूंसोबत राजकीय नेतेही दाढी-मिशा राखण्यावर भर देत असल्यानं तरुणांमध्ये त्याची क्रे झ आणखी वाढली आहे. आपल्या भारतीय क्रिकेट टीमचंच उदाहरण घ्या, एक महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळला तर आजच्या घडीला संघात खेळणार्या अनेकांनी दाढी राखलेली आहे. शिखर धवनच्या बब्बर मिशा लोकप्रिय आहेत. कोहलीच्या दाढीचे तर केवढे चर्चे, त्यासारखी दाढी ठेवायची फॅशन आता अगदी कॉलेंजगोइंग तरुणांतही दिसते आहे. एरव्ही कॉलेजात शिकणारे तरुण एकदम दाढी करून येत, आता अनेकजण खास दाढी जेल नी ट्रिम करणं हे सारं फार हौशीनं करताना दिसत आहेत. हे सारं सुरू असताना राजकारण तरी त्याला कसं अपवाद राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते थेट आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अमोल कोल्हे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितीन नांदगावकर, विश्वजित कदम, जयकुमार गोरे, सुजय विखे, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यातही एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे त्यांची दाढी. या राजकीय नेत्यांकडे पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येकाच्या दाढीची स्टाइल वेगळी आहे. पण त्यामुळे त्यांचा रुबाबदार लूक अधिक खुलून दिसतो. तरुण मुलांवर नेहमीच अभिनेते, क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांच्या वेश-केशभूषेचा प्रभाव पडलेला दिसतोच. अगदी कपडे, चष्मे ते चपलांर्पयत. स्टाइल आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यात आता नव्या काळात सध्या दाढी हे एक नवीनच फॅशन स्टेटमेंट म्हणून उदयाला आलेलं दिसतं आहे. पूर्वी एखाद दुसर्या चित्रपटात दिसणारी हिरोची दाढी आणि मिशी आता सिनेमांतही झळकू लागली आहे. दबंग सलमानचा मिशीचा लूक असो नाहीतर आता नव्या सिनेमासाठी आमीर खानने वाढवलेली दाढी असो, कबीर सिंगची खुरटलेली दाढी असो चर्चा तर त्यांच्या स्टायलिश लूकची होतेच. आणि आता त्याचाच प्रभाव म्हणून की काय आता आपल्या 'माचो' लूकसाठी तरुण मुलंही आपली दाढी निगुतीनं वाढवू लागली आहेत. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते आणि टी-20, आयपीएलपासून ते प्रो-कबड्डीच्या खेळाडूंर्पयतच्या प्रत्येकाच्या दाढी-मिशांच्या स्टाइल्स वेगवेगळ्या आहेत. आपल्याला जे आवडेल, चांगले दिसेल असं वाटतं ते लूक तरु ण मुलं धडाधड कॉपी करत आहेत. आणि 'स्टायलिश' दिसण्याचा रांगडा प्रयत्नही करत आहेत. तरुणांशी 'कनेक्ट' वाढविण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते तरी यापासून कसे दूर राहतील. एकेकाळी राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करणार्यांना 'क्लीन शेव्ह्ड' राहणं फार महत्त्वाचं मानले जात होतं. गालावर वाढत असलेले दाढीचे छोटे खुंटही ताबडतोब हटवले जात होते. पण आज हे चित्र पूर्णतर् बदललं आहे. अलीकडच्या काळात दाढी-मिशी ही 'स्टाइल स्टेटमेंट' बनू लागली आहे. या स्टायलिश लूकमुळे राजकीय नेत्यांना, तरु णांना आपले करण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर हा लूक अधिक भारदस्त दिसण्यासाठी व्यायामशाळांमध्ये जाऊन शरीर कमावण्यावरही सध्या दणक्यात भर दिला जातो आहे. जिम, रनिंग किंवा सायकलिंग करताना अनेकजण दिसतात. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व अधिक भारदस्त दिसतं असं तरुणांना वाटतं. त्यामुळे दाढी आणि व्यायाम हे दोन सध्याचा तरुण मुलांचे नवे मित्र झालेले दिसतात. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ असलेल्या तरु णांना प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी-मिशांसारखा प्रकार भलताच आवडतो. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी वाढवलेली दाढी अन् मिशीची स्टाइल लोकप्रिय ठरली. सातार्याच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढवलेल्या दाढीचीही चर्चा झाली. तरु ण पिढी याला 'महाराज शेव्हिंग कट' म्हणून फॉलो करताना दिसते. ( स्वप्नील लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे. )
लता मंगेशकर : उत्तररात्रीच्या रत्नखचित आकाशाकडे पाहताना सहज उत्तर दिशेला युगानुयुगे तेवणाऱ्या ध्रुव ताऱ्याकडे आपले लक्ष जाते आणि जगदाकारात धूलिकणासम असलेल्या इवल्याशा पृथ्वीवरल्या इवल्याशा जीवालाही धीर येतो. आपल्यासारख्या नगण्य मानवी जीविताला तो ध्रुवतारा अढळपणाचे जणू आशीर्वचन देत असतो. तोच ध्रुवतारा नभातून अदृश्य झाल्याची, निराधार करणारी भावना प्रत्येक भारतीय मनात घर करून गेली. तो दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२२. लता मंगेशकर नावाचा सूर नव्हे. सुरांचे एक युग त्या रविवारी निमाले, वसंत ऋतूच्या आगमनकाळीच या गानकोकिळेने निरोप घेतला. या दैवयोगास काय म्हणावे? हा क्षण कधी येऊच नये, असं प्रत्येकालाच वाटत होते. पण कालगतीचे नियम देवदूतांनाही पाळावे लागतात. गेल्या दोन अडीच वर्षात विषाणूच्या उद्रेकामुळे अनेक प्रतिभावंत आपण गमावले. अनेकांना आपल्या आप्तांना अकाली निरोप द्यावा लागला. त्याचे दुःखही सहन करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. परंतु, लतादीदी नावाचा अलौकिक स्वर जिथे उमटला, तो कंठ मुका झाला हे दुःख सहन होण्यापलीकडचे आहे. कारण लता मंगेशकर नावाचा हा स्वर कुण्या व्यक्तीच्या मालकीचा राहिलाच नव्हता. तो भारतीय मनाचा आत्मस्वर होता. तो आपला आप्तस्वर होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान! त्यांच्या स्वर्गीय स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नव्हती. या स्वरांना कोंदण लाभले होते ते केवळ उत्कटतेचे अन् भव्यतेचे! लतादीदींच्या संगीतमय जीवनाला भारतरत्नाची झळाळी लाभली तसेच नव्वदीच्या टप्प्यावर त्यांना 'डॉक्टर ऑफ द नेशन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गानकोकिळा बनल्या. चोवीस तासांतला कोणताही क्षण असा असणं शक्य नाही जेव्हा लतादीदींच्या स्वरानं वातावरण भरून आणि भारावून गेलेलं नाही. देवळात, शाळेच्या प्रार्थनेत, घरात, नाट्यमंदिरात, उत्सवात, लग्नसमारंभात, तुम्ही कुठेही जा त्यांचा स्वर आपल्या कानावर येतोच. तो देखील थोडाथोडकी नव्हे, तर सत्तरहून अधिक वर्षे ! वडिलांना ही गोष्ट आवडली नाही. आपल्या मुलीने चित्रपटातील गाणी गावित हे वडिलांना मंजूर नव्हते. त्यामुळे हे गीत चित्रपटातून वगळण्यात आले. पण लतादीदींच्या गायन -कौशल्यामुळे वसंत जोगळेकर प्रभावित झाले. १९४२ साली दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी लतादीदींच्यावर आली. भावंडांमध्ये दीदी मोठ्या असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्या काळी नूरजहाँ, शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, राजकुमारी या गायिकांचा समाज मनावर पगडा होता. अशावेळी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे ही गोष्ट सोपी नव्हती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. खरंतर त्यांना अभिनयाची तितकीशी आवड नव्हती पण वडिलांच्या अकाली मृत्युमुळे त्यांना पैशासाठी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करावे लागले. अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तो 'पहिली मंगळागौर (१९४२) ज्यामध्ये त्यांनी स्नेहप्रभा प्रधानच्या छोट्या बहिणीची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी 'चिमुकला संसार' (१९४३), 'गजाभाऊ' (१९४४), 'बड़ी माँ (१९४५), 'जीवनयात्रा' (१९४६), 'माँद' (१९४८), 'छत्रपती शिवाजी' (१९५२) इत्यादी चित्रपटात भूमिका केल्या. त्यानंतर त्या पार्श्वगायन क्षेत्राकडे वळल्या. १९४९ हे वर्ष दीदींच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष होते. 'महल' या चित्रपटातील 'आयेगा आनेवाले' या गीतामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. हे गीत लतादीदींनी त्या काळातील एक सुंदर व लोकप्रिय अभिनेत्री 'मधुबाला' यांच्यासाठी गायलेले होते. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटामुळे लतादीदी व मधुबाला यांची कीर्ती सर्वत्र पसरली. यानंतर लतादीदींनी मागे वळून कधी पहिलेच नाही. लता मंगेशकर. . अभिजात भारतीय संगीतातील कोहिनूर! त्यांची गाणी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. अनेक हिंदी, मराठी गाणी दीदींनी अजरामर करून ठेवली आहेत. लतादीदींनी हजारो गाणी गायली आहेत. आपण सारे खरंच भाग्यवान यासाठी की आपल्या हयातीत आपण त्यांना पाहू शकलो, ऐकू शकलो. आपला जीवनप्रवास दीदींच्या स्वराने सुखकर झालाय. अमृतवेलीवर चांदण्यांची शुभ्र, मृदुल फुले झंकारावी. असा दीदींचा स्वर! हा नुसता गोड नव्हे तर अजोड होता. खरंतर साक्षात सरस्वतीचा स्पर्श लाभलेला त्यांचा हा आवाज, शब्दापलीकडचा होता. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून ते गालिबच्या गजलांपर्यंत गेल्या कित्येक दशकात दरवळणारा तो एक स्वरसुगंध होता. दीदींच्या आवाजाचा परिसस्पर्श अनेक कवी, शायर, संगीतकार, अभिनेत्रींच्या प्रतिभेला लाभला. त्यांचे सोने झाले. दीदींच्या या ईश्वरी आवाजाची रूपे वर्णावी ती किती? सकाळी भक्तिगीतांचा कार्यक्रम रेडिओवर सुरु झाला की 'सुंदर ते ध्यान. . . . . . ऐकू येतं. काही क्षणात 'मोगरा फुलाला. . . . . . . " चे शब्द कानावर पडतात, ते संपताच गणराज रंगी नाचतो. . . . . ' हे गीत सुरु होते. त्यांच्या आवाजातील 'पसायदान' ऐकताना त्या 'माऊली' होऊन आपल्याला भेटतात. ने मजसी ने परत मातृभूमीला. . . ' हे दीदींचे गीत ऐकताना स्वातंत्रवीर सावरकरांच्या मनातील देशभक्ती जाणवते. 'मराठा तितुका मेळवावा. . . . ' या चित्रपटातील 'अखेरचा हा तुला दंडवत' हे दीदींनी गायलेलं गीत ऐकलं की हृदयात गलबलतं. दीदींनी या गाण्याला संगीत दिले होते. 'आनंदघन' या टोपणनावांनी दीदींनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या गाण्यातील आर्तता थेट हृदयाला जाऊन भिडते. कुठलाही प्रहर असो, ऋतू असो, रस असो, भाव असो भारतीय भाषा व नृत्यप्रकार असो, सणवार व उत्सव असो. कोणतेही वय वा प्रसंग असो. दीदींच्या स्वरांनी सर्वकाही सकळांसाठी सजवून ठेवले आहे. गेली सात दशकं आपण ते स्वरवैभव अनुभवले. त्यांच्या गाण्याची दखल घेऊन २००१ मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च असा मानाचा 'भारतरत्न' 'किताब बहाल केला. १९८९ मध्ये त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्कारही बहाल करण्यात आला. १९७२, १९७५ व १९९० मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार ही देण्यात आले होते. सन १९७४ मध्ये जगात सर्वाधिक गीते गाणाऱ्या गायिका म्हणून नावाची नोंद केली गेली. गिनीज बुकात दीदींच्या९० वर्षे वयातही त्या गात होत्या. ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांची गीते गेली. भारतीय सिनेसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून त्या सर्वपरिचित होत्या. 'भारतरत्न' लता मंगेशकरांच्या गाण्यातील ईश्वराची रूप शोधण्यातच आपल्या जन्माचे सार्थक आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लतादीदी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर येते एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे कलाकार व गायक होते. त्यांच्या परिवारामध्ये भाऊ हृदयनाथ मंगेशकर तसेच बहिणी उषा, आशा, मीना यांनी देखील 'संगीत' हेच कार्यक्षेत्र निवडले. लता मंगेशकर यांचे बालपण महाराष्ट्रात गेले. आपल्या कुटुंबाचं कर्तेपण शिरावर घेणाऱ्या लतादीदींचा प्रवास सांगली, पुणे, कोल्हापूर ते मुंबई असा झाला. तो खडतर होता. काळ १९३२-३३ चा संगीत रंगभूमीच्या विपन्नावस्थेची परमावधी झालेली. सांगलीच्या घरात बळवंत संगीत नाटक मंडळीचे मालक मा. दीनानाथ, नाटका कंपनीचे कुटुंब सावरण्याच्या विचारात अस्वस्थ आहेत. एका दिवेलागणीला आपल्या शिष्याला गाणं शिकवत आहेत. उजळणी करायला सांगून थोडे बाहेर जाऊन येत आहेत. तेव्हा अवघी साडेचार वर्षाची लता शिष्याला सांगते, "बाबांनी असं शिकवलंय, मी म्हणून दाखवते "तुला" वडील ते ऐकून चकित होऊन म्हणतात, "माझ्या घरातचं गवई आहे. मी दुसरं कुणाला काय शिकवु? " लतादिदींची शिकवणी सुरु झाली. बाबांचं निधन होईपर्यंत ती अखंड राहिली. एकदा ते माईना म्हणाले, "लताच्या रूपाने मला उद्याचा सूर्योदय दिसतोय". अवघ्या साडेबारा वर्षे वयाच्या मुलीला वडिलांनी जवळजवळ दीडशे चिजा शिकवून पारंगत केलं होतं. १९४१ मधील दीदींच्या बालपणीची आणखी एक घटना! पुण्यात 'खजांची' च्या गाण्याची स्पर्धा जिंकल्यावर मेडल व बक्षीस मिळालेला दिलरुबा घेऊन आलेल्या आपल्या मुलीला वडील म्हणाले, "यश डोक्यात जाऊ देऊ नकोस. तुला खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप पुरस्कार मिळवायचे आहेत. " या आणि अशा असंख्य घटनांनी दीदींच्या बालपणीचा काळ व भावी काळ उजळलेला होता. लहानपणापासूनच दीदींना गायिका बनायचे होते. वसंत जोगळेकर निर्मित 'किती हसाल' या चित्रपटासाठी एक गीत लताने गायले तेव्हा लोटला तरी आजही या गाण्याची गोडी कायम आहे. सामाजिक बांधिलकी जपणे हा तर दीदींच्या स्वभावाचा स्थायीभाव! रसिकांनी केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून दीदींनी माई मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर ही दोन सुसज्ज हॉस्पिटल्स पुण्यात सुरु केली. आपल्या कुटुंबावर मायेची पखरण घालणाऱ्या लताजींनी आपल्या भावंडांना अखेरपर्यंत मातृप्रेमाचे छत्र दिल्याचे हृदय चित्र आपण पहिले आहे. लताजींच्या बरोबर सुरांच्या ओढीनं झपाटलेली मंगेशकर भावंडं लताजींच्या पश्चातही आपापल्या वेगळ्या वाटेनं गाण्याची साधना करत आहेत. एकदा पु. ल. म्हणाले होते की, "मला आकाशात देव आहे का नाही हे माहित नाही पण आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे". खरंच, असा स्वर, असा सूर, पुन्हा होणे नाही. जोपर्यंत सूर्याचे तेज,चंद्राची शीतलता, फुलातील सुगंध गंगेचे पावित्र्य शाश्वत आहे अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहतील व पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरु राहील तोपर्यंत दीदींचा सूर हा वायुलहरींवर तरळत राहील. स्वरलतेच्या या साऱ्या आठवणी म्हणजे जणू आपल्या मर्मबंधातली ठेव !
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते. यापैकी जवळपास १. ०१ लाख खात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली आहे. तर ९६ हजार खातेदारांनी आधार संलग्नीकरण करून कर्जमाफीच्या रकमेची पडताळणीही करून घेतली आहे. सध्या ९० हजार खातेदारांच्या खात्यावर ५८९. २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. २० बँकांचे हे खातेदार आहेत. यापैकी ६२ हजार ३८ शेतकऱ्यांना माफीनंतर कर्जवाटप करण्यात आले आहे. ही रक्कम ४७३. ९६ कोटी आहे. तर माफीनंतर ज्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ४५० एवढी आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाचा दावा केला असला तरीही जवळपास तीस टक्के शेतकरी अजूनही पुन्हा पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे याबाबत ओरड होणे साहजिकच आहे. पुढील काळात या शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्जमाफीत सर्वाधिक ४१ हजार २९१ शेतकरी खातेदार स्टेट बँक ऑफ इंडियाचे असून रक्कम ३१० कोटी आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १५ हजार ४९३ खातेदारांना ११४ कोटी तर परभणी मध्यवर्ती बँकेच्या १२ हजार ९७९ खातेदारांना अवघी २५. ५९ कोटींची माफी झाली आहे.
मुंबईः सोमवारी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्यात राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील, उद्धव गटातील शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव आणि सुभाष देसाई आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि अस्लम शेख उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारबद्दल सांगितले की, हे सरकार लवकरच पडेल. आज महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस होता, यासंदर्भात आदित्य म्हणाले की, दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी झाली, पण गुजरातला केंद्राचा आशीर्वाद आहे. गुजरातमध्ये दोन मुख्यमंत्री आहेत, एक त्यांचा आणि दुसरा महाराष्ट्राचा, जे सर्व काही गुजरातला पाठवत आहेत. यावेळी आदित्य म्हणाले की, आजवर आपण जेवढी सरकारे पाहिली आहेत, त्यांनी कधीही मुंबईला वाकवण्याचे काम केले नाही, मुंबई तोडण्याचे काम केले नाही, मात्र मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा या सरकारचा हेतू आहे. मुंबई! आदित्य ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला इशारा देतो, जर तुम्ही आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न केलात तर हा महाराष्ट्र तुम्हाला तोडेल, पण झुकणार नाही जनता आमच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचे सरकार चांगले चालवले. आर्थिक बोजा वाढला नाही. यासोबतच ते म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत, त्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, मात्र सरकार मदत करत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी विराटने सोशल मिडीयावरुन फोटोसकट शेअर करताच ती वा-यासारखी जगभर पसरली. आता प्रेगन्सीमध्येसुध्दा अनुष्का सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनुष्काने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत अनुष्काने केलेला हा शीर्षासन सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधूनच घेत नाही तर थक्क करतोय. भिंतीचा आधार घेऊन अनुष्काने शीर्षासन केलं असून पती विराट कोहलीने तिच्या पायांना आधार दिला आहे. योगमार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्काने हे शीर्षासन केलं आहे. अनुष्का लिहते, " 'हा सर्वांत अवघड व्यायामाचा प्रकार आहे. योगसाधना माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या कारणास्तव माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे. "
कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काेरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शहर व ग्रामीण भागांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा व विद्युत मशिनरी सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पूर्ण क्षमतेचे जनरेटर बसवावेत. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करा. येथील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी तेथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढवा, स्राव तपासणीचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता तत्काळ घेऊन कामे गतीने मार्गी लावावीत. सद्यःस्थितीत असणारे आयसीयू बेड, उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर सुविधा, ऑनलाईन माहिती भरण्याची वेळेत कार्यवाही करणे, स्राव तपासणी क्षमता, बिलांचे ऑडिट, मृत्यू ऑडिटवर अधिक लक्ष देणे, रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका, लसीकरण आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामाच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे ऑडिट करणाऱ्या पथकांनी बिलांची काटेकोर तपासणी करून रोजच्या रोज अहवाल सादर करावा. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. बिलांचे ऑडिट आणि डेथ ऑडिटवर अधिक लक्ष देण्यात येणार असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ओळ : कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी कोरोना आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपप्र जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
Satara Hill Half Marathon 2022 A Runner Dies Of A Heart Attack During A Competition : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापुरातील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. धावपटूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पळताना मृत्यू झाला. यामुळे स्पर्धेला गालबोट लागले. ज्या खेळाडूचा मृत्यू झाला तो राष्ट्रीय टेबल टेनिसपटू होता. राजक्रांतीलाल पटेल (३२) या खेळाडूचे नाव होते. मॅरेथॉनदरम्यान धावताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. धावताना धावपटूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. स्पर्धेच्या स्वयंसेवकांनी त्याला तातडीने अँब्युलन्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून धावपटूचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. राजक्रांतीलाल पटेल हा कोल्हापूरच्या मार्केट यार्ड भागातील रहिवासी होता. राष्ट्रीय पातळीवर टेबल टेनिस खेळाडू म्हणून त्याला ओळखत होते. यंदाच्या साताऱ्याच्या हाफ मॅरेथॉनमध्ये तो सहभागी झाला होता. स्पर्धा उत्साहात सुरू होती. राजक्रांतीलाल पटेल पूर्ण अंतर पार करून स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचला. स्पर्धेची शेवटची शंभर मीटर राहिली होती, त्यावेळी तो जमिनीवर कोसळला. तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या यशवंत हॉस्पिटलला हलवले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. नंतर मृतदेह जिल्हा सरकारी दवाखान्यात हलवून शवविच्छेदन करण्यात आले. राजक्रांतीलाल पटेलच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून ते सातारा जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत.
मेहुणबारे (जळगाव) : येथून जवळच असलेल्या शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथे तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी छापा टाकून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून, याच महिन्यात अशा प्रकारे अवैध दवाखाना थाटणाऱ्या बंगाली डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली होती. चाळीसगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. देवराम लांडे यांना शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुश्ताक सय्यद यांनी माहिती दिली होती. त्यानुसार शिरसगाव येथील शांताबाई परशुराम पाटील यांच्या राहत्या घरी, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागे माधवराव देवराम पंडित हा डॉक्टर असल्याचे भासवून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करीत होता. माहितीच्या आधारे तालुकास्तरावर नेमण्यात आलेल्या समितीमधील सदस्य, डॉ. लांडे तसेच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आरोग्य विस्ताराधिकारी प्रदीप सोनवणे व दोन शासकीय पंच यांच्या पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी घराच्या वरच्या मजल्यावर एका वृद्ध महिलेवर कथित डॉ. पंडित (रा. चाळीसगाव) उपचार करीत होता. माधवराव पंडित हा डॉक्टर असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी कोरोना संसर्गात ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक करीत त्यांच्यावर उपचार करताना आढळून आला. या प्रकरणी तालुका आरोग्याधिकारी डॉ. लांडे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत. पंडित याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्राची मागणी केली असता ते नसल्याचे सांगितले. त्या ठिकाणी असलेल्या रुग्णास विचारले असता चार दिवसांपासून न्यूमोनियासदृश आजारावर उपचार करीत असल्याचे सांगितले, तर डॉक्टरच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात विविध प्रकारची वैद्यकीय औषधे व साहित्य मिळून आले. त्यानुसार घटनेचा पंचनामा करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर ध्वज उतरवताना देखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. देशाची राष्ट्रभक्ती व्यक्त करताना जसा उंचावर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आपली मान उंचावतो तशीच खराब झालेल्या, फाटलेल्या, मळलेल्या राष्ट्रध्वजाला देखील सन्मानपूर्वक निरोप देणं गरजेचे आहे. या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून 2022 ते 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूवर (ULLU) दररोज बोल्ड (Bold) आणि हॉट (Hot) कंटेंट पाहायला मिळत आहे. या ओटीटीने त्याच्या XXX आणि एरोटिक व्हिडिओंच्या आधारे प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोक या ओटीटीचे चाहते झाले आहे. सध्या या अॅपवरील 'पलंग तोड' (Palang Tod) या नवीन शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. भारत यावर्षी आपला 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा करणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिनी परेड आयोजित करण्यात आली आहे. भारत दरवर्षी लोकशाहीचा हा महापर्व भव्य पद्धतीने साजरा करतो, परंतु यावर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजारामुळे या उत्सवामध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (24 जानेवारी) जेजुरीमध्ये 90,000 भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. यावेळी कोरोनाचे नियम अगदीच धाब्यावर बसलेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला. अमरावती : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ अखेर २ हजार ५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी एक हजार ३९४ स्थळांचे नियमितीकरण, ८८ स्थळांचे स्थलांतरण तर ४ स्थळे निष्कासित करण्यात आलीत. कायदा, सुव्यवस्थेला धोका नसलेल्या धार्मिक स्थळांना नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तहसीलदार, बीडीओ, नगररचना विभाग, बांधकाम, पोलीस विभागाद्वारा अहवाल मागविण्यात आले. त्यानंतर एक हजार ३९४ धार्मिक स्थळांना निष्कासित करून उर्वरीत एक हजार ७५ स्थळांविषयीची प्रक्रिया सुरू आहे. कायद्यानुसार अडसर ठरणाऱ्या ८८ स्थळांना स्थलांतरित करून अमरावती तालुक्यातील चार धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २००९ पूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, स्थलांतरण व निष्कासनासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली. त्यावर हरकती मागविल्या. त्याची सुनावणी झाली व १ मे १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे निष्कासित करण्यासंदर्भातील यादी राज्य समितीला पाठविण्यात आली. नंतर निष्कासनाची तारीख सूचनास्थळावर लावून चार स्थळे निष्कासित करण्यात आलीत. अमरावती तालुक्यातील २६, नांदगाव खंडेश्वर २८१, चांदूररेल्वे, तिवसा ९, धामणगाव ८, अचलपूर २२२, चांदूरबाजार १३, दर्यापूर १७३, मोर्शी ५४७, वरूड १६, धारणी ६ व चिखलदरा तालुक्यातील ६ स्थळे नियमित केली आहेत. अमरावती तालुक्यातील २, भातकुली १५२, अंजनगाव ३ व चिखलदरा तालुक्यातील ८५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. दर्यापूर तालुक्यातील ३ स्थळे निष्कासित केली असून येथील ६४ व मोर्शीतील १५ स्थळे स्थलांतरित करण्यात आली. जिल्ह्यातील २५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी १३९४ स्थळे नियमित केली. उर्वरित १०७५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. ८८ स्थळे स्थलांतरित व ४ निष्कासित करण्यात आली आहेत. - नरेंद्र फुलझेले, (महसूल विभाग)
ना. प्राजक्त तनपुरे हे कोरोना संसर्गावरील उपायात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता येथे आले होते. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांची त्याप्रसंगी भेट घेतली. दहावी तसेच बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता जमा केलेली फीची रक्कम त्यांना परत मिळावी, अकरावी तसेच पदवीच्या वर्गात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निकष कोणते, ते स्पष्ट करावेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून केवळ ट्यूशन फी घ्यावी, इतर फी आकारू नये, या व इतर अनेक मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे. राज्य सरकारने या मागण्या पूर्ण न केल्यास भाजप युवा मोर्चाचे वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदन देताना भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संयोजक प्रतीक भारसाकडे, आदित्य शिंगरडे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई, 09 मार्चः प्रवासात आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना घराबाहेर पडल्यानंतर जर वॉशरूमला जायचं असेल, तर अनेक अडचणी येतात. वॉशरूमच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे एकही ठोस योजना नाही. त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजानिक ठिकाणी असलेल्या वॉशरुमधील असुविधा आणि अस्वच्छता पाहाता महिला अशा ठिकाणी जाण्याच टाळतात. त्यामुळे सुरक्षित शौचालय सापडेपर्यंत त्यांना दैनंदिन क्रियाविधी रोखून धरावी लागते. पण आता या प्रवासातील आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी असणाऱ्या 'वोलू'ने एक अनोखं मोबाइल App लॉन्च केलं आहे. या App च्या माध्यमातून महिलांना शहरातील सर्वात जवळचं वॉशरूम सुविधा शोधण्यात मदत होणार आहे. यामुळे शहरातील अनोळखी ठिकाणी गेल्यानंतरही शौचालय शोधत फिरायची गरज भासणार नाही. ही सुविधा मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नोकरदार महिलांसाठी हे App अधिक फायदेशीर ठरणार आहे. घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयं शोध फार कठीण काम असतं. अशावेळी अनेक महिला लघुशंकेला येईल या भीतीने पाणी पिणं देखील टाळतात. तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहे अनेकदा अस्वच्छ असतात. अशावेळी अनेकदा महिला लघुशंकेला जाणं टाळतात. यामुळे अनेक आजार बळावतात, या समस्येला डोळ्यासमोर ठेऊन वोलू एपनं ही सुविधा विकसीत केली आहे. सध्या ही सुविधा मुंबईपुरतीच मर्यादीत आहे. पण येणाऱ्या काळात ही सुविधा देशभर उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. CM Eknath Shinde : विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, मोठी बातमी मिळणार? वोलू App गुगल मॅपच्या आधारे महिलांना जवळच्या स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची माहिती देणार आहे. Woloo अॅश्युरन्स (डब्ल्यूएएच) प्रमाणित प्रसाधन सुविधा कुठे आहे, हे शोधण्यास मदत करणार आहे. महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयं मिळावीत, यासाठी कंपनीनं टॉयलेट बोर्ड कोलिशन (टीबीसी) ने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे महिलांसाठी अनेक खाजगी हॉटेल, मिटिंग हॉल अशा विविध ठिकाणची शौचालयं खुली करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती हॉटेल चालक विजय यांनी दिली आहे. या App च्या मदतीने पहिल्या टप्यात मुंबईतील 500 शौचालयं खुली केली आहेत. आगामी काळात 100 मेट्रो शहरांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. वोलू हे भारतातील पहिलं App आहे. ज्यामुळे महिलांना स्वच्छतेचं प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या शौचालयांचा वापर करता येणार आहे. हे App सध्या कोरोना वॉरियर्ससाठी मोफत आहे, तर सामान्यांना यासाठी 99 रूपये मोजावे लागतील, अशी माहिती वोलू App चे व्यवस्थापक अमित अरोन्डेकर यांनी दिली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
निकालच नव्हे, चूकही ऐतिहासिक\nDivya marathi Article7march 2019\nनिकालच नव्हे, चूकही / निकालच नव्हे, चूकही ऐतिहासिक\nMar 07,2019 10:32:00 AM IST\nदरोडा, सामूहिक बलात्कार आणि खून यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना दिलेली फाशीसारखी शिक्षा रद्द करून संबंधितांची सर्वाेच्च न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली. ती करतानाच या प्रकरणातील आरोपींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने आर्थिक भरपाई द्यावी तसेच संबंधित तपासी अधिकाऱ्यावरही कारवाई करावी, असा ऐतिहासिक निर्णयही दिला. केवळ न्यायालयीन निकाल एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नसून न्यायव्यवस्थेसह तपास यंत्रणा आणि एकुणातच सामाजिक स्तरावरही त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला अगोदरचा निर्णय नवीन पीठाने पूर्णांशाने फिरवला तर आहेच, शिवाय तपास यंत्रणेवर मूलभूत स्वरूपाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत. परिणामी, या निकालाचा अन्वयार्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मुख्य म्हणजे ज्या चुकीच्या निकालामुळे या 'अाराेपींना' १६ वर्षे गजाअाड जावे लागले, त्याची भरपाई कशी हाेणार? त्यापैकी एक जण तर १८ वर्षांपेक्षा लहान हाेता. त्याचे अवघे अायुष्यच उद््ध्वस्त झाले, याला जबाबदार काेण? ९ वर्षांपूर्वी झालेल्या चुकीचे परिमार्जन करणारा हा एेतिहासिक निकाल अाहे हे खरे, पण त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया अाणि तपास यंत्रणा यांच्यावरील विश्वासच उडून जावा, अशी ती चूकही एेतिहासिक अाहे.\n१५ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण दरोड्याचे प्रस्तुत प्रकरण गाजले होते, ते त्यातील अमानुषतेमुळे. बेलतगव्हाण येथील एका शेतामध्ये सालदारी करणाऱ्या सातोटे कुटुंबीयांच्या घरावर दराेडा घालताना दरोडेखोरांनी लूटमार तर केलीच, शिवाय कुटुंबातील चार कर्त्या पुरुषांचे निर्घृण खून केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घरातील अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवरही बलात्कार केला होता. ही घटना उघडकीस आल्यावर केवळ नाशिकच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांत तीव्र सामाजिक पडसाद उमटले होते. संतप्त लाेकक्षाेभ पाहून नाशिकच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांचीही तातडीने उचलबांगडी करण्यात आली होती. सामाजिक दबाव वाढत गेल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून मराठवाड्याच्या भोकरदन येथून सहा संशयितांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध प्रथम नाशिक सत्र न्यायालयात खटला चालला आणि सहाही आरोपींना फाशी झाली.\nया निर्णयाला आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २००७ मध्ये तिघांना फाशी, तर तिघांना जन्मठेप सुनावली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले आणि २००९ मध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने सर्वांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणी आरोपींची फेरविचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर २०१४ मध्ये एका आरोपीने पुन्हा केलेल्या फेरविचार याचिकेचे पुनरुज्जीवन करून त्यावर सुनावणी सुरू झाली. चार वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे २०१८ मध्ये फाशीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला. त्यानंतर गेल्या मंगळवारी न्यायालयाने संबंधित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता तर केलीच, पण त्याबरोबरच सर्व आरोपींना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेशही राज्य सरकारला बजावले. शिवाय, निर्दोषींना खटल्यात अडकवल्याबद्दल संबंधित तपास अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.\nअगोदर निकाल देतेवेळी झालेली चूक सुधारत अशा प्रकारे आरोपींना न्याय देण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ अशी आहे. पण, केवळ तेवढाच अर्थ या निकालाला नाही, तर त्याचा सामाजिक संदर्भ अधिक परिणामकारक आहे. जातीय रचनेच्या उतरंडीत आपल्याकडे काही जाती-जमातींवर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला गेला आहे. विशेषकरून भटक्या-विमुक्त संवर्गात मोडणाऱ्या संबंधित जातींमध्ये जन्माला येणारा जणू प्रत्येकच जण गुन्हेगार निपजतो, असा अपसमज असून तो अत्यंत घातक आहे. त्यातून संबंधितांवर अन्याय तर होतोच, पण सामाजिक तेढही वाढीस लागते. गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या काही अप्रिय घटना घडल्या की मग अशाच अपसमजातून या जातींमधील मंडळी पोलिसांचे 'सॉफ्ट टार्गेट' बनतात.\nसातोटे हत्याकांडानंतर पोलिस यंत्रणेवर वाढत गेलेल्या सामाजिक आणि राजकीय दबावापोटीच तत्कालीन तपास यंत्रणेने विशिष्ट समाजातील सहा संशयितांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, असा नव्या निकालाचा अन्वयार्थ निघतो. सर्वोच्च न्यायालयाच्या तीनसदस्यीय खंडपीठाने पुनर्विचार याचिका ग्राह्य धरत सर्व आरोपींना निर्दोष ठरवल्याचा घेतलेला निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योगायोगाने नाशिक सत्र न्यायालयानेही नुकतेच जमिनीच्या वादातून झालेल्या अन्य एका खून प्रकरणात पाेलिसांवर ताशेरे अाेढत फेरतपासाचे अादेश दिले. हे दाेन्ही निर्णय तपास यंत्रणेला संशयाच्या भोवऱ्यात ढकलणारे असल्याने सरकार तसेच संबंधित यंत्रणेने त्यातून वेळीच बोध घेणे निकडीचे आहे. पारदर्शक तपास ही निःपक्ष निकालाची पूर्वअट असते. मात्र, या प्रक्रियादेखील लाेकानुनय करत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले अाहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने हीच चिंता अधाेरेखित केली अाहे.
Afghanistan News: हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचाव मोहिमेला 'ऑपरेशन देवी शक्ती' (Operation Devi Shakti) असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला 'ऑपरेशन देवी शक्ती' असे नाव दिले आहे. हे नाव कसे अस्तित्वात आले याची माहिती सूत्रांनी दिली. ऑपरेशनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की हे नाव निवडले गेले कारण हा निष्पाप लोकांना हिंसाचारापासून वाचवण्याचा हा एक प्रयत्न आहे, ज्याप्रमाणे 'माँ दुर्गा' निरपराध लोकांना राक्षसांपासून वाचवते, त्याचप्रमाणे काबूलमधून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले आहे. सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी अशाच प्रकारचे संकट मोचन सुरू राबवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्गा देवीचे महान भक्त आहेत. ते नवरात्रात नऊ दिवस उपवास ठेवतात. नऊ दिवस, फक्त गरम पाणी पितात आणि कधीकधी एका वेळच्या आहारात फक्त एक फळ खातात. नुकत्याच झालेल्या सीसीएस बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाला निर्देश दिले होते की, अफगाणिस्तानातील लोकांच्या बचाव कार्याला मानवी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, केवळ हिंदू आणि शीख सारख्या अल्पसंख्यांकांना अफगाणिस्तानातून विविध विमानांनी परत आणले पाहिजे असं नाही, तर अनेक अफगाण नागरिकांनीही या संकटकाळात भारतात येण्याचा पर्याय निवडला आहे, त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाऊ नये. तालिबानने वेढलेल्या काबूलच्या ताजिक शहरातून बाहेर काढल्यानंतर भारताने मंगळवारी आपल्या 25 नागरिकांना आणि अनेक अफगाणी शीख आणि हिंदूंसह 78 लोकांना दुशांबेमधून परत आणले. शीख धर्मग्रंथ, गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रतींसह हा गट सोमवारी भारतीय हवाई दलाच्या लष्करी वाहतूक विमानाने काबूलहून दुशांबेला रवाना झाला. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि व्ही मुरलीधरन यांनीही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांचे स्वागत केले. मंगळवारच्या बचावकार्यानंतर, 16 ऑगस्टपासून दिल्लीला परत आणलेल्या लोकांची संख्या 800 वर गेली आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्याच्या एक दिवसानंतर पहिल्या तुकडीला काबूलहून विमानाने हलवण्यात आले होते. पुरी यांनी ट्विट केले की, "काही काळापूर्वी काबुल ते दिल्ली येथे श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे तीन पवित्र स्वरूप प्राप्त करण्याचा आणि त्यांना अभिवादन करण्याचा बहुमान मिळाला. " एअर इंडियाच्या विमानाने दुशांबेहून लोकांना परत आणण्यात आले. ऑपरेशन देवी शक्तीचा एक भाग म्हणून भारताने नाटो आणि अमेरिकेच्या विमानांनी काबूलमधून नागरिकांना बाहेर काढल्यानंतर काही दिवसांनी कतारची राजधानी दोहा येथून आपल्या 146 नागरिकांना परत आणले. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल काबीज केले. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर दोन दिवसातच भारताने अफगाणिस्तानच्या राजधानीतील भारतीय दूतावासातील इतर दूतावासातील 200 कर्मचाऱ्यांसह 200 लोकांना बाहेर काढले. पहिल्या निर्वासन विमानाने 16 ऑगस्ट रोजी 40 हून अधिक लोकांना, बहुतेक भारतीय दूतावासाचे कर्मचारी परत आणले. ऑपरेशन अद्याप संपलेले नाही आणि हे ऑपरेशन देवी शक्ती पुढील काही दिवस चालू राहण्याची अपेक्षा आहे.
खोडद : 'संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले आहेत. आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी संविधान एकदा तरी वाचायला हवे,' असे आवाहन नीलम गायकवाड यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने खोडद ग्रामपंचायतीला भारतीय संविधान प्रस्तावना भेट देण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, उपसरपंच सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नीलम गायकवाड, कल्पना डोके,योगेश शिंदे,नवनाथ पोखरकर, संदीप घायतडके,विजय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा वाव्हळ, अमर सोनवणे,श्रीकांत सोनवणे, उमेश वाघंबरे, विक्रम वाव्हळ,गोपी खंडे, संतोष डोळस, अॅड. मिथिलेश शिंदे,संग्राम सोनवणे,दावीत इंगळे,संदीप उबाळे,अक्षय वाव्हळ,ऋषिकेश वाव्हळ,गणेश सोनवणे,माजी सरपंच विजय गायकवाड,संतोष काळे,विशाल पानमंद, प्रदीप बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वाव्हळ बोलताना म्हणाले की , "संविधान वाचन केल्यास आपल्या अधिकारांची आपल्याला जाणीव निर्माण होते. अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये. भारतीय नागरिक म्हणून संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक आहे. भारताच्या संविधान प्रस्तावनेला डॉ. आंबेडकरांनी एक महत्त्वपूर्ण मूर्त स्वरूप दिले आहे. संविधान प्रस्तावनेच्या माध्यमातून संविधानाविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना भेट देणार आहोत. " प्रास्ताविक संदीप घायतडके यांनी केले. सूत्रसंचालन रमेश साबळे यांनी केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले. "संविधान हे राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेल्या मूळ आदर्श नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्रीय अस्तित्व ठरवितात. भारताचे संविधान हे एक सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वांत मोठे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्वांचा आपल्या देशाला आदर्श घालून दिला आहे. ग्रामपंचायत सदस्या, खोडद, "आपल्या देशाचा कारभार संविधानाच्या आधारावर चालतो. ग्रामपंचायत म्हणजे संसदेचा पहिला पाया आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची प्रस्तावना नाहीये ही बाब लक्षात आल्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये अशा ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. " कॅप्शन - जुन्नर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने खोडद ग्रामपंचायतला संविधानाची प्रस्तावना भेट देण्यात आली.
Congress News : महाराष्ट्रातील सत्तावादाचे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे न राहता ते सर्वोच्च न्यायालयात सात बेंचच्या समोर गेले पाहिजे, ही उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यामध्ये निवडणूक आयोग हस्तक्षेप करीत आहे, हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. कॉंग्रेसच्या (Congress) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपुरात (Nagpur) सुरू झाली आहे. बैठकीला जाण्यापूर्वी नाना पटोले (Nana Patole) पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील ईडी सरकार (एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस) (Devendra Fadanvis) ही राज्याची तिजोरी लुटण्यासाठी आणि त्यांच्या मौज मस्तीसाठी बनलेली आहे. मंत्रिमंडळातला एक मंत्री सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे. असा टोला देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता नानांनी लगावला. ते म्हणाले, हे संभव होऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी दर महिन्याला जिल्ह्यात जाऊन बैठक घेतली पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्या सोडवल्या पाहिजेत. पण असे होताना दिसत नाही. एक मंत्री दर महिन्याला ६ जिल्ह्यात जाणे शक्यच नाही. तरीही त्यांनी सहा-सहा जिल्हे आपल्याकडे ठेवले, हे न समजण्यासारखे आहे. जनतेमध्ये राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. जर सरकारमध्ये सहभागी असलेले काही लोक अपात्र ठरले, तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने आपली कार्यवाही थांबवली पाहिजे. राज्य सरकार लोकशाहीच्या परंपरेला हरताळ फासत आहे. या सरकारमधील पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यांवर अन्याय करीत आहे. जनतेचे खूप प्रश्न आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे. पण सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही. या सरकारमधील लोक पूर्ण वेळ राजकारण करण्यात लागलेले आहेत. त्यामुळे राज्याची अधोगती होत आहे, असे नाना पटोले म्हणाले. ज्या समृद्धी महामार्गाच्या कामाचा बडेजाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्या रस्त्यावर १००पेक्षा जास्त अपघात झाले. अनेकांनी त्यामध्ये जीव गमावला. खरं तर हा श्रीमंतांसाठी बनलेला रस्ता आहे. गरीब आणि मध्यमवर्गायांसाठी हा रस्ता नाही. जे अपघात झाले, त्यामध्ये लहान गाड्यांचा समावेश आहे. या रस्त्यासाठी घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज आता गरिबांच्या खिशातून लुटून फेडण्याचा घाट घातला गेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
चांदूररेल्वे : मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या अपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेश अध्यक्ष शरद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात ८ आॅगस्ट रोजी मंत्रालयाला घेराव घालण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, विना अनुदानित व्यवस्थापक अभ्यासक्रमात शैक्षणिक शुल्काची १०० टक्के परिपूर्ती व्हावी, ओबीसींना घरकूल द्यावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहीर करावी, वसतिगृह द्यावे आदी मागण्यांसाठी जनता दलाने मुंबई मंत्रालयाला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. अटक केल्यानंतर आंदोलकांनी जोरदार नारेबाजी सुरू केली. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, माजी आमदार पांडुरंग ढोले, प्रताप होगाडे, नाथा शेवाले, नंदेश अंबाडकर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
अकोला : राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसह इतरही मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे नऊ दिवसात अकोला विभागाचे एक कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. लाल परीची चाके थाबंल्यामुळे संप काळात चार हजार ५०० बसच्या पाच लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण होत आहे. डिझेलचे दर वाढतच असून, राज्य शासनाकडून महामंडळाला तुटपुंजी मदत मिळते. यासह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढू, असेही वचन सरकारकडून देण्यात आले हाेते. मात्र वचन पाळले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रविवारी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य भरातील कर्मचाऱ्यांसोबतच रविवारपासून अकोला विभागातील कर्मचारीही संपावर गेले आहे. त्यापूर्वी २७ ऑक्टोबरपासूनच एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. रविवारी सकाळपासूनच विविध मागण्यांसाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येत बेमुदत उपोषणासोबतच एसटीचा चक्का जाम करीत आंदोलन अधिक तीव्र केले. अकोला शहरातूनच राेज जळवपास १० हजार प्रवासी प्रवास करतात. खासगी वाहनांकडून लुट राेज मध्यवर्ती व जुन्या बस स्थानकासमाेरून अवैध प्रवासी वाहतूक हाेते. या खासगी वाहतुकदारांचे कर्मचारी बस स्थानकाबाहेर ओरडून प्रवासी भरत असतात. मात्र एसटीचा संप सुरू असल्याने त्यांनी थेट बसस्थानकावरच धाव घेत प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे वळवल्याचे दिसून आले. या खासगी वाहतूकदारांना आता राज्य शासनानेही प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने तिकीट आकारून प्रवाशांची लुट केली जात आहे. रेल्वेवरील गर्दी वाढली एसटीच्या संपामुळे रेल्वेवरील गर्दी वाढली आहे. मात्र, आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने अनेकांच्या पदरी निराशा येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आधीच आरक्षण हाऊसफुल्ल आहे. त्यात आता एसटीच्या संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची माफी मागितली आहे. माफीचे कारण अमेरिकन टेलिव्हिजनवरील क्वांटिको मालिकेच्या वादग्रस्त कथन होते ज्यात हिंदुस्थानीना दहशतवादी दाखवण्यात आले. अशा मालिकेत प्रियांकाने काम केले असून भारतीयांबद्दल चुकीचे बोलले यावर चाहते संतापले होते. सोशल मिडीयात तिच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. अखेर प्रियांकाला या वादावर माफी मागावी लागली. प्रियांकाने माफी मागताना म्ह्टलंय, 'क्वांटिको'मध्ये लोकांच्या भावना दुखावल्या, याबद्दल मला खूप दुःख होत आहे. असे करण्याचा माझा हेतू नव्हता आणि कधी नसेल. मी मनापासून सगळ्यांची माफी मागतो आणि मला हिंदुस्थानी असल्याचा गर्व आहे. या मालिकेत पाकिस्तानला फसवण्यासाठी हिंदुस्थान कटकारस्थान रचतो, असे दाखवण्यात आले आहे. आणि प्रियांका एफबीआय एजंटची भूमिका साकारत आहे. हा पाकिस्तानी नाही कारण याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. ही माळ कोणत्याही पाकिस्तानी मुसलमानाच्या गळ्यात नसू शकते. हा एक भारतीय राष्ट्रवादी आहे आणि तो पाकिस्तानला फसवू इच्छित आहे.
वर्धा : आज ०९ आक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन,वर्धा येथे महाराष्ट्र सरकार, पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन तथा पोलीस वेल्फेअरचे विरोधात भीम टायगरचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ दिवे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ ढोणे, जिल्हा संघटक आशिषभाऊ जांभुलकर, शहर अध्यक्ष, विशाल रामटेके, तालुका अध्यक्ष विशाल नगराळे, आर्वी तालुका अध्यक्ष विनोद पायलेरवी चाटे, पावन धावणे, गणेश खेलकार धम्मा शेलकर, अंकुश गजभिये, अजय अवथरे, अक्षय भगत, अनिकेत भगत, धीरज भगत, अहिंसक तेलंग, संजय कांबळे आदी पदाधिकारी भीमसैनिकांनी साखळी उपोषण केले. पोलिसांनी अहिंसक तेलंग, गणेश खेडकर, संजय कांबळे, विनोद पायले, धम्मा शेलकर कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करुन अटक केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन भारतीय संविधान जिंदाबाद, पेट्रोल पंप हटलाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सरकार, शासन, प्रशासन, पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे यांचा निषेध-मुर्दाबाद करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौध्द महासभा, भीम टायगर सेना, निर्माण सोशल फोरम, संबुद्ध महिला संघटना, समता सैनिक दल, संभाजी ब्रिगेड, बिरसा क्रांती दल, बहुजन युथ पँथर आदी आंबेडकरी व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या १४ ऑक्टोबर २०२१ रोजी, जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने, वर्धा सिव्हील लाईन येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ धमचक्र प्रवर्तन दिनी अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील आंबेडकरी व समस्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक चळवळ, आजचा तरुण आणि करियर...!!"
Uday Chopra At Mother Pamela Chopra Funrel : एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून नेटकऱ्यांनी उदय चोप्राला ट्रोल करायला सुरुवात केली. Uday Chopra Laugh At Mother Pamela Chopra Funrel : दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी व आदित्य तसेच उदय चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं काल गुरुवारी निधन झालं. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पामेला यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. पण यावेळी असं काही घडलं की, उदय चोप्रा जबदस्त ट्रोल झाला. होय, सांत्वनासाठी आलेल्या सेलिब्रिटींसोबत उदय चोप्रा हसत हसत भेटताना दिसला. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून नेटकऱ्यांनी उदय चोप्राला ट्रोल करायला सुरुवात केली. अरे, तुझ्या आईचं निधन झालं आहे, हे काही लग्नाचं रिसेप्शन नाही, अशा शब्दांत अनेकांनी उदय चोप्राला सुनावलं. उदय चोप्राची आई पामेला यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चोप्रा कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, रणवीर सिंग, विकी कौशल, शबाना आझमी, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक या कलाकारांनी आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी उदय चोप्रा यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत उदय चोप्रा हसताना दिसतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत आमिर खान व किरण राव दिसत आहेत. आमिर व किरण चोप्रा यांच्या घरी पोहोचतात. त्यांना भेटताना उदय चोप्रा हसताना दिसतो. आईच्या निधनानंतर उदय हसत हसत सर्वांना भेटतो हे पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ' याला कोणत्या प्रसंगी कोणते एक्सप्रेशन द्यावेत, हेच माहित नाही. म्हणूनच फ्लॉप झाला,'असं एकाने लिहिलं. 'आपल्या आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा पाहिला,' 'भावा, अंबानीचा इव्हेंट नाही, तर अंत्यसंस्कार आहे', 'अरे तुझ्या आईचं निधन झालंय, लग्नाचं रिसेप्शन नाही', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला या आदित्य आणि उदय चोप्रा यांच्या आई होत्या. जवळपास 11 वर्षांपूर्वी पामेला यांचे पती यश चोप्रा यांचं निधन झालं होतं.
येत असतो, तो लालोत्पादक ग्रंथि अथवा लालापिंड ह्मणून विशेष ग्रंथि असतात त्यांत उत्पन्न होतो. आकृति ६१ः - लालापिण्ड (लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी ) दाखविणारी आकृति. a अधोजिव्हा ग्रंथि ( सबलिंग्वल ग्लॅन्ड ), b अधोहनुग्रंथि ( सब मक्सिलरी ग्लॅड ) या दोन्ही ग्रंथींच्या स्रावक नलिका तोंडाच्या आंत खालच्या बाजूला जिभेच्या बुंधाशीं d या ठिकाणीं उघडतात. C कर्णमूल ग्रंथि ( परॉटिड ग्लॅन्ड). या ग्रंथीची स्रावकनलिका तोंडामध्यें e या ठिकाणीं उघडते. THE SALIVARY GLAND - लालापिंड अथवा लालोत्पादक ग्रंथिः - लालापिंड अथवा लालोत्पादक ग्रंथी या मोठाल्या बहुगाखिनी ग्रंथि असतात. या सर्व तोंडाच्या आंतल्या पोकळीपासून कांहीं अंतरावर असतात, व या प्रत्येकीपासून निघून तोंडांत येणारी वाहकनलिका सुमारें दोन इंच लांबीची असते. लालापिंडाच्या तीन जोड्या असतात. प्रत्येक बाजूस कानाच्या पुढें एक ग्रंथि असते तिला कर्णमूलग्रंथि ह्मणतात. खालच्या जाभाड्याच्या खालच्या अंगास दोहों बाजूस दोन ग्रंथी असतात, त्यांना 'अधोहनु ग्रंथि म्हणतात व तिसरी जोडी जिभेच्या खालीं असते. या ग्रंथींनी 3 अघोजिन्हा ग्रंथी ह्मणतात. अन्न तोंडांत घातले ह्मणजे अथवा तें नुसतें दृष्टीस पडलें किंवा त्याचा नुसता वास आला तरी सुद्धां तोंडांत लाळेचा पुष्कळ प्रवाह येतो. हें मज्जातंतूमधून येणाऱ्या संवेदनांच्या योगानें घडून येतें. तोंड, डोळे व नाक १ Parotid_gland = कर्णमूलग्रंथि २ Submoxillary gland = अधोहतुप्रथि ३ Sublingual gland = अधोजिव्हाग्रंथि. यांमधील ज्ञानतंतूच्या द्वारें, अन्नाची रुचि, त्याचा देखावा व त्याचा वास यांपासून त्या त्या इंद्रियांत उत्पन्न होणा-या संवेदना मुख्य मज्जास्थानाकडे नेल्या जातात. या संवेदना शेवटीं वेणीस्थानांत एका विशिष्ट बिंदूश येऊन पोंचतात, व त्याचा परिणाम असा होतो कीं वेणीस्थानांतून लालापिंडाकडे संवेदना पाठविल्या जातात. या संवेदना लालापिंडांच्या स्नावक पेशींपर्यंत येऊन त्यांना लालास्राव उत्पन्न करण्यास लावतात व त्याचवेळी त्या स्रावक पेशींच्या भोवतालच्या लहान धमन्या शिथील करून त्यांत अधिक रक्त आणितात. ACTION OF SALIVA लाळेची क्रियाः - थोडीशी स्टार्च ( पिठी) पाण्यांत कालवून उकळवावी व ती थंड होऊं द्यावी, व तिची पातळ पेज करावी यांतील थोडीशी पेज एका कांचेच्या नळींत घालून त्यांत थोडें पाण्यांत विरघळविलेले आयोडीन घालावें, झणजे सगळ्याचा रंग निळा होतो स्टार्च ( पिठी किंवा खळ ) ओळखण्याची ही परीक्षा किंवा खूण आहे. स्टार्चची थोडीशी पेज दुसऱ्या एका कांचेच्या नळींत घालून त्यांत थोडीशी तुम्ही आपली लाळ घाला व ती नळी साधारण आपल्या शरीराची जितकी उष्णता असते तितकी उण्णता जेथें असेल अशा ठिकाणीं ठेवा. कांहीं वेळानें या पेज व लाळेच्या मिश्रणाचा पांढुरका रंग जाऊन, त्याचा रंग पाण्यासारखा स्वच्छ होतो, व तें मिश्रण पूर्वीपेक्षा पातळ होतें, व पाण्यासारखे दिसू लागतें; व आणखी कांहीं वेळानें त्या मिश्रणांत जर आयोडिन घातले तर त्याचा रंग निळा होत नाहीं. यावरून अर्से सिद्ध होतें कीं, स्टार्चचें रूपांतर होऊन त्यापासून दुसरा कांहीं तरी पदार्थ बनला असला पाहिजे. आयोडिन घालण्याच्या ऐवजीं त्यांत थोडासा कास्टिक सोडा पाण्यांत विरघळवून घाला, व सल्फेट आफ कॉपर ( मोरचूत ) ह्मणजे तांब्याचा गंधकाम्लापासून झालेला क्षार पाण्यांत विरघळवून त्याचे एकदोन थेंब त्यांत घाला, व हे सर्व मिश्रण उकळवा ह्मणजे त्याचा रंग नारिंगी तांबडा होईल व बुंधाशीं कांहीं घन पदार्थ बसेल. साखरपरीक्षेची ही अगदीं नेहमीची खूण आहे, व या परीक्षेवरून, या पेज व लाळेच्या मिश्रणांतील स्टार्च नाहींशी होऊन त्यांत साखर उत्पन्न झाली अर्से सिद्ध होतें. लाळेच्या क्रियेनें स्टार्चची साखर बनली. जर थोडीशी शिजवलेली स्टार्च कांहीं मिनिटेंपर्यंत तोंड्यंत धरून ठेविली तर ती गोड लागू लागते. आपण खातों तें अन्न जोपर्यंत तोंडांत असतें तितक्या अवकाशांत खाल्लेल्या अन्नांतील थोड्याशा स्टार्चची साखर होते. परंतु अशा रीतीनें फारच थोड्या स्टार्चची साखर होते. 'मॉल्ट ह्मणून एक पदार्थ आहे त्यांत ज्या जातीची साखर असते त्याच प्रकारची साखर लाळेच्या क्रियेनें स्टार्चपासून उत्पन्न होते. स्टार्च खेरीज दुसन्या कोणत्याही अन्नतत्वावर लाळेची कांहीं क्रिया होत नाहीं. अन्न निजवून तें चावण्यास व गिळण्यास सोपे जाईल अशा स्थितींत आणणे हा लाळेचा दुसरा उपयोग आहे. पाणी, व ज्यांच्या योगानें पाणी आम्लविरुद्ध होईल असे कांहीं क्षार, अन्नमार्गाच्या अंतरत्वचेपासून उत्पन्न होणारा म्यूसिन ( श्लेष्मा ) नांवाचा एक बुळबुळीत पदार्थ, आणि टायालिन नांवाचा दुसरा एक पदार्थ हे लाळेचे घटक पदार्थ आहेत. म्यूसिन व टायालिन हे दोन्ही पदार्थ रक्तांत सांपडत नाहींत. ते लालापिंडांच्या स्रावक पेशींपासून उत्पन्न होतात. स्टार्चच्या पेजेमध्यें लाळ घातली ह्मणजे स्टार्चची साखर बनविणारा पदार्थ टायालिन होय. विपकप्रवर्तक ह्मणून कांहीं पदार्थ आहेत. त्याचे वर्गांतील टायालिन हा एक आहे. FERMENTS विपाक प्रवर्तक पदार्थ (फरमेंट्स) : या पदार्थाचें मुख्य दोन वर्ग आहेत. एक "सजीव, अथवा सशरीर पदार्थ व दुसरा निर्जीक अथवा अशरीर पदार्थ. पहिल्या वर्गातील पदार्थांत सजीव परमाणू असतात. याचें उत्तम उदाहरण म्हटलें ह्मणजे यीस्ट नांवाचा पदार्थ आहे. तो कांहीं विशिष्ट प्रवाही पदार्थात लहान लहान जिवंत परमाणु मिसळून हा पदार्थ बनलेला असतो. ह्या पदार्थाचे अंगीं साखरेपासून दारू उत्पन्न करण्याचा गुण आहे. झणून याला मद्यविपाकजनक ह्मणतात. सातूंपासून दारू बनविण्याच्या क्रियेमध्यें हे जिवंत परमाणू सातूंतील साखरेची दारू करितात. ह्या जिवंत परमाणूंची साखरेपासून दारू करण्याची क्रिया चालू असतां त्यांची संख्याहि वाढत असते. एका जिवंत परमाणूला एक लहानसा अंकुर फुटतो, व तो अंकुर मूळ परमाणूप्रमाणे मोठा होतो. या अंकुरापासून दुसरा अंकुर फुटतो व त्याला आणखी तिसरा फुटतो. याप्रमाणे १ Malt = सातूचे वाळलेले तत्त्व. २ Alkaline = आम्लविरुद्ध ३ Ptyalin = टायालिन. ४ Ferment = विपाक प्रवर्तकपदार्थ. ५Orgainsed = संजीव, सशरार.६ Unorganised निर्जीव, अशरीर ७ Malt - सातूंचें तत्त्व२०५ एक परमाणूपासून अनेक अंकुर उत्पन्न होतात, व या प्रत्येक अंकुराचा एक एक स्वतंत्र परमाणु होतो. कधीं कधीं मूळचा परमाणू व खाचेपासून निघालेला एक अंकुर व त्या अंकुरापासून निघालेला दुसरा अंकुर असे तीनचार अंकुर एकाखालीं एक लागलेले असतात. हे पुढें एकमेकांपासून सुटतात व स्वतंत्र परमाणू होतात. हे परमाणू एकत्र करून वाळविले तरी जिवंत रहातात, व पुन्हां साखरेच्या पाण्यांत घातले ह्मणजे साखरेची दारू बनवितात व आपणही वाढू लागतात. ज्या पाण्यांत हे परमाणू जिवंत असतात तें पाणी जर कांहीं वेळ उकळविलें तर ते मरतात; व मग त्याचे हातून साखरेमध्यें कोणताहि फेरबदल करण्याचें सामर्थ्य रहात नाहीं. दुसन्या एका जातीच्या जिवंत परमाणूंच्या आंगीं दारूपासून शिरका उत्पन्न करण्याचें सामर्थ्य असतें. या गोष्टीचा फायदा घेऊन विनिगर नामक एक आम्ल पदार्थ आहे तो तयार करण्याचे कारखान्यांत या जिवंत परमाणूंचा उपयोग करतात. सजीव विपाक प्रवर्तक पदार्थांच्या योगानें कुजणें वगैरे सृष्टींतील अनेक क्रिया नेहमीं घडत असतात. या सजीव परमाणूंना सूक्ष्म जंतू म्हणतात. निर्जिव विपाक प्रवर्तक पदार्थ हे यीस्टप्रमाणें सजीव परमाणू नाहींत. किंवा सुक्ष्म जंतूही नाहींत व यामुळे ते वाढतहि नाहींत. ते जिवंत परमाणूंपासून उत्पन्न झालेले रासायनिक पदार्थ असतात. ज्या जिवंत परमाणूंपासून ते उत्पन्न झालेले असतात. त्या परमाणूंपासून जरी त्यांना वेगळें काढलें तरी कांहीं विशिष्ट पदार्थांमध्यें कांहीं विशिष्ट प्रकारचा फेरबदल करण्याचें सामर्थ्य त्यांच्या आंगीं असतें. योग्य व अनुकूल परिस्थिति असली तर त्यांचे आंगची ही शक्ति फार वेळ टिकते. ज्या पदार्थांत फेरफार करण्याची ही शक्ति असते तो फेरफार घडवून आणण्याचें काम कितीही वेळ जरी करीत असले तरी ते स्वतः फारसे कमी होत नाहीं. ह्या धर्मामुळे अगदीं थोडा विपाकप्रवर्तक पदार्थ पुष्कळ पदार्थाचें रूपांतर करूनहि अनुकूल परिस्थिती असल्यास पुन्हां जशाच्या तसाच शिल्लक रहातो. प्राण्यांच्या शरीरांत सांपडणा-या निर्जीव विपाक प्रवर्तक पदार्थांची क्रिया शरीराच्या इतकें उष्णतामान असले ह्मणजे उत्तम चालते. व पाण्याला उकळी येईल इतकी उष्णता लाविली तर त्यांची शक्ति नष्ट होते. टायालिन हा एक निर्जीव विपाक प्रवर्तक पदार्थ आहे. कांहीं विशेष रीतीनें स्टार्च ( मंडान्न ) व पाणी यांचा
किरकोळ वादाच्या कारणातून चौघांनी तिघांना लाकडी दांडके, दगडाने मारहाण केली. मारहाणीत भैरवनाथ शंकर वाकळे (वय 27 रा. बोल्हेगाव) हे जखमी झाले आहेत. तसेच दगडाबाई शंकर वाकळे व दिपाली गणेश वाकळे (रा. बोल्हेगाव) यांना मुकामार लागला आहे. बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली. भैरवनाथ वाकळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दिलीप मार्तंड वाकळे, मोहन मार्तंड वाकळे, अभि मोहन वाकळे, सुरेश दिलीप वाकळे (सर्व रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन वाकळे व फिर्यादी भैरवनाथ यांचा भाऊ गणेश वाकळे यांचे रंगपंचमीच्या दिवशी किरकोळ कारणातून वाद झाले होते. याच कारणातून शनिवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी भैरवनाथ यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. फिर्यादीची आई दगडाबाई, भावाची बायको दिपाली वाकळे या घराकडे पळत असताना त्यांना पाठीत दगडे लागुन मुकामार लागला आहे. तसेच अभि वाकळे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक धिरज अभंग करीत आहेत.
श्रीनगर, 27 सप्टेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra coronavirus) 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत (Maharashtra School reopen) . राज्य सरकारने शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही (Corona positive student) आणि शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही (Student infected with coronavirus). याचाच प्रत्यय आला तो जम्मू-काश्मीरमध्ये. जिथं शाळा सुरू होताच तब्बल 32 विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळले आहेत (Jammu kashmir school student corona positive). जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील 32 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने दहावी आणि बारावीसाठी शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. पण हा निर्णय आता महागात पडेल की काय असंच वाटतं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार शाळेत येणाऱ्या मुलांची अँटिजेन टेस्ट करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले होते आणि या टेस्टमध्येच मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी लडाखच्या लेहमध्येही अशीच परिस्थिती झाली होती. कोरोनाची 71 नवीन प्रकरणं आढळली होती. त्यानंतर प्रशासनाने 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस शाळा पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रानेही शाळा सुरू करायला ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार (Maharashtra school reopen from 4 October) आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वीही राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा शाळा सुरू होणार. पण महाराष्ट्रतल्या शाळा सुरू होण्याआधी इतर ठिकाणच्या शाळांची अशी परिस्थिती समोर येत असल्याने आता चिंता वाढली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Health Tips Marathi : आजकाल तरुणांमध्ये (Young people) मानसिक आजारांचे (mental illness) प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण याच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल देखील उचलतात, मात्र असे न करत मानसिकदृष्ट्या फीट (Feet) राहण्यासाठी काही उपाय देखील आहेत. त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळात देखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांत चिंता-उदासीनता आणि तणाव-संबंधित विकारांनी ग्रस्त लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. संशोधकांचे (Researchers) म्हणणे आहे की मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे हे तुमच्या प्राधान्यांपैकी एक असले पाहिजे. गेल्या वर्षभरात मनोरुग्णांच्या संख्येत झालेली वाढ भविष्यासाठी (Future) चिंताजनक आहे. आपली जीवनशैली, आहार आणि भावनिक वातावरण या समस्यांना अनेक प्रकारे वाढवत आहे, ज्याबद्दल सर्व लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी काय करता येईल हे लक्षात घेऊन आम्हाला कळू द्या? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, बहुतेक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मानसिक आरोग्य सेवा वितरणाची प्रगती मंदावली आहे. तो सामाजिक विकासात मोठा अडथळा ठरू शकतो. डब्ल्यूएचओचे पहिले महासंचालक डॉ. ब्रॉक चिशोल्म म्हणाले, "चांगल्या मानसिक आरोग्याशिवाय शारीरिक आरोग्य टिकून राहू शकत नाही. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्राथमिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया? लोकांप्रती तुमचे प्रेम, भावना व्यक्त करा आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा. मनात एखाद्या गोष्टीबद्दल बसल्याने तणाव आणि चिंता वाढते. ही सवय तुम्हाला अधिक नकारात्मक बनवू शकते ज्याचा थेट तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शरीराच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणे, तुमच्या मेंदूला निरोगी राहण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर युक्त गोष्टींचे प्रमाण वाढवा. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले अन्नपदार्थ टाळा. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आनंदी राहणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, सर्जनशील व्हा. स्वतःचा आनंद घेतल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. तुम्हाला आवडणारी क्रियाकलाप करण्याचा अर्थ तुम्ही त्यामध्ये चांगले आहात आणि काहीतरी साध्य केल्याने तुमचा स्वाभिमान वाढतो. चांगली पुस्तके वाचणे, चांगले संगीत, सायकल चालवणे इत्यादी काळजी विसरण्यास आणि चांगला मूड राखण्यास मदत करू शकतात.
बिहार. . . बिहारच्या बाहेर राहाणाऱ्या इतर राज्यातील लोकांच्या मनात हा शब्द उच्चारला की अनेक विचार तात्काळ मनामध्ये यायला लागतात. तसेच बिहारची एक प्रतिमा मनामध्ये तयार झालेली असते. ती बिहार शब्द उच्चारला की आपसूक मनात येते. गरिबी, भ्रष्टाचार, जातींचे अतिरेकी राजकारण, मागासलेपण, शिक्षणाचा अल्पप्रसार, कोसी नदीला दरवर्षी येणारा पूर, कायदा-सुव्यवस्थेचा अभाव, स्थलांतरितांचे लोंढे अशा अनेक गोष्टी या प्रतिमेत आहेत. किंवा तशी प्रतिमा बातम्या, सिनेमांमधून करून देण्यात आली आहे. परंतु बिहार गेली अनेक शतकं या प्रश्नांच्या गर्तेत अडकलेला असला तरी भारतामधील अनेक महत्त्वाच्या चळवळींचा उदय तसेच अनेक चळवळींचा विकास खऱ्या अर्थाने या राज्यात झाला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा विचार करण्याची आपल्याला संधी आहे. त्यासाठी वर्ष 2000 पूर्वीच्या बिहारचा विचार करणे गरजेचे आहे. त्यावेळेस झारखंडही बिहारमध्येच होते. आपल्या हक्कांसाठी चळवळ करण्याचा किंवा विद्रोहाचा जो वृक्ष बिहारमध्ये वाढीस लागला त्याचं बीज संथाळांनी पेरलं असावं असं म्हणता येईल. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास पाहाता संथाळांनी सरकारविरोधात आपल्या हक्कासाठी बिहारमध्ये पहिलं बंडाचं निशाण रोवल्याचं दिसतं. 1855च्या सुमारास आजचा भागलपूर जिल्हा, झारखंड आणि पश्चिम बंगालला लागून असणाऱ्या प्रदेशात संथाळ मोठ्या संख्येने राहात होते. राजमहल डोंगररांगामधील या पहाडियांनी आपल्या हक्कासांठी आणि जमीनदारीविरोधात उठाव केला. जमीनदार, सावकार आणि ब्रिटिश सत्ताधारी यांच्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायातून बाहेर पडायचं असेल तर शासन आपल्याच हातात असलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांच्या विद्रोहामुळेच संथाळांचा वेगळा परगणा तयार करावा लागला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत चंपारण्य (चंपारण) सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सत्याग्रहामुळे केवळ स्वातंत्र्यचळवळीला वेग आला नाही तर महात्मा गांधीजींच्या कार्यालाही दिशा देणारा तो क्षण होता. आफ्रिकेतील सत्याग्रहानंतर महात्मा गांधी यांनी केलेला तो एक मोठा आणि त्यांनी केलेला भारतातला पहिला सत्याग्रह होता. चंपारण्यमध्ये ऊसाचे आणि निळीचे मळे होते. इथल्या शेतकऱ्यांना निळीची लागवड करण्याची आणि सांगितलेल्या दरानेच त्याची विक्री करण्याची सक्ती करण्यात आली होती. 1917 साली गांधीजींनी चंपारण्यला भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ब्रिटिश सरकारने गांधीजींना चंपारण्य सोडण्याचा दिलेला हुकूमही त्यांनी पाळण्यास नकार दिला. अखेर 'तीनकाठीया' पद्धती, बेकायदेशीर कर गोळा करणे, शेतकऱ्यांची पिळवणूक, वेठबिगार रद्द करण्यासाठी सरकारला 'चंपारण्य कृषी कायदा' करावा लागला. या सत्याग्रहात राजेंद्रप्रसाद, अनुग्रह नारायण सिन्हा, जे. पी. कृपलानी, नरहरी पारेख, वल्लभभाई पटेल, महादेव देसाई, इंदुलाल याज्ञिक यांचाही समावेश होता. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करवून घेता येतात हे या सत्याग्रहानं भारताला दाखवून दिलं. महात्मा गांधींकडे देशातल्या चळवळीचं नेतृत्व येण्यासाठीही हा सत्याग्रह कारणीभूत ठरला. भूदान, ग्रामदान या चळवळी आपल्या देशात होऊन गेल्या यावर कदाचित आजच्या पिढीला विश्वासच बसणार नाही. आपल्याकडचे इतके महत्त्वाचे विशेषाधिकार दुसऱ्याला देणं आजच्या काळामध्ये कल्पनेतही शक्य नाही. पण अशी चळवळ आपल्याच देशात झाली आहे. ते ही गेल्या 70 वर्षांमध्ये. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये गागोदे गावात विनोबा भावे यांचा जन्म झाला. सुरुवातीची दहा वर्षे इथं काढल्यावर त्यांनी आयुष्यभर भारतभर भ्रमण केलं. याच भ्रमणामध्ये ते एकदा हैदराबाद जवळच्या पोचमपल्ली गावामध्ये गेले होते. (आज हे गाव इक्कत साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ) तिथं भूदानाची कल्पना मांडल्यावर गावातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याने आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. झालं तेव्हापासून विनोबांचा भूदानाचा यज्ञ सुरू झाला. विनोबांच्या भूदान चळवळीनं स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत शांततेत एक सामाजिक क्रांतीच केली होती. भूदानाचा यज्ञ तिकडे सुरू झाला असला तरी त्याचा वन्ही बिहारमध्ये खऱ्या अर्थाने चेतवला गेला. बिहारमध्ये भूदान चळवळीला उचलून धरलं गेलं. याचं एक कारण दुसरंही असावं. बिहार किंवा उत्तर भारतामध्ये शेकडो-हजारो एकर जमिनीचे मालक असणारे शेतकरी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे गरीब मजूर असं चित्र जास्त आहे. दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये उत्तर भारतात अल्पभूधारक किंवा जमिन नसणारे शेतमजूर संख्येने जास्त आहेत. त्यामुळेच भूदानासारखी चळवळ तिथं चालली असावी. बिहारमध्ये विनोबांच्या चळवळीला जयप्रकाश नारायण यांची साथ मिळाली आणि तेथे लक्षावधी एकर जमीन भूदान य़ज्ञात जमा झाली. भूदान चळवळीतल्या जमिनींमध्ये बिहारमध्ये काही घोटाळे झाल्याच्या आणि त्याच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याच्या बातम्याही अलिकडच्या काळात आलेल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेलं सर्वात मोठं आंदोलन कोणतं असा विचार करायला गेलं तर 1970च्या दशकात झालेलं आंदोलन हेच उत्तर आपल्या मनात येऊ शकेल. आज साठी-सत्तरीपार असलेल्या नागरिकांच्या तरुणपणी झालेलं हे आंदोलन संपूर्ण भारतभर पसरलं होतं. या आंदोलनाला नावच मुळी 'बिहार मूव्हमेंट' असं म्हटलं गेलं होतं. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वामुळे त्याला जेपी मूव्हमेंट आणि संपूर्ण क्रांती आंदोलन असंही म्हटलं गेलं. बिहारमधील सिताब दरिया इथं जन्मलेल्या जयप्रकाश नारायण यांनी या आदोंलनाच्या माध्यमातून संपूर्ण राजकारणाची दिशा बदलून टाकली. 1974 साली पाटणा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. लालूप्रसाद यादव, सुशीलकुमार मोदी, रामविलास पासवान यांच्यासारखे नेते यामध्ये सहभागी झाले होते. भलेमोठे मोर्चे, विद्यार्थ्यांवर गोळीबार, रस्ते अडवणे अशा अनेक घटना या आंदोलनात घडत राहिल्या आणि पाहातापाहाता संपूर्ण बिहारमध्ये ते आंदोलन पसरत गेलं. बिहार सरकारच विसर्जित करण्याची मागणी त्यामुळे पुढे आली. कामगार युनियनचे संप, निदर्शनं, मोर्चे सुरूच राहिले. हे वातावरण असंच तापत राहिलं. अखेर 1975 च्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अयोग्य असल्याचं स्पष्ट करत त्यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली. त्याचेच पर्यवसान पुढे आणीबाणी घोषित करण्यात झाली आणि पुढचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. 21 महिन्यांसाठी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. आज भारतीय राजकारणात दिसणारी राजकीय नेत्यांची बहुतांश पिढी याच आंदोलनाच्या आणि आणीबाणीच्या काळात तयार झाली. विद्यार्थी आंदोलनात असणारे अनेक नेते पुढे राजकारणात आले. अनेक नेते विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रामध्येही मंत्रिपदावर गेले. 'द जॉर्ज' मूळच्या बिहारच्या नसलेल्या पण बिहारशी संबंध आलेल्या नेत्यांची यादी करायची झाली तर ती यादी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. जॉर्ज ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर ती एक चळवळच होती. त्यांचं मूळगाव मंगळुरू असो, मुंबई असो, तिहार जेल असो की बिहारमधलं मुजफ्फरपूर. जिथं जॉर्ज तिथं चळवळ असं समीकरण झालं होतं. 1975साली आणीबाणी लागण्यापूर्वी काही दिवस आधीच जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये घेतली होती. त्याला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, चरणसिंग असे नेते उपस्थित होते. या बैठकीत एक मसुदा तयार करण्यात आला होता. 'बिहार, नव्या भारतासाठी संघर्ष' असं त्याचं शीर्षक होतं. आणीबाणी लागू झाल्यावर अनेक नेत्यांना कारागृहात टाकलं तर काही नेते भूमिगत राहून काम करू लागले. 25 जून 1976 रोजी म्हणजे आणीबाणी लागू होण्याला एक वर्ष पूर्ण झालं त्या दिवशी मुंबईत डायनामाईटचे स्फोट झाले. असेच स्फोट बंगळुरू, पाटणा इथं झाले. या स्फोटांशी जॉर्ज यांचा संबंध आहे हे समजल्यावर त्यांना अटक होऊन तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. तुरुंगात असताना बिहार विधानसभेनं जॉर्ज यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली होती. ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी लिहिलेल्या 'सुसाट जॉर्ज' या पुस्तकात याचा सविस्तर उल्लेख आहे. बिहार विधानसभेतील सदस्यांवर 'प्रतिपक्ष' या साप्ताहिकातून टीका केल्याबद्दल ही कारवाई करण्यात येत होती. सर्व विरोधी आमदारांनी राजीनामे दिल्याने विधानसभेत फक्त काँग्रेसचेच आमदार राहिले होते. पण जॉर्ज यांना आपली बाजू मांडण्यांची संधी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना जॉर्ज यांना कलकत्त्याला विमानाने नेण्यात आलं. तिथून ते पाटण्याला जाणार होते. परंतु विधानसभेत बाजू मांडायची आय़ती संधी जॉर्ज यांना मिळेल आणि सेन्सॉरशिप असूनही विधानसभेचं कामकाज म्हणून वृत्तपत्रांना ते छापायची संधी मिळणार हे लक्षात आल्यावर आयत्यावेळेस ते प्रयोजन रद्द केलं गेलं आणि जॉर्जना पुन्हा दिल्लीला आणलं गेलं. पुढे आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत 1977 साली जॉर्ज फर्नांडिस मुजफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आले. त्यांचा हातकडी घातलेला फोटो या निवडणुकीत चांगलाच प्रसिद्ध झाला. आज बिहारमध्ये जातीचं राजकारण सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात चालतं असं म्हणतात. पण चार-पाच दशकांपूर्वी अशी स्थिती नव्हती. अनेक कार्यकर्ते, नेते बिहारमध्ये येत असत. तेथे काम करत असत. महाराष्ट्रातल्या मधू लिमयेंनी बिहारमध्ये मुंगेरमध्ये दोनदा आणि बांकामध्ये दोनदा अशी चारवेळा निवडणूक जिंकली होती. जॉर्ज फर्नांडिसांनी 1977, 1980, 1989, 1991 आणि 2004 अशा मुजफ्फरपूरमधून निवडणुका जिंकल्या. 1996,1998,1999 या तीन निवडणुका ते नालंदा मतदारसंघातून जिंकून आले होते. बाहेरच्या कार्यकर्त्यांना बिहारने कसं स्विकारलं? महाराष्ट्र असो वा इतर प्रदेशातले नेते बहुतांश समाजवादी चळवळीतले नेते बिहारमध्ये जात असत. मधू लिमये असो वा जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रेरणा बिहारमधून मिळाली होती. याबद्दल बोलताना अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर सांगतात, "बिहारमध्ये कार्यकर्ते अगदी भूदान चळवळीपासून जात आहे. जमीन वाटपासाठी पन्नालाल सुराणा तिकडे जाऊन राहिले होते. अखिल भारतीय सोशालिस्ट पार्टी असताना महाराष्ट्रातील अनेक नेते तिकडे जात. कार्यकर्तेही जात. युवक क्रांती दलाचे कुमार सप्तर्षी तिकडे जाऊन-येऊन असत. अरुण केळकर, जगदीश देशपांडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिकडेच वास्तव्य केलं होतं. त्याकाळी प्रदेश, भाषा, जात न पाहाता बिहारच्या मतदारांनी त्यांना स्विकारलं होतं. " 1980 साली बी. पी. मंडल यांनी आपला मागासवर्गीयांची स्थिती सुधारण्यासाठी केलेला अहवाल सादर केला होता. बी. पी. मंडल बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून जात. ते काही दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्रीही होते. मात्र त्यांचा अहवाल दहा वर्षे कोणत्याही सरकारने स्विकारला नव्हता. व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने तो 1990 साली स्विकारला आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस लागू करत असल्याचे सांगितले. त्यांच्या राष्ट्रीय मोर्चाला डाव्यांचा आणि भाजपाने बाहेरुन आधार दिला होता. त्याच्या पुढच्याच महिन्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी यात्रा सुरू केली होती. मंडल आयोगाच्या शिफारसींना प्रत्युत्तर म्हणूनही या यात्रेकडे पाहिले जात होते. ही यात्रा बिहारमध्ये पोहोचल्यावर मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींची रथयात्रा थांबवली. त्यापाठोपाठ भाजपाने व्ही. पी. सिंह यांचा पाठिंबा काढून घेतला आणि सिंह यांना राजीनामा द्यावा लागला. सामाजिक न्यायासाठी आपण सत्ता सोडत आहोत असं व्ही. पी. सिंह यांनी राजीनामा देताना सांगितलं. मंडल आयोगाच्या निर्णयावर गेल्या तीन दशकात अनेकदा चर्चा आणि राजकारण झालं आहे. आयोगाच्या शिफारसीनंतर एक पिढी गेली तरीही या आयोगाचं नाव चर्चेत असतं. ती एक भारतीय राजकारणाला दिशा देणारी घटना होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. 'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा. )
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथर केंद्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांचा आर. पी. आय पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. नडगम यांच्या प्रवेशाची घोषणा करतांना आठवले म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे यशवंत नडगम व त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी माझी भेट घेतली असता अनेक विषयांवर तेथे चर्चा झाली. आज नडगम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आर. पी. आय मध्ये प्रवेश केला; त्यांचे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे पक्षात स्वागत करतो. लवकरच त्यांना सन्मानाच स्थान पक्षात मिळेल असेही आठवले यावेळी म्हणाले. गेल्या वीस वर्षांपासून पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सोबत चळवळीत सक्रिय सहभागी होऊन महाराष्ट्रभर समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नडगम यांनी दलित पँथर मधून काम केले. आंदोलन, मोर्चे, संघटना बांधणी, विविध सामाजिक उपक्रमातून जनतेशी घट्ट नाळ यशवंतभाऊ नडगम यांची महाराष्ट्रात पाहायला मिळते. त्याच कामाला अजून जोमाने पुढे नेण्यासाठी बळ मिळावे यासाठी हा प्रवेश करण्यात आला. यशवंत नडगम म्हणाले, दलित पँथर संघटना आहे त्यांच पद्धतीने पुढेही काम करेल, संघटनेचे काम आणि पक्ष प्रवेश दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. अंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून काम करत असतांना रामदास आठवले साहेब यांना व त्यांच्या कार्याचा परिचय मला आहे, आरपीआय मध्ये गेल्यावर नक्कीच दलित पँथरचे काम महाराष्ट्रात अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. येणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आठवले साहेबांच्या आशिर्वादाने आम्ही काम करून दलित पँथरची विजय पताका महाराष्ट्रात फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांच्या मदतीनं कारची तपासणी करण्यात येईल. त्यातूनच अपघाताचं कारण स्पष्ट होईल, असं कन्नूर शहराचे पोलीस आयुक्त अजीत कुमार यांनी सांगितलं. कारमधील इतरांना काही झालं नाही. ते सुरक्षित आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवानं या अपघातात पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कुमार यांनी दिली. मृत महिलेचं नाव रिशा असं आहे. तिचं वय २६ वर्षे आहे. रिशा त्यांचा पती प्रजीतसोबत रुग्णालयात जात होत्या. रिशा आणि प्रजीत यांच्यासोबत कारमध्ये आणखी ४ जण होते. ते अपघातातून सुखरुप बचावले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही.
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्व समावेशक घटनेमुळेच आपली लोकशाही भक्कम राहिली आहे. मात्र सध्या ही घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर- "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्व समावेशक घटनेमुळेच आपली लोकशाही भक्कम राहिली आहे. मात्र सध्या ही घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाले तर देशात प्रचंड प्रक्षोभ उसळेल असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत दिला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान' या विषयावर विधानसभेत चर्चेची सुरुवात करताना विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाचा आढावा घेतला. या वेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारताबरोबर आणि नंतरही अनेक देश स्वतंत्र्य झाले. मात्र त्यातील फारच कमी देशांमध्ये लोकशाही व्यवस्था रुजली. आपल्या देशात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वतंत्रता, बंधूता असा गाभा असणारी धर्मनिरपेक्ष राज्यघटना दिली. अशी सर्वसमावेशक घटना दिल्यामुळेच आपली लोकशाही इतर देशांपेक्षा भक्कम आहे. असे असतानाच ही घटना बदलण्याचे कारस्थान रचले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे ऐक्य टिकविण्यासाठी राज्यघटनेचा गाभा धर्मनिरपेक्ष राहील याची काळजी घेतली. मात्र आता धर्मनिरपेक्ष हा शब्दच बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. एकंदरच सध्याची परिस्थिती पाहता डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना बदलण्याचे कारस्थान या मागे दिसते. विचार बदलवा लागला. आता पुन्हा तेच कारस्थान सुरू झाल्याची शंका येऊ लागली आहे. अलिकडे डॉ. आंबेडकरांबद्दल सरकारला खूपच आपुलकी वाटू लागल्याचे दिसते. बिहारमधील निवडणुकीच्या निकालानंतर ती आपुलकी अधिकच वाढली आहे. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस दिवस 'बंधुता आणि सामाजिक समरता दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इथेच खरी मेख आहे. सामाजिक समरता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवडता शब्द आहे. हा शब्दच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सर्वसमावेशक घटनेला बाधा आणणारा आहे. डॉ. आंबेडकर यांनी घटनेद्वारे व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. तर सामाजिक समरता हा शब्द आपले व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेतो. ज्यांनी या शब्दांचा उपयोग केला त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला नाही. परंतु मी तो शोधून काढला. एकाच विचाराशी सर्वानी आपले सर्वस्व समर्पित करणे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे एकाच विचाराखाली देशाला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच घटनेत बदल करण्याचे कारस्थान सुरू आहे, असे सांगत चव्हाण यांनी, तसे करण्याचा कुणी प्रयत्न केला तर संपूर्ण देशात मोठा प्रक्षोभ उसळेल, असा इशाराही दिला.
विकासकामांची वानवा, जाहिरातबाजीवर अमाप खर्च! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची मोठी फसवणूक केली. नोटबंदीसारखे निर्णय जनतेवर लादले. #GST ची घाईघाईत अमलबजावणी आणि त्यात सुधारणांचा खेळ सुरूच आहे. थोडक्यात जनहिताची कामे केली नाहीत. पण, तसा आव मात्र आणला. त्यासाठी पुन्हा जनतेचाच पैसा फक्त उधळला. मोदी सरकारने सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी तब्बल ५ हजार २४५ कोटी ७३ लाख रुपये इतकी प्रचंड रक्कम खर्च केली आहे. ही आकडेवारी सरकारकडूनच देण्यात आलेली आहे. निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीतून सत्ताही त्यांनी मिळवली. मग योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, पाणी टंचाईवर उपाययोजना व विकासकामांसाठी हे ५ हजार कोटी रुपये अधिक उपयुक्त ठरले असते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.
राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे. अमरावती, दि. 23 - राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे. त्याकरिता ११ वनवृत्तांमध्ये महसूल व पोलीस खात्याच्या धर्तीवर कारभार सांभाळण्यासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य सचिवांकडे जबाबदारी सोपविली आहे. राज्य शासनाकडून वनविभागात विविध योजना, उपक्रम सातत्याने राबविले जातात. मात्र, यापैकी बहुतांश योजना, उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे वनविभागाला लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात ११ वनवृत्तनिहाय अतिरिक्त प्रधान वनसचिवांकडे पालकत्व सोपविण्यात आले आहे. महसूल व पोलीस खात्याच्या धर्तीवर वनविभागाचाही कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. वनवृत्तनिहाय दरमहिन्याला आढावा बैठक घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी अपर प्रधान मुख्य वनसचिवांकडे सोपविण्यात आली आहे. नागरिकांशी संबंधित प्रश्न, समस्या सोडवितानाच जंगलांमध्ये वाढते अतिक्रमण रोखण्याचे आव्हान देखील 'पालक' संकल्पनेवर सोपविले आहे. ही संकल्पना व्याघ्र प्रकल्प वगळून राबविली जाईल. नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर, ठाणे, चंद्रपूर आणि गडचिरोली वनवृत्तात ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे २२ आॅगस्ट २०१७ रोजी शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यभरात ११ वनवृत्तात पालक संकल्पना राबविण्यासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य सचिवांकडे जबाबदारी सोपविली आहे. एपीसीसीएफ पालकमंत्री म्हणून वनविभागाचा कारभार पाहतील. राज्य शासनाने वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. वनाधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहून असून त्या सोडविण्याची जबाबदारी देखील 'एपीसीसीएफ'ची राहणार आहे.
लाईव्ह न्यूज : नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! मुंबई : चेंबूरच्या कदम बाबा उद्यानाला गर्दुल्लयांचा विळखा! महाराष्ट्र : महाराष्ट्र : महाराष्ट्र : मुंबई : नौका धक्क्याला! मुंबई : मुंबई : मेट्रोच्या नव्या डब्यांना मंजुरी कधी? महाराष्ट्र : महाराष्ट्र : महाराष्ट्र : बॉम्बे रुग्णालयात हिंसाचार करणारा तो मनोरुग्ण?
"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते. " कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनंतर आता राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा (Govind singh Dotasara) यांचे वक्तव्य चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले, महिला भांडखोर असतात. त्यांचा हा गूणच त्यांना पुरुषांच्या पुढे जाण्यापासून रोखतो. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात, तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शाळेतील भांडणांसंदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. जर आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा, केली तर पुरुषांच्याही पुढे असाल, असेही डोटासरा म्हणाले. यावेळी डोटासरा गमतीत म्हणाले, महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते. ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडून पुरुषांच्याही पुढे जावे. यापूर्वी कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांचे वक्तव्यही चर्चेत आले होते. ते म्हटले होते, आधुनिक भारतीय महिला मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. एकतर त्यांची अविवाहित राहण्याची इच्छा असते अथवा लग्नानंतरही त्यांची मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. त्यांना सरोगसीद्वारे मुले हवी आहेत. आपल्या विचारात हा बदल योग्य नाही, असे डॉ. के. सुधाकर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना म्हटले होते.
अनंत कान्हेरे मैदानावरील(गोल्फ क्लब मैदान) जॉगिंग ट्रॅक वर बसवलेले गाण्याचे स्पीकर्स कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहेत। पहाटेच्या वेळेला जॉगिंग करतांना सुमधुर संगीताचा आस्वाद घेत व्यायाम करणे हा एक अतिशय सुंदर अनुभव होता, पण स्पीकर्स बंद असल्याने व्यायाम प्रेमींची निराशा होते। अतिशय सुंदर असलेली सुविधा केवळ दुर्लक्षामुळे नागरिकांना उपलब्ध होऊ शकत नाही। संबंधित याकडे लक्ष देतील काय?
गोंदवले - पाणी फाउंडेशन ही आईच्या भूमिकेत असून त्या काळ्या आईचं ऋण फेडणे आपलं कर्तव्य आहे. यासाठी, गावकरी एक झाले की आपोआप गाव एक होतोय आणि गाव एक झाला की श्रमदानातून पाणीदार होतोय, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी गोंदवले खुर्द येतील महा ग्रामसभेत केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप 2019च्या निमित्ताने येणाऱ्या 45 दिवसांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनासाठी गोंदवले खुर्दमध्ये मारुती मंदिरासमोर गावाची महा ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला गावातून सुमारे दीड हजार मुले-मुली, महिला पुरुष जमा झाले होते. सभेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र समन्वयक डॉ. अविनाश पोळ, चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भारत गणेशपुरे, मंत्रालयातील उपसचिव डॉ. नामदेव भोसले, बाळासो शिंदे, अजित पवार, यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. पोळ म्हणाले, या काळ्या आईने आपल्याला खूप भरभरून दिले. तिची तहान भागवणे आपलं कर्तव्य आहे. सध्या थर्टी फर्स्ट, व्हॅलेंटाईन डे अशी नवनवीन फॅड निघाली आहेत. त्यामुळै भावी पिढी व्यसनी होऊ लागली आहे. म्हणून मी 2004 साली माझ्या गावच्या परिसरात असणाऱ्या सुमारे 67 गावातील युवकांना एकत्र करून अशा महत्वाच्या दिवशी गावातील मंदिरे रस्ते धुवून काढणे, अशी शक्य असणारी कामे करायाला सुरुवात केली. त्यानंतर निश्चय करून अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान सुरू केले. यामुळे किल्ला स्वच्छ झाला. किल्ल्यावर पाणी आडलं आणि श्रमदान करणाऱ्या लोकांच्या शरीराची चांगल्या प्रकारे निगा राखली गेली. मी स्वतः 365 दिवस श्रमदान केलेला माणूस आहे. आपण श्रमदानातून खूप काही मिळवू शकतो. मन आणि शरीर सुदृढ राहत आहे. पाणी फाउंडेशन काय पैसे घेऊन आले नाही. पाणी फाउंडेशन ज्ञान घेऊन आले आहे. कारण पैसे चिरंतन टिकत नाही म्हणून ज्ञान महत्वाचे आहे. माणूस एकत्र आल्यावर सगळं शक्य असते. आषाढी वारीत कोणताही गोंधळ धिंगाणा ना बंदोबस्त असतो. कारण प्रत्येकजण मनाने एक झालेला असतो. आपण ही एकत्र येऊन श्रमाची चळवळ सुरू करायची आहे. गावातील सगळ्यांनी श्रमदान केले तर खूप पाणी आडू शकत. फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे. आज असणारी उपस्थिती पाहता आपण श्रमदानाला पण अशीच उपस्थिती लावली तर आपल्या गावाचा पाणलोटची वाढ होण्यास वेळ लागणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहा याच शुभेच्छा आहेत. यानंतर नामदेव भोसले बाळासो शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. दरम्यान, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी लोकांना खूप मोलाच मार्गदर्शन करत लोकांना आजच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत असत एकत्र राहून मोठ्या प्रमाणात काम करून आपला पाणलोट वाढवा असे आवाहन त्यांनी केले.
पुणे : दांडक्याने व बॅटने मारहाण करून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सागर दिलीप मोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली आहे. बबिता राम राठोड (वय ३२, रा. छत्रपती स्टोन क्रशर, जांभुळवाडी रोड, ता. हवेली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड हे तपास पथकाचे स्टाफसह रात्रपाळी ड्युटीस हजर असताना मोरे हा जांभुळवाडी तलाव या ठिकाणी येणार आहे, अशी माहिती बातमीदारामार्फत पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी व शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन मोरे याला ताब्यात घेतले. परिमंडळ २ चे पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी कारवाई केली.
अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनी- प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवावा असा सोहळा ! अट्टारी-वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लक्ष्मणरेषा आखणारी पंजाबकडील महत्त्वाची सीमा. अट्टारी हे पंजाब मधील भारताच्या अखत्यारीत असलेले शेवटचे गाव! आणि वाघा हे पाकिस्तानच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशामधील पहिले गाव. म्हणून या सीमेला अट्टारी-वाघा बॉर्डर असे म्हटले जाते. येथून लाहोर अवघं ५ किमी अंतरावर आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधील इतर सीमा पर्यटनाच्या दृष्टीने जास्त सुरक्षित नसल्या, तरी अट्टारी-वाघा बॉर्डर मात्र त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी खुली आणि सुरक्षित आहे. त्यामुळे दरोरोज जवळपास हजारहून अधिक पर्यटक या सीमेला भेट देतात आणि पलीकडील पाकिस्तान न्याहाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. सीमेपलीकडल्या पर्यटकांची देखील हीच परिस्थिती! बरं तर ही अट्टारी-वाघा बॉर्डर अजून एका गोष्टीसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे- भारताचे बिएसएफ जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात रंगणारी बिटिंग रिट्रीट सेरेमनी! पर्यटक तर हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी खास गर्दी करतात. अर्ध्या-पाऊण तास चालणारा हा सोहळा दरोरोज संध्याकाळी ४ः३० वाजता सुरु होतो. जेव्हा हा सोहळा सुरु होतो तेव्हा तेथील देशभक्तीपर वातावरण पाहून रक्त अगदी सळसळून उठतं. दोन्ही बाजूचे पर्यटक आपल्या देशाचे गुणगान गात असतात, नारेबाजी करत असतात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घोषणाबाजीत कुठेही अपमानकारक शब्द कानी पडत नाहीत. दोन्ही देशांचे सैनिक परेड करत एकमेकांना 'आव्हानात्मक मानवंदना' देतात. सैनिकाच्या नजरा आणि त्यांचे जोशपूर्ण हावभाव पाहून भान हरपतं. सैनिकांचे एकाच सरळ रेषेत डोक्यापर्यंत पाय घेऊन जाऊन तो पुन्हा जमिनीवर आदळण्याचे कौशल्य पाहणाऱ्याला थक्क करून सोडतं. शेवटी एकाच वेळी दोन्ही देशांचे झेंडे उत्कृष्ट पद्धतीने खाली उतरवून अतिशय काळजीपूर्वक घडी करून ठेवण्यात येतात. खास या सोहळ्याकरिता दोन्ही देशांकडून आपापल्या बाजूकडील लोखंडी गेट खोलले जातात. त्यानंतर दोन्ही देशांकडील ठराविक प्रतिनिधी हस्तालोंदन करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दोन्ही गेट पुन्हा बंद होतात. अश्याप्रकारे या सोहळ्याचा समारोप होतो. १९५९ सालापासून अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनीच्या प्रथेला सुरुवात झाली आणि आजवर अखंड एकही दिवस न चुकता हा सोहळा रोज पार पाडला जातो हे विशेष! जेव्हा ही प्रथा सुरु झाली तेव्हा दोन्ही बाजुंच्या लष्कराने एकमेकांना मानवंदना देणे आणि शुभेच्छा देणे त्या मागचा मुख्य उद्देश होता. परंतु काही वर्षांनंतर त्या मागचा हा खरा उद्देश लोप पावून दोन्ही देशांचे सैनिक आपल्या हालचालींमार्फत एकमेकांना आव्हान देऊ लागले. सोहळ्यास उपस्थित असणारे दोन्हीकडील नागरिक देखील दुसऱ्या देशातील नागरिकांना घोषणांमार्फत चिथावणी देऊ लागले. आंतरराष्ट्रीय सीमेवर अश्या प्रकारचे वर्तन हे अशोभनीय होते, त्यामुळे प्रसंगी हिंसेचे वातवरण निर्माण होण्याचीही शक्यता होती. हा धोका ओळखून २०१० साली पाकिस्तान रेंजर्सचे मेजर जनरल याकुब अली खान आणि बीएसएफचे डिरेक्टर जनरल रमण श्रीवास्तव यांनी सैनिकांच्या रागीट हालचाली सोहळ्यामधून हटवण्याचा निर्णय घेतला. जसे की एकमेकांना अतिशय क्रोधाने पाहणे, जोरजोरात पाय आपटणे आणि अश्या बऱ्याच हालचाली! सध्याच्या सोहळ्यामध्ये अश्या हालचाली पाहायला मिळतात, पण त्या तितक्याश्या आक्रमक नसतात. या सोहळ्यासाठी दोन्ही देशाच्या सैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि खास याच सोहळा सादर करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली असते. तसेच खास त्याच्यासाठी सैन्यामार्फत मिशी आणि दाढी ठेवण्याचे अतिरिक्त धोरण ठरवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या इतर सीमांवर जरी नेहमी तणावपूर्व वातावरण असले तरी अट्टारी-वाघा बोर्डरवर मात्र क्वचितच अशी परिस्थिती पाहायला मिळते. आजही या सीमेवर तैनात असणारे दोन्ही देश प्रत्येक सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई भरवतात. भारत आणि पाकिस्तानच्या अनोख्या संबंधाचे दर्शन या सीमेवर घडते. दोन्ही देशांमधील शत्रुत्व, बंधुभाव, सहकार्य या सर्वांचे रंग हा सोहळा दाखवतो. अंगावर शहारे येणं म्हणजे काय असतं याचा खरा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकदा तरी ही रिट्रीट सेरेमनी पाहिली पाहिजे.
CoronaVirus in Akola: आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे. अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, ९ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७६० झाली आहे. दरम्यान, ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये दिग्रस ता. पातूर, व्याळा ता. बाळापूर, जीएमसी क्वॉर्टर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. शुक्रवारी आणखी चौघांंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये निंभोरा येथील ५६ वर्षीय पुरुष, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष व वाडेगाव, ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. उपरोक्त चौघांनाही अनुक्रमे ७ आॅक्टोबर, १८ सप्टेंबर, २३ सप्टेंबर व २९ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून पाच, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अवधाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक , हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होमक्वारंटीनचा कालावधी पूर्ण झालेले ५० अशा एकूण ८५ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६७८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
ऑकलंडच्या ईडन पार्क येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 203 धावा केल्या आणि भारतासमोर धावांचे 204 लक्ष्य दिले. छोटी बाउंड्री असल्याने या सामन्यात मोठे षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. किवीकडून कॉलिन मुनरो (Colin Munron) याने अर्धशतकी खेळी केली. मार्टिन गप्टिल याने 19 चेंडूंचा सामना करत 30 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने 51 धावांचा अर्धशतकी डाव खेळला. भारताच्या गोलंदाजांनी यंदा धमाकेदार खेळ केला. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि यजमान संघाला पहिले बॅटिंग करण्याचे आमंत्रण दिले. किवींकडून रॉस टेलर (Ross Taylor) आणि मिशेल सॅंटनर अनुक्रमे 54 आणि 2 धावांवर नाबाद परतले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मोहम्मद शमीने सर्वाधिक 53 धावा लुटलेल्या शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. (Career Sankat Main Hai! न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँड टी-20 सामन्यातून रिषभ पंत याला डच्चू, केएल राहुल ची विकेटकीपर म्हणून निवड झाल्यानंतर चाहत्यांनी पंतला केले ट्रोल) टॉस गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडकडून गप्टिल आणि मुनरोने डावाची सुरुवात केली. दोघांनीही पॉवरप्लेच्या 6 षटकांत संघाच्या खात्यात विकेट न गमावता 68 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. दोघे चांगली फलंदाजी करत असताना 30 धावांवर शिवम दुबेने गप्टिलला रोहित शर्माकडे कॅच आऊट केले. मुनरोने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु 42व्या चेंडूत 59 धावांची खेळी खेळल्यानंतर शार्दुलच्या चेंडूवर युजवेंद्र चहल याच्याकडे झेलबाद झाला. पुढच्याच षटकात कॉलिन डी ग्रैंडहोम खातं न उघडता रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शिवमकडे झेलबाद झाला. यानंतर केन विल्यमसनने 25 चेंडूंतर भारताविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पहिले अर्धशतक झळकावले, परंतु चहलच्या पुढच्या चेंडूवर तो 51 धावांवर बाद झाला. विल्यमसन आणि रॉस टेलरने चांगली भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा महत्वाचे योगदान दिले. दरम्यान, न्यूझीलंडकडून या सामन्यात हमीश बेनेट ने टी-20 मध्ये पदार्पण केले. 2010 मध्ये भारताविरुद्ध टेस्ट आणि त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या हमीशने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, भारताच्याही प्लेयिंग इलेव्हनमधून रिषभ पंतला वगळले असून त्याच्या जागी मनीष पांडेला संधी दिली. पंतच्या अनुपस्थितीती सलामी फलंदाज केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळेल.
सध्या जगभर करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर होत असून कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. देशातील नागरिकांना घरी राहून करोनाला हरवायचं आहे. ही शर्यत पळण्याची नाही, तर थांबून जिंकण्याची आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा वगळता आज सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. म्हणूनच घरी राहूया व करोनाला हरवूया. महाराष्ट्र पोलिसांनीसुध्दा करोनापासून बचाव करण्यासाठी घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी त्याच्या सोशल मिडीयावर एक भन्नाट मीम शेअर केलं आहे. तर त्याचं झालं असं मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनत्री अमृता खानविलकरची प्रसिध्द नटरंग सिनेमातील लावणी मला जाऊ द्या ना घरी. . . या गाण्याचं मीम बनवून महाराष्ट्र पोलिसांनी शे्र केलं आहे. ते म्हणतात, आता घरी राहून करोना व्हायरसचे 'बारा वाजवूयात,,,,मला राहू द्या ना घरी' , हे जबरदस्त मीम खुद्द अमृतानेच शेअर करत महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, संकटकाळी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उद्योगपती मान्यवर व सेलिब्रिटींनी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा करोना संकटातून राज्याला सावरायला पुढे सरसावले आहेत. अमृता खानविलकर हिनेसुध्दा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी खारीचा वाटा उचलला आहे.
हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे! एप्रिल आणि मे महिना सुरू झाला की प्रत्येक घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. शाळकरी मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळे त्यांचा घरात धुडगूस सुरू असतो. दिवसभर त्यांचं बाहेर उन्हात खेळणं, आणि मग खेळून झालं की १० रूपयाच्या बर्फाच्या गोळ्यावर ताव मारणं, १ रुपयाचा पेप्सीकोला खाणं, अशा कित्येक गोष्टी आपणसुद्धा आपल्या लहानपणी अनुभवल्या असतील. घरातसुद्धा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. घरात पिण्याच्या पाण्याचा माठ भरून ठेवणे त्यात वाळा घालणे, घरातल्या एसी कुलर्सचं काम करून घेणे अशी लगबग सुरू असते. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ज्याची लहानांपासून वृद्ध सगळेच आतुरतेने वाट बघत असतात, तो म्हणजे फळांचा राजा आंबा, आणि त्यातही मे महिन्यात हापूस आंबा नाही खाल्ला तर मग जीवन व्यर्थ आहे अशाच नजरेने लोकं तुमच्याकडे बघतात. आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : आपल्या महाराष्ट्रात हापूस, केसर, पायरी असे काही आंबे आहेत जे प्रामुख्याने खाल्ले जातात. पण दूधपेढा , दूरी, गुलाबखस, कालापहाड, इमरती, शेंदर्या, शककरगोटी, मारुत्या, पपय्या, ही काही खाद्यपदार्थ, मिठाई किंवा शीतपेयांची नावे नाहीत... ही नावे कशाची आहेत माहिती आहे का? मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या आंब्याची! खरी गम्मत तर ही आहे की, मधुर चवीच्या, अवीट आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्या आंब्याच्या बर्याच जाती आपल्याला माहिती नसतात. सर्वांचा आवडता हापूस सोडला तर अजूनही काही आंब्याच्या जाती आहेत ज्या रसाळ चवीच्या तर आहेतच पण दुर्मिळदेखील आहेत. चला माहिती करून घेवू या आम्र कुलाची. बंगालचा नवाब सिराज-ऊद-दौला याने ही आंब्याची जात विकसित केली. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील असलेल्या या आंब्याचे मूळ १४८ प्रकार होते पण आता केवळ ४२ प्रकार शिल्लक राहिलेत. हा आंबा चवीला अतिशय रसाळ असून तेवढाच नाजुकदेखील आहे. एका खास बांबूच्या सूरीनेच तो कापावा लागतो. तसेच झाडावरून उतरवल्यावर खास कापडात ठेवावा लागतो. राजा महाराजांसाठी खास बनवलेला हा आंबा प्रती नग ५०० ते १५०० रुपयात मिळतो. जसा कोहितूर तसाच हादेखील दुर्मिळ आणि शाही. पण आंब्यांची राणी म्हणून ओळखला जातो. मध्यप्रदेशातील काठठीवाडा क्षेत्रात याची लागवड केली जाते. चवीला अतिशय मधुर असणारा हा आंबा वजनाला भारी म्हणजे १ ते २ किलो असतो. जूनच्या अखेरीस बाजारात येतो. ५०० ते १२०० रु. प्रती नग विकला जातो. बडोदा, वापी, अहमदाबाद इथून या आंब्याला चांगली मागणी असते. दशहरा व नीलम यांच्या संकरातून १९७१ मध्ये हा आंबा कृषि अनुसंधान केंद्र दिल्ली येथे विकसित केला गेला. चवीला अत्यंत गोड, पातळ सालीचा, फळात रेषा नसलेला असतो. हे ही वाचा - लॉकडाऊन वाढलाय, घरी आंबे पण आहेत; तर आंब्याच्या या १२ डीशेस् एकदा ट्राय करून बघाच! केरळमधील थ्रीसुर जवळील मुंदूर येथे वर्षातून तीन वेळा बहर येणार्या या आंब्याची चव प्रियूर व मुवांदन या स्थानीक प्रजातीच्या एकत्र चवीसारखी लागते. एक फळ साधारण ३०० ग्रामचे असते. मोठ्या गोटीच्या आकाराएवढा हा स्थानिक ग्रामीण आंबा, हिरव्या सालीचा, गोड आणि केशरी रसाचा, कोय अगदी छोटी असणारा गावकूसातला पण आता दुर्मिळ झालेला आंबा. याचाच अजून एक भाऊबंद आहे तो म्हणजे काली गोटी. हा देखील दुर्मिळ झालाय. मध्यम आकाराचा आणि साखरेसारखी गोडी असणारा हा स्थानिक आंबा. पण याची लागवड आता फारशी प्रचलित नाही. साधारण तोतापुरी आंब्यासारखा दिसणारा हा आंबा. या आंब्याचा देठाच्या विरूद्ध बाजूला पोपटाच्या चोचीचा आकार असतो म्हणून हा राघू आंबा. जाड सालीचा लोणच्याचा आंबा. . आता दुर्मिळ झाला असून याची जागा तोतापुरी आंब्याने घेतली आहे. आंध्रप्रदेशातील हा प्रसिद्ध आंबा असून घट्ट रसाचा आणि फळात रेषा नसलेला आहे. यालाच सफेदा असेही म्हणतात. हा आंबा चिरून आणि रस काढूनही खाल्ला जातो. चवीला रसाळ असलेल्या या आंब्याची, टिकावू असल्याने मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हा आंबा शक्यतो चोखून खाल्ला जातो. बिहार व उत्तर प्रदेशातील हा प्रसिद्ध आंबा चवीलाही भलताच गोड असतो. पातळ साल आणि सोनेरी रंग, निमुळता आकार यामुळे आकर्षक दिसणारा हा आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. बिहारमधील चौसा या गाववरून या आंब्याचे नाव चौसा हे पडले. कर्नाटकचा हापूस म्हणून ओळखला जाणारा बदामी आंबा आकाराने बदामासारखाच दिसतो. जास्त केसर नसलेला सोनेरी पिवळ्या रंगातला, देठाकडे थोडा लालसर असलेला हा आंबा, चवीला हापूस आंब्याहूनही एकदम गोड असतो. याशिवाय अल्फान्सो-हापूस, केशर, पायरी , रत्नागिरी हापूस, दशेरी, लंगडा, तोतापुरी, निलम, हिमसागर, मालगोवा, मालदा, सिंदूरा, रसपल्ली ही हापूसची भावंडेदेखील आपली रसना तृप्त करत आहेत. हे ही वाचा - देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स... चुकूनही विसरू नका! मग सांगा बरे यातील कोणता आंबा तुम्हाला खायला आवडेल? तुम्हाला माहीत असलेल्या आंब्यांच्या इतर जातीही आमच्या सोबत जरूर शेअर करा आणि या मौसमात आपल्या आवडत्या आंब्याचा जरूर आस्वाद घ्या. . आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक कराः InMarathi. com । आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । शेअरचॅट । Copyright © InMarathi. com । All rights reserved.
AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय. ICC World Cup 2023 : टीम इंडियाने 12 वर्षापूर्वी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयी पताका रोवला होता. त्यावर आता ए.बी. डिव्हिलिअर्स याने मोठं वक्तव्य केलंय.
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. ती सोशल मीडियावर आपले हॉट ऍण्ड बोल्ड फोटो शेअर करत असते. आता मलायकाने होळीनिमित्त चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत मलायका ट्रॅक पॅट आणि स्पोर्ट ब्रामध्ये दिसत आहे. मलायकाचा हा शुभेच्छा देतानाचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोतील तिच्या फिट बॉडीचे चाहत्यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी कमेंटस् करत तिल्याही शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे मलायका कायम चर्चेत असते. या दोघांनीही रिलेशनशिपबाबत खुलेपणाने स्वीकार केला आहे. या दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आलेले आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. कुंभार पिंपळगाव : रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. कुंभार पिंपळगाव ते पिंपरखेड या सात किलोमीटरच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली. या रस्त्याची मागली पंधरा वर्षांपासून दुरुस्तीच करण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला. पिंपरखेडा गावची प्रति पंढरपूर म्हणून ओळख आहे. इथे विठ्ठल रुख्मिनी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र पिंपरखेड ते कुंभार पिंपळगाव या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यानंतर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागणी मान्य झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस'च्या घरात मैत्री आणि शत्रुता हे दोन भाव अगदीच पक्के आहेत. मैत्रीत कुस्ती आणि कुस्तीत दोस्ती अशी अनेक समीकरण या घरात पहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या घरात कॅप्टन्सीचं वारं घुमताना दिसत आहे. साजिदनंतर शिव आणि आता शिवनंतर कोण. . ? असा प्रश्न असताना टीना तिलाच कॅप्टन्सी मिळावी म्हणून सतत आग्रही दिसली. यासाठी कितीतरी वेळा ती साजिद, अब्दू, शीवच्या मागेपुढे करताना दिसली. पण षीने असा काही गेम पटलला कि बस्स रे बस्स. सध्या घराचा कॅप्टन शिव ठाकरे आहे. संपूर्ण घराची सत्ता त्याच्या हातात आहे. असे असताना बिग बॉस शिवसोबत आणि शिव टीनासोबत मोठा गेम खेळून गेला. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि, 'शिव, निम्रित, साजिद बसून टीना दत्ताला घराची कॅप्टन बनवण्याबद्दल बोलत आहेत. खरंतर आठवड्यात कोण कॅप्टन होणार. . ? हे एक टास्क खेळून ठरवले जाते. पण यावेळी बिग बॉस शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि नवीन कॅप्टन निवड असे सांगतात. यावर प्लॅनिंग बाजूला करून शिव 'निम्रित'ला घराचा नवा कॅप्टन बनवतो. शिवच्या या निर्णयानंतर कॅप्टन्सीची स्वप्न घेऊन बसलेली टीना दत्ता चांगलीच संतापली. निम्रित कॅप्टन होताच टीना म्हणाली कि, 'तुम्ही सगळे फसवे आणि फ्रॉड आहात. ' तर निम्रित यावर उत्तर देत म्हणते की, 'तुझी मैत्रीही पाहिली. चल इथून. ' यावर थोडीच टीना शांत बसणार होती. ती पुट्पुटत रूममध्ये जाते आणि म्हणते कि, 'कॅप्टन होताच तिच्यात ऍटिट्यूड आलाय. एका वेगळ्याच लेव्हलला पोहोचली आहे. आता मला तिचा हा ऍटिट्यूड तोडायचाय. फक्त तीन दिवसांत हिची कॅप्टन्सी जाणार. ' आता हा वाद काय आणि कोणत्या वळणाला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अकोला : इन्फेक्शनमुळे मुलांमध्ये जंतदोषाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मुलांमधील हा दोष टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ४७ हजार १४ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ही मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेसंदर्भात गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा परिषदचे नंदा गिरी, निक्षी कुकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी साजीया नौसर, जिल्हा रुग्णालयाचे के. व्ही जामुळकर आदी उपस्थित होते. मुलांमधील जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. मोहिमेंतर्गत १९ वर्षांपर्यंतच्या ४ लाख ४७ हजार १४ लकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या मिळणार नाही, अशांना १७ ऑक्टोबर रोजी गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. शिवाय, जे मुलं शाळेत जात नाहीत, अशांना आशांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. काय आहे जंतदोष? खानपानाद्वारे विविध प्रकारचे जंतू लहान मुलांच्या पोटात जातात. या जंतुंमुळे अन्नातील पौष्टिक तत्त्व मुलांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खुंटताे. तसेच विष्ठेद्वारेही जंत बाहेर पडू लागतात. त्यामुळे मूल आजारी राहते. गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा? शहरी भागासह प्रत्येक गावात आशा सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १,४०४ अंगणवाडी केंद्र, १,०८० शाळा, ३२६ खासगी शाळा, १३ तांत्रिक शिक्षण संस्था, आणि १,१६० आशा सेविकांमार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या मुलांना शाळेत जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी आपल्या गावातील आशा सेविकेकडे जंतनाशक गोळ्यांची मागणी करावी. महापालिका क्षेत्रातील २७० अंगणवाडींना देखील जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणी देखील बालकांना गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.
की टाकल्यावर टिपा येथे येतात आपण सुरुवातीला आणि अधिक अनुभवी golfers दोन्ही सज्ज टिपा टाकल्यावर सापडतील खाली. सूचनात्मक लेख आणि व्हिडिओ ज्याचे उद्देश्य आपल्याला अधिक पुश तयार करण्यात मदत करण्यासाठी आहे, एकतर मूलभूत विकसित करून किंवा सराव मसलत करून ज्यामुळे मदत होऊ शकते. सर्व एकापेक्षा अधिक महत्वाचे आहे असे टाळण्यासाठी येथे क्लिक कराः आपल्या निबंधाचा अभ्यास करण्याकरिता फक्त अधिक वेळ द्या. आपण प्रॅक्टीस सुविधेत हिरव्या रंगाच्या किती गॉल्फर्सना वगळले हे आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु आपण ठेवण्याच्या टिपावर येण्यापूर्वी आपण येथे वाचू शकता किंवा पाहू शकता, आपण अधिक ऑफलाइन वाचन आणि नंतर पहात आहात. तर येथे काही शिफारसी आहेतः - टाकण्यावर सर्वोत्कृष्ट शिक्षण संबंधी पुस्तके : भरपूर गोल्फ प्रशिक्षकांनी टाकल्यावर कला आणि विज्ञानाबद्दल पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी कोणती पुस्तके सर्वोत्तम आहेत? आपण ज्यास चुकीचे होऊ शकत नाही अशा नऊ निवडी येथे आहेत. - टॉप प्लेटिंग / शॉर्ट गेम डीव्हीडी : जर आपण पुस्तक शिकण्यासाठी डीव्हीडी मार्ग पसंत केले तर, हे शॉर्ट गेममधील शिक्षण डीव्हीडीसाठीचे सात पर्याय आहेत. ही वैशिष्ट्ये अशा स्थितीत आणि पकड आणि एक घन स्ट्रोक विकसित करण्यासाठी मार्ग अशा टाकल्यावर च्या तत्त्वावर लक्ष केंद्रित. हे सराव डाइल्स आहेत जे आपण उत्तम स्ट्रोक तयार करण्यासाठी वापरू शकता, गती आणि अंतरावरील नियंत्रणासाठी किंवा हिरव्या रंगावर आपले अनुभव सुधारण्यासाठी. पारंपारिक putters (नेहमीच्या 30-इंच-इंच फॅटस्टिक्स), प्लस लाँग पुटर्स आणि बेली पॉटर आहेत. आणि नियंत्रकाची संस्था द्वारे पुठ्ठावर प्रक्षेपित केल्यावर नियमांनुसार दीर्घ मानक फडररचा वापर करून पूर्णपणे ठीक आहे.
न्यूयॉर्क (अमेरिका) - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत, तर अल्बानियाला जून मासासाठी या परिषदेचे अध्यक्षपद मिळालेले आहे. वर्ष २०२० मध्येही पाकने असाच प्रयत्न केला होता. तेव्हाही ५ सदस्यांनी पाकचा प्रयत्न उधळून लावला होता.
Leo Horoscope Today 21st March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही खूप दिवसांपासून घर, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. मात्र, अतिउत्साह टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांकडून काही संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कौंटुंबिक कार्यक्रमांनिमित्त घरी नातेवाईक, पाहुण्यांची रेलचेल राहील. सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असेल असे ग्रहांची स्थिती सांगतेय. तुमच्या व्यावसायिक कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाशी संबंधित कामात प्रगती होताना दिसेल. बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. प्रॉपर्टी डीलरचे काम संथगतीने होताना दिसेल. नोकरदारांना जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाचा ताण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहील. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळचा वेळ तुमचा आनंदात जाईल. लवकरच तुमच्या घरी शुभवार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा. सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल. नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि फळांचे दान करा. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहे त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे परंतु, गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की, ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल - म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकतात ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही आपला महत्वाचा वेळ खराब केला. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन धन देऊ शकतात. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात. तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. दूरच्या नातेवाईकाकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे, आपले संपूर्ण कुटुंब आणि विशेषतः आपल्याला आनंद होईल. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद ही होऊ शकतो. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की, घरी तुमची कुणी वाट पाहत आहे ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल - पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल - इतरांची मदत घ्या. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. - तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारी असतात. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्ससुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे. आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असतं, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.
म्हणून "स्पर्श मध्ये" पोस्ट हटवा? या सामाजिक नेटवर्कवर प्रथम वापरकर्ते वेळोवेळी असा प्रश्न चेहर्याचा. पहिल्याने, तो यायला निर्माण होत आणि फक्त खरोखर आवश्यक पत्रव्यवहार ठेवा, आणि दुसरे म्हणजे, नको वापरकर्ते दृष्टी संवाद काढण्यासाठी. म्हणून "संपर्कात" हटवा पोस्ट नाहीत? हे आम्ही या लेखातील कव्हर होईल काय आहे. लक्ष द्या! आपण मुख्य प्रश्नाचे उत्तर आधी, मी काही तथ्य लक्षात ठेवा इच्छितः - हटवू कोणताही मार्ग नाही पाठवलेला संदेश "VKontakte" ; - त्याच विभागात असलेली सर्व माहिती समकालीन काढण्याची नाही कार्य आहे. हे कार्य करणार नाही, कारण संदेश त्याच्या गंतव्य गाठली आहे, आणि म्हणून लवकरच तो नेटवर्क वर दिसत आहे, तो वाचू शकता. दुसऱ्या प्रकरणात, "VKontakte" साइट प्रशासन एकाच वेळी सर्व संभाषणे हटवण्यासाठी संधी प्रदान केली नाही. त्यामुळे, आता या लेखात आपण मुख्य विषय चालू. "VKontakte" म्हणून पोस्ट हटवा? - तुमची लॉगइन माहिती अंतर्गत साइटवर जा. - , "या शीर्षकाखाली या माझे संदेश" डावीकडे मेनू मध्ये आयटम निवडा. - सामाजिक नेटवर्क दोन प्रकारे संदेश प्रदर्शन पुरवतोः संवाद स्वरूपात (म्हणजे एकच फाइल एकत्र एक वापरकर्ता पासून सर्व पत्रव्यवहार) किंवा यामधून, येणारे आणि जाणारे विभागले आहेत, जे अक्षरे स्वरूपात. आपण एक विशिष्ट संदेश सर्व पत्रव्यवहार काढण्यासाठी, आणि नाही गरज असेल तर, तो प्रथम पर्याय निवडा अधिक सोयीस्कर आहे. आम्ही आणि केस बद्दल इतर सांगू होईल. - विशिष्ट वापरकर्त्याच्या सर्व पत्रव्यवहार काढणे. - सर्व संदेश एकाच ठिकाणी गोळा केली जाते पासून संवाद, खूपच सोपे काढून टाका. आपल्याला काय करावे लागेल सर्व - अव्यक्त संभाषण वरील उजव्या कोपर्यात स्थित आहे क्रॉस, वर क्लिक करा, व नष्ट आहे. - एका वेळी संदेश एक हटवा जास्त कठीण आहे. आपण चेकमार्कचा अवांछित संदेश खाली आणले आहे, आणि बटण वापरू "Delete" करणे आवश्यक आहे. 5. एक विशिष्ट संदेश काढणे. - संवाद उघडत, आपण फक्त योग्य संदेश मिळेल. पत्रव्यवहार लहान असेल, तर, तो स्वतः करायचे ते, अन्यथा, शोध फंक्शन वापरू शक्य आहे. हे वरील उजव्या कोपर्यात स्थित आहे "ऑपरेशन्स" संवाद दिली. - मी कसा हटवू संदेश, "स्पर्श मध्ये"? संदेश घडयाळाचा आवश्यक आणि "हटवा. " 6. "संपर्कात" पोस्ट काढून टाकायचे? आपण पूर्णपणे याच नावाच्या विभाग स्वच्छ करणे आवश्यक आहे, तर, आपण पूर्णपणे स्वतः प्रत्येक संवाद किंवा प्रत्येक संदेश काढून करण्याची आवश्यकता आहे. गोष्ट मी एकदा आपल्याला चेतावणी जोरदार एक छोटेसे काम आणि बरेचदा काही वेळ शक्य आहे. इंटरनेट वर आपण पत्रव्यवहार दूर करण्यासाठी कार्यक्रम आणि स्क्रिप्ट विविध शोधू शकता. पण आम्ही त्यांना वापर शिफारस नाही आपले पृष्ठ चुकीचे हात मध्ये येते की एक धोका आहे म्हणून, किंवा साइट प्रशासन संशयास्पद क्रियाकलाप आपले खाते प्रतिबंध करेल.
Gold Rate: ब्रिटनच्या नव्या कोरोनाने सोन्याचे दर वाढायला प्रारंभ; पुन्हा रेकॉर्ड करणार? ऑनलाइन लोकमत । Published: December 21, 2020 10:56 PM 2020-12-21T22:56:01+5:30 2020-12-21T23:00:00+5:30 Gold Rate Today: सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या व चांदीच्या दरांनी भारतीय रिटेल बाजारात वाढ नोंदविली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कमी जास्त होत असलेल्या सोन्याने पुन्हा एकदा चिंता वाढविली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ दिसत आहे. सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या व चांदीच्या दरांनी भारतीय रिटेल बाजारात वाढ नोंदविली आहे. दिल्लीमध्ये सोन्य़ाच्या दराने पुव्हा 50 हजारांचा आकडा पार केला असून आज 496 रुपयांची वाढीने 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर मुंबईच्या रिटेल बाजारात सोन्याच्या दरात 200 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. याची किंमत 50308 रुपये झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसली आहे. सोमवारी दिल्लीत चांदी 2,249 रुपयांनी वाढून 69,477 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर मुंबईच्या बाजारात चांदीच्या किंमतीत 673 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचा दर 67,192 रुपये आहे. जाणकारांनुसार युरोपमध्ये कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा सापडलेला नवीन प्रकार यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी झपाट्याने शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यात गुंतवायला सुरुवात केली आहे. सोमवारी कॉमेक्सवर सोने 1900 डॉलर पार गेले होते. य़ामुळेच MCX वर सोन्याने 51,000 रुपयांच्या टप्प्याकडे कूच सुरु केली आहे. MCX वर चांदी 70,500 रुपयांपलिकडे गेली आहे. लॉकडाऊनमध्य़े मार्च ते ऑगस्ट पर्यंत सोन्याचे दर चढेच होते. मात्र, चीन आणि रशियाच्या कोरोना लसीच्या बातम्यांनी सोन्याची चमक उतरू लागली होती. नोव्हेंबरमध्ये तर चार वर्षांतली मोठी घसरण नोंदविली होती. आता पुन्हा सोने वाढू लागले आहे. यंदा सोन्याने मोठी झेप घेत ऑल टाईम रेकॉर्ड केले होते. सोने ७ ऑगस्टला 56200 रुपयांवर गेले होते. आता या दरात १० टक्क्यांची घसरण झाली होती. तर चांदीच दर हा १० ऑगस्टला 78,256 रुपये झाला होता. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात होती. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता होती. मात्र, जगभरात कोरोनाच्या नव्या व्हायरसची लाट पाहता सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारीही सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सोने ७ ऑगस्टचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे.
ओटीटीच्या मायाजाळात एकीकडे सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छोटा पडदाही त्यांची मक्तेदारी अबाधीत राहावी यासाठी जिवाचं रान करताना दिसत आहेत. पण या सगळ्या प्रयोगांमध्ये सगळंच काही हिट होतं असं नाही. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत अलीकडेच काही रिअॅलिटी टीव्ही शो अचानक सुरू झाले आणि पटकन बंदही झाले. काही भाग प्रसारित केल्यानंतर, या 'बहुप्रसिद्ध' टीव्ही कार्यक्रमांनी आपले शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या शोंसाठी लोकप्रिय कलाकार परीक्षक आणि सूत्रसंचालक म्हणून घेण्यात आले होते. फू बाई फू ते बॅण्ड बाजा बरात यांसारखे अनेक शो कमी टीआरपी आणि कलाकारांच्या इतर कामातील व्यस्ततेमुळे अचानक बंद झाले. या रिअॅलिटी शोकडून वाहिनीला आणि निर्मात्यांना फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षेनुसार या शोला प्रसिद्धी मिळाली नाही. मराठी रिअॅलिटी सिंगिंग शो 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ' या शोने ६ ते १९ वयोगटातील गायकांसाठी एक व्यासपीठ तयार केले होते. सोशल मीडियाचा कमी वापर आणि शोच्या कमी प्रमोशनचा फटका या टीव्ही रिअॅलिटी शोला बसला. निर्मात्यांना हा शो प्रसारित झाल्यानंतर काही महिन्यांतच बंद करावा लागला. टीव्हीवरील विनोदी रिअॅालिटी शोपैकी एक असलेला बहूचर्चित फू बाई फू हा शो केवळ २१ भाग प्रसारित केल्यानंतर अचानक बंद झाला. अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत हे या शोचे परीक्षक होते. तर मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी वैदेही परशुरामी या कार्यक्रमाची सूत्रधार होती. या शोमध्ये ओंकार भोजने, पॅडी कांबळे यांसारखे प्रख्यात विनोदी कलाकार होते, परंतु सर्वात कमी टीआरपी आणि कमी प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे, तो एका महिन्याभरातच संपवावा लागला. रेणुका शहाणे आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी सूत्रसंचालन व परीक्षण केलेला बँड बाजा वरात शो प्रसारित झाल्यानंतर काही आठवड्यांतच बंद झाला. हा शो नवविवाहित वधू, वर आणि त्यांचे कुटुंब यांच्यातील खेळांबद्दल होता. या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजनाचे होत होते. परंतू या शोला प्रेक्षकांना खिळवून ठेवायला नीट जमले नाही त्यामुळे शो बंद करावा लागला. किचन कल्लकर या कुकिंग शोचे दोन सीझन काही महिन्यांपूर्वी प्रसारित झाले होते. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रशांत दामले परीक्षक म्हणून काम करत होते. या शोमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींना स्टेजवर आमंत्रित केले जायचे. त्यांच्यात पाककला स्पर्धा आयोजित केली जायची. कलाकारांच्या व्यस्त शेड्युलमुळे आणि इतर कमिटमेंटमुळे हा शो अल्पावधीतच बंद करावा लागला. निलेश साबळेने लाव रे तो व्हिडिओ या शोचे सूत्रसंचालन केले होते. काही दिवस या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केले मात्र नंतर हळूहळू प्रेक्षक या शोकडे पाठ फिरवू वाहवे. सर्वोत्कृष्ट व्हायरल व्हिडिओ शोमध्ये दाखवणे या संकल्पनेवर आधारिक हा शो काही भागांनंतर बंद झाला.
उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या श्रीकांत यशवंत कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी : डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत यशवंत कांबळे (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाकडे जात होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटार चालकाने श्रीकांतच्या दुचाकीला धक्का दिला. हा अपघात १० आॅक्टोबरला झाला होता. यामध्ये श्रीकांतला दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Facebook Users : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर; झुकरबर्गने हे कसं साध्य केलं ? मुंबई : जगभरात फेसबुक वापरकर्ते वाढत आहेत. डिसेंबर 2022 मध्ये, सरासरी दोन अब्ज लोकांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. हे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येने हा प्लॅटफॉर्म वापरला आहे. अलीकडे कंपनी तोट्यात होती. प्लॅटफॉर्मवर जाहिराती मिळणेही कमी झाले होते आणि खर्चही वाढत होता. यावर उपाय म्हणून मेटामध्ये 11,000 कर्मचाऱ्यांची छाटणीही करण्यात आली. अशा परिस्थितीत मेटा वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे. खर्चात वाढ आणि जाहिराती न मिळाल्याने कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी त्याच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. मात्र, कंपनीने खर्च कमी करण्यावर भर दिला. सरासरी दोन अब्ज युजर्स फेसबुक वापरत आहेत. कंपनीला गेल्या वर्षी पहिल्यांदाच तोटा सहन करावा लागला आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 2023 हे वर्ष 'कार्यक्षमतेचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे. यानंतर काही तासांतच कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काटकसर करण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. 2022 मध्ये, कंपनीच्या कमाईत पहिल्यांदा घट झाली. यावर झुकरबर्ग म्हणाले की, आता आपण वेगळ्या वातावरणात आहोत. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मेटा या कंपनीनेही गेल्या वर्षी आपले कर्मचारी कमी केले आहेत. 11,000 लोकांना काढून टाकून, कंपनीने सुमारे 13 टक्के कर्मचारी कमी केले आहेत. झुकेरबर्गने सांगितले की, गेल्या वर्षी त्याचे 4. 6 बिलियन डॉलर (सुमारे 37,635 कोटी रुपये) नुकसान झाले होते, ज्यामुळे त्याचा नफा अर्धा झाला होता. कंपनीने उचललेल्या पावलांमुळे डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांची कमाई $32. 2 (सुमारे 2,63,545 कोटी रुपये) होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 4 टक्के कमी होती. मात्र, तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा कंपनीची कामगिरी चांगली झाली आहे. हे गेल्या वर्षी पहिल्यांदा घडले जेव्हा फेसबुकवर दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांची संख्या कमी झाली. डिसेंबर 2022 मध्ये, त्याच्या दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हिंदुधर्माचें स्वरूप धर्म हेंच प्रमुख लक्षण बनले आहे. हिंदु मनुष्य विशिष्ट जातिधर्माचे पालन करीत असला म्हणजे त्याला नीट हिंदु समजतात. हिंदूंच्या सामाजिक चालीरीतींच्या पाठीशी पारलौकिक-पारमार्थिक कल्पना आहेतच, पुनर्जन्माचा व कर्मविपाकाचा सिद्धान्त, ही महत्वाची अदृष्टकल्पना, सगळ्या सामाजिक रचनेच्या नियमांचे समर्थन करण्याकरिता धर्मशास्त्रांनी उपयोगात आणली आहे. हिंदुधर्मात पारमार्थिक किंवा आध्यात्मिक संप्रदाय अनेक परस्परविरुद्ध कल्पनांनी बनलेले आहेत. त्या कल्पनांमध्ये अविरोध उत्पन्न करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो व्यर्थ ठरतो. प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता । उपास्यानामनियमः एतद्धर्मस्यलक्षणम् ॥ हें लोकमान्य टिळकांचे हिंदुधर्मलक्षण समाधानकारक नाही. हैं लक्षण हिंदुधर्माची एक बाजू फारच चांगल्यारीतीने वर्णन करून सांगतें. हिंदुधर्माला विधायक ( positive ) व्यवस्थित, संघटित, सुसंगत असा पारमार्थिक पाया नाही ही गोष्ट या लक्षणावरून सहज उघडकीस येते. ' प्रामाण्यबुद्धिवेदेषु ' या शब्दसमुच्चयाने असे सुचविलें आहे की, वेद हा सगळ्या हिंदूंचा प्रमाणग्रंथ आहे. ज्यांना वेदाधिकार नाही, आणि ज्यांच्या चालीरीती वैदिकधर्मावर आधारलेल्या नाहीत असे शें, ७० लोक हिंदुसमाजात आहेत. त्या लोकांचा वेद हा प्रमाणग्रंथ कसा होऊ शकेल ? ज्या लोकांना वेद-श्रवणाचाही अधिकार नाही, एवढेंच नव्हे तर श्रवणाने महापातकाचे व नरकाचे धनी बनावे लागतें, त्या लोकांची वेदावर प्रामाण्यबुद्धि म्हणजे श्रद्धा आहे, या म्हण हिंदुधर्माची समीक्षा ण्यात काहीच अर्थ नाही. साधनांची अनेकता व उपास्यांचा अनि यम ही व्याख्याच होऊ शकत नाही. प्रत्येक विशिष्ट संप्रदायाच्या हिंदूस म्हणजे शैव, वैष्णव, स्मार्त, शाक्त इत्यादि हिंदूस विशिष्ट साधन व विशिष्ट उपास्य आहेच. ही गोष्ट खरी की, सगळ्या हिंदूंना मिळून एक तऱ्हेचें साधन किंवा एक तऱ्हेचें उपास्य नाही. पण हें अभावघटित लक्षण हिंदुधर्माचें खरें लक्षण नव्हे. जेव्हा एखाद्या पदार्थाचें किंवा पदार्थसमुदायाचें लक्षण सांगण्याची गरज असते, तेव्हा त्या पदार्थाच्या बाहेर न सांपडणारें पण त्या सर्व पदार्थास व्यापणारें असें त्या पदार्थाचें भावरूप ( positive ) स्वरूप सांगावयाचें असतें. ● उपास्यानामनियमः व साधनानामनेकता' यावरून एवढेंच सिद्ध होतें कीं, सगळ्या हिंदूंचा हिंदुधर्म म्हणून एक विशिष्ट सर्वसाधारण धर्म नाही, हिंदूंचें धर्म अनेक आहेत; हिंदूंच्या धर्मात एकसूत्रीपणा नाही. हिंदूंच्या समाजसंस्थेचें जातिव्यवस्था हें महत्वाचें (Positive ) लक्षण आहे. प्रार्थनासमाज आर्यसमाज इत्यादि आधुनिक प्रकार अपवाद म्हणून सोडल्यास हिन्दूंचा बहुजनसमाज जातिसंस्था मानूनच व्यवहार करतो. आर्यसमाज व प्रार्थनासमाज यांच्यातही जाती मानून व्यवहार करणारे फार लोक आहेत. जैनधर्म जाति मानीत नसला तरी जैनलोक जाति मानतात. हिन्दुस्थानातील मुसलमान व खिश्चन यांच्यामध्ये सुद्धा जाति मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिन्दुसमाजाच्या या प्रमुख संस्थेचा त्यांच्यावरही परिणाम शिल्लक राहिलाच आहे, हाच याचा अर्थ आहे.
कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. वारणा खोऱ्यात चांदोलीचा भाग समाविष्ट होतो. संजय पाटील । कºहाड : कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. वारणा खोऱ्यात चांदोलीचा भाग समाविष्ट होतो. तर कोयना खोºयाने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. ही दोन्ही खोरी एकमेकानजीक असल्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही खोºयात भूकंप झाला तरी त्याची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दोन्हीकडे जाणवते. मात्र, गत दहा वर्षांत सातारा जिल्ह्यामध्ये जाणवलेल्या एकूण भूकंपांपैकी बहुतांश धक्क्यांचा केंद्रबिंदू सांगलीच्या वारणा खोºयात असल्याचे समोर आले आहे. कोयना विभागात १९६७ मध्ये ६. ६ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला तरी लहान-मोठे हजारो धक्के दरवर्षी या विभागाला बसतायत. गत बारा वर्षांत विभागामध्ये तब्बल सात हजारांपेक्षा जास्त भूकंप 'किर्णास' वेधशाळेत नोंदले गेलेत. त्यापैकी बहुतांश भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोºयात असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाºया कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे 'किर्णास' भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गत बारा वर्षांत हजारो भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोºयामध्ये आहे. मात्र, कोयना खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तीव्रताही जास्त असल्याचे त्या-त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येत आहे. किर्णास वेधशाळेतील नोंदीनुसार गत दहा वर्षांमध्ये २००७ मध्ये सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार २५३, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १३ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकूण १ हजार २६९ भूकंप झाले. २००८ मध्येही तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १११, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ७ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकूण १ हजार १२० भूकंप झाले होते. पाटण तालुक्यातील हेळवाक गावापासून दक्षिणेला हेळवाक खोरे सुरू होते. येथूनच कोयना नदी कºहाडकडे वळली आहे. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी ही गावे वारणा खोऱ्यात येतात. तर कोयना विभागातही शेकडो गावांचा समावेश आहे. किर्णासच्या नोंदीनुसार गत बारा वर्षांत झालेल्या भूकंपांपैकी एकच भूकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला. हा भूकंप २०१२ मध्ये झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भूकंपाने त्यावेळी काही वित्तहानी झाली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झालेला नाही. कोयना, चांदोली विभागात २०१२ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंत १ हजार १३६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ तर सहा रिश्टर स्केलपर्यंतचा १ असे एकूण १ हजार १४०, २०१३ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ३९६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकूण ४०३, २०१४ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ४००, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकूण ४०२, २०१५ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २५०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकूण २५३ आणि २०१६ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकूण २७ भूकंप झाले आहेत.
एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आज शनिवारी आणि उद्या रविवारी दीपावली स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ गिरीश आफळे यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गटाच्या वतीने उद्या रविवारी सकाळी साडेसात वाजता यमुनानगर निगडी येथील एसपीएम प्रशाला येथे दीपावली स्नेहमीलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय क्रीडा भारतीचे महामंत्री राज सज्जनलाल चौधरी भारत विश्वगुरु होण्याच्या दिशेने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. चिंचवड गटाच्या वतीने उद्या रविवारी सकाळी साडेसात वाजता थेरगाव गावठाण येथील कैलास मंगल कार्यालय येथे दीपावली स्नेहमीलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ह. भ. प. डॉ यशोधन महाराज किसन साखरे हे प्रपंच आणि परमार्थ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा व त्याची अंमलबजावणी या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सार्वजनिक हिताचे रक्षण करावे. तसेच तंबाखू विक्रेत्यांनी शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री करू नये, तसेच धोक्याची सूचना नसलेले तंबाखूजन्य पदार्थ विकू नयेत. १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रास्ताविक जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटिकर यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे व कार्य याबद्दल माहिती सांगितली. कार्यशाळेस जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक भातलवंडे, जितेंद्र कदम, डॉ. लक्ष्मण देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांची उपस्थिती होती.
Pune Fire: पुणे येथे एका इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. तसेच ड्युटीवर असलेल्या 37 कर्मचाऱ्यांपैकी 20 जणांचा बचाव करण्यात आले आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीत आलेल्या आगीत जीव गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. Tweet: ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. )
पुणे -गावठाणांची मोजणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळे वेळेची बचत होते. तसेच ड्रोनद्वारे मोजणीची अचुकता सुद्धा अधिक आहे. भूमि अभिलेख विभागाने राबविलेल्या या उपक्रमाची दखल केंद्र सरकारने घेतली असून देशभरातील गावांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या योजनेला स्वामित्त्व' हे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. 11) होणार आहे. देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील सुमारे 763 गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. या उपक्रम देशभरात राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंढणपूर येथील शेतकरी विश्वनाथ मुजुमले यांना पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मान मिळाला आहे.
BBC News, व्हीडिओ, व्हीडिओ, तुम्ही बुडणारी राजधानी पाहिली आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला सन्मान नाकारणारी लिसिप्रिया कंगुजम कोण आहे? 'उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही' व्हीडिओ, 'क्लाऊड सीडिंग'मुळे पूर रोखता येऊ शकतो का? सामना वि. शिवसेनाः 'नाणार' की जाणार? व्हीडिओ, व्हीडिओ, हवामान बदलांमुळे आपला अंत जवळ आलाय का? ऑस्ट्रेलियातील वणव्याचा हा फोटो खरंच नासाने जारी केलाय?
हैदराबाद - कॉलेजच्या जीवनात शिक्षण घ्यायचे सोडून अनेकदा मुले-मुली नको त्या गोष्टींच्या आहारी जातात आणि नको त्या गोष्टी करुन बसतात. आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील एका कॉलेजच्या मुलाने आपल्याच वर्गातल्या एका मुलीसोबत केलेल्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यासंदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. गोदावरी जिल्ह्यातील राजामहेंद्रवरम येथील एका ज्युनियर कॉलेजमधील एका मुलाने कॉलेजच्या वर्गात त्याच वर्गातल्या मुलीशी लग्न केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेजच्या रिकाम्या वर्गखोलीत सदर युवक त्याच्या मैत्रिणीला मंगळसूत्र घालताना दिसत असून, त्याने तिला कुंकुमतिलक (सिंदूर) लावल्याचे दिसून येत आहे. या दोघांच्या मित्रांनी हा व्हिडीओ चित्रीत करुन सोशल मिडीयामध्ये पोस्ट केल्यानंतर, हस्ते-परहस्ते तो व्हायरल होत गेला आहे. या दोघांच्या विवाहाला घरुन विरोध असल्याने, त्या दोघांनी अशा आक्रमक पद्धतीने विवाह केल्याचे समजते. आपल्या मुलीने घरी न सांगता, विरोध असलेल्या मुलाशी लग्न केल्याने मुलीच्या घरच्यांनी तिला घरी परत स्वीकारण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, मुलगा 18 वर्षांचा तर मुलगी 17 वर्षांची असल्याने कायद्यानुसार हा बालविवाह ठरतो आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवरुन पोलिसांनी या अतिउत्साही दाम्पत्याला शोधून काढून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांच्या घरच्यांचे समुपदेशन करण्याची नवी डोकेदुखी पोलिसांसमोर निर्माण झाली आहे.