text large_string |
|---|
Union Bank of India Share Price । 73 रुपयाचा शेअर तेजीत येणार, बँकेने डिव्हीडंड जाहीर केला, स्टॉक खरेदी करावा का? Adani Group Shares । हिंडेनबर्ग फर्मच्या धक्क्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स सावरले, आता होतेय मजबूत खरेदी, कारण काय? Tata Chemicals Share Price । टाटा स्टॉक मध्ये नो घाटा! टाटा केमिकल्स शेअरवर तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
गेल्या काही दिवसांपूर्वी कॅमस्कॅनर अॅप अचानकच चर्चेत आले; ते त्यात सापडलेल्या मालवेअरमुळे. . . यूजर सुरक्षेला धोका नको म्हणून हे अॅप 'गुगल प्ले स्टोअर'ने काढून टाकले आहे. कॅम स्कॅनर या अॅपचा वापर 'फोटों'चे रूपांतर 'पीडीएफ'मध्ये (PDF) करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. महत्त्वाची कागदपत्रे, मार्कलिस्ट, देयके आदी स्कॅन करून ते 'पीडीएफ'मध्ये ठेवल्यास गरजेप्रसंगी वापरता येते. मात्र, दरवेळी स्कॅनर उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे मोबाइलवर फोटो काढून ते 'पीडीएफ'मध्ये साठवले जाते. हे सर्व काही मिनिटांतच होत असल्यामुळे हे 'कॅम स्कॅनर' हे अॅप लोकप्रिय झाले होते. धोका कोणता आढळला? आजपावेतो दहा कोटी यूजरनी कॅम स्कॅनर हे अॅप डाउनलोड केल्याचे आढळून आले असून, बऱ्याच जणांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप पहिल्यापासूनच (बिल्ट इन) असल्याचेही दिसून आले आहे. पूर्वी या अॅपमध्ये फारसा काही धोका असल्याचे आढळून आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या अॅपमध्ये 'ट्रोजन ड्रॉपर' (Trojan. Dropper. AndroidOS. Necro. n) नामक मालवेअर आढळून आला आहे. 'कॅस्परस्की सिक्युरिटी'ने ही बाब जगासमोर आणली. या मालवेअरचा वापर करून मोबाइलमधील बँकेसंदर्भातील माहिती चोरण्यापासून, खोट्या जाहिराती करण्यापर्यंत आणि फेक सबस्क्रायबर वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जाण्याची शक्यता असल्याचेही 'कॅस्परस्की सिक्युरिटी'ने म्हटले आहे. त्याची दखल घेऊन 'गुगल प्ले स्टोअर'नेही या अॅपला घरचा रस्ता दाखवला. 'कॅमस्कॅनर'ने आपल्या अॅपमधून हा मालवेअर काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे. तरी वेगवेगळ्या मोबाइलवर या अॅपचे विविध व्हर्शन उपलब्ध असल्याने त्यामध्ये हा मालवेअर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हे अॅप इन्स्टॉल करणाऱ्या सर्व यूजरनी अॅप अनइन्स्टॉल करणे अधिक फायद्याचे ठरते. 'ट्रोजन ड्रॉपर' नक्की काय करतो? 'कॅमस्कॅनर' अॅपमध्ये 'ट्रोजन ड्रॉपर' या मालवेअरचा 'कोड' टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यामध्ये नकोशा जाहिराती दिसू लागल्या. तसेच, या जाहिरातींमध्ये अशी यंत्रणा टाकण्यात आली होती, की त्यात अजून एखादा मालवेअर डाउनलोड होईल. या पद्धतीने एक-एक करून अनेक मालवेअर आपल्या नकळत डाउनलोड होत जातील. तसेच, या मालवेअरचा दुसरा धोका म्हणजे या मालवेअरमुळे यूजरला एखाद्या वेबसाइटचे किंवा अॅपचे 'सबस्क्रिप्शन' काही रक्कम भरून घेण्यास भाग पाडले जात होते. 'कॅमस्कॅनर'ला पर्याय कोणता? हे अॅप केवळ काढलेल्या फोटोचे 'पीडीएफ'मध्ये रूपांतर करीत असे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे 'स्कॅनिंग' होत नाही. त्यावर पर्याय म्हणजे आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्याने कागदपत्रांचा फोटो काढायचा आणि ते फोटो 'मायक्रोसॉफ्ट वर्ड' मध्ये टाकून 'पीडीएफ' साठवून ठेवावी. त्यासाठी कोणत्याही त्रयस्थ अॅपची गरज भासत नाही. 'गुगल प्ले स्टोअर' सुरक्षित आहे का? 'गुगल प्ले स्टोअर'वर एखादे अॅप आपण बघतो, त्या वेळी विश्वास ठेवून अॅप डाउनलोड केले जाते. 'गुगल प्ले स्टोअर'ने 'प्ले प्रोटेक्ट' नावाने एक सिस्टीम सुरू केली आहे. या सिस्टीममध्ये प्रत्येक अॅप सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासले जाते. मात्र, सततच्या घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे 'प्ले स्टोअर'ची ही सिस्टीम खरेच काम करते की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोणीही नाममात्र फी भरून 'गुगल प्ले स्टोअर'वर आपले अॅप टाकू शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे हे अॅप प्रमाणित आहे किंवा नाही, हे तपासून घेण्याची कोणतीही सिस्टीम किंवा यंत्रणा 'गुगल'कडे नाही. 'गुगल प्ले स्टोअर'वर असणारी अशा पद्धतीची अॅप भारंभार डाउनलोड केलीही जातात. 'कॅम स्कॅनर'च्या बाबतीत घडलेली चूकही 'गुगल प्ले स्टोअर'च्या लक्षात आलेलीच नाही. कोणते अॅप डाउनलोड करू नयेत? 'प्ले स्टोअर'वर निम्याहून अधिक अॅप बनावट आणि बोगस आहेत. त्यांचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. अॅपला आकर्षक नाव, आकर्षक चित्र टाकून यूजरला फसवले जाते. अॅपच्या माध्यमातून जाहिराती दाखवणे आणि त्यातून पैसे मिळवणे हाच हेतू असतो. केवळ नावाला आणि चित्रांना भुलून अॅप डाउनलोड करू नये. अॅप कोणी बनवले आहे, नक्की ते कशासाठी वापणार आहोत, ती कंपनी मोठी आणि अधिकृत आहे की नाही, या सर्व गोष्टींची पडताळणी यूजरने आधी करण्याची आवश्यकता आहे. एखादे अॅप वापरण्यापूर्वी त्यावर अन्य यूजरने टाकलेल्या प्रतिक्रियाही तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. |
औरंगाबाद : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पुढील सत्ता आमचीच असणार, असा दावादेखील विविध राजकीय पक्ष करत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर हेच असतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णासाहेब पाटील यांनी दिली. औरंगाबादमध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबडेकरांशी झालेल्या चर्चेनंतर, एमआयएम १०० ऐवजी ६० जागांसाठी तयार? औरंगाबाद जिल्ह्यातील मुलाखती होण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये या मुलाखती पार पडल्या. सर्वच ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आणि इच्छुक उमेदवारांची गर्दी होती. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही जोमाने काम करू आणि महाराष्ट्रात वंचितचे जास्तीत जास्त आमदार निवडून कसे येतील हा प्रयत्न करू, असंही पाटील म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर आम्ही चर्चा करतो आहोत. चर्चेअंती मार्ग नक्की निघेल, असं काँग्रेसच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र प्रकाश आंबेडकर अजूनही विधानसभेला आघाडीसोबत जाणार की स्वबळावर निवडणूक लढवणार, हे आद्यपही स्पष्ट झालेले नाही. |
यामाहाची खास कॅशबॅक ऑफर, कोरोना वॉरियर्सला मिळणार5हजार रुपयांचा फायदा; 'असा' घ्या लाभ - Mhlive24.com\nयामाहाची खास कॅशबॅक ऑफर, कोरोना वॉरियर्सला मिळणार5हजार रुपयांचा फायदा; 'असा' घ्या लाभ\nMHLive24 टीम, 09 जुलै 2021 :- यामाहा मोटर कंपनी आपला 66 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या प्रसंगी यमाहा मोटर इंडियाने फ्रंटलाइन वर्कर्स ना सन्मानित करण्यासाठी 'ग्रेटिट्यूड बोनस' जाहीर केला आहे, ज्यामध्ये कंपनी आपल्या स्कूटर मॉडेल्स Fascino 125 Fi आणि Ray ZR 125 Fi च्या खरेदीवर 5,000 रुपये कॅशबॅक ऑफर करीत आहे . फ्रंटलाइन वर्कर्समध्ये वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि लष्करी कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे.\nयामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन Motofumi Shitara यांनी यामाहा कर्मचार्यांनी तसेच डीलर भागीदार, पुरवठा करणारे आणि ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले व असे म्हटले की त्यांनी अभूतपूर्व अशा दिलेल्या सपोर्टमुळे या व्यवसायात कंपनीला आत्मविश्वास वाढण्यास आणि व्यवसाय टिकवून ठेवण्याचा आत्मविश्वास दिला आहे. ते पुढे म्हणाले की, कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आपल्या कर्तव्यातून पार पडलेल्या जबाबदारीसाठी फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो.\nसर्व दुचाकी वाहनांमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल :- गेल्या महिन्यात, यामाहा इंडियाने नवीन एफझेड-एक्स मॉडेलच्या लॉन्चसह त्याच्या आगामी सुधारित योजनांची माहिती दिली. भारतातील सर्व यमाहा दुचाकींमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्टैंडर्ड म्हणून उपलब्ध असेल.\nतथापि, आता स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञान स्कूटरपुरते मर्यादित असेल. स्कूटरबाबत यामाहाने असेही म्हटले आहे की ते लवकरच Ray-ZR 125 मॉडेल्स अपडेटेड Fascino समवेत लाँच करणार आहेत. कंपनीने गेल्या वर्षीच नवीन 125 सीसी स्कूटर बाजारात आणले. Fascino हायब्रीड तंत्रज्ञानासह नवीन इंजिनसह अनेक अपग्रेड्स मिळतील. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाहतुकीचे नियम मोडून आपण पोलीसांच्या नजरेतुन वाचू असा विचार करणाऱ्यांनी आता सावधान, कारण देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात नवीन ड्राइविंग लाइसेंस आणि गाडीची आरसी बदलणार असून रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार, १ ऑक्टोंबर पासुन संपुर्ण देशात एक सारखे ड्राइविंग लाइसेंस बनवले जाणाार आहेत. त्यातून वाहतुकीचे उल्लंगन केल्यास ते लपू शकणार नाही. ड्रायविंग लायसन्स आणि आरसी आता याचे रंग,लुक, डिजाइन आणि सिक्यॉरिटी फीचर्स हे सर्व सारखेच असणार आहेत. परंतु त्यात स्मार्ट डीएल आणि आरसीमध्ये प्रामुख्याने माइक्रोचिप क्युआर कोड असणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातुन केंद्रीय ऑनलाईन डेटाबेसव्दारे चालक किंवा वाहन यांचे मागील रिकॉर्ड एका डिवाइसच्या माध्यमातुन वाचले जाणार आहे. तसेच वाहतुक पोलीसांना त्यांच्या जवळ असलेल्या डिवाइसमध्ये कार्ड टाकताच किंवा क्युआर कोड स्कॅन करून करताच गाडी व चालक यांची संपुर्ण माहिती मिळणार आहे. रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार , १ ऑक्टोंबर पासुन संपुर्ण देशात एक सारखे ड्राइविंग लाइसेंस बनवले जाणाार आहेत. या अधिसुचने नुसार देशातील प्रत्येक राज्याचे ड्राइविंग लाइसेंस आणि रजिस्ट्रेशन प्रमाण पत्राचा फॉर्मेट एक सारखा असणार आहे . तसेच लाइसेंस व आरसी याचा रंग देखील सारखा असेल. प्रामुख्याने मेट्रो रेल्वे व एटीएम च्या स्मार्ट कार्डमध्ये वापरली जाणाऱ्या एनएफसी या फिचरमुळे कोणत्याही गाडीची व चालकाची मागील १० वर्षातील संपुर्ण माहिती समोर येणार आहे. ही एनएफसी सुविधा जाते. चीप व एनएफसी सुविधेला अनिवार्य करण्याचा प्रस्ताव होता,परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारांना पर्याय ठेवण्याचा निर्णय दिला आहे. देशात दररोज ३२,००० डीएल घेतले जातात किंवा त्याचे रीन्यू केले जाते. तसेच दररोज कमीतकमी ४३,००० गाड्या रजिस्टर होतात किंवा रि-रजिस्टर केल्या जातात. या नवीन डीएल किंवा आरसीमध्ये १५-२० रुपये पेक्षा जास्त खर्च नसणार आहे . ट्रांसपोर्ट मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते या नवीन बदलामुळे वाहतुक पोलीसांचा वेळ वाचणार आहे. |
लॉकडाउन (Lockdown) लागू करुन आणि लोकल सेवा बंद करुनही मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. शहरात ज्या बसेस सुरु आहेत त्यातूनही मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. सोशल डिस्टन्सींगचे कोणत्याही प्रकारे पालन होत नाही. गर्दीच पाहायला मिळते. मग असे असताना मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवास केल्यानंतरच कोरोना पसरतो हे कशावरुन, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्मान सेना (MNS) या पक्षाने सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सविनय कायदेभंग (Savinay Kaydebhang) करत मनसे उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार आहे. दरम्यान, मनसेच्या काही नेत्यांना रेल्वे पोलिसांनी आगोदरच नोटीस बजावली आहे. तरीही हे नेते सविनय कायदेभंग करण्यावर ठाम आहेत. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनास उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) पाठिंबा दिला आहे. मनसे सरचिटणीस यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई बेस्ट आणि उपनगरांतून तसेच नवी मुबईतून धावणाऱ्या विविध बसेसचे व्हिडिओ सोशल मीडियारुन शेअर केले होते. हे व्हिडिओ शेअर करत देशपांडे यांनी जर बेस्ट बसने प्रवास करताना कोरोना होत नाही. तर मग मुंबई लोकलने प्रवास केल्यावर कोरोना कसा नाही होत, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला होता. (हेही वाचा, Western Railway Special Suburban Train: मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय) दरम्यान, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनास उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) पाठिंबा दिला आहे. मनसेला पाठींबा देताना या संस्थेने म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा आणि इतर काही कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू, अद्यापही सर्वासामन्य नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी दिली नाही. सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न सुटलाच नाही. रिक्षा, टॅक्सी व अन्य पर्याय लोकांना परवडणारे नाहीत. बेस्ट बस सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे आपण मनसेच्या कायदेभंगास आपण पाठिंबा देत असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) म्हटले आहे. लोकल प्रवास हा मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाची गरज आहे. मुंबई रेल्वे थांबली तर अवघे शहर ठप्प झाल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे लॉकडाऊन काळ संपून आता अनलॉक प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आणि तितकीच आवश्यक असलेली मुंबई लोकल लवकर सुरु व्हावी अशी जनभावना तयार होऊ लागली आहे. |
आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल? 3. New Parliament Building : नव्या संसदेच्या सुरक्षेसाठी थर्मल इमेजिंग सिस्टिमची व्यवस्था, जाणून घ्या काय आहे ही व्यवस्था? 4. Indian Population: लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला! "तरच होणार देशाची प्रगती. . " 5. Rahul Gandhi : राहुल गांधींना पासपोर्ट मिळणार, दिल्ली न्यायालयाचा मोठा दिलासा! |
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबईः मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा राज्यातील एकमेव देखभाल-दुरुस्ती डेपो ठाणे जिल्ह्यात तब्बल ६० हेक्टर जमिनीवर बांधण्यात येत आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने डिसेंबर २०२२ मध्ये मागविलेल्या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. येत्या साडेपाच वर्षांत या डेपोचे बांधकाम पूर्ण करण्याची अट आहे. ज्या चार कंपन्यांनी हा डेपो बांधण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे, त्यामध्ये दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, केईसी इंटरनॅशनल, लार्सन अँड टुब्रो आणि एससीसी-प्रेमको यांचा समावेश आहे. या निविदांची आता तांत्रिक मूल्यमापन तपासणी करून नंतर तांत्रिकदृष्ट्या पात्र कंत्राटदारांच्या आर्थिक बोली उघडून सर्वांत कमी दराची निविदा भरणाऱ्या कंत्राटदारास हे काम देण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनची सुरक्षितता डेपोंवरच अवलंबून आहे. बुलेट ट्रेनच्या यशस्वीतेसाठी या देखभाल-दुरुस्तीचे सर्वांत मोठे योगदान राहणार आहे. या ठिकाणी जपान येथून मागविलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे जी देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे, त्यावर बुलेट ट्रेनची सुरक्षितता अवलंबून राहणार आहे. कामाच्या व्याप्तीमध्ये ठाणे डेपोची रचना आणि बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामध्ये रस्ते, गटारे, इमारतींचे बांधकाम, तपासणी शेड, गाड्यांची दैनंदिन तपासणी, त्या धुण्यासाठी जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय जपान येथून मागविलेली ८०० हून अधिक उपकरणे बसवून त्यांची प्रत्यक्षात तपासणी करून रीतसर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच हा डेपो कार्यान्वित करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या भारोडी आणि अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिंकनसेन ट्रेन-सेटची देखभाल या ठिकाणी करण्यात येणार आहे. साबरमती डेपोनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डेपो असणार असून, आणखी एक डेपो सुरत येथे बांधण्यात येत आहे. बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकासाठी २२ हेक्टर जागेचे संपादन करण्यात आले आहे. यात ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर ८ आर ८१ चौ. मीटर, मरेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ. मीटर, राज्य शासनाच्या दोन हेक्टर ३२ आर १० चौ. मीटर जमिनीचा समावेश आहे. यासाठी आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढली आहेत. |
मी एक युवक आहे आणि आपण अशा एका उभारणाऱ्या देशाचं भविष्य आहे, याची जाणीव होते तेव्हा जबाबदारी, कर्तव्ये लक्षात येऊ लागतात. अशी कर्तव्य देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. माझ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा कुठंतरी देशाच्या विकासाला हात भार लावत असतो. आम्ही एकमेकांना बांधले गेलेलो आहोत, हे आम्हाला समजतच नाही. आम्ही सगळं काही आपलं वयक्तिक असतं असं मानतो; पण आपण आपल्या एका छोट्या छोट्या कृतीने समाजाच्या आणि देशाच्या जडणघडणीत हातभार लावत असतो. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जी युवकांपुढील आव्हाने सांगितली, तिचा आम्ही विचार करायला पाहिजे. त्याआधी कर्तव्ये समजण्यासाठी आम्ही कसे आहोत? कुठे आहोत? हे प्रश्न स्वतःला करू, तेव्हा उत्तरे नक्की मिळतील. मला दोन प्रकारचे तरुण दिसतात. आम्ही सारे एकाच तर समाजाचे भाग असतो आणि याच विविधतेने नटलेल्या समाजात विविध जगण्याच्या पद्धती स्वीकारलेल्या पिढ्या आहेत. काही तरुण सामाजिक दृष्ट्या दुर्बल असतात कारण त्यांना उभारण्यासाठी वाव मिळालेला नसतो आणि काही तरुण-तरुणी एका वाटेवर फसलेल्या असतात. मला या विषयी थोडं सांगायचं आहे. असंख्य ध्येय ठेवून आम्ही देशाच्या प्रगतीचा विचार करीत जेव्हा उद्याच्या भारताची स्वप्ने बघत असतो तेव्हा उगवणाऱ्या सूर्यापासून प्रेरणा घेत असतो मात्र मावळतीच्या सूर्याला ही स्वप्ने थांबवू शकत नाही. काहीतरी तशी गत आपली होऊन बसलीये.शिक्षणाचा अभाव असणारी पिढी आणि शिक्षणाचा विपर्यास केलेली पिढी एकाच समाजाच्या दोन बाजू. एखादं नेतृत्व तयार व्हायला असंख्य कष्ट घ्यावे लागतात. मग ते नेतृत्व सामाजिक, राजकीय असो नाहीतर कुठल्या तरी कले मधील. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेला महाराष्ट्र आणि त्यांनी निर्माण केलेली युवा नेतृत्वाची फळी आज ही भारताच्या विशेष राजकीय पटलावर कार्य करते आहे. आज प्रत्येक चौकात युवा नेतृत्वाचा,नेत्यांचा झगमगाट झालाय. कुणी पंडित नेहरूंना 'आमचं काळीज' म्हणलं नसेल, नाहीतर कोणत्या भपकेबाज ओळींच्या स्तुतींनी त्यांनी त्यांचं नेतृत्व पुढं आणलं असेल. आमच्या आजच्या चौका चौकात दिसतेय ती अशा ध्येयशून्य विचारांची स्वघोषित युवा नेतृत्वाची फळी. मग वाढदिवस आणि मिरवणुका काढून कुठला समाज प्रगती करणार? आम्ही आमची आव्हाने ओळखून पुढे चालायचं की अशाच अडगळीत जाऊन पडायचं. समांतर विकासाची ध्येय घेऊन पुढे येणारी पिढी एक बाजूला आणि गळ्यात कित्येक तोळे सोने घालून समाजाच्या विकासासाठी नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेली पिढी एक बाजूला. देशाच्या प्रगतीसाठी भारताचा कार्यकर्ता होऊन जिथं गरज असेल तिथं जाऊन कार्य करण्यासाठी प्रेरित होणारी पिढी आमच्या देशाचं भविष्य. कुठल्या तरी राजकीय नेत्यांचा कार्यकर्ता हा अडगळीला पडलेला असतो. आम्हाला कार्यकर्त्यांची फळी घडवणारे नेते ही तितकेच मिळाले आणि कायकर्त्यांना त्यांच्याच जागेवर ठेवणारे ही तितकेच. नव्या पदव्या, नवी स्टाईल ही आज राजकारणात शिरू पाहत असलेली समस्या. जिथं वैचारिक बैठक नाही, देशाचा इतिहास, भूगोल माहिती नसणारी, समाज कारण जाणून न घेता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारी पिढी कुठं तरी आम्हाला ऱ्हासाकडे घेऊन जाईल.बदलेला गावगाडा आणि बदलत जाणारं शहर हेही आव्हान आज आमच्या समोर आहे. आम्ही संस्कृती च्या गप्पा न मारता त्यातील संस्कार घेऊन पुढे चालावं तर पाश्चिमात्य परंपरा यांनी आमच्या देशात केलेला शिरकाव हे ही भयानक आहे. रस्त्या रस्त्यावर आज युवक निर्भत्सपणे वागताना दिसतात. सौन्दर्याची व्याख्या बदलून ती झगमटाणे इतक्या सहजरित्या घेतलीये की आता यातून आम्ही कसे सोडवू स्वतःला? हे प्रश्न अनुत्तरित नसावेत. आमचा इतिहास आमची जीवनशैली ही कित्येक हजार वर्षाची देणं असताना आम्हाला बाहेरचं जास्त अप्रूप वाटावं. या साठी आमची शिक्षण व्यवस्था ही तितकी प्रगल्भतेच्या वाटेवर उभी हविये. आमच्या देशात सर्जनशील तरुणांची खाण असताना, आम्ही कुठल्याच पातळीवर कमी नसताना काही कीड लागलेली विचार सरणी ही लागलीच बाहेर काढली तर नवा भारत, येणाऱ्या भारताची प्रतिमा ही महापुरुषांच्या कार्याला साजेशी ठरेल. प्रत्येक तरुणांची देशाच्या विविध प्रकारच्या प्रगतीमध्ये गरज आहे. तरुण हा देशाचा कणा आहे आणि जशी आव्हाने आहेत तशा अनेक संधी आमच्या दाराशी उभ्या असलेल्या दिसून येतात. बदलत जाणारी माध्यमं आमच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळा ठरावी? इतके आम्ही वाहवत जाणार नाही हा आमचा सुरू असलेल्या नवं वर्षाचा संकल्प असेलच. यावरून कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेल्या ओळी आठवता, "तरूणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरूवरी, करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळू नका" अनेक आव्हाने जेव्हा असतात तेव्हा कुठंतरी लढायला शक्ती येते. नव्या भारताच्या स्वप्नासाठी आम्ही प्रत्येक युवक कंबर कसून तयार राहू, ही शपथ घेऊन आव्हाने कितीही आली तरी आमच्या देशाचा झेंडा हा डौलात फडकत ठेवू. |
नवी दिल्लीः कॉंग्रेसमधील सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील राजकीय नाट्यानंतर आता भाजपलाही आपल्या आमदारांमध्ये फुटण्याची भीती आहे. कारण राजस्थानमध्ये महिनाभरापेक्षा जास्त काळ सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षही आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी अर्थात गुजरातमध्ये हलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे हे पाहता पक्ष विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत तेथे आमदारांना ठेवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राजस्थान विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हरियाणातील कॉंग्रेसचे बंडखोर सचिन पायलट कॅम्पचे मुख्यमंत्री तर अशोक गहलोत आमदार सध्या जैसलमेरमधील हॉटेलमध्ये आहेत. गेल्या वर्षी कॉंग्रेसमध्ये बसपाचे विलीनीकरण करणाऱ्या सहा आमदारांच्या या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निकाल या आमदारांविरोधात गेला तर कॉंग्रेस आपले आमदार काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकेल अशी भीती भाजपला आहे. अशा परिस्थितीत आमदारांना 14 ऑगस्टपर्यंत गुजरातमधील कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवता येईल आणि तेथून विधानसभेत थेट आणता येणार अससल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाचे पाच आमदार उदयपूर येथून गुजरातशिफ्ट करण्यात आले आहेत. यात साळंबरचे आमदार अमृत लाल मीणा, झाडोळचे आमदार बाबूलाल खरडी, मावलीचे आमदार धरम नारायण जोशी, उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंग मीना आणि गोगुंदाचे आमदार प्रताप गेमेटी यांचा समावेश आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनीही दिल्लीत पक्षाच्या हाय कमांडची भेट दिली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. असे मानले जाते की त्यांनी राजस्थानमधील राजकीय परिस्थितीबद्दल नड्डा यांच्याशी बोलणे झाले असावे. सचिन पायलट यांनी आणखी 18 आमदारांसह कॉंग्रेसमधून बंड केल्यावर राज्यातील राजकीय घडामोडी सतत बदलत असतात. हे सत्र 14 ऑगस्टपर्यंत या विषयाला पुर्णविराम लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. |
मुंबई : लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल असे सांगत उद्या बुधवारी कंगना मुंबईत येणार असून विमानतळ आणि कंगनाच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तिच्या रक्षणासाठी सज्ज राहतील असा इशारा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आज अभिनेत्री कंगना राणावतने केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दुरध्वनी करून आपल्याला संरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेऊन रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेत कंगना राणावत यांनी आपण लहानपणापासून मुंबईत वास्तव्यास असून मुंबई आणि महाराष्ट्राची मी परम भक्त असल्याचे सांगितले. यावर आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कंगना राणावत यांच्या रक्षणासाठी मुंबई विमानतळ आणि त्यांच्या निवास्थानी ही सज्ज राहतील असे आश्वासन दिले. मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध आम्ही एक शब्दही खपवून घेणार नाही मात्र सरकारवरील टीका मुंबईवरील टीका असल्याचा कांगावा करून कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी देणे लोकशाहीला धरून होणार नाही त्यामुळे उद्या कंगना राणावत मुंबईत येईल तेंव्हा तिचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल असे आठवले यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकारवर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगना राणाव ला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशारा आठवले यांनी आज दिला आहे. कंगना राणावत यांनी मुंबईला आपल्या मातृस्थानी मानत असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्राविरुध्द मत मांडलेले नाही सरकार आणि राज्य कारभारावर टीका करण्याचे विचारस्वातंत्र्य सर्वसामान्यांप्रमाणे कंगनालाही अधिकार आहे असे आठवले यांनी म्हंटले आहे. |
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माझे गाव कोरोनामुक्त हे प्रबोधनात्मक अभियान राबविण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या मदतीने ऑनलाईन प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच, सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पहिल्या टप्प्यात कोवाड, किणी, तेऊरवाडी, दुंडगे, निदूर या पाच गावांतून ऑनलाईन प्रबोधनाची मोहीम राबविली असली तरी संपूर्ण चंदगड तालुक्यात हे अभियान राबविण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे. १ जून रोजी डॉ. अरुण खरे (नाशिक) यांचे कोरोना काळात आरोग्याची काळजी, ३ जूनला डॉ. शरद श्रेष्ठी (बेळगाव) यांचे कोरोना व बालकांचे आरोग्य व ५ जून रोजी डॉ. एस. डी. कदम (कोल्हापूर) यांचे झाडे लावा, झाडे जगवा आणि कोरोनाला पळवा या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम झाला. त्यावर विषय तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली. सरपंच अनिता भोगण (कोवाड), संदीप बिर्जे (किणी), राजू पाटील (दुंडगे) यांनी ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाला कसे थोपवता येईल, याविषयी मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली. डॉ. के. एस. काळे यांनी प्रास्ताविक केले. अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. दीपक पाटील, डॉ. के. एस. काळे, डॉ. ए. के. कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. कांबळे यांनी आभार मानले. No comments: या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील. |
रेड्डींच्या साम्राज्यात औषधोपचारदरम्यान बिबट्याचा मृत्यू ! परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या साम्राज्यात प्रादेशिक वनविभागातील एका बिबट्याचा औषधोपचारादरम्यान एक वर्षापूर्वी मृत्यू झाला. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच या बिबट मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होण्याची गरज आहे. अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने या बिबट्यास २५ एप्रिल २०२० रोजी अचलपूर तालुक्यातील खैरी दोनोडा गावानजीक खैरी शेतशिवारात जेरबंद केले होते. या बिबट्याचा मागील पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकल्याने त्या पायाला जखम झाली होती. या जखमी बिबट्याला २५ एप्रिल रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारार्थ दाखल केले गेले. सिपना वन्यजीव विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक शिवाबाला एस यांचे मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे यांनी त्यावर स्क्वीजकेज मध्ये औषधोपचार सूर केलेत. हा बिबट शेडूल वनमधील वन्यजीव असल्यामुळे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे त्यावर सरळ नियंत्रण होते. पर्यायाने या बिबट्याची जबाबदारी त्यांचेवर होती. त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही निर्णय स्थानिक यंत्रणेला घेण्याची मुभा नव्हती. २५ एप्रिलपासून ३१ मे २०२० पर्यंत तब्बल ३७ दिवस या बिबट्याला उपचारार्थ या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला ठेवले गेले. उपचारार्थ दाखल असलेला हा बिबट तापाने फणफणत असतानाच मृत्युमुखी पडला. मृत्यूपूर्वी या बिबट्याचे रक्त नमुने गोरेवाडा नागपूर येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यातही काही गंभीर बाबी पुढे आल्या होत्या. या बिबट्याच्या मागच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होती. यात त्याला वेदनाशमक औषधींसह अँटिबायोटिक दिल्या गेले. पण, त्या पायाच्या एक्स-रे काढल्या गेला नाही. पोटाची सोनोग्राफी केल्या गेली नाही. त्याला स्क्वीज केजमधून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडल्या गेले नाही. त्याला त्याच स्क्वीज केजमध्ये अडकऊन ठेवत तब्बल ३७ दिवस त्याच्या मरणाची वाट पाहिल्या गेली. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर प्राथमिक उपचार करून दोन-तीन दिवसात त्याला गोरेवाडा नागपूर येथे उपचारार्थ पाठविणे आवश्यक होते. पण तसे केल्या गेले नाही. अवघ्या चार वर्षे वयाचा सशक्त बिबटावर डॉ. अक्षय घटारे औषधोपचार करीत होते. यातच डॉ. घटारे यांना तेथून हलविले गेले. यामुळे या बिबट्याकडे आठ दिवस दुर्लक्ष झाले आणि बिबटाची प्रकृती खालावली. दरम्यान जंगलातून ट्रकद्वारे आणल्या गेलेली मोठमोठी लाकडे या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला लागून टाकल्या गेलीत. यात त्या बिबट्याला असुरक्षित वाटू लागले. लाकडासह मानवी हस्तक्षेपातून होणारा आवाज बघून तो भेदरला. अशा अवस्थेतच स्क्विज केजमध्ये अखेर त्याची प्राणज्योत मालवली. |
India vs Bangladesh ICC Women's World Cup : भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मंगळवारी बांगलादेश महिला संघावर मोठा विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने नेट रन रेटमध्ये कमालीची सुधारणा करताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या अन्य संघांची डोकेदुखी वाढवली आहे. यास्तिका भाटिया ( Yastika Bhatia) च्या अर्धशतकी खेळीला स्मृती मानधना, शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, रिचा घोष व स्नेह राणा यांची साथ मिळाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. स्मृती व शेफाली यांनी भारतीय संघाला चांगली सुरूवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. स्मृती ३० धावांवर माघारी परतली. त्यानंतर शेफालीही ४२ धावांवर बाद झाली. मिताली राजही भोपळ्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ७४ अशी झाली. हरमनप्रीत कौरही १४ धावाच करू शकली. पण, यास्तिकाने रिचा घोषला सोबतिला घेऊन संघाचा डाव सावरला. या दोघिंनी अर्धशतकी भागीदारी केली. रिचा २६ धावांवर बाद झाली, यास्तिकाही ५० धावांवर माघारी परतली. पूजा वस्त्राकर व स्नेह यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताची धावसंख्या दोनशेपार नेली. स्नेह २३ चेंडूंत २७ धावा करून बाद झाली, तर पूजाने ३३ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या. भारताने ७ बाद २२९ धावा उभ्या केल्या. निम्मा संघ ३५ धावांवर माघारी परतला. स्नेह राणाने दोन झटके दिले. पूजा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड यांची साथ मिळाली. भारतासाठी डोईजड होत असलेल्या सल्मा खातूनची ( ३२) विकेट अनुभव झुलन गोस्वामीने घेतली. राजेश्वरीने सुरेख गोलंदाजी केली तिने १० पैकी ४ षटकं निर्धाव फेकली अन् १५ धावांत १ विकेट घेतली. पूजाने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. पूनमच्या नावावर एक बळी राहिला. स्नेहने १०पैकी २ षटकं निर्धाव फेकताना ३० धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या नावावर सर्वाधिक १० विकेट्स आहेत. झुलनने दोन विकेट घेत बांगलादेशचा संघ ११९ धावांवर माघारी पाठवला. भारताने हा सामना ११० धावांनी जिंकला. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
अशा परिस्थितीतही सातारा पोलीस नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे, घरात बसण्याचे आवाहन करत होते. परंतु ज्या दिवशी साता-यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्या दिवसापासून पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन रस्त्यावर गस्त सुरू केली. रात्रंदिवस पोलीस शहरातून फेरफटका मारत होते. सातारा : गत दोन महिन्यांपासून रात्रंदिवस नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करणाऱ्या पोलिसांची आता धावपळ थांबलीय. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे थोडी का होईना पोलिसांना आता विश्रांती मिळू लागलीय. देशात २४ मार्चला संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याच दिवसापासून जिल्ह्यातील पोलीस खºया अर्थाने कोरोनाच्या रणांगणात उतरले. महाराष्ट्रभर कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, पुढील दोन आठवडे साताºयात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून येत नव्हता. अशा परिस्थितीतही सातारा पोलीस नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे, घरात बसण्याचे आवाहन करत होते. परंतु ज्या दिवशी साताºयात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्या दिवसापासून पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन रस्त्यावर गस्त सुरू केली. रात्रंदिवस पोलीस शहरातून फेरफटका मारत होते. बिनकामी रस्त्यावर एखादा फिरताना दिसल्यास वेळ पडल्यास त्याला लाठीचा प्रसादही देण्यास पोलीस मागे-पुढे पाहत नव्हते. अनेकांनी ठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे पोलिसांवर सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. परिणामी पोलिसांच्या हातातील काठी अचानक गायब झाली. दोन महिन्यांपासून पोलिसांना कसल्याही प्रकारची उसंत मिळत नव्हती. परंतु आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पोलिसांना थोडी विश्रांती मिळत आहे. पोलिसांना आता त्यांच्या घरी जाता येत आहे. ही संधी असली तरी पोलिसांना धोका मात्र अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पोलिसांना आता वेळ मिळू लागलाय. यावेळेचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्याचा निर्णय घेतलाय. काहींनी वाचनावर भर दिलाय तर काहींनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलंय. रोज सकाळी व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याकडे अनेकांचा कल आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व्यायामापेक्षा वाचन करण्यास अनेकांची पसंती आहे. जनतेकडून स्वागत. . संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन झाल्यापासून पोलिसांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. कोरोनाच्या रुपाने साक्षात मृत्यू समोर उभा असताना खंबीरपणे जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस लढत आहेत. जनतेकडून होणारे स्वागत पाहून पोलिसांची छाती अभिमानाने फुलून जातेय. आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून ड्यूटीवर आहे. काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे थोडीफार विश्रांती मिळतेय. मात्र, आम्हाला धोका कायम आहे. लोकांना सांगूनही लोक ऐकत नाहीत. याचे आम्हाला वाईट वाटते. आम्ही कोणासाठी रस्त्यावर उभे आहोत, आपल्याच सुरक्षिततेसाठी. मग तुम्ही काही दिवस घरात बसा ना. |
महिंद्रा सीआयई एक मल्टी-टेक्नॉलॉजी ऑटोमोटिव्ह घटक पुरवठादार आहे आणि वाहन बाजारासाठी घटक आणि उप-असेंबली अव्वल माहिर आहे. तांत्रिक बाबी स्टॉकच्या मूल्यात सुधारणा दर्शवतात. दैनिक RSI ५० वर परत आला आहे आणि वाढत आहे. OBV त्याच्या शिखरावर पोहोचत आहे. मुंबई - नकारात्मक जागतिक संकेतांमध्ये गुंतवणूकदारांनी धोकादायक समभागातून बाहेर पडण्याची निवड केल्याने भारतीय निर्देशांकांची तीव्र विक्री झाली. व्यापक निर्देशांक १% वरून ४% पर्यंत खाली आले आहेत. बाजारात घसरण असूनही महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्हच्या स्टॉकमध्ये जोरदार खरेदीचे स्वारस्य दिसून आले आहे. कारण सोमवारच्या व्यवहार सत्राच्या सुरुवातीच्या तासांमध्ये तो ४% पेक्षा अधिक वाढला आहे. त्याचबरोबर तो निफ्टी ५०० समभागांमधून सर्वाधिक लाभ मिळवणारा ठरला आहे. त्याच्या अलीकडील उच्च पातळीपासून तो १५ % वाढल्यानंतर स्टॉक किमान स्तरावरून झेपावला आहे आणि सध्या त्याच्या आधीच्या सत्राच्या उच्च पातळीवर व्यवहार करत आहे. त्याची व्यवहार संख्या अधिक आहे. यातून स्टॉकच्या सकारात्मक पूर्वाग्रहाला समर्थन मिळते. तांत्रिक बाबी स्टॉकच्या मूल्यात सुधारणा दर्शवतात. दैनिक RSI ५० वर परत आला आहे आणि वाढत आहे. OBV त्याच्या शिखरावर पोहोचत आहे. ते वाढत्या आवाजाचा दृष्टीकोन दर्शवते. स्टॉकने बाजारातील चढ-उतारांविरूद्ध भक्कम लवचिकता दर्शविली आहे आणि व्यवहारासाठी व्यवहार करणे ही एक सकारात्मक अल्पकालीन कल्पना असू शकते. त्याच्या पुढील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी हा स्टॉक त्यांच्या वॉचलिस्टमध्ये समाविष्ट करू शकतात. महिंद्रा सीआयई एक मल्टी-टेक्नॉलॉजी ऑटोमोटिव्ह घटक पुरवठादार आहे आणि वाहन बाजारासाठी घटक आणि उप-असेंबली अव्वल माहिर आहे. Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified. |
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील एक मजली असलेल्या कौलारू घरास शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले. वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर ,निराबाई भोईर व कैलास भोईर यांचे एक मजली कौलारू घर आहे. सकाळी साडेनऊ वाजता वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटने अचानक आग लागली व पाहता पाहता आग संपूर्ण घरात पसरली. कैलास भोईर यांच्या दोन मुलांची नुकतीच लग्न झाली असून लग्नात मिळालेला आहेर, वातानुकूलित यंत्र यांनीही पेट घेतल्याने कॉम्प्रेसर मधील गॅसचा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले. आगीची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी नारपोली पोलिसांसह अग्निशमन दलास पाचारण केले व त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते . या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी केली असून मौजे पूर्णाचे तलाठी सुधाकर कामठी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे. |
सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंर्या बाजाराचे वेध लागत असतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगर्या बाजाराची परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणार्या भोंगर्या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्या पर्वतरांगेत पावरा, पाडवी, गावीत, भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या जमातीत दिवाळी आणि होळी या सणांना असाधारण असे महत्त्व आहे. सातपुड्यात असलेल्या आदिवासी पाड्यात विविध ठिकाणी पाच दिवसाचा होळी सण साजरा केला जातो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पध्दतीने आदिवासीबांधव सपत्नीक होळीचे पुजन करतात. होळी प्रज्वलीत झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरूष मोहाच्या फूलांची दारू (कच्ची दारू) सेवन करून ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी ही समजूत आदिवासी बांधवांमध्ये आहे. होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पध्दत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी जाऊन फाग मागत असतात. देणगी गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो. 'होळी' ही पोरब राजाची मुलगीः 'होळी' ही पोरब नामक राजाची मुलगी होती. दिसायला ती सुंदर तर होतीच सोबत ती अनेक कलांगुणांनी निपुण होती. ती एका 'भोंगडा' नामक आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडते. तो बांबूपासून वस्तू तयार करण्याचे काम करीत असतो. त्याची कला पाहुन ती फारच भारावून गेली असते. मात्र एका देवाच्या मुलीचे एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडणे, हे इतर देवांना मान्य नव्हते. त्यामुळे राजा पोरब त्या दोघांमध्ये येऊन उभा ठाकतो. मात्र होळीचे प्रेम हे निस्सिम होते. आपले प्रेम खरे आहे, हे सिध्द करण्यासाठी ती अग्नीच्या पेटत्या ज्वालांमध्ये उडी घेते. मात्र तिचे प्रेम सत्य असल्यामुळे ती अग्निज्वालातून जिवंत चालत येते. हा चमत्कार पाहून पोरब राजाला त्याची चूक कळते व तो तिचा विवाह बांबूपासून वस्तू तयार करणार्या आदिवासी तरूणाशी लावून देतो. अशा प्रकारची आख्यायिका आदिवासी बांधव सांगतात. यावरूनच तरूण- तरूणींना आपल्या मनासारखा जीवनसोबती मिळावा म्हणून होळीला आदिवासी भागात भोंगर्या बाजाराची परंपरा दृढ झाली आहे. भोंगर्या बाजारः 'भोंगर्या' हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला 'बाजार' (जत्रा) होय. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आदिवासी पाड्यांचे मुखीया नदी काठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेत असतात. होळी सणाअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. आदिवासी तरूण- तरूणी मोठ्या संख्येने या बाजारात उपस्थित होत असतात. प्रत्येक गावातून आठ ते दहा गृप नाचण्यासाठी येत असतात. भोंगर्या बाजारात होळीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी केले जाते. नारळ, खोबरे, दाळ्या, गूळ, साखरेचे हार, कपडे, रंगीत कागद, रंग आदी वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपाआपल्या गावात परततात. होळीच्या दिवशी जंगलात जाऊन बांबूची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी जाळतात. त्या अगोदर त्यांची पूजा केली जाते. ढोलीला नवीन चामडे चढवतात. जीवनसाठी निवडण्याची परंपराःफाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला आदिवासी बांधव 'होळी' सण साजरा करीत असतात. होळी सणा अगोदर भरविण्यात येणार्या भोंगर्या बागारात आदिवासी समाजात तरूण- तरूणी मनासारखा जीवनसाथी निवडत असतात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विवाहइच्छूक तरूण-तरूणी सजून धजून या बाजारात मोठ्याप्रमाणात सहभागी होत असतात. आवडत्या तरूणीला याबाजारातून पळवून नेण्याचीही फार प्राचीन प्रथा आहे. म्हणून या बाजाराला काही भागात 'भगोरिया बाजार' ही म्हटले जाते. या बाजाराच्या निमित्तानेच वर्षातून एकदाच आदिवासी समाजात विवाह जुळत असतात. अग्नीची पूजा करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक होळीद्वारे आपली संस्कृती आजही जपत आहे. हे मात्र तेवढेच खरे. खरं तर होळी म्हणजे जाती-धर्माच्या भिंती ओलांडून साजरा होणारा लोकोत्सवच आहे. म्हणूनच तर होळी म्हणजे आदिवासींचा दीपोत्सवच आहे, असे म्हटले जाते. |
सातारा (प्रतिनिधी) - सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांना या विभागातील अभ्यासाअंती छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून माध्यमिकचे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये डीवायएसपी पदी निवड झालेले अमर माहिते, पुजा नांगरे आणि अमोल जंगले यांचा समावेश आहे. या कालावधीत त्यांनी शिक्षणाधिकारी (माध्य) राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांची माहिती घेतली. यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, एम. ई. पी. एस. कायदा व नियम, माहिती अधिकार, माध्यमिक शाळा वार्षिक तपासणी, मोफत पाठ्यपुस्तक व पुस्तकपेढी योजना, इन्स्पायर ऍवॉर्ड, उपशिक्षणाधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, अधीक्षक (रा. प. ) यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, विस्तार अधिकारी यांचे कामकाज व विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, रमेश चव्हाण आणि अधिक्षक हेमंत खाडे यांचे त्यांना सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव, टंकलेखन संस्था तसेच माध्यमिक शाळांनाही क्षेत्रभेटी देवून तेथील कामकाज समजून घेतले. शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे दालनात प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी तिघांनीही मनोगतात स्पष्ट केले की, राज्यात 50 हून अधिक उपशिक्षणाधिकारी विविध जिल्ह्यात प्रशिक्षण घेत आहेत. सातारा माध्यमिक विभागाने तयार केलेला आराखडा सर्व बॅचला उपयोगी ठरत आहे. अमर मोहिते व पुजा नांगरे यांनी स्वरचित काव्यवाचन केले. अमर मोहिते म्हणाले, डीवायएसपी पदासाठी निवड झालो असली तरी पुढील आदेश येईपर्यंत उपशिक्षणाधिकारी पदाचे उर्वरित प्रशिक्षण घेणार आहे. यापुढे तिघेही प्राथमिक विभागात व त्यानंतर सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिक्षण विभागातील विविध पदांच्या जबाबदाऱ्या पाहणार आहेत. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी उषा कुंभारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुजाता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत जगदाळे, मनिषा चंदुरे, मंगल मोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मारुती सपकाळ व इतर कर्मचारी उपस्थित होते. |
Solar Flare Impact : अमेरिकनं अंतराळ संस्था नासाने (NASA) सूर्यावरील स्फोटाचा फोटो शेअर केला आहे. रविवारी (2 ऑक्टोबर) सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट झाला. नासा संस्थेने हा क्षण टिपला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने (NASA) सांगितलं की 2 ऑक्टोबर रोजी सूर्यावर मोठं सौरवादळ उत्पन्न झालं. यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयर (Solar Flare) तयार झाल्या. नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेच्या साहाय्याने या घटनेचा फोटो टिपण्यात यश मिळालं. सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करून सौरवादळाची फोटो टिपला होता. त्याच महिन्यात, CESSI जे सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सने या भारतीय संस्थेने सूर्याच्या पृष्ठभागावर भविष्यात होणाऱ्या उद्रेकाबाबत शक्यता असल्याचं सांगितलं होतं. पृथ्वीला धोका? येत्या काही दिवसांत सूर्यावर असे अनेक स्फोट होऊ शकतात, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याचं कारण म्हणजे सूर्याचा एक भाग पृथ्वीच्या दिशेने आहे आणि सूर्याच्या या भागात स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी धोक्याची शक्यता आणखी वाढली आहे. सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे काय? सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. याचं रुपांतर नंतर सौर वादळात होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात, यावरून तुम्ही या धोकादायकचा अंदाज लावू शकता. जेव्हा सूर्यावरील वायूंच्या घर्षण होऊन स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने फेकल्या जातात. सौरवादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? सौरज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होईल. या सौरज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. |
पर्थ - आजपासून पर्थच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगला आहे. भारत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघ विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात खेळत आहे, तर भारताकडून सलामीचाच कसोटी सामना मायभूमीतच ऑस्ट्रेलियाने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा मानस आहे. पण विराटच्या दिशेने या सामन्यात नाणेफेकीचा डाव मात्र झुकला नाही आणि नकोशा यादीत त्याला स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणेफेक गमावून विराट कोहलीने एक विचित्र विक्रम केला. विराट कोहलीने एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा नाणेफेक गमावली. विराट कोहली हा नाणेफेकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा कमनशिबी भारतीय कर्णधार ठरला. या आधी २०१० मध्ये १२ कसोटी सामन्यात महेंद्रसिंग धोनी नाणेफेक हरला होता, तर सौरव गांगुली २००२ साली ११ वेळा नाणेफेकीत पराभूत झाला होता. |
मुंबई। मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सध्या ईडीची मोठी कारवाई सूरू आहे. ईडीने आज प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर धाड टाकली आहे. आज सकाळपासून ईडीचे अधिकारी याप्रकरणी तपास करत आहेत. तसेच सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याही घरी ईडीने धाड मारली आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेना प्रवक्ते आणि आमदार असले तरी ते बांधकाम व्यावसायिकही आहेत. त्यामुळे त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केली असावी म्हणूनच ईडीने ही धाड टाकली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. ईडीने धाड नेमकी कोणत्या कारणासाठी टाकला? हे काही काळाने स्पष्ट होईल. सरनाईक शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या मुंबईसह ठाण्यातील एकूण १० ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे. या सर्व प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं कारवाई केली तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे. प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही, असं आवाहन संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. सरकार आणि सरकारशी संबंधित लोकांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. मात्र, कितीही त्रास द्या, कितीही खोटे गु,न्हे दाखल करा, कितीही खोटे कागदपत्र तयार करा, पण शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा एकही आमदार भाजपच्या हाती लागणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. 2 महिन्यात राज्यात सत्तापालट होऊन भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट झाली आहे. त्यातूनच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाची भाषा आमच्यासमोर करु नका, असा दम संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना भरला आहे. पुढील पाच नाही तर आता भाजपनं पुढील २५ वर्षे सत्तेची स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. धक्कादायक! से. क्सची इच्छा वाढवण्यासाठी या अभिनेत्री ड्र. ग्ज घेतात? |
दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह 'प्लेआॅफ' गाठण्याचे 'लक्ष्य' आखले आहे. मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह 'प्लेआॅफ' गाठण्याचे 'लक्ष्य' आखले आहे. रॉयल्सने सलग पाच सामने जिंकून विजयी सुरुवात केली, पण त्यानंतर ओळीने तीन सामने गमावले. शिवाय दोन सामने पावसात वाहून गेले. रविवारी या संघाने दिल्लीवर विजय नोंदवित विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणली. शेन वाटसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सचे मनसुबे हैदराबादला नमवून प्लेआॅफ गाठण्याचे असतील. सनरायझर्सची वाटचाल चढउताराची ठरली. १६ एप्रिलला विशाखापट्टणममध्ये रॉयल्सने हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी हैदराबादकडे असेल. सनरायझर्स सांघिक खेळात अपयशी ठरले. शनिवारी अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चेन्नईवर २२ धावांनी विजय मिळविला; पण केकेआरकडून पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स संघ कर्णधार डेव्हिड वॉर्नर तसेच शिखर धवन यांच्यावर विसंबून आहे. हे दोघे चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरताच अन्य फलंदाज नांगी टाकतात. डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि प्रवीण कुमार यांच्या उपस्थितीत संघाचा वेगवान मारा भक्कम आहे. पण फिरकी मारा कमकुवत वाटतो. ही उणीव दूर करण्यासाठी लेगस्पिनर कर्ण शर्माच्या जोडीला डावखुरा विपुल शर्मा याचा संघात समावेश करण्यात आला. रॉयल्सकडे स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकणारा अजिंक्य रहाणे, कर्णधार वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांचा भरणा आहे. संजू सॅमसन तसेच करुण नायर यांनीदेखील प्रभावी कामगिरी केल्याने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांवरील ताण कमी झाला. गोलंदाजीत या संघाकडे टीम साऊदी, धवल कुलकर्णी व खुद्द वॉटसन हे विरोधी फलंदाजांना घाम फोडू शकतात. (वृत्तसंस्था) राजस्थान रॉयल्स आणि सनराइझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ६ लढती झाल्या आहेत. यामध्ये राजस्थानने ४ तर हैदराबादने २ सामन्यांत विजय संपादन केला आहे. शेन वॉटसन : (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युुआॅन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू. डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोझेस हेनरिक्स, इयान मॉर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशीष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, लक्ष्मीरतन शुक्ला, प्रवीण कुमार, हनुमान विहारी, प्रशांत पद्मनाभन व सिद्धार्थ कौल. |
ठाण्यात टोलमुक्तीसाठी भाजपच्या नगरसेवकाचे सरकारविरोधात आंदोलन ! ठाणेः "सरकारमध्ये नसताना टोल बंद करूअश्या घोषणा देणारे आता गप्प का" तसेच "टोल लूटमार बंद करा " अशा घोषणा देत कोपरीकर आक्रमक होऊन ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सकाळी आनंद नगर येथील टोल नाक्यावर टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी आंदोलन करण्यात केले आणि ठाण्यातील भाजपचे नगररसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडून भाजपा चक्क सरकारला घरचा आहेर दिला आहे. या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला आहे.राज्यात भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र चार वर्ष पूर्ण होऊनही ठाणे जिल्ह्याजवळ टोलनाके अद्याप सुरु आहेत असा सवाल नागरिकांनी यावेळी केला . सरकार सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वतःकडे असताना देखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत असा संतप्त सवाल करत कोपरीकर नागरिक आनंदनगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी धडकले. आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवसातून अनेकदा हा टोलनाका ओलांडावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला नाही तर मोठे जन आंदोलन छेडू असा कडक इशारा स्थानिक नगरसेवक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांनी सरकारला दिला आहे. चव्हान हे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले नगरसेवक असून त्यांनी सोमवारी केलेल्या आंदोलनामुळे भाजपा आणि शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात देखील कोपरी आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोल पासून 10 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असताना सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्ती टोल वसूल केला जातो.कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. कोपरीकरानी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना घोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी तोल न भरता मुंबई शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊन देखील कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न स्वप्नच राहिले. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशे व्यतिरिक्त काहीच पडले नाही. त्यामुळे जन आक्रोश वाढत गेला व संतप्त कोपरीकरांनी आनंदनगर चेकनाक्यावर धडक दिली.शासनाचा अधिसूचना धुडकावून लोकांची लूट करणाऱ्या या टोलवाल्यानी कोपरीकरांना लवकरच टोलमुक्ती द्यावी अन्यथा याहून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला. |
SKK/ SBT/ MHM/ ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) पूर्वी श्री. सरफरे..... श्री.पांडुरंग फुंडकर (पुढे सुरु... अशा परिस्थितीत आज महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये, नागपूर नगरीमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होत असताना नागपूर शहरामध्ये पोलिसांनी उच्छाद मांडलेला आहे. तेव्हा या विषयावर सभागृहामध्ये चर्चा व्हावी... सभापती : सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना विनंती आहे की, प्रस्तावावर चर्चा होत असतांना त्यांनी सविस्तर सगळे मुद्दे मांडावेत. श्री.पांडुरंग फुंडकर : सभापती महोदय, या प्रस्तावावर चर्चा व्हावी, अशी विनंती करतो. प्रा.जोगेंद्र कवाडे : सभापती महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जो स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे,त्या संदर्भात बोलायचे झाले तर संपूर्ण महाराष्ट्राचे सरकार..त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील गृह खाते हे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहिलेले आहे. नागपूर शहराला पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आणलेले आहे. 10 लाख पोलीस आणि एस. आर. पी.च्या बटालियन, रॅपिड अॅक्शन फोर्स येथें तैनात केला आहे. शिस्तबध्द पध्दतीने मोर्चा निघणार असताना त्या मोर्चाला बंदी घालण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या गृह खात्याने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने खैरलांजी हत्याकांड प्रकरणामध्ये काहीही लक्ष घातले नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये जातीयवादी शक्तींनी अत्यंत निघृणपणे भोतमांगे कुंटुंबाचा मुडदा सभापती : सन्माननीय सदस्यांनी ज्यावेळेस प्रस्तावावर चर्चा होईल, त्यावेळेस सर्व तपशील मांडावा. आता 289 अन्वये प्रस्ताव दिलेला आहे, त्या अनुषंगाने प्रश्नोत्तराचा तास तहकूब करुन प्रस्ताव घेण्याच्या संबंधातच सन्माननीय सदस्यांनी बोलावे. जोगेंद्र कवाडे : सभागृहासमोरील प्रश्नोत्तराचाच तास नाही तर सभागृहासमोरील सर्व ठेवून केवळ खैरलांजीमध्ये घडलेल्या प्रकरणाच्या विषयावर चर्चा व्हावी. महाराष्ट्र सरकार हे जातीयवादी आहे, महाराष्ट्राचे गृह खाते जातीयवादी पध्दतीने दलितांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा माझा आरोप आहे. मला लक्षात आणून द्यावयाचे आहे की, दलितांवर अत्त्याचार होतात त्यावेळेस तेथे दहा पोलिसही पाठविले जात नाहीत. या संदर्भाने मोर्चा निघणार म्हटल्यानंतर पोलिसांचा आतंकवाद सुरू केलेला आहे. यामध्ये दलित भोतमांगे कुटुंब बळी पडलेले आहे, ही लोकशाही आघाडी सरकारला शोभा देणारी बाब नाही, तर ती शरमेची बाब आहे. खैरलांजी हत्त्याकांडामध्ये पोलिसांनी अत्याचार केलेला आहे. म्हणून माझे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र सरकार हे सत्तेमध्ये रहाण्याच्या लायकीचे नाही, हे सरकार बरखास्त केले असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही |
शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर तालुक्यातील महिलांना व महिला बचत गटांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीत व शिरूर तालुक्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आज शिरूर तालुका यशस्वी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने तहसीलदार लैला शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी औद्योगिक क्षेत्रात स्थानिक बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार या आदेशानुसार स्थानिक महिला बचत गटांना रोजगार योजनेत समाविष्ट करावे असे आदेशही दिले आहेत. त्यानुसार शिरूर तालुक्यातील महिलांना औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. "शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट असून या बचत गटातील अनेक महिलांना विविध प्रशिक्षण दिलेले आहेत याचा फायदा रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करताना होणार असून स्थानिक तरुणांना बरोबर महिलांनाही औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून द्यावा. -नम्रता गवारी (सचिव यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन, शिरूर तालुका) याबाबत शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार लैला शेख यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सचिव नम्रता गवारी, पुष्पा जाधव, शारदा भुजबळ, ज्योती गेजगे, प्रियंका अभंग उपस्थित होत्या. जगावर कोरोनाची महाभयंकर संकट निर्माण झाले आहे. आपल्या देशात बेकारी निर्माण झालेली आहे. छोटे-मोठे उद्योग बंद झालेले आहे तरी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची एमआयडीसी मध्ये आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी धाडसी पाऊल उचलले आहे . या औद्योगिक वसाहतींमध्ये महिलांनाही ही रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी महिला बचत गट यांनाही रोजगार उपलब्ध करावा. यासाठी यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने अनेक महिलांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण पण हि दिलेले आहेत. अशा महिलांना औद्योगिक वसाहतीत कंपन्यांमध्ये सामावून घेता येईल. असे या निवेदनात म्हटले आहे. |
बुलढाणा पेपरफुटीचे प्रकरण आता आणखीन वाढलेले दिसत आहेत. काल पोलिसांनी अजून दोघांना या संदर्भात अटक केली आहे. दोन्ही आरोपी लोणार ताल्यक्यातील एका खाजगी शाळेतील शिक्षक असल्याचे कळले आहे, या पेपरफुटी प्रकरणात आता एकूण सात आरोपी झाले असून या प्रकरणामध्ये अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. शकील शे. मुनाफ राहणार लोणार , आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण राहणार सावरगाव तेली,तालुका लोणार अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. बारावी परीक्षेचा गणित विषयाची प्रश्नपत्रिकेतील दोन पाने हि सिंदखेड राजा तालुक्यातल्या एका परीक्षेच्या केंद्रावरून व्हायरल झाली होती, यासंदर्भातली बातमी सर्व प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. पण याविषयीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत राज्यात पोचलेली नव्हती. म्हणूनच बारावी गणिताचा पेपर परत घेणार नसल्याचे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले होते. पण मुंबईच्या काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गणिताचा पेपरची काही पाने आढळल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. त्यामुळे बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी आता मुंबईचा संबंध दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांचा संबंध असल्यामुळे अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण तपास आता क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. बुलढाण्यातील कथित पेपरफुटीप्रकरणी पेपर फुटला नसल्याचा दावा बोर्डाने केला होता. हे ही वाचाः काय आहे प्रकरण? बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणित विषयाचा पेपर परीक्षा सुरु झाल्यानंतर वीस ते तीस मिनिटांत पेपर फुटल्याची चर्चा सुरु होती. गणिताचा पेपर सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. या पेपर फुटीचा विषय विधानसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला होता. या वर्षी बोर्डाच्या सर्व खबरदारी घेऊन पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या आधीच पेपर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षण मंडळ एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी विविध उपाय करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांची पथके या बरोबरच भरारी पथके, बैठे पथक परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे थेट परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येत आहे. म्हणूनच आता शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. |
शाखेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे चोरीच्या मोटारसायकल घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. औरंगाबाद शहरातून गेल्या सहा महिन्यात पाचशेपेक्षा अधिक मोटारसायकली दिवसा ढवळ्या चोरीला गेल्या. मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण पोलिसांपुढे एक आव्हानच होते. या चोऱ्यांचे आव्हान स्वीकारून औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना नुकतेच मोठे रॅकेटच हाती लागले आहे. या रॅकेटचे कनेक्शन थेट सटाणा असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी शहरात सापळा रचून भाक्षी रोडवरील सागर अहिरे, बस स्थानक मागील शिवाजीनगरमधून अर्जुन पवार या दोघा चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच औरंगाबाद शहरामधून चोरी करून सटाण्यात विक्र ी केलेल्या पाच पल्सर, एक बुलेट आणि एक यामाहा एफ झेड जप्त केल्या आहेत. तसेच वणी येथे विकलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या मोटारसायकल रॅकेटमध्ये सटाण्यातील एक जण अद्याप फरार असून प्रतिष्ठित घरातील काही तरु ण या रॅकेटमध्ये कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. |
भंडाऱ्यातील प्रीती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी अंतिम सुनावणी घेताना आज हा निकाल दिला. भंडाऱ्यातील प्रीती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी अंतिम सुनावणी घेताना आज हा निकाल दिला. तीन वर्षांपूर्वी, ३० जुलै २०१५ या दिवशी एसी दुरुस्तीच्या बहाण्याने आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी रात्री आठच्या सुमारास तकिया वॉर्डातील रुपेश बारिया यांच्या घरात प्रवेश करत एकूण तीन जणांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चोरट्यांनी रुपेश बारिया यांच्या पत्नी प्रीती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या वेळी त्यांचा मुलगा भव्य बारिया (९) याच्याही डोक्यात हातोडीने वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला. बारिया यांच्या घरातून दरोडेखोरांनी सोने-चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. बारिया यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी शेख आणि राऊत यांनी दुपारी दोनच्या सुमाराला म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी चोरी केली. एसी दुरुस्तीच्या बहाण्याने गेलेल्या शेख आणि राऊत यांनी शिंदे यांच्या घरी एकटीच असलेली त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने हल्ला केला आणि घरातील दागदागिने, लॅपटॉप आणि एटीएमकार्ड चोरले. या हल्ल्यामुळे अश्विनीला कायमचे अपंगत्व आले होते. या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी रवींद्र शिंदे यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरले होते. या कार्डमधून त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याद्वारे पोलिसांनी त्यांच्या लोकेशनला छडा लावला आणि त्यांना अटक केली. शेख आणि राऊतविरोधात पोलिसांनी कलम ३०२, ३०७, ३९७ आणि ४५२ अंतर्गत गुन्हे नोंदवले. या प्रकरणात एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच जप्त केलेल्या हातोडीच्या आधारेही त्यांचा दोष सिद्ध झाला. आज या खटल्यातील अंतिम सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा ठोठावली. |
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी बोगस आहे, तर आम्ही विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी बोगस आहे, तर आम्ही विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. त्याचवेळी कायदेतज्ज्ञ म्हणतात की, बोगस पदवी घेणा-यांवर कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे. समाजमनातील या विविध प्रतिक्रिया. . तावडे कोणते मॉडेल आणताहेत? पदवीच्या बोगस प्रमाणपत्राच्या विषयावर दिल्लीच्या एका माजी मंत्र्याला तुरुंगात जावे लागले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचेही प्रकरण असेच गाजत आहे. तावडे यांनी घेतलेली पदवी ही असेच प्रकरण आहे. त्यातच ज्या संस्थेला कोणतीही मान्यता नाही तिची पदवी घेऊन त्याचा अभिमान बाळगत असतील तर तर राज्यात कोणते मॉडेल उभे करू इच्छित आहेत? बोगस पदवी आहे हे आता त्यांना मान्यच करावे लागणार आहे, त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडून येणा-या आदेशापूर्वी राजीनामा द्यावा यातच त्यांचे हित आहे. शिक्षणमंत्री म्हणून आदर्श काय घ्यायचा? राज्याचे शिक्षणमंत्रीच जर बोगस आणि कोणत्याही विद्यापीठ आदी संस्थेची मान्यता नसलेली पदवी घेतल्याचे सांगून फसगत करत असतील तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा? शिक्षणमंत्री म्हणून त्यांची खूप मोठी जबाबदारी राज्याच्या शिक्षणासाठी असते. याचे भान त्यांना असायला हवे. मात्र पदवी पूर्णपणे बोगस असतानाही ते समर्थन करतात ही बाब योग्य नाही. कोणत्याही संस्थेची मान्यता नसतानाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे एखाद्या खासगी संस्थेच्या घरगुती अभ्यासक्रमाला पदवी म्हणत असतील तर तो गुन्हा आहे. त्यामुळे ते स्वतःच नियम पायदळी तुडवत आहेत, असेच म्हणावे लागेल. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी झाल्यास आणखीही काही बाबी उघड होतील. त्यातही त्यांच्याकडून पदवी म्हणून नोंद करण्याचा गुन्हाच झालेला असल्याने त्यांनी या प्रकरणी राज्यातील सर्व जनतेची माफी मागावी. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे हसे होत आहे. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठ हे विद्यापीठ म्हणून त्याला मान्यता नसतानाही त्याला जर शिक्षणमंत्री म्हणून विद्यापीठ संबोधत असतील तर ही मोठी गंभीर बाब आहे. एखाद्या संस्थेला आणि तिच्या खासगी शिकवणीला जर पदवी म्हणता येत असेल तर मग उद्या खासगी क्लासेसवाल्यांनी दावा केला तर शिक्षणमंत्री म्हणून तावडे मान्य करून घेतील काय, ज्ञानेश्वर विद्यापीठ ही खासगी संस्था आहे. यामुळे अशा संस्थेच्या कागदपत्रांचा वापर पदवी म्हणून करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे तावडे यांच्या सर्वच प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. |
चुंबकीय द्रवगतिकी - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nचुंबकीय द्रवगतिकी : (मॅग्नेटो-हायड्रोडायनॅमिक्स, MHD). द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थाच्या विद्युत् भारित कणांच्या चुंबकीय क्षेत्रामधील गतीच्या शास्त्राला अत्यंत व्यापक अर्थाने चुंबकीय द्रवगतिकी असे म्हणतात. केव्हा केव्हा वायुरूप पदार्थांच्या बाबतीत चुंबकीय वायुगतिकी ही विशेष संज्ञा वापरली जाते. या दृष्टीने प्रस्तुत विषयाला चुंबकीय द्रायुगतिकी हे नाव अधिक समर्पक होईल.\nया विषयाच्या अभ्यासाला प्रथम मायकेल फॅराडे (१७९१ - १८३७) यांनी सुरुवात केली. आरंभीच्या प्रयोगांत पारा किंवा वितळविलेला सोडियम यासारख्या द्रवरूप धातूंचा उपयोग करीत, परंतु सध्या प्रामुख्याने वायूंबद्दलच संशोधन चालू आहे.\nविश्वोत्पत्तिशास्त्र, चुंबकीय वादळे, ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशांत आढळणारा विविध रंगी आविष्कार), व्हॅन एलन प्रारण पट्ट [→ प्रारण पट्ट], आयनांबराद्वारे (पृथ्वीपासून सु. ८० ते ३०० किमी. उंचीमधील विद्युत् संवाहक हवेच्या थराद्वारे) रेडिओ तरंगाचे प्रसारण, अति-उष्ण आयनद्रायूची चुंबकीय क्षेत्रजन्य साठवण [→ आयनद्रायु भौतिकी], अणुकेंद्रीय संघटनाद्वारे (दोन अणूंचा संयोग होऊन) निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊर्जेचा औद्योगिक उपयोग, अणुऊर्जेवर चालणारी अवकाशयाने, चुंबकीय द्रवगतिकीय पद्धतीने विद्युत् निर्मिती, चुंबकीय द्रवगतिकीय धारवा (यंत्रातील फिरता दंड योग्य स्थितीत राहण्यासाठी दिलेला आधार), दाबमापक आणि पंप यांसारखी साधने इ. विविध वैज्ञानिक व तांत्रिक चुंबकीय द्रवगतिकीच्या तत्त्वांचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे या विषयाच्या अभ्यासाला हल्ली फार महत्त्व प्राप्त झाले आहे.\nद्रायूंच्या (वायू व द्रव या प्रवाही पदार्थांच्या) प्रवाहाला द्रायुगतिकीचे नियम लागू होतात [→ द्रायुयामिकी], पण द्रायूत विद्युत् भारित कण असल्यास त्यांची गती विद्युत् गतिकीच्या सिद्धांतांनुसार असते. तेव्हा चुंबकीय द्रवगतिकीचे नियम हे द्रायुगतिकी व विद्युत् गतिकी यांचे नियम व त्या नियमांचे अन्योन्य परिणाम यांवरून सिद्ध होतील, हे उघड आहे.\nवायुकणावर गुरुत्त्वाकर्षणाची प्रेरणाही लागू होत असल्याने तिचाही परिणाम लक्षात घेणे जरूर आहे. परंतु सर्वसामान्य प्रयोगात ही प्रेरणा तुलनात्मक दृष्टीने फार दुर्बल असते. तेव्हा ती दुर्लक्षणीय मानून गतिविषयक समीकरणे सुलभ करता येतात. परंतु सूर्य किंवा इतर प्रचंड ताऱ्यांच्या अंतर्भागात गुरुत्वाकर्षण खूपच प्रभावी होते, तेथे ही प्रेरणा विचारात घेऊन निष्पन्न होणारी समीकरणे वापरावी लागतात.\nसर्वसामान्य दाबाखाली व सर्वसामान्य तापमानाला वायूंचे कण बव्हंशी निर्भारित असतात. पण तापमान उच्च (५,०००° से. किंवा अधिक) असल्यास वायुकणांची औष्णिक गती खूपच जोरदार होते. मग त्या कणांच्या टकरींमुळे त्यांच्या अणूतील (एक वा अधिक) इलेक्ट्रॉन अणूपासून फुटून निघतात. म्हणजेच वायूमध्ये आयन (विद्युत् भारित कण) निर्माण होतात व त्यामुळे वायू विद्युत् संवाहक (ज्यामधून विद्युत् प्रवाह सुलभपणे जाऊ शकतो असे) बनतात. अशा आयनयुक्त वायूला आयनद्रायू असे म्हणतात. अशा आयनद्रायूच्या गतीचा अभ्यास हाच प्रस्तूत नोंदीचा विषय आहे.\nमूलभूत संकल्पना : आयनद्रायूमधील कणांची संख्या फार प्रचंड असते. प्रत्येक कणावर लागू होणाऱ्या प्रेरणांच्या महत्ता सामान्यतः वेगळ्याच असणार. प्रत्येक कणावरील प्रेरणा लक्षात घेऊन त्याचे गतिविषयक समीकरण मांडता येईल व अशा सर्व समीकरणांच्या साहाय्याने त्या द्रायूची गती अगदी तपशीलवारपणे निश्चित करता येईल. या पद्धतीला सूक्ष्ममानीय पद्धती असे म्हणतात. या पद्धतीने प्रत्येक कणाची गती बिनचूकपणाने ज्ञात होऊ शकते. पण एकूण समीकरणांची संख्या इतकी प्रचंड होईल की, ती सोडविणे अव्यवहार्य व अशक्यप्रायही आहे. तेव्हा काही प्रमाणात बिनचूकपणाचा त्याग करून द्रायूतील कणांच्या गतीचा सरासरीने विचार करणे, हाच व्यवहार्य व उपयुक्त मार्ग स्वीकारावा लागतो. याकरिता एकूण द्रायू छोट्या छोट्या विभागांत (कोशिकांत) विभागला आहे, अशी कल्पना करू. या कोशिकांचे आकारमान इतके लहान असावे की, त्यांत द्रायूची घनता सर्वत्र समान आहे असे मानता यावे. पण आकारमान फारच लहानही नसावे, ते इतपत मोठे असावे की, त्यातील कणांच्या गतिविषयक राशींमधील अनियत वधघट सरासरीने पाहता उपेक्षणीय ठरावी. अशा सुयोग्य आकारमानाच्या कोशिकांची निवड बहुधा करता येते. वैयक्तिक कणाऐवजी या कोशिकांच्या गतीचा विचार करणे यालाच स्थूलमानीय दृष्टिकोन म्हणतात.\nअशा प्रत्येक कोशिकेची वस्तुमान घनता (कोशिकेतील एकूण कणांचे वस्तुमान भागिले कोशिकेचे आकारमान) ρ व कोशिकेतील कणांचा सरासरी वेग u हा विचारात घ्यावयाचा असतो. हा सरासरी वेग कोणत्याही एका कणाच्या वेगाहून खूपच वेगळा असू शकतो. उदा., वाहत्या पाण्यात बुचाचा तुकडा तरंगत असेल, तर त्या तुकड्याचा वेग हा पाण्याच्या रेणूंच्या सरासरी वेगाइतका असेल, परंतु प्रत्येक रेणूचा वेग त्याहून खूपच जास्त असतो. ⇨द्रव्यांच्या गत्यात्मक सिद्धांतानुसार रेणूचा यदृच्छ वेग सु. ३०० मी. /से. इतका असेल. तापमान वाढले की हा यदृच्छ वेगही वाढतो आणि दाबही वाढतो. मग रेणूंच्या होणाऱ्या टकरांमध्ये ते परस्परांवर जास्त जोरदार प्रेरणा लागू करू लागतात. त्यामुळे या दाबातील फेरबदलाला विशेष महत्त्व येते.\nप्राथमिक समीकरणाची सिद्धता : अशी कल्पना करा की, एका विशिष्ट कोशिकेतील कणांना १, २, ३,..., i,...असे क्रमांक दिले. त्यांपैकी कोणताही i क्रमांकाचा कण विचारात घ्या. त्याचे वस्तुमान mi आहे व त्याच्यावरील निष्पन्न प्रेरणा (लागू होणाऱ्या सर्व प्रेरणांची सदिश बेरीज म्हणजे महत्ता व दिशा लक्षात घेऊन केलेली बेरीज) fi आहे असे समजू. मग न्यूटन यांच्या दुसऱ्या गतिविषयक नियमानुसार या कणाचा प्रवेग ai हा,\nया समीकरणाने दिला जाईल. कणावर लागू होणाऱ्या प्रेरणा चार प्रकारच्या असतील. (१) दाबजन्य, (२) गुरुत्वीय व कण विद्युत् भारित असेल तर, (३) विद्युत् क्षेत्रजन्य व (४) चुंबकीय क्षेत्रजन्य. चुंबकीय क्षेत्रजन्य प्रेरणा फक्त गतिमान विद्युत् भारावरच लागू होऊ शकते. कणावरील विद्युत् भार q व त्याचा वेग u असून त्याच्या भोवतीच्या विद्युत् क्षेत्राची तीव्रता E व चुंबकीय क्षेत्राची तीव्रता B असल्यास त्याच्यावरील विद्युत् चुंबकीय प्रेरणाfही\nf = q ( E + u X B) ... ... ... (२)\nया सदिश समीकरणाने दिली जाते. [येथे u × B हा u व B या सदिशांचा फुली गुणाकार असल्याने त्याची दिशा u व B या दोघांनाही लंब असते, → सदिश]. या प्रेरणेला लोरेन्ट्स प्रेरणा असे म्हणतात.\nस्थूलमानीय पद्धतीने विचार करता u ऐवजी कोशिकेतील कणांचा सरासरी वेग u हा विचारात घ्यावा लागेल. कोशिकेतील कणांवरील सरासरी प्रेरणा आणि सरासरी प्रवेग u यांना जोडणारे समीकरण (गुरुत्वाकर्षण दुर्लक्षणीय मानल्यास)\nù = ( 1/ρ )(δ p + σ E + j X B) ... (३)\nअसे येईल. येथे δp ही कोशिकेच्या दोन बाजूंवरील दाबांमधील फरकामुळे उत्पन्न होणारी प्रेरणा आहे व σ ही कोशिकेतील विद्युत् भार घनता (कोशिकेतील एकूण विद्युत् भार भागिले कोशिकेचे आकारमान) व j ही कोशिकेतील विद्युत् प्रवाह घनता (विद्युत् भारित कणांच्या गतींमुळे कोशिकेतून जाणारा विद्युत् प्रवाह भागिले कोशिकेच्या लंब काटछेदाचे क्षेत्रफळ) होय. जरूर तर या समीकरणात उजव्या बाजूला गुरुत्वीय प्रेरणा व्यक्त करणारे जादा पद घालता येईल. हे समीकरण म्हणजे चुंबकीय द्रवगतिकीतील प्राथमिक समीकरण होय. विशिष्ट परिस्थितीत हे समीकरण यापेक्षाही सोपे करता येते.\nकाही आसन्नीकरणे : (१) अनेकदा प्रयोगात घेतलेल्या वायूचे तीव्र आयनीकरण झालेले असते. त्यामुळे तो चांगला विद्युत् संवाहक बनतो. मग अल्प तीव्रतेच्या विद्युत् क्षेत्रामुळेही वायूमध्ये जोरदार विद्युत् प्रवाह सुरू होऊन त्यामुळे विद्युत् क्षेत्र निर्माण करणाऱ्या विद्युत् भारांचे निराकरण होते. अशा तऱ्हेने विद्युत् भार घनतेचे मान अत्यंत अल्प होते. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्युत् क्षेत्रजन्य प्रेरणा दुर्लक्षणीय मानता येते.\n(२) आयनीकरण तीव्र असल्यास त्याला आदर्श विद्युत् संवाहक मानता येईल (आसन्नीकरणाने). अशा परिस्थितीत वायूच्या प्रवाहाबरोबर त्याच्या भोवतीच्या चुंबकीय क्षेत्ररेषाही त्याच वेगाने पुढे जातात. (हे गणिताने सिद्ध करता येते).\nआयनद्रायुगतिकीशी संबंधित आविष्कार : (१) आयनद्रायूचे स्वनिर्मित आकुंचन, (२) अणुकेंद्रीय संघटन विक्रियेने ऊर्जा निर्माण करण्याच्या साधनात उपयोगात आणली जाणारी चुंबकीय कोष (स्टेलेरेटर) योजना, (३) आयनद्रायूतील आयनांची गती, (४) चुंबकीय दर्पण योजना, (५) आयनद्रायूमधील आंदोलने, या आविष्कारांसंबंधीचे विवेचन 'आयनद्रायू भौतिकी' या नोंदीत पहावे. या आविष्कारांच्या बाबतीत काही जादा विवेचन पुढे दिले आहे.\nअणुकेंद्रीय संघटनाच्या विक्रियेपासून औद्योगिक उपयोगासाठी ऊर्जा मिळविण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. ही पद्धत लाभदायी होण्यासाठी हायड्रोजनाच्या दोन समस्थानिकांचे (एकच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अणू एक कोटी अंश से. या तापमानाला पुरेसा वेळ ठेवणे आवश्यक असते. परंतु इतका अतितप्त द्रायू कोणत्या प्रकारच्या पात्रात ठेवावयाचा ही मुख्य अडचण आहे. त्यासाठी चुंबकीय परिरोध (अडकवून ठेवण्याच्या) पद्धतीचा उपयोग करणे योग्य दिसते. या पद्धतीत अतितप्त द्रायू जणू काही चुंबकीय क्षेत्ररेषांनी बनलेल्या (काल्पनिक) पात्रात साठविला जातो. अशा दोन साठवणांचे विवेचन 'आयनद्रायू भौतिकी' या नोंदीत दिलेले आहेच.\nअशा सर्व साधनांत एक अडचण उभी राहते ती ही की, साठवणांतील द्रायूच्या अंगभूत अस्थिरतेमुळे द्रायू फारच अल्प काळपर्यंत (१०-३ से. ते १०-६ से.) एकत्रित राहतो. हा काळ वाढवावयाचा म्हणजे द्रायूची अस्थिरता कमी केली पाहिजे. यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले गेले. यामधील सामान्य तत्त्व म्हणजे परिरोधित द्रायूभोवतालच्या चुंबकीय रेषांना जास्त उपयुक्त आकार देणे, हे होय. या नव्या प्रकल्पात रशियन शास्त्रज्ञांनी बनविलेले टोकामॅक हे साठविण्याचे साधन जास्त उपयुक्त ठरावे अशी कल्पना आहे आणि म्हणून त्याची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयोग सुरू आहेत.\nचुंबकीय द्रायुतरंग : चुंबकीय द्रायुतरंग हे अल्प परमप्रसराचे (कणाचे मूळ स्थितीपासून होणारे कमाल स्थानांतरण) असतील, तर त्यांचे तीन प्रकार असतात. अवतरंग (ज्या तरंगात आंदोलने तरंगगतीला लंब असतात), अनुतरंग (ज्यात आंदोलने तरंगगतीला समांतर असतात) व व्यावर्तन (पिळाकार) तरंग हे ते प्रकार होत.\nया तरंगांची यंत्रणा सुलभतेने समजावी यासाठी दोन कल्पनांचा उपयोग करतात. एक म्हणजे संपूर्णपणे विद्युत् संवाहक द्रायूच्या कणांचे विस्थापन केल्यास त्यांच्याबरोबर संबंधित चुंबकीय क्षेत्ररेषांचेही त्याच दिशेने व त्याच मानाने विस्थापन होते. दुसरी कल्पना म्हणजे चुंबकीय क्षेत्ररेषांची (ताणलेल्या रबराच्या पट्टीप्रमाणे) आकुंचन पावून आपली लांबी कमी करण्याची प्रवृत्ती असते. त्याचबरोबर या रेषा आपल्या शेजारच्या रेषांवर लंबदिशेने दाब देत असतात. या कल्पनांच्या साहाय्याने अवतरंगांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येईल. समजा की, आ. १ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे आयनद्रायूमधील चुंबकीय क्षेत्ररेषा आडव्या आहेत व द्रायुकणांच्या उभ्या स्तरांना एकाआड एक वर व खाली अशी विस्थापने दिली. मग द्रायुकणाबरोबर क्षेत्ररेषांचेही तसेच विस्थापन होऊन त्यांचा आकार आ. १ (आ) मध्ये दाखविल्याप्रमाणे होतील. यामुळे छेडलेल्या तारेप्रमाणे क्षेत्ररेषा आंदोलने करू लागतील. त्यानुसार शेजारचे द्रायुकणही आंदोलने करू लागून द्रायूमध्ये क्षेत्ररेषांच्या दिशेने प्रसारित होणारा अवतरंग उत्पन्न होईल. या तरंगांची कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या आंदोलनांची संख्या)fव तरंगलांबी (दोन लागोपाठच्या सारख्याच स्थितीतील कणांमधील अंतर) λ असेल तर\nतरंगाचा वेग = f· λ =\n√ - 4 π ρ\nयेथे ρ वस्तुमान घनता व B चुंबकीय क्षेत्राची तीव्रता होय.\nआ. २ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे क्षेत्ररेषा उभ्या व समांतर असून द्रायूचे एकाआड एक उभे स्तर अनुक्रमे परस्परांजवळ व परस्परांपासून दूर नेले तर त्यामुळे चुंबकीय क्षेत्ररेषांचेही तसेच विस्थापन होऊन त्यांचा आकृतिबंध आ.२ (आ) प्रमाणे बनेल. त्या रेषा परत पूर्व स्थळी येण्याचा प्रयत्न करतील व आपल्याबरोबर तेथील द्रायूकणांनाही त्याच दिशेने खेचतील. अशा तऱ्हेने द्रायूत (आडव्या दिशेने) आंदोलने निर्माण होऊन त्या दिशेने अनुतरंग प्रसारित होईल.\nतरंगांचे विविध प्रकार : चुंबकीय क्षेत्रात आयनद्रायुकणांची गती भोवतालच्या विद्युत् चुंबकीय क्षेत्रांशी निगडित झालेली असते. त्यामुळे त्यात नेहमीपेक्षा काही वेगळ्या प्रकारचे तरंग प्रस्थापित होऊ शकतात. चढत्या कंप्रतेनुसार या तरंगांचे स्थूलमानाने चार टप्पे मानता येतात.\n(१) पहिला किमान कंप्रतेचा टप्पा म्हणजे आयनद्रायुकणांच्या परस्परांमधील टकरींची (सरासरी) कंप्रता. (२) द्रायूतील आयनांची सायक्लोट्रॉन कंप्रता आयनांचा विद्युत् भार आणि M-वस्तुमान) हा दुसरा टप्पा. (३) इलेक्ट्रॉनांची सायक्लोट्रॉन कंप्रता इलेक्ट्रॉनाचा विद्युत भार आणि m - वस्तुमान). (४) आयनद्रायूमधील इलेक्ट्रॉनांच्या नैसर्गिक आंदोलनांची कंप्रता = सु. ५ X १०१० हर्ट्झ ( n - द्रायूच्या प्रतिएकक घनफळातील इलेक्ट्रॉन संख्या). (आयनांची सायक्लोट्रॉन कंप्रता आणि इलेक्ट्रॉनांची सायक्लोट्रॉन कंप्रता यांचे स्पष्टीकरण पुढील परिच्छेदात दिले आहे).\nपहिल्या टप्प्यापेक्षा कमी कंप्रतेच्या तरंगांचे आयनद्रायूतील प्रसारण हे पूर्णपणे ध्वनितरंगांच्या वायूतील प्रसारणासारखेच होते. आयनद्रायूची घनता जास्त असून तापमान कमी असेल, तर त्यात असे तरंग संभवतात. या दोन टप्प्यांमधील कंप्रतांचे तरंग आल्फव्हेन तरंग म्हणून ओळखले जातात. हे तरंग म्हणजे चुंबकीय द्रायुगतिकीचे एक खास वैशिष्ट्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्ररेषांची छेडलेल्या तारेसारखी जी आंदोलने होतात त्यामुळे द्रायूत हे तरंग निर्माण होतात. ते चुंबकीय क्षेत्ररेषांच्या दिशेनेच जातात.\nआयन आणि इलेक्ट्रॉन सायक्लोट्रॉन तरंग : तरंगाची कंप्रता पहिल्या टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत वाढवीत गेल्यास, आल्फव्हेन तरंगांचे दोन वृत्तध्रुवित (ज्यामध्ये द्रवाचे कण तरंगांच्या प्रसारणाच्या दिशेभोवती वर्तुळाकार फिरत असतात) तरंगांमध्ये द्विभंजन होते. एका तरंगांतील वर्तुळाकार गती आयनाच्या गतीच्या दिशेप्रमाणे व दुसऱ्यातील त्याच्या विरुद्ध दिशेने असते. यांतील पहिल्या तरंगांना आयन सायक्लोट्रॉन तरंग व दुसऱ्याला इलेक्ट्रॉन सायक्लोट्रॉन तरंग असे म्हणतात. पहिल्याची कंप्रता fi पेक्षा कमी असते. रेडिओमध्ये कित्येकदा आयनांवरातील प्रक्रियांमुळे शिटीसारखे आवाज येतात. त्यांचे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉन सायक्लोट्रॉन तरंगावरून देता येते.\nविद्युत चुंबकीय तरंग : आयनद्रायूमधून विद्युत् चुंबकीय तरंगांच्या होणाऱ्या प्रसारणाबद्दल 'आयनद्रायू भौतिकी ' आणि 'आयनांबर' या नोंदी पहाव्या.\nपृथ्वीचे चुंबकत्व : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची उपपत्ती ही अद्याप न सुटलेली समस्या आहे. चुंबकीय द्रायुगतिकीनुसार दिलेली उपपत्ती सध्या सामान्यपणे मान्य झालेली आहे. पृथ्वीच्या अंतर्भागात १,८०० किमी. च्या खाली द्रवरूप लोह व निकेल या धातू आहेत. त्यांतील अनेक अणूंचे आयनीकरण झालेले आहे. त्यांच्या संनयन प्रवाहामुळे (द्रवातील उष्ण भाग वर येऊन त्याची जागा थंड भागाने घेतल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहामुळे) विद्युत् प्रवाह तयार होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे स्वयं-उत्तेजित जनित्राप्रमाणे (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राप्रमाणे) विद्युत् प्रवाह चालू राहतो व त्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र प्रस्थापित होते. हे विद्युत् प्रवाह चालू राहण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा पृथ्वीच्या वलनापासून व पृथ्वीच्या अंतर्भागातील किरणोत्सर्गी (आपोआप भेदक किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्यांमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेतून मिळते. या आयनद्रायूतील आवर्तांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आढळून येणारे स्थानिक स्वरूपाचे फेरफार निर्माण होतात.\nचुंबकीय वादळे आणि त्यांच्याशी निगडित आविष्कार : सूर्यापासून प्रोटॉनांचा (हायड्रोजनाच्या विदलित म्हणजे इलेक्ट्रॉन अलग झालेल्या अणूंचा) प्रवाह बाहेर पडत असतो. त्याला सौरवात असे म्हणतात. केव्हा केव्हा हा प्रवाह फारच जोरदार होतो व त्याबरोबर सूर्याशी संबद्ध चुंबकीय क्षेत्रही पृथ्वीकडे प्रसारित होते. यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अचानक मोठे बदल झालेले अनुभवाला येतात. यांनाच चुंबकीय वादळे असे म्हणतात. या प्रोटॉन प्रवाहांचे कित्येकदा फार दूरगामी परिणाम होतात. उदा., ध्रुवीय प्रकाश जास्त तेजस्वी होतात. दूर अंतरावरील रेडिओ संदेश खंडित होतात. या प्रोटॉन प्रवाहामुळे दूरध्वनीच्या तारांत विद्युत् प्रवाह प्रवर्तित होऊन दूरध्वनी संदेशसुद्धा ऐकू येईनासे होतात. त्याचप्रकारे विद्युत् ऊर्जावाहकात प्रवर्तित झालेल्या विद्युत् प्रवाहांमुळे वीजपुरवठासुद्धा केव्हा केव्हा खंडित होतो. हे सर्व परिणाम चुंबकीय द्रायुगतिकीच्या साहाय्याने समजू शकतात.\nत्याचप्रमाणे चुंबकीय वादळाबरोबरच केव्हा केव्हा विश्वकिरणांची (बाह्य अवकाशातून येणाऱ्या अतिशय भेदक किरणांची) तीव्रता एकदम कमी झालेली आढळते. याला 'फॉरबुश परिणाम' असे म्हणतात. विश्वकिरणांची तीव्रता नेहमीच विषुववृत्तावर कमी असून ती ध्रुवांकडे वाढत जाते. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पृथ्वीकडे येणाऱ्या विश्वकिरणांची तीव्रता पूर्वेकडून येणाऱ्या विश्वकिरणांपेक्षा २०% जास्त असते. हे सर्व आयनद्रायुगतिकीचेच आविष्कार होत.\nव्हॅन एलन प्रारण पट्ट : आयनद्रायुगतिकीनुसार विशिष्ट ऊर्जेचे विद्युत् भारित कण विशिष्ट तीव्रतेच्या चुंबकीय क्षेत्रात जणू काही अडकून बसतात. व्हॅन एलन व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, विषुववृत्तावर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी ४,००० किमी. उंचीवर १ ते १०० Mev ऊर्जेचे प्रोटॉन (Mev म्हणजे दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट हे ऊर्जेचे एकक असून ते १·६०२०३ X १०-१२ अर्ग बरोबर आहे) व सरासरी २०,००० किमी. उंचीवर १ ते १० Mev ऊर्जेचे प्रोटॉन अडकून त्यांची पृथ्वीभोवती वलये बनलेली आहेत. [→ प्रारण पट्ट] .\nविश्वकिरणांची ऊर्जा : विश्वकिरणांतर्गत कणांना इतकी प्रचंड ऊर्जा प्राप्त होण्याची यंत्रणा अद्याप नीट समजलेली नाही. याबद्दल फेर्मी यांनी एक उपपत्ती सुचविली आहे. प्रकाशवेगाशी तुलनीय वेगाने जाणाऱ्या विद्युत् भारित कणांचे जेव्हा गतिमान चुंबकीय 'आरशा' वरून परावर्तन होते तेव्हा त्या कणांची ऊर्जा वाढते हे चुंबकीय द्रवगतिकीवरून सिद्ध करता येते. आंतरतारकीय अवकाशात गतिमान आयनांचे मेघ व त्यांच्याशी संलग्न चुंबकीय क्षेत्रे विखुरलेली आहेत. ही क्षेत्रे गतिमान चुंबकीय आरशाप्रमाणे कार्य करतात. प्रारंभीचे (कमी ऊर्जेचे) विश्वकिरण कण पृथ्वीवर येईतो अशा आरशावरून अनेकदा परावर्तन पावतात व अशा प्रत्येक परावर्तनात त्यांची ऊर्जा वाढता वाढता शेवटी ती फार प्रचंड होते [→ विश्वकिरण].\nविश्वोत्पत्तिशास्त्र व चुंबकीय द्रवगतिकी : कोनीय संवेगाच्या अक्षय्यतेचा नियम (वलन करणाऱ्या वस्तूचे निरूढी परिबल - म्हणजे कोनीय प्रवेगाला होणाऱ्या विरोधाचे माप - गुणिले तिचा कोनीय वेग ही राशी बाह्य परिबलाच्या अभावी कमी वा जास्त होऊ शकत नाही) सर्व वस्तूंना लागू पडतो तसाच दीर्घिकांनाही (परस्परांशी संबद्ध अशा ताऱ्यांच्या प्रचंड समुदायालाही, उदा., आपल्या आकाशगंगेलाही) लागू पडतो. आकाशात दिसणाऱ्या दीर्घिकांचा हल्लीचा कोनीय संवेग निश्चित करता येतो. त्यावरून गणित करता या दीर्घिकांचा आरंभीच्या अवस्थेतील कोनीय संवेग हल्लीपेक्षा सु. ५ अब्जपट जास्त असला पाहिजे असे दिसून येते. म्हणजेच ह्या दीर्घिका निर्माण झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्या कोनीय संवेगात फार प्रचंड घट झालेली आहे. या घटीची मीमांसा चुंबकीय द्रवगतिकीनुसार पुढीलप्रमाणे करता येते. दीर्घिकेतील एखादा तारा चुंबकीय वायुमेघात जन्माला आला असेल, तर त्याच्या वलनावर भोवतीच्या चुंबकीय क्षेत्राचे गतिविरोधकासारखे कार्य होते आणि त्यामुळे वलन गती व म्हणून कोनीय संवेग कमी होत जातो [→ विश्वोत्पत्तिशास्त्र].\nचुंबकीय द्रवगतिकीचे काही उपयोग : (१) चुंबकीय द्रवगतिकिय जनित्र : तप्त वायूच्या गतिज ऊर्जेचे एकदम विद्युत् ऊर्जेत रूपांतर करण्याचे हे अभिनव साधन आहे. अद्याप याचा पूर्ण विकास झालेला नसला, तरी त्याच्यासंबंधी जोरदार संशोधन चालू आहे.\nप्रचलित पद्धतीच्या जनित्रापेक्षा यामध्ये अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे यात कोठलेच फिरते किंवा हालते भाग नसल्याने घर्षण व त्यामुळे होणारी झीज हे प्रश्नच उत्पन्न होत नाहीत. यात कोठलाही तप्तवायू (उदा., जेट एंजिनातून बाहेर पडणारा वायू) वापरता येतो किंवा थंड वायू कोणत्याही प्रकारच्या इंधनाने अथवा अणुकेंद्रीय विक्रियेने तापवून वापरता येतो. नेहमीचे वायू सु. ३,०००° से. तापमानाला पुरेसे विद्युत् संवाहक होतात. परंतु वायूत अल्प प्रमाणात (सु. १ टक्का) सोडियम वा पोटॅशियमाची वाफ मिसळल्यास सु. १,०००° ते २,०००° से. तापमानाचा वायू सुद्धा चालू शकतो.\nआ. ३ मध्ये अशा जनित्राच्या रचनेची रूपरेषा दाखविली आहे. तप्त वायू उच्च तापमानाला व उच्च दाबात त या पोकळीमध्ये असून तो न या नलिकेने थ या नीच दाब असलेल्या पोकळीमध्ये जाऊ लागतो. यामुळे न मध्ये u या वेगाचा वायुप्रवाह चालू होतो. या प्रवाहाच्या लंबदिशेने B तीव्रतेचे (सु. १०,००० गौस) चुंबकीय क्षेत्र लावल्यास B आणि u या दोहोंना लंबदिशेने कार्य करणारी u × B ही प्रेरणा वायूतील आयनावर लागू होते. त्यामुळे धन व ऋण आयन परस्परांना विरुद्ध दिशेने सरकू लागून नळीत दोन्ही बाजूंना ठेवलेल्या प आणि फ या विद्युत् संवाहकाकडे जातात आणि प व फ यांच्यामध्ये V = D< u × B> व्होल्ट इतका विद्युत् दाब निर्माण होतो. प व फ कोणत्याही विद्युत् उपकरणाला जोडल्यास त्यातून विद्युत् प्रवाह चालू होतो. (येथे D हे प व फ यांमधील अंतर व < u × B> हे u × B चे सरासरी मूल्य होय). या जनित्राचा अंतर्गत विद्युत् रोध फारच अल्प असल्याने त्याला जोडावयाच्या साधनाचा बाह्य रोधही शक्य तितका कमी असणे इष्ट असते. यासाठी अतिसंवाहक [ कित्येक धातूंचा विद्युत् रोध सु. ४° के. या अतिनीच तापमानाला शून्यप्राय होतो व ती धातू मग अतिसंवाहक झाली असे म्हणतात, → अतिसंवाहकता ] पदार्थ वापरणे फायदेशीर होते.\nवर वर्णन केलेले जनित्र एकदिश (एकाच दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह देते. पण चुंबकीय क्षेत्र प्रत्यावर्ती (दिशा एकसारखी उलट सुलट होणारे) असल्यास प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह मिळतो.\nया प्रकारच्या जनित्रांचा अद्याप पूर्ण विकास झालेला नाही. परंतु त्या दृष्टीने जोरात प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एडव्हान्स्ड रिसर्च प्रॉजेक्ट एजन्सी या संस्थेने व विमानदलाने सहकार्य करून ३२,००० किवॉ. शक्तीचे एक जनित्र चालू केलेले आहे.\nया जनित्राच्या बाबतीत दोन मुख्य अडचणींचे निराकरण करणे जरूर आहे. (१) उच्च तापमानाला टिकाव धरतील अशा धातूंच्या पट्ट्या व त्या बसविण्यासाठी उच्च तापमानातही तग धरू शकणारे विद्युत् निरोधक पदार्थ विकसित करणे जरूर आहे. (२) जनित्राचा अत्यंत कमी अंतर्गत रोध ही सुद्धा एक अडचणच आहे.\n(२) चुंबकीय द्रवगतिकीय प्रवाहमापक : वरील रचनेत प व फ यांना एक व्होल्टमापक (विद्युत् दाब मोजणारे उपकरण) जोडून विद्युत् दाबाचे (V चे) मापन करता येईल. परंतु वरील सूत्रानुसार V α u. तेव्हा V वरून u चे मान काढता येईल. या पद्धतीच्या प्रवाहमापकाला विद्युत् चुंबकीय प्रवाहमापक असेही म्हणतात. सध्या असा प्रवाहमापक केशनलिकेतून (अतिशय बारीक व्यासाच्या नलिकेतून) जाणारा रक्ताचा प्रवाह व द्रवरूप धातूंचे प्रवाह मोजण्यासाठी वापरला जात आहे.\n(३) चुंबकीय द्रवगतिकीय पंप : एखादा विद्युत् संवाहक द्रायू u या वेगाने B या u ला लंब असलेल्या चुंबकीय क्षेत्रातून वाहत असेल आणि त्या u व B ला लंब असे E हे विद्युत् क्षेत्र तेथे असेल, तर त्या द्रायूतून जाणाऱ्या विद्युत् प्रवाहाची घनता j = k (E + u × B ) या समीकरणाने दिली जाते (K = द्रायूची संवाहकता) व त्यामुळे द्रायूवरf= j × B ही प्रेरणा कार्य करू लागते. पुरेशी जोरदार असल्यास ही प्रेरणा द्रायूला दाबाच्या विरुद्ध दिशेनेही रेटू शकते. म्हणजेच तिचा उपयोग पंपासारखा होऊ शकतो. या तत्त्वावर कार्य करणाऱ्या पंपाला विद्युत् चुंबकीय पंप असेही म्हणतात. काही अणुभट्ट्यांतील उष्णता बाहेर काढून घेण्यासाठी त्यांच्यामधून द्रवरूप सोडियम धातू खेळविलेली असते. त्यासाठी या पंपाचा उपयोग करतात.\n(४) चुंबकीय द्रवगतिकीय प्रचालन : रॉकेटाचे प्रचालन (पुढे जाण्याची क्रिया) त्याच्या पाठीमागून फार वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूच्या प्रतिक्रियेमुळे होते. या वायूत मोठ्या प्रमाणात आयन असल्यास त्याला सुयोग्य दिशांनी विद्युत् आणि चुंबकीय क्षेत्रे (E व B) लावल्यास त्या वायूवर वरीलप्रमाणेf= j × B ही प्रेरणा कार्य करील. या प्रेरणेची प्रतिक्रिया रॉकेटाला पुढे रेटेल. अशा प्रकारच्या प्रचालनाला विद्युत् चुंबकीय प्रचालन असे म्हणतात. या प्रचालनाच्या पद्धतीत पुन्हा अनेक प्रकार आहेत. परंतु हा सर्व भाग अद्याप प्रायोगिक अवस्थेत आहे [→ रॉकेट विद्युत् चुंबकीय प्रचालन].\nसंदर्भ : 1. Alfven, H. Cosmical Electrodynamics, Oxford, 1950.\n2. Hughes, W. F. Young, F. J. Electromagnetodynamics of Fluids, New York, 1966.\n3. Lichnerowicz, A. Relativistic Hydrodynamics and Magnetohydrodynamics, New York, 1967.\n4. Pai, S. Ι . Magnetogasdynamics, and Plasma Dynamics, Englewood Cliffs, N. J., 1962.\n5. Rosa, R. J. Magnetohydrodynamic Energy Conversion, New York, 1968.\n6. Spitzer, L. Physics of Fully Ionised Gases, New York, 1956.\n7. Thompson, W. B. An Introduction to Plasma Physics, Oxford, 1962.\nपाटणकर, भा. वि. घुणकीकर, ज. तु. |
जेजे इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांनी 'अक्षर घटने'चा एक अभिनव प्रयोग केला. या अक्षर घटनेमध्ये मुंबईतील रचना संसद आणि रहेजा स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट या कला महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा सामील झालेले होते. एकूण ५० विद्यार्थ्यांनी या अक्षर घटनेरूपी उपक्रमात आपली कला सादर केली. यामध्ये त्यांनी 'पांडुरंग' हा शब्द ११ भारतीय लिपींमध्ये लिहिला तसेच १०० टोप्या आणि झेंडय़ावर त्याची कॅलिग्राफी केली. त्यासाठी त्यांनी १५० लांबी आणि पाच फूट रुंदीचा कपडेपट तयार केला. ते सगळं घेऊन हे विद्यार्थी वारीत सहभागी झाले. या सगळ्या विद्यार्थ्यांनी २२ जुलैला सदाशिवनगर येथील रिंगणात आपली कला सादर केली. वारकऱ्यांना त्यांनी 'पांडुरंग' साकारलेले झेंडे आणि टोप्या दिल्या. एखादा कलाकार किंवा चित्रकार सतत काही ना काही तरी वेगळे आणि नवीन असे शोधत असतो. अशीच काही तरी वेगळे साकारण्याची कल्पना प्राध्यापक संतोष क्षीरसागर यांच्या डोक्यात आली. मग त्याला रहेजा आणि रचना संसद कॉलेजच्या अनिल नाहटे आणि वैशाली आंबेरकर या शिक्षकांची साथ मिळाली. कोणत्याही भाषेमध्ये अक्षरं महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक अक्षरे मिळून लिपी बनलेली असते आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये ३६हून जास्त भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची, प्रदेशाची एक वेगळी भाषा. असं म्हणतात की आपल्या देशात दर मैलावर भाषा बदलते. प्रत्येक भाषेची वेगळी लिपी. अक्षर हे दृश्य कलेचे एक माध्यम आहे. हीच विविधतेतील एकता दृश्य माध्यमातून दाखवण्याचा हेतू होता. यासाठी त्यांनी अकरा भारतीय लिपींची निवड केली. एक महिन्या-पासून याची तयारी सुरू होती. या अक्षर घटनेची प्रमुख खुशबू नायक सांगते, वारीला हा जाण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता. अक्षर घटना साकारताना खूप मजा आली. पुढच्या वेळेपासून मोठय़ा प्रमाणावर करायचे आम्ही सगळ्यांनी ठरवले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भक्ती संप्रदायाची ओळख झाली. बाहेरील जगाचा दृश्य तसेच कला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते समजले. पर्यावरणाचे महत्त्व पटले. यादरम्यान विद्यार्थ्यांना खूप चांगले अनुभव आले. लोकांना त्यांची कल्पना खूपच आवडली. ते जेव्हा रिंगणात उभे राहिले तेव्हा काही वारकरी चक्क मुलांच्या पाया पडले. एक पंजाबी कुटुंब त्यांच्याजवळ आले. त्यांना बाकीचं काय लिहिलं होतं ते समजत नव्हतं, पण गुरुमुखीमध्ये 'पांडुरंग' हा शब्द वाचून त्यांना बाकीच्याची कल्पना आली. गावातल्या लोकांनी त्यांनी बनवलेल्या टोप्या आवडीने घेतल्या. महिलांनी त्यांच्या सोबत फुगडय़ा घातल्या. एका वारकऱ्याला त्यांची ही अक्षर घटना इतकी भावली की, पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत तो त्यांच्या सोबत होता. आम्हाला वारीत दिला गेलेला प्रसाद अतिशय आवडला असं आकांक्षा जोशी सांगते. मुलांना कॉलेजचे प्राचार्य वाघमारे यांचेसुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले. |
सलमान खान सध्या 'बिग बॉस 14' होस्ट करतोय. 'बिग बॉस 'चा हा सीझनही गेल्या सीझनइतकाच गाजेल, अशी अपेक्षा होती. पण सध्या तरी टीआरपीच्या रेसमध्ये हा शो फार कमाल दाखवू शकला नाही. पण म्हणून भाईजानची क्रेज कमी झालेली नाही. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल सुरु असतानाही सलमानच्या 1999 साली रिलीज झालेल्या 'हम साथ साथ है' या सिनेमाने जबरदस्त टीआरपी मिळवला आहे. हिंदी मुव्ही चॅनल्सवर या चित्रपटाने धम्माल करत सर्वाधिक टीआरपी मिळवला. टीव्हीवर प्रसारित कार्यक्रमांचे विश्लेषण करणा-या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बार्क) ताज्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. हिंदी मुव्ही चॅनल्समध्ये कायम सोनी मॅक्स व स्टार गोल्डची चलती दिसते. मात्र गेल्या आठवड्यात झी सिनेमाने बाजी मारली. ती सुद्धा 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या जोरावर. झी सिनेमावर प्रसारित झालेला 'हम साथ साथ है' हा सिनेमा सर्वाधिक पाहिला गेला. साहजिकच टीआरपी चार्टवर हा सिनेमा अव्वल स्थानी पोहोचला. सूरज बडजात्याच्या या सिनेमात सैफ अली खान, सलमान खान, मोहनीश बहल, तब्बू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 'हम साथ साथ है' या सिनेमाने टीआरपी शर्यतीत आयपीएल सामन्यांनाही मात दिली. गेल्या आठवड्यात आयपीएल सामन्यांऐवजी 'हम साथ साथ है' सर्वाधिक लोकांनी पाहिला. स्टार गोल्डवर प्रसारित आयपीएल यामुळे दुस-या क्रमांकावर राहिले. टीआरपीत तिसºया क्रमांकावर 'केजीएफ- चॅप्टर 1' तर चौथ्या क्रमांकावर 'हाऊसफुल 4'ने स्थान मिळवले. . . . तर पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार सलमान खानचा 'राधेः योर मोस्ट वांटेड भाई'? क्या बात! आता सलमान खानच्या परिवारानेही खरेदी केली क्रिकेट टीम, क्रिस गेल असणार टीमचा 'बॉस' |
मागील अनेक वर्षांपासून भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. पण, पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वकार युनूस (Waqar Younis) म्हणाले की नजीकच्या काळात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळतील असा त्यांचा विश्वास आहे. दोन्ही देशांतील बहुसंख्य क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेटच्या बाजूने असतील, असे वकार म्हणाले. दोन आशियाई दिग्गजांमधील द्विपक्षीय मालिका ही 'विश्व क्रिकेटमध्ये सर्वात मोठी हिट' ठरेल असे वकार यांचे मत आहे. सीमापारहुन होणाऱ्या दहशतावादी हल्ल्याचं कारण देत भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला आहे आणि दोन्ही देश फक्त आयसीसीच्या स्पर्धेत आमने-सामने येतात. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा यांनीही भारत-पाक क्रिकेट मालिकेला पाठिंबा दर्शवला होता, पण भारतीय खेळाडूंनी सध्याच्या घडीला शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं आणि वकार यांनीही भारत-पाक मालिका व्हायला हवी असं मत व्यक्त केलं आहे. (पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार यूनुस यांचा ट्विटर अकाउंट हॅक; पॉर्न व्हिडिओला केले 'लाईक', किळसवाण्या कृतीमुळे सोडले सोशल मीडिया) "जर तुम्ही जाऊन पाकिस्तान आणि भारत यांनी एकमेकांना खेळावे की नाही याविषयी दोन्ही देशातील लोकांना विचारले तर त्यातील जवळपास 95% लोक सहमत होतील की या दोघांमधील क्रिकेट खेळले जावे," असे वकार यांनी ग्लोफॅन्सला Q टी-20 च्या चॅट शो दरम्यान सांगितले. "इम्रान-कपिल सिरीज किंवा इंडिपेन्डेन्स सिरीज...तुम्हाला जे नाव द्यायचंय ते नाव द्या. पण सध्याच्या घडीला भारत-पाक मालिका खेळवली गेली तर त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना वंचित ठेवू नये म्हणून पाकिस्तान इंडियाने खेळावे आणि नियमितपणे खेळायला हवे, असे मला वाटते. " दरम्यान, जानेवारी 2013 पासून भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. अखेरीस पाकिस्तानने 2 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारताचा दौरा केला होता. 2007-08 हंगामापासून दोन्ही संघ द्विपक्षीय कसोटी मालिकेत भेटले नाहीत. दोन्ही टीम अखेरीस आयसीसी 2019 वर्ल्ड कप सामन्यात आमने-सामने आले होते, ज्यात भारताने पाकिस्तानी टीमचा धुव्वा उडवला होता. |
तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली. औद्योगिक क्षेत्रातील के झोन मध्ये असलेल्या प्लॉट नंबर के. दहा व अकरा मधील खन्ना अॅण्ड खन्ना लिमिटेड या रासायनिक कारखान्याच्या समोरून जाणाºया नाल्यामध्ये विषारी व दुर्गंधीयुक्त वायुमिश्रीत घातक रासायनिक सांडपाणी शनिवारी रात्री अनधिकृतपणे सोडल्याने त्या परिसरातील कारखान्यात काम करणाºया कामगारांना व रस्त्यावरून ये-जा करणाºया असंख्य नागरिकांना डोळ्यांची जळजळ व श्वसनास त्रास, मळमळ इत्यादी प्रकारचे त्रास जाणवू लागल्याने कामगार काम बंद करून सुरक्षित स्थळी पळाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापुर एक चे उप प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर के झोन मधील कारखान्यात जाऊन पाहणी करु न सांड पाण्याचे नमुने घेत होते. त्या दरम्यान त्यांनी खन्ना अॅण्ड खन्ना लिमिटेड या कारखान्याच्या प्रवेशद्वारा जवळील जुन्या व बंद करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या लाईनचे चेम्बर उघडायला लावून पाहणी केली असता त्या बंद परंतु अनिधकृतपणे वापरात असलेल्या लाइन मधील काळ्या व तेलकट रसायनाचा उग्र वास येवून डोळेही चुरचुरत होते. त्याचेही नमूने घेण्यात आले आहेत. घटनास्थळी तारापूर अग्निशमन दलाची एक गाडी व जवान दुपारी साडे बारा पासून तत्परतेने हजर होते तर पोलीस परिसराची पाहणी करून गेले मात्र यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये कुणीही तक्रार नोंदविली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं तर निश्चित घटना काय किती जणांना त्रास झाला. यासंदर्भात प्राथमिक माहितीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही तर यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे सांगितले. तर आॅक्टोबरमध्ये अशीच घटना घडून २१ चिमण्या मेल्या होत्या त्या घटनेची ही पुनरावृत्ती झाली असून तारापूर गॅस चेम्बर बनत असल्याची भीती रहिवाश्यांकडून व कारखानदारांकडून व्यक्त होत आहे . >शनिवार व रविवार या दिवशी प्रशासनाला सुट्टी असते त्यावेळेस मोठया प्रमाणात कारखाने अवैधरित्या प्रदूषण करत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक असताना ते ती घालत नाहीत. - मनीष संखे, अध्यक्ष, - जय किसन यादव, |
पुणे७-धनकवडीतील करंजी, चकली,बेसन लाडू पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे १५० किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलिया तील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सौ. सुलोचना भोसले यांनी आज शनिवारी सांगितली . बचत गटाचे काम करतच तिने दुकानातूनच दिवाळीचा फराळ विक्री करण्याचे तिचे स्वप्न होते. ते तिने प्रत्यक्षात आणले. आणि आत्ता ना नफा -ना तोटा या तत्वावर तिने नागरिकांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ विक्री करण्यास सुरुवातही केली. ही घटना आहे , धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील पुणे महापालिकेच्या कोठीजवळील संकल्प महिला गृहउद्योगाची . आणि त्यांच्या संचालिका सौ. सुलक्षणा भोसले यांची. सौ. भोसले यांनी धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी खास दिवाळीचा मुहूर्त साधून ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहे. त्यांच्या खारी करंजीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गृहउद्योगातर्फे भाजणी चकली , बेसन लाडू, शंकरपाळी , खजूर लाडू , करंजी , अनारसे , रवा लाडू, ओल्या नारळाची करंजी , आदी पदार्थ कमी दारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत. धनकवडी , कात्रज , आंबेगाव , नर्हे आंबेगाव आदी परिसरातील नागरिक हे पदार्थ खरेदी करण्यासाठी येत आहेत. यासंदर्भात बोलताना सौ भोसले यांनी सांगितले कि , अनेक महिलांना नोकरी व अन्य कामामुळे घरी दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड असते. त्यामुळे त्यांना खास घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ दिवाळीसाठी हवे असतात . हे लक्षात घेऊन आम्ही बचतगटाच्या महिलांच्या मदतीने घरीच फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मशीनवरही हे पदार्थ तयार करून मिळतात . पण आम्ही नागरिकांची गरज व मागणी लक्षात ठेवून खास घरीच पदार्थ तयार केले. तसेच माझ्याकडे काम करण्यास येत असलेल्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळेल हे सुद्धा मी ठरवले . सध्या आम्ही ८ - १० महिलांच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार विक्री करत आहोत. या उपक्रमास सौ. मनीषा देशमुख , सौ . चेतना तांबे, सौ. उमा गणगोटे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे. पुणे७-धनकवडीतील करंजी, चकली,बेसन लाडू पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे १५० किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलिया तील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सौ. सुलोचना भोसले यांनी आज शनिवारी सांगितली . |
महाकाय मगरीशी अर्धातास झुंज - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महाकाय मगरीशी अर्धातास झुंज\nमहाकाय मगरीशी अर्धातास झुंज\nPosted: 6:00 AM, 07/06/2017 by Rohan Patil\nमडुरा ः मगरीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली म्हैस.\nबांदा : मडुऱयात मगरींची संख्या आणि त्यांची दहशत वाढतच चालली आहे. गेल्या पाच वर्षांत अंगावर काटा आणणाऱया अनेक घटना घडल्या आहेत. सोमवारी सायंकाळी असाच एक थरार मडुरे परबवाडीतील अनेक ग्रामस्थांनी अनुभवला. स्थानिक ग्रामस्थ उत्तम परब हे सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांची गुरे घेऊन माळरानावर जात असताना नदीपात्रात दबा धरून बसलेल्या एका महाकाय मगरीने गुरांमधील एका गाभण म्हशीवर अचानक हल्ला चढविला. त्यानंतर सुमारे अर्धातास आठ/दहा ग्रामस्थ आणि त्या मगरीत जोरदार संघर्ष झाला. अखेर ती मगर नदीपात्रात पळाली खरी, मात्र म्हशीला जीव गमवावा लागलाच.\nश्री. परब नेहमीप्रमाणे गुरे घेऊन जात होते. नदीपात्रानजीक गुरे पोहोचली असता अचानक गुरांची पळापळ झाली. काय झाले, हे लक्षात येण्यापूर्वीच एका मगरीने एका म्हशीचा जबडाच पकडला होता. महाकाय मगरीच्या ताकदीपुढे त्या म्हशीचे बचावाचे प्रयत्न तोकडे पडले अन् क्षणार्धात ती जमिनीवर आडवी पडली. हादरलेल्या परब यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेथेच काही अंतरावर असलेल्या ग्रामस्थांनी तेथे तात्काळ धाव घेतली अन् सुरू झाला मगर आणि त्या ग्रामस्थांतील संघर्ष. एका बाजूने मगर म्हशीचा जबडा धरून ओढत होती, तर दुसरीकडे म्हशीचे पाय धरून ग्रामस्थ ओढत होते. ग्रामस्थ म्हशीला सोडविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत होते, मात्र महाकाय मगरही म्हशीचा जबडा सोडत नव्हती.\nतोवर आणखी काही ग्रामस्थ तेथे पोहोचताच झालेली आरडाओरड व ग्रामस्थांची संख्या पाहून मगरीने नदीपात्रात पळ काढला. मात्र तोवर ती म्हैस मृत्युमुखी पडली होती. झाल्या प्रकाराने उपस्थित सर्वच ग्रामस्थ हादरून गेले. मडुऱयातील मगरींचे संकट किती गडद झाले आहे, याचा या ग्रामस्थांनी थेट अनुभव घेतला. धाकू गावडे, केशव परब, रामा परब, बाबलो परब, हिरोजी परब, पिंटो परब, दिनेश परब, गुरु मातोंडकर आदींसह अन्य ग्रामस्थांनी थेट मगरीशी दोन हात केले. नंतर संपूर्ण गावात ही बातमी पसरताच तो चर्चेचा विषय ठरला. गुरे चारण्यासाठी नेणे आणि आता पावसाळय़ात शेती करणे किती जोखमीचे आहे, हाच मुद्दा प्रामुख्याने पुढे आला. वनपाल पृथ्वीराज चव्हाण यांनी पंचनामा केला. उत्तम परब यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nयाच गावात गेल्या पाच वर्षांत मगरीच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 15 ते 16 जनावरे या मगरींच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मगरींनी फडशा पाडलेल्या पाळीव कुत्र्यांची संख्या तर खूपच मोठी आहे. गेल्या दोन वर्षांत तर शेतकऱयांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या. एका शेतकरी महिलेची मगरीने पाठ धरली होती. गेल्यावर्षीच शेतकऱयांसमोर एका बैलाला एका महाकाय मगरीने ओढत नदीपात्रात तळाशी नेले होते. मळेवाड येथे तर गेल्या वर्षी पावसाळय़ात एका ओढय़ात गुरांना घेऊन गेलेल्या शेतकऱयालाच ओढून नेण्याचा प्रयत्न एका मगरीने केला होता. यात त्या शेतकऱयाने हात गमावला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव बचावला होता. काही महिन्यांपूर्वीच एका बैलाचा जबडाच एका मगरीने फोडला होता. या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने यावर कायमस्वरुपी उपाय काय, असा सवाल ग्रामस्थ करीत आहे. की एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच मगरींची दखल घेण्यात येणार आहे, असाही ग्रामस्थांचा सवाल आहे. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयपीएसचं प्रशिक्षण पूर्ण करुन सेवेत प्रवेश करणाऱ्या देशभरातल्या 131 IPS अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये 28 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सल्ले देत सूचनाही केल्या. पंतप्रधान म्हणाले, अधिकाऱ्यांनी काम करताना मानवी दृष्टीकोन ठेवावा. फक्त दंडुक्याच्या धाकाने काम शक्य नसतं. सिंघम सारखे चित्रपट पाहून काम करण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे काही पोलीस अधिकारी हे स्वतःला मोठे समजतात. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा बिघडते, असे ते म्हणाले. Tanushree studied about textiles and she trained in Jammu and Kashmir, fighting terror. Here is an interesting interaction between PM @narendramodi and Tanushree. Aditya Mishra serves in the MP cadre. He shared a touching poem liked by an Inspector who was working with him. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, काश्मीर सारख्या राज्यात काम करत असताना तिथल्या अधिकाऱ्यांनी संवाद वाढवावा. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आईची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी आज हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस सेवेत येणाऱ्यांच प्रशिक्षण होत असतं. या अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, गुन्ह्यांची उकल करताना अधिकाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. त्यामुळे कमी वेळात आणि अधिक चांगल्या पद्धतीने ही उकल करता येते. लोकांशी संवाद, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य कठोरता या गुणांच्या बळावर अधिकारी देशाची चांगली सेवा करु शकतात, असंही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (SVPNPA) प्रशिक्षण दरम्यान अधिकाऱ्यांना कायदा, गुन्ह्यांची तपासणी, फॉरेन्सिक, नेतृत्त्व आणि व्यवस्थापन, गुन्हेगारी, सार्वजनिक सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, मानवाधिकार, आधुनिक भारतीय पोलीस प्रणाली, जगात सुरु असलेलं संशोधन अशा सर्व प्रकारांची माहिती दिली जाते. |
नवी दिल्ली, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे. वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिलं असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केलं आहे. 6 जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळावरुन दरवर्षी किमान 56 दशलक्ष प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने विमानतळ सर्व्हिस रेटिंगमध्ये दिल्ली विमानतळाचा दर्जा उत्तम असल्याचं सांगितलं होतं. दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम असल्याची नोंद यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आता वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून सीआयएसफचं कौतुक करण्यात आलं आहे. यानिमित्ताने अजून एक मानाचा तुरा दिल्ली विमानतळ आणि सीआयएसफच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. सीआयएसएफचे महासंचालक ओ पी सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "सेवा आणि सुरक्षेच्या बाबतीत जवानांनी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळावर रोज हजारो प्रवाशांचा सामना करताना, धोक्यांची काळजी घेत असताना जवानांनी नेहमीच आपल्यातील नेतृत्वगुण दाखवत उत्तम कामगिरी केली आहे". दिल्ली विमानतळावर रोज 4000 सीआयएसएफ जवान दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात असतात. "सुरक्षेसाठी तैनात जवानांना अनेकदा जेवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठीही वेळ नाही मिळत. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ते सतत तत्पर असताता", असं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. दिल्लीसह मुबई, चेन्नई आणि कोलकाता विमानतळ संवेदनशील असून नेहमी रडारवर असतात. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमीच या विमानतळांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे यांची सुरक्षा जास्त महत्वाची असते. |
(अरुण कृष्णाजी कांबळे या पानावरून पुनर्निर्देशित) अरुण कृष्णाजी कांबळे (जन्म : करगणी-सांगली जिल्हा, १४ मार्च १९५३; - हैदराबाद, २० डिसेंबर २००९) हे दलित चळवळीचे लढाऊ नेते आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता. |
बेघर आणि भिकाऱ्यांनी देखील देशासाठी काम करायला हवं. राज्य त्यांना सर्व सुविधा देऊ शकत नाही, असं मुंबई हायकोर्टाने आज म्हटलं आहे. Bombay High Court । (Photo Credits: ANI) बेघर आणि भिकाऱ्यांनी देखील देशासाठी काम करायला हवं. राज्य त्यांना सर्व सुविधा पुरवू शकत नाही, असं मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) आज म्हटलं आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश दिपंकर दत्ता (Dipankar Datta) आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी (G S Kulkarni) यांनी हा निर्णय दिला. ही जनहित याचिका ब्रिजेश आर्य (Brijesh Aarya) यांनी दाखल केली असून यात या याचिकेत मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) शहरातील बेघर व्यक्ती, भिकारी आणि गरीबांना तीन वेळेचं जेवण, पाणी, आश्रय आणि स्वच्छ शौचालय उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. एनजीओच्या मदतीने मुंबईतील अशा लोकांना जेवण तसंच महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवले जात असल्याची माहिती बीएमसीने कोर्टाला दिली. पालिकेचा हा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला असून अन्न आणि इतर साहित्य वितरणासंबंधित पुढील निर्देश देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बेघर, भिकारी व्यक्तींनी देखील देशासाठी काही काम केले पाहिजे. प्रत्येकजण कार्यरत आहे. राज्य सर्व काही देऊ शकत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. तसंच आपण केवळ समाजातील अशी (बेघर, भिकारी) लोकसंख्या वाढवत आहात, असं याचिकाकर्त्यांना कोर्टाने सुनावलं आहे. याचिकेत मांडण्यात आलेले सर्वच मुद्दे मान्य करणे म्हणजे लोकांना काम न करण्यास निमंत्रण दिल्यासारखं होईल. तसंच याचिकेत त्रुटी असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. बेघर नक्की कोणाला म्हणावे? शहरात त्यांची संख्या किती? याचा तपशील याचिकेत नाही. (मुंबई मधील अनधिकृत बांधकामाबद्दल BMC काय करत आहे? Bombay High Court चा सवाल) त्याचबरोबर शहरात सार्वजनिक शौचालयं आहेत आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येतं. मात्र बेघर लोकांसाठी हे निःशुल्क उपलब्ध करुन देण्यावर विचार करण्याचे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत. |
उशिरा जागे होणारे प्रशासन ! रुग्णालयांतील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि शासनाचे रुग्णालयांकडे असणारे दुर्लक्ष यांमुळे अशा घटना घडतात ! उशिरा जागे होणारे प्रशासन ! रुग्णालयांतील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि शासनाचे रुग्णालयांकडे असणारे दुर्लक्ष यांमुळे अशा घटना घडतात ! स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद ! या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय धोरणाला सहकार्य करण्यासाठी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम स्थगित. एका ४२ वर्षीय आरोग्य कर्मचार्याचे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसर्या दिवशी छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देहलीमध्ये 'सीट बेल्ट' बांधणे बंधकारक नियमाचे उल्लंघन करणार्यांना एक सहस्र रुपयांचा दंड भरवा लागणार आहे. 'कोव्हिशील्ड' ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही. माझे आरोग्य आता सुधारत आहे. मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. |
राज्यात पाणीटंचाईने मोठी संकटे समोर मांडून ठेवली आहेत; मात्र याचा सर्वाधिक फटका बसतो आहे, तो अर्थातच शेतक-यांना! पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई यामुळे या दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा कोलमडून गेला आहे. पावसानेच दगा दिला, तर आशा तरी कुणाची करायची, या चिंतेत शेतकरी असल्याने त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक वर्षच जणू दुष्काळमय झाले आहे. दुष्काळाने त्याचे जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्याजवळ एकच उपाय उरला आणि तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करणे! गेल्या काही वर्षात राज्यात हजारो शेतक-यांनी आपले आयुष्य संपवले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो; पण आज हाच कणा मोडून पडू लागला, तर अर्थव्यवस्था तरी कशी काय टिकेल, याचा राज्यकर्त्यांनी कधी तरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट गावांमध्ये पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाचा आहे. राज्यात धरणांतील पाणीसाठा झपाटय़ाने खालवत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र बनणार आहे. मराठवाडय़ातील धरणांत अवघा एक टक्का पाणीसाठा असून, अन्य विभागांतही पाणीपातळी धरणांचा तळ गाठू लागली आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मनमाड शहरात २५ दिवसांतून एकदा, तर जळगाव शहरात सात, धुळ्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खो-यातील ३८ धरणांपैकी भीमा खो-यातील तब्बल नऊ, तर कृष्णा खो-यातील एक धरण संपूर्ण रिकामे झाले आहे. या सर्व ३८ धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे. अलीकडच्या काळात माणूस आणि जलस्रेत यांचा एकमेकांशी असलेला संबंधच तुटत आहे. पावसामुळे धरणे जरी भरली, तरी आवश्यक तेवढे पाणी मिळतच नाही. त्यामुळे कायमच टंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पूर्वीच्या काळी खेडी अधिक आणि शहरे अल्प असायची; मात्र आता उलट झाले आहे. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे शहरात ना शुद्ध अन्न, शुद्ध हवा, ना शुद्ध पाणी! शहरांना सिंचनाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठाही अल्प होत आहे. या सर्वाचाच परिणाम म्हणून भविष्यात भीषण अन्नटंचाईलाही सामोरे जावे लागणार आहे. येणारा काळ भयावह असेल, याची काही अंशी तरी कल्पना सध्याच्या दुष्काळावरून करता येईल. सध्याच्या टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जनावरासाठी चारा डेपोमध्ये चारा उपलब्ध करून देण्यात आला असला तरी या दिल्या जात असलेल्या सर्व सोयी- सुविधा अपु-या आहेत. राज्यातील १,५८६ गावे व ४,३०५ वाडय़ांवर पिण्याच्या पाण्याचे दुभिक्ष्य आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील गावांत लोकांना पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी ४-५ मैलांपर्यंत वणवण करावी लागते, तर काही शहरांमध्ये आठवडय़ातून, कधी पंधरवडय़ातून तर काही ठिकाणी महिन्यातून एकदा नळाला पाणी येते. राज्यात १९७२च्या दुष्काळापेक्षा भयावह परिस्थिती आहे. पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. एकवेळेस अन्न मिळेल, पण पाणी मिळेल याची शाश्वती नाही. दुष्काळाने ग्रामीण जनता हैराण आहे. जानेवारीपासूनच महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. टंचाईबाबत सरकार म्हणते, तातडीने उपाय केले आहेत. उपाययोजना काय तर, टँकर सुरू करणे, रोजगार हमीची कामे सुरू करणे, दुष्काळी गावांतील पाणीपट्टी आणि वीजबिल वसुली थांबवली, अशी उत्तरे प्रशासन देते. हे गेल्या चार दशकांपासून चालू आहे. आजची परिस्थिती काय, तर रोजगार हमी योजनेवर काम करायला कोणी तयार नाही. पारंपरिक माती कामावर जाण्याचा कल कमी होत आहे. दुष्काळी भागांतील रिकाम्या हातांना कामे देण्यासाठी आता अन्य पर्याय लागतील. जे कौशल्य त्यांच्यात आहे, त्यानुसार कामे देणे गरजेचे आहे. खेडय़ांतील बलुतेदारी संपली आहे. स्वतःच्याच शेतीमध्ये मशागत करण्यासाठी शेतक-यांना रोजगार हमी योजनेतून निधी द्यावा, अशी मागणी जोर धरते आहे. टंचाई आराखडय़ावर तालुका पातळीवर समन्वय व नियोजन नसल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवते आहे. मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. दरवर्षीच अशी परिस्थिती उद्भवते आणि या समस्येकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ही मानवनिर्मित जलसमस्या म्हणायला हरकत नाही. राज्यात पावसाच्या प्रमाणानुसार दोन भाग पडतात. एक म्हणजे जादा पावसाचा भाग, तर दुसरा कमी पावसाचा भाग. एकीकडे ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यावेळी दुस-या भागात मात्र पाऊस पोहोचलेला नसतो. त्यामुळे काही भागात पाऊस, तर काही भागात दुष्काळ अशी विचित्र परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे आगामी काळात ही स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. राज्यात जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ठिबकसाठीचे अनुदान आदी योजना सरकारतर्फे राबविल्या जात आहेत. या योजना राबवूनही पावसाने दगा दिल्याने योजना कुचकामी ठरल्या. जलयुक्त शिवार योजना झालेल्या गावांनाही पाणी पुरवावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अन्नधान्याचा प्रश्न नाही, समस्या आहे ती पाण्याची. पाणीसाठे आटत आहेत. भूगर्भातील पाणीही कमी होत आहे. पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर वन्यजीवही तहानेने व्याकुळ होत आहेत. अभयारण्यांतील नैसर्गिक पाणवठय़ावरही दुष्काळ दिसून येत आहे. पाण्याचा थेंब ना थेंब वाचला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी जलसंधारणावर सुद्धा भर देण्याची आवश्यकता आहे. पावसाचे पाणी अडविले पाहिजे. काही ठिकाणी हे पाणी पाझर तलाव, धरण, बंधारे घालून अडविण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याने त्याची निर्मिती करूनही पाणी अडलेले नाही. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पावसाअभावी कोरडे ठाक पडले आहेत. पाण्यासाठी काही ठिकाणी जुने स्तोत्र असलेल्या विहीर व विंधन विहीर यांचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे स्तोत्र देखील पाण्याअभावी आटून गेले आहेत. त्यामुळे भविष्यात दुष्काळ हटवण्यासाठी आतापासूनच नियोजन केले, तरच दुष्काळ टाळता येईल. त्यासाठी जागोजागी नदी अडून त्यावर सिमेंट काँक्रीटचे बंधारे घालावेत. त्यामुळे भूजल पातळीवर येण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय परिसरातील शेतीलाही पाणी मिळेल. राज्यात नदी जोड प्रकल्प राबवावा. धरणापासून पाणी नसलेल्या भागात कालवे काढण्याची गरज आहे. |
पुणे : मोशीतील ग्रामदौवत श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. या उत्सवातील यंदाच्या लिलावामध्ये मानाच्या विड्याला तब्बल ८१ लाखांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील उद्योजक अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी घेतला. या विड्यातून महाराजाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना अतिश बारणे आणि अक्षय बारेण यांनी व्यक्त केली. यासोबतच, मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी ३३ लाख ५५ हजार ५५५ रूपये, मानाचे पहिले लिंबू (फळ) १३ लाख २५ हजार रूपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे, दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी ७ लाख ५१ हजारांना तर शेवटचे मानाचे लिंबू १७ लाख रूपयांना निरज सस्ते यांनी बोली लावली. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूं व भंडाऱ्यातील प्रसाद बनवण्याची भाडी व इतर वस्तूंची बोली लावली जाते. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भाडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात. लिलावाच्या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. |
करोनाकाळामध्ये शहरात ठिकठिकाणी कोणतीही नोंदणी नसलेल्या वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. अनधिकृत लॅबच्या प्रश्नावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही, या लॅबची आजतागायत नोंद झालेली नाही. करोनाकाळामध्ये शहरात ठिकठिकाणी कोणतीही नोंदणी नसलेल्या वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. अनधिकृत लॅबच्या प्रश्नावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही, या लॅबची आजतागायत नोंद झालेली नाही. या परिस्थितीचा फायदा घेत काही एमडी पॅथॉलॉजिस्ट एकाच वेळी अनेक ठिकाणी स्वाक्षरी करून आणि प्रत्येक अहवालामागे दरआकारणी करून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. त्यामुळे औषधांच्या दुकानांमधील फार्मासिस्टप्रमाणे पॅथॉलॉजिस्टनाही एकाहून अधिक ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यासंबंधी नियमावली केव्हा करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातून निलंबन झालेला रक्तसंक्रमण अधिकारी मुंबई वगळता इतर अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांवर स्वाक्षरी करताना आढळून आला आहे. यापूर्वीही अशा काही जणांच्या तक्रारी आल्या असल्या, तरीही सर्वसामान्यांच्या जिवाशी निगडित असलेल्या या प्रकरणांमध्ये सरकारने अद्याप निश्चित काहीही भूमिका घेतलेली नाही. वसई विरार महापालिकेमध्ये रजिस्ट्रेशन क्रमाकांची नोंद देणे हे पॅथॉलॉजिस्टसाठी बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे शहरातील कोणत्या लॅबमध्ये कोणता पॅथॉलॉजिस्ट काम करतो, हे शोधणे शक्य होते. त्याच्या वैद्यकीय गुणवत्तेची खातरजमा करणेही शक्य होते. मात्र मुंबईसारख्या महानगरामध्ये असे कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे मुंबईबाहेर अशा डिजिटल स्वाक्षरी ठोकणे, त्यासाठी प्रत्येक अहवालामागे शुल्क आकारणे असे प्रकार घडतात. एवढेच नव्हे, तर वार्षिक रक्कम दिल्यास शुल्कात एक महिन्याची सवलत देण्याच्या 'स्कीम' पॅथॉलॉजिस्टकडून दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. प्रत्येक प्रयोगशाळामध्ये एमडी पॅथॉलॉजिस्ट असणे गरजेचे आहे. या पॅथॉलॉजिस्टने संबंधित व्यक्तीला अहवाल देण्यापूर्वी त्याचे सूक्ष्मदर्शीय अवलोकन (मायक्रोस्कोपी) करणे गरजेचे आहे. कोणती उपकरणे वैद्यकीय चाचण्यांसाठी वापरली जातात, हेदेखील तपासायला हवे. एखाद्या रुग्णाच्या वैद्यकीय निदानाच्या अहवालामध्ये रक्तामध्ये गुठळ्या आहेत असे दिसून आल्यास, त्या गुठळ्या कोणत्या कारणांमुळे निर्माण झाल्या, हे तपासायला हवे. त्याची नेमकी माहिती संबंधितांना द्यायला हवी. यासंदर्भात सर्वसामान्यांनी साक्षर होण्याची गरज अधिकृत पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. लॅबमध्ये गेल्यानंतर तिथे कोणते पॅथॉलॉजिस्ट आहे, यासंदर्भात प्रश्न विचारणे गरजेचे आहे. नमुने घेण्यासाठी घरी येणारी व्यक्ती हे रक्ताचे वा लघवीचे नमुने कोणत्या लॅबमध्ये नेऊन देते, याचीही माहितीही घेणे गरजेचे आहे. मात्र सर्वसामान्यांमध्ये यासंदर्भात जागृती नसल्यामुळे लॅबचालकांच्या संदर्भात कोणतीही विचारणा होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. करोनाकाळामध्ये आरटीपीसीआर, अँटिजन, रक्त चाचण्या अशा अनेक चाचण्या करोना संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जात होत्या. अनेक सोसायट्या, कंपन्यांमध्ये प्रवेशापूर्वी या चाचण्यांची अट घालण्यात आली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन या काळामध्ये मुंबईत उदयाला आलेल्या लॅबचीही तपासणी करण्याची गरज या क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. |
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणा-या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या अशी मागणी आहे. गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणा-यांवर कारवाईची मागणी होत आहे. गडचिरोली : केंद्रीय खत व रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपुरात खत कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. हा कारखाना गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गडचिरोली : जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे. गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणा-यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. हिंदी व बंगालीप्रमाणे माडिया भाषेतून शिक्षणाची सोय करण्याची मागणी आहे. गडचिरोली : शेतीकडे जाणा-या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पाणंद रस्ता म्हटले जाते. या पाणंद रस्त्यांवर शेतक-यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वनकर्मचा-यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचा-यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे. कुरखेडा : जिल्ह्याच्या शहरी भागात हॉटेल, गॅरेज, चहा टप-या व इतर दुकानांमध्ये अल्पवयीन मुले काम करीत आहेत. परिणामी बालमजुरी कायद्याची खुलेआम अवहेलना होत आहे. १६ वर्षाखालील बालकांना तुटपुंजी मजुरी देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाइलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाइल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाइलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे. देसाईगंज : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कच-याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतक-यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. आलापल्ली : अंगणवाडी बालकांना हक्काच्या इमारतीमधून ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी नाबार्ड व जिल्हा विकास निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र बांधकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अनेक अंगणवाडींचे बांधकाम पूर्ण झाले नाही. आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, पांढरे पट्टे दिसत नसल्याने रात्री अपघात होण्याची अधिक शक्यता असते. |
लग्नाच्या चार दिवस आधी अज्ञात हल्लेखोरांनी गुप्तांग कापून जखमी केलेल्या मध्य प्रदेशातील २५ वर्षीय तरुणावर दुसरा मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाच्या नियोजित वधूनं त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. भोपाळः लग्नाच्या चार दिवस आधी अज्ञात हल्लेखोरांनी गुप्तांग कापून जखमी केलेल्या मध्य प्रदेशातील २५ वर्षीय तरुणावर दुसरा मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाच्या नियोजित वधूनं त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. मोरेना जिल्ह्यातील या तरुणाचं उद्या, ६ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होतं. या विवाहाची सर्व तयारीही झाली होती. मात्र, मागील आठवड्यात दोघा अज्ञातांनी हल्ला करून त्याचं गुप्तांग कापून टाकलं. काही कारणामुळं जखमी तरुणावर तातडीनं शस्त्रक्रियाही होऊ शकली नाही. त्यामुळं त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. त्यातच मुलीकडून लग्नाला नकार आला आहे. 'मुलीकडून नकार येणार हे आम्हाला अपेक्षितच होतं. आम्ही मनाची तशी तयारीही केली होती. पण आमच्या मुलाला समजावणं कठीण आहे,' अशी खंत पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली. |
नवी दिल्ली - प्रेषित महंमद यांच्यावर भाजपच्या प्रवक्त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया आल्यामुळेच भाजपला आपल्या प्रवक्त्यांवर कारवाई करणे भाग पडले आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. श्रीमती नुपूर शर्मा आणि नवीन कुमार हे इस्लामोफोबियाचे मूळ निर्माते नव्हते. लक्षात ठेवा, ते राजापेक्षा अधिक निष्ठावान राहण्याचा प्रयत्न करत होते असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे. देशांतर्गत टीकेने भाजपला दोन प्रवक्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास प्रवृत्त केलेले नाही, केवळ आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांमुळे भाजपला ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे की, काही देशांनी भारताच्या माफीची मागणी केली आहे. पण भाजपच्या प्रवक्त्यांमुळे संपुर्ण देशाला माफी मागण्याची वेळ आली आहे. या लोकांच्या वेडेपणाबद्दल भारताने माफी मागण्याची गरज काय असा सवालही खेरा यांनी व्यक्त केला आहे. |
मुंबईः राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता त्याचे हादरे भाजपला बसू लागले आहेत. भाजपने अनपेक्षितरित्या राज्यातील सत्ता गमवल्यानंतर आता पक्षात बरीच धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर कालच आपली नाराजी थेट माध्यमांसमोर व्यक्त करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच आता भाजपला आणि राज्यातील भाजपचे दिग्गज नेते फडणवीस यांना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल भाजपचे १२ आमदार हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे. याशिवाय राज्यसभेचा एक विद्यमान खासदार देखील राजीनामा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. जर एकाच वेळी १२ आमदारांनी राजीनामा देऊ केला तर त्याचा मोठा परिणाम भाजपवर होऊ शकतो. विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या हेतूने भाजपने मोठ्या 'भरती' सुरु केली होती. त्यावेळी भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज आमदारांना फडणवीसांनी भाजपमध्ये प्रवेश दिला होता. राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल अशी अटकळ असलेल्या या आमदारांचा होरा पूर्णपणे चुकला. त्यामुळे आता थेट विरोधात बसावं लागल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे आता यापैकी अनेक आमदार हे पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. यासाठी ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यासही तयार असल्याचं बोलण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा आमदारांना आपल्या पक्षात पुन्हा स्थान देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की, ऐन वेळी पक्षाची साथ सोडून गेलेल्या आमदारांना जर पुन्हा पक्षात घेतलं तर पक्षातील सध्याचे आमदार नाराज होण्याची मोठी शक्यता आहे. अशावेळी या आमदारांना कशा पद्धतीने पक्षात सामावून घ्यायचं याचा देखील विचार तीनही पक्षांना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२ आमदारांपैकी ४ आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता शिवसेना या आमदारांबाबत योग्य तो निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यावा लागणार आहे. जर हे 'ऑपरेशन' यशस्वी झालं तर त्याचा मोठा फटका भाजपला बसेल. त्यामुळे भाजप राज्यात बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल. त्यामुळे आता सगळ्या प्रकारात भाजप डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. |
आम्ही चढत असताना उतरणाऱ्या ट्रेकर्सना मी विचारात होतोच कि किती गर्दी आहे वर? तेव्हा एक दिलासादायक उत्तर मिळाले कि वर जागा नसली लेण्यांमध्ये तरी आता गडावर तंबू भाड्याने मिळतात कॅम्पिंग साठी. अर्थात माझे प्रयत्न लेण्यांमध्ये जागा मिळवण्याचेच होते. गडावर पोचल्यावर मंदिरात न जाता आधी लेण्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी सगळ्यांना लेण्यांकडे पिटाळले. सुदैवाने लेणी रिकामीच होती सगळी. मग पहिल्याच लेण्यामध्ये पथारी पसरली. चटया अन्थरल्याबरोबर सगळे आडवे झाले. जड बॅगा उतरल्यावर खूप बरे वाटले. सगळ्यात मोठे समाधान लेण्यांमध्ये जागा मिळाल्याचे होते. थोडा वेळ आराम केल्यावर सगळे कोकण कड्याकडे निघालो. सगळेच विचारात होते कुठे आहे कोकण कडा... त्यांना बहुधा वाटत होते कि कडा अजून थोध उंचावर असेल अन मी संगत होतो कि थोडी वाट बघा सरप्राईज आहे. आणि चालता चालता समोर कोकण कडा आला. प्रत्येकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मी मनीष आणि वसंत फक्त चेहरे न्याहाळत होतो. ग्रुपमधले दोन तीन जण तर कड्याजवळ येऊन आडवे झाले आणि कड्यावरून खाली बघायला लागले. मला तो दिवस आठवला जेव्हा आम्ही पहिल्यांदा हरिश्चंद्रगडावर आलो होतो. खिरेश्वर मार्गे आल्यामुळे प्रचंड थकलो होतो आणि त्यात कोकण कडा म्हणजे सगळ्या कष्टांच चीज झाल्यासारखं झाला होतं. आजही तेच फिलिंग होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर. कड्यावर थोडावेळ गेला नाही अन एक अजब समस्या उद्भवली... कड्याच्या खाली असलेया मधमाश्यांच्या पोळ्यांपैकी एक मोहोळ उठलं आणि सगळीकडे पळापळ सुरु झाली. खरतर कोकण कड्यावर मधमाश्या नेहमीच्याच पण त्यांना बघून दोघेजण जरा बिथरले आणि पळापळ करायला लागले. त्यांच्या हात झटकण्याने खरोखरच एखादी माशी बिथरली बहुतेक आणि तिने त्याच्या मानेवर एक जळजळीत दंश केला. आता तो बोंबलत सैरावैरा पळत सुटला त्यात आमच्या गँगच्या मर्कटलीला भरीस पडू नयेत म्हणून मी आणि वसंताने सगळ्यांना कड्याच्या उजव्या बाजूला खाली खडकाळ भाग आहे तिथे पिटाळले. ते दोघे अजून पळत होते आणि अम्ही मजा बघत होतो. आता पुन्हा फोटोसेशन चालू झाले. सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढून घेतले. जसा सूर्य क्षितिजाजवळ आला तसे पुन्हा कोकण कड्यावर येऊन ग्रुपचे फोटो काढले आणि थर्मास मध्ये आणलेला चहा(अजून गरम होता, पैसे वसूल झाले म्हणा थर्मासचे) घेतला. आता लेण्यांकडे निघायचे होते. जाता जाता सगळ्यांना रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणासाठी लाकडे जमा करताच यायला सांगितलं. लेण्यांपर्यंत येईपर्यंत बर्यापैकी सरपण जमा केलं सगळ्यांनी. आता जाऊन स्वयम्पाकाची तयारी सुरु केली . तीन दगडांची चूल लेनिसमोर आधीपासूनच होती आता वसंत, मी आणि सागराने लगबगीने सुत्रेहातात घेतली. बाकीचे गप्पाटप्पा करत होते. पण तिघांनी सगळं करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही कामं वाटून दिली. मी, वसंत आणि केतन मंदिराजवळील छोट्या कुंडातून पाणी आणले तोपर्यंत सागराने महिला मंडळाला हाताशी घेऊन चूल पेटवणे, खिचडीसाठी भाज्या कापणे आणि त्याच्या स्पेशल वांग्याच्या भरीतासाठी वांगी भाजून घेणे सुरु केलं. हे सगळं काम चालू असताना प्यायला आणि स्वयंपाकाला पुरेसं पाणी भरून झालं होतं. लेण्यांमध्ये वापरलेल्या पणत्या सापडल्या त्यात स्वयंपाकासाठी आणलेलं तेल भरून लेणी छानशी उजळून काढली त्यामुळे आमच्या चार्जेबल लाईट्सवर थोडा कमी भर आला(तसेही त्या बेभरवश्याच्या असतात हा माझा वयक्तिक अनुभव). वेफर्स, फरसाण खात खात आम्ही स्वयंपाक पूर्ण व्हायची वाट बघत छान चुलीशेजारीच शेकत बसलो. स्वयंपाक झाल्याबरोबर जेवायला बसलो. आणि मुद्दामून तिखटजाळ बनवलेले भरीतही सगळे अधाश्यासारखे खाऊ लागले(सागराच्या हातच्या, चवीला तोड नाही दुसरं काय!). ऐसे सहभोजन पुन्हा होणे नाही! खिचडीभात मात्र बरंच उरला होता. आता उद्याच्या सकाळचा मॅगीचा बेत रद्द करावा लागणार एवढे नक्की होते. जेवणं आटोपली आणि गप्पा मारता मारता झोपले सगळे. पण शांत झोप सगळ्यांच्याच नशिबात नव्हती, रात्री दोघे अज्ञात लेण्यांमध्ये शिरले आणि आतल्या स्वयंपाकघर वजा खोलीत बसून शेकोटी पेटवू लागले. त्यांच्या शेकोटी पेटवण्याच्या उठाठेविंमुळे आणि तुटणाऱ्या लाकडांच्या आवाजांमुळे आमच्यापैकी काहीजणांची झोपमोड झाली. त्याय पुन्हा शेकोटीचा धूर पूर्ण लेण्यामध्ये पसरला आणि डोळ्यांत झोम्बयाला लागला. सगळे प्रचंड वैतागले तेव्हा थोड्यावेळात ते दोघे थोडेसे शांत झाले(आमच्या ग्रुप मध्ये महिला मंडळ नसते तर मी अमोलचे हात आवरू शकलो नसतो अन मनिषचे शब्दिक वार तर निव्वळ असहनीय, जंगलमध्ये सगळं अमंगल झालं असतं ना राव.). 'केव्हातरी पहाटे'ते दोघे निघून गेले आणि आम्ही थोडे शांत झोपलो. |
मुंबई दि. 24 : बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती करण्यात येत आहे, यातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी, या पद्धतीने या रंगमंच कला दालनाचे काम व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह विविध विभागांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कलादालनाचे काम इतके आकर्षित असावे की बाहेरच्या व्यक्तीस आत यावे असे वाटावे आणि आत आलेल्या व्यक्तीस मराठी रंगभूमीची देदीप्यमान वाटचाल अनुभवल्याचा आनंद मिळावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कलादालनाच्या निर्मितीमध्ये नाट्यक्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि मान्यवरांचा सहभाग घेण्यात यावा. मराठी रंगमंच कलादालनात नाटकाचा उगम ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला जावा, संगीत, व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमी, दलित, कामगार नाट्य चळवळ आणि त्याची वैशिष्ट्ये माहित व्हावीत, जेष्ठ मराठी नाटककार, नेपथ्यकार, लेखक, नाट्य कलावंत यांचीही माहिती येथे उत्तम मांडणीतून उपलब्ध व्हावी असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. कलादालनाच्या निर्मितीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विषय वस्तू समितीची (कंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, मुक्ता बर्वे, संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय, मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, उपायुक्त परिमंडळ 1 बृहन्मुंबई महानगरपालिका आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नाट्य क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांना आमंत्रित म्हणून समितीमध्ये निमंत्रित करता येणार आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. विषय वस्तू समितीची पहिली बैठक 27 फेब्रुवारी रोजी असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. |
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील चोरीच्या घटना आणि लुटमार थांबत नसून, आता चोरट्यांनी आपला मोर्चा पार्किंग केलेल्या कारकडे वळविला असून, ईस्कॉन मंदिराजवळ पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून तीन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनेश चंदवाणी (वय 40, रा. कोरेगांव पार्क) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोरेगांव पार्क परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, त्यांनी त्यांची कार ईस्कॉन मंदिराजवळ पार्क केली होती. तर, त्यांच्यासोबतच नितीन जाधव आणि मंगेश गायकवाड यांनीही त्यांच्या कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वेस्टर्न पुतळ्याकडे जाणार्या महात्मा गांधी रोडवर पार्क केल्या होत्या. यादरम्यान, चोरट्यांनी तीनही कारच्या काचा फोडून त्यातील 60 हजार रूपयांचे 3 लॅपटॉप चोरून नेले आहेत. हा सर्व प्रकार 13 ते 23 या कालवधीत घडला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. पीएमपीएल मधील प्रवासादरम्यान महिलांकडील दागिने चोरीचे प्रकार कायम असून, महिलेच्या पर्समधील 43 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बोपोडी परिसरात राहण्यास आहेत. कामानिमित्त स्वारगेट परिसरात आल्या होत्या. त्यांना एफसी रोडला जायचे होते. त्यामुळे त्यांनी स्वारगेटवरून पीएमपी बस पकडली. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. बस येथील वाडेश्वर बस स्टॉपला थांबल्यानंतर फिर्यादी खाली उतरल्या. त्यावेळी त्यांना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत. |
फतेहपुर (राजस्थान) : वृत्तसंस्था - कारमध्ये महिलेचे हातपाय बांधून तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील फतेहपुरमध्ये घडली आहे. ही महिला गुरुवारी लग्न समारंभ उरकून घरी परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकजण सीआरपीएफचा जवान आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पीडित महिला (वय-५६) गुरुवारी एका लग्न सोहळ्यासाठी गेली होती. लग्न सोहळा संपल्यानंतर घरी परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला एका कारमध्ये नेऊन तिचे हातपाय बांदले. आरोपींनी तिच्यावर तिन तास सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढला. आरोपींनी रात्री नऊच्या सुमारास या महिलेले तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून दिले. महिलेने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींनी अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. फतेहपुरचे पोलीस उपायुक्त कुशाल सिंह यांनी सांगितले की, पीडीत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. लग्न समारंभावरुन परतत असताना आरोपींनी पीडित महिलेला घरी सोडतो असे सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने आरोपींनी बळजबरीने तिला कारमध्ये बसवले. आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला रात्रीच्या सुमारास घरी सोडले. या प्रकरणात मनोज जाखड आणि विरेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी ज्यावेळी हे कृत्य केले त्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैंकी मनोज हा सीआरपीएफचा जवान असून त्याला २०१६ मध्ये फरार घोषीत करण्यात आले आहे. त्याच्यावर लक्ष्मणगढ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. |
मुंबई - बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्याने फिल्म प्रोडक्शनमध्येही चांगले यश मिळविले आहे. आता तो तमन्ना भाटिया स्टारर एका कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, रितेश देशमुख हा आपल्या आगामी चित्रपटास स्वतः प्रोड्यूस करत आहे. रितेश देशमुख सध्या एका कॉमेडी चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करत असून यात तो मुख्य भूमिका साकारत आहे. यात त्याच्यासोबत मुख्य नायिका म्हणून तमन्ना भाटिया झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केलेला नाही. दरम्यान, रितेश आणि तमन्ना यांनी 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या "हमशकल्स' चित्रपटात एकत्रित काम केले होते. याशिवाय ही जोडी 2013मध्ये एका ऍक्शन कॉमेडी "हिम्मतवाला'मध्येही झळकली होती. आता परत एकदा रितेश आणि तमन्ना यांची कॉमेडी चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रितेशने यापूर्वी "यलो', "बालक पालक', " माऊली' आणि "फास्टर फेणे' यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता तो एक कॉमेडी चित्रपटाचे प्रोडक्शन करत असून त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाही यात काम करण्याची शक्यता आहे. |
रुपाली आणि वीणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगल्यानंतर रुपालीनं घराची कॅप्टन होण्याचा मान पटकावला आहे. कॅप्टनसीपदासाठी 'समुद्रमंथन' हा टास्क रंगला होता. रुपाली आणि वीणाच्या टीमला प्रत्येकी तीन टास्क देण्यात आले होते. या टास्कदरम्यान ज्या टीमचे गुण अधिक आहेत ती टीम विजयी म्हणून घोषित करण्यात येणार होती. |
आजपर्यंत तुम्ही प्रेमाविषयी खूप कथा कविता पुस्तके वाचली असतील ज्यात प्रियासी आणि प्रियकर दोघेही त्यांच्या नात्याला अस्थित्व मिळवून देण्यासाठी लढत झगडत असतात पण जर त्यातल्या एकाने साथ सोडून कायामच निघून गेला तर कल्पना करा त्याच्या साथीदाराची काय अवस्था होईल काय वेदना होतील त्याला कसा जगेल तो त्याच्या शिवाय ...! तुम्ही त्या दुखाचा अंदाजापन नाही लाऊ शकत. पण काही नाती अशी पण असतात जी कितीही मोठी अडचण आली तरी एकमेकांची साथ सोडत नाही आपल्या जोडीदाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. कितीही मोठ्या अडचणीत सापडलात तरी तुमची प्रियासी तुमची साथ कधी सोडत नाही अगदी घराच्यांच्याही विरोधात जाऊन ती तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करते चला तर मग पाहूया या कहाणीतील लैला मजनूची साथ कशी आहे ते. हि कहाणी आहे रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या सोहम आणि आकांशाची आहे. दोघेही लहानपणापासून एकसोबत होते ते राहायलाहि जवळ-जवळच होते. त्यामुळे त्यांची मैत्री खूप घट्ट जुळलेली होती. ते दोघे एकसोबत शाळेत जायचे, घरी येताना पण दोघे एकसोबातच घरी यायचे शाळेतही ते दोघेच असायचे त्यांच्या मध्ये त्यांनी कधीच कोणा तिसऱ्याला जागा दिली नव्हती. त्यानंतर ते हायस्कूल मध्ये गेले असताना त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला कालपर्यंत जो आकांशा शिवाय राहू शकत नव्हता तो सोहम आज अकांशाला विसरत चालला होता तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच कारण होत त्याच्या नवीन मित्र अस म्हणतात कि चांगल्या सावैपेक्षा वाईट सवाई खूपच लवकर लागतात. सोहमच्या मित्रांनी सोहमाला मुलींविषयी एवढ्या निगेटिव थिंग्स त्याच्या डोक्यात घातल्या होत्या कि तो दुसऱ्या मुलींनाच काय तर तो आकांशाला सुद्धा बोलत नव्हता घरी जाताना रोज आकांशा त्याच्यासाठी थांबत होती पण सोहम तिला पाहून न पाहिल्यासारखे करत होता. आणि हा गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक होते एवढ्या लहान वयामध्ये एवढी विचित्र वागणूक त्याच्या घरच्यांनाही खटकत होती त्यामुळे एकदिवशी सोहमच्या आई-वडिलांनी आकांशाला बोलून घेतले आणि सोहमाच्या बदलत्या वागनुकीबाद्धाल विचारू लागले त्यावर आकांशाने उत्तर दिले कि त्याला जेव्हापासून नवीन मित्र भेटले आहेत तेव्हापासून तो तास वागतो आहे आणि त्याचे आणि माझे बोलणे मागच्या १ महिन्यापासून नाही झाले. हे ऐकून सोहमच्या घरच्यांना धक्काच बसतो हा अचानक असा कसाकाय बदलू शकतो जो मुलगा त्याच्या आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मध्ये कोणा तिसऱ्याला येऊ डेट नव्हता तोच मुलगा आत्ता त्याच बेस्ट फ्रेंडसोबत बोलत नाही त्याच्या आई-वडिलांना सोहमची काळजी वाटू लागली होती. सायंकाळी सोहम घरी आल्यावर त्याला विचारतात हि तू असा का वागतो आहेस काय झाले आहे आणि तू अंकीताशी का बोलत नाहीस तिने आम्हाला आज सांगितल तुमच्या दोघांमध्ये भांडणे झाली आहेत का त्यावर सोहम वर्गांमधल्या मित्रांनी जे काही सांगितल ते सर्व सोहम त्याच्या मम्मी आणि पप्पांना सांगतो. त्यावर सोहमचे वडील त्याला सांगतात कि तू त्या मित्रांशी मैत्री तोडून तक आणि अशा वाईट वळणावर नेणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करू नको आणि सगळ्यात आधी आकांशाला तुझ्या या वागण्यामुले खूप वाईट वाटले आहे त्यामुळे तिला जाऊन sorry म्हण आणि परत अशी चूक होणार नाही याची हमी दे. त्यानंतर सोहम आकांशाला sorry म्हणतो आणि ते दोघे अनुज पाहिल्यासारखे राहतात. या सगळ्यात त्याचं मैत्रीच नात आजू घट्ट झाल होत १० वी नंतर दोघेही ITI करतात आणि सोहमला जॉब साठी बाहेर गावी जाव लागत तो बाहेरगावी जाणार आहे हे ऐकताच आकांशाच्या डोळ्यात पाणी आल आत्तापर्यंतच्या सोबतीमध्ये त्याचं मैत्रीच नात मैत्रीपेक्षा खूप पुढे गेल होत आत्ता ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते हे त्यांनाही माहिती नव्हत कि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. खरतर सोहमच स्वप्न होत कि त्याने गितकार व्हाव खूप गाणी लिहावी आपली पण या जगामध्ये ओळख निर्माण व्हावी मला माझ्या वडिलांच्या नावाने नाही तर माझ्या नावाने वडिलांना ओळखतील अस काही तरी त्याला करायचं होत आणि आकांशाला हि सोहमला मोठा गीतकार झालेलं पहायचं होत पण आकांशा काही सोहमला सांगू शकली नाही. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या इछेचा गळा दाबला आणि तो जॉब करण्यासाठी बाहेर गावी गेला पण तिथेही त्याच कामावर लक्ष लागेना त्याला आकांशाची सारखी आठवण येत होती आणि तो घर सोडून पहिल्यांदाच बाहेर आला होता तो ज्या कंपनी मध्ये जॉब करत होता त्या कंपनी मध्ये २ महिनेपण टिकू शकला नाही त्याने दोनच महिन्यात तो जॉब सोडला आणि घरी निघून आला. सोहमने जे केले ते बरोबरच होते जर एखाद्या कामात जर आपले मन रमत नसेल तर ते काम सोडून दिलेलाच केव्हाही चांगल सोहम घरी सर्वात पहिल्यांदा त्याने अकांशाला विचारले सोहमच्या आईने सांगितले कि आकांश तिच्या रानात गेली आहे हव तर फोन करून बोलून घेते सोहम म्हणाला नको मी तिला रानातच जाऊन भेटतो तस पण मला पप्पांना सांगायचे आहे मी आलेलो. त्यामुळे मीच जाऊन भेटतो त्यांना अस म्हणून तो घरातून निघून जातो रानात गेल्यावर आकांशा सोहमला बघून खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते आणि एका पाठोपाठ प्रश्नांचा भडीमार करते त्याच्यावर एवढ्या उशिरा का आलास मला तुझी खूप आठवण येत होती एवढे दिवस झाले एक फोन पण नाही केला ती अचानक बोलायची थांबते आणि लागून तिथून जाण्यसाठी पुढे पाउल टाकते तेवढ्यात सोमम तिचा हात धरतो आणि मागे खेचतो आणि अकांशाला विचारतो तुला माझी इतकी का आठवण येत होती. आकांशा घाबरलेल्या आवाजामध्ये उत्तर देते तू माझा खूप जवळचा मित्र आहेस न म्हणून आणि आपण दोघे काधीच एकमेकांना सोडू अस लांब राहिलो नाही त्यामुळे जास्तच आठवण येत होती त्यावर सोहम अकांशाला विचारतो तुला मी सारखा तुझ्या जवळ हवा आहे का आकांश त्यावर माल डोलवत हो म्हणते सोहम तिला परत विचारतो आणि अस वाटण्यापाठीमागचे कारण काय आहे आकांशा तिथून लाजून निघून जाते आणि जाता जाता सोहमला म्हणते तुला कारण हव असेल तर वाट बघावी लागेल सोहम आणि आकांशा याच्यामधील प्रेम आत्ता बाहेर यायला लागले होते जे त्यांनी एवढ्या दिवस एकमेकांपासून लपवून ठेवलं होत हे खर आहे कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासमोर आपण आपल्या मनातल त्याच्यासाठीच प्रेम कधीच लपवू शकत नाही आणि ते समोरच्याला कळत असत पण त्यालाही ते दाखवायचं नसत. सोहम जेव्हा सायंकाळी घरी येतो तेव्हा त्याचे वडील त्याच्यावर कूप रागावतात. तो त्याची जॉब सोडून आलेला असतो आणि त्याच्या वडिलांना याची काहीच कल्पना नसते त्यामुळे त्याचं सोहमवर रागवण साहजिकच होत सोहम आणि त्याच्या वडिलांचा आवाज ऐकून आकांशा घरातून बाहेर येते आणि सोहमच्या घरी जाते काय झाल हे बघायला सोहमच्या घरात गेल्यावर आकांशा सोहमच्या वडिलांना विचारते काय झाल काका तुम्ही एवढ्या जोरात कोणाला रागावताय त्यावर सोहमचे वडील रागीट आवाजामध्ये बोलतात अजून कोणावर ओरडणार हे आमचे कुलदीपक साहेब आम्हाला न विचारता स्वतःच स्वताचे निर्णय घ्यायला लागले आहेत एवढे मोठे झाली कि आम्हाला विचारायचे सुद्धा गरजेचे वाटले नाही त्यावर आकांशा सोहमाच्या वडिलांना शांत करत म्हणते की, काका तुम्ही त्याची बाजू तरी ऐकून घ्या काय माहिती त्याच्या अस करण्यापाठीमागचे कारण तरी समजून घ्या. त्यावर सोहमचे वडील म्हणतात बोला साहेब अस का केल तुम्ही त्यावर सोहम म्हणतो त्या कामात माझ मन गालात नव्हत त्यामुळे मला ते काम व्यवस्थित करता येत नव्हत आणि एखादी गोष्ट जबरदस्तीने करण्यात काहिच अर्थ नाही. सोहमचे वडील म्हणतात अरे मग आम्हाला सांगायचं ना आम्ही त्याच कंपनी मध्ये दुसर काम दिल असत तुला पण अस माघारी यायची काय गरज होती सोहम आणि सोहमचे वडील हे दोघेही एकमेकांना समजून घेत नव्हती सोहम अचानक बोलतो बास आत्ता या विषयावर चर्चा मला नाही बोलायचं या विषयावर एवढ बोलून सोहम घरातून बाहेर जातो. त्याला समजवण्यासाठी आकांशा त्याच्या पाठीमागे जाते सोहम त्याच्या घरासमोरच्या बाकावर जाऊन बसलेला असतो. आकांशा त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि सोहम ला विचारते काय झाल तुला चिडायला तू अस नाही करायला पाहिजे होत त्याचं तुझ्यावर रागवण साहजिकच आहे आणि तू येतानापण त्यांना नाही सांगितल. त्यावर सोहम म्हणतो तुला तर त्यांचीच बाजू घेणार ना मला कोणीच नाही समजून घेत नाही त्यावर आकांशा म्हणते तुला कोणीच समजून घेत नाही अस समजू नको तुझी काळजी आहे सर्वांना पण आत्ता तू चुकला आहेस. आणि तू आत्ता रागात आहेस त्यामुळे तुला काही कळत नाही आत्ता तू घरी जाऊन शांत झोप आपण उद्या बोलू तोपर्यंत तुझा आणि तुझ्या बाबाचा राग कमी होईल. आणि अस म्हणून आकांशा घरी जायला उठते तेवढ्यात सोहम अकांशाचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो तू रानात काहीतरी म्हणत होतीस आकांशा सोहमला लाजून म्हणते तुला त्याच्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागेल आणि अस म्हणून आकाश तिथून निघून जाते. सकाळी सोहम उठल्यावर रानात जातो तेवढ्यात आकांशा सोहमला शोधात त्याच्या घरी येते आणि त्याच्या आईला विचारते सोहम कुठे गेला आहे अकांशाने आज सोहमने दिलेला पंजाबी ड्रेस घातलेला होता आज तिचा वाढदिवस होता ती सोहमला शोधात रानात जाते आणि सोहम कडे जाऊन सोहमला विचारते आज मी कशी दिसतेय त्यावर सोहम मुद्दाम तिला तंग करण्यासाठी तिला म्हणतो जशी रोज दिसतेस तशीच नंतर सोहम अकांशाला विचारतो पण तू आज का विचारल मला आज काही स्पेशिअल आहे का अकांशाला वाटत कि सोहम तीचा वाढदिवस विसरला आणि काही स्पेशिअल नाही म्हणून तिथून निघून जाण्यासाठी मागे फिरते तेवढ्यात सोहम तिचा पाठीमागून हात पकडतो आणि तिला hug करून Happy Birthday Wish करतो. आकांशा म्हणते तुला माहिती होत तर आधी का नाही wish केल सोहम म्हणतो असच तुला चिडवण्यासाठी तुझ्या या छोट्याश्या नाकावर राग नाही सूट करत त्यानंतर आकांशा म्हणते हे काय आहे सोहम म्हणतो काय काय आहे आकांशा म्हणते हे काय करतोयस त्यावर सोहम म्हणतो तुला hug करतोय आकांशा विचारते का सोहम त्यावर विचारतो का तुला मी hug नाही का करू शकत त्यावर आकांशा म्हणते करू शकतोस सोहम तिला परत विचारतो तू त्यादिवशी काय म्हणत होतीस आत्ताच नाही सांगणार त्यावर सोहम तिला विचारतो माझ्यावर प्रेम करतेस आकांशा नाही अस उत्तर देते सोहम त्यावर म्हणतो तू खोत बोलतेस आकांशा त्याला विचारते कस ते सांग हे बघ तुला जर हाच प्रश्न दुसऱ्या कुणी विचारला असता तर तू काय केल असत आकांशा म्हणाली मी त्याला नाही म्हणून तोथून निघून गेले असते मग सोहम त्यावर म्हणतो मी तुला मागशीपासून hug करून थांबलो आहे आणि मी तुला माझ्यावर तुझ प्रेम आहे का नाही हे पण विचारल तरी तू रागावली नाहीस कि माझ्यापासून लांब नाहीस गेली मग कस प्रेम नाही संग त्यावर आकांशा त्याला hug करते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत सोहम तिला विचारतो काय झाल तुला रडायला आकांशा म्हणते मी कितीदिवस हेच ऐकण्यासाठी आतुर झाले होते मी तुझी प्रेत्येक वेळेस वाट बघत होते कधी तू मला तुझ्या मनातल सांगणार आहेस. आकांशा आणि सोहन एकमेकांच्या मनातल सांगत असतात तेवढ्यात तिथे अकांशाचे बाबा येतात आणि त्यादोघांना एकमेकांच्या मिठीत बघुत ते खूप चिडतात आणि अकांशाला तिथून घरी घेऊन जातात. संध्याकाळी सोहमचे बाबा घरी आल्यावर घडलेल्या प्रकरणावर चर्चा होते आणि सोहमचे बाबा आकांशा आणि सोहमला विचारतात तुम्ही आम्हाला किती दिवसापासून खोत बोलत आला आहात किती दिवसापासून चाललाय हे सगळ त्यावर आकांशा तिच्या आई बाबाला समजावण्याचा प्रयत्न करते कि तिने तिच्या आई बाबाचा विश्वास आणि त्यांची मान खाली जाईल असे काम केले नाही आकांशा तिच्या बाबाला सांगते सोहमला मी आजच सकाळी सांगितल आहे माझ्या मना काय आहे ते आणि मी अस कोणताच काम करणार नाही जेणेकरून तुमची मान खाली जाईल आकांशा सोहमच्या बाबांकडे जाते आणि त्यांना म्हणते कि बाबा माझ सोहमवर खूप प्रेम आहे. आणि त्याच्याशिवाय नाही राहू शकत त्यावर अकांशाचे बाबा म्हणतात काय आहे त्याच्याकडे तुला खुश ठेवण्यासाठी न स्वतःच घर नाही नोकरी साधी दीड दमडी कमावण्याची अक्कल नाही आणि निघालेत प्रेम करायला आधी स्वतःच्य पायावर नित उभा राहा म्हणाव साहेबांना आणि नंतर माझ्या मुलीचा विचार करा. अस म्हणून अकांशाचे आई बाबा आकाशाला तिथून घेऊन चालले असतात तेवढ्यात सोहम त्यांना थांबवतो आणि म्हणतो माझ्याकडे स्वतःच घर नाही मी जॉब करत नाही म्हणून मी तुमच्या मुलीसाठी योग्य नाही का पण मला सांगा हे सगळ ऐश्वर्य असणारा एखादा मुलगा तुम्हाला मिळाला आणि तुम्ही त्याच्यासोबत अकांशाचे लग्न लाऊन दिल तर ती आयुष्यभरासाठी खुश राहील का त्याच्यासोबत त्यावर अकांशाचे वडील म्हणतात ते मला माहिती नाही पण तु आजपासून माझ्या मुलीपासून दूर राहिचस परत माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही आणि अस म्हणून अकांशाचे वडील अकांशाला घरी घेऊन जातात. त्यानंतर सोहम त्याच्या वडिलांना बोलतो तुम्ही का काहीच नाहीत बोलला त्यावर सोहमचे वडील म्हणतात काय बोलायचं होत मी तुझ्या बाजूने ते जे बोलून गेलेत ते खर आहे तुझी तू चालू जॉब सोडून आलास कोणत्या तोंडाने मी त्यांना त्यांची मुलगी मागणार होतो. हे ऐकल्यावर सोहम त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसतो दोन दिवसानंतर सोहमला अकांशाच्या घरी गाड्यांची गर्दी झालेली दिसते काय झाल हे बघण्यासाठी सोहम गेटवर जातो तेव्हा त्याला समजत कि आकांशा साठी तिच्या वडिलांनी मुलगा पहिला आहे. अकांशाच्या घराचे पाहुणे गेल्यावर सोहम अकांशाच्या घरी जातो आणि अकांशाच्या बाबांना विनंती करतो कि तिच्या दुसर्या मुलासोबत लग्न लाऊन देऊ नका आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. त्यावर अकांशाचे वडील चिडून बोलतात मी तुला सांगितल होत ना अकांशाचा नाद सोडून दे म्हणून तरी तू परत आलास माणसाने अंथरून पाहून पाय पसरावे आणि स्वप्न अशीच बघावीत जी कधी पूर्ण होऊ शकतात. त्यावर सोहम म्हणतो बाबा माझ हे स्वप्न तर नक्कीच पूर्ण होणार तुमच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या आशीर्वादाशिवाय एवढ म्हणून सोहम तिथून निघून जातो. त्याला खूप वाईट वाटत होत आपली प्रियासी आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्याची होतेय त्याला अकांशाच्या मैत्रिणी कडून समजते कि तिचा साखरपुडा परवा दिवशी आहे आणि तिच्यासोबत अकांशाने सोहमसाठी पत्र पाठवल होत ज्यामध्ये तिच्या भावना पेनाच्या शाईने रेखाटल्या होत्या त्या पत्रामध्ये ती म्हणते. सोहम मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत बाबा माझे जबरदस्ती लग्न लाऊन देतात माझ्या मनाविरुद्ध वागायला मला भाग पडतात. मी फक्त तुझीच आहे. आयुष्यात लग्न फक्त एकदाच होत आणि ते मला दुसर्या कोनासोबातही करायचं नाहीये मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा please तू मला या सगळ्यातून लांब घेवून जा मी जर तुझी नाही झाले तर कोणाचीच नाही होणार मी लग्नाच्या मंडपात स्वतःचा जीव देईन हे पत्र वाचल्यावर सोहमला थोडा धीर मिळतो आणि सोहम त्या पत्राच्या उत्तरात दोघेही लग्नाच्या आदल्या दिवशी पळून जाण्याची योजना आखतात. आणि योजने प्रमाणे ते दोघेही गावातून बाहेर येतात आणि त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात करतात सोहम अकांशाला घेऊन खूप दूर निघून जातो तिथ गेल्यावर दोघेजण लग्न करतात आणि सगळ काही सुरळीत चाललेलं असत २ वर्षानंतर त्यांना एक गोंडस मुलगी होते आणि भावनेच्या भरात अकांशाचा स्वतावर कंट्रोल राहत नाही आकांशा तिच्या आईला फोन करते आणि दोघांच्या चुकीबाद्धाल माफी मागते आणि त्यांच्या मिलचा फोटो त्यांना पाठवते मुलीचा चेहरा बघून नातवंडाच्या प्रेमासाठी त्यांचे आई-वडील त्यांना माफ करतात. आणि परत घरी बोलावतात हि आनंदाची बातमी देण्यासाठी आकांशा सोहमला फोन करते पण सोहांचा फोन बंद लागतो सोहम घरी आल्यावर आकांशा त्याला जोरात मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत सोहम अकांशाला विचारते काय झाल तुला त्यावर आकांशा सांगते मी सकाळी आईला फोन केला होता सोहम गंभीरपणे विचारतो मग काय झाल काय म्हणाल्या त्या आकांशा हसत हसत सांगते त्यांनी आपल्याला माफ केल आहे आणि आपल्याला घरी सुद्धा बोलावल आहे. हे ऐकून सोहम पण खूप खुश होतो. सोहम आणि आकांशा दुसर्याच दिवशी त्यांच्या गावी जातात आणि दोघांच्या हि घरच्यांची माफी मागतात अकांशाचे वडील म्हणतात खर तर माफी आम्हाला मागायला हवी पोरांनी आम्ही तुमच्या प्रेमाला नाही समजू शकलो. आम्हाला माफ करा तुम्ही आमच्यापासून लांब गेल्यावर आम्हाला समजल. मुलाचं प्रेम काय असत. आत्ता तुम्ही इथूण कुठेही जायचं नाही अस म्हणून सोहम च आणि अकांशाचा गृहप्रवेश होतो. आणि ते दोघेही आनंदाने आपल आयुष्य जगतात. |
टोक्यो । भारताला अजून एक पद प्राप्त झालं आहे. रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. ४-७ या गुणांनी त्याचा पराभव झाला आहे. रवीकुमार दहियाचा रशियाच्या खेळाडू कडून पराभव झाला आहे. आतापर्यंत भारताला ४ पदकं मिळाली आहेत. रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले. भारताच्या हॉकी संघाची पदकासाठीची प्रतीक्षा तब्बल ४१ वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक जिंकलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आली नाही. परंतू टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा संपवत भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरत, भारतीय हॉकीचे जुने दिवस पुन्हा एकदा आणले आहेत. सामन्याच्या पहिल्या सत्रात जर्मनीचं संपूर्णपणे वर्चस्व पहायला मिळालं. टिमूर ओरुझने दुसऱ्या मिनीटाला गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. संपूर्ण पहिल्या सत्रात जर्मनीने वारंवार भारतीय गोलपोस्टवर हल्ले करत भारतीय खेळाडूंना दडपणाखाली आणलं. ज्याचं उत्तर भारतीय खेळाडूंकडे दिसलं नाही. सुदैवाने पहिल्या सत्रात भारतीय संघाने एकपेक्षा जास्त गोल खाल्ला नाही. चौथ्या सत्रात जर्मनीने आक्रमक खेळाला सुरुवात करत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारताचा बचाव भेदून जर्मनीने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी निर्माण केली. यावेळी ल्युकास विंडफेडरने श्रीजेशचा बचाव भेदत जर्मनीची पिछाडी एका गोलने कमी केली होते. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई नंतर आमदार सुनील राऊत यांनी पत्रकारांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्रिपद मिळाले. मात्र, आता राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात ईडीचे कटकारस्थान सुरु असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना सुनील राऊत म्हणाले, जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करते आहे. हे सूडाचे राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार. . आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा सुनिल राऊतांनी दिला. जमिनीवरून विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचा फॉर्म भरला होता, तेव्हा तिचे मूल्य 1 कोटी 6 लाख रुपये होती. रेडी रेकनरखाली जमीन घेतलेली नाही. काहीच गैर व्यवहार झालेला नाही. पण त्यांना काहीही करून संजय राऊत यांना अडकवायचे आहे. ती लिंक लागत नाहीये, म्हणून संजय राऊतांची कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे, असे सुनील राऊत म्हणाले. |
मुंबई - शिवसेनेने नाकारलेला मदतीचा हात, त्यातच पक्षात सुरू झालेली बेबंदशाही मनसेच्या पथ्यावर पडणार आहे. 'तुमच्या राजाला साथ द्या' ही मनसेची भावनिक साद सोशल नेटवर्कवर धुमाकूळ घालत असून शिवसेनेतील बंडाळीमुळे नाराज झालेला मतदार मनसेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेकडे टाळीसाठी हात पुढे केला होता. त्यामुळे शिवसेना-मनसेच्या मतदारांत भावनिक बंध निर्माण झाले होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळी नाकारली. त्यानंतर बुधवारी झालेल्या मेळाव्यात 'तुमच्या राजाला साथ द्या' या भावनिक गाण्याने मनसेने साद घातली. हे गाणे सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. हे गाणे फेसबुक आणि व्हॉट्सएपवर फिरत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनसेची वातावरण निर्मिती सुरू असताना शिवसेनेत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेचे मतदारही नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत मनसेने दमदार उमेदवार दिल्यास शिवसेनेवरील नाराजीचा फायदा मनसेला होऊ शकतो. मुंबईतील किमान १० प्रभागांत ही नाराजी मनसेला लाभदायक ठरू शकते. घाटकोपर, चेंबूर, अंधेरी, कांदिवली, मुलुंड, वरळी आदी परिसरात मनसेला या नाराजीचा फायदा होण्याची शक्यता आहे. |
मालिकेच्या पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यात अरुंधती काॅलेजला जायला निघतेय. इकडे देशमुखांच्या घरी नेहमीप्रमाणे अनिरुद्ध काही कडवट बोलतोच. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळे जण अरुंधतीच्या घरी जातात. तिथे यश तिला म्हणतो, आमच्या शाळेचा पहिला दिवस होता, तेव्हा तू आम्हाला सोडायला आली होतीस, आता आम्ही तुला सोडायला येतो. महत्त्वाचं म्हणजे यात ईशाही आहे. म्हणजे तिचाही राग मावळलाय. आप्पा अरुंधतीला म्हणतात, आमच्यामुळे तुला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आता तू तुझी स्वप्न पूर्ण करतेस, आम्हाला अभिमान वाटतोय. अरुंधतीही एकदम भारावून जाते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. अरुंधतीला भेटायला आशुतोष, सुलेखा ताईही आल्यात. तिचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. अरुंधतीची भूमिका करणारी मधुराणी वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच आघाड्या सांभाळते. ती आपल्या उत्तम अभिनयासोबतच गायिका आणि म्युझिक कंम्पोझर म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म भुसावळचा आहे. मधुराणी गोखले प्रभुलकरने आपले शालेय शिक्षण पुण्याच्या एच. एच. सी. पी हायस्कूलमधून पूर्ण केलं. १६ वर्षाची असताना तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने स्वतःसाठी लिहिलेल्या सी-सॉ स्क्रिप्टला पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धेत पारितोषिक मिळालं होतं. तिनं पुण्याच्या एस. पी. कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तिला कविता लिहिणं आणि कादंबरी वाचण्याची आवड आहे. तिचा जन्म आणि पुढील जडणघडण ही भुसावळमध्येच झाली. तिने आपला पती प्रमोद प्रभुलकर याच्यासोबत मिळून मिरॅकल अॅक्टिंग अॅकेडमी नावाने स्वतःची अभिनय कार्यशाळा सुरू केली. |
चचा : खुशाल जा. आम्ही तुला रोखणार नाहीं. तिथं गेल्यानंतर माझ्या बतीनं महात्माजीना एक सलाम कर नी त्यांच्या आत्म्याला सांग की तुमच्या निर्वाणामुळे एक बुडुं दिल कायमचं बेचैन झालं आहे. (नझीर उठतो. ) अन्वर : आत्तांच चाललास ? नझीर : होय. रोशन : थांब मी तुझी कपड्याची ब्याग आणते. नझीर : वेडी. मी समारंभाला कां जात आहे ? मला कांहीं नको. फक्त तेथे पोचून दर्शन घेईपर्यंत माझ्या जीवांत जीव राहावा अशी खुदाची प्रार्थना कर. अच्छा चचा. अन्वर, रोषन, दिलवरला सलाम सांगा. [ निघून जातो ] चचा : पगली रडतेस. पूस ते डोळे. पाहा मी कुठे रडतोय. जिवाचा आकांत करून रडावं असं वाटतंय मला. पण अश्रू ओघळायलाच कबूल नाहींत. बेटी बापूंजीचं तें आवडतं भजन म्हण पाहू. [ रोषन भजन म्हणतेरघुपतिराघव राजाराम । पतित पावन सीताराम । ईश्वर अल्ला तेरे नाम । सबको सन्मति दे भगवान । भजन संपतां, " रघुपति राघव राजाराम " हा चरण पुटपुटत चचा आंतल्या खोलीत जातात ] अन्वर : रोषन चल आपण चचाबरोबर जावू या. मला चचा बद्दल मीति वाटते. फार मनाला लागलंय त्यांच्या. रोषन : चल. [ दोघंही त्या खोत जातात. क्षणभर कुणीही नसतं तोच ताज प्रवेश करते. तिच्यात बदल झाला आहे. अंगावरचे कपडे मलीन झाले आहेत. केंस अस्ताव्यस्त झाले आहेत. डोळ्या भोंवतीं कंगोरे पडले आहेत. दिवानखान्यांत येऊन ती क्षणभर थबकते. एकदा सारा दिवाणखाना न्याहाळते. दिलवरच्या खोलीत जावून कानोसा घेते. व परत दिवाणखान्यांत येते तोंच जिन्यावर पावलें वाजतात. दिलवर खाली येतो. त्याच्या चेहऱ्यावरून तो कुठें तरी बाहेर जाणार असावा असं वाटतं. त्याला पाहिल्याबरोबर ताज भावना वेगानें पुढें जातें . ] साजः दिलवर. दिलवरः [ मार्गे सरकत ] कोण तूं ? नी एकदम अंगावर काय पडतेस ? गळ्यांत पडायची नवी तन्हा भिकारणीनी शोधून काढली वाटतं. ताज : भिकारीण. दिल चेष्टेलासुद्धां सुमार असतो. दिलवर : माझं नांव दिल नाहीं. माझं नांव मोहन आहे. ताज : नाहीं नाहीं. तुझं नांव दिल आहे मी ठेवलं आहे ते ! मला माहीत आहे हे सारं नाटक तूं कां करीत आहेस ? तुला तशा जखमी स्थितींत टाकून गेलें म्हणून तूं रागवलास आहेस. पण माझा काय इलाज होता ? अब्बानी मला बळजबरीनं नेलं. रडत रडत मी कराचीला पाऊल टाकलं. मला कांहीं सुचत नव्हतं. सारखी तुझी मूर्ती डोळ्यासमोर यायची. तुझी तब्येत कशी असेल ही एकच काळजी भेडसावीत होती मला. दिलवर : काय भारुड चालवलंस तूं ? ताज : माझ्या बदनशीबाची कहाणी तुला भारुड वाटते अं. इतका रागावलास तूं माझ्यावर ? दिलवर : तुझ्यावर रागावण्याचा माझा काय संबंध ? तूं कोण कोठली ? ताज : दिल माझी ओळख विसरलास एव्हढ्यांत ? वेड्या तुझ्या ताजला तूं विसरलास ? या कोचावर तासाचे तास गप्पा मारीत आपण बसत होतों. त्या गॅलरींत आपण प्रितीच्या गुजगोष्टी करीत होतों. नी याच गॅलरींत 'मी तुझा आहे' अशी ग्वाही तूं मला जबळ घेवून दिली होतीस. दिलवर : वेड बिडतर लागलं नाहीं ना तुला ? यापूर्वी कधीं पाहीली नाहीं नी म्हणे मी तुला ग्वाही दिली. ताज : असं कां बरं वेड पांघरतोस ? दिलवर : तुलाच 'वेड लागलंय. तुझं डोकं तपासून घेऊन ये. वेड्याच्या हॉस्पीटलांतून पाहारेकऱ्याच्या हातावर तुरी देवून पळून तर नाही ना आलीस ? कीं वेडाचं सोंग घेवून नवजवानांना आपल्या मायजाळ्यांत गुंतवणाऱ्या बाजार बसव्यापैकींताज : दिल, हे तुझ्या तोंडून ऐकण्यासाठीच मी इथें आलें ? कोसाचं अंतर पायीं तुडवींत मी आलें. सान्यासुखावर तिलांजली सोडून एकाद्या भिकारणीसारखी तुझ्यापाशी भीक मागायला आले म्हणून नी भिकारीण ठरलें. एका |
नाशिकमधून तडीपार असणारा, बारामती शहरातील हॉटेल मातोश्रीमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या गुंडाचा हॉटेल कर्मचाऱ्यानेच चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला एका तासात बारामती तालुका पोलीसांनी जेरबंद केले. बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिकमधून तडीपार असणारा, बारामती शहरातील हॉटेल मातोश्रीमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या गुंडाचा हॉटेल कर्मचाऱ्यानेच चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला एका तासात बारामती तालुका पोलीसांनी जेरबंद केले. गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे खून झालेल्याचे नाव असून, याप्रकरणी विकास दीपक सिंग (वय २९, मूळ रा. चंदीगड,पंजाब, सध्या रा. आमराई, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पंजाबकडे पळून जात असताना अटक केली आहे. त्या संदर्भातील माहिती पोलीस निरीक्षक महेश ढव्हाण यांनी दिली. माझ्या ताब्यातील किचनमध्ये पाय ठेवायचा नाही, असा दम गणेश प्रभाकर चव्हाण याने विकास दीपक सिंग याला दिला होता. त्यामुळे चिडून सिंग याने चव्हाण याच्यावर चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी विकास सिंग हा पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह कोंडवे, साहेब फौजदार भागवत, ठाणे अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक रणजित मुळीक, पोलीस शिपाई प्रशांत राऊत, अमोल नरुटे आदींनी शोधमहीम सुरू केली. यावेळी बारामती शहरातील माळावरची देवी परिसरात संशयित आरोपी सिंग याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल घुगे करत आहेत. बारामतीतील हॉटेल चालक व मालकांनी आपल्याकडे कामावर ठेवलेल्या कामगारांची सर्व माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. त्यांचे आधार कार्ड ठेवावीत, सदर कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना? याची खात्री करावी, अन्यथा हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येईल. - महेश ढव्हाण, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे. |
भारतीय सेलिब्रिटींसोबत क्रिसने केलेल्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. फोटोतील त्याच्या चेहऱ्यावरील आनंद तो भारतीय सेलिब्रिटींना भेटून किती खूष झालाय, हेच सांगतो. पार्टीत क्रिसने 'Love' असे लिहिलेला अतिशय साधा असा पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. क्रिससाठी आयोजित करण्यात आलेल्या या डिनरपार्टीला शंकर महादेवन, लॉय मेंडोसा, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, विवेक ओबेरॉय आणि सुझान खान यांनी हजेरी लावली होती. तसेच विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेंन्मेट आणि वायकॉम १८ चे अधिकारीही उपस्थित होते. फोटो काढून घेण्यासाठी फारच उत्सुक होती. विवेक ओबेरॉयने पत्नी प्रियांका आणि मार्टिनसोबतच्या फोटोवर विवेक ट्वीटही केले आहे, "माणुसकीचा आवाज बनलेला, एक ग्रेट माणूस. . . 'कोल्डप्ले'चा निर्माता क्रिस मार्टिन सोबतची ही एक अविस्मरणीय संध्याकाळ आहे. " मार्टिनसोबत चांगले क्षण अनुभवायला मिळाले म्हणून सुझान खान हिनेही आपला भाऊ झायेद खान आणि पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशन यांचे आभार मानत ट्वीट केले आहे, "क्रिस मार्टिन सोबत जीवनातील एक भव्य क्षण अनुभवत आहे. एका सुंदर हृदयाच्या या माणसाच्या प्रेमात मी उजळून निघते. " मार्टिन फक्त 'गाला' चाच निर्माता नाही, तर त्याची निर्मिती असलेल्या जगप्रसिद्ध ब्रिटिश बॉय बॅण्ड 'कोल्डप्ले'च्या शोलाही आज रसिकांची चांगलीच गर्दी जमेल आणि अर्थातच हा शो 'मैदान फूल शो' होईल असं म्हटलं जातंय. 'गाला' चा शो मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावरच आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण, समानता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या ज्वलंत विषयांवरील जनजागृतीसाठी क्रिस आपल्या संगीतातून प्रकाश टाकणार आहे. GCFIदेखील 'द वॅम्प्स' प्रमाणे भविष्यातील आतंरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांची फळी तयार करण्यासाठी सज्ज झाली आहे. जेणेकरून जाय झी आणि डेमी लोवॅटो प्रमाणेच इतरही कलाकार इथे येतील. अमिताब बच्चन, ए आर रहेमान, फ्रिदा पिंटो, अलिया भट, रणबीर सिंग, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, मोनाली ठाकूर, अर्जित सिंग हे भारतीय सेलिब्रिटी गालाला उपस्थित राहणार आहेत. |
नवी दिल्ली - भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक स्वर्णपदक मिळून दिले आहे. त्याच्या चमकदार कामगिरीचे माजी नेमबाज व ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याने कौतुक केले आहे. नीरज तू देशाचे स्वप्न पूर्ण केले, धन्यवाद. . ! खूप अभिमान वाटत आहे, असे कौतुकाचे ट्विट अभिनव बिंद्रा याने केले आहे. Also, welcome to the club - a much needed addition! Extremely proud. I am so delighted for you. ट्विटबरोबरच अभिनवने नीरजला एक पत्र देखील लिहिले आहे. यात त्याने नीरजला ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर, भालेफेक हे जरी भारतात जास्त फॉलो होणारे खेळ नसले, तरी तुझ्या ऐतिहासिक कामगिरीमुळे ते प्रकाशझोतात आले आहे, असे अभिनवने म्हंटले आहे. नीरज हा ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याचबरोबर, 2008 नंतर, म्हणजेच 13 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिकण्याचा पराक्रम केला आहे. 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची संख्या 7 इतकी झाली झाली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्य पदक आहेत. |
- कोणत्याही घरात नवजात मुलाची किलकारी ही आनंदाची आणि जबाबदारीची जाणीव करून देते. - मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पालक बरीच आर्थिक गुंतवणूक करतात. नवी दिल्ली : कोणत्याही घरात नवजात मुलाची किलकारी ही आनंदाची आणि जबाबदारीची जाणीव करून देते. आज, मुलाच्या जन्मानंतर लगेचच पालक त्यांचे भविष्य सुरक्षित आणि सुनिश्चित करण्याचा विचार करण्यास सुरवात करतात. मुलाच्या वाढत्या वयात, त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची इच्छा आणि विशेषतः त्याचे शिक्षण आणि विवाहासाठी पैशाची तजविज करण्यासाठी पालक झटत असतात. आजकाल शिक्षण खूप महाग झाले आहे, हे खर्च टाळता येत नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पालक बरीच आर्थिक गुंतवणूक करतात. त्यांना चांगल्या परताव्यासह एका फंडामध्ये गुंतवणूक करायची असते परंतु बहुतेक पालक बहुधा फिक्स्ड डिपॉझिट सारख्या पारंपारिक प्रकारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तथापि, अशा पारंपारिक वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणुकीचा एक तोटा म्हणजे आपल्याला महागाईकडे पाहिले तर मिळणारे परतावे आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुरेसे नसतात. अशा परिस्थितीत योग्य गुंतवणूक निवडणे फार महत्वाचे आहे. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्मार्ट गुंतवणूक सुनिश्चित करण्यासाठी ही पाच आर्थिक धोरणे लागू करणे आवश्यक आहे : याचा पहिला टप्पा चांगला नियोजन आहे. एक जबाबदार पालक या नात्याने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आपल्याला किती पैशांची आवश्यकता असेल याची पूर्ण आणि स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवा की आपण शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे. जितक्या लवकर आपण आपली गुंतवणूक सुरू कराल तितक्या जास्त वेळ आपल्या गुंतवणुकीला मिळेल. आपल्याला नियमित गुंतवणुकीत आणि गुंतवणुकीचे चक्रवर्ती फायदे मिळविण्यात मदत करणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजित मार्गाने मासिक गुंतवणूक करणे. अशा प्रकारे आपण काही वर्षांत एक मोठा निधी तयार करू शकता. अशा प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी आपण म्युच्युअल फंडाची एसआयपी निवडू शकता. आपण जितके दीर्घकालीन गुंतवणूक करून तितके रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या नवजात मुलासाठी वर्षाकाठी 15 वर्षांसाठी 12% व्याज दराने 5000 रुपये गुंतविले तर आपण 15 वर्षांसाठी 25 लाख निधी जमा करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही तीच रक्कम पाच वर्षांसाठी समान 12 टक्के व्याज दरावर गुंतवणूक केली तर तुम्ही फक्त चार लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. ही चक्रवाढ व्याजाची शक्ती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, इक्विटी-आधारित मालमत्तांच्या माध्यमातून दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीला चांगला जोखीम-समायोजित परतावा मिळाला आहे आणि इतर सर्व मालमत्तांपेक्षा जास्त आहे. तथापि, कोणत्या सिक्युरिटीज चांगल्या रिटर्न्स देतात हे तपासणे आणि समजणे सर्वसामान्यांना अवघड आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला निर्णय आहे कारण इक्विटीमध्ये भाग घेण्याचा हा सर्वात चांगला आणि सुरक्षित मार्ग आहे. प्रत्येक उद्दिष्टासाठी स्वतंत्र गुंतवणूक करणे नेहमीच योग्य आहे. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता आणि छान गुंतवणूक योजना तयार करू शकता. जर आपली उद्दिष्ट्ये दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे असतील तर आपण इक्विटीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता परंतु लक्षात ठेवा की या दरम्यान आपणास इक्विटी मार्केटमधील छोट्या-मोठ्या चढ-उतारांचा त्रास होणार नाही. जसे आपण आपले ध्येय जवळ जाता, तसे आपण वेळेनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करू शकता. आपल्या शेवटच्या ध्येयावर लक्ष ठेवण्याऐवजी वेळोवेळी आपण आपले ध्येय गाठण्यासाठी किती ध्येय गाठला आहे हे आपण पहात रहाणे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करणे. |
लहान पाणी माझ्या हातापायात थोडे बळ आल्यावर, आमचे अण्णा एखाद्या वेळेस म्हणायचे, "सुऱ्या, तो कोपऱ्यातील तबला घे बर, पाडू -बिडू नकोस!" मग मी डगमगत्या पायाने तो जडशीळ, हो तेव्हा तो जडच वाटायचा, तबला पोटाशी धरून त्यांना आणून देत असे. "शाब्बास, असाच तो डग्गा पण आण." अण्णा ,म्हणजे माझे वडील. हाच तो माझा तबल्याशी पहिला संपर्क! माझी हि तबला नेण्या -आणण्याची हमाली बरेच दिवस चालली. मी नऊ -दहा वर्षाचा होईपर्यंत. एक दिवस समोर तबला असताना अण्णा म्हणाले. "सुऱ्या, बस. " मी बसलो. "थोडी पावडर लाव. " मी समोरच्या डबड्यातली पावडर घेतली अन तोंडाला फसली. "गधड्या, तोंडाला नाही, बोटाना!" मी पुन्हा पावडर मध्ये बोटे बुडवली. "हा, म्हणजे काय कि बोट तबल्याला चिटकत नाहीत!" मग त्यांनी मला, 'धा', 'धी ', 'ना ' वगेरे बोल वाजवायला शिकवले. कसा -बसा, केरवा, त्रिताल शिकला अन 'दादऱ्या ' ला बसकण मारली. आम्ही जन्मजात कर्मदरिद्री! वाजवण्यात लक्ष दिले नाही. एका सुंदर विश्वाला मुकलो! एका दिवशी तबल्याचा ढिला झालेला एक गटकु, अण्णांची नजर चुकून मी पळवला. सुताराच्या किसन्या कडून, त्याची विट्टी करून घेतली. मी अन किसन्यानी दिवसभर गिल्ली दांडू खेळलो. मी एक जोरकस रद्दा मारला, तशी विट्टी समोरच्या घराच्या पत्र्यावर जाऊन पडली. ' पराई गिल्ली हमारा राज' म्हणून खच्चून ओरडलो, म्हणजे समजा उद्या किसन्या नवी विट्टी घेऊन आलातर, 'नई गिल्ली नया राज ' होणार नव्हते! संध्याकाळी शुभंकरोती म्हणून अभ्यास केला. अण्णा ऑफिसातून आल्यावर जेवणे झाली. मग अण्णांनी तबला काढला. गटकु ठोकून तो 'तालावर ' आणताना -एक महाराज गायब! "मघाशी आई तबला पहात होती." "अजून कोण आलत?" " हो, एक मांजर! हो, त्यांनचं ते नेलं असलं, उंदीर समजून!" माझ्या या उत्तरावर त्या दिवशी अण्णांनी माझ्या डोक्याचा गटकु 'तालावर ' आणला. डोक्यावरच टेंगुळ दोन दिवस हे जग पाहून अंतर्धान पावलं! पुढे पुढे उरलेल्या गटक्याना कीड लागली, मग अण्णा, माझ्या बाभळीच्या गाठीच्या विट्ट्या त्या जागी वापरू लागले! तबला हे एक ताल वाद्य आहे. (त्या अर्थाने एक तालेवार प्रकरण!) गाण्याचा कणा. तशी काही गाणी तबल्या शिवाय हि होतात, पण 'उभी ' राहत नाहीत. तालात गणिती अचूकता आणि हृदयाचा ठेका असतो. तर पेटी (आणि तंतू वाद्य )ची जवळीक मनाच्या लहरींशी असते! मन आणि पेटी चंचल.(असं माझं मत आहे.) असो. तबला, यात तबला आणि डग्गा येतो. उत्तर भारतात तबल्याला 'दाया ' म्हणजे उजवा म्हणतात. कारण तो उजव्या हाताने, म्हणजे वर्चस्व (डॉमिनेटिंग )असणाऱ्या हाताने वाजवतात. जर तुम्ही डावखोरे असाल तर 'दाया ' डावीकडे जातो. 'बाया 'म्हणजे आपण ज्याला मराठीत डग्गा म्हणतो तो. तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते. हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत. याना स्वतंत्र बैठक लागते! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी! त्या छछोर गिटारी सारखे हे, गळ्यात पडत नाहीत, कि लाडे -लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत, कि लोचट 'माऊथ ऑर्गन 'सारखा मुका घेत नाहीत! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो! गाण्याची एखादी महिफल असावी, मग यांचा रुबाब पहावा. या पंगतीत पहिला मान यांचाच. हे एकदा स्थानापन्न झाले कि पाहावे. अहाहा! साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोड! किंचित स्थूल नारायणाच्या शुभांगी सालंकृत नऊ वारीतली लक्ष्मी बसल्याचा भास होतो! सणावाराच्या ह्या मेहुणा सोबत 'ब्राम्हण ' असावा तशी पेटी बैठक मांडते. मग याज्ञीक 'गायक' येतात, सभेला विनम्र अभिवादन करून, 'सा' चे प्रोक्षण सोडतात! त्यांच्या शेजारी दोन तंबोरा धारक, त्या 'सा'ने आपल्या तंबोरारुपी जोड समया चेतावतात. या जोड समया महफिल संपे पर्यंत एका लईत तेजाळत रहातात! महफिलीत उदबत्तीचा सुगंध दरवळू लागतो! इकडे तब्ब्लची, तबल्याना नमस्कार करून, तो 'सा', जो एव्हाना पेटीच्या पट्टीत पाझरलेल्या असतो, तो अलगत तबल्यावर घेतात. तो तबल्याला पण गरजेचा असतो. हा 'सा ' हि त्या चीजेची बेस लाईन असते. यावर साऱ्या गाण्याचा तोल असतो. पाश्च्यात्य संगीतात याला एक गोड नाव आहे tonic! गुटगुटीत संगीताचा आधार! असो. एव्हाना श्रोत्यांची संगीत क्षुधा अनावर झालेली असते. ' कर्णी (ध्वनी )कवळ घेता ....... 'श्रोता भूतली कोठे असतो ? 'अधांतरी हे झुले नभांगण ... ' अश्या अवस्थेला तो पोहंचला असतो! तर अशी असते हि संगीत महफिलची जादू! सगळा आनंद नाही हो, शब्दात पकडता येत, त्यात आम्ही शब्ददरिद्री! या साठी महफिलीत हजेरी लावून अनुभवावे लागते! महेफील संपते. टाळ्यांचा कडकडाट होतो. सगळ्यांच्या नजर गायकाकडेच! 'व्वा ,व्वा '. क्या बात है ', ' बढिया ' सगळं तिकडेच. गाण्या दरम्यान गायक, एखाद्या समेला तब्ब्लची कडे मान डोलवतात, तेव्हड्या दादेवर तो खूष! तब्ब्लचीने महफिल संपल्यावर केलेल्या नम्र कुर्नीसातला, सुद्धा श्रोते नजरअंदाज करतात! तो गपचिप तबला डग्ग्याचे, बेरहमीने कान पकडून पडद्याआड जातो. अरे जरा संभालकें लेजावो तबलेको, उस्ताद!, क्यू कि, ' ये तुम्हारा अतीत है, ये तुम्हारा अजीज है, ये तुम्हारी मजबुरी है, ये तुम्हारी शान है, ये तुम्हारी जान है, और यही तुम्हारी मंजिल भी है!' तबल्याचे स्वामित्व ताला कडे आहे. तसे बरेचसे ताल आहेत पण, नेहमी वापरले जाणारे काही ताल म्हणजे तीनताल (१६मात्रांचा ), झुमरा (१४), तीलवाडा (१६), धमार (१४), एकताल (१२), जपताल (१०), केरवा (८), रूपक (७), दादरा (६). धमार ,एकताल हे संथ आणि माध्यम लयीचे सोबती, तर जपताल ,रूपक, दादर गती फुलवतात. पण त्रिताल हा ठेका संथ आणि गतिमान दोन्ही लयीत उपयुक्त आहे. कारण हा एक अतिशय बांधेसूद (सिमेट्रिक )ताल आहे. त्यामुळे तो संथ आणि गतिमान लयीत आपली छाप (कि थाप )सोडतो! याशिवाय काही अभावाने वापरले जाणारे ताल, जसे अदाचौताला (१४), दीपचंदी (१४), शिखर (१७), सुलताल (१०), तीवर (७), पंचम सवारी (१५). ब्रह्मताल, यात तर तब्ब्ल अठावीस मात्रा आहेत! वादकांच्या मनाची, मनगटाची,आणि स्मृतीची सत्व परीक्षाच! आणि गाणारा किती संथ गतीत तरंगत असेल देव जाणे! मी या तालावरची एखादी चीज /गाणे खूप दिवसा पासून शोधतोय. तबल्याच्या शाईस आम्ही लहानपणी तबल्याचा डोळा म्हणायचो. एक सरळ डोळ्याचा आणि एक बांगा डोळ्याचा! अण्णा देवाघरी गेले. आणि तबला माळ्यावर अज्ञातवासात! एकदा बायकोने ती 'अडगळ ' माळ्यावरून खाली काढली. मी तो साफ करून, पुसून नीट झाकून कोपऱ्यात ठेवला. अण्णांच्या जुन्या आठवणीने उर भरून आला. दुसरे दिवशी दोन फुले वाहिली, बरे वाटले. खूप सैल झाला होता, शाई उडाली होती. नीट करून कधी मधी वाजवण्याचे मनाशी पक्के केले. चार दिवसांनी अण्णांचे श्राद्ध होते. दुपारी चार पर्यंत धामधूम संपली. रात्री जेवण नव्हते, म्हटले तबल्यावरून हात फिरवावा. काल पर्यंत्त तो ज्या कोपऱ्यात होता, तो कोपरा आज रिकामा होता! "आग, माझा तबला?" "तो न, परवाच भंगारवाल्याला दिला! नुस्ती मेली अडगळ! सगळी कीड लागली होती! बुळुबुळु पीठ घरभर पसरत होत!" माझ्या काळजाचा ठोका चुकला! खरे सांगतो त्या वर्षी नंतर अण्णांचे श्राद्ध काही माझ्या हातून नाही घडले! बायको साठी ती 'अडगळ 'होती, पण माझ्यासाठी, तो ' ठेवा ' होता! माळ्यावरून तो 'बांगा 'डोळा माझ्याकडे आशेने पहात असावा, आज ना उद्या एखादी थापा पडेल म्हणून! त्या दिवशी माळ्यावरच्या, त्या अडगळीच्या माझे घर आणि मन रिकामे केले! सु र कुलकर्णी ---आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . |
एक स्वागत पत्र काय आहे? हे कोणत्याही प्रकारे क्लिष्ट समजले जाणार नाही. खरं तर, योग्यरित्या लिहिले तर, स्वागत पत्र सोपे आणि बिंदू असावी. आपले स्वागत पत्र संस्था लेटरहेडवर लिहिलेले आहे किंवा, मंजूर झाल्यास हे सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी आहे की आपण स्थानिक स्टेशनरी स्टोअरमधून थीम्झी स्टेशनरी वापरण्याचा विचार करा. प्रोत्साहन ट्रिप म्हणजे काय? एक प्रोत्साहन ट्रिप हा एक नियोजित कार्यक्रम किंवा ट्रिप आहे ज्याचा वापर विशिष्ट व्यवसाय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लोकांना मन वळवण्यासाठी केला जातो. बर्याचदा, प्रोत्साहनात्मक ट्रिप एखाद्या विशिष्ट गोलापर्यंत पोहोचण्यासाठी विक्रता किंवा इतर प्रकारचे व्यावसायिकांसाठी एक बक्षीस असते. सहसा, लक्ष्य निर्धारित विक्री आणि व्यवसाय विकास संबंधित आहेत, परंतु कार्यावर आणि व्यवस्थापकांनी लाभदायक व्यवसाय उद्दिष्टे कोणत्याही संख्येसाठी या प्रकारच्या प्रोत्साहनांचा वापर केला आहे. आपण आपल्या स्वागत पत्रात खालील गोष्टींसह अनेक आयटम समाविष्ट केल्याचे सुनिश्चित करणे महत्वाचे आहेः - अभिनंदन वैयक्तिकरित्या किंवा "उपस्थित राहणारे" पाठोपाठ कार्यक्रमाचे शीर्षक वापरा. - बॉडी परिच्छेद "अजेंडा" माहिती (संलग्नक) प्रकट करते. बर्याचदा, आपण पत्र वैयक्तिकृत करणे निवडल्यास, इव्हेंटच्या प्रोग्रामला पत्र मध्ये समाविष्ट करणे उपयोगी आहे. हे वैकल्पिक आहे. आपण असे केल्यास, हे परिच्छेद दुसर्या परिच्छेदानंतर निश्चित केले आणि सूचीबद्ध केले असल्याचे सुनिश्चित करा - आणि अशा प्रकारे संदर्भ दिला आहे. आम्हाला आनंद होत आहे की आपण आमच्यात सहभागी होऊ शकता आणि आपण [RESORT] मध्ये [DESTINATION] मध्ये राहावे अशी आशा आहे आणि हे दोन्ही नवीन आणि शैक्षणिक आहेत. पुढील [NUMBER] दिवसांमध्ये आमच्याकडे पूर्ण अजेंडा आहे, म्हणून कृपया या पॅकेटमधील माहिती वाचण्यासाठी काही मिनिटे द्या. यात आमच्या प्रवासाचा कार्यक्रम आणि इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे. आम्ही आपल्याशी या काळासाठी [विश्रांतीचा दिवस वर्णन करण्यासाठी वेळ देण्याबद्दल उत्सुक आहोत]. आपण आपला निवास अधिक सुखद करण्यासाठी काहीही करू शकत असल्यास कृपया आम्हाला कळवा. [EVENT TITLE] सामील झाल्याबद्दल धन्यवाद. प्रामाणिकपणे, |
वैजापूर,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात "श्री" विसर्जन मिरवणूक आज उत्साहात व शांततेत पार पडली. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात ढोलताशांचा गजर व डीजेच्या दणदणाटात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी अकरा वाजेपासूनच "श्री" विसर्जनास सुरुवात झाली. सुरुवातीला माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांनी स्थापन केलेल्या शहरातील श्री. स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाने आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेना नेते आसाराम पाटील रोठे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांच्याहस्ते गणपतीची पूजा व वृक्षारोपण करून उंट, घोडे व लेझीम पथकासह पाटील गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात केली. अत्यंत शिस्तबध्दपणे व मुलींच्या लेझीम पथकासह काढण्यात आलेल्या मंडळाच्या या गणपतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. "श्री" विसर्जन मुख्य मिरवणुकीस सायंकाळी सात नंतर प्रारंभ झाला. शहरातील 50 गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या दणदणाटात गणरायाला निरोप देण्यात आला. परंपरागत विसर्जन मार्ग असलेल्या गांधी रोड व्यतिरिक्त यावर्षी पहिल्यांदाच संकट मोचन हनुमान मंदिराकडून गणेश मंडळांना मार्ग खोलून दिल्याने या मार्गावरून येणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन मिरवणूक काही काळ थांबली होती. किरकोळ वाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. श्री.गणेश महासंघाच्यावतीने अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, सचीव धोंडिरामसिंह राजपूत, घनश्याम वाणी, जफर खान, विनोद गायकवाड, बापू गावडे,बाबासाहेब गायकवाड यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मिरवणुकीत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, गणेश महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत, सचिव जफर खान, घनश्याम वाणी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक सहभागी झाले होते.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, गोपनीय शाखेचे संजय घुगे हे मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. पुढे जाण्यावरून निर्माण झालेला किरकोळ वाद वगळता मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पडली. |
नागपूर (प्रतिनिधी) - नूकताच जाहिर झालेल्या 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत विदर्भातून शिवम जाधव ने 500 पैकी 486 गुण (97.2%) मिळवून विदर्भातून तिसरा आणि राज्यातुन 11 वा तर बंजारा समाजातून प्रथम क्रमाकाने मेरिट उत्तिर्ण झाला आहे. शिवम शशिकात जाधव हा नागपूर येथील भारतीय विद्या भवन्स विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत होता. यापूर्वी त्याने मॅथेथिक ऑलपियाड मुंबई या सेंटरल बोर्डच्या परीक्षेत सुध्दा सुयश मिळविले आहे. शिवम जाधव ने मिळविलेल्या या यशाबद्दल संपूर्ण बंजारा समाजातून व भारतीय विद्या भवन्स नागपूर कडून त्यांचे कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय शिवम जाधवने आपले आई-वडिल डॉ.सौ. सुरेखा शशिकांत जाधव यांना दिले. शिवम जाधव ह्या यशा बद्दल सा. बंजारा पुकार परिवार तर्फे अभिनंदन करण्यात आले. दि. ०२/०९/२०१७ रोजी शनिवार ठाणे शासकीय विश्रामगृह येथे नागपुरला २८ व २९ ऑक्टोबर ला होणाऱ्या अ. भा. गोर बंजारा साहित्य संमेलन बाबत मुंबई, कोकण विभागीय बैठक संपन्न झाली. |
सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा संजय केदार यांची नियुक्ती झाली आहे. केदार यांनी जानेवारी महिन्यात मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. मात्र, ७ जुलै रोजी त्यांच्या जागेवर तडकाफडकी मनमाडचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसातच करोनाचे संकट देशावर आले आणि देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात सिन्नर शहरात चांगले काम करणाऱ्या केदार यांची अचानक पाच महिण्यात बदली झाल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. विशेष म्हणजे मेनकर यांच्या नियुक्तीचे आदेश निघताना केदार यांना कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता. या बदलीच्या विरोधात केदार मॅटमध्ये जातील अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह उदय सांगळे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी केदार यांच्या नियुक्तीचे आदेश आज (दि.२३) काढले आहेत. |
सुंदर, मार्गारीटा, मार्गोचे नाव, स्वतःच बोलते बर्याचदा मार्गारिर्टे नावाचा अर्थ राणी किंवा सुंदर फूल डेझीशी संबंधित आहे. लॅटिन भाषेतील मार्गारिटा ("मार्गारिटाईटिस") मधून अनुवादित भाषेत "मोती" किंवा "मोतीची आई" असे म्हटले जाते, तेव्हा याच नावाचा "मार्जरीटोस" किंवा एफ्रोडाइट - सौंदर्यसृष्टीची देवता आहे. मार्गारिटा - एक करुणास नाव, अगदी तीक्ष्ण आणि अधीर ठिकाणीही तिचे मालक सरळपणा व स्वातंत्र्या द्वारे दर्शविले गेले आहे, ती आपले मत व्यक्त करण्यास घाबरत नाही, जरी ती इतरांच्या मतानुसार पूर्णपणे भिन्न असली तरी. बालपण मार्गारिटा-मुलगा मित्रांशी संपर्कात चांगले आहे, साहस आवडतात अभ्यासात, तो नेहमी पहिला प्रयत्न करतो, शिक्षकांशी भांडणे आवडतो, जे बहुधा शाळेतील मतभेदांचे कारण असते. मानवतावादी विज्ञान अचूक निवड करतात. कार्य जर आपण व्यवसायाबद्दल बोलत असाल ज्यामध्ये मार्गारिटा स्वतःला प्रकट करू शकते तर बहुधा शिक्षक, अभियंता आणि मुख्य भूमिकेची पूर्तता तिला होईल. स्वतः मध्ये कार्य करणे ही मुख्य गोष्ट नाही, फक्त भौतिक घटक जे पूर्णतः गरजा पूर्ण करते, ज्यामध्ये अनेक आहेत, महत्वाचे आहेत. सोसायटी मार्गारिटा जवळजवळ मित्र नाही, हे तिच्या लोकांच्या अविश्वासमुळे होते आणि ज्या व्यक्तीने स्वतःच्या अहंकारास प्रथम स्थानी असणे आवश्यक आहे, आणि इतरांच्या समस्यांबद्दल आणि चिंतेकडे फारसा रस नाही. महिलांसाठी, नावाचा मालक पुरुष कंपनी पसंत करतो. त्याऐवजी पुरुष लक्ष न देता सोडू नका. त्याच वेळी मार्गारिटा "द्वदमा-या" साठी किंवा त्यासाठी शोधण्यात येत आहे. नातेसंबंध जोडी आणि नातेसंबंध मध्ये तो हाती सत्ता असलेला प्रबळ स्थिती पसंत. जोरदार एक ब्रेक अनुभव, स्वतः मध्ये बंद करू शकता लिंग मार्गरिटा एक उज्ज्वल, अनैतिक, वैविध्यपूर्ण आवडतात. पण तिच्या अंथरुणावर बसणे केवळ सशक्त आणि आत्मविश्वास व्यक्तीसाठीच शक्य आहे. मार्गोला प्रेमात पडणे हे दुर्दैवी होते, ती कधीही विसरू शकत नाही. कुटुंब आणि विवाह मार्गारिटा फारच मोनोग्रामस म्हटले जाऊ शकते, म्हणून ती एकापेक्षा जास्त वेळा विवाह करणार आहे हे शक्य आहे. परंतु, प्रौढत्वामध्ये निष्कर्ष काढला जाणारा विवाह, दिवस अखेरीपर्यंत टिकणार आणि टिकणार आहे. बर्याचदा माझ्या पतीला त्याच्या मार्गारिटापासून खूप खळबळ करावी लागते - अगदी विवाहित असल्यामुळे, इतर चाहत्यांसोबत ती फ्लिकर्ट करीत नाही. सुसंगतपणा आम्ही सुसंगतता बद्दल बोलत असाल तर, मार्गारिआ मायकेल, Gennady, Eduard, सेर्गेई नाव सर्वात योग्य आहेत. या लोकांबरोबर, त्या कुटुंबात आणि सिव्हिल रिलेशनशिपमध्ये तिचे दीर्घकालीन संबंध असू शकतात. सिरिल, इवान, विटाली किंवा व्लादिमिरसोबत विवाह करणे बहुधा अधिक काळ टिकणार नाही. म्हणून, जे सर्व सांगितले गेले आहे ते नमूद करा, नाव मार्गारिाचा अर्थ खालील गुणधर्मांवरून कमी झाला आहे : सरळपणा; स्वातंत्र्य; असहिष्णुता; स्वार्थ; व्यावहारिकता; हेतू; निधर्मीपणाच्या कडीवर नेतृत्व करणे; स्पष्टपणा; अवास्तव. |
जळगाव प्रतिनिधी । आर.ओ. तात्या पाटील यांच्या प्रकृतीबाबत पसरवण्यात येणार्या अफवा निराधार असून ते लवकरच सक्रीय होणार असल्याचे नमूद करत आमदार किशोर पाटील यांनी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांची नियोजीत सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगतले. याबाबत वृत्तांत असा की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे १५ फेब्रुवारी रोजी सभा होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, अलीकडेच माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाल्यामुळे ठाकरे यांची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडने सर्वप्रथम दिले होते. यावर आज खुद्द आमदार किशोर पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. आज सायंकाळी शहरातील पद्मालय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी आर.ओ. तात्यांच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला असला तरी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ते लवकरच सक्रीय होणार असल्याची माहिती दिली. तात्यांच्या प्रकृतीबाबत मीडिया तसेच सोशल मीडियातून सुरू असणार्या अफवा या निराधार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये. कारण आम्ही सर्व शिवसैनिक सभेसाठी सज्ज असलो तरी स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांनीच ही सभा पुढे ढकल्याचे निर्देश दिले. यामुळे त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. दरम्यान, त्यांनी युती होवो अथवा न होवो...शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, किशोर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. |
Lab in Aurangabad for native cows; Chief Minister's announcement । देशी गायींसाठी औरंगाबादेत लॅब; मुख्यमंत्र्यांची घोषणा, शासकीय खर्चातून राज्यातील गायींचा विमा - Divya Marathi\nLab In Aurangabad For Native Cows; Chief Minister's Announcement\nदेशी गायींसाठी औरंगाबादेत लॅब; मुख्यमंत्र्यांची घोषणा, शासकीय खर्चातून राज्यातील गायींचा विमा\nजालना - राज्यात शासकीय खर्चातून गायींचा विमा काढला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. शिवाय उत्तम प्रतीच्या देशी गायींच्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी औरंगाबादेते सिमेन सॉर्टेड लॅब उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.\nजालना येथे आयोजित महा पशुधन प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पशुधन जगवण्यासाठी स्वस्तात औषधी मिळावी म्हणून जेनेरिक मेडिकल, पशुधनासाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यासंदर्भात मागणी केली होती.\nदूध वाढीसाठी उपयोगी\nदुग्धोत्पादनवाढीसाठी राज्य सरकारने सिमेन सॉर्टेड लॅब हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. या माध्यमातून गायींपासून कालवड जन्माला येईल. त्यामुळे राज्यात गायींची संख्या वाढेल व पर्यायाने दूध उत्पादनात वाढ होऊ शकते. |
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव 'अहल्या' असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. 'चपराक'ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा 'चपराक'कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात. सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोकी अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे दुरूस्त करावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. अहल्याबाईंची थोरवी सर्व भारतात बद्रीनाथ ते कन्याकुमारी पर्यंत आजही गायिली जाते. त्यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्याने सोलापूर विद्यापीठाचा गौरव झाला आहे. माझ्याकडे धनगर समाजातील काही बांधव आले व त्यांच्या आहे त्या नावाचा आग्रह आहे, असे सांगितले. माझा त्या नावाला विरोध नाही. मी पुण्यश्लोकी अहल्यादेवींवर पुस्तक लिहिले आहे. त्यांचा स्मृतीदिन मी श्री रूक्मिणी मंदिरात अनेक वर्षे साजरा करीत होतो. त्यांच्या जीवनावर मी अनेक व्याख्याने दिली आहेत. इतका त्यांच्याविषयी मला आदर आहे. या विषयावर कलह होऊ नये. सर्व समाजाला आहे हे नाव मान्य असेल तर माझा काहीही आक्षेप नाही. |
कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोनासारख्या महामारीशी लढाई करताना सर्वसामान्य नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात कार्यतत्पर असलेल्या महानगरपालिकेला शुक्रवारी कोरोनानेच धक्का दिला. महापालिकेचे उद्यान अधीक्षक अरुण दत्तू खाडे यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या या उमद्या अधिकाऱ्याचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. हळद वाळण्यापूर्वीच त्यांना कोरोनाने हिरावून घेतल्याने महापालिका वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी गावचे रहिवासी असलेले अरुण खाडे गेल्यावर्षीच महापालिकेकडील उद्यान विभागात अधीक्षक म्हणून नोकरीस लागले होते. नोकरीवर हजर झाले आणि शहरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या महामारीत त्यांना विविध टप्प्यांवर काम करावे लागले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कारोनायोध्दा म्हणून काम केले. कोरोनाची साथ संपल्यानंतर दि. ७ मार्च रोजी त्यांचा विवाह झाला. शुक्रवारी त्यांच्या विवाहाला दोन महिनेच पूर्ण झाले होते, तोपर्यंतच त्यांच्यावर नियतीने घाला घातला. दि. १६ एप्रिल रोजी ते पळशी गावी गेले होते. दि. १९ एप्रिलला कोल्हापुरात आले. त्यापूर्वी त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्यामुळे एन्टिजेन चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतर ते आयसोलेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेथे त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. तरुण अधिकाऱ्याचे निधन झाल्याची वार्ता पसरताच महापालिकेत हळहळ व्यक्त होत होती. (फोटो मिळवून देत आहे) |
भूकंपाचे धक्के हे मंगळवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान जाणवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजीचे अधिकारी आता या भूकंपाशी संबंधित माहिती गोळा करत आहेत. या भूकंपामुळे अद्याप कुठल्याही नुकसानीची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. उत्तर भारतातील सर्व भागात गेल्या काही दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि ईशान्येकडील काही भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. |
Women's Day Special : महिला नेमकी कुठे गुंतवणूक करतात? मुंबई : आजवर गुंतवणूक हा विषय आला की, बहुतांश महिला या 'आम्हाला त्यातले फार काही कळत नाही अथवा माझे पती, वडील किंवा भाऊ ते सारे बघतात,' अशा आशयाची उत्तरे द्यायच्या; पण अलीकडच्या काळामध्ये या विषयातही महिलांनी विशेष रस घेण्यास सुरुवात केली असून, अनेक महिला रिअल इस्टेटपासून, शेअर बाजार आणि सोन्यापासून ते म्युच्युअल फंडापर्यंत सर्वच क्षेत्रांत स्वतःहून गुंतवणूक करत असल्याचे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम उद्योगातील अग्रगण्य अनारॉक संस्थेच्या सर्वेक्षणातून ही रंजक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार ६५ टक्के महिलांनी त्यांना रिअल इस्टेट अर्थात गृहनिर्माण प्रकल्पांत गुंतवणूक करण्यात प्राधान्याने रस असल्याचे सांगितले. यांपैकी ८३ टक्के महिलांनी ४५ लाख रुपये किंवा त्यावरील घरात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत, तर उर्वरित महिलांनी ९० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या घरात त्यांना रस असल्याचे सांगितले. आठ टक्के महिलांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात रस असल्याचे दिसून आले, तर सात टक्के महिलांना मुदत ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे सोयीचे वाटत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बहुतांश महिला स्वतःचे आर्थिक निर्णय घेताना गुंतवणूक सल्लागाराशी थेट संवाद साधत निर्णय घेत आहेत. - नोकरी किंवा व्यवसायात असलेल्या महिलांचा कर्ज घेण्यातील टक्का वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून दिसून येते. - देशात होणाऱ्या एकूण कर्ज वितरणात महिलांचे प्रमाण २६ टक्के असल्याचे दिसून आले. - गृहकर्ज, गोल्ड लोन, शैक्षणिक कर्ज घेण्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. - वाहनकर्जामध्ये मात्र तितकेसे प्रमाण दिसत नाही. |
आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहाण्याआधी देशाच्या भविष्याची स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करा, असे आवाहन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी शनिवारी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना केले. आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहाण्याआधी देशाच्या भविष्याची स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करा, असे आवाहन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी शनिवारी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना केले. आयआयटी मुंबईचा ५३वा दीक्षांत समारंभ पवई कॅम्पसमध्ये झाला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दोन हजार ३८९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर ऑटोमोबाइल क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेत महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांना 'डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. तर, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे डॉ. दिनेश शर्मा यांना सत्यार्थी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर याप्रसंगी उपस्थित होते. देशात वाढत असलेल्या शाळाबाह्य मुलांची संख्या लक्षात घेता, लवकरच आपण '१० मिलियन्स-१० मिलियन्स' ही चळवळ सुरू करणार आहोत. यात देशातील जे '१० मिलियन्स' विद्यार्थी उच्च शिक्षणाचे धडे घेत आहेत. ते शिक्षणापासून अलिप्त असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणार आहे. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. |
कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउन आणि सध्याच्या परिस्थितीत अनेकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. यातच मनोरंजन विश्वाचं ठप्प झालेलं काम काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलय. मात्र तरीही मनोरंजन क्षेत्रातील कलाकारा अनेक अडचणींना सामोरं जाव लागतय. यातली महत्त्वाची अडचण म्हणजे घराची. अभिनेत्री पूजा बिरारीला कोरोनाच्या भीतीमुळे घर मिळेनासं झालय. झी युवा वाहिनीवरील 'साजणा' या मालिकेत पूजा झळकली होती. आणि आता 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतून तिला पुन्हा संधी मिळाली आहे. या मालिकेत काम करत असताना मुंबईत भाड्याने घर मिळणं दुर्लभ झाल्यानं तिला या अडचणीला सामोरं जावं लागतय. तेव्हा कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या हळूहळू सगळं सुरळीत होत असलं तर अद्याप बऱ्याच गोष्टी अजूनही सुरळीत झाल्या नसल्याचं चित्र पाहायला मिळतय. |
लॉकडाउनमध्ये घरात राहून करण्यासाठी विविध गोष्टी आहेत मग त्यापैकी काय करायचं? तर काही कलाकार मंडळींनी विविध व्हिडीओ करायचं ठरवलं आहे. घरातच राहून विविध व्हिडीओ शूट करून वेगवेगळ्या थिमवर कलाविश्वातील कलाकार व्हिडीओ तयार करत आहेत. सोशल मिडीयावर तर सध्या कलाकारांचे हे व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. नुकताच काही अभिनेत्रींनी मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री विणा जगताप, समृध्दी केळकर, सरीदा मेहेंदळे जोशी, तितीक्षा तावडे, मयुरी कपाडने, रिचा अग्नीहोत्री झळकत आहेत. घरात राहून या अभिनेत्री काय काय करत आहेत हे या व्हिडीओत पाहायला मिळतय. इतके दिवस घरात असूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य या व्हिडीओतून सकारात्मक ऊर्जा देतय. कुणी पुस्तक वाटतय, नाचतय, घरकाम करतय, व्हिडीओ कॉल करतय अशा विविध गोष्टी या व्हिडीओत दाखवण्यात आल्या आहेत. त्यातच 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर हा व्हिडीओ केला असल्याने हा व्हिडीओ सकारात्मक वाटतो. शिवाय घरातच राहण्याचही आवाहन या अभिनेत्री या व्हिडीओतून करत आहेत. |
प्रकरण ३७ वें क्षणभर मुकुंदरावहि गडबडले. नंतर त्यांनी हसून खुणेनेच इंदिराताईंना झोप लागली असल्याचें सांगितलें. नंतर ते हलकेंच म्हणाले, " आठ दिवसांनंतर आज तिला ही झोप लागते आहे. तुम्हाला बघून तिला इतकं स्वस्थ वाटलं. " माझ्या सर्वोगांतून आनंदाच्या लहरी उठल्याप्रमाणे मला झालें. मनाला एकदम हलकें वाटू लागलें. मी खाली गेलें आणि मधल्या अंधा-या खोलीत बसून खूप रडलें. त्या रडण्यांत दुःख मात्र नव्हतें. मग मावशींनी इंदिराताईंच्या आजाराची हकीकत सांगितली. इंदिरा ताईंना टायफॉइड झाला होता. आठ दिवसांत त्यांना झोप आलेली नव्हती. आणि त्यापूर्वीपासूनच ताप येत असून तो पुरता निघत नव्हता. आता दोनतीन दिवसांत उतार पडला पाहिजे म्हणजे काळजी नाही असें जुन्नरचे डॉक्टर विश्वनाथराव म्हणाले होते. आणि आज त्यांना स्वस्थ झोप लागली होती. मावशीहि मला म्हणाल्या, " सुमतीताई, तुम्ही तार पोचल्या बरोबर आलांत म्हणून बरं झालं. इंदूला बोलवत नाही; पण त्यांतून बळ करून म्हणायची, की सुमतीताईंना बोलवा म्हणून. संध्याकाळ डॉक्टर आले तेव्हा त्यांनी अत्यंत अनुकूल अभिप्राय दिला. डॉक्टरांची आणि माझी चांगली ओळख होती. ते मला म्हणाले, "आता जायची घाई करूं नका बरं का. " नाही, नाही. मुळीच घाई करणार नाही. तेवढयांत इंदिराताई क्षीणपणें बोलल्या, " जायचंच नाही. बरं, नाही जाणार. तुम्ही लवकर बऱ्या व्हा म्हणजे झालं. " डॉक्टर न बोलण्याची सूचना करीत असतां इंदिराताई म्हणाल्या, वचन द्या जाणार नाही म्हणून. माझीं कोरीव लेणीं मीं इंदिराताईचा हात हात घेतला आणि म्हटलें, अगदी वचन. पण आता तुम्ही स्वस्थ पडा. बोलण्याचे श्रम घेऊं नका मुळीच. एखाद्या लहान मुलाप्रमाणे इंदिराताई एका कुशीवर वळल्या आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. प्रकरण ३८ वें दिराताईच्या प्रकृतींत झपाटयाने सुधारणा होत गेली. त्यांच्या शुश्रूषेचें काम मीं सर्वस्वी आपल्याकडे घेतलें होतें आणि इंदिराताईंना त्यामुळे अतिशय समाधान वाटत होतें. इंदिराताई माझ्यावर किती सहज प्रेम करीत होत्या ! त्यांत कुठे कांही देखावा नाही, खोच नाही, कांही नाही. माझ्या मनांत त्याच्याबद्दल इतका अशुभ विचार आला कसा हेंच मला आता नवल वाटू लागलें होतें. माझ्या मनाच्या डोहांत असलें हें सापाचें पिल्लू का उमटलें ? माझेंच मन मला खात होतें म्हणूनच मी इंदिराताईच्या शुश्रूषेची तपस्या करीत होतें. त्या शुश्रूषेमुळे इंदिराताईंना आराम पडत होता आणि त्यामुळे मला एक प्रकारें तपस्यापूर्ति झाल्याप्रमाणे वाटत होतें. पण माझ्या मनांत असा विचार आलाच कां, हें प्रश्नचिन्ह डोळ्यांपुढे कालियाप्रमाणे नाचत होतें. इदिराताईच्या नित्य शुश्रूषेमुळे मला पुष्कळच दगदग होई; पण मनाला बरें वाटे. पण इंदिराताईच्या खोलीबाहेर पडलें, की मनाला बेचैन होई. इंदिराताई तोंडाने पुष्कळदा म्हणत, तुम्ही इतके माझ्या करिता श्रम करतांहां, आता तुम्हीच आजारी पडाल बरं का. जरा तरी विश्रांति घेत चला पण जरा दूध, लापशी वगैरे देण्याच्या वेळी मी नसलें, की त्या सहज म्हणून माझी चवकशी करीत. मुकुंदराव एकदा माझ्यादेखतच थट्टेने त्यांना रुष्ट स्वरांत म्हणाले, " इंदू, तूं आता माझ्यापेक्षा सुमतीताईच्यावर जास्त प्रेम करायला लागलीस अं ! " इंदिराताईंनी त्यांच्याकडे पाहात विचारलें, " शक्य तरी आहे का तें ?." त्यांनी स्वरांत थट्टेचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या नेत्रांतून उमटलेला प्रोतीचा संदेश गहनगंभीर होता. |
शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी. टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली. नागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी. टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली. महापालिकेने २०१५ मध्ये स्मार्ट सिटीसाठी काही आयडिया मागितल्या होत्या. यातील पहिल्या तीन आयडिया देणाऱ्यांना मनपा शहराचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनविणार होती. त्यांना पुरस्कृतही करणार होती. मनपाने त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले होते. नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत १४०० आयडिया मनपाला पाठविला. यातून गौरवने दिलेली आयडिया प्रथम ठरली होती. गौरवने हा प्रोजेक्ट तयार करताना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यातून काही त्रुटी काढल्या. पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था लक्षात घेतली. त्यावर अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. त्याने नागपूर झूम अॅप तयार केले. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवर फोकस केले. गौरवने तयार केलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम त्याने सिटी बसवर फोकस केले. कारण आजही नागपूरकरांमध्ये शहर बससंदर्भात संभ्रम आहे. बसची निश्चित वेळ, थांबे याबाबत माहिती नाही. गौरव जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसला लावून अॅपच्या माध्यमातून बसची इत्थंभूत माहिती मोबाईलद्वारे नागरिकांना मिळणार होती. ओला, उबेर या खासगी प्रवासी वाहनांप्रमाणे ही यंत्रणा संचालित होणार होती. त्याचा डेमोसुद्धा गौरवने दिला होता. शहरातील वाहतुकीच्या समस्येचे मूळ म्हणजे सिग्नलचे मॅनेजमेंट नाही. शहर स्मार्ट होताना वाहतुकीची व्यवस्था स्मार्ट झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कितीही असली तरी, आपल्या सिग्नलमध्ये ३० सेकंदचा टाईम सेट आहे. गौरवने शहरातील सिग्नलला सेंसरच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची आयडिया दिली होती. यातून सिग्नल वाहतुकीची स्थिती लक्षात घेता ऑटोमॅटिक ऑपरेट होणार होते. त्यामुळे आज जसा आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो तो या यंत्रणेमुळे बसणार नव्हता. शहरातील विशेषकरून बाजारपेठ परिसरात पार्किंगची बिकट समस्या निर्माण झाली होती. कारण चारचाकी वाहने झपाट्याने वाढली आहेत. लोकांना अजूनही पार्किंगच्या जागा माहिती नाही. गौरवने तयार केलेला नागपूर झुम अॅप पार्किंगची समस्या सोडविण्यास महत्त्वाचा ठरणार होता. २०१५ मध्ये या आयडिया मनपाला दिल्या होत्या. मनपा त्याची अंमलबजावणी करणार होती. चांगल्या आयडियांना पुरस्कृत करून, पहिल्या तीन आयडियांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनविणार होती. पण आज या आयडिया धूळखात पडल्या आहेत. २०१५ च्या आयडिया २०१९ मध्ये पुरस्कृत करण्यात आल्या आहे. अजूनही कुणाला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनविले नाही, याची खंतही गौरवने व्यक्त केली. |
पहिलीला शाळेत जाण्याआधी माझ्या बाबांनी आमच्याच घरी ट्युशन लावला होता. प्राथमिक शाळेतल्या बाई अर्धा-एक तास मला घरी शिकवायच्या. पाटीवर लिखाण करण्याचा सहामाही झाली आणि मला सहामाही परीक्षा नंतर पहिली मध्ये बसवला. कारण सहा महिन्यात फाटक बाईने माझं पहिलीचा अभ्यास चांगलं करून घेतलं होतं. मोत्यातली दाणे असे वाटायचे. मस्तपैकी सुंदर अक्षर असे लिहिलेले असायचे त्यांचं जसं मराठी अक्षर फार सुंदर होतं तसं त्यांचं इंग्लिश अक्षर देखील फार सुंदर होता एकदा त्यांनी माझी वही बघितले त्यांना वाईट वाटलं पण त्यांनी तसं माझ्यासमोर मला दाखवलं नाही उलट माझं कौतुक केलं म्हणाले "कृष्णा तुझे अक्षर सुंदर असायला हवे कारण तुझी चित्रकला मी पाहिलेली आहे आणि ज्याची ड्रॉईंग छान, चित्रही छान तर त्याचं अक्षरीही अक्षरही छान असतं , मी माझ्या बाबांची डायरी घेतली आणि तशीच अक्षरे लिहायला घेतले माझे अक्षर सुंदर बनायला लागले. कारण बाबांच्याअक्षरात काना मात्रा त्याकडे आवर्जून लक्ष असे हळूहळू माझा अक्षरेही सुंदर वळणदार झालेली. या सुंदर अक्षर यामागचे माझ्या बाबांचे मला प्रेरणा होती. त्यामुळे माझे अक्षरही वळणदार सुंदर झाले होते, एकदा तिसरीला असताना गुरुजीने आम्हाला मकर संक्रांति या सणाची विशेष माहिती लिहून आणायला सांगितली. तसं मी चांगला निबंध लिहून दिला होता, त्यावेळी चव्हाण गुरुजीने सगळ्यांसमोर माझी पाठ थोपटली होती आणि वर्गात माझं चांगलं कौतुक केलं होतं चव्हाण गुरुजी माझं कौतुक करत सगळ्यांना बोलले "खरे एके दिवशी चांगला मोठा लेखक होईल. कारण आतापासूनच कथा लिहिली ती कथा वाचताना आटोपशीर लिहिलेली आहे असं वाचकांना वाटेल". कौतुकाचे असे चार शब्द लहान मुलांना मिळाले ना तर त्याचा जीवनाचं सोनू होऊन जातं कारण अशाच कौतुकाने त्याला अजून काम करण्याचा उत्साह येतो. पण काही स्वार्थी माणसं मुलांचा जीवन उध्वस्त करत आहेत, कारण काही कौतुक तर काही करतच नाहीत पण त्यांचा उत्साह कमी करतात ,नाराज करतात त्यामुळे होतं काय अशा माणसाची आधोगती लवकर होते . जर हे त्याला कळाले तर त्यालासुद्धा पश्चाताप होतो. म्हणून आपल्याला कुणाचं चांगलं करायला जमत नसेल तर वाईट तरी कोणाचं करू नये हे जे मोठे माणसं बोलतात ना ते खरं आहे. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुम्हाला मनातून सुद्धा एक आनंद मिळत असतो तेच वाईट काम करा कराल तर तुम्हाला आत्मिक आनंद मिळणार नाही जे काही आनंद असेल तो तात्पुरता असेल , फसवा असेल. असेल तसं मी छोट्या छोट्या गोष्टी लिहायचा प्रयत्न करत होतो पण मला असं आढळलं , की लेखकाला चांगली कथा चांगले लेख लिहायचे असतील तर त्याला त्या विषयाच्या लिखाणाला वेळ दिलाच पाहिजे नाहीतर घाईगडबडीत लेख लिहिण्याचा प्रयत्न केला, कथा लिहिण्याचा प्रयत्न केला पण वाचकांना ते लेख आवडेलच असं नाही म्हणून कथा किंवा लेख वाचकांना आवडणारी होण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागतो विचार करायला तेवढा वेळ लेखकाला देणं भागच आहे आणि त्या वेळात जो लेख किंवा कथा तयार होते ते वाचकांना आवडलेलं असतं, आपण पाच वर्षाचा मुलगा असला का त्याला अंगणवाडीमध्ये शिशू म्हणून पाठवतो पण आमच्या जमान्यामध्ये सहा-सात वर्षाचा मुल झालं की मुलाला शाळेत पहिलीत प्रवेश देत, माझ्या लिखाण्या या मागची प्रेरणा म्हणजे फारच कंटाळवाणं होती कारण ज्यावेळी पहिली ला जायचं वेळ होती ते वयच सहा सात वर्षाचे पण त्या वयात मला बोलता येत नव्हतं लहानपणी माझा भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे सर्दी तापाने अचानक वारलाने,मला मानसिक धक्का बसला, आणि त्यानंतर मी एकाकी झालो असे वाटायला लागले होते,आम्ही दोघे कोलशेत गावात आम्ही दोघे भाऊ आमची बहिण लहान होते,आणि माझा भाऊ मला भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे हा लहानपणी माझ्या बरोबर गावात कुठेही असायचा मी फॅट होतो आणि शांत होतो पण अचानक माझा भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे अचानक गेल्याने मी एकटा पडलो जिथे आम्ही राहत होतो ते घर आईला माझा भाऊ गुरुनाथ नसल्याने खायाला उठायचे तिला वाटायचं आता आपण लहान मुलांना बरोबर कुठे कुठेतरी लांब राहायला पाहिजे म्हणून ते कोलशेत सोडून पातलीपाडा येथे राहायला आलो आणि मला माझा भाऊ गुरुनाथ अचानक गेल्याने चुकचुकल्यासारखे सारखे वाटायचे, दुःख सारखे वाटायचे. अचानक माझी वाचाच बंद पडली होते,मला आता बोलता येत नव्हतं,पातलीपाडाला आल्यानंतर आणि बऱ्याच ठिकाणी बाबांनी मला बोलता यावं म्हणून डॉक्टर दवाखाना केला पण काही उपयोग झाला नाही पण तरीही बाबा माझे काही प्रयत्न सोडत नव्हते,एकदा मला ठाण्यातल्या चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. कडे घेऊन गेले ,त्यांनी मला खालून वर चेक केले,काही शब्द बोलायला सांगितले ते शब्द मी बोलत होतो ,पण माझे शब्द बोलायला जड जात होते ,ते त्यांनी त्यातच परिक्षा केली काही औषधे व ईंजेक्शन औषधांचा कोर्स करायला सांगितले आणि ईतक्या दिवस मी मुका राहणारा मी परत बोलन हे स्वप्नात देखील वाटले नव्हते,दुपारी घरातील थोडे वामकुक्षी झाल्यावर झोपेतून उठून जो तो हातपायतोंड धुऊन चायखारी बिस्कटे खात पित होते,मी मोरीत हातपायतोंड धुत असता माझा बोट चुकून जीभेला लागलं तशी माझी जीभ जोरात दाबली गेली आणि जीभेच्याखाली जीभेला असणारा गुबगुबीत फोड औषधे घेऊन नरम झाला होता,तोच फोड फुटला होता मी पाण्याची गुळणी करुन मोरीत थुंकलो व परत पाणी घेऊन तोंड धुतलं ,मी आता पटापट आई बरोबर बोलायला लागलो होतो ,घरात सगळी कडे आनंदी आनंदी आनंद झाला.मधला भाऊ गुरुनाथ वारल्यानंतर आम्ही तिघे उरलो होतो,मोठा भाऊ आईच्या गावाला म्हणजेच मामाच्या गावाला,उलवे गावाला शिकायला पाठवलं होतं,आता पातलीपाडा येथे मी आणि माझी छोटी बहीण व आई ,बाबा असे चार सभासद कुटुंब पण आई बाबा माझ्या तब्येतीची काळजी घेत,मला पुस्तक वाचायला आवडत असे,कधी ठाण्याच्या बुधवाराच्या बाजारात बाबांबरोबर गेलो की गोष्टीचे पुस्तके घ्यायचो,बाबांना सुदधा बरं वाटायचं, होटेलात मला बाबा केशरी दूध व मलई बर्फी घेऊन द्यायचे किती आनंद वाटायचा मला.घरी आलो का आई बाबांना बडबडायची "मुलाला बाजारात घेऊन जाता त्याला नाश्ता वगैरे द्यायचा ना" मग मीच पटकन बोलायचो ,"नाही आई,बाबांनी मस्त केशरी दूध व मलई बर्फी दिली ना ,खायाला,किती बरं वाटलं,आणि हे मला गोष्टीचे पुस्तके पण घेऊन दिलीत बाबांनी"तेव्हा आईचा राग शांत व्हायचा, माझ्या पहिल्या गमभण लिखाणाला फाटकबाई ह्या प्रेरणास्रोत, माझ्या पहिल्या शुदधलेखन व सुंदर वळणदार अक्षराचे प्रेरणास्त्रोत माझे बाबा रामचंद्र खरे, माझ्या पहिल्या निबंध कथालेखनाचे प्रेरणास्त्रोत चव्हाण गुरुजी, माझ्या पहिल्या एकाकिंका नाट्यस्पर्धेला जी एकाकिंका लिहली.ती एकाकिंका"अजूनही वेळ आहे" या एकाकिंकेला उत्तेजनार्थ सन्मान पदक मिळाले त्याचे पहिले प्रेरणास्रोत शिष्यमित्र सिद्धार्थ कांबली हा आहे,हा माझा छोट्या भावासारखा . बालकथा ढिश्योंव ढिश्योंव"या दिवाळीअंकाचे संपादक रामनाथ थरवळ सर हे पण माझ्या बालकथेचे पहिले प्रेरणास्रोत. "आरोग्यश्री' या दिवाळी अंकासाठी माझ्या पहिल्या वैद्यकीय ड्रग्जलेस थेरपीच्या विषयाच्या "क्रेमोथैरपी "लिखाणाला पहिले प्रेरणास्त्रोत " आरोग्यश्री" संपादक डॉ.श्रीकांतसर गोडसे. "तुमची आमची सर्वांची मुंबई "या अंतर्गत भारतातील सर्व मराठी साहित्यिंकासाठी साहित्य स्पर्धा संपादक श्री एकनाथसर मोरेंनेआयोजित केली होती.त्यांच्या प्रेरणेने मी लघु नाटिका लिहिली होती व या लघुनटिकेला ला "उत्कृष्ट नाटयलेखन" म्हणून ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले. "वटवृक्ष शिवसेनेचा" डॉ.कृष्णकांत रामचंद्र खरे, हिंदु ह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या समाजसेवेतील स्फूर्ती दायक योगदान यावर लेख लिहिण्याचा योग मला आला,आणि यशस्वी झाला. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. "नोन स्टोप नोव्हेंबर "या सदराखाली एकाहून एक दर दिवसानुसार स्टोरी मिररने दिलेल्या विषयांवर कथा लिहण्याचा योग आला, मला वाचक म्हणून एकापेक्षा एक अशा कथा वाचायला आवडल्या, माझ्या नोन स्टोप नोव्हेंबरमध्ये 20, 21 तरी कथा लिहलेल्या आहेत, व चालु असलेल्या डिसेंबरच्या आपले एवढं उत्स्फूर्तपणे लिखाणाच्या मागे मस्के सरांच्या आग्रहानेच. म्हणजे माझ्या स्टोरी मिरर वर कथा लिहिण्यामागे मस्के सर प्रेरणादायी स्त्रोत आहेत व माझ्या लिखाणा मागे नेहा मैडम स्टोरी मिरर विषयी माहिती देण्याचा त्या माझ्या प्रेरणास्त्रोतच आहेत. जे ध्येय असतात त्याला ते सहायक असतात ती म्हणजे प्रेरणा मिळाल्याने माणूस आणखीन उत्साहाने आपली कर्तबगारी दाखवू शकतो, मग आपण म्हणतो की त्या कर्तबगारीच्या मागे कोणाची तरी प्रेरणा आहे. त्या लिखाणाचा मागे कोणाची तरी प्रेरणा आहे, पण ज्याच्या लिखाणामागे जे प्रेरणास्रोत झाले आहे आहेत त्यांचं निदान लिखाणात नाव तरी येणे गरजेचे आहे कारण अशाच व्यवहाराने एक दुसऱ्याला बरं वाटतं,आनंद मिळतो मग माझ्या लिखाणाच्या मागची प्रेरणा किती छान पद्धतीने झाली आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या नवीन प्रसंगाला ती प्रत्येक पहिल्या लिखाणामागची प्रेरणा वाटते हे आपल्याला वाचल्यावरच बरं वाटेल. |
सासवड : वीर धरणातून नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन २६ मेपर्यंत चालू राहिल्याने वीर धरणातील पाणीपातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्याने सासवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी येणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे अतिशय आतील बाजूला असलेल्या जुन्या धरणामध्ये तात्पुरते दोन वीजपंंप लावून जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची सासवड नगरपालिकेची कसरत सुरू असून, त्यातून सासवड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते. शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर, गराडे, घोरवडी धरणांतील पाण्याचा स्रोत आटल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी वीर योजनेचा स्रोत आहे. त्यातून पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिले होते. तरीही आचारसंहितेचे कारण देऊन सदर प्रश्न प्रलंबित ठेवल्याने व जलसंपदा (नियोजन) विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सासवड शहरातील नागरिकांचे अडचणीत वाढ झाली. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे या खात्याचे मंत्री असून याबाबतचे नियोजन त्यांच्या खात्याकडे आहे. वास्तविक निरा डावा कालव्यास आवर्तन १५ दिवस जादा सोडल्याने धरणातील पाणी पातळी वेगाने कमी होत गेली. यावर सासवड नगरपरिषदेने मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केल्याने दि २६ मे रोजी नीरा डावा कालव्याचे ऊन्हाळी आवर्तन बंद केले. त्यानंतर दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा पाणी पातळी खाली गेल्याने विस्कळीत झाला यावर सोशल मीडिया व नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी वीर धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, हे पाणी वीर धरणात किती क्षमतेने पोहोचेल व किती टीएमसी पाणी धरणात येईल याविषयी शंकाच आहे. ४राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीर धरणाचा डावा कालवा बंद करण्याबाबत व अर्धा टीएमसी गुंजवणी धरणातील पाणी २३० क्युसेक्स वेगाने वीर धरणात सोडण्याचे आदेश दिले खरे; परंतु गुंजवणी धरणातून सोडलेले पाणी प्रत्यक्ष वीर धरणात किती पोहोचणार? तसेच हे पाणी सासवड शहरासाठी राखीव आहे का ? कारण वीर धरणावरून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने सासवडला मिळेल का? याविषयी गंभीर साशंकता सासवडच्या नागरिकांमध्ये आहे. * सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती संजय ग. जगताप तसेच सासवडचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले. |
लोकसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी तसंच विरोधी पक्ष नेत्यांच्या मुलाखती विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह या निवडणुकीत ज्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही असे राज ठाकरे यांच्या मुलाखती मतदारांना पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत आहेत. मात्र या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मीडियापासून दूर का आहेत? उद्धव ठाकरे जाहीर सभांमध्ये बोलताना दिसत आहेत मात्र प्रसारमाध्यमांशी थेट बोलण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल आम्ही शिवसेना नेते आणि पत्रकारांना विचारलं. उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून त्यांची भूमिका मांडत आहेत. सभांमध्ये पत्रकारही असतात आणि सगळेच असतात. ते योग्यवेळी भूमिका मांडतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेशी थेट संवाद साधण्याला प्राधान्य दिलं आहे. जेव्हा थेट संवाद होत आहे, तेव्हा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कशाला बोलायचं अशी त्यांची भूमिका आहे असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. "उद्धव ठाकरे आणि बाकी पक्षांचे नेतेही प्रसारमाध्यमांशी फटकूनच वागतात. त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलायची आवश्यकता वाटत नाही. युतीचा निर्णय घोषित केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मिठी मारली होती. अमित शहा ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना वागवतात तसं आता उद्धव ठाकरे वागू लागले आहेत", असं शिवसेना पक्षासंदर्भात अनेक वर्ष वृत्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "शहा यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर उद्धव यांना विश्वास आहे. त्याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नांना आपण सामोरं जाऊ शकत नाही याची जाणीव उद्धव यांना आहे. युतीची घोषणा झाली त्याहीवेळी पत्रकारांचे प्रश्न घेण्यात आले नाहीत. प्रश्न स्वीकारणं गैरसोयीचं ठरेल याची त्यांनी कल्पना आहे. मात्र त्यांचं मन खातं आहे. अस्वस्थ वाटत असल्याने ते डिनायल मोडमध्ये आहे". "पाच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप यांच्यावर टीका करत होते. युती झाल्यामुळे शिवसेना-भाजप मित्रपक्ष आहेत. हे समीकरण लोकसभेपुरतं आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी हेच समीकरण असेल हे पक्कं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी ऑक्टोबरमध्येच बोलतील", असं त्यांनी सांगितलं. "शिवसेनेने भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्याने सेनेचा कार्यकर्ता हलला आहे. भूमिकेत अचानक झालेला बदल त्यांना तितकासा पटलेला नाही. त्यांनी तसं मधल्या फळीला सूचितही केलं आहे. मात्र मातोश्रीची भूमिका ठरली आहे", असं त्यांनी सांगितलं. "शिवसेना हा वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे. ते जात-धर्म यावरून उमेदवार ठरवत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रभावशाली नेते होते. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध होते. कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी ते प्रयत्न करत असत. मतदार बाळासाहेबांसाठी मतदान करत असत. बाळासाहेब मीडियापासून दूर राहत असत. ते मूडी होते. मात्र त्यांना मीडियाचं वावडं नव्हतं. आता शिवसेनेची कार्यपद्धती बदलली आहे", असं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी सांगितलं. "पाच वर्ष शिवसेनेकडून भाजपवर, त्यांच्या नेत्यांवर टीका केली जात होती. मात्र निवडणुकीसाठी युती जाहीर होताच चित्र पालटलं. यामुळे शिवसेनेचा तळातला कार्यकर्ता नाराज आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी या नाराजीकडे लक्ष न देता वाटचाल करायचं ठरवलं आहे. काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळाला. बाळासाहेबांचा संदर्भ पुसट होताना दिसतो आहे", असं त्यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणतात, "भाजपपेक्षा जागा कमी पडल्या तर काय अशी भीतीही शिवसेनेच्या पोटात आहे. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी-अमित शहा यांना लक्ष्य करत सभा घ्यायला सुरुवात केली आहे. मराठी मतं फुटण्याची शक्यता शिवसेनेला वाटते आहे. परिस्थिती सोनेरी भासवण्यात येत असली तरी तशी नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही". |
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. बुधवारी (9फेब्रुवारी) या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर ४४ धवांनी विजय मिळवला आणि सामन्यात २-० अशी आघाडी मिळवली. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी भारतीय फलंदाजांमध्ये शानदार खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देण्यास चमकदार कामगिरी केली. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज युझवेंद्र चहल हा या सामन्यात त्याच्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीमुळे चर्चेत राहिला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेवटच्या षटकात युझीने फलंदाजी केली. २३७ धावांमध्ये युझवेंद्र चहलने ११ धावांचे योगदान दिले आणि या दरम्यान त्याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, ज्यामुळे त्याने चार धावा काढल्या. संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणारा अल्झारी जोसेफने डावातील शेवटचे ५० वे षटक टाकले. यावेळी चहल समोर स्ट्राइकवर होता. अशा परिस्थितीत जोसेफच्या वेगवान चेंडूला घाबरण्याऐवजी चहल बेधडकपणे स्ट्रेट ड्राईव्ह खेळताना दिसला, ज्यावर त्याने चौकार मारला. त्याच्या या खेळीचे जोरदार कौतुक केले जात आहे. चहलचा चौकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने गोलंदाजीतही एक गडी बाद केला. पण आज सर्वांचे लक्ष चहलच्या फलंदाजीवर लागले होते. वेस्टइंडीजचा हा वर्षातील दुसरा एकदिवसीय मालिकेतील पराभव आहे. या आधी आयर्लन्डने त्यांचा मायदेशात १-२ असा पराभव केला होता. दरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने ६४ आणि केएल राहुलने ४९ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा फक्त ५ धावा करू शकला. सलामीवीर रिषभ पंतने आणि विराट कोहलीने १८ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने २४ तर दीपक हुडाने २९ धावा केल्या. शार्दुल ठाकुरने ८ धावा तर मोहम्मद सिराजने ३ धावा केल्या आणि युझवेंद्र चहलने नाबाद ११ धावा केल्या आणि भारताला २३७ धावा करण्यास मदत केली. वेस्ट इंडिज संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. भारताने या सामन्यात विजय मिळवला. जॉर्ज ऑर्टिझची हॅटट्रिक, एफसी गोवानं मिळवला चेन्नईयनवर मोठा विजय! |
निगम (एल.आय.सी.) च्या नॅशनल फेडरेशनच्या ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडीया यांच्या वतीने दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित द्वितीय विमा महाकुंभ या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज त्यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंग एल.आय.सी. चे वरिष्ठ क्षेत्रीय व्यवस्थापक मुकेशचंद्र जोशी, फेडरेशनचे अध्यक्ष विनय कुसरे व या कार्यक्रमाचे संयोजक दिपक मोघे प्रामुख्याने उपास्थित होते. मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांमध्येही मंडळाने सहकार्य केले असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. 21 व्या शतकातील अर्थव्यवस्था ही विमा, निवृत्तीवेतन व शेअर होल्डिंग या तीन घटकांवर अवंलबून असून ते देशाच्या प्रगतीचे ग्रोथ इंजिन आहे. आपल्या मंत्रालयाचे पोर्ट ट्रस्टचे पेंशन फंड एल.आय. सी . कडे आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना 3 हजार निवृत्तीवेतन देण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली. देशात वाढत्या रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता विमा कंपन्यानीही रस्ते सुरक्षा विषयावर जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे अपघात विमा क्षेत्रास लाभ मिळेल, असेही त्यांनी यावेळी सुचवले. याप्रसंगी श्री. नितीन गडकरी यांचा फेडरेशनच्या वतीने पुष्पहार , मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . दोन दिवस चालणा-या या कार्यक्रमात वित्तीय बाजार, व्यावसायिकता, मानवी व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांच मार्गदर्शन सत्र होणार आहेत. उद्घाटकीय कार्यक्रमास नागपूर व राज्यातील इतर भागातून आलेले विमा कर्मचारी, विकास अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. |
किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याचा विषय गेल्या तीन दिवसांपासून गाजतो आहे. आपण राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला काढून टाकण्यात आलं असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला. त्यानंतर बहुजनांवर सीरियल आणि सिनेमा इंडस्ट्रीत कायम अन्यायच होत आला आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महिला कलाकारांशी गैरवर्तणूक केल्यामुळे काढून टाकण्यात आल्याचं चॅनलचं स्पष्टीकरण आल्यानंतरही किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून हे होणारच होतं. गैरवर्तणुकीच्या आरोपांमध्ये काही दम नाही असं म्हटलं आहे. आपण जाणून घेऊन नेमकं या प्रकरणात काय काय घडलं आहे? 13 जानेवारीला रात्री 8 च्या दरम्यान किरण मानेंनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. काट लो जुबान, आंसुओंसे गाऊंगा... गाड दो, बीज हूँ मै. . पेड बन ही जाऊंगा! अशी ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकण्यात आल्याची बातमी समजली. आपण गेल्या आठ दिवसांपासून राजकीय पोस्ट लिहून टीका करत असल्याने आणि त्या भाजपच्या विरोधात असल्याने आपल्याला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे असा आरोप किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून केला. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्याने, पोस्ट लिहिल्याने तुम्हाला काढून टाकलं हे तुम्हाला चॅनलनं सांगितलं आहे का? यावर किरण मानेंनी अद्याप काहीही उत्तर दिलेलं नाही. किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून वगळलं, सरपंच युवतीने मालिकेला दाखवला बाहेरचा रस्ता! चॅनलने काय म्हटलं आहे? स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. किरण मानेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काय म्हटलं? 'आज शरद पवारांची मी भेट घेतली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची इथ्यंभूत माहिती असणारे नेते म्हणजे शरद पवार. मी आज त्यांना भेटलो. त्यांना मी माझी बाजू सांगितली. मी माझी बाजू आज त्यांना सांगितली. मला चॅनलमधून कारण उशिरा सांगण्यात आलं. की ज्या सीरियलसाठी मी खूप योगदान दिलं त्या सीरियलमधून अशा पद्धतीने मला काढू नये. मला असं काढून टाकणं हे मला हे मला झुंडशाहीसारखं वाटतं. किरण मानेंबाबत मालिकेतील स्त्री कलाकारांनी काय म्हटलं आहे? मुलगी झाली हो' या मालिकेत साजिरी पाटील म्हणजेच 'माऊ'ची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने याप्रकरणी तिचे मत व्यक्त केले आहे. 'किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या सिरीअलच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांचा रोल प्ले करणार आहे. तर आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. सुरुवातीचे महिने फार उत्तम गेले. ' असे ती म्हणाली. 'त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. त्यानंतर त्यांनी बरेच अपशब्द उच्चारले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचे शूटींग थांबणार नाही. त्यांना गैरवर्तवणुकीमुळे काढण्यात आले आहे. गेले वर्षभर त्यांना याबद्दल समज देत आहेत'असेही दिव्या म्हणाली. सविता मालपेकरांनी काय म्हटलं आहे? राजकारणात असलेले अनेक कलाकार आहेत. ते विशिष्ट राजकीय भूमिका घेतात म्हणून त्यांना काढून टाकलं जात नाही. आदेश बांदेकर हेदेखील राजकारणात आहेत. अमोल कोल्हे हेदेखील राजकारणात आहेत. तेदेखील राजकीय भूमिका मांडत असतात पण म्हणून त्यांना काढून टाकलं जात नाही. काय म्हटलं आहे शर्वाणी पिल्ले यांनी? किरण माने यांची वर्तणूक चांगली नव्हती. ते सतत टोमणे मारतात. मी आणि दिव्या तर त्यांच्याशी बोलतही नव्हतो. फक्त कामापुरते बोलत होतो. तरीही किरण माने आमच्याबाबत अपशब्द वापरत बोलत होते. त्यांचं हे वर्तन चांगलं नाही. दिव्याने तर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर महिन्यात त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांचं वर्तन सुधारलं नाही. आत्ता त्यांनी राजकीय भूमिका घेतल्याने मला काढून टाकलं असं पांघरूण घेतलं आहे. मात्र हे पांघरूण कधीतरी निघणार आहे. सत्य काय ते आम्हाला ठाऊक आहे असंही शर्वाणी पिल्ले यांनी म्हटलं आहे. या सगळ्यानंतर पुन्हा एकदा किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून हे सगळं होणारच होतं असं म्हटलं आहे. . महिलांशी गैरवर्तन असे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. मला काढून टाकल्यानंतर विशिष्ट काळ गेल्यानंतर हे कारण देण्यात आलं आहे. जे कलाकार माझ्याविरोधात बोलत आहेत ते पोटार्थी आहेत. त्यांनाही ही भीती वाटते आहे की त्यांनी सीरियलमधून काढून टाकलं जाईल. त्यामुळे ते तसं बोलत आहेत. महिलांशी गैरवर्तन करत होतो तर मग आधी मला का काढून टाकण्यात आलं नाही? आता जे काही स्पष्टीकरण दिलं जातं आहे ते सगळं राजकीय झुंडशाही झाकण्यासाठी आहे. या आशयाची एक भलीमोठी फेसबुक पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे आणि हे सगळं घडणारच होतं असं म्हटलं आहे. मनसेच्या अमेय खोपकरांची भूमिका काय? किरण माने स्वतला नाहक मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने कलाकारांशी गैरवर्तणूक केली आहे आणि आम्ही त्या कलाकारांच्या पाठीशी आहोत. . नाहक उगाचच खोटं बोलून विषय भलतीकडेच किरण मानेंनी घेऊन जाऊ नये. . किरण मानेंविषयी प्रतिक्रिया द्यायला तो काही इतका मोठा नाही. मनसे किरण मानेंच्या विरोधात आहे. . आणि वेळ येईल तेव्हा मनसे चित्रपट सेनेचा अध्यक्ष म्हणून मी माध्यमांशी जरूर बोलेन. आत्ता त्या किरण मानेंबद्दल बोलून त्याला नाहक मोठं करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. आदेश बांदेकर यांनी काय म्हटलं आहे? 'मी नेहमीच राजकारण आणि कलाक्षेत्र हे वेगळं ठेवतो. जेव्हा समाजकारण करायचं असतं तेव्हा समाजकारण करतो. जेव्हा कलाक्षेत्रात वावरतो तेव्हा कलाकार म्हणून काम करतो. . किरण माने या कलाकाराला राजकीय पोस्ट करतो म्हणून काढून टाकतो असं माझ्या ऐकण्यात नाही. किरण मानेच काय पण कोणत्याही कलाकाराला मालिकेतून या कारणामुळे काढून टाकलं आहे असं कधीच माझ्या निदर्शनास आलेलं नाही. किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्यापासून हे सगळं प्रकरण गाजतं आहे. किरण माने यांच्यावर त्यांच्याच मालिकेतील सहकलाकारांनी आरोप केले आहेत. मात्र किरण माने हे सगळं मान्य करायला तयार नाहीत. राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून आपल्याला काढून टाकण्यात आलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच बहुजनांवर कायमच अन्याय होतो अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. |
मुंबई । ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारतर्फे अर्थसंकल्प मांडत आहेत. अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. शेतकऱ्यांना हेलपाटे न मारावे लागता सरकारनं कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या विकासकामासाठी निधी मिळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतचं कर्जमुक्त योजना आणली. तसेच शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. नऊ हजार 35 कोटी रक्कम कर्जमाफीसाठी देण्यात आली आहे. 2 लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली. सर्व कर्ज भरून 2 लाखाचं कर्ज सरकार माफ करणार आहे. दोन लाखपर्यंत कर्जमाफी देणार, असं अजित पवारांनी सांगितलं. -अयोध्येत शरयु आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत! |
देवरुख : तरुणांनी धनगर समाजाला दिशा देण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र व्यापक ऋणानुबंध संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ऋणानुबंध सामाजिक संस्थेचा या वर्षीच्या गुंफण सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. १ मे रोजी गिरगावातील साहित्य संघ मंदिर येथे करण्यात आले आहे. या गुंफण सोहळ्यासाठी अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. धनगर आरक्षण प्रश्नी चळवळ उभी करणारे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना या सोहळ्यात उपस्थित धनगर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. गुंफण सोहळ्याच्या अध्यक्षपदी कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले दक्षिण मुंबईतील भाजपचे आमदार राज के. पुरोहित असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. राजू जांगळे, जयसिंग तात्या शेंडगे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या धनगर समाजातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असणार आहे. संस्थेच्यावतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी एक असलेला हा गुंफण सोहळा असून या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना ऋणानुबंध संस्थेच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावेळी सामाजिक क्षेत्र - सीताराम खरात, शैक्षणिक क्षेत्र - प्रियांका पिंगळे, क्रीडा क्षेत्र - ज्योती शेळके आणि बाळू ढेबे, पत्रकारिता - प्रकाश काळे, संस्था विभाग -स्वराज्य प्रतिष्ठान, रायगड, सत्यम गणेश मंडळ तांबेवाडी- रत्नागिरी, ठाणेश्वर युवा मंडळ- निओशी, रत्नागिरी, सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई, रवळनाथ सनराईस ग्रुपआडवली सिंधुदुर्ग यांना ऋणानुबंध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेले ज्ञानेश येडगे जिल्ह्यातील इतिहासात एकमेव ठरत असल्याने संस्थेच्यावतीनेत्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. ज्ञानेश येडगे हे ऋणानुबंधच्या स्पर्धा परीक्षा उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या योगदानासाठी संस्थेने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजातील युवा पिढीला ऋणानुबंध संस्थेच्या उपक्रमांची उत्सुकता असते. यावर्षीच्या गुंफण सोहळ्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक विकास लांबोरे, अध्यक्ष मंगेश येडगे, सचिव दीपक झोरे यांनी केले आहे. |
जालना ,१६ मार्च /प्रतिनिधी :-डॉ गोविंद भताने यांना इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डच्या वतीने देण्यात येणारा यंग अचिव्हर ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सत्कार सोहळा मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधानसभा मुख्य प्रतोद आशिष शेलार व विले पार्ले विधानसभेचे आमदार पराग आळवणी यांची उपस्थिती होती.तसेच प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता मुकेश ऋषी,रणजित बेदी ,अली खान यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी संपूर्ण भारतातील उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. गोविंद भताने हे डेंटल सर्जन तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी डेंटल विंगचे प्रदेश संयोजक असून अत्यंत कमी वयात त्यांनी फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस 2022 च्या वतीने देण्यात येणारा यंग अचिव्हर ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. |
औरंगाबाद : घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची तयारी भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रभाग ७ व ९ मध्ये पहिल्या टप्प्यात काम सुरू होणार आहे. या भागात पाइप टाकण्यासाठी कंपनीने मनपाकडे परवानगी मागितली. खोदकामामुळे रस्त्याचे नुकसान होणार असल्याने १८ कोटी ८५ लाख रुपये महापालिकेला भरावेत, असे पत्र प्रशासनाने कंपनीला दिल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. शहरासह वाळूज एमआयडीसी भागात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा व्हावा, यासाठी नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार, औरंगाबाद ते नगर पाइपलाइन टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. वाळूजपर्यंत पाइप टाकण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील दोन प्रभागांत घरोघरी एलपीजी गॅस पाइपलाइनद्वारे देण्याची तयारी कंपनीने केली. त्यानुसार, भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने महापालिकेला पत्र देत, प्रभाग सात व नऊमध्ये रस्त्याशेजारी पाइपलाइन टाकण्याची परवानगी मागितली. पाइप टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. त्या पोटीचा खर्च म्हणून महापालिकेला १८ कोटी ८५ लाख रुपये भरावेत, असे मनपातर्फे कळविण्यात आले. महापालिकेने शहरात जवळपास ४०० कोटी रुपये खर्च करून सिमेंट, डांबरी रस्ते तयार केले आहेत. गॅस पाइपलाइनसाठी रस्ते फोडण्याची गरज नसल्याचे पानझडे यांनी सांगितले. कंपनीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, क्रॉसिंगच्या ठिकाणी मशीनचा वापर करण्याची सूचना केली जाणार आहे. गॅस पाइपलाइनचे जाळे पूर्णपणे टाकण्यात आल्यानंतर, प्रभाग ७ म्हणजे जवाहर कॉलनी, प्रभाग ९ म्हणजेच क्रांती चौक वॉर्डातील वसाहतींना फायदा होणार आहे. ज्या भागात अधिकृत वसाहती आहेत, त्या भागात पहिल्या टप्प्यात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. |
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध भाष्यकार रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकला (Shoaib Malik) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या वृत्तावरून दोघांमध्ये ट्विटरवर युद्ध सुरु झाले. एका मुलाखतीत रमीझने शोएब आणि मोहम्मद हाफिज, (Mohammad Hafeez) या वरिष्ठ क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आदरपूर्वक निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. या दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी व युवा खेळाडूंसाठी मार्ग तयार करावा, असे राजा म्हणाले होते. यंदा फेब्रुवारीमध्ये हाफिज आणि शोएबचे पाकिस्तानच्या (Pakistan) टी-20 संघात पुनरागमन झाले. मात्र, रमीज राजाच्या या वक्तव्यावर आता शोएब मलिकने प्रत्युत्तर दिले आहे. मलिकने उपहासात्मक ट्विटमध्ये राजा यांच्यावर निशाणा साधला आणि विचारले की तिघांनीही 2022 पर्यंत निवृत्त व्हावे का? ""हो रमीझ राजा भाई सहमत आहे. आपण तिघेही आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असल्याने एकत्रितपणे निवृत्त होऊ या...मी फोन करतो आणि 2022 साठी याची योजना आखूया ? " मलिकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राजा आणि हाफिज यांना टॅग करत लिहिले. (शाहीद आफ्रिदीच्या ऑल-टाइम XI मध्ये फक्त एक भारतीय, पाच पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश) हाफिजने शांत राहण्याचा निर्णय घेतला, तर मलिकने रमीझ आणि हाफिजला टॅग करत उपहासात्मक ट्विट केले. शोएबच्या ट्विटवर रमीझ यांनी प्रतिक्रिया दिली आणि पाकिस्तानी अष्टपैलूची बोलती बंद केली. प्रत्युत्तरात रमीझने लिहिले,"सन्मानाने निवृत्त, कशामधून? मला पाकिस्तान क्रिकेटबद्दल जे योग्य वाटेल त्याबद्दल मी बोलतो. पाकिस्तान क्रिकेट पुन्हा शीर्षस्थानी पोहचावं अशी माझी इच्छा आहे. मलिक साहेब मी त्याच्यातून कधीच निवृत्त होणार नाही. " राजा हे देखील म्हणाले की जर मलिक 2022 पर्यंत निवृत्त झाले तर तो त्यांच्या इतका वृद्ध होईल. "तुम्ही निवृत्तीनंतरच्या योजनांमध्ये, 2022 मध्ये भाष्य करण्यास सुरुवात करणे कठीण होईल कारण तोवर तुमचे वय जवळपास माझ्या इतके वाढेल," त्यांनी लिहिले. @realshoaibmalik @MHafeez22 1-retire gracefully . . from what ? . . speaking my mind on pak cricket? Sticking my neck out for pak cricket ? Wanting pak cricket back at top ? No chance . . won't be gracefully retiring from that ever Malik Sahib! as for ur post retirement plans . . दरम्यान, मोहम्मद हाफिजने ट्विट करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिले, "संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या साथीने लढा देत आहे. सर्वांनी चांगले वागून आणि गरजूंना मदत करण्याचे मी आवाहन करतो. आपला अहंकार आणि नापसंती मागे ठेवा. आपला वैयक्तिक अँजेडा विसरून एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे या. " दरम्यान, टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप घेणार असल्याचे 39, वर्षीय मोहम्मद हाफिजने आधीच जाहीर केले आहे. दुसरीकडे, मर्यादित षटकांच्या स्वरूपात शोएबने अद्याप आपल्या भविष्याबद्दल काही स्पष्ट केले नाही. शोएबने चार वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. |
तळोदा : शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव कामांसाठी पालिकेने पुन्हा शासनाकडे 13 कोटींचा प्रस्ताव पाठविला असून, त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी कार्यक्रमात दिली. येथील पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी सहा घंटागाडय़ा खरेदी केल्या आहेत. या गाडय़ांचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, आरोग्य सभापती सुनयना उदासी, महिला व बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, बांधकाम सभापती भास्कर मराठे, नगरसेवक रामा ठाकरे, सुरेश पाडवी, अमानुद्दीन शेख, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, बेबीबाई पाडवी, अनिताबाई पाडवी, कल्पनाबाई पाडवी, शोभाबाई भोई, योगेश चौधरी, संदीप परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, योगेश मराठे, राजेंद्र राजपूत उपस्थित होते. या वेळी परदेशी यांनी शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देतांना सांगितले की, या योजनेच्या वाढीव कामांसाठी गेल्या महिन्यातच पालिकेमार्फत साधारण 13 कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावादेखील सुरू असून, मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच हा निधी प्राप्त होणार आहे. यातून तापीनदीवर आधुनिक पद्धतीचा ज्ॉकवेल बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यात गाळही साचणार नाही. याशिवाय शहरातील नवीन वसाहतींबरोबरच सर्व भागातील नवीन जलवाहिन्या टाकण्यात येईल. सध्याच्या जलवाहिन्यांमध्ये प्रचंड क्षार व ब्लिचींग पावडर साचल्यामुळे पाणीपुरवठय़ातही बाधा येत आहे. या योजनेमुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा दूर होणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. या वेळी त्यांनी शहरातील स्वच्छताबाबत पालिका ठोस उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिक, व्यापाःयांनीही कचरा संकलनासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी, गणेश ठाकूर, अभियंता एस. एम. गावीत, मोहन माळी, अश्विन परदेशी आदींसह कर्मचाःयांनी परिश्रम घेतले. |
पुणे महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेची कामे केली जात आहेत. यामध्ये ८४ पाण्याच्या नवीन टाक्या आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाण्याचे मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. तरीही पाण्याची गळती कमी होत नसल्याचे चित्र आहे. पुणे : पुणेकरांचा जादा पाणी वापर, शहरात मोठ्या प्रमाणावर होणारी पाण्याची गळती आणि अधिकाऱ्यांची भूमिका यावरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्येच शुक्रवारी 'तू-तू मैं-मैं' झाली. 'पाणी गळती रोखता येत नसेल, तर महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी अजित पवार यांनी केली, तर 'अजित पवारांनी त्यांच्या सरकारच्या काळात हा प्रश्न का सोडविला नाही,' असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेची कामे केली जात आहेत. यामध्ये ८४ पाण्याच्या नवीन टाक्या आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाण्याचे मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. तरीही पाण्याची गळती कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानभवन येथे पाण्याच्या गळतीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील आणि पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. बैठकीत झालेल्या चर्चेवर अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले. 'अधिकाऱ्यांकडून पाणी प्रश्न आणि गळतीवर तोडगा काढण्यासाठी काहीही केले जात नाही. प्रत्येक वेळी तीच उत्तरे दिली जातात. सत्ता बदलली तरीही अधिकाऱ्यांची उत्तरे कायम आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळेत ही पाणी गळती न रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,' असे पवार म्हणाले. महापालिका आयुक्तांनी ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याचे 'रेकॉर्ड'वर कबूल केले आहे. जलवाहिन्या, कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे महापालिकेला २१ टीएमसी पाणी घ्यावे लागते. त्यामुळे हे पाणी महापालिकेच्या खात्यावर पडते. पुणेकर इतके पाणी वापरत नसताना त्यांच्यावर चुकीचा आरोप होतो. मात्र, यात केवळ अधिकाऱ्यांची चूक आहे, असा दावा पवार यांनी केला. 'अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी पुण्याचा पाणी प्रश्न का सोडविला नाही,' असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 'समान पाणीपुरवठा योजनेची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण होतील. त्यानंतर पाणीगळती कमी होऊन महापालिकेला जादा पाणी उचलावे लागणार नाही. या संदर्भातील कामाचे वेळापत्रक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडले आहे. मात्र, त्यावर टीका करून, नकारात्मक बोलून चालणार नाही. विकासकामे आणि विविध प्रश्न राजकीय करून सुटणार नाहीत,' असे पाटील यांनी सुनावले. |
मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणाची गर्दी! मायणी : सर्वत्र संचारबंदी, दुकानात पाचपेक्षा अधिक लोक असतील तर कारवाई, जिल्हाबंदी, मात्र मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेरील बाजूस स्वॅब देण्यासाठी रोज गर्दी होत आहे. ना सोशल डिस्टन्स, ना रांग, त्यामुळे या ठिकाणी कोणते नियम आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी, जिल्हाबंदी, अत्यावश्यक सेवा व दुकाने सोडून संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. लग्नसमारंभासाठी २५ लोकांची परवानगी व दोन तासांचा वेळ, तसेच अत्यावश्यक सेवेच्या दुकानासह इतर ठिकाणी पाचपैकी अधिक व्यक्ती एकत्र आल्या की कारवाई, असे अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र हे सर्व नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मायणी व मायणी परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे व कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागलेले अनेकजण मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी रोज सकाळी येत आहेत. या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान न ठेवता तपासणीसाठी आलेल्या व्यक्ती मोठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणीही कर्मचारी या गर्दीवर नियंत्रण ठेवताना दिसत नाही. तसेच येणारे लोकही याकडे एवढ्या गांभीर्याने पाहत नाहीत. या तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींपैकी काही संशयित कोरोनाबाधित रुग्ण असल्याकारणाने इतर सर्वसामान्य नागरिकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (चौकट) लसीकरण ठप्प! मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून पूर्ण संपला आहे. रविवारी सकाळच्या सत्रातही साठा न आल्याने या ठिकाणचे कोरोना लसीकरण पूर्ण थांबले आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी जास्तीत जास्त व वेळेत लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी मोठी गर्दी होत आहे. (छाया : संदीप कुंभार) |
रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कोलंबो : रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याच्या श्रीलंका संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताने विजयासाठी दिलेल्या ४१३ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर ४३. ४ षटकांत १३४ धावांत संपुष्टात आला. आश्विनने ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला कसोटी विजय ठरला. भारताने सुरुवातीपासून या लढतीत वर्चस्व कायम राखले. गॉलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या नाट्यमय पराभवादरम्यान झालेल्या चुकांपासून बोध घेत भारताने या लढतीत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या बाजूचा विचार करताना संगकाराच्या चमकदार कारकिर्दीचा हा निराशाजनक शेवट ठरला. त्याला अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रीलंका संघाने अखेरच्या ७ विकेट ५८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्याआधी, पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेपूर्वीच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात आला. लेगस्पिनर अमित मिश्राने दुष्मंता चामिराला (४) बाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने उपाहारानंतर पाचव्या चेंडूवर विजय निश्चित केला. आश्विन व्यतिरिक्त मिश्राने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यजमान संघातर्फे दिमुथ करुणारत्नेने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ४६ धावांची खेळी केली. करुणारत्नेचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. उभय संघांदरम्यान तिसरा व निर्णायक कसोटी सामना २८ आॅगस्टपासून खेळला जाणार आहे. श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. आज पहिल्याच चेंडूवर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बाद झाला. कालच्या २ बाद ७२ धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेने २२व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची विकेट गमावली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बदली यष्टिरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. मिश्राने २८व्या षटकात दिनेश चांदीमलला (१५) तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेने ३०व्या षटकात शंभर धावांचा पल्ला गाठला. पहिल्या तासाभराच्या खेळानंतर श्रीलंकेची ४ बाद १०६ अशी अवस्था होती. आश्विनने सहाव्या चेंडूवर लाहिरू थिरीमानेला (११) बाद केले. त्यानंतरच्या षटकात ईशांतने जेहान मुबारकला (०) खाते उघडण्यापूर्वीच दुसऱ्या स्लिपमध्ये कर्णधार कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. आश्विनने ३७व्या षटकात धम्मिका प्रसादला (०) आणि त्यानंतर दोन षटकांनी करुणारत्नेला तंबूचा मार्ग दाखवून डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. उपाहाराला १४ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मिश्राने थारिंडू कौशलला (५) पायचित केले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. उपाहारानंतर मिश्राने चामिराला बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (वृत्तसंस्था) भारत पहिला डाव ३९३. श्रीलंका पहिला डाव ३०६. भारत दुसरा डाव ८ बाद ३२५ (डाव घोषित). श्रीलंका दुसरा डाव : कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. आश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ४६, कुमार संगकारा झे. विजय गो. आश्विन १८, अॅन्जेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव २३, दिनेश चांदीमल त्रि. गो. मिश्रा १५, लाहिरू थिरिमाने झे. पुजारा गो. आश्विन ११, जेहान मुबारक झे. कोहली गो. ईशांत ००, धम्मिका प्रसाद झे. मिश्रा गो. आश्विन ००, रंगाना हेराथ नाबाद ०४, थारिंडू कौशल पायचीत गो. मिश्रा ०५, दुष्मंता चामीरा पायचीत गो. मिश्रा ०४. अवांतर (७). एकूण ४३. ४ षटकांत सर्व बाद १३४. बाद क्रम : १-८, २-३३, ३-७२, ४-९१, ५-१०६, ६-१११, ७-११४, ८-१२३, ९-१२८, १०-१३४. गोलंदाजी : आश्विन १६-६-४२-५, यादव ७-१-१८-१, ईशांत ११-२-४१-१, मिश्रा ९. ४-३-२९-३. |
आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. 'सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल. तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वतः ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दुःखे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाoयांना राग येऊ शकतो - कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे - त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. तुमच्याकडे नेतृत्वगुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे - तुमच्या मनातील ख-या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मने जिंकून घ्याल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वतःला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. आपण Rashifal १४ ऑगस्ट २०१९ मध्ये सगळ्या राशींचे rashifal वाचले. आपल्याला Rashifal 14 Aug 2019 चे हे rashifal कसे वाटले? कमेंट करून आपला अभिप्राय आवश्य द्या आणि हे राशीफळ आपल्या मित्रांच्या सोबत शेयर करण्यास अजिबात विसरू नका. नोट : आपल्या कुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि Rashifal 14 Aug 2019 मध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी कोणत्याही तज्ञ ज्योतिषीला भेटू शकता. |
- बुध ग्रहाने आज मीन राशीत प्रवेश केला आहे. - आज सकाळी 10. 54 मिनिटांनी बुधाने आपली राशी बदलली आहे. - पूर्वी बुध कुंभ राशीत बसला होता. Budh Gochar 2023: बुध ग्रहाने आज मीन राशीत प्रवेश केला आहे. आज सकाळी 10. 54 मिनिटांनी बुधाने आपली राशी बदलली आहे. पूर्वी बुध कुंभ राशीत बसला होता. आज बुध ग्रहाच्या संक्रमणासोबतच तीन ग्रहांचा संयोगही एक अद्भुत संयोग होत आहे. सूर्य, गुरु आणि बुध हे संयोगी असल्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. (budh gochar 2023 in marathi mercury transit in pisces jupiter sun and budh grah budhaditya yoga in meen rashi in marathi) अधिक वाचा : Surya Grahan 2023: २०२३ चे पहिले सूर्यग्रहण ठरू शकतं अशुभ ! बुधाच्या राशीत बदल आज, १६ मार्च रोजी सकाळी १०. ५४ वाजता, बुध ग्रह मीन राशीत प्रवेश केला आहे, तो १६ मार्च ते ३१ मार्च दुपारी ३ः०१ वाजता मीन राशीत राहील. बुधाच्या संक्रमणासोबत सूर्य, गुरू आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य योग तयार होत आहे. असे मानले जाते की कुंडलीत जेव्हा जेव्हा बुधादित्य योग तयार होतो तेव्हा त्या घराला शक्ती मिळते. जेव्हा बुध आणि सूर्य हे ग्रह एकाच घरात म्हणजेच एकाच राशीत असतात तेव्हा हा योग विशेष फल देतो. बुधादित्य योगाने धन-वैभव, मान-सन्मान प्राप्त होतो. सर्व ग्रहांमध्ये बुध हा सर्वात मोठा ग्रह आहे. हा सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. म्हणूनच त्याला सर्व ग्रहांचा राजकुमार असेही म्हणतात. आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे. या युतीमुळे मीन राशीच्या लोकांना शुभ संकेत मिळतील. - नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते, तसेच नोकरीत उच्च पद मिळू शकते. - जे सोशल मीडियावर सक्रिय आहेत, त्यांचे फॉलोअर्स वाढू शकतात. - व्यवसाय करणाऱ्या लोकांना अधिक नफा मिळू शकतो, तसेच तुमचे उत्पन्नही वाढू शकते. - आत्तापर्यंत ज्यांच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांच्या लग्नाची परिस्थिती अनुकूल होऊ शकते. - जे विद्यार्थी शिकत आहेत ते परीक्षेतही चांगले निकाल देऊ शकतात. |
२३ जुन १९८५. आजपासुन बरोबर २७ वर्षापुर्वी एअर इंडिया फ्लाईट १८२ उर्फ एम्पेरर कनिष्कला (बोईंग ७४७) आयरिश समुद्राच्या हद्दीत ३१,००० फुटांवर बॉम्बने उडवुन देण्यात आले होते ज्यात सर्वच्यासर्व ३२९ प्रवासी मारले गेले होते. यात ३०२ प्रवासी आणि २७ कर्मचारी होते. मरणार्यांत २८० कॅनडियन, २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा समावेश होता. सामानात असलेल्या एका बॅगमध्ये हा ब्लास्ट झाल्याने विमान हवेतच फुटले. मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. ही फ्लाईट माँट्रेयल वरुन लंडन मार्गे दिल्ली येथे जात होती. ह्यामागे बब्बर खालसा म्हणजेच खलिस्थान मुव्हमेंट्चा हात सिद्ध झाला आणि त्या संबंधीत ट्रायल्स २७ वर्षानंतर अजुनही कॅनडामध्ये सुरु आहेत. ही कॅनडामधील सर्वात खर्चिक केस ठरली असुन ह्यावर आतापर्यंत १३० मिलियन कॅनडियन डॉलर खर्च झाले आहेत. ९/११ सोडले तर आतापर्यंत झालेल्या सर्व विमान अपघातांमध्ये हा सर्वात भयानक आणि भीषण घातकी हल्ला होता. आयरिश समुद्रात इतरस्र विखुरलेले विमानाचे उरले सुरले अवशेष ज्या जहाजाला प्रथम दिसले ते म्हणजे ल्युरेण्टियन फॉरेस्ट. (Laurentian Forest) दुसरीकडे जपानच्या नरिता विमानतळावर अजुन एक बॉम्बब्लास्ट झाला होता जो खरेतर एअर इंडिया फ्लाईट ३०१ उडवण्यासाठी ठेवण्यात आला होता. सुदैवाने विमानतळावर ब्लास्ट झाल्याने प्रवाशी सुखरुप राहिले पण दुर्दैवाने सामान हाताळणारे २ कर्मचारी म्रुत्युमुखी पडले. मला ह्या प्रसंगाबद्दल लिहावेसे का वाटले किंवा अधिक माहिती करुन का घ्याविशी वाटली ह्यामागे कारण म्हणजे बॉब. बॉबला मी गेल्यावर्षी दुबईमध्ये भेटलो होतो. माझ्या नव्या कंपनीत तोही माझ्यासारखाच नव्याने दाखल झाला होता. मला भेटताच पहिल्याच दिवशी त्याने ह्या हल्ल्याचा उल्लेख केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ह्या अपघाताबद्दल 'असा अपघात झाला होता' ह्या व्यतिरिक्त काहीही ठावुक नव्हते. बॉब मुळचा आयरिश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी ल्युरेण्टियन फॉरेस्टने विमानाचे अवशेष पाहिले तेंव्हा तो त्या बोटीवर होता. त्यावेळी तो अवघ्या २२ वर्षाचा होता. आज २७ वर्षांनी ४९ वर्षाचा बॉब मला त्या दिवशी जे पाहिले ते सांगत होता. '३२९ पैकी फक्त १३२ म्रुतदेह हाती लागले ते सुद्धा ल्युरेण्टियन फॉरेस्टने त्वरित हालचाल केली म्हणुन. बाकी १९७ म्रुतदेह समुद्रात बुडाल्याने हाती लागले नाहीत. मिळालेले बहुतेक म्रुतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आम्ही कसे उचलुन आणले हे आमचे आम्हालाच ठावुक. काहींची फक्त धडेच होती तर काही फक्त हात-पाय. समुद्रावर तरंगणार्या अनेक प्रेतांवर समुद्री पक्षी तुटुन पडले होते. हे सर्व घेउन आम्ही किनार्यावर गेलो ते गाव होते बॅन्ट्री. आम्हाला 'बॅन्ट्री' (Bantry) मधल्या लोकांनी खुप मदत केली.' कॅनडा सरकरने बॅन्ट्री येथे उभारलेले स्मारक. जिथे मला ऐकतानाच कसेसे होत होते (आणि तुम्हाला नक्कीच वाचताना होईल) तिथे बॉब आणि ल्युरेण्टियन फॉरेस्टच्या क्रुने हे काम कसे केले असेल ठावुक नाही. विमानाचे बुडालेले अवशेष शोधुन वर काढण्यासाठी गार्डलाईन लोकेटर (Guardline Locator) ह्या ब्रिटिश आणि लिओन थेवेनिन (Léon Thévenin) या फ्रेंच बोटीला पाचारण करण्यात आले. त्यांचे मुख्य काम होते flight data recorder (FDR) आणि cockpit voice recorder (CVR) शोधणे. १६ दिवस अथक शोध घेतल्यावर अखेर एके ठिकाणी ६,७०० फुट खोलीवर विमानाचे अवशेष सापडले. दुसरीकडे कॅनडामध्ये तपासाला वेग आलेला होता आणि संशयाची सुई थेट बब्बर खालसाकडे वळली होती. ब्लास्ट एका सानयो स्टिरिओ वापरुन केल्याचे तपासात उघड झाल्यावर तपासाची चक्रे अजुन वेगाने फिरु लागली आणि काही दिवसात ईंद्रजित सिंग रेयात याला सी.एस.आय.एस.ने Canadian Security Intelligence Service (CSIS) ब्रिटिश कोलंबिया मधुन अटक केली. ह्या सर्वाची सुरुवात ३-६ जुन १९८४ रोजी अमृतसर येथे जे काही घडले तिथुनच झाली होती. ऑपरेशन ब्लु स्टार. त्यानंतर ४ महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या आणि शीख विरोधी दंगली याने फक्त भारतात नव्हे तर कॅनडामध्ये देखील वातावरण तंग झाले. अजितसिंग आणि परमार अमेरिका-कॅनडा येथे एकत्र आले. ह्या दोघांनी संपुर्ण कॅनडामध्ये फिरुन प्रचार करुन पैसे उभे केले आणि शीख समुदायाला भारत सरकार विरुद्ध लढण्यास उभे केले. दोघांनी काही महिन्यात २००,००० कॅनडियन डॉलर उभे केले आणि रेयातला सोबत घेउन बॉम्ब बनवायला सुरुवात केली. १९८१ साली परमार २ पंजाब पोलिस ऑफिसर्सना मारुन कॅनडा येथे पळुन गेला होता. त्याच्या आमच्या ताब्यात द्यावे ही भारताची मागणी कॅनडाने फेटाळली होती. भारताने मग त्यावर इंटरपोल मार्फत दबाव टाकायला सुरुवात केली. १९८२ साली त्याला अवैधरित्या जर्मनीमध्ये शिरताना अटक झाली आणि १ वर्षाची शिक्षा भोगल्यावर त्याची रवानगी पुन्हा भारताऐवजी कॅनडाला केली गेली होती. अजित सिंग बाग्री (ह्याने १९८४ साली न्युयोर्क येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शीख परिषदेत 'हिंदुंनी कैक शिखांना नाहक ठार मारले आहे. आम्ही ५० हजार हिंदु मारत नाही तोवर शांत बसणार नाही.' असा सज्जड दम भारत सरकारला दिला होता.) तलविंदरसिंग परमार (हा कॅनडामध्ये बब्बर खालसाचा प्रमुख होता) लखबिरसिंग ब्रार रोडे (हा ईंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन संस्था चालवत होता आणि ह्या हल्ल्या मागचा मास्टर माईंड समजला जातो). लखबिरसिंग हा जरनैल सिंग भिंद्रावाले याचा भाचा. हरदयालसिंग जोहाल (तलविंदरसिंग परमारचा उजवा हात. विमानाचे तिकिटे ह्याचा फोन नंबर देउन बुक केली गेली होती.) दलजित संधु (विमानाची तिकिटे ऑफिसमधुन जाणारा) मनमोहन सिंग (तलविंदरसिंग परमारचा डावा हात. ) स्रुजन सिंग गिल. (आयत्यावेळी ऑपरेशन मधुन हात काढुन घेउन लंडन येथे पळुन गेला) रिपुदमनसिंग मलिक आणि अजित सिंग बाग्री यांना कॅनडा सरकारने २००० साली (घातपाताच्या १५ वर्षांनी) अटक केली आणि २००५ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी त्यांना पुराव्याअभावी सोडुन दिले. मलिक आणि बाग्री यांनी कॅनडा सरकारवरच मानहानीचा दावा ठोकत अनुक्रमे ६.४ मिलियन आणि ९.७ मिलियन कॅनडियन डोलरची मागणी केली आहे. ट्रायल मध्ये ईंद्रजित सिंग रेयात याने मी परमारला ओळखत नाही असे सांगितले होते पण CSIS कडे दोघांना एकत्र पाहिल्याचे पुरावे होते. मुळात परमारने रेयातला बॉम्ब बनवण्यासाठी योजले होते. ह्यानंतरही भक्कम पुरावे न मिळाल्याने CSIS कोणालाही अटक करुन ठेवु शकले नाही. रेयात कॅनडा सोडुन ईंग्लंड मध्ये निघुन गेला जिथे तो जॅग्वार कंपनीत कामाला लागला. २ वर्षांनी त्याला पुन्हा कॅनडामध्ये आणुन त्याच्यावर केस सुरु केली गेली. १९९१ मध्ये त्याला फक्त १० वर्षाची शिक्षा झाली. २००१ साली तुरुंगातुन सुटल्यावर त्याच्यावर पुन्हा केस उभी करुन त्याला ५ वर्षांकरिता पुन्हा जेल मध्ये टाकले गेले. त्याच्यावर विविध गुन्ह्यांसाठी एका मागुन एक केसेस केल्या गेल्या. गेल्या वर्षी म्हणजे ७-१-२०११ रोजी त्याला पुन्हा ९ वर्षांकरिता जेल मध्ये टाकले गेले आहे. परमार कॅनडा मधुन गायब झाला तो कुठे गेला त्याचा पत्ता कोणालाच लागला नाही. तो पाकिस्तानात लपुन भारताविरुद्ध नव्या योजना आखत आहे अशी गुप्त बातमी १९८८ मध्ये मिळाली होती. १९९२ मध्ये अचानक पंजाबमध्ये तो पोलिस चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. तो भारतात कसा आला, कधी आला, त्याला जिवंत पकडायचे प्रयत्न का केले गेले नाही याची उत्तरे अर्थात गुलद्स्त्यातच आहेत. म्रुत्युपुर्वी परमारने Punjab Human Rights Organisation (PHRO)ला दिलेल्या एका ईंटरव्ह्युमध्ये म्हटले आहे की, लखबिरसिंग ब्रार, ईंद्रजित सिंग रेयात आणि मनजितसिंग (हे नाव वरच्या यादीतही नाहिये) यांनी कट रचला आणि २ विमानांमध्ये बॉम्ब ठेवले. लखबिरसिंग याने व्हँकुव्हर - टोकयो - बँगकॉक विमानाचे तिकिट घेउन त्यात बॅग ठेवली तर मनजितसिंगने माँट्रेयल - लंडन - दिल्ली विमानात बॅग ठेवली. लखबिरसिंगला १९९८ मध्ये नेपाळमध्ये २० किलो आर.डी.एक्स. बाळगल्यावरुन अटक झाली. त्यावेळी याला भारताच्या ताब्यात का घेतले गेले नाही माहित नाही पण २००१ साली तो पुन्हा पाकिस्तानात आहे याची पक्की बातमी आली. आज तो कुठे आहे याची माहिती नाही. असेही एक मत होते की हे सर्व त्यावेळच्या काँग्रेस सरकारने शीख समुदायाविरुद्ध जागतिक मत तयार होण्यासाठी नाटक रचले. खुद्द लखबिरसिंग हा रॉ (RAW)चा अंडर कव्हर एजंट होता आणि त्याला वाचवण्यासाठी १९९२ मध्ये परमारला ठार मारले गेले. खरे खोटे ठावूक नाही कारण आज २७ वर्षांनी देखील अनेक गोष्टी गुलदस्त्यातच आहेत. स्टॅनली पार्क, व्हँकुव्हर येथील स्मारक... म्रुत्युमुखी पडलेले बहुतेक प्रवाशी ह्या शहरातील होते. माहिती आणि फोटो.... विकिपेडिया वरुन साभार. उत्तम माहिती! पुन्हा एकदा नीट वाचतो. मस्त माहिती दिलीस. बॉब तुला भेटला आणि हा विषय निघाला म्हणजे खरंतर जरा नवलच म्हटलं पाहिजे. कदाचित तू 'इण्डिया'चा आहेस हे कळल्यावर त्याच्या आठवणी चाळवल्या गेल्या असतील. वर्तमानपत्रात ही बातमी मी अगदी बारकाईने फॉलो केली होती. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डर यांसारख्या संज्ञा तेव्हा प्रथम कळल्या होत्या. या उपकरणांच्या मदतीने अपघाताच्या आधीची काही मिनिटे काय काय घडामोडी झाल्या हे समजतं - हे कळल्यावर खूप अचंबा वाटला होता. कनिष्कचा ब्लॅक बॉक्स सापडल्यावर त्याचाही फोटो पेपरमधे आला होता. तो अजून आठवतोय मला. (ब्लॅक-बॉक्स हा काळ्या रंगाचा नसतो हे ही त्या फोटोवरूनच कळलं होतं. कनिष्कचा केशरी रंगाचा होता.) मलिक आणि बाग्री यांची सुटका झाल्यावर लोकसत्ताने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या मुलाखतींवर आधारित एक फीचर केलं होतं. उत्फुल्ल चेहर्याने कोर्टाच्या बाहेर पडणार्या त्या दोघांचा फोटो त्यात दिला होता. तो पाहून तेव्हाही मनात चीडच दाटून आली होती. लले.. तुला विपु करणारच होतो कारण हा तु लिहिलेल्या गोल्डन टेंपल धाग्याशी सुसंगत आहे ना. जुन्या लोकसत्ता किंवा इतर पेपर मधील कात्रणे मिळु शकतील का? त्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना मनःपुर्वक श्रद्धांजली. या सार्या माहीती बद्द्ल धन्यवाद सेनापती. रोहन .. काय काय आठवणी जाग्या झाल्या तुझ्या या लेखामुळे.. मुंबई ला आमच्या शेजार च्या बिल्डिंग मधे एअर इंडिया चा एक पर्सर राहायचा. ऑफ ड्यूटी असला की तो ,त्याची बायको आणी त्यांचा लहानसा सव्वा वर्षाचा ,भुरक्या रंगाचे केस असलेला अति गोंडस पोरगा आणी बरोबर एक भला मोठा गोल्डन रिट्रायवर असे रस्त्याने रेग्युलरली वॉक ला जायचे.. तेंव्हा बालकनीत चहा पिताना हे दृष्य आमच्या इतकं सवयीचं झालं होतं.. आणी या काळ्या दिवसानंतर हे देखणं कुटुंब नाहीसं झालं.. या फ्लाईट वर हे तिघं सुट्टीवरून परत येत होते.. मागे म्हातारी नानी एकटीच उरली होती.. तिची एकुलती एक पोरगी ,तिच्या कुटुंबासमवेत अचानक हरवून गेली.. जे मृतदेह मिळाले त्यात २ लहान मुलांचा समावेश होता. तो बिचारा पोरगा... आणि त्याचे आई-वडील. वर्षु ताई ही म्रुतांची लिस्ट. त्यात पॅसेंजर इंडिया मध्ये फक्त ३ अकडा आहे. म्हणजे हेच तिघे असतिल. >>> मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. या घातपाती हल्ल्यावर पूर्वी एक वृत्तांत पाहिला होता. त्या वृत्तांतानुसार, हे विमान निघण्याच्या एक दीड तास आधी एक पगडी व केस नसलेला शीख प्रवासी घाईघाईत चेकिंग काऊंटरपाशी आला. त्याने आपले सामान चेकइन केले व बोर्डिंग पास घेतला. ५ मिनिटांनी तो परत आला व काहीतरी महत्त्वाचे विसरल्याची बतावणी करून १५-२० मिनिटांत ते घेऊन परत येतो असे सांगून तो विमानतळावरून निघून गेला. दरम्यान त्याच्या चेकइन केलेल्या बॅगा विमानात पोचल्या होत्या. विमानोड्डाणाची अंतिम घोषणा झाली तरी तो परत आला नव्हता. त्याची काही काळ वाट पाहून शेवटी त्याला न घेताच त्याच्या सामानासकट विमानाने उड्डाण केले व त्यानंतर काही वेळाने त्याच्या सामानात असलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन विमान अटलांटीक समुद्रात कोसळून सर्व प्रवाशांचा मृत्यु झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्याला पकडले तेव्हा त्याचे सामान चेकइन करणार्या महिला कर्मचार्याने त्याला बरोबर ओळखले. त्या घातपातानंतर विमान कंपन्यांनी एक नवीन नियम केला. त्या नियमानुसार, जर सामान चेकइन करून बोर्डिंग पास घेतलेला प्रवासी प्रत्यक्ष विमानात हजर झाला नाही तर विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून त्या प्रवाशाचे चेकइन केलेले सामान विमानातून बाहेर काढले जाते व नंतरच विमानोड्डाण होते. या प्रकारात विमान उड्डाण व्हायला खूप उशीर होतो, पण सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे. आई गं मोकिमी..हो गं तेच असतील.. रोहन, त्या अपघाताची आणि संबंधित खटल्याची माहिती तू लिहिलीस ते चांगलंच केलंस. पण बॉबचं आणि तुझं काय-काय संभाषण झालं, त्याच्या अपघाताबद्दलच्या काय प्रतिक्रिया होत्या हे ही लिहिणं शक्य आहे का? म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून या सर्व घटना - असं काही? त्यानंही कदाचित नंतर हा खटला फॉलो केला असेल. (आयरिश जनता त्यांच्या अंतर्गत राजकीय समस्यांनी ग्रस्त असली तरी) खलिस्तान/बब्बर खालसा/पंजाब/भारत या दृष्टीकोनातून एक आयरिश व्यक्ती म्हणजे बर्यापैकी "न्यूट्रल" म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही संज्ञा जेव्हा बर्यापैकी अज्ञात होती, तेव्हा घडलेली ही घटना आहे. अशा वेळी परकीय पण तुलनेने अलिप्त राष्ट्रे त्या बाबीबद्दल काय विचार करत होती हे समजायला थोडाफार वाव आहे. मी सुद्धा कनिष्कबद्दल पेपरातुन फॉलो केलेले तेव्हा. पण बॉबचं आणि तुझं काय-काय संभाषण झालं, त्याच्या अपघाताबद्दलच्या काय प्रतिक्रिया होत्या हे ही लिहिणं शक्य आहे का? >>> ह्याविषयावर आमचे बोलणे झाले ते खुपच त्रोटक असे मी म्हणीन. पण मी पुन्हा त्याच्याशी या विषयावर बोलु शकीन. त्याचे 'न्युट्रल' मत नेमके काय आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करु शकतो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.