text large_string |
|---|
सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकूण ११५ पदे भरणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट centralbankofindia. co. in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पदाचे नाव आणि पदसंख्या : शैक्षणिक पात्रताः पद क्र. 15: (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी. पद क्र. 16: (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी. |
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराषट्रीय स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने 26 धावा करताच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या खास क्लबमध्ये शामिल झाला आहे. खारी पियरे याच्या चेंडूवर षटकार लगावत राहुलने हजार धावांचा टप्पा गाठला. शुक्रवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्यात राहुलने टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. आजवर रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, शिखर धवन आणि युवराज सिंह यांनी टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे. राहुलने 29 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. इतकेच नाही तर कर्णधार विराटनंतर सर्वात जलद एक हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. (IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिज फलंदाजांचे वर्चस्व, टीम इंडियाला विजयासाठी 208 धावांचे आव्हान) कोहलीने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद 27 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, राहुल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासह संयुक्तपाने तिसरे सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या. फिंच नेही 29 डावात ही कामगिरी बजावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम याने सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या आहे. बाबरने केवळ 26 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. दुसरीकडे, नुकत्याच संपुष्टात आलेल्या विजयने विजय हजारे ट्रॉफीच्या 11 सामन्यात 66. 64 च्या सरासरीने राहुलने 598 धावा केल्या होत्या. ही स्पर्धा राहुलसाठी खास राहिली कारण त्याचा संघाने (कर्नाटक) विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राहुलने आपल्या संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. |
माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे ही बाब मी स्वीकारत नाही. त्याच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे असं मृत युवकाच्या आईने आरोप केला. १८ वर्षाच्या कोट्यधीश युवकाचा लग्नाच्या काही तासांतच मृत्यू झाला आहे. तो शाळेत शिकायला होता. त्याला वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा प्राप्त झाला होता. या मुलाने समलैंगिक विवाह केला. ज्याच्याशी युवकाने लग्न केले त्याला केवळ दोनवेळाच भेटला होता अशी माहिती मृत युवकाच्या आईने दिली. मृत युवक सेंट्रल तैवानच्या ताइचुंग या शहरात वास्तव्यास होता. मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच वडिलांनी त्यांच्या नावावर १३. ११ मिलियन पाऊंड(जवळपास १३४ कोटी) संपत्ती नावावर केली होती. ४ मे रोजी या युवकाचा मृतदेह तो राहत असलेल्या एका अपार्टमेंटबाहेर संशयास्पदरित्या सापडला. मृत्यूच्या २ तासाआधी त्याने ज्या युवकाशी लग्न केले होते त्याची ओळख २६ वर्षीय हसिया अशी आहे. इंडिपेंडेंट यूके रिपोर्टनुसार, मृत लाई ची आई चेनने १९ मे रोजी पत्रकार परिषद घेत सांगितले की, माझ्या मुलाच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे. माझा मुलगा गे नव्हता. तो हसियाला केवळ दोनवेळा भेटला होता. त्याच्या वडिलांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. हसिया हा संपत्तीशी निगडीत दस्तावेज आणि आवश्यक कागदपत्रे बनवण्याचे काम करायचा. लाईचा ज्यादिवशी मृत्यू झाला त्यादिवशी हसियाने त्याला रिएल इस्टेट बिझनेस सांभाळण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. हसिया आणि लाईने रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर २ तासांत लाईच्या मृत्यूची बातमी समोर आली. माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे ही बाब मी स्वीकारत नाही. त्याच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे. संपत्तीच्या कारणास्तव त्याला मारण्यात आले असा आरोप युवकाच्या आईने केला. हसिया आणि मृत युवकाच्या वडिलांचे संबंध होते. हसिया लाईला केवळ २ वेळा भेटला होता. त्यातील दुसरी भेट ही लाईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर झाली. सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे हसियाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला कोर्टाने ८ लाख जामीनावर बाहेर सोडले आहे. हसिया आणि त्याच्या वडिलांची ५ तास चौकशी करण्यात आली. लाईच्या आईने केलेले आरोप एकतर्फी आहेत असा हसियाच्या वकिलांनी सांगितले. अद्याप लाईच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले नाही. पोस्टमोर्टम रिपोर्टची सगळे प्रतिक्षा करत आहेत. |
Latest Delhi Crime News : आलिशान जीवन जगण्यासाठी हल्लीची तरुणाई काय करेल याचा भरोसा नाही. असात एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. इथे एका तरुणाने ११२ दिवस मस्त ५ स्टार हॉटेलमध्ये आराम केला आणि २४ लाखांचं बिल केलं. पण यानंतर तरुणाने कोणालाही काही न बोलता धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. |
नवी मुंबई ः कोव्हीड 19 च्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हीड सुरक्षा नियमावलीच्या कक्षेत काटेकोरपणे साजरा व्हावा तसेच कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका व पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी श्रीगणेशोत्सव 2021 बाबतच्या पूर्वतयारी आढावा बैठकीप्रसंगी दिले. शानाच्या नियमावलीनुसार श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे सूचित करण्यात आले असून त्याविषयी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे तसेच मूर्तीकारांनाही त्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. तथापि या अनुषंगाने पुन्हा एकवार सर्व मंडळे तसेच मूर्तीकारांना माहिती देण्यात यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप उभारणी करण्यासाठी मंडळांना आवश्यक परवानगी मिळणे सोयीचे जावे याकरिता 24 जुलैपासूनच वेबपोर्टलवर विशेष सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. त्यामध्ये अखेरच्या 31 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत 133 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 120 मंडळांनी अर्जासह सर्व कागदपत्रे जोडल्याने त्यांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आलेली आहे. मागील वर्षी श्रीगणेशोत्सवानंतरच कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती या बाबीकडे विशेष लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने विभाग कार्यालयांनी सतर्क रहावे व याकामी कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही असे स्पष्ट केले. श्रीगणेशोत्सवामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवून श्रीगणेशोत्सव आरोग्यत्सव स्वरूपात साजरा करण्याविषयी मंडळांना प्रोत्साहीत करावे व त्यादृष्टीने प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे तसेच मास्कचा वापर अनिवार्य असणे या महत्वाच्या गोष्टी असल्याचे सांगत आयुक्तांनी श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे व तशा प्रकारच्या सूचना नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही द्याव्यात असे सूचित केले. विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या विसर्जनाचा आढावा घेऊन यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करीत एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे व त्यांच्या कामास सुरूवातही झालेली आहे. ही कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीची कामे श्रीगणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण असावीत असे निर्देश देत नागरिकांच्या माहितीसाठी या विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स होर्डींगव्दारे तसेच सोशल मिडियाच्या विविध माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस विभाग नागरिकांना श्रीगणेशोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी सज्ज आहे. तथापि नागरिकांनी सध्याची कोव्हीड 19 परिस्थिती लक्षात घेता आपल्या वर्तनामुळे कोव्हीडच्या तिसर्या लाटेला निमंत्रण तर दिले जात नाही ना? असा प्रश्न स्वतःलाच विचारून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन ठेवावे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. |
यांकी मेणबत्ती नवीन डिझाइनसह स्वाक्षरी संकलन लाँच करते - बातमी\nयांकी मेणबत्ती पुन्हा डिझाइन केलेल्या जहाजांसह एक नवीन संग्रह लाँच करत आहे\nनवीन महिना = नवीन घर सुगंध. यांकी मेणबत्ती पूर्णपणे नवीन डिझाइन केलेल्या भांड्यांमध्ये नवीन सुगंधांचा संग्रह लाँच करेल. मेणबत्ती कंपनी पदार्पण करेल स्वाक्षरी संग्रह मार्चमध्ये, दहा नवीन संकलन-अनन्य सुगंधांचा संग्रह ज्यात वाइल्ड ऑर्किड, उष्णकटिबंधीय नंदनवन पलायन जो उबदार सूर्यप्रकाशात चमकदार फुलांचा आणि पिकलेल्या फळांचा समावेश आहे; Praline & Birch, एक मसालेदार उबदार praline जे लॉग आग समोर आनंद एक मेजवानी लक्षात कॉल. आणि बरेच काही.\nस्वाक्षरी संग्रह यांकीच्या विद्यमान डिझाईन्समध्ये नवीन जीवनाचा श्वास घेण्याची आशा करतो. पुन्हा डिझाइन केलेल्या मेणबत्त्याच्या भांड्यांमध्ये हाताने सचित्र लेबले देखील असतील जी प्रत्येक सुगंधातील सुगंध दर्शवतील आणि नवीन कथील झाकण जे मेणबत्ती कोस्टर म्हणून दुप्पट होऊ शकतात. नवीन स्वाक्षरी संग्रह खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल यांकी मेणबत्ती स्टोअर किंवा ऑनलाइन, तसेच अॅमेझॉन, बेड बाथ अँड बियॉन्ड, कोहल्स आणि मीजर 1 मार्चपासून सुरू होत आहे.\nट्रेंड आणि सुगंध तज्ञांच्या बरोबरीने काम करून, आम्ही आमचे नवीन आणि दीर्घकालीन ग्राहक त्यांच्या घरासाठी मेणबत्त्या निवडताना काय शोधत आहेत हे प्रतिबिंबित करण्यासाठी संग्रह विकसित केला आहे, यांकी कँडलसाठी मार्केटिंगचे व्हीपी अण्णा व्हिटन यांनी एका प्रसिद्धीपत्रकात नवीन संकलनाविषयी सांगितले. गोंडस, नवीन भांडी, एकाधिक आकारात उपलब्ध, सुंदर डिझाईन्स आणि विविध प्रकारचे सुगंध पर्याय ऑफर करतात जे रोजचे क्षण तयार करण्यात मदत करतात जे आस्वाद घेण्यासारखे आहेत.\nक्रेडिटः यांकी मेणबत्ती\nप्रीमियम सोया-वॅक्स ब्लेंड्स आणि डबल कॉटन विक्सने बनवलेले, यांकीचे नवीन सिग्नेचर कलेक्शन विविध आकारांमध्ये येईल, जसे की स्वाक्षरी मोठी ($ 29.50) आणि स्वाक्षरी लहान ($ 13); एक स्वाक्षरी तीन-विक मेणबत्ती ($ 26.50) देखील येत्या काही महिन्यांत बाहेर येईल.\nसंग्रहात खालील सुगंधांचा समावेश असेलः अंबर आणि चंदन (ड्रिफ्टवुड, वेलची आणि एम्बर); ब्लॅक टी आणि लिंबू (काळा चहा, व्हॅनिला, कस्तुरी, लिंबू पिळणे); Iced Berry Lemonade (स्ट्रॉबेरी, लिंबू आणि टार्ट ग्रेपफ्रूट); महासागर हवा (चमेली, पांढरा अंबर आणि चंदन); जंगली ऑर्किड (फुले, तळवे, पिकलेले फळ); गुलाबी चेरी आणि व्हॅनिला (चेरी, व्हॅनिला क्रीम आणि बदाम); प्रालिन आणि बर्च (मसालेदार उबदार pralines); उष्णकटिबंधीय वारा (पॅशनफ्रूट, पेरू आणि पुदीना); बेसाइड सीडर (द्राक्ष, मंदारिन फुलणे आणि उबदार एम्बर); आणि व्हॅनिला क्रेम ब्रुली (व्हॅनिला कस्टर्ड, टोस्टेड प्रालिन आणि दालचिनी).\nयांकी कँडलची नवीन खरेदी करा स्वाक्षरी संग्रह 1 मार्च पासून सुरू होत आहे.\nजेसिका एक लेखिका आणि अपार्टमेंट थेरपी येथे माजी विकेंड संपादक आहे. तिचे काम बस्टल, नायलॉन, इनस्टाईल, कॉस्मोपॉलिटन आणि बरेच काही मध्ये देखील दिसते. ती तिच्या कुत्र्यासह दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये राहते.\nजेसिकाचे अनुसरण करा\nकॉफी फिल्टरसह कागदाची फुले कशी बनवायची\nचक्रीवादळ किंवा इतर तीव्र हवामानादरम्यान आपल्या घराचे संरक्षण कसे करावे\n$ 100 अंतर्गत 10 वास्तविक उपकरणे\nकस्टम कलर चॉकबोर्ड पेंट कसा बनवायचा\n911 म्हणजे देवदूत संख्या\nअंक 11 मध्ये711 चा अर्थ काय आहे?\nदेवदूत संख्या 1010 डोरेन सद्गुण\nदेवदूत क्रमांक 1010 डोरेन सद्गुण\nमी 222 का पाहत राहू? |
लंडन, 26 जानेवारी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, अनमोल असा क्षण असतो. त्यामुळे आपल्या लग्नात आपलं कुटुंब, नातेवाईकांसह आपली बेस्ट फ्रेंडही असावीच असं बहुतेकांना वाटतं. पण एका महिलेने मात्र हद्दच केली. तिने आपल्या लग्नात सर्व मित्रमैत्रिणींना बोलावलं पण तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच बॅन केलं (Bride best friend no entery in wedding). या महिलेने आपल्या स्वतःचा रेडिटवर आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. काही आठवड्यांपूर्वीच तिने आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी आपल्या काही मित्रमैत्रिणींना बोलावलं. तिची प्री वेडिंग पार्टीही झाली. या सर्वात तिची बेस्ट फ्रेंडही होती. पण प्री-वेडिंग पार्टीत तिच्या बेस्ट फ्रेंडबाबत असं काही समजलं ज्यामुळे ती संतप्त झाली होती आणि तिने तिला आपल्या लग्नाच्या पार्टीच्या लिस्टमधून बाहेर केलं. तिची बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होती. तिला याबाबत माहितीच नव्हतं. कारण ती असे कपडे घालायची ज्यामुळे तिचं बेबी बम्प दिसायचं नाही. आता बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होणार म्हणजे खरंतर तिला आनंद वाटायला हवा होता. कारण तिचं लग्न आणि आता तिची मैत्रिणीही प्रेग्नंट हा तर खरं दुहेरी आनंद होता. पण तिला याचा राग आला. याचं कारण म्हणजे तिच्या प्री-वेडिंग पार्टीत तिच्याऐवजी तिच्या मैत्रिणीचीच जास्त चर्चा होती, तिच्याकडेच सर्वजण लक्ष देत होते. तिच्या प्री वेडिंग पार्टीत सर्वजण तिलाच प्रेग्न्सीच्या शुभेच्छा देत होते (everyone congratulated the bride's best friend on her pregnancy) . जेव्हा तिने आपल्या मित्रमैत्रिणींना बेस्ट फ्रेंडला शुभेच्छा देताना पाहिलं तेव्हा आपलं नटणंथटणं वायाच जाणार. सर्व पाहुणे तिला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी मैत्रिणीलाच आई होण्याच्या शुभेच्छा देणार. तिच्याऐवजी तिची बेस्ट फ्रेंडचं सर्वांचं आकर्षण ठरेल. असं तिला वाटू लागलं. त्यामुळे प्री-वेडिंग पार्टीतच तिने आपल्या मित्रमैत्रिणींना सुनावलं. तुम्ही लोक माझ्या लग्नासाठी आला आहात ना तिच्या प्रेग्न्सीच्या पार्टीसाठी. आता ही परिस्थिती आहे मग लग्नात काय होणार. कारण नवरदेवाचे नातेवाईकही त्या बेस्ट फ्रेंडला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते, त्यामुळे नवरीबाईने मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या ब्रेस्ट फ्रेंडलाच लग्नात येण्यास बंदी घातली. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
'मोतीचूर चकनाचूर'च्या ट्रेलरला न्यायालयाची स्थगिती - Majha Paper\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आथिया शेट्टी, नवाजुद्दीन सिद्दीकी, मुंबई उच्च न्यायालय, मोतीचुर चकनाचुर / October 11, 2019 October 11, 2019\n'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. १० ऑक्टोबरला नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार होता.\n'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाचे लेखक देव मित्र बिस्वाल यांचे मानधन दिले नसल्यामुळे त्यांनी निर्माता उडपेकर मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यावर ट्रेलरला स्थगिती देण्याच निर्णय दिला आहे. निर्मात्याने बिस्वाल यांना ११ लाख रुपये मानधन देण्याचे ठरले होते. पण त्यांना केवळ ६ लाख रुपयेच मिळाले. या स्क्रिप्टवर गेली पाच वर्षे बिस्वास काम करीत होते. निर्मात्यांना कथानक आवडले व तिन चित्रपटांसाठी करारबध्द केले. 'मोतीचूर चकनाचूर' हा यातील पहिलाच चित्रपट होता. पण कंपनीचे संचालक राजेश भाटिया आणि बिस्वाल यांच्यात एडिंटिंगच्या दरम्यान मतभेद झाले होते.\nबिस्वाल यांना कंपनीच्यावतीने एक ईमेल पाठवण्यात आला. त्यांची सेवा संपली असल्याचे यात लिहिण्यात आले होते. त्यानंतर बिस्वाल यांनी निर्मात्याशी संपर्क केला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायलयाचे दार ठोठावले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. |
पल्लवी जोशी यांनी लहान वयात रंगमंचात काम करणं सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी झाला. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटची चित्रपटात बहिण किवा हिरोईनची मैत्रीण सारखे सहकारी भूमिकेत देखील अभिनय केली होती ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होता. पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून "सा रे ग म' करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता. त्यांचे निवेदन, टाळ्या वाजविण्यासाठीचे आवाहन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. हिंदीतील "अंताक्षरी'ही त्यांनी केली. "रिटा' हा मराठी चित्रपट त्यांनी केला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या "बुद्धा इन ट्रॅफिक जॅम' या चित्रपटात ती अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. "सौदागर', "तेहलका' मध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. श्याम बेनेगल यांच्या "मेकिंग ऑफ महात्मा' मध्येही त्यांनी काम केले होते. "वो छोकरी'साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्हीवरही "जुस्तजू', "अल्पविराम' या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. संजीव वेलणकर पुणे. |
प्रकाशकाचे मनोगत चिखलदरा नगर मेळघाटाच्या सातपुडा पर्वताच्या पठारावर वसलेले अतिशय सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. शहराच्या दक्षिणेकडील असलेल्या डोंगर माथ्यावर उभारलेल्या गाविलगड किल्ल्याचे अवशेष दुरूनही दिसतात. पर्यटकांना दुरून होणारे गाविलगडाचे हे मनोहारी दर्शन त्यांची उत्सुकता वाढवते. चिखलदऱ्याला येणारा पर्यटक गाविलगडावर जावून आल्याशिवाय राहत नाही. पण किल्ल्याचा इतिहास आणि त्याच्या रचनेमागची सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी समजावून न घेता किल्ला 'पाहणे' हे खऱ्या अर्थाने 'पहाणे' नसते. किल्ल्यामधला पुराण पुरूष जोपर्यत तुमच्या कानात कुजबुजत नाही तोपर्यंत तुमच्या पाहण्याला काही अर्थ नसतो. पर्यटकांना मेळघाटातील गाविलगड आणि नरनाळा या किल्ल्याचा इतिहास व रचना यांची माहिती व्हावी, व ह्या माहितीसह त्यांनी डोळसपणे या किल्ल्यांचे भ्रमण करावे या उद्देशाने एखादे पुस्तक प्रकाशित करण्याचा चिखलदरा नगर परिषदेचा मानस होता. आतापर्यंत गाविलगड व नरनाळा या किल्ल्याबद्दल समग्र आणि संशोधनपर आधारीत एकही पुस्तक उपलब्ध नव्हते. पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. बोरकर यांनी उपलब्ध ऐतिहासीक पुराव्यावरून गाविलगड व नरनाळा किल्ल्याचा इतिहास संकलीत केला. नगर परिषदेने या माहीतपर आधारीत पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले. पर्यटकांच्या सोयीसाठी चिखलदरा परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारे प्रकरणही यात समाविष्ट करण्यात आले आहे. श्री. मिलिंद डाहाके यांनी पुस्तकांची छपाई उत्तम केली आहे. नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी या कामासाठी उत्साह दर्शविला मा. आयुक्त श्री मल्लिक साहेब यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहून आपली पर्यटनाबाबतची आस्था दर्शविली आहे. नगर परिषद चिखलदरा यांच्या तर्फे पर्यटकासाठी आणखी काही माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची योजना आहे. पर्यटानवर प्रेम करणाऱ्या समस्त जनतेच्या सहकार्याने ही योजना पुर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. मोना कासदेकर डि.ए. पठाण मुख्याधिकारी |
मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ख्रिस मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( international cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याने 69 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही बातमी जाहीर केली.(IPL's most expensive player abruptly retires from international cricket, will now be the team's coach) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, 'आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे! माझ्या प्रवासात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या प्रत्येकाचे आभार, मग तो मोठा असो किंवा छोटा... हा एक मजेदार प्रवास होता!' याशिवाय त्याने आपल्या भविष्याविषयीही सांगितले आहे. खरे तर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता टायटन्स क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. देशातील प्रतिष्ठित स्पर्धा आयपीएलमध्येही मॉरिसने भाग घेतला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाने 2021 मध्ये विक्रमी 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले होते. मॉरिसच्या आधी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच्या नावावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आफ्रिकन संघासाठी चार कसोटी क्रिकेट सामने खेळताना 2 विकेट्स घेतले आहे. याशिवाय, त्याने आपल्या संघासाठी एकदिवसीय स्वरूपात 42 सामने खेळले आहे आणि T20 क्रिकेटमध्ये 23 सामने खेळले आहे. (IPL's most expensive player abruptly retires from international cricket, will now be the team's coach) |
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना संबंधित लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे पॅनकार्ड नसल्याने ही रक्कम देताना अडचणी येत होत्या. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना संबंधित लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे पॅनकार्ड नसल्याने ही रक्कम देताना अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढताना पॅनकार्डाऐवजी आधार कार्डाच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातही मागेल त्याला शेततळे या राज्य सरकारच्या योजनेत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी पैसे देताना अडचणी येत होत्या. शेततळे करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची इच्छा असतानाही त्यांना याबाबतचा सरकारचा निधी मिळविताना अडचणी येत होत्या. वित्त विभागाचे सचिव डी. के. जैन यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी सीएमपी व्यवस्थेच्या माध्यमातून पॅनकार्ड दाखविल्यानंतर पैसे देण्याच्या पद्धतीत बदल केला. त्यामुळे आता पॅनकार्डऐवजी आधारकार्ड दाखविल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम भरण्यात येत आहे. त्याबाबत वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डी. के. जैन यांनी दिली. |
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १ : रेल्वे तिकीट बुक करणे आता अधिकच सुलभ झाले आहे. कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार तिकिटांचे बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकिटे बुक होतात. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज गुरुवारी आयआरसीटीसीच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. हे संकेतस्थळ आता अद्ययावत करण्यात आले असून, त्यामुळे तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगाने तिकीट बुक करता येणार आहे. या संकेतस्थळावर खाण्यापिण्यासह इतर सुविधाही मिळणार आहेत. रेल्वेमंत्री गोयल म्हणाले की, आयआरसीटीसीचे संकेतस्थळ हे रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचे पहिले केंद्र आहे. त्यामुळे प्रवाशांना येणारा अनुभव चांगला असावा. नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी आभासी तिकीट बुक करण्यावर आहे. यासाठीच आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सातत्याने अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. |
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे . त्यातच उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. कार्यक्रमासाठी आलेल्या अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर येताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी कोण करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "डॉक्टरांनी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. |
पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की..., पाहा व्हिडीओ\nBy टीम थोडक्यात On September 19, 2021 1:35 pm\nPhoto Credit- Twitter/Dallas\nनवी दिल्ली । अनेक पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही काळानंतर वाद सुरु होतात. यातून वैतागलेला पती नाही तर पत्नी बाहेर कुठं तरी रमतात. मात्र ही बाब जोडीदाराला समजल्यानंतर जे होतं याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे.\nस्वतःच्या बहिणीचं स्वतःच्याच नवऱ्यासोबत अफेअर असल्याचं पत्नीला समजलं. यानंतर महिलेनं आपल्या बहिणाला तिच्या जाॅब इंटरव्ह्यूच्या वेळी जाऊन मारहाण केल्याचं कळतंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.\nमारहाण करत असलेल्या महिलेच्या बहिणीचं तिच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर संतापलेली महिला थेट आपल्या बहिणीला गाठते यावेळी तिची बहिण एका जाॅब इंटरव्ह्यूमध्ये असते. मात्र महिला पुढे मागे न बघता थेट तिथं जाऊन तिला खुर्चीवरुन खाली पाडते. त्यानंतर अक्षरशः तिचे केस धरुन तिला मारते.\nदरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर 'डॅलस' अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पत्नी स्वताःच्याच बहिणीला मारहाण करते, जेव्हा तिला समजतं की ती तिच्या पतीसोबत...., असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nही माझी शेवटची राजकीय लढाई- कॅप्टन अमरिंदर सिंग\nTMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता; पक्षात प्रवेश करताच बाबूल सुप्रियोंना मोठं गिफ्ट? |
थिम्पू - भावी पिढ्यांवर प्रभाव टाकू शकेल, अशी शैक्षणिक कामगिरी करण्याची भूतानमधील विद्यार्थ्यांत क्षमता आहे. त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून वाटचाल करावी आणि हिमालयातील या देशाला नवी उंची प्राप्त करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. राॅयल विद्यापीठात रविवारी माेदींनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, भूतानी तरुणांनी परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. सध्याच्या युगात अनेक प्रकारची आव्हाने आहेत. प्रत्येक आव्हानाला ताेंड देण्यासाठी नवनव्या कल्पनांचा वापर करण्याची जिद्द बाळगावी. तरुणपणीचा काळा सर्वात चांगला मानला पाहिजे. कारण अनेक आव्हाने आणि संधी तुमच्यासमाेर येत असतात. काहीतरी अतुलनीय कामगिरी करण्यास सक्षम आहाेत, हा विश्वास बाळगला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही पुढील पिढ्यांवर प्रभाव टाकू शकाल. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात स्वतः ला घडवा, असे माेदींनी सांगितले. या प्रसंगी भूतानचे पंतप्रधान लाेते शेरिंग यांचीही उपस्थिती हाेती. भूतानच्या तरुणांसाेबत १.३ अब्ज भारतीय आहेत. ते तुमच्याकडे पाहून केवळ आनंदी हाेत नाहीत, तर ते तुमचे भागीदारही आहेत. भारतीय तरुण तुमच्यासाेबत शिकतील. तुम्हाला साथ देतील, असे माेदींनी सांगितले. भारत-भूतान यांच्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून ऊर्जा मिळेल. परंतु खरी ऊर्जा दाेन्ही देशांतील सामान्य नागरिकांच्या मैत्रीतून मिळणार आहे, हे विसरता येणार नाही. हेच संबंध अधिक दृढ हाेणे गरजेचे आहे. दाेन्ही देशांच्या नागरिकांनी आपल्या अनुभवांची परस्परांशी देवाण-घेवाण करावी. दरम्यान, माेदींचे शनिवारी भूतानला आगमन झाले हाेते. त्यांचा रविवारी हा दाैरा आटाेपला. ते मायदेशी रवाना झाले. माेदींचा हा दुसरा भूतान दाैरा आहे. भारताचे नॅशनल नाॅलेज नेटवर्क व भूतानचे द्रूकरेन या संस्थांतील सहकार्यामुळे उभय देशांत विद्यापीठ, संशाेधन संस्था, गं्रंथालय, आराेग्य-केंद्र व कृषी संस्था यांच्या पातळीवरील संपर्क व संवाद व्यवस्था निर्माण हाेण्यास मदत झाली आहे. या सर्व व्यवस्थेचा याेग्य ताे वापर करून आपल्या देशाचा फायदा करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भारत भूतानला नवनवीन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी तयार आहे. शाळेपासून अंतराळ, डिजिटल पेमेंट्सपासून आणीबाणीतील व्यवस्थापनापर्यंत भारत सहकार्य करेल. त्यातून मैत्रीवर चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास माेदींनी व्यक्त केला. |
Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय. . गुंडांची नशा उतरतेय! फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. फिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय. मात्र या ठिकाणी बटाट्याची दारू भलतीच धुमाकूळ घालू लागलीय तर गल्लीबोळातल्या गुंडांची नशा झटक्यात उतरलीय. यमुना नदीचं खोरं सध्या 'बटाट्याचा टापू' म्हणून प्रसिद्ध. फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी आपल्या शेतात बटाटाच पिकवितात. फरुखाबादसारख्या केवळ एका गावातून बारापेक्षाही जास्त किसान रेल्वे बटाटा घेऊन गेल्या वर्षभरात धावल्या आहेत. शेतकरी आता एकजूट करून प्रश्न विचारू लागलेत. सुरेश सिंग चंदेल 'लोकमत'ला सांगत होते, 'जोपर्यंत देशात बटाट्याच्या को-प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळणारच नाही. त्यासाठी सरकारनं बटाट्यातून अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगांना परवानगी द्यावी. सध्या या परिसरात बटाट्यावर अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या आनंद शर्मा यांचा तर दावा आहे की, राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रानं विकसित केलेला निळा बटाटा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल. उत्तर प्रदेशात बटाट्याचा व्होडका तयार होईल का नाही, याची गॅरंटी या क्षणी कोणत्याच राजकीय नेता देऊ शकत नाही. मात्र याच नेत्यांच्या जीवावर गावागावांत धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांची नशा उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्णपणे उतरून टाकलीय. यंदाच्या प्रचार धुमाळीत निवडणूक आयोगानं अत्यंत कडक भूमिका घेतल्याचं सर्वांनाच जाणवू लागलंय. गल्लीबोळातले एकेक गुंड वेचून-वेचून पोलिसांनी गजाआड केलेत. थंडीचा कडाका, दारूचा शिडकावा! उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत असलं असलं तरी थंडीचा कडाका मात्र वाढत चाललाय. या थंडीपासून शेतातील बटाट्याचं सरंक्षण करण्यासाठी शेतकरी चक्क देशी दारूचा वापर करताहेत. पाण्यात दारूच्या बाटल्या ओतून त्याची फवारणी पिकावर केली जात आहे. यामुळे पिकांना म्हणे गर्मी मिळते. विशेष म्हणजे आचारसंहिता काळात अडचण नको म्हणून अनेकांनी अगोदरच बाटल्यांची खोकी घरात भरून ठेवलीत. |
बंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकात सरकार स्थापन होऊन अवघे काही महिनेच झाले असताना आता पुन्हा एकदा सत्तेसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. २ अपक्ष आमदारांनी राज्यातील काँग्रेस-निजद सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आले आहे. कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरू असल्याने राजकीय अस्थिरता वाढली आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज मकरसंक्रांत आहे. त्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार हे कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. तर एच. नागेश यांनीही पाठिंबा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडायचेच, अशी रणनिती भाजपकडून अवलंबिली जात आहे. त्यासाठी भाजपकडून तीव्र हालचाली सुरू आहेत. यामुळे राज्यातील काँग्रेस-निजदची चिंता वाढली असून यामुळे राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वतःचे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता. ए. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान, राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राज्यातील सरकार पाच वर्षे कालावधी पूर्ण करेल, असा दावा कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. |
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राची सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा उद्यावर गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत हे प्रकरण पोहोचले नाही त्यामुळे पुन्हा ही सुनावणी उद्यावर गेली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं विधिज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पूर्ण कामकाजभर त्यांची बाजू मांडली. उद्या पुन्हा युक्तिवाद काही काळासाठी युक्तिवाद होतील. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे अडचणी वाढल्या? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातल्या पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर सुरु असलेल्या या सुनावणीतला पहिला मुख्य मुद्दा आहे की ही सुनावणी सात न्यायाधीशांच्या विस्तारित खंडपीठासमोर व्हावा का. ही मागणी उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ महाराष्ट्राच्या प्रकरणात वारंवार येतो आहे. त्या रेबीया निकालात असा निर्णय विधानसभा अध्यक्ष या स्थितीत घेऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं. हरीश साळवे यांनी मंळवारी कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंनी गटनेते म्हणून केलेल्या अजय चौधरी यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित करता आले असते. आता त्यांचा राजीनामा अवैध ठरवला तरच या मुद्द्यांना अर्थ आहे, असं त्यांनी म्हटलं. बहुमत नसलेल्या नेत्यांसाठी पक्षांतरबंदी कायदा नाही, राजकीय सभ्यतेचे अनेक पैलू त्यामध्ये आहेत. तसंच नबाम रेबिया प्रकरण योग्य किंवा अयोग्य हे राजकीय स्थितीवर अवलंबून असतं, असंही साळवे यांनी म्हटलं. दरम्यान, नीरज किशन कौल म्हणाले, शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांची नाराज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर होती. त्यामुळे अशा पक्षांतर्गत नाराजीचा विचार व्हायला हवा. कौल यांचा युक्तिवाद सुरू असताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "मला तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. तुम्ही म्हणत आहात की एकदा की राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर ते (उद्धव ठाकरे) कोर्टात गेले. त्यांनी बहुमत चाचणीला स्थगिती देण्याची मागणी केली. कोर्टाने म्हटलं की बहुमत चाचणीला स्थगिती देता येणार नाही. त्यानंतर केवळ बहुमत चाचणीला सामोरे जाणं, हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे शिल्लक होता. त्यानंतर अपात्र होऊ शकणाऱ्या सदस्यांमार्फत या चाचणीवर किती प्रभाव पडतो, हे पाहणं आवश्यक होतं. ते त्यांनी राजीनामा देऊन टाळलं. याचा अर्थ त्यांना सभागृहात बहुमत चाचणीला सामोरे जायचं नव्हतं. " नबाम रेबिया प्रकरण बाजूला ठेवून या प्रकरणावर युक्तिवाद करा, अशी सूचनाही सरन्यायाधीशांनी यावेळी कौल यांना केली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी नेबाम रेबिया प्रकरणाचा दाखला दिला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती वागू नये असा युक्तिवाद त्यांनी केला. विधानसभेचं अधिवेशन सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणता येतो असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. शिवसेनेने दाखल केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय घ्यावा. तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलं. काय आहे नेबाम रेबिया प्रकरण? अरुणाचल प्रदेशमध्ये 9 डिसेंबर 2015 ला काँग्रेसमधील आमदारांच्या एका गटानं बंडखोरी करत राज्यपालांकडे विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष रेबिया यांना हटविण्याची मागणी केली होती. विधानसभा अध्यक्ष आम्हाला अपात्र करू इच्छितात अशी तक्रार त्यांनी राज्यपाल ज्योति प्रसाद राजखोवा यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यपालांनी 16 डिसेंबरला विधानसभेचं आपात्कालीन अधिवेशन बोलावण्यासाठी तसंच अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला हिरवा कंदील दाखवला. काँग्रेसने राज्यपालांच्या कारवाईचा विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारनं कलम 356 वापरत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. नंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. त्यामध्ये काँग्रेसच्या 20, भाजपच्या 11 आणि दोन अपक्ष आमदारांनी भाग घेतला. त्यांनी खालिखो पूल यांना गटनेते म्हणून निवडलं. त्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 14 बंडखोरांना आमदारांना अपात्र घोषित केलं. 5 जानेवारी 2016 ला गुवाहाटी उच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द ठरवला आणि अध्यक्षांची याचिका फेटाळून लावली. अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी राज्यपालांना 14 जानेवारी 2016 ला विधानसभेचं अधिवेशन बोलवायला सांगितलं. मात्र राज्यपालांनी एक महिना आधीच 16 डिसेंबर 2015लाच विधानसभेचं अधिवेशन बोलावला होतं. त्यातून घटनात्मक पेच निर्माण झाला. तुकी यांनी थेट विधानसभेलाच टाळं ठोकलं. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका विधानसभेचे अध्यक्ष रेबिया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. 15 जानेवारी 2016 ला राज्यपालांच्या अधिकारांसदर्भात विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर 29 जानेवारी 2016 ला नबाम तुकी यांनी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका दाखल केली. 30 जानेवारी 2016ला केंद्राने अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट योग्य असल्याची भूमिका मांडली. केंद्राने राज्यातील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचंही म्हटलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान 2 फेब्रुवारी 2016ला अरुणाचलचे राज्यपाल राजखोवा यांनी सांगितलं की, राज्यातील राष्ट्रपती शासन अस्थायी आहे आणि राज्यात लवकरच लोकांनी निवडून दिलेलं सरकार स्थापन होईल. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की, राज्यपालांचे सर्वच अधिकार न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेत येत नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालय लोकशाही व्यवस्थेला तडे जातानाही पाहू शकत नाही. याच दरम्यान 10 फेब्रुवारी 2016 ला सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांची विधानसभा अध्यक्षांविरोधातली याचिका फेटाळून लावली. 19 फेब्रुवारी 2016 ला राज्यातील राष्ट्रपती राजवट संपविण्यात आली. 20 फेब्रुवारी 2016 ला खलिखो पूल यांनी अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पूल यांना 18 बंडखोर आमदार, 11 भाजप आमदार आणि 2 अपक्ष आमदारांचं समर्थन होतं. विशेष म्हणजे याच घटनेच्या एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील नवीन सरकारच्या स्थापनेसंदर्भात जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचा आपला आदेश मागे घेतला होता. अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी ज्यापद्धतीने विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला होता ते घटनेचं उल्लंघन होतं. दरम्यान, काँग्रेसच्या 30 बंडखोर आमदारांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशमध्ये आपला गट विलीन केला होता. काँग्रेसकडे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा आता कोणताच अधिकार नव्हता. या सर्व न्यायालयीन संघर्षानंतर 13 जुलै 2016 ला सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशमधील राज्यपालांचा निर्णय घटनाविरोधी असल्याचं म्हटलं आणि नबाम तुकी यांच्या बाजूने निर्णय दिला. |
Rama Steel Tube Share Price । शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स 2. 64% वाढीसह 36. 95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे, कारण कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकाना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज शेअर बाजरी जबरदस्त पडझड असताना या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE - NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price । Rama Steel Tubes Stock Price । BSE 539309 । NSE RAMASTEEL) आज NSE आणि BSE निर्देशांकावर या कंपनीचे एकूण 2,683,945 शेअर्स ट्रेड झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हा स्टॉक 36 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. लोह आणि पोलाद उत्पादने करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहेत. डिसेंबर तिमाहीमध्ये सर्वाधिक 53,216. 16 टन उत्पादने विक्रीचे प्रमाण गाठल्यानंतर शेअर च्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. तीन महिन्यांत 74 टक्के परतावा : 25 ऑगस्ट 2022 रोजी रामा स्टील ट्यूब कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्समध्ये विभागले होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या स्टॉकने लोकांना 142 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शंकर शर्मा पोर्टफोलिओ : 12 ऑक्टोबर 2022 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनी संचालक मंडळाने दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांना प्राधान्याच्या आधारावर 112. 50 रुपये प्रीमियमसह 16. 25 लाख परिवर्तनीय वॉरंट जारी करण्यास मंजुरी दिली होती. वॉरंट वाटप करणाऱ्याला इश्यू किमतीच्या 25 टक्के अधिक रक्कम द्यावी लागली होती. 14 जानेवारी 2023 रोजी ICRA ने रामा स्टील ट्यूब्स इन्स्ट्रुमेंट्स कंपनीला BBB रेटिंग दिले आहेत. ICRA या रेटिंग एजन्सीने रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे व्यवस्थापन आणि स्टील पाईप उद्योगातील दीर्घ ट्रैक रेकॉर्डबद्दल सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. News Title । Rama Steel Tubes Share Price 539309 RAMASTEEL stock market live on 28 January 2023. Mankind Pharma Share Price । कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा शेअरने 5 दिवसात 11. 80% परतावा दिला, पुढे शेअर मोठा फायदा देणार? - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
चिंचवड : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पिंपरी-चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढायचीच नाही, तर ती जिंकायचीसुद्धा हे राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता.२) ठरवले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खांद्यावर दिली. घड्याळावरच आणि पक्षातलाच उमेदवार देण्याचेही यावेळी निश्चित झाले. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या काहींच्या खेळींना लगाम बसला आहे. तब्बल १० इच्छुकांनी त्यासाठी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे गुरुवारी मुलाखती दिल्या. हे सगळे तालेवार असून त्यात बहुतांश माजी नगरसेवक आणि माजी पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी आहेत. त्यातील एकाची निवड करण्यात अजितदादांची कसोटी लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, इच्छुक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या काल पुण्यातील बारामती होस्टेलवर बैठक पार पडली. अजित पवारांनी उद्योग नगरीतील पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर मंगला कदम आणि चिंचवडचे प्रभारी आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी चर्चा केली. इच्छुकांची मते `वन टू वन` जाणून घेतली. नंतर इच्छुक आणि ज्येष्ठांची एकत्रित बैठक घेत दोघांचाही अंदाज घेतला. कालच्या बैठकीचा तपशील ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहेत. त्यानंतर आजच्या महाविकास आघाडीत आज जागावाटप होऊन त्यात चिंचवड, राष्ट्रवादी, तर कसबा कॉंग्रेसच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर तेथील उमेदवार कोण असणार याबाबत दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात येईल. |
"त्यामुळे पुढच्या आयुष्यावर पकड येते आणि ते जगायला सोपंही जातं. आपण ते सुखलेले नातं ओढत ताणत गेलो कि मग त्रास होतो, जखम होते. हे ते स्वताशीच म्हणाले..... कारण सरळ होतं माझ्या त्या लहान बुद्धीला ते अजिबात समजणारं नव्हतं. मात्र आज त्याचा अर्थ कळतो आहे. हळू हळू आमचं काम सुरु होतं. एक एक टप्पा आमचा पुढे जात होता. हळू हळू फक्त लाकडाचे उभे आडवे दांडे आता एक कामी, उपयोगी येणाऱ्या चौपाईत रुपांतरीत होत होती. कोणतीच गोष्ट एका दमात होत नाही, हेच सत्य. "प्रत्येक गोष्टीला तीचं योग्य परिपक्व रूप घेण्यासाठी योग्य तो काळ लागतोच जसं बाळाला जन्म घेण्यासाठी ९ महिन्याचा कालावधी लागतोच तसं प्रत्येक परिपक्व गोष्टीलासुद्धा लागतो. आणि जर तो योग्य वेळ नाही मिळाला तर ती वस्तू गोष्ट तितकी परिपक्व होत नाही. मग ते premature जन्माला आलेलं बाळ असेल किंवा घाई घाईत तयार झालेलं नातं. किंवा अजून वेगळं काही. पण सत्य हेच आहे कि, "जगातल्या कोणत्याही वस्तूला तो योग्य कालवधी, तो योग्य वेळ लागतोच तीचं परिपक्व रूप घेण्यासाठी ' मी मधेच बाबांना प्रश्न विचारत होतो. बाबा मला भूक लागली आहे करा लवकर अजून किती वेळ. हो बाळा लवकरच करतोय.. पण घाईत केलं तर चुकेल ना ते.. त्यात काय चुकायचं सोपं तर आहे ते. एकदा इकडून आणि एकदा तिकडून दोरी ओवली कि बस झालं. असं मी सहज बोलून गेलो. कारण तेव्हा मी लहान होतो आणि लहान, बुद्धी कमी असतांना व्यक्ती चुका सहज करतो. अजून काय असतं बाबा, सोपं तर आहे. बघा मी करतो, बाबांच्या हाता मधून दोरी घेत मी बोललो आणि समोर असलेल्या दोऱ्या मधून ती ओवू लागलो गुंफू लागलो. |
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या 'एवढ्या' BLUE FILMS (पॉर्न सीडी) मुंबई : वृत्तसंस्था - ओशिवरा पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना तब्बल 'अडीच लाख' पॉर्न सीडी सापडल्या. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा मारला त्यावेळी ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत होती. मिस्टी मुखर्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. अभिनेत्री मिस्टी मुखर्जी फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप झाला होता. यानंतर ओशिवरा पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी लॅपटॉप आणि अन्य सामान जप्त केले. तसेच जप्त करण्यात आलेल्या पॉर्न सीडी दक्षिण भारतातून खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या सीडींची बनावट सीडी बनवून त्या मुंबई, ठाणे परिसरात विकले जात होते. हा व्यवसाय अभिनेत्रीच्या फ्लॅटमधून चालत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिनेत्री मिस्टी मुखर्जी, तिचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे. कोण आहे मिस्टी मुखर्जी ? मिस्टी ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. तिने बॉलिवडमध्ये अनेक चित्रपटात प्रमुख भुमिकेत काम केले आहे. तिचा बॉयफ्रेड राकेश कटारिया हा दिल्लीचा असून तो व्यवसायान फॅशन डिझायनर आहे. मिस्टी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जवळपास ७० आयपीएस आणि आयएएस अधिकारी राहत होते. |
मुंबई, 26 मे- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला काल मुंबईत सीबीआयने अटक आली. आज या दोघांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेकडून कटाची माहिती मिळवायची आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे ज्यांची विल्हेवाट लावली, त्याबाबत माहिती घ्यायची आहे. पुनाळेकर आणि भावे यांचा कसा सहभाग होता, हे जाणून घ्यायचे आहे. यासाठी सीबीआयच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली. ही मागणी कोर्टाने मान्य करत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यत सीबीआय कोठडी सुनावली आहे. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील जामिनावर बाहेर असलेले संशयित आरोपी समीर कुलकर्नीही कोर्ट परिसरात हजर आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत. विक्रम भावे यांचे मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचे समजते. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोलकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर. . संजीव पुनाळेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत सीबीआयली संजीव पुनाळेकरबाबत माहिती मिळाली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते. पुनाळेकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावली. ही पिस्तुलं त्यांनी तोडून खाडीमध्ये फेकून दिली, असा दावा सीबीआयने केला आहे. हत्येच्या वेळी एकूण चार जण उपस्थित होते, असा दावाही सीबीआयने केला आहे. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी ही चार पिस्तुलं वापरण्यात आली होती का, हे आता तपासातून पुढे येणार आहे. वैभव राऊत आणि शरद कळसकर 23 जुलै 2018 च्या रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तुकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे जिथे फेकले ती जागा ठाण्यातील कळव्याचा पूल, वसईमधला खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल यापैकी एक जागा होती. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५० वी बैठक आज संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये रू. १२,९६९. ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता मिळाली असून त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक - मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल व मुंबईकारांचा प्रवास अधिक आरामदायी व कमी वेळेत होणे शक्य होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो मार्ग-३) प्रकल्पाकरीता प्राधिकरणातर्फे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) करीता २५० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. येत्या वर्षात मेट्रो मार्ग-२अ (दहिसर-डी. एन. नगर (अंधेरी)) व मेट्रो मार्ग-७ (दहिसर (पूर्व) - अंधेरी (पूर्व)) या मार्गिकांवर वर प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकल्पांकरीता अनुक्रमे ७००. ६५ कोटी व ९९९. ४५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मेट्रो रेल प्रकल्पांसाठी अर्थकसंकल्पामध्ये ४५७१. २५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मेट्रो भवन, मेट्रो कर्मचारी निवासस्थानेकरीता ३२९. ३० कोटी, मोनोरेल प्रकल्पाकरीता १२०. २० कोटी, मुंबई पारबंदर छन्न् मार्ग २९००. ३५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारककारीता १०० कोटी, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकरीता २६० कोटी, वांद्रे-कुर्ला संकुल (कलानगर उड्डाणपुलासह) ६० कोटी, मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांकरीता (MUTP) ४०५ कोटी, एमयुआयपी (विस्तारित) प्रकल्पाकरीता ७७६. ८५ कोटी, मेट्रो स्थानकांसाठी नियोजन व बहुवाहतुक आराखड्याकरीता ३०० कोटी, प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोताचा विकास प्रकल्पाकरीता ६१३. ३५ कोटी, सांताक्रुझ-चेंबुर-जोडरस्ता विस्तारित प्रकल्पाकरीता २०० कोटी, छेडानगर जंक्शन येथे उन्नतमार्ग सुधारणा प्रकल्पाकरीता ६० कोटी, पूर्व/पश्चिम द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरूस्तीकरीता २०० कोटी, सिटीपार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान पादचारी झुलता पूल प्रकल्पाकरीता ७७. ०५ कोटी तसेच इतर प्रकल्पांकरीता ९८३. ३५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सर्वेक्षण व अनुदाने याकरीता १७५. ३५ ,कर्ज वितरण व सुरक्षा ठेवीकरीता २७३, प्रशासकीय भांडवली खर्चाकरीता ५४८. ६० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. सन २०२१-२२ या अर्थसंकल्पीय वर्षात १२९६९. ३५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून ९८३३. ७५ कोटी इतकी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाने सन 2019-20 च्या वार्षिक अहवालास मान्यता दिलेली असून मेट्रो मार्ग-2ब (ङिएन. नगर ते मंडाळे) येथील विस्तारीकरणास व स्थानक बदलास तसेच मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) येथील स्थानक बदलास मंजूरी देण्यात आली. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पृष्ठभागाच्या कामकाजाकरीता आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कामकाजांकरीता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली. |
परभणी : जिल्ह्यात गोदावरीच्या कुशीत वसलेले जांभूळ बेट पर्यटन स्थळ व्हावे, म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मंगळवारी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पालम तालुक्यातील जांभूळबेट या निसर्गरम्य ठिकाणाला मंगळवारी (दि. 2) भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषिभूषण कांतराव देशमुख, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, गट विकास अधिकारी आर. व्ही. चकोर, सभापती विजयकुमार शिंदे, नांदेड येथील वृक्ष मित्र संघटनेचे पदाधिकारी, सरपंच अविनाश कदम, उपसरपंच राम कदम, जिल्हा कक्षातील ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद टेंकाळे, महेंद्र डोंगरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी जांभूळ बेटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. मोठ्या प्रमाणात वृक्षांची उपलब्ध करून काटेरी बाबळी काढून त्या ठिकाणी फळांची वृक्षलागवड करणार असल्याचे या वेळी सांगितले. परभणीचा नागरिक म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घेतल्यास लोकसभागातून जांभुलबेटाचा सर्वांगीण विकास होईल अशी भावना कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी ढोलकीपटू शाहीर सुभाष जोगदंड यांच्या संचाने उपस्थितांसमोर स्वच्छता व स्वागत गीतांचे सादरीकरण केले. |
Kon Honar Crorepati : ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व 29 मेपासून सुरू होत आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) सांभाळत आहे. यंदा या कार्यक्रमाच्या बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्टदेखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर बसून करोडपती होण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. मनासारखं जगायचं असेल तर आता मागे नाही राहायचं, असं म्हणत 'कोण होणार करोडपती' येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. या कार्यक्रमाने अनेक सामान्य व्यक्तींचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'कोण कोणार करोडपती' या कार्यक्रमाबद्दल बोलताना सचिन खेडेकर म्हणाले,"आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं". सचिन खेडेकर पुढे म्हणाले,"मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करुन आलेले असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर". |
बेस्ट उपक्रमामधील पहिली इलेक्ट्रिक बस (Electric Bus) सेवा मुंबईकरांसाठी आजपासून (9 सप्टेंबर) सुरु होणार आहे. तसेच या बसचा क्रमांक 302 असा ठरवण्यात आला असून सहा वातानुकूलित आणि चार विनावातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक बसची सोय करण्यात आली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरातील प्रतीक्षानगर ते सायन- मुलूंड पर्यंत ही इलेक्ट्रिक बस धावणार आहे. तसेच एलबीएस मार्गावरुन सायन ते कुर्ला, कमानी, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप आणि शेवटचे स्थानक मुलूंड या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन धारावी बस आगारात करण्यात येणार असून एकदा बस चार्ज केल्यावर संपूर्ण दिवसभर ती सुरु राहण्याची क्षमता त्यामध्ये आहे. (बसचे निश्चित ठिकाण कळणार आता मोबाईलच्या एका क्लिकवर) त्याचसोबत बसची माहिती देणारे अॅप आजपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना बसचा मार्ग, बसची वेळ आणि नजीकच्या बस स्थानकासंदर्भासह अन्य माहिती सुद्धा अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. मात्र तिकिट दरासाठी वातानुकूलित बससाठी 6 रुपये प्रति पाच किमी आणि विनावातानुकूलित बससाठी 5 रुपये तिकिटाचे दर ठरवण्यात आले आहे. |
Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता. 24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता. शिझानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय भावूक झाले होते. शिझानला घ्यायला त्याची बहिण फलक नाज (Falaq Naaz) आणि शफक नाज (Shafaq Naaz) गेले होते. भावाची सुटका झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. तुनिषा आणि शिझान 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' ही मालिका करत होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते. शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणापासूनच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याने 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेत तुनिषाने देखील प्रमुख भूमिका साकारली. |
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांची असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ब्रिटीश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम,पश्चिम भारताचे सहायक संचालक वेनॉर्न डिसूझा आणि पश्चिम भारतासाठी शाळांचे संपूर्ण काम पाहणाऱ्या उर्वी शहा यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी गायकवाड यांनी ही माहिती दिली. मागील अनेक वर्षापासून ब्रिटीश कौन्सिल राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर काम करीत आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ब्रिटिश कौन्सिल राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देत असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांची असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी वेगवेगळया उपक्रमातून या संस्थेची मदत घेण्यात येणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले. प्रा. गायकवाड म्हणाल्या, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, बीड,हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर येथेही ब्रिटीश कौन्सिलने राबविलेल्या उपक्रमांना यश आले असून या जिल्हयातील विद्यार्थ्याना याचा फायदा होत असल्याचे दिसून येत असल्याने अधिकाधिक ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी ब्रिटीश कौन्सिलची मदत घेण्यात येणार आहे. |
दूरदर्शन ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल आपण सर्वांनी जागरूक असले पाहिजे. गेल्या दोन दशकात टीव्हीच्या जगात अनेक बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी जसं लांबलचक अँटेना असायचे, त्याद्वारे खेडोपाडी दूरदर्शन दिसत होते. यानंतर डीटीएच (डीटीएच)चा प्रवेश झाला आणि त्यामुळे हळूहळू अनेक टीव्ही चॅनेल्स भारताच्या घराघरात पोहोचल्या. आपल्या सर्वांना माहित आहे की डीटीएच किंवा डिश टीव्हीचा अँटेना मागील अँटेनापेक्षा खूप वेगळा आहे. त्यात एक गोल छत्री ठेवली आहे. ज्याद्वारे उपग्रहाकडून सिग्नल्स मिळतात आणि आम्ही आमचे आवडते कार्यक्रम टीव्हीवर पाहू शकतो. मात्र, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की डीटीएच किंवा डिश टीव्हीचा अँटेना गोल का असतो? ते चौरस किंवा इतर काही आकार का बनवले जात नाहीत? जर तुम्हाला याचे उत्तर माहित नसेल तर कोणीही नाही, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. डिश टीव्हीच्या अँटेनाचा आकार जाणूनबुजून गोल केला आहे. हे केले जाते जेणेकरून जेव्हा एखादा प्रकाश डिशवर आदळतो तेव्हा तो परावर्तित होत नाही आणि सरळ मागे जातो, उलट तो फोकसवर थांबतो. त्याचप्रमाणे जेव्हा उपग्रहातून येणारे सिग्नल्स देखील छत्रीला आदळतात तेव्हा ते फीड हॉर्नवर लक्ष केंद्रित करतात आणि यामुळे आपल्या टीव्हीवर अनेक प्रकारचे चॅनेल येतात. शेवटचा सेट टॉप बॉक्स का वापरला जातो हाही प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सेट टॉप बॉक्स उपग्रहाकडून माहिती घेतो. म्हणजे फीड हॉर्नसह सिग्नल सेट टॉप बॉक्सपर्यंत पोहोचतो, त्यानंतर सेट टॉप बॉक्स हे सिग्नल डीकोड करतो. ही डीकोड केलेली माहिती आपण सर्व टीव्हीद्वारे पाहतो. |
भारतीय हवाई हद्दीत इराणच्या पॅसेंजर जेटवर 'बॉम्ब' असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॅसेंजर जेट आता चीनच्या दिशेने जात आहे, तर सुरक्षा एजन्सींची एक टीम विमानावर नजर ठेवण्यासाठी जमली आहे. हे विमान भारतीय हवाई हद्दीतून जाणार होते. त्यानंतर दिल्ली विमानतळावरून जयपूर विमानतळापर्यंत माहिती देण्यात आली. त्यानंतर अवजड एजन्सीही अलर्टवर आल्या आहेत. असे वृत्त आहे की विमानाने आपत्कालीन लँडिंगसाठी भारताकडे परवानगी मागितली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. विमानाला दिल्ली आणि जयपूरला उतरायचे होते. पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही. आता हे उड्डाण चीनच्या दिशेने जात आहे. मि माहितीनुसार, हे विमान महान एअरलाइन्सचे आहे. बॉम्बची अधिकृत पुष्टी नाही, परंतु हे स्पष्टपणे सांगितले जात आहे की हे उड्डाण भारतीय हवाई दलाच्या श्रेणीबाहेर गेले असावे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
चक्कर येत असतांना होणारी डोळ्याची हालचाल. चक्कर या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे. एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे 'चक्कर येणे' या रोगात दिसून येतात.आपल्या कानाच्या आतील बाजूस असलेले 'लॅबरिथ'(अंतःकर्ण?)[मराठी शब्द सुचवा] या भागाशी याचा संबंध असतो.त्या भागाने शरीराचा तोल सांभाळण्याचे काम होते.तो भाग उठ-बस,झोप,उभे असणे किंवा चालणे या शरीरक्रियांचे संदेश मेंदुकडे प्रक्षेपित करतो.या संदेश पाठविण्याच्या क्रियेत काही कारणांनी बिघाड झाल्यास, चक्कर येते.अचानक कमी ऐकु येणे,कानात किणकिणल्यागत नाद होणे. कानावर आघात झाल्यास,मधुमेह, रक्ताची हानी,तीव्र सर्दी,मानेच्या मणक्याचे आजार किंवा झीज,मद्यावस्था किंवा अती धुम्रपानही याचे कारण असू शकते.उपवासामुळे अन्नात पौष्टिक घटकांचा/शरीरास अन्नाचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता हेही एक कारण असु शकते.वाढते वय.अति विचार, मानसिक चिंता. वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक. लांबच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे,अचानक हालचाली टाळणे,उठता-बसतांना सावकाश हालचाली करणे, झोपून उटावयाचे असल्यास सावकाश कुशीवर वळुन,हातावर जोर देउन बसावे व मग सावकाश उभे रहावे.या प्रकाराने मेंदुस संदेश पोचविण्याचे कामात वेळ मिळतो व सर्व ठिकठाक राहते. |
'हे गणराया' बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस! गणेशस्तुती हा रसिकांच्या पसंतीचा विषय आहे. शब्द, संगीत आणि गायन ह्याचा त्रिवेणी संगम या गाण्यात आपल्याला दिसून येईल . कलेची देवता असलेल्या अधिपती गणपती बाप्पाला या गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा या सर्व कलाकारांनी पोहोचवली आहे. श्रवणीय संगीत, शब्दमधुर गीत आणि शंकरजींच्या आवाजातला गोडवा नक्कीच बाप्पापर्यंत पोहोचणार आणि बाप्पाच्या आशीर्वादाने अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडत जाणार. संगीतकार नीरज करंदीकर यांनी यापूर्वीही दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आशा भोसले,सुरेश वाडकर,हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, देवकी पंडित बेला शेंडे, आर्या आंबेकर यांच्यासाठी नीरज यांनी यापूर्वी संगीत दिलेले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने नीरज यांनी गायिका प्रियांका बर्वे ह्यांनी गायलेल्या गाण्याला संगीतबद्ध केले होते. |
औरंगाबाद : शहरातील सार्वजनिक शौचालये लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही महापालिकेला कमी शौचालयांमुळे तीन वर्षांपासून कमी गुण मिळत आहेत. महापालिका स्वतःहून १०० शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. खाजगी संस्थेच्या सहकार्याने शौचालय उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत, शहरातील पेट्रोलपंपांवरील शौचालयेही नागरिकांसाठी खुली करावीत, अशी विनंती महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सुलभ इंटरनॅशनलने शहरात मागील दोन महिन्यांपासून सर्वेक्षण केले. यात शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे निवडण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वात मोठा प्रश्न जागेचा आहे. अनेक ठिकाणी शौचालय उभारणीस विरोध होतो. या जागांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेने आरक्षणे टाकलेली आणि ताब्यात घेतलेल्या जागांचाही विचार सुरू आहे. या सर्व प्रक्रियेला किमान ६ महिने लागणार आहेत. संपूर्ण १०० शौचालये उभारण्यास वर्षाचा काळ लागू शकतो. महापालिकेवर शहरात शौचालये उभारण्याचे दायित्व आहे. आजपर्यंत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शौचालयांसाठी वेगळे गुण देण्यात येतात. मनपाने व्यापक प्रमाणात शौचालये उभारली नाहीत. त्यामुळे दरवर्षी मनपाला कमी गुण मिळत आहेत. शौचालयांसाठीची मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये नागरिकांसाठीही खुली करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. इंदूर महापालिकेने शहरातील प्रत्येक रस्त्यावर शौचालयाची व्यवस्था केली आहे. औरंगाबाद महापालिकेने कचरा प्रश्नात इंदूर पॅटर्नचा अवलंब केला आहे. शौचालयेही त्याच धर्तीवर उभारण्यात येणार आहेत. महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने खाजगी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. |
मुंबई । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (२७ मे) इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट्समुळे या चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून लढावे यासाठी शिवसेनेकडून एक सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. "हीच वेळ आहे, हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय", असा मजकूर लिहीत वरुण सरदेसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांना मिठी मारत असल्याचा एक फोटो शेअर केला. वरुण सरदेसाई यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, पक्षाकडून किंवा आदित्य ठाकरेंकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आदित्य ठाकरे यांनी यंदा विधानसभा लढवावी, अशी इच्छा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नव्या पिढीसाठी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी ही विधानसभा निवडणूक लढविणे गरजेचे असल्याचे युवासेनेचे मत आहे. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
डाल्टन, जॉन -(१७६६-१८४४)- हा इंग्रज पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रज्ञ कंवरलंडमध्यें ईगल्स फॉल्ड येथें तारीख ६ सप्टेंबर १७६६ रोजीं जन्मला. याचा बाप जोसेफ डाल्टन हा गरीब कोष्टी होता. याच्या आईचें नांव डेबोरा ग्रीनप असें होतें. याला जोनाथन व मेरी या नांवांची दोन भावंडे होतीं. जॉन याचें प्राथमिक शिक्षण त्याच्या बापाजवळ व जॉन फ्लूचर नांवाच्या तेथील शाळा मास्तराजवळ झालें. १७७८ सालीं फ्लेचरनें नोकरी सोडल्यानंतर डाल्टन यानें तेथेंच शाळा काढली. या प्रयत्नांत त्यास यश आलें नाही म्हणून दोन वर्षानंतर तो शेती करूं लागला. तो राबिन्स नांवाच्या आपल्या नातेवाईकाजवळ गणित शिकला होता. तेथून तो १७८१ सालीं केंडाल येथें एका शाळेंत पुन्हां नोकरी करण्यास गेला. १७८५ सालीं तो व त्याचा भाऊ जोनाथन तेथील शाळेचे व्यवस्थापक झाले. डाल्टनला कायदा व आयुर्वेद शिकण्याची इच्छा झाली परंतु त्याला कोणी पाठिंबा देईना पुढें १७९३ सालीं तो मँचेस्टर येथे गेला व तेथें मरेपर्यंत राहिला. जानगौफ नांवाच्या एका आंधळ्या तत्त्ववेत्त्याजवळ तो शास्त्र शिकला व पुढें गणित व पदार्थविज्ञानशास्त्रांचा तेथील अध्यापक झाला. स. १७९३त त्यानें "विद्युत् उल्कार्दीचें निरीक्षण व इतर निबंध" नांवाचें पुस्तक लिहिलें या पुस्तकाची फारशी चर्चा झाली नाही. १८०१ सालीं इंग्रजी व्याकरणाची मूलतत्त्वें नांवाचें पुस्तक प्रसिध्द केलें. १७९४ सालीं मँचेस्टर येथील साहित्य व तात्त्विक संस्थेचा तो सभासद निवडला गेला व त्यानें "रंगाविषयीं विलक्षण माहिती" नांवाचा लेख लिहिला. यांत डाल्टोनिझम किंवा रंगांधत्व याचा उहापोह केलेला होता. निळा व जांभळा यांखेरीज तिसरा रंग पिंवळा हा होय व हिरवा, नारिंगी वगैरे पिंवळ्याचेच प्रकार आहेत असें त्यांत सुचविलें होतें याशिवाय पाऊस, दंव, झर्याचा उगम, उष्णता, आकाशाचा रंग, वाफ, प्रकाशपरावर्तन व वक्रीभवन, सहाय्यक क्रियापदें व धातुसाधित अव्ययें इत्यादि विषयांवर त्यानें लेख लिहिले. सन १८०० त तो त्या संस्थेचा चिटणीस झाल्यावर त्यानें मिश्रवायूची घटना, निर्यात प्रदेशांत व हवेंत पाण्याच्या व इतर द्रव्यांच्या वाफेचा जोर; बाष्पीभवन व उष्णतेनें वायूचें प्रसरण इत्यादि लेख लिहिले. या वेळेसच त्यानें वायूप्रसरणाचा नियम ठरविला व पुढे तो नियम गेलुसाक यानें प्रसिध्दीस आणला. पुढें एक दोन वर्षांत पाणी व इतर द्रव यांजकडून वायूचें शोषण व आंशिक भाराचा नियम यांवर लेख लिहिले.\nयाचे विशेष महत्वाचे शोध 'अणुवाद' या विषयावर होत. वातावरण व इतर वायू यांच्या भौतिक गुणधर्मांवरूनच त्याला ही कल्पना सुचली असें त्याच्या हस्तलिखित लेखावरून दिसतें. वायूचें शोषण या लेखांत तो म्हणतोः "पाणी सर्व वायूंस सारखेंच कां शोषून घेत नाही ? मला वाटतें कीं वायूंच्या परमाणूंच्या वजनावर व संख्येवर ही गोष्ट अवलंबून असावी" यानंतर त्यानें अणुभारांकांचें कोष्टक दिलें आहे. डाल्टन यानें आपली "अणुकल्पना" डॉ. थामसन यास कळविली व त्यानें ती आपल्या "रसायनशास्त्रपध्दति" नांवाच्या पुस्तकांत १८०७ सालीं प्रसिध्द केली. डाल्टन यानें याविषयीं आणखी माहिती "रसायनशास्त्रीयतत्त्वज्ञानाची नवी पध्दती" या पुस्तकांत १८०८ सालीं प्रसिध्द केली.\nमँचेस्टरच्या संस्थेचा स. १८१७ पासून अंतकालपर्यंत म्हणजे स. १८४४ तो अध्यक्ष होता. तेथें त्यानें एकंदर ११६ निबंध लिहिले. १८१४ सालींतील एका निबंधांत आकारमानपृथकरणासंबंधीं उल्लेख आहे. १८४० साली त्यानें स्फुरितें व तालितें यांवर निबंध लिहिला परंतु तो राजसंस्थेनें प्रसिध्द करण्याचें नाकारलें. म्हणून तो लेख त्यानें स्वतःच प्रसिध्द केला. असेच त्यानें आणखी ४ लेख प्रसिध्द केले. एक क्षरांत अम्ल, अनाम्ल व क्षर याचें प्रमाण" व दुसरा "शर्करापृथकरणाची नवी व सोपी रीत" हे दोन होते. या दोन लेखांत त्याचा महत्त्वाचा शोध होता तो हा कीं जेव्हां कांहीं क्षर पाण्यांत विरघळतात तेव्हां पाण्याचें आकारमान वाढत नाहीं. यावरून क्षराचे परमाणू पाण्याच्या अणूंमधील छिद्रांत शिरत असले पाहिजेत.\nप्रयोग करण्याकरितां याला सुबक व बिनचुक यंत्रे लागत नसत. त्याचें काम कालचलाऊ यंत्रावर भागत असे. प्रयोगापेक्षां त्याची आपल्या अकलेवरच फार भिस्त असे. दुसर्याच्या प्रयोगांवर व प्रयोगनिर्णयावर त्याचा फारसा विश्वास नसे. गेलुसाकच्या "वायूंचें आकारमानाच्या प्रमाणांत मिळणें" या निर्णयावर त्याचा भरंवसा नव्हता. डेव्हीनें हरवायूच्या गुणधर्मांविषयीं पुरी चिकित्सा केल्यानंतर देखील याच्या त्या वायूविषयी कांहीं विचित्र कल्पना होत्या. इतर रसायनशास्त्रज्ञांनीं अणुभारांकांचीं कोष्टके तपासून नवी तयार केल्यानंतरहि हा आपलेच कोष्टक वापरीत असे. बर्झेलियसची रासायनिक पदार्थाची नामावली सोपी व सोईस्कर ठरलेली असूनहि हा आपलीच चक्राकार चिन्हांची नामावली वापरीत असे. त्याचें पुस्तकालय खांकोटीस मारण्याइतकें लहान होतें. परंतु त्यांतलीं अर्धी पुस्तकेंहि त्यानें वाचलेलीं नव्हती. तो मँचेस्टर येथें १८४४ सालीं अर्धांगवायूनें मेला. १८३३ सालीं लोकांनी वर्गणी गोळा करून ठेवली होती तींतून त्याचा अर्धा पुतळा करवून मँचेस्टर येथील राजसंस्थेच्या समोरच्या दिवाणखान्यांत उभा केला. |
पळवे : पिंपळनेर (ता. पारनेर) येथे संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात झाला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून तालुक्यातील काही बांधव उपस्थित होते. पूजा करुन भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पठारवाडी व पिंपळनेर भजनी मंडळाने भजन सेवा केली. त्याबद्दल भजनी मंडळींचे पारनेर तालुका नाभिक ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पारनेर तालुकाध्यक्ष दादाभाऊ बिडे, माजी अध्यक्ष बबनराव आतकर, कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शामकांत जाधव, उपाध्यक्ष शाम साळुंके, सलून असोसिएशन कार्याध्यक्ष दीपक शिंदे, बाराबलुतेदार अध्यक्ष मनोहर राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कानिफनाथ गायकवाड, विठ्ठल सोनवणे, दत्ता सोनवणे, धनंजय सोनवणे, राम शिंदे, राहुल खंडागळे, नानासाहेब पावडे, विनायक कोरडे, संजय वाघचौरे, माऊली कोरडे, तुकाराम क्षीरसागर, राजू क्षीरसागर, बाळासाहेब भुजबळ, नारायण खंडागळे, दत्तात्रय जाधव आदी बांधव उपस्थित होते. १२ वाजता जन्म सोहळ्यानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. |
'गोलंदाजांनी नियमानुसारच गोलंदाजी करावी. अन्यथा गोलंदाजांनी आपल्या शैलीतच बदल करावे,' असा सल्ला श्रीलंकेचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने दिला आहे. शारजाः 'गोलंदाजांनी नियमानुसारच गोलंदाजी करावी. अन्यथा गोलंदाजांनी आपल्या शैलीतच बदल करावे,' असा सल्ला श्रीलंकेचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) गोलंदाजांच्या शैलीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्यामुळे मैदानावरील पंचांकडून गोलंदाजांच्या शैलीबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवायला सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुरलीधरनने आपले मत व्यक्त केले. आयसीसीने श्रीलंकेच्या सचित्र सेनानायके, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि पाकिस्तानचा सईद अजमल यांच्यावर नुकतीच बंदी घातली. गेल्याच महिन्यात झिम्बाब्वेचा प्रोस्पेर उत्सेया, बांगलादेशचे सोहाग गाझी, अल-अमिन हुसेन यांच्या गोलंदाजीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. नुकत्याच आटोपलेल्या चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेटमध्ये याचा प्रत्यय आला. सूर्यकुमार यादव, सुनील नारायण, प्रेनेलन सुब्रयेन, अदनान रसूल, महम्मद हफीझ या चॅम्पियन्स लीगमधील गोलंदाजांच्या गोलंदाजीबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेष करून फिरकी गोलंदाजांच्या शैलीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे या गोलंदाजांचे 'दुसरा' हे प्रमुख 'शस्त्र'च अडचणीत सापडले आहे. याबाबत मुरलीधरन म्हणाला, 'पूर्वी १५ अंशाचा नियम तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच गोलंदाजांनी गोलंदाजी करायला हवी. आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर गोलंदाजांची शैलीही तपासली जाते. यात थोडा फार फरक जाणवला, तर त्यावर काम होणे अपेक्षित आहे. आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर अधिक मेहनत घेऊन गोलंदाजांना ही शैली सुधारता येते. मात्र, मैदानावरील पंच त्या गोलंदाजांबाबत आक्षेप घेत असतात. त्यामुळे इतरांना त्या गोलंदाजाच्या शैलीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. ' मुरलीधरन पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी 'स्पिन कन्सल्टंट' म्हणून काम पाहत आहे. |
संत विविध सद्गुणांचे जे वर्णन करतात, त्यात मार्दवाचंही अनेकदा येतं पण आपलं त्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं. ज्ञानी पुरुषाचं व्यक्तिमत्त्व ज्या ज्या गुणवैशिष्टय़ांनी जडत-घडत असतं, त्यात मार्दवाचं महत्त्व विशेष आहे. संत विविध सद्गुणांचे जे वर्णन करतात, त्यात मार्दवाचंही अनेकदा येतं पण आपलं त्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं. ज्ञानी पुरुषाचं व्यक्तिमत्त्व ज्या ज्या गुणवैशिष्टय़ांनी जडत-घडत असतं, त्यात मार्दवाचं महत्त्व विशेष आहे. सर्व धर्माच्या प्रवर्तकांमध्ये, सत्पुरुषांमध्ये, संतमहंतांमध्ये हे गुण वैशिष्टय़ आढळतं. या संदर्भात येशू ख्रिस्ताचं उदाहरण विख्यात आहे. इतरांविषयीच्या जिव्हाळ्यापोटी, स्नेहापोटी, आत्मीयतेपोटीच मार्दव जन्म घेत असतं. मार्दवातून मायावी व्यक्त होते. त्यामुळे आपलं अस्तित्व दुस-याला बाधक नि तापदायक न ठरता हवंहवंसं वाटू लागतं. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी बोलण्यातील मार्दवाचीही महती वर्णिली आहे. 'माहात्मेनि प्रियावक्तेआ होआवे' असं त्यांचं एक वचन आहे. साधकानं प्रियभाषी असावं, आपल्या भाषणानं, बोलण्यानं दुस-याचं मन दुखावणार नाही, याची त्यानं काळजी घ्यायला हवी. दैनंदिन जीवनात आपण एवढी काळजी घेतली तरी समाजातलं सहजीवन किती सुखाचं होईल! समाजातलाच काय पण कुटुंबातला प्रत्येक जण दुस-याच्या भावनांचा विचार करून बोलू लागला तर त्या समाजाचं नि त्या घराचं रूप किती पालटेल! मतमतांतरं किंवा विरोध असणारच नाहीत, असं नाही. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' अशी म्हणच आहे; पण मार्दवाचे रेशमी बंध घातले, तर जीवनातले कितीतरी संघर्ष मुळातच नष्ट होतील किंवा त्यांच्यामधल्या तीव्रतेची धार, विरोधाचा विखार तरी कमी होईल. मग हे मार्दवयुक्त जीवन जगताना सर्वाना कसं वाटेल, याचं मोठं रम्य चित्र ज्ञानदेवांनी एके ठिकाणी रेखाटलं आहे. पक्ष्यांना अंतराळ हे कसं मोकळं-मोकळं वाटतं! मातेचं वात्सल्य बालकाला कसं हवंहवंसं वाटतं! वसंतातल्या वायुलहरी आपल्याला प्रमुदित करतात. आता जैसे कां मौवाळ। जळचरांसि जळ। कां पक्ष्यांसि अंतराळ। मोकळें हें। । नातरि बालका दोसें। मातेचें स्नेह जैसे। कां वसंतिचा स्पर्शे। मारुतु मौ। । डोळेयां प्रियाचिये भेटी। पीलेयां कूर्माची दीठी। तैसें भूतमात्रीं राहाटी। मौवाळ तें। । ('ज्ञानेश्वरी', राजवाडे प्रत १६-६७-६९) तसंच मार्दव जीवनांचे रंगरूप पालटून टाकतं. प्रत्येकाच्या वागण्या, बोलण्यातून, इतकंच नव्हे तर दृष्टीतूनही हे मार्दव प्रकटलं तर हे जीवन किती सुसह्य, किती रमणी नि आल्हाददायक होईल, नाही? मग शेजारी-शेजारी वेगवेगळ्या गावांचे, वेगवेगळ्या देशांचे, हा कन्नडभाषक हा मराठी भाषक, हा हिंदू, हा मुसलमान, हा जैन, हा बौद्ध, हा ख्रिस्ती असा भेदाभेद तरी राहील का? मार्दवाच्या स्नेहबंधांनी आपण सारे बांधले गेलो तर घराघरातले, राष्ट्राराष्ट्रातले नि जगातले कितीतरी प्रश्न सहज सुटतील, असं नाही का तुम्हाला वाटत? केशवस्वामी भागानगरकर यांची समाधी हैदराबादेच्या परिसरात आहे. ते अत्यंत लोकप्रिय संतकवी असून त्यांची पदरचना लक्षणीय आहे. मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही त्यांनी लेखन केलं. आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेनं त्यांचं हे महत्त्वपूर्ण लेखन संग्रहित केलं आहे. त्यांची बहुतेक पदरचना उपदेशपर आहे. या उपदेशपर रचनेत पाखंडी लोकांवर टीकाही केली आहे. इथं 'पाखंडी' या शब्दाचा अर्थ धर्मावर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे एवढाच नाही तर 'धर्माचा खरा अर्थ लक्षात न घेता आपण धार्मिक आहोत, असा आभास निर्माण करणारे', 'धर्माचा स्वार्थासाठी उपयोग करणारे' असाही आहे. त्यांची वृत्ती निर्मळ नसते. त्यांना मनापासून साधना किंवा भक्ती करायची नसते, पण आपण मोठे भाविक आहोत, असं लोकांना भासवायचं मात्र असतं. त्यामुळं समाजात जे जे लाभ मिळतील तेही त्यांना हवे असतात. असे लोक केवळ समाजालाच फसवीत नाहीत तर स्वतःलाही फसवतात. अशांचा उद्धार कसा होणार? केशवस्वामींचं याविषयीचं हिंदी पद असं आहे : झूटा तेर जप। भात-रोटी गप। अतित सु रहे छप। तीन काल लेवे झडप। । मुसु लेवे नाम। अंदर भरे काम। ऐसा बेका (फा) म। तुज केंव मिलेगा राम? तन लाते खाक। मन में नापाक। ऐसें कै लाख - हम देखे सौ लाख। । बंदगी करता। नहिं समजे बदख्त। अंदर किया सख्त। केंव चढेगा तख्त? यख्त्यार नहिं दिल। बहुत बंदगी में ढिल। ऐसा गाफिल किया। साहेब के दिल। । कहे केशवराज। सुन मेरा आवाज। सब को सिरताज। भजो गरीबनवाज। । केशवस्वामी म्हणतात, आपण जप करीत आहोत म्हणून फार मोठे साधक आहोत, असं तू कितीही भासविलंस तरी त्याचा काय उपयोग? जपाचं खरं उद्दिष्ट नामस्मरण आणि चिंतन हे आहे. ते तर तुला प्राप्त करताच येणार नाही, कारण तुझं लक्ष आहे त्यानंतर मिळणा-या भोजनाकडे. तू मोठा जपी आहेस, असं वाटल्यामुळं लोक तुझा आदर करतील नि तुला भोजन देतील खरं, पण तुझ्या या दांभिकपणामुळं काळच तुला खाऊन टाकील त्याचं काय? त्या वेळी आपलं जीवन आपण व्यर्थ घालविलं, याचा तुला पश्चात्ताप झाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण त्या वेळी फार उशीर झालेला असेल! 'मरणाचे स्मरण असावे' असं समर्थ रामदास म्हणतात ते यासाठीच! पुढं केशवस्वामी म्हणतात, तू आपल्या मुखानं वरकरणी परमेश्वराच्या नामाचा जप करीत असलास तरी तुझं मन कशाचा जप करतंय? ते तर कामवासनेचा करीत बसलंय! तुझ्यासारख्या माणसाला रामाची प्राप्ती मात्र कधीच होणार नाही. मग तुझ्या या आयुष्याचा काय उपयोग? तू अंगाला राख फासलेली आहेस. आपण फार विरक्त व संन्यस्त वृत्तीचे आहोत, असा भास तर तू निर्माण केलास खरा. असे खोटे, दांभिक भक्त तर मी असंख्य पाहिले आहेत. खरा भक्त निष्ठेनं, श्रद्धेनं, सर्व विकार दूर सारून ईशभक्ती करतो. जोवर तू विकार टाळण्यासाठी मन खंबीर करणार नाहीस तोवर तू 'बंदगी' (भक्ती) कशी करणार? आत्मज्ञानाच्या सिंहासनावर आरूढ कसा होणार? असं बेसावध राहून चालेल का? आता तरी माझा हा उपदेश ऐक नि पतितांचा उद्धार करणा-या परमेश्वराची निष्ठेनं भक्ती कर म्हणजे तुझं आयुष्य सार्थकी लागेल. या पदात केशवस्वामींनी पाखंडी लोकांवर प्रखर टीका केली असली, तरी त्यांना उद्धाराचा मार्गही दाखविला आहे. यातून अशा लोकांचं अनुसरण करू नये, अशी गर्भित सूचनाही जनसामान्यांना दिली आहे. त्यांना नितळ भक्तीची वाट दाखविली आहे. |
शेतात असताना अचानक समोर आला बिबट्या,हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू ! अहमदनगर ब्रेकिंग : उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने ११ वर्षांच्या चिमुकलीस जाळले ! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम काकाला झाली ही शिक्षा ! अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक ! |
अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी या प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अॅप कार्यालयावर छापे टाकले होते. यावेळी पोलिसांनी कार्यालयातील अनेक स्क्रिप्ट जप्त केल्या. पोलिसांना ज्या स्क्रिप्ट मिळाल्या आहेत त्याच्या आधारावर अश्लील चित्रपटांचे चित्रिकरण केलं जाणार होतं, अशीही माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिप्टची लिपी हिदींमध्ये आहे. जवळपास सर्वच स्क्रिप्ट हिंदीत होत्या. त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर पुन्हा पॉर्न चित्रपट बनवण्याची तयारी केली जात होती. पण राज कुंद्राला बेड्या ठोकल्यानंतर सर्व स्क्रिप्ट ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट नेमकं कसं चालायचं, याबाबतची माहिती राज कुंद्राच्या कार्यालयात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. |
You are here: Home » बातम्या » मॅचचा फिव्हर आमदारांवरही, विधिमंडळाच्या कामकाजानंतर वानखेडेवर हजेरी ? मॅचचा फिव्हर आमदारांवरही, विधिमंडळाच्या कामकाजानंतर वानखेडेवर हजेरी ? March 31, 2016 12:35 PM0 commentsViews: 31 मार्च : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. मॅचचं औचित्य साधत विधिमंडळातील सर्व सदस्य मॅच पाहण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच कामकाज संपल्यांनंतर सर्व आमदार मॅचचा आनंद घेण्यासाठी वानखेडे स्टेडियम गाठणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आज भारत मॅच जिंकणारच असा विश्वास गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. |
किम फोटो शेअर करताना म्हणते की, रात्रीच्या वेळी स्विमिंग इन्जॉय करते आहे. नाइट स्विम'. (Photo Credit- @kimkardashian/Instagram) किमचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. इतकचं नाही तर सेलिब्रिटीजदेखील तिच्या या फोटोंवर कमेंट करीत आहेत व तिचं कौतुक करत आहेत (Photo Credit- @kimkardashian/Instagram) किम नेहमीचे तिच्या बोल्ड फोटोंसाठी चर्चेत असते. अनेक ठिकाणी ती तिची फिट बॉडी फ्लॉंट करताना दिसते. (Photo Credit- @kimkardashian/Instagram) |
पुणे : शहातील नायडू रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांचे केंद्रबिंदू आहे. आजघडीला या रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, याच रुग्णालयातील एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. परंतु, सुराक्षकांजवळ पीपीई किट नसल्यामुळे त्याला थांबवण्यास कुणीही पुढे येईना. प्रशासनाचीही धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कोरोनाची बाधा झालेले काही रुग्ण अनेक दिवस एकाच खोलीत राहिल्याने कंटाळले आहेत. त्यामुळे काहीही करून बाहेर पडायचे असाही काही रुग्णांचा प्रयत्न असतो. पुणे महापालिकेच्या संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या नायडू रुग्णालयात गुरुवारी असाच प्रकार घडला. एक वृद्ध रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाला. रुग्णालय प्रशासनाने त्याची खूप समजूत काढली. पण तो कुणाचे काही ऐकायला तयार नव्हता. सोबत आणलेल्या पिशवीसह तो रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. सुरक्षारक्षकांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ. पीपीई किट घातले नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्याच्या जवळही जाता येईना. हा रुग्ण प्रवेशद्वारातून जेव्हा बाहेर जाण्यास निघाला. तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने लांब बांबूच्या सहाय्याने त्याला ढकलत खाली पाडले. त्यानंतर काही वेळाने पीपीई किट घालून आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याला हाताला धरून वॉर्डमध्ये नेले. आणि इतरांनी सुटकेचा निश्वास टाकला. रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. या आजारावर कोणत्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. परिणाणी या आजाराविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येतो, अशा व्यक्तींचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. किमान 14 दिवस एकाच खोलीत उपचार घ्यावे लागत असल्याने एकटेपणाचीही काहींना भीती वाटते. त्यामुळे अशा रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे. |
पुणे । संत तुकोबांची पालखी आज (१२ जून) दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान करणार आहे. राज्यातील कोरोनास्थितीमुळे पहिल्यांदाच या पालखी सोहळ्यात अगदी मोजक्याच वारकऱ्यांचा सहभाग असणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ ५० जणांना या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. दरवर्षी तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानावेळी इंद्रायणीचा काठ माउलींच्या सहवासाने गजबजलेला असतो. मात्र, यंदा इंद्रायणीचा काठही निर्मनुष्य पाहायला मिळाला आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याला कोरोनामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच अगदी सध्या पद्धतीने हा सोहळा करावा लागणार आहे. आपली सगळी सुख-दुःख विसरून पंढरीच्या वारीत पालखी सोहळ्याच्या निमित्ताने माउली विठुरायाच्या नामात दंग होतात. यंदा मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या पालखी सोहळ्यावर अनेक निर्बंध असल्याने माउलींना प्रत्यक्ष या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०. ४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र यंदा जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. सध्या १०. ४५ इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे, तर सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर म्हणजेच एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळू शकते. मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईकरांसाठी वर्षभर १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणांमध्ये १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे. |
27 Advocates In Amravati Municipal Corporation For Avoiding Opposition । विरोध टाळण्यासाठी मनपात २७ वकिलांची फळी - Divya Marathi\n27 Advocates In Amravati Municipal Corporation For Avoiding Opposition\nविरोध टाळण्यासाठी मनपात २७ वकिलांची फळी\nअमरावती - महापालिकेच्या पॅनलवर एक-दोन नव्हे, तर २७ विधिज्ञांची निवड झाल्यामुळे आता पालिकेशी संबंधित खटल्यांच्या सोडवणुकीला विलंब होणार नाही, अशी खात्री निर्माण झाली आहे. चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनपा प्रशासनात वेगवान बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुंबलेल्या खटल्यांची संख्या कमी करून ती निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विधी अधिकाऱ्याच्या नेमणुकीशिवाय पॅनलमधील वकिलांची संख्या वाढवण्याला जुने वकील बदलण्यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. मनपाने अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयान्वये पॅनलवरील जुन्या वकिलांची सेवा मोडीत काढून त्याऐवजी नव्या दमाच्या वकिलांची फळी निर्माण केली आहे. दोन टप्प्यांत तयार करण्यात आलेल्या या चमूत २७ विधिज्ञ आहेत. पहिल्या टप्प्यात ही संख्या दहा होती. त्यानंतर एकाच वेळी १७ नवीन विधिज्ञ नेमल्या गेलेत. त्यामुळे एकूण संख्या २७ वर पोहोचली आहे.\nवकिलांची एवढी मोठी फळी तयार झाल्यामुळे मनपाच्या विरोधात खटले दाखल करणाऱ्यांवर अंकुश लागला असून, छोट्या-मोठ्या अडचणींसाठी मनपाला न्यायालयात आव्हान देणाऱ्यांची संख्याही भविष्यात घटणार आहे. शिवाय नव्याने दाखल होणारे खटले प्रलंबित प्रकरणे यांचा निकाल लागण्यासही मदत होणार आहे.\nमनपाने कमी केली विरोधकांची संख्या : मनपाच्यापॅनलवर २७ वकिलांची नेमणूक करून मनपाने विरोधक कमी करण्याचा उद्देशही पूर्ण केला आहे. कारण ज्या वकिलांना पॅनलवर नेमले गेले, त्यांना मनपाच्या विरोधातील खटला घेता येत नाही. त्या अर्थाने आपले विरोधकच कमी केले आहेत.\n६० उमेदवार होते रिंगणात\nपॅनलवरील वकिलांची संख्या वाढवण्याशिवाय मनपाने अलीकडेच विधी अधिकाऱ्याचीही नियुक्तीही केली. परीक्षा मुलाखत अशा दोन टप्प्यांत ही संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण केली गेली. त्यासाठी सुमारे ६० उमेदवार रिंगणात होते. |
चाफळ - विभागात गत आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरी भागात पिकांची उगवण चांगली झाल्याने विभागातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बळीराजा कोळपणीच्या कामात व्यस्त आहे. यावर्षी विभागात वळीव पाऊस चांगला झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. तरीही तळभागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे तळभागातील पेरण्याही रखडल्या होत्या. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने पेरणी करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत विभागात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरी भागात हायब्रीड, पसऱ्या भूईमुग, निमपसऱ्या, वेस्टर्न, ट्रॉंबे आदी भुईमुगाच्या जाती, भात या मुख्य पिकाबरोबरच विविध प्रकारची कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. या सर्वच पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्याने येथील शेतकरी समाधानी आहेत. चाफळसह इतर तळभागात सोयाबीन पेरण्याचे प्रमाण जास्त आहे. विभागात गणेवाडी, कोळेकरवाडी, भैरेवाडी, महाबळवाडी, गुजरवाडी, सर्व सडे, कोचरेवाडी, विरेवाडी, चव्हाणवाडी, मस्करवाडी व जंगलवाडीतील काही शेतकरी दुर्मिळ होत चाललेली नाचणी व वरीचे पिकही घेत आहेत. नाचणीच्या तरव्याचींही उगवण चांगली झाली आहे. पाडळोशी, धायटी व दाढोली परिसरात लागणीचे भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथेही भाताचे तरवे चांगल्या प्रकारे उगवून आले आहेत. |
पेण : काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा पारा वाढला आहे. दोन दिवसांपासून तर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पेण तालुक्यातील भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. राज्यात तीन वर्षांपासून सतत मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, वादळ वाऱ्यासह पाऊस, कोरोना संसर्ग या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा पूर्णता होरपळून गेला आहे. या वर्षी मात्र सर्व गोष्टींना बाजूला सारून तालुक्यातील शेतकरी नव्या उमेदीने शेती कामात लागले आहेत. हवामान खात्याने राज्यात लवकरच पाऊस असल्याचे सांगितल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत. शेतीसाठी लागणारा रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडले आहे. शेती साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांसह शेतात काम करणाऱ्या मजुरांचेही दर वाढले आहे. मात्र, भाताच्या उत्पादनात हमीभाव मिळत आहे. अलिबाग : खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने विविध कंपन्यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक आणि नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशील (जसे पीक, बाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी) नमूद करावे. रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सील बंद, मोहर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जात आहे. या वर्गाला मुले, मुली व पालक उत्तम प्रतिसाद देत असून दररोज अभ्यास घेतला जात आहे. या वर्गाला शिक्षिका स्वाती चक्रदेव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सुरेश गोखले, नितीन बामगुडे, प्रतिभा पोळेकर, रोहिदास घरत, नगरसेविका नंदिनी बामगुडे, नेहा केकाणे, दिलीप मोने,राहुल तळकर, उत्तम पाटील, जंगम काका यांचे सहकार्य लाभले आहे. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थी-पालकांना संस्कृत भाषेचे अध्ययन करायला मिळत असल्याने त्यांनी केंद्राचे आभार मानले आहे. खोपोली : खोपोलीतील पूज्य गगनगिरी मठातील गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलश स्थापित करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नाणीज धर्मपिठाचे पीठाधीश आचार्य नरेंद्र महाराज यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातून संत महात्म्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संत महात्म्यांची मांदियाळी शुक्रवारी असणार आहे. गगनगिरी मठ व्यवस्थापन समिती आणि समितीचे प्रमुख आशीष महाराज यांच्या नेतृत्वाखाली गगनगिरी महाराज भक्त गण यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता शाही मंगलस्नान, काकड आरती, धार्मिक पूजा अर्चा होणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवर संतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलशाची स्थापना होणार आहे. |
मुंबई, 19 नोव्हेंबर : हल्ली लोक आपल्या वाढत्या वजन आणि वाढत्या पोटाच्या घराकडे खूप लक्ष देतात. पोटाचा वाढत घेर कुणालाच आवडत नाही. म्हणून तो कमी करण्यासाठी लोक सगळे शक्य ते सर्व प्रयत्न करतात. मात्र काही लोकांना जास्त व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला एका योगासनाबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही जेवण केल्यानंतर अगदी सहज करू शकता. हे आसन करणं इतकं सोपं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते आरामात करू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत असेल किंवा चालण्यात अडचण येत असेल तर योगासने तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा. यामुळे तुम्ही फिट राहाल आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया हे आसन कोणतं आहे? ते कसं करायचं? आणि त्याचे फायदे. दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटे तुम्ही वज्रासन करू शकता. यामुळे पचनसंस्था मजबूत होते, रक्ताभिसरण सुधारते. अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांसाठी वज्रासन खूप फायदेशीर आहे. यामुळे पायांच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडेल आणि रक्ताभिसरण चांगले होईल. हे नियमितपणे केल्यास शरीराला आकार येतो, तुमची झोपेची पद्धतही सुधारते. सर्व वयोगटातील लोक हे आसन सहज करू शकतात. लहान मुलांनाही वज्रासन करण्याची सवय लागल्यास चांगले, ज्यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली होते. - वज्रासन नाडी उत्तेजित करते, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. - हे सायटिका, मज्जातंतूशी संबंधित समस्या आणि अपचनापासून मुक्त होण्यास मदत करते. - हे पेल्विक क्षेत्र आणि ओटीपोटात रक्त प्रवाह सुधारते, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाल होण्यास मदत होते. - त्यामुळे शरीरातील पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत होते. - लिव्हरच्या कार्यातही मदत होते. - पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे. - सर्व प्रथम गुडघ्यावर बसा. - पाठीचा कणा सरळ ठेवा. - पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि बोटे जमिनीकडे आणि टाच छताकडे असाव्यात. - तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि ही मुद्रा स्थिर ठेवा. - या आसनात काही मिनिटे बसा. हे एकमेव आसन आहे जे पोट भरल्यानंतरही करता येते. हे मांड्या, पाय, पृष्ठभाग, गुडघे, कंबर, घोट्याच्या समस्यांमध्ये आराम देते. पायात किंवा गुडघ्यात दुखापत किंवा दुखत असल्यास हे आसन करणे टाळावे. हे आसन करणे खूप सोपे आहे, ते दुपारी जेवणानंतर किंवा तुमच्या सोयीनुसार काही मिनिटे करता येते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. 2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. 3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. 4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा. आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 देव उंच ढगांतून बोलला. आणि देवाने त्यांना नियम दिले. 8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस. 9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. 1 The Lord reigns,(A) let the nations tremble;(B) he sits enthroned(C) between the cherubim,(D) let the earth shake. 2 Great is the Lord(E) in Zion;(F) he is exalted(G) over all the nations. he is holy.(J) you have established equity;(M) what is just and right.(N) and worship at his footstool; he is holy. 6 Moses(P) and Aaron(Q) were among his priests, Samuel(R) was among those who called on his name; and he answered(S) them. 7 He spoke to them from the pillar of cloud;(T) they kept his statutes and the decrees he gave them. Holy Bible, New International Version®, NIV® Copyright ©1973, 1978, 1984, 2011 by Biblica, Inc.® Used by permission. All rights reserved worldwide. NIV Reverse Interlinear Bible: English to Hebrew and English to Greek. Copyright © 2019 by Zondervan. |
मुंबई : सध्या सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन धन खाते योजनेंतर्गत खाती उघडली होती. पीएम जन धन योजनेअंतर्गत, सरकार खात्यात रोख रक्कम नसली तरीही १० हजार रुपये काढण्याची सुविधा देते. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही १० हजार रुपयांपर्यंतची रोकड काढू शकता. तुम्ही हे खाते कसे उघडू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएम जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्याचे यश पाहून, सरकारने २०१८ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती अधिक वैशिष्ट्यांसह लॉन्च केली. प्रधानमंत्री जन धन योजनेसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे असली पाहिजेत. तुमच्याकडे कागदपत्रे नसल्यास, तुम्ही छोटे खाते उघडू शकता. यामध्ये बँक अधिकाऱ्यासमोर स्वतःचे साक्षांकित छायाचित्र व स्वाक्षरी द्यावी लागेल. जन धन खाते उघडण्यासाठी पैशांची गरज नाही. जन धन खाते असे उघडा : जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल. येथे तुम्हाला PMJDY खाते उघडण्यासाठी एक फॉर्म मिळेल. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, बँकेच्या शाखेचे नाव, नॉमिनी, व्यवसाय किंवा नोकरी इत्यादी भरा. फॉर्म भरल्यानंतर, सर्व महत्वाची कागदपत्रे संलग्न करा आणि बँकेत जमा करा. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर जन धन खाते उघडले जाईल. जन धन खात्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत : तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी जन धन खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला एटीएम कार्ड, २ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, ३० हजार रुपयांचा जीवन विमा आणि ठेव रकमेवर व्याज मिळते. यामध्ये तुम्हाला १० हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाईल. तुम्ही ते कोणत्याही बँकेत उघडू शकता. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. जन धन खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा मिळते. यासोबतच मोफत मोबाईल बँकिंगचाही लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला जन धन खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची बँक शिल्लक देखील तपासू शकता. तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PMJDY खाते असल्यास तुम्ही 8004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. |
नांदेड - अशोक चव्हाणांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना प्रचारासाठीही भाडोत्री नेता आणावा लागला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. नांदेडच्या भोकरमधील सभेत ते बोलत होते. राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळवण्याचा डाव आखला असल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज ठाकरे माझ्यावर आरोप करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसे विसरता? असा प्रश्नदेखील मुख्यमंत्र्यांनी विचारला. शेतकऱ्यांची वाईट अवस्था आम्ही जाणतो म्हणूनच शेतकरी साठ वर्षांचा झाला की त्यालाही पेन्शन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गरीबी हटावचा नारा राहुल गांधी देत आहेत. इतक्या वर्षांनी ही घोषणा देताना त्यांना लाज कशी वाटत नाही? असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला. |
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात बंदी असलेला सॅटेलाईट फोन पोलंडच्या नगरीकाजवळ आढळून आल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. डॅमियन रोमन झेल्नसिकी(२६, रा.पोलंड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून दंडात्मक कारवाई केली. गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले की, डॅमियन हा स्वयंसेवी संस्थेच्या कामाासाठी पाचोड (ता. पैठण) येथे आला होता. काम संपवून तो गुरूवारी सकाळी स्पाईस जेटच्या विमानाने दिल्लीला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर आला. सीआयएसएफ च्या जवानांनी त्याची बॅग एक्स-रे मशिमनमधून तपासली तेव्हा त्यात संशयित वस्तू असल्याचे निदर्शनास आले. झडतीत बॅगमध्ये सॅटेलाईट फाेन आढळला. भारतात सॅटेलाईट फोन वापरण्यास प्रतिबंध आहे. ही माहिती विमानतळ प्रशासनाने पोलिसांना कळवली आणि डॅमियनला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास यांनी डॅमियनला ताब्यात घेतले आणि सॅटेलाईट फोन जप्त केला. तो भारतात कधी आला, औरंगाबादेत येण्याचे कारण काय, येथे किती दिवस थांबला, मुक्काम कुठे होता, सॅटेलाईट फोन त्याने कुठे खरेदी केला अदी प्रश्नांची सरबत्ती डॅमियनवर करण्यात आली. तेव्हा त्याने पाचोड येथील आशिष ग्रामरचना ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची कागपत्रे नेण्यासाठी १ तारखेला औरंगाबादेत आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरूध्द भारतीय बिनतारी तारा यंत्र अधिनियम १९३३ च्या कलम ६ आणि सहकलम भारतीय टेलिग्राफ अॅक्ट कलम २० नुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. डॅमियनने त्याच्या सॅटेलाईट फोनवरून काठमांडू येथे नातेवाईकांशी संपर्क साधला होता. तेथून तो दिल्ली मार्गे औरंगाबादेत आला. या विमान प्रवासात त्याचा फोन लगेज बॅगेत असल्याने तो स्कॅन मध्ये आला नसावा असे पोलिसांनी सांगितले. |
घरात वडीलधारी मंडळी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआप वळतील. वृषभ - (शुभ रंग- पिस्ता) व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. प्रतिष्ठेची काळजी घ्या. कष्टाने यश साध्य होईल. मिथुन -(शुभ रंग- हिरवा) व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील आशादायी दिवस. कर्क - (शुभ रंग- गुलाबी) कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे. सिंह- (शुभ रंग - लाल) नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल भाग्यवान महिला आज मौल्यवान खरेदी करतील. चालू नोकरीत बदल करायचा असेल तर संधी चालून येतील. कन्या- (शुभ रंग- मोतिया) आज प्रॉपर्टी विषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल, सांभाळा. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही. तुळ - (शुभरंग -स्ट्रॉबेरी) दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. वृश्चिक- (शुभ रंग- आकाशी) आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल शक्यतो टाळा. धनु -(शुभ रंग - भगवा ) अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. विरोधकही आज नमते घेतील. मकर - (शुभ रंग- जांभळा) कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट, विजा विषयक कामे यशस्वी होतील. कुंभ- (शुभ रंग- नारिंगी) सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. मीन - ( शुभ रंग - मरून) यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. |
आपल्या जुन्या सोळा वर्ष करडू परदेशी भाषेतील शाळा आणि शेवट मैत्री येथे ह्या पूर्णपणे सर्व समस्या मदत केल्याबद्दल येतो. आपण राजकारण, क्रीडा आणि नवीन टीव्ही मालिका बोलत तास खर्च करू शकता. आपण त्याला बोलू शकत नाही की काही आहे की विचार होईल. आणि हा, सत्य आपल्या मुलाला आपण भोगावी लागली तेव्हा तो समलिंगी आहे की एक वेळ येते पर्यंत. अशा ओळख पालक प्रतिक्रिया भिन्न असू शकतेः कोणीतरी, घेऊन जाऊ शकता पूर्णपणे सोपे, आणि काही घाबरून शकते राग, नैराश्य मध्ये आणि वर उडी. येथे आपण अशा एक दिवस आपल्या कुटुंबातील येईल की नाही, काय करण्याची आवश्यकता आहे. पुस्तके वाचा, इंटरनेट ाऊज, शाळा सल्लागार संपर्क करा. आपण कोणत्याही आपल्या मुलाला करू शकतील असे त्याच प्रकारे, उघडपणे सुरक्षित लिंग, विशेषतः एचआयव्ही, एड्स आणि इतर रोग बद्दल, लैंगिक संबंधातून पसरणारे रोग बद्दल मुलगा किंवा मुलगी बोला. आपण आणि आपल्या मुलाला एकटे नाही आहात, मदत नेहमी आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण नेहमी इंटरनेट वर संबंधित साइट भेट देऊ शकता. हे आपल्या मुलाला एक कठीण काळ असतो. ही बातमी तो एक अतिशय भावनिक क्षण आहे, आपल्या समज कठीण असू शकते तरी. मदत करण्यासाठी जास्त इच्छा करणार नाही प्रयत्न करा. आपल्या मुलाला माहित आपण नेहमी आहेत, परंतु सर्व समस्या उपाय नेतृत्व घेऊ नका करू. इतरांना सांगू नका. त्याच्या वैयक्तिक जीवन काळजी आणि गोपनीयता अधिकार घ्या. ज्यांना निर्णय सांगू आणि ते करू तेव्हा, संपूणपणे आपण आपल्या मुलाचे मालकीची आहे. त्याच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य याबद्दल जागरुक असणे, तसेच उदासीनता किंवा शारीरिक शोषण चिन्हे लक्ष द्या. आवश्यक असल्यास, व्यावसायिक मदत घ्यावी. आपण निश्चितपणे नेहमी आपल्या मुलाला समर्थन करण्यास तयार आहे, एक पालक समजत नाही असताना, आपल्या भावना या वेगळे असू शकते. अनेक पालक ते काही चूक केली आहे, पण बहुतांश घटनांमध्ये तो पटकन एक भावनिक राज्य आहे म्हणून तर वाटत. आपण जेव्हा तयार असाल, आपण तो मोठ्याने म्हणा. समलिंगी गर्व (समाजात LGBT लोक अस्तित्व एक प्रात्यक्षिक आहेत साठा) मध्ये भाग घेऊन मुले अशी व्यक्ती पालकांना स्थानिक संस्था सामील व्हा. homophobia बोलण्यास सुरुवात करा. प्रत्येकासाठी नागरी हक्क मागणी, स्थानिक महापालिका आणि राज्य संस्था पत्रे लिहा. तुम्ही समलिंगी समुदाय येतात आणि सक्रियपणे त्याच्या कार्यात सहभागी असल्यास, आपण तो जसा आहे तसे आपल्या मुलाला समर्थन, आणि तो आपण किती म्हणजे दाखवा. |
रावेर : सर्वांना संधी दिली जाते, मग मलाच का डावलले जाते ? असा प्रश्न उपस्थित करीत रावेर पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे या खासदार रक्षा खडसे यांच्याशी बोलत असताना त्यांना रडू कोसळले. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनावेळी हा प्रकार घडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परीषद सदस्य तथा सेवा व समर्पण अभियानाचे जिल्हाप्रमुख नंदकिशोर महाजन, उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, माधुरी नेमाडे, जुम्मा तडवी, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हाध्यक्ष सारीका चव्हाण, सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनील पाटील, महेश पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, रजनीकांत बारी आदी यावेळी उपस्थित होते. रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गरजु लोकांना किराणा किट्स वाटप करण्यात आले व अपंग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी किसान जवान सन्मान दिवस म्हणुन भारतीय जनता पार्टीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते तालुका वैद्यकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चिनावल येथील वैद्यकीय कार्यालय कायम स्वरूपी रावेरात आले असून यासाठी विद्यमान पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्यानी विषय लावून धरला होता. |
सिडको प्राभाग २८ मधील वृंदावन नगर येथे सभापती सुवर्णा मटाले यांनी डेंगू, चिकनगुनिया याबाबत पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. सध्या डेंग्यू ,चिकनगुनिया याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी जनजागृती करून मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाहणी करून सर्वत्र फवारणी करून ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आढळले, त्या ठिकाणी विशिष्ट औषधाची फवारणी केली जात आहे. त्याच बरोबर पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडल्याने बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना काही सूचना करण्यात आल्या. पाण्याचा हौद, टाक्या, रांजण, कूलर, फ्रिजचा ड्रीप पॅन, झाडांच्या कुंड्यामधील साचलेले पाणी हे आठवड्यातून एकदा स्वच्छ करून साठवलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. (फोटो ३१ मटाले) सिडको प्रभाग क्रमांक २८ मध्ये डेंग्यू, चिकनगुनियाबाबत जनजागृती करताना सभापती सुवर्णा मटाले समवेत मनपा कर्मचारी. |
विदेशी दारू दुकानदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राहुल अशोक बनसोड आणि नीलेश शेलार याला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. औरंगाबाद ः विदेशी दारू दुकानदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राहुल अशोक बनसोड आणि नीलेश शेलार याला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. गारखेडा परिसरात राजू मनकानी यांचे एएनटी वाइन शॉप आहे. मनकानी यांच्याकडून बनसोड व शेलार एका विदेशी ब्रॅँडचे दोन ते तीन हजार रुपयांचे मद्य खंडणी स्वरुपात घ्यायचे. हे प्रकार वारंवार सुरू होते. त्यामुळे मनकानी यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली होती. मंगळवारी रात्री बनसोड व शेलारला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. |
मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. लंडन : मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय तपासी यंत्रणांना माझे काही जाब-जबाब घ्यायचे असतील तर त्यांनी इथे लंडनमध्ये यावे किंवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत, असा भन्नाट सल्ला वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिला आहे. मल्या म्हणाले, 'माझ्या बाबतीत जे काही सुरु आहे त्याचे वर्णन मी 'पिच्छा पुरविणे' याखेरीज अन्य प्रकारे करू शकत नाही. (पण) काहीही करून मला यातून निभावून बाहेर पडावेच लागेल. मल्ल्या म्हणाले, 'माझ्या किंगफिशर एअरलाइन्सचे अनेक अधिकारी भारत सरकारला चौकशीसाठी (तेथे) उपलब्ध आहेत. शिवाय कंपनीची हजारो कागदपत्रेही मिळविणे त्यांना शक्य आहे. या उपरही त्यांना खुद्द मला काही विचारायाचे असेल तर त्यांनी इथे लंडनमध्ये येऊन मला विचारावे, रेडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माझ्याशी बोलावे अथवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत व मी त्याला उत्तरे देईन. मला काहीच दडवून ठेवायचे नाही. 'मल्ल्या पुढे असेही म्हणाले, 'पण केवळ मी जातीने भारतात हजर नाही एवढ्यावररूनच माझ्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढून माझा पासपोर्ट रद्द केला जावा हे मला जरा विरोधाभासी व चिंताजनक वाटते. यावरून त्यांच्या हेतूविषयी (ते स्वच्छ असल्याविषयी) मला कशी बरं खात्री वाटावी? 'हा अनुभव आपल्याला नवीन नाही व यापूर्वी ही आपण हे सर्व सहन केले आहे, असे सांगताना मल्ल्या म्हणाले, तपासी अधिकाऱ्यांचा पहिला (कटु) अनुभव मला १९८५ मध्ये आला. मोठ्या तयारीनिशी दोन वर्षे ते माझ्याकडे येत राहिले व शेवटी त्यांना काहीही सापडले नाही व मी पूर्णपणे निर्दोष ठरलो. वाईट याचे वाटते की, भारतात तपासी यंत्रणा या राजकारण्याच्या हातातील खेळणे आहेत. (वृत्तसंस्था) मोटार शर्यतीच्या 'फॉम्युला १' स्पर्धेत उतरणाऱ्या 'फोर्स इंडिया' या संघाचे मालक असलेल्या मल्ल्या यांनी याच क्रीडाप्रकाराशी संबंधित 'आॅटोस्पोर्ट' या नियतकालिकास मुलाखत देताना वरीलप्रमाणे सल्ला देताना म्हटले की, भारत सरकारने माझा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केलेला असल्याने मला भारतात जाणे अशक्य आहे. |
बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. १२ मे रोजी त्यांचा आगामी सरकार -३ हा मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे. ते आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. रामगोपाल वर्मा विरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. रामगोपाल वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दर्शित केलेल्या अज्ञात चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांच्यावर या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वारंट काढले आहे. औरंगाबाद मधील मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीने २००९ मध्ये आलेल्या अज्ञात सिनेमाची मुळ कथा त्याची असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. असे मोहसिनने म्हटले आहे. मी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाने दोघांनाही समन्स पाठवले आहेत. |
नवी दिल्ली, 20 जानेवारीः सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) च्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) तेजी पाहायला मिळाली. दरम्यान देशांतर्गत बाजारात याचा परिणाम दिसला नाही. दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 85. 20 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 75. 38 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 91. 80 रुपये आणि 82. 13 रुपये प्रति लीटर आहे. 1 जानेवारीपासून पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 1. 50 रुपयांची वाढ झाली आहे. 2020 च्या दुसऱ्या सहामाहीतही पेट्रोलचे भाव वाढले होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अशी माहिती दिली आहे की कोरोना व्हायरस काळात तेल उत्पादक देशांनी कमी प्रमाणात उत्पादन केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. कमी उत्पादनामुळे तेलाची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत पाहायला मिळते आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमती 35 ते 38 अमेरिकी डॉलर प्रति बॅरल होत्या, आता त्यामध्ये वाढ होऊन दर 54 ते 55 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाल्याा आहेत. (हे वाचा-इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं) दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. (हे वाचा-PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे) BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजला असून, यात बाधितांचे प्रमाण आणि मृत्यू यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांमध्ये दहशत आहे. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, मास्कसह सामाजिक आंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय वापरूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण प्रचंड वाढला आहे. कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने तालुका आणि गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला लसीकरणाकडे पाठ फिरविणारे सुशिक्षित देखील आता लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रांगेत उभे आहेत. तालुक्यातील लसीकरणाने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र यामध्ये लसीकरण करण्यात येत आहे. परंतु एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीबाबत विविध गैरसमज असल्याने तालुक्यातील कातकरी समाज लसीकरणाबाबत उदासीन आहे. कोरोना लस घेतल्याने माणसाचा मृत्यू, विविध आजार, तसेच अर्धांगवायूमुळे होतो, अशी समजूत या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु हातावर पोट असलेला आणि रोजंदारीवर जाणार्या गरीब आदिवासी समाजाच्या मनात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे. सामाजिक संघटनांच्या मदतीने, तसेच वाडी वस्तीतील सुशिक्षित तरुण-तरुणींमार्फत लसीकरणाचे फायदे समजावले जात आहेत. श्रमजीवी संघटनादेखील यामध्ये प्रशासनाच्या मदतीला धावून आली असून आपल्या वाडी वस्तीतील संपर्काचा जोरावर कार्यकर्ते मदतीला घेऊन लसीकरणासाठी मानसिकता बदलण्याचे काम करण्यात येत आहे. तालुक्यात 228 कातकरी वाड्या असून, कुटुंब संख्या 2 हजार 978 आहे. एकूण लोकसंख्या 17 हजार 500 च्या घरात आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये वाडी-वस्तीत लसीकरण याचे प्रमाण शून्य आहे. पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून दूर असलेला आदिवासी समाज दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे सर्व स्तरावर लसीकरण होणे गरजेचे असल्याने प्रशासन देखील यासाठी प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हे प्रशासनाचे देखील लक्ष्य असून, तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी फिरते लसीकरण देखील करण्यात आले होते. वाडीवस्तीमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असून, 100 टक्के लसीकरण होईल याबाबत खात्री आहे. श्रमजीवी संघटनेमार्फत वाडीवस्तीवर जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जगा आणि जगवा हे ध्येय घेऊन संघटना काम करीत आहे. संघटनेच्या प्रयत्नाला यश येत असून, लसीकरणासाठी अनेकजण तयार झाले आहेत. |
नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३०० पानांची) पानांचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत होता. दरम्यानच्या काळात पानांचे सौदे बंद होते. मात्र पानांचे सौदे सुरू होताच खाऊच्या पानांना चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पिवळ्या पानांचा भाव जादा वधारला आहे. बाजारपेठेत अशा तीन हजार पानांना सध्या ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यंदा कोरोना आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पान उत्पादक कोलमडून पडला आहे. अशावेळी दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या १५ दिवसांपासून आवक घटल्याने मागणी वाढून पान उत्पादकांना दर मिळू लागला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, मालवण, फोंडा, कोल्हापूर आदी बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत. आजवर कधीही नुकसान झाले नाही, इतके कोरोनामुळे झाले आहे. सध्याचा दर किती दिवस टिकतो, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. ""हत्ती गेला अन् शेपूट राहिले"" अशी पान उत्पादकांची स्थिती आहे. कारण पाने खुडण्याचा हंगाम जून ते डिसेंबरअखेर चालतो. पानांची खुडणी केवळ १० टक्के उरली असताना, आता दर वाढला आहे. |
मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यन्त उद्यापासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. २२ जून पर्यन्त तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाच्या साधारण वळवाच्या सरींची शक्यता जाणवते. २२ जूनपर्यन्त हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच कदाचित मर्यादित असु शकतो असे वाटते. पूर्वमोसमी वळीव पावसाच्या सध्याच्या ह्या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगनातून संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात साधारण शुक्रवार दि. २३ जून ला नैरूक्त मान्सून प्रवेशित होवु शकतो. मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बं. उपसागरीय शाखाही उर्जीतावस्थेत येण्याची शक्यता जाणवते. दरम्यानच्या ह्या कालावधीतच (२३ ते २९ जुन) तळ कोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होवुन, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. म्हणजेच २३ ते २९ जुन ह्या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. विदर्भात मात्र सध्यःस्थित असलेली दिवसाची उष्णतेची लाटसदृश स्थिती व रात्रीची दमट वातावरणतून होणारी अस्वस्थता, घालमेल सोमवार दि. १९ जूनपर्यन्त कदाचित कायम राहू शकते, असे वाटते. उर्वरित महाराष्ट्रातील तापमानात मात्र विशेष फरक जाणवणार नाही. ' हिंद महासागरीय द्विध्रुवीता ' (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी) धन अवस्थेकडे झुकण्याचे अपेक्षित असतांना सध्या तो ही फारच बळकट स्थितीत आहे, असे समजु नये. असे वाटते. जून २३ ला सुरु होणाऱ्या व जुलै ६ ला संपणाऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अश्या मोसमी पावसाची शक्यता जाणवते. म्हणजेच ७ जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण ७ जुलैनंतरच्या आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते, असे एकंदरीत वाटते. ' बिपोरजॉय ' चक्रीवादळ सध्या त्याच्या संलग्नित हवेचा दाब तीव्रतेच्या उतरत्या पायरीने सध्या हवेच्या तीव्र कमी दाबाच्या म्हणजे ' डिप्रेशन ' अवस्थेत राजस्थानातील बारमेर, जोधपूर शहरांच्या वायव्येकडे असुन पुढील २ दिवसात अजमेर, जयपूरच्या वायव्येकडून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते. त्याच्या दोन दिवसाच्या अस्तित्व कालावधीत व मार्गस्थ पूर्व राजस्थानच्या भागात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तसेच सिमला कुलू मनाली, देहाराडून व सभोंवतालचा परिसरात उद्या रविवार दि. १८ जून २०२३ पासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. २२ जून पर्यन्त गडगडाटीसह वारा, वीजा, गारासह अवकाळी वातावरण व पावसाची दाट शक्यता जाणवते. ह्या कालावधीत तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी ह्याचीही नोंद घ्यावी, व सुरक्षित असेल तरच हिमालयीन चढाई करावी. असे वाटते. वर विवेचनातील शास्त्रीय तांत्रिक मुद्दे हवामान साक्षरतेसाठीच समजावे, ही विनंती. सध्याच्या पावसाळी वातावरणासंबंधी विशेष जाणवणारी घडामोड एव्हढीच असु शकते, असे वाटते. |
नागपूर : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गृहमंत्रीपद गमावणारे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय लोकांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदतीने चार ठिकाणी कारवाई केली. ईडीच्या धाडीमुळे देशमुख आणि त्यांच्याशी जुळलेल्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप लावल्यानंतर देशमुख अडचणीत आले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने २४ एप्रिलला देशमुख यांच्याशी जुळलेल्या लोकांविरुद्ध नागपूर आणि मुंबईत चौकशी अभियान राबविले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई आणि नागपूरच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपुरात चार ठिकाणी धाडी टाकल्या. प्राप्त माहितीनुसार हरेकृष्णा अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील व्यापारी सागर भटेवरा यांच्या घरी धाड टाकली. सागर हे सुपारीचा व्यवसाय करतात. ते देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख गृहमंत्री झाल्यानंतर ते जास्त सक्रिय झाले होते. ईडीने सदर येथील न्यू कॉलनी येथील समित आयजॅक यांच्या बंगल्यावरही धाड टाकली. समित हेसुद्धा देशमुख निकटवर्तीय समजले जातात. त्यांचे शहरातील एका चर्चित कुटुंबासोबत नाते आहे. जाफरनगर येथे कादरी यांच्या घरीही ईडीने धाड टाकली. याच प्रकारे छिंदवाडा रोड येथील प्रसिद्ध सीए कार्यालय आणि घरीही अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. सीए देशमुख यांच्या कुटुंबीयांशी जुळले असून त्यांच्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक असल्याचे सांगितले जाते. त्यांनी देशमुख कुटुंबीयांसोबत मुंबईत संपत्ती खरेदी केल्याचे समजते. दिवसभर चाललेल्या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. ईडीच्या नागपूर शाखेचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांची माहिती गोळा करीत आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्याविरुद्धही कारवाई होण्याची शक्यता आहे. धाडींमुळे देशमुख कुटुंबीयांशी जुळलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. |
दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती हे लक्षात घेऊन प्रथम साध्या शब्दाने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शक्य असेल तर त्यांना काही भेटवस्तू देऊन सन्मानित करणे ही आणखी चांगली भावना ! ही सकारात्मक अशी उच्च दर्जाची शिकवण भारतीय संस्कृती देते, आपल्या स्वतःच्याच कल्याणासाठी. अशी सकारात्मकता नेहमीसाठी असली तर तुमचे कोणतेच काम कधी अडत नाही. कारण तुम्ही कृतज्ञ असता ब्रह्मांडाशी ! म्हणजे जो देतो त्याच्याशी ! |
५. तपश्चर्या व तस्वबोध स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यांत आला आहे. चार आर्यसत्यांचें स्पष्टीकरण जगांत दुःख आहे हें कोणालाही नाकबूल करतां येत नाही. परंतु जो तो आपलें दुःख कसें नष्ट होईल याच विचारांत असतो. त्याचा परिणाम असा होतो की, दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येकजण आपण सुखी होऊं इच्छितो. त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान् असतात, ते पुढारी बनतात, व इतरांना त्यांचें ताबेदार व्हावें लागतें. हिंसक बुद्धीमुळे ह्या पुढाऱ्यांत देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळयांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान् पुढाज्याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडतें. राजाला आपलें राज्य दुसरा राजा घेईल असें भय वाटतें आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो. अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जाग दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचें दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे; आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला. जन्मजरामरणादिक सर्वसाधारण दुःख श्रमणांना मान्य होतें, इतकेंच नव्हे, तर त्या दुःखाचा नाश करण्यासाठीच त्यांची तपश्चर्या असे. परंतु दुःखाचें कारण कोणतें, यासंबंधी त्यांचा मतभेद होता. कोणी म्हणत, दुःख आत्म्याने उत्पन्न केलें ( सयंकत दुक्खं ); दुसरे म्हणत, दुःख पराने उत्पन्न केलें ( परंकतं दुक्खं ); तिसरे म्हणत, कांही अंशीं आत्म्याने आणि कांही अंशीं पराने दुःख उत्पन्न केलें ( सयंकतं च परंकतं च दुक्ख ); आणि चवथे म्हणत, दुःख आत्म्याने किंवा पराने उत्पन्न केलें नसून आकस्मिक आहे ( असयंकार अपरंकारं अधिच्चसमुप्पन्नं दुक्खं ). * यांत पहिल्या प्रकारचे श्रमण म्हटले म्हणजे निर्ग्रन्थ (जैन) वगैरे होत. पूर्वजन्मीं आत्म्याने पाप केल्यामुळे दुःख उत्पन्न झालें, असें ते समजत आणि त्याच्या परिहारार्थ देहदण्डन करून आत्म्याला कष्टवीत. दुसऱ्या प्रकारचे श्रमण सांख्यांसारखे होते. ते जड प्रकृतीमुळे दुःख उत्पन्न झालें असें मानीत आणि आत्म्याला प्रकृतीच्या तडाक्यांतून सोडविण्यासाठी खडतर तप करीत. तिसऱ्या प्रकारचे श्रमण आत्मा आणि प्रकृति मिळून दुःख उत्पन्न करतात असें प्रतिपादीत आणि आत्म्याला त्यांतून सोडविण्यासाठी देहदण्डन करीत. चवथ्या प्रकारचे श्रमण दुःख आकस्मिक समजत असल्यामुळे अक्रियवादाकडे झुकत. अशा रीतीने श्रमण एक तर निष्फल तपश्वर्या करीत, किंवा निष्क्रिय बनत. बहुजनसमाजाला त्यांचा फारच थोडा उपयोग होई. दुःखाचें खरें कारण आत्मा किंवा प्रकृति नसून मनुष्याची तृष्णा आहे, हें प्रथमतः बुद्ध भगवन्ताने दाखवून दिलें. पूर्वजन्मींच्या आणि ह्या जन्मींच्या तृष्णेमुळेच सर्व दुःख उत्पन्न होतें. तृष्णा कोठून आली, हा प्रश्न निरर्थक आहे. ती जोपर्यंत असेल तोंपर्यंत उत्पन्न होणारच. हें दुसरें आर्यसत्य. तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो, हें तिसरें आर्यसत्य. आणि तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या मधून जाणारा आर्य अष्टांगिक मार्ग, हें चवथें आर्यसत्य. * निदानवग्गसंयुत्त, वर्ग २, सुत्त ७ पहा. ५. तपश्चर्या व तत्वबोध अष्टांगिक मार्गाचे स्पष्टीकरण ह्या आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक् दृष्टि ही पहिली पायरी आहे. सम्यक् दृष्टि म्हणजे चार आर्यसत्यांचें यथार्थ ज्ञान. जगामध्ये दुःख भरलें आहे. तें मनुष्यजातीच्या तीव्र तृष्णेमुळे उत्पन्न झालें, त्या तृष्णेचा क्षय केला असतां सर्वांना शांति मिळणे शक्य आहे आणि परस्परांशीं कायावाचामनेंकरून सदाचाराने, सत्याने, प्रेमाने आणि कळकळीने वागणे, हा आर्य अष्टांगिक मार्ग त्या शांतीचा मार्ग आहे. अशी सम्यक् दृष्टि लोकांत उद्भवली नाही, तर अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या पाय होणारे तंटेबग्वेडे थांबावयाचे नाहीत, आणि जगाला शांति मिळावयाची नाही. आपलें ऐश्वर्य आणि सत्ता वाढविण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर त्यापासून त्याची आणि इतरांची सारखीच हानि होणार आहे. यासाठी कामोपभोगांत बद्ध न होण्याचा, इतरांवर पूर्ण- मैत्री करण्याचा, आणि इतरांच्या सुखसमाधानांत भर घालण्याचा शुद्ध संकल्प बाळगणे योग्य आहे. खोटें भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड, इत्यादि असद्वाणीच्या योगे समाजाची घडी बिघडते, व तंटेबखेडे उद्भवून ते हिंसेला कारणीभूत होतात म्हणून सत्य, परस्पराचें सख्य साधणारें, प्रिय आणि मित भाषण करणे योग्य आहे. यालाच सम्यक् वाचा म्हणतात. प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादि कर्मे कायेने आचरली, तर त्यापासून समाजांत मोठे अनर्थ उत्पन्न होतील. यास्तव प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादिक कर्मापासून अलिप्त राहून, लोकांचें कल्याण होईल अशींच कायक आचरली पाहिजेत. यालाच सम्यक् कर्मान्त म्हणतात. सम्यक् आजीव म्हणजे समाजाला अपाय होणार नाही अशा रीतीने आपली उपजीविका करणें. उदाहरणार्थ, गृहस्थाने मद्यविक्रय, जनावरांची देवघेव, इत्यादि व्यवसाय करता कामा नये. यांपासून समाजाला मोठा त्रास होतो, हे उघड आहे. असे व्यवसाय वर्ज्य करून शुद्ध आणि सरळ व्यवहाराने आपली उपजीविका करणें, यालाच सम्यक् आजीव म्हणतात. जे वाईट विचार मनांत आले नसतील त्यांना मनांत येण्यास सवड न देणें, जे वाईट विचार मनांत आले असतील त्यांचा नाश करणें, जे सुविचार मनांत उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणें, आणि जे सुविचार मनांत उद्भवले असतील ते वाढवून पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करणें, या चार मानसिक प्रयत्नांना सम्यक् व्यायाम म्हणतात. ( शारिरीक व्यायामार्शी याचा संबंध नाही.) शरीर अपचित्र पदार्थांचें बनलें आहे, हा विवेक जागृत ठेवणें, शरीरांतील सुखदुःखादि वेदनांचें वारंवार अवलोकन करणें, स्वचित्ताचें अवलोकन करणे आणि इंद्रियें व त्यांचे विषय यांपासून कोणती बंधनें उत्पन्न होतात आणि त्यांचा नाश कसा करता येतो इत्यादि मनोधर्मांचा नीट विचार करणें, याला सम्यक् स्मृति म्हणतात. आपल्या शरीरावर, मृतशरीरावर, मैत्री करुणादिक मनोवृत्तीवर किंवा पृथ्वी, आप, तेज, इत्यादिक पदार्थांवर चित्त एकाग्र करून चार ध्यानें संपादन करणे याला सम्यक् समाधि म्हणतात. * दोन अंतांला न जातां या मध्यम मार्गाची भावना केली पाहिजे. पहिला अन्त म्हणजे कामोपभोगांत सुख मानणें. त्याला हीन, ग्राभ्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह (हीनो ह्या सर्व पदार्थांवर ध्यानें कशी संपादता येतात, याचें विवरण 'समाधिमागा'त केलें बाहे. |
चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा "पिरीयारूम पेरूमल"\nDecember 13, 2018 December 12, 2018 Raj Jadhav101 Views 1 Comment Film, Film Review, Pariyarum Perumal, tollywood\n'परीयेरूम पेरूमल' सुरू होतो आणि पुढच्या दहाच मिनिटात तो पुढे काय दाखवणार आहे याची प्रचिती मिळते. अगदी सुरुवातीपासून हा चित्रपट जातीयवादावर ठळकपणे बोट ठेवतो आणि प्रत्येक फ्रेमगणिक अस्वस्थ करत राहतो.\nजे केवळ पाहणेच असह्य होते, ते सहन करणाऱ्यांच्या बाबतीत केवळ विचारच केलेला बरा. अश्यानेच, त्यांच्या मनावर त्या घटनांचे कधी न पुसलेले घाव कोरले जातात ते कायमचेच.\n'परीयेरूम पेरूमल', हा खालच्या जातीतला एक तरुण, कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गावातून बाहेर पडून तिरुनेलवेल्लीला येतो.\nकायद्याचा नावाखाली होत असलेली आपल्या समाजाची फसवणूक थांबवण्याच्या उद्देशाने त्याला वकील बनायची इच्छा असते.\nडॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने तो कॉलेजमध्ये दाखल होतो, पण इथली जातीयवादाची परिस्थिती त्याहून वाईट आहे, हे एका घटनेने त्याला समजते.\nहळुवारपणे त्याचे प्रेमाचे बंध त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या उच्चवर्णीय ज्योतीशी फुलू लागतात, ज्याचे परिणाम त्याला भोगायला लागतात, तेही तिच्याशी सर्व संबंध तोडण्याच्या ताकीदसहित.\nतो ते करायला तयार होतोही पण त्यानंतरही त्याला आणि त्याच्या परिवाराला हिणवले जाते, ज्याची किंमत त्याला मोजावी लागते, हे वेगळे सांगायला नको.\nअखेरीस, दोघांचे प्रेम सफल होते की जात जिंकते, हे चित्रपटात पाहणेच उचित ठरेल.\nविषयानुरूप, मारी सेल्वाराजचा स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न दाद देण्यासारखा आहे. चित्रपटात दाखवलेले बरेचसे अनुभव आणि पात्रे ही त्याच्या पाहण्यातली आहेत. चित्रपटातील गाव आणि तिथून लॉसाठी नायकाचे शहरात जाणे, हा भाग त्याने प्रत्यक्ष अनुभवला आहे.\nअगदी वैयक्तिक नसली तरी ही कथा त्याच्या अनुभवांची बायोग्राफी म्हणता येईल.\n'परीयेरूम पेरूमल' हे नाव ठेवण्यामागेही एक सुंदर धागा आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये या नावाच्या देवाला सगळ्या जातीतले लोक पूजतात.\nहेच चित्रपटाच्या मेन पात्राचे नाव ठेवून कमी लेखल्या जाणाऱ्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यालाही समाजात स्थान मिळावं, हा अनुल्लेखित संदेशही यात आहे.\nकथीरने मेन लीडमध्ये सुंदर काम केलंय. हा चित्रपट त्याचाच आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याची अगतिकता, हतबलता आणि अस्वस्थता नेमकेपणाने मांडली आहे. अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या काही गाण्यांच्या शब्दांत आणि चित्रीकरणातही ती रागावाटे ठळकपणे उठून दिसते.\nआनंदी आणि त्याच्यामधील हळुवार फुलणारे प्रेम, हे थंड हवेच्या झुळुकेप्रमाणे किंचित दिलासा देणारं ठरतं. ते सोडलं तर इतर वेळी पडद्यावर जातीयवादाची आग कधीही विझलेली दिसत नाही.\nखालच्या जातीच्या लोकांना केवळ आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी जीवानिशी मारणारे गावामधील एक कपटी म्हाताऱ्याचे पात्र, ही मानसिकता किती खोलवर गेली आहे, याचा प्रत्यय देते.\nआणि शेवटी सगळ्यात महत्वाचे पात्र म्हणजे करुप्पी नावाचा कुत्रा, ज्याचा स्क्रीनटाईम थोड्या वेळ आहे, पण त्याचे ठसे पूर्ण चित्रपटात दिसत राहतात.\nप्रगत शहरांच्या आणि चकाचक इमारतींच्यापल्याड अजूनही काही बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती आहेत.\nआजही, बऱ्याच ठिकाणी, खालच्या जातीच्या लोकांकडे पाहण्याचा उच्च समाजाचा मागासलेला दृष्टिकोन, त्यांना हिणवले जाणे, वेगवेगळ्या प्रकारे नाहक त्रास देणे, वेळोवेळी त्यांना स्वतःची जागा दाखवून देणे हे प्रकार सर्रास होतात.\nज्याच्या बातम्या शहरातील वर्तमानपत्राच्या कुठल्याश्या कोपऱ्यात येतात किंवा येतही नाहीत. कदाचित जीव गेल्यानंतरही चार ओळींसाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई चालूच राहते.\nजातीयवाद हा जणू काही त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भागच असावा, आणि कुणी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला परत त्याची लायकी दाखवण्यात येते.\nयातून तो पेटून उठला तर चुकीच्या मार्गावर तरी जातो आणि शांत राहिला तर निमूटपणे जन्मभर शांतच राहतो, ही शोकांतिका आहे.\nबेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.\n← पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nकाँग्रेसचा आमदार : 'मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू' →\nNovember 19, 2018 Prasad Deshpande 1\nOne thought on "चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा "पिरीयारूम पेरूमल""\nसिनेमा बघितल्यावर विचार मांडू. |
जॉन सीना (John Cena) 27 जुलैला पुन्हा एकदा RAW मध्ये परतत आहे. जॉन सीना सध्या प्रो-रेसलिंगच्या जगातला सर्वात मोठा स्टार आहे. जॉन सीना 27 जुलैला पुन्हा एकदा RAW मध्ये परतत आहे. जॉन सीना सध्या प्रो-रेसलिंगच्या जगातातील सर्वात मोठा स्टार आहे. 20 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने WWE मध्ये अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. त्याचबरोबर एक यशस्वी स्टार म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. याशिवाय तो बराच काळ WWE चा चेहरा देखील राहीला आहे. अशा परिस्थितीत, जॉन सीनाच्या त्या विक्रमांबद्दल जाणून घेऊया, जे कोणत्याही स्टारसाठी मोडणे खूप कठीण आहे. दरम्यान, जॉन सीना (John Cena) हा सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. त्याने रिंगमध्ये अनेक मोठ्या लढती जिंकल्या आहेत. यादरम्यान त्याच्या पराभव आणि विजयाचे अंतरही खूपच कमी झाले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 1300 लढतीपैंकी 77.23% लढती जिंकल्या आहेत. दुसरीकडे, रोमन रेन्स आणि शार्लोट फ्लेअर सारख्या स्टार्संनी अनेक लढती जिंकल्या आहेत. परंतु जॉन सीनाच्या विक्रमापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. जॉन सीना त्याच्या करिअरमध्ये 13 वेळा WWE चॅम्पियन बनला आहे. तो इतर कोणत्याही स्टारपेक्षा जास्त वेळा WWE चॅम्पियन बनला आहे. हा विक्रम देखील त्याच्या खूप जवळ जाणारा आहे, कारण रेसलमेनिया 38 मध्ये WWE चॅम्पियनशिप युनिव्हर्सल चॅम्पियनशिपमध्ये (Championship) एकरुप झाली आहे. |
पाकमध्ये असुरक्षित हिंदू ! कराची (पाकिस्तान) - पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे येथे बंद पाळण्यात आला. |
गेली दोन वर्षं इरफान न्युरोएंडोक्राईन ट्युमर या आजाराने ग्रस्त होता. कारवा हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच ही बातमी समोर आली होती. यावेळी आजारपणात सदोदित सोबत असलेल्या सुतापाबाबत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुतापा एक डायलॉग रायटर आहे. तिने शब्द, खामोशीः द म्युझिकल, सुपारी या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. |
नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागण्याचे आदेश शनिवारी स्वागताध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांनी संमेलन स्थळ, परिसर आणि उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी करून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नाशिकचे संमेलन अधिक निर्विघ्न पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नेमणूक केली आहे. रविवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर सर्वच विभागांना कामाला लागण्याचे, तसेच पुढील ५० दिवसांत सर्व कामे सज्ज कऱण्याचे आदेश देण्यात आले. त्यात वाहतूक व्यवस्था, पार्किंगसह, स्वच्छता, वीज, वायफाय, अग्निशमन आणि संबंधित सर्व यंत्रणा लवकरात लवकर तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंडावरे यांनी संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव बच्छाव, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कल्पना कुटे, आरोग्य विभागाचे प्रशांत शेटे, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय बैरागी, आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशांत वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संमेलनस्थळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या त्याची यादी तयार करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. हे संमेलन नाशिककरांचे आहे, ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे होईल त्याची जबाबदारी प्रत्येकावर असल्याचे मुंडावरे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत लोकहितवादी मंडलाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, उपाध्यक्ष भगवान हिरे, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर, अमोल जोशी यांच्यासह अधिकारी कायर्कर्ते उपस्थित होते. |
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तू लग्न केले, तर सासरच्या लोकांना आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ दाखवेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवींद्र मधुकर लोखंडे (चिखलठाण वाडी, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील मांजरी येथे प्रशिक्षण घेत असताना पीडित महिला व आरोपीची ओळख झाली. रवींद्र याने मैत्री वाढवत पीडित महिलेला जानेवारी २०१७ मध्ये चिखली घाटात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याचे फोटो व व्हिडीओ काढला. त्यानंतर श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू, नगरमधील साईबन, चिखली घाट अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेवर वारंवार अत्याचार केले. तू लग्न करू नकोस; अन्यथा आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ तुझ्या सासरच्या लोकांना दाखवेन, अशी धमकी रवींद्र पीडित महिलेला देत असे. अखेर या जाचाला कंटाळून पीडित महिलेने तोफखाना पोलिस ठाणे गाठले. तिने फिर्याद दिल्यानंतर आरोपी रवींद्र याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंडे करत आहेत. |
Arvind Kejriwal : काँग्रेसचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा? काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आज पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव टाकरे यांनी राहुल गांधींना अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काँग्रेस राज्यसभेमध्ये दिल्लाच्या अध्यादेशावर केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी केजरीवाल सतत हा मुद्दा उपस्थित करत होते आणि संसदेत अध्यादेशाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावे अशी मागणी करत होते. |
ही शंका बरोबर नाही. कारण उपांशु व अंतर्याम हे दोन ग्रह प्राणरूप व अपानरूप आहेत. प्राण व अपान या दोन वायूंची निष्पत्ती झाल्यानंतरच इतर इंद्रियांची स्थिती होत असते. अर्थात् चक्षुरादिइंद्रियरूप अशा ऐंद्रवायवादि ग्रहांच्या ग्रहणापूर्वीच प्राणापानरूप उपांशु व अंतर्याम या ग्रहांचे ग्रहण करण्यात येणे हे निर्विवादच आहे. त्यांच्याखेरीज इतर जे ग्रह घेतले जातात त्यांमध्ये मैत्रावरुण ग्रह घेण्यापूर्वी ऐंद्रवायव हा एकच ग्रह घेतला जात असतो. देवांच्या पासून इच्छित वर मिळविल्यानंतर मित्र व वरुण या दोघांनी काळस्वरूपाची विभागणी केली. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ मित्राने 'दिवस' म्हणून कल्पिला आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ 'रात्र' म्हणून वरुणाने निश्चित केला. आणि तेव्हापासून काळाचे मूळचे अविभक्त स्वरूप दिवस व रात्र या नांवांनी दोन ठिकाणी विभागले गेले. एवं च, मित्र व वरुण यांनी कालविभागाचे कार्य केल्याच्या स्मरणासाठी 'मैत्रावरुण' नामक सोमग्रह घेतला जात असतो. (अनुवाक ८). पूर्वकाळी एकदा यज्ञपुरुषाने देवांची काही वस्तू घेतली आणि त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी दोरी चढवून सज्ज केलेले आपले धनुष्य त्याने आपल्या डाव्या हातात धरून उभे केले. धनुष्याचे एक टोक खाली भूमीला टेकलेले असून वरच्या बाजूस जे त्या धनुष्याचे दुसरे टोक होते, ते आपल्या गळ्याशी धरून यज्ञपुरुष उभा होता. इतक्यात धनुष्याचे जे टोक भूमीवर होते त्याला जखडून बांधलेली त्या धनुष्याची दोरी वाळवीने खाऊन तोडून टाकली. त्याबरोबर धनुष्याच्या कांबीचा बाक ढिला होऊन त्याचे वरचे टोक ताडकन् वर उचलले गेले आणि त्याच्या जबर हिसक्याने यज्ञपुरुषाचे शिरही धडावेगळे होऊन अंतराळात उडाले. तेव्हा देव उभयता अश्विनीकुमारांना म्हणाले की, तुम्ही उत्कृष्ट वैद्य आहा, त्या अर्थी आमच्यासाठी तुम्ही या यज्ञपुरूषाचे शिर पुन्हा त्याच्या धडाला चिकटून त्याला सजीव करा. तेव्हा अश्विनीकुमार म्हणाले की आम्ही यज्ञपुरुषाचे शिर त्याच्या धडाला चिकटवून त्यास पुन्हा सजीव करू. परंतु, या कामगिरीबद्दल तुम्ही आम्हास एक वर दिला पाहिजे. तो हा की, तुम्ही इतर देवांच्या बरोबर आम्हा उभयतांच्यासाठीही एक सोमग्रह भरून घेत जावा. देवांनी त्यांची मागणी मान्य केली व त्यांच्यासाठी एक सोमग्रह भरून घेतला. आणि मग अश्विनीकुमारांनी विच्छिन्न झालेले यज्ञपुरूषाचे शिर पुन्हा त्याच्या धडास जोडून त्याला सजीव केले. यास्तव, यज्ञपुरुषावर आलेल्या शिरच्छेदरूप दुष्प्रसंगाची निष्कृती होण्यासाठी उभयता अश्विनीकुमारांच्यासाठी एक सोमग्रह भरून घ्यावा. अश्विनीकुमारांच्या संबंधी देव असे म्हणत की, रोगचिकित्सा करून औषधोपचार करण्यासाठी मनुष्यसमाजात संचार करणारे हे दोघे अश्विनीकुमार अपवित्र आहेत. यास्तव, ब्राह्मणाने वैद्यकीचा धंदा करू नये. वैद्यकीचा धंदा जो ब्राह्मण करतो, तो अपवित्र व यज्ञकर्माशी संबंध ठेवण्यास अपात्र असतो. 'बहिष्पवमान' नांवाचे सामगान हे वैद्यकीच्या धंद्याने येणारी अपवित्रता व यज्ञकर्मसंबंधाविषयीची अपात्रता दूर करणारे आहे, हे ध्यानी आणून देवांनी आपल्या यज्ञात बहिष्पवमान नामक सामाचे उद्गात्यांनी गान केल्यानंतरच, अपवित्रतेचा दोष दूर झालेल्या उभयता अश्विनीकुमारांच्यासाठी सोमग्रह भरून घेतला. सारांश, देवांचेच अनुकरण करून बहिष्पवमान साम गाइले गेल्यानंतर अश्विनीकुमारांच्यासाठी सोमग्रह भरून घ्यावा. बहिष्पवमान सामगानाचे हे महत्त्व जाणणाऱ्या विद्वान् यजमानाने आपल्या यज्ञात बहिष्पवमान सामाचे गान अवश्य करवावे. बहिष्पवमान साम हे स्वभावतःच अत्यंत पवित्र असते. अग्नी, उदक व ब्राह्मण या तिघांच्या ठिकाणी भैषज्य म्हणजे रोगनिदान व तद्विषयक उपचारसामर्थ्य हे स्वभावतःच निष्पन्न झालेले असते व तेच देवांनी अश्विनीकुमारांच्या ठिकाणी स्थापन केले होते. यास्तव, रोगनिदान व तद्विषयक उपचार यांमध्ये निष्णात असलेल्या अश्विनीकुमारांचा अनुग्रह संपादन करण्यासाठी वैद्यकीचा धंदा करणाऱ्या ब्राह्मणाने औषधे तयार करताना आपल्या शेजारी उदकाने भरलेले एक पात्र ठेवावे. त्याच्या दक्षिण दिशेस एक ब्राह्मण बसवावा. आणि त्याच्या सन्निध अग्नी प्रज्वलित करून ठेवावा. आणि नंतर करावयाचे असेल ते औषध करावे. असे केल्याच्या योगाने औषध उत्कृष्ट गुणकारक होण्याला ज्या साधनभूत अंगांचे साहाय्य आवश्यक असते त्या अंगांच्या साहाय्यानेच ते औषध तयार केल्यासारखे होते. आणि ते अत्यंत गुणकारी बनते. ब्रह्मवादी असे म्हणतात की, ऐंद्रवायव, मैत्रावरुण व आश्विन हे तीन सोमग्रह वस्तुतः दोन दोन देवतांच्यासाठी घ्यावयाचे असताना ते एकाच ग्रहपात्रात भरून घेतले जातात. आणि त्यांचे हवन मात्र दोन पात्रांनी केले जाते, हे काय म्हणून ? या शंकेचे समाधान असे की, नेत्र, नासिका आणि कर्ण ही इंद्रिये बाह्यतः जरी द्विधा झालेली असतात तरी त्यांच्या ठिकाणची तत्तत्कार्यक्षमशकी अंतर्यामी एकच असते. यास्तव, दोन देवतांच्यासाठी घ्यावयाचे असलेले पूर्वोक सोम्ग्रह एकाच ग्रहपात्रात भरून घेतले जातात. आणि ही नेत्रादि इंद्रिये बाह्यतः द्विघा झालेली असल्यामुळे त्या द्विदेवत्य म्हणजे दोन देवतांच्या उद्देशाने व्हावयाचे यजन दोन पात्रांनी केले जात असते. रेंद्रवायव, मैत्रावरुण व आश्विन हे द्विदेवत्यसंज्ञक तीन सोमग्रह प्राणरूप आहेत. आणि 'इडा' ही पशुरूप आहे. यास्तव, 'द्विदेवत्य' ग्रहांच्या पूर्वी जर इडेचे उपाह्नान केले तर पशूंच्या सह यजमानाचे प्राण त्याला सोडून दूर होतात व त्यामुळे तो मरतो. यास्तव, प्रथम द्विदेवत्य ग्रहांचे भक्षण करून नंतर इडेचे उपाव्हान करावे. असे केले असता यजमानाने जणू प्राणांना आपल्या ठिकाणी स्थिरतेने धारण करून पशूंनाही आपल्याजवळ केल्यासारखे होते. रेंद्रवायव ग्रह वाग्रूप असून मैत्रावरुण ग्रह हा चक्षुरूप आहे. आणि आचिनसंज्ञक ग्रह हा श्रोनेंद्रियरूप आहे. यास्तव, ऐंद्रवायव ग्रहाचे भक्षण करताना तो ग्रह आपल्या समोर धरूनच त्याचे भक्षण करावे. कारण समोरच असलेल्या मुखाने प्रत्येकजण बोलत असतो. मैत्रावरुण ग्रहाचे भक्षण करतानाही तो ग्रह आपल्या समोर धरूनच त्याचे भक्षण करावे. कारण, समोर असलेल्या नेत्रेंद्रियानेच प्रत्येक माणूस पाहत असतो. आश्विन ग्रहाचे भक्षण करताना तो ग्रह आपल्या मस्तकामोवती एकवार फिरवावा आणि मग त्याचे भक्षण करावे. कारण, मस्तकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या कानांनी माणूस सर्व बाजूंच्या शब्दांचे श्रवण करतो. द्विदेवत्यसंज्ञक ग्रह प्राणरूप आहेत. यास्तव, यजन झाल्यानंतर ती ग्रहपात्रे अध्वर्यूने रिकामीच त्या त्या जागी ठेवू नयेत. कारण मनुष्याच्या शरीराच्या अंतर्भागी जे प्राण असतात ते रिकामे म्हणजे कोरडे नसून जीवनरसाने आर्द्र झालेल्या स्थानाशी चिकटून असतात. विस्तीर्ण अशा यज्ञानुष्ठानापैकी अध्वर्यू जेव्हा एखादे कर्म करावयाचे विसरतो, तेव्हा जेथून ते कर्म अंतरलेले असते, त्या स्थानाला अनुलक्षून राक्षस चाल करून येतात व यज्ञाचा विघात करतात. यास्तव, प्राणभूत असे द्विदेवत्यग्रह अध्वर्यूने रिकामे न ठेवता ऐंद्रवायच ग्रहामध्ये पुरोडाशशकल, मैत्रावरुण ग्रहामध्ये आमिक्षा व आश्विन ग्रहामध्ये धाना ठेवून त्या ग्रहांचे त्या त्या जागी आसादन करावे. म्हणजे त्या योगाने यज्ञानुष्ठानातील विस्मृत झालेले कर्म केल्यासारखे होऊन यज्ञ सांग असा होतो. अर्थात् असे करणे राक्षसांच्या संचारालाही प्रतिबंधक होते. हविर्धानमंडपामध्ये दक्षिण दिशेस जो शकट उभा केलेला असतो, त्याच्या उत्तर बाजूच्या चाकोरीवर हे द्विदेवत्य ग्रह ओळीने ठेवावेत. शकटाच्या चाकाची ही चाकोरी वाग्रूप आहे. अर्थात् तिच्या ठिकाणी ग्रह ठेवले असता अध्वर्यूने जणू काय वाणीच्याच ठिकाणी वाणीचे स्थापन केल्यासारखे होते. तृतीय सवनापर्यंत हे तीनही ग्रह तेथेच राहू द्यावेत. अशा प्रकारे ग्रहांचे तेथे राहू देणे, यज्ञानुष्ठानाचे सांतत्य राखण्याला कारणभूत होते. ( अनुवाक ९). बृहस्पती हा देवांचा पुरोहित असून शंड व मर्क हे असुरांचे पुरोहित होते. देव व असुर हे दोघेही आपापल्या पुरोहितांनी अनुष्ठित केलेल्या मंत्रसामर्थ्याने संपन्न असल्यामुळे ते परस्परांचा पराभव करू शकत नव्हते. तेव्हा देवांनी असुरांमध्ये फितुर उत्पन्न करण्याच्या इच्छेने शंड व मर्क या त्यांच्या दोघा पुरोहितांना एकांतामध्ये बोलावून आणले. आणि 'आमच्याविरुद्ध असुरांना तुम्ही साहाय्य करू नका', अशी त्यांची आर्जवाने विनवणी केली. तेव्हा त्या दोघांनी, 'तुमच्या यज्ञामध्ये आम्हाला तुम्ही भाग देत नाही, तरी अग्निष्टोम यज्ञामध्ये तुम्ही जर आम्हा दोघांच्यासाठी दोन सोमग्रह भरून घ्याल, तर आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे असुरांचे साहाय्यक न होता, तुमच्यामध्येच मिळून जाऊ', असा देवांना वर मागितला. देवांनी त्याच्या म्हणण्यास मान्यता दिली व तीप्रमाणे त्यांनी अग्निष्टोम यज्ञात शंड व मर्क या दोघांच्या नांवाने अनुक्रमे 'शुक्र' व 'मंथी' हे दोन सोमग्रह भरून घेतले. अर्थात् शंड व मर्क या दोघांनी असुरांना साहाय्य करण्याचे बंद केल्यामुळे देव विजयी झाले आणि असुरांचा पराभव झाला. या वृत्तांताचे रहस्य जाणणारा जो कोणी यजमान आपल्या अग्निष्टोम यज्ञात शंड व मर्क यांच्या नांवाने शुक्र व मंथी हे दोन ग्रह घेतो तो विजयी होतो व त्याच्या शत्रूचा पराभव होतो. देवांचे विजयरूप कार्य सिध्द होताच देवांनी फितुर झालेल्या त्या शंड व मर्क या दोघांना आपल्यातून दूर केले. आणि शंड व मर्क यांच्या नांवाने घेतलेल्या शुक्र व मंथी या नांवाच्या दोन सोमग्रहांचे यजन स्वपक्षीय अशा इंद्राच्या नांवाने केले. यासाठी शुक्रसंज्ञक सोमग्रहाचे यजन करण्यापूर्वी त्या ग्रहपात्राच्या खाली टेकणासारख्या धरलेल्या काष्ठशकलाने त्या ग्रहाच्या बुडाशी लागलेली धूळ झाडून टाकताना अध्वर्यूने अपनुत्तः शंड : सहामुना' असे म्हणावे. त्याचप्रमाणे प्रतिप्रस्थात्यानेही मंथी नामक ग्रहपात्राच्या बुडाशी असलेली धूळ झाडताना 'अपनुत्तो मर्कः सहामुना' असे म्हणावे. आता सांगितलेले मंत्र म्हणून धूळ झाडताना अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी, यजमान ज्याचा द्वेष करीत असेल व जो यजमानाचा द्वेष करीत असेल त्या मनुष्याच्या नांवाचे स्मरण करावे. यजमानाचा द्वेष्य किंवा द्वेष्टा यांच्या नांवाचे स्मरण म्हणजे मनामध्ये त्याचे नामग्रहण करणे होय. हे नामग्रहण पूर्वोत मंत्रातील 'अमुना' या पदाच्या जागी करावे. असे केले असता, यजमान ज्याचा द्वेष करतो अथवा यजमानाचा जो द्वेष करतो त्या मनुष्यासह अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी शंड व मर्क या दोघा असुरांना दूर केल्यासारखे होते. अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनीही अनुक्रमे शुक्र व मंथी या ग्रहांचे यजन करताना 'स प्रथमः संकृतिर्विश्वकर्मा' या मंत्राने आपल्या यज्ञाचे मुख्य दैवत असलेल्या इंद्रासाठी ते करावे. कारण, विश्वकर्मा, मित्र, वरुण इत्यादि देवतांची स्वरूपे इंद्रानेच धारण करून ती ती महत्कार्ये केलेली आहेत. शुक्रग्रह हा आदित्यरूप असून मंथीनामक ग्रह चंद्ररूप आहे. यास्तव, हे दोन्ही ग्रह समित्शकलांनी झाकून घेऊन अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी आहवनीयाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांचे यजन करण्यासाठी जावे. कारण पश्चिम दिशेस अस्तास गेलेले सूर्यचंद्र उदय पावण्यासाठी पूर्व दिशेस जात असताना कोणासही दिसत नाहीत. आहवनीयाच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख उभे राहून अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी अनुक्रमे शुक्र व मंथी या ग्रहांचे यजन करावे. कारण, पश्चिमाभिमुख होऊन सूर्य व चंद्र अस्तास जाताना सर्व लोक त्यांना पाहत असतात. शुक्र व मंथी हे दोन सोमग्रह जणू काय, यज्ञाचे दोन नेत्रच असून उत्तरवेदी ही जणू यज्ञाची नासिका आहे. अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी शुक्र व मंथी या ग्रहांचे यजन करताना आहवनीयाच्या पूर्वेस जाताना उत्तर वेदीच्या दोहो बाजूंनी वळसा घालून जावे. अध्वर्यूने दक्षिण बाजूने व प्रतिप्रस्थात्याने उत्तर बाजूने वळसा घालून पूर्वेस जावे. कारण, नासिकेच्या दोन बाजूस दोन नेत्र असतात. व नासिकेकडूनच दोन्ही नेत्रांचे धारण केले जात असते. अशा प्रकारे उत्तरवेदीचे सर्व बाजूंनी परिक्रमण केल्याने ते राक्षसांचा नाश करण्यास कारणभूत होते. देवांनी उत्तरवेदीच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख उभे राहून ज्या आहुती दिल्या त्यांच्या योगाने पूर्व दिशेस जे असुर होते त्यांना त्यांनी हाकून लावले. आणि पश्चिम दिशेस पूर्वाभिमुख उभे राहून ज्या आहुती दिल्या त्यांच्या योगाने पश्चिम दिशेस असलेल्या असुरांना देवांनी हाकून लावले. यास्तव, चमसाध्वर्यूनी चमसांच्या आहुती उत्तरवेदीच्या पश्चिमेस प्राङ्मुख उभे राहून द्याव्यात आणि शुक्र व मंथी या दोन ग्रहांच्या आहुती अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता या दोघांनी उत्तरवेदीच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख उभे राहून द्याव्यात. असे केल्याने यजमान पश्चिम दिशेस व पूर्व दिशेस असणाऱ्या शत्रूंना दूर हाकून लावतो. काही आहुती प्राङ्मुख व काही आहुती पश्चिमाभिमुख देण्याचे कारण असे की, प्रजा गर्भधारणकाली मातृशरीरात पूर्वाभिमुख प्रवेश करतात व जन्मताना पश्चिमाभिमुख होऊन मातृशरीरातून बाहेर पडतात. शुक्र व मंथी या दोन सोमग्रहांना अनुलक्षूनच प्रजा उत्पन्न होतात. शुक्रग्रहाला अनुलक्षून उपभोग्य अशा विषयांचा उपभोग घेणाऱ्या ब्राह्मणादि उच्च जातीच्या प्रजा निर्माण होत असून मंथी ग्रहाला अनुलक्षून सेवकाचे काम करणाऱ्या हीन जातीच्या प्रजा निर्माण होत असतात. अध्वर्यूने शुक्रग्रह हाती घेऊन त्याचे यजन करण्यासाठी उत्तरवेदीच्या दक्षिणेकडून पूर्वेस जाताना 'सुवीराः प्रजाः प्रजनयन् परीहि शुक्रः शुक्रशोचिषा' हा मंत्र म्हणावा. व प्रतिप्रस्थात्याने मंथीग्रह हाती घेऊन उत्तरवेदीच्या उत्तरेकडून वळसा घालून पूर्वेस जाताना 'सुप्रजाः प्रजाः प्रजनयन् परीहि मंथी मंथिशोचिषा', हा मंत्र म्हणावा. शुक्र ग्रहाच्या मंत्रामध्ये 'सुवीराः' म्हणजे अत्यंत शूर म्हणून गणल्या जाणाऱ्या ज्या प्रजा त्याच 'अत्री' म्हणजे उपभोग्य अशा भोगांचा उपभोग करणाऱ्या उच्चजातीय प्रजा अभिप्रेत असून मंथी ग्रहाच्या मंत्रात 'सुप्रजाः ' म्हणजे सुस्वभावी व आज्ञाधारक अशा सेवकाचे काम करणाऱ्या हीनजातीय प्रजा अभिप्रेत आहेत. आता सांगितलेल्या दोनही मंत्रांचे मर्म जो जाणतो, |
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर हे #MeToo मोहीमेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. एम. जे. अकबर हे संपादक असताना त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप 6 महिला पत्रकारांनी केला आहे, त्यानंतर अकबर यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. मात्र या आरोपांबद्दल चौकशी करावी लागेल असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटंल आहे, या आरोपांची सत्यता तपासावी लागणार असल्याचं ते म्हणाले आहेत. अमित शाह यांच्या या विधानामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे, सध्या अकबर नायजेरीयाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही अकबर यांच्यावर टिका करताना, आरोप करणाऱ्या महिलेच्या धाडसाचं कौतूक केलं होतं. बेटी बचाव पासून स्त्री सशक्तीकरणाच्या अनेक योजना सरकारने हाती घेतल्या असतांना अकबर यांच्यावरील आरोपामुळे पक्षातील जेष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे अकबर मायदेशात परतल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेवून कारवाई करण्याचा मानस भाजप नेतृत्वाचा आहे. |
मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजाराची रोकड, मोबाईल हॅडसेट, जुगाराचे साहित्य असा १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित कुणाल रणजित परमार (रा. कासार गल्ली, गुजरी), अमित विरचंद ओसवाल (रा. शिवाजी पेठ), अंकुश प्रतापचंद शहा (रा. भेंडे गल्ली, कोल्हापूर), प्रेम सुनिल नांगरे (रा. शिवाजी चौक), अनुप श्रीपाल देवकुळे (रा. माळी कॉलनी), ओंकार शिवाजी कवाळे (रा. बागल चौक) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. तसेच हॉटेलचे मालक राहुल शेषमल कर्णावट, व्यवस्थापक विक्रम सदाशिव कदम (रा. दोघे मुक्तसैनिक वसाहत) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना खबऱ्याने फोनवरून माहिती दिली होती. त्यानुसार शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हॉटेल इंटरनॅशनलवर छापा टाकला. यावेळी पैसे लावून तीन पानी जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड जप्त केली. |
गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ! मुंबई, ३ मार्च (वार्ता. ) - राज्यपालांच्या अभिभाषणाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पाला प्रारंभ होतो; मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा दिल्या. या वेळी सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण पूर्ण न करताच सभात्याग केला. यामुळे २ मिनिटांतच राज्यपालांच्या अभिभाषणाचा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झालेल्या प्रकाराचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ३ मार्चला, म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी 'वन्दे मातरम्' म्हणण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रारंभ होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपिठावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हाताने थांबण्याची खूण केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घोषणा देण्याचे थांबवले; मात्र त्यानंतर विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. या वेळी विरोधकांनी हातात फलक घेऊन अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी केली. विरोधकांनी सभागृहात नवाब मलिक आणि महाविकास आघाडी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. |
'हर हर महादेव' या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. पुणे - 'हर हर महादेव' या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्राध्यापक रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आक्षेप नोंदवले. - बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असल्याचे दाखवले आहे, हे खटकणारे आहे. - शिरवळ येथे समुद्र असल्याचे दाखवले आहे, मात्र तेथे नदी आहे. तिथे त्याकाळी इंग्रजांचे प्राबल्य देखील नव्हते. - बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे या भावंडांमधील लहानपणीच्या कटू प्रसंगांनाही कोणताही ऐतिहासिक आधार नाही. - अफजलखानाच्या वधाप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे हजर असल्याचे चित्रपटात दाखवले आहे, मात्र वास्तविक तेव्हा बाजीप्रभू तेथे नव्हते. - बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यात भलत्याच कारणावरून वाद झाल्याचे दाखवण्यात आले आहे. |
आज खूप छान साडी नेसून ती ऑफिसला गेली,फेंट गुलाबी रंगाची साडी अगदी साजेशीच jwellary व matching ची purse घेऊन ती निघाली. आज खूप नाराज होती नेहा, पण काय करणार सगळ्या बायकांनी theme ठरवलेली त्यामुळं सजून गेली ती.आज office मध्ये खूप छान वातावरण होतं, महिला दिन होता त्यामुळं सगळ्या ladies स्टाफ छान पैकी सजून सवरून आल्या होत्या. भाषणं झाली, कार्यक्रम झाले, पण नेहाला मात्र मूड गेल्यासारखं झालं. संध्याकाळ झाली आणि ती ऑफिस मधून घरी आली, सगळीकडे तिला अंधार दिसला, आणि अचानकपणे light ऑन झाली व तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला, पाहते तर तिचा नवरा अमित याने सारे decoration केलं होतं. घराचं व तिच्यासाठी खास त्याने स्वतः स्वयंपाक बनवला होता, नेहाने कडकडून अमित ला मिठी मारली व म्हणाली की मला वाटलं तू विसरलास आज काय आहे ते, त्यावर तो म्हणतो वेडाबाई, अग प्रत्येक दिवस तुझाच आहे ,आणि आज फक्त ते बोलून दाखवायचं असतं. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, खरंच प्रत्येक नवऱ्याला बायकोची किंमत कळली तर प्रत्येक स्त्रीसाठी दररोजच महिला दिन असेल नाही का! |
रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. पुणेः रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना दंड करण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिका आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना लक्ष्य करणार आहे. अशा नागरिकांना १८० रूपये दंड करण्यात येणार आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असून त्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरू आहे. रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम दिवाळीत थोडी थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळेच आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. मोळक म्हणाले, कचºयाबाबत थेट सर्वोच्च न्यायालयापासून ते राष्ट्रीय हरित प्राधिकरणापर्यंत महापालिकेवर वारंवार ताशेरे मारण्यात येत असतात. त्यामुळे हा विभाग जागरूक झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा मिळून तब्बल २ हजार २०० टन कचरा शहरात दररोज निर्माण होतो. त्यातील १ हजार २०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाते. ३०० टन कचºयाचे रिसायकलींग केले जाते व ५०० टन कचरा ओपन ग्राऊंडवर डंप केला जातो. स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाºयांकडून घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यात येत असतो. ते पालिकेचे पगारी नोकर नाहीत व त्यांच्या संस्थेला प्रशासकीय खर्चापेक्षा जास्त पैसे दिले जात नाहीत. त्यांना प्रत्येक कुटुंबाने महिना ६० रूपये द्यावेत व ओला तसेच सुका कचरा वेगळा करून द्यावा असे अपेक्षित आहे. तसे होत नाही. त्यांना ६० रूपये दिले जात नाही. कचरा रस्त्यावर फेकला जात असतो. यावर उपाय म्हणून आता कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून मोळक म्हणाले, रस्त्यावर कचरा फेकणे हा आपला हक्क असल्यासारखे अनेक नागरिक वागत असतात. कचरा वेगळा करून देत नाहीत. सार्वजनिक ठिकाणच्या कोपºयात कचरा फेकत असतात. त्या सर्वांना शिस्त लागावी यासाठी आता थुंकणाऱ्यांना दंड करण्यात येतो तसाच कचरा फेकणाºयांनाही करण्यात येणार आहे. प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड आकारला जाईल. त्याशिवाय फेकलेला कचरा जमा करून तो कचरा वाहणारी जी यंत्रणा महापालिकेने तयार केली आहे, त्यांच्याकडे द्यायची जबाबदारीही संबधितावरच असेल. अशा यंत्रणेची माहिती त्यांनी करून घेणे अपेक्षित आहे. नसेल तर महापालिका ती त्वरीत करून देण्यास तयार आहे. मात्र यंत्रणा असूनही त्याचा वापरच न करणे हा गुन्हाच आहे व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आरोग्य उपविधीत तशी तरतुदही आहे. थुंकणाºयांना दंड करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १५ जणांचे एक पथक तयार केले आहे. त्यांचे नेमुन दिलेले काम संपल्यावर दुपारी १२ ते २ या वेळात त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख चौकांमध्ये थांबून सिग्नल वगैरे ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. १५० रूपये दंड करण्यात येतो. लगेच पावतीही दिली जाते. थूंकलेली जागा त्याच्याकडूनच स्वच्छ करून घेण्यात येते. त्यासाठी बादली, फडके महापालिका देते. कचरा फेकण्याचे प्रमाण सकाळी व रात्री जास्त असते. त्यामुळे त्यासाठी तशा पथकांची रचना तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मोळक यांनी दिली. यात पैसे जमा करून उत्पन्न वाढवणे महापालिकेला अपेक्षित नसून शहर स्वच्छ रहावे हा प्रमुख उद्देश आहे असे ते म्हणाले. दंड आकारताना संबधितांबरोबर नम्रतेने वागावे, अरेरावी करू नये अशा स्पष्ट सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. त्यांना धडा मिळावा, शरम वाटावी एवढेच यात आहे. आतापर्यंत ४७६ जणांना दंड करून ७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला, मात्र कुठेही, कोणाशीही भांडणे, वादावादी झालेली नाही. उलट संबधितांनीच आता पुन्हा कधीही असे कुठेही थुंकणार नाही असे सांगितले आहे. |
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा पूर्वभाग. जत शहरापासून चाळीस किलोमीटरवर जालिहाळ बुद्रुक. दुष्काळ पाचवीला पूजलेला. दारिद्र्य, अशिक्षितपणा, निरक्षरता, बेरोजगारी फणा काढून उभे! हे सगळं आता गावकऱ्यांनीच बदलायला घेतलंय. - आणि त्यासाठीचं माध्यम आहे रेडिओ ! दोनवेळच्या खाण्याची ददात असणाºया बाईच्या पोटाला खंडीभर पोरं, त्यात ती अशिक्षित, कुढलेली. त्यामुळं लहानग्यांचं कुपोषण ठरलेलंच. काहीजणी सततच्या बाळंतपणात अडकलेल्या, तर काहीजणी वेळेआधीच गर्भाशयाच्या पिशव्या काढून बसणाºया. आता बायांना कळायला लागलंय, गर्भार असताना काय काळजी घ्यायची, कुपोषण कसं थांबवायचं आणि 'आॅपरेशन' कधी करायचं ते! आता इथला भूमिपुत्र दुष्काळाला टक्कर देत फोंड्या माळावर द्राक्ष, डाळिंबबागांसोबत ड्रॅगन फ्रूटसारखी शेतीही करू लागलाय! कॉन्ट्रॅक्ट शेतीतून माळरानावरच्या शेवगा, लाल भोपळ्याच्या उत्पादनात उतरू लागलाय. आणि हो. . . जेमतेम आठवीपर्यंत शिकणारी पोरं-पोरी आता पदवीनंतर व्यवसाय कौशल्याचे धडे घेऊन शहरात जाऊन पंधरा-वीस हजार रुपये कमवू लागलीत. हा बदल केवळ गेल्या पाच वर्षांतला. 'येरळावाणी' नावाच्या कम्युनिटी रेडिओच्या प्रयत्नांतून साकारलेला. सहा वर्षांपूर्वी म्हणजे ३१ जुलै २०११ रोजी सांगलीतल्या येरळा प्रोजेक्ट्स सोसायटीनं जत पूर्व भागातल्या जालिहाळ बुद्रुक इथं 'येरळावाणी ९१. २ एफएम' या कम्युनिटी रेडिओची मुहूर्तमेढ रोवली. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं. येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी या 'एनजीओ'चे प्रमुख एन. व्ही. देशपांडे यांची ही भन्नाट संकल्पना. त्यांना मोठी साथ मिळते अपर्णा कुंटे यांची. त्या रिसोर्सेस आणि रिसर्च टीमच्या प्रमुख, तर उदय गोडबोले प्रमुख कार्यक्रम अधिकारी आहेत. खरं तर 'येरळा'नं १९९८ पासून जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या २२ गावांच्या विकासासाठी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच शिक्षण, शेती, आरोग्य, महिला विकास अशा विषयांवर उद्बोधक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेता यावेत, यासाठी 'येरळावाणी'ची निर्मिती झाली. एन. व्ही. देशपांडे सांगतात, 'येरळा'चं काम, विकासाचे मुद्दे लोकांच्या कानावर जाण्यासाठी 'येरळावाणी' सुरू झाली. लोकहिताच्या कामांचा प्रचार आणि प्रसार कार्यकर्त्यांमार्फत व्हायचा; पण त्यातून काहीतरी सुटून जायचं. त्यातूनच मग कम्युनिटी रेडिओचं सुचलं. अर्ज केला, परवाना मिळाला. स्टुडिओ, टॉवर, ट्रान्समिटर, संगणक यासाठी 'आत्मा'नं हात दिला. रेडिओचा निर्णय झाला; पण प्रश्न होता दर्जाचा. कारण इथल्या लोकांनी रेडिओ स्वीकारण्याआड अडथळा होता भाषेपासून स्थानिक आवाजापर्यंतचा. कानडी आणि मराठी तेही तिथला 'टिपिकल' हेल काढून बोलणारी, संवाद साधणारी टीम हवी होती. मग शोध सुरू झाला. त्यातून चुणचुणीत टीम मिळाली. त्यांना तयार करण्यात आलं. कार्यक्रमांत लोकांना सहभागी करून घ्यायचं, दररोज त्यांच्या गरजांचे विषय घ्यायचे म्हणजे स्टुडिओ तिथंच उभारणं क्रमप्राप्त होतं. कारण जत पूर्वभाग सांगली शहरापासून दीडशे किलोमीटरवर ! जालिहाळ बुद्रुक इथं संस्थेचा कॅम्प्स होताच. त्यामुळं तिथंच एक स्टुडिओ उभारण्याचं ठरलं. कार्यक्रमांचं स्वरूप, रूपरेषा ठरवणं, एडिटिंग-रेकॉर्डिंगवर हात फिरवणं, कार्यक्रमांना आवश्यक त्या पूरक गोष्टी पुरवणं, सांगली-मिरज परिसरातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन देणं, त्यांचा सहभाग घेणं यासाठी मात्र सांगलीत दुसरा स्टुडिओ उभारला गेला. सगळी मिळून १२-१३ जणांची टीम. त्यात सफाईदार कानडी बोलणारे पाचजण. आता २२ गावांमध्ये 'येरळा' काम करते; पण ८० गावांतले जवळपास ८० हजारांवर श्रोते 'येरळावाणी'नं मिळवलेत. या मागास गावांतील लोकांशी संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचा सार्वजनिक विकासातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. रेडिओवरच्या कार्यक्रमांचं स्वरूप तसंच असतं. सततच्या दुष्काळामुळं आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी काहीसे मनोरंजक कार्यक्रम, शेती, युवक, महिला सबलीकरण, हवामान, आरोग्य, शिक्षणविषयक कार्यक्रमांचा त्यात समावेश असतो. तोट्यात जाणाºया शेतीला पर्याय म्हणून नोकरी, स्वयंरोजगार याबाबतच्या मार्गदर्शनावर अलीकडे जादा भर दिला जातोय. विशेष म्हणजे या कार्यक्रमांत लोकांनाच सहभागी करून घेऊन त्यांना हवं तसं व्यक्त होण्यास सांगितलं जातं. सुरुवातीपासूनच सगळे कार्यक्रम कानडी-मराठीत होतात. त्यावरची सगळी चर्चा तिथल्या बोली भाषेत ! कानडीमिश्रित मराठी आणि मागासलेपणाचा न्यूनगंड चिकटल्यानं तिथल्या लोकांना बोलतं करणं कौशल्याचं होतं. त्यासाठी तिथलीच टीम निवडल्यानं काम सोपं झालं. आज बिनधास्त बोलणारी टीम तर तयार झालीच; पण कार्यक्रमांत भाग घेणारेही बिनदिक्कत बोलू लागलेत, मनातलं काहीबाही स्पष्टपणे सांगू लागलेत. स्टुडिओतली टीम तंत्रज्ञानात तरबेज झालीच, पण वाड्या-वस्त्यांवरल्या बायाबापड्याही स्टुडिओत जाऊन कानाला हेडफोन लावून माईकवर फडाफडा बोलू लागल्या, कॉम्प्युटरची बटनं दाबून रेडिओ चालवू लागल्या ! मराठी कानावर पडल्यावर कावºया-बावºया होणाºया कानडी बायका रेडिओ ऐकून मराठी बोलू लागल्या! ! आधी श्रोते मिळवण्याची धडपड होती. त्यासाठी 'येरळावाणी'नं हजारभर रेडिओ सेट वाटले. गाडीवर बॅनर लावून प्रचार केला. नंतर मोबाइलनं प्रचाराचं काम चोख पार पाडलं. रेडिओ ऐकून माणसं 'शहाणी' झाल्याचं बघायचं असेल तर या भागात जावं. रेडिओवरून सांगितलं गेलं आणि माणसांच्या कृतीत बदल झाला. या माळरानावर साप, विंचू मुबलक. ते चावल्यावर आधी हमखास वैदूकडं नेलं जायचं. आता रेडिओवरचा सल्ला ऐकून सजगता वाढल्यानं थेट आरोग्य केंद्राचा, डॉक्टरचा रस्ता धरला जातोय. आरोग्याच्या प्रश्नांवर 'येरळावाणी'नं चार वर्ष काम केलं. डॉक्टरांच्या सल्ल्यांचा सातत्यानं 'डोस' दिला. आता आरोग्याच्या, शेतीच्या, शिक्षणाच्या प्रश्नांवर काहीजण तर 'येरळावाणी'त फोन करून विचारतात, कुठं जाऊ, काय करू म्हणून ! त्यामुळं 'आशा' वर्कर्सच्या कामालाही हातभार लागतोय. रेडिओवरचा सल्ला, कार्यक्रम ऐकून क्षयरोगावर योग्य उपचारांसाठी आरोग्य कर्मचाºयांकडं रांग लागू लागली. त्यामुळं इथलं क्षयरोग्यांचं प्रमाण पाच-दहा टक्क्यांवर आलंय. आता बायकांना तंत्रज्ञानाची शिकवणीही सुरू झालीय. काही दिवसांपर्यंत या बायकांना मिक्सरचा वापरही करायचं कळत नव्हतं. तिथं आता त्यांना घरात लागणाºया इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधलं बरचसं कळू लागलंय. बायकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण याबाबत गावागावात, घरोघरी जाऊन समजावणं शक्य नव्हतं. अशावेळी कम्युनिटी रेडिओ उपयोगाला आला. या प्रश्नांवर संवादात्मक कार्यक्रम, नभोनाट्य रचली गेली. काही कार्यक्रमांत तर असं जिणं अनुभवणाºयांना सामावून घेतलं गेलं. विधवा-परित्यक्त्यांना सामाजिक पत वाढवण्यासाठी बळ दिलं गेलं. . . मानसिकतेतला हा बदल हीच या कम्युनिटी रेडिओची फलश्रुती. या भागात भूमिहीन, अल्पभूधारक शेतमजूर तर दिसतातच; पण चाळीस-पन्नास एकरावर रान असूनही पाणी नसल्यानं दुसºया शेतात राबायला, पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड करायला जाणाºयांची संख्याही मुबलक. दरवर्षी उसाच्या गळीत हंगामात इथल्या ५० ते ५५ टक्के लोकवस्तीचं स्थलांतर होतं. आधल्या वर्षी टोळीच्या मालकाकडून उचल घ्यायची आणि पुढच्या वर्षी ऊसतोडीला जाऊन ती फेडायची, हे दुष्टचक्र मागं लागलेलं. विशेष म्हणजे दुष्काळ पडला की इथं पोरांची लग्नं पटापट होतात. कारण ऊसतोडीसाठी त्याला आयती जोडीदारीण मिळते ! अशा ऊसतोड मजुरांना, अल्पभूधारकांना रेडिओनं ऊर्जा दिली. पाणी-पीक व्यवस्थापनापासून मार्केटिंगपर्यंतच्या टिप्स मिळाल्या. या भागात भूमिहीन, अल्पभूधारक शेतमजूर तर दिसतातच; पण चाळीस-पन्नास एकरावर रान असूनही पाणी नसल्यानं दुसऱ्या शेतात राबायला, पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड करायला जाणाºयांची संख्याही मुबलक. दरवर्षी उसाच्या गळीत हंगामात इथल्या ५० ते ५५ टक्के लोकवस्तीचं स्थलांतर होतं. आधल्या वर्षी टोळीच्या मालकाकडून उचल घ्यायची आणि पुढच्या वर्षी ऊसतोडीला जाऊन ती फेडायची, हे दुष्टचक्र मागं लागलेलं. विशेष म्हणजे दुष्काळ पडला की इथं पोरांची लग्नं पटापट होतात. कारण ऊसतोडीसाठी त्याला आयती जोडीदारीण मिळते ! अशा ऊसतोड मजुरांना, अल्पभूधारकांना रेडिओनं ऊर्जा दिली. पाणी-पीक व्यवस्थापनापासून मार्केटिंगपर्यंतच्या टिप्स मिळाल्या. 'हॉर्टिकल्चर'चे धडे दिले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. सततच्या दुष्काळाला टक्कर देण्यासाठी शेतीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी या रेडिओनं ठरवलं. प्रबोधन केलं. तसे कार्यक्रम आखले. दहावी-बारावी शिकलेल्या पोरांना कौशल्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पोरांना जत, सांगली, मिरजेतल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून दिले. आता त्यातली पोरं शहरात नोकºया करू लागलीत. पोरीबाळी अंगणवाड्यांचं 'ट्रेनिंग' घेऊन काम करू लागल्यात. आधी घरातला थोरला पोरगा आठवीपर्यंतच शिकायचा. कारण पुढं शिकून नोकरीसाठी शहरात गेल्यावर शेतीकडं कुणी बघायचं, ही बापाला भीती. त्यामुळं आठवीनंतर त्याला शाळेतून काढून शेतीत गुंतवलं जायचं. आता तिशी-चाळिशीतली पिढी पोराबाळांच्या शिक्षणाबाबत सजग बनलीय, पोरांचं शिक्षण उसनवार करून पूर्ण करू लागलीय. हे थक्क करणारं अचाट काम पाहण्यासाठी आपण पोहोचतो, संखपासून पाच किलोमीटरवरच्या बोºयाळ वस्तीवर. तिथं कुडाच्या खोपटात भारती बिराजदार राहतात. गाव आसंगी तुर्क. शिक्षण 'एफवाय'पर्यंत झालेलं. भारतीताई गाव सोडून नवºयासोबत इथं येऊन राहिल्यात. माहेर कर्नाटक. शिलाईकाम येत होतंच. नवºयाच्या मित्रानं या दोघांना रेडिओ दिला आणि त्या रेडिओच्या रूपानं भारतीतार्इंना हितगूज साधायला कुणीतरी मिळालं. 'येरळावाणी' ऐकता-ऐकता त्या फॅशनेबल कपडे शिवायला लागल्या. आज त्यांच्याकडं लग्नसमारंभासाठी महिलांच्या कपड्यांचे गठ्ठे येऊन पडतात ! विरंगुळ्यासाठी त्यांनी रेडिओवरच्या प्रश्नमंजूषेत भाग घेतला. दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि बघता बघता त्या रेडिओवरील पाहुण्या होऊन गेल्या. आरोग्य, आहार, कृषी, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालनावरील कार्यक्रम त्या केवळ ऐकतच नाहीत, तर त्यात भागही घेतात. दर महिन्याला स्टुडिओत जातातच. आधी त्या भ्यायच्या. . . ती भीती गेली आणि 'कॉन्फिडन्स' आला. कसं बोलायचं, कसं रहायचं हे रेडिओनं शिकवल्याचं त्या सांगतात. आसपासच्या बायकांना घेऊन एकत्रित रेडिओ ऐकल्यानं वस्ती सुधारलीय. या वस्तीवर घराघरात 'टॉयलेट'चा वापर होतोय. पांडोझरीच्या सुरावती दत्तात्रय गडदे रेडिओमुळं अंगणवाडीसेविका बनल्यात. शिक्षण दहावी. 'जागर तिच्या आरोग्याचा' कार्यक्रम ऐकला आणि त्यांना बाईचं आरोग्य कळू लागलं. गरोदर असताना नियमित तपासणी, चौरस आहार याचं महत्त्व समजलं आणि ते सुरावतींनी आचरणात आणलं. नंतर त्यांनी स्वतःच आरोग्यविषयक कार्यक्रम केले. तेरा माणसांचं कुटुंब सांभाळणाºया सुरावतींची वाणी एकदम स्वच्छ. खणखणीत मराठी आणि तेही धीटपणानं बोलतात. शेती आतबट्ट्यात आली की, शेजारणीनं 'देव डब घातल्यानंच' नुकसान झाल्याची अंधश्रद्धा या भागात होती. पण रेडिओनं त्यामागची कारणं दाखवून देऊन विज्ञानवादी बनवलं. त्यावर सुरावती यांनी स्वतःच अंधश्रद्धा निर्मूलनावरील कार्यक्रम तयार करून ऐकवले. सुरावती यांचं लग्न लहानपणीच ठरलेलं; पण पोटाला असलेल्या दोन लेकींना पूर्ण शिकवूनच लग्नाचं बघायचं, असं त्यांनी घरात सगळ्यांना बजावून सांगितलंय. तिकोंडीच्या 'आशा' वर्कर असलेल्या अलका जाधव आणि महादेवी सावंत यांचे अनुभव तर भन्नाटच. लहान वयात बायकांची 'पिशवी' काढण्याविरोधात त्यांनी प्रबोधनाची चळवळच उभी केलीय. स्वतःच्या आरोग्याचंच कळत नसलेल्या बायका लहान वयात गर्भार राहिल्यानं पुढं बाळांच्या संगोपनाचं कसं बघणार? त्यावर या दोघींनी 'लग्न लहान वयात झालं, तरी १८ वर्षांपर्यंत आईकडंच थांबा', असा सल्ला द्यायला सुरुवात झाली. मग पोरी शिक्षण संपेपर्यंत तरी माहेरी राहू लागल्या. . . किशोरवयीन मुली, गरोदर, स्तनदा मातांचं आरोग्य कसं सांभाळावं, याचं शास्त्रशुद्ध शिक्षणच बायकांना मिळालं. अलका जाधव यांनी स्वतःच्या लेकीला 'येरळावाणी'च्या मदतीनं कौशल्य विकासाच्या कोर्सला पाठवलं. पाठबळ दिलं. ती आता थेट विदर्भातल्या अमरावतीत जाऊन नोकरी करतेय. जतपासून ४० किलोमीटरवरच्या दरीबडचीतली राजश्री मोर्डी आर. जे. बनलीय. सांगलीतल्या स्टुडिओतून कानडी आणि मराठीतून गप्पा मारत श्रोत्यांना रेडिओसमोर खिळवून ठेवते. मुलाखती घेते, एडिटिंगही करते. एकदम तेजतर्रार बोलणं. तिचा आत्मविश्वास सगळं काही सांगून जातो. महाराष्ट्राच्या कोपºयातल्या गावात हे काही आगळं घडतंय याचं श्रेय 'येरळावाणी'चं. कल्पकता हा 'येरळावाणी'चा जणू स्थायिभावच ! २०१४-१५ मध्ये 'लढा दुष्काळाशी' या कल्पक कार्यक्रमाला शेती आणि पर्यावरण विभागातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा राष्टÑीय पातळीवरचा पहिला पुरस्कार मिळालाय. (लेखक 'लोकमत'च्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत) कम्युनिटी रेडिओ म्हणजे काय? मुख्य प्रवाहातल्या व्यावसायिक रेडिओ या माध्यमात विकासाविषयक कार्यक्रमांना अलीकडं अत्यंत कमी जागा मिळतेय. त्यामुळं जिथं प्रसारमाध्यमांचं अवकाश मर्यादित असतं, तिथं कम्युनिटी रेडिओ ही संकल्पना राबवण्यास वाव मिळतो. विशिष्ट भागातल्या लोकांसाठी ही रेडिओ केंद्रं काम करत असतात. तिथल्या लोकांच्या गरजा, समस्या-उपाय, विकासाच्या संकल्पनांची माहिती याबाबतचे कार्यक्रम प्रसारित केले जातातच, शिवाय लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठीही हे केंद्र कार्यरत असतं. संबंधित भागातल्या लोकांचा विकासातील सहभाग वाढावा आणि त्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. कम्युनिटी रेडिओ चालतात कसे? कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यासाठी कोणीही केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडं अर्ज करू शकतो. व्यक्तिगत पातळीवर किंवा एनजीओंच्या माध्यमातून ही रेडिओ स्टेशन्स चालविली जातात. या रेडिओ केंद्रांचा कारभार जेमतेम दोन-तीन जण मिळून एखाद्या खोलीतूनही चालवू शकतात. एफएम रेडिओ चॅनल्सवर दिवसभर मनोरंजन आणि गाण्यांचा रतीब असतो. मात्र कम्युनिटी रेडिओ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चालवले जात नाहीत. व्यावसायिक रेडिओंना १० किलोवॅट्सचे, तर कम्युनिटी रेडिओंना केवळ ५० वॅट्सचे ट्रान्समिटर आवश्यक असतात. कम्युनिटी रेडिओंच्या प्रक्षेपणाच्या वेळा व कालावधी वेगवेगळा असतो. चार तासांपासून १६ तासांपर्यंत त्यांचं प्रक्षेपण चालतं. साधारणपणे १८ ते ३५ किलोमीटरचा परीघ हा त्यांचा टप्पा असतो. तथापि त्याबाहेरही काही अंतरापर्यंत त्यांचं प्रक्षेपण ऐकू येतं. |
महिन्या-दीड महिन्यात तुझी बदली करतो, असे त्याला सांगून त्याला राजगडचा किल्लेदार म्हणून नेमले. तोरण्यावर अशीच तात्पुरती नेमणूक करण्यात आली. सिंहगडचा किल्ला देवीसिंग बुंदेला यांजकडे देण्यात आला. हे सर्व झाले तरी मराठ्यांच्या हालचालीमुळे औरंगजेब अस्वस्थ होता. पुणे प्रांतातून निघून त्याने भीमाकाठी खेड येथे मुक्काम करण्याचे ठरविले. पुण्याहून तो खेडच्या वाटेवर असताना एप्रिल महिन्यात औरंगजेबाचा बक्षी (संरक्षण खात्याचा प्रमुख, सैन्याला पगार वाटप करण्याची जबाबदारी असलेला.) रूहल्लाखान हा मरण पावला. बावीस वर्षापूर्वी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा पासून त्याचे चार सेनाप्रमुख बक्षी हे मरण पावले होते. औरंगजेबाच्या मावसभावाचा मुलगा रुहुल्लाखान पहिला, हा इ.स. १६९२ मध्ये विजापूर जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या गलगली येथे वारला. त्यानंतर बक्षी मुफलिसखान हा इ.स.१७०० (सतराशे) च्या जानेवारी महिन्यात मीरज येथे वारला. बक्षी बहिरामंदखान हा इ.स.१७०२ च्या नोव्हेंबर मध्ये पेडगाव ( बहादुरगड ) जवळ वारला आणि आता रूहुल्लाखान दुसरा हा खेडच्या वाटेवर मरण पावला. मोगलांचे मनुष्यबळ हळूहळू कमी होऊ लागले होते, हे उघड आहे. गेल्या वीस वर्षात औरंगजेबाचे अनेक नामांकित सरदार मरण पावले होते. दिलेरखान, बहादुरखान खानजहान, रुहुल्लाखान, हिंमतखान, हसनअलीखान ही काही नावे झाली. त्यांची जागा घेईल अशी माणसे सापडेनात प्रातांच्या सुभेदाराच्या जागाही रिकाम्या पडू लागल्या. औरंगजेबाने दोन-दोन हुद्यांवर एकाच माणसाची नेमणूक केली. त्याचा आणखी एक उपक्रम म्हणजे एका हुद्यावर असलेल्या अधिकाऱ्याला लष्करी काम किंवा मोहिमेचे काम सांगितले की त्याच्या मूळच्या हुद्यावर त्याच्यातर्फे नायब (डेप्युटी) म्हणून नेमणुका करावयाच्या. बऱ्याच प्रांतावर तर त्याने आपली मुले आणि नातवंडे यांना सुभेदार म्हणून नेमले होते. पंजाब आणि काबुल हे प्रांत औरंगजेबाचा मोठा मुलगा शाहजादा मोअज्जम यांजकडे होते. याच मोअज्जमचा मोठा मुलगा मुईजोद्दिन (हा पुढे जहादारशहा या नावाने बादशहा झाला. इ.स. १७११) हा मुलतानचा सुबेदार (आणि ठठ्ठाचा पण सुबेदार - सिंध) होता. मोअज्जमचा दुसरा मुलगा अजीमुश्शान (ह्याचा मुलगा फरूखसीयर हा पुढे बादशहा झाला. १७१३ ते १७१९) हा बंगालचा आणि बिहारचा सुबेदार होता. औरंगजेबाचा दुसरा मुलगा आज्जम हा गुजराथचा सुबेदार तर आजमचा मुलगा बेदारूख्त हा औरंगाबाद आणि खानदेश, दोन प्रांतावर सुभेदार होता. सुभे हैद्राबादवर औरंगजेबाचा मुलगा कामबक्ष हा सुभेदार असला तरी तो नेहमी आपल्या बापापाशी असे- त्यामुळे हैद्राबादचे प्रशासक हे कामबक्षाचे नायब (डेप्युटी) म्हणून काम करीत. एकाच अधिकाऱ्याकडे किती हुद्दे होते ते पहाः औरंगजेबाचा मावस भाऊ आणि मुख्य प्रधान असदखान याचा मुलगा झुल्फिकारखान नुस्त्रतजंग याच्याकडे हैद्राबाद-कर्नाटक (तामिळनाडू) हा प्रांत होता. त्या बरोबरच बक्षी बहरामंदखानाच्या मृत्यूनंतर त्याला प्रमुख बक्षी म्हणून नेमण्यात आले. पुढे खानदेशात मराठ्यांची आक्रमणे थोपविण्यासाठी त्याला सतत तिकडे राहावे लागले. त्यामुळे बादशाही छावणीत बक्षीचा नायब म्हणून मतलबखान हा काम करू लागला. हैद्राबाद - कर्नाटक प्रांतावर झुल्फिकारखानाचा नायब म्हणून दाऊदखान हा काम पाही. औरंगजेबाच्या या शेवटच्या काळात त्याचे महत्त्वाचे आणि मातबर सरदार असे दोनच राहिले होते. एक झुल्फिकारखान आणि दुसरा शाहबुद्दीन फिरोजजंग, शाहाबुद्दीन फिरोजजगकडे सुभे बदिर आणि सुभे वऱ्हाड हे दोन सुभे देण्यात आले होते. फिरोजजंग हा स्वतः कंधार (नांदेड जिल्हा) जवळ तळ देऊन असे. वऱ्हाडच्या सुभ्यावर त्याच्या तर्फे नायब म्हणून सर्जाखान हा असे. १७०३ च्या नोव्हेंबर महिन्यांत नेमाजी शिंदे याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य सर्जाखानावर चालून गेले. लढाईत सर्जाखानाचा जावई मारला गेला आणि स्वतः सर्जाखान हा भाल्याच्या जखमा होऊन मराठ्यांच्या हाती कैद झाला. जबर खंडणी भरूनच त्याला आपली सुटका करून घेता आली. याच खान फिरोजजंगाचा मुलगा मीर कमरुद्दीन चीनकुलीजखान हा होय. हा इ.स.१७०२ पासून १७०७ पर्यंत विजापूरचा सुबेदार होता. निजाम हैद्राबादच्या घराण्याचा संस्थापक निजाम उल्मुल्क तो हाच होय. बादशहा खेडला पोहोचला त्यावेळी त्याच्या छावणीतील सैन्य वीस हजाराहून अधिक नसावे. त्याचे दोन प्रमुख सरदार तर बाहेरच होते. खेडच्या मुक्कामात असताना (बादशहा) त्याचा सरदार अमानुल्लाखान याने तुंग आणि तिकोणा हे किल्ले जिंकून घेतले. बादशहाने तिकोण्याचे नाव अमानगड आणि तुंगचे नाव बंकीगड असे ठेवले. या अमानुल्लाखानाचा आजा अलाबर्दीखान ह्याने सोळाशेएकतीस (१६३१ - ३२) च्या सुमारास मोगलांतर्फे नाशिक जिल्ह्यातील चांदवड, धोडप इत्यादी किल्ले गंभीरराव (सुप्रसिद्ध शिवकालीन संस्कृत कवी जयराम पिंडे याचा बाप) याच्याकडून जिंकून घेतले होते. अमानुल्लाखान याला त्याच्या आज्याची अलाबर्दीखान ही पदवी देण्यात आली. कल्याण-भिवंडी येथील ठाणेदार व फौजदार मातबरखान हा १७०४ च्या सुरुवातीस मरण पावला होता. त्याच्या हाताखाली नाशिकचाही भाग होता. ही ठाणी त्याचा नातेवाईक जैनुद्दीन अलीखान याजकडे देण्यात आली. सध्याच्या रायगड जिल्ह्यात जंजिऱ्याचा सिद्दी याकूतखान याने मोगलांच्या पाठिंब्याने आपले बस्तान बसविले होते. सरकारी कागदपत्राप्रमाणे तो दंडराजपुरीचा किल्लेदार आणि फौजदार म्हणून ओळखला जात असे. त्याने रत्नागिरी जिल्ह्यात हातपाय पसरुन महिपतगडचा किल्ला जिंकून घेतला होता. बादशहाने त्या किल्ल्याचे नाव याकूतगड असे ठेवले. महिपतगड हाती आल्यावर बादशहाला प्रतापगड जिंकून घेण्याची इच्छा झाली. या दृष्टीने सिद्दी याकूतखानाने तयारी करावी अशी बादशहाने आज्ञा केली. बादशहाचा हा डाव लक्षात येताच मराठ्यांचे बारा हजार सैन्य हे प्रतापगडाजवळ जमले आणि त्याने महिपतगड उर्फ याकूतगडाला शह दिला. त्यामुळे बादशहाची प्रतापगडची योजना बारगळली. सिद्दी याकूतखान याच्या विनंतीवरुन बादशहाच्या तोफखान्याचा अधिकारी तरबियतखान हा चिपळूण येथे मोगलांचे ठाण बसवून आला. दक्षिण कोकण आणि फोंडा प्रांत हे शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिले. मोगलांचे रसद तोडण्याच्या मराठ्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे बादशाही छावणीतील धान्य पुरवठा करणे हे मोठे जिकिरीचे काम होऊन बसले. एकोणीस मे ची मोगल दरबारची बातमीपत्रे पहाः "बादशहाना कळविण्यात आले की, छावणीपासून काही अंतरावर घोड नदीच्या भागात पंधराहजार मराठे स्वारांचे सैन्य गोळा झाले आहे. त्यांच्यावर चालून जाण्यासाठी बादशहाने जे सैन्य पाठविले ते अवघे आठ हजार तीनशे वीस स्वारांचे. बादशाही छावणीत महागाई फार वाढली आहे. गहू वगैरे धान्याचा भाव रुपयाला अडीच शेर झाला आहे. छावणीतील माणसे अतिशय हैराण झाली आहेत." छावणीत अधूनमधून रसद येई. धान्याची ने-आण करण्यासाठी वंजाऱ्यांचे तांडे हजारो बैलांवर धान्याच्या गोण्या लादून लांब-लांबून छावणीत आणीत. मराठ्यांची सैन्ये त्यांच्या तांड्यावर तुटून पडत आणि रसद लुटून नेत. हे टाळण्यासाठी मराठ्यांच्या विरुद्ध मोगलांना तीन-चार हजार स्वारांची संरक्षण पथके पाठवावी लागत. याशिवाय मराठ्यांची सैन्ये दक्षिण कर्नाटक, तामिळनाड, विजापूर प्रांत, औरंगाबाद, वऱ्हाड, खानदेश इत्यादी भागात मुक्तपणे संचार करीत होती. मोगलांचे सुभेदार बादशहाना लिहित की, "मराठ्यांची अनेक सैन्ये आहेत आणि एकेक सैन्य वीस ते पंचवीस हजार स्वारांचे आहे. " औरंगजेबाने आपल्या पत्रात त्यांना कळविले की, शिवाजीच्या काळात मराठ्यांचे सैन्य दहाबारा हजारांच्यावर नव्हते ते इतके कसे वाढले ह्याचा शोध घ्यावा. "तुमचे पत्र म्हणजे एक कोडेच वाटते." असे बादशहा आपल्या अधिकाऱ्यांना लिहितो. मराठ्यांचे व्यापक डावपेच या काळातील प्रमुख मराठे सरदारांची नावे मोगलांच्या कागदपत्रात आढळतात. ती म्हणजे धनाजी जाधव, बहिर्जी हिंदुराव घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे ही होत. दक्षिण कर्नाटकात मराठ्यांच्या आक्रमणामुळे हिंदुची म्हैसूर, चित्रदुर्ग आणि बिदनुर ही राज्ये वाचली तर तामिळनाडूमध्ये तंजावर हे सर्वनाशापासून बचावले गेले. मराठ्यांनी १७०४ च्या जून-जुलाईत हैद्राबाद शहरालाच वेढा घातला आणि तेथील सुभेदाराकडून जबर खंडणी वसूल केली. विजापूर-कर्नाटकाचा सुभेदार खुदाबंदाखान याच्यानेही मराठ्यांचा प्रतिकार करवला नाही. मराठ्यांना त्याने जबर रक्कम देऊन स्वतःची कातडी बचावली हे बादशहाला कळले. खुदाबंदाखान हा शाईस्ताखानाचा मुलगा, बादशहाचा मामेभाऊ अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याला औरंगजेबाने आपल्या खेडच्या छावणीत बोलावून घेतले. आणि विजापूर कर्नाटकच्या सुभेदारीवर हैद्राबादचा नायब सुभेदार रूस्तुमदिलखान याची नेमणूक केली. हैद्राबाद - कर्नाटकचा नायब फौजदार दाऊदखान पन्नी याच्याकडे हैद्राबादचा सुभाही लावून देण्यात आला. बादशाही छावणीत येणारी अगर इतरत्र मुगल सैन्याला मिळणारी धान्याची रसद तोडूनच मराठे थांबले नाहीत, त्यांनी यापेक्षाही मोठी आणि व्यापक योजना आखली. बादशहाच्या मोहिमेला लागणारा पैसा हा सतत उत्तरेकडून येत होता. तो खजिना नर्मदेवर अगर नर्मदेपार अडवून मोगलांचे दक्षिणेतील सैन्य कोंडीत पकडावे ही ती योजना होती. यासाठी नेमाजी शिंद्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे प्रचंड सैन्य प्रथम वऱ्हाडात घुसले आणि तेथील सुभेदाराला कैद करुन या खानदेशात सरकले. या सैन्याने नर्मदा ओलांडली आणि आगऱ्याहून येणाऱ्या खजिन्याच्या वाटेवर माळव्यातील सिरोंजपर्यंत धुमाकूळ घातला. बादशाहाची तारांबळ काय वर्णावी! मराठ्यांची ही योजना म्हणजे बादशहाच्या अस्तित्वावरच घाला. औरंगजेबाने प्रथम जी गोष्ट केली ती ही की, माळव्याचा अकार्यक्षम सुबेदार शास्ताखान (शिवकालीन शाइस्ताखानाचा मुलगा) याची बदली करुन त्यांच्या जागेवर आपला तडफदार नातू बेदारबख्त याची नेमणूक केली. खानदेश आणि औरंगाबाद भागात झुल्फिकारखान याला ठेवण्यात आले. फिरोजजंग याला वऱ्हाडातून निघून मराठ्यांवर चालून जाण्याची आज्ञा करण्यात आली. १७०४ मधील औरंगजेबाच्या अनेक पत्रांचा एकच सूर आहे. "उत्तरेकडून येणारा खजिना सुरक्षित आणा." हाच तो सूर. मोगल सैन्यातील सैनिकांचे पगार वर्षवर्षभर तुंबून पडले होते. छावणी सोडून अनेक लोक पळून जात. सरदारांच्या जहागिरीचे उत्पन्न येईना. त्यामुळे काही सरदार सरदाऱ्या सोडून घरी बसू लागले. अशी ही विलक्षण परिस्थिती होती. आदल्या वर्षापासूनच म्हणजे १७०३ पासूनच मराठ्यांशी तडजोडीची बोलणी करावी म्हणून औरंगजेबाचा मुलगा कामबक्ष याच्या मध्यस्थीने अंतस्थ प्रयत्न चालू होते. यासाठी मोगलांनी दोन मराठ्यांना दक्षिणेतून आणले. एक तंजावरचे राजे व्यंकोजी यांचा मुलगा रायभानजी आणि दुसरा म्हणजे दाऊदखानाच्या मार्फतीने आलेला शंकराजी मल्हार. या दोघांचा भाव मोगलांच्या छावणीत बराच वाढविण्यात आला. रायभान हा सहा हजारी तर शंकराजी हा पांच हजारी मनसबदार झाला. पण इतकेहीकरुन त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दक्षिणचा सुभा हा शिऱ्याच्या गोळ्यासारखा आयता घशात पडत असता मराठ्यांनी तरी तडजोडीस कां तयार व्हावे? असा प्रश्न समकालीन इतिहासकार भीमसेन सक्सेना विचारतो. तरी पण खेडच्या छावणीत रायभानजी भोसले आणि शंकराजी मल्हार हे दोघेही असून मराठ्यांशी बोलणी करण्याचे प्रयत्न करीतच होते. शाहूला सोडून द्यावे, स्वराज्य मराठ्यांच्या ताब्यात द्यावे आणि मराठ्यांचा चौथाईचा अधिकार मान्य करावा, अशा मागण्या मराठ्यांच्या होत्या असे दिसते. पण शाहूला सोडून देणे आणि स्वराज्याच्या भौगोलिक मर्यादा व चौथाईचे स्वरुप आणि निश्चिती यावरुन बोलणी फिसकटली, असे दिसते. औरंगजेबाच्या पत्रावरून या गोष्टी लक्षात येतात. औरंगजेबाला आता वाटू लागले की, शाहूला पुढे आणणे हे सर्वच दृष्टीने आवश्यक आहे. "तुमचाच राजा आहे आणि आम्ही त्याला फक्त मदत करीत आहोत" असे मराठ्यांना सांगायचे. आपल्यानंतर शाहाजादा कामबक्ष याला दक्षिणेत स्थिर करुन त्याला शाहूचे सहकार्य मिळेल अशी व्यवस्था करावयाची ही योजना औरंगजेबाच्या मनात घोळू लागली. "शाहू हा तुमचाच राजा आहे आणि किल्ला त्यालाच मिळणार आहे" असे सांगून औरंगजेबाने राजमाचीचा किल्ला मिळविला होता. आपल्या मृत्युनंतरच्या राजकारणात शाहूचे आणि शाहूमुळे मराठ्यांचे सहकार्यही करावे असी औरंगजेबाने इच्छा व्यक्त केली होती, पण तो डाव फसला. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांना नाटकशाळांकडून झालेल्या मुलीची लग्ने मोगल अधिकाऱ्यांशी लावून दिली होती. पण आता शाहू महाराजांचे कौतुक करण्यात औरंगजेबाने कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. राजे शाहू यांचे लग्न बादशहाच्या छावणीतील दैनंदिन अखबार म्हणजे बातमीपत्रात चौदा आणि पंधरा जून १७०४ या तारखांच्या पुढील नोंदीवरून बादशहाने शाहू महाराजांच्या लग्नाचे किती कौतुक केले याची कल्पना येईल. त्या नोंदी अशाः याचे लग्न बहादुरजी (जाधव) यांच्या मुलीशी ठरले. त्या निमित्त राजे शाहू यांस मदत म्हणून तेरा हजार रुपयांचे अलंकार देण्यात आले. बहादुरजी (जाधव) याने आपल्या मुलीच्या अंगावर दागिने घालावे म्हणून त्याला तेराशे रुपयाचे अलंकार देण्यात आले. काल (१४ जून) चौदा जून दिवस मावळता राजा शाहू हा स्वतःचे लग्न ठरल्यामुळे बादशहाच्या हुजुरात आला. त्याने बादशहाला मुजरा केला. बादशहाने त्याला मुंडावळीसाठी म्हणून हजार रुपये किंमतीचा माणकाचा शिरपेच, तेराशे रुपये किंमतीचा रत्नजडित कंबरपट्टा व खिलातीची वस्त्रे दिली. बादशहा म्हणाले "दौलत खान्यापासून (बादशहाच्या वास्तव्य स्थानापासून) बहादुरजीच्या तंबूपर्यंत नौबती वाजविण्यात याव्यात. राजा शाहू याच्या स्वारीसाठी छत्र असलेला लाल अंबारीचा हत्ती देण्यात यावा. वरातीमध्ये पुढील मंडळीनी राजा शाहू याच्याबरोबर राहावे -- (१) छावणीचा कोतवाल सर्रबराह खान, (२) नगार खान्याचा अधिकारी मुहंमद अमीन, (३) फत्ते दौलत कौल, (४) फरासखान्याचा अधिकारी मुहंमद हादी, (५) खाजगीतील निरीक्षक खिदमतगारखान याचा नायब हाजी सुहेल, (६) वरातीबरोबर हमीदोद्दीनखानाची पथके राहावीत. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली अशी पंधरा तारखेची नोंद आहे सिंहगड, राजगड, तोरणा इत्यादि किल्ले मोगलांच्या हाती गेलेले होते. ते मोगलांना पचू द्यायचे नाहीत म्हणून मराठ्यांच्या फौजा त्या किल्ल्याच्या भोवती सतत गस्त घालीत संधीची वाट पाहात होत्या. बादशहाच्या अंतःपुराचा पूर्वीचा तळ सोलापूर जिल्ह्यात भीमेकाठी ब्रह्मपूरी येथे होता. १६ डिसेंबर १६९९ मध्ये धनाजी जाधव याने ब्रह्मपुरीच्या छावणीवर हल्ला करून मोगलांवर मोठा कठिण प्रसंग आणला होता. बादशहाची मुलगी झिन्नतउन्निसा बेगम आणि त्याची बायको उदेपुरी बेगम यांच्यासकट बादशहाचा सगळा कबीला मराठ्यांच्या हाती पडण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. मोगलांनी मोठ्या शिकस्तीने आपला बचाव केला. पण या घटनेमुळे औरंगजेब हादरून गेला आणि त्याने आपली बायको, मुलगी आणि अंतःपुरातील इतरत्र स्त्रिया यांना पेडगाव ( बहादुरगड) या भीमेच्या कांठच्या मुगल किल्ल्यात आणून ठेवले. त्या तळाचे रक्षण करण्यासाठी बादशहाने आपला मातब्बर सरदार मुहंमद अमीनखान (भावी निजामउल्मुल्काचा चुलत चुलता आणि मुगल साम्राज्याचा भावी मुख्यप्रधान) याची नेमणूक केली. औरंगाबादेहून बादशाही छावणीपर्यंतच्या मार्गाचे रक्षण करण्याचे काम मुगलखान (निजामउल्मुल्काचा साडु) याजकडे देण्यात आले. खुद्द बादशहाच्या छावणीत एक तरबियतखान सोडला तर बाकीचे सरदार दुय्यम दर्जाचे होते. मुगलांच्या तर्फे लढणाऱ्या मराठ्या सरदारांची नावे आढळतात त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जतचे डफळे, बुधपाचगावचे घाटगे, म्हसवडचे माने अशी नावे आहेत. कान्होजी आणि गणोजी शिर्के हे शेवटपर्यंत मोगलांना चिकटून होते. पण मोगलांना सोडून मराठ्यांना मिळणारे मराठे सरदारही काही कमी नव्हते. १७०४ च्या बातमीपत्रात अशा फरारी झालेल्या मराठे सरदारात रावप्रभु हे एक नाव आढळते. दुसरे आश्चर्य म्हणजे औरंगजेबाला जाऊन मिळालेला धर्मांतरित सूर्याजी पिसाळ उर्फ शेख फत्तेउल्ला हा याच वर्षी मोगलांची छावणी सोडून पळाला आणि जाऊन ताराबाईला मिळाला. कृष्णा आणि भीमेच्या संगमाचा प्रांत हा कर्नाटकातील बेडर या लढाऊ जातीचा प्रांत आहे. मराठ्यांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या जमातीचे भरपूर सहकार्यं मिळविले. त्या प्रांतात मराठे आणि बेडर यांचे प्रचंड सैन्य गोळा झाले. बेडरांचा किल्ला, वाकिणखेडा (गुलबर्गा जिल्हा) जिंकून घेण्यासाठी औरंगजेब खेड सोडून नोव्हेंबर महिन्यांत बाहेर पडला. पाबळ, कोरेगांव असे करीत तो बहादूरगडला आला. येथे झिन्नतउन्निसा बेगम आणि उदेपुरी बेगम ही त्याला भेटली. बहादुरगड येथेही औरंगजेबाला आपल्या कबिल्याची सुरक्षितता वाटेना. त्यानें आपल्या कबिल्याची अहमदनगरकडे रवानगी करण्याची व्यवस्था केली. पळसदेव, अकलूज असे करीत तो ३१ डिसेंबर १७०४ रोजी पंढरपूर येथे आला. प्रवासातच त्याला कळले की मराठ्यांनी सामानगड आणि लोहगड हे किल्ले जिंकून घेतले आहेत आणि सिंहगडला गंभीर धोका निर्माण झाला आहे. १७०४ च्या अखेरीस औरंगजेबापाशी छावणीत जी फौज शिल्लक राहिली ती अधिकाऱ्यांची पथके वगैरे जमेस धरून वीस हजाराहून अधिक नव्हती. वाकिणखेड्याला वेढा घालण्यासाठी विजापूरचा सुभेदार (भावी निजाम उल्मुल्क) हा पुढे गेला होता. तो महाराष्ट्रातून बाहेर पडला हे मराठ्यांनाही हवे होते, आणि त्यामुळे मराठ्यांना किल्ले घेणे सोयीचे होऊ लागले. अशी ही हकीकत आहे औरंगजेबच्या खेडच्या मुक्कामाची. देवी दयाळ रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-८०. सेतूमाधवराव पगडी. |
IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. युवा खेळाडूंना सोबत घेऊन भारताला ही मालिका जिंकायची आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागी कोणाला संधी मिळते हा खरा पेच संघ व्यवस्थापनासमोर आहे. याचे उत्तर कर्णधार रोहितने दिले आहे. यशस्वी जैस्वालसह रोहित ओपनिंगला येणार आहे. शुबमन गिलने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळायचे आहे अशी विनंती राहुल द्रविडकडे केली होती आणि ती मान्य झाल्याचे रोहितने सांगितले. त्याशिवाय या खेळपट्टीचा आधीचा अनुभव लक्षात घेता दोन फिरकी आणि तीन जलदगती गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील असेही रोहित म्हणाला. भारतीय संघ बऱ्याच वर्षांपासून लेफ्ट राईट कॉम्बिनेशनच्या शोधात होता आणि आता सलामीला तसेच चित्र दिसेल. रोहितच्या सांगण्यानुसार तो आणि यशस्वी सलामीला त्यानंतर गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन/ के एस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव अशी टीम असू शकते. भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी. वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप कर्णधार), एलिक एथानाझे, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशूआ सिल्वा, शेनॉन गॅब्रीएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेयमन रेइफेर, केमार रोच, जोमेल वॉरिकन. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. त्यामुळं रेल्वे चालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळं उद्रेक झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. लासलगाव- सोमवारी सकाळी लासलगावमधून (Lasalgaon) एक मोठी दुर्घटना समोर येत आहे, लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ (Railway Stations) रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. त्यामुळं रेल्वे चालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळं उद्रेक झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. (Lasalgaon Railway Accident) आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान हे कर्मचारी रेल्वे ट्रकवर काम करत होते, चालकाच्या बेसावधमुळं हे बळी गेल्याची भावना नातवाईकांनी व्यक्त केली आहे, या घटनेत चारही कर्मचारी जागेवरच ठार झाले. कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. यामुळं पुढील अनर्थ टळला आहे. पण चालकाविरोधात लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते. रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संताप.... दरम्यान, या घटनेमुळं चालकाविरोधात लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावर अपघात ग्रस्त टॉवर रेल्वे गाडी आली असता मृत्युमुखी पडलेल्या चौघा ट्रेक मेंटेनरचे साथीदार लासलगाव रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी टॉवर रेल्वे गाडीच्या वाहन चालकाला खाली उतरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिस कर्मचारी या ठिकाणी हजर होते. त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता रेल्वेच्या चालकाला सुरक्षित स्थळी लासलगाव पोलिस कार्यालयाला घेऊन गेले. घटनेमुळे रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. कसा झाला अपघात? रेल्वे लाईनची काम करणारी दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सहा वाजता उभी होती. या टॉवर गाडीला लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचे होते. रेल्वे पोल नंबर 230 /231 च्या दरम्यान या गाडीला काम करायचे होते. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमेन कामासाठी हजर होते. त्यांचे काम सुरू होते. मात्र, टॉवर गाडी ही डाऊनलाईननेच उगाव दिशेकडे गेल्याने या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आत गाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे चौघे कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले. |
समुपदेशकांकडे पेपरतपासणीच्या कामाची चौकशी, परीक्षार्थ्यांना सतत 'बिझी' टोन । Saamana (सामना) परीक्षेदरम्यान मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली हेल्पलाइन काही मॉडरेटर्स आणि नियामकांमुळे सतत 'बिझी' आहे. या हेल्पलाइनवर मॉडरेटर्सच आपल्या व्यथा मांडत असून 'पेपरतपासणीसाठी बोर्डाकडून अद्याप विचारणा झालेली नाही', असे सांगत आहेत. 'सहकारी शिक्षकाला पेपरतपासणीसाठी बोलावणे आले आहे. मला कधीपर्यंत कॉल येईल', अशी चौकशीही हेल्पलाइनवरील समुपदेशकांकडे होत आहे. 18 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. यादरम्यान तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडाळांमार्फत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या हेल्पलाइन क्रमांकावर परीक्षार्थी, पालकांबरोबच शिक्षकांचे फोनही खणाणत आहे. परीक्षार्थ्यांकडून हॉलतिकीट हरविल्याबाबत, बैठक क्रमांक, कोणत्या शाईचे पेन वापरावे यापासून अभ्यास झाला नाही, दडपण आले आहे, परीक्षा केंद्राची चौकशी करण्याविषयीचे कॉल येत असताना बारावीचे काही शिक्षक पेपरतपासणीच्या कामाची विचारणाही या हेल्पलाइनवर करीत आहेत. मात्र या शिक्षकांना त्यांच्या प्रश्नांचे काहीच उत्तर समुपदेशक देऊ शकत नाही. यंदा शिक्षण मंडळाने मॉडरेटर्स म्हणून नेमणूक पत्र शिक्षकांना पाठविलेले नाही. त्याऐवजी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आता हे एसएमएस किती शिक्षकांना मिळाले, किती शिक्षकांनी पाहिले हा संशोधनाचा विषय आहे. याआधी दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थीही हेल्पलाइन सुरू झाल्यावर डुप्लिकेट मार्कशीटविषयी या हेल्पलाइनवरच चौकशी करीत असल्याचे बोर्डाच्या समुपदेशकांनी सांगितले. डुप्लिकेट मार्कशीट मिळविण्यासाठी काय करावे लागेल, अर्ज कसा लिहावा, याची विचारणाही परीक्षा काळातच काही विद्यार्थी करीत आहेत. |
ब्रुसेल्स- अँड्रॉईडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलकडून तब्बल २० हजार कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो. ही कारवाई गुगल कंपनीवर या आठवड्यात केली जाऊ शकते. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुगल आपले अँड्रॉईड सॉफ्टवेअर मोफत देते, पण गुगल त्या बदल्यात वेब ब्राउझर व सर्च इंजिनसारखे अॅप इन्स्टॉल करण्याची सक्ती करते, असा गुगलवर आरोप आहे. अँड्रॉईड फोनचा युरोपच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये जवळपास ७५ टक्के हिस्सा असून या कंपन्यांनी तक्रार केली होती की, आम्हाला गुगलच्या दबावामुळे गुगल सोडून दुसऱ्या कंपन्यांचे सर्च इंजिन व ब्राउझर्सचा वापर करता येत नाही. गुगलने या आरोपाचे खंडन करताना आमच्याकडून फोन उत्पादकांवर दबाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मागील तीन वर्षांपासून या प्रकरणाची युरोपातील प्रतिस्पर्धी आयोगाचे प्रमुख मार्गारेट वेस्टेजर हे चौकशी करत होते. या आयोगाला वार्षिक उलाढालीच्या १० % दंड लावण्याचा अधिकार आहे. त्यानुसार हा दंड ठोठावला जाऊ शकतो. |
- आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं पहिल्यांदाच आज भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत दिली जाणार आहे. - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, कुलभूषण जाधव यांना सोमवारी राजनैतिक संपर्क उपलब्ध करून दिला जाईल. - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं की, व्हिएन्ना करार, आयसीजेचा निर्णय आणि पाकिस्तानी कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामाबादः आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं पहिल्यांदाच आज भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत दिली जाणार आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, कुलभूषण जाधव यांना सोमवारी राजनैतिक संपर्क उपलब्ध करून दिला जाईल. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं की, व्हिएन्ना करार, आयसीजेचा निर्णय आणि पाकिस्तानी कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानंही लिहिलं की, भारतीय कमांडर जाधव हेरगिरी, दहशतवाद आणि तोडफोडीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) सुनावणी झाल्यानंतर पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी दिली. याआधी पाकिस्ताननं कुलभूषणपर्यंत राजनैतिक प्रवेश कायमच नाकारला आहे. आयसीजेच्या सुनावणीनंतर अखेर पाकिस्ताननं कुलभूषण यांना दूतावासाची मदत देण्यास तयार असल्याचं सांगितलं. ही प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाणार असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे कुलभूषण जाधव आज दुतावासातील अधिकाऱ्यांना भेटतील. दरम्यान याआधीही पाकिस्ताननं भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र ही भेट थेट झाली नव्हती. त्यावेळी बरेच अडथळे होते. याआधी जाधव यांना दूतावासाची मदत देण्यासाठी पाकिस्ताननं भारतासमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यात या भेटीदरम्यान पाकिस्तानचा एक अधिकारी उपस्थित राहिल. भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि ही चर्चा रेकॉर्ड होईल अशा अटी ठेवल्या होत्या, ज्याला भारतानं त्याला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर भारतानं पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणता जाधव यांना राजनैतिक प्रवेश देण्यास सांगितले होतं, तेव्हापासून भारत पाकिस्तानच्या उत्तराची वाट पहात होता. आता सुमारे १ महिन्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या मागणीला उत्तर देताना अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर व्यवसायानिमित्त जाधव यांचं इराण येथून अपहरण केलं गेलं होतं. त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आलेत असं भारताचं म्हणणं आहे. |
त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेच्या आश्रमशाळेतील पहिलीचा विद्यार्थी निवृत्ती बाळू चावरे (६, रा. कळमुस्ते (ह) ता. त्र्यंबकेश्वर) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी सदर मुलाचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचा दावा केला असला तरी या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत आश्रमशाळेतील अधीक्षक नंदू देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती चावरे याच्याबरोबरच त्याच्या समवेत त्याच्या तीन बहिणीही शिक्षण घेत आहेत. होळीच्या सणासाठी सोमवार, दि. ६ मार्च रोजी सर्व भावंडे आपल्या पालकांबरोबर गेले होते. पालक कळमुस्ते ह. येथील असले तरी ते पोटा पाण्यासाठी विंचूर, ता. निफाड येथे द्राक्ष मळ्यात कुटुंबीयांसमवेत राहतात. तेथे या मुलांना नेल्यानंतर सुट्यांच्या काळात त्यांनी द्राक्षांचे सेवन केले. द्राक्षांच्या अतिसेवनाने निवृत्ती यास खोकला, सर्दी झाली होती. नेहमीचा सर्दी-खोकला म्हणून पालकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. पालकांनी मुलांना दि. १३ मार्च रोजी आश्रमशाळेत आणून सोडले आणि ते परत विंचूरला निघून गेले. सर्व मुले व्यवस्थित होती. सायंकाळच्या भोजनास ही मुले गेली नाहीत. कारण त्यांनी घरूनच डबा आणला होता; पण सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास खांबाला धरून चकरा मारणारा निवृत्ती अचानक चक्कर आल्यामुळे खाली कोसळला. हातापायाची कापरे होऊ लागल्याने आश्रमशाळेतील देवरे व जाधव या शिक्षकांनी त्यास जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल येवले यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली तर पालकांनाही आणण्यात आले. शवविच्छेदनात मृत्यूचे निदान न्यूमोनिया असल्याचा रिपोर्ट डाॅक्टरांनी दिला असल्याचेही देवरे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन गवळी करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वच आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवृत्तीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम लचके, जिल्हा सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उपसचिव मुरलीधर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. |
नवी दिल्लीः फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने(एसीसी) सन १९८८ व १९९९ बॅचच्या देशभरातील २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. त्यात शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी व सदानंद दाते यांनाही पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. दाते हे मुंबईतील कायदा व सुवस्था तसेच गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबाबत दाते यांचा गौरवही करण्यात आला. ते तीन वर्षे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही होते. मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) कार्यरत आहेत. त्यांनी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (आयबी) काम केले आहे. मुंबई गुन्हे शाखेत ते कार्यरत होते. ते महाराष्ट्र एटीएस व सीआयडी प्रमुखही होते. रश्मी शुक्ला ह्या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्या सध्या हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्या तेथे काम करत आहेत. राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा ठपका ठेवला होता. यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रश्मी शुक्ला केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या. तरी याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशी केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर याप्रकरणी अटकेची टांगती तलवार होती. मात्र सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लिन चिट दिली. त्यानंतर याचा तपास बंद करण्यात आला. मात्र याचा नव्याने तपास करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने गेल्या वर्षी पोलिसांना दिले. |
एमपीसी न्यूज - आळंदी येथे दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने फुटपाथवर व रस्त्यावरील दुकानांवर अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. नगरपरिषद चौक ते माऊली मंदिर परिसर, महाद्वार चौक ते शनी मंदिर परिसर, चाकण रस्ता भाजी मंडई ते चावडी चौक, तसेच प्रदक्षिणा रस्ता या ठिकाणी फुटपाथवर व रस्त्यावर असणाऱ्या दुकानांवर अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आली. मंदिर परिसरात हार, फुले, प्रसाद तसेच इतर वारकरी व विविध साहित्य वस्तू दुकाने असल्याने, दुकानातील साहित्यांचे वस्तूंचे नुसकान होऊ नये. म्हणून तेथील दुकानदारांना ठरलेल्या सीमा रेषेच्या आत, दुकानांच्या आत साहित्य वस्तू त्वरित ठेवण्याची नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सक्त ताकीद देण्यात आली. तत्पर माऊली मंदिर परिसरातील व शनीमंदिर परिसरातील दुकानदारांनी यावेळी स्वतःहुनच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली. त्यामुळे जेसीबी चालकासह पालिका कर्मचाऱ्यांचे बरचसे श्रम वाचले. या अतिक्रमण कारवाई दरम्यान यावेळी आळंदी दिघी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आळंदी नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागीय प्रमुख सचिन गायकवाड व आळंदी नगरपरिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. |
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. कोरोना महामारीचा जगातील अनेक देशांवर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी या महामारीचा ज्या पद्धतीने सामना केला, त्यासाठी त्याच्या प्रशासनाचे जबरदस्त कौतुक होत आहे. त्यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. (New zealand reporter asked question to pm jacinda ardern face expression goes viral) न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि आरोग्य महासंचालक डॉ. अश्ले ब्लूमफील्ड कोविड -19 संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देत होते. या दरम्यान एका पत्रकाराने त्याना विचारले, ऑकलंड रुग्णालयातील एक रुग्ण आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर लैंगिक संबंधाचा आरोप आहे. सध्य स्थितीत, याला हाय-रिस्क कृत्य म्हटले जाऊ शकते का? हा प्रश्न ऐकताच जॅसिंडा यांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रचंड बदलले आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या प्रश्नाचे उत्तर देताना, डॉ ब्लूमफील्ड म्हणाले, मला वाटते, की हे एक अत्यंत हाय-रिस्क कृत्य असू शकते. मात्र, मला या घटनेची माहिती नाही. यानंतर, पीएम आर्डर्न यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, मला वाटते की जरी कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले गेले तरी रुग्णालयात भेटीच्या वेळेस अशी कोणतीही क्रिया करणे चूकच आहे. |
याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे. नवी दिल्ली - याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे. याकूबसाठी दयेची मागणी करणा-या अर्जावर भाजपा खासदाराची स्वाक्षरी असणे दुःखद असून, शत्रुघ्न सिन्हा यांची भूमिका पक्ष विरोधात असल्याचे जेटलींनी सांगितले. सिन्हा यांनी स्वाक्षरी करणे पक्षासाठी लज्जास्पद आहे ? या प्रश्नावर जेटली म्हणाले की, निश्चितच उलट तुम्ही हा प्रश्न ज्यांनी स्वाक्षरी केली त्यांना विचारला पाहिजे. मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कोणतीही दया दाखवू नये अशी आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे जेटलींनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हा यांनी पहिल्यांदा पक्ष विरोधी भूमिका घेतलेली नाही. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी पक्षावर असलेली आपली नाराजी प्रगट केली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना नुकतीच त्यांनी भाजपाचे मुख्य स्पर्धक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. |
अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांचे घरातील व्यक्तींकडून लाडकोड होतात, ते घरात अगदी हक्काने सगळीकडे वावरत असतात, लोळत-फिरत असतात. प्राण्यांसोबत राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी-आनंदासाठी चांगलंच आहे. पण तुमच्याकडे पाळीव प्राणी असेल तर काही मुलभूत काळजी घेणंही गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहावं. कारण प्राण्यांमुळे काही आजारांचा संसर्ग होऊ शकतो. रेबीज किंवा टॉक्सोप्लाझोसिस (एकपेशीय परजीवीमुळे होणारा संसर्ग) यांसारखे गंभीर आजारही प्राण्यांमुळे होऊ शकतात. झुनोसिस (मनुष्य आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होऊ शकणारे आजार) या संकल्पनेअंतर्गत 200 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. याचं जर अजून विश्लेषण केलं तर आपल्याला ज्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो त्यातल्या 10 पैकी 6 आजार हे पाळीव प्राणी किंवा प्राण्यांमुळे पसरू शकतात. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनची ही आकडेवारी आहे. आता यामुळे घाबरून प्राणी पाळण्याची कल्पनाच सोडायची का? किंवा आता जे प्राणी आपल्या घरात नांदताहेत त्यांचं काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असं काहीही करण्याची गरज नाहीये. पाच मुलभूत गोष्टींचं पालन केलं तरी तुम्ही प्राण्यांपासून होणाऱ्या संसर्गाला दूर ठेवू शकता. . . व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर रोगजनकांच्या संपर्कात येण्याचा धोका टाळू शकता. तुमच्या पाळीव प्राण्यांना कोणताही त्रास होत नसला तरी वर्षातून किमान एकदा त्यांना पशुवैद्यकाकडे न्यायला हवं, त्यांची तपासणी करून घ्यायला हवी. तुम्ही व्हेटरनरी डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमच्या पेटच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. त्यांच्या काही मुलभूत चाचण्या केल्या जातात. या भेटीत प्राण्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत असलेल्या दोन गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांचं लसीकरण रेकॉर्ड अद्ययावत करणे. (यामध्ये दरवर्षी ज्या लशी घेणं आवश्यक असतं, त्यांचा समावेश आहे. ) आता यामध्ये आपण कुत्रे आणि मांजर हेच मुख्य पाळीव प्राणी आहेत, असं गृहीत धरलं तर सगळ्यांत महत्त्वाची आहे रेबीज विरुद्धची लस. विषाणूमुळे होणाऱ्या या रोगामध्ये मृत्यूदर हा जवळपास 100% आहे. बोटुकाटू इथल्या पॉलिस्टा स्टेट युनिव्हर्सिटी (युनेस्प) च्या व्हेटरनरी मेडिसीन आणि झुटेक्निक्स विभागातील प्राध्यापक सिमोन बाल्डिनी सांगतात की, रेबीजच्या विषाणूचा संसर्ग लाळेद्वारे, प्राण्याने चाटण्यामुळे, चावण्यामुळे किंवा ओरखडल्यामुळे होऊ शकतो. त्यामुळेच प्राण्यांना नियमितपणे रेबीज प्रतिबंधक लस देणं हे तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठीही अत्यावश्यक असतं. दुसरी नियमित काळजी म्हणजे जंतनाशक औषध देणं. या औषधांमुळे शरीरातील परजीवी काढून टाकल्या जातात. "पाळीव प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यानांमध्ये फिरायला नेल्यावर विष्ठा केल्यास मालकांनी ती उचलावी. कारण त्यातूनही जंतुसंसर्ग होऊ शकतो," असं बाल्डिनी सांगतात. प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घेताना त्यांचे अन्न आणि पाणी ठेवलेल्या कंटेनरची देखभाल करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी ते लघवी करतात आणि मलविसर्जन करतात, त्या जागाही स्वच्छ ठेवायला हव्यात. कारण या जागा जीवाणू संसर्गाचे स्रोत ठरू शकतात. मांजरांबद्दल बोलायचं झाल्यास टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाचा जीवाणू. त्याच्यामुळे टॉक्सोप्लाझोसिस नावाचा आजार होऊ शकतो. साओ पाउलो मधील एमिलिओ रिबास संसर्गजन्य रोग संस्थेतील (Emílio Ribas Infectious Diseases Institute) उष्णकटिबंधीय आजार आणि झुनोसेससाठीच्या बाह्यरुग्ण क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर मार्कोस व्हिनिसियस डी सिल्वा म्हणतात, "हे सूक्ष्मजीव प्राण्यांच्या पचनमार्गात असतात आणि विष्ठेमधून शरीराबाहेर टाकले जातात. " "एखादी व्यक्ती अस्वच्छ पाणी किंवा न शिजवलेले अन्नपदार्थ यांच्यामार्फत या जीवाणूंच्या थेट संपर्कात येण्याची शक्यता असते. " काही वेळा टोक्सोप्लाझोसिस खूप गंभीर ठरू शकतो. विशेषतः गर्भवती महिलांमध्ये तो वि चिंताजनक आहे, कारण यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भात विकृती निर्माण होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी मांजरींच्या विष्ठेची चाचणी करून त्यात टॉक्सोप्लाझ्मा जीवाणू आहेत की नाही हे तपासणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही चाचणी कुत्र्यांच्या पिलांमध्ये पण घेतली जाते. जर मांजरांच्या शरीरात या विषाणूचं अस्तित्व आढळलं, तर त्यावर उपचार उपलब्ध आहेत. दुसरी पायरी म्हणजे मांजर 'बाथरूम' म्हणून वापरत असलेल्या बॉक्सची स्वच्छता नियमित करणे. त्यातील विष्ठा दररोज काढण्याव्यतिरिक्त हा बॉक्स आठवड्यातून किमान दोनदा स्वच्छ करायला हवा. त्यातलं खाण्याचं आणि पाण्याचं वाडगं हे नियमित साबणाने स्वच्छ करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाताचे जीवाणू इतर ठिकाणी पसरू नयेत म्हणून साफसफाईनंतर आपले हात स्वच्छ धुणे. गर्भवतींसाठी टोक्सोप्लाझोसिस हा इतका गंभीर आहे की, तज्ज्ञांच्या मते त्यांनी गरोदरपणात मांजरांचा बॉक्स साफ करायलाच जाऊ नये. जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यासाठी पाळीव प्राण्यांच्या इतर वस्तूंची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ- तुमच्या मांजराची कचरा पेटी किंवा कुत्र्याची शौचाची मॅट. या गोष्टी तुमचं स्वयंपाकघर, खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून शक्य तितक्या लांब ठेवाव्यात. काही प्राण्यांना शी-शू करण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, जेणेकरून ते इथे-तिथे घाण करणार नाहीत. त्यांनी केलेला कचरा हा सातत्याने साफ करावं. ज्या गोष्टींशी त्यांचा सातत्याने संपर्क येतो, ते भाग ब्लीच किंवा अँटीबॅक्टेरियल द्रव्याने निर्जंतुक करायला हवेत. काही प्राण्यांसाठी या गोष्टी खूप कमी प्रमाणात लागू होतात. उदाहरणार्थ- कासव. कासव वारंवार साल्मोनेला बॅक्टेरिया उत्सर्जित करतात. हे जीवाणू माणसांच्या आतड्यांमध्ये होणाऱ्या संसर्गाचं प्रमुख कारण आहेत. 4. घराबाहेरच्या जागेचीही काळजी घ्या. पाळीव प्राणी असतील तर केवळ घरातल्या गोष्टींचीच नाही, तर बाहेरच्या जागेचीही काळजी घ्यायला हवी. आरोग्य मंत्रालयाचे झुनोसेस सल्लागार असलेले सिल्वा सांगतात की, घराबाहेरच्या जागा या पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांच्यातील संपर्क बिंदू असतात. शहरात येणाऱ्या वटवाघळांपासून धोका असतो "किंवा उंदीर मूत्राच्या वासाने येतो," असं साओ पाउलो (PUC-SP) च्या पॉन्टिफिकल कॅथलिक विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर आणि प्राध्यापक स्पष्ट करतात. उंदरांच्या शरीरात तसेच उंदरांच्या मूत्रात लेप्टोस्पायरा नावाचे जीवाणू असतात, त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. हा सूक्ष्मजीव त्वचेतून किंवा श्लेष्मल त्वचेतून आत प्रवेश करतो. त्याच्यामुळे सौम्य तापापासून ते अत्यंत गंभीर रक्तस्रावापर्यंत त्रास होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे परसबागेकडे विशेष लक्ष देणे. नाले किंवा पाइप आउटलेट स्वच्छ ठेवणे. पाळीव प्राण्यांचे अन्न सुरक्षित आणि इतर प्राण्यांना पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी साठवणे, कचरा रोज काढणे, भंगार सामान वेळोवेळी दूर करणे. सिमोन बाल्डिनी सांगतात की, लेप्टोस्पायरोसिसबद्दल बोलायचं तर कुत्र्यांसाठी एक लस उपलब्ध आहे. ती दर बारा महिन्यांनी देणं गरजेचं आहे. कुत्र्यांना होणारा अजून एक चिंताजनक रोग म्हणजे लेशमॅनियासिस. या प्रोटोझोआचा प्रसार डास चावल्यामुळे होतो. या डासांची पैदास कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये (जसे की बागेत जमा होणारी कोरडी पाने) होते. हा कचरा साचू न देणे हा रोग टाळण्याचा एक मार्ग आहे. "प्रतिबंधक उपाय म्हणून कुत्र्यांना रिपेलन्ट कॉलर वापरू शकता आणि लेशमॅनियासिस प्रतिबंधक लस देऊ शकता," लुचेस म्हणतात. ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आहे. यामुळे प्राण्यामधील अनपेक्षित प्रजननाला अटकाव होतो. यामध्ये अजून एक गोष्ट आहे. मांजरासारख्या काही प्रजाती प्रजनन हंगामात मारामारी करतात. या संघर्षांमध्ये एकमेकांना चावतात आणि ओरखडतात. या उघड्या जखमा व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांच्या प्रसाराचे स्त्रोत आहेत. निर्बिजीकरण केलेल्या प्राण्यांमध्ये हे वर्तन होत नाही आणि त्यामुळे आपल्यालाही संरक्षण मिळते. *बीबीसी न्यूज ब्राझीलवरून आंद्रे बिएरनथ यांच्या रिपोर्टिंगसह. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. ) |
नवी दिल्ली । केंद्रीय विश्वस्त मंडळाची (Central Board of Trustees) बैठक पुढील महिन्यात 4 मार्च रोजी श्रीनगर येथे होणार आहे. ज्यात काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. अनिवार्य पीएफच्या पगाराची मर्यादा वाढविण्याचा सरकारचाविचार आहे. सरकार यूनिव्हर्सल मिनिमम वेज़च्या अनुषंगाने पीएफ कपातीसाठी सध्याची वेतन मर्यादा वाढवण्याची तयारी करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पीएफ कपातीसाठी सध्याची पगार मर्यादा बदलणे शक्य आहे. आवश्यक पगाराची मर्यादा 15000 रुपयांवरून 25000 रुपये केली जाऊ शकते. अधिकाधिक लोकांना EPFO च्या कक्षेत आणण्याचा सरकारचे विचार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FY21 मधील EPFO रिटर्नचा देखील बैठकीत आढावा घेण्यात येईल. गुंतवणूकीतून मिळालेल्या रिटर्नच्या आधारे पीएफवरील व्याज निश्चित केले जाईल. सध्या बेसिक सॅलरी सीलिंग 15 हजार रुपये आहे, जो वाढवून 25 हजार रुपये केला जाऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यांची बेसिक सॅलरी मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना पीएफचे कॉन्ट्रिब्यूशन वैकल्पिक आहे. |
तृष्णा.. । काय वाटेल ते........\nबंबैय्या हिंदी.. →\nPosted on March 6, 2011\tby महेंद्र\nतृष्णा , फोर्ट मुंबई.\nपरवाच टाऊन साईडला कामानिमित्त गेलो होतो. दुपारी ३ वाजे पर्यंत कामाच्या रगाड्यात काही वेळ मिळाला नाही जेवायला! कडकडून भूक लागली होती. "महेश लंच होमला' जाऊ या का रे??" बरोबर असलेल्या मित्राला विचारले, पण त्याला मात्र त्याच्या अमेरिकन मित्राने रेकमंड केलेले 'तृष्णा' ट्राय करायचे होते . हे तृष्णा म्हणजे नगीनदास मास्तर मार्गाच्या आणि ह्रिदम हाऊसच्या मधल्या भागात असलेले रेस्टॉरंट. दोन वेळा टाइम्सचं बेस्ट फुड अवॉर्ड मिळवलेले आणि लंडन मधे शाखा असलेले.... इतकी वर्ष झाली मी त्या भागात जात असतो, पण ह्या हॉटेल मधे कधीच गेलो नव्हतो .\n'तृष्णा' कडे मोर्चा वळवला. ऍज युजवल पार्किंगची बोंब आहे या भागात. फाउंटन वर कार पार्क करून चरफडत चालत चालत आलो पुन्हा हॉटेल पर्यंत! अंतर फार नव्हतं पण पोहोचे पर्यंत पार घामाघूम झालो होतो.सध्या मुंबईचे चांगले दिवस (थंडीचे) संपले आहेत. दुपारी बाहेर पडलं की होणारी नुसती घामाने होणारी कचकच.\nहॉटेलचे मुख्य दार पाहिल्यावर आत मधे इतके चांगले हॉटेल असेल असे अजिबात वाटत नाही. दाराजवळ गेल्याबरोबर दरबानने दार उघडून धरले आणि आम्ही आत शिरलो. एसीचा आतला थंडावा एकदम हाडापर्यंत शिरला. ह्या दरबानला बाहेर निघतांना त्याने तुमच्या साठी दार उघडले म्हणून, आणि थॅंक्यु सर म्हणून मान झुकवली म्हणून त्याला किती टीप द्यायची - हा प्रश्न नेहेमीच पडतो मला. 🙂 असो.\nघामाने थबथबलो असतांना जर राईट टेम्प्रेचरची बिअर मिळाली तर??\nहॉटेल मधे शिरल्यावर आधी पहिला फिल येतो की आपण 'ऑड मॅन आऊट' आहोत इथे. कारण सगळे फिरंगी लोकंच दिसतात इकडे बसलेले. मला वाटतं की आमच्या शिवाय फक्त चार पाच भारतीय लोकं असतील.\nहॉटेल मधे शिरल्या बरोबर काय दिसलं असेल ? तर जवळपास मनगटा एवढा जाड आणि चांगला १२ इंच लांबीचा असलेला लॉब्स्टर घेऊन वेटर एका टेबल वर सर्व्ह करत होता. इथला क्रॅब आणि प्रॉन्स फेमस आहे . पण काय कोण जाणे, खाण्याची मात्र इच्छा होत नव्हती. तसाही शेलफिश ला मी ऍलर्जिक आहेच.\nवेटरने येऊन काय आणू म्हणून विचारल्यावर, मी आणि माझा मित्र दोघंही एकदम म्हणालो.. 'किंगफिशर'!!!!! बिअर चे घोट घेत मेन्यूकार्ड चाळणे सुरु केले. मेन्यू कार्ड बघतांना कार्डाच्या डाव्या बाजू सोबतच उजव्या बाजूला पण लक्षं द्यावं लागते. प्रत्येक डिश साधारण ५५० ते ६०० रू. प्लेट आहे. स्पेशल डीशचे भाव तर विचारूच नका. 😦\nआम्ही फिश टिक्का ( हैद्राबादी रावस) , चिकन टिक्का मसाला, आणि पांप्लेट चायनीज स्टाइल मागवलं. सोबतीला अर्थातच नीर दोसा! वेटर म्हणाला की नीर दोसा चायनीज फिश सोबत चांगला लागणार नाही, म्हणून 'पाप्लेट इन ग्रिन सॉ"(?????)घ्या. फारसा विचार न करता म्ह'ट्लं, की चला, आपल्याला माहीती नाही, आणि तो सांगतोय तर घेऊ या "फिश इन ग्रीन सॉस!"\nरावस हैद्राबादी टिक्का..\nपंधरा मिनिटातच टेबलवर जेवण आणून लावलं त्या वेटरने. स्टार्टर म्हणून मागवलेले रावस हैद्राबादी सर्व्ह केलं ,आणि एक घास घेतला नसेल तर लगेच मेन कोर्स एकदमच आणून ठेवलं समोर. 'रावस टीक्का' पूर्णपणे थंड झालेला होता, पण चवीला छान होता. फिशचे पिसेस पण चांगलेच मोठे होते. एका प्लेट मधे सहा पोर्शन्स होते. 'पाप्लेट इन ग्रीन सॉस' म्हणजे पालकात शिजवलेले पापलेट ( जर हे माहीत असतं तर मी ऑर्डर केलंच नसतं कधी). तसंही मला फारसं पाप्लेट आवड्त नाही आणि ते पण पालकात शिजवलेले?? मसाले वगैरे एकदम कमी, मिठ , तिखट कसलीच फारशी चव नसलेले ते पाप्लेट अजिबात आवडले नाही. 'चिकन तृष्णा' आणि 'नीर दोसा' मात्र खूपच छान होता.असं म्हणतात इथे गार्लिक बटर क्रॅब/ प्रॉन्स चांगला मिळतो पण ट्राय केले नाही.\nफिश जर फ्रेश असेल तर फिशचा अजिबात वास येत नाही. पण थोडी जरी ( म्हणजे चार तासापेक्षा जास्त) शिळी असली की फिशला एक वेगळाच दर्प येतो.इथे फिश एकदम ताजी होती हे नक्की. 🙂\nतृषणा मधलं लंच.. पाप्लेट इन ग्रीन सॉस एकदम बेचव होतं.\nएकंदरीत हॉटेलचे नुसतेच नाव मोठे आहे, जेवण पण फारसे आवडले नाही. जरी चिकन करी चांगली असली तरीही तिचे भाव पहाता खूप ओव्हरप्राइस्ड वाटते. इथे बहुतेक परदेशी नागरिक जेवायला येतात, त्यामुळे सगळं काही चवीला एकदम माइल्ड असं असतं. वेटर्सची सर्व्हीस पण काही फारशी चांगली नव्हती.एकंदरीत इथला अनुभव काही फारसा चांगला नव्हता.\nजेंव्हा बिलं हातात आलं, तेंव्हा दोन किंगफिशर,एक फिश टीक्का,एक फिश इन ग्रिन सॉस, आणि चिकन तृष्णा यांचं बिल होतं- ३१७०/ रुपये. यामधे १० टक्के म्हणजे अंदाजे ३०० रु.सर्व्हीस टॅक्स इन्क्लुडेड आहे. थोडक्यात माझ्या मते इथली प्रत्येक डीश ही ओव्हरप्राइस्ड आहे, अर्थात त्यांचा एक्स्पेक्टेड कस्टमर हा तुमच्या माझ्यासारखा नाही, तर परदेशी पर्यटक आहेत- तेंव्हा इथे न गेलेलेच बरे असे मला वाटते.. थोडक्यात काय- तर नाम बडे और दर्शन खोटे..\nमहेश लंच होम मधला फोटो. फार पूर्वी काढून ठेवला होता.मंगलोरी डीशेस एकदम मस्त!\nया हॉटेल पेक्षा मला महेश लंच होम जास्त आवडतं . काही दिवसापूर्वी महेशला गेलो होतो, आम्ही तीन मित्र. तर दोन बिअर आणि फिशकरी राइस, फिश टिक्का , आणि नीर डोसा यांचं बिल फक्त १६०० रुपये झाले. तिथली फिश करी अगदी ऑथेंटीक कारवार मंगलोर स्टाइलची असते. सीफुड साठी माझं रेकमंडेशन महेश लंच होम-आजकाल जरी पुर्वीपेक्षा भाव खूप वाढवलेले असले तरीही.. !म्हणून टाऊन साईडला कधी गेलात तर महेश लंच होम ला थम्स अप!!\nखिशात खूप पैसे खुळखुळत आहेत? आणि एखाद्या खूप फेमस हॉटेल मधे जाऊन काहीतरी खायची इच्छा आहे टाऊन साईडला? तर मासे खाण्यासाठी म्हणून तर मग तृष्णा ठीक आहे-\nमहेश लंच होम.. माझं फेवरेट (टाऊन साईडचं) इतर भागातलं म्हणाल तर फ्रेश कॅच.. माहीम.\nपण माझा प्रिफरन्स महेश लंच होम.. पण माझं सगळ्यात फेवरेट सीफूड चं हॉटेल कुठलं ते विचाराल, तर त्याबद्दल पुढच्या पोस्ट मधे. अतीशय स्वस्त आणि चांगले सीफूड मिळण्याचे ठिकाण म्हणजे "फ्रेश कॅच" आणि कोंकण्याचे गोमंतक..पण त्याबद्दल नंतर कधी तरी लिहीन....\nThis entry was posted in खाद्ययात्रा and tagged चिकन, फिश, Mahesh Lunch home, Trushna. Bookmark the permalink.\n51 Responses to तृष्णा..\nवा, छान खाद्य अनुभव घरि बसल्या दिलात! मि शाकाहारी असून आवडला!\nधन्यवाद. अहो मी पण मूळचा शाकाहारी, पण हळू हळू कट्टर मासांहारी बनलोय. 🙂\nह्म्म...... आता आम्ही किती निषेध व्यक्त करायचा ते सांग 🙂\nबाकी मांसाहाराबद्दल अगदी डीट्टो 🙂\nतिथे शाकाहारी पण मिळतं बरं कां.. 🙂\nअरे मी पण पक्की मांसाहारी बनलीये 😉\nनेक्स्ट ट्रिप ला नक्की भेट दे.. 🙂\nwoww....महेश लंच होम माझे पणऑल टाईम फेवरेट...मला फीश ज्याम आवडते सो मुंबई्च्या वारीत महेश कडे जाणे होतेच.....आता ह्या मंथ एंड ला येतेच आहे तेंव्हा सुहासने सांगितल्याप्रमाणे रस्सा ला पण भेट देणार आहे...तृष्णा पण बघुन येउ...\nवेल..थोडासा का असेना णिशेध द्यायचा मौका दिलात अगदी बरे वाटले...हुश्य्य्य्य्य...... 😛\nमहेश चांगलं आहेच, पण माहीमचं फ्रेश कॅच एकदम अफलातून आहे. तिथे रेट्स पण खूप कमी आहेत महेश च्या कम्पॅरीझन मधे. 🙂 माहीम स्टेशनला उतरल्यावर कोणीही सांगेल कुठे आहे ते..\nरस्सा आहेच माऊ ताई, पण आमच्या बिल्डिंग खाली असलेले कोकण किनारा पण ट्रायकर, तिथे आता जेवण मस्त मिळतय, बहुतेक शेफ बदलला वाटत 🙂\nसुहास,अरे फोन नंबर त्याच दिवशी फिड करुन घेतलाय....आता फक्त १५ दिवस राहिले आहेत रे...बस्स..मग मज्जाच !!\nमाऊताई तुमच्या डायटिंग चे काय मग?\nहल्ली नॉनवेज शिवाय बाहेर जेवण होतच नाही...तृष्णाबद्दल मित्राकडून ऐकून होतो...महेश लंच होम मस्तच दिसतय. टाउन साइडलामुद्दाम एकदिवस खादाडी करायला जावच लागणार... 🙂\nमहेश ला गेला नाहीस अजून? खरंच चांगलं आहे. पूर्वी इथे १००-१५० रुपयात चांगलं जेवण व्हायचं, पण आजकाल सगळीकडेच तर महागाई वाढलेली आहे .. तशीच इथे पण 😦\nhmmm apala pranta nahee ha - fish vagaire. mahesh lunch home puNyathee ahe, -quite popular in fact, puN mala tikhat vatala farach- mhaNaje cashew curry ka kaheetaree veg ghetalela te. TrishNa puN hota bund garden road var puN banda padala te, bahutek tumhee mhaNata tya karaNanech asel- overpriced, ekda office party la gelo hoto- exactly tumhee varaNan kelay tase te crabs aNun dakhvun cook karun det hote, puN thankfully veg menu was equally diverse. aNee bil hee pahava lagala nahee:-) host was someone else.\nहे तृष्णा सगळ्या परदेशी पर्यटकांचे आवडते आहे. "बिल पहावे लागले नाही" 🙂 🙂 आम्हाला पण कधीच पहावे लागत नाही बरोबर कोणी कस्टमर असला की 🙂\nपोस्ट खूपच आवडली महेंद्रजी.या परिसरात बरीच वर्षं घालवली आहेत म्हणून परिसराबद्द्ल प्रेम आहे.मी बर्याच वेळा अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर गल्लीतलं गोमंतक आहे तिथे गेलोय.स्वस्त आणि मस्त.खूप विस्तृत लिहिलंय.छायाचित्रांसकट तोंडाला पाणी सुटलं हे मात्रं खरं! मस्तंच!\nगोमंतक तर ऑल टाईम फेवरेट मधे मोडतं. पण गुरुवारी बंद असतं ते. बांद्ऱ्याला असलेली ब्रांच माझीआवडीची. ओ एन जी सी मधे काही कामासाठी गेलो , की जेवायला तिकडेच जातो अजूनही. 🙂\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.. एक बाकी खरं, टाऊन साईडची मजा काही औरच.. 🙂\ntumhee lok "townside" nakkee kashala mhaNata? fort and around? kharee -intended - mumbai tevadheech actually...\nटाउन साईड म्हणजे फोर्ट, कुलाबा, चर्चगेट एरीया.\nजसे खडकी, पिंपरीला रहाणारे लोकं , पुण्याला जाऊन येतो म्हणतात , तसेच आहे हे पण 🙂\nमहेश लंच होम ची पुण्यात कॅंपात पण शाखा आहे बहुतेक!!, कधी गेलो नाही वाचल्यासारखे वाटते आहे\nगेला होतास की नाही कधी??\nपोस्ट जबरी पण महागडी आहे 😉\nअसो, मुंबई भेटीत भेट द्यायच्या हॉटेल्सची संख्या वाढतेय. एक दोन महिन्यासाठी मुंबईमध्ये प्रोजेक्ट मिळतो का पाहायला हवे 😉\nफ्रेश कॅच आणि गोमंतक वरच्या पोस्टची वाट पाहतोय.\nफ्रेश कॅच वर खरंच एक स्पेशल पोस्ट व्हायलाच हवी, इतके चांगले हॉटेल आहे ते. वरची दोन्ही हॉटेल्स थोडी महागडी जरूर आहेत, आणि तृष्णा तर नक्कीच 😦 पुन्हा मी पण तिकडे कधी जाणार नाही हे पण पक्क!\nअरेरे.. काय हे.. डायट चालू आहे असं काहीतरी ऐकलं होतं मी 😉\nअरे डायटच आहे हे. दोन पिस तंदूरी फिश, एक पिस पाप्लेट, थोडा पालक आणि दोन पिस चिकनचे बस्स.. एवढंच रे. आणि कार्बोहायड्रेट्स म्हणशिल तर केवळ एक नीर दोसा घेतला. ( पूर्वी इतकं मला चकण्याला लागायचं - आता पूर्ण जेवण होतं एवढ्यात 🙂 )\nह्याला म्हणतात जिभेवर ताबा ठेवणे. संयमाची कमाल आहे.\n😉 :-0 😉\nनाईलाजाला इलाज नाही.\nआज कोल्हापूरला आहे बघ, पण चक्क मेथीबेसन - भाकरी जेवतोय 🙂\nमागे एकदा गेलो होतो तृष्णाला. पण मला नाही आवडले तिथले जेवण. एकतर अर्धवट गरम आणि चवीच्या नावाने शंख. त्यात पुन्हा जेव्हा बिल हातात आले तेव्हातर अजुनच उतरले मनातून. महेश मात्र नेहमीचा अड्डाच असायचा. महिन्यातून एकदा तरी चक्कर व्हायचीच तिथे. तिथे लेम फ़्राय म्हणून एक प्रकारचे फ़िश मिळायचे, अजुन मिळते का ठाऊक नाही. पण ती आमची आवडती डिश असायची. स्वस्त आणि क्वांटिटी भरपूर..... !! बाकी महेशला बिअर कधी प्यालो नाही. कारण त्यावेळी हार्डवरच दणका असायचा. लग्नानंतर आता सगळेच बंद झाले. ह्म्म्म गेले ते दिवस...................... 😛\nतॄष्णा मला पण फारसं आवडलं नाही. ओव्हर प्राइस्ड मेन्यु आणि टीपला हपापलेले वेटर्स. पण महेश अजूनही आवडतं. तिथे चांगला चॉइस आणि मेन्यु स्प्रेड असतो. .\nNamaste kaka, bar vatale aaj khadadichi post vachun. Tumhi refineries madhye kaam karata ka? Karan majhe mister suddha oil n gas madhye aahet. Anyways as usual rocking post aahe. Thanks.\nनाही, आम्ही ऑफशोअर साठी बरीच मशिन्स विकलेली आहेत, म्हणून जावं लागतं बरेचदा.. 🙂\nMajhe mister suddha offshore Lach asatat. Ek Mahina on aani ek Mahina off. NOV madhye aahe sadhya. Nyways pudhachi post lavkar yevu det. Thanks.\nplease try your non-veg lunch or dinner at SATKAR near Goregaon(east) railway station & then tell me thank you. but if u want to take dinner at 9.00 o'clock go before 1 hour.\nगोरेगावचे सत्कार शेट्टीचे आहे की आपले म्हणजे मराठी माणसाचे आहे? नक्की जाऊन येईन एखाद्या वेळेस. 🙂\nbakasuracha punrjnm.........hahahaha...@ ..kha kha kha kha......\nआयला, अरे तू पण का आता?? खूप कमी केलं आहे खाणं.. 🙂\nअरे वा.. कोल्हापूर...! म्हणजे माझ्या गावाजवळ..!!\nपोस्ट नेहमीप्रमाणेच एकदम मस्त...!!\nकाका....तुम्ही तर डाएट वर आहात अस ऐकल होत.....ती अफ़वा होती का ? 😉\nअफवांवर विश्वास ठेऊ नये असे म्हणतात. आणि अफवा जास्त वेगाने पसरते, तेंव्हा खरं काय असेल ते बघ तूच.. 🙂\nखूपच छान महेन्द्रभाउ पण कधी बोरीवलीला (प.) गेलात तर दक्षिण (वझीरा नाका) ट्राय करून बघा मस्त आहे आणि स्वस्त ही!!!\nबोरीवली ला बरेचदा जातो . पण घरचे शुध्द शाकाहरी लोकं बरोबर असल्याने शक्यतो शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्स मधेच जाता येते.. पण कधी जमलं तर नक्की जाईन. 🙂 धन्यवाद. आणि ब्लॉग वर स्वागत..\nकाका नमस्कार तुम्ही परत माझी आवडीची पोस्त लिहिलीत आभारी आहे पण ,,,,\nइतक्या मोठ्या मुंबईत तुम्हाला शे पाचशे बिलापुरती चांगली खादाडी सापडत नाहीत का ? काका ,जरातरी गरीबाचा विचार करा ना राव !! काका ठाण्यात मासा कुठे खायचा ? बजेट सांगायची गरज नाही ..........\nनाही तसं काही नाही, केवळ अपघातानेच या जागी पोहोचलो. मित्राच्या एका अमेरिकेन मित्राने तारीफ केली म्हणून त्याला इथे जायचं होतं.. पण लवकरच फ्रेश कॅच वर टाकतो पोस्ट. ठाण्यातलं काही फारसं माहीती नाही मला >\nपोस्ट जबरी पण महागडी आहे..+१११\nती अफवा मी सुद्धा ऐकली होती बहुतेक तुमच्या ब्लॉगवरच ,जाऊ द्या दुसरया कोणीतरी लिहल असेल ते .... 🙂\nबर्याच दिवसांनी काय वाटेल ते वर आलो आणि पुढ्यात अस ताट वाढून ठेवलात म्हणून ....णी शे ढ ....!!!\nहा हा हा.. अरे त्या अफवेनेच माझे वजन कमी होतंय बघ. काहीच करायची गरज नाही .\nMe2divsapasun hya sitevarche likhan wachat aahe.khup chan watata.mala wachanachi khup aavad aahe.ha tumcha lekh wachlyanantar khup bhuk lagli mala ani jevayla gelyavar tiffin che jevan gelach nahi.ithe blog var likhan kase karta yete hybaddal jara guide karal ka?\nदोन दिवस कामात बिझी होतो, म्हणून वेळ लागतोय उत्तर द्यायला.\nया ब्लॉग वर ब्लॉगर्स वर ब्लॉग सुरु करण्याची बरीच माहीती दिलेली आहे. फक्त मराठी मधे टाइप करण्यासाठी एखादं फ्री सॉफ्ट वेअर शोधा नेट वर. पूर्वी बरहा फ्री होते, आता चार्जेबल झालेले आहे. पण कोणाकडे जुने व्हर्शन असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणखी काही माहिती लागल्यास अवश्य सांगा.\nतृष्णा ऐकलेही नव्हते मी कधी... असो.. महेश लंच होम आपले पण फेवरेट... 🙂 खेकडा तंदूर खायला मी तिथेच जातो... 🙂 पण गोमंतकची चव वेगळीच... 🙂 आपण केलला डिनर आठवला... 🙂\nअरे फिरंगी लोकांसाठी आहे ते. त्या पेक्षा माहीमचं फ्रेश कॅच मस्त आहे. ट्राय कर एकदा.. गोमंतक तर माझं फेवरेट!!\nमहेश मधे पण आता दर वाढले आहेत. स्वस्त आणि मस्त साठी 'महेश' जवळ असणारे लक्ष्मी बिल्डिंग मधिल 'प्रदीप गोमांतक' छान आहे.\nछोटंसच आहे पण अजुनही चव तिकवुन आहे.\nएक बाकी खरं की महेशची क्वॉलिटी अजूनही अप्रतीम आहे. त्यात त्यांनी अजिबात कॉम्प्रोमाइझ केलेले नाही.सध्या काही दिवसांसाठी नॉन व्हेज बंद केलेले आहे. नंतर पुन्हा सुरु केल्यावर मग बघू या.. |
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 'नामा'चे महात्म्य आणि महत्त्व आपल्या आत्म साक्षात्कारी प्रवचनांमधून आत्मानुभवाच्या वाणीने असे काही फुलवले की हा 'नमा' चा अपूर्व मोगरा कैवल्य-सुगंध उधळत अवकाशभर पसरला. श्री महाराज पहिल्या वर्गातील प्रवचनकार होते. ज्यांना उत्तम जीवन म्हणजेच आनंदाने भरलेले समाधानी जीवन जगावे अशी खरी इच्छा होती, त्यांना उत्तम जीवन म्हणजे काय आणि ते जगण्याचा सोपा मार्ग कोणती, हे सांगण्यासाठी महाराजांनी प्रवचने केली आहेत. ज्ञानदेवांनी नेवाशाला जेव्हा गीतेवर प्रवचने केली तेव्हा ती सारी सच्चिदानंदांनी लिहून घेतली. त्यामुळे तर ज्ञानेश्वरी हा अजोड ग्रंथ उपलब्ध झाला. सातशे वर्ष होऊन गेली या कहाणीला, इ. स. १२९० मध्ये ज्ञानदेवांनी गुरूआज्ञेने गीतेवर भाष्य केले होते. ग्रंथाचा शेवट करतांना सच्चिदानंदांविषयक ज्ञानदेव म्हणाले की, शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंदबाबा आदरे। लेखकु जाहला। । गोंदवलेकर महाराजांच्या मुखातून ही जी रसाळ नाममहात्म्य सांगणारी प्रवचनं बाहेर पडली ते अमृतधन ज्यांनी टिपून ठेवले, त्यांचे फार मोठे उपकार समजावर आहेत. ज्यांनी ही रसाळ प्रवचने ऐकली ते तर फारच भाग्यवान. सातशे वर्षापूर्वी जे नेवाशात घडले तसेच ते १००-१२५ वर्षापूर्वी गोंदवल्याला घडले. नाथांनी नंतर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली तशी टिपणवह्यांवरून गोविंद सिताराम गोखले यांनी या प्रवचनांना एक सुंदर घाट दिला. त्यासंबंधी संग्राहक गोखले लिहितात की, श्री महाराजांच्या भक्तांपैकी काहींनी वेळोवेळी लिहून घेतलेल्या लिखाणांच्या वह्या पाहायला, वाचायला मिळण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामधील भाषेचा साधेपणा, विचारांचा सखोलपणा, तसेच शिकवणुकीत निःस्वार्थीपणामुळे व प्रत्यक्ष अनुभवाने आलेला रोखठोकपणा, साध्यासाध्या दृष्टांताच्या योगाने गहन विषय उलगडून दाखवण्याची महाराजांची हातोटी व विशेष म्हणजे भगवंताच्या प्रेमाने उचंबळणारी प्रभावी भाषा या गुणांनी मन वेधून घेतले. ते पुढे म्हणतात की, लोकांना नामाचे महत्त्व पटावे म्हणून किती कळवळ्याने जीव तोडून महाराजांनी सांगितले. नामस्मरणाची आवड लोकांत निर्माण व्हावी म्हणून आपले उभे आयुष्य महाराजांनी खर्ची घातले. नामस्मरणाचा हा सुलभ मार्ग जो आचरील त्याला त्याचा प्रपंच कसाही असला तरीदेखील 'न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण। ' हा रोकडा अनुभव येईल अशी स्वानुभवाच्या ठाम बलावर महाराजांनी सर्वांना ग्वाही दिली. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्यकर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करणे हेच श्रीमहाराजांच्या निरुपणाचे सूत्र आहे. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधला नाममहात्म्याचा गाभा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की, परमेश्वराशी नाममार्गाने अनुसंधान ठेवणे प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. निर्गुण निराकार परमेश्वराला नाम साकारात आणते. परमेश्वराचे दर्शन त्यामुळे सुलभ होते. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होणे आणि त्या झालेल्या जाणिवेशी आपला प्रत्येक श्वास गुंफून टाकणे फार महत्त्वाचे आहे. महाराजांच्या शिकवणीचा, त्यांच्याच भाष्यातून वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. |
दर वर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत असून 'सडक सुरक्षा जीवन रक्षा' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कापूरबावडी माजीवडा ब्रिजच्या जवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कापूरबावडी वाहतूक उपविभाग ठाणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लांभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रस्ता सुरक्षिततेबाबतचे नियम आणि ते न पाळल्यास होणारे परिणाम याचे प्रात्यक्षिकासह महत्व पटवून देण्यात आले. दरम्यान ठाणे वाहतूक पोलीस आणि होंडा मोटरसायकल यांच्या संयुक्त विद्यमाने व समाज आणि रस्त्यावरील प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे रोड सेफ्टी ई- गुरुकुल या अनोख्या उपक्रमाद्वारे डिजिटल पातळीवरून तसेच ऑफलाइन प्रशिक्षणाद्वारे देत असलेल्या प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे अशी माहिती होंडा मोटरसायकल अँड स्कूटर ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी दिली. ठाणे शहरात या उपक्रमात ५ हजार ७०० पेक्षा जास्त लहान मुले व प्रौढांना घोडबंदर रस्त्यावरील लहान मुलांसाठीच्या ट्रॅफिक प्रशिक्षण पार्क्समधे आपल्या नियमित उपक्रमांद्वारे प्रशिक्षित केले आहे. कोव्हिड- १९ च्या युगात न्यू नॉर्मल परिस्थितीत मे २०२० पासून ठाण्यातील ९ हजार ५०० नागरिकांना शिक्षित केले आहे. या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यात वयोगटांनुसार तयार करण्यात आलेल्या सात ऑनलाइन प्रशिक्षण मोहीम राबवून मोटर वाहन जागरूकता कायदा, पादचारी सुरक्षा जागरूकता आणि सर्व वयोगटांसाठी रस्ता सुरक्षेचे सुवर्ण नियम, रस्ता अभियांत्रिकी आणि वाहनांची आरोग्य तपासणी आणि प्रौढांसाठी कागदपत्रे व बस चालक आणि कंडक्टर्ससाठी स्कूल बस कम्युनिकेश माध्यमातून रस्त्यावर सुरक्षित कसे राहायचे याविषयी जागरूकतेचा प्रसार केला जाणार आहे. ही चौफेर जागरूकता मोहीम सर्व वयोगटांना रस्त्यावर पाळायचे नियम शिकवणार आहे. शिकाऊ परवाना अर्जधारक आणि ट्रॅफिकचे नियम मोडणारे ट्रॅफिकचे नियम तसेच रस्त्यावरील शिस्त क्लासरूम प्रशिक्षण सत्रांद्वारे सहा शहरांत कार्यरत असलेल्या होंडाच्या सुरक्षित वाहन चालक प्रशिक्षण माध्यमातून दिले जाईल. डिजिटल पातळीवरून विविध सरकारी संघटना, शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट्सच्या सहकार्याने पूर्ण होणार आहे. याबाबत नागराज यांनी माहिती देताना सांगितलें की. याला होंडाच्या ६ हजार ३०० पेक्षा जास्त विक्री आणि सेवा केंद्रांची जोड मिळणआर असून ते १००० पेक्षा जास्त शहरे व गावांतील दुचाकी ग्राहकांना शिक्षित करतील. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.