text large_string |
|---|
नवी दिल्लीः 'काही लोकांना असं वाटतं की, गांधी कुटुंबामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. जर तुम्हा सर्वांना असं वाटत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग (पद सोडण्यासंबंधी) करण्यासाठी तयार आहोत. ' असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (13 मार्च) नवी दिल्लीत पार पडलेल्या CWC बैठकीत केलं असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशा स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी पहिल्यांदाच केलं आहे. त्यामुळे नुकताच झालेला पाच राज्यातील पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला असल्याचं बोललं जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर काँग्रेस कार्यकारिणीची (CWC)रविवारी दिल्लीत बैठक झाली. ज्याचे अध्यक्षपद पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भूषवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या महत्त्वांच्या पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. पण असं असलं तरीही यापुढे देखील सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष पुढे जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीची माहिती देताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुढे नेण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर आपला सर्वांचा विश्वास असल्याचे सांगितले. मात्र, बैठकीनंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की, राहुल गांधींनी त्यांचे नेतृत्व करावे. मात्र 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या पुढील निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसला मजबूत करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचेही यावेळी म्हणाल्या. याचवेळी असंही ठरलं की, काँग्रेस एप्रिलमध्ये चिंतन शिबिर आयोजित करणार आहे. दुसरीकडे पंजाबच्या पराभवाची जबाबदारी घेत हरीश चौधरी म्हणाले की, पंजाबच्या निकालाची जबाबदारी मी घेतो. आम्ही पुन्हा नव्या रणनीतीने लढू. आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम असल्याचे ते यावेळी म्हणाले. 'काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी' शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय? काँग्रेसमध्ये वेगाने बदलाची मागणी होत आहे. या संदर्भात काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनीही राहुल गांधींनी पूर्णवेळ भूमिकेत काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे म्हटले आहे. 'माझ्यासारख्या कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोन वर्षांपूर्वी G-23 सदस्यांनी लिहिलेले पत्र शेअर केले होते आणि ते म्हणाले की, पत्रात सर्व सदस्यांनी संघटना बदलण्याची मागणी केली होती. जेणेकरून परिस्थिती अधिक चांगली होईल, परंतु तेव्हापासून फारसा बदल झालेला नाही. |
नवी दिल्ली : वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पत्रकारांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रोहित सरदाना यांना आज (30 एप्रिल) सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं. रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत करत होते. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि सहकार्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर 29 एप्रिललाही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचं आवाहन केलं होतं. त्याआधी 28 एप्रिल रोजी त्यांनी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं. रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत होते. आजतक वरुन दंगल या शोचं अँकरिंग ते करत होते. तर अनेक वर्षांपासून ते झी न्यूजमध्ये वृत्तनिवेदक होते. 2018 मध्ये रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. रोहित सरदाना यांच्या निधनावर वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "अतिशय धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन. " |
गौतम अदाणी यांचा जीवन परिचय :- Biography of Gautam Adani In Marathi » Mr Marathi\nगौतम अदाणी यांचा जीवन परिचय :- Biography of Gautam Adani In Marathi:- आपण सर्व भारतातातील व्यावसायिक आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अडाणी यांना तर ओळखतच असेल. सद्य ते भारतातातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित झाले आहेत. यांचे पूर्ण नाव गौतम शांतीलाल अदाणी असे आहे. अडाणी समूहाचे अनेक व्यवसाय आहे. त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी प्रीती अदाणी हे करतात. ते सद्य आशियातील सरावात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंत व्यतीच्या यादीत त्यांच्या ६ वा नंबर येतो.\nआपण त्यांच्या संप्पतीचा विकंबर केला तर सध्या २०२२ च्या नुसार त्यांची संपूर्ण संपत्ती $९२.९ अब्ज इतकी आहे. आणि त्यांनी सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मागे सारले आहे. गौतम अदाणी त्यांच्या सफलतेसाठी खूप मेहनत करत आले. १९८८ या वर्षी त्यांनी अहमदाबाद येथे अडाणी समूहाची स्थापना केली.\nगौतम अदाणी यांचा जीवन परिचय :- Biography of Gautam Adani\nगौतम अदाणी यांचा परिचय :- Introduction by Gautam Adani\nगौतम अडाणी यांचे पूर्ण नाव गौतम शांतीलाल अदाणी असे आहे व त्यांच्या आई चे नाव शांती अडाणी असे आहे. भारतातातील व्यवसायाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असी राज्य गुजरात येथील सर्वात व्यस्त शहर अहमदाबाद येथे गौतम अडाणी यांचा जन्म झाला. त्यांचा परिवार एक जैन परिवार आहे. गौतम अडाणी यांना एकूण ७ भावंडे आहेत. त्याआधी यांचा संपूर्ण परिवार अहमदाबाद येथील उत्तर भागात असेलेल्या थाराड या नावाच्या शहरातून अहमदाबाद येथे स्थलांतरित झाले होते. त्यांच्या वडिलांच्या छोटा-मोठा कपड्याचा व्यवसाय होता.\nते अहमदाबाद येथे राहत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नागिनदास या विडाळ्यातच झाले. आणि त्यांच्या गुजरात विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आहे. त्यांना त्यांच्या शिक्षणात रस वाटत नसल्याने ते त्यांच्या पदवीच्या दुसऱ्याचा वर्षात त्या विद्वतपीठातून बाहेर पडले आणि ते त्या दरम्यान व्यवसाय करायला खूप उत्सुक होते. परंतु त्यादरम्यान त्यांना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय न बघता त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता.\nगौतम अडाणी यांच्या करियरची सुरुवात :- Beginning of Gautam Adani's career\nत्यांच्या पदवीच्या शिक्षण सोडल्यानंतर ते थेट मुंबईत कामासाठी आले होते. आणि तेथे त्यांनी महिंद्रा समूहासाठी काम केले. त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजेच १९८१ मध्ये त्यांचे मोठे भाऊ मनसुखभाई अडाणी यांनी प्लास्टिक उद्योग सुरु केला होता आणि त्यांनी गौतम अडाणी यांना त्या कंपनीत काम करायला मुंबईहून अहमदाबाद येथे बोलावून घेतले. त्यांच्या मोठ्या भावाच्या बोलवण्यावर गौतम अडाणी त्यांचे मुंबईचे काम सोडून ते अहमदाबादला परतले. आणि त्यांच्या भावाने स्थापन केलेली कंपनी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रवेशद्वार ठरला.\nत्यानंतर त्यांच्या भावाच्या कंपनी मध्ये त्यांनी प्राथमिक पॉलिमर आयात करण्यास सुरु केले. आणि त्यानंतर त्यांचे उत्पादन वाढत असल्याने त्यांनी १९८८ मध्ये त्यांनी अडाणी एक्सपोर्टची स्थापना केली. अडाणी हे समूह कृषी आणि ऊर्जा वास्तूचे व्यवहार जास्त प्रमाणात करत असत. १९९१ यामध्ये आर्थिक उदारीकरणाची धोरणे त्यांच्या कंपनी मध्ये अनुकुल ठरली. त्यामुळे नंतर धातू कापड. व कृषी उत्पादनाच्या व्यापारामध्ये त्यांनी व्यवसाय करण्य्यास करण्यास सुरुवात केली.\n१९९४ मध्ये गुजरात सरकारने मुद्रा बंदराच्या घोषणा केली आणि १९९५ मध्ये अडाणीला कंत्राट मिळाला. १९९५ मध्ये त्यांची पहिली जेटी उभारण्यात आली. आज कंपनी सर्वात मोठी मल्टी पोर्ट म्हनुन काम करत असते. मुद्रा बंदर हे सर्वात मोठे जगातील खासगी मल्टी-पोर्ट ऑपरेटर बनले आहे. १९९६ यामध्ये ऊर्जा व्यवसाय च्या शाखा ही शाखा अडाणी पॊवर यांनी स्थापन केली. अदाणी पॉवर कडे ४६२० MW मोठ्या क्षमतेचे औद्योगिक ऊर्जा प्रकल्प अडाणी कडे आहे. २००६ मध्ये अडाणीची या ग्रुपने वीजनिर्मिती या व्यवसायात प्रवेश करण्यात आला.\n२००९ ते २०१२ पर्यंत अदानी नेऑष्ट्रेलियामध्ये जाऊन कोळसा खान विकत घेतली. मे २०२० मध्ये अदानी ने $६अब्ज सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडिया ची सर्वात मोठी जगातील सौर बोली जिंकली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये अदानी ने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणू ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांना मागे टाकत ते आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.\nगौतम अदानी यांचे वयक्तिक जीवन :- Personal life of Gautam Adani\nगौतम अदानी यांचा विवाह प्रीती अडाणी यांच्याशी झाला होता. १९९८ मध्ये खंडणीसाठी त्यांचे अपहरण करून त्याला ओलीस मध्ये ठेवले होते. आणि त्यांच्या पैसे न घेता त्यांची सुटका केली आणि भारतातात झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक म्हणजे २६/११ चा मुंबईचा ताज हॉटेल चा हल्ला त्यावेळी गौतम अडाणी मुंबईतील ताज हॉटेल मध्येच उपस्थित होते. असे त्यांच्या अथक प्रयत्नाने गौतम अदानी सध्या भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे. आणि जगात ते ६ व्या क्रमणकावर आहे. |
कुंती ही यदूवंशी राजा शूरसेनची कन्या होती. त्याने तिचे नाव "पृथा" असे ठेवले. ती वसुदेव व सुतसुभा (शिशुपालची आई) यांची बहीण होती. वसुदेवपुत्र भगवान श्रीकृष्णाची आत्या होती. ती दहा वर्षाची असताना तिला कुंतीभोज (वसुदेवचा मित्र) राजाने दत्तक घेतली. "कुंतीभोज राजा हा नागवंशी होता." दत्तक गेल्यानंतर कुंती कधीही शूरसेन या आपल्या जन्मपित्याकडे, त्याच्या घरी गेली नाही. ती नागवंशी घराण्यात एकरूप झाली. आणि राजा कुंतीभोजची कन्या म्हणून "कुंती" अशी ती प्रसिद्ध पावली. महाभारतात अर्जुनाने नागजातीतील "उलूपी" नावाच्या मुलीशी लग्न केले होते हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. माद्री ही कुंतीपेक्षा लहान व सौन्दर्यवती होती. तिला पाहून पंडूचे मनात एकेदिवशी वासना निर्माण झाली. त्यात त्याचा शापामुळे अंत झाला. प्रायश्चित्त म्हणून माद्री सती गेली. पण सती जाण्यापूर्वी दुःखाच्या आवेगात कुंतीने माद्रीला दोष दिला. "तू स्वतःस का सावरले नाहीस, शाप माहित असताना तुझ्याही मनात पांडूराजा विषयी वासना कशी काय निर्माण झाली, तू त्याला थांबवले का नाहीस?" वगैरे, वगैरे कुंती माद्रीस बोलली. कुंती जेव्हा पाच पुत्रांना घेऊन हस्तिनपूरला परत आली, तेव्हा सगळा दोष मात्र तिच्याच माथी मारणेत आला. "तू वयाने मोठी होतीस, तू सतत लक्ष ठेवणे गरजेचे होते, तुझेच ही घटना घडू न देणे हे कर्तव्य होते,"-- वगैरे, वगैरे. म्हणून "सर्प" कथेतील जीए यांचा "तो साप" म्हणतो, "मला नंदनवन आणि त्यातील स्त्री यांची आठवण झाली. त्यांच्या निर्व्याज सुखात वासना निर्माण करून त्यांचा अधःपात आपल्या पूर्वजाने घडवून आणला असं एक कायमचा दुष्ट डाग |
'औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत', संजय राऊतांचा काँग्रेसवर 'निशाणा' - पोलीसनामा (Policenama)\n'औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत', संजय राऊतांचा काँग्रेसवर 'निशाणा'\nपोलीसनामा ऑनलाईनः औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे कधीच नव्हता. त्याच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही 25 वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं 'सेक्युलर' नव्हे, असे म्हणत शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच संभाजीनगर नामांतर करण्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यास यापूर्वी काँग्रेसनं विरोध केला होता. तर दुसरीकडे नामांतरावरून भाजपाही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यात पुन्हा एकदा खा. राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तील रोखठोक या सदरात म्हटले आहे की, जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला आहे.\nखासदार राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात पुढे म्हटले आहे की, राज्यातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणत असत असे, खा. राऊत यांनी आपल्या सदरात म्हटले आहे.\n'या'5इलेक्ट्रिक कारचा भारतीय बाजारपेठेवर कब्जा, टाटाची 'ही' कार नंबर - 1\nNashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा...\nकाय सांगता ! होय, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने भारताकडून घेतले...\nजाणून घ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून कोणकोणत्या आजारांवर उपचार होतात ? |
उपनगरातील तपोवन रोडवरील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून एका युवकाने पाणी पिण्याचा बहाणा करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी फिर्यादीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सावेडी गावातील तलाठी कार्यालयाजवळ राहणार दिलीप उर्फ सागर बारस्कर याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सविस्तर माहिती अशी, तपोवन रोडवरील ढवणवस्ती येथील एका घरात आरोपी दूध घालण्याचे काम करीत होता. सदर पीडित महिला घरात एकटी असल्याचे पाहून सदर आरोपी पाणी मागण्याचे कारण करून महिलेच्या कंपाउंड भितीवरून उडी मारून घरात घुसला. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलून तिच्याशी गैरवर्तन केले . महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून केला सदर महिलेचा पती घरी आल्यनंतर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली फिर्यादीत बारस्कर ( पूर्ण नाव नाही ) मी एकटी असल्याचे पाहून आरोपी दूध देऊन परत आला त्याने पाणी मागणी करून त्याने भितीवरून उडी मारून किचनमध्ये येऊन त्याने गैरवर्तन केलं असे म्हंटले आहे. हि घटना २० रोजी घडली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी दिली आहे. तपास हे कॉ. शिरसाठ यांनी केला. |
'पुनर्निर्माणा'च्या आधी.. इक्वेडोरमधल्या किटो शहरात 'अधिवास परिषदे'साठी गेल्यानंतर दिसली ती या शहराची दोन रूपं.. इक्वेडोरमधल्या किटो शहरात 'अधिवास परिषदे'साठी गेल्यानंतर दिसली ती या शहराची दोन रूपं.. एक सांस्कृतिक अवकाश पुन्हा उभारणारं जुनं शहर आणि दुसरीकडे नवं, आर्थिक पुनर्निर्माणासाठी उपयुक्त असं 'न्यू टाउन किटो'. हे असं पुनर्निर्माण आपल्याकडेही दिसतं. कोणासाठी आणि कशासाठी असतं ते? जागतिक स्तरावरील शहरीकरणाबाबत विचारमंथन करू पाहणाऱ्या 'अधिवास परिषदे'च्या निमित्ताने, अर्बन ऑक्टोबरच्या निमित्ताने शहरी अधिवासांबद्दल चर्चा करत असताना शहरांचे पुनर्निर्माण आणि त्यामध्ये अपेक्षित असणारा व वास्तवात दिसणाराही लोकसहभाग यांची चर्चा महत्त्वाची ठरते. जागतिक स्तरावर ती गेली काही दशके सुरू आहेच पण जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान ते स्मार्ट सिटीज ही वाटचाल लक्षात घेता भारतातही त्यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात या चर्चेचे वेगवेगळे पैलू आहेत. अर्बन पोलिसी वा शहरांबाबतची धोरणे निश्चित करणाऱ्या शासनाच्या दृष्टिकोनातून, धोरणांची अंमलबजावणी करताना राबवावे लागणारे कायदे- आखावे लागणारे नियम याबाबत काम करणाऱ्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून, शहररचनाकार- धोरणअभ्यासक-पर्यावरण मंच-नागरी संघटनांच्या दृष्टिकोनातून बघता शहरांच्या पुनर्निर्माणाबाबतचे वेगवेगळे पैलू समोर येत राहतात. 'शहर नेमके कोणाचे व कोणासाठी' या मुलभूत प्रश्नाकडे बघण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि प्रत्येक दृष्टिकोनामागे असणारी जी आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक गणिते आहेत ती शहरांच्या पुनर्निर्माणाबाबत वेगवेगळे 'विचारव्यूह' रचत राहताना दिसतात. अर्थात 'ग्लोबल साउथ' म्हटल्या जाणाऱ्या विकसनशील देशांमध्ये 'पुनर्निर्माण म्हणजे नेमके काय' या प्रश्नाला संकल्पनात्मक पातळीवर टोकदारपणे भिडू पाहण्याऐवजी जागतिक अर्थनीतीने, बाजारपेठेने निष्टिद्ध केलेली पुनर्निर्माणाची कल्पना स्वीकारली जाताना दिसते. शहरांसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक घेऊन येणारे रस्ते-उड्डाणपूल ते मेट्रो-मोनो रेल वा सॅनिटेशन मनेजमेंट असे नवनवीन 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स', भव्य मॉल्स-हाउसिंग कॉम्प्लेक्सेस- आयटी हब्ज असे 'रोजगारप्रवण' प्रकल्प किंवा पर्यटनाद्वारे विकासाला चालना देण्यासाठी शहरामधील 'ऐतिहासिक वारशाचे' -मुख्यतः इमारतींचे, बागांचे, सार्वजनिक स्थळांचे 'जतन व सुंदरीकरण' याभोवती 'पुनर्निर्माणाच्या'- शहर 'चकाचक' करण्याच्या कल्पना फिरत राहतात. 'नागरी संघटना' या अतिढोबळ वर्गवारीतील काही संघटनांचा सहभाग लाभल्यानंतर 'लोकसहभागातून' पुनर्निर्माण होऊ घातले असल्याचा पद्धतशीर आभासही निर्माण होतो. शहरे सुंदर-बिंदर दिसू लागतात अनेकांना, काहीसा 'इंटरनशनल' फील-बिल येतो शहराच्या काही भागांना पण समस्यांच्या जंजाळात घुसमटलेल्या शहरात पुनर्निर्माणापूर्वी आढळून येणारा उत्फुल्ल जिवंतपणा, रसरशीतपणा मात्र पुनर्निर्माणानंतर बराचसा हरवलेला दिसतो. असलाच तर उसना आणलेला वाटतो. मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प एका मर्यादेपर्यंत आवश्यक असतातही शहराला; पण प्रत्येक शहराला नव्हे. आवश्यकता नसतानाही असे प्रकल्प आले तरी शहराच्या प्रकृतीला ते मानवतात का ? केवळ आर्थिक पुनर्निर्माणावर भर देताना शहराचा सांस्कृतिक-सामाजिक अवकाश कोंडला जातो का? वेगवेगळ्या लोकसमूहानी वेगवेगळ्या वेळी शहरामध्ये वावरताना कामकाजाची ठिकाणे-निवासी व्यवस्था-विरंगुळ्याच्या जागा असे जे आपापले खास भवताल निर्माण केले असतात ते पुनर्निर्माणानंतर नष्ट होतात का? मुळात शहरामधील सांस्कृतिक व्यवहारांचे 'पुनर्निर्माण' साधता येते का ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होताना दिसतात. इक्वेडोरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अधिवास परिषदेतही 'शहरी पुनर्निर्माणा'बाबत असे अनेक प्रश्न हिरीरीने चर्चिले गेले. मुळात जिथे ही परिषद पार पडली त्या किटो शहरात ही चर्चा व्हावी याला वेगळे महत्त्व आहे. 'पर्यटनावर आधारित शहरी विकासाला चालना देण्यासाठी' युरोपात ज्या धर्तीवर 'कल्चरल कॅपिटल ऑफ युरोप' हा कार्यक्रम राबवण्यात आला, युरोपीय शहरांचा सांस्कृतिक वारसा आणि बाजारपेठेच्या, नवउदार अर्थनीतीच्या गरजांची भयानक सांगड जशी घालण्यात आली तो प्रयोग दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदा राबवण्यात आला इक्वेडोरची राजधानी किटो या शहरामध्ये! इंका संस्कृतीमधील अवशेषांवर वसवले गेलेले जुने शहर- ओल्ड टाउन किटो -स्पॅनिश, मूरिश वास्तूशैलीचा स्वतंत्र व संगमशैलींचाही उत्तम नमुना आहे. शासकीय इमारती, कार्यालयीन कामकाज यासाठी नव्याने बांधणी केलेले शहर 'न्यू टाउन किटो' मात्र पारंपारिक वास्तुशैलींपासून पूर्ण फारकत घेतलेले, अमेरिकन डाऊन टाउनचा कित्ता तंतोतंत गिरवणारे आहे. आर्थिक पुनर्निर्माण या दृष्टिकोनातून राबवले जाणारे प्रकल्प प्रमुख्याने न्यू टाउनमध्ये आहेत. ओल्ड टाउनचे 'सांस्कृतिक पुनर्निर्माण' करण्यात आले आहे. 'ला रोन्दा', 'कासा डि ला ग्रान्दा' हा निवासी परिसर आज सुबक-टुमदार-कात टाकलेला आणि रोषणाईने उजळून निघालेला दिसेल. सतराव्या- अठराव्या शतकापासून 'रसिक-श्रीमंत' वर्ग आणि त्यांनी उदार आश्रय दिलेले कवी-संगीतकार-गीतकार-गायक-वादक यांच्या सक्रिय अस्तित्वाने बहरून आलेला 'ला रोन्दा', पुनर्निर्माणानंतर पारंपारिक सुरावटी आळवणारे गायक-वादक किंवा 'पारंपारिक' खाद्यपदार्थ विकणारे फूड जॉइंट, कॅफेटेरिया आणि पर्यटक यांनी फुलून आलेला आढळतो. अर्थात या व्यावसायिकांपैकी फार कमी जण प्रत्यक्ष 'ला रोन्दा' मध्ये राहतात. रोजच्या जगण्यातले त्यांचे सामाजिक अवकाश, सांस्कृतिक व्यवहार हे प्रत्यक्ष दुसरीकडे घडतात मात्र 'पारंपारिक' झुलीखालचे निव्वळ 'आर्थिक व्यवहार' या 'पर्यटक-केंद्री' ला रोन्दा परिसरात घडतात. 'डय़ूटी-अवर्स' संपले की 'झुली' उतरवून परत निघतात हे गायक आपापल्या 'घरी'. आपल्याकडे एखाद्या मॉलमध्ये 'मिनी-राजस्थान' निर्माण करणाऱ्या चोखी-ढाणी प्रमाणे वा एसीच्या गारव्यात 'बहरलेल्या' पंजाबी ढाब्याप्रमाणे होऊन गेला आहे ला-रोन्दा .. हवा भरल्यावर सुंदर-सुबक वाटणारा पण प्रत्यक्षात बेजान, थंड, उस्फूर्तपणा गमावलेला. किटोमधील फसलेले सांस्कृतिक पुनर्निर्माण हे केवळ एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतातही आढळतातच. सांस्कृतिक वारसा म्हणून पुनरुज्जीवित केलेला मुंबईचा 'फोर्ट डिस्ट्रिक्ट' हे अशा फसगतीचे कदाचित सर्वात पहिले आणि उत्तम उदाहरण असेल. सांस्कृतिक वारशाकडे आपण कसे बघतो? कोणाचा वारसा आपण सांगू पाहतो? तो वारसा 'आपला' आहे असे किती लोकांना, लोकसमूहांना वाटते? याहीकडे सांस्कृतिक पुनर्निर्माणानिमित्ताने लक्ष द्यायला हवे. शहर लोकांचे असते, लोकांनी घडवलेले असते असे म्हटले तरी त्यातही जात-धर्म-वर्ग वास्तवावर आधारित सांस्कृतिक वर्चस्ववाद असतो आणि त्याचे प्रच्छन्न दर्शन पुनर्निर्माणासाठी शहराचा कोणता 'भाग', 'कोणाचा' भाग निवडला जातो यावर ठरत असते. 'सुंदर', 'महत्त्वाच्या' इमारती वा पुतळे असलेले 'अर्बन डिस्ट्रिक्ट' निवडून त्यांचे जतन करणे सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीने सर्वात सोप्पे, श्रेयवादी असतेही पण या पलीकडे जाऊन शहरी अवकाशात निर्माण होणारा 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' (इन्टॅन्जिबल हेरिटेज) आपण जपू पाहतो का ? कसा जपू पाहतो ? यावर सर्व थरांतून लाभणारा लोकसहभाग आणि सांस्कृतिक पुनर्निर्माणाचे यश अवलंबून आहे. साधं उदाहरण घेऊ, दादर स्टेशनबाहेर दशकानुदशके भल्या पहाटे भरणारा फुलबाजार असो, मुंबईच्याच फ्लोरा फाउंटन भागात गॉथिक शैलीतील इमारतींच्या भिंतींना टेकून उभा राहिलेला 'बुक डिस्ट्रिक्ट' असो, दिल्लीच्या दरियागंज भागातील रविवारचा पुस्तक बाजार असो, पुण्यातील 'मंडई' असो वा शहरांच्या परिघांवर भरणारे आठवडी बाजार, चळवळीला दिशा देणारी-मोर्चे विसर्जित होणारी मैदाने असोत वा सिनेमाघरे-नाटय़गृहे.. .. अनियंत्रित, विस्कळीत वाटणारे हे सारे लोकांच्या रोजच्या व्यवहारांना जागा करून देणारे आणि त्यामार्फत लोकांना शहरांत सामावून घेणारे अवकाश आहेत. या अवकाशांमध्ये बहुसंख्य लोकांचे सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार चालत राहतात, त्यांचे जगणे या अवकाशांशी जोडले गेले असते. या अमूर्त अवकाशामध्ये शहर व्यक्त होत राहते दशकानुदशके, शतकानुशतके .. कोणतीही 'भव्य' कामगिरी खात्यावर जमा नसलेले अनेक 'सामान्य लोक' जो अवकाश घडवतात, भवताल निर्माण करतात त्याचे ऐतिहासिक महत्त्व सांस्कृतिक पुनर्निर्माणासाठी विचारांत घेतले तर साहजिकच लोकसहभाग उस्फुर्तपणे येतो,मोठय़ा प्रमाणावर येतो. मोठय़ा प्रकल्पांच्या जंजाळात, आर्थिक गणितांच्या जुळवाजुळवीत जेव्हा हे अवकाश गिळून टाकले जातात तेव्हा पुनर्निर्माणानंतरही शहराचा रसरशीतपणा हरवून गेलेला आढळतो. पुनर्निर्माणाच्या नावाखाली बाजारपेठेची आर्थिक गणिते, वर्गीय हितसंबंध जोपासणारे सौंदर्यशास्त्र माथी थोपवून घेण्याआधी आपल्या शहरांनी मुक्तपणे आपला अमूर्त वारसा ओळखायला हवा, आपले अवकाश जाणून घ्यायला हवेत - इतकंच ! |
विमान प्रवास करण्यास स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरावर एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. मात्र, नाम साधर्म्यामुळे एका एनआरआय कुणाल कामराला एअर इंडियाने तिकीट नाकारल्याची घटना समोर आली आहे. जयपूरः विमान प्रवास करण्यास स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरावर एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. मात्र, नाम साधर्म्यामुळे एका एनआरआय कुणाल कामराला एअर इंडियाने तिकीट नाकारल्याची घटना समोर आली आहे. एका टीव्ही पत्रकाराला प्रश्न विचारल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगो विमान कंपनीने बंदी घातली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवरून केलेल्या सूचनेनंतर अन्य काही विमान कंपन्यांनीदेखील कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी विमान प्रवासास बंदी घातली. त्याच्या परिणामी स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा या विमान कंपन्यांच्या काळ्या यादीत आहे. त्याचा फटका एका एनआरआय भारतीयास बसला. अमेरिकेतून आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी हा कुणाल कामरा अमेरिकेतून भारतात आला आहे. कुणालने जयपूरहून मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाचे तिकीट बुक केले होते. मात्र, विमानतळावर पोहचल्यावर तिकीट रद्द झाल्याचे या कुणाल कामराला समजले. तिकीट रद्द का झाले याचे कारण विचारल्यानंतर विमान प्रवासास बंदी घातली असल्याचे त्याला समजले. बंदी घातलेला कुणाल कामरा 'तो मी नव्हेच' असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर एनआरआय कुणाल कामराला विमान प्रवासास मंजूरी मिळाली. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने इंडिगो एअरलाइन्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याच्यावर एअरलाइन्सने लावलेली सहा महिन्यांची बंदी उठवण्याची मागणी त्याने केली आहे. शिवाय त्याला मानसिक त्रास दिल्याबद्दल इंडिगो एअरलाइन्सकडे २५ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. इंडिगो एअरलाइन्सने माफी मागावी आणि सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांना याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. |
दसरा मेळावा शिवतीर्थावरच परवानगी द्या, नाहीतर. . . शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. कायदेशीर मार्गाने परवानगी दिलीत तर ठीक, नाहीतर शिवतीर्थावर घुसू आणि मेळावा घेऊ. मुंबईः शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. कायदेशीर मार्गाने परवानगी दिलीत तर ठीक, नाहीतर शिवतीर्थावर घुसू आणि मेळावा घेऊ, असा इशारा देत शेकडो शिवसैनिकांनी आज महापालिकेवर धडक दिली. एक महिन्यापूर्वी परवानगीसाठी अर्ज दिला आहे, पण अद्यापही उत्तर न आल्याने शिवसैनिक महापालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयावर धडकले. शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी शिवसेनेने 22 ऑगस्टला महापालिकडेकडे अर्ज केला. मात्र, महिना उलटला तरी परवानगी न मिळाल्याने शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला. परवानगी द्या, नाहीतर शिवतीर्थावर घुसून दसरा मेळावा घेऊ, असा सज्जड इशाराच यावेळी देण्यात आला. विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक शशी पडते, माजी नगरसेवक वसंत नकाशे आदी यावेळी उपस्थित होते. परवानगीसाठी चार दिवस पुरेसे असताना परवानगीसाठी एक महिना टाळाटाळ केली जात आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी की देऊ नये याबाबत मुंबई महापालिकेवर कोणाचा तरी मोठा दबाव आहे, असा आरोप यावेळी मिलिंद वैद्य यांनी केला. एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले भाडेही भरण्यात आले आहे. जर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार असेल तर आम्हाला शिवतीर्थावर परवानगी देण्यास काय हरकत आहे? त्यांचा मेळावा बीकेसीत आणि आमचा शिवतीर्थावर होत असेल तर मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही वैद्य यांनी विचारला आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज जी उत्तर विभागाकडून परवानगीसाठी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील विधी खात्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून विधी खात्याकडे मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत असा कोणताच अर्ज आतापर्यंत आलेला नाही, असे विधी खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले. महाभारतच्या बातम्या मिळविण्यासाठी व्हॉट्सऍप ग्रुपला जाईन करा अथवा 95118 27050 हा क्रमांक तुमच्या मोबाईलवर ग्रुपवर ऍड करा. |
घरात सुख शांतीचे वातावरण असेल, कार्यक्षेत्रात मोठा फायद्याचे संकेत, लवकर मिळेल बातमी - enews 30\nHome/ज्योतिष/घरात सुख शांतीचे वातावरण असेल, कार्यक्षेत्रात मोठा फायद्याचे संकेत, लवकर मिळेल बातमी\nघरात सुख शांतीचे वातावरण असेल, कार्यक्षेत्रात मोठा फायद्याचे संकेत, लवकर मिळेल बातमी\nChhaya V 10:10 am, Mon, 13 December 21\tज्योतिष Comments Off on घरात सुख शांतीचे वातावरण असेल, कार्यक्षेत्रात मोठा फायद्याचे संकेत, लवकर मिळेल बातमी\nदिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांना आणि सज्जनांना आदर देण्यात अग्रेसर राहाल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील.\nतुम्ही पैसेही वाचवू शकता. तुमच्यासाठी आनंददायी बातम्यांचे प्राबल्य कायम राहील. आज घरात सुख शांतीचे वातावरण असेल, यामुळे तुमचा आनंद वाढेल. कामात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nकाही महत्त्वाचे काम पूर्ण करून यश मिळेल. पालकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन यश मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा.\nव्यवसायात तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे. महत्वपूर्ण कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. आपण फायदेशीर प्रवासाला जाऊ शकता. दैनंदिन कामांमध्ये तुम्हाला पूर्ण यश मिळेल.\nविरोधकांचे मनसुबे फसतील. हिशेबात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे. आज कोणतीही सरकारी किंवा वैयक्तिक बाब सहज सुटेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख आणि शांती ही तुमची प्राथमिकता असेल.\nनकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवा. परस्पर संमतीने कोणतीही विशिष्ट समस्या सोडवता येईल.जुने मतभेद आणि गैरसमज वेळेत दूर होतील. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल राहील.\nतुमच नशीब साथ देईल. तुम्ही तुमच्या हुशारीने कामे पूर्ण कराल. लाभाचे सुख आणि यश प्राप्त होईल. तुमची वागणूक अतिशय सौम्य असणार आहे, वर्तनातील बदल इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल.\nतुम्ही तुमच्या कामात मेहनत कराल आणि कोणाच्या तरी मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.\nचांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगला फायदा होईल.\nवृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराशी जोडलेल्यांना याचा लाभ मिळू शकतो. रिअल इस्टेटच्या बाबतीत फायदे होतील.\nPrevious 13 डिसेंबर 2021 : आज आनंदाने भरलेले असेल दिवस, कार्यक्षेत्रात काही चांगले बदल घडून येतील\nNext या4राशित लपलेले आहेत श्रीमंत होण्याचे सर्व गुण, माहिती करा तुमच्या राशिचाही समावेश आहे का? |
ठाणे : येथील तलावपाली, जांभळी नाका येथून श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी माेर्चा काढून वन जमिनीचा हक्क मिळवण्याची मागणी लावून धरली. यासाठी प्रशासनाकडून वरर्षनुवषार्पासून दिरंगाई केली जात असल्याचा आराेप करून जिल्ह्याभरातील आदीवासी शेतकर्यांनी आज एकत्र येत हा वनहक्कांचा पुराव माेर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. येथील शासकीय विश्रामगृहाजवळून जाणार्या कळवा राेडवर या माेर्चाचे सभेत रूंपातर झाले त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली. तलावपालीच्या शिवाजी मैदानावर एकत्र आलेल्या या कार्यकत्यार्ंनी जांभळी नाका, टेंभीनाका, सिव्हील रूग्णालय राेडने पुढे जेलजवळून जात कळवा राेड हा माेचार् थांबवण्यात आला. तेथे सभेत रूपांतर झालेल्या या माेर्चेकरांनी विविध घाेषणा देत ठाणेकरांसह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे फलक घेऊन आदिवासी शेतकर्यांनी वनजमिनीच्या हक्काची मागणी प्रशासनाकडे त्यांनी लावून धरली. या 'वनहक्कांचा पुरावा' या माेर्चात सहभागी झालेल्या जिल्ह्याभरातील आदिवाशी शेतकर्यांचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा , उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर सरचिटणीस बळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, प्रवक्ते प्रमोद पवार,संगीता भोमटे जया पारधी आणि जिल्हा सरचिटणीस राजेश छन्ने, जिल्हा युवक प्रमुख मुकेश भांगरे आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गाेपीनाथ ठाेंबरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. |
नवी दिल्ली : महाराष्ट्र बँकेला हिंदी भाषेत बँकेचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल व्दितीय क्रमांकाच्या 'राजभाषा कीर्ती पुरस्कारा' ने आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने 'हिंदी दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रीजीजू, हंसराज अहीर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील शासकीय व खाजगी संस्थांना तसेच व्यक्तिगतरित्या हिंदी भाषेला समृद्ध करणाऱ्या तज्ञांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र बँक दैंनदिन कामकाजाचे कार्यान्वयन हिंदी मध्ये करीत असल्यामुळे 'राजभाषा कीर्ती' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र बँकेला मिळालेला पुरस्कार बँकेचे कार्यकारी अधिकारी अलेख राऊत यांनी स्वीकारला. याप्रसंगी हिंदीचे महत्व विषद करीत सामाजमाध्यमांद्वारे तसेच इतर क्षेत्रातही हिंदीचा होत असलेल्या अधिक वापरावर प्रकाश टाकण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने हिंदीमध्ये सुरू केलेले ट्विटर हँडल, फेसबुक यावरून हिंदी भाषिकांची जगभरातील संख्या लक्षात येते. हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणात संदर्भ माहिती निर्मिती होत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. सिंग यांनी सांगितले. अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. |
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. भुसावळ : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड यासह देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर १२ दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांना आतंकवादी, खलिस्तानवादी असे संबोधून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात पंजाब, हरियाणा, चंदीगड भारतातील शेतकरी संघटनांनी नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकत्रित आले आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवीद्र निकम, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे तसेच शहर शिवसेनेचे अध्यक्ष बबलू बराटे यांनी कळविले आहे. |
मुंबई - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 'ईडी'ने नोटीस बजावल्यापासून मोदी सरकार आणि भाजपा विरोधात शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. "नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे", असा टोलाही त्यांनी लगावला. |
चंदीगड, 20 जुलै : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणारे चार शूटर पोलिस चकमकीत ठार झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी या चार मारेकऱ्यांना चकमकीत ठार केले आहे. यामध्ये जगरूप रूपा आणि मनप्रीत मनू या गुंडांचा समावेश आहे तर इतर दोन गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. अमृतसर जिल्ह्यातील अटारी गावात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात ही चकमक सुमारे 6 तास चालली. यादरम्यान 3 पोलीस जखमी झाले आहेत. सकाळी 10. 15 वाजल्यापासून पोलिसांची या हल्लेखोरांशी चकमक सुरू होती. ज्या ठिकाणी ही चकमक झाली ती बलविंदर सिंग डेअरी वाले नावाच्या व्यक्तीची जमीन असल्याचे सांगितले जाते. तेथे एक जुनी इमारत होती ज्यामध्ये हे सर्व गुंड लपले होते. चकमकीदरम्यान पंजाब पोलिसांचे जवान घराच्या छतावर चढले होते. यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. यात एक एके 47 सह पिस्तोलचा समावेश आहे. प्रत्यक्षात हे गुंड गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना घेराव घातला. अमृतसर पोलिस आणि गुंड यांच्यात अनेक वेळा गोळीबार झाला. घटनास्थळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. चकमकीदरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. हे बदमाश लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडी यांच्यासाठी काम करायचे. 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडशी जोडला होता. या घटनेत गँगस्टर गोल्डी बराडने एक व्हिडिओ जारी केला आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये बराडीने मुखवटा घातलेला असून, त्याचा चेहरा दिसत नाही. पण पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या आवाजाची पुष्टी केली होती. व्हिडिओमध्ये गोल्डी बराड म्हणाला, 'माझे नाव गोल्डी बराड आहे. मी मुक्तसर साहिबचा रहिवासी आहे. तुम्ही सर्व मला ओळखता. तुम्ही सर्वजण खूप दिवसांपासून बातम्यांमध्ये माझे नाव ऐकत असाल. मूसेवाला प्रकरणात माझे नाव जोडले गेले. मला कसलाही पश्चाताप नाही. हे काम मीच केल्याचे आधीही सांगितले होते. पंजाब पोलिसांनी 13 गुंडांना शस्त्रांसह अटक केली होती, ज्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गँगस्टर-दहशतवादी हरविंदर रिंडा यांच्याशी संबंधित 9 शार्पशूटरचा समावेश आहे. त्याचवेळी पोलिसांच्या चौकशीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो आणि त्याचा ग्रुप सिद्धू मूसवालाच्या गाण्याने खूप रागावला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीत असेही समोर आले आहे की, सिद्धू मुसेवालाच्या गाण्यांवर लॉरेन्स आणि त्याचे साथीदार खूप नाराज होते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगर शहरात होते, व त्यातच युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांचा वाढदिवसाचे निमित्त यावेळी नामदार बाळासाहेब थोरात , आमदार डॉ. तांबे, आमदार लहू कानडे यांनी पाटोळे यांचा सत्कार करून वाढिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या , मयूर पाटोळे हे नगरशहरात युवक काँग्रेसचे उत्तम काम करत आहे, व तसेच सर्वसामान्य युवक कार्यकर्त्यांना देखील काँग्रेस पक्षातच भविष्य घडविण्याची संधी आहे असे मत यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मयूर काँग्रेस मध्ये वयाने सर्वात लहान व लाडका आहे ,भविष्यत पक्ष संघटनेत आणखी मोठे काम कर अासे डॉ. तांबे यांनी यावेळी म्हंटले , तसेच अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वक ज्ञानदेव जी वाफारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष भैय्या वाबळे, शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेजा,अभिजीत लूनिया, गणेश भोसले, आदी काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते. - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । |
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांसह दावे -प्रतिदावे करण्यात येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर शिवसेना सहभागी होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सत्ताधारी भाजपाला आता जनता कंटाळली आहे . अगदी शिवसेनेलासुद्धा, त्यामुळे निवडणूक निकालात कल हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. अनिल देशमुख हे काटोल नरखेड मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर देशमुख यांच्या विरोधात भाजपाकडून चरणसिंह ठाकूर रिंगणात उतरले आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तास्थानी रुजू होणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मग शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, असं अनिल देशमुख यांना वाटत आहे. दरम्यान २०१४ साली काटोलमधून आशिष देशमुख निवडून आले होते, पण २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या कोरोना व्हायरसची मोठी दहशत आहे. चीनमधून सुरु झालेल्या या साथीने पुढे भयानक रूप धारण केले आणि आता आजार इतर देशांमध्ये देखील पसरू लागला आहे. मात्र नेमकं या आजराची सुरुवात कोणत्या व्यक्तीपासून झाली याचा शोध सुरु होता अखेर याचा उलगडा झाला आहे. स्टिव्ह वॉल्श असं या व्यक्तीचं नाव असून ती पेशानं व्यवसायिक आहे. स्टिव्ह यांच्यावर लंडनमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टिव्ह पूर्णपणे बरे झाले असले, तरी त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. अशी माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात स्टीव्ह एका ब्रिटनमधील विक्री परिषदेला गेले होते त्याच ठिकाणी त्याला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे समजते. आणि त्यानंतर स्टिव्ह कडून इतर देशांमध्ये कोरोना पसरल्याने त्यांना सुपर स्प्रेडर असे म्हणण्यात आले. स्टीव्ह ज्या परिषदेच्या कार्यक्रमासाठी गेला होता त्या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला. यानंतर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर सर्व लोकांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत १०९ पैकी ९४ जण मायदेशी परतले होते. त्यामुळे जीवघेणा कोरोना विषाणू पसरत गेला. सिंगापूरमधल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले दक्षिण कोरियाचे दोन जण मलेशियन व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू दोन नातेवाईकांच्या शरीरात पसरला. स्टीव्ह परिषद संपल्यानंतर फ्रान्समध्ये सुट्टीसाठी गेला होता त्याआधी त्याच्या संपर्कात आलेल्या चार ब्रिटन मित्रांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढेच नाही तर स्टीव्हच्या संपर्कातील एका स्पॅनिश नागरिकाला देखील कोरोनाची बाधा झाली त्यानंतर ही व्यक्ती स्पेनमध्ये गेली असता तिच्याद्वारे अकरा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे कोरोना एकाकडून दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पसरत गेल्याचे समोर आले आहे. |
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'एआरटी' सेंटरमध्ये एचआयव्ही, एड्सग्रस्तांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'एआरटी' सेंटरमध्ये एचआयव्ही, एड्सग्रस्तांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना औषधीसाठी पायपीट करावी लागत असून त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एचआयव्ही - एड्स उपचार केंद्रात (एआरटी) जिल्ह्यातील तीन हजार ५०० रुग्ण लाईन वनचा उपचार घेत आहेत. आता औषधा सुधारणा झाल्यानंतर एकच गोळी नियमित घ्यावी लागते. या औषधीचा नॅको (नॅशनल एड्स कंटोल आॅर्गनायझेशन) कडून पूरवठा केला जातो. टीएलई (टीनोफोव्हीट लॅमी व्होडींग इफा व्हिरेंस) या गोळीत तिन्ही घटक आहेत. मात्र महिनाभरापासून या गोळीचा पुरवठा बंद असल्याने एचआयव्हीबाधितांची परवड होत आहे. खासगीत ही औषधी अतिशय महाग आहे. महिन्याकाठी दोन हजार रुपयांचे औषध घ्यावे लागते. व्यक्तीचा सीडीफोर ( पांढऱ्या पेशी) कमी झाल्यानंतर त्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. हळूहळू एचआयव्हीचा व्हायरस वाढत जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात बळावते. त्यामुळे टीएलई गोळ््या नियमित घेणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यापासून या औषधाचा मागणी इतका पुरवठा होत नाही. त्यामुळे औषधासाठी आलेल्या रुग्णाला परत जावे लागते. शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना येथील संपर्क क्रमांक देवून परत पाठविल्या जाते. औषधी आली की नाही, याची खातरजमा करूनच रुग्णांनी यावे, अशी सूचना दिली जात आहे. औषधांचा तातडीने पुरवठा व्हावा यासाठी थेट नॅकोकडे पाठपुरावा केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) |
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल व कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. आयपीएल संपल्यावर चहल व तनिष्का लग्न करणार याबद्दलच्या बातम्यांना सगळीकडे उधाण आलं होतं. पण आता या वृत्तावर युजवेंद्रने पूर्णविराम दिला आहे. ट्विट करत युजवेंद्रने लग्नाबाबतचा खुलासा केला आहे. 'माझ्या खासगी आयुष्यात सध्या काहीही सुरू नाही. मी अजिबात लग्नबंधनात अडणार नाही. मी आणि तनिष्का खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे सर्वाना, मीडियाला व माझ्या चाहत्यांना विनंती आहे की माझ्या लग्नाबद्दलच्या बातम्या पसरवू नका. माझ्या प्रायव्हसीचा तुम्ही सगळे आदर कराल ही अपेक्षा. अफवा पसरवणं बंद करा. माझ्या लग्नाबाबतच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यामुळे काहीही पोस्ट करण्याआधी ते तपासून पाहा', असं युजवेंद्रने ट्विट करत म्हटलं. युजवेंद्रच्या ट्विटमुळे त्याच्या लग्नाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र चहल कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत असून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. चहल सध्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळण्यात व्यस्त आहे. पण त्यानंतर युजवेंद्र चहल व तनिष्का कपूर लग्न करणार असल्याची चर्चा होती पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंमली पदार्थांच्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) कर्नाटकचे दिवंगत मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा यांच्या बंगल्यावर छापा टाकला. सीसीबीने राज्याच्या राजधानीत अंमली पदार्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यापासून या प्रकरणातील आरोपी आदित्य अल्वा फरार आहे. आदित्य हा चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आहे. त्याचे वडील कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या काळातील कट्टर नेते होते. कन्नड चित्रपटाची अभिनेत्री रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, रेव्ह पार्टीचे संयोजक वीरन खन्ना, सेल्समन राहुल आणि आरटीओ लिपिक बीके रवि शंकर आदींना अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक दिवस आधी सोमवारी कोर्टाने रागिनी द्विवेदीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीसीबीने सांगितले की, सर्च वॉरंट मिळवून 'हाऊस ऑफ लाइफ' नावाच्या आदित्य अल्वाच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. चार एकरात पसरलेल्या या बंगल्यात पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यात कन्नड चित्रपटांमधील मोठे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका महिलेसह तीन जणांना मोठ्या प्रमाणात सिंथेटिक ड्रॅगसह अटक केली. हे लोक कन्नड चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींना हा पुरवठा करीत असत. त्यानंतर सीसीबीने हे प्रकरण आपल्या हातात घेतले. दरम्यान, आजकाल चित्रपटसृष्टीत मादक पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणातच फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर आता दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये मादक पदार्थांच्या व्यापाराची आणि रेव्ह पार्ट्यांची प्रकरणेही समोर येत आहेत. |
अभिनंदन - प्रवेश समितीने आपल्याला आपल्या मुलाखतीस पुरेशी मागणी केली आहे! हे उत्कृष्ट आहे. परंतु नृत्य टॅप करू नका. तिसर्याहून अधिक इच्छुकांनी अंतिम स्वीकृती यादीवर नाही. आपण त्या सूचीवरील नावे आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपण काय करू शकता? शाळेच्या वेबसाइटवर टेहळणी करा जेणेकरून आपण त्यांच्या प्रोग्रामशी परिचित असाल, ते काय ऑफर करतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी तयार केलेली प्रतिमा ते कसे समजले आणि कसे त्या मिशन स्टेटमेंट मूर्त स्वरुप देणे प्रयत्न आवडत विचार करा. ते विशेषतः कठोर परीणाम मानदंडाबाबत चिंतीत आहेत का? विविधता? सर्जनशीलता? जे काही आहे, ते आपण हे समजून घेतल्या हे दाखवा. आपली परिपक्वता ही आपली ताकद असेल- आत्मविश्वास, अनुभव आणि नेतृत्व क्षमता दर्शविण्यासाठी त्याचा वापर करा आणि आपल्या मुलांना कमीत कमी गटातुन बाहेर येता येतील अशा मुलांवर आपले पाय ठेवतील. संशोधन कॅम्पस प्रोफेसर आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या प्रोग्राम आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी तयार रहा. कॅम्पसमध्ये सर्वात गतिशील प्रोफेसर्स कोण आहेत, आणि त्यांच्या कामाची शस्त्रे पहा. कार्यक्रमानुसार, ज्यांना आपण सहभाग घेण्यास आणि राष्ट्रीय स्तरावर कॅम्पसमध्ये स्पर्धांत किंवा संशोधन प्रयोगशाळेचा शोध घेण्यास उत्सुक आहात त्यांना शोधा. लक्षणीय माजी विद्यार्थी संशोधन आणि आपल्याला माहित असेल त्यातील अंदाजे भोवतालचा प्रश्न विचारू. आपल्याजवळ शाळेतील सर्व संबंध आहेत का? सर्व माहिती मुलाखत उपयुक्त होईल. त्यांच्या प्रश्नांची छान तयारी करा आणि आधीच अपेक्षित प्रश्नांची काही उत्तरे लिहा. कारण आपण अधिक अनुभवी आहात, आपल्या चर्चेवर लक्ष केंद्रित करण्याची जागा नेतृत्वावर असेल. आपल्या महान शक्ती काय आहे? एक यशस्वी प्रकल्प बोलण्यासाठी तयार रहा. आपल्या पुढाकाराची आणि नेतृत्वाची उदाहरणे देण्यास सिद्ध व्हा. तुम्ही जबाबदारी कशी घेतली? प्रशासकांना असे वाटते की ज्यांना नेतृत्व कौशल्य आहे त्यांनी पदवीधर होण्याचे आणि काहीतरी महत्वाचे काम करण्याची संधी आहे, आणि म्हणूनच विद्यापीठाची प्रतिष्ठा परत देण्याची अधिक शक्यता आहे. तसेच, आपण शैक्षणिक संस्थानातील एका विरामांनंतर परत आल्यास, त्यांना जे मोठे प्रश्न जाणून घ्यायचे आहे ते आहे, " आता आपण शाळेत परत जायचे का? " हे सुनिश्चित करा की आपण प्रत्येक प्रश्नावरून या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहात कारण ती निश्चितपणे विचारली जाईल आणि आपल्या मुलाखतीवर थेट परिणाम करेल. शेवटी, आपल्याकडे अर्थपूर्ण आणि व्यावहारिक प्रश्नांची सूची असल्याचे सुनिश्चित करा हे प्रश्न मिरर किंवा मित्राने विचारून घ्या . त्यांनी कार्यक्रम आणि विशिष्ट तपशीलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे वाटते की प्रवेश समितीचे सदस्य याबद्दल बोलू इच्छित आहेत, परंतु ते असे प्रश्न असले पाहिजे जे या शाळा आपल्यासाठी बरोबर आहे काय हे निर्धारित करण्यात मदत करेल. उदाहरणार्थ, प्रकाशने, इंटर्नशिप किंवा जॉब प्लेसमेंट यावर काय धोरण आहे? विचारू न विचारले जाणारे प्रश्नः - "तर . . . मी काय केलं? " - "मी आर्थिक मदतसाठी किती पैसे मिळवू शकेन? (ही एक वेगळा विभाग आहे, जरी फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती मागणे ठीक आहे. ) - "हे मुलाखत कधी सुरू आहे? " (त्या प्रश्नासह, अचानक . . . इतके मोठे नाही). मुलाखत दिवसः आपण शैक्षणिक संस्थांचे हॉलमध्ये पुन्हा प्रवेश करीत असलात तरीही हे औपचारिक उद्घाटन आहे आणि याचा अर्थ योग्य पोशाख आवश्यक आहे - एक सूट किंवा सुंदर ड्रेस निश्चितपणे जाण्यासाठी मार्ग आहे. नाही जीन्स, नाही scraggly दाढी आणि केस, नाही चक टेलर च्या. ते स्वच्छ करा आणि आपले सर्वोत्तम प्रदर्शन करा. जरी मुलाखतीची प्रक्रिया शाळा-शाळेत बदलली असली तरी, आपण कदाचित प्रवेश अधिकारी, प्राध्यापक आणि सध्याच्या विद्यार्थ्यांशी भेटू शकाल, म्हणून हे सुनिश्चित करा की आपण या तीनपैकी तीन लोकांच्या प्रश्नांची तयारी केली आहे. सोपे होणे चांगले असले तरी, सुरक्षिततेच्या खोट्या अर्थाने फसवणुक होऊ नका- आपण ज्या मित्रांची मुलाखत घेत आहात ते अद्याप तुमचे मित्र किंवा सहकर्मी नाहीत आणि ते आपले मूल्यांकन करत आहेत. प्रौढ-प्रकारचे पेय (ते जरी ऑफर करीत नसले तरी) मिळू नका, बोलू नका बोलू नका, आणि जरी आपण समान वय असू शकाल . . . त्यांच्यावर फटका लावू नका. बर्याच भागात, मुलाखत आपल्याला जे माहित आहे त्याबद्दल नाही, परंतु आपण स्वतः कसे सादर केले आपला अनुप्रयोग आपल्याला हे दूर करण्यासाठी पुरेसे प्रभावी होते, परंतु ते आपली खात्री आहे की आपण वेडे नाहीत, खरोखर आपल्याला स्वारस्य आहे आणि आपण त्यांच्या संस्कृतीसह बसू शकाल. आपल्या मुलाखतीत अधिकार कसे कार्य करावे याबद्दल काही विचारः - वेडीला होऊ नकाः आपल्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येक कारण द्या (हे नाइट्स टेंपलरवरील आपल्या सिद्धान्त आणण्याचा वेळ नाही). - सामना खेळः शैली मध्ये आपल्या मुलाखत मिरर प्रयत्न करा जर ते उघडलेले आणि सभ्य दिसत असतील तर, आरामशीर वळण घेण्याचा प्रयत्न करा, परंतु जर ते वाटलेले दिसले तर मग ते औपचारिक देखील व्हा. - येथे ऐकाः आपल्या योग्यता ध्यास करून संभाषण वर्चस्व नका. ऐकण्याची खात्री करा . - आपण बोलण्यापूर्वी विचार कराः सर्व मुलाखतींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहेः मौन बद्दल काळजी करू नका. आपल्या उत्तरांवर विचार करण्यासाठी वेळ काढा (जरी हे अस्ताव्यस्त वाटेल, आणि तसे होईल). उत्तर देण्यापेक्षा आपल्याला काय म्हणायचे आहे हे उत्तर देणे महत्वाचे आहे. मुलाखत नंतर, आपण एक आभार नोंद करणे आवश्यक आहे- तो मुलाखत प्रक्रिया एक आवश्यक भाग आहे. आपल्या नोटमध्ये, आपल्या मुलाखतींना भेटणे किती आनंददायक आहे (त्यांचे नाव लिहू जेणेकरुन आपण ते विसरू नका) आणि आपण पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी उपलब्ध असल्याचे सांगू शकता. या कल्पनांना ध्यानात घ्या आणि आपण स्वीकृतीच्या मार्गावर असाल. पुन्हा, विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी, मुलाखतींमध्ये उत्तर देणारे सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे "आता का? " आपल्याला असे वाटते की आपण या कल्पनेवर खरोखरच बोलू शकता, तेव्हा आपण स्वीकृती मिळाल्यानंतर एक उत्कृष्ट शॉट मिळविले आहे. रियान हिकी यांच्याशी संबंधित लेखः - महाविद्यालयात हलवत आहात? आपल्या कुटुंबाला घेऊन जा! |
ग्रॅन मेलिया जकार्ता हे 5-स्टार हॉटेल आहे जे जकार्ता गोल्डन ट्रँगलमध्ये आपल्या ग्राहकांसाठी आधुनिकता आणि विदेशीपणा आणते. एकूणच, अवंत-दर्जाचे वास्तुकला आणि निर्दोष डिझाइन हॉटेलच्या अत्याधुनिक सेवा वाढवतात. आणि नंतर आशियाई लक्झरीसह स्पॅनिश परंपरांचे मिश्रण आहे, जे जकार्तामधील दोन्ही विश्रांतीसाठी सर्वोत्तम निवासस्थानांपैकी एक बनवते & व्यवसाय प्रवासी. ग्रॅन मेलिया जकार्ता हे प्रथम श्रेणीतील काही आंतरराष्ट्रीय हॉटेल्सपैकी एक आहे & 5-स्टार मानक देखील धारण करते. हे हॉटेलला तिथे राहणाऱ्या प्रवाशांच्या अपेक्षांपेक्षा जास्त करण्याची परवानगी देते! शिवाय, सुबकपणे नियुक्त केलेले सुइट्स आणि खोल्या चवदार भव्यतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही तपशीलाकडे लक्ष न देता आलिशान सुविधांच्या श्रेणीसह काळजीपूर्वक तयार केले आहे. यामध्ये वाय-फाय, आलिशान बाथरूम, रूम सर्व्हिस, टीव्ही इत्यादींचा समावेश आहे. एकूणच, ग्रॅन मेलिया जकार्ता हे व्यवसायासाठी आणि विश्रांतीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. हे 5-स्टार हॉटेल बँक्वेट हॉल देखील देते जे तुमचे कार्यक्रम अधिक खास बनवू शकतात! या विलक्षण 5-स्टार आस्थापनामध्ये अनन्यता आणि लक्झरीचे वातावरण वाढवण्यासाठी, युमेया फर्निचरमधील फक्त सर्वोत्तम खुर्च्या वापरल्या जातात! हे Gran Melia Jakarta हॉटेलला अतुलनीय सोई प्रदान करण्यास सक्षम करते & रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल, लॉबीमध्ये लक्झरी, & अगदी खोल्या. फर्निचर सारख्या इतर गोष्टींपेक्षा आर्किटेक्चरवर अधिक लक्ष केंद्रित करणे ही बहुतेक हॉटेल्सची एक सामान्य चूक आहे (खुर्च्या, अधिक विशिष्ट होण्यासाठी) उदाहरणार्थ, ज्याला चायनीज खाद्यपदार्थ वापरायचे आहेत ते अन्नाचा आनंद घेण्यावर त्यांचे 100% लक्ष केंद्रित करू इच्छितात. या परिस्थितीत, आरामदायी बसण्याची व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून ग्राहक त्यांच्या जेवणाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल. याउलट, खराब-गुणवत्तेच्या खुर्च्यांमुळे आराम करणे आणि आराम करणे त्रासदायक ठरेल. सुदैवाने, ग्रॅन मेलिया जकार्ता हॉटेल आपली सोईची परंपरा कायम ठेवण्यासाठी युमेया फर्निचरच्या प्रीमियम खुर्च्या वापरते & जागतिक दर्जाच्या सेवा! या उल्लेखनीय खुर्च्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे तपशीलाकडे बारकाईने लक्ष देणे, हे परिपूर्ण अपहोल्स्ट्रीमध्ये स्पष्ट आहे जे उशी रेषा सरळ आणि मखमली गुळगुळीत राहण्याची खात्री देते. त्याचप्रमाणे, खुर्च्या कव्हर्स देखील कार्यक्रमाच्या एकूण थीमशी खुर्च्या जुळतील याची खात्री करण्यासाठी वापरली जाऊ शकतात! शिवाय, युमेया फर्निचरच्या खुर्च्या देखील आरामात आहेत & पुढील स्तरावर टिकाऊपणा. हे ग्रॅन मेलिया जकार्ता हॉटेलला त्याच्या संपूर्ण परिसरात उच्च-गुणवत्तेची सेवा सातत्याने ठेवण्याची परवानगी देते. कोणी बँक्वेट हॉलमध्ये किंवा हॉटेलच्या लॉबीमध्ये बसले आहे की नाही हे महत्त्वाचे नाही; आराम & प्रीमियम-स्तरीय सेवा तशीच राहते! आणि मी नमूद केले आहे की या खुर्च्या 10 वर्षांच्या वॉरंटीसह आणि 500 पौंड वजन सहन करण्याच्या क्षमतेसह येतात... होय, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे जे या खुर्च्यांना या 5-स्टार हॉटेलसाठी इतका चांगला पर्याय बनवते. निष्कर्ष काढण्यासाठी, जकार्ताच्या स्पंदनशील हृदयात असलेल्या 5-स्टार हॉटेलला 5-स्टार मानकांशी जुळणार्या किंवा त्यापेक्षा जास्त खुर्च्यांची आवश्यकता आहे. आणि असे दिसते की ग्रॅन मेलिया जकार्ता हॉटेलने युमेया फर्निचरसोबत भागीदारी करून ते साध्य केले आहे. |
पणजी : गोवा व कर्नाटकमधील पाणी तंटाप्रश्नी मंगळवारी लवादासमोर सुनावणी होऊ शकली नाही. आता २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पणजी : गोवा व कर्नाटकमधील पाणी तंटाप्रश्नी मंगळवारी लवादासमोर सुनावणी होऊ शकली नाही. आता २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. कर्नाटक सरकारला जलदगतीने सुनावणी झालेली हवी होती; पण लवादाचे अध्यक्ष येऊ न शकल्याने लवादाने सुनावणी पुढे ढकलली. गोवा सरकारने आपले सर्व साक्षीदार लवादासमोर हजर करण्यासाठी तयार ठेवले आहेत. सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे गोवा सरकारला पूर्वतयारी करण्यासाठी आणखी वेळ मिळेल. गोव्याचे पहिले साक्षीदार तज्ज्ञ डॉ. ज्योती प्रकाश हे मंगळवारी लवादासमोर हजर होणे अपेक्षित होते. दरम्यान, म्हादई पाणी तंटा प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा व तोडगा काढावा, अशी मागणी मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या कर्नाटक सरकारच्या योजनेस राजेंद्र सिंग यांचा पाठिंबा आहे. कर्नाटकला पाणी वळविण्यास मान्यता दिली जावी, अशी मागणी सिंग यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. एका नदीतून दुसऱ्या नदीत पाणी वळविण्याच्या कल्पनेला माझा आक्षेप आहे; पण कर्नाटकच्या प्रकल्पास आपला पाठिंबा असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. |
हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये प्ले ऑफची शर्यत अजून चुरशीची होत जाणार आहे. इथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळेल. नवीन वर्षात पहिल्याच सामन्यात सोमवारी (2 जानेवारी) ओडिशा एफसी घरच्या मैदानावर मुंबई सिटी एफसीचा सामना करणार आहे. या पर्वात आधीच्या सामन्यात मुंबई सिटीने विजय मिळवत तीन गुणांची कमाई केली होती. मुंबई सिटी हा यंदाच्या पर्वातील एकमेव अपराजित संघ आहे. पण कलिंगा स्टेडियमवर ओडिशाविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे, कारण येथे त्यांना एकदाच अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले आहे. ओडिशाला मागील तीन सामन्यात तीन गुण मिळवता आलेले नाहीत आणि तीनही सामन्यांत त्यांना गोल करता आलेला नाही. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सने अखेरच्या 4 मिनिटाला गोल केला अन् ओडिशाचा पराभव केला. त्यात मागील तीनपैकी दोन सामन्यांत एक तरी खेळाडू निलंबनामुळे बाहेर बसला आहे. सोमवारी साऊल क्रेस्पो हा मुंबई एफसीविरुद्ध सुरुवातीच्या फळीत परतण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती. मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ मुंबई सिटीविरुद्ध तगडा संघ मैदानावर उतरवणार आहे. "आम्ही त्याच रणनीतीने मैदानावर उतरणार आहोत आणि चेंडूवर ताबा ठेवून हाय प्रेसिंग सामना खेळणार आहोत. प्रतिस्पर्धी काय खेळतो याची वाट पाहत बसणारा आमचा संघ नाही. मानसिकता कणखर आहे आणि आम्हाला जिंकण्याची हिच संधी आहे," असे गोम्बाऊ म्हणाले. मुंबई सिटी नवीन वर्षात अपराजित मालिका कायम राखण्यासाठी सज्ज आहे. उद्याचा विजय त्यांना पुन्हा तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवेल. मुंबई सिटीने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवताना 32 गोल केले आहेत. गटविजेत्या हैदराबाद एफसीपेक्षा 8 गोल अधिक मुंबई सिटीने केले आहेत. ग्रेग स्टीव्हर्ट हा हिरो आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल सहाय्य करणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. ग्रेगने 11 सामन्यांत 7 गोल सहाय्य केले आहेत आणि 4 गोल केले आहेत. बिपीन सिंग आणि लालीन झुआला छांगटे यांना रोखणे प्रतिस्पर्धीना अवघड आहे. "खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी मला फार काही करावं लागत नाही, कारण हे सर्व खूप प्रेमळ आणि चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या कामगिरीवर मी खूप आनंदी आहे. आता आम्हाला आणखी चांगलं काय करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल,"असे मुख्य प्रशिक्षक बॅकिंगहॅम म्हणाले. उभय संघामध्ये 7 सामने झाले आहेत आणि निकाल मुंबई सिटीच्या बाजूने आहेत. मुंबई सिटीने 4 विजय मिळवले आहेत आणि ओडिशाला 3 विजय मिळवता आले आहेत. |
आर्टिफिशल इंटेलिजन्सची कमाल आज जग पाहतंय. त्याचा वापर करून अनेक डिझायनर्स आपली कला दाखवत आहेत. शाहिद नावाच्या डिझायनरने काही उद्योगपतींचे महिला रुपातले फोटो बनवले आहेत. या डिझायनरने त्यांच्या या महिला रुपाला नावेही दिली आहेत. या आधीही विविध डिझायनर्सने असे फोटो तयार केले आहेत. मुकेश अंबानींचं नाव या डिझायनरने मुस्कान अंबानी ठेवलं आहे. याच डिझायनरने शार्क टँक इंडिया या शोमधल्या शार्कचे फोटो शेअर केले आहेत. या शार्क्सचे चेहरे त्याने लहान बाळांसारखे दाखवले आहेत. |
सखल ठिकाणी जिथे पाणी साचलं आहे तसंच वाहनं अडकली आहेत त्या ठिकाणी आयनएस तानाजीची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. अशा ठिकाणी आपली वाहनं नेणं टीम टाळत आहे. यासाठी पायी चालत तसंच सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटचा वापर केला जात आहे. काही वयस्कर महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात टीमला यश आलं आहे. दरम्यान एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि नौदलाच्या मदतीने १००० लोकांनी सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. यामध्ये स्थानिक लोकांचीही मदत मिळत आहे. दरम्यान भारतीय नौदल मदतीसाठी पुर्णपणे सज्ज असून गरज भासेल त्याप्रमाणे कार्यरत असणार आहे. |
Diwali News : लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. मुंबई : मुंबईकरांच्या काळजीपोटी प्रमुख रुग्णालयातील भाजलेले वॉर्ड सुसज्ज ठेवावे, जेणेकरून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. दिपावलीच्या काळामध्ये ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. २५ ऑक्टोबर २०१६ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आवाजाचे व हवेत उडणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रहिवासी क्षेत्रातील फटाके दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या दुकानांची तपासणी करा, असे निर्देश परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, मर्यादित स्वरूपाच्या परवानगीतच दिपावली सण साजरा करावा. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलझडी, अनार यासारखे मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्यास राज्य शासन व महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण व सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा. |
मुंबई : मध्य रेल्वेवरील (central Government) सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात (sand hurst road railway station) चालत्या लोकलमध्ये चढत असताना वृद्ध महिला (Senior citizen Waman) प्रवासीचा तोल गेला. फलाट आणि लोकलच्या पोकळी खाली जाणाऱ्या महिलेला त्वरित आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने (RPF) वाचवले. आरपीएफ महिला कॉंन्स्टेबल सपना गोलकर (sapana golkar) यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानमुळे त्या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Footage) झाली असून सर्वत्र महिला कॉंन्स्टेबल सपना गोलकर यांचे कौतुक होत आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, (ता. 21) रोजी दुपारी 3 च्या सुमारास बदलापूरला जाणारी धीमी लोकल स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर आली होती. नंतर काही मिनिटांत आपल्या गंतव्य स्थानकाकडे ही लोकल रवाना होत होती. लोकलचा वेग धिमा असताना एक वृद्ध महिला प्रवासी धावत लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लोकलच्या दरवाज्यामधून आत जाणे त्या महिलेला जमले नाही. या दरम्यान त्या वृद्ध महिलेचा तोल गेला. ती खाली पडत होती. रेल्वे फलाट आणि लोकलच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यावर असलेल्या महिला आरपीएफ काँन्स्टेबल सपना गोलकर यांनी समयसूचकता दाखवून त्या वृद्ध महिलेला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे. या महिला काँन्स्टेबलच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ, मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेतली आहे. |
छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आज 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी शिवनेरीवर पोहचले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. "युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागतो, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय. कोरोनाच्या लढाईत मास्क आपली ढाल आहे, हे विसरू नका," असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. अजित पवार यांनी म्हटलं, "यंदा कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यावर मर्यादा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीचं काम दर्जेदार पद्धतीनं झाली पाहिजेत. हा निधी परिसराच्या विकासासाठी आहे. कामाच्या दर्जेत आणि गुणवत्तेतील कमी खपवून घेतली जाणार नाही. " भारतीय पुरातत्त्व विभागानं 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर प्रकाशयोजना केली आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, "काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करतात, त्या थांबल्या गेल्या पाहिजे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पुन्हा अशा घडू नये यासाठीची खबरदारी प्रशासनानं घ्यायला पाहिजे. " संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच 20 कोटी रुपये निधी रायगड प्राधिकरणासाठी दिले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. " जलदुर्ग प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि रायगड यांना जोडण्यात यावं, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. शिवजयंतीनिमित्त रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय रायगड परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. - सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यानं, गाणी, नाटक इत्यादींचं सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचं केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. - कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. - या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी. - शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरं आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसंच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. शिवजयंतीनिमित्त खेळाडू, राजकारणी आणि सामान्य माणसं अशा अनेकांनी व्यक्त होत शिवाजी महाराजांविषयीचा आदर व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलंय, "शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमत्त त्यांना प्रणाम. त्यांचं शौर्य, बुद्धिमत्ता देशाला युगानुयुगे प्रेरित करत राहिल. " भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने ट्वीट करत म्हटलंय, "शिवाजी महाराजांचं धैर्य आणि त्याग पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. " शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी शिवाजी महाराजांची वाळूची प्रतिमा रेखाटली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. " हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा. ) |
त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबी आहे. अगदी गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या गंभीरपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, विशेषता सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे आदी ठिकाणी नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. नागरिकांनीही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास अडचणी येतील याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे. ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील ही गर्दी रोखावी. राज्य शासनाने दिलेल्या सवलती व्यतिरिक्तच्या वेळेत आस्थापना सुरु असल्याचे दिसल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एखाद्या ठिकाणी गर्दी झाली तर तात्काळ तेथील यंत्रणांनी त्याची माहिती मिळताच कारवाई करणे अपेक्षित आहे. कारण ही गर्दी कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचे निमित्त ठरु नये, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्ण आढळून आलेल्या भागात भेटी देऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व रुग्णालयांना आवश्यक ऑक्सीजनची साठवणूक करण्यासंदर्भाव यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या लाटेत सर्वोच्च मागणी ज्या दिवशी नोंदविली गेली, त्याच्या तीनपट ऑक्सीजन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपलब्धथ राहील, याचे नियोजन सर्व रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. |
भारतीय हॉकी संघाने २०२२ बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने ब्रिटनमधील कोरोनाची स्थिती आणि तेथील विलगीकरणाच्या कालवधीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटनमध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी १० दिवसांचा विलगीकरण कालावधी बंधनकारक आहे. भारतीय संघाने आगामी काळातील एशियन गेम्साला प्राधान्य देत कॉमनवेल्श गेम्समधून माघार घेतली. यापूर्वी इंग्लंड हॉकी संघाने भारतात पुढच्या महिन्यात होणाऱ्या एफआईएच जूनियर हॉकी विश्वचषकातून माघार घेतली होती. कोरोनाच्या खबरदारीसाठी ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवासांचा विलगीकरण कालावधी पार पाडावा लागतो. याच पार्श्वभूमीवर ब्रिटन संघाने हा निर्णय घेतला होता. ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारतीय संघानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत कॉमनवेल्थ गेम्समधूम माघार घेतली आहे. जूनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत भुवनेश्वरमध्ये खेळली जाणार आहेत. दरम्यान, भारत आणि यूकेमध्ये कोरोनाच्या नियमांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद चालू आहे. यूके सरकारणे आधी भारतीय कोरोना प्रतिबंधक वॅक्सीनला मान्यता दिली नव्हती. आता मान्यता दिली आहे, पण भारतीय नागरिकांना तेथे गेल्यावर विलगीकरणात राहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी असेच नियम लागू केले आहेत. याचा परिणाम आता दोन्ही देशांच्या हॉकी संघांवर झालेला पाहायला मिळत आहे. |
शासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ७४ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित झाली. शासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ७४ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित झाली. शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारित निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पैसेवारी घोषित करण्याच्या शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याची सुधारीत नजर अंदाज आणेवारी ७३ पैसे आहे. यामुळे दुष्काळ स्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागाची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर होत असते तर कोकण, पुणे व नाशिक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर होते. राज्य शासनाला केंद्राकडे मदतीचे ज्ञापन पाठविण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर ही तारीख गृहीत समजून औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागाने नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, अशा सूचना महसूल विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. किंबहुना दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला महसूल विभागाने पैसेवारीची सुधारित पध्दत जाहीर केली. ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेली गावे जाहीर करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील ८४६ गावात सरासरी ७४ पैसेवारी जाहीर केली. पैसेवारीच्या सुधारित निकषांमुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती शासन जाहीर करणार, या आशेवर शेतकरी असताना सात दिवसांत २३ सप्टेंबरला शासनाने सुधारित पैसेवारीचा निकष मागे घेतला. ५० पैशांपेक्षा अधिक किंवा ५० पैशांपेक्षा कमी, अशी पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्यात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७३ पैसे दर्शविली आहे. ही सर्व गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४६ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ७२ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७४ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७२ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ७१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ७२ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७१ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७९ पैसे दाखविण्यात आली आहे. |
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आमदार बाजोरिया यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. परंतु, अडत्यांनी त्यांचे ऐकले नाही. शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार एक कोटी 87 लाख रुपयांचा आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन विभागाच्या थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा. ली. यांनी सोयाबीन खरेदीसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचे शेख जावेद हुसेन कादरी यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. एप्रिल आणि मे महिन्यात नर्मदा साल्वेसने लक्ष्मी सेल्स यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे सोयाबीन अडत्यांमार्फत खरेदी करून माल खरेदी केला नाही अशी भूमिका घेतली. संपूर्ण प्रकरणाची बाजार समितीने अंतर्गत चौकशी करून लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन व नर्मदा साल्वेस यांचे परवाने रद्द केले आहे. नर्मदा साल्वेससाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनने 11 अडत्यांकडून सोयाबीन खरेदी केले. जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त क्विंटल सोयाबीन विकला. परंतु, नर्मदा आणि लक्ष्मी फर्मकडून दोन महिने उलटूनही व्यवहाराचे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे अडत्यांनी नर्मदा साल्वेसकडे व्यवहाराचे पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अडत्यांनी याबाबत शांततेत प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांकडून नकार घंटा येत असल्याने अडत्यांनी याबाबत रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवप्रकाश रूहाटीया आणि जावेद हुसेन कादरी यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आमदार गोपीशन बाजोरिया यांनी प्रयत्न केला. परंतु, अडते त्यांच्या प्रस्तावावर मान्य झाले नाही. सर्व अडत्यांच्या खात्यात त्यांची देयक रक्कम जमा करा, त्यानंतर प्रकरण मागे घेण्यात येईल अशी भूमिका अडत्यांनी घेतली असल्याने त्यामुळे बाजोरिया यांची शिष्टाई अपयशी ठरली. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
बीजिंग (चीन) - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतर तो विषाणू ७ दिवस चीनमध्ये पसरू दिला. त्याविषयी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, अशी माहिती चिनी सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांतून उघड झाली आहे. १. 'एसोसिएटेड प्रेस'च्या वृत्तानुसार, 'चीनच्या आरोग्ययंत्रणांनी १४ जानेवारीलाच कर्मचार्यांना कोरोनाच्या साथीचा सामना करण्याचा आदेश दिला होता; परंतु प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेला सतर्क केले नाही. २. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी २० जानेवारीला या विषाणूविषयी लोकांना सांगितले. तोपर्यंत ३ सहस्रांंहून अधिक लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले होते. वुहानमधीले डॉक्टर आणि परिचारिका यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे संकेत डिसेंबर २०१९ मध्ये दिले होते; परंतु अधिकार्यांनी त्या डॉक्टर आणि परिचारिका यांची बोलती बंद केली, तसेच काही डॉक्टरांना शिक्षासुद्धा करण्यात आली. |
पिल्लाला दूध दिल्यानंतर हा टेडीबिअरजवळ जाऊन त्याला स्वतःची आई समजून फिडिंग करतो. वर्धा - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले, महाराष्ट्रासाठी हा मार्ग प्रगतीचा ठरेल असा विश्वास सगळ्यांनीच व्यक्त केला. मात्र याच मार्गावर होणाऱ्या अपघातांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. केवळ माणसेच नव्हे तर समृद्धी महामार्गावरील अपघातात मुक्या प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना २ महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गावर घडली. समृद्धी महामार्गावर वर्धानजीक एका मादी माकडाचा अपघातात मृत्यू झाला होता. यावेळी माकडासोबत त्याचे पिल्लूही होते. आईच्या अपघातानंतर पिल्लू आईला पकडूनच होते. तेव्हा महामार्गावरून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने अपघात झालेल्या माकडाला आणि त्याच्या पिल्लाला वर्ध्यातील करूणाश्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. याबाबत प्राणीमित्र ऋषिकेश गोडसे म्हणाले की, जेव्हा करुणाश्रममध्ये या माकडाला आणि पिल्लाला आणले. तेव्हा या पिल्लाला जगवायचे कसे हा प्रश्न पडला होता. मग आम्ही या पिल्ल्ला टेडीबिअर दिला. त्या टेडीबिअरच्या सहाय्याने हे पिल्लू आता २ महिन्याचे झाले आहे. या पिल्लाचे आणि टेडी बिअरचे अनोखं नाते बनले आहे. पिल्लाला दूध दिल्यानंतर हा टेडीबिअरजवळ जाऊन त्याला स्वतःची आई समजून फिडिंग करतो. आता या पिल्ल्याची प्रकृती सदृढ आहे असं त्यांनी सांगितले. तसेच माकडाच्या पिल्ल्लाला माणसाने हाताळले नाही कारण ते माणसाळू नये. जर या पिल्लाला माणसाची सवय लागली तर त्याला जंगलातील अधिवासात मुक्तपणे संचार करता येणार नाही याची खबरदारीही प्राणीमित्रांनी घेतली. |
माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे 'हापूस' या फळाशी माझे तेव्हापासूनचे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही म्हणजे - लहानपणापासून 'हापूस' हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही. अप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव वधारलेले असत. पण तरीही वडिल आंबे हमखास घेऊन येत. त्यांना आंब्यांची चांगली जाण होती. शिवाय घरी दारावर काही 'माम्या' (मामीचे बहुवचन). हा खास कोकणी शब्द आहे. दारावर ताजी भाजी, ओले काजु, लोणचाच्या कैर्या, आंबे, फणसाची कौरी, इत्यादी विकायला घेऊन येणार्या बायकांना 'मामी' म्हणायची पद्ध्त आहे. जसे सगळे पोलिस 'मामा' असतात ना तशी. कोकणेतर लोकांचा एक (गैर)समज असा की कोकणात प्रत्यकाच्या आंब्यांच्या बागा आहेत. तो समज स्वाभाविक आहे म्हणा, पण माझ्या सारखे बरेच रत्नागिरीकर आजन्म आंबे विकत खात आले आहेत. काही बागायतदार कच्चे आंबे विकत. वडिल असे कच्चे आंबे शेकड्याच्या हिशोबाने विकत घेत. त्यात एक 'बिटके हापूस' हा प्रकार असे. ज्या देठांना काही आंबे एकदम लागतात, त्यातले काही आकाराने मोठे होतात, आणि काही छोटे रहातात. पण आकार छोटा असलातरी गुणधर्म सारखेच. आम्हाला या बिटक्यांचे भयंकर वेड. शिवाय हा छोटासा आंबा चवी इतकाच दिसयलाही 'गोड'. तर वडिलांचा ठरलेला विकणारा माणूस असे 'बिटके हापूस' सुद्धा विकायच्या. मग घरी आणून रितसर त्यांची अडी घालून वेताच्या करंड्यांमध्ये पिकायला ठेवत. दर दिवशी ती अडी बाजुला करून आंबे किती पिकले आहेत यावर नजर ठेवावी लागत असे. आणि एकदा का आंबे पिकायला लागले की संपूर्ण खोली हापूस आंब्याच्या वासाने घमघमत असे. पिकलेले आंबे जमिनीवर नीट पसरुन ठेवावे लागत. खोलीभर नुसते आंबेच आंबे. हवे तितके खा. काही बंधन नाही. हापूसच्या जोडीला पायरी, रायवळ आंबे ही मुबलक असायचे. आई विविध आंब्याचे विविध प्रकार करायची. कैरीचे ताजे लोणचे, आमरस, साखरांबा, पन्हे, आंब्यची साटं, रायवळच्या पिकलेल्या अख्ख्या आंब्याचे रायते, पल्प, आंब्याची वडी, केक, आईस्क्रिम, जाम, आणि बरेच काही. दर दिवशी नविन बेत असे. ही चंगळ अगदी आंब्याचा सिझन संपेपर्यंत चाले. सुट्टीत घर पाहुण्यांनी भरुन जायचे. मावस-मामे-आत्ये-चुलत भावंड एकत्र जमून आंब्याचा यथेच्छ आनंद घेत असू. काल पहिला आंबा पिकला. आधी देवाला ठेवला आणि मग आम्ही दोघांनी प्रत्येक फोडीचा आस्वाद घेत घेत, तो फस्त करण्याचे स्वर्गीय सुख घेतले. हापूस आवडला! यंदा हापूस इतका महाग झालाय कि इथे भारतातही (अगदी रत्नागिरितही) सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर गेलाय. त्यामुळे तुम्हाला इतक्या दूर राहूनही निदान एक डझन हापूस खायला मिळाला याचा आनंद झाला. आणि हो, आता आंबे मोजून मापून खायची सवय लावायला हवी, नाही का? Hapus awadla. Season sampe paryant tula bharpur ambe khayla milot hi devakade prarthana. khupach chan....avadla tuzha hapus cha lekh....coincidentally, mazhya eka mitrane sarva chilla pillan sathi hapus che t-shirt kele ahet...te suddha me justat collect kelet....so its hapus everywhere.... we started as long as april 4...gudipadwyachya divhsi...jevha ithe 2000 rupaye dozen hote....hahahaha....but since then chaluch ahe....shur sakali uthla ki amba ase mhanun je chalu hoto to thambatach nahi....aso...hope u eat more at some reduced prices....and plan your next trip in may so that bharpur khaun jashil.... जर्सीत कुठे मिळतात हापूस? पत्ता देऊ शकाल का? मी चार वर्षं जर्सीत राहून तळमळतोय हापूस खाण्यासाठी :).. प्लीज.. wholefoods (Texas) madhe milat ahet asa aajach sakali aikalay.... Tithe te Indian mango mhanun vikat ahet. bhav post madhe sangitalya pramanech ahe. Abhijit Kulkarni (01:33:14) : Mastach.. hyavarun mala athavla... Mee NJ, Parlin madhye astana, eka patel chya dukana javal eka (pakistani) desi cha dukan hota. tyachya kade kahi ambe hote vikayla ani mala yevun 3nch divas zale hote ithe. Tyala sahaj vicharla kuthla amba ahe re? ( to totapuri/ ani kuthlya tari jateetla mix / hybrid amba hota with worst taste ever) ashich gammat.... |
(फाइल फोटो- राहुल महाजन आणि डिंपी गांगुली) मुंबईः टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या 'बिग बॉस'मध्ये शुक्रवारी डिंपी गांगुलीची एन्ट्री झाली आहे. चर्चेत कसे राहावे हे डिंपीला चांगलेच ठाऊक आहे. डिंपीच्या एन्ट्रीने शोचा टीआरपी वाढेल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. डिंपी राहुल महाजनची पत्नी आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल महाजनसोबत बिघडत चाललेल्या नात्यामुळे डिंपी प्रसिद्धीझोतात आली होती. डिंपीने राहुलवर मारहाण केल्याचा आरोप लावून त्याचे घर सोडले होते. मात्र राहुलने माफी मागितल्यानंतर ती घरी परतली होती. काही दिवस लोटत नाही तोच राहुल आणि डिंपीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. न्यायालयात घटस्फोटाची मागणी करणारा अर्जसुद्धा या दोघांनी दाखल केला आहे. बातमी आहे, की दुबईस्थित बिझनेसमनसोबत डिंपीच्या वाढत चालेल्या जवळीकमुळे राहुलसोबतचे तिचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी मे महिन्यात दोघांनी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. अद्याप त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. यादोघांमधील वाद इतका एकोपाला गेला आहे, की दोघांचा घटस्फोट होणे निश्चित आहे. राहूलच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार, 'दोघांचा घटस्फोट होणे निश्चित आहे. राहूलला निवडणूक संपण्याची प्रतिक्षा होती. दोघांचे नाते संपुष्टात आले आहे.' डिंपीचे माहेरचे आडनाव गांगुली आहे. 2010 मध्ये 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये डिंपी सहभागी झाली होती. सर्व स्पर्धकांमध्ये डिंपीने बाजी मारत राहुलसोबत लग्न केले. राहुलच्या आयुष्यात पदार्पण करण्यापूर्वी डिंपीने मॉडेलच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. लग्नानंतर डिंपीची काही खासगी छायाचित्रे इंटरनेटवर आली होती. ती छायाचित्रे बघून डिंपी बिनधास्त आयुष्य जगते, हे दिसून आले होते. |
बहीणभावाच्या प्रेमाची अनेक उदाहरणे समाजात असताना, थोरल्या बहिणीने लहान भावाचा खून केल्याची अविश्वसनीय वाटावी अशी घटना अमरावती येथे घडली. अमरावतीः घराबाहेर जाऊ देत नाही या कारणासाठी मोठ्या बहिणीने लहान भावावर बत्त्याचे अनेक वार करून त्याला ठार केल्याची घटना खोलापुरी गेट येथे घडली. या बहिणीला शुक्रवारी दुपारी सराफा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने तिचे आईवडील सुन्न झाले आहेत. नीता (बदललेले नाव) हिला आपले आईवडील आपल्यापेक्षा लहान भावावरच जास्त प्रेम करतात असे नेहमी वाटत असायचे. तसे ती बोलूनही दाखवत असे व त्याविरुद्ध रोषही व्यक्त करत असे. मात्र तिच्या या बोलण्याकडे आईवडिलांनी फार गंभीरतेने विचार केला नाही. तिच्या या रागापायी तिने याआधीही घर सोडून जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते. आठच दिवसांआधी तिला पोलिसांनी घरी आणून सोडले होते. त्यामुळे त्यावर कायमची देखरेख ठेवली जात होती. गुरुवारी तिचे आईवडिल दोघेही घरी नसताना तिने पुन्हा घर सोडण्याचा निर्धार केला व बॅग भरायला घेतली. ते पाहून लहानशा भावाला पुढील कल्पना आली. त्याने ताई, तू जाऊ नको ना.. अशी प्रेमळ व आर्त विनवणी सुरु केली. त्याला न जुमानता ती घरातून निघू लागली. त्यावेळी लहानग्या भावाने असहाय्यपणे मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला.. त्याने आरडाओरडा सुरू करताच संतापलेल्या बहिणीने जवळच पडलेला बत्ता उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार करणे सुरू केले. बत्त्याच्या माराने त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले व तो खाली कोसळला. रक्ताने माखलेले कपड्यांनिशी तिने घरातून पळ काढला. रात्री ती अकोली रेल्वेस्थानकावर थांबली असता तेथे तिच्या परिचयाचा एक तरुण आला. त्याला तिने खोटी कहाणी सांगत रात्रभरासाठी आश्रय देण्याची विनंती केली. त्यानेही तिला आपल्या घरी नेले. सकाळी ही बातमी उघड होताच, त्याने तिला सराफा परिसरापर्यंत आणून सोडले. |
रशियाचं चीनवरील वाढतं अवलंबत्व भारतासाठी अडचणीचं ठरेल? स्वीडन आणि फिनलँड नाटोत येण्याची शक्यता रशियाच्या पराभाचे कारण बनेल का? रशिया-युक्रेन युद्धामुळे चीनच्या मुसक्या आवळायची भारताला संधी? युक्रेननंतर आता ब्रिटनला रशिया उद्ध्वस्त करणार? |
ईरई नदीच्या काठाचे सौदर्यीकरण केले जात आहे. आगामी काळात नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. चंद्रपूर : ईरई नदीच्या काठाचे सौदर्यीकरण केले जात आहे. आगामी काळात नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्या सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबध्द असून शहराला विकासाच्या दृष्टीने सर्वच बाबतीत पुढे नेण्याची ग्वाही दिली. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलते होते. कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर वसंत देशमुख, मनपा आयुक्त संजय काकडे, सभापती एस्टर सिरवार आदी उपस्थित होते. ईरई नदीच्या सौंदर्यीकरणासह इरई नदी ते वडगांवपर्यंत ऊर्जा बचत व नवीन आधुनिक पध्दतीने उभारण्यात येत असलेल्या पथदीवे उभारणाचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावर ८१ लाख ७२ हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच डस्टबीन वाटप व लोकार्पण सोहल्यानंतर पाच देऊळ येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जटपुरागेट ते रामाळा तलाव ते पाच देऊळ ते बगड खिडकी रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावर ४ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून हा रस्ता करण्यात आला. कोनेरी स्टेडियम येथे ६० लाख रुपए खर्च करून होत असलेल्या नूतनीकरण कामाचा पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी ४१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या रय्यतवारी प्रभागामध्ये बायपास रोड ते समाज भवन ते लव इंडिया आर्गनायझेशन चर्चपर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन, वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळील १ कोटी ४४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजनही केले. वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळ पथदिवे उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ३१ लक्ष रुपए पथदिव्यांवर खर्च होणार आहे. जयका आॅटो ते भागवत आर्केडपर्यंतसुध्दा सदर पथदीवे बसविले जात असून ५९ लाख ४७ हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन झाले. जुना वरोरा नाका ते पोस्ट आॅफिसपर्यंत पथदीवे बसविण्यात येत आहे. नागपूर रोड येथे कॉ. धांडे यांच्या घरासमोरील खुल्या जागेचा विकास केला जात आहे. त्या ४० लाख ३७ हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जटपुरा गेट ते इंदिरा गांधी पुतला दरम्यान बसविण्यात येत असलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी) मौलाना अब्दुल कलाम आझाद बागेतील जलशुध्दीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी भूमिपूजन व लोर्कापण केलेली काही कामे महानगरपालिका निधीतून, काहीकामे मागासक्षेत्र अनुदान निधीतून आणि काही कामे ना. मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून केली जात आहे. |
शेतकरी आंदोलन व क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेलं मत, यावरच गुरुवारी दिवसभर चर्चा रंगली. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हीनं ट्विट काय केलं, भारतीय क्रिकेटपटूंनी एका आशयाच्या ट्विटचा सपाटा लावला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, प्रग्यान ओझा यांनी रिहानाचं नाव न घेता तिला अप्रत्यक्ष सुनावले. भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत, हा समान संदेश देणारे ट्विट या सर्व क्रिकेटपटूंनी केले. हे असे कसे घडले, यामागचं गुपित टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सांगितले. जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाली तेव्हा भारतीयांनीही दुःख व्यक्त केले; इरफान पठाणचा 'यॉर्कर' भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England) यांच्यात पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाची गुरुवारी बैठक पार पडली आणि त्यात शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचे विराटनं सांगितलं. तो म्हणाला,"देशातील चालू घडामोडींवर आम्ही नेहमी चर्चा करतो आणि प्रत्येकजण त्यावरील आपलं मत मांडतो. तशीच चर्चा शेतकरी आंदोलनावरही आज झाली आणि त्यानंतर प्रत्येकानं सोशल मीडियावर त्यांची मत मांडली. " भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का! ; कंगना राणौतची जहरी टीका जाणून घ्या कोण काय म्हणालं? जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे. विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे. सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, "एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया. "देशानं एकत्र येऊन हा प्रश्न आज किंवा उद्या सोडवू, परंतु याचा अर्थ देशात फूट पडलीय असा होत नाही. चर्चेनं सर्व प्रश्न सुटतील,"असे सुरेश रैनानं ट्विट केलं. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, भारताच्या आर्थिक जडणघडणीत कृषीक्षेत्राचे मोठे योगदान आहे. शेतकरी हे देशाचा पाठीचा कणा आहेत. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो चर्चेनं लवकरच सोडवण्यात येईल, अशी मला खात्री आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, आपण सर्व एकत्र उभे राहिलो तर सर्व प्रश्न सोडवले जाऊ शकतात. चला तर मग एकजूट राहूया आणि अंतर्गत प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं काम करूया. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
The Lokpal and Lokayuktas: Study Material for MHADA Exam 2021: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान. हा विषय कट ऑफ मार्क्स ओलांडण्यासाठी आवश्यक स्कोअर प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यात स्टॅटिक जनरल नॉलेज हा घटक महत्वाचा आहे. लोकपाल व लोकायुक्त हा घटक स्टॅटिक जनरल नॉलेज व भारताची राज्यघटना या दोन्ही विषयात येतो. त्यामुळे या विषयावर पकड असणे गरजेचे आहे. आता आगामी म्हाडाच्या परीक्षेमध्ये या विषयाचा चागला अभ्यास असणे गरजेचे आहे. म्हाडा भरती 2021 चा पेपर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. या म्हाडा भरतीच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान विषयावर एकूण 50 विचारले जातील. यात लोकपाल व लोकायुक्त यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आज या लेखात आपण लोकपाल आणि लोकायुक्त (The Lokpal and Lokayuktas), लोकपालचा इतिहास, रचना, भारताचे पहिले लोकायुक्त कोण आहेत? याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती पाहणार आहोत. The Lokpal and Lokayuktas: लोकपाल व लोकायुक्त (The Lokpal and Lokayuktas) हे भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण आहे. जी भारतीय प्रजासत्ताकातील सार्वजनिक हिताचे प्रतिनिधित्व करते. लोकपालाचे वर्तमान अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष आहे. लोकपालचे अधिकार केंद्र सरकारच्या सार्वजनिक प्रतीनिधींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचे आहेत. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील जनलोकपाल आंदोलनानंतर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये संसदेत सुधारणांसह मंजूर करण्यात आला. लोकपाल राष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जबाबदार आहे तर लोकायुक्त राज्य स्तरावर समान कार्य करतात. History of The The Lokpal and Lokayuktas: 1963 पासून, भारत लोकपाल नियुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा जोपासत आहे. लोकपाल हा वाक्यांश एलएम सिंघवी यांनी तयार केला आहे. 1967 मध्ये ब्रिटनमधील लोकपालाच्या धर्तीवर याची निर्मिती झाली. लोकपालची 'कुप्रशासन' उघड करण्याची कल्पना होती, ज्याची ब्रिटीश खासदार रिचर्ड क्रॉसमन यांनी "पक्षपातीपणा, दुर्लक्ष, विलंब, अक्षमता, अयोग्यता, मनमानी इत्यादी दूर करणे अशी व्याख्या केली होती. त्याच्या गरजेची पुष्टी करूनही, 1964 ते 2003 पर्यंत सौम्य दक्षता आयोगाला प्राधान्य देऊन, भारतात लोकपाल खरोखर कोणालाच हवा नव्हता. 1960 मध्ये, भारतीय संसदेने पहिल्यांदा लोकपाल (The Lokpal and Lokayuktas) नियुक्त करण्याच्या कल्पनेवर चर्चा केली ज्याला खासदारांसह सार्वजनिक कार्यकर्त्यांविरुद्धच्या तक्रारी पाहण्याचा अधिकार असेल. 1966 मध्ये, पहिल्या ARC (प्रशासकीय सुधारणा आयोग) ने भारतात 'लोकपाल' निर्माण करण्यासाठी शिफारसी जारी केल्या. ही एक द्विस्तरीय प्रणाली होती, एक केंद्रासाठी आणि दुसरी राज्य स्तरासाठी लोकपाल विधेयक 8 वेळा संसदेत मांडले गेले पण ते मंजूर झाले नाही. 2002 मध्ये, MN वेंकटचिलिया समितीने लोकपाल आणि लोकायुक्तांच्या (The Lokpal and Lokayuktas) नियुक्तीसाठी राज्यघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला; मात्र, समितीने भारताच्या पंतप्रधानांना लोकपालच्या अधिकारक्षेत्राबाहेर ठेवले. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने, वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली लोकपालची तातडीने निर्मिती करण्याची शिफारस केली. 2011 मध्ये, सरकारने भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भ्रष्टाचाराचा मुकाबला कसा करायचा आणि प्रदीर्घ प्रलंबित लोकपाल विधेयकाचे मूल्यांकन करण्यासाठी सूचना देण्यासाठी मंत्री गटाची (GoM) स्थापना केली. लोकपाल विधेयक, 2011 संसदेत सादर करण्यात आले, ज्यामध्ये विशिष्ट लोकसेवकांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी लोकपाल नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली होती. Composition of The Lokpal: भारताचे राष्ट्रपती लोकपालच्या प्रत्येक सदस्याची निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे नियुक्ती करतील ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर आठ पर्यंत सदस्य असतील. लोकपालच्या (The Lokpal and Lokayuktas) रचनेतील अध्यक्ष व सदस्य कोणकोण असतील हे खाली दिलेले आहे. या सर्वांना राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जाते. The Lokayukta: लोकायुक्त ही भारतातील राज्यांमधील भ्रष्टाचारविरोधी लोकपाल संस्था आहे. एकदा नियुक्त झाल्यानंतर, लोकायुक्तांना सरकार बरखास्त करू शकत नाही किंवा त्यांची बदली करू शकत नाही आणि केवळ राज्य विधानसभेद्वारे महाभियोग प्रस्ताव मंजूर करून काढून टाकले जाऊ शकते. मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय सुधारणा आयोगाने (ARC) 1966 मध्ये "नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या समस्या" या विषयावर एक विशेष अंतरिम अहवाल सादर केला. या अहवालात, ARC ने 'लोकपाल' आणि 'लोकायुक्त' (The Lokpal and Lokayuktas) अशी दोन विशेष प्राधिकरणे, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्याची शिफारस केली. लोकायुक्त, आयकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोसह, मुख्यत्वे राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करतात. लोकायुक्तांच्या अनेक कृतींमुळे आरोप झालेल्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 1971 मध्ये लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायद्याद्वारे लोकायुक्तांची (The Lokpal and Lokayuktas) संस्था सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. त्यानंतर ओडिशा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र या राज्यांनी असेच कायदे लागू केले. अधिकार, कर्मचारी, निधी आणि स्वतंत्र तपास यंत्रणा यांच्या अभावामुळे महाराष्ट्र लोकायुक्त हा सर्वात कमकुवत लोकायुक्त मानले जातात. दुसरीकडे, कर्नाटक लोकायुक्त हे देशातील सर्वात शक्तिशाली लोकायुक्त मानले जातात. |
मुंबईःक्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आजही दिलासा मिळू शकला नाही. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केले असून या अर्जांवरील सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही. या तिन्ही अर्जांवरील उर्वरित सुनावणी आता उद्या (बुधवार) दुपारी होणार आहे. दरम्यान, आर्यन, अरबाज, मूनमून यांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ( Aryan Khan Bail Plea Latest Update ) जामीन अर्जावर आर्यनतर्फे आज युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्यातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे तिन्ही अर्जांवरील पुढील सुनावणी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आता उद्या ठेवली आहे. उद्या दुपारी ही सुनावणी होईल. त्यामुळे आर्यनला जामीनदिलासा मिळणार की नाही, याचा फैसला आता उद्या अपेक्षित आहे. आर्यनच्या वतीने आज सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात युक्तिवाद केला. 'बाहेर राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांशी आर्यनचा काहीच संबंध नाही. आमचा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर आरोप नाही आणि पंच साक्षीदार एक किंवा दोनशीही आमचा संबंध नाही. आम्हाला आमची बाजू मजबूत करण्यासाठी कोणत्याही आधाराची गरज नाही, त्यामुळे बाहेरच्या आरोप प्रत्यारोपांशी आमचा काहीच संबंध नाही, हे आम्ही प्रतिज्ञापत्रावरही स्पष्ट केलेले आहे', हे रोहतगी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आर्यनच्या विरोधात केसच होऊ शकत नाही, असे नमूद करत रोहतगी यांनी जोरकसपणे मुद्दे मांडले. 'आर्यनला ड्रग्ज सेवन करताना पकडले नाही. त्याच्याकडून काहीच हस्तगत केले नाही. फक्त अरबाजसोबत तो गेला होता. त्यात अरबाजकडे ड्रग्ज होते हे आर्यनला माहीत होते, असा निष्कर्ष एनसीबीने काढला तेच चुकीचे आहे. अरबाजवरील आरोप खरे मानले तरी त्याच्याकडे फक्त ६ ग्रॅम चरस आढळले, त्याआधारेही आर्यनला गजाआड ठेवले जाऊ शकत नाही', असे रोहतगी यांनी नमूद केले. एनसीबीने दुसरा आधार घेतलाय तो ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपाचा, दलाल असल्याप्रमाणे आर्यनचा सहभाग असल्याचे दाखवण्यासाठी पण आर्यनला कलम २७ लावलेले नाही. सर्वसाधारण आरोप लावत कटात सहभाग असल्याचे एनसीबी म्हणत आहे. आणखी दाखवले आहे ते आर्यनचे व्हाट्सअॅप चॅटस. २०१८, २०१९ वगैरेचे. क्रूझ टर्मिनल विषयी, या प्रकरणाविषयीचे काहीच चॅट्स नाहीत. आपण असे गृहित जरी धरले की, आर्यन आणि त्याचे मित्र मंडळी रेव्ह पार्टीसाठी जमणार होते पण ती पार्टी झालीच नाही, एनसीबीने टर्मिनलवरच हटकले आणि पकडले. सेवन करताना पकडले वगैरेचाही प्रकार नाही. त्यामुळे आर्यनच्या विरोधात केसच होत नाही, असे रोहतगी म्हणाले. अरबाजकडून काही तरी हस्तगत केल्याचा एनसीबीचा दावा असला तरी त्याने ते फेटाळले आहे. त्याचे उत्तर त्याचे वकील देतील, मात्र एनसीबीने आर्यनला अटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही रोहतगी यांनी नमूद केले. |
२१. १७२- परशुरामभाऊंची शेवटची स्वारी इ. स. १७९९ आशीर्षवरून मरारूप गर्मी विशेष वडीली छ० २ साबानचे आशीर्वादपत्र पाठविल २७ मावानीं मुक्काममजकुरास पावले. "कामाठी याचे गेजमेरे पाप्रमाण बाकी अखरसालीं हिशेब पावेल. व जिलीवीचे प्याथांची अकरमानी ना करण्याचा मजकूर मागाहून लिहितों. " म्हणोन लिहिले, ती बापुस धातक्षयाचा उपद्रव जाहला आहे म्हणून लिहिले, त्यास भा नाकर्शल तेव्हां खरं. राजश्री माधवराव गस्ते बांसगेले असता तरासग मातारेकर याणी शिराळेंहून येऊन छापा घातला. बहुत नाशाला रूप रा॥ बाबा निघून खटावाचे मुक्कामास आले म्हणून लिहिले, त्यास जमिगानं दग्याचे काम केलें. ईश्वर इच्छेस उपाय नाहीं. इकडील वर्तमान वाटलान्या पत्रावरून विदित होईल. येलबुर्गेचे बोलणें एक दोन रोजांत फडशा हाईल. करवीरकरांची फौज नवलगुंदच्या सुमारें आली आहे. या प्रमाणे वर्तमान आहे तीर्थस्वरूप राजश्री विठ्ठलराव यादवाडकर यांस छ० ८ साबानीं मोर्चात दक्षिणच्या अंगे तोफा लाविल्या होत्या तिकडे गेले होते तेव्हां गोळी आंगरखा फाटून पोटास लागली. हलकी जखम आहे. कळावें. वरकढ मजकूर मदार याजबरोबर लिहिला आहे त्याजवरून विदित होईल. चिरंजीवा ची प्रकृत ठीक नाही इतक्यास्तव वडिलांचे मर्जीस आल्यास लक्षमृत्युंजय अनुष्टान करावयाची चाज्ञा व्हावी. सेवेशीं विदित होय हे विज्ञापना. नं ४६४४ श्री माऊति प्रसन्न. ( पौष शु० ११-१७ जाने. ) ३० १५ भावान सन. तिस्सा तिसैन. पौष. शिवराजश्री बाळासाहेब वडिलांचे सेवेशीं. अपत्य वाणाने दोन्ही कर जोडून शिर साष्टांग नमस्कार विज्ञापना तागायत ३० १० साबानपावेतों मुक्काम येलबर्गे येथें वडिलांचे आशीर्वादकरून नुसरून सां विशेष स्वामीकडून पत्र येऊन संभाळ होत नाहीं. त्यास न करावें. येणारासमवेत पत्र पाठवून सांभाळ करीत जावा. यानंतर आम्हांकडील वर्तमान तर येलबर्गे यास मोर्चे लावले आहेत. तोफांचीही मागगेरी वरचेवर होती, परंतु तहामध्ये आद्यापवत येत नाहीं. गायाचं पूर्वस तोफा लाविल्या. भिंताड दोन हात पडलें. तदनंतर गांवाचे उत्तरेस व्यवल्या तिकडुनन मारगिरी चालेना. हल्लीं गांवाचे दक्षिणेस लावल्या आहेत परंतु गांव भरीव आहे. सुरंग लावावयाचे मसलतींत आहेत. राजश्री घोंडपित गोखले यांजकडून दोनशें स्वार रुसून राजश्री ● परशरामभाऊंच्या २ लष्कररीतून पत्र बाळासाहेबास मिरजेस. तसेच पढच्या नंबरच. |
मुंबईः- ई सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे करण्यात येत आहे. १) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका . २) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका . ३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका . ४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या. ५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका . केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे. |
Akola Police News नव्याने पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी खांदेपालट केले. अकोला : पाेलीस निरीक्षक तसेच सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांची यादी राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर नव्याने पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी खांदेपालट केले. त्यानुसार नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले प्रकाश पवार यांना बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. यासोबतच नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले दत्तात्रय आव्हाड यांना रामदासपेठ पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्याकडे पातूर पोलीस स्टेशनचा कारभार सोपविण्यात आला आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेले सुनील सोळुंके यांना बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमधये बदली देण्यात आली आहे. यासोबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी सचिन यादव यांची तर पिंजर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी महादेव पडघन यांची बदली करण्यात आली आहे. या सोबतच दहीहंडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी महेश गावंडे तर उरळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी आनंद वडतकर व सायबर सेलच्या प्रमुखपदी प्रशांत संदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बदल्यांचा आदेश शनिवारी दिला आहे. |
एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - अविश्वसनीय विजय मिळवण्याची क्षमता, संपूर्णपणे विजयी सांघिक कामगिरी, चपळ क्षेत्ररक्षण अशा सर्व गोष्टींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे पदार्पणातच आयपीएल स्पर्धेत सर्वांना प्रभावित करणाऱ्या गुजरात टायटनने आजही आपली विजयी कामगिरी अभेद्य ठेवत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा गडी राखून पराभव केला. टाटा आयपीएल 2022 मधला आजचा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन या संघात झाला, ज्यात बंगलोर संघाचा कर्णधार डूप्लेसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 170 धावा जमवून हा निर्णय योग्य असल्याचेही सिद्ध केले. खरे तर बंगलोर संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खळबळजनक झाली, कर्णधार डूप्लेसी भोपळाही न फोडता संगवानच्या गोलंदाजीवर विकेटकिपर साहाच्या हातात झेल देवून बाद झाला, आणि बंगलोर संघाला मोठा धक्का बसला, पण अखेर या धक्क्यातून संघाला सावरले ते विराट कोहली आणि रजत पाटीदार या जोडीने. आताशा कोहलीच्या कमी धावात बाद होण्याची क्रिकेटरसिकांना कितीही आवडत नसले तरी सवय झाली आहे, तो ही ब्रेक न घेता (हा सल्ला त्याला त्याच्या आवडत्या कोचनेच दिला आहे) खेळतो, त्याचे हल्ली मिथुन चक्रवर्तीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या नव्या चित्रपटासारखे व्हायला लागले आहे. निर्मात्याला वाटायचे दादाचा हा चित्रपट तरी आपल्याला पैसे वसूल मिळवून देईल, पण कसले काय चित्रपट पहिल्याच आठवड्यात डब्ब्यात, तसेच कोहलीचेही व्हायला लागले आहे. आणखी एक इंनिंग आणि त्यात तरी त्याची मोठी (शतक) खेळी होईल असे वाटत असते आणि हाय रे दैवा, सगळ्या अपेक्षा कचऱ्यात, तसे तो निराश करत आणि होत बाद होतो. आज मात्र त्याची बॅट बोलली आणि त्याला दुसऱ्या बाजूने रजत पाटीदारनेही चांगली साथ दिली. या जोडीने बघता-बघता दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 99 धावांची भागीदारी करून चांगलाच डाव सावरला. दोघेही उत्तम खेळत होते, कोहली चांगलाच भरात आलेला होता, आणि त्याच्या बॅटला लागलेले ग्रहण आज सुटणार असे वाटत असतानाच पाटीदार आपले अर्धशतक पूर्ण करुन संगवानच्या गोलंदाजीवर 52 धावा काढून बाद झाला. हे त्याचे पहिलेच आयपीएल अर्धशतक ठरले. त्याने केवळ 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकात मारत या धावा काढल्या आणि कोहलीला उत्तम साथ दिली. तो बाद झाल्यानंतर कोहलीही आपले 43वे आयपीएल अर्धंशतक पूर्ण करून शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. कोहलीने 53 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीने या महान क्रिकेटपटूचा गेलेला फॉर्म वापस येवो, इतकीच अपेक्षा, कारण कोहलीकडून अनेक विक्रमाची अपेक्षा तुम्ही आम्ही नाही तर साक्षात सचिन तेंडूलकरने केली आहे. त्या सर्व आशा-आकांक्षा फलद्रूप होवोत, आणि त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले जावोत, हीच एक क्रिकेटरसिक म्हणून अपेक्षा. पाटीदार आणि कोहलीने दिलेल्या या चांगल्या सुरूवातीचा फायदा ग्लेनने मॅक्सिमम वेल उचलून संघाला मधल्या फळीतल्या खेळाडूंना सोबत घेवून अचूक उचलला, आणि बंगलोर संघाने गुजरात पुढे 171 धावांचे रॉयल चॅलेंज उभे केले. मॅक्सवेलने आपल्या चिरपरिचित शैलीत तडाखेबंद 33 धावा केल्या तर महिपाल लोमरारनेही अखेरच्या षटकात हाणामारी करत 16 धावांचे वेगवान योगदान दिले, ज्यामुळे बंगलोरच्या नावावर 6 बाद 170 अशी सन्मानजनक धावसंख्या लागली. गुजरात संघाचे मागील सामन्यातले विजयी सातत्य बघता 120 चेंडूत 171 धावा हे लक्ष्य फारसे कठीण वाटले नव्हतेच, त्यातच वृद्धीमान साहा आणि शुभमन गीलने जबरदस्त सुरुवात करून दिली, या जोडीने फक्त 42 चेंडूत नाबाद अर्धशतकी सलामी देत संघाचा आत्मविश्वास किती बुलंद आहे याचीच प्रचीती दिली. मात्र हसरंगाने आपल्या पहिल्याच षटकात साहाला बाद करून ही जोडी फोडली आणि आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. साहाने 22 चेंडूत 4 चौकार मारत 29 धावा काढल्या. त्याच्या जागी आला तो आणखी एक युवा फलंदाज साई सुदर्शन. त्याच्या साथीने पुढे खेळताना फक्त 17 धावांची भागीदारी झालेली असताना शुभमन गील सुद्धा जम बसल्यानंतर पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि शाहबाज अहमदला आपली विकेट देवून बसला. गीलने 28 चेंडूत 31 धावा काढल्या, यावेळी गुजरात संघाची धावसंख्या 9 व्या षटकाच्या अखेरीस 2 बाद 68 अशी होती. यानंतर थोड्याच वेळात हार्दिक पंड्या आणि साई सुदर्शनही फारसे योगदान न देता बाद झाले आणि गुजरात संघ 13 व्या षटकाअखेरीस 4 बाद 95 अशा परिस्थितीत आला, तरीही कोणालाही गुजरात संघ पराभूत होईल, अशी शंकाही भेडसावत नव्हती कारण यावेळी मैदानावर होते किलर मिलर आणि मागच्या सामन्यातल्या विजयाचा शिल्पकार राहुल तेवतीया. आणि या जोडीने त्या सर्व अपेक्षा जराही अवास्तव नाहीत हे सिद्ध करताना 43 चेंडूत 79 धावांची नाबाद भागीदारी करत गुजरात संघाला 'रोकना मुश्कीलही नही, नामुमकीन है' असाच जणू संदेश देत आपल्या विजयी अभियानाला दिमाखात चालू ठेवले. राहुल तेवतीयाने पुन्हा एकदा आपले महत्व सिद्ध करत फक्त नाबाद 43 धावा करताना 5 चौकार आणि दोन षटकार मारले तर मिलरनेही त्याला योग्य साथ देत 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. गुजरात टायटनचा हा सातवा विजय आहे. |
कोळ्याची पहिली ओळख होते ती घरातच. म्हणजे कोपऱ्यात वा अडगळीच्या ठिकाणी लागलेलं जाळं झटकून टाकण्याएवढी किंवा अंगावर एखादा कोळी चुकूनमाकून पडला, तो झटकण्याएवढीच काय ती ओळख. मात्र वैज्ञानिकांनाही आपल्या कलात्मक मांडणीत गुंगवून विचार करायला लावणारं कोळ्याचं जाळं आणि त्याचं विश्व फार मोठं आहे. सृष्टीतला चमत्कारीक कीटक म्हणून कोळ्याकडे पाहिलं जातं. जगात कोळ्याच्या असंख्य जाती आहेत. घराभोवती नजरेस पडणारा कोळी साधारण चपट्या आकाराचा असतो व तो नहमी दारं-खिडक्यांच्या चौकटीच्या फटीत राहतो. दुसरा उंच पायांचा कोळी, जो छतापासून जमिनीपर्यंत कोठेही संचार करत असतो. तर या जातीतला आणखी एक कोळी म्हणजे ड्रॅगन फ्लाय. तो माशी, मुंग्यांना भक्ष्य बनवत असतो. कोळ्याचं जाळं हा खरंतर अभ्यासाचा स्वतंत्र विषय ठरावा एवढा सखोल आहे. कारण कोळी जाळं विणायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचा प्रत्येक धाग्याशी संबंध असतो. त्याला 'टेलिग्राफ लाइन'ही म्हणतात. या रेशमी धाग्यांमुळे कोळ्याला जाळ्याच्या कुठल्या दिशेला, कुठल्या धाग्यात शिकार अडकलीय, याचं ज्ञान होतं आणि क्षणार्धात तो तिथपर्यंत पोहोचतो. शिकार पूर्णपणे हतबल होईपर्यंत जाळं अधिक घट्ट करून बांधून ठेवतो. काही कोळी त्यांचं भक्ष्य लगेच संपवतात किंवा बांधून ठेवतात. गोळा झालेलं हे अन्न कालांतराने गरजेप्रमाणे संपवतात. कोळ्याची किमया एवढ्यावरच संपते, असं नाही. बांधलेल्या भक्ष्यामध्ये सडण्याची प्रक्रिया होऊ नये, यासाठी कोळी त्यात एक दवपदार्थ सोडतो. त्यामुळे शिकारीचा जीव जातो व ती सडतही नाही. उत्तर थायलंडमधील १८ सेंटीमीटर रुंदीचा 'नेपफेला' नामक कोळी चक्क पक्ष्यांचीच शिकार करतो, इतकं त्याचं जाळं पक्कं असतं. कोळी हवेत तरंगताना, उड्या मारताना व वरखाली फिरताना 'टेलिग्राफ लाइन्स'चा वापर करतात. यातूनच तो खूप बुद्धिमान असल्याचं वाटेलही, मात्र कोळ्यांना बुद्धीच नसते. कोळ्याच्या जाळ्यातील एक तंतू एक इंचाच्या दहा लाखांच्या भागांइतका सूक्ष्म असतो. या जाळ्याच्या एक किलो वजनाच्या तंतूद्वारे संपूर्ण पृथ्वी गुंडाळता येऊ शकते. जन्मल्यापासूनच कोळी जाळं विणायला सुरुवात करतो. 'युनिवसिर्टी ऑफ प्युटरिका'तील शास्त्रज्ञांनी 'डाविर्न बार्क' नामक कोळ्याचं जगातलं सर्वात मोठं व मजबूत कोळ्याचं जाळं शोधून काढलंय. हे जाळं इतर जाळ्यांच्या तुलनेत १० पट अधिक मजबूत असतं. २५ फूटांपर्यंत पसरलेल्या या जाळ्याचा व्यास २.८ मीटर इतका असतो. सर्वसाधारणपणे असं जाळं नदी व तलावाजवळ असतं. पक्षी खाणारा कोळी हा कोळ्यांचा एक प्रकारच. त्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो थेट शिट्टीच वाजवतो. त्याचा आकार ५५ मिलिमीटर एवढा असतो. उत्तर व मध्य ऑस्ट्रेलिया, गिनिया, तुली इत्यादी प्रदेशांत हे कोळी वस्ती करतात. लहान आकाराचा पक्षी जाळ्यात सापडला की त्याला पायात दाबून ठेवून त्याच्या अंगात विष सोडतात. बारीक किडे, पाल, बेडूक व लहान आकाराचे पक्षी हे त्याचं प्रमुख अन्न. कोळ्याच्या मादीचं आयुष्य हे १० वर्षांहून अधिक असतं. नराचा मात्र संबंधांनंतर मृत्यू होतो. मादी तिची अंडी पांढऱ्या रंगाच्या तंतूंनी बनलेल्या कोषात टाकते व बिळात तो कोष अडकवून ठेवते. एका वेळेत ही मादी ४८ अंडी घालू शकते. इतर प्रकारचे कोळी दीडशे ते दोनशे अंडी घालतात. कोळ्यांच्या जाळ्यातील चिकट पदार्थाला गोंद म्हणतात. हा गोंद मानवी जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढलाय. भविष्यात कदाचित या 'गोंद'चा वापर करून खोल झालेल्या जखमांना टाके घालण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच एरवी समस्या म्हणून बघितल्या जाणाऱ्या या चमत्कारिक कोळ्याकडे थोडं जिज्ञासू दृष्टीनं पाहण्याची गरज आहे! |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७) पत्रांक ८६. श्री नकल. ३०००० कित्ता रकमा. देणें रु। २००० त्रिंबकराव हरी परचुरे यांणीं बंदर सुरतची मामलत करून रसदेचा भरणा केला असतां, त्याजकडून मामलत काढून रसदेचा ऐवज घेतला; तो माघार दिल्हा. सा खर्चाचे रुपये मारिनलेस देणें पडिले, ते रुा १५२५ माहाल मार कमाविसदार व कारकून याचे मुशाहिरे देणें पडिले ते रुा ४७५ व्याजावा. सदरहू बत्तीस हजार रुपये पेशजींचे हिशेबाशिवाय मारनिलेचे देणे. शिवाय व्याज सदरहु ऐवजाचे मित्या पाहून देणे असे. जाणिजे. छ १५ माहे सवाल. |
दिल्लीत शमीम एका रेफ्रिजरेटर कारखान्यात मदतनीस म्हणून काम करू लागले. पण, उजव्या हाताला झालेल्या एका जुन्या दुखापतीमुळे त्यांना जड वस्तू उचलणं जमत नसे. "दुखापत बरी झाली होती पण दर वेळी वजन उचललं की हात सुजून जायचा," ते जाळीदार कापडावर प्लास्टिकचे मोती भरता भरता सांगतात. म्हणून त्यांच्या काकांनी जरीकाम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राशी शमीम यांची ओळख करून दिली आणि शमीम यांना जरीकाम शिकवायला सांगितलं. दिल्लीत एक वर्ष त्यांच्या हाताखाली काम करताना शमीम यांना पगार मिळत नव्हता पण चांगलं जेवण आणि कारखान्यात झोपण्यापुरती जागा मिळायची. "पहिले तीन महिने मला सोपं हातकाम [जर शिवणं] शिकवलं. त्यात माहीर होण्यात मला एक वर्षं लागलं," त्यांना आठवतं. काही वर्षं शमीम दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जरीकाम करत होते. काळ पुढे गेला तसं त्यांच्यात इतर जरी कारागिरांएवढा वेग आणि अचूकपणा येत गेला आणि ते दिवसाला रु. ६५ कमावू लागले. दिल्लीतील रघुबीर नगरात मुंबईला आलेल्या एका जुन्या साथीदाराने त्यांनाही मुंबईला बोलावून घेतलं, तेव्हा ते जुळवाजुळव करू लागले. २००९ मध्ये अखेर ते मुंबईत आले. त्यांना अगोदर या भव्य शहराची भीतीच वाटली, ते म्हणतात. त्यांचे नातेवाईक त्यांना बजावत की या शहरात "टपोरीगिरी" चालते, आणि बाहेरच्या माणसांनाही त्रास दिला जातो. "लोकं म्हणायचे, 'मारो बिहारी को, बंगाली को, भैय्या को'. आता परिस्थिती बदलली आहे." |
Ajit Pawar News : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. "महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत" असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना "मै फडतूस नही, काडतूस हू...झुकेगा नही, घुसेगा" असे म्हटले होते. यानंतर "फडतूस आणि काडतूस" शब्दाचा वाद चांगलाच पेटला होता. यावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये शाब्दीक वाद पेटला होता. या प्रकरणावरुन आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'फडतूस आणि काडतूस' शब्दावरुन उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस याचे नाव न घेता टीका केली आहे. अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, "काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावे तेच कळत नाही. कोणी फडतूस म्हणते, तर कोणी काडतूस म्हणते. कुणी काहीही म्हणते, अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले, असे अजित पवार म्हणाले. तसचे संयुक्त महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली आहे. त्या रस्त्याने आपण जायला पाहिजे. वसंत दादा यांनी दाखवलेल्या तसेच वसंतदादा नाईक आणि शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवे. तो रस्ता आपल्या भल्याचा असल्याचे पवार म्हणाले. तो रस्ता आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत, असा टोला त्यांनी लगावला. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
ठाणे, दि. 4 - मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच तसेच चार सराफ आणि अन्य टोळीतील चौघे अशा १३ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील २६ लाखांच्या सोने चांदीसह ५५ लाख ८४ हजारांचा ऐवजही हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हयांची कबूली दिली आहे. विमलसिंग उर्फ राज टाक (२९, शिकलकर), विकी सिंग कलाणी उर्फ शिकलकर (२८, रामटेकडी, हडपसर, पुणे), घुंगरुसिंग तिलपिटीया उर्फ शिकलकर (४४, रा. वडोदरा, गुजरात) आणि किस्मतसिंग शिकलकर (३१, रा. धुळे ) या शिकलकर टोळीसह निरव उर्फ निशीत सोनी (३४, रा. धुळे), संदीप डहाळे (३५), विक्रम गलांडे (२८), पुरुषत्तोम दंडगव्हाळ उर्फ बापूशेठ (५५, रा. चौघेही नाशिक ) या चार सराफांनाही अटक करण्यात आली आहे. चोरीनंतर हे टोळके नाशिकच्या या सराफांकडे दागिन्यांची विक्री करीत होते. चोरीचा माल अल्प किमतीत घेऊन या टोळीला मदत केल्याप्रकरणी सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून कापूरबावडी, मुंब्रा या भागातील चोऱ्या उघडकीस आल्या असून, ७५५ ग्रॅम सोने आणि १४ किलो ७०७ ग्रॅम चांदी असा २६ लाख दोन हजार ७६७ रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर श्रीकृष्णा पांडे (३१, वसई), ललीत हरीजन (२२, वसई) आणि अजयकुमार उर्फ दुर्गाप्रसाद हरीजन (२२, वसईरोड, भिवंडी) या तिघांकडून गोदाम चोरीतील सात गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून २० लाख ९४ हजार ३८९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्यांनी भिवंडीतील प्लास्टीक दाणा गोदाम फोडले होते. त्यांना नवी मुंबई भागातून अटक करण्यात आली. याशिवाय, जमील सलमानी अहमद (२३, रा. नालासोपाला) यांच्याकडून भांडूप भागातील चोरी उघडकीस आली. एका नामांकित कंपनीच्या ट्रकचे आठ लाख ८७ हजार ३१५ रुपयांचा १०० टायर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. ठाणे शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या भागातील चोऱ्या उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांना दिले होते. सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे, गुजरात आणि पालघर भागातून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन अनेक सराफाच्या व्यापाऱ्यांना केले होते. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी असे सीसीटीव्ही लावले. दिवा, कापूरबावडी येथील एका सीसीटीव्हीत हे टोळके आढळल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आल्याचे मणेरे यांनी सांगितले. शिकलकर टोळीतील टक्कुसिंग आणि त्याचे साथीदार पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईलचा वापर करीत नव्हते. तसेच वारंवार राहण्याचे ठिकाणही बदलत होते, अखेर त्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर या सर्वांना वेगवेगळया ठिकाणांवरुन पकडण्यात आले. एखाद्या ठिकाणी चोरी केल्यानंतर समान वाटणी करायची. त्यानंतर ते एकत्र न राहता वेगवेगळया ठिकाणी राहायला जात होते. |
लखनऊः "पुढच्यावर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar pradesh assembly election) सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (Bjp) सहजतेने विजय मिळवेल" असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केला आहे. भाजपा २०१७ पेक्षा जास्त जागा २०२२ मध्ये जिंकेल (win) असे योगींनी म्हटले आहे. "मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३१२ जागा जिंकल्या होत्या. पुढच्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ३२५ ते ३५० दरम्यान जागा जिंकेल" असा दावा योगींनी केलाय. सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्था या आधारावर योगींनी हा दावा केला आहे. "सत्तेत परतण्याचा मला पूर्ण विश्वास आहे. मला उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण चांगल्यापैकी समजतात. मागच्या २३ वर्षापासून मी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय आहे" असे योगी म्हणाले. ते हिंदुस्थान टाइम्सशी बोलत होते. २६ सप्टेंबरला योगींनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत सात मंत्र्यांना सामावून घेतले. यातून सामाजिक संतुलन आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व दिल्याचं योगींच म्हणणं आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पश्चिम युपीतल्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावा आदित्यनाथ यांनी केला. हा भाग भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. केंद्रातल्या सत्तेचा मार्ग युपीतून जातो. त्यामुळे सर्वच पक्षांचा उत्तर प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न असतो. |
राम जन्मभूमी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील एका गावातून अटक करण्यात आली आहे. गत २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास राम जन्मभूमी परिसरालगत राहणाऱ्या मनोज कुमार यांना एका व्यक्तीने राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. अयोध्या पोलिसांना तपासात आढळले की, आपल्या आरोपीने गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्यासाठी त्याच्या मोबाईल नंबरवरून नेट कॉलिंग करून राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. अयोध्येचे सर्कल ऑफिसर एस. के गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्याकडे ज्या क्रमांकावरून फोन आला त्याची सर्व्हिलांसच्या मदतीने चौकशी करण्यात आली. त्यात अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नामक व्यक्तीने दिल्लीच्या बिलालला फसवण्याच्या हेतूने नेट कॉलिंग करून त्याच्या नावाने धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जार्ड संतन शाणी एश्वेरा उर्फ आयरन सॅटर्न हेल यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भागातून अटक करण्यात आली. पकडण्यात आलेले आरोपी सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होते. स्वतःला कधी चेन्नई तर कधी महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याची बतावणी करत होते. मधुबन सिंह यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे ५ च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. मनोज यांनी त्यांना तुम्ही कोण व कुठून बोलत आहात ? असे विचारले असता त्यांनी आपण दिल्लीहून बोलत असल्याचे सांगितले. आज सकाळी १० वाजेपर्यंत राम जन्मभूमी उडवण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ९ मोबाइल फोन, लॅपटॉप, २ कुराण, मुस्लीम टोप्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, चेक बूक, बर्थ सर्टिफिकेट, इलेक्शन कमिशनचे २ साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, ताबीज मालासह अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. सीओ गौतम यांच्या माहितीनुसार, अनिल रामदास घोडके याने यापूर्वीही अशा प्रकारचे बेकायदा कृत्य केले होते. त्याने रामजन्मभूमीसह दिल्ली मेट्रो स्टेशनही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. राहुरी कृषी विद्यापिठाजवळील डिग्रस येथे या जोडप्यास अटक केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, पण ते याबाबत अनभिज्ञ होते. त्यानंतर राहुरी पोलीस या गावात जाऊन या जोडप्याबाबत माहिती घेत होते. या गावातील काही प्रमुख मंडळींशी संपर्क साधला असता तुमच्याकडूनच हे कळते आहे. अशी व्यक्ती गावात नसल्याचे सांगितले. |
सिंदखेडराजा - मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे अमर झालेल्या राम मगरची आई मंदाबाईंनी त्याची किडनी घेतलेल्या अब्दुल गणीने आपणास फक्त एकदा आई म्हणावे, अशी हळवी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या अपेक्षेने उपस्थित सर्वांचे मन हेलावले आहे. तर, याच वेळी रामच्या अवयवदानाचा निर्णय त्याचा मामा सिद्धेश्वर गाडगे यांचा असल्याचेही मंदाबाईंनी सांगितले. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील राम मगर या युवकाचा १२ जानेवारी रोजी अकोला येथून परत येत असताना चांडस फाट्यावरील गतिरोधकावर अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामला १३ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब लावता रामचे मामा सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील सिद्धेश्वर यशवंत गाडगे यांनी रामचे अवयव दान करण्याची कल्पना तेेथील डॉक्टरांसमोर मांडली सिद्धेश्वर गाडगे यांनी भाऊ बद्रीनाथ गाडगे भाचा श्याम मगर यांना आपला निर्णय कळवला. तसेच मंदाबाईंना आपल्याला रामचे अवयव दान करायचे आहेत. आपला राम अवयवरूपी जिवंत राहू दे, असे म्हणत मंदाबाईंची संमतीपत्रावर सही घेतली, अशी माहिती रामची आई मंदाबाईंनी बुधवारी २० जानेवारी रोजी दिली. दरम्यान अवयव दान केल्यानंतर ते अवयव घेणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. मात्र, औरंगाबाद येथील अब्दुल गणी या किडनीच्या रुग्णास रामची किडनी देण्यात आल्याचे कळले. त्यामुळे मंदाबाईंचे मातृत्व जागे झाले असल्याचे दिसून आले. दरम्यान अब्दुल गणी याने बरे झाल्यानंतर एकदा तरी येऊन आपणास आई म्हणावे, अशी अपेक्षा रामच्या आईने व्यक्त केली आहे. त्यामुळे अब्दुल गणीने रामच्या आईची इच्छा पुर्ण करावी,अशी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त होत आहे. अवयवदानाच्या निर्णयासंदर्भात सिद्धेश्वर गाडगे यांना विचारले असता, त्यांनी आपला पुतण्या रवींद्र बद्रीनाथ गाडगे यांची किडनी निकामी झाली होती. त्या वेळचा प्रसंग त्यांनी कथन केला. रवींद्रची किडनी २८ एप्रिल २०१३ ला निकामी झाल्याचे कळले. त्या वेळी कुणी किडनीदाता मिळेल, या आशेत तब्बल एक वर्षाचा काळ गेला, परंतु किडनी मिळाली नाही. शेवटी रवींद्रला त्याची अाई सुमन गाडगे यांची किडनी ऑगस्ट २०१४ रोजी रोपित केली. त्यामुळे अवयवांची रुग्णांना असलेली निकड आपल्याला जाणवली त्या प्रसंगामुळेच अापण अवयवदान करण्यास पुढाकार घेतल्याचे सिद्धेश्वर गाडगे यांनी सांगितले. |
BBC News, जेलमधले 2 आणि MIMचे 2 आमदार ठरवणार 6वा खासदार शिवसेनेचा की भाजपचा? भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली? OBC आरक्षणासाठी 14 महापालिकांची वॉर्ड रचना पुन्हा बदलणे शक्य? व्हीडिओ, भाजपने कट्टर हिंदुत्व स्वीकारावं असं म्हणणारे 'हे' तरुण कोण आहेत? 'बैल जोडीने येतो आणि नांगरासकट येतो,' फडणवीसांचा 'मुळशी पॅटर्न' 'गाय एक उपयुक्त पशू' असं सावरकर का म्हणत? व्हीडिओ, व्हीडिओ, |
"माझं पहिलं लग्न सात वर्षांपूर्वी झालं. ते कुटुंब आमच्या परिचयाचं होतं. मला आजही आठवतं, माझ्या सासरचे लोक भेटण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी आमचं चांगलं आदरातिथ्य केलं आणि आम्हाला खूप प्रेमही दिलं. तुला आमची मुलगी मानलं जाईल, तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही विश्वास त्यांनी दिला. असं बरंच काही ते बोलले होते," आयशा वकार (बदललेलं नाव) सांगत होत्या. पहिलं लग्न त्यांच्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे होतं. सुरुवातीच्या दिवसांत आपल्या पतीचा स्वभाव पाहून त्यांना वाटलं की त्यांच्यापेक्षा अधिक प्रेम आपल्यावर दुसरं कोणीही करू शकत नाही. आयशा यांनी या लग्नासाठी लगेच होकार दिला आणि त्या कराचीहून लाहोरला आल्या. "लग्नानंतर मी पुन्हा नोकरी करू लागले. पण लग्नाच्या एका महिन्याच्या आतच परिस्थिती बदलली. " पाकिस्तानसह अनेक दक्षिण आशियातील देशांमध्ये महिलांनी घटस्फोट घेतल्यास सहज स्वीकारत नाही. त्यामुळे अनेकदा महिलांना एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं आणि त्यांना मानसिक तणावाचा सामनाही करावा लागतो. आयशा यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितंल, "सासू आणि पतीने मला विचारलं की मला आपल्या माहेरच्यांकडून संपत्तीत वाटा मागितला पाहिजे. माझा पगारही माझ्या पतीने घेतला. "हे नेहमीच होऊ लागलं. मला ते खर्च करण्यासाठी पैसेही देत नसत. माझ्याकडून मात्र सर्व पैसे घेत होते. मी माझ्या घरातल्यांना हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले ही बाब सामान्य आहे. पती-पत्नीचे पैसे एकच असतात. त्यामुळे यावर जास्त विचार करू नको. " 'हे माझं मूल नाही' आयशा आणि त्यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी खरं तर लग्नाचा अनुभव तेवढा सुंदर नसतो जेवढा सहसा सांगितला जातो किंवा विचार केला जातो. सासरच्या लोकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयशा यांच्या कुटुंबाने त्यांची संपत्ती आयशाच्या नावावर केली. पण सासरच्या लोकांच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. त्यांची वागणूक बदलली होती. आयशा सांगतात, "माझ्या नावावर असलेला प्लॉट मी त्यांच्या नावावर करावा अशी मागणी माझ्या पतीने केली. त्यांना त्या जागेवर एक ऑफिस सुरू करायचे होते. पण मी याला विरोध केला. यानंतर त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला. माझी सासू आणि पती माझा अपमान करू लागले. घरकामासाठी घरात कर्मचाऱ्यांची फौज असूनही मी ऑफिसमधून घरी आल्यावर सर्व काम माझ्याकडून करवून घ्यायचे. " माझ्या माहेरीही सर्वांना याचा त्रास होत होता. आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटत होतं. "मी माझ्या घरातल्यांना हे सांगितल्यानंतर ते मला एकच गोष्ट सारखी समजवत होते की, मुलींना संसार करण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. " कुटुंबियांच्या या सल्ल्याने आयशा यांना आणखी कमकुवत केलं. सासरी जसजसा अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला तशी आयशाची सहनशक्तीही कमी झाली. आयशा सांगतात, "माझे पती दारू प्यायचे. दारू प्यायल्यानंतर ते माझ्याशी गैरवर्तणूक करायचे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच मी गरोदर झाले. माझ्या पतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले की हे मूल माझे नाही. हे ऐकताच माझ्या पायाखालून जमीन सरकली. त्यादिवसापासून हे घर माझ्यासाठी नरकाप्रमाणे बनलं. " एकेदिवशी पतीने माझ्यावर गलिच्छ आरोप केले आणि गरोदर असताना मला घराबाहेर काढलं, असंही आयशा सांगतात. त्यावेळी आपण लाहोर शहरात पूर्णपणे एकटे आहोत याची जाणीव त्यांना झाली. माहेरच्यांनी त्यांना आपल्या पतीशी जुळवून घेण्यास सांगितल्यावर आयशा आणखी हैराण झाल्या. आयशा यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या पतीने मात्र ही मुलगी आपली नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "ही मुलगी माझी नाही, तुमच्या मुलीचे बाहेर पुरुषांशी संबंध होते, ही त्यांच्यापैकीच कोणाची मुलगी असेल. " आयशा यांनी अखेर आपल्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि नंतर घटस्फोटाने त्यांच्या आयुष्यातील तणाव वाढला आणि या परिस्थितीत त्यांना कोणाचीही मदत मिळत नव्हती. घटस्फोट झाल्यानंतर अनेकांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला असंही त्या सांगतात. 'तुम्ही माझ्या मुलीला कुबूल करणार का? ' पहिल्या लग्नाच्या अनुभवानंतर पुन्हा एकदा तोच त्रास आपल्याला होऊ नये, असं आयशा यांना वाटत होतं. दुसऱ्या लग्नासाठी त्यांची केवळ एकच अट होती, घटस्फोटानंतर आपल्याला आरोपी तर समजलं जाणार नाही ना? "मला प्रश्न पडला की एका घटस्फोटित महिलेसाठी लग्नाचं स्थळ कसं आलं? कोणी आपल्या स्वार्थासाठी तर माझ्याशी लग्न करत नाहीये ना? अशीही शंका मला आली. मी मुलाला भेटण्याचं ठरवलं. त्यांना भेटल्यानंतर आणि चर्चा केल्यानंतर मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. " आयशा यांनी दुसरं लग्न करण्यापूर्वी आपल्या होणाऱ्या पतीला विचारलं की, "तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करणार का? " त्यांचं उत्तर होतं, "मी त्या मुलीला आपलं मानतो. " त्यामुळे आयशा लग्नासाठी तयार झाल्या. एका घटस्फोटित महिलेशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पतीला आणि कुटुंबाला "लोकांच्या कडव्या शब्दांचा सामना" करावा लागला. "त्यांनी केवळ मला खूश ठेवलं नाही तर माझ्यापर्यंत कधीही कोणती समस्या येऊ दिली नाही. या नात्यामुळे माझ्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण होऊ शकला. म्हणूनच मी आता एक समाधानी आयुष्य जगत आहे," असं आयशा म्हणाल्या. 'घटस्फोटित महिलेवर आरोप करणारे लोक' मानसोपचारतज्ज्ञ रैहा आफताब यासंदर्भात बोलताना सांगतात, पाकिस्तान, भारत आणि इतर काही देशांमध्ये घटस्फोटानंतर महिलांना असं सांगितलं जातं की आता त्यांची स्वतःची काही ओळख राहिली नाही. आफताब म्हणाल्या, "आपल्या देशात मुलीच्या आयुष्याचे ध्येय केवळ लग्न करणं आहे असं मानलं जातं. लहानपणापासूनच मुलीचे आई-वडील तिच्या लग्नाच्या तयारीसाठी अनेक गोष्टी करत असतात. म्हणूनच लग्नाकडे एक गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं. मुलीच्या कुटुंबाकडून लग्नासाठी खूप खर्च केला जातो आणि मुलीचा घटस्फोट झाला तर सगळे पैसे वाया गेले असं म्हटलं जातं. " लग्नाआधी मुलीचं नाव तिच्या वडिलांशी जोडलेले असते आणि लग्नानंतर आपल्या पतीशी. लग्नानंतर पतीचे घरच तिचे घर आहे, असंही मुलीच्या मनावर बिंबवलं जातं. "कोणात्याही व्यक्तीसाठी मानसिकदृष्ट्या अशा गोष्टी स्वीकारणं कठीण असतं. " रैहा आफताब सांगतात की, घटस्फोटानंतर बहुतांश मुलींच्या माहेरी त्यांचं स्वागत केलं जात नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की आता कोणतंही घर आपलं नाही. "घटस्फोटित महिलांसाठी ही गोष्ट एक अस्तित्वाची लढाई बनते आणि यामुळे मानसिक समस्याही उद्भवतात," असंही त्या म्हणाल्या. "आशियाई देशांत मुलीचा सासरचा संसार तिचे वास्तविक यश आहे असं मानलं जातं आणि तिला यात अपयश आलं तर तिचे आयुष्य व्यर्थ आहे असंही मानलं जातं. " रैहा यांचं म्हणणं आहे की, घटस्फोट हा काही दोष नाही तर एखाद्या अप्रिय नात्यातून बाहेर पडण्यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबाने तिला सहकार्य केलं तर ती एका समस्येतून बाहेर पडताना दुसऱ्या समस्येत अडकणार नाही. आफताब पुढे सांगतात, "दुसरा पती आणि सासरचे लोक चांगले असतील तर मुलीचाही नात्यावरील उडालेला विश्वास पुन्हा दृढ होतो. आत्मविश्वासही वाढतो आणि यामुळे आयुष्यातील वाईट अनुभवांना विसरण्यास मदत होते. " हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. ) |
वासनांध धर्मांध ! फरीदाबाद (हरियाणा) - येथे साजीद नावाच्या धर्मांधाने एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित हिंदु मुलीचे वय ११ वर्षे असून ती ४थीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी साजीद हा विवाहित असून ३ मुलांचा बाप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी साजीद याला कह्यात घेतले आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना फरीदाबादच्या सेक्टर ५८ ठाणा क्षेत्रातील आहे. ११ वर्षांची पीडित मुलगी तिच्या इतर ५ बहिणी आणि वडील यांच्यासह तेथे रहात होती. आरोपी साजीद त्यांच्या शेजारी रहात होता. साजीदने पीडितेला खाऊचे आमीष दाखवून घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीला धमकावून सलग ६ महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. साजीदच्या सततच्या लैंगिक शोषणामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या आजीला तिच्या शरीरात होत असलेल्या पालटांचा संशय आल्याने तिने पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. नंतर साजीदच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली. या घटनेविषयी फरीदाबादच्या हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या रोखण्यासाठी सरकार आता तरी काही पाऊले उचलणार का ? तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना तरी याविरोधात आवाज उठवणार का ? |
इंग्रजी व्याकरणातील शब्दसमूह ( एसओटी ) या शब्दसमाधी शब्दाचा अर्थ मागासवर्गमधील क्रियापद व मुख्य खंडांमधील क्रियापद दरम्यानच्या तणावाच्या संदर्भात आहे. ब्रायन गार्नर म्हणतात, " तनु सृष्टीचा सामान्य क्रम, "मागासलेला खंड भूतकाळातील कालखंडाप्रमाणेच मुळात जुन्या कालखंडातील क्रियापद असणे आवश्यक आहे. " काहीवेळा, तथापि, हा क्रम " वर्तमान ताण मध्ये मुख्य क्रियापद येत" ( गार्नर च्या आधुनिक इंग्रजी वापर , 2016) उल्लंघन करीत आहे. आरएल ट्रस्कच्या मते, अनुक्रम नियम ( बॅकशेफिंग म्हणूनही ओळखले जाते) "काही इतर भाषांपेक्षा इंग्रजीमध्ये कमी कठोर आहे" ( इंग्लिश व्याकरण , 2000 चे शब्दकोश ) तथापि, हे देखील सत्य आहे की अनुवादाचे नियम सर्व भाषांमध्ये घडत नाहीत. - "बहुतेक [तणाव क्रम] एक मुख्य कलम एक गेल्या ताण एक प्रकरण आहे एक अधीनस्थ कलम मध्ये एक गेल्या ताण मागे गेले. तुलना कराः (अ) मी धरतो [ आपण उशीर पडणार आहात ]. मनोरंजक गोष्ट ही आहे की, उपनगरातील खर्चाच्या भूतकाळातील ताण सहजपणे सध्याच्या वेळेस नमूद करू शकतात, जसे हॅलो! मला माहित नव्हते की तू इथे आहेस . अशा परिस्थितीत, भूतकाळातील भूतकाळ भूतकाळातील आणि वर्तमान काळातील सामान्य अर्थांचे ओव्हररायस होते. " (उपस्थित सध्याचा पाठिंबा देत आहे) (बी) मी गृहीत धरला [ आपण उशीर होणार होता ]. (भूतकाळाचे भूतकाळ गेल्यानंतर) (जिऑफ्री लीच, अ ग्लॉसरी ऑफ इंग्लिश व्याकरण एडिनबर्ग युनिव्हर्सिटी प्रेस, 2006) - "[डब्ल्यू] अहो आम्ही म्हणू शकतो की, सुझी म्हणते की ती येत आहे , जर आपण भूतकाळात प्रथम क्रियापद ठेवले तर आपण सामान्यपणे दुसर्या क्रियापदेला भूतकाळात ठेवतो तसेच सुझीने सांगितले की ती येत आहे . ती येत आहे ती काही अप्रामाणिक आहे, परंतु ती पूर्णपणे असंवैधानिक नाही. . . " (आर. एल. ट्रस्क, डिक्शनरी ऑफ इंग्लिश व्याकरण . पेंग्विन, 2000) - अनुक्रम नियम ( बॅकशिपिंग ) "[ब] युज 'ताणतणाम' या नियमाने , भूतकाळातील ताण-आकुंचन बदलून गेल्या ताणतणावाच्या क्रियापदार्थ बदल घडवून आणणे हे या पद्धतीत आणि संपूर्ण क्रियापदावर लागू होतेः 'मी येत आहे'(एफआर पामर, मूड आणि मॉडेलॅलिटी , 2 री एड. केंब्रीज यूनिवर्सिटी प्रेस, 2001) 'तो तेथे असू शकतो' 'आपण येऊ शकता' 'मी तुमच्यासाठी हे करेन' तिने सांगितले की ती माझ्यासाठी " "[अ] जरी हे खरे आहे की संवादाचे आकडे संख्यासाठी अधोरेखित करीत नाही, तरी काही पुरावे आहेत की ते तणावग्रस्त आहेत. माझा अप्रत्यक्ष भाषण असणा- या चक्रामागील तत्त्वांशी माझा पुरावा आहे. सुप्रसिद्ध, एक भूतकाळातील क्रियापद नंतर अप्रत्यक्ष कोटेशनमध्ये त्याच्या तात्पुरत्या परस्परांशी एक तात्कालिक क्रियापद बदलणे शक्य आहे. उदाहरणार्थ, मुख्य क्रियाचे वर्तमान-काल स्वरूपाचे हे थेट उद्धरणाने उद्भवते (3 ए) वेगळ्या स्वरुपाच्या स्वरूपाकडे (3b) प्रमाणे अप्रत्यक्ष कोटेशनमध्ये बदलले जाऊ शकतेः "आता या संदर्भात खालील उदाहरणे विचारात घ्याः (4 ए) जॉन म्हणाला, 'वेळ कळवतो. 'या उदाहरणांवरून स्पष्ट होते की , भूतकाळातील क्रियापदानंतर अप्रत्यक्ष उद्धरणाने शक्य होईल , शक्य आहे आणि शक्य आहे . याशिवाय, (3) यासारख्या उदाहरणात फिक्स फॉर्मुलामध्ये (4) आणि (5) (6) मधील एक सामाजिक सूत्र (6) मध्ये बदल करणे समाविष्ट आहे आणि अशा प्रकारे स्पष्टपणे पुरावा मिळतो की अनुक्रमांची ताण नियम समाविष्ट आहे. म्हणूनच असे दिसते की सर्वसाधारणपणे क्रियापदांशी संबंधित वर्तमान-भूतकाळातील फरक, मोडल्सशी संबंधित तसेच, इच्छाशक्ती, आणि करू शकतात , उदाहरणार्थ, विशिष्ट वर्तमान स्वरूपात वर्गीकृत केले जाणे आणि शक्य तितके वेगळे गेल्या . " (5 ए) जॉन म्हणाले, 'भिकारी निवडक होऊ शकत नाहीत. ' (5 बी) जॉन म्हणाले की भिकारी निवडक होऊ शकत नाहीत. (6 एक) जॉनने विचारले, 'मला क्षमा केली जाऊ का? ' (6b) जॉनने माफी मागितली तर विचारले. (पॉल स्काचटर, "एक्सचेंजिंग ऑक्झिलरी ऑर्डर") भाषावैज्ञानिक श्रेण्याः ऑक्सिलिअरीज अँड संबंधित प्यूल्स , इ. स. फ्रॅंक हेन्सी यांनी डी. रेडिल / क्लिवेर अकादमी पब्लिशर्स, 1 9 83) |
वनस्पतींचे रस - अनेक व्याधींवर औषध चिकित्सा ! प्रवाळ - आभूषण व औषधोपयोगी ! कांदा - डोळ्यात पाणी आणणारा परंतु बहुगुणोपयोगी ! डोकेदुखी : अस्वस्थ करणारा आजार ! |
नागपूर- राज्यभर पेटलेल्या शेतकरी अांदाेलनात स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारशींची अाग्रही मागणी हाेत असताना शरद जाेशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने साेमवारी नागपुरातील बैठकीत मात्र या शिफारशींनाच विराेध केला. त्याएेवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच 'राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी यापुढे आंदोलन करण्यात येईल,' असा इशाराही संघटनेने दिला अाहे. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक सोमवारी नागपुरात झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, 'स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी शेतकरी हिताची नाही. त्यामुळे या शिफारशींना आमचा विरोध राहणार असून त्याऐवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी केल्यास शेतमालास योग्य दर मिळतील, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नको, असे त्यांनी जाहीर केले. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी लादण्यात आलेल्या सर्व अटी काढून टाकून संपूर्ण कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी एक ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या कळवल्या जाणार आहेत. ३ सप्टेंबरला शरद जोशी यांच्या जयंतीदिनी शेतकरी एक दिवसाचे उपवास आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले जाईल, असे चटप यांनी सांगितले. याशिवाय शेतमालाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची लूट कशी होत आहे, याचा लेखाजोखा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाइल फोनवर उपलब्ध करण्याचा निर्णयही शेतकरी संघटनेने जाहीर केला. शेतमालाचे भाव पाडण्याचे प्रयत्न सरकारने बंद करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले, विद्यमान अध्यक्ष अनिल धनवट, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष मदन कांबळे या वेळी उपस्थित होते. मंगळवारपासून राज्यात सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करू, त्यांच्या सभा, बैठका होऊ दिल्या जाणार नाहीत, असे शेतकरी संघटनेने सांगितले. सत्ताधाऱ्यांत भाजपसह शिवसेना, रासप, स्वाभिमानी संघटना या साऱ्यांनाच समान न्याय लावला जाणार आहे. इतर पक्षांनी सत्तेत राहून शेतकऱ्यांची दिशाभूल चालवली असल्याचा आरोप चटप यांनी केला. |
Set aside 12% of Maratha community seats and start recruitment: Vadettiwar । मराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा : वडेट्टीवार - Divya Marathi\nSet Aside 12% Of Maratha Community Seats And Start Recruitment: Vadettiwar\nनागपूरःमराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा : वडेट्टीवार\nश्रीमंत मराठे पदाेन्नती आरक्षणाचे विरोधक : आंबेडकर\nमराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. आेबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला. ओबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापि वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको, पण असे करताना ओबीसींवरही अन्याय नको, असे ते म्हणाले.\nनोकरभरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या. यासंदर्भात अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.\nराज्य सरकारने मराठा समाजाला नोकऱ्यांत १२ % आरक्षण दिले. याला कुणी कोर्टात आव्हान देत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे कुणाच्या हातात नाही. तोपर्यंत मराठा समाजाच्या जागा न भरता इतर समाजाच्या जागा भरणे योग्य राहील, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.\nमुंबई । राज्यात मराठा समाजातील श्रीमंत लोक आरक्षणाच्या विरोधात असून त्यांना मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू द्यायचीच नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने याप्रश्नी १२ मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. मात्र ती नावालाच आहे. |
पहिलं. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. पाहिला, तर, अनेक नामें व अनेक रूपें, हेंच जगताचें अबाधित लक्षण ठरतें. एके ठिकाणीं तुकाराम महाराजांनी असेच म्हटले आहे. "जग ऐसें बहुनावें ॥ बहु भावे भावना ॥ आतां हें अनेकनामरूपात्मकजगत् हा सर्व प्रकृतीचा परिणाम आहे, हें वर सांगितलेंच आहे; ज्या आधारावर हीं अनेकनामरूपें आहेत, त्या आधारालाच सत्ता असें म्हणतात; व त्यालाच पुरुष ही संज्ञा आहे. म्हणून जिकडे जिकडे नामरूपात्मक प्रकृति आहे, तिकडे तिकडे आधारभूत पुरुषसंज्ञित सत्ता आहेच. अशीं ह्रीं सर्व जगभर ठेंचून भरल्यासारखीं असल्यामुळे, " दोघे न माती जगीं इये" असे मूळांत उद्गार काढले आहेत. या दृष्टीनें अतिसूक्ष्म परमाणु घेतला तरी त्याला रूप आहेच. ज्या अर्थी रूप आहे, त्या अर्थी नामही आहेच. आणि ज्या अर्थी रूप व नाम हीं दोन्हीं आहेत, त्या अर्थी त्यांना आधारभूत सत्ताही पण आहेच. म्हणून मूळांत परमाणूमध्यें देखील आनंदानें प्रकृतिपुरुष रहातात असें म्हटलें आहे. जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ॥ जिये दोघे जीवप्राण । जिया दोघा ॥ १२ ॥ अन्वय - जिहीं एकएकावीण तृणाचेंही निर्माण न कीजे, जिये दोघे जिया दोघा ( ची ) जीवप्राण ( आहेत. ) ॥ १२ ॥ अ. वि. - संसारामध्ये एखादी जरी सामान्य गोष्ट करावयाची असली, तरी नवराबायको एकमेकांच्या विचाराशिवाय करीत नाहींत. एकमेकांचा एकमेकांना क्षणभरदेखील वियोग सहन होत नाहीं. असा जेथें प्रीतीचा प्रकार दिसेल, तेथें लोक असेंच म्हणतील कीं हीं नवराबायको एकमेकांचीं एकमेक जीवप्राण आहेत. असाच प्रकार ज्ञानेश्वर महाराजांना प्रकृतिपुरुषांच्या ठिकाणी आढळून आल्यामुळे, वरील उद्गार काढला आहे. हीं प्रकृतिपुरुष एकमेकांवाचून गवताची काडी देखील निर्माण करीत नाहींत; म्हणजे गवताची काडी जर |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : संघातील बारावा खेळाडू हा राखीव असतो. पण आता हा दक्षिण आफ्रिकेचा बारावा खेळाडू फलंदाजीसाठी उतरणा आहे. आता हा बारावा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा डावाने होणारा पराभव टाळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. आयसीसीचे नियम आता बदलण्यात आले आहेत. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याजागी राखीव असलेला बारावा खेळाडू खेळू शकतो. त्यानुसार आता दक्षिण आफ्रिकेचा बारावा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गर हा दुखापतग्रस्त झाला आहे. उमेश यादवचा एक उसळता चेंडू एल्गरला लागला आणि तो थेट जमिनीवर पडला. त्यानंतर एल्गरची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून तो हा सामना खेळू शकणार नाही, असे वृत्त आहे. त्यामुळे आता जर एल्गर खेळू शकत नसेल तर त्याच्याजागी बाराव्या खेळाडूला फलंदाजीसाठी पाठवण्यात येणार आहे. रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा एक बाऊन्सर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर आदळला आणि त्यानंतर तो थेट जमिनीवर पडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला गंभीर दुखापत झाली असून त्याला आता या सामन्याला मुकावे लागणार आहे. उमेश यादवच्या दहाव्या षटकात ही गोष्ट घडली. उमेशने एक बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला यशस्वीपणे करता आला नाही. हा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो थेट जमिनीवर पडला. एल्गर जमिनीवर पडल्यावर भारताचे खेळाडू त्याच्याजवळ धावत गेले. संघाचा फिजिओही मैदानात आला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती की, त्यानंतर एल्गरला एकही चेंडू खेळता आला नाही. एल्गरने तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा केल्या होत्या. पण आता दुखापतीमुळे त्याला पुन्हा मैदानात येता येणार नाही. आता त्याच्याजागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
नवी दिल्ली - शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली निवड पूर्णपणे बेकायदेशीर असून लोकसभाध्यक्षांच्या या निर्णयाविरूध्द शिवसेना न्यायालयात जाणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नेमणूक अवैध असल्याचे सांगितले. घटनेनुसार, गटनेता निवडण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा असतो. यानुसार, उध्दव ठाकरे यांनी गटनेतेपदी माझी निवड केली असल्याचे पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना 13 जून 2019 रोजी लिहिले होते. यामुळे कायद्याच्यादृष्टीने गटनेता मीच आहे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 12 खासदारांनी दि. 19 जुलैला बिर्ला यांची भेट घेतली होती. यावेळी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड केली जात असल्याची माहिती देणारे सर्कुलर 18 जुलै रोजीचे आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? बारा खासदारांनी 19 जुलैला भेट घेतली असताना नियुक्ती 18 जुलैला कशी काय केली जाते? असा शंकावजा प्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता बिर्ला यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता किंवा आपली बाजू मांडण्याची संधी न देता शेवाळे यांची निवड केली आहे. ही निवड पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. |
संजय उपाध्याय हे महान राम भक्तांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी राम जन्मभूमीचे भूमिपूजन केले आहे. राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिले गृहस्थ आहेत. त्यांच्या सुपुत्राला महाराष्ट्रातून निवडून आणण्यात भाजपला काही अडचण वाटत नाही. आमच्याकडे फक्त 20 आमदारांची कमतरता आहे, ती आम्ही भरून काढू!!, असा आत्मविश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु संजय उपाध्याय यांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या मनसुब्यांना तितकाच जोरदार धक्का बसला आहे. त्यातही चंद्रकांतदादा पाटील यांनी फक्त 20 आमदारांची कमतरता आहे, असा आकडाच सांगितल्याने महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते धास्तावले आहेत. कारण ही जागा काँग्रेसच्या राजीव सातव यांचे होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांना काँग्रेसचाच पारड्यात ही जागा टाकावी लागली. परंतु तरी देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार एकगठ्ठा रजनी पाटील यांनाच मतदान करतीलच याची काँग्रेस जनांना शाश्वती नाही. त्यातही आधी रजनी पाटलांचे नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत घातल्याने आणि नंतर काढल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी काँग्रेसला सहन करावी लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत 20 आमदारांचा आकडा गाठणे भाजपला फार अवघड जावे अशी स्थिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने राजकीय चतुराई दाखवून संजय उपाध्याय यांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उतरविल्याचे दिसून येत आहे. |
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं नेरूळ / बेलापूर-खारकोपर विभागात उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबरपासून नेरूळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान प्रत्येकी ४ उपनगरी सेवा अशा एकूण ८ सेवांचं नियोजन करण्यात आलं आहे. सध्या मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज १,५७२ उपनगरी सेवा चालवित आहे. अशातच चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ/बेलापूर - खारकोपर मार्गावर ८ उपनगरी सेवा जोडल्या गेल्यास २० नोव्हेंबरपासून एकूण १५८० सेवा होणार आहेत. सध्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं अद्याप सर्वसामान्य पुरूष प्रवासी रेल्वे प्रवासाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवाय, कधी रेल्वे प्रशासन लोकल सुरू करणार असा प्रश्न अनेक प्रवासी संघटनांसह स्थानिक प्रवाशांना पडला आहे. |
IND vs WI TIlak Verma Celebration Viral Video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात (IND vs WI 2nd T20I) टीम इंडियाला दारूण पराभव झाला. दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजने 2 गडी राखून भारताला पाणी पाजलं. त्यामुळे आता कॅरेबियन संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताचे सर्व फलंदाज स्पशेल फेल ठरले. तिलक वर्मा (Tilak Varma) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्माने दमदार अर्धशतक ठोकत वर्ल्ड कपचे दार ठोठावले आहेत. अशातच आता तिलक वर्माचा एक व्हिडीओ (Tilak Varma Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने (Tilak Varma) दमदार अर्धशतक ठोकलं आहे. 39 बॉलमध्ये पाच फोर आणि एका खणखणीत सिक्सच्या मदतीने त्यांने अर्धशतक साजरं केलं. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तिलक वर्माने अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केलं. खणखणीत फिफ्टी मारल्यानंतर लहान मुलांसारखं नाचताना (Tilak Varma Celebration) दिसला. तिलकने असं का केलं? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर आता तिलक वर्माने उत्तर दिलंय. सेलिब्रेशनचे कारण रोहित शर्माची मुलगी समायरा (Samaira) आहे. टिलक पुढे म्हणाले की, आमचे संबंध खूप चांगले आहेत. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक किंवा अर्धशतक झळकावतो तेव्हा मी शतक खास पद्धतीने साजरं करेन. मी तिला म्हटलं होतं आणि मी हे फक्त सॅमीसाठी (Sammy) साजरे केलं होतं, असं तिलक वर्मा म्हणतो. रोहित भाई मला नेहमी मदत करतो. आजच्या खेळीनंतर माझी त्यांच्याशी बोलणं होईल. माझ्यासाठी तो सपोर्ट सिस्टीम सारखा आहे. त्याने मला सांगितलं होतं, तू फक्त क्रिकेट एन्जॉय कर. त्यानंतर मी मोकळेपणाने फलंदाजी करतोय, असंही तिलक वर्मा म्हणतो. दरम्यान, तिलक वर्मा सध्याच्या टी-ट्वेंटी संघात 4 थ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्यामुळे आता तिलक वर्मा याला आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर 4 थ्या क्रमांकासाठी ट्राय केलं जातंय का? असा सवाल उपस्थित होत आहे. युवराज सिंह याच्यानंतर अजून एकही खेळाडू या स्थानावर टीकला नाही. ऋषभ पंत जायबंदी उठली नसेल तर तिलक वर्मा लेफ्ट हॅड फलंदाज मैदानात उतरू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता तिलक वर्माकडे मोठ्या आशेने पाहिलं जातंय. |
'26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी दिल्लीत पार्टी करत होते' । Sakal\n2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला.\n'26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते'\n26/11 Mumbai Terror Attack : भारतीय जनता पक्ष (BJP) आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्यानिमित्तानं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधलाय. एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत त्यांनी गांधींवर टीका केलीय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, 'जेव्हा 26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते, हे विसरणार नाही.' असं त्यांनी नमूद केलंय. ही वर्तमानपत्राची कात्रण दरवर्षी 26/11 च्या निमित्तानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. या अहवालानुसार, मुंबईतील हल्ल्यानंतर लगेचच राहुल गांधी दिल्लीतील एका पार्टीत दिसले होते, असं नमूद आहे.\n2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी (Mumbai Attack 2008) हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. हा हल्ला भारतीय इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जातो. त्याचवेळी 1 डिसेंबर 2008 रोजी 'मेल टुडे'वर प्रसिद्ध झालेल्या या बातमीत असं सांगण्यात आलंय, की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईचे अश्रू सुकले नव्हते आणि राहुल गांधी लगेचच एका फार्महाऊसवर मित्रांसोबत पार्टी करताना दिसले. दिल्ली रिपोर्टनुसार, राहुल गांधी त्यांचा मित्र समीर शर्माच्या संगीत समारंभात गेले होते, असं बातमीत म्हंटलंय.\nहेही वाचाः कसाबला जिवंत पकडून ओंबळेंनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला होता\nपाकिस्तानचे 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत आले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून हा हल्ला केला. मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चार दिवस चकमक सुरू होती. या हल्ल्यात 18 सुरक्षा जवान शहीद झाले होते. देशभरातून या शूर शहिदांना नमन केले जात आहे.\nमुंबई हल्ल्याच्यानिमित्तानं राहुल गांधी यांनीही ट्विट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलीय. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, सीमेवरील कठीण वातावरणात सैनिक कुटुंबापासून दूर राहून देशाचं रक्षण करतात. दहशतवादीसारख्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून निष्पापांना वाचवतात. हा कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अभिमान आहे, असा माझ्या देशाचा तरुण आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीरांना विनम्र अभिवादन. जय हिंद!', असं त्यांनी ट्विट केलंय. |
लक्ष्मी नगरातील अॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १. ३० वाजता घडली. मलकापूरः येथील लक्ष्मी नगरातील अॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १. ३० वाजता घडली. त्यात अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाले. लक्ष्मी नगरातील चैतन्य अँग्रो बायोटेक प्रा. लि. या कंपनीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खाजगी पाणी वाहतूक करणारे चालक मालक पंकज राजेंद्र खराडे त्यांचे टँकर नजिकच्या मार्गावरून जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ टँकरने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, राजेंद्र वाडेकर, पालिकेचे अग्निशमन दल घेवून घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी कंपनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तत्पूर्वी कंपनीचे संचालक अशोकराव देशपांडे व प्रसंन्ना देशपांडे घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीचे पश्चिमेकडील स्क्रँप पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवानं आग पुढे सरकण्यापूर्वी आटोक्यात आल्याने लाखोच नुकसान झाले मात्र मोठा अनर्थ टळला. नांदुरा रस्त्यावर जाधववाडीतील डबल डायमंड फँक्टरीत घडली. त्या ठिकाणी जिनमाता जिनिंग कंपनीच्या सुमारे ४०० गठाणी तर निखिल ट्रेडींग कंपनीच्या सुमारे ३०० गठाणी आगीत जळून खाक झाल्या. या आगीविषयी माहिती देताना उपस्थितांनी सांगितले की ,गठाणीवर लावलेला खतांच्या पिशव्यांंचा पडम सुसाट हवेमुळे इलेक्ट्रीक डि. पी. वर पडल्याने पेटला. त्यामुळे कापसाच्या गठाणींनी पेट घेतला आणि त्याच रूपांतर मोठ्या आगीत झाल्याने अंदाजे सव्वा कोटीच्या कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची माहिती आहे. |
चीनमध्ये जन्माला आलेल्या करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इटलीमध्ये करोना विषाणूने बळीं गेलेल्यांची संख्या आता हजारावर पोहोचली आहे. चीननंतर करोनाचा सर्वाधिक फटका इटली या देशाला बसला आहे. आतापर्यंत १५ हजार ११३ करोना संशयीत रुग्ण इटलीमध्ये सापडले आहेत. त्यापैकी १०१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एक हजार ४५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना व्हायरस सार्स'मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत. |
ठाकरे गट शिवसेना आणि नुकतेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर शिंदे गटाने फडणवीसांनाच धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिंदे गटात राज्यभरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होऊ लागले होते. यातच शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. परंतू, आता शिंदे गटाने फडणवीसांनाही धक्का देण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने दहिसरमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोडले आहेत. मुंबईत १०० हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. सुर्वे यांच्या मतदारसंघात असलेल्या मुंबई वॉर्ड क्र. २५ मध्ये हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये भाजपाचे माजी वॉर्ड अध्यक्षा देखील होत्या. त्यांच्यासह कार्यकर्त्या महिलांनी शिवसेनेत हा प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 माजी नगरसेवक आणि 6 तालुकाध्यक्षांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांनी शिंदे गटात प्रवेश केला. |
बालवयातील वागणुकीवरून, नंतर त्यांनी केलेल्या कार्यावरून, छत्रपती होण्याच्या त्यांच्या अंगच्या गुणावरून, त्यांना 'छत्रपती' म्हटले असणे शक्य आहे. नाहीतरी फाटक स्तुतिपाठकांचा आरोप रामदासांवर करतातच. एकीकडे रामदासांना ते अव्यवस्थित वृत्तीचे नव्हते असे गौरवायचे आणि लागलीच त्यांना दिलेल्या विशेषणावरून तोच अव्यवस्थितपणा त्यांना चिकटवायचा हे फक्त विधानासाठी विधान करावयाच्या वृत्तीचे द्योतक वाटते. फाटकांच्या मताप्रमाणे हे पत्र १६७२ नंतर नव्हे, १६७४ नंतर - छत्रपती झाल्यानंतर लिहिले असले पाहिजे. मग 'तीर्थक्षेत्रे मोडिली' ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।' अशी तक्रार समर्थांनी का करावी ? कारण शिवाजी महाराजांनी हे कार्य राज्याभिषेकाच्या कितीतरी आधीच सुरू केले होते. या काव्याचे आपल्या मतानुसार का असेना निर्णायक मूल्यमापन केले असते तर बरे झाले असते. ताप्तर्य, काव्य या दृष्टीने नव्हे, पण राजकारण आणि समर्थ यांचा संबंध दर्शविणारा हा एक पुरावा या दृष्टीने या प्रकरणाचे महत्त्व आहे. तथापि राजकारणाच्या दृष्टीने काढलेला हा निष्कर्ष या प्रबंधाच्या दृष्टीने अखेरचा नाही. कारण 'राजकारणाचा शोध' हे प्रबंधाचे प्रतिपाद्य नव्हे. हा निष्कर्ष आनुषंगिक आहे एवढेच येथे मानावयास पाहिजे. वीस ओव्यांचे हे एक लहानसे काव्य आहे. पहिल्या ओवीत गणपती, सरस्वती, सद्गुरू, संत, कुलदेवता आणि दाशरथी रामचंद्र यांना वंदन केले आहे. आणि दुसऱ्या ओवीत श्रोत्यांना सांगितले आहे की मी जे बोललो आहे ते मानले तर घ्यावे, नाहीतर 'दाटूनि सांडावे' ही रामदासांची निराग्रही भूमिका आहे. राजधर्म हा आपण 'प्रपंचाकारणे सांगितला आहे असे त्यांनी म्हटले आहे. 'प्रपंचाकारणे स्वभावें । बोलिलो मी ।। ७ शेवटच्या ओवीतही अशा प्रकारचा उल्लेख आहे. ऐसा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिलो काही एक । एका मनोगते स्वामी सेवक । असतां बरें ।।२०।।' आणि या प्रपंचाच्या बाबतीत तो सावधपणे केला तर माणसाला सुख लाभते असा विचार सांगणारी एक ओवी आहे. यावरून प्रपंच म्हणजेच राजधर्म असा समन्वयात्मक अर्थ लावायचा आहे असे होईल. परंतु प्रपंच ४ ते १९ पर्यंतच्या ओव्या लक्षात घेतल्यास प्रपंच असे ज्याला आपण व्यवहारात म्हणतो त्याहून राजकारण-राजधर्म-वेगळा असल्याबद्दलची खात्री पटते. आणि म्हणून हा राजधर्माचा उपदेश सामान्य प्रापंचिक माणसाकरिता नसून राजकारणी पुरुषासाठीच आहे, मग तो शिवाजीला सांगितलेला असो, अथवा संभाजीला सांगितलेला असो. या काव्यात एकच अलंकार आहे आणि तो म्हणजे दृष्टान्त मोहरा अभिमानाला पेटलाइरेला पडला तर तो स्वप्राणाचीही क्षिती न बाळगता पडतो. हा विचार पटविण्यासाठी एक दृष्टान्त दिलेला आहे. - देखोनि व्याघ्राचा चपेटा । मेंढरे पळती बारी वाटा । मस्त जो तो रेडा मोठा । काय करावा ।।९ या लहानशा काव्यात समर्थांचे व्यक्तित्व प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. समर्थांना अन्याय खपत नाही, दुबळेपणा आवडत नाही, भोंगळपणा त्यांना पसंत नाही. ते चतुर होते, धोरणी दासांच्या राम व कृष्ण आणि प्रासंगिक काव्याचा अभ्यास / १५७ |
मुंबई, दि.२९ (पीसीबी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय. तसेच हे सर्व अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला बदनाम करण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप करत याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केलीय. "तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे," असा आरोप सचिन सावंत यांनी केला. "गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे," असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सचिन सावंत यांनी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेधही केलाय. |
टोकियो ऑलिम्पिकमध्ये असे काही खेळाडू होते, ज्यांना पदके जिंकता आली नाहीत, पण त्यांनी केलेल्या खेळीमुळे अनेकांच्या ते लक्षात राहिले. अशाच खेळाडूंना मदत करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. नवी दिल्ली : यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले होते. अनेक गोष्टींमुळे संस्मरणीय ठरलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच भारताला पदक मिळाले, तसेच हॉकीमध्येही 41 वर्षांनंतर भारतीय संघाला ऑलिम्पिक पदकावर नाव कोरता आले. टोकियोमध्ये काही भारतीय खेळाडूंनी जगाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. त्यांना पदक जिंकता आली नाहीत, पण त्यांनी अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. अशाच खेळाडूंचा उत्साह कायम ठेवण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. मॅनकाइंड फार्मा या प्रमुख औषध उत्पादक कंपनीने भारतीय खेळाडूंच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 20 निवडक खेळाडूंची निवड केली असून त्यांना प्रत्येकी 11 लाख रुपये बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. टोकियोमध्ये या खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही, पण त्यांनी शेवटपर्यंत चांगली कामगिरी केली होती. त्या कामगिरीचे कौतुक मॅनकाइंड या फार्मास्युटिकल कंपनीने केलं आहे. कंपनीकडून बक्षीस महिला हॉकी संघाच्या 16 सदस्यांव्यतिरिक्त बॉक्सर सतीश कुमार, कुस्तीपटू दीपक पूनिया, नेमबाज सौरभ चौधरी आणि गोल्फर अदिती अशोक या चौघांची नावे त्या 20 खेळाडूंमध्ये आहेत. या सर्वांना प्रत्येकी 11 लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मॅनकाइंड फार्माचे उपाध्यक्ष आणि एमडी राजीव जुनेजा म्हणाले की, "आपल्या भारतीय खेळाडूंनी प्रत्येक खेळात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ते जिंकले नसतील, पण त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर देशाचा नावलौकिक वाढवला आहे. अशा खेळाडूंना बक्षीस देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. " दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला 6 पदके जिंकता आली होती. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरी ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. |
नांदुरा : लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार खान यांच्या निलंबनानंतर तहसील कार्यालयाची अवस्था बेभरवशाची झाली असून प्रभारी तहसीलदार शेलार यांच्या कारकिर्दीत महत्वाच्या विभागातील कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठय़ा प्रमाणावर हेळसांड होत आहे. येथील तहसीलदार खान यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे सद्या येथील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने येथील तहसील कार्यालयातील महत्वाच्या विभागातील कर्मचार्यांची अनेकवेळा कार्यालयास दांडी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे काम होण्यासाठी चकरा माराव्या लागतात. या त्रासाला कंटाळून अखेर काहीजण नाईलाजाने दलालांच्या हातात पैसा सोपवून आपली कामे करुन मोकळे होतांना दिसतात. एकंदरीत राज्य शासनाचा महत्वाचा विभाग असलेल्या महसूल विभागाकडून सर्वसामान्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या विभागाबाबत सर्वत रोष व्यक्त होत आहे. काल २५ जुलै रोजी प्रभारी तहसीलदार शेलार हे अमरावती येथे गेले होते तर पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने या विभागात शुकशुकाट दिसला. या विभागात नवीन रेशनकार्ड, दुय्यम रेशनकार्ड, अन्न सुरक्षा योजना तसेच इतर दाखल्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. पुरवठा विभागामध्ये नेहमीच नागरिकांना नियमित कामासाठी त्रस्त केल्या जाते. जेणेकरुन दलालांना आयतीच संधी मिळते. परंतु जिल्हा प्रशासनाचा यावर कोणताच वचक नसल्याने सर्व सामान्यांची विविध कामासाठी आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी बाहेरगावावरुन जाणे-येणे करतात. त्यामुळे कार्यालय उघडल्यानंतरही तास, दोन तास या कार्यालयात कुणीच नसते. कार्यालयात असलेली थंब इम्प्रेशनची मशीन नावापुरतीच आहे. लेटलतीफ कर्मचार्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने कर्मचार्यांची मुजोरी वाढली आहे. |
साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघावर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. पण, या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवले. या परिषदेसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरिष्ठ खेळाडू येणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्यानं नाराज झालेल्या मीडियाने परिषदेवर बहिष्कार टाकला. संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी नेट बॉलर्संना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे चहर व अवेश या परिषदेला गेले. त्यामुळे मीडियाने या परिषदेवर बहिष्कार घातला. प्रसारमाध्यमांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. भारतीय संघाचे सदस्य नसलेल्या खेळाडूंना पत्रकार परिषदेत पाठवण्यात काय अर्थ, असा सवाल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी केला. या निर्णयाबाबत विचारणा केली असता संघ व्यवस्थापक म्हणाले,"भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहिमेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. " 2015मध्येही कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रत्येक पत्रकार परिषदेला हजर असायचा, तर संघातील प्रमुख खेळाडू फक्त BCCI TVकडेच बोलायचे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. सराव सत्रात रोहित शर्माच्या हातावर चेंडू आदळला, परंतु चिंतेचे कारण नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची 'डोप टेस्ट'! भारतीय संघ बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची नियमित उत्तेजक चाचणी करण्यात आली. जागतिक उत्तेजक चाचणी संघटनेच्या मान्यताप्राप्त संस्थेकडे बुमराहने ही चाचणी करून घेतली. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाला 132 धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजा सामनावीर ठरला, पण आयसीसीकडून त्याच्यावरच मोठी कारवाई केली गेली. दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघासाठी पहिल्या डावात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन () याने पाच विकेट्सचा हॉल पूर्ण केला. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हा 31 वा पाच विकेट्सचा हॉल होता आणि ही कामगिरी संघासाठी मॅच विनिंग ठरली. भारतीय संघासाठी पहिल्या डावाती पहिल्या दोन विकेट्स वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी घेतले. पण त्यानंतर खेळपट्टीवर पूर्णपणे फिरकी गोलंदाजांचे राज्य पाहायला मिळाले. पहिल्या डावात रविंद्र जडेजा पाठोपाट रविचंद्रन अश्विनने देखील महत्वाच्या तीन विकेट्स घेत चाहत्यांचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फी या सामन्यातून कसोटी पदार्पण करू शकला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या. कोणत्याही खेळाडूसाठी पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरणे करणे म्हणजे स्वप्न असते. मर्फीने मात्र हे स्वप्न सत्यात उतरवले. जडेजा सामनावीर ठरण्यासाठी त्याचे अष्टपैलू प्रदर्शन कराणीभूत ठरले. जडेजाप्रमाणे अश्वननेही पाच विकेट्स गेतल्या, पण अश्विन फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकला नाही. अश्विन पहिल्या डावात 23 धावा करून बाद झाला, पण जडेजाने मात्र 70 धावा कुटल्या. (ICC took action against Ravindra Jadeja due to wrongdoing in live match) |
दादासाहेब फाळके खूप दूरदृष्टी लाभलेला माणूस. सिनेमा जन्माला घालतानाच, त्यांनी माकेर्टिंगचे नवे फण्डेही शोधले. आता 'हरिश्चंदाच्या फॅक्टरी'साठी तेच 'फाळके फॉर्म्युले' वापरले जातील. - दिनेश कानजीदादासाहेब फाळके खूप दूरदृष्टी लाभलेला माणूस. सिनेमा जन्माला घालतानाच, त्यांनी माकेर्टिंगचे नवे फण्डेही शोधले. आता 'हरिश्चंदाच्या फॅक्टरी'साठी तेच 'फाळके फॉर्म्युले' वापरले जातील. . . . . . . राजा हरिश्चंद १९३१ मध्ये झळकला. हा पहिला सिनेमा बनवण्याचा मान दादासाहेब फाळके या मराठी माणसाचा. पण फाळकेंचा तल्लख मेंदू केवळ सिनेमा जन्माला घालून थांबला नाही. सिनेमा चालावा म्हणून त्यांनी अफलातून माकेर्टिंग जन्माला घातलं. 'हरिश्चंदाची फॅक्टरी'साठीही दादासाहेबांनी त्याकाळी वापरलेलं माकेर्टिंग तंत्र वापरलं जाणार आहे. हल्ली कोटीचे सिनेमे बनतात. ते चालवण्यासाठीही कोटींचा खर्च करावा लागतो. जाहिरात आणि माकेर्टिंगसाठी प्रचंड पैसा ओतावा लागतो. पण सिनेमाच्या माकेर्टिंगचा इतिहासही सिनेमा इतकाच जुना आहे. म्हणजे राजा हरिश्चंद या सिनेमा इतका जुना म्हणा हवं तर. फाळकेंनी 'राजा हरिश्चंद'च्या तिकीटबारीवर चालवण्यासाठी ज्या काही क्लुप्त्या वापरल्या त्या भन्नाट होत्या. सिनेमा चालवण्यासाठी महिला प्रेक्षकांना थिएटरकडे वळवलं पाहिजे हे त्यांना ठाऊक होतं. त्या काळी महिला फारशा बाहेर पडत नसत. महिलांना सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी त्यांनी पहिल्या काही लकी महिलांना चक्क नऊवारी साड्या वाटल्या. पहिल्या काही प्रेक्षकांना गिफ्ट व्हाऊचर वाटण्याची सुरूवात मल्टिप्लेक्सच्या जमान्यात झाली, असा समज असणाऱ्यांना हा धक्का आहे. बैलगाडीवरून मेगाफोनने गावागावात सिनेमाचा प्रचार करण्याची सुरूवातही फाळकेंनी केली. त्या काळी नाटक कंपनीवाले अशी जाहिरात करायचे. बैलगाडीवर सिनेमाचं पोस्टर आणि सिनेमातले काही शॉट्स दाखवणारा बायोस्कोप असायचा. गावातली पोरंटोरं या गाडीमागे धावायची. बैलगाडीत बसलेली सिनेमावाले सिनेमाची पत्रकं वाटायचे. त्यामुळे पोरांच्या घरातही आपसूकचं सिनेमाची जाहिरात व्हायची. 'हरिश्चंदाची फॅक्टरी'ची निर्माती यू टीव्ही ही कंपनीही नऊवारी, मेगाफोन आणि बायोस्कोप वापरून सिनेमाचं माकेर्टिंग करणार आहे. पण बैलगाडी ऐवजी मेगाफोन आणि बायस्कोप लादण्यासाठी वाहनांच्या फ्लोटचा वापर होणार आहे. हा फ्लोट सिनेमा रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात जाईल. फाळकेंच्या अफाट कर्तृत्वाची झलक पाहायला मिळावी, म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत अशी माहिती 'यू टीव्ही'च्या व्हाइस प्रेसिडेण्ट माकेर्टिंग शिखा कपूर यांनी दिली आहे. 'सिनेमाचा विषय घराघरात पोहोचावा म्हणून आम्ही ठिकठिकाणी फाळकेंच्या सिनेकर्तृत्वाची झलक दाखवणारी प्रदर्शनं भरवणार आहोत. यात त्यांच्या सिनेमांचे फोटो, पोस्टर, सिनेमातले कॉश्चुम्स आदींचा समावेश असेल. 'फॅक्टरी'चं माकेर्टिंग करताना फाळकेंचा आणि त्या निमित्ताने सिनेमाच्या इतिहासातील मराठी कर्तृत्वाचा लोकांना पुन्हा एकदा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे', असंही त्या म्हणाल्या. |
बांधकामाचा भाग पुनरावृत्तीच्या ऐवजी वगळण्यात येतो. गहाळ व्याकरणिक एकक याला अंतर म्हणतात. भाषासंग्रह जॉन आर. रॉस यांनी "निष्ठा ऑन व्हेरिएबल्स इन सिंटॅक्स" (1 9 67) या शब्दसंग्रहातील शब्दसमूह बनविले आणि त्याच्या लेख "गॅपिंग अँड ऑर्डर ऑफ डिस्ट्रिब्युटेड्स" मध्ये चर्चा केली, जी भाषाविज्ञानातील प्रगतीमध्ये , एम. बिअरविच आणि केई हेडॉल्फ (मटन, 1 9 70). उदाहरणे आणि निरिक्षणः - "कार जुन्या-बर्याच होत्या, बसही होत्या. " (बिल ब्रायसन, द लाइफ अँड टाइम्स ऑफ द थंडरबॉल्ट किड . ब्रॉडवे बुक्स, 2006) - "अर्नाद त्याचा जवळचा मित्र होता, पीटर, त्याचा सर्वात जुना मित्र. " (जेम्स सेलटर, लाइट इयर्स , रँडम हाऊस, 1 9 75) " गॅपिंग . . . एका परिवर्तन चे वर्णन करते ज्यामुळे एखादे क्रियापद काढून टाकून एखादे वाक्यात अंतर निर्माण होते जे अन्यथा पुन्हा दिसून येईल, उदा. कॅरोलीन बासरी आणि लुईस (नाटक) पियानो वाजवतो . गॅपिंग वरीलप्रमाणे कार्य करू शकते, किंवा शब्दांच्या पहिल्या सूचनेच्या हटविण्याच्या बाबतीत म्हटल्याप्रमाणे. रॉसनुसार गॅपिंगची दिशा गहरी संरचनामधील घटकांच्या शाखांवर अवलंबून असते आणि भाषेच्या अंतर्निहित शब्द ऑर्डरमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करते. (हडुमोड बुस्मान, रूटलेज डिक्शनरी ऑफ भाषा अँड लिविविस्टिक्स , टेलर अँड फ्रान्सिस, 1 99 6) नमुना विचारात घ्या (154): अ. जॉन कॉफी आवडतो आणि सुसान चहाला पसंत करतात. ब. जॉन कॉफी आणि सुसान आवडतात - चहा. (154) गॅपिंग म्हणून ओळखली जाणारी एक पॅटर्न स्पष्ट करते. गॅपिंग ही अशी कार्यवाही आहे जी एक घटकातील एका वाक्यात मागील वाक्यात समान प्रकारच्या एका घटकासह ओळखल्या जाणार्या एक वाक्य मध्ये डिलिट करते. अधिक विशेषतः, (154 ख) गॅपिंगमध्ये दोन समन्वयित खंडांचे दुसरे क्रियापद हटवते; हे शक्य आहे कारण हटविलेला क्रियापद पहिल्या वाक्याच्या क्रियापदापेक्षा वेगळा आहे. मध्ये (154 ब) क्रियापद सरकवले आहे परंतु, महत्त्वपूर्ण म्हणजे, त्याचे एनपी [ नॉउ वाक्यांश ] पूरक मागे सोडले जाते. (लिलियन एम व्ही. हाजीमन आणि जॅकलीन गुएरॉन, इंग्रजी व्याकरणः ए जनरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह . विली-ब्लॅकवेल, 1 999) "निश्चितपणे, काहींची बांधिलकी लेखी भाषेत मोठ्या प्रमाणात आढळते. जॉन हा एक सफरचंद खातो आणि मरीया एका आळीपाळीचे उदाहरण आहे, जिथे जिथे खाल्ले गेले ते दुसऱ्या खंडातून वगळलेले आहे, हे समजले जाते की मरीया आल्या . ताओ आणि मेयर (2006) मध्ये आढळल्या की, कॉरपोराच्या व्यापक शोधानंतर, 'जीपिंग भाषण करण्याऐवजी लिखित स्वरूपात मर्यादीत आहे. ' एलीया कझन चित्रपट ' द लास्ट टाइकून' मध्ये , एक शक्तिशाली चित्रपट दिग्दर्शक एक दृश्ये नाकारतो ज्यामध्ये फ्रेंच अभिनेत्रीला 'ना मी I' असे नाव दिले जाते, कारण हे अप्रामाणिक भाषण आहे. 'या परदेशी स्त्रियांना खरोखरच वर्ग असतो' हे रिंग खरे आहे. गॅपिंग बांधकाम उत्तम दर्जाचे आहे, आणि जोरदार उच्चांकिरित रजिस्टर्सपर्यंत मर्यादित आहे, तरी संपूर्ण बोलीभाषा इंग्रजीतून कमी पडत आहे. " (जेम्स आर. हूरफोर्ड, द ओरिजिन्स ऑफ व्याकरणः लँग्वेज इन द लाइट ऑफ इव्होल्यूशन . ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 2012) |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच 'फुलवंती' आणि 'जाणता राजा' ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. 'जाणता राजा' या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले. पुरस्कार - डी. लिट. (२०१३), महाराष्ट्र भूषण (२०१५), गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२), पद्म विभूषण (२०१९). सचित्र चरित्र - बेलभंडारा (लेखन - सागर देशपांडे) संशोधन प्रबंध - 'मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१' (भारत इतिहास संशोधन मंडळ) कार्यकाळ - तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत 'माणूस' साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग. लेखन - आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्यांचा सरकारवाडा, पुरंदर्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड. |
सातारा : कामगार हिताचे अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागावा. आठ दिवसांत कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन ते त्वरित मार्गी लावावेत कामगारांवर अन्यायकारक भूमिका अधिकाऱ्यांनी घेऊ नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. एसटी कामगार प्रश्नांबाबत काही अधिकारी अन्यायकारक भूमिका घेत आहेत. या संदर्भात एसटी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह भोसले व संघटनेचे सर्व विभागीय पदाधिकारी यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे ड्याशिंग मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी मंत्रीमहोदय यांनी विभागनियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकी वेळी एसटी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले उपाध्यक्ष रामभाऊ रैनाक, कार्याध्यक्ष शिवाजी देसाई प्रमुख सल्लागार पी. एस. सपकाळ सहसचिव पावन फाळके भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. |
Athiya-KL Rahul: केएल राहुल आणि अथिया शेट्टीची लग्नानंतरची पहिली डिनर डेट. . चाहते म्हणाले, 'अरे आता लग्न झालं जरा. . . " बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांचा विवाह 23 जानेवारी रोजी खंडाळा येथील फार्म हाऊसवर कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत झाला. लग्नानंतर हे कपल सतत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, हे जोडपे सोमवारी संध्याकाळी एकत्र दिसले. सोमवारी संध्याकाळी लग्नानंतर पहिल्यांदाच अथिया शेट्टी आणि केएल राहुल सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा हात धरताना दिसले. हे जोडपे मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट झाले होते. अथिया शेट्टी आणि केएल राहुलने पापाराझींना निराश केले नाही आणि एकत्र पोझ दिली. अथिया आणि केएल राहुल डिनरसाठी ब्रँडा येथील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. लग्नानंतर अथिया मस्त लूकमध्ये दिसली. प्रिंटेड निळा शर्ट आणि डेनिम जीन्स, तर तिथेच, केएल राहुल जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये नेहमीसारखाच सुंदर दिसत होता. मात्र, चाहते अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना त्यांच्या कॅज्युअल कपड्यांमुळे ट्रोल करत आहेत. खरंतर, दोघेही लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत, पण दोघांनी खूप कॅज्युअल कपडे घातले आहेत. साधारणपणे याआधी, जेव्हा जेव्हा एखादी सेलिब्रिटी कपल लग्नानंतर पहिल्यांदाच पापाराझींसमोर येते तेव्हा ते चांगले तयार होऊन येतात. नववधू हातात बांगड्या, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि साडी किंवा सूट-सलवार घातलेली दिसतात. तर, अथिया शेट्टी जीन्स आणि शर्ट परिधान केलेली दिसली. यासोबतच तिच्या गळ्यात ना सिंदूर होता ना गळ्यात मंगळसूत्र. अशा परिस्थितीत चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले की, कोण म्हणेल की यांचे लग्न झाले आहे. यादरम्यान केएल राहुल अथियाला लोकांच्या गर्दीतून वाचवताना दिसला. बातमीवर विश्वास ठेवला तर लवकरच हे कपल वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. |
पंधरा दिवसापासून ही कारवाई सुरू असून या कारवाईसाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर तसेच प्रवाशांवर या अंतर्गत कारवाई केली जात असून, दंडात्मक कारवाईबरोबरच वालचंदनगर पोलीस जनजागृती देखील करत आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या मर्यादेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देणाऱ्या हॉटेल ढाबाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री दहानंतर कोणतीही कार्यालय अथवा कोणतेही कामकाज चालू राहणार नाही अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रम व इतर सामाजिक राजकीय कार्यक्रमांना 50 लोकांपेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे अशी माहिती सहायक निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. दरम्यान पवार यांनी आवाहन केले आहे की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोणीही विनामास्क घराबाहेर कामाव्यतिरिक्त पडू नका, रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवेखेरीज घराबाहेर पडू नये असे आवाहन पवार यांनी केले आहे. |
सोलापूर Multistate Co-operative - राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पुण्यात पार पडली आणि तिच्यात सोलापूरच्या लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद साबळे यांनी काम पाहिले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुरेश वाबळे तर उपाध्यक्ष म्हणून प्रा.व्ही. एस. अंकलकोटे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी साबळे यांनी केली. Multistate Co-operative फेडरेशन ही मल्टीस्टेट सोसायट्यांच्या धोरणावर विचार करणारी एकमेव राष्ट्रीय संघटना आहे. अशा संस्थांच्या वाटचालीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने ही संघटना कार्यरत असते. या फेडरेशन मध्ये सध्या प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या संस्थांचा सहभाग आहे. लवकरच तिची व्याप्ती वाढवून तिच्यात सात राज्यातल्या मल्टीस्टेट संस्थांना समाविष्ट करण्यावर विचार केला जात आहे. अशा या वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहण्याची संधी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांना मिळाली आहे. त्यांनी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन म्हणून मोठे काम केले असून अल्पावधीतच तिचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाढवले आहे. या निवडीबद्दल रोहन देशमुख यांचे अभिनंदन होत आहे. या निवडणुकीनंतर Multistate Co-operative फेडरेशनचे कायदा सल्लागार प्रमोद गडगे, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, शिवाजी अप्पा कप्पाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला. या संचालक मंडळात धनलक्ष्मी हजारे, राहुल महाडिक, दिलीपसिंह भोसले, सुकुमार पाटील, अशोक ओव्हळ, रवीन्द्र कानडे, नारायण खांडेकर, जयसिंह पंडित, मारोतीराव कंठेवाड, कडूभाऊ काळे, मगराज राठी, जितेन्द्र जैन यांचीही निवड झाली आहे. |
सणसवाडी/ लोणी काळभोर - कंपनी मालकांकडून कामगारांची पिळवणूक होत असून काही कंपनी मालकांनी तर गेल्या आठ महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत, अशा कंपन्यांकडून होणारी श्रमचोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील अशा कंपन्यांची यादी तयार करण्यात येत असून श्रमचोरी कायद्यांतर्गत अशांवर कारवाईबाबतची दिशा ठरविण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचेही कटके यांनी सांगितले. सणसवाडी (ता. शिरूर) येथील स्मार्ट कार्ड आय टी सोल्यूशन्स लि. कंपनीतील 300 पेक्षा अधिक कामगारांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर कटके यांनी ही माहिती दिली. या कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून कामगारांना वेतन दिलेले नाही, अशी कैफियत या कंपनीतील कामगारांनी कटके यांच्यापुढे मांडली होती. यामुळे कटके यांनी दिवाळी किराणा संरजाम किटचे वाटप करीत कामगारांना आधार दिला. कटके यांनी सांगितले की, अडचणीच्या काळात समाजाच्या पाठीशी कसे उभे राहाता येईल, याचा प्रयत्न सर्वांनी करावा. कामगारांसोबत अडचणीच्या काळात नेहमीच उभा राहिलो आहे. सणवाडीतील कंपनीतील कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभुमीवर इतर कंपन्यातील कामगारांकडूनही माहिती घेत आहे. अडचणीच्या काळात श्रमचोरी हा गुन्हा ठरतो. या कायद्यानुसारच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याकरीता प्रयत्न करणार आहे. यासाठी खासदार राऊत यांच्याशीही चर्चा केली असून लवकरच बैठकीही घेण्यात येईल. यावेळी भारतीय कामगार सेना युनियनचे अध्यक्ष विक्रम दरेकर, सणसवाडीचे मा. सरपंच अजित दरेकर, युनियनचे उपाध्यक्ष चंद्रकांत भोंडवे, उद्योजक नानासाहेब भाडळे, प्रमोद भाडळे, विजय हरगुडे, कामगार उपस्थित होते. |
अशी अनेक वर्षे आहेत Throughपल आणि एरिक्सन बॉक्समध्ये न जाता पेटंट वापरण्यावरून कोर्टात लढा देत आहेत. हे स्पष्ट आहे की सॅमसंग ही एकमेव कंपनी नाही जी कॅपर्टिनोने गेल्या काही वर्षात अगदी तशीच केली आहे. यापूर्वी आम्ही दोन्ही कंपन्यांचा सामना करीत असलेल्या खटल्याची चर्चा केली आहे ज्यात एरिकसन यांनी असा दावा केला आहे की कपर्टिनो संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या चिप्स स्वीडिश फर्मची पेटंट आहेत. एरिक्सनने सुरुवातीला अत्यधिक नुकसान भरपाईची मागणी केली, करारावर पोहोचण्यासाठी दोन्ही कंपन्यांना लवादाचा अवलंब करावा लागला. Appleपलला एरिक्सन कंपनीला किती रक्कम द्यावी लागेल हे या क्षणी माहित नाही, परंतु नॉर्डिक बँकेच्या माध्यमातून रॉयटर्सच्या मते, गुंतवणूकदारांना दिलेल्या संप्रेषणात, IPhoneपलला प्रत्येक आयफोन आणि आयपॅडच्या नफ्यापैकी 0,5% देय द्यावे लागेल पेटंटच्या मालकीच्या फर्मकडे. 2012 पासून दोन्ही कंपन्या करारावर पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी वादात आहेत. गेल्या जानेवारीत Appleपलने एरिक्सनच्या स्वीडिश लोकांना कोर्टात नेले कारण ते विक्री केलेल्या प्रत्येक आयफोन आणि आयपॅडसाठी अत्यधिक रकमेची मागणी करत होते. स्वीडिश कंपनी अमेरिकन मातीवर हे तंत्रज्ञान वापरणार्या डिव्हाइसची विक्री रोखण्याचा प्रयत्न केला, यश न मिळाल्यास, दोन्ही बाजूंच्या फायद्यासाठी असलेल्या करारावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना. पुढची पायरी त्याने घ्यावी लागली ती म्हणजे संपूर्ण युरोपमधील कपर्टिनो-आधारित फर्मची विक्री रोखणे, परंतु करारावर उघड झाल्यानंतर स्वीडिश लोक आपला हात ठेवतील आणि चिप्सच्या वापरासाठी पेटंटचा मुद्दा सोडतील. 2 जी, 3 जी सह आणि 4 जी / एलटीई तंत्रज्ञान. |
मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. ८६ वर्षांच्या परंपरेला यावर्षी खंड पडणार असला तरी यावेळी हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मंडळाकडून यावर्षी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे, असे ट्विट उद्धव ठाकरेंनी केले आहे. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
लंडन, 13 ऑगस्ट : क्रिकेटमध्ये नवनवीन फॉरमॅट सुरू होत आहेत. याआधी 50 ओव्हर, कसोटी क्रिकेट आणि 20 ओव्हरच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मात्र आता चक्क 10 ओव्हरचे सामने सुरू होणार आहे. 2020 जुलै आणि डिसेंबरमध्ये 'द 100 लीग' ही अनोखी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ज्याचे नियम वाचून तुम्ही हैरान व्हाल. इंग्लंड अण्ड वेल्स क्रिकेट यांच्यावतीनं या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 19 एप्रिल 2018मध्ये इसीबीनं 100 चेंडूंच्या सामन्याची मॅच होणार असल्याची घोषणा केली होती. या फॉरमॅटमध्ये 100 चेंडूचा सामना असणार आहे. यात 15 ओव्हरमध्ये 6 चेंडू तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 चेंडू खेळावे लागणार आहेत. तसेच, या स्पर्धेतील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात 10 ओव्हर हे 10-10 चेंडूंचे असतील यात सहा चेंडूंवाली एकही ओव्हर नसेल. याशिवाय या लीगमधला मजेदार नियम म्हणजे, या स्पर्धेत कोणताही फलंदाज एलबीडब्ल्यू आऊट होणार नाही. या स्पर्धेत मॅंचेस्टर ओरिजनल्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स, बर्मिंगहॅम फोएनिक्स, ट्रेंट रॉकेट्स, वेल्श फायर, लंडन स्पिरिट, ओव्हल इन्विंसिबल, साऊदर्न ब्रेव या संघाचा समावेश असणार आहे. वाचा-ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, ICCनं सांगितली 'ही' डेडलाईन! दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीरी गॅरी कर्स्टन पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या द हंडरेड लीगमध्ये कार्ड़िफ पुरुष संघाचा प्रशिक्षक होणार आहे. त्यामुळं बऱ्याच काळापासून या संघाच्या प्रशिक्षकाचा शोध संपल आहे. तर, ऑस्ट्रेलिया महिला संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक मॅथ्यू मॉटला कार्डिफ संघाच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद दिले आहे. टीम इंडिया आणि आयपीएल यांना कोचिंग देण्याशिवाय गॅरी यांनी बिग बॅश लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले होते. ही अनोखी स्पर्धा आणणार क्रिकेटमध्ये मज्जा! आपल्या नव्या संघासोबत काम करण्याआधी गॅरी यांनी, "मी इंग्लिश अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम केलेले नाही. ही एक सुवर्ण संधी आहे. मला खात्री आहे की, ही स्पर्धा लोकप्रिय होईल", असे सांगितले. तर, मॅथ्यू मॉट यांनी, "ही स्पर्धा महिला क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा सफल होईल, या लीगमध्ये 100 चेंडूंचा सामना होईल. एक ओव्हर दहा चेंडूचाही असणार आहे, त्यामुळं ही स्पर्धा खुप वेगळी आहे आणि रोचक आहे. वाचा-भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी 'जेआरडी टाटा अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली : मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत आहे. यामध्ये तग धरण्यासाठी गांधींनी सांगितलेली 'आरोग्य स्वराज' ही संकल्पना नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. विचारांची शिकवण देणारे गांधी आणि या विचारकृतीला सामावून घेणारी गडचिरोलीची माणसे ही माझ्यासाठी दोन विद्यापीठे आहेत. त्यामुळे हा पुरस्कार गडचिरोलीच्या लोकांना समर्पित आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी 'जेआरडी टाटा अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते व भावना पॉप्युलेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक पूनम मुट्रेजा यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या सोहळ्यात डॉ. बंग बोलत होते. यावेळी रतन टाटा म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी युवांची सक्षम पिढी घडली पाहीजे. डॉ. बंग दाम्पत्य आरोग्यासोबतच सामाजिक भान असलेली युवा पिढी तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यामुळे लोकसेवेसाठी प्रथमच दिला जाणारा जेआरडी टाटा सन्मान या दोघांना देताना मला आनंद होत आहे. दिल्लीतील हिंसाचारात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करीत डॉ. राणी बंग म्हणाल्या, गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात लोकांना अशाच दुःखाला सामोरे जावे लागते. त्यांचे दुःख आम्ही आरोग्यसेवेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करीत असून हा पुरस्कार त्यांना व कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे त्या म्हणाल्या. |
मुंबई, 12 फेब्रुवारी : बॉलिवूडमधील कलाकारांवर विनयभंग किंवा छेडछाडीचा गुन्हा दाखल होण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर गणेश आचार्यवर एका महिला कोरिओग्राफरनं जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पाहायला लावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'कर्मफलदाता शनी', 'फीर लौट आयी नागिन' आणि 'राम सिया के लव कुश' फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case Of Molestation). अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शाहबाज खानवर आहे (Actor Shahbaz Khan). या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहितीनं ANI नं त्यांच्या ट्वीटरवरुन दिली. शाहबाझनं आतापर्यंत 'कर्मफलदाता शनी', 'फीर लौट आयी नागिन', 'राम सिया के लव कुश', 'दास्तान-ए-मोहोब्बत सलीम अनारकली', 'अफसर बिटिया', 'चंद्रकांता', 'युग' अशा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबतही अभिनय केला आहे. यात अमिताभ बच्चन यांचा 'मेजर साहब' सैफ अली खानचा 'एजंट विनोद', सनी देओलचा 'द हीरोः लव स्टोरी ऑफ स्पाय' या सिनेमांचा समावेश आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
नवी दिल्ली - कोणतेही फोन, डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची हेरगिरी करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअर तयार करणा-या इटलीतील एका वादग्रस्त कंपनीचे देशातील यापूर्वीचे यूपीए सरकार आणि आघाडीच्या गुप्तहेर संघटना ग्राहक होत्या. विविध ई-मेल आणि माहितीच्या आधारे विकिलिक्सने हा दावा केला आहे. २०११ मधील या ई-मेलनुसार, भारतीय वकिलातीने इटलीशी संपर्क साधून हॅकिंगची क्षमता असलेल्या या रिमोट कंट्रोल सिस्टीमचे (१६ स्पाय वेअर) दिल्लीत सादरीकरण करण्याचा प्रस्ताव कंपनीला दिला होता. काही स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, ही कंपनी जे सॉफ्टवेअर तयार करते ते बेकायदा नाहीत. जगभरातील पोलिस यंत्रणा व गुप्तहेर संघटना याचा सर्रास वापर करतात. याउलट जगातील इतर माध्यमांनी मात्र ही कंपनी हेरगिरी करणारी उपकरणे विकत असल्याचे म्हटले आहे. कंपनीने हे तंत्रज्ञान रशिया, सौदी अरब आणि इतर काही देशांच्या सरकारला विकल्याचेही स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या देशांचा हेरगिरीच्या बाबतीत असलेला इतिहास फारसा चांगला नाही. विकिलिक्सनुसार, हॅकिंग टीममधील काही लोक भारतातही आले होते. त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारमधील वरिष्ठांसमोर सादरीकरणही केले होते. यात सरकारसह आयबी व रॉ या गुप्तहेर संघटनांतील अधिकारी होते. भारताशी हा व्यवहार करण्यासाठी ही वादग्रस्त कंपनी इस्रायलमधील नाईस या कंपनीशी हातमिळवणी करत होती. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांवर देखरेखीचा प्रयत्न हाेता.संशयित ई-मेल व कॉम्प्युटर्सवर देखरेख करता यावी म्हणून हा प्रयत्न केला गेला होता. |
नवीनतम शाई पुस्तक वाचकांच्या वापरकर्त्यांनी - शाईपुस्तक कॅलिप्सो मॉडेल - नुकतेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुस्तके देणारी लोकप्रिय वेबसाइट वब्लिंक (आणि केवळ नाही) च्या संसाधनांमध्ये सोयीस्कर प्रवेश मिळविला आहे. ते त्यांच्या वाचकांवर अधिकृत वॉब्लिंक अनुप्रयोग स्थापित करू शकतात आणि वेबसाइटवर खरेदी केलेली पुस्तके सहज वाचू शकतात. इतकेच काय - चालू असलेल्या रीड.पीएल २०२० मोहिमेचे आभार - कॅलिप्सो इंकबुक्स धारक त्यांच्या डिव्हाइसवर १२ प्रकाशन बेस्टसेलर विनामूल्य डाउनलोड देखील करू शकतात, यासह डोमिनिका साओविक, जाकूब मॅसेकी, रॉबर्ट माएस्की आणि जकूब ieविक यांची पुस्तके. ई-पुस्तके, ऑडिओबुक आणि पारंपारिक कागदाच्या स्वरूपात पोलिश बाजारपेठेत वब्लिंक सर्वात लोकप्रिय पुस्तकविक्री प्लॅटफॉर्म आहे. वेबसाइट वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांपैकी एक म्हणजे अनुप्रयोग म्हणजे ते मोबाइल डिव्हाइसच्या पातळीवरून वेबसाइटवर खरेदी केलेली सामग्री सोयीस्करपणे वापरू शकतात. आतापासून, हा अनुप्रयोग इंकबुक कॅलिप्सो डिव्हाइस (व्रोकॉ पासून इंकबुक पोलस्का मधील नवीनतम ई-बुक वाचक) साठी देखील उपलब्ध आहे. हे स्थापित केल्यानंतर (आपण ते ई-रीडरच्या शाईपुस्तक अॅप्स मेनूमधून करू शकता), फक्त Woblink.pl येथे आपल्या खात्यात लॉग इन करा आणि नंतर आपण वाचत असलेली सामग्री समक्रमित करा. याबद्दल धन्यवाद, आम्ही संगणकावरून फायली संगणकावरुन वाचकांना त्रासदायक "मॅन्युअल" हस्तांतरित केल्याशिवाय, आरामात त्वरित ई-पुस्तके वाचू शकतो. इंकबुक कॅलिप्सो सध्या एक ई-बुक रीडर आहे ज्यावर आपण वॉबलिंक अनुप्रयोग स्थापित करू शकता. "वॉबलिंक हे आणखी एक व्यासपीठ आहे जे पोलिश" वाचन "सामग्री देते, ज्यात शाईपुस्तक कॅलिप्सो वापरकर्त्यांकडे त्यांच्या डिव्हाइसमधून सहज प्रवेश आहे. आम्ही आमच्या क्लायंटना सर्वात मोठ्या वाचन संसाधनांमध्ये सोयीस्कर आणि बिनधास्त प्रवेश प्रदान करण्यासाठी धडपडत आहोत - आता, कॅलिप्सो मार्गे ते लेगीमी, एम्पिक गो, पब्लिओ किंवा फक्त वॉबलिंकची संसाधने वापरू शकतात. आम्हाला खात्री आहे की ही एक ई-बुक वाचक आहे जी निश्चितपणे या प्रकारच्या सामग्रीचे "सेवन" करण्यासाठी सर्वात चांगली निवड आहे - त्याची स्क्रीन डोळ्यांसमोर ठेवणारी आहे आणि वाचकाची विशिष्टता वाचनावर लक्ष केंद्रित करणे सुलभ करते "- संस्थापक आणि बॉस पेवे होर्बॅक्झिस्की स्पष्ट करतात शाईपुस्तक युरोप. हे जोडण्यासारखे आहे की वॉबलिंक अनुप्रयोगासह शाई पुस्तक कॅलिप्सो सध्या एकमेव ई-बुक वाचक आहे, ज्यामधून आपण वाचनाला प्रोत्साहन देणार्या विलक्षण रीड पीएल 2020 मोहिमेचा लाभ घेऊ शकता! (इतरांसह, वब्लिंकद्वारे आयोजित) मोहिमेचा एक भाग म्हणून, आयोजक निवडलेल्या लेखकांच्या 12 बेस्टसेलर प्रदान करतात, जे सोयीस्कर - आणि निः शुल्क असू शकतात - नोव्हेंबर 2020 मध्ये वाचले जाऊ शकतात. हे स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनवर देखील केले जाऊ शकते, परंतु ई-बुक रीडर ही सर्वात चांगली निवड असल्याचे दिसते. यावर्षी उपलब्ध असलेल्या शीर्षकांमध्ये हे समाविष्ट आहेः जकूब ieवीक "टोपीएल" (मार्जिनसि पब्लिशिंग हाऊस) वोज्टेक द्रवेनियाक "सेन्सॉरशिपविना इतिहास 5. आणि धडकी भरवणारा आणि मजेदार - पीआरएल" (वायडॉनिक्टिक् झ्नाक) |
महाराष्ट्रातील (Maharashtra) महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने (BJP) मंगळवारी मुंबईत कार्यकारिणीची बैठक (BJP Executive Meet) बोलावली आहे. महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरणाचे आरोप हे पक्षाच्या अजेंड्यावर सर्वोच्च आहेत, असे पक्षाने सांगितले. नांदेड, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातील अलीकडच्या काळात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचा एका तरुण टिकटोक कलाकाराच्या आत्महत्येनंतरचा राजीनामा या प्रकरणातील केंद्रीय एजन्सींचा सुरू असलेला तपास यावरही चर्चा केली जाईल. या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा एक संकल्प असेल. अभिनंदन नोट महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात केंद्रीय नेतृत्वाखाली लसीकरणाच्या यशावर प्रकाश टाकेल, ते म्हणाले. कॉन्क्लेव्हमध्ये स्वीकारल्या जाणार्या दुसर्या ठरावात, भाजपने म्हटले की ते एमव्हीए सरकारमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण उघड करेल. तिसर्या ठरावात, तीन पक्षीय युतीने आपले राजकारण पुढे नेण्यासाठी विविध विभागांचे निर्दयीपणे शोषण कसे केले. परंतु मराठा आणि ओबीसींसह जवळजवळ प्रत्येक वर्गाच्या समस्या सोडविण्यात अयशस्वी झाले यावर राज्य नेते लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे जवळपास सर्वच वर्ग राज्य सरकारवर नाराज असल्याचा खुलासा उपाध्ये यांनी केला. अजेंड्यावर नसला तरी, नांदेड, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्रिपुरातील मशिदीवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या, हा आरोप त्रिपुरा राज्य सरकारने नाकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाने एका निवेदनात कोणताही हल्ला झाल्याचा म्हटले नाही. कथित घटनेच्या अहवालामुळे नंतर केवळ अशांतता निर्माण झाली नाही तर अमरावतीसह राज्यात अनेक ठिकाणी हिंसक संघर्षही झाला. |
Hotel Style Masala Dosa Recipe : आपल्या भारतात असे अनेक पदार्थ आहेत त्याची चव आपण कधी तरी चाखलीच असेल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात आपण त्याला हमखास बनवण्याचे ट्राय करतो. परंतु, एकतर तो पदार्थ फसतो किंवा तो खालेल्या टेस्ट सारखा लागत नाही. साउथ इंडियन हॉटेल किंवा अण्णाकडच्या टेस्ट सारखा आपला डोसा खरेतर बनत नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तो तव्याला टिकटणारही नाही, हमखास टेस्टी व कुरकुरीत असा हॉटेलसारखा चविष्ट डोसा बनवू शकतो. जाणून घेऊया रेसिपी (Recipe) २ कप उकडलेले तांदूळ (Rice) १/२ किलो उकडलेला बटाटा (Potatoes) डोसा पीठ तयार करण्यासाठी, तांदूळ (त्यात मेथी घालून) आणि उडीद डाळ धुवून साधारण ६-८ तास वेगळ्या डब्यात भिजत ठेवा. तांदूळ आणि उडीद डाळ नीट भिजल्यावर, मिक्सरमध्ये ज्या पाण्यात भिजवले होते ते पाणी वापरून मिक्सरमध्ये मिश्रण एकसारखे होईपर्यंत वेगवेगळे बारीक वाटून घ्या. जोपर्यंत मिश्रण एकसारखेपणा येईपर्यंत. दोन्ही पीठ एका मोठ्या डब्यात एकत्र मिसळा आणि त्यात मीठ घाला. चांगले एकत्र करुन रात्रभर आंबू द्या. डोसामध्ये मसाला भरण्यासाठी, जाड तळाच्या पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करा आणि मोहरी तडतडू द्या. नंतर त्यात चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून कांदे गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात चिमूटभर मीठ, हळद घालून नीट मिसळा. आता चौकोनी तुकडे केलेले बटाटे घ्या आणि त्यात परतून घेतलेल्या कांद्यामध्ये घाला आणि एकत्र करा. आता डोश्याचा तवा घेऊन मंद आचेवर गरम करा. डोसा तयार करण्यासाठी त्यावर १ चमचा तेल टाका. तवा गरम झाल्यावर पीठ ओता आणि गोलाकार आकारात पसरवा. डोसाच्या कडांचा रंग तपकिरी झाल्यावर मंद आचेवर ठेवून डोसाच्या बाजूने तेलाचे काही थेंब शिंपडा आणि 2 चमचे तयार बटाट्याचे मिश्रण घाला. डोसा फोल्ड करा. गरमागरम मसाला डोसा नारळाची चटणी आणि सांभार सोबत सर्व्ह करा. डोसासाठी योग्य पिठात बनवण्यासाठी, उकडलेले तांदूळ वापरा. यामुळे तुमचा डोसा आणखी कुरकुरीत होईल. तुमच्या डोश्याला सोनेरी रंग येण्यासाठी तुमच्या पिठात कोरडी भाजलेली चणाडाळ वापरा. चांगला डोसा बनवण्यासाठी 1-2 चमचे मेथीचे दाणे वापरून पहा आणि आपले पिठ उबदार ठिकाणी ठेवा. यामुळे तुमचा डोसाही चविष्ट होईल. तुम्ही डोसा बनवणाऱ्यांना गरम तव्यावर पाणी शिंपडून डोसा बनवताना पाहिले असेल. हे नॉन-स्टिक पॅनवर करू नका, कारण त्याचा कोटिंगवर परिणाम होऊ शकतो. तुमचा मसाला डोसा बनवण्यासाठी नेहमी तूप किंवा लोणी वापरा कारण त्यामुळे चव वाढेल. (Lifestyle News) Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
लंडन। wd। Last Modified सोमवार, 7 जुलै 2014 (11:41 IST) नोवाक जोकोविकने रॉजर फेडररला हरवत दुसर्यांनादा विम्बल्डन किताब पटकावला आहे. जोकोविकने सातवेळा विम्बल्डन जिंकणार्या फेडररला 6-7 (7-9), 6-4, 7-6 (7-4), 5-7, 6-4 अशा सेटमध्ये पराभूत केले. सातवेळा विम्बल्डन जिंकणारा स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने पहिला सेट 51 मिनिटात 7-6 ने जिंकला. 2011 साली विम्बल्डन जिंकणारा सर्बिायाचा नोवाक जोकोविकने दुसरा सेट 43 मिनिटात जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सेट हा पहिल्या सेटप्रमाणे अत्यंत चुरशीचा व रंगतदार ठरला. हा सेट टाब्रेकरचा झाला. जोकोविकने हा सेट 7-6 (7-4) ने जिंकून पाच सेटसच लढतीत 2-1 अशी आघाडी घेतली. फेडररने दोन गेम पॉईंट वाचविले. अटीतटीच सामन्यात जोकोविकने रॉजर फेडररला हरवत त्याचे आठवेळा विम्बल्डन किताब जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या जोकोविकने दुसर्यांदा विम्बल्डन किताब मिळविला आहे. |
। गोवे-कोलाड । वार्ताहर । गोवे-खांब ग्रामिण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट सामन्यात श्री सोमजाई गोवे संघ अंतिम विजेता ठरला. सोमजाई गोवे व हेटवणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अखेर श्री सोमजाई संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर जय बजरंग हेटवणे संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. श्री क्षेत्रपाल पुई संघ तृतीय तर श्री सोमजाई तिसे संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर सोमजाई गोवे संघाचा निखिल वाफिलकर तर स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज हेटवणे संघाचा अक्षय तेलंगे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गोवे संघाचा सागर जाधव यांना गौरविण्यात आले. श्री गणेश गोवे यांच्या वतीने रविवार दि. 30 जानेवारी रोजी आयोजित केलेली स्पर्धाचे उद्घाटन गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण धामणसे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या स्पर्धेला नितीन जाधव,पांडुरंग जाधव,लिलाधर दहिंबेकर,जयशिंग पवार, नंदकुमार वाफिलकर, रविंद्र जाधव, श्रीधर गुजर, महेंद्र जाधव, महादेव जाधव,नितीन वारकर, सुरेश जाधव,अरुण दहिंबेकर, आप्पा जाधव, अरुण पवार, शिवराम जाधव, रुपेश जाधव, अविनाश आंबेकर, धनेश घरट, बारक्या सुर्वे,उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिचंद्र गुजर, अजित दहिंबेकर, प्रशांत गुजर,निखिल दहिंबेकर, निलेश दहिंबेकर, अविनाश दहिंबेकर,अशोक दहिंबेकर,विनय दहिंबेकर, सार्थक दहिंबेकर, रुपेश पवार, शरद वारकर, सहेंद्र पवार, सत्कार कापसे, सुजित पवार, प्रल्हाद कापसे, मयूर जाधव, हर्षद जाधव, आकाश दहिंबेकर,राकेश मांजरे, साहिल दहिंबेकर, प्रमोद वारकर, पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. |
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा अविश्वसनीय प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने लिहिले, 'मी नेहमी मोठ्या एथलेटिक वेअर ब्रँडच्या बिलबोर्डवरील बॉडी पाहिली. आणि मला वाटले की माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीसाठी असे शरीर प्राप्त करणे शक्य आहे का? बिपाशा बासूचे या जाहिरातींमधले चेहरे पाहून मला प्रेरणा मिळाते . मी कधी त्या ब्रँडचा चेहरा होईन हे स्वप्नही पाहिले नाही; पण आता जवळजवळ १५ वर्षांनंतर ती प्रेरणा मी प्रत्यक्षात आणली आहे. यासाठी खूप विश्वास लागतो. फक्त तुमचाच नाही तर तुम्हाला या प्रवासात साथ देणाऱ्या लोकांवरही'. भविष्यात तापसी प्रेक्षकांना शाहरुख खानसोबत 'डंकी', रोमँटिक थ्रिलर 'फिर आयी हसीन दिलरुबा', 'एम्पायर' आणि 'वो लड़की है कहाँ' यांसारख्या चित्रपटांत दिसणार आहे. |
६ चित्रदीपः । अन्वयः - सर्वः ऐहिकामुष्मिकः संसारः वास्तवः । ततः अद्वैत न भाति नास्ति च इति अज्ञानिविनिश्चयः अस्ति । अर्थः-सर्वहि ऐहिक व पारलौकिक संसार खरा आहे त्यामुळे अद्वैत भासत नाहीं ह्मणून तं नाहींच असा अज्ञान्यांचा निश्चय असतो. ।।२४०।। विवरणः - जे दिसेल तेवढेच खरें असे अदीर्घदर्शी समजतात. कारण त्यांना विचार करून सूक्ष्म तत्त्व ठरविण्याची संवय नसते आणि त्यामुळे कांहीं चार्वाकादि नास्तिक केवल हा दृश्यमान ऐहिक संसारच खरा आहे, असे समजतात; व कांहीं त्यांच्याहून अधिक विचार करणारे मीमांसकादि आस्तिक ऐहिक व पारलौकिक संसार खरा असे मानतात; अर्थात् त्यांना अद्वैत तत्त्वाचा साक्षात्कार होत नाही. ते अद्वैत भासत नसल्यामुळे नाहींच असे निःशंकपणे म्हणतात. ॥ २४ ॥ पण आत्मज्ञानी पुरुषांची समजूत अशी नसते - असे आतां सांगतात - ज्ञानिनो विपरीतोऽस्मान्निश्चयः सम्यगीक्ष्यते ।। स्वस्वनिश्चयतो बद्धो मुक्तोऽहं चेति मन्यते ॥ २४१ ॥ अन्वयः - ज्ञानिनां निश्चयः अस्मात् विपरीतः अस्ति । तैः सम्यक् ईक्ष्यते । स्वस्वनिश्चयतः अहं बद्धः मुक्तः इति च मन्यते । अर्थः - ज्ञान्यांचा निश्चय याहून निराळा असतो. ते खरें खरें जाणतात; आणि आपापल्या निश्चयानेच मी बद्ध आहे, मी मुक्त आहे, असे मानतात. ॥ २४१ ॥ विवरणः - ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो, त्यांची समजूत अगदीं विपरीत असते. म्हणजे पूर्वोक्त आस्तिक व नास्तिक यांप्रमाणे ते दोन्ही संसार नित्य आहेत असे समजत नाहीत तर ते खोटे आहेत, व एक अद्वैत ब्रम्हतत्त्वमात्र त्रिकाळी सत्य ठरणारे आहे असें निश्चयानें जाणतात. त्याचप्रमाणे जसा जसा संकल्प असेल तसे तसे त्याला फळ मिळते म्हणजे जीव आपल्या संकल्पानेंच बद्ध होतो व त्यामुळेच मुक्तहि होतो. असें ते समज |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.