text large_string |
|---|
अकोलेः मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकवले बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने प्रदेश संपर्कप्रमुख संभाजीराजे दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिमा भेट देऊन करण्यात आला. संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री यांचे स्वागत व सत्कार युवक युवती करीत आहे. अकोले येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री आले असता मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख संभाजीराजे दहातोंडे, कु मानसी वाडेकर, सिद्धी धुमाळ, अक्षदा धुमाळ, प्रगती वैद्य, मनीषा भोर, हर्षदा वाकचौरे, स्वराज गवांदे, प्रथमेश सहाणे, अभिषेक वाकचौरे युवक व युवती यांच्या शुभहस्ते करण्यात आला. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून विद्यार्थी व नोकरीसाठी युवकांना आरक्षणाची अत्यंत गरज होती अनेक नेत्यांनी अन पक्षांनी समाजाचा फक्त मतासाठी वापर केला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण लागु करून समाजाच्या दृष्टीने अतिशय उत्तम कामगिरी केली त्यामुळं युवक व युवतींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री ना राम शिंदे, आमदार वैभवराव पिचड, जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राज गवांदे, युवक जिल्हाध्यक्ष ओम काळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील, युवक अध्यक्ष अक्षय अभाळे, शिक्षक अध्यक्ष किशोर धुमाळ, सुशांत वाकचौरे, अशोक आवारी, ईश्वर वाकचौरे उपस्थित होते. |
लोकसभा २०१९ः सुषमा स्वराज निवडणूक लढवणार नाहीत! इंदूर : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची पूर्ण कल्पना मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. अनेक दिवसांपासून त्या प्रकृतीच्या कारणास्तव अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक त्या लढवतील की नाही याबद्दल खात्री नव्हती. त्यानुसार त्यांनी स्वतःच आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. परंतु पक्ष त्यांनी भविष्यात राज्यसभेवर पाठवू शकतो असं म्हटलं जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सांभाळताना त्यांना अनेकवेळा प्रकृतीच्या करणास्थाव इस्पितळात दाखल व्हावं लागलं होतं. सध्या मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे आणि पक्ष प्रचाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्य प्रदेशातील भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्सुक? - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने दहा लाख आणि सिरमने कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. सिरमला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सिरममध्ये आग लागली की लावली याची चौकशी होणे आवश्यक आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबले पाहिजे होते. शेतकरी नेतेच आज आंदोलन करत आहेत. बाजार समित्या बंद करणे ही सरकारची भूमिका नाही. कृषी कायदा मागे घेणं योग्य नाही, दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे चुकीचं आहे. याबाबत केंद्राने बैठका घेण्यातही अर्थ नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आता कृषी कायद्याचा शरद पवार यांनी अभ्यास करून कायद्यात बदल सुचवायला हवा, असेही आठवले म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा पाहून वाटतंय की, उद्धव यांना ते सांगत आहे की उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत परत जायला हवे. असे सांगून आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी बीजेपीसोबत परत जायला हवे असे सांगितले. दरम्यान, राज्यातील सरकारचे भविष्य मला दिसत नसून, एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल नाहीतर दोन पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील, असेही ते म्हणाले. प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याकरिता जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, अशी ओबीसीचीही मागणी असल्याचे सांगून आठवले यांनी मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचे सांगितले. एल्गार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यात नक्षलवादी लोक असू नयेत. आंबेडकर, गांधीवादी लोक असावे. एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झालेली नाही. नक्षलवाद्यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊ नये, असे या वेळी आठवले म्हणाले. संभाजी भिडे दोषी असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. |
गेले काही महिने ट्विटर अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती हाय प्रोफाईल युजर्सची अकौंट हॅक होण्याची. अशी महत्वाची अकौंट हॅक होण्यापासून कशी थांबवावी याचे उत्तर ट्विटरला मिळालेले नाही. परिणामी त्यांनी एका नावाजलेल्या हॅकरलाच कंपनीचा सुरक्षा प्रमुख किंवा सिक्युरिटी हेड म्हणून नियुक्त केले आहे. या प्रसिद्ध हॅकरचे नाव पिटर जात्को असे असून तो मुगे (Mudge) या नावानेही ओळखला जातो. मिळालेल्या माहितीनुसार पिटर नावाजलेला हॅकर आहे आणि जगभरात त्याची हीच ओळख आहे. ट्विटर मधील त्याच्या नियुक्तीने तो खुपच आनंदात आहे. पिटर थेट ट्विटर सीईओ जॅक डोर्सी यालाच रिपोर्ट करणार आहे. पिटरकडे डिफेन्स अॅडव्हांस रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, सीडीसी कम्युनिकेशन्स येथे कामाचा अनुभव आहे. गेल्या काही महिन्यात ट्विटरवर जो बायडेन, जेफ बेजोस, बिल गेट्स, अॅलन मस्क अश्या अनेक धुरीणांची अकौंटस हॅक केली गेली आहेत आणि त्यामुळे ट्विटर युजर्स बरोबरच कंपनी या संकटातून कसे बाहेर पडायचे आणि अकौंट सुरक्षेची हमी कशी द्यायची यासाठी प्रयत्न करत आहे असे समजते. |
सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला. वैरागड : सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपऱ्हे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला. पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला तरी मान्सून सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ८ जून रोजी झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण केली. तसेच बाह्य मशागतीचे काम आटोपून आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नसल्याने धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर होते. असे असताना २७ जून रोजी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसाने शेतकरी सध्यातरी आनंदीत असून खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने भिडले आहे. वैरागड परिसरात शासनाच्या धडक सिंचन व नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच अनेक शेतकºयांनी कृषिपंपाची जोडणी केली. त्यामुळे सिंचनाची सुविधा या भागात झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर वैरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानपऱ्हे टाकले. हे पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोवणीचे काम हाती घेतले आहे. या कामातून अनेक महिला व पुरूष मजुरांना रोजगार मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे. पऱ्हेही रोवणीयोग्य झाल्याने येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा पाऊस बरसल्यास बहुतांश गावातील रोवणीचे काम सुरू होणार आहे. |
जळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल कस्तुरीसमोर झालेल्या दुचाकींच्या अपघातात वसीम इब्राहिम शेख (३२, रा. अक्सानगर) हा तरुण ठार झाला होता. या प्रकरणी गुरुवारी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शेख हे अक्सानगरात कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या काकांचे औरंगाबर रस्त्यावर नॅशनल वर्कशॉप नावाचे दुकान आहे. ३ जुलैला वसीम हे काकांच्या दुकानावर गेले होते, नंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहराकडे येण्यासाठी ते दुचाकीने निघाले. दरम्यान, हॉटेल कस्तुरीसमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला रामनगरकडून येणाऱ्या दुचाकी (एमएच. १९. डीआर. ७४८०) ने जोरदार धडक दिली. यात वसीम यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्तरावरून पसार झाला. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी मयत वसीमचे भाऊ इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंसह 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिल्याने आता हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. याविरूद्ध बंडाखोर आमदारांकडून 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी आहे. |
श्रावणाच्या या पवित्र महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्याची ते विशेष काळजी घेतात. भोलेनाथांना सर्वात प्रिय बेलपत्र आहे , जे अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर कृपा ठेवतात, परंतु धार्मिक ग्रंथांनुसार, बेलपत्र तोडण्यासाठी काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. बेलपत्र तोडताना मनापासून भगवान शंकराची पूजा करावी. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलची पाने तोडू नयेत. तसेच तिथींच्या संक्रांतीच्या वेळी आणि सोमवारी बेलची पाने तोडू नयेत. बेलपत्र डहाळीसह कधीही तोडू नये. याशिवाय अर्पण करताना तीन पानांचे देठ तोडून भगवान शंकराला अर्पण करावे. बेलपत्र हे असे पान आहे, जे कधीही शिळे होत नाही. भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष वापरल्या जाणाऱ्या या पवित्र पानाबद्दल धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, जर नवीन बेलपत्र उपलब्ध नसेल, तर दुसऱ्याचे अर्पण केलेले बेलपत्रही अनेक वेळा धुवून वापरता येते. गुळगुळीत पृष्ठभागाच्या बाजूने स्पर्श करताना नेहमी भगवान शिवाला उलटे बेलपत्र अर्पण करा. अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने नेहमी बेलपत्र अर्पण करा. भगवान शंकराला बिल्वाची पाने अर्पण करण्यासोबतच जलधाराही अर्पण करा. पाने फाटणार नाहीत याची काळजी घ्या. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते. बिल्वाच्या पानांनी शिवलिंगाची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते. केवळ भगवान शिवच नाही तर त्यांचा अंशावतार बजरंगबलीही बेलपत्रावर प्रसन्न होतो. शिवपुराणानुसार घरामध्ये बिल्वचे झाड लावल्याने संपूर्ण कुटुंब विविध प्रकारच्या पापांच्या प्रभावापासून मुक्त होते. ज्या ठिकाणी बिल्व वृक्ष आहे ते स्थान काशीतीर्थासारखे पूजनीय आणि पवित्र मानले जाते. अशा ठिकाणी साधना व उपासना केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. |
एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करुन ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मागणी फेटाळण्यात आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवार, ८ सप्टेंबरपासून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेबाबत २१ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या राज्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर हजर राहून परीक्षा देण्याचे बंधन आहे. कोरोना संकटात परीक्षा केंद्रावर जाण्याच्या निमित्ताने संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा मुद्दा उपस्थित करत आठ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने विद्यार्थ्यांची मागणी फेटाळली. |
मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायटींची जास्त संख्या आणि नव्याने विकसित झालेल्या मोशी-चऱ्होली-डुडुळगावमधील महापालिकेच्या आरक्षणांचा विकास रखडला आहे. हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायटींची जास्त संख्या आणि नव्याने विकसित झालेल्या मोशी-चऱ्होली-डुडुळगावमधील महापालिकेच्या आरक्षणांचा विकास रखडला आहे. हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. मागील निवडणुकीत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा व सात यांचा मिळून यंदा प्रभाग क्रमांक तीन बनला आहे. येथील सध्याचे नगरसेवक आणि इच्छुकांची भाऊगर्दी होणार असे दिसते. त्यातच या प्रभागात दोन जागा या सर्वसाधारण आणि दोन या ओबीसीसाठी आरक्षित असणार आहेत. या भागातील आमदार हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीदेखील येथे मोठी फिल्डिंग लावली आहे. तर, माजी आमदार विलास लांडे हेदेखील या भागावर आपले वर्चस्व कायम ठेवून आहेत. त्यामुळे येथे चांगला धुराळा पहायला मिळेल. त्यातच येथील आरक्षणांचा अद्याप विकास झालेला नाही, त्यामुळे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. सध्या येथे शिवसेनेचा एक नगरसेवक असून, आता त्यांना कडवे आव्हान उभे राहील, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या भागात आता राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने उमेदवार शोधावा लागेल. या ठिकाणी गावांचा परिसर अधिक असला, तरी नवीन विकसित झालेल्या सोसायट्यांची संख्या अधिक झाली आहे. गाववाल्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक झाली आहे. मध्यमवर्गीय उच्चभ्रूंचे मतदान निर्णायक ठरणार आहे. समाविष्ट गावांत अजूनही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. रस्ते, शाळा, उद्याने आदी आरक्षणे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती. ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आरक्षणांचा रखडलेला विकास ही येथील प्रमुख समस्या आहे. इंद्रायणी नदी आणि प्रमुख रस्त्यांचा आधार घेऊन नवीन प्रभाग झाला आहे. मोशी जकात नाक्यासमोरील पुलापासून इंद्रायणी नदीने आळंदीची हद्द, देहूगाव नाका, चऱ्होली गावठाण, निरगुडी आणि पुढे लोहगाव आणि लष्करी हद्दीने पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत, पुढे संत ज्ञानेश्वरनगर, दिघी, मॅगझिन हद्दीने गंधर्वनगरी, केंद्रीय विहार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची विरुद्ध बाजूने मोशी गावठाण, पुढे मोशी नाक्यापर्यंतचा भाग या भागात जोडला आहे. नकाशात भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मोठा दिसतो. याचे प्रमुख कारण समाविष्ट गावांचा भाग अधिक असल्याने मोकळ्या जागा अधिक आहेत. नवीन प्रभागरचनेत मोशी गावाचे दोन भागांत विभाजन केले आहे. मात्र, चऱ्होली आणि डुडुळगाव या गावांचा पूर्णपणे समावेश केला आहे. मोशी आणि चऱ्होली परिसरात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. मंदा आल्हाट आणि धनंजय आल्हाट या दोन्ही नगरसेवकांना प्रभाग दोन आणि तीन अशा दोन्ही ठिकाणी संधी आहे. तसेच, सर्वसाधारणसाठी दोन जागा राखीव असल्याने चऱ्होलीच्या दोन्ही नगरसेवकांना संधी आहे. तर, राष्ट्रवादीकडून विनया तापकीर, मंदा आल्हाट, चंद्रकांत तापकीर, नवनाथ तापकीर, घनश्याम घेडकर हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून धनंजय आल्हाट, किसन महाराज तापकीर, सुनील तापकीर, सुरेखा बुर्डे, शशिकांत बुर्डे हे प्रयत्न करीत आहेत. भाजपची यादी मोठी असून शैला मोळक, नीलेश काळजे, दत्तात्रेय तापकीर, संतोष आंबेकर, नितीन तापकीर, सचिन लालदास तापकीर, संतोष भाऊसाहेब तापकीर, सुनील बोराटे, राजाराम बोराटे, लक्ष्मण सस्ते यांसह अनेकांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, असे सांगितले जात आहे. |
कृषी सहायक विजयता सुर्वे यांनी सोयाबीनची पाहणी करून रोगनियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्यासह शुद्ध बियाण्यांसाठी भेसळयुक्त झाडे काढून टाकण्याचा सल्ला दिला. शिवाय ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन करताना प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाहणी एप प्रत्येक एण्ड्राईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आपला पीकपेरा स्वतः नोंदवावा. जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी आपण पुराव्यानिशी दावा करू शकतो. एका मोबाईल नंबररून आपण स्वतःसह २० पेरेपत्रक भरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या शेती शाळेला कृषी सहायक ए. टी. ठोंबरे यांच्यासह आकाश देवळे, श्रीकृष्ण भगत, गोपाल देवळे व इतर शेतकरी उपस्थित होते. फवारणीदरम्यान काळजी घ्या! सोयाबीनसह इतर पिकांवर रोग नियंत्रणासाठी फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, पायात बूट, हातमोजे, नाकातोंडावर मास्क, चष्मा आदी साधनांचा वापर करावा. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना फवारणी करावी, असेही विजयता सुर्वे यांनी सांगितले. |
SMART व्यवसाय लक्ष्य सेट करण्याचा परिचयआपल्या लक्ष्य निश्चित करण्यासाठी SMART गोल सेटिंग ही लोकप्रिय पद्धत आहे. हे महत्वाचे आहे कारण ते आपल्याला लक्ष्य आणि प्रक्रियाक्षम बनविण्याच्या प्रक्रियेद्वारे वेळ आणि उर्जेची बचत करण्यास मदत करते. हे आपल्याला आपल्या चाकांना फिरविण्यास मदत करते! स्मार्ट लक्ष्य काय आहे? आपण एसएमटीआर परिवर्णी शब्दाने परिभाषित करू शकता. ही अशी परिभाषा आहे जी लघु उद्योग मालकांसाठी सर्वात योग्य आहेः - विशिष्ट - आपण स्पष्टपणे स्पष्ट केले आहे की आपण काय साध्य करू इच्छिता. - मोजण्यायोग्य - आपली प्रगती जाणून घेण्यासाठी आपण लक्ष्य आणि लक्ष्य ओळखले आहेत. - प्राप्य - आपले ध्येय यथार्थवादी आणि आटोपशीर आहे. - संबंधित - आपल्या व्यवसायाचे मॉडेलसह फिट होणारे एक लक्ष्य आपण ओळखले आहे. - वेळ-आधारित - आपण ध्येयासाठी विशिष्ट कालावधीची ओळख करुन दिली आहे. एकदा आपण हे लिहिलेले आहे की SMART चा उद्देश स्मार्ट स्मार्ट सेटिंगिंग वर्कशीटद्वारे चालवा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे उत्तर द्या. आपण प्रारंभ करण्यापूर्वी काय एक SMART ध्येय असे दिसते हे पाहणे देखील उपयुक्त ठरते. येथे काही स्मार्ट लक्ष्य उदाहरणे आहेत जी प्रक्रिया पुढे प्रदर्शित करतात. आपण आपली प्रगती ट्रॅकिंग करण्यास सज्ज असता तेव्हा, लक्ष्य सेटिंग आणि ट्रॅकिंग सॉफ्टवेअरच्या सूचीची खात्री करणे देखील सुनिश्चित करा. आता आपण स्मार्ट लक्ष्य सेटिंगबद्दल मूलतत्त्वे जाणून घेता आहात, येथे पाच टिपा आहेत जे आपल्याला आपल्या व्यवसायात SMART लक्ष्य सेटिंग वाढवण्यास मदत करतील. SMART गोल सेटिंग म्हणजे मान्यताप्राप्त विभागांमध्ये उद्दिष्टे कमी करणे. प्रक्रियेच्या सुरुवातीस, आपण SMART निकषांद्वारे आपला ध्येय चालवण्याआधी , अखेरीस सुरुवात करणे आणि मागे काम करणे उपयोगी असू शकते. जेव्हा आपण मोठ्या चित्राची लक्षणे लक्षात ठेवता तेव्हा त्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे नेहमीच सोपे असते. आपल्या मनात मोठ्या चित्राची नोंद केल्यानंतर, आपल्याला उलट दृष्टीकोन घेणे आणि तपशीलवर लक्ष देणे आवश्यक आहे. "मापदंड" आणि "प्राप्य" SMART निकष पूर्ण करण्यासाठी आपण आपले ध्येय खाली लहान कृतींमध्ये मोडण्यास प्रारंभ करता तेव्हा, ज्याप्रमाणे लहान व शक्य तितक्या विशिष्ट क्रिया आहेत ते समाविष्ट करा. आपल्याला आवश्यक असलेल्या पायऱ्या जितक्या लहान कराव्यात तितकेच पुढे-पुढे जाणे आणि गती वाढवणे सोपे होईल. SMART Goal Setting एक सूत्र वापरण्याबद्दल आहे जे, यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, आपल्याला बिंदू A वरुन बिंदूकडे प्रभावीपणे घेऊन जाईल. आपण प्रक्रियेत जितके अधिक संरचित आहात, प्रगती करणे सोपे होईल. प्रारंभ करण्यासाठी आपण समाविष्ट केलेल्या SMART कार्यपत्रके, उदाहरणे आणि साधने वापरा. आणि आपल्या डोक्यात ध्येय ठेवण्याची इच्छाशक्ती टाळा! सर्वकाही खाली लिहा, जेणेकरून आपण ते लक्ष्यित करीत आहात आणि आपण ते कसे साध्य करू इच्छिता याचा रेकॉर्ड आहे. जेव्हा आपण आपल्या ध्येयामध्ये अडकलेले आहात आणि दररोजच्या कार्यांवर आपण लक्ष केंद्रित केले, तेव्हा त्या प्रक्रियेत आपण कुठे आहात ते विसरणे सोपे असू शकते. आपली प्रगती मोजणे, आपल्या पुढील चरणांचे पुनरावलोकन करा आणि आपल्या यशाची जपणारी करण्यासाठी नियमीत लक्ष्य तपासणी करा. आपण योग्य दिशेने जात आहोत हे सुनिश्चित करण्याचा हा केवळ एक चांगला मार्ग नाही, परंतु हे आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये आनंदित करेल आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित राहतील . अनेक कारणांसाठी ओपन-एण्डेड गोल धोकादायक असतात, ज्यापैकी एक म्हणजे प्रगती प्रोत्साहित करण्यासाठी कोणतेही तात्काळ किंवा वेळ दबाव नाही. समाप्तीची तारीख नाही. बहुतेक वेळा धीमे प्रगती. म्हणूनच SMART गोल सेटिंगचा "वेळ-आधारित" भाग खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण प्रथम सुरूवात करता तेव्हा आपले ध्येय वेळेनुसार विचारात घ्या आणि त्यास लहान लक्ष्यांत मोडून टाका, जेणेकरून आपण प्रत्येक यशस्वीरित्या आपल्या यश पाहू शकता. आपल्या व्यवसायासाठी लक्ष्य सेट करण्याबद्दल अधिक माहितीसाठी, लघु उद्योग उद्दिष्ट सेटिंग मार्गदर्शिकेमध्ये प्रदान केलेल्या संसाधनांचे पुनरावलोकन करा. |
विरोधकांच्या महासभेतील एकमुखी आवाजाने मोदी सरकारची तोफही थरथरली, अशी बोचरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? असा सवालही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केला आहे. २२ विरोधी पक्षांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. मात्र, त्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका करण्याचे कारण काय? असा सवाल करताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेनेसह कोणी बोलले तर ते लोकविरोधी, देशविरोधी होते. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. जनता मुर्ख नाही त्यांना सर्वकाही समजते त्यामुळे मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल, असे शिवसेनेने म्हटले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. याचे शिवसेनेकडून कौतुक करण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम बंगालची ही वाघीण मोदी-शहांना सळो की पळो करुन सोडत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. शिवसनेलाही कोलकात्याच्या महासभेत यावे आणि मोदी सरकारविरोधात रणशिंग फुकावे अशी ममतांची इच्छा होती. मात्र, आमचे रणशिंग आम्ही आमच्याच मैदानात फुकत असतो आणि ते याआधीच फुंकले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मात्र, महाआघाडीत पासवान, नितीशकुमार आणि आठवलेंसारखे नमुने आहेत ज्यांचा राम मंदिराला विरोध आहे त्यामुळे महाआघाडीला आमचा विचार झेपला नसता असेही शिवसेनेने म्हटले आहे. महाआघाडीवर टीका करण्यापेक्षा विरोधकांचा भडीमार मोदींनी संयमाने सहन करायला हवा असा सल्लाही शिवसेनेकडून सरकारला देण्यात आला आहे. सरकार देशाचे शत्रू नाही मात्र आपले सरकार अमर असल्याच्या भ्रमात त्यांनी राहू नये, असा खोचक टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकविरोधाची पर्वा न करता भाजपाने मेहबुबा मुफ्तींसोबत सत्ता उपभोगली. त्यानंतर स्वतःच त्यातून बाहेर पडून मुफ्ती देशविरोधी असल्याचा डांगोरा भाजपा पिटत असल्याचे शिवसनेने म्हटले आहे. |
मी स्मिताच्या दुसऱ्या कॉमेंटशी पुर्ण सहमत आहे. बरेचदा पुरुषांना आपली मदत घरच्या स्त्रीला हवी आहे हेच लक्षात येत नाही . आणि काही वेळेस तर लक्षात आलं तरीही दुरलक्ष केले जाते. मी पण त्या लेखात हेच सांगितलंय.. की सुरुवातीपासूनच पांगळा बनवून ठेऊ नये नवऱ्याला ( मला दोन्ही मुली आहेत म्हणून म्हणतो असे नाही) हे माझे स्वतःचे खरे खुरे मत आहे. मुलींची काम करण्याची सवय 'न' च्या बरोबर असते. कॉलेज, क्लासेस, टर्म वर्क मध्ये त्या इतक्या गुंतल्या असतात, की त्यामुळे स्वयंपाक घर म्हणजे फक्त मॅगी/पास्ता/सुप बनवण्यापुरतंच वापरता येतं. स्त्री घरामध्ये काय काय कामं करते हे लक्षात फक्त जेंव्हा ती आजारी पडते तेंव्हाच येते. असंख्य कामं आहेत जी तुमच्या नकळत बिनबोभाट होत असतात. कुठल्याही परीस्थितीत तिने लवकर बरं व्हावं आणि घराकडे पुन्हा पहिल्यासारखं लक्ष द्यावे असे वाटू लागते. आणि ती जन्माची सहचारिणी 'सखी' - तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा समजते. मस्त आहे लेख एकदम.. खरं तर हे लग्न करताना सांगितले गेले तर किती छान होईल नाही? हे सारं कसं असायला हवं असं आहे, प्रत्यक्ष मात्र फार वेगळी परिस्थिती आहे. जसं आपण स्वयंपाक, सण-वार, कुलाचार याबद्दल लग्न ठरलेल्या मुलीशी बोलतो ना तसेच सहजीवन या शब्दाचा खरा अर्थ मुलाला आणि मुलीला का नाही सांगत? मला फार वाटते की हे खूप गरजेचे आहे. कडेकडेच्या गोष्टींवर सखोल चर्चा केली जाते पण या नात्याच्या गाभ्याबद्दल कधी बोललेच जात नाही. कालांतराने नाती दृढ होतात पण ती कशी करता येतील याबद्दल सगळ्यांना अनुभव असुनही बोलले नाही जात. म्हणजे गर्भसंस्कार कसे बाळ जन्माला येण्याआधी केले जातात ना तसे हे संस्कार नाती जन्माला येण्याआधी व्हायला हवेत खरं तर.. नाही का? खूप गहन विषय आहे हा. बऱ्याच गोष्टी आपोआपच समजतील म्हणून सांगितल्या जात नाही. कुठलाही प्रिज्युडीस न ठेवता त्यांनी स्वतःचे अनूभव घ्यावे म्हणून.. दादा, नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख. तुमचे लेखन नेहमीच अतिशय संतुलीत असते. कुठेही किंतु बाळगायला जागाच ठेवत नाही तुम्ही. म्हणुनच आम्ही नेहमीच तुमच्या नव्या लेखनाची वाट पाहत असतो. धन्यवाद. |
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे. औरंगाबाद : जिल्ह्यातील ४९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. खासगी रुग्णालयात एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ५२१ बरे झाले तर ५०३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५१६ जणांवर उपचार सुरु आहेत. |
भंडारा : चालकाला बेशुद्ध करून कार पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ही टोळी जेरबंद केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून १२७ झोपेच्या गोळ्याही जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आपल्या लठ्ठपणाचा फायदा घेत या टोळीतील सदस्य रस्त्यावर हात दाखवत कार चालकांना थांबवून लिफ्ट मागत असत. गाडीत बसल्यानंतर रस्त्यात कारचालकाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत त्याची कार चोरून नेली जात असे. असं कृत्य करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या ३ आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य (वय ४२ वर्ष), सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल (वय ३६ वर्ष),भास्कर नंदेश्वर (वय ५२ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडून चोरीची अर्टिगा कार व १२७ झोपेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. घटनेच्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथील कैलास तांडेकर यांना आरोपी भास्कर याने आपल्या लठ्ठपणाच्या फायदा घेत लिफ्ट मागितली. मात्र काही वेळानंतर कैलास तांडेकर यांना बेशुद्ध करून त्यांची अर्टिगा कार पळवून नेत भास्कर नंदेश्वर हा फरार झाला. शुद्धीवर येताच कैलास तांडेकर यांनी तुमसर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबधित तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला. तपास सुरू असताना छत्तीसगड येथे खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, संबधित चोरीची कार विक्रीसाठी येत आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला असता आरोपी पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य व सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल या दोघांना अटक केली. दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर आता आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. |
शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शेतक-यांना १० हजार रुपयांची उचल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ही उचल शेतक-यांना मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांसह भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने केला आहे. मुंबई - शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शेतक-यांना १० हजार रुपयांची उचल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ही उचल शेतक-यांना मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांसह भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला एक महिना होत आला तरी अद्याप राज्यातील किती शेतक-यांनी या निर्णयाचा फायदा घेत उचल घेतली आहे त्याची कोणतीही ठोस आकडेवारी मंत्रालयात नाही. या आकडेवारीची जुवळाजुळव करण्यातच मंत्रालयातील अधिका-यांची दमछाक सुरु असल्याचे चित्र आहे. शेतक-यांनी पुकारलेल्या संपानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी राज्यातील शेतक-यांना दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत शेतक-यांना बियाणे, खते खरेदीसाठी १० हजार रुपयांची उचल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेकडून जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवून आंदोलन केले जात आहे. तरी देखील शेतक-यांना उचल देण्याच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांकडून दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, पाऊस लांबल्याने दुबार पेरणीच्या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा अवस्थेत शेतक-यांना किमान या उचलीचा थोडाफार आधार होता. मात्र मंत्रालयात जिल्हा बँकांनी किती शेतक-यांना दहा हजार रुपयांची उचल दिली यांची ठोस माहिती नाही. राज्य भरातील बँकांकडून ही माहिती अजूनही उपलब्ध झालेली नसल्यामुळे उचलीच्या आकडेवारीची जुळवाजुळव करण्यातच अधिकारी गुंतलेले आहेत. अजून निम्या शेतक-यांना देखील १० हजार रुपयांची उचल मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतक-यांच्या मागणीनुसार १० हजार रुपयांची उचल तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य बँकेने सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिल्या आहेत. सरकारने हमीचे पैसेनही दिले आहेत. जिल्हा बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांनीही अशाप्रकारे १० हजार रुपयांची उचलीची मागणी करणारे अर्ज संकलित केले आहे. त्याना उचल देण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यात थोडा वेळ लागतो. पंधरा पंधरा दिवसांनी ती माहिती मंत्रालयात दिली जाते अशी माहिती सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी सांगितले. |
वैजापूर,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वैजापूर शहरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वसंत क्लब वैजापूरतर्फे आज गौरव करण्यात आला. क्लबच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा क्लबचे अध्यक्ष माणिक आहेर होते. आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी पुढील ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थिनी प्रतिक्षा चन्ने व माया साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी क्लबचे उपाध्यक्ष डॉ. व्ही.जी, शिंदे, सचिव जफर ए.खान, सहसचिव डॉ.संतोष गंगवाल, घनश्याम वाणी, बिलाल सौदागर, रहिम खान, पारस घाटे, महेश बुनगे, वसंतराव कदम यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
मुंबईतील वांद्रे येथे पाच मजली इमारत कोसळली आहे. इमारतीत पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिका-यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी साडेचार वाजता वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर भागात ही घटना घडली. इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, एक रेस्क्यू व्हॅन आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. बचावकार्य सुरू आहे. मंगळवारीही मालाड पश्चिम येथील मालवणी भागात दुमजली घर कोसळून दोन जण जखमी झाले होते. मंगळवारी सायंकाळी 7. 30 च्या सुमारास ही घटना घडली होती. |
बदलापूर : देशात ओमायक्रॉनची संख्या दिवसेंदिवस वाढत असून डोंबिवली पाठोपाठ बदलापूरातही बुधवारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने बदलापूरकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. बदलापूर पूर्व परिसरात रहाणारी २८ वर्षीय बाधित पोलीस कर्मचारी नायगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्यांची ड्युटी मागील आठवड्यात विधानसभा अधिवेशनात लागली होती. २५ डिसेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बदलापूर येथील गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. तसेच त्याच्या पत्नीचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह असल्याची माहिती कुळगाव -बदलापूर नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली. |
म. टा. प्रतिनिधी, पुणेः वडगाव बुद्रुक परिसरातील गोळीबार प्रकरणात सात वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. सोपान नारायण तावरे (वय ४०, रा. जांभळी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वडगाव बुद्रुक येथील शेळकेनगर येथे ७ मे २०१४ रोजी तुकाराम बाबूराव पासलकर यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली होती; पण आरोपी तावरे फरारी होता. पोलिस कर्मचारी विल्सन डिसोजा यांना माहिती मिळाली, की तावरे कै. वसंतराव बागूल उद्यान येथे येणार आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. युनिट तीनच्या पथकाने बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सारंग विष्णू भोसले (२१, रा. पद्मावती सहकारनगर) याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे असा ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी, भोसलेविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून सराईत गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. त्या वेळी सराईत गुन्हेगार भोसले कोथरूड परिसरात आला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. |
১) ঐ লোকট। ছেলেকে ঠেঈাইবে। तो मनुष्य मुलाला लाठीने मारील. ২) তাহারা প্রচুর টাকা কামাইবে । ते पुष्कळ पैसा मिळवतील. গুরুমহাশয় ছাত্রদিগকে ধমকাইতেছেন। गुरुजी विद्यार्थ्याना धमकावीत आहेत. তাহার আচরণ দেখিলে সকলে তাহাকে জুতাইবে। त्याचे आचरण पाहिले तर सगळे त्याला जोड्याने मारतील. তাহার সম্বন্ধে আমার মন বিষাইয়া গিয়াছে । त्याच्याविषयी माझे मन खराब ( शब्दशः विषारी) झाले आहे. ছেলেরা দিপাবলীর ছুটিতে বাড়ী যাইবার জন্য মুখাইয়া আছে । दिवाळीच्या सुटीत घरी जाण्याकरिता मुले उत्सुक झाली आहेत. আমার তপশ্চর্যা কখন ফলিবে কে জানে ? माझी तपश्चर्या केव्हा फळाला येईल कोण जाणे? আবার এই রকম খারাপ কাজ করিলে বাবামহাশয় তোমাকে বেতাইবেন। पुन्हा असे वाईट काम केलेस तर बाबा तुला वेताने मारतील. ৯) আমি থাকলে ঐ লোককে জুতিয়ে লম্বা ক'রে দিতুম। मी असतो तर त्या माणसाला जोड्याने मारून लंबे केला असता. ১০) ভিড়ের মধ্যে কে যেন আমার পকেটা হাতাইল । गर्दीत कोणीतरी माझे पाकीट पळविले. ১১) ছেলেটা ত নদীর মধ্যে তলিয়ে গেল । मुलगा तर नदीत बुडुन गेला. ( किंवा नदीच्या तळाशी गेला.) ১২) আমি কিশরকে ডাকিতেই সে চমকাইয়৷ উঠিল ৷ मी किशोरला हाक मारताच तो दचकला. ভীতুকেই লোকে সর্বদা দাবড়ায় ৷ भिल्यालाच लोक नेहमी घाबरवतात. बंगाली भाषा प्रवेश । ३१९ |
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा दर कमी असलेल्या जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकार कोरोना निर्बंधात आणखी सूट देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस लवकरच यामधून प्रवास करु शकेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते 'बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट' (बेस्ट) च्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली आणि संध्याकाळी 4 नंतरही निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली टप्प्याटप्प्याने आणखी यामध्ये सूट देण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार अधिक शिथिलता देझ्रक्यास तयार आहे. परझ्ंतु, आझ्रृही प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेत आहोत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांबाबतही निर्णय घेतला जाईल. या शिथिलतेमुळे कोरोना महामारीची इतर लाट येणार नाही हे आपल्याला सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाणे रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. |
गोवा कार्निव्हल. । काय वाटेल ते........\n← साउंड ऑफ म्युझिक ...\nPosted on February 17, 2010\tby महेंद्र\nकार्निव्हल म्हंट्लं की रंभा संभा डान्स करणाऱ्या रिओ द जिनेरिओ च्या सुंदऱ्या आठवतात .. खरं ना? अर्थात तसं असेल तर त्यात कोणालाच दोष देता येत नाही , कारण त्यांचे डान्सच (???मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसताय म्हणुन- ब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??)- इतके मस्त असतात की ते आठवण सहाजिकच आहे.\nकार्निव्हल म्हणजे काय?? तर खा, प्या, मजा करा. कुठल्यातरी एका रोमन शब्दाचा हा अपभ्रंश आहे हा.कार्निव्हल चा ख्रिश्चन लोकांचा सण, पण सगळे हिंदु लोकं पण यामधे तेवढ्याच उत्साहाने भाग घेतात. १९६१ पर्यंत पोर्तुगिझ लोकांनी गोव्यावर राज्य केलं, आणि कळत नकळत त्यांची संस्कती ही गोव्याची संस्कृती झालेली आहे. कार्निव्हल हा तर गोव्याची सांस्कृतिक ओळख बनलाय.\nदर वर्षी साधारणपणे फेब्रूवारी महिन्यात कार्निव्हल सिलेब्रेट केला जातो. अगदी नक्की वेळ सांगायची तर गुड्फ्रायडेच्या ४३ दिवस आधी कार्निव्हल सुरु होतो. गुडफ्रायडेच्या आधीचे हे चाळीस दिवस रोमन कॅथलिक ख्रिश्चन लोकं उपवास करतात. चाळीस दिवस फिश, मिट न खाणे अगदी कटाक्षाने पाळतात हे लोकं . पुढे चाळिस दिवस मिट नाही- म्हणुन उपवासाच्या पुर्वीचे तिन दिवस खाउन पिउन मस्ती करण्यासाठी म्हणुन हा कार्निव्हल ! मुस्लीम लोकं जसे उपवास संपले की इद मनवतात, तसंच हा कार्निव्हल म्हणजे उपवासाच्या आधीचं सिलेब्रेशन.\nगोव्या मधे इतक्या वेळेस आलोय, अगदी इस्टर च्या वेळेस पण गोवा पाहिलंय. तो इस्टरचा कॅंडल मार्च, आणि झेविअर्स चर्च च्या बाहेर उभं राहुन ( आत जाणं अलाउड नाही, जर तुम्ही कॅथलीक नसाल तर - आणि विथ ड्यु रिस्पेक्ट मी बाहेरच थांबलो होतो) मास ऐकलाय, पण हे कार्निव्हल एकदम कलरफुल फेस्टिव्हल असतो. इतक्या वेळा आलोय गोव्याला पण असुनही कार्निव्हल च्या वेळेस गोव्यात रहाण्याचा योग आजपर्यंत कधीच आला नव्हता- या वर्षी पहिली वेळ कार्निव्हल पहाण्याची 🙂 .\nफार पुर्वी एक किंग मोमो होऊन गेला. त्याच्या काळापासुन हा फेस्टीव्अल सुरु करण्यात आलाय ( कृपा करुन हा किंग मोमो कोण , कुठला असे प्रश्न डोक्यात आणुन त्रास करुन घेउ नका -उत्तर सापडणार नाही) 🙂 मी शोधलंय पण सापडलं नाही नेट वर म्हणुन सांगतोय!!. तर एक दिवस राजाने अनाउन्स केलं की आता तिन दिवस काम वगैरे बंद -कारण आता उपवास सुरु होणार पुढे चाळीस दिवस तेंव्हा आता हे तिन दिवस फक्त मजा करा... आणि तेंव्हा पासुन हा कार्निव्हल सुरु झालाय.\nसध्या एक कार्निव्हल कमीटी आहे पणजीला. ती कमीटी एक मोमो राजा निवडते . निवडीची प्रोसिजर अगदी गुप्त राखण्यात येते. कार्निव्हलची सुरुवात खास निवडुन दिलेला किंग मोमो करतो. कार्निव्हल चा पहिला शोभारथ हा किंग मोमोचा असतो. त्यावर निवडुन दिलेला किंग ड्रेस, दागिने वगैरे घालुन बसलेला असतो, आणि तो किंग मोमो ऑफिशिअली कार्निव्हल सुरु झाला आहे असं अनाउन्स करतो - हा कार्निव्हल पणजी ला पहिल्या दिवशी , नंतर एक दिवस वास्को आणि एक दिवस मडगांवला असतो. 'किंग मोमो' औट घटकेचा म्हणजेच तिन दिवसांचा राजा असतो गोव्याचा.\nत्या दिवशी त्या मोमोचा थाट अगदी बघण्यासारखा असतो. आम्हाला पहायला मिळाला नाही, पण मागच्या वर्षीच्या किंग चा फोटॊ इथे पोस्ट करतोय.\nदुपारी ३ वाजता गोव्याला येउन पोहोचलो- फ्लाईट दिड तास लेट!! पोहोचल्याबरोबर ताबडतोब बॅग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो.जेट कनेक्ट ची फ्लाइट होती, त्यामुळे खाणं वगैरे काहीच नव्हतं फ्लाइट मधे. कोल्ड सॅंडविच चा मला मनापासुन तिटकारा आहे. अगदी काहीच खायला नसेल, आणि भुकेने जीव जायची वेळ आली तरच मी ते कोल्ड सॅंडविच खातो. गोव्याला पोहोचल्यावर आधी काहीतरी पोटात ढकलावं म्हणुन ड्रायव्हरला अनंताश्रम मधे गाडी घे म्हंटलं. एखादा दिवस खराब असतो तो असा..\nहॉटेल बंद. हीच एक गोव्याची गोष्ट मला आवडत नाही. शेवटी ड्रायव्हरला म्हंटलं, की रस्त्याने जे कुठलं हॉटेल उघडं दिसेल तिथे थांबव. एक हॉटेल सापडलं उघडं. तिथे गेलो, तर फक्त प्रॉन्स बिर्याणी आहे- बाकी सगळं संपलं.. असं म्हणाला तो. एक बिर्याणी आणी प्रॉन्स वेफर्स, सोबत एक ग्लास बिअर वर सेटल केलं. हे प्रॉन्स वेफर्स द बेस्ट प्रकार आहे गोव्यातला. बहुतेक सगळ्याच बार मधे मिळतो. व्यवस्थित जेवण नशिबातच नव्हतं.थोडं फार पॊटात ढकलुन तिथुन निघालो ते सरळ कामाला लागलो.\nसगळी कामं आटोपली पणजीची, आणि मग तिथुन टॅक्सीने कोलव्याला निघालो. इतकी वर्ष येतोय गोव्याला, पण अजुनही मला कोलवा बिच आवडतो. दर वेळेस इथलं एक हॉटेल ठरलय रहाण्यासाठी .समुद्र किनाऱ्यावर असल्याने, सकाळी उठुन पाण्यात पाय बुडवायला बरं वाटतं इथल्या समुद्रात! आणि सकाळचा टाइमपास पण मस्त होतो :). इथल्या बिच वरची रेती पण खुपच नरम आणि स्वच्छ आहे.\nमडगांवला पोहोचलो, तर पुढे ट्रॅफिक जॅम दिसला म्हणुन ड्रायव्हरला सांगुन कार बाजुला लावली - पहातो तर कार्निव्हलचा रंग अगदी टिपेला पोहोचला होता. लोकं बेधुंद होऊन नाचत होते. रस्ता जाम झालेला होता पण कोणाच्याही कपाळावर आठि दिसत नव्हत\nवलेले होते. प्रत्येकाची थिम वेगळी होती. या कार्निव्हलचा फायदा करुन घ्यायला म्हणुन हिरो होंडा बाइकवाल्यांनी पण आपली बाईक एका फ्लोट वर डिस्प्ले केली होती. प्रत्येक फ्लोट वर मोठे मोठे स्पिकर्स आणि मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं. मुलं, मुली, नाचत होते. एक वेगळी झिंग होती वातावरणात. आपणही नाचावंसं वाटत होतं . असं होतंच बहुतेक- जेंव्हा असं म्युझिक असलं की नाचावसं वाटतंच.. मुलं मुली कलरफुल कपडे - मुद्दाम या ऑकेजन साठी बनवलेले घालुन फिरत होते. एकाही मुलीचे किंव मुलाचे कपडे अंग उघडे टाकणारे नव्हते हे इथे नमुद करावसं वाटतं.\nआम्ही चालत चालत पुढे निघालॊ. हे फ्लोट्स बघुन लक्षात यायचं की हे बनवण्यासाठी बरीच मेहेनत घेतली आहे , आणि खर्चही भरपुर केलाय. हे फ्लोट बनवणारे कारागीर म्हणजे लोकल लोकं. हे फ्लोट्स ओपन ट्रक्सवर सजवलेले असतात. कार्निव्हल सोहळा हा नेहेमी पणजीलाच सुरु होतो.\nप्रोसेशन संपलं की स्टेज वर रात्री लोकल मुलं, नाटकं, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, या मधे नाच, गाणी, नाटकं किंवा एक पा्त्री प्रयोग वगैरे सगळं काही असतं. मुलं मुली मुद्दाम डिझाइन केलेले कार्निव्हल चे कपडे घालुन असतात. थोडक्यात नुसतं खा, प्या, मजा करा असा माहौल असतो.सगळ्यात चांगल्या डिझाइन केलेल्या , आणि त्यावरच्या मुलांचे कपडे, नाच या सगळ्या गोष्टींना जज करुन पहिल्या तिन फ्लोट्स ला बक्षीस दिलं जातं.\nमी पण व्हिडीओ घेतलाय, पण माझ्या पेक्षा पण एक चांगला व्हिडीओ मला नेट वर सापडला म्हणुन तो युज करतोय इथे.\nमुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. अगदी दहा बारा वर्षाच्या मुलामुलींपासुन तर चांगले वयात आलेले मुलं मुली या प्रोसेशन मधे नाचत होते. एक फ्लोट तर चक्क गांधीजींचा होता. त्यावर एक माणुस टकलु करुन पदयात्रेच्या पोझ मधे उभा होता, एवढंच नाही तर त्या फ्लोट बरोबरचे बरेच लोकं टकलू करुन फिरत होते.\nरस्त्याने जातांना बरेच ठिकाणी प्रोसेशन थांबत होतं- पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे. मला एका गल्ली मधे कमीत कमी ६ प्रोसेशन आपली पाळी येण्याची वाट पहात थांबलेले दिसले. त्यामुळे त्यांचे फोटॊ चांगल्या रितिने काढता आले. इतक्या सगळ्या प्रोसेशनस मधे पण कुठेही ट्राफिकची वाट लागलेली नव्हती. थोडा फार जाम होणं तर सहाजिकच आहे, पण ट्राफिक मुव्हिंग होता.\nमला हे कार्निव्हल फार वेळ पहात रहाणं शक्य नव्हतं, कारण संध्याकाळी एका डिलरला भेटायला जायचं होतं. जवळपास तास -दिडतास कार्निव्हल एंजॉय करुन हॉटेलवर परत गेलो.\nइथे कार्निव्हलची मजा म्हणजे दिवस भर आणि रात्रभर इथे हुंदडणे आणि प्रोसेशन बरोबर फिरणे यातच आहे. याच प्रोसेशन मधे काही मुलांनी मुलींचे कपडे घालुन केलेले डान्स वगैरे पण खरंच खुप छान जमले होते. भरपुर फोटो काढले , व्हिडिओ पण घेतलेत , आणि या प्रोसेशनचा एक भाग होऊन त्यांच्या बरोबर थोड्ं अंतर चालुन पण गेलो. अधुन मधुन एखादी पिल्लु बिअर हातात धरुन नाचणारा गोवनिज तुम्हाला गळ्यात हात घालुन नाचायला ओढायचा.\nकार्निव्हल म्हणजे धमाल.. बस्स.. संध्याकाळी एका स्टेजवर लोकल मुलं मुली नाटकं, नाच वगैरे कार्यक्रम करतात. उत्तररात्रीपर्यंत चालतो हा सोहळा. माझी इच्छा होती रात्रीचा कल्चरल कार्यक्रम पहायची, पण शक्य झालं नाही. असो. इतकंच पहायला मिळालं हे पण खुप झालं. जर शक्य असेल तर गोव्याला ह्याच पिरियड मधे व्हिजीट प्लान केली तर रात्री खुप छान करमणुक होऊ शकेल, आणि एक सुंदर अनुभव घेता येइल\n( बरेच फोटो पण काढले आहेत, ते उद्या सकाळी पोस्ट करीन. फोटो ऑफिसच्या लॅप टॉप वर आहेत आणि आज चार्जर विसरुन आलोय ऑफिसमधे ..... )\nThis entry was posted in सण and tagged कार्निव्हल, गोवा, carnival, goa. Bookmark the permalink.\n30 Responses to गोवा कार्निव्हल.\nअहो आवरा जरा,\nतुम्ही काय सलग आम्हां फोटोग्राफर्सना जळवणारे पोस्ट्स टाकताय? तिकडे फारच मजा असते कार्निवलला. आमच्या नशिबी कधी येणार कुनास ठाऊक. पोस्ट नेहमीप्रमाणे जबऱ्या आहे.\nपुढल्या वर्षी प्लान करा. इतका कलरफुल इव्हेंट तर फोटोग्राफर्सनी मिस करुच नये.फक्त वाईड ऍंगल लेन्स सोबत ठेवलं तर फोटो खुप मस्त येतिल. 🙂\nchangli maahiti dilit.\nkadachit hach to Momo urf Momus - mala wikipedia madhye sapadala tumhihi vachla asel kadachit.\nअसावा .. तोच असावा कदाचित..\nहीच ती पोस्ट जिची वाट पहात होते. काय डोळे भरून वर्णन केलंय तुम्ही! फोटोही येऊ द्यात लवकर. तुम्ही घेतलेले व्हिडीओज आत्ताच पाहिले. छान आले आहेत. फ्लोटवर सामाजिक संदेशही दिले आहेत. हिरवा बेडूक आवडला. गांधीजीसुद्धा पाहिले. ती मुलं मुलींसारखी वेशभुषा करून का नाचत होती, हे समजलं नाही. एकदा सवड काढून कार्निव्हल पहायला तरी गोव्याला जायलाच हवं. पण तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या कार्निव्हलचा आनंद घेता आला.\nअवांतरः परवा प्रदर्शित होणा-या 'रिंगा रिंगा' चित्रपटामधेही भरपूर गोवा आहे. खास करून 'बाय गो बाय गो, विलायती नाय गो' गाण्यामधे छान कार्निव्हल दाखवला आहे. फटाक्यांना गोव्यात 'फुगेटीव्ह' म्हणतात, असं काही दिवसांपूर्वीच कळलं.\nया वेळेस अनएक्स्पेडली झाल तिथे जाणं. ठरवलेलं नव्हतं. मडगांवला दिड दोन तास घालवले संध्याकाळचे. पण सुटी काढुन जावं असा प्रोग्राम असतो. शक्य झाल्यास पणजीचाच कार्निव्हल बघावा..\nतिथल्या मित्राला प्रश्न विचारुन अगदी भंडावुन सोडलं होतं..तो पण वैतागला, म्हणे कशाला इतक्या चौकशा करतो आहेस? पण ब्लॉग वर लिहायचं म्हंटलं की डोळे अन कान नेहेमी उघडे ठेवावेच लागतात.. 🙂\nअगदी बरोबर. मी सुद्धा जेव्हा पासून ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हापासून जास्तच चिकित्सक झाले. यामुळे सामान्य ज्ञानात बरीच भर पडते शिवाय भटकंतीचा आनंदही मिळतो.\nMi oan vat pahat hoto ya postchi,,,Buzz vvar update yet vachale hote...Baki mastch aahe ha canival...Mahiti pan chan sangitlit tumhi....\nbaki ithe "पोहोचल्याबरोबर ताबडतोब ऍग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो" ithe eggs chya ivaji bags as hav hot ka?\nMi pan vat pahat hoto ya postchi,,,Buzz vvar update yet vachale hote...Baki mastch aahe ha canival...Mahiti pan chan sangitlit tumhi....\nअरे हो.. चुक झाली होती दुरुस्त केली.. 🙂\nब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??\nमस्त वर्णन आहे, अगदी तिथे असल्यासारखं वाटलं...\nपुढील फेब्रुवारी मध्ये जायलाच हवं...\nएकदा काय वाटेल ते लिहायचं म्हंटलं की काहिही लिहिता येतं.. 🙂\nnice info....I had no idea about king Momo....\nand BTW I thought you hadashell fish allergy....nasel tari ti prawn pachanar nahi....pan at least hya post madhe khadachita warnan nahiye....:)\nते लिहिणार होतोच.. पण टाळलं. बहुतेक नंतर लिहिन वेगळं पोस्ट!! अहमदाबादचं पण बाकी आहे लिहायचं.\nशेल फिश खरंच चालत नाही, अंगावर खुप लाल उठतं.. पण दुसरं कहिच नव्हतं, म्हणुन खावं लागलं. चिंबोरीची तर मला भयंकर वाईट ऍलर्जी आहे. असो.. चालायचंच..\nहे प्रॉन्स पापड एकदम मस्त- बरं कां!!!\nएक्सपेक्टेड पोस्ट 🙂\nनेहमीप्रमाणेच मस्त..वीडियोस उत्तम आहेत, लवकर फोटोस अपलोड करून लिंक शेअर करा..\nफोटो अपलोड करतोय.. आज संध्याकाळपर्यंत.\nमस्तच. . . मज़ा आहे की!!!\nवर्थ व्हिजिटींग प्लेस आहे. पुढल्या वर्षी तर सरळ सुटी काढुनच जायचा प्लान आहे.\npost khup aavadali....majhya aatta paryantchya sagalya trips madhali goa trip avismaraniy hoti. aamhi sudha Colva residency madhech rahilo hoto..(seafacing)..\nColva beach khup swaccha aahe aani jast gardicha nahi....\npan tumhi kelelya varnavarun ekada carnival madhe janyachi utsukata jastach vadhaliy.....\nगोव्याला कामानिमित्य बरेचदा जाणं होतं..पण कधीच बोअर होत नाही तिथे. रेसिडन्सी आणि सिल्व्हर सॅंड पण चांगलं आहे. कार्निव्हल फक्त तिन दिवस असतो,ते तिन दिवस लक्षात ठेउन टुर प्लान करा. पणजी चा कार्निव्हल, ओपनिंग सिरोमनी खुप सुंदर असतो.. चुकवु नये असं काही.\nCool Stuff 🙂 BTW my wife asked to try out bhosale's khaanaval if Anantaashram is closed.. It is almost next to Anataashram.\nनेमका रविवार होता आणि दुपारची तिन साडेतिन ची वेळ. सगळी हॉटेल्स बंद झालेली होती. तसं महाराजाशेजारचं एक हॉटेल नाव विसरलो सुरु होतं, पण ते स्ट्रिक्टली व्हेज.. 😦 म्हणुन उमा पेट्रोल पंप जवळच्या एका हॉटेलमधे गेलो होतो. भोसले ची खानावळ माहिती नव्हती. पुढल्या वेळेस नक्की. 🙂\nसही आहे. हे उपवास लागायच्या आधी हाणून घ्यायचे म्हणजे आपण श्रावणाआधी गटारी करतो तसलाच प्रकार. आणि हो आज "प्रॉन्स वेफर्स" विशलिस्टमध्ये add झाले बरं का?\nकरायलाच हवे. जातिच्या खवैय्याने तर अवश्य!!\nवा छान. मी गोव्यातच असुन या वेळेस कार्नीवल बघु शकलो नाहि.गेल साल एका अपघातामुळे अंथरुणात आहे.पण तुमच्या मुळे तो आनंद मीळाला. धन्यवाद\nवर्ष भर अंथरुणात? बापरे खुप मोठा अपघात झाला असावा.. लवकर बरे व्हा हीच शुभेच्छा..\nछान योग जुळुन आला तुमच्यासाठी...मस्त धमाल वर्णन कार्निव्हलच...\nआत्तापर्यंत चार वेळा कार्निवल पाहिले आहे.:) एकदम भन्नाट प्रकार. मी मडगावला २ वर्षे राहिले असल्याने ही सगळी धमाल अनुभवली असली तरी त्यावेळी चौथीत होते. त्यामुळे बालपणातली मजा अजूनच वेगळी. मग लग्न झाल्यावर दोन वेळा गेलो होतो कार्निवलच्या वेळीच, पण पणजीत. सहीच. गेल्या दहा वर्षात मात्र योग आलेला नाही, आता तुझे इतके रसभरीत वर्णन वाचून पुढच्या वेळी योग जमवायला हवा. आमच्याही काही आठवणी जरा ताज्या होतील...:) प्रोसेशन संपल्यानंतरचे डान्स आणि धमाल मस्त असते. सगळे अगदी खुळावलेले असतात. नंतर श्रमपरिहारही जोरात चालतो. एकदा नचिकेतच्या मित्राने अचानक खिशातून रिवॉल्वर काढून दाखवून आमची बोलती बंद केली होती.पुढे दोन-तीन दिवस मी त्याला पाहिले की चक्क तिथून निघून जात होते.बाकी जरूर एकदातरी पाहावेच असेच असते कार्निवल. व्हिडिओज एकदम मस्त आहेत. फोटो???\nतुझं लहानपण तर गोव्यालाच गेलंय, मग तर नक्की पुर्वी पाहिला असेल कार्निव्हल. रात्रीचा प्रोग्राम मला पहाता आला नाही, एक बिझिनेस डिनर होतं प्लान्ड म्हणुन. पुढल्या वर्षी नक्कीच जाईन तिथे सुटी काढून..:) |
मुंबई - 'कोरोना विषाणू'च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जवळपास साडेतीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार आपल्या घरात बसून आहेत. दरम्यान, इतक्यात तरी चित्रपटगृह उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत. अश्यातच आता, यामध्ये मराठी चित्रपटांचा सुद्धा समावेश ओटीटी प्लॅटफॉर्मवर करावा यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने नुकतंच सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे हिंदी प्रमाणे अनेक मराठी चित्रपटांना सुद्धा आर्धिक नुकसान सोसावे लागले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्चदेखील वसूल होत नाही, अशी निर्मात्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांनाच अनुदान मिळू शकणार आहे. या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज कराव्या लागलेल्या चित्रपटांना आपण अनुदान योजनेत सामावून घ्यावे, जेणेवरून त्या चित्रपटाच्या निर्मात्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यांना मोठा हातभार लागेल व ते आणखी चित्रपट निर्मिती करू शकतील, अशी मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ओटीटीवर महानायक अमिताभ बच्चन यांचा 'गुलाबो सीताबो', अभिनेत्री विद्या बालन हिचा 'शकुंतला देवी' आणि 'दिल बेचारा' असे अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहे. |
कामशेतजवळील विद्यावती चॅरिटेबल ट्रस्टच्या निवासी अनाथ आश्रमात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली आहे. डॉ. नीलम गो-हे यांची मागणीविद्यावती अनाथ आश्रम प्रकरणम. टा. प्रतिनिधी, पुणेकामशेतजवळील विद्यावती चॅरिटेबल ट्रस्टच्या निवासी अनाथ आश्रमात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली आहे. कामशेतजवळील विद्यावती चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथ आश्रमातील एक १४ वर्षी अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्यामुळे वडगाव पोलिसांनी त्याच आश्रमातील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या आश्रमातील एका समवयस्क मुलाने संबंधित मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिची गर्भधारणा झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर तिची वैद्यकीय चौकशी करण्यात आली असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांनी अनेक तांत्रिक बाबी पुढे करून माहिती देण्यास टाळाटाळ केली. कोणत्याही निवासी आश्रमामध्ये मुले आणि मुली यांना एकत्रित ठेवता येत नाहीत. मात्र या संस्थेत त्यांना एकत्र ठेवण्यात आले होते. या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे, असे डॉ. गो-हे यांनी नमूद केले. या आश्रमामध्ये रेक्टर ठेवण्यात आली नव्हती. महिला व बालकल्याण समितीमार्फत या अनाथालयाची नियमित तपासणी करणे बंधनकारक असताना अशा प्रकारची तपासणी करण्यात आलेली नाही, म्हणून समितीच्या सदस्यांना जबाबदार धरण्यात यावे. अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले असून याठिकाणी दक्षता समिती नेमावी. जबाबदार महिला प्रतिनिधींची नेमणूक करून त्यांच्याबरोबर विद्याथीर्नींचा संवाद घडवून आणावा. या मुलींशी प्रशिक्षित समुपदेशकांच्या मदतीने महिला पोलिस अधिका-यांमार्फत संवाद साधावा. मुलांची आरोग्य चाचणी करण्यासाठी विशेषज्ञाची नेमणूक करावी. पुणे जिल्ह्यातील महिला बालकल्याण अधिका-याने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे. महिला आयोगाचे अध्यक्ष रिक्त असून त्यावर योग्य नेमणूक करण्यात यावी. पोलिस तपासासाठी पाच तज्ज्ञ बाल समुपदेशकांची समिती स्थापन करण्यात यावी, अशा विविध मागण्या डॉ. गो-हे यांनी केल्या आहेत. |
मुंबई : मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचं सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 17 अतिरेकी येत असल्याचा फोन आला आहे. यामुळे संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडाली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मुंबईतली महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, याआधीही अनेक वेळा मुंबई पोलिसांना अनेक दहशतवादी हल्ल्याचे निनावी फोन आले आहेत. ऐन दिवाळीत मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला होता. पोलीस कंट्रोल रूमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची माहिती मिळाली होती. |
परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करणारे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह इतरांना पोलिसांनी मंगळवारी (ता. 25) राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा कार्यालयासमोरून अटक केली. (Ncp) पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी (Nawab Malik) संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते परभणीत प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण करू नये, अशी मागणी भाजप (Bjp) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. मंगळवारी (ता. 25) सकाळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या कार्यालयाच्या बाहेरच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह इतरांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांवर कारवाई करत त्यांना अटक केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे सध्या भाजपच्या निशाण्यावर आहेत. आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिक यांनी भाजपवर जी टीकेचीझोड सुरू केली आहे, त्याने भाजप पुरती हैराण झाली होती. विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करतांना थेट मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे खळबळजनक आरोप देखील केले होते. नेमका हाच मुद्दा उपस्थित करत भाजपने प्रजासत्ताकदिनी नवाब मलिक यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणास विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संघटन सरचिटणीस अॅड. एन. डी. देशमुख, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सरचिटणीस संजय रिझवानी, मंडळाध्यक्ष भीमराव वायवळ, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष विजय गायकवाड, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस संतोष जाधव. अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतीख पटेल, किसान मोर्चा संयोजक अंकुश आवरगंड, अनुसूचित जाती मोर्चा संयोजक उमेश शेळके, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज पोरवाल, कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी, संदीप शिंदे, दीपक शिंदे, माऊली कोपरे आदींचा यात समावेश आहे. या सर्वांना अक करून नंतर सोडून देण्यात आले. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
मुंबईः वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने जाहीर केले की इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या आगामी वनडे वर्ल्डकपनंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेआधी गेलने ही घोषणा केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही ट्विटरवरुन ही माहिती दिली. ब्रिजटाउनः इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांची वनडे वर्ल्डकप तयारी किती झाली आहे, याचा अंदाज लवकरच येईल. बुधवारपासून या दोन संघांमध्ये पाच वनडेंच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली वनडे रंगणार आहे ती केन्सिग्टन ओव्हल येथे. कसोटी मालिकेतील विजयी सिलसिला वनडे मालिकेतही कायम राखण्यावर वेस्ट इंडिजचा भर असेल. अलीकडेच विंडीजने विस्डन करंडक कसोटी मालिकेत इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला आहे. दुबईः स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला दुबई ड्युटी फ्री टेनिस स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. याआधी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या मुगुरुझाने सेटची पिछाडी भरून काढत युक्रेनच्या डेयाना यास्त्रेमस्काची झुंज ४-६, ६-३, ६-३ अशी मोडून काढली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या मुगुरुझाचा सामना होईल तो चीनच्या झेंग सायसायशी. 'पैशाचा प्रश्न नाही' लंडनः गेल्या मोसमातील अमेरिकन ओपन आणि नुकतीच पार पडलेली ऑस्ट्रेलियन ओपन अशा सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाका हिने सोमवारी स्पष्ट केले की प्रशिक्षक साशा बजिनसह संपुष्टात आणलेल्या कराराचे कारण पैशात नव्हते. 'मी यशापेक्षाही आनंद अन् सुखाला महत्त्व दिले', असे ती म्हणाली. 'वर्षांतील सर्वाधिक दिवस मी कुटुंबियांपेक्षाही या टीमसह असते. तेव्हा पैशावरुन त्यांच्याशी कधीच फारकत घेणार नाही. ऑस्ट्रेलियन ओपन दरम्यान तुम्हाला जाणवले असेल की साशा अन् माझे फारसे पटत नाही. त्याने माझ्यासाठी जे काही केले आहे, त्याबाबत मी साशाची कायम ऋणी राहीन', असे ओसाका म्हणाली. पॅरिसः गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून सावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काचे रँकिंग सुधारले आहे. तो आता जागतिक टेनिस रँकिंगमध्ये ४१व्या क्रमांकावर आला आहे. गेल्या रविवारी तो रॉटेर्डम टेनिस स्पर्धेत उपविजेता ठरला. २०१७मध्ये वॉवरिन्का फ्रेंच ओपनमध्ये नदालविरुद्ध उपविजेता ठरला होता. त्यानंतर प्रथमच रॉटेर्डम स्पर्धेच्या निमित्ताने वॉवरिन्काने एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. रॉटेर्डम (नेदरलँड्स) : गेल मॉनफिल्सने आपला जवळचा मित्र स्टॅन वॉवरिन्कावर ६-३, १-६, ६-२ अशी मात करत रॉटेर्डम ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. तीन वर्षांपूर्वी या स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या मॉनफिल्सला वॉवरिन्काने दुसऱ्या सेटमध्ये तगडी लढत दिली. वॉवरिन्काने तो सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली; पण मॉनफिल्सने तिसरा सेट जिंकून जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या ११ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेची फायनल बिनसीडेड टेनिसपटूंमध्ये रंगली होती. दुबईः भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने आयसीसीच्या महिला वनडे रँकिंगमधील फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. तर मिताली राजही पाचव्या क्रमांकावर कायम आहे. स्मृती ७७४ गुणांसह अव्वल असून अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्या ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी व मेग लॅनिंग. गोलंदाजांमध्ये भारताची झुलन गोस्वामी तिसऱ्या क्रमांकावर असून दीप्ती शर्मा आठव्या तर पूनम यादव नवव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत दीप्ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. |
अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. खेड : वाकी बुद्रुक ( ता. खेड ) येथील संतोषनगर परिसरात निर्जनस्थळी रस्त्यावर टॉवेलमध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले मृत अवस्थेतील नवजात अर्भक आढळून आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची शक्यता पोलिसांतर्फे वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषनगरचे पोलीस पाटील अजित मच्छिंद्र कड ( वय - ३५ वर्षे, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावाच्या हद्दीतील संतोषनगर येथे संदीप नामदेव कड यांच्या मालकीच्या गट नं. ३४ येथे हे अर्भक आढळून आले होते. कोणीतरी अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले. त्यामुळे संबंधित अर्भक मयत झाले आहे. या धक्कादायक घटनेने पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, अरुण लांडे, मुश्ताक शेख व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. |
एक घाबरेघुबरे कुटुंब ज्येष्ठाला घेऊन रुग्णालयात आले. 'डॉक्टर, यांच्या छातीत दुखतंय. जरा पहा', हे सांगणार तितक्यात डॉक्टरांनी नाडी तपासली. हृदयाची स्पंदनेच सुरू नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. सर्वच रुग्णाजवळ पोहोचले. पुढची ३५ मिनिटे काय घडेल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. . . . डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले आणि एक नाही तर चक्क दोनदा हृदय बंद पडलेल्या या ज्येष्ठाला मृत्यूचा दारातून सहीसलामत बाहेर काढण्यात टीम यशस्वी झाली. हा थरारक प्रसंग जयताळा मार्गावरील विवेका रुग्णालयात घडला. बंद पडलेल्या हृदयाची स्पंदने सुरू करण्यासाठी एकाचवेळी मसाज, शॉक आणि अॅन्जिओप्लास्टी अशा तिहेरी मार्गांचा अवलंब करीत डॉक्टरांच्या टीमने या रुग्णाला अक्षरशः नवजीवन दिले. दत्तवाडी येथील या वृद्धाला ८ नोव्हेंबर रोजी अचानक घरीच छातीत दुखू लागले, शुद्धही हरपली. नातेवाइकांनी तडक विवेका रुग्णालय गाठले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी तातडीने पेसमेकर टाकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रुग्णाला सीपीआर आणि शॉक देणे सुरू होते. याच दरम्यान अॅन्जिओप्लास्टी करीत हृदयाच्या झडपांमधील अवरोध दूर करण्यात आला. या ३५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांमुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा करणारी रक्तवाहिनी उघडली गेली आणि हृदय पूर्ववत धडधडायला सुरू झाले. दुसऱ्या दिवशी रुग्णाला बरे वाटू लागले. चार दिवसांनंतर त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. महिनाभरानंतर हा रुग्ण सध्या ठणठणीत होऊन सामान्य जीवन जगत आहे. याला दुजोरा देताना डॉ. जगताप म्हणाले, 'खरेतर टीमवर्कमुळे हा रुग्ण वाचू शकला. अशाप्रकारे घरी असताना हृदय बंद पडले तर रुग्णाच्या वाचण्याची शक्यता फक्त १० टक्के असते. मात्र, या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणत असताना हृदय बंद पडले. रुग्णालयात असे घडले तर त्याला वाचविण्याची शक्यता पाच टक्क्यांनी वाढविता येते. शिवाय, या रुग्णाला हृदयविकार आणि मधुमेहाचाही पूर्वेतिहास होताच. हृदय बंद पडल्यानंतर मेंदूतील पेशींना प्राणवायू न मिळाल्याने त्या मृत होणे सुरू होते. मात्र, या रुग्णाला 'सीपीआर' दिला जात असल्याने प्राणवायूचा पुरवठा खंडित होण्यापासून वाचविता आले. ' रुग्णालयातील डॉ. पीयूष चवदलवार, डॉ. अमित देशराज, डॉ. अजय साखरे, डॉ. निखिल बालंकी, तंत्रज्ञ मनोज टिपले, उमेश अलोणे, परिचारिका कल्पना ठोंबरे, राखी रविदास या टीममुळे रुग्ण वाचू शकला, असेही डॉ. जगताप यांनी नमूद केले. |
पुलाच्या रेतीबंदर बाजूला एखादे वाहनतळ, पेट्रोलपंप असेल तर वाहन चालकांना ते अधिक फायदेशीर असणार आहे. डोंबिवली परिसरातील रहिवाशांना ठाणे, नाशिक महामार्गाकडे जाताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उड्डाण पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या प्रशासकीय मंजुरीची अडथळ्यांची शर्यत देखील जलदगतीने पार करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठीच्या विविध आव्हानांचा येत्या काळात प्रशासन कसा पाठपुरावा करणार हाच मुख्य मुद्दा आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर ते भिवंडी बाजूकडील माणकोली, पिंपळास दिशेने उल्हास खाडीवर १२७५ मीटर लांबीच्या उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 'मेसर्स सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला कामाचा ठेका दिला आहे. १८५ कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. तीन वर्षांत (३६ महिने) ठेकेदाराला हे काम पूर्ण करायचे आहे. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे हे अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांमध्ये कापणे शक्य होणार आहे. सध्या डोंबिवली परिसरातील रहिवाशांना ठाणे, मुंबई, नाशिक महामार्ग दिशेने जाताना गर्दीचा शिळफाटा रस्ता किंवा कल्याणमधील शिवाजी चौकातील कोंडीचा सामना करावा लागतो. माणकोली उड्डाण पुलामुळे त्यांचा तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डोंबिवली पश्चिमेत दुचाकी, चारचाकी, अवजड सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. पुलाचे काम 'एमएमआरडीए'च्या नियंत्रणाखाली होणार असल्याने निधीची कमतरता नाही. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल, यात संशय घेण्यास वाव नाही. यानिमित्ताने सी लिंक पद्धतीचा पूल प्रथमच ठाणे जिल्ह्य़ात होत आहे. या पुलामुळे अंतर कमी असूनही दूर असणारी डोंबिवली आणि ठाणे ही दोन महानगरे एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. या पुलामुळे डोंबिवलीच्या समाजजीवनात आमूलाग्र बदल होतील, पण त्याचबरोबर काही संभाव्य धोक्यांचा विचार करावा लागणार आहे. पूल होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी भूमाफियांनी आधीच पुलाच्या आसपासच्या मोक्याच्या जागा अडविल्याने या परिसरातील सारे नियोजनाचे आराखडे सपशेल फसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीकिनारी भूमाफियांनी चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये पडद्यामागून राजकीय मंडळींचा सहभाग असल्याने पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी चाळी तोडल्या तरी त्या पुन्हा रात्रीतून उभ्या करण्याचा अगोचरपणा भूमाफियांकडून सुरू आहे. चाळी तोडण्याची कारवाई केली, की पडद्यामागून राजकीय मंडळी अधिकाऱ्यांवर रोष धरत असल्याने अधिकारी अशा बांधकामांकडे मग नाइलाजाने दुर्लक्ष करतात. रेतीबंदर, मोठागाव खाडी किनारी सी.आर.झेड क्षेत्रात, सरकारी जमिनींवर राजरोसपणे बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू असल्याने, येणाऱ्या काळात माणकोली उड्डाण पुलाला ही बांधकामे मोठा अडथळा ठरु शकतात. पूल होणार असल्याने वाहनांची वर्दळ वाढणार आहे. पुलाच्या रेतीबंदर बाजूला एखादे वाहनतळ, पेट्रोलपंप असेल तर वाहन चालकांना ते अधिक फायदेशीर असणार आहे. डोंबिवली पश्चिमेत एकही पेट्रोलपंप नाही. अशा सरकारी, राखीव पडीक जागा येणाऱ्या काळात वाहनतळ, पेट्रोलपंप, सीएनजी पंपसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी खूप मोलाच्या आहेत. अशा मोक्याच्या जागा जर भूमाफियांनी गिळंकृत केल्या तर सार्वजनिक सुविधा द्यायच्या कुठून, असा मोठा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखणे आवश्यक आहे. माणकोली उड्डाण पुलाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे असल्याने हे काम साधारणपणे फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत डोंबिवलीतून पुलाच्या दिशेने येणारे पंडित दीनदयाळ रस्त्यासारखे मोठे, आनंदनगर भागातील गल्लीबोळातील पोहच रस्ते अतिक्रमणमुक्त आणि रुंदीकरण करण्यात आले पाहिजेत. येणारा तीन वर्षांचा काळ पाहता पालिकेने, वाहतूक पोलीस अधिकारी, पोलीस, वाहतूक तज्ज्ञ यांच्या पुढाकाराने डोंबिवली पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांचे नियोजन, कोणते रस्ते एकेरी, दुहेरी वाहतुकीसाठी खुले ठेवायचे, कोपर उड्डाण पुलावरील वाहनांचा भार वाढणार असल्याने त्यासाठी कोणती पर्यायी यंत्रणा उभी करायची, डोंबिवली पूर्व, पश्चिमेतून, २७ गावे, एमआयडीसी भागातून येणारा वाहनचालक माणकोली उड्डाण पुलाच्या दिशेने जाताना कोणकोणत्या रस्त्याने जाऊ शकेल, याचे सर्वेक्षण करून त्याप्रमाणे आतापासून या वाहतुकीचे नियोजन केले तरच, डोंबिवलीतून माणकोली पुलाच्या दिशेने वाहने सहीसलामत जाऊ शकतील. सध्या डोंबिवली पश्चिमेतील कोपर उड्डाण पूल, दीनदयाळ चौक, विष्णुनगर पोलीस स्थानक, फुले चौक भागातील रिक्षा वाहनतळ, खासगी वाहने, पादचाऱ्यांची वर्दळ पाहता हा रस्ता गजबजून गेलेला असतो. वाहने दसपटीने वाढली आहेत. त्या प्रमाणात नवीन रस्ते किंवा रस्त्यांचे वेळीच रुंदीकरण न केल्याचे त्याचे चटके आता शहरवासीयांना बसत आहेत. दहा वर्षांनंतर प्रथमच पालिकेने शहरातील रस्तारुंदीकरणांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे दर तीन वर्षांंनी पूर्ण केली असती तर, आता जे आकुंचन पावलेले रस्ते आणि त्यात एकमेकाला घासत, रेटत पुढे जाणारी वाहने असे विदारक दृश्य शहरात दिसते, ते कित्येक प्रमाणात कमी झाले असते. कोणत्याही प्रशासन व्यवस्थेची अभियांत्रिकी फळी मेणचट असेल तर त्या शहराची, व्यवस्थेची कशी वाट लागते, याचे कल्याण डोंबिवली पालिका हे उत्तम उदाहरण आहे. पाटय़ाटाकू शिक्षण, दडपशाही वृत्ती आणि फक्त व्यवस्थेतील मानाची पदे मिळविण्यात माहीर अशीच अभियांत्रिकी फळी वर्षांनुवर्ष पालिकेत सर्वोच्च स्थानी राहिली. सर्वच आयुक्त, पदाधिकाऱ्यांनी असे 'बस्तानठोके, हडपे अधिकारी' आपल्या अवतीभोवती बाळगण्यात धन्यता मानली. विद्यमान आयुक्त ई. रवींद्रन तरी अशा अधिकाऱ्यांना बाजूला सारतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, तीही फोल ठरली. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, माणकोली उड्डाण पुलाचा विचार करता, डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्ता, महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, गणेशनगरमधील रस्ते, विजयनगर सोसायटीतून देवीचापाडा, उमेशनगरकडे येणारे सर्व रस्ते यांचे वेळीच रुंदीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. डोंबिवली पूर्व भागातील केळकर रस्ता, टंडन रस्ता, कोपर उड्डाण पुलाजवळच्या अडचणी दूर होणे आवश्यक आहे. कोपर उड्डाण पुलावरून पश्चिमेत उतरल्यानंतर फक्त दीनदयाळ रस्ता हा एकमेव रस्ता न ठेवता, शास्त्रीनगर, सखारामनगर कॉम्प्लेक्स ते रेतीबंदर असा आणखी एक पर्यायी रस्ता माणकोली उड्डाण पुलाच्या दिशेने पोहच रस्ता म्हणून उपलब्ध करून देता येऊ शकेल का, या सर्व शक्यता पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी तपासून पाहिल्या पाहिजेत. पश्चिमेत रेतीबंदर चौक रेल्वे फाटकातून पुलाकडे जाताना रेल्वे मार्ग ओलांडावा लागणार आहे. त्यामुळे या भागात प्राधान्याने भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाचा विचार करावा लागणार आहे. ती शक्यता आताच तपासून पाहणे आवश्यक आहे. ठाण्याकडून येणाऱ्या, डोंबिवलीतून पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना रेतीबंदर रेल्वे फाटकात ये जा करण्यासाठी पर्यायी कोणतेही साधन उपलब्ध करून दिले नाही, तर वाहतूक कोंडीचा हा एक नवीन अड्डा रेल्वे फाटकाजवळ तयार होईल. मग, ही वाहतूक कोंडी दीनदयाळ रस्ता, उमेशनगर परिसराला कवेत घेईल. खाडीच्या पलीकडे म्हणजे पिंपळास, माणकोली भागातून पुलाला नाशिक महामार्गाच्या दिशेने एक ते दीड किलोमीटरचा पोहच रस्ता तयार करण्यात येणार आहे. या भागात काही ग्रामस्थांनी प्रस्तावित रस्त्याचा अंदाज घेऊन जागा अडविण्यासाठी टपऱ्या, लाकडाचे खुटले टाकण्याची नामी शक्कल लढवली आहे. नाशिक महामार्गालगतचा भिवंडीलगतचा भाग गोदामांसाठी (कु)प्रसिद्ध आहे. या गोदामांच्या दगडी, विटा पुलाच्या पोहच रस्त्याच्या मार्गाकडे सरकणार नाहीत ना, याची काळजी नियंत्रक संस्थेला घ्यावी लागणार आहे. |
जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये आता मराठी पुस्तक वाचणे शक्य झाले आहे ते 'ई-बुक'मुळे. कम्पुटर आणि इंटरनेटमुळे जगभर पोहोचलेले हे साहित्य सध्या तयार होते आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावांमध्ये. 'बुकगंगा'चा साखरप्यात उपक्रम म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये आता मराठी पुस्तक वाचणे शक्य झाले आहे ते 'ई-बुक'मुळे. कम्पुटर आणि इंटरनेटमुळे जगभर पोहोचलेले हे साहित्य सध्या तयार होते आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावांमध्ये. विश्वास बसला नाही तरीही ही वस्तुस्थिती आहे. 'बुकगंगा डॉट कॉम' या कंपनीने हे शक्य करून दाखविले आहे. 'बुकगंगा'चे संस्थापक मंदार जोगळेकर हे मराठी 'ई-बुक'मध्ये आघाडीचे नाव आहे. ते मूळचे साखरपा या गावचे. आपल्या गावातील मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे या ध्यासामधून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. गेले सहा महिने तो यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कंपनीच्या माध्यमातून 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी'चा (सीएसआर) उपक्रम म्हणून हा प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी 'मटा'ला सांगितले. अमेरिकेमध्ये प्रत्येक छोट्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मिती करण्यात येते. साहजिकच रोजगारासाठी शहराची वाट धरणाऱ्यांची संख्या तेथे खूप कमी आहे. हाच प्रयोग भारतामध्ये करणे शक्य आहे हेच जोगळेकरांनी सिद्ध करून दाखविले आहे. साखरपा हे गाव रत्नागिरी या जिल्हाच्या ठिकाणापासून जवळ आहे. या गावातील कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील ग्रॅज्युएट झालेल्या वीस मुला-मुलींना प्रशिक्षण देऊन या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. तेथील अपुरा वीजपुरवठा लक्षात घेऊन बॅटरी बॅकअप आणि जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ही मुले हे सगळे काम अतिशय कौशल्याने पार पाडत असून, त्यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातील तज्ज्ञांना बोलविण्यात येते. या कामासाठी लागणारी सर्व कौशल्ये या मुलांनी आत्मसात केली असून, एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या दर्जाचे काम ती आता करतात. 'गावातच राहून, प्रसंगी शेतीचे काम करूनही हे काम करता येत असल्याने रोजगाराचे एक नवीन साधन त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर आपल्या गावासाठी काही तरी केल्याचे समाधान मिळते आहे,' असे जोगळेकर यांनी सांगितले. |
खारघरमधील गो शाळा चालक शैलेश खोतकर यांना या प्रकाराबद्दल ओवे कॅम्पमधील रहिवाशांनी माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गायीवर प्राथमिक उपचार केले. पनवेल : खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून गायी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी ओवे कॅम्प परिसरात अशीच एक घटना घडली. गायीला चोरण्यासाठी चोरट्यांनी तिला गुंगीचे औषधही दिले होते. खारघरमधील गो शाळा चालक शैलेश खोतकर यांना या प्रकाराबद्दल ओवे कॅम्पमधील रहिवाशांनी माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गायीवर प्राथमिक उपचार केले. दोन महिन्यापूर्वी खोतकर यांच्या गो शाळेतही चोरीचा प्रकार घडला होता. यासंदर्भात त्यांनी तक्रारही केली होती. सध्या गो हत्येवर बंदी असल्याने गो शाळा, तसेच मोकाट गायी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात खोतकर यांनी आवाज उठवला मात्र गो हत्या करणाऱ्यांकडून खोतकर यांना त्रास देण्यात येत आहे. गायी चोरणाºयांवर कारवाई करण्याची मागणी खोतकर यांनी केली आहे. |
एककाळ होता जेव्हा भारताला सोन्याची चिमणी म्हणलं जायचं. भारतात त्या काळी सोने चांदी भरपुर मात्रेत असायचं. भारतीय मसल्यांकडे जगभरातील व्यापारी मौल्यवान संपत्तीच्या स्वरुपात पहायचे. या मसल्यांचा सुगंध हजारो किलोमीटर दुर अटलांटीक समुद्राच्या पार पोर्तुगालमध्ये दरवळायचा. युरोपीयन लोकांना भारतीय मसल्यांचा सुगंध आणि चवीने वेड लावलं होतं. वास्को द गामा(Vasco da Gama) हा भारतात पाऊल ठेवणारा पहिला युरोपीयन होता. ज्याला मसाल्यांच्या सुगंधानं भारताकडं आकर्षित केलं होतं. तसं युरोपच्या पश्चिमेला असणाऱ्या पोर्तुगाल आणि भारतात खुप आधीपासून व्यापारी संबंध होते. इसवीसन पुर्ण ३२७ मध्ये सिकंदरनं भारतावर आक्रमण केलं होतं. भारतातील नैसर्गिक संपत्ती अफाट आहे याची त्याला जाणीव होती. त्या संपत्तीला स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यानं आक्रमण केलं. भारतात त्याचा पराभव झाला. त्याला परत मायदेशी ही परतता आला नाही. या आक्रमणावरुन भारतीय संपदेवर अनेक राष्ट्रांची नजर होती ही बाब अधोरेखित होते. यावरुन गोष्ट सिद्ध होते की जगाला भारताचे आकर्षण होते. इसवी सनानंतर अनेक परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमण केलं. भारताला लुटण्याचे प्रयत्न केले. भारताकडे जाणारे अनेक व्यापारी मार्ग त्यांनी शोधून काढले. त्या सर्वांचा उद्देश एकमेव होता तो म्हणजे भारताची लुट.(Vasco da Gama found a new way to India) आणि यातूनच त्यांना भारताच्या मसाला उत्पादन व्यवसायावर कब्जा करायचा होता. हे स्पष्ट होतं. भारतात गंगेच्या किनारील सुपीक मैदानं शेतीसाठी उपयुक्त आहेत तर भारताच्या दक्षिणेतून मोठ्या प्रमाणात मसाल्यांचे उत्पादन घेता येतं. तसेच बंगालचं सुती कापड आणि ढाकाची मलमल युरोपात मोठ्या प्रमाणात विकली जायची तेव्हा बंगाल आणि ढाका हे भारताचंच क्षेत्र होतं. युरोपात काळी मिरीचा वापर मांस संरक्षित करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी केला जातो. लवंग, दालचिनीचा वापर व्हेंटीलेशनसाठी व्हायचा. खोलीतील दुर्गंध दुर घालवण्यासाठी या मसाल्यांचा व्हायचा. कोचीन आणि मालाबार तटावर काळी मिरीचं उत्पन्न घेतलं जायचं. लवगं बंगाल खाडीच्या तटावर उत्पादीत केली जायची. वास्को द गामा ८ जुलै १४९७ मध्ये ४ जहाजांना घेऊन पहिल्यांदा समुद्री यात्रेवर निघाला. मोठ्या प्रवासानंतर अफ्रिकेच्या 'केप ऑफ गुड होप'वर पोहोचला. नंतर तो कालिकतवर आला. राजा जमोरिन सोबत मसाल्यांचा वापर केला. मसल्यांची एक खेप घेऊन मायदेशी परतला. पोर्तुगीजात त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. नंतर १५०२ मध्ये २० जहाजांचा ताफा घेऊन तो भारताकडे निघाला. त्यासोबत लुटेरे आणि सैनिकही होते. भारता आल्यानंतर त्यानं मोठ्या प्रमाणात लुटी केल्या. मसल्यांच्या व्यापारावर कब्जा केला. भारतात चौक्या स्थापन केल्या. १५११ पर्यंत पोर्तुगीचांनी भारता आणि श्रीलंकेच्या मालाबार तटावरील मसाला व्यापावर नियंत्रण प्रस्थापरित केलं. १६ व्या शतकात भारतीय मसाल्यांच्या व्यापारावर त्यानं एकाधिकार मिळवला. १६ व्या शतकात पोर्तुगीजच्या निम्म्याहून अधिकचं कर उत्पादन भारतीय मसाल्यांच्या विक्रीतून येत होतं. यात काळ्या मीरीला विशेषमहत्त्व होतं. या मसल्यांची खरेदी एका पारड्यात सोनं चांदी आणि एका पारड्यात काळीमीरी तोलावी अशी होत होती. इतिहासकारांच्यामते हजारो वर्षांपासून उपयोग केला जातोय. |
दोन्ही मुलांना सध्या रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये ठेवले आहे. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात शहरातील एका खासगी रुग्णालयात एक कोरोना पॉझिटिव्ह महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष बाब म्हणजे दोन्ही मुलांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या मुलांच्या आईला त्यांच्यापासून दूर एका आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. पूर्णपणे बरे होईपर्यंत मुलांपासून दूर रहाण्याचा सल्लाही आईला देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयात या महिलेने मुलांना जन्म दिला. या महिलेला शरीरावर सूज आणि पोटात होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. येथे उच्च रक्तदाबामुळे महिलेची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांना शंका आली. महिला ज्या भागात राहते तेथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. यानंतर डॉक्टरांनी तिची कोरोना चाचणी केली असता तिला संसर्ग झाल्याचे आढळले. यानंतर, महिलेची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी तिचे सी-सेक्शन ऑपरेशन केले. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या महिलेने मुलगी व मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही मुले पूर्णपणे निरोगी आहेत. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "जुळ्या मुलांसह गर्भवती असल्यामुळे तिला आपत्कालीन परिस्थितीत भरती केले होते." पुढे त्यांनी सांगितले की, महिला रेड झोनमधून आल्यामुळे आम्ही कोरोनाचे लक्षण दिसताच तिची चाचणी केली होती. सध्या दोन्ही मुले सध्या सुरक्षित असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत. |
'हल्लीचे जग हे स्क्वेअर फुटात अडकले आहे. भवतालचा अस्वस्थ वर्तमान आणि कावऱ्याबावऱ्या चेहऱ्यांवरील भावभावनांशी एका घटकाला काहीही देणेघेणे नाही. अवतीभोवती वणवा पेटला असताना ज्यांच्या मनात संवेदनशीलतेची वात तेवत असते तिथेच चळवळीची बिजे रुजतात. त्यामुळे समाजाला दिशा देणाऱ्या चळवळीची उभ्या रहायच्या असतील तर स्क्वेअर फुटाचा परीघ ओलांडला पाहिजे. तरुणांनी त्यासाठी पुढे यावे, अशी भावनिक साद, नाना पाटेकर यांनी येथे घातली. |
मोदी सरकारने पत्रकारांच्या गळचेपीला राजमान्यता दिली? गेल्या पंधरवड्यात घडलेल्या तीन घटना. घटना पहिलीः कठुआ आणि उन्नावच्या बलात्काराच्या घटनांनंतर काही दिवसांनी पत्रकार राणा अयुब यांना जबर धक्का बसला. ट्विटरवर त्यांच्या नावाने एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली - "बलात्कार करणाऱ्यांनाही मानवी हक्क असतात. या हिंदुत्ववादी सरकारने लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी ठोठावली आहे. अधिकाधिक मुसलमानांना फासावर लटकवण्याचा हा घाट आहे. हे सरकार मुस्लीमविरोधी आहे. " काही वेळाने ही प्रतिक्रिया मोदी सरकारची तळी उचलून धरणाऱ्या एका चॅनलवरही झळकली. आपल्या नावाने एक बोगस हॅंडल तयार करण्यात आल्याचं राणा यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पुढच्या तीन दिवसात त्यांना हैराण करण्याचा प्रयत्न हर प्रकारे करण्यात आला. बलात्काराच्या धमक्या देण्यापासून त्यांचा फोटो मॉर्फ करून अश्लील व्हीडिओ पाठवण्यापर्यंत असंख्य आक्षेपार्ह प्रकार करण्यात आले. सोशल मीडियावरच्या शिवीगाळीचा अनुभव राणा अयुब यांना नवा नव्हता. गुजरातच्या दंगलीबद्दलचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून हा त्रास वाढला होता. पण यावेळी हद्द झाली. शेवटी त्यांनी दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन याविरुद्ध तक्रार नोंदवली. दुसरी घटनाः NDTVचे लोकप्रिय अॅंकर रवीश कुमार यांच्याबाबतची. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हा प्रकार उघडकीला आणला आहे. त्यांचा फोन नंबर पद्धतशीरपणे सार्वजनिक करण्यात आला. मग त्यांना आई-बहिणीवरून गलिच्छ शिव्या देणारे फोन्स येऊ लागले. त्यापाठोपाठ द्वेषाचं विष ओकणाऱ्या व्हॉट्सअॅप मेसेजसचा मारा सुरू झाला. सतत तीन दिवस हा प्रकार घडत होता. रवीश कुमार यांनी या मंडळींचे फोन नंबरही जाहीर केले. पण कोणतीही कारवाई झाली नाही. मोदी सरकारवर कठोर टीका करणारे पत्रकार म्हणून रवीश प्रसिध्द आहेत. तिसरी घटनाः छत्तीसगडमधल्या बस्तरहून निघणाऱ्या 'भूमकाल समाचार' या साप्ताहिकाचे संपादक कमल शुक्ला यांच्यावर या सोमवारी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा दोष हा की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने न्या. लोया प्रकरणी दिलेल्या निकालावर टीका करणारं व्यंगचित्र फेसबुकवर शेअर केलं! यंदाच्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये (माध्यम स्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत) भारताचा क्रमांक 136 वरून 138वर का घसरला, हे स्पष्ट करायला या ताज्या घटना पुरेशा आहेत. 'रिपोर्टर्स विदाउट फ्रंटियर्स' या संस्थेने तयार केलेल्या या अहवालात पहिला क्रमांक नॉर्वेचा आहे. या यादीत भारतापाठोपाठ पाकिस्तान, चीन, इराण, इराक वगैरे देश आहेत. सर्वांत मोठी लोकशाही असल्याचा दावा करणाऱ्या भारताच्या दृष्टीने ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अर्थात, ही परिस्थिती केवळ गेल्या चार वर्षांत निर्माण झाली आहे, अशातला प्रकार नाही. स्वतंत्र भारतातलं वृत्तपत्र स्वातंत्र्य कधीच परिपूर्ण नव्हतं. नेहरूंच्या काळातही पत्रकारांचा सरकारशी संघर्ष झालाच. पण देशाचे नेते म्हणून पंडितजी नेहमीच वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. इंदिरा गांधी यांना आणीबाणी लादून माध्यमांवर बंधनं आणली. पण निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर स्वतःची चूक मान्य केली. राजीव गांधींनीही 'डिफेमेशन बिल' आणून पत्रकारांच्या मुसक्या बांधायचा प्रयत्न केला. पण त्याविरोधात देशव्यापी आंदोलन उभं राहिल्यावर सपशेल माघार घेतली. त्यापूर्वी कर्नाटकात गुंडू राव सरकारने विरोधी बातम्या देणाऱ्या 'इंडियन एक्सप्रेस'ची वीज कापली होती. पण जनक्षोभामुळे काढता पाय घेतला. पत्रकारांवर हल्ले पूर्वीही झाले, सत्ताधाऱ्यांनी हल्लेखोर शोधण्यात हलगर्जीपणा केला असला तरी अशा हल्ल्यांचं समर्थन कधी केलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं वैशिष्टय हे की या सरकारने पत्रकारांच्या गळचेपीला राजमान्यता दिली. नरेंद्र मोदींनी आपल्याविरुध्द लिहिणाऱ्या पत्रकारांना 'न्यूज ट्रेडर' ही नवी उपाधी दिली. व्ही. के. सिंग किंवा किरण रिजिजू यांच्यासारखे त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी पत्रकारांना 'प्रेस्टिट्यूट' म्हणू लागले. मीडिया हा आपला शत्रू आहे, याची खूणगाठ मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच बांधली होती. गुजरात दंगलीच्या काळात पत्रकारांनी आपल्याला लक्ष्य केल्याचा त्यांचा राग होता. त्याचंच उट्टं जणू ते काढत होते. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर आजपर्यंत मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी मुलाखती दिल्या त्यासुद्धा निव्वळ मर्जीतल्या पत्रकारांना. अडचणीचे किंवा खोलात जाणारे प्रश्न विचारायचे नाहीत, ही जणू या मुलाखतींची पूर्वअट होती! प्रतिकूल मीडियाला धडा शिकवण्यासाठी आता मोदींना मोठं हत्यार सापडलं होतं - सोशल मीडिया. तिथे कोणतीच बंधन नव्हती. मग मोदी भक्तांची एक मोठी फौज तयार करण्यात आली. मोदींवर किंवा सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला टार्गेट केलं गेलं. आता पत्रकारांवर प्रत्यक्ष हल्ला करण्याची गरजच नव्हती! फेसबुक किंवा ट्विटरवर चारित्र्यहनन करणारा मजकूर पसरवून त्यांना आधीच अर्धमेलं करून टाकायचं ही रणनीती वापरण्यात आली. याचं सविस्तर विश्लेषण स्वाती चतुर्वेदी यांनी 'आय अॅम अ ट्रोल' या पुस्तकात केलं आहे. आज राणा अयुब किंवा रवीश कुमार यांच्या वाट्याला जो क्लेशकारक अनुभव येत आहे तो यापूर्वीच बरखा दत्त, सागरिका घोष, नेहा दीक्षित, रोहिणी सिंग यांना आला आहे. महिला पत्रकारांविषयी अश्लील मजकुराचा भडिमार करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा हा उघड प्रयत्न आहे. विशेष म्हणजे अशा अनेक विकृत व्यक्तींना पंतप्रधान मोदी फॉलो करत असतात. पुरुष पत्रकारांचा अनुभव काही वेगळा नाही. राजदीप सरदेसाई, करण थापर, सिद्धार्थ वरदराजन, कुमार केतकर ही या भक्तांची आवडती टार्गेट्स. राजदीप सरदेसाईंना तर एकदा मोदींच्या लंडन दौऱ्याच्या वेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही करण्यात आली. मी स्वतः सोशल मिडियावर हा विषारी अनुभव 2013 पासून घेत आहे. माझ्या नावाचं बोगस अकाउंट निर्माण करून 'मोदी निवडून आल्यास मी नागड्याने भर रस्त्यावरून धावेन' असं जाहीर करण्यात आलं. आजही मी मोदी किंवा सरकारवर टीका करतो तेव्हा हा बोगस अकाउंट डोकं वर काढतो. पत्रकारांविषयी अभूतपूर्व विष पसरवणारे सत्ताधारी म्हणून या सरकारची नोंद होईल. अलीकडेच प्रेस अॅक्रिडिटेशनचे नियम फेक न्यूजशी जोडून पत्रकारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न या सरकारमधल्या माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी केला. पण तीव्र प्रतिक्रिया उलटल्याने पंतप्रधानांना हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा लागला. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भयंकर मनस्ताप सहन करूनही बहुसंख्य पत्रकारांनी या छळवणुकीला भीक घातलेली नाही आणि आपलं काम चालू ठेवलं आहे. मात्र गौरी लंकेशच्या तेही नशिबात नव्हतं. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर ज्या धर्मांध संघटनाना बळ मिळालं, त्यांपैकी कुणी तिच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे. 'अटक केलेल्या आरोपीचे सनातनसारख्या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध' अशी बातमी प्रसिध्द झाली आहे. याच संघटनांवर दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनाचा संशय आहे. देशातली परिस्थिती किती भयावह आहे हे यावरून दिसतं. कर्नाटकातलं काँग्रेस सरकारही गौरी लंकेशच्या खुनाचा छडा लावण्याचं अपयशी ठरलं आहे. पत्रकारांना कोण वाचवणार? पण गौरी लंकेशच्या खुनाबाबत जनक्षोभ तरी निर्माण झाला, ग्रामीण भारतातल्या पत्रकाराच्या नशिबात हत्येनंतरही अवहेलनाच येते. 12 पत्रकार गेल्या वर्षभरात देशभरात मारले गेले आहेत. त्यांपैकी बिहारचे राजदेव रंजन, त्रिपुराचे शांतनू भौमिक, छत्तीसगड साई रेड्डी, उत्तर प्रदेशचे जगेंद्र सिंग यांची थोडी तरी चर्चा झाली, इतरांची नावही आपल्याला ठाऊक नाहीत. ग्रामीण पत्रकाराला एका बाजूला राजकीय माफियाशी लढावं लागतं, तर दुसरीकडे भ्रष्ट पोलिसांचा सामना करावा लागतो. त्याला ना नोकरीचं संरक्षण ना सरकार किंवा समाजाचं. जगेंद्र सिंगला तर पोलिसांनी जाळून मारल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांत 90 पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती नुकतीच सरकारने राज्यसभेत दिली. ती दिशाभूल करणारी असल्याचा दावा महाराष्ट्रातल्या पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकट्या महाराष्ट्रातच गेल्या तीन वर्षांत 218 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. हा आकडा खरा असेल तर परिस्थिती गंभीर आहे. मी स्वतः शिवसेना आणि नारायण राणेंच्या गुंडांचा अनुभव घेतला आहे. पण गेल्या दोन दशकांत सेनेचं राडा तंत्र सर्वपक्षीय झालं आहे. वाळू माफियापासून दूध माफियांपर्यंत असंख्य गुंड टोळ्यांनी समाजाला वेढून टाकलं आहे. जिथे मरणच स्वस्त झालंय तिथे पत्रकारांना कोण वाचवणार? विशेष म्हणजे पत्रकारांवरच्या हल्ल्यांविरोधात खास कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. पण हा कायदा अजून राष्ट्रपतींच्या सहीची वाट पाहतो आहे! एवढं करून पत्रकार जिवंत राहिला तर त्याला नमवण्याचे इतर 'कायदेशीर' मार्ग वापरले जातात. अब्रूनुकसानीचा दावा हे त्यातलं सगळ्यांत मोठं अस्त्र आहे. मीडिया कंपन्यांवर जाहिरातींचा मारा करून त्यांना गुंगवून टाकण्याचं तंत्रही या नव्या सत्ताधाऱ्यांनी वापरलं आहे. कोट्यवधी रुपयांची जाहिरात देणाऱ्या क्लायंटला कोण दुखावेल? सहाजिकच अशा दुभत्या गाईला सांभाळून घ्या, असा संपादकावर मार्केटिंगचा सतत दबाव असतो. हेच तंत्र सर्वपक्षीय राजकारणी आपापल्या पातळीवर वापरू लागले आहेत. त्यामुळे अग्रलेखापेक्षा पहिला पानावरच्या जाहिरातीला अधिक महत्त्व आलं आहे. सहाजिकच बहुसंख्य संपादक सरपटणारे प्राणी झालेत. ज्यांचा कणा शाबूत आहे त्यांना त्याच्यासकट घरी पाठवण्यात आलंय! एकूणच स्वतंत्र पत्रकारितेच्या दृष्टीने वातावरण भयंकर विषारी आणि घुसमटीचं आहे. हे असंच चालू राहिलं तर माध्यम स्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत भारत आणखी घरंगळू शकेल. हे होऊ द्यायचं नसेल तर लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी कंबर कसायला हवी. डिजिटल विश्वाने नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ लोकांच्या पाठिंब्यावरच पुन्हा ताठ उभा राहू शकतो. भारतीय पत्रकार लढाऊ आहेत, ते सहजासहजी हार मानणार नाहीत. (लेखातील मतं लेखकाचे वैयक्तिक मतं आहेत. ) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. ) |
सिंधुदुर्ग, 20 मेः तौत्के चक्रीवादळा (Cyclone Tauktae)मुळे महाराष्ट्र (Maharashtra), केरळ, गोवा, गुजरात या राज्यांच्या किनारपट्टीभागाला मोठा फटका बसला. चारही राज्यांत चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी गुजरात आणि दीव या भागांची हवाई पाहणी केली. तसेच गुजरात राज्यात तातडीच्या मदतकार्यासाठी पंतप्रधानांनी 1000 रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली. पंतप्रधानांनी गुजरातचाच दौरा केल्याने त्यांच्यावर टीका होत होती. महाराष्ट्रातही यामुद्यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. आता याच मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? चक्रीवादळग्रस्त असलेल्या कोकण दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला महाराष्ट्राकडे कमी लक्ष दिले? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला याचं कारण म्हणजे लँडफॉल गुजरातमध्ये झालं. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्याने प्रचंड नुकसान झालं. 45 नागरिकांचा मृत्यू झाला. गावंच्या गावं 100 टक्के उद्वस्त झाली त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला, तातडीची मदत केली. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, इतर राज्यांनाही मदत करण्यात येईन असं जाहीर केलं आहे. तौत्के चक्रीवादळाचा परिणाम केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दमण, दीवमध्ये आहे एकूण आठ राज्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे या सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल. समाधान आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करत आहेत. सरकार आलं तर आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा स्वाभाविक आहे. आम्हीही अपेक्षा करतोय की उद्या मुख्यमंत्री येत आहेत तर त्यांनी भरघोस मदतीची अशी घोषणा करावी. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं आहे तशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनीही कोकणाच्या पदरी काहीतरी पाडावं आणि निसर्ग वादळाच्या वेळी जशी निराशा केली तसं आता करू नये असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
"आमच्या प्रश्नांचं मुख्यमंत्र्यांकडे उत्तरच नव्हतं, म्हणून...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! "पाहुणे आले घरापर्यंत", 'तो' व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा खोचक टोला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा! "आता पुढचा नंबर अनिल परबचा ; उद्धव ठाकरे यांची अडचण मी समजू शकतो" ; किरीट सोमय्यांचं विधान! "उद्धव ठाकरेंचं पुन्हा 'सूड दुर्गे सूड", दिशा सालियान प्रकरणावरून भाजपाचा निशाणा! |
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेतील दुसरा वन-डे क्रिकेट सामना आज (गुरुवार) इडन गार्डन्सवर रंगणार आहे. भारताने चेन्नई येथे झालेली पहिली वन-डे जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या वन-डेला पावसाचा फटका बसला होता. आता दुसऱ्या वन-डेवरही पावसाचे सावट आहे. |
मुंबई, 12 एप्रिलः भारतात कोरोना व्हायरस एप्रिल महिन्यात वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 400च्या वर गेली होती. देशात 586 कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून 1 लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणखीन दोन आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व समाजात रुजावे यासाठी राज्यातील सर्वग्रामपंचायतींनी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणूनसाजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना,विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करुनघेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करुन त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते. या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व समाजात रुजावे यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात यावा. या दिवशी काय करावे लागणार. या दिवशी गावातील महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिनाच्या शुभेच्छा देणारा बॅनर/फ्लेक्स लावावा. गावकर्यांमध्ये, विशेषतः नवमतदारामध्ये मताधिकार, निवडणूक, लोकशाही याविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी सदर दिनाचे महत्व सांगावे. सदर दिवशी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून मताधिकार, लोकशाही यांसंबंधी रांगोळी गावकर्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यकम घेण्यात यावा. ज्यांनी नियमितपणे मताधिकार बजाविले आहे अशा जेष्ठ मतदारांचा सत्कार करावा. सदर कार्यक्रम साजरा करताना कोव्हीड -19 संबंधी शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे. |
वाढत्या रुग्णसंख्येसाठी अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील हा आकडा १, ३७७ इतका आहे. वाढत्या रुग्णसंख्येसाठी अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील हा आकडा १, ३७७ इतका आहे. पहिली लाट डिसेंबर महिन्यात ओसरू लागल्याने खासगी कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात आले. नागरिकांमधील बेफिकिरी वाढली. याचा परिणाम जानेवारी महिन्यात दिसून येऊ लागला. वृद्धांसोबतच युवाही बाधित झाले. मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. मे महिन्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. आता तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविला जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक गंभीर राहणार असल्याची चर्चा आहे. आत्तापासून सावधगिरी म्हणून लहान मुलांना इन्फ्लुएन्झा इंजेक्शन देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. साधारणतः सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना हे इंजेक्शन देण्याचे बोर्ड लहान मुलांच्या रुग्णालयात लावण्यात आले आहेत. याहून अधिक वयाच्या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधी देण्यात येत आहे. हे सारे घडत असताना सरकारीस्तरावर लसीकरणाची गती वाढलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम भागात अजनूही लसीकरण झालेले नाही. सुमारे ३० लाख लोकसंख्येच्या यवतमाळ जिल्ह्यात १८ वर्षांवरील २४ लाख लोक आहेत. आतापर्यंत ६ लाख ४० हजारांवर चाचण्या झाल्या आहेत. तर ४ लाख ४२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अजूनही १९लाख ५० हजार नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही. करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण तातडीने करण्याची गरज व्यक्त होत आहे. |
आज आयपीएल 2023 मध्ये अशा दोन संघांमध्ये स्पर्धा होणार आहे, ज्यांनी हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. राजस्थान रॉयल्सची गुवाहाटी येथील त्यांच्या दुसऱ्या होम ग्राउंड बारसापारा स्टेडियमवर पंजाब किंग्जशी लढत होईल. या दोन संघांच्या सामन्यांमध्ये अनेकदा थरार पाहायला मिळतो. असाच एक सामना तीन वर्षांपूर्वी झाला होता, ज्याने एक खेळाडू आयपीएलमध्ये अव्वल स्थानावर आणले होते, तर दुसरा लीगमधून बाहेर फेकला गेला होता. राजस्थान आणि पंजाब यांच्यातील हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक आणि आश्चर्यकारक सामन्यांमध्ये गणला जाईल. याचे कारण असे दोन खेळाडू झाले, जे एका षटकात खलनायकाकडून नायक आणि नायकाकडून खलनायक बनले. राहुल तेवतिया आणि शेल्डन कॉट्रेल अशी या खेळाडूंची नावे असून शारजाचे मैदान या सामन्याचे साक्षीदार होते. तारीख होती 27 सप्टेंबर. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 223 धावांची जबरदस्त धावसंख्या उभारली. मयंक अग्रवालने 106 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात शेल्डन कॉट्रेलने तिसऱ्याच षटकात जोस बटलरची विकेट घेतली. संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मात्र धडाकेबाज फलंदाजी करत 9व्या षटकापर्यंत राजस्थानला 100 धावांपर्यंत पोहोचवले. स्मिथ बाद झाल्यानंतर क्रिजवर राहुल तेवतियाची एंट्री झाली, ज्याची आयपीएल कारकीर्द तोपर्यंत जवळपास अज्ञातच होती. सॅमसनने खूप धावा केल्या, पण तेवतिया धावांसाठी झगडत होता. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सॅमसन बाद झाला आणि त्यावेळी राजस्थानला 23 चेंडूत 63 धावांची गरज होती. तोपर्यंत तेवतियाची धावसंख्या 21 चेंडूत 14 धावा होती आणि समालोचनापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वजण तेवतियावर टीकेचा पाऊस पाडत होते. तेवतियाचा हा संघर्ष आणखी दोन चेंडू टिकला, त्यानंतर असे काही घडले, जे केवळ आयपीएलमध्येच नाही तर क्रिकेटच्या इतिहासातही दुर्मिळ आहे. 18 व्या षटकात, तेवतियाचा सामना डावखुरा विंडीजचा वेगवान गोलंदाज कॉट्रेलशी झाला, ज्याचा आयपीएलमधील प्रवेश चर्चेचा विषय होता. त्यानंतर पुढच्या 6 चेंडूंबद्दल अनेकदा त्या चर्चा रंगू लागल्या. या षटकातील पहिल्या 4 चेंडूत सलग 4 षटकार मारून तेवतियाने खळबळ उडवून दिली. पाचवा चेंडू कसा तरी रिकामा राहिला, पण तेवतियाने पुन्हा सहावा चेंडू षटकारासाठी पाठवला आणि षटकातून 30 धावा जमवल्या आणि फलंदाजीसह संघाला वाचवले. त्यानंतर तेवतियाने पुढच्या षटकात शमीला षटकार ठोकला आणि 31 चेंडूत 53 धावा (7 षटकार) करून बाद झाला. राजस्थानने पुढच्याच षटकात विक्रमी लक्ष्य गाठले. यामुळे आयपीएलमधील दोन्ही खेळाडूंचा दर्जा बदलला. त्या हंगामात तेवतियाने राजस्थानसाठी आणखी काही चांगल्या खेळी खेळल्या. त्याच वेळी, 2022 च्या हंगामात, गुजरात टायटन्सने त्याला 9 कोटी रुपयांची जबरदस्त बोली लावून खरेदी केले. तेवतियाने या मोसमात गुजरातसाठी काही सामने जबरदस्त फिनिशिंगसह जिंकले आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली. यातील एक डाव फक्त पंजाबविरुद्ध होता, ज्यात त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या मोसमातही तो गुजरातचा एक भाग आहे आणि चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो विजयी खेळाडूंपैकी एक होता. शेल्डन कॉट्रेल त्या हंगामानंतर आयपीएलमध्ये परत येऊ शकला नाही. |
देऊळगावराजे : देऊळगावराजे येथे ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित केली होती. याविरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर व शिरापूरचे माजी सरपंच केशव काळे, हरीभाऊ ठोंबरे, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव राजे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पूर्ववत करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. गेल्या तीन दिवसांपासून महावितरणच्या शेतकऱ्यांची वीजबिल भरलेली नाही हे कारण दाखवून वीज बंद केली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. अशातच आता मार्च महिन्यात शक्य असेल तेवढी बाकी शेतकऱ्यांनी वीजबिले भरली आहेत. पण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिल भरण्याची राहिली नाही. त्यात वीजबिल भरण्यासाठी महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी केशव काळे, अभिमन्यू गिरमकर, हरिभाऊ ठोंबरे, राजेंद्र बुऱ्हाडे, बाळकृष्ण पाचपुते, शिवाजी काळे, नंदकिशोर पाचपुते, सचिन कदम, शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम आदी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून लाईट पूर्ववत करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाणार आहे. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या जातील. पुढील काळात अशी एकाकी वीज बंद केली जाणार नाही. जर वीज बंद करण्याची वेळ आली तर संबधित गावच्या शेतकरी वर्गाला आणि ग्रामस्थांना पूर्वकल्पना देऊन ग्रामसभेत शेतकऱ्यांना तशा सूचना केल्या जातील. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीच्या वेळी भर सभेत म्हणाले होते की सत्ता आल्यावर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात येईल. परंतु तसे झाले नाही. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. यामुळे राज्य शासनाने वीजबिल माफ करावे आणि पुरवठा खंडित करू नये. चौकट : आज सर्व शेतकऱ्यांनी मिळून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत. |
काळी चहा म्हणजेच बिना दुधाची चहामध्ये अँण्टीऑक्सीडेंट भरपूर असतं. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास चहा खूप उपयुक्त आहे. तोंडातील विषाणूंपासून लढण्यास शक्ती काळ्या चहामधून मिळत असते. काळा चहा प्यायल्याने शररीतील सुस्ती निघून जाते. या चहामधील पोषक तत्त्व शरीरातील रक्त साखर नियंत्रित ठेवत असते. तसेच मधुमेह होण्याचा धोका देखील कमी कमी असतो. यातील फायटोन्यूट्रिएंट्स त्वचेसह केसांसाठी देखील चांगले असते. काळा चहा डोक्यातील नसांना सुरक्षा पुरवते. मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवत असते. काळी चहा अँण्टीकऑक्सीडेंट आणि फायटोन्यूट्रिएंट्स असते. जे शरीराला डिटॉक्सीफाय करत असते. ज्यामुळे त्वचा ग्लो होत असते. काळ्या चहामध्ये कॅटेचीन असतं जे पचनसंबंधीच्या समस्या दूर करते. काळ्या चहामध्ये अँण्टीकऑक्सीडेंट खूप असतं. जे हृदयाचे आरोग्य सुधारते. Thanks For Reading! |
अंत्यविधीप्रसंगी भावना व्यक्त करू न दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पिंपळगाव बसवंत( जि.नाशिक) : आहेरगाव (ता. निफाड) येथील रहिवासी व सैन्यदलात पठाणकोट येथे कार्यरत असताना मृत्यू झालेले सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय ३२) यांना शुक्रवारी (ता. १३) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. या वेळी 'वीर जवान अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या. जवानाच्या निधनाने दिवाळी सण मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सोमवारी (ता. ९) मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव आहेरगाव येथे दाखल झाले. पार्थिव गावात येताच नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. देशमुख यांच्या निवासस्थानी काही वेळी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर गावातून सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक संजय महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर भाऊ समाधान याने मुखाग्नी दिला. विस्ताराधिकारी के. टी. गादड, मंडल अधिकारी शीतल कुयटे, प्रशासक स्वप्नाली कागदे, ग्रामसेवक भालचंद्र तरवारे, पोलिसपाटील ज्ञानेश्वर कोकाटे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्यविधीप्रसंगी भावना व्यक्त करू न दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. भास्कर महाराज रसाळ, केशव माळोदे, दत्तात्रय कडलग, जयवंत रसाळ, नंदकुमार जहागिरदार, दिनकर कुयटे, संजय गवळी यांनी संताप व्यक्त केला. |
हॅट्स आणि इतर महिला हॅट्स एकावेळी फॅशनच्या बाहेर गेले पण वर्तमान आणि आगामी हंगाम संग्रह या सहयोगी एक आश्चर्यकारक विविधता दाखवा. रेट्रो मागे-शैलीतील डोक्याचे कपडे देखील फॅशन हाउसच्या नवीनतम संग्रहांमध्ये यशस्वीरित्या मिसळले. 20 च्या शैलीतील क्लोनची टोपी अतिशय नाजूक आणि व्यवस्थित दिसत आहे. अशाप्रकारच्या पोषाखास प्राथमिक पोशाखासह कठोर रंग अनुपालनामध्ये निवड करणे आवश्यक आहे. नर शैली. पुरुषांच्या शैलीमध्ये मिस्टीयर आणि किंचित निराशावादी स्त्रीच्या हॅट्सची भावना आणि मखमली तयार करतात. ते देखावा मध्ये अतिशय साध्या आणि मोहक आहेत, दोन्ही क्लासिक परिधान आणि रस्त्यावर कपडे योग्य. हे डेली-सीझन हेडग्रीअर म्हणून अशा महिला टोपी वापरण्यास सोयीचे आहे, जे केवळ आपल्याला सजवू शकत नाही, पण उबदार देखील. मूळ आणि धैर्याने चमचे आणि खालच्या केसांचे टोपी ते साधेपणा आणि उच्च दर्जाचे कार्यप्रदर्शन एकत्र करतात, जे दररोजच्या टप्प्यासाठी अशा शिरपेचात जोरदार अचूक बनवते. 2013 च्या हंगामात, ठळक रंग आणि सर्वात जास्त शक्य फील्ड फॅशनमध्ये असतील. हे आभूषणांच्या स्वरूपात कोणतीही जड अत्यावश्यकच करत नाही तर हॅटने केवळ त्याचे कार्य केले पाहिजे. बुडलेले टोपी सजावट भरपूर सह तंग crocheted मणी अतिशय मोहक आणि नाजूक दिसत. फॅशनच्या शिखरावर - नैसर्गिक धागाच्या नमुनाशिवाय एक मोठा संभोग. लहान संत्रीसाठी ते अधिक श्रेयस्कर असल्यास, हे नॉर्वेजियन नमुनासह सुशोभित केले जावे. फर आणि हिवाळा महिला कॅपिटल हॅट्स फॅशनचा येणारा हंगाम हा अशक्यतेने तेजस्वी रंगांचा ब्रॉड-ब्रमीड फर हॅट्स प्रदान करतो. परिचित आल्हादक कुबंका काही संग्रहांमध्ये देखील उपस्थित आहे, परंतु ते शास्त्रीय भाषेपेक्षा बरेचसे असावे. आणखी एक ठळक पर्याय लोखंडी किंवा फॉक्स फर बनवणारे उंच फर हॅट आहे. उबदार टोपी अनेक चढ मध्ये प्रस्तुत केले जातात. मुख्य प्रवृत्ती म्हणजे चामड्याच्या आतील आणि धातूच्या घटकांसह पोलिसांची टोपी. बर्याच संग्रहामध्ये गुंडगिरीच्या शैलीमध्ये ठळक अक्षरे असतात, ज्याला असमंजसपणे किंवा थोडासा रंगडा केला जातो. सिलेंडर आणि गोलंदाज विशेषतः विलक्षण व्यक्तिमत्त्वांसाठी, महिला टोपी मागे शैलीमध्ये तयार केल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत, एक उंच सिलेंडर बर्याचशा गोष्टींना आकर्षित करेल आणि थोडा नीच भ्रामक अभिमान व्यक्त करेल. सर्वात फॅशनेबल क्लासिक ब्लॅक रंग आणि राखाडी छटा होईल. गोलंदाजांची टोपी मजबूत आणि गंभीर महिलांसाठी योग्य आहे एकीकडे, एका बाजूला, दुसऱ्यांवर - खूप नाजूक दिसते. पसंतीचे गडद रंग आहेत आणि सजावट किमान. महिला टोपी - काय बोलता येईल? खेळ आणि सहज. प्रेमींना आरामदायी आणि आरामदायक वाटत असल्यास, कॅप्स आणि गुंडीत टोपी हे प्रतिमेसाठी एक उत्कृष्ट जोड असेल. सरल आणि मोहक हॅट्स ट्रिलबाय आणि फेडरसह असणारी आणि अनन्य शैलीची शैली एकत्र करणे देखील शक्य आहे. |
MS Dhoni Buys Kia EV6: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कार आणि बाईकचा मोठा शौकीन आहे. त्याला अनेकदा महागड्या कार आणि बाईक चालवताना पाहिलं गेलं आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार आणि बाईक आहेत. आता या कलेक्शनमध्ये त्याने आणखी एका कारचा समावेश केला आहे. एका रिपोर्टनुसार, महेंद्र सिंह धोनीने नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 खरेदी केली आहे. या कारसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एका चार्जवर 700 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, महेंद्र सिंह धोनी त्याच्या नवीन इलेक्ट्रिक कार EV6 मध्ये रुतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांच्यासह बसलेला दिसत आहे. या नवीन कारवर टीसी नोंदणी क्रमांक दिसत आहे. कंपनी सीबीयू मार्गाने ही कार भारतात आयात करते. त्यापैकी आतापर्यंत फक्त 200 युनिट्स भारतात आले आहेत. या सर्व कार विकल्या गेल्या आहेत. या कारचे आणखी युनिट्स लवकरच देशात आयात केले जाणार आहेत. किती आहे किंमत? Kia च्या या इलेक्ट्रिक कारचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एका व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 59. 95 लाख रुपये आहे. ज्यामध्ये फ्रंट-माउंटेड सिंगल मोटरसह टू-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशन दिले गेले आहे. ही मोटर 229 पीएस पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. तर इतर व्हेरियंटमध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे. त्याची मोटर 325 पीएस पॉवर आणि 605 एनएम टॉर्क जनरेट करते. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 64. 95 लाख रुपये आहे. Kia EV6 मध्ये 77. 4 kWh चा बॅटरी पॅक मिळतो. जो एका चार्जवर 708 किलोमीटरपर्यंत चालवता येतो. ही कार 350kW DC फास्ट चार्जरसह 10-80% चार्ज होण्यासाठी फक्त 18 मिनिटे घेते. याशिवाय महेंद्र सिंह धोनीकडे इतरही अनेक आलिशान कार आहेत, ज्यात जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, लँड रोव्हर, मर्सिडीज-बेंझ जीएलई, ऑडी क्यू7 सारख्या कारचा समावेश आहे. दरम्यान, अलीकडेच धोनी Yamaha RD 350 बाईक चालवताना दिसला होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या कलेक्शनमध्ये Yamaha RD350 LC चा समावेश केला आहे. हे बाईक चंदीगड येथील ब्लू स्मोक कस्टम्सची रिस्टोअर केलेली Yamaha RD350LC आहे. संबंधित बातमीः Car loan Information: |
पावकी अंतःकरण, सतीशचंद्र पुनः ह्मणाला "शकुनि ! तुझ्या सांगण्यावरूनच हे काम केले; परंतु त्याचें फळ काय झाले आहे : परलोकास तर मी आधीच अंतरलो आहे, आणि आतां इहलोकासहि मुकण्याची पोळी आली आहे! या घोर पापसागरांत मला तूच बुडविलें आहेस ! तुझ्यामुळेच मी आपल्या स्वतावर हीं भयंकर संकटे ओढून घेतली आहेत! आतां तूं आणखी काय करणार आहेस? माझातर सर्व नाश केलासच! जा, आतां आणखी कोणा दुसऱ्या वैभवशाली मनुष्याचा सत्यनाश करण्याच्या कार्यास लाग ! मीहि आतां घोर मापाला जर कांहीं प्रायश्चित्त असले तर तें घेण्याच्या मार्गास लागतों. " यजमानाचे हे गंभीर शब्द ऐकून शकुनि चकितच झाला. आज कांहीं निराळाच प्रकार आहे, हे त्या धूर्त जंबूकानें तत्काळ ताडून आपल्या डोळ्यांत दोनचार कपटाश्रु आणून गद्गदस्वरानें झटलें 'यजमानांची आपल्यावर पूर्ण कृपादृष्टि असावी, हीच कायती यजमानांच्या उत्कर्षकाळीं माझी अभिलाषा होती. आज जर यजमानांवर खरोखरच एखादा महत्प्रसंग गुदरला असेल तर त्यांतहि आपल्या धन्याबरोबर वांटा • घेण्यास हा बंदा अगदर्दी एका पायावर तयार आहे. " सतीशचंद्र आवेशानें म्हणाला " शकुनि ! तूं फार मिठ्या तोंडाचा आहेस. या अशा विषमय अंतःकरणास ब्रह्मा इतकी मधुर जिव्हा कां देतो, कांहीं कळत नाहीं ! " "महाराज, मी महान् पातकी आहें, हैच खरें. कारण, तसे नसतें तर स्वामिभक्तीचा हा असा मोबदला कां मिळता ?" इतकें बोलून शकुनीनें आणखी दोनचार अश्रु डोळ्यांबाहेर काढिले. हे पाहून सतीशचंद्र काहीं शांत होऊन म्हणाला "माझ्याच उन्नत्यर्थ तूं अहर्निश झटत असतोस, हे मला ठाऊक आहे; पण पापमार्गात सर्वदा भयच असतें. या मार्गाखेरीज उन्नति करून घेण्याचा दुसरा मार्गच नव्हता का राजा तोडरमल. आपले अश्रुबिंदु अगदींच निष्फळ झाले नाहींत असें पाहून शंकुनि आपला कंठ अधिकच सद्गदित करून म्हणाला "स्वामिभक्ति हें जर पास असेल, तर खरोखरच मी पापिष्ट आहे. त्याहून दुसरे पा मला ठाऊक नाहीं. "" "नाहीं ठाऊक? बंगचूडामणि राजा समरसिंह याचा घात करण्या विषयीं माझ्या कानांत विष कोणीं ओतलें ?" "राजाज्ञेनेंच त्याचा वध झाला आहे. " "बरें, त्याच्या जमीदारीचा सध्या कोण उपभोग घेत आहे ? " "बंगालच्या सुभेदारानें स्वेच्छेनें जें कांहीं एखाद्यास दान दिलें तें स्वीकारणें हें त्याचें कर्तव्यच आहे. " "शकुनि ! आतां आणखी गोडगोड बोलून माझ्या बुद्धीला भुरळ पाडूं नकोस. आज माझे ज्ञानचक्षु उघडले आहेत व त्यांच्या द्वारें मल माझ्या हृदयांत इतका अंधार, इतकें पाप दिसत आहे कीं, तिकडे माझ्यानें पहावतहि नाहीं ! आज माझ्या कन्येनें मला उपदेशामृ पाजून शुद्धीवर आणलें. " इतकें बोलून सतीशचंद्रानें विमलेच्य भेटीची हकीगत शकुनीला सांगितली. त्यावर शकुनि किंचित् धिक्काराच्या आवाजानें ह्मणाला "बंगदेशचे राजाधिराज दिवाण सतीशचंद्र यांनां एखाद्या क्षुद्र पोरीच्या भाषणाने इतकी भीति वाटावी ? " "पण बालिका जर खरें सांगते, तर तें बालिकेच्या मुखांतू निघालें आहे ह्मणून त्याचा उपहास करणें अगदर्दी मूर्खपणाचें होईल पापमार्ग सर्वदाच . अनिष्टकारक आहे, हे मला आज इतक्य दिवसांनी कळून चुकले आहे. " "बरें, पण मी विचारतों कीं, आपणावर असें संकटतरी कोण झालें आहे ?" पातकी अंतःकरण. "राजा तोडरमल्ल पहिल्यानेंच बंगाल आणि बहार हे देश पादाक्रांत करून दिल्लीस परत गेले, त्या गोष्टीला आज सहा वर्षे झालीः तोडरमल दिल्लीस जातात न जातात तोंच पुण्यात्मा समरसिंह याचा मीं कपटानें वध केला. या दुष्ट कृत्यास तूंच मलां प्रवर्त केलें होतेंस !" "दिल्लीच्या बादशहाचा बंग आणि बहार देशांचा सेनापति मनाइखान यानें समरसिंहास प्राणदंडाची शिक्षा दिली. " "तें खरें, परंतु आमच्याच कृष्णकारस्थानांमुळे तें कारस्थानांमुळे ते घडून आलें. त्यानंतर दोन वर्षांनी जेव्हां राजा तोडरमल यांनीं दुसऱ्यांदा बंगदेश जिंकिला, तेव्हां समरसिंहाच्या वधाविषयीं आपल्यास कसकुशा खोट्यानाव्या गोष्टी जुळवाव्या लागल्या व जीव बचावण्यास केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागले, तें तुला आठवतच असेल. " "बरें पुढें?" " पुढे काय ? आँतां राजा तोडरमल बंगदेशचे सेनापति व सुभेदार होऊन पुनः मुंगेरीस येत आहेत. आतां मात्र आपला कांहीं निभाव लागण्याची आशा नाहीं. " "ज्या कौशल्याने आजवर ही गोष्ट अगदीं गुप्त ठेवितां आली, तें कौशल्य आतां कां ह्मणूनं व्यर्थ होईल ? " " दूरदर्शी तोडरमल्लापुढें माझें कौशल्य टिकणार नाहीं. तूं त्यांनां पुरतेपणीं ओळखले नाहींस ! " "पण हाच दूरदर्शी राजा एकवार आपल्या कौशल्याने चकला आहे!" "होय, खरें. मण तेव्हां ते एकदोन महिन्याकरितांच आले होते. या वेळीं सुभेदार होऊन आले आहेत. यामुळे त्यांचा बरेच दिवस मुक्काम होईल. शकुनि ! आतां तुझ्यानें माझें मन वळविण्याचा प्रयत्न होणार नाहीं. मी त्यांच्याकडे जाऊन सर्व खरी खरी हकीगत सांगेन व त्यांची क्षमा मागेन. त्यांनी मला एकवार क्षमा केली आहे. तशीच या वेळींहि करतील, असा संभव आहे. नंतर मी या पापपूर्ण |
पिंपरी : मुख्यमंत्री पदी 'पुन्हा येईन' चा देवेंद्र फडणवीस यांचा नारा फोल ठरला. पण आता जनतेचा आशीर्वाद सोबत असल्यास 'आपण येतोच' असा नारा त्यांनी दिला आहे. पुण्याच्या आळंदीत जोग महाराजांच्या स्मृती सोहळ्यात ते बोलत होते. राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत येत राहतात. पण आपण सत्तेत असो की विरोधात सन्मार्ग मात्र सोडू नये. याच सन्मार्गावर चालायचं असेल तर आपल्याला टॉनिक लागतं. ते टॉनिक अर्थात आशीर्वाद घ्यायला इथे आलोय. जनतेचा हा आशीर्वाद सोबत असला की 'आपण येतोच, येतोच आणि येतोच' असा नवा नारा फडणवीसांनी दिला. आळंदी येथील जोग महाराज स्मृती सोहळ्यानंतर ते म्हणाले की, मी तीन वर्षांपूर्वी या सोहळ्यासाठी आलो होतो, पुढच्या वर्षीही मी पुन्हा येईन. ते म्हणाले, अनेकदा आपण संकुचित विचारांच्या गोष्टी करतो, मात्र संतांनी कधीच असा संकुचित विचार केला नाही. अलीकडच्या काळात सेक्युलर हा शब्द अधिक वापरला जातोय. या शब्दाचा अर्थ काय यावर अनेक वाद होतात. पण याचा खरा अर्थ आणि व्यापक विचार हा वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांच्या यायला कोणतीही अट नाही. म्हणूनच प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने वळतात, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, अजून माझ्या हातून सत कार्य न झाल्याने मी सत्कार स्वीकारत नाही. जे कामं आणि निर्णय घेतले ते कर्तव्य होतं. त्यामुळे आज सत्कार घेण्यासाठी नव्हे तर आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. ते म्हणाले की, राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत जात असतात. पण आपण सन्मार्ग सोडू नये आणि या सन्मार्गावर चालण्यासाठी टॉनिक लागतं. ते घ्यायला इथे आलोय. तो आशीर्वाद घ्यायला आलोय, हा आशीर्वाद सोबत असला की आपण येतोच, येतोच आणि येतोच, असं ते म्हणाले. काल शरद पवार यांनी देखील याठिकाणी आले होते. 'पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका', असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. त्यावर विठ्ठलाच्या दर्शनाला, माऊलींच्या दर्शनाला किंवा तुकोबारायांच्या दर्शनाला आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. |
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची हत्या करण्याता आली आहे. शनिवारी रात्री गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. |
भरगच्च खुमन लंपाक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने वर्चस्व सिद्ध केले. अर्जेंटिनाने पनामा देशावर २-० असा विजय मिळवला. पोर्तुगालच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लढती खेळणारा खेळाडू ठरला आहे. गोलकीपर जोमात विरोधी टीम कोमात! हा राडा रोखताना पंचांची चांगलीच तारांबळ उडाली. स्टेडियमवरील वातावरण तणावपूर्ण झालं. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे. |
सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. नाशिक : सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. दोनदिवसीय जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवसाच्या सत्राचे उद्घाटन मेळाव्याचे अध्यक्ष नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्या बीजभाषणाने झाले. वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दत्ता पाटील यांनी साहित्यासह विविध विषयांना हात घालत आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. आपल्या सभोवताली एकमेकांना नाकारणारी नवी व्यवस्था तयार व्हायला लागली असून, चर्चा आणि वाद यातील सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. चर्चा म्हणजेच वाद असे नवीन समीकरण तयार होऊ लागले आहे, हे सांगताना दत्ता पाटील यांनी सोशल मीडियावर जातीधर्मावरून, राजकारणावरून चाललेल्या उन्मादयुक्त व्हर्च्युअल दंगली डोळ्यांना सहजपणे दिसत असल्याचे सांगितले. चर्चेच्या पलीकडे पोहचलेले नेटिझन्स अतिशय उन्मादाने वावरत असून, ही एकप्रकारची हिंसाच आहे आणि ती शारीरिक हिंसेपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगताना अशा व्यवस्थेवर ज्यांनी नियंत्रण राखायला हवे, अशा यंत्रणाच सोशल माध्यमांच्या पोशिंद्या आहेत हे ठळकपणे अधोरेखित केले तसेच आजच्या लेखकांच्या पिढीला याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे आवाहन केले. जागतिकी करणानंतर खेडोपाडी अनेक स्थित्यंतरे बघायला मिळू लागली आहेत, मातीशी घट्ट नाळ असल्याशिवाय समकालीन भान येत नाही. अलीकडच्या काळात मातीतले लिहिणाºयांना पुरस्कारांच्या पातळीवर बसवत तातडीने त्यांना संपवून टाकण्याची घाई झाली असल्याचेही सांगितले. साहित्याची समाजकारण, राजकारणापासून फारकत होऊच शकत नाही तसेच जीवनशैलीवर राजकीय आणि जातीपातीच्या, धार्मिकतेच्या उन्मादी वातावरणाचा मोठा प्रभाव आहे हे वास्तव नाकारून चालत नाही तसेच आपल्याला या गोष्टींपासून अलिप्त राहताच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण होऊ लागली आहे. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अॅड अभिजीत बगदे, सांस्कृतिक कार्यसचिव जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह आमदार देवयानी फरांदे आणि सुहास फरांदे उपस्थित होते. |
मेष : चित्त स्थिर नसल्याने 'तळ्यात मळ्यात' होईल. व्यक्तिचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. वृषभ : काहीतरी भव्यदिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील. सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा. मिथुन : तडजोडीचे धोरण ठेवून इतरांशी वागावे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कर्क : नवीन कामांची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. कलाकार खेळाडूंना मान मिळेल. सिंह : व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. नवीन योजना हाती घ्याल. कन्या : दैवाची साथ. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. अनपेक्षित फायदा महत्वाचे पत्रव्यवहार होतील. तूळ : अचानक सर्व काही सुरळीत झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. वृश्चिक : नोकरी व्यवसायात मनातील इच्छा सफल होतील. महत्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. धनु : व्यवसायात मेहनत व चिकाटीने कामे शक्य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. मकर : आळस झाडून उमेदीने कामाला लागा. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर जास्त भर दया. कुंभ : तुमच्या वागण्या बोलण्याने तुम्ही इतरांची मने जिंकून घ्याल. नम्र व संयमाने वागून कामे पूर्ण करा. मीन : नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी. |
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल. हा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मनःशांती ढळेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात. तुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वतःकडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वतःशी व स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे नबम तुकी ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल. कुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे. |
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नव्या चित्रपटाबाबत मोठी घोषणा झाली आहे. अजय देवगणने शनिवारी सांगितले की, 'त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मैदान' १५ ऑक्टोबर २०२१ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ' दरम्यान अजय देवगणचा हा चित्रपट स्वातंत्र्यानंतर भारतीय फुटबॉल संघाला एका शिखरावर पोहोचवणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधरित आहे. अजयचा 'मैदान' हा चित्रपट पहिल्यांदा ऑगस्ट २०२१मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे 'मैदान' हा अनेक भाषेत प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह, तामिळ, तेलुगू, मल्याळम या भाषेत अजयचा 'मैदान' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण सय्यद अब्दुल रहीम ही मुख्य भूमिका साकारणार आहे. सय्यद अब्दुल रहीम हे १९५० पासून ते १९६३ पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे कोच आणि मॅनेजर होते. दरम्यान 'मैदान' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा करत आहेत. अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणि, गजराज राव आणि बोमन इराणी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार करणार आहेत. हेही वाचा - 'गली बॉय'नंतर रणवीरसोबत पुन्हा एकत्र दिसणार आलिया! |
शेवगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी शेवगावच्या बाजारपेठेत मात्र अजूनही विनामास्क किंवा मास्क खाली गळ्यावर उतरून फिरणाऱ्यांची संख्या आहे तीच आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीची ठिकाणे कोरोनाचा विस्फोट करण्यास कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे. विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या अशा लोकांमुळे संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळी बाराच्या सुमारास बाजारपेठ, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, हॉटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत हे गंभीर वास्तव समोर आले. तालुक्यात काही प्रमाणात कोरोना संसर्गात वाढ होत आहे. कोरोनाची एन्ट्री झाल्यावर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केलेला असताना शेवगाव तालुका कोरोना संसर्गापासून तब्बल अडीच महिने अबाधित राहिला होता. त्यानंतर कोरोनाचा शिरकाव होताच झपाट्याने बाधितांची संख्या तालुक्यात वाढली होती. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले होते. दरम्यान मागील काही महिन्यांपासून रुग्ण संख्येत घट होत असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चिंता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला जात आहे. मात्र तरीही नागरिकांची बेफिकिरी वाढतच असल्याचे चित्र बाजारपेठेत व सार्वजनिक ठिकाणी दिसत आहे. अनेक भाजी, फळ, विक्रेते नाका तोंडाला बांधलेला रूमाल ग्राहकांशी बोलण्यासाठी गळ्यावर उतरवून ठेवतात. बसस्थानक परिसरात अनेक शाळकरी मुले, काही नागरिक विनामास्क वावरताना दिसून आले. मास्क वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र असले तरी गर्दीत तीन ते चार लोक विनामास्क वावरतच आहेत. विनामास्क वावरणाऱ्यांपासूनच सर्वाधिक धोका आहे. विशेष म्हणजे बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. अनेक दुकानदारच विनामास्क असतात. पोलीस ठाणे, तहसील कार्यालयाच्या आवारात बहुतेक नागरिकांनी कारवाईच्या भीतीने व स्वतःची काळजी घेताना तोंडाला मास्क बांधलेला दिसला. मात्र दोन-तीन टाळके मास्क न लावता वावरत होते. बसस्थानक परिसरात बहुतांश शाळकरी विद्यार्थी विनामास्क होते. बहुतांश प्रवाशांनी मास्क लावलेला होता. तर ५ ते १० टक्के लोकांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अनेक जण कोरोना आजाराला हलक्यात घेऊन वावरताना पाहिला मिळाले. बहुतांश हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी झालेली पहायला मिळाली. ग्रामीण रुग्णालयात बहुतांश नागरिक काळजी घेताना दिसले. तोंडाला मास्क बांधलेले होते. मात्र उपस्थित लोकांमध्ये १० ते १५ लोकांनी मास्क लावलेला नव्हता. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे. विनामास्क फिरताना दिसून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. -प्रभाकर पाटील, शेवगाव बसस्थानकावरील गर्दी. |
श्री. हेमंत टकले...... वाहतूक करणाऱ्या बसेस, ट्रेलर, ट्रॅक्टर या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. मुंबई-पुणेबेंगलोर एक्स्प्रेसच्या रस्त्याची प्रायोरिटी लक्षात घेऊन त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ट्रेलरची वाहतूक मुंबई-आग्रा हायवेकडे वळविण्यात आली. त्या ट्रेलर्सना मुंबई-पुणे या हायवेवरुन जाण्यास न सांगता, त्या ट्रेलर्सना मुंबई-नाशिक-पुणे असा प्रवास करून पुढे जाण्यास सांगितले. या ट्रेलरचा वाढता व्याप एका हायवेवरून दुसऱ्या हायवे वर टाकण्यात आला महोदय, दोन-तीन आठवड्यापूर्वी माझे एक मित्र मुंबईतील कामे आटोपून दुपारी 4.00 वाजता मुंबई-नाशिक एक्स्प्रेस या रस्त्यावरून नाशिकला निघाले होते. या एक्स्प्रेसवरील घोटीइगतपुरी दरम्यान सर्व्हस रोडच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूवर जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्या सर्व्हस रोडवरुन एक माणूस सायकरुन जात होता. मागच्या कॅरिअरवर त्या व्यक्तीची आई आणि पुढे मुलगा बसलेला होता. इकडे-तिकडे न बघता त्या व्यक्तीची सायकल हायवेवर आली. त्या हायवेवर छोट्या छोट्या गाड्या वेगात धावत होत्या. त्यातील एका गाडीने त्या सायकलवरील व्यक्तीला उडविले आणि त्यात तिघांपैकी दोघे जण जागीच ठार झाले. त्यानंतर त्या भागात आंदोलन झाले. त्या हायवेच्या दोन्ही बाजूला 10-10 कि.मी. अंतरापर्यंत 5 तास वाहतूक ठप्प इ ाली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई वगैरे मिळते हा भाग निराळा. परंतु ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरातील लोकांना सबवे करुन देण्याचे आश्वासन अगोदरच देण्यात आले होते. किंबहुना गावकऱ्यांची तशी मागणी होती. परंतु तो सबवे करण्यात आला नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की, ज्यामुळे लोकांना आपले आपल्याकडे रस्त्यांच्या बाबतीत नॅशनल हायवे ऑथॉरिटी, जिल्हा परिषदांच्या रस्त्याची ऑथॉरिटी, राज्याची ऑथॉरिटी असे प्रकार आहेत. शिवाय ज्यांनी ज्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी महान काम केले ते ठेकेदार सुध्दा त्यांचा एक भाग असतो. प्रसिद्धीसाठी नोह महोदय, माझ्या एका सहकाऱ्यांनी बीडवरून जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत प्रश्न विचारला होता. त्यांचे म्हणणे होते की, त्या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावावयास पाहिजेत. परंतु बांधकाम विभागाने असे उत्तर दिले की, तो श्री. हेमंत टकले..... रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांनी सर्वेक्षण केल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. मग दरम्यानच्या काळात त्या भागातील लोकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. वास्तविक पाहता या सर्व यंत्रणांची एखादा प्रश्न सोडविण्याऐवजी तो प्रश्न अधिक गुंतागुंतीचा कसा होत जाईल अशी मानसिकता असेल तर त्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. महोदय, राज्याच्या आरोग्य विभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही अतिशय चांगली योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 900 अॅम्ब्युलन्स पुरविण्यात आलेल्या आहेत. त्या कोठे आहेत, त्यांचा उपयोग कसा होता हा आजच्या चर्चेचा विषय नाही. त्यावर सभागृहात ज्यावेळी चर्चा उपस्थित होईल त्यावेळी बोलता येईल. परंतु या योजनेतील अॅम्ब्युलन्स आणि महामहार्गावर होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या अॅम्ब्युलन्स यामध्ये राज्य सरकार काही फरक करणार आहे की नाही ? महोदय, कोकणातील लोक नेहमी मुंबई-गोवा हायवेवरून प्रवास करतात. या हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या निमित्ताने मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की, राज्यात 1210 अपघातांची ठिकाणे आहेत. त्यात मुंबईमध्ये 392, पुणे येथे 158, नाशिक येथे 286, औरंगाबाद येथे 195, अमरावती येथे 107 आणि नागपूर येथे 72 ठिकाणे आहेत. ही अधिकृत सर्वेक्षणातून आलेली नोंद आहे. या ठिकाणांवरील अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या सोयी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपल्याकडे विभागवार आकडेवारी असेल तर एकूण राज्याचा आणि जनतेचा विचार ज्यावेळी करतो त्यावेळी हे बोलण्यापुरते ठीक आहे. यातून धोरण आणि त्या धोरणांची अंमलबजावणी ही प्रक्रिया कागदोपत्री सुस्पष्ट आणि परिणामकारक ठरावी अशी वाटणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करीत असताना त्या भागातील जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावयास पाहिजे. या बाबतीत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची खात्री दिली तर चांगले होईल. सिद्धीसाठी नाही |
असे हतबल झाले मुकेश अंबानी (फाइल फोटो) नवी दिल्ली. अनिल अंबानी यांना मोठा झटका बसला आहे, ज्यानंतर समोर आलं आहे की त्यांचे मोठे बंधू आणि देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी इच्छा असून देखील त्यांना मदत करु शकत नाहीत. याचं कारण आहे बाॅम्बे हायकोर्टाने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायंस कम्युनिकेशन्स (आरकाॅम) च्या विरोधात दिलेला निर्णय. आरकाॅम यानंतर आपले कोणतेही अॅसेट कोर्टाच्या परवानगी शिवाय विकू शकणार नाही. आरकाॅम कर्जात बुडाली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने मुकेश अंबानी यांच्या जिओशी आपले अॅसेट्स विकण्यासाठी मोठी डील केली होती. आरकाॅम वर 45 हजार कोटींच (मार्च 2017) कर्ज आहे. लेंडर्सच्या दबावामुळे अनिल अंबानी यांनी डिसेंबर 2017 मध्य कर्ज फेडण्यासाठी एक प्लॅन सादर केला होता. यामध्ये त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी मोठी मदद देऊ केली होती. अनिल अंबानी यांनी मोठे बंधू मुकेश यांच्या जिओ कंपनी सोबत हजारो करोड रुपयांची डीलची घोषणा केली होती. यानुसार आरकाॅमचे अॅसेट्स विकण्याचा प्रस्ताव होता. पण कोर्टाच्या आदेशामुळे मुकेश अंबानी देखील हतबल झाले आणि अनिल अंबानींच्या देखील अडचणी वाढल्या. स्वीडनची कंपनी इरिक्सनच्या भारतीय सब्सिडियरीने आरकाॅमच्या देशभरातील नेटवर्कला आॅपरेट आणि व्यवस्थापनासाठी सात वर्षांचा करार केला होता. या कराराअंतर्गत कंपनीची आरकाॅम कडे 1155 करोड रुपयांची बाकी आहे. यामुळे कंपनीने सप्टेंबर 2017 मध्ये आरकाॅमच्या विरोधात इनसाॅल्व्हंसी पिटीशन दाखल केली होती आणि बाकी रकम मिळण्याची विनंती केली होती. आॅर्बिट्रेशन कोर्टाने या याचिकेनंतर आरकाॅमला मोठा झटका दिला आणि आरकाॅम व तिच्य़ा अन्य दोन कंपन्यांचे अॅसेट मंजूरी शिवाय विकण्याचा प्रतिंबंध लावला. |
मुंबई, 12 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेशची टीम (Bangladesh Cricket Team) जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर न्यूझीलंड या दोन देशांना पराभूत करत सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या या टी20 सीरिजमध्ये यजनान टीमनं आधी ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा फडशा पाडला. त्यानंतर न्यूझीलंडचा या ऐतिहासिक विजयानंतरही बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) नाराज झाला आहे. त्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डावरच (BCB) नाराजी व्यक्त केली आहे. शाकिबनं ढाकामधील एका कार्यक्रमात सांगितलं की, 'ज्यांनी बांगलादेशमध्ये मागील 9-10 मॅच खेळल्या. त्यापाैकी जवळपास कुणीही फॉर्मात नव्हते. कुणीही या पिचवर चांगली बॅटींग केली नाही. त्यामुळे आपण या कामगिरीचा फार विचार केला नाही तरच बरं होईल. या पिचवर कोणताही बॅट्समन 10-15 मॅच खेळला तर त्याचं करिअर उद्धवस्त होईल,' असा गंभीर इशारा शाकिबनं दिला आहे. शाकिब पुढे म्हणाला की, ' आमची टीम वर्ल्ड कपच्या 15-16 दिवस आधी ओमानमध्ये असेल. पिच आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास या वेळेचा मोठा उपयोग होईल. बांगलादेशमधील पिच आणि परिस्थितीचा आमच्यावर काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही. आम्हाला जिंकण्याची सवय लागलीय. आमच्या मानसिकतेमध्येही बदल झाला आहे. याचा वर्ल्ड कपमध्ये नक्की फायदा होईल. ' असा दावा शाकिबनं केला. T20 वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत खेळण्यासाठी बांगलादेशला पहिल्यांदा पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. बांगलादेशची पहिली लढत 17 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे. बांगलादेशचे मुस्तफिजूर रहमान (राजस्थान रॉयल्स) आणि शाकिब अल हसन (कोलकाता नाईट रायडर्स) हे दोन खेळाडू टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलमध्ये खेळणार आहेत. आयपीएलमध्ये खेळल्याचाही आम्हाला फायदा होईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये आमचा हा अनुभव टीमच्या फायद्याचा ठरेल, अशी आशाही शाकिबनं व्यक्त केली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन दुर्घटनेत डोळ्यासमोर झालेला भावाचा दुर्देवी मृत्यू, तोंडावर आलेली परिक्षा, सुरू असलेले उपचार अशा परिस्थितीत बीकॉमच्या द्वितीय वर्षातील सत्र परिक्षा कशी द्यायची हा प्रश्न जखमी आकाश परबला पडला होता. परंतु, मुंबई विद्यापीठ या आकाशच्या मदतीला धावून आले आहे. कारण मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी व विक्रोळी महाविद्यालयातील प्रतिनिधी यांनी स्वतः आकाशच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतली. विद्यापीठाच्या नियमानुसार त्याला वाढीव एक तास सुद्धा देण्यात आला होता. एलफिन्स्टन दुर्घटनेत जखमी झालेले अनेकजण अजूनही त्या गंभीर धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतायेत. त्यापैकीच एक भांडूपच्या रामानंद आर्य़ डीएव्ही महाविद्यालयात बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी आकाश परब. लहान भावाच्या दुर्देवी मृत्यूच दुःख, स्वतःला होणाऱ्या वेदना, तोंडावर आलेली तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा अशा तिहेरी संकटांचा सामना तो अनेक दिवसांपासून करत होता. अचानक झालेल्या अपघातात भावाला गमावल्याने आधीच दुःखाचं डोंगर कोसळलेले असताना, परीक्षा तर द्यायचीय, पण ते कसं या विचारात तो मनातल्या मनात कुंचत होता. पण आकाशच्या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पुढाकार घेत आकाशच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आकाशने परीक्षा द्यावी, याकरता त्यांनी परीक्षा विभागाला तात्काळ पाऊले उचलण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक ड़ॉ. अर्जुन घाटुळे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन आकाश परबची चौकशी केली. रुग्णालयातून आकाशच्या घरचा पत्ता घेऊन त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला राहत्या घरीच परीक्षा देता येईल, असे आश्वासन दिलंय. त्यानुसार शुक्रवारी विद्यापीठाने आपले प्रतिनिधी आणि महाविद्यालयातील शिक्षक यांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेऊन आकाशच्या घरी परीक्षा घेण्यासाठी पाठवले. परीक्षा लिहताना येणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून विद्यापीठाने नियमाच्या अनुषंगाने त्याला एक तास वाढवूनही दिला. इतकंच नाहीतर नुकत्याच सुरू झालेल्या बीकॉम द्वितीय वर्ष(सत्र तीन)चे आकाशचे उर्वरित पेपरही त्याला त्याच्या राहत्या घरीच देता येणार याची विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे. माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव लिलाधर बनसोड म्हणाले की, "कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पुढाकार घेतलाय. शिवाय आकाश परबला स्वतःहून परीक्षा द्यायची इच्छा होती. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थांची परीक्षा द्यायची इच्छा असल्यास आम्ही त्याला अडवू शकत नाही. म्हणूनच केईएम रुग्णालयात जाऊन आकाशच्या प्रकृतीची चौकशी करून त्याला राहत्या घरीच परीक्षा देता येईल, असा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार विद्यापीठाचे प्रतिनिधी व महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रश्नपत्रिका आकाशच्या घरी घेऊन गेले. आणि आकाशने परीक्षा दिली." |
नवी दिल्ली, 11 मार्च : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सवर्णांसाठी लागू केलेल्या 10 टक्के आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं. दरम्यान, हे आरक्षण स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा युक्तिवाद केला होता. पण, न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. सवर्णांसाठी लागू करण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता 78 टक्क्यांवर गेले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापना, मंडळे, महामंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. राज्यातील मराठा समाजाचा समावेश 'एसईबीसी' राखीव प्रवर्गात केल्याने त्यांना राज्यातील 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. पण केंद्राच्या राखीव प्रवर्गाच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येईल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
खर्चात काटकसर करून नव्हे तर अधिकाºयांच्या वेतनावरील खर्च कमी झाल्याने पालिकेच्या आस्थापना खर्चात कपात झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. उपायुक्तांसह अन्य प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पदे रिक्त असल्याने आस्थापना खर्च ४८ टक्क्यापर्यंत कमी झाल्याचा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द महापालिका आयुक्तांनी केला आहे. अमरावती : खर्चात काटकसर करून नव्हे तर अधिकाºयांच्या वेतनावरील खर्च कमी झाल्याने पालिकेच्या आस्थापना खर्चात कपात झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. उपायुक्तांसह अन्य प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पदे रिक्त असल्याने आस्थापना खर्च ४८ टक्क्यापर्यंत कमी झाल्याचा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द महापालिका आयुक्तांनी केला आहे. शासन निर्देशानुसार 'ड' वर्ग महापालिकेचे आस्थापना खर्चाची विहित मर्यादा ३५ टक्के इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात आस्थापना खर्च ६५ टक्क्यापर्यंत पोहोचल्याची अनियमितता लेखापरीक्षकांनी नोंदविली होती. आस्थापना खर्चात वाढ झाल्याने नवीन पदे व नोकरभरतीवर राज्य सरकारने टाच आणली आहे. त्या पार्श्वभूमिवर आस्थापना खर्चात काटकसर करून तो ३५ टक्क्यापर्यंत आणणे, प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होत असताना काटकसर केल्याने नव्हे तर तात्पुरत्या पदभारांनी त्यात कमी आल्याची वस्तुस्थिती आहे. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील महापालिकेच्या एकूण महसुली उत्पन्नाशी आस्थापना खर्चाची टक्केवारी ६० टक्के इतकी होती. राज्य शासनाने ४ मे २००६ च्या निर्णयान्वये आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्केपर्यंत घालून दिली आहे. मात्र, तो खर्च ६० ते ६५ टक्क्यापर्यंत पोहोचल्याने पालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यात कपात करण्यासाठी कंत्राटी तत्वावर काम करणाºयांना अर्धवेळ - अर्धवेतन करण्यात आले. याशिवाय काटकसर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात फारशी प्रगती होवू शकली नाही. मात्र प्रतिनियुक्तीच्या अधिकाºयांसह अनेक पदांवर प्रभारी नियुक्ती दिल्याने वेतन खर्चात मोठी कपात झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर सन २०१७-१८ मध्ये महापालिकेस प्राप्त प्रत्यक्ष उत्पन्न २०४. ५४ कोटी असून आस्थापना खर्चाची टक्केवारी ६५ टक्के इतकी आहे. अर्थात २०१२-१३ च्या तुलनेत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात आस्थापना खर्चात सुमारे १७ टक्क्यांची कपात विनासायास झाली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांची पदे रिक्त असताना सहायक आयुक्त व अधीक्षकांच्या जागेवर वरिष्ठ लिपिकांना चार्ज देण्यात आला आहे. सुनील पकडे, मंगेश वाटाणे, दुर्गादास मिसाळ, प्रमोद येवतीकर हे वरिष्ठ लिपिकाचे वेतन घेतात. मात्र मूळ पदाऐवजी त्यांचेकडे अन्य प्रभार देण्यात आला आहे. अमित डेंगरे व योगेश पिठे हे अनुक्रमे सिस्टिम मॅनेजर व सांख्यिकी अधिकारी आहेत. त्यांचेकडे सहायक आयुक्तांचा पदभार असला तरी वेतन मात्र त्यांना त्यांच्या मूळ पदाचे मिळत आहे. अनंत पोतदार या कंत्राटी सेवानिवृत्ताकडे तूर्तास कार्यकारी अभियंता १ व २ चा चार्ज असल्याने दोन्ही पदावरील व्यक्तींच्या वेतनावर होणाºया खर्चात कपात झाली आहे. महापालिकेचे दोन्ही उपायुक्तपदावर तूर्तास वर्ष-दीड वर्षापासून महापालिका आस्थापनेवरील अधिकाºयांचा वावर आहे. नरेंद्र वानखडे महिला बालविकास अधिकारी, तर महेश देशमुख पर्यावरण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे उपायुक्त पदाचा चार्ज असला तरी त्यांना वेतन मात्र त्यांच्या मुळपदाचे मिळत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील उपायुक्तांच्या वेतनावर होणारा २४ लाखांचा वार्षिक खर्च वाचला आहे. याशिवाय शहर अभियंता, कार्यकारी अभियंता पदावर कंत्राटी व्यक्ती असल्याने पदावर होणारा खर्च वाचला आहे. |
गेल्या काही महिन्यांत आशियाच्या काही भागांत बीजिंगच्या आक्रमक पवित्र्यानंतर जपानचे हे असे पहिले विधान आहे. नवी दिल्लीः चीनबरोबर लडाखमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आणि जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सेस (जेएमएसडीएफ) यांनी हिंदी महासागरात एक संयुक्त युद्धसराव केला आहे. शनिवारी हा युद्धसराव करण्यात आला असून, जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा युद्धसराव पार पडल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांनी चीनच्या संरक्षण क्षमतांवरच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील चीनच्या हेतूंवरही चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांत आशियाच्या काही भागांत बीजिंगच्या आक्रमक पवित्र्यानंतर जपानचे हे असे पहिले विधान आहे. भारत-जपान संरक्षण अभ्यासाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान) यांनी दक्षिण चीन समुद्राच्या मालकी हक्काचा वाद आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने सोडविला जावा, असे विधान केले होते. दिल्ली आणि टोकियोनं संरक्षण भागीदारी वाढविण्याच्या प्रयत्नांनंतर मागील तीन वर्षांत जेएमएसडीएफ आणि भारतीय नौदलाच्या दरम्यानचा हा 15वा प्रशिक्षण अभ्यास होता. या युद्धात चार युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये दोन युद्धनौका भारताच्या होत्या आणि दोन जपानच्या युद्धनौका होत्या. आयएनएस राणा आणि आयएनएस कुलुश यांच्यासह जपानी नौदलाचे जेएस काशिमा आणि जेएस शिमायुकी या युद्धसरावात सहभागी झाले होते. सन 2000पासून जेएमएसडीएफ हे जगातील चौथं मोठं नौदल आहे. जपानच्या पाण्यातील क्षेत्रात चीन दावा करत असल्यानं गेल्या काही वर्षांत जपान निरंतर आपला युद्धनौकांचा ताफा वाढवत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात चीनही जपानच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा चीनच्या बऱ्यापैकी भागावर जपाननं कब्जा मिळवला होता. |
Home / इंटरनेट / शेअरचॅट म्हणजे काय आहे आणि यापासून पैसे कसे कमावतात? शेअरचॅट म्हणजे काय आहे आणि यापासून पैसे कसे कमावतात? Sharechat App एक अतिशय लोकप्रिय App आहे. या App च वापर कोट्यावधी लोक करतात आणि जे लोक त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आणि फेसबुकवर स्टेटस ठेवतात ते शेअरचॅट शी नक्कीच परिचित असतील कारण त्यासाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या काळात बरेच लोक Sharechat App वापरतात कारण हा App तुम्हाला भरपूर करमणूक देते, या अॅपमध्ये तुम्हाला या अॅप्लिकेशनमधील व्हिडिओ, फोटो आणि बरेच विनोद पाहायला मिळतात, तुम्ही हे करमणूक अगदी विनामूल्य पाहू शकता आणि तुमचे मित्रदेखील शेअर करू शकता ! आपल्याला विविध प्रकारचे स्टिकर्स देखील पहायला मिळतील, आपण आपले तयार केलेले व्हिडिओ, फोटो या अॅपवर अपलोड करू शकता आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण या शेअरचेट अनुप्रयोगाच्या मदतीने पैसे देखील कमवू शकता, आपल्याला शेअर चॅट या App पासून पैसे कसे कमवायचे हे आम्ही येथे सांगणार आहोत. शेअरचॅट App म्हणजे काय आणि त्यातून पैसे कसे कमवायचे? शेअर चॅट App एक व्हिडिओ स्टेटस App म्हणून ओळखला जातो. आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा एक अतिशय लोकप्रिय व्हिडिओ स्टेटस अॅप आहे .शेअर चॅट 2015 मध्ये लाँच करण्यात आले होते जो आज कोट्यावधी लोक वापरत आहे. शेअरचॅटमध्ये आपणास व्हिडिओ, ऑडिओ आणि संदेश पाहायला मिळतील आणि आपण ते आपल्या कोणत्याही मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह शेअर करू शकता तसेच आपण आपले खाते तयार करून पोस्ट सामायिक करू शकता आणि एखाद्याच्या खात्याचे अनुसरण करू शकता. शेअर चॅट या मध्ये आपण आपला स्वतःचा व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करुन शेअर चॅटवर प्रसिद्ध होऊ शकता आणि आपण जितकी अनोखी सामग्री टाकता तितकीच आपल्या लोकप्रिय होण्याची शक्यता वाढत जाईल शेअरचॅट हे पूर्णपणे विनामूल्य आहे. खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून आपण हे App डाउनलोड करू शकता. जर आपल्याला शेअर चॅटमधून पैसे कमवायचे असतील तर प्रथम आपल्या Followers ला वाढवावे लागेल, आपल्याला दररोज चांगल्या प्रतीची पोस्ट अद्यतनित करावी लागेल. ज्याद्वारे आपण कमवू शकता, आपल्याला बरेच काही करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण व्हाट्सएपवर किंवा आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर कोठेही शेअरचॅट App चा व्हिडिओ शेअर करता, तेव्हा आपण त्या विडिओ द्वारे पैसे कमाऊ शकतो. आणि आपण ही पेमेंट आपल्या पेटीएम खात्यात सहज जमा करू शकतो. शेअरचॅट मध्ये तुमच्याद्वारे मिळविलेली रक्कम परत घेण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणत्याही पैसे काढण्याची प्रक्रिया आवश्यक नाही कारण जेव्हा तुम्ही शेअर चॅट खाते तयार करता तेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करता पण तुमचा तोच नंबर. पेटीएम खाते असणे आवश्यक आहे. अन्यथा आपली मिळवता येणार नाही. आणि शेअरचॅट आपण मिळविलेली रक्कम आपल्या पेटीएमवर जमा करते. दुसरा एक अजून मार्ग आहे त्यात आपण दुसऱ्या व्यक्तीला शेअर चॅट Refer करायचे असते. त्याने जर हे पहिल्यांदाच डाउनलोड केले तर आपल्याला यातून ४० रुपये प्रति Refer पर्यंत पैसे मिळतात. |
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. पुणे, दि. 27 - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये इमारतीचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून लॅबमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही. दलाच्या पाच बंबांसह दोन टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीएल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेच्या आवारामध्ये छोट्या मोठ्या लॅबोरेटरी आहेत. इंडस मॅजिक लॅब नावाची इमारत आहे. या इमारतीला आग लागल्याची माहिती दलाला रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मिळाली होती. तातडीने एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. परंतु, इमारतीला चारही बाजुंनी आगीने वेढा दिलेला असल्यामुळे आणखी कुमक मागवण्यात आली. दलाचे पाच बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, सुनिल गिलबिले यांच्यासह दहा अधिकारी आणि जवळपास ३५ जवानांनी चारही बाजुंनी इमारतीवर पाण्याचा मारा सुरु केला. पाण्याचा मारा करुन अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर थंडाव्याचे काम सुरु करण्यात आले होते. या आगीमध्ये इमारतीचा ८० टक्के भाग जळून खाक झाला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये कोणीही नव्हते. काम संपवून सर्वजण बाहेर पडले होते. या लॅबमध्ये विविध रसायने, केमिकल्स, एलपीजी सिलींडर्स होते. परंतु, सुदैवाने कशाचाही स्फोट झाला नाही. इमारतीजवळ परिसरातील कर्मचारी आणि अधिका-यांनी धाव घेत जवानांना मदत केली. ही आग एवढी तीब्र होती की इमारतीमधील लोखंडाचे खांबही वाकले आहेत. या इमारतीशेजारीच अनेक छोट्या मोठ्या लॅब आहेत. शेजारी असलेली बैठी इमारतीतील लॅब वाचवणे जवानांपुढील आव्हान होते. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला. एनसीएलमध्ये यापुर्वीही अशा प्रकारे आगीच्या दोन - तीन घटना घडलेल्या आहेत. ज्या इमारतीला आग लागली होती त्याशेजारी एक बैठी इमारत आहे. या इमारतीमध्ये हायड्रोजन सिलेंडर्स आणि स्फोट होऊ शकतील असे ज्वालाग्रही केमिकल्स होती. दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता हे सर्व साहित्य विद्युत वेगाने बाहेर काढले. हे सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याने त्याला धग लागू शकली नाही. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जर या साहित्याला धग लागली असती तर आगीने आणखी रौद्ररुप धारण केले असते. अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत मोठा अनथ टाळला. |
इतिहासाच्या दृष्टि ने 'पेटेंट' हा शब्द, लैटिन शब्द Lilterae Patents ने आला आहे. पेटेंट चा अर्थ आहे 'उघडा' आणि Lilterae Patents चे शाब्दिक अर्थ आहे(Letters patents) किंवा उघडे पत्र. पुर्वी शासन किंवा सरकार द्वारे पदवी' हक्क' विशेष अधिकार पत्रा द्वारे दिले जात. हे शासकीय दस्तावेज असत. आणि ते सार्वजनिक रूपात दिले जात म्हणून हे नेहमी 'खुले' राहत होते. यूरोपात 6वीं शताब्दीत अशा प्रकार चे पत्र दिले जात होते. हे शासना द्वारे विदेशी जागे चे शोध आणि त्यावरील मिळवलेले विजयासाठी दिले जात असे. आजकल पेटेंट शब्दाचा प्रयोग आविष्कांराच्या संबंधित होत. पेटेंट कानून सारखे याला समझले जात. 14 मार्च 1474 ला वियाना सिनेट (Venetian Senate) द्वारे पारित केले गेले. आविष्कार पेटेंट आविष्कारांसाठी दिले जाते.'आविष्कार' चे अर्थ त्या प्रक्रिया किंवा उत्पाद ने आहे जे कि औद्योगिक उपयोजन (Industrial application) च्या योग्य आहे. अविष्कार नवीन आणि उपयोगी असावे आणि त्याचा त्या काळातील टेक्नॉलॉजी च्या संदर्भातील माहितीत पुढचे पाऊल असावे. हे आविष्कार त्या कलेत पारंगत व्यक्तिसाठी स्पष्ट (Obvious) पण नसावे. आविष्कार ला भारताच्या पेटेंट अधिनियम धारा 3 च्या प्रकारात पण पाहु शकतो. कोणत्या ही गोष्टी ला आविष्कार तेव्हाच म्हणटले जाते जेव्हा पर्यंत नवीन नसने. जेव्हा एखाद्या गोष्टी चे पूर्वानुमान कोणत्या प्रकाशित दस्तावेज द्वारे करता येते. किंवा पेटेंट अर्ज प्रस्तुत करण्या पूर्वी विश्व मध्ये आणि कुठे प्रयोग केले जाउ शकते तर याला नवीन नाही म्हणता येईल. जर एकादी गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे या पूर्वी कलेच्या रूपात उपलब्ध आहे तर त्याला ही आविष्कार म्हणता येणार नाही. भारत देशात परमाणु उर्जा शी सम्बन्धित आविष्काराचे पेटेंट नाही करू शकत. पेटेंट का दिले जाते- अविष्काराची बरोबर आणि प्रथम घोषणा (माहिती) देण्याच्या एवज मध्ये राज्य निश्चित कालावधि साठी पेटेंट देते. राज्य(सरकार) ला नवीन अविष्काराची माहिती मिळते. तसेच पेटेंट धारकाला निश्चित कालावधि साठी एक्सव अधिकार ! |
अवर्षणग्रस्त परिसराचे पालटले रुपडे! मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जून महिन्याच्या आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसर्गिकरीत्या लाभलेले जंगल हिरवेगार झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा डोंगररांगासह सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील विस्तीर्ण वनराई पसरलेली आहे. या जंगलात विविध वनौषधी आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर अवर्षणग्रस्त झालेला होता. त्यामुळे जंगलाचे संगोपन आणि संवर्धन फारशा प्रमाणात झालेले नव्हते. कारण पाण्याअभवी असंख्य झाडे, झुडपे वाळत चालली होती. वनविभागाने अथक परिश्रम घेऊनही जंगलाचा चेहरामोहरा फारसा बदलत नव्हता परंतु मागील वर्षीही चांगला पावसाळा होता आणि याहीवर्षी चांगला पाऊस होत असल्याने जंगल परिसर हिरव्या शालूने नटल्यासारखा दिसू लागला आहे. दरवर्षी समाधान पाऊस राहिल्यास ही वनराई पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. आजही या जंगलात विविध वनौषधीबरोबरच अनेक प्रकारची जंगली श्वापदांचेही रहिवास आहे. मेशी, डोंगरगाव, खारीपाडा येथील वनकमिटी तसेच वनविभागानेही जंगल संवर्धनाची जागरूकता कायम ठेवण्याचे बोलले जात आहे. |
देवळा : तालुक्याचे भूमिपुत्र व स्वतंत्र देवळा तालुक्याचे निर्माते माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव सोनूजी अहेर यांच्यावर सायंकाळी त्यांच्याच नावाने वसलेल्या दौलतनगर येथील मैदानावर शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 'अमर रहे, अमर रहे डॉक्टर बाबा अमर रहे' अशा घोषणा देत हजारोंच्या साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. सायंकाळी पाच वाजता शववाहिकेद्वारे देवळा येथे डॉ. अहेर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात आले, त्यावेळी जमलेल्या नातेवाईक, हितचिंतकांचा संयमाचा बांध सुटला. प्रत्येकाने आपल्या भावनांना वाट करून दिली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येऊन दौलतनगरमधील डॉ. अहेर यांच्या 'गिरिजा' बंगल्यासमोरील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस यंत्रणेकडून गोळीबाराच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी दुपारी तीन वाजेपासूनच मालेगाव-देवळा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. डॉ. अहेर यांच्या निधनाचे वृत्त सकाळी देवळ्यात कळताच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण व्यवहार बंद ठेवले. संपूर्ण गावात दिवसभर शुकशुकाट होता. अंत्यसंस्कारप्रसंगी आमदार स्नेहलता काळे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, आमदार सुधीर तांबे, आमदार पंकज भुजबळ, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, प्रताप वाघ, माजी आमदार शिरीष कोतवाल, शांताराम अहेर, डॉ. शोभा बच्छाव, संजय चव्हाण, श्रीमती नीलिमा पवार, लक्ष्मण सावजी, विजय साने, सतीश कुलकर्णी, डॉ. हेमलता पाटील, श्रीराम शेटे, डॉ. शशीकांत पवार, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, बाळू पाटील, कारभारी अहेर, आत्माराम कुंभार्डे, डी. जी. सूर्यवंशी, नाना महाले, दत्ता पाटील, प्रकाश वडजे, नितीन पवार, रामचंद्र बापू पाटील, अरुण अहेर, बाळकृष्ण मगर, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. |
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचे परिणाम सर्वच घटकावर होत आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने कुणालाही घराबाहेर पडायचे आदेश नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्त पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत आणि संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत श्री. पावडे यांनी ' संकटकाळी माझं योगदान' हा उपक्रम हाती घेतला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्री. पावडे यांनी पुढाकार घेऊन 'संकटकाळी माझं योगदान' हा उपक्रम राबवित तब्बल ११० हून अधिक जणांचे रक्तदान करुन घेतले आहे. नांदेडमधील तरुणांना रक्तदानासाठी त्यांनी विनंती केली. स्वतः रक्तदान करून सुरुवात केली. तीन दिवसात तब्बल ५० जणांनी रक्तदान केले आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तो रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन जीवाची बाजी लावून काम करत आहे. कर्तव्य बजावत आहेत. याच अनुषंगाने आपणही देशहितासाठी आपला सहभाग द्यावा, रक्तवाचून कुणाचेही प्राण जाऊ नयेत यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'संकटकाळी माझं योगदान' या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पावडे यांनी केले आहे. हा उपक्रम येत्या ता. ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. श्री हुजुर साहिब ब्लड बँक येथे येऊन कुणीही रक्तदान करु शकते. शिवाय रक्तदान त्याची येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही विठ्ठल पावडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुठवडा जाणवत असल्यामुळे नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, दिंगबर कल्याणकर, प्रणव बोडके, केशव कल्याणकर, प्रविण देवणे, शरद कदम, सोपान कल्याणकर, गोपाल इंगोले, जर्नादन कल्याणकर, शिव कल्याणकर, दीपक कल्याणकर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कल्याणकर यांनी केले आहे. |
Amravati News अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ५६ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून ३२ वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच रजईत गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारी घडली. अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ५६ वर्षीय अल्पसंख्याक असहाय महिलेवर बलात्कार करून ३२ वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच रजईत गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारी पथ्रोट येथे घडली. सायंकाळी ४ च्या सुमारास घडलेली ही घटना रात्री साडेआठ वाजता उजेडात आली. मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी विशाल जगन्नाथ नांदूरकर(३२, रा. तांबटकरपुरा, पथ्रोट) याच्याविरुद्ध खून, अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृत महिलेचे शनिवारी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूच्या कारणांचा अधिक खुलासा पोलिसांकडून अपेक्षित आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गावातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह आरोपीने स्वतःच्याच घरात रजईत गुंडाळून लपवून ठेवला होता. यानंतर तो दारूच्या नशेत सायंकाळी पोलिस ठाण्याकडे फिरत असताना अनावश्यक बडबड करीत होता. या बडबडीत माझ्या घरात ती महिला पाय घसरून पडली अन् मेली, असेही तो बोलून गेला. परिसरात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला थांबवून ठेवत त्याच्या बडबडीची दखल घेतली आणि आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला. प्रथमतः त्याला महिला दिसली नाही. तथापि, घरातील गादी आणि रजई खाली पडलेली दिसली. पोलिस कर्मचाऱ्याने ती रजई, गादी सरकवून बघताच महिलेचा मृतदेह दिसून आला आणि लागलीच पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिस बंदोबस्तात वाढ केली गेली. आरोपी विशाल हा मद्याच्या अमलात राहतो, तर मृत महिला एका पायाने अधू होती. कुबड्यांच्या साहाय्याने घरोघरी जाऊन किरकोळ कामे करून ती उदरनिर्वाह करायची. आरोपीने तिला घरी बोलावून कार्यभाग उरकविला आणि त्यानंतर कापडाने गळा घोटला. यातच ती ठार झाली, अशी सूत्रांची माहिती आहे. आरोपीस पथ्रोट पोलिसांनी शनिवारी अचलपूर न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपीस २९ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. आम्हांला शवविच्छेदन अहवालासह वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. - सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट. |
हरियाणवी अभिनेत्री आणि डान्सिंग सेन्सेशन सपना चौधरी (Sapna Chaudhary) आज एक मोठे नाव आहे. सपनाचे प्रत्येक गाणे येताच व्हायरल होते. अभिनयासोबतच सपना सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. दररोज तिचे फोटो आणि रील इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. दरम्यान, सपनाचा एक लेटेस्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पती वीर साहूवर चिडलेली दिसत आहे. सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हरियाणवी क्वीन सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सपना तिचा पती वीर साहूसोबत देसी स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये सपना ट्रॅक्टरमध्ये बसून गावातील शेतात हिंडताना दिसत आहे. ट्रॅक्टरवर बसलेली सपना तिचा नवरा वीरवर ओरडताना दिसत आहे. सपना त्याला म्हणते, " माझा ड्रायव्हर बकवास आहे, माझा ड्रायव्हर बेकार आहे, माझा ड्रायव्हर मूर्ख आहे. नीट चालवा. . भाडं मिळणार नाही. " (sapna choudhary latest hilarious video with husband veer sahu) नेहमीप्रमाणे सपना चौधरीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. त्याचबरोबर त्यावर कमेंट करून ते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "भाऊ वीर आणि सपना जी यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे माणूस कितीही मोठा झाला तरी, त्याच्या संस्कृतीशी आणि जन्मभूमीशी संबंधित काम विसरू नका! " दुसरीकडे, एकाने लिहिले, "ड्रायव्हर बदला. " अशा अनेक कमेंट्स सपनाच्या या व्हिडिओवर येत आहेत. |
Anil Kapoor : अनिल कपूरला आली लक्ष्याची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला, 'हमाल दे धमाल. . . ' अनिल कपूरने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली. Anil Kapoor : राज्यात काल मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही एक खास पोस्ट केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) सोबत फोटो शेअर करत त्याने 'मराठी भाषा दिवस' च्या शुभेच्छा दिल्या. अनिल कपूरनेलक्ष्मीकांत बेर्डे सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'महाराष्ट्रातील सर्वांनाच मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा, आज माझ्या हमाल दे धमाल या एकमेव मराठी सिनेमाची आठवण आली. या सिनेमात काम करणं माझं सौभाग्य होतं. तसंच हा सिनेमा माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डेच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सिनेमा होता. त्याची आजही खूप आठवण येते. ' अनिल कपूरने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली. लक्ष्याची मुलं अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनीही ही स्टोरी रिपोस्ट केली. 1989 मध्ये 'हमाल दे धमाल' हा सिनेमा रिलीज झाला होता जो तुफान हिट झाला. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर, सचिन पिळगांवकर आणि अनिल कपूरचीही भूमिका होती. |
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी खुली चर्चा करावी तर मी चुकीचं ठरलो तर जलसमाधी घेईन असं आव्हान नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. अहमदाबाद - काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांच्या होमपीचमध्ये टीकेचं लक्ष्य केलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले आहे की, मोदी सांगतात मी फकीर आहे, मी स्वयंसेवक आहे, मी चौकीदार आहे पण तुम्ही हे का सांगत नाही मी पंतप्रधान आहे. मी ठामपणे सांगतो मोदी चोर आहेत अशी घणाघाती टीका नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. अहमदाबादमधील धोलका येथील जाहीर सभेत ते बोलत होते. त्याचसोबत जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी खुली चर्चा करावी तर मी चुकीचं ठरलो तर जलसमाधी घेईन असं आव्हान नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. ज्या महात्मा गांधी यांनी नेहमी सत्य बोला असा विचार दिला त्याच मातीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा थापेबाज माणूस जन्माला आला अशी टीकाही नवजोत सिंग सिद्धू यांनी केली. २०१४ साली नरेंद्र मोदी देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याच्या नावाखाली सत्तेवर आले मात्र आज ते सर्वांना चौकीदार बनवत आहेत. लोकशाही आज गुंडशाही झाली आहे. जे मोदींची भक्ती करतील ते देशभक्त आणि त्यांचा विरोध करतील ते देशद्रोही ठरतात. आम्हाला पंतप्रधान आणि भाजपाच्या समर्थकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको असा टोलाही नवजोत सिंग सिद्धू यांनी लगावला. इथे लोकांच्या एकवेळ जेवण मिळत नाही. उपाशी पोटी तुम्ही लोकांना योगा करायला सांगता? सर्वांना बाबा रामदेव बनवायचा आहे का? लोकांचे खिसे रिकामे अन् खाते उघडले जात आहेत असा चिमटा नवजोत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या खास शैलीत काढला. काल झालेल्या बिहार येथील जाहीर सभेतही नवजोत सिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केले होते. जातीपातीच्या राजकारणात तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे. मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान काँग्रेसला केलं तर मोदींचा पराभव निश्चित होऊ शकतो. ज्या मतदारसंघात तुम्ही अल्पसंख्याक म्हणून आहात त्याच मतदारसंघात तुम्ही एकजूट आला तर बहुसंख्याक होऊ शकता असं नवजोत सिंग सिद्धू यांनी सांगितले होते. भाजपावाले मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी औवेसीसारख्या एमआयएमला ताकद देत आहेत. |
नवी दिल्ली दि. ४ - अॅपलच्य आयफोन सिरीजमधील दोन नवे फोन त्यांच्या वार्षिक परिषदेत लाँच केले जाणार असल्याची चर्चा जोरावर असून त्यात आयफोनचे स्वस्त व्हर्जनही सादर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या स्वस्त हँडसेटबाबत गुप्तता पाळली जात असली तरी चीनी युजरनी वाईबो या मायक्रो ब्लॉगिगवर या फोनची प्रतिमा लोड केली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार हा स्वस्त आयफोन मागच्या बाजूने थोडा बाकदार आहे व त्यामुळे तो हातात धरताना अतिशय सोयीचा वाटतो आहे. यापूर्वी अॅपलने नेव्ंही, गोल्ड ऑरेंज, पांढरा, गुलाबी आणि हिरवा या रंगात स्वस्त आयफोन सादर करण्याचा विचार केला होता. या फोनची १ हजार मॉडेल्स तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्याही जूनमध्ये सुरू झाल्या आहेत. या फोनचे केसिंग प्लॅस्टीक पॉलीकार्बोनेट पासून बनविले गेले असल्याचीही चर्चा आहे. हा फोन ३०० ते ४०० डॉलर्सच्या रेंजमध्ये विकला जाईल असेही सांगितले जात आहे. परिषदेत २० जून रोजी हा स्वस्त आयफोन आणि आयफोन पाच -एस अशी दोन नवी मॉडेल सादर केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. |
सुशांत अशोकराव थुल (रा. मोतीबाग) तसेच अफसर अली शोहरत अली अशी या दोघांची नावे असून आज पहाटे २. १५ च्या सुमारास वैशाली नगरातील हनुमान सोसायटी गार्डनजवळ ते अंधारात दडून होते. गस्तीवरील पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लोखंडी रॉड, पेचकस तसेच घरफोडीचे साहित्य आणि एक्टिव्हा दुचाकी असा ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सुशांत थुल हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर पाचपावली, तहसील, जरीपटका, सीताबर्डी, गणेशपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे १४ गुन्हे दाखल आहेत. |
लंडन : ब्रिटनने शुक्रवारी (ता. 31) रात्री 11 वाजता युरोपिय महासंघातून (ईयू) अधिकृतरीत्या काडीमोड घेतला. "ईयू'शी असलेले ब्रिटनचे 47 वर्षांपासूनचे जुने संबंध संपुष्टात आले. युरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील काही भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तर एका समुदायाने मात्र नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, याचा जगावर आणि भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारे परिणाम होणार आहे. युरोपिय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्याच्या घटनेचा भारतासह जगावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतासाठी हा निर्णय चांगला व वाईट असा दोन्ही प्रकारे होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या आधी जाहीर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात या ऐतिहासिक क्षणांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ""ब्रेक्झिटच्या मोहिमेचे नेतृत्व 2016मध्ये ज्यांनी केले त्यांच्यासाठी ही नवी पहाट आहे. आपल्या महनीय देशाची पुढील वाटचाल सुरू होत आहे. ब्रिटनमधील सर्वांसाठी हा क्षण आशा आणि उमेदीचा ठरेल असा विश्वास देणारा आहे. ही केवळ कायदेशीर मुक्तता नाही, तर खऱ्या अर्थाने देशाची फेरबांधणी आणि बदलाचा काळ आहे. आता तुम्ही देशाच्या कोणत्या भागात जन्मला यावरून तुमचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे अस्तित्व अवलंबून राहणार नाही. संपूर्ण ब्रिटनच्या क्षमतेला यातून बळ मिळणार आहे," असे जॉन्सन म्हणाले. ब्रिटनची "ईयू'मधून बाहेर पडण्याची तयारी 2016मध्ये झाली. त्या वेळी उत्तर इंग्लंडमधील सदरलॅंड शहराने जून 2016 मध्ये "ईयू'तून बाहेर पडण्यास समर्थन देण्याची घोषणा केली होती. तत्कालीन पंतप्रधान जॉन मेयर यांनी "बेक्झिट'वर जनमत घेण्याचे आश्वासन त्या वेळी दिले होते. जनमतातून "ब्रेक्झिट'ला कौल मिळाल्यानंतर साडेतीन वर्षांनंतर ही प्रक्रिया काल पूर्ण झाली. ब्रिटन 1973 मध्ये युरोपिय महासंघात सहभागी झाला होता. त्यानंतर 47 वर्षांनंतर तो बाहेर पडल्याने आता "ईयू'मध्ये 27 सदस्य देश उरले आहेत. या बदलाचा परिणाम लगेचच दिसणार नाही, असे "ईयू'च्या प्रमुखांनी सांगितले. कारण "ईयू'- ब्रिटनमध्ये या आठवड्यात झालेल्या करारानुसार 11 महिन्यांचा संक्रमण काळ निश्चित केला आहे. ब्रिटिश नागरिक 31 डिसेंबरपर्यंत "ईयू'च्या सदस्य देशांमध्ये काम आणि व्यवसाय करू शकतील. हा नियम "ईयू'तील सदस्य देशांतील नागरिकांनाही लागू होईल. "ईयू'तून बाहेर पडण्याचे ब्रेक्झिट समर्थकांनी स्वागत केले आहे. "ईयू'च्या नेत्यांना मात्र ब्रिटन बाहेर पडल्याचे दुःख वाटत आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आम्ही एक देश, एक संस्था आणि एक समाज या रूपात जवळ आलो होतो. |
गावठी पिस्तुल प्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेश पर्यंत. . . उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील आणि पोलिस निरीक्षक आजीनाथ काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. उस्मानाबाद : तुळजापूर मधील गावठी पिस्तुल प्रकरणाचे धागेदारे चक्क मध्यप्रदेशपर्यंत पोहचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३ पिस्तुल जप्त केल्या असून, याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर जवळच असणाऱ्या पाचुंदा तलावाजवळ ३० डिसेंबर रोजी खंडाळा येथील राजेंद्र सुरेंद्र कांबळे (वय २१) व काक्रंबा येथील ओंकार प्रदिप कांबळे (वय १७) या दोन युवकांना पिस्तुलसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेवून पिस्तुल जप्त केल्या आहेत. एक पिस्तुल उस्मानाबाद तर दुसरी पिस्तुल तुळजापूर येथे विक्री केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. पिस्तूल प्रकरणी तुळजापूर येथील एकास पोलिसांनी मंगळवार (ता. ४) रोजी ताब्यात घेतले आहे. तो मध्यप्रदेश येथून गावठी पिस्तूल उस्मानाबाद जिल्ह्यात आणून २० हजार रुपयास विक्री करीत होता हे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता सदरील गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणले होते असे आरोपींनी कबुल केले होते. तसेच हे गावठी पिस्तूल मध्यप्रदेश येथून तुळजापुर येथे विक्रीस आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस पथक तपासासाठी मध्यप्रदेश येथे जाणार आहेत. या प्रकरणात ५ आरोपी सध्या निष्पन्न झाले असून, अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील आणि पोलिस निरीक्षक आजीनाथ काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. रात्रीच्या वेळी चौघांनी पती-पत्नीस चाकूचा धाक दाखवला; पण. . |
मुंबई : भाजपा (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना लैंगिक अत्याचार व धमकीप्रकरणी उच्च न्यायालयाकडून (High Court) अटकेपासून दिलासा मिळाला आहे. नाईक यांचा उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारल्यावर नाईकांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. (Ganesh Naik Latest News) दोघांमधील संबंध हे संमतीने असून ते १९९३ पासून नातेसंबंधात होते. त्याला सकृतदर्शीनी बलात्कार म्हणता येणार नाही, असे नमूद करत न्यायलयाने नाईकांना दिलासा दिला आहे. अटक झाल्यास वैयक्तिक बंधपत्रावर सुटकेचे आदेशही दिले असून पोलिसांकडे (Mumbai Police) रिव्हॉल्वर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाईकांविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात तर लैंगिक अत्याचाराबद्द्ल नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीमध्ये महिलेने म्हटले की, नाईक हे माझ्याबरोबर गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्यापासून एक मुलगाही असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या मुलाला वडील म्हणून नाईकांनी नाव द्यावे यासाठी संबंधित महिलेने नाईक यांच्याकडे मागणी केली असल्याचा दावाही या तक्रारदार महिलेने केला होता. दरम्यान, नाईकांनी मार्च २०२१ तक्रारदार महिलेला बेलापूरातील सेक्टर १५ मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. मात्र, त्याठिकाणीही या महिलेने हीच मागणी केल्याने यावेळी नाईकांनी या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तू जास्त बोलू नको. तू काय करणार? मला त्रास देऊ नका नाहीतर मी स्वतःला आणि तुम्हाला सुद्धा संपवेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे, तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले होते. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. नांदेडः नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पॉईंटच्या नावाने दुकाने उघडली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजून अंधारमय खोली करुन बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेरुन जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला- मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र कंम्पार्ट बनविले आहेत. या ठिकाणी बसण्यासाठी तासानूसार पैसे आकारले जातात. परंतू यातून अश्लिल चाळे करणाऱ्यांना हक्काच्या जागा उपलब्ध होऊन छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी आनंदनगर भागात टाकलेल्या धाडीत पकडलेल्या सर्व मुली अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना कळवून त्यांना समज देण्यात आला. त्यानंतर त्यांना सोडले. परंतू पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. |
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आयुक्त इक्बालसिंह चहल वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील (ONGC outfall) भागाची पाहणी केली. तसेच, अंधेरी सबवेची पाहणी केली. याशिवाय, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचलं आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्याने हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी सबवे, मालाड सबवे, मिलन सबवे, किंग सर्कल, शिंदेवाडी, दादर टीटी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प! |
गुणवत्ता आहे; पण सुविधा हव्यात! 'महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये गुणवत्ता आहे; पण हे गुणवान मल्ल अजूनही मातीच्या कुस्तीतच अडकून पडले आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्ती आता मॅटवर गेली आहे. त्याचबरोबर या मल्लांना आर्थिक पाठबळही मिळायला हवे. दुर्दैवाने जे आपल्याकडे मिळत नाही. तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पाहिजे, तर तशा सुविधाही पुरवायला हव्यात आणि कुस्तीच्या विकासात गती यायला पाहिजे,' अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पाटोद्याच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइलमध्ये बाँझपदक पटकावले. ब्राँझपदक जिंकणारा राहुल हा महाराष्ट्राचा पहिलाच मराठमोळा. एकूण भारताचा तिसरा मल्ल. त्याआधी महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने २०१५ तर संदीप यादवने २०१३मध्ये पदक पटकावले. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही. पुरुषांप्रमाणे, महिलांनी निराशा केली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसानंतरही भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली आहे. |
पुणे - खराडी रस्ता येथे गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला मद्यप्राशन केलेल्या आयटी अभियंता कारचालकाने धडक दिल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, अपघातानंतर दुचाकीतील पेट्रोल सांडून दुचाकीने पेट घेतल्याने तरुणी भाजली असल्याचेही चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले. श्रध्दा मधुकर बांगर (वय-22, रा. चंदननगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक मनीष बळीराम चौधरी (वय 37, रा. पाषण रोड) याला अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष चौधरी हा आयटी अभियंता असून एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. गुरुवारी रात्री श्रध्दा ही खराडी येथील सिटी विस्टासमोरून जात असताना तिच्या स्कूटी पेप्ट गाडीला नगर रस्त्याच्या दिशेने येत कारचालक मनिष चौधरी याने त्याची भरधाव कार पाठीमागून धडकवली. त्यामध्ये श्रध्दा स्कूटीवरून पडत रस्त्यावर घसरत गेली. दरम्यान, अपघातानंतर स्कूटीतील पेट्रोल सांडून गाडीने पेट घेतला. अपघातामुळे श्रध्दा जखमी होऊन तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कारचालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे. |
मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाटा मोटर्सच्या २६ वातानुकूलित बसगाड्या शुक्रवारी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या 'फेम २' उपक्रमांतर्गत ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी २६ बसगाड्या शनिवारी बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या. नरिमन पॉइंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिव्यांग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यासाठी इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. मुंबईत सध्या ४६ इलेक्ट्रिक बस सुरू असून एकूण ३४० गाड्या उपलब्ध होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीतजास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बसेसची पाहणी केली. तसेच स्वतः या नवीन इलेक्ट्रिक बसमधून प्रवासही केला. तर, शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रिक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येईल, असे या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. |
अलिबाग : रोहा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघातील आठवीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा ट्रस्ट मार्फत पाच हजार टॅबचे वाटप, बुधवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र या टॅब खरेदीकरिता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या कंपन्यांचा सामाजिक उत्तर दायित्व निधी(सीएसआर)आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून वापरण्यात येत आहे. केंद्रीय गिते यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करुन त्यासाठी ४०० कोटी रुपये शिवसेनेने खाल्ल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच उघडकीस आणले होते. त्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्याच पद्धतीने मुंबईतील या कोट्यावधी रुपयांच्या टॅब घोटाळ््याचा पुढील टप्पा शिवसेना केंद्रीय मंत्री गीते यांच्या माध्यमातून रायगडमध्ये करीत असून त्यातून किमान १५० कोटी रुपये खाण्याचा हा प्रकार असल्याचे मलिक यांनी सांगितले. टॅब खरेदीसाठी आपल्या अधिकार क्षेत्रातील कंपन्यांचा सिएसआर वापरुन आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री गिते यांची सीबीआय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. बुधवारी रोहा येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम शिवसेनेचा आहे की शासकीय आहे या बाबत सुस्पष्टता नाही. अशा परिस्थितीत केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक अतूल सोबती आणि भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे अतिरिक्त सचिव मधुकर गुप्ता हे दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास सरकारी अधिकाऱ्यांना उपस्थित राहाता येत नाही. अशा परिस्थितीत हे दोन अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास त्या दोघांनाही सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री गीते यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्याचे स्विय्य सहाय्यक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता गिते मातोश्री बंगल्यावर बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) |
धुळे : दहीहंडीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु धुळ्यात मात्र मनसेच्यावतीने अनोख्या पद्धतीने दहीहंडी (Dahi Handi) साजरी करण्यात आली आहे. धुळे (Dhule) शहरात असलेल्या समस्यांना हात घालत मनपा आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर समस्यांची दहीहंडी बांधून आंदोलन केले. (Dhule Corporation MNS News) धुळे शहरामध्ये महानगरपालिका (Dhule Corporation) हद्दीमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा तसेच इतर बहुतांश अडचणींचा सामना रोजच करावा लागत आहे. यामुळे धुळे महापालिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्यावतीने (MNS) बालकृष्णाच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर समस्यांची दहीहंडी उभारण्यात आली आहे. पालिका प्रशासनातर्फे आयुक्त साहेबांनी ही दहीहंडी लवकरच फोडावी व धुळेकरांना समस्या मुक्त करावे; अशी मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्यांच्या दहीहंडीच्या माध्यमातून केली आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
श्रीकांत एक उबर ड्रायवर आहे. ट्रिप स्टार्ट करण्याआधी काही सेल्फी पाठवायचे असतात. हे सर्वकाही अॅपमध्ये फीड होतात. उबर AI त्याची ओळख करतो. त्यानंतर ड्रायवर चालकाला टॅक्सी चालवण्याची परवानगी देतो. परंतु, श्रीकांतचे हे सर्व बदल झाले, कारण, त्याने केस कापल्यानंतर सेल्फी पाठवल्यानंतर ओळखणे अवघड झाले. श्रीकांत तिरुपती बालाजीला आपले केस दान करण्यासाठी आला होता. केस छोटे केल्यानंतर आणि दाढी केल्यानंतर उबरने त्याला ओळखले नाही. त्याने अनेकदा आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले. श्रीकांतने म्हटले की, मी वेगवेगळ्या अँगलने सेल्फी टाकली. परंतु, अॅपने ती स्वीकारली नाही. खूप सारे प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. तर कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले. उदारनिर्वाह करण्यासाठी त्याच्याकडे उबर चालवण्याशिवाय पर्याय नाही. मी कंपनीकडे अनेकवेळा विनंती केली परंतु, कंपनीने माझे ऐकले नाही. कंपनीने याला उत्तर देताना श्रीकांत खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. उबरने म्हटले की, श्रीकांतला यासाठी कामावरून काढले की, तो वारंवार गाइडलाइन्स तोडत होता. काय असते आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) एक असा टूल आहे. जो आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा ऑफिसमध्ये पंच इन आणि पंच आउट करण्यासाठी एक सॉफ्टवेयर बनवले आहे. जे तुमची डोळे, केस, तुमची दाढी, नाक, आणि कानाची ओळख पटवते. जर कोणाला आयफोन उघडायचा असेल तर फेस आयडी लावलेला असतो. ती व्यक्ती तुमच्या चेहऱ्याविना फोन उघडू शकत नाही. एआय तुमच्या चेहऱ्यासाठी ओळख बनलेला असतो. पुढील कामांसाठी परमिशन मागतो. त्यामुळे तुमची दाढी, केस अचानक कापल्यानंतर एआय समोर आल्यास त्याची ओळख पटवणे अवघड होते. कारण, याच्या सिस्टममध्ये जुन्या चेहऱ्याचा फीड असतो. |
ऑलिंपिक स्पर्धेत चालण्यायोग्य प्रवासासाठी उत्कृष्ट चालण्याची गती, उत्तम ताकद (50 किलोमीटरची लांबी मॅरॅथॉन चालविण्यापेक्षा 42. 2 कि. मी. ची मोजमापपेक्षा जास्त असते), तसेच योग्य तंत्रज्ञानाकडे अचूक लक्ष देणे आवश्यक आहे, जे एक भयानक "उचल" उल्लंघन आहे. आजच्या ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे 20 आणि 50 किलोमीटरचे मोजमाप असणार्या दोन रेस वॉकिंग इव्हेंट्सचे वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या वर्षांमध्ये, ओलंपिक शर्यत चालणे 1500, 3000 आणि 3500 मीटरच्या अंतरावर 10 कि. मी. आणि 10 मैलांवर होते. स्त्री आणि पुरुष दोघेही 20 किलोमीटर (12. 4-मैल) शर्यत धावतात, जे सुरुवातीपासून सुरू होते. आयएएएफचे नियम चालत आणि चालणे यातील फरक स्पष्ट करतात. रेस वॉच दरम्यान चालण्यासाठी चालण्यापासून सीमा पार करणा-या स्पर्धकांना "उचल" उल्लंघन मूलभूतपणे मागील पावलांची वाढ होताना वॉकरचा पुढचा पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. तसेच, पृष्ठभागाशी संपर्क साधताना पुढचा पाय सरळ असावा. रेस स्पीडींग जेजे अशा प्रतिस्पर्ध्याला सावधगिरी बाळगू शकतात जे त्यांना एक पिवळा पॅडल दाखवून लिफाफा जास्त दूर स्पर्श करतात. त्याच न्यायाधीश वॉकरला सावधगिरी बाळगू शकत नाही. त्याऐवजी, जेव्हा चालक स्पष्टपणे चालण्याच्या नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरतो तेव्हा न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांना एक लाल कार्ड पाठवतो. तीन वेगवेगळ्या न्यायाधीशांपैकी तीन लाल कार्ड, परिणामतः स्पर्धकांच्या अपात्रतेचा परिणाम होईल. अन्य सर्व बाबतीत, रेस वॉक समान नियमांचे पालन करतो कोणत्याही अन्य रस्त्याची शर्यत. पुरुषांकरता नियम-फक्त 50-किलोमीटर (31-मैल) इव्हेंट 20-किलोमीटरच्या आवृत्ती प्रमाणेच आहेत. ऑलिंपिक स्पर्धा रस्त्यावर होतात आणि विशेषतः फिरत आणि वळणावळणाचे भरपूर आकर्षण असते, तसेच उतार व खालच्या पातळीवर मॅरेथॉनप्रमाणे, रेस वॉच घटना विशेषतः ऑलिम्पिक स्टेडियममध्ये सुरु होतात आणि समाप्त होतात. रेस वॉचिंग इव्हेंटमधील खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रता वेळ प्राप्त करणे आवश्यक आहे आणि त्यांना त्यांच्या राष्ट्राच्या ऑलिंपिक संघासाठी पात्र होणे आवश्यक आहे. ऑलिंपिक खेळापूर्वी 18 महिन्यांपूर्वीच पात्रता कालावधी सुरु होतो. देशभरातील जास्तीत जास्त तीन प्रतिस्पर्धी कोणत्याही शर्यतीत धावण्याच्या प्रसंगी स्पर्धा करू शकतात. ऑलिंपिक स्पर्धेत चालणा-या स्पर्धेत प्रारुपिकांचा समावेश नाही. त्याऐवजी, सर्व पात्रता अंतिम फेरीत स्पर्धा करतात. सर्व जातींप्रमाणे, स्पर्धकाच्या धैर्य (डोके, हात किंवा पाय नाही) अंतिम रेषा पार करते तेव्हा चालणे चालू होते. |
ग्रामीण रुग्णांना सर्वोपचार आता 'पीएचसी'तच! आशा सेविकांच्या मदतीने ग्रामीण भागातली गरोदर माता व बालकांच्या सर्वांगीण आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अकोला : ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. शिवाय, आशा सेविकांच्या मदतीने ग्रामीण भागातली गरोदर माता व बालकांच्या सर्वांगीण आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ग्रामस्थांना प्राथमिक उपचारासाठी येथे आवश्यक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु साधा ताप आला तरी ग्रामस्थांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. शिवाय गर्भवतींनाही प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा सर्वोपचार रुग्णालय गाठावे लागते. प्राथमिक उपचारासह प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रातच व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांच्या पथकाने निर्देश दिले. आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सीईओ आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली, तसेच पीएचसीत आढळलेल्या त्रुटी महिनाभरात दुरुस्ती करून सर्वसामान्य ग्रामस्थांना सर्वच उपचार येथे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे गरोदर मातांसह बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहे. यामध्ये आशा सेविकांची मुख्य भूमिका असणार आहे. गरोदर मातांच्या आहारापासून तर त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय तपासण्या आदींवर आशा सेविकांचे लक्ष राहणार आहे. कर्करोग, मधुमेह यासारख्या असाध्य आजारांच्या निदानासाठी जिल्हा स्तरावर एनसीडी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याच प्रकारचे केंद्र जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आले असून, यामध्ये असाध्य आजारांचे निदान करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णांवर प्राथमिक उपचार पीएचसीतच होणे अपेक्षित आहे. याबाबत जिल्हा परिषद सीईओंनी तसे निर्देश दिले असून, गरोदर मातांकडे विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात जिल्ह्यातील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचसीला भेटी देणे सुरू आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला. |
लेखिका, समीक्षक आशा सावदेकर यांचे निधन () डॉ. सावदेकर यांची तरुण मुलगी अपर्णा दासगुप्ता यांचे हृदयविकाराने निधन झाले व नंतर पती बाळासाहेब सावदेकर यांचेही निधन झाले. अशा एकामागून एक आपत्ती कोसळल्यामुळे मानसिकरीत्या खचल्या व त्यातून त्या सावरू शकल्या नाही. गेली काही वर्षे त्यांची स्मृतिभ्रंशातच गेली आहेत. तेव्हापासून त्या सोनेगाव एचबी इस्टेट परिसरातील विहीनीसोबत राहात होत्या. त्यांचे स्नेही डाॅ. निखिल हे त्यांची वैद्यकीय देखभाल करीत हाेते. विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी' या मुखपत्राच्या प्रमुख संपादक राहिलेल्या डाॅ. सावदेकर यांनी वि. सा. संघाकरीता 'कविता विदर्भाची' हे कविताविषयक महत्त्वाचे संपादन केले. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास हा त्यांचा प्रबंध, कथाकार पु. भा. भावे यांच्यावरील 'पु. भा. भावे : साहित्यवेध', कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या अध्ययनावरील 'भारतीय साहित्याचे शिल्पकारः ना. सी. फडके', 'मुशाफिरी' ही महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यांचा काव्याचा व्यासंग आणि अभ्यास मोठा हाेता. 'मुशाफिरी' या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ तसेच बा. भ. बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता, समीक्षेची समीक्षा आणि काव्यगंगेच्या तटावर हे ग्रंथ प्रकाशित आहेत. जयकृष्ण केशव उपाध्ये या विदर्भातील या मान्यवर कवींचा काव्यसंग्रह आशाताईंनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केला आहेे. 'मी तुळस तुझ्या अंगणी' ही एक त्यांची एक कादंबरीही आहे. लोकमत साहित्य जत्रेचे संपादन आणि लेखनाचे कार्य त्यांनी केले आहे. वैदर्भीय प्रतिभेच्या डॉ. कुसुमावती देशपांडेंच्या परंपरेत त्यांच्यानंतर डॉ. आशा सावदेकर यांनी त्यांच्या व्यासंगाने स्थान निर्माण केले होते. 'सरस्वती सन्मान' प्रदान करणाऱ्या अंतिम निवड समितीतही त्या राहिल्या होत्या. त्यांच्या निधनाने शाेकभावना व्यक्त केली जात आहे. विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी' या मुखपत्राच्या प्रमुख संपादक राहिलेल्या, कवितेच्या साक्षेपी अभ्यासक, समीक्षक, ललित लेखक आणि माझ्या एक आत्मीय, सुहृद स्नेही डॉ. आशा सावदेकर यांचे निधन साहित्य जगतासाठी वाईट बातमी आहे. त्यांच्यासोबतच मीही तेव्हा युगवाणीचा संपादक म्हणून काम केले आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या जुन्या आत्मीय स्नेह्यांपैकी मीही एक आहे. अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन व कवितांचे समीक्षण त्यांनी केले आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ, महाराष्ट्र एका महत्त्वाच्या समीक्षकाला मुकला आहे. |
र ावेर : शहरातील जुना सावदा रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील रहिवासी असलेली विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रहिवासास असलेल्या विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सदर महिलेचे सासरे लग्न सोईरीकच्या कामासाठी बाहेरगावी जाण्याचे तयारीत असताना ते बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना सुनबाईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समजली. सदर विधवा महिलेचे पती दिनेश चौधरी यांनीही १३ते १४ वर्षांपुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कटू स्मृतींना आप्तेष्टांकडून यावेळी व्यक्त झाल्या. पतीच्या निधनानंतर हलाखीची परिस्थिती असताना एकूलता एक मुलगा कुणाल (वय १९) याचा सांभाळ करून त्यांनी आपली गुजराण सुरु ठेवली होती. तर सदर विधवा महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत महिलेचे दीर अनील सखाराम चौधरी यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या माहेरातील मंडळीने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत. |
जून महिन्यातील पुरस्कार अज्ञात आणि क्रान्ति यांच्या कवितांना विभागून देण्यात येत आहे. अज्ञातांच्या कविता सहजसुंदर, सुबोध ! प्रभावी शब्दकळा. संयत चित्रण. 'कळले नाही '- प्रतिभेची देणी कोणी, कशी, कधी, का दिली घेतली कळले नाही. अखंड स्रोताचे कूळ आणि मूळ शोधावे कशाला ? मागून मिळणारे दान नाहीच ते ! तळाशी; कितीक उरले कळले नाही "' (शब्दांना दाद देता देता, अर्धविरामाचा सुरेख वापरही पहा). क्रांती यांच्या कविता सातत्याने वाचनीय असतात. खास शब्दसौष्ठव आणि सहज, भावपूर्ण कविता. उन्मनीमध्ये मनातील भावमुद्रा आणि ऋतुचक्राची यांची घातलेली सुंदर सांगड आहे. 'म्हटले तर प्रेयसाला, म्हटले तर श्रेयसाला' उद्देशून . या महिन्याच्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल रैना आणि स्लार्टी यांचे मनःपूर्वक आभार. |
पुणे - लग्नाचे आमिष दाखविण्याबरोबरच पिस्तुलाच्या धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. त्यानंतर तरुणीचा अश्लील व्हिडिओ तयार करून अन्य लोकांना पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद ज्ञानेश्वर तुपे (वय 27, रा. ऍमोनोरा पार्क, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे; तर सुरेखा तुपे, सिद्धार्थ तुपे, संभाजी दगडू भंडारे, शंभूराजे तावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तरुणीची ओळख होती. त्यांची ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत मंदिरामध्ये नेऊन लग्न केल्याचे नाटक केले. त्यानंतर तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तरुणीने आरोपीला विरोध दर्शविला. त्यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने तरुणीचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे काढून तावरे यास पाठविले. तावरे याने अन्य लोकांना पाठविले. या सर्व घटनांनंतर तरुणी लग्न झाल्यामुळे आरोपीच्या घरी राहण्यासाठी गेली, त्यावेळी सुरेखा तुपे हिने तिला जबर मारहाण करीत विष पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. |
जामखेड, 23 एप्रिल : कोरोना हा शब्द ऐकला की आता त्याबरोबर अनेक शब्द आपल्या डोळ्यासमोर फिरायला लागतात. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर. आता यातही रेमडेसिविर (Remdesivir) हे तर जणू कोरोना रुग्णांसाठी अमृतच बनलंय. कारण याची प्रचंड मागणी असून पुरवठा मात्र नाही. मात्र आपल्याच महाराष्ट्रात एक असं कोविड सेंटर आहे जिथं रेमडेसिविर किंवा महागडी औषधं न देताही रुग्णांना अगदी तंदुरुस्त करून घरी पाठवलं जात आहे. तेही अगदी मोफत. (Free treatment on cororna) हाच आहे कोरोनावर उपचार करण्याचा जुलिया पॅटर्न. (Julia hospital jamkhed) (वाचा-मोठा दिलासा! आता कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, विमा कंपन्यांना दिले आदेश) तर हा जुलिया पॅटर्न आहे अहमदनगर जिल्ह्यात्या जामखेड तालुक्यातल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जुलिया हॉस्पिटलमधील उपचारांचा. डॉ. रवी आरोळे आणि शोभा आरोळे हे बहीण-भाऊ हे हॉस्पिटल चालवतात. मॅगसेसे पुरस्कारप्रास्त दिवंगत डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचे ते मुलं आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल बनवण्यात आलं. याठिकाणी कोरोना रुग्णांवर ते उपचार करत आहेत आणि तेही अगदी मोफत. याठिकाणच्या उपचारांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेमडेसिविर किंवा अशा कोणत्याही महागड्या औषधांचा मारा इथं रुग्णांवर केला जात नाही. (वाचा-कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा) खासगी रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता त्यांची लूट करतात. त्यामुळं लोकांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. लोक शेती विकून दवाखान्यांचा भरणा करत आहेत, असं रवी म्हणतात. कोरोनाची स्थिती समजावताना ते म्हणतात की, कोरोनाचे केवळ 20टक्के रुग्ण हे गंभीर असतात आणि त्यापैकीही फक्त 5 टक्के रुग्णांना रेमडेसिविरची गरज असते. पण तरीही त्यासाठी एवढी ओरड सुरू असल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवललेल्या पद्धतीनुसार उपचार करून अगदी स्वस्तात रुग्ण अगदी तंदुरुस्त होतो असं डॉ. रवी आरोळे यांचं म्हणणं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आरोळे यांनी या रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास 3700 रुग्णांना कोरोनामुक्त केलं. तर यावेळी आतापर्यंत 1250 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याठिकाणी सध्या 650 रुग्ण आहेत. याठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. पण आता या रुग्णालयासमोरही आर्थिक संकट उभं राहिलं आहे. रुग्णांना दिलं जाणारं जेवण, ऑक्सिजन यासाठीचा खर्च होतो. रुग्णांकडून आम्ही पैसे मागत नाही. पण त्यांनी स्वतःच्या मर्जीने पुढील रुग्णांच्या उपचारासाठी मदत करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर आरोळे यांनी म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुंबई, 9 जुलै- अभिनेताकुशल ब्रदिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळं नेहमीच तो चाहत्यांचं लक्षवेधून घेत असतो. प्रत्येक पोस्टच्या शेवटी कुशल सुकून असं लिहित असतो. त्याची प्रत्येक पोस्ट ही बोलकी असतेच शिवाय मनाला सुकून देणारी असते. कुशलनं नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो जितका बोलका आहे तितकीच फोटोला साजेशी अशी पोस्ट देखील आहे. कुशल बद्रिकेने एक बालपणीची गोष्ट सांगितली आहे. त्याच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकर याने एक कमेंट केली आहे. सध्या कुशलची ही पोस्ट आणि संतोषची कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. कुशल बद्रिके हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने बालपणीची गोष्ट सांगितली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "म्हातारीच्या कापसाची गोष्ट. लहानपणी, अलगद ओंजळीत झेललेल्या "म्हातारीच्या कापसाला" मी हळूच फुंकर घालायचो की तो कापूस हवे सोबत उडत... उडत... जायचा मग पुन्हा अलगद त्याला ओंजळीत झेलायचं,पुन्हा फुंकर, पुन्हा हवा, तोच खेळ पुन्हा पुन्हा. मग कधीतरी जोराचा वारा यायचा आणि कुणास ठाऊक कुठे ? पण "म्हातारीचा कापूस" घेऊन लांब... उडून जायचा आणि मी... मी त्या उडत जाणाऱ्या "म्हातारीच्या कापसाकडे" नुसतं बघत रहायचो, असहायपणे तो दिसेनासा होईपर्यंत. आणि मनात मात्र खूप दुःख-दुःख व्हायचं. त्यावेळी त्या "म्हातारीच्या कापसाने" मनाला झालेली जखम आजपर्यंत कोणत्याच कापसाने टिपता आली नाही मला. हल्ली, काही नाती सुद्धा त्या "म्हातारीच्या कापसासारखी" अलगद ओंजळीतून निसटून जात आहेत आणि मला मात्र पुन्हा लहान झाल्यासारखं झालंय, "उडून जाणाऱ्या म्हातारी कडे नुसतं बघत बसणारं एक लहान मुल", असे कॅप्शन कुशल बद्रिकेने म्हटले आहे. कुशलच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. "तू आता फक्त २ बोटं उरलायस शाहरुख व्हायला, होशील लवकरच होशील. फक्त आता केस सतत डोळ्यावर येण्याची acting करत रहा", असे संतोष जुवेकरने म्हटले आहे. शिवाय एका चाहत्याने म्हटलं आहे की,आमचे श्रद्धास्थान. . . दिवसेंदिवस saheb तुमची अॅक्टींग आनि लेखन फुलत chalay. . अशा अनेक कमेंट कुशलच्या या पोस्टवर आल्या आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
एकसंध सामाजिक किंवा वंशीय गट पूर्ण अलग विकसित करण्याची संधी. स्थलांतर आणि सामाजिक विकास पारंपारीक गट, देशांचे आणि सांस्कृतिक समुदाय यांचे मिश्रण आधारित आहे. आम्ही एकरुपता आहे काय समजून करू इच्छित असल्यास, सामान्य मानसिक आणि ठरवते की एक प्रक्रिया म्हणून विचार करणे आवश्यक आहे सामाजिक बदल विद्यमान सामाजिक वातावरण पासून संक्रमणानंतर नवीन शर्तींच्या परिस्थितीशी जुळवून घेत करण्यासाठी, उद्देश गट येणार्या. बर्याचदा, ती चेहरा, बदलांचा परिणाम म्हणून एक भिन्न संस्कृती अस्तित्वात परिस्थितीत सामील होणे आवश्यक आहे, जे उघड. सांस्कृतिक एकरुपता बहुतेकदा स्थलांतर संकल्पना संबद्ध आहे. स्थलांतरित, एक पूर्णपणे त्यांना उपरा जीवन परिस्थितीशी जुळवून घेत सामाजिक मानके ते आले असलेल्या देशातील अस्तित्वात लागू आहे. एक नियम म्हणून, आहे काय एकरुपता, तो फक्त काही वर्षे नंतर किंवा अगदी पुढील पिढी मध्ये समजू शकते. या संज्ञा देशातील हाती सत्ता असलेला प्रबळ समाज मानके त्यांच्या पुरोगामी habituation दृष्टीने अल्पसंख्यक गट पहा शकता. एकरुपता प्रकार नैसर्गिक असू शकते, एक नियम म्हणून, कंपनी किंवा राष्ट्र म्हणून नाट्यमय नाहीत. उदाहरणार्थ, ज्यू युरोप लोकसंख्या किंवा दुसरे महायुद्ध आधी सोव्हिएत युनियन, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख परिरक्षण असूनही, मुख्यत्वे संस्कृती आणि राहण्याचा त्यांच्या देशांच्या लोकांना सद्यस्थिती जाणून घेतली होती. मातृभाषा बहुतेकदा फ्रेंच नाही यिद्दी किंवा हिब्रू, आणि रशियन, जर्मन होता. इतर देशांचे सदस्य अनेक मिश्र विवाह होते. आधुनिक रशिया मध्ये बष्किर आणि तातार व्यक्ती वंशीय गट परिस्थितीः आणखी एक उदाहरण घेऊ, तसेच एकरुपता आहे काय करून संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अंमलबजावणी आणि मिलाप रशियन संस्कृती मध्ये रशियन साम्राज्य जीवन शंभर अनेक वर्षे योगदान दिले. मिश्र विवाह, ओलांडून-त्यांच्या पूर्वजांना स्त्राव रशियन भाषा ज्ञान आणि धर्म उदाहरणे आहेत एक राष्ट्र जीवन नियम, तत्त्वे शेवटी विषय, मोठ्या पारंपारीक गट जीवन मार्ग कसा. मात्र, अनेकदा ही प्रक्रिया आवश्यक आहे. या प्रकरणात, तो एक मूलभूत संताप आणि नंतर उघडा ओरडणे, व्यक्ती व गट शोकांतिका आहे. एक उदाहरण Karachai, सक्ती एकरुपता आहे क्राइमीन Tatars, स्टालिन काळात पोल, युक्रेनच्या. वीस-पहिल्या शतकाच्या सुरूवातीस त्याचे वस्तुमान स्थलांतर आणि सर्व देशांमध्ये लोकसंख्या अत्यंत उच्च हालचाल, नवीन आव्हाने सामाजिक शास्त्रज्ञ आणि धोरण निर्मात्यांना confronts. Ethnographers आणि समाजशास्त्रज्ञ आधुनिक रशिया किंवा युरोप मध्ये एकरुपता काय, विश्लेषण, embeddedness विविध अंश सूचित काय समस्या पुनर्वसन संबंधात निर्माण होतात. उदाहरणार्थ, स्कँडिनेव्हिया किंवा जर्मनी मुस्लीम समाजाच्या या देशांच्या सरकार प्रत्यक्ष डोकेदुखी आहे. स्वेच्छेने एक चांगले जीवन हलवून, ते, असे असले तरी, सर्वात देशी लोकसंख्या वेगळे. ते यजमान देश भाषा अभ्यास त्यांच्या धार्मिक ओळख साठवायची नाही प्रयत्न करा. कुंपण एक परिणाम म्हणून, ते एक सभ्य नोकरी शोधू आणि त्यांच्या पायांवर प्राप्त करणे फार कठीण आहेत, ते सामाजिक मदत निधी राहतात. सांस्कृतिक एकरुपता - ही प्रक्रिया जे एक विशिष्ट गट हाती सत्ता असलेला प्रबळ सामाजिक गट भाग बनतो आहे. सोव्हिएत प्रजासत्ताक पासून रशिया मध्ये एक समान समस्या चिंता आणि स्थलांतरित. नवीन गट (किंवा गट संबंध जे समाज सकारात्मक अपुरा आहे) एकात्मता एक उच्च पातळी साध्य करण्यासाठी झुकत असेल, तर तो स्थिर आणि मजबूत विरोधकांना येतो हाती सत्ता असलेला प्रबळ संस्कृती, समाजातील ओळखले जाऊ झुकत असेल तर हा गट की अवलंबून जे त्याच्या मानके पालन होईल. या प्रक्रिया बहुतेकदा प्राप्त राज्य, भर त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख साधताना स्थलांतरित सुरक्षा भावना प्रदान आहे ज्या एकरुपता घरगुती धोरण होऊ. दुसरीकडे, यजमान देशाच्या धोरण त्यांचे वर्तन बदलण्यासाठी सक्ती आणि नागरिक बहुतांश मानके अनुसरण सक्ती करण्यासाठी स्थलांतरित लोकांमध्ये काही मूल्ये आणि तत्त्वे निर्मूलन निर्देशित केली जाऊ शकते. असा भेदभाव प्रामाणिकपणाने व्यापक आहे. तीन टप्प्यात समावेश काय एकरुपता आहे याचे वर्णन प्रक्रिया. त्यांना पहिल्या - बहुसंख्य समाज मध्ये राजकीय ट्रेंड बाब, काही विशिष्ट आचरण एक अल्पसंख्याक उचलून, आणि एकात्मता आहे. दुसरा टप्पा, स्ट्रक्चरल एकरुपता म्हणतात, प्राप्त देशातील सामाजिक संस्था स्थलांतरित च्या आत प्रवेश करणे स्पष्ट होते. अल्पसंख्यांक प्रमाणात बहुतांश नियम ते राजकीय आणि विधान जीवन सहभागी सुरू रुपांतर केले जात आहेत कुठे. तिसरा टप्पा आहे की स्थलांतरित नाही फक्त बाहेरून पण आंतरिक समाजातील पूर्ण सदस्य, झाले आहे. या स्टेजला, ते त्यांच्या स्वतः च्या म्हणून आसपासच्या समाजातील मानके स्वीकारा. ते या देशात एका अर्थाने विकसित. पूर्ण एकरुपता सहसा बराच वेळ लागतो. बर्याचदा, परिणाम फक्त स्थलांतरित पुढील पिढी मध्ये दृश्यमान आहेत. |
ग्रामीण भागांतील एकूण करोना रुग्णसंख्या १६ हजारांहून अधिक असून आत्तापर्यंत ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे गावातील रुग्णांना शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. ग्रामीण भागांतील एकूण करोना रुग्णसंख्या १६ हजारांहून अधिक असून आत्तापर्यंत ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे गावातील रुग्णांना शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शासनातर्फे भिवंडी तालुक्यातील सावड येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विस्तारित केंद्र असणारे ठाणे ग्रामीण कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील आरोग्य व्यवस्था बळकट होणार आहे. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांचा भार हा जिल्हा सामान्य रुग्णालयांवरच आहे. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील रुग्णही जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. भिवंडी तालुक्यातील या नव्या अद्यायावत ग्रामीण रुग्णालयामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भार आता कमी होणार आहे. पुनर्विकासाच्या प्रस्तावामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची कित्येक वर्षे डागडुजी करण्यात आली नव्हती. इमारतीच्या पुननिर्माणासाठी रुग्णालय स्थलांतरित होण्याच्या बेतात असतानाच मार्चमध्ये करोना संसर्ग सुरू झाला. त्यावेळी जिल्ह्यात एकही करोना उपचार केंद्र नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाने ती जबाबदारी स्वीकारली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांची सोय आहे. मात्र आता ग्रामीण रुग्णालयाच्या रूपाने जिल्हा सामान्य रुग्णालयास एका सक्षम आरोग्य केंद्राची मदत होणार आहे. भिवंडी तालुक्यातील सावड या मध्यवर्ती ठिकाणी एका भव्य गोदामात उभारण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयात ८५० खाटांची सोय आहे. त्यातील ३०० खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था असून ८० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. पहिल्या टप्प्यात या रुग्णालयात २० व्हेंलिलेटर्स असतील. त्याचबरोबर पाच डायलेसिस यंत्रे, शुद्ध पाण्यासाठी आर. ओ. प्रकल्प, डॉक्टर्स, परिचारिकांसाठी विश्राम कक्ष आदी सुविधा या रुग्णालयात आहेत. या रूग्णालयात १८ हजार किलोलिटर क्षमतेच्या ऑक्सिजनच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखीखाली जिल्हा प्रशासनातर्फे अतिशय कमी कालावधीत हे अद्यायावत रुग्णालय उभे राहिले आहे. |
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन - समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (SP leader Abu Azmi) हे कालपासून अमरावती दौऱ्यावर होते व त्यांची आज अकोला येथे जाहीर सभा होणार होती. दरम्यान आझमींनी (Abu Azmi) अकोला दौरा रद्द केला असून ते तातडीने मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाले आहेत. यावर अबु आझमी यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, मी माझ्या खाजगी व्यापारात अडचण आल्यामुळे मुंबईला निघत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी इन्कम टॅक्स (Income Tax) आणि ईडीकडून (ED) छापेमारी (Raid) केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर ते अमरावती दोऱ्यावर असताना त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. तरी यावर, माझ्या घरी किंवा कुठेही आयटी किंवा ईडीचे छापे पडले नसल्याचे आझमी म्हणाले परंतु त्यांनी अचानक दौरा रद्द केल्याने शंका व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपवर (BJP) टीका करताना आझमींनी खळबळजनक व्यक्तव्य केले. ते म्हणाले, 'देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे, तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे. त्यामुळे जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे या विरोधात उभे राहिले पाहिजे. ' असे आवाहन आमदार अबू आझमी यांनी केलं. 'पंतप्रधान मोदी 15 लाख रुपये देणार होते, दोन करोड नोकऱ्या देणार होते, त्याच काय झालं. देशात बेरोजगारी वाढली आहे आणि देश बरबाद होत आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ' अशी टीका त्यांनी मोदींवर (PM Narendra Modi) केली. तसेच लव जिहादच्या नावाखाली भाजपचा अतिरेक करत, अमरावतीत अलीकडे भाजपने लव्ह जिहादचे अनेक आरोप केले असल्याचे आझमी म्हणाले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.