text large_string |
|---|
Soon the zoo will relocate\nया प्राणिसंग्रहालयाचे लवकरच स्थलांतर\n'थीम पार्क' देखील उभारणार\n12 Jun, 2022, 8:43 am\nसिद्धार्थ उद्यानातील (Siddhartha Udyan) प्राणिसंग्रहालयाचे (Zoo) येत्या दोन वर्षांत स्थलांतर होणार आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाची जागा उद्यानाला मिळणार असून ३२ एकर जागेतील उद्यानात मनमुराद फिरण्याचा आनंद बाळगोपाळांसह नागरिकांना घेता येणार आहे.\nउद्यापासून भरणार शिक्षकांची शाळा\nमहापालिकेचे (Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यान सध्या दहा ते बारा एकरात तयार करण्यात आले आहे. उद्यानाला लागूनच सुमारे बावीस एकरात प्राणिसंग्रहालय तयार करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयाची जागा मुळातच उद्यानाची होती; पण प्राणिसंग्रहालय देखील महापालिकेचेच असल्यामुळे त्याला उद्यानाची जागा देण्यात आली. त्याशिवाय उद्यानाच्या जागेत एक एकरावर पोहण्याचा तलाव तयार करण्यात आला. उद्यानाची एकूण जागा सुमारे ३५ एकर आहे. त्यापैकी प्राणिसंग्रहालय, पोहण्याचा तलाव आणि बीओटी प्रकल्प यासाठी जागा दिल्यामुळे उद्यानाचे क्षेत्र कमी झाले.\nमिटमिटा येथे (Smart City) 'स्मार्ट सिटी'च्या माध्यमातून सफारी पार्कचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन वषांत हे काम पूर्ण होईल, असे मानले जात आहे. सफारी पार्कच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सफारी पार्कचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. सफारी पार्कचे काम पूर्ण झाल्यावर सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय लगेचच सफारी पार्कमध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्राणिसंग्रहालय स्थलांतरित झाल्यावर सिद्धार्थ उद्यानाचा विस्तार केला जाणार आहे. विस्तारित सिद्धार्थ उद्यान ३२ एकर जागेवर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उद्यानाच्या विस्तारित जागेच 'थीम पार्क' करण्याचे नियोजन केले जात आहे. हे थीम पार्क परयंटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. |
जॉन अब्राहमचा New York आठवतोय? कसा जॉन एका नं केलेल्या अतिरेकी कामासाठी जेलमधे डांबल्या जातो? तसंच काहीसं एका माणसासोबत घडलंय. Imagine - तुमचा लहानपणचा शाळकरी मित्र मोठा होऊन पत्रकार होतो - अफगाणिस्तानमधे जातो - तिथे मारला जातो. तुम्हाला धक्काच बसतो...तुम्ही हे कसं झालं ह्याची माहिती काढता तर तुम्हाला ISIS बद्दल कळतं, त्यांच्या ऑनलाईन नेटवर्कबद्दल कळतं...आणि तुम्ही आश्चर्यचकित होता. आपल्यापैकी बहुतेकांचा प्रवास इथे थांबेल. पण - एका साध्या सज्जन कार सेल्समनने एक धाडसी पाऊल उचललं आणि दुर्दैवाने ते त्याच्या अंगलट आलं. टोबी लोपेज ह्या, Toyota कार विकणाऱ्या तरुणाने ट्विटरवर ISIS ला संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्याच्या ऑफिसमधून, रात्री उशिरापर्यंत जागून त्याने जिहादी नेटवर्कशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. लवकरच एका तोतया "ISIS लीडर"सोबत त्याचं Skype वर बोलणं सुरु झालं. अपहृत व्यक्तींच्या सुटकेबद्दल त्यांच्याशी टोबीची बोलणी सुरू झाली. पलीकडून जेव्हा पैश्यांची मागणी झाली - तेव्हा टोबीने तातडीने FBI ला माहिती दिली. आणि तिथून FBI सोबत टोबीचं नाजूक, सावध नातं सुरू झालं. दुर्दैवाने - ह्याचा शेवट टोबीच्याच अटकेत झाला. चिंताजनक गोष्ट ही की टोबी तब्बल १४ महिने कुठ्ल्यायी न्याय्य प्रक्रीयेशिवाय जेलमधे डांबल्या गेला होता. त्याच्यावर दोनदा निरनिराळ्या चाचण्या करण्यात असल्या ज्यात तो मानसिकदृष्ट्या नाजूक वाटला. FBI च्या मते तो ज्या लोकांशी ऑनलाईन बोलत होता, ते खोटे होते...अस्तित्वातच नव्हते ! चाचण्यांमधे टोबीला "delusional disorder, grandiose type" झाल्याचं निदान झालं. वर्षभर टोबीच्या कुटुंबाच्या आणि विवीध पत्रकारांच्या पाठपुराव्यानंतर केस नव्या अधिकाऱ्याकडे दिली गेली. त्याने त्वरित टोबीच्या सर्व ऑनलाईन संभाषण आणि हिस्ट्रीची तपासणी केली आणि तिसऱ्या मानसिक चाचणीची आज्ञा दिली. शेवटी टोबीला जामिनावर सोडण्यात आलंय. टोबीच्या लेटेस्ट कमेंटनुसार - तो अमेरिकन सरकारविरुद्ध केस करण्याची तयारी करत आहे. संपूर्ण वृत्त इथे वाचा. |
'ह्या' व्यवसायातून घरबसल्या महिला करू शकतात बक्कळ कमाई - Mhlive24.com\n'ह्या' व्यवसायातून घरबसल्या महिला करू शकतात बक्कळ कमाई\nMHLive24 टीम, 13 जुलै 2021 :- अनेक व्यवसाय असे आहेत जे कोणतीही महिला तिच्या घरातून करू शकते आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. दररोजच्या कामामधून अगदी थोडा वेळ काढून आणि थोडे प्रयत्न केल्यास कोणतीही महिला अगदी सहजतेने हे व्यवसाय करू शकते. त्यातील एक म्हणजे केक बनवणे.\nआता केक बनविण्याच्या असंख्य रेसिपी आल्याने तसेच बेकिंग उपकरणे आणि केक बनवण्याच्या सोप्या पद्धती मुळे केक अगदी कोणीही बनवू शकतो. या लेखामध्ये आपण केक व्यवसायातील संधी आणि बनवण्याच्या पद्धती आणि साहित्य याविषयी माहिती घेणार आहोत.\nकेक आणि बेकरी च्या उत्पादनांची मागणी सतत वाढत आहे. वाढदिवसाचे कार्यक्रम असले की केक अति आवश्यक असतो तुम्हाला फक्त पिठात प्रयोग करायला आवडत असेल, तर बेकरीचा व्यवसाय सहजपणे घरीच सुरू केला जाऊ शकतो.\nआपला व्यवसाय रोलिंगमध्ये आणण्यासाठी फक्त आवश्यक असलेले थोडेफार कौशल्य आणि उपकरणांमध्ये थोडीफार गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा उद्योग अतिउत्तम ठरू शकतो. तुम्ही केक कसा बनवायचा या साठी यूट्यूब चा आधार घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठ शिकायला जाण्याची सुद्धा गरज नाही.\nकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- मैदा 25%, साखर 20%, मिल्क प्रोटीन 9.96 टक्के, पाणी 28%, पामतेल सात टक्के, व्हॅनिला इसेन्स 0.12 टक्के, बेकिंग पावडर आठ टक्के, बेकिंग सोडा 0.12 टक्के, सोर्बीक आमल 1., मीठ 0.5 टक्के याप्रमाणे मिश्रण करून घ्यावे.\nकेक बनवण्याची पद्धत :- सगळ्यात आगोदर मैदा शिफ्टर मधून चाळून घ्यावा.वरील सर्व साहित्य चार ते पाच मिनिटे एकत्र मिसळून या मिश्रणाला दोन ते तीन वेळा चाळून घ्यावे. हे सगळ्या प्रकारचे तयार झालेले मिश्रण केकच्या साच्यामध्ये टाकावे.\nबेकिंग साठी बेकरी ओव्हनमध्ये 170 अंश सेल्सिअस तापमानाला 25 मिनिटे ठेवावे. नंतर हे मिश्रण बाहेर काढून सामान्य तापमानात थंड करावे. त्यानंतर हे मिश्रण साच्यांमध्ये बाहेर काढून त्याचे काप करावेत. या सगळ्यांचा स्पॉन्ज तयार झाल्यानंत त्यावर शिरफ स्प्रे करावे.\nनंतर त्यावर क्रीम चा थर द्यावा. तयार झालेल्या केकचा सुगंधित क्रीमने सजावट करून त्याची साठवणूक चार अंश सेल्सिअस तापमानात करावी. व मागणीनुसार बाजारात विक्री साठी पाठवा.\nकेक विक्री व्यवसाय वाढवण्यासाठी टिप्स :- त्याचे विविध प्रकार आणि वेगळ्या पद्धती असतात, त्या पद्धती शिकून घेऊन स्वतःचे केक शॉप चालू करता येते. स्वच्छतेचे सर्व निकष पाळून आणि केक ची चांगली गुणवत्ता देऊन ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकते.\nजर या व्यवसायामध्ये जम बसला सर केकचा स्वतःचा ब्रँड तयार करता येऊ शकतो. आणि जर आपण निर्माण केलेला ब्रँड लोकप्रिय झाला तर विविध ठिकाणांचा अभ्यास करून आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन वेगवेगळ्या शहरात स्वतःची फ्रॅंचाईजी सुरू करता येते. |
जागेचे भाडे न मिळाल्याने अन्सारी यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र शालेय शिक्षणासाठी मंजूर होणाऱ्या निधीमध्ये भाडे देण्याची तरतूद नाही, असे शासनाने सांगितले. मुंबई : शाळेसाठी इमारत भाडेतत्त्वावर घेतल्यास त्याचे भाडे दिले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने लोकायुक्त माजी न्या. व्ही. एम. कानडे यांच्यासमोर दिली आहे. याचा लाभ राज्यभरातील १५०० जणांना मिळणार आहे, ज्यांनी आपली जागा राज्य शासनाला शाळा सुरू करण्यासाठी दिली आहे. नांदेड येथील मोहम्मद लियाकत अली अन्सारी यांनीही जिल्हा परिषदेला शाळा चालविण्यासाठी आपली जागा दिली होती. त्यांना गेली १० वर्षे भाडे मिळाले नव्हते. त्यांची थक्कबाकी सुमारे १५ लाख रुपये होती. ही रक्कम त्यांना येत्या आठ ते दहा दिवसात मिळेल, असे आश्वासनही लोकायुक्तांसमोर देण्यात आले आहे. या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर त्याची माहिती सादर करण्याचे आदेशही लोकायुक्त न्या. कानडे यांनी दिले. जागेचे भाडे न मिळाल्याने अन्सारी यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र शालेय शिक्षणासाठी मंजूर होणाऱ्या निधीमध्ये भाडे देण्याची तरतूद नाही, असे शासनाने सांगितले. मात्र राज्य शासन अनेक ठिकाणी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शाळा सुरू करते. काही ठिकाणी माफक भाडे घेऊन जागा मालक आपली जागा देत असतात. अधिकाधिक जणांना शिक्षण मिळावे, हा त्यामागचा हेतू असतो. जागा भाडेतत्त्वावर घेतल्यावर त्याचे भाडे वेळेत मिळायला हवे. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना लोकायुक्त न्या. कानडे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार, शाळेसाठी जागा देणाऱ्या जागा मालकांना भाडे देण्याची तरतूद केल्याचा अध्यादेश जारी केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त सचिव वंदना कृष्णा यांनी लोकायुक्त न्या. कानडे यांना दिली. आहेत. महाराष्ट्रात ही टक्केवारी गाठायची असेल तर राज्य शासनाने शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे, असे निरीक्षणही लोकायुक्त न्या. कानडे यांनी नोंदवले आहे. |
सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या फ्रान्झ काफ्काच्या एका कथेची आठवण मला अण्णा हजारेंच्या अलीकडच्या वक्तव्यांमुळे झाली. देशात आता परत आंदोलने करण्याची गरज असून हजारे अशा आंदोलनात (गरज पडल्यास) सहभागी होणार आहेत. सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या फ्रान्झ काफ्काच्या एका कथेची आठवण मला अण्णा हजारेंच्या अलीकडच्या वक्तव्यांमुळे झाली. देशात आता परत आंदोलने करण्याची गरज असून हजारे अशा आंदोलनात (गरज पडल्यास) सहभागी होणार आहेत. तसेच ते झोपलेले नसून जागे आहेत, अशा प्रकारची काही विधाने त्यांनी केल्याचे वाचनात आले. तसेच, 'मी असे म्हणालोच नव्हतो' अशाही प्रकारचे काही खोडसाळ बातम्यांचे खंडन करणारे विधान व 'खोडसाळ' बातम्या दोन्हीही बाजू वाचनात आल्या. काफ्काच्या कथेचे नाव होते, 'द फास्टिंग आर्टिस्ट' (Hunger Artist). या कथेचा नायक उपवास करण्यात पटाईत असलेला 'उपोषणपटू' आहे. गावोगाव त्याचे प्रायोजक त्याच्या 'उपोषणा'चे खेळ लावतात. एका पिंजऱ्यात त्याला बंद करून अन्नपाण्याशिवाय तो कसा व कित्येक दिवस राहतो, याची प्रदर्शने मांडण्यात येतात. तो न खाता-पिता राहतो किंवा नाही हे पाहण्यासाठी खास 'दक्ष' पथके नेमण्यात येतात व या उपोषणपटूचे उपवास कौशल्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. क्वचित प्रसंगी त्याचा उपहासही करतात, त्याच्यावर शंकाही घेतात व अशावेळी तो वैतागून व चवताळून पिंजऱ्याच्या दारावर मुठी आपटताना पाहून लोक खूष होतात. अशावेळी प्रायोजक मधे पडून त्याची बाजू तरी घेतात किंवा त्याची हेटाळणी करतात. उपोषणपटूला 'बेमुदत' उपवासाचाच ध्यास असतो. महिन्या-दोन महिन्यांच्या उपोषणापेक्षा 'बेमुदत'चा खेळ दाखवून त्याला आपल्या गुणांची चमक दाखवायची इच्छा असते. परंतु खेळ फार दिवस लांबला, तर त्या-त्या भागातील दर्शकांना तेच तेच पाहण्याचा कंटाळा येईल, म्हणून प्रायोजक मधेच खेळ आटोपून त्याला दुसऱ्या ठिकाणी प्रदर्शनासाठी उभे करीत असत. हा खेळ बरीच वर्षे चालल्यानंतर अर्थातच लोकांना तेच तेच पाहण्याचा कंटाळा येऊ लागला. प्रायोजक मिळेनासे झाले. तर आपल्याला 'बेमुदत उपासा'चा जो महान खेळ दाखवायचा आहे, ते इप्सित साध्य होत नसल्याने काफ्काचा नायक प्रायोजकांची संगत सोडून एका सर्कशीत भरती होतो. सर्कसच्या मालकाला अर्थातच या उपोषणपटूची आता फारशी किंमत उरलेली नाही, याची जाणीव असतेच. तो त्याला अन्य वन्य प्राण्यांच्या बाजूलाच रिकामा असलेला एक पिंजरा देतो. त्या पिंजऱ्यात या कथेचा नायक 'उपवासपटू' पडून राहतो. प्रेक्षक येत राहतात, पण त्याला नव्हे तर वाघ किंवा सिंह, हत्ती किंवा उंट बघायला. सर्कस सुंदरी किंवा विदूषक बघायला. याच्या पिंजऱ्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. . . वगैरे. त्याच्या शेवटाविषयी इथे काही लिहित नाही. अण्णा हजारेंचे विधान म्हणजे काफ्काच्या उपोषणपटूने सर्कसच्या पिंजऱ्यात मारलेली उडी आहे काय, असा प्रश्न माझ्या मनात आला. या प्रश्नाने मलाच भीती वाटली व खिन्नताही आली. गेली अनेक दशके आपण अण्णांची आंदोलने जवळून व लांबून पाहिली आहेत. राळेगणसिद्धी ते जंतरमंतर किंवा रामलीला ते मुंबईतील वांद्र्याचे 'बीकेसी एक्झिबिशन सेंटर' व परत राळेगण असा प्रवास आपण पाहिला आहे. तत्त्वशून्य व राजकीय विचारांच्या अभावाने अशक्त असलेल्या पण बुजगावण्याप्रमाणे उंच व शक्तिमान वाटणाऱ्या त्यांच्या आंदोलनाचा जमाखर्च मांडला तर गावोगाव प्रायोजित केलेल्या उपोषणपटूच्या खेळातून जेवढे साध्य होते तेवढेच त्या आंदोलनांनी साध्य केले. वेगवेगळ्या काळात त्या त्या वेळच्या राजकीय फडात वा सर्कशीत हे प्रयोग लावले गेले व गुंडाळले गेले. केजरीवाल, किरण बेदी, व त्यांच्या समवेत असलेले सर्वपक्षीय आंदोलक, पिंजऱ्यातले पशू, पक्षी, हा अण्णांचा शेवटचा प्रयोग असेल असे वाटत होते. या देशातील गांधी, नेहरू, आंबेडकर आदी सेक्युलर व नवदर्शनवादी राजकीय विचार संपवण्याचे जे वेगवेगळे प्रयत्न गेली दशकभर चालू आहेत त्यात नेहरूंना अनुल्लेखाने वा भंपक उल्लेखाने तर आंबेडकरांना त्यांनी दिलेल्या घटनेला बगल देण्याने मूळ मार्गातून बाजूला करण्याचे सर्वंकष प्रयत्न आज चालू आहेत. गांधींसाठी वेगळीच वाट या राजकारणाने शोधून काढली आहे. त्याचा एक भाग म्हणजे 'उपोषणपटू' सर्कस कलाकारास 'डायरेक्ट' गांधी म्हणूनच एका मोठ्या व्यासपीठावर प्रक्षेपित करणे व त्या निमित्ताने गांधीजींनी दिलेल्या 'उपवास' व 'सत्याग्रह' या अजोड अस्त्रातील ऊर्जाच काढून घेणे. त्याचा इतिहास व ऐतिहासिक अपरिहार्यता, या दोन्हीला मूठमाती देणे. त्याचे रूपांतर क्षणिक उत्सवात - वा गी दबॉरने म्हटल्याप्रमाणे 'स्पेक्टॅकल' किंवा केवळ देखाव्यात करणे. त्याचे काळाचे संदर्भ तोडून त्याला एका निरंतर किंवा सततच्या, अखंड वर्तमानाच्याच, भविष्य नसलेल्या सरकत्या वर्तमानावर उभे करणे. एकदा अण्णांना गांधी म्हणून उभे केल्यावर गांधींच्या साबरमती आश्रमात जाऊन चरख्यावर सूत कातून, त्याचे कताईचे फोटो व्हायरल करण्याचे धारिष्ट्य आपल्या प्रधानसेवकापासून खादी बोर्डाच्या नव्या संचालक मंडळाला आले, यात नवल ते काय? काफ्काच्या कथेत उपवास सर्कसपटू त्याच्या शेवटच्या क्षणात त्याच्या जीवनाचे कारण व एक अधिक मोठे सत्य सांगून जातो. उपवासपटू म्हणतो की मला कुठलाच पदार्थ खाण्यासाठी आवडत नसे, किंवा मी खाणे, भोजन करणे, जेवणे, या क्रियेचाच द्वेष करीत असे, साहजिकच उपोषण हेच माझे जगणे व जीवन होते. संतपणा व संयमाचा फोलपणा, आपण जे नाही तेच आहोत म्हणण्याचा हट्टीपणा आणि एकूणच निरर्थक, तत्त्वशून्य जगण्याला झूल व झालर चढवण्याचा दांभिकपणा हेच त्याच्या जीवनाचे सार होते. भस्म्या रोग झालेला बकासूर जेवढा भयंकर व राक्षसी तेवढाच उदराग्नी थंड पडलेला व म्हणून न खाण्याला उपवास असे नाव देणाराही. स्वतःच्याच स्वतःच उभ्या केलेल्या पिंजऱ्यातील सर्कशीच्या खेळात एक गवताची क्षुद्र काडी बनून जाणारा सर्कसपटू महात्मा कसा बनणार? फास्टिंग आर्टिस्टच्या खेळातील मजा आता संपली आहे. ज्या प्रकारची गर्दी या भ्रष्ट व देदीप्यमान बेगडी व चमचमणाऱ्या पिंजऱ्यासमोर अलीकडे पाहायला मिळते, ती पाहता जुन्या व चघळून चोथा झालेल्या कार्यक्रमांना आता फारशी संधी नाही. अण्णा एक साधे जीवन जगले. एका सामान्य गावाचे त्यांनी आदर्श गाव करून दाखवले. साध्या राहणीतून निर्माण झालेली शक्ती ही त्यांची नैतिक व भौतिक ऊर्जा आहे व होती. सर्कशीत झगमगाट असतो, चकचकीत व तंग कपडे असतात, प्राणी व पिंजरे असतात, रिंग मास्टर व मालक असतो, विदूषक व सर्कस सुंदरी असते आणि मुख्य म्हणजे ट्रॅपिजचे प्रयोग असतात. तिथे नवा पिंजरा शोधणे किंवा एका झोपाळ्यावरून दुसऱ्या झोपाळ्यावर उडी मारणे, डोळे अंधारणाऱ्या प्रकाशझोताला सामोरे जाणे म्हणजे उपवासाच्या दिवशीच कडकडून भूक लागणे, असे होऊ नये; एवढीच विनयपूर्वक प्रार्थना. |
'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. अजय देवगण, सैफ अली खान, काजोल अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. अलीकडे 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'च्या ट्रेलर लॉन्चवेळी जे काही घडले, त्यामुळे शरद केळकर अचानक चर्चेत आला. या इव्हेंटमध्ये शरद केळकरला तो साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आलेत. प्रश्न विचारताना एका पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरदने लगेचच शिवाजी नव्हे 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा, असे त्या पत्रकाराला बजावले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांबद्दलचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. आज याच मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2005 मध्ये शरदने किर्ती गायकवाडशी लग्न केले. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरदने 'सात फेरे' या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना किशा नावाची एक मुलगी आहे. किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले. नच बलिए या रिअॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे. अभिनयात येण्यापूर्वी शरद जिममध्ये नोकरी करायचा, हे क्वचितच लोकांना ठाऊक असेल. शरदचे सुरुवातीचे शिक्षण ग्वालियरमध्ये झाले. तर इंदूरच्या प्रेस्टीज कॉलेजमधून त्याने एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. या काळात शरदने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 2002 साली शरद ग्रेसिम मिस्टर इंडियाचा फायनलिस्ट ठरला. पण तो हा किताब जिंकू शकला नाही. मुंबईत आल्यानंतर शरदने एका टेलिकॉम कंपनीत पार्ट टाइम जॉब सुरु केला. सोबतच एका जीममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. कामासोबतच तो मॉडेलिंगसुद्धा करु लागला होता. 2004 मध्ये शरदला छोट्या पडद्यावर संधी मिळाली. दूरदर्शनवर प्रसारित होणा-या 'आक्रोश'या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अनेक हिंदी रिअॅलिटी शोचा होस्ट म्हणूनही तो दिसला. कालांतराने हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा आदी बॉलिवूडच्या सिनेमात तो झळकला. प्रभासने साकारलेल्या बाहुबली या व्यक्तिरेखेला शरदने आवाज दिला आहे. आज शरद एक मोठा डबिंग आर्टिस्ट म्हणूनही ओळखला जातो. |
पंचवटी : कोरोना संकटाचा गैरफायदा घेत कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात दोन इंजेक्शन ५४ हजार रुपये एवढ्या ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन नर्ससह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने चौघांचीही चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागासह आडगाव पोलिसांनी आडगाव शिवारात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करीत ५४ हजार रुपयांना दोन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तीन नर्ससह चौघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी संशयिकांकडून दोन इंजेक्शन जप्त केले असून, चौघांनाही अटक केली आहे. शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किंमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. या गुन्ह्याच्या सुगावा लागताच त्यांनी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या मदतीने इंजेक्शन खरेदीसाठी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयासमोर सापळा लावला. यावेळी जत्रा हॉटेल चौकाजवळ राहणाऱ्या संशयित जागृती शरद शार्दुल (२१), श्रुती रत्नाकर उबाळे (२१) या दोघींना रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांना स्नेहल अनिल पगारे (२२, रा. शांतीनगर मनमाड ) व कामेश रविंद्र बच्छाव (२२, उदय कॉलनी , नाशिक ) हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरीत दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन, मोबाईल , स्कूटी असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, अटक केलेल्या चौघाही संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चौघांनाही सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावल्याची मोाहिती पोलिसांनी दिली. |
CBSE Board 12th Improvement Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार म्हणजेच इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे आयोजन १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत करणार आहे. सीबीएसई बारावीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. जे विद्यार्थी आपल्या निकालाने समाधानी नाहीत, ते या श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकतात. सीबीएसई बोर्डाने संलग्न शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान, इयत्ता बारावीचे जे विद्यार्थी आपल्या निकालाबाबत समाधानी नाहीत आणि निकाल सुधारण्यासाठी परीक्षे देऊ इच्छितात, ते या महिन्यापासून सुरू होणारी क्लास इम्प्रूव्हमेंट परीक्षा देऊ शकतात. सीबीएसई बोर्ड द्वारे इम्प्रूव्हमेंट परीक्षेसाठी एक समिती नेमण्यात येणार आहेत. ही समिती या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात अंतिम निर्णय घेईल. दुसरीकडे, बोर्डाद्वारे सीबीएसई बारावी इम्प्रूव्हमेंट परीक्षेसंदर्भातील माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही. विषयवार परीक्षेच्या तारखा आणि अन्य अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाची अधिकृत वेबसाइट, cbse. nic. in ला नियमित भेट देत राहावी. कोण देऊ शकतं सीबीएसई बोर्ड बारावी इम्प्रूव्हमेंट परीक्षा? कॉरेस्पॉंडंट, खासगी आणि श्रेणीसुधार करू इच्छिणारे विद्यार्थी. सीबीएसई मार्किंग पॉलिसीद्वारे मिळालेल्या गुणांवर समाधानी नसलेले विद्यार्थी. पहिल्यांदा कंपार्टमेंट परीक्षा देणारे विद्यार्थी. सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी ज्यांना केवळ एकाच विषयाची परीक्षा द्यायची आहे. असं म्हटलं जात आहे की सीबीएसई द्वारे इम्प्रूव्हमेंट परीक्षेसाठी विषयनिहाय वेळापत्रक आणि रजिस्ट्रेशन तारीख आदी माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रक लवकरच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केलेतय जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलला भेट देत राहावी. |
भोपाळ, 28 फेब्रुवारी : ग्वाल्हेरमधील (Madhya Pradesh News) हजीरा भागातील पीएचइ कॉलनीच्या फ्लॅटमध्ये 35 वर्षीय महिलेचा न्यूड मृतदेह (Nude dead body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा दिसून येत आहेत. गळ्यावर सुऱ्याने वार केले आहेत. महिला इंदूरची राहणारी होती. 7 वर्षांपूर्वी पतीला सोडून ग्वाल्हेरला येऊन एका शेफसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. काही दिवसांनंतर तिने लग्नही केलं होत. या घटनेनंतर सीता थापाचा पती शेरू (जो तिचा लिव्ह इन पार्टनर होता) बेपत्ता आहे. फ्लॅट नंबर एस-10 मधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस टाळं तोडून आत दाखल झाले तर सीताचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. शरीरावर एकदा कापड नव्हतं. प्राथमिक तपासानुसार पतीनेच ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी रात्री वा रविवारी सकाळी महिलेचा हत्या करण्यात आली असावी. तरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोलीस तपास करीत आहेत. थेरू थापा ग्वाल्हेरमधील बँबू रेस्टॉरंटमध्ये शेफ होता. लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट बंद झाल्यामुळे त्याची नोकरी सुटली होती. यानंतर तो नशेचं व्यसन लागलं होतं. यानंतर तो नियमित दारू पिऊ लागला होता. CSP रवी भदौरियांनी सांगितलं की, महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यानंतरच नेमका प्रकार उघड होईल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव : संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे ग्रामपंचायतीच्या मालकीचा सार्वजनिक पाणी पुरवठा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या तलावात येथील काही ग्रामस्थ १० आॅगस्ट २०१९ पासून अनधिकृतपणे विद्युतपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा करत होते. हा अनधिकृत पाणी उपसा बंद करावा अशा वेळोवेळी ग्रामसेवकांनी नोटिसा बजाविल्या होत्या. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामसभेत त्यांच्याविरुद्ध सर्वानुमते ठराव झाला. ग्रामविकास अधिकारी आतीफ फाहीम शेख (वय-२१, रा. शिवाजीनगर,ता. संगमनेर ) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी देवराम अहिलाजी काळे, प्रभाकर महादू फटांगरे, मुरलीधर लहानु खरात, रवींद्र दादा खरात, बाजीराव सूर्यभान फटांगरे, शिवाजी सखाहारी फटांगरे, सूर्यभान सयाजी फटांगरे, संपत धोडींबा फटांगरे, बाळकिसन नामदेव फटांगरे, शांताराम अमृता फटांगरे (सर्व रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारखी करीत आहेत. |
९००० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅलिफोनिर्याया येथील प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. विजय मल्ल्यांचे कार कलेक्शनची सुरुवात १९१३ मध्ये रॉल्स रॉयस कार खरेदीने झाली. पुढे त्यांचे कार कलेक्शन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की, १९९२ मध्ये त्यांनी केवळ कारच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र मॅनेजरची नियुक्ती केली. मल्ल्याचा काही स्पोर्टस कार विविध दहा देशांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत. |
असा मेकअप जो केल्यासारखा वाटणारच नाही, जाणून घ्या अलायाच्या नो-मेकअप लूकचं सिक्रेट! अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप उत्पादनांचा वापर करतात. अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप उत्पादनांचा वापर करतात. अलिकडे विविध कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्टस वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स अभिनेत्री अलाया स्वतः रोजच्या जीवनात वापरते आणि त्यामुळेच नो मेकअप लुकमध्ये सुद्धा ती तितकीच सुंदर दिसते. या टिप्स वापरून तुम्ही मेकअप न करता सुद्धा सुंदर दिसू शकता. कारण नेहमीच अभिनेत्रींच्या सुंदर लुकचं आपल्याला आकर्षण असतं आणि त्याप्रमाणे दिसायचं असतं. खूप क्यूट, सिंपल आणि प्रभावी ड्रेसिंगमुळे अलाया सध्याच्या काळात चर्चेत आहे. अशात तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आलाया इतकी छान आणि सिंपल दिसते कशी? तर मग जाणून घ्या तिच्या क्युटनेसचे गुपीत. अलाया फर्नीचरवाला ही अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी आहे तसंच कबीर बेदी यांची नात आहे. जवानी जानेमन हा अलायाचा पहिला सिनेमा होता. सगळ्यात आधी अलाया क्लिंजर आपल्या त्वचेला क्लीन आणि टोन करण्यासाठी वापरते. क्लिंजर स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि लेअर तयार करण्यासाठी तसंच त्वचेला पोषण मिळण्यासाठी फायदेशीर असतात. चेहरा आणि त्वचेला फिनिशिंग लूक देण्यासाठी अलाया फाउंडेशन प्रिमियमचा वापर करते. त्यानंतर हाइड्रा फाउंडेशनने मेकअप बेस तयार करते. अलाया फिनिशिंग टच नंतर आपल्या त्वचेवर फाऊंडेशन नंतर अल्ट्रा मॅट पावडर आणि कॉम्पॅक्ट लावते. ब्लश करण्यासाठी तुम्ही अलायासारखा सेम लुक करण्याची काही गरज नाही. कारण स्किन टोननुसार तुम्ही आपल्या ब्युटिशियनचे मत विचारात घेऊन मग ब्लश करू शकता. आपले आईब्रोज् हेवी आणि डार्क दिसण्यासाठी अलाया वाईल्ड तसंच ब्लॅक पेन्सिलचा वापर करते. यामुळे तुमचे आईब्रो छान आणि डार्क दिसायला मदत होईल. सिंगल लाईट कोड लायनरचा वापर करते. आयलॅशेच एनहान्स करण्यासाठी लायनरचा वापर केल्याने तुमच्यासुद्धा पापण्या दाट दिसतील. ( हे पण वाचा-साबणाची वडी की लिक्विड सोप? त्वचेसाठी काय असतं अधिक फायदेशीर) चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या ओठांना कसं ठेवतो हे खूप महत्वाचं असतं. त्यासाठी अलाया न्युड कलर लिपस्टिकचा वापर करते. त्यामुळे तिचा हा लूक नॅचरल दिसून येतो. ( हे पण वाचा-त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर) |
अंबरनाथ : बिग सिनेमाच्या २८ कर्मचाऱ्यांची नोकरी युवा सेनेमुळे वाचली आहे. अंबरनाथच्या बिग सिनेमामध्ये काम करणाऱ्या या मुलांना १० दिवसांपूर्वी अचानक नोकरी सोडण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवली आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून सिनेमागृह बंद असून सिनेमागृह चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आता ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू करायला परवानगी मिळाली असली तरी एकही नवीन चित्रपट आलेला नसून चित्रपट आला तरी प्रेक्षक भीतीपोटी सिनेमागृहात यायला तयार नाहीत. त्यामुळे अंबरनाथच्या बिग सिनेमात काम करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. याबाबत कर्मचाऱ्यांनी युवा सेनेकडे धाव घेतली. युवा सेनेचे राज्य विस्तारक निखिल वाळेकर आणि माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी याबाबत बिग सिनेमा प्रशासनाशी चर्चा केली. तसेच मुलांना काढून न टाकता त्यांना अन्य ठिकाणी कामावर घ्या, अशी सूचना केली. त्यावर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत टप्प्याटप्प्याने सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा कामावर घेण्याचे मान्य केले. येत्या १५ दिवसांत सर्व मुलांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. |
यहोशवा 24 ERV-MR - यहोशवाचा - Bible Gateway\nयहोशवाचा अखेरचा निरोप\n24 यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.\n2 मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, "इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.3पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला.4मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.\n5 "मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. त्यांच्यामार्फत मला माझ्या लोकांना मिसरमधून बाहेर काढायचे होते. त्यासाठी मी मिसरमधील लोकांना भयंकर त्रासदायक गोष्टींनी पिडले. आणि तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले.6अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला.7तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला. म्हणून मी मिसरमधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले. समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले. मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्व्यांनी पाहिलीच आहे.\n"त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढलेत. 8 मग मी तुम्हाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील अमोरी लोकांच्या प्रदेशात आणले. त्यांनी तुमच्याशी युध्द केले पण मी तुमच्यामार्फत त्यांचा पराभव केला. त्यांचा संहार करायचे सामर्ध्य मी तुम्हाला दिले. मग तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.\n9 "त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले. 10 पण मी परमेश्वराने, बलामाचे म्हणणे ऐकायचे नाकारले. तेव्हा बलामाने तुम्हाला आशीर्वादच दिला. आणि मी तुमचे रक्षण करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले.\n11 "मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामुळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात. 12 तुमचे सैन्य चाल करून गेल्यावर मी त्याच्यापुढे गांधील माश्शा पाठवल्या. त्यांनी हैराण होऊन ते लोक चालते झाले. तेव्हा तलवार किंवा धनुष्य न वापरताच तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.\n13 "मी परमेश्वराने, तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत-ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहात आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत."\n14 मग यहोशवा लोकांना म्हणाला, "तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.\n15 "पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु."\n16 मग लोकांनी उत्तर दिले, "हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही. 17 आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले. 18 तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे."\n19 त्यावर यहोशवा म्हणाला, "हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही. 20 तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील."\n21 तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, "नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु."\n22 यहोशवा त्यांना म्हणाला, "एकदा प्रत्येकाने स्वतःकडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?"\nलोक उत्तरले, "होय निःसंशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे."\n23 तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, "तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा."\n24 लोक यहोशवाला म्हणाले, "आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू."\n25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले. 26 त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या कराराची साक्ष होय.\n27 मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, "आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील."\n28 एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.\n29 यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते. 30 तिम्नथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.\n31 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.\nयोसेफ घरी परततो\n32 इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.\n33 अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला. |
पिंपळनेर : श्री समर्थ सदगुरू खंडोजी महाराजांच्या १९१व्या अखंड श्री नामसप्ताह महोत्सवानिमित्त मंदिरात अभंग निरूपण स्पर्धा, महिला भजन, नाम जप, हरिपाठ सुरु असून भाविकांमध्ये उत्साह आहे. भाविक नाम सप्ताह महोत्सवाचा लाभ घेत आहेत. ८ व ९ सप्टेंबर रोजी श्री समर्थ सद्गुरुखंडोजी महाराज नाम सप्ताह यात्रा उत्सव होत असल्याने मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या यात्रा उत्सवात गावात सर्वत्र दिव्यांची व्यवस्था केली जात आहे. तसेच पालखी ज्या मार्गाने मार्गस्थ होते त्या रस्त्यांची दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच यात्रेत पाळणेही थाटून तयार झाली आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने गावाच्या मुख्य बाजारपेठेत बसस्टँड परिसर, मंदिर परिसर येथे पोलीस तैनात केले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी यात्रा उत्सवातील तयारी सुरू केली आहे. पालखी उत्सवानिमित्ताने मंदिर समितीतर्फे पंचक्रोशीतील भजनी मंडळांना आमंत्रित केले जात आहे. मंदिरात काकड आरतीसाठी महिला, पुरुषांची तसेच युवकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच या नामसप्ताह महोत्सवात धूम असते, ती पायदळी सोंगाची. यावेळी पायदळी सोंगामध्ये सर्वप्रथम अष्टविनायक गणेश मित्र मंडळाने गणपती व सरस्वतीचे पायदळी सोंग काढून सुरुवात केली. पायदळी सोंगामध्ये बाळगोपाळही सोंग काढण्याचा आनंद घेत आहे. तसेच यात्रा उत्सवात मराठा पाटील समाज व जागृती मित्रमंडळातर्फे सजीव वहन देखावा काढण्यात येणार आहे. सदर मंडळ तयारीला लागले आहेत. ४ रोजी सायंकाळी ४ वाजता निरूपण स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. तसेच रात्री हभप नितीन महाराज मुदावडकर कळवणकर यांचे कीर्तन होणार आहे. |
51,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह, मिनीॅपोलिस / सेंट पॉल विद्यापीठातील मिनेसोटा विद्यापीठाची विद्यापीठ अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. मिनेसॉपीतील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मिनेसॅपिझ नदीतील दोन्ही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर व्यापलेले आहे, आणि शेतमजूर कार्यक्रम शांतस्थानीच येथे आहेत. पॉल कॅम्पस यू एम अनेक मजबूत शैक्षणिक कार्यक्रम आहे, विशेषतः अर्थशास्त्र, विज्ञान, आणि अभियांत्रिकी मध्ये. हे उदार कला आणि विज्ञान आहे, ते हा फा बीटा कप्पाचा एक अध्याय आहे. मिनेसोटा विद्यापीठातील गोल्डन गोफर बिग टेन कॉन्फरन्समध्ये खेळतात आणि नवीन टीसीएफ बँक स्टेडियममध्ये खेळतात. बिग टेन स्कूलांची तुलना करा आणि गोल्डन गोफर नावाचा इतिहास जाणून घ्या. आपण मध्ये मिळेल? कॅप्पेक्सच्या विनामूल्य साधनासह येण्याची आपल्या शक्यतांची गणना करा. प्रवेशाचा डेटा (2016) नावनोंदणी (2016) - एकूण नोंदणीः 51,579 (34,870 पूर्वस्नातक) खर्च (2016-17) - शिक्षण आणि शुल्कः $ 14,142 (मध्ये-राज्य); $ 23,806 (आउट ऑफ़ राज्य) - पुस्तकेः $ 1,000 ( इतका का? ) - एकूण किंमतः $ 26,71 9 (इन-स्टेट); $ 36,383 (राज्याच्या बाहेर) मिनेसोटा विद्यापीठ आर्थिक मदत (2015-16) "मिनेसोटा विद्यापीठातील संशोधकांनी समजूत करून समृद्ध केले आहे की, शिक्षणाच्या उन्नतीसाठी व सत्यासाठी शोध करण्यासाठी समर्पित आहे; विविध समुदायासाठी शिक्षणाद्वारे या ज्ञानाच्या योगदानाबद्दल; राज्य, राष्ट्रा आणि जगाच्या लोकांना लाभ देण्यासाठी ज्ञान, अनेक कॅम्पस आणि संपूर्ण राज्यावर चालणा-या विद्यापीठाचे उद्दिष्ट तीन गुणाचे आहेः - संशोधन आणि शोध उच्च दर्जाचे संशोधन, शिष्यवृत्ती, आणि कलात्मक क्रियाकलाप करून ज्ञान, समज आणि सर्जनशीलतेची निर्मिती आणि जतन करणे जे राज्यातील विद्यार्थी, विद्वान आणि समुदायांसाठी, देशाला आणि जगाला लाभदायक ठरते. - पोहोच आणि सार्वजनिक सेवा विद्यापीठ आणि समाजातील ज्ञान बदलून, विद्वत्तापूर्ण कौशल्याचा समुदाय समस्यांना लागू करून, संस्था आणि व्यक्तींना त्यांच्या बदलत्या वातावरणास प्रतिसाद देऊन आणि ज्ञान व संसाधने तयार करून विद्यापीठातील नागरिकांच्या प्रवेशासाठी राज्य, राष्ट्र आणि जग. " |
भावी हिंदी स्वराज्य प्रतिनिधित्वाला नालायक समजावयाचा. जो स्वतःचें कल्याण अकल्याण पाहू शकत नाहीं तो दुसऱ्याचें कसें पाहणार हैं उघडच आहे. 'सप्तव्यसन - वर्जितः ' सात्त व्यसनांपासून अलिप्त असेल तो मनुष्य भला मनुष्य म्हणावा. तात्पर्यं, ज्याच्या हातीं लोकांनी आपली सर्व सत्ता' ठेव म्हणून द्यावयाची तो इसम चांगला, तशाच योग्यतेचा पाहिजे. कोणी तरी केवळ मतदार होण्यास लायक असा इसम प्रतिनिधि होण्यास लायक समजणें, त्यानें भिकायाप्रमाणें दारोदार मतांची भीक मागत फिरणें, सूक्तासूक्त वाटेल त्या रीतीनें मतें मिळविणें, त्यासाठी वाटेल तीं वचनें देणें वगैरे दोष हल्लीच्या निवडणुकीच्या पद्धतीत आहेत. आपण सर्व चांगले वाईट सारख्या योग्यतेचे अशी भलतीच समजूत सर्व मतदारांची झाल्यामुळे हल्लींच्या प्रातिनिधिक संस्थांचें समाजसत्तेत ( सोशिआलिझम, बोल्शेविझम वगैरे ) रूपांतर होतें. हे दोष आपल्या पूर्वजांनी मोठ्या चातुर्यानें घालावले होते. अनेक स्वाऱ्या, लढाया, आपसांतील द्वेष वगैरेंमुळे त्या संस्था मोडकळीस येऊन मोडल्या, ही गोष्ट निराळी. पण त्यांची रचना नमुनेदार असून ग्रकि संस्थानांनीं ती त्या काळीं उचलली तें योग्यच केलें. पुढे सुद्धा आपण तीच पद्धति स्वीकारली पाहिजे तरच आपलें कल्याण होणार.. आहे. |
सालेकसा : विद्यार्थी जीवन हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सोनेरी काळ आहे. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी बनून जगायचे असेल तर विद्यार्थी काळात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेत संधीचे सोने केले पाहिजे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल यांनी केले. त्या सालेकसा येथे मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. इमारतीचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल, अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्या दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हरिनारायण चौरसिया, नवीनभाई पटेल, विजय रगडे, सातपुते व प्राचार्य डॉ. ललीत जीवानी उपस्थित होते. वर्षा पटेल पुढे म्हणाल्या, वाढती विद्यार्थी संख्या व सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा जवाबदारी कडे वळावे लागते. विशेष करून मुलींना घरगृहस्ती मध्ये जवाबदारी संभाळावी लागते. शिक्षण घेत असताना आपल्या क्षमतेचा व बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे आयुष्यात अनेक आवाहने पेलण्याची धैर्य वाढते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार होते. ते म्हणाले की, सालेकसा तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त व मागासलेला असून या तालुक्याचे मुली व मुले शिक्षणाच्या सोयी अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडतात. २२ वर्षा पूर्वी त्यानी केलेल्या प्रयत्नामुळे प्रफुल्ल पटेल यांनी येथे पदवी महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणाची दारे उघडून दिली. येथे विज्ञान शाखा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला. कार्यक्रमाला पुरविण्यासाठी विस्तारीत स्वरूपात पुन्हा नवीन इमारत जोडण्यात आल्याचे म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करण्यात व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ललीत जीवानी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य हरिनारायण चौरसिया यांनी महाविद्यालयाच्या प्रगती बाबत अनेक प्रसंगाचा उलगडा केला. माजी मंत्री भरत बहेकार यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. प्राध्यापकांनी सुरू केलेली मेरिट स्कॉलरशीपचे ३० धनादेश पात्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. संचालन प्रा. श्रीकांत भोवते तर आभार प्रा. गोपाल हलमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) |
देश-विदेशः बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे बदलले नशीब - Maharashtra Express\nआपणा प्रत्येकाला पैशांची खूप गरज असते.\nत्यासाठी आपआपल्य़ा कामाच्या, धंद्याच्या ठिकाणी नवनवीन कल्पनांमधून आपण आपली आर्थिक स्थिती कशी सुधारु शकतो याचा विचार करतो.\nमात्र याच वेळी एखादा लॉटरी लावणारा अचानक कसा मोठा होतो याचा आपण विचार करत असतो\nआणि आपल्याही मनात लॉटरीचा विचार येतो असाच विचार एका व्यक्तीला काही तासांमध्ये कोट्याधीश करुन गेला आहे.\nहो आयुष्याची 72 वर्षे कष्ट करण्यात घालवली मात्र त्याला अचानक लॉटरी लागली तो व्यक्ती म्हणजे केरळमधील कोट्टायम येथे राहणाऱ्या सदानंदन. सदानंदन याने काही तासांपूर्वी घतलेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे आज तो 12 कोटींचा मालक बनला आहे. |
Jio Plans : रिलायन्स जिओ आपल्या स्वस्त आणि स्वस्त प्रीपेड योजनांसाठी ओळखले जाते. हे सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन योजना आणते. तुम्ही Jio च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग (Calling), मोफत एसएमएस आणि इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल आणि कमी डेटा वापरत असाल तर तुमच्यासाठी हे चांगले पर्याय असू शकतात. जिओच्या या प्लानची किंमत फक्त 15 रुपये आहे. हा प्लॅन खास अशा लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. जे रोजचे मिलेना डेटा लवकर पूर्ण करतात. आजच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरत आहेत. या प्रकरणात, इंटरनेट वापरत असताना, अनेक वेळा प्लॅनसह उपलब्ध 1 GB, 1. 5 GB, 2 GB किंवा अधिकचा कोटा संपतो. या डेटा अॅड ऑन प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. जिओच्या या प्लॅनची वैधता तुमच्या बेस प्लॅनपर्यंत कायम आहे. हा जिओच्या प्लॅनवर डेटा अॅड आहे. अशा परिस्थितीत मेसेजिंगसाठी तुम्हाला एसएमएसची सुविधा मिळत नाही. Jio चा 75 रुपयांचा प्लान हा कंपनीचा सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग रिचार्ज प्लान आहे. जिओचा 75 रुपयांचा प्लॅन एकूण 23 दिवसांची वैधता देतो. हा प्लॅन कमी डेटा वापरणाऱ्या जिओ युजर्ससाठी आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज 100MB डेटा ऑफर केला जातो, तर 200MB डेटा संपूर्ण वैधतेसह ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड मर्यादा 64kbps पर्यंत कमी होते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. यासोबतच ५० एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. जर आपण इतर फायद्यांबद्दल बोललो तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मोफत डेटा आणि कॉलिंगसह Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या ९१ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज O. 1MB डेटा मिळतो. याशिवाय कंपनी 200MB अतिरिक्त डेटा देखील देते. एकूणच, जिओच्या या प्लॅनमध्ये 3GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गुढीपाडवा, शाळेत प्रवेश वाढवा' या टॅगलाइनवर 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात हळदी कुंकूसारखे उपक्रम राबविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना दिल्या. मात्र, या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाची परवानगीच घेतली नाही. त्यामुळे शेख यांचे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागविणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली. |
एकीकडे आड, दुसरीकडे विहिर! एकीकडे आड, दुसरीकडे विहिर! युध्दाच्या धुमश्चक्रीत शत्रुंच्या घरादारावर हल्ला करताना शत्रुच्या बायकोला ठार मारण्याचे ऑर्डर्स हवालदार मानसिंग याला मिळाले होते. हे युध्दही कुठल्याही सबळ कारणासाठी लढला जात नव्हता. शत्रूंचा धर्म वेगळा म्हणून युनिटच्या सर्वांना चेव चढला होता. वरिष्ठांच्या ऑर्डर्सचे पालन न करणाऱ्यास कोर्ट मार्शलचे सोपस्कार न करताच जिवेनिशी मारले जाईल अशी तंबी दिली होती. हवालदार मानसिंगला हे एक भयंकर कृत्य असून ते करणे योग्य वाटत नव्हते. शत्रूची बायको एक निरपराध व्यक्ती होती. केवळ तिचा आणि माझा धर्म वेगवेगळा आहे म्हणून तिला ठार मारणे अन्यायकारक ठरेल असे त्याला वाटत होते. वरिष्ठांची अशा प्रकारची आज्ञा पाळणे हा युध्दगुन्हा आहे अशी त्याची खात्री होती. युध्दगुन्हा ठरविण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जिवंत राहून लढा द्यावा लागेल. मात्र हा रक्तपिपासू मेजर त्याला जिवंत ठेवेल याचीच त्याला खात्री नव्हती. ऑर्डर्स पाळण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. जर त्या स्त्रीला हवालदार मानसिंग यानी न मारता तसेच जिवंत सोडून दिल्यास त्यालाच इतरांनी गोळी घालून ठार मारले असते. कुठल्या कारणासाठी त्याला मारले याचा थांगपत्ताही कुणाला लागला नसता. शिवाय त्याच्या मृत्युपश्चात या बाईचे काय हाल झाले असते - सामूहिक बलात्कार, छळ व शेवटी दुर्मरण - या कल्पनेची पण त्याला शिसारी येत होती. त्यापेक्षा आपणच मन घट्ट करून, धैर्य एकवटून तिला गोळी घालून ठार केल्यास तिची निदान मरणयातनेतून तरी सुटका होईल, हाही विचार त्याच्या मनात घोळत होता. जरी हा तर्क योग्य वाटत असला तरी त्याच्या मनाला अस्वस्थपणा जाणवत होता. एखाद्याचा जीव घेणे ही कल्पनाच त्या अस्वस्थतेचे मूळ होते. प्राप्त परिस्थितीचा सामना तो कसा काय करणार? त्याचा निर्णय कुठलही असो, तो एकाच वेळी योग्य व अयोग्य असणार हे मात्र नक्की! आपण करत असलेल्या दुष्कृत्याचे (लंगडे!) समर्थन करण्यासाठी मी नाही केल्यास दुसरा करेल हा युक्तिवाद नेहमीच केला जातो. खरे पाहता आपल्या कृत्यांना आपणच पूर्णपणे जवाबदार असतो; इतर काय करणार याचा विचार करण्याचीसुध्दा गरज नसते. उघडयावर पडलेला मोबाइल आपण न उचलल्यास इतर कुणीतरी घेऊन जाईल म्हणून मी उचलला असे म्हणत आपण आपल्या मनाचे समाधान करून घेत असल्यास आपण चक्क चोरी करत आहोत हे कसे काय विसरू शकतो? हवालदार मानसिंगसमोर असलेली समस्या फारच गंभीर स्वरूपाची होती. त्याने तिला ठार न मारल्यास तिची अवस्था फारच कठिण होईल, तिला मरणयातना सहन करत शेवटी मरून जावे लागेल, हालाहाल करून तिला जिवेनिशी मारले जाईल, याची त्याला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत तिला गोळी घालून मारणे हाच एकमेव पर्याय असून तो अत्यंत योग्यही आहे, असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. सामान्यपणे दुसऱ्याचे नुकसान न केल्यास किंवा कुठल्याही प्रकारची इजा न करता काम करत असल्यास त्याला नैतिक असे म्हटले जाते. मानसिंगला नीतीने वागावे असे अगदी मनापासून वाटते. शत्रू स्वतःहून हल्ला केल्यामुळे त्याला ठार मारणे हे त्याच्या नैतिकतेत बसते. कारण त्यानी पत्करलेल्या या सैनिकी पेश्यात हेच अपेक्षित आहे. परंतु काही कारण नसताना शत्रुच्या बायका-मुलांना मारणे हे त्याच्या दृष्टीने अनैतिक असते. मात्र स्वतःचा जीव वाचविणे व त्या स्त्रीला जास्त दुःख न देता ठार मारणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी तो नीतीला अनुसरून असणार नाही, यामुळे तो अस्वस्थ आहे. कुणाचा तरी जीव घेणे हा तर्क केव्हाही नैतिक नसणार! अजून एक पर्याय या चर्चेमधून सुचण्याची शक्यता आहे. तिलाही मारणे व तिला मारल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून स्वतःलाही मारून घेणे. परंतु चिकित्सक विचार प्रयोगात आपण अशा वेगवेगळया पर्यांयाचा विचार करत नसतो. या प्रयोगात मानसिंगसमोर फक्त दोन पर्याय आहेतः त्यानी तिला गोळी घालून मारून टाकावे किंवा वरिष्ठांचे ऑर्डर्स न पाळता स्वतःच मरणाला सामोरे जावे. आपल्याला आता नैतिकता व अनैतिकता याविषयी निर्णय द्यायचा असून आणखी किती पर्याय असू शकतील, व अशा पर्यायांची साधक-बाधकता काय असेल इत्यादींच्या शोधाच्या फंदात पडायचे नाही. कित्येकांना काही वेळा योग्य कृती करणे अशक्यातली गोष्ट असेही वाटेल. कृती केली तरी अनीती व न केली तरी अनीती या कात्रीत सापडल्यामुळे परिस्थितीचा सामना कसा करावा हेच उमजत नाही. (टु बी ऑर नॉट टु बी ) अशा प्रसंगी कमीत कमी नुकसान होईल तो पर्याय निवडण्याकडे कल असतो. परंतु हा तर्कसुध्दा आपल्याला गोत्यात आणू शकेल. मानसिंग त्या बाईला गोळी घालून मारण्याचा पर्याय निवडत असल्यास आपण त्याला दोष देऊ शकणार नाही. त्याला कुठलीही शिक्षा सुनावणार नाही. जर तो गोळी मारूनसुध्दा निर्दोष सुटल्यास त्यानी केलेली कृती योग्य व नैतिक होती असेच म्हणावे लागेल. परंतु एखाद्या निरपराध्याची जाणून बुजून हत्या करणे कुठल्या नैतिकतेत बसते, याचे उत्तर देता येईल का? कदाचित कृती वाईट परंतु हेतू चांगला अशी पळवाट यातून काढता येईल. मानसिंगने केलेली कृती वाईट होती, परंतु त्यात त्याची चूक नव्हती, असेही म्हणता येईल. हा तर्क बरोबर आहे असेही वाटू लागेल. जगाचे व्यवहार किती गुंतागुंतीचे आहेत हेही यावरून कळेल. यावरून आपण जे उघड उघड अन्यायकारक व/वा अनैतिक आहे त्याचेच समर्थन करत आहोत, याचे थोडेसे तरी भान हवे. हा तिढा सोडवायचेच असे ठरविल्यास साधन व साध्य यांची फारकत करावी लागेल. मानसिंग यानी ऑडर्स पाळण्यास नकार द्यायला हवे होते. त्यासाठी त्याला स्वतःचा बळी द्यायची तयारी ठेवायला हवे. मानसिंग यानी त्या परक्या व अनोळख्या स्त्रीचे पुढे काय होणार याची काळजी करायची गरज नाही. मानसिंग असे करू शकल्यास त्याच्या नीती मूल्याला धक्का लागणार नाही. परंतु नैतिकतेच्या या लुटुपुटू लढाईत त्या स्त्रीला मरणांतिक वेदना होत मरण पत्करावे लागणार त्याचे काय? |
साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले. शिर्डी : साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले. संबंधित शेतक-याची जमीन खरेदी करण्यासंबंधी या व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय घेण्याची ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. न्यायालयाने यापूर्वीच अनुमती देऊन तसेच गेल्या सात महिन्यांपूर्वी संस्थाननेही या संदर्भातील उपोषणकर्त्यांना आश्वासन देऊनही अशोक गोंदकर यांची जमीन खरेदी केली नाही़ याबाबत संस्थान काहीही ठोस भूमिका घेत नसल्याने मंगळवारीच गोंदकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी अशोक गोंदकर यांनी साईनिर्माण संघटनेचे अध्यक्ष विजय कोते व माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता अनेक कार्यकर्त्यांनी संस्थानच्या सभागृहाच्या दरवाजाचा ताबा घेतला़ दरवाजालाच फलक लावून प्रवेश बंद केला़ तसेच सभागृहासमोर बसून टाळ वाजवून आंदोलन सुरू केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, सचिन चौघुले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलक हटत नसल्याचे बघून व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणेचा वापर करून अन्यत्र बैठक घेण्याचा पवित्रा घेतला. यानंतर आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता पाहून हावरे यांनी विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांना चर्चेसाठी पाठविले. आंदोलकांनी चर्चेस नकार दिल्याने अखेर हावरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आजच सभागृहात निर्णय घेऊन शासन मान्यतेसाठी पाठवू, त्या मान्यतेनंतर जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करू, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा योगिता शेळके, विश्वस्त बिपीन कोल्हे, प्रताप भोसले आदींची उपस्थिती होती. |
भिवंडी, दि. ४ - परकीय आक्रमणांनी पिचलेल्या सर्वसामान्यांच्या मनातील स्वाभिमानाला फुंकर घालून स्वराज्य निर्माण कऱण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. स्वराज्यातील सर्वात लहान घटक देखील दुःखी राहणार नाही, याची काळजी शिवरायांनी घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील छत्रपतींचे हे कार्य पुढे नेऊन राष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे बौद्धिक प्रमुख प्रा. शरद कुंटे यांनी व्यक्त केला. रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचा प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग भिवंडीतील प्रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या एकवीस दिवसीय वर्गात मुंबई, ठाण्यासह कोकणातील सर्व जिल्हे आणि गोवा राज्यातून एकूण १४५ स्वयंसेवक आले होते. या वर्गाचा समारोप आणि छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हिंदूसाम्राज्य दिनाचा उत्सव शनिवारी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण न्यासाचे अध्यक्ष सोन्या पाटील उपस्थित होते. या वर्गाचे कार्यवाह उत्तम आंबेकर, सर्वाधिकारी नंदा ओझे, कोकण प्रांताचे संघचालक बापूसाहेब मोकाशी आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. भारतीय इतिहासाचा अभ्यास केला, तर अनेक लोकप्रिय राजांच्या अभिषेकाचे उल्लेख त्यात सापडतात. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व या सर्व समारंभांपेक्षा वेगळे आणि मोठे आहे. सुलतानी आक्रमणानंतर सुमारे ९०० वर्षे आपला देश परकीयांच्या अधिपत्याखाली अक्षरशः भरडून निघाला होता. या परकीय आक्रमकांनी देवस्थाने आणि महिलांची विटंबना केली. देशातील जनतेला लुटले. सततच्या या आक्रमणांमुळे पिचलेल्या जनतेचा स्वाभिमान शून्यवत झाला होता. याच सुमारास परमेश्वरी कार्य म्हणून स्वराज्य स्थापनेचा धाडसी आणि यशस्वी प्रयत्न कऱणार्या शिवाजी महाराजांनी जनतेच्या स्फुलिंगाला नवी चेतना दिली. परकीय सत्ताधिशांचे वर्चस्व झुगारून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या सुवर्णेतिहासातील परमोच्च प्रसंग होता. शिवरायांचे चरित्र हे आजही देशप्रेमी व्यक्तींसाठी स्फूर्तीदायक ठरते आहे, असे प्रा. कुंटे यांनी सांगितले. संघशिक्षा वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी यावेळी दंडयुद्ध (लाठीकाठी), निःयुद्ध (स्व-संरक्षण तंत्र), लेझीम, व्यायामयोगाची मनोहारी प्रात्यक्षिके सादर केली. स्वयंसेवकांनी सादर केलेले प्रदक्षिणा संचलन हा प्रेक्षकांच्या अपूर्वाईचा विषय ठरला. या वर्गात स्वयंसेवकांना शरिरीक, बौद्धिक, सामाजिक स्वच्छता, सेवाकार्ये, प्रथमोपचार, प्रचार आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे वर्गाचे कार्यवाह आंबेकर यांनी सांगितले. समारोप कार्यक्रमातील प्रात्यक्षिके पाहण्यासाठी भिवंडीकरांनी या कार्यक्रमाला बरीच गर्दी केली होती. |
Medicine From The Sky Telangana Launches Delivery Of Medicines And Vaccines By Drones 2\nHome विशेष 'या' राज्यात ड्रोनद्वारे पोहोचणार लस... काय आहे उपक्रम?\n'या' राज्यात ड्रोनद्वारे पोहोचणार लस... काय आहे उपक्रम?\nहा प्रकल्प तेलंगणातील 16 ग्रीन झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे.\nSeptember 14, 2021 1:22 PM Mumbai\nनागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे माहिती, तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव यांनी शनिवारी पहिला मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट लॉन्च केला. ज्याचा उद्देश ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम भागात लस आणि इतर आवश्यक उत्पादनं पोहोचवणे हा आहे. यामध्ये मारुत ड्रोन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, हेलीकॉप्टर, ब्लू डार्ट मेड एक्स्प्रेस, ब्लू डार्ट आणि स्काय एअर यांचा समावेश आहे.\nप्रायोगिक तत्वावर सुरू करणार\nमेडिसिन फ्रॉम द स्काय हा प्रकल्प तेलंगणातील 16 ग्रीन झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये तयार करण्यात येणा-या डेटाच्या आधारावर हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात येईल, असे सिंधिया यांनी सांगितले. मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट हा तेलंगणातील जागतिक आर्थिक मंच, नीती आयोग आणि अपोलो हॉस्पिटलच्या हेल्थनेट ग्लोबल यांच्या भागीदारीतून साकारण्यात आलेला एक उपक्रम आहे.\nआव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपयोग होणार\nभारतात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ग्रामीण व दुर्गम भागात खूप कमी आहे. देशातील अनेक भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ही डोंगराळ, जंगल किंवा नदी क्षेत्रात आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वर्षातील अनेक महिने ही केंद्रे रस्त्यांपासून तुटली जातात. बर्फाळ प्रदेशात देखील हवामानाच्या समस्यांमुळे आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे या भागांत कोविड-19 लसीकरण करणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे अशा भागातील हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हेलिकॉप्टर ड्रोन तयार करण्यात आल्याचे मारुत ड्रोनेटेकचे संस्थापक प्रेमकुमार विस्लावाथ यांनी सांगितले.\nआरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान यांची सांगड\nमाहिती व तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव म्हणाले की, हा प्रकल्प तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवेचा एक महत्वाचा बिंदू आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्य आघाडीवर आहे. ड्रोन इकोसिस्टमसाठी भांडवल गोळा करण्याच्या पैलूंचा शोध घेण्याकरिता WEF ने तेलंगणा सरकार, PHFI आणि नीती आयोग यांचा समावेश असलेल्या इंडस्ट्री कोअर ग्रुपची नियुक्ती केली आहे.\nपूर्वीचा लेखगुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला... सामनातील अग्रलेखावर नितेश राणेंची टीका\nपुढील लेखपरप्रांतीयांची नोंद : भाजपाची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार! |
गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या हितासाठीच्या या योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरील अधिकारी ज्याप्रमाणे दरवर्षी पुराची किंवा दुष्काळाची वाट बघतात, जेणेकरून सरकारद्वारे भरपाई म्हणून दिल्या जाणाऱ्या निधीने स्वतःचे खिसे भारता येतील, तसाच हा प्रकार आहे. सरकारी योजना कशा प्रकारे राबविल्या जातात आणि त्या कशा बारगळू दिल्या जातात हे समजून घ्यायचे असेल, तर 'प्रधानमंत्री मातृवंदना योजने'कडे बघायला हवे. ही योजना म्हणजे नाव बदलून, नव्या बाटलीमध्ये जुनी दारू भरली आहे. परंतु ज्या पद्धतीने तिची अंमलबजावणी झाली आहे, तो एक राष्ट्रीय पातळीवरील घोटाळा म्हणायला हवा. आधी या योजनेचे महत्त्व समजून घेऊ या. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही, भारतातील गर्भवती स्त्रियांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षय (रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता) मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कुपोषणग्रस्त आईचे बाळही कुपोषित असण्याची शक्यता जास्त असते. गर्भातच कुपोषण झालेली मुले, पुढे आयुष्यभर कुपोषणग्रस्त राहतात, कारण (कुपोषणाची) काही लक्षणे कधीच उलथवून लावता येत नाहीत. या समस्येकडे भारत सरकारचे लक्ष १९८०च्या दशकामध्ये गेले. ही समस्या विशेषतः गरीब व असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्तनपान करणार्या मातांमध्ये (lactating) दिसून येते. या अनुषंगाने गर्भवती स्त्रियांच्या फायद्यासाठी 'मातृत्व लाभ योजना' सुरु करण्यात आली. यामध्ये गर्भवती स्त्रियांना दोन टप्प्यांमध्ये ६००० रुपये देण्याची तरतूद होती. पहिला हप्ता योजनेमध्ये स्त्रीची नोंदणी झाल्यावर आणि दुसरा मुलाचा जन्म झाल्यावर. या योजनेचे नाव नंतर 'इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना' ठेवण्यात आले व तिची ५३ जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी झाली. मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी ही योजना देशभर राबविण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव बदलून 'प्रधानमंत्री मातृवंदना योजना' ठेवण्यात आले आणि रोख मदत ६००० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आली, जी तीन हप्त्यांमध्ये देण्याची तरतूद करण्यात आली. १५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या 'हिंदुस्तान टाइम्स'मधील एका बातमीनुसार, योजना सुरु होऊन वर्षभरानंतरही केवळ २% लाभार्थींना या योजनेतून मदत मिळाली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, आम्ही 'माहितीच्या अधिकारा'खाली अर्ज करून सरकारला अनेक प्रश्न विचारले. यावर मिळालेली उत्तरे धक्कादायक आहेत. सरकारने ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत १६५५. ८३ कोटी रुपये, १८,८२,७०८ लाभार्थींना देण्यासाठी दिले होते. परंतु या रकमेच्या वितरणामध्येच ६,९६६ कोटी रुपये खर्च केले गेले. याचा अर्थ योजनेमध्ये झालेला प्रशासकीय खर्च हा कुपोषित मातांना देण्यात आलेल्या खर्चाच्या ४. २पट इतका होता. - ओडिशामध्ये नोव्हेंबर २०१८पर्यंत या योजनेअंतर्गत केवळ पाच लाभार्थींची नोंदणी झाली होती. याचा अर्थ २५,००० रुपयांचे वितरण झाले होते. प्रशासकीय खर्च मात्र २७४ कोटी रुपये इतका झाला होता. - आसामध्येही असेच आकडे दिसून येतातः ३,०९९ लाभार्थींपर्यंत ११. ५८ कोटी रुपये पोहोचले होते, तर प्रशासकीय खर्च ४१० कोटी रुपये इतका झाला होता. - गुजरातमध्ये या योजनेमध्ये १,२१,४२२ लाभार्थींची नोंदणी झाली आहे व त्यांच्यापर्यंत एकूण ९६. १५ कोटी रुपये पोहोचले आहेत. परंतु यासाठी सरकारला ५२,५८४ अंगणवाड्यांना समाविष्ट करून घ्यावे लागले व योजनेवर २९७. २१ कोटी इतकी अधिक रक्कम खर्च करावी लागली. - केरळमध्ये, ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत ८१,७०८ स्तनपान मातांमध्ये (lactating) ६४. ६८ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. परंतु यासाठी ३३,४५२ अंगणवाड्यांची नोंदणी करावी लागली व यासाठी ७१. ०६ कोटी प्रशासकीय खर्च आला. - बिहारमध्ये या योजनेसाठी ३१७. २३ कोटी इतका प्रशासकीय खर्च आला आणि लाभार्थींची संख्या १२,४१५ इतकी होती. - या तुलनेमध्ये, जम्मू आणि काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्ये लाभार्थींची संख्या अनुक्रमे १४,३२५ व ३०,६७८ इतकी होती. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या हितासाठीच्या या योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरील अधिकारी ज्याप्रमाणे दरवर्षी पुराची किंवा दुष्काळाची वाट बघतात, जेणेकरून सरकारद्वारे भरपाई म्हणून दिल्या जाणाऱ्या निधीने स्वतःचे खिसे भारता येतील, तसाच हा प्रकार आहे. (मोदी सरकारच्या मुख्य योजनांचे विश्लेषण करणाऱ्या वादा फरामोशी यांच्या पुस्तकातील हा वेचा विशेष परवानगी घेऊन छापण्यात आला आहे. नौशीन रेहमान याच्या मूळ हिंदी लेखाचे भाषांतर असलेल्या इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे. ) |
पुणे, ता. ७ : एका पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण करून पैसे लुबाडल्याची तक्रार ज्येष्ठ महिलेने पोलिस आयुक्तालयात केली. अडीच वर्षांपूर्वी तक्रार देवूनही ज्येष्ठ महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे या ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. प्रमिला माणिकचंद शेलोत (वय ७१, रा. अलंकापुरम, चऱ्होली) असे ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. ही महिला सध्या स्वारगेट परिसरात वास्तव्यास आहे. या महिलेने पुणे पोलिस आयुक्तालयात १० नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार अर्ज (क्रमांक ५८८७) आणि पुन्हा ३० सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार अर्ज (क्रमांक ८१८३) दिला आहे. प्रमिला शेलोत यांचे पती आणि मुलाचे निधन झाल्यामुळे त्यांना कोणाचा आधार नाही. ही महिला आळंदी रस्त्यावरील अलंकापुरम चऱ्होली पायथ्याजवळ भाडेतत्त्वावर राहत होती. त्यावेळी विश्वेश्वर कदम याने घरमालकाच्या मदतीने महिलेची १५ लाख ५० हजारांची रोकड आणि संसारोपयोगी भांडी लंपास केले. तसेच, या कर्मचाऱ्याने मारहाण करून महिलेचे बॅंक पासबुक आणि मोबाईल घेतले, असे ज्येष्ठ महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच, तिचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत, असे या महिलेचे म्हणणे आहे. |
आता त्या परिपूर्ण गॅस (gas) समीकरणाच्या संकल्पनेनुसार, त्या गैर-परिपूर्ण वायू वर्तनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, म्हणून आपण येथे विचार करत आहोत की, गैर-परिपूर्ण वायूचे समीकरण सामान्य रूप आहे की तुम्हाला हे माहित असेल की Pv हे zRT च्या बरोबरीचे आहे, येथे लहान v मोलारच्या प्रमाणाशिवाय काहीच नाही, येथे हा लहान v दुसरे काही नसून मोठा V भागिले n आहे. मोठा V तुम्हाला माहित आहे की त्या वायूचे परिमाण आणि n हे मोल्सची संख्या आहे. तर, लहान v जो मोलच्या आधारावर एक विशिष्ट प्रमाण आहे ज्याला मोलर (molar) प्रमाण म्हणतात. तर, हे V भागिले n हे लहान v ला दर्शवित आहे. तर, समीकरणातून तुम्ही असे लिहू शकता की, Pv हा ZnRT च्या बरोबर आहे. आपण येथे लिहू शकतो z हे Pv भागिले RT च्या समान असेल. तर, हे Pv भागिले RT किंवा z हे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) आहे, आपण त्याला विशिष्ट मोलर (molar) प्रमाणाचे कार्य म्हणून दर्शवू शकता. तर, हे 1+ B भागिले v + C भागिले v + D भागिले v द्वारे दर्शविले जाऊ शकते. जेथे B, C, D हे सर्व गुणांक आहेत, त्या गुणांकांना विरियल (Virial) गुणांक म्हणतात आणि विरियल (Virial) गुणांक प्रत्यक्षात त्या विशिष्ट प्रणालीच्या तापमानावर अवलंबून असतात. तुम्हाला हे दिसेल की हे C आणि D मूल्ये या दुसऱ्या विरियल (Virial) गुणांकाच्या तुलनेत लहान होत आहेत. म्हणून त्यानुसार, आपण असे म्हणू शकतो की जर आपण उजव्या बाजूच्या या दोन अटींकडे दुर्लक्ष केले, तर उर्वरित भाग 1 + B भागिले v आहे. म्हणून, या 1 + B भागिले v वरून, आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) z किती असावा याची थेट गणना करू शकता. आता, या बाबतीत, येथे दिलेल्या खालील सहसंबंधांवरून या B चा अंदाज लावला जाऊ शकतो. तर, हे गुणांक मुळात गंभीर तापमान आणि गंभीर दाबावर अवलंबून असतात. तर, हे B मूल्य व्यक्त केले जाऊ शकते, कारण येथे B हा RTC भागिले Pc गुणिले B0 + ओमेगा गुणिले B1 च्या बरोबर आहे. तर हे बी 0 एक स्थिर आहे जे त्या कमी तापमानावर देखील अवलंबून असते. हे प्रतिनिधित्व करण्यासाठी समीकरण आहे. येथे BO आहे आणि B1 देखील एक स्थिर आहे, की B1 देखील स्लाइड्समध्ये दिलेल्या या परस्परसंबंधाने व्यक्त केले जाते, तर ओमेगाला संकेन्द्रिक घटक म्हणतात. या संकेन्द्रित घटकाचे नंतरही वर्णन केले जाईल. हा आणखी एक घटक आहे, जो तेथे गंभीर तापमान आणि दाब यावर अवलंबून असतो. म्हणून, जर तुम्हाला माहित असेल की संकेतात्मक घटक आणि ते गंभीर तापमान आणि दाब, तुम्ही तेथे B मूल्य काय असेल हे शोधू शकाल, आणि एकदा तुम्हाला ते B मूल्य समजले की, नंतर तुम्ही समीकरणावरून कोणत्या कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) काढू शकता? (Refer Slide Time: 24:26) Compressibility foctor, zpv/RT Compressibility Chart 0.5 Reduced pressure, P Source: D. M. Himmelblau, J. B. Riggs. Basic Principles and Calculations in Chemical Engineering. 7/8th Ed.. Prentice Hall of India, 2012. आता, येथे एक भरपाई तक्ता देण्यात आला आहे. हे मुळातच कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) कमी दाबाचे कार्य आहे, ते येथे दिले आहे. तर, हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) विरुद्ध कमी दाब तो बनवला जातो, तो तुमच्या पाठ्यपुस्तकातील हिमेलब्लाऊ (Himmelblau) मधूनही घेतला जातो. तर, तुम्ही त्यातूनही जाऊ शकता. येथे पहा की ते कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) कसे आहे, ते त्या विशिष्ट वायूंच्या कमी मोलरच्या (molar) आकारासह बदलत आहे आणि ते कमी तापमानाने कसे बदलत आहे आणि ते कमी दाबाने कसे बदलत आहे? तर, एका विशिष्ट कमी तापमानावर, म्हणजे T भागिले Tc आणि तेथे मोलरचे (molar) प्रमाण देखील कमी केले जर तुम्हाला ते माहित असेल, तर तुम्ही एका विशिष्ट कमी केलेल्या दाबाने सहजपणे गणना करू शकता, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर (compressibility factor) किती असावा. आपल्याकडे हे काही वायू येथे असू द्या, समजा हा कमी झालेले मोलर (molar) मूल्य येथे आहे आणि ते कमी झालेले तापमान 1 |
कर्वेनगर : अमरावतीमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्याला अटक करून मोबाईल जप्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज एमआयटी कॉलेजसमोर आंदोलन करण्यात आले. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी प्रशांत राठोड या विद्यार्थ्याच्या राज्याचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रश्न केला, 'आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांची इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणाची सोय करून देईल काय? ' यावर विनोद तावडे यांनी 'तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर,' असे अफलातून उत्तर दिले. अशा प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून दडपशाहीचा मार्ग अवलंबन करणाºया आणि लोकशाहीस काळिमा फासणाºया हुकुमशाही प्रवृत्तीच्या तावडे यांचा आज एमआयटी कॉलेजे कोथरुड येथे महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत. याप्रसंगी एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, राज्य महासचिव वीरेंद्र सिंहासने, कोथरुड ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर, किशोर मारणे, किरण मारणे, सजंय मानकर, युवराज मदगे, उमेश ठाकुर, राजेंद्र मगर, राज जाधव, प्रफुल्ल पिसाळ, अभिजित पाटील, कुणाल मिसाळ व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ४या प्रकरणाचे चित्रीकरण करणाºया विद्यार्थ्यांना अटक करण्याचे तुघलकी आदेश दिले. प्रसंगी पोलिसांनी मोबाईल हिसकावून विद्यार्थ्याला पोलीस वाहनात डांबून ठेवले. नंतर विद्यार्थ्यांचा वाढता दबाव पाहता त्या विद्यार्थ्याला सोडून देण्यात आले, पण मोबाईल जप्त करण्यात आले. एकूणच हा प्रकार मानवी हक्कांची पायमल्ली करणारा असून, विद्यार्थ्यांचे किंबहुना देशाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हनन आहे. |
'आप'मध्ये होळीपूर्वीच सुरू झालेल्या 'धुळवडी'ची परिणती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विरोधक योगेंद्र यादव आणि भूषण कुटुंबियांच्या गच्छंतीने होते की, विकोपाला पोहोचलेल्या गटबाजीवर सामोपचाराने तोडगा निघतो याचा आज, बुधवारी फैसला होणार आहे. यादव, भूषण यांची गच्छंती की वादावर तोडगा? दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीमध्ये होळीपूर्वीच सुरू झालेल्या 'धुळवडी'ची परिणती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विरोधक योगेंद्र यादव आणि भूषण कुटुंबियांच्या गच्छंतीने होते की, विकोपाला पोहोचलेल्या गटबाजीवर सामोपचाराने तोडगा निघतो याचा आज, बुधवारी 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत फैसला होणार आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे असलेल्या राष्ट्रीय संयोजकपदावरून पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. दिल्लीत दोनवेळा सत्तेत पोहोचणाऱ्या 'आप'ला सव्वादोन वर्षांच्या राजकीय वाटचालीतील सर्वात मोठ्या अंतर्गत कलहाला सामोरे जावे लागत आहे. बुधवारच्या बैठकीत प्रशांत भूषण आणि यादव यांची 'आप'च्या राजकीय कामकाज समितीतून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल समर्थक आशुतोष आणि आशिष खेतान यांनी ट्विटरद्वारे भूषण कुटुंबीयांवर हल्ला चढविला, तर योगेंद्र यादव प्रसिद्धी माध्यमांच्या मदतीने 'आप'विरुद्ध बातम्या पेरत असल्याचे स्टिंग आज उघड झाले. केजरीवाल यांच्यासोबत सदैव राहणारे विभव यांनी एका इंग्रजी दैनिकाच्या महिला पत्रकारासोबत फोनवर झालेले संभाषण टेप केले आणि योगेंद्र यादव यांच्याविरुद्धचा पुरावा म्हणून २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ते सादर केल्याचे समजते. शांती भूषण, प्रशांत भूषण आणि शालिनी भूषण हे एकाच कुटुंबातील तीन सदस्य 'आप'ला कुटुंबकेंद्रीत करू इच्छित असल्यामुळे त्यांनी केजरीवाल यांना लक्ष्य करून 'आप' व्यक्तिकेंद्रीत होत असल्याची टीका केली असल्याचा आरोप खेतान यांनी केला आहे. केजरीवाल यांना लक्ष्य करू पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर 'आप'च्या राष्ट्रीय संयोजकपदाच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत कार्यकारिणीच्या बैठकीत भाग न घेण्याचे केजरीवाल यांनी ठरवले आहे. मात्र, केजरीवाल यांनी तब्येतीचे कारण सांगून बेंगळुरूमध्ये निसर्गोपरासाठी जाण्यासाठी दहा दिवसांची रजा घेतली आहे. राष्ट्रीय संयोजकपद मिळवू पाहणारे योगेंद्र यादव मात्र बैठकीत हजर राहणार असून, भूषण यांच्या अनुपस्थितीत त्यांना केजरीवाल समर्थकांच्या भडिमाराचा सामना करावा लागणार आहे. |
Pune : वाद प्रशासनाचे, हाल प्रवाशांचे! पुणे : वाकडेवाडीला बस स्थानकांचे स्थलांतर झाल्याने सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना वाकडेवाडीला येण्यासाठी जास्तीचा वेळ व पैसे खर्चावे लागते. वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांकडून जास्तीच्या दराची आकारणी त्यामुळे मनस्ताप देखील होतो. अपुऱ्या जागेत हे बस स्थानक उभारल्याने एसटीला देखील मोठा फटका बसत आहे. शिवाजीनगरच्या तुलनेत येथे एसटीच्या रोज सुमारे सातशे फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय प्रवाशांना देखील कमी फेऱ्यांचे फटका सहन करावा लागत आहे. ना येथे उपाहारगृह आहे, ना बसण्याची नीट व्यवस्था आहे. तीन वर्षांसाठी स्थलांतरित झालेल्या या बस स्थानकाचा जागेचा वाद अद्याप सुरु आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे मात्र हाल सुरूच आहे. मेट्रो प्रशासनाने शिवाजीनगर बस स्थानकाच्या खाली भुयारी स्थानक बांधण्यासाठी बस स्थानक पाडले. त्या बदल्यात शिवाजी नगरचे बस स्थानक तीन वर्षांच्या कालावधीसाठी वाकडेवाडी येते तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले. 'आरे' दूध संघाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे वाकडेवाडी स्थानक उभारण्यात आले. मे २०२२ मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर एसटीने पूर्वीप्रमाणे बस स्थानक बांधून देण्याची मागणी मेट्रोकडे केली. त्याला मेट्रोने विरोध केला. हा वाद आणखी सुरूच आहे. मेट्रो व एसटीच्या वादात मात्र सामान्य प्रवासी भरडला जात आहे. काय आहेत समस्या? १. शिवाजीनगर बसस्थानकाच्या तुलनेने वाकडेवाडी स्थानकाची जागा कमी. त्यामुळे बस गाड्यांची संख्या कमी झाली. परिणामी फेऱ्या कमी झाल्या. २. एसटी गाड्यांना आत येण्यास व बाहेर जाण्यास अडचण होते. परिणामी बाहेर वाहतूक कोंडी. ३. फलाटांची रचना बस स्थानकाच्या मधोमध त्यामुळे एसटीला बाहेर जाण्यासाठी फलाटाला वळसा घालावा लागतो. त्यामुळे बस स्थानकात बसची गर्दी होऊन कोंडी. ४. 'आरे'च्या सूचनेमुळे येथल्या जागेचा कमर्शिअल वापर नाही. परिणामी पार्किंग व उपाहारगृह नाही. ५. बांधकाम करण्यास मनाई असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी चांगल्या स्थितीतले फलाट नाही. छप्पर देखील पत्र्याचे आहे. १. शिवाजीनगरला बस स्थानक असताना रोज सुमारे २४०० एसटीची वाहतूक होत होती. २. एसटीचा रोजचा प्रवास ६६ हजार किमी इतका होत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत होती. ३. रोजची प्रवासी संख्या सुमारे वीस हजार. ४. चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष. ५. अधिकाऱ्यासाठी विश्रांती कक्ष. ६. कर्मचाऱ्याचे व अधिकाऱ्याचे क्वार्टर. शिवाजीनगर बसस्थानकाची जागा व ते पूर्वीप्रमाणे बांधून द्यावेत ही मागणी मेट्रो प्रशासनाकडे केली. त्यांच्याकडून देखील दोन ते तीन पर्याय सुचविण्यात आले आहे. त्यावर विचार सुरु आहे. लवकरच या संदर्भात निर्णय घेऊ. |
अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या 3,400 कोटी रुपयांच्या सिक्योर बॉन्डचा लिलाव होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हे बाँड भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे आहेत, म्हणूनच विमा कंपनीने 11 जुलैपर्यंत एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) आमंत्रित केले आहेत. म्हणजे ज्यांना बाँड खरेदी करण्यात रस आहे, ते 11 जुलैपर्यंत अर्ज करु शकतील. यानंतर लिलाव केला जाईल. दरम्यान, IDBI Caps ने EoI आमंत्रित करणार्या नोटिसमध्ये याचा उल्लेख केलेला नाही. IDBI कॅपिटल मार्केट्स (IDBI Caps) हे बाँड्सच्या (Bonds) विक्री प्रक्रियेसाठी LIC चे सल्लागार आहेत. एलआयसीने (LIC) बाँड विकण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिलायन्स कॅपिटल्सच्या बाँड विकण्याचा विमा कंपनीचा हा दुसरा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, रिलायन्स कॅपिटलच्या 8,091 कोटी रुपयांच्या रोख्यांसह 16 कंपन्यांच्या मालमत्ता पोर्टफोलिओसाठी प्रस्ताव आमंत्रित केले होते. मालमत्तेच्या किंमतीबद्दल एलआयसी आणि बोलीदार यांच्यातील मतभेदांमुळे विक्री झाली नाही. अनिल अंबानींच्या रिलायन्स (Reliance) समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याच वेळी, LIC बद्दल बोलायचे झाल्यास, 31 मार्च 2021 पर्यंत, एकूण NPA 7. 78% किंवा सुमारे 35,130 कोटी रुपये होता. मे महिन्यात LIC ची शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून शेअर्स जवळपास 40% ने घसरले आहेत. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे थोडा त्रास होईल. परंतु प्रयत्न केल्यास तो दूर होईल. समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नात्यातही रोमान्स असेल आणि आकर्षणाची भावनाही वाढेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपला मुद्दा पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामासाठी दिनमान मजबूत आहे. |
मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया. संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया. श्रीचित्शक्ति (सौ. ) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता. '.... . भगवंत त्याची मारक शक्ती श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाद्वारे प्रगट करत आहे. 'एकदा श्रीचित्शक्ति (सौ. ) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या मिरज येथील उपाहारगृहाला भेट दिली. त्याआधी आठ दिवस मला 'गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी', असे वाटत होते. आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो. साधनेचा संस्कार राहील शाश्वत । जरी नाही झालो याच जन्मी, जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त । । श्री. महेंद्र राठोड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ४९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 'प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात येऊन देवीशी चर्चा करून जातात', असे देवी मला सांगत आहे. कु. अपाला औंधकर ही 'भरतनाट्यम्' हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे. |
एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात 7 हजार 863 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात सध्या 79 हजार 093 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 20 लाख 36 हजार 790 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 6 हजार 332 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93. 89 टक्के झाले आहे. दरम्यान, पुण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. आज पुण्यात 6 हजार 124 चाचण्या झाल्या त्यात 688 नवीन रुग्णांची वाढ झाली तर, 498 रुग्ण बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात सध्या 5 हजार 091 रुग्ण उपचाराधिन घेत आहेत. |
गिरजाबाई --आतां तुला अक्कल तरी कधीं येणार ? तुला अजून खोटे दागिने आणि खरे दागिने यांची कांहीं परीक्षा नाहीं. तुला नवरी तरी कशी येणार ? गावबा--हें पहा, मला वाटतें नाटकांत जसे बायका खोटे डागिने अंगावर घालतात, तसे हे डागिने खोटे आहेत. बाजारांत यांचें कांही येणार नाहीं. कसें नाथमहाराज ! एकनाथ - दागिने तिच्या माहेरचे. आझाला घेण्याचा संबंध काय ? त्या दागिन्यांवर तिची सत्ता. माझा काही संबंध नाही. गिरजाबाई -- म्हणजे ? मजवर सत्ता आहे तर मी ज्या आपल्या वस्तूंवर सत्ता करतें त्यांवर इकडची सत्ता नाहीं का झाली ! उमीचंद - चाईसाहेच बरोबर बोलल्या. एकनाथ तुली चला बाजारांत. मोडा हे दागिने आणि टाका माझे रुपये देऊन. एकनाथ --हलवायाचे घरावर तुळशीपत्र ! तुझें काय जातें ? उमीचंद - अरे बाबा, आमच्यावर काही प्रसंग आला, आम्ही जर कैदेत जाऊं लागलों, तर आमची बायको एक गुंजभरभुद्धां सोनें आपल्या अंगावरचें देणार नाही. आम्हांला लभ करावयाचें हणजे दहा पांच हजार रुपये अगोदर बायकोच्या बापाजवळ स्त्रीधन लणून ठेवावें लागतें. तुझी बायको फार चांगली आहे. आपल्या नवन्याला सगळे दागिने अंगावरचे काढून देते ! गिरजाबाई - तुझी इतक्या चांगल्या गोष्टी सांगतां; मग तुह्मीच हे दागिने मोडून आणा जा. आपले रुपये काढून घ्या आणखी चाकीचे-गावबाचाकीचे मला दक्षणा. उमीचंद मला तुमच्या नवऱ्याची आज्ञा पाहिजे. एकनाथ - मी आज्ञा करणार नाहीं. उमीचंद - चरें मी जातों. पण मी तुलास शपथ घातली आहे याचा विचार करा. ( जातो. ) गिरजाबाई - आतां नुकतेंच जेवावयाला बसणार तो कर्जदारानें गांठलें. काय करावें माणसानें ? दागिने तर मोडावयाचे नाहीत. मग त्या वाण्याचे रुपये फिटणार तरी कसे ? आता उपास का करावयाचा ! |
Tokyo Olympics 2020 : टोकियो शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, पण ऑलिम्पिक खेळाडूंची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली असल्याने त्यांना कोरोना चाचणी अहवाल दाखविण्यापासून सुटका मिळावी, असे बत्रा यांचे म्हणणे आहे. टोकियो : टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधून बाहेर पडण्यापू्र्वी खेळाडूंना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने सांगितले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली. यापूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सरकारला विनंती केली होती की, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पथकाचे लसीकरण करण्यात आले आहे आणि टोकियोमध्ये नियमित कोरोना चाचणी घेण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखविण्यापासून सूट मिळावी, अशी विनंतीही बत्रा यांनी केली होती. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी पुढे म्हणाले की, 'केवळ त्याच व्यक्तींना विमानात चढण्याची परवानगी देण्यात यावी, ज्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आहे. ज्यांना कोणत्याही आजाराची लक्षणे नाहीत, त्यांना प्रवेश दिला जावा. तसेच टोकियोहून भारतात आलेल्या सर्वांची पुन्हा चाचणी केली जाईल. आणि 14 दिवसांसाठी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची अटीवरच त्यांना विमानतळावरून सोडण्यात येईल. ' क्रीडा सचिव रवी मित्तल यांना लिहिलेल्या पत्रात बत्रा यांनी म्हटले आहे की, परदेशातून भारतात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखविणे आवश्यक आहे. हे जपानहून आलेल्या लोकांनाही लागू होते. फक्त टोकियोहून परत येणारे खेळाडू, अधिकारी, आयओए प्रतिनिधी, एनएसएफ अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना यातून सूट मिळावी, ही विनंती आहे. स्पर्धा पूर्ण होताच खेळाडूंनी 48 तासांच्या आत सोडावं लागणार टोकियो टोकियो ऑलिम्पिक प्रोटोकॉलनुसार, दररोज खेळाडूंची अँटीजेन चाचणी घेण्यात येत आहे. आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात येत आहे. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना 48 तासांच्या आत टोकियो सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतीय संघाला कोरोना चाचणी शिवाय टोकियोमधून सोडण्याची परवानगी देण्याची विनंती भारत सरकारने जपान सरकारला करावी, अशी विनंती बत्रा यांनी केली आहे. रौप्यपदक विजेती मीराबाई चानूसह वेटलिफ्टिंगचे खेळाडू सोमवारी भारतात दाखल होणार आहेत. जपानमधून एअर इंडिया, विस्तारा, ऑल निप्पॉन एअरलाइन्स आणि जपान एअरलाइन्सची उड्डाणे होणार आहेत. या सर्व विमान कंपन्यांनीही आरटी-पीसीआर अहवालाशिवाय भारतीय खेळाडूंना प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही बत्रा यांनी केली होती. |
Nagpal Made Durgaji By Media, Akhilesh Ministers Say । नागपाल यांना मीडियाने 'दुर्गा जी' बनवले!, अखिलेश सरकारमधील दोन मंत्र्यांची मुक्ताफळे - Divya Marathi\nNagpal Made Durgaji By Media, Akhilesh Ministers Say\nनागपाल यांना मीडियाने 'दुर्गा जी' बनवले!, अखिलेश सरकारमधील दोन मंत्र्यांची मुक्ताफळे\nनवी दिल्ली - गौतम बुद्धनगरच्या उपविभागीय अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनानंतरही उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांची मुक्ताफळे सुरूच आहेत. दुर्गाशक्ती यांना मीडियाने 'दुर्गा जी ' बनवले आहे, असे उद्गार उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री मोहंमद आझम खान यांनी काढले आहेत, तर निलंबनाचा बाऊ केला जात असल्याचा आरोप अन्य एका मंत्र्याने केला आहे.\nदुर्गा यांच्यासोबत इतर अधिका-याला निलंबित करण्यात आले असते तर वादंग झाले नसते. प्रसारमाध्यमांकडून बळजबरीनेच या प्रकरणाला हवा दिली जात आहे. आयएएस इंग्रजीची देण आहे. त्यांनी भारतात ही व्यवस्था लागू केली. परंतु ब्रिटनमध्ये ही गोष्ट लागू नाही. सव्वाशे कोटी भारतीयांना हजार-दोन हजार आयएएस चालवू शकत नाहीत. आता व्यवस्थेत परिवर्तन व्हायला हवे, असे ते म्हणाले. बुधवारी रात्री बरेलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.\nदुर्गाशक्तीचा बाऊ होतोय- शिवपाल : उत्तर प्रदेशात कसलेही बेकायदा वाळू उत्खनन केले जात नाही. तसे एकही ठिकाण दिसणार नाही. म्हणूनच दुर्गाशक्ती यांच्या निलंबन मुद्द्याचा बाऊ केला जात आहे, असे शिवपाल सिंह यादव यांनी म्हटले आहे. शिवपाल हे अखिलेश यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते बहरैचमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मी स्वतः राज्याचा दौरा केला आहे. त्यात मला असा बेकायदा प्रकार कोठेही आढळून आला नाही. एवढेच नाही तर अधिकारी ऐकत नाहीत. म्हणून लोकांकडून अगोदर तक्रारी केल्या जातात. मात्र आम्ही अशा अधिका-यांवर कारवाई करतो, तेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित करतात, असे ते म्हणाले.\nसुप्रीम कोर्टाने जनहित याचिका स्वीकारली; सोमवारी सुनावणी\nउत्तर प्रदेशच्या निलंबित उपविभागीय अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या जनहित याचिकेवर 12 ऑगस्ट रोजी (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे नागपाल यांना गुरूवारी आयपीएस अधिका-यांनी आपले समर्थन देत आयएएस संघटनेच्या मागणीला बळकटी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदा बांधकाम होऊ देऊ नका, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दुर्गाशक्ती यांनी त्याची अंमलबजावणी केली. परंतु त्यामुळे त्यांना झळ पोहचली आहे. म्हणूनच दुर्गाशक्ती यांचे संरक्षण करावे. त्यासाठी या प्रकरणाची सुनावणी तत्काळ करावी, अशी विनंती याचिकाकर्ते एम.एल. शर्मा यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. दुर्गाशक्ती यांच्यावरील कारवाई मनमानी पद्धतीची आणि घटनाबाह्य असल्याचा दावा शर्मा यांच्याकडून याचिकेत करण्यात आला आहे.\nअखिलेश यांना पत्र\nआयएएस अधिका-यांनंतर राष्ट्रीय आयपीएस संघटनेने दुर्गाशक्ती यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत. दोन पानी पत्रावर देशातील4हजार सदस्यांच्या स्वाक्ष-या आहेत. दुर्गाशक्ती यांची पुन्हा नियुक्ती करावी, अशी विनंती आयपीएस संघटनेकडून करण्यात आली.\n28 वर्षीय दुर्गाशक्ती या गौतम बुद्ध नगरच्या उपविभागीय अधिकारी होत्या. परंतु त्यांनी एका धार्मिक स्थळाची भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. त्यावरून त्यांना सरकारने निलंबित केले. मात्र दुर्गाशक्ती यांनी वाळू माफियांच्या विरोधात जोरदार मोहिम उघडली होती. त्यामुळे या गटाकडून अखिलेश सरकारवर दबाव वाढवण्यात येत होता, असा आरोप आहे. |
मुंबईसह राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहाच्या आवारात भोपाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, भिवंडी, रायगड येथून मोठ्या प्रमाणात बकरे आणण्यात आले होते. तसंच, रविवार संध्याकाळपर्यंत २ लाख २१ हजार बकरे, शेळ्या, मेंढ्या, म्हैस, रेडा अशी मोठी जनावरं विक्रीसाठी आले होते. त्यामधील १ लाख ६० हजार जनावरांची विक्री झाली आहे. देवनार इथं विक्रीसाठी आलेल्या बकऱ्यांची किंमत लाखात आहे. दहिसर येथून आलेला एका टारझन नावाच्या बकऱ्याची किंमत ५ लाख ११ हजार रुपये असून, हा बकरा मलवा या जातीचा आहे. अफलातून नावाचा बकऱ्याची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून, या बकऱ्याला भोपाळ येथून आणण्यात आलं आहे. तसंच, शेरा या आणखी एका बकऱ्याची किंमत १.४० लाख रुपये आहे. यंदा देवनार इथं होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त भरणाऱ्या बाजारात चोरीचे प्रकार होऊ नयेत म्हणून यावर्षी प्रथमच बार कोड असणाऱ्या प्रवेशिका व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. |
कल्पनारम्य फुटबॉलला इतके मजेदार बनविणारा भाग म्हणजे आपण थोडेसे नाखूष असू शकतात. आपल्या लीगमध्ये कंटाळवाणा संघाचे नाव असणारा माणूस असणे पुन्हा या वर्षी न्यू यॉर्क wildcats होऊ नका. आता आपण काही नवीन फंतासी फुटबॉल संघांच्या नावांविषयी विचार करायला सुरुवात केली आहे. लक्षात घेऊन त्या आत्म्यासह, येथे नवीन संघाचे नाव शोधण्यासाठी अनेक उत्कृष्ट ठिकाणे आहेत. आपल्या कल्पनारम्य फुटबॉल संघ आणि आपल्या लीगसाठी योग्य असलेल्या एखाद्यास आपण शोधू शकता, किंवा हे स्त्रोत आपल्याला आपल्या स्वतःच्या सोबत येण्यासाठी काही उत्कृष्ट प्रेरणा प्रदान करतात, एकतर मार्ग कार्य करते. स्पष्टपणे, प्रेरणा मिळविण्यासाठी सर्व वेगवेगळ्या ठिकाण आहेत, आणि हे खरोखर आपण कोणत्या प्रकारचे मालक आहात त्यावर अवलंबून आहे. म्हणून आम्ही प्रत्येकास मदत करू शकणारे काही भिन्न व्यक्तिमत्वांसह प्रयत्न करू. 151+ भयानक विस्मयकारक फंतासी फुटबॉल संघ नावे आणि लोगोः इतकेच नव्हे तर फॉरवर्ड सोबतच्या सर्व कर्मचार्यांनी फॅटीसी टीम नावांची एकत्रित यादी तयार केली आहे आणि त्यांनी आपल्या टीमच्या लोगोसाठी आपण वापरत असलेल्या सुमारे 20 किंवा खूपच छान लोगो देखील तयार केले आहेत! लीगमध्ये प्रवेश करणार्या काही नव्या खेळाडूंनी "जमीस 'क्रॅब शॅक, हर्ली गुर्ले, आणि' हॅन्गीन 'अमेरी कूपरसारख्या मजेदार नवीन संघांची नावे मिळविली. " कल्पनारम्य फुटबॉल लीगचे नावेः या लीगमध्ये काही जण आयुक्त बनू शकतात कारण आपण आपल्या लीगसाठी एक नवीन नाव शोधण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु संघाचे नाव आवश्यक नाही. परंतु जेव्हा आपण "फंतासी फुटबॉल लीगची नावे" टाइप केलीत तेव्हा ते येथे आणले होते. आशेने, आपण "फॅन्सी लीग" नावाचा बोअरिंग लीगमध्ये खेळत नाही. तसे असल्यास, आपल्याला एक नवीन कल्पनारम्य फुटबॉल लीग नाव आवश्यक आहे. रॅझबॉलचे नाव जनरेटरः आपण आपल्या फॅन्सी फुटबॉल संघाचे नाव आवडत असलेल्या गोष्टी एकत्र जोडण्यासाठी हा एक चांगला स्त्रोत आहे. मग जनरेटर एक पर्याय बाहेर पडतो! पहिल्या टप्प्यात, त्यात शहरे, विशेषण आणि रंगांसारख्या गोष्टींसाठी श्रेणी आहेत, तर दुसरी श्रेणीमध्ये युद्धविषयक अटी, '80 चे खलनायक आणि केसांचा बँड आहे. तो एक उज्ज्वल साधन आहे! सीबीएस येथे सर्वात लोकप्रिय कार्यसंघ नावेः CBSSports. com वर असलेल्या एका जुन्या मित्राची एरिक केई, काही अहवाल धावून आले, काही संख्या क्रुचले आणि काही अल्गोरिदम पचवण्याकरता सीएसएसमध्ये सर्वात लोकप्रिय संघाचे काही नावे घेऊन आले, सर्वात लोकप्रिय आयुक्त जगातील सेवा कोण आवडत नाही, "मला आपले टीडी करा" किंवा "क्लीव्हलँड स्टीमर्स" दाखवा? यति वेडर यांचे वाइंडेड माइंडः बरेच लोक पीजी असलेल्या आहेत, जसे की "ड्यूने ओवर ओवर ड्वेन बॉवे" आणि "फॉर्टी वर्ष ओल्ड व्हर्जिन. " यापैकी बरेच जण आपण वापरू शकता अशा लोगोसह येतात! आशेने, या सर्व पर्यायांमध्ये आपणास आपल्या टीमने योग्य काल्पनिक पाय वर सुरु करण्यास मदत करण्यासाठी या नवीन फॅन्सी फुटबॉल संघांच्या नामावलीमध्ये काहीतरी सापडेल! नशीब हा हंगाम! |
दर्शन धाकल्या धन्याच मोहीम वढु तुळापूर राज पाना शिवजयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला. आता तयारी सुरू झाली वढू-तुळापूर मोहिमेची. तस माझ या मोहिमेत जाण कॅन्सल झाल होत कारण रविवारी एक महत्वाच काम होत. पण माझ मन मला स्वस्त बसु देत नव्हतं. मला स्वतःचाचा राग येत होता. किती दिवसांपूर्वीची इच्छा होती या दोन पवित्र स्थळांना भेट द्यायची. मन सारख खात होत. मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. अधून मधून राज दादा मला सांगत होता "धिरू तु येतोयस.... मला बाकी काहीही सांगु नकोस.... तु येतोयस". शेवटी ठरवलं जायच मोहिमेला बाकी सर्व गेल उडत. आम्ही कसे निघालो काय हसरे क्षण तिथे अनुभवले ते मी या अगोदरच्या लेखात "काही क्षण हसरे मोहीम वढु तुळापूर" या लेखात मांडलेत आता वढू-तुळापूर या दोन ठिकाणी मन हेलावून टाकणारे अनुभव आले ते या लेखात मांडतोय. आम्ही अजय दादांच्या घरून थेट तुळापूर ला पोहोचलो. आम्हाला कल्पना होती की आम्ही तिथे अंगावर शहारे येणारे अनुभव घेणार आहोत. आम्ही तुळापुरला गाडीतुन उतरलो. समोर भव्य प्रवेशद्वार आतमध्ये काही पर्यटक डबे खात बसलेत. काही दुकान मांडली आहेत, कुणी झोपलय तर कुणी अजुन काही करतय. छे..... ते सर्व वातावरण पाहून मनाला यातना होत होत्या. तिथल्या प्रत्येकाला धरून धरून सांबावस वाटत होत "अरे मुर्गांनो ही पिकनिक करायची जाबा नाहीय, इथे शंभु राजांनी प्राण सोडलेत त्या जागेची काय ही विटंबना करताय".....औरंगजेबाचे सैन्य जेव्हा डोळ्यात तप्त सळ्या घुसवत होते तेव्हा शंभुराजेंना जेवढ्या यातना झाल्या नसतील त्यापेक्षा जास्त यातना त्यांच्या या समाधीस्थळाची होत असलेली विटंबना पाहून होत असतील. अरे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ज्या जागेची धुळ मस्तकी लावायला हवी त्या जागेवार खेळताय, बागडताय, पिकनिक एन्जॉय करताय. शेकडो वर्षांपूर्वी परकीयांनी आपल्या राजांचा अपमान केला पण आज राजांचा अपमान करणारे कुणी परके नाही तर स्वकीयच आहेत. अहो ज्या भामा, भिमा, इंद्रायणी तीरावर संगमेश्वराचे मंदिर, संमोर शंभु राजेंची भव्य मुर्ती, पुढे कवी कलश व शंभु राजेंची समाधी इतक्या पवित्र स्थाानी काय रे हे अपवीत्र वर्तन अरे मोजक्या पैशांसाठी आणि आणि क्षणिक आनंदासाठी बाजार मांडलाय या पवित्र स्थानाचा.... इथे आलो तेव्हा मनात वेगळेच विचार होते. पण इथे जे पाहीले ते पाहून मन अस्वस्थ झाले. शंभुराजे तुम्ही धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपले प्राण दिलेत पण, हे स्वार्थी लोक ही आत्मीयता विसरून भलतीकडे चाललेत. थांबवा हे राजे सर्व....आम्ही तिथुन थोडे पुढे गेलो जिथे तीन नद्यांचा संगम होता. भामा, भिमा, इंद्रायणी पण तिथेही तेच कोण तिथे कपडे धुतय, तर कोणी गरम होतय म्हणून थंडाव्यासाठी नदित आंघोळ करतय. अक्षरक्षा रडायला येत होत ते पाहून. इथे आपलेच नाणे खोटे तिथे इतरांना दोष काय द्यायचा. तिथे नद्यांच्या संगमाचा इतिहास आणि तुळापूरचा इतिहास नमुद असलेला एक फलक लावलेला होता. त्या फलकाच्या अगदि समोरच एका आजींनी येवून हात- तोंड धुतले. एव्हाना स्वतः 1:चीच लाज वाटायला लागली होती. या पवित्र स्थळाचा होत असलेला अपमान सहत करतच आम्ही तिथुन निघालो. मनात एक सल कायम होती. अशा पवित्र स्थळांवर पिकनिक काढण्याइतके निगरगट्ट का झालोय आपण. या अशा पवित्र स्थळाची होत असलेली विटंबना कधी थांबणार हा एकच विचार माझ्या मनात होता किंबहुना प्रत्येक दुर्गवीराच्या मनात हाच विचार होता. तिथून निघालो ते थेट पोचला वढु ला. मनात भिती होती इथेही तोच बाजार नसेल ना..... पण इथे तर अगदि विरुद्ध वातावरण होत. अगदी शांतता... समोर शंभु राजेंची समाधी... लगेच सर्व समाधीकडे गेलो. माथा टेकवून समाधीचे दर्शन घेतले. माथा टेकताच अंगात अक्षरशः विज चमकुन गेली. क्षणभर तर शंभु राजेंच्या चरणावर माथा टेकतोय असं वाटल. कंठ दाटुन आला. तसाच आवंढा गिळत मी दर्शन घेतल. दर्शन घेवुन मी बाजुला झालो. सर्वानी समाधीचे दर्शन घेतले आणि शंभु महाराज, शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. दर्शन झाल्यावर सर्व दुर्गवीर समाधीभोवती बसलो. "कुणीतरी बाळ इथे निजला"..... • हे काव्य लावण्याची विनंती केली. काव्य सुरू झाले भिमा इंद्रायणी तीरी.... समोर भामा, भिमा, इंद्रायणीचा संगम तरळू लागला. वढु तुळा संगमावारी... दोन पवित्र स्थान खाडकन डोळ्यासमोर उभी राहीली. मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला..............समोर एक बाणेदार, तेजस्वी व रौद्र रूप समशेरीसम उभे राहून मृत्युला आव्हान देताना दिसले. ते रुप डोळ्यातुन अक्षरशः आग ओकत होते. वाटत होते या नजरेनेच गनीम घायाळ झाले असतील. इतक्यात पुढच वाक्य कानी पडल....बाळ इथे निजला. शिवाचा बाळ इथे निजला... हे काव्य आम्हा सर्वाना त्या प्रसंगात घेवून गेले.... वाघा सारखे आलेले शंभूराजे शिवबांसारखे जगुन, सिंहासारखे मरण झेलुन एक तेजस्वी राजा म्हणुन अमर झालेले शंभू राजे माझ्या डोळ्यासमोर तरळू लागले. कधीही कुणाला शरण न जाता प्रसंगी मरण पत्करणारे शंभु राजे शिकण्यासारखे आहेत आजच्या स्वार्थी आणि लाचार लोकांनी....खरच निस्वार्थी जगणं आणि धर्मासाठी देशासाठी बलिदान देण म्हणजे काय ? ? हे शंभु राजे अभ्यासल्यावर समजतात. पण त्याआधी शंभु राजेंचा तो "निस्वार्थीपणा" शिकला तर पाहीजे. मुजरा राजे... मुजरा तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला.... तुम्ही अवघं जीवण रणांगणात घालवलं पण हार म्हणून कधी मानली नाही. आयुष्यात आलेल्या प्रचंड दुःखावर मात करून शिवरायांचे स्वप्न साकार करण्यासाठी जो सागररूपी पराक्रम केला तो तुमच्या बलिदानाने करुणेचा (दुःखाचा) आगर झालाय.... दगडासारखा अभेद्य (अखंड) असा सह्याद्री तुमच्या बलिदानाच्या दुःखाने अश्रुंनी भिजलाय... असा भावार्थ या काव्याच्या प्रत्येक ओळीतुन व्यक्त होत होता.... या काव्याच्या प्रत्येक ओळीनुसार आम्हा सर्वांचे मन हेलावून जात होते. कितीही स्वतःला थांबवल तरी प्रत्येकाच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते. (प्रत्येकजण ते दाखवत नव्हता इतकच) नील दादांकडे माझं सहज लक्ष गेलं. एरव्ही हसतमुख असणारा निल दादा त्याच्याही डोळ्यातुन पाणी वाहत होतं. इतर सर्वांची अवस्था काही वेगळी नव्हती. काही क्षण तिथे स्तब्धता होती. कोणीही काहीही बोलत नव्हतं....कारण प्रत्येकजण जखमी परंतु "बाणेदार शंभुराजेंना" पाहत होता. थोडा वेळ तसाच गेला कुणाच्या तोंडातुन एक चकार शब्द येत नव्हता, कसा येणार सर्वाचा कंठ दाटुन आला होता. मी तिथुन उठलो आजुबाजुचा परिसर न्याहाळु लागलो. आजुबाजुचा परिसर न्याहाळणे हे तर कारण होत खर तर डोळ्यातले अश्रु पुसायलास मी बाजुला निघुन गेलो होतो. बाजुला जावून घाईघाईने अश्रु पुसले इतक्यात मोनीश दादांनी खांद्यावर हात टाकला कदाचित त्यांना माझी ती अवस्था समजली असावी. खरच तिथे कुठेतरी शंभुराजेंच वास्तव्य असल्याचा भास झाला. तिथे थोडा वेळ गेल्यावर सर्व बाहेर येवून बसलो. सतत काहीतरी जाणवंत होत. एक वेगळ तेज आम्हाला न्याहाळतय याची जाणीव होत होती. इतकी शांतता होती की, आजुबाजुंच्या झाडांच्या पानांची सळसळ तिथली शांतता भंग करत होते. एखाद्या पक्षाचा आवाज मनात धडकी भरविण्याइतका भयानक वाटावा इतकी शांतता तिथे होती. मनात विचारचक्र चालु होते..... तुळापूर आणि वढु दोन्हीही पवित्र स्थान... मग एका जागेवरील पावित्र्य पुर्णपणे नष्ट केलेले आणि एकाच पावित्र्य अजुनतरी जपलेल.... खरचं कलियुग म्हणतात ते हेच आपण सर्व गोष्टिंची फक्त वाट लावतोय, सर्व गोष्टिंचा फक्त बाजार करतोय.... कुठल्याही धार्मीक स्थळावर जा तिथे बाजार... कुठल्या ऐतिहासिक स्थळावर जा तिथे बाजार.... मन हेलावून जात हा बाजार पाहुन.... शंभु राजेंची समाधी असलेल्या या दोन स्थळांपैकी सरस स्थळ कोणते हे सांगायचा माझा प्रयत्न नाही, दोन्ही स्थळ माझ्यासाठी सारखीच पण त्याच पावित्र्य नष्ट केलय आपल्यातीलच काही खुशालचेंडु लोकांनी, तेही स्वतःच्या स्वार्थासाठी.... कधी थांबणार ही विटंबना.... आहे का कोणाकडे उत्तर ? ? लेखात उल्लेख केलेले बाळ इथे निजला है काव्य ऐकण्यासाठी येथे क्लिक करा :https://youtu.be/s1lc0ZcG3tg दर्शन शिवजन्मभुमीचे..... छायाचित्र :- विकीपिडीया दि.११.०८.२०१३ रोजी आम्ही मोजके दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो. तसे आम्ही वेळेत निघालो पण काही तांत्रिक कारणास्तव रात्री साधारण ११ ते १२ वाजेपर्यंत जुईनगर रेल्वे स्टेशन ला बसुन गप्पा मारत होतो. (मह्याचा महिमा बाकी काय ? ? ) अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा मह्या गाडीसहीत प्रकट झाला. आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पकडली. व्याकी-व्याकी ची रिस्क नको म्हणून मी खिडकीवर आक्रमण केले. पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधुंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपुन गडदर्शन. सचिन बंधु फोन करून पल पल की खबर घेत होते पण आम्ही पहाटेपर्यंत पुण्यात पोहोचणार हे नक्की असल्याने आम्ही सचिन बंधुंना झोपायचा सल्ला दिला. मध्येच कुठेतरी काळोखातला फ्राईड राईस खावुन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. पहाटे सचिन दादांच्या घरी पोहोचुन जागा मिळेल तस आडव तिडव झोपुन सकाळी ७ः०० पर्यंत आराम केला. श्रमदान मोहिम नसल्याने सर्व आरामात होतो. पहिला चहा मग इडली चटणीचा नाष्टा येणार होता. अगोदरच भुक लागलेली त्यात इडली-चटणी म्हटल्यावर आम्ही दातांना धारच काढुन बसलो होतो. नाष्टावर उभा-आडवा हात मारुन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. नियोजीत बैठक पार पाडुन निघालो किल्ले हडसर च्या दिशेने. वाटेत दुर्गवीर बंधु स्वरुप पुरवंत यांच्या घरी थोडा विश्राम व चहापान करुन हडसर च्या दिशेने निघालो. खुप लांबचा पल्ला गाठुन आम्ही किल्ले हडसर च्या पायथ्याशी पोहोचलो पण गड चढाई व परतीचा प्रवास याचे नियोजन काही जमत नव्हते. मग आमच्या प्रशांत बंधुंनी आणलेले चकली आणि स्विट खात खात गडावर जायचे की नाही याचा विचार करत होतो. तेवढयात तिथे काही गावकरी आले त्यांनी पावसाळयात आणि इतक्या उशिरा गड चढणे धोकादायक असल्याचे सांगितले. त्यामुळे गावकरयांचा सल्ला मानुन मागे फिरून शिवनेरीवर जायचे ठरवले. सचिन बंधुंची थोडी निराशा झाली पण पर्याय नव्हता आम्हाला पुन्हा मुंबईला परतीचा प्रवास करायचा होता. ठरल्याप्रमाणे शिवनेरीच्या दर्शनास निघालो. मनात खुप औत्सुक्य होते की आपण शिवजन्मभुमीचे दर्शन घेणार आहोत. गडाची चढाई सुरु केली. सर्वसाधारणपणे कोणताही गढ चढताना मन भरून येत. मन आपोआप शिवकाळात जात. आजुबाजुला मावळे असल्याचा भास होतो. आपण वर राजांच्या भेटीलो चाललोय अस वाटत राहतं. पण शिवनेरीच्या पायथ्यापासुनच मन पिळवटुन निघत होतं. आजुबाजुला गार्डनसारखे झालेले बांधकाम गडाचे मुळ स्वरूप नष्ट करत होते. दोन्ही बाजुंना सिमेंटीकरण आणि परदेशी झाडांची लागवड !! का ? ? कशासाठी ?? ज्या ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हायला हवे त्याचे जिर्णोद्धार / नुतणीकरण कशासाठी ?? खरं तर त्यांच संवर्धन व्हायला हवं नुतनीकरण नाही. पुढे महादरवाजापाशी गेला तिथे काहीतरी चुकतय अस वाटलं. नंतर लक्षात आला मुळ दरवाजा जो गोमुखी असावा जो बहुतांश किल्ल्यांवर असतो तो अगदिच निमुळता करण्यात आला आहे. म्हणजे मुळ दरावाजाचे अस्तित्वच नष्ट करण्यात आले होते. आजुबाजुला असलेल गार्डनच स्वरूप, पिकनीकच स्वरूप पाहुन मन खिन्न झाले होते. पुढे शिवजन्माची प्रतिकात्मक जागा म्हणून बांधण्यात आलेली इमारत ते ठिकाण डोळयात साठवुन घेण्याचा प्रयत्न करतोय तर तिथेही खुशालचेंडु पर्यटक आडवे आले. जस देवारयात जावुन बसल्यावर मनःशांती मिळते तस या पवित्र स्थळी बसल्यावर शांतता वाटावी ही अपेक्षा मात्र तिथेले पर्यटक फोल ठरवत होते. सर्वांचा नुसता गोंधळ, आरडा-ओरडा. जिथे बसल्यावर इतिहासाच्या आठवणीने मन भरुन यायला हवे तिथे हा गोंधळ पाहुन मन हेलावून जात होते. वरती गेलो तर एक तरुण चक्क फुटबॉल घेवून आला होता. खेळण्याअगोदरच त्याला समजावलं ही खेळण्याची जागा नाहियं. पुढे अजुन खुप काही सहन करायचं बाकी होत एक तरुण तर चक्क इतकी पिवुन आला होता की त्याला स्वतःचा तोल सावरता येत नव्हता. हा सगळा प्रकार सहन होत नव्हता म्हणून गड उतरायला सुरुवात केली तर तिथे एक तरूण चक्क सिगारेट फुंकताना दिसला. प्रथम मी त्याला मराठीत समजावल पण कदाचित मराठी समजल नसावं म्हणुन मग हिंदीत समजावलं. त्यानेही जास्त काही न बोलता चिगारेट चटकन विझवली. शिवनेरीवरुन परत निघताना मनात खुप प्रश्न होते. गडावर जपण्यासारखे खुप काही आहे. पाण्याच्या टाक्या, त्याच्या बाजुला शिवलिंग, एका खडकांत असलेले खोदिव टाके, गडाच्या बाजुला लेणीसदृष्य वास्तु मग या सर्व वास्तु जपण्याऐवजी गडावर इतरत्र नुतणीकरण कशासाठी. बाकी हौशे नवशे पर्यटक हा तर एका बिघडलेल्या मानसिकतेचा भाग आहे तो कधी सुधारणार कुणास ठावुक ? ? |
'छत्रपती शिवाजी महाराज यांना सेक्युलर ठरवण्याचे षड्यंत्र ! ' या विषयावर 'ऑनलाईन' विशेष संवाद ! मुंबई - महाराष्ट्रातील युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारलेली आहे. तिची दिशा भरकटवण्यासाठी २० वर्षांपूर्वी राजकीय पक्षांनी काही जात्यंध संघटनांना हाताशी धरून इतिहासाची तोडमोड केली आणि 'छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानप्रेमी होते, त्यांच्या सैन्यात मुसलमान सैन्य होते, त्यांनी मशिदी बांधल्या, मशिदींना देणग्या दिल्या, त्यांना मुसलमान गुरु होते', अशी माहिती जाणीवपूर्वक सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना 'सेक्युलर' (निधर्मी) ठरवण्याचा प्रकार चालू आहे. एकदा का छत्रपती शिवाजी महाराजांची अल्पसंख्यांकप्रेमी छबी निर्माण झाली की, उद्या आपल्यालाही त्यांचे नाव सांगून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून राजकीय स्वार्थ साधता येईल, असे राजकीय पक्षांचे षड्यंत्र आहे. छत्रपती शिवरायांना 'सेक्युलर' ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. अशांना हिंदूंनी ओळखले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे 'हिंदवी स्वराज्या'चे खरे विचार अर्थात् 'हिंदु राष्ट्र' स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज यांना 'सेक्युलर' ठरवण्याचे षड्यंत्र ! ', या विषयावर आयोजित 'ऑनलाईन' विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी 'सव्यासाची गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य लखन जाधव म्हणाले की, आज कार्यकर्त्यांना केवळ 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', या घोषणा द्यायला लावल्या जात आहेत; पण त्यांचे (छत्रपती शिवाजी महाराजांचे) विचार, प्रेरणा, राज्यकारभार शिकवला जात नसून तो शिकवायला हवा. महाराजांचे गड-दुर्ग भग्न होत असतांना त्यांचे रक्षण न करता त्यावर अवैधपणे मशिदी, दर्गे उभारले जात आहेत. छत्रपती शिवरायांनी जे ३६ वर्षे लढून मिळवले, ते धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे. वर्ष १९६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते, तर पाकिस्तानची सीमा आपल्या आसपास दिसली असती. हे वाक्य पुष्कळच महत्त्वपूर्ण आहे, तसेच मोगल इतिहासकार तारुकी अली नरूला आणि आदिलशाह यांची कागदपत्रे पडताळल्यावर त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकणात अनेक मशिदी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच अफझलखानला पाठवले गेले. यावरून छत्रपती शिवराय हे 'सेक्युलर' कधीही नव्हते आणि नाहीत, हेच दिसून येते. केवळ छत्रपती शिवरायांना 'सेक्युलर' करण्याचा प्रकार नाही, तर 'ते देव मानत नव्हते', 'धर्म मानत नव्हते', असाही ठसवण्याचा भयंकर प्रयत्न जात्यंध लोकांकडून चालू आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे निस्सीम भक्त होते. केवळ हिंदूंना त्यांच्या ध्येयापासून विन्मुख करण्यासाठी जात्यंधांचे प्रयत्न चालू आहेत. |
sarah taylor pregnancy england। नवी दिल्ली : इंग्लंडमहिला क्रिकेट संघाची माजी यष्टीरक्षक खेळाडू सारा टेलरने अलीकडेच आपल्या जीवनसाथीच्या गरोदरपणाची बातमी ट्विटरवर शेअर केली होती. त्यानंतर तिला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला. पण काही ट्रोलर्सनी ती समलिंगी आहे असे म्हणून खिल्ली उडवली आणि तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. या ट्रोल करणाऱ्यांना सारा टेलरने ट्विटरवरूनच सडेतोड उत्तर दिले आहे. सारा टेलरने लेस्बियन असल्याची कबुली देत एक भावनिक पोस्ट केली आहे. सारा टेलरने एक भावनिक पोस्ट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामध्ये तिने म्हटले, "माझ्या जोडीदाराच्या गरोदरपणाची घोषणा करताना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील याचा मला अंदाज नव्हता. आशा आहे की मी काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन. होय, मी लेस्बियन आहे आणि खूप दिवसांपासून आहे. नाही, हा पर्याय नाही. मी प्रेमात असून मी आनंदी आहे. माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक कुटुंब वेगळे असते. ते कसे कार्य करते आणि दिसते यावर निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला पटवून सांगा. आम्ही आमच्या मुलाला खूप प्रेम देऊ. " सारा टेलरने आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये लिहले की, "आम्ही सर्वजण वेगवेगळ्या समजुतींनी वेगवेगळ्या प्रकारे वाढलो. मी इतरांसोबत तुलना करत नाही. तसेच द्वेष आणि टीका करणार्या लोकांना मी हे सांगायलाच हवे की ते प्रेमाच्या जगाशी संबंधित नाहीत. जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात आणि तुम्हाला कोण पाहिजे आहे तोपर्यंत प्रेम करत राहा. प्रेम आणि समर्थन पाठवलेल्या सर्वांचे आभार आणि प्रेम म्हणजे प्रेम. " खरं तर सारा टेलरने 2019 मध्ये मानसिक आव्हानांचे कारण देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ती आपल्या देशातील अनेक क्रिकेट क्लबसाठी कोचिंग करताना दिसली आहे. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
मराठी वेब सीरिजच्या विश्वात नवा प्रयोग करून यशस्वी ठरलेली रानबाजार ही वेब सिरीज खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. या वेब सिरीजमधील कलाकारांचा अभिनय, अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टींमुळे रानबाजार ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या विशेष पसंती उतरली. सुरुवातीच्या पाच भागानंतर या वेब सिरीजच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता ३ जून रोजी या वेब सिरीजचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा एक थरार अनुभवायला मिळणार आहे. |
नवी दिल्ली, 18 जानेवारी : हॉलिवूडची (Hollywood) अभिनेत्री (actress) केट विन्स्लेट (Kate Winslet) ही एक सुंदर आणि तितकीच प्रतिभावंत कलाकार. टायटॅनिक सिनेमानंतर तिला खूप प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेम मिळालं. नुकत्याच तिनं एका मुलाखतीत एक खासगी बाब व्यक्त केली आहे. जेम्स कॅमेरून यांनी दिग्दर्शित केलेल्या टायटॅनिक (Titanic) सिनेमात केट नायिका होती. या सिनेमानं तिला जगभरात एक ओळख दिली. शिवाय तिचं आयुष्यच यातून बदलून गेलं. अभिनेता लिआर्नाडो डी कॅप्रिओसोबत जुळलेली तिची केमिस्ट्री आजही लोकांना मोहात पाडते. टायटॅनिक ब्लॉकबस्टर हिट झाली. केट एका रात्रीत सुपरस्टार (superstar) बनली. मात्र आता केटनं एक खुलासा केला आहे. डेलीमेलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. WTF विथ मार्क मरोन या पॉडकास्टमध्ये बोलताना केट म्हणाली, की टायटॅनिक आल्यावर मी एकदमच सेल्फ प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये गेले होते. माझे दिवस आणि रात्री अगदी एकसारख्याच जात होत्या. मी स्वतःशीच खूप विचार करायचे. हा विचार मुख्यतः स्वतःबद्दल असायचा. मी स्वतःवरच शंका घेऊ लागले होते. माझ्यावर तेव्हा खूप टीकाही झाली होती. मुख्यतः ब्रिटिश प्रेसनं (British Press) ही टीका केली होती. ' ती पुढे सांगते की तिला प्रामाणिकपणे असं वाटायचं, की तिला मुद्दाम भीती घातली जाते आहे, धमकावलं जातं आहे. मी सतत एकच विचार करायचे, की हे लवकर कसं संपेल. अर्थात, काही काळानंतर हे सगळं संपलं मात्र मला एक नक्की कळालं. ते म्हणजे, प्रसिद्ध होणं (Famous) नेमकं काय असतं. मी प्रसिद्ध होण्यासाठी तशी अजिबातच तयार नव्हते. तेव्हा केटनं मिळालेल्या प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्याऐवजी आपल्या अभिनयाला अजून सुंदर बनवण्यासाठी कष्ट घेतले. मात्र अजून इतर भूमिका करण्याबाबत ती संभ्रमातच होती. तिला चुका करायच्या नव्हत्या. ती म्हणते, 'मी अजून चुका कराव्या हे मला आता आवडणार नव्हतं. मला या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचं होतं. मग मी लहान-लहान गोष्टी शोधत त्यांवर मेहनत घेऊ लागले. ' केटनं नुकतंच 19 व्या शतकात बनलेल्या Ammonite या सिनेमात काम केलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
आरोग्यं धनसंपदा उपक्रमास प्रारंभ. पुणे-कोरोना काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत. स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला असून त्याचा प्रारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे अध्यक्ष अरुण जिंदल, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेत कोविड योद्धासाठी मास्क, सॅनिटायझर, पी पी इ किट पुरविण्यात येणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून लढाई लढणाऱ्या सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. या साहित्याची आवश्यकता असणाऱ्यांनी संदीप खर्डेकर यांच्याशी 9850999995 वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. |
अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) प्रवेश प्रक्रिया तीन वेळा वेळापत्रक बदलल्यानंतरही सुरू झालेली नाही. आता पुन्हा बदल करत सोमवारपासून प्रवेशाची फेरी घेतली जाईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. ही फेरी चार ते सात सप्टेंबरदरम्यान राबविली जाणार आहे. अद्याप निवड यादी जाहीर झाली नसल्याने फेरी लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. |
कियारा आडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे सिद्धार्थ मल्होत्रा सोबत लग्नगाठ बांधली. कियारा आणि सिद्धार्थ गेली चार वर्ष एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ आणि कियाराची पहिली भेट 'लस्ट स्टोरीज' च्या सेटवर झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाराने सिद्धार्थच्या आधी काही मुलांना डेट केलं आहे. रिपोर्ट्स नुसार, कियाराने आपल्या पहिल्याच चित्रपटातील कलाकार 'मोहीत मारवाह' याला डेट केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते प्रेमात पडले होते. मोहीत हा बोनी कपूर यांची बहीण रीना कपूर यांचा मुलगा आहे. मात्र 'फगली' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कियारा आणि मोहीत वेगळे झाले. मोहीत सोबत ब्रेकअप केल्यानंतर कियारा आणि मुस्तफा बर्मावाला यांच्या जवळीकीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मुस्तफा हा लोकप्रिय दिग्दर्शक अब्बास- मस्तान यांच्यापैकी अब्बास बर्मावाला यांचा मुलगा आहे. कियाराने कधीही तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलणं योग्य समजलं नाही. पण ती सिद्धार्थबद्दल मोकळेपणाने बोलत असे. Thanks For Reading! |
नाशिकरोड : नर्मदा बचाव आंदोलक व शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना जमीन दाखविणे कार्यक्रम व कालावधीबाबत दिलेल्या प्रस्तावाबाबत मतभिन्नता असल्याने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरूच होते. घोषित-अघोषित प्रकल्पबाधितांची संख्या, महाराष्ट्रात जागेची उपलब्धता, तुकड्या-तुकड्याने विखुरलेली असलेली जमीन अशा काही कारणांवरून पुनर्वसनाचा प्रश्न ताणला जाण्याची शक्यता आहे. नर्मदा काठच्या आदिवासींचा पुनर्वसनाचा प्रश्न व इतर विविध मागण्यांसाठी नर्मदा बचावच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर कुठलीही पूर्वसूचना न देत धडक मारून विभागीय आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गुरुवारी शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले व आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, आंदोलक यांच्यात एका सभागृहामध्ये तब्बल साडेआठ तास चर्चा झाली. प्रकल्पग्रस्तांना जमीन दाखविण्याच्या मुद्यावरून शासन व नर्मदा आंदोलनाचे नेते यांच्यात एकमत न झाल्याने ठिय्या आंदोलन व चर्चेची पुढील फेरी सुरू होती. विभागीय आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनास बसलेले आंदोलक गुरुवारी रात्री विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेश द्वाराबाहेर येऊन बसले. नर्मदा बचावच्या प्रतिनिधींनी शासनाने २७ एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत प्रकल्पग्रस्तांना जमीन दाखविण्याचा जो कार्यक्रम निश्चित केला आहे त्याला कडाडून विरोध करत शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. दुपारी १ वाजेच्या सुमारास विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या सोबत नर्मदा आंदोलनाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. डवले यांनी २७ एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत प्रकल्पबाधितांना जमीन दाखविण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन स्पष्ट केले. मात्र त्याला आंदोलनाच्या मेधा पाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. जमीन दाखविण्याचा कालावधी व केलेले नियोजन चुकीचे आहे. पावसाळा सुरू झाला तर जमीन बघण्यास कोणी येणार नाही. जमीन दाखविण्याच्या ३ नोटीस बजावल्या व संबंधित जमीन बघण्यास आला नाहीतर त्या जागेच्या सातबाऱ्यावर संबंधितांचे नाव लावुन टपालाद्वारे कागदपत्रे पाठवितात हे मान्य नाही. गाव व त्यातील प्रकल्पबाधित यांना एका ठिकाणी पुनर्वसन करायचे असेल तर तुकड्या-तुकड्याने जागा नको अशी भूमिका पाटकर व इतरांनी घेतली. त्यामुळे दोन-अडीच तास चाललेली बैठक निष्फळ ठरली. डवले यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींना तुमचे जमीन बघणे कार्यक्रमांचे नियोजन लेखी स्वरूपात देण्याचे सांगितले. |
सिन्नरः सिन्नर- घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ वळणावर गॅस टँकर उलटून टँकरने पेट घेतल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सिन्नरः सिन्नर- घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ वळणावर गॅस टँकर उलटून टँकरने पेट घेतल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. टँकरने पेट घेतल्याने आगेचे मोठे लोळ दिसत आहेत. त्यात दोन दुचाकी जळल्याचे समजले. या आगीत अन्य वाहने पेटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिन्नर- घोटी महामार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे खबरदारी म्हणून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीबाजूकडील वाहतुक ठप्प झाली आहे. परिसरातील बघ्यांनी गर्दी केली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहे. |
हे कसे कार्य करते - शेन्झेन सनसन इंटरनॅशनल लॉजिस्टिक कंपनी, लि.\nया द्रुत आणि सोप्या चरणांद्वारे सनसोनप्रेस आपल्या पूर्तीची डोकेदुखी दूर करण्यास आणि आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकते. इन-टाइम वेअरहाउस यादी आणि ट्रॅकिंग माहितीसह जलद आणि अचूक पूर्ती\nचरण 1- सानुकूलित समाधान\nआपल्या पूर्णतेचे आउटसोर्स करण्यास सज्ज आहात? सनसोन एक्सप्रेसशी संपर्क साधा आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापक संपूर्ण प्रक्रियेदरम्यान समर्थनासाठी नियुक्त केले जाईल. प्रत्येक व्यापार्यासाठी आम्ही आपली उत्पादने, यादीतील गरजा, लक्ष्य बाजाराचे पुनरावलोकन करू आणि आपल्याकडे येणा any्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ. त्यानंतर आम्ही त्यांच्या व्यवसाय आवश्यकतांचे विश्लेषण करू आणि सर्वोत्तम पूर्तता आणि वहन समाधान देऊ.\nचरण 2- सनसोनप्रेसवर इन्व्हेंटरी पाठवा\nआपण आपले विनामूल्य वापरकर्ता खाते तयार केल्यानंतर, कृपया एएसएन (प्रगत शिपिंग सूचना) तयार करा आणि आपल्या उत्पादनाची यादी सनसोनप्रेसप्रेस केंद्रावर पाठवा. कमीतकमी व्हॉल्यूमची आवश्यकता नाही, आपल्यास पाहिजे तितक्या वस्तू पाठवा. सनसोनप्रेसप्रेसच्या सवलतीच्या परदेशी नौवहन दरांचा फायदा व्यवसाय घेऊ शकतात.\nआमचा कार्यसंघ आपला साठा प्राप्त करतो, तपशीलवार धनादेश घेते, छायाचित्रे घेते किंवा आपल्या वैशिष्ट्यांनुसार क्यूसी आयोजित करतो, त्यानंतर आपल्या निवडलेल्या ऑर्डर पूर्ती केंद्रात त्याचे घर शोधा, आपण खाते केंद्राद्वारे आपल्या सूचीचे परीक्षण आणि नियंत्रण करू शकता。\nचरण3- ऑर्डर तयार करा\nग्राहक आपल्या ईकॉमर्स वेबसाइटवर ऑर्डर देतात आणि आपण त्यांना एपीआय, बॅच सीएसव्हीद्वारे अपलोडद्वारे किंवा मॅन्युअली ऑर्डर तयार करून सनसोनप्रेसप्रेस टीमकडे सबमिट करता.\nआमची इन-हाउस वेअरहाउस मॅनेजमेंट सिस्टम वापरुन आपल्या ऑर्डर प्राप्त झाल्या आणि थेट आमच्या सिस्टममध्ये स्कॅन केल्या आहेत.\nचरण4- पिक, पॅक आणि शिप ट्रॅकिंग\nआमच्या खंडित वेळेपूर्वी आपण खाते केंद्रात ऑर्डर सबमिट केल्यावर, सनसोन एक्सप्रेस त्याच दिवसाची पूर्तता करण्यास वचनबद्ध आहे. आम्ही काळजीपूर्वक निवडतो आणि पॅक करू आणि आंतरराष्ट्रीय शिपिंगची त्वरित व्यवस्था करू. दरम्यान आपल्याला खाते केंद्राद्वारे पूर्तता प्रक्रियेमध्ये संपूर्ण दृश्यमानता आणि नियंत्रण मिळण्याची परवानगी आहे.\nआमची तज्ञ पूर्ती कार्यसंघ काळजीपूर्वक आपले ऑर्डर उचलून पॅक करा आणि तुमची इच्छा किंवा कोणतीही इन्सर्ट किंवा जाहिरात सामग्री जोडा.\nगोदाम ते आपल्या ग्राहकांच्या दारापाशी मागोवा घेत आम्ही संपूर्ण प्रक्रियेची दृश्यमानता ऑफर करीत आहोत.\nचरण ON- संकल्पित पार्सल मिळवा\nठराविक दिवसांच्या वाहतुकीनंतर ग्राहकांना पार्सल मिळतात. आम्ही केवळ आपले पार्सल पूर्ण आणि वितरित करीत नाही, तर ग्राहकांच्या समाधानाने देखील वितरित करतो.\nआपण चीनमध्ये आपल्या ई-कॉमर्स पूर्ततेचे आउटसोर्सिंगबद्दल विचार करीत आहात? आता कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
येवला (जि. नाशिक) : शहरालगत असलेल्या सुकी येथे लांडग्याच्या हल्ल्यामध्ये विठ्ठल आनंद जाधव यांच्या घराजवळ असलेल्या चाळीमध्ये लांडग्यांनी हल्ला करून चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. (Four goats killed in wolf attack Nashik News) यामुळे परिसरातील शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी पूर्ण बंदिस्त जागा असताना लांडग्याने जमिनीखाली उकरून जाळीच्या खालून लांडग्याने आत प्रवेश करून शेळ्यांना ठार केले आहे. याची माहिती मिळताच माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, वन विभागाचे कर्मचारी व पंचायत समितीचे पशुसंवर्धनचे डॉ. झाल्टे यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तालुक्यामध्ये लांडग्याच्या हल्ल्या गावागावात वाढत आहे शेतकरी बांधवांनी आपल्या पशूंचे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन सभापती प्रवीण गायकवाड केले. याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी नागपुरे, राठोड, डॉ. झाल्टे, अरुण जाधव, प्रकाश जाधव, रामकृष्ण जाधव, राजेंद्र जाधव, अनिल जाधव, रामनाथ जाधव, अरुण जाधव आदी उपस्थित होते. |
Pune Dams पुण्यात यंदा भरपूर पाऊस झाला असला तरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे अद्याप शंभर टक्के भरू शकलेली नाहीत. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. पुणेः केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार धरणे ही १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असताना, पुणे शहरातील चार प्रमुख धरणांपैकी टेमघर आणि जिल्ह्यातील वडिवळे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह ही चार धरणे अद्यापही शंभर टक्के भरू शकलेली नाहीत. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये २९.१० अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. ( Pune Water Level In Dams 2020 Latest Updates ) केंद्रीय जल आयोगाने धरणे ही टप्प्याटप्प्याने कशी भरण्यात यावीत, याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार धरणे ही ३१ जुलैपर्यंत ५० टक्के भरणे आवश्यक आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे ७७ टक्के आणि १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरणे अत्यावश्यक आहे. या निर्देशानुसार जिल्ह्यातील चार धरणे ही अद्यापही शंभर टक्के क्षमतेने भरू शकली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाचा समावेश आहे. हे धरण ९८.६४ टक्के भरले असून, त्यामध्ये ३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणात एक जूनपासून आतापर्यंत २७९२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र, तरीही हे धरण शंभर टक्के भरलेले नाही. या धरण क्षेत्रात ३२०० मिलिमीटर पाऊस पडल्यावर धरण शंभर टक्के भरेल, असा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमध्ये २९.१० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी २९.०३ टीएमसी पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी वडिवळे हे धरण अद्याप शंभर टक्के भरलेले नाही. सध्या हे धरण सुमारे ९३.१२ टक्के भरले असून, सुमारे एक टीएमसी पाणीसाठा आहे. पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह ही धरणे निम्मीही भरू शकलेली नाहीत. पिंपळगाव जोगे धरण हे सुमारे ४६.६१ टक्के आणि माणिकडोह धरण हे ४५.५१ टक्के भरले आहे. या धरणांमध्ये अनुक्रमे १.८१ टीएमसी आणि ४.६३ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. |
पतीकडून 'या' गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असते पत्नी, कधी बोलून तर बघा! - Marathi News । Every woman wants to hear these4things from her partner । Latest relationship News at Lokmat.com\nसेवा ज्येष्ठतेसाठी परिचारिकांची आरोग्य उपसंचालकांकडे कैफियत; आंदोलनाचा इशारा\nगोव्यात कॉपीराईट अॅक्टअंतर्गंत मोठी कारवाई, २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त, चार अटकेत\nझिरो बॅलन्सने खाते उघडण्याची मोहीम\n'बेफिक्रे' श्रुती हासनची 'बेधडक' कबुली, बॉडी शेमिंग करणा-यांना दिले सणसणीत उत्तर\nOMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर\nमुंबई - मराठा आरक्षणाबाबत सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करा; याचिकाकर्ते विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात मागणी\nEvery woman wants to hear these4things from her partner\nपतीकडून 'या' गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असते पत्नी, कधी बोलून तर बघा!\nलग्नाचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेलं असतं. या नात्यात प्रेम आणि समर्पणासाठी दोघांनाही मेहनत घ्यावी लागते.\nBy ऑनलाइन लोकमत । Follow । Published: October 22, 2019 01:07 PM2019-10-22T13:07:45+5:30 । Updated: October 22, 2019 01:15 PM2019-10-22T13:15:24+5:30\nलग्नाचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेलं असतं. या नात्यात प्रेम आणि समर्पणासाठी दोघांनाही मेहनत घ्यावी लागते. एकीकडे एखादी छोटीशी गोष्ट दोघांमध्ये वाद निर्माण करू शकते तर दुसरी काही शब्द ऐकून पत्नी पतीवरील सगळा राग विसरू शकतात. अनेकदा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आणि धावपळीचं जीवन जगताना पुरूष मनासारखं जगणं विसरून जातात. सतत तणावामुळेही असं होतं. पण पुरूषांनी हे लक्षात घ्यायला हवं की, पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला फार काही केलंच पाहिजे असं नाही. दोन शब्द प्रेमाचे देखील त्यांना बराच आनंद देऊन जातात.\nजाऊदे...काही हरकत नाही!\nजर पत्नीकडून एखादी चूक झाली तर पती सवयीनुसार सामान्यपणे त्यांच्यावर रागावतात. पण रागावण्याऐवजी एकदा प्रेमाने म्हणून बघा की, जाऊदे, काही हरकत नाही...कधी कधी अशा चुका होतात. काळजी करू नको. मी सगळं ठीक करेन. इतके जरी शब्द वापरले तर पत्नीच्या मनात तुमच्या विषयी आणखी प्रेम आणि सन्मान वाढेल.\n(Image Credit : stocklib.com)\nजर तुमची पत्नी एकटी गावाला जाणार असेल तर त्यांना म्हणा की, पोहोचल्यावर आठवणीने फोन कर किंवा मेसेज कर. याने त्यांना जाणीव होईल की, तुम्हाला त्यांची काळजी आहे. असं बोलल्याने तुमच्या पार्टनरला चांगलं वाटेल आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी आणखी प्रेम वाढेल.\nकसा गेला तुझा दिवस?\n(Image Credit : 21andmarried.com)\nहे गरजेचं नाही की, प्रत्येकवेळी तिनेच तुमच्या दिवसभरातील गोष्टींची विचारपुस करावी. कधी कधी वेळ काढून तुम्ही सुद्धा त्यांना त्यांचा दिवसा कसा गेला हे विचारू शकता. पण इतकंच करून भागणार नाही तर ते ज्या सांगत आहेत, ते कान देऊन ऐका. त्यांना हे चांगलं वाटेल की, पती आपल्या गोष्टींवर लक्ष देत आहे. सोबत एखादी अडचण सोडवून दिल्यासही त्यांना चांगलं वाटेल.\nमी करतो, तू राहुदे....\n(Image Credit : modspace.in)\nजेव्हा तुमच्या पत्नीच्या मागे कामांचं ओझं असतं तेव्हा तुम्हीही त्यांना मदत करू शकता. 'मी करू लागतो', असं म्हणाल तर तुमची पार्टनर नक्कीच खूश होईल. त्यांना याचा आनंद वाटेल की, तुम्हाला त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत जाणीव आहे आणि सोबतच मदतीसाठीही तयार आहात. आजच्या धावपळीच्या जीवनात महिला घरात आणि बाहेरील कामांमध्ये चांगला बॅलन्स ठेवतात. तर अनेकदा त्यांना खूप काम असेल तर तुम्हीही त्यांची मदत करू शकता. याने भांडणही होणार नाहीत.\nWeb Title: Every woman wants to hear these4things from her partner\nहो (716 votes)\nनाही (520 votes)\nको-वर्किग? ऑफिसला न जाता, खुर्चीला न चिकटता रेस्टॉरण्ट, कॅफेत बसून काम करण्याचा एक नवा ट्रेण्ड. |
तर प्रवीण सखाराम भिल याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २ जून रोजी रात्री ९. ३० वाजता द्वारका नगरातील चौकात एकलव्य पुतळ्याजवळ गप्पा मारत असताना विकास राजेंद्र पाटील याने येथे गप्पा का मारतात, येथे बसायचे नाही असे म्हणत वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. विकास पाटील याने हातातील लोखंडी रॉडने प्रवीण भिलच्या डोक्यावर मारून दुखापत केली. यावरून विकास पाटील, रावसाहेब पाटील, दगा यादव पाटील, नवल यादव पाटील, अमोल दगा पाटील (सर्व रा. बाळापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी रावसाहेब पाटील व अमोल पाटील यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींना अटक केलेली नाही. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. मोरे करीत आहेत. |
नगर - कृषी विभागातर्फे राज्यातील शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (एमआयडीएच) या योजनेंतर्गत ट्रॅक्टर व अवजारांसाठी अनुदान दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात व प्राप्त अर्जांमधून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. याच योजनेंतर्गत किन्ही येथील शेतकरी सचिन मोढवे यांना 27 एचपी ट्रॅक्टर सोडत पद्धतीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला होता. संबंधित शेतकऱ्याने कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदीदेखील केला. मात्र, दहा महिने उलटून गेले, तरी कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये अनुदान अद्याप मिळालेले नाही. तत्कालीन कृषी आयुक्त धीरजकुमार हे एक दिवस बळिराजासाठी या अभियानांतर्गत बहिरोबावाडी, किन्ही येथे आलेले होते. त्या वेळी त्यांच्यासमवेत तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पारनेरचे तहसीलदार आवळकंठे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी जगताप, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात शेतकरी सचिन मोढवे यांना ट्रॅक्टरचे वितरणदेखील करण्यात आले. परंतु या गोष्टीला दहा महिने होऊन गेले, तरी कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये अनुदान अद्याप मिळालेले नाही. या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाशी अनेकदा संपर्क करून विचारणा केली असता काही तांत्रिक अडचणींमुळे अनुदान देण्यास विलंब होत असून, कृषी आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे लेखी पत्राद्वारे जुजबी उत्तर दिले जाते. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका, संगमनेर तालुक्यातील पाच व कोपरगाव तालुक्यातील एका असे सात शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. राज्यातील कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजनेतून शेतीशी कृषी विभागाने तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे, अन्यथा संबंधित शेतकऱ्याचा ट्रॅक्टर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आणून लावला जाईल. -अनिल देठे पाटील, शेतकरी नेते. |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, आता शिवसेनेने पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला आहे. मात्र, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित दादांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामध्ये नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेकडून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. यामुळे पारनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकत वाढली असल्याचे बोलले जात आहे. |
पिंपरी : काही अज्ञातांनी दगड व धारदार हत्यारांनी वार करून तरुणाचा खून केला. गुळवेवस्ती, भोसरी येथे सोमवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिन्टू कुमार सहदेव शाह (वय २९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पाहणी केली. तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने मारून तसेच तोंडावर धारदार हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सुरवातीला तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यानंतर संबंधित मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचे निष्पन्न झाले. तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. |
मुंबई : भाजपा आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत साटम पोलीस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण करत असल्याचा आरोप अमित साटम यांचा आहे. फेरीवाल्यांनी मात्र अमित साटम आपल्याकडून हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. विशेष म्हणजे, साटम यांनी यावेळी पोलिसांनाही नाकर्ते ठरवत शिवीगाळ केली. ही संपूर्ण घटना 7 सप्टेंबर रोजी घडलेली आहे. दरम्यान, अद्याप याप्रकरणी कुठलाही गुन्हा दखल झालेला नसला, तरी साटम यांच्या अर्वाच्च भाषेतली शिवीगाळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. |
पणजी : जुने गोवे येथील 'हातकातरो खांब' प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे निवेदन ११ नोव्हेंबर या दिवशी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांना आणि काही दिवसांपूर्वी पुरातत्व खाते यांना दिले आहे. पुरातत्व खात्याचे मुख्य अधीक्षक इजार आलम हाश्मी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये 'स्वदेशी विचार मंच'चे सर्वश्री मयुरेश कुष्टे, भारत हेगडे, हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक, सुशांत दळवी आणि भगवंत नाईक यांचा समावेश होता. पुरातत्व खात्याने गावागावात पुरातत्व वास्तूंच्या शोधाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करून त्या ठिकाणी आढळणारी वारसास्थळे पुरातत्व खात्याच्या सूचीत समाविष्ट करणार असल्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ही मागणी केली आहे. पुरातत्व खात्याचे मुख्य अधीक्षक इजार आलम हाश्मी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे, तसेच 'हातकातरो खांबा'ची पाहणी करून त्या ठिकाणी माहिती फलक लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी केलेल्या बलीदानाचे 'हातकातरो खांब' हे प्रतीक आहे. 'हातकातरो खांब' हा पोर्तुगीज राजवटीत हिंदूंवर केलेल्या क्रूर अत्याचाराचे प्रतीक आहे. हा खांब गेली १५० वर्षे जुने गोवे येथे आहे आणि याचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख आढळतो. या ठिकाणी 'हात कातरो खांबा'ची ऐतिहासिक माहिती सांगणारा एकही फलक नाही. या खांबाविषयी किंवा खांबाचे जतन करण्याविषयी भारतीय पुरातत्व खाते किंवा गोवा शासनाचे पुरातत्व खाते गंभीर नसल्याचेच हे द्योतक आहे. यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये गोवा शासनाचे नगरविकास खाते आणि पालिका प्रशासन यांनी जुने गोवे येथील वारसास्थळांचे जतन आणि विकास करण्यासाठी 'मास्टर प्लान' सिद्ध करणार असल्याचे म्हटले होते, तसेच या वेळी हिंदु जनजागृती समितीने 'हातकातरो खांबा'ला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करण्याची मागणी केली होती. या वेळी 'हातकातरो खांबा'चे जतन करण्यासमवेतच त्याच्या बाजूला कुंपण घालणे, इतिहास तज्ञांचे साहाय्य घेऊन खांबाच्या ठिकाणी खांबाविषयी माहिती देणारा फलक प्रदर्शित करणे, गोव्यात येणार्या पर्यटकांना याविषयी माहिती देणे, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१४ मध्येही अशाच प्रकारची मागणी गोवा शासनाकडे केली होती. |
ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या 'बिग बास्केट' (BigBasket) या कंपनीवर सायबर अटॅक (Cyber attack) झाला असून सुमारो दोन कोटी ग्राहकांची माहिती चोरली गेली आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म 'साबल इंक' (Cybleinc)ने याबाबत माहिती दिली आहे. 'बिग बास्केट' या चीनची गुंतवणूक असलेल्या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर सायबर अटॅक झाला असून सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती डार्कवेब (Darkweb) वर ३० लाख रुपयांना विकली गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, ईमेल आयडी, संकेतशब्द, पिन, संपर्क क्रमांक, जन्मतारीख, पत्ता इत्यादींची संपूर्ण माहिती आहे. बिग बास्केट कंपनीने बंगळुरुमधील सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. बिग बास्केटनं म्हटलं की, आम्ही ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला प्राधान्य देतो. ग्राहकांचा फानान्शिअल डेटा आम्ही स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड्सचे नंबर वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फानान्शिअल माहिती सुरक्षित आहे. |
अमेझॉन प्राईम व्हिडिओची ऑरिजिनल सीरीज 'ब्रीदः इन द शैडोज़' 10 जुलै 2020 ला होणार प्रदर्शित! अमेझॉन प्राईम व्हिडिओने आज घोषणा केली की अमेझॉन ऑरिजिनल सिरीज 'ब्रीद' चा बहुप्रतीक्षित नवीन सीजन 10 जुलै 2020 ला प्रदर्शित करण्यात येईल. साइकोलॉजिकल क्राइम थ्रिलर 'ब्रीदः इन द शैडोज़' अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे रचित आणि निर्मित असून या सीरीज द्वारे बॉलीवुड सुपरस्टार अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचसोबत, अभिनेता अमित साध पुन्हा एकदा आपली पुरस्कार विजेता भूमिका सीनियर इंस्पेक्टर कबीर सावंत साकारताना दिसणार आहे. या मूळ सिरीजमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री निथ्या मेनन देखील आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. सैयामी खेर देखील एक प्रमुख व्यक्तिरेखेसोबत कलाकारांच्या या टोळीत सामील झाली आहे. ही बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजिनल सीरीज जगभरातील 200 हून अधिक देश आणि प्रदेशात विशेष करून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लॉन्च होईल. अबुदंतिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा म्हणाले की, "अबुदंतिया एंटरटेनमेंट नेहमीच विविधांगी शैलीत आकर्षक आणि प्रभावशाली कंटेंट बनवण्यात अग्रेसर राहिले आहेत. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत पुन्हा एकदा यशस्वी अमेझॉन ओरिजिनल सीरीज ब्रीद च्या नव्या सीजनसाठी सहयोग देण्यासाठी उत्साहित आहोत. मी व्यक्तिशः अमित, निथ्या आणि सैयामी यांच्यासोबत अभिषेक यांच्या येण्याने खूप आनंदित आहे आणि मयंक द्वारे एक मनोरंजक कहाणी, एक ताजी आणि उन्नत स्टोरी लाईन सोबत आम्हाला विश्वास आहे की हा शो संपूर्ण जगभरातील चाहत्यांना आवडेल. " निर्देशक मयंक शर्मा म्हणाले की, "आम्ही प्राईम मेंबर्ससाठी ब्रीदचा हा नवा सीजन आणताना आनंदित आहोत. जेव्हा की शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली स्वतःची अशी एक कहाणी आहे, परंतु या सर्व कहाण्या एकमेकांशी आंतरिक संबंधांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत. या नव्या चैप्टरसोबत प्राईम सदस्यांच्या भावना आणि रोमांच एका नव्या रोलर-कोस्टर राईडवर घेऊन जाण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. " ही सीरीज अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि मयंक शर्मा द्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे. या शो ला भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिली आहे. |
कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही हवेत; नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच! रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे. अकोला : निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षांपासून रखडेले शहरातील नेकलेस रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिली; मात्र आठवडा उलटून गेला तरी, रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आला. आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहरातील सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक या ८१६ मीटर लांबी व १५ मीटर रुंदीच्या 'नेकलेस' रस्ता कामासाठी शासनामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना, गत दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू का करण्यात आले नाही, असा सवाल खा. संजय धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केला होता. या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम बाकी असल्याने रस्त्याचे काम सुरू होणे बाकी असल्याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर, या मुद्यावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरीत, काम केव्हा सुरू करणार, अशी विचारणा केली होती. त्यानुषंगाने नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींना दिली होती. आठवडा उलटून गेला; मात्र अद्यापही नेकलेस रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने, रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याची कार्यकारी अभियंत्यांनी लोकप्रतिनिधींना दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे. |
नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका (India vs New Zealand ODI Series) पार पडली. ही मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकत भारतीय संघाला व्हाईटव्हॉश दिला. या मालिकेत भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे बुमराह टीकाकारांच्या कचाट्यात सापडला. यावर आता भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) बुमराहच्या टीकाकारांवर निशाना साधला आहे. बुमराहने आतापर्यंत 12 कसोटी, 64 वनडे आणि 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 62 विकेट्स, वनडेत 104 विकेट्स आणि टी20त 59 विकेट्स घेतले आहेत. |
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विभागाचे ( आयएमएफ) प्रमुख डॅनियल ले यांनी मंगळवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबाबत पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की ती (भारत) 'अत्यंत मजबूत अर्थव्यवस्था' आहे. ते म्हणाले की, सध्या भारताचा आर्थिक विकास दराने वेगाने वाढत आहे. लेह म्हणाले की, 2022 मध्ये भारताचा विकास दर 6. 8 टक्के राहणार आहे. त्याचबरोबर सध्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वात आशादायक अर्थव्यवस्था आहे, हे आपण विसरता कामा नये. जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीनुसार हा अंदाज भारताच्या विकास दराचा अंदाज 6. 1 टक्क्यांवरून 5. 9 टक्के असणार आहे. पण त्याची कारणे आंतरराष्ट्रीय आहेत. भारताची पायाभूत अर्थव्यवस्था मजबूत आहे. सध्या चिंता करण्यासारखे काहीही नाही. लेह यांनी पुढे सांगितले की आयएमएफकडून विकास दराचा अंदाज कमी करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. कारण, जागतिक घडामोडींचा हा परिणाम होत असतो. आम्हाला मिळालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीनुसार हा अंदाज व्यक्त केला आहे. विकास दर ६. ३ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता 2020-21 मध्ये कोरोनाची महामारी असतानाही भारतासाठी आर्थिक वर्ष खूप चांगले होते. आता भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग आला आहे. भारतातील राहणीमानात सातत्याने सुधारणा होत आहे. मात्र, भारताला बेरोजगारीवर नियंत्रण ठेवताना रोजगाराच्या संधी वाढवण्यावर अधिक भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले. रोजगार वृद्धीवर भर दिल्यास पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6. 3 टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. रोजगार वाढविण्याचे समोर आव्हान- आरबीआयने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलेला अंदाज हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजाहून कमी आहे. आयएमएफचे प्रमुख म्हणाले, की वाढती महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाढणारे व्याजदर यांच्यात संतुलन राखणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हान असणार आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे बँकेच्या कर्जात कपात होणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकर कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे जागतिक महामंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. |
कोलकाता - मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत २०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान पेलताना लवकर बाद झाला होता. त्यामुळे नाराज रोहितने आपल्या बॅटन यष्ट्या उद्ध्वस्त केल्या म्हणून सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला. मुंबई इंडियन्सपुढे इडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात २३३ धावांचे आव्हान होते. सलामीवीर रोहित ते आव्हान पेलताना हॅरी गर्नीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याला पंचांनी पायचीत दिल्यानंतर डीआरएसचा रोहितने आधार घेतला. पण तो बाद असल्याचे तिसऱ्या पंचांनीही स्पष्ट केले. तेव्हा नाराज झालेला रोहित पॅव्हेलियनकडे जाताना दुसऱ्या टोकाला असलेल्या यष्ट्यांना बॅटने ठोकरून पुढे गेला. रोहितकडून इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेतील नियमांचा भंग झाला. हा नियमभंग केल्याची कबुलीही रोहितने दिली. २. २ या नियमाचा रोहितने भंग केला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात याआधीही षटकांची गती योग्य न राखल्याबद्दल त्याला १२ लाखांचा दंड सहन करावा लागला आहे. |
अहमदनगर - कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण संकटात आले आहेत. कर्जाचे हप्ते भरायचे कसे, अशी चिंता असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत दिलासा देणारी बातमी दिली आहे. SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (MLCR) ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील महिन्यात देखील SBI ने MLCR कर्ज दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्यापूर्वी ०.१५ टक्के अशी आतापर्यंत SBI ने १४ वेळा MLCR च्या व्याजदरात कपात केली आहे. MLCR च्या व्याजदरात कपातामुळे जुलैच्या दहा तारखेपासून होम लोन आणि कार लोन कमी दरात उपलब्ध होईल. तसेच MLCR शी संबंधित कर्जाचे हप्ते, ईबीआर कमी होईल. स्टेट बँकेचे सध्याचे MLCR चे व्याज दर सर्वात कमी असल्याचा दावाही SBI ने केला आहे. |
मुंबई, 24 एप्रिल : महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक रिक्षा चालकाला त्यांच संशोधन पाहून रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर (R&D) आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीममध्ये सल्लागार पदाची ऑफर दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी रिक्षाचालकाचं कौतुक केलं आहे. देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनावर (Coronavirus) नियंत्रण आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा मुख्य हेतू आहे. महिना ओलांडल्यानंतर अत्यावश्यक सेवांसह काही मूलभूत गोष्टीही सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या इनोव्हेटिव्ह ट्विट, वेगळा दृष्टीकोन यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आज एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालकात कोरोनाच्या धोक्यापासून आपला व प्रवाशांचा बचाव करण्यासाठी रिक्षेच्या संरचनेत बदल केला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक असतं. सरकारकडूनही वारंवार हेच सांगितलं जात आहे. त्यामुळे या व्हिडीओमधील पठ्ठ्याने रिक्षामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी चार वेगवेगळे भाग केले आहे. त्यामुळे प्रवासी एकमेकांना पाहूही शकत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका नसेल. आनंद महिद्रा यांनी हा ट्विट करीत या रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आपले लोक विविध परिस्थिती स्वीकारत त्यात नावीन्यपूर्णता आणत असतात. हे पाहून मी चकीत होतो. या रिक्षा चालकाला R&D & product development teams मध्ये सल्लागार म्हणून घ्यायला हवं. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये रिक्षाचालकाचं कौतुक करण्यात आलं आहे. याशिवाय आनंद महिंद्रा यांच्या तातडीने निर्णय घेण्याच्या तयारीबद्दल अप्रुप व्यक्त केलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
कोपरगावः नगरमधील मनमाड महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल साई टुरिस्ट समोर उलटला. यात रस्त्याने जाणारे दोन पादचारी दबल्याने गंभीर जखमी झाले आहे. तर उडी मारल्याने चालकाचा जीव वाचला. हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा. |
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील जैन लेआऊट वणी येथील शिक्षक अजय लटारी विधाते यांचा मृतदेह आढळून आला. धुळे : मध्य प्रदेशकडून भोईटीमार्गे शिरपूरकडे येणारी संशयास्पद कार सांगवी पोलिसांनी पकडली. सांगली : रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ? रत्नागिरी : रत्नागिरी : दोन महिने अगोदरच गणेश आले आकाराला! रत्नागिरी : रत्नागिरी : रत्नागिरी : . . . अन् चिमुरड्या सुप्रियाला भेटली आज्जी! रत्नागिरी : रत्नागिरी : शिशुविहारकडे कामगारांची पाठच! रत्नागिरी : रत्नागिरी : |
मुंबईसह सर्वत्र होळी आणि धुळवड उत्साहात साजरी होत असताना. २४ तासांत धारावी, मालवणी आणि पवई परिसरात झालेल्या तीन हत्यांमुळे या उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईसह सर्वत्र होळी आणि धुळवड उत्साहात साजरी होत असताना. २४ तासांत धारावी, मालवणी आणि पवई परिसरात झालेल्या तीन हत्यांमुळे या उत्सवाला गालबोट लागले आहे. मालवणीत क्षुल्लक कारणांवरून सहकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. पवईत मुलीकडे मोबाइल नंबर मागितल्याने त्याची हत्या झाली आहे. तर धारावीत अनोळखी मारेकऱ्यांनी अज्ञात व्यक्तींची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पवई आणि मालवणी हत्येत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र धारावी हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. धारावीच्या अकबर गल्लीत सोमवारी दुपारी १२च्या सुमारास गोळीच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्या झालेल्या आरोपींच्या जवळ दोन पुंगळ्या मिळाल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे पाकीट आणि मोबाइल मारेकऱ्यांनी पळवल्याने मृताची ओळख पटत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात इसमांनी मृत व्यक्तीला अकबर गल्लीत पळण्यास सांगून त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडल्या, यातील एक गोळी त्याला लागली नाही, तर दुसरी गोळी त्याच्या डोक्यात शिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याच परिसरातून तीन वेगवेगळ्या गल्ल्यांमधून पळ काढणे सोपे असल्याचे हेरून मारेकऱ्यांनी हत्येसाठी ही जागा निवडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मालवणीत रविवारी पहाटे मोबाइल चार्जिंगला लावण्यावरून झालेल्या वादातून व्येंकटेशन धुराई कन्नू (३०)ने सोबत राहणाऱ्या बिरू बन्सल (२०) याची चाकू भोकसून हत्या केली. पोलिसांनी कन्नूला अटक केली आहे. पवईतील टेकडीपाडा, आयआयटी कॅम्पस, पोस्टनिटी, येथे मुलीकडे मोबाइल नंबर मागितल्याने झालेल्या वादातून मुलीच्या घरातल्यांनी सचिन चंद्राकांत हेमाडी(२०) या तरुणाच्या डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून त्याची हत्या केली. या प्रकरणी पवई पोलिसांनी नंदू अनिल खुराडे, कांच्या उर्फ संजय अनिल खुराडे, गिता अनिल खुराडे, प्रशांत हरिश्चंद्र कोपी उर्फ परशा यांना अटक केली आहे. |
सामान्यतः उतारवयांत माणसाला दीर्घकाल टिकणारी एखादी उपाधि जडते. त्यामुळे त्याच्या प्रकृतीचें मान हळूहळू कमी होतां होतां शेत्रीं अंतःकाल नैसर्गिकरीत्याच ओढवतो. हे नैसर्गिक मरण आयुष्यरेषा विराम पावतांना उलट्या ठेवलेल्या पिसाप्रमाणें तळहातावर संपते त्यावरून दिसून येते (आकृति ३४ ). अथवा आयुष्यरेषा विराम पावण्यापूर्वी अस्पष्ट होत होत मनगटाच्या खालच्या सीमाप्रदेशांत विलीन होईल तरीही म्हातारपणचें स्वामाविक मरण वांट्यास येईल असे समजावें. मात्र बाकीच्या प्रमुख रेषा व हातांवरील इतर शुभाशुभ चिन्हें• ह्यांची अनुकूलता पाहूनच हा निर्णय प्रगट करावा. आयुष्यरेषेवर आडव्या छेद देणाऱ्या रेषा बहुधा तळहातावर पहावयास सांपडतात (आकृति ३५ ). ह्या आडव्या रेषा आयुष्यरेषेच्या आंत शुक्र उंचवट्यावर उगम पावून नंतर आयुष्यरेषा छेदतील तर संकोचित, लाजाळू, प्रेमळ वा स्वच्छंदी - स्वैर वृत्तीपाय व्यक्तीचें नुकसान होतें; आणि है छेद मंगळ-उंचवट्यावरून आलेले दिसून येतील, तर भांडखोर, हट्टी क अविवेकी स्वभावामुळे वारंवार अडचणी निर्माण होतात. आयुष्यरेषेला छेदण्याऐवज ह्या आडव्या रेषा तींत मिसळतील तर (आकृति ३५ ) नुकसान अथवा अडचणी येणार नाहींत. तथापि मनुष्याच्या मनाची प्रसन्नवृत्ति एवढ्यातेवढ्या कारणानें नाहींशी होईल. मंगळ वा शुक्र उंचवट्यावरील आडव्या रेषा व्यक्तीला विकारलोलुप अथवा भावनावश करीत असल्यानें, त्या शारीरिक वा मानसिक सुखांत वारंवार व्यत्यय आणतात असा अनुभव आहे. ह्या आडव्या रेषांचा छेद आयुष्यरेषेप्रमाणेंच मस्तकरेषेलाही बसेल ( आकृति ३५ ) तर मस्तकरेषा दूषित होईल. अर्थात् अविचाराचा परिणाम म्हणून भोगावयास लागणारी आपत्ति डोक्यांत काहूर उठवील व कोत्या, अदूरदर्शी आणि अपेशी कृत्यांमुळे शरीरप्रकृति त्या त्या काली खालावेल असे समजावें. आयुष्यः रेषा आयुष्यरेषा, मस्तकरेषा आणि अन्तःकरणरेषा ह्या तिन्ही प्रमुख रेषांना अंगठ्याच्या मूलप्रदेशांतून निघणाऱ्या आडव्या रेषा छेदतील तर ( आकृति ३५ ) त्या फारच अनिष्ट होत. ज्याच्या मृत्यूमुळे आपल्या जीवनास कलाटणी मिळेल अशा व्यक्तीच्या दर्शक अशा त्या असतात. आई-बाप - भावंडे-पतिपत्नी ह्यांचा कायमचा वियोग, बहुतेक लांबच लांब पण प्रमुख रेषांना तळहातावर तिरपा छेद देऊन, ह्या रेषा सूचित करतात. मात्र आयुष्यरेषेवर वयाच्या कोणत्या वर्षाला त्या छेद देतील तें लक्ष्यपूर्वक पहावें; आणि पुढेही कोणत्या ग्रहाच्या उंचवट्यावर अथवा कोणती विशिष्ट प्रमुख रेषा छेदून विराम पावण्याचा तिचा इरादा आहे हे ध्यानांत घ्यावें. बुध-उंचवटा, त्यावरील विवाह रेषा, अन्तःकरणरेषेचा बुध-उंचवट्यानजीकचा प्रदेश ह्यांवरून पतिपत्नी, अपत्य अथवा जिवलग स्नेही ह्यांचा बोध होतो. मस्तकरेषा, रविशेषा, रवि उंचवट्याखालचा अन्तःकरणरेषेचा टापू, शनि-उंचवटा अगर धनरेषा ह्यांमुळे पिता, वरांतील मिळवता, जबाबदार, वडीलधारा मनुष्य, आपला आश्रयदाता हीं ओळळतां येतात. तर आयुष्य रेषा चंद्र-उंचवटा, गुरु-उंचवट्याखालचा मस्तक वा अन्तःकरणरेषेचा भाग ह्यांवरून मातृ• सौख्याचा बोध होतो. येणेंप्रमाणे आडवा छेद नेमका कोठें बसतो तें पहावे व विचार करून मग निर्णय द्यावा. सारांश, आयुष्यरेषेवरून शरीरप्रकृति, आरोग्य, काटकपणा, उत्साह व देहवल ह्यांचें दिग्दर्शन होतें. ही रेषा जितकी लांब, अर्धवर्तुळाकार, बारीक व खोल असेल त्या प्रमाणांत वरील गोष्टींची सुबत्ता लाभते. मात्र आयुर्मर्यादा अगर आकस्मिक तऱ्हेनें येणारें गंडांतर हे केवळ आयुष्यरेषे • वरून सांगतां येत नाहीं; तर त्यासाठी तळहातावरील इतर प्रमुखरेषा, ग्रहांचे उंचवटे, शुभ वा अशुभ चिन्हें ह्रीं एकसमयावच्छेकरून पहाव • लागतात. निर्दोष व संपूर्ण आयुष्यरेषा असलेली माणसेंहीं अल्पायुषी |
औरंगाबाद,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- उभारी, बाल संगोपन, रोजगार हमी, जल जीवन मिशन, कृषी, महावितरण आदी विषयांसह शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले. कन्नड येथील गजानन हेरिटेज येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. यावेळी उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पोलीस निरीक्षक हेमंत मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच उभारी प्रकल्पात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावयाच्या मदतीचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महसूल विभागाने गृह प्रकल्प आराखडा तयार करावा. कोविड लसीकरणाबाबत जागृती करावी. कोविड चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा. व्यापारी, फेरीवाले, रिक्षा चालक आदींची कोविड चाचणी आवश्यक आहे. त्यांच्या चाचण्यांची देखील तपासणी करावी. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. विभागांच्या कार्याबाबत बैठकीमध्ये श्री.विधाते यांनी सविस्तर माहिती सादर केली. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उभारी प्रकल्पांतर्गत मदत देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून उषा पवार, सुधा वाळुंजे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पांतर्गत प्रशासनाकडून मदत करण्यात आली. त्याचबरोबर पालक अधिकारी यांच्याशीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधला. विठ्ठलपूर येथे इको बटालियनच्या माध्यमातून 99.20 हेक्टरवर 24 देशी प्रजातीच्या 51 हजार 428 वृक्ष लावण्यात आलेले आहेत. या लागवड क्षेत्रास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट दिली. वृक्ष संवर्धनासाठी बटालियनला निधी कमी पडू देणार नाही. गोगा बाबा टेकडी याठिकाणी चौकी आणि जवान तैनात करण्यात यावेत, असे बटालियनच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, इको बटालियनचे श्री.लेफ्टनंट कर्नल मिथिल जयकर, एस.भटनागर, राजेश गाडेकर, सहायक वन सरंक्षक एस.यू. शिंदे, तहसीलदार संजय वरकड, एम. ए. शेख, वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रादेशिक वन विभागाच्या कन्नड शहरातील नर्सरीमध्ये असलेल्या जांभूळ, मोहगुणी, रक्तचंदन, करंज, मियावाकी घनवन प्रकल्प आदींची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. तसेच वन विभागाकडून वृक्ष वाढीसाठी करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. · पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद-शिर्डी रस्ता विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातून पर्यटकांना चालना मिळेल. अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी पर्यटनास चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. · महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संगोपन योजनेचा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ देण्याची कार्यवाही करा. · जिल्ह्यात 850 हेक्टरवर वृक्षारोपण झालेले आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी परिसरात सामाजिक जबाबदारीने वृक्ष लागवड करावी व उद्दिष्ट पूर्ण करावे. · शबरी, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभासाठी सर्वेक्षण करा. · कोविड लसीकरण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.कार्यालयाबाहेर संपूर्ण लसीकरण झाल्याचा फलक लावावा. · जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 55 लिटर पाणी देण्यासाठी नियोजन करा. · सुरू झालेल्या शाळांनी वृक्ष लागवडीवर अधिक भर द्यावा. · सुंदर माझे कार्यालय अंतर्गत सर्व कार्यालये आंतर्बाह्य स्वच्छ ठेवावीत. दस्तावेज सुस्थितीत ठेवावीत. सहा गठ्ठे पद्धत अवलंबवावी. |
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे शनिवारपासून दोन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. किराणा दुकान, भाजीपाला, पानपट्टी यास अन्य दुकाने बंद करण्यात आली असून, फक्त रुग्णालये, औषध दुकाने व दूध संकलन केंद्रे सुरू आहेत. गावात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला. आरवडेमध्ये महिन्याभरापासून कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शुक्रवारी गावात १० कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली. जुलैत आजअखेर ६० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. बंदीच्या कालावधीत गावात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. दोन दिवसांत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच विनामास्क आढळल्यास किंवा गाव बंदच्या कालावधीत छुप्या पद्धतीने दुकाने उघडी दिसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे व त्यामध्ये पुढे दहा दिवस बंद वाढविण्यासाठी निर्णय होईल, असे उपसरपंच पंढरीनाथ वाघ यांनी सांगितले. |
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कान्हे येथे श्री भैरवनाथ (Maval) महाराज देवस्थान मंदिर कान्हे उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत झालेल्या या सप्ताहाची सांगता हभप महेश महाराज मडके यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर अशा कार्यक्रमांनी सप्ताहभर हरिनामाचा अखंड जागर करण्यात आला. यावेळी कान्हे नगरीचे सरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री भैरवनाथ महाराज देवस्थान मंदिर कान्हे उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार दि. 28 मार्च 2023 ते 04 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. पहाटे 4 ते 7 काकड आरती, 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, 11 ते 12 गाथा पारायण, 12 ते 2 महाप्रसाद भोजन, 2 ते 4 ज्ञानेश्वरी पारायण, 4 ते5 हरिपाठ, 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 कीर्तन, 9 ते 10 महाप्रसाद भोजन व 11 ते 4 हरिजागर अशा दैनंदिन कार्यक्रम रुपरेषेतून हरिनाम भजन कीर्तन सोहळा जल्लोषात पार पडला. हभप महेश महाराज मडके यांच्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध ऐतिहासिक, सांप्रदायिक,पारंपरिक वेशभूषा साकारून हिंदू संस्कृतीचे आगळे वेगळे दर्शन प्रत्येक कीर्तन प्रसंगी दाखवण्यात आले. श्री भैरवनाथ महाराज सेवाभावी ट्रस्ट,कान्हे, जेष्ठ नागरिक संघ कान्हेचे सर्व सदस्य तसेच श्री भैरवनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष सतिश सोपान सातकर, खजिनदार संतोष श्रीरंग सातकर, सचिव राजेंद्र प्रभाकर सातकर, उपाध्यक्ष सोमनाथ सातकर, किशोर अशोक सातकर, सुरज बाळासाहेब सातकर,तुषार अदिक सातकर, सनी सातकर, प्रतिक लक्ष्मण सातकर, संदीप चंद्रकांत सातकर, कैलास मोरायण सातकर, संदेश बाळासाहेब सातकर तसेच समस्त ग्रामस्थ कान्हे यांच्या देखरेखीखाली कार्यक्रमाचे (Maval)आयोजन करण्यात आले होते. |
चाकण : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होऊ लागला आहे. रविवारी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डातील बाजारावरही कोरोनाचा परिणाम दिसून आला. गेल्या आठवड्यात या बाजारात ४ कोटी ८० लाखांची उलाढाल झाली. त्या तुलनेत रविवारच्या बाजारात उलाढाल ९० लाखांनी कमी होऊन ३ कोटी ९० लाखांची उलाढाल झाली. बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात प्रचंड घसरण झाली. तळेगाव बटाट्याची किंचित आवक वाढूनही बाजारभावात स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक कमी झाल्याने भाव स्थिर राहिले. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. गाजर व वाटण्याची आवक घटूनही भाव घसरले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व शेपू भाजीची आवक वाढली तर कोथिंबीरीची भाजीची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हैशीच्या संख्येत घट झाली तर शेळ्यांमेंढयांच्या संख्येत वाढ झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याच्या भावात १,८०० रुपयांची मोठी घसरण झाली. तळेगाव बटाट्याची एकूण १०५० आवक क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक ५० क्विंटलने वाढूनही बाजारभाव स्थिर राहिले. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक ८ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक १६ क्विंटलने घटूनही बाजारभाव ८,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमूग शेंगांची ३० क्विंटल आवक होऊनही भाव ८,००० पोहचले. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २४३ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणेः कांदा - एकूण आवक - ५,००० क्विंटल. भाव क्रमांक १. २,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये. बटाटा - एकूण आवक - १,०५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये. टोमॅटो - ६२ पेट्या ( ५०० ते १,००० रू. ), कोबी - १५५ पोती ( १०० ते ३०० रू. ), फ्लॉवर - १४७ पोती ( ६०० ते १,२०० रु. ),वांगी - ६४ पोती ( १,००० ते २,००० रु. ). भेंडी - ५० पोती ( ३,००० ते ४,००० रु. ),दोडका - ३९ पोती ( २,००० ते ३,००० रु. ). कारली - ४९ डाग ( २,५०० ते ३,५०० रु. ). दुधीभोपळा - ३३ पोती ( ५०० ते १,००० रु. ),काकडी - ३७ पोती ( ५०० ते २,००० रु. ). फरशी - १४५ पोती ( २,००० ते ३,००० रु. ). वालवड - २६ पोती ( २,००० ते ४,००० रु. ). गवार - १५ पोती ( ४,००० ते ६,००० रू. ), ढोबळी मिरची - ४९ डाग ( १,००० ते २,००० रु. ). चवळी - १४ पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ), वाटाणा - ७३ पोती ( २,००० ते ३,००० रुपये ), शेवगा - १३ पोती ( ३,००० ते ५,००० रुपये ), गाजर - १२३ पोती ( ६०० ते १,२०० रु. ). राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख ४० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ७५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,४०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते १,००० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही. मेथी - एकूण २८ हजार ५४५ जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), कोथिंबीर - एकूण १९ हजार ७६० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), शेपू - एकुण २ हजार ५२० जुड्या ( ६०० ते १,००० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ८५० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ). चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या ९५ जर्शी गायींपैकी ६५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रुपये ), १२५ बैलांपैकी ७५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३,०००० रुपये ), १६० म्हशींपैकी ११० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,८०० शेळ्या - मेंढ्यापैकी ९,३०० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला. चाकण बाजारात वांग्याचा लिलाव. |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी, आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-२० आणि वनडे संघामध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव नव्हते. आयसीसीच्या टी-२० आणि वनडे संघाचा कर्णधार बाबर आझम कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी प्रभावी नेता आहे. वर्षाच्या सुरुवातीला, साउथम्प्टनमध्ये भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याने ४ सामन्यात ६५.८३च्या सरासरीने शतकासह ३९५ धावा केल्या. संघात समाविष्ट असलेल्या तीन भारतीय खेळाडूंपैकी रोहित शर्माची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. Here's your 2021 ICC Men's Test Team of the Year ? रोहितने कॅलेंडर वर्षात दोन शतकांसह ९०६ धावा केल्या. प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्धची त्याची दोन्ही शतके संस्मरणीय होती. भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा पहिला-पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या यादीत स्थान मिळवणारा तिसरा भारतीय अश्विन आहे, ज्याचा जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये समावेश आहे. अश्विनने ९ सामन्यात ५४ विकेट घेतल्या. विराट कोहलीला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२०, एकदिवसीय आणि सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. हेही वाचा - ICC Women's ODI Team Of The Year : मिताली राज आणि झुलन गोस्वामीला संघात मिळालं स्थान; 'ही' दिग्गज बनली कप्तान! आयसीसी वर्षातील कसोटी संघ (पुरुष): दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लॅबुशेन, जो रूट, केन विल्यमसन (कप्तान), फवाद आलम, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, काइल जेम्सन, हसन अली, शाहीन आफ्रिदी. |
जनुक काय आहे? जीन - ज्या द्वारे एन्कोड केलेली अनुवांशिक nucleotides dezoksiribonuklinovoy ऍसिड परिभाषित क्रम (माहिती माहिती प्रथिने प्राथमिक रचना यासंबंधी रेणू). डीएनए रेणू - दुहेरी अडकलेल्या. साखळ्या प्रत्येक एक विशिष्ट nucleotide क्रम आहे. प्राथमिक प्रथिने, रचना जे संख्या आणि amino ऍसिडस् क्रम आहे, आनुवंशिक गुण निर्णायक भूमिका बजावते. योग्य माहिती एन्कोड करण्यासाठी आणि नियमितपणे वाचा, जनुक एक दीक्षा codon समाप्तीच्या codon आणि codons इच्छित हे अमिनो आम्ल क्रम थेट एनकोड त्याशिवाय आवश्यक आहे. Codons की सलग तीन nucleotides स्थापन एक विशिष्ट एनकोड अमिनो आम्ल. Codons UAA, UAG, UGA रिकाम्या आहेत आणि विद्यमान amino ऍसिडस् कोणत्याही कोड नाही, उत्तर प्रक्रिया वाचन थांबवले आहे. उर्वरित codons (61 तुकडे रक्कम) amino ऍसिडस् एनकोड. हाती सत्ता असलेला प्रबळ आणि मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा जीन्स वाटप. हाती सत्ता असलेला प्रबळ जनुक - जे विशिष्ट वैशिष्ट्य एक प्रकटीकरण उपलब्ध nucleotides एक क्रम ((मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा किंवा हाती सत्ता असलेला प्रबळ जनुक संदर्भ समान जोडी आहे पर्वा जीन्स कोणत्या प्रकारचे)). मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा जनुक एक nucleotide क्रम, ज्यायोगे एक दृश्य रूप वैशिष्ट्य अभिव्यक्ती समान मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा जनुक एक जोडी उपस्थितीत फक्त शक्य आहे. अशी माहिती पिढ्यानपिढ्या संक्रमण होऊ शकते, फक्त अनुवांशिक डेटा करावा. तथापि, जनुक रूपे फक्त संयोजन एक विशेष गुण अभिव्यक्ती असते. जोडी मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा आणि हाती सत्ता असलेला प्रबळ जनुक असेल तर ते हाती सत्ता असलेला प्रबळ encoded phenotypically मालमत्ता दिसेल. आणि केवळ दोन मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा जीन्स संयोजन बाबतीत त्यांची माहिती प्रकट. म्हणजे, हाती सत्ता असलेला प्रबळ जनुक मागे हटण्याची प्रवृत्ती असणारा अदृष्य करतो. कोठे जीन्स आहेत? आपल्याला पूर्वजांना येतात जीन्स वाहून माहिती. या केवळ पालकच नव्हे तर आजी आजोबा आणि इतर रक्त नातेवाईक यांचा समावेश आहे. वैयक्तिक जनुक संच शुक्राणूंची आणि अंडी, किंवा असं म्हणा च्या जंक्शन येथे स्थापना आहे - X आणि Y गुणसुत्र किंवा दोन एक्स गुणसुत्र विलीन होत तेव्हा. फक्त एक्स क्रोमोसोम - वडील आपल्या आई पासून तर X आणि Y क्रोमोसोम दोन्ही माहिती आणू शकता, पासून. हे एक्स क्रोमोसोम महिला पुरुष लोकसंख्या विविध निसर्ग रोग करण्यास अधिक प्रतिरोधक आहेत, त्यामुळे अधिक माहिती ओळखले जाते. सिध्दांत, नवजात मुले आणि मुलींची संख्या समान असावी, पण सराव मध्ये, मुले जन्माला येतात. एक परिणाम म्हणून, या दोन तथ्य आधारावर, दोन नर व मादी एक समतोल आहे. पुरुष लोकसंख्या उच्च कस विविध प्रभाव, महिला वैशिष्ट्यपूर्ण जास्त प्रतिकार भरपाई दिली जाते. सध्या आम्ही जनुकीय व्यापक अभ्यास. अलग पद्धती, आणि वैयक्तिक जीन्स hybridization च्या क्लोनिंग. हे आहे - भविष्यात तयार सर्वात महत्वाचे पाऊल. या विषयावर अशा लक्ष अनुमान आणि अपेक्षा भरपूर खूप आहे. एक सखोल अभ्यास केल्यानंतर स्थलांतरासाठी अवयव आणि त्यांच्या प्रणाली वाढण्यास अनेक रोग टाळण्यासाठी आणि पुढील पिढी गुणधर्म आणि वैशिष्ट्ये योजना मानवजातीला सक्षम करू शकता. |
अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे नागरिक देखील आपल्याला या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी नवनवीन उपाय करत असतात. यातच या संकटाचा फायदा घेऊन अनेकजण खोटे मेसेज तयार करून ते व्हायरल करत आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कुठे घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. |
Abdul Sattar : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या घटना तब्बल सातवेळा झाल्या, आताही आणखी दोन- तीन दिवस अवकाळी पावसाच्या शक्यता आहेत, त्यामुळे येत्या ५ तारखेपर्यतच्या नुकसानीचा अंदाज घेऊन अंतिम आकडेवारीनंतर नुकसानीच्या मदतीचा निर्णय होईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. (Agriculture Minister Abdul Sattar statement Decision after 5th on farm loss nashik news) उत्तर महाराष्ट्र कृषी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री सत्तार म्हणाले की, खरीप आढावा घेतला. त्यात खत बियाणे वेळेत मिळावीत निष्कृष्ट बियाणे येणार नाही, आल्यास विना जामीन कारवाई व्हावी, अशा सूचना दिल्या आहेत. यंदाही ड्रोनद्वारे नॅनो युरिया पुरवण्याचा प्रयोग राबविला जाईल. याशिवाय कांदा साठवून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपाय आणि ठिबक सिंचन किमान सातवर्षे खराब होणार नाही, अशी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पाऊस आणि हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १० हजार पर्जन्यमान आणि हवामानाचा अंदाज देणारे यंत्र बसविले जाणार आहे. त्यात, नाशिक जिल्ह्यातील ४१३ मंडळात ३५० पर्जन्यमापक केंद्रात नवीन १७८३ नवीन यंत्रासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. पुढाऱ्यांनो अधिकाऱ्यांना वेठीस धरू नका कृषी आयुक्तपासून तर कृषी कर्मचाऱ्यांपर्यंत कुणावरही हल्ला झाल्यास त्यांना संरक्षण देणे माझे कर्तव्य आहे. मग कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कारवाई होणार असेही मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले. |
१० वी व १२ वी त शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे पालकच जास्त काळजीत असतात असे चित्र सध्या आपल्याला दिसत आहे. आपल्या पाल्याला मिळालेले गुण, त्यांची आवड, कौशल्ये आणि त्यांच्यात असलेल्या गुणवैशिष्टयांनुसार ऍडमिशन मिळेल कि नाहीआणि घेतलेल्या शिक्षणावर पुढील करिअर अवलंबून आहे तसेच निवडलेल्या अभ्यासक्रमास स्कोप असेल की नाही, अशा सर्व प्रश्नांचं रूपांतर काळजीत होणं हे पालकांच्या दृष्टीने साहजिकच आहे. परंतु काळजी करण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार केल्यास आपल्या पाल्यांना ही त्याची मदत होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पालकांची मोठी भूमिका असते. आपल्या पाल्याला समजून घेणे आणि परीक्षेच्या काळात त्याला मदत करणे ही सर्वच पालकांची इचछा असते परंतु आपली मदत कशी होईल हे काही वेळेस समजत नाही. अशावेळेस खालील २२ मुद्दे मदत करतील. स्मृतीच्या तत्वानुसार जो अभ्यास केला आहे त्याची जितकी उजळणी जास्त तितकी ती माहिती स्मरणात राहते. उजळणी न केल्यास त्या अभ्यासाचे किंवा माहितीचे विस्मरण होते. आपण केलेल्या अभ्यासाचे विस्मरण होऊ नये यासाठी उजळणी वर भर द्यावा. विषयांची काठिण्य पातळी कमी अधिक असल्याने नेमका कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा आणि दिवसातून किती विषय हाताळावेत हे समजत नाही. अशावेळेस आठवडी वेळापत्रक तयार करावे. कठीण व सोप्या विषयांसाठी वेळेचे संतुलन राखून वेळापत्रक तयार करावे. पाठांतरावर भर न देता विषय समजून घेण्यावर भर द्यावा. विषय समजल्यास प्रश्नांची उत्तरे आपल्या भाषेत देण्यास मदत होते. परीक्षेच्या वेळेस दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करणे हे देखील एक आव्हानच आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काही दिवस आधी वेळ लावून प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव करावा. कमी वेळेत सविस्तर उत्तराची मांडणी करण्याचा प्रयत्न करावा. पूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडविल्यास पेपर सोडवण्याची तयारी होते. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव असल्यास पेपर देताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही व पेपर ची भीती देखील कमी होते. सात्विक आहार आणि पूर्ण झोप ही नेहमीच आरोग्यदायी असते. जेवण्याच्या आणि झोपेच्या वेळेत संतुलन राखणे महत्वाचे आहे. खूप जागरण करून अभ्यास करणे आणि अवेळी जेवण केल्यास त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होतात. आपल्या पाल्याने परीक्षेच्या वेळेस कोणताही ताण घेऊ नये यासाठी पालकांनी स्वतः आणि आपल्या मुलांमध्ये सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करावी. सकारात्मक विचार करणे, परीक्षेकडे एक आव्हान म्हणून पाहणे, आपले पूर्वीचे चांगले अनुभव डोळ्यासमोर आणावेत, मित्रांशी तुलना न करता आपण परीक्षेसाठी सक्षम आहोत असा विचार करणे, मी परीक्षेत नक्कीच यशस्वी होईल असा आत्मविश्वास बाळगणे. परीक्षा ही एक ओझं नसून आपल्याला यशाकडे नेण्याचा मार्ग आहे अशी भावना पालकांनी आपल्या मुलांमध्ये निर्माण करावी. कोणतेही काम करण्यासाठी घरातील आणि आजूबाजूचे वातावरण चांगले असल्यास काम चांगले होते. आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी देखील घरातील वातावरण चांगले असल्यास त्यांना अभ्यास करण्यास हुरूप येतो व कोणतेही बर्डन राहत नाही. मुलांशी संवाद साधत असताना पालकांनी योग्य भाषा आणि योग्य शब्दांचा वापर करावा. काही वेळेस पालकांच्या मनाप्रमाणे मुले वागत नसल्यास किंवा सांगितलेल्या गोष्टी ऐकत नसल्यास पालकांचा राग अनावर होऊन मुलांना अपशब्द वापरले जातात. अशावेळेस रागावर नियंत्रण ठेऊन पालकांनी योग्य भाषा व शब्दांचा वापर केल्यास मुलांशी संवाद चांगला होतो. आपल्या मुलाची प्रगती काय आहे हे पूर्वी दिलेल्या परीक्षेतील गुणांपेक्षा आताच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून बघता येते. अधून मधून शिक्षकांना भेटून मुलांच्या प्रगतीची चौकशी करावी. स्व अभ्यासातून विद्यार्थी स्वतः च्या चुका समजून घेऊन त्या सोडवतात. विषयाचं आकलन हे स्व अभ्यासाने चांगले होते. कोणावर अवलंबून न राहता स्वतंत्रतेने अभ्यास करण्याची सवय लागते. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना स्व अभ्यासावर भर देण्यास सांगावे. पारितोषिक हे धन प्रबलक आहे. पारितोषिक दिल्याने कामाची पुनरावृत्ती होते म्हणून मुलांनी चांगला अभ्यास केल्यास त्यांना योग्य ते पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करावे. परीक्षे संदर्भात आपल्या मुलांनी काय योजना आखली आहे या बाबत एक मित्र होऊन त्यांच्याशी चर्चा करावी. योजना योग्य असल्यास त्याचे समर्थन करावे, योग्य नसल्यास मार्गदर्शन करावे. प्रसार माध्यमे, सामाजिक माध्यमे, दूरदर्शन, मोबाइल अशा अनेक गोष्टी ज्या मुलांना अभ्यासापासून विचलित करतात त्यांचा वापर कमी करावा. या सर्व गोष्टींची जेवढी गरज आहे तेवढाच त्याचा वापर ठेवावा. अनावश्यक वापरामुळे नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती द्यावी. परीक्षा झाल्यानंतर पेपर चे विश्लेषण करण्यात त्यांना मदत करावी. काय होईल? कसे होईल? असे प्रश्न स्वतः ला विचारण्या पेक्षा आपल्याला काय तयारी करायची आहे, कशी तयारी करायची आहे याचा विचार करून मार्ग काढणे जास्त महत्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याची कुवत बघूनच त्यांच्या कडून अपेक्षा कराव्यात. आजच्या धकाधकीच्या जीवनात आई वडील दोघेही कामावर जातात, त्यांना वेळ काढणे जरी अवघड असले तरी थोडा वेळ आपल्या मुलांसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. परीक्षेच्या काळात मुले गोंधळलेली असतात, घाबरलेली असतात अशा वेळेस आई वडील जर त्यांच्या सोबत असतील तर नक्कीच त्यांना मदत होईल. परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकतात. आपले मूल घरातील एक महत्वाची व्यक्ती आहे याची जाणीव त्यांना करून द्यावी. बरेच विद्यार्थी परीक्षा होऊन गेल्यानंतर निकालाचा विचार करतात, निराश होतात. अशावेळेस पालकांनी निकाल लागण्या आधीच निराश होण्याची आवश्यकता नाही तर मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यास प्रोत्साहन द्यावे. परीक्षा झाल्यानंतर काही वेळेस विद्यार्थी अयशस्वी होतात किंवा कमी गुण मिळतात. अशावेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन जे झाले आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाण्यास मार्गदर्शन करावे. पालकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करावा परंतु अतिरिक्त विचार करू नये. मुलांचे निर्णय आपण घेण्यापेक्षा त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावे. मार्गदर्शन करावे पण मार्ग निवडून देऊ नये. याने जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ते सक्षम होतात व पालक म्हणून काळजी करण्याची आवश्यकता भासत नाही. ज्या वेळेस पालकांना वाटेल की, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण काही मदत करू शकत नाही किंवा आपल्या कडून हे शक्य नाही त्या वेळेस तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरते. वरील मुद्द्यांचा विचार केल्यास आणि अंमलबजावणी केल्यास नक्कीच मुलांना घरात चांगले वातावरण मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, परीक्षेस योग्य रीतीने सामोरे जातील, परीक्षेच्या आधी आणि नंतर येणारा ताण हाताळू शकतील, पालक आणि पाल्य यांच्यातील संबंध सुधारतील. |
मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई, दि. 9 - मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेनं दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली आहे. सकाळी दरड कोसळल्याने कामवर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, खारेगाव टोल नाक्याजवळील ठाणे-नाशिक रोड वर टँकर उलटल्याने नाशिक रोडवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसत आहे. नाशिक, कल्याण व मुंबईच्या दिशेनं येणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या खोळंब्याचा गैरफायदा घेत भिवंडीतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. कल्याणला जाण्यासाठी 40 तर ठाण्यात पोहोचण्यासाठी 50 रूपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरुन वाहनांना जाण्यास मनाई केली असून पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. |
नाशिक, 6 फेब्रुवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर आगपाखड केली. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही, असं म्हणता शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. केंद्र सरकारबरोबरच एल्गार परिषदेवरही टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणाले की, एल्गार वाल्यांनी मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं, असंही त्यांनी आवाहन केलं आहे. CM Eknath Shinde : विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, मोठी बातमी मिळणार? - केंद्र सरकार, शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. शेतकरी हिंसक झालं तर सरकार जबाबदार. सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? कृषी कायदे मागे घेऊन चर्चा करावी. देशात अराजकता निर्माण व्हावी असं सरकारला वाटतं. जनतेपूढे अहंकार चालत नाही. बहुमत आहे म्हणून अहंकार योग्य नाही. हे राजकीय पक्षांचे नाही तर किसान संघटनांचे आंदोलन आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
ठाणे महानगरपालिका व त्यांचा अंगीकृत असलेला परिवहन उपक्रम ही यातून सुटलेले नाही. परिवहन उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होऊन, सुमारे रु. 80 कोटीच्या अपेक्षित प्रवासी उत्पन्नाला मुकावे लागले आहे. ठाणे - सन 2020-21 या आर्थिक वर्षात सर्व जगावर आलेल्या कोरोना या महामारीच्या संकटामुळे जगाची, देशाची, राज्याची किंबहुना ठाणे शहराची आर्थिक प्रगती कुंठीत झाली आहे. आपला देश, पर्यायाने आपण सर्व यातून हळूहळू बाहेर येत आहोत. भारताने कोव्हिड-19 या संसर्गजन्य विषाणूवर विजय प्राप्त करणेसाठी लस काढण्यात आली असून, लसीकरणाची सुरुवात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. ही आपणासर्वांकरीता आनंदाची बाब आहे. शासनाने कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकरीता केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे आपल्याला मोठ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. ठाणे महानगरपालिका व त्यांचा अंगीकृत असलेला परिवहन उपक्रम ही यातून सुटलेले नाही. परिवहन उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होऊन, सुमारे रु. 80 कोटीच्या अपेक्षित प्रवासी उत्पन्नाला मुकावे लागले आहे. अत्यावश्यक सेवेत गणलेल्या या शासकीय यंत्रणाना या महामारीत पहिले सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेच्या माध्यमांतून कोव्हिड रुग्णांकरीता, अत्यावश्यक सेवेत काम करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना ने-आण करणेस तसेच, परप्रांतीय प्रवाशांना परगावी जाणे करीता अनेक प्रवासी सेवा-सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या मध्ये 30 मिडी बसेसचे रुग्णवाहीका म्हणून वापर करण्यांत आला असून कोव्हिड रुग्णांना जलदगतीने सेवा देण्याच्या प्रयत्नात परिवहन उपक्रमाचे 175 कर्मचा-यांना कोव्हिड या विषाणूची लागण झाली व त्यामध्ये 14 कर्मचा-यांना आपले प्राण गमवावे लागले. अशा माझ्या अधिकारी/कामगार बंधुना मी परिवहन प्रशासनाच्या वतीने विनम्र श्रध्दांजली वाहतो, आणि सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 मूळ अंदाजपत्रकाच्या प्रस्तावनेला सुरुवात करीत आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 च मूळ अंदाजपत्रक मा. परिवहन समितीस, परिवहन व्यवस्थापक म्हणून सादर करीत आहे. सन 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक महसुली व भांडवली खर्चासह रु. 218 कोटी 86 लक्ष चे सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक महसुली व भांडवली खर्चासह रु. 458 कोटी 13 लक्ष रकमच सादर करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा, ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सुधारित) 1949 मधील अनुसुची प्रकरण 4 वर्ग 3 (ब) अन्वये, 'अत्यावश्यक सेवा' म्हणून संबोधण्यांत आलेली आहे. ठाणे शहराचा समतोल व सर्वांगिण विकासामध्ये परिवहन उपक्रमाची सेवा, ही अत्यंत महत्वाची अशी सेवा आहे. ठाणे शहरांतील व उपनगरांतील प्रवाशांना जास्तीत-जास्त व चांगल्या त-हेने वाहतुक सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न याव्दारे करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत परिवहन सेवेच्या ताफ्यांत कार्यरत असलेल्या एकूण 364 बसेस पैकी ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून चालविण्यासाठी 124 बसेस असून, त्यापैकी आजमितीस वोल्वोसह सरासरी 110 बसेस चालविण्यात येतात. JnNURM अंतर्गत प्राप्त झालेल्या 190 अधिक 50 महिलांकरीता तेजस्विनी बसेस अशा एकूण 240 बसेस पैकी 223 बसेस GCC तत्वावर चालविणेत येत आहेत. या व्यतिरिक्त सन 2021-22 आर्थिक वर्षा मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमांतून 200 बसेस, PPP (Public-Private-Participation) तत्वावर MMRDA यांचेकडून 100 इलेक्ट्रीक बसेस व ठाणे महापालिकेकडून 50 मिडी बसेस खरेदी करण्याचे नियोजन आहे. माहे डिसेंबर 2021 अखेर पर्यंत परिवहन उपक्रमाच्या बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित आहे. यामुळे परिवहन सेवेच्या ताफ्यांत नविन 350 बसेसची भर पडणार आहे. अशी एकूण सुमारे 700 बसेस दैनंदिन प्रवासी संचलनासाठी उपलब्ध करुन ठाणे महानगरातील वाढत्या नागरिकाना जास्तीत-जास्त सेवा उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न राहतील. ठाणे शहर हे मुंबई शहरालगत असलेले उपनगर आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये ठाणे महापालिकेतर्फे ठाणेकर नागरिकांना उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात यत आहेत. परिणामी ठाणे शहरांतील लोकसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 18 लक्ष 19 हजार इतकी आहे. जनगनणेची आकडेवारी लक्षात घेता, सन 2020 अखेर पर्यंत ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे 25 लक्ष इतकी अपेक्षित आहे. "सेट्रल इन्स्टीटयुट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट C. I. R. T. पुणे' या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुरविणेकरीता 1 लाख लोकसंख्येस 30 बसेस या प्रमाणे परिवहन सेवेस आजमितीस सुमारे 750 बसेसची आवश्यकता आहे. 1) प्रवासी भाडे उत्पन्न :- सन 2021-22 मूळ अंदाजपत्रकांत साध्या 94 बसेस भाडयापोटी रक्कम रु. 22 कोटी 99 लक्ष इतके उत्पन्न, JnNURM-2 अंतर्गत आलेल्या 190 बसेसपासून रु. 57 कोटी 26 लक्ष, वातानुकुलीत वोल्वो 30 बसेस पासूनचे उत्पन्न रु. 16 कोटी 56 लक्ष, व महिलांकरीता 50 तेजस्विनी बसेसपासून रक्कम रु. 9 कोटी 46 लक्ष, असे फूण रु. 106 कोटी 27 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तसेच परिवहन उपक्रमांत नव्याने खरेदी करण्यात येणा-या 50 मिडी बसेस पासून रु. 4 कोटी 59 लक्ष, 100 इलेक्ट्रीक बसेसपासून रक्कम रु. 4 कोटी 53 लक्ष, 200 मिडी बसेस पासून 9 कोटी 7 लक्ष असे परिवहन सेवेचे नवीन बसेससहीत एकूण रक्कम रु. 124 कोटी 46 लक्ष इतके प्रवासी उत्पन्न अपेक्षित धरले आहे. 2) इतर मिळकती पासूनचे उत्पन्न :- तिकिट विक्री उत्पन्ना व्यतिरिक्त इतर मिळकतीपासून म्हणजे, बसेस वरील जाहिरात भाडयापोटी या वर्षी रु. 4 कोटी 34 लक्ष, विद्यार्थी पासेस पोटी रु. 1 कोटी 25 लक्ष, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी रु. 5 कोटी 20 लक्ष, सवलतीपोटी अनुदान (दिव्यांग,जेष्ठनागरीक) करीता रु. 18 कोटी 79 लक्ष पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती पोटी सन 2018-19 पासून प्रलंबित रु. 17 कोटी 22 लक्ष तसेच इतर किरकोळ उत्पन्न रु. 2 कोटी 22 लक्ष असे एकत्रित रु. 49 कोटी 2 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. अशी अंदाजपत्रकातील एकूण महसुली जमा रक्कम रु. 173 कोटी 48 लक्ष इतकी अपेक्षित धरण्यात आली आहे. रु. 13 कोटी 84 लक्ष इतकी तरतुद करण्यात आली आहे. 2) विधी विभागाकडील प्रलंबित विमा दावे : सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून परिवहन उपक्रमाच्या 94 बसेसचा तृतियपक्षी व 230 बसेसचा प्रथम पक्षी विमा काढण्यात आला असल्याने, सन 2021-22 या मुळ अंदाजपत्रकात विम्यापोटी व सन 2018-19 पूर्वीच्या अपघात दाव्यांपोटी रक्कम रु. 4 कोटी 86 लक्ष इतक्या रकमेची तरतूद केली असून, सदरचा खर्च ठाणे महापालिका महसुली अनुदानातून मागणी करण्यात येत आहे. 3) सेवा निवृत्ती निधीबाबत :- परिवहन सेवेकडील सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजना लागू आहे. आजमितीस एकूण 630 व सन 2021-22 या आर्थिक वर्षात 157 कर्मचारी निवृत्त होणार असून, एकूण 787 कर्मचा-यांना उपदान, रजावेतन व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी रु. 1 कोटी 75 लक्ष पर्यंत अदा करावे लागणार आहे. सद्यः स्थितीत सेवानिवृत्ती प्रशासन हिस्सापोर्टी (1 प्रमाणे) दरमहा द्याव्या लागणा-या रकमेपेक्षा पेन्शन अदायगीची रक्कम रु. 1 कोटी 50 लक्षांनी जास्त आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतन व उपदान अदायगीपोटी अंदाजपत्रकामध्ये एकूण रु. 21 कोटी 6 लक्ष रकमेची करण्यांत आलेल्या तरतूदी पैकी रु. 18 कोटी रकमेची महसुली अनुदानात मागणी करण्यांत आलेली आहे. या व्यतिरिक्त थकित उपदान व रजा वेतन करिता रक्कम रु. 4 कोटी रकमेची तरतुद करणेत आली असून, सन 2021-22 मूळ अर्थसंकल्पात रु. 4 कोटी रकमेची ठामपाकडे अनुदान स्वरुपात मागणी केली आहे. 4) डिझेल/सी. एन. जी. बाबत :- सन 2021-22 वर्षात आवश्यक असलेल्या डिझेल खरेदीकरिता एकूण रु. 43 कोटी 41 लक्ष रकमेची तरतुद करण्यात आली आहे. सी. एन. जी. पोटी वार्षिक रु. 4 कोटी 56 लक्ष इतकी रक्कम अदा करावी लागेल. सन 2021-22 च्या अंदाजपत्रकांत वंगणापोटी वार्षिक रु. 65 लक्ष असे एकत्रित रु. 48 कोटी 62 लक्ष इतक्या रकमेची तरतु करण्यांत आली आहे. दृष्टीक्षेपांतील उत्पन्न वाढीबाबतचे स्त्रोत : १. परिवहन सेवेच्या जागांवर होडींग्जला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. 3. मान्यतेस्तव सादर करण्यांत आला आहे. अत्याधुनिक पध्दतीचे निवारे विकसित करणे. ३. ४. परिवहन सेवेच्या जागांमध्ये ए. टी. एम. सेंटरची उभारणी करुन उत्पन्नाचे स्त्रोत विकसित करणे. ५. परिवहन सेवेच्या बस आगारांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवून ऊर्जेमध्ये बचत करणे. ६. ७. परिवहन सेवेच्या बसमध्ये एल. ई. डी. स्क्रीन लावून जाहिराती व्दारे उत्पन्न वाढविणे. बस फे-या वाढविण्याबाबत उपाययोजना ठाणे शहरांतील विविध विकास कामे नियोजित वेळापत्रकानुसार कार्यान्वित करणेकरीता मोठया प्रमाणात रस्त्यावरील कामे सुरु आहेत. परिणामी बस फे-या रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत ठाणे शहर वाहतुक नियंत्रणकक्ष यांजकडे समन्वय साधून वाहतुककोंडी सोडविणेबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. जेणे करुन यामुळे परिवहन सेवेच्या उत्पन्नात वाढ होईल. ८. आनंदनगर व कोलशेत आगारातील राखीव भूखंड बांधा वापरा व हस्तांतरीत करा (BOT) या तत्वावर विकसित करुन घेणे. प्रवासी संख्या वाढविण्याची उपाययोजनाः १) ठाणे शहरामध्ये येणारा प्रवासी हा मुख्यत्वे रेल्वेने ठाणे स्टेशन येथे येऊन येथून इच्छीत स्थळी प्रवास करीत असतो. ठाणे सँंटीस येथून १०२ मार्गावर प्रवासी सेवा पुरविली जाते. सेंटीस येथे आलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता मेगाफोनव्दारे' सोडण्यांत येणा-या वसेसवावतयी माहिती देण्यात येते. सॅटीस येथे प्रवाशांचा ओघ मोठया प्रमाणात असून, प्रवाश्यांना मार्गदर्शन करणेसाठी प्रवासी गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येते. २) ठाणे शहर अंतर्गत परिवहन सेवेचे विविध बस थांबे आहेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत या बस थाब्यांवर डिजिटल बस थांबे निर्माण करुन या डिजिटल धाब्यावर बस आगमणाची वेळ दर्शविण्यात येणार आहे. परिणामी परिवहन सेवेचे बसने प्रवास करणा-या प्रवाशाना बस आगमनाची निश्चित वेळ समजण्यास मदत होऊन त्याजोगे प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. जास्तीत-जास्त प्रवासी परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचे नियोजन आहे. ५) ठाणेकर जनतेने खाजगी वाहनांचा वापर करणे ऐवजी, परिवहन उपक्रमाच्या बसेसचा वापर करण्याबाबत डिजिटल माध्यमांतून जनतेला आवाहन करता येईल. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होऊन प्रदूषण ही कमी होण्यास मदत होईल. |
प्रकरण १८ कलम १०८ वें या सनदेमध्यें दुरुस्त्या सुचविणाऱ्या उपसूचना आमसभेमध्यें मांडण्यांत येऊन दोन-तृतियांश सभासदांच्या बहुमतानें त्या मंजुर झाल्या, त्या उपसूचनांवर यूनोच्या प्रत्येक सभासद राष्ट्राच्या सरकारने त्याच्या त्याच्या राज्यघटनेंतील पद्धतीप्रमाणें शिक्कामोर्तब केलें म्हणजे त्या दुरुस्त्या कायम होतील, आणि सर्व सभासद राष्ट्रांवर त्यांचा अंमल होईल. सुरक्षा मंडळाचे कायम सभासद असलेल्या सर्वच राष्ट्रांची या दुरुस्त्यांना संमति मिळालेली असलीच पाहिजे. कलम १०९ वें १. सध्यांच्या या सनदेचा फेरविचार करण्यासाठीं यूनोचे सभासद असलेल्या सर्व राष्ट्रांची एक सर्वसाधारण परिषद भरवावी असें जर आमसर्भेतील दोन-तृतियांश सभासदांनीं व सुरक्षा मंडळांतील ७ सभासदांनीं तशी मतें देऊन ठरविलें तर ती म्हणतील त्या वेळीं व त्या ठिकाणी तशी परिषद भरूं शकेल. या परिषदेमध्यें यूनोचा सभासद असलेल्या प्रत्येक सभासदाला एक मत असेल. २. ही परिषद हजर सभासदांच्या दोन-तृतियांश बहुमताने सध्यांच्या सनदेमध्यें जे कोणते फेरफार सुचवील त्यांवर, यूनोच्या एकूण सभासदराष्ट्रांतील दोन-तृतियांश सभासद राष्ट्रांनी व सुरक्षा मंडळांतील कायम सभासदांसकट एकूण ७ राष्ट्रांनी त्यांच्या त्यांच्या राज्यघटनेंतील पद्धतीप्रमाणे, शिक्कामोर्तब केले म्हणजेच ते फेरफार अंमलांत येतील. ३. ही सनद अंमलांत आल्यापासून आमसभेची दहावी वार्षिक सर्वसाधारण परिषद भरण्याची वेळ येईपर्यंतच्या कालांत, एकदांहि जर अशी परिषद भरविली गेली नाहीं तर, अशी परिषद भरविण्याबद्दलची सूचना त्या दहाव्या वार्षिक परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेंत पुढे मांडली जाईल, आणि आमसभेतील सभासदांच्या साध्या बहुमतानें व सुरक्षामंडळांतील कोणाहि सात सभासदांच्या मतानें तशी परिषद भरू शकेल. |
बीड जिल्ह्यातील राजुरीचे नाव नवगण गणपतीसाठी ओळखले जाते. राजुरी नवगण हे गणेशाचे स्थान बीडशहरापासून अहमदनगर रस्त्यावर दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या पंचक्रोशीत नवगण म्हणजेच नऊ गणपतीची स्थाने आहेत. त्यामुळे या गणपतीस नवगण व गावास नवगण राजुरी या नावाने मराठवाड्यात ओळखले जाते. |
मुंबई, दि. १३ (पीसीबी) - अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केले. परंतु यावर आता आदित्य आणि दिशानेही भाष्य केले आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज (१३ जून) वाढदिवस आहे. आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत, वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट आलं का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर 'मातोश्री'वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले की, डिनर मातोश्रीवरच करणार असल्याचं सांगितलं. "मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न दिशाने ट्रोलर्सना विचारला आहे. पुरुष किंवा स्त्री यावरुन मी मित्रांची निवड करत नाही. मी ज्याच्यासोबत फिरते ते माझे मित्रच आहे. मी केवळ मुलींसोबतच मैत्री करत नाही. प्रत्येकाचेच मुली आणि मुले असे मित्र असतात, असे दिशा पटानी म्हणाली. |
पाण्याखालून दारूची तस्करी; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त - KhabarBatTM\nHome चंद्रपूर पाण्याखालून दारूची तस्करी; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nपाण्याखालून दारूची तस्करी; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nअमित तेलंग/ प्रतिनिधी\nजिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून दारू आणतात. एका चारचाकी वाहनात पिण्याच्या पाण्याच्या बॉटलखालून पोलिसांनी देशीदारूचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किमत २९ लाख ९६ हजार रुपये आहे.\nनागपूरहून खांबाडामार्गे एक चारचाकी वाहनातून दारूसाठा आणण्यात येत होतो. या वाहनासमोर दुसरे एक वाहन होते. त्या मार्गात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यामुळे पायलेqटग करणाèया वाहनाने गस्तीवरील पोलिसांची नजर चुकवून दुसèया मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या मार्गावर उपविभागीय पोलिस अधिकाèयांचे पथक गस्तीवर होते. या पथकातील पोलिसांनी एमएच ४९ बी-के ३०३५ या क्रमांकाचे वाहन अडवून तपासणी केली. या वाहनातून पोलिसांनी एक लाख रुपये आणि महागडे मोबाईल ताब्यात घेतले. याच वाहनामागे असेलल्या एम एच-०- २७०४ हे वाहन पोलिसांनी अडविले. या वाहनात वरच्या भागात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, तर आतमध्ये देशी दारूने भरलेल्या दीडशे पेट्या पोलिसांना आढळल्या. बिसलेरी बाटल्यांचा देखावा करून अवैध दारू चंद्रपुरात आणण्यात येत होती. याप्रकरणी पोलिसांनी राहील सलीम खान पठाण, शेख जुबेर शेख गुलाल आणि रणजित चंद्रमणी मेश्राम यांना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली. |
PHOTOS साडीनंतर आता टिकलीच्या पाकिटांवरही अवतरले मोदी!- News18 Lokmat\nHome » photogallery » national » BINDI PACKETS WITH NARENDRA MODIS PICTURES GO VIRAL ONLINE\nPHOTOS साडीनंतर आता टिकलीच्या पाकिटांवरही अवतरले मोदी!\n2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचं खादी जॅकेट प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मोदींचा कुर्ता आणि मोदींच्या कपड्याची स्टाईल प्रसिद्ध झाली होती. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मर्चंडायझिंग सुरू केलं आहे. मोदी आणि कमळ कुठे कुठे दिसतंय पाहा...\n। March 30, 2019, 18:20 IST\nरंगपंचमीआधी प्रियंका गांधींचं चित्र असलेली लहान मुलांची खेळणी आकर्षणाचा विषय झाली. प्रियंका गांधींची पिचकारीनं तर बाजारात धुमाकूळ घातला होता.प्रियंका गांधींनंतर आता मोदींचा फोटो असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी बाजारात आल्या आहेत.\nनिवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियासोबतच वस्तुंच्या माध्यमातून मोदींनी अनोखा प्रचार केला आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी घराघरात पोहोचण्याच्या दृष्टीनं भाजपने चक्क टिकल्यांच्या पाकिटांवर मोदींचा फोटो लावला आहे. ज्यामुळे हर घर मे मोदी आणि फिरसे एक बार मोदी सरकार हे त्यांचं कॅम्पेनिंग राबवलं जातं आहे.\nबाजारात मोदींचे फोटो असलेली घड्याळंही अगदी कमी किमतीत अगदी सहज उपलद्ध आहेत. वेगवेगळ्या आकारांची, आणि मेसेज, मोदींचे फोटो असलेली ही घड्याळं आहेत. नमो अगेन, मोदी वन्समोर, कार्यकर्ता, मोदी फिरसे अशा प्रकारचे संदेश देण्यात आले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेलं मै भी चौकीदार अंतर्गत चौकीदार असं लिहिलेल्या बॅग, कॅप, टी-शर्ट बाजारात असलेले पाहायला मिळतात.\nमोदींचे फोटो फक्त पेन, टी-शर्ट, बॅग, घड्याळ, रूमाल यांच्यापुरते मर्यदित न राहता मोदींचा फोटो असलेली साडी बाजारात आली आहे. मोदींचा साडीच्या पदरावर असलेला फोटो आणि वेगवगळ्या रंगात या साड्या बाजारात उपलद्ध असलेल्या पाहायला मिळतात.\nमोदींचे फोटो फक्त पेन, टी-शर्ट, बॅग, घड्याळ, रूमाल यांच्यापुरते मर्यदित न राहता मोदींचा फोटो असलेली साडी बाजारात आली आहे. मोदींचा साडीच्या पदरावर असलेला फोटो आणि वेगवगळ्या रंगातील साड्या बाजारात उपलद्ध आहेत. मोदी जॅकॅटची क्रेझ जरी ओसरली असली तरी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचे फोटो असलेल्या वस्तू, कपड्यांनी मात्र बाजारात नवं स्थान निर्माण केलं आहे. |
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये २०१६-१७मध्ये करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार राज्यात ३३३१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. मात्र काही शिक्षक पदावर काही कारणांमुळे रुजू झाले नाहीत, तर काही शाळांनी शिक्षकांना रुजू करून घेतले नाही. अशा शाळांमधील ती पदे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. |
औरंगाबाद, ४ डिसेंबर / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून 54 तर जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित होते. जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील जामवाडी येथे मोटार वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी येथील इंटरपासलगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री संदिपान भूमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापुर तालुक्यातून जातो. या दरम्यान 2 टोल, 4 फ्लायओव्हर, 05 इंटरचेंज् (सावंगी व शेंद्रा/ जयपुर एमआयडीसी, माळीवाडा, हडसपिंपळगाव व जांबरगांव) आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत. |
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आलं आहे. नृत्यांगना असलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Dance) प्रत्येक कार्यक्रमाला उसळणारी प्रचंड गर्दी आणि तिच्या दिलखेचक अदा, यामुळं ग्रामी महाराष्ट्रात गौतमी प्रचंड प्रसिद्धीला आली आहे. मुंबई : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आलं आहे. नृत्यांगना असलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Dance) प्रत्येक कार्यक्रमाला उसळणारी प्रचंड गर्दी आणि तिच्या दिलखेचक अदा, यामुळं ग्रामी महाराष्ट्रात गौतमी प्रचंड प्रसिद्धीला आली आहे. गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम म्हणजे गर्दीची खात्री असल्यानं अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांसाठी बोलवलंही जाऊ लागलंय. मात्र, प्रत्येक कार्यक्रमात होत असलेल्या हुल्लडबाजीनं गौतमीचे कार्यक्रम सातत्यानं वादातही राहिलेत. सातत्यानं होत असलेल्या या नकारात्मक प्रसिद्धीनं गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ केल्याचं दिसतंय. मी माझं काम करतेय ! नाशिकच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातही हुल्ललडबाजी झाली. इतकंच नाही तर काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं. याच कार्यक्रमात गौतमी पाटीलची लोकप्रियता ओसरतेय की काय अशी शंका निर्माण झालीय. नाशिकच्या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या, असं समोर आलंय. यानंतर बार्शीतल्या तिच्या कार्यक्रमातही वाद झालाय. गौतमी पाटील या कार्यक्रमाला उशिरा पोहचल्यानं तिची आणि आयोजकांची वादावादी झाल्याचं सांगण्यात येतंय. यावर आयोजकांनी उशिरा बोलावलं म्हणूनच उशीर झाल्याचा दावा गौतमीनं केला आहे. सातत्यानं होत असलेले वाद, कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, सातत्यानं होत असलेला नकारात्मक प्रचार यामुळं गौतौमी पाटील संतापली आहे. सांगोला तालुक्यात कार्यक्रमाला आलेल्या गौतमीनं हा उद्वेग व्यक्त केला आहे. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का, इतर महिला दिसत नाहीत का, असा सावलच तिनं टिकाकारांना केलाय. आधी आपला कार्यक्रम पाहा आणि मग टीका करा, असा सल्लाही तिनं दिलाय. मी काय महाराष्ट्राचा बिहार केला आहे का, दादा, असा सवालही तिनं सगळ्यांनाच केलाय. ट्विटरवरही तिनं मी करते ते योग्य आहे, असं सांगत टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. महगाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं गौतमीनं म्हटलय. हुल्लडबाजी, पत्रकारांना मारहाण हे अयोग्यच असल्याचंही तिनं सांगितलंय. कार्यक्रमात या, एन्जॉयकरा, वाद आणि हाणामाऱ्या करु नका, असं आवाहनही तिनं चाहत्यांना केलंय. बार्शीत नेमकं काय घडलंय? बार्शीत आयोजकांनी तिकिट लावून गोतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. आयोजकांनी सांगितलं त्याच वेळी स्टेजवर गेले, यात आपली चूक काय, असा सवाल तिनं केलाय. कार्यक्रमाची परावनगी एकतर आयोजकांनी घेतली नव्हती. रात्री १० नंतर पोलिसांनी कार्यक्रम थांबवला. असंही तिनं स्पष्ट केलं. या सगळ्यात आय़ोजक आणि गौतमी पाटील यांच्यात वाद रंगलाय. . बार्शीतील कार्यक्रमात फसवणबक झाल्याचा आरोप करत गोतमी पाटीलसह तिच्या सहकाऱ्यावर आयोजकांनी गुन्हा दाखल केलाय. तर कार्यक्रमासाठी ठरलेली रक्कम आयोजकांनी दिलीच नाही, असं गौतमीच्या वतीनं सांगण्यात आलंय. आयोजकच उशिरा आल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचा दावाही करण्यात आलाय. पैशांवरुन हा वाद रंगलाय का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पैसे गुंतवताना आपण नेहमीच विचार करतो की आपले पैसे कसे सुरक्षित राहतील आणि त्यावर भरपूर व्याज पण मिळेल. बाजारात अनेक बचत पर्याय आहेत, ज्यात बचत करु तुम्ही योग्य ती ग्रोथ करु शकतात. परंतू गुंतवणूक करताना एक बाब महत्वाची असते ती म्हणजे गुंतवणूक संरक्षित आहे का? जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर हे ५ गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ज्यात बचत खात्यापेक्षा अधिकचे व्याज मिळते. या खात्याला एका ठरलेल्या काळासाठी सुरु करता येते. एफडीचे व्याजदर हे रक्कम किती काळासाठी बचत करुन ठेवण्यात येणार आहे यावर ठरत असते. फायनेंशियल बँक, पोस्ट ऑफिस आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये एफ डी करता येते. आरडी एक असा सेविंग ऑप्शन आहे, ज्यात प्रति माहिना एक ठरलेली रक्कम सेव केली जाऊ शकते, त्यावर व्याज मिळते. देशातील सर्व प्रमुख वित्तीय संस्थामध्ये आरडी अकाऊंट सुरु करण्याची सुविधा आहे. पीपीएफ अकाऊंट रिटायरमेंट साठी खोलण्यात येते. यावरील व्याज दर तिमाहीच्या आधारे केंद्र सरकारकडून ठरवण्यात आल्या प्रमाणे देण्यात येते. सध्या ८ टक्के वार्षिक व्याज आहे. सध्याच्या तिमाहीत एमआयएस अकाऊंट मध्ये ७. ७ टक्के व्याज दर मिळेल. या स्किम मध्ये मॅच्युरिटी ५ वर्षात पुर्ण होते. या खात्यात अधिकतर ४. ५ लाख रुपये आणि ज्वाइंट अकाऊंट मध्ये ९ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते. एनपीएस सरकारने सुरु करण्यात आलेली रिटायरमेंट प्लॉनिंग स्किम आहे. ज्यात पेंशन फंड नियामक आणि विकास प्रधिकरण (PFRDA)च्या माध्यमातून नियंत्रित केली जाते. या स्किममध्ये नोकरीच्या दरम्यान सेविंग केली जाते आणि रिटारमेंट नंतर पेंशनच्या पद्धतीने पैसे मिळतात. |
सध्या सोशल मीडियावरुन या ओखी वादळाचा फायदा घेऊन काही अतिउत्साही लोक वाट्टेल ते व्हिडीओ फॉरवर्ड करत आहेत. पण अशा कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका. सध्या व्हॉट्सॅपवर फिरत असलेले व्हिडीओ हे ओखी वादळाशी संबंधित नाहीत. Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारात माशी कुठे शिंकतेय? , नवे मंत्री का ठरेनात? Congress Delhi : महाराष्ट्र काँग्रेसचे 25 नेते दिल्लीत जाणार, महाराष्ट्रातील संघटन बदलावर चर्चा? |
आपल्या पक्षातील आमदारांना रोखावे कसे असा प्रश्न भाजपाला पडल्यासारखी स्थिती आहे. पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या गोव्यातील दीर्घ अनुपस्थितीमुळे गोव्याचे प्रशासन दिशाहीन बनले आहे अशी टीका आता विरोधकच नव्हे तर भाजपाचे आमदार मायकल लोबो आदी करू लागल्यामुळे सत्ताधारी भाजपा पक्ष संघटना सध्या गोंधळलेली आहे. आपल्या पक्षातील आमदारांना रोखावे कसे असा प्रश्न भाजपाला पडल्यासारखी स्थिती आहे. पर्रीकर सरकारने आपल्या कारकिर्दीचे नुकते दीड वर्ष पूर्ण केले. मात्र दीड वर्षातील अर्धा कालावधी सरकारमधील मंत्री, आमदारांच्या आजारपणातच वाया गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपाचे दोन आमदार तर अजुनही रुग्णालयातच आहेत. गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्ष व शिवसेनेने चालवली आहे. गोव्याचे प्रशासन ठप्प झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही चालवली आहे. भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी विरोधकांच्या त्यात आरोपावर मोहर उमटविली. मुख्यमंत्री सगळ्या फाईल्स घेऊन बसले आहेत व त्यामुळे तीन हजार सरकारी पदे भरण्याचे काम अजून उरले आहे, अशी टीका लोबो यांनी केली. भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनीही शनिवारी नोकर भरतीप्रश्नी व खनिज खाणप्रश्नी लोबो यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत अशी भूमिका मांडली. लोबो यांनी प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण भले वेगळे असेल पण प्रश्न दुर्लक्षिता येत नाहीत, असे ज्येष्ठ आमदार डिसोझा म्हणाले. भाजपचे दोन्ही खासदार लोकसभा निवडणुकीवेळी निवडून येणार नाहीत, कारण खाणप्रश्न सुटलेला नाही, अशी टीका चक्क भाजपाचेच आमदार असलेले विधानसभा उपसभापती लोबो यांनी केल्यामुळे भाजपा पक्ष संघटनेत गोंधळच उडाला आहे. लोबो यांना कसे रोखावे ते भाजपाला कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री जर गोव्यात असते तर त्यांनी लोबो यांना रोखले असते असे भाजपाच्या एका गटला वाटते. लोबो यांनी पक्ष शिस्त पाळावी, त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर काय ते बोलावे, असा सल्ला आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिला आहे. वास्तविक गोव्याचा खाणप्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री पर्रीकर हे रुग्णालयातून केंद्र सरकारला पत्र लिहित आहेत याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी टीकाकारांना उत्तर देताना म्हटले आहे. |
नाशिक : बिटको महाविद्यालयात 'सोशल मीडिया' विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक : बिटको महाविद्यालयात 'सोशल मीडिया' विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. सरिता ढवळे, प्रा. अनुजा मोहाडकर, प्रा. पूजा घोलप आणि सारंग बहादे यांनी मार्गदर्शन केले, तर दुसºया सत्रात डॉ. मेघा सायखेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा वापर विधायक व शैक्षणिक कार्यासाठी करावा. डॉ. औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्मिता कचोळे यांनी आभार मानले. |
मायमराठी बातमीपत्र स दहा तीस वा बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस गुरुवार पुराचं संकट हे राष्ट्रीय आहे तेव्हा केंद्राकडून राज्याला मदत मिळावी अशी अपेक्षा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची ठाकरे यांनी काल पाहणी केली त्यावेळी स्लामपूर वं ते वार्ताहरांशी बोलत होते देशात कुठंही कोणतंही संकट आलं तर महाराष्ट्र पुढे असतो तेव्हा महाराष्ट्रालासुद्धा अन्य राज्यांसारखी मदत मिळावी असं सांगून याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून लोकांनी सादर केलेल्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयनं काल रात्री दिल्लीत त्यांच्या घरातून अटक केली अटकेनंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात ठेवलं असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामिन देण्याची याचिका फेटाळल्यानंतर मंगळवारपासून चिदंबरम गायब झाले होते मात्र काल संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काल रात्रीपासून वकिलांसोबत जामिन याचिकेसंदर्भात कागदपत्र तयार करत असल्याचं सांगत त्यांनी कायद्यापासून स्वतःचा बचाव करत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात नियमभंग प्रकरणी सीबीआयनं एनडीटीव्ही वृत्त वाहिनीचे प्रवर्तक प्रणव रॉय त्यांच्या पत्नी राधिका रॉय आणि तिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कालावधीत बत्तीस सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे यासंदर्भात कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्रा यांच्याविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना गेल्या नऊ ऑगस्टला भारताबाहेर जाताना मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं होतं येत्या डिसेंबरपासू सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्याची घोषणा केंद्रिय मार्ग परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्यांच्या मंत्राल च्या संकेतस्थळाचं उद्घाटन करताना ते बोलत होते पर्यंत बावीस लाख वाहनांना फास्ट टॅग जारी केले असल्याचं त्यांनी सागितलं मोटार वाहन कायदा दोन हजार एकोणीस मुळे अपघात तसंच अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी होईल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना अॅन्टीग्वामधे नार्थ साउंड शून्य आजपासून सुरू होत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि ग्रजीतून प्रसारित होणार आहे एमएम रेनबो आणि तिर फ्रिक्वेन्सीजवरुन तसंच प्रसारभारती यूटयूब चॅनलवर हे ऐकता येईल जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेतल्या भारताच्या मोहिमेची सुरुवातही या कसोटी सामन्यानं होत आहे भारत ऑस्ट्रेलिया ग्लंड दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड पाकिस्तान श्रीलंका वेस्ट डीज आणि बांगला देश या नऊ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत हे सर्व देश एकमेकांविरुद्ध कसोटी सामने खेळतील |
Suicide : याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत आज एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. ४५ वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. १२ वर्षीय कैनन आणि ९ वर्षीय सुजैन अशी या दोन मुलींची नावे असल्याचे समजते आहे. वडील लोहार काम करायचे. घरी आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना एकूण ४ मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अजगर अली जब्बार अली यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला होता. तसेच एक मुलगी जमिनीवर तर दुसरी मुलगी ही खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हजर असून अधिक तपास चालू आहे. |
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रेल्वे प्रवाशासाठी 'मेन्यू ऑन रेल' आणि 'मदद' हे दोन मोबाइल ऍपचे अनावरण केले आहे. रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने (दिल्ली विभाग) वरील ऍप विकसित केले आहेत. 'मेन्यू ऑन रेल' या ऍपद्वारे प्रवासी आपल्या प्रवासादरम्यान आवश्यक असणाऱ्या खाण्या-पिण्यासंबंधी सर्व गोष्टींबाबतीत चौकशी करू शकतात तर 'मदद' (MADAD -Mobile Application for Desired Assistance During travel) या दुसऱ्या ऍपद्वारे प्रवाशांना त्यांच्या प्रत्येक तक्रारींचे निवारण करता येणार आहे. वरील ऍप अँड्रॉइड आणि IOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. |
सात महिन्यांपूर्वी या सरकारकडे वनजमिनीवर हक्क, रेशनवर धान्य, मुलांना शिक्षणामध्ये शुल्कमाफी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आलो होतो, तेव्हा सरकारने केवळ आश्वासने दिली, पण त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. सात महिन्यांपूर्वी या सरकारकडे वनजमिनीवर हक्क, रेशनवर धान्य, मुलांना शिक्षणामध्ये शुल्कमाफी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आलो होतो, तेव्हा सरकारने केवळ आश्वासने दिली, पण त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. आता मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी थेट व आक्रमक भूमिका राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान घेतली. तब्बल दोन दिवसांची पायपीट करून मुंबई गाठवणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे, निद्रिस्त सरकारी यंत्रणामुळे आणि दुष्काळाच्या घेऱ्यामुळे शेतीची अन् त्यांच्या जगण्याची काय दशा झाली आहे, याचे विदारक वास्तव सरकारपुढे मांडले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आता मागे हटणार नाही. कितीही दिवस उपाशीपोटी राहावे लागले तरी चालेल, अशी सडेतोड भूमिका या आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली होती. ज्या सरकारला शेतकऱ्याचे दुःख कळत नाही तो जनतेच्या आशाआकांक्षा कशा पूर्ण करणार, असा सवाल त्यांनी केला. ठाण्याहून पायी मजल दरमजल करत हा महाराष्ट्राच्या अठरा जिल्ह्यांतून तब्बल आठ हजार शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले होते. लोकसंघर्ष मोर्चाने या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चाला 'उलगुलान मोर्चा' असे नाव देण्यात आले होते. या आदिवासी शेतकरी मोर्चामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. नंदूरबार, जळगाव, भुसावळ, औरंगाबाद, बुलढाणा यासारख्या राज्यातल्या विविध भागांतून आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. भिल्ल, फासेपारधी, कड, तोमार, पोवार अशा विविध समाजाचे आदिवासी या मोर्चात सहभागीहोते. भाषेचा अडसर असला तरीही मोर्चेकऱ्यांच्या डोळ्यातून त्यांचा निर्धार व्यक्त होत होता. मागील अनेक महिन्यांपासून हे आदिवासी शेतकरी विविध मागण्या सरकारकडे सातत्याने करत आहेत. मात्र त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. दुष्काळग्रस्त प्रदेशांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता केवळ कागदोपत्री निकषांच्या आधारे दुष्काळग्रस्त जिल्हे घोषित करण्यात आले आहे. राज्यातील काही दुष्काळग्रस्त भागांमध्ये सरकारने रेशन देण्याची सोय केली तशी आमच्या दुष्काळग्रस्त भागांमध्येही व्हायला हवी, या मागणीकडे लक्ष देण्याची निकड लोकसंघर्ष मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम यांनी व्यक्त केली. शेती पिकत नसल्याने मुलांचे शिक्षण सुटते, कुटुंबातील व्यसनाधीनता वाढते, त्यामुळे या सामाजिक प्रश्नांकडेही लक्ष देऊन मुलांचा विशेषत्वाने विचार करा, अशी आर्त साद या मोर्चातील महिलांनी घातली. पारंपारिक आदिवासी गीतांचा आणि वाद्यांची साथ घेत हा मोर्चा चुनाभट्टीहून निघालेला हा मोर्चा दादर, भायखळा, जेजे पूलमार्गे दुपारी १२. ३०च्या सुमारास आझाद मैदानात दाखल झाला. पायाच्या जखमा, डोक्यावरचं रणरणत उन, पदरात असणारी तान्ही मुलं, अन् पोटातल्या भुकेची पर्वा न करता या मोर्चेकऱ्यांनी शेतीवर मालकी हक्क, दुष्काळी परिस्थितीमध्ये सोबत अन् सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मागण्या जोरकसपणे लावून धरल्या होत्या. वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मागण्या सादर केल्या. त्यांची पूर्तता होण्याची लेखी हमी मिळेपर्यंत आझाद मैदानात उलगुलानचा आवाज जोरदार घुमत होता. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.